445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी में मासेमारी बंदी 15 अगस्त तक, 2030 तक 30–70 हजार नौकरियाँ
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..नितेश राणे.. मासेमारी और सागरी सुरक्षा. मासेमारी बंदीचा कालावधी... स्थानिक मच्छीमारांच्या आर्थिक फायद्यासाठी व सागरी जीवांच्या प्रजननासाठी मासेमारीची बंदी १५ ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली होती.. नवीन हंगाम.. मासेमारीचा नवीन हंगाम १६ ऑगस्टपासून अधिकृतपणे सुरू होत आहे. मच्छीमारांचे हक्क.. राज्यातील मच्छीमारांच्या अधिकारांचे आणि रोजगाराचे पूर्ण संरक्षण केले जाईल; कोणाचाही हक्क हिरावून घेऊ दिला जाणार नाही. बंदर विकास (पंतप्रधान प्रकल्प).. कोणत्याही पोर्ट/बंदर प्रकल्पाची अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक असलेली सर्व राजकीय ताकद आणि इच्छाशक्ती सरकारकडे आहे.. रोजगार उद्दिष्ट (२०३०).. २०३० पर्यंत जहाज बांधणी (Shipbuilding) क्षेत्रातून सुमारे ३०,००० ते ७०,००० नवीन नोकऱ्यांची निर्मिती करण्याचे लक्ष्य निश्चित केले आहे. सुरक्षा व ओळखपत्र अनिवार्य.. सागरी क्षेत्रात काम करणारा प्रत्येक खलाशी भारतीय असणे बंधनकारक आहे. त्याच्याकडे वैध आधार कार्ड आणि मतदार यादीत नाव असणे अनिवार्य आहे. किनारपट्टी सुरक्षा.. संपूर्ण महाराष्ट्र किनारपट्टी "जिहाद मुक्त" आणि सुरक्षित ठेवण्यावर सरकारचा भर असेल. पायाभूत सुविधा व राजकीय मुद्दे.. मुंबई-गोवा महामार्ग.. महामार्गाचे काम आता केवळ ५% शिल्लक असून हे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. मराठा आरक्षण.. महायुती (देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील) सरकार मराठा समाजाला टिकणारे आरक्षण देण्यास कटिबद्ध आहे.. हिंदू समाज संरक्षण.. हिंदू समाजाला ताकद देण्यासाठी आणि त्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी सरकार सर्व आवश्यक निर्णय घेत आहे. मुंब्रा नाव बदल.. 'मुंब्रा' या क्षेत्राचे नाव बदलून लवकरच 'मुंब्रा देवी' केले जाईल. काँग्रेसवर टीका.. पृथ्वीराज चव्हाण हे स्वतः मुख्यमंत्री असताना त्यांनी काँग्रेस पक्षाची दुरवस्था केली होती, ज्यामुळे काँग्रेस आज विरोधी पक्षात आहे. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करू नये. संजय राऊत व विरोधकांवर निशाणा.. शिवसेना आणि निवडणूक आयोग.. संजय राऊत यांनी पक्षाबाबत केलेल्या दाव्यांवर टीका करताना, "निवडणूक आयोगाच्या कार्यालयात राऊत काय चहा पाजायला उपस्थित होते का?" असा सवाल उपस्थित केला. अर्बन नक्षलवाद.. हिंदू संस्थांना बदनाम करून तुष्टीकरणाला खतपाणी घालणाऱ्या विचारसरणीमध्ये 'अर्बन नक्षलवादी' मानसिकतेचे लोक सक्रिय आहेत आणि त्यात संजय राऊत यांचा समावेश असू शकतो..0
0
Report
नाशिक: Ring Road-affected farmers stage self-immolation protest at Collectorate
Nashik, Maharashtra:- रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलन - स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रिंग रोडबाधित शेतकऱ्यांचे आंदोलन - नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मक्लेश आंदोलनाला सुरुवात - काही दिवसांपूर्वी याच शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते - कुंभमेळामंत्री गिरीश महाजन यांच्या मध्यस्थीनंतर आमरण उपोषण मागे घेण्यात आले होते - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत चर्चेचे आश्वासन मात्र अद्याप चर्चा नाही - कुंभमेळा मंत्र्यांनी शब्द न पाळल्याचा आंदोलकांचा आरोप - जिल्हा प्रशासनाकडूनही योग्य कारवाई होत नसल्याचा शेतकऱ्यांचा आरोप - आंदोलनादरम्यान गिरीश महाजन आणि जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्यावर आंदोलकांची जहरी टीका - मागणी मान्य झाली नाही तर सर्व बाधित शेतकरी थेट मुख्यमंत्र्यांच्या वर्षा या बंगल्यावर जाऊन करणार आंदोलन आंदोलनाचा आढावा घेत आंदोलकांशी बातचीत केली आमच्या प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
यवतमाळ में स्वतंत्रता दिवस पर ध्वजारोहण और जल-संरक्षण के साथ किसानों को राहत की घोषणाएं
Yavatmal, Maharashtra:भारताच्या 80 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालयात मृदू व जलसंधारणमंत्री तथा पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते मुख्य ध्वजारोहणाचा सोहळा पार पडला. यावेळी जिल्हाधिकारी विकास मीना, प्रभारी मुख्यकार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांच्यासह अधिकारी कर्मचारी, स्वातंत्र्य सेनानी उपस्थित होते. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनिय कामगिरी केलेल्या अधिकारी, कर्मचारी, युवा यांचा सन्मान करण्यात आला. तसेच जलसंवर्धन अभियानाअंतर्गत जलसंवर्धनाची शपथ घेण्यात आली. यवतमाळ जिल्ह्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके विक्री करणाऱ्यांवर कारवाया केल्या गेल्या. आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांना आर्थिक उभारी देण्याचं काम शासन करीत आहेत. 82 हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांना कर्जमाफी ची रक्कम वाटप करण्यात आली आहे. अल निनो चे सावट असल्याने पाणी वापराबाबत नियोजन प्रशासनाने केले आहे. तसेच पिक विमा लाभ मिळण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठपुरावा सुरू असल्याची माहिती पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली.0
0
Report
Advertisement
भोंदू बाबा मनोहर मामा भोसले के अघोरी प्रथाओं से ठगी, 25 आरोपी, 10 गिरफ्तार
Pandharpur, Maharashtra:भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या अनिष्ट व अघोरी प्रथा आणि जादूटोणा कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशांची विल्हेवाट लावण्यात पुणे जिल्ह्यातील भिगवन मधील प्रसिद्ध शिक्षण संस्था चालकाचा सहभाग निष्पन्न ,रामदास झोळ आणि त्याचे साथीदार यांचा सहभाग सोलापूर गुन्हे शाखेनं निष्पन्न केला आहे. सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी पोलीस स्टेशन सह भोंदू बाबा मनोहर मामा भोसले यांच्या विरोधात तब्बल सहा गुन्हे दाख्ल आहेत. याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांनी एक विशेष एसआयटी स्थापन केली. यामध्ये भोंदू मनोहर भोसले याला मदत करणारे तब्बल 25 आरोपींचा सहभाग आढळून आला आहे.यापैकी दहा जणांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे कुर्डूवाडी पोलिसात दाखल असलेल्या पुण्यातील प्रमुख आरोपी मनोहर मामा भोसले असून त्याने अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा, अशा अघोरी पुजेच्या माध्यमातून अनेक पिडीतांची फसवणूक करुन त्या कृत्यातून मिळालेल्या अवैध पैशाची विल्हेवाट लावण्याकरीता दत्तकला इनस्टिटयूट (शिक्षण संस्था), स्वामी चिंचोली, दौंड पुणे चे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचे मार्फतीने त्याची विल्हेवाट लावत असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने, त्यांना सदर गुन्हयात आरोपी करण्यात आले आहे. तसेच त्यांचेबरोबर त्यांच्या इनस्टिटयूट (शिक्षण संस्था) मध्ये त्यांना मदत करणारे, त्यांचे इतर साथिदार यांना देखील गुन्हयात आरोपी करुन त्यापैकी राजेंद्र गोकुळ हुंबे, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे यांना अटक करण्यात आली आहे. याचा तपास गुन्हे शाखेकडील पोलीस उपनिरीक्षक राहुल गरड हे करत आहेत0
0
Report
भागवत नागपुर में युवाओं से बोलते: भारत का विश्वगुरु बनने का मार्ग
Nagpur, Maharashtra:नागपुर: नागपुरात आज सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ‘जेन-झी’शी संवाद साधणार आहे. कस्तुरचंद पार्कवर एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात ते नव्या पिढीतील विद्यार्थ्यांसह तरुणांशी संवाद साधणार आहेत. तत्पूर्वी ते ध्वजारोहण करतील आणि त्यानंतर मुख्य व्यासपीठावर येतील. यावेळी सरसंघचालकानी केलेले भाषण मार्गदर्शन. नागपूर - डॉ मोहन भागवत,सरसंघचालक,भाषण. भारताला जेव्हा स्वातंत्र्य मिळाला त्यावेळी लोक बोलायचे की हे स्वातंत्र्य टिकणार नाही पण स्वातंत्र्य टिकलं. प्रसंग सगळेांशी संवादाचा आहे पण मला तरुणांशी संवाद साधायला सांगितलं. प्रसंग सर्वांसोबत संवादाचा आहे मात्र तरुण हे डेमोक्रॅटिक आहे, त्याचा योग्य लाभ झाला तर आपण विश्वगुरू बनणार आणि नाही झाला तर पुढे खूप बोजा येईल. तीस वर्षांनंतर आजची पिढी जुनी पिढी बनेल, आजच्या पिढीला पुढच्या पिढी बद्दल विचार करणे आवश्यक आहे. आपली तुलना इतर लोकांशी करू नये, आपण अमेरिका चीन ऑस्ट्रेलिया न्यूझीलंड नाही, हे तरुणांनी समजायला पाहिजे की आम्ही भारत आहोत. उन्नतीचे जे निकष पाहिजे त्यासाठी आपल्याला आपला आणि आपल्या देशाचा विचार करावा लागेल, इतर केवळ त्यांच्या भौतिक उन्नतीचा विचार करतात मात्र भारतात आपण भौतिक उन्नतीचा विचार करत नाही. संतुलन ठीक करून पुढील मार्ग दाखवणे हे भारताच्या प्रती आपलं दायित्व आहे यासाठी आपल्याला तयार व्हायचं आहे. रोजगार केवळ नोकरी होत नाही; हाताने काम करणाऱ्याला ही प्रतिष्ठा पाहिजे, उद्दमिता यालाही प्रतिष्ठा पाहिजे. अधिक साधन संपन्न देश नोकरीचा विचार करू शकतात, मात्र भारतासारखे विशाल जनसंख्या असलेला आपल्या देशाला वेगळा विचार करावा लागेल. प्राण गेले तरी चालेल असा विचार करणारे तरुण असतात, कारण वरिष्ठ किंवा ज्येष्ठ नागरिक हे हिम्मत करू शकत नाही तरुणांमध्ये ही हिंमत असते. जग ज्याला अविचार म्हणते तेच साहस पुढे कामात येणार; एकट्याचा भाग्य नाही बनत आपल्याला देशाचं भाग्य बनवायचं आहे. जगात प्रतिष्ठा पाहिजे असेल तर जेव्हा पर्यंत आपला देश, समाज प्रतिष्ठित नहीं, तोपर्यंत ते मिळणार नाही. आम्ही तेव्हा वैभव संपन्न आहोत जेव्हा भारत वैभव संपन्न आहे.0
0
Report
GEN Z को मार्गदर्शन देकर युवाओं के साथ संवाद का क्रम जारी रहा
Nagpur, Maharashtra:सरसंघचालक ने GEN Z को मार्गदर्शन किया। इसके बाद वहां मौजूद GEN Z युवाओं से संवाद किया गया, उनकी प्रक्रियाओं को हमारे प्रतिनिधियों ने लिया.0
0
Report
Advertisement
अगस्त की छुट्टियों में शिर्डी में भक्तों की भारी भीड़
Shirdi, Maharashtra:सलग सुट्टयांमुळे शिर्डीत भाविकांची अलोट गर्दी झाली आहे.. साईनामाचा जयघोष करत भाविक साईचरणी नतमस्तक होण्यासाठी शिर्डीत दाखल झालेत.. आज 15 ऑगस्ट आणि उद्या रविवार अशी सलग सुट्टी असल्याने पर्यटन स्थळांसोबत धार्मिक तिर्थस्थळे हाऊसफुल्ल झाल्याचं चित्र आहे.. साई मंदिराच्या दर्शन रांगांसह शिर्डीतील रस्ते भाविकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत.. सलग दोन दिवस शिर्डीत गर्दीचा ओघ असाच कायम राहणार आहे.. साई मंदिरातून गर्दीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
नागपुर में बनावट देशी-विदेशी शराब बनाने वाले कारखाने पर आबकारी विभाग की बड़ी कार्रवाई
Nagpur, Maharashtra:नागपुर - *नागपुरातील काटोल तालुक्यातील चिखलागढ शिवारात बनावट दारू निर्मितीचा कारखान्यावर राज्य उत्पादन्न शुल्क विभागाची मोठी कारवाई* - *शेतातील घरावर छापा टाकून देशी-विदेशी बनावट दारू आणि निर्मितीसाठी लागणारं साहित्य असा ५४ लाख ८१ हजार ७० रुपयांचा मुद्देमाल जप्त* - रॉकेट संत्रा आणि टँगो पंच देशी दारूचे ३६০ बॉक्स, रॉयल स्टॅगच्या ४०८ बाटल्या जप्त - बनावट दारू तयार करण्यासाठी लागणारे स्पिरीट, ब्लेंड आणि इतर साहित्यही जप्त केले.. - दारू आणि साहित्याच्या वाहतुकीसाठी वापरली जाणारी बोलेरो पिकअप आणि ह्युंदाई आय-२० कार जप्त - कारवाईप्रकरणी चार आरोपीं विरोधात महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार गुन्हा दाखल - चिखलागढ येथील शेतातील घरात बनावट देशी-विदेशी दारू तयार करून तिची विक्री आणि वाहतूक केली जा असल्याचा माहिती मिळाली होती... - आता या रॅकेटचा मुख्य सूत्रधार कोण? आर्थिक पाठबळ कुणाचं? साहित्य कुठून येत होतं? याचा तपास सुरू... - तयार दारूची विक्री आणि वितरण कोणत्या नेटवर्कच्या माध्यमातून होत होतं, याची सखोल चौकशी करण्याची मागणी - केवळ कारखाना चालवणाऱ्यांवर कारवाई न करता संपूर्ण नेटवर्क आणि मुख्य सूत्रधारापर्यंत पोहोचण्याचं आव्हान राज्य उत्पादन शुल्क विभागासमोर आहे...0
0
Report
स्वतंत्रता के पथ पर विराट संकल्प: भारत विश्वगुरु बनेगा
Nagpur, Maharashtra:नागपूर सरसंघचालक मोहन भागवत, (संघ मुख्यालयात ध्वजारोहण केल्यानंतर केलेले मार्गदर्शन ) - स्वातंत्र्य दिन हा आपल्या सर्वांसाठी अभिमानाचा आणि उत्सवाचा विषय आहे. १८५७ पासून जवळपास ९० वर्षे अनेक प्रकारचा त्याग आणि बलिदान देऊन आपल्या पूर्वजांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. त्या त्याग आणि बलिदानाचा गौरव आपल्या मनात आहे आणि त्या संघर्षाची यशस्वी सांगता झाल्याचा आनंदही आपल्या मनात आहे. - मात्र, त्यासोबतच आपल्याला आणखी एका गोष्टीचे भान असणे आवश्यक आहे. एवढे परिश्रम करून, एवढा त्याग आणि बलिदान देऊन मिळालेले हे स्वातंत्र्य कायम टिकवणे आणि त्याचा योग्य परिणाम देशात घडवून आणणे हीसुद्धा आपली जबाबदारी आहे. - सावरकरांनी म्हटले आहे....स्वातंत्र्याचा परिणाम म्हणून जे काही उत्तम, उदात्त, उन्नत, महान आणि मधुर आहे. ते सर्व आपल्या देशात अवतरले पाहिजे. ही आवश्यकता पूर्ण करण्याची जबाबदारीही आपलीच आहे. - आपण आपल्या तिरंग्याचे ध्वजारोहण करतो. त्यातील तीन रंगांकडे पाहिल्यावर आपल्याला हाच संदेश मिळतो. - केशरी रंग हा कर्मशीलता, ज्ञान आणि त्यागाचे प्रतीक आहे. ज्या प्रकारच्या परिश्रमातून एखाद्या राष्ट्राला स्वातंत्र्य मिळते आणि स्वातंत्र्यानंतर ते राष्ट्र उत्कर्ष, वैभव आणि सामर्थ्याने संपन्न व सुरक्षित बनते, त्या त्याग आणि बलिदानाची आठवण करून देणारा हा केशरी रंग आहे. - आपल्या जीवनात त्याग, बलिदान, कर्मशीलता आणि ज्ञान असेल, तर समाजात शांतता निर्माण होते. पांढरा रंग आपल्याला शांती आणि पवित्रतेचा संदेश देतो. आपण जे तप करीत आहोत ते योग्य दिशेने सुरू आहे की नाही, याची परीक्षा घेत राहण्याची प्रेरणा हा रंग देतो. आणि या सर्वांचा परिणाम म्हणजे समृद्धी. त्याचे प्रतीक म्हणून आपल्या तिरंग्यात हिरवा रंग आहे. - या सर्व गोष्टी करताना आपण व्यक्ती म्हणून वेगवेगळे असलो, तर आपले विचारही वेगवेगळे असतील. मात्र ही विविधता हीच एकतेची अभिव्यक्ती आहे. - धर्मचक्राच्या अनेक आऱ्यांप्रमाणे आपण वेगवेगळ्या दिशेने जात असलो, तरी हे सर्व आरेएका धर्माच्या, एका शिस्तीच्या मर्यादेत ठेवण्यात आले आहेत. - समाज योग्य पद्धतीने चालण्यासाठी ज्या अनुशासनाचे पालन करणे आवश्यक आहे, - राष्ट्रध्वजाचे ध्वजारोहण करताना या सर्व प्रतीकांमागे असलेल्या विचारांचे आपण चिंतन केले पाहिजे. त्या चिंतनातून मिळणारे सार आपल्या जीवनात उतरवणे अत्यंत आवश्यक आहे. - कारण आपले राष्ट्र स्वतंत्र झाले आहे आणि ते स्वतंत्रच राहील, ही गोष्ट निश्चित आहे. मात्र या राष्ट्राला सुखी, संपन्न आणि सुरक्षित बनवायचे आहे. जगामध्ये आपले निश्चित आणि महत्त्वपूर्ण योगदान देणारे राष्ट्र बनवायचे आहे. - आपल्या मार्गात अनेक आव्हाने आहेत. आपल्या विचारांशी आणि तत्त्वांशी तडजोड न करता संपूर्ण जगामध्ये या आव्हानांचा सामना करून भारताला विश्वगुरू राष्ट्र बनवायचे आहे. संपूर्ण मानवतेच्या जीवनात सार्थक योगदान देणारा देश म्हणून भारताला उभे करायचे आहे. - हे कर्तव्य आज आपल्या सर्वांसमोर आहे. याचे आपण चिंतन करूया आणि आजचा हा संदेश घेऊन येथून पुढे जाऊया.0
0
Report
Advertisement
FDA ने महाप्रसाद आयोजनों के लिए अनिवार्य परमिट और सुरक्षा नियम जारी किए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:श्रावण महिन्यात मंदिरे, सार्वजनिक मंडळे आणि भाविकांकडून ठिकठिकाणी महाप्रसाद व मोफत अन्नदानाचा उपक्रम राबवला जातो. मात्र, अस्वच्छतेमुळे अन्नातून विषबाधेचे प्रकार घडू नयेत, यासाठी अन्न व औषध प्रशासन (एफडीए) आता अॅक्शन मोडवर आले आहे. भाविकांच्या आरोग्याच्या सुरक्षेसाठी महाप्रसाद आयोजकांना एफडीएचा परवाना अनिवार्य करण्यात आला आहे, स्वयंपाक आणि पिण्यासाठी केवळ स्वच्छ किंवा आरओ पाण्याचाच वापर करावा. अन्न बनवणाऱ्या व वाढणाऱ्या स्वयंसेवकांना मास्क, हँडग्लोव्हज आणि हेड कॅप वापरणे अनिवार्य आहे. प्रसाद जास्त वेळ उघड्यावर ठेवू नये. शिळे अन्न वाटल्यास कठोर कारवाई केली जाईल. अन्न साठवण्यासाठी आणि वाटपासाठी केवळ स्टेनलेस स्टील किंवा सुरक्षित भांड्यांचाच वापर करावा, असेही नियमावलीत नमूद आहे.0
0
Report
ठाणे महापालिका स्कूलों में हर घर तिरंगा से देशभक्ति उपक्रम
Thane, Maharashtra:हर घर तिरंगा अभियानांतर्गत मनपा शाळांमध्ये देशभक्तीपर उपक्रम स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर ठाणे महापालिका शाळांमध्ये ‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत विविध देशभक्तीपर उपक्रम घेण्यात आले. विद्यार्थ्यांनी तिरंगा रॅली, चित्रकला, रांगोळी आणि निबंध स्पर्धांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतला. पातलीपाडा, दिवा, गायमुख आणि इतर मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांनी तिरंगा व देशभक्तीवर आधारित कलाकृती साकारल्या. तसेच घोषणाबाजी करत रॅली काढून परिसरात देशभक्तीचे वातावरण निर्माण केले. या उपक्रमांमधून विद्यार्थ्यांनी राष्ट्रध्वजाबद्दलचा आदर आणि देशप्रेमाचा संदेश दिला.0
0
Report
मुंबई में पांच फर्जी डॉक्टर गिरफ्तार, 1.19 लाख का चिकित्सा सामान जब्त
Mumbai, Maharashtra:मुंबईत पाच बोगस डॉक्टरांवर गुन्हे शाखेची कारवाई; १ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त मुंबईत वैद्यकीय पदवी आणि परवाना नसतानाही नागरिकांवर उपचार करणाऱ्या पाच बोगस डॉक्टरांवर मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. गुन्हे शाखेच्या कक्ष ६ आणि कक्ष ८ ला मिळालेल्या विश्वसनीय माहितीनंतर देवनारच्या झाकिर हुसेन नगर परिसरातील चार आणि बांद्रा पूर्वेतील नौपाडा परिसरातील एका क्लिनिकवर छापे टाकण्यात आले. या कारवाहीदरम्यान सगीर अहमद हाशमी, अखिलेश कुमार दुबे, मेहमुद आलम शेख, केशव प्रसाद पटेल आणि मोहम्मद आफताब खान हे पाच जण रुग्णांवर उपचार करताना आढळून आले. विशेष म्हणजे, या व्यक्तींकडे कोणतीही अधिकृत वैद्यकीय पदवी किंवा वैद्यकीय परवाना नसतानाही डॉक्टर असल्याचे भासवून विविध आजारांवर औषधोपचार केले जात असल्याचे समोर आले. पोलिसांनी त्यांच्या ताब्यातून इंजेक्शन, औषधांच्या बाटल्या, सिरिंज, अँटीबायोटिक गोळ्या आणि इतर वैद्यकीय साहित्य असा एकूण १ लाख १९ हजार ३२४ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी देवनार आणि निर्मल नगर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ६ आणि ८ च्या पथकाने महापालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत ही कारवाई केली असून, बोगस डॉक्टरांविरोधात पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
पालघर में आश्रमशाला के विद्यार्थिनी सुरक्षा पर सवाल: रातभर छह किलोमीटर पैदल यात्रा
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यात विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. जव्हार तालुक्यातील देहरे आश्रमशाळेतील विद्यार्थिनींना शाळा सुटल्यानंतर बस उपलब्ध न झाल्याने रात्रीच्या अंधारात तब्बल सहा किलोमीटर पायी प्रवास करावा लागला. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे, नुकत्याच आश्रमशाळेतील एका विद्यार्थिनीचा सर्पदंशामुळे मृत्यू झाल्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्या सुरक्षाव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. या घटनेची जिल्हाधिकारी इंदूराणी जाखड यांनी गंभीर दखल घेतली आहे. एसटी अर्थात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या अधिकाऱ्यांना या प्रकरणाची चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच हलगर्जीपणा करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या प्रकारावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे माजी आमदार सुनील भुसारा यांनी प्रशासनावर जोरदार टीका केली आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेबाबत प्रशासनाने गांभीर्याने उपाययोजना करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, विक्रमगडचे विद्यमान भाजपा आमदार हरिश्चंद्र भोये यांनी विद्यार्थिनींसाठी मानव विकास बससेवेची मागणी यापूर्वीच करण्यात आली असल्याचे सांगितले. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना पत्र देऊन याबाबत सातत्याने पाठपुरावा करण्यात आला होता. त्यानंतर बससेवाही सुरू झाली आहे.मात्र चालक किंवा डेपो व्यवस्थापनाच्या हलगर्जीपणामुळे हा प्रकार घडला असल्यास संबंधितांवर तातडीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात येतील, असे आमदार भोये यांनी स्पष्ट केले. मात्र, बससेवा सुरू असतानाही विद्यार्थिनींना रात्रीच्या अंधारात सहा किलोमीटर पायी जाण्याची वेळ का आली? विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी नेमकी कोणाची? आणि अशी घटना पुन्हा घडू नये यासाठी कायमस्वरूपी सुरक्षित वाहतूक व्यवस्था कधी निर्माण होणार? हे प्रश्न आता पालकांकडून उपस्थित केले जात आहेत.0
0
Report
नाशिक के गड्ढे मौत बनते, सातवीं मौत के बाद प्रशासन से मांगें तेज
Nashik, Maharashtra:नाशिक शहर की सड़कों पर गड्ढे मौत बनते जा रहे हैं। सातपूर क्षेत्र में सड़क पार करते समय गड्ढा चुकाने के प्रयास में बाइक सवार दिलीप काळे को भिड़ंत हो गई और वे गंभीर रूप से घायल हो गए थे। 25 दिनों तक उपचार के बाद उनका निधन हो गया। परिवार ने महापालिका प्रशासन पर आरोप लगाते हुए आर्थिक सहायता और परिवार में से एक व्यक्ति को महापालिका में नौकरी देने की मांग की है। स्थानीय नगरसेवकों ने आयुक्त और महापौर को पत्र लिखकर सहायता की मांग की। महापालिका ने कहा है कि लगभग 15 हजार गड्ढे भरे गए हैं, पर गड्ढों ने मौत का यह सिलसिला बढ़ा दिया है। दिलीप के परिवार ने कहा कि घर की आय भाजी के व्यवसाय पर निर्भर है; अब परिवार आर्थिक संकट में है।0
0
Report
Sawantwadi Assembly sees major chaos over health issue as parties clash
Oras Bk., Maharashtra:अँकर सावंतवाडीच्या आमसभेत आज आरोग्याच्या प्रश्नावरून प्रचंड गोंधळ झाला. सावंतवाडीत आरोग्याचा प्रश्न गंभीर असून यासंदर्भात भीक मागो आंदोलन करण्यासाठी मंजूर द्यावी अशा पद्धतीची मागणी सावंतवाडीतील एका नागरिकाने केली. यावरून हा शब्द मागे घ्यावा अशी मागणी शिंदेच्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी केली. या मुद्द्यावरून भाजप आणि शिंदेंचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेले. याावेळी सभागृहात प्रचंड गोंधळ झाला. दीपक केसरकर यांनी मध्यस्थी करून हा वाद मिटवला मात्र काल दोडामार्गमध्ये झालेला राडा आणि आज भाजप आणि शिंदे सेनेचे कार्यकर्ते एकमेकांच्या अंगावर धावून गेल्याने आजचीही आमसभा वादळी ठरली.0
0
Report
Advertisement
