icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के जयगड़ बंदर के निर्यात प्रकल्प को गति देने का निर्देश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जयगड बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या..मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश!.. अँकर कोकणातील हापूस आंबा,काजू आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीतील जयगड बंदर सज्ज होत आहे... मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या निर्यात प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.. बंदरावरील शीतसाखळी आणि पायाभूत सुविधा सक्षम करून हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे..
0
0
Report

कोसारी दुहेरी हत्याकांड के साक्षीदार का अपहरण कर खून, शव पेड़ से लटका मिला

Sangli, Maharashtra:स्लग - दुहेरी हत्याकांड खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा अपहरण करून निर्घृण खून.. अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी येथील दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कर्नाटकच्या मदभावी येथे अपहरण झालेल्या दादासो यमगर यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.मंगळवारी सांगलीच्या न्यायालयात जबाब देण्यासाठी निघाले असता कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागज फाटा येथून यमगर यांचा अपहरण करण्यात आले होते.याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला होता.दरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास कर्नाटकच्या अथणी तालुक्यातल्या मदभावी येथे यमागर यांचा खून करून मृतदेह झाडाला गळफास लावलले अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या घटनास्थळी धाव घेतली होती.मृत यमगर हे जत तालुक्यातल्या कोसारी मध्ये 2023 मध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते, मंगळवारी त्यांची न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली जाणार होती,तत्पूर्वी त्यांचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. जबाब नोंदवू नये,या उद्देशाने त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

शिर्डी जमीन घोटाला: भोंदू खरात की चौकसी तेज, साक्षियों के बयान सामने

Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदू खरात याची चौकशी सुरू... भोंदू खरात याची दुपारपासून शिर्डी पोलिस करताय कसून चौकशी.. मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदली... शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर... सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केला नाही... मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो , ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले... चौकशी दरम्यान अशोक खरात याने दिली पोलिसांना माहिती.. पोलिस चौकशीत अशोक खरात याने दिलेली माहिती - 22 / 8 / 2023 ला साठे खत आणि मुक्तीआर पत्र झालं आणि 23 / 8 / 2023 ला खरेदी खत झालं.. 22 तारखेला मूळ जमीन मालक आले नाही , त्याची खूप वेळ वाट बघितली त्यामुळे 23 आम्हाला जमिनीची खरेदी करावी लागली.. 22 आणि 23 तारखेला आम्ही रक्कम RTGS करून गोंदकर यांच्या खात्यावर पाठवली होती... जमीन परत घ्यायचे आणि व्याज मिळावे असे काहीही ठरलेलं नव्हत.. सर्व साक्षीदार एक झाले आहेत आणि आता नाही होऊन पडत आहेत... मी जेव्हा जमीन बघायला गेलो तेव्हा जमिनीचा मूळ मालक नव्हता.. अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे दोघे जण जमीन दाखवण्यासाठी आले होते... जेव्हा जमीन खरेदी करायला गेलो तेव्हा शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे होते... आरोपी भोंदू अशोक खरात चौकशीत सविस्तर माहिती न देता पोलिसांना देतोय अर्धवट माहिती... भोंदू खरात हा शिर्डी पोलिसांच्या कोठडीत असताना सकाळी 10 वाजता करतो जेवण , एक चपाती आणि डाळ भात अस कोठडीत दिलं जात जेवण... आणि सकाळच्या जेवणातील उरलेले जेवण सायंकाळी 5 वाजता करतो..मात्र संध्याकाळी भोंदू खरात हा जेवण करत नाही.... विश्वसनीय सूत्रांची माहिती....
0
0
Report

चंद्रपुर के टाडोबा-आंधारी बफर.zone में मामा मेल बाघ ने गाई का शिकार किया

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर, मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ गाईची केली शिकार अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर आलाय. मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ वाघाने गाईची शिकार केली. पाळीव जनावरावर हल्ला करून शेत शिवारात ओढून नेले. सध्या जानाळा- केसलाघाट या भागात मामा मेलचा मुक्काम आहे. हा भला थोरला वाघ या भागात अनेक ठिकाणी दर्शन देत आहे. ताज्या व्हिडिओत फुलझरी गावाच्या अगदी बाजूला त्याने सहजपणे गाईची शिकार केली. वाघाच्या या वावराने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. वनविभागाचे मामा मेल वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे.
0
0
Report

आमदार शिवाजी पाटील पर 100 करोड़ के मानहानि दावे की चेतावनी, मुश्रीफ का इशारा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर, आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील साधा ग सुद्धा कधी ऊच्चारलेला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतरच त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला दिसतोय. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते सातत्याने माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत. मी मात्र श्री. पाटील यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे यापूर्वीच सांगितलेले होते आणि बोलणारही नव्हतो. परंतु; काल त्यांनी माझ्यावर हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले, असा व्यक्तिशः बदनामीकारक आरोप केला. त्यामुळे, मी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन. परंतु माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन मी कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या- ज्या वेळी माझी व्यक्तिशः बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्यावतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर केलेल्या या वक्तव्यातून त्यांनी माझी व्यक्तीशः बदनामी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांनी यासंबंधीचे पुरावे जाहीर करावेत. अन्यथा त्यानंतर त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीकारक दावा दाखल करणार आहे. श्री यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार शिवाजी पाटील यांनी असेही वक्तव्य केले आहे की केडीसीसी बँकेकडून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्यास आमदार घाबरतात. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हासुद्धा आमदारांचा, माझ्या संचालकांचा, कारखानदारांचा आणि समस्त शेतकऱ्यांचाही अपमानच आहे. श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, आमदार श्री. पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी. बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, अशा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावच. कारण आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदांना आणि जनतेलाही माहीत आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती: 13 वर्षीय गर्भपात मामले में डॉक्टर समेत अन्य आरोपी गिरफ्तार

Rui, Maharashtra:अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरणात फलटणमधील डॉक्टरला अटक.... वडगाव निंबाळकर पोलिसांकडून डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडाझडती..... तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप..... baramati तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत एका तेरा वर्षीया अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणात रवींद्र आनंदराव गार्डी या आरोपीला अटक देखील केली होती, मात्र पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र गार्डी याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात फलटणमधील डॉक्टर योगेश हनुमंत नरुटे याला देखील वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडझडती देखील घेतली असून या गर्भपात प्रकरणी वापरण्यात आलेले साहित्य याशिवाय रुग्णालयातील काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. संबंधित डॉक्टरने मुलगी अल्पवयीन माहित असताना देखील तिचा गर्भपात केला यासंदर्भात पोलिसांना खबर देणे आवश्यक होतं मात्र दिली नाही गर्भपात करून तिच्या गर्भाची विल्हेवाट लावली पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे आरोप डॉक्टर वरती ठेवण्यात आले आहेत. याशिवाय या प्रकरणात पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्या मदतीने फलटणमधील डॉक्टरच्या रुग्णालयात संबंधित पीडित मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी पोलिसांनी पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याला देखील आरोपी करत अटक केली आहे. काय आहे प्रकरण.... बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका 48 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केला होता. यातून संबंधित पीडित मुलगी गर्भवती राहिली. पीडित मुलगी आणि आरोपी हे नात्यातील असल्याने हे प्रकरण समझोता करून गर्भपात करून मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रकरणाचा पुढे उलघडा झाल्यानंतर संबंधित आरोपीला काही स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुढे या प्रकरणात पोलिसांनी संबंधित पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आया. वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपी रवींद्र आनंदराव गार्डी याला अटक देखील केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली असताना 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतच पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीच्या मदतीने रवींद्र गार्डी याने आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असताना संबंधित पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात घडवून आणण्यात मध्यस्थी केलेल्या पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्यावर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. तर फलटणमधील ज्या डॉक्टरच्या रुग्णालयात या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला त्या डॉक्टरला देखील या प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करत डॉक्टरला अटक करण्यात आली. पोलिसांनी डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडाझडती घेत काही महत्वाची कागदपत्रे आणि गर्भपात प्रकरणी वापरलेले काही साहित्य हस्तगत केले आहे.
0
0
Report

गोवा की जलक्रीड़ा: महिला पर्यटक की मौत टल गई, सुरक्षा व्यवस्था पर सवाल

Ratnagiri, Maharashtra:गोवा.. गोव्यात पर्यटनाचा थरार की मृत्यूचा सापळा?.. पॅरासेलिंग करताना पर्यटक महिलेचा श्वास गुदमरला!.. अँकर गोव्याच्या निळ्याशार समुद्रात पर्यटनाचा आनंद लुटणं एका महिला पर्यटकाच्या जीवावर बेतलं असतं,अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुष्मिता नावाच्या एका पर्यटकाने आपला 'मरणाशी आलेला अनुभव' सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच सतर्क केलं आहे.. पॅरासेलिंगचा आनंद घेत असताना अचानक सुष्मिता समुद्रात कोसळली. मात्र,भयानक गोष्ट अशी की,पॅरासेलिंगची दोरी सुष्मिताच्या गळ्याभोवती आवळली गेली.समुद्राच्या मध्यभागी श्वास कोंडलेला असताना आणि समोर मृत्यू दिसत असतानाची ती भीषण धडपड कॅमेरात कैद झाली आहे. ”तो १ मिनिटाचा थरार माझं आयुष्य संपवू शकला असता. पाण्यात पडले, गळ्याभोवती दोर आवळला गेला आणि सगळं संपलं असं वाटलं होतं,” अशा शब्दांत सुष्मिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.. सुदैवाने,वेळीच मदत मिळाल्याने सुष्मिता बचावली असली, तरी या घटनेने गोव्यातील जलक्रीडा (Water Sports) प्रकारांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मित्रांनो, कोणताही वॉटर स्पोर्ट करण्यापूर्वी तिथली सुरक्षा उपकरणं तपासा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका.कारण एक छोटीशी चूक आनंदाच्या सहलीचं रूपांतर कायमस्वरूपी मानसिक आघातात करू शकते..
0
0
Report

गोकुळ दूध संघ चुनाव: सुप्रीम कोर्ट के फैसले से दूध उत्पादकों को राहत

Kolhapur, Maharashtra:On गोकुळ निवडणूक निकाल स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत.. गोकुळवर प्रशासकाच्या माध्यमातून ताबा मिळवायचा जे षडयंत्र रचले होते.. तो सुप्रीम कोर्टाने हाणून पडला. त्यामुळेच गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक आम्हाला सहकार्य करेल. आम्ही सातत्याने सांगत होतो 1200 संस्थांचा निकाल लावून ताबडतोब निवडणुका घ्या.. पण राज्य शासनाने घाईगडबडीत शेवटच्या दिवशी कायदा केला.. ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी चार वाजता प्रशासक साताऱ्यावरून कोल्हापुरात पोहोचतात, हा सगळा गौडबंगाल होता. पण आता दूध उत्पादकाला दिलासा मिळाला आहे... निवडणुकीसाठी सव्वाशे दिवस लागतात.. कदाचित सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन काही दिवस वाढवून घेऊ शकतो.. पण गोकुळची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यातील दूध उत्पादक आता मतदानाला पात्र झाला.. मतदान करून तो निर्णय घेईल.. उद्याच्या निवडणुकीत काय करायचे.. जे मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या समोर आले.. त्या मुद्द्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने न्यायपूर्वक निर्णय दिला आहे.. गोकुळ दूध संघ बिनविरोध निवडणूक मधल्या काळात विनय कोरे यांनी त्या पद्धतीची प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती.. पण आता निवडणुका पुढे गेल्यामुळे ती चर्चा थांबली आहे.. आता तरी तसा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही.. पण प्रस्ताव आला तर त्याच्यावर विचार केला जाईल.. ऑन राज्य सरकारला चपराक हा निर्णय सरकारला चपराकच आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.. ऑन महायुती नेते आरोप प्रत्यारोप जो वाद आहे तो महायुती अंतर्गत आहे.. त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे.. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. ती जनता योग्य निर्णय घेईल.. पावसाळ्यात निवडणुका येत असल्या तरी ठरावची प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होईल.. मतदान पावसाळाच्या नंतर एखादा महिना पुढे घ्यावे असं होईल... ऑन अपात्र संस्था बाराशे संस्थांची सुनावणी पूर्ण झाली पाहिजे अशी आमची ठाम भूमिका.. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका.. ऑन आघाडी आम्ही समविचारी जे सोबत येतील त्यांच्यासोबत आघाडी करू.. निवडणुका गोकुळ वाचवण्यासाठी व्हायला पाहिजे अशी भूमिका.. गोकुळ दूध संघ वाढवण्यासाठी जी लोकं सोबत येईल त्यांना घेऊन निवडणुकीला सामोर जावे पक्षीय राजकारण संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका.. कारण साडेपाच लाख शेतकरी यामध्ये आहेत . पण उलट्या बाजूने काय होईल हे मला माहित नाही.. गोकुळची आगामी निवडणूक गोकुळ दूध उत्पादक विरुद्ध बाकीचे अशी होईल.. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेऱ्या आमच्यासोबत असतील.. आम्ही जो शब्द दिला होता दरवाढीचा तो आम्ही पूर्ण केला. जास्त दूध दरवाढ दिले. पाच वर्षात कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास दिला नाही.. सगळ्यांना सोबत घेऊन गोकुळची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे याच्यावर भर होता..त्यामुळे लोक आमच्यासोबत राहतील.
0
0
Report
Advertisement

नाशिक में महिंद्रा परियोजना और MIDC विस्तार के लिए उद्योग मंत्री का बड़ा दावा

Nashik, Maharashtra:मी उद्योगमंत्री झाल्यावर पहिल्यांदा जेव्हा नाशिक ला आलो तेव्हा अनेक तक्रार होत्या मात्र आता या सर्व तक्रारी संपले आहेत याचा आनंद आहे उद्योजकांच्या अनेक अडचणी सोडवले महिंद्रा प्रकल्पसाठी आम्ही जेवढे पाठपुरावा करत होतो त्याचे 10 पट इथले उद्योजक करत होते नाशिक जिल्ह्यात अजून 10 ते 12 ठिकाणी आपण midc करत आहोत यासाठी 1300 एकर जागा आम्ही संपादित करत आहोत महिंद्रा प्रकल्प देखील नाशिक मधेच होणार आहे कुंभ मध्ये उद्योग विभागाकडून देखील आम्ही काम करणार आहे गेल्या 3 वर्षात 65 ते 67 हजार युवकांना आम्ही उद्योजक केले आहेत डाओस वर किती mou केले यावर देखील टीका होतो मात्र मी आता यावर श्वेतपत्रिका काढणार आहे mou फक्त डाओस मधेच करत नाही तर राज्यात देखील आम्ही करत आहोत
0
0
Report

नाशिक में कुंभ के साथ उद्योग विभाग का बड़ा जुड़ाव, विकास तेज

Nashik, Maharashtra:आज विशेष आनंद आम्हाला आहे एक आगळा वेगळा कार्यक्रम आज होत आहे. कुंभ सोबत उद्योग विभागाला जोडण्यात येत आहे. कुंभ एक मोठं चॅलेंज आहे आणि आम्ही ते स्वीकारले आहे. गेल्या वेळी पेक्षा 4 ते 5 पट जास्त भाविक येणार आहेत. 10 ते 12 कोटी भाविक येथील अस अंदाज आहे. आज नाशिक शहर अध्यात्मिक आणि धार्मिक शहर म्हणून ओळखला जाते. आता विमानसेवा, रस्ते कनेक्टिव्हिटी देखील मोठया प्रमाणात झाले आहेत. कार्गो सेवा देखील सुरू होणार आहे. रेल्वे स्टेशन विस्तार देखील होणार आहे. सर्व बाजूने नाशिक शहराचा विकास आता होत आहे. नाशिक मध्ये जागचे भाव मोठया प्रमाणात वाढले आहे. मुंबई आणि पुणे नंतर नाशिक कडे जास्त ओढ आहे. पुणे पेक्षा जास्त पसंती आता नाशिकला मिळताना पाहायला मिळतो आहे. भाषणाला जास्त वेळ घेतला तर स्टेज वर असलेले मंत्रीपैकी कुणालाही मी कुंभमेळा मंत्री करून टाकेन अस मला मुख्यमंत्री म्हणाले. जास्तीजास्त झाडं आम्ही नाशिकला लावणार आहे. राज्यत सर्वाधिक झाड आम्ही नाशिक ला लावणार आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण डोंबिवली में पानी कटौती: 24 घंटे के लिए जल आपूर्ति बंद

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीत पाणी कपात पावसाळा लांबणार असल्याने प्रशासनाची खबरदारी यंदा पावसाळा लांबणार असल्याचा अंदाज हवामान खात्याला वर्तवला आहे. त्यामुळे पाण्याचे नियोजन करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाकडून देण्यात आल्यात. कल्याण डोंबिवली महापालिकेने देखील पाणी कपात करण्याचा निर्णय घेतलाय. 11मे रात्री बारा वाजल्यापासून पुढील २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे .शिवाय त्यानंतर कमी दाबाने पाणीपुरवठा होईल .यंदा तापमानात प्रचंड वाढ झाल्याने पाण्याचं नियोजन करण्यासाठी प्रत्येक पालिका महापालिकांसाठी तारेवरची कसरत असणार आहे. पाणी कपात करण्याचा निर्णयानंतर नागरिकांनी पाणी जपून वापरावं असा आवाहन कल्याण डोंबिवली महापालिका प्रशासनाने केलंय.
0
0
Report

कल्याण के डम्पिंग ग्राउंड में आग, धुएं से लोगों को सांस लेने में परेशानी

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा एकदा आग लागलीय. आगीमुळे शहरात धुराचे लोट.. कल्याणमध्ये डम्पिंगला पुन्हा आग लागलीय. कल्याण पश्चिमेच्यातील आधारवाडी डम्पिंग ग्राउंडला याआधी ४ दिवसापूर्वी आग लागली होती कल्याण मधील पुन्हा आज दुपारी आग लागल्याची माहिती केडीएमसी अग्निशमन दलाला देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या सहा गाड्यांकडून आग विझवण्याचं प्रयत्न सुरू आहे. ही आग कशामुळे लागली हे सध्या तरी स्पष्ट होऊ शकले नाही. मात्र आगीमुळे आजूबाजूच्या परिसरातील उष्णतेत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. असुन धुराचे लोट पसरल्याने आजू बाजूच्या परिसरातील नागरिकांना श्वसनाचे त्रास होऊ लागले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top