445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के बोरव्हा बुद्रुक में सोलर पंप आग में खाक, किसान मुआवजे की मांग
Washim, Maharashtra:वाशीम जिले के मंगरूळपीर तालुक्यात बोरव्हा बुद्रुक शिवारात आज दुपारी शशिकला दबडे नामक महिला किसान के खेत में सोलर पंप के पैनल, पाइप और ड्रिप सिंचयन आग में झुलस गए और खाक हो गये. बड़ा नुकसान हुआ है और आग के कारण अभी अस्पष्ट है. नुकसान भरपाई देने की मांग की गई है.0
0
Report
भोंदू बाबा मनोहर भोसले के साथी पर धोखाधड़ी का मामला, तीन दिन की पुलिस कोठड़ी
Pandharpur, Maharashtra:भोंदू बाबा मनोहर भोसले याला माढा न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी मध्ये ठेवण्याचे आदेश दिले आहेत. सोलापूर येथील रियल इस्टेट व्यवसायिक याच्या व्यवसायामध्ये प्रगती करण्यासाठी पूजा विधी करण्यासाठी 50 हजार रुपयांची रक्कम घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी भोंदू बाबा मनोहर भोसले यांच्या साथीदार विशाल वाघमारेवर कुर्डूवाडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता.यानंतर पुणे येथून या दोघांना सोलापूर ग्रामीण पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलं होतं. आज कुर्डूवाडी पोलिसांनी मनोहर भोसले यांचा साथीदार विशाल वाघमारे याला माढा न्यायालयामध्ये हजर करण्यात आला दोन्ही बाजूच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकल्यानंतर माढा न्यायालयाने मनोहर भोसले ला तीन दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत0
0
Report
विदर्भ में ताप बढ़े… मौसम विभाग तीन दिनों में लहर की आशंका घोषित करेगा— समाचार
Akola, Maharashtra:विदर्भात उष्णतेची तीव्रता अधिक वाढत आहे आणि त्यामुळे हवामान खात्याने येत्या तीन दिवस उष्णतेच्या लाटेची शक्यता वर्तवली आहे आणि याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी जयेश जगड यांनी.0
0
Report
Advertisement
पालघर में युरिया खाद का कालाबाज़ार, पदाधिकारी भी शामिल: पुलिस ने चार आरोपियों को पकड़ा
Palghar, Maharashtra:शेतकऱ्यांना शेतीसाठी विक्रीसाठी असलेल्या युरिया खताचा काळाबाजार पालघर जिल्ह्यात पुन्हा एकदा समोर आला आहे. विशेष म्हणजे राजकीय पक्षांचे पदाधिकारीच हे रॅकेट चालवत असल्याचं उघड झालं आहे. शेतकऱ्यांना अनुदानित दरात उपलब्ध होणारा युरिया खत बेकायदेशीर रित्या औद्योगिक वापरासाठी वळवला जात असून बोईसर पोलिसांकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. शेतीसाठी आलेल्या युरिया खताचा काळ्या बाजारात विक्रीसाठी वाहतूक करणाऱ्या ट्रक सह वीस लाखांचा मुद्देमाल आणि चार आरोपींना पालघरच्या बोईसर पोलिसांनी अटक केली आहे तर आणखीन फरार असलेल्या चार आरोपींचा शोध सध्या बोईसर पोलिसांकडून घेतला जातोय. विशेष म्हणजे इतक्या मोठ्या प्रमाणावर युरिया खताचा काळाबाजार सुरू असताना देखील कृषी विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
उपवर्गीकरण के विरोध में बडोले ने बदर समिति की रिपोर्ट पर होली जलाने का आह्वान किया
Bhandara, Maharashtra:उपवर्गीकरण विरोधात आज आमदार राजकुमार बडोले यांनी बदर समितीच्या अहवालाची होळी.... अनुसूचित जाती मध्ये भांडण लावण्याचा काम सरकार करत आहेत..... आज उपवर्गीकरणाच्या विरोधात आमदार राजकुमार बडोले यांनी रणशिंग फुकले आहे. गोंदिया येथे जाहीर सभा घेत उपवर्गीकरण या अहवालाची होळी केली आहे... महाराष्टा्र सरकारने बदर समिती तयार करून अनुसूचित जातीवर अन्याय करण्याचा काम केलं आहे.. या समितीच्या माध्यमातून उपवर्गीकरण करून अनुसूचित जाती मध्ये भांडण लावण्याचा काम करत आहे. बदर समितीचा अहवाल रद्द करावा. अन्यथा महाराष्ट्र पेटल्याशिवाय राहणार नाही. तर दुसरीकडे सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर सर्व जनता रस्त्यावर उतरेल असा इशाराच राष्ट्रवादीचे आमदार राजकुमार बडोले यांनी सरकारला दिला आहे...0
0
Report
नवी मुंबई में इंग्लिश मीडियम शिक्षा नीति पर विरोध, हाई कोर्ट में याचिका दाखिल
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेत शिक्षण रूपांतरण धोरण आणत सर्व शाळा इंग्रजी माध्यमाच्या करण्याचा प्रस्ताव सत्ताधारी भाजपने बहुमताच्या जोरावर मंजूर केलाय. याविरोधात विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करत सदर प्रस्ताव असंवैधानिक असल्याचे स्पष्ट केलेय. या प्रकरणी न्यायालयाने हस्तक्षेप करुन सदर प्रस्ताव स्थगित करण्याची मागणी केलेय. याविरोधात योग्य न्याय न मिळाल्यास मराठी शाळांसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा देखिल विरोधीपक्ष नेते विजय चौगुले यांनी दिलाय.0
0
Report
Advertisement
बिग बॉस ६ की विजेता तन्वी कोलते का देवरुख-साखरपा में भव्य स्वागत
Ratnagiri, Maharashtra:साखरपा - रत्नागिरी.. बिग बॉस ६ ची विजेती तन्वी कोलतेचं मायभूमीत जंगी स्वागत.. देवरुख-साखरपा नगरीत निघाली भव्य मिरवणूक!.. अँकर आपल्या सर्वांच्या पसंतीचा रियालिटी शो 'बिग बॉस' सीझन ६ ची महाविजेती, अभिनेत्री तन्वी कोलते सध्या विजयाचा गुलाल उधळत आपल्या मूळ गावी परतली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील देवरुख-साखरपा भागात आज तन्वीचे पाय लागताच वातावरण पूर्णपणे भारावून गेले होते. विजेतेपदाचा मुकुट परिधान करण्याच्या आपल्या लाडक्या लेकीचे स्वागत करण्यासाठी साखरपावासीयांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात तन्वीची भव्य मिरवणूक काढण्यात आली. फुलांनी सजलेली गाडी आणि चाहत्यांचा उत्साह पाहून तन्वी देखील भावूक झालेली पाहायला मिळाली.0
0
Report
जालना के बदनापूर में बैंक घोटाला: नकली सोने से 7.31 करोड़ की ठगी, तीन गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालन्यात बँक घोटाळ्यांचं सत्र सुरुच, तिसरा बँक घोटाळा समोर. बदनापूर येथील कॅनरा बँकेत बनावट सोने तारण ठेऊन 7 कोटी 31 लाखांची फसवणूक झाल्याचं उघड. बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल. 22 एप्रिल 2026 रोजी बँकेत तपासणी सुरु असताना काही पाकिटात बनावट सोने असल्याचं निदर्शनास आलं. त्यानंतर सखोल चौकशी आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीत धक्कादायक बाब समोर आलीये. बँकेचे अधिकारी संजय डोंगरे हे स्ट्राँग रुममधून सोन्याची पाकिटे चोरून खिशात ठेवत असल्याचं सीसीटीव्ही कॅमेरात कैद झालं आहे. शाखा व्यवस्थापक विजेंद्र पाटणकर यांनी सुरक्षा नियमांच्या उल्लंघन केलंय. तर सुवर्ण मूल्यमापक प्रवीण बुऱ्हाडे यांनी बनावट सोन्याला खरे असल्याचे प्रमाणित करून बँकेची फसवणूक केली आहे. यात 22 पाकिटांमध्ये बनावट सोने आढळले, तर 30 सोन्याची पाकिटं गायब असल्याच निदर्शनास आलं आहे. त्यामुळं बँकेच्या व्यवस्थापकांनी दिलेल्या तक्रारीनुसार बँक मॅनेजरसह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून दोघांना अटक करण्यात आली.. दरम्यान जालना मर्चंट, पूर्णवादी नागरीक सहकारी बँकेनंतर आता बदनापूर मधील कॅनरा बँकेत घोटाळा झाल्याचं उघडकीस आल्यानं जिल्ह्यात खळबळ उडालीये...0
0
Report
वरुड में 16 वर्षीय बेटी के बाल कटवाकर घर में बिठाने, माता-पिता पर अत्याचार का मामला
Amravati, Maharashtra:16 वर्षीय तरूण मुलीचे टक्कल करून आई-वडिलांनी बसवलं घरात; मुलीवर मुलांची वाईट नजर नको म्हणून पालकांचा अजब प्रताप अमरावती जिल्ह्यातून वरुड पोलीस ठाण्याच्या हद्दीत 16 वर्षीय अल्पवयीन मुलीचे आई-वडिलांनीच केस कापून टक्कल केल्याची घटना घडली आहे. मुलीवर कुणाची वाईट नजर पडू नये या कारणावरून हा प्रकार केल्याचा आरोप आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तपास सुरू आहे. ही घटना अमरावती जिल्ह्यातील वरुड तालुक्यातील असून पीडित मुलीच्या म्हणण्यानुसार तिच्याकडे एका मुलाकडून वारंवार वाईट नजरेने पाहिले जात होते. या संदर्भात तक्रार करण्यासाठी आई-वडिलांनी तिच्यावर दबाव टाकला मात्र मुलीने तक्रार देण्यास नकार दिल्यानंतर संतप्त झालेल्या पालकांनी अत्यंत टोकाचा निर्णय घेत मुलीचे केस कापून टक्कल केले आणि तिला घरातच बसवून ठेवले. या घटनेनंतर मानसिक छळ सहन न झाल्याने मुलीने थेट वरुड पोलीस ठाण्यात धाव घेत आई-वडिलांविरुद्ध तक्रार दाखल केली. पीडित मुलीच्या तक्रारीवरून आई-वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान या विषयी पोलिसांना विचारले असता पोलिसांनी धक्कादायक माहिती दिली आहे. वरुड येथील मुलीवर तिची आई आणि सावत्र बापाने संशय घेऊन मारन्याची धमकी आणि शिवीगाळ केली. आता आम्ही तिला बालनिरीक्षक गृहात पाठवले आहे. मुलीवर संशय घेत तिच्या आईने आणि सावत्र बापाने पट्ट्याने मारहाण केली आहे इलेक्ट्रॉनिक स्ट्रिमर मशीनने तीचे केस कापले असल्याचं प्रभारी पोलीस निरीक्षक राहुल जाधव यांनी सांगितला आहे. सध्या सदर मुलगी ही आई वडिलाला सोडून आता महिला बालकल्याण समितीकडे आली असून तिच समुपदेशन या ठिकाणी केला जात आहे. या संदर्भात बालकल्याण समितीच्या सदस्या सुचिता बर्वे यांनी प्रतिक्रिया दिली. मुलीचे टक्कल केल आहे मुलगी सध्या बालगृहामध्ये आहे बालकांचे काही हक्क आहे तिच्या मानवी हक्काचे उल्लंघन कोणी करू शकत नाही हा आघात आहे. तिला विद्रुप केल असून तिला आई-वडिलाकडे जायचं नाही ती स्वतःहून आपल्याकडे आली आहे अशी माहिती त्यांनी दिली. या घटनेमुळे परिसरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मुलींचे संरक्षण करण्याऐवजी त्यांच्यावरच बंधने आणि शिक्षा लादण्याची मानसिकता अजूनही समाजात का आहे असा सवाल उपस्थित केला जात आहे. एकीकडे महिला सुरक्षेच्या मोठ्या घोषणा केल्या जात असताना दुसरीकडे अशा घटना समाजातील वास्तव दाखवतात मुलींना सुरक्षित वातावरण देण्याऐवजी त्यांच्या स्वातंत्र्यावर गदा आणणाऱ्या या मानसिकतेत बदल होणे गरजेचे आहे.0
0
Report
Advertisement
सांगली के पलूस में गारपिटी से फसलें तबाह, पृथ्वीराज देशमुख ने नुकसान जायजा
Sangli, Maharashtra:सांगली के पलूस तालुक्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या गारपिटीने शेतीचे मोठं नुकसान झालं आहे. दोन दिवसांपूर्वी अंकलखोप परिसरात प्रचंड गारपीट होऊन केळ्याची बाग जमीनदोस्त झाली होती, तसेच अन्य शेतीचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. नुकसानग्रस्त शेतीची भाजपाचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांनी पाहणी केली आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन देशमुख यांनी शेतकऱ्यांशी संवाद साधत नुकसानीचा आढावा घेतला, राज्य सरकारच्या माध्यमातून लवकरच नुकसान भरपाई मिळेल, असा आश्वासन दिले आहे.0
0
Report
अंबरनाथ फ्लॅट में किरायेदार का शव मिलने से हड़कंप
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये घरात आढळला भाडेकरूचा मृतदेह दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाल्याची शक्यता आनंदविहार संकुलातील घटनेनं खळबळ पोलिसांनी शिडी लावून घरात प्रवेश केला असता घराच्या बेडरूममध्ये बेडवर झोपलेल्या अवस्थेत किरण येळणे यांचा मृतदेह आढळून आला. त्यामुळे त्यांचा बहुधा झोपेतच हार्ट अटॅकने मृत्यू झाला असावा, अशी प्राथमिक शक्यता व्यक्त होतेय. दरम्यान, पोलिसांनी त्यांचा मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून त्यातून मृत्यूचं नेमकं कारण समोर येऊ शकणार आहे.0
0
Report
खानापूर में गर्मी से अंडे उत्पादन में रोज 8 लाख की गिरावट, पोल्ट्री किसान चिंतित
Sangli, Maharashtra:स्लग - खानापूर तालुक्यात अंडी उत्पादनाला वाढत्या उन्हाचा फटका, रोज आठ लाख अंड्याची घट.. अँकर - वाढत्या उन्हाच्या तडाख्यामुळे सांगलीच्या खानापूर तालुक्यातील अंडी उत्पादनावर मोठा परिणाम झाला आहे. रोजच्या अंडी उत्पादनामध्ये तब्बल आठ लाखांची घट होत आहे.त्यामुळे पोल्ट्री धारकांना मोठा आर्थिक फटका बसत आहे.विटा परिसरा सह खानापूर तालुक्यात दररोज 2 लाख अंड्यांचा उत्पादन होतं.मात्र सध्या उन्हाच्या वाढत्या कार्यामुळे अंडी उत्पादनात मोठी घट झाली आहे. उष्णतेपासून कोंबड्यांचे बचाव करण्यासाठी पोल्ट्री धारकांना अधिकचा खर्च देखील करावा लागत आहे.याशिवाय अंड्यांचे दर देखील आखाती युद्धामुळे कमी झाल्याने पोल्ट्री धारकांना मोठ्या आर्थिक भुर्दंडाला सामोरे जावे लागत आहे.0
0
Report
Advertisement
जऊळका में पानी कमी से मुंग की फसल संकट, किसान धरण खोलने की मांग
Washim, Maharashtra:जऊळका परिसरात शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा नैसर्गिक संकटाचं सावट पसरलं आहे. मुंग पिकाला वेळेवर आणि पुरेसं पाणी न मिळाल्याने उत्पादन घटण्याची भीती व्यक्त केली जात आहे. काटेपूर्णा धरणातील कमी पाणीसाठ्यामुळे शेतकरी अडचणीत सापडले आहेत, जऊळका या परिसरातील शेतकऱ्यांनी मोठ्या अपेक्षेने उन्हाळी मुंग पिकाची लागवड केली होती. मात्र पाणी अभावी पिकाची वाढ खुंटली असून उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता आहे. काटेपूर्णा धरणात पुरेसा पाणीसाठा नसल्याने शेतीसाठी आवश्यक पाणी मिळत नसल्याने धरणाचं खोलीकरण करण्याची मागणी शेतकरी करत आहेत.0
0
Report
शिरूर की सड़क पर गर्भवती माँ की प्रसूति, महिलाओं ने मदद से जन्म कराया
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भाग... दुपारची वेळ, आणि अचानक एका माऊलीच्या प्रसूती कळांनी परिसर हादरला. वेदना इतक्या तीव्र होत्या की पुढच्या एका मिनिटाचाही प्रवास करणं अशक्य झालं होतं. रुग्णालय दूर होतं आणि वेळ कमी... नियतीने जणू रस्त्यातच वाट अडवली होती. पण त्याचवेळी माणुसकीची ढाल होऊन शिरूरच्या रणरागिणी धावून आल्या! कोणतंही साधन नाही, ना वैद्यकीय उपकरणं... पण जिद्द होती त्या माऊलीला वाचवण्याची. परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा आडोसा केला. गजबजलेल्या रस्त्याचं रूपांतर काही क्षणातच एका तात्पुरत्या 'लेबर रूम'मध्ये झालं. ही लढाई फक्त त्या माऊलीची नव्हती, तर तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येक माऊलीची होती. केवळ महिलाच नाही, तर माहिती मिळताच डॉ. सुनिता पोटे यांनीही क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली. भर रस्त्यात, कडक उन्हात आणि धूळ-मातीच्या वातावरणात डॉक्टरांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने प्रसूती पार पाडली. अखेर त्या झाडाखालून बाळाच्या रडण्याचा आवाज आला आणि काळजाचा ठोका चुकलेल्या अनेकांच्या डोळ्यात आनंदाश्रू तरळले. डॉ. सुनिता पोटे(प्रसूती करणाऱ्या डॉक्टर) आजच्या डिजिटल युगात माणु�किती संपली की काय, असं वाटत असतानाच जोशीवाडीतील या घटनेने समाजाला एक वेगळाच आरसा दाखवलाय. माता आणि बाळ दोघेही अब सुखरूप आहेत. पण या संकटाच्या वेळी साड्यांची भिंत उभी करणाऱ्या त्या माता आणि देवदूतासारख्या धावून आलेल्या डॉक्टरांचं आज संपूर्ण जिल्ह्यात कौतुक होतंय.0
0
Report
मुंबई में मराठी अनिवार्यता से परप्रांतीय रिक्षाचालक पलायन, हजारों परिवार घर लौटे
Dhule, Maharashtra:मुंबईत रिक्षा चालकांना मराठीची सक्ती केल्यानंतर परप्रांतीय रिक्षाचालकांनी आपल्या घरची वाट धरली आहे. परवाने असतानाही फक्त मराठी भाषा शिकायला वेळ न दिल्यामुळे हे रिक्षा चालक आपल्या गावाकडे परतत आहेत. मुंबई आग्रा महामार्गावरती अशा रिक्षा चालकांचे जथे च्या जथे दिसून येत आहेत. मराठी भाषेच्या सक्तीमुळे परप्रांतीय रिक्षाचालकांचे पलायन सुरु झाले आहे. अस्वस्थ झालेल्या रिक्षा चालकांनी संसाराच्या गाडग्यासह असंख्य रिक्षाचालक उत्तर प्रदेश-बिहारच्या वाटेवर चालले आहेत. येत्या १ मे पासून रिक्षा परवान्यासाठी मराठी भाषा येणं बंधनकारक करण्यात आल्याने, परप्रांतीय रिक्षाचालकांचे धाबे दणाणले आहेत. या सक्तीमुळे मुंबई, नालासोपारा आणि उपनगरांमधील हजारो परप्रांतीय रिक्षाचालक आता आपल्या मूळ राज्याकडे, म्हणजेच उत्तर प्रदेश आणि बिहारकडे परतू लागले आहेत. विशेष म्हणजे, हे सर्व रिक्षाचालक आपल्या कुटुंबासह आणि घरातील सर्व सामानासह स्वतःच्या रिक्षातूनच हा हजारो किलोमीटरचा प्रवास करत आहेत. सध्या मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरून दररोज शेकडो रिक्षा यूपी-बिहारकडे जाताना दिसत आहेत. प्रवासात खाण्यासाठी सोबत बेकरीचे पदार्थ आणि पाणी घेऊन हे चालक मार्गस्थ झाले आहेत. रिक्षा चालक. अचानक घेतलेल्या या निर्णयामुळे परवाना रद्द होण्याची भीती या चालकांना सतावत आहे. अनेकांनी कर्ज काढून रिक्षा आणि परवाने घेतले आहेत, त्यामुळे आता रोजगार हिरावला गेल्याने जगायचे कसे, असा प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला आहे. आम्हाला मराठी भाषा शिकण्यासाठी सरकारने किमान काही महिन्यांचा वेळ द्यावा, एकदम परवाने रद्द करू नयेत', अशी आर्त हाक या रिक्षाचालकांनी दिली आहे. रिक्षा चालकांनी आपल्या घरची वाट धरल्याने महानगरांमध्ये रिक्षाचालकांचा तुटवडा जाणवू शकतो. प्रवाश्याना नसत्या जाचाचा त्रास सहन करावा लागेल. येणाऱ्या काही दिवसांमध्ये घराकडे जाणाऱ्या रिक्षा चालकांची संख्या अजून वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
