445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बर्ली में मोर की निर्घृण हत्या; ग्रामस्थों ने वन विभाग से कठोर कार्रवाई की मांग
Sangli, Maharashtra:स्लग- बुर्लीतील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी मोराची निर्घृण शिकार ! दोषींवर वनविभागाने कारवाई करण्याची ग्रामस्थांची मागणी अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील बंच्याप्पा बनात राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोराची निर्घृण शिकार झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बनातील मंदिराजवळ नदीकडच्या बाजूला मोराची पिसे छिन्नविच्छिन्ह अवस्थेत विखुरलेली पाहायला मिळाली, तर मोराच्या शरीराचा भाग गायब असल्याने ही शिकारच असल्याचे राणी मित्रांकडून सांगण्यात येत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून पक्षीप्रेमींमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.बंच्याप्पा बनात शेकडो मोरांचे वास्तव्य आहे,या घटनेबाबत तातडीने वनविभागाने या प्रकरणाचा सखोल तपास करून दोषींवर कडक कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.0
0
Report
कल्याण में गांजा तस्कर महिला गिरफ्तार, 1.5 किलोग्राम गांजा बरामद
Kalyan, Maharashtra:कल्याण महात्मा फुले पुलिस ने गांजा तस्कर महिला को गिरफ्तार किया। अनिता लव्हाळे नाम की महिला सोलापूर की रहने वाली है जो तळोजा में रहती है। पुलिस के जब्त के दौरान अद्वच किलो गांजा मिला। परकर के कप्पे में गांजा छुपाकर वह गांजा तस्करी कर रही थी। ओडिशा से ट्रेन से गांजा बिक्री के लिए आने की सूचना मिली थी। कल्याण रेलवे स्टेशन क्षेत्र में पुलिस ने जाल बिछाकर आरोपी अनिता को गिरफ्तार कर लिया है।0
0
Report
गोदा से नर्मदा जलयात्रा का शुभारम्भ चौंडी में Ahilyabai Holkar के जन्मगांव से
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या चौंडी येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सभापती राम शिंदे यांच्या हस्ते गोदा ते नर्मदा जलयात्रेचा शुभारंभ झाला. अहिल्यादेवी होळकर यांच जन्मगाव असलेल्या चोंडी येथे जल कलश पूजन, माती कलश पूजन आणि अहिल्यादेवींच दर्शन घेऊन जल यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सव आणि जलसंपदा विभागाच्या 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या निमित्ताने 'गोदा ते नर्मदा' अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. आजपासून ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देत चौंडी मध्यप्रदेशातील महेश्वर पर्यंत जाणार आहे.0
0
Report
Advertisement
मराठी सीखने पर राजनीति गरमाई: हिंदुत्व के नाम पर बहस तेज
Oras Bk., Maharashtra:ऑन मनसे vs सदावर्ते --- प्रत्येकाला मराठी आलीच पाहिजे ही आमची सगळ्यांची भूमिका आहे. आमच्या परिवहन मंत्र्यांनी जी भूमिका घेतलीय त्याच समर्थन मुख्यमंत्र्यांनी केलेय. प्रत्येकजण मराठी शिकेल उगाच कोणीही या मुद्द्यावर वाद करू नये. ज्यांना इथे व्यवसाय करायचा आहे ते मराठी शिकतील, आमचे उत्तर भारतीय भाऊ देखील शिकतील त्या निमित्ताने हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे काम कोणी करू नये. आणि हिंदूंना मारण्याच्या सुक्या धमक्या देऊ नये असा विचार आमचं हिंदुत्ववादी सरकार असताना करू नये. ज्यांना मराठी शिकायचं असेल त्यांना आम्ही sगळं ट्रेनिंग देऊ. पुस्तक देऊ. मारण्याची भाषा कोणी करू नये, एवढीच खाज असेल तर एम आय एम ची नगरसेविका बोलते की मला मराठी येण्याची गरज नाही तेव्हा का गप्प बसता तेव्हा हे कागदी वाघ कुठे जातात. तेव्हा हे बिळात लपलेले वाघ कुठे असतात हिरव्या सापांना ठेचण्याची हिंमत नाही?? जो नियम हिंदू धर्माला लावता तोच नियम इतर धर्माना लावा. मुसलमान समाजाचे किती ड्रायव्हर मराठी बोलतात त्यांना कोणी का विचारत नाही. आमच्या हिंदू समाजात फूट पाडण्याचे काम कोणी करू नये आम्ही राज्यात बसलोय हे लक्षात ठेवा ज्याला मराठी येत नसेल त्यांनी मराठी शिकाव. ऑन शिंदे सेना --- निरुपम यांना शिंदे साहेब समजवतील शिंदे साहेब सक्षम आहेत. ऑन संजय राऊत ( भाजपा निर्लज्ज ) --- निर्लज्जची व्याख्या काय आहे. हे ज्याला चांगल्या पद्धतीने माहित आहे त्याला सगळे निर्लज्ज वाटतात. निर्लज्ज मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसलाय. निर्लज्ज काय असतो ते आपल्या मालकाकडे बघून सांगावे ऑन टोल -- मी आमदार होतो तेव्हा जिल्हा वासियांवर टोल लावायला दिला नाही. टोल सुरु झाला तरी mh 07 च्या गाडयांना टोल लागणार नाही. मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे.0
0
Report
बागेश्वर बाबा के बयान पर महाराष्ट्र में सियासत ताप, मिटकरी ने कड़ा हमला
Akola, Maharashtra:बागेश्वर बाबा यांच्या छत्रपती शिवाजी महाराजांबद्दל केलेल्या वक्तव्यावरून राजकारण तापताना दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी या वक्तव्याचा तीव्र शब्दांत समाचार घेतला आहे. मिटकरी यांनी बागेश्वर बाबांसह पंडित प्रदीप मिश्रा आणि आमदार संजय गायकवाड यांच्यावरही निशाणा साधला आहे. महाराष्ट्रातील जनतेला शिवरायांचा खरा इतिहास माहिती आहे, त्यामुळे बाहेरून येणाऱ्या व्यक्तींनी शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवण्याची गरज नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. तसेच, काही लोक महाराष्ट्रात येऊन धार्मिक कार्यक्रमांच्या माध्यमातून मोठी कमाई करत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बागेश्वर महाराजांच्या वक्तव्याकडे दुर्लक्ष करणंच योग्य असल्याचंही मिटकरी यांनी म्हटलं आहे.0
0
Report
सावंतवाड़ी में वादळी वाऱ्य से नुकसान, पालकमंत्री नितेश राणे ने भरपाई का आश्वासन दिया
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी शहरात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या नुकसानीची पालकमंत्री नितेश राणे यांनी पाहणी केली. यावेळी त्यांच्यासह आमदार दीपक केसरकर, सावंतवाडी नगराध्यक्ष श्रद्धाराजे भोसले उपस्थित होते. जेवढं नुकसान झालंय तेवढी भरपाई देण्याची आपली जबाबदारी असून निकषाच्या पलीकडे जाऊन नुकसान भरपाई दिली जाईल असे आश्वासन मंत्री नितेश राणे यांनी यावेळी दिलंय0
0
Report
Advertisement
Sujay Vikhe on: Sanjay Raut Trump-like attitude, we won't stop
Ahilyanagar, Maharashtra:चौंडी, अहिल्यानगर सुजय विखे ऑन संजय राऊत संजय राऊत यांना कोणीच घेत नाही त्यामुळे ते एकटे त्यांना संधी मिळाली तर ते येतील पण ते जिथे आहे तिथे सुखी असू द्या ते मुख्यमंत्र्यांपासून तर दहा-पंधरा आमदार पर्यंत आले जोपर्यंत उद्धव ठाकरेंचा एकही सरपंच शिल्लक राहत नाही तोपर्यंत मी थांबणार नाही संजय राऊत हे ट्रम्प सारखेच वागत आहे त्यांना पाहूनच संजय राऊत यांनी भूमिका घेतली संजय राऊत यांचा परिणाम ट्रम्पवर झाला का..... शेवटचा सरपंच पडे पर्यंत मी थांबणार नाही ही संकल्पना त्यांनी पुढे चालू ठेवावी सुजय विखे ऑन महापुरुष वाद महापुरुषांबद्दल एका व्यक्तीने बोललं प्रतिमा मधील होत नाही सোशल मीडियाच्या माध्यमातून प्रत्येक जण राजकारण करण्याचा प्रयत्न करत आहे संजय गायकवाड पहिल्यांदा नाहीतर नेहमीच बोलतात, त्यांनी या आधी एका व्यक्तीला मारल होत छत्रपती शिवाजी महाराजांना बोलल्यावर त्यांची प्रतिमा किंवा भावना कमी होत नाही टीव्हीवर दिसण्यासाठी अनेकांचा खटाटोप सुरू आहे0
0
Report
बिजली कटने से कालंबनी अस्पताल में पोस्टमार्टम तीन घंटे देरी, प्रशासन पर सवाल उठे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा कारभार अंधारात.. जनरेटरअभावी पोस्टमार्टम ३ तास रखडले! कळंबनी उपजिल्हा रुग्णालयाचा धक्कादायक कारभार समोर आला आहे. वीजपुरवठा खंडित झाल्यानंतर रुग्णालयातील दोन्ही जनरेटर बंद असल्याने एका मृतदेहाचे पोस्टमार्टम तब्बल तीन तास रखडले. एक जनरेटर नादुरुस्त तर दुसरा डिझेलअभावी बंद असल्याने हा गंभीर प्रकार घडला. उपजिल्हा रुग्णालयात अत्यावश्यक सुविधेअभावी मृतदेहाची विटंबना होत असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे. या निष्काळजीपणाला जबाबदार असणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे.0
0
Report
नेनाडे जिला केंद्रीय बँक बचाने का श्रेय किसे मिला—देशमुख बनाम चव्हाण की बहस
Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Bank_Pckg Feed on - 2C --------------------------------- Anchor - अवसायानात निघालेल्या नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटी रुपयांचे कर्ज देऊन तारले होते. पुढे अशोक चव्हाण मुख्यमंत्री झाले आणि त्यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज माफ केले. याच जिल्हा बँकेच्या शाखेच्या एका सोहळ्यात बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून श्रेयवादाची लढाई रंगली. पाहुयात नेमके काय घडले. Vo - शेतकऱ्यांची बँक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांची परिस्थिती फारशी चांगली नाही. राजकारण्यात ताब्यातील या बँकाची ही परिस्थिती का झाली हे वेगळे सांगण्याची गरज नाही. पण बँक बुडन्यापासून कोणी वाचवली यावरून मात्र नांदेडमध्ये श्रेयवादाची लढाई पाहायला मिळाली. नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक बुडन्यापासून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी वाचवली की माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी वाचवली यावरून श्रेयवादाची ही लढाई रंगली. कर्जाची परतफेड होत नसल्याने नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँक 2007 साली अवसायानात निघाली होती. पण राज्य सरकारच्या सव्वाशे कोटीच्या कर्जामुळे बँक बुडन्यापासून वाचली. याच नांदेड जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या भोकर येथील शाखेचं इमारतीचा लोकार्पण सोहळा काल सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या उपस्थितीत पार पडला. यावेळी माजी मुख्यमंत्री खासदार अशोक चव्हाण, आमदार प्रताप पाटील चिखलीकर आणि माजी खासदार भास्करराव पाटील खातागावकर यांनी बँक वाचवण्याचे श्रेय कुणाचे याबद्दल वक्तव्य केले. अवसायानात निघालेल्या या बँकेला माजी मुख्यमंत्री स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी सव्वाशे कोटीचे कर्ज दिले त्यामुळे बँक असेपर्यंत त्यांचे उपकार मानले पाहिजेत असे वक्तव्य आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केले. तर बँक वाचवण्याचे श्रेय विलासराव देशमुख आणि अशोक चव्हाण या दोघांनाही जाते असे माजी खासदार भास्करराव पाटील म्हणाले. तर अशोक चव्हाण यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत झालेला किस्सा सांगितला. बँक बंद करण्याचा प्रस्ताव मंत्रीमंडळात आला होता त्यावेळी मी महसूल मंत्री होतो. सर्व मंत्री एकीकडे होते आणि मी एकीकडे. पण विलासरावानी बँक बंद करण्याचा निर्णय घेतला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यावर बँकेला दिलेल्या सव्वाशे कोटीच्या कर्जाचे रूपांतर अनुदानात केले असे अशोक चव्हाण म्हणाले. पण अशोक चव्हाण यांनी भाषनात विलासरावांना श्रेय दिले नाही. Sound Byte - आ.प्रताप पाटील चिखलीकर Sound Byte - भास्करराव पाटील - माजी खासदार Sound byte - खा. अशोक चव्हाण Vo - बँक बंद न करण्याचा निर्णय विलासरावानी घेतला त्यामुळे त्यांचे आभार व्यक्त करणार की नाही हा प्रश्न झी २४ तासच्या प्रतिनिधिने विचारल्यावर मात्र अशोक चव्हाण हो नक्कीच आभार मानणार असे उत्तर दिले. Boom Byte - खा. अशोक चव्हाण Vo - साखर कारखाण्यांना आणि संस्थांना दिलेले भरमसाठ कर्ज, अवास्तव खरेदी, फुगीर नोकरभरती या आणि इतर कारणामुळे नांदेड जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अवसायानात निघाली होती. सहकार खात्याने केलेल्या चौकशीमध्ये तत्कालीन संचालक मंडळाला दोषी धरण्यात आले होते. मात्र पुढे कोणतीही कारवाई झाली नाही. आज सुदैवाने बँक पुन्हा सुस्थीतीत आणण्यात आताच्या संचालक मंडळाला यश आले आहे. पण ही बँक वाचवण्याचे श्रेय घेण्यावरून वाद रंगला असताना बँक का बुडाली याच आत्मचिंतन करनेही गरजेचे आहे.0
0
Report
Advertisement
शिंदे के साथ सत्ता की बहुमत चुनौती, ऑपरेशन टाइगर पर राजनीतिक संग्राम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर *संजय शिरसाट पत्रकार परिषद ऑन आपचे 7 खासदार भाजपाकडे ऑपरेशन टायगर चर्चा - आमचे जे सहा-सात खासदार भाजपात गेले ते राज्यसभेचे, राज्यसभेत बहुमत असायला अजून 18 खासदारांची गरज आहे. - म्हणून आम्ही ऑपरेशन टायगर करतोय असं नाही. आमच्या संपर्कात सगळेजण आहेत हे आम्ही नाकारत नाही ऑपरेशन टायगर सांगून केलं जात नाही. - मात्र योग्य निर्णय कधी घ्यायचा हा अधिकार शिंदे यांच्याकडे आहे. असे सांगून ऑपरेशन होत नाही मात्र योग्य वेळी राजकीय भूकंप पाहायला मिळेल. ऑन विधान परिषदसाठी शिंदे शिवसेनेकडून बच्चू कडू आणि नीलम गोऱ्हे यांचे नाव चर्चेत. - विधान परिषदेमध्ये दोन जागा आहेत यासाठी दहा-बारा इच्छुक उमेदवारांची यादी एकनाथ शिंदे साहेबाकडे आहे. - आता त्यात एक नंबर कोण दोन नंबर कोण असे कयास मीडियाच्या माध्यमातून लावले जात आहेत. - अशी आतापर्यंत कोणतीही चर्चा झाली नाही, प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने लॉबिंग करत असतो. ऑन मराठी सक्तीला विरोध - निरुपम - महाराष्ट्र मध्ये काम करणाऱ्या प्रत्येकाला मराठी आली पाहिजे. मात्र निर्णय घेऊन उद्याच मराठी बोल असा आग्रह धरणे योग्य नाही. यावर काय निर्णय घ्यायचा ते प्रताप सरनाईक हे शिंदे साहेबांना बोलून घेईल. ऑन संदीप देशपांडे - संजय निरूपम - भैया मुंबई बंद करू शकत नाही. महाराष्ट्रात राहायचं तर मराठी यायला पाहिजे. मराठी पाट्या सर्व मुंबई मध्ये लावण्यात आला आहे. - काही लोकांना वाटतं आता मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी होईल - मुंबईत हिंदी भाषिकांचा कब्जा होईल असे वाटत मात्र तसे होणार नाही. - महानगरपालिकेत हिंदी महापूर होईल असे वाटत होतं पण काही होणार नाही. - मुंबई हे मराठी माणसाचीच आहे त्यासाठी कोणतेही तडजोड आम्ही करणार नाही. ऑन बकासुर सारखी भाजप झाली आहे - संजय राऊत - संजय राऊतला डिप्रेशन आले आहे. कुणाच्या बाजूने बोलावा हा त्याच्यासाठी मोठा विषय झाला आहे. - अजित दादाची राष्ट्रवादी शरद पवार गटातून फुटली बाजूला झाली. शरद पवारांची आजची भूमिका काय आहे हे संजय राऊतला माहित नाही. - उबटामध्ये जे अंतर्गत आता भांडण आहेत त्यामुळे उबाटाची सध्याची स्थिती काय आहे ते त्यांना सांगता येत नाहीत. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट आणि काँग्रेसचे काँग्रेसच आहे ते कधी कुठे जाईल त्याचा काही नियम नाही. - तुमच्यामध्ये असलेली फाटा फूट याचा इतराने जर फायदा घेतला तर त्याला बकासुरमन कितपत योग्य आहे. - आता संजय राऊत ने कितीही बडबड केली तरी हे समीकरण काय ते आता रोखू शकणार नाहीत ऑन संजय राऊत - उद्धव ठाकरे दुखी आहेत - उद्धव ठाकरे का दुःखी आहेत. त्याचा कारण संजय राऊत यांना माहिती आहे. आणि उद्धव ठाकरे दुखी असल्याने संजय राऊत का दुःखी हेही माहिती आहे. यांची काराने वेगळी आणि दाखवता वेगळी.. ऑन बागेश्वर धाम शिवाजी महाराजांच्या बद्दल वक्तव्य - या महाराजांनी महाराज गिरी सोडून राजकारणात करावं, प्रत्येक जण उठतो राजकारणात धडे देत आहे शिवाजी महाराज थकले होते तुम्हाला माहित आहे का शिवाजी महाराज थकले होते? - काही कथोगल्पित कहाण्या करणं या महाराजांनी थांबवल्या पाहिजे. ऑन सुनेत्रा पवार यांचे मुख्यमंत्री म्हणून बॅनर.... - सुनेत्रा पवार यांचे बोर्ड लावले हे कार्यकर्त्यांचे भावना असते. प्रत्येकाला वाटत आपला नेता मोठा व्हावा. - आम्हालाही एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री म्हणून पहायचे देवेंद्र फडणवीस साहेबांचे बॅनर लागले नव्हते का? एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना. ऑन बागेश्वर धाम वक्तव्य चार मुले जन्माला घाला एक आरएसएसला द्या - चार मूल पैदा करावे की सहा आता ही यांनी ठरवावे का ? - अशा प्रकारचे वक्तव्य करून समाधानी काय दिशा द्यायची हे त्यांनी ठरवलं पाहिजे. ऑन संजय गायकवाड यांच्यावर गुन्हा दाखल करावा - संजय गायकवाड यांनी त्यासंदर्भात कायद्याचे स्पष्टीकरण दिल आहे. परंतु नियमानुसार जी काय असेल ती कारवाई पोलीस करत आहेत. ऑन शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यावर चाकू हल्ला - शहरामध्ये गुन्हेगاريةचे प्रमाण वाढतय, कुणाचं प्रमाण वाढते मी पोलीस आयुक्तां सुद्धा सांगितल आहे की शहरामध्ये गुंडगिरी ड्रगचे प्रमाण खुनाचे प्रमाण वाढतात. - पोलिसांचा धाक या शहरांमध्ये राहिला नाही की काय अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ऑन उद्धव ठाकरे विधान परिषद उमेदवारी. - उद्धव ठाकरे यांना पुन्हा विधान परिषद मध्ये जायचं आहे त्यांची ती मानसिकता आहे. - काँग्रेसवाले म्हणतात उद्धव ठाकरे असतील तर आम्ही विचार करू राष्ट्रवादीवाले म्हणतात आम्ही पाठिंबा देऊ ह्या सगळ्या बातम्या फक्त चाललेल्या आहेत. - अखेर उद्धव ठाकरे हेच विधान परिषद चे उमेदवार असणार आहेत ते स्वतः इच्छुक आहेत. - किती काही झालं तरी ही निवडणूक उद्धव ठाकरे लढवणार आहेत. ऑन भाजप आय एम ए निवडणूक - पक्ष वाढविण्यासाठी सर्वच मदत करत आहे. ही सर्व पुढील निवडणुकriची तयारी आहे. हे भाजपने केले त्यात काही गैर नाही. ऑन मनसे पदाधिकारी गुन्हे दाखल - मनसेने आंदोलन केलं म्हणून संजय निरूपण यांनी यांनी विरोध केला की काय म्हणून संजय निरुपम च्या विरोधात आंदोलन. - हा आता राजकीय डावपेच त्या ठिकाणी चालला आहे. - महाराष्ट्रात राहणाऱ्या प्रत्येक माणसाला मराठी आलं पाहिजे हा आमचा सुद्धा आग्रह आहे. ऑन सोलापूरच्या मनोहर बाबाला अटक नेत्यांचे सोबत फोटो - बाबा असतील भविष्यकाळातील प्रत्येक माणूस राजकीय नेत्याशी संबंधित असतो. - त्यांचा असलेला एखादा कार्यक्रम असेल त्यांची असलेली एखादी भेट असेल हे स्वाभाविक आहे. - जसं खराब प्रकरण झालं आहे त्याच्यामध्ये त्यांनी केलेले दुष्कृत्य यामध्ये कोणत्याही राजकीय पक्षाचा नेता आढळला तर त्यावर कारवाई झाली पाहिजे असे आमचे स्पष्ट मत आहे. - युपी बिहारचे बाबा इकडे फिरत असतात आणि ते फोटो काढतात आणि त्या फोटोच्या आधारे मग ते इतरांना ब्लॅकमेल करतात असं झालं आहे. - आता राजकीय पुढारी सुद्धा बाबा सोबत फोटो काडताना घाबरतील आणि फोटो देणार नाहीत.0
0
Report
रत्नागिरी के लाडघर समुद्र तट पर बैलगाड़ी दौड़ ने दर्शकों में मचाया धमाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार नुकताच रंगला.. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनाऱ्यावर रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने रविवारी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा अनुभव दिला. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर वेगाने धावणाऱ्या बैलगाड्यांनी उपस्थितांची मने जिंकली. परिसरातील अनेक नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने शर्यतीत चुरस निर्माण झाली होती. अंतिम फेरीत ओंकार आरेकर यांच्या बैलगाडीने अप्रतिम वेग आणि नियंत्रण राखत प्रथम क्रमांक पटकावला. मनीष मोरे यांनी द्वितीय तर सुनील सुर्वे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली.0
0
Report
शिरूर की सड़क पर प्रसूति: महिलाओं की मदद से बना लेबर रूम, माता- baby सुरक्षित
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भागात आज एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णालय गाठण्यापूर्वीच नियतीने रस्त्यावरच तिची वाट अडवली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, तिला पुढच्या एका मिनिटाचाही प्रवास करणं अशक्य झालं. आणि अशातच शिरूरच्या रणरागिणी धावून आल्या... रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाखाली परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा अडोसा केला. एका रस्त्याचं रूपांतर तात्पुरत्या 'लेबर रूम'मध्ये झालं. केवळ महिलाच नाही, तर माहिती मिळताच डॉक्टरांनीही क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली आणि त्या कठीण परिस्थितीत प्रसूती शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडली. महत्त्वाचं म्हणजे या धावपळीत आणि तणावाच्या वातावरणात माता आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आधुनिक काळात आपण डिजिटल होत असलो, तरी माणुसकीचा ओलावा आजही जिवंत आहे, हेच या घटनेने सिद्ध केलंय.0
0
Report
Advertisement
बार्शी भगवंत महोत्सव में आनंद Shinde की सुरों की महफिल, हजारों की भीड़
Solapur, Maharashtra:सोलापूर - बार्शीतील भगवंत महोत्सवात रंगली आनंद शिंदेंच्या सुरांची मैफिल, गाण्यांच्या कार्यक्रमाला बार्शीकरांचा तुफान प्रतिसाद बार्शीचे दैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीकरांसाठी भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या भगवंत महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांमध्ये पावसाचा व्यत्यय येत असताना सुद्धा आनंद शिंदे यांच्या खास शैलीतील नवे जुने गाणे ऐकण्यासाठी जवळपास 25 हजारापेक्षा जास्त बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती.0
0
Report
Kolhapur में गर्भपात की गोलियाँ देने वाले फर्जी डॉक्टर समेत एजेंट गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एजंटला कोल्हापुरात अडकण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी खोतवाडी इथं कारवाई झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आरोग्य विभाग मिळून ही कारवाई केलीय. पोलिसांनी ऋषिकेश खोत आणि ऋषिकेश माने या दोघांना अटक केली आहे. ऋषिकेश खोत याने बीएचएमएस शिक्षण अर्धवट सोडून दवाखाना थाटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.0
0
Report
शिरूर के जांबूत में 9 साल का बिबट पिंजरे में जेरबंद, माणिकडोह भेजा गया
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील जांबूत येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात ९ वर्ष वयाचा नर बिबट जेरबंद झाला असून या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय, वन विभागाने गेली चार महिन्यात पिंपरखेड जांबुत चांडोह परिसरात हा ४५ वा बिबट जेरबंद केला असून इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने वनविभागाच्या मोहिमेचे परिसरात कौतुक केले जातंय.0
0
Report
Advertisement
