icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर मेट्रो परिसर के घर से 15 जिलेटिन, 50 डेटोनेटर्स मिलने पर बम दस्ते तैनात

Nagpur, Maharashtra:नागपूरातील दोसर भवन चौका मेट्रो स्टेशनच्या मागे एका घरी डिटोमेटर्स आणि जिलेटीन सापडल्याने एकच खळबळ उडाली... अत्यंत दाटी-वाहाटचा परिसर आणि संवेदनशील परिसरात हे सापडले आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 15 जिलेटिन कांड्या आणि 50 डेटोनेटर्स आणि 8 कनेक्टर सापडले आहेत... बॉमशोधक व नाशक पथक, फॉरेन्सिक टीम आणि पेसोची टीम ही तिथे पोचली आहे... संपूर्ण परिसराचे बॅरिकेटिंग करण्यात आले आहे... सुमारे महिनाभरापेक्षा अधिक काळापासून हे सगळं जिलेटिन आणि डेटोनेटर्स असलेली बॅग या घरा खाती पडली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे... निनेमक्या या जिलेटिन कांड्या आणि डेटोनेटर्स कशा तिथे पोहोचल्या याचा पोलीस तपास करत आहे... दरम्यान या सगळ्या गोष्टी सापडलेल्या तिथून काही अंतरावरच पोद्दारेश्वर राम मंदिर आणि मोमिनपुरा आहे. रामनवमीला याच परिसरालगत शोभायात्राही होती.
0
0
Report
Advertisement

तीन महीनों से पानी आपूर्ति नहीं, ग्रामवासी हंडा मोर्चा लेकर ग्राम पंचायत के खिलाफ

Chandvad, Maharashtra:गेल्या तीन महिन्यांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याने संतप्त झालेल्या गणूर येथील ग्रामस्थांनी अखेर तीव्र आंदोलनाचा मार्ग अवलंबला. नागरिकांनी हंडा मोर्चा काढत थेट ग्रामपंचायतीवर धडक दिली आणि ग्रामपंचायत कार्यालयाला ताळे ठोकत निषेध नोंदविला. यावेळी ग्रामस्थांनी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, उपसरपंच व सदस्य यांना कार्यालयातच कोंडून धरत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. “जोपर्यंत गावाला नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत ग्रामपंचायतीचे कुलूप काढणार नाही,” असा ठाम पवित्रा आंदोलकांनी घेतला. गावकऱ्यांचा आरोप आहे की, दर महिन्याला प्रत्येकी सुमारे १५० रुपये पाणीपट्टी आकारली जात असूनही प्रत्यक्षात पाणीपुरवठा होत नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. “पैसे घेतले जातात, पण मूलभूत सुविधा दिल्या जात नाहीत, हे अन्यायकारक आहे,” अशी भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली. दरम्यान, तीन महिन्यांपासून पाणी न मिळाल्यामुळे त्या कालावधीतील पाणीपट्टी माफ करण्यात यावी, अशी मागणीही ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे केली आहे. या आंदोलनामुळे प्रशासनावर दबाव निर्माण झाला असून, लवकरात लवकर पाणीपुरवठा सुरळीत करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

अलीबाग के बहिरीदेव जत्रा में भक्तों की भीड़, पालखी शोभायात्रा और नृत्य कार्यक्रम

Chendhare, Maharashtra:अलीबाग तालुक्यातील बहिरीचा पाडा येथील श्री बहिरीदेवाचा जत्रोत्सव आणि पालखी सोहळा मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती. दुपारी सासन काठ्या नाचवण्यात आल्या. या जत्रेच्या वेळी पाठीवर निवडुंगाने मारून घेण्याची तसेच निवडुंगावर झोपण्याची पारंपरिक प्रथा देखील पार पडली. संध्याकाळी पालखी मिरवणूक निघाली यात भाविक पारांपारिक वाद्यांच्या तालावर नाचत होते. यानिमित्ताने रात्री स्थानिक कलाकारांचे सांस्कृतिक कार्यक्रम पार पडले.
0
0
Report
Advertisement

अकोला में मोर्णा नदी स्वच्छता अभियान का शुभारंभ, लोगों से स्वच्छता का आह्वान

Akola, Maharashtra:अकोला शहरात“आपली नदी, आपली जबाबदारी” या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला आहे.भाजपच्या 46 व्या वर्धापन दिनानिमित्त हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या“सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास” या विचारांना प्रत्यक्ष कृतीत उतरवत मोर्णा नदी स्वच्छतेसाठी जनसहभागाचे आवाहन करण्यात आले आहे.या अभियानांतर्गत मोर्णा नदीतील जलकुंभी काढून नदी स्वच्छ करण्याचे काम हाती घेण्यात आले असून, या उपक्रमाचा शुभारंभ भाजपा विधिमंडळ प्रतोद आमदार रणधीर सावरकर यांच्या हस्ते करण्यात आला.आजपासून सुरू झालेलं हे स्वच्छता अभियान 12 एप्रिलपर्यंत चालणार असून, मोर्णा नदी जलकुंभीमुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला आहे.अकोला शहरातील हा उपक्रम जनसहभागातून एक आदर्श निर्माण करेल, असा विश्वासही व्यक्त केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

बुलढाणे में महायुती के भीतर घमासान: आमदार गायकवाड बनाम जिल्हा अध्यक्ष शिंदे, आश्रम शाळा पर आरोप

Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात महायुतीचा केवळ कागदोपत्री उरलेला 'तथाकथित' संसार आता रसातळाला गेला आहे. सत्तेच्या वाटेकरी असलेल्या दोन नेत्यांमध्ये सध्या 'तू-तू मैं-मैं' नाही, तर थेट चारित्र्यहननाचे रक्तरंजित युद्ध सुरू झाले आहे. शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी भाजप जिल्हाध्यक्ष विजयराज शिंदे यांच्यावर 'पांढरपेशी भोंदू' असल्याचा शिक्का मारत, त्यांच्या आश्रमशाळेतील काळ्या कारनाम्यांचा पाढा वाचला आहे. "मुलींचे आयुष्य उद्ध्वस्त करणारा नराधम" अशा शब्दांत गायकवाडांनी शिंदेंना घेरल्याने संपूर्ण जिल्ह्याचे राजकारण ढवळून निघाले आहे ब Bulढाणा विधानसभेत सध्या राजकीय शिष्टाचार धाब्यावर बसवण्यात आले आहेत. आमदार गायकवाड आणि विजयराज शिंदे यांच्यातील संघर्ष आता वैयक्तिक द्वेषाच्या टोकाला पोहोचला आहे. ज्या भोंदूबाबा खरातने राज्याची मान खाली घातली, त्याच रांगेत गायकवाडांनी शिंदेंना नेऊन बसवले आहे. स्वतःला शिक्षणसम्राट म्हणवून घेणाऱ्यांच्या आश्रमशाळेत नेमका कोणता 'अंधार' दडला आहे, यावरून गायकवाडांनी आरोपांच्या तोफा डागल्या आहेत. ग्राफिक्स : गायकवाडांचा 'विखारी' वार! नवा 'खरात' अवतरला: अशोक खरात जेलमध्ये आहे, पण जिल्ह्याचा 'दुसरा खरात' म्हणजेच विजयराज शिंदे बाहेर मोकाट फिरत आहेत. आश्रमशाळेचा बाजार: मुलींच्या भविष्याशी खेळणाऱ्यांचा बुरखा फाडण्याची गायकवाडांची घोषणा. दलालीचा दावा: शाळेतील एका महिला कर्मचाऱ्याच्या माध्यमातून हे सर्व गैरप्रकार पद्धतशीरपणे सुरू असल्याचा दावा. भयावह वास्तविकता: पीडित मुलींच्या कुटुंबाची इज्जत वाचवण्यासाठी आतापर्यंत संयम पाळला, पण आता हिशेब चुकता होणार.
0
0
Report

चंद्रपुर में मधमाशा के हमला: सेवानिवृत्त कर्मचाऱे की मौत, दो घायल; मैदान में हड़कंप

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात मधमाशांच्या हल्ल्यात एका सेवानिवृत्त कर्मचाऱ्याचा मृत्यू तर दोन जण जखमी झाले. ही घटना चंद्रपूर औष्णिक वीज केंद्राच्या आत असलेल्या मैदानावर घडली. मधुकर रंगारी (65) असं मृतक व्यक्तीचं नाव असून ते लगतच्याच नवेगाव- सिन्हाळा या गावातील रहिवासी आहेत. डीजेच्या दणदणाटाने मधमाशांचे मोहोळ उठले आणि हल्ला सुरू झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. या प्रकाराने मैदानावर एकच पळापळ झाली. तर खेळाडू सैरावैरा धावत सुटले. काही वेळाने माशा स्थिर झाल्यावर जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले. यात रंगारी यांना मृत घोषित करण्यात आले.
0
0
Report
Advertisement

युद्ध के कारण निर्यात बंद, हापूस आम अब कोल्हापुर के स्थानीय बाजार में आया

Kolhapur, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे हापूस आंब्याची निर्यात थांबली आहे. त्यामुळे कोल्हापूरच्या स्थानिक बाजारपेठेत रत्नागिरी देवगड हापूस आंबा मोठ्या प्रमाणात दाखल झाला आहे. कोकणातील हवामान बदल, अवकाळी पाऊस यामुळे आंब्याचे उत्पादन घटले आहे. त्यामुळे यंदा आंबा चाखायला मिळेल की नाही याबद्दल शंका उपस्थित केली जात होती. पण निर्यात होणारा आंबा स्थानिक बाजारपेठेत आल्यामुळे उच्च दर्जाच्या हापूस आंब्याची चव चाखता येणार आहे. असे असले तर हापूस आंब्याचे दर अजूनही सर्वसामान्याच्या आवक्या बाहेर आहेत.
0
0
Report

चंद्रपुर में शराबी बस चालक को सतर्क यात्री ने रोककर बड़ा हादसा टल गया

Chandrapur, Maharashtra:Feed slug ---0704ZT_CHP_ST_DRIVER ( single file sent on 2C) टायटल:-- चंद्रपुर जिल्ह्यात दारू पिऊन बस चालवणाऱ्या ड्रायव्हरला सतर्क प्रवाश्याचा दणका, डगमगत चालणारी बस थांबवून प्रवासी उतरले खाली, मद्यधुंद चालकाला विचारला जाब, मोठी दुर्घटना टळली अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यात दारू पिऊन बस चालवणाऱ्या बस ड्रायव्हरला सतर्क प्रवाशांनी दणका दिला. प्रवाशाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला. हा प्रकार गडचांदूर-नागपूर बस फेरी दरम्यान झाला. राजुरा डेपोची MH-14 5322 क्रमांकाची महामंडळाची बस भद्रावती येथे मोठ्या अपघातातून थोडक्यात बचावली. धक्कादायक बाब म्हणजे गडचांदूर-नागपूर या बसचा चालक दारूच्या नशेत असल्याचे लक्षात आले. बस डगमगत रस्त्याच्या कडेला डिव्हायडरला धाडकून रस्त्याच्या खाली उतरली. ही बाब प्रवाश्यांच्या लक्षात येताच एका सतर्क प्रवाशाने तत्काळ बस थांबवून चालकाला जाब विचारला. यावेळी चालक मद्यधुंद अवस्थेत असल्याचे दिसून आले. संतप्त प्रवाशांनी तात्काळ दुसरी बस उपलब्ध करून देण्याची मागणी वाहकाकडे केली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही मात्र प्रवाशांच्या जीवाशी खेळणाऱ्या या प्रकारामुळे प्रवाशांनी तीव्र संताप व्यक्त केला असून चालकावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ---------- vis--------- आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top