icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गड़चिरोली विमानतळ भूसंपादन स्थगित, किसानों को लिखित आश्वासन मिलने के बाद आंदोलन समाप्त

Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोलीत काँग्रेसचे आंदोलन संपले, विमानतळ भूसंपादन प्रक्रियेेला तात्पुरती स्थगिती, शेतकऱ्यांना लेखी आश्वासन, मुख्यमंत्र्यांशी चर्चेनंतर अंतिम निर्णय, सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांची आंदोलनस्थळी भेट, जनभावनांचा आदर राखत शासनाची सकारात्मक भूमिका गडचिरोलीत विमानतळासाठी भूसंपादन प्रक्रियेविरोधात जिल्हा मुख्यालयात मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या काँग्रेसच्या शेतकरी आंदोलनाची दखल घेत जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिनिधी म्हणून आंदोलनस्थळी भेट देऊन आंदोलक शेतकऱ्यांशी रात्री उशिरापर्यंत sविस्तर चर्चा केली. यावेळी त्यांनी विमानतळ भूसंपादनासंदर्भातील पुढील प्रक्रिया सध्या तात्पुरती स्थगित करण्यात येत असल्याचे जाहीर करत अंतिम निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून घेतला जाईल, असे आश्वासन दिले. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीचे लेखी पत्रही आंदोलक शेतकऱ्यांना देण्यात आले. गडचिरोली येथे विमानतळ उभारणीसाठी शिरापूर चक, गुरुवळा, हिरापूर आणि राखी या गावांमधील सरकारी, खाजगी तसेच वन विभागाच्या अखत्यारितील एकूण ३११.८१ हेक्टर आर जमीन संपादित करण्यासाठी राज्य शासनाने १२ मे २०२६ रोजीच्या शासन निर्णयान्वये १०४ कोटी ४८ लाख ६४ हजार २३९ रुपयांच्या खर्चास प्रशासकीय व वित्तीय मान्यता प्रदान केली आहे. या निर्णयाविरोधात ठिय्या आंदोलन सुरू झाले होते. नागरिकांनी लोकशाही मार्गाने आंदोलन केले असून शासन जनभावनांचा पूर्ण आदर करते. कोणतेही काम बळजबरीने करण्याची शासनाची भूमिका नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले असून विकास आणि लोकहित यांचा समतोल राखण्यावर भर दिला आहे. यासोबतच प्रस्तावित चामोर्शी औद्योगिक वसाहतीच्या टप्पा पाच अंतर्गत लॉईड्ससाठी तसेच JSW कंपनी बाबत सुरू असलेल्या भूसंपादन प्रक्रियेबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली. भूसंपादन अधिसूचनेनुसार सुरू असलेल्या या प्रक्रियेत संबंधित नागरिक व शेतकऱ्यांना हरकती आणि सूचना नोंदविण्यासाठी ९० दिवसांची मुदतवाढ देण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
0
0
Report

उमेश दलवी हत्या मामला: सचिन साठे पीड़ित परिवार से मिले, मुख्यमंत्री से मुलाकात योजना

Beed, Maharashtra:ANC - कामगार उमेश दळवी खूनप्रकरणात आतापर्यंत पोलिसांनी केवळ एका आरोपीला अटक केली असून, पीडित कुटुंबाने सुरुवातीपासून या गुन्ह्यात तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आरोप केला असून मात्र उर्वरित संशयितांबाबत अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नसल्याने कुटुंबीयांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. दरम्यान, लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे चुलत नातू सचिन साठे यांनी आज पीडित कुटुंबाची भेट घेत त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या. यावेळी त्यांनी वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशीही चर्चा करून तपासाची माहिती घेतली. सचिन साठे यांनी या प्रकरणात पीडित कुटुब्लाला न्याय मिळवून देण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार असल्याचे सांगितले. तसेच दोषींवर कठोर कारवाई होऊन संपूर्ण सत्य समोर आणण्यासाठी आपण पाठपुरावा करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
0
0
Report
Advertisement

शिवाजी महाराज के शिवराज्याभिषेक दिवस पर देशभर में रायगड़ में बड़ा उत्साह

Yeola, Maharashtra:हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवराज्याभिषेक सोहळ्याला 352 वर्ष पूर्ण झाले असून देशभरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा शिवराज्याभिषेक दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे स्वराज्याची राजधानी रायगडावर सकाळपासूनच लाखोंच्या संख्येने मावळे दाखल झाले आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून येवला शहरात शिवसृष्टी उभारण्यात आली असून या ठिकाणी देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश पुतळ्याला शेकडो शिवप्रेमींनी सकाळपासून अभिवादन केले असून बनकर पाटील स्कूलच्या विद्यार्थ्यांनी या ठिकाणी भेट देऊन अभिवादन केले या ठिकाणी शिवव्याख्याते दीपक देशमुख यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची पाने उलगडत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले .
0
0
Report

कांदा खरीदी शर्तों में ढील, किसान बोले- मिनिमम 2000 रुपये क्विंटल चाहिए

Shirdi, Maharashtra:राज्य सरकारने शासकीय कांदा खरेदीच्या अटी शिथिल करून शेतकऱ्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला खरा , पण हा शासन निर्णय अद्याप कागदावरच असल्याने कांदा उत्पादक शेतकरी प्रचंड अडचणीत सापडला आहे. कांदा उत्पादनासाठी प्रति क्विंटल २ हजार रुपयांपर्यंत खर्च येत असतांना मात्र , शेतकऱ्याच्या पदरात १२०० रुपये पडत असल्याने शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान होत असल्याने, शासनाने तातडीने हस्तक्षेप करून कांद्याला प्रति क्विंटल किमान २ हजार रुपये भाव जाहीर करावा , अशी आर्त हाक श्रीरामपूर येथील कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी सरकारला दिली आहे.
0
0
Report

CAMIT ने डीज़ल खरीद-आपूर्ति पर जारी नियमों से बना भ्रम, तत्काल स्पष्टीकरण की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर चेंबर ऑफ असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र इंडस्ट्री अँड ट्रेड (CAMIT) ने अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाने जारी केलेल्या डिझेल खरेदी व पुरवठा संदर्भातील परिपत्रकाच्या संभाव्य परिणामांबाबत गंभीर चिंता व्यक्त केलीय. जमाखोरी, काळाबाजार आणि पेट्रोलियम पदार्थांच्या अनधिकृत वापरावर नियंत्रण आणण्यासाठी राज्य शासनाच्या प्रयत्नांचे CAMIT पूर्णपणे समर्थन केले असले तरी, सदर परिपत्रकाची सद्यःस्थितीतील अंमलबजावणी राज्यातील लाखो प्रामाणिक डिझेल ग्राहकांसाठी गोंधळ, अडचणी आणि अनावश्यक त्रास निर्माण करू शकते, अशी भीती CAMIT ने व्यक्त केली आहे. याबाबत, तातडीने आवश्यक स्पष्टीकरण जारी करण्यात आले नाही तर या परिपत्रकाचा परिणाम रुग्णालये, नर्सिंग होम्स, डायग्नोस्टिक सेंटर्स, गृहनिर्माण संस्था, निवासी संकुले, हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बँक्वेट हॉल्स, शैक्षणिक संस्था, किरकोळ दुकाने, व्यापारी प्रतिष्ठाने, लघु व मध्यम उद्योग, गोदामे, कोल्ड स्टोरेज, टेलीकॉम टॉवर्स, बँका, एटीएम, इव्हेंट मॅनेजमेंट कंपन्या, बांधकाम क्षेत्र, कृषी क्षेत्र तसेच डिझेल जनरेटर आणि डिझेलवर चालणाऱ्या उपकरणांवर अवलंबून असलेल्या असंख्य व्यावसायिक आस्थापनांवर होऊ शकतो. CAMIT जमाखोरी, काळाबाजार आणि अनधिकृत व्यापाराविरोधातील कठोर कारवाईचे पूर्ण समर्थन केलेय. मात्र, अशा कारवाईचा फटका प्रामाणिक ग्राहकांना बसता कामा नये. अंमलबजावणीबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे पेट्रोल पंप चालक वैध ग्राहकांनाही डिझेल पुरवठा करण्यास टाळाटाळ करू शकतात. त्यामुळे अत्यावश्यक सेवा, उद्योग, व्यापार आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी गोंधळाची परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त केलीय. या पार्श्वभूमीवर CAMIT ने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून त्यांच्या तातडीच्या हस्तक्षेपाची विनंती केलीय. चेंबरने शासनास विनंती केली आहे की, बेकायदेशीर मोठ्या प्रमाणावर खरेदी आणि जनरेटर, आपत्कालीन वीजपुरवठा व नियमित कामकाजासाठी डिझेल खरेदी करणाऱ्या वैध ग्राहकांमध्ये स्पष्ट भेद करण्यात यावा. तसेच प्रामाणिक ग्राहकांना कोणत्याही अडथळ्याशिवाय डिझेल उपलब्ध व्हावे यासाठी व्यवहार्य पडताळणी व स्व-घोषणा (Self-Declaration) प्रणाली लागू करण्याचा प्रस्तावही CAMIT ने मांडला आहे. याबरोबर जमाखोरी, काळाबाजार आणि गैरवापराविरुद्ध कठोर कारवाई सुरू ठेवण्याचेही समर्थन केले आहे. CAMIT चे अध्यक्ष दीपक अग्रवाल यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधीनी.
0
0
Report
Advertisement

इंदापुर में गार्पीट से 24 जिलों में फसलें बर्बाद, नुकसान की भरपाई त्वरित मांगी

Rui, Maharashtra:इंदापूर बाईट... कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन राज्यातील नुकसानीची आकडेवारी... गारपीट आणि वादळी वाऱ्याने राज्यात 24 जिल्ह्यांना फटका बसला आहे.... साधारण एक लाख एकर शेतीला फटका बसला आहे... खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे... शेतकऱ्यांनी ज्या पिकावर उद्याचा स्वप्न रंगवलं होतं... शेतकऱ्याचं खूप मोठं नुकसान झाले आहे... राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार कृषी विभाग महसूल विभाग यांना सूचना दिले आहेत... जिथे जिथे वादळी वाऱ्यामुळे गारपिटीमुळे पावसामुळे नुकसान शेतकऱ्यांच्या पिकाच झाला आहे... नुकसान भरपाई चे पंचनामे करा... ताबडतोब आव्हान शासनाला सादर करा... जेणेकरून शेतकऱ्याला मदत करता येईल...
0
0
Report

भंडारा नगरपालिका ने मानसून पूर्व नाले साफ-सफाई अभियान शुरू किया

Bhandara, Maharashtra:मान्सूनपूर्व नालेसफाईला सुरुवात.... पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्यासाठी नगर परिषदेने हाती घेतली मोहीम.... पावसाळा तोंडावर आला असून भंडारा नगर परिषदेच्या वतीने शहरात मान्सूनपूर्व नालेसफाई मोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे. शहरातील प्रमुख नाल्यांमधून गाळ व कचरा काढण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून पावसाळ्यात नाले तुंबून नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरू नये यासाठी विशेष दक्षता घेतली जात आहे. भंडारा शहरात मान्सूनपूर्व नालेसफाईचे काम हाती घेण्यात आले आहे. यासाठी सुमारे ५० कर्मचारी कार्यरत असून मोठ्या प्रमाणात नाल्यांमधील गाळ, प्लास्टिक व इतर कचरा बाहेर काढला जात आहे. शहरातील मुख्य तसेच अंतर्गत भागातील नाल्यांची साफसफाई करून पाण्याचा प्रवाह सुरळीत ठेवण्यावर भर दिला जात आहे. दरवर्षी पावसाळ्यात काही भागांमध्ये पाणी साचण्याच्या समस्या निर्माण होतात. कचरा आणि गाळामुळे पाण्याचा निचरा अडथळा निर्माण होऊ नये यासाठी कर्मचारी सकाळपासून काम करत आहेत. तसेच नागरिकांनीही नाल्यांमध्ये कचरा टाकू नये, असे आवाहन नगर परिषदेकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

दौंड के कुरकुंभ में बल्कर ट्रक दुर्घटना, अभी तक कोई हताहत नहीं

Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील कुरकुंभमध्ये बल्कर ट्रकचा भीषण अपघात. सुदैवाने अपघातात कोणतीही जीवितहानी नाही. दौंड- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुरकुंभ येथे बल्कर ट्रकचा भीषण अपघात झाला. सोलापूरहून पुण्याकडे जाणारा ट्रक अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्याच्या मधोमध आडवा झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ट्रक रस्त्यात आडवा झाल्याने काही काळ वाहतुकीला अडथळा निर्माण झाला होता. क्रेनच्या साह्याने बल्कर ट्रक बाजूला करून सुरळीत करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement

सोयाबीन के दाम गिरावट: खरीदारी खतरे में, किसान चिंतित

Washim, Maharashtra:खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी समोर आली आहे. वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोमवारी सोयाबीनला प्रति क्विंटल ७ हजार ५०० रुपयांपर्यंत दर मिळाला होता. मात्र आज हे दर घसरून ६ हजार ६०० रुपयांवर आले आहेत. अवघ्या काही दिवसांत सोयाबीनच्या दरात सुमारे ९०० रुपयांची घसरण झाल्याने दरवाढीच्या अपेक्षेने माल साठवून ठेवलेल्या शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे. सध्या खरीप हंगामाच्या पेरणीची तयारी सुरू असून बियाणे, खते आणि मशागतीचा खर्च वाढलेला आहे. अशा परिस्थितीत बाजारभावातील ही घसरण शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी भर टाकणारी ठरत आहे. आगामी काळात सोयाबीनच्या बाजारभावात सुधारणा होईल का, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

पिंपरी चिंचवड के सापों के लिए नगरपालिका ने एसी- कुलर की व्यवस्था

Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडत असला तरी पिंपरी चिंचवडमध्ये तापमान कमी होण्याची चिन्ह दिसत नाही. वाढत्या उष्णतेमुळे माणसांचे हाल होत आहेत; परंतु प्राण्यांची स्थिती वेगळी नाही. पिंपरी चिंचवड महापालिकेने बहिणाबाई चौधरी प्राणी संग्रहालयातील सापांसाठी विशेष व्यवस्था केली आहे: महापालिकेने नुकतेच सरपोद्यानात दोन एसी आणि कुलरची व्यवस्था केली. गेली दहा वर्ष नूतनीकरणाच्या नावाखाठे हे प्राणी संग्रहालय बंद आहे. परंतु या प्राणी संग्रहालयात असलेल्या 23 सापांसाठी गाराठी व्यवस्था केली आहे. आढावा केला आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top