Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ में नगरपालिका कार्रवाई पर भाजी विक्रेता जनाबाई दळवी का दर्दनाक बयान वायरल
Beed, Maharashtra:बीड: मी पाया पडत होते, तरीही त्यांना माझी दया आली नाही... भाजीविक्रेत्या जनाबाई दळवी यांनी सांगितली आप बीती... ANC - गेल्या 35 वर्षापासून भाजीपाला विक्री करण्याचे काम 70 वर्षीय जनाबाई दळवी करतायेत. मात्र दोन दिवसांपूर्वी नगरपालिका प्रशासनाकडून जनाबाई यांच्यावर निष्ठुर कारवाई करण्यात आली. त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर तेजीने व्हायरल होत आहे. मी पाया पडत होते, आणि ते मला ओढत होते. माझा सर्व भाजीपाला कचरा गाडीत टाकत होते. मात्र त्यातल्या कुठल्याही पुरुषाला माझी दया आली नसल्याचे सांगत जनाबाई सध्या घरातच बसून अश्रू ढाळत आहेत. कर्मचाऱ्यांनी केलेल्या ओढतानामध्ये त्या साध्या घरातच बसून आहेत. त्यांच्याशी संवाद संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...0
0
Report
राज्य-देश में डीज़ल-पेट्रोल साठा पर्याप्त, अफवाहों से बचें: भरणे
Ahilyanagar, Maharashtra:दत्ता भरणे ऑन डिझेल पुरवठा राज्यात आणि देशात डिझेल पेट्रोलचा साठा पुरेसा आहे..अफवांवर विश्वास ठेऊन शेतकऱ्यांनी पेट्रोल पंपावर डिझेल मिळवण्यासाठी गर्दी करू नये... पंपचालक सातबारा मागत असल्यास जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार करावी अस आवाहन राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणेांनी केलेल आहे...सध्या पेट्रोल पंपावर शेतकऱ्यांच्या डिझेलसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे यावर दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिलीये. राज्यात खतं-बियाण्यांचा तुटवडा नाही-भरणे राज्यात खरीप हंगाम तोंडावर आला असतानाच संभाव्य दुष्काळाच्या संकटाची चर्चा सुरू झाली आहे... हवामान विभागाने यंदा पाऊस कमी पडण्याची शक्यता व्यक्त केली असून त्यामुळे राज्य सरकार अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि कृषी विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली...राज्यात खतं आणि बियाण्यांचा कोणत्याही प्रकारचा तुटवडा भासणार नसल्याचा दावा सरकारकडून करण्यात आला आहे...केंद्र सरकारकडून मंजूर करण्यात आलेला खतांचा साठा राज्याला उपलब्ध होत असल्याने शेतकऱ्यांना अडचण येणार नसल्याचे सांगण्यात आले...कमी पावसाच्या शक्यतेमुळे कमी पाण्यात येणाऱ्या पिकांवर भर देण्याच्या सूचना कृषी विभागाकडून करण्यात येत आहेत... हवामानाच्या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करण्याचे आवाहनही करण्यात आले आहे...याबाबत माहिती देताना कृषिमंत्री दत्ता भरणे म्हणाले, हवामान विभागाने पाऊस कमी पडण्याची शक्यता वर्तवली आहे... मात्र राज्य सरकार पूर्ण तयारीत आहे... खतं, बियाणे आणि शेतीसाठी लागणाऱ्या सर्व बाबींमध्ये कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही...कमी पाण्यात येणाऱ्या पिकांबाबतही नियोजन सुरू आहे.0
0
Report
NEET पेपरफुटी मामले में CBI टीम ने लातूर पुलिस अधीक्षक कार्यालय में बैठक की, जांच तेज
Latur, Maharashtra:लातूरमध्ये NEET पेपरफुटी प्रकरणाच्या तपासाला आणखी वेग आला असून, CBI चे पथक आज लातूर पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. पथकाने काही वेळ पोलिस अधीक्षक Amol Tambe यांच्यासोबत सविस्तर चर्चा केल्याची माहिती समोर येत आहे. तपासाच्या अनुषंगाने हि भेट महत्वाची मानली जात आहे. भेटीतील संवाद समोर आला नसला तरी कारवयाच्या अनुषंगाने लातुरात मोठ्या घडामोडी घडत आहेत. त्यानुसार स्थानिक पोलिसांची सीबीआय मदत घेऊ शकते. लातुरातील आतापर्यंत दोघांना अटक झाली आहे तर चाल डॉक्टरांची चौकशी सुरू आहे. त्यामुळे आता पुढचा नंबर कोणाचा? याची चर्चा रंगली आहे याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...0
0
Report
Advertisement
धुळे-नंदूरबार जिल्हा बँक ने खरीप पीक कर्ज मध्ये 82% वितरण कर दिया
Dhule, Maharashtra:धुळे व नंदुरबार जिल्हा बँकेने खरीप पिक कर्ज वाटपाला सुरुवात केलेली आहे. महिनाभरामध्ये बँकेने 82 टक्के शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप केलेला आहे. यामध्ये धुळे व नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे. कुठलाही अडथळा विना शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटप करण्यात येत असल्याची माहिती बँकेचे व्यवस्थापक मनोज चौधरी यांनी सांगितला आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये बँक शंभर टक्के पेक्षा जास्त पीक कर्ज वाटप करेल असा विश्वासही चौधरी यांनी व्यक्त केलेला आहे. जिल्हा बँकेने 300 कोटी पेक्षा अधिक पीक कर्ज वाटप केलेल आहे. यात प्रामुख्याने आदिवासी भागातील शेतकऱ्यांचाही समावेश आहे. एकीकडे जिल्हा बँक ८२ टक्के कर्ज वाटप करत असताना दुसरीकडे मात्र राष्ट्रीयकृत बँकांनी पीक कर्ज वाटपात आखडता हात घेतला आहे. राष्ट्रीयकृत बँकांकडून केवळ सरासरी 15 टक्क्यांपर्यंत पीक कर्ज वाटप करण्यात आलेला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
सोलापुर कांग्रेस में शहर- जिलाध्यक्ष नियुक्ति से नाराज़गी, हटाव की मांग; आत्मदहन की धमकी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात काँगेसच्या शहर - जिल्ह्याध्यक्ष निवडीवरून नाराजीनाट्य, कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटावची मागणी - सोलापुरात काँग्रेसच्या शहर, जिल्हाध्यक्ष निवडीवरून कार्यकर्त्यांमध्ये नाराजीनाट्य - आमची नावे यादीत असतानासुद्धा वरिष्ठानी दुजाभाव केल्याची व्यक्त केली भावना - काँग्रेसच्या जेष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हटावची करण्यात आली मागणी - न्याय न मिळाल्यास पक्षाचे नेते राहुल गांधी यांच्यासमोर आत्मदहन करण्याचा इशारा बाईट - विजय हत्तुरे ( काँग्रेस कार्यकर्ते ) बाईट - सुरेश कांबळे ( महाराष्ट्र प्रदेश सचिव )0
0
Report
चिपळूण के सैनिक संकुल की मंजूरी सातारा को मिलने से कोकण में भारी नाराज़गी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील सैनिकांना धक्का! चिपळूणसाठीचे प्रस्तावित सैनिक संकुल साताऱ्याला. आमदार शेखर निकम यांची नाराजी. जे कोकणाचे आहे हे कोकणात व्हायला पाहिजे, शेखर निकम यांनी व्यक्त केली खंत. अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणमध्ये प्रस्तावित असलेले ‘छत्रपती श्री संभाजी महाराज सैनिक संकुल’ सातारा जिल्ह्यासाठी मंजूर झाल्याचे समोर आल्यानंतर कोकणात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.त्यासाठी सातत्याने पाठपुरावा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार शेखर निकम यांनी याबाबत नाराजी व्यक्त केली.कोकणातील हजारो माजी सैनिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असलेला हा प्रकल्प चिपळूणमध्ये व्हावा, यासाठी आमदार शेखर निकम यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. अधिवेशनातही त्यांनी याबाबत चर्चा घडवून आणली होती. सैनिकांसाठी कॅन्टीन, ईसीएचएस आणि विविध सेवा एकाच छताखाली उपलब्ध व्हाव्यात, हा या संकुलामागील उद्देश होता. मात्र, माजी सैनिक कल्याण मंत्री शंभूराजे देसाई हे हे संकुल साताऱ्यासाठी मंजूर करण्याच्या प्रयत्नात असल्याची चर्चा रंगली असून, त्यामुळे माजी सैनिक आणि सामाजिक संघटनांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक में मानसून पूर्व आंधी-बारिश से येवल्यात भारी नुकसान, घर ढहे और फसलें बह गईं
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात मान्सून पूर्व पाऊस व वादळी वाऱ्यांमुळे सर्वाधिक नुकसान नाशिकच्या येवल्यात झाले असून देवळाणे, बोकटे, नांदूर, आडगाव, निमगाव मढ या गावांमध्ये घरांची पडझड, कांदा चाळीचे नुकसान, व केळी बागांचे नुकसान झाले आहे देवळाणे येथील बाळासाहेब जाधव या शेतकऱ्याचे घराचे छत कोसळून तीन जण जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे दरम्यान देवळाणे व बोकटे येथे कांदा चाळ व केळी बाग नुकसानीच्या ठिकाणी समीर भुजबळ यांनी प्रत्यक्ष पाहणी केली यावेळी महसूल व कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांना तातडीने नुकसानीचे पंचनामे करून शासन दरबारी अहवाल सादर करण्याच्या सूचना माजी खासदार समीर भुजबळ यांनी केल्या0
0
Report
बीड़ में ईंधन संकट: सिर्फ दो लीटर पेट्रोल, चार पहिये को 10–12 लीटर डीज़ल
Beed, Maharashtra:बीड: शहरात केवळ दोन लिटर पर्यंत पेट्रोल पुरवठा... Wkt ANC - बीड शहरात गेल्या दहा ते बारा दिवसांपासून इंधन पुरवठा अत्यल्प होत असल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. आज शहरातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी दुचाकी वाहनांना केवळ दोन लिटर पेट्रोल, तर चारचाकी वाहनांना दहा ते बारा लिटर डिझेल देण्यात येत आहे. त्यामुळे या इंधनटंचाईचा सर्वाधिक फटका शेतकरी, प्रवासी वाहतूक चालक आणि दैनंदिन प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे.0
0
Report
जालना में डीज़ेल संकट: किसानों को दूर-दराज तक भटकना मजबूर
Jalna, Maharashtra:जालना : डिझेलसाठी शेतकऱ्यांची परवड सुरूच, अनेक पंपांवरील डिझेल साठा संपल्याने शेतकरी दूरवर प्रवास करून कॅन घेत भटकंती करतायत. अँकर : जालना जिल्ह्यांतील अनेक पेट्रोल पंपांवरील डिझेलचा साठा संपला आहे. त्यामुळे ट्रॅक्टरसाठी डिझेल मिळवण्यासाठी शेतकरी दूरवर प्रवास करून कॅन घेत भटकंती करतायत.0
0
Report
Advertisement
वाशीम के शेलूबाजार में हल्दी की बुवाई शुरू, किसानों ने यांत्रिक पद्धति अपनाई
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलूबाजार परिसरात शेतकऱ्यांनी हळद पेरण्याला सुरुवात केली आहे. आघाडीची शेती पद्धतीचा अवलंब करत अनेक शेतकरी यांत्रिक पद्धतीने हळदीची पेरणी करत आहेत. यामुळे कमी वेळेत पेरणीचे काम पूर्ण होत असल्याने शेतकरी या पद्धतीला प्राधान्य देत आहेत. गेल्या काही वर्षांत हळद पिकाला बाजारात चांगला प्रतिसाद मिळत असून या पिकातून शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या समाधानकारक उत्पन्न मिळत आहे. त्यामुळे सोयाबीन, कापूस यांसारख्या पारंपरिक पिकांसोबत आता शेतकरी हळद लागवडीकडेही वळताना दिसत आहेत. त्यामुळे शेलूबाजार परिसरात हळद लागवडीचे क्षेत्र वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
वाशीम में ईंधन कीमतों में उछाल: डीजल-पेट्रोल की कमी से किसान-वाहन चालक चिंतित
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिल्ह्यात डिझेल आणि पेट्रोलचा तुटवडा जाणवून येत आहे. आजही काही पेट्रोल पंपांवर “नो डिझेल, नो पेट्रोल” असे फलक लावण्यात आले आहेत, ज्यामुळे शेतकरी आणि वाहनधारक मोठ्या रांगा लावून उभे आहेत. आजही डिझेलच्या किंमती 94 पैशांनी तर पेट्रोलच्या किंमती 90 पैशांनी दर वाढवण्यात आले आहेत. एकीकडे इंधन दरवाढ तर दुसरीकडे डिझेल-पेट्रोलचा तुटवडा, अशा दुहेरी संकटामुळे वाहनधारक चिंता व्यक्त करत आहेत. सध्या शेतकऱ्यांचे खारीप पेरणीपूर्ण माशागतीचे काम सुरु असल्याने इंधनाची उपलब्धता अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी आणि इंधन वापरणाऱ्यांनी त्वरित साठा पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे. साठेबाजी रोखण्यासाठी जिल्हाधिकारी यांनी आज आदेश जारी करत, वाहनाची पडताळणी करूनच इंधन पुरवठा करण्याचे निर्देश दिले आहेत. इंधन तुटवड्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी पेट्रोल,डिझेल दर GFX: पेट्रोल 90 पैशांनी महागले तर डिझेल 94 पैशांनी महागले सद्यस्थितीत दर:( तिसऱ्यांदा दर वाढ) पेट्रोल प्रतिलिटर *109.85* डिझेल प्रतिलिटर *96.43* आधीचे दर:( दुसऱ्यांदा दर वाढ) पेट्रोल:108.95 डिझेल:95.49 अगोदरचे दर:(पहिल्यांदा वाढ) पेट्रोल 108.04 डिझेल:94.550
0
Report
जालना में ओबीसी नेता लक्ष्मण हाके पर मंडल आयोग और आरक्षण की राजनीति
Jalna, Maharashtra:जालना :ओबीसी नेते लक्ष्मण हाके बाईट जरांग्या खुळखुळ्या तुला अक्कल नावाचा प्रकार नाही : हाके प्रसाद लाड यांनी राजकारणाचा पुढाऱ्यांचा फायदा घेऊन अंबानीच्या पुढे जावं... प्रसाद लाड यांना आरक्षण, जरांगे ची मागणी, ओबीसींचे नुकसान यातली काडीची अक्कल आहे का?? नऊ जेजेसच्या खंडपीठा समोर तावून सलाखून मंडल आयोग लागू झाला आहे सुप्रीम कोर्टाच्या निर्देशाने झाला आहे. देशभरातल्या प्रत्येक राज्यात इम्प्लिमेंट झालाय. बेअक्कल माणसे एकत्र झाल्यावर असेच आरोप करणार..... मुख्यमंत्र्यांची आयमाय काढणाऱ्याकडून काय अपेक्षा करायचा.. आम्हाला महाराष्ट्रातील ओबीसी, भटका विमुक्त एकत्र करायचा आहे.. राजकारणाच्या जोरावर ओबीसीच्या अन्नात माती कालवण्यात यासारखे माणसं जात आहेत त्यांना आणि त्यांच्या पक्षाला आम्हाला धडा शिकवायचा आहे.. बाईट - प्रा .लक्ष्मण हाके ओबीसी आंदोलक0
0
Report
Advertisement
वर्धा में 47.1°C तापमान, रेड हीट स्ट्रोक ने नागरिकों को किया परेशान
Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग वर्धा में 47.1 डिग्री सेल्सियस तापमान तीन दिन का रेड हीट स्ट्रोक जारी वर्धा में भीषण गर्मी ने लोगों का जीना मुश्किल कर दिया है। जिले में तापमान लगातार नए रिकॉर्ड बना रहा है। कल वर्धा का अधिकतम तापमान 47.1 डिग्री सेल्सियस दर्ज किया गया, जिससे जनजीवन पूरी तरह प्रभावित हो गया है। दोपहर के समय सड़कों पर सन्नाटा देखने को मिल रहा है, वहीं ठंडे पेय पदार्थों की दुकानों पर लोगों की भारी भीड़ उमड़ रही है। नागरिकों का कहना है कि वर्धा में इससे पहले इतनी भीषण गर्मी कभी महसूस नहीं हुई। बढ़ते तापमान को देखते हुए मौसम विभाग ने भी हीट स्ट्रोक को लेकर सतर्क रहने की अपील की है। इस भीषण गर्मी का जायजा लिया हमारे प्रतिनिधि मिलिंद आंडे ने...0
0
Report
येवला क्षेत्र की दो एकड़ केला बगान आंधी-बारिश से ध्वस्त, किसान लाखों के नुकसान में
Yeola, Maharashtra:येवला क्षेत्रातील बोकटे शिवारात झालेल्या वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने बापूसाहेब सिताराम दाभाडे या शेतकऱ्याची दोन एकर केळीबाग अक्षरशः उध्वस्त झाली असून या नैसर्गिक आपत्तीमुळे संबंधित शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. येवला परिसराची ओळख कांद्याचे आगार म्हणून आहे. मात्र गेल्या काही वर्षांपासून कांद्याला अपेक्षित बाजारभाव मिळत नसल्याने शेतकऱ्याने मोठी आर्थिक गुंतवणूक करत दोन एकर क्षेत्रात केळी लागवड केली होती. केळी पीक चांगल्या जोमात आले मात्र वादळी वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसाने काही क्षणांतच संपूर्ण पीक उद्ध्वस्त केले. जोरदार वाऱ्यामुळे केळीची झाडे मुळासकट कोसळली असून अनेक घडांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे.0
0
Report
फडणवीस के शिर्डी आगमन के साथ वंदे भारत ने किया प्रभावी प्रदर्शन
Shirdi, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदे भारत ट्रेनने शिर्डीत पोहचले... डिफेन्स क्लस्टरच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री शिर्डीत... मुंबईतून वंदे भारतने प्रवास करत मुख्यमंत्री शिर्डीत दाखल... शिर्डी रेल्वे स्थानकावरून हॉटेल सन अँड सँडकडे रवाना... मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यात फक्त पाच गाड्या... मुख्यमंत्री बाईट पॉईंटर - जगातल्या विकसित राष्ट्राप्रमाणे वंदे भारत ही ट्रेन आहे... वंदे भारतमध्ये आल्याने अनेक लोकांच्या भेटी झाल्या... प्रवासात फाईल्सच काम देखील करता आलं... आजचा प्रवास अत्यंत लाभदायी वाटला... पंतप्रधान मोदी यांनी दिलेलं आवाहन आपण स्वतः अनुकरन केलं पाहीजे... शेतकऱ्यांना डिझेल उपलब्ध करून देण्याबाबत कालच जिल्हाधिकारी यांना सूचना केल्यात... कोणी साठेबाजी करत असेल तर त्यावरही लक्ष ठेवण्याच्या सूचना... दरवर्षी किती डिझेल लागते याबाबत माहिती आहे, मात्र अचानक 30% जास्त मागणी होत असल्यास काहीतरी गडबड आहे... शेतकऱ्यांना त्रास होणार नाही अशा उपाययोजना... शिर्डी डिफेन्स क्लस्टर - शिर्डी भक्तीचं केंद्र असलेली आता शक्तीचं केंद्र बनतंय... शांतता तेच प्रस्तापित करू शकतात जे शक्तिमान असतात... दुर्बल व्यक्ती कधीच शांतता प्रस्तापित करू शकत नाही...0
0
Report
Advertisement
