Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:05:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नर्तिका पूजा गायकवाडची पोलीस कोठडी आज संपणार - गोविंद बर्गे यांच्या आत्महत्या प्रकरणातील संशयित आरोपी नर्तिका पुजा गायकवाड ची आज पोलीस कोठडी संपणार - आज दुपारनंतर नर्तिका पूजा गायकवाड हिला बार्शी न्यायालयात हजर केले जाणार - गोविंद बर्गे यांच्या आत्महत्ये प्रकरणी पोलिसांचा तपास भरकटल्याची चर्चा.... - राज्यातील अनेक कला केंद्राचे मालक आणि पूजा गायकवाडच्या मैत्रिणींचा तपास मात्र पोलिसांच्या हाती काहीच नाही - नर्तिका पूजा गायकवाड व्यतिरिक्त अन्य कोणत्याही आरोपींना अटक नाही - नर्तिका पुजा गायकवाड हिच्या वाढीव दोन दिवसाच्या पोलीस कोठडीत कोणते नावे खुलासे समोर आले हे पाहणे महत्त्वाचे - नर्तिका पुजा गायकवाड हिच्या पोलीस कोठडीत वाढ होणार की तिची रवानगी न्यायालयीन कोठडीत होणार हे आज स्पष्ट होणार आहे
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Sept 15, 2025 03:04:53
Ratnagiri, Maharashtra:( मंत्री नितेश राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्या वक्तव्याच्या दोन फ्रेम करून बातमी घ्यावी) रत्नागिरी- भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या दोन मंत्र्यांमध्ये रंगले वाकयुद्ध मत्स्य आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांचा रत्नागिरीतल्या लोकांनी जास्तीत जास्त भगवे मफलर वापरण्याचा दिला सल्ला रंगीबेरंगी मफलर वापरण्यापेक्षा भगवा मफलर वापरा, पाहिजे असतील तर माझ्या गाडीत स्टाॅक आहे मोठा नाव न घेता नितेश राणेंचा उद्योग मंत्री उदय सामंत यांना लगावला होता टोला नितेश राणेंच्या या टोल्यावर उद्योग मंत्री उदय सामंत यांचे प्रत्युत्तर भगवी शाल दिली ते बरं केलेत, भगवी शाल मी तशीच ठेवली भगवी शाल काढली तर मी हिंदू नाही असं काही म्हणाले असते मला रत्नागिरीमध्ये काय करावे लागते ते तुम्हाला माहित नाही ज्याचे जळते त्यालाच कळते, सेवाभावी संस्थेमध्यून मी मोठा झालोय नितेश राणे उदय सामंत
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:02:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn paithan rain av काल नुकसानीचे 2 ठिकाणचे ड्रोन  फुटेज पाठवले आहे, संभाजी नगर हुन प्रातिनिधिक  ते वापरा दोन्ही पौठांचे आहेत... गेली दोन दिवस संभाजीनगर जिल्ह्यात पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे..पैठण तालुक्यात पावसाचा अक्षरशः हाहाकार दिसला. शनिवारी रात्री ते रविवारी पहाटे दरम्यान १० मंडळांत अतिवृष्टी झाली असून, शेकडो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. काही ठिकाणी घरांच्या भिंती पडल्या, पत्रे उडाली, तर काही घरांमध्ये पाणी शिरले. सौर विद्युत पंपाचे पॅनलही पडले. खुलताबाद, कन्नड तालुक्यांतही मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला. त्यामुळे नद्या, नाल्यांना पूर आला होता. या दमदार पावसाने २०० गावांत पाणीच पाणी केले. पैठण तालुक्यात  नांदर, हर्षी, जायकवाडी, दादेगाव, बालानगर, ढोरकीन परिसरातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. उसाचे पीक आडवे झाले. तर, कपाशी, तूर, सोयाबीन आदी पिकांत पाणी साचले होते. मोसंबी बागेतही पाणी साचून झाडे कोसळली. या सगळ्यांचे पंचनामे सुरू झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 15, 2025 03:01:50
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अरबी समुद्रात छत्रपती शिवरायांचे स्मारक उभारण्यासाठी सरकारची इच्छा कमी पडतेय - सोलापुरात स्वराज्य संग्राम संघटनेच्या प्रथम वर्धापन दिनानिमित्ताने राज्यस्तरीय मेळावा. - मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज यांचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक अरबी समुद्रात झालं पाहिजे. - छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारकाचं भूमिपूजन होऊन नऊ वर्ष पूर्ण झाली तरी अद्यापही एकही वीट रचली गेली नाही. - स्वराज्य संग्राम संघटना आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारला जाग आणण्याचा प्रयत्न करणार. - स्मारक तयार करण्याबाबत सरकारची इच्छा शक्ती कमी पडत आहे आणि विरोधकही काही बोलत नाहीत.. - स्वराज्य संग्राम संघटनेचे संस्थापक अध्यक्ष तानाजी शिंदे यांनी राज्य सरकारला दिला इशारा. Byte : तानाजी शिंदे, स्वराज्य संग्राम संघटना, संस्थापक अध्यक्ष
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Sept 15, 2025 03:01:25
Pune, Maharashtra:रिपोर्टर:- लैलेश बारगजे स्लग:- शिक्षक पात्रता चाचणी फीड 2C Anc:- सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार पहिली ते आठवीपर्यंतच्या वर्गाना शिकविणाऱ्या शिक्षकांनी पुढील दोन वर्षात टीईटी उत्तीर्ण न झाल्यास सक्तीने सेवानिवृत्ती घ्यावी लागणार आहे...तर पाच वर्षांपेक्षा कमी सेवाकाल असलेल्या शिक्षकांना पदोन्नतीसाठी टीईटी उत्तीर्ण होणे बंधनकारक ठरणार आहे...परंतु या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी शिक्षक भारती संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे...दरम्यान विद्यार्थ्यांना स्पर्धेत टिकवण्यासाठी आणि चांगले विद्यार्थी घडवण्यासाठी शिक्षकांनी टीईटी देणे वावगे नसल्याचे मत शिक्षक आमदार किशोर दराडे यांनी व्यक्त केलंय...शिक्षकांनी टीईटी परीक्षा दिलीच पाहिजे असं त्यांनी म्हंटल आहे...तर शिक्षक भारती संघटनेने मात्र या निर्णयाबाबत न्यायालयाला निवेदन पाठवून या निर्णयाचा पुनर्विचार करण्याची विनंती केली आहे...दरम्यान सरकारने अशा पध्दतीने काही निर्णय घेतल्यास रस्त्यावरील आणि न्यायालयीन लढाई लढण्याचा इशारा देखील देण्यात आलाय बाईट:- किशोर दराडे, शिक्षक आमदार
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Sept 15, 2025 03:00:58
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Csn marathwada rain av काल संभाजी नगर , परभणी असे शॉट्स आलेले आहेत ते वापरा मराठवाड्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये बहुतांश ठिकाणी रविवारी पावसाने जोरदार हजेरी लावली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील १० तर मराठवाड्यात एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली असून याचा सुमारे ६४० गावांना फटका बसला आहे. गेल्या आठवड्यापासून पावसाने उघडीप दिल्यानंतर तापमान वाढले. विश्रांतीनंतर पुन्हा पाऊस सुरू झाल्याने कुठे दिलासा तर कुठे पिकांचे नुकसान झाले आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्यामुळे मराठवाड्यासह संपूर्ण राज्यात पावसासाठी अनुकूल वातावरण आहे. पुढील २ दिवसांत छत्रपती संभाजीनगरसह परभणी, बीड, धाराशिव, परभणी, हिंगोली व जालना या जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान तज्ज्ञांनी वर्तविली आहे. रविवारी सकाळपर्यंत झालेल्या पावसामुळे संभाजीनगर जिल्ह्यातील १०, जालन्यातील ५, बीडमधील ७, लातुरातील ७, धाराशिव, हिंगोलीतील प्रत्येकी १ तर नांदेड जिल्ह्यातील २ अशा एकूण ३२ मंडळांमध्ये अतिवृष्टीची नोंद झाली.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 15, 2025 02:47:12
Raigad, Maharashtra:यात ओबीसी संदर्भातील फाईल futej वापरावे. स्‍लग – मराठा आरक्षणावर कोकणातील कुणबी समाज आक्रमक ........ कुणबी समाज आज तहसील कार्यालयावर धडकणार ; मराठा आरक्षणाविरोधात आक्रमक भूमिका ........... अँकर - राज्य सरकारने मराठा समाजाला कुणबी जातीचे प्रमाणपत्र देण्यासंदर्भात निर्णय घेतल्‍यानंतर कोकणातील कुणबी समाज आक्रमक झालाय. या निर्णयाला कुणबी समाजासह इतर ओबीसी समाजाकडून तीव्र विरोध होत आहे. मराठा आरक्षणाविरोधात कोकणातील कुणबी समाजाकडून आंदोलनाची रणनीती आखली जात आहे. याचा पहिला भाग आज कोकणातील सर्व जिल्‍हयांमध्‍ये तहसील कार्यालयांवर कुणबी समाजाचा मोर्चा धडकणार आहे. यावेळी शासनाला निवेदन दिलं जाईल. मुंबईतील कुणबी समाजोन्नती संघात सर्व शाखा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली यात हा निर्णय घेण्‍यात आला. बाईट - अनिल नवगणे, पदाधिकारी कुणबी समाज संघटना
5
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 02:45:16
Nashik, Maharashtra:*Breaking... विशाल मोरे, मालेगाव* - Anc: मालेगाव तालुक्यातील कोठरे शिवारातील बापू भिका पवार यांचे शेत असून त्यांनी १० वर्षापूर्वी एका सावकाराकडून २० लाखांचे कर्ज घेतले होते त्या बदल्यात त्यांनी त्यांची शेती सदर सावकाराकडे गहाण ठेवली होती मात्र त्या २० लाखांची शेतकऱ्याने ७१ लाखांची परत फेड केलेली असताना सुद्धा सावकाराने त्या शेतकऱ्याची जमीन परस्पर हडप करून काल त्या शेतीवर ताबा घेण्यासाठी गुंड पाठवले. जमिनीचा ताबा घ्यायला येणाऱ्या गुंडांकडून बापू पवार या शेतकऱ्याला त्याचा मुलगा मनोज पवार, पत्नी निर्मला पवार यांना लोखंडी टामीने बेदम मारहाण केल्याने बापू पवार गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मालेगाव सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. *बाईट: मनोज पवार, शेतकरी*
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Sept 15, 2025 02:30:52
Raigad, Maharashtra:स्‍लग – रायगडात महायुतीमधील बेबनाव पुन्‍हा एकदा समोर ....... पाली नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणूकीत शब्‍द देवूनही फसवणूक ........ महेंद्र दळवी यांचा राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि सुनील तटकरेंकडे रोख ......... आगामी निवडणूकीत या प्रवृत्‍तीचा बिमोड करू ......... महेंद्र दळवी यांचा राष्‍ट्रवादीला सूचक इशारा ........... अँकर – रायगड जिल्‍हयातील महायुतीमधील बेबनाव पुन्‍हा एकदा समोर आलाय. पाली नगराध्‍यक्षपदावर आमचा हक्‍क असताना शब्‍द देवून आम्‍हाला फसवण्‍यात आल्‍याचा आरोप शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांनी केलाय. यापूर्वी असा अनुभव अनेक नेत्‍यांना अनेकदा आला आहे. त्‍याचा बिमोड करण्‍याच्‍या दृष्‍टीने आम्‍ही आगामी निवडणूकांमध्‍ये घेणार असल्‍याचा इशाराही दळवी यांनी दिला आहे. यावेळी त्‍यांचा रोख राष्‍ट्रवादी कॉंग्रेस आणि खासदार सुनील तटकरे यांच्‍याकडे होता. पाली नगराध्‍यक्षपदाच्‍या निवडणूकीत भाजपने राष्‍ट्रवादीच्‍या मदतीने शिवसेनेच्‍या उमेदवाराचा पराभव केला. त्‍यामुळे या निवडणूकीच्‍या निमित्‍ताने महायुतीमधील मतभेद स्‍पष्‍ट झाले आहेत. बाईट – महेंद्र दळवी, आमदार
0
comment0
Report
YKYOGESH KHARE
Sept 15, 2025 02:30:38
Nashik, Maharashtra:nsk_aakroshmorcha अँकर नाशिक शहरामध्ये आज शरद पवार यांच्या उपस्थितीमध्ये राष्ट्रवादी पक्षाच्या आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे. नाशिकच्या गोल्फ मैदानापासून ते जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत या मोर्चाचे आयोजन करण्यात आला आहे. शेतकऱ्यांचे विविध प्रश्न हमीभाव कांद्याचा भाव तसेच पिक विमा पासून शेतकरी आत्महत्या पर्यंत अनेक विविध प्रश्नांपर्यंत या मोर्चाच्या माध्यमातून सरकारचा निषेध केला जाणार आहे यासाठी स्वतः शरद पवार रोहित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षाचेआजी माजी प्रदेशाध्यक्ष आणि राज्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित असणार आहेत. दुपारी बारा वाजेच्या सुमारास या मोर्चाला सुरुवात होईल
0
comment0
Report
Advertisement
Back to top