icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

धाराशिव में अल निनो से पानी संकट; 13 जलस्रोतों में पानी सुरक्षित रखा

Dharashiv, Maharashtra:अल निनो ची धास्ती! धाराशिवच्या 13 धरणांतील पाणी पिण्यासाठी राखीव; नियम मोडणाऱ्यांवर फौजदारी कारवाईचा इशारा. ऐन पावसाळ्यात टंचाईचं सावट; जिल्ह्यातील धरणांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक. अँकर धाराशिव जिल्ह्यावर ऐन पावसाळ्यातच पाणीटंचाईचं संकट गडद होताना दिसत आहे. अल निनोच्या संभाव्य परिणामांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन सतर्क झालं असून जिल्ह्यातील 13 धरणांमधील उपलब्ध जलसाठा पिण्याच्या पाण्यासाठी राखीव ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी याबाबत आदेश जारी केले आहेत. राखीव जलसाठ्याचा अनधिकृत उपसा करणाऱ्यांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. सध्या जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये अवघा 14 टक्के जलसाठा शिल्लक असून, गेल्या वर्षी अतिवृष्टीचा सामना केलेल्या धाराशिवकरांवर यंदा टंचाईचं सावट निर्माण झालं आहे. नागरिक आणि शेतकरी दोघेही या परिस्थितीमुळे चिंतेत आहेत. अल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे यंदाच्या पावसाबाबत अनिश्चितता निर्माण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर धाराशिव जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेत जिल्ह्यातील 13 धरणांमधील पाणी पिण्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश दिले आहेत. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांनी जारी केलेल्या आदेशानुसार, राखीव जलसाठ्याचा कोणताही अनधिकृत उपसा केल्यास संबंधितांवर फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे. सध्या जिल्ह्यातील विविध प्रकल्पांमध्ये केवळ 14 टक्के जलसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पावसाळा सुरू असतानाही पाणीटंचाईचं संकट अधिक गडद होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गेल्या वर्षी अतिवृष्टीचा फटका बसलेल्या धाराशिव जिल्ह्याला यंदा मात्र टंचाईच्या संकटाला सामोरं जावं लागत आहे. त्यामुळे शेतकरी आणि नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे.
0
0
Report

रत्नागिरी में मॉनसून अलर्ट: 181 गाँवों को नोटिस, ग्रामीणों में नाराज़गी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीत मान्सून अलर्ट: १८१ गावांना नोटिसा; ग्रामस्थांमध्ये नाराजी!.. रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे.. जिल्हाधिकारी मनुज जिंदाल यांनी चिपळूण, गुहागर,खेडसह जिल्ह्यातील तब्बल १८१ गावे दरडप्रवण क्षेत्र म्हणून घोषित करत नागरिकांना सुरक्षित स्थळी स्थलांतरित होण्याच्या नोटिसा बजावल्या आहेत.. चिपळूणमध्ये 17 गावे आणि गुहागर 20 गावे दरड प्रवण क्षेत्रात.. प्रशासन अलर्ट मोड वर कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी प्रशासनाने आपली बचाव यंत्रणा सज्ज ठेवली आहे..
0
0
Report
Advertisement

डोंबिवली MIDC में कचरे की चोरी: CCTV से पति-पत्नी कैद

Kalyan, Maharashtra:चोरांची नजर कचराच्या डब्यावर.. डोंबिवली MIDC निवासी भागात कचऱ्याची चोरी. दुचाकी वरून आलेले जोडपे CCTV कॅमेरात कैद.. डोंबिवली एमआयडीसी निवासी भागात सोसायटीच्या इमारती मध्ये ओला, सुका कचऱ्यासाठी वेगवेगळे डबे ठेवत जातात या डब्याची बाजारात अंदाजे तीन हजार आसपास किंमत आहे किंमत जास्त असल्याने या डब्याची चोरी चे प्रमाण वाढले आहेत.आज पहाटे पाच वाजताच्या सुमारास निवासी भागातील सिमेन्स सोसायटीच्या समोर ठेवलेले कचऱ्याचे मोठे डबे हे दुचाकीवरून आलेल्या एका जोडप्याने चोरी करून जात असल्याचे सीसी कॅमेऱ्यात कैद झाले आहे. याबद्दल मानपाडा पोलिस ठाण्यात याची तक्रार देणार आहेत. पोलिसांनी यावर कारवाई करावी अशी अपेक्षा येथील रहिवाशांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report

शिर्डी मंदिर प्रसाद में भेसले पेड़े, स्वास्थ्य संकट खड़ा

Shirdi, Maharashtra:Anc - साईबाबांच्या शिर्डीत भाविकांच्या आरोग्याशी अक्षरशः खेळ सुरू आहे.. मंदिर परिसरात असणाऱ्या शेकडो प्रसादाच्या दुकानांवर भेसळयुक्त आणि निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांची विक्री सुरू असल्याचं समोर आलंय.. V/O - दररोज हजारो तर वर्षाकाठी करोडो भाविक साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत येतात.. अनेक भाविक साई मंदिर परिसरात असणाऱ्या खाजगी दुकानदारांकडून प्रसाद विकत घेतात.. मात्र या दुकानांमध्ये विकल्या जाणाऱ्या पेढा प्रसादावर पॅकेजिंग आणि एक्सपायरी डेट, तसेच हा पेढा नेमका कुठे आणि कोण बनवतो याबाबत उल्लेख कळायचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अनेक वर्षांपासून अक्षरशः दगडासारख्या पेढा प्रसादाची साईभक्तांना विक्री केली जात आहे.. पॅकिंग केलेल्या पेढ्यांना बुरशी लागल्याचं देखील दिसून येतयं.. प्रसादाच्या नावाखाण्या साईभक्तांच्या आरोग्याशी खेळ सुरू असून, शिर्डी नगरपालिकेसह अन्न व औषध प्रशासनाचे याकडे साफ दुर्लक्ष झालयं. निकृष्ट दर्जाच्या पेढ्यांमुळे साईभक्तांमध्ये तीव्र नाराजी असून, श्रद्धेच्या नावाखुळे भाविकांच्या आरोग्याशी सुरू असलेला हा खेळ थांबणार तरी कधी? असा प्रश्न उपस्थित होतोय.. V/O - अत्यंत खराब आणि निकृष्ट दर्जाचा पेढा साईमंदिर परिसरात विकला जात असून आम्ही भाविक म्हणून दर्शनानंतर कुटुंबासाठी प्रसाद नेतो मात्र मंदिर परिसरात आम्ही पेढा खरेदी केला अत्यंत खराब दर्जाचा पेढा या ठिकाणी विक्रीस आहे..यावर अन्न भेसळ प्रशासनाने चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी पेढा प्रसाद खरेदी केलेल्या साईभक्तांनी केलीय... V/O - साईबाबांच्या दर्शनासाठी येणाऱ्या साईभक्तांच्या येण्या जाण्यावर व्यावसायिकांचा उदरनिर्वाह सुरू असून पेढा व्यापाऱ्यांनी ही चांगल्या दर्जाचा पेढा दुकान व्यावसायिकांना द्यावा. कमी दर्जाचा पेढा देऊ नये अशी मागणी शिर्डीतील माजी नगरसेवक सुरेश आरने यांनी केलीय... V/O - हा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर अन्न आणि भेसळ विभाग आणि शिर्डी नगरपरिषदेचे वरिष्ठ अधिकाऱ्यांची प्रतिक्रिया मिळवण्याचा प्रयत्न आमच्या प्रतिनिधीने केला मात्र अन्न आणि औषध प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांंकडून फोन कॉलवर सांगण्यात आलं की आमच्याकडे मागील काही दिवसांपूर्वी काही तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.. त्या तक्रारीच्या अनुषंगाने आम्ही कारवाई करू अशी माहिती देण्यात आली आणि शिर्डी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांशी संपर्क होऊ शकला नाही. V/O - साईंच्या नगरीत श्रद्धेच्या नावाखाली सुरू असलेला हा प्रकार अत्यंत गंभीर मानला जात आहे. साईभक्त प्रसाद म्हणून जे पेढे घरी घेऊन जातात, त्याच पेढ्यांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पॅकेजिंग नाही, उत्पादनाची माहिती नाही, एक्सपायरी डेट नाही आणि अनेक ठिकाणी बुरशी लागलेले पेढे विक्रीस असल्याचे चित्र समोर येत आहे. त्यामुळे अन्न व औषध प्रशासन आणि स्थानिक प्रशासन नेमकं कोणाची वाट पाहत आहे? साईभक्तांच्या आरोग्याशी सुरू असला हा खेळ थांबवण्यासाठी जबाबदार यंत्रणा कधी जागी होणार, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यनगर
0
0
Report

अकोला मेडिकल कॉलेज में आदिवासी महिला के इलाज पर मंत्री ने जांच के आदेश दिए

Akola, Maharashtra:अकोला येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील आदिवासी महिलेच्या प्रकरणाची गंभीर दखल राज्य शासनाने घेतली आहे.पतीला उपचारासाठी पाठीवर उचलून रुग्णालयात आणावे लागल्याच्या घटनेनंतर राजकीय आणि प्रशासकीय स्तरावर हालचालींना वेग आला है.आता वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या या संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत.अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी या प्रकरणा नंतर रुग्णालयात भेट दिली होती आणि या संदर्भात आपण पाठपुरवठा करणार असल्याची ग्वाही दिली होती.आज आमदार पठाण यांनी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालयातील अमानवीय आणि निष्काळजी कारभाराची चौकशी करण्याची मागणी केली.एका आदिवासी महिलेने स्ट्रोकग्रस्त पतीला उपचारासाठी रुग्णालयात आणल्यानंतर तिला स्ट्रेचर, व्हीलचेअर किंवा कर्मचाऱ्यांची मदत मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे तिला एका हातात लहान मूल आणि पाठीवर पतीला घेऊन रुग्णालयात धाव घ्यावी लागली होती.या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राज्यभरातून संताप व्यक्त करण्यात आला. यानंतर आमदार साजिद खान पठाण यांनी मंत्र्यांकडे तक्रार करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली. या मागणीची दखल घेत वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी समिती गठीत करण्याचे आदेश दिले आहेत , तर उद्या 11 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांची एक तातडीची बैठक मुंबई येथील मंत्रालयात बोलावण्यात आली आहे, या बैठकीत अधिष्ठातासह या प्रकरणातील संबंधिक अधिकारी उपस्थित राहणार आहे.चौकशी अहवालानुसार संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर carवाई होण्याची शक्यता साजिद खान पठाण यांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

भुजबळ के फैसले पर नाराज समर्थक, येवला में बैनर के साथ प्रदर्शन

Yeola, Maharashtra:अँकर:-राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी राज्यसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागेवर राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत होते मात्र पक्षाने माजी आमदार राजेंद्र जैन यांना उमेदवारी जाहीर केल्याने भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे या पार्श्वभूमीवर आक्रमक होत काल येवला शहरात "साहेब निर्णय घ्या" अशा आशयाचे बॅनर झळकले होते तर आज भुजबळ समर्थक कार्यकर्त्यांनी संपर्क कार्यालयात एकत्र येत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस दिलीप खैरे यांची भेट घेतली यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या भावना व्यक्त करत जोरदार घोषणाबाजी केली यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी मंत्री छगन भुजबळ जो निर्णय घेतील, त्या निर्णयामागे आम्ही ठामपणे उभे राहू, असा विश्वास व्यक्त केल्याने मंत्री भुजबळ काही निर्णय घेणार का याकडे येवल्यातील कार्यकर्त्यांसह राज्याचे लक्ष लागले असल्याचे बोलतांना सांगत आहे
0
0
Report

उल्हासनगर में सड़क पर एक टोळी ने दो युवकों की बेदम पिटाई, सीसीटीवी में कैद

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात भर रस्त्यात टोळीकडून तरुणांन मारहाण , जुन्या वादातून मारहाण केल्याची माहीती ,सर्व घटना सीसीटीव्ही मध्ये कैद , Anchor उल्हासनगर येथील पवई चौक परिसरातील जिओ पेट्रोल पंपाजवळ जुन्या वादातून दोन तरुणांना एका टोळी कडून भररस्त्यात बेदम मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार, मारहाण करणारे तरुण कल्याण पूर्वेकडील खडेगोलवली परिसरातील "दही" गँग टोळी शी संबंधित असल्याचे समोर आले आहे. या टोळीचा कोळशेवाडी आणि खडेगोलवली भागात गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे . याप्रकरणी आरोपीविरोधात मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

शिर्डी के प्रसाद मिलावट मामले में भक्तों में फूट, अधिकारियों की चूक पर उठे सवाल

Shirdi, Maharashtra:साईं की शिर्डी में प्रसाद और फूल-माला की दुकानों पर मिलावटी पेड़ों की बिक्री...? फूल-माला की दुकानों पर बेचे जा रहे पेड़ा प्रसाद पर न तो कोई पैकेजिंग है और न ही निर्माण अथवा समाप्ति (एक्सपायरी) तिथि का उल्लेख... झी न्यूज की पड़ताल में चौंकाने वाला खुलासा... पत्थर जैसे सख्त पेड़ा प्रसाद की साई भक्तों को बिक्री... शिर्डी में साई भक्तों को फफूंद लगा पेड़ा बेचा जा रहा है... साई भक्तों की सेहत के साथ खिलवाड़... शिर्डी नगर परिषद तथा अहिल्यानगर खाद्य एवं औषधि प्रशासन की अनदेखी... निकृष्ट गुणवत्ता वाले पेड़ों को लेकर साई भक्तों में तीव्र नाराज़गी.. शिर्डी के साई मंदिर परिसर से स्थिति का जायज़ा लेते हुए और निकृष्ट पेड़ों की गुणवत्ता को लेकर स्थानीय नागरिकों से बातचीत की हमारे प्रतिनिधि कुणाल जमदाडे ने...
0
0
Report
Advertisement

शिरळा के आरळा में हिंदू जन आक्रोश मोर्चा, पुलिस बंदोबस्त के बीच निकला

Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यातल्या आरळा येथे आज हिंदू जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. आमदार संग्राम जगताप, आमदार सत्यजित देशमुख यांच्यासह हिंदुत्ववादी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आरळा गावातून हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. आरळा येथील अल्पसंख्यांक कुटुंब मारहाण प्रकरणी हिंदुत्ववादी नेत्यांसह तरुणांवर दाखल झालेले खोटे गुन्हे निषेधार्थ गावात सर्व हिंदू समाजाकडून जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात गावाचा आसपासचे हिंदू समाज मोठ्या संख्येने सहभागी झाला होता; महिलांची संख्या देखील लक्षणीय होती. दरम्यान मोर्चाच्या पार्श्वभूमीवर गावामध्ये मोठा पोलीस बंदोबस्त सकाळपासून तैनात करण्यात आला आहे.
0
0
Report

चंद्रपुर में शिवसेना गुट के नेता के स्कॉर्पियो से MD ड्रग्स समेत गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले में वरोरा पुलिस ने एन्टी-नशा अभियान के तहत शिवसेना शिंदे गट के वाहतूक सेना पूर्व जिलाअध्यक्ष गुलाम सिद्दीकी के स्कॉर्पियो की स्टेपनी से MD ड्रग्स बरामद किया. इस कार्रवाई में 5.580 ग्राम MD ड्रग्स के साथ कुल 10 लाख 37 हजार रुपये का माल जप्त किया गया और गुलाम सिद्दीकी को गिरफ्तार किया गया है. पद्मालय नगर क्षेत्र में कार्रवाई की गई. पुलिस को पद्मालय नगर क्षेत्र में कुछ खास व्यक्तियों को नशीला पदार्थ बेचने की गोपनीय सूचना मिली थीं. सूचना के आधार पर पुलिस ने MJ-34-C H-55 नंबर की स्कॉर्पियो वाहन की छानबीन की. वाहन की स्टेपनी में छिपाकर रखा गया MD ड्रग्स पुलिस को मिला. इसके बाद पुलिस ने आरोपी गुलाम सिद्दीकी को हिरासत में लेकर आगे की पूछताछ शुरू कर दी है.
0
0
Report

वाशीम के नाले सफाई की धीमी गति से बाढ़ का खतरा, नागरिकों ने जताई चेतावनी

Washim, Maharashtra:पावसाळा तोंडावर आला असतानाही वाशिम नगर परिषदेकडून नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू आहेत.कंत्राटदारां कडून केवळ थातूरमातूर स्वरूपात नालेसफाई केली जात आहे.अनेक भागांमध्ये अद्याप नालेसफाई सुरूच नसल्याने नाल्यांमध्ये गाळ व कचरा साचून पावसाचे पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे.त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरात जलमय परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात असून सुरू असलेली नालेसफाईची कामे दर्जेदार व वेगाने पूर्ण करावीत,अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

नालासोपारा के सामाजिक कार्यकर्ता ने अपने दुकान में आत्महत्या कर ली

Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा : नालासोपाऱ्यात सामाजिक कार्यकर्त्याची स्वतःच्या दुकानात आत्महत्या. बाबुलनाथ विश्वकर्मा असे आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. विश्वकर्मा हे जनहित ट्रस्ट या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष होते. काल सोमवारी रात्री आपल्या व्यवसायिक दुकानात गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली. चार दिवसांपूर्वी काही कौटुंबिक वादातून राहतं घर सोडून ते आपल्या दुकानात येवून राहत असल्याची माहिती मिळत आहे. पोलीसांनी मृतदेह ताब्यात घेऊन, शवविच्छेदन करीता पाठविला आहे. सध्या पुढील तपास तुळींज पोलीस करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top