445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उंबर्डा में जमीन विवाद की मारामारी CCTV में कैद, दो कुटुंब घायल
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात जमिनीच्या वादातून दोन कुटुंबांमध्ये तुफान हाणामारी झाली. CCTV फुटेज समोर आल्याने खळबळ. पोलिसांवर गंभीर आरोप! कल्याण पश्चिमेतील उंबर्डा परिसरात राहणाऱ्या संगम लोखंडे आणि रणजीत लोखंडे या दोन कुटुंबांमध्ये जमिनीच्या वादातून हा संघर्ष उफाळून आला. त्यांच्या जागेत बाहेरून आणलेली झाडे टाकल्याबाबत विचारणा केल्यानंतर वाद झाला आणि हाणामारी झाली. रणजीत लोखंडे आणि त्यांच्या नातेवाईकांनी लोखंडी रॉड, स्टंप, लाकडी दांडके आणि चाकूने हल्ला केल्याचा आरोप केला गेला. या हल्ल्यात शकुंतला लोखंडे आणि निरंजन लोखंडे जखमी झाले असून रुग्णालयात उपचार सुरू आहेत. संपूर्ण मारहाणीची घटना CCTV फुटेजमध्ये कैद असल्याच्या दाव्यांनाही महत्त्व दिले गेले, तरी पोलिसांनी एकपक्षीय तक्रार नोंदवल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे. आत्मदहनाची धमकी देऊन न्याय न मिळाल्यास मागेल असल्याचा इशारा लोखंडे कुटुंबाने दिला. पुढे काय होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
यवतमाल में मॉनसूनपूर्व पेरणी शुरू, बारिश के अभाव से किसान चिंतित
Yavatmal, Maharashtra:मृग नक्षत्र लागताच यवतमाळ जिल्ह्यातील काही शेतकऱ्यांनी मॉन्सूनपूर्व धूळ पेरणीची लगबग सुरू केली आहे. जिल्ह्यात अद्याप मान्सूनच्या पावसाने हजेरी लावलेली नाही, मॉन्सूनपूर्व अवकाळी पाऊस काही भागात बरसला, मात्र अद्याप पेरणीयोग्य पाऊस झालेला नाही. अल निनो च्या प्रभावामुळे यंदा पाऊस उशिरा व खंडित स्वरूपाचा राहण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. शासन व जिल्हा प्रशासनाने देखील शेतकऱ्यांनी पेरण्याची घाई करू नये असे आवाहन केले आहे. मात्र परंपरागत शेती करणाऱ्या काही शेतकऱ्यांनी पेरणीसाठी मृग नक्षत्राचा मुहूर्त साधला आहे. ज्या शेतकऱ्यांचे क्षेत्र मोठे आहे अशा शेतकऱ्यांना पाऊस सुरू होताच पेरणीसाठी अडचणी जातात. वेळेवर मजुरांची उपलब्धता होत नाही, त्यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी आतापासूनच सरकी टोबायला सुरुवात केली आहे. ईश्वराची कृपा होईल व निसर्गाची साथ मिळेल अशी अशा या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
चंद्रपुर में भाजप विजय के शिल्पकार बने बंटी भांगडीया के बैनर तैनात
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आमदार बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून लावलेले बॅनर, कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख. अँकर: चंद्रपुरात भाजपच्या विजयानंतर आ. बंटी भांगडीया यांचे विजयाचा शिल्पकार म्हणून बॅनर लागले आहेत. यात कुठे किंगमेकर, कुठे धुरंधर तर कुठे जिल्ह्याचे नेतृत्व असा उल्लेख आहे. चंद्रपूर-गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेवर नेमकी व्यूहरचना करत आ. भांगडीया यांनी अरुण लाखानी यांचा ऐतिहासिक विजय खेचून आणल्याचा उल्लेख बॅनरवर आहे. शहरातील विविध चौकात लावलेल्या आ. भांगड़ीया यांच्या संदर्भातील बॅनरची चर्चा आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में दिन के समय कार से पांच लाख रुपये की नकद चोरी, CCTV में कैद
Nagpur, Maharashtra:नागपूर दिन के समय कार में पांच लाख रुपए की नकद चोरी की घटना घटली। खापरखेडा पुलिस स्टेशन के दायरे में चोरी की यह घटना घटली। नागपूर सावनेर- महामार्ग पर पिपळा में मंगलवार दुपारी तीन तेरा बजे के आसपास यह घटना CCTV में दर्ज है। संपत साहू और अतुल काळे यह दोनों नागपूर से होकर सावनेर की ओर जा रहे थे। उसके दौरान पिपळा में चाय पीने के लिए दोनों ने गाड़ी पार्क की और थोड़ा दूर चाय लेने गए, तब चोरों ने कार से नकद लंपास कर दिया। CCTV में पूरी चोरी रिकॉर्ड हुई। खापरखेडा पुलिस इस मामले की जांच कर रही है。0
0
Report
जालना में तीन महीने के वेतन के लिए घंटाघाड़ी चालकोंने किया ठिय्या आंदोलन
Jalna, Maharashtra:जालना : तीन महिन्यांचा पगार थकला,घंटागाडी चालकांनी पुकारला संप अँकर : जालन्यात कचरा वाहतुक करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडी चालकांनी संप पुकारला आहे.घंटा गाडी चालकांचा तीन महिन्यांचा पगार रखडला आहे.त्यामुळे घंटागाडी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.पगार मिळण्याच्या मागणीसाठी सर्व घंटागाडी चालकांनी शहरातील मस्तगड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.3 महिन्यांपासून पगारच नसल्यानं घर चालवायचं कसं असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केलाय.दरम्यान तातडीने पगार न झाल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय.दरम्यान या संपामुळे शहरातील स्वच्छतेवर मोठा परीणाम होण्याची शक्यता आहे0
0
Report
बीड में गोदावरी नदी में भाविकों की नाव पलटी, एक महिला और एक बच्चा लापता
Beed, Maharashtra:बीड: गोदावरीत भाविकांची बोट बुडाली; अतिभारामुळे दुर्घटना, महिला व चिमुकली बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती... ANC - एक धक्कादायक बातमी बीड मधून येतेय... माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तमपुरी येथील एका मंदिराच्या दर्शनासाठी भाविक बोटीने नदी पार करत होते. गोदावरी पात्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन अक्षरशः बुडाली. बोटीत 35 पेक्षा जास्त भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत एक महिला आणि एक लहान बाळ बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती असून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुरुषोत्तमपुरी येथे दोन मंदिरे असून त्यापैकी एका मंदिरात जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. भाविकांच्या म्हणण्यानुसार, काही बोट चालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अतिभाराने प्रवास केल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप होत आहे. बाईट: महिला भाविक ( बुडालेली महिला ) एकूण दोन बाईट्स आहेत.0
0
Report
Advertisement
गडचिरोली के अहेरी नगर परिषद के कर संकलन अधिकारी पर हमला, अधिकारी गंभीर घायल
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर हल्ला हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर आज सकाळी 4 इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी वैभव पांढरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी माजी जि. प..अध्यक्ष अजय कंकडालवारसह चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. अवैध इमारतीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकला गेले असताना वाद उकरून काढत हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी तपास प्रक्रिया वेगवान केली आहे.0
0
Report
सोलापुर में मंत्री के बयान से सियासी घमासान, दर्शन की बहस तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत, मंत्री जयकुमार गोरे यांची खा. धैर्यशील मोहिते यांचे नाव न घेता जोरदार टीका *ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी तपपूर्ती* - जनसामान्यांना बळ देणारे , देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करणारे पंतप्रधान देशाला लाभले आहेत - मोदींच्या भविष्यातील कालखंडासाठी श्री सिद्धरामेश्वर यांना साकड घातलं *ऑन ग्रामपंचायत निवडणुका* - लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका घेतोय - सर्व ग्रामपंचायत यांना लवकरच लोकनियुक्त बॉडी देण्याचा प्रयत्न करू *ऑन धैर्यशील मोहिते पाटील* - ते काय म्हणतात याला मी अन्सरेबल नाही - धैर्यशील मोहिते पाटलांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही हे मला माहिती नाही - मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे... ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही - सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणार आणि ते सरकार दरबारी घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे - मग ही भूमिका पोस्टमन, आमदार, पालकमंत्री स्वरूपात करेन - सामान्य माणसांचा प्रश्न सोडवत असताना मला पोस्टमनची भूमिका मिळाली तरी यात वाईट वाटायचं कारण नाही *ऑन विधानपरिषद निवडणूक* - आम्हाला तयारी करण्याची खूप काही आवश्यकता नाही... - आमच्याकडे विजयासाठी लागणारे मतदान ऑलरेडी भारतीय जनता पार्टी म्हणून आहे - महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि तसेच पुढे आलो तर काही शिल्लक राहील असे मला वाटत नाही - तरीदेखील पाचशे पार जाण्याचा आमचा संकल्प आहे *ऑन डीसीसी बँक* - राजेंद्र राऊत यांनी डीसीसी बँकेच्या भ्रष्टाचारा संदर्भात आवाज उठवला म्हणून त्यांना मतदान पडणार नाही असा नरेटीव सेट केला जातोय - भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मत पडतात की कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे - ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची अडचण आहे... ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सर्व संचालक व्यवस्थित आहेत.. त्यांना आनंद आहे - त्याच संचालकांची इच्छा होती की चौकशी व्हावी.. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी - भ्रष्टाचार कुठे झालेला आहे कोणत्या टोकाला झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे *ऑन विधान परिषद विजय आकडा* - अबकी बार 500 पार *ऑन मोहिते पाटील* - तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेत नाही - मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून मला केव्हा आवश्यकता भासली नाही... आजही वाटत नाही.. - त्यामुळे ही निवडणूक आम्हाला विचारला असता तर बिनविरोध झाली असती... आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती... आमचे दर्शन घेतले असोत - मात्र आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत... - आता स्वतःच अस्तित्व शिल्लक रहावं किंवा आमच्याशिवाय काही घडत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हे मोडीत निघेल - आणि ही निवडणूक त्याला उत्तर असेल... बाईट - जयकुमार गोरे ( पालकमंत्री, सोलापूर )0
0
Report
वासिम लॉज छत पर युवक की मौत, पुलिस जांच शुरू
Washim, Maharashtra:वासिम शहर के शिवाजी चौक इलाके में एक लॉज की छत से एक व्यक्ति गिरकर दूसरी छत पर चोट लगने से मौत हो गई। घटना सुबह उजागर हुई और क्षेत्र में भारी खलबली मच गई। वर्धा जिले के चार से पाँच लोग लॉज में काम के लिए रुके थे। रात के समय इनमें से मृतक आशीष शेलके लॉज की छत पर गया और करीब 25 से 30 फुट नीचे छत पर गिरकर डाक頭 पर गंभीर चोट लगने से घटनास्थल पर ही उसकी मौत हो गई। सूचना मिलते ही पुलिस और फोरेंसिक टीम मौके पर पहुँच गईं, शव का पंचनामा कर पोस्टमार्टम के लिए जिला सामान्य अस्पताल भेज दिया गया। आगे की जांच वाशीम शहर पुलिस कर रही है.0
0
Report
Advertisement
गोवा के अंबाबाई मंदिर में 1.5 किलो सोने का कलश स्थापित करने की तैयारी
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. गोव्यातील एका भक्ताने दीड किलो सोन्यात डेऱ्यासह साडेतेरा फुटाचा कळस बनवला आहे. सध्या अधिक मास सुरू आहे, तो संपायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे येत्या शुक्रवारी हा कळस मंदिरावर बसावा यासाठी फक्त प्रयत्न केला जात आहे. गोव्यातील याच भक्ताने अंबाबाईला यापूर्वी सोन्याचा अलंकार देणगी म्हणून दिला होता.. आता हाच भक्त अंबाबाई देवीच्या कळसासाठी दीड किलो वजनाचा सोन्याचा शिखर अर्पण करणार आहे. हा सोन्याचा कळस व डेरा कर्नाटक मधील मेंगलोर इथल्या कारागराने बनविला आहे. आधी कळसाचे तांब्यातील मॉडेल बनवले, हे मूळ कळसावर बसवून माप घेतले गेले. त्यासाठी 200 किलो तांबे वापरण्यात आले. याच तांब्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. हा कळस बनवण्यासाठी तब्बल दीड महिन्याचा कालावधी लागला. अंबाबाई मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
दिल्ली बुलावे के बावजूद गोकुळ गीते शिंदे से मिलने पर अडिग
Nashik, Maharashtra:Nashik breaking गोकुळ गीते byte points - काल मी प्रचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या भावाला फोन आला होता - मला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले होते - *आज ते दिल्ली ला आहेत मात्र मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे* - *मी आता देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहे* - मला जर दिल्लीला बोलावले तरी मी जाईन मुख्यमंत्री याना भेटायला - *काल किशोर दराडे भेटायला आले होते पण मी त्यांना भेटलो नाही* - काल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली - आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही - मी भाजपात सक्रिय नाही माझे बंधू गणेश गीते भाजपात आहेत त्यामुळे मी काम करत होतो - माझ्या उमेदवारी वर जळगाव चा प्रश्न अवलंबून नाही - *दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत मागच्या सहा वर्षात दराडे कुठलेही काम केले नाहीत* - आजच्या भेटीत देखील काही मार्ग निघेल अस वाटत नाही - मी तडजोड करणार नाही - *इथले जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत त्यामुळे मतदार मला लढण्यासाठी सांगत आहेत* - *नेत्यांचा मान राखण्यासाठी मी थांबू शकतो घरात बसू शकतो पण पाठिंबा देऊ शकत नाही* - दराडे यांना जिंकून आण्यासाठी त्यांना पाठिंबा हवं आहे - माझं आणि गिरीश महाजन यांचे फार काही संबंध नाही पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत - गणेश गीते यांनी देखील थांबण्यासाठी सांगत आहेत - *गेल्या 8 दिवसापासून मला प्रलोभन येत आहेत पण मला ते नको आहे भीक घेणार नाही* - मध्यस्थी मार्फ़त प्रलोभने दिले जात आहेत0
0
Report
वसई पश्चिम में unknown आरोपी ने महिला का पीछा कर विनयभंग किया, खोज जारी
Vasai-Virar, Maharashtra:महिलेचा पाठलाग करून इमारतीतच विनयभंग; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल वसई : नालासोपारा पश्चिम परिसरात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वसई पश्चिम येथील एका हॉटेलमधून आपल्या राहत्या घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपी महिलेच्या इमारतीपर्यंत पोहोचला. इमारतीच्या परिसरात आरोपीने महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घालत, महिलेचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75 आणि 78 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि पायात सँडल घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.0
0
Report
Advertisement
अमरावती अस्पताल के एक बिस्तर पर दो मरीज, स्वास्थ्य व्यवस्था चिंतित
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा सामान्य रुग्णालयात एका बेडवर दोन रुग्ण उपचार घेत आहेत. जिल्हा सामान्य रुग्णालयाची यंत्रणा व्हेंटिलेटरवर असल्याचं बोललं जातं. जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या वार्ड क्रमांक 6 मध्ये एकाच बेडवर दोन रुग्णांवर उपचार सुरू असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे आरोग्य यंत्रणेबद्दल प्रश्न उभे राहू लागले आहेत. रुग्णालयातून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी यांनी.0
0
Report
अकोला में यूरिया-डीएपी की बेहतर सप्लाई से खरीप तैयारी तेज
Akola, Maharashtra:अकोला जिलेतील अकोट शहरासह तालुक्यात युरिया आणि डीएपी खतासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि डीएपी खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. खतांचा पुरवठा कमी असल्याच्या भीतीने अनेक कृषी सेवा केंद्रांसमोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने परिस्थितीची दखल घेत तालुक्यासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या. आज युरिया डीएपी खताचा नवीन साठा कृषी सेवा केंद्रांना वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी मध्यरात्रीपासूनच केंद्रांसमोर दाखल झाले. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि वेळेत खत मिळावे यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र वाढती गर्दी पाहता सर्वांना खत मिळेल का, याबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता कायम आहे. प्रशासनाने खतांचे नियोजनबद्ध वितरण करून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.0
0
Report
काली हल्दी के दामों में भारी गिरावट; किसानों की आर्थिक चिंता बढ़ी
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिति में काली हल्दी (कोचा) पिक के दाम गिरावट की तस्वीर दिख रही है। पिछले सप्ताह हुए लिलाव में काली हल्दी को प्रतिक्विंटल 21 हजार रुपये का अधिकतम दाम मिला था। लेकिन वर्तमान लिलाव में दाम लगभग 4 हजार रुपये गिरकर किसान चिंतित हो उठे हैं। औषधीय गुणों के कारण काली हल्दी को महत्त्वपूर्ण नगदी फसल माना जाता है। इस पिक की बाजार में आम तौर पर अच्छी मांग रहती है। परंतु अभी बाजार में आपूर्ति बढ़ने और मांग घटने के कारण दामों पर प्रभाव पड़ रहा है, व्यापारियों के अनुसार। इस गिरावट से काली हल्दी उत्पादक किसानों की आर्थिक गणित पर असर पड़ने की सम्भावना है।0
0
Report
Advertisement
