445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मंदिर दानपेटी की चोरी: सेवेकरी के घर से 4 लाख रुपये बरामद
Pimpri-Chinchwad, Maharashtra:माऊलींच्या दानपेटीवर दरोडा; सेवेकऱ्याच्या घरात चोरीची तब्बल पावणे चार लाख रुपये जप्त झाले आहेत. kailas puri pune 25-5-26. Anchor - देवाच्या आळंदीतील माऊलींच्या दानपेटीवर सेवेकरीने डल्ला मारला. विशाल वारुळे नामक सेवेकरीच्या घरात रोकड सापडलीये. 10, 20, 50 आणि शंभर रुपयांच्या नोटांनी भरलेल्या पिशव्यांमध्ये तब्बल पावणे चार लाख रुपये जप्त झालेत. दानपेटीतील रक्कम जमा करताना विशाल हातचलाखी करायचा आणि एका पिशवीमध्ये नोटा भरायचा. गेल्या तीन महिन्यांपासून त्याचा हा उद्योग सुरु होता असा अंदाज वर्तवला जातो. ज्या दिवशी नोटांनी भरलेली पिशवी घरी घेऊन जायचा, त्या दिवशी विशाल मंदिरातील काही हार घरी घेऊन जातो. असं म्हणायचा आणि पिशवीत हार दिसतील असे ठेवायचा, खाली मात्र रोकड असायची. घरी आल्यावर रोकड मोजायचा आणि नंतर ती पिशवी आहे तशी बेडमध्ये ठेऊन द्यायचा. त्याचं पिशव्यांमध्ये पावणे तीन लाखांची ही रोकड आढळली. गेल्या तीन महिन्यांपासून तो दानपेटीतील रक्कम जमा करणे आणि ती मोजून ठेवणे, हे काम करत होता. बाईट-भीमा नरके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक आळंदी0
0
Report
दौंड‑मनमाड रेललाइन के दुहेरीकरण से ट्रेनें अस्थाई रद्द
Amravati, Maharashtra:दौंड‑मनमाड रेल्वे मार्ग पर दुहेरीकरण का काम शुरू; अमरावती और नागपुर के बीच चलने वाली कुछ महत्त्वपूर्ण ट्रेनें अस्थायी रूप से रद्द कर दी गई हैं. पुणे मंडल के अनुसार विसापुर, रांजणगाव, सारोळा स्टेशन के बीच प्री नॉन इंटरलॉकिंग और नॉन इंटरलॉकिंग ब्लॉक लिया जाएगा. इससे पुणे, अमरावती और नागपुर के बीच प्रमुख गाड़ियाँ अस्थाई रद्द रहेंगी. हावड़ा पुणे एक्सप्रेस और अमरावती पुणे एक्सप्रेस के मार्ग बदले गए हैं; अमरावती‑पुणे एक्सप्रेस 27 और 28 मई 2026 को रद्द रहेगी. पुणे‑अमरावती एक्सप्रेस 28 और 30 मई 2026 को रद्द रहेगी. नागपुर‑पुणे और पुणे‑नागपुर विशेष गाड़ियाँ 27 और 28 मई 2026 को रद्द की गईं.0
0
Report
ईंधन महंगाई से आम नागरिक परेशान, शिर्डी में पेट्रोल-डिजेल की कमी जारी
Shirdi, Maharashtra:Anc - सामान्य नागरिकांना पुन्हा महागाईचा झटका बसलाय... पेट्रोल तब्बल 3 रुपये 13 पैशांनी तर डिझेल 2 रुपये 80 पैशांनी महागलं आहे. काही दिवसांपूर्वीच दरवाढ झाल्यानंतर आता पुन्हा वाढ झाल्याने वाहनचालकांमध्ये संताप व्यक्त झालाय. अहिल्यानगर जिल्ह्यात इंधन पुरवठा सुरळीत असल्याचा दावा केला जातोय मात्र जिल्ह्यातील अनेक पंप पेट्रोल डिझेल वाचून बंद आहेत. त्याचबरोबर वाढत्या दरांमुळे नागरिकांचं आर्थिक गणित बिघडताना दिसत आहे. डिझेल दरवाढीचा फटका वाहतूक क्षेत्रासह शेती आणि जीवनावश्यक वस्तूंच्या किमतींवरही बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिर्डीला येणाऱ्या साईभक्तांना देखील पेट्रोल डिझेल मिळत नसल्याने पंप शोधावे लागत आहेत. विविध धार्मिक स्थळांवर पर्यटक आणि साईभक्तांना घेऊन जाणाऱ्या टुरिस्ट वाहन चालक आणि मालकांना डिझेल मिळत नसल्याने एका पंपावरून दुसऱ्या पंपावर भटकंती करण्याची वेळ आली आहे.. शिर्डी परिसरातील पाच ते सहा पंप बंद असल्याने साई भक्तांना पेट्रोल डिझेल साठी भटकंती करण्याची वेळ आलीये..त्यामुळे सरकारने पेट्रोल-डिझेलचा साठा मुबलक करावा आणि वाढते दर नियंत्रणात आणावेत, अशी मागणी सर्वसामान्य नागरिकांसह वाहन चालकांकडून केली जात आहे...0
0
Report
Advertisement
वादळी हवा-बारिश ने केलों की फसल को किया बर्बाद, किसान बेहाल
Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याला वादळी वाय्राच्या पावसाने झोडपल्याने केळी पिकाचं प्रचंड नुकसान झालंय, लाखणगाव परिसरात उभ केळीचं पिक जमिनदोस्त झाल्याने शेतकय्रांच लाखो रूपयांच नुकसान झालंय, आधीत आखाती देशात सुरू असलेल्या महायुद्धामुळे केळीची निर्यात ठप्प झालाेल केळीला कवडीमोल बाजारभाव मिळत असताना त्यात आता वादळी वाऱ्याच्या पावसाने केळीचे पीकच उध्वस्त केल्याने शेतकरी हातबल झालाय याचाच केळीच्या शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
MIDC क्षेत्र में गैर-औद्योगिक व्यवसाय बंद, क्लासेस-होस्टेल-खानावली तुरंत बंद करने का आदेश
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ग्राउंड रिपोर्ट... एमआयडीसीतील बिगर औद्योगिक व्यवसायांवर प्रशासनाचा दणका... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका तात्काळ बंद करण्याचे आदेश... क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिकांवर कारवाईची टांगती तलवार... नियमभंग करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा... एमआयडीसी परिसरात उद्योगांव्यतिरिक्त सुरू असलेल्या व्यवसायांवर आता कारवाईची टांगती तलवार आली आहे. क्लासेस, हॉस्टेल, खानावळी, अभ्यासिका आणि इतर व्यावसायिक उपक्रम तात्काळ बंद करण्याचे आदेश जिल्हा उद्योग केंद्राने दिले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. औद्योगिक वसाहतीत बिगर औद्योगिक व्यवसाय सुरू असल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाने हा निर्णय घेतला असून आदेशाचे पालन न केल्यास संबंधितांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला. ट्युशन एरिया मधून आढावा घेत त्या भागातील लोकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी..0
0
Report
लातूर पेपरफुटी केस: पुराने वीडियो वायरल से राजनीति गरम, जांच तेज
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज पेपरफुटी करणाऱ्यांना मृत्युदंडाची मागणी करणाऱ्या मोटेगावकर याचा जुना व्हिडिओ व्हायरल.... नीट पेपरफुटी प्रकरणात सीबीआय कोठडीत असलेल्या मोटेगावकरच्या जुन्या वक्तव्याची चर्चा... लोका सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण, मोटेगावकरांचा जुना व्हिडिओ सोशल मीडियावर चर्चेत... पेपरफुटीविरोधात कठोर भूमिका... आता व्हायरल व्हिडिओमुळे नव्या चर्चांना उधाण....0
0
Report
Advertisement
नागिना घाट पर गोदावरी नदी में डूबे दो युवक, दर्दनाक मौत
Nanded-Waghala, Maharashtra:नागिना घाट परिसरात गोदावरी नदीपात्रात बुडून दोन युवकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. 19 वर्षीय गणेश डोंगरे आणि 14 वर्षीय रणवीर शिंगाडे या दोघांचा मृत्यू झाला. दोघेही नांदेड शहरातील खोब्रागडे नगर येथील रहिवासी होते. गणेश व रणवीर हे नगीना घाट परिसरात गोदावरी नदीकाठी काल सायंकाळी गेले होते. नदीपात्रात उतरल्यावर पाण्याचा अंदाज न आल्याने दोघेही खोल पाण्यात गेले आणि बुडाले. परिसरातील नागरिकांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र तोपर्यंत उशीर झाला होता.0
0
Report
चंदूर के युवाओं ने मोर्णा नदी की सफाई अभियान चला कर एकता की मिसाल दी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील चांदूर गावातील युवकांनी नदी स्वच्छतेचा संकल्प केला आणि आज हे अभियान संपूर्ण गावासाठी प्रेरणादायी ठरत आहे. अकोला जिल्ह्यातील सुमारे दहा हजार लोकसंख्या असलेल्या चांदूर गावातून मोर्णा नदी वाहते. मात्र गेल्या काही वर्षांत नदीपात्रात वाढलेली घाण, झाडाझुडपे आणि अतिक्रमणामुळे नदीचे अस्तित्व धोक्यात आले होते. पावसाळ्यात काटेरी झाडांमुळे पाण्याचा प्रवाह अडत असल्याने पूरस्थितीही निर्माण होत होती. ही परिस्थिती बदलण्यासाठी गावातील काही युवकांनी पुढाकार घेत “नदी पुनर्जीवन” अभियान सुरू केले. युवकांनी गावकऱ्यांसमोर नदी स्वच्छतेची संकल्पना मांडली आणि विशेष म्हणजे सर्व जाती-धर्म तसेच सर्व पक्षांचे लोक मतभेद विसरून या अभियानात सहभागी झाले. ग्रामपंचायतीच्या सहकार्याने नदी स्वच्छतेच्या कामाला सुरुवात करण्यात आली. गावकऱ्यांनी स्वेच्छेने देणग्या देत या उपक्रमाला हातभार लावला. नदीपात्रातील काटेरी झाडे हटवून नदीचा प्रवाह मोकळा करण्यात आला. तसेच नदीपात्र रुंद करण्यात आल्याने भविष्यातील पुराचा धोका कमी झाला आहे. विशेष म्हणजे आता गावकरी केवळ नदीच नव्हे तर गावातील रस्त्यांचीही श्रमदानातून स्वच्छता करत आहेत. जवळपास दोन किलोमीटर लांबीच्या मोर्णा नदीला नवसंजीवनी देण्यासाठी सुरू असलेले हे अभियान पर्यावरण संवर्धनासोबतच सामाजिक एकतेचेही उत्तम उदाहरण ठरत आहे. चांदूर गावातील युवकांनी दाखवलेली ही सकारात्मक दिशा इतर गावांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे. Byte : मिलिंद पाटील.0
0
Report
सोलापुर में अकलपनीय बारिश, बार्शी में बिजली गिरने से दो भैंसों की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा तडाखा, बार्शीत वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू - गेल्या दोन दिवसात जिल्ह्यातील अनेक भागांना अवकाळी पावसाचा मोठा तडाखा - मोहोळ तालुक्यात आलेल्या वादळी वाऱ्यामुळे लांबोटी येथील हॉटेलची आणि पेट्रोल पंपाच्या छताची मोठ्या प्रमाणात पडझड - तर दुसरीकडे बार्शीतील पिंपळगाव मध्ये वीज पडून दोन म्हशींचा मृत्यू - जिल्ह्यातील काही भागांमध्ये आंबा डाळिंब असे शेती पिकांचे मोठे नुकसान0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर हवाई अड्डे पर अंतरराष्ट्रीय सेवाओं के लिए इमिग्रेशन मंजूरी का इंतजार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर विमानतळावर टर्मिनल सज्ज, काऊंटर उभे.. अगदी विमान कंपनीही थेट बँकॉक विमानसेवा सुरू करण्यासाठी तयार आहे, मात्र छत्रपती संभाजीनगर विमानतळाची आंतरराष्ट्रीय भरारी केवळ एका सरकारी मंजुरीअभावी अडकून पडली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाकडून इमिग्रेशन चेकपोस्ट मंजुरी न मिळाल्याने विमानतळावरून एकही आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होऊ शकलेली नाही. चिकलठाणा विमानतळाला दोन वर्षापासून केंद्रीय गृह मंत्रालयाकडून आयसीपी मंजुरीची प्रतीक्षा आहे. याशिवाय विमानतळावरून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू होत नाही. दोन वर्षापूर्वी एअर एशिया कंपनी थेट बँकॉक विमानसेवेसाठी तयार होती, परंतु विमानतळाला इमिग्रेशन चेकपोस्ट नसल्याने ही विमानसेवा अडकली. गतवर्षी आंतरराष्ट्रीय विमानसेवेसाठी धावपट्टीला टर्निंग पॅड वाढवणे, टॅक्सी-वे लिंक फिलेट वाढवणे, टर्मिनलवर स्वतंत्र इमिग्रेशन व इमिग्रेशन सिक्युरिटी, बोर्डिंग व चेक-इन काउंटर उभारणे आदी पायाभूत सुविधांचे काम करण्यात आले आहे0
0
Report
मालेगाव में गर्भलिंग रैकेट का पर्दाफाश; 23 हजार की मांग, 5 गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव येथे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. आरोग्य विभागाने डिकॉय ऑपरेशन राबवत माने हॉस्पिटल सोनोग्राफी सेंटरवर छापा टाकला. या तपासणीसाठी २३ हजार रुपयांची मागणी करण्यात आल्याचे समोर आले. कारवाई दरम्यान महिला डॉक्टर आणि मुख्य दलाल फरार झाले. या तपासणीसाठी रुग्णालय संचालक डॉ. विवेक माने यांच्यासह ५ जणांविरोधात PCPNDT कायद्यांतर्गत मालेगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
जलसंकट चेतावनी: जायकवाड़ी सहित सभी जलाशयों का पानी 40% से नीचे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अलनिनोमुळे यंदा सरासरीखेappa कमी पाऊस पडण्याचा अंदाज असून, जलसंपदा विभाग अलर्ट मोडवर आहे. उपलब्ध पाण्यातून ऑगस्टपर्यंत पिण्यासाठी पाणी राखून ठेवण्याचे नियोजन केले आहे. कडक उन्हाळ्यामुळे लहान मोठ्या अशा सर्व प्रकारच्या धरणांतील पाण्याचे वेगाने बाष्पीभवन होत आहे. यामुळे नागरिकांनी पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन गोदावरी महामंडळाचे कार्यकारी संचालक यांनी केले आहे. मराठवाड्यातील सर्वात मोठ्या जायकवाडी प्रकल्पासह सर्वच मोठ्या, मध्यम आणि लघू प्रकल्पातील जलसाठा वेगाने घटत आहे. जलसंपदा विभागाच्या साप्ताहिक अहवालानुसार जायकवाडी धरणांत आज ४० टक्के जलसाठा आहे. मोठ्या धरणात सरासरी ४३ टक्के जलसाठा आहे. मध्यम प्रकारच्या धरणांत सरासरी ३० टक्क्यांपर्यंत घटला आहे. लघु प्रकल्पांची अवस्था बिकट आहे. या प्रकल्पांत सरासरी २० टक्केच पाणी उरल्याचे आकडेवारीवरून दिसून येते.0
0
Report
Advertisement
मालेगांव में मानसून पूर्वी तेज़ बारिश से कांदा किसानों को भारी नुकसान
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात अचानक झालेल्या मान्सून पूर्व पावसाने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. विक्रीसाठी शेतातून काढून ट्रॅक्टरमधून बाजार समितीकडे नेला जात असलेला कांदा अचानक आलेल्या जोरदार पावसात पूर्णपणे भिजला. त्यामुळे आधीच कमी दरामुळे अडचणीत सापडलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर आणखी आर्थिक संकट ओढवले आहे. मोठ्या मेहनतीने पिकवलेला कांदा पावसामुळे खराब होण्याची भीती व्यक्त केली जात असून शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे. प्रशासनाने पंचनामे करून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में पानी की भारी किल्लत, निजी टंकरों की आपूर्ति प्रभावित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाळ्यात छत्रपती संभाजी नगरच्या सातारा-देवळाई वासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. उन्हाळ्याच्या सुरुवातीला बोअरवेल कोरडे पडल्याने खासगी टँकरवर अवलंबून असलेल्या नागरिकांना विकत पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, टँकरची मागणी वाढल्याने नागरिकांना तीन-चार दिवस प्रतीक्षा करावी लागत आहे. त्यात शहरात सध्या डिझेल टंचाईचा फटका खासगी टँकर चालकांना बसत आहे. डिझेल भरण्यासाठी चालकांना पेट्रोल पंपांवर तासन् तास रांगेत उभे राहावे लागत आहे तसेच परिसरातील विहिरी व टँकर भरण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या बोरिंगची पाणीपातळी मोठ्या प्रमाणात घटल्याने टँकर चालकांना दूरवरून पाणी आणावे लागत आहे. पाणी विकत घेण्यासाठी पैसे मोजूनही टँकर वेळेवर येत नाही. तसेच पाणी नसल्याने अनेकांना काम धंदे सोडून पाण्याची वाट बघावी लागते. काही ठिकाणी दोन ते तीन दिवसांनी पाणी मिळत असल्याने महिलांना आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रास सहन करावा लागत आहे तसेच परिसरातील नागरिकांनी मनपाकडून सोसायटींना पाणीपुरवठा करावा, अशी मागणी केली आहे.0
0
Report
जनगणना के लिए 10 शिक्षकों की गैरहाजिरी पर पुलिस को मामला दर्ज कराने की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जनगणनेच्या राष्ट्रीय कामासाठी संभाजी नगर महापालिकेने नियुक्त केलेले १० शिक्षक वारंवार संपर्क करूनही गैरहजर राहिले आहेत. अखेर मनपा प्रशासनाने या दांडीबहाद्दर शिक्षकांविरोधात गुन्हा दाखल करण्यासाठी रविवारी सिटी चौक पोलिसांना पत्र दिले आहे. झोन क्रमांक १ च्या सहाय्यक आयुक्त तथा जनगणना अधिकारी यांनी हे पत्र दिले असून, सोबत शिक्षकांची यादीही जोडली आहे. कर्मचाऱ्यांवर 'जनगणना अधिनियम १९४८' च्या कलम ११ अन्वये गुन्हा या दाखल करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे0
0
Report
Advertisement
