icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर विधान परिषद चुनाव: एक ही दौर में परिणाम, राजेंद्र राऊत बनाम वसंत देशमुख

Solapur, Maharashtra:सोलापूर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात सोलापूर विधान परिषदेच्या मतमोजणीला सुरुवात सोलापूर विधान परिषदेच्या निकाल अवघ्या एका फेरीतच होणार पूर्ण सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत 616 पैकी 614 मतदारांनी केले मतदान 614 मतांपैकी वैध अवैध प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर अवघ्या एका तासात येणार निकाल समोर सोलापूर विधान परिषदेसाठी महायुतीचे राजेंद्र राऊत विरुद्ध महाविकास आघाडीचे वसंत देशमुख यांच्यात होतेय लढत सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे पारडे जर मात्र खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्या विजयाच्या ठाम दाव्यामुळे निकालाचा सस्पेन्स कायम
0
0
Report
Advertisement

बुडापेस्ट में विठ्ठल-रुक्मिणी पवित्र पादुकाएँ पहुंचीं, यूरोप में वारकरी यात्रा जारी

Satara, Maharashtra:सातारा - हंगेरीची राजधानी बुडापेस्ट येथे ‘ग्लोबल वारी २०२६’ अंतर्गत भगवान श्री विठ्ठल-रुक्मिणी यांच्या पवित्र पादुकांचे आगमन होत ऐतिहासिक आणि भक्तिमय सोहळा उत्साहात पार पडला. युनायटेड किंगडममधील लंडन येथून ६ जून रोजी सुरू झालेली ही पवित्र वारी नेदरलँड्स, बेल्जियम, फ्रान्स, लक्झेंबर्ग, जर्मनी, पोलंड आणि झेक रिपब्लिकचा प्रवास करत २१ जून रोजी बुडापेस्ट येथे पोहोचली. बुडापेस्टच्या प्रसिद्ध हिरोज स्क्वेअर येथे आयोजित कार्यक्रमात पादुका दर्शन, भजन, प्रार्थना, लेझीम, भक्तिगीते तसेच पारंपरिक भारतीय वेशभूषेतील मुलांच्या सहभागामुळे वारकरी संप्रदायाचा भक्तिरस अनुभवायला मिळाला. त्यानंतर पवित्र पादुकांसह शांततापूर्ण पालखी पदयात्रा सिटी पार्क (व्हारोशलिगेट) पर्यंत काढण्यात आली. ‘श्री विठ्ठल वारी – लंडन ते पंढरपूर’ या उपक्रमांतर्गत युरोपातील विविध देशांतून विठ्ठल भक्तीचा संदेश पोहोचवण्यात आला. आता ही पवित्र यात्रा तुर्की, जॉर्जिया मार्गे भारतात दाखल होणार असून मुंबई, पुणे, देहू आणि आळंदी येथे मुक्काम करत पायी वारीद्वारे २५ जुलै रोजी पंढरपूरमध्ये दाखल होणार आहे. परदेशात राहणाऱ्या भारतीय समुदायाने मोठ्या श्रद्धा आणि उत्साहाने या सोहळ्यात सहभाग नोंदवत महाराष्ट्राची वारकरी परंपरा जागतिक स्तरावर पोहोचवल्याची भावना व्यक्त केली. राम कृष्ण हरी आणि जय हरी विठ्ठलच्या जयघोषांनी बुडापेस्ट परिसर भक्तिमय वातावरणाने दुमदुमून गेला. बाईट -
0
0
Report

मानसून सुस्त, वाशीम में पेयजल संकट गहरा रहा है

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात मान्सूनचा पाऊस अद्याप समाधानकारक बरसत नसल्याने पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनत चालला आहे. पाटबंधारे विभागाच्या अहवालानुसार, जिल्ह्यातील ७७ मध्यम व लघु सिंचन प्रकल्पांमध्ये एकूण ३१.७६ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ १०.७६ टक्के उपयुक्त पाणीशिल्लक आहे. दोन मध्यम प्रकल्पांमध्ये २८.८९ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी अवघे २ दशलक्ष घनमीटर म्हणजे ६.९२ टक्के पाणी उपलब्ध आहे. तर ७५ लघु प्रकल्पांमध्ये २६६.५६ दशलक्ष घनमीटर क्षमतेपैकी २९.७६ दशलक्ष घनमीटर म्हणजे ११.१६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. जलसाठ्याची ही चिंताजनक स्थिती लक्षात घेता प्रशासनाने पिण्याच्या पाण्याला प्राधान्य देण्याचा निर्णय घेतला आहे. लवकरच दमदार पाऊस न झाल्यास जिल्ह्यातील पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

माहुली के पर्यावरण प्रेमी ने 15 लाख वृक्षबीज एकत्र कर पेड़रोपण अभियान शुरू किया

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील माहुली येथील पर्यावरणप्रेमी निखिल चव्हाण यांनी उन्हाळ्यात वाया जाणाऱ्या वृक्षबियांचे संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला आहे. यंदा त्यांनी तब्बल १५ लाख वृक्षबियांचे संकलन केले असून त्यामध्ये कडूनिंब, बेहडा, अर्जुन, बहावा, शिरस, पांगारा, चिंच यासह २३ प्रजातींचा समावेश आहे. या बिया वन विभागाच्या वाशिम व मानोरा कार्यालयांना तसेच विविध शाळांना देण्यात आल्या आहेत. आगामी पावसाळ्यात या बियांचे बीजगोळे तयार करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कमी खर्चात हरित क्षेत्र वाढविणाऱ्या या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत असून ‘हरित वाशीम’च्या संकल्पनेला बळ देणارا ठरत आहे.
0
0
Report

खेड में पेट्रोल पंप के पास मानव अवशेष मिलने से बड़ा हड़कंप

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime खेडमध्ये खळबळ: साखरोली पेट्रोल पंपाजवळ आढळले मानवी अवशेष, पोलिसांकडून तपास सुरू!.. मान्य खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या पुढील एका वळणावर रविवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान मानवी अवशेष (हाडे) आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हे अवशेष ताब्यात घेतले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.. हे मानवी अवशेष नेमके स्त्रीचे आहेत की पुरुषाचे,तसेच हा प्रकार घातपाताचा आहे की आत्महत्येचा,याबाबत अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही.. पोलिसांनी हे अवशेष पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून,परिसरात कसून चौकशी सुरू केली है..
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के लिए आज से सभी स्कूल सुबह 7:30-11:30 सत्र में चलेंगे, गर्मी के कारण निर्णय

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत आज पासून सर्व शाळा सकाळच्या सत्रात.. अँकर यावर्षी जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.पाऊस नसल्याने उष्णचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.. वाढत्या उकाड्यामुळे आज पासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.. याबाबतचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी काढले आहे.. त्यानुसार सर्व शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरतायेत.. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून रोजी झाली.अद्याप पावसाची कोणतीही चिन्ह नसल्यामुळे कडाका वाढला आहे.. विद्यार्थ्यांनाही या उष्णतेचा त्रास होत असल्यामुळे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत घेण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली होती.. शिक्षक संघटनांची ही मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेशच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली..त्यानुसार शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत एकमत झाले.. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी परिपत्रक जाहीर करत आज पासून सकाळ सत्रात शाळा भरविण्याचे आदेश दिले.. पाऊस सुरू झाल्यानंतर शाळा नियमित वेळेत भरवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे..
0
0
Report

ईडी ने गोवा के अवैध खनन मामले में 1023 करोड़ संपत्ति जब्त की

Ratnagiri, Maharashtra:गोवा.. गोव्यातील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी ईडीने जप्त केली 1000 कोटींची मालमत्ता.. अँकर ईडी ने गोव्यातील कथित बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन प्रकरणात सिंगापूर मधील मालमत्तेसह 1023 कोटी रुपयांवर अधिक मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.. सांगावकर ग्रुप आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांनी (इव्हीएस) केलेल्या मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर लोहखनिज उत्खननाच्या प्रकरणात मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत 19 जून रोजी एक तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे..असे केंद्रीय तपस यंत्रणेने एका निवेदनात म्हटले आहे.. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये भारतातील 99 स्थावर मालमत्ता,सिंगापूर मधील 31 स्थावर मालमत्ता आणि भारतीय कंपन्यांमध्ये इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.. मनी लॉन्ड्रीच्या हा तपास गोवा पोलिसांच्या सीआयडीने दाखल केलेल्या एफ आय आर वर आधारित आहे.. ईडी ने माहिती दिलेय की सर्वोच्च न्यायालयाने 2014 आणि 2018 मधील निकालांद्वारे असे स्पष्ट केले आहे की 22 नोव्हेंबर 2007 नंतर गोव्यात केलेले सर्व प्रकारचे खाणकाम बेकायदेशीर होते.. बेकायदेशीरपणे उत्खनन केलेले खनिज अत्यंत कमी मूल्यावर ब्रिटिश व्हर्जिन आयלँडमध्ये नोंदणीकृत असलेल्या शेल कंपन्यांना निर्यात केले गेले..
0
0
Report
Advertisement

अकोला में NEET री-नीट शांतिपूर्ण, 408 छात्र अनुपस्थित, सुरक्षा कड़े इंतजाम

Akola, Maharashtra:नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात NEET-UG ची फेरपरीक्षा रविवारी अकोला जिल्ह्यात शांततेत आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. मात्र या परीक्षेकडे तब्बल ४०८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या री-नीट परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातील १७ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी ६ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार १३० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर ४०८ विद्यार्थी गैरहजर होते.परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी, सीसीटीव्ही निरीक्षण आणि बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
0
Report

नाशिक के कामगार नगर में छत पर युवक की हत्या, शव थैले में मिला

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कामगार नगर परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह नाशिकच्या महात्मा नगर कामगार नगर भागामध्ये खळबळ हत्या करून मृतदेह पोत्यामध्ये भरून टेरेसवर ठेवल्याची प्राथमिक माहिती तरुणाचा मृतदेह असून पोलीस घटनास्थळी दाखल परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने शोध घेतला असता रात्री उशिरा पोत्यात मृतदेह असल्याच आल समोर याच परिसरातील एक तरुण गेल्या तीन दिवसांपासून होता बेपत्ता सदर समृद्धी देह या बेपत्ता तरुणाचा की आणखी कोणाचा पोलिसांकडून तपास सुरू परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर आतापर्यंत तीन ते चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रकार आला उघडकीस
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top