Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात

Aug 26, 2024 17:30:55
Yavatmal, Maharashtra

यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 10:52:34
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते दिवंगत अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेनंतर काही दिवसांनी या प्रकरणाला नव्या वादाची किनार मिळाली आहे. अपघातामागे कटकारस्थान असण्याची शक्यता व्यक्त करत आमदार रोहित पवार यांनी गंभीर आरोप केले आहेत. सुमित कपूर यांना आमिष दाखवून “सुसाईड बॉम्बर” म्हणून पाठवण्यात आले असावे, तसेच विमानाच्या टॉयलेटजवळ अतिरिक्त इंधन साठवून स्फोट घडवण्यात आला असावा, असा संशय त्यांनी व्यक्त केला. माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या हत्येसारखा कट येथेही रचला गेला असावा, असा दावाही करण्यात आला आहे.रोहित पवार यांनी VSR कंपनीवर कोणाचे वरदहस्त आहे का, तसेच कंपनीला वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे का, याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी केली आहे. आर्थिक व्यवहारांसह सर्व शक्यतांचा तपास करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी भूमिका त्यांनी मांडली. दरम्यान, या संदर्भात काल शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सीबीआय चौकशीची मागणी केली. उच्चस्तरीय चौकशीच्या मागणीवर आमदार अमोल मिटकरी यांनी पुन्हा आपली भूमिका स्पष्ट केली. “ही मागणी रास्त असून मी आठ दिवसांपूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन पत्र दिले होते, मात्र त्यावर अद्याप उत्तर मिळाले नाही,” असे मिटकरी यांनी सांगितले. तसही उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची सीबीआयमार्फत चौकशी करण्याची मागणी केल्याचे त्यांनी नमूद केले. राज्य शासनाने केंद्र सरकारसोबत समन्वय साधून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी, तसेच सर्व आमदारांनीही चौकशीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन मिटकरी यांनी केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 18, 2026 10:32:24
Chandrapur, Maharashtra:भिगवण येथील मुलीच्या अपहरण प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर यांची चंद्रपुरात प्रतिक्रिया. मला माहिती मिळताच मी पुणे पोलीस अधीक्षक आणि तपास अधिकारी यांच्यासोबत बोलले, घडलेली घटना जर अशा प्रकारे घडली असेल तर हा सुरक्षिततेचा प्रश्न आहे, पोलिसांनी सात तपास पथक यासाठी तयार केली आहेत, घटनास्थळापासूनचे 185 किलोमीटरचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत, पण त्यामध्ये घेऊन जाताना ट्रेस होत नाहीये, पोलिसांना तातडीने याचा तपास करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या प्रकरणात पोलिसांना सहकार्य करणे गरजेचे आहे, जर काही माहिती असेल तर ती पोलिसांना दिली पाहिजे, या परिस्थितीत मुलीचा शोध लागणं फार गरजेचे आहे।
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 18, 2026 10:04:19
Oros, Maharashtra:विमान अपघात आणि ब्लॅक बॉक्सवर शंका- जगामध्ये अनेक वेळा विमान अपघात झालेले आहेत. विमान अपघात म्हणजे स्फोट आलाच, विमान जळणं आलंच, तरीसुद्धा आजपर्यंत ब्लॅक बॉक्स जळून खाक झाल्याचं कधी ऐकलेलं नाही. अहमदाबादची दुर्घटना तर कितीतरी मोठी होती, पण त्यातला ब्लॅक बॉक्स सापडला आणि डेटा काही खराब झालेला नव्हता. मग हाच का? इथं संशय जास्त आहे आणि रोहित पवारांनी जो काही संशय व्यक्त केलाय, तो खरा वाटतो. तेव्हा याच्यावर DGCA ने प्रकाश टाकला पाहिजे आणि सरकारनेही प्रकाश टाकला पाहिजे, नेमका ब्लॅक बॉक्स जळालाच कसा? एवढंच! आणि हे विचारायचा अधिकार आहे, कारण राज्याचा उपमुख्यमंत्री त्याच्यामध्ये दगावलेला असेल, तर हे विचारायचा महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकाला अधिकार आहेच. ऑन- अल्पसंख्याक शाळांच्या मंजुरीबाबत-अजित दादांनीच हा निर्णय घेतलाय असा बनाव करण्यासाठी अधिकाऱ्यांच्या लेव्हलला काही भ्रष्ट मार्गानं या मान्यता दिलेल्या आहेत का हे तपासणं गरजेचं आहे. खरं खरं ज्या अल्पसंख्याक संस्था काम करतात, अल्पसंख्याकांसाठीच काम करतात आणि काही राजकीय हेतूने त्या अडवलेल्या होत्या आतापर्यंत, असं असेल आणि मान्यता दिली असेल तर आमची काही हरकत नाही. पण बोगस अल्पसंख्याक संस्था असतील, तर त्याची निश्चितच चौकशी झाली पाहिजे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 18, 2026 10:01:24
Satara, Maharashtra:सातारा -सातारा नगरपरिषदेच्या वतीने उद्या होणाऱ्या शिवजयंती कार्यक्रमात ‘अघोरी नृत्य’ या सादरीकरणाचा समावेश असल्याने महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती ने तीव्र आक्षेप घेतला आहे. विज्ञानवादी छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मरणदिनानिमित्त अशा प्रकारचा कार्यक्रम घेणे योग्य नसून तो तातडीने रद्द करावा, अशी मागणी अंनिसचे डॉ. हमीद दाभोलकर यांनी केली आहे. निवेदनात आमदार शिवेंद्रसिंह राजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले यांनीही नगरपरिषदेला तत्काळ सूचना देऊन हस्तक्षेप करावा, असे म्हटले आहे. अंनिसने नमूद केले की, डॉ. नरेंद्र दाभोळकर यांच्या कार्यातून उभ्या राहिलेल्या चळवळीच्या पार्श्वभूमीवर आणि राज्यातील अघोरी आणि अमानुष प्रथा विरोधी कायद्याच्या अस्तित्वात अशा कार्यक्रमाचे आयोजन लांछनास्पद आहे. या मागणीपत्रावर उदय चव्हाण, दीपक माने, वंदना माने, भगवान रणदिवे आणि शंकर कणसे यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Feb 18, 2026 09:51:15
Oros, Maharashtra:तळकोकणातील आंबा बागायतदारांना नुकसान भरपाई मिळत नसल्याने बेजार झालेल्याशेतकऱ्यांनी əlगार मेळाव्याचे आयोजन केले. शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ह्यावर्षी कोकणात बदलत्या वातावरणाचा फटका आंबा पिकाला बसलाय सुरवातीला चांगला आलेला मोहोर काळा पडल्याने ह्यावर्षी आंबा पीक कमी येणार ह्यामुळे बागायतदार धास्तावलेत. शेतकऱ्यांना योग्य नुकसान भरपाई मिळावी येत्या अधिवेशनात आंबा बागायतदारांसाठी सरकारने पॅकेज जाहीर करावं. कर्ज माफी करावी आणि ज्यांची कर्ज नाहीत त्यांना ND_RF च्या निकषांनुसार चार पट नुकसान भरपाई मिळावी अशा मागण्या या मेळाव्यात सर्वानुमते ठरविण्यात आल्यात शासन दरबारी आपल्या मागण्या मान्य न झाल्यास 12 मार्च रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्याचा इशारा राजू शेट्टी यांनी दिलाय. त्यानंतरही शासन सुशेगात राहिल्यास पुढील काळात सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्यासह सांगली सातारा येथील शेतकरी बांधवाना घेऊन मुंबई गोवा महामार्ग रोखणार असल्याचा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिलाय.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 18, 2026 09:49:13
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 18, 2026 09:48:44
Washim, Maharashtra:वाशीम: जिल्ह्यातील टो येथील मैनागिरी महाराज महाविद्यालयात परीक्षा केंद्रावर १६ फेब्रुवारी रोजी बारावीच्या परीक्षेदरम्यान सामूहिक कॉपी प्रकरणी शिक्षण विभागाने ५८१ विद्यार्थ्यांवर कारवाई केल्यानंतर पालक संतप्त झाले असून मोठ्या संख्येने जिल्हाधिकारी कार्यालयात धडक दिली. प्राथमिक शिक्षण अधिकारी संजय ससाणे यांनी सर्व विद्यार्थ्यांना दोषी धरून अन्यायकारक कारवाई केली. कॉपी करणाऱ्यांवर कारवाईला विरोध नाही, मात्र निरपराध विद्यार्थ्यांना दोषी ठरवू नये, अशी मागणी त्यांनी केली. पालकांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत दोषी विद्यार्थ्यांची स्वतंत्र चौकशी करून निरपराधांना न्याय देण्याची मागणी केली आहे. बाईट:सुनीता राऊत,पालक बाईट:पवन पतंगे,पालक
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 18, 2026 09:32:40
Bhandara, Maharashtra:अपघात होण्याच्या आदल्या दिवशी अजित दादांशी फोनवर संवाद झाला होता। पूर्व विदर्भातील एका नेत्याचा फोन गेला होता, या आरोपावर प्रफुल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. रोहित पवारांनी केलेल्या आरोपावर प्रफुल पटेल यांनी सावध प्रतिक्रिया दिली की मी जिम्मेदार व्यक्ती आहे, मी संयमाने बोलणार आणि पुरावे आलेच तरच बोलू. अजित पवारांच्या विमान अपघातावर अनेक शंका-कुशंका असल्यामुळे सीबीआय चौकशीची मागणी मुख्यमंत्र्यांकडे केली गेली. प्रफुल पटेल म्हणाले की अजित दादा जान एक दुर्दैवी घटना आहे, या घटनेची सखोल तपासणी विविध यंत्रणेद्वारे होत आहे; राज्य सरकार सुद्धा तपास करत आहे, परंतु अनेक लोकांनी शंका व्यक्त केल्या पाहिजेत म्हणून चौकशी आवश्यक आहे. एनएआयबी स्वायत्त संस्था चौकशी करत असल्यामुळे ब्लॅक बॉक्स संदर्भात मला अधिक माहिती नाही, मात्र ब्लॅक बॉक्स जळाल्याची प्राथमिक माहिती आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Feb 18, 2026 09:09:37
Akola, Maharashtra:अकोला शहरातील जवाहर नगर परिसरात एका विद्यार्थिनीची छेड काढणाऱ्या टवाळखोराला सिव्हिल लाईन पोलिसांनी अटक केली आहे. 15 फेब्रुवारीला बाईकवरून आलेल्या एका टवळखोराने मुलीची छेडछाड केल्याची संतापजनक घटना घडली होती. ही संपूर्ण घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. नगरसेवक आशिष पवित्रकार यांच्या घरासमोर ही घटना घडली होती. सिव्हिल लाईन पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी करत सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू केला. अखेर 3 दिवसांनंतर आरोपीला अटक करण्यात पोलिसांना यश मिळालं. दामिनी पथक 24 तास कार्यरत ठेवून या भागात नियमित गस्त घालण्याची मागणीही नगरसेवक आशिष पवित्रकार यांनी केली आहे. जवाहर नगर परिसरात शिकवणी वर्ग मोठ्या प्रमाणात असल्याने विद्यार्थिनींची वर्दळ अधिक असते. मात्र या घटनेनंतरही पुरेशी गस्त नसल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे. या प्रकारामुळे महिला सुरक्षा बाबत कठोर उपाययोजना करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 18, 2026 09:05:47
Shirdi, Maharashtra:महात्मा फुले कृषी विद्यापीठ आयोजित कृषी महोत्सवास कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची उपस्थिती... अंतर्गत थेट पीक प्रात्यक्षिके , शिवार फेरी आणि कृषी प्रदर्शनाचे करण्यात आले होते आयोजन... *ऑन शेतकरी कर्जमाफी -* एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परदेशी समितीचा अहवाल येईल... 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाईल... *ऑन अजित पवार मृत्यू, रोहित पवार आरोप -* मुख्यमंत्र्यांनी अगोदरच चौकशीचे आदेश दिलेले आहेत... उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी देखील चौकशीची मागणी केलेली आहे... एखादा अहवाल आल्याशिवाय भाष्य करणे योग्य नाही... *अजित पवार NDA तून बाहेर पडणार होते?, रोहित पवार दावा -* याबाबतीत मी बोलणे योग्य नाही... पक्षाचे वरिष्ठ नेते याबाबतीत खुलासा करतील...
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 18, 2026 08:53:40
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील भिगवण मध्ये घडलेल्या हिंदू मुलीच्या अपहरण घटनेबद्दल लोकांच्या तीव्र संताप आहे,त्या विरोध भिगवण मध्ये हिंदू जन आक्रोश मोर्चा निघतोय,त्यामध्ये आपण सहभागी होणारच अशी भूमिका भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी व्यक्त केली आहे.या मोर्चाच्या संदर्भात सांगली पोलिसांनी आपल्याला बोलावलं होतं,कोल्हापूर परिक्षेत्राचे आयजी सुनील फुलारी यांच्याकडून देखील,या घटनेबाबत गतीने तपास करण्यात येत असल्यास सांगण्यात आलंय,मात्र या ठिकाणी येणाऱ्या मोर्चाला आपण जात आहोत,अशी माहिती आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे,ते सांगलीत बोलत होते,भिगवण मध्ये आज गोपीचंद पडळकर आणि आमदार संग्राम जगताप यांच्या नेतृत्वाखाली हिंदू जन आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top