445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर में जेल से छूटे अपराधी का जुलूस, सार्वजनिक शांति भंग के आरोप
Pandharpur, Maharashtra:खुनासारख्या गंभीर कलमाच्या गुन्ह्यातून कारागृहाबाहेर सुटल्याचा पंढरपुरात जल्लोष करण्यात आला. फटाक्याची आतषबाजी झाली. मिरवणूकही काढली गेली. यातून सार्वजनिक शांतता भंग व जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी पंढरपूरात 20 जणांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या जल्लोषाचे व्हिडिओ समाज माध्यमात व्हायरल झाले आहेत. लखन उर्फ पिंटू ढावरे हा सन 2017 साली पुणे येथे झालेल्या एका खुनाच्या गुन्ह्यात नागपूर काराग्रहात शिक्षा भोगत होता. कारागृहातून सुटल्यानंतर लखन दुसऱ्याच दिवशी पंढरपुरात आला. याचवेळी त्याच्या साथीदारांनी विनापरवाना मोटारसायकल रॅली व मिरवणूक काढली. डोक्यावरून फटाक्याची पेटती माळ फिरवत लोकांच्या जीवितास धोका देखील निर्माण केला. याच बाबत पोलीस हवालदार सचिन हेंबाडे यांच्या फिर्यादीनुसार 20 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
युद्ध विराम के बाद कलिंगड के दाम उछले, भारतीय किसानों को मिली राहत
Yeola, Maharashtra:अमेरिका-इजरायल इराण युद्धाचा भडका उडाल्यानंतर भारतीय शेती उद्योगाला मोठा फटका बसला होता; निर्यात होणाऱ्या अनेक फळे भाजीपाला पिकांचे दर कोसळले गेल्याने शेतकरी हवालदिल झाले होते. युद्ध काळापूर्वी 20 ते 25 रुपये प्रति किलोने विकले जाणारे कलिंगड युद्धकाळात अवघे 5 ते 6 रुपये प्रति किलोने विकले गेले मात्र आता अमेरिकेने युद्धविरामाची घोषणा केल्यानंतर कलिंगडाच्या निर्यातीला वाव मिळाल्याने कलिंगडाचे दर पुन्हा सुधारले आहेत; सध्या बाजारात कलिंगडाला 15 ते 16 रुपयांचा प्रति किलो दर मिळत आहे. या संदर्भात शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे.0
0
Report
चंद्रपुर के ब्रह्मपुरी अस्पताल की पंजीकरण रद्द, ऑपरेशन थिएटर सील; तीन मरीजों की दृष्टि चली
Chandrapur, Maharashtra:टायٹل:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ख्र cristanंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द, जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन थियेटर केले सील, मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची होती तक्रार अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी शहरातील ख्रिस्तानंद हॉस्पिटलची नोंदणी रद्द करत जिल्हा प्रशासनाने ऑपरेशन थिएटर सील केले आहे. रुग्णालयात मोतीबिंदू शस्त्रक्रियेनंतर ३ रुग्णांना जंतूसंसर्ग होऊन त्यांची दृष्टी गेल्याची तक्रार प्राप्त झाली होती. जिल्हा शल्य चिकित्सकांनी सोमवारी या रुग्णालयाची नोंदणी रद्द करून ऑपरेशन थिएटर सील केले. १९ फेब्रुवारी ला या हॉस्पिटल मध्ये ३ रुग्णांवर मोतिबिंदूचं ऑपरेशन करण्यात आले होते. त्यानंतर या तिघांची दृष्टी गेल्याची तक्रार जिल्हा प्रशासनाकडे अलीकडेच करण्यात आली होती. चौकशी समितीच्या प्राथमिक अहवालानुसार ख्रिस्तानंद हॉस्पिटलमध्ये स्वतंत्र नेत्ररोग विभाग मंजूर नसतांनाही तिथे अवैधरित्या नेत्र शस्त्रक्रियागृह चालविले जात असल्याची आणि या ठिकाणी ऑपरेशन केल्या जात असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर महादेव चिंचोळे यांनी दिली आहे. त्यामुळे बॉम्बे नर्सिंग होम ॲक्टचे उल्लंघन केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली. ख्रिस्तन रुग्णालय हे या भागातील अत्यंत नामांकित आणि सेवाभावी रुग्णालय आहे. ख्रिस्त मिशनरीतर्फे चालविल्या जाणाऱ्या या रुग्णालयात अल्प दरात सेवा मिळत असल्याने रुग्णांचा मोठा ओघ असतो. या कारवाईने आरोग्य क्षेत्रात खळबळ उडाली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
अजीत पवार के निधन के तीन महीने पूरे, युगेंद्र पवार ने स्मृति स्थल पर श्रद्धांजलि दी
Rui, Maharashtra:राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाला आज तीन महिने पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे युवा नेते आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र श्रीनिवास पवार यांनी बारामतीत अजित पवार यांच्या स्मृतिस्थळाच दर्शन घेत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली. याशिवाय स्मृतिस्थळ परिसरात स्वच्छता अभियान देखील राबविण्यात आले.0
0
Report
नागपूर पुलिस अधिकारी शिवाजी ननवरे ने धौलागीरी शिखर फतह किया
Nagpur, Maharashtra:नागपूर शहर पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी सर केला धौलागिरी शिखर जगातील सातव्या क्रमांकाचे उंच आणि अत्यंत कठीण समजले जाणारे नेपाळमधील धौलागिरी शिखर यशस्वीरीत्या शिवाजी ननवरे यांनी सर केले आहे या शिखराची उंची 8,167 मीटर इतकी असून अशी कामगिरी करणारे महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत शिवाजी ननवरे यांनी यापूर्वी जगातील अनेक उंच आणि आव्हात्मक शिखरे सर केली आहेत यात माउंट एवरेस्ट, माउंट लोहात्से, माउंट मकालू आणि माउंट मनास्लो या शिखरांचा समावेश आहे0
0
Report
वाशीम में सिंचन की कमी से फसलों का क्षेत्र घटा, ज्वारी की बुवाई बढ़ी
Washim, Maharashtra:यंदा सिंचनाच्या टंचाईमुळे उन्हाळी पिकांच्या क्षेत्रात घट झाली आहे. वाढते तापमान आणि रब्बी हंगामातील जादा पाण्याच्या वापरामुळे पाण्याचा तुटवडा निर्माण झाला.या परिस्थितीत उडीद, मका, बाजरी आणि सोयाबीन पिकांचे क्षेत्र कमी झाले. मात्र ज्वारीच्या पिकाने चांगली वाढ नोंदवली आहे. सरासरी ६३२ हेक्टरच्या तुलनेत यंदा ९७२ हेक्टरवर ज्वारीची पेरणी झाली असून सुमारे ३४० हेक्टरने वाढ झाली आहे.कमी पाण्यात येणाऱ्या ज्वारी आणि तिळाकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत आहे.0
0
Report
Advertisement
वन्यप्राणी रात में पानी के लिए निकलते, 11 मचान से वॉटर होल सेंसेस
Washim, Maharashtra:वाशीम-अकोला सीमेवरील काटेपूर्णा अभयारण्य येथे १ मे रोजी होणाऱ्या वॉटर होल सेन्सससाठी वनविभागाने तयारी पूर्ण केली आहे. बौद्ध पौर्णिमेच्या रात्री होणाऱ्या या उपक्रमासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारण्यात आले आहेत. उन्हाळ्यात नैसर्गिक पाणवठे आटत असल्याने वन्यप्राणी रात्री पाण्यासाठी बाहेर पडतात. त्यामुळे अचूक नोंद घेण्यासाठी मचानांजवळ कृत्रिम पाणवठे तयार करण्यात आले आहेत. दरवर्षी होणाऱ्या या सेन्ससमधून वन्यप्राण्यांची संख्या, वर्तन व हालचालींचा अभ्यास केला जातो, ज्यामुळे संवर्धनासाठी महत्त्वाचे नियोजन करता येते.0
0
Report
सातारा के कुरकुंभ मंदिर से नया दस्तावेज: शिवाजी महाराज ने ध्वज मंडप बनवाया
Satara, Maharashtra:सातारा: पुणे जिल्ह्यातल्या दौंड तालुक्यातील मौजे कुरकुंभ येथील श्री फिरंगाई माता देवस्थानाबाबत एक अत्यंत महत्त्वाचा ऐतिहासिक दस्तऐवज उजेडात आला आहे. छत्रपती राजाराम महाराज यांनी १६९८ मध्ये दिलेले एक आज्ञापत्र नुकतेच मोडी लिपीत वाचण्यात आले असून यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतः या मंदिरात 'ध्वज मंडप' बांधल्याचा आणि देवस्थानच्या नंदादीपाची व्यवस्था केल्याचा स्पष्ट उल्लेख आढळला आहे. या शोधामुळे शिवकाळातील या जागृत देवस्थानाच्या महतीवर शिक्कामोर्तब झाले आहे. कुरकुंभ येथील देवीचे पुजारी मच्छिंद्र भगत यांनी पुणे पुरालेखागारातून या पत्राची प्रत प्राप्त केली होती. या पत्रातील गुढ आणि अप्रकाशित माहिती मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी प्रकाशात आणली आहे. यांच्या मोडी लिपी वाचक आणि इतिहास अभ्यासक कांचन कोठावळे यांनी सातारच्या राजघराण्यातील मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची भेट घेतली. आणि या विषयाची पूर्ण माहिती देऊन एकदा या मंदिराला भेट द्यावी अशी विनंती यावेळी त्यांनी केली आहे.0
0
Report
सोलापूर में रिकॉर्ड तापमान: पारा 44°C के करीब, भीषण गर्मी से लोगों की परेशानी
Solapur, Maharashtra:सोलापुरात तापमानाचा पारा 44 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचला; सोमवारी 43.9 °C नोंद झाली. यंदाच्या मोसमातील सोलापूरात सर्वोच्च तापमानाची नोंद झाली. सोलापूरकरांना पारा 43.9 अंशावर पोहोचला. सकाळी 8 वाजल्यापासून उन्हाच्या झळा जाणवू लागल्या. प्रशासनाच्या सूचना केवळ गरज असेल तेव्हाच बाहेर पडणे. हवामान विभागाचा अंदाज 5 मेपर्यंत अशी स्थिती राहणार.0
0
Report
Advertisement
कराड-चिपळूण हाईवे पर ST बस ने रिक्षा को टक्कर दी, 3 घायल
Satara, Maharashtra:कराड सातारा:- कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण माजलगाव या एसटी बसने अपे रिक्षाला कराड आरटीओ ऑफिस जवळ जोराची धडक दिली है. एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अपे रिक्षा एका खड्यात पलटी झाली असून चालक हनुमंत सुर्वे यांच्यासह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या धडकेत अपे रिक्षा 20 ते 25 फूट लांब फेकली गेली असून एका खड्ड्यात पलटी झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना उपचारासाठी कराडला हलवले आहे.0
0
Report
रांजणगाव में पानी टैंकर चोरी: CCTV फुटेज से बदमाश गिरफ्तार
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे पाण्याचा टँकर चोरी प्रकरण उघड झालंय, शेतकरी अशोक भुजबळ यांच्या घरासमोरून पाण्याचा टँकर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरट्याने अत्यंत चलाखीने ही चोरी केली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अखेर त्यांना अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी वचक बसवला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.0
0
Report
नागपुर में पिछले 10 दिनों में 13 अज्ञात लोगों की प्राकृतिक मौत, गर्मी से संकेत
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झालाय -- एकीकडे रणरणत्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे... सर्वसामान्य उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहेत... त्यामुळे या नैसर्गिक मृत्यूकडे उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र ‘डेथ ऑडिट’नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे... - ૪૧ ते ૪५ अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर होरपळत आहे . दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्ण झळा जाणवत आहेत... --दरम्यान या मृत व्यक्तींमधील अनेक जण बेघर असून काही जणांना आरोग्याच्या समस्या असल्याचीही शक्यता आहे - प्रशासनाचा इशारा १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या असे आवाहन केले जात आहे... तर मनपाकडून बेघरांसाठी निवारा केंद्र आणि शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे...0
0
Report
Advertisement
हिंगोली में येलो अलर्ट: दोपहर 12-3 बजे बाहर न निकलें, गर्मी से बचाव निर्देश
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्याला आज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी येलो अलर्ट जाहीर केला आहे.. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे शक्यतो नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे बारा ते तीन या वेळेत बाहेर पडू नये बंद चार चाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत असे आव्हानं देखील हिंगोली प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आल आहे…0
0
Report
नाशिक के धर्मांतरण मामले में अंतरराष्ट्रीय मोड़, मलेशिया–मालेगाव कनेक्शन का दावा अदालत में
Nashik, Maharashtra:मल्टी नॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण मलेशिया आणि मालेگाव कनेक्शनचा न्यायालयात धक्कादायक दावा फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिकरोड न्यायालयात सविस्तर सुनावणी पूर्ण विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपासात मलेशियाशी आर्थिक संबंध आणि मालेगाव कनेक्शनचे प्राथमिक धागेदोरे समोर आल्याचा दावा केला पीडित महिलेचे कथित नाव बदलून तिला मलेशियातील ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठविण्याचा कट असल्याचे न्यायालयात नमूद दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी २ मे तारीख निश्चित केली तोपर्यंत निदा खानच्या अटकेवरील संकट कायम, तपास यंत्रणांची नजर अधिक तीक्ष्ण प्रकरणातील डिजिटल, आर्थिक आणि बाह्य नेटवर्क तपासामुळे चौकशीचा विस्तार वाढण्याची शक्यता नाशिकातील प्रकरणाचे धागेदोरे आता थेट सीमापार पोहोचल्याच्या दाव्याने खळबळ0
0
Report
कुंभ मेले के लिए 377 एकड़ में 94 एकड़ पहले कब्जा, बाकी अधिग्रहण जारी
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात - जमीनमालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची स्पष्ट ग्वाही - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक ३७७ एकरपैकी ९४ एकर जमीन आधीच अधिग्रहित, उर्वरित २८३ एकर संपादन प्रक्रिया सुरू - अतिरिक्त १९२ एकर भूसंपादनाचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठवला - तपोवन बैठकीत जमीनमालकांनी सेल इंडेक्सनुसार दर निश्चितीची मागणी करत भरपाईबाबत भूमिका मांडली - महापौर हिमगौरी आडके यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न शिखर समितीसमोर मांडण्याचे आश्वासन दिले - उर्वरित जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्यायही चर्चेत, प्रलंबित १२.५० कोटींचे वाटप महिनाभरात करण्याचा दावा - कुंभमेळा नियोजनास वेग देताना शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर प्रशासनाचा भर - साधूग्राम उभारणीसोबत विकासही, पण जमीनमालकांचा न्याय अबाधित ठेवण्याची मोठी परीक्षा0
0
Report
Advertisement
