445001
यवतमाळ: गोरबंजारांचा सामूहिक तीज उत्सव उत्साहात
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात बंजारा समाज तीज उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करत आहे. यावेळी बंजारा पारंपारिक वेशभूषेत महिलांनी गोरमाटी गीत आणि डफडीच्या तालावर नृत्य केले. बंजारा नायक कारभारी यांची परवानगी घेऊन किशोरी मुली ओल्डीवर गहू पेरून त्याला पाणी देतात. डफडीचा आवाज आणि बंजारा गीताच्या तालावर महिला तन्मयतेने नृत्य करतात. तसेच, उत्कृष्ट तीज सजविण्याची स्पर्धा आयोजित केली गेली असून आकर्षक सजावट केलेल्या तीजसह यवतमाळमध्ये रॅली देखील काढण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के पेठरोड में MD ड्रग्स सप्लाई का धंधा पकड़ा गया; दो गिरफ्तार
Nashik, Maharashtra:नाशिकच्या पेठरोडवरील अश्वमेधनगर परिसरात एमडी ड्रग्ज विक्रीचा डाव नाशिक पोलिसांनी उधळून लावला आहे. अमली पदार्थविरोधी पथकाने सापळा रचत दोघा संशयित पेडलरना ताब्यात घेतलं. दर्शन गायकवाड आणि रोशन लोखंडे अशी या दोघांची नावं आहेत. त्यांच्या अंगझडतीत तब्बल ५६ ग्रॅम एमडी पावडर आढळून आली असून, त्याची किंमत तब्बल १ लाख ६८ हजार रुपये आहे. यासोबतच गुन्ह्यात वापरलेली दुचाकीही पोलिसांनी जप्त केली आहे. विशेष म्हणजे, संशयित दर्शन गायकवाड हा पोलिस रेकॉर्डवरील अट्टल गुन्हेगार असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणी म्हसरुळ पोलिस ठाण्यात अमली पदार्थविरोधी कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, एमडीचा पुरवठा नेमका कुठून झाला आणि तो कोणाला विकला जाणार होता, याचा तपास सुरू आहे...0
0
Report
नागपुर के मारबत महोत्सव में चार देशों के राजदूत पहुंचेंगे, धमाकेदार कार्यक्रम
Nagpur, Maharashtra:नागपूरची ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेची ओळख असणाऱ्या मारबत महोत्सवाचा आंतरराष्ट्रीय पातळीवर ठसा उमटवण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रयत्नरत आहे. त्यादृष्टीने महापालिकेने तयारी केली असून येत्या 11 सप्टेंबर रोजी आयोजित मारबत महोत्सव पाहण्यासाठी चार देशाचे राजदूत येणार आहे. याशिवाय काही सेलिब्रिटी कलाकारांनाही निमंत्रित करण्यात आलेय. महोत्सवाअंतर्गत विविध उपक्रम राबविल्या जात आहेत. नागपूर शहरातील पर्यटनाला चालना मिळावी, शहराच नाव राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर घेऊन जाण्यासाठी तसेच नागपूरचा सांस्कृतिक वारसा समृद्धीकरणकरण्याठी मनपामार्फत उत्सवाचे हे आयोजन करण्यात येत आहे. महत्त्वाचं म्हणजे नेहरु पुतळा चौकाजवळ काळी -पिवळी मारबत भेटीचा प्रसंग पाहण्यासाठी यंदा खास व्यवस्था ही करण्यात आलीय. या सगळ्या बाबत माहिती जाणून घेतली आहे स्थायी समिती अध्यक्ष शिवानी दाणी यांच्याकडून0
0
Report
चाकण में भीषण ट्रैफिक जाम: पुणे-नाशिक हाईवे पर 5–7 किमी वाहन कतारें
Shirur, Maharashtra:चाकणमध्ये भीषण वाहतूककोंडी; पुणे-नाशिक महामार्गावर ५ ते ७ किलोमीटर वाहनांच्या रांगा चाकण औद्योगिक वसाहतीतील पुणे-नाशिक महामार्गावर सकाळपासून वाहतुकीचा बोजवारा उडालाय… पाच ते सात किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने कामगार, प्रवासी आणि रुग्णवाहिकांनाही मोठा त्रास सहन करावा लागतोय. सकाळच्या शिफ्टच्या वेळी वाहनांची संख्या वाढल्याने महामार्गावरील वाहतूक संथ झाली… अनेक वाहनचालकांना तासन्तास कोंडीत अडकून पडावं लागतंय.रुग्णवाहिकांनाही या कोंडीतून मार्ग काढताना अडचणी येत असल्याने परिस्थिती अधिक गंभीर बनलीय चाकण औद्योगिक वसाहतीत दररोज लाखो कामगारांची ये-जा होते… त्यात वाढती वाहनसंख्या आणि अपुऱ्या वाहतूक व्यवस्थेमुळे वारंवार कोंडीची समस्या निर्माण होतेय.त्यामुळे तात्पुरत्या उपायांपेक्षा कायमस्वरूपी वाहतूक नियोजन करण्याची मागणी होत असून, चाकणची ही वाहतूककोंडी अखेर कधी सुटणार? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातोय.0
0
Report
Advertisement
नाशिक में आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळ 22 फुट गणेश मूर्ति के साथ गणेश उत्सव
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळाचा गणेशोत्सवाचा जल्लोष; २२ फूट उंच गणरायाची भव्य प्रतिष्ठापना नाशिक च्या आरके ग्रुप शंभूराजे मित्रमंडळाच्या वतीने गेल्या २० वर्षांपासून रेडक्रॉस परिसरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यंदाही गणेशोत्सवासाठी मंडळाने जय्यत तयारी केली असून, तब्बल २२ फूट उंच श्री गणरायाची भव्य मूर्ती प्रतिष्ठापनेसाठी काल सायंकाळी वाजत-गाजत मिरवणुकीने आणण्यात आली. गणरायाच्या आगमनाच्या मिरवणुकीत २२ दशमूर्ती आणि ५० वादकांचे ढोल पथक सहभागी झाले होते. ढोल-ताशांच्या गजराने आणि गणपती बाप्पा मोरयाच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. पारंपरिक पद्धतीने आणि उत्साहपूर्ण वातावरणात काढण्यात आलेल्या या मिरवणुकीने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले..गेल्या दोन दशकांपासून सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसह गणेशोत्सवाची परंपरा जपणाऱ्या मंडळाने यंदाही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. भव्य मूर्ती, आकर्षक सजावट आणि उत्साहपूर्ण मिरवणुकीमुळे यंदाचा गणेशोत्सव विशेष ठरणार आहे....0
0
Report
सोलापुर में मातंग समाज का महा-येल्गार मोर्चा: उपवर्गीकरण के लिए तत्काल निर्णय की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज मातंग समाजाचा महाएल्गार मोर्चा आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसाठी सोलापुरात आज मातंग समाजाचा महाऑेल्गार मोर्चा सकल मातंग समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर निघणार महामोर्चा सर्वोच्च न्यायालयाच्या १ ऑगस्ट २०२४ च्या निकालाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करण्याची मागणी आरक्षण उपवर्गीकरणाचा तातडीने निर्णय घेण्याची राज्य सरकारकडे मागणी न्यायमूर्ती अनंत बदर आयोगाचा अहवाल सादर होऊनही कार्यवाही नसल्याने समाजात नाराजी आरक्षणाचा अपेक्षित लाभ न मिळालेल्या ५७ जातींना न्याय देण्याची मागणी सकाळी ११ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याला अभिवादन करून मोर्चाला सुरुवात नवी वेस, महात्मा फुले पुतळा, अण्णाभाऊ साठे चौक, रामलाल चौक मार्गे मोर्चा डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, सिद्धेश्वर मंदिर मार्गे जिल्हा परिषद पुनम गेटवर सभेत रूपांतर मातंग समाजातील आमदार, खासदार, माजी मंत्री आणि प्रमुख नेतेमंडळी मोर्चात सहभागी होणार महाराष्ट्रभरातून समाजबांधव सोलापुरात दाखल होण्याची शक्यता मोर्चानंतर शिष्टमंडळाकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात येणार0
0
Report
मालेगांव में 5 दिन के बच्चे की माँ से बिक्री: 6 आरोपी गिरफ्तार
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या मालेगावात ५ दिवसांच्या मुलाची आईकडून विक्री प्रकरण - पोलिसांनी केली आणखी दोन संशयित महिलांना अटक - ७० हजारात केली मुलाची विक्री पोटच्या ५ दिवसांचा मुलाची ७० हजार रुपयात विक्री करणाऱ्या निर्दयी मातेला आयशानगर पोलिसांनी अटक केली होती. मुंबईपासून तामिळनाडू, मालेगाव असे कनेक्शन निघालेल्या या प्रकरणामुळे मोठी खळबळ उडाली होती. यात एकूण ६ जणांवर गुन्हा दाखल असून आधी आई फर्जना चांद शेख हिला व नंतर यतील मध्यस्ती सूफिया शेख उर्फ मन्ना वय वर्ष ५१, दुसरी नसीम बानो - वय वर्ष ५५ यांना पोलिसांना अटक करण्यात यश आलं. यातील मुख्य आरोपी अण्णा अजून धारावी पोलिसांच्या गुन्ह्यात अटक असून आणखी एक महिलेचा या गुन्ह्यात समावेश आहे.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव के लिए 307 ST बसें मुंबई रवाना, कोकण के यात्रियों को परेशानी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गौरी-गणपती उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी लक्षात घेऊन एसٹی महामंडळाने छत्रपती संभाजीनगर विभागातील तब्बल ३०७ बस ९ सप्टेंबरपासून मुंबईकडे पाठविण्याचा निर्णय घेतला आहे. या बस मुंबईत पोहोचल्यानंतर कोकणातील विविध मार्गावर प्रवाशांच्या सेवेसाठी धावणार आहेत. मात्र, विभागाच्या एकूण ५०० बसपैकी ३०७ बस उत्सवासाठी बाहेर गेल्याने जिल्ह्यातील नियमित प्रवाशांची मोठी गैरसोय होण्याची शक्यता आहे. जिल्ह्यातील आठही आगरातून या बस जाणार आहे त्यामुळे उर्वरित बसेसमध्ये मोठी गर्दी होऊ शकते प्रवाशांना ताण येऊ शकतो...0
0
Report
मराठवाड़ा में पानी की कमी से फसल संकट, जायकवाड़ी ही एकमात्र सिंचाई की उम्मीद
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात या वर्षी धरणसाठ्यांतील परिस्थिती गंभीर झाली आहे. एकीकडे कोरडवाहू क्षेत्राला फटका बसत असताना मराठवाड्याच्या सिंचन क्षेत्राला जवळपास ६ लाख हेक्टर क्षेत्राला फटका बसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. अशीच परिस्थिती राहिल्यास त्याचा मोठा फटका मराठवाड्याला बसणार आहे. विशेष म्हणजे मराठवाड्याचे निम्म्यापेक्षा अधिक सिंचन क्षेत्र घटणार असल्यामुळे किमान ८ लाख शेतकऱ्यांना त्याचा फटका बसणार आहे. मराठवाड्यात या वर्षी केवळ ३८८ मिमी पाऊस झाला आहे. त्यामुळे अपेक्षित सरासरीच्या केवळ ७0 टक्केच पाऊस झाल्यामुळे मराठवाड्यातील धरणांमध्ये पाणीसाठा झालाच नाही. नाशिकमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे मराठवाड्यातील एकमेव मोठे जायकवाडी धरण भरले आहे. दरम्यान, मराठवाड्यात सीना-कोळेगाव प्रकल्पात शून्य टक्के, दुधना प्रकल्पात २3 टक्के, निम्न तेरणा प्रकल्पात २५ टक्के, मांजरा धरणात १३ टक्के, माजलगाव प्रकल्पात २५ टक्के आणि सिद्धेश्वर प्रकल्पात ३५ टक्के इतकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे या प्रकल्पांतून सिंचन होण्याची स्थिती सध्या नाही. केवल जायकवाडी धरणात ९० टक्क्यांपेक्षा अधिक पाणीसाठा असल्यामुळे जायकवाडीतून सिंचन होणार आहे. मात्र, जायकवाडीच्या सिंचनालादेखील खराब कालव्यांचा आणि अपूर्व्या मनुष्यबळाचा मोठा फटका बसत आहे.0
0
Report
सोलापूर के ग्रामीण निधि मामले पर विपक्ष-सत्ता पक्ष में तकरार, समान निधि की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातील निधीवरून विरोधातल्या आमदार खासदारांची नाराजी. जिल्ह्यातील पांदण रस्त्याच्या निधीवरून सत्ताधारी आणि विरोधकातील आमदारांमध्ये दुजाभाव होत असल्याचा आरोप. पाणंद रस्ते तयार करण्यासाठी विरोधी पक्षातील नेत्यांना अडीच कोटी तर सत्ताधारी पक्षातील साडेसात कोटी रुपये दिल्याचं विरोधकांचे मत. राज्य सरकारने दुजाभाव न करता सर्व आमदारांना समान निधी देण्याची राष्ट्रवादी एस पी आमदार अभिजीत पाटील यांनी मागणी केली. राष्ट्रवादी एस पी खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी थेट डीपीडीसी बरखास्त करण्याची मागणी केली. डीपीडीसी बंद करून येणाऱ्या वित्त आयोगानुसार स्थानिक स्वराज्य संस्थेतील संस्थेंना निधी द्यावा. खासदार आमदारांचा निधी बंद करून थेट ग्रामपंचायतला निधी देण्यासाठी मागणी. इतर राज्यात वित्त आयोगाचा निधी थेट ग्रामपंचायतींना मिळतो. काँग्रेस खासदार प्रणिती शिंदे यांच्या नेतृत्वात दिशा समिती माध्यमातून जिल्ह्यातील आढावा घेण्यात आला.0
0
Report
Advertisement
पोळा त्योहार में बैल सजावट का बाजार, मगर बारिश के संकट से किसान चिंतित
Akola, Maharashtra:पोळा... बळीराजाचा जिव्हाळ्याचा सण! वर्षभर शेतात राबराब राबणाऱ्या वृषभराजाचे ऋण फेडण्याचा, त्याच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस... बैलांना सजवून, त्यांची पूजा करून शेतकरी हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतो. मात्र यंदाच्या पोळ्यावर पावसाच्या खंडाचे सावट आहे... अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारली आहे. पावसाचा मोठा खंड पडल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत दिवसेंदिवस भर पडत आहे. अशातच पोळा सण तोंडावर आला असून, बाजारपेठेत बैलांच्या सजावटीसाठी लागणारे साहित्य विक्रीसाठी दाखल झाले आहे. बैलांच्या शिंगांसाठी रंग, गोंडे, झुली, घुंगरू, वेसण, कासरे आणि विविध प्रकारचे सजावटीचे साहित्य बाजारात उपलब्ध आहे. शेतकरी आपल्या लाडक्या वृषभराजासाठी हे साहित्य खरेदी करताना दिसतोय... मात्र दरवर्षीच्या तुलनेत बाजारात काहीशी मंदी जाणवत आहे. कारण पोळ्याची तयारी करताना शेतकऱ्यांच्या डोळ्यांसमोर केवळ आपल्या बैलांची सजावट नाही... तर आभाळाकडे लागलेले नजरही आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेली पिकं आता माना टाकू लागली आहेत. सोयाबीन, कापूस यांसारख्या खरीप पिकांना पाण्याची नितांत गरज असताना पावसाने पाठ फिरवल्याने बळीराजा संकटात सापडला आहे. पोळा सणासाठी बैलांना सजवायचं... त्यांची पूजा करायची..त्यांच्या ऋणाची परतफेड करायची... पण दुसरीकडे शेतात उभ्या असलेल्या पिकांचं काय, हा प्रश्नही शेतकऱ्यांना सतावत आहे. पोळ्याच्या बाजारात बैलांच्या सजावटीची खरेदी सुरू आहे... मात्र या खरेदीतही शेतकऱ्याच्या मनातील चिंता साफ दिसतेय. वर्षभर शेतकरीाच्या खांद्याला खांदा लावून शेतात राबणाऱ्या वृषभराजाला सजवताना शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद आहे... पण आभाळाकडे पाहताना त्याच डोळ्यांत पावसाची आस आणि संकटाची चिंता आहे.0
0
Report
महायुती के भीतर टकराव: मुख्यमंत्री और उपमुख्यमंत्री के बीच कलगीतुरा, नाना पटोले का हमला
Bhandara, Maharashtra:*मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्यातच कलगीतुरा रंगलेला आहे. तोच जिल्ह्यात पोहचला.... कमिशन खाण्यासाठी हा वाद चाललेला आहे.... Anchor :- भंडारा जिल्ह्यात महायुती मध्ये जुंपली आहे.. भाजपा आमदार परिणय फुके व शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्यात जुंपली आहे.. यावर उत्तम देताना नाना पटोले म्हणाले की वर मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री यांच्यातच कलगीतुरा रंगलेला आहे. तोच जिल्ह्यात पोहचलेला आहे.... हे फक्त कमिशन खाण्यासाठी हा वाद असल्याचं नाना पटोले यांनी घणाघात केला आहे .... BYTE :- नाना पटोले, ऑन महायुती *फडणवीस सरकार लोकांची समाधान करण्यामध्ये अपयशी ठरलेली आहे... खोटे बोलून ही सरकार सत्तेत आलेली आहे...* Anchor :- फडणवीस सरकार महाराष्ट्राच्या प्रत्येक जाती धर्माच्या लोकांच्या समाधान करण्यामध्ये अपयशी ठरलेलं आहे. दिलेल्या आश्वासनांची पूर्तता न करता ते फेल झालेले आहे. खोटं बोलून हे लोक सत्तेत आले आहे. महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावाने महाराष्ट्र विभाजयचा आणि महाराष्ट्राची बदनामी देशपातळीवर करायची. शाहू फुले आंबेडकरी विचारसरणीला फासायचं ही मानसिकता या सरकारची आहे... त्याच्यामुळे हा उद्रेक महाराष्ट्र मध्ये झाला पाहिजे असे सरकारला वाटते. BYTE :- नाना पटोले *काँग्रेस वाढविण्याचा काम आहे.... आमदार भोंडेकर लहान नेते राहिले नाही.... असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे.....* Anchor :- काँग्रेस जिल्हाध्यक्ष यांनी शिवसेना आमदार नरेंद्र भोंडेकर यांना काँग्रेस मध्ये येण्याचे खुले आमंत्रण दिले. यावर नाना पटोले म्हणाले की हे चांगलं आहे... काँग्रेस वाढविण्याचा काम आहे.. पण त्यासाठी एकदम पक्षात घेतले जात नाही. दिल्लीला जाते त्यानंतर निर्णय होतो. आमदार भोंडेकर लहान नेते राहिले नाही.... असा टोला नाना पटोले यांनी लगावला आहे..... BYTE :- नाना पटोले,0
0
Report
यवतमाल के सूखे से किसान परेशान, सितंबर के पहले हफ्ते तक मदद नहीं मिली
Yavatmal, Maharashtra:खरीप हंगामातील ऑगस्ट महिन्यानंतर आता सप्टेंबर चा पहिला आठवडा देखील पावसाअभावी कोरडा गेल्याने कृषी क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले आहे. पिकांची अवस्था अतिशय बिकट झाली असून, त्यांना वाचविण्याची अखेरची धडपड करताना शेतकरी दिसत आहे. कोरडवाहू शेतकऱ्यांवर तर मोठा खर्च व परिश्रम करून देखील शेत शिवार आता सोडून देण्याची वेळ आलेली आहे. यवतमाळतील दुष्काळी स्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
Advertisement
रास्ता न देने के कारण टेम्पो चालक पर पेपर स्प्रे से हमला, दो फ्रिज सहित नुकसान
Kalyan, Maharashtra:भर रस्त्यात डोळ्यात पेपर स्प्रे मारत टेम्पो चालकाला बेदम मारहाण. गाडीसह मालाची तोडफोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. कल्याण पूर्वेतील चक्कीनाका परिसरात टेम्पो चालकाने कार को रास्ता न दिल्याच्या रागातून टेम्पो चालकाला डोळ्यात पेपर स्प्रे मारकर बेहम मारहाण करवी, टेम्पोमध्ये असलेले दोन फ्रिज आणि इतर साहित्याची तोडफोड केली. टेम्पो चालक सुनील याला बेहम मारहाणी केली असून गजानन गायकवाड यांच्या विरोधात कोळसेवाडी पोलिसांत गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी गजानन गायकवाड याचा शोध घेत आहे.0
0
Report
बावड़ी के विषाक्त गैस से एक की मौत, बचाने गया दूसरा बेहोश
Bhandara, Maharashtra:विहिरीतील विषारी वायूने एकाचा मृत्यू... वाचवायला गेलेला दुसरा बेशुद्ध... भंडारा जिल्ह्याच्या पालांदूर पोलीस स्टेशन अंतर्गत खुनारी शेतशिवारात धक्कादायक घटना घडली आहे. विहिरीतील विषारी वायूमुळे एका ६० वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला, तर त्यांना वाचवण्यासाठी विहिरीत उतरलेली दुसरी व्यक्ती बेशुद्ध पडली. रामदास कोहळे, वय ६०, रा. दिघोरी हे शेतावरील घरात राहत होते. ते विहिरीत पडलेल्या अवस्थेत आढळून आले. त्यांना बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू असतानाच विहिरीतील विषारी वायूमुळे बचावासाठी गेलेल्या व्यक्तीचा श्वास गुदमरला आणि तो बेशुद्ध झाला.यानंतर स्थानिकांच्या मदतीने बेशुद्ध व्यक्तीला विहिरीबाहेर काढून उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान, विहिरीत नेमका कोणता धोका आहे, हे तपासण्यासाठी स्थानिकांनी कोंबडी विहिरीत सोडली. मात्र काही वेळातच कोंबडीचाही मृत्यू झाल्याने विहिरीत विषारी वायू असल्याचा संशय बळावला होता. अखेर अग्निशामक दलाच्या मदतीने रामदास कोहळे यांचा मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे,0
0
Report
खेत में विद्युत प्रवाह की चपेट में आकर किसान पिता की मौत, पुत्र घायल
Bhandara, Maharashtra:शेतात पडलेल्या विद्युत कंडक्टरचा धक्का... खत मारताना वडिलांचा दुर्दैवी मृत्यू तर मुलगा जखमी मोहाडी तालुक्यातील ताडगाव येथील शेतकरी सकाळी शेतावर खत मारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याचा विद्युत प्रवाहाचा धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. गणेश केशव गिरी वय (65) वर्ष मृत्यू झाला. तर दुर्गेश गणेश गिरी (३३) वर्ष असे जखमीचे नाव आहे. जीर्ण असलेल्या पोल वरून विद्युत कंडक्टर तुटून शेतात पडलेला असताना त्याकडे दुर्लक्ष झाल्याने हा अपघात झाल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
