445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
हिवरखेड-अकोट मार्ग पर पेड़ गिरा, ट्रैफिक तीन घंटे के लिए रुका; जानमाल सुरक्षित
Akola, Maharashtra:Anchor अकोला-जळगाव जिल्ह्याला जोडणाऱ्या हिवरखेड-अकोट राज्य मार्गावर आज मोठा अपघात टळला. हिवरखेड येथील विठोबा हॉटेलसमोर एक विशाल वृक्ष उन्मळून थेट रस्त्यावर कोसळल्याने दोन्ही बाजूंची वाहतूक काही काळ पूर्णपणे ठप्प झाली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. प्रत्यक्षदर्शींच्या माहितीअनुसार, कोसळलेले झाड काही वाहनांवर तसेच वीजतारांवर पडल्याने नुकसान झाले आहे. वृक्ष रस्त्याच्या मध्यभागी आल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेला कळविण्यात आले असून झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम हाती घेण्याची तयारी सुरू आहे. दरम्यान, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
कांदिवली पूर्व में 17 वर्षीय लड़की हत्या: प्रेमी गिरफ्तार, AI से पहचान साफ
Mumbai, Maharashtra:कांदिवली समता नगर पुलिस स्टेशन मुंबईतील कांदिवली पूर्व येथील समतानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीच्या हत्येचा गुन्हा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उघडकीस आणला आहे. या प्रकरणातील २२ वर्षीय आरोपी प्रियकराला अटक करण्यात आली असून, अत्याधुनिक एआय तंत्रज्ञानाच्या मदतीने पोलिसांनी मृत मुलीची ओळख पटवत गुन्ह्याचा छडा लावला. कांदिवली पूर्व येथील दामूनगर परिसरातील वन विभागाच्या हद्दीत सुमारे दोन किलोमीटर आत १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा मृतदेह आढळून आला होता. मृतदेहाची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते. घटनास्थळी सापडलेल्या मुलीच्या बॅगेतील पुस्तक, हस्ताक्षर आणि चेहऱ्याच्या वैशिष्ट्यांचा एआय तंत्रज्ञानाद्वारे अभ्यास करण्यात आला. त्याआधारे ती कोणत्या महाविद्यालयात शिक्षण घेत होती आणि तिची ओळख काय आहे, याचा शोध पोलिसांनी काही तासांत लावला. तपासादरम्यान पोलिसांना समजले की, मृत मुलगी आणि २२ वर्षीय सचिन वाग्मोर आरोपी गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंधात होते. पोलिसांच्या तपासानुसार, आरोपी मुलीवर लग्नासाठी दबाव टाकत होता. मात्र, मुलीने लग्नास नकार दिल्याने आरोपी संतप्त झाला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने शेवटची भेट घेण्याच्या बहाण्याने मुलीला दामूनगर येथील वनक्षेत्रात २km आत नेले आणि तेथे तिची निर्घृण हत्या करून घटनास्थळावरून फरार झाला. घटनेची माहिती मिळताच समतानगर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि काही तासांत आरोपीचा शोध घेऊन त्याला अटक केली. aरोपीविरुद्ध हत्या तसेच अल्पवयीन मुलीशी संबंधित असल्याने पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, या गुन्ह्यात इतर कोणाचा सहभाग आहे का, याचाही तपास सुरू आहे. या प्रकरणाचा जलद निकाल लागावा यासाठी पोलिसांनी हा खटला फास्ट ट्रॅक न्यायालयात चालविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. पोलीस उपायुक्त गजानन राणे यांनी सांगितले की, ६० दिवसांच्या आत दोषारोपपत्र दाखल करण्याचा प्रयत्न केला जाईल आणि आरोपीला कठोर शिक्षा व्हावी यासाठी सर्व आवश्यक पुरावे न्यायालयात सादर केले जातील.0
0
Report
सच्चिदानंद महाराज की कानूनी नोटिस से राष्ट्रवादी कांग्रेस में नया विवाद
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना सच्चिदानंद महाराज यांनी कायदेशीर नोटीस पाठवल्यानंतर पक्षात नव्या वादाला तोंड फुटले आहे. राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवड प्रक्रियेत अनियमितता झाल्याचा आरोप सच्चिदानंद महाराज यांनी केला आहे. या आरोपांना पक्षाचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. मिटकरी म्हणाले की, राष्ट्रीय अध्यक्षांच्या निवड प्रक्रियेवेळी सच्चिदानंद महाराज स्वतः उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी कोणताही आक्षेप नोंदवला नव्हता. त्यामुळे आता अचानक नोटीस पाठवण्यामागे दुसऱ्या कुणाचा तरी 'मास्टरमाईंड' असल्याचा संशय व्यक्त करत, या संपूर्ण प्रकरणामागील सूत्रधाराचा शोध घेणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
सोलापूर में ज्ञानेश्वर पालखी के स्वागत के लिए भव्य कमानी, मोदी-फडणवीस की प्रतिमाओं सहित
Pandharpur, Maharashtra:Anchor - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून ग्रामविकास विभागाने भाविकांच्या स्वागतासाठी आकर्षक आणि भव्य स्वागत कमानी उभारल्या आहेत. या कमानींमुळे पालखी मार्गाचे सौंदर्य खुलले आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे औचित्य साधत ग्रामविकास विभागाच्या वतीने पालखी मार्गावर विविध ठिकाणी भव्य आणि आकर्षक स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत. या कमानींवर श्री विठ्ठल रुक्मिणी प्रतिमा , वारकऱ्यांची वाद्ये तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वारकरी वेषातील प्रतिमा लावल्या आहे.त्यामुळे पालखी मार्गाला आध्यात्मिकतेसोबतच आकर्षक स्वरूप प्राप्त झाले आहे. सोलापूर जिल्ह्यात 19 जुलै रोजी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा प्रवेश करणार आहे. त्यांचे उत्साहपूर्ण स्वागत करण्यासाठी आणि वारीचे वैभव अधिक उठावदार करण्याच्या उद्देशाने या स्वागत कमानी उभारण्यात आल्या आहेत.0
0
Report
नवी मुंबई में अनैतिक संबंध के चलते पति की हत्या, पत्नी और प्रेमी ने गला घोंटा
Navi Mumbai, Maharashtra:ऐरोलीतील महिला सुनिता कुशवाह हिचे तिचा रिक्षावाला प्रियकर राहुल प्रजापती सोबत अनैतिक संबंध जुळले होते. या संबंधाना अडसर ठरत असलेल्या पती बलीराम कुशवाह याची पत्नी आणि तिच्या प्रियकराने गळा दाबून गळ्यावर वार करत हत्या केली. हत्येनंतर पुरावे मिटविण्यासाठी बलीराम च्या मृतदेहाचे 3 तुकडे करून ते गोणीत आणि चादीरीत गुंडाळून प्रियकर राहुलच्या रिक्षातून गवळीदेव डोंगर परिसरात वेगवेगळ्या ठिकाणी फेकले. हत्येच्या 8 महिन्यांनी बळीराम च्या भावाने पोलिसात मिसिंग तक्रार दाखल केली. रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तपास करत दोघांचे जुने कॉल डिटेल चेक करून दोघांची स्वतंत्र चौकशी केली असता जबाबात विसंगती आढळल्याने पोलीसी खाक्या दाखवताच दोघांनी हत्येची कबुली दिली. पोलीस मृतदेहाचा शोध घेत असून घटनेला 11 महिने उलटले असल्याने शोध घेण्यास अडचणी येत आहेत याप्रकरणी पोलिसांनी सुनीता आणि तिचा प्रियकर राहुल याला अटक केली असून अधिक तपास सुरु आहे.0
0
Report
सोलापुर ATS ने 126 करोड़ के घोटाले के मामले में तीन आरोपी गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: आंतरराष्ट्रीय संघटना और पाकिस्तानातील नागरिकांशी संबंध असल्याच्या कारणावरून सोलापुरातील 3 जणांवर ATS कडून कारवाई - तब्बल 126 कोटींचे संशयास्पद व्यवहार समोर आलेल्या आंतरराष्ट्रीय संघटनेशी सोलापुरातील आरोपींचे आर्थिक संबंधित समोर आलेत. - सोलापुरातील 3 आरोपींनी 10 कोटी 50 लाखाचा निधी आंतरराष्ट्रीय संघटनेला दिल्याचे तपासात उघड - याप्रकरणी अटकेतील 1 आरोपीचा जामीन आणि 2 जणांचा अटकपूर्व जामीन अर्ज कोर्टाने फेटाळला - आरोपींच्या मोबाईल मध्ये पाकिस्तानातील 70 पेक्षा अधिक लोकांचे नंबर तसेच 4 व्हाट्सअप ग्रुप मध्ये सहभाग असल्याचे तपासात उघड - बोगस धर्मादाय संस्था नोंदणी करून जवळपास दहा कोटी पन्नास लाख रुपयांचे व्यवहार करण्यात आले. - सोलापुरातील नागरिकांकडून निधी गोळा करत हे पैसे संबंधित आंतरराष्ट्रीय संस्थेला दिल्याचेही समोर आलेय. - आंतरराष्ट्रीय संघटनेला दिलेला हा निधी देश विघातक कृत्यासाठी वापरला गेला असल्याची शक्यता असल्याने एटीएस कडून ही कारवाई करण्यात आली.0
0
Report
Advertisement
पत्नी हत्या मामला: सलमान खान के मोहम्मद खान पर आरोप, आरोपी गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: नागपूर-मुबंई समृद्धी महामार्गावर पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील सलमान खान नेक मोहम्मद खान याने पत्नी हसीनबानो हिची लोखंडी रॉडने मारहाण करून गळा आवळत हत्या केल्याचा प्राथमिक आरोप आहे. हत्येनंतर आरोपीने मृतदेह कारमध्ये ठेवून अनेक तास प्रवास केल्याची माहिती समोर आली आहे. त्यानंतर आरोपी स्वतः वाशीम जिल्ह्यातील कारंजा शहर पोलीस ठाण्यात हजर झाला आणि पोलिसांसमोर शरणागती पत्करली. पोलिसांनी कारमधून हसीनबानोचा मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला आहे. प्राथमिक चौकशीत चारित्र्याच्या संशयातून हत्या केल्याचे समोर आले असून, घटना घडली तेव्हा दाम्पत्य तीन लहान मुलांसह प्रवास करत होते. कारमध्ये अन्य कोणाचा सहभाग होता का, यासह सर्व बाबींचा कारंजा शहर पोलीस सखोल तपास करत आहेत.0
0
Report
सोलापुर में भीषण गर्मी, मॉनसून नहीं, पारा 37.4°C तक पहुंचा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सोलापूरकर अनुभवतायत आहेत कडक उन्हाळा, जिल्ह्यातून पाऊस गायब तर तापमानाचा पारा पोहोचला 37.4° वर - ऐन पावसाळ्यात सुद्धा सोलापूरकर अनुभवतायत कडक उन्हाळा - पावसाळ्याच्या ऋतूमध्ये सोलापूरच्या तापमानाचा पारा पोहोचला 37.4 अंशांवर - पुनर्वसु नक्षत्राने सोलापूरकरांची केली घोर निराशा - कडक उन्हामुळे सोलापूरकरांच्या अंगाची लाही लाही तर दुसरीकडे खरीपाचा हंगाम हातातून निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी चिंतेत - वाढत्या उन्हामुळे सोलापूर शहरातील रस्त्यांवरील वर्दळ कमी0
0
Report
जुन्नर के टीकेकरवाड़ी में पुष्पावती नदी का भव्य झरना, पर्यटक मोहित
Shirur, Maharashtra:जुन्नर/पुणे। गेल्या आठवड्यात सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे उत्तर पुणे जिल्ह्यातील नद्या दुथडी भरून वाहत आहेत. जुन्नर तालुक्यातून खळखळून वाहणाऱ्या पुष्पावती नदीला टीकेकरवाडी येथे भव्य धबधब्याचे स्वरूप आले असून, या निसर्गरम्य दृश्याने पर्यटकांना भुरळ घातली आहे. जुन्नर तालुक्यातील टीकेकरवाडीच्या पश्चिमेला असलेल्या नेतवड गावाजवळ मांडवी आणि पुष्पावती नद्यांचा संगम होत असल्याने पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात वाढला आहे. टिकेकरवाडी येथे उंचावरून कोसळणाऱ्या पाण्यामुळे पुष्पावती नदी परिसरात भव्य धबधब्याचे मनमोहक दृश्य निर्माण झाले आहे. पाण्याचे उडणारे तुषार आणि हिरवाईने नटलेला परिसर पर्यटकांना आकर्षित करत आहे।0
0
Report
Advertisement
तळकोकण में पिछले आठ दिनों से वर्षा नहीं हुई, किसानों के खेत बर्बाद
Oras Bk., Maharashtra:खरं तर हे गीत विदर्भ आणि मराठवाडा या भागाशी निगडीत असायच मात्र तशीच परिस्थिती आता तळकोकणात पाहायला मिळत आहे. मागील आठ दिवस पावसाने दडी मारल्याने तळकोकणातील शेताला अक्षरशः तडे गेलेत, रोप देखील कोमेजून गेलीत. पहिल्यांदाज अशी परिस्थिती कोकणात पहायला मिळत आहे. या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
राम मंदिर रामरक्षा पठण को लेकर संजय राउत की मंदिर ट्रस्ट से चर्चा
Nagpur, Maharashtra:खासदार संजय राऊत यांनी रामनगरातील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांना फोन करून 18 जुलै च्या राम रक्षा पठाण साठी सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. काल रात्री संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क साधून 18 जुलैला उद्धव ठाकरे आणि इतर शिवसैनिकांना रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण करायचे आहे, त्यासाठी मंदिर ट्रस्टने सहकार्य करावे अशी विनंती संजय राऊत यांनी केल्याची माहिती रवी वाघमारे यांनी दिली. धार्मिक भावनेतून शुद्ध मनाने राम रक्षा पठण करायचे असल्यास कोणालाही आमची अडचण नाही, मात्र हे करत असताना त्याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये. आपल्या राजकीय विचाराच्या मंदिराच्या बाहेर ठेवून यावं असंही मंदिर ट्रस्टने संजय राऊत यांना सांगितल्याचे रवि वाघमारे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासून रामनगर येथील राम मंदिरात यायचे... मंदिराच्या सहाशे सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक सदस्य आहेत.. त्यामुळे फडणवीस सदस्य आहेत म्हणून उद्धव ठाकरे राम रक्षा पठण करण्यासाठी या मंदिरात येत असावेत असे आम्हाला वाटत नाही असे रवि वाघमारे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राम मंदिराच्या शेजारीच असलेल्या एनआयटीच्या पटांगणावर भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन केले आहे... मुळात ते महायज्ञ मंदिराच्या बाहेरील एनआयटीच्या पटांगणावर आहे... मात्र, त्या आयोजनामुळे मंदिरात चे पावित्र्य आणि गरिमा कायम राहील अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टने व्यक्त केली आहे.0
0
Report
Ambabai मंदिर में अवैध संवर्धन पर Kolhapur के संतप्त लोग, नेता हर्षल सुरवे ने किया विरोध
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अशास्त्रीय पद्धतीने केल्या जात असलेल्या संवर्धन प्रक्रिये बाबत कोल्हापूरकर संतप्त झाले आहेत.. अंबाबाई देवीच्या भक्ताने देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.. शिवसेनेचे स्थानिक नेते हर्षल सुर्वे यांनी देखील संवर्धनाच्या प्रक्रियेबाबत संताप व्यक्त केला आहे.. संवर्धन प्रक्रिया राबवत असताना पुरातत्वीय निकशांचे सरळ सरळ उल्लंघन केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.. काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागली हा त्याचाच भाग असल्याचा आरोप शिवसेना नेते हर्षल सुर्वे यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
जयंत पाटील पर सुरेश धस का खुला आरोप: जियो टैगिंग से महाराष्ट्र लूट
Beed, Maharashtra:बीड : जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. भाजप आ सुरेश धस मविआ सरकार मध्ये जलसंपदा मंत्री असताना जिओ टॅगिंग चा जी आर काढला महाराष्ट्राची लूट झाली.. महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. किती वाटा आहे. कोण डायरेक्टर सगळ काढणार - सुरेश धस जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी डवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. दादागिरी नवंटंकी तिकडे चालवायची इकडे नाही. देवांनी तुम्हाला जेवढे डोके दिले त्याच्यापेक्षा एक टक्का आमच्या देवांनी सुद्धा जास्त दिले. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील आम्ही नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन डवचण्याचे काम करता. आम्ही तुमच्याकडे येऊन डवचू अस. म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिले. दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अधिवेशनात आरोप केलं होते त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट इशारा दिला आहे. पुढे बोलताना माविआच्या सरकार मध्ये कोण जलसंपदा मन्त्री होते. ज्यांच्या कालावधी मध्ये जिओ टॅगिंग चा जी आर काढला. त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट झाली. पुढच्या अधिवेशनात पहिल्यांदा पहा तसेच महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. कोणाचे रजिस्टेशन आहे. त्यांच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे. कोण डायरेक्टर आहेत हे सुधा पहिल्या दिवशी कळेल जयंत पाटील यांना कळेल अस खुलं आव्हान सुरेश धस यांनी दिले आहे. बाईट- आ सुरेश धस (भाजप आमदार)0
0
Report
कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में ग्राइंडर से अवैध संवर्धन का खुलासा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरात अशास्त्रीय पद्धतीने जतन संवर्धनाची प्रक्रिया राबवल जात असल्याचं दिसून येत आहे.. पुरातत्व विभागाच्या निकषानुसार मंदिराच्या मूळ ढाच्याला कोणताही धक्का न लावता संवर्धनाचे काम केलं पाहिजे हा साधा निकष आहे. पण सध्या अंबाबाई मंदिरात सर्व नियमांना पायदळी तुडवत मंदिराच्या खालच्या भागालाच चक्क ग्राइंडर लावून फोडले जात आहे.. याचाच आढावा घेतलाय आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..0
0
Report
आहिल्यानગર में बारिश कमी से फसलें संकटग्रस्त, किसान स्पिंकलर से पानी दे रहे
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अचानक पाठ फिरवल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पेरणीनंतर जोमाने उगवलेली पिके आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून ती वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या विहिरींचे पाणीही स्प्रिंकलरद्वारे शेतात सोडण्याची वेळ आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबला , तर विहिरीही कोरड्या पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पिके वाया जाण्याचाच नव्हे तर शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा खर्च आणि मेहनतही पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असून, चिंताग्रस्त बळीराजा आता फक्त आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. राहता तालुक्यातील अनेक शेतकरी शेतातील पिकांना वाचवण्यासाठी स्पिंकलरच्या साहाय्याने पाणी देत असल्याचं चित्र समोर आलं असून शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
Advertisement
