Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SNSWATI NAIK
Nov 23, 2025 07:36:12
49
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 23, 2025 07:32:59
45
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 23, 2025 07:06:33
95
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 23, 2025 06:32:15
128
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 23, 2025 06:00:37
Jalna, Maharashtra:जालना :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतुरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई बबनराव तुमचं आठवेळा बाळंतपण झालं पण तुम्हांला एकही टाका बसला नाही आता राहुलला पुढे करा-रावसाहेब दानवे अँकर :एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक असणारे माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि परतूरचे आमदार बबनराव लोणीकरांची दिलजमाई झाली आहे.याआधी दोघांमधील होणारे कोल्ड वार जालना जिल्ह्यात नेहमी चर्चेचा विषय सर्वांना माहीत आहे.परतूर नगर परिषदेच्या निवडणूकीमुळे दिलजमाई झाल्याचं पहायला मिळाल. दोन नेत्यांचे भांडण मिटवण्यासाठी दुसरा कोणीतरी दलाल मध्ये असतो, परंतु आमच्यातले भांडण मिटवायला कोणी नव्हतं,आम्ही दोघे बसून चर्चा करून हा वाद मिटवला आहे.आम्ही दोघे एकत्र आल्याने मला मनातून खूप आनंद झाला आहे, असं रावसाहेब दानवे यांनी त्यांच्या भाषणात म्हटलं आहे. परतुर येथे झालेल्या एका कार्यक्रमात दोघांनी एकमेकांवर स्तुतीसुमने उधळत जिल्हास्तरीय राजकीय निर्णय एकत्र घेणार असल्याचा संकल्प बोलून दाखवला आहे, दानवे लोणीकरांच्या दिलजमाई मुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. दरम्यान, बबनराव तुमची वेळ आली आहे आता तुम्ही मागे व्हा आणि राहुल लोणीकरला पुढे करा .तुम्ही आठ विधानसभेच्या निवडणुका लढल्या असून, आठ वेळा तुमचं बाळंतपण झालं पण एक टाका सुद्धा पडला नाही तुम्हाला. त्यामुळे तुम्ही आता मागे व्हा आणि राहुल लोणीकर ला पुढे करा .मी तुमच्या पाठीशी आहे, आणि जे नाही त्यांना सोबत घेऊन पार्टीला सांगू बबनरावने घोषणा केली विधानसभा लढणार नाही, त्यांना परभणी लोकसभेची जागा सोडा .हरिभाऊ बागडे यांनी निवडणूक लढणार नाही अशी घोषणा केल्यानंतर पार्टीने त्याला राज्यपाल केलं, बबनराव तुम्हाला जर राज्यपाल केलं तर आमचं ध्यान ठेवा बाबा, पार्टीचं काही सांगता येत नाही..असं म्हणत रावसाहेब दानवे यांनी परतूरमध्ये जाऊन चांगलीच टोलेबाजी करत स्वतःच्या पक्षातील आमदारालाच चिमटे घेतलेत. साऊंड बाईट - रावसाहेब दानवे साऊंड बाईट - रावसाहेब दानवे
185
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 05:19:50
Washim, Maharashtra:वाशिमच्या मंगरूळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथे जिल्हा परिषद शाळेमागील वार्ड क्रमांक १ मध्ये सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.ग्रामपंचायतने सांडपाण्याच्या व्यवस्थापनाकडे दुर्लक्ष केल्यामुळे दूषित पाणी थेट नागरिकांच्या घरासमोर साचत असून परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर बनत आहे.दुर्गंधीयुक्त व जंतुयुक्त पाणी रस्त्यावर पसरल्याने शाळेत ये-जा करणाऱ्या विद्यार्थ्यांसह स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.या अस्वच्छ परिस्थितीमुळे रोगराई पसरण्याचा धोका वाढला असून नागरिकांमध्ये नाराजी पसरली आहे.स्थानिकांनी तातडीने स्वच्छता करून सांडपाणी व्यवस्थापनाची योग्य उपाययोजना करण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
167
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 23, 2025 05:17:01
92
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 23, 2025 05:16:34
Ratnagiri, Maharashtra:Anchor - रत्नागिरी नगर परिषदेच्या निवडणुकीच्या तोंडावर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असलेल्या सर्व महिला उमेदवारांना रत्नागिरीतील पत्रकारांनी विविध मुद्द्यांवर चर्चेसाठी आमंत्रित केले. या चर्चासत्रांमध्ये रत्नागिरी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार असलेल्या पाच महिला सहभागी झाल्या. यावेळी रत्नागिरी शहरातील समस्या, विविध उपक्रम, रत्नागिरी शहराच्या विकासाचा दृष्टिकोन, यापूर्वी झालेल्या सर्व गोष्टींचा ऊहापोह या चर्चासत्रात करण्यात आला. प्रत्येक उमेदवाराला रत्नागिरी शहराशी निगडित काही प्रश्न विचारण्यात आले आणि त्याची समर्पक उत्तर मिळवण्याचा प्रयत्न देखील यावेळी करण्यात आला.
80
comment0
Report
Advertisement
Back to top