Back
बदलापूरच्या दगडखाणीला 190 कोटींचा दंड: गावकऱ्यांचा आनंद!
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 15, 2025 01:01:04
Ambernath, Maharashtra
बदलापूर जवळच्या दगडखाणीला 190 कोटींचा दंड
मुंबई उच्च न्यायालयाचा खाण मालकाला दणका
दगड खाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उध्वस्त होण्याची भीती
कोर्टाच्या निर्णयामुळे आदिवासी पाड्यांना मोठा दिलासा
Bdl stone crusher
Anchor- बदलापूरजवळील चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या दोन गावांजवळ असलेल्या दगड खाणीला मुंबई उच्च न्यायालयानं 190 कोटींचा दंड ठोठावलाय. इको सेन्सेटिव्ह झोनमध्ये ही दगड खाण सुरू होती. या दगड खाणीमुळे भूस्खलन आणि दरड कोसळून गावं उध्वस्त होण्याच्या भीतीनं गावकरी भयभीत झाले होते. नियमांचे उल्लंघन आणि परवानगीपेक्षा जास्त उत्खनन केल्यानं कोर्टानं दगड खाणीवर दंडात्मक कारवाई केलीय. राज्यातील दगड खाणीला इतक्या मोठ्या प्रमाणात दंड ठोठावण्याची ही पहिलीच वेळ आहे.
बदलापूर जवळच्या चामटोली गावापासून 3 किमी अंतरावर ही दगड खाण आहे. या दगड खाणीमुळे चिंचवली आणि कोपऱ्याची वाडी या आदिवासी गावातील रहिवाशांचं आरोग्य धोक्यात आलं होतं. सातत्यानं होणारं वायू प्रदूषण, ध्वनी प्रदूषण आणि खदानीतून निघणाऱ्या पाण्यामुळे इथल्या शेतकऱ्यांच्या जमीनीही नापीक झाल्या आहेत. तसंच या भागातील पिण्याच्या पाण्याचे झरेही बंद झाले आहेत. ही दगडखाण बंद करण्यासाठी ग्रामपंचायतीने ठराव घेऊन सुद्धा दगडखाण बंद होत नव्हती. अखेर स्थानिक रहिवासी आणि वनशक्ती या सामाजिक संस्थेने या संदर्भात मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केली आणि एकत्रित लढा दिला. या लढ्याला आता यश मिळालय. परवानगी क्षेत्राच्या बाहेरील जागेत 1 लाख 30 हजार ब्रास दगड खाणीचं उत्खनन केल्यानं आणि त्याची रॉयल्टी न भरल्यानं हायकोर्टानं खाण मालकाला 190 कोटी 30 लाख रुपयांचा दंड ठोठावलाय. शिवाय जिल्हाधिकाऱ्यांनी सक्तीनं त्याची अंमलबजावणी करावी असे आदेश देखील उच्च न्यायालयानं दिले आहेत. त्यामुळे आता ही दगडखाण बंद होणार असल्यानं गावकऱ्यांनी उच्च न्यायालयाच्या आदेशाचं स्वागत केलय.
Byte - नंदकुमार पवार, याचिकाकर्ते आणि वनशक्तीचे सदस्य
चंद्रशेखर भुयार , बदलापूर
8
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 06:34:57Ratnagiri, Maharashtra:
रात्रीपासून संगमेश्वर तालुक्यात जोरदार पाऊस
संगमेश्वर तालुक्यात 142 मिलिमीटर पावसाची नोंद
तालुक्यातील कसबा, शास्त्री फुल भागाला पावसाने जोरदार झोडपले
लावणी कामांना वेग, बळीराजा सुखावला
संगमेश्वर तालुक्यातील माखजन बाजार पेठेत पुराचे पाणी
गड नदीचे पाणी माखजन बाजारपेठेत
पावसाचा जोर वाढला तर पुराच्या पाण्याचा बाजारपेठेला धोका वाढणार
गड नदीच्या लागतच्या गावांना सतर्कतेचा इशारा
0
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 15, 2025 06:32:13Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
1 FILE
SLUG NAME -SAT_KOYNA_DISCHARG
सातारा - कोयना पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कोयना धरणातून विसर्ग सुरू करण्यात आला आहे.धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटांनी उचलून 5000 क्युसेक विसर्ग कोयना नदीपात्रात सुरू करण्यात आला आहे.धरणाच्या पायथा वीजगृहातून 2100 क्युसेक विसर्ग याआधी पासून सुरू असून आता एकूण 7100 क्युसेक विसर्ग नदीपात्रात केला जातो आहे त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.सध्या धरणात 75.48 टीएमसी पाणीसाठा असून 15819 क्युसेक वेगानं धरणात पाण्याची आवक होते आहे.पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी हा विसर्ग सुरू करण्यात आला आहे
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 06:31:38Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_MRGS_WELL
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: मनरेगा योजनेंतर्गत शेतकऱ्यांसाठी उभारण्यात येणाऱ्या सिंचन विहिरींच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणावर दिरंगाई होत असून अनेक विहिरींची कामं पूर्ण होऊनही लाभार्थ्यांना अद्याप निधी मिळालेला नाही, त्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.2023-24 वर्षामध्ये 614 विहिरींसाठी शासनाकडून 7 कोटी 37 लाख 85 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता.मात्र, 2024-25 आणि 2025-26 या कालावधीत दीड हजारांहून अधिक लाभार्थ्यांना अजूनही निधी मिळालेला नाही.या विलंबामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी असून, योजनांच्या अंमलबजावणीत अधिक पारदर्शकता आणि गती देण्याची मागणी शेतकऱ्याकडून होत आहे.
3
Share
Report
AKAMAR KANE
FollowJul 15, 2025 06:31:27kolhapur, Maharashtra:
2c ला बाईट व्हिडिओ जोडला आहे
-----------------
नागपूर
- उपप्रादेशिक परिवहन कार्यालय पूर्व नागपूरात पैसे घेतल्या शिवाय काम होत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. दलाला मार्फ़त गेले तरच काम होते असाही आरोप करण्यात आला आहे..
- या कार्यालयात पैसे घेऊन काम करत असल्याचा आरोप करण्यात यावेळी परिवहन कार्यालयात जाऊन वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगून कारवाईची मागणी करण्यात आली..
- अनेक तक्रारी मनसेकडे आल्यात त्याचे पुरावे सुद्धा अधिकाऱ्यांना दिले आहे.. मोठ्या प्रमाणात पैसे घेऊन काम केले जाते असा आरोप मनसेकडून करण्यात आला..
- पुढील सात दिवसात कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन केलं जाईल..
- यात फॉर्म भारतानं स्वतः गेल्यास काम करण्यासाठी पैसे द्यावे लागते, अनेक काम होत नाही, मात्र दलाला मार्फत गेले तर काम होतात.. यात रेषा मारल्या जातात, या रेषेवरून पैसे देण्याचं ठरत असल्याचा आरोप मनसेचे पदाधिकारी आदित्य दुरुगकर यानी केला आहे..
-------
बाईट - आदित्य दुरुगकर, मनसे.
0
Share
Report
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 15, 2025 06:30:39Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणी शहरातील सुभाष रोड परिसरात वास्तव्यास असलेल्या नागरिकांना मोकाट कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटना समोर आल्या आहेत, सदर प्रकार सीसीटीव्ही कॅमेर्यामध्ये कैद झालाय, सुभाष रोडवरील नागराज कॉर्नर येथे मोकाट कुत्र्यांनी चांगलाच हैदोस घातलाय, मनपाकडे वारंवार तक्रार करून देखील या मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त केला जात नसल्याने वेगवेगळ्या ठिकाणी दोन कुत्र्यांनी अनेक व्यक्तींना चावा घेतलाय. यामध्ये एका वृद्ध महिलेचा तर एका लहान मुलाचा समावेश आहे. वृद्ध महिलेच्या हाताला दुखापत झाल्याने त्यांना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या मोकाट कुत्र्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करीत आहेत,
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 06:30:32Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1507ZT_MAVAL_ROAD_CCTV
Total files : 01
Headline-पीएमआरडीए आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष कायम
-तीन तासांत दहा अपघात सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद
Anchor:
देहूत एका मार्गावर ते ही एकाच ठिकाणी तीन तासांत दहा अपघात झालेत. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. पण हे अपघात म्हणजे जणू ऍक्शन रिप्लेचं, जे सीसीटीव्हीत सुद्धा कैद झालेत. बरं या अपघातांना नेहमीप्रमाणे प्रशासनचं जबाबदार आहे, असा आरोप स्थानिकांनी केलाय. मावळ तालुक्यातील देहू ते येलवाडी मार्गावर हे दहा अपघात एकाचं ठिकाणी झालेत. या मार्गावर प्रचंड खड्डे पडलेत, त्या खड्ड्यांमुळे अपघात घडू शकतो अन एखाद्याचा त्यात नाहक बळी जाऊ शकतो. म्हणून स्थानिकांनी खड्डे बुजवण्याची विनंती केली तर प्रशासनाने मलमपट्टी म्हणून या खड्ड्यात मुरुम आणून भरला. बरं यामुळं तर आणखी भलतंच घडायला लागलं. पावसामुळं मुरुमचा चिखल झाला अन तो रस्त्यावर पसरला. आता इथून प्रवास करणारे दुचाकीस्वार एकामागोमाग एक घसरुन जखमी होतायेत. त्यामुळं प्रशासनाने केलेली तात्पुरती मलमपट्टी ही कोणाच्या जीवावर बेतणारी ठरतेय. एखाद्याचा जीव जाण्याआधी प्रशासन यावर तोडगा काढेल अशी अपेक्षा स्थानिकांना आहे.
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 06:02:54Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_ZP_PANCHYATSAMITYA
रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम
अँकर : वाशिम जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रारूप प्रभागरचनेची अधिसूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी जाहीर केली आहे.२१ जुलैपर्यंत नागरिक,राजकीय पक्ष आणि इच्छुक व्यक्तींना हरकती व सूचना नोंदवता येणार आहेत.जानेवारी २०२५ मध्ये जिल्हा परिषद व सहा पंचायत समित्यांचा कार्यकाळ संपल्याने सध्या प्रशासकीय व्यवस्था लागू आहे.सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर 2025-30 या कार्यकाळासाठी निवडणुकांची प्रक्रिया पुन्हा सुरू झाली असून,नव्याने प्रभागरचना करण्यात आली आहे.नवीन प्रारूप प्रभागरचना जनतेसमोर खुली असून, यावर हरकती आल्यानंतर अंतिम अधिसूचना प्रसिद्ध केली जाईल.त्यानंतर निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे.त्यामुळे जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला आहे.
0
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 15, 2025 06:02:40Raigad, Maharashtra:
स्लग - पावसामुळे जनजीवन विस्कळीत ..... रोह्यातील किल्ला गावातील घरांमध्ये शिरले पाणी ...... कुंडलिका नदीने ओलांडली इशारा पातळी ...... कोलाड नाक्यावर रस्त्यांवर पाणी ......
अँकर - मुसळधार पावसामुळे रोहा तालुक्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. कुंडलिका नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. ती इशारा पातळीवरून वाहते आहे. त्याचा फटका रोह्याच्या किल्ला गावाला बसला आहे. गावातील घरांमध्ये पाणी शिरल्याने नागरिकांची गैरसोय झाली आहे. कोलाड नाका इथं रस्त्यावर पाणी साचले असून पाण्यातून वाट काढताना वाहन चालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दरम्यान महाबळेश्वर भागात पडणाऱ्या पावसामुळे सावित्री नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्याने महाड आणि पोलादपूर तालुक्यातील यंत्रणांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
0
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 15, 2025 06:00:48Navi Mumbai, Maharashtra:
story Slug -: सुरक्षा रक्षकाच्या बुटातुन निघाला कोब्रा, सर्पमित्राने केलं रेस्क्यू.
शूज मे छुपा कोब्रा
ftp slug - nm cobra in shose
shots-
reporter- swati naik
navi mumbai
Anchor -: महापे एमआयडीसी क्षेत्रातील एका खाजगी कंपनीच्या सुरक्षा रक्षकाला त्याच्या केबिनच्या बाहेर ठेवलेल्या शूजमध्ये चक्क साप पाहून धक्का बसलाय. यावेळी सर्पमित्र अक्षय डांगे यांना घटनास्थळी बोलावण्यात आले. यावेळी सर्पमित्राने शूज मध्ये असलेला सापाला रेस्क्यू करत सुरक्षितपणे बाहेर काढले. सुरक्षा रक्षकाच्या शूज मध्ये तीन फूटांपेक्षा जास्त लांबीचा कोब्रा नाग असल्याचे निष्पन्न झालेय. असे सरपटणारे प्राणी थंड रक्ताचे असल्याने ते पावसाळ्यात अनेकदा उबदार आणि कोरड्या जागी जातात त्यामुळे पावसाळ्यात शूज उघड्यावर ठेवू नयेत असा सल्ला सर्पमित्राने दिलाय. या रेस्क्यू करण्यात आलेल्या कोब्रा नागाला मानवी वस्तीपासून दूर असलेल्या एका निर्जन क्षेत्रात सोडण्यात आलेय.
gf-
=======================
0
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 15, 2025 05:32:20Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 1507ZT_CHP_FAKE_POLICE
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील मूल तालुक्यातील पोलिसांच्या भरारी पथकाच्या नावाखाली उकळली खंडणी; तिघे अटकेत, मूल पोलिसांची कारवाई, १३ लाखांचा मुद्देमाल जप्त
अँकर:-- भरारी पथकातील पोलिस असल्याची बतावणी करून अवैध दारू व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या तीन जणांना सोमवारी मूल पोलिसांनी बेड्या ठोकल्या. या कारवाईत १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या तिघांनी मूल तालुक्यात दोघांना गंडविल्याचे समोर आले आहे. माता बादल दुर्गाप्रसाद दुबे (३६) व संगीता बादल दुबे (२७, दोघेही रा. रेंगेपार, ता. साकोली जि. भंडारा), अजय विजय उईके (३१, रा. गजानन मंदिर रोड, शितला मंदिरामागे, चंद्रपूर) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत. तर देवेंद्र चरणदास सोनवणे (३०, रा. निलज, ता. साकोली, जि. भंडारा) फरार असून, त्यांच्या शोधासाठी पोलिस रवाना झाले आहेत. ३ जुलै रोजी चिरोली येथील सुरेश गणमेनवार
यांच्या घरी पांढऱ्या रंगाच्या इर्टिका कारमधून चार जण आले. त्यांनी स्वतःला भरारी पथक चंद्रपूर पोलीस चे सदस्य असल्याचे दारूसाठ्यावर कारवाई करण्याची धमकी देत १० हजार रुपये वसूल केले. यानंतर डोंगरगाव येथील एजाज शेख यांच्याकडून ५ हजार रुपये घेतले. याबाबतची तक्रार १३ जुलै रोजी मूल पोलिसांत दाखल करण्यात आली. गुन्ह्यात वापरलेले वाहन, मोबाइल असा १३ लाखांचा मुद्देमाल जप्त केला. पुढील तपास मूल पोलिस करीत आहेत
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 15, 2025 05:31:33Washim, Maharashtra:
वाशिम:
File:1507ZT_WSM_CROP_AREA_DECREASED
रिपोर्टर: गणेश मोहळे,वाशिम
अँकर:वाशिम जिल्ह्यात ज्वारी, बाजरी, मका या तृणवर्गीय पिकांचे अपेक्षित क्षेत्र १,२०९ हेक्टर असताना केवळ १०५ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. यामध्ये खरीप ज्वारी ६२, मका ३१ व बाजरी फक्त २ हेक्टरवर लागवड झाली. कमी बाजारभाव,उत्पादन खर्चातील वाढ व वन्यप्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकरी या पारंपरिक पिकांपासून दूर जाऊ लागले असून,नव्या पिकांकडे वळत आहेत.परिणामी तृणपिकांचे क्षेत्र घटल्याने जनावरांसाठी कडबा मिळणे दुरापास्त होणार आहे.
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 05:30:24Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File name : 1507ZT_MAVAL_WATER_WASTE
Total files : 01
Headline : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर जुना उर्से टोल नाक्याजवळ पिण्याच्या पाइपलाइन फुटली
हजारो लीटर पाणी वाया
Anchor:
मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर जुना उर्से टोल नाक्याजवळ पिण्याचे पाणी याच्या पाईपला भगदाड पडल्याने हजारो लिटर पाणी वाया जात आहे. रस्त्यावर या पाण्याचा झरा वाहत आहे.. मात्र याकडे स्थानिक पाणीपुरवठा विभागाचे दुर्लक्ष होत आहे. वाया जाणारे पाणी हे पाणी पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेवर जमा झाले आहे.
0
Share
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
FollowJul 15, 2025 05:06:51Pune, Maharashtra:
Reporter name : Chaitralli Raajapurkar
Location : Maval
File.name : 1507ZT_MAVAL_POTATO_ISSUE
Total files : 03
Headline -लोणावळ्यात पर्यटकांच्या जीवाशी खेळ. वडापाव च्या भाजीत नासका बटाटा वापरत असल्याचं उघड
-सजग नागरिकांच्या सतर्कतेमुळे हा किळसवाणा प्रकार उघड
-12 जुलै रोजी घडलेल्या या प्रकारचा व्हिडीओ सोशियल मीडियावर वायरल
Anchor:
लोणावळा शहरातील मुख्य बाजारपेठेत परमार हॉस्पिटलसमोरील चौकात असलेल्या 'चौधरी वडेवाले' या दुकानात वडापाव आणि भजी बनवण्यासाठी चक्क टाकाऊ, सडलेले आणि उंदराने अर्धवट खाल्लेले बटाटे वापरले जात असल्याचे समोर आले आहे. एवढेच नाही, तर यासाठी अत्यंत गलिच्छ पाण्याचाही वापर केला जात होता. मिळालेल्या माहितीनुसार, एका जागरूक नागरिकाने हा प्रकार उघडकीस आणला. त्याने पाहिले की, चौधरी वडेवाले दुकानात सडलेले आणि उंदराने अर्धवट खाल्लेले बटाटे थेट प्रेशर कुकरमध्ये उकळले जात होते. या बटाट्यांसाठी वापरले जाणारे पाणीही अत्यंत अस्वच्छ होते. तक्रारदाराने पोलिसांकडे दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, भजी आणि वडे बनवण्यासाठी लागणारे पीठ देखील अशाच घाणेरड्या पाण्यात मिसळले जात होते. शनिवारी 112 या पोलीस हेल्पलाईनवर तक्रारदाराने तक्रार नोंदवली. पोलीस तात्काळ घटनास्थळी पोहोचले असता, दुकानाचा मुख्य आचारी पळून गेला होता. पोलिसांनी संबंधित तक्रारदाराकडून तक्रार अर्ज स्वीकारला असून, याप्रकरणी तपास सुरू केला आहे.
0
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 15, 2025 05:02:17Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Governer
Feed on - 2C
-------------------------
Anchor - बाबरी मशीद प्रकरणात शंकरराव चव्हाण यांचा काही दोष नसताना त्यांची विनाकारण बदनामी झाली असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरीभाऊ बागडे यांनी नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. खासदार अशोक चव्हाण यांच्या मातोश्री कैलासवासी कुसुमताई चव्हाण यांच्या स्मृती पुरस्कार कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. कल्याणसिंग यांचे भाजपचे सरकार असल्याने बाबरी वाचवायची असेल तर राष्ट्रपती राजवट लागू करा असा आग्रह शंकरराव चव्हाण यांचा होता. पण मंत्रिमंडळातील काही सदस्यांनी विरोध केला. शरद पवार यांनी 356 लागू करू असे सांगितले. 356 ही लागू केली नाही आणि बाबरी पडली असे राज्यपाल हरिभाऊ बागडे म्हणाले. ते सांगण्यासाठी शरद पवार पंतप्रधान नरसिंह राव यांच्याकडे गेले मात्र त्यावेळी नरसिंह राव पूजा करत होते आणि बाबरी पडेपर्यंत त्यांची पूजा आटोपलीच नाही असे राज्यपाल बागडे म्हणाले.
Sound Byte - हरिभाऊ बागडे - राज्यपाल राजस्थान
------------------------------
पिओके ला लॉर्ड माउंट बॅटन जबाबदार, त्यांचे हे पाप अजून भोगतोय - राज्यपाल
Anchor - पिओके ला कुणी जबाबदार असेल ते लॉर्ड माउंट बॅटन आहेत आणि त्यांचं हे पाप अजून आपण भोगतोय असे वक्तव्य राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नांदेडमध्ये आयोजित एका कार्यक्रमात केले. शेषराव मोरे यांच्या पुस्तकाचा दाखला त्यांनी यावेळी दिला.
Sound Byte - हरिभाऊ बागडे
------------------------
0
Share
Report
PPPRANAV POLEKAR
FollowJul 15, 2025 04:34:08Ratnagiri, Maharashtra:
Anchor - रत्नागिरी जिल्ह्यात मागच्या 24 तासांमध्ये चांगलाच पाऊस झाला आहे. मंडणगड तालुक्यात सकाळी सहा वाजता मुसळधार पावसामुळे भिंगळोली येथील बस डेपो व शासकीय रेस्ट हाऊस दरम्यान रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरल्याने वाहतूक विस्कळीत झाली. त्यामुळे स्वाभाविकपणे जनजीवनावरती असा परिणाम झाला.तसेच दापोली फाटा समर्थ नगर येथील घरांसमोर मोठ्या प्रमाणात पाणी रस्त्यावर आले.
लोकेशन - मंडणगड, रत्नागिरी
0
Share
Report