icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ओबीसी नेता लक्ष्मण हाके बोले- स्थापितों को सबक सिखाने के लिए तैयार

Sangli, Maharashtra:स्लग - प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी,प्रसंगी कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होण्यास तयार - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे विधान अँकर - कॉक्रोच जनता पार्टी व आंदोलनाचे ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी समर्थन केले आहे.तसेच प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी,प्रसंगी कॉकरोच जनता पार्टीचा आपण पाहिले सदस्य होण्यासही तयार आहे,असे विधान हाके यांनी केले आहे. तसेच प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कोणता कारखानदार येणार नाही तर हीच तरुणाई प्रस्थापितांना धडा शिकवेल,आणि त्यांना घरी बसवेल, असा विधान हाके यांनी केले आहे,ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
0
0
Report

नाशिक के येवला में फिट इंडिया रैली: साइकिल से स्वास्थ्य और ईंधन बचत संदेश

Yeola, Maharashtra:केंद्र सरकारच्या फिट इंडिया मोहिमे अंतर्गत नाशिकच्या येवल्यात येवला शहर व तालुका पोलीस स्टेशन तर्फे सायकल रॅליचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य, प्रदूषण प्रदूषण मुक्त पर्यावरण, इंधन बचतीचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी येवला येथे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल रॅली ही सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्याकडे रवाना झाली या ठिकाणी सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला याप्रसंगी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहाय्यक निरीक्षक सागर कोते,येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी,तथा येवला सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते
0
0
Report

नासिक धर्मांतरण केस में नया खुलासा, निदा खान के आश्रय देने वाले विधायक के बयान की चर्चा

Nashik, Maharashtra:नाशिकच्या बहुचर्चित मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या जबाबातील काही बाबी चार्जशीटमधून उघड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, निदा खानच्या ठिकाणाबाबत विचारणा करण्यात आलेंतर मतीन पटेल यांनी "इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा" असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. या खुलाशामुळे तपासाला नवा वळण मिळाले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला आहे...या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे.....चौकशीदरम्यान एसआयटीने मतीन पटेल यांना निदा खानच्या वास्तव्याबाबत आणि तिच्या हालचालींबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी "निदा खान कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मतीन पटेल यांनी "इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा" असे उत्तर दिल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे....या उत्तरामुळे तपास यंत्रणांचे लक्ष आता या प्रकरणातील इतर संभाव्य दुव्यांकडेही वळले आहे. याप्रकरणी आता बजरंग दलानेदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती आज जलील सारखा एमएम चा नेता जर अशा पद्धतीने धर्मांतराला खतपाणी घालत असेल तर त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे... याबाबत बजरंग दलाकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येत आहे.... बाईट-श्रीकांत क्षत्रिय.... बजरंग दल इस प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र अर्थात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान संकलित करण्यात आलेले जबाब, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. चार्जशीटमधील या नव्या खुलाशामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.मात्र यासंदर्भात तपास यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही... यावर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आपले म्हणणे मांडले आहे... इम्तियाज जलील या प्रकरणात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाला पाहिजे...अशी मागणी हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते सागर शेलार व्यक्त केले... नIDA खानला आश्रय, मतीन पटेल यांचा जबाब आणि त्यामध्ये आलेला इम्तियाज जलील यांचा उल्लेख यामुळे टीसीएस धर्मांतर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता एसआयटीच्या पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम: महिला अधिकारी बयान लिए साक्ष मांगे पर पुलिस कर्मी पर मारपीट, धमकी

Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला आपल्याच खात्यातील एका महिला पोलीस अंमलदाराच्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीतील साक्ष फिरवण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मित्रानं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरच मारहाण करून गाडी खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका अधिकाऱ्याला थार गाडीसोबर काही अंतर फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस हवालदार गजानन काळे यांच्या तक्रारीवरून विराज पाटील आणि महिला पोलीस अंमलदार शेख निलोफर यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती वाशीम शहर पोलीसाकडून देण्यात अली.
0
0
Report

नवी मुंबई में महापालिका-पुलिस की संयुक्त कार्रवाई, बेघर बसों में भरकर स्थानांतरित

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील उड्डाण पूल और इतर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक वास्तव्य करत आहेत. महापालिकेने याआधी अनेक वेळा कारवाई करून त्यांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केले मात्र तरीही अनेक जण उड्डाणपूल और फुटपाथवर राहणे पसंत करतात. या बेघरांमार्फत अनेक गैरकृत्य केले जात असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत या बेघर नागरिकांना फरफटत आणि लाठीचार्ज करत बस मध्ये कोंबले आणि त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित केले आहे.
0
0
Report

महामार्ग पर भीषण एक्सीडेंट: मोटरसाइकिल चालक 50 फुट तक घसीटा गया, हालत गंभीर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गावर मृत्यूचा थरार; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ५० फूट फरफटत गेला, प्रकृती चिंताजनक!. चिपळूण-गुहागर महामार्गावरील गणेशखिंड-पाचाड परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका सुसाट चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.. ही धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार विजय शिरकर हे सुमारे ५० ते ५५ फूट फरफटत जाऊन रस्त्याशेजारील मोरीत फेकले गेले.. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून विजय शिरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

उरण के जासई तालाब में तीन नाबालिग लड़कियों की डूबकर मौत

Navi Mumbai, Maharashtra:शनिवारी दुपारच्या सुमारास उरण तालुक्यातील जासई गावातील तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच, गावात पाणी आले नसल्याने जासई येथील दोन महिला या शनिवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळेस, त्यांच्या तीन अल्पवयीन मुली या आईसोबत तलावावर गेल्या होत्या. तलावाच्या काठावर असलेल्या एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात कोसळली, यावेळेस इतर दोघीनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे मृत मुलीच्या आईने सांगितले आहे. याचदरम्यान, आईने देखील मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत खांद्यापर्यंत पाण्यात जाऊन बुडणाऱ्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. हे ठिकाणी, मोहम्मद कुरेशी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने स्थानिक गावकरी प्रशांत म्हात्रे या तरुणाने देखील पाण्यात धाव घेऊन अल्पवयीन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत बाहेर काढले होते. यावेळी, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिलی आहे. यात, रेहाना रमजान परवीन (८ वर्षे), रविना रमजान परवीन (७ वर्षे) आणि सौम्या कन्हैय्या प्रजापती (१३ वर्षे) या तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, या मृत अल्पवयीन मुली मूळच्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील रहिवासी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर, मध्यरात्री उशिरा या तिन्ही मुलींचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे नगरसेविका नाहीदा ठाकूर यांनी सांगितले आहे。
0
0
Report
Advertisement

मालेगांव में नाबालिग प्रसूति के बाद नवजात की विल्हेवाट: 11 पर POCSO समेत आरोप

Nashik, Maharashtra:• मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती आणि नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार. • अल्पवयीन मुलीची प्रसूती करून जन्मलेल्या बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा डॉ.किशोर डांगे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल. • अटक करण्यात आलेले डॉक्टर हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती. • एका खाजगी रुग्णालयात प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादीत नमूद. • या प्रकरणात दोन नामवंत डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पॉक्सो आणि बेकायदेशीर प्रसूतीसंदर्भातील गुन्हे दाखल. • अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप. • या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून शहरात संतापाची लाट.
0
0
Report

कर्जमाफी के फैसले के विरोध में किसान मोर्चा होली मनाता

Beed, Maharashtra:राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची बीड तालुक्यातील खांडे पारगाव या गावी होळी करण्यात आली... शेतकरी हक्क मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाची होळी करत निषेध नोंदवला... सरकारने जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाले असेल त्यांना केवळ पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल... नागपूर येथे झालेल्या आंदोलनात सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता ही शेतकऱ्यांची फसवणूक असून याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत.. या कर्जमाफीने शेतकऱ्याच्या पदरात काही पडलं नाही.. तर सरकारमध्ये आमदार झालेल्या बच्चू कडू च्या पदरात पडलंय.. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवलेत त्यामुळे आमदार बच्चू कडू ची आमदारकी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली...
0
0
Report
Advertisement

अकोला गांधी चौक पर नोवल्टी आइसक्रीम शॉप से चोर ने 80 हजार चुराए

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गांधी चौक परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. गांधी चौकातील नोव्हेल्टी आइसक्रीम या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास नोव्हेल्टी आइसक्रीम दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ला फोडून त्यामधील सुमारे 80 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाला चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शहरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असतानाही भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
0
0
Report

कराड के पास बने उड्डाणपुल का काम पूरा, 20 जून तक यातायात खुलने की उम्मीद

Satara, Maharashtra:अँकर -पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड जवळील सहापदरी साडेतीन किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 20 जून पर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी करून पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबत संबंधित कंपनीला सूचना केल्या .कराड जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडी वर उपाय म्हणून या पुलाचे काम हाती घेण्यात आलं होतं. पुल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली
0
0
Report

मुलुंड के मिठागर पर निर्माण प्रस्ताव के विरोध से मैदान में आक्रोश

Mumbai, Maharashtra:मिठागर बचावासाठी मुलुंडकरांचा एल्गार मुलुंड मध्ये भव्य जनआंदोलनातून सरकारला इशारा मुलुंडच्या मिठागरांवर गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध नागरिक रस्त्यावर धारावी पुनर्वसनानंतर आता मिठागरांचा मुद्दा तापला मुलुंडकर आक्रमक प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन व्हिओ : मुलुंड,भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील मिठागरांच्या हजारो एकर जमिनींवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.केंद्र सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांसाठी या जमिनींचा वापर करण्याचे प्रस्ताव वेळोवेळी पुढे आले आहेत.मात्र पर्यावरणवादी, स्थानिक रहिवासी आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रस्तावांना सातत्याने विरोध केला आहे.मिठागरे ही नैसर्गिक जलसाठा क्षेत्रे असून मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास मुंबईतील पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मुंबईच्या विकास आराखड्यात मिठागरांच्या संवर्धनाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. पर्यावरणीय मंजुरी आणि जमीन हस्तांतरणाच्या मुद्द्यांवरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मिठागरांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आधीच मुलुंडकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता मिठागरांवरील प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे स्थानिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक,पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडेल,अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिठागर वाचवा,मुलुंड वाचवा अशा घोषणा देत सरकारने हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top