445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित पवार के एजेंडे पर शरद पवार का पलटवार, बारामती में बड़ा खेल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : शरद पवारांना विचारून आमचा पक्ष चालत नाही - उमेशा पाटील *- ऑन रोहित पवार कर्जत जामखेड :* - रोहित पवारांच्या विधानातून त्यांचा अजेंडा स्पष्ट होत आहे. - रोहित पवारांचा छुपा अजेंडा आहे की, अजितदादांची लिगसी स्वतःभोवती केंद्रित करण्यासाठी त्यांनी हा सगळा उद्योग मांडलेला आहे. - वडील, पती गेल्यानंतर त्याचे दुःख त्यांना माहिती, मात्र यांनी अजितदादांचा किती छळ केला हे आम्हाला माहिती है. - सुनेत्रा ताई लोकसभेला उभारल्यावर रोहित पवारांनी काय भाषणे केली होती ते सर्वांना माहिती. तेव्हा ते काका काकी नव्हते का? - अजित दादांचा पुतण्या असून, दादा हयात असताना ते तुम्हाला कळले नाहीत, त्यावेळी दादांना साथ द्यायची होती. - दादा गेल्यानंतर बारामती मतदारसंघ मोकळा झाल्यासारखं त्यांना वाटतंय. - बारामतीचा किल्ला आणि त्याची तटबंदी अभेद्य आहे. - बारामती या राजधानीवर रोहित पवारांसारख्या बांडगुळांना वर्चस्व गाजवता येणार नाही. - त्यांचा डोळा बारामतीवर आहे त्यामुळे अजितदादांबद्दल कळवा दाखवतात. *- ऑन राष्ट्रवादी विलीनीकरण :* - राष्ट्रवादीचे विलीनीकरण कधीही होणार नाही. - आमच्या पक्षातील आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना विलीनीकरण मान्य नाही. हे कधीही होणार नाही हे लॉक करून ठेवा. - तुतारीचे आमदार, खासदार फुटून घड्याळाकडे येऊ नये म्हणून विलीनीकरणाचे गाजर सातत्याने समोर ठेवले जाते. - विलीनीकरणाची चर्चा त्यांच्या पक्षातील आजी-माजी प्रदेशाध्यक्ष रोहित पवार करतात आमच्यातले कोणीही करत नाही. - सुनेत्रा पवार यांची बिनविरोध होऊ घातलेली निवडणूक बिनविरोध होई नये यासाठी या लोकांनी प्रयत्न केले. - जे उमेदवार अर्ज काढून घेत होते त्यांना काढू नका म्हणून त्यांनी (पवार गटाने) सांगितले. - रोहित पवारांना दादांबद्दल एवढा कळवळा होता तर मग बारामती ॲग्रोला मतदानादिवशी सुट्टी का दिली नाही? - मतदानासाठी शासकीय सुट्टी असताना रोहित पवारांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांना सुट्टी दिली नाही, कारण रेकॉर्डब्रेक मतदान होऊ नये म्हणून. - त्यामुळे यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे यांच्या पोटात आणि ओठात वेगळं आहे. *- ऑन भाजपसोबत गेल्यास वेगळा निर्णय :* - रोहित पवार हे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, सुप्रिया सुळे, जयंत पाटील यांच्यापेक्षा वरिष्ठ नेते झालेले आहेत. *- 2016 पुणे जिल्हा परिषद निवडणुकीच्या दरम्यान रोहित पवारांनी जर मला तिकीट नाही दिलं तर मी आणि आमचा परिवार भाजपमध्ये जाऊ अशी धमकी शरद पवारांना दिली होती.* - त्यावेळी शरद पवारांनी अजित दादांना विचारायला सांगितलं. 2016 मध्ये रोहित पवार भाजप मध्ये जाण्याचा प्रयत्न करत होते. - विलीनीकरण होणार होतं म्हणजे काय? आमचे आमदार तुतारीकडे जाणार होते का? - रोहित पवारांना मंत्री होण्याची अपेक्षा होती परंतु त्यांना अडथळा निर्माण झाला म्हणून ते आमच्या नेत्यांमागे लागले होते. - उद्या रोहित पवारांना कुठूनही ऑफर मिळाली तर ते तिकडे जाऊ शकतात *- ऑन राष्ट्रवादी फेरबदल :* - रोहित पवारांना कर्जत जामखेडच्या प्रश्नांपेक्षा इतर सर्व प्रश्नांमध्ये इंटरेस्ट आहे. - ते विरोधी पक्षात आहेत मात्र भाजपाच्या संदर्भात त्यांना बोलताना केव्हा पाहिला आहे का? - शिवसेना एकनाथ शिंदे संदर्भात बोलतात ka? - मतदार संघामध्ये एमआयडीसी आणण्याचं गाजर दाखवलं त्यावर ते बोलतात ka? - ते फक्त आमच्या पक्ष.. घडामोडींवर बोलतात - कोणाला मंत्री करायचं कोणाला काढायचं हा अधिकार सर्वस्वी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना आहे. - रोहित पवार स्वतःला मुख्यमंत्र्यांच्या वरचे सुपर पॉवर समजतात का? *- ऑन शरद पवारांकडे साकडे :* - घड्याळ चिन्हाच्या पक्षाच्या लोकांनी जाऊन शरद पवारांकडे आमचं गाऱ्हाणं मांडण्याचा विषयच कुठे येतो? - शरद पवारांना विचारून आमचा पक्ष चालत नाही.. आमचा पक्ष हा सुनेत्रा पवारांच्या विचारांनी चालतो - हे रोहित पवार बोलतात शरद पवार स्वतः असं म्हणतात ka? ( भेटायला आलेल्या घडायचे लोकांनी मला असं असं म्हटलं ) - पार्थ पवारांना समज द्यावी असं सांगायला आमचे नेते गेले होते असं सुपीक बुद्धीतून कुठे जन्माला आल? - यामध्ये रोहित पवार अशा पद्धतीचे फेक स्टेटमेंट करतात.. काला कसलाही आधार नसतो. - माध्यमांमध्ये आमच्या पक्षाबद्दल उलट सुलट चर्चा व्हावी.. आमदार,नेते, कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा याच्याकरता ते प्रयत्न करत असतात. *- ऑन शरद पवार :* - कोणत्या आमदारांनी शरद पवार साहेबांना फोन केला ते सांगा. - आमच्या पक्षातील आमदार सत्तेत नसणाऱ्या पक्षाकडे जाऊन काय साध्य करणार. - आमच्या सर्व आमदारांचा सुनेत्रा वहिनी पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास आहे. - अजितदादां मूळे ते आमदार म्हणून निवडून आले. दादांमुळेच त्यांच्या मतदारसंघात निधी मंजूर झाला. विकास कामे झाली आणि ते निवडून आले. - दादांनंतर त्यांच्या कुटुंबीयांच्या पाठीमागे भक्कमपणे उभा राहण्याचा निर्णय सर्व आमदारांनी घेतला. - आमच्या आमदारांच्या मनात काही शंका असतील तर ते सुनेत्रा वहिनी यांच्याकडे जातील. - या सर्व बातम्या खोट्या आहेत ते रोहित पवार पेरत आहेत. *- ऑन मुख्यमंत्री पार्थ पवार भेट :* - संसदेतील सदस्य म्हणून पार्थ पवार हे सरकार मधल्या कामामुळे फडवणीस यांना भेटले. - मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान यांना भेटायला जाताना मुख्य नेते सोबत असावं असं काही नसतं. - मुख्यमंत्री यांची वेळ तातडीने मिळाली असेल त्यामुळे ते भेटायला गेले असतील *- ऑन रोहित पवार आमदार कॉल :* - अजितदादांच्या निधनानंतर अवघ्या दोन तासात रोहित पवार यांनी आमदारांना कॉल लावला हे सत्य आहे. - त्यावेळेस आपल्याला एकत्र यावे लागणार आणि साहेबांच्या नेतृत्वाखाली एकत्र काम करू. - अशा प्रकारचे फोन तुतारींच्या नेत्याकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना सुरू झाले होते. - अजितदादांच्या कुटुंबीयांना बाजूला करून हा पक्ष गिळंकृत करायचा प्रयत्न होता. - तुतारीच्या नेत्यांना विलीनीकरणाच्या नावाखाली हा पक्ष ताब्यात घेण्याची घाई झाली होती. *- हे षडयंत्र लक्षात आल्याने तातडीने सुनेत्रा वहिनींची उपमुख्यमंत्रीपदी शपथ झाली. या अस्वस्थतेतून रोहित पवार आमच्या पक्षाला टार्गेट करत असतात.* *- ऑन जिशान सिद्धकी आमदारकी :* - सुनील तटकरे यांना बदलून दुसऱ्या कोणाला नेमले असं पत्र पक्षाकडून काढला आहे का? - त्यामुळे सुनील तटकरे हे सध्यातरी आमचे प्रदेशाध्यक्ष आहेत. *- निवडणूक आयोगाच्या पत्र व्यवहारांमध्ये सुनील तटकरे यांच्या नावासमोर प्रदेशाध्यक्ष लिहिलं नाही म्हणून त्यांना पदावरून कमी केलं असा अर्थ काढण्याची गरज नाही.* *- ऑन राष्ट्रवादी पक्ष फुटी :* - पक्षफुटी संदर्भात आमदारांच्या मनात तीळमात्र शंका नाही. - हे जाणीवपूर्वक बातम्या पेरण्याचं काम मीडियाला हाताशी धरून केलं जात आहे. सध्याचे आमदार जाणार कुठे, फुटून काय तुतारीत जाऊन बसणार का.? *- उमेश पाटील ऑन रोहित पवार :* - लहान्या भावाला दिलेला सल्ला आम्ही पार्थ पवारांपर्यंत पोहोचवू. *- रोहित पवारांचा स्वभाव कसला आहे ते संबंध बारामती कराना माहिती आहे* - आम्ही पार्थ पवार यांच्यासोबत काम करतोय, कुणीही हलक्या कानाच नाही. स्वभावाचा विचार केला असता, रोहित पवार यांचा स्वभाव कसला आहे, याबाबत सगळ्या बारामतीकराना आणि त्यांच्या मतदार संघाला माहिती आहे. - रोहित पवार यांना कार्यकर्ता जवळ आलेला सहन होत नाही, त्यांच्या जवळ शंभर दीडशे पी ए आहेत, पी ए च्या फिल्टर मधून जाऊन कार्यकर्त्याची भेट होते. अशी बाब पार्थ पवारांच्या बाबतीत नाही. - कुठलाही कार्यकर्ता थेट पार्थ पवारांना कॉल करू शकतो, तसं रोहित पवारांना थेट कॉल केला तर शिव्या पडतात. त्यामुळे स्वभाव बदलण्याची आवश्यकता रोहित पवाराना आहे . *- ऑन कृषी कर्ज माफी :* - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 30 जून पर्यंत कर्ज माफी करू असे सांगीतल आहे. - हा त्यांचा निर्णय स्वागतार्ह आहे, अतिवृष्टी मुळे शेतकरी अडचणीत आला आहे. - मी हिरोगिरी करत असेल तर ठीक आहे, तुम्ही मात्र महाराष्ट्र राज्याचे व्हीलन होऊ नका. - तुमचं पितळ उघडे पाडायला साध्या कार्यकर्त्याची गरज आहे. जे सत्य आहे ते सत्य आहे, हिरोगिरीची आवश्यकता नसते. *- ऑन संजय शिरसाठ :* - एक आनंद परांजपे यांचा प्रवेश झाल्याने हुरळून जाऊ नका. तुमचे अनेक नेते आमच्या संपर्कात आहेत. - माईक समोर आला म्हणून काहीही बोलू नका. *- ऑन राष्ट्रवादी काँग्रेस प्रवेश :* - फुले,शाहू, आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या विचाराने कार्यरत आणि सत्तेत असणारा एकमेव पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. - विरोधात असणारे सेक्युलर पक्ष आहेत आणि त्यांच्या पक्षाचे आमदार आणि खासदार यांना त्यांच्या विचारांशी कॉम्प्रमायज करायचं नाही. आणि त्यांच्या मतदारसंघात त्यांना विकास काम देखील करायचे आहेत. - त्यामुळे विरोधात असलेल्या पार्टीचे जे आमदार, खासदार आहेत. त्यांना जर पक्षांतर करायचं असेल तर प्राधान्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घड्याळ आहे. - सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वात विरोधातील आमदार, खासदार असतील किंवा इतर पक्षातील असतील ते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या संपर्कात आहेत. - याबाबतीत लवकरच तुम्हाला घडामोडी झालेल्या दिसतील. *- ऑन दादा घातपात रोहित पवार वक्तव्य :* - रोहित पवार जे बोलले आहेत ते कुठल्या संदर्भाने बोलले आहेत. - ज्यावेळेस स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होत्या तेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आणि तुतारी पक्ष हा एकत्रित लढला त्यामुळे आमचा विरोधकच भाजप होता त्यावेळेसची ती परिस्थिती होती. - मग अजित दादांकडे कोणती फाईल होती ती रोहित पवारांनी सांगावे. आणि त्या फायली कोणाकडे असतात गृहविभागाकडे, सीआयडी, सीबीआय आणि ईडीकडे असतील आमच्याकडे कसे असणार फाईल आमच्याकडे कुठे असलं खातं आहे. - रोहित पवार हे मनाने काहीतरी गप्पा मारतात त्यांच्या बोलण्यामध्ये काही तथ्य नाही. - अजित दादा पवार यांचा अपघात की घातपात हे त्यांच्याच पक्षातील राष्ट्रीय आणि सर्वोच्च नेत्यांनी अजितदादांच्या अंत्यविधी अगोदरच हा घातपात नसून अपघात आहे असे पत्रकार परिषद घेऊन सांगितलं होतं. - ज्येष्ठ नेते शरद पवार हे त्यांच्या अनुभवाच्या जोरावरच पत्रकार परिषद घेऊन हे कारण सांगितलं असेल मात्र रोहित पवार हे विपरीत बोलत आहेत. - रोहित पवार यांनी जे अजित पवारांच्या अपघाताबद्दल जे मुद्दे घेतले आहे ते योग्य आहेत आमचं त्याला समर्थन ही आहे.आम्ही ते नाकारत नाही. - याबाबत सीबीआयकडे आम्ही त्यांचे मुद्दे घेऊन पत्र दिलं आहे. - रोहित पवारांचा उद्देश हा अजित पवार यांच्या अपघात आणि शोध लागावा यासाठी नसून अजित पवार यांची सहानभूती आपल्याकडे केंद्रित करण्याचा आहे. - आणि भविष्यकाळात बारामती मतदार संघावर आपला दावा करणं ही धडपड आहे. अजित पवारांच्या प्रेमापोटी नाही. BYTE : उमेश पाटील (नेते, राष्ट्रवादी अजितदादा गट)0
0
Report
कल्याण के चक्की नाका क्षेत्र में तबेले की माला गिरने से दो कर्मचारी घायल
Kalyan, Maharashtra:कल्याणपूर्वेच्या चक्की नाका परिसरातील तबेलाचा काही माळा कोसळला. या दुर्घटनेमुळे मोठा गोंधळ उडाला होता. चक्की नाका परिसरात गाई आणि म्हशींचा तबेला आहे. या तबेलामध्ये चारा ठेवण्यासाठी जो माळा बनवण्यात आला होता तो सायंकाळी आठच्या सुमारास अचानक कोसळला. यात तबेलातील दोन कर्मचारी किरकोळ जखमी झालेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार करून त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. दरम्यान या दुर्घटनेनंतर तब्येतीला साहित्य त्याचबरोबर गाई आणि म्हशी दुसरीकडे स्थलांतरित करण्याचे काम सुरू आहे. अग्निशमन दल घटनास्थळी पोहोचलं आणि त्यांनी त्या ठिकाणी मदतकार्य केलं.0
0
Report
ATM से गलत निकासी: 100 के बदले 500, 400 के बदले 2000, वीडियो वायरल
Vasai-Virar, Maharashtra:वसईच्या गोलानी नाका परिसरात एका एटीएम मशिनने ग्राहकांना अक्षरशः ‘लॉटरी’ लावल्याचा प्रकार समोर आला आहे. हिताची एटीएममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने 100 रुपयांऐवजी 500 रुपये, तर 400 रुपयांऐवजी थेट 2000 रुपये बाहेर येत असल्याचा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेचा व्हिडिओ एका ग्राहकाने मोबाईलमध्ये कैद केला असून, तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, माहिती मिळताच बँक प्रशासन आणि संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली असून, एटीएम सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
जुन्नर बेल्हे में ST बस पलटी, एक की मौत, कई घायल
Shirur, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील बेल्हे येथील गुळुंचवाडी फाट्यावर आज सायंकाळी 5 वाजता महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाची लालपरी एसटी बस पलटी झाल्याची घटना घडली आहे. यात चालकासह 1 प्रवासी मृत झाले आहेत. बस क्रमांक MH14-BT 4023 ही बस भिवंडी डेपोची असून शेगावहून कल्याणकडे जात होती. अपघाताच्या वेळी बसमध्ये प्रवाशांची संख्या 30 ते 35 होती. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. अपघातात अनेक प्रवासी जखमी झाल्याची माहिती मिळत असून स्थानिक नागरिकांच्या मदतीने तात्काळ बचावकार्य करण्यात आले. सर्व जखमींना उपचारासाठी अळेफाटा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
जालना में अवैध खाद स्टॉक गिरफ्तार, किसान धोखाधड़ी रैकेट का पर्दाफाश
Jalna, Maharashtra:जालना शहरातील नवीन मोंढा परिसरात ही घटना समोर आली आहे.शेतकऱ्यांची फसवणूक करून अनधिकृतरीत्या खतांचा साठा करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा कृषी विभागाच्या भरारी पथकाने पर्दाफाश केला आहे. या कारवाईत तब्बल १ हजार ७६२ खताच्या गोण्या आणि जवळपास १८ लाख ७ हजार १८४ रुपयांचा संशयित खतसाठा जप्त करण्यात आला आहे.विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेलं खत नांदेडमधील इफको फर्टिलायझर्सकडे विक्री झाल्याचं नमूद करण्यात आलं होतं.मात्र प्रत्यक्षात हे खत जालन्यातील जय भारत अँग्रो ट्रेडर्सच्या गोदामात आढळून आल्यानं चंदनझिरा पोलीस ठाणीयात जय भारत अँग्रो ट्रेडर्सचे मालक आकाश बायस यांच्यासह नांदेडचे इफको फर्टिलायझर्सचे मालक अनिल बाळा प्रसाद मंत्री यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
घोड़ागाड़ी से इंधन बचत का संदेश, सांसदों की अनोखी पहल सुर्खियों में
Sangli, Maharashtra:संगलीमध्ये आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांनी थेट घोडा गाडीतून प्रवास केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इंधन बचतीच्या आव्हानाच्या पार्श्वभूमीवर रयत क्रांती संघटनेच्या वतीने सांगलीत आत्मनिर्भर भारत नागरिक शेतकरी कष्टकरी परिषदेचा आयोजन करण्यात आलं. या परिषदेला आमदार सदाभाऊ खोत व आमदार गोपीचंद पडळकर यांनी इंधन बचतीचा संदेश देण्यासाठी शरदला सर्किट हाऊस येथून मारुती चौकापर्यंत घोडा गाडी चालवत प्रवास केला आहे. आमदार महोदय घोडा गाडीतून जात असल्याने यावेळी अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.0
0
Report
Advertisement
संगमनेर में जल संकट पर मंत्री विखे पाटील ने अधिकारियों के खिलाफ सख्त कार्रवाई की चेतावनी दी
Shirdi, Maharashtra:राज्यात जलसंपदा मंत्री विखे पाटील व जिल्हाधिकारी पंकज आशिया यांच्या उपस्थितीत आज संगमनेर शहरात आढावा बैठक पार पडली. यावेळी मोदी यांच्या आवाहनानुसार विखे यांच्या ताफ्यात वाहने कमी असली तरी आढावा बैठकीला आलेल्या कार्यकर्त्यांच्या गाड्यांची संख्या मोठ्या प्रमाणात दिसून आली. बैठकीत विखे पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या समस्या जाणून घेतले आणि अनेक अधिकाऱ्यांना फैलावर घेतले. संगमनेर शहरातील आढावा बैठकीत वाढत्या उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण भागातील पाणी आणि विजेच्या समस्या मोठ्या प्रमाणात आल्यानंतर विखे यांनी ग्रामसेवकांना नाराजी व्यक्त केली. निवडणुका झाल्यानंतर नागरिकांना आधार देण्यासाठी काम करा; प्रश्न सोडवा, कायदा आणि प्रशासनात बदल गरजेचे.0
0
Report
उल्हासनगर रेल्वे से 21 किलोग्राम गांजे की तस्करी: तीन गिरफ्तार
Ambernath, Maharashtra:उड़ीसाहून रेल्वे ने उल्हासनगर में 21 किलोग्राम गांजे की तस्करी रोक दी; रिक्षा से सप्लाई से पहले ही अपराध शाखा का धड़ाकेदार छापा, तीन आरोपियों को हिरासत में लिया गया। उल्हासनगर अपराध शाखा ने मादक पदार्थों के विरुद्ध बड़ी कार्रवाई कर 9 लाख 35 हजार रुपए के सामान को जप्त किया है। इस मामले में तीन आरोपियों को गिरफ्तार किया गया। पुलिसकर्मियों ने घुमते समय उल्हासनगर-1 क्षेत्र के अमरदाय कंपनी के बाहर एक संदिग्ध रिक्षा देखी। जांच के दौरान रिक्षा से बड़े पैमाने पर गांजा मिला। इस कार्रवाई में रिक्षा चालक हिदायतुल्ला बिसमिल्ला शेख तथा उड़ीसा राज्य के बिकास बिकरम रणबैसा और सुधीर धरूबा रणबैसा को गिरफ्तार किया गया। पुलिस पूछताछ में आरोपियों ने बताया कि उड़ीसा से रेलमार्ग के जरिए गांजे की बोरियाँ लाकर यह माल रिक्षा के माध्यम से अम्बरनाथ क्षेत्र के बाबू खान को बिक्री हेतु ले जाया जा रहा था। इस दौरान अपराध शाखा ने घेराबंदी कर आरोपियों को रंगे हाथ पकड़ा। आरोपियों के पास से 21.584 किलोग्राम गांजा, तीन मोबाइल फोन और परिवहन हेतु इस्तेमाल की गई रिक्षा बरामद हुई, कुल मिलाकर 9,35,360 रुपयों का माल जप्त किया गया। इस घटना से रेलवे के रास्ते मादक पदार्थों की तस्करी कितनी आसानी से हो रही है, इस पर गंभीर चिंता व्यक्त की जा रही है। इतने बड़े पैमाने पर गांजा रेलमार्ग से शहर में लाया गया है, जिससे रेलवे सुरक्षा तंत्र और जाँच व्यवस्था पर सवाल उठ रहे हैं। इस मामले की आगे की जांच उल्हासनगर अपराध शाखा कर रही है, और यह देखा जा रहा है कि इस रैकेट के पीछे और कौन-कौन सा सहभागी है। चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर0
0
Report
चंद्रपुर शहर में जल संकट गहरा, टँकर कम पड़ रहे, नलों की सप्लाई असंतोषजनक
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील विविध भागात पाणीटंचाईची बिकट स्थिती, शहरातील मनपाच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या टँकर बाबत नागरिक असमाधानी ,नळ योजनेद्वारे होणारा पुरवठा अनियमित, नागरिक टॅंकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून आता पाणी साठवण्यासाठी करत आहेत धडपड चंद्रपूर शहराच्या विविध भागात पाणीटंचाईची स्थिती बिकट होत चालली आहे. शहर जिल्ह्यात बाराशे ते चौदाशे मिलिमीटर पाऊस नोंदविला जातो. इरई धरणातील पाणी शहराच्या विविध भागात पोहोचवणाऱ्या जलवाहिन्या अमृत टप्पा एक व दोन बिनकामाच्या ठरल्या आहेत. मनपाच्या 11 टँकरच्या माध्यमातून शहरात सुरू करण्यात आलेल्या पाणीपुरवठा स्थितीबाबत नागरिक असमाधानी आहेत. शहराचे हृदय स्थान असलेल्या जटपुरा प्रभागात स्थितीत त्याहून वाईट आहे. नळाद्वारे होणारा पुरवठा अनियमित असून टँकरही अपुरे पडत आहेत. टँकर बुक केल्यावर तीन दिवसांनी तो पाठविला जात असल्याने टँकर येताच आपली दैनंदिन कामे सोडून नागरिक पाणी साठवण्याची धडपड करत आहेत. शहरात मनपाचे नवे कारभारी पदारुढ झाल्यानंतरही प्रत्यक्ष पाणीपुरवठा स्थितीत मात्र बिघाड होत चालला आहे. यामुळे नागरिक त्रस्त आहेत.0
0
Report
Advertisement
वायरल ऑडिओ क्लिप: मंदिर समिति ने नंबर वाले के खिलाफ दर्ज किया मामला
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती कडून व्हायरल ऑडिओ क्लिप ची दखल, क्लिप मधील मोबाईल नंबरच्या व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल श्री विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी प्रति मानसी दोनशे रुपये असे प्रमाणे पाच माणसांसाठी एक हजार रुपयांची मागणी भाविकाकडे करणारी ऑडिओ क्लिप समाज माध्यमांमध्ये व्हायरल झाली होती. यामध्ये पैसे मागणाऱ्या व्यक्तीने आपल्या अकाउंट कर्जाचे हप्ते चुकल्याने मायनस झाले आहे. त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीच्या क्रमांकावर दर्शनासाठी ची रक्कम पाठवावी अशी मागणी भाविकाकडे केली आता त्या क्रमांकाच्या व्यक्तीविरोधात श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने गुन्हा दाखल केल्याची माहिती व्यवस्थापक प्रवीण घम यांनी दिली आहे.0
0
Report
नितेश राणे बोले: सिंधुदुर्ग के महत्त्वाकांक्षी पर्यटन प्रकल्प से विकास
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे रोहित पवार पर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पर और पार्थ पवार पर दिए गए उनका वक्तव्य। 2019 में रोहित पवार भाजपा में आने की बातचीत हुई थी; उनका द्वेष किसी के पक्ष में नहीं है। अगर सही तरीके से घड़ी-बंद होती तो रोहित पवार आज भाजपा के विधायक होते। बच्चू कडूं ने कहा कि महायुती सरकार है; देवेंद्र फडणवисс सक्षम मुख्यमंत्री हैं; शिंदे उनके समर्थन में। पार्थ पवार ने कहा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्य के परिवार प्रमुख हैं, सब कुछ उनके पास है। गुलदार बोट प्रकल्प महत्त्वपूर्ण है; कुछ महीनों पहले मुख्यमंत्री और दोनों उपमुख्यमंत्रियों ने हिरवा कंदील दिया था; सिंधुदुर्ग जिले के पर्यटन के लिए लाभकारी; मछुआरों को नुकसान नहीं होगा; पर्यटन बढ़ेगा; हमारे खात्याने यह निर्णय लिया है।0
0
Report
पेट्रोल 120 से 30 तक? जयंत पाटील का दावा, डॉलर भी 100 के पार
Sangli, Maharashtra:स्लग - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 जातील, डॉलर शंभर रुपयांवर, तर लॉकडाऊन सारखी परिस्थिती निर्माण होण्याची आमदार जयंत पाटील यांनी व्यक्त केली भीती... अँकर - देशात पेट्रोलचे दर 120 ते 30 रुपये होतील, डॉलरचा दर शंभर रुपये पर्यंत जाईल, असे विधान राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी करत भाजपावर टीका केली आहे. तसेच देशात आपोआप लॉकडाऊन लागेल की, काय ? अशी भीती आपल्या मनात निर्माण झाल्याचे जयंत पाटलांनी व्यक्त केली आहे. पंतप्रधानांनी केलेल्या इंधन बचतीच्या आव्हानावर देखील खोचक टीका केली आहे, ते सांगलीच्या ईश्वरपूर येथे शेतकरी नेते रघुनाथदादा पाटील यांच्या अमृत महोत्सवाच्या कार्यक्रमादरम्यान बोलत होते. साऊंड बाईट - जयंत पाटील - आमदार राष्ट्रवादी काँग्रेस ( SP )0
0
Report
Advertisement
वाशीम में गो तस्करी: चोर बेहोश कर डालने की कोशिश CCTV में कैद
Washim, Maharashtra:वाशीम: अँखर: गो तस्करीचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे, वाशिम शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात रात्रीच्या सुमारास आलिशान कारमधून आलेल्या चोरट्यांनी गायला गुंगीचे औषध देत बेहोश करून गाडीत टाकण्याचा प्रयत्न करत असताना अचानक त्या परिसरातील एक व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करांनी तिथून पळ काढला.दरम्यान परिसरातील व्यक्ती घरातून बाहेर आल्याने गो तस्करीचा प्रकार टळल्याचं समोर आल आहे.याप्रकरणी गो रक्षकांनी वाशिम शहर पोलिसात तक्रार देत गुन्हा दाखल करून, जखमी गायी वर उपचार केले. हा सर्व गो तस्करीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे.0
0
Report
मुख्यमंत्री के निर्देश के बावजूद संगमनेर में मंत्री विखे पाटील के नेतृत्व में बैठकें
Shirdi, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ऑनलाईन बैठका घेण्याचे आणि उद्घाटन-राजकीय कार्यक्रम टाळण्याचे निर्देश दिले असताना... मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत संगमनेर तालुक्यात शासकीय बैठका, उद्घाटन समारंभ आणि राजकीय कार्यक्रमांचे आयोजन... मंत्री विखेच्या ताफ्यात अधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या 25 ते 30 वाहनांची संख्या... मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांची उपस्थिती... अहिल्यानगर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण...0
0
Report
अकोला में पति-पत्नी के विवाद में पत्नी की हत्या, आरोपी गिरफ्तार
Akola, Maharashtra:पती-पत्नीच्या वादाने पुन्हा एकदा हिंसक वळण घेतल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. डाबकी रोड पोलीस स्टेशन हद्दीतील गजानन नगर परिसरात पतीने भररस्त्यात पत्नीवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीती आणि खळबळ निर्माण झाली आहे. पोलिसांनी आरोपी पतीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. मंदा दीपक गुडडे असे मृत महिलेचे नाव आहे. तर आरोपी पतीचे नाव दीपक गुडडे असे आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये गेल्या काही दिवसांपासून घरगुती कारणांवरून सतत वाद सुरू होता. पहाटेच्या सुमारास दोघांमध्ये पुन्हा वाद झाला. त्यानंतर मंदा गुडडे या दूध आणण्यासाठी घराबाहेर पडल्या.यावेळी आरोपी पती दीपक गुडडे याने त्यांचा पाठलाग केला आणि गजानन नगर परिसरात भररस्त्यात गाठून चाकूने हल्ला चढविला. अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात एकच गोंधळ उडाला. गंभीर जखमी झालेल्या मंदा गुडडे यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच डाबकी रोड पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. तसेच आरोपी दीपक गुडडे याला ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास डाबकी रोड पोलीस करीत आहेत. घरगुती वाद आणि क्षणिक रागातून घडलेल्या या घटनेमुळे एका महिलेचा जीव गेला तर एका कुटुंबाचे आयुष्य उद्ध्वस्त झाले आहे. किरकोळ वादाचे रूपांतर थेट हत्येत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
