445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपुर में सीएनजी संकट: सिर्फ दो पंप, भारी कतारें लग गईं
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये सीएनजीचा तुटवडा, वाहनांच्या दोन किलोमीटर पर्यंत लागल्या रांगा. पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने रोज हजारो भाविकांची वाहने या ठिकाणी येत असतात. अनेक जन सीएनजी असलेल्या गाड्या वापरतात. मात्र पंढरपूर मध्ये सीएनजी पंप संख्या दोन असल्याने त्यात सीएनजी तुटवडा असल्याने सर्वच वाहनांना सीएनजी मिळत नाही. तीन तीन तास रांगेत थांबूनही सीएनजी मिळत नसल्याने वाहन चालक हैराण झाले आहेत.0
0
Report
वैजापूर के कांदा किसान आंदोलन ने समृद्धी महामार्ग रोककर ट्रैफिक बाधित किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या वैजापूर मध्ये उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आंदोलन केलं. यावेळेस आंदोलकांनी समृद्धी महामार्ग रोखून धरला आणि जोरदार घोषणाबाजी केली. कांद्याला हमीभाव मिळालाच पाहिजे या मागणीसाठी हे आंदोलन होतं. यावेळेस समृद्धी महामार्गावर टायर सुद्धा पेटवण्यात आले आणि वाहतूक रोखून धरली. महामार्गावर वाहनांच्या लांबस लांब रांगा लागल्या. पोलिसांनी समजूत घातल्यावर ही आंदोलक हटायला तयार नव्हते. अखेर पोलिसांनी काही आंदोलकांना आणि उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांना ताब्यात घेतलं आणि महामार्ग मोकळा केला. जवळपास 15 ते 20 मिनिटं आंदोलकांनी महामार्ग रोखून ठेवला होता त्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. अखेर पोलिसांनी आंदोलकांना हटवून महामार्ग वाहतूक सुरळीत सुरू केली आहे. अंबादास दानवे यांना ताब्यात घेऊन वैजापूर पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे. कांद्याला हमीभाव दिला नाही तर यापेक्षा मोठा आंदोलन करण्यात येईल असा इशारा अंबादास दानवे आणि आंदोलक शेतकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
नागपुर में इलेक्ट्रिक बस दुर्घटना; कंटेनर की टक्कर से चालक-परिचालक घायल
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील महापालिकेच्या आपली बसचा अपघात - सकाळच्यावेळी झालेला इलेक्ट्रिक बसचा अपघात - समोरून भरधाव आलेल्या कंटेनरने दिली बसला धडक - चालक आणि वाहक किरकोळ जखमी - बस अजनीकाडून बर्डीकडे येत असताना पंचशील चौकात झाला अपघात.. - बसमध्ये 5 प्रवाशी होते, सुदैवाने प्रवाश्यांपैकी कोणीही जखमी नाही0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में हापूस आमों की कीमतें गिरीं, मानसून से किसान परेशान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत हापूसचा अंतिम टप्पа.. कोसळते दर आणि पावसाच्या सावटात बागायतदार संकटात!.. अँकर रत्नागिरीत हापूस आंबा हंगाम आता अंतिम टप्प्यात पोहोचला असून मान्सूनच्या धास्तीने बागायतदारांची काढणीसाठी मोठी धावपळ सुरू आहे.. यंदा निसर्गाच्या लहरीपणामुळे आधीच उत्पादनात ७० ते ८० टक्क्यांची मोठी घट झाली आहे,त्यातच आता बाजारात आवक वाढल्याने हापूसचे दरही कमालीचे कोसळले आहेत... एकीकडे घसरलेले भाव आणि दुसरीकडे पावसाचे संकट यामुळे आंबा उत्पादक शेतकरी "इकडे आड तिकडे विहीर" अशा कात्रीत सापडला आहे... हाता-तोंडाशी आलेले पीक मान्सूनपूर्वी पदरात पाडून घेण्यासाठी शेतकऱ्यांची झाडांवर शेवटची धडपड सुरू आहे..0
0
Report
खेड के किसान घोड़े से खेत में, ईंधन महंगाई के बीच पारंपरिक खेती की मिसाल
Shirur, Maharashtra:*बुलेट-कारच्या युगात खेडच्या शेतकऱ्याचा घोड्यावरून प्रवास; इंधन बचत आणि पारंपरिक शेतीचा अनोखा संदेश* ANC :आजच्या काळात माणूस अलिशान गाड्या आणि महागड्या प्रवासामागे धावत असताना, खेड तालुक्यातील पाईट गावातील शंकर हेंगले मात्र रोज घोड्यावरून शेतात जातात. वाढते पेट्रोल दर, खराब रस्ते आणि गोवंश आधारित शेती यामुळे त्यांनी हा मार्ग निवडला आहे. VO :पाईट गावातील शंकर खेंगले यांनी आधुनिक वाहनांऐवजी घोडीला आपल्या जीवनाचा भाग बनवलेय शेतातील खराब रस्ते आणि वाढत्या इंधन दरांमुळे ते रोजच्या प्रवासासाठी घोडीचाच वापर करतात.गोवंशाचे संगोपन करत असताना त्यांनी महाराष्ट्राच्या खिल्लार गाईच्या संगोपनाचा ध्यास घेतलाय ट्रॅक्टरपेक्षा बैल आणि गोपालनावर आधारित शेतीच जमीन टिकवते, असा विश्वास व्यक्त करत कप पेट्रोल शंभरी पार करत असताना, दुचाकीऐवजी घोड्यावरून प्रवास करणारा हा शेतकरी इंधन बचतीचाही संदेश देतोय. मुंबईतील आयुष्य सोडून गावाकडे परतलेल्या शंकर हेंगले यांनी पारंपरिक शेती आणि गोवंश संवर्धनाची वाट निवडत आधुनिक दिखाऊ जीवनशैलीसमोर वेगळा आदर्श उभा करत खिल्लार गाईचे संगोपन, इंधन बचत आणि पारंपरिक शेती जपत आधुनिक जीवनशैलीला चपराक दिलीय Byte: शंकर धोंडीबा खेंगले (शेतकरी ) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया खेड पुणे...0
0
Report
रत्नागिरी में कृत्रिम रेत परियोजना से रोजगार के नए अवसर, ग्रामीण अर्थव्यवस्था को नई दिशा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कृत्रिम वाळू प्रकल्पामुळे रोजगार निर्मितीला बळ.. साई क्रश सॅन्ड जिल्ह्यातील पहिला प्रकल्प.. ग्रामीण अर्थव्यवस्थेला ही मिळणार नवी दिशा.. उद्योजक अनिकेत कदम यांचा विश्वास.. नदीपात्रातील अवैद्य वाळू उपसा रोखून पर्यावरण संवर्धनासाठी कृत्रिम वाळू अर्थात एम सॅन्ड उद्योगाला शासनाने प्राधान्य देत धोरणात्मक पावले टाकण्यास सुरुवात केली आहे.. वेरळ येथील साईक्रश सॅन्ड प्रकल्प जिल्ह्यातील पहिला प्रकल्प ठरणार आहे.. पर्यावरणाचा समतोल राखत बांधकाम क्षेत्रासाठी पर्यायी साधन उपलब्ध करून देण्याच्या हेतूने उभारण्यात आलेल्या प्रकल्प अंतर्गत अवजड दगड, बेसॉल्ट किंवा ग्रॅनाईट दगड मोठ्या क्रशर मशीनद्वारे बारीक करून त्याद्वारे कृत्रिम वाळू तयार करण्यात येते.. या कृत्रिम निर्मितीला चालना मिळून भविष्यात अशा उद्योगामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही नवी दिशा मिळेल असा विश्वास युवा उद्योजक अनिकेत कदम यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली..0
0
Report
Advertisement
कांदा भाव गिरावट के विरोध में रोहित पवार ने लासलगाव किसान आंदोलन शुरू किया
Lasalgaon, Maharashtra:सातत्याने होत असलेल्या कांदा दर घसरणी मुळे लासलगाव येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव येथे दाखल झाले असून कांद्याच्या माळा गळ्यात घालून आंदोलनाला सुरुवात झाली आहे. कांद्याला हमीभाव द्यावा विकलेल्या कांद्याला अनुदान द्यावे अशी प्रमुख मागणी आमदार रोहित पवार यांच्याकडून करण्यात आली असून मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीला जाणारा रस्ता महाराष्ट्रातून बंद करून असा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
विदर्भ में गर्मी का कहर: 46°C के पास, वार्धा-अमरावती-आकोला पर ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात उष्णतेचा प्रकोपामुळे सर्वसामान्यांना नागरिक हैराण.... सूर्यनारायण काढतोय होरपळून वर्धा, अमरावती आणि अकोला येथे उष्णतेचा *ऑरेंज अलर्ट* तिन्ही जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने 46 अंश सेल्सिअस च्या जवळपासच्या तापमानाची नोंद0
0
Report
रत्नागिरी: अशोक पाटील के बांधकाम पर सरकार ने कार्रवाई की घोषणा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आमदार अशोक पाटील यांच्या बांधकामावर होणार कारवाई.. सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांच्या तक्रारीनंतर शासनाचा दणका.. डापोली तालुक्यातील हर्णे येथील कथित सीआरझेड उल्लंघन प्रकरणाला आता मोठे वळण मिळाले असून सामाजिक कार्यकर्ते प्रसाद कर्वे यांनी केलेल्या तक्रारीची शासनाने गंभीर दखल घेतली आहे.. सरकारने त्या अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.. अशोक पाटील हे शिंदे शिवसेनेचे भांडुप येथील आमदार असल्याने या प्रकरणामुळे हर्णे परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.. अशोक पाटील यांनी केलेल्या बांधकामा बाबत प्रसाद कर्वे यांनी आपले सरकार पोर्टलवर तक्रार दाखल केली होती.. या तक्रारीच संबंधित बांधकाम सीआरझेड नियमांचे उल्लंघन करून करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला होता.. तसेच बिनशेती परवानगी रद्द झाल्यानंतर ही बांधकाम सुरू असल्याचे नमूद करण्यात आले होते..0
0
Report
Advertisement
1.5 किलो चांदी की कोल्हापुरी चप्पल: शादी में नई परंपरा बनती दिखी
Kolhapur, Maharashtra:जगभरात मंदीचे सावट आहे.. भारतातदेखील त्याचा मोठा प्रभाव जाणवतो.. असाच प्रत्येय कोल्हापुरात आला आहे.. सासर्याच्या ऑर्डर नुसार एका चांदी कारागीराने अधिक मासाचे वाण म्हणून चक्क चांदीचे कोल्हापुरी चप्पल बनवले आहे. दीड किलो वजनाचे हे चप्पल असून कोल्हाबूरचे कारागीर विक्रांत माळी यांनी आठ दिवसाच्या परिश्रमानंतर हुबेहूब चांदीची कोल्हापुरी चप्पल तयार केली आहे. अधिक महिन्यात जावयाला चांदीचे दागिने देण्याची परंपरा असते. त्यानुसार कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात वास्तव्याला असणाऱ्या एका श्रीमंत बापाने लाडक्या लेकीचं लग्न नुकताच झाल्याने लेकी बरोबर जावयाची हौस झाली पाहिजे या उद्देशाने चांदीचे चप्पल बनवण्याचे काम सराफाला दिले.. त्यानंतर सराफाने तब्बल दीड किलो चांदी वापरून कोल्हापुरी चप्पल बनवून दिले आहे. विशेष म्हणजे याच कारागिराने पिण्याच्या पाण्याचे चार आणि पाच किलो वजनाचे दोन पिंपदेखील बनवले आहेत.. यावरून हौसेला मोल नसते याचा प्रत्यय येत आहे. कारागिराने कोल्हापुरी चप्पल बनवण्यासाठी 22 हजार रुपयांची मजुरी घेतली आहे.0
0
Report
स Solapur: उजनी कालव्य में दो प्रवासी कारागिर डूबे, शव बरामद
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यात दोन परप्रांतीय कारागीर उजनी कालव्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना मोहोळ तालुक्यात दोन परप्रांतीय कारागीर उजनी कालव्यात वाहून गेल्याची धक्कादायक घटना समोर ढोकबाबुळगाव येथे उजनीच्या डाव्या कालव्यात पोहण्यासाठी गेल्यानंतर एकाला वाचवताना दुसराही वाहून गेला. राजस्थान येथील श्रीकांत चोपडा, रविकांत चोपडा असं वाहून गेलेल्या दोन फरशी बसवणाऱ्या कारागिरांचे नाव आहे.. श्रीकांत आणि रविकांत हे दोघेजण शनिवारी पाहण्यासाठी गेले होते. मात्र त्याच वेळी दोघेजण वाहून गेले असता रविवारी त्यांचा मृतदेह पाण्यावर तरंगताना दिसला. श्रीकांत आणि रविकांत दोघेजण पाहण्यासाठी केले. मात्र त्याचवेळी रविकांत याने श्रीकांतचा पाय धरला. त्यातच दोघेजण बुडाल्याची प्रत्यक्षदर्शीची माहिती याप्रकरणी मोहोळ तालुका पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे..0
0
Report
पालघर बोईसर में पानी लीक पर विवाद, चार ने पति-पत्नी और बच्चे पर हमला किया
Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यातील बोईसरच्या भीमनगर परिसरात मध्यरात्री किरकोळ कारणावरून झालेल्या वादाचे रूप थेट जीवघेण्याअहल्ल्यात बदलल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरातील बाथरूममधून पाणी लीक होत असल्याच्या कारणावरून सुरू झालेल्या वादानंतर चार जणांनी मिळून पती, पत्नी आणि त्यांच्या मुलावर लोखंडी रॉड व धारदार हत्याराने हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात तिघेही गंभीर जखमी झाले असून कानाला आणि डोक्याला गंभीर दुखापती झाल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. हल्ल्यानंतर आरोपींपैकी बोईसर पोलिसांनी एकाला तात्काळ अटक केली आहे. या प्रकरणी विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून बोईसर पोलिसांकडून तपास सुरु आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर पुलिस ने एक साल में 2.99 करोड़ रुपये मूल्य का माल जप्त किया
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर शहर गुन्हे शाखेकडून वर्षभरात 2 कोटी 99 लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या पथकाकडून 2025 या वर्षांमध्ये चोरी, घरफोडी अशा वेगवेगळ्या विषयातून 325 गुन्हे वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आले होते. यामध्ये तीन कोटी तेरा लाख 40 हजारांचा माल चोरीस गेला होता. चोरीला गेलेल्या माला पैकी शहर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी दोन कोटी 99 लाख 37 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 2025 या वर्षात चोरीस केलेल्या मालापैकी 95% मुद्देमाल जप्त करण्यात शहर गुन्हे शाखेला मोठे यश आले आहे.0
0
Report
कागल एमआईडीसी में भूखंड घोटाले की आशंका, सतेज पाटील ने खुलासे का संकेत दिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील कागल हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक वसाहतीत भूखंडांच्या कोठ्यावधी रुपयांचे व्यवहार होत आहेत. येत्या काळात या भूखंड माफियांचे कारणाने उघड करण्याचा इशारा आमदार सतेज पाटील यांनी दिला आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे. या ट्वीटमध्ये कागल हातकणंगले एमआयडीसीमध्ये भ्रष्टाचाराची गंभीर प्रकरण घडत असल्याचं म्हटले आहे. या प्रकारामुळे मूळ उद्योजकांमध्ये तीव्र नाराजी पसरल्यामुळे येत्या काही दिवसात भूखंड माफियांचे कारणाने देखील उघड करण्याचा इशारा देखील सतेज पाटील यांनी दिला आहे.0
0
Report
महाल कोठीरोड गोलीबारी घटनास्थल पर हमारे प्रतिनिधियों ने आकलन किया
Nagpur, Maharashtra:महाल कोठीरोड परिसरात गोळीबाराच्या घटनास्थळावरून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
