Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 23, 2026 10:21:13
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑटोमोबाइल प्रमाणे संभाजी नगर कंडोम उत्पादनात ही अग्रेसर आहे, एकूण 6 कंपन्यांद्वारे उत्पादन होते, मात्र युद्धाचा परिणाम आयात निर्यातीवर झाला आणि या कंपन्यांना सुद्धा फटका बसलाय, कच्चा मालाचे भाव वाढल्याने याचा परिणाम कंडोम चे दर वाढण्यावर ही होऊ शकेल असे चित्र आहे... युद्धाचा फटका कंडोम उत्पादनाला, कच्चा मालाचे दरात 50 टक्क्यांची वाढ, कंडोमचे दर वाढणार, निर्यात ही मंदावणार. युद्धाचे परिणाम सर्वच स्तरावर होत आहेत, छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज वसाहतीत कंडोम उत्पादन करणारे 6 उद्योग आहेत यांनाही या युद्धाचा मोठा फटका बसला आहे, कंडोम साठी लागणारा कच्चा माल युरोप सह आखाती देशा पलीकडून येतो मात्र होमुर्ज समुद्रधुनी मूळ शिपिंग बंद आहे परिणामी माल अडकला, त्यामुळं उपलब्ध मालाचे दर गगनाला भिडले आहेत, Lubricants ( silicon oil 50 टक्के दर वाढले ), अल्युमिनीम फाइल 3 लेअर -- 35 टक्के दर वाढले, पॅकेजिंग मटेरियल 15 टक्के दर वाढले, तर लॅटेक्सचे दर 27 टक्क्यांनी वाढले आहे, बरं दर वाढूनही माल म्हणावा तसा मिळत नाहीय त्यामुळे घेतलेल्या ऑर्डर पूर्ण करणे शक्य होत नाहीय, त्यामुळे उद्योगच अडचणीत आल्याचं कंपनी कर्मचारी सांगताय, एकीकडे कच्चा माल आयात कमी होतोय त्यामुळं इथून 38 देशांना निर्यात होतेय त्यावर सुद्धा नियंत्रण आल्याचं कंपनी व्यवस्थापक सांगताय, तर याच कंपनीत देश अंतर्गत 50 वर ब्रँड साठी उत्पादन होतेय त्यावरही मर्यादा आल्या आहेत त्यामुळं उद्योग प्रचंड अडचणीतून जातोय असे सांगण्यात येताय, एकीकडे कच्चा माल दर वाढले असल्याने किमतीवर परिणाम होणार, तर दुरीकडे माल मिळाला नाही तर थेट उपलब्धतेवर ही परिणाम होईल असे चित्र आहे त्यामुळं आता कंडोम उद्योग ही युद्धा मुळे धोक्यात आले आहे...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 10:17:34
Jalna, Maharashtra:जालना | जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद,एकाची धारदार शस्त्राने वार करून हत्या, दोघे गंभीर जखमी (पॅकेज) अँकर : जालन्यात रेड्यांच्या टकरीवरुन दोन गटात वाद होऊन एकाची धारदार Shस्त्राने वार करून निर्घुन हत्या केल्याची घटना घडलीेये.तर दोन जण गंभीर जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.दरम्यान पोलिसांकडून आता या प्रकरणातील आरोपींची शोधाशोध पोलिसांनी आता सुरू केलीय. व्हिओ :१:जालन्यातील मोतीबाग परीसरात रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. मात्र टकरी लावताना दोन गटात झालेल्या मारहाणीत एका तरुणाचा मृत्यू झालाय.28 वर्षीयरवी अशोक लाड असं मयत तरुणाचं नाव आहे.या मारहाणीच्या घटनेत ईतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. शहरातील मोतीबाग परिसरात काल रेड्यांच्या टकरी लावण्यात आल्या होत्या. त्याठिकाणी दोन गटात वाद निर्माण झाला होता. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास वाद मिटवण्याच्या उद्देशाने एका गटाने दुसऱ्या गटाला बोलावून घेतलं आणि दोन्हीही गट पुन्हा समोरासमोर आले. या वादाचे रूपांतर नंतर शिवीगाळ आणि हाणामारीत झाले. या मारहाणीत एका गटातील तिघे गंभीर जखमी झाले. त्यानंतर त्यांना जिल्हा सरकारी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं. मात्र यातील रवी लाड (वय  याच्या पोटात धारदार शस्त्राचे वार असल्याने त्याची प्रकृती गंभीर झाली.आणि त्याला पुढील उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे एका खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते.  मात्र उपचारादरम्यान रात्री एक वाजेच्या सुमारास त्याचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.. बाईट- प्रेम अशोक लाड, जखमी व्हिओ :०२: या मारहाणीत  20 वर्षाचा प्रेम लाड आणि दुसरा 20 वर्षाचा तरुण नरेश अवघड  हे सुद्धा जखमी झाले.या तरुणांवर सध्या जालन्यातल्या जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. बाईट : डॉ उनगे मेडिकल ऑफिसर,जिल्हा शासकीय रुग्णालय,जालना निळा शर्ट व्हिओ :०३:दरम्यान रेड्यांच्या टकरीवरून झालेल्या या राड्या प्रकरणी कदीम जालना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू केलाय.सध्या पोलीस आरोपींचा शोध घेतायत.जालन्यात रेड्यांच्या टकरीवरून होणाऱ्या वाद सध्या चर्चेचा विषय बनलाय.त्यामुळे पोलिसांच्या कारवाईकडे शहरवासीयांचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Mar 23, 2026 09:50:58
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यातील दारव्हा कारंजा मार्गावरील टोलनाका पालकमंत्री संजय राठोड यांच्या पाठबळामुळे अनधिकृतपणे सुरु आहे, असा आरोप करीत काँग्रेस आणि शिवसेना उबाठाने टोल नाक्यावर धडक देत टोल वसुली बंद पाडली. काँग्रेस नेते राहुल ठाकरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आले. भांडेगाव-भुलाई जवळ असलेला हा टोलनाका अयोग्य आहे, या मार्गांवर प्रचंड खड्डे असून, कुठलीही सुविधा नाही त्यामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. असे असतानाही टोल वसुली कशासाठी असा सवाल यावेळी उपस्थित करण्यात आला. हा टोलनाका बंद करा अशी मागणी करीत कार्यकर्ते आक्रमक झाले, त्यांनी हाती दगड घेत टोलनाक्यावर कुच keल्याने पोलिसांनी आंदोलकांची धरपकड करून त्यांना स्थानबद्ध केले. पालकमंत्री घाबरत असल्याने पोलिसांना समोर करीत असल्याच्या घोषणा यावेळी आंदोलकांनी दिल्या.
1062
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 23, 2026 09:32:40
Shirur, Maharashtra:पुणे लोणीकंद जवळ ट्रॅव्हलर बसला भीषण आग, प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला पुणे–अहिल्यानगर महामार्गावर पुण्याच्या दिशेने निघालेल्या ट्रॅवलर बसला लोणीकंद जवळ अचानक भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये वाहनांना आग लागण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने ही घटना चिंतेचा विषय ठरत आहे. लोणीकंद जवळ बस प्रवासात असताना समोरून इंजिनमधून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या कडेला घेतली. यानंतर चालकाने सर्व प्रवाशांना खाली उतरवले. काही प्रवाशांनी परिस्थितीची तीव्रता पाहून काचा फोडून बाहेर पडण्याचा मार्ग निवडला. स्थानिक नागरिकांनी तातडीने धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या मदतीने आग नियंत्रणात आणण्यात यश आल्याने मोठा अनर्थ टळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर वाहनधारकांनी इंजिन, वायरिंग व इंधन यंत्रणेची नियमित तपासणी करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
1070
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Mar 23, 2026 09:01:58
1035
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 23, 2026 08:55:53
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवाला शेतकऱ्यांनी फिरवली पाठ , एकूण 50 पैकी 13 स्टॉल रिकामेच ठेवल्याने कृषी विभागाचे अपयश उघड - सोलापुरात भरवण्यात आलेल्या कृषी महोत्सवाला तुरळक प्रतिसाद - जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयाच्या वतीने तीन दिवसीय कृषी महोत्सवाचे आयोजन - कृष्ण कार्यालयाच्या वतीने प्रदर्शनात ठेवण्यात आलेल्या 50 पैकी 13 स्टॉल शेतकऱ्यांचा प्रतिसाद न मिळाल्याने रिकामीच - जिल्हास्तरीय कृषी महोत्सवास शेतकरी ते ग्राहक शेती उत्पादने विक्री करण्याची संकल्पना सपशेल फेल याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
975
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 23, 2026 08:54:43
Jalna, Maharashtra:जालना : लोकवर्गणीतून बांधली जिल्हा परिषदेची कॉर्पोरेट लूक असणारी शाळा,शिक्षण दर्जेदार असल्यानं बाहेरील जिल्ह्यातून विद्यार्थी घेतायत शाळेत अँडמिशन अँकर : राज्यातील अनेक ठिकाणी जिल्हा परिषद शाळांच्या इमारती जीर्ण आणि मोडकळीस आलेल्या असतानाजालन्यातील लालवाडी तांडा येथे लोकवर्गणीतून कॉर्पोरेट लूक असणारी शाळा बांधण्यात आलीय.जालन्यातील स्टील उद्योजकांच्या मदतीसह शिक्षक आणि गावकऱ्यांनी घेतलेल्या पुढाकारातून ही शाळा बांधण्यात आलीय.या शाळेत 1ली ते 4 थी पर्यतचे वर्ग आहेत. 20 लाख रुपये खर्चून या शाळेचं बांधकाम पूर्ण करण्यात आलंय.शाळेतील विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीसाठी डिजिटल शिक्षणावर शिक्षकांनी भर दिल्यानं विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेत चांगलीच वाढ झालीय.शाळेत दर्जेदार शिक्षण दिलं जात असल्यानं बाहेरच्या जिल्ह्यातील विद्यार्थी देखील या शाळेत अँडमिशन मिळवण्यासाठी धडपडतायत. बाईट : सचिन खिल्लारे,मुख्याध्यापक, लालवाडी जिल्हा परिषद शाळा
1076
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 23, 2026 08:30:28
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील जोतिबा मंदिर परिसरात मंदिरातील 15 ते 20 पुजाऱ्यांकडून भाविकांना बेदम मारहाण करण्यात आल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर पुजाऱ्यासह इतर भाविकांवर गुन्हा दाखल झाला आहे. कोडोली पोलीस ठाण्यामध्ये 15 पुजारी आणि 15 भाविकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. रविवारी जोतिबा मंदिरातील पुजारी भाविकांच्या अंगावर तुटून पडत लाथाबुक्क्यांनी मारहाण केली होती इतकेच नव्हे, तर दोन ते तीन पुजाऱ्यांनी भाविकांच्या डोक्यात नारळ फोडल्याचेही व्हिडिओ समोर आले. त्यानंतर या वादावर परस्पर पडदा टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण सोशल मीडियावर या अमानुष मारहाणचा व्हिडिओ जोरदार व्हायरल झाल्यानंतर अखेर कोल्हापूर पोलिसांनी पुजारी आणि काही भक्तांवर गुन्हा दाखल केला.
1040
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 23, 2026 08:20:26
1055
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 23, 2026 08:16:39
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यातून जाणारा नागपूर- गोवा शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा, मागणीसाठी सांगलीमध्ये आंदोलन करण्यात आला आहे.शेतकरी कामगार पक्षाच्या नेतृत्वाखाली शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकरी संघटना समितीच्यावतीने सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्रदर्शनी करण्यात आली.राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत सांगली जिल्ह्यामध्ये गरज नसताना आणि हजारो शेतकऱ्यानी हरकती नोंदवलेल्या आहेत.मात्र तरीही गरज नसताना शक्तीपीठ महामार्ग करण्याचा घाट सरकारकडून घालण्यात येत आहे,असा आरोप शेतकरी कामगार पक्षाच्या वतीने करण्यात आला आहे.शक्तिपीठ महामार्ग साठी एक इंचही जमीन घेऊ देणार नाही,अशी भूमिका देखील यावेळी शेतकऱ्यांनी जाहीर केली आहे.
1040
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 23, 2026 08:00:58
Ahilyanagar, Maharashtra:कैप्टन खरातच्या अटकेनंतर त्याचे वेगवेगळ्या व्यक्तीशी असलेले संबंध समोर येत आहेत. आदर्शगाव हिवरेबाजार येथील सरपंच पोपटराव पवार यांचा एक व्हिडिओ समोर आला असून या व्हिडिओमध्ये पोपटराव पवार खरातच कौतुक करतांना पाहायला मिळत आहे या सोबतच ओशनोलॉजी बाबत देखील पवार बोलत आहेत असा व्हिडिओ समोर आला. दरम्यान कॅप्टन खरात सोबत आमचा संबंध केवळ गावातील दगडी बांधकाम करण्यासाठी आला होता, गावातील शंकराचे मंदिर हे दगडी असावे अशी गावकऱ्यांची भावना होती त्यामुळे अशी दगडी मंदिर कोठे आहेत हे पाहत असतांना मीरगावला जाणं झालं होतं. सोबतच जो व्हिडिओ समोर येतोय तो सिन्नर तालुक्यातील एका वृक्षारोपण कार्यक्रमातील असून माझा अथवा हिवरे बाजारचा संबंध नाही असं पोपटराव पवारांनी म्हंटलंय. पोपटराव पवार यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बार्गजे यांनी
1037
comment0
Report
Advertisement
Back to top