445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर में Reelstar की रोहिणी पाराध्ये ने आत्महत्या की, पती-पत्नी की लोकप्रियता से मचा हंगामा
Pandharpur, Maharashtra:सोलापुर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. रिलस्टार विवाहित महिलेने आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे. अज्ञात कारणावरून हॉटेल ग्रामपंचायतच्या स्वयंपाक घरातील पत्र्याच्या लोखंडी अंगलला दोरीच्या साहाय्याने रिलस्टार रोहिणी निलेश पाराध्ये (वय 25) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना तालुक्यातील ब्रह्मपुरी येथे घडली आहे. या प्रकरणाची खबर पती निलेश यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली असून मंगळवारी दुपारी 2.30 च्या सुमारास घटना घडली आहे. एका रीलस्टाराच्या आत्महत्येने सोलापुरात खळबळ उडाली आहे. आत्महत्या का केली कोणत्या कारणाने केली याचे गूढ अद्यापही कायम आहे. मागील काही वर्षभरापासून रोहिणी पाराध्ये व निलेश पाराध्ये हे पतीपत्नी हे विविध सामाजिक घटना व खाद्यपदार्थावर आधारीत रीलच्या माध्यमातून सोशलमीडियामध्ये लोकप्रिय ठरले आहेत .त्यांच्या या लोकप्रियतेचा फायदा घेऊन त्यांनी रत्नागिरी-नागपूर या राष्ट्रीय महामार्गावर खवैय्यासाठी ब्रह्मपुरी येथे हॉटेल ग्रामपंचायत हा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायात ते स्थिर होऊन आणखी नवीन शाखा प्रास्ताविक असताना अचानक पत्नी रोहिणी पाराध्ये हिने अचानक गळफास घेतला.पती निलेशने उपचारासाठी मंगळवेढ्याच्या ग्रामीण रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डाॅक्टरानी मृत घोषीत केले.0
0
Report
देव्हाडा में 221 धान की बोरी जली, किसान को लाखों का नुकसान
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांनी शेतात ठेवलेली २२१ धानाची पोती जळून खाक.... शेतकऱ्याचे लाखाचे नुकसान.... मोहाडी तालुक्यातील देव्हाडा येथे बिरबल गोटेफोडे या शेतकऱ्यांनी शेतावर ठेवलेली २२१ धान पोती जाळून खाक झाली आहे. देव्हादी येथील शेतकऱ्यांनी धानाची मळणी करून शेतावर धानाची पोती शेतावर ठेवली होती. माता रेल्वे लाईनला लागून कचरा पेटविण्यासाठी आग लावण्यात आली होती ती आग शेतापर्यंत पोहचत धानाची २२१ पोती ट्रॅक्टर टाली जाळून खाक झाली. अग्नी आणि विभागाची गाडी येऊन आग आटोक्यात आणली पण तो पर्यंत संपूर्ण धान जळून राख झाले होते.... यात शेतकऱ्यांचे लाखाचे नुकसान झाले आहे...0
0
Report
वाशिम में अचानक भारी बारिश और ओले से लोगों को गर्मी से राहत
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील तोंडगाव फाटा परिसरात आज सायंकाळी अचानक गारपीटसह जोरदार पाऊस झाला. या अवकाळी पावसामुळे नागरिकांना उकाड्या पासून मोठा दिलासा मिळाला आहे. पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे. अचानक झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी नागरिकांची धावपळ उडाली, तर या पावसामुळे शेती मशागतीच्या कामाला वेग येणार असल्याने शेतकरी वर्गातही समाधानाचे वातावरण दिसून आले.0
0
Report
Advertisement
लातूर के डॉक्टर मनोज शिरुरे की सीबीआई गिरफ्तारी: तीन विद्यार्थियों को प्रश्न दिलाने में मदद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआय कडून अटक....तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा शिरुरेवर आरोप....शिरुरेच्या अटकेनंतर घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट... नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणात लातूरच्या डॉक्टर मनोज शिरुरे यांना सीबीआयने अटक केली आहे. तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, तीन विद्यार्थ्यांना केमिस्ट्रीचे प्रश्न मिळवून देण्यासाठी मदत केल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. दरम्यान, न्यायालयाने डॉ. मनोज शिरुरे यांना सीबीआय कोठडी सुनावली असून या प्रकरणाचा तपास अधिक वेगाने सुरू आहे. अटकेची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या घरासह हॉस्पिटल परिसरातही शुकशुकाट पाहायला मिळाला.0
0
Report
मराठवाड़े में शिवसेना की रणनीति, शिंदे के दौरों से संगठन मजबूत
Jalna, Maharashtra:जालना खासदार श्रीकांत शिंदे बाईट मराठवाड्यात आज पासून शिवसंवाद दौऱ्याला सुरुवात झाली आहे.. 23 विधानसभेचा आढावा घेतला जाणार असून यातून पक्षाची बांधणी केली जाणार आहे.. कार्यकर्त्या बरोबर संवाद साधण्यात आला आहे.. वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठका सुरू असून, जागे संदर्भात आणखी फायनल झालेलं नाही, लवकरच आपल्याला कळेल.. शिवसेनेचा शिष्ट मंडळ महायुतीच्या इतर नेत्यासोबत चर्चा करत आहेत जागे संदर्भात.. अभिमन्यू खोतकर यांचा चांगलं काम असून पक्ष या सर्व गोष्टी बारकाईने बघत आहेत.. त्यांच्या पक्षातील नेत्यांना हे विचारलं पाहिजे छगन भुजबळ यांना आम्ही शुभेच्छा देतो.. मराठवाड्यावरती शिवसेनेचे बारकाईने लक्ष आहेत, शिंदे साहेब मुख्यमंत्री होते त्यावेळेस देखील मराठवाड्याला भरपूर काही देण्याचा काम केलं आहे 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण बाळासाहेबांना असं सांगितलं आहे, त्यामुळे आमची भूमिका स्पष्ट आहे.. पक्ष सगळ्याच कार्यकर्त्याबद्दल योग्य वेळी योग्य विचार करतो ज्योतीताई वाघमारे या सर्वसामान्य महिला कार्यकर्त्याला पक्षाने राज्यसभेवर खासदार केलं एक तारिखे आधी जागेचा तिढा सुटून जाईल.. शिंदे साहेब मुख्यमंत्री असताना मराठा समाजाच्या अनेक मागण्या पूर्ण केल्या आहेत, आता जरांगे पाटलाच्या ज्या मागण्या असतील त्यावर सरकार विचार करून नक्की त्यांच्या मागण्या सोडेल.. कांद्याच्या प्रश्नावरती आज मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांची केंद्रीय मंत्रिमंडळ बरोबर बैठक आहे.. पार्टीची काय परिस्थिती झाली आहे त्याला वाढवलं पाहिजे त्यासाठी फिरलं पाहिजे, टीका करत बसले म्हणून अडीच वर्षात ही परिस्थिती झाली आहे, अजून रसातळाला जाऊन बसले आहेत, जेव्हा शिंदे साहेबांनी उठाव केला त्यावेळेस देखील तुम्ही टीका केली परंतु लोकांनी मतपेटीतून उत्तर दिला आहे.. त्यांना आता टाईमपास तोच उरलेला आहे.0
0
Report
दिल्ली बैठक से पहले चाकण कांदा उत्पादक किसान आक्रामक, खर्च बढ़ने पर आंदोलन की चेतावनी
Shirur, Maharashtra:चाकण बाजार समितीत कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक; उत्पादन खर्च निघत नसल्याने दिल्लीतील बैठकीकडे लक्ष, तीव्र आंदोलनाचा इशारा! कांद्याचे कोसळलेले भाव आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे राज्यातील कांदा उत्पादक शेतकरी पुन्हा एकदा मेटाकूटीला आला आहे. पुण्याच्या चाकण बाजार समितीत कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. कांदा उत्पादीत करत असताना खते, डिझेल आणि मजुरी महागल्याने शेतकऱ्यांचे मूळ भांडवलही निघणे कठीण झालेय या पार्श्वभूमीवर आज दिल्लीत होणाऱ्या कांदा दराबाबतच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागलेय जर आज दिल्लीतून सकारात्मक निर्णय आला नाही, तर चाकण परिसरात रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी आणि चाकण बाजार समितीच्या सभापतींनी दिला आहे. शिवाय मागच्या तीन महिन्यांपासून विक्री झालेल्या कांद्याला हमीभावाने समतोल राखण्यासाठी अनुदान देण्याची मागणी करण्यात आली0
0
Report
Advertisement
नीट पेपरफुटी: लातूर कनेक्शन से जांच तेज, पेपर बिक्री के आरोप
Latur, Maharashtra:नीट २०२६ पेपरफुटी प्रकरणाच्या तपास वेगाने पुढे सरकत असतानाच आता काही धक्कादायक दावे समोर येत आहेत। लातूरचा शिवराज मोटेगावकर आणि नीटच्या केमिस्ट्री पेपर सेटर प्रा. पी. व्ही. कुलकर्णी याच्याविरोधात गंभीर संशय व्यक्त केला जात आहे। सूत्रांच्या माहितीनुसार, लाखो रुपयांच्या व्यवहारातून पेपर विक्री झाल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे। काही आर्थिक व्यवहार ऑनलाइन पद्धतीने झाल्याचाही संशय व्यक्त केला जात आहे। सीबीआयच्या वाढत्या चौकशीमुळे आणि समोर येणाऱ्या नव्या धागेदोर्यांमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे। पाहूयात याच संदर्भातील हा स्पेशल रिपोर्ट...0
0
Report
लातूर NEET मामले में डॉक्टर मनोज शिरूर पर सीबीआई गिरफ्तारी से नया पेच
Latur, Maharashtra:लातूर में कथित नीट प्रकरणाच्या तपासात नवे धागेदोरे समोर येत आहेत. लातूर शहरातील मोठमोठी हॉस्पिटल्स... वैद्यकीय क्षेत्रातील मोठी नावे... आणि मुलांना डॉक्टर बनवण्याचं स्वप्न... तपासाच्या भोवऱ्यात आता याच गोष्टी चर्चेच्या केंद्रस्थानी आल्या आहेत. सीबीआयच्या चौकशीत समोर आलेली काही माहिती अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. पाहूया हा स्पेशल रिपोर्ट. डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वप्न होते. अनेक वर्षांच्या मेहनतीने उभं केलेलं नाव... समाजात निर्माण केलीली ओळख... आणि तो वारसा पुढच्या पिढीकडे सोपवण्याची इच्छा... परंतु आता याच पार्श्वभूमीवर तपासाची सुई फिरताना दिसत आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये गुणवत्ता महत्त्वाची की शॉर्टकट...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. या संपूर्ण प्रकरणात डॉ. मनोज शिरूरे यांच्याCBI ने चौकशी करून त्यांच्या घराची झाडाखाली घेतली त्यानंतर त्यांना आता अटक करण्यात आली आहे. आणि त्याला न्यायालयाने पाच दिवसांची CBI कोठडी दिली आहे. अटकेची बातमी कळताच त्याच्या घर आणि हॉस्पिटलच्या परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. अनेक डॉक्टरांचे शहरात टोलेजंग हॉस्पिटल आहेत. त्याचा वारस पुढे सुरू ठेवण्यासाठी मुलांना डॉक्टर करण्याचे स्वतः स्वप्न होते. पण हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी नियम आणि गुणवत्तेचा मार्ग निवडला गेला की शॉर्टकटचा...? मेहनत महत्त्वाची की प्रभाव...? असे अनेक प्रश्न या संपूर्ण प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. वैद्यकीय क्षेत्रात उभा केलेला वारसा पुढे नेण्यासाठी कुठे चुकीचा मार्ग स्वीकारला गेला का...? तपास यंत्रणा आता याच धाग्यांचा शोध घेत आहे. मात्र, तपास पूर्ण होईपर्यंत कोणालाही दोषी ठरवण्यात आलेले नाही.0
0
Report
नीट पेपर फूट: सीबीआय ने पुणे से टीचर समेत 13 आरोपी अटक
Pune, Maharashtra:नीट पेपर घोटाळ्यात सीबीआयने पुण्यातून आणखी एका खासगी क्लासच्या शिक्षकाला अटक केलीय. तेजस शहा असं त्याचं नाव असून तो मनिषा हवालदारच्या संपर्कात होता...पाहुयात सीबीआच्या नीट तपासातील आजपर्यंतचे नेमके काय अपडेट्स आहेत ते...? नीट पेपर फुटीत तेजस शहाला पुण्यातून अटक...!!! तेजस पुण्यातील एका क्लासमधे होता टिचर मनिषा हवालदारकडून पेपर घेतल्याचा तेजसवर आरोप डॉ. मनोज शिरुरेलाही अखेर दाखवली अटक नीट पेपरफुटीत आतापर्यंत 13 जण अटकेत दरम्यान, या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... चंद्रकांत फुंदे, प्रतिनिधी, पुणे दरम्यान या क्लासचे संचालक सचिन हलदणकर या अटकेचा आमच्या क्लासशी कोणताही संबंध नसल्याचा दावा केलाय...या तपासकामी आम्ही सीबीआयला पूर्ण सहकार्य करू असंही ते म्हणाले... या नीट पेपर घोटाळ्यात सीबीआय देशभरात तब्बल 49 ठिकाणी धाडी टाकून 13 आरोपींना अटक केली त्यापैकी तिन्ही मनिषा या पुण्यातल्याच निघाल्यात यापकी मनिषा वाघमारे ही एजंट असून ती केमिस्ट्रीचे पेपरसेटर पी व्ही कुलकर्णीच्या संपर्कात होती तर मॉर्डनची जीवशास्राची प्रा. मनिषा मांढरे आणि फिजिक्सची प्रा. मनिषा हवालदार ही देखील एनटीएची पेपर सेटर निघालीय...तर तिकडे लातुरातील फेमस क्लास चालक प्रा. शिवराज मोटेगावकर याच्या संपर्कात आलेले बालरोग तज्न डॉ. मनोज शिरूरेलाही सीबीआयने अखेर अटक दाखवलीय...त्यामुळे या नीट पेपर फुटी प्रकरणात आणखी किती जणांना अटक होतेय हे तपासाअंतीच समोर येईल...दरम्यान, या बायो,फिजिक्सच्या तज्न प्राध्यापिका असलेल्या या दोन्ही मनिषांना एनटीए शी जोडून देणारे एक रिटायर प्राध्यापक माञ अजूनही चौकशीच्या कक्षेबाहेर कसे काय राहिलेत? असा सवाल या क्षेणातील जाणकार खासगीत विचारताहेत...पाहुयात सीबीआय त्यांच्या पर्यंत नेमकं कधी पोहोचतंय ते?0
0
Report
Advertisement
सांगली तासगांव में डिजिटल अरेस्ट से 60 लाख की धोखाधड़ी, दो गिरफ्तार
Sangli, Maharashtra:सांगली के तासगांव में डिजिटल अरेस्ट के नाम पर 60 लाख रुपये की धोखधड़ी करने वाला गिरोह गिरफ्तार किया गया। एक अंकर ने सेवानिवृत्त शिक्षक दंपति को वीडियो कॉल के जरिए कहा कि वे मानवीय तस्करी/ड्रग्स तस्करी आदि मामलों में शामिल हैं और डिजिटल अरेस्ट की धमकी देकर उनके बैंक खाते से पैसे उड़ा लिए गए। सेवानिवृत्त शिक्षक अण्णासाहेब पाटील और उनकी पत्नी को धमकी देकर लगभग 7 लाख रुपये ट्रांसफर कराए गए। तासगांव पुलिस ने शिकायत के बाद साइबर क्राइम ब्रांच को सौंप दी। साइबर क्राइम ब्रांच ने पश्चिम बंगाल के अबू हुसेन आलम और सुशील राम को हडपसर से गिरफ्तार किया। इनके खातों में 29 लाख रुपये जमा निकले। गिरफ्तारी के दौरान 18 बैंक कार्ड, चेकबुक, पासबुक और मोबाइल फोन जब्त किए गए। आगे की कार्रवाई जारी है; नागरिकों से कहा गया कि ऐसे मोबाइल कॉल से सावधान रहें।0
0
Report
Mulund में पानी की किल्लत पर मणसे-आरपीआई-वंचित का संयुक्त मोर्चा
Mumbai, Maharashtra:मुलुंडमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ आज मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीने मुलुंड टी विभाग कार्यालयावर संयुक्त हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करत नागरिकांनी टी कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जय शास्त्री नगर येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शंकर टेकडी, राहुल नगर आणि हनुमान पाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर हंडे आणि मडकी घेऊन रॅली काढत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नागरिकांनी थेट मुलुंड टी विभाग कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. टी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. स्थानिक नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.0
0
Report
कोकण विधानसभा क्षेत्र के लिए मंत्री पद पर समझौता नहीं: गोगावले ने साफ इंकार
Chendhare, Maharashtra:अकोणकर - कोकण विधान परिषदे की सीट के लिए पालकमंत्री पद पर सेतु बनाने की चर्चा है. पर मंत्री भरत गोगावले ने इसे साफ इनकार किया है. पालक मंत्री पद और विधान परिषदे की सीट के बारे में कोई डील नहीं हुई है, यह उन्होंने स्पष्ट कहा है. यह चर्चा कठिनाई बन सकता है और हुआ नहीं है; अगर शिंदे साहेब और वरिष्ठ स्तर पर चर्चा हुई हो, तो मुझे उसके बारे में जानकारी नहीं है. शिंदे साहेब ने पालक मंत्री पद के लिए प्रयत्न किये हैं, इसलिए जो निर्णय शिंदे साहेब लेंगे वही मान्य होगा.0
0
Report
Advertisement
कोकण में विधान परिषद की मांग पर शिवसेना को समर्थन, गोगावले बोले गलत नहीं
Chendhare, Maharashtra:विधान परिषद जागेची मागणी शिवसेनेला मिळावी अशी संपूर्ण कोकणाची मागणी आहे. कोकणात शिवसेनेची सदस्य संख्या अधिक असल्याने मागणी करणं काही चुकीचं नाही अस सांगताना मंत्री भरत गोगावले यांनी शिवसैनिकांच्या मागणीचं समर्थन केलं आहे. मात्र निर्णय युतीचे नेते घेतील असं देखील गोगावले म्हणाले आहेत.0
0
Report
घर बनवाने के विवाद में पड़ोसी ने पड़ोसी की हत्या; आरोपी रोहित शेलार फरार
Kalyan, Maharashtra:घर बांधण्याच्या वादातून शेजाऱ्याने केली शेजाऱ्याची हत्या घटनेनंतरच्या सीसीटीव्ही समोर आरोपी रोहित शेलार अद्याप फरार मंगळवारी संध्याकाळी डोंबिवली पूर्वेतील खंबाळपाडा परिसरात घर बांधण्याच्या वादातून प्रताप चौधरी या व्यक्तीची हत्या करण्यात आली. हत्या करणारा आरोपी रोहित शेलार याच्या टिळक नगर पोलीस शोध घेत आहेत. घटनेनंतरच्या सीसीटीव्ही समोर आला आहे。0
0
Report
Akole Taluka Child Marriage Data Sparks Questions on Administration in Maharashtra
Shirdi, Maharashtra:अकले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारी केवळ धक्कादायक नाही... तर प्रशासनाच्या यंत्रणेलाच प्रश्नांच्या भोवऱ्यात उभं करणारी आहे... महिला व बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तब्बल ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली आहे... काही मुलींची प्रसूतीही झाल्याने बालविवाह रोखण्यासाठी नेमकी यंत्रणा काय करत होती..? असा सवाल आता उपस्थित केला जातोय... अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचे सर्वेक्षण केले जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली गरोदर असल्याची माहिती समोर येईपर्यंत प्रशासनाला याची कल्पना नव्हती का..? की प्रशासनाला माहिती मिळूनही कानाडोळा केला..? अशा प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारच्या मातृत्व वंदना योजनेसाठी आलेल्या अर्जांमध्येही अल्पवयीन मुलींची नावे आढळल्याने सरकारी यंत्रणांमधील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही बालविवाह सुरू असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नसल्याचे सांगितले जात असले. गावपातळीवरील यंत्रणा, ग्रामसेवक, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांना याची माहिती नव्हती का..? नागरिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट् राज बालहक्क आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन बाल हक्क आयोगाच्या कार्यालयात मुंबई येथे सुनावणी पार पडली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ही मुंबई येथे सुनावणीला हजर होते. सुनावणी केल्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी ही गंभीर गोष्ट असल्याची कबुली दिली आणि सांगितलं की अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. परंतु महिला बालविकास विभाग आणि शैक्षण विभाग यांच्या दुर्लक्षामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढतं चालले आहे. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच विवाह लावत असल्याचे समोर आले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना अशा विवाहांवर कारवाई का झाली नाही..? या बाबत प्रशासन मौन का बाळगून आहे..? या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य सरकार आणि राज्य बालहक्क आयोगाने चौकशी करून काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी बाल संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी राज्य सरकारकडे केलीय. श्रीनिवास रेणुकादास, अशासकीय सदस्य, बालसंरक्षण समिती अकोले. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण अजूनही गंभीर असल्याचं चित्र समोर येत आहे... शासकीय आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी २२ टक्के बालविवाह होत असून, अनेक अल्पवयीन मुली बालमाता बनत आहेत... देशातील सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या ७० जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत... बालविवाह प्रतिबंधक कायदा कडक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे... बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कारवाईचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे... शासन विविध योजना राबवत असताना अकोले तालुक्यात समोर आलेली ही आकडेवारी प्रशासनाच्या दाव्यांनाच छेद देणारी ठरत आहे..आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का..? आणि जागरूक राहून बालविवाह थांबवणार का..? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी २४ तास अहिल्यानगर0
0
Report
Advertisement
