icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला आलेगाव में बारिश से पानी सड़कों पर, ग्राम पंचायत के कामकाज पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला शहरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागात आज झालेल्या जोरदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला असला, तरी पातूर तालुक्यातील आलेगाव येथे ग्रामपंचायतीच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. आज झालेल्या पावसाने शेतकरी आणि नागरिकांना दिलासा दिला.मात्र आलेगावमध्ये पहिल्याच पावसात रस्त्यांना अक्षरशः तळ्याचे स्वरूप प्राप्त झाल्याने ग्रामपंचायतीच्या कामकाजाचा बोजवारा उडाल्याचे समोर आले आहे.आज दुपारच्या सुमारास अकोला जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. पातूर तालुक्यातील आलेगावमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात रस्त्यांवर साचले. नाल्यांची योग्य प्रकारे साफसफाई न झाल्याने नाल्यातील पाणी थेट रस्त्यांवर आणि काही ठिकाणी घरांच्या परिसरात शिरल्याचे चित्र पाहायला मिळाले. त्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय झाली.
0
0
Report

उद्धव ठाकरे की बैठक के लिए संजय देरकर की गैरहाजिरी, पालखी यात्रा का कारण

Yavatmal, Maharashtra:मुंबईत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बोलाविलेल्या आमदारांच्या बैठकीला अनुपस्थित असलेले यवतमाळच्या वणी विधानसभा मतदारसंघाचे आमदार संजय देरकर यांनी त्यांच्या गैरहजेरीचे कारण स्पष्ट केले आहे. मतदार संघातील नागरिकांचे श्रद्धास्थान जगन्नाथ महाराज यांची पालखी असल्याने, आणि या पालखीला उपस्थित राहण्याची परंपरा गेल्या वर्षापासून सुरू आहे. जाऊ शकलो नाही शिवाय 27 जूनला पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यवतमाळ मध्ये येत असल्याने सभेची तयारी देखील सुरू आहे. त्यामुळे या दोन्ही कार्यक्रमांचे नियोजन करून मुंबईसाठी रवाना होणार असल्याचे संजय देरकर यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

धुळे के तीन तालुकों में बारिश ने किसानों में खुशी ला दी

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील अनेक तीन तालुक्यामध्ये पावसाने हजेरी लावलेली आहे. शिरपूर शहरासह साक्री ,शिंदखेडा तालुक्यात विविध ठिकाणी वारासह पावसाने हजेरी लावली. आभाळाकडे डोळे लावून बसलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. उघळ्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना देखील अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्याने उकाडापासून काहीसा दिलासा मिळाला आहे. या पावसामुळे पेरणी केलेलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार असल्याने शेतकरी वर्गात आनंदाचे वातावरण आहे. जून महिना तीन आठवडे कोरडे गेल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली होती. परंतु आज झालेल्या पावसामुळे शेतकरी राजा सुखावला आहे.
0
0
Report

एसटी कर्मचारियों की वेतन-भत्ते मांगों पर ठोस निर्णय नहीं—आंदोलन 29 जून से अनिश्चितकालीन

Akola, Maharashtra:राज्य परिवहन महामंडळ (एसटी महामंडळ) के कर्मचारियों की लंबित आर्थिक मांगों के बारे में अभी ठोस निर्णय न हो पाने से कर्मचारियों में तीव्र नाराजगी है। इस पृष्ठभूमि पर संयुक्त क्रिया समिति ने आंदोलन का संकेत दिया है और 29 जून से राज्य भर में अनिश्चितकालीन धरना-हड़ताल शुरू करने जा रही है। 13 अक्तूबर 2025 को शासन के साथ हुई बैठक में वेतन-वृद्धि की बकाया राशि, महंगाई भत्ता, गृहभत्ता, राज्य सरकारी कर्मचारियों के अनुरूप वेतन-श्रेणी लागू करना, कैशलेस मेडिकल-फेसिलिटी आदि अन्य आर्थिक मांगों पर सकारात्मक निर्णय लेने का आश्वासन दिया गया था। लेकिन इसके बाद चुनाव आचारसंहिता के कारण अगली बैठक नहीं हो सकी, यह संयुक्त क्रिया समिति का कहना है। सरकार को तत्काल इन मांगे पूरी करनी होंगी, अन्यथा आंदोलन और तीव्र किया जाएगा, समिति ने चेतावनी दी है। आंदोलन के पहले चरण में 15 जून को घंटानाद और महाआरती का प्रदर्शन किया गया। आज, 22 जून को राज्यभर के डिपो में द्वारसभा कर कर्मचारियों ने अपनी मांगों पर सरकार का ध्यान खींचा। आगे भी निर्णय न होने पर 29 जून से केंद्रीय कार्यालय, विभागीय कार्यालयों और कार्यशालाओं के सामने अनिश्चितकालीन धरना शुरू किया जाएगा— संयुक्त क्रिया समिति के पदाधिकारीयों ने बताया।
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई हार्बर लाइन के तीन स्टेशन ट्रान्सफर सफल, सांसद नरेश म्हस्के के प्रयास

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील हार्बर लाईन वरील रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरणाचा मागील 18 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लागला मार्गी. नवी मुंबईतील तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचे झाले हस्तांतरण. तीनही रेल्वे स्थानकांचे सिडको कडून रेल्वे विभागाकडे करण्यात आले हस्तांतरण. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठा यश. रेल्वे स्थानकांवरील समस्यांचे निराकरण करणे होणार सुलभ, प्रवश्यांना होणार लाभ. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील इतर रेल्वे स्थकांचा देखिल पुढील 6 महिन्यात सिडको कडून रेल्वे कडे होणार हस्तांतरण.
0
0
Report

शिंदे के आदेश से Akola शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, नए चेहरों को अवसर पर चर्चा

Akola, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणी पुन्हा बरखास्त करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कार्यकारणी बरखास्त करण्यामागे पक्षातील अंतर्गत वाद कारणीभूत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेला अपयश यामागच कारण आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. आता पुढील काही दिवसांत नव्या कार्यकारिणीची घोषणा होते का आणि पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात कार्यकारिणी बरखास्त करण्याची ही दुसरी वेळ आहे..
0
0
Report
Advertisement

जयकुमार गोरे ने मित्र पक्षों को सूचक इशारा देकर हिशोब की नसीहत दी

Sangli, Maharashtra:स्लग - राजकारणामध्ये हिशोब ठेवायला शिकवलय-मंत्री जयकुमार गोरेंचा मित्र पक्षांना सुचक इशारा.. राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो,हे आम्हाला देवेंद्र फडणीस यांनी शिकवलंय,अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली-सातारा विधानसभेतील मत फुटींवर सूचक इशारा दिला आहे.राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो,पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो,अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतो हा वेगळा विषय आहे,पण राजकारणात हिशोब ठेवायला देवेंद्र फडणवीस यांनी शिकवलं आहे,असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटली आहेत,यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे. बाईट - जयकुमार गोरे - ग्रामविकास मंत्री.
0
0
Report

वाशिम में शिंदे गट प्रवेश से राजनीतिक हलचल तेज; ठाकरे 27 जून दौरे पर

Washim, Maharashtra:वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २७ जून रोजी वाशिम दौऱ्यावर येणार असून वाशिम जैन भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या तयारीसाठी झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय देशमुख यांच्यासोबत एकही प्रमुख पदाधिकारी जाणार नसल्याचा दावा सहसंपर्कप्रमुख सुधीर कव्हर यांनी केला असून, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त केला.
0
0
Report

चंद्रपुर में भारी बारिश ने गर्मी से राहत दी; ऑरेंज अलर्ट जारी

Chandrapur, Maharashtra:टायटल:---दीर्घ कालावधीनंतर चंद्रपुरात बरसला मुसळधार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा अँकर:-- आज सकाळपासून चंद्रपूरचे तापमान उष्ण असताना दुपारी अचानक आभाळ भरून येत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले 20 दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या चंद्रपूरकरांना पावसाने चिंब भिजविले. सात जून हा चंद्रपुरात पावसाचा आगमनाचा दिवस असताना यंदा पहिला मुसळधार पाऊस आज बरसलेला दिसला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाई तीव्र होत असताना जूनमध्ये पाऊस हजेरी लावणार की नाही अशी शंका शेतकरी व नागरिकांच्या मनात होती. मात्र आज सुमारे अर्धा तासापासून जोरदार पाऊस बरसत असून त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस असाच सातत्याने बरसत राहावा अशीच नागरिकांची इच्छा आहे. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता तो प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top