icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

डोंगरगाव डिo परिषद स्कूल में प्राचार्य की गैरहाजिरी पर हंगामा, पालक कार्रवाई की मांग

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकाचा खळबळ जनक प्रकार उघडकीस....प्रत्यक्ष हजर नसताना दोन दिवसाआधी लावली हजेरी.....पालक व चपराशांची तक्रार....कारवाईची मागणी.... भंडारा जिल्ह्यातील मोहाडी तालुक्यातील डोंगरगाव येथील जिल्हा परिषद शाळेत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. मुख्याध्यापकांनी प्रत्यक्ष शाळेत उपस्थित नसतानाही दोन दिवसांपूर्वीच हजेरी पुस्तकावर सही केल्याचे आढळून आले. आज सकाळी शाळा सुरू होण्याच्या वेळेनंतरही कोणतेही शिक्षक किंवा मुख्याध्यापक शाळेत आले नव्हते. दरम्यान, चपराशाने काही वेळापूर्वीच शाळा उघडल्याचे समोर आले. त्यामुळे मुख्याध्यापकांची हजेरी नेमकी कशी लागली, असा प्रश्न उपस्थित होत आहे. हा प्रकार केवळ डोंगरगावपुरता मर्यादित नसून इतरही जिल्हा परिषद शाळांमध्ये अशीच परिस्थिती असल्याची चर्चा आहे. शिक्षकांच्या निष्काळजीपणामुळे जिल्हा परिषद शाळांबाबत पालकांमध्ये नाराजी वाढत असून शिक्षण विभाग संबंधित मुख्याध्यापकांवर कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में महिलाओं की सुरक्षा को लेकर पदाधिकाऱियों का जिलाधिकारी कार्यालय पर प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील महिलांमध्ये असुरक्षिततेची भावना... पोलीस अधीक्षक जिल्हाधिकाऱ्यांना महिलांनी दिले निवेदन... dynesendivasa महिलां अत्याचारांच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. लहान चिमुकल्या मुलींपासून ते वृद्ध महिलांपर्यंत कुणीही सुरक्षित नसल्याची भीती निर्माण झाली आहे. बलात्कार, विनयभंग, अत्याचार आणि हत्या यांच्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळत आहे. याच पार्श्वभूमीवर भंडारा येथे महिला सशक्तिकरण संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. भंडारा येथील शासकीय रुग्णालयात एका वृद्ध महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न तेथीलच कर्मचाऱ्याकडून झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे रुग्णालयासारखी सुरक्षित मानली जाणारी ठिकाणेदेखील महिलांसाठी असुरक्षित होत चालल्याची भावना महिलांमध्ये व्यक्त केली जात आहे. तसेच लाखनी तालुक्यातील 14 वर्षीय अल्पवयीन मुलीवर शेजाऱ्याने केलेल्या अत्याचाराची घटना, शहरातील 29 वर्षीय तरुणी 11 दिवसांपासून बेपत्ता असल्याची घटना.. या सर्व घटनेच्या निषेधार्थ महिला सशक्तिकरण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात धडक देत कठोर कारवाईची मागणी केली. अशा नराधमांना कठोर शिक्षा व्हावी, जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

हवाई अड्डे के पास लेजर बीम पर 15 किमी क्षेत्र में 5 जुलाई तक रोक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विमानतळ परिसरातून विमानांचे टेक-ऑफ आणि लँडिंग होताना लेझर किरणांमुळे वैमानिकांचे लक्ष विचलित होत आहे. ही बाब गंभीरपणे घेत छत्रपती संभाजी नगर पोलिस आयुक्त यांनी विमानतळाच्या १५ किलोमीटर परिघात लेझर आणि बीम लाइट्सच्या वापरावर ५ जुलैपर्यंत बंदी घातली आहे. यामुळे आता संपूर्ण शहर आणि आसपासचा ग्रामीण भाग नो लेझर शोच्या कक्षेत येणार आहे. लग्नसराईत वापरले जाणारे तीव्र लेझर किरण थेट विमानांच्या कॉकपिटमध्ये शिरतात, ज्यामुळे वैमानिकांना काही क्षणांसाठी अंधारी येते. उड्डाण किंवा लँडिंगच्या वेळी वैमानिकाचे लक्ष विचलित झाल्यास मोठी दुर्घटना घडू शकते. प्रवाशांच्या आणि विमानतळ परिसरातील रहिवाशांच्या सुरक्षेसाठी प्रतिबंधात्मक उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेचे कलम १६३ (१) व (३) अन्वये हे आदेश लागू करण्यात आले आहेत.
0
0
Report

सावकारी जाँच के बाद रोशन कुळे को मुख्यमंत्री सहायता निधि से 5 लाख

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- सावकारी जाचामुळे किडनी विकणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर अँकर:--  सावकारी जाचामुळे किडनी विकणा-या चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील मिंथूर येथील शेतकरी रोशन कुळे यांना मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून 5 लाखांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला होता. जिल्हाधिका-यांच्या खात्यात पीडित शेतकऱ्यासाठी शासनाकडून पाच लाखांची रक्कम जमा करण्यात आली. सावकारी जाचामुळे रोशन कुळे यांनी कंबोडिया येथे जाऊन आपल्या किडनीची विक्री केली होती. हे प्रकरण उघडकीस येतात राज्यभरात खळबळ उडाली होती. त्यानंतर या प्रकरणाचा तपास करत असताना चंद्रपूर पोलिसांनी एका आंतरराष्ट्रीय किडनी तस्करीचा पर्दाफाश केला. मात्र या सर्व गोष्टी होत असताना पीडित शेतकऱ्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून सरकारने त्याला पाच लाखांची विशेष मदत दिली आहे. 19 तारखेला आ. मुनगंटीवार यांच्या हस्ते रोशन कुळे यांना पाच लाख रुपयांच्या रकमेचा धनादेश दिला जाणार असल्याची प्राथमिक माहिती मिळाली है.
0
0
Report

सोलापूर में कार में गंधक बॉक्स रखने के दौरान भीषण विस्फोट, एक मजदूर घायल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात कारमध्ये गंधकाचा बॉक्स ठेवताना भीषण स्फोट, कामगाराच्या पायाचा अक्षरशः चेंदामेंदा - सोलापूर शहरातील जुनी मिल कंपाऊंड परिसरामध्ये काल रात्री गंधकाचा कारमध्ये स्फोट झाल्याने मोठी खळबळ - गंधकाचा बॉक्स कारमध्ये ठेवताना चुकून खाली पडल्याने झाला भीषण स्फोट - दुर्दैवी घटनेमध्ये कामगाराच्या पायाचा झाला अक्षरशः चेंदारेंडा - एअरगन मध्ये वापरण्यात येणारे गंधक हे कामगाराच्या माध्यमातून गाडी ठेवत असताना घडला प्रकार - अंगावर शहारे आणणारी घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - कामात निष्काळजीपणा केल्याप्रकरणी सहारा एअर गन हाऊस मालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती - बॉम्बस्फोटासारख्या गंधकाच्या स्फोटामुळे नागरिक काही काळासाठी भयभीत बाईट - प्रत्यक्षदर्शी ( काल रात्री दिलेली बाईट आहे... यांनी स्वतःला जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले )
0
0
Report
Advertisement

शिवाजीनगर अंडरपास: 11 फीट ऊँचाई के कारण बड़े वाहन अब टकराने से बचेंगे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या तोंडाशी अवजड वाहने अडकून होणारी वाहतूक कोंडी फोडण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पाऊल उचलले आहे. भुयारी मार्गाच्या आत असलेले हाइट बॅरिकेड काढून ते शिवाजीनगर चौकाच्या दिशेने बरेच अलीकडे बसवण्यात येणार आहेत. यामुळे वाहनचालकांना उंचीचा अंदाज आधीच येईल आणि वाहने अडकण्याच्या प्रकार थांबतील. ११.४७ कोटी रुपये खर्चुन उभारलेल्या या मार्गाची उंची ११ फूट आहे. सध्या बॅरिकेड भुयारी मार्गाच्या अगदी जवळ असल्याने अवजड वाहने थेट तोंडाशी येऊन अडकतात, ज्यामुळे संपूर्ण वाहतूक ठप्प होते. बॅरिकेड चौकाच्या दिशेने पुढे सरकवल्यामुळे, उंचीपेक्षा जास्त असलेले वाहन भुयारी मार्गापर्यंत न पोहोचता आधीच वळवता येणे शक्य होणार आहे.
0
0
Report

संभाजीनगर में संपत्ति-जलकर वसूली के लिए प्रशासन ने सख्त कदम उठाए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये मालमत्ता कर आणि पाणीपट्टी वसुलीसाठी मनपाने कठोर पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. कर वसुलीत कुचराई करणाऱ्या आणि सर्वात कमी मालमत्तांचे सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर थेट बडतर्फीची कारवाई केली जाईल, असा इशारा मनपा आयुक्त यांनी दिला. आढावा बैठकीत आयुक्तांनी वसुलीच्या कामाचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी सर्व सहायक आयुक्तांना कडक शब्दांत सूचना दिल्या. प्रत्येक झोनमधील १०० - बड्या आणि वसुलीयोग्य थकबाकीदारांची यादी तयार करून, त्यांच्याकडून कर वसूल - करण्यासाठी सहायक आयुक्तांनी स्वतः - वैयक्तिक लक्ष घालावे आणि पाठपुरावा करावा, असे निर्देश दिले आहेत. ज्या मालमत्तांची कर आकारणी झालेली नाही किंवा जे मालक कर भरत नाहीत, अशांचा शोध घेण्यासाठी प्रत्येक झोनमध्ये बिल कलेक्टर आणि पथक प्रमुखांची नियुक्ती करण्यात आली आहे
0
0
Report

मोदी के भावनात्मक आह्वान पर अमरावती सांसद ने उठाए सवाल

Amravati, Maharashtra:देश आर्थिक दिवाळखोरी कडे, भावनिक आवाहन केल्यापेक्षा नागरिकांना दिलासा देणे गरजेचे; काँग्रेस खासदार बळवंत वानखडे अँकर :- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना भावनिक आव्हान केल्यानंतर त्यांच्या या आव्हानावर अनेक स्तरातून टीका होताना पाहायला मिळत आहे अशाच अमरावती लोकसभेचे खासदार बळवंत वानखेडे यांनी नरेंद्र मोदी यांच्या भावनिक आव्हानावर टीका केली आहे. देश आर्थिक दिवाळखोरी कडे निघतोय की काय असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनानंतर अमरावतीचे काँग्रेस खासदार बळवंत वानखडेंकडून प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवडणुकीनंतर महागाई वाढेल असं राहुल गांधींनी आधीच सांगितलं होतं भावनिक आवाहन केल्यापेक्षा नागरिकांना दिलासा देणे गरजेचे असून भावनात्मक आवाहननी नागरिकांचे भलं होणार नाही जी परिस्थिती उद्भवेल त्यावर मात करण्याची त्यांची जबाबदारी आहे असेही खासदार बळवंत वानखडे म्हणाले आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में 43.4°C तापमान, गर्मी से लोग बेहाल

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर जिल्ह्याच्या तापमानाने ४३.४ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला असून, नागरिक उन्हाच्या झळांनी अक्षरशः होरपळून निघाले आहेत. सोमवारी तापमानाची नोंद ही केवळ आकडा नसून जिल्ह्यासाठी धोक्याची घंटा आहे. यापूर्वी २६ एप्रिल रोजी ४३.४ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती, जी गेल्या तीन वर्षांतील सर्वाधिक पातळी होती. मात्र सोमवारी पुन्हा एकदा पाटा त्याच ४३.४ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. तीन वर्षांनंतर पुन्हा एकदा इतकी भीषण उष्णता अनुभवायला मिळत असल्याने हवामान खात्याकडूनही सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top