Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में कांदे के भाव से किसान नाराज़, बाजार में 101 रुपये प्रति क्विंटल
Nashik, Maharashtra:- कांद्याला त्योग्य भाव न मिळाल्याने शेतकरी संतप्त... - नांदगाव बाजार समिती कार्यालयासमोरच ट्रॅक्टरभर कांदा ओतला... - सुरुवातीला व्यापाऱ्यांनी कांदा खरेदीस दिला होता नकार.. - बाजार समिती प्रशासनाच्या मध्यस्थीने कांद्याला मिळाला होता १०१ रुपये प्रति क्विंटल भाव... - कांद्याची गुणवत्ता कमी दर्जाची असल्याने शेतकऱ्याला मिळाला कमी भाव..- बाजार समिती प्रशासन - तसेच खराब असलेल्या लाल व उन्हाळ कांदा एकत्र आणल्याने योग्य भाव मिळाला नसल्याचा नांदगाव बाजार समिती प्रशासनाचा दावा...0
0
Report
नक्सल प्रमुख हिडमा के गानों पर बवाल, पुलिस ने कार्रवाई दर्ज की
Chandrapur, Maharashtra:नक्सल संघटनांचा सशस्त्र दल प्रमुख हिडमा ठार झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याच्या गौरवार्थ गाण्यांचा भडीमार, ही गाणी वाजविणे- त्यावर नृत्य करणे यावर पोलीस दाखल करत आहेत गुन्हे, मात्र प्रतिबंधित नक्सल संघटना व त्याचे सदस्य यांना मदत केल्याप्रकरणी या गुन्ह्यांचा प्रयोजन, नागपूर विभागाचे पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांची चंद्रपूरात माहिती. पोलिसांनी चकमकीत ठार मारलेल्या नक्षल चळवळीचा सशस्त्र दलप्रमुख माडवी हिडमा याच्या गौरवार्थ गाणे वाजवल्याच्या घटना संदर्भात आधी पुणे व नंतर आता काही दिवसांपूर्वी गडचिरोली जिल्ह्यात युवकांवर गुन्हे दाखल झाले आहेत. हिडमाच्या गौरवार्थ समाज माध्यमांवर हजारो गाणी सहजपणे उपलब्ध आहेत. अशा परिस्थितीत ही गाणी प्रतिबंधित नसताना युवकांवर गुन्हे दाखल करण्यात येत आहेत. सरकारने 2009 साली प्रतिबंध केलेल्या सीपीआय माओवादी या संघटनेचा हिडमा सदस्य होता. त्याच्या गौरवार्थ अथवा प्रतिबंधित संघटनेला मदत होईल अशा पद्धतीची कुठलीही कृती गुन्हा ठरते याकडे त्यांनी लक्ष वेधले. हे गुन्हे केवळ जनमानसात हे चुकीचे आहे हे ठसविण्यासाठी होत असल्याचे पाटील म्हणाले. समाज माध्यमामध्ये उपलब्ध असलेल्या अशा पद्धतीचे आक्षेपार्ह ५४ मजकूर आजवर गुप्तचर विभाग आणि नक्षलविरोधी सेलने हटवल्याची माहितीही त्यांनी दिली.0
0
Report
औरंगजेब को लेकर सभागृह में हंगामा, संभाजीनगर के नाम पर कटाक्ष
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत आज औरंगजेब नावाच्या उल्लेखावरून वाद निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. सभेत कचरा उचलण्याच्या मुद्द्यावर चर्चा सुरू असताना काँग्रेसचे नगरसेवक आझाद खान यांनी राज्यातील विविध महानगरपालिकांचा उल्लेख करताना छत्रपती संभाजीनगरचा उल्लेख 'औरंगाबाद' असा केला. तसेच 'औरंगजेब आमचाच होता आणि शिवाजी महाराजही आमचेच होते,' असे वक्तव्य त्यांनी केले. या वक्तव्यानंतर सभागृहात वातावरण तापले. शहर सुधार आघाडीचे प्रमुख तथा नगरसेवक पवन महल्ले यांनी या वक्तवाला तीव्र विरोध दर्शवत औरंगजेब हा क्रूर शासक होता, त्यामुळे शहराचा उल्लेख छत्रपती संभाजीनगर असाच करावा, असे स्पष्ट केले. महापुरुषांच्या यादीत औरंगजेबाचा समावेश होऊ शकत नाही, असेही त्यांनी म्हटले. दोन्ही बाजूंकडून जोरदार शाब्दिक खडाजंगी झाल्याने सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
Advertisement
मोदी के आह्वान पर रायगढ़ में मिले-जिले प्रतिक्रियाएं, देशहित पर एक सवाल
Chendhare, Maharashtra:प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने देश को संबोधित करते हुए सोना खरीदना न करने, पेट्रोल-डीजल के इस्तेमाल में कमी लाने तथा विदेश दौरों से बचने जैसे संदेश दिए हैं। उनके इस आह्वान पर रायगढ़ जिले से मिश्रित प्रतिक्रिया आई हैं। कुछ ने मोदी की भूमिका का समर्थन किया है तो कुछ ने कहा है कि मोदी को इस पर खुद विचार करना चाहिए। देश में इस स्थिति के कारणों पर आत्मचिंतन करने की जरूरत है—ऐसे कुछ लोगों का कहना है।0
0
Report
लातूर पुलिस वेतन घोटाला: 2.38 करोड़ का अपहरण, तीन गिरफ्तार
Latur, Maharashtra:लातूर पोलीस दलात कोट्यवधींच्या वेतन घोटाळा... पोलीसांनीच पोलीसांच्या पैशांवर मारला डल्ला... वेतनाच्या आकड्यांचा खेळ करत तब्बल २ कोटी ३८ लाखांचा अपहार... दहा वर्षे सुरू होता गैरव्यवहार... चौघांविरुद्ध गुन्हा... तिघांना अटक... लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील आर्थिक गैरव्यवहारामुळे खळबळ... ज्यांच्या खांद्यावर कायदा आणि सुरक्षेची जबाबदारी आहे... लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन प्रक्रियेत तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचं प्राथमिक चौकशीतून समोर आले आहे... धक्कादायक बाब म्हणजे पोलीसांच्या वेतनाच्या पिशव्या/पैशांवरच डल्ला मारण्यात आलाय... या संपूर्ण प्रकरणामुळे पोलीस दलातील प्रशासकीय पारदर्शकतेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत... पाहूयात हे नेमकं प्रकरण काय आहे ते ZEE 24 TAAS च्या स्पेशल रिपोर्ट मधून... लातूर पोलीस अधीक्षक कार्यालयातील वेतन वितरण प्रक्रियेमध्ये मोठा आर्थिक गैरव्यवहार समोर आला आहे. वेतन वितरण प्रक्रियेत मे २०१५ ते मार्च २०२५ या कालावधीत वेतन अभिलेखांमध्ये खाडाखोड करुन, बनावट दस्तऐवज तयार करणे व त्याच्या गैरवापराने वेतन शिर्षकाखाली अनाधिकृतपणे स्वतःच्या खात्यावर अधिकची रक्कम जमा करुन घेतली होती. वेतन पथक विभागातील लिपिकांनी संगणमत करुन अनाधिकृतपणे तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार एवढी रक्कम बँक खात्यावर जमा करुन घेतली होती. वेतन वितरण प्रक्रियेत आर्थिक अनियमितता झाल्याची बाब प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाल्याने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या संपूर्ण प्रकारात तब्बल २ कोटी ३८ लाख ९२ हजार रुपयांचा अपहार झाल्याचं स्पष्ट झालं आहे... या संशयास्पद प्रकरणाची चौकशी सुरु असून तिघांना अटक झाली आहे... पोलीस दलातच उघड झालेल्या या कोट्यवधींच्या वेतन घोटाळ्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत... दहा वर्षे हा प्रकार कसा चालू राहिला... वेतन प्रक्रियेमधील अनियमितता नेमकी कुणाच्या दुर्लक्षामुळे दडपली गेली... पुढे काय revelation होईल याकडे सगळे लक्ष देत आहेत...0
0
Report
मोदी के आह्वान पर जनता की प्रतिक्रियाएं तेज़, जानिए क्या कहा गया
Nanded-Waghala, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनावर जनतेच्या प्रतिक्रिया.0
0
Report
Advertisement
सुर्या जलप्रकल्प की मुख्य जलवाहिनी फूटते ही वसई-विरार में पानी संकट गहरा
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार पाणीपुरवठा करणारी सुर्या प्रकल्पाची जलवाहिनी फुटली 50 फुटांपर्यंत उंच उडाला पाण्याचा फवारा मुख्य जलप्रवाहाची कुंडी बंद होईपर्यंत लाखो लीटर पाणी वाया भर उन्हाळ्यात वसई-विरारवर जलसंकटाचे सावट पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता ANC : वसई-विरार महापालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सुर्या प्रकल्पाची मुख्य जलवाहिनी फुटल्याने मोठी गळती होऊन भर उन्हाळ्यात नागरिकांसमोर पाणीटंचाईचे संकट उभे ठाकले आहे. मुंबई- अहमदाबाद दिल्ली महामार्गावरील खानिवडे येथे जुन्या टोल नाक्याजवळ, विराम हॉटेलसमोर सोमवारी रात्री साडेडहा ते 11 वाजण्याच्या सुमारास ही जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटताच पाण्याचा प्रचंड दाबाने तब्बल ५० फुटांपर्यंत उंच फवारा उडत होता. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच महापालिकेच्या पाणी विभागाला सतर्क करण्यात आले असून दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. मात्र मुख्य जलप्रवाहाची कुंडी बंद होईपर्यंत लाखो लीटर पाणी वाया गेले. फुटलेल्या जलवाहिनीतून बाहेर पडलेल्या पाण्यामुळे आजूबाजूच्या शेती भागात अक्षरशः पाणी साचले होते. आधीच वाढत्या उकाड्याने हैराण झालेल्या वसई-विरारकरांसाठी ही घटना मोठी चिंतेची ठरत असून पुढील काही दिवस पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
बागलाण में शराब छुड़ाने वाले बाबा: दो युवकों की संदिग्ध मौत, वजह क्या?
Nashik, Maharashtra:नाशिक के बागलाण तालुक्यातील तिळवण येथील कळवण रस्त्यावरील बारी परिसरात दोन युवकांचे मृतदेह संशयास्पदरीत्या आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोघांच्या मृतदेहाजवळ रस्त्याच्या कडेला त्यांच्या दुचाकीही आढळली. सकाळी शवविच्छेदनानंतर दोघांवर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार झाले. याप्रकरणी सटाणा पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. तालुक्यातील कंधाणे येथील राजेंद्र लक्ष्मण सोनवणे (४३) व निकवेल येथील सचिन केशव जाधव (३९) हे दोघे मित्र होते. एकाचवेळी दोघांचा मृत्यू झाल्याने हा विषबाधेचा प्रकार असावा, असा संशय व्यक्त होत आहे. याबाबत पोलिसांना समजताच घटनास्थळी आंदोलनेपासन मृतदेह सटाणा ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आले. सकाळी शवविच्छेदन करण्यात आले असून, त्यांचा व्हिसेरा तपासणीसाठी पाठवण्यात आला. त्या अहवालानुसार मृत्यूचे नेमके कारण ठरणार आहे असे तपास अधिकारी सांगतात. या दोघा तरुणांना मद्याचे व्यसन होते. त्यामुळे तालुक्यातील एका मांत्रिकाकडे ते व्यसनमुक्तीसाठी गेले होते, असे ग्रामस्थांनी सांगितले. परत येत असतानाच बारीत दोघांवर मृत्यू ओढवला. यातील एकाच्या तोंडातून रक्त आल्याचे दिसून आले. तेव्हा ग्रामस्थांनी तसेच मयत तरुणांच्या नातेवाईकांनी आरोप करत दारू सोडणाऱ्या बाबा वर कारवाई करावी अशी तक्रारी सटाणा पोलिसांना दिली. दरम्यान नाशिक जिल्ह्यात भोंदू बाबांचे कांड थांबता थांबेना झाले असून या प्रकरणातील संशयाची सुई दारू सोडणाऱ्या बाबीकडे जात असल्याची चर्चा आहे. या प्रकरणाची पुढील माहिती पोलिस तपास externally प्राप्त होत आहे.0
0
Report
कोकण के मछुआरों को तूफानी मौसम से भारी नुकसान, सरकार से तत्काल सहायता की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील मासेमारी हंगाम अंतिम टप्प्यात असतानाच दक्षिणेकडील वाऱ्याने मच्छीमारांच्या अडचणीत भर टाकली आहे. वारंवार निर्माण होणाऱ्या वादळसदृश्य परिस्थितीमुळे समुद्रात जाणे धोकादायक बनले असून अनेक बोटी किनाऱ्यावरच थांबल्या आहेत. हंगामाच्या शेवटच्या टप्प्यात चांगल्या उत्पन्नाची अपेक्षा असलेल्या मच्छीमारांना यंदा मोठा आर्थिक फटका बसला आहे. पावसाळ्यापूर्वीची शेवटची कमाईही हुकल्याने मच्छीमार बांधव चिंतेत सापडले आहेत. आता शासनाने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी कोकण किनारपट्टीवरून जोर धरू लागली आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में ई-चलान के विरोध में ट्रांसपोर्टरों का उग्र प्रदर्शन, दंड माफ़ी की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात ई-चलन विरोधात वाहतूकदार आक्रमक झाले आहेत. महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनाकडून वाहनांवर आधीच विविध प्रकारचे कर लावले जात असताना, ई-चलनाच्या माध्यमातून अन्यायी आणि जुलमी पद्धतीने दंड वसूल केला जात असल्याचा आरोप वाहतूकदारांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्हा वाहतूकदार समन्वय समितीच्या वतीने प्रादेशिक परिवहन कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे. ई-चलनामुळे वाहनचालक आणि वाहतूक व्यवसायिक आर्थिक संकटात सापडत असल्याचा दावा आंदोलकांनी केला. सरकारने तात्काळ सर्व प्रलंबित ई-चलन दंड माफ करावेत, तसेच ई-चलन प्रणाली कायमस्वरूपी बंद करावी, अशी प्रमुख मागणी आंदोलनकर्त्यांकडून करण्यात येत आहे..0
0
Report
हरदडा फाटा—पुसद रोड पर काम गति दें, नागरिकों ने किया रास्ता रोको
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील हरदडा फाटा ते पुसद रस्त्याचे संथ गतीने सुरू असलेले काम त्वरित पूर्ण करावे या मागणीसाठी ढाणकी येथील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले. हरदडा फाटा ते उमरखेड- पुसद रस्त्याचे काम मंद गतीने होत आहे. ज्याचा नागरिकांना त्रास होत आहे. त्यामुळे आंदोलकांनी स्थानिक आमदार व बांधकाम विभागा विरुद्ध घोषणाबाजी केली.हरदडा फाटा येथे तब्बल दोन तास नागरिकांनी रस्ता रोखून धरल्या नंतर संबंधित कंपनी च्या अधिकाऱ्यांनी कामाला गती देऊन ते लवकरात लवकर पावसाळापूर्वी पूर्ण करू असे लेखी आश्वासन दिले. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.0
0
Report
नालासोपारा में गटर की ढीली जाल से महिला गंभीर घायल, नगरपालिका पर नाराज़गी
Vasai-Virar, Maharashtra:*नालासोपाऱ्यात पालिकेच्या निष्काळजीपणाचा फटका नागरिकांना* *तुटलेल्या गटारात महिलेचा पाय अडकून गंभीर दुखापत* *नागरिकांच्या अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर महिलेचा पाय बाहेर काढण्यात यश* *संतप्त नागरिकांची पालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र टीका ANC : नालासोपाऱ्यातील जिजाई नगर परिसरात पालिकेच्या तुटलेल्या गटारामुळे एका महिलेला गंभीर दुखापत झाल्याची धक्कादायक घटना रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. रस्त्याच्या कडेला असलेल्या गटारावरील लोखंडी जाळी तुटलेल्या अवस्थेत असल्याने महिलेला त्याचा अंदाज न आल्याने तिचा पाय खोलवर अडकला. या दुर्घटनेत महिलेच्या पायाला गंभीर दुखापत झाली असून तिच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेनंतर संतप्त नागरिकांनी पालिकेच्या निष्काळजी कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त करत, धोकादायक अवस्थेतील गटारे तातडीने दुरुस्त करण्याची मागणी केली आहे. ..0
0
Report
Advertisement
वाशीम में तापमान 42.6°C: अगले दिनों में और गर्मी के संकेत
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मागील चार दिवसांपासून ढगाळ वातावरणासह अवकाळी पावसाची हजेरी लागल्याने तापमानात घट झाली होती. त्यामुळे नागरिकांना उकाड्या पासून काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज पुन्हा तापमानात वाढ झाली; आज वाशीमचे कमाल तापमान ४२.६ अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले. तसेच पुढील काही दिवस तापमानात सातत्याने वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी, उन्हात बाहेर पडताना सतर्कता बाळगावी आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
रायगड़ महामार्ग पर पेट्रोल-डिझेल की कमी से कोकण में पर्यटकों को परेशानी
Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मुंबई-गोवा महामार्गावर सीएनजीच्या तुटवड्यानंतर आता पेट्रोल आणि डिझेलचाही गंभीर तुटवडा निर्माण झाला आहे. नागोठणे ते खेडदरम्यान महामार्गावरील अनेक पेट्रोल पंपांवर ही परिस्थिती आहे. त्यामुळे कोकणात पर्यटनासाठी निघालेल्या प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कोकणात जाणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र वाढत्या मागणीच्या तुलनेत इंधनाचा पुरेसा पुरवठा होत नसल्याने ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे ज्या पंपांवर इंधन उपलब्ध होते, त्या ठिकाणी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र दिसत आहे. वाहन धारकांना मर्यादित स्वरूपात पेट्रोल दिले जात आहे.0
0
Report
मीरा-भाईंदर में दिव्यांग के साथ VIP ट्रीटमेंट पर पुलिस पर सवाल
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदर ब्रेक मीरा-भाईंदर मधील भाईंदर वेस्ट पोलीस स्टेशन मध्ये आरोपीला 'व्हीआयपी' वागणूक मीरा भाईंदर मधील दिव्यांगाना करोडो रुपयाला चुना लावणाऱ्या पूनम गुप्ताला कोठडीऐवजी चक्क खुर्चीत बसवून 'व्हीआयपी' वागणूक दिल्याने प्रहार संघटनेच्या जिल्हाध्यक्ष काजल नाईक यांनी पोलिसांवर संताप व्यक्त केला सह six महिने तक्रार न घेतल्याने काजल नाईक यांनी दिव्यांगांसह ठाण्यात मांडला ठिय्या; आरोपीचे 'लाड' करणाऱ्या पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह. आरोपी आणि पोलिसांच्या 'कम्फर्ट झोन'चा व्हिडिओ समोर आल्याने सामान्य जनतेतून खाकी वर्दीच्या धाकावर जोरदार चर्चा. अनेक दिव्यांगांना चुना लावणाऱ्या आरोपीला विशेष ट्रीटमेंट मिळत असेल, तर सामान्यांना न्याय मिळणार का? असा संतप्त सवाल.0
0
Report
Advertisement
