icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ में भारी बरसात से अरुणावती नदी उफान, आर्णी शहर के मोहल्लों में बाढ़

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे अरुणावती नदीला पूर आला असून, पुराचे पाणी आर्णी शहरातील अनेक भागात शिरले आहे. आर्णी येथील उदयनगर, शनीमंदिर, मोबीनपुरा या भागात पुराचं पाणी शिरल्याने अनेक घरांमध्ये पाणी साचले आहे. काल रात्रीचा सुमारास अचानक पाण्याचा प्रवाह वाढून या परिसराला पुराच्या पाण्याने वेढले. त्यामुळे नागरिकांची एकच धावपळ उडाली. नागरिक कुटुंबीयांना घेऊन सुरक्षित स्थळी पोहोचले. दरम्यान घरांमध्ये पाणी शिरल्याने दैनंदिन गरजेच्या साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या पूर परिस्थितीमुळे अनेक कुटुंबीय उघड्यावर आले आहेत.
0
0
Report

वाशीम में किसानों के कर्ज माफी के लिए ई-केवाईसी पूरी करने का अभियान चल रहा

Washim, Maharashtra:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत वाशिम जिल्ह्यात कर्जमाफीची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्ह्यात 54 हजारांहून अधिक शेतकरी पात्र ठरले असून, त्यापैकी आतापर्यंत 35 हजार 429 शेतकऱ्यांनी ई-केवायसी पूर्ण केली आहे. उर्वरित शेतकऱ्यांनी तातडीने ई-केवायसी पूर्ण करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. ई-केवायसी अपूर्ण राहिल्यास कर्जमाफीचा लाभ मिळण्यास विलंब होऊ शकतो. दरम्यान, सेतू केंद्रे, महा-ई-सेवा केंद्रे आणि बँकांमध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असून, तांत्रिक अडचणींमुळे अनेकांना प्रतीक्षा करावी लागत आहे.
0
0
Report

सोलापुर में चिंचपूर बंधारा डूबा, महाराष्ट्र-कर्नाटक संपर्क टूट गया

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पाण्याचा प्रवाह वाढल्याने चिंचपूर बंधारा बुडाला पाण्याखाली, महाराष्ट्र कर्नाटकचा संपर्क तुटला - पुणे जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे उजनी धरण झाले ओव्हरफ्लो - त्यामुळे भीमा नदीत पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आल्याने जिल्ह्यातील अनेक बंधारे पाण्याखाली - दक्षिण सोलापूर तालुक्यातील चिंचपूर बंधारा पाण्याखाली बुडाल्याने महाराष्ट्र आणि कर्नाटक या दोन राज्यांचा संपर्क तुटला - चिंचपूर बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद - कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी प्रशासन अलर्ट मोडवर
0
0
Report
Advertisement

नंदुरबार में भारी बरसात ने खरीफ को दी नई उम्मीद, किसानों में खुशी

Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात सलग तीन दिवसांच्या रिमझिम पावसानंतर अखेर पावसाने दमदार पुनरागमन केले आहे. रात्रभरापासून नंदुरबार शहरासह जिल्ह्यातील अनेक भागांत जोरदार पाऊस सुरू असून, शेतकऱ्यांसह नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. जून महिना पूर्णपणे कोरडा गेल्यानंतर आणि जुलै महिन्याच्या अखेरच्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ १९.८ टक्के पावसाची नोंद झाल्याने खरीप हंगामातील सुमारे ४० टक्के पेरण्या रखडल्या होत्या. अपुऱ्या पावसामुळे जिल्ह्यावर पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची भीतीही व्यक्त केली जात होती. रात्रभर सुरू असलेल्या या दमदार पावसामुळे रखडलेल्या पेरण्यांना वेग मिळण्याची शक्यता आहे. पावसामुळे कापूस, मिरची आणि मका या पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या आहेत. काही दिवस जिल्ह्यात समाधानकारक पाऊस कायम राहिल्यास शेतीसह पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नालाही मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

धुळे में आज भारी बारिश की संभावना, नदी किनारों पर सतर्कता जारी

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात आज अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असून जिल्ह्यात रात्रीपासून पाऊस बरसत आहे. जिल्ह्यातील यंदाच्या पावसाळ्यातला हा पहिला दमदार पाऊस असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे. जिल्ह्यातील अनेर आणि अक्कलपाडा धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात आला आहे. तर हातनुर धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे तापी नदीलाही पूर परिस्थिती निर्माण होऊ शकते, त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिलेला आहे. या पावसामुळे जिल्ह्यातील खरीप पिकांना जीवनदान मिळाला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून बळीराजा अशा दमदार पावसाच्या प्रतीक्षेत होता. संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी अनावश्यक प्रवास टाळावा, तसेच प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनामार्फत करण्यात आले आहे
0
0
Report

मराठा-कुणबी आरक्षण प्रमाणपत्र वितरण, 3.11 लाख लाभार्थी घर पहुंचे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर कुणबी नोंदी शोधून प्रमाणपत्र देण्याच्या प्रशासकीय मोहिमेने मराठवाड्यात वेग घेतला आहे. न्यायमूर्ती संदीप शिंदे समितीच्या राबवण्यात निर्देशानुसार येत असलेल्या या प्रक्रियेत, मराठवाड्यात आतापर्यंत तब्बल ३ लाख ११ हजार ३३ नागरिकांना कुणबी प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, प्रलंबित अर्जाची संख्या अवघ्या ६१ वर आहे. सप्टेंबर २०२५ पासून ते आतापर्यंत विभागात नव्याने ७२ हजार १२ प्रमाणपत्रांचे वाटप झाले आहे. मराठा-कुणबी, कुणबी-मराठा आणि केवळ कुणबी अशा तिन्ही प्रकारच्या नोंदींसाठी दाखल झालेल्या ३ लाख ११ हजार ६०९ अर्जापैकी फक्त ५१५ अर्ज त्रुटींमुळे नामंजूर झाले आहेत. उर्वरित सर्व पात्र लाभार्थीना घरपोच प्रमाणपत्रे मिळाली आहेत असा प्रशासनाचा दावा आहे..
0
0
Report

यवतमाल में मुसलधार बारिश से दुकानों में पानी घुसा; नालियों के दोषपूर्ण निर्माण

Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये पावसाने कहर केला असून, हवामान विभागाने देखील पावसाचा रेड अलर्ट जाहीर केला आहे. गुरुवारी दिवसभर मुसळधार पाऊस बरसल्याने शहराच्या अनेक भागात पाणी साचले आहे, शहराच्या मध्यवस्तीतील दत्त चौकात देखील रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहू लागले आहे. दत्त चौक ते दाते कॉलेज चौक मार्गावर नालीचे सदोष बांधकाम केल्यामुळे रस्त्यावरील पाणी थेट दुकानांमध्ये शिरले. हा मार्ग तयार होत असतानाच स्थानिक व्यवसायिकांनी या कामाबद्दल आक्षेप नोंदविला होता, मात्र नगरपालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने या तक्रारींकडे दुर्लक्ष केले. परिणामी पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात दुकानांमध्ये पाणी शिरून साहित्याचे नुकसान होत आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल: दारव्हा में बाढ़ के पानी में कार डूब, पत्नी व दो बच्चियाँ लापता

Yavatmal, Maharashtra:यवतमालच्या दारव्हा तालुक्यातील दहेली गावाजवळील नदीत एक कार वाहून गेली आहे. या कार मधील पती झाडाचा आधार घेऊन बचावला असून पत्नी व दोन मुलींचा शोध लागलेला नाही. लोणी येथील अविनाश खंडारे हे कुटुंबीयांसह ईर्टिगा कार घेऊन गावी परतत असताना अडाण नदीवरील पुलावरून त्यांचे वाहन पुराच्या पाण्यात वाहून गेले. मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली. अविनाश खंडारे हे वाहून जात असताना एका झाडाच्या साहाय्याने बचावले, त्यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून बचाव पथकाने त्यांची सुटका केली. मात्र त्यांची पत्नी माधवी खंदारे, मुली प्राची व साची या पुराच्या पाण्यात वाहून गेल्या. रात्रीपासून त्यांचा शोध घेतल्या जात आहे. पालकमंत्री संजय राठोड यांना घटनेची माहिती मिळतात त्यांनी प्रशासनाला ताबडतोब मदत कार्य सुरू करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
0
0
Report

उद्धव ठाकरे ने अभिजीत दिपके को मातोश्री बुलाया, शादी पर मजाक चर्चा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्लीतील विद्यार्थी आंदोलन यशस्वी करून संभाजीनगरमध्ये परतलेले काँक्रोच जनता पार्टीचे अभिजित दिपके यांना उद्धव ठाकरे यांनी 'मातोश्री'वर येण्याचे निमंत्रण दिले आहे. उबाठाचे नेते, माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी दिपके यांची रात्री भेट घेतली. या भेटीदरम्यान पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी खैरे यांच्या मोबाइलवरून दिपके यांच्याशी संवाद साधला. उद्धव ठाकरे यांनी दिपके यांच्या आई-वडिलांशीही संवाद साधला आणि गमतीने अभिजित यांना 'आता लग्न करून टाका,' असा सल्लाही दिला असल्याची चर्चा आहे...
0
0
Report
Advertisement

रोहा-कोलाड मार्ग पर गटर स्लैब गिरा, वाहन क्षति; नगरपालिका पर सवाल

Chendhare, Maharashtra:रोहा-कोलाड मार्गावरील दमखाडी नाका परिसरात गटरावरिल काँक्रीट स्लॅब गुरुवारी रात्री सुमारे ८ वाजण्याच्या सुमारास अचानक कोसळला. या दुर्घटनेत तेथे उभ्या मोटारसायकल आणि रिक्षांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर नागरिकांनी रोहा नगरपालिकेच्या ढिसाळ आणि निष्काळजी कारभारावर तीव्र संताप व्यक्त केला. शहरातील गटरांवरील स्लॅबची नियमित तपासणी व दुरुस्ती न केल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केलाय. या घटनेची चौकशी करून जबाबदार व्यक्तींवर कारवाई करावी, नुकसानग्रस्त वाहनधारकांना भरपाई द्यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
0
0
Report

गडचिरोली में 24 घंटे में हुई तेज बारिश ने 25 प्रमुख मार्ग रोक दिए, प्रशासन अलर्ट

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत पावसाचा विश्रांती मात्र 24 तास पडलेल्या पावसाने २५ प्रमुख मार्ग वाहतुकीसाठी बंद, प्रशासनाचा सतर्कतेचा इशारा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला आढावा अँकर: गडचिरोली जिल्ह्यात सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सध्या पावसाने विश्रांती घेतली आहे . मात्र 24 तास पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील अनेक नदी-नाले दुथडी भरून वाहत असून २५ प्रमुख रस्ते आणि राष्ट्रीय महामार्ग वाहतुकासाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला असून प्रशासनाने नागरिकांना विनाकारण प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. आलापल्ली–सिरोंचा राष्ट्रीय महामार्गावरील मोसम नाला, आष्टी–आलापल्ली मार्गावरील दिना नदी, तसेच कुरखेडा, एटापल्ली, धानोरा, सिरोंचा, मुलचेरा, अहेरी, गडचिरोली, चामोर्शी, आरमोरी, देसाईगंज आणि भामरागड तालुक्यांतील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. अनेक गावांचा संपर्क तात्पुरता तुटला आहे. प्रशासनाने संबंधित ठिकाणी सतर्कता बाळगण्याच्या सूचना दिल्या असून, नागरिकांनी पूर आलेले रस्ते, पूल किंवा नदी-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे. तसेच परिस्थितीवर महसूल, पोलीस आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. भामरागडमधील 700 नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करण्यात आल्याची माहिती जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी दिली आहे. पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जिल्हा प्रशासनाशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून परिस्थितीचा सविस्तर आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी जिल्ह्यातील पावसाची स्थिती, पूरग्रस्त भागातील उपाययोजना आणि प्रशासनाकडून सुरू असलेल्या बचाव कार्याची माहिती मुख्यमंत्र्यांना दिली. 24 तासांत गडचिरोली जिल्ह्यात सरासरी 123 मिमी पावसाची नोंद झाली असून काही भागांत 200 मिमीपर्यंत अतिवृष्टी झाली आहे. छत्तीसगड राज्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भामरागड तालुक्यातील नद्यांच्या पाणीपातळीत मोठी वाढ होऊन पूरस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यात राज्य आपत्ती प्रतिसाद दल (एसडीआरएफ) तैनात असून जिल्हा प्रशासन, पोलीस विभाग आणि संबंधित यंत्रणा परस्पर समन्वयातून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे निर्देश देत बचाव व मदतकार्य प्रभावीपणे सुरू ठेवण्यास सांगितले.
0
0
Report

गडचिरोली में भारी बारिश: कार पानी में बह गई, पेड़ से अड़कर बची जान

Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील रेंगेवाही नाल्यावर वन अधिकाऱ्यांची कार पाण्यात वाहून गेली, झाडाला अडकल्याने जीव वाचला. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूराच्या पाण्याचा अंदाज चुकला. अश्टी–मुलचेरा मार्गावरील रेंगेवाही नाल्यावर पूराच्या पाण्यातून कार घेऊन जाण्याचा प्रयत्न वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याला महागात पडला. प्रचंड प्रवाहात कार वाहून गेली; परंतु झाडाला अडकल्याने मोठी दुर्घटना टळली. कारचा ताबा सुटला आणि ती प्रवाहात वाहून गेली. दूर अंतरावर कार एका झाडाला अडकल्याने कारमधील व्यक्तींचे प्राण थोडक्यात बचावले. घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस, महसूल विभाग आणि वन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने बचावकार्य राबवून कारमधील सर्व व्यक्तींना सुखरूप बाहेर काढण्यात आले. पूर आलेले रस्ते, पूल आणि नदी-नाले ओलांडण्याचा प्रयत्न करू नये, असे प्रशासनाने केले आहे. सध्या पाऊस थांबला असला तरी जिल्ह्यात सतर्कतेचा इशारा कायम आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top