Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
ADANIRUDHA DAWALE
Oct 15, 2025 05:33:09
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यात निवडणूक आयोगाने अनेक गावं वगळल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. त्यामुळे सर्वत्र जिल्हासह महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रियेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. आता हळूहळू सगळीकडून वोट चोरीचे प्रकरण बाहेर येत आहे. अंजनगाव तालुक्यातून गावच्या गाव वगळण्यात आली, असे करून निवडणूक जिंकत आहे. भाजपकडे फिरते वोटर आहे. ते अमरावती जिल्ह्यात मध्य प्रदेशात Rajasthan मध्येही वोट करतात, या फिरत्या वोटर्स पासून सगळ्यांनी सावध व्हा, यशोमती ठाकूर यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. देशावर खरच प्रेम करत असाल तर ही चोरी जास्तीत जास्त उघडकिस आणण्याचेही आव्हान यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Oct 15, 2025 05:09:53
Washim, Maharashtra:अँकर:मागील दोन-तीन महिन्यांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे आणि सततच्या पावसामुळे पैनगंगा नदीला वारंवार महापूर येत आहेत.या पुराच्या पाण्याने वाशिमच्या रिसोड तालुक्यातील पेनबोरी ते मसला पेनदरम्यानचा शेतरस्ता पूर्णपणे पाण्याखाली गेला होता.आता पाऊस थांबला असला तरी त्या भागातील रस्ता अद्यापही चिखलमय स्थितीत असून, शेतकऱ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.या परिसरातील शेतांमध्ये सध्या सोयाबीन काढणीचे काम सुरू आहे.मात्र, रस्त्यावर चिखलाचा जाड थर असल्याने शेतात जाणे अवघड झाले आहे.ट्रॅक्टर, बैलगाड्या तसेच मजूर यांना शेतात पोहोचणे कठीण झाले असून, त्यामुळे काढणीचे काम मंदावले आहे. परिणामी, रब्बी पेरणीच्या कामावर याचा थेट परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.पैनगंगा नदीच्या महापुरामुळे आधीच पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यात आता रस्त्याच्या बिकट स्थितीमुळे शेतीच्या कामात आणखी अडथळे निर्माण झाले आहेत. या परिस्थितीत, वाशिम पेनबोरी ते मसला पेनदरम्यानचा शेतरस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
2
comment0
Report
SKSACHIN KASABE
Oct 15, 2025 05:00:50
Pandharpur, Maharashtra:28 युग विटेवर उभारलेल्या विठुरायाची मूर्ती तब्बल चार वर्ष मंदिरात नव्हती. अफजलखान औरंगजेब यांच्या आक्रमणापासून संरक्षण करण्यासाठी या मूर्तीला सुरक्षितपणे ठेवण्यात आलं होतं. याची आठवण म्हणून मूर्ती संरक्षण दिवस आवर्जून साजरा केला जातो. आदिलशाही आणि मुघल शासकांच्या काळामध्ये हिंदूंची अनेक देऊळ मुर्त्यांची तोडफोड करण्यात आली. असाच प्रसंग 330 वर्षांपूर्वी पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरात सुद्धा घडण्याची शक्यता होती. त्यामुळे त्या काळात देगावच्या या पाटलांच्या वाड्यात आणि त्यांच्या शेतातील विहिरीमध्ये विठ्ठल मूर्तीचे संरक्षण करण्यात आलेलं होत. याचीच आठवण म्हणून आज सूर्याजी पाटलांचे वंशज आमदार अभिजीत पाटील यांच्या माध्यमातून मागील काही वर्षांपासून श्री विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस साजरा केला जातो. विठुरायाच्या मंदिरातून पादुका घेऊन त्या पालखीत ठेवल्या जातात. वारकऱ्यांसह वाजत गाजत चालत देगावच्या वाड्यात या पादुका नेल्या जातात. तिथे विविध उत्सव भजन कीर्तन होऊन या मूर्तीचा संरक्षण उत्सव सोहळा संपन्न होतो.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 04:52:40
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून सोलापूरकरांना दिवाळीच मोठ गिफ्ट, कार्यक्रमानिमित्त सोलापूर विमानतळावर करण्यात आली जय्यत तयारी - आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या हस्ते सोलापूर ते मुंबई आणि सोलापूर ते बंगळुरू विमानसेवेचा होणार शुभारंभ - मुख्यमंत्र्यांच्या स्वागतासाठी सोलापूर विमानतळावर जय्यत तयारी - सोलापूर विमानतळावर भव्य सभा मंडपासह दोन हजार लोकांची आसन व्यवस्था - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, राज्य उड्डाणमंत्री मुरलीधर मोहोळ, मंत्री शिवेंद्रराजे भोसले, जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांची असणार प्रमुख उपस्थिती याविषयीचा सोलापूर विमानतळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
2
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 15, 2025 04:34:15
Ambegaon, Maharashtra:*शिरूर/पुणे* कांद्याला बाजारभाव नाही, आणि तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये व्यस्त आहात- वळसे पाटलांचा अमोल कोल्हे यांना टोला तर भाजपच्या मांडीला माडी लावून मलिदा खाता त्या सरकारला जाब विचारायचे धाडस दाखवा अमोल कोल्हे यांचा पलटवार.. माजी मंत्री व खासदार आमने-सामने, शेतमालाच्या भावावर शाब्दिक चकमक शेतमालाचे भाव केंद्र सरकार ठरवित असताना पुढाकार घेण्याची जबाबदारी कोणाची, असा सवाल करत माजी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी आज शिरूरचे खासदार अमोल कोल्हे यांच्यावर निशाणा साधला. केंद्र सरकार शेतमालाचे भाव ठरवते, मग त्यांच्याकडे प्रश्न विचारायची हिंमत दाखवावी. कांद्याला बाजारभाव नाही, आणि तुम्ही कोणत्या सिरियलमध्ये बिझी आहात? असा टोला त्यांनी कोल्हेंना लगावला. या वक्तव्यावर अमोल कोल्हे यांनीही तितक्याच जोरदार शब्दांत पलटवार केला.भारतीय जनता पक्षाच्या मांडीला मांडी लावून सत्तेचा मलिदा खात असाल, तर त्या सरकारला कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाब विचारायचं धाडस दाखवा.कोल्हेंनी वळसे पाटलांवर टोला लगावला आहे
2
comment0
Report
YKYOGESH KHARE
Oct 15, 2025 04:01:57
Nashik, Maharashtra:Anchor त्र्यंबक रोडवरील नियंत्रण रेषेअंतर्गत येणाऱ्या शेतकरी व व्यावसायिकांच्या हक्कांवर गदा येत असल्याचा आरोप करत नाशिक महानगर प्रदेश विकास प्राधिकरण कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी ठिय्या आंदोलन केले. त्र्यंबकेश्वर कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक ते त्र्यंबकेश्वर रस्त्याचे रुंदीकरण व विस्तारीकरण आहे. एनएमआरडीएने त्र्यंबक रोडवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्याचे नियोजन केले असल्याची नोटीस प्रसिद्ध झाली आहे. त्यामुळे बाधितांमधून तीव्र असंतोष व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, ही कारवाई ऐन दिवाळीच्या तोंडावर होत असल्याने शेतकऱ्यांसह नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण आहे.
2
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 15, 2025 04:00:35
Amravati, Maharashtra:AMT_VOTER_LIST दोन फाईल आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा बोगस कारभार चव्हाट्यावर; अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब अँकर :– स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या तोंडावर निवडणूक आयोगाचा बोगस कारभार चव्हाट्यावर आल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी तालुक्यातील अनेक गावे मतदार यादीतून गायब झाले आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूकीच्या तोंडावर निवडणूक विभागाचा अजब कारभार चव्हाट्यावर आला आहे. निवडणूकीपूर्वी निवडणूक विभागाने प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्यात अख्खे गावे गायब आहे. पंचायत समितीचे माजी सभापती शशिकांत मंगळे यांचा हा आरोप असून शशिकांत मंगळे यांनी जिल्हाधिकारी यांकडे तक्रार केली आहे. बाईट :– शशिकांत मंगळे, माजी सभापती, पंचायत समिती
1
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 15, 2025 03:54:59
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:धाराशिव – दिवाळीचा उत्सव साजरा करण्यासाठी या वेळी राज्याचे परिवहन आणि धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी वेगळाच मार्ग निवडला. महापुराच्या विळख्यात सापडलेल्या भूम तालुक्यातील साडेसांगवी या गावात सरनाईक यांनी आपल्या कुटुंबासह गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी केली. पत्नी, मुले, सुना, नातवंडांसह सरनाईक साडेसांगवीत दाखल झाले आणि गावकऱ्यांना दिवाळीचं साहित्य, आकाशकंदील, फटाके, आणि दिवाळी किटचे वाटप करण्यात आले. गावातील प्रत्येक कुटुंबाला पाच हजार रुपयांची आर्थिक मदतही करण्यात आली. पूराच्या कालात तुटलेल्या दोन पुलांमुळे गावाचा संपर्क तुटला होता. त्याच पुलांची आणि रस्त्याची उंची वाढवून नव्याने बांधणी करण्याच्या कामाचं भूमिपूजनही यावेळी करण्यात आलं. पुढील पावसाळ्यापूर्वी ही कामं पूर्ण करण्याचं आश्वासन पालकमंत्री सरनाईक यांनी दिलं. “ही दिवाळी कायम आमच्या लक्षात राहील. माझ्या कुटुंबाप्रमाणेच गावकऱ्यांचीही दिवाळी व्हावी म्हणून आलो,” असं सरनाईक म्हणाले. तर त्यांच्या पत्नीनेही गावकऱ्यांसोबत दिवाळी साजरी करत आनंद व्यक्त केला.
4
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 15, 2025 03:54:39
Ratnagiri, Maharashtra:Anchor - मिसाईल मॅन आणि माजी राष्ट्रपती डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचा आज जन्मदिवस. आजचा हा दिवस वाचन प्रेरणा दिवस म्हणून देखील ओळखला जातो. आजच्या दिवसानिमित्त कोकणातली ही बातमी. रत्नागिरी जिल्ह्यातल्या धामणसे गावामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि वाढावी यासाठी ग्रंथालय चालवले जातेय. या ग्रंथालयाला 50 वर्ष पूर्ण झाली आहेत. दुर्गम आणि ग्रामीण भागात असलेल्या ग्रंथालयामध्ये तब्बल 21 हजारहुन जास्त पुस्तक आहेत. कवितासंग्रह, कथा आणि कादंबऱ्या तसेच विविध ग्रंथ यासह स्पर्धा परीक्षांसाठी लागणारि पुस्तके देखील या ठिकाणी उपलब्ध आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना याचा फायदा होतोय. तंत्रज्ञानाच्या या जमान्यामध्ये वाचन संस्कृती जपावी आणि ती वाढावी यासाठी प्रयत्न देखील केला जातोय. त्याला चांगला प्रतिसाद देखील मिळतोय. लोकेशन - धामणसे, रत्नागिरी
7
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 15, 2025 03:54:20
Akola, Maharashtra:गेल्या दोन महिन्यांपासून झालेल्या सलग आणि अवकाळी पावसामुळे अकोला जिल्ह्यातील शेतीला मोठा फटका बसला आहे. या अतिवृष्टीमुळे अनेक ठिकाणी पिकांचे नुकसान झाले असून, त्यात अळीच्या प्रादुर्भावाने भर टाकली आहे. विशेषतः सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख पिकांवर अळीचा तीव्र प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.अळीने पिकांतील रस शोषून घेतल्यामुळे शेतं ओसाड झाली आहेत आणि त्यांचं एकमेव उत्पन्नाचं साधन धोक्यात आलं असल्याच शेतकऱ्यांनी म्हंटलय. दिवाळीसारख्या सणाच्या तोंडावर आलेल्या या संकटामुळे शेतकऱ्यांची आर्थिक परिस्थिती अधिकच बिकट झाली आहे. शेतकऱ्यांनी आता शासनाकडे तातडीने पंचनामे करून आर्थिक मदतीची मागणी केली आहे. कृषी विभागाने त्वरित लक्ष देऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरीव मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
6
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Oct 15, 2025 03:52:20
Vasai-Virar, Maharashtra:ढिसाळ वाहतूक नियोजनामुळे विद्यार्थ्यांच्या 12 बस वाहतूक कोंडीत अडकल्या मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी संध्याकाळी पाच वाजल्यापासून विद्यार्थी वाहतूक कोंडीत अडकले तहान आणि भुकेमुळे शेकडो विद्यार्थी झाले व्याकूळ वाहतूक व्यवस्था कोलमडलेली असताना वाहतूक पोलीस मात्र गायब ठाणे घोडबंदर महामार्गाच्या दुरुस्तीसाठी अवजड वाहनांना घातलेल्या बंदीचा फटका सामान्य नागरिकांना सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक भूमिपुत्र संघटनेचे अध्यक्ष सुशांत पाटील यांनी याबाबतची माहिती मिळताच त्यांच्या सहकाऱ्यांसह बस पर्यंत पोचून विद्यार्थ्यांना पाणी आणि खाण्यासाठी बिस्किट उपलब्ध करून दिले. तसेच वाहतूक कोंडीतून बस बाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले.
2
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Oct 15, 2025 03:50:09
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील सासपडे येथे अल्पवयीन मुलीच्या खुनानंतर जिल्ह्यात संतप्त वातावरण आहे. संबंधित संशयित आरोपी राहुल यादव याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे यासाठी आक्रोश मोर्चे काढले जात आहेत. या मृत मुलीच्या आई वडिलांची घरची परिस्थिती हलाखीची असल्याने त्यांना मदतीसाठी लोक पुढे येऊ लागले आहेत. सुशील मोझर यांच्या रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने या कुटुंबाची भेट घेऊन या मृत मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी उच्च न्यायालयापर्यंत मोठा वकील देऊन कठोर शिक्षा होण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत. त्याच बरोबर पीडित कुटुंबाचा घरातील लोकांना पूर्ण मदत रक्षक प्रतिष्ठानच्या वतीने केली जाणार आहे。
5
comment0
Report
Advertisement
Back to top