icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर में कुलर में पानी भरते समय बिजली का झटका: पिता और पुत्र की मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात कुलर मध्ये पाणी भरताना विजेचा शॉक लागून बाप लेकाचा मृत्यू झालाय. ही घटना चंद्रपूर शहरातील इंदिरानगर भागात उजेडात आली. आज सकाळी १० वाजताच्याुमारास इंदिरानगर रेल्वे रुळाजवळ राहणारे वामन मांडवे (61) हे सकाळी चालू कुलर मध्ये पाणी टाकत असताना त्यांना विजेचा जोरदार झटका बसला. वडील खाली पडल्याचे दिसताच मुलगा राहुल मांडवे (38) वडिलांजवळ गेला असता त्यांना सुद्धा विजेचा जोरदार धक्का लागला. या धक्क्यात बाप-लेकाचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी मृत्यूने संपूर्ण परिसर हळहळून गेलाय. उन्हाळ्यात महावितरणने नागरिकांना विजेच्या धक्क्यापुढे आधीच सावध केले होते. कुलर ची वायरिंग ची बरोबर तपासणी करावी व चालू कुलर मध्ये पाणी टाकायच्या वेळेस कुलर बंद करणे अश्या सूचना महावितरणने दिल्या होत्या. मात्र या दुर्दैवी घटनेमुळे लोकांनी महावितरणच्या सूचना गांभीर्याने घेतल्या नसल्याचे दिसून येत आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण पर मंत्री विखे पाटील का बयान: जरांगे पाटलां से मिलकर आंदोलन रोकें की विनंती

Shirdi, Maharashtra:मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष मंत्री राधाकृष्ण विखे पाटील बाईट ऑन मनोज जरांगे उपोषण. जरांगे पाटलांनी आंदोलनाची भूमिका सोडून द्यावी. आंदोलन स्थगित करावं. उद्या समक्ष भेटूनही त्यांना आंदोलन न करण्याची विनंती करणार - मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची प्रतिक्रिया. मी जरांगे पाटलांच्या संपर्कात. मुख्यमंत्री या विषयात सकारात्मक. जरांगे पाटलांच्या मागणीनुसार हैदराबाद गॅजेट जाहीर केलं. सरकार काय कारवाई करतंय यात मी मध्यंतरी त्यांच्याशी बोललो आहे. या विषयाच्या अनुषंगाने मी सातत्याने मुख्यमंत्र्यांचा संपर्कात आहे. मी उद्या मनोज जरांगे पाटलांना भेटून चर्चा करणार. कायद्याच्या चौकटीत राहूनच निर्णय करावा लागेल. देवेंद्र यांनी आधीही आणि आताही आरक्षण देण्यासंदर्भात भूमिका घेतली आहे. त्यांच्यामुळेच आपण पुढे चाललोय. उपोषण हा मार्ग नाही. त्यांच्या काही मागण्या मान्य केल्यात, काही मागण्यांवर कार्यवाही सुरू आहे. जरांगे पाटील गैरसमजातून काही आरोप करताय. मराठा समाजाला आरक्षण देण्याचे मुख्य काम देवेंद्र फडणवीस यांनीच केलंय. जरांगे पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांना टार्गेट करू नये, ही विनंती. राष्ट्रवादी असो की भाजप - शिवसेना, आम्ही महायुती म्हणून काम करतो. व्यक्तीवर टिका करून प्रश्न सुटत नाही. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करून जरांगे पाटील आपला जनाधार कमी करताय. हैदराबाद गॅजेटची अंमलबजावणी का झाली? आणि सातारा गझेटची का झाली नाही? त्यांना भेटून सांगणार. जरांगे पाटलांनी उष्माघाताबाबत जे वक्तव्य केलयं, आम्ही ते होऊ देणार नाही. समाजाला त्यांची गरज आहे. ते समाजाचे नेतृत्व करताय, त्यांच्याबद्दल आम्हाला आदर.
0
0
Report
Advertisement

अकोल्यात उष्णते के बीच फिरती पानीपोई ने लोगों की प्यास बुझाई

Akola, Maharashtra:अकोल्यात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत असून, पुढील दोन दिवसांसाठीही उष्णतेचा इशारा देण्यात आला आहे. तापमानाने 44 अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अशा कडाक्याच्या उन्हात नागरिकांना दिलासा देण्यासाठी अकोल्यातील सामाजिक कार्यकर्ते निशिकांत बडगे यांनी एक प्रेरणादायी उपक्रम सुरू केला आहे. आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ त्यांनी शहरात फिरती पाणपोई सुरू केली असून, हा उपक्रम सध्या नागरिकांसाठी मोठा आधार ठरत आहे. अकोल्यात अनेक ठिकाणी उष्णतेमुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना पिण्याच्या पाण्याची तीव्र गरज भासत असताना प्रत्येकाकडे पाण्याची बाटली असतेच असे नाही. हीच गरज ओळखून निशिकांत बडगे यांनी छोट्या चार्जिंग ऑटोवर फिरती पाणपोई उभारली आहे. शहरातील विविध भागात ही पाणपोई फिरवून नागरिकांना मोफत थंड पिण्याचे पाणी उपलब्ध करून दिले जात आहे. रस्त्यावर काम करणारे मजूर, प्रवासी, विद्यार्थी, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिक या उपक्रमाचा मोठ्या प्रमाणात लाभ घेत आहेत. वाढत्या उन्हाच्या झळांमध्ये हा उपक्रम नागरिकांना केवळ पाणीच नाही तर माणुसकीचा गारवाही देत आहे. समाजासाठी संवेदनशीलतेने पुढे येत राबविण्यात आलेला हा उपक्रम अनेकांसाठी प्रेरणादायी ठरत असून, अकोल्यातील ही फिरती पाणपोई सध्या चर्चेचा विषय बनली आहे.
0
0
Report

गर्मी की तेज लहर दिमाग़ और आंखों को कर रही परेशन, डॉक्टर चेतावनी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यासह संपूर्ण देशामध्ये सध्या उन्हाचा पारा खूपच उचं आहे. या कडक उन्हाळ्याचा प्रभाव फक्त शरीरीक थकव्यापुरता मर्यादित नाही तर ते तुमच्या डोळ्यांवर व मज्जासंस्थेवर थेट परिणाम करतोय. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रदीर्घ काळ उन्हात राहिल्याने डोळ्यांची जळजळ, तीव्र डोकेदुखी आणि न्यूरोलॉजिकल समस्या यांची रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. विशेषतः लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि आधीच गंभीर Today आजार असलेल्या व्यक्तींना हा धोका अधिक आहे. डॉक्टरांच्या मते अति उष्णता आणि शरीरातील पाणीपोषणाची कमतरता यामुळे मेंदूच्या रक्ताभिसरणावर परिणाम होतो, इलेक्ट्रोलाइट संतुलन बिघडते आणि मज्जासंस्थेवर ताण येऊन बेशुद्ध पडणे शक्य होते. डॉक्टरांचे पुढील उपाय सुचवितात: उन्हात जाणे कमी करा, पाणी प्यायला विसरू नका, डोळ्यांचे रक्षण करण्यासाठी चष्मा/गॉगल्स वापरा, लहान मुलं व स्वयंच्छासहीत काळजी घ्या. रुग्णालयांमध्ये डोळ्यांची जळजळ, तीव्र डोकेदुखी आणि न्यूरोलॉजिकल तक्रारींच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याचे निदर्शनास आले आहे. या उन्हाळ्याचा परिणाम नागरिकांनी आपली दिनचर्या नियंत्रित पद्धतीने करावी अशी शिफारस डॉक्टर देत आहेत.
0
0
Report
Advertisement

Solapur महायु़ती में कटुता से बचाने की पुकार: उदय सामंत का स्पष्ट संदेश

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महायुतीमध्ये कटूता येईल अशा प्रकारचा मिठाचा खडा कोणी टाकू नये - उदय सामंत उदय सामंत, उद्योगमंत्री जरांगे पाटील आंदोलन जरांगे पाटील आणि माझी भेट महिन्यापूर्वी झाली होती. त्यानंतर प्रसाद लाड त्यांना भेटायला गेले.. मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असल्यापासूनची महायुतीची आहे मनोज दादांच्या काही शंका असतील सरकार म्हणून आम्ही ते दूर करू.. प्रसाद लाड यांनी जरांगे पाटील यांच्यासोबत जाऊन सविस्तर चर्चा केली.. प्रसाद लाड यांचा काल मला फोन आलं होता. मराठा आरक्षणासंदर्भात विखे पाटील यांच्याशी चर्चा करण्यासंदर्भात ते बोलले. मनोज दादांना आंदोलनाची वेळ येणार नाही, त्याप्रमाणे शासन काम करेल. या प्रकारची भूमिका प्रसाद लाड यांनी मांडली राज्य सरकारची भूमिका मराठा समाजाबाबतीत सकारात्मक आहे. तीच घेऊन पुढे जात आहोत.. आम्ही सरकारमध्ये काम करत असताना सांघिक काम करतोय.. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना महायुती म्हणून काम करत होतो.. आता देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्व एकत्रित येऊन निर्णय घेतोय.. मराठा समाजाचा प्रश्न तडीस नेऊन मार्गी लावणार आहोत. ऑन नवीन कार्यकारणी शिवसेना जिल्ह्यातल्या कोर कमिटीच्या सदस्यांसोबत बैठक झाली. पाच जून रोजी खासदार माने यांनी मुलाखती लावल्या आहेत.. ऑन सोलापूर विधान परिषद विधान परिषदेची निवडणूक समोर आहे. सोलापूर जिल्ह्यात आमच 110 सदस्य आहेत. यासंदर्भात आमची कोर कमिटीची बैठक झाली. आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कानावर घालणार आहोत.. पण समन्वय असणे आवश्यक आहे कारण आम्ही महायुती म्हणून काम करतो.. पालकमंत्री कोणाचा जरी असला तरी त्यांनी दोन्ही पक्षातील नेत्यांना सोबत घेऊन चाललं पाहिजे.. महायुतीमध्ये कटूता येईल अशा प्रकारचा मिठाचा खडा कोणी टाकू नये आमचा पण मतदानामध्ये वाटा आहे. आपण सर्वांनी जर समन्वयाने केले तर चांगली निवडणूक होऊ शकते. पण डावलून जर केलं तर मित्र पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये कटूता राहते अशा प्रकारची भूमिका आमच्या नेत्यांनी मांडली.. ऑन महायुती फार्मूला लोकशाहीमध्ये कोणीही अर्ज खरेदी करू शकतो. शिवसेनेची भूमिका महायुती म्हणूनच निवडणूक लढवण्याची आहे. सोलापूरात आमच्या पक्षातील कार्यकर्त्याने अर्ज घेतला असेल आणि जर एकनाथ शिंदे यांनी महायुतीची घोषणा केली. त्या कार्यकर्त्याला कसं समजायचं ते आमच्यावर सोडून द्या. जिल्ह्यातील कोर कमिटी बैठकीत विधानपरिषदेवर नाही तर संघटना वाढवताना ज्या अडचणी येत आहे त्यावर चर्चा झाली.. पालकमंत्री गोरे यांना विनंती करणार आहोत की, सर्वांना सोबत घेऊन जाणं गरजेचं आहे. मी आणि दादा भुसे यांनी कोर कमिटी आमची भूमिका मांडली.. आमच्या ज्या विद्यमान जागा आहेत. त्या सोडून आम्ही एक दोन जास्त जागा मागितल्या आहेत.. मात्र यावर एकनाथ शिंदे निर्णय घेतील.. उपमुख्यमंत्री शिंदे साहेब आज दिल्लीवरून येतील आणि एक दोन दिवसात फॉर्मुला ठरेल.. महायुती म्हणून आम्ही 17 जागा लढू आणि त्या जिंकून.. ऑन ठाणे बहुजन आघाडी लोकशाही मध्ये कोणी कोणाला भेटू शकतो. परवा आमचे रवींद्र फाटक आणि आज खासदार भेटले यात नावीन्यपूर्ण काय आहे. आमच्या कोणत्याही नेत्याने बहुजन विकास आघाडी शिवसेनेमध्ये विलीन होतंय असे म्हणलं नाही.. आप्पा आणि हितेज ठाकूर यांच्या बद्दल आम्हाला नितांत आधार आहे.. विधान परिषदेच्या जागेवरून रवी फाटक साहेब भेटले असतील.. तो लोकशाहीला एक भाग आहे.. शिवसेना आणि राष्ट्रवादी मध्ये कुठनं वाद दिसतो हे आम्हाला अजून कळलं नाही.. सोलापूर एमआयडीसी बाबत मी आता बोलणार नाही, आचारसंहिता सुरू आहे. मात्र 15 ते 20 दिवसानंतर सोलापूर एमआयडीसी संदर्भातील सर्व प्रश्न सोडवले जातील.
0
0
Report

तळेगाव दाभाडे में गणपती मंदिर से चोरी की कोशिश, नागरिकों ने चोर पकड़ लिया

Varsoli, Maharashtra:Anchor: तळेगाव दाभाडे शहरातील गणपती चौक येथील ऐतिहासिक गणपती मंदिरामध्ये चोरीचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्याला नागरिकांच्या सतर्कतेने पकडण्यात यश आले. यावेळी संतप्त नागरिकांनी चोराला चांगलाच चोप देत तळेगाव पोलिसांच्या ताब्यात दिले. शहरामध्ये दिवसाढवळ्या वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून काही दिवसांपूर्वी जिजामाता चौकातील तुळजाभवानी मंदिरातही असाच प्रकार घडला होता. त्यामुळे नागरिकांनी अधिक सतर्क राहून संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ पोलिसांना माहिती देण्याचे आवाहन करण्यात येत आहे. गणपती मंदिरातील चोरीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चित्रित झालीये...
0
0
Report

Washim में तेज गर्मी, रेड अलर्ट जारी; दुपहरी बाहर निकलना रोक दिया गया

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात सूर्य आग ओकत असून सध्या उन्हाचा तीव्र कहर सुरू आहे. गेल्या महिन्याभरापासून तापमानाने चाळीशी पार केली आहे.काल जिल्ह्यात ४३.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.आज हवामान विभागाने वाशिम जिल्ह्यासाठी उष्णतेचा रेड अलर्ट जारी केला आहे.वाढत्या उष्णतेमुळे नागरिक अक्षरशः हैराण झाले असून, दुपारच्या वेळेत वाशिम शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे.मुख्य रस्त्यांवरील नागरिकांची आणि वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात कमी झाली असून, अत्यावश्यक काम असल्याशिवाय नागरिक घराबाहेर पडत नसल्याचे चित्र आहे.उष्माघाताचा धोका वाढल्याने प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.पुरेसे पाणी पिणे, दुपारच्या वेळेत घराबाहेर पडणे टाळणे आणि आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

बदलापुर के भाजपा विधायक किसन कथोरें का व्हॉट्सएप हैक, 55 हजार की मांग

Ambernath, Maharashtra:भाजप आमदार किसन कथोरेंचं व्हॉट्सअप हॅक हॅकर्सकडून कथोरेंच्या नावाने पैशांची मागणी आमदार किसन कथोरें यांची सायबर पोलिसात तक्रार。 महत्त्वाचं म्हणजे या हॅकर्सनी त्यांच्या मोबाईल मधील सर्व नंबरवर मेसेज पाठवून आमदार कथोरेंच्या नावाने 55 हजारांची मागणी केलीय. याप्रकरणी कथोरें यांनी सायबर पोलिसात तक्रार दाखल करून हॅकर्सवर कारवाईची मागणी केलीय. आमदार कथोरें यांच्या स्वीय सहाय्यक जालिंदर सावंत यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून व्हॉट्सअॅप हॅक झाल्याची माहिती कार्यकर्त्यांना दिली असून पैशांच्या मागणी संदर्भात मेसेज आल्यास त्याला प्रतिसाद देऊ नये असं आवाहन केलंय。
0
0
Report

पनवेल उपजिल्हा अस्पताल में शववस्त्र के लिए 600 रुपये की मांग, वीडियो वायरल

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल उपजिल्हा रुग्णालयात माणुसकीला काळिमा फासणारी घटना समोर आलेय. तुर्भे मधील एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्यावर पनवेल उपजिल्हा रुग्णालयात महिलेचा शव हे शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मात्र याठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांनी कफन अर्थात शववस्त्रासाठी 600 रुपयांची मागणी केली. अखेर 500 रुपये घेऊन पुढील प्रक्रिया करण्यात आली. याघटनेचा विडिओ समोर आला असून नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. यावेळी मयत महिलेच्या पतीने शववस्त्राचे तरी पैसे मांगू नयेत, सरकारने याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी केलेय.
0
0
Report
Advertisement

बीड़ नगर परिषद कार्यालय के बाहर कर्मी बनाम सामाजिक कार्यकर्ता में मारामारी

Beed, Maharashtra:बीड : चौकशीसाठी तक्रार अर्ज देणारा कार्यकर्ता व नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये मारामारी. शहरातील सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला. बीड शहरातील एका नगरसेवकाच्या कार्यालयासमोर नगरपरिषद कर्मचारी व त्याच्या विरोधात तक्रार अर्ज देणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांमध्ये मारामारी झाल्याची घटना घडली; या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ देखील समोर आला असून याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. बीड शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याने नगरपालिकेत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या चौकशीसाठी अर्ज दिलेला होता. हा कर्मचारी आपल्या इतर दोन सहकाऱ्यासह एका नगरसेवकाच्या कार्यालयाकडे गेला असताना त्या ठिकाणी हा सामाजिक कार्यकर्ता होता. त्याठिकाणी दोघांमध्ये शाब्दिक वाद झाला व यानंतर हाणामारी देखील झाली हा सर्व प्रकार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून याची जोरदार चर्चा बीड शहरात होत आहे...
0
0
Report

अजित पवार के निधन के चार महीने: बारामती स्मृतिस्थल पर परिवार ने श्रद्धांजलि दी

Rui, Maharashtra:अजित पवारांच्या निधनाला चार महिने पूर्ण.... जय पवारांसह युगेंद्र पवारांनी घेतले अजित पवारांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन..... राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज चार महिने पूर्ण झाले. यानिमित्ताने बारामतीतील विद्या प्रतिष्ठान परिसरातील स्मृतिस्थळी त्यांचे धाकटे पुत्र जय पवार यांनी भेट देत अभिवादन केले. दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे युवा नेते आणि अजित पवार यांचे पुतणे युगेंद्र पवार यांनीही स्मृतिस्थळाचे दर्शन घेत दादांना श्रद्धांजली अर्पण केली.
0
0
Report

अमरावती में बकरी ईद धूमधाम से, पुलिस बंदोबस्त के बीच शहर उत्सव बना

Amravati, Maharashtra:अमरावतीत बकरी ईद उत्साहात साजरी; शहरात अनेक ठिकाणी पोलिसांचा बंदोबस्त, एकमेकांना दिल्या शुभेच्छा अमरावती शहरात बकरी ईद अर्थात ईद-उल-अधा मोठ्या उत्साहात भक्तिमय आणि आनंदी वातावरणात साजरी करण्यात आली. ईदच्या निमित्ताने शहरातील हैदरपुरा ईदगाह मैदानासह विविध मशिदींमध्ये हजारो मुस्लिम बांधवांनी एकत्र येत सामूहिक नमाज अदा केली. पहाटेपासूनच ईदगाह आणि मशिदींमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. पारंपरिक वेशभूषेत मुस्लिम बांधवांनी अल्लाहची प्रार्थना करत देशात शांतता सुख-समृद्धी आणि बंधुभाव कायम राहावा अशी दुआ मागितली. मरकज अहले सुन्नत मस्जिद मिस्कीन शाह मियांचे इमाम मुफ्ती शरफोद्दीन यांनी ईदची नमाज अदा करून घेतली. नमाजानंतर उपस्थितांनी एकमेकांना आलिंगन देत ईद मुबारकच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी शहरात शांतता, सामाजिक सलोखा आणि उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले असून प्रशासनाकडूनही चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top