icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नाशिक मध्ये पुराने प्रेमी के मोहभंग के कारण हत्या, चार आरोपि गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिक - जुन्या प्रियकराचा अडथळा येत असल्याने काढला काटा - जुना प्रियकर वसंत सातपुते घरात झोपलेला असताना गळा आवळून चाकूने वार करत हत्या - दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात ,एकूण चार आरोपींचा सहभाग निष्पन्न - साय्यायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची माहिती - बाईट - संदीप मिटके, एसीपी, गुन्हे शाखा - जवळपास 15 वर्ष ते सोबत राहत होते, - नवीन प्रियकर साहिल सोबत हसीनाचे संबंध जुळले - त्यामुळे जुन्या प्रियकराचा अडथळा येत असल्याने जुन्या प्रियकराचा काटा काढला. - पाच तारखेला रात्री तीन वाजता वसंत हा घरात झोपला असताना साहिलने गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. - विशेष म्हणजे 24 तास मृतदेह घरातच पडून होता. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री एर्टीगा गाडीत टाकून तो मृतदेह कसारा घाटात फेकून विल्हेवाट लावण्यात आली.. - एकूण चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे
0
0
Report

नागपुर के 12 स्कूलों और जिला कोर्ट को बम धमकी, सुरक्षा तैनाती बढ़ी

Nagpur, Maharashtra:नागपूरात twelve शाळांसह जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी ई-मेल आल्यानं खळबळ. नागपूरात आज सकाळी 12 प्रतिष्ठित शाळा आणि जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मोठी खळबळ उडाली. शाळा सुरू झाल्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश आल्याचं समोर आलं. धमकीनंतर पोलिसांनी तातडीने सर्व संबंधित ठिकाणी धाव घेतली. बॉम्ब शोध आणि नाशक पथकांसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं असून, शाळा परिसराची कसून तपासणी करण्यात आली. अद्याप तरी कुठेच काही मिळून आले नाही. या धमकीमागे नेमकं कोण आहे? ई-मेल कुठून पाठवण्यात आला? याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. नागपूर शहरातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या 12 शाळांमध्ये मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार अशी धमकी मिळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. शहरातील 12 शाळांच्या अधिकृत ईमेल वर सकाळी हा मेल पाठवण्यात आला होता. सकाळी शाळा उघडल्यानंतर मुख्याध्यापकांनी संगणक उघडताच खळबळ उडाली. शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याने या शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार शाळेतील मुलांवर लादत असल्याची आगपाखड मेलमध्ये केली असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे या शाळा बॉम्बने उडवून देण्याची वेळ आल्याचा उल्लेख धमकीतून करण्यात आला आहे. बॉम्बची धमकी मिळालेल्या शाळांमध्ये सेंटर पॉईंटच्या भांडेवाडी, सदर शाळेसह केंद्रीय विद्यालयाच्या अजनी, काटोल, वायुसेना नगर येथील शाळांचा समावेश आहे. सोबतच जिल्हा न्यायालयाचाही समावेश आहे. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाला अलर्ट देण्यात आला. पोलीसांच्या पथके त्वरित शाळांमध्ये दाखल झालीं धमकीच्या मेलची तात्काळ गंभीर दखल घेत सर्व शाळांमध्ये बॉम्ब शोध व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने संपूर्ण परिसर रिकामा करत तपासणी सुरू केली. सोबतच पोलिसांनी बॉम्बचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी दुपारी 12च्या sुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले. सायबर विभागाकडून मेलची तपासणी सकाळी धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सायबर शाखेने मेल पाठवणाऱ्या आयपी पत्त्याची तपासणी सुरू केली आहे. हा मेल नेमका कुठून आला तो कोण पाठवला याचा तपास केला जात आहे. शाळा परिसरात अचानक पोलीस पथके दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला.
0
0
Report

ओबीसीआरक्षण पर राजनीती तेज, आंदोलन और पुरानी 58 लाख नोंदों पर बहस

Nagpur, Maharashtra:परिणय फुके, ओबीसी नेते, भाजप नेते - कॉक्रोज जनता पार्टी चे आंदोलन बघून मनोज जरांगे यांना अति उत्साह आला आहे. मात्र आरक्षण हे संविधानाच्या चौंकतीत राहून देता येते...जोर जबरदस्तीने करून आरक्षण मिळत नाही. सरकार उलथून टाकण्याची भाषा आराजतेला खतपाणी देणारी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने ओबीसी आरक्षणाला कुठलाही धोका नाही. 58 लाख नोंदी जुन्या आहे. गडचिरोली सर्पदंश - त्या मुलीच्या आई वडिलांना तिथे योग्य उपचार होत नाही असे वाटत असेल त्यामुळे त्यांनी नागपुरात उपचार दिले जात आहे...ते योग्य आहे. चांगले उपचार होणे महत्वाचं आहे. महिला आरक्षण अडचण - एक टक्का कमी असला तरी पक्षीय स्तरावर महिलांना ओपन मधून निवडणूक लढवू शकतात..यात खूप पेच निर्माण न करता लवकरात लवकर निवडणूका घ्याव्यात.... निवडणुकासाठी पुढे गेले पाहिजे... महिलांना 33 टक्के आरक्षण असल्यानं खुल्या प्रवर्गातून आरक्षण देता येईल. दिल्ली नक्षल - अराजकता पसरवणारे, देशाचं नाव क्रॅब करणारे नवीन नवीन काही तरी करत असतात याचा काही फरक पडत नाही.. कंत्राटदार आंदोलन - भरपूर पैसे शासनाकडे प्रलंबित आहे. वर्षभरात तोडगा काढून त्यांना पैसे देणार आहे...
0
0
Report
Advertisement

कांग्रेस के आरोप: मोदी ब्रांड की हवा क्यों फटी, देशभक्ति पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर ऑन वंदे मातरम् आरोप - मला असं वाटतं की भाजपची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी नावा असलेल्या ब्रँडची हवा खराब झाली आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान भाषण देतात, पण भाजपच्या संघटन मंत्र्यासारखे भाषण दिल्यासारखे वाटते. ज्या पद्धतीने देशाच्या सैनिकांचा अपमान केला जातो, त्यांच्या जॅकेटवर असलेल्या तिरंग्यावर आणि जॅकेटवर मोठा पैसा खर्च केला जातो. दुसऱ्या देशाचा तिरंगा त्यांच्या जॅकेटवर दिसला. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये वंदे मातरम्‌चा मुद्दा घेऊन देशप्रेमाचे आम्ही आहोत, असा सिद्ध करता. प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन हे देश लुटत आहेत. जिथे नाव घेतात, तिथे लुटतात. भाजपने आम्हाला देशप्रेम शिकवू नये. देशासमोर असलेल्या परिस्थितीवर चर्चा करावी. ऑन नक्षल पक्ष - आपल्याकडे एक मन आहे गिधड पर मुसिबत आती है तब गिधड शहर की और भागता है अशा प्रकारचे वक्तव्य करून तरुण-तरुणींचा अपमान ज्या पद्धतीने चालला आहे, देशाच्या तरुणांना गटार म्हटलं जातं, दिमाखी नक्षल म्हटलं जातं. भाजपच्या लोकांचा आता शेवटचा काळ आहे. परिणाम मोदी यांच्यावर होत आहे. हे घाबरलेले आहेत. सत्तेतून यांना आता दूर जाणार आहेत. घाबरलेल्या परिस्थितीत तरुणांना नक्षल, गटार, आंदोलनजीवी, दिमाखी नक्षल म्हणणं योग्य नाही. प्रधानमंत्री देशाबद्दल भाषण देतात तेव्हा जागतिक पातळीवर विश्लेषण होतं, भारतात काय चाललं आहे, विदेशी नीती काय आहे, यावर चर्चा होते. देशाच्या तरुणांना, त्यांच्या भविष्याला दिमाखी नक्षल म्हणणं... हे बरोबर नाही कोणाची दिमाकी हालत खराब आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. ऑन मुख्यमंत्री अधिकार - मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळाचा एखादा चुकीचा निर्णय झाला, तर त्याला रद्द करण्याचे अधिकारा मुख्यमंत्र्यांना असतो.मुख्यमंत्री, ‘मी किती भारी आहे,’ हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात तरतूद आहे. मुख्यमंत्री हे महत्त्वाचे असतात. विधानसभेतसुद्धा सांगितलं की मंत्र्यांना काहीच अधिकार नाहीत. त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे. ऑन एकनाथ शिंदे चित्रपट गाणे - त्यांनी काही केलं तर ते वॉशिंग मशीनमध्ये आहेत, वॉशिंग मशीनमधली पार्टी आहे. अशी चर्चा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या नाहीत. हे विषय काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. अनेक प्रश्न समोर आहेत. काँग्रेसला त्यामध्ये रस आहे. ऑन हसन दलवाई - मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी हे वक्तव्य केलं आहे. हे मोठे नेते आहेत. त्यांच्या लेव्हलवर काही चर्चा झाली असेल, त्यांना माहिती असेल. आमच्या लेव्हलवर अशी चर्चा झाली नाही.आमच्यासमोर अशी चर्चा झाली नाही. ऑन नरेंद्र भोंडेकर आरोप, रेती घाट - ३०० कोटींपेक्षा जास्त घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे.अनेक पेपर्स आम्ही महसूलमंत्र्यांना दिले. बावनकुळे साहेबांनी प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. विकासासाठी रस्ते नाहीत, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुठभर लोकांचं मोदी सरकार, मुठभर लोकांचं लाडाचं करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घ्यावा. भंडारा जिल्ह्यातल्या डीपीडीसी मध्ये काय झालेलं आहे, अत्यावश्यक माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी कारवाई करावी. ऑन दिल्ली आंदोल(नक्षल ) - भाजप मध्ये अनेक नेते समाविष्ट आहेत. बिहारचे मुख्यमंत्री असतील, अनेक उदाहरण देता येतात. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? किती गुन्हे दाखल आहेत, काय स्थिती आहे, हे आपण पाहिलं आहे. या सर्व गोष्टींमध्ये भाजपमध्ये किती विध्वंस व्यवस्था आहे, याचा अंदाज आहे. हे सॅम्पल आहे दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडेसुद्धा भाजपने बोट दाखवलं पाहिजे. ऑन एसआर प्रकरण - मी काही आढावा घेतला. असं लक्षात आलं की १० टक्के वोटर संख्या आहे. काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही मृत्युमुखी आहेत. पुन्हा एकदा महिन्याभरानंतर संधी प्राप्त होणार आहे. या यादीनंतर त्यांना एक महिन्याची मुदत राहणार आहे. ही प्रक्रिया चालत राहणार आहे. या सर्व यादीमध्ये संपूर्ण स्ट्रक्चर उभं होईल. त्याच्यामध्ये गडबड दिसेल. निवडणूक आयोगाने यात सुधारणा केली पाहिजे. ऑन नाशिक कुंभ - नाशिकच्या मंत्र्यांच्या परिवारातील लोक सामील होत आहेत. नकली टेंडर काढून वर्क ऑर्डर दिली जाते. सरकार ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या लोकांचे घर लुटले जात आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाने सरकार पैसे खर्च करीत आहे. परस्पर लुटले जात आहे. सरकारचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व गोष्टींमध्ये कशी बाहेर येईल, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. जर साधुसंतांनी या संदर्भात बाहेर चर्चा केली तर, सनातन धर्माची बदनामी आणि महाराष्ट्राची बदनामी होईल.
0
0
Report

72 करोड़ के रेती घोटाले के बाद मंत्रियों की चुप्पी पर आक्रोश, निलंबन मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा, शिवसेना - मागील मार्च महिन्यात रेती घाटा संदर्भातला प्रश्न मी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला होता. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा भाग घेतला होता. राज्यचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, ३४ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झालेले आहे. ७२ कोटी रुपयांचा दंड ठेवण्यात आलेला आहे. जे जे अधिकारी यात आरोपी आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली होती. उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) सस्पेंडसुद्धा करण्यात आले होते. - मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले होते की, ७२ कोटींचा घोटाळा ३०० कोटींवर झाला असता, दंड व्हायला हवा होता. एवढा मोठा घोटाळा झाल्या नंतर सुद्धा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) निर्णय देत असेल, तर हा सभागृहाचा अवमान आहे. सभागृहापेक्षा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) मोठा होत नाही. - ज्या कंपनीला मंत्र्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, ज्या कंपनीवर ७२ कोटींचा दंड ठेवण्यात आलेला आहे, त्याच कंपनीला पुन्हा टेंडर दिलेलं आहे. त्या सर्व आमदारांनी मागणी केली, त्या कंपनीकडून दंड वसूल करा. - जिल्हाधिकारी चार महिने हा संपूर्ण प्रश्न ओळवत आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी हे मंत्र्यांपेक्षा मोठे होऊ शकत नाहीत. तहसीलदारानेसुद्धा आदेश काढले असतील, मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर काढला असेल, तरी पूर्वपरवानगी मंत्र्यांची किंवा सभागृहाची घेतली का?बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की, उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) आणि कलेक्टर यांनी नाकारलं. - हा सर्वात मोठा घोटाळा आहे. हा ३०० कोटींचा घोटाळा आहेच. एक हजारो कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. - जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यातील मुख्य सूत्रधार कोण? जिल्हाधिकारी यांची हिंमत कशी काय? धृतराष्ट्र सारखा डोळ्याला पट्टी बांधून ठेवणारा हा जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकारी यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे.
0
0
Report

बुद्धिजीवी नक्षलवाद पर केंद्र सरकार से सवाल, कांग्रेस का आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट – श्यामकुमार बर्वे, खासदार, रामटेक लोकसभा, काँग्रेस नेते -ऑन बुद्धिजीवी नक्षलवाद पक्ष- काँग्रेस पक्ष देशात सर्वात मोठा झाला, ही निवडणूक लढण्यासाठी मोठा झाला नाही. बुद्धिजीवी नक्षलवाद पार्टी उदयास आली आहे. लातूरमध्ये फॉलोअर्ससुद्धा तयार झाले आहेत. हे केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतले पाहिजे. हुकूमशाहीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जनभावना त्यांच्या विरोधात झालेली आहे. जनतेमध्ये राग आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राग समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी आली पाहिजे. ‘बुद्धिजीवी नक्षलवाद’ असे काय-काय शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यांनी यापूर्वीसुद्धा नवीन-नवीन शब्द वापरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करून कार्यशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. ऑन ایسआयआर - संसद लेव्हलवर, कोर्टातसुद्धा ایسआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. ती चुकीची पद्धत आहे. दोन कोटी नावे वगळण्यात येत आहेत. दहा-दहा वर्षे मतदान केलेल्या लोकांना शुद्ध करावे लागत आहे की मी मतदार आहे म्हणून. पहिल्यांदा जेव्हा निवडणूक झाली, त्यावेळी नाव आणि मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित केले. ते प्रोत्साहन सोडून आता नावे कशी कमी होतील, यामध्ये निवडणूक आयोग इंटरेस्टेड आहे. ऑन वंदे मातरम् - वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान ज्यांच्या पॅकेटला तिरंगा लागला होता, त्यावरसुद्धा अनेक लोकांनी भाष्य केले आहे. वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. हा यायचा जमाना आहे. त्यामुळे कोण कुठे जळून घेतो, त्यांची भावना काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे.
0
0
Report
Advertisement

आशिष जयस्वाल के बयानों पर राजनीति गर्म, ठाणे में विवाद जारी

Nagpur, Maharashtra:नागपूर आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - प्रत्येक माणूस राजकारणात अस्तित्व जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात. हे खोटे भ्रम आणि स्टंट करणारे वक्तव्य आहे. विनाकारण कोणाची बदनामी करून स्वतःला लाईम लाईट मध्ये आणण्याचा हा प्रकार आहे...एका जबाबदार राजकारणाने अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये.... अशा माणसाचा हसा करायला पाहिजे इतके दिवस तुम्ही चुपचाप का बसले होते. चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे घेणे ह्या चुकीच्या बालिशपणा आहे... - ठाणे कार्यक्रम भाजपला निमंत्रण नाही - राजकारणात प्रत्येकाचा आपल्या पक्ष वाढला पाहिजे परंतु नेमकं तिथं काय घडलं हे मला माहित नाही.... शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेना मजबूत आहे.. आनंद दिघे ते साहेबांचं शिवसेनेवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे...याच भान प्रत्येकाने ठेवावं... - कंत्राटदार आंदोलन - मागच्या सरकारमध्ये लोकहिताचे निर्णय घेतले... तेव्हा अंदाजीत खर्चपेक्षा खूप जास्त खर्च झाला आहे. कृषी पंपाची वीज बिल माफी ती कमी अपेक्षित होते आतापर्यंत ती 32000 कोटी पर्यंत गेली आहे.... शेतकरी कर्जमाफी लेक लाडकी योजना लाडकी बहीण योजना मुलींची फीमाफीच्या योजना सरकारने राबवला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुद्धा त्या दरम्यान सुरू होते₹ थोडी आर्थिक घडी हे अडचणीची झाली होती. त्या परिस्थितीला मात करून सव्वा वर्षात टप्प्याटप्प्यात सर्व गोष्टी क्लिअर करत आहोत. नवीन काम घेण्यासंदर्भात आम्ही थांबवल आहे... वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढून सगळ्यांचे दिले जात आहें. - नरेंद्र भोडेकर आरोप रेती घोटाळा - भंडारा जिल्ह्याचा विषय आहे मी त्या खात्याचा मंत्री नाही... रेती घरकुल धारकांना घाटातून लाभ देण्यासाठी धोरण राबवलेला आहे वाळू राखून सुद्धा ठेवली आहे. भविष्यात वाळूची चोरी कमी व्हावी या दृष्टीने शासनाचा प्रयत्न असतो डिमांड आणि सप्लाय चा रेशो बिघडल्याने काही लोक अशा पद्धतीने गैरव्यवहार करतात शासन त्याच्यावर कारवाई करत आहे... - मुख्यमंत्री मुख्यमंत्री हस्तक्षेप करून निर्णय बदलू शकतात.. - मुख्यमंत्री शेवटी बॉस असतात त्यांना कुठले विभागाच्या निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा विषय नाही.
0
0
Report

मेळघाट के आदिवासी छात्र की मौत पर हड़कंप, स्कूल में जांच शुरू

Amravati, Maharashtra:मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू; अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल मधील धक्कादायक घटना, पाच विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने अचानक खडबड उडाली आहे. अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल मधील ही धक्कादायक घटना आहे. चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता अकरावीत शिकत असलेला विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याच्या पोटात दुखत असल्याने व उलट्या आणि मळमळ होत असल्याने हतरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाच आदिवासी विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांना डायरिया झाला होता की अन्नातून विषबाधा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि काही विद्यार्थ्यांच्या आजाराबाबत आदिवासी विभागाकडून चौकशी सुरू असून विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला असल्याचा आरोप केला जात आहे.
0
0
Report

श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा: मुआवजे लिए पारदर्शी समिति के साथ निष्पक्षता पर जोर

Kolhapur, Maharashtra:श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांच्या भूसंपादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या तीर्थक्षेत्र विकास आराखडा दरम्यान मालमत्ता धारकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठकीदरम्यान दिला आहे. हा विकास आराखडा तयार करताना कोणत्याही स्थानिक नागरिकावर किंवा मालमत्ताधारकावर अन्याय होणार नाही अशी प्रशासनाची स्पष्ट भूमिका आहे. बाधित होणाऱ्या सर्व रहिवाशी आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांना योग्य तो मोबदला मिळावा आणि शक्तीपीठ महामार्गाच्या धर्तीवर, जर भूसंपादनाबाबत काही तक्रारी किंवा अडचणी असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात या यावी अशी सूचना ही क्षीरसागर यांनी केलीय. दरम्यान या समितीद्वारे पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवून आणि कोणावरही अन्याय न करता तीर्थक्षेत्राचा विकास केला जाईल अस क्षीरसागर यांनी म्हटल आहे..
0
0
Report
Advertisement

नागपुर ग्रामीण RTO भ्रष्टाचार याचिका अब जनहित याचिका में बदली: उच्च न्यायालय के निर्देश

Nagpur, Maharashtra:नागपूर ग्रामीण RTO तील कथित भ्रष्टाचाराची याचिका आता जनहित याचिका करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. नागपूर ग्रामीण आरटीओतील कथित भ्रष्टाचार आणि व्यावसायिक वाहनांकडून बेकायदा वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरटीओतील कथित ‘एंट्री लिस्ट’ किंवा एक्सेल शीटच्या माध्यमातून काही वाहनांना कारवाईपासून संरक्षण दिल्याचा आरोप करणाऱ्या फौजदारी रिट याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वाहतूक व्यावसायिक नीलेश सहदेव नायक यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांच्या संवेदनशील पथकांवरील सलग नियुक्त्या आणि परिवहन आयुक्तांच्या रोटेशन धोरणाच्या अंमलबजावणीवरही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांच्या सत्यतेबाबत न्यायालयाने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. आता जनहित याचिकेच्या रुपात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.
0
0
Report

मेळघाट के टोक पर गारपठार जलप्रवाह, पर्यटकांची गर्दी

Amravati, Maharashtra:मेळघाटच्या टोकावरील गारपठार धबधबा प्रवाहित; धबधब्याची पर्यटकांना भुरळ, मध्य प्रदेशाने अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांची धबधब्यावर गर्दी अँकर :- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला मेळघाट्याच्या टोकावरील गारपथार धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहे त्यामुळे मध्य प्रदेशाने महाराष्ट्रातील पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असल्यास पाहायला मिळत आहे. सावलमेंढा ते डोमा मार्गावर हा धबधबा असून अनेक पर्यटकांना हा धबधबा माहीत नसल्याचा दिसून येत आहे. मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मेळघाटाचा निसर्ग सौंदर्य फुलल असून हा धबधबा मेळघाटाच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी.
0
0
Report

आदिवासी विद्यार्थियों के निर्णय वापस; कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार की चर्चा

Nagpur, Maharashtra:आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय तात्काळ मागे घ्या.. विजय वडेट्टीवार यांची मागणी आदिवासी विकास विभागाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थी, आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींविरोधात विदर्भातील आदिवासी विद्यार्थी संघाने केले आंदोलन.. तिथे जाऊन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भेट देत चर्चा केली य विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग नागपूर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारले आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची भेट घेऊन केली चर्चा आश्रमशाळा आणि वसतिगृहां ही केवळ निवास व भोजनाची व्यवस्था नाही,ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सामाजिक विकास, सुरक्षितता आणि भविष्यासाठीची आधारव्यवस्था आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे कोणतेही निर्णय पारदर्शक चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय लादणे अन्यायकारक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विजयवाडी तिवारी यांनी आदिवासी खात्याच्या सचिवांशी टेलिफोनिक संवाद साधला विद्यार्थ्यांच्या संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या १) विद्यार्थ्यांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींची तात्काळ पुनर्तपासणी व पुनर्विचार करावा. २) विद्यार्थ्यांना शांततामय लोकशाही मार्गाने प्रश्न मांडण्याचा अधिकार अबाधित ठेवावा. ३) आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, भोजन, पाणी आणि आरोग्य सुविधाएं सक्षम कराव्यात. ४) विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र, गोपनीय आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी. ५) वसतिगृह प्रवेशासाठी लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक अटींचा पुनर्विचार करावा. ६) अभ्यासक्रम किंवा फॅकल्टी बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची हमी द्यावी. ७) प्रत्येक आश्रमशाळा व वसतिगृहात पालक-विद्यार्थी संवाद समिती स्थापन करावी. ८) विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांबाबत नियमित मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. ९) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा, ग्रंथालय, इंटरनेट, क्रीडा व स्पर्धा परीक्षा सुविधा वाढवाव्यात. १०) PESA कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी.
0
0
Report
Advertisement

जुन्नर सांसद डॉ. अमोल कोल्हे की प्रेस कॉन्फ्रेंस: हायवे-रेल फ्रेट कॉरिडोर संकेत

Barav, Maharashtra:खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्रकार परिषदेतील पॉईंटर १. पक्षांतर्गत बैठक व जयंत पाटील यांची अनुपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली बैठक ही केवळ जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक होती. बैठकीला सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते; जयंत पाटील यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे याचे कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नयेत. एकत्र प्रवास केल्याने गोष्टी बदलत नसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. २. पुणे-नाशिक हायवे (एलिव्हेटेड कॉरिडोअर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भूसंपादनाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. १० हेक्टरपैकी ६.९१ हेक्टर (PMRDA क्षेत्र) जमिनीच्या लँड रिवॉर्डचे पैसे जमा झाले आहेत; उर्वरित ३.९१ हेक्टर (PCMC क्षेत्र) जमिनीसाठी मुख्य सचिवांकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील १५ दिवसांत नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडोअरचे काम सुरू झालेले दिसेल. ३. भगवा रंग आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यापासून माझ्याकडे भगवा रंग आहे; माझ्यासाठी भगवा हा तिरंग्याचा पहिला रंग आहे." पक्षांतर किंवा इतर राजकीय अफवांना काहीही आधार नाही. ४. पुणे-नाशिक रेल्वे आणि फ्रेट कॉरिडोअर जुना सर्व्हेक्षण मार्ग: पुणे-नाशिक रेल्वे जुन्या सर्व्हेनुसारच व्हावी, यासाठी नेमलेल्या समितीसमोर आणि पंतप्रधानांकडे संपूर्ण अभ्यास सादर केला आहे. वाकीपर्यंत कनेक्टिव्हिटी: तळेगाव-उरुळी कांचन मार्गाला स्थानिक गावांचा विरोध असल्याने तो मार्ग वाकीच्या बाजूला (चाकण चौकाच्या अलीकडे) आणला आहे, ज्यामुळे जुन्नर-आळेफाट्यावरून अवघ्या ३५ मिनिटांत रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. पीएम गतिशक्ती टर्मिनल: आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर 'पीएम गतिशक्ती टर्मिनल' तसेच छत्रपती संभाजीनगर ते जेएनपीटी (JNPT) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरची मागणी केंद्राकडे केली आहे. ५. पालकमंत्री पदाचा वाद व विरोधकांच्या टीकेला उत्तर पालकमंत्री पदाची रस्सीखेच हा सत्ताधारी तीन पक्षांचा अंतर्गत प्रश्न असून त्यांनीच तोडगा काढावा. केवळ आंदोलने आणि विधाने करून प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष शासन दरबारी पाठपुरावा करून कामे मार्गी लागतात. आम्ही आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस काम करत आहोत. Byte: डॉ अमोल कोल्हे (खासदार शिरूर लोकसभा) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...
0
0
Report

Kolhapur की इचलकरंजी में हर घर तिरंगा रैली, विद्यार्थियों ने देशभक्ति का संदेश दिया

Kolhapur, Maharashtra:नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रसन्मान जागृत करण्यासाठी ’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये शहर व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तिपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यвар, सर्वच शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आल्याने संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय होऊन गेला होता.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top