Back
कल्याणमध्ये शिंदे यांच्या शिवसेनेत उत्तर भारतीयांची 'जंबो भरती'!
ABATISH BHOIR
FollowJul 09, 2025 12:37:44
Kalyan, Maharashtra
मराठी आणि हिंदीचा वाद सुरू असतानाच कल्याण मध्ये शेकडो उत्तर भारतीयांचा शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश
काँग्रेस पक्षातील उत्तर भारतीय पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा आमदार विश्वनाथ भोईर यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या "जय गुजरात, जय भारत" या घोषणेनंतर राज्यात राजकीय वातावरण तापले आहे. विशेषतः मराठी अस्मितेवरून ठाकरे गट आणि मनसेने आक्रमक भूमिका घेतली आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईतील वरळी डोम येथे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विजय मेळाव्यात मराठी भाषेच्या अवमानावरून शिंदे यांच्यावर जोरदार टीका झाली.मात्र दुसरीकडे, शिंदे गट मात्र आपली राजकीय गणितं नव्याने आखताना दिसतो आहे. कल्याण पश्चिमचे आमदार विश्वनाथ भोईर यांनी शहाड परिसरात आयोजित एका विशेष कार्यक्रमात काँग्रेसला मोठा झटका देत उत्तर भारतीय समाजातील अनेक प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्त्यांना शिंदे यांच्या शिवसेनेत सामील करून घेतले. या पक्षप्रवेशामुळे कल्याणच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे.मराठी-हिंदी भाषेच्या संघर्षाचा वाद अजूनही तापलेला असतानाच, कल्याणमधील ‘उत्तर भारतीय जंबो भरती’मुळे शिंदे गटाने काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे. ही भरती केवळ स्थानिक पातळीवर नव्हे तर राज्यभरात राजकीय दृष्टिकोनातून चर्चेचा विषय बनली आहे. उत्तर भारतीय मतदारांच्या उपस्थितीमुळे आगामी स्थानिक निवडणुकांमध्ये शिंदे गटाचा ‘हिंदी पट्टा’ अधिक मजबूत होणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.
Byte :- विश्वनाथ भोईर (. शिवसेना शिंदे गट कल्याण पश्चिम आमदार )
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
GDGAJANAN DESHMUKH
FollowJul 09, 2025 18:02:19Parbhani, Maharashtra:
अँकर- परभणीच्या साबळे भोगाव येथे मकरंद अनासपुरेंच्या यांच्या जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणे एका महिला शेतकर्याची विहीर चोरीला गेलीय,अश्या अनेक विहिरी चोरीला गेल्याचा आरोप शेतकरी नेत्यांमधून केला जतोय,बघुयात एक विशेष रिपोर्ट
व्हीओ- राज्यातील शेतकऱ्यांचा दुष्काळ मिटून शेतात सिंचनाची व्यवस्था व्हावी यासाठी राज्यशासनाने महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत मागेल त्याला विहीर ही सिंचन विहिरींची योजना सुरू केली. पण परभणी जिल्ह्यात अनेक विहरी कागदावरच उभारल्या जात असून शासनाच्या निधीचा अपहार सरकारी बाबूच करीत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. परभणी जिल्ह्यात 10 हजार पेक्षा अधिक सिंचन विहिरिंना मंजुरी देण्यात आली आहे. सिने अभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या जाऊ तिथे खाऊ या चित्रपटाप्रमाणे परभणीच्या भोगाव साबळे येथिल संजीवनीबाई जीवनराव साबळे यांच्या गट नंबर 99 मधील शेतात केलेली विहिरी हरवली आहे. याबाबतची तक्रार त्यांचा संजीवनी साबळे यांचा मुलगा गोपाळ साबळे यांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांकडे केली,गोपाळ साबळे यांना आपल्या आईच्या नावावर असलेल्या गट नंबर 99 मधील शेतात विहिरीचा पहिला हप्ता म्हणून 58 हजार 960 रुपये रोजगाराच्या खात्यावर पाठवून उचलल्याचे समजले, गोपाळ यांनी आपल्या शेतात विहिरी मिळावी म्हणून केवळ अर्ज केला होता, पण गावातील विहिरीचे चार चार वर्षांपासून बिल निघत नसल्याने त्यांनी विहिरीचा नाद सोडला होता, पण दोन वर्षांनी त्यांनी चौकशी केली असता आपली विहीर मंजूर झाली असून आपण विहिरीचे खोदकाम केले नसतांना आपल्या परस्पर शासनाने रोजगाराच्या नावावर पैसे वर्ग केल्याची माहिती पुढे आली. त्यानंतर त्यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठून या भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी तक्रार केली,
बाईट- गोपाळ साबळे- शेतकरी महिलेचा मुलगा
मिड पिटीसी- गजानन देशमुख
व्हीओ- याबाबत आम्ही पंचायत विभाग गाठून उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. संदीप घोणसीकर यांना या प्रकाराबाबत विचारले असता याबाबत आम्ही चौकशी केली असून भोगाव साबळे येथील ग्रामरोजगार सेवक आणि अभियंता यांनी लाभार्थ्याला अपरोक्ष लाभार्थ्याला मंजूर असलेली विहीर दुसरीकडून दाखवून प्रत्यक्ष काम न करताच मंजुरांच्या खात्यात निधी वर्ग केल्याचे स्पष्ट झाले असून ग्रामरोजगार आणि अभियंता यांच्यावर कारवाई प्रस्तावित केल्याचे सांगितले,शिवाय जिल्ह्यत ईतर ठिकाणावरून अश्याच स्वरूपाच्या तक्रारी प्राप्त झाल्याचे सांगितले,
बाईट- डॉ. संदीप घोंसीकर- उपमुख्य कार्यकारी अधिकारी,पंचायत विभाग,परभणी
व्हीओ- भोगाव साबळे या गावातील हे एकमेव उदाहरण आहे असे नसून परभणी जिल्ह्यतील अनेक तालुक्यात अधिकार्यांच्या हातावर चिरीमिरी दिली की कागदावरच विहिरी काढल्या जात असल्याचा आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्षाने केलाय,याच नवल वाटायला नको,पण ज्यांचा मुख्यमंत्री आहे,त्जे सत्ताधारी आहेत, त्या भाजप पक्षाच्या जिल्हाध्यक्षाने जिल्हाधिधिकाची भेट घेऊन जिल्ह्यातील नऊ च्या नऊ गटविकास अधिकारी पैसे घेतल्याशिवाय कोणतच काम करीत नसल्याची लेखी तक्रार केलीय,
बाईट- किशोर ढगे- जिल्हाध्यक्ष,स्वाभिमानी शेतकरी संघटना,परभणी
बाईट- सुरेश भुमरे- भाजपा जिल्हाध्यक्ष,परभणी
एन्ड व्हीओ- मंडळी ज्यांच्या पक्षाचा मुख्यमंत्री आहे,त्या सत्ताधारी पक्षाचे जिल्हाध्यक्षानेच जिल्ह्यातील सर्वच्या सर्व बीडीओ शेतकऱ्यांकडून पैसे घेऊन लूट करीत असल्याचा आरोप केला असेल तर परभणीत सर्व काही आलबेल सुरू आहे हे समजून घ्यायच का,आपल्या पक्षाच्या जिल्हाध्यक्षानेच भ्रष्ट कारभाराला वाचा फोडल्यावर तरी मुख्यमंत्री फडणवीस याकडे जिल्ह्याकडे लक्ष घालतील का हे बघण महत्वाचं ठरणार आहे...
गजानन देशमुख, झी मीडिया परभणी
14
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 09, 2025 18:02:07Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0907ZT_BARAMATIPKG
BYTE 3
बारामती उपविभागातील बाधित शेतकऱ्यांना अद्याप नुकसान भरपाई नाही...
काटेवाडी परिसरात शेतकरी नुकसान भरपाई पासून...
अजित पवार यांनी आदेश देऊनही प्रशासन हालेना...
Anchor:- मे महिन्यामध्ये राज्याच्या अनेक भागात अतिवृष्टी झाली यात पुणे जिल्ह्यातील बारामती, दौंड ,पुरंदर ,इंदापूरच्या पट्ट्यात देखील मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी होऊन शेतकऱ्यांच्या अतोनात नुकसान झाले. बारामती तालुक्यातील काटेवाडी ढेकळवाडी,काटेवाडीसह ,ढेकळवाडी लिमटेक ,खताळपटटा या गावातही अतिवृष्टी झाली सलग चार ते पाच दिवस अतिवृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले या शेतकऱ्यांच्या शेतीच्या नुकसानीचे पंचनामे झाले. मात्र नुकसान भरपाई आद्यप मिळाली नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पंचनामे करून नुकसान भरपाईचे आदेशही दिले तरीही प्रशासन मात्र हालेना अशी स्थिती सध्या आहे.
२१ ते २५ मे दरम्यान अतिवृष्टीचा पाऊस जास्तीचा झाल्यानंतर २६ मे रोजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी थेट बारामती गाठत या ठिकाणी फुटलेला निरा डावा कालवा आणि अतिवृष्टीचा दौरा केला.. बांधा बांधावरती जाऊन त्यांनी पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना पंचनामा करण्याचे आदेश दिले काही ठिकाणी पंचनामे झाले मात्र आतापर्यंत नुकसान भरपाईचा तपास नाही..
अतुष्टीच्या पाण्याने ओढ्याना महापूराची परिस्थिती आली यात शेतात पाणीच पाणी झाले पुराच्या पाण्यामुळे शेतांचे बांध फुटले शेतातील सुपीक माती खरडून गेली दगड गोटे वाहून आले त्यामुळे मोठे नुकसान झाले ऊस लागवडीसाठी केलेली मशागत वाया गेली पुन्हा दुबारमशागत करावी लागल्याने शेतकऱ्यांना मोठ्या खर्चाला सामोरे जावे लागत आहे.
बाईट:_ आप्पासाहेब ठोंबरे,शेतकरी
बाईट:_ आबा टकले, शेतकरी
सदर सर्व बाधित शेतकऱ्यांचे पंचनामे संयुक्तकरित्या केल्या असून त्याचा अहवाल शासन दरबारी पाठवण्यात आला आहे लवकरच नुकसान भरपाई मिळेल असे कृषी विभागाचे बारामती उपविभागाचे कृषी अधिकारी टी.के. चौधरी यांनी सांगितलेय..
बाईट _ टी. के.चौधरी, उपविभागीय कृषी अधिकारी बारामती उपविभाग
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अतिवृष्टी झालेल्या भागातही पाहणी करून पंचनामे करण्याचे आदेश दिले तरीही शासनाकडून दिरंगाई होत असल्याने लवकरात लवकर या बाधित झालेल्या शेतकऱ्यांना मदत मिळावी हीच अपेक्षा व्यक्त होत आहे.
जावेद मुलाणी,
झी 24 तास ,
बारामती
14
Share
Report
TTTUSHAR TAPASE
FollowJul 09, 2025 17:00:36Satara, Maharashtra:
TUSHAR TAPASE
5 FILES
SLUG NAME - SAT_BENDUR
सातारा - सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यात आज बेंदुर सण पारंपरिक उत्साहात साजरा करण्यात आला. यांत्रिकीकरणामुळे शेतीत ट्रॅक्टरचा वापर वाढला असला तरीही जांभुळणी येथील शेतकऱ्यांनी बैलांना विसरले नाही.ट्रॅक्टरसोबत बैलांची गावातून गजी नृत्यात मिरवणूक काढण्यात आली. गुलालाची उधळण, डीजेच्या तालावर फेर धरत शेतकऱ्यांनी बैलांप्रती आपली निष्ठा दाखवली. पारंपरिकतेसह आधुनिकतेचा संगम साधणारी ही मिरवणूक गावात चर्चेचा विषय ठरली.
14
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 16:00:47Washim, Maharashtra:
वाशिम :
File:0907ZT_WSM_NO_CEMETERY
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर: वाशिमच्या कारंजा तालुक्यातील सोमठाणा गावात स्मशानभूमी नसल्यामुळे गावकऱ्यांनी प्रेत थेट ग्रामपंचायत कार्यालयात ठेवून ग्रामपंचायतचा जाहीर निषेध केल्याची धक्कादायक घटना घडलीये.पावसाळ्यामध्ये मयत झालेल्या व्यक्तीला अंत्यविधी करण्यासाठी गावात कुठेही स्मशानभूमी नसल्यामुळे याचा मोठा त्रास गावकऱ्यांना सहन करावा लागतोय.या संदर्भात ग्रामपंचायतला गावकऱ्यांनी वारंवार गावात स्मशानभूमीची मागणी करून सुद्धा गेल्या वीस वर्षापासून ग्रामपंचायतला जाग आली नाही. त्यामुळे संतप्त झालेल्या गावकऱ्यांनी आज गावात मयत झालेल्या व्यक्तीचं प्रेत थेट ग्रामपंचायत कार्यालयातच नेऊन ठेवलं.त्यामुळं ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होत.त्यानंतर पोलीसांनी गावात येऊन मध्यस्ती केल्यानंतर वातावरण शांत झालं.आणि लवकरच स्मशानभूमी बांधण्यात येईल अशी आश्वासन दिल्यानंतर अखेर मयत व्यक्तीचं प्रेत उचलण्यात आलं.
बाईट:स्थानिक नागरिक, सोमठाणा
14
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 16:00:30Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_SCHOOL_CLOSE
FILE - 5 VIDEO
भंडारा जिल्ह्यात पूर परिस्थिती पाहता शाळांना सुट्टी जाहीर
Anchor :- भंडारा जिल्ह्यात 3 दिवसापासून पावसाची सततधार सुरू आहे. जिल्ह्यात अनेक भागात अचानक पूरसदृश्य परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यानुषंगाने भारतीय हवामान खाते यांनी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. तसेच अनेक तालुक्यातील रस्ते मार्ग हे पुराच्या पाण्याने प्रभावित झाले असून जिल्ह्यातील 81 रस्ते हे पुरामुळे वाहतुकीस बंद करण्यात आलेले आहे. भंडारा जिल्हयात कोणत्याही प्रकारची अनुचित घटना घडू नये तसेच अतिवृष्टीमुळे आपतकालीन परिस्थिती निर्माण झाल्यास त्याचा परिणाम शालेय विद्यार्थ्यांवर होऊ नये या करिता जिल्हयातील सर्व अंगणवाडी, शाळा व महाविद्यालये मधिल विद्यार्थाना उद्या जाहीर करण्यात आली आहे.
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 16:00:17Gadchiroli, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_GAD_TEAMS_READY
( single file sent on 2C)
टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती, एकूण 22 मार्ग झालेत बंद, आपत्ती व्यवस्थापन दले सज्ज, जिल्ह्यात 24 तासात 42 मिलिमीटर सरासरी पावसाची नोंद, उत्तर गडचिरोलीत सर्वाधिक पाऊस
अँकर:--गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात असून आपत्ती प्रतिसाद दल सज्ज ठेवण्यात आले आहे. वैनगंगा नदीच्या पुराने अन्य उपनद्या देखील पात्र सोडत आहे. गडचिरोली ते नागपूर (आरमोरी) मार्ग बंद असून, पर्यायी मार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे. गोसीखुर्द धरणातून पाणी सोडण्यात आल्यामुळे गडचिरोलीपर्यंत सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. जिल्ह्यातील एकूण 22 राष्ट्रीय आणि जिल्हा मार्ग बंद झाले आहेत.
पुरामुळे बंद असलेले मार्ग दि.09.07.2025
वेळ सायंकाळी 5.00 वा.
1) गडचिरोली ते आरमोरी रस्ता राष्ट्रीय महामार्ग 353 सी (पाल नदी, कोलांडी नाला, गाढवी नदी)
2) गडचिरोली चामोर्शी राष्ट्रीय महामार्ग 353 सी (गोविदपुर नाला, शिवणी नाला)
3) कुरखेडा वैरागड रस्ता राज्यमार्ग 377 तालुका आरमोरी / कुरखेडा
4) अहेरी वटरा बेजुरपल्ली परसेवाडा रस्ता राज्यमार्ग 370 (वटरा नाला) तालुका अहेरी
5) मांगदा ते कलकुली प्रजिमा 50 तालुका आरमोरी
6)कढोली ते उराडी रस्ता प्रजिमा 7 ता.कुरखेडा (लोकल नाला )
7) चातगाव रांगी पिसेवाडा रस्ता प्रजिमा 36 तालुका आरमोरी
8) शंकरपूर जोगीसाखरा कोरेगाव चोप रस्ता प्रजिमा 1 तालुका देसाईगंज
9) आष्टी उसेगाव कोकडी तुलसी कोरेगाव रस्ता प्रजिमा 49 तालुका देसाईगंज
10) वैरागड देलनवाडी रस्ता प्रजिमा 8 तालुका आरमोरी
11) चौडमपल्ली चपराळा रस्ता प्रजिमा 53 तालुका चामोर्शी
12) अरसोडा कोंढाळा कुरूड वडसा रस्ता प्रजिमा 47 तालुका देसाईगंज
13) भेंडाळा बोरी अनखोडा रस्ता प्रजिमा 17 (हळदीमाल नाला, अनखोडा नाला) तालुका चामोर्शी
14) शिवणी चंदागड शिरपूर रस्ता प्रजिमा 35 तालुका कुरखेडा
15) अमिर्झा मौसिखांब रस्ता प्रजिमा 57 तालुका गडचिरोली
16) वडसा वळण मार्ग प्रजिमा 41 तालुका देसाईगंज
17) आरमोरी जोगीसाखरा शंकरनगर रस्ता प्रजिमा 48 तालुका आरमोरी (गाढवी नदी)
18) चामोर्शी मार्कंडादेव रस्ता प्रजिमा 37 तालुका चामोर्शी
19) खरपुंडी दिभना बोदली रस्ता प्रजिमा 44 तालुका गडचिरोली
20) वडसा नैनपुर कोकडी रस्ता प्रजिमा 32 तालुका देसाईगंज
21) आरमोरी अरसोडा रस्ता प्रजिमा- 47 तालुका आरमोरी
22) वेलतूर ते एकोडी रस्ता प्रजिमा,- 55 तालुका चामोर्शी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
गडचिरोली
14
Share
Report
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 14:35:17Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_SCHOOL_HOLIDAY
( single file sent on 2C)
टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात उद्या सुट्टी जाहीर, तालुक्यातील सर्व शाळा, महाविद्यालय यांना जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने उद्या देण्यात आली सुट्टी
अँकर:-- भारतीय हवामान खात्याने चंद्रपूर जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता वर्तविली आहे. गोसीखुर्द प्रकल्पाच्या कार्यकारी अभियंत्यांकडून प्राप्त माहितीनुसार धरणाच्या पाणलोट क्षेत्रात झालेल्या अतिवृष्टीमुळे वैनगंगा नदीपात्रामध्ये पूरनियंत्रणासाठी 16,500 ते 18,000 क्यूमेक्स पाण्याचा विसर्ग वाढविण्यात येणार आहे. मागील दोन दिवसांपासून ब्रह्मपुरी तालुक्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. परिणामी, नदीपात्रातील पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणावर वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने कोणतीही अनुचित घटना टाळण्यासाठी व संभाव्य आपत्कालीन परिस्थितीचा विचार करून, ब्रह्मपुरी तालुक्यातील सर्व अंगणवाड्या, पूर्व प्राथमिक, प्राथमिक व माध्यमिक शाळा, विद्यालये, महाविद्यालये तसेच खाजगी कोचिंग क्लासेस यांना दिनांक 10 जुलै 2025 रोजी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. हा आदेश फक्त ब्रह्मपुरी तालुक्यात लागू राहील. जिल्ह्यातील अन्य तहसीलांतील शाळा व शिक्षणसंस्था सुरू राहतील. या कालावधीत सर्व मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी कार्यालयीन वेळेत शाळेत उपस्थित राहून स्थानिक प्रशासनाच्या सूचनेनुसार आपत्ती व्यवस्थापनाचे कामकाज पार पाडावे, अशाही सूचना देण्यात आल्या आहेत.
बाईट १) सतीश मसाल, तहसीलदार, ब्रम्हपुरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
14
Share
Report
JMJAVED MULANI
FollowJul 09, 2025 14:35:02Baramati, Maharashtra:
JAVEDMULANI
SLUG 0907ZT_DAUNDCRIME
BYTE 1
दौंडमध्ये वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करून 1लाख 88 हजाराचा ऐवज लंपास..
Anchor:—दौंड तालुक्यातील देऊळगावराजे गावात रात्रीच्या सुमारास तीन अनोळखी चोरट्यांनी घरात घुसून वयोवृद्ध दांपत्याला मारहाण करत तब्बल 1 लाख 88 हजार रुपयांचे दागिने आणि रोकड लुटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. 75 वर्षीय पोपट अप्पासाहेब अवचर आणि त्यांच्या पत्नीला मारहाण करून त्यांच्या जवळील सोन्याचे मंगळसूत्र गंठण, कर्णफुले,चांदीचे जोडवे आणि रोख रक्कम चोरट्यांनी जबरदस्तीने काढून घेतली. त्यानंतर घरातील पेटीतील दागिन्यांवरही हात साफ केला. मात्र आरोपी फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
बाईट:पोपट अवचर
14
Share
Report
VKVISHAL KAROLE
FollowJul 09, 2025 14:34:52Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:
csn university issue avb
feed attached
विद्यापीठाच्या उपकुलसचिव डॉ हेमलता ठाकरे यांचा आत्महत्येचा प्रयत्न...
औषधी गोळ्यांचा ओव्हरडोस घेतल्यानंतर बेशुद्ध अवस्थेत खोलीत आढळल्या...
मुलाने वेळीच रुग्णालयात दाखल केल्याने वाचला जीव, मात्र अजूनही ठाकरे शुद्धीत नाही...
संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू..
डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात उपकुल सचिव पदावर ठाकरे या कार्यरत..
काही दिवसापूर्वीच विद्यापीठातील अधिकाऱ्यांवर ठाकरे यांनी गंभीर आरोप केला होता.
त्यांच्या खोलीत आढळली सुसाईड नोट, सुसाईड नोटमध्ये विद्यापीठाच्या दोन मोठ्या अधिकाऱ्यांचे नाव...
बदली झाल्यावर शिपाई दिला नसल्याने फाईलचे भले मोठे गठ्ठे डोक्यावर घेऊन नवीन कार्यालयात जात असल्याचा ठाकूर यांचा व्हिडिओ काही दिवसांपूर्वी व्हायरल झाला होता
*सुसाईड नोटमध्ये काय लिहले आहे...*
मला संसार करताना जेवढा त्रास झाला नाही तेवढा त्रास ऑफिसमध्ये होत आहे. ऑफिसमधील अधिकारी मुद्दामहून मला त्रास देत आहे. त्यांच्या या सततच्या त्रासामुळे माझी जगण्याची इच्छा संपली आहे. कुलगुरू विजय फुलारी आणि प्राध्यापक प्रशांत अमृतकर दोघे मिळून गेल्या काही महिन्यांपासून खूप त्रास देत आहे. आई मला सांगायची कितीही त्रास झाला तर सहन करायचं. तुमच्या या संस्कारामुळे माझे हात बांधले होते. पण या दोन्ही अधिकाऱ्यांनी मिळून ऑफिसचे साहित्य चोर म्हणून माझ्यावर पोलीस ठाण्यात केस केली. ते माझ्या मनाला खूप लागला आहे आई... माझ्यावर घेतलेला हा आळा घेऊन पुढे मी जगू शकणार नाही. ऑफिसमध्ये मी खूप प्रामाणिकपणे काम केलं मात्र त्याचा काहीही उपयोग झाला नाही. जोडीदाराशिवाय मी एकट जीवन जगत आहे, हे ऑफिसमधल्या लोकांना माहीत होतं. वरच्या अधिकाऱ्यांकडे मी या दोघांविरोधात तक्रारी केल्या होत्या. पण फुलारी यांचे पोलीस दलात मोठ्या पदावर नातेवाईक नोकरीला आहे. त्यांचे सगळ्या ऑफिसमध्ये आणि मंत्रालयात मित्र व नातेवाईक आहे. ते मला कधीच मदत करणार नाही. प्रशांत अमृतकरचे पण आहेत. त्यामुळे त्यांचे कुणीही काहीही करू शकत नाही. माझ्या तक्रारीची दखल ना पोलिसांनी घेतली, ना विद्यापीठातील मोठ्या अधिकाऱ्यांनी घेतली. यापुढे मला ते खूप त्रास द्यायला सुरुवात करतील. मग आता जगून काय करू, यांना देव कधीच माफ करणार नाही. ते मला नोटीस यासाठी देतात की मी विद्यापीठ सोडावा किंवा जीव, अशी परिस्थिती निर्माण करतात. मी त्यांची इच्छा पूर्ण करत आहे....
13
Share
Report
SKSACHIN KASABE
FollowJul 09, 2025 14:32:01Pandharpur, Maharashtra:
09072025
slug - PPR_COLLECTOR_WORKER
feed on 2c
file 03
------
Anchor - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची स्वच्छता कामगारांविषयी कृतज्ञता, त्यांच्या घरी जाऊन मानले आभार
आषाढी वारीमध्ये स्वच्छता हा प्रमुख मुद्दा असतो. पंढरपूर शहरात मेहतर समाजाचे सफाई कामगार वर्षानुवर्ष हे काम एक सेवा म्हणून करत आले आहेत. सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी या सफाई कामगारांच्या घरी जाऊन त्यांच्या या कामा बद्दल कृतज्ञता व्यक्त केली. तसेच त्यांच्या घरी चहा नाश्ता घेतला. जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांच्या या साधेपणाच्या माणुसकीचे कौतुक होतं आहे.
15
Share
Report
SNSWATI NAIK
FollowJul 09, 2025 14:30:53Navi Mumbai, Maharashtra:
story slug - नवी मुंबईत उडता पंजाब
navi mumbai drugs action
FTP slug - nm drugs story
byet- acp
shots-
reporter- swati naik
navi mumbai
anchor - नवी मुंबई पोलिसांना मिळालेल्या माहिती वरून नवी मुंबईतील बेलापूर मधील एका लॉज वरून धाड टाकून दोन संशयित व्यक्तींना ताब्यात घेतले असता, त्यांच्याकडे 40 ग्राम वजनाचे हेरॉईन ड्रग्स आढळून आले. दोघानाही पोलिसांनी अटक करून कसून चौकशीत आणखी सात आरोपी निष्पन्न झाले. त्यांच्याकडेही 80 ग्रााम हेरॉईन ड्रग्स सापडले,असे एकूण 45 लाख किमतीचे 120 ग्राम हेरॉईन ड्रग्स सापडले.या कारवाईत एकूण 9 आरोपी अटक केले असून नवी मुंबईतील अनेक ठिकाणी विक्री करण्यासाठी थेट पंजाब मधून आणलेले ड्रग्स पोलिसांनी कारवाई करून हस्तगत केले.तर याबाबत आणखी सखोल तपास सुरू असल्याचे सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक राजपूत यांनी सांगितले....
बाईट - अशोक राजपूत
सहाय्यक पोलीस आयुक्त पनवेल
14
Share
Report
PNPratap Naik1
FollowJul 09, 2025 14:30:34Kolhapur, Maharashtra:
Kop Bendur
Feed:- 2C
Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील बसर्गे गावात महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त सदृढ बैल जोडी स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. गेल्या 21 वर्षापासून आयोजित करण्यात आलेल्या स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. बसर्गे गावातील बाळेश नाईक यांच्या पुढाकाराने आयोजित केलेल्या सदृढ बैल जोडी स्पर्धेत पंचक्रोशीतील ४० हून आधीक स्पर्धकाने सहभाग नोंदवला. या स्पर्धेत सहभागी झालेल्या बळीराजांने बैलांना रंगीबेरंगी हार घालून फुलांनी सजविले होते. शेतीच्या मशागतीची कामे पूर्ण झाल्यानंतर महाराष्ट्रीयन बेंदूरच्या निमित्ताने या स्पर्धा भरवल्या जातात. स्पर्धेतील विजेत्याना राष्ट्रवादीचे नेते राजेश पाटील यांच्या हस्ते 1 लाख रुपयांचे बक्षीस देवून गौरवण्यात आले..
14
Share
Report
NMNITESH MAHAJAN
FollowJul 09, 2025 13:36:05Jalna, Maharashtra:
FEED NAME | 0907ZT_JALNA_CRIME(3 FILES)
जालना : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत, दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात
अँकर : तलवार बाळगून इन्स्टाग्राम वर व्हिडीओ व्हायरल करून दहशत माजवण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी दोन आरोपीना ताब्यात घेतलं आहे.संभाजी जऱ्हाड आणि विशाल धोंगडे अशी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावं आहेत.यातील संभाजी जऱ्हाड याने त्याचा मित्र विशाल धोंगडे याच्याकडील तलवार आणून व्हिडीओ तयार करून हा व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर अपलोड करून दहशत पसरवली.त्यामुळे पोलिसांनी दोन्हीही आरोपींना ताब्यात घेत त्यांच्यावर गुन्हा दाखल करत तलवार जप्त केली आहे.तसेच तालुका पोलीस ठाण्यात आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणी अधिक चौकशी करत आहेत.
बाईट : पंकज जाधव,पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा,जालना
15
Share
Report
MNMAYUR NIKAM
FollowJul 09, 2025 13:08:18Buldhana, Maharashtra:
बुलढाणा पिसाळलेल्या कुत्र्याचा हैदोस; दिसला त्याला चावला ; जिल्हा सामान्य रुग्णालयात गर्दी; 14 जणांना घेतला चावा.
Anchor- बुलढाणा शहरामध्ये पिसाळलेल्या कुत्र्याने आज दिवसभरापासून चांगलाच हैदोस घातला आहे.. शहरातील संगम चौक परिसरातील जिजामाता प्रेक्षागार जयस्तंभ चौक हिरवे पेट्रोल पंप या परिसरात आणि विविध भागातील तब्बल 14 जणांना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चावा घेतला आहे..जिल्हा सामान्य रुग्णालयात आज सकाळपासून एकापाठोपाठ एक रुग्ण दाखल झाले यामध्ये लहान बालके युवक व महिलांचाही समावेश आहे.. हे रुग्ण कुत्रा चावल्यामुळे रुग्णालयात दाखल झाले होते.. सर्वांना चावणारा कुत्रा एकच असल्याने या कुत्र्याला स्थानिकांनी युवकांनी मारून टाकल्याचेही सांगण्यात आले आहे.. तर जखमी असलेल्या 14 जणांवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे..
बाईट-डॉ. भागवत भुसारी,अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक..
13
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 13:08:10Ambernath, Maharashtra:
उल्हासनगरात तरुणाने दुकानातील मोबाईल आपटून फोडले
ईएमआयवर मोबाईल न दिल्याच्या रागातून कृत्य
संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद
Ulh mobile
Anchor : उल्हासनगरात एका तरुणाने मोबाईलच्या दुकानातील काउंटरमध्ये ठेवलेले मोबाईल आपटून फोडल्याची घटना घडली आहे. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Vo : उल्हासनगरच्या कॅम्प ५ भागातील एका मोबाईलच्या दुकानात ७ जुलै रोजी हा प्रकार घडला. या दुकानात अतुल नावाचा एक तरुण मोबाईल घेण्यासाठी आला आणि त्याने ईएमआयवर मोबाईल मागितला. मात्र दुकानदाराने आमच्याकडे ईएमआय वर मोबाईल मिळत नाही, असं त्याला सांगताच त्याला राग आला. याच रागातून त्याने दुकानदाराला शिवीगाळ करत काउंटरमध्ये ठेवलेले २ मोबाईल आपटून फोडले. हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून याप्रकरणी हिललाईन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर
14
Share
Report