Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पत्रकारों को धमकी देने वाले शिवसेना सांसद संजय दिना पाटील के खिलाफ कार्रवाई की मांग
Yeola, Maharashtra:मुलाखत घेण्यासाठी गेलेल्या पत्रकारांना अरेरावीची भाषा करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या शिवसेनेच्या संजय दिना पाटील या खासदारावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीसाठी येवला तालुका मराठी पत्रकार संघाच्या वतीने शहर पोलिसांना निवेदन देण्यात आले तसेच पत्रकारिताकरत असताना अनेक वेळा पत्रकारांना धमकी देणे असे प्रकार सातत्याने होत असतात त्याकरता पत्रकार संरक्षण कायदा लागू करावा अशी मागणी देखील याप्रसंगी करण्यात आले येवला तालुका मराठी पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते0
0
Report
रत्नागिरी में बारिश सक्रिय, किसान खुश, बुवाई और जुताई में रफ्तार बढ़ी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसाने घेतली उसंत..शेतीच्या कामांना वेग.. जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असे वाटत असताना मागील 24 तासात पावसाने उसंत घेतली.. अँकर जिल्ह्यात पाऊस सक्रिय झाला असे वा वाटत असतानाच मागील 24 तासात पावसाने उसंत घेतली आहे.. जिल्हाभरात अवघा सरासरी १३.६१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.. तीन-चार दिवसांतील पावसामुळे पाण्याचा प्रश्न काही प्रमाणात सुटला असल्याचं दिसतं असून पेरणी केलेल्या बियाणानेही आता तग धरली असून नांगरणीच्या कामाला वेग आला आहे..0
0
Report
चीन की पाबंदियों से कैलास यात्रा में फंसे 52 भारतीय भक्त, मदद के लिए भारत सरकार से गुहार
Shirur, Maharashtra:पुण्यातील तब्बल ५२ भाविक सध्या नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत. मोक्षप्राप्तीची आणि अत्यंत पवित्र मानली जाणारी 'कैलास-मानसरोवर यात्रा' करण्यासाठी ये भाविक घराबाहेर निघाले, परंतु अब त्यांच्या यात्रेवर अनिश्चिततेचे सावट निर्माण झाले आहे. चीन प्रशासनाच्या आडमुठेपणामुळे आणि अनागोंदी कारभारामुळे या ५२ शिवभक्तांचा पुढील प्रवास रखडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे, चीन सरकारने या भाविकांना प्रवासासाठी आवश्यक असणारे 'परमिट' जारी केले, प्रवासाचे पैसेही उकळले, मात्र ऐनवेळी त्यांचा 'व्हिसा' रोखून धरला आहे! गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व भाविक काठमांडूमध्ये व्हिसाच्या प्रतीक्षेत असून, आता त्यांनी थेट भारत सरकारकडे मदतीची आर्त हाक दिली आहे. पुढे: पुणे जिल्ह्यातील शिरूर आणि परिसरातील जवळपास ५२ भाविक अत्यंत श्रद्धेने कैलास-मानसरोवर यात्रेसाठी घराबाहेर पडले. नेपाळमार्गे तिबेटमध्ये प्रवेश करून कैलास पर्वताचे दर्शन घेण्याचे त्यांचे स्वप्न होते. यासाठी लागणारे व्हिसा ॲप्लिकेशन, पासपोर्ट आणि इतर सर्व आवश्यक कायदेशीर दस्तऐवज या भाविकांनी वेळेत पूर्ण केले होते. चीन सरकारने त्यांना परवानगी म्हणजेच परमिटही दिले. मात्र ऐनवेळी चीन प्रशासनाने खोडा घातला आहे. पैसा लेकरही व्हिसा का दिया जाता है? असा संतप्त सवाल आता हे भाविक उपस्थित करत आहेत. गेल्या ४ दिवसांपासून हे सर्व लोक काठमांडूमध्ये अडकून पडले आहेत, त्यांच्या राहण्याचा आणि खाण्याचा खर्चही वाढत चालला आहे. या ५२ लोकांमध्ये ज्येष्ठ नागरिकांचाही समावेश आहे. केंद्रीय परराष्ट्र मंत्रालयाने, देशाचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने हस्तक्षेप करावा, अशी मागणी या अडकलेल्या भाविकांनी केली आहे. चीनच्या या अशा वागणुकीमुळे दरवर्षी अनेक भारतीय पर्यटकांना मनस्ताप सहन करावा लागतो. प्रश्न: पैसे आणि परमिट देऊनही चीनने ऐनवेळी व्हिसा का रोखला? या ५२ निष्पाप भाविकांची सुटका करण्यासाठी सरकार किती तत्परतेने पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.0
0
Report
Advertisement
TET पेपर फोड़ने वालों को मौत की सजा, शिक्षक-विधायक विक्रम काळे की प्रतिक्रिया
Dharashiv, Maharashtra:धाराशिव TET चा पेपर फोडणाऱ्यांना मृत्यू दंडाची शिक्षा सुनावली पाहिजे . सखोल चौकशी करून केस फास्टट्रॅक कोर्टात चालवा रद्द केलेली परीक्षा त्वरित घेण्यात यावी आणि संबंधितांना योग्य ती शिक्षा व्हावी हि घटना वेदना देणारी व शिक्षकांच्या भविष्यावर घाला घालणारी आहे TET पेपर फुटीवर शिक्षक आमदार विक्रम काळे यांची प्रतिक्रिया.0
0
Report
TET और NEET पेपर लीक: महाराष्ट्र सरकार पर उंगली, दानवे बोले घोटाला
Washim, Maharashtra:उद्या होणाऱ्या TET चा पेपर फुटला. या अगोदर ही NEET चा पेपर फुटला होता. त्या तील आरोपी जेल मध्ये आहेत. NEET पेपर फुटीचे केंद्र महाराष्ट्र आहे. हे सरकार गुड गव्हर्नन्स झिरो टोलरंस ची बाता मारते. या सरकारचाच हात पेपर फुटी मध्ये असल्याचा घणाघात UBT नेते अंबादास दानवे यांनी केलाय. ते वाशिम इथ UBT पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्या साठी आले असता बोलत होते.0
0
Report
दानवे का वाशिम दौरा: निधि वितरण और राम मंदिर पर कठोर टिप्पणी
Washim, Maharashtra:अँकर:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी वाशिम येथे विविध राजकीय मुद्द्यांवर भाष्य करत सत्ताधाऱ्यांवर जोरदार टीका केली.पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या कार्यकर्ता संवाद मेळाव्यानिमित्त ते वाशिम येथे आले असता त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.दानवे म्हणाले, "मला अद्याप कोणतीही कायदेशीर नोटीस मिळालेली नाही.नोटीस मिळाल्यानंतर कायदेशीररित्या योग्य ते उत्तर देईन. मला कोणालाही नोटीस पाठवण्याचा अधिकार नाही.यावेळी त्यांनी यवतमाळ-वाशिम मतदारसंघाबाबतही भूमिका स्पष्ट केली. हा मतदारसंघ कोणाच्या बापाचा नसून तो शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्या विचारांचा मतदारसंघ आहे," असे ते म्हणाले.विकास निधीच्या मुद्यावर बोलताना दानवे म्हणाले की, "निधी मंजूर करण्याची एक ठरलेली शासकीय प्रक्रिया असते. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या स्तरावर निर्णय होतात आणि त्यासाठी अनेक महिने लागतात. एखाद्या व्यक्तीमुळेच निधी मिळाला, असा दावा करणे म्हणजे जनतेची दिशाभूल करणे आहे. राज्याच्या निधी वाटपाचे धोरण ठरलेले असून त्यानुसारच आमदार-खासदारांना निधी दिला जातो.स्वतःचे अपयश लपवण्यासाठी काहीजण जनतेची दिशाभूल करत आहेत. त्यामुळे मला कोणताही पुरावा देण्याची गरज वाटत नाही.राम मंदिराच्या मुद्द्यावरही त्यांनी प्रतिक्रिया देत सांगितले की, राम मंदिरासाठी शिवसेनेने संबंधित न्यासाला मदत केली होती. त्या निधीचा हिशोब संबंधित न्यासाने द्यावा. तसेच राम मंदिरातील कथित चोरी आणि सुरक्षेच्या मुद्द्यावर नितेश राणे यांनीही आपली भूमिका स्पष्ट करावी. हिंदुत्वाच्या नावावर राजकारण करणाऱ्यांनी या मुद्द्यांवरही बोलले पाहिजे. बाईट:अंबादास दानवे, UBT नेते0
0
Report
Advertisement
केतन हत्या केस: सिया के माता-पिता से दो घंटे की पूछताछ शुरू
Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणात आतापर्यंत 10 जणांचे जबाब नोंदवण्यात आले होते. त्यात काल सिया चा भाऊ साहिल याची कसून चौकशी पोलिसांनी केली. तर आज सिया चे आईवडील यांचा जबाब नोंदविण्यात येणार आहे. मागील 2 तासांपासून सिया च्या आई वडिलांची चौकशी करण्यात येणार आहे. याच संदर्भात उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन टोनपे यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... 121 with गजानन टोनपे, DYSP (file no.01) ग्राफिक्स : *सियाच्या आई-वडिलांना चौकशीत कोणत्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागणार?* - सिया आणि चेतन मित्र होते, त्यांचे प्रेम संबंध होते. याची तुम्हाला कल्पना होती का? - सियाने चेतनशी लग्न करण्याचा हट्ट धरला होता का? - सियाच्या संमतीने केतनशी लग्न जुळवलं होतं का? - सियाला केतनचा स्वभाव पटत नव्हता का? - सियावर केतनशी लग्न करण्यासाठी जबरदस्ती केली जात होती का? - लग्न ठरल्यानंतर ही सिया नेहमी चेतनशी भेटत होती, याची तुम्हाला माहिती नव्हती का? - साहिल आणि चेतन मित्र आहेत, हे पण तुम्हाला माहित नव्हतं का? - लोहगडावर ते तीन वेळा गेले होते, त्यावेळी सियाने काय कारणं सांगितली होती? - केतनच्या हत्याेचा कट रचला जात होता? याबाबत तुम्हाला कल्पना होती का?0
0
Report
धाराशिव में ओमराजे के शिंदे प्रवेश के बाद नया राजनीतिक समीकरण
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजे निंबाळकर यांच्यावर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? धाराशिव हा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनाचा बालेकिल्ला असल्याचा दावा करत शिवसैनिक ओमराजेंना राजकीय उत्तर देण्याच्या तयारीत आहेत. आगामी सभेला शक्तिप्रदर्शनाचे स्वरूप देण्याचा प्रयत्न सुरू असून, ओमराजेंच्या पक्षांतराचा मुद्दा सभेच्या केंद्रस्थानी राहण्याची शक्यता आहे. धाराशिवमध्ये ठाकरे गटाने गावोगावी बैठका सुरू करत संघटनात्मक ताकद दाखवण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
शिंदे की शिवसेना में प्रवेश के बाद धाराशिव में ओमराजे निंबाळकर पर राजनीतिक परीक्षा
Dharashiv, Maharashtra:धाराशिव ओमराजेंची दुहेरी कोंडी; ठाकरे गटाचा थेट हल्ला, भाजपचीही नवी रणनीती! उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यापूर्वी शिवसैनिकांची मोर्चेबांधणी; भावी खासदार'च्या बॅनरने राजकीय चर्चांना उधाण! शिंदे सेनेत प्रवेशानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण; ओमराजेंसमोर मित्र की मित्रपक्ष प्रतिस्पर्धी? अँकर: ठाकरे यांची साथ सोडत खासदार ओमराजे निंबाळकर यांनी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवच्या राजकारणात नवे समीकरण तयार झाले आहे. एका बाजूला उद्धव ठाकरे यांच्या धाराशिव दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर शिवसैनिक ओमराजेंच्या विरोधात आक्रमक झाले आहेत, तर दुसऱ्या बाजूला भाजपकडून आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांचे पुत्र मल्हार पाटील यांचे "भावी खासदार" असे बॅनर झळकल्याने महायुतीतही राजकीय संदेश दिला जात असल्याची चर्चा आहे. त्यामुळे ओमराजे निंबाळकर यांची विरोधकांसह मित्रपक्षाकडूनही कोंडी होत असल्याचं चित्र आहे. पाहूयात हा रिपोर्ट...0
0
Report
Advertisement
विश्वास नागरे पाटील के वीडियो पर कांग्रेस का विरोध, RSS समर्थक बयान से हलचल
Nagpur, Maharashtra:नागपुर के पुलिस आयुक्त के तौर पर नियुक्ति से पहले विश्वास नागरे पाटील का एक वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है। इस वीडियो पर कांग्रेस ने आपत्ति जताई है। कांग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे ने भी भय व्यक्त किया है। हमारे प्रतिनिधी نے उनसे बातचीत की। ভিডিও के अंश: - विश्वास नागरे पाटील ने क्षेत्र के भीतर Hindu समाज के साथ RSS के समर्थन का संकेत दिया है, जिससे हिंदू राष्ट्र के अजेन्डे की चर्चा उठी है। - संविधान के अनुसार काम करने के बारे में आश्वासन चाहिए ताकि अन्य धर्मों के साथ व्यवहार निष्पक्ष हो। - नागपुर शहर सभी धर्मों को मानने वाला नगर है; विरोध के बावजूद प्रशासनिक neutrality बनाए रखने की जरुरत जताई गई है। - कांग्रेस और अन्य दलों ने यह भी कहा कि अधिकारी की नियुक्ति के समय पूर्वाग्रह से मुक्त भावना जरूरी है ताकि संविधान के अनुरूप कार्य हो सके। - अगला चरणसूत्र: नियुक्ति की पूर्वग्रह-शून्यवृत्ति पर आश्वासन और शर्तों के अनुसार कार्य करने की प्रतिबद्धता।0
0
Report
एल निनो के प्रभाव से मान्सून अभी सक्रिय नहीं, येवला में खरीफ पेराई अभी अड़ गई
Yeola, Maharashtra:एल निनोच्या प्रभावामुळे मान्सून अद्याप अपेक्षित प्रमाणात सक्रिय झालेला नसल्याने दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या येवला तालुक्यात पेरण्या खोळंबल्या आहेत पावसाअभावी शेतकरी मका, सोयाबीनसह खरीप पिकांसाठी शेताची मशागत आणि तयारी करत आहेत मात्र अद्याप समाधानकारक पाऊस न झाल्याने पेरणी कधी करावी, असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे गेल्या वर्षी याच कालावधीत बहुतेक भागात पेरण्या पूर्ण झाल्या होत्या, असे शेतकरी सांगत आहेत आता मोठ्या पावसाची प्रतीक्षा असून मान्सून कधी सक्रिय होणार, याकडे येवला तालुक्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे0
0
Report
अस्पताल में सुरक्षा गार्ड की सतर्कता से बड़ा हादसा टला; चाकू लेकर आया युवक पकड़ा
Akola, Maharashtra:अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील सुरक्षा रक्षकाच्या सतर्कतेमुळे मोठी अनर्थकारक घटना टळली आहे. उमरी परिसरातील एका युवकावर झालेल्या चाकू हल्ल्यानंतर त्याच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, उपचार सुरू असलेल्या वॉर्डबाहेर संशयास्पद हालचाली करणारा एक तरुण सुरक्षा रक्षकाच्या निदर्शनास आला. त्याची झडती घेतली असता त्याच्याकडून धारदार चाकू जप्त करण्यात आला. त्यामुळे रुग्णावर पुन्हा हल्ला करण्याच्या उद्देशाने तो आला होता का, की त्यामागे अन्य काही कारण होते, याचा तपास आता पोलीस करत आहेत. मात्र सुरक्षा रक्षकाच्या प्रसंगावधानामुळे संभाव्य मोठी घटना टळली असून त्याच्या तत्परतेचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.0
0
Report
Advertisement
फडणवीस-उद्धव ठाकरे की एक विमान यात्रा, महाराष्ट्र के राजनीतिक समीकरण गरम
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग ठाकरे गट नेते वैभव नाईक बाइट पॉईंट्स. ऑन देवेंद्र फडणवीस और उद्धव ठाकरे एकाच विमानातून प्रवास. तो निवळ योगायोग होता. परंतु उद्धवजी सुद्धा माजी मुख्यमंत्री आहेत आणि प्रमुख नेते हे महाराष्ट्राचे आहेत. देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री आहेत. दोघांनी युती म्हणून काम केलेलं आहे. एकत्र बोलणं चर्चा करणं राजकारणाला अपेक्षित आहे. मीडियाने किंवा विरोधी पक्षाने चर्चा करू नये. राजकारणामध्ये संबंध वेगवेगळे होत चालले आहेत. अशा भेटीमुळे राजकीय संबंध सुधारतील याचा फायदा महाराष्ट्राला होईल. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नावावर पक्षाच्या नावावर, उद्धवजींचे फोटो लावून हे खासदार निवडून आले होते. त्यांच्या मतदारसंघांमध्ये जाऊन उद्धवजींना माफी मागावी लागत आहे. उद्धवजी ने सांगितलं म्हणून तिथल्या जनतेने यांना निवडून दिलं. संजय दिना पाटील यांच्या मतदारसंघांमध्ये सुद्धा उद्धवजीने माफी मागितली. ज्यां कार्यकर्त्यांनी निवडून दिलं त्यांच्यासाठी हा दौरा आहे. अणुऊर्जा प्रकल्पाला जनतेचा नेहमीच विरोध आहे. याआधी जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला कोकणातील जनतेने विरोध केला होता. मुणगेतील अणुऊर्जा प्रकल्प आहे त्या प्रकल्पाला कोण आडवी मांजर येतील त्यांना आपण ठेचून काढू असं नारायण राणे म्हणाले होते. अणुऊर्जा प्रकल्पाला आम्ही ठामपणे विरोध करणार आहोत. पालकमंत्री नितेश राणे यांच्या या प्रकल्पाला आम्ही विरोध करू असं सांगितलं आहे. पालकमंत्र्यांची भूमिका विरोध विरोधाची असेल तर त्याचा आम्ही स्वागत करू. आंबा काजू नुकसान भरपाई गेल्या मार्च एप्रिलमध्ये शेतकऱ्यांनी नुकसान भरपाईसाठी आंदोलन केलं. मागच्या अधिवेशनामध्ये तुटपंजी मदत 220 रुपये कलमाला जाहीर झाले होती. त्याला विरोध केला होता आणि दुसऱ्या दिवशी मोर्चा देखील काढला होता. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचं काम निलेश राणे यांनी केल आहे. कोकण कृषी विद्यापीठ हे कोकणातील महत्त्वाचे विद्यापीठ आहे या विद्यापीठाने अनेक शेती शास्त्रज्ञ दिलेले आहेत.0
0
Report
इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थे की वार्षिक सभा में हंगामा, 14 निदेशकों पर आरोप
Rui, Maharashtra:इंदापूर प्राथमिक शिक्षक पतसंस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळ.. संचालकांमध्ये जुंपली. पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुका प्राथमिक शिक्षक पतसंस्थेची 103 वी वार्षिक सभा वादळी ठरली. 12.05 टक्के लाभांश मंजूर झाला असला तरी अहवालातील चुकांवरून सभेत मोठा गोंधळ झाला. विविध विषयावरून संचालकांमध्ये जुंपली. दिव्यांग माजी सभापतींनी 14 संचालकांवर आरोप करताच काही संचालक त्यांच्या अंगावर धावले. सुदैवाने त्यांना इजा झाली नाही. सत्ताधारी गटातील पाच संचालक व्यासपीठावर न बसता खाली सभासदांमध्ये बसले होते. यामुळे संचालक मंडळातील दुफळी उघड झाली आहे.0
0
Report
इंदापुर में जबरी चोरी: दो आरोपी गिरफ्तार, 56 हजार का माल जप्त
Rui, Maharashtra: इंदापूरात जबरी चोरीचा गुन्हा उघड... स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई... दोन आरोपी जेरबंद... आरोपींकडून 56 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत... ANCHOR इंदापूर पोलीस ठाण्यात दाखल जबरी चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावण्यात पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून गुन्ह्यातील मुद्देमाल ही जप्त करण्यात आला आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली बारामती विभागाच्या पथकाने गोपनीय माहिती आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे ही कारवाई केली... अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये कृष्णा राजू गिरी (वय 20) आणि वैभव देविदास साळुंखे (वय 22), दोघेही अकलूज, ता. माळशिरस, जि. सोलापूर येथील रहिवासी आहेत. आरोपींकडून विवो कंपनीचा मोबाईल, सेकंड कॉपी घड्याळ आणि गुन्ह्यात वापरण्यात आलेली होंडा स्प्लेंडर मोटारसायकल असा एकूण 56 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे... जप्त मुद्देमालासह आरोपींना पुढील कारवाईसाठी इंदापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले असून गुन्ह्याचा पुढील तपास चालू आहे...0
0
Report
Advertisement
