Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई एयरपोर्ट पर छत्रपति शिवाजी महाराज का 20 फुट ऊँचा पुतला उद्घाटन
Navi Mumbai, Maharashtra:नवीORI मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले पुतळ्याचे अनावरण. मंत्री गणेश नाईक, अदिती तटकरे देखिल उपस्थित. शिवराज्याभिषेक दिनाचे औचित्य साधत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज स्वराज्याला छत्रपति मिळाले मला आनंद आहे या दिवशी सगल्याना जगणे हिंदवी स्वराज्य मान्य केलं तो आजचा दिवस. छत्रपती शिवरायांचा 20 फुटी पुतळ्याचे अनावरण नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर झाले. मागच्या वेळी आलो तेव्हा बोललो होतो महाराजांचा पुतळा स्वराज्याच्या राजधानीत झाला पाहिजे केवळ आठ महिन्यात हा पुतळा तयार झाला त्याचं अनावरण केलं. प्रत्येक jण यातून ऊर्जा प्राप्त करेल. बाळ माने आम्हाला परके नाहीत बाळ माने भाजपा मध्येच तयार झालेत काही कारणाने ते पक्ष सोडून गेलेले. यासंदर्भात निर्णय मुख्यमंत्री करत नाहीत प्रदेशअध्यक्ष करत असतात. नवी मुंबई विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नवं दिलं पाहिजे हा आमचा आग्रह आहे. यासंदर्भात आम्ही कारवाई पूर्ण केली आहे. केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरु आहे आम्ही पाठपुरावा करुन हे नामकरण करुन घेऊ. माणसं पैसा पेक्ष प्रेमाने जिंकता येतात हे जर तुम्हाला समजले तर तुम्हाला अश्याप्रकारचे बिल मांडण्याची आवश्यकता पडणार नाही. या निवडणुकीत प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे. यासंदर्भात कोणी बिल मांडणार असेल तर मला काहीच हरकत नाही. निवडणूक प्रक्रियेत परिवर्तन झालं पाहिजे असे माझंही मत. बाईट- देवेंद्र फडणवीस -मुख्यमंत्री0
0
Report
रत्नागिरी में जलसंकट गहराया: ग्रामीण पानी के लिए प्यासे, प्रशासन के दावों पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी जिल्हात सध्या भीषण पाणी टंचाई गावागावांत आहे.. पाण्यासाठी लोक वणवण फिरत आहेत.. घरापासून दूरवर असलेल्या जलस्रोतांवरती जाऊन पाणी घरात आणले जाते.. चिपळूण तालुक्यातील सावर्डे कोंडमळा येथील घराजवळील विहिरी आटल्यात त्यामुळे घरापासून जवळच असलेल्या जलस्त्रोत्रांवरती जाण्यासाठी मुंबई-गोवा महामार्ग पार करून महामार्गाच्या बाजूला सीडी लावून दहा ते बारा फूट खाली उतरून पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.. गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात प्रशासनाचे नियोजन फेल ठरल आहे..0
0
Report
ज्योती वाघमारे ने संजय राऊत पर आरोपों की बौछार, विपक्ष में तीखी बहस
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ज्यांना लढता येत नाही ते पराभूत मानसिकतेचे लोक असतात - खा. ज्योती वाघमारे ज्योती वाघमारे, राज्यसभा सदस्य शिवसेना ऑन संजय राऊत दीडशे कोटी आरोप ज्यांना लढता येत नाही, ते पराभूत मानसिकतेचे लोक असतात.. ते फक्त दुसऱ्यांवर आरोप करतात.. संजय राऊत यांनी खरंतर आत्मपरीक्षण करायला हवं होतं अनेक ठिकाणी विधानपरिषद निवडणुकीत उमेदवार दिले नाही.. नाशिक मध्ये ठाकरे यांच्या शिवसेनेला उमेदवार देता आला नाही.. तिथे नक्की काय उलाढाल झाली. त्याचं कारण संजय राऊत यांनी सांगाव. या लोकांनी आपला पराभव मान्य केला आहे. उन्हांना लढता येत नाही.. त्यांच्याकडे माणसं नाहीत.. अशा पद्धतीचे थातूरमातूर आरोप करून स्वतःचं अपयश झाकण्याचा प्रयत्न करताय.. ऑन सुप्रिया सुळे आरोप सुप्रिया सुळे यांना आपला पक्ष सांभाळता येत नाही. या लोकांना आपली माणसं सांभाळता येत नाहीत. बिलंच मांडायचा असेल तर एक एकर शेतीमधून शंभर कोटींचं वांग्याचे उत्पन्न कस निघते. याची देखील चौकशी लावली पाहिजेत.. खरंतर सुप्रिया सुळे यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं पाहिजे की, शंभर कोटीचं उत्पन्न कसे निघतं त्या संदर्भात असलं. यातून शेतकरी आत्महत्या तरी थांबतील. परंतु सगळ्यात जास्त पक्ष कोणी फोडले आणि ते कसे फोडले. याची चौकशी आणि आत्मपरीक्षण ताईंनी केलं तर बरं होईल.. ज्योती वाघमारे, राज्यसभा खासदार शिवसेना0
0
Report
Advertisement
परतूर, जलना में युवक का शव कचरे की गाड़ी में ले जाने पर प्रशासन पर आक्रोश
Jalna, Maharashtra:जालना :ब्रेकिंग कच-याच्या गाडीत युवकाचा मृतदेह नेण्याची पोलीस प्रशासनावर नामुष्की परतुर शहरातील संतापजनक घटना परतूर नगरपालिकेला दोन रुग्णवाहिका असताना पोलीस प्रशासनाकडून मृतदेहाची विटंबना ! पोलीस प्रशासनावर नागरिकांचा संताप, दोषींवर कारवाई करण्याची मागणी अँकर- जालना जिल्ह्यातल्या परतूर येथे एका युवकाचा मृतदेह कच-याच्या गाडीत नेल्याने पोलीस प्रशासनाविरोधात नागरिकांनी संताप व्यक्त केलाय.. परतूर शहरातील हिरालालनगर येथील बेपत्ता सुरेश ढाकरगे या युवकाचा मृतदेह पाण्याच्या टाकीखाली आढळून आला.. यावेळी पोलिसांनी पंचनामा करत मृतदेह शवविच्छेदनासाठी चक्क कच-याच्या गाडीत टाकून नेला.. विशेष म्हणजे पंधरा दिवसांपूर्वीच भाजपचे आमदार बबनराव लोणीकर यांच्या हस्ते पालिकेच्या नवीन रुग्णवाहिकेचं लोकार्पण करण्यात आलं होतं.. त्यामुळं पालिकेला दोन रुग्णवाहिका असताना कच-याच्या गाडीत मृतदेह नेण्याची नामुष्की पोलीस प्रशासनावर आली. त्यामुळं नागरिकांत संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे..0
0
Report
अकोला के अस्पताल में मरीज को मदद नहीं मिली, महिला ने पति को गोद में उठाया
Akola, Maharashtra:अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात आरोग्य व्यवस्थेचा संवेदनाहीन चेहरा समोर आला आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेलेल्या आपल्या पतीला उपचारासाठी घेऊन आलेल्या एका आदिवासी महिलेला रुग्णालयात कोणतीही मदत मिळाली नाही. त्यामुळे या महिलेला चक्क आपल्या पतीला पाठीवर घेऊन रुग्णालय परिसरात भटकावे लागले. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित रुग्णाला तातडीने उपचारांची गरज असताना रुग्णालयातील कर्मचारी उपस्थित असूनही महिलेला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नाही. पोटाला सामानाची बॅग लटकवून आणि पाठीवर पतीचा भार घेऊन ही महिला विविध विभागांमध्ये मदतीच्या शोधात फिरत होती. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एका गंभीर रुग्णाला उपचारासाठी आणलेल्या कुटुंबीयांना मूलभूत सुविधा आणि मदत मिळत नसेल, तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे अपेक्षा ठेवायची, असा सवाल उपस्थित केला जात आहे. दरम्यान, या प्रकारामुळे रुग्णालयातील रुग्णसेवा, कर्मचारी वर्गाची संवेदनशीलता आणि आपत्कालीन व्यवस्थेवर टीका होत असून, "येथे उपचार मिळतात की मरण?" असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
गड़चिरोली विमानतळ भूसंपादन स्थगित, किसानों को लिखित आश्वासन मिलने के बाद आंदोलन समाप्त
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोलीत काँग्रेसचे आंदोलन संपले, विमानतळ भूसंपादन प्रक्रियेेला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट, जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका गडचिरोलीत विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत sविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले. गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारितील एकूण ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने १२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू झाले होते. नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले असून शासन जनभावनांचा पूर्ण आदर करते. कोणतेही काम बळजबरीने करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून विकास आणि लोकहित यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. यासोबतच प्रस्तावित चामोर्शी औद्योगिक वसाहतीच्या टप्पा पाच अंतर्गत लॉईड्ससाठी तसेच JSW कंपनी बाबत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. भूसंपादन अधिसूचनेनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित नागरिक व शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
जाँचें बदलीं तो भी नहीं झुकेंगे—वैभव नाईक का विरोध जारी
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग — मागील अनेक वर्ष माझी चौकशी सुरू आहे अधिकारी बदलले की पुन्हा चौकशी सुरू होते. आणि राजकीय वातावरण बदलले की चौकशी सुरू होतात. हे माझ्यावर अन्यायकारक आहे सगळ्या चौकशांना आम्ही सामोरे जाऊ मात्र दबावाला बळी पडणार नाही. माझी चौकशी सुरू आहे हा माझ्यावर अन्याय आहे त्याच्या विरोधात मी लढणार — वैभव नाईक0
0
Report
उमेश दलवी हत्या मामला: सचिन साठे पीड़ित परिवार से मिले, मुख्यमंत्री से मुलाकात योजना
Beed, Maharashtra:ANC - कामगार उमेश दळवी खूनप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली असून, पीडित कुटुंबाने सुरुवातीपासून या गुन्ह्यात तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप केला असून मात्र उर्वरित संशयितांबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चुलत नातू सचिन साठे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा करून तपासाची माहिती घेतली. सचिन साठे यांनी या प्रकरणात पीडित कुटुब्लाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाई होऊन संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.0
0
Report
शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस पर देशभर में रायगड़ में बड़ा उत्साह
Yeola, Maharashtra:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 352 वर्ष पूर्ण झाले असून देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडावर सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने मावळे दाखल झाले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात शिवसृष्टी उभारण्यात आली असून या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याला शेकडो शिवप्रेमींनी सकाळपासून अभिवादन केले असून बनकर पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले या ठिकाणी शिवव्याख्याते दीपक देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने उलगडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .0
0
Report
Advertisement
कांदा खरीदी शर्तों में ढील, किसान बोले- मिनिमम 2000 रुपये क्विंटल चाहिए
Shirdi, Maharashtra:राज्य सरकारने शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा , पण हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल २ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असतांना मात्र , शेतकऱ्याच्या पदरात १२०० रुपये पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान २ हजार रुपये भाव जाहीर करावा , अशी आर्त हाक श्रीरामपूर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे.0
0
Report
CAMIT ने डीज़ल खरीद-आपूर्ति पर जारी नियमों से बना भ्रम, तत्काल स्पष्टीकरण की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (CAMIT) ने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या डिझेल खरेदी व पुरवठा संदर्भातील परिपत्रकाच्या संभाव्य परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय. जमाखोरी, काळाबाजार आणि पेट्रोलियम पदार्थांच्या अनधिकृत वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांचे CAMIT पूर्णपणे समर्थन केले असले तरी, सदर परिपत्रकाची सद्यःस्थितीतील अंमलबजावणी राज्यातील लाखो प्रामाणिक डिझेल ग्राहकांसाठी गोंधळ, अडचणी आणि अनावश्यक त्रास निर्माण करू शकते, अशी भीती CAMIT ने व्यक्त केली आहे. याबाबत, तातडीने आवश्यक स्पष्टीकरण जारी करण्यात आले नाही तर या परिपत्रकाचा परिणाम रुग्णालये, नर्सिंग होम्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल्स, शैक्षणिक संस्था, किरकोळ दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लघु व मध्यम उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, टेलीकॉम टॉवर्स, बँका, एटीएम, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच डिझेल जनरेटर आणि डिझेलवर चालणाऱ्या उपकरणांवर अवलंबून असलेल्या असंख्य व्यावसायिक आस्थापनांवर होऊ शकतो. CAMIT जमाखोरी, काळाबाजार आणि अनधिकृत व्यापाराविरोधातील कठोर कारवाईचे पूर्ण समर्थन केलेय. मात्र, अशा कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसता कामा नये. अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पेट्रोल पंप चालक वैध ग्राहकांनाही डिझेल पुरवठा करण्यास टाळाटाळ करू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर CAMIT ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाची विनंती केलीय. चेंबरने शासनास विनंती केली आहे की, बेकायदेशीर मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि जनरेटर, आपत्कालीन वीजपुरवठा व नियमित कामकाजासाठी डिझेल खरेदी करणाऱ्या वैध ग्राहकांमध्ये स्पष्ट भेद करण्यात यावा. तसेच प्रामाणिक ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी व्यवहार्य पडताळणी व स्व-घोषणा (Self-Declaration) प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही CAMIT ने मांडला आहे. याबरोबर जमाखोरी, काळाबाजार आणि गैरवापराविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवण्याचेही समर्थन केले आहे. CAMIT चे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनी.0
0
Report
इंदापुर में गार्पीट से 24 जिलों में फसलें बर्बाद, नुकसान की भरपाई त्वरित मांगी
Rui, Maharashtra:इंदापूर बाईट... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन राज्यातील नुकसानीची आकडेवारी... गारपीट आणि वादळी वाऱ्याने राज्यात 24 जिल्ह्यांना फटका बसला आहे.... साधारण एक लाख एकर शेतीला फटका बसला आहे... खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... शेतकऱ्यांनी ज्या पिकावर उद्याचा स्वप्न रंगवलं होतं... शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले आहे... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी विभाग महसूल विभाग यांना सूचना दिले आहेत... जिथे जिथे वादळी वाऱ्यामुळे गारपिटीमुळे पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाच झाला आहे... नुकसान भरपाई चे पंचनामे करा... ताबडतोब आव्हान शासनाला सादर करा... जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल...0
0
Report
Advertisement
भंडारा नगरपालिका ने मानसून पूर्व नाले साफ-सफाई अभियान शुरू किया
Bhandara, Maharashtra:मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात.... पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी नगर परिषदेने हाती घेतली मोहीम.... पावसाळा तोंडावर आला असून भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमधून गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. भंडारा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० कर्मचारी कार्यरत असून मोठ्या प्रमाणात नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढला जात आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात. कचरा आणि गाळामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी सकाळपासून काम करत आहेत. तसेच नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.0
0
Report
दौंड के कुरकुंभ में बल्कर ट्रक दुर्घटना, अभी तक कोई हताहत नहीं
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये बल्कर ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. दौंड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे बल्कर ट्रकचा भीषण अपघात झाला. सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक रस्त्यात आडवा झाल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. क्रेनच्या साह्याने बल्कर ट्रक बाजूला करून सुरळीत करण्यात आली.0
0
Report
चंद्रपुर जिले में बल्लारपुर में देशी पिस्तौल और चार जिंदा कारतूस के साथ युवक गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के बल्लारपुर शहर में एक युवक को देशी बनावटी पिस्तौल और चार जिंदा कारतूस के साथ गिरफ्तार किया गया. स्थानीय अपराध शाखा को मिली गुप्त सूचना के आधार पर बल्लारपुर शहर के दাদা भाई नौरोजी वार्ड में छापेमारी कर हथियार जब्त किए गए. इस मामले में सलमान खान पठाण को गिरफ्तार कर पुलिस के हवाले कर दिया गया है.0
0
Report
Advertisement
