445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कराड बस स्ट Stand पर धमकी देकर मंगलसूत्र झपटे; दंपति गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड बसस्थानक परिसरात महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. या बंटी बबली आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. आरोपी श्रावण कांबळे आणि त्याची पत्नी पूनम कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
भंडारा के मातोश्री पांदण रस्तों में गुणवत्ताहीन काम, आरोपित ठेकेदार और भ्रष्टाचार
Bhandara, Maharashtra:अंदाजपत्रकाला डावलून मातोश्री पांदण रस्त्यांची कामे?... निकृष्ट दर्जाच्या कामांवर ग्रामस्थांचा आक्षेप.... पांदण रस्ते ठरत आहेत कंत्राटदाराचे कुरण.... Anchor : भंडारा जिल्ह्यात मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम, मनरेगाच्या नियमांचे उल्लंघन आणि यंत्रसामग्रीचा वापर केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. VO : ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मातोश्री पांडण रस्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांवर मुरूम व खडी टाकण्याची कामे केली जात आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे. मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बोगस मजूर दाखवून केवळ फोटो काढले जातात आणि प्रत्यक्ष काम यंत्रांद्वारे केले जाते, असा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. तुमसर तालुक्यातील रूपेरा आणि मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील नागरिकांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी‑ंकडे लेखी तक्रार सादर केली आहे. या योजनेतील कामे काही कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांसाठी 'कुरण' ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. BYTE : मनोहर बिसने, तक्रारदार रूपेरा BYTE :- रत्न पुंडे, ग्रामपंचायत सदस्य नवेगाव VO : तांत्रिक मंजुरीनुसार पांदण रस्त्याच्या कामात प्रथम ६ इंच जाडीचा मुरूम टाकून त्याची योग्य दबाई करणे आवश्यक असते. त्यानंतर ८० एमएम व ४० एमएम खडीचे थर टाकून दबाई आणि शेवटी घोटाई करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असून कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. BYTE : प्रशांत पडोळे, खासदार Vo : ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
एमआईडीसी के लिए अरापुर के पास जमीन माप पूरी, किसान मुआवजे पर चर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रस्तावित एमआयडीसीसाठी आरापूर जवळपास दीड महिन्यानंतर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता दरनिश्चितीच्या वाटाघाटी होणार असून या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुलतानाबाद, आरापूर आणि गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांची ही बैठक सकाळी ११ वाजता होईल. नमोजणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी फळझाडे आणि बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला होता. 'आधी जमिनीचे दर निश्चित करा, मगच मोजणी करा,' अशी मागणी त्यांनी केली होती. आता मोजणी पूर्ण झाली असली तरी मोबदल्याची योग्य रक्कम मिळावी यावर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही त्यांची जमीन एमआयडीसीतून वगळणार का, हा प्रश्नही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर समेत जिले में मानसून सक्रिय, बारिश और आंधी की संभावना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून रोजी शहरात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार0
0
Report
शिवसेना ने मंत्री संजय राठोड को राष्ट्रीय नेता नियुक्त कर विमुक्त-भटक्या समाज के सशक्तिकरण का लक्ष्य दिखाया
Yavatmal, Maharashtra:विमुक्त व भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेने मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केलीयानंतर मसानजोगी, पारधी, बंजारा, लोहार, गवळी, गोंधळी, जोशी, बहुरूपी आदी भटक्या समाजाकडून राठोड यांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भटक्या विमुक्त जमातीतील ही मंडळी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. यावेळी संजय राठोड यांनी किंगरी घंटा खजेरी आदी वाद्य वाजवून यापुढील काळात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरण हेच पुढील ध्येय असल्याचे देखील संजय राठोड म्हणाले.0
0
Report
मराठवाड़ा में जून तक मानसून की बारिश उम्मीद के मुताबिक नहीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित वेगाने पाऊस बरसत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची जून महिन्याची सरासरी 116.1 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 70.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 96 मिमी पाऊस झाला होता. जिल्हानिहाय पाहता धाराशिवमध्ये सर्वाधिक 94.8 मिमी (86.2%) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 80.7 मिमी (72.5%) पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी 59.8 मिमी (51%), परभणीत 61.9 मिमी (49.2%), नांदेडमध्ये 71 मिमी (52.7%), हिंगोलीत 76.2 मिमी (52%), छत्रपती संभाजीनगरमध्ये 63.1 मिमी (58.2%) आणि जालना जिल्ह्यात 66.9 मिमी (58.2%) पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या, उगवण आणि पुढील शेतीकामांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.0
0
Report
Advertisement
कळमजापूर के खेत में बिजली गिरने से महिला की मृत्यु, छह महिलाएं अस्पताल में भर्ती
Amravati, Maharashtra:कळमजापूर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू; सहा महिला जखमी काल झालेल्या वादळी पावसात कळमजापूर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे (वय ३७, रा. कळमजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.0
0
Report
यवतमाड़ दौरे पर राठोड की तीखी टिप्पणियाँ, सरकार पर दबाव बनाए रखने का दावा
Yavatmal, Maharashtra:जो गरजते है वो बरसते नही अशा शब्दात मंत्री संजय rाठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवा बाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालेो अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील... त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू असे संजय राठोड यांनी सांगितले.0
0
Report
सिंधुदुर्ग: बरसात में न्हावानकोंड झरना पहली बार प्रवाहित, पर्यटक आकर्षित
Oras Bk., Maharashtra:वर्षा पर्यटन के बारे में कहा जाए तो कोकण तथा तळकोकण के पर्यटक बारिश के मौसम में खास आकर्षण के पात्र होते हैं। सिंधुदुर्ग जिले में कई झरने प्रवाही हो जाते हैं और पर्यटक इन्हें देखने के लिए आते हैं। देवगड तालुक के न्हावानकोंड झरना प्रवाहित हुआ है, जो जिले का यह पहला झरना है जो पूर्ण रूप से प्रवाहित हुआ है। हमारे प्रतिनिधि उमेश परब ने इस स्थिति का अवलोकन किया।0
0
Report
Advertisement
नागपुर के महाल शिवतीर्थ में शिवराज्याभिषेक दिवस धूमधाम से, प्रतिनिधियों ने लिया आढ़ावा
Nagpur, Maharashtra:नागपुरात महाल शिवतीर्थ येथे शिवराज्याभिषेक दिन सोहळा मोठ्या दिमाखात पार पडत आहे तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
नवी मुंबई में 56 करोड़ के ड्रग्स नष्ट, अभियान को मिली तेज़ रफ्तार
Navi Mumbai, Maharashtra:नशामुक्त नवी मुंबई अभियानाला अधिक बळ देत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून तब्बल 56 कोटी 69 लाख 55 हजार 192 रुपये किमतीचे जफ्त केलेला अंमली पदार्थाचा साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केला. समाजातील अमली पदार्थांचे वाढते जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात हा अमली पदार्थाचा साठा शास्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत आतापर्यंत 166 गुह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यामधील जवळपास 57 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन ते नष्ट करण्यात आले आहे. त्याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून 26 गुह्यांतील जप्त अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.0
0
Report
नाशिक में अवैध रेत डम्पर दुर्घटना, दो दोस्त घायल, चालक फरार
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात अवैधरित्या वाळू व मुरूम वाहतूक करणाऱ्या डम्परांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाटोदा ठाणगाव रस्त्यावर मोटरसायकलने जात असलेल्या दोघा मित्रांना वाळू वाहतूक करणाऱ्या एका ढंपरने चिरडले असून ऋषिकेश रावसाहेब भुजाडे राहणार विखरणी याची प्रकृती चिंताजनक आहे तर साहिल बंडू सूर्यवंशी राहणार ठाणगाव येथील गंभीर दुखापत झाली असून ऋषिकेश भुजाडे याच्यावर नाशिक येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र लोक सेवा आयोग पूर्व परीक्षा अब कम्प्यूटर आधारित, अंतिम परीक्षा ऑफ़लाइन रहेगी
Navi Mumbai, Maharashtra:anchor- महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात येणारी गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी आज नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर, सह सचिव सरीता देशमुख उपस्थित होते. पूर्व परिक्षा ही केवळ संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे मात्र मुख्य अंतिम परीक्षा मात्र ऑफ लाईन होणार आहे. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणा-या सेवा, संवर्ग, पदसंख्या व उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. ओफलाईन परीक्षांसाठी केंद्रांची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्रे उपलब्ध न होणं, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतुक, सुरक्षा व मनुष्यबळ यांमुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचं नियोजन केलं आहे. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबध्द होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संगणक प्रणाली आधारित परिक्षा पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं भिमनवार यांनी सांगितलं. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.0
0
Report
येवला के आडगाव चौथा भाग में भारी बारिश से दीवार गिरी, वृद्ध महिला घायल
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील आडगाव चोथवा भागात झालेल्या जोरदार पावसामुळे एका घराची भिंत कोसळून वृद्ध महिला जखमी झाल्याची घटना घडली आहे. रेशमबाई खोकले असे जखमी महिलेचे नाव असून त्यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना तातडीने येवला उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. स्थानिकांमध्ये या घटनेمुळे चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
धाराशिव में 28 जून की उद्धव ठाकरे रैली, ओमराजे के भविष्य पर निर्णय होंगे
Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे की जाहीर सभा. सभेच्या तयारीसाठी जिल्ह्यात ठाकरे गटाच्या बैठका सुरू असून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकवटताना दिसत आहेत. ओमराजे बाबतची भूमिका ठरणार असं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी स्पष्ट केलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २८ जून रोजी उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. सभेच्या तयारीसाठी जिल्हाभर ठाकरे गटाच्या बैठका सुरू असून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकवटताना दिसत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर नाराज झालेल्या शिवसैनिकांना एकत्र आणण्याचा आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न या सभेतून केला जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत नेमकी कोणती भूमिका मांडणार, ओमराजेंवर किती आक्रमक टीका करणार आणि पुढील राजकीय रणनीती काय असेल, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरच ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे २८ जूनची सभा धाराशिवच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
