Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ग्रामीण विकास मंत्री जयकुमार गोरे ने Zee Taas को महाराष्ट्र दिवस की शुभकामनाएं दीं
Solapur, Maharashtra:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून झी 24 तास च्या प्रेक्षकांना महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा0
0
Report
शिरूर के होटल उद्योग पर गैस कीमतों का भारी असर, 19kg सिलेंडर में 993 रुपये वृद्धि
Shirur, Maharashtra:व्यावसायिक गैस सिलेंडरमध्ये तब्बल ९९३ रुपयांची वाढ; हॉटेल व्यवसायावर परिणाम ANC:घरगुति गैस दर स्थिर असताना १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किंमतीत मोठी वाढ करण्यात आली आहे. या दरवाढीमुळे हॉटेल आणि खाद्य व्यवसायांवर आर्थिक ताण वाढण्याची शक्यता आहे. VO: १९ किलोच्या व्यावसायिक गॅस सिलेंडरची किंमत २०९३ रुपयांवरून थेट ३०८६ रुपयांवर पोहोचली आहे. म्हणजेच एका सिलेंडरमागे तब्बल ९९३ रुपयांची वाढ करण्यात आली आहे. सध्या व्यावसायिक गॅसचा पुरवठा पूर्णपणे सुरळीत नसतानाच ही दरवाढ करण्यात आल्याने हॉटेल व्यावसायिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.गॅस दरवाढीचा थेट परिणाम हॉटेल व्यवसायावर होणार असून, खाद्यपदार्थांच्या किंमती वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशालाही मोठा फटका बसण्याची चिन्हे आहेत.याचाच आढाव घेत हॉटेल व्यावसायिकाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To दत्ता बाबर (हॉटेल व्यावसायिक प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
वाशिम में 67वें स्थापना दिवस पर ध्वजारोहण और शासकीय समारोह
Washim, Maharashtra:वाशिममध्ये महाराष्ट्र राज्याच्या ६७ व्या स्थापना दिनानिमित्त भव्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात होतं. वाशिम येथील पोलीस कवायत मैदानावर हा मुख्य शासकीय समारंभ पार पडला.राज्याचे कृषी मंत्री तथा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.यावेळी जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक तसेच शिक्षक आमदार किरण सरनाईक यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.यावेळी बोलताना मालक मंत्री दत्तात्रय भरणे यांनी वाशिम जिल्ह्यात आगामी काळात उष्णतेच्या लाटेची शक्यता असून नागरिकांनी त्यासाठी सज्ज राहावं आणि स्वतःची काळजी घ्यावी असे आवाहन केलं0
0
Report
Advertisement
रायगढ़ में महाराष्ट्र दिवस पर ध्वजारोहण, आदिती तटकरे ने किया उद्घोष
Chendhare, Maharashtra:महाराष्ट्र स्थापना दिवस आज रायगड जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा झाला. रायगड जिल्ह्याचा मुख्य ध्वजारोहण अलिबाग येथील पोलिस परेड मैदानावर पार पडला. मंत्री आदिती तटकरे यांनी ध्वजारोहण केले. रायगड पोलिस दलाकडून राष्ट्रध्वजाला मानवंदना देण्यात आली. विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा यावेळी गौरव करण्यात आला.0
0
Report
रशीदपुरा के अवैध गर्भपात रैकेट का मुख्य एजेंट गिरफ्तार, शिर्डी से पकड़ा गया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील रशीदपुरा भागात उघडकीस आलेल्या अवैध गर्भपात रॅकेटमधील मुख्य एजंट मंगेश सुखदेव थोरात याला गुन्हे शाखेच्या पथकाने गुरुवारी बेड्या ठोकल्या. पोलिसांची कारवाई सुरू झाल्याचे समजताच तो शिर्डी येथे जाऊन लपला होता. महिलांना गर्भपातासाठी पोहोचवण्यासाठी तो तब्बल १५ हजार रुपये कमिशन घेत असल्याचे पुढं आले होते, रशीदपुरा प्रकरणात २८ एप्रिल रोजी सिटी चौक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांची धरपकड सुरू झाली होती. कारवाईची धास्ती घेऊन थोरातने थेट शिर्डी गाठली होती आणि तेथील देवस्थानच्या एका खोलीत तो लपून बसला होता. मात्र, जवळचे पैसे संपल्याने घरून पैसे घेण्यासाठी तो शहरात परतणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. या माहितीच्या आधारे गुरुवारी सकाळी पावणेनऊच्या सुमारास मध्यवर्ती बसस्थानक परिसरात त्याला अटक झाली...0
0
Report
सातारा में महाराष्ट्र दिवस पर ध्वजारोहण, मंत्री शम्भूराज देसाई ने किया सम्मान
Satara, Maharashtra:सातारा- महाराष्ट्र दिनानिमित्त आज छत्रपती शाहू स्टेडियम येथे सातारयाचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सातारा पोलीस दलाच्या वतीने परेड संचलन करण्यात आले या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा पोलीस अधिक्षक निखिल पिंगळे यांच्यासह प्रशासनातील अधिकारी कार्यक्रमास उपस्थित होते.. यावेळी पोलीस दलातील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या पोलिसांचा पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.0
0
Report
Advertisement
प्रताप सरनाईक ने धाराशिव में ध्वजारोहण किया, महाराष्ट्र दिन पर स्वास्थ्य केंद्रों का उद्घाटन
Dharashiv, Maharashtra:पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते ध्वजारोहण महाराष्ट्र दिनानिमित्त सकाळी ८ वाजता महाराष्ट्र मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडले. यानंतर धाराशिव जिल्ह्यातील दोन प्राथमिक आरोग्य केंद्रे व चार उपकेंद्रांचे ऑनलाईन उद्घाटन पालकमंत्री प्रताप सरनाईक यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.0
0
Report
रत्नागिरी में महाराष्ट्र दिन: मंत्री उदय सामंत ने ध्वजवंदन, पुलिस परेड शानदार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते शासकीय ध्वजवंदन पोलीस परेड मैदानावर सोहळा.. पोलीस पथकाकडून आकर्षक असं संचलन.. व्हिक्टर या श्वानांकडून देखील सलामी..0
0
Report
जालना के पूर्व विधायक सुरेशकुमार जेथलिया का निधन, क्षेत्र में शोक की लहर
Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग | माजी आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं निधन हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने जेथलिया यांचं निधन जेथलिया अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाचे होते नेते जेथलिया यांच्या निधनाने जिल्ह्यात मोठी पोकळी जालना जिल्ह्यातील परतूर विधानसभा मतदार संघाचे आमदार सुरेशकुमार जेथलिया यांचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालंय. आज सकाळी ही घटना घडली. सुरेशकुमार जेथलिया यांनी परतूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून एक वेळा नेतृत्व केलं. तर महाराष्ट्र विधान परिषदेत देखील ते आमदार म्हणून निवडून गेले होते. काँग्रेस पक्षानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला होता. आज पहाटेच्या वेळी त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. त्यानंतर त्यांना जालना येथील खाजगी रुग्णालयात नेलं असता डाॅक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं.. दरम्यान जेथलिया यांच्या निधनाने परतूर मंठा विधानसभा मतदारसंघावर शोककळा पसरली असून जिल्ह्याच्या राजकीय राजकारणात मोठी पोकळी निर्माण झालीये...0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजी नगर में दरगाह चौक पर 176 अतिक्रमणों पर प्रशासन की जेसीबी से तोड़फोड़
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या शहानूरमियाँ दर्गा चौकात गेल्या १५ वर्षांपासून विनापरवानगी बस्तान मांडलेल्या अनधिकृत चौपाटीवर मनपाने जेसीबी चालवला. कारवाईदरम्यान काही दुकानदारांसह हुल्लडबाज जमावाने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आक्रमक पवित्रा घेत जमावाला पांगवले. सकाळी १० वाजता सुरू झालेली कारवाई रात्री ८ वाजेपर्यंत सुरू होती. दर्गा चौक ते भाजीवाली बाई पुतळ्यापर्यंत तब्बल १७६ अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली. या वेळी कुणालाही संधी न देता DP रस्त्यामध्ये बाधित होणारी अनधिकृत दुकाने जमीनदोस्त केली. चौपाटीसमोरील हॉटेल व फळविक्रेत्यांची अतिक्रमणेही जमीनदोस्त करण्यात आली0
0
Report
वाशिम के दौरे के बीच कृषि मंत्री के सामने किसानों का आमरण उपोषण, गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे आज वाशिम जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून एक मे महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने त्यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर मागील आठवड्यात संपूर्ण कर्जमाफीसाठी आमरण उपोषण केलेले शेतकरी सतीश इढोळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून, त्यांच्या वर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. ईडोळी यांनी पालकमंत्र्यांना काळे झेंडे दाखवून आंदोलन करण्याचा इशारा दिला होता. शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्यात यावी, वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा देण्यात यावा, वाशिम एमआयडीसी मध्ये नवीन उद्योग सुरू करावेत या संदर्भात मागण्यासाठी सतीश इढोळे आणि आडोळी येथील गावकऱ्यांनी ठिय्या आंदोलन, आमरण उपोषण करून गाव विक्रीला काढलं होतं. आज कृषिमंत्रीांच्या दौऱ्यात त्यांनी कुठलाही अडथळा आणू नये म्हणून पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतला आहे.0
0
Report
वाळूज में युवक पर चाकू हमला, करण गायकवाड घायल अस्पताल में भर्ती
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमधील वाळूज महानगर परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वडगाव कोल्हाटी येथे एका तरुणावर चाकूने भीषण हल्ला करण्यात आला असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. वडगाव कोल्हाटी येथे करण गायकवाड या तरुणावर अज्ञात हल्लेखोराने अचानक चाकूने वार केले. हा हल्ला इतका भीषण होता की घटनास्थळी रस्त्यावर रक्ताचा सडा पडल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. गंभीर जखमी झालेल्या करण गायकवाड याला तात्काळ घाटी रुग्णालयात दाखल केले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, हल्लेखोर घटनास्थळावरून फरार झाला असून वाळूज एमआयडीसी पोलीस त्याचा शोध घेत आहेत.0
0
Report
Advertisement
महाल दंगों के कथित सूत्रधार फहीम खान फिर गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:गेल्या वर्षी मार्च महिन्यात महाल परिसरात झालेल्या हिंसाचार prकरणी कथित सूत्रधार फहीम खानला पुन्हा जेरबंद करण्यात आले आहे.. महाल परिसरात मार्च २०२५ मध्ये उसळलेल्या दंगलीप्रकरणी मुख्य आरोपी म्हणून समोर आलेल्या फहीम खान याला पुन्हा एकदा पोलिसांनी अटक केली आहे. तहसील पोलिसांनी गुरुवारी रात्री उशिरा ही कारवाई केली आहे.. विशेष म्हणजे फहीम खान हा एमआयएमच्या नगरसेविका अलिसा खान यांचा पती आहे. २०२५ च्या मार्च महिन्यातील दंगल प्रकरणी त्याच्याविरोधात नागपूरच्या विविध पोलिस ठाण्यांत एकूण पाच गुन्हे दाखल असून, काही प्रकरणात त्याला तेव्हाचे अटकेनंतर जामीन मिळाले होते.. तर एका प्रकरणात तो फरार होता आणि त्या प्रकरणातच त्याला अटक करण्यात आल्याची माहिती आहे... * १७ मार्च २०२५ रोजी महाल परिसरात मोठ्या प्रमाणावर हिंसाचार उसळला होता. या घटनेत तोडफोड, दगडफेक आणि सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले होते. * विशेष म्हणजे, महिला पोलिस कर्मचारीांशी गैरवर्तन व छेडछाडीचे गंभीर आरोपही समोर आले होते.तेव्हाच्या हिंसाचारात अनेक पोलिस अधिकारी आणि कर्मचारी ही जखमी झाले होते. या संपूर्ण प्रकरणात फहीम खान हा कथित सूत्रधार असल्याचे आरोप होते..तेव्हा महापालिका प्रशासनाने अतिक्रमणाचे आरोप करत त्याचे घरही पाडले होते. दरम्यान, फहीम खानच्या अटकेनंतर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी संवेदनशील भागांमध्ये कडेकोट बंदोबस्त तैनात केला आहे. आरोपीला न्यायालयात हजर करून पोलिस कोठडीची मागणी करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे..0
0
Report
भारत में वाशीम शहर में पानी की तंगी: 26% शेष, आपूर्ति हर 8-10 दिन पर
Washim, Maharashtra:वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी पाणी प्रकल्पात सध्या केवळ 26 टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. त्यामुळे वाशिम नगरपरिषदेकडून नागरिकांना आठ ते दहा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. नियमित पाणी मिळत नसल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणावर गैरसोय सहन करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात वाशिम शहरात पाणीटंचाईची समस्या गंभीर होते आणि यंदाही तीच परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक नागरिकांना टँकरने पाणी विकत घ्यावे लागत असून, पैसे देऊनही वेळेवर पाणी मिळत नसल्याचे सांगितले. या पार्श्वभूमीवर, कायमस्वरूपी उपाययोजना करून नियमित आणि शुद्ध पाणीपुरवठा करावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. नगर परिषद प्रशासनाकडून उपलब्ध पाणीसाठ्याचे नियोजन करण्यासाठी आठ दिवसाआड पाणीपुरवठा केला जात असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. वाशीम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी प्रकल्पातील पाणीसाठ्याचा आढावा आमचे वाशिम प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी घेतला आहे.0
0
Report
गोकुळ दूध संघ: 1320 संस्थाओं की सुनवाई पूरी होने तक चुनाव टाला गया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या अवसानातील 1320 संस्थांची सुनावणी पूर्ण झाल्यानंतरच गोकुळची निवडणूक घेण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने दिले आहेत. त्याचबरोबर ही सुनावणी 75 ते 80 दिवसात पूर्ण करून निवडणूक घ्यावी असं देखील न्यायमूर्ती माधव जामदार आणि न्यायमूर्ती प्रवीण पाटील याच्या डिव्हिजनल बेंचने निर्णय दिला आहे. एकूण सभासदांपैकी 20 टक्क्यांपेक्षा अधिक सभासद यांची सुनावणी होणे बाकी आहे, त्यामुळे त्यांना वगळून निवडणूक घेणे योग्य ठरणार नाही, त्यामुळे त्यांची सुनावणी घेतl्यानंतरच निवडणूक घ्या असे न्यायालयाने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयामुळे गोकुळची मुदत चार तारखेला संपल्यानंतर पाच तारखेला गोकुळवर प्रशासक राज येणार आहे. एकीकडे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे पदाधिकारी, नेते, संचालक गोकुळची निवडणूक ठरलेल्या वेळेत होऊ दे अशी भूमिका मांडत होते, पण कोर्टानेच संस्थांची सुनावणी पूर्ण होईपर्यंत निवडणूक घेण्यास मज्जाव केल्याने गोकुळच्या सत्ताधाऱ्यांना मोठा दणका बसला आहे.0
0
Report
Advertisement
