445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ के आंबाचोंडी माता परिसर में मोर का मनमोहक नृत्य; जनता मंत्रमुग्ध
Beed, Maharashtra:बीड: आंबाचोंडी माता परिसरात मोराचा मनमोहक नृत्याविष्कार; नागरिक मंत्रमुग्ध ANC - बीडच्या धारूर येथील आंबाचोंडी माता परिसरात मोराने पिसारा फुलवून केलेला मनमोहक नृत्याविष्कार नागरिकांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. निसर्गरम्य वातावरणात घडलेल्या या सुंदर दृश्याचे व्हिडिओ चित्रीकरण रोहन हजारी यांनी केले. मोराचा डौलदार पिसारा आणि आकर्षक हालचालींमुळे हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत असून नागरिकांकडून त्याचे कौतुक होत आहे. या प्रसंगातून वन्यजीव व निसर्गसंवर्धनाचा संदेशही अधोरेखित होत असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.0
0
Report
उल्हासनगर में बैनर लगाते समय बिजली का झटका: युवक की मौत
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर कॅम्प क्रमांक २ येथील खेमानी चौकातील कॅनरा बँकेसमोर वाढदिवसाचा बॅनर लावत असताना विजेचा धक्का लागून एका युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. रवी मोरे या युवक रात्री सुमारास विजेच्या खांबावर चढला होता. यावेळी त्याच्या पायाचा संपर्क विद्युत वाहिनीशी आल्याने त्याला जोरदार विजेचा धक्का बसला. धक्क्यामुळे तो खाली असलेल्या पत्र्यावर कोसळला. घटनेची माहिती मिळताच उपस्थित नागरिकांनी तत्काळ धाव घेत रवी मोरे याला खाली उतरवलं आणि टेम्पोच्या साहाय्याने मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केलं. त्यानंतर मृतदेह पुढील वैद्यकीय आणि कायदेशीर प्रक्रियेसाठी मीरा रुग्णालयात हलविण्यात आला. रवी मोरे हा कल्याणमधील खडेगोळवली परिसरातील रहिवासी असून तो बॅनर लावण्याची कामं करत होता. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून,0
0
Report
भीमाशंकर मंदिर में दर्शन के लिए ऑनलाइन पास की बाध्यता शिथिल, भक्तों की भीड़ बढ़ी
Shirur, Maharashtra:श्री क्षेत्र भीमाशंकरात आजपासून ऑनलाइन पासची सक्ती शिथिल करून सर्वसामान्य भाविकांसाठी दर्शन व्यवस्था सुरू करण्यात आली आहे. यामुळे पहाटेपासूनच मंदिर परिसरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. धुक्याच्या वातावरणात अनेक वाहनेही भीमाशंकरकडे दाखल झाली. मंदिर परिसरात सुरू असलेल्या कामांमुळे सध्या सकाळी ७ ते ११ या चार तासांदरम्यानच दर्शनाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे भाविकांना पहाटेच येथे पोहोचावे लागत आहे. सर्वसामान्यांना दर्शनाची संधी उपलब्ध झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण असले, तरी मर्यादित वेळेमुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
Advertisement
महिलाओं के हाथ में घर का नियंत्रण, यही सफलता की कुंजी: पाटील ने कहा
Ambegaon, Maharashtra:महिलांच्या व्यवस्थापन कौशल्याला आणि पाककलेला सहकारमंत्री बाबासाहेब पाटील यांनी अनोख्या शैलीत सलाम केला. “ज्या घराचा कारभार महिलेच्या हातात, तो कारभार सर्वात उत्तम,” असे सांगत त्यांनी महिलांच्या निर्णयक्षमता, संसार सांभाळण्याची कला आणि स्वयंपाकातील हातोटीचं तोंडभरून कौतुक केलं. याचवेळी ‘मॅगी-पिझ्झा’सारख्या पाश्चात्य खाद्यसंस्कृतीवर टीका करत, घरच्या शेवया, लोणचं आणि पारंपरिक खाद्यपदार्थांचं महत्त्व अधोरेखित केलं. पुणे जिल्हा बँकेच्या राजगुरुनगर येथील कार्यक्रमात बोलताना सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी महिलांच्या व्यवस्थापन कौशल्याचा गौरव केलं घरातील अर्थकारणापासून स्वयंपाकघरापर्यंत महिलांची भूमिका महत्त्वाची असल्याचं त्यांनी नमूद करत मोजमाप न करता केवळ अंदाजाने जेवणाला चव आणणाऱ्या गृहिणींची तुलना त्यांनी कोणत्याही मोठ्या व्यवस्थापकांशी केली. पाश्चात्य खाद्यपदार्थांच्या वाढत्या प्रभावावर भाष्य करताना त्यांनी भारतीय पारंपरिक खाद्यसंस्कृतीचं महत्त्व पटवून दिलं. महिलांच्या कष्ट, त्याग आणि कौशल्यामुळेच कुटुंबव्यवस्था भक्कम राहते, अशा शब्दांत त्यांनी महिलांना अभिवादन केलं.0
0
Report
भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना विजयाचा विश्वास; काँग्रेसच्या भूमिकेवर संशय
Amravati, Maharashtra:भाजप उमेदवार प्रवीण पोटे यांना विजयाचा विश्वास; संविधानाबद्दল काँग्रेसची भूमिका संशयास्पद, प्रवीण पोटे यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत भाजप उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर टीका करत आपल्या विजयाबाबत विश्वास व्यक्त केला आहे. काँग्रेस हा सुज्ञ लोकांचा पक्ष असल्याचे सांगतानाच बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाबाबत काँग्रेसची भूमिका संशयास्पद असल्याचे त्यांनी म्हटले. गुप्त मतदानाच्या निवडणुकीत व्हीप लागू होत नसतानाही काँग्रेसने कुणालाही मतदान करू नये अशी भूमिका घेतल्याचा आरोप त्यांनी केला. काँग्रेसचा उमेदवार रिंगणात असतानाही पक्षाने तटस्थ राहण्याचे निर्णय घेतल्याचे ते म्हणाले. मतदान करणाऱ्या सर्व मतदारांनी संविधानाचा विचार करून मतदान केल्याचे सांगत त्यांनी त्यांचे अभिनंदन केले. तसेच या निवडणुकीत आपल्या विजयाची खात्री असल्याचा दावा करत नगरसेवकांनी सर्वपक्षीय पातळीवर सहकार्य केल्याचेही प्रवीण पोटे यांनी सांगितले.0
0
Report
सांगली के कैफे में नाबालिग के साथ बलात्कार, आरोपी गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सांगलीच्या विश्रामबागेतील एका कॅफेमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पीडित मुलीचे अश्लील व्हिडिओ बनवत, व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये संशयित तरुणा विरोधात गुन्हा दाखल झाला असून समर्थ देवकुळे या तरुणाला अटक देखील करण्यात आली आहे. जानेवारी 2026 मध्ये हा प्रकार झाल्याचा समोर आला असल्याचे सांगितले जाते; संशयिताकडून व्हिडिओ देखील बनवण्यात आला, त्यानंतर पीडित अल्पवयीन मुलीला काही दिवसांपासून पुन्हा भेटायला बोलवत, व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती, त्यानंतर घाबरलेल्या पिडीत मुलीने हा सर्व प्रकार आईला सांगितला, त्यानंतर विश्रामबाग पोलीस ठाण्यामध्ये धाव घेऊन गुन्हा दाखल करण्यात आला आहे, मात्र या घटनेमुळे शहरातल्या कॅफे हाऊस मधील सुरक्षा का प्रश्न ऐरणीवर आला आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती में स्ट्रॉंग रूम के बाहर पुलिस का कड़ा बंदोबस्त, मतगणना कल सुबह शुरू
Amravati, Maharashtra:अमरावतीत स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त; २२ तारखेला सकाळी ८ वाजता होणार मतमोजणीला सुरुवात. 451 पैकी 427 मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. २२ तारखेला मतमोजणी अमरावतीच्या जिल्हा नियोजन सभागृहामध्ये होणार आहे. याच ठिकाणी मतपत्रिका ठेवण्यात आला असून या स्ट्रॉंग रूम बाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे चार दिवस अमरावतीच्या याच जिल्हा नियोजन सभागृहामधील मतमोजणी आणि स्ट्रॉंग रूमचं नियोजन करण्यात आलं. २४ तास बंदूकधारी पोलीस या ठिकाणी तैनात करण्यात आले आहे.0
0
Report
शिंदे की शिवसेना में ओमराजे निंबाळकर के प्रवेश पर वैराग में पेड़े बाँटकर उत्साह
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - खा. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वैराग येथे वाटण्यात आले पेढे धाराशिवचे खा. ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदे यांच्या शिवसेनेकडून वैराग येथे वाटण्यात आले पेढे गेल्या दोन दिवसापासून सोशल मीडियावर ट्रोल होणाऱ्या ओमराजे निंबाळकर यांच्या समर्थनार्थ शिंदेंच्या शिवसेनेकडून जल्लोष ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यकर्त्यांनी वैराग येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर पेढे वाटून व्यक्त केला आनंद वैराग शहरात शिंदेंच्या शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या संभाव्य पक्षप्रवेशाचे जोरदार स्वागत केल ओमराजे निंबाळकर यांच्या शिवसेना शिंदे पक्षप्रवेशामुळे बार्शी शिवसेना वाढणार असल्याचा विश्वास शिवसैनिकांनी व्यक्त केला0
0
Report
सोलापुर विधान परिषद चुनाव में मोहिते पाटील और राऊत के आरोप-प्रत्यारोप तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणुकीवरून खा. धैर्यशील मोहिते पाटील - माजी आ. राजेंद्र राऊत यांच्यात खडाजंगी. सोलापूर विधान परिषद मतदानाच्या शेवटच्या दिवशी खा. धैर्यशील मोहिते पाटील आणि माजी आमदार राजेंद्र राऊत यांच्या आरोप प्रत्यारोप. विधान परिषदेच्या मतदानाच्या दिवशी मोहिते पाटील यांच्या हर हर महादेवच्या स्टेटसभोवती फिरली निवडणूक. जिल्ह्यात अदृश्य शक्ती ज्या पद्धतीने काम करत होती त्यासाठी हर हर महादेवचा नारा दिल्याचं धैर्यशील मोहिते पाटील यांचे वक्तव्य. हर हर महादेवचा सर्वाधिक नारा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात देण्यात आला. कारण मावळ्यात धैर्य आणि धाडस यावयासाठी. त्याला भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांनी आम्हीच खरा मावळा असल्याचं सांगत दिलं प्रतिउत्तर. आमचे पूर्वज छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्यात सरदार होते. रावतानी पानिपतच्या युद्धातही मोठं योगदान दिले. इतिहासाची पान जर चाळली तर कोणाचा इतिहास कसा आहे हे माझ्या तोंडातून निघालं तर मोहिते पाटलांना फारच झोंबल. हर हर महादेव हे खऱ्या छत्रपतींच्या मावळ्याला शोभत असल्याचं प्रत्युत्तर राजेंद्र राऊत यांनी मोहिते पाटील यांना दिल आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में पुराने बस स्टैंड के पास नया बस स्टेशन तैयार; लोकार्पण जल्द
Washim, Maharashtra:वाशीम में पुराने बस स्टैंड के पास नया बस स्टेशन तैयार; लोकार्पण जल्द0
0
Report
सोलापुर से गोवा और हैदराबाद के उड़ानें 71 दिन बंद, मुंबई सेवा 85 दिन ठप
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरहुन गोवा, हैदराबादची विमानसेवा 71 दिवस बंद - सोलापूर हुन गोवा, हैदराबाद विमानसेवा 71 दिवस असणार बंद - सोलापूर ते मुंबई विमान सेवेचे देखील मंगळवारपासून 85 दिवस उड्डाण नाही - पावसाळ्यात कमी होणारी दृश्य मानता आणि सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा उपलब्ध नसल्याने घेण्यात आला निर्णय - सुरळीत सुरू असणारी विमानसेवा दृश्यमानतेच्या कारणांनी बंद होत असल्याने उद्योग, व्यापार, पर्यटन क्षेत्रातून उमटतेय तीव्र नाराजी - त्यामुळे सोलापुरकरांना आगामी 85 दिवस थेट सोलापुरहून विमानसेवेचा लाभ घेता येणार नाही - मात्र सोलापुरात लवकरात लवकर नाईट लँडिंगचे काम पूर्ण करून विमानसेवा सुरळीत करण्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे आश्वासन0
0
Report
मानसून देरी से खरीफ बुवाई की रफ्तार धीमी, किसान चिंतित
Yeola, Maharashtra:हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार यंदा राज्यात सर्वत्र मान्सून लांबला आहे.. मान्सूनचा पाऊस न पडल्याने या पावसावर अवलंबून असलेले खरीप हंगामाच्या पेरणीचे कामे खोळंबले असल्याने शेतकरी चिंतेत आहे.. ग्रामीण भागातील बाजारपेठा ह्या बऱ्यापैकी शेतकऱ्यांवर अवलंबून असतात.. त्यामुळे बी - बियाणे मुबलक प्रमाणात खरेदी करून ठेवलेल्या कृषी सेवा केंद्राकडेही शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे.. एरवी जून महिना उजाडला की बी -बियाणे व रासायनिक खते खरेदीसाठी शेतकऱ्यांची कृषी सेवा केंद्रात लगबग सुरू होऊन मोठ्या प्रमाणात गर्दी होत असेय यंदा मात्र कृषी सेवा केंद्रासह बाजार पेठेत शुकशुकाट पाहायला मिळत आहे.. येवला येथील कृषी सेवा केंद्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी..0
0
Report
Advertisement
आमित शाह के कोल्हापुर दौरे में 20 जून को पुलिस मैदान में जनसभा, सुरक्षा खाका तैयार
Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून कोल्हापुर दौऱ्यावर येत आहेत। आज रात्री नऊच्या दरम्यान अमित शाह कोल्हापुरात पोहोचणार असून 20 जून रोजी सकाळी 11 वाजता कोल्हापूरच्या पोलीस मैदानावर त्यांची जाहीर सभा होणार आहे। या सभेच्या पार्श्वभूमीवर महायुतीच्या नेत्यांनी सभास्थळाची पाहणी केली। या वेळी कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, मंत्री हसन मुश्रीफ, खासदार धनंजय महाडिक, आमदार राजेश क्षीरसागर, आमदार अमल महाडिक यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। अमित शाह यांनी विविध विकासकामांसाठी दिलेल्या पाठबळाबद्दल त्यांचे आभार मानण्यासाठी ही सभा आयोजित करण्यात आली आहे। सभेसाठी प्रशासन आणि महायुतीकडून जय्यत तयारी सुरू आहे. सभेला मोठ्या प्रमाणात नागरिक आणि कार्यकर्ते उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्याने वाहतूक, सुरक्षा, बैठक व्यवस्था आणि पार्किंगसह विविध बाबींवर चर्चा करण्यात आली.0
0
Report
रत्नागिरी MIDC संकट: पानी की आपूर्ति बंद, उद्योग धंधे ठप्प, हजारों रोजगार पर खतरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..रत्नागिरीच्या खेड लोटे MIDC वर पाणीबाणीचे संकट.. वाशिष्टी नदी आटल्याने अनेक प्लांट बंद,हजारो कामगार वाऱ्यावर! पाऊस लांबल्याचा मोठा फटका;पाणीपुरवठा करण्यासाठी MIDC युनियनची प्रशासनाकडे आर्त हाक.. अँकर पावसाने पाठ फिरवल्याने कोयना धरणातील पाणीसाठा धोक्याच्या पातळीवर पोहोचला असून वीज निर्मिती पूर्णपणे ठप्प झाली आहे.. परिणामी चार दिवसांपासून वाशिष्टी नदीत कोयनेचे अवजल सोडण्यात आलेले नाही.. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रासह चिपळूण शहर आणि नदीकाठच्या असंख्य गावांवर तीव्र पाणीटंचाईचे संकट ओढावले आहे.. पुढील आठ दिवसात पाऊस न झाल्यास गंभीर परिस्थिती निर्माण होणार असल्याची भीती व्यक्त होत असून दुसरीकडे एमआयडीसी ने ही अनिश्चित काळासाठी पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे सर्वांना कळवले आहे.. दरम्यान पिण्यासाठीही पाणी नसल्याने काही midc तील ७५ टक्के उद्योगांनी आपलें उत्पादन बंद ठेवले आहे.. सोबत wkt & बाईट0
0
Report
अंबेगाव में जमीन विवाद के चलते एक ही परिवार के सदस्य घायल, सात आरोपी गिरफ्तार
Shirur, Maharashtra:अंबेगाव तालुक्यातील तिवलदरा घोडेगाव येथे शेतजमिनीच्या वादातून एकाच कुटुंबातील सदस्यांवर लाठ्या-काठ्या, दगड आणि झाडाच्या फांद्यांनी जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. पूर्ववैमनस्यातून झालेल्या या बेदम मारहाणीत अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. फिर्यादी स्वप्नील काळे हे आपल्या कुटुंबासह शेतात सोयाबीनची पेरणी करत असताना, त्यांच्या चुलत भावाने बेकायदेशीर जमाव जमवून हा वाद घातला. वाद विकोपाला गेल्यानंतर आरोपींनी स्वप्नील यांच्या डोक्यात दगड घातला, तसेच त्यांच्या वडिलांनाही बेदम मारहाण केली. इतकेच नव्हे तर, पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या वडिलांना वाटेत गाठून पुन्हा मारहाण करत जिवंत मारण्याची धमकी देण्यात आली. या धक्कादायक घटनेप्रकरणी घोडेगाव पोलिसांनी डॉक्टरांचे वैद्यकीय प्रमाणपत्र घेऊन सात जणांविरोधात गंभीर कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
