Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 12:36:53
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 12:19:11
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये शिंदेंच्या शिवसेनेचे नेते माजी आमदार किशनचंद तनवाणी नाराज असल्याचा चर्चा आहेत त्यांच्या भावासाठी आणि मुलांसाठी त्यांना गुलमंडी प्रभागातून तिकीट हवे होते मात्र त्या ठिकाणी आमदार प्रदीप जैस्वाल यांचा मुलगा ऋषी जैस्वाल यानेही तिकिटांची मागणी केलीय त्याचे पारडे जड आहे त्यामुळं तनवाणी नाराज असल्याची चर्चा आहे याबाबत त्यांनी आज पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली आणि नाराजी दर्शवली... महत्वपूर्ण म्हणजे आज तनवाणी यांनी जागा वाटप बैठकीला ही दांडी मारली, ठाकरे गट सोडून आम्ही शिवसेनेत आल्यावर अनेक कार्यकर्ते आमच्यासोबत पक्षात आले. पण आम्हाला आता कुणीही पक्षात विचारत नाही. काही कार्यक्रम असल्यास आम्हाला निरोप मिळत नाही. आमचं काही चुकत असेल तर आम्हाला कार्यमुक्त करा असं थेट शिरसाट यांच्याकडे सांगितले असल्याचे तनवाणी म्हणाले आहे. त्यामुळं निवडणुकीच्या तोंडावर तनवाणी यांच्या नाराजीचा फटका शिवसेनेला बसू शकतो...
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 16, 2025 12:18:48
Pandharpur, Maharashtra:उद्धव आणि राज या ठाकरे बांधवांना एकत्र यायला 12 वर्ष उशीर झाला. आता पर्यंत प्रतिमा निर्माण करायला ते कमी पडले. सगळे पाणी वाहून गेल्यावर जनता आता प्रतिसाद देणार नाही. शिवसेनेचे माजी आमदार शहाजी पाटील यांनी ठाकरे एकत्र येण्याचा परिणाम होणार नसल्याचे सांगितले ठाकरे बंधूांनी बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाल्यावर निवडणुक काळात मराठी बांधवांना साद घातली. मराठी बांधव वर झालेला अन्याय , गिरणी कामगार वर झालेला अन्याय यावर कधी हात घातला नाही. मनसेने मराठी मुद्दा वर हाणामाऱ्या केल्या. अडीच वर्षात उद्धव ठाकरेंनी ठोस निर्णय मराठी बांधवासाठी घेतले नाहीत प्रभाग प्रमाणे मराठी बांधवांचा मुद्दा आणि दुसऱ्या प्रभागात वेगळे मुद्दे घ्यायचे असे काम ठाकरे बंधूंचे सुरू आहे. महा विकास आघाडीचा हाच डावपेच सुरू आहे. दोन्ही ठाकरे बंधू यांनी मराठी भागात तो मुद्दा लावून धरायचा. काँग्रेसने मुस्लिम आणि मागासवर्गीय मतांना घेऊन निवडणुका खेळायच्या. पण हे चालणार नाही. ठाकरे बंधुंना एकत्र येण्यास 12 वर्ष उशीर झाला. सगळे पाणी वाहून गेल्यावर एकत्र येण्याला जनतेने प्रतिसाद दिला नाही. उशीर झाल्याचा फटाका बसणार आहे. प्रतिमा निर्माण करायला दोन्ही बंधू कमी पडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे झाले तेव्हा पासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.yांचा काळात मुंबई भव्य दिव्य गतिमान विकास झाला आहे. सुसज्ज सुरक्षित शहर होत आहे. ते काम मुंबई मधील जनतेला आवडले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 11:59:49
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 16, 2025 11:57:44
Baramati, Maharashtra:इंदापूर तालुक्यात पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळण्याचा प्रकार उघड…दोन्ही तोतया पत्रकारांना अटक… ANCHOR — इंदापूर तालुक्यात पत्रकार असल्याचे भासवून हॉटेल व्यावसायिकाकडून खंडणी उकळणाऱ्या दोन तोतया पत्रकारांवर इंदापूर पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. गागरगाव येथील 96 कट्टा हॉटेलचे चालक नितीन गोरख तळेकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी स्वतःला पुण्यातील मोठे पत्रकार असल्याचे सांगून सातत्याने धमक्या देत होते. व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर पैसा द्या.. अन्यथा बदनामीकारक बातम्या प्रसिद्ध करू अशी धमकी देत आरोपींनी फोन-पे आणि रोख स्वरूपात पैसे उकळले. पुढे दरमहा मोठ्या रकमेची मागणी सुरू झाल्याने तक्रारदार मानसिक तणावात सापडले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत इंदापूर पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतले असून, यापूर्वीही त्यांच्यावर खंडणीचे गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 16, 2025 11:46:01
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Dec 16, 2025 11:07:03
Nashik, Maharashtra:नाशिक - अखिल भारतीय संत समितीची नाशिकमध्ये राष्ट्रीय चिंतन बैठक - बैठकीला देशभरातील साधू महंत उपस्थित - अखिल भारतीय संत समितीचे महत्त्वाचे साधु महंत यांच्यात झाली बैठक - कुंभमेळा और धर्म प्रचार कार्याच्या अनुषंगाने नाशिक मध्ये बैठक - संत समितीचे अध्यक्ष कैवल्याचार्य आचार्य महाराज,स्वामी जितेंद्र आनंद सरस्वती, मनमोहन दास जी महाराज यांच्यासह देशभरातून आलेलं साधू महंत आणि महामंत्री उपस्थित जितेंद्रानंद सरस्वती महाराज बाईट पॉइंट्स - नाशिकमध्ये अखिल भारतीय संत समितीची मोठी मागणी - तपोवन क्षेत्र तीर्थक्षेत्र म्हणून घोषित करण्याची मागणी - त्र्यंबकेश्वर आणि तपोवन परिसरात मांस आणि मद्य विक्री पूर्णतः बंद करण्याची मागणी - साधू संतांवर टीका केल्यास थेट पोलिसात गुन्हा दाखल करण्याचा इशारा - झाडांच्या आडून विरोध करणाऱ्या लोकांच्या चौकशीची ही मागणी - विरोध करणाऱ्यांना विदेशी फंडिंग होत असल्याचा अखिल भारतीय संत समितीचा आरोप
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 16, 2025 10:55:10
Pune, Maharashtra:राज्यातील महानगरपालिकांची बिगुल वाजला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरू होत असल्याने इच्छुक उमेदवारांसह नागरिकांमध्ये उत्सुकता आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीच्या तीन-तीन पक्षांमुळे रंगत वाढते आहे. अहिल्यानगर महानगरपालिकेत 2003 साली स्थापनेपासून काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भाजप यांचे महापौर राहिले आहेत. 2018-23 सत्तेवर असलेल्या महापौरांमध्ये राष्ट्रवादी आणि शिवसेनेचे प्रभाव दिसत होते; 2018 च्या निवडणुकीनंतर महाविकास आघाडीतील घटकांचे परस्पर बळ कमी-जास्त झाले. अहिल्यानगर महानगरपालिका (2018-23) एकूण नगरसेवक संख्या 68 होती. भाजपा 14, शिवसेना 24, राष्ट्रवादी 18, काँग्रेस 5, बसपा 4, सपा 1, इतर 2 नगरसेवक राहिले. निवडणुकीनंतर पक्षीय बलाबलात बदल झाले असून सध्या भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस आणि इतर पक्षांचे गणित दृष्टीने महाविकास आघाडीतील आणि आघाडीच्या स्थितीवर परिणाम होणार आहे. निवडणूक कार्यक्रम लागण्यापूर्वी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखतींचा समाचार घेतला जात आहे. आगामी दिवसांत प्रत्यक्ष वर्चस्व कोण ठरवतो, तेच स्पष्ट होईल.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 10:54:52
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- भाजप आणि काँग्रेस यांच्यात चंद्रपूरची मनपा निवडणूक ठरणार रंजक, एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यात प्रतिष्ठेची लढाई अँकर:-- अखेर दीर्घ प्रतिक्षेनंतर महानगरपालिका निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. चंद्रपूर शहर महानगरपालिकेत देखील विविध पक्षांचे नेते-कार्यकर्ते सर्वशक्तीनिशी मैदानात उतरले आहेत. ही लढाई भाजप आणि काँग्रेस यांच्यातील राज्यातील महत्वाची लढत ठरणार आहे. एकीकडे मुनगंटीवार-जोरगेवार तर दुसरीकडे वडेट्टीवार-खा. धानोरकर यांच्यातील अंतर्गत कुरघोडीसह यात कोण बाजी मारते हे बघणं औत्सुक्याचे बनले आहे. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर बाईट २) नंदू नागरकर, काँग्रेस नेते,माजी नगरसेवक एकूण प्रभाग--- 17 एकूण नगरसेवक- 66 भाजपा- 36 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष--3 ------- काँग्रेस-12 UBT शिवसेना- 2 राष्ट्रवादी (शरद पवार) -2 मनसे - 2 ---- बसपा- 8 प्रहार - 1 आधी काँग्रेस आणि आता भाजप असा या महानगरपालिकेचा राजकीय लंबक फिरत राहिला आहे. राज्यात राजकीय उलथापालथ झाल्यानंतर आणि राज्यस्तरीय नेत्यांच्या पळापळीनंतर नेमके दान कुणाच्या पारड्यात पडते हे बघणे महत्वाचे असणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडी यापैकी कोण कसे लढणार, योग्य उमेदवाराला तिकीटवाटप, याशिवाय बंडखोरांची समजूत काढण्यात कुणाला कसे यश मिळेल या राजकीय गणिते अवलंबून आहेत. बाईट ३) प्रमोद काकडे, जिल्हा प्रतिनिधी, दै. सकाळ एकूण व्ही. ओ. ३) चंद्रपूर शहराला मोठा राजकीय इतिहास आहे. राज्याला 2 मुख्यमंत्री देणारा हा भाग राजकीय दृष्ट्या अत्यंत सजग आहे. शहराला वळसा घालणारी ईरई नदी आणि बल्लारपूर वळण मार्गाला एकीकडे आणि दुसरीकडे मूल मार्गाला जोडणारे घनदाट जंगल ही याची चतुःसीमा आहे. सुमारे 3 लाख मतदार मनपातील कारभारी निवडणार आहेत. हे शहर राज्यात धूळ आणि प्रदुषणासाठी कुख्यात आहे. तापते ऊन आणि वन्यजीवांचा संचार यामुळे शहर-जिल्हा सतत चर्चेत आहे. 2017 ते 2022 या काळात भाजपची सत्ता असताना मनपातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहार यावर आसूड ओढणारे विरोधी बाकावरील नगरसेवक मात्र रखडलेली निवडणूक आणि गैरकारभार यामुळे प्रचंड नाराज आहे. बाईट ४) पप्पू देशमुख, विरोधी नगरसेवक व्ही. ओ. ४) मागील 5 वर्षात या शहरात मूलभूत विकासकामांच्या बाबतीत प्रगती झाली आहे मात्र राज्यात भाजपची सत्ता असताना ज्या प्रमाणात विकासनिधी अपेक्षित होता तो मिळाला नाही परिणामी 300 कोटींच्या अंदाजपत्रकापैकी केवळ 50-60 कोटी महसूल प्राप्ती असताना विकास योजना राबविताना तारेवरची कसरत होत आहे. मनपा हद्दीत राबविलेली अमृत पाणीपुरवठा योजना टप्पा 1 चे काम पूर्ण झालेले नाही मात्र टप्पा 2 साठी शहरात अनिर्बंध खोदकामे सुरू आहेत. याशिवाय शहराची 100 कोटी रु. खर्चून तयार मलनिस्सारण योजना  प्रभावी ठरलेली नाही. शहरातील अंतर्गत रस्ते वाईट स्थितीत आहेत. तर सार्वजनिक वाहतूक, पार्किंग आणि प्रसंधानगृहांची संख्या आणि स्थिती चिंताजनक आहे. सर्वाधिक प्रदूषित शहरातील आरोग्य व्यवस्था खुद्द सलाईनवर असून कचरा संकलन सुविधा आणि शहर स्वच्छता सुधारण्याची गरज आहे. गेल्या काही वर्षात बगीचे आणि सौंदर्यीकरणाचे विविध प्रकल्प राबविण्यात आले ही यातील जमेची बाजू आहे. --------
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 16, 2025 10:54:25
Jalna, Maharashtra:जालना : जालना शहरात हवा कुणाची.?(पॅकेज) अँकर : राज्यातील महापालिका निवडणुक जाहीर झाली आहे.त्यामुळे सर्वच राजकिय पक्षांनी निवडणुकिची तयारी सुरु केलीय.जालन्यात तब्बल 2017 नंतर निवडणुक होणार असल्यानं सर्वच राजकीय पक्ष निवडणुकीच्या कामाला लागले आहेत. जालना महापालिका निवडणुकीत भाजप नेते रावसाहेब दानवे,अर्जुन खोतकर,माजी आमदार कैलास गोरंटयाल आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे नेते राजेश टोपे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. व्हिओ :१:जालना महानगरपालिका झाल्यानंतर पहिल्यांदाच महापालिकेसाठी निवडणूक पार पडत आहे.त्यामुळं महापालिकेवर सत्ता मिळवण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसलीये..महापालिकावर सत्ता मिळवण्यासाठी एकमेकांविरोधात उभे राहणारे आमदार अर्जुन खोतकर, कैलास गोरंट्याल हे आता गोरंटयाल यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीतील मित्र पक्षात आले आहेत.. महापालिका निवडणुकीचे बिगૂલ वाजल्यानंतरही अद्याप जालन्यात महायुती झालेली नाहीये.. युतीसाठी अर्जुन खोतकर यांनी भाजपला पहिला प्रस्ताव दिला..मात्र बराच काळ लोटूनही अद्याप भाजपने शिवसेनेच्या प्रस्तावावर कोणताही निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे निवडणूक युतीत होणार की स्वबळावर लढवली जाणार हे अद्याप अनुत्तरित आहे. तर महाविकास आघाडी बाबत देखील अजून कोणताही निर्णय झालेला नाही.तर भाजपने इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप करत निवडणुक तयारीत आघाडी घेतलीय बाईट- अर्जुन खोतकर, आमदार शिवसेना बाईट- अरविंद चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी व्हिओ 2- काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी कॉंग्रेसमधून काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केलाय.गोरंटयाल यांच्यासोबत काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानं कॉंग्रेस समोर यावेळी नवीन उमेदवार शोधण्याचं आव्हान उभे राहिलंय. दरम्यान महापालिका निवडणूक जाहीर झाल्यानं भाजपने देखील निवडणुकीची तयारी सुरू केली असून इच्छुक उमेदवारांना अर्जाचं वाटप केलंय.दरम्यान उमेदवारांच्या मुलाखती नंतर युती करायची की नाही हे ठरवू अस भाजपचे निवडणूक प्रमुख कैलास गोरंटयाल यांनी म्हटलं आहे. बाईट : कैलास गोरंटयाल,माजी आमदार (खुर्चीवर बसून घेतलेला बाईट) व्हिओ- 3-शहरात तब्बल 65 जागांसाठी निवडणूक होणार आहे.2017 मध्ये शहरात 61 नगरसेवक होते आता ही संख्या वाढून 65 झाल्यानं राजकिय पक्ष निवडणुकीच्या तयारीला लागलेत. 2017 मध्ये निवडणूक झाली त्यावेळी काँग्रेस 28,राष्ट्रवादी 9,शिवसेना 11 ,भाजप 11,अपक्ष 2 जागेवर विजयी झाले होते. तर काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंटयाल यांच्या पत्नी संगीता गोरंटयाल या नगराध्यक्ष म्हणून निवडून आल्या होत्या.मात्र गोरंटयाल यांनी काँग्रेसच्या 28 पैकी 23 नगरसेवकांसह भाजपात प्रवेश केलाय.त्यामुळे काँग्रेसला यावेळी नवीन उमेदवार शोधावे लागणार आहेत. तर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांनीही काही दिवसांपूर्वी शिवसेनेत प्रवेश केल्यानं या निवडणुकीत राजकिय समीकरण बदलण्याची शक्यता आहे. बाईट : अहेमद नूर,राजकीय विश्लेषक( चेक्स शर्ट,चष्मा लावलेले) समस्या ग्राफिक्स व्हिओ :4: शहरातील समस्या जालना हे व्यापारी शहर आहे.मात्र इथे समस्यांचा डोंगर पाहायला मिळतो. शहरात 8 -8 दिवस नळाला पाणी येत नाही.शहरातील सर्व रस्त्यांवर मोकाट जनावरांचा धुमाकूळ पाहायला मिळतो त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या पाहायला मिळते.त्याच बरोबर शहरात मोकाट कुत्र्यांनी उच्छाद घातला असून 4 महिन्यात 4 लहान मुलांचा बळी गेलाय.शहरातील कुंडलीका आणि सीना या प्रमुख नद्या प्रदूषित झाल्या असून या नद्यांना अतिक्रमणाचा विळखा पडला आहे.त्याच बरोबर शहरात महात्मा फुले मार्केट पाडून ठेवलं आहे.मात्र त्याचे नव्याने बांधकाम झालेले नाही.शहरात मनोरंजनाचं एकमेव साधन असलेल्या मास्टर कृष्णराव फ़ुलंब्रीकर नाट्यगृहाची दुरावस्था झालीय.शहरात सगळीकडे कचऱ्याचं साम्राज्य पसरलेल असून कचरा समस्या सुटलेली नाही.भूमिगग गटारे शहरात सर्व भागात झालेली नसल्यानं रस्त्यावर गटाराचे पाणी पहायला मिळत.मात्र या समस्या न सुटल्यानं शहरातील नागरिकांचा या निवडणुकीत रोष दिसून येण्याची शक्यता आहे. बाईट : नागरिकांचे 2 बाईट आहेत(निळा शर्ट आणि लाल चेक्स शर्ट असलेली व्यक्ती) व्हिओ:05:जालना शहराची लोकसंख्या 3 लाख 75 हजार इतकी असून या पैकी 2 लाख 2 लाख 45 हजार 929 इतके मतदार आहेत.एकूण मतदारांपैकी पुरुष मतदार 1 लाख 28 हजार 894 आहेत.तर महिलाअ 1 लाख 17 हजार आहेत.तर ईतर 34 मतदार आहेत.या मतदारांपैकी दलित, मुस्लिम आणि ओबीसी मतदारांची संख्या जास्त असल्यानं हे मतदार कुणाच्या पारड्यात यावेळी मतदान टाकतात यावरच राजकिय पक्षांच्या उमेदवारांचे भवितव्य अवलंबून असणार आहे. बाईट : सुरेश केसापूरकर,राजकिय विश्लेषक,पत्रकार(टक्कल असलेले) व्हिओ :06:जालना शहरात बांधकामासाठी लागणाऱ्या लोखंडी सळईचे कारखाने मोठ्या प्रमाणात आहेत.त्याचबरोबर वेगवेगळ्या शेती पिकांचे बियाणे बनवणाऱ्या कंपन्या मोठ्या प्रमाणात असल्यानं शहराला स्टील सिटी आणि सिड सिटी म्हटलं जातं.याच शहरात आता महानगरपालिका अस्तिवात आल्यानं ही महानगरपालिका ताब्यात घेण्यासाठी सर्वच राजकिय पक्षांनी आपली ताकद पणाला लावलीय.
0
comment0
Report
Advertisement
Back to top