Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Washim farmers get favorable prices for tur as heavy arrivals recorded
Washim, Maharashtra:वाशिम : काल तूर विक्रीसाठी शेतकऱ्यांनी मोठी गर्दी केली. एकाच दिवशी तब्बल ६ हजार ५९० क्विंटल तूरची आवक नोंदविण्यात आली. बाजार समितीतील लिलावात तूरला किमान ७,१२० रुपये तर कमाल ७,८७८ रुपये प्रतिक्विंटल दर मिळाला. खरेदी पेरणीसाठी आर्थिक नियोजन करण्याच्या उद्देशाने शेतकरी साठवून ठेवलेली तूर विक्रीसाठी आणत असल्याने बाजार समितीतील आवक वाढल्याचे दिसून येत आहे. वाढलेल्या आवकेनंतरही तूरला समाधानकारक दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण आहे。0
0
Report
बारिश मौसम में कोकण की रात्री फेरी सेवाएं 15 जून से 31 जुलाई बंद
Ratnagiri, Maharashtra:पावसाळ्यात रात्रीची विशेष फेरीबोट सेवेमहिनाभर बंद.. पावसाळी वातावरण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनानुसार कोकणातील विविध ठिकाणच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याच्या निर्णय सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतला आहे.. या निर्णयामुळे दाभोळ-धोपावे,जयगड-तवसाळ आणि वेसवी-बागमंडले या मार्गावरील रात्रीची अतिरिक्त फेरी सेवा काही काळासाठी उपलब्ध राहणार नाही.. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार 15 जून ते 31 जुलै या कालावधीत संबंधित मार्गावरील रात्रीच्या वेळेतील ज्यादा फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील.. पावसाळ्यात समुद्र आणि खाड्यांमधील बदलते हवामान,वाढलेला वारा तसेच प्रवाशांच्या सुरक्षाेतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे..0
0
Report
सोलापूर किसान जल समाधी पर बातचीत, खाते में पैसे आते ही आंदोलन रोकने का निर्णय
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - जलसमाधी आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांची जिल्हाधिकाऱ्यांसोबत बैठक संपन्न मात्र जोपर्यंत पैसे खात्यात जमा होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय - सोलापुरातील गोकुळ शुगरच्या थकीत ऊस बिलासाठी शेतकऱ्यांनी केलेल्या जलसमाधी आंदोलनानंतर प्रशासन खडबडून जागे - काल सायंकाळी आंदोलन करते शेतकरी आणि जिल्हाधिकारीांची बैठक संपन्न - जवळपास पाऊण तास झालेल्या चर्चेमध्ये जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी समजून घेतली शेतकऱ्यांची व्यथा - मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून लवकरच तोडगा काढण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आश्वासन - मात्र जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा होणार नाहीत तोपर्यंत धरणे आंदोलन सुरूच ठेवण्याचा शेतकऱ्यांचा निर्णय - मात्र येणाऱ्या काळात लवकरात लवकर पैसे जमा नाही झाले तर आंदोलन आणखी तीव्र करण्याचा शेतकऱ्यांचा इशारा0
0
Report
Advertisement
तीन बैलगाड़ियों के साथ संत तुकाराम पालखी यात्रा इस बार तैयारी पूरी
Varsoli, Maharashtra:जगद्गुरू संत तुकाराम महाराज संस्थांच्या वतीने संत तुकाराम महाराजांच्या 341 व्या देहू ते पंढरपूर पालखी सोहळ्याची तयारी सुरू केली आहे. यंदाच्या पालखी रथ सेवेसाठी खिल्लार जातीच्या तीन बैलजोड्या संस्थान स्वतः खरेदी करणार आहे. पालखी रथासाठी ताकदवान व उंच बैलजोड्याची निवड केली जाते. गेल्यावर्षी संस्थानच्या वतीने प्रथमच बैलजोड्या खरेदीचा निर्णय घेण्यात आला होता. मागील वर्षी कर्नाटकातून एक आणि साताऱ्यातील बावधन येथून बैलजोड्या खरेदी केल्या होत्या. ह्यावेळी देखील तिथूनच बैलजोड्या खरेदी करणार आहेत. पालखी रथासाठी दोन तर चौघडा गाडीसाठी एक अशा एकूण तीन बैलजोड्या सेवेत दाखल होणार आहे. ही प्रक्रिया पुढील आठवड्या पर्यंत खरेदी प्रक्रिया पूर्ण होईल असे संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे.0
0
Report
सेना ने अण्णा हजारे को रालेगण सिद्धि में टी55 भीम टैंक भेंट किया
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांना सैन्यदलाकडून रणगाडा भेट देण्यात आला आहे अण्णा हजारे यांच्या सैन्य दलातील कार्य आणि समाजसेवा यांची दखल घेत संरक्षण विभाग आणि सैन्य दलाकडून रालेगणसिद्धी येथे हा रणगाडा भेट देण्यात आला आहे टी55 म्हणजेच भीम नावाचा हा रणगाडा सैन्यदलाकडून देण्यात आला आहे रणगाडा रालेगणसिद्धी येथे दाखल झाला असून अण्णा हजारे यांना भेट देण्यात आलेल्या रणगाड्याचा आढावा घेण्यात आला0
0
Report
सोलापुर में हैदराबाद रोड पर जलती कार, तीन यात्री सुरक्षित
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील हैद्राबाद रोडवर बर्निंग कारचा थरार, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही - सोलापूर शहरातील हैदराबाद रोडवर बर्निंग कारचा थरार - बुधवारी रात्री एका धावत्या कारने अचानक पेट घेतल्याने मोठी खळबळ - कारमधून प्रवास करणारे तिघेजण सुखरूप - परिसरातील नागरिकांच्या समय सूचकतेमुळे पेटलेली कार विझवण्यात यश - सुदैवानं कोणतीही जीवित हानी नाही मात्र आगीचे कारण अद्याप अस्पष्ट0
0
Report
Advertisement
वाशीम में ई-शिवाई बस दुर्घटना: चालक के नियंत्रण से बस खाई किनारे उतरी, कई घायल
Washim, Maharashtra:तोंडगाव फाट्याजवळ वाशीम जिल्ह्यात ई-शिवाई बसचा अपघात झाला. चालकाचे बसवरील नियंत्रण सुटल्याने बस रस्त्याच्या कडेला खाली उतरली. या अपघातात बसमधील काही प्रवासी किरकोळ जखमी झाले असल्यामुळे पुढील उपचारासाठी वाशिम येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटना मिळताच स्थानिक नागरिक आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. क्रेनच्या सहाय्याने अपघातग्रस्त बस रस्त्यावर आणण्याचे काम सुरू आहे.0
0
Report
चंद्रपूर इरई नदी पुल पर कार नदी में गिरी, 5 घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील इरई नदी पुलावरील घटना, पुलाचा कठडा तोडून कार नदीत कोसळली, पाच जण जखमी. अँकर: चंद्रपूर शहरा लगत असलेल्या इरई नदी पुलावरून कठडा तोडून कार नदीत कोसळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चंद्रपूर कडून नागपूर कडे जात असताना भरधाव वेगात असलेल्या कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने नदी पुलावरुन कोसळून अपघात झाला. कार मध्ये ५ प्रवासी प्रवास करीत होते. पाच ही जण गंभीर जखमी झाले असून खासगी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. या घटनेने नदी पुलावर मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पुढील तपास रामनगर पोलीस करीत आहेत.0
0
Report
तीव्र गर्मी ने वाशीम के संतराबागों को नुकसान पहुँचाया; लाखों रुपये की फसल बर्बाद
Washim, Maharashtra:वाशीमच्या मानोरा तालुक्यातील अनेक भागांमध्ये यंदाच्या तीव्र उष्णतेचा मोठा फटका संत्रा बागांना बसला आहे.मृग बहरासाठी ताणावर ठेवलेल्या बागांना वेळेत पाऊस न झाल्याने आणि वाढत्या तापमानामुळे अनेक संत्रा बागा करपून वाळून गेल्या आहेत.उष्णतेमुळे झाडांतील ओलावा कमी झाल्याने पाने करपली,फांद्या सुकल्या आणि संपूर्ण बागांचे नुकसान झाले. लाखो रुपयांची गुंतवणूक केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता आर्थिक संकट उभे ठाकले असून संत्रा उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.0
0
Report
Advertisement
अकोला के कृषी केंद्रों में टोकन से युरिया-डीएपी की भीड़, आधार से पांच बैग वितरित
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात युरिया आणि डीएपी खत खरेदी करिता कृषी केंद्रांसमोर शेतकऱ्यांच्या रांगा पाहायला मिळत आहे. वाढती गर्दी पाहता कृषी सेवा केंद्रांनी टोकन पद्धती सुरू केली यानंतर आधार कार्ड द्वारे एका व्यक्तीला पाच युरिया बॅग देण्यात येत होत्या. नेमकी सध्याची काय परिस्थिती आहे या संदर्भात आमचे प्रतिनिधी जयेश जगड आमच्या सोबत जुडले आहेत..0
0
Report
पवन धरण प्रभावितों के पुनर्वसन के लिए निधि और भू-आवंटन पर मंजूरी
Varsoli, Maharashtra:पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाच्या प्रश्नाला अखेर सकारात्मक दिशा मिळणार असून. मुंबईतील सह्याद्री अतिथीगृह येथे राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव आणि मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या उपस्थितीत पवना धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासंदर्भात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत धरणग्रस्तांच्या विविध मागण्या आणि पुनर्वसन प्रक्रियेतील अडचणींबाबत सविस्टर चर्चा करण्यात आली. बैठकीत पुनर्वसनासाठी जागा वाटप करताना प्रत्येक धरणग्रस्त कुटुंबास दोन एकरप्रमाणे आवश्यक क्षेत्र उपलब्ध करून देण्यास तत्त्वतः मान्यता देण्यात आली. तसेच पुनर्वसित गावठाणांमध्ये रस्ते, पाणीपूरवठा, वीज आणि इतर मूलभूत नागरी सुविधा उभारण्यासाठी विशेष बाब म्हणून भरीव निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासनही शासनाकडून देण्यात आले..0
0
Report
अकोला महापालिका ने 2026 जनगणना के पहले चरण में महाराष्ट्र में दूसरा स्थान पाया
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेने 2026 च्या जनगणना मोहिमेत उल्लेखनीय कामगिरी करत राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. केंद्रीय जनगणना संचालनालयाच्या निर्देशानुसार राबविण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अकोला मनपाने नियोजित वेळेआधी काम पूर्ण करत हा मान मिळवला आहे. या यशाबद्दल मनपा अधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. महाराष्ट्रात सुरू असलेल्या जनगणना मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात अकोला महानगरपालिकेने उत्कृष्ट कामगिरी नोंदवली आहे.1 मे ते 15 मे या कालावचीत ‘स्वगणना’ मोहीम राबविण्यात आली होती. त्यानंतर 16 मे ते 14 जून दरम्यान प्रगणकांनी घरोघरी जाऊन माहिती संकलनाचे काम केले. अंतिम मुदतीला अवघे तीन दिवस शिल्लक असतानाच अकोला मनपाने संपूर्ण काम पूर्ण करून राज्यातील महापालिकांमध्ये दुसरा क्रमांक मिळवला.0
0
Report
Advertisement
कॉलेज रोड पर निजी सावकारी विवाद में युवक पर गोली, हालत गंभीर
Nashik, Maharashtra:कॉलेज रोड परिसर में निजी सावकारी के पैसे के विवाद के कारण एक युवक पर बंदूक तानकर प्राणघातक हमला हुआ। नाशिक शहर के कॉलेज रोड इलाके में निजी सावकारी के पैसे के विवाद के चलते युवक पर बंदूक तानी गई और उसकी बेदम मारपीट भी की गई। इस हमले में युवक गंभीर घायल है, पीड़ित ने गंगापुर पुलिस द्वारा पर्याप्त कार्रवाई नहीं करने का आरोप लगाया है। अमृतधाम निवासी तुषार भोसले अपने मित्रों से कॉलेज रोड पर मिलने गया था, रात लगभग 11:30 बजे संदिग्ध सूरज तिवारी, प्रशांत भोकेफोडे, निकिल साळवे और अमित यादव ने फ़ॉर्च्युनर कार से वहाँ आकर हमला किया। तुषार ने 8 महीने पहले 15% ब्याज पर 8 लाख रुपये लिए थे। हर महीने 75,000 रुपये ब्याज दे रहे थे और इसी पैसे के विवाद से आरोपियों ने तुषार पर बंदूक तानकर उसके मित्र को बेरहमी से पिटाई की। घायल के सिर और गाल में गंभीर चोट आई हैं और एमएलसी दर्ज की गई है। शिकायत देकर भी पुलिस कार्रवाई नहीं होने का आरोप तुषार भोसले ने किया है। इस घटना से नाशिक में निजी सावकारों के डर का मुद्दा फिर से सामने आया है, और कानून के दायरे में पुलिस ऐसे साहूकारों के विरुद्ध कैसे कार्रवाई करेगी, यह देखने के लिए महत्वपूर्ण है।0
0
Report
खापा में ट्रक की भिड़ंत, दुचाकी सवार युवक की मौके पर मौत
Bhandara, Maharashtra:ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू...खापा येथील घटना भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील खापा येथे ट्रकने दुचाकीस्वारास जोरदार धडक दिल्याची घटना रामटेकच्या दिशेने भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रकने दुचाकीला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, दुचाकीस्वार युवकाचा जागीच मृत्यू झाला. मृत युवक हा हिंगणा येथील रहिवासी असून त्याचे नाव हिमांशु पटले असे आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
तापोला केबल ब्रिज दिवाळी में खुलेगा; महाबळेश्वर-खेड का नया संपर्क बन जाएगा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महाबळेश्वर-खेड 'तापोळा केबल ब्रिज' अंतिम टप्प्यात; दिवाळीत होणार खुला!.. अँकर पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणचे अंतर कमी करणाऱ्या महाबळेश्वर आणि खेड तालुक्याला जोडणारा तापोळा येथील भव्य 'केबल स्टेड ब्रिज' आता अंतिम टप्प्यात आला आहे.. १४८.५ कोटींच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे ९० टक्के काम पूर्ण झाले असून,आगामी दिवाळीत हा पूल वाहतुकीसाठी खुला होणार आहे.. या पुलामुळे सातारा आणि रत्नागिरी जिल्ह्यांमधील दळणवळण अधिक सोपं आणि जलद होईल.तसेच आजवर विकासापासून दूर राहिलेल्या कांदाटी खोऱ्यातील गावांचा आर्थिक आणि सामाजिक कायापालट होणार आहे.. सध्याच्या आंबेनळी आणि वरंधा घाटापेक्षा तापोळा मार्ग अधिक सोयीस्कर असल्याने पर्यटकांची याला पहिली पसंती असेल.. कोयना बॅकवॉटर आणि रघुवीर घाटाच्या निसर्गरम्य परिसरामुळे पर्यटनाला मोठी संजीवनी मिळणार असून,कोकण,गोवा आणि व्याघ्र प्रकल्पांकडे जाणाऱ्या पर्यटकांसाठी हा मार्ग गेमचेंजर ठरणार आहे..0
0
Report
Advertisement
