icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ महायुती में जागा दावेदारी का खेल: क्या भाजपा 25 में 25 पर अड़ी?

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील धुसफूस कायम आहे. भाजपने गोकुळ दूध संघाच्या 25 पैकी 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या निश्चित केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचा दिसून येत आहे. आमच्या संस्था कमी कशा होतील, आम्ही काही संस्थांची नाराजी दूर करणार हा भाग होत आहे. गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानांत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या संस्था अपात्र ठरल्या तर महायुतीमध्ये कोणाला फायदा होईल हे स्पष्ट होते. अदृश्य शक्तीने गोकुळच्या 1400हून अधिक संस्था मतदानासाठी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला; उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार कायम ठेवला. महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना या दोन्ही पक्षांची जागा महत्त्वाची ठरत आहेत. भाजपालाही महायुतीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला, कोल्हापूरातील एका हॉटेलवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांची बैठक झाली; चंद्रकांत दादा पाटील आणि अमल महाडिक उपस्थित होते. गोकुळ निवडणुकीसाठी 25 पैकी 25 जागा निश्चित झाल्या आहेत काय हा निर्णय अद्याप स्पष्ट नाही. भाजपने 25 पैकी 25 जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. Mahayutiमध्ये जागा वाटपास जोरदार रस्सीखेच सुरू आहे; कोण मोठा भाऊ ठरणार, ते नंतरच ठरेल.
0
0
Report
Advertisement

धान बोनस के मुद्दे पर भाजपा को घर का झटका, किसान मोर्चा साकोलि

Bhandara, Maharashtra:धान बोनसच्या मुद्द्यावर भाजपला घरचा अहेर!... बोनससाठी ५ ऑक्टोबरला साकोलीत भव्य शेतकरी मोर्चा!... माजी खासदार सुनील मेंढेंचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा!... बोनसची रक्कम खात्यावर जमा करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! दरम्यान, बोनसच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी साकोलीत भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोर्चात सहभागी होण्याचे सांगितल्याचा दावा किसान संघाने केला आहे. विशेष म्हणजे, सुनील मेंढे यांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे धानाच्या बोनसच्या मुद्द्यावरून भाजपला घरच्यांकडूनच आंदोलनाचा इशारा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे....
0
0
Report

NMIA पर गणेशोत्सव: नवी मुंबई एयरपोर्ट में लोककला का धमाकेदार कार्यक्रम

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गणेशोत्सवानिमित्त ‘द फोक मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात गणपतीवरील भक्तिगीते, कोकणातील कलाकारांच्या संचाने सादर केलेले पारंपरिक बाळ्या नृत्य, तसेच विविध लोकसंगीत आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा साकारत या कार्यक्रमाने विमानतळावरील उत्सवी वातावरणात भर घातली. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या विविध लोककलांची आणि सांस्कृतिक परंपरेची खास झलक अनुभवता आली.
0
0
Report

नाशिक में पेयजल संकट गहराया: पूर्व हिस्से में टैंकरों की बढ़ती मांग

Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका मराठवाड्याच्या सीमेलगत असल्याने पावसाच्या कमी संवेदना दिसत आहेत. यंदाही पावसाने दडी मारल्याने येवला तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या पांजरवाडी, सायगाव, भुलेगाव, देवथाण, रेंडाळे, खामगाव, गवंडगाव, पिंपळखुटे, कोळम, अंकाई आणि गोरखनगर यांच्या 12 गावांना 9 टॅन्करद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी 10 गावांचा प्रस्ताव आत्ताही शासनाच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे. येवला उत्तर-पूर्व भागात पाणीपुरवठा काही प्रमाणात दिलासा देत असला तरी दुष्काळ कायम आहे. महिलांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पिके पेरणी झाली होती, परंतु पावसाअभावी तशीच उभी पिके करपू लागली आहेत. शेतकरी तातडीने दुष्काळ घोषित करावे अशी मागणी करतात. याशिवाय शेजारी नांदगाव तालुक्यातही दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नांदगावमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली ज्यामध्ये टँकर मागणी नोंदवण्यात आली. एकूण नाशिक जिल्ह्यात 18 गावं आणि 37 वाड्यांना 15 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून तातडीचे उपाययोजना केले जाण्याचे आदेश दिले आहेत.
0
0
Report
Advertisement

कांग्रेस का विरोध: इंदोरा-चौक से दिघोरी तक फ्लायओवर के नामकरण पर हंगामा

Nagpur, Maharashtra:नागपूर में नागपूरतील इंदोरा चौक कमाल टॉकीज ते दिघोरी चौकदरम्यानच्या नवनिर्मित फ्लायओव्हरच्या नामकरणावरून काँग्रेसचा विरोध. फ्लायओव्हरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा आक्षेप. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महाराज अग्रसेन किंवा डागा रुग्णालयाच्या नावाचा विचार करण्याची मागणी. यूथ काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस आणि फ्रंटल संघटनांकडून विरोध प्रदर्शन. कमाल चौकात आंदोलन. नामकरणाचा निर्णय बदलण्याची काँग्रेसची मागणी..... आंदोलन पुलावर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले
0
0
Report

वाशिम में 50 दिन से बारिश नहीं, खरीफ नुकसान और DCH MH एप गड़बड़ी

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात गेल्या ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप पिके करपून गेली असून शेतकरी आधीच आर्थिक संकटात सापडला आहे.त्यातच आता शासनाच्या पीक-पेरा नोंदणीसाठी वापरणाऱ्या DCH MH अ‍ॅपमध्ये गेल्या काही दिवसांपासून तांत्रिक अडचणी येत असल्याने शेतकऱ्यांच्या पीक नोंदणीचे काम रखडले आहे.पीक-पेरा नोंदणी वेळेत होत नसल्याने दुष्काळी परिस्थितीचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांना आणखी मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळे संबंधित विभागाने अ‍ॅपमधील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून पीक-पेरा नोंदणी सुरळीत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

उल्हासनगर में करंट से 26 वर्षीय युवती की मौत, CCTV पोल पर सुरक्षा सवाल

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर-३ मधील धक्कादायक घटना उल्हासनगर-३ ओटी सेक्शन परिसरात एक अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. गणेश गंगा अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या करिश्मा मडवानी (वय २६) या तरुणीचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. सुरक्षेसाठी बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या पोलच्या संपर्कात येताच करिश्मा यांना विजेचा जोरदार धक्का बसला. पोलमध्ये नेमका करंट कशामुळे आला, याचे कारण अद्याप अस्पष्ट असून मध्यवर्ती पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील सीसीटीव्ही पोलच्या विद्युत सुरक्षेवर गंभीर प्रश्न निर्माण झाले असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर
0
0
Report
Advertisement

महासभा में अनुबंध कर्मियों के लिए 7500 रु वृद्धि: आयुक्तों पर सागर नाईक का तीखा निशाना

Navi Mumbai, Maharashtra:कंत्राटी कर्मचाऱ्यांना 7500 रूपये वाढीव पगार देण्याचा निर्णय महासभेत मंजूर झाला असताना देखिल प्रशासनाच्या ढिसाळ कारभारामुळे कंत्राटी कामगारांना वाढीव पगारापासून वंचित रहावे लागत आहे. याविरोधात सभागृह नेते सागर नाईक आक्रमक झाले असून महासभेत आयुक्तांसह प्रशासनाला धारेवर धरलेय. पुढील 15 दिवसात प्रशासनाने कंत्राटी कामगारांना वाढीव पगार देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करावी आणि हा विलंब आम्ही खापवून घेणार नाही असा थेट इशारा मनपा आयुक्तांना दिलाय. यासोबतच तुमचा वैयक्तिक विरोध असेल तर सांगा पण स्वतःच डोक लावायला जाऊ नका असे खडेबोल सभागृह नेते सागर नाईक यांनी आयुक्तांना सुनावले आहेत।
0
0
Report

ओबीसी जनगणना को लेकर किसानों-नेताओं का दिल्ली तक आंदोलन शुरू

Nagpur, Maharashtra: Ngp wadetiwar Byte live u ने फीड पाठवले नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On ओबीसी बैठक - आज विदर्भातील सर्व जिल्ह्यातून ओबीसीचे सर्व नेते, पदाधिकारी ओबीसी चळवळीत काम करणारे निवडक प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक होती - सरकार आमच्याशी जी चालबाजी करते आहे, आमच्या समाजाचे फसवणूक करते, हे एक राजपत्र प्रसारित झाला आहे,पंधरा दिवस प्रसिद्ध झाल्यापासून लोकांपुढे येऊ दिला नाही, याचं कारण असं आहे की जे 1 फेब्रुवारीला जनगणना होणार होते तो त्यांनी एक डिसेंबरला केलाय कारण उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा आणि उत्तराखंड या चार राज्यांच्या निवडणुका आहे म्हणून एक फेब्रुवारीपासून होणारे जनगणना ही एक डिसेंबर पासून केली - जात- निहाय जनगणना ओबीसींची झाली पाहिजे, ओबीसींचा स्वतंत्र कॉलम असला पाहिजे यासाठी आमची मागणी होती, म्हणून सरकारने लोकांचा आक्रोश होऊ नये म्हणून सरकारने ओबीसींची फसवणूक करण्यासाठी दोन महिने अगोदर अशा प्रकारचा राजपत्र काढून हे राजपत्र फसवून काय असं मी मानतो, - साधारणता एक नोव्हेंबरला दिल्लीत देशव्यापी आंदोलनाची सुरुवात होणार आहे, यापूर्वी दिल्लीत 62 संघटनाची बैठक झाली, मी त्यात गेलो नव्हतो, सरकारने दोन महिने आधी जनगणना सुरू केल्याने आमचा आंदोलन एक नोव्हेंबरला दिल्लीत होणार आहे - साधारणतः 63 संघटना 13 सप्टेंबर च्या बैठकीत दिल्लीत होत्या, आमचा स्वतंत्र ओबीसीचा कॉलम जनगणनेत असावा - ओबीसींची जातनिहाय जनगणना झाली नाही तर आमचा आरक्षण संपुष्टात येईल, सुप्रीम कोर्ट फडणवीस सरकारने आमची फसवणूक केली, सुप्रीम कोर्टात ओबीसींच्या निकाल लागला नाही मात्र लांबवत चालले आहे - माझ्या मतदारसंघात ओबीसींच्या जागा कमी झाल्या, ऑपरेशनच्या जनगणना स्वतंत्र कॉलम शिवाय झाले नाही तर उरलं सोडलं आरक्षणही संपुष्टात आणण्याचा यांचा चालबाजी आणि उद्देश आहे हे आता लपून राहिलं नाही - 2 ऑक्टोबर गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीच्या निमित्ताने तालुका स्तरावर सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला आहे, 25 ऑक्टोबरला जिल्हास्तरीय आंदोलन आणि मोर्चा होईल - त्यानंतर चलो दिल्लीचा नारा घेऊन एक नोव्हेंबर ला दिल्लीला पोहचणार - On जरांगे पाटील - मला वाटतं की तीन वेळा जरांगे पाटलांचा आंदोलन झालं या तीनही आंदोलनात गुलाल फासून, कागद देऊन सरकारने त्यांची बोळवणूक केली - त्यांनी ज्या काही मागण्या दिल्या आणि त्या मंजूर केल्यानंतर त्यावर आमच्या लक्ष आहे, जर त्या 12 मागण्यांमध्ये ओबीसींच्या हक्क हिरावला जात असेल तर आम्ही स्वस्थ बसणार नाही, आमच्या वाट्याचं कुणाला देऊ नका ज्यांना कुणाला जायचं असेल ते स्वतंत्र द्या - आता न्यायालयीन लढाई सुरू झालेली आहे - On नांदेड बैठक काजू- बदाम - मंत्री गेले की अधिकाऱ्यांना सवय झाली आहे की काजू बदामाचे प्लेट पुढे आणून ठेवायचे, पहिले हे चिवडा द्यायचे आता ड्रायफ्रूट देतात, कोणाला भुक लागली तर कोणी खातो, या संवेदनशील विषयाला मराठवाड्यात दुष्काळा च्या माध्यमातून आला आहे, त्यामुळे काजू किसमिस खाल्ल्याने कोणाचं मन बदलत नाही - भरणे हे ओबीसी चळवळीतील आहेत त्यामुळे ते शेतकऱ्यांचा अहित करणार नाही मात्र तिजोरीची चाबी देवेंद्र फडणीस यांच्याकडे आहे त्यामुळे ते किती खोलतात आणि किती देतात - मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती गंभीर आहे त्यासाठी आम्ही जाणार दौरा करणार - On दिल्ली आंदोलन - आम्हाच्या ६०-७० संघटना बसतील आणि त्याचा कसा स्वरूप असेल हे जॉईंटली त्या ठिकाणी दिल्लीत घोषित होणार आहे ते लवकर होणार आणि त्याची तयारी कशी असणार हे सांगणार - On दुष्काळ केंद्र सरकार मदत - मुख्यमंत्री विरोधी पक्षात असताना एनडीआरएफ, एसडीआरएफ हे बाजूला करा आणि तात्काळ मदत करा अशी त्यांची भाषण आहेत, आमची देखील तीच मागणी आहे आता सत्तेत जे आहेत ते करून द्या ते केंद्राची वगैरे वाट पाहू नका राज्याच्या तिजोरीतून सगळी काम करा कशाला पाहिजे शक्तीपीठ? - यापेक्षा शेतकऱ्यांसाठी तिजोरी मोकळी करण्याची आवश्यकता आहे, बाकी सर्व काम बंद करा पण शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे रहा फडणवीसजी ऑक्टोबर महिन्यांची वाट पाहू नका अशी आमची त्यांच्याकडे मागणी आहे - On जरांगे समर्थक - आम्हाला लक्ष देण्याची गरज नाही,शिव्या आम्हालाही मोठ्या प्रमाणात देता येतात पण आमची तशी संस्कृती नाही आणि संस्कारही नाही - On दुष्काळ पालकमंत्री पाहणी - कोरड्या नजरेने पाहू नका, तुमच्या डोळ्यात ते भाव दिसले पाहिजे की शेतकऱ्यांची काय अवस्था आहे त्यामुळे हे पाहून जाऊ द्या आम्ही पाहून गेल्यानंतर जर काही केलं नाही तर आम्ही यांना पाहून घेऊ - On उड्डाणपूल हेडगेवार नाव - हे काही स्वातंत्र्य योद्धा वगैरे होते काय? हे स्वातंत्र्य चळवळीत फार मोठा योगदान होतं, दोन चार गोळ्या लागल्या आणि तलवारबाजीने यांच्यावर जखमा झाल्या, स्वतंत्र्यासाठी- देशासाठी समर्पित असणाऱ्यांची नावे दिले तर त्याला महत्त्व असेल, जर केवळ नाव देत असेल तर सत्तेचा वापर आणि विशिष्ट विचाराला बढावा देण्यासाठी आहे असं मी समजतो
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव का समापन: जिले में 19 सार्वजनिक और 4.3 लाख से अधिक घरेलू मूर्तियों का विसर्जन

Ratnagiri, Maharashtra:पाच दिवस मोठ्या उत्साहात साजरा झालेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होत असून, जिल्ह्यात १९ सार्वजनिक, सव्वा लाखांहून अधिक घरगुती गणेशमूर्ती आणि ४३ हजार ३७ गौरींचे आज विसर्जन होत आहे.. डीजेवरील निर्बंधांमुळे पारंपरिक ढोल-ताशा, लेझीम आणि झांज पथकांच्या गजरात या विसर्जन मिरवणुकां निघत असून, विसर्जन घाटांवर प्रशासनाकडून स्वच्छता आणि दिव्यांची चोख व्यवस्था करण्यात आली आहे.. चिपळूण बाजारपूल येथील वाशिष्टी च्या गणेश विसर्जन घाटाच्या इथून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top