Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आंबे में विषबाधा: सात परिवार अस्पताल पहुँचा, कैलक्शियम कार्बाइड के इस्तेमाल का शक
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर के शेवगाव में आंबे से एक ही परिवार के सात जण विषबाधित हो गए. सातों को समय रहते उपचार मिल गया और उनकी हालत अब ठीक है. बाजार से लाये गए आंबे के रस को पीने के कारण परिवार के सदस्य अचानक चक्कर आने लगे. यह घटना पिछले हफ्ते की है. अभिजीत जायभाय और परिवार के अन्य सदस्य शहर के हॉस्पिटल में प्राथमिक उपचार के बाद अहिल्यानगर स्थित साई एशियन हॉस्पिटल में उपचार के लिए भेजे गए. डॉक्टर सचिन पांडुले ने बताया कि जल्दी पिक करने और स्टोर करने के लिए व्यवसायिक रसायनों के प्रयोग से फलों में विषाक्तता के लक्षण दिखते हैं; आजकल बाजार में मिलने वाले फलों में ऐसी रसायनों की अधिक संभावना रहती है. लोगों को किन फलों को कैसे खरीदा जाए, इस पर सतर्क रहने की जरूरत है.0
0
Report
लातूर के ट्यूशन एरिया पर प्रशासन की कार्रवाई, क्लासेस और हॉस्टेल बंद
Latur, Maharashtra:AC :- नीट पेपरफुटी प्रकरणानंतर चर्चेत आलेल्या लातूरच्या तथाकथित ‘ट्युशन एरिया’वर आता प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आले आहे. लातूर जिल्हा उद्योग केंद्राने औद्योगिक वापरासाठी मंजूर गाळ्यांमध्ये सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनाच्या या निर्णयांनंतर क्लास चालक, हॉस्टेल व्यावसायिक, छोटे व्यावसायिक आणि विद्यार्थ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे. तर आता या निर्णयाविरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे...पाहूयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट... VO 01 :- लातूरचा ‘शिक्षण पॅटर्न’ राज्यभर चर्चेत राहिला आहे. शिक्षणासाठी राज्यातील विविध भागांतून हजारो विद्यार्थी लातूरमध्ये दाखल होतात. मात्र आता याच ट्युशन एरियावर प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. औद्योगिक वापरासाठी मंजूर जागांमध्ये सुरू असलेले क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम बंद करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या संदर्भात एका तक्रारदाराने प्रशासनाकडे सातत्याने पाठपूरावा केल्यानंतर प्रशासनाने कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे. बाईट :- मल्लिकार्जुन भाईकट्टी (तक्रारदार) VO 02 :- प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात आता क्लासेस चालक, हॉस्टेल व्यावसायिक, खानावळ चालक आणि छोटे व्यावसायिक रस्त्यावर उतरले आहेत. क्लासेस एरियामधील व्यावसायिकांनी प्रशासनाच्या नोटिसीची होळी करत निषेध आंदोलन केले. काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी देखील या आंदोलनात सहभाग घेत प्रशासनाचा निर्णय मागे घेण्याची मागणी केली. या निर्णयाचा थेट परिणाम विद्यार्थ्यांवर होणार असल्याचं आंदोलनकर्त्यांचं म्हणणं आहे. आधीच नीट पेपरफुटी प्रकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम आणि मानसिक तणावाचं वातावरण आहे. त्यात आता क्लासेस, हॉस्टेल आणि अभ्यासिकांवर कारवाई झाली तर विद्यार्थ्यांनी राहायचं कुठे, अभ्यास करायचा कसा, असा सवाल उपस्थित केला जात आहे. तो ट्युशन एरिया शहराबाहेर गेल्यास मुलींच्या सुरक्षेचा प्रश्नही निर्माण होईल, अशी चिंता पालकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. बाईट :- महिला पालक बाईट :- व्यवसायिक बाईट :- वस्तीगृह चालक बाईट :- विद्यार्थी बाईट :- अभय साळुंखे (काँग्रेस जिल्हाध्यक्ष) VO 03 END :- एकीकडे औद्योगिक जागांचा मूळ उद्देश कायम ठेवण्यासाठी प्रशासन कारवाई करत आहे. तर दुसरीकडे या निर्णयाचा परिणाम विद्यार्थी, क्लासेस आणि छोट्या व्यावसायिकांवर होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे प्रशासन पुढे काय भूमिका घेणार, आंदोलनाची दिशा काय असणार आणि या प्रश्नावर नेमका तोडगा काय निघणार, याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS | लातूर0
0
Report
पंढरपूर भाळवणी में दो करोड़ की फर्जीवाड़ा: महिलाएं-पुरुष धोखे के शिकार
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील भाळवणी येथे शंभर ते दीडशे महिला आणि पुरुषांची जवळपास अडीच कोटी रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. काही महिन्यात दाम दुपट रक्कम करून देण्याच्या आमिषाला हे लोक बळी पडले त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे. पंढरपूर तालुक्यातील भाळवणी परिसरातील मोलमजूरी करणाऱ्या तसेच घरकाम करणाऱ्या महिलांचा विश्वास संपादन करून राजू निराळे नावाच्या व्यक्तीने त्यांना तुमची गुंतवलेली रक्कम दाम दुपट करून देतो अवघ्या काही महिन्यांमध्ये तुम्हालाही रक्कम मिळेल असं अमित दाखवलं त्यांना विश्वास पटावा म्हणून कोरे चेक तसेच स्टॅम्प पेपर सुद्धा बनवून दिले यामुळे या महिला आणि पुरुषांनी यामध्ये आपले पैसे गुंतवले मात्र बराच कालावधी लोटला तरी आपले पैसे मिळेना हे लक्षात आल्यानंतर आपली फसवणूक झाल्याचं त्यांना समजलं आज या फसवणूक झालेल्या महिला आणि पुरुषांनी सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांची भेट घेऊन कारवाई करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
सीबीआई ने पेपरफुटी मामले में लातूर के शिवराज मोटेगावकर को गिरफ्तार किया
Latur, Maharashtra:सीबीआई ने लातूर के शिवराज मोटेगावकर को नीट पेपरफुटी मामले में गिरफ्तार किया है। इसके बाद मोटेगावकर का एक पुराना वीडियो अब सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। पेपरफुटी के विरोध में कठोर कार्रवाई की मांग करने वाला मोटेगावकर अब खुद नीट पेपरफुटी प्रकरण में गिरफ्त में हैं, जिसके चलते नई चर्चाएं शुरू हो गई हैं।\n\nमहाराष्ट्र के नीट 2026 पेपरफुटी प्रकरण में सीबीआई ने कारवाई कर लातूर के शिवराज मोटेगावकर को गिरफ्तार किया है। इस कारवाई के बाद राज्य के शिक्षा क्षेत्र में बड़ी चर्चा शुरू हो गई है। इस बीच मोटेगावकर का पुराना इंटरव्यू फिर से सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। "लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपौन कोरडे पाषाण" जैसे कहावत के अनुसार पेपरफुटी करने वालों को "मृत्युदंड या आजन्म कारावास" की सजा होनी चाहिए, ऐसी मांग करने वाला मोटेगावकर अब खुद नीट पेपरफुटी प्रकरण में गिरफ्तार है। इस वीडियो में वह कह रहे हैं कि "शिक्षण जैसे पवित्र क्षेत्र में गैरप्रकार करने वालों को मृत्युदंड या आजन्म कारावास सजा होनी चाहिए" साथ ही "वन नेशन, वन एक्झाम... फिर वन नेशन, वन पेपरफुटी चालणार का?"\n\nवायरल बाइट :- शिवराज मोटेगावकर\n\nअंबादास दानवे ने मोटेगावकर के पुराने वायरल वीडियो पर टिप्पणी की है और कार्रवाई की मांग की है।\n\nजुनी भूमिका... सध्याची परिस्थिती... और फिर वायरल हुआ वीडियो... इस पूरे प्रकरण की चर्चा अब बढ़ रही है। एक समय पेपरफुटी के खिलाफ कठोर भूमिका लेने वाले शिवराज Motegavakar के पुराने वीडियो अब फिर चर्चा में है। लोकसंवेग ...0
0
Report
नीट पेपरफुटी: लातूर में डॉक्टरों की गिरफ्तारी, CBI जांच का नया मोड़
Latur, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात नवा धक्कादायक ट्विस्ट... पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने नीट परीक्षेशी संबंधित काही कागदपत्रे आणि निट चा पेपर लातूर मधील सीबीआयच्या रडारवर असलेल्या दोन डॉक्टरांनी रद्दीमध्ये शिकल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणामुळे आता तपासाची दिशा बदलली असून, रद्दी खरेदी-विक्री करणाऱ्यांची देखील आता CBI चौकशी करणार आहे त्यामुळे रद्दी विकणारे ही आता सीबीआयच्या रडारवर आलेत. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट नीट' पेपरफुटी प्रकरणात सुरवातीला प्रा. पी.व्ही. कुलकर्णी याला सीबीआयने ताब्यात घेतले. त्यानंतर या कुलकर्णी पाठोपाठ लातूर मधील बड्या खासगी क्लासेस चालक शिवराज मोटेगावकर यालाही अटक झाली. यानंतर CBI चौकशीत लातुरातील एका बालरोगतज्ज्ञांचे नाव समोर आले.आता लातुरातील इतर तिघा डॉक्टरांची नावेही उघड झाली. आतापर्यंत चार डॉक्टरांची सीबीआयने कसून चौकशी केली. त्यांच्याकडे असलेली संशयास्पद कागदपत्रे, मोबाइल आणि इतर साहित्य जप्त केले. जप्त केलेले साहित्य पुण्याला पाठविले. पुण्यातील तपासामध्ये हाती येणाऱ्या धोग्यादोऱ्यांवरच आता लातुरातील तपासची चक्रे फिरू लागली आहेत सीबीआयच्या चौकशीत दोन डॉक्टराची चौकशी करून त्याच्या घराची झाडाझडती घेण्यात आली. यामध्ये सीबीआयला नीट परीक्षेशी संबंधित काही कागदपत्रांच्या व्यवहाराचा तपास समोर आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. ज्या डॉक्टरांनी निटचा पेपर आणि त्याची नोट्स विकत घेतले ते पेपर झाल्यानंतर नीट घोटाळ्याची माहिती समोर आल्यानंतर ते सर्वच पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने रद्दीमध्ये विकण्यात आल्याचा संशय तपास यंत्रणांकडून व्यक्त केला जात आहे. संबंधित डॉक्टरांच्या दवाखान्यात सीबीआयचे पथक चौकशीसाठी पोहोचल्यानंतर या संदर्भात काही महत्त्वाची माहिती समोर आली आहे. आता या संपूर्ण प्रकरणातील पुरावे, कागदपत्रे आणि संबंधित व्यवहारांची सखोल पडताळणी तपास यंत्रणांकडून सुरू आहे. नीट पेपरफुटी प्रकरणाच्या तपासात आता पुराव्यांच्या साखळीचा शोध घेण्यावर सीबीआयचा भर असल्याचे दिसत आहे. रद्दीमध्ये विकण्यात आलेली कागदपत्रे नेमकी कोणती होती, ती कुठून आली आणि या संपूर्ण प्रकरणाशी त्यांचा नेमका काय संबंध आहे, याचा तपास आता अधिक वेगाने सुरू आहे. लातूर शहरातील रद्दी खरेदी-विक्री करणाऱ्या अनेक व्यक्तींची चौकशी करण्याची तयारी तपास यंत्रणांनी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, पुण्यातील तपासातून समोर येणारे धागेदोरे आणि लातूरमधील चौकशी यांची सांगड घालतात आता सीबीआय संपूर्ण नीट पेपर फुटीचे जाळे उलगडण्याच्या दिशेने पुढे सरकत असल्याचे चित्र आहे....0
0
Report
बदलापूर की जांभळे महंगाई की चपेट में, कीमत पाव किलो 100 रुपये
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या जांभळांना महागाईची झळ पावकिलो जांभळांना 100 रूपयांचा भाव जांभळांच्या विक्रीसाठी आदिवासी महिलांची तगमग बदलापूरच्या जांभळाला अधिकृतपणे भौगोलिक मानांकन म्हणजेच जीआय टॅग मिळालाय. मात्र महागाईमुळे यंदा जांभळप्रेमींना खिशाला चाट द्यावी लागत आहे. बदलापूरच्या आसपास अनेक छोटी-मोठी गावं असून याठिकाणी हलवा, काला खट्टा, गिरवी ही जांभळं विशेष लोकप्रिय आहेत. या जांभळांना बाजारात मोठी मागणी असते. उन्हाळ्यात आदिवासी बांधव जांभळा आणि करवंद हा रानमेवा गोळा करून त्याची बाजारात विक्री करत असतात. दिवसभरातल्या विक्रीतून संध्याकाळी त्यांच्या घरची चूल पेटते. युद्धामुळे पेट्रेल-डिझेलचे दर वाढल्याने त्याचा फटका सर्वच गोष्टींना बसलाय. भाजीपाल्याचे दर वाढले आहेत. वाहतूक खर्चही वाढल्याने महागाईची झळ बदलापूरच्या जांभळांनाही बसलीय. किरकोळ बाजारात जांभळांचा दर 400 रूपये किलो इतका झालाय. जांभळांची एक पाटी अडीच ते तीन हजार किलोंना असल्यामुळे स्वस्त दरात जांभळविक्री परवडत नसल्याचं आदिवासी महिलांचं म्हणणं आहे. गेल्या वर्षी याच जांभळांचा दर 50 रूपये पाव इतका होता. यंदा मात्र जांभळप्रेमींना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. अर्थात जांभळ खरेदी करताना ग्राहक मोलभाव करत असले तरी हे फळ वर्षातून एकदाच मिळत असल्यामुळे बदलापूरच्या जांभळांना ग्राहक पसंती देत असल्याचं पाहायला मिळतंय.0
0
Report
Advertisement
कोल्हापूर दूध संघ के चुनाव की प्रक्रिया शुरू, मतदाता सूची 2 जून–1 जुलाई 2026
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दुध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात करत विभागीय उपनिबंधक, दुग्ध पुणे विभाग यांनी महत्त्वाचे आदेश जारी केले आहेत. गोकुळ दूध संघाच्या प्रारूप मतदार यादीची तयारी करण्यासाठी 2 जून ते 1 जुलै 2026 या कालावधीत ठराव सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. संघाशी संलग्न असलेल्या दूध संस्थांनी विहित मुदतीत ठराव सादर करावेत, असे देखील आदेशात नमूद करण्यात आले आहे. या प्रक्रियेनंतर प्रारूप मतदार यादी तयार करण्यात येणार असून, आगामी निवडणुकीच्या हालचालींना वेग येणार आहे. गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीकडे जिल्ह्यातील सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळाचेही लक्ष लागले आहे.0
0
Report
हिंगोली के खटकाळी बायपास पर दर्दनाक हादसा, कार पीछे से टकराई, चालक फरार
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली शहरातल्या खटकाळी बायपासवर एक काळजाचा थरकाप उडवणारा अपघात घडलाय. एका सुसाट कारने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. धडक दिल्यानंतर निर्दयी कार चालकाने दुचाकीला थांबवण्याऐवजी थेट अर्धा किलोमीटरपर्यंत रस्त्यावरून फरफटत नेलं. या भीषण अपघातात दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. धक्कादायक बाब म्हणजे अर्धा किलोमीटरनंतर कार चालक दुचाकी तिथेच सोडून फरार झाला असून, अपघाताचा हा थरार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.0
0
Report
प्रतिभा धानोरकर ने विधान परिषद चुनाव में बीजेपी के घोड़ाबाज़ार पर सख्त निशाना साधा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीमध्ये होत असलेल्या घोडेबाजाराबाबत काँग्रेस खासदार प्रतिभा धानोरकर यांची प्रतिक्रिया.... # लवकरात लवकर उमेदवार फायनल व्हावा यासाठी माझी प्रदेशाध्यक्ष सोबत चर्चा झालेली आहे, उमेदवार निश्चित झाल्याशिवाय भूमिका आणि रणनीति ठरवता येणार नाही. येत्या एक-दोन दिवसात काँग्रेस नेते या ठिकाणी उमेदवार फायनल करतील, पक्ष जो उमेदवार देईल त्याचं आम्ही काम करू # प्रत्येक निवडणुकीत भाजपचा घोडेबाजार असतो, विधान परिषदेच्या प्रत्येक निवडणुकीत घोडेबाजार होत असतो, आताच्या निवडणुकीत मतदार म्हणून जे नगरसेवक निवडून आले आहेत, त्यांचा निवडणुकीत खूप खर्च झालाय, त्यामुळे साहजिकच जो उमेदवार जास्त पैसे देईल त्याच्याकडे त्यांचा कल असतो, त्यादृष्टीने भाजपने घोडेबाजार सुरू केलाय आणि काही नगरसेवक देखील त्यांनी उचलून नेले आहेत, पण मला अपेक्षा आहे की पक्षाचे नगरसेवक पक्ष जो उमेदवार देईल त्यालाच मतदान करतील, काँग्रेसच्या सिम्बॉल वर जे नगरसेवक निवडून आले आहेत ते पक्ष ज्याला उमेदवारी देईल त्यालाच मतदान करतील असा मला विश्वास आहे. बाईट १) प्रतिभा धानोरकर, खासदार, चंद्रपूर ( काँग्रेस)0
0
Report
Advertisement
मराठी चित्रपट महामंडळ चुनाव के दौरान सुशांत शेलार का विजय पाटकर पर बड़ा भ्रष्टाचार आरोप
Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अभिनेता सुशांत शेलार यांनी माजी संचालक अभिनेते विजय पाटकर यांच्यावर गंभीर आरोप करत जोरदार टीका केली आहे. विजय पाटकर यांचे संचालकपद न्यायालयाने रद्द केले आहे. त्यांना अर्ज भरू दिला नाही, एका मंत्र्याने अर्ज भरत असताना दबाव टाकल्याचं त्यांचं म्हणणं हे चुकीचं आहे असे शेलार म्हणाले. तसेच पाटकर यांनी खोटे आरोप करू नयेत, असेही त्यांना सुनावले आहे. शेलार यांनी पाटकर यांच्या कार्यकाळातील मानाचा मुजरा कार्यक्रमात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप केला. 15 ते 16 लाखांत होणारा कार्यक्रम तब्बल 57 लाख रुपयांत करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. तसेच महामंडळाच्या ऑडिटमध्ये 10 लाख 78 हजार रुपयांचा फरक आढळल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी त्यांनी गेल्या दहा वर्षांत चित्रपट महामंडळाच्या माध्यमातून इमारती उभारण्यात आल्याचे सांगितले. मागील आठ वर्षांत न्यासाने खर्चावर नियंत्रण आणण्यासाठी प्रत्येक खर्चाची माहिती देण्याच्या सूचना केल्या होत्या, त्यामुळे काही विकासकामे तात्पुरती थांबली होती, असेही ते म्हणाले. अभिनेत्री नीलम शिर्के या सुरुवातीपासून अभिनय क्षेत्रात कार्यरत असून त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार असल्याचे शेलार यांनी स्पष्ट केले. सुषमा अंधारे यांच्या प्रतिक्रियेवरही त्यांनी जोरदार टीका केली. “नीलम सामंत अभिनेत्री असल्याने त्यांना निवडणूक लढवण्याचा पूर्ण अधिकार आहे. मग तुम्ही अभिनेत्री व्हा आणि तुम्ही सुद्धा उमेदवारी अर्ज भरा,” असा टोला त्यांनी लगावला.0
0
Report
चंद्रपुर गडचिरोली वर्धा सीट पर भाजपा कांग्रेस के धोखेबाज़ घोड़ाबाज़ार के आरोप
Chandrapur, Maharashtra:काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा गंभीर आरोप , चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी भाजपने सुरू केलाय घोडेबाजार चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषेद जागेच्या निवडणुकीवरून भाजप- काँग्रेस एकमेकांविरोधात उभे ठाकले आहेत. नागपुरात बोलताना काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपने ही निवडणूक शंभर कोटींवर नेल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. भाजपने आमच्या नगरसेवकांची अज्ञातस्थळी पळवापळवी करण्याचा प्रयत्न चालवला असल्याचा दावा त्यांनी केला. चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी घोडेबाजार तेजीत आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील काँग्रेसचे जवळपास 100 नगरसेवक पर्यटनासाठी रवाना झालेत. भाजपकडून या नगरसेवकांना पर्यटनासाठी रवाना करण्यात आल्याचे म्हटले जाते. धक्कादायक म्हणजे भाजपकडून काँग्रेसचेच चंद्रपूर, गडचिरोली आणि वर्धा जिल्ह्यातील 100 नगरसेवक सोबत घेण्याचे लक्ष्य आहे. सध्या पर्यटनासाठी गेलेल्या नगरसेवकांना 5 लाखांचं आगाऊ टोकन रक्कम देण्यात आली असून लक्ष्मीदर्शनाचा आकडा 15 लाखांपर्यंत जाणार असल्याची खात्रीलायक माहिती आहे. सध्या सिंदेवाही नगरपालिका 4, सावली नगरपालिका 5, नागभीड नगरपरिषदेच्या 5 नगरसेवकांसह कोरपना, कुरखेडा आणि कोरची सह इतरही काही नगरपंचायतीं-मधील नगरसेवकांचा पर्यटन वारीत समावेश आहे. मागच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपकडे स्पष्ट बहुमत असताना देखील भाजपचे उमेदवार डॉ. रामदास आंबटकर अगदी काठावरच्या बहुमताने विजयी झाले होते. यावेळी स्थानिक स्वराज्य संस्थेत भाजपकडे बहुमत असलं तरी बहुमताचा आकडा विजयाच्या अगदी उंबरठ्यावर आहे. त्यामुळे भाजपकडून यावेळी सावधगिरी बाळगत काँग्रेसच्या नगरसेवकांवर उमेदवार जाहीर होण्याआधीच डाव टाकण्याचा प्रयत्न आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील एका भाजप आमदारावर विधान परिषद निवडणुकीची जबाबदारी देण्यात आली आहे. आणि त्यांच्याच माध्यमातून काँग्रेसच्या नगरसेवकांना ही पर्यटन वारी घडवण्यात येत असल्याची चर्चा आहे. काँग्रेसचे नेते हा विजय वडेट्टीवार पाणी9 यासंबंधी खळबळजनक आरोप करत भाजप ही निवडणूक शंभर कोटींवर घेऊन जात असल्याचे म्हटले आहे.0
0
Report
कोकण विधानपरिषद चुनाव 2026: शिवसेना बनाम राष्ट्रवादी के बीच घेराबंदी तेज
Ratnagiri, Maharashtra:कोकण विधानपरिषद निवडणूक २०२६ – विशेष राजकीय पॅकेज.. रत्नागिरी.. संख्याबळाच्या जोरावर शिवसेना आग्रही.. तर 'पारंपरिक जागा आमचीच' म्हणत अजित पवार गटाचे प्रतिआव्हाड!.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकिभरून महायुतीत मोठा संघर्ष पेटलाय.संख्याबळाच्या जोरावर मुख्यमंत्र्यांच्या शिवसेनेने या जागेवर थेट दावा ठोकलाय, तर 'पारंपरिक जागा आमचीच' म्हणत अजित पवारांच्या राष्ट्रवादीने त्यांना जोरदार प्रतिआव्हाड दिलंय.त्यातच शिवसेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि राजन साळवी या दोन्ही बड्या नेत्यांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीचा पेच अधिकच वाढला आहे.१ जून ही अर्ज भरण्याची शेवटची मुदत असताना, कोकणचा हा हायव्होल्टेज तिढा कसा सुटणार? पाहूयात हा विशेष रिपोर्ट... कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकिची रणधुमाळी आता रंगात आली आहे.रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांचे कार्यक्षेत्र असलेल्या या जागेवरून महायुतीच्या घटक पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू झाली आहे.१ जूनपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत असताना,महायुतीमधील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांनी या जागेवर आपला नैसर्गिक हक्क असल्याचा ठाम दावा मांडला आहे.त्यातच शिवसेनेकडून माजी आमदार सदानंद चव्हाण आणि नुकतेच पक्षात आलेले राजन साळवी यांनीही उमेदवारीची इच्छा व्यक्त केल्याने महायुतीमधील जागेचा पेच अधिकच वाढला आहे.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था पक्षनिहाय संख्याबळ.. 1) शिंदे शिवसेना: जिल्हा परिषद ७७ + नगरपरिषद १५९ = एकूण २३६ 2) भाजप: जिल्हा परिषद ४६ + नगरपरिषद १०५ = एकूण १५१ 3) अजित पवार राष्ट्रवादी: जिल्हा परिषद १८ + नगरपरिषद ४५ = एकूण ६३ 4) उद्धव ठाकरे शिवसेना: एकूण ५५ काँग्रेस: एकूण ५० शिवसेनेने याच भक्कम संख्याबळाचा हवाला देत या जागेवर आपला आग्रही दावा ठोकला आहे.दरम्यान,चिपळूण येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची तालुका कार्यकारिणीची बैठक पार पडली.या बैठकीत कोकण विधानपरिषदेच्या जागेवरून पक्षाची भूमिका स्पष्ट करण्यात आली. 'कोकण हा शिवसेनेचा बालेकिल्ला कालही होता,आजही आहे आणि उद्याही राहील', असा ठाम विश्वास व्यक्त करत ही जागा पारंपरिकपणे शिवसेनेचीच असल्याचा पुनरुच्चार करण्यात आला.या जागेवर पक्षाचा हक्क अबाधित राखत चिपळूण-संगमेश्वर मतदारसंघाचे दोनदा प्रतिनिधित्व केलेले माजी आमदार सदानंद चव्हाण यांना उमेदवारी द्यावी,असा ठराव बैठकीत एकमताने मंजूर करण्यात आला.उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही दिवसांपूर्वी चिपळूण येथील जाहीर सभेत सदानंद चव्हाण यांना लवकरच मोठी जबाबदारी देण्याचा शब्द दिला होता,याची आठवण कार्यकर्त्यांनी करून दिली.या संदर्भात पालकमंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आग्रही मागणी करण्याचे या बैठकीत निश्चित झाले आहे.0
0
Report
Advertisement
बीड में मजदूर हत्या: आरोपी की गिरफ्तारी नहीं, परिजनों ने थाने में धरना दिया
Beed, Maharashtra:बीड: कामगाराचा खून प्रकरण; आरोपीला अटक करण्याच्या मागणीसाठी नातेवाईकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, 35 तासांपासून कामगाराचा मृतदेह जिल्हा रुग्णालयातच..! ANC - अवैध दारूच्या दुकानात कामगार असलेल्या उमेश दळवी या तरुणाची निर्घुण हत्या करण्यात आली आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आरोपी लाला शेख याच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र आरोपींना अद्याप अटक करण्यात आली नाही. घटना घडल्यानंतर संतप्त नातेवाईकांनी पोलिस ठाण्यात ठिय्या घातला होता तेंव्हा तब्बल 22 तासानंतर गुन्हा दाखल करण्यात आलाय. आता आरोपीला अटक करा या मागणीसाठी नातेवाईक संतप्त झाले असून मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला आहे. तब्बल 35 तासांपासून मृतदेह जिल्हा रुग्णालयातच आहे. पोलिसांनी तत्काळ दखल घेऊन न्याय द्यावा अशी मागणी पीडित कुटुंबाची आहे. बाईट: पप्पू कागदे, रिपाई बाईट: मयताची पत्नी बाईट: मयताचे नातेवाईक0
0
Report
आंबेनळी घाट हादसा: आठ की मौत, सुरक्षा पर उठा सवाल
Satara, Maharashtra:सातार्ा रायगड जिल्ह्यांना जोडणारा आंबेनळी घाट पुन्हा एकदा भीषण अपघाताने हादरला आहे. मौजमजा आणि फिरण्यासाठी गेलेल्या मित्रांवर काळाने घाला घातला असून, स्कॉर्पिओ गाडी तब्बल १५०० फूट खोल दरीत कोसळल्याने आठ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. यामध्ये एकाच आसगाव गावातील पाच जणांचा समावेश असल्याने गावावर शोककळा पसरली आहे. रात्रीच्या अंधारात झालेल्या या अपघाताची माहिती तब्बल दुसऱ्या दिवशी संध्याकाळी समोर आली. सध्या महाबळेश्वर ट्रेकर्स, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम, पोलीस आणि प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदत व बचावकार्य सुरू आहे. पाहूया यावरील हा रिपोर्ट... साताऱ्यातील आंबेनळी घाटात झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण जिल्हा हादरला आहे. हर्णे बंदरावरून शनिवारी रात्री परतत असताना मित्रांची स्कॉर्पिओ गाडी आंबेनळी घाटातील खोल दरीत कोसळली. तब्बल १५०० फूट खोल दरीत गाडी कोसळल्याने गाडीत असलेल्या आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातातील सर्वात वेदनादायक बाब म्हणजे मृतांपैकी पाच जण हे एकाच आसगाव गावातील होते. त्यामुळे संपूर्ण गावावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मित्रांसोबत आनंदाच्या क्षणांसाठी गेलेले तरुण कायमचे काळाच्या पडद्याआड गेले. रात्रीच्या अंधारात ही गाडी दरीत कोसळल्याने अपघाताची माहिती कोणालाच मिळू शकली नाही. रविवारी संध्याकाळी हा अपघात उघडकीस आल्यानंतर प्रशासनाची धावपळ सुरू झाली. मात्र रात्रीच्या वेळी मृतदेह बाहेर काढणे धोकादायक असल्याने सोमवारी पहाटेपासून मदत आणि बचावकार्य सुरू करण्यात आले. महाबळेश्वर ट्रेकर्स आणि प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमकडून अत्यंत कठीण परिस्थितीत बचावकार्य सुरू आहे. पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक ग्रामस्थही घटनास्थळी मदतीसाठी दाखल झाले आहेत. या घाटात संरक्षक कठडे नाहीत. याआधीही अनेक अपघात झाले आहेत. अजून किती बळी गेल्यावर शासन जागं होणार? असा सवाल आसगावातील मृतांचे नातेवाईक करतायत. आंबेनळी घाट हा अत्यंत धोकादायक घाट म्हणून ओळखला जातो. या घाटात यापूर्वीही अनेक भीषण अपघात झाले आहेत. २०१८ मध्ये दापोली कृषी विद्यापीठाची बस दरीत कोसळून तब्बल ३० जणांचा मृत्यू झाला होता. मात्र तरीही या घाटातील सुरक्षेच्या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. मात्र या भीषण अपघातानंतर पुन्हा एकदा आंबेनळी घाटाच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. काही क्षणांच्या निष्काळजीपणामुळे किंवा अपुऱ्या सुरक्षाव्यवस्थेमुळे आठ जणांना आपला जीव गमवावा लागला. त्यामुळे आता तरी प्रशासन आंबेनळी घाटातील सुरक्षेबाबत ठोस पावले उचलणार का? हाच सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.0
0
Report
लातूर क्लासेस एरिया फैसले पर विरोध: प्रदर्शन ने प्रशासन से नोटिस वापस लेने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूर शहरातील क्लासेस एरियातील औद्योगिक वसाहतीत असलेले खाजगी कोचिंग क्लासेस, हॉस्टेल्स, खानावळी, हॉटेल, आशा व्यवसाय तात्काळ बंद करण्याचे आदेश प्रशासनाकडून दिल्यानंतर आता या निर्णयाविरोधात संताप व्यक्त केला जात आहे. कोंग्रेस आणि क्लासेस एरियातील व्यावसायिक, क्लास चालक रस्त्यावर उतरले असून प्रशासनाने दिलेल्या नोटिसीची होळी करत निषेध आंदोलन करण्यात आणलं आहे. प्रशासनाने घेतला निर्णय मागे घ्यावा, आणि निट प्रकरणातील आरोपीला भरचौकात फाशी द्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
