icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वंचित बहुजन आघाडी ने गैس टंचाई के खिलाफ जिलाधिकारी कार्यालय के सामने प्रदर्शन किया

Sangli, Maharashtra:स्लग - वंचित बहुजन आघाडीचे गॅस टंचाई विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चूल मांडून आंदोलन.. अँकर - सांगली मध्ये गॅस टँचाई व गॅसचा सुरू असलेल्या काळाबाजार विरोधात "वंचित बहुजन आघाडी" तर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयच्या दारात चुल मांडून महिला भगिनींनी चुलीवर स्वयंपाक करत निषेध नोंदवला आहे.यावेळी केंद्र व राज्य सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला, गॅस टँचाई दूर करून गॅस सिलेंडर पुरवठा सुरळीत करावा तसेच गॅसचा सुरू असलेला काळाबाजार त्वरित थांबवा अशी मागणी यावेळी वंचित बहुजन आघाडी कडून करण्यात आली आहे.
0
0
Report

राहुरी विधानसभा उपचुनाव: अक्षय कर्डिले ने उमेदवारी अर्ज दाखिल किया

Ahilyanagar, Maharashtra:राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपचे उमेदवार अक्षय कर्डिले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला... दरम्यान त्यांचे प्रमुख विरोधक प्राजक्त तनपुरे यांची भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांची भेट घेतली त्यामुळे तनपुरे हे माघारी घेतील अशी चर्चा सुरू आहे... दरम्यान तनपुरे यांनी माघार घेतली असल्यास मी त्यांचेही आभार मानतो असं अक्षय कर्डीले यांनी म्हंटले आहे.. सोबतच शिवाजीराव कर्डिले यांनी अतिशय सामान्य कार्यकर्ता ते लाखो कार्यकर्ते असलेला नेता असा प्रवास केलेला आहे त्यांच्याच वाटेवर आपणही पुढे चालणार असल्याचं अक्षय कर्डिले यांनी म्हटल आहे
0
0
Report
Advertisement

कांग्रेस के आदेश से सरकार गिरने की कवायद; छह महीने पहले से निलंबित विधायक बारामती चुनाव में घमासान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाट ऑन सामना जेव्हा आघाडी होणार होती तेव्हा शेवटपर्यंत, म्हणजेच राष्ट्रवादी उबाठाबरोबर गेली होती, पण काँग्रेसने सांगितले आम्हाला हायकमांड आदेश आले पाहिजे, सात वाजेपर्यंत राज्यपाल यांना पत्र द्यायचे होते मात्र तरीही काँग्रेसने त्यांना कोणताही होकार दिला नवता, काँग्रेस पक्ष इतर पक्षाच्या नव्हे त्यांच्या नीतीवर चालते, त्यावेळी काँग्रेसमुळे आपलं सरकार पडलं हे आता यांना आता जाणवत आहे, *मात्र त्यापूर्वी सहा महिने आधीच हे सरकार पडलं असतं, त्यासाठी आमचे भास्कर जाधव यांना जाणीवपूर्वक तालिका अध्यक्ष म्हणून बसवलं होतं, त्यावेळी 12 आमदार काँग्रेसचे निलंबित केले त्यामुळे या सरकारचं मरण सहा महिने पुढे ढकलले, आमच्या एका मेळाव्यात उद्धव ठाकरे म्हटले होते. ज्यांच्यासोबत मी राहिलो त्यांनी मला सडवलं आणि ज्यांच्या विरोधात मी काम केलं त्यांनी मला सन्मान दिला. तुम्ही घेतलेल्या निर्णयमुळे तुम्हाला पश्चाताप करावा लागत आहे. आमचा बंड 6 महिने आधीच झाले असतेआमदारांना जे निलंबित केले त्यामुळे न्यायालयात जावे लागले ना, थोडा गोधळ केला म्हणून निलंबित केले गेले होते, असे कधी होत नसते, त्यांना निलंबित करण्याचे कारण म्हणजे याचे विकोपा वाढत होता, तो विकोपा दिसू नयेत म्हणून आधी 12 आमदार कमी केले* ऑन बारामती निवडणूक एखादा नेता निधन झाल्यावर बिनविरोध निवडणूक झाली पाहिजे आपली संस्कृती आहे. आता काँग्रेस ज्याप्रमाणे उमेदवार उभा करत आहे, त्यामुळे सुरू आसलेल्या परंपरा छेद आहे ऑन बारामती बॅनर पक्षाचा विषय आहे, बॅनर कुणी लावले महाराष्ट्राला माहीत आहे, अजित दादा गेल्यानंतर राष्ट्रवादी पक्षात धुसपस वाढत आहे, ऑन नितेश राणे शिवाजी महाराज वक्तव्य नितेश राणे कशाच्या आधारे बोलले माहीत नाही, त्याचा अभ्यास त्यांनी केला असावा, पण असे म्हणतात 18 पगड जात घेऊन चालणारे शिवाजी महाराज आहे . ऑन अंजली दमानिया खऱ्या अर्थाने अंजली दमानिय यांची चौकशी झाली पाहिजे, कुणालाही असे बदनाम करण्याची प्रथा सुरू झाली आहे. ऑन अमृता फडणवीस खरात वक्तव्य त्यांना प्रोत्साहन द्यावे, त्यांना पोलीसमध्ये भरती करावा, गुन्हा केल्यावर शिक्षा झाली पाहिजे, तपास कसा करावा याचा निर्णय सरकार घेत असते ऑन खरात संपत्ती त्यावर निर्णय येऊ द्यावे, ed त्यात अली आहे, त्यात संपत्ती बेकायदेशीर असेल तर सर्वकाही समोर येईल... ऑन एलपजी गॅस एलपजी विषयी गेल्या कॅबिनेटमध्ये चर्चा झाली होती, पण म्हणावा तसा परिणाम झाला वाटत नाही, मुख्यमंत्री योग्य निर्णय घेणार ऑन संजय गायकवाड संजय गायकवाड यांनी केलेला आरोप स्थानिक राजकारणवर आरोप केला असतील, यावर शिंदे आणि फडणवीस यावर योग्य तो निर्णय घेतील....
0
0
Report

गृह मंत्रालय ने 39 विधायक के नाम जारी कर इस्तीफे की मांग; सांगली में प्रदर्शन

Sangli, Maharashtra:अशोक खरात प्रकरणाशी संबंधित 39 आमदारांची नावे गृहमंत्रालयाने जाहीर करून राजीनामे घ्यावेत, या मागणीसाठी सांगलीमध्ये मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे. शहरातल्या स्टेशन चौक येथे मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्यावतीने खरात प्रकरणी निदर्शने करत गृहमंत्रालयाकडुन अशोक खरात प्रकरणी 39 आमदारांचे संबंध असल्याचा स्पष्ट करण्यात आला आहे त्यामुळे या आमदारांची नावे जाहीर करून त्यांचे तातडीने राजीनामे घ्यावेत, त्याचबरोबर प्रत्येक पोलीस ठाण्यात अंधश्रद्धा निर्मूलन कक्षा कार्यरत करून राज्यातील बुवाबाजी आणि अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांची विरोधात कारवाई करावी, अाशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

राहुरी विधानसभा क्षेत्र में भाजपा ने प्राजक्ता तनपुरे से चुनाव न लड़ने का आग्रह किया

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्या नगरच्या राहुरी विधानसभा मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी अतिशय नाट्यमय घडामोडी घडल्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या काही तास आधी माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन उमेदवारी न करण्याची विनंती केली आहे या प्राजक्त तनपुरे यांनीदेखील रवींद्र चव्हाण आणि विखे यांच्याशी चर्चा केल्यानंतर समाधानकारक उत्तर मिळालेले असल्याचे म्हटले आहे सोबतच आपण कार्यकर्त्यांना विचारात घेऊन निर्णय घेऊ असे देखील म्हटले आहे प्राजक्ता तनपुरे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी
0
0
Report

मुंबई-गोवा महामार्ग के पूर्ण होते ही गड्ढों की समस्या, ठेकेदार पर गंभीर आरोप

Chendhare, Maharashtra:गेल्या 14 वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाच्या पूर्णत्‍वाच्या प्रश्न अद्याप कायम असतानाच, पूर्ण झालेल्या भागांमध्येच तडे आणि भेगा पडू लागल्या आहेत. लोणेरे ते दासगाव दरम्यानच्या टोळ गावानजिकच्‍या उड्डाण पुलावर खराब झालेल्या रस्त्याचे दुरुस्ती काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. या भागात जेसीबीच्या सहाय्याने खराब झालेला काँक्रीटचा थर काढून नव्याने काँक्रीटीकरण करण्यात येत आहे. मात्र, अवघ्या दोन वर्षांपूर्वी पूर्ण झालेल्या या कामातच मोठ्या प्रमाणावर तडे आणि भेगा पडल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांच्या मते, सुरुवातीपासूनच कामात हलगर्जीपणा आणि निकृष्ट दर्जाच्या साहित्याचा वापर झाल्याची चर्चा सुरू आहे. परिणामी, महामार्ग पूर्ण होण्याआधीच दुरुस्तीची वेळ आल्याने संबंधित कंपनी आणि ठेकेदारांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
0
0
Report

नितीन गडकरी नागपूर भाजपा स्थापना दिवस मौके पर सेकुलरिज्म और हिंदुत्व पर बोले

Nagpur, Maharashtra:नागपूर भाजपा स्थापना दिवसाच्या निमित्ताने टिळक पुतळा येथे झालेल्या समारंभातील केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे भाषण नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री भाषण नागपूर आजच्या दिवस आमच्यासाठी आणि खूप भाग्यशाली दिवस आहे. आजपासून 40 वर्षे आधी संपूर्ण देशात भारतीय जनता पक्षाची स्थापना झाली होती त्यावेळी देशात 30 जागेवर मोठे मोठे कार्यक्रम झाले होते. आजच्या दिवशी 40 वर्षे आधी न्यू इंग्लिश महाल मध्ये नागपूरला राम जेठवानाजी यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पक्षाच्या स्थापना झाली होती असे वीस जागी अनेक नेता त्या त्या ठिकाणी गेले होते. ते जे कार्यक्रम झाले होते त्यावेळी भारतीय जनता पक्षाच्या विचाराच्याबाबत, संविधानाच्याबाबत आणि उद्दिष्टाबाबत चर्चा झालेली होती. त्यानंतर मुंबई बांद्रा येथे अधिवेशन झालेल होत. त्यामध्ये मोहम्मद करिम शागला हे प्रमुख पाहुणे होते. ते त्यावेळी बोलले होते की देशाच्या भविष्यतील जबाबदारी ज्या पक्षावर येणार आहे आणि ज्यांचा पंतप्रधान बनणार आहे त्यांच्यासोबत मी आज इथे उपस्थित आहे हे माझा भाग्य आहे. शागला यांनी म्हटलेलं होतं ते खरं झाल. अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. त्यावेळी अटल बिहारी वाजपेयी यांनी आपल्या भाषणात चांगली गोष्ट सांगितली हो. ती ते आज सुद्धा मनात आठवण आहे. अंधेरा छटेगा सूरज निकलेगा और कमल खिलेगा। मला वाटतं की त्यांची भविष्यवाणी आज सिद्ध झालेली दिसतेय. पक्षाची स्थापना कुणा व्यक्तीला प्रधानमंत्री बनवण्याकरता नव्हती झाली। अटल बिहारी म्हणत होते देशातला पंतप्रधान कोण होणार हा महत्वपूर्ण नाही तर हा देश कसा असणार हे महत्वपूर्ण आहे. त्याला घेऊन आम्ही चाळीस वर्षे काम करतोय. अनेक उद्दिष्ट आम्ही पूर्णत्वास नेले. येणाऱ्या काळात चाळीस वर्षात आणि त्याच्या आधीपण आमचे जे विरोधी होते त्यांनी जहर घोळण्याचे काम केलं. मात्र आमचा पक्ष जातीवादी, सांप्रदायिक नाही. आमची पार्टी कोणत्या धर्माविरोधी नाही, आमचा पक्ष मानतो की समाजात उपासना वेगवेगळी आहे. कोणी मंदिरात जात असेल कोणी मस्जिद वाव गुरुद्वारा जात असेल. प्रत्येकाला अधिकार आहे. ज्याच्यावर त्याची विश्वास आहे त्याची पूजा करणे. मात्र वेगवेगळ्या पूजा करून आपण भारतीय आहोत. आमचचा इतिहास सांस्कृतिक विरासत एक आहे. अब्दुल रहमान अंतुले आमचे मुख्यमंत्री होते. एकदा त्यांनी मला सांगितले की मी कोण आहे कोकणस्थ ब्राह्मण असल्याचे त्यांनी सांगितले आणि माझे नाव करंदीकर आहे मात्र त्यावेळी आमच्या हिंदू धर्माने अशा चुकीच्या प्रथा होत्या. कोंबडी खाल्ल्यानंतर बाकीचा पार्ट कोणाच्या घराबाहेर टाकल्या की तो गेला असे म्हणत सात समुद्र पार गेला तर त्याला हिंदू धर्मातून काढून घ्यायचे... काही पंडितांनी, आणि ब्राह्मणांनी चुकीच्या बाबींमुळे नुकसान केले अस्पृश्यता, जातीयता नव्हती ना आम्ही ती मानतो. आम्ही एवढेच म्हणतो कोणताच व्यक्ती जात धर्म पंथ यामुळे नव्हे तर त्याच्या गुणांमुळे मोठा होतो. त्यामुळेच आज आमच्या बाबत चुकीचा प्रचार करण्यात येतो की या जातीचा पक्ष आहे गांधीचे हत्यारे आहेत अल्पसंख्यांकाच्या विरोधात आहे मुसलमानांच्या विरोधात आहे. जावेद अख्तर यांनी अटल बिहारी वाजपेयी यांची मुलाखत घेतली होती आणि विचारलं होतं तुमचा पक्ष आल्यानंतर सेक्युलरवाद संपेल का मुसलमानांना या देशातून बाहेर काढणार? तेव्हा अटल बिहारी वाजपेयी यांनी उत्तर दिले होते की हा देश सेक्युलर आहे आणि सेक्युलर राहणार. सेक्युलर राहणार त्याकरता भाजपा किंवा आरएसएस कारण नसेल कारण या देशातील बहुसंख्य हिंदू समाजाचे इतिहास संस्कृती विरासत यांच्यातील जी सर्वसमावेशकता आहे ती भारतीय संस्कृती आहे. त्यामुळे कोणत्याच धर्मावर अन्याय होणार नाही. मात्र त्याचा इंटरप्रिटेशन अनेकदा चुकीचे केले जाते त्यामुळेच आपल्याला भारतीयत्व म्हणजेच आपण ज्याला राष्ट्रीयत्व म्हणतो तेच हिंदुत्व आहे हिंदू हे जात, धर्म, पंथ नव्हे सुप्रीम कोर्टाने डेफिनेशन केली आहे वे ऑफ लाइफ जीवनपद्धती आहे सेक्युलर म्हणजे धर्मनिरपेक्षता हा अर्थ होत नाही त्याचा अर्थ सर्व धर्म समभाव आहे एक बाब नक्की आहे सरकार सेक्युलर असली पाहिजे राजा सेक्युलर असला पाहिजे व्यक्ती कधी धर्मनिरपेक्ष राहू शकत नाही असते तर राजीव गांधी आणि Indira गांधींच्या मृत्यूनंतर ब्राह्मणांना बोलवून मंत्रागनी करण्यात आले तर ते सेक्युलर होते तर त्यांनी कशाला ब्राह्मणांना बोलावले कारण त्यांच्यासोबत धर्म जोडलेला आहे. स्वीकारत होते. सर्व धर्म समभाव हा आमचा अर्थ आहे सर्व धर्माचा सन्मान करायचा आहे आणि आमची राष्ट्रीयत्व हे भारतीयत्व आहे. आमचा मुसलमान मक्का, मदीना जातो त्याला हिंदी मुसलमान है असं म्हणतात इंग्रजांनी आपल्या संस्कृती आणि इतिहासबाबत चुकीच्या बाबी भरवल्या त्यामुळे आपल्याला जो अप्रचार झाला जातीयवादी आहे मुसलमान विरोधी आहे हे जे आरोप होतात ते चुकीचे आहेत. भाजपमध्ये कोणतंही चांगले कार्य झाले की असे नाही म्हटत परिवाराचे, जातीचे कल्याण व्हावे आम्ही म्हणतो विश्वाचे कल्याण व्हावे हीच भारतीय संस्कृती आहे आणि याचे आदर्श छत्रपती शिवाजी महाराज आहे. तुम्ही कधी शिवाजी महाराजांच्या इतिहासात पाहिले आहे का एकातरी मशिदीला तोडून मंदिर बनवले महिलांच्या बाबतीत नेहमीच आदर आणि सन्मान ठेवले. पाणी, रोजगार मिळो असा भारत घडवायचा आहे मी त्यांना फक्त निवडणुका दिसतात आमचं काय होणार मला एक संधी हवी मात्र आम्ही यांना संधी देण्याकरता नाही समाज बदलवण्याकरता आलो आहे देशाला बदलावयाचे आहे ईमानदारीने काम केले तर संधी मागण्याची गरजच नाही जनता तुमच सपोर्ट करेल चाळीस वर्षात बरेच कार्य झाले मात्र पुढे अजून बरेच काम करायचे आहे नेतृत्वाच्या पोटातून नेते नको
0
0
Report
Advertisement

वासिम में पाइपलाइन टूटने से पानी बर्बाद, आपूर्ति 15–20 दिन में संभव

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:एकबुर्जी धरणातून वाशीम शहराला पाणीपुरवठा केला जात असला तरी धरणातील जलपातळी कमी झाल्यामुळे शहरात१५ ते २० दिवसांनीच नळ सोडले जात आहेत.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे.अशातच शहरातील पोस्ट ऑफिस चौक परिसरात पाईपलाईन फुटल्याने शेकडो लिटर पाणी वाया जात आहे. सध्या शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामांदरम्यान निष्काळजीपणामुळे पाईपलाईन ला फुटल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याचे दिसून येत आहे.एकीकडे पाण्यासाठी नागरिकांना दिवसन्‌दिवस प्रतीक्षा करावी लागत असताना, दुसरीकडे होणारी ही नासाडी संताप वाढवणारी ठरत आहे.त्यामुळे या पाईपलाईनची तात्काळ दुरुस्ती करण्याची मागणी केली जातं आहे.
0
0
Report

प्रणिती शिंदे शहराध्यक्ष बनने पर विचार कर रहीं, बारामती में नया राजनीतिक उलटफेर?

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : खा. प्रणिती शिंदे h्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि तुम्ही त्यांना शहराचा अध्यक्ष करणार का ? असे म्हणत मंत्री जयकुमार गोरेंचा खा. प्रणिती शिंदेंना टोला बारामती पोटनिवडणूक - बारामतीतून सुनेत्रा वहिनी यांना बिनविरोध निवडून द्यावे ही आमची भावना.. - काँग्रेस पक्षाने काय करावं, हा काँग्रेस पक्षाचा विषय आहे. - सातत्याने संस्कृती शिकवणारा काँग्रेस पक्ष, स्वतः आचरण करण्याच्या जेव्हा गोष्टी येतात त्यावेळेस दुसरी भूमिका घेतो. - बारामतीत सुनेत्रा वहिनी बिनविरोध होतील अशी स्थिती आहे - मात्र जरी बिनविरोध झाल्या नाहीत तरी निवडून येण्यात काहीही अडचण नाही. - साधारण संकेत असतात एखाद्या सदस्याच्या मृत्यूनंतर तिथली निवडणूक बिनविरोध व्हावी. - संविधानामध्ये निवडणूक लढण्याचा अधिकार दिला आहे त्यामुळे प्रत्येक जण आपला निर्णय घेण्यासाठी सक्षम असतो. ऑन प्रणिती शिंदे शहराध्यक्षपद - राष्ट्रीय नेत्यांना तुम्ही कुठे कुठे आणणारे आहात, मला माहिती नाही. - प्रणिती शिंदे h्या राष्ट्रीय अध्यक्ष व्हायचा विचार करतात आणि आता तुम्ही त्यांना शहराचा अध्यक्ष करणार का? - कार्यकर्त्यांच्या भावना आहेत त्यांनी अध्यक्ष व्हावं तर त्यांनी विचार करावा. ऑन विजयकुमार देशमुख जाहिरात - प्रत्येक आमदाराने आपल्या कार्यालयात पक्षाचा वर्धापन दिन साजरा करावा हा संकेत आहे. - संविधानाने त्यांना अधिकार दिला आहे. कोणाचा फोटो कुठे घालावा, हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे. जाहिरातीच बिल त्यांनी पेड केला आहे. - प्रोटोकॉल हा ज्यांनी खर्च केला आहे त्याचा अधिकार आहे..
0
0
Report

राहुरी विधानसभा चुनाव: अक्षय कर्डिले के खिलाफ महाविकास आघाड़ी कौन उतारेगी?

Ahilyanagar, Maharashtra:राहुरी विधानसभा उमेदवारी राहुरी विधानसभा मतदारसंघांमध्ये भाजपकडून अक्षय शिवाजी कर्डिले यांची उमेदवारी निश्चित झालेली आहे तर राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून प्राजक्त तनपुरे यांना उमेदवारीची चर्चा असताना अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही प्राजक्त हे अपक्ष उमेदवारी करणार असल्याची चर्चा आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षाकडून प्राजक्त यांनी उमेदवारी घेतली नाही तर माजी पंचायत समिती सदस्य गोविंद मोकाटे यांना उमेदवारी दिली जाऊ शकते यासोबतच शिवसेना यु बीटी कडून अहिल्यानगर उत्तर विभागाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब खेवरे यांनी देखील उमेदवारीसाठी इच्छा व्यक्त केली आहे काही दिवसांपूर्वीच काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी देखील काँग्रेसचा उमेदवार असेल असं विधान केलेलं आहे त्यामुळे भाजपाच्या अक्षय कर्डिले यांच्या विरोधात महाविकास आघाडी एकत्रित उमेदवार मैदानात उतरवतात की मव्यामधील तीनही पक्ष आपले उमेदवार उमेदवारी अर्ज दाखल करतात हे अवघ्या काही तासातच कळणार आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के भटाड़ा-मेवाड़ पुरातत्त्व स्थल खनन से खतरे में; हाईकोर्ट समिति ने किया निरीक्षण

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भटाडा-मेवाडचा प्रागैतिहासिक पुरातत्त्व स्थळ अनियंत्रित खाणकामामुळे गंभीर धोका निर्माण झाला आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने नियुक्त केलेल्या विशेष समितीने परिसराची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. भटाडा-मेवाड ही स्थलें पाषाणयुगीन मानवाच्या अस्तित्वाचे महत्त्वपूर्ण पुरावे जपणारी मानली जातात. येथे अशूलियन प्रकारातील दगडी कुऱ्हाडी, स्क्रॅपर आणि चॉपर यांसारखी हत्यारे मोठ्या प्रमाणात आढळून आली आहेत. त्यामुळे हा परिसर मानवी उत्क्रांतीच्या अभ्यासासाठी अत्यंत महत्त्वाचा समजला जातो. गेल्या काही वर्षांत वाढलेल्या खाणकामामुळे जमिनीचे नैसर्गिक थर उध्वस्त होत आहेत, ज्यामुळे पुरातत्त्वीय अवशेषांचे मूळ संदर्भ नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. संशोधनासाठी आवश्यक असलेली महत्त्वपूर्ण माहिती कायमची नष्ट होण्याची भीती व्यक्त केली गेली आहे. उच्च न्यायालयाने हस्तक्षेप केला असून, नियुक्त समितीने प्रत्यक्ष पाहणी करून नुकसानीची नोंद केली आहे. समितीचा सविस्तर अहवाल लवकरच न्यायालयात सादर होणार असून, त्यानंतर खाणकामावर निर्बंध लावण्याबाबत निर्णय होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

डिंभे धरण क्षेत्र में साग की अवैध कटाई, वन संसाधन खतरे में

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरण परिसरात सागाच्या झाडांची मोठ्या प्रमाणावर बेकायदा वृक्षतोड होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भीमाशंकर अभयारण्याच्या खालच्या भागातील या जंगल परिसरात नियमांना धाब्यावर बसवत झाडे तोडली जात असल्याचा आरोप करण्यात येत आहे. डिंभे धरणालगतच्या जंगलामध्ये रात्रीच्या वेळी सागाची झाडे तोडून त्याची तस्करी केली जात असल्याची माहिती स्थानिकांकडून समोर आली आहे. हा परिसर पेसा क्षेत्रात मोडत असल्याने कोणतीही वृक्षतोड करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक असते. तसेच अधिकृतपणे तोडलेल्या झाडांवर वन विभागाचा हॅमर म्हणजे अधिकृत शिक्का मारणे बंधनकारक असते. मात्र समोर आलेल्या दृश्यांमध्ये अशा कोणत्याही परवानगीशिवाय सागाची झाडे तोडली जात असल्याचे दिसून येत आहे. डिंभे धरण परिसर पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील मानला जातो. अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होत असल्याने वनसंपत्तीला धोका निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. दरम्यान या प्रकरणात वन विभाग नेमकी काय कारवाई करणार, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top