Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 07, 2026 05:33:16
Shirdi, Maharashtra:राहाता नगरपरिषदेचे नगरसेवक दशरथ तुपे यांना तुषार सदाफळ याने फोनवरून तसेच चौकात जमाव जमवून pिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याप्रकरणी राहाता नगरपरिषदेचे नगराध्यक्ष आणि सर्व नगरसेवकांनी पोलीस निरीक्षकांना निवेदन देऊन संबंधित आरोपीवर कठोर कारवाई करण्याची आणि नगरसेवक तुपे यांना पोलीस संरक्षण देण्याची मागणी केलीय... राहाता शहरातील तुषार सदाफळ नावाच्या व्यक्तीने नगरसेवक दशरथ तुपे यांना फोन केला...राहाता शहराचे ग्रामदैवत श्री विरभद्र यात्रेनिमित्त पाळण्याचे टेंडर आपल्याला का दिले नाही ? असा जाब विचारत सदाफळ याने तुपे यांना शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचे नगरसेवक दशरथ तुपे यांनी तक्रारीत म्हणटलय..
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 07, 2026 05:16:55
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 07, 2026 05:01:48
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील भुली येथील ग्रामस्वच्छता महिला मंडळाच्या ५० महिलांनी जिल्हाभर ‘स्वच्छता सप्ताह’ राबविण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. महिलांनी वाशीम येथील जिल्हाधिकारी कार्यालय व जिल्हा परिषद परिसरात स्वच्छता मोहीम राबवून स्वच्छतेचा संदेश दिला.या अभियानाची सुरुवात १मार्च रोजी तीर्थक्षेत्र धामणगाव देव येथील मुंगसाजी महाराज संस्थान परिसरातून करण्यात आली.यावेळी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर व जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी योगेश क्षीरसागर यांनी महिलांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले. ग्रामस्वच्छता महिला मंडळाच्या वतीने १ ते ८ मार्च दरम्यान ‘स्वच्छता सप्ताह’ राबविण्याचा संकल्प करण्यात आला आहे. महिलांनी स्वतःझाडू हाती घेत सामाजिक बांधिलकीचे प्रेरणादायी उदाहरण घालून दिले.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 04:49:16
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 07, 2026 04:33:10
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 04:30:34
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात स्थानिक गुन्हे शाखेने ‘ऑपरेशन प्रहार’ अंतर्गत कारवाई करत गोवंश चोरी करणाऱ्या टोळीतील एका मुख्य आरोपीला अटक केली आहे. या कारवाईत अकोला शहर व ग्रामीण भागातील एकूण ११ गोवंश चोरीचे गुन्हे उघडकीस आले आहे.खदान पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांनी एका आरोपीला ताब्यात घेतले.चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने विविध ठिकाणी गोवंश चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपीकडून १ लाख ४০ हजार ५०० रुपये रोख, मोबाईल व गुन्ह्यात वापरलेली तीन चारचाकी वाहने असा एकूण ७ लाख ५० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ही कारवाई पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शंकर शेळके व त्यांच्या पथकाने केली आहे. दरम्यान, या कारवाईचे नागरिकांकडून स्वागत होत असून जिल्ह्यातील उर्वरित गोवंश तस्करांवरही कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 07, 2026 04:17:20
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेतील स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीपूर्वी राजकीय वातावरण तापू लागलं आहे. स्वीकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेस पक्षातही अंतर्गत नाराजी समोर येत आहे. ९ मार्च रोजी अकोला महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांची निवड होणार असून त्यासाठी इच्छुक उमेदवारांनी जोरदार तयारी सुरू केली आहे. २०२६ च्या महापालिका निवडणुकीत ८० प्रभागांसाठी मतदान झाले होते. नियमानुसार एकूण सदस्यसंख्येच्या १० टक्के म्हणजेच साधारणपणे ८ स्वीकृत नगरसेवकांची नियुक्ती करण्यात येणार आहे. निवडणुकीदरम्यान अनेक पक्षांनी उमेदवारी न मिळालेल्या कार्यकर्त्यांना स्वीकृत नगरसेवक पदाचे आश्वासन दिले होते. मात्र प्रत्यक्ष निवडीनुसार वेळी अनेकांना डावलण्यात आल्याने पक्षांतर्गत नाराजीचे सूर उमटू लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटानंतर आता काँग्रेस पक्षातही यावरून अंतर्गत कलह समोर आला आहे. काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते आणि शहर उपाध्यक्ष कपिल रावदेव यांनी आपल्या प्राथमिक सदस्यत्वासह सर्व पदांचा राजीनामा दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, कपिलराव देव यांना यावेळी स्वीकृत नगरसेवक म्हणून महापालिकेत पाठवण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र ऐनवेळी काँग्रेसकडून उमेदवारी दुसऱ्याला देण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत राजीनामा दिला आहे. दरम्यान, स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीवरून अकोला महानगरपालिकेतील राजकारण अधिक तापण्याची चिन्हे दिसत असून पुढील काही दिवसांत आणखी घडामोडी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 07, 2026 04:15:42
Malegaon, Maharashtra:UPS C परीक्षेत मालेगावच्या विद्यार्थ्यांचा देशात डंका... केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षेच्या निकालात मालेगाव तालुक्याने यंदा उल्लेखनीय यश मिळवले असून चार विद्यार्थ्यांनी देशपातळीवर यश मिळवत तालुक्याचा मान उंचावला आहे. सोयगावचा कार्तिक बच्छाव (१७७), पाटणेची धनश्री अहिरे (४८९), कळवाडीची प्रेरणा खवळे (९१३) आणि मालेगाव कॅम्पचा अनिकेत अहिरे (९४०) यांनी यश मिळवत मालेगावच्या शैक्षणिक क्षमतेची चमक देशभर दाखवून दिली आहे. सोयगाव येथील कार्तिक बच्छाव याने देशात १७७ वा क्रमांक मिळवत आयएएस पदाच्या दिशेने दमदार पाऊल टाकले आहे। पाटणे गावातील शेतकरी कुटुुंबातील धनश्री अहिरे हिनेही जिद्दीच्या जोरावर यूपीएससीत ४८९ वा क्रमांक मिळवत यश मिळवले आहे. माळमाथा भागातील कळवाडी येथील शेतकरी कैलास खवळे आणि सुनिता खवळे यांची कन्या प्रेरणा खवळे हिने देशात ९१३ वा क्रमांक मिळवत यश संपादन केले आहे. यश मिळवणारी ती माळमाथा भागातील पहिली ‘शेतकऱ्याची लेक’ ठरली आहे. कॅम्प येथील अनिकेत अहिरे यानेही देशात ९४० वा क्रमांक मिळवत यूपीएससीत यश मिळवले आहे。
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 07, 2026 04:15:31
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - राज्यात तापमानाचा पारा वाढला, सोलापुरात 39.5 सर्वाधिक तापमान महाराष्ट्र तापला, पारा थेट 39 अंशांवर --उकाड्यामुळे मुंबईकरांची काहिली --पुढील पाच दिवस पारा चढाच राहणार --सोलापुरात सर्वाधिक 39 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद --नागरिकांनो आरोग्याची काळजी घ्या ANC- मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच महाराष्ट्र तापला आहे...वाढत्या उष्णतेमुळे नागरिकांची काहिली होत आहे..सोलापुरात काल मोसमातील सर्वाधिक 39.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय...दरम्यान दोन दिवसांपासून मुंबईकरांचीही उकाड्यामुळे काहिली होत आहे...ही स्थिती पुढचे काही दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने दिलाय...रविवारी आणि सोमवारी पालघर, ठाणे, मुंबई आणि रायगडला उष्णतेचा येलो अलर्ट देण्यात आलाय... दरम्यान कुठल्या शहरात किती तापमान होतं पाहू या ग्राफिक्सच्या माध्यमातून महाराष्ट्र तापला, पारा 39 अंशांवर सोलापूर- 39.5 अहिल्यानगर-36 संभाजीनगर-37.6 जळगाव-38.7 परभणी-38.5 सातारा- 36.1 उदगीर- 37 मुंबई- 34.6 मालेगाव- 37.4 नाशिक 36.6 अमरावती 40.8
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 07, 2026 03:45:39
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 07, 2026 03:32:12
Solapur, Maharashtra:सोलापुर शहरातील सिव्हील हॉस्पिटल मध्ये अचानकपणे स्ट्रेचर तुटल्याने मृतदेह हातात घेऊन जाण्याची नातेवाईकांवर वेळ आली. सोलापूर शहरातील सिव्हील हॉस्पिटल मधून संतापजनक घटना समोर आली. मृतदेह शवविच्छेदनासाठी स्ट्रेचरवरून घेऊन जात असताना घडली दुर्दैवी घटना. नाईलाजाने उपस्थित नातेवाईकांना मृतदेह हातात घेऊन पुढे जाण्याची वेळ आली. आकाश जगदीश कोळी, 24 वर्षे तरुण, भीमा नदीत पोहण्यासाठी गेला असता नदीत बुडून झाला होता मृत्यू. शासकीय रुग्णालयाचा कारभार समोर आला तर काही काळ नातेवाईकांचा देखील संताप. मृत आकाश कोळी हा तरुण शासकीय रुग्णालयातच कंत्राटी सफाई कर्मचारी म्हणून होता कार्यरत. रुग्णालय प्रशासनाने वेळीच सावध होऊन योग्य ते सुधारणा करण्याची सोलापूरकरांची मागणी.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Mar 07, 2026 03:21:36
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 07, 2026 03:21:14
Jalna, Maharashtra:जालना : दिपक बोऱ्हाडे यांची पुन्हा 16 तारखेला मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा 15 तारखेला सकाळी जालन्यातून आंदोलनासाठी रवाना होणार धनगर समाजाच्या आंदोलकांना मुंबईतल्या आझाद मैदानात येण्याचं आवाहन मल्हारराव होळकरांच्या जयंतीदिनी आंदोलनाची घोषणा आंदोलनासाठी परवानगी, शांततेत आंदोलन करणार अँकर : धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी दिपक बोऱ्हाडे यांनी पुन्हा 16 मार्च रोजी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन करण्याची घोषणा केली आहे.या आंदोलनासाठी 15 तारखेला सकाळी जालन्यातून रवाना होणार असल्याचं बोऱ्हाडे यांनी म्हटलं आहे.धनगर समाजाच्या आंदोलकांनी या आंदोलनासाठी मुंबईतल्या आझाद मैदानात येण्याचं आवाहन बोर्हाडे यांनी केलं आहे.मल्हारराव होळकरांच्या जयंतीदिनी आंदोलनाची घोषणा करणार असून ही जयंती आझाद मैदानातच साजरी करणार असल्याचं बोर्हाडे यांनी म्हटलं है.मुंबईत करण्यात येणाऱ्या या आंदोलनासाठी पोलिसांकडे परवानगी मागण्यात आली असून हे आंदोलन शांततेत करणार असल्याचं बोर्हाडे यांनी म्हटलं आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top