Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रायगढ़ के कर्जतमध्ये राजनैतिक समीकरण बदलेगा; तटकरे-थोरवे साथ आएंगे?
Chendhare, Maharashtra:रायगढ़ के कर्जतमध्ये बड़ी राजनैतिक घडामोड .........तटकरे थोरवे एकत्र येण्याचे संकेत .......... कर्जतमधील राजनैतिक समीकरणे बदलेणार ? ....... अँकर - रायगडच्या कर्जतमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात सुरू असलेला वाद आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षाचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसून आला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात येऊन दोन्ही नेते एकत्र काम करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत थोरवे यांनी दिले आहेत. त्यामुळे रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात तटकरे आणि थोरवे प्रत्यक्षात एकत्र येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。0
0
Report
महाराष्ट्र कृषि विभाग पावस स्थिति का आकलन, किसानों के लिए पानी प्रबंधान की योजना
Nagpur, Maharashtra:नागपूर.... On कृषी विभाग आढावा पावसाच्या परिस्थितीबाबत दर दहा वर्षांनी एक वर्ष पावसाचे प्रमाण कमी असते. मागील दशकात 2017 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत जर पाऊस कमी पडला, तरीही आपण परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पावसामध्ये जास्त अंतर पडल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांना अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करावी, त्यांचे फोटो अपलोड करून जिओ-ट्रॅकिंग करावे, जेणेकरून सर्व अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसेल. क्रॉप डायव्हर्सिटीच्या संदर्भात “महाराष्ट्र 2047” कृषी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तिथे योग्य पाणी व्यवस्थापन केले जाईल. आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल उपलब्ध करून देण्यावरही विचार सुरू आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी देखील खतांची मोठ्या प्रमाणात उचल झाली होती. खत विक्रीसाठी अनावश्यक परवाने देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही परिस्थितींक chemical खतांचा तुटवडा होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. On दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते योग्य त्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतील, हा त्यांचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम असेल. On कॅबिनेट संदर्भातील शब्द कॅबिनेटबाबत कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता. हा निर्णय पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. On संजय राऊत त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल झालेला दिसतो. त्यांच्यासाठी फक्त एकच सांगायचे आहे कसं होतास तू काय झालास तू काँग्रेसच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या भूमिकेमुळे उभाठा पक्षाला मोठा परिणाम होऊ शकतो On बच्चू कडू प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्यांचा नेता सर्वोच्च पदावर जावा. पूर्वी विदर्भाकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात विदर्भाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच, केंद्रात प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. On बंगाल निवडणूक हा विजय अत्यंत मोठा आणि अभूतपूर्व आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणाला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे या विजयातून दिसून येते. On पालघर अत्याचार प्रकरन अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना अजूनही घडत आहेत, ही गंभीर बाब आहे. कायदे अधिक कठोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने कारवाई होऊन लवकरात लवकर निकाल लागणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडल्यास दोन महिन्यांच्या आत निकाल लागावा किंवा एका महिन्यात चार्जशीट दाखल व्हावी, . करण्याची गरज आहे. अधिक प्रभावी कायदे करण्याची गरज आहे0
0
Report
अष्टविनायक लेण्याद्री में चतुर्थी उत्सव: भक्तों की भीड़ और रंग-बिरंगी फूलों से सजावट
Barav, Maharashtra:आज अंगारक चतुर्थी निमित्त अष्टविनायक लेण्याद्री गिरिजात्मज नगरी सजली असून पहाटेपासूनच लाडक्या बाप्पाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केलीय। चतुर्थी निमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून लाडक्या बाप्पाला केळी आणि आंब्याचा महानैवद्य दाखवण्यात आलाय। याचाच मंदिर गाभाऱ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी।0
0
Report
Advertisement
वीशाम के जाऊळका में पिसाले कुत्ते ने 10 लोग घायल, इलाके में दहशत
Washim, Maharashtra:वाशीमच्या मालेगाव तालुक्यातील जाऊळका येथे पिसाळलेल्या कुत्र्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या कुत्र्याने गावातील 10 महिला व पुरुषांना चावा घेतल्याची घटना घडली आहे. जखमींना तातडीने मालेगाव येथील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. या घटनेनंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पिसाळलेल्या कुत्र्याचा तात्काळ बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
भारत की पहली डिजिटल जनगणना: नागरिक स्व-गणना पर मंत्री भुसे का आग्रह
Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - मंत्री दादा भुसे यांनी परिवारासह स्व-गणना करत राष्ट्र हिताचे कामात सक्रिय योगदान द्यावे.... - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आवाहन. Anc: केंद्र शासनाने भारताची १६वी जनगणना, २०२७ चा कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी होणारी जनगणना ही भारत शासनाची पहिली डिजीटल जनगणना असणार आहे. ज्यात दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा घरयादी व घरगणना हा असणार आहे. १) स्व गणना:- दि.०१ मे, २०२६ पासुन दि.१५ मे, २०२६ या कालावधीत म. शासनाने नागरिकांना स्वगणना करणेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्यात नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची माहिती म. शासनाचे संकेतस्थळ se.census.gov.in वर स्वतः प्रविष्ट करावयाची आहे. यात आपणास आपले कुटुंबातील कोणताही एक मोबाईल क्रमांक वापरुन OTP व्दारे लॉगईन करता येईल. आवश्यक माहिती प्रविष्ट करुन तुमच्या घराचे स्थान डिजिटल नकाशावर चिन्हांकित करावयाचे आहे आणि त्यानंतर कुटुंबाशी संबंधत माहिती प्रविष्ट करावयाची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करावे. त्यानंतर आपणास १२ आकडी SE ID मिळेल. सदर SE ID जपुन ठेवावा आणि ज्यावेळी मनपाचे नियुक्त प्रगणक माहितीची पडताळणी करणेसाठी भेट देतील त्यावेळी SE ID त्यांस द्यावा. यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः देखील स्व गणना करून आपले राष्ट्रीय कार्य पूर्ण केले. स्वगणना केली नसेल तरीही मनपाचे नियुक्त प्रगणक आपले घरी येऊन जनगणनेची प्रक्रिया पुर्ण करतील याची नोंद घ्यावी. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असुन यात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवुन आपली जबाबदारी पार पाडावी.0
0
Report
कटेपूर्णा अभयारण्य में टैंकर से जलसंकट दूर, कृत्रिम पानवठे बनाए गए
Washim, Maharashtra:कटेपूर्णा अभयारण्य मध्ये वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक पाणवठे आटण्याची शक्यता निर्माण झाल्याने अभयारण्यात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. वन विभागाकडून विविध भागात शेकडो कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी भरले जात आहे. दर तीन ते चार दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा करून कोणताही पाणवठा कोरडा पडू नये याची दक्षता घेतली जात आहे. दुर्गम भागातही प्रखर उन्हात पाणी मिळत असल्याने हरण, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांना याचा फायदा होत आहे.0
0
Report
Advertisement
वसई के राजवाड़ी समुद्र तट पर दुर्लभ डॉल्फिन मृत पाई गई
Vasai-Virar, Maharashtra:वसईतील राजवाडी समुद्र किनाऱ्यावर आज दुर्मिळ जातीचा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यामुळे हा डॉल्फिन किनाऱ्यावर वाहण्यात आला. आज दुपारच्या सुमारास किनाऱ्यावर फिरणाऱ्या गावकऱ्यांना हा मोठ्या आकाराचा मासा दिसून आला आणि त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. या मृत डॉल्फिनची लांबी अंदाजे ८ ते १० फूट असून रुंदी सुमारे ३ फूट आहे. दरम्यान, बोटीचा धक्का लागल्यामुळे या डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गावकऱ्यांच्या मदतीने या मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरच पुरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सागरी जीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.0
0
Report
वाशीम में नींबू की किल्लत से ठंडे पेय महंगे, मांग बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत असल्यामुळे लिंबू सरबत, सोडा आणि उसाच्या रसासारख्या थंडपेयांची मागणी वाढली आहे. मात्र, या पेयांमध्ये वापरल्या जाणाऱ्या लिंबाच्या दरात सध्या वाढ झाली आहे. वाशीमच्या भाजीपाला मार्केटमध्ये लिंबाचा पुरवठा मर्यादित प्रमाणात होत असून लिलावात येणारा माल लवकरच संपत आहे. त्यामुळे बाजारात लिंबाचा तुटवडा जाणवत आहे. वाढत्या मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी पडत असल्याने व्यापारी तसेच ग्राहक या दोघांनाही अडचणींचा सामना करावा लागत आहे.0
0
Report
धान से जुड़ा ब्रेकिंग: Angarakhi Chaturthi पर भक्तों की भारी भीड़ खड़ी गणेश मंदिर near Kolhapur
Kolhapur, Maharashtra:अंगारकी चतुर्थीनिमित्त कोल्हापूर शहराजवळ असणाऱ्या आर के नगर इथल्या खडीचा गणपती मंदिर इथे देखील भक्तांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्त खडीच्या गणपतीचे पूजा अर्चा करण्यासाठी दाखल झालेत. इथली गणेश मूर्ती स्वयंभू असून दरवर्षी जमिनीतून काही इंचाने वरती येते अशी भक्तांची धारणा आहे.0
0
Report
Advertisement
तुळजापुर में माता तुळजाभवानी के मंदिर में नगारा अर्पण उत्साह के साथ हुआ
Dharashiv, Maharashtra:तुळजापुरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात; आई तुळजाभवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात पार पडला. तुळजाभवानी पक्षाळ मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत “आई राजा उदो उदो” च्या जयघोषात नगारा मंदिरात आणण्यात आला. रात्री धूप आरतीच्या वेळी मुख्य महंत तुकोजी बुवा आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नगारा देवीला अर्पण करण्यात आला. परंपरेनुसार धूप आरतीदरम्यान नगारा वाजवण्याची परंपरा आजही कायम राखली जात आहे.0
0
Report
बीजेपी 365 दिन चुनाव पर फोकस, मोदी-शाह WB में जोर; महिला आरक्षण का असर?
Mumbai, Maharashtra:भाजप ३६५ दिवस निवडणुकीचा विचार करतात, मोदी फक्त निवडणुकीच्या विचार करतात, आणि अमित शाह पश्चिम बंगाल मध्ये काही दिवस ठाण मांडून बसले होते लाखो मतदार कापले जातात, मतदारांची संख्या कमी करून विजय मिळवला जातो. निवडणूक आयोगाला हाताशी धरले जात महिला आरक्षणाचा फटका फक्त पश्चिम बंगाल मध्ये बसला? मग केरळ मध्ये काय? तिकडे महिला नाही का? तामिळनाडू मध्ये तर TVK जिंकून आले त्यांनी तर या आरक्षणावर काही भूमिका देखील घेतली नव्हती0
0
Report
कोल्हापुर में बच्चों के साथ अत्याचार के मामलों में भारी बढ़ोतरी, 623 घटनाएं दर्ज
Kolhapur, Maharashtra:बालकांवर वाढत जाणारे अत्याचाराचे प्रकरण गंभीर बनली आहे. नरसापुर घटनेनंतर अनेक जिल्ह्यांमधील बालकांवर झालेले अत्याचाराची प्रकरणे डोळ्यात अंजन घालणारी अशी आहेत. सदन समजल्या जाणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील आकडेवारी देखील चिंताजनक आहे. गेल्या पाच वर्षात कोल्हापूर जिल्ह्यात तब्बल 623 बालकांवर झाल्याचे गुन्हे दाखल झाले आहेत. तर 1130 बालकांचे अपहरण झाले्याचे पोलीस रेकॉर्ड वरून दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
नसरापूर में तीन साल की बच्ची के साथ सामूहिक दुष्कर्म-हत्या पर ब्राह्मण समाज का विरोध, कठोर सजा की मांग
Lasalgaon, Maharashtra:पुणेच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या या अमानुष घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचा संताप झाला असून लासलगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देत यावेळी आरोपीविरुद्ध जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा करावी तसेच यावेळी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना ज्या प्रकारे कठोर शिक्षा दिली जात होती, त्याच धर्तीवर आरोपीला भर चौकात फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिला वर्गाने केली0
0
Report
रत्नागिरी के दाभोळ खाड़ी में केरला जैसी बैकवॉटर हाउसबोट सेवा शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दाभोळखाडीत केरळच्या धर्तीवर हाऊस बोट सुरू अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक दाभोळ खाडीला आता पर्यटनाचा नवा आयाम मिळालाय. केरळच्या धर्तीवर विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करत हाऊसबोट सेवा सुरू करण्यात आली असून, या हाऊसबोटीचा लोकार्पण सोहळा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दाभोळ धक्क्यावर पार पडला. सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. दाभोळ खाडी आता पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.0
0
Report
यवला के गोळी नदी किनारे सिद्धिविनायक गणेश मंदिर में अंगारकी चतुर्थी पर भक्तों की भीड़
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील गोळी नदीच्या तीरावर ती इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणेशाचे भव्य दिव्य मंदिर असून या मंदिरात प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी ही गर्दी केली असून इच्छा पूर्ण करणारा उजव्या सोंडेचा गणपती म्हणून देशमाने येथील गणपती राज्यभरात प्रसिद्ध आहे. नवस फेडण्यासाठी भाविक अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी गर्दी करत असतात याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
