icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका सभागृह में जन्म प्रमाणपत्र घोटाला: QR से दूसरा नाम उजागर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर ब्रेकिंग... मनपा सभेत बनावट जन्म प्रमाणपत्राचा धक्कादायक प्रकार उघड ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या सभेत आज एक गंभीर प्रकार समोर आला आहे. जन्म दाखला एका व्यक्तीच्या नावाने असताना, त्यावरील QR कोड स्कॅन केल्यावर दुसऱ्याच व्यक्तीचे नाव दिसत असल्याचे उघड झाले. हा प्रकार भाजपचे नगरसेवक राजगौरव वानखेडे यांनी सभागृहात उघड करत प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. बनावट जन्म प्रमाणपत्र तयार करणाऱ्या रॅकेटचा संशय व्यक्त करत, संबंधितांवर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली आहे. एका जन्म प्रमाणपत्रावर दोन वेगवेगळी नावे आढळल्यामुळे नागरिकांच्या अधिकृत कागदपत्रांच्या विश्वासार्हतेवरच प्रश्न उपस्थित होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

सतारा में 9-10 मई को विद्रोही साहित्य सम्मेलन, परिवर्तनकारी विचारों की बहार

Satara, Maharashtra:साताऱ्यात 9 आणि 10 मे ला विद्रोही साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या संमेलनाचे अध्यक्ष म्हणून डॉ. आ. ह. साळुंखे तर स्वागताध्यक्ष म्हणून डॉ. भारत पाटणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ज्येष्ठ विचारवंत प्रा. डॉ.सोनाझारिया मिंझ यांच्या हस्ते संमेलनाचे उद्घाटन होणार आहे. विद्रोही सांस्कृतिक चळवळ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हे १५ वे विद्रोही साहित्य संमेलन पार पडणार आहे. या संमेलनात परिवर्तनवादी विचारांची मांडणी, परिसंवाद, गटचर्चा, काव्यवाचन आदी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, राज्यभरातील लेखक, विचारवंत आणि साहित्यप्रेमी मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. सामाजिक, शैक्षणिक व सांस्कृतिक विषयांवर चर्चेचा ऊहापोह या संमेलनात होणार आहे.
0
0
Report
Advertisement

पुराने पुणे- मुंबई मार्ग पर तेजगति कार में आग, चालक की मौत

Varsoli, Maharashtra:Headline : जुन्या पुणे मुंबई महामार्गावर चारचाकी वाहनाला आग या आगीत वाहनचालकाचा आगीत होरपळून मृत्यू Anchor: जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर कामशेत येथील उड्डाणपुलावर भीषण अपघाताची घटना घडली आहे. भरधाव चारचाकी वाहनाला अचानक आग लागून वाहनातील चालकाचा होरपळून मृत्यू झाला. ही घटना रात्री साधारण दीडच्या सुमारास घडली. आग इतकी भीषण होती की काही क्षणांतच संपूर्ण वाहन आगीच्या भक्ष्यस्थानी गेले. घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलीस आणि वडगाव अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. मात्र, तोपर्यंत आगीने रौद्ररूप धारण केले होते. चालकाला वेळेत बाहेर पडता न आल्याने त्याचा जागीच होरपळून मृत्यू झाला. सध्या मृत व्यक्तीची ओळख पटलेली नाही. हा अपघात मुंबईहून पुण्याकडे येणाऱ्या मार्गावर घडला असून, घटनेचा पुढील तपासकामशेत पोलीस करत आहेत.
0
0
Report

देहूरोड में बीजेपी कार्यकर्ता रमेश रेड्डी की हत्या: चार आरोपी गिरफ्तार

Varsoli, Maharashtra:देहूरोड परिसरात २९ एप्रिल रोजी गोळीबाराचा थरार झाला होता या गोळीबारात भाजप कार्यकर्ता रमेश रेड्डी यांची गोळ्या झाडून आणि कोयत्याने वार करून हत्या केली होती, या प्रकरणात पोलिसांनी मोठी कारवाई करत चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. या आरोपींनी ज्या भागात गोळीबार करत रमेश रेड्डी ची हत्या केली त्याच भागात पोलिसांनी धिंड काढली ,रमेश रेड्डी यांच्यावर चार हल्लेखोरांनी गोळ्या झाडून निर्घृण हत्या केली होती. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली होती. प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत देहूरोड पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आणि अखेर चार आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.पोलिसांनी कडक बंदोबस्तात आरोपींना घटनास्थळ परिसरात आणून त्यांची धिंड काढली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित झाले. पोलिसांनी या कारवाईद्वारे गुन्हेगारांवर वचक बसवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, या हत्येमागील नेमका हेतू काय होता, याचा शोध पोलिस घेत असून पुढील तपास सुरू आहे. आरोपींकडून अधिक माहिती मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे...
0
0
Report

Sangli-Kolhapur road potholes rift: residents endure danger as project stalls

Sangli, Maharashtra:सांगली-कोल्हापूर रस्त्याचे काम रखडल्याने दुरावस्था,रस्ता ठरतोय नागरिकांच्यासाठी जीवघेणा.. अँकर - सांगली शहरातला कोल्हापूर रस्ता हा गेल्या सहा महिन्यांपासून रखडला आहे चौपदरीकरण करण्यासाठी रस्त्याचे काम सुरू करण्यात आलं मात्र सध्या त्या रस्त्याचे काम बंद पडले परिणामी रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले ज्यामुळे रोज त्रास अपघात होत आहेत. व्ही वो - सांगलीतून कोल्हापूरकडे जाणारा शहरातला प्रमुख रस्त्याचं सहा महिन्यांपूर्वी चौपदरीकरण सुरू झालं.महापालिका प्रशासनाकडून चौपदरीकरणासाठी रस्त्याच्या बाजूला असणारी अतिक्रमण काढण्यात आली.मग सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीनेरस्त्याच्या कामाला सुरुवात देखील झाली,मात्र गेल्या चार ते पाच महिन्यांपासून रस्त्याचे काम बंद पडले आहे.व्ही वो - सांगली शहराच्या एसटी स्टँड जवळ असणाऱ्या शास्त्री चौकापासून ते आदीसागर मंगल कार्यालयापर्यंत रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे.ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत.या खड्ड्यांमुळे वाहनधारकांना मोठा त्रास सहन करावा लागतोय,अक्षरशः जीव मुठीत घेऊन वाहन चालवावी लागतात.इतकच नव्हे तर रोजरासपणे किरकोळ अपघात घडत असल्याने काही महिन्यांपूर्वी याच खड्ड्यांमुळे एका महिलेचा मृत्यू देखील झाला होता. बाईट - सुभाष भोसले - रिक्षा चालक - सांगली. व्ही वो - सांगली-कोल्हापूर रस्त्याच्या खड्ड्यांविरोधात आणि रस्त्याचे काम तातडीने सुरू करावं,या मागणीसाठी लोकहित मंचकडून आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात आंदोलनाची भूमिका घेण्यात आली आहे। बाईट - मनोज भिसे - अध्यक्ष - लोकहित मंच व्ही वो - रस्त्याच्या कामाची बिल न मिळाल्याने ठेकेदाराकडून काम बंद करण्यात आलाय.तर सार्वजनिक बांधकाम विभागाकडून निधीच्या बाबतीत तरतूद आणि वरिष्ठ पातळीवर निधीची मागणी करण्यात आल्याचं सांगण्यात आलंय। नागरिकांच्या सोयीच्या दृष्टीने रस्त्याचा चौपदरीकरण काम सुरू झालं खरं, मात्र हाच रस्ता आता नागरिकांसाठी जीवघेणा बनला असून रस्त्याचे काम रखडल्याने नागरिकांना वेगवेगळ्या त्रासाला सामोरे जावं लागत असल्याने याला जबाबदार कोण ? असा प्रश्न आता निर्माण झालाय.
0
0
Report
Advertisement

शिरूर पुलिस स्टेशन के टाकळी हाजी चौकी में हफ्ते वसूल स्टिंग वायरल: महकमे में हड़कंप

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी पोलीस चौकीत हप्ते वसुली होत असल्याचा आरोप केला जात असल्याचाच धक्कादायक व्हिडिओ समोर आलाय,एका युवकाने केलेल्या स्टिंग ऑपरेशन मधून ही धक्कादायक बाब समोर आलीय, शिरूर पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या टाकळी हाजी पोलीस चौकीतील हा धक्कादायक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून या व्हिडिओमुळे पुणे ग्रामीण पोलीस दलात खळबळ उडालीय... धक्कादायक बाब म्हणजे टाकळी हाजी परिसरातील अवैध धंदेवाल्यांकडून पोलीस अधिकाऱ्यांकडून सर्रासपणे हप्ते वसुली केली जात असल्याची तक्रार ही ग्रामस्थांनी वारंवार वरिष्ठांकडे पत्राद्वारे केलीय.
0
0
Report
Advertisement

गणपतीपुळे में हाउसफुल भीड़, कोकण के समुद्र किनारे पर्यटकों ने जमकर आनंद

Ratnagiri, Maharashtra:गणपतीपुळे-रत्नागिरी गणपतीपुळे पर्यटकांनी हाउसफुल. अँकर आज अंगारकी संकष्टी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे भाविकांची गर्दी.. श्रींच्या दर्शनानंतर भाविकांनी समुद्र स्नानाचा आनंद घेतला.. समुद्रकिनारा पर्यटकांनी हाउसफुल.. शाळेला पडलेल्या सुट्ट्यांमुळे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातून पर्यटक कोकणच्या समुद्र किनाऱ्याचा मनमुराद आनंद लुटताना.. यावर्षी खास विशेष म्हणजे बाहेरून आलेल्या पर्यटकांनी आय लव माय कोकण चे टी-शर्ट्स घालून जल क्रीडा चा आनंद घेतला या समुद्रकिनाऱ्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement

रायगढ़ के कर्जतमध्ये राजनैतिक समीकरण बदलेगा; तटकरे-थोरवे साथ आएंगे?

Chendhare, Maharashtra:रायगढ़ के कर्जतमध्ये बड़ी राजनैतिक घडामोड .........तटकरे थोरवे एकत्र येण्याचे संकेत .......... कर्जतमधील राजनैतिक समीकरणे बदलेणार ? ....... अँकर - रायगडच्या कर्जतमध्ये राजकीय समीकरणांमध्ये मोठा बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राष्ट्रवादी आणि शिंदे गटातील शिवसेना यांच्यात सुरू असलेला वाद आता मिटण्याच्या मार्गावर असल्याचे संकेत मिळत आहेत. शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी दिलेल्या सूचनांमुळे जिल्ह्यात चर्चांना उधाण आले आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे आणि आमदार महेंद्र थोरवे यांच्यात तीव्र राजकीय संघर्ष सुरू होता. या संघर्षाचा परिणाम स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही दिसून आला होता. मात्र आता हा वाद संपुष्टात येऊन दोन्ही नेते एकत्र काम करण्याच्या तयारीत असल्याचे संकेत थोरवे यांनी दिले आहेत. त्यामुळे रायगडच्या राजकारणात मोठी उलथापालथ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आगामी काळात तटकरे आणि थोरवे प्रत्यक्षात एकत्र येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे。
0
0
Report

महाराष्ट्र कृषि विभाग पावस स्थिति का आकलन, किसानों के लिए पानी प्रबंधान की योजना

Nagpur, Maharashtra:नागपूर.... On कृषी विभाग आढावा पावसाच्या परिस्थितीबाबत दर दहा वर्षांनी एक वर्ष पावसाचे प्रमाण कमी असते. मागील दशकात 2017 मध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली होती. यावर्षी जिल्ह्यातील धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणीसाठा उपलब्ध आहे. सरासरी पावसाच्या तुलनेत जर पाऊस कमी पडला, तरीही आपण परिस्थितीचा सामना करण्यासाठी पूर्णपणे तयार आहोत. पावसामध्ये जास्त अंतर पडल्यास शेतकऱ्यांना दुबार पेरणीची वेळ येऊ शकते. त्यामुळे पाण्याचे योग्य नियोजन करणे आणि शेतकऱ्यांना अशा परिस्थितीचा सामना करण्यासाठी मार्गदर्शन करणे आवश्यक आहे. कोणतीही परिस्थिती उद्भवली तरी प्रशासनाने सज्ज राहावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन पाहणी करावी, त्यांचे फोटो अपलोड करून जिओ-ट्रॅकिंग करावे, जेणेकरून सर्व अधिकारी प्रत्यक्ष क्षेत्रात कार्यरत असल्याचे दिसेल. क्रॉप डायव्हर्सिटीच्या संदर्भात “महाराष्ट्र 2047” कृषी योजनेची प्रभावी अंमलबजावणी करण्यावर भर देण्यात आला आहे. ज्या भागात पाणी उपलब्ध आहे, तिथे योग्य पाणी व्यवस्थापन केले जाईल. आदिवासी शेतकऱ्यांना बोरवेल उपलब्ध करून देण्यावरही विचार सुरू आहे. कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आढावा घेऊन योग्य नियोजन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. रासायनिक खतांची मागणी वाढलेली आहे. मागील वर्षी देखील खतांची मोठ्या प्रमाणात उचल झाली होती. खत विक्रीसाठी अनावश्यक परवाने देऊ नयेत, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. जास्तीत जास्त सेंद्रिय शेतीला चालना देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणत्याही परिस्थितींक chemical खतांचा तुटवडा होऊ नये, यासाठी प्रशासनाला स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. On दिवाळीपूर्वी मंत्रिमंडळ फेरबदलाबाबत एकनाथ शिंदे हे आमचे सर्वोच्च नेते आहेत. ते योग्य त्या गुणवत्तेच्या आधारे निर्णय घेतील, हा त्यांचा अधिकार आहे. या संदर्भात त्यांनी अद्याप कोणतीही भूमिका जाहीर केलेली नाही. त्यांचा निर्णय अंतिम असेल. On कॅबिनेट संदर्भातील शब्द कॅबिनेटबाबत कोणताही शब्द देण्यात आलेला नव्हता. हा निर्णय पक्षाच्या नेतृत्वावर अवलंबून असतो. On संजय राऊत त्यांच्या विचारांमध्ये मोठा बदल झालेला दिसतो. त्यांच्यासाठी फक्त एकच सांगायचे आहे कसं होतास तू काय झालास तू काँग्रेसच्या संपर्कात आल्यामुळे त्यांच्या वैचारिक भूमिकेत बदल झाला आहे, असे मत व्यक्त करण्यात आले. त्यांच्या भूमिकेमुळे उभाठा पक्षाला मोठा परिणाम होऊ शकतो On बच्चू कडू प्रत्येक राजकीय पक्षाला आपला पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे. प्रत्येक कार्यकर्त्याला वाटते की त्यांचा नेता सर्वोच्च पदावर जावा. पूर्वी विदर्भाकडे दुर्लक्ष झाले होते, मात्र आता एकनाथ शिंदे यांचे नेतृत्वात विदर्भाकडे विशेष लक्ष दिले जात आहे. तसेच, केंद्रात प्रतापराव जाधव यांना मंत्रीपद देण्यात आले आहे. On बंगाल निवडणूक हा विजय अत्यंत मोठा आणि अभूतपूर्व आहे. हिंदुत्ववादी विचारसरणी आणि सर्वांना सोबत घेऊन जाण्याच्या धोरणाला जनतेचा पाठिंबा मिळाल्याचे या विजयातून दिसून येते. On पालघर अत्याचार प्रकरन अजूनही पुरोगामी महाराष्ट्रात अशा दुर्दैवी घटना अजूनही घडत आहेत, ही गंभीर बाब आहे. कायदे अधिक कठोर करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अशा प्रकरणांमध्ये जलदगतीने कारवाई होऊन लवकरात लवकर निकाल लागणे आवश्यक आहे. एखादा गुन्हा घडल्यास दोन महिन्यांच्या आत निकाल लागावा किंवा एका महिन्यात चार्जशीट दाखल व्हावी, . करण्याची गरज आहे. अधिक प्रभावी कायदे करण्याची गरज आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top