icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोथरूड में IT इंजीनियर ने घर पर वृंदावन-सरीखा प्रेम मंदिर बना कर चकित किया

Shirur, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सवाचा उत्साह शिगेला पोहोचला असतानाच, कोथरूडमध्ये एका आयटी अभियंत्याने साकारलेला घरगुती देखावा सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेतोय. कोथरूडच्या नळस्टॉप परिसरात राहणाऱ्या सुरज सुतार यांनी आपल्या घरात थेट वृंदावनच्या प्रसिद्ध 'प्रेम मंदिरा'ची हुबेहूब प्रतिकृती साकारली आहे. भक्ती आणि कलेचा हा अनोखा संगम पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडत आहे. सुरज सुतार यांनी मोठ्या खर्चाच्या दिखाऊ सजावटीला फाटा देत, घरगुती साहित्याचा अत्यंत कल्पकतेने वापर करत हे देखणे 'प्रेम मंदिर' उभारले आहे. मंदिराची बारीक कलाकुसर आणि आकर्षक रोषणाई यामुळे बाप्पाच्या दरबारात वृंदावन अवतरल्याचा भास होत असून, हा अनोखा देखावा पाहण्यासाठी परिसरातील गणेशभक्तांची पावले नळस्टॉपकडे वळत आहेत.
0
0
Report

रामानंद संप्रदाय की वसुंधरा पायी दिंडी का यवतमाळ में जल्लोषपूर्ण स्वागत

Yavatmal, Maharashtra:नाणीजधाम येथील रामानंदाचार्य नरेंद्रचार्य यांच्या रामानंद संप्रदायाच्या वतीने उपपीठ नागपूर ते नाणीजधाम या वसुंधरा पायी दिंडीचे यवतमाळ मध्ये जल्लोषात स्वागत करण्यात आले. वसुंधरा पायी दिंडीच्या निवासस्थानी वृक्षारोपण करण्यात आले. ‘पर्यावरणाची करु रक्षा मग पृथ्वीची होईल सुरक्षा’ अशा घोषणा करत वसुंधरा पायी दिंडीत सुमारे दोन हजार भाविक भक्तगण सहभागी झाले आहेत. पर्यावरण संरक्षण आणि हवामान बदलाविषयी जनजागृती करण्यासाठी काढली जाणारी ही वार्षिक पदयात्रा आहे. सिद्ध पादुका रथासह निघालेली ही दिंडी ४० दिवसांत दररोज २० ते २५ किलोमीटर प्रवास करित आहे. यावेळी ग्रामस्वच्छता, पर्यावरण संवर्धन व वृक्षारोपणाचे उपक्रम राबविण्यात येत असून, २१ ऑक्टोबर रोजी नाणीज येथे दिंडीचा समारोप होणार आहे.
0
0
Report

ग्रामसभा में निधि-विकासकार्य के सवाल पर अधिकारी ने धमकी दी, वीडियो वायरल

Bhandara, Maharashtra:ग्राम विकास अधिकारीाची ग्रामस्थांवर मुजोरी.... निधीचा हिशोब मागितल्यावर प्रश्नांची उत्तरे देण्याऐवजी धमकी... पोलिस तक्रार करून जमानत होऊ देणार नाही.... ग्रामसभेतील व्हिडिओ व्हायरल Anchor :- भंडारा जिल्ह्याच्या डोंगरी बु. ग्रामपंचायतीच्या निधीचा hिशोब मागणे हा नागरिकांचा अधिकार असताना, डोंगरी बु. येथे ग्रामसभेत निधी व विकासकामांबाबत प्रश्न विचारले यात ग्रामविकास अधिकारी यांनी उत्तरे दिली नाही म्हणून एका नागरिकांनी तुम्ही राजीनामा द्यावा अशी मागणी केली. यावर ग्राम विकास अधिकारी यांनी तुम्ही पगार देता का? तसेच मी तुमची पोलिस तक्रार करेन व जमानत (जामीन) होऊन देणार नाही. अशी धमकी दिली आहे. त्यामुळे एखाद्या ग्रामविकास अधिकाऱ्याला विकास कामाबद्दल प्रश्न विचारणे चुकीचे आहे. का असा प्रश्न आता ग्रामस्थांना पडला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर Viral होत असून अशा ग्राम विकास अधिकारीवर कारवाई होणे गरजेचे आहे.....
0
0
Report
Advertisement

नांदगाव तालुक्यात सूखा संकट गहन, खेती और पशुधन के लिए सरकार तुरंत कदम उठाए

Nashik, Maharashtra:नांदगाव तालुका दुष्काळ जाहीर करण्यासाठी दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून आवश्यक उपाययोजनांची तातडीने कार्यवाही करा... - आ.सुहास कांदे यांचे प्रशासकीय अधिकाऱ्यांना निर्देश.. - पर्जन्यमान, पिकांची सद्यस्थिती, पिकांचे झालेले नुकसान, पाण्याची उपलब्धता, भूजल पातळी, चारा व पशुधनाचा घेतला विभागनिहाय आढावा.. - नांदगाव तालुका दुष्काळी आढावा बैठक संपन्न.. Anc- नांदगाव तालुक्यात अपेक्षित पाऊस झालेला नसल्याने शेती क्षेत्रावर त्याचा प्रतिकूल परिणाम झाला आहे.कमी पर्जन्यमानामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम होण्याबरोबरच आगामी काळात पशुधनासाठी चारा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे.. या पार्श्वभूमीवर दुष्काळसदृश परिस्थितीची वस्तुनिष्ठ माहिती संकलित करून शासनस्तरावर आवश्यक प्रस्ताव सादर करण्याच्या दृष्टीने विभागनिहाय कार्यवाही करण्याच्या सूचना आमदार सुहास कांदे यांनी प्रशासकीय दुष्काळी आढावा बैठकीत दिल्या..दुष्काळी परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्यांना आवश्यक शासकीय योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी विभागांनी समन्वयाने काम करावे..दुष्काळी परिस्थितीचा सामना करण्यासाठी प्रशासनाने केवळ कागदोपत्री अहवाल न तयार करता प्रत्यक्ष क्षेत्रीय परिस्थितीची पाहणी करून गावनिहाय वस्तुनिहावा आढावा घेण्यात आला. बैठकीस महसूल, कृषी, पंचायत समिती, ग्रामविकास, जलसंधारण तसेच संबंधित विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते..
0
0
Report

मराठवाड़ा के जल संसाधन: निधि कमी, 10 साल और लगेंगे प्रकल्प पूरे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात गोदावरी पाटबंधारे महामंडळाकडून सध्या २७ प्रकल्प बांधकामाधीन आहेत. या प्रकल्पांवर ४४ हजार ८६७ कोटी रुपये अद्ययावत खर्च होणार आहे. त्यापैकी १८,४८१ कोटी रुपये खर्च झाले असून २६,३८५ कोटींची मराठवाड्याला गरज आहे. मात्र, दरवर्षी २,६०० कोटींचाच निधी मिळत आहे. त्यामुळे आणखी किमान दहा वर्षे हे प्रकल्प पूर्ण होण्याची वाट पाहावी लागणार आहे. परिणामी, मराठवाड्यासाठी अतिरिक्त निधी देण्याची मागणी करण्यात येत आहे. एकीकडे मराठवाड्याला दुष्काळमुक्त करण्याची भाषा मुख्यमंत्री करत आहेत आणि दुसरीकडे जलसंपदा कामासाठी निधीच मिळत नसल्याने मराठवाडा दुष्काळमुक्त होणार कसा असा प्रश्न उपस्थित होतो..
0
0
Report

विदर्भ में सूखे के बीच शिवसेना ने सरकार के खिलाफ मोर्चा निकाला

Yavatmal, Maharashtra:यंदाच्या खरीप हंगामात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्याने कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष आक्रमक झाला असून पश्चिम विदर्भातील प्रत्येक जिल्ह्यात रस्त्यावर उतरून धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबत यवतमाळ जिल्ह्यात आमदार नितीन देशमुख आणि आमदार संजय देरकर यांनी शिवसैनिकांची बैठक घेतली. 21 ते 30 सप्टेंबर दरम्यान विदर्भात हे मोर्चे निघतील, यवतमाळात 23 सप्टेंबरला शिवसैनिक शेतकऱ्यांसह जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकतील. सद्यस्थितीत पावसाअभावी पिकांची परिस्थिती अतिशय वाईट आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपये मदत द्यावी, पिक विम्याचे चार ट्रिगर सुरू करावे, चारा डेपो चे नियोजन करावे, शेतकऱ्यांना 24 तास वीज द्यावी अशा प्रमुख मागण्यांसाठी शिवसेना सरकारला धारेवर धरेल असा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में अवैध प्लॉटिंग बेलगाम, प्रशासन क्यों नहीं सख्त?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहराच्या चारही दिशांमध्ये मनपा hddaीत बेकायदेशीर प्लॉटींग सुरू आहे. महसूल प्रशासनाचे दुर्लक्ष आणि मुद्रांक विभागातील खाबुगिरीमुळे बेकायदेशीर प्लॉटिंग फोफावत आहे. जमिनीचे अनधिकृतरीत्या तुकडे करून ते विकणे तुकडाबंदी कायद्यानुसार बंद असतानाही मुद्रांक विभागातील अनेक दुय्यम निबंधकांनी कायद्याचे उल्लंघन केले आहे. महसूल आणि मुद्रांक विभागाच्या या प्रकारामुळे बेकायदेशीर प्लॉटिंगचा सुळसुळाट सुरू आहे. मनपाने कारवाई केल्यानंतरही महसूल व मुद्रांक विभागाने अद्याप गांभीर्याने लक्ष दिलेले नाही. गेल्या पंधरवड्यात पालिकेच्या अतिक्रमण हटाव विभागाच्या पथकाने कारवाई करीत जमिनीवर पाडलेले १ हजारहून अधिक प्लॉट सपाट करून प्लॉटिंग करणाऱ्यांवर गुन्हे दाखल केले. त्यासोबतच महसूल विभागासोबत बैठक घेत सदरील सर्व गट क्रमांक खरेदी विक्रीच्या व्यवहारांसाठी लॉक करण्याची मागणी केली मात्र महसूल आणि मुद्रांक विभागाचं साफ दुर्लक्ष आहे त्यामुळे मनपाच्या कारवाईला काय अर्थ राहणार अशी चर्चा सुरू आहे..
0
0
Report

नारळीबाग ड्रग्स सप्लायर नदीम शेख गिरफ्तार, 2.53 लाख कीमत के MD ड्रग्स जप्त

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्वतःच्या व्यसनाची गरज भागवण्यासाठी उच्चशिक्षित प्रॉपर्टी डीलरने अंमली पदार्थांच्या विक्रीत उतरल्याचा प्रकार समोर आला आहे. छत्रपती संभाजी नगर पोलिसांच्या अंमलीपदार्थ प्रतिबंधक विभागाने नारळीबाग परिसरात कारवाई करत नदीम इब्राहिम शेख याला बेड्या ठोकल्या. त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ८७० रुपये किमतीचे ५१ ग्रॅम २९ मिलिग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. हे ड्रग्ज मुंबईतून आणल्याचे स्पष्ट झाले असून, सिटी चौक पोलिसांत मुंबईच्या सप्लायरसह दोनघांवर गुन्हा दाखल झाला आहे.
0
0
Report

एल निनो के कारण फसल और पानी की स्थिति बिगड़ने लगी; सरकार ने आपात जल योजना शुरू की

Yavatmal, Maharashtra:अल निनोचा प्रचंड प्रभाव हवामानावर झाला असून, शेती पिके व पाण्याची अवस्था वाईट आहे... दरम्यान येणाऱ्या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्याचा जल व मृदा संधारण विभाग सक्रिय आहे अशी ग्वाही जल व मृदा संधारण मंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. नागरिकांनी पाणी जपून वापरावे, पाण्याचे योग्य नियोजन करावे असे आवाहन त्यांनी केले. पावसाचा प्रत्येक थेंब उपयोगात आणण्यासाठी जल व मृद संधारण विभागातर्फे नाला खोलीकरण, गाळ मुक्त धरण, गाळ युक्त शिवार, नवीन स्ट्रक्चर आदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत. Yावेळी पिकांची अवस्था वाईट आहे, उत्पन्नात देखील घट राहील या बाबी आम्ही कॅबिनेट बैठकीत मुख्यमंत्र्यांपुढे मांडलेल्या आहेत असे मंत्री संजय राठोड यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

मालेगाव छावणी: रात भर सार्वजनिक स्थानों पर मद्यपान के खिलाफ पुलिस की कार्रवाई

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - उघड्यावर मद्यप्राशन करणाऱ्यांवर मालेगाव छावणी पोलिसांची कारवाई... रात्रीच्या वेळी रस्त्याच्या कडेला, चौकात तसेच सार्वजनिक ठिकाणी बसून मद्यपान करणाऱ्यांवर छावणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरातील विविध भागांत पोलिसांनी गस्त घालत सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या काही नागरिकांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या या कारवाईमुळे रात्रीच्या वेळी सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करणाऱ्या नागरिकांना त्रास देणाऱ्यांवर यापुढेही कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांकडून देण्यात आला.
0
0
Report
Advertisement

अकोला में गणेशोत्सव: 30 साल पुरानी परंपरा, कृष्ण-राधा रूप गणेश मूर्ति से भक्तों का खास आकर्षण

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात गणेशोत्सवानिमित्त विविध मंडळांकडून देखावे साकारले जात आहेत. मात्र आळशी प्लॉट येथील प्रगती गणेशोत्सव मंडळ आपली 30 वर्षांची परंपरा यंदाही कायम ठेवत आहे.या मंडळाचे वैशिष्ट्य म्हणजे दरवर्षी गणेशाची मूर्ती श्रीकृष्णाच्या स्वरूपात साकारली जाते.यंदाही मंडळाने श्रीकृष्ण-राधा यांच्या स्वरूपातील गणेशमूर्तीची स्थापना केली आहे. विशेष म्हणजे, या मंडळाने आतापर्यंत श्रीकृष्णाच्या विविध रूपांचे देखावे उभारून भक्तांना आकर्षित केले आहे.यावर्षी मंडळाने भगवान विष्णू अनंत शेषाच्या फण्यांखाली शयन करतात, असे स्वरूपात श्री गणेशाची मूर्ती रचना केली आहे. प्रगती गणेशोत्सव मंडळाचा हा देखावा भक्तांचे लक्ष वेधून घेत असून, शहरातील गणेशोत्सवात खास आकर्षण ठरत आहे.
0
0
Report

यशोमती ठाकूर के मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी पूजन, किसानों को सुख-समृद्धि

Amravati, Maharashtra:यशोमती ठाकूर के मोझरी निवासस्थानी महालक्ष्मी पूजन; शेतकरी, कष्टकरी और सर्वसामान्यों की सुख-समृद्धि के लिए माता चरणी साकडे. अँकर: अमरावती जिल्ह्यातील मोझरी येथे माजी मंत्री तथा काँग्रेस नेत्या ॲड. यशोमती ठाकूर यांच्या निवासस्थानी महालक्ष्मी अर्थात गौरी मातेचे विधिवत पूजन भक्तिमय वातावरणात पार पडले. दरवर्षीच्या परंपरेनुसार झालेल्या या सोहळ्यात खासदार बळिराजाला वानखडे आणि यशोमती ठाकूर यांच्या मातोश्री पुष्पमाला ठाकूर यांच्या हस्ते गौरी मातेची प्रतिष्ठापना व महापूजा करण्यात आली. यावेळी ठाकूर कुटुंुबीय, आप्तेष्ट, महिला आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. शेतकरी, कष्टकरी, मजूर, तरुण, महिला आणि सर्वसामान्य जनतेच्या सुख समृद्धीसाठी मातेच्या चरणी प्रार्थना करण्यात आली. बळीराजाला कष्टाचा योग्य मोबदला मिळावा, शेतकरी संकटमुक्त व्हावा, तरुणांना रोजगार मिळावा आणि प्रत्येक घरात सुख-समाधान नांदावे, यासाठी साकडे घालण्यात आले. अमरावतीसह संपूर्ण महाराष्ट्राच्या सुख, शांती आणि समृद्धीसाठीही प्रार्थना करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top