445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
20 साल बाद दहावी पास: Akola की रुपाली डोंगरे की प्रेरक सफलता
Akola, Maharashtra:शिक्षणासाठी वयाचं बंधन नहीं असतं,” हे अकोल्यातील रुपाली डोंगरे यांनी आपल्या जिद्दीच्या बळावर सिद्ध करून दाखवलं आहे. लग्नानंतर तब्बल २२ वर्षांनी दहावीची परीक्षा देत रुपाली डोंगरे यांनी यश मिळवलं असून, माय-लेकाच्या या यशाची सध्या अकोल्यात जोरदार चर्चा रंगली आहे. अकोल्यातील अकोट फैल परिसरात राहणाऱ्या रुपाली गणेश डोंगरे या आयुष्मान आरोग्य मंदिरात रुग्णांची नोंदणी करण्याचे काम करतात. तर त्यांच्या पती गणेश डोंगरे हे रंगरंगोटी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. घरची जबाबदारी, नोकरी आणि मुलांचा सांभाळ सांभाळत रुपालीताईंनी शिक्षण पूर्ण करण्याचा निर्धार केला. त्यांनी अकोल्यातील जागृती रात्रशाळेत प्रवेश घेतला आणि दिवसभराच्या धावपळीनंतर रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत दहावीची परीक्षा दिली. विशेष म्हणजे यंदा माय-लेकाने एकत्र अभ्यास केला. त्यांच्या मोठ्या मुलगा दक्ष डोंगरे याने बारावीच्या परीक्षेत ५५ टक्के गुण मिळवत यश संपादन केले, तर रुपालीताईंनी दहावीत ४० टक्के गुण मिळवत आपलं स्वप्न पूर्ण केलं. निकालाच्या दिवशी मनात धाकधुकी असली तरी अखेर मेहनतीचं चीज झालं आणि रुपालीताईंच्या चेहऱ्यावर आनंद फुलला. परिस्थिती कितीही कठीण असली तरी जिद्द आणि इच्छाशक्ती असेल तर कोणतंही स्वप्न पूर्ण करता येतं, हे त्यांनी दाखवून दिलं आहे. विशेष म्हणजे दहावी उत्तीर्ण झाल्यानंतरही त्यांचा शैक्षणिक प्रवास थांबलेला नसून पुढेही शिक्षण सुरू ठेवण्याची त्यांनी इच्छा आहे. रुपाली डोंगरे यांची ही प्रेरणादायी यशोगाथा आज अनेक महिलांसाठी नवा आदर्श ठरत आहे.0
0
Report
विदर्भ में भीषण लू, अकोला में तापमान 45.1°C; यलो अलर्ट जारी
Akola, Maharashtra:अवकाळी पावसामुळे काही दिवस तापमानात घट झाली होती, मात्र पुन्हा एकदा उन्हाचा तडाखा वाढू लागला आहे. राज्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद पुन्हा अकोल्यात झाली असून ११ मे रोजी अकोल्याचा पारा तब्बल ४५.१ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे नागरिकांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत आहे. भारतीय हवामान विभागाच्या माहितीनुसार, विदर्भात उष्णतेची लाट कायम असून अकोला शहर पुन्हा एकदा राज्यातील सर्वाधिक तापमानाचे शहर ठरले आहे. वाढत्या तापमानामुळे दुपारच्या वेळेत रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत असून नागरिकांनी अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडणे टाळले आहे.दरम्यान, उष्णतेच्या तीव्र लाटेमुळे विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली असून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक के मालेगाव में आदिवासी जमीन पर भू-माफियाओं का कब्जा, विरोध प्रदर्शन जारी
Nashik, Maharashtra:नाशिकच्या मालेगावात आदिवासी बांधवांच्या जमिनीवर भू माफियांचा कब्जा... आदिवासी बांधवांनी निषेध करत काढला निषेध मोर्चा... नाशिकच्या मालेगाव येथील आदिवासी बांधवांच्या जमिनीवर काही भू माफियांनी कब्जा केला त्याचा त्यांनी विरोध केल्यामुळे काही आदिवासी बांधव यांच्यावर गुन्हे दाखल केले. याचा निषेध म्हणून आदिवासी बांधवांनी आपल्या लहान बालकांसोबत शहरातील मोसमपूल गांधीपुतळा येथून अपर जिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा काढत निषेध व्यक्त करत निवेदन दिले.0
0
Report
Advertisement
अंबरनाथ में शिवसेना ने भाजपा के साथ युति की पेशकश
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये शिवसेनेकडून भाजपला युतीची ऑफर झाल्या गेल्या गोष्टी सोडून एकत्र येण्याचा प्रस्ताव शहर विकासासाठी मतभेद विसरून एकत्र येण्याचं आवाहन विकासासाठी जुने वाद विसरण्याचे माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी यांचं आवाहन0
0
Report
बिश्नोई संदर्भ पर संग्राम जगताप के बयान से उठा नया राजनीतिक विवाद
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप लॉरेन्स बिष्णोई ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडीच्या कथित प्रकारांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोर्चात बोलताना जगताप म्हणाले, “बिश्नोई समाज काळवीट हरणाला दैवत मानतो. त्याला जर कुणी ठार मारले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाते. त्याच धर्तीवर हिंदू समाज गाय आणि महिलांना माता मानतो. त्यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली, तर त्यालाही तसेच उत्तर दिले गेले पाहिजे.” नगर–पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सविरोधात आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात त्यांनी हे विधान केले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.0
0
Report
नवी मुंबई अस्पताल में बाहरी मरीजों के लिए शुल्क बढ़ाने की तैयारी, मंत्री का निर्देश
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना नवी मुंबईतील मनपा रुग्णालयात उपचार घेणे होणार खर्चिक, बाहेरील रुग्णांना खाजगी रुग्णालयाप्रमाणे दर आकरण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रशासनाला निर्देश. नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना खर्चिक होणार आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयात बाहेरील रुग्णांची संख्या 60 टक्के असून यामुळे कर भरणाऱ्या नवी मुंबईकरांना योग्य उपचार आणि सेवा देण्यास अडचणी निर्माण होतायत. अधिकारी आणि नगरसेवकांच्या आढावा बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई क्षेत्रा बाहेरील रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारा असे निर्देश दिलेत. आगामी महासभेत तश्या प्रकारचा ठराव मंजूर करुन घ्यावा जेणेकरून नवी मुंबईतील रुग्णांना अधिक चांगली आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे.0
0
Report
Advertisement
वीरार जेटी पर मद्यधुंद हालत में डूबते व्यक्ति को बचाने वाला कर्मचारी CCTV में कैद
Vasai-Virar, Maharashtra:विरार जेटीवर आज दुपारी घडलेल्या थरारक घटनेत एका सतर्क कामगाराने प्रसंगावधान दाखवत मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास एक व्यक्ती विरार जेटीच्या टोकावर फिरत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. त्याचवेळी रो-रो सेवेत कार्यरत असलेले कामगार आदेश नाईक यांनी पाण्यात पडल्याचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली. लाटांचा सामना करत त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले. आदेश नाईक यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिकांकडून त्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे. ही सर्व घटना जेट्टी वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे...0
0
Report
वनमंत्री गणेश नाईक ने वाशी में मानसून पूर्व समीक्षा बैठक आयोजित
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी आज वाशी येथे सर्व मनपा अधिकारी आणि नगरसेवकांची मान्सून पूर्व कामांसंबंधी आढावा बैठक घेतली. क्वारी असलेल्या ठिकाणी दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, नाले गटर यांची स्वच्छता करण्यात यावी, मोकळ्या वायर आणि डीपी यांची दुरुस्ती करावी, शाळांचे लिकेज दुरुस्त करावे शाळेत स्वच्छता करावी असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी देखिल प्रभागातील समस्या मांडल्या असून यासर्व समस्या सोडविण्याचे निर्देश नाईकांनी अधिकाऱ्यांना दिलेत.0
0
Report
CIDCO के अधिकारियों पर संताप जताते हुए वन मंत्री गणेश नाईक ने पाणथळ क्षेत्र के मामले की जाँच की मांग की
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी CIDCO अधिकाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त केलाय. पाणथळ क्षेत्र असणारी 8 ते 10 ठिकाण सिडकोच्या समितीने पाणथळ क्षेत्र नाहीत असा अहवाल दिला. आम्ही आवाज उठवला नसता तर सदर अहवाल मंजूर होऊन या पाणथळ क्षेत्रावर भूखंड बनवून ते विक्रीसाठी काढले असते. सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत हे मी विधान भवनात आमदार असताना बोललो होतो आता मंत्री असताना बोलतोय. गावातील लोकांनी घरे दुरुस्त करायला घेतली की हे अधिकारी येऊन करावी करतात आणि लगेचच तो भूखंड विकतात इतकी नालायक लोकं आहेत अशी जहरी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर के केंद्रीय अस्पताल में कैदी ने हंगामा किया, अपने सिर से शीशा तोड़ा
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्यवर्ती रुग्णालयात कैद्याचा राडा; स्वतःच्या डोक्याने फोडली काच ! उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधारवाडी जेलमधील आरोपी अजबिल अन्सारी याला पोटदुखीच्या तक्रारीमुळे उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तपासणीनंतर पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर आरोपीने संताप व्यक्त करत थेट रुग्णालयातील 13 नंबर कॅबिनची काच स्वतःच्या डोक्याने फोडली. "आता तरी मला ऍडमिट करा" असा हट्ट धरत आरोपीने रुग्णालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.0
0
Report
जालना पुलिस ने 1100 बटन गोलीयाँ और 76 सिरप की बोतलें जप्त कर तीन गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना: 1100 बटन गोळ्या सहित 76 कप सिरपच्या बाटल्यांज जप्त; तीन जणांना अटक. जालना पोलिसांनी 1100 बटन गोळ्या सहित 76 कप सिरपच्या बाटल्या जप्त केल्या असून तीन जणांना अटक करण्यात आली. या कारवाईत 1100 बटन गोळ्या आणि 76 कप सिरपच्या बाटल्या जप्त झाल्या आहेत. 28 एप्रिल रोजी कदीम जालना पोलिसांनी बटन गोळ्या विक्री करणाऱ्या एका आरोपीला अटक केली होती. या गुन्ह्याचा सखोल तपास करताना आणखी दोन आरोपींना अटक करण्यात आली. माहिती पोलीस अधीक्षकांनी दिली आहे.0
0
Report
सासवड में शिवसेना का बड़ा जनआक्रोश हंडा मोर्चा, पानी योजना तेज शुरू करने की मांग
Rui, Maharashtra:सासवडमध्ये पाण्यासाठी शिवसेनेचा भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून सासवड वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागताय. या पार्शभूमीवर शिवसेने शिंदे गटाच्या वतीने आज भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला जेष्ठ नागरिक युवक आणि विविध भागातील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २७ वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात पाच-पाच दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १४३ कोटींच्या नवीन पाणी योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान,आंदोलनामुळे सासवड शहरातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में बंदूकधारी डकैती: 70 लाख की लूट, आरोपी गिरफ्तार
Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरात एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ७० लाखांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.या आरोपीचा माग काढण्यासाठी अकोला पोलिसांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास केला आणि ५८० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अखेर पोलिसांनी आरोपीला भुसावळ येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा दिवसांपासून अकोला शहरात वास्तव्यास होता. चादर विक्रीचा व्यवसाय करत तो परिसराची रेकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
चंद्रपुर के नागभीड़ में घोड़ाझरी कालवे में भगदाड़, लाखों लीटर पानी बर्बाद—किसान चिंतित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागाभेड तालुक्यातल्या घोडाझरी कालव्याला भगदाड पडलेले असून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतीवर परिणाम झाला आहे. उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी यावर्षी कालव्यातून पाणी सोडण्यात आले; मात्र शेवटल्या टोकावर पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात आणि परिसरात वाहून जाऊन पाण्याची नासाडी झाली आहे. शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची समस्या जशीची तशी असून या घटनेमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित सिंचन विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
कल्याण के आचार्य अत्रे रंगमंदिर में इंतजामों पर कलाकारों का गुस्सा वायरल वीडियो से उजागर
Kalyan, Maharashtra:कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुरवस्थेबाबत अनेकदा कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी या रंगमंदिरातील गैरसोय आणि दूरवस्थेसंबधी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याचं पुढे काहीच होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. कल्याणचे हे नाट्यगृह शहरातील प्रमुख सांस्कृतिक merkez असून विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे इथे होत असतात. मात्र नाटकातील कलाकारांना येथे गैरसोयीचा सामना करावा लागतो. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी याबाबত नाराजी व्यक्त केलीय.0
0
Report
Advertisement
