445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला पुलिस ने अवैध हाथभट्टी शराब पर बड़ी कार्रवाई, लगभग 2 लाख रुपए का माल जब्त
Akola, Maharashtra:अकोल्यात पोलिसांनी अवैध दारू भट्टीवर कारवाई करायला सुरुवात केली आहे.जिल्ह्यात सुरू असलेल्या “ऑपरेशन प्रहार” मोहिमेअंतर्गत अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत बार्शीटाकळी तालुक्यातील सिंदखेड मोरेश्वर शिवारातील अवैध हातभट्टी दारू अड्डा उद्ध्वस्त केला आहे. या कारवाईत तब्बल २ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून मोठ्या प्रमाणावर मोहा सडवा आणि हातभट्टी दारू नष्ट करण्यात आली आहे.स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सिंदखेड मोरेश्वर परिसरात छापा टाकण्यात आला. यावेळी तिघेही आरोपी अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करताना आढळून आले. कारवाईदरम्यान पोलिसांनी ८३ डबे मोहा सडवा, ५५ लिटर गावठी हातभट्टी दारू, चार प्लास्टिक टाक्या आणि इतर साहित्य जप्त केले.या प्रकरणी बार्शीटाकळी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला.0
0
Report
लोकमाता अहिल्यादेवी होळकर की 301वीं जयंती पर येवला में पुष्पहार अर्पण व अभिवादन
Yeola, Maharashtra:अँकर : लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त येवला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष तसेच नगरपालिका यांच्या वतीने येथील अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. सजवलेल्या पुतळ्याने उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.या प्रसंगी समाज बांधव,पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या लोककल्याणकारी, सामाजिक व धार्मिक कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांचे स्मरण केले. जयंतीनिमित्त आयोजित अभिवादन कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.0
0
Report
मिरजे में 800 से अधिक नेताओं ने भाजपा में प्रवेश, सशक्त हो गया पक्ष
Sangli, Maharashtra:यामध्ये एमआयएम पक्षाच्या माजी जिल्हाध्यक्षांसह काँग्रेस व राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या माजी नगरसेवकांसह,माजी पंचायत समिती सभापतींनी भाजपामध्ये प्रवेश केला आहे.मिरजेचे आमदार आणि माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये 800 हुन अधिक जणांचा हा पक्षप्रवेश सोहळा संपन्न झाला आहे.या पक्ष प्रवेशामुळे मिरज तालुक्यातील भाजपा अधिक भक्कम होईल,असा विश्वास आमदार सुरेश खाडे यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी के प्रबंधन का नियंत्रण कोल्हापुर से, विरोध तेज
Sangli, Maharashtra:सांगलीतील कृष्णा नदीचे व्यवस्थापन कोल्हापूरमधून करण्यास विरोध.. कृष्णाखोर विकास महामंडळ अंतर्गत असणाऱ्या कार्यालयांची पुनर्रचना करण्यात आले आहे.त्यामुळे सांगलीतील कृष्णा नदीचे व्यवस्थापन कोल्हापूरकडे वर्ग करण्यात आला आहे.मात्र यावर सांगितलं विविध सामाजिक संघटनांबरोबर कृष्णा महापूर नियंत्रण समितीने विरोध दर्शवला आहे. सदरचा निर्णय राज्य सरकारचा नसून कृष्णा खोरे विकास महामंडळाने परस्पर घेतला आहे,असा आरोप करत कृष्ण नदीच्या व्यवस्थापनाचा कार्यालय सांगली जिल्ह्यातच असलं पाहिजे अशी मागणी कृष्णा महापूर नियंत्रण समितीकडून करण्यात आली आहे.0
0
Report
मानसून देरी से, जिले में जल संकट; डैमों में 29% पानी बचा
Shirdi, Maharashtra:मान्सून लांबणीवर पडल्यामुळे पाण्याचं संकट गडद होताना दिसतंय. अहिल्यानगर जिल्हयातील प्रमुख धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असून मुळा, भंडारदरा आणि निळवंडे धरणांमध्ये सरासरी केवळ 29 टक्के पाणी शिल्लक आहे. त्यामुळे आता पिण्याच्या पाण्यासाठी साठा राखून ठेवण्याची वेळ जलसंपदा विभागावर आली आहे... मान्सून उशिरा येणार असल्याच्या अंदाजामुळे जिल्ह्यातील पाणीसाठ्याचं नियोजन करण्यावर भर दिला जातोय. मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या महत्त्वाच्या धरणांमध्ये जलसाठा न्यूनतम पातळीवर पोहोचला आहे. सध्या केवळ 29 टक्के पाणी शिल्लक असल्याने शेती आणि उद्योग क्षेत्रावर त्याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाकडून उपलब्ध पाण्याचा वापर काटेकोरपणे करण्याचे नियोजन सुरू आहे. विशेषतः पिण्याचं पाणीासाठी साठा राखून ठेवण्यावर प्रशासनाचा भर आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदा धरणांमधील जलसाठा खूपच कमी असल्याने जिल्हयात पाणी टंचाईची भीती व्यक्त केली जात आहे. जर मान्सून आणखी लांबला, तर पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.0
0
Report
कोकण रेलवे ने बिना टिकट यात्रियों पर कार्रवाई, अप्रैल 2026 में 2.9 करोड़ वसूल
Ratnagiri, Maharashtra:कोकण रेल्वे मार्गावरून विनातिकीट आणि अनधिकृतपणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना चाप लावण्यासाठी प्रशासनाने तिकीट तपासणीची मोहीम अत्यंत तीव्र केली आहे. नुकत्याच संपलेल्या २०२५-२६ या आर्थिक वर्षात कोकण रेल्वेने सातत्य राखत एकूण ११ हजार ३९४ विशेष तिकीट तपासणी मोहिमांचं आयोजन केलं होतं. या वर्षभराच्या कालावधीत संपूर्ण मार्गावर तब्बल ४ लाख ९९ हजार ६७५ अनधिकृत प्रवासी आढळले. या सर्व प्रवाशांवर कडक कारवाई करत रेल्वेने रेल्वे भाडे आणि दंडाच्या स्वरूपात एकूण २७ कोटी ६८ लाख रुपयांची विक्रमी वसुली केली आहे. तर सरत्या एप्रिल २०२६ या एकाच महिन्यात रेल्वेने तब्बल ९३४ विशेष तिकीट तपासणी मोहिमा राबवल्या. या मोहिमेदरम्यान ३७ हजार विनातिकीट आणि नियमबाह्य प्रवास करणारी प्रकरणे उघडकीस आली असून, अशा प्रवाशांकडून रेल्वे भाडे आणि दंडापोटी २ कोटी ९০ लाख रुपयांचा महसूल वसूल करण्यात आला आहे. रेल्वेच्या या आक्रमक भूमिकेमुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के कुंभार्ली घाट में एसटी बस रात के भीतर बंद, यात्रियों को चार घंटे इंतजार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. कुंभार्ली घाटात एसटी मध्यरात्री नादुरुस्त. जंगलमय भागात प्रवाशांचे तब्बल ४ तास अतोनात हाल. डेपोच्या ढिसाळ कारभारामुळे संताप. अँकर: रत्नागिरीतून एक धक्कादायक आणि संतापजनक बातमी समोर येत आहे. कुंभार्ली घाटातील घनदाट आणि जंगलमय भागात रात्रीच्या सुमारास खेड - नांदेड ही एसटी बस अचानक बंद पडली. धोक्याच्या वळणावर आणि निर्जन ठिकाणी बस नादुरुस्त झाल्यामुळे बसमधील लहान मुले, वृद्ध आणि इतर प्रवाशांना तब्बल चार तास ताटकळत राहावे लागले. घाटात रखडलेल्या काही प्रवाशांनी तातडीने संबंधित बस डेपोशी संपर्क साधून मदतीची मागणी केली होती. मात्र, डेपो प्रशासनाकडून वेळेत कोणतीही पर्यायी व्यवस्था किंवा मदत न मिळाल्याने प्रवाशांना रात्रीचे चार तास रस्त्यावरच बसून काढावे लागले. एसटी प्रशासनाच्या या अत्यंत बेजबाबदार आणि ढिसाळ कारभारामुळे प्रवाशांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
पिंपरी–चिंचवड़ में जहरीली शराब से 11 मौतें, केंद्रीय मंत्री आज पहुँचेंगे
Pimpri-Chinchwad, Maharashtra:विषाक्त शराब प्रकरण में पिंपरी चिंचवड़ में रात्रि के हादसों से मृतकों की संख्या 11 हो गई है। मृतकों के रिश्तेदारों से मिलने के लिए केंद्रीय मंत्री रामदास आठवले और नीलम गोरहे आज पहुँचेंगे। इस स्थिति का आकलन हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने किया।0
0
Report
वांगणी के अनधिकृत चॉलों पर धड़ाकेदार कार्रवाई; 100 से अधिक घर ढहे
Ambernath, Maharashtra:महसूल विभागाची धडक कारवाई 100हून अधिक अनधिकृत घरे जमीनदोस्त अनधिकृत चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य? वांगणी पश्चिमेकडील एकविरा नगर भागात धडक कारवाई करत महसूल विभागानं 100हून अधिक घरं जमीनदोस्त केली आहेत. या कारवाईमुळे चाळमाफियांचे धाबे दणाणले आहेत. महत्वाचं म्हणजे या चाळींमध्ये बेकायदेशीर कृत्य करणाऱ्यांचं वास्तव्य वाढत असल्याच्या तक्रारीही प्राप्त झाल्या होत्या. त्यामुळे या कारवाईनं गुन्हेगारांनाही चाप बसणार आहे. वांगणी ग्रामपंचायत हद्दीत चाळ माफियांनी अक्षरश: उच्छाद मांडला होता. वांगणी पश्चिमेकडे मोठ्या प्रमाणात अनधिकृत चाळींचं बांधकाम करण्यात आलं होतं. सोशल मीडियात स्वस्त घरांच्या फसव्या जाहिराती करत त्याची गोरगरीबांना विक्री केली जात होती. या चाळ माफियांनी स्वातंत्र्यसैनिकांच्या जागेतही अवैध बांधकामं केली होती. याबाबत अनेकदा तक्रारी झाल्यानंतर वांगणीच्या सरपंच वनिता आढ़ाव यांनी याबाबत सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर अंबरनाथचे तहसीलदार अमित पुरी यांनी मोठ्या फौज फाट्यासह वांगणीत धडक कारवाई केली. या कारवाईत जवळपास 100 हून अधिक घरं जमीनदोस्त करण्यात आली आहेत. याशिवाय सार्वजनिक बांधकाम विभागानेही राज्य महामार्गावरील अतिक्रमाणांवर कारवाई केलीय.0
0
Report
Advertisement
Chondi Jyanti Mahotsav Me Rohit Pawar aur Gopi Chand Padalkar ke beech hungama: Chunaav ki badha
Ahilyanagar, Maharashtra:आमदार रोहित पवार जाणीवपूर्वक जयंती उत्सवात गोंधळ घालून गाल बोट लावण्यासाठी चोंडी येथे येतात रात्री दर्शन करून गेल्यानंतर जाणीवपूर्वक पुन्हा येऊन घोषणाबाजी करत गोंधळ निर्माण केल्याचा आरोप भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे अहिल्यादेवी होळकर यांचं जन्मगाव असलेल्या चोंडी येथे 301वी जयंती साजरी केली जाते रात्री बारा वाजेच्या sुमारास जयंतीनिमित्त गोपीचंद पडळकर कार्यकर्त्यांसोबत अहिल्यादेवी यांच्या स्मारकावर अभिवादन करण्यासाठी पोहोचले यासोबतच आमदार रोहित पवार देखील अभिवादन करण्यासाठी आले अभिवादन झाल्यानंतर दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते एकत्र झाले आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरू झाला ढकलाढकली आणि घोषणाबाजी झाल्यानंतर पोलिसांनी हस्तक्षेप केला रोहित पवार देखील अभिवादन झाल्यानंतर स्मारकाच्या बाहेर पडले दरम्यान हा प्रकार रोहित पवारांकडून जाणीवपूर्वक केला गेला असल्याचं पडळकर यांनी म्हटल आहे गोपीचंद पडळकर यांच्याशी बातचीत केली आहे आमची प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी0
0
Report
यवतमाळ विधान परिषद: महायुती उम्मीदवार अभी तय नहीं, काँग्रेस के साहेबराव कांबळे आगे
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषदेसाठी महायुतीचा उमेदवार अद्याप निश्चित झालेला नाही, महाविकास आघाडी करून काँग्रेसचे साहेबराव कांबळे यांचे नाव निश्चित मानले जात आहे, त्यांनी आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला असून, सोमवारी ते काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून उमेदवारी अर्ज दाखल करतील असे त्यांनी सांगितले आहे. तर महायुतीत शिवसेना ही जागा लढवेल मात्र अद्याप उमेदवारीची निश्चिती झाली नाही. यात स्थानिक उमेदवार द्यावा असा आग्रह असल्याने, खेतानी फाउंडेशनचे सलीम खेतानी यांचे नाव आघाडीवर आहे. याशिवाय नागपूर येथील किरण पांडव आणि माजी आमदार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या नावाची देखील चर्चा आहे. या नावांपैकी पालकमंत्री संजय राठोड कुणाला पसंती देतात आणि शिवसेना नेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
नवी मुंबई में पहली बारिश से गर्मी से राहत, बच्चे मैदान में आनंदित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मद्ये पहिला पावसाने हजेरी लावली पहाटे पडलेल्या पावसाने नवी मुंबई तर सुखावले ,मैदानात क्रिकेट खेळणाऱ्या मुलांनी या पावसाचा आनंद घेतला, वाढती उष्णता मुळे हेराण झालेल्या नवी मुंबईतील नागरिकांना दिलासा मिळाला ।0
0
Report
Advertisement
गर्मी से दूध उत्पादन 30-40% गिरे, Shirur के किसानों ने गोठों में फॉगर्स लगाये
Shirur, Maharashtra:राज्यात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून, या वाढत्या उन्हाचा मोठा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसतोय. वाढत्या तापमानामुळे दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, गाईंच्या दूध उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. इतकंच नाही, तर दुधातील फॅट आणि डिग्रीचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. या कडक उन्हापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी शिरूरमधील शेतकऱ्यांनी आता आपल्या गोठ्यांमध्ये फॉगर्स (तुषार सिंचन यंत्रणा) बसवले आहेत. याद्वारे गोठ्यात गारवा निर्माण करून जनावरांना उष्णतेपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, एकीकडे घटलेले दूध उत्पादन आणि दुसरीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेले चाऱ्याचे दर, अशा दुहेरी संकटात सध्या पशुपालक शेतकरी सापडला याचाच गाई गोठ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
चंद्रपूर के सावली में 20 हाथियों का गांवों में प्रवेश, वन विभाग सतर्क
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील करोली-आकापूर मार्गे चार पिल्लांसह २० हत्तींच्या कळपाने पुन्हा प्रवेश केल्याने सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या सततच्या हालचालींमुळे वनविभागाची चिंता वाढली असून कळपावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला परिसराच्या दिशेने परत गेल्याचे दिसून आले होते. मात्र, करोली-आकापूर मार्गे पुन्हा सावली तालुक्यात प्रवेश झाल्याने वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सायखेडा परिसरातून हत्तींच्या कळपाला हुसकावून लावण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले असून त्यानंतर कळपाने जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे सांगण्यात आले.0
0
Report
पालघर- बोईसर में CNG किल्लत से रिक्षाचालक 3–4 घंटे लाइन में, प्रशासन से कदम उठाने की मांग
Palghar, Maharashtra:Anch - पालघर आणि बोईसर परिसरातील सीएनजी पंपांवर सध्या सीएनजीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून यबोईसर एमआयडीसी येथील पेट्रोल पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याच पाहायला मिळतात . गुजरात गॅस कडून होत असलेल्या अपुऱ्या सीएनजी पुरवठ्यामुळे सध्या सीएनजी वाहन चालकांना भर उन्हात तीन ते चार तास ताटकळत उभा रहावं लागत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . शहरांमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांच प्रमाण जास्त असल्याने या रिक्षा चालकांना आपला दिवसभराचा व्यवसाय बाजूला ठेऊन सीएनजी पंप बाहेर भर उन्हात रांगेत उभ राहावं लागत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होतो . प्रशासनाने संबंधित सीएनजी पंप चालकांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी या रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे .0
0
Report
Advertisement
