icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ के अवैध वाळू घोटाले में तहसीलदार सहित 15 दलालों पर केस

Beed, Maharashtra:बीड: राक्षसभुवन वाळू घोटाळ्यात मोठी कारवाई; तहसीलदार, तलाठी, महसूल कर्मचाऱ्यांसह 15 दलालांवर गुन्हे दाखल होणार 250 घरकुल लाभार्थ्यांचा जबाब; वाळूच मिळाली नसल्याचा केला खुलासा तहसीलदारांसह 38 जणांची दोन दिवस चालली चौकशी, तहसीलदारावर गुन्हा तथा निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या राक्षसभुवन येथील बहुचर्चित वाळू घोटाळ्यात कारवाईचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून गोदावरी नदीपात्रातून झालेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात दोन दिवस तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून सुनावणी झाली. त्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. तलाठी, कंत्राटी कर्मचारी आणि तब्बल 15 दलालांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धक्का радыक बाब म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षणात 250 लाभार्थ्यांनी आम्हाला कोणतीही वाळू मिळाली नसल्याचा जबाब दिला आहे. कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष वास्तवातील तफावत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदी पात्रातून घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली अवैध वाळू उत्खनन तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या संगणमताने होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आमदारांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याची तक्रार दिली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत महसूल विभागासह इतर जणांवर ही कारवाई होत आहे.
0
0
Report

बीड़ में केक शॉप में आग, लगभग 5 लाख का नुकसान

Beed, Maharashtra:बीड: कडा येथील केक शॉपला आग; ५ लाखांचे नुकसान... विद्युत महावितरणची मेन लाईन तुटल्याने दुर्घटना, पहाटे घटना घडल्याने जिवीतहानी टळली..! ANC - कडा शहरातील मुख्य कडा-आष्टी रस्त्यालगत असलेल्या दिपक पवळ यांच्या केक शॉपला विद्युत महावितरणची मेन लाईन तुटल्यामुळे आग लागून संपूर्ण दुकान जळून खाक झाले. या आगीत दुकानातील साहित्य, उपकरणे तसेच इतर मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून अंदाजे ५ लाख रुपयांचे नुकसान झालेले सांगण्यात आले आहे. दिपक पवळ यांनी मोठ्या कष्टाने उभारलेले हे केक शॉप काही वेळातच आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. सुदैवाने ही घटना पहाटेच्या सुमारास घडल्याने कोणतीही जिवीतहानी झाली नाही. मात्र, आगीत संपूर्ण दुकानाचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. बाईट: दीपक पवळ
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में 7 घंटे में 1167 रिक्षाचालकों पर कार्रवाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी आणि प्रवाशांशी उद्धटपणे वर्तणूक करणाऱ्या रिक्षाचालकांना चाप बसवण्यासाठी शहर वाहतूक शाखेने तपासणी मोहीम घेत ७ तासांत १ हजार १६७ बेशिस्त रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारला. यात ६० टक्के रिक्षाचालक गणवेशाशिवाय, तर ४० टक्के रिक्षाचालक कुठलाच परवाना नसताना प्रवाशांची धोकेदायकरीत्या वाहतूक करताना आढळल्याचे धक्कादायक वास्तविक समोर आले. शहरात अनेक ठिकाणी रिक्षाचालकांकडून वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवले जात असल्याच्या, तसेच प्रवाशांशी उद्धट, उर्मट वर्तन होत असल्याच्या तक्रारी पोलिसांकडे येत होत्या. शिवाय, नियमबाह्य क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशांची वाहतूक करून स्वतः सह प्रवाशांचाही जीव धोक्यात घातला जातो. या पार्श्वभूमीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर में प्री मॉनसून हीटवेव, तापमान 38–39°C

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहराला जोरदार अजूनही पूर्वमोसमी पावसाची प्रतीक्षा लागून आहे. शहरात ढगाळ वातावरणामुळे उकाड्यात प्रचंड वाढ झाली असून संपूर्ण शहर घामाघूम झाले आहे. १६ आणि १७ जून रोजी शहरात कोंदट आणि कमालीचे दमट हवामान कायम राहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. त्यामुळे नागरिकांना असह्य उकाड्याचा सामना करावा लागणार आहे. एकीकडे नागरिक पूर्वमोसमी पावसाची वाट पाहत असताना दुसरीकडे तापमानही कमी होण्यास तयार नाही. शहराचे कमाल तापमान सातत्याने ३८ ते ३९ अंश सेल्सियसच्या दरम्यान नोंदवले जात आहे. सोमवारी शहराचे तापमान ३८.३ अंश सेल्सियस इतके होते. आकाश ढगाळ असूनही पाऊस पडत नसल्यामुळे हवेतील आर्द्रता कमालीची वाढली आहे.
0
0
Report
Advertisement

जायकवाडी ड्रम का पानी पीने के लिए आरक्षित; 28% भंडार, उद्योगों पर जल कटौती संभव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या जायकवाडी धरणातील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश शासनाने दिले आहेत. सोमवारी झालेल्या ऑनलाइनबैठकीतही त्यावर अंमल करण्याच्या सूचना राज्याच्या मुख्य सचिवांनी विभागीय प्रशासनाला दिल्या. जायकवाडीतून पाण्याचे सगळे आवर्तन बंद केले असून उद्योगांची पाणी कपात भविष्यातील परिस्थितीवर अवलंबून असे प्रशासनाने सांगितले.. जायकवाडी धरणात सध्या 28% साठा आहे पाऊस आला तर साठ्यात वाढ होईल त्यामुळे संकट टळेल असा विश्वासही व्यक्त करण्यात आला..
0
0
Report

अमरावती विधान परिषद चुनाव में सपकाळ ने पैसे की देवाण-घेवाण पर कड़ा आरोप लगाया

Akola, Maharashtra:अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार निशाणा साधला आहे. अमरावती विधान परिषद निवडणुकित घोडेबाजार सुरू असून मोठ्या प्रमाणात पैशांची देवाणघेवाण होत असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. पातूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित सभेनंतर ते माध्यमांशी बोलत होते.सत्ताधाऱ्यांनी कोणतेही विकासकाम केले नसून पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांचा प्रभाव मतदारांवर पडत नसल्याने पैसे वाटपाचा मार्ग स्वीकारला असल्याची टीका सपकाळ यांनी केली आहे.काँग्रेसमध्ये कोणतीही नाराजी नसून पक्षश्रेष्ठींकडे तक्रारी करण्यात आल्याच्या चर्चा केवळ अफवा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.अमरावती विधान परिषद निवडणुकीत काँग्रेसचे दोन आणि वंचित बहुजन आघाडीचा एक उमेदवार रिंगणात असून मित्रपक्ष म्हणून दोन्ही पक्षांमध्ये समन्वय साधण्याच्या दृष्टीने चर्चा सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. स्थानिक काँग्रेस नेते एकमताने जो प्रस्ताव देतील, तो प्रदेश काँग्रेस समितीला मान्य असेल, असेही त्यांनी स्पष्ट केले. वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत स्थानिक स्तरावर चर्चा झाल्यास त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असेही त्यांनी नमूद केले.यावेळी त्यांनी जयपूर येथे CJP चे दीपकेंवर झाल्याहत्याचा निषेध व्यक्त केला. तसेच पातूर नगरपरिषदेची निवडणूक तब्बल दहा वर्षांनंतर होत असल्याबद्दल टीका करत, इतका विलंब होणे म्हणजे लोकशाही मूल्यांची पायमल्ली असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
0
0
Report
Advertisement

नागपुर में शोरूम आग: दमकल ने आग पर पाया नियंत्रण, सुरक्षा नियमों पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास चितार ओळ लागत सोनचाफा ज्वेलरी शोरूमला आग लागली होती... वेगाने पसरणाऱ्या या इमारतीची आग लगतच्या होर्डिंग आणि दुचाकींचाही कवेत घेते... दरम्यान अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले... अग्निशामक दलाच्या जवानांनी लगेचच ही आग नियंत्रणात आणली... आगीमुळे मोठं नुकसान झालं असून इमारती लगतच्या दुचाकीही जाळल्यात... दरम्यान बाजारपेठ असलेल्या महाल परिसरात काही दिवसांपूर्वीच आशिष एन एक्स या कपड्यांच्या दुकानाला आग लागली होती. त्यानंतर आज पुन्हा एका शोरूमला आग लागल्याने मोठ्या शोरूममध्ये अग्निशामन दलाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत पुन्हा त्याबाबत नियमांचे पालन होतं का प्रश्नचिन्ह निर्माण झालेयं
0
0
Report

जेजुरी के खंडेराय गढ़ से पालखी सोहळा शाही स्नान के लिए प्रस्थान

Rui, Maharashtra:जेजुरी 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात श्री खंडेरायाच्या गडावरून पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानसाठी प्रस्थान झालंय.... अखंड महाराष्ट्राचे कुलदैवत असणाऱ्या श्री क्षेत्र जेजुरीच्या खंडेरायाच्या गडावरून 'येळकोट येळकोट जयमल्हार' जयघोषात पालखी सोहळ्याचे कऱ्हा नदीवर शाही स्नानासाठी प्रस्थान झालंय.... अधिकमास महिन्यात सोमवती अमावस्या असल्याने मोठं महत्त्व प्राप्त झालंय.. देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक भक्त हे सोमवती अमोशा निमित्त जेजुरी गडावर दाखल झालेले पहावयास मिळाले यावेळी भाविकांनी भंडाऱ्याची मुक्त उधळण केलीय..
0
0
Report

सांगली में वेदांत बंडगार हत्या के विरोध में कैन्डल मार्च

Sangli, Maharashtra:अँकर - सांगली जिल्हा हादरून टाकणाऱ्या 14 वर्षीय वेदांत बंडगर यांच्या हत्येच्या निषेधार्थ सांगली मध्ये सामाजिक संघटनांच्या वतीने कॅन्डल मार्च काढण्यात आला. सांगली मिरज रोडवरील शहीद अशोक कामटे चौकापासून विश्रामबाग येथील क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्यापर्यंत काढण्यात आलेल्या कॅन्डल मार्चमध्ये पीडित बंडगर कुटुंबासह सांगलीतील विविध पक्षातील व सामाजिक कार्यकर्ते आणि सांगलीकर नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. हातात मेणबत्ती घेऊन मृत वेदांत बंडगर याला न्याय द्यावा, गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली. यावेळी समस्त सांगलीकरांच्यावतीने चिमुरडया वेदांत याला सामुदायिक श्रद्धांजली वाहण्यात आली.
0
0
Report
Advertisement

बारामती में कर्जमाफी पर सरकार पर सवाल, आंदोलन की धमकी तेज

Rui, Maharashtra:पॉइंटर - कर्जमाफी चा बिना अट येईल असे वाटत होतं. त्यामुळे 48 लाख शेतकऱ्यांना यांना वंचित राहावं लागतं होते. 44 लाख शेतकऱ्यांना 50 हजाराची मदत झाली असती. 2 लाखापर्यंत सरसकट माफ करावा असा आम्हाला म्हणायचं होत. काही जाचक अटी काढणं गरजेचे होत. उपोषण सोडत असताना महाजन साहेब आले. ते cm सोबत बोलले. Cm सकारात्मक निर्णय घेतील. आम्ही सरकारशी बसून बोलू. अजून काही दिवस आम्ही बसलो असतो. आमची भावना होती की सरकारला संधी देऊ. सरकार चूक करणार नाही कारण त्याला अहिल्यादेवी यांचं योजनेला नाव आहे. सरकार महापुरुष यांच्या अवमान करतो आहे असं वाटू शकते, तसेच मला पंढरपूरला शब्द दिला होता. जर पंढरपूरचा शब्द फिरवला तर वारकरी त्यांना पूजा करू देणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते त्यामुळे सरकार शब्द फिरवणार नाही. आपण संधी देऊन बघू. जर अटी मान्य केल्या नाहीत 4 जुलै ला आम्ही मराठवाड्यात मोठं आंदोलन करू. संधी देऊन सुद्धा काम केलं नाहीतर महाजन साहेब खोट बोलले आणि cm साहेब देखील खोटं बोलले अस म्हणावं लागेल. डिलीमिटेशन चा कायदा महिलांचा आरक्षण पुढं करून त्यांना तो आणायचा होता मात्र तो हाणून पाडला. टीएमसी ला पराभव स्वीकारावा लागला. भाजपाला आता कळलं आहे निवडून येणं अवघड है त्यामुळे ते कुठे खासदार हाताला लागतात काही बघत आहेत. उद्धव ठाकरे साहेबांचे खासदार खरंच अन रिचेबल आहेत खरंच ते आन रीचेबल होते का का मुद्दामून ते अनरिचेबल झालं हे बघावे लागेल. त्यामुळे लोकांच्यात याबाबत भाजपमध्ये नाराजी होऊ शकते. आपण भाजपसोबत कधी जाणार नाही तो विचारा मला पटत नाही. सध्या अनेक प्रश्न आहेत यावर कुणीतरी बोललं पाहिजे. आज सपकाळ साहेब तिथे येणार होते. अनेक नेते सरकारच्या विरोधात एकवटले आहेत. माझी भूमिका संघर्षाची आहे. मनोज जरांगे जेव्हा आंदोलन कर्जमाफीसाठी करतील त्यावेळेस आपण तिथं बघूया. दोन लाखापर्यंत मदत मिळणं आमच्या शेतकऱ्यांना सध्या गरजेचा आहे.
0
0
Report

ठाकरे गुट बनाम शिंदे गुट: महासभा में आमने-सामने टकराव

Kalyan, Maharashtra:न्यूज फ्लॅश केडीएमची महासभेत ठाकरे गट आणि शिवसेना शिंदे गट आमने सामने खासदार श्रीकांत शिंदे यांना कल्याण मध्ये रस्त्यांवर फिरवा सर्व रस्ते खड्डे मुक्त होतील शिवसेना ठाकरे गटाचे गटनेते उमेश बोरगावकर यांच्या या विधानानंतर शिंदे गटाने घेतला आक्षेप स्थायी समिती सभापती मल्लेश शेट्टी, शिवसेना गटनेते विश्वनाथ राणे आणि इतर नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना धारेवर धरले उद्धव ठाकरे यांना फिरवा आमच्या नेत्यात दम आहे असे शब्दात शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकांनी उमेश बोरगावकर यांना सुनावले काही काळ महासभेत गोंधळाची परिस्थिती
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top