445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
मावळ तालुक्यात विषमुक्त सेंद्रिय खेती के लिए दशपर्णी अर्क अभियान
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यातील कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महादशपर्णी अर्क सोहळा निमित्त मावळ तालुक्यातील शिलाटणे, जांभूळ, नानोली तर्फे चाकण, यागावातील महिला शेतकरी गटांनी उत्साहात दशपर्णी अर्क तयार केला. या सर्व गटांच्या एकजुटीमुळे पाणी फाउंटेशन मेनटॉर कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मावळ तालुक्यात एकूण 800 लिटर दशपर्णी अर्क बनविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दशप्रणी अर्क पिकामध्ये कीड रोगासाठी कसा फायदेशीर आहे हे कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांनी सांगितले. या उपक्रमातून विषमुक्त शेतीच्या चळवळीत आपला सहभाग नोंदविला आणि गटशेती मध्ये वाटचाल करण्याचा दृढ संकल्प अधिक बळकट झाला..0
0
Report
भंडारा में बिना नंबर प्लेट वाहनों के इस्तेमाल पर प्रशासन पर प्रश्नचिह्न
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सुरूलेल्या भूमिगत गटारे व रस्ते कामांमध्ये नियमांचे उल्लंघन करत भंगार अवस्थेतील विनानंबरची वाहने वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वाहनांवर नंबर प्लेटऐवजी ‘नगरपरिषद भंडारा’ आणि ‘मांगूकिया ब्रदर्स’ अशी नावे लिहिलेली दिसत आहेत. वाहतूक विभाग व आरटीओच्या नियमांना धाब्यावर बसवत सर्रासपणे ही वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी एका वाहनावर कारवाई केली असली, तरी अशा अनेक वाहनांचा वापर सुरू असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत असून प्रशासन आता काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वन विभाग ने सीतेपार में पांच वर्षीय बच्ची हत्या करने वाले बिबटिए को जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या सीतेपार परिसरात पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांआधी पहाटे मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंशिका मिरी हिच्यावर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून शोधमोहीम राबवली आणि अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले. जेरबंद केलेल्या बिबट्याला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
कुही में तहसीलदार को JCB से चार किलोमीटर तक फरफटाने का मामला
Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील कुahi तालुक्यात नायब तहसीलदार कारवाईसाठी गेले असताना जेसीबी न थांबवता मुरूम माफियांनी तहसीलदारांना जेसीबीला लटकवत चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मुरूम माफियांनी महसूल पथकावर हा हल्ला चढवला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला हल्ला. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना बोरी नाईक परिसरात अवैध उत्खननाची माहिती मिळाली... त्यामुळे त्यांनी तातडीने पावले उचलत कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान जेसीबी चालकाने महसूल यंत्रणेला न जुमानता जेसीबी घेऊन तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार निकाळजे यांनी जेसीबिवर चढले व तो थांबवण्याचा प्रयत्न केला.. मात्र जेसीबी चालकाने निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवून तीन ते चार किलोमीटरपर्यंत लटकून, फरफटत नेले, त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला. घटनेचा माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखল झाले. कुही पोलिसांनी जेसीबी चालक मयूर थोटे याला अटक केली केली.0
0
Report
जालना मर्चेंट बैंक घोटाला: भोकरदन शाखा प्रबंधक गिरफ्तार, मुख्य सूत्रधार पहले गिरफ्तاري
Jalna, Maharashtra:जालना मर्चंट बँक घोटाळा : भोकरदन शाखा व्यवस्थापकाला केली अटक आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; मुख्य सूत्रधाराला यापूर्वीच अटक कलमाताही वाढ अँकर : जालना शहरातील जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षकांनी सखोल तपासाबाबतचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या इतर साथीदारांना यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणात भोकरदन शाखेचा अटक केली आहे. बुधवारी भोकरदन शाखेच्या व्यवस्थापकास व्यवस्थापक नटवर सत्यनारायण (४७, वसुंधरानगर, दायमा जालना) याचा कटामध्ये सहभाग निष्पन्न झाला. तसे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यामुळे त्यासही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आजपर्यंत मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यास अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्ह्यात आरोपींनी कर्जाची रक्कम विशिष्ट खात्यावर वर्ग केली आहे. त्या माध्यमातून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे बाधा निर्माण झाली आहे. म्हणून नमूद गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे गुन्ह्यात ठेवीदारांच्या हितसंबंधांना हितसंबंध जोपासणारा कायदा, कलम ३, ४ व५ ही वाढ करण्यात आली आहे.0
0
Report
उष्णते के कारण नाशिक में पोल्ट्री फार्म के कोंबड़े मरने लगे, किसान चिंतित
Nashik, Maharashtra:नाशिकच्या ग्रामीण भागात उष्णतेचा कहर, पोल्ट्रीतल्या कोंबड्या पडत आहेत मृत्यूमुखी. आधी बागलाणच्या अंबासनमध्ये 600 कोंबड्यांचा मृत्यू.. और आत्ता नांदगाव मध्येही कोंबड्या पडत आहेत मृत्यूमुखी. नाशिक जिल्ह्यातील अंबासन परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वाढत्या उष्णतेचा फटका कुकूटपालन व्यवसायालाही बसताना दिसत आहे. तीव्र उष्णतेमुळे तब्बल सहाशे कोंबड्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सध्या परिसरात उष्णतेची लाट कायम असून तापमानात मोठी वाढ झाल्याने पशुपक्ष्यांनाही याचा मोठा फटका बसत आहे. शेतकऱ्यांनी उष्णतेपासून बचावासाठी विविध उपाययोजना केल्या असल्या तरीही या घटनेमुळे कुकूटपालन व्यवसायावर मोठे संकट ओढवले आहे. दरम्यान, या घटनेमुळे संबंधित शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून प्रशासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के जयगड़ बंदर के निर्यात प्रकल्प को गति देने का निर्देश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जयगड बंदराच्या निर्यात प्रकल्पाला गती द्या..मंत्री नितेश राणे यांचे प्रशासनाला निर्देश!.. अँकर कोकणातील हापूस आंबा,काजू आणि मत्स्य उत्पादनांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्यासाठी रत्नागिरीतील जयगड बंदर सज्ज होत आहे... मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांनी या निर्यात प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.. बंदरावरील शीतसाखळी आणि पायाभूत सुविधा सक्षम करून हा प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करण्यावर त्यांनी भर दिला आहे.. त्यामुळे कोकणातील शेतकऱ्यांना आणि मच्छिमारांना थेट आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध होऊन त्यांच्या उत्पन्नात मोठी वाढ होणार आहे..0
0
Report
कोसारी दुहेरी हत्याकांड के साक्षीदार का अपहरण कर खून, शव पेड़ से लटका मिला
Sangli, Maharashtra:स्लग - दुहेरी हत्याकांड खटल्यातील मुख्य साक्षीदाराचा अपहरण करून निर्घृण खून.. अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातल्या कोसारी येथील दुहेरी हत्याकांडातील साक्षीदाराचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.कर्नाटकच्या मदभावी येथे अपहरण झालेल्या दादासो यमगर यांचा झाडाला लटकलेल्या अवस्थेत मृतदेह आढळून आला आहे.मंगळवारी सांगलीच्या न्यायालयात जबाब देण्यासाठी निघाले असता कवठेमहांकाळ तालुक्यातल्या नागज फाटा येथून यमगर यांचा अपहरण करण्यात आले होते.याप्रकरणी कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा देखील झाला होता.दरम्यान बुधवारी दुपारच्या सुमारास कर्नाटकच्या अथणी तालुक्यातल्या मदभावी येथे यमागर यांचा खून करून मृतदेह झाडाला गळफास लावलले अवस्थेत आढळून आला आहे. घटनेची माहिती मिळताच सांगलीचे पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या घटनास्थळी धाव घेतली होती.मृत यमगर हे जत तालुक्यातल्या कोसारी मध्ये 2023 मध्ये घडलेल्या दुहेरी हत्याकांडातील मुख्य साक्षीदार होते, मंगळवारी त्यांची न्यायालयामध्ये महत्त्वपूर्ण साक्ष नोंदवली जाणार होती,तत्पूर्वी त्यांचा अपहरण करून खून करण्यात आला आहे. जबाब नोंदवू नये,या उद्देशाने त्यांचे अपहरण करून खून करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांच्याकडून व्यक्त करण्यात येत आहे.0
0
Report
बस ब्रेक फेल से पलटी: 7 जख्मी, 27 यात्री सुरक्षित
Nashik, Maharashtra:बसचे ब्रेक फेल..चालकाचे नियंत्रण सुटले ; बस विजेच्या डिपीवर जाऊन आदळत पलटी झाली... अपघातात ७ जण जखमी दोघे गंभीर... खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल... विजेचा पुरवठा खंडित झाल्याने सुदैवाने बसमधील २७ प्रवासी वाचले.. मालेगाव - धुळे रस्त्यावरील रॉयल हॉटेलजवळ घडली घटना..0
0
Report
Advertisement
शिर्डी जमीन घोटाला: भोंदू खरात की चौकसी तेज, साक्षियों के बयान सामने
Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिसांकडून जमीन गैरव्यवहार प्रकरणात भोंदू खरात याची चौकशी सुरू... भोंदू खरात याची दुपारपासून शिर्डी पोलिस करताय कसून चौकशी.. मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदली... शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर... सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केला नाही... मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो , ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले... चौकशी दरम्यान अशोक खरात याने दिली पोलिसांना माहिती.. पोलिस चौकशीत अशोक खरात याने दिलेली माहिती - 22 / 8 / 2023 ला साठे खत आणि मुक्तीआर पत्र झालं आणि 23 / 8 / 2023 ला खरेदी खत झालं.. 22 तारखेला मूळ जमीन मालक आले नाही , त्याची खूप वेळ वाट बघितली त्यामुळे 23 आम्हाला जमिनीची खरेदी करावी लागली.. 22 आणि 23 तारखेला आम्ही रक्कम RTGS करून गोंदकर यांच्या खात्यावर पाठवली होती... जमीन परत घ्यायचे आणि व्याज मिळावे असे काहीही ठरलेलं नव्हत.. सर्व साक्षीदार एक झाले आहेत आणि आता नाही होऊन पडत आहेत... मी जेव्हा जमीन बघायला गेलो तेव्हा जमिनीचा मूळ मालक नव्हता.. अरविंद बावके आणि किरण सोनवणे हे दोघे जण जमीन दाखवण्यासाठी आले होते... जेव्हा जमीन खरेदी करायला गेलो तेव्हा शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके आणि महेंद्र शेळके हे होते... आरोपी भोंदू अशोक खरात चौकशीत सविस्तर माहिती न देता पोलिसांना देतोय अर्धवट माहिती... भोंदू खरात हा शिर्डी पोलिसांच्या कोठडीत असताना सकाळी 10 वाजता करतो जेवण , एक चपाती आणि डाळ भात अस कोठडीत दिलं जात जेवण... आणि सकाळच्या जेवणातील उरलेले जेवण सायंकाळी 5 वाजता करतो..मात्र संध्याकाळी भोंदू खरात हा जेवण करत नाही.... विश्वसनीय सूत्रांची माहिती....0
0
Report
चंद्रपुर के टाडोबा-आंधारी बफर.zone में मामा मेल बाघ ने गाई का शिकार किया
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर, मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ गाईची केली शिकार अँकर:--चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा- अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील मातब्बर वाघ मामा मेल ची नवा व्हिडिओ समोर आलाय. मुल तालुक्यातील फुलझरी गावाजवळ वाघाने गाईची शिकार केली. पाळीव जनावरावर हल्ला करून शेत शिवारात ओढून नेले. सध्या जानाळा- केसलाघाट या भागात मामा मेलचा मुक्काम आहे. हा भला थोरला वाघ या भागात अनेक ठिकाणी दर्शन देत आहे. ताज्या व्हिडिओत फुलझरी गावाच्या अगदी बाजूला त्याने सहजपणे गाईची शिकार केली. वाघाच्या या वावराने ग्रामस्थ मात्र चिंतेत आहेत. वनविभागाचे मामा मेल वाघाच्या हालचालींवर बारकाईने लक्ष आहे.0
0
Report
आमदार शिवाजी पाटील पर 100 करोड़ के मानहानि दावे की चेतावनी, मुश्रीफ का इशारा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर, आमदार शिवाजी पाटील यांनी गेल्या पाच वर्षात गोकुळमधील साधा ग सुद्धा कधी ऊच्चारलेला नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत झालेल्या दारूण पराभवानंतरच त्यांना हा सगळा साक्षात्कार झालेला दिसतोय. त्यामुळेच अलीकडच्या काळात ते सातत्याने माझ्यावर आरोप करीत सुटले आहेत. मी मात्र श्री. पाटील यांच्यावर काहीही बोलणार नाही, असे यापूर्वीच सांगितलेले होते आणि बोलणारही नव्हतो. परंतु; काल त्यांनी माझ्यावर हसन मुश्रीफ यांनी नोटाबंदीच्या काळात स्वतःकडील कोट्यावधी रुपये बँकेत आणून बदलून घेतले आणि बँकेला अडचणीत आणले, असा व्यक्तिशः बदनामीकारक आरोप केला. त्यामुळे, मी त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीचा दावा न्यायालयात दाखल करणार असल्याचा इशारा, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिला आहे. मंत्री श्री. मुश्रीफ यांनी प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात म्हटले आहे, मी गेल्या ३५-४० वर्षांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनाच्या वाटचालीमध्ये माझ्या वैयक्तिक प्रतिमेला फार जपत आलो आहे. मी कुठलीही गोष्ट मान्य करीन. परंतु माझी प्रतिमा, माझा स्वाभिमान, माझ्याबद्दलचा समाजाचा दृष्टिकोन कधीही बदलता कामा नये, यासाठी मी पडेल ती किंमत देऊन मी कायदेशीर लढाई लढत असतो. आजपर्यंत ज्या- ज्या वेळी माझी व्यक्तिशः बदनामी केली, त्यांच्याविरोधात मी १०० कोटी रुपयांचे फौजदारी बदनामीकारक दावे न्यायालयात दाखल केलेले आहेत. माझ्यावतीने दाखल होत असलेला हा दहावा दावा आहे. आमदार शिवाजी पाटील यांनी माझ्यावर केलेल्या या वक्तव्यातून त्यांनी माझी व्यक्तीशः बदनामी केली आहे. येत्या आठ ते दहा दिवसांत त्यांनी यासंबंधीचे पुरावे जाहीर करावेत. अन्यथा त्यानंतर त्यांच्यावर शंभर कोटी रुपयांचा फौजदारी बदनामीकारक दावा दाखल करणार आहे. श्री यांनी पत्रकात पुढे म्हटले आहे की, आमदार शिवाजी पाटील यांनी असेही वक्तव्य केले आहे की केडीसीसी बँकेकडून साखर कारखान्यांसह इतर संस्थांना अर्थपुरवठा केला जातो. त्यामुळे मुश्रीफ यांच्या विरोधात जाण्यास आमदार घाबरतात. त्यांचे हे वक्तव्य म्हणजे हासुद्धा आमदारांचा, माझ्या संचालकांचा, कारखानदारांचा आणि समस्त शेतकऱ्यांचाही अपमानच आहे. श्री मुश्रीफ यांनी पुढे म्हंटले आहे, आमदार श्री. पाटील हे गोकुळ दूध संघ आणि के. डी. सी. सी. बँकेत चौकशी लावतो, हे करतो आणि ते करतो, अशा नुसत्या बाष्कळ गप्पा मारत आहेत. त्यांनी ते एकदा करूनच दाखवावच. कारण आम्ही संस्था कशा स्वच्छ, पारदर्शी आणि सभासदाभिमुख चालविलेल्या आहेत, हे सगळ्या सभासदांना आणि जनतेलाही माहीत आहे.0
0
Report
Advertisement
बारामती: 13 वर्षीय गर्भपात मामले में डॉक्टर समेत अन्य आरोपी गिरफ्तार
Rui, Maharashtra:अल्पवयीन मुलगी गर्भपात प्रकरणात फलटणमधील डॉक्टरला अटक.... वडगाव निंबाळकर पोलिसांकडून डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडाझडती..... तेरा वर्षाच्या अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याचा आरोप..... baramati तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाणे हद्दीत एका तेरा वर्षीया अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील आरोपीने लैंगिक अत्याचार केल्याची घटना मागील काही दिवसापूर्वी घडली होती. या प्रकरणात रवींद्र आनंदराव गार्डी या आरोपीला अटक देखील केली होती, मात्र पोलीस कोठडीत असतानाच रवींद्र गार्डी याने गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आता या प्रकरणात फलटणमधील डॉक्टर योगेश हनुमंत नरुटे याला देखील वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित अल्पवयीन मुलीचा गर्भपात केल्याप्रकरणी अटक केली आहे. वडगाव निंबाळकर पोलिसांनी आज संबंधित डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडझडती देखील घेतली असून या गर्भपात प्रकरणी वापरण्यात आलेले साहित्य याशिवाय रुग्णालयातील काही कागदपत्रे पोलिसांनी हस्तगत केली आहेत. संबंधित डॉक्टरने मुलगी अल्पवयीन माहित असताना देखील तिचा गर्भपात केला यासंदर्भात पोलिसांना खबर देणे आवश्यक होतं मात्र दिली नाही गर्भपात करून तिच्या गर्भाची विल्हेवाट लावली पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला असे आरोप डॉक्टर वरती ठेवण्यात आले आहेत. याशिवाय या प्रकरणात पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्या मदतीने फलटणमधील डॉक्टरच्या रुग्णालयात संबंधित पीडित मुलीचा गर्भपात केल्या प्रकरणी पोलिसांनी पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याला देखील आरोपी करत अटक केली आहे. काय आहे प्रकरण.... बारामती तालुक्यातील वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तेरा वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्याच नात्यातील एका 48 वर्षीय पुरुषाने लैंगिक अत्याचार केला होता. यातून संबंधित पीडित मुलगी गर्भवती राहिली. पीडित मुलगी आणि आरोपी हे नात्यातील असल्याने हे प्रकरण समझोता करून गर्भपात करून मिटवण्याचा प्रयत्न झाला. मात्र या प्रकरणाचा पुढे उलघडा झाल्यानंतर संबंधित आरोपीला काही स्थानिकांनी पकडून पोलिसांच्या हवाली केले. पुढे या प्रकरणात पोलिसांनी संबंधित पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून पोलिसात पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आया. वडगाव निंबाळकर पोलिसांनी संबंधित प्रकरणातील आरोपी रवींद्र आनंदराव गार्डी याला अटक देखील केली. न्यायालयाने त्याला पाच दिवसाची पोलीस कोठडी सुनावलेली असताना 28 एप्रिल 2026 रोजी सकाळी आठ वाजताच्या सुमारास वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात पोलीस कोठडीतच पांघरण्यासाठी दिलेल्या चादरीच्या मदतीने रवींद्र गार्डी याने आत्महत्या केली. यानंतर या प्रकरणाची पुढील चौकशी सुरू असताना संबंधित पीडित अल्पवयीन मुलीचा गर्भपात घडवून आणण्यात मध्यस्थी केलेल्या पिंटू उर्फ शरद यशवंत धुमाळ याच्यावर देखील पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करत त्याला अटक करण्यात आली. तर फलटणमधील ज्या डॉक्टरच्या रुग्णालयात या अल्पवयीन मुलीचा गर्भपात करण्यात आला त्या डॉक्टरला देखील या प्रकरणात दोषी ठरवत त्याच्यावर देखील पोलिसांकडून कारवाई करत डॉक्टरला अटक करण्यात आली. पोलिसांनी डॉक्टरच्या रुग्णालयाची झाडाझडती घेत काही महत्वाची कागदपत्रे आणि गर्भपात प्रकरणी वापरलेले काही साहित्य हस्तगत केले आहे.0
0
Report
गोवा की जलक्रीड़ा: महिला पर्यटक की मौत टल गई, सुरक्षा व्यवस्था पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:गोवा.. गोव्यात पर्यटनाचा थरार की मृत्यूचा सापळा?.. पॅरासेलिंग करताना पर्यटक महिलेचा श्वास गुदमरला!.. अँकर गोव्याच्या निळ्याशार समुद्रात पर्यटनाचा आनंद लुटणं एका महिला पर्यटकाच्या जीवावर बेतलं असतं,अशी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सुष्मिता नावाच्या एका पर्यटकाने आपला 'मरणाशी आलेला अनुभव' सोशल मीडियावर शेअर करत सर्वांनाच सतर्क केलं आहे.. पॅरासेलिंगचा आनंद घेत असताना अचानक सुष्मिता समुद्रात कोसळली. मात्र,भयानक गोष्ट अशी की,पॅरासेलिंगची दोरी सुष्मिताच्या गळ्याभोवती आवळली गेली.समुद्राच्या मध्यभागी श्वास कोंडलेला असताना आणि समोर मृत्यू दिसत असतानाची ती भीषण धडपड कॅमेरात कैद झाली आहे. ”तो १ मिनिटाचा थरार माझं आयुष्य संपवू शकला असता. पाण्यात पडले, गळ्याभोवती दोर आवळला गेला आणि सगळं संपलं असं वाटलं होतं,” अशा शब्दांत सुष्मिताने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.. सुदैवाने,वेळीच मदत मिळाल्याने सुष्मिता बचावली असली, तरी या घटनेने गोव्यातील जलक्रीडा (Water Sports) प्रकारांमधील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आणला आहे. मित्रांनो, कोणताही वॉटर स्पोर्ट करण्यापूर्वी तिथली सुरक्षा उपकरणं तपासा आणि आपल्या अंतर्मनाचा आवाज ऐका.कारण एक छोटीशी चूक आनंदाच्या सहलीचं रूपांतर कायमस्वरूपी मानसिक आघातात करू शकते..0
0
Report
गोकुळ दूध संघ चुनाव: सुप्रीम कोर्ट के फैसले से दूध उत्पादकों को राहत
Kolhapur, Maharashtra:On गोकुळ निवडणूक निकाल स सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचे दूध उत्पादक म्हणून आम्ही स्वागत करत आहोत.. गोकुळवर प्रशासकाच्या माध्यमातून ताबा मिळवायचा जे षडयंत्र रचले होते.. तो सुप्रीम कोर्टाने हाणून पडला. त्यामुळेच गोकुळच्या निवडणुकीत दूध उत्पादक आम्हाला सहकार्य करेल. आम्ही सातत्याने सांगत होतो 1200 संस्थांचा निकाल लावून ताबडतोब निवडणुका घ्या.. पण राज्य शासनाने घाईगडबडीत शेवटच्या दिवशी कायदा केला.. ताबडतोब प्रशासक नेमण्याची कारवाई झाली. अगदी चार वाजता प्रशासक साताऱ्यावरून कोल्हापुरात पोहोचतात, हा सगळा गौडबंगाल होता. पण आता दूध उत्पादकाला दिलासा मिळाला आहे... निवडणुकीसाठी सव्वाशे दिवस लागतात.. कदाचित सरकार पुन्हा सुप्रीम कोर्टात जाऊन काही दिवस वाढवून घेऊ शकतो.. पण गोकुळची निवडणुकीची प्रक्रिया सुरू होईल. जिल्ह्यातील दूध उत्पादक आता मतदानाला पात्र झाला.. मतदान करून तो निर्णय घेईल.. उद्याच्या निवडणुकीत काय करायचे.. जे मुद्दे सुप्रीम कोर्टाच्या समोर आले.. त्या मुद्द्याच्या आधारे सुप्रीम कोर्टाने न्यायपूर्वक निर्णय दिला आहे.. गोकुळ दूध संघ बिनविरोध निवडणूक मधल्या काळात विनय कोरे यांनी त्या पद्धतीची प्राथमिक चर्चा अनेकांशी केली होती.. पण आता निवडणुका पुढे गेल्यामुळे ती चर्चा थांबली आहे.. आता तरी तसा प्रस्ताव माझ्याकडे आलेला नाही.. पण प्रस्ताव आला तर त्याच्यावर विचार केला जाईल.. ऑन राज्य सरकारला चपराक हा निर्णय सरकारला चपराकच आहे. आम्हाला आनंद आहे की आम्ही निवडणुकीला सामोरे जात आहोत.. ऑन महायुती नेते आरोप प्रत्यारोप जो वाद आहे तो महायुती अंतर्गत आहे.. त्यामध्ये गोकुळ भरडला जाऊ नये एवढी आमची अपेक्षा आहे.. कोल्हापूरची जनता सुज्ञ आहे. ती जनता योग्य निर्णय घेईल.. पावसाळ्यात निवडणुका येत असल्या तरी ठरावची प्रक्रिया सुरू होऊन ती पूर्ण होईल.. मतदान पावसाळाच्या नंतर एखादा महिना पुढे घ्यावे असं होईल... ऑन अपात्र संस्था बाराशे संस्थांची सुनावणी पूर्ण झाली पाहिजे अशी आमची ठाम भूमिका.. त्यांना न्याय मिळाला पाहिजे अशी आमची भूमिका.. ऑन आघाडी आम्ही समविचारी जे सोबत येतील त्यांच्यासोबत आघाडी करू.. निवडणुका गोकुळ वाचवण्यासाठी व्हायला पाहिजे अशी भूमिका.. गोकुळ दूध संघ वाढवण्यासाठी जी लोकं सोबत येईल त्यांना घेऊन निवडणुकीला सामोर जावे पक्षीय राजकारण संस्थांमध्ये असू नये ही आमची भूमिका.. कारण साडेपाच लाख शेतकरी यामध्ये आहेत . पण उलट्या बाजूने काय होईल हे मला माहित नाही.. गोकुळची आगामी निवडणूक गोकुळ दूध उत्पादक विरुद्ध बाकीचे अशी होईल.. दूध उत्पादक शेतकरी आणि दूध डेऱ्या आमच्यासोबत असतील.. आम्ही जो शब्द दिला होता दरवाढीचा तो आम्ही पूर्ण केला. जास्त दूध दरवाढ दिले. पाच वर्षात कोणत्याही कर्मचाऱ्याला त्रास दिला नाही.. सगळ्यांना सोबत घेऊन गोकुळची प्रॉडक्टिव्हिटी वाढवणे याच्यावर भर होता..त्यामुळे लोक आमच्यासोबत राहतील.0
0
Report
Advertisement
