Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में मतदाता सत्यापन अब फेस रिकग्निशन से, पहली बार प्रयोग
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये मतदारांची पडताळणी आता 'फेस रिकग्निशन' द्वारे होणार; राज्यातील अशा प्रकारचा पहिलाच प्रयोग. विधान परिषदेच्या नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीत ६१९ मतदारांचा चेहरा स्कॅन करून होणार तपासणी. बोगस आणि दुबार मतदानाला आळा घालण्यासाठी 'सी डॅक' संस्थेने तयार केले विशेष मोबाईल ॲप. १८ जून रोजी होणार मतदान; तांत्रिक अडचण आल्यास नेहमीप्रमाणे मतदान करण्याची मुभा, राज्य निवडणूक आयोगाची तत्त्वतः मान्यता. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांचे विशेष पुढाकार; ॲपमुळे जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांना मतदानाची अचूक आकडेवारी जागेवरच मिळणार. दिव्यांग प्रमाणपत्र पडताळणीसाठी 'अल्टीमेटम'0
0
Report
Ratnagiri ke schoolon mein aaj 10 hazar naye chhaatriyon ka pehla kadam, school varsh ki shuruaat
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दहा हजार मुलांचे शाळेत पडणार आज पहिले पाऊल.. नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात.. अँकर यावर्षी नवीन शैक्षणिक वर्षाला आजपासून सुरुवात होत आहे.. शाळेतील विद्यार्थी संख्या वाढावी,विद्यार्थ्यांना शाळेची ओढ लागावी यासाठी शाळेत नव्याने दाखल होणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी नवगतांचे स्वागत हा उपक्रम शासनाने सुरू केला आहे.. जिल्ह्यात अडीच हजार शाळामध्ये तब्बल 10 हजार 91 विद्यार्थी नव्याने पहिलीच्या वर्गात दाखल होणार आहेत.. यामध्ये 5 हजार 114 मुले, 4 हजार 977 मुली..पहिलीच्या वर्गात पाऊल ठेऊन आपल्या शिक्षणाचा श्रीगणेशा करणार आहेत..0
0
Report
रत्नागिरी में जाधव के दरवाजे के पास भाजप ने नया कार्यालय उद्घाटन किया, राजनीतिक संघर्ष तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ठेट भास्कर जाधवांच्या 'दारात' भाजपचे आव्हान!.. चिपळुणात कार्यालयाशेजारीच 'कमळ' फुलले; प्रमोद जठारांच्या हस्ते उद्घाटन.. अँकर ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांच्या चिपळूण येथील कार्यालयाच्या अगदी बाजूलाच भाजपने आपले नूतन कार्यालय सुरू केले आहे.या कार्यालयाचे आज माजी आमदार प्रमोद जठार यांच्या हस्ते दिमाखात उद्घाटन झाले.. राजकारणातील दोन कट्टर विरोधकांची कार्यालये आता एकाच भिंतीच्या अंतरावर आमनेसामने आली आहेत.. थेट भास्कर जाधवांच्या दारातच भाजपने 'कमळ' फुलवल्याने चिपळुणात राजकीय संघर्ष आणि चुरस कमालीची वाढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.. या अनोख्या शेजारधर्माची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा आहे..0
0
Report
Advertisement
इस्लाम पार्टी नेता के गोदाम से राशन घोटाला: गर्भवती महिलाओं तक पहुंचा घोटाला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इस्लाम पार्टीच्या नेत्याच्या गोडूनवर छापा रेशनिंगचे धान्य काळाबाजार करत होता गरीरोदर मातांना वाटप केल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा देखील काळाबाजार सुरू होता ANCHOR : छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलिसांच्या छाप्यात एक मोठा गैरव्यवहार चव्हाट्यावर आला आहे. किराडपुरा भागातील एका गोदामात बेकायदेशीरपणे साठवून ठेवलेला रेशनिंगचा मोठा साठा पोलिसांनी जप्त केला. या कारवाईत रेशनिंगचे धान्याचाच काळाबाजार उघड झाला सोबतच त्याहूनही धक्कादायक प्रकार समोर आला आहे. बाल विकास प्रकल्पांतर्गत अंगणवाडीतील ६ महिने ते ३ वर्षांच्या मुलांसाठी आणि गरोदर मातांसाठी शासनाकडून मोफत दिला जाणारा 'अन्नपूर्णा' पोषण आहारही या माफियांच्या गोदामात सापडला. १ किलोच्या प्लास्टिक पॅकिंग फोडून त्यातील तांदूळ आणि मिक्स पावडर गोण्यांमध्ये पलटी केली जात असतानाच रंगेहात पकडण्यात आले. धक्कादायक म्हणजे सगळा गोरखधंदा इस्लाम पार्टीचा नेता कलीम कुरेशी चालवत होता तो सद्या फरार आहे. तर पोलिसांनी समीर बाबर कुरेशी, फहाद लईक शुतरी आणि फरदीन गणी पठाण या तिघांना अटक केली आहे. याप्रकरणी जिन्सी पोलीस ठाण्यात जीवनावश्यक वस्तू कायद्यांतर्गत दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.0
0
Report
दुभाषी बनावट दस्तावेज से संपत्ति हड़पने के मामले में SIT ने किया पर्दाफाश; जांच जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये मालमत्ता खरेदी-विक्रीदरम्यान वाढत्या फसवणूक आणि तोतयेगिरीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी दखल घेत विशेष तपास पथक स्थापन केली आहे. या गैरव्यवहारांच्या मुळाशी जाऊन संघटित भूमाफियांच्या टोळ्यांचा पर्दाफाश करणे या पथकाचा मुख्य उद्देश आहे. सिटी चौक आणि सातारा पोलिस ठाण्याच्या हद्दीत २०२४ ते २०२६ या काळात बनावट दस्तऐवज व मुद्रांक नोंदणीप्रकरणी एकूण ११ गुन्हे दाखल झाले. हिरापूर येथील कोट्यवधींची जमीन बोगस हिबानामा करून बळकावण्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मूळ मालकाच्या जागी तोतया व्यक्तीला उभे करणे आणि बनावट पॉवर ऑफ अटर्नी वापर करून मालमत्ता हडप करण्याची कार्यपद्धती समोर आली आहे. त्यामुळं या आरोपी विरोधात भक्कम पुरावे गोळा करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल करण्यासाठी ही एसआयटी नेमली आहे.0
0
Report
गोदावरी नदी में डूब कर ही परिवार की तीन महिलाएं मरीं, मोहोला में शोक
Parbhani, Maharashtra:अँकर -परभणीच्या सोनपेठ तालुक्यातील मोहोळा गावाजवळ असलेल्या गोदावरी नदीत आंघोळीसाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीसह एका महिलेचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे समीक्षा जाधव उत्कर्ष जाधव सिंधुताई जाधव असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे असून तिघी नदीवर आंघोळ करत असताना समीक्षा व उत्कर्षा पाण्यात बुडत असल्याने वाचवण्यासाठी सिंधूबाई यांनी उडी मारली मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने त्यादेखील पाण्यात बुडाल्या आणि या घटनेत तिघींचा मृत्यू झाला आहे.. एकाच कुटुंबातील दोन बहिणींसह चुलतीचा मृत्यू झाल्याने मोहोळा पाटील जाधव कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे..0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में पानी की आपूर्ति: 12 जून तक नई उम्मीद, तकनीकी बाधाएं बनीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात वाढीव पाणी एप्रिल महिन्यातच आणण्यात येणार होते. पहिली डेडलाइन हुकल्यानंतर न्यायालयाने १२ जूनला पाणी आणावे, असे निर्देश दिले. मात्र गेली दोन दिवसांपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून तांत्रिक अडचणींना डोंगर मांडण्यात येतोय. शुक्रवारी आणायला पाणी सुरुवात करताच जायकवाडीत स्कोअर व्हॉल्व्ह निखळला. शनिवारी पम्पिंग सुरू केली, तर व्हॅक्युम पंपच जळाला. रविवारी सायंकाळी साडेचारच्या दरम्यान शहरात वाढीव पाणी आणण्यासाठी पम्पिंग सुरू केले. रात्री उशिरापर्यंत सर्व काही सुरळीत असेल तर नक्षत्रवाडी जलशुद्धीकरणात फक्त साडेसात एमएलडी पाणी येईल त्यामुळं पाणी येण्यासाठी ची अडथळ्यांची शर्यत कायम आहे...0
0
Report
Indigo ने छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे की गोवा-हैदराबाद उड़ानें 16 जून–30 सितम्बर तक बंद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंडिगो एएरलाइन्सने छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील गोवा आणि सायंकाळची हैदराबाद विमानसेवा १६ जूनपासून ३० सप्टेंबरपर्यंत तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळं प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत..महत्वाचं म्हणजे गेल्या १२ वर्षात छत्रपती संभाजीनगर विमानतळावरील प्रवासी संख्या ४ लाखांवरून ७ लाखांपर्यंत गेली आहे. विमानतळाने सुविधा, तांत्रिक क्षमता आणि विस्ताराच्या दृष्टीनेही मोठी झेप घेतली आहे. परंतु, आगामी काही दिवसांत कमी होणारी ही विमाने चिंतेचा विषय ठरतोय..0
0
Report
चिपळूण के कळवंडे गांव में आबकारी विभाग छापा: करीब 2.9 लाख का माल जब्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या कळवंडे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाचा छापा.. पावणेतीन लाखांचा मुद्देमाल जप्त!.. चिपळूण तालुक्यातील कळवंडे गावात राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त केला आहे.. या छाप्यात सुमारे २ लाख ९० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून,६ हजार लिटर रसायन जागेवरच नष्ट करण्यात आले.. याप्रकारणी आरोपी नंदेश वरपे विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.. व्यसनमुक्तीचा पुरस्कार मिळालेल्या गावातच हा अवैध धंदा सुरू असल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत होता.. पुढील तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के चिपळूण में जल संकट, ग्राम पंचायत कार्यालय के बाहर मोर्चा निकाला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी पाण्यासाठी आक्रोश! चिपळूणच्या उभळे आगरगावात ग्रामस्थांचा ग्रामपंचायतीवर धडक मोर्चा; 'जलजीवन मिशन'चा फज्जा! अँकर एकीकडे मान्सून लांबल्याने राज्यभरात चिंतेचं वातावरण असतानाच,रत्नागिरीच्या चिपळूण तालुक्यातून पाण्याची अत्यंत भीषण आणि चिंताजनक परिस्थिती समोर आली आहे.. चिपळूणमधील उभळे आगरगाव येथे थेंबभर पाण्यासाठी नागरिकांना जीवघेणा संघर्ष करावा लागत आहे.. 'हर घर जल'च्या घोषणा केवळ कागदावरच राहिल्या असून,प्रत्यक्षात जिल्ह्यात 'जलजीवन मिशन'चा पुरता फज्जा उडाल्याचं पाहायला मिळतंय.. याच तीव्र पाणीटंचाईला कंटाळून आज उभळे आगरगावातील संतप्त महिला आणि ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायत कार्यालयावर धडक मोर्चा काढला.. 'घोषणा नको,पाणी द्या' अशी मागणी करत ग्रामस्थांनी प्रशासनाला चांगलंच धारेवर धरलं आणि जाब विचारला..0
0
Report
18 जून को छत्रपती संभाजीनगर-जालना में महायुती के पक्ष में मतदान की तैयारी तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी 18 जून ला मतदान होणार आहे. त्यासाठी भाजपने रविवारी दोन्ही जिल्ह्यातील महायुतीच्या मतदारांकडून पहिल्या पसंतीचे मतदान रंगीत तालिमीमध्ये करून घेतले. ४१९ बहुमताचा आकडा महायुतीकडे असताना ४५५ जणांनी पहिल्या पसंतीची मते टाकली. मतदानापूर्वीच इतर पक्षांचे ३६ नगरसेवक भाजपच्या गोटात आले असून पुढील दोन दिवसांत जालन्यातील आणखी काही नगरसेवक महायुतीकडे येतील, असा दावा भाजप नेत्यांनी केला. ५०० मतांचे पहिल्या पसंतीचे टार्गेट भाजपने ठेवले आहे. भाजप, उद्धवसेना व अपक्ष अशी तिरंगी लढत होत आहे. महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पार पडली...0
0
Report
कोकण में मानसून बदला, फसलें सूखने से किसानों पर दुबार बुवाई का खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात पाऊस गायब.. धूळपेरणी वाया जाण्याची भीती, बळीराजा संकटात! रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात मान्सूनपूर्व सरींच्या भरवशावर शेतकऱ्यांनी धूळपेरणी तर उरकली, पण आता पावसाने अचानक दडी मारल्यामुळे बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे.. 'अल निनो'च्या प्रभावामुळे यंदा मान्सून लांबला असून, तो थेट २० जूनच्या sुमारास सक्रिय होण्याचा अंदाज आहे.. दरम्यानच्या काळात कडक ऊन आणि वाढत्या उकाड्यामुळे शेतातील ओलावा संपला असून, नुकतीच उगवलेली कोवळी भातरोपे आता करपू लागली आहेत.. त्यामुळे कोकणपट्टीतील शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली असून, आता सर्वांचे डोळे आभाळाकडे लागले आहेत.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
Advertisement
शिरूर शिंदोडी में 11 केवी तार टूटने से किसान अक्षय हाके की मौत
Shirur, Maharashtra:महावितरणच्या हलगर्जीपणाचा आणखी एक बळी शिरुर तालुक्यात गेलाय. शिरुर तालुक्यातील शिंदोडी येथे ११ केव्ही क्षमतेची विद्युत वाहिनीanggावर तुटून पडल्याने, एका २७ वर्षीय तरुण शेतकऱ्याचा जागीच दुर्दैवी मृत्यू झालाय. अक्षय हाके असं या मृत तरुणाचं नाव आहे. अक्षय काल दुपारी आपल्या घराशेजारील ऊसाच्या शेतात पाणी धरण्यासाठी गेला होता. याच दरम्यान शेतातून गेलेली महावितरणची ११ केव्ही क्षमतेची जीर्ण तार अचानक तुटली आणि थेट ऊसाच्या शेतात पडली. शेतात पाणी देत असताना ही तार न दिसल्याने अक्षयला विजेचा तीव्र धक्का बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे शिंदोडी गावावर सध्या शोककळा पसरली असून, महावितरण प्रशासनाविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जातोय. दरम्यान, ही विद्युत वाहिनी जवळपास १९७५-७६ सालची असून, येथील तारा अत्यंत जीर्ण झाल्या आहेत. महावितरणने हे जीर्ण खांब आणि तारा तातडीने बदलाव्यात, अशी मागणी आता स्थानिक ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
गोरेगांव सेनगाव मार्ग पर दुर्घटनाओं में वृद्धि, पुलिस ने मोड़ पर रेडियम पट्टियाँ लगाईं
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या गोरेगाव सेनगाव महामार्गावरील पळशी परिसरात अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने गोरेगाव पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी पोलिसांच्या वतीने धोकादायक वळणांवर रेडियम पट्ट्या आणि परावर्तित चिन्हे लावण्यात आली आहेत. रात्रीच्या वेळी वाहनचालकांना वळणांचा अंदाज यावा आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे, या उद्देशाने ही मोहीम गोरेगाव पोलिसांच्या वतीने हाती घेण्यात आली आहे.0
0
Report
भंडारय की वरठी में दीपक से पुराने लकड़ी के घर में आग, जान बची
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या वरठी येथे दिव्याच्या वातीमुळे जुन्या घराला आग... जीवित हानी नहीं though मोठे नुकसान... हरकंडे यांच्या जुन्या लाकडी फाट्याच्या घराला रविवारी सायंकाळी साडेआठ वाजताच्या दरम्यान आग लागली. प्राथमिक माहितीनुसार, दिव्याच्या वातीमुळे ही आग लागल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटना घडली तेव्हा घरात कोणीही नसल्याने आग झपाट्याने पसरली. परिसरातील नागरिकांनी तत्काळ अग्निशमन विभागाला माहिती दिली। अग्निशमन दल व स्थानिकांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले। मात्र, तोपर्यंत घरातील साहित्याचे मोठे नुकसान झाले होते। या घटनेत जीवितहानी टळली.0
0
Report
Advertisement
