Back
पिंपरीतील 33 सराईत गुन्हेगार तडीपार, कायदा आणि सुव्यवस्थेचा महत्त्वाचा निर्णय!
KPKAILAS PURI
FollowJul 09, 2025 05:03:20
Pune, Maharashtra
pimpri tadipar
kailas puri pune 9- 7- 25
feed by 2c
Anchor - पिंपरी- चिंचवड पोलीस आयुक्तालयातून 33 सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय, ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्या आदेशानंतर करण्यात आली, पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 मधून 15 आणि परिमंडळ 2 मधून 18 सराईत गुन्हेगारांना दोन वर्षांकरिता पुणे जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलय, काही जणांवर एक वर्षांकरिता ही कारवाई करण्यात आली, काही महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महानगर पालिकेच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई करण्यात आली अस म्हटलं तरी वावग ठरणार नाही.
14
Share
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
AAASHISH AMBADE
FollowJul 09, 2025 10:34:07Chandrapur, Maharashtra:
Feed slug :--- 0907ZT_CHP_FLLODY_VILLAGE
( single file sent on 2C)
टायटल : वैनगंगेच्या पुराचा चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका, बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज
अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात वैनगंगा नदीला आलेल्या पुराचा ब्रह्मपुरी तालुक्यातील 8 गावाना फटका बसलाय. ग्रामस्थांच्या मदतीसाठी बचाव पथकांसह जिल्हा प्रशासन सज्ज झालंय. गोसेखुर्द धरणामधून वैनगंगा नदीत सध्या मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू आहे. वाढत्या पाण्याचा फटका चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रह्मपुरी तालुक्याला बसलाय. नदीकिनारी असलेली लाडज, पिंपळगाव भोसले, भालेश्वर, चिखलगाव, अरहेर नवरगाव आणि बेलगाव आदी गावं प्रभावित झाली आहेत. सध्या 14 कुटुंबांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं असून गरज पडल्यास आणखीही लोकांना हलविले जाणार आहे. वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत सातत्याने वाढ होत असून ब्रह्मपुरी तालुक्यातल्या अनेक नदी-नाल्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ झाली आहे. मुडझा-गांगलवाडी आणि गांगलवाडी-आरमोरी मार्गावरील वाहतूक ठप्प झाली असून वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ झाल्यास तालुक्यात पूर परिस्थिती उद्भवू शकते. त्यामुळे जिल्हा प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापनाची टीम परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहे.
चंद्रपूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 67.8 मिलिमीटर पाऊस नोंदविण्यात आलाय. चिमूर तालुक्यात 151 मिलिमीटर, ब्रह्मपुरी तालुक्यात 145 मिलिमीटर, नागभीड तालुक्यात 150 आणि सिंदेवाही तालुक्यात 92 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
बाईट १) सतीश मसाल, तहसीलदार, ब्रह्मपुरी
आशीष अम्बाडे
झी मीडिया
चंद्रपूर
0
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 10:33:52Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_MNS_TOLL_RADA_POLICECASES
रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशिम
अँकर:अकोला-नांदेड राष्ट्रीय महामार्गावरील वाशिम जिल्ह्यातील तोंडगाव टोल प्लाझावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन करत टोल प्लाझाची तोडफोड केली. टोल प्लाझावर प्रवाशांसाठी आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध नसतानाही टोल आकारला जात असल्याच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. मनसे कार्यकर्त्यांनी टोल प्रशासनावर प्रवाशांना कोणत्याही प्रकारच्या सुविधा न देता नियमितपणे टोल वसूल केल्याचा आरोप केला.या तोडफोडीच्या घटनेनंतर पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्यांचा शोधा टीम तयार करण्यात आलं असल्याची माहिती वाशिमचे पोलिस अधीक्षक तारे यांनी दिली.दरम्यान,या आंदोलनाचे मनसेचे वाशिम जिल्हाध्यक्ष राजू किडसे यांनी समर्थन केले असून, “सुविधा नसताना टोल आकारला जात आहे,त्यामुळे कार्यकर्त्यांनी योग्य ती प्रतिक्रिया दिली,” असे त्यांनी म्हटले.
बाईट: अनुज तारे,पोलीस अधीक्षक वाशिम
बाईट:राजू किडसे,मनसे जिल्हाध्यक्ष
1
Share
Report
PTPRAVIN TANDEKAR
FollowJul 09, 2025 10:30:51Bhandara, Maharashtra:
Pravin Tandekar Bhandara
Slug - 0907_BHA_SDRF
FILE - 2 VIDEO, 4 IMAGE
पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना SDRF च्या पथकाने काढले सुखरूप बाहेर....
Anchor :- भंडारा जिल्ह्यात तीन दिवसापासून पावसाची संततदार सुरू होती त्यामुळे जिल्ह्यातील नदी नाले ओसंडून वाहत आहेत तर काही गावांना पुराच्या पाण्याने वेळा दिलेला आहे. त्याकरिता जिल्हा परिषदेच्या वतीने जिल्ह्यात सहा शोध पथक व बचाव पथक कार्यरत आहेत.
SDRF 02 पथक, DDRF 02 पथक
होमगार्ड 2 पथक, कार्यरत ठेवण्यात आलेले आहेत. तर भंडारा शहराला लागून भोजापूर येथे काही लोक पुराच्या पाण्यात अडकलेली होती त्यांना पुरातून बाहेर काढण्याकरीता SDRF शपथकाने बचाव कार्य करत त्यांना सुरक्षित ठिकाणी हलविलेले आहे.
0
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 09, 2025 10:30:44Yavatmal, Maharashtra:
Anchor : यवतमाळ मध्ये 3 दिवसांपासून सततधार पाऊस सुरु असल्याने मारेगाव तालुक्यातील कोसारा वर्धा नदीवरील पूल पाण्याखाली आला आहे. पुलावरून दोन ते तीन फूट पाणी वाहत असल्याने राळेगाव- वडकी- खैरी- कोसारा- वरोरा- चंद्रपूर मार्ग बंद पडला आहे.
पुराचे पाणी अनेक शेतामध्ये शिरले असून शेटपिकांचे मोठे नुकसान होतं आहे.
0
Share
Report
KJKunal Jamdade
FollowJul 09, 2025 09:44:28Shirdi, Maharashtra:
Anc - साईंच्या शिर्डीत तीन दिवसीय गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो आहे.आज उत्सवाचा पहिला दिवस असून आजपासून उत्सवाला सुरुवात झाली आहे.यंदाच्या गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई मंदिर परिसरात साई भक्तांचे लक्ष वेधून घेणारे साईबाबांच्या फोटोंचे प्रदर्शन गुजरात येथील साईभक्त जिज्ञेश रजपूत यांनी भरवलय.. साई भक्त रजपुत यांनी साईबाबांच्या जुन्या आठवणींना उजाळा देत साईबाबांचे हयातीत असताना पासूनच्या फोटोंची सामग्री करत त्याचबरोबर पुस्तकांमधून आणि सोशल मीडियाहून सर्व जुने आणि नवीन फोटो एकत्र करत जवळपास 1800 ते 2000 फोटोंचे प्रदर्शन या साईभक्तानी भरवलय.. या प्रदर्शनाच्या माध्यमातून सुरत येथील साईभक्ताने साईबाबांच्या जुन्या आणि नवीन आठवणींना उजाळा दिलाय.. साई मंदिर परिसरामध्ये भरवलेलं हे प्रदर्शन सर्व साई भक्तांचे लक्ष वेधून घेतय..प्रदर्शनाच्या ठिकाणांहून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
wkt/121 कुणाल जमदाडे साईभक्त
9
Share
Report
HPHARSHAD PATIL
FollowJul 09, 2025 09:43:59Palghar, Maharashtra:
पालघर - पालघरच्या डहाणू नरपड परिसरात बिबट्याचा वावर . बिबट्याचा मुक्त संचार नरपड येथील कल्पेश पाटील यांच्या वाडीत लागलेल्या कॅमेरात कैद . काल पहाटे याच बिबट्याकडून गोठ्यातील वासरावर जीवघेणा हल्ला . हल्ल्यात वासराचा जागीच मृत्यू . मागील अनेक महिन्यांपासून या परिसरात असलेल्या बिबट्याच्या वावरामुळे स्थानिकांमध्ये भीतीच वातावरण . बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अपयश .
9
Share
Report
SRSHRIKANT RAUT
FollowJul 09, 2025 09:43:46Yavatmal, Maharashtra:
Anchor : बच्चू कडू यांची सातबारा कोरा यात्रा सततधार पावसामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सुरू आहे. धो धो पावसात गाव खेड्यामध्ये शेतकरी या पदयात्रेत सामील होत आहेत. हिंदी सक्तीचा जीआर मराठी भाषिकांचा मोर्चा निघण्याआधीच रद्द झाला मात्र रोज शेतकरी मरत असताना सरकार मात्र किंतु परंतु ची भाषा करीत असल्याने, आता लाठीकाठी, रुमणे घेऊन एकजूट करा आणि सरकारला हिसका दाखवा असे आवाहन बच्चू कडू यांनी केले. उपोषण, पदयात्रा झाल्यावरही सरकार कर्जमाफी देत नसेल तर गांधी जयंतीला भगतसिंग गिरी करू असाही ईशारा बच्चू कडू यांनी दिला.
बाईट : बच्चू कडू
6
Share
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowJul 09, 2025 09:40:05Beed, Maharashtra:
बीड: खाकीतला चोर "अधिकारी"; पोलिस दलाची प्रतिमा डागाळली...!
Anc- अत्यंत विनम्र आणि संयमी म्हणून त्या अधिकाऱ्याची ओळख होती. मात्र तो चोरीच्या भूमिकेत आढळल्याने अनेक पोलीस अधिकारांच्या भवया उंचावल्या आहेत. ऑनलाइन गेम चा नादात कर्जबाजारी झालेल्या पोलीस अधिकाऱ्यानेच चक्क चोरीचा मार्ग पत्करला... मात्र म्हणतात ना पोलिसांचे हात चार हात पुढे त्याच प्रमाणे स्वतः पोलीस अधिकारी असून देखील स्वतःच्याच डिपार्टमेंटला चकवा देण्यात तो अपयशी ठरला. पाहुयात बीडच्या एका अधिकाऱ्याचा चोरटा प्रवास....!!
Vo 1 -----
खाकी वर्दीत फोटो दिसणारा हा अधिकारी बीड पोलीस दलाच्या तांत्रिक विभागात asi पदावर आहे... अत्यंत संयमी आणि विनम्र असा स्वभाव असलेल्या या अधिकाऱ्याच्या हातात बीड पोलिसांनीच बेड्या ठोकल्या आहेत. अमित सुतार असं या अधिकाऱ्याचे नाव आहे. .. ऑनलाइन गेम खेळण्यात तो कर्जबाजारी झाला आणि त्याने चोरीचा मार्ग पत्करला .. कर्ज फेडण्यासाठी त्याने चक्क दुचाकी चोरीला सुरुवात केली. बीड परिसरात स्वस्त दराने दुचाकी विकली जात असल्याची खबर बीडच्या स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. त्यानंतर पोलिसांनी रंगेहात दुचाकी विकताना आरोपीसह समान पकडले. त्यांची चौकशी केली असता धक्कादायक माहिती समोर आली. सदर गाड्या या इस्मानी नाही तर बीडमधल्या तांत्रिक पदावर असलेल्या अमित सुतार या अधिकाऱ्याने चोरले असल्याचे समोर आले.
बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड
Vo 2 ------
आरोपी अमित सुतार याचा दुचाकी चोरण्याचा हा पहिलाच गुन्हा नाही. तर या आधीही अमित सुतारने जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील तांत्रिक विभागातील तब्बल आठ बॅटऱ्या चोरून विक्री केल्या होत्या. याप्रकरणी त्याला बीड पोलिसांनी अटक देखील केली होती. त्याचे निलंबन ही झाले होते. अशातच आर्थिक परिस्थिती ढासळल्याने अमित सुताऱ याने पुन्हा एकदा चोरीचा मार्ग अवलंबला. पोलिसांनी आता त्याला बेड्या ठोकले आहेत. अमित सुतार आणि त्याचे दोन सहकारी सध्या बीड पोलिसांच्या कोठडीत आहेत. अमित सुतार याने आणखीन किती चोऱ्या केल्यात याचा तपास आता बीड पोलीस करत आहेत...
बाईट: शिवाजी बंटेवाड, पोलिस निरीक्षक बीड
Vo 3 -----
सर्वसामान्यांना न्याय मिळावा आणि पोलिसांची प्रतिमा पारदर्शक व्हावी यासाठी बीडचे जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावंत यांनी अनेक संकल्पना राबवून पोलीस दल पारदर्शक करण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे त्यांच्याच दलातील पोलीस अधिकारी आरोपीच्या कठड्यात उभा आहे. एखाद्या व्यक्तीला जुगाराचे व्यसन लागल्यानंतर तो गुन्ह्याची वाट कशी धरतो हे पोलिस अधिकारी अमित सुतार याच्याकडे पाहिले असता लक्षात येईल. त्यामुळे जुगारासारखे व्यसन किती घातक असते हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे...
END PTC
MAHENDRAKUMAR MUDHOLKAR, BEED
10
Share
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowJul 09, 2025 09:35:25Ambernath, Maharashtra:
१२ वर्षीय मुलाला मारहाण ,लिफ्ट मध्ये केली मारहाण
संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद,
Amb boy beating
Anchor एका बारा वर्षीय मुलाला लिफ्ट मध्ये मारहाण केल्याचा संताप जनक प्रकार समोर आला आहे , अंबरनाथ शहरातील पालेगावच्या पटेल जी १ या इमारतीतील लिफ्ट मध्ये एक इसम एका 12 वर्षे मुलाला मारहाण करत आहे . हा मारहाणीचा प्रकार लिफ्ट मधील सीसीटीव्ही कॅमेरा झाला , अंबरनाथच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात या प्रकरणात तक्रार दाखल झाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत ,मात्र त्या चिमुकल्याला मारहाण का करण्यात आली हे मात्र समजू शकले नाही
चंद्रशेखर भुयार , आंबरनाथ
5
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 09:33:57Manmad, Maharashtra:
अँकर :-
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या विषयी आमदार गोपीचंद पडळकर यांनी गलिच्छ भाषेत वक्तव्य केले आहे भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांनी मराठी भाषेचा अपमान केला आहे या दोघांवरही गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे मनमाड यांच्या वतीने निषेध व्यक्त करण्यात आला आहे दरम्यान या मागणीचे निवेदन मनमाड पोलिसांना देण्यात आले.
7
Share
Report
SKSudarshan Khillare
FollowJul 09, 2025 09:33:50Manmad, Maharashtra:
अँकर:-मुबंईत सुरु असलेल्या विधानसभा अधिवेशनात महायुती सरकार जन सुरक्षा कायदा विधेयक आणण्याच्या तयारीत असून हा कायदा लागू करण्यात येऊ नये यासह इतर विविध मागण्या सोबत कामगार संघटनानी पुकारलेल्या आज भारत बंदला पाठिंबा देण्यासाठी मनमाडला सिटू कामगार संघटना आणि अखिल भारतीय किसान सभे तर्फे निषेध मोर्चा काढण्यात आला. जन सुरक्षा कायदा अन्याय करणारा ठरणार आहे त्यामुळे हा कायदा लागू करण्यात येऊ नये, तसेच केंद्र सरकार सर्वच क्षेत्रात खाजगी कारण करण्याचा डाव आखत असल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. मोर्चात मोठया संख्येने कामगार, शेतकरी आणि नागरिक सहभागी झाले होते..
6
Share
Report
GMGANESH MOHALE
FollowJul 09, 2025 09:33:02Washim, Maharashtra:
वाशिम:
File:0907ZT_WSM_WATER_LEVEL
रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम
अँकर: वाशिम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून सांतधार पावसाने हजेरी लावली आहे.या मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील नद्या आणि नाले दुथडी भरून वाहत आहेत. विशेषतः वाशिम आणि हिंगोली जिल्ह्याच्या सीमेवर असलेली पैनगंगा नदी पूर्ण क्षमतेने वाहत असून, प्रकल्पांमधील पाणीपातळी झपाट्याने वाढत आहे.जिल्ह्यात आतापर्यंत सरासरीपेक्षा जास्त पावसाची नोंद झाली आहे, जास्त पावसामुळे जरी जलसाठ्यात भर पडत असली,तरी दुसरीकडे शेतकरी मात्र चिंतेत आहेत.शेतात पाणी साचण्याचे प्रमाण वाढले असून, त्यामुळे उभ्या पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली जातं आहे.
4
Share
Report
SMSATISH MOHITE
FollowJul 09, 2025 09:10:17Nanded, Maharashtra:
Satish Mohite
Slug - Ned_Kidnapping
Feed on - 2C
---------------------------
Anchor - चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीला पळवून नेणाऱ्या आरोपीला महिना उलटूनही अटक न केल्याने नांदेड जिल्ह्यातील हदगाव मध्ये बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेतर्फे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढण्यात आला. हदगाव तालुक्यातील एका चौदा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचे 6 जून रोजी अपहरण करण्यात आले होते. या प्रकरणी आरोपिंवर अपहरणासह पोकसो आणि इतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील एका आरोपीला पोलिसांनी अटक केली पण मुख्य आरोपीला महिना उलटूनही अटक करण्यात आली नाही. महिना उलटूनही आरोपीला अटक न करण्यात आल्याने बजरंग दल आणि विश्व् हिंदू परिषदेने हदगाव पोलीस ठाण्यावर मोर्चा काढला. अपहरण आणि पोकसो सारख्या कलमांतर्गत गुन्हा दाखल होऊनही आरोपीला अटक होत नसल्याने पोलीस तपासावर प्रश्नचीन्ह निर्माण होत आहे. तपास अधिक-र्यावर कारवाई करावी अशी मगणी यावेळी मोर्चेकऱ्यांनी केली. लव्ह जिहाद मधून हे अपहरण झाल्याचा आरोपही करण्यात आला.
Byte - मोर्चेकरी
----------------------------
13
Share
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowJul 09, 2025 09:05:41Raigad, Maharashtra:
स्लग - सरकारी कर्मचारी , शिक्षकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा .......
अँकर - सरकारी कर्मचारी आणि शिक्षक यांच्या प्रलंबित मागण्यांसाठी आज रायगड जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. संघटना सदन इथून निघालेल्या मोर्चाची हिराकोट तलावाजवळ सांगता झाली. सुधारित पेन्शन संदर्भातील निर्णयाची अंमलबजावणी करावी, विनाअनुदानित शाळांना अनुदान द्यावे, नवीन शैक्षणिक धोरणाचा पुनर्विचार करावा, तात्काळ पेन्शन योजनेचा लाभ मिळावा, जनसुरक्षा विधेयक रद्द करावे अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या. विविध शासकीय कार्यालयातील कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले होते. कर्मचारी, शिक्षक समन्वय समितीचे अध्यक्ष सुरेश पालकर, कार्याध्यक्ष कैलास चौलकर यांनी आंदोलनाचे नेतृत्व केलं.
11
Share
Report
JJJAYESH JAGAD
FollowJul 09, 2025 09:04:27Akola, Maharashtra:
4 फाईल्स आहेत..AVB
Anchor : अकोला जिल्ह्यात गेल्या ३ दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहेय..तर ९ जुलै ते १५ जुलैपर्यंत पाऊस पडण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहेय..अकोला जिल्ह्यातील पूर्णा, मोर्णा, निर्गुणा, काटेपूर्णा, मन, पठार, गौतमा आदी नदीकाठावरील गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहेय...पावसामुळे नदी, नाले व तळ्यांतील पाणीसाठ्यात वाढ झालीय त्यामुळे पाण्यात शिरण्याचे अनावश्यक धाडस करू नये असे आवाहन देखील प्रशासनाने केले आहेय...वीज व पावसापासून बचावाकरीता सुरक्षित ठिकाणी आश्रय घेण्यात यावा अशा स्थितीत झाडाखाली आश्रय घेऊ नये तर या कालावधीत रस्त्याचे अंडरपास, नाल्या, खड्डे, सखल भाग किंवा पाणी साठते अशा जागेवर जाणे टाळावे अशा सूचना देखील देण्यात आल्या आहेत..तर पूर आलेल्या पुलावरून जाऊ नये तर जनावरांना झाडांना किंवा वीजेच्या तारेखाली बांधू नये ,वीज चमकताना मोबाईल व वीज उपकरणे बंद ठेवावी , वाहन वीजेच्या खांबापासून दूर ठेवावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहेय..
Byte : राजेंद्र कौसल, हवामान विभाग , अधिकारी
10
Share
Report