icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मान्सून के आगमन से मावल के किसानों में उम्मीद की लहर

Varsoli, Maharashtra:मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच मावळ तालुक्यात शेतकरी कामाला लागले असून भात लागवडीपूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. शेतात नांगरणी, मशागत, आणि रोपवाटिकांसाठी जमीन तयार करण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शेतीची प्रत्येक तयारी वेळेत पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. तसेच शेतांमध्ये कृषी अवजारांचा वाढलेला वापर, मशागतीची सुरू असलेली कामे आणि आगामी हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आशावाद हे चित्र सध्या मावळात पाहायला मिळत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता नव्या हंगामाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून शेतीच्या कामांमुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..
0
0
Report

अहिल्यानगर विधानपरिषद चुनाव: करण ससाणे नहीं पहुँचे, रिंगण में मुकाबला गर्म

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक... आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस... अपक्ष उमेदवार करण ससाणे नॉट रिचेबल... करण ससाणे हे श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष... महाविकास आघाडीचे एकमत न झाल्याने करण ससाणे हे अपक्ष म्हणून रिंगणात... भाजपकडून प्राजक्त तनपुरे, अपक्ष करण ससाणे, अपक्ष दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी निवडणुकीच्या रिंगणात... निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न... मात्र करण ससाणे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने चुरस वाढली... dup़ारी तीन वाजेपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे लक्ष...
0
0
Report

यवतमाळ विधान परिषद चुनाव: कांग्रेस ने उम्मीदवार वापस लेकर फारुक सय्यद को बढ़ाने की तैयारी

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूकितुन महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी नाट्यमय रीत्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस अलर्ट मोड वर आली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होऊ नये या दृष्टीने काँग्रेस नेत्यांनी हालचाली सुरू केल्या असून सध्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले फारुक सय्यद यांना पुरस्कृत उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी है. त्या दृष्टीने काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस हार मानणार नाही, जय पराजयाचा विचार करणार नाही करिता निवडणुकी होईलच असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

सांगली में महायुति की रणनीति तय, बंडखोरी रोकने के लिए जोर

Satara, Maharashtra:सातारा:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली या भेटीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीबाबत दोन्ही नेत्या मध्ये चर्चा झाली.या महत्त्वपूर्ण भेटीनंतर विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम हे दोन्ही नेते एकाच गाडीतून सांगलीकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बंडखोरी बाबत प्रतिक्रिया दिली आहे. "सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महायुतीत 'युतीधर्म' पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी ३ वाजੇपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून, बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः सांगलीला निघालो असल्याचे ते म्हणाले." सांगलीत तानाजीराव पाटील, आमदार सुहास बाबर आणि इतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बंडखोर अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवसेनेकडून युतीधर्माचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली... साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकी नंतर महायुती मध्ये अंतर्गत नाराजीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आधी सांगलीचा हा पहिला टप्पा आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतर महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून साताऱ्याच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला बाईट: पालकमंत्री शंभूराज देसाई
0
0
Report

रत्नागिरी में मध्यरात्री कार समेत बाइक जलकर खाक; बड़ा अग्निकांड

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत मध्यरात्री एक भीषण आगीची घटना घडली आहे. येथील रहिवासी सुरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या मारुती सुझुकी SX4 (क्र. MH 46N7377) या कारला मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी थरारक आणि मोठी होती की, आगीच्या ज्वालांनी रौद्ररूप धारण केले. या आगीत कारच्या शेजारीच उभी असलेली टीव्हीएस रायडर (TVS Raider, क्र. MH08BA5583) ही मोटरसायकलही होरपळली असून तिचेही प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उप-अग्निशमन अधिकारी विवेक राणे आणि त्यांच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अग्निशमनदल आग विझवेपर्यंत मारुती कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.
0
0
Report
Advertisement

सांगली-सातारा उपचुनाव में तानाजी पाटील के माघार से तस्वीर बदलेगी?

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधानसभा निवडणूकीतून शिवसेनेचे तानाजी पाटील माघार घेण्याची शक्यता,सूत्रांची माहिती.. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आजचा अंतिम दिवस आहे.या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची शक्यता असून दुपारी 3 पर्यंत ते आपला अर्जं माघार घेतील,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तर काँग्रेसकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबत नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय होणार आहे,तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील माघार घेणार,यावर खलबते सुरू आहेत,त्यामुळे दुपारी तीन नंतर कोणाची माघार होणार,हे समोर येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

बदलापूर तालाब में प्रदूषण का कब्जा, नगरपालिका की लापरवाही से बदतर हालात

Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या गाव तलावात घाणीचं साम्राज्य अस्वच्छता और दुर्गंधीमुळे नागरिक हैराण पालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात बदलापूर पश्चिमेकडे गाव परिसरात जुना तलाव असून कमळांचा तलाव म्हणून तो प्रसिद्ध होता. मात्र गेल्या काही वर्षात या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालीय. तलावात जलपर्णी वाढली असून सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दुषित झालंय. काही समाजकंटक तलावात कचरा टाकत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढलंय. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचं प्रमाणही वाढलंय. एकीकाळी बदलापूरकरांच्या पर्यटनाचं ठिकाण असलेला हाच तलाव आता इथल्या रहिवाशांचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतोय. पालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावभोवतीचे संरक्षक कठडेही गायब झाले आहेत. बदलापूरचं वैभव असलेला गाव तलाव नामशेष होत चालल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळलीय.
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ की कंपनी में 80 लाख की धोखाधड़ी, डायरेक्टर-प्रोडक्शन सुपरवाइजर के खिलाफ मामला दर्ज

Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या नामांकित कंपनीत ८० लाखांची फसवणूक. कंपनीचा डायरेक्टर आणि सुपरवायझरवर गुन्हा दाखल. दोघांविरोधात शिवाजी नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. अंबरनाथ पूर्व परिसरातील एका नामांकित कंपनीची तब्बल ८० लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कंपनीचे डायरेक्टर आणि प्रोडक्शन सुपरवायझर यांनी संगनमत करून बनावट कागदपत्रांच्या आधारे कंपनीची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप असून, या प्रकरणी अंबरनाथ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अंबरनाथ पूर्व भागातील एमआयडीसीमध्ये एका नामांकित कंपनीमध्ये डायरेक्टर आणि कंपनीचे पार्टनर नरेश महाजन तसेच सुपरवायझर मुन्ना यादव यांनी जून २०२० ते डिसेंबर २०२४ या कालावधीत या दोघांनी कंपनीतील विविध व्यवहारांमध्ये गैरप्रकार करत बनावट बिल तयार केली. तसेच कामगारांच्या पगारासह इतर आर्थिक व्यवहारांमध्ये फेरफार करून कंपनीला मोठा आर्थिक फटका दिला. या फसवणुकीमुळे कंपनीचे सुमारे ८० लाख रुपयांचे नुकसान झाल्याचं कंपनीच्या व्यवस्थापनाने केलेल्या अंतर्गत चौकशीत हा प्रकार उघडकीस आल्यानंतर कंपनीचे मालक लक्ष्मीनारायण श्री निवासन यांनी अंबरनाथ शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत आरोपी नरेश महाजन आणि मुन्ना यादव यांच्या विरोधात फसवणूक आणि विश्वासघातासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून दोन्ही आरोपी फरार असून त्यांचा शोध सुरू असल्याची माहिती पोलीस उपायुक्त सचिन गोरे यांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास शिवाजीनगर पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top