Yavatmal
यवतमाळ पोलिसांची मॉकड्रिल, युवकाच्या डोळ्याला दुखापत
Chinchbardi, Maharashtra:यवतमाळच्या शारदा चौकात पोलिसांनी केलेल्या मॉक ड्रिलमध्ये एक युवक जखमी झाला आहे. प्रात्यक्षिकात पोलिसांनी टायर पेटवून, स्टेन ग्रेनेड फोडले, ज्यामुळे ग्रेनेडचा तुकडा शाहरुख अलीच्या डोळ्याला लागला. त्याला जिल्हा व खाजगी रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले, पण गंभीर जखमेच्या कारणाने नागपूरला हलवण्यात आले. शारदा चौक हा अत्यंत वर्दळीचा भाग असून, पोलिसांनी बघ्यांच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही उपाययोजना केली नसल्याने ही दुर्घटना घडल्याचा आरोप आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आसाम में आटपाड़ी के युवक से 55 करोड़ रुपये का सोना बरामद: पुलिस ने किया गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सांगलीच्या आटपाडी येथील तरुणाला आसाममध्ये 55 कोटीचे सोने तस्करी करताना अटक. अक्षय बनसोडे असे या तरुणाचं नाव असून तो आटपाडीचा असल्याचा आसाम पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ५५ कोटी रुपयांचा सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत.त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि १३ ग्रॅम चांдиही जप्त करण्यात आली आहे.आसामच्या गुवाहाटीतील खारघुली परिसरात छापा टाकुन अक्षय बनसोडे याच्याकडील दोन बॅगांची झाडाझडती घेतली असता बॅगमधून ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे सापडली असून सोना जप्त करत अक्षय बनसोडे याला आसाम पोलिसांनी अटक केल्याचे गुवाहाटी पोलीस उपायुक्त शंभवी मिश्रा,यांनी स्पष्ट केले आहे.तर बनसोडे हा आटपाडी मधला असल्याचं समोर आल्याने,त्याच्या अटकेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.0
0
Report
नाशिक में संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की पालखी पहुँची; महापौर और डीसीपी ने किया स्वागत
Nashik, Maharashtra:नाशिक संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशिक शहरात पोहोचली... नाशिकच्या त्रंबक नाका परिसरात असलेल्या पंचायत समिती येथे पालखीचं करण्यात असत आहे स्वागत... त्र्यंबकेश्वर वरून पालखी निघाल्यानंतर हा तिसरा दिवस... नाशिक महापालिकेच्या महापौर हिमगौरी आडके आणि पोलीस उपायुक्त मोनिका राऊत यांनी खेळली फुगडी.. आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड...0
0
Report
यवतमाळ के खैरगाव में अवैध और मुदतबाह्य कीटनाशक-खत जब्त, 17.82 लाख मूल्य
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके तसेच रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या माथी ही मुदतबाह्य खते व औषधी बनावट लेबल लावून मारल्या जात होती. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईत 17 लाख 82 हजाराचा साठा जप्त करण्यात आला. यश शिवनवार या व्यक्तीच्या गोदामावर अधिकृत परवाण्याशिवाय थेट आदिलाबाद आणि सारखणी येथून मोठ्या प्रमाणात ही अवैध खते व कीटकनाशके मागविल्या जात होती. कमी दरात माल आणून तो बनावट लेबल चिटकवून शेतकऱ्यांना विकला जात होता. या कारवाईमुळे खरीप हंगामामध्ये भोळाबाबडा शेतकरी नागविला जात असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.0
0
Report
Advertisement
रायगड में बारिश से नदी-धाराओं के जलस्तर में उछाल, आंबा नदी ने चेतावनी लाइन पार
Chendhare, Maharashtra:पावसाने प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ आंबा नदीने ओलांडली इशारा पातळी २८ धरणातील पाणीसाठ्यात वाढ परिसरातील पाणी चिंता मिटली मागील दोन तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नागोठणे जवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून पाणी धोका पातळीच्या जवळ पोहोचले आहे. अन्य नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. पावसाने जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. २७ धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुतारवाडी आणि पाभरे ही धरणे १०० टक्के भरली असून परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.0
0
Report
घरकुल अनुदान मामले में ग्राम पंचायत के तीन अधिकारी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:घरकुल अनुदानाच्या पुढील हप्ता मंजूर करण्यासाठी मागितली लाच... सात्रळ ग्रामपंचायतीचा कंत्राटी लिपिक, ग्रामविकास अधिकारी आणि अभियंत्यावर कारवाई... प्रधानमंत्री आवास योजनेतील लाभार्थ्याकडून 20 हजार रुपयांची केली होती लाचेची मागणी... अहिल्यानगर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची सापळा कारवाई.... ग्रामविकास अधिकारी हैदर पटेल , गृहनिर्माण अभियंता सचिन ब्राम्हणे , लिपिक ज्ञानदेव डुकरे या तिघांवर कारवाई...0
0
Report
क्लॉकवाली बारिश ने कल्याण-डोंबिवली क्षेत्र में पेड़ गिराये, बिजली सेवाएं बाधित; यातायात प्रभावित
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंगरी परिसरामध्ये कालपासून सत्ताधार पाऊस पावसामुळे कल्याण डोंबिवली मध्ये अनेक झाडे कोसळली डोंबिवलीच्या सुदर्शन नगर येथील विद्युत वाहिनिनवरती झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली आहे कल्याण डोंबिवली मध्ये देखील एका दिवसात अनेक झाडें पडल्या च्या घटना घडल्या आहेत व गाड्यावर झाडे कोसळल्याने गाड्यांचे देखील नुकसान झालेले आहे सुदयवाने जीवितहानी नाही तर काल मुंबईमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीमध्ये देखील महानगरपालिकेने झाडांचे ऑडिट करावं असं कल्याण डोंबिवलीकरांच्या नागरिकांचं म्हणणं देखील आहे त्याचा आढावा0
0
Report
Advertisement
आंबेगांव के एकलहरे में बिबटिये की पिंजरे में गिरफ्तारी, ग्रामीणों को मिली राहत
Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून आंबेगावच्या एकलहरे परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलंय. एकलहरे येथील लोंढेमळा आणि दरा वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्या थेट घरांच्या आजूबाजूला फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने दरा वस्तीवरील रामदास लोंढे यांच्या शेताच्या कडेला पिंजरा लावला होता. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय,जेरबंद झालेली ही मादी बिबट्या असून तिचे वय साधारण ३ ते साडेतीन वर्षे आहे. या मादी बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे एकलहरे परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.0
0
Report
शिरूर-आंबेगांव में मानसून देरी से पहुंचा, खरीफ की बुवाई अभी बाधित
Shirur, Maharashtra:राज्यात मान्सूनच आगमन झालं मात्र अद्यापही उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाऊसच न झाल्याने शेतकऱ्यांच्या खरीप हंगामाच्या पेरण्या रखडल्यात बळीराजाच्या नजरा सध्या आभाळाकडे लागल्या असून मोठ्या प्रमाणात ढग दाटून येत आहे मात्र पाऊसच बरसत नसल्याने सध्या शेतकऱ्यांच्या नजरा या मोठ्या पावसाकडे लागल्या असून पाऊस झाल्यानंतर शेतकऱ्यांना खरीप हंगामाच्या पेरण्या करता येणार आहे. याचाच थेट शेतातून आढावा घेतला0
0
Report
तळकोकण में भारी बारिश से नदीयां उफान पर, सिंधुदुर्ग में येलो अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:मागील काही दिवसांच्या लपंडावानंतर पावसाने तळकोकणात दमदार हजेरी लावलीय. कालपासून पावसाने तळकोकणात जोर धरलाय, त्यामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नद्या नाले तुडुंब भरून वाहत आहेत. सिंधुदुर्गात आज येलो अलर्ट जारी करण्यात आला असून नागरिकांना सतर्कतेच आवाहन करण्यात आलंय.0
0
Report
Advertisement
अक्कलकोट में कारहुणवी मिरवणुकी के दौरान बैल छोड़े गए; ग्रामवासियों की सतर्कता से नियंत्रण काबू
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये कारहुणवी सणाच्या मिरवणुकी दरम्यान बैल उधळल्याची घटना समोर, बैलांना तात्काळ नियंत्रणात आणण्यात गावकऱ्यांना मोठे यश - जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यात कारहुणवी सण मोठ्या उत्साहात साजरा - अक्कलकोट तालुक्यातील सलगर गावामध्ये मिरवणुकीदरम्यान बैलजोडी उधळल्याची घटना समोर - गावकऱ्यांच्या सतर्कतेमुळे बैलांना नियंत्रणात आणण्यात मोठे यश - सुदैवाने सदरच्या घटनेत कोणतीही दुर्घटना नाही मात्र गावकऱ्यांची काहीशी पळापळ0
0
Report
अंबरनाथ तालुक्य में धान की बुवाई अंततः शुरू, बरसात के बाद 3700 हेक्टेयर में खेती शुरू
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात; ३७०० हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड Anchor यंदा पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाचे उशिराने आगमन झाल्यामुळे लांबलेली भात शेतीच्या पेरणीची कामे आता तालुक्यात सुरू झाली आहेत. तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली. पुरेसा पाऊस न झाल्याने भाताचे बियाणे सुकण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. हवामान कोरडे राहिल्याने शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे खरिपाचा हंगाम यंदा काहीसा उशिराने सुरू झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यात एकूण 3700 हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने आता शेतकऱ्यांची बियाणे टाकणे, शेत जमीन तयार करणे आणि पेरणीची कामे करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे पर्यायाने भात लावणीची कामेही जुलै महिन्याच्या मध्यानंतर किंवा शेवटी सुरू होतील . चंद्रशेखर भुयार, बदलापूर0
0
Report
गोंदिया में बारिश से किसानों की पेराई रुकी, अब मौसम ने दी राहत
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्यात अखेर पावसाने हजेरी लावली आहे... एलनिनो मुळे मान्सून उशिरा दाखल झाला. पण गोंदिया जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली होती. त्यामुळे शेतकऱ्यांची पेरणी खोळंबली होती. आता पावसाने हजेरी लावली असल्याने शेतकरी सुखावला आहे. तर दुसरीकडे उकळ्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे...0
0
Report
Advertisement
कल्याण- डोंबिवली में बारिश से पेड़ गिरे, गाड़ियों को नुकसान, बिजली सप्लाई बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली पावसाची रिमझिम सुरु.. कल्याण मध्ये झाडें कोसळून गाड्याचे नुकसान तर डोंबिवली मध्ये विदयुत वाहिन्याच्या तारांनवर झाडें कोसळून विदयुत पुरवठा बंद. कल्याण डोंबिवली परिसरात काल संध्याकाळी पासून पावसाची संततधार सुरु तर पहाटे पावसाच्या विश्रांती नंतर पुन्हा पावसाची रिमझिम सुरु झाली आहे काल रात्री कल्याण मध्ये अनेक ठिकाणी झाडें पडून गाडयाचे नुकसान झाले आहे तर डोंबिवली मध्ये विदयुत वाहिनीच्या तारवांवर झाडें कोसळून विदयुत पुरवठा खंडित झाला आहे.0
0
Report
एसीबी ने मेयो अस्पताल के सर्जिकल विभाग के प्रमुख और स्टेनो सहित दो के खिलाफ रिश्वतखोरी के आरोप दर्ज किए
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्य रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलचे शल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक (स्टेनो) आशिष मेटेकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे... परिवहन विभागाच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय रजेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय मंडळाची अनुकूल शिफारस देण्यासाठी दोघांनी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाने त्याची तक्रार एसीबी कडे केल्यानंतर लाचेची मागणी केल्या संदर्भात आवश्यक तपासणी केल्यानंतर काल रात्री उशिरा एसीबीने डॉ. जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक मेटेकर या दोघांच्या विरोधात तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे...0
0
Report
सोलापुर महापालिका: सात समिति सभापतियों के चयन के लिए शुक्रवार मतदान
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर महानगरपालिकेच्या सात सभापती पदांसाठी शुक्रवारी होणार निवडणूक सोलापूर महानगरपालिकेच्या विविध सात विशेष समित्यांच्या सभापती निवडीसाठी शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. सात समित्यांपैकी महिला व बालकल्याण समितीसाठी नगरसेविकांमध्ये रस्सीखेच सुरू आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडून कोणाला कौल मिळतो याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. या निवडणुकीमध्ये निर्णय अधिकारी म्हणून अप्पर जिल्हाधिकारी काम पाहणार आहेत。0
0
Report
Advertisement
