Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में अतिक्रमण विरोधी कार्रवाई: सड़क पर माल हटाकर रोका गया व्यवसाय

GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 10:05:33
Washim, Maharashtra
वाशिम: File:1509ZT_WSM_ATIKRAM_HATAV_MOHIM रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक परिसरात रस्त्यावर बसलेल्या दुकानदारांच्या अतिक्रमणाविरुद्ध कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे.गेल्या काही दिवसांपासून काही दुकानदार रस्त्यावरच माल ठेवून व्यवसाय करत होते.यामुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत होते.नागरिकांकडून सातत्याने तक्रारी होत असल्याने वाशिम नगर परिषद अतिक्रमण पथक आणि पोलिसांनी आज सकाळी संयुक्त कारवाई केली.या कारवाईत रस्त्यावर ठेवलेला माल हटवण्यात आला.तसेच अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांना पुन्हा रस्त्यावर व्यवसाय न करण्याचा इशारा देण्यात आला आहे.नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल,असे नगरपरिषद व पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Sept 15, 2025 12:02:13
Washim, Maharashtra:वाशिम: File:1509ZT_WSM_ST_MORCHA रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:अनुसूचित जमातीमध्ये(आदिवासींमध्ये) इतर जातींचा समावेश कोणत्याही परिस्थितीत होऊ नये,अशी ठाम भूमिका आदिवासी समाजाने मांडली असून या मागणीसाठी आज वाशीमच्या मंगरूळपीर तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला.यावेळी आदिवासी बांधवांनी तहसीलदार मार्फत मुख्यमंत्री तसेच आदिवासी विकास मंत्र्यांना निवेदन सादर केले.निवेदनात आदिवासी समाज हा भारताचा मूळ रहिवासी असून त्यांची स्वतंत्र संस्कृती असल्याचे नमूद करण्यात आले आहे.आजही आदिवासी समाज दऱ्याखोऱ्यात राहतो, त्यामुळे मूलभूत विकासापासून वंचित असल्याचेही निदर्शनास आणले आहे.सध्या महाराष्ट्रात अनुसूचित जमातींमध्ये एकूण ४५ जमातींचा समावेश आहे.त्याव्यतिरिक्त इतर कोणत्याही जातीला अनुसूचित जमातीचा दर्जा देऊ नये, अशी स्पष्ट मागणी निवेदनातून करण्यात आली आहे.अन्यथा आदिवासी समाज संविधानिक मार्गाने संपूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन उभारेल, असा इशाराही देण्यात आला आहे. या मोर्चामध्ये मोठ्या संख्याने आदिवासी महिला,पुरुष व युवक सहभागी झाले होते.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 12:01:56
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Haveli 20 Family Rain Damage File:05 Rep: Hemant Chapude(Haveli) Anc: पुण्याच्या थेऊर परिसरात मध्यरात्री झालेल्या ढगफुटी सदृश्य पावसाने गाठ झोपेत असताना पुराच्या पाण्यात २० कुटुंब अडकली जीवाच्या आकांताने टाहो फोडत असताना तब्बल 70 नागरिकांना रेस्क्यू करत वाचवण्यात आलं मात्र या पुरामध्ये 46 शेळ्या एक गाय एक म्हैस यांचा दुर्दैव रित्या मृत्यू झालाय,तर घरातील संसार उपयोगी सर्व साहित्य पुराच्या पाण्यात उध्वस्त झालं,आमच कुटुंब संसार उघड्यावरती आलाय आम्ही जगायचं कसं याच्या चिंतेने नुकसानग्रस्त कुटुंबांना अश्रू अनावर झालेत याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त महिला प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Sept 15, 2025 11:48:40
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 11:48:30
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_GAD_RADA ( single file sent on 2C)  टायटल:-- गडचिरोली  जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागेपल्ली येथे  धक्कादायक प्रकार,अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी केला धावा     अँकर:--गडचिरोली  जिल्ह्यातील अहेरी लगतच्या नागेपल्ली येथे  धक्कादायक प्रकार घडला. अंत्यसंस्कारासाठी गेलेल्या नागरिकांवर स्मशानभूमीत अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी धावून गेल्याने दोन गटात तुफान राडा झाला आणि एकमेकांवर लाट्याकट्याने मारहाण केल्याचा प्रकार घडला. दरम्यान या प्रकरणी पोलिसांकडून गुन्ह्याची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू असून स्मशानभूमीत घडलेल्या या प्रकारावरून संताप व्यक्त केला जात आहे. नागेपली ग्रामपंचायत प्रशासनाच्या म्हणण्यानुसार सदर जागा स्मशानभूमीची असून येथे गावातील नागरिकांची अंत्यविधी केली जाते. मात्र या जागेवर बाहेरून आलेल्या काही वराह पालन व्यवसायिकांनी अतिक्रमण करून कच्च्या झोपड्या बांधल्या. दरम्यान आज गावातील एकाचा निधन झाल्यानंतर गावकऱ्यांनी या स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी गेले असता अतिक्रमण केलेल्या नागरिकांनी त्यांना अडवणूक केली. या वादाचे पर्यावरण हाणामारीत झाली आणि जोरदार मारहाणीत अनेक जण जखमी झाल्याची माहिती आहे. झाली. या प्रकरणी पोलिसात कारवाई करणे सुरू आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 11:46:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : गावात रुग्णवाहिका पोहोचू न शकल्याने बैलगाडीवरून रुग्णाला घेऊन जायची वेळ - अक्कलकोट तालुक्यात मागील काही दिवसापासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे बोरी नदी परिसरातील गावात पूरजन्य परिस्थिती. - पुराच्या पाण्यात रुग्णांना स्वतःचा जीव धोक्यात घालून प्रवास करत असल्याचे पाहायला मिळाले. - आंदेवाडी गावात पुराच्या पाण्यामुळे रुग्णवाहिका गावात पोहोचू न शकल्याने रुग्णाला गावातील ओढयाचा पूल बैलगाडीने पार करावा लागल्याचे पाहायला मिळाले. - बोरी नदीच्या पूरजन्य परिस्थितीमुळे गावातील मार्ग झाले बंद . - गावातील वृद्ध महिलेला दवाखान्यात जाण्यासाठी गावात रुग्णवाहिका पोहोचत नसल्याने नागरिकांनी बैलगाडीने रुग्णवाहिके पर्यंत नेले. - अक्कलकोट तालुक्यातील आंदेवाडी (जहागीर ) गावातील धक्कादायक घटना.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Sept 15, 2025 11:39:51
Beed, Maharashtra:बीड: आष्टी तालुक्यात ढगफुटी, कडा शहराला पुराने वेढले ... EXCLUSIVE ड्रोन सौजन्य: शरद गर्जे Anc- काल आणि आज पहाटे झालेल्या ढगफुटी पावसाने कडा शहर व परिसरात भीषण पुरस्थिती निर्माण झाली आहे.. अचानक कोसळलेल्या मुसळधार पावसाने सर्वत्र नाले-ओढ्यांना पूर आले आहे. कडा शहर पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, रस्ते, घरे व दुकाने जलमय झाली आहेत. पूरपाण्याने कडा नगरीचे सामान्य जीवन विस्कळीत झाले आहे. घरे, दुकाने, बाजारपेठ, रस्ते यामध्ये पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे. वाहनांची चळवळ ठप्प झाली असून नागरिकांना सुरक्षित स्थळी हलविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. ढगफुटी पावसाने शेतीचेही मोठे नुकसान झाले आहे. शेतातील उभे पिके, फळबागा व जनावरांच्या चाऱ्याचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. या आपत्तीमुळे शेतकऱ्यांबरोबरच शहरातील लहान व्यापाऱ्यांनाही मोठा आर्थिक फटका बसला आहे.
4
comment0
Report
SMSATISH MOHITE
Sept 15, 2025 11:39:34
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 11:33:42
Nashik, Maharashtra:सुप्रिया सुळे - - जय जवान जय किसान - सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे - विनम्रपणे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्या - सरसकट कर्जमाफी द्या म्हणून सांगा - *१ महिन्यात कर्जमाफी दिली नाही तर सरकारला आम्ही फिरू देणार नाही* - २५ लाख महिलांची नावे लाडक्या बहीण योजनेतून नाव वगळले - सरसकट शब्द दिला तेव्हा कर्जमाफी केली होती - आम्ही सातबारा कोरा केला होता - आता तुम्ही आश्वासन दिले ते पाळा - ६५ हजार शेतकरी नावे उताऱ्यावरून कमी केली - भ्रष्टाचार सुरू केला आहे - आम्ही ८ खासदार शब्द देतो - *जिल्हा बँकेची चौकशी लावू हा शब्द देतो* - नाशिकच्या टीमने अतिशय चांगला मोर्चा केला - मोठ्या कामाची ही छोटी सुरुवात आहे - शेतकऱ्यांना न्याय मिळाल्याशिवाय स्वस्त बसणार नाही - *एक महिना आदराने घेऊ कर्जमाफी दिली नाहीतर मंत्र्यांना महाराष्ट्रात फिरू देणार नाही, नाही, नाही*
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Sept 15, 2025 11:31:25
Shirur, Maharashtra:Feed 2C Slug: Theur Cow Death File:02 Rep: Hemant Chapude(Haveli) Anc: पुण्याच्या थेऊर परिसराला ढगफुटी सदृश्य पावसाने झोडपलं आणि क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं नागरिक मध्यरात्री रात्रीच्या अंधारात शिवांच्या आकांताने टाहो फोडत होते तर मुके प्राणी आपला जीव वाचवण्यासाठी हंबरडा फोडत होते अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या प्राण्यांना वाचवण्यासाठी रात्रीच्या अंधारात पुराच्या पाण्यात पोहून कसरत करत आपला आणि आपल्या प्राण्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करत होते मात्र या पुराच्या पाण्यात गाई म्हशी सह शेळ्यांचाही मृत्यू झालाय त्यामुळे शेतकय्रांचे लाखो रूपयांचे नुकसान झालंय,नुकसान ग्रस्त पशुपालकांच्या व्यथा जाणून घेतल्यात आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To नुकसान ग्रस्त पशुपालक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया हवेली पुणे...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Sept 15, 2025 11:19:37
Akola, Maharashtra:Anchor : अकोल्यात आदिवासी आरक्षण बचाव आंदोलन चिघळल्याने अकोला जिल्हाधिकारी कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं होत. अकोल्यात आदिवासी समाजाच्या आरक्षण बचाव आंदोलनाला काही काळ तणावपूर्ण वळण मिळाले. शांततेच्या मार्गाने सुरू झालेलं हे आंदोलन अचानक उग्र बनले, जेव्हा आंदोलक जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी पोहोचले, त्यावेळी ते बैठकीत व्यस्त असल्यामुळे निवेदन स्वीकारण्यात विलंब झाला.या विलंबामुळे आंदोलकांमध्ये संतापाची लाट उसळली आणि त्यांनी थेट जिल्हाधिकारी दालनाकडे मोर्चा वळविला. यावेळी पोलिस आणि आंदोलकांमध्ये काही काळ संघर्षजन्य परिस्थिती निर्माण झाली. मात्र पोलिसांच्या मध्यस्थीनंतर आणि समजुतीनंतर परिस्थिती नियंत्रणात आली.यानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आंदोलन शांततेत संपवले. दरम्यान, प्रशासन आणि आंदोलकांमध्ये समन्वयाचा अभाव मुळे हे परिस्थिती निर्माण झाल्याचा दिसून आलं..
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Sept 15, 2025 11:16:31
Chandrapur, Maharashtra:Feed slug :--- 1509ZT_CHP_TIGER_DEATH ( single file sent on 2C)  टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा भिमणी नदीत मृतावस्थेत आढळलेला वाघ वनपथक पोचण्याआधीच गेला वाहून, वनविभागात खळबळ, वनाधिकारी प्रकरणावर मौन अँकर:- चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील भीमणी नदी पात्रात वाघ मृतावस्थेत दिसून आला. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. मात्र वनविभागाचे पथक घटनास्थळी पोहोचेपर्यंत वाघाचा मृतदेह मुसळधार पावसाच्या सोबत नदीच्या प्रवाहात वाहून गेला. सध्या वनविभागाने मृतदेह शोधण्यासाठी मोहीम हाती घेतली आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे सर्व नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. शेतकरी व मजूर शेतातील कामे आटोपून परतत असताना त्यांना भीमणी नदीच्या पात्रात पाण्यावर तरंगणारा वाघ मृतावस्थेत दिसला. त्यांनी तत्काळ वनविभागाला माहिती दिली. वनविभागाकडून ग्रामस्थांनाही मृतदेह दिसल्यास त्वरित कळविण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जिल्ह्यातील वाघांच्या मृत्यूच्या मालिकेत ही नवी भर पडल्याने वनविभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वरीष्ठ वनाधिकारी मात्र प्रकरणावर मौन आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर 
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 15, 2025 11:16:14
Jalna, Maharashtra: FEED NAME | 1509ZT_JALNA_EMPLOYEE(14 FILES) जालना :पाच महिन्यांपासून जिल्ह्यातील 1 हजार 400 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले,17 सप्टेंबरपासून आंदोलनाचा ईशारा अँकर | जालना जिल्ह्यातील तब्बल 1 हजार 400 ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचे पगार थकले आहेत.या कर्मचाऱ्यांमध्ये कार्यालयीन कर्मचारी, पाणीपुरवठा कर्मचारी,कार्यालयीन लिपिक यांचा समावेश आहे.तब्बल 5 महिन्यांपासून पगार थकल्यानं ग्रामपंचायत कर्मचारी कार्यालयीन कामकाजा बरोबरच रोजंदारीने जाऊन कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असल्याचं समोर आलंय. बाईट :बाबासाहेब शेळके,ग्रामपंचायत कर्मचारी, डोमेगाव(कार्यालया बाहेर केलेला बाईट) बाईट : संदीप पंडित,ग्रामपंचायत कर्मचारी आणि जिल्हा उपाध्यक्ष,महाराष्ट्र राज्य ग्रामपंचायत कर्मचारी युनियन, जालना
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 15, 2025 11:01:32
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे शहर विधानसभा निवडणुकीत तब्बल 45 हजार बोगस मतदारांनी मतदान केल्याचा आरोप शिवसेना ऊबाठा चे नेते माजी आमदार अनिल गोटे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत बोगस मतदानावरून अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद घेत निवडणूक यंत्रणेवर गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीच्या काळात तब्बल 27 हजार बोगस मतदारांचा मतदार यादी समावेश केल्याचा आरोप गोटे यांनी केला आहे. बोगस मतदार नोंदणीसाठी बीएलओ यांचा वापर केला गेला असून एकाच व्यक्तीची चार चार पाच पाच वेळा नावांची नोंदणी झाल्याचा दावाही गोटे यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीत सात ते आठ टक्के बोगस मतदान झाल्याचा आरोप अनिल गोटे यांनी पत्रकार परिषद केला आहे. विशेष म्हणजे या पत्रकार परिषदेत गोटे यांनी कोणत्याही राजकीय पक्षावर कोणताही आरोप न करता निवडणूक यंत्रणेला लक्ष केल आहे. Byte- अनिल गोटे माजी आमदार प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top