icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोल AP दौरे में गडकरी के ताफे में 50% कमी, सिर्फ तीन वाहन इस्तेमाल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनांत 50 टक्के कपात; दौऱ्यात प्रशासनातील केवळ तीन वाहने अँकर - केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या तब्बल 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.आजच्या दौऱ्यात ते पंढरपूर आणि अक्कलकोट येथे विविध विकास कामांची पाहणी करणार असून, काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात प्रशासनाकडून केवळ तीन वाहनांचाच वापर केला जाणार आहे.यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे एक वाहन, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांसाठी एक वाहन, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे एक वाहन अशा मर्यादित वाहनांचा समावेश असणार आहे.दरम्यान, अधिकाऱ्यांनी शक्य असेल त्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात, कार्यालयीन कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.
0
0
Report

20 साल बाद पवनराजे हत्याकांड का फैसला आज सुनाया जाएगा

Dharashiv, Maharashtra:धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या निकालाकडे Anchor राज्यात एकेकाळी गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल अखेर आज, 14 मे रोजी जाहीर होणार आहे. तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बहुचर्चित हत्याकांडात नेमका कोण दोषी ठरणार, याकडे धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील असून, या प्रकरणातील आरोपी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचीही मोठी पार्श्वभूमी आहे. 2006 मध्ये नवी मुंबई येथील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाने राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. या खटल्यात माफीचा साक्षीदार असलेला-parasmal jain, गुरूर दिगेश तिवारी, पिंटू सिंह यांच्यासह माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील अशा एकूण 9 आरोपींवर सुनावणी सुरू होती. अनेक वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता विशेष न्यायालय आज, 14 मे रोजी या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहे. दरम्यान, याआधी काही आरोपींविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांनी केला होता. खटल्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या साक्षी आणि पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणणाऱ्या पवनराजे हत्याकांडाचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपलाय. तब्बल २० वर्षांनंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

राज ठाकरे के आदेश पर मनसे ने चंद्रपुर के जंगलों में पाणवठे बनाए

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या प्रादेशिक जंगलात प्राण्यांसाठी तयार केले पाणवठे अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा अतिशय वेगाने वाढतोय. विशेषतः एप्रिल महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यात लोकांना हीटवेव्हचा सामना करावा लागला होता. या उन्हाच्या वाढत्या पाराामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमधील अनेक पानवठे आटलेले आहेत. त्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं पाण्यासाठी शहराकडे म्हणजेच मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. मानवी वस्ती कडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पणनवठे तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरालगत असलेल्या जंगलात 16 पाणवठे तयार केलेले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनाला चंद्रपूरकर सैनिकांनी तत्परतेने प्रतिसाद दिलाय.
0
0
Report
Advertisement

Belgaon नगर पालिका सभागृह में सीमावाद पर हंगामा, महाजन रिपोर्ट विरोध से माहौल गरमाया

Belagavi, Karnataka:बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात सीमाप्रश्नावरून मोठा गदरोळ निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ‘महाजन अहवाल’ विषय सभागृहात आणण्याचा प्रयत्न झाल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध नोंदवला. यावेळी सभागृहात तसेच बाहेरही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान कन्नड संघटनांनी ‘महाजन अहवाल’ लागू करण्याच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी या दबावाला न जुमानता ठाम भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आक्रमक भूमिका घेत महाजन अहवालाचा मुद्दा सभागृहात मांडण्यास जोरदार विरोध केला. “बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग असून, सीमावप्सा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत महाजन अहवालावर चर्चा करणे किंवा ठराव आणणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरू शकतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. “प्रश्न न्यायप्रविष्ट असताना हा विषय सभागृहाच्या पत्रिकेत कसा आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या दोन्ही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.
0
0
Report

सोलापूर: किसानों ने डबल पैसे का झांसा देकर धोखाधड़ी का आरोप, जांच की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची 20 महिन्यात पैसे डबल करून देण्याचे आम्ही दाखवून मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अक्कलकोट मधील तडवळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक समर्थ क्रॉप केअर कंपनीमध्ये केली आहे. पैसे डबल करण्यासोबतच फॉरेन ट्रिप घडवण्याचे आमिष दाखवण्यात आले असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली. सदरच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे के हवेली तालुका में असमय बरसात से गर्मी में राहत

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका परिसराला अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात घट झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या झळांपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळला आहे.
0
0
Report

शिरूर-रांजणगाव में मोर का डौलदार नृत्य वीडियो वायरल

Shirur, Maharashtra:सकाळचं कोवळं ऊन आणि हिरवीगार शेतं... याच शेतांच्या बांधावर जेव्हा साक्षात निसर्गाचा राजा म्हणजे 'मोराने' आपला पिसारा फुलवला, तेव्हा पाहणारेही थक्क झाले. शिरूर-रांजणगाव पट्ट्यात आजही निसर्गाचं हे वैभव कसं जिवंत आहे, याची साक्ष या 'थुई थुई' नाचणाऱ्या मोराने दिली आहे. पाऊस येण्याच्या चाहुलीने घातलेला हा फेर पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांचं पारणं फिटलंय. सध्या सोशल मीडियावरही या मोराच्या डौलदार नृत्याचाच डंका पाहायला मिळतोय! सकाळी मॉर्निंग वॉक ला बाहेर पडलेल्या बापूंनाहेब शिंदे यांनी आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय
0
0
Report

कवठा गाँव में जलकष्ट: प्रशासन से तुरंत समाधान जरूरी

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांनी पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावेत लागतात. “सारा समंदर मेरे पास है, एक बूंद पानी मेरी प्यास है” या गाण्याप्रमाणे गावकऱ्यांची अवस्था झाली आहे. कवठा गावाजवळून वाहणारी मन नदी सध्या पूर्णपणे कोरडी पडली आहे. गावातील बॅरेजमध्ये पाणी नाही, पाइपलाइनचे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत, तर आरो प्लांटही बंद अवस्थेत असल्याने केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. गावकरी नदीकाठी दोन फूट खड्डे खोदून त्यामधून झिरपणारे पाणी काढून तहान भागवत आहेत. “पिण्यासाठी पाणी नसल्याने आम्हाला नदीकाठी जाऊन खड्डे खोदावे लागतात,” अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. खारपानपट्ट्यातील कवठा गावात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मन नदीतील विहिरीतून केवळ पंधरा मिनिटे पाणी मिळते, त्यामुळे गावातील महिला आणि पुरुषांचा दिवसातील दोन ते तीन तास केवळ पाणी भरण्यात जातो. सकाळी शेतमजुरी करून परतल्यानंतर भर उन्हात नदीकाठी झिरे खोदून पाणी काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले. कवठा गावातील पाणीटंचाईची ही गंभीर समस्या आता प्रशासनासाठी मोठे आव्हान बनली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

तीन दशक बाद भी भेल प्रकल्प शुरू नहीं; किसानों ने तेरहवां पुण्य स्मरण किया

Bhandara, Maharashtra:भेल प्रकल्पग्रस्तांनी तेरा वर्षांपासून बंद असलेल्या भेल प्रकल्पाचे मुंडण करून केले 13 वे पुण्यस्मरण.... तेरा वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मुंडिपार येथे भेल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.यावेळी ५०० एकर शेती अधिग्रहित करून थाटात काम सुरू झाले मात्र काम आवार भिंत बांधून थांबले. व स्थानिकांना आपल्या जमिनी नाही आता रोजगारही नाही त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे तेरा वर्षे लोटूनही प्रकल्प सुरू झाले नाही या ठिकाणी कोणतेही काम झालेले नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रोश व्यक्त करत आहेत व त्यांनी आज तेराव्या वर्षी भेलचे तेराव्या पुण्यस्मरण आयोजित करून मुंडन केले आहे.
0
0
Report

मेहराज खान के ख़िलाफ़ 3 बच्चों के तथ्य छिपाने मामले में पुलिस कस्टडी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिका निवडणुकीसाठी आयोगाची दिशाभूल करून तिसरे अपत्य लपवल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी यांना १७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शाळेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी, मेहराज खान यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फक्त दोन मुलांचा उल्लेख केला होता, प्रत्यक्षात 3 अपत्य आढळून आली.. या संदर्भात कुठलं रॅकेट तर काम करत नाही ना याचाही तपस पोलीस करत आहेत..
0
0
Report
Advertisement

सिल्लोड में खेत तालाब में दो चिमुकले भाई डूबे, गांव में शोक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून दुःखद घटना समोर आली आहे. शिवना गावात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव साबळे (वय १२) आणि गोपाल साबळे (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे मेंढपाळ कुटुंबातील असून शेततळ्याशेजारी खेळत असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेत दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top