icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बीड़ में तृप्ती देसाई के सद्बुद्धि के लिए पाँच बजे सुबह प्रतीकात्मक पालना आंदोलन

Beed, Maharashtra:बीड: तृप्ती देसाईंच्या 'सद्बुद्धी’साठी पहाटे पाच वाजता पाळणा हलवला! शिंदे सेनेची महिला आघाडी आक्रमक..!! ANC - सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी नीलम गोऱ्हे यांच्या पक्षीय कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत केलेल्या वक्तव्यामुळे शिवसेना शिंदे गटामध्ये राजकीय वातावरण तापले आहे. देसाई यांनी गोऱ्हे यांच्या विधान परिषद निवडीवर टीका करत, त्यांच्या पक्ष बांधणीतील योगदानावरही सवाल उपस्थित केला होता... याच पार्श्वभूमीवर शिवसेना महिला आघाडीने आक्रमक भूमिका घेत पहाटे पाच वाजण्याच्या च्या सुमारास अनोख्या पद्धतीने निषेध नोंदवला. महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांनी तृप्ती देसाई यांचा प्रतिकात्मक फोटो पाळण्यात ठेवून ‘पाळणा आंदोलन’ केले. यावेळी पाळण्यात दुधाची बाटली ठेवून गाणे म्हणत पाळणा हलवण्यात आला. “तृप्ती देसाई यांच्या बुद्धीची वाढ व्हावी आणि त्यांना सद्बुद्धी लाभावी, यासाठीच हा प्रतीकात्मक पाळणा हलवण्यात आला... तसेच, आमच्या पक्षाच्या अंतर्गत बाबींमध्ये हस्तक्षेप करू नये, अन्यथा शिवसेना स्टाइलने धडा शिकवला जाईल,” असा इशाराही महिला आघाडीने यावेळी दिला आहे. दरम्यान या प्रकारामुळे राज्याच्या राजकारणात नव्या वादाला तोंड फुटले असून, महिला आघाडीच्या या आक्रमक भूमिकेमुळे पुढील राजकीय घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत. बाईट: संगीता चव्हाण बाईट: अनिल जगताप
0
0
Report

जालना में 100 करोड़ रुपए की 11 एकड़ जमीन फर्जी दस्तावेज़ से हड़पने का मामला

Jalna, Maharashtra:जालना : 100 कोटी रु. किमतीची 11 एकर जमीन हडपण्याचा प्रयत्न न्यायालयाच्या आदेशाने तत्कालीन दुय्यम निबंधक, भूमी अभिलेख उपअधीक्षकांसह ५ जणांवर गुन्हा; बनावट मुखत्यारपत्राद्वारे फसवणूक 11 एकर जमीन हडपण्यासाठी बनावट कागदपत्रे तयार करून कोट्यवधींचा डल्ला मारल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. जिल्हा न्यायालयाच्या आदेशावरून तत्कालीन दुय्यम निबंधक आणि भूमिलेख विभागाच्या उपअधीक्षकांसह पाच जणांविरुद्ध फसवणूक व गुन्हेगारी कटाचा गुन्हा कधीम जालना पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या जमिनीचे बाजारमूल्य १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे समोर आलं आहे. तत्कालीन भूमिलेख उपअधीक्षक रवींद्र मुथा आणि तत्कालीन सह दुय्यम निबंधक बी. बी. वाडेकर यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. जमिनीचा ताबा नसताना आणि रद्द झालेले पीआर कार्ड असतानाही त्यांनी बेकायदेशीरपणे विक्री करारनामे नोंदवले. पोलिसांनी सुरुवातीला दखल न घेतल्याने आबड यांनी न्यायालयात धाव घेतली होती. तक्रारदार अंकित आबड यांची सर्वे नंबर ५५४ मध्ये मालकीची जमीन आहे. या जमिनीवरून १९८६ पासून न्यायालयात वाद सुरू आहे. मात्र, संशयित संध्या डागा यांनी कायदेशी प्रक्रियेचे उल्लंघन करून आणि तक्रारदाराला कोणतीही नोटीस न देता २० ऑगस्ट २०२१ रोजी आशिष छाजेड यांच्या नावाने बनावट मुखत्यारपत्र तयार केले. याच आधारे ६ मे २०२२ रोजी मालमत्ता पत्रकावर (PR Card) स्वतःचे नाव नोंदवून घेतले. पोलिस निरीक्षक आरती जाधव यांच्या तपासणी अहवालामुळे या प्रकरणातील गुंतागुंत समोर आली. या प्रकरणात आता आणखी कोणाकोणाचा समावेश आहे याचा पोलिस शोध घेत आहेत
0
0
Report
Advertisement

आधारवाडी डंपिंग ग्राउंड पर भीषण आग, शहर में धुआं और सांस लेने में परेशानियाँ

Kalyan, Maharashtra:आधारवाडी डम्पिंगग्राउंड पर भीषण आग। आगीमुळे शहरातील काही भागांमध्ये धुराचे साम्राज्य. अग्निशामक दलाकडून आग विझवण्यासाठी शर्यतीचे प्रयत्न कल्याण पश्चिम आधारवाडी डम्पिंग ग्राउंड ला आठच्या आजच sुमारास डम्पिंग राऊंड आग लागल्याचं अग्निशामक दलाला माहिती मिळाल्यानंतर आग विझवण्यासाठी चार गाड्या घटनास्थळी दाखल होऊन आग विजवण्याचे शर्यतीचा प्रयत्न सुरू आहे हवा असल्याने आग आणि धूर पसरल्याने शहरांमध्ये धुरीचे लोट पाहायला मिळत आहे आधारवाडी परिसरामध्ये नागरिकांना श्वास घेण्यास त्रास
0
0
Report

चंद्रपुर के सिंडेवाही में बाघिन ने वनरक्षक पर हमला, घंटेभर में मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रातील नवरगाव-रत्नापूर परिसरात रविवारी अजब घटना पुढे आली. एका वाघिणीने वनरक्षकावर प्राणघातक हल्ला केला. मात्र अवघ्या तासाभरातच तिचा गूढ मृत्यू झाला. रविवारी सकाळी रत्नापूर शिवारात ही वाघीण आपल्या तीन बछड्यांसह वावरताना दिसली. ही बातमी पसरताच नागरिकांनी मोठी गर्दी केली. जमावाला पांगवण्यासाठी गेलेल्या वनविभागाच्या पथकावर चिडलेल्या वाघिणीने अचानक हल्ला केला. या झटापटीत वाघिणीने वनरक्षक सज्जन पारेकर यांच्या पायाचा लचका तोडल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यानंतर वनविभाग वाघिणीचा शोध घेत असतानाच, दुपारी ही वाघीण मक्याच्या शेतात मृतावस्थेत आढळली. या परिसरात एका बैलाचीही शिकार झाल्याचे समोर आले आहे. हल्ला करणारी वाघीण अवघ्या तासाभरात मृत कशी झाली? आणि तिचे तीन बछडे सध्या कुठे आहेत? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. नियमानुसार मृत वाघिणीचे शवविच्छेदन करून पंचांसमक्ष अंत्यसंस्कार करण्यात आले. वाघिणीचे वय ९ ते १० वर्षे असून, शवविच्छेदना अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होईल. वाघांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरीकानी केली आहे.
0
0
Report

लातूर में गर्मी से तीसरी मौत, औसा में हीट स्ट्रोक से युवक की मौत

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूर जिले में उष्माघात से तीसरा बळी गेलाय. औसा तालुक्यातील एरंडी गावात प्रखर उन्हामुळे एका तरुणाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. 25 वर्षीय महेश लिंबाजी इंगोले हा तरुण शेतातून काम आटोपून घरी परतला, घर आल्यावर त्याला अचानक चक्कर आली व तो खाली कोसळला. कुटुंबीयांनी तातडीने त्याला सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र उष्माघातामुळे त्याचा जागीच मृत्यू झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल के अकोला बाजार में अघोरी पूजा से गुप्त धन खोजने वाले छह गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या अकोला बाजार परिसरातील कारेगांव शेतशिवारात गुप्तधन शोधण्यासाठी अघोरी पूजा करत असलेल्या सहा जणांना वडगांव जंगल पोलीसांनी अटक केली आहे. वरूड-कारेगांव रस्त्यावर हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांना एक संशयित चारचाकी वाहन तपासले असता त्यात अघोरी पूजेशी संबंधित विविध साहित्य आढळून आले. यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचे पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूल, रुद्राक्ष माळ, केस, लिंबू, सुया, ताबीज, रंगीबेरंगी धागे आदी वस्तूचा समावेश होता. या साहित्याचे आधारे संशयितांची चौकाशी केली असता सहा जणांनी गुप्तधन काढण्यासाठी शिवारात आल्याची कबुली पोलिसांनी दिली. ताब्यात घेतलेले पाच जणं वाशिम जिल्ह्यातील असून एक जण आर्णी येथील आहे. यात धक्कादायक बाब म्हणजे काही महिलांचे फोटो आणि केस सुद्धा सापडले. पंचधातु चे बिर कंगण ज्याचा उपयोग अघोरी पूजे साठी केला जातो ते सुद्धा यावेळी सापडले. वीरेंद्र गायकवाड हा पूजा करणारा पुजारी असल्याचं पुढे आलं आहे
0
0
Report

यवतमाळ आयुर्वेद महाविद्यालय में 18 छात्रों के रैगिंग मामले में कार्रवाई और रस्टिकेट की सिफारिश

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या डायाभाई मावजी मजीठिया आयुर्वेदिक महाविद्यालयातील 18 विद्यार्थ्यांवर रॅगिंग घेतल्याप्रकरणी कारवाई निश्चित करण्यात आली आहे. त्यातील एका विद्यार्थ्याला एक वर्षाकरिता रस्टिकेट केले जाणार आहे तर आठ विद्यार्थ्यांना सहा महिन्याकरिता रस्टिकेट केले जाणार आहे. चार विद्यार्थ्यांना पाच हजार रुपये, एका विद्यार्थ्याला चार हजार रुपये, तीन विद्यार्थ्यांना तीन हजार तर एका विद्यार्थ्याला दोन हजार रुपये दंड ठोठावण्याचे प्रस्तावित आहे. आणखी तीन विद्यार्थ्यांना समज देण्यात आली आहे. आयुर्वेद प्रथम वर्षात नव्याने दाखल झालेल्या विद्यार्थ्यांची रॅगिंग घेतल्या बाबत तक्रार यूजीसी अँटी रॅगिंग हेल्पलाइन न्यू दिल्ली या वेबसाईटवर करण्यात आली होती, त्यात 21 विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे म्हटले होते. या प्रकरणाची चौकशी करण्याबाबत सूचना देण्यात आल्या होत्या, त्यानुसार महाविद्यालयाच्या अँटी रॅगिंग कमिटीने चौकशी केली असता, विद्यार्थ्यांनी रॅगिंग घेतल्याचे स्पष्ट झाले.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर बुक क्लब ने हर रविवार दो घंटे पढ़ने की पहल शुरू की

Chandrapur, Maharashtra:शहरातील बागा झाल्या बुक सेंटर, 'चंद्रपूर बुक क्लब' उपक्रमाची झाली सुरुवात, दर रविवारी 2 तास वाचन उपक्रम, सुशिक्षित तरुण सरसावले वाचनसंस्कृतीच्या जतनासाठी अँकर: आजच्या इंटरनेटच्या काळात वाचन संस्कृती लोप पाऊन मोबाइलमध्ये व्यस्त पिढी उदयास येत आहे. त्यामुळे वाचनाची ओढ निर्माण व्हावी, यासाठी काही सुशिक्षित तरुण-तरुणींनी चंद्रपुरात 'चंद्रपूर बुक क्लब' उपक्रमाची सुरूवात केली आहे. व्ही. ओ. १) पुस्तके वाचल्याने एकट्याने विचार करण्याची सवय लागते आणि खरा आनंद मिळतो. पुस्तके विवेक बुद्धी उजळवतात, सभोवतालच्या जगाची समज देतात. आताशा माहिती तंत्रज्ञानाचा वापर वाढत आहे आणि वाचन संस्कृती लोप पावत आहे. यामुळे बौद्धिक ज्ञानाच्या कक्षा अरुंद होऊन बौद्धिक विकासावर परिणाम होताना दिसतो. यावर उपाय म्हणून दर रविवारी चंद्रपूरकरांसाठी तुकूम भागातील शिवनेरी बालोद्यानात 'बुक क्लब' ची सुरूवात करण्यात आली आहे. यात सर्व वयोगटांसाठी विविध प्रकारच्या पुस्तकांची मेजवानी आहे. आपल्या रविवारच्या सुट्टीची सकाळ पुस्तकांच्या सहवासात घालविण्याची संधी उपलब्ध होत आहे. या उपक्रमासाठी प्रगती निशा प्रभुदास, रोहित सोनटक्के, सुप्रिया चूनारकर, चेतन सोनुले, यांनी पुढकार घेतले आहे. बाईट १) प्रगती निशा प्रभुदास, संयोजक व्ही. ओ. २) आजच्या इंटरनेटच्या काळात समाजातील तरुणांना विविध गोष्टींचा छंद असतो. मात्र, या सुशिक्षित तरुणांनी वाचन संस्कृती वाचविण्यासाठी सुरू केलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे. विशेषतः शालेय विद्यार्थी उपक्रमात हिरिरीने सहभागी होत आहेत. बाईट २),३) वाचक व्ही. ओ. ३) वाचाल तर वाचाल अशी एक म्हण आहे. यासाठी वाचन संस्कृतीचे जतन व्हावे म्हणून सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

उद्योग मंत्री उदय सामंत बोले: मराठी भाषे का सम्मान जरूरी, किसी की बात नहीं चलेगी

Nanded-Waghala, Maharashtra:- जळगाव जिल्ह्यात शिवसेनेचे नेते गुलाबराव पाटील यांनी काय भाषण केले ते मला माहिती नाही. पंरतू प्रत्येकाला इच्छुक राहण्याचा अधिकार आहे. प्रत्येकाला संघटना बांधण्याचा अधिकार आहे. पक्ष संघटना बांधताना स्वतःची महत्त्वकांक्षा प्रकट करण्याचा अधिकार आहे. त्याच भावनेतून गुलाबराव पाटील बोलले असतील तर त्यात वावग काय आहे. - मराठी भाषा शक्ती: याबाबत काही लोक राजकारण करत आहेत. मी स्वतः मराठी भाषेचा मंत्री आहे. तसा जिल्हाधिकारी होताना, मुख्य कार्यकारी अधिकारी होताना, पोलीस अधीक्षक होताना, मराठीचा पेपर द्यावाच लागतो. कुणावर जबरदस्ती करून हे केलं जात नाही. जे रिक्षावाले, टॅSSIवाले आहेत त्यांना प्रमाणिक मराठी बोलता आली पाहिजे ही भूमिका परिवहन मंडळाची असेल तर त्याच राजकारण करु नये. त्यांनी स्वतःदेखील शिकवायला तयार आहेत. जो महाराष्ट्रात राहतो त्याला मराठी आली पाहिजे असं जर प्रताप सरनाईक असतील तर त्याच्यात वावग काय आहे. परंतु एक महत्त्वाची भूमिका अशी आहे की जो गैरसमज मराठी लोकांमध्ये पसरवला जातोय, अशा पद्धतीची शिवसेनेची आणि परिवहन मंत्र्यांची भूमिका नाही. फक्त त्यांनी शिकावं ही जर आग्रहाची भूमिका असेल पण त्यात कोणी वावग वाटून घेऊ नये. - भागेश्वर बाबा: छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज, यांच्याबद्दल कोणी जरी वावग बोलल, मोठ्यातली मोठी व्यक्ती वावग बोलली तर ते योग्य ठरत नाही. - श्रीमंत कोकाटे: कोण काय बोलल, याच्यावर मी प्रतिक्रिया देणे याला अर्थ नाही. कोकाटे काय बोलले. बाकी काय बोलले. बागेश्वर काय बोलले हे मी ऐकले नाही. एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की छत्रपती शिवाजी महाराज यांच्या बद्दल कोणीही वावग बोलू नये ही शिवसेनेची भूमिका आहे. - मुखेड एमआयडीसी मंजुरी: नांदेड जिल्ह्यात अनेक ठिकाणी एमआयडीसी होते, अनेक माझे सहकारी यासाठी प्रयत्नशील आहेत. मुखेड मध्ये आम्ही नोटिफिकेशन काढलेल आहे. यानंतर पुढील प्रक्रिया होणार आहे. - नांदेड मध्ये हेलिकॉप्टर निर्मिती प्रकल्प: याबाबत मला देखील संभ्रम आहे. मला आता नांदेडला आल्यानंतर कळालं की इथे हेलिकॉप्टरचे पार्ट्स बनणार आहेत. मला आता Hemant Patil म्हणाले तुम्ही काही हेलिकॉप्टर बनवणार का एमआयडीसी मार्फत. आतापर्यंत नांदेडचा विमानतळ एमआयडीसी कडे आहे हे मला माहीत होतं. आता ते वापरायला आम्ही महाराष्ट्र विमान प्राधिकरणाकडे दिलं आहे. परंतु हेलिकॉप्टरचा कारखाना कधी येणार आहे, कसा येणार आहे याची पुर्ण माहिती घेईन, पुढच्या वेळी नांदेडला आल्यावर त्याचं स्पष्टीकरण करेन. - दावोसMidдел करारात चार हजार कोटी करार आहे असं अशोक चव्हाण म्हणाले: अशोक चव्हाण साहेब आमचे ज्येष्ठ नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, त्याच्याशी चर्चा करेन आणि त्यानंतर स्पष्टीकरण देईन. - ऑपरेशन टायगर, खासदार संजय जाधव येणार: आता सामूहिक विवाह सोहळ्याला आलेलो आहे, राजकीय चर्चा न केलेली बरी, विवाह सोहळ्याला आलो राजकारणावर चर्चा करणे योग्य नाही, राजकारणावर बोलायचं नाही असं ठरवलं.
0
0
Report
Advertisement

विदर्भ में अप्रैल से रिकॉर्ड गर्मी, तापमान 45°C के पार पहुंचा

Akola, Maharashtra:तर विदर्भात उष्णतेचा अक्षरशः कहर पाहायला मिळतोय. एप्रिल महिन्यातच सूर्य आग ओकत असल्याने नागरिक हैराण झाले आहेत. अकोला, अमरावती आणि वर्धा या तीन जिल्ह्यांमध्ये तापमानाने 45 अंशांचा टप्पा ओलांडला असून, यंदाच्या मोसमातील आतापर्यंतचा हा उच्चांक ठरला आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट दिसत आहे. काल अकोला आणि अमरावती येथे तब्बल 45.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे, तर वर्ध्यात पारा 45.5 अंशांवर पोहोचला. याशिवाय भंडारा, चंद्रपूर आणि नागपूरमध्येही तापमान 44 अंशांच्या पुढे गेले आहे. गडचिरोली आणि गोंदिया येथे 43.6 अंश, तर वाशीम आणि यवतमाळमध्ये 43 अंश तापमानाची नोंद झाली आहे. सर्वात कमी बुलढाणा येथे 42.2 यांच्या तापमानाची नोंद झाली असली तरीही हा तापमान बुलढाणा करिता या ऋतूतला सर्वाधिक तापमान आहे. प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक काम असल्यास दुपारी 12 ते 4 घराबाहेर निघण्याची सूचना जरी दिली असली तरीही नाईलाजाने दैनंदिन कामासाठी नागरिकांना घराबाहेर पळावे लागत आहे. विदर्भात आता नागरिक घराबाहेर पडताना मोठी काळजी घेत आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाने विक्रमी पातळी गाठल्याने विदर्भातील नागरिकांना उष्णतेचे तीव्र चटके बसत आहेत.दुपारच्या वेळेत अत्यावश्यक कामांशिवाय नागरिक घराबाहेर पडणे टाळत आहेत. रस्ते ओस पडल्याचे चित्र अनेक शहरांमध्ये पाहायला मिळत आहे.दरम्यान, उष्माघाताचा धोका वाढल्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. भरपूर पाणी पिणे, उन्हात बाहेर पडताना डोक्यावर संरक्षण ठेवणे आणि दुपारच्या कडक उन्हापासून दूर राहणे, असे उपाय सांगितले जात आहेत. मात्र पोटाची खाणगी भरण्यासाठी अनेकांना घराबाहेर पडावे लागत आहे, दुपारच्या वेळेत नागरिकांची गर्दी नसल्याने व्यावसाकीयांना सुद्धा याचा फटका बसत आहे. एकीकडे वाढतं तापमान आणि दुसरीकडे उष्माघाताचा धोका, यामुळे विदर्भात सध्या नागरिकांचे हाल होत आहेत. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विदर्भातील या उष्णतेच्या लाटेमुळे जनजीवन विस्कळीत झालं असून, नागरिकांनी सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला.
0
0
Report

जालना में मराठी भाषा मुद्दे पर मनसे का आक्रामक प्रदर्शन

Jalna, Maharashtra:जालना | शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत, मनसेचे जोडे मारो आंदोलन गुणरत्न सदावर्ते जालन्यात आला तर त्याची गाडी फोडू मराठी भाषा मुद्द्यावरून मनसे आक्रमक जालना शहरात मनसेच्या वतीने आंदोलन अँकर- जालन्यात शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत, मनसेचे जोडे मारो आंदोलन केलंय.. मुंबईसह राज्यभरात मराठा भाषेचा मुद्दा चांगलाच पेटलाय.. त्यावरून अॅडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंनी मराठी भाषेला विरोध करत राज ठाकरेंवर टीका केली होती. त्यावरून ममसेनं आक्रमक भूमिका घेत सदावर्तेंचा जाहीर निषेध केलाय. जालन्यात मनसेच्या कार्यकर्त्यांनी शेळीला सदावर्तेंचा फोटो लावत जोडे मारत निषेध व्यक्त केलाय. शिवाय सदावर्ते जालन्यात आल्यास त्याची गाडी फोडून टाकू असा इशाराही दिलाय.
0
0
Report

निलंगा शहर में कचरे का राज, नागरिक परेशान, सार्वजनिक शौचालय बदहाल

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... निलंगा शहरात घाणीचं साम्राज्य; नागरिक त्रस्त....कचऱ्याच्या ढिगांमुळे दुर्गंधी, आरोग्याचा प्रश्न गंभीर....सार्वजनिक शौचालयांची दयनीय अवस्था उघड.... निलंगा शहरात मूलभूत सुविधांचा बोजवारा उडाल्याचं चित्र समोर आलं आहे. शहरातील अनेक भागांमध्ये कचऱ्याचे ढीग साचल्यामुळे दुर्गंधी पसरली आहे. तर नगरपरिषदेच्या वतीने उभारण्यात आलेल्या सार्वजनिक शौचालयांचीही दयनीय अवस्था पाहायला मिळते आहे. जागोजागी कचरा आणि घाणीचं साम्राज्य पसरल्याने नागरिक त्रस्त झाले असून, नगरपरिषदेच्या दुर्लक्षामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातो. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेऊन नागरीकाशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top