445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तुर्भे डम्पिंग ग्राउंड के विरोध में आमरण उपवास, रास्ता रोको कर प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:तुर्भे येथील डम्पिंग ग्राउंड मध्ये उभारण्यात येणाऱ्या वेस्ट टू एनर्जी या प्रकल्पा विरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी वासीयांनी विरोध दर्शवत आमरण उपोषणाला सुरुवात केलय. आज सायंकाळी आक्रमक झालेल्या नागरिकांनी आपला संताप व्यक्त करण्यासाठी रास्ता रोको देखिल केला. आक्रमक झालेल्या नागरिकांनी ठाणे बेलापूर रोड वर उतरत चक्काजाम आंदोलन करत प्रशासना पर्यंत आपला आवाज पोहचविण्याचा प्रयत्न केला. यावेळी आमरण उपोषणाला बसलेल्या नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी आंदोलनकर्त्यांची समजूत काढत शांततेच्या माध्यमातून आंदोलन करण्याचे आवाहन केल्यावर हा रास्ता रोको मागे घेण्यात आलाय.0
0
Report
तुर्भे डम्पिंग ग्राउंड की वेस्ट टू एनर्जी परियोजना रोकें, उपोषण जारी रहेगा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील तुर्भे डम्पिंग ग्राउंड मध्ये वेस्ट टु एनर्जी हा प्रकल्प महापालिकेतर्फे राबविण्याचा घाट घातला जात असून याविरोधात स्थानिक नगरसेवक आणि झोपडपट्टी धारकांनी आमरण उपोषणाचे हत्यार उपसले आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प राबविल्यास झोपडपट्टी भागात पुनर्विकास प्रकल्प राबविता येणार नाही. यासोबतच नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण निर्माण होणार आहे. वेस्ट टु एनर्जी प्रकल्प रद्द करावा अन्यथा आमरण उपोषणावरून उठणार नाही असा थेट इशारा नगरसेवक सुरेश कुलकर्णी यांनी मनपा प्रशासनाला दिलाय.0
0
Report
गडचिरोली में काँग्रेस का धरणा, भूमि-धिग्रहण में प्रशासनिक मनमानी
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने केले धरणे आंदोलन जिल्हाधिकारी कार्यालया पुढे एकत्र आले संबंधित गावातील हजारो नागरिक, सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा केला निर्धार अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील एमआयडीसी आणि विमानतळाच्या जागेसाठी भूमीअधिग्रहण संदर्भात प्रशासनाची मनमानी सुरू असल्याच्या आरोप करत काँग्रेसने आज धरणे आंदोलन केले. जिल्हाधिकारी कार्यालया पुढे संबंधित गावातील हजारो नागरिक एकत्र आले. यासंदर्भात सकारात्मक निर्णय न झाल्यास चार जून रोजी ठिय्या आंदोलन करण्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केलाय. गडचिरोली जिल्ह्याला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचा दावा करणाऱ्या सरकारकडून प्रत्यक्षात मात्र शेतकऱ्यांवर सातत्याने अन्याय होत असल्याचा आरोप करण्यात आलाय. एमआयडीसीच्या या दडपशाही धोरणाविरोधात १४ गावांतील नागरिकांनी एकत्र येत 'मुंडण आंदोलन' केले होते. सरकार आणि प्रशासनाला जागे करण्यासाठी वेळोवेळी निवेदने देण्यात आली, परंतु प्रशासनाकडून यावर कोणतीही सकारात्मक पावले उचलली गेली नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला असून, "सरकार गडचिरोलीला विकासाकडे नाही, तर विनाशाकडे घेऊन जात आहे," अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
जुन्नर के पश्चिम आदिवासी क्षेत्र में जल संकट पर प्रशासन ने ठोस आदेश दिए
Barav, Maharashtra:*ब्रेकिंग* *पुणे* *जुन्नर तालुक्यातील पश्चिम आदिवासी भागातील भीषण पाणीटंचाईचा प्रश्न आता थेट पुणे जिल्हा परिषदेत पोहोचला* जिल्हा परिषद सदस्या माई लांडे यांनी डोक्यावर पाण्याचा हंडा घेऊन पुणे जिल्हा परिषद सीईओ यांच्या केबिनमध्ये ठिय्या आंदोलन करत प्रशासनाला धारेवर धरले* जुन्नरच्या आदिवासी भागात शासनाचे पाण्याचे टँकर वेळेत पोहोचत नसल्याचा आरोप करत, जलजीवन मिशनची कामेही अत्यंत बोगस पद्धतीने झाल्याचा गंभीर आरोप माई लांडे यांनी केला. अनेक गावांमध्ये आजही पिण्याच्या पाण्याची व्यवस्था नसल्याने संतप्त झालेल्या माई लांडे थेट हंडा घेऊन जिल्हा परिषदेत दाखल झाल्या. यानंतर मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांनी परिस्थितीची दखल घेत प्रशासनाला तातडीचे आदेश दिले. जुन्नरच्या पश्चिम आदिवासी भागात टँकर वेळेत पोहोचवावेत, गरज पडल्यास टँकर संख्या वाढवावी तसेच रोजचा अहवाल सादर करावा, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, जलजीवन मिशन अंतर्गत ज्या ठिकाणी निकृष्ट किंवा बोगस कामे झाली आहेत, त्या प्रकरणांची चौकशी करून संबंधित ठेकेदारांना ब्लॅकलिस्ट करण्याचा इशाराही प्रशासनाने दिला आहे. पुढील आठवड्यात पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना पश्चिम आदिवासी भागाचा दौरा करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यावेळी बोलताना माई लांडे म्हणाल्या, “माझ्या माणसांना पिण्याचे पाणी मिळालेच पाहिजे। समस्या सुटल्या नाहीत तर जिल्हा परिषद जनरल बॉडीमध्ये अधिक आक्रमक भूमिका घेऊ, आणि गरज पडल्यास आदिवासी महिलांसह उपोषण आंदोलन करू.” पाणीटंचाईच्या प्रश्नावर आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी आमनेसामने आल्याने जुन्नर तालुक्यातील परिस्थितीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.0
0
Report
मीरा रोड के सीएनजी पंप पर भारी मारपीट: दो पक्ष भिड़े, मामला दर्ज
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा रोडच्या सीएनजी पंपावर तुफान हाणामारी; गुन्हा दाखल मीरा- रोडवरील महानगर सीएनजी पेट्रोल पंपावर सीएनजी भरण्यासाठी वाहनांची मोठी रांग लागलेली असताना एका वाहनचालकाने अचानक मध्येच गाडी घुसवल्याने दोन जना मध्ये वाद झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर काही वेळातच हा वाद विकोपाला जाऊन वाद तुफान हाणामारीत बदलल्याची माहिती समोर आली आहे. या मारामारीत काही जण जखमी झाल्याची माहिती असून, घटनेनंतर दोन्ही पक्ष मिरा रोड पोलीस ठाण्यात पोहोचले. पोलिसांनी दोन्ही बाजूंची माहिती घेत पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. तसेच, समोर आलेल्या एफआयआरनुसार भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 79, 115(2), 352, 189(1), 189(2), 190, 191(2) तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम 37(1), 37(3) आणि 135 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती आहे.0
0
Report
Dhananjay ने पड़ोसियों के बीच पानी डालने को लेकर भिड़ंत, CCTV में कैद
Ambernath, Maharashtra:घरासमोरील नाल्यात पाणी टाकलं यावरून शेजाऱ्यांमध्ये हाणामारी\nहाणामारीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद\nघरासमोरील नाल्यात पाणी टाकलं या किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून एका कुटुंबातील सदस्यांना मारहाण केल्याची घटना उल्हासनगर कॅम्प नंबर दोन मध्ये घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली असून ,या प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे\nVo कॅप नंबर दोन भैय्यासाहेब आंबेडकर परिसरात मुंड आणि वाल्मिकी हे दोन कुटुंब शेजारी शेजारी राहतं ,या दोन कुटुंबांमध्ये कायम किरकोळ कारणावरून वाद होत असतात , काल संध्याकाळच्या सुमारास संतोषदेवी मुंड यांनी लादी पुसायचं पाणी घरासमोरील नाल्यामध्ये टाकलं , हे पाहून शेजारी राहणारे रमेश वाल्मिकी यांनी हे पाणी नाल्यात का टाकलं यावरून संतोष देवी यांना जाब विचारला , त्यानंतर रमेश यांनी संतोष देवी यांना शिवीगाळ करत त्यांना धक्काबुक्की केली हे पाहून संतोष देवी यांचे पती सुनील कुमार तिथे आले , मात्र रमेश वाल्मिकी आणि त्यांच्या मुलांनी लाथा बुक्क्यांनी मुंड पती-पत्नीला जबर मारहाण केली ,ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे ,याप्रकरणी पोलिसांनी वाल्मीकी परिवारातील चार जणांविरोधात गुन्हा दाखल केला असून पोलीस अधिक तपास करीत आहेत\nचंद्रशेखर भुयार उल्हासनगर0
0
Report
Advertisement
विदर्भ में तेज गर्मी: अमरावती 46.4°C, वर्धा 46.5°C, नागपुर 44.4°C
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भ होरपळला.. वर्धा 46.5 अंश सेल्सिअस तापमान अमरावती 46.4 और अकोला जिल्ह्यात पारा 46.3 अंशावर जिल्हा तापमान अमरावती 46.4 वर्धा 46.5 अकोला 46.3 यवतमाळ 45.4 नागपूर 44.4 बुलडाणा 43.8 चंद्रपूर 43.8 गडचिरोली 43.6 वाशिम 44.0 गोंदिया 43.80
0
Report
अब Akola तक पहुँचा नीट पेपर फूट, कांग्रेस ने मंत्री इस्तीफे की माँग की
Akola, Maharashtra:देशभर गाजत असलेल्या नीट पेपर फुटी प्रकरणाचे पडसाद आता अकोल्यातही उमटताना दिसत आहेत. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ करणाऱ्या या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा, या मागणीसाठी काँग्रेसच्या वतीने अकोल्यात आंदोलन करण्यात आले. काँग्रेसचे आमदार साजीदखान पठाण यांच्या नेतृत्वात हे आंदोलन पार पडले. यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. देशभरात झालेल्या नीट पेपर फुटीमुळे लाखो विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फेरल्याची भावना व्यक्त करत काँग्रेसने केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. वर्षभर परिश्रम घेऊन परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये या प्रकारामुळे तीव्र नाराजी आणि निराशेचे वातावरण निर्माण झाले असल्याचे आंदोलकांनी म्हटले. पेपर फुटीमुळे शिक्षण व्यवस्थेवरील विश्वास डळलीत झाला असून, या प्रकरणातील मुख्य सूत्रधारांसह संबंधित सर्व दोषींना कठोर शिक्षा करण्यात यावी, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली. तसेच या गंभीर प्रकाराची नैतिक जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली. यावेळी काँग्रेस तर्फे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा फोटो जाळण्यात आला. पेپر खोटी प्रकरणात पोलिसांनी मोटेगावकर यांना अटक केली आहे तर मोटेगावकर यांचा काँग्रेसच्या व्यासपीठावरून एका भाषणाचा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. यामध्ये आपण देशमुख परिवाराचा कुंकू लावला असल्याचं त्यांनी म्हटले आहे. तर गुन्हेगार कोणाचाही नातेवाईक असो कुणाचाही निकड वरती असो त्याला शिक्षा झालीच पाहिजे अशी भूमिका सुद्धा काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनी मांडली आहे. या आंदोलनात काँग्रेसच्या विविध सेलचे पदाधिकारी, युवक काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.0
0
Report
जलना: शिवसेना प्रदर्शन, महंगाई और प्याज के भाव गिरने के विरोध में
Jalna, Maharashtra:जालना :महागाई, कांद्याच्या कमी दरावरून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं आंदोलन जालना शहरातील मोतीबाग परीसरात हे आंदोलना करण्यात आलं यावेळी शिवसैनिकांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करून परीसर दणाणून सोडला.सध्या कांद्याचे भाव कोसळल्याने शिवसैनिकांनी गळ्यात कांद्याच्या माळा घालून सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणाचा जाहीर निषेध नोंदवला.0
0
Report
Advertisement
पाबळ में घर में भीषण आग, शेड में मंडप और सामग्री जलकर खाक
Shirur, Maharashtra:शिरूर/पुणे पाबळमध्ये घराला भीषण आग, मंडपाच्या साहित्याचे मोठे नुकसान ANC..शिरूर तालुक्यातील पाबळ येथे राजू झोडगे यांच्या घराला अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत शेडमध्ये ठेवलेले मंडपाचे साहित्य जळून खाक झाले असून मोठे आर्थिक नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अचानक घरातून धूर निघत असल्याचे परिसरातील नागरिकांच्या निदर्शनास आले. काही क्षणातच आगीने रौद्ररूप धारण केल्याने शेडमधील मंडपाचे कापड, सजावटीचे साहित्य, प्लास्टिक साहित्य तसेच इतर वस्तूंना आग लागली. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांसह अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या तत्परतेमुळे आग परिसरात पसरून मोठी दुर्घटना होण्यापासून टळली. मात्र, आगीत मंडप व्यवसायासाठीचे मोठ्या प्रमाणात साहित्य जळून नुकसान झाले आहे. दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
चांदूर बाजार तहसील में किसानों का आक्रामक आंदोलन, पांदन रस्ते तुरंत बनाओ की मांग
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांचे झोपा काढो आंदोलन; हंगामापूर्वी पांदण रस्ते तयार न झाल्याने महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तहसील कार्यालयात शेतकऱ्यांनी झोपा काढो आंदोलन सुरू केले असून महसूल प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. पावसाळ्यापूर्वी पांदन रस्ते तयार करा या मागणीसाठी लोकविकास संघटनेने हे आंदोलन केले आहे. पावसाळा तोंडावर आलेला असतानाही ग्रामीण भागातील पांदन रस्त्यांची कामे सुरू न झाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी असून याच पार्श्वभूमीवर आज लोकविकास संघटनेच्या वतीने चांदूर बाजार तहसील कार्यालयात आक्रमक आंदोलन करण्यात आले. शेतकरी आंदोलक गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली शासन आणि प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तहसील कार्यालयात झोपा काढो आंदोलन करण्यात आले असून आंदोलकांनी पावसाळ्यापूर्वी सर्व पांदन रस्ते तातडीने तयार करा अशी मागणी करत प्रशासनाविरोधात घोषणाबाजी केली आहे. पांदन रस्ते नसल्यामुळे शेतीमालाची वाहतूक, शेतात जाणे आणि कृषी कामे मोठ्या प्रमाणात प्रभावित होत आहे त्यामुळे आज शेतकरी आक्रमक झाले असून आंदोलनावेळी परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान मागण्या पूर्ण न झाल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल दिला इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
शिवसेना के मंत्री पुत्र विकास गोगावले का नाम चर्चा में, एकनाथ शिंदे ही करेंगे निर्णय
Chendhare, Maharashtra:स्लग - कोकण स्थानिकच्या जागेवर शिवसेनेचा डोळा ..... मंत्री पुत्र विकास गोगावले यांचं नाव चर्चेत ...... याबाबतचा निर्णय एकनाथ शिंदे घेतील ...... भरत गोगावले यांचे स्पष्टीकरण ....... या मतदार संघात शिवसेनेचे सर्वाधिक मतदार असल्याची करून दिली आठवण ...... महायुतीचे नेते एकत्र बसून निर्णय घेतील असंही ते म्हणाले.0
0
Report
Advertisement
20 मई को देशभर में दवा दुकानों का बंद, ऑनलाइन बिक्री पर रोक मांग
Kalyan, Maharashtra:बेकादेशीर औषध विक्री, नियमबाह्य दिले जाणारे डिस्काउंटसह जी एस आर अधिसूचना रद्दबातल करण्याच्या मागणीसाठी ऑल इंडिया केमिकल अँड ड्रगिस्ट असोसिएशनतर्फे येत्या २० मे रोजी केमिस्ट व्यापाऱ्यांचा देशव्यापी बंद पुकारण्यात येणार आहे. या बंदमध्ये Kashmireपासून ते कन्याकुमारीपर्यंतचे तब्बल साडेबारा लाख केमिस्ट सहभागी होणार असल्याची माहिती ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष जगन्नाथ (आप्पा) शिंदे यांनी दिली आहे.0
0
Report
वाशीम में 43°C तापमान, पेट्रोल-डिज़ेल की किल्लत से सड़कें उठी आपाधापी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात तापमान ४३ अंशांपर्यंत पोहोचल्याने नागरिक उष्णतेने त्रस्त झाले आहेत. त्यातच सलग चौथ्या दिवशी पेट्रोल डिझेल टंचाई कायम असल्याने वांधारकासह शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. ज्या पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध होत आहे, तेथे मोठी गर्दी होत असून वाशिममधील दक्षता पेट्रोल पंपावर शेतकरी कॅन व वाहनांसह रांगेत उभे असल्याचे चित्र दिसून आले. भर उन्हात तासन्तास प्रतीक्षा करावी लागत असल्याने वाहनधारक हैराण झाले असून प्रशासनाने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
अंबराठ में सत्ता संघर्ष खत्म, बीजेपी ने हाई कोर्ट याचिका वापस ली
Ambernath, Maharashtra:अंबरनाथचा सत्तासंघर्ष : भाजपाकडून उच्च न्यायालयातील याचिका मागे शिवसेना भाजपा युती झाल्यानंतर निर्णय अंबरनाथ पालिकेतील सत्तासंघर्षाच्या राजकारणाला अखेर पूर्णविराम मिळाल्याचं चित्र समोर आलं आहे. भाजपाने मुंबई उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका मागे घेतली आहे. jिल्हाधिकाऱ्यांनी शिवसेनेचा गट अधिकृत ठरवल्यानंतर भाजपाने या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, आता अंबरनाथमध्ये शिवसेना-भाजपाची युती झाल्यानंतर भाजपाने आपली याचिका मागे घेतली आहे. यावेळी भाजपा गटनेते अभिजित करंजुले आणि शिवसेना गटनेते रवींद्र करंजुले हे दोन्ही मुंबई उच्च न्यायालयात उपस्थित होते. युतीनंतर दोन्ही पक्षांतील राजकीय संघर्ष संपुष्टात आल्याचं मानलं जात असून, आगामी काळात पालिकेतील सत्तासमीकरण यामुळे अधिक मजबूत होणार आहे。0
0
Report
Advertisement
