445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डॉन की रील बनवाने वालों ने रामलीला मैदान में युवक की चाकू से हत्या कर दी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सोशल मीडियावर डॉन ची रील बनवणाऱ्या टवाळखोर तरुणांनी एक युवकाचा चाकूने भोसकून खून केला. ही घटना सिडको ठाण्यापासून १०० फूट अंतरावरील रामलीला मैदानात घडली. चाकूचे आरपार २ वार गेल्याने युवकाच्या शरीरातून मोठा रक्तस्त्राव झाल्याने खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना पहाटे साडेपाचला युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणी सिडको ठाण्यात खुनाचा गुन्हा नोंदवला. प्रवीण सुरेश मांडोळे असे मृत युवकाचे नाव आहे. प्रसन्नजीत ऊर्फ चिक्या प्रमोद हिवाळे आणि अरुण पद्मसिंह भूल यांच्यासह इतर दोन अनोळखींचा आरोपींमध्ये समावेश आहे. जुन्या किरकोळ वादातून आरिपीनी पीडिताला बाहेर बोलावले आणि प्रथम लाथ बुक्क्यांनी मारले नंतर पार्श्वभागात चाकूने भोसकले, त्यात रक्त स्त्राव झाल्याने मृत्यू झाला...0
0
Report
पैठण के बिडकीन में तूफान से पेड़ बिजली तार पर गिरा, व्यापक दहशत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण मधील बिडकीन मध्ये वादळी वाऱ्यामुळे एक मोठे झाड घरावरून गेलेल्या विजेच्या तारेवर कोसळल्याची घटना घडली. झाड तारेवर पडताच जोरदार ठिणग्या उडाल्या आणि काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यांमुळे मोठे नुकसान सुरू आहे. अनेक ठिकाणी घरावरील पत्रे उडाले तर सोलार पॅनल देखील वादळी वाऱ्यामुळे पडलेत, अचानक झालेल्या या वादळी व्यावरसह पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली.0
0
Report
संभाजी नगर में सांसद के बंगले पर चोरों ने डकैती जैसी चोरी को अंजाम दिया: CCTV से मिली जानकारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संभाजी नगर शहर में चोरों का सिलसिला जारी है। अब सांसद संदीपन भुमरे के रामकृष्णनगर स्थित बंगले में ही चोरों ने चोरी की घटना को अंजाम दिया। आधी रात के समय बंगले के मुख्य गेट से कूदकर उन्होंने सांसद की सुरक्षा रक्षक का मोबाइल छीन लिया। सांसद के बंगले में चोरी की घटना से शहर में चर्चा है। पुंडलिकनगर पुलिस स्टेशन में मामला दर्ज किया गया है। CCTV फुटेज के आधार पर पुलिस चोरों की खोज में लगी है.0
0
Report
Advertisement
कास तालाब में संग्राम भंडारे डूबे: रेस्क्यू टीम आज भी तलाश में
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील कास तलावात वनवासवाडी येथील संग्राम भंडारे हा व्यक्ती बुडाला आहे. हा व्यक्ती कास तलावात पाय घासरून पडला आहे. शिवेंद्रसिंहराजे भोसले रेस्क्यू टीमने रात्री या व्यक्तीचा शोध घेतला मात्र मृतदेह आढळून आला नाही त्यामुळे आज पुन्हा सकाळपासून शोध मोहीम सुरू केली जाणार आहे.0
0
Report
विधान परिषद चुनाव के लिए बीजेपी ने विदर्भ के उम्मीदवारों की घोषणा की
Nagpur, Maharashtra:नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी विदर्भातील उमेदवारांची नावे भाजपाकडून जाहीर करण्यात आलीयं.. नागपूर मतदार संघात डॉक्टर राजीव पोतदार, वर्धा -चंद्रपूर- गडचिरोली या विधान परिषदेच्या मतदारसंघासाठी अरुण लखानी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भंडारा- गोंदािया मतदारसंघासाठी अविनाश ब्राह्मणकर आणि अमरावती मतदारसंघात प्रवीण पोटे यांना उमेदवारी मिळाली आहे. तर यवतमाळ मतदारसंघातून शिवसेना शिंदे गटाचे दुष्यंत चतुर्वेदी यांचे नाव आघाडीवर आहे.0
0
Report
वाशीम के घोटी खेतों में आग, लाखों का नुकसान; किसान सरकार से मदद मांगते हैं
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील घोटी शेतशिवारातील धरण परिसरात लागलेल्या भीषण आगीमुळे इंझोरी व जामधरा येथील अनेक शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले. अचानक भडकलेल्या आगीने मोठा परिसर व्यापत शेतांमधील सिंचनासाठी वापरण्यात येणारे प्लास्टिक पाईप, वायर आणि इतर साहित्य जळून खाक केले. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था विस्कळीत झाली असून खरीप हंगामाच्या तोंडावर त्यांच्यासमोर आर्थिक संकट उभे राहिले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून महसूल व कृषी विभागाने तातडीने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना शासनाकडून मदत व नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
खटाव में मानसून पूर्व भारी बारिश, किसानों के खेतों में पानी ने अब जगा दी उम्मीद
Satara, Maharashtra:सातारा : गेल्या काही दिवसांपासून असह्य उकाड्याने हैराण झालेल्या खटाव तालुक्यातील डिस्कळ सह ललगुण, बुध परिसरात नागरिकांना अखेर निसर्गाने मोठा दिलासा दिला आहे. अचानक हवामानात बदल झाल्यामुळे वादळी वाऱ्यासह गारांचा जोरदार पाऊस झाला. या दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे अक्षरशः रस्त्यावर पाण्याच पाणी पाहायला मिळाले.. तासभर पडलेल्या पावसामुळे भूजल पाणी पातळीत वाढ होण्यास मदत होणार आहे. शेतीसाठी हा पाऊस समाधानकारक असल्यामुळे पेरणीपूर्व मशागतीसाठी उपयुक्त असणार आहे.0
0
Report
असलम काझी की कुस्ती महोत्सव में सिकंदर शेख व पृथ्वीराज ने बराबरी की कुस्ती
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कुर्डूवाडी मध्ये कुस्ती सम्राट असलम काझी यांनी भरवलेल्या भव्य कुस्ती स्पर्धेत सिकंदर शेख आणि पृथ्वीराज पाटील यांची कुस्ती बरोबरीत सुटली या कुस्ती स्पर्धेसाठी राज्यभरातून अनेक नामवंत मल्ल सहभागी झाले होते ग्रामीण भागात होणारे अशाच पूर्वी स्पर्धांमुळे अनेक मल्लांना आपली कुस्ती दाखवण्यासाठी मैदान उपलब्ध होते जवळपास 1000 च्या आसपास विविध वयोगटातील महिलांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता0
0
Report
जालना में तेज कार पेड़ से टकराई, आग लगने से चालक की मौत
Jalna, Maharashtra:जालना : भरधाव कार झाडावर आढळून अपघात,कारने पेट घेतल्यानं चालकाचा होरपळून मृत्यू जालना : भरधाव कार झाडाला धडकली. यानंतर कारने पेट घेतला. या आगीत कारचालकाचा आतच होरपळून मृत्यू झाला. ही घटना जालना जिल्ह्यातील जाफराबाद-चिखली रोडवरील जंजाळवाडी परिसरात घडली. 35 वर्षीय नितीन गवळी रा. रुपचंदनगर, जि. अकोला असे या घटनेतील मृताचे नाव आहे. मृत हा नाशिक येथील बस डेपोतील कर्मचारी आहे. नितीन गवळी कारने नाशिकहून अकोल्याकडे जात होते. पहाटे सुमारे ५ वाजेच्या सुमारास जाफराबाद-चिखली मार्गावरील जंजाळवाडी परिसरात कारवरील नियंत्रण सुटले. भरधाव वेगातील कार रस्त्यालगत असलेल्या मोठ्या झाडावर जोरात आदळली. अपघातानंतर कारने तत्काळ पेट घेतला. दरम्यान, गाडीचे दरवाजे लॉक झाल्याने नितीन गवळी यांना बाहेर पडता आले नाही. ते गाडीतच अडकून पडले. आगीत होरपळून त्यांचा जागीच मृत्यू झाला. काही वेळातच कार जळून खाक झाली.दरम्यान जाफ्राबाद पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
हिंगोली कृषि उपज मंडी में मूंगफली की आवक बढ़ी, प्रतिक्विंटल 700 रुपए
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यांमध्ये भुईमुगाचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जात असून हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सध्या भुईमुगाची आवक मोठ्या प्रमाणात वाढू लागली आहे हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भुईमुगाचा लिलाव करण्यात येत आहेत जिल्हाभरातून मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी या लिलावामध्ये आपल्या भुईमुगाच्या शेंगा विकण्यासाठी दाखल केल्या आहेत त्यामुळे शेकडो क्विंटल भुईमूग शेंगा हिंगोलीच्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विक्रीसाठी आणण्यात आल्यावर असून हिंगोलीच्या बाजार समितीमध्ये भुईमुगाला 700 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळत आहे0
0
Report
अकोला तार फाईल क्षेत्र में रेलवे जमीन के अतिक्रमण हटाने के लिए बुल्डोजर चालू
Akola, Maharashtra:अकोला शहरातील तार फाईल परिसरात रेल्वे प्रशासनाच्या जमिनीवरील अतिक्रमण हटविण्यासाठी आज मोठी कारवाई सुरू करण्यात येणार आहे. या कारवाईसाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात तणावपूर्ण शांतता आहे. रेल्वेच्या मालकीच्या जागेवर अनेक वर्षांपासून अतिक्रमण करून घरे बांधण्यात आली होती. यासंदर्भात रेल्वे प्रशासनाने सुमारे १६० घरांना नोटिसा बजावल्या होत्या. अतिक्रमणधारकांना जागा रिकामी करण्यासाठी ३१ मे ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मुदत संपल्यानंतर आज सकाळपासून प्रशासनाने अतिक्रमण हटविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस, रेल्वे सुरक्षा दल आणि महसूल विभागाचे अधिकारी मोठ्या संख्येने घटनास्थळी उपस्थित आहेत. या कारवाईमुळे परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली असून प्रशासनाकडून शांतता राखण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तार फाईल परिसरातील रेल्वेच्या जागेवर उभारण्यात आलेल्या अतिक्रमित घरांवर आज प्रशासनाचा बुलडोझर चालणार आहे. यासाठी सकाळपासूनच पोलीस आणि रेल्वे प्रशासनाने परिसराचा ताबा घेतला आहे. अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या प्रश्नावर अखेर प्रशासनाने कठोर पाऊल उचलले आहे.0
0
Report
कर्जमाफी के दावों के बीच महंगाई, ठाणे घोटाले, ED-सीबीआई विवाद पर बहस
Mumbai, Maharashtra:On ८० लाख लाडक्या बहिणी अपात्रः हे सरकार बोगस स्किम चं सरकार मत मिळवण्यासाठीची स्किम.. स्कॅम आहे हा.. अपात्र केलेल्या लाडकया बहिणींनी पण काही स्वप्न पाहिलेली होती ना.. On शेतकरी कर्जमाफी घोषणाः किती दिवस नुसत एकतोय घोषणा करतात पुढे काही करत नाहीत एकिकडे महागाई वाढवायची व दुसरीकडे अशा घोषणा करायच्या On महायुती रायगड जागा तिढाः पालकमंत्री कोण आहेत तिथले ? हा.. हा… On राऊत, देशमुखांना तुरूंगात धाडणाऱ्या ई डी च्या विशेष संचालक राजीनामाः संजय राऊत , अनिल देशमुख यांच्या प्रकरणांत कोर्टानं ईडी वर ताशेरे मारले होते.. ईडी सिबीआय चा गैर वापर केला जातो विरोधकांना सतावलं जातं On thane scams: मुख्यमंत्री कार्यालयातून ठाण्यातली आणखी प्रकरण बाहेर योणार आहेत On जरांगेः हे सरकार फसवणार सरकार..0
0
Report
Advertisement
चंद्रपुर जिले में कुएं में गिरे बाघ की मौत; वन विभाग ने शव कब्जे में लिया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात विहिरीत पडून वाघाचा मृत्यू झालाय. सिंदेवाही तालुक्यातील चारगाव बडगे परिसरातील शेतशिवारातल्यापांडुरंग गजभिये यांच्या शेत शिवारातील कठडा नसलेल्या विहिरीत आज सकाळी एक वाघ पडून असल्याचं निदर्शनास आलं. यानंतर वनविभागाच्या पथकाने घटनास्थळ गाठून वाघाचा मृतदेह ताब्यात घेतला. प्राथमिक माहितीनुसार वाघाचा मृत्यू दोन ते तीन दिवस आधी झालेला असून हा नर वाघ अंदाजे सात ते आठ वर्षांचा आहे.0
0
Report
विकरोळी के ICU बंद: महापौर रितू तावडे ने निरीक्षण कर स्थिति सुधार का भरोसा दिया
Mumbai, Maharashtra:विक्रोळीतील बंद ICU ची महापौर रितू तावडे यांनी घेतली दखल रुग्णालय पाहणीदरम्यान विक्रोळीकरांची जोरदार घोषणाबाजी विक्रोळीतील पालिकेच्या क्रांतिवीर महात्मा ज्योतिबा फुले रुग्णालयातील ICU गेल्या नऊ महिन्यांपासून बंद असल्याने संतप्त विक्रोळीकरांनी काही दिवसांपूर्वी ICU बाहेर तोंडाला ICU मास्क लावून रुग्णालय प्रशासनाविरोधात आंदोलन केले होते. या आंदोलनाची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी आज रुग्णालयाला भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. यावेळी स्थानिक नागरिकांनी महापौरांसमोर जोरदार घोषणाबाजी करत रुग्णालयातील अपुऱ्या सुविधांबाबत नाराजी व्यक्त केली. आंदोलकांच्या मागण्यांची दखल घेत महापौर रितू तावडे यांनी रुग्णालयातील ICU तसेच इतर अपुऱ्या सुविधा लवकरात लवकर सुरळीत करण्यात येतील, असे आश्वासन दिले. Byte: रितू तावडे (महापौर)0
0
Report
चंद्रपुर के Chimur में बाघ के हमले से गुराखी की मौत, इलाके में दहशत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मोटेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू, परिसरात दहशत चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या मोटेगाव जंगलात वाघाच्या हल्ल्यात गुराख्याचा मृत्यू झालाय. यामुळे परिसरात दहशत पसरली आहे. रोजच्या दिनक्रमानुसार दिलीप नन्नावरे नामक गुराखी आपल्या बक-या घेऊन लगतच्या बद्री टेकड्यांवर चराईसाठी गेले होते. दरम्यान संध्याकाळी बक-या घरी परतल्या मात्र दिलीप आलाच नाही. घरच्या मंडळींनी शोधाशोध केल्यावर फाटलेले कपडे आणि कु-हाड सापडली. घाबरलेल्या नातेवाईकांनी गावात पोचून ग्रामस्थांना माहिती दिली. मोठ्या संख्येत ग्रामस्थ पुन्हा जंगलात परतल्यावर त्यांना मृतदेह सापडला. वनविभागाने शव ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवले आहे. दरम्यान वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
