445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चिपळुण के स्कूल के पास लकड़ी में आग, दमकल ने तुरंत बुझाई, नुकसान टला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण मध्ये नगर परिषदेच्या शाळेच्या शेजारी ठेवलेल्या लाकडांना अचानक लागली आग. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शाळेला लागून ठेवलेल्या लाकडांना शॉर्ट सर्किट मुळे दुपारी आग लागल्याची घटना. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिपळुण मधील पाग परिसरातील घटना. आगीच्या घटनेत कोणतीही हानी नाही. चिपळुण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी वेळेत पोचल्याने आग विझवण्यात यश.0
0
Report
MIDC कार्यालय के बाहर कचरा फेंक आंदोलन, अधिकारी ने दैनिक सफाई का भरोसा दिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR : वाळूज MIDC भागात गेल्या तीन वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकदा निवेदन देऊन आणि मागणी करून देखील एमआयडीसी कडून कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयडीसी कार्यालयात कचरा फेकून आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आले. शेवटी नागरिकांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी उद्यापासून नियमित कचरा उचलण्याचा आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.0
0
Report
बीड में वाल्मीक कराड समर्थक की दहशत, दलीत महिला पर बेदम मारहाण
Beed, Maharashtra:बीड: वाल्मीक कराडच्या समर्थकाची रंजेगावात दहशत.. घरासमोरच लघुशंका अन् जुगाराला विरोध केल्याचा संताप; दलीत महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण, दोन चिमुकल्यांनाही फेकल्याचा आरोप! ANC - पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका दलीत महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज व त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी वाल्मीक कराडचा समर्थक आहे. वाल्मीक कराडसोबतचे फोटो देखील आता समोर आले आहेत. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होईल, असे संबंधित महिलेने म्हटले होते. शिवाय महिलेच्या घरासमोरच लघुशंका करण्यात आली याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर, शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयाण प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यावेळी महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले मात्र सुदैवाने त्यांना किरकोळ इजा झाली आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही..0
0
Report
Advertisement
राजापूर के धरण उपोषण पर नेताओं की चुप्पी और सरकार पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:राजापूर - रत्नागिरी.. राजापूर जामदा धरण उपोषण.. कोकण विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज करिता सर्व पक्षाचे दिग्गज नेते रत्नागिरीत आले होते त्यातील एकालाही असं वाटलं नाही की राजापुरात ही लोक भर उन्हातान्हात रस्त्यावर बसून साखळी उपोषण करतायेत..तिथं त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटले नाही.. याचा विचार कोकणातल्या लोकांनी करावा.. जे आले होते त्यांनी कमीत कमी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.. लोकांच्या अडचणी कडे आणि तक्रारींकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षातील लोकांना वाटत नाही.. कारण दिवसा घरी सत्ताधारी पक्ष हा सर्व बाजूंनी इतका मजबूत होत चाललाय त्यामुळे कुठल्याही विरोधकाची दखल घेणं त्यांना आवश्यक वाटत नाही..0
0
Report
राज्य सरकार ने कर्ज माफी का फैसला लिया, किसानों में विविध प्रतिक्रियाएं
Yeola, Maharashtra:राज्य सरकारकडून कर्ज माफी निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानंतर शेतकरी वर्गात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे0
0
Report
जालना के किसानों ने चुनाव के बाद तुरंत कर्जमाफी और नया फसल कर्ज मांगा
Jalna, Maharashtra:जालना : शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यावर कर्जमाफी काय कामाची,पेरणीसाठी खते-बियाणे घेण्यासाठी तातडीने कर्जमाफी करा ,शेतकऱ्यांची मागणी अँकर :शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.विधान परिषद निवडणूक संपल्यांनंतर कर्जमाफी दिली जाणार आहे.सरकारच्या या निर्णयावर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.निवडणूक झाल्यानंतर कर्जमाफी काय कामाची पेरणीसाठी खते बियाणे खरेदीसाठी पैसे हवेत त्यामुळे तातडीने कर्जमाफी देऊन नव्याने पीक कर्ज द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय .0
0
Report
Advertisement
राजापूर उपचुनाव में शिवसेना का दबदबा बना रहा, भाजपा को चुनौती
Ratnagiri, Maharashtra:भास्कर जाधव.. प्रेस pointer On विधानपरिषद कोकणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे भाजपा नाना प्रकारचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेल आहे.. अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले परंतु कोकणातील लोकांचा शिवसेनेकडे ओढा जास्त आहे.. भाजपाकडे नाही इथे शिवसेना अजून बळकट होण्या ऐवजी हिते राष्ट्रवादी बळकट झाली तरी चालेल.. शिवसेनेचं खच्ची करण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आलेली आहे.. संख्याबळाच्या दृष्टीने ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती.. On राजापूर जामदा धरण उपोषण.. कोकण विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज करिता सर्व पक्षाचे दिग्गज नेते रत्नागिरीत आले होते त्यातील एकालाही असं वाटलं नाही की राजापुरात ही लवकर रस्त्यावर बसून साखळी उपोषण करतायेत पुण्यात त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटले नाही.. याचा विचार कोकणातल्या लोकांनी करावा.. जे आले होते त्यांनी कमीत कमी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.. लोकांच्या अडचणी कडे आणि तक्रारींकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षातील लोकांना वाटत नाही.. कारण दिवसा घरी सत्ताधारी पक्ष हा सर्व बाजूंनी इतका मजबूत होत चाललाय त्यामुळे कुठल्याही विरोधकाची दखल घेणं त्यांना आवश्यक वाटत नाही.. On विधानपरिषद नाराज रामदास कदम, योगेश कदम, महेंद्र दळवी आणि गोगावले सगळं काही अलबेला नाही आहे तटकरेंची कार्यपद्धती गरज असेल तेव्हाच राम राम करायचा नाहीतर लांब लांब करायचं.. On शिवसेना जागा (विधानपरिषद) ही जागा शिवसेनेचीच.. पवार साहेबांनी ठासून सांगितलं होतं त्या जिल्ह्यातला आमदार असतो त्याच जिल्ह्यातलाच उमेदवार द्यावा लागतो.. सुनील तटकरे यांना ही जागा देण्यामागे कारणीभूत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील त्या वेळचे राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि लोक हे आहेत.. रत्नागिरी जिल्ह्याचा हक्क हा रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमुळेच मारला गेला.. संख्याबळ असलेली शिवसेना ही बॅकफूटवर का गेली दादांच्या निधनानंतर पक्ष आता कोणताही नेता राहिलेले नाही किंवा आपल्या कार्यकर्त्यासाठी खंबीरपणे उभा राहील भांडेल.. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कमी करायचा असेल तर राष्ट्रवादीचे एखादी जागा वाढली तर त्यांना काही वाईट वाटण्याचं कारण नाही On पुढच्या विधानसभेच्या आधी गुवाहाटी सारखी परिस्थिती घडू शकेल.. भाजपामध्ये काही मंत्र्यांसह 22 आमदार लवकरच प्रवेश करणार.. On abdul sattar एकत्रि करण अशा प्रकारच्या चर्चा या जाहीर करता येत नाहीत.. अशा प्रकारच्या चर्चा हे माध्यमांशी समोर करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही.. On उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले पुन्हा त्यांच्याकडे परत येऊ शकतात का?.. संपूर्ण राजकारणाचा विचका झालेला आहे.. संपूर्ण राजकारणातली सभ्यता ही सत्ताधारी पक्षाने धुळीस घातलेली आहे.. सततरी पक्षाला हे कळून चुकलंय की आपण आपल्या विचारांचा नेतृत्व तयार करू शकत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात तयार झालेली तयार नेतृत्व आपल्या पक्षात घेणे हे काम सध्या सुरू आहे.. On लाडकी बहीण.. 80 लाख लोकांची मतं त्यावेळेला या लोकांनी घेतली आणि त्या मतदारां जवळचा विश्वासघात करण्याचे काम या सरकारने केलं 80 लाख लोकांची नावं लाडक्या बहिणीमधून कमी केली जात आहे ऐंशी लाख लोकांबरोबर कुटुंबातील माणसं त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे.. या सरकारने लाडक्या बहिणीच्या सोबत विश्वासघात केलेला आहे त्यामुळे हे लाडके भाऊ नाही हे विश्वासघातकी भाऊ आहेत..0
0
Report
चांदवड, नाशिक में बस में आग, 54 यात्री सुरक्षित बाहर, पूरी बस राख
Chandvad, Maharashtra:नाशिकच्या चांदवडमध्ये शहादाहून नाशिककडे जात असलेल्या बसने अचानकपणे घाट सोडल्यानंतर पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. बसमधील 54 प्रवाशांना मात्र सुखरूप बाहेर काढण्यास यश आले असले तरी या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. घटनेस्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बस जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे.0
0
Report
यवतमाल जिले के संकटग्रस्त किसानों ने कर्जमाफी की घोषणा का स्वागत किया
Yavatmal, Maharashtra:राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकाऱ्यांना कर्जमुक्त करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी उशीर जरी झाला असला तरी नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आणि कर्जबाजारी शेतकरी यांना पूर्णतः दिलासा दिला पाहिजे, सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व प्रक्रिया उद्योग झाल्यास यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकताच भासणार नाही. त्यामुळे तशा उपाययोजना करण्यातची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
Advertisement
शिर्डी में शिवसेना का उभार मेळावा: अहिल्यानगर जिला के पदाधिकारी उपस्थित
Shirdi, Maharashtra:शिवसेना उबाठाचा शिर्डीत मेळावा... अहिल्यानगर जिल्हा कार्यकर्ता मेळावा... खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे , सुनिल शिंदे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित... मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची मेळाव्याला दांडी... शिवसेना कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी केलं जाणार मार्गदर्शन... शेकडो पदाधिकाऱ्यांची मेळाव्याला उपस्थिती...0
0
Report
परभणी के इंदेवाड़ी में तूफानी बारिश से मकान ढह, 11 वर्षीय बालिका की मौत
Parbhani, Maharashtra:परभणीच्या इंदेवाडी शिवारात वादळी वाऱ्यासह पाऊस. वादळी वाऱ्यामुळे घराची भीत कोसळल्याने, भिंती खाली चिरडून 11वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू.. दिपाली नंदगे वय 11वर्ष मृत्यू झालेल्या मुलीचं नाव. घटनेनंतर गावावर शोककळा..0
0
Report
जालना में 20 लाख विमा के लिए साथी की हत्या, खुद की मौत का बनाव
Jalna, Maharashtra:जालना : विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी(पॅकेज) यामध्ये पोलीस अधीक्षक बाईट देणार आहेत. बाईट दिला की पाठवून देतो. जालना : विम्यासाठी स्वतःच्या मृत्यूचा बनाव, कारमध्ये दिला मित्राचा बळी(पॅकेज) अँकर : जालन्यातील जाफ्राबादमध्ये 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी एकाने स्वतःच्या मृत्यूचा बनाव करत स्वतःच्या कारला आग लावून मित्राचा बळी दिल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी सखोल तपास करत मुख्य आरोपीसह तिघांना बेड्या ठोकल्यायत. बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ : ०१: : स्वतःचा कार अपघातात अपघाती मृत्यू झाल्याचा बनाव करून सहकाऱ्याचा केला खून करण्यात आला आहे. 20 लाख रुपयांच्या विम्यासाठी हा कट रचल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे. जालन्यातील जाफ्राबाद-चिखली रोडवर ही घटना घडलीय. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य आरोपीसह तिघांना अटक केली असून एका महिलेला देखील ताब्यात घेतलं आहे. नितीन गवळी हा या प्रकरणातील मुख्य आरोपी असून आकाश गवळी आणि आकाश फुलारी अशी पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नाव आहेत. तर आणखी एका महिलेला देखील पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. रविवारी सकाळी जाफ्राबाद-चिखली रोडवर एक कार झाडावर आढळून पेट घेतलीली दिसून आली होती. यात एक मृतदेह आढळून आला होता. सुरुवातीला हा मृतदेह नाशिक येथील नितीन गवळी याचा असल्याचं सांगण्यात आलं. मात्र तपासात नितीन गवळी यानेच 20 लाखांच्या विम्याचा लाभ मिळण्यासाठी सहकारी असलेल्या आणि पेंटरचं काम करणाऱ्या संदीप चव्हाणचा खून करून कार पेटवून दिल्याचं निष्पन्न झालं आहे. बाईट : तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०२: मूळचा उत्तर प्रदेशातील असलेला संदीप चव्हाण हा नाश्क येथे पेंटरचे काम करत होता. दरम्यान त्याची ओळख नितीन गवळी आणि राजू फुलारे यांच्याशी झाली. "गावाकडे पेंटिंगचे काम आहे, आपण गावी जाऊ" असे सांगून आरोपींनी संदीप चव्हाणला सोबत नेलं. नाशिकहून छत्रपती संभाजीनगरमार्गे सिल्लोड येथे येत असताना आरोपींनी दारू प्राशन केली. त्यानंतर मुख्य फरार आरोपी नितीन गवळी याने त्याचा चुलत भाऊ आकाश गवळीला सिल्लोड येथे बोलावून घेत तिघांनी मिळून संदीप चव्हाणचा गळा दाबून खून केला. त्यानंतर जाफराबाद तालुक्यातील जंजाळवाडी परिसरात आकाश गवळी यांनी आणलेल्या गाडीला दोरी बांधून गाडी झाडावर आदळल्याचा बनाव करण्यात आला. तसेच, पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने गाडीवर पेट्रोल टाकून ती पेटवून देण्यात आली. नितीन गवळी हा आर्थिक अडचणीत असून, त्याने स्वतःचा सुमारे २० लाखांचा विमा काढला होता. त्या विम्याचा लाभ मिळवण्यासाठीच हा संपूर्ण कट रचण्यात आला. तपासात बनाव असल्याचे निष्पन्न झालं आहे. बाईट : तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०३: या घटनेबाबत 31 मे रोजी डायल वर जाफराबाद-चिखली रस्त्यावर अपघात होऊन कारला आग लागल्याची माहिती प्राप्त झाली होती. त्यानंतर पोलीसांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, मृत व्यक्ती नितीन गवळी असल्याचे सांगण्यात आले. याप्रकरणी जाफराबाद पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासात हा बनाव असल्याचे निष्पन्न झाले. चौकशीत नितीन गवळी याने स्वतःच्या मृत्यूचा बनाव रचून विमा रक्कम मिळविण्यासाठी आणि इतर कारणांमधून सुटका मिळवण्यासाठी संदीप चव्हाणचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे. बाईट: तेगबीर सिंग संधू,पोलीस अधीक्षक, जालना व्हिओ : ०४: दरम्यान या प्रकरणात कारमध्ये आढळून आलेल्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी डीएनए तपासणीची प्रक्रिया सुरू आहे. या प्रकरणात आकाश गवळी आणि राजू फुलारे यांनी जबाब दिल्याची माहिती आहे. या कार जळीत प्रकरणानंतर मुख्य आरोपी नितीन गवळी हा फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला गुजरात मधून अटक केली आहे. सध्या नितीन गवळीची पोलिसांकडून चौकशी सुरू असून त्याच्या चौकशीतून आणखी काही बाबी उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जातीय.0
0
Report
Advertisement
भाजपा की शिंदे-नीति से महाराष्ट्र की राजनीति भारी उथल-पुथल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भास्कर जाधव 1-2-1.. अंबादास बोलले ते त्यांचा अनुभव बोलले ती वस्तुस्थिती आहे.. भाजपच्या जे-जे जवळ गेलेले पक्ष आहेत. त्या सर्वच पक्षांना अशा प्रकारचा अनुभव आलेला आहे.. ज्यांच्या बरोबर मैत्री करायची तेच पहिल्यांदा मित्राला संपवण्याचे काम ज्या दिवसापासून मैत्री करायची त्या दिवसापासूनच भाजपचे काम सुरू होतं.. एकनाथराव शिंदे यांच्या बाबतीत आता भाजपचे काम ते सुरू झालेल आहे.. खरंतर ते 2024 लाच सुरू झालेय.. 2024 च्या निवडणुकीमध्ये पुन्हा आपण एकनाथराव शिंदे यांनाच मुख्यमंत्री करू असं सांगणारा भाजपा निवडणुकीत एकनाथराव शिंदे यांचा भाजपने खर्ची करण केलं..जसे भाजपचे जास्तीत जास्त आमदार निवडून आले तसे एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्री तर सोडा उपमुख्यमंत्री पद द्यायला तयारही नव्हते भाजपने एक कलमी कार्यक्रम महाराष्ट्रात आता सुरू केलेला आहे.. एकनाथ शिंदेंच कच्चीकरण करणे कालच्या विधान परिषदेच्या 17 जागांपैकी भाजपच्या मूळ सातच जागा होत्या ते 12 वरती अडकून बसले..शिवसेनेच्या मुळ जागा 6 होत्या तिथं रडत खडत 4 जागा दिल्या.. स्वतः मोठे होण्यासाठी आपल्याच मित्रांना आपल्या पायाखाली घ्यायचं.आणि आपली उंची वाढवायची ही भाजपची जुनीच कार्यपद्धती आहे विश्वासघात हा त्यांच्या पाचवीला पुजलेला आहे.. एकत्र यावं कधी एकत्र यावं.. विधानसभेच्या निवडणुकीसाठी अजून तीन वर्ष बाकी आहे त्यामुळे या तीन वर्षात काय काय राज्यात घडामोडी घडतील हे बघावं लागेल.. एक घडामोडी निश्चित झालेली आहे.ती म्हणजे देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांची लोकप्रियता ही झपाट्याने कमी व्हायला लागलेली आहे.. जशी लोकप्रियता कमी होते त्याच पद्धतीने विश्वास सुद्धा या ठिकाणी प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात.. प्रकल्प येतात म्हणून कोणी जाहीर केले?.. राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं ना.. मंत्रिमंडळात असलेले मंत्री अशा प्रकारचे जर वक्तव्य करत असतील त्यांना वाटत असेल जनता ही पूर्णपणे अज्ञानी असेल परंतु त्याच्यामध्ये त्यांचं ज्ञान दिसून येते एवढेच मी सांगतो.. तटकरेंनी स्वतः आणि स्वतःच्या घराण्यापलीकडे कोणत्याही पक्षाचा किंवा सहकाऱ्यांचा विचार केलेला नाही.त्या विचारांमध्ये ते याही वेळेला आता यशस्वी झालेले आहेत.. सोबत 1-2-10
0
Report
पानी की किल्लत से नाराज़ महिलाएं बागलाण में ग्राम पंचायत कार्यालय पर हंडा मोर्चा
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यातील वायगावमध्ये पाणीप्रश्नावर महिलांचा उद्रेक... ग्रामपंचायतीला ठोकले टाळे Anc- नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात पाणीटंचाईने गंभीर स्वरूप धारण केले असून प्रशासनाच्या दुर्लक्षाविरोधात महिलांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. वायगाव येथे अनेक दिवसांपासून पिण्याच्या पाण्याचा तीव्र प्रश्न निर्माण झाला आहे. वारंवार मागणी करूनही ग्रामपंचायतीकडून टँकर सुरू करण्यात आले नसल्याने संतप्त महिलांनी आज थेट ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढत कार्यालयाला कुलूप ठोकले. "जोपर्यंत गावात नियमित पाणीपुरवठा सुरू होत नाही, तोपर्यंत कुलूप उघडू देणार नाही," असा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या आंदोलनामुळे ग्रामपंचायत प्रशासनासह संबंधित यंत्रणेची धावपळ उडाली असून, पाणीटंचाईच्या प्रश्नावर प्रशासन काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
हेलीकॉप्टर के सामने प्रेम प्रस्ताव पेश किया गया, प्रशिक्षण केंद्र में भावुक पल
Nashik, Maharashtra:दीक्षांत सोहळ्यात प्रेमाची भरारी, वैमानिकाने हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसून केले प्रपोज* नाशिकच्या कॉम्बॅट आर्मी एव्हिएशन ट्रेनिंग स्कूलमध्ये आज लष्करी शिस्त, पराक्रम आणि आधुनिक विमानचालन कौशल्याचे दर्शन घडले. मात्र दीक्षांत संचलन सोहळ्यानंतर घडलेल्या एका भावनिक प्रसंगाने उपस्थितांची मने जिंकली. प्रशिक्षण पूर्ण करून वैमानिक म्हणून नव्या जबाबदारीसाठी सज्ज झालेल्या भारत भारद्वाज यांनी आपल्या प्रेयसी आरुषीला सर्वांसमोर लग्नासाठी मागणी घातली. विशेष म्हणजे, ज्या ठिकाणी भारत यांनी कठोर प्रशिक्षण पूर्ण केले, त्याच ठिकाणाहून आता त्यांना सेवाही बजावायची आहे. दीक्षांत सोहळा संपल्यानंतर हेलिकॉप्टरसमोर गुडघ्यावर बसत त्यांनी आरुषीला अंगठी घालून लग्नासाठी प्रपोळ केले. या अनपेक्षित क्षणाने उपस्थित अधिकारी, कुटुंबीय आणि मित्रमंडळी भारावून गेली. आरुषीनेही सर्वांसमोर हा प्रस्ताव स्वीकारताच परिसर टाळ्यांच्या कडकडाटाने दुमदुमून गेला. भारत भारद्वाज यांनी ऑफिसमध्ये अधिकारी म्हणून रोज सॅल्युट मिळतो आणि करावा लागतो पण घरात पत्नीच खरी बॉस असते. त्यामुळे हा माझ्याकडून प्रेमाचा सॅल्युट होता अशी मिश्कील प्रतिक्रिया दिली. तर असे सरप्राईज मिळेल, याची कल्पनाही नव्हती, असे सांगत आरुषीने आपल्या आनंदाच्या भावना व्यक्त केल्या. देशसेवेच्या शपथेसोबतच प्रेमाचीही नवी सुरुवात करणारा हा क्षण उपस्थितांसाठी संस्मरणीय ठरला.0
0
Report
Advertisement
