Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
धामणी के किसान अनिश्चितकालीन उपोषण पर, विद्युत कनेक्शन के विवाद से हंगामा
Shirur, Maharashtra:धामणी ग्रामपंचायती समोर २२ जूनपासून सुरू होणाऱ्या विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी धामणी आणि पहाडदरा येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण पुकारलं असल्याची माहिती दिली जाते. डिंभे कालव्यावरून 9 उपसा सिंचन योजना पूर्ण झाल्या असूनही महावितरणकडून विद्युत कनेक्शन मिळत नसल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ झालेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विशेष बाब म्हणून वीज कनेक्शन देण्याचे आदेश दिले होते, विधानसभाातही आश्वासन दिले होते; परंतु महावितरणकडून सोलर धोरणाबद्दल तत्त्वाने आक्षेप घेण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. प्रायोगिक तत्त्वावरील सोलर पंप अपयशी ठरल्याने शेतकऱ्यांनी पारंपरिक विद्युत कनेक्शनची मागणी केली आहे. कर्जबाजारी झालेले शेतकरी पाण्याअभावी संकटात सापडल्याने आज २२ जूनपासून सुरू होणाऱ्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी सरपंच सागर जाधव यांच्यासह १० शेतकऱ्यांनी धामणी ग्रामपंचायतीसमोर आमरण उपोषण पुकारलं आहे.0
0
Report
भंडारा-गोंदिया में अविनाश ब्राह्मणकर का नया नेतृत्व, किसानों के लिए आवाज़ तेज
Bhandara, Maharashtra:भंडारा गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी शेतमजूर, सर्वसामान्य लोकांसाठी आवाज उचलणाऱ्या हा एक नेता आता विधान परिषदेला मिळालेला आहे. निश्चित हा विजय आमचा सर्वसामान्य कार्यकर्त्यांचा आणि मतदारांच्या एक या माध्यमातून नवीन अध्याय भंडारा गोंद्या जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे. एक नवीन नेतृत्व अविनाश ब्राह्मणकर यांच्या या दोन्ही जिल्ह्यांना मिळालेला आहे. आता अविनाश ब्राम्हणकर हे भंडारा गोंदिया जिल्हाच्या अहोरात्र मेहनत करून विकास करतील.0
0
Report
चंद्रपुर के मोरवा हवाई अड्डे के विस्तार को गति मिली; फडणवीस ने तात्कालिक कार्रवाई के निर्देश
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूरच्या मोरवा विमानतळ विस्तार व आधुनिकीकरणाला गती, आ. मुनगंटीवार यांच्या मागणीला सकारात्मक प्रतिसाद; मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे त्वरित कार्यवाहीचे निर्देश चंद्रपूर शहरालगतच्या मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश आले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संबंधित प्रस्तावाची तातडीने दखल घेत महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीला आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या या सकारात्मक निर्णयामुळे मोरवा विमानतळाच्या विस्तार व आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला गती मिळाणार असून यासाठी आ. सुधीर मुनगंटीवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मुंबई येथे प्रत्यक्ष भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. चंद्रपूर जिल्ह्याच्या औद्योगिक, व्यावसायिक आणि पर्यटन विकासासाठी विमानतळाचा विस्तार अत्यंत आवश्यक असल्याचे त्यांनी निदर्शनास आणून दिले. आ. मुनगंटीवार यांनी मांडलेल्या मोरवा विमानतळाच्या आधुनिकीकरणासाठीच्या मागणीची दखल घेत मुख्यमंत्री फडणवीस यांनी तातडीने पुढील कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. सध्या चंद्रपूर विमानतळाची धावपट्टी सुमारे ९०० मीटर लांबीची असून छोट्या प्रवासी विमानांच्या उड्डाणासाठी ती अपुरी आहे. भविष्यात नियमित विमान सेवा सुरू करण्यासाठी धावपट्टीचा विस्तार, डीजीसीए मानकांनुसार सुविधा उभारणे आणि अन्य पायाभूत विकासकामे करणे आवश्यक आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सकारात्मक भूमिकेमुळे चंद्रपूर विमानतळ विकासाचा मार्ग अधिक सुकर झाला आहे.0
0
Report
Advertisement
शिंदे-फडणवीस गुटों की तकरार से महाराष्ट्र में खतरे के संकेत
Mumbai, Maharashtra:तुम्हाला वाटत नाही का हा खूप मोठा चमत्कार आहे या सगळ्या मतदारांना शिंदे च्या निग्रहणीत सुरक्षित ठेवले होते आणि मतदाना वेळी सोडले होते शिंदे गटात आणि भाजप मध्ये कोणत्या प्रकारचे संबंध आहे जरी शिंदेच्या बाजुला मुख्यमंत्री यांचे हसू दिसत असेल तर ते खोटे आहे शिंदेंना दिल्लीतून बळ दिले जात आहे मात्र शिंदे गटाचा एक उमेदवार भाजपने पडला धमक्यांची रिकॉर्डिंग देखील तुम्ही ऐकली असेल तरी सुद्धा शिंदे गटा विरोधात मतदान झाले या राजकारणामुळे महाराष्ट्र कमजोर केले जात आहे शिवसेना कमजोर करण्याचा प्रयत्न आहे भाजप हा भांडवल दरांचा पक्ष आहे आणि आम्ही भांडवल दरविरोधात बोलू नये हे आम्हाला मान्य नाही घाटकोपर, भांडुप मध्ये लोकांचा रोष काल दिसून आले आहे ही गद्दारी अमित शहा आणि शिंदेंनी करून घेतली आहे या मागे एकच हेतू आहे की आम्ही मुंबईसह महाराष्ट्र पैशाने विकत घेऊ शकतो आम्ही कोणाच्या बाजूने असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही कोणाच्या बाजूने का राहू आम्ही आमची भूमिका घेऊन लढत राहू जय सैतान देवेंद्र फडणवीस यांच्या मानेवरती उभे होते त्यांच्या गळा दाबण्यासाठी अशी शक्यता मला वाटते आम्हाला राज्याच्या हितासाठी निर्णय घ्यावा लागेल उद्धवजी या संदर्भात निर्णय घेतील शिवसेना कमजोर महाराष्ट्र फोडण्यामागे त्याच्यामागे एकच ध्येय आहे की शिवसेना कमजोर करणे आणि मुंबई उद्योगपतींच्या घशात घालणं की शिवसेना विरोध करते या राज्याचं नेतृत्व करणारे मुख्यमंत्र्यांना कळायला पाहिजे यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील अगदी शंकरराव चव्हाण सुद्धा असतील माननीय शरद पवार असतील विलासराव देशमुख असतील केंद्रामध्ये इंदिरा गांधी राजीव गांधी कोणी असतील त्यांना माहित आहे की शिवसेनेचे महाराष्ट्रातलं राजकीय दृष्टा मत त्यांना माहित होते की हा जो एक फोर्स आहे तो एक प्रकार राष्ट्रवादी फोर्स आहे सरकारला काही संदर्भात लढाया करता येत नसतील तर शिवसेना या लढाया लढत आहे देशासाठी हे माहीत होतं गद्दाराना भुमिका असते का ओमराजे नामचीन गद्दार आहेत आणि यांना काही भूमिका असू शकते शिवसेना तोडणे म्हणजे महाराष्ट्राचे तुकडे करणे हे अमित शहांचे भांडवलदार आहेत त्यांची आजीबाबत मनधरणी केली नाही जर शिंदे गटात गेल्यावर त्यांच्या वडिलांच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का ओम च्या वतीने पहिले 15 कोटी कोणी घेतले याची माहिती उद्धव ठाकरे यांच्या कडे आहे लातूरचा काय विकास केला धाराशिव मध्ये विकास दिसत आहे तो युतीचा राज्य असताना विकास झालेला आहे साखर कारखाने उभे करणे म्हणजे विकास नाही सर्वत्र विकास हा सामुदायिक पद्धतीने होत असतो खासदारांना वाटत असेल की 100 कोटी घेतला म्हणजे विकास झाला म्हणजे व्यक्तिगत असे नाही आहे फडणवीस खोटं बोलत आहेत शिंदे यांच्या समोर काय बोलताना शिंदे यांच्या पाठीमागून काय बोलतात ते दाखवत आहेत शिंदे मध्ये आणि माझ्या मध्ये काही नाही आहे शिंदेने पूर्ण सुपारी घेतली आहे फडणवीसंना आडवा करण्याची आणि त्यांना अमित शहांचा पाठिंबा आहे देवेंद्र फडणवीस यांचा टांगा पलटी करण्यासाठी संजय राऊत आहे पहिले माझ्याशी लढा नंतर उद्धव साहेबांशी मी आजही सांगतो माझ्यासारखे हजार लोक पक्षामध्ये आहेत असे दाखवू जया पक्षासाठी ठाकरे कुटुंबासाठी जीवाची बाजी लावायला तयार असतील पैशासाठी नाही बाळासाहेब ठाकरेंच्या पक्षासाठी आमच्यासारखे लाखो लोक आहेत या पक्षात जे तुमच्या गद्दारांशी लढायला तयार आहेत मिस्टर शिंदे माणसांचं जीवन हे क्षणभंगुर आहे बघा अजित दादांचं काय झालं एवढी मस्ती दाखवू नका आज हात उद्या नसाल0
0
Report
सोलापूर विधान परिषद के विजयी उम्मीदवार राजेंद्र राऊत को सीएम फडणवीस ने बधाई दी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग सोलापूर विधान परिषदेचे विजयी उमेदवार राजेंद्र राऊत यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोन करून दिल्या शुभेच्छा सोलापूर विधान परिषदेचे महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा राजेंद्र राऊत यांना फोन करत विजयाच्या दिल्या शुभेच्छा भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे वसंत देशमुख यांच्यात होता सामना वसंत देशमुख यांचा दारुण पराभव केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा0
0
Report
लोणावळा में स्मार्ट मीटर विरोधी बाजार बंद, नागरिकों का भारी रोष
Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या लोणावळ्यात आज स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात नागरिकांचा संताप रस्त्यावर उतरणार आहे. लोणावळा व्यापारी संघटनेच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय नेते, व्यापारी आणि नागरिकांनी बंदची हाक दिल्याने शहरातील बाजारपेठा कडकडीत बंद राहिल्या. महावितरणच्या कथित गलथान कारभाराविरोधात नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. भरमसाठ वीजबिले, वारंवार खंडित होणारा वीजपुरवठा आणि स्मार्ट मीटर सक्तीच्या निर्णयामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी आज लोणावळा बंद ठेवत प्रशासनाला इशारा दिला आहे. त्यामुळे शहरातील बहुतांश व्यवहार ठप्प झाले असून नागरिकांचा रोष स्पष्टपणे दिसून आला. तर स्मार्ट मीटर मुळे होणारी विजवाढ ही या निमित्ताने पुढे आली आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर विधान परिषद चुनाव: बीजेपी के डॉक्टर राजीव पोतदार भारी जीत के साथ विजयी
Nagpur, Maharashtra:नागपूर विधान परिषद निवडणुकांत भाजपचे डॉ. राजीव पोतदार यांनी दणदणीत विजय मिळवला... त्यांना झालेल्या 823 मतांपैकी 682 मतं मिळाली... तर काँग्रेसचे अतुल लोंढे यांना केवळ 130 मत मिळालीत... या विक्रमी विजयानंतर डॉक्टर राजीव पोतदार यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
नाशिक चुनाव: नरेंद्र दराडे 100+ मतों से हारे, भुजबल-गिरीश महाजन पर आरोप
Yeola, Maharashtra:नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचा 100 हून अधिक मतांनी पराभव झाला. दरम्यान माझ्या पराभवाला महायुतीचे नेते जबाबदार असून त्यांनी माझा घात केला आहे. यात मंत्री गिरीश महाजन, मंत्री छगन भुजबळ यांच्यावर थेट आरोप करण्यात आल्याने खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांकडून येवल्यात मंत्री छगन भुजबळ यांच्या संपर्क कार्यालय बाहेर पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
सांगली सातारा चुनाव विजय के बाद बीजेपी में जोरदार जश्न, पेड़े बांटे और आतिशबाज़ी
Sangli, Maharashtra:सांगली सातारा विधानसभा परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार देण्याची कदम यांचा दणदणीत विजय झाला आहे.या विजयानंतर सांगलीमध्ये भाजपाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला आहे.मारुती चौक या ठिकाणी भाजपा कार्यकर्त्यांकडून गुलाल आणि फटाक्यांची आतिशबाजी करत पेढ्यांचा वाटप देखील करण्यात आला आहे.त्यावेळी कदम यांच्या समर्थकांकडून दर्शन कदम आमदार असा फलक झळकवत जल्लोष केला आहे.0
0
Report
Advertisement
परभणी: महायुती के सईद खान विजयी, समर्थकों में जल्लोष
Parbhani, Maharashtra:परभणी ब्रेकिंग परभणी सईद खान यांचा विजयानंतर कार्यकर्त्यांकडून जल्लोष परभणीत महायुतीचे सईद खान विजयी.. महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांचा पराभव.. महायुतीचे सईद खान यांना 242 मते महाविकास आघाडीचे विवेक नावंदर यांना 159 मते.. परभणी महायुतीचे उमेदवार सईद खान विजयी..0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव: राजेंद्र राऊत 484 में 614 मतों से भारी जीत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे राजेंद्र राऊत यांना 614 पैकी 484 मते घेत दणदणीत विजय ( 1 to 1 ) - सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांचा दणदणीत विजय - 614 पैकी 484 मते घेत राजेंद्र राऊत यांनी रोवला विजयाचा झेंडा - तर विरोधी उमेदवार वसंत देशमुख यांना 118 मते - एकूण मतमोजणी प्रक्रियेमध्ये 13 मते बाद - महायुतीचे राजेंद्र राऊत यांच्या दणदणीत विजयानंतर सोलापुरात जल्लोषाला सुरुवात0
0
Report
वाशिम में संजय देशमुख के शिंदे गुट में शामिल होने पर स्वागत बैनर लगे
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:ऑपरेशन टायगरच्या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सेनेचे सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करून शिंदे सेनेत जाणार असल्याच्या चर्चा असताना उबाठा सेनेकडून याला विरोध ही झाला होता ,तर दुसरीकडे वाशिम मध्ये शिंदे सेनेच्या वतीने खासदार संजय देशमुख यांच्या फोटोला दुग्धाभीषेक करत समर्थन देण्यात आले होते ,आता मात्र संपूर्ण शहरात चौका चौकात खासदार संजय देशमुख यांचे शिंदे सेनेत आल्या बद्दल हार्दिक अभिनंदन अशे आशयाचे ब्यानर झळकले आहेत0
0
Report
Advertisement
भाजपा की बड़ी जीत: अविनाश ब्राह्मणकर 302 मतों से विजयी
Bhandara, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत भाजपाचा विजय. भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला आहे. एकूण ४५७ मतांपैकी ३०२ मत घेत अविनाश ब्राह्मणकर यांना मिळाली तर काँग्रेस समर्थित उमेदवार नरेश ईश्वरकर यांना १५४ मत मिळाली आहेत. यात भाजपा उमेदवार अविनाश ब्राह्मणकर यांचा विजय झाला आहे. एक मत अवैध ठरलं आहे.0
0
Report
पिंपरी-चिंचवड में अवैध गुटखा-तंबाकू पर बड़ी कार्रवाई; 21 लाख रु का माल जप्त
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवडमध्ये प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि सुगंधित तंबाखूच्या अवैध साठ्यावर अन्न व औषध प्रशासनाची मोठी कारवाई केलीय.. अकुर्डी मधल्या गुरुद्वारा चौकाजवळ छापा टाकून तब्बल २१ लाख ११ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अन्न सुरक्षा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार करण्यात आलेल्या या कारवाईत १२ लाखांहून अधिक किमतीचा प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त करण्यात आला. यासोबत टेम्पो, कार, दुचाकी आणि मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून मोक्का अंतर्गत कारवाईचा प्रस्ताव पोलिसांकडे पाठविण्यात आला आहे....0
0
Report
मुंबई-गोवा राजमार्ग पर सुबह इंद्रधनुष, जून में दिखा अप्रत्याशित प्राकृतिक चमत्कार
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर सकाळी सकाळीच निसर्गाचा आविष्कार पाहायला मिळाला. जिल्ह्यात आज रिमाझिम पाऊस आणि ऊन यांचा खेळ सुरू असतानाच निसर्गाची अनुभूती असलेला “इंद्रधनुष्य” पाहायला मिळाला. “इंद्रधनुष्य” प्रामुख्याने श्रावण महिन्यात दिसून येतो. मात्र, निसर्गाचा हा आविष्कार जून महिन्यात दिसल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
