445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित पवार ने हितेंद्र ठाकूर से मुलाकात कर ठाणे बैंक पर विजय का जश्न मनाया
Vasai-Virar, Maharashtra:राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट, ठाणे जिल्हा बँकेत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी घेतली भेट... सोशल मीडियावर रोहित पवारांनी पोस्ट केल भेटीचे कारण. ठाणे पालघर जिल्ह्यात भाजपाला धोबीपछाड देत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ठाणे ठाणे बँकेवर आपलं वर्चस्व कायम राखल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.. वसई-विरार शहराला विकासकामांच्या माध्यमातून एक आकार देणारे ज्येष्ठ नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख मा. हिंतेंद्र ठाकूर साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसंच जिल्हा बँकेवर सत्ता आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी माजी. आ. क्षीतिज ठाकूर माजी. आ. सुनील भुसारा उपस्थित होते...अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर केली आहे ...0
0
Report
पोलादपूर-अंबेनळी घाट में दराड़ गिरा; मार्ग मलबे से अवरुद्ध, प्रशासन सतर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ब्रेकिंग स्लग : पोलादपूर-आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; बावळी टोक परिसरात रस्ता मलब्याखाली रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावळी टोक परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून मोठे दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने नागरिक आणि वाहनचालकांना अत्यावश्यक काम असल्यासच आंबेनळी घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार घाटमार्ग तात्पुरता बंद करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून संबंधित विभागांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.0
0
Report
सातारा जिले में बारिश तेज, महाबलेश्वर में 158 मिमी रिकॉर्ड, जलस्तर बढ़ना चिंता
Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.महाबळेश्वर मध्ये एका दिवसात 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पाटण ,कोयना, नवजा भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे . मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक 158 मिलिमीटर पाऊस झाला आहे.त्याचबरोबर धरणाच्या पाणी पातळीत देखील झपात्याने वाढ होत आहे.. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात देखील पाण्याची आवक वाढत आहे त्याचबरोबर कण्हेर, धोम बलकवडी, उरमोडी धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. घाट रस्त्यावर प्रवास करताना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के आंबा घाट में दराड़ गिरने से एकेरी मार्ग बंद, चालक सतर्क रहें
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीच्या आंबा घाटात दरड कोसळली.. महामार्गावर एकेरी वाहतूक बंद,चालकांना सतर्कतेचे आवाहन.. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान आज सकाळी नऊच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे.. सुदैवाने,चारपदरी रस्त्याच्या मधोमध असलेल्या लोखंडी कंपाउंडमुळे मुख्य दरड वाहतुकीच्या मार्गावर आली नाही,मात्र काही दगडांचे तुकडे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे.. खबरदारीचा उपाय म्हणून दक्खन ते कळकदारा दरम्यानचा एकेरी मार्ग सध्या बंदण्यात आला असून,परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहनधारकांनी आपली वाहने अत्यंत सावधगिरीने चालवावीत,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..0
0
Report
भंडारा में विकसित भारत रोजगार व आजीविका सुरक्षा अभियान का शुभारम्भ, 125 दिन रोजगार
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ शुभारंभ. मजुरांना 125 दिवस रोजगाराची हमी. ग्रामीण भागातील रोजगार और शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ भंडारा जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ झाला. ग्रामपंचायत बेला येथे झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. या नव्या अभियानामुळे मजुरांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार असून, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपातील 318 विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर मान्यورांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.0
0
Report
चंद्रपुर में मानव-वन्यजीव संघर्ष रोकथाम के लिए मंत्री स्तर पर ठोस कदम तय
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याच्या वनमंत्र्यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या आनी अधिकारी वर्ग आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची बैठकला उपस्थिती होती. वनमंत्री नाईक यांनी उपाययोजना करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांवर स्थानिक स्तरावर बैठक घेऊन आवश्यक ते सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव सहजीवनासाठी उपाययोजना महत्त्वाच्या असून राज्य सरकार यात सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे ते म्हणाले. मानव-वन्यजीव संघर्ष तांत्रिक अहवालाची तातडीने अंमलबजावणी, जिल्ह्याला व्याघ्र जिल्ह्याचा दर्जा, घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्यांचे हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांसाठी अंडर- ओव्हर पास उभारणी अशा विविध मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.0
0
Report
Advertisement
22 जुलाई तक सुनवाई, आरक्षण सीमा के कारण चुनाव टाले गए
Washim, Maharashtra:वाशिमसह राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबाबतचा निर्णय आता २२ जुलै रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे.आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याच्या कारणावरून निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.या प्रकरणावरील सुनावणीनंतर न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिल्यास राज्य निवडणूक आयोग पुढील प्रक्रिया सुरू करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यामुळे वाशिमसह राज्यातील इच्छुक उमेदवार,राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष आता २२ जुलैच्या सुनावणीकडे लागले आहे.0
0
Report
सोलापुर वनविभाग घोटाले की जांच अब सीबीआई के हवाले, HC के आदेश से मामला आगे बढ़ेगा
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित वन विभागाच्या सामाजिक वनीकरणा वृक्ष घोटाळ्याचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचने सीबीआय कडे सोपवलेला आहे या प्रकरणातील तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठ यश आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष और पाठिंबामुळे 2017 ते 2025 या काळात 109 कोटी रुपयांचा वृक्ष लागवड घोटाळा झाला होता ही बाब कागदपत्रानुसार तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी समोर आणली होती. 2022 यामध्ये पंढरपूर मधील आणि मंगळवेढा मधील वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणी 8 आणि 13 असा 21 कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हाही दाखल झाला होता. संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन नाकारण्यात आला होता तरीही त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नव्हती त्यामुळे यातील तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर हे प्रकरण दाखल केलं आणि यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणि पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे दुर्लक्ष हे पाहता कोल्हापूर सर्किट बेंच ने या 109 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा तपास आता सीबीआयने करावा असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदाच वनविभागाच्या घोटाळ्याला आता सीबीआय हाताळणार आहे दादा साहेब चव्हाण , तक्रारदार0
0
Report
अमरावती नगरपालिका में पार्षद संजय गव्हाळे पर FIR, सफाई अधिकारी को गाली दी
Amravati, Maharashtra:नगरसेवक संजय गव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल; अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना शिवीगाळ. अशी तक्रार अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनला दिली. त्या अनुषंगाने नगरसेवक संजय गव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुतगिरणी परिसरात महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, महापौर श्रीचंद तेजवाणी आणि नगरसेवक समस्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवक संजय गव्हाळे आक्रमक झाले आणि त्यांनी स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली.0
0
Report
Advertisement
धुळे टोल नाके पर शरद पाटील का आक्रामक भाषण वीडियो वायरल
Dhule, Maharashtra:माजी आमदार शरद पाटील यांनी धुळे चाळीसगाव दरम्यान असलेल्या टोलनाक्यावरती कर्मचाऱ्यांना अर्वच भाषेत बोलायचं व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओ बद्दल माजी आमदार शरद पाटील यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला गेल्याचा सांगितलं असलं तरी व्हिडिओमध्ये ते कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेमध्ये बोलताना दिसून येत आहे. मुंबईवरून धुळ्याकडे येत असताना टोलनाक्यावर हा वाद झाला आहे. माजी आमदार शरद पाटील यांची टोल न देण्यावरून टोल कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्या प्रकरणी शरद पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार शरद पाटील यांच्यावर टोल नाक्यावर टोल न भरल्याच्या वादातून कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. टोल नाक्यावर नियमित शुल्क भरण्याच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली. यावेळी शरद पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांशी उग्र भाषेत वाद घालत शिवीगाळ केल्याचा तसेच पदाचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.0
0
Report
राजापूर-रत्नागिरी में शिवसृष्टी ढहाने पर ठेकेदार के खिलाफ सख्त कार्रवाई के निर्देश
Ratnagiri, Maharashtra:राजापूर-रत्नागिरी.. पहिल्याच पावसात शिवसृष्टीचे बांधकाम कोसळले.. ठेकेदारावर कारवाईचे आदेश.. राजापूर शहरात पर्यटन संचालनालयामार्फत १ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या 'शिवसृष्टी' प्रकल्पाचा काही भाग पहिल्याच पावसात खचून कोसळला.. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत, राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.. या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.. तसेच,या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालयाकडे तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..0
0
Report
चेन्नई की भक्त ने शिर्डी साईबाबा के लिए सोने का शंख दान किया
Shirdi, Maharashtra:शिर्डीच्या साईबाबांना चेन्नई येथील साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मीकांता यांनी 100 ग्रॅम वजनाचा सुंदर सुवर्ण नक्षीकाम केलेला शंख अर्पण केला आहे. या सुवर्ण शंखाची किंमत 13 लाख 27 हजार रुपये इतकी असून शिर्डी साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांच्या हस्ते दानशूर साईभक्त श्रीमती जी. लक्ष्मी कांता यांचा विशेष सत्कार करण्यात आला.0
0
Report
Advertisement
संगमेश्वर, रत्नागिरी में गव्यों के उत्पात से धान की फसल को भारी नुकसान
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर/ रत्नागिरी कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; भातलावणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. भातलावण्याची कामे सुरू असतानाच गव्यांकडून शेतात घुसून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत वारंवार वन विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
ठाकरे सेना ने नागेश पाटील आष्टीकर को चुनौती देने के बाद आक्रामक रुख दिखाया
Nanded-Waghala, Maharashtra:बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला आव्हान दिल्यानंतर आता ठाकरे सेना देखील आक्रमक झालीये. वाय प्लस सुरक्षा बाजूला करून नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदार संघात फिरावं ऑपरेशन तुडवा कसं असते त्याची प्रचिती नागेश पाटील अष्टीकर यांना येईल असे प्रति आव्हान ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आष्टीकर यांना दिले. खासदार आष्टीकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अंजनखेड येथे झाला होता. त्यांनतर झालेल्या सभेत खासदार आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला इशारा देत मी प्रत्येक गावात येणार आहे समोर येऊन दाखवा असा इशारा दिला होता. त्याला आता ठाकरे सेनेने उत्तर दिले आहे.0
0
Report
नाशिक के पिंपळगाव जलाल में रेलवे गेट 72 के पास भारी पानी से परेशानी
Yeola, Maharashtra:अँकर : नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील रेल्वे गेट क्रमांक 72 येथील रेल्वे पुला खालील बोगद्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पाणी इतके साचते की विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य होते आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तरी रेल्वे गेट क्रमांक 72 सुरू करण्यात येावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
