445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के संगमेश्वर में तेज बारिश, अवकाली मॉनसून के साथ ऑरेंज अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाचा सह अवकाळी पाऊस तुरळ इथं मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी मुंबई गोवा महामार्गावर ची वाहतूक मंदावली हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा कोकणासाठी आज हवामान विभागांना दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात गेल्या अर्ध्या तासापासून बरं असतात पावसाच्या दमदार सरी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात0
0
Report
उष्णते का कहर: धाराशिव के खवा-पेड़ा उद्योग संकट में
Dharashiv, Maharashtra:उष्णतेचा फटका; धाराशिवचा खवा क्लस्टर डळमळीत – कुंतलगिरीचा पेढा झाला महाग! दूध उत्पादक शेतकरी ही संकटात धाराशिव जिल्हा खवा उत्पादनासाठी देशभर ओळखला जातो… पण आता वाढत्या उन्हामुळे हाच खवा आणि पेढा उद्योग संकटात सापडला आहे. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने जनावरांवर ताण वाढलाय… पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय… आणि याचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर होतोय. परिणामी, खव्याच्या किमती वाढल्या असून कुंतलगिरीचा देशभर प्रसिद्ध पेढा देखील महागला… शेतकरी ते ग्राहक सगळेच या संकटाच्या फटक्यात सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होतं… मात्र सध्या तीव्र उष्णतेमुळे उत्पादन निम्म्यावर आलं आहे. जिल्ह्यात साधारण 5 ते 6 लाख लिटर दूध उत्पादन होत असताना, आता त्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, धाराशिवचा खवा उद्योग हा कोट्यवधींची उलाढाल करणारा उद्योग मानला जातो… मात्र दुधाच्या कमतरतेमुळे खवा उत्पादन घटलं आहे आणि त्याचा थेट परिणाम पेढा उद्योगावरही दिसून येतोय. एकीकडे उष्णतेचा वाढता तडाखा… दुसरीकडे घटलेलं दूध उत्पादन… आणि त्यातून महागलेला खवा व पेढा… धाराशिवचा हा प्रसिद्ध उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येत्या काळात दूध व्यवसायासोबतच धार्मिक प्रसाद व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.0
0
Report
भीमा नदी में पानी तुरंत न छोड़े जाने पर किसान 28 अप्रैल को जल समाधि का ऐलान
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीत जर तातडीने पाणी सोडले नाही तर 28 एप्रिल रोजी उजनी धरणात शेतकरी जल समाधी घेणार, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळी पिकांना पाण्याची गरज आहे. भीमा नदी कोरडी आहे. उजनी धरणात पाणी कशासाठी साठवले आहे. वाळू चोरणाऱ्या लोकांसाठी नदी कोरडी ठेवली आहे का ? जर पाणी तातडीने सोडले नाही तर 28 एप्रिल रोजी शेतकरी जल समाधी घेतील असा इशारा दिला आहे0
0
Report
Advertisement
चंद्रकांत पाटील ने जल प्रबोधन के लिए जलव्यवस्थापन कृती पंधरवडा का उद्घाटन किया
Sangli, Maharashtra:सांगलीमें जलसंपदा विभागाच्या माध्यमातून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयामध्ये जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा पार पडली; यावेळी मध्ये चंद्रकांत पाटलांनी बोलताना जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करत शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.0
0
Report
मराठी अनिवार्यता पर कोकण रिक्षा संघ ने सरकार के कदम का स्वागत किया
Kalyan, Maharashtra:मराठी सक्तीच्या निर्णयाचे कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघाचे स्वागत ... महारष्ट्रात मराठी आलीच पाहिजे... कोकण विभाग रिक्षा टॅक्सी महासंघासह कल्याणातील रिक्षा चालकांची भूमिका महाराष्ट्रात मराठी आलीच पाहिजे अशी भूमिका या रिक्षा संघटनेसह कल्याण डोंबिवली चा आजूबाजूच्या परिसरातील रिक्षा चालकांनी घेतली आहे. ज्या युनियनने हा संप पुकारला ते मुंबई पुरतीच मर्यादित असल्याचा टोला देखील संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी लगावला .आपण कोणत्याही राज्यात गेलो तरी त्या ठिकाणची भाषा ही आलीच पाहिजे मग महाराष्ट्रात मराठी का नको, मराठी येत नसेल तर शिकून घ्या असे देखील या रिक्षा चालकांनी यावेळी सांगितले., रिक्षा संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरटीओसह तहसीलदार कार्यालयातील अधिकार्यावर देखील याचे खापर फोडले परवानासाठी लागणारे डोमेसाईल सर्टिफिकेट तसेच मराठीच्या परीक्षा घेताना मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला जातो त्यातून असे परवाने देण्यात येतात त्यामुळे आधी शासकीय अधिकाऱ्यांना वठणीवर आणा अशी मागणी देखील संघटनेचे अध्यक्ष प्रणव पेणकर यांनी केली0
0
Report
मराठी विरोध: कर्नाटक दहावी परिणाम से सीमा भाग के विद्यार्थियों में मराठी के बहिष्कार पर हलचल
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र एकीकरण युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके बाईट मुद्दे शिक्षण क्षेत्रातही कर्नाटक सरकारने मराठी द्वेस्टी भूमिका दाखवण्याच काम केलाय कर्नाटक सरकारने सीमा भागातील विद्यार्थ्यांच्या दहावीच्या निकाल पत्रातून मराठी हा शब्द गायब केलाय मराठी हा शब्द न लिहिता तिथं ब्लँक ठेवून फक्त मार्क लिहिले आहेत यातून कर्नाटक सरकारचा मराठी द्वेष दिसून येतोय मा भागात मराठीचं अस्तित्व नाही हा दाखवण्याचा केबिलवाना प्रयत्न कर्नाटक सरकार करते त्यांनी कितीही झाकण्याचा प्रयत्न केला तरी सीमा भागातील मराठी माणसं आणि भाषा अबाधित राहणार आहे या चळवळीला आम्ही पूर्णत्वाला नेल्याशिवाय शांत बसणार नाही हे कर्नाटक सरकारला आम्ही ठणकावून सांगतो मराठी बद्दल हा काही प्रकार केला आहे याचा आम्ही निषेध करतो महाराष्ट्र सरकारने याची दखल घेऊन केंद्राकडे तक्रार करावी आणि अभिजात मराठी भाषेला पुसण्याचा प्रयत्न केलाय थांबवावा अशी विनंती0
0
Report
Advertisement
राहुरी विधानसभा उपचुनाव में मतदान जारी, सुबह 7-1 बजे तक 28.6% मतदान
Ahilyanagar, Maharashtra:राहुरी विधानसभा पोटनिवडणुक मतदान राहुरी विधानसभा पोटनिवडणूकसाठी मतदान प्रक्रिया होत आहे. सकाळी 7 वाजेपासून 1 वाजेपर्यंत 28.60% मतदान झाला आहे. ऊनाचा तडाखा असल्यामुळे मतदारांमध्ये फारसा उत्साह नाही। सकाळच्या टप्प्यात चांगलं मतदान होईल अशी अपेक्षा असताना सर्वसाधारण मतदान झाले आहे; काही मतदान केंद्रांवर चांगली गर्दी आहे तर काही ठिकाणी तुरळक गर्दी पाहायला मिळत आहे0
0
Report
विजय वडेट्टीवारचा संजय गायकवाडांना निर्वाणीचा इशारा – अमरावती ब्रेकिंग
Amravati, Maharashtra:अमरावती ब्रेकिंग... शिवाजी कोण होता प्रकाशकाला हात लावला तर संजूला गंजू करून सोडू हे संजाने लक्षात ठेवावे; विजय वडेट्टीवार यांचा संजय गायकवाड यांना निर्वाणीचा इशारा0
0
Report
पति की पुरानी प्रेमिका ने घर में हत्या कर दी, शहर दहल गया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या बजाजनगरमध्ये रक्ताचं नातं आणि अनैतिक संबंधांतून एक थरारक घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकराच्या पत्नीची भरदिवसा घरात घुसून निर्घृण हत्या केली आहे. धक्कादायक म्हणजे आरोपी महिलेने आधी पिस्तूल रोखलं आणि नंतर चाकूने सपासप वार करून साधना सोनपेटकर या ४० वर्षांच्या महिलेचा जीव घेतला. छत्रपती संभाजीनगरचा बजाजनगर परिसर आज सकाळी नेहमीप्रमाणे गजबजलेला होता. साई श्रद्धा पार्क येथील एका घरात जे घडलं, त्याने संपूर्ण मराठवाडा हादरला. ४० वर्षांच्या साधना सोनपेटकर यांची त्यांच्याच घरात घुसून हत्या करण्यात आली. हत्या करणारी दुसरी कोणतीही नसून, त्यांच्या पतीची जुनी मैत्रीण शैला सोनार होती. मृत साधना यांचे पती महेंद्र सोनपेठकर आणि आरोपी शैला सोनार यांच्या संबंधाची माहिती आधीच समोर आली होती. या वादातून शैलाने महेंद्र यांच्यावर बलात्काराचा गुन्हाही दाखल केला होता. संबंधित वादाच्या रागातून हत्याकांड घडल्याचा संशय व्यक्त केला जातो. शैला सोनारने घरातच पिस्तूल आणि चाकू घेऊन साधना यांच्या घरात घुसली. गावात जवळजवळ तिघांमध्ये झटापट झाली. शैलाने साधनाच्या डोक्यावर पिस्तूल रोखलं; आजीनं पिस्तूल हिसकावून बाहेर फेकलं, पण शैलाचा राग शांत झाला नाही. तिने धारदार चाकू काढला आणि साधनावर वार सुरू ठेवल्या. साधना रक्ताच्या थारोळ्यात कोसळल्यावरही शैला वार करीत राहिली; या भीषण हल्ल्यात साधना यांचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर शैलाने स्वतःला घरात कोंडून घेत आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी दरवाजा तोडून ताब्यात घेतलं.0
0
Report
Advertisement
डिजिटल इंडिया के तहत सांगली के तलाठों को लैपटॉप वितरित
Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये डिजिटल इंडिया उपक्रमा अंतर्गत तलाठ्यांना चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते लॅपटॉप वाटप करण्यात आले आहेत. सांगली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तालुक्यातील 53 तलाठयांना प्राथमिक स्वरूपात लॅपटॉप वाटप करण्यात आले, या प्रसंगी जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष यांच्यासह अधिकारी उपस्थित होते. सांगली जिल्ह्यासाठी साडेतीनशे लॅपटॉप उपलब्ध झाले आहेत. या लॅपटॉपच्या माध्यमातून अधिक पद्धतीने नोंदी ठेवणं सोपं जाणार असून शेतकरयांच्या वेदना लक्षात घेऊन शेतकरयांच्या अडचणी सोडवण्याचे काम तलाठ्यांनी करावं, असं आवाहन या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.0
0
Report
संजय गायकवाड पर विवाद: 'शिवाजी कोण होता?' किताब पर धमकी-वार ऑडियो वायरल
Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार संजय गायकवाड مرة ایکदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. कोल्हापूरमधील प्रकाशक प्रशांत आंबी यांना फोन करून शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप झाला आहे. हा वाद कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित ’शिवाजी कोण होता?’ या पुस्तकावरून निर्माण झाला आहे. ऑडिओ क्लिप सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली असून आमदारांवर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. VO 1:- नेहमीच कोणत्या ना कोणत्या वादात चर्चेत असणारे शिवसेना आमदार संजय गायकवाड पुन्हा एकदा चर्चेत आलेत. आमदार गायकवाड यांनी कोल्हापुरातील संघर्षा बुक गॅलरीचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना मध्यरात्री फोन करून धमकी दिल्याचा आरोप समोर आला आहे. विशेष म्हणजे, ’शिवाजी कोण होता?’ या कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित पुस्तकावरून हा वाद निर्माण झाला आहे. आमदार गायकवाड यांनी हे पुस्तक प्रशांत आंबी यांनी लिहिल्याचा समज करून त्यांना जाब विचारला. मात्र, आंबी यांनी हे पुस्तक आपले नसून कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांचे असल्याचे स्पष्ट केले. तसेच पुस्तकाचा उद्देश छत्रपती शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा नसल्याचेही त्यांनी सांगितले. तरीही आमदार गायकवाड यांनी संतप्त होत शिवीगाळ सुरूच ठेवल्याचा आणि “तू पण पानसरे यांच्याकडे जाशील” अशा शब्दांत धमकी दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक संघर्षा बुक गॅलरी VO 2 :- या घटनेनंतर संबंधित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली असून, खळबळ उडाली आहे. प्रकाशक प्रशांत आंबी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आमदार गायकवाड यांना सत्तेचा माज आल्यामुळे यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. Byte:- प्रशांत आंबी, प्रकाशक संघर्षा बुक गॅलरी GFX in “शिवाजी कोण होता?” – पुस्तकात नेमकं काय आहे हे पाहूया? कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांनी 1988 साली “शिवाजी कोण होता?” हे पुस्तक लिहिले. या आधी 1939 साली कर्नाटकातील ग. कृ. कुऱ्हाडे यांनीही याच विषयावर पुस्तक लिहिले होते. पानसरे यांच्या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचा वेगळ्या दृष्टिकोनातून आढावा घेतला आहे. पुस्तकातील मुख्य मुद्दे - शिवाजी महाराजांचा हिंदू-मुस्लिम धर्माविषयी काय दृष्टिकोण होता - शिवाजी महाराजांच्या दरबारात सर्वधर्मीयांचा सहभाग होता .. लढाया केवळ हिंदू-मुस्लिम संघर्ष नव्हत्या, याचे अनेक उदाहरणांसह स्पष्टीकरण. - शिवाजी महाराजांच्या दरबारात अनेक मुस्लमान सरदार, वतनदार आणि चाकर होते, हे सर्व मोठमोठ्या हुद्द्यावर आणि जबाबदारीच्या जागेवर होते हे विविध उदाहरणे देऊन पुस्तकात मांडले आहे. - छत्रपती शिवाजी महाराजांचे मराठे आणि हिंदू विरुद्ध लढायांचा उल्लेखदेखील या पुस्तकाच्या माध्यमातून करण्यात आला आहे. -छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यक्तिमत्व आजही सामान्य जनतेच्या मनावर अधिराज्य का गाजवते, यामागील कारणांचा शोध या पुस्तकाच्या माध्यमातून घेण्यात आला. - अनेक राजे होऊन गेले, पण शिवाजी महाराजांसाठी लोक जीव द्यायला का तयार होते याचे विश्लेषण. - वडिलोपार्जित सत्ता नसताना स्वतःच्या कर्तृत्वावर उभारलेले स्वराज्य. - “रयतेच्या भाजीच्या देठालाही हात लावू नये” – शिवाजी महाराज यांची प्रजेबद्दलची संवेदनशीलता काय होते याचा देखील उल्लेख या पुस्तकात करण्यात आला आहे. परस्त्रीला मातेसमान मान आणि सर्व धर्मांप्रती आदराची भूमिका. स्त्रियांवरील अत्याचार करणाऱ्यांना कठोर शिक्षा, करप्रणालीतील सुसूत्रता आणि दुष्काळात दिलासा देणाऱ्या योजना.. यासह अन्य मुद्द्यांना या पुस्तकाच्या माध्यमातून स्पर्श करण्यात आला आहे. GFX Out VO 3:- दरम्यान पुस्तकाचे लेखक दिवंगत कॉम्रेड गोविंदराव पानसरे यांच्या कुटुंबियांनी आणि गोविंदराव पानसरे यांच्या विचाराचे पाईक यांनी आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्याचा समाचार घेत त्यांच्यावर कारवाईची मागणी केली आहे.. इतकंच नव्हे तर पानसरे यांचे विचार कधीच संपणार नाहीत अशी भूमिका मांडली आहे. Byte:- मेधा पानसरे, सून कॉम्रेड गोविंदराव पानसरे Byte:- मेघा पानसरे, मुलगी गोविंदराव पानसरे Byte:- कॉम्रेड सतीशचंद्र कांबळे VO 4 :- अभिव्यक्ति स्वातंत्र्य, ऐतिहासिक मांडणी त्यावर राजकीय प्रतिक्रिया महाराष्ट्रासाठी नवीन नाही. पण किमान शिवसेना आमदार संजय गायकवाड यांना हे पुस्तक नेमकं कोण लिहिलंय. हे तरी जाणून घ्यायला हवं होतं अशी प्रतिक्रिया सर्व स्तरातून व्यक्त केल्या जात आहेत..0
0
Report
नाशिक में गर्भपात रैकेट: SIT ने चार डॉक्टरों पर की जांच तेज
Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणात एसआयटीकडून सुरू असलेल्या तपासात अनेक धक्कादायक बाबी समोर येताय... एसआयटीने खरातच्या कुकर्मांसह गर्भपात प्रकरणाची चौकशी केली करत असताना काही धक्कादायक माहिती समोर आलीये.या प्रकरणा नंतर आता अशोक खरात हा गर्भपात चे रॅकेट चालवत होता का ? आशा पद्धतीने तपास एसआयटी करत आहे.... कारण शासकीय अधिकारी असलेला डॉक्टर देखील अशोक खरातला गर्भपात करण्यासाठी मदत करत असल्याची माहिती समोर येते....पाहूया ह्या रिपोर्ट मधून...भोंदू अशोक खरात यांनी तब्बल आठ महिलांचे लैंगिक शोषण करत मी देवाचा अवतार आहे असं सांगून लैंगिक छळ केल्याबाबतीत नाशिकच्या सरकार वाडा पोलीस ठाण्यात आठ गुन्हे दाखल करण्यात आले आहे... बंधू अशोक खरात हा ज्या महिलांबरोबर लैंगिक शोषण करत होता त्यातून एखादी महिलेला गर्भधारणा झाली तर तो गर्भपात करण्यासाठी काही गोळ्या देत असल्याची देखील माहिती समोर आली होती यानंतर जे डॉक्टर अशोक खरातला मदत करत होता या डॉक्टरांची चौकशी करण्यात आली होती.. नाशिकमधील चार बड्या डॉक्टरांचाही सहभागीता होता... या डॉक्टरांमार्फत गर्भपाताच्या गोळ्या दिल्या जातल्या... धक्कादायक बाब म्हणजे, यात नाशिकमधील एका शासकीय मोठ्या डॉक्टर अधिकाऱ्यानेही गर्भपाताच्या या रॅकेटमध्ये मदत केल्याचा संशय आहे. या डॉक्टरांनाही लवकरच चौकशीसाठी बोलावण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून समजते...स्वतःला अवतारी पुरुष सांगून खरातने पीडितांना जाळ्यात ओढले आणि घटस्फोट, नोकरी किंवा कौटुंबिक समस्या सोडवण्याचे आश्वासन देऊन शोषण केले. पीडित महिला गरोदर राहिल्यास खरात त्यांना गर्भपाताच्या गोळ्या देत असे, अशी माहिती समोर आली आहे. खरातच्या या काळ्या कारनाम्यात काही डॉक्टरांचा आणि सोनोग्राफी सेंटर्सचा सहभाग असल्याचेही समोर आलीये..... यात कोणत्या डॉक्टरांचा सहभाग होता, गर्भपात करण्यासाठी गोळ्या कुठून आणल्या, यासंदर्भात तपास केला जातोय... ह्या संपूर्ण प्रकरणाकडे एसआयटीने आपलं लक्ष केंद्रित करून शासकीय अधिकारी असलेला हा डॉक्टरची देखील एसआयटी कसून चौकशी करणार असल्याचे माहिती सूत्रांच्या मार्फत कळत आहे...नाशिकमधील चार डॉक्टरांचा सहभाग आहे. हे सर्व डॉक्टर पंचवटी परिसरातील असून, यातील एका डॉक्टर दाम्पत्याचे दिंडोरी रोडवर सोनोग्राफी सेंटर असल्याचे समजते.. या डॉक्टरांमार्फत गर्भपाताची औषधे, उत्तेजक औषधे पुरविण्यात या डॉक्टरांची महत्वाची भूमिका महत्वाची मानली जाते. त्यामुळे आता हे डॉक्टरही तपास यंत्रणेच्या रडारवर असून, त्यांनाही चौकशीसाठी लवकरच बोलावण्यात येणार असल्याची शक्यता आहे...0
0
Report
Advertisement
नांदेड़ गैंगवार: कबुतर गिरफ्तार, इंस्टाग्राम पर राहत-हिला देने वाली कहानी खत्म
Nanded-Waghala, Maharashtra:हीरोइन शाहरुख शेख, जिन्हें कबुतर के नाम से चर्चित किया जाता है, नागपुर नहीं बल्कि नांदेड़ के रहने वाले हैं. कबुतर उर्फ शाहरुख पर दस से अधिक गंभीर अपराध दर्ज हैं और गँगवॉर की हत्या में उसका सक्रिय हिस्सा रहा. अपराध कर भागने की उसकी आदत है, पर पुलिस ने उसे पकड़कर उसकी फड़फड़ बंद कर दी. फरार रहते हुए भी वह अपने इंस्टाग्राम अकाउंट पर सक्रिय था और पत्नी तथा मां के लिए रिल्स पोस्ट करता था. गँग वॉर में उसकी भागीदारी के बाद उसे 15 दिनों के भीतर गिरफ्तार किया गया. Byte- अबिनाश कुमार - पुलिस अधीक्षक. पोस्ट- 15 से 20 वर्ष की युवाओं में इंस्टाग्राम पर भाईगिरी के रिल्स बनते दिख रहे हैं और पुलिस इससे निपटने के लिए कड़े कदम उठाने की तैयारी कर रही है. आरोपी चाहे कितना भी शातिर क्यों न हो, नांदेड पुलिस ने साबित किया है कि वह पाताल से भी खोज निकालते हैं. ताकि युवा कबुतर जैसे अपराधियों के चक्कर में न पड़ें, वरना भविष्य खतरे में होगा. सतीश मोहिते, Zee 24 Taas, नांदेद0
0
Report
विदर्भ में हीट वेव, नागपुर में पारा 43-45°C के आसपास
Nagpur, Maharashtra:Ngp Heat wkt live u ने फीड पाठवले ---------- राज्याच्या काही भागात अवकाळी पाऊस असताना विदर्भात मात्र सूर्यचा तडाखा चांगलाच जाणवत आहे... बहुतांश भागात पारा 43 अंशापर्यंत पोहोचला आहे... चार-पाच दिवसांपूर्वी वर्धा आणि अकोला तर 45अंश पर्यंत तापमान होतं... आजही नागपूरात सूर्याचा कहर जाणवत आहे..... याचाच आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
मराठा आरक्षण पर फिर से हमले: जरंगे पाटील विखे पाटलांना निशाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आरक्षण वरून जरांगे पाटील पुन्हा एकदा आक्रमक झाले आहेत, यावेळी मराठा आरक्षण उपसमितीवर हल्लाबोल करीत त्यांनी ज्यांच्यावर स्तुतीसुमन उधळली त्या विखे पाटील यांना लक्ष्य केले आहे. विखे पाटलांनी अध्यक्ष पदावरून नाव घालवले अशी जहरी टीका जरांगे पाटलांनी केली असल्यामुळे येणाऱ्या काळात जरांगे पुन्हा आंदोलनाच्या पवित्र्यात तर नाही ना या चर्चा उधाणलेल्या आहेत. मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटलांची आंदोलन संपूर्ण राज्याने पाहिली आहे. त्यात मुंबईचा अखेरचा आंदोलन, हैदराबाद गॅजेट निर्णय व उपसमितीचे काम यामुळे जरांगे पाटलांनी आंदोलन मागे घेतलं आणि सरकारवर विश्वास दर्शवला, परंतु जरांगे आता पुन्हा सरकारवर नाराज आहेत आणि त्यांनी थेट विखे पाटळांना हल्लाबोल केलंय. मराठा आरक्षण उपस्थिती बरखास्त करा अशी थेट मागणी मनोज जरंगे पाटील यांनी केली आहे. उपसमितीच्या अध्यक्ष पदासाठी विखे पाटील नाव करण्याची शक्यता होती, परंतु त्यांनी नाव घालवलं. मराठा समाजाच्या हक्कांसाठी स्वतंत्र मराठा आणि कुणबी मंत्रालय स्थापन करण्याची मागणी मुख्यमंत्र्यांकडे करणार असं जरांगे पाटील म्हणाले. धाराशिव येथे भीम जयंती कार्यक्रमासाठी आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. विखे पाटलांनी मात्र सावध भूमिका घेतली आहे; मी अध्यक्ष राहिलेच पाहिजे असे काहीही नाही, मात्र आम्ही जे काम केले त्याचा अहवाल जरांगे यांना पाठवला असल्याचे विखे पाटील म्हणाले. जरांगे पाटील आतापर्यंत विखे पाटील आणि मराठा आरक्षण उप समिती या सगळ्या बाबत समाधानी होते, मात्र अचानकच त्यांनी आता हल्लाबोल सुरू केलाय. गेल्या काही दिवसं जरांगे पाटलांची ही धडपड सुरू असल्याचे सांगण्यात येत आहे, त्यामुळे आता हल्लाबोल आणि लवकरच आंदोलन या भूमिकेत जरांगे नाही ना, या बाबत पुन्हा एकदा मराठवाड्यात चर्चा सुरू झाल्या आहेत.0
0
Report
Advertisement
