icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिंदे के वारकरी महामंडळ गठन की घोषणा: भक्तों के हित के लिए कदम

Pandharpur, Maharashtra:Anchor - राज्यातील वारकऱ्यांसाठी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वारकरी हित डोळ्यासमोर ठेवून वारकरी महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केली. मात्र दोन वर्षांनंतरही वारकऱ्यांच्या प्रश्नांसाठी तयार झालेल्या महामंडळा कडे शासनाचे दुर्लक्ष झाले आहे. वारकरी संप्रदायाच्या हितासाठी त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी त्यांना मदत करण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला. त्यांनी आध्यात्मिक सेनेच्या माध्यमातून वारकरी दिंडी अनुदान , आर्थिक मदत, अपघातग्रस्त वारकरी विमा , वारकरी सेवा रथ असे उपक्रम राबवले. याच उपक्रमांना पुढ नेण्यासाठी त्यांनी एकच ठिकाणी वारकरी संप्रदायसाठी काम करता यावे म्हणून वारकरी महामंडळ घोषित केले. सदर वारकरी महामंडळ लवकर स्थापन करावे. आषाढी वारी सोहळा काही महिन्यावर आला असताना वारकऱ्यांना योग्य सुविधा साठी महामंडळाची गरज आहे.
0
0
Report
Advertisement

मेळघाट के भुमकाबाबा मंदिर दर्शन फिर खुला; आमदार केवलराम काळे ने बंदी हटाने का प्रयास किया

Amravati, Maharashtra:मेळघाटातील भुमकाबाबा मंदिर अखेर दर्शनासाठी खुले; मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांच्या पुढाकारामुळे बंदी उठवल्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. वनविभागाने काही दिवसांपूर्वी Semadoh, Dwaradev baba, Kandribaba आणि Narsinghbaba यांच्या देवस्थाने बंदी घालण्यात आली होती, परंतु आमदार काळे यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांच्याकडे पाठपुरावा केला. त्यानंतर विश्रामगृहात झालेल्या बैठकीत सकारात्मक निर्णय घेत सेमलाडोह येथील भुमकाबाबा मंदिरावरील दर्शन बंदी उठवण्यात आली. त्यामुळे स्थानिक नागरिक व भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

बीड़ में अज्ञात पत्र भेजने पर प्रज्ञा खोसरे पर बदनामी का दावा

Beed, Maharashtra:बीड:रूपाली ठोंबरे यांना निनावी पत्र पाठवणाऱ्या विरोधात मानहानीचा दावा करणार - प्रज्ञा खोसरे Anc:भोंदू अशोक खरात प्रकरणाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली ठोंबरे यांना बीडमधून एक निनावी पत्र पाठवण्यात आलं होतं. या पत्रात बीड मधील राष्ट्रवादीच्या नेत्या प्रज्ञा खोसरे अशोक खरातच्या बीड जिल्हा हस्तक म्हणून काम पाहत असल्याचा उल्लेख होता. तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना खोसरे यांच्या पासून धोका असल्याचा उल्लेख देखील त्या पत्रात करण्यात आला होता. यावर प्रज्ञा खोसरे यांनी खुलासा करत माझी बदनामी करून राजकारण केल जात असल्याचा आरोप केलाय. मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात महिलांची बदनामी करू नये असे स्पष्ट सांगितले असताना देखील एका महिलेची बदनामी केली जात आहे. ज्याने रूपाली ठोंबरे यांना पत्र पाठवले त्याच्या विरोधात मानहानीचा दावा करणार असल्याचे खोसरे यांनी सांगितले. सुनेत्रा पवार यांना माझ्यापासून धोका ही बाब हस्यास्पद आहे. अजित दादा गेल्यानंतर आम्ही वाहिनीत दादा पाहतो. राजकारण करायचं असेल तर समोर येऊन करा. त्या पत्रात कोणताही पुरावा नाही. त्यातून महिलेची बदनामी करून बीड जिल्ह्याची बदनामी केली जाते असल्याचे खोसरे यांचे म्हणणे आहे. बाईट:प्रज्ञा खोसरे - वायरल पत्रातील उल्लेख असलेल्या राष्ट्रवादीच्या नेत्या
0
0
Report

चंद्रपुर के वढोली में डीजे पर नाचते युवक की हृदयाघात से मौत

Chandrapur, Maharashtra:ट्रेंडिंग: चंद्रपूर जिले के वढोली में मित्र के विवाह में डीजे के जा रहे ताल पर नाचते समय एक युवक के हृदयविकार के झटके से अचानक मौत हो गई। आरोपी युवक अल्पेश दहागावकर, उम्र 25 वर्ष, विवाह कार्यक्रम में डीजे के ताल पर नाच रहे थे तभी अचानक गिर पड़े। घटना के बाद उपस्थित लोगों ने स्थिति को गंभीर माना और उन्हें गोंडपिपरी के सामान्य अस्पताल में भर्ती कराया गया जहां डॉक्टरों ने उन्हें मृत घोषित कर दिया। प्राथमिक जानकारी के अनुसार हृदयविकार के कारण मौत की संभावना जताई जा रही है। इस घटना से शादी समारोह में माहौल शोकपूर्ण हो गया है।
0
0
Report
Advertisement

दिंडोरी तालुक्यात एकाच दिवशी चार बालक पाण्यात डूबून मृत्यु, एक बालक फासाने मौत

Malegaon, Maharashtra:दिंडोरी तालुक्यावर पुन्हा शोककळा. वेगवेगळ्या घटनेत पाच बालकांचा मृत्यू झाला. पहिल्या घटनेत खेरवाडी येथे मोहाडीचे दोन मुले ओहळात बुडून मृत्यू झाले. दुसऱ्या घटनेत परमोरी येथील कादवा नदीत दोघे मुलं बुडून मृत्यू झाले. मोहाडी येथील फटांगडे कुटुंबीय देव नैवद्याचा कार्यक्रमासाठी खेरवाडी येथे आले असता रस्त्याच्या बाजूला ओहळाकडे खेळत असताना रुद्र गणेश जाधव व ओमकार सुनील फटांगडे हे दोन्ही भाऊ ओहळात पडले. तिसऱ्या घटनेत कादवा म्हालूंगी येथील सुरज हिंम्मत गायकवाड याचा झोका बांधत असतांना गळ्याला फास बसून मृत्यू झाला. या तिन्ही घटनेमुळे दिंडोरी तालुक्यात शोककळा पसरली आहे.
0
0
Report

मलकापूर में मध्यरात्री दो गुटों के बीच तनाव; पुलिस की सतर्कता से स्थिति शांत

Buldhana, Maharashtra:मलकापुरात मध्यरात्री दोन गट आमने-सामने; पोलीस प्रशासनाच्या सतर्कतेमुळे तणाव निवळला अब्दुल हमीद चौकात मध्यरात्री दोन गटांत निर्माण झालेल्या वादामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. परंतु, पोलीस प्रशासन आणि स्थानिक सामाजिक कार्यकर्त्यांनी वेळीच हस्तक्षेप केल्यामुळे पुढील अनर्थ टळला असून सध्या शहरात पूर्णपणे शांतता आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अब्दुल हमीद चौकात झेंडा लावण्याच्या कारणावरून दोन गटांतील युवकांमध्ये सुरुवातीला शाब्दिक चकमक झाली। या वादाचे रूपांतर नंतर मोठ्या वादात झाले आणि दोन्ही बाजूंकडून प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली। यामुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण होऊन तणाव वाढला होता. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली। परिस्थितीचे गांभीर्य ओळखून शहरातील सामाजिक कार्यकर्त्यांनीही मध्यस्थी केली। पोलिसांनी दोन्ही गटातील नागरिकांना शांत राहण्याचे आवाहन करत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले。 घटनेची गांभीर्य लक्षात घेता, वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी रात्रीच घटनास्थळाला भेट देऊन सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेतला। अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

शिरळा में शिवम-शौर्य सुरक्षा अभियान: बच्चों को बिबट्या-रानडुकर से स्व-रक्षा सिखाई जाएगी

Sangli, Maharashtra:स्लग - हिंस्र प्राण्यांपासून संरक्षणासाठी शिवम शौर्य अभियानाचा शुभारंभ. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील बिबट्याची वाढती दहशत आणि वाढणारे हल्ले तर पार्श्वभूमीवर शिवम-शौर्य सुरक्षा अभियान सुरू करण्यात आले आहे. शालेय विद्यार्थ्यांच्या मध्ये हिंस्र प्राण्यांपासून स्वरक्षण कसं करावं,याबाबतची जनजागृती करण्यात येणार आहे. मांगले येथील जिल्हा परिषदेच्या शाळेमधून अभियानाचा शुभारंभ झाला आहे. यावेळी शालेय विद्यार्थ्यांना बिबट्या, रानडुकर गवा रेडा पासून स्वरक्षण कसे करावे, याबाबतची प्रात्यक्षिका देण्यात आली. सांगली जिल्हा परिषदेचे सदस्य विराज नाईक यांच्या माध्यमातून मानसिंग भाऊ लोककल्याण अभियान व वन विभागाच्यावतीने शिवम -शौर्य अभियान शिराळा तालुक्यामध्ये राबविण्यात येणार आहे.
0
0
Report
Advertisement

बाहुबली हत्ती का अचानक दर्शन: मोर्ले की सड़क पर हड़कंप, इलाके में दहशत

Oras Bk., Maharashtra:दोड़ामार्ग तालुक्यातील मोर्ले येथे मुख्य रस्त्यावर ‘बाहुबली’ नावाचा टस्कर हत्ती अचानक अवतरल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. ऐन वर्दळीच्या वेळी हत्ती थेट रस्त्यावर आल्याने ग्रामस्थ, वाहनचालक आणि शालेय विद्यार्थ्यांची काही काळ अक्षरशः घाबरगुंडी उडाली. हत्ती रस्त्यावरच ठाण मांडून राहील्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. सुदैवाने काही वेळाने हा हत्ती जंगलाच्या दिशेने निघून गेल्याने सर्वांनी सुटकेचा निःश्वास सोडला. मोर्ले परिसरात सध्या पाच हत्तींचा कळप वावरत आहे. मात्र बाहुबली हा टस्कर या कळपापासून वेगळा झाला असून तो सध्या एकटाच या भागात मुक्तपणे फिरत आहे. बाहुबली हत्तीचा वावर तसा शांत असला तरी त्याच्या अनिश्चित हालचालींमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
0
Report

वाशीम के मंगरुळपीर में गर्मी की फसल की बुवाई दोगुनी, वर्षा ने अच्छा आधार दिया

Washim, Maharashtra:वाशीम: मंगरुळपीर तालुक्यात गतवर्षी झालेल्या दमदार पावसामुळे सिंचनाला चांगला आधार मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तुलनेत मंगरुळपीरमध्ये उन्हाळी पिकांची पेरणी अधिक प्रमाणात झाली आहे. तालुक्यात आतापर्यंत सरासरी ८१.२९ टक्के उन्हाळी पेरणी पूर्ण झाली असून, यंदा विशेषतः तिळाच्या आणि उन्हाळी ज्वारी क्षेत्रात दुपटीने वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मंगरुळपीर तालुक्यात सरासरी १४२५.७५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी अपेक्षित होती, मात्र प्रत्यक्षात ११५९ हेक्टर क्षेत्रात उन्हाळी पिकांची पेरणी पूर्ण झाली आहे.
0
0
Report

नांदेड के उमरी में भंडारे के दौरान विषाक्तता से दो मरीज अस्पताल

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्हयातील उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे भंडाऱ्याच्या जेवनातून तब्बल दोन जणांना विषबाधा झाली. गावातील भवानी माता मंदिरावर भंडाऱ्याच्या कार्यक्रमात आंबीलमधून विषबाधा झाली. या सर्व रुग्णांना उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. अत्यवस्थ चार रुग्णांना नांदेडला हलवण्यात आले. उमरी तालुक्यातील कावलगुडा येथे काल 7 एप्रिल रोजी भंडाऱ्याचा कार्यक्रम होता. दुपारी बारा वाजेपासूनच मंदिरासमोर भंडाऱ्याला सुरुवात झाली. सायंकाळी अनेक भाविकांना पोटदुखी, जुलाब, उलटी होऊ लागली. काही जणांनी जवळच्या खासगी रुग्णालयात जाऊन उपचार घेतले. औषधी, गोळ्या घेऊन हे सर्व रुग्ण परत घरी गेले. रात्री रुग्णांची संख्या वाढतच गेली. अनेकांना त्रास जाणवू लागला. उमरी ग्रामीण रुग्णालयात महिला, पुरुष, लहान बालके मोठ्या संख्येने उपचारासाठी दाखल झाले. रुग्णांची संख्या वाढल्याने त्यांना कारेगाव , धर्माबाद , सिंधी येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच जिल्हा परिषदेचे आरोग्य अधिकारी आणि जिल्हा आरोग्य विभागाचे अधिकारी कर्मचारी गावात दाखल झाले. सद्या सर्व रुग्णांची प्रकृती धोक्या बाहेर आहे. अनेक रुग्णांना उपचारानंतर घरी पाठवण्यात आले अशी माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली. कावलगुडा गावातील मंदिरामध्ये झालेल्या कार्यक्रमात आंबिल करण्यात आले होते या आंबिलासाठी वापरण्यात आलेल्या दहीच्या माध्यमातून ही विषबाधा झाल्याचा प्रार्थमिक अंदाज आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top