icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अवकाली बारिश से मुरबाड के फलों में भारी नुकसान, किसान संकट में

Ambernath, Maharashtra:अवकाळी पावसामुळे मुरबाड तालुक्यातील फळ पिकांचे मोठे नुकसान नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याची मागणी मुरबाड तालुक्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे फळ पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. आदिवासी विभागातील टोकावडे , मोरोशी ,शिरोशी, आणि धसई विभागात वादळी वाऱ्यासह आलेल्या अवकाळी पावसामुळे आंबा, चिकू सह इतर फळबागांमधील फळ गळून पडले आहेत , त्यामुळे शेतकरी संकटात सापडला आहे . भाजीपाला पिकाचे नुकसान आणि फळबागांना फटका यामुळे मोठे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. नुकसानीचे तात्काळ पंचनामे करण्याची मागणी शेतकऱ्यांनी तहसीलदार आणि कृषी विभागाला केली आहे केली आहे.
0
0
Report

शिरूर तालुक्य में गारपीट-आकस्मिक वर्षा से नुकसान; किसानों को 22 हजार मदद

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... शिरूर तालुक्यात गारपीट आणि अवकाळी पावसाने प्रचंड नुकसान झालं असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिरूर हवेलीचे आजी-माजी आमदार मदतीला धावलेत, आमदार माऊली कटके आणि माजी आमदार अशोक पवार यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या शेताच्या बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी करत तहसीलदारांना तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना केल्यात, यावेळी लोकप्रतिनिधींना शेतकऱ्याच्या रोशाला ही सामोरं जावं लागलं फळबागेला 5 लाख रुपये खर्च आलाय आणि तुम्ही फक्त 22 हजार रुपये मदत देणार असाल तर शेतकऱ्यांनी जगायचं कसं असा उद्विग्न सवाल शेतकऱ्यानी लोकप्रतिनिधींना केलाय.
0
0
Report
Advertisement

पारनेर क्षेत्र में आंधी-बारिश ने फलों और फसलों को भारी नुकसान पहुंचाया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या पारनेर तालुक्यात गुरुवारी सायंकाळी वादळ वाऱ्यासह जोरदार पाऊस आणि गारपिट झाल्याने तालुक्यातील पश्चिम आणि उत्तर भागातील गावांना तडाखा बसला आहे या अवकाळी पावसाने आंबा, केळी, डाळिंब या फळबागांसह कांदा, गहू या पिकांच मोठ नुकसान झाला आहे....वासुंदे, पळशी, वनकुटे, खडकवाडी,वडगाव सावताळा, पाडळी आळे,म्हस्केवाडी, रेनवडी या गावात मोठे नुकसान झाल आहे शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास निसर्गाच्या कहरामुळे हिरावून गेला आहे....अवकाळी पावसानंतर शासनाने तात्काळ संबंधित प्रशासनाला पंचनामे करण्याचा सुचना दिल्याचे ग्रामसेवकांनी सांगितले आहे.
0
0
Report

कल्याण गांधारी रिंग रोड: स्टंटबाज़ युवक मौत का सापळा बना

Kalyan, Maharashtra:भय इथले संपत नाही ... कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर स्टंटबाज तरुणांची थरारक बाईक रेसिंग नागरिक वॉक करणाऱ्या जीवला धोका. कल्याण मधील गांधारी रिंग रोड हा मृत्यूचा सापळा बनलाय. सायंकाळच्या sुमारास स्टंटबाज वाहन चालक भरधाव वेगाने या रोडवरून गाड्या चालवतात, तर कधी रेसिंग लावतात. त्यामुळे या रस्त्यावर इव्हिनिंग वॉक, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांचा सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे या रोडवर अनेकदा अपघात झालेत अनेक जणांना आपला जीव गमावा लागला आहे पोलीस या रोडवरील स्टंट बाज तरुणांना धडा शिकवण्यासाठी तात्पुरत्या उपाययोजना करतात मात्र त्यानंतर ही हा जीवघेणा थरार सुरूच आहे . कल्याण गांधारी रिंग रोडवरील पुलावर धूम स्टाईलने बाईक चालवणाऱ्या तरुणांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल झाले काल रात्रीच्या सुमारासचा हा व्हिडिओ वायरल झाला आहे पोलीस प्रशासन अशा स्टंटबाज वाहन चालकांवर कठोर कारवाई करणार का आता संतप्त सवाल आता नागरिक उपस्थित करत आहेत
0
0
Report
Advertisement
Advertisement

गोकुळ चुनावों में आबिटकर का बड़ा दावा: महायुती मजबूत, समर्थक उत्साहित

Kolhapur, Maharashtra:आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे राज्यातील लोकांना उत्तम आरोग्य सुविधा मिळत आहेत त्यामुळे लोक समाधानी आहेत प्रकाश आबिटकर ऑन गोकुळ जिल्ह्यातील सर्व निवडणुका यापूर्वी महायुती म्हणून लढल्या आहेत गोकुळची निवडणूक सुद्धा महायुती म्हणूनच लढवली जाईल असाच मतप्रवाह जिल्ह्यातील आणि राज्यातील नेत्यांचा आहे, पुढच्या आठवड्याभरात पात्र अपात्र संस्थांची यादी येईल, संस्थांचा निकाल लागेल आणि यानंतरच आम्ही महायुती म्हणून निवडणुकीला सामोरे जाऊ प्रकाश आबिटकर ऑन अदृश्य शक्ती गोकुळची निवडणूक अजून सुरू व्हायची आहे, ज्या त्या लोकांकडून अशा ऍक्टिव्हिटीज सुरू असतात त्याचा तो भाग असेल, अदृश्य शक्ती बद्दल जे बोलले असतील त्यांनाच त्याची कल्पना असेल प्रकाश आबिटकर ऑन एकनाथ शिंदे कॉल माजी सर्वांना विनंती आहे लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना आमचा सर्वांशी संपर्क येतो, अनेक लोक आपल्याला संपर्क करत असतात याचा अर्थ त्या घटनाक्रमाशी आमचा संबंध जोडणे चुकीचं आहे फोटो काढण्यासाठी नमस्कार करण्यासाठी आग्रह धरतात त्यांच्या भावना दुखवू शकत नाही, कालच मी माध्यमांना सांगितलं असे अनेक अशोक खरात आहेत ज्यांच्यापासून लोकप्रतिनिधी, माध्यमांनी सावध राहिले पाहिजे लोकांनी नतमस्तक कोणासमोर व्हावं तर देवासमोर व्हावं, देवाचा अवतार असल्याचा भास करणाऱ्या माणसासमोर काय करावे याच्या संबंधीची स्पष्टता घ्यायला हवी अनेक लोकप्रतिनिधी म्हणून संपर्कात येत असतात, त्यातलाच हा भाग असेल अनेक लोकांना भेटणारा अनाथांचा नाथ अशी त्यांची प्रतिमा आहे, चुकीच्या गोष्टीच्या समर्थन उपमुख्यमंत्री शिंदे कधीच करणार नाहीत खरात संबंधी चौकशी सुरू आहे यात कठोर कारवाई केली जाईल, आता याला फाटे फोडण्यात अर्थ नाही, या प्रकरणात गोळ्या देणाऱ्यांवर ही कारवाई होणार आहे जे चुकीचे असेल त्यावर नक्कीच कारवाई होईल प्रकाश आबिटकर ऑन गर्भलिंग निदान कायदा गेल्या वर्षभरामध्ये PCPNDT ज्याप्रमाणे सुधारणा केल्या, माहिती देणाऱ्यांना एक लाख रुपये वाढवले, पूर्वी दहा हजार मिळत नव्हते काल सुद्धा राज्याच्या सभागृहात याबाबत चर्चा झाली, ज्या हॉस्पिटलने यात भाग घेतला त्यांना डी रजिस्टर करण्याचा निर्णय घेतला आहे गर्भलिंग निदान करणाऱ्या हॉस्पिटलची डॉक्टरची आम्ही गैर करणार नाही, असे प्रकार करणाऱ्या हॉस्पिटल आणि डॉक्टरवर मकोका कारवाई करता येईल का याचाही शासन गंभीरपणे विचार करत आहे राज्यात PCPNDT ॲक्ट कठोरपणे राबवणे सरकारची जबाबदारी आहे, पुढच्या काळात याचं कामकाज दिसेल, प्रकाश आबिटकर ऑन बिद्री गर्भलिंग निदान या प्रकरणात सर्वांवर कठोर कारवाई होणार, याची नियमावली त्याप्रमाणे काम होईल, यात सहभागी व्यक्तींवरही कारवाई होणार आहे,अशा प्रकरणात प्रबोधनाची गरज आहे तालुका आणि जिल्हास्तरावरील सर्व कमिटीच्या मी बैठक घेत आहे, त्यामुळे या प्रकरणांना गती येईल, राज्यात अशा घटना घडल्यानंतर पुरोगामी महाराष्ट्राची प्रतिमा मलिन होत आहे प्रकाश आबिटकर ऑन संजय राऊत ज्यांनी आरोप केला आहे त्यांच्याकडूनच स्पष्टता यावी, त्यांना काहीतरी माहिती असेल, महाराष्ट्रात शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात इतके लोक शिवसेनेत दाखल होत आहेत, त्यामुळे महाराष्ट्र शिवसेनामय होईल अशा पद्धतीचे काम शिंदे साहेबांकडून सुरू आहे संजय राऊत यांच्या प्रश्नांकडे लक्ष देण्यापेक्षा पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला उपमुख्यमंत्री शिंदे यांनी जबाबदारी दिली आहे प्रकाश आबिटकर ऑन रवी राणा प्रत्येक व्यक्तीला आपल्या पक्षासाठी चांगलं काम करण्याचा अधिकार आहे, राणा यांनी भाजपबाबत वक्तव्य केलं असेल मात्र महाराष्ट्रात शिवसेनेचे जे काम सुरू आहे, त्यामुळे शिवसेना मजबूत नेतृत्व असणारा पक्ष महाराष्ट्रात दिसतोय, आणि अजूनही शिवसेना गतीने पुढे जाईल
0
0
Report

गोकुळ चुनाव: महायुती में नेतृत्व विभाजन और सत्ता की बेचैनी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळची निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. त्यामुळे गोकुळची सत्ता मिळावी यासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील महायुतीच्या सर्वच नेत्यांनी कंबर कसली आहे. असं असलं तरी ही सत्ता कशी मिळवायची या संदर्भात मात्र महायुतीच्या नेत्यांमध्येच मतभिन्नता असल्याचं दिसून येत आहे.. गोकुळचे नेते वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ आणि सत्ताधारी संचालक गोकुळची निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न करत आहेत.. तर दुसरीकडे भाजप नेते उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील आणि शिवसेना नेते आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी गोकुळची निवडणूक महायुती म्हणूनच लढणार अशी भूमिका व्यक्त केली आहे. महायुती मधील नेत्यांमध्ये गोकुळच्या सत्ता समीकरणासंदर्भात मत भिन्नता असल्याने नेमकं गोकुळच्या राजकारणात काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रशेखर बावनकुळे ने बच्चू पर तंज: चुनाव जीतने के लिए लाचार होना गलत

Amravati, Maharashtra:निवडणुका जिंकण्या करिता एवढी लाचारी करणे योग्य नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची बच्चू कडून वर बोचरी टीका अँकर :- आमदार प्रवीण तायडे यांच्या चुलत भावाला जीवे मारण्याचा बच्चू कडू यांनी कट आरोप करत भाजप आमदार प्रवीण तायडे यांनी चांदूर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे अमरावतीचा राजकारणात मोठी खळबळ उडाली असून यावर अमरावतीचे पालकमंत्री व महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रतिक्रिया देत बच्चू कडू यांच्यावर खोचक व टीका केली आहे निवडणुका जिंकण्यासाठी एवढी लाचारी करणे योग्य नसून हे लाचारीचे लक्षण असल्याचे बावनकुळे यांनी म्हटल आहे. निवडणुका जिंकण्यासाठी आमदार होण्याकरिता एवढी लाचारी पाळणे हे योग्य नाही हे लाचार पणाचा लक्षण आहे हे लोकशाहीमध्ये मान्य नाही राजकारणामध्ये निवडणूक येतात जातात निवडून आल्यावर त्यांना मारणे किंवा त्यांचा कट करणे त्यांच्या भावा विरोधात षडयंत्र रचणे जीवनाशी मारणे हे योग्य नाही पोलिसात तक्रार झाली नसती तर हा प्लॅन त्यांनी सक्सेस केला असता आणि त्यांच्या भावाचा आणि त्यांचा जीव गेला असता असे बावनकुळे यांनी म्हटले आहे. बाईट :- चंद्रशेखर बावनकुळे, महसूल मंत्री
0
0
Report

चंद्रपुर के जिल्हाधिकारी पद पर वसुमना पंत की नियुक्ति, आज पदभार ग्रहण

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूरच्या जिल्हाधिकारीपदी वसुमना पंत रुजू ,आज स्वीकारली पदाची सूत्रे भारतीय प्रशासकीय सेवेच्या 2017 बॅचच्या असलेल्या वसुमना पंत यांनी आज चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी पदाची सूत्रे हाती घेतली. जिल्हाधिकारी कार्यालयात त्यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या हस्ते स्वागत करण्यात आले. याप्रसंगी अतिरिक्त जिल्हाधिकारी डॉ. नितीन व्यवहारे, निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार, चंद्रपूरचे उपविभागीय अधिकारी विशालकुमार मेश्राम, उपजिल्हाधिकारी शुभम दांडेकर यांनी नूतन जिल्हाधिकारी वसुमना पंत यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. सन 2017 मध्ये नागरी सेवेत प्रवेश केल्यानंतर त्यांनी नंदुरबार येथे उपविभागीय दंडाधिकारी तसेच एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी म्हणून कारकीर्दीची सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी वाशीम जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहिले. याशिवाय फलोत्पादन संचालक तसेच वनामती संचालक म्हणूनही त्यांनी काम केले आहे. नागपूर महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून तसेच नागपूर स्मार्ट अँड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभारही त्यांनी सांभाळला आहे. पंत जिल्ह्याच्या पहिल्या महिला जिल्हाधिकारी असतील。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top