445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में RSS कार्यालय के विरोधी आंदोलन के आयोजकों की गिरफ्तारी
Pune, Maharashtra:पुणे ब्रेक आरएसएसच्या कार्यालयावर आंदोलनासाठी निधालेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय हे पुणे युवकचे कार्यकर्ता मनुस्मृतिविरोधात आरएसएसच्या मोती बाग कार्यालयाकडे आंदोलन करण्यासाठी निघाले असता पोलिसांनी त्यांना शनिवार पेठ चौकीसमोरच पकडलं आणि जाळीच्या गाडीतून पोलीस स्टेशन ला नेलंय. विशेष म्हणजे आज सीएम पुणे दौऱ्यावर असताना युवक कांग्रेस नं हे आक्रमक आंदोलन केलंय0
0
Report
दौंड से मुंबई तक ओबीसी आरक्षण एल्गार मोर्चा, सरकार पर निशाना
Rui, Maharashtra:लक्ष्मण हाके उद्या सकाळी दहा वाजता मुंबईच्या दिशेने निघणार... नालायक सरकारने आमच आरक्षण घालवलं : लक्ष्मण हाके यांचा सरकारवर घणाघात... परवानगी मिळू अगर ना मिळो लोकशाहीने आम्हाला अधिकार दिलाय : लक्ष्मण हाके... सरकारकडून परवानगीची अपेक्षा नाही : लक्ष्मण हाके... हे सरकार ओबीसींना पायदळी पुरवण्याचा प्रयत्न करतय... सरकारचा अगर कोणत्याही आमदाराचा अद्याप पर्यंत संपर्क नाही : लक्ष्मण हाके... नालायकांना सत्त्यावरून खाली खेचून हाच ओबीसींचा यापुढे अजेंडा : लक्ष्मण हाके... मनोज जरांगे पाटलांना शासन भिलं आहे...0
0
Report
अमित ठाकरे पुणे के कॉलेज कैंपसों में विद्यार्थियों की समस्याओं पर चर्चा, शाखाओं के उद्घाटन
Pune, Maharashtra:पुणे सरकारी पॉलिटेक्निक कॉलेज में अमित ठाकरे पुणे के आठ-नौ कॉलेज कैंपसों में दौरे कर रहे हैं। आज पूरे दिन वे पुणे के कॉलेज कैंपसों में मुलाकात करेंगे और विद्यार्थियों की समस्याओं को जानेंगे। साथ ही कुछ जगहों पर मनविसे शाखाओं के उद्घाटन भी करेंगे।0
0
Report
Advertisement
भीमा नदी पर मछुआरों का उग्र आंदोलन, पानी के मुद्दे पर दखल की मांग
Rui, Maharashtra:मच्छीमारांच्या आंदोलनाचे तीव्र रूप धारण... शेकडो आंदोलक भीमा नदीत जलसमाधी आंदोलन ...महिला आंदोलकांचा मोठा सहभाग. उजनी धरणातील स्थानिक मच्छीमारांच्या आंदोलनाने आता उग्र रूप धारण केले असून शेकडो आंदोलन जलसमाधी आंदोलन करीत आहे शासनाने जो पर्यन्त दखल घेत नाही तोपर्यंत पाण्याबाहेर घेणार नाही असा इशारा आंदोलकांनी दिला आहे पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील भीमा नदीकाठी पळसदेव गावात शेकडो मच्छीमार आंदोलन भीमा नदी पात्रात उतरले आहे याचा आढावा घेतला है0
0
Report
अण्णा हजारे की तबीयत बिगड़ी, मुंबई के बॉम्बे अस्पताल में भर्ती
Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची तब्येत बिघडली असून त्यांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आल आहे... अण्णा हजारे यांना तीन-चार दिवसांपासून त्रास होत आहे व्यवस्थित जेवणही जात नव्हतं आज प्रकृती जास्त अस्वस्थ वाटत असल्याने त्यांना तपासणी करण्यासाठी मुंबई हलवण्यात आलं आहे स्थानिक डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर डिहायडरेशन चा त्रास असल्याचं सांगितलं आहे अण्णा हजारे यांची प्रकृती जास्त बिघडू नये याची खबरदारी घेत राळेगण येथील कार्यकर्त्यांनी अण्णांना मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटल येथे तपासणी करण्यासाठी दाखल केलं आहे0
0
Report
कोदवली हार्डी वाड़ी के ग्रामवासियों ने किरण सामंत उपस्थिति में शिवसेना में प्रवेश किया
Ratnagiri, Maharashtra:राजापूर: कोदवलीतील हार्डी वरची वाडीतील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे. गावाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि स्थानिक समस्या सोडवण्यासाठी हा निर्णय झालेले ग्रामस्थांनी स्पष्ट केले. यावेळी आमदार किरण सामंत यांच्या उपस्थितीत रस्ते, पाणी आणि विजेसह सर्व मूलभूत प्रश्न मार्गी लावण्याची ग्वाही देत नवप्रवेशितांचे स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे परिसरात शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट झाली आहे.0
0
Report
Advertisement
मराठी विरोध के बीच रिक्षाचालकों के लिए मराठी अनिवार्यता स्थगित, भाजपा और सरकार पर हमला
Ratnagiri, Maharashtra:रिक्षाचालकांसाठी मराठीच्या सक्तीला स्थगिती; भास्कर जाधवांचा मुख्यमंत्री आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल.. मुख्यमंत्री मराठाद्वेष्टे आहेतच, पण आता मराठीद्वेष्टेही निघाले"; भास्कर जाधवांचा घणाघात.. भाजपच्या मागणीनंतर मराठी भाषेच्या निर्णयाला स्थगिती देणे म्हणजे दादागिरी – भास्कर जाधव.. प्रताप सरनाईक यांच्या भूमिकेचे समर्थन.. विरोधी पक्षात असलो तरी रिक्षा व्यावसायिकांनी मराठी बोललेच पाहिजे, या भूमिकेसाठी प्रताप सरनाईक यांचे आभार. त्यांनी मराठी शिकण्यासाठी व्यवस्था आणि मुदतही दिली होती.. भाजपवर निशाणा.. मराठी भाषेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर भाजपच्या रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्याने मागणी केली आणि मुख्यमंत्री महोदयांनी रिक्षाचालकांसाठीच्या मराठी सक्तीला वर्षभरासाठी स्थगिती दिली.. मायुथीमध्ये समन्वयाचा अभाव.. आघाडी किंवा युतीचे सरकार असताना मित्रपक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करणे गरजेचे असते; मात्र केवळ आपल्या पक्षाच्या पदाधिकाऱ्याच्या मागणीवरून निर्णय रद्द करणे ही 'दादागिरी' आहे.. मराठी भाषेबद्दल भाजपचा द्वेष.. त्रिभाषा सूत्राच्या वेळीही मराठीला बाजूला सारण्याचे काम फडणवीस सरकारच्या काळात झाले, तेव्हाही मुख्यमंत्री गप्प होते.. रिक्षाचालकांना केवळ प्राथमिक मराठीची गरज.. प्रवाशांशी बोलताना रिक्षाचालकांना फार मोठी भाषा बोलण्याची गरज नसते,केवळ भाडे आणि पत्ता समजण्यापुरते तीन-चार शब्द बोलावे लागतात; तरीही त्याला स्थगिती देण्यात आली.. मराठीद्वेष्टे सरकार.. या निर्णयामुळे राज्यातील मुख्यमंत्री व सत्ताधारी हे मराठी माणूस आणि मराठी भाषेचा द्वेष करणारे आहेत, हेच स्पष्ट होते..0
0
Report
उद्योगमंत्री के जनहित फैसले पर भास्कर जाधव ने उठाए सवाल
Ratnagiri, Maharashtra:उद्योगमंत्र्यांनी स्वतःच्या हितापेक्षा जनतेच्या हिताचे निर्णय घ्यावेत; बॉक्साईट प्रकल्पावरून भास्कर जाधवांचा सामंत बंधूंवर निशाणा.. दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही..सामंत बंधूंच्या निर्णयावर भास्कर जाधवांचा सवाल.. Pointer *स्थानिकांना विश्वासात घेणे गरजेचे..*रत्नागिरी जिल्ह्यात नवीन उद्योग आणताना स्थानिक जनतेला विश्वासात घेणे अत्यंत आवश्यक आहे.. *जनतेच्या गरजेनुसार काम करावे..* उद्योगमंत्र्यांनी लोकांची मानसिकता, मागण्या आणि त्यांच्या गरजा ओळखून उद्योगमंत्री म्हणून जबाबदारीने काम केले पाहिजे.. *सामंत बंधूंच्या निर्णयावर सवाल..* दोन भावांनी (उद्योगमंत्री उदय सामंत आणि किरण सामंत) घेतलेला निर्णय हा जनतेच्या हिताचा आहे की त्यांच्या स्वतःच्या फायद्याचा, हे स्पष्ट नाही.. *लोकहिताचा सल्ला..* जिल्ह्यातील प्रकल्पांबाबत कोणताही निर्णय घेताना तो स्वतःच्या हिताचा नसून केवळ जनहिताचाच असला पाहिजे..0
0
Report
कोल्हापुर के पारगाव में भ्रष्टाचार के खिलाफ ग्रामस्थों का जिल्हा परिषद के समक्ष प्रदर्शन
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातल्या हातकणंगले तालुक्यातील नवे पारगाव इथ विकास कामात झालेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आज ग्रामस्थांनी जिल्हा परिषदेसमोर बोंबाबोंब आंदोलन केल आहे. या भ्रष्टाचाराला जिल्हा परिषदेचे कार्यकारी अभियंता पाठीशी घालत असल्याचा आरोप ग्रामस्थानी केलाय. यावेळी आंदोलकांनी संबंधित ठेकेदाराने बनावट सह्या करून 14 लाख रुपये लाटत आर्थिक घोटाळा केला असल्याचा आरोप केला. यावेळी पारगाव ग्रामस्थांनी जोरदार बोंबाबोंबारत जिल्हा परिषდესचा आवार दणाणून सोडला. त्याचबरोबर बोगस पद्धतीने काम करून भ्रष्टाचार करणाऱ्या ठेकेदारावर फौजदारी गुन्हा दाखल करावा अशी मागणी ही ग्रामस्थांनी केली आहे।0
0
Report
Advertisement
कोल्हापुर गणेशोत्सव: डॉल्बी विवाद से प्रशासन बनाम मंडळ का टकराव संभव
Kolhapur, Maharashtra:पुण्यानंतर अब कोल्हापुरात गणेशोत्सवात डॉल्बीचा वाद पेटण्याची शक्यता आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन करून डॉल्बी किंवा ध्वनिप्रदूषण करणाऱ्या मंडळांना कारवाईचा इशारा कोल्हापूर पोलीस प्रशासनाने दिला आहे. पारंपरिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करा, मात्र प्रशासनाने अतिरेके करू नये, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी घेतली आहे. मंडळांच्या कार्यकर्त्यांनी मात्र डॉल्बीवर निर्बंध घालण्यास विरोध केलाय. पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही ‘डॉल्बी विरुद्ध प्रशासन’ असा संघर्ष पाहायला मिळण्याची शक्यता आहे. कोल्हापुरात गणेशोत्सव म्हटलं की जल्लोष, मिरवणूक आणि डॉल्बी. गणेशोत्सवाच्या या काळात डॉल्बीच्या आवाजावरून प्रशासन आणि गणेश मंडळांमध्ये संघर्षाची चिन्हं दिसू लागली आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचा उल्लंघन करणाऱ्या मंडळांची गय केली जाणार नाही, असा स्पष्ट इशारा कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक निलोत्पल यांनी दिलाय. प्रशासनाच्या भूमिकेमुळे गणेशोत्सव मंडळांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. डॉल्बी आणि लेसर लाइटसाठी अनेक मंडळांनी आधीच पैसे देऊन बुकिंग केलंय, आता डॉल्बी रद्द करायचा कसा असा प्रश्न मंडळांकडून विचारला जातोय. कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही डॉल्बीच्या अतिरेकावर चिंता व्यक्त केली आहे. गणेशोत्सव पारंपरिक पद्धतीने साजरा व्हावा; डॉल्बीसारख्या वाद्यांवर तरुणाई बेधुंद होताना काळजी वाटते; त्यामुळे डॉल्बी सारख्या साऊंड सिस्टिमला आपला विरोध अशी भूमिका मांडली आहे. परंतु प्रशासनानेही अतिरेक करू नये असे स्पष्ट केलेय. एकीकडे प्रशासनाची कायदा आणि नियमांची अंमलबजावीणी, दुसरीकडे मंडळांची परंपरा आणि जल्लोष कायम ठेवण्याची भूमिका. ध्वनी प्रदूषण कायद्यानुसार विविध क्षेत्रांमध्ये आवाजाची मर्यादा निश्चित केली गेली आहे; डॉल्बी लावताना या ध्वनीमर्यादेचे पालन होणार का याचं परीक्षण महत्त्वाचं ठरेल. नागरिक आणि पर्यावरण कार्यकर्ते ध्वनिप्रदूषणाच्या नियमांची अंमलबजावणी कठोरपणे करण्याची मागणी करत आहेत.anted प्रताप नाईक-ZEE 24 TASA, कोल्हापूर.0
0
Report
मंचर में सचिन आहिर के समर्थकों के बीच महायुती की नई चुनौती
Manchar, Maharashtra:मंचर पुणे... सचिन आहिर उपसभापती विधान परिषद भीमाशंकर दर्शन व विकासकामे: - गेल्या अनेक वर्षांपासून मला भीमाशंकरची ओढ आहे. पदाच्या माध्यमातून लोकांची सेवा घडावी हीच प्रार्थना केली. मंदिराच्या विकासकामांचा आढावा घेतला असून पुजाऱ्यांचे प्रश्न आणि भाविकांच्या सुविधांबाबत चर्चा झाली. नोव्हेंबर महिन्यात पुन्हा बैठक घेऊन प्रशासकीय आढावा घेतला जाईल, जेणेकरून आगामी कुंभमेळ्यापूर्वी सर्व कामे वेळेत पूर्ण होतील. मराठा आरक्षण व वक्तव्यांवर प्रतिक्रिया: - व्यक्तीवर टीका करण्यापेक्षा त्यांनी मांडलाला विषय महत्त्वाचा आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नावर काम केले आहे. उदय सामंत आणि शंभूराज देसाई सातत्याने चर्चा करत आहेत. कोणावरही वैयक्तिक किंवा एकेरी टीका करणे ही महाराष्ट्राची संस्कृती नाही, सर्वांनीच संयम बाळगला पाहिजे. सहकार क्षेत्र आणि मुंबई जिल्हा बँक निवडणूक: - ठाणे जिल्हा बँकेप्रमाणेच सहकार क्षेत्रात (दूध संघ, बाजार समित्या, पतसंस्था) पक्षाचा विस्तार झाला पाहिजे. यासाठी डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली होती. मुंबई बँकेतही पक्षाचे संचालक किंवा पॅनेल उभे करता येईल का, याबत प्रारंभिक स्तरावर चाचपणी सुरू आहे. पुणे जिल्हा दौरा आणि निधी वाटपातील नाराजी: - पुणे जिल्ह्याशी माझा जुना संबंध आहे. जिल्हा परिषद सदस्यांशी चर्चा करताना निधी वाटपाबाबत तक्रारी समोर आल्या. सत्ताधारी असो वा विरोधक, विकासकामांसाठी सरसकट निधी मिळायला हवा. आगामी डी-लिमिटेशनमुळे मुंबई Pune्यात मतदारसंघांची संख्या वाढणार आहे, त्यामुळे पक्षविस्तारासाठी सर्वच पक्ष प्रयत्न करत आहेत. महायुतीतील स्थानिक समन्वय व दुरावा: - महायुती म्हणून काम करताना स्थानिक पातळीवर दुरावा नसावा. स्थानिक नेत्यांनी मोठे मन दाखवून समन्वयाचा हात पुढे केला, तर आम्हीही दोन पावले पुढे जाऊ. एकतर्फी संवाद होऊ शकत नाही. Byte: सचिन अहिर (उपसभापती ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...0
0
Report
नागपुर के संविधान चौक पर आदिवासी अधिकार बचाव आंदोलन जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात संविधान चौकात ट्रायबल रिपब्लिक आदिवासी अधिकार बचाव आंदोलन करण्यात येतेय आदिवासी विभागाने लक्ष्मण मानकर ट्रस्टसोबत 490 वस्तीगृह व्यवस्थापनबाबत केलेल्या सांमजस्य करार रद्द करावा आणि इतर मागण्या विविध मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात येय यावरून आदिवासी विद्यार्थी संघटना आणि सामाजिक संस्थांनी नाराजी व्यक्त करत आंदोलन केले असून याबाबत अनेक सवाल उपस्थित केले आहेत... 490 वसतिगृहांना खाजगी संस्थांकडे देण्याचा षडयंत्र असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में ठाकरे शिवसेना ने मराठा मांगों के पालन की मांग की
Kolhapur, Maharashtra:मनोज जरांगे-पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरात ठाकरे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी केलीय. सरकारने मराठा समाजाच्या मागण्या मान्य कराव्यात अशी मागणी करत शहरातील दसरा चौकात ही घोषणाबाजी करण्यात आली. प्रत्येक वेळी सरकार मराठा समाजाच्या तोंडाला पान पुसत असेल तर ते योग्य नाही अशी भूमिका ठाकरे सेनेच्या कार्यकर्त्यांनी मांडली आहे.0
0
Report
विदर्भ में अगस्त में बारिश 58% नीचे, नागपुर सहित जिलों में भारी कमी
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात केवळ ऑगस्ट महिन्यातच पावसाची 58% तूट... ( 297.1 MM सरासरी पाऊस... 125.5 MM बरसलेला पाऊस ) तर यंदाच्या मोसमात आत्तापर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिना मिळून एकूण 22 टक्के विदर्भात पावसाची तूट --- विदर्भात कमी पावसामुळे चिंता वाढल्या -- पुढील काही दिवसात पाऊस मात्र पावसाची तूट भरून निघण्याची शक्यता कमीच *ऑगस्ट महिन्यात विदर्भात कमी झालेला पाऊस जिल्हानिहाय* ( किती टक्के ऑगस्ट महिन्यात कमी पावस झाला ते ) अकोला (-84%) अमरावती (-82%) यवतमाळ (-78%) वर्धा (-73%) वाशिम (-71%) नागपूर (-71%) बुलडाणा (-61%) चंद्रपूर (-55%) गडचिरोली (-32%) गोंदिया (-28%) दरम्यान विदर्भातील कमी पावसाबाबत माहिती जाणून घेतली आहे नागपूर प्रादेशिक हवामान विभागाचे हवामान तज्ञ प्रवीण कुमार यांच्याकडून0
0
Report
ओबीसी आरक्षण-यूपीएससी घोटाळा: कांग्रेसचा आरोप और सुप्रीम कोर्टी निकालों पर चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते (on अभिजित दिपके.. विद्यार्थी गुन्हे मागे घेतले नाही...) -- ते आंदोलन विद्यार्थ्यांसाठीच होते.. ----------मोदींच्या काळात मोठा अन्याय OBCवर होतोय . 2016 ची UPSC परीक्षा झाली... 314 OBC विदयार्थी पास झाले.. मात्र क्रिमीलीअर सर्टिफीकेटवरून त्यांना वगळले --या मुलांना OBC मध्ये टाकून कमी मार्क घेणाऱ्या ओपन विद्यार्थांना घेण्यात आलं... हाय कोर्टचे चार निकाल विद्यार्थ्यांच्या बाजूने लागले...1000 ते 1100 विद्यार्थी असे अधिकसंख्या दाखवून पोस्टिंग द्या.... जॉइन करा -- मात्र हे सरकार OBC मुलांवर उठणार सरकार आहे...याबाबत सर्वोच्च न्यायलयात अपील केले... नरेंद्र मोदींनी या विद्यार्थ्यांचा गळा घोटायच काम केल -- ओबीसीचा मतदान घ्यायचे मात्र ओबीसीच्या मुलं आयपीएस होऊ नये असे काम करतात हे सरकार मनुवादी आहे... ओबीसीच्या धने ( उत्तराखंड, राहुल गांधी गुन्हा ) हे पागलपणाचे लक्षण आहे. असा गुन्हा दाखल होऊ शकत नाही. आयोजकावर गुन्हा दाखल झाला पाहिजे.. शुद्धीकरण केले त्याच्यावर गुन्हा दाखल झाला पाहिजे ---भागवत अमेरिकेत जाऊन वेगळे बोलतात आणि देशात मात्र दलितांवर अन्याय होत असतात.... मनुवादी विचारधारा यांच्या डोक्यात आहे... यांचे दिवस भरले आहे... सत्तेची मस्ती आहे त्यामुळे असे पाऊल उचलतात... (on जात पडताळणी ऑनलाईन ) --- याच स्वागत आहे.. ऑनलाइन प्रक्रियेच मी स्वागत करतो.. (on सुळे ) --- संजय राऊत सर्वोच्च न्यायालयावरून जे बोलले ते पाहिलं.... सुप्रियाताई म्हणताय ते बरोबर आहे.. पक्षाला अशा पद्धतीने घेता येत नाही... राज्यात राष्ट्रवादीला जन्माला घालण्याचं काम शरद पवार यांनी केले. तोच पक्ष तुम्ही फूट पाडून ताब्यात घेण्याचं काम करत आहे. त्यामुळे सर्वोच्च न्यायालयात जो काही शिवसेनेच्या बाबतीत झाला तो निकाल आता पेंडिंग आहे.. शिवसेनेबाबत तसंच केलं. राष्ट्रवादी निकाल देण्याकरता सर्वोच्च न्यायाल थांबत आहे.. त्याचा दुरुपयोग करून अशा पद्धतीने होत असेल तर ते निषेध आहे.सुप्रिया सुळे म्हणताय ते 100% सत्य आहे (on समृद्धी महामार्ग ) -- समृद्धी महामार्ग आता सुरक्षित राहिला नाही... अपघातात अगोदर लोकांचा जीव गेला होता दिवसा दढवळ्या दरोडे पडत आहे.सरकार दरोडेखोरांना संपवणार आहे की सरकारचा वरदस्त यांच्यावर आहे. कायद्याचा वाचक नाही त्यामुळे दिवसाढवळ्या अशा घटना घडल्या नसत्या (on भागवत अमेरिका ) भागवत यांनी अमेरिकेचे बोलले त्याचे स्वागत करतो... मात्र त्यांनी भारतात त्यांनी बोलावे ... अमेरिकेत जे बोलत यावर लोकांनी काम करावं.. उठले सुटले हिंदू-मुस्लीम करत असतात... जो कोणी एकमेकांच्या धर्माविरुद्ध बोलेल तो गुन्हेगार ठरेल.. सहीष्णूता म्हणतात सांगलीत मस्जिदमध्ये इंजिनियर मुलाचा खून करता... (on भागवत Toranto भागवत वक्तव्य ) देशात दिल्ली ते गल्ली हिंदू सरकार आहे... यांची पॉलिसी डुप्लिकेट आहे.. आपल्या विचाराचे लोक बादशहाच्या दरबारात आणि इंग्रजांच्या दरबारातही होते... प्रत्येक धर्माने सहीष्णुतेच्या आधारावर काम करावे.. देशात एक बात आणि हिंदुस्तानच्या बाहेर एक बात करू नये -- बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते ऑन – पावसाची परिस्थिती - राज्यात पावसाची परिस्थिती गंभीर आहे. मराठवाड्यात, पश्चिम महाराष्ट्रात अत्यंत पाऊस आला. काही नद्या भरून वाहिल्या, तर काही नद्या भरल्या sुद्धा नाहीत. नद्या वाहायला sुद्धा नाहीत, अशी परिस्थिती अनेक भागांमध्ये आहे. विहिरी खोलवर गेलेल्या आहेत. पुढच्या काळात काय होईल, हे आत्ताच सांगता येत नाही. - परभणीतून एका शेतकऱ्याचा फोन आला. “आमचं सर्व काही गेलं असतं,” त्यांनी सांगितलं. पिकांना अळीमुळे संकट आलेलं आहे. दुबार पेरणीला सुद्धा पाणी लागतं. याकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे. नद्या कोरड्या आहेत. ही परिस्थिती पाहता भविष्यात खूप मोठ्या संकटाला सामोरं जावं लागेल. आतापासून सरकारने यावर उपाययोजना करण्यासाठी काम केलं पाहिजे. सर्वांना विश्वासात घेऊन पुढची योजना केली पाहिजे. यासाठी शेतकऱ्यांच्या पाठीमागे सरकारने उभं राहिलं पाहिजे. राज्याची तिजोरी सदा उघडी असली पाहिजे. (on महागाई वाढली आहे) - महागाई वाढली आहे. दूध, साखर वाढलेली आहेत. पेट्रोल 112 रुपये झालेलं आहे. खाण्याचं तेलसुद्धा वाढलेलं आहे. डाळ वाढली आहे. गॅस सिलेंडरसुद्धा वाढलेला आहे. यामुळे सर्वसामान्य गावातील माणूस रस्त्यावर आलेला आहे. गावात लाकडावर भोजन बनवण्याची व्यवस्था आता होऊ लागली आहे. सरकारची मानसिकता नाही आहे गरीबाच्या घरी सिलेंडर मिळावं म्हणून... दूध महागल्यामुळे लहान मुलांनासुद्धा याचं संकट पाहावं लागणार आहे. मध्यमवर्गीयांची परिस्थिती सध्या गंभीर झाली आहे. ( आदिवासी -- खाजगीकरण ) - लक्ष्मणराव मानकर ट्रस्ट संघाशी संबंधित आहे. अनेक आश्रमशाळा आहेत, संघाच्या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी. डुपिकेट देशप्रेमींना सांगावं लागेल .. आदिवासी विद्यार्थ्यांना ट्रेनिंग देण्याचं काम सुरू असेल, तर ही सुरुवात आहे. - शाळेमध्ये प्रवेश कराल, त्यांचे व्यक्तिमत्व विकासाच्या माध्यमातून संघाची माहिती दिली जाणार, नॉनव्हेज खाऊ नका, व्हेज खा, असे सांगण्यात येईल.... ड्रेस कसा असावा, हे रुजवण्याच्या काम करतील त्यानंतर त्यांच्या डोक्यात संघाचे विचार रुजवण्याचं काम करतील. आदिवासी विद्यार्थ्यांवरकंट्रोल मानकर ट्रस्ट करेल. या माध्यमातून एक षडयंत्र सुरू आहे. (ऑन – लोकसेवा आयोग MPSC ) - २०२५ राज्य उत्पादन शुल्क जी परीक्षा, पेपर लीकच्या तक्रारी आहेत. असा आहे की, १०० गुणांचा पेपर होता, विद्यार्थ्यांना ८४ मार्क कसे मिळू शकतात? एमपीएससीमध्ये होऊ शकत नाही. शंभर टक्के गोंधळ निर्माण झालेला आहे. - ज्या व्यक्तीने पेपर लिक केला त्याच्याकडे शंभर कोटींची संपत्ती सापडली गेली आहे. हस्तगत करण्यात आलेल्या ज्यांच्याकडे संपत्ती सापडली तो सत्ताधारी पक्षाच्या माणसाशी संबंध आहे... - ही परीक्षा पारदर्शक पद्धतीने पूर्ण झाली पाहिजे.एमपीएससीच्या परीक्षेवर विद्यार्थ्यांचा विश्वास राहणार नाही. ही गंभीर बाब आहे. प्रशासकीय सेवेत पैसे घेऊन लिक करून सिलेक्शन होत असेल, तर महाराष्ट्र खड्ड्यात जाईल. महाराष्ट्राच्या टॅलेंटला व्हॅल्यू नसणार. येणाऱ्या काळात फार मोठी अराजकता निर्माण होईल. - एमपीएससीवर बोर्ड आहे. एमपीएससी मधील संचालक मंडळ आहे, हे इमानदार आहेत की नाही, त्यांच्यावर असलेल्या आरोपांची चौकशी करून यामध्ये पारदर्शकता आणावी. अन्यथा आंदोलनाला सामोरं जावं लागेल.0
0
Report
Advertisement
