445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सायन–पनवेल महामार्ग पर युवक को गर्मी से अचानक तबीयत बिगड़ी, अस्पताल भर्ती
Navi Mumbai, Maharashtra:सायन–पनवेल महामार्ग पर खारघर में डचाकी से यात्रा करते समय एक युवक को अचानक गर्मी लग गई. युवक अस्वस्थ हो गया और उसने तुरंत अपनी बाइक सड़क के किनारे रोकी. कुछ समय में वह फुटपाथ पर गिर गया. घटना की गंभीरता को देखते हुए स्थानीय नागरिकों ने तुरंत पास के ट्रैफिक पुलिस को बुलाया. पुलिस ने भी तत्परता दिखाते हुए युवक को MGM अस्पताल में भर्ती कराया. अभी युवक का उपचार चल रहा है और उसकी स्थिति स्थिर है.0
0
Report
भास्कर जाधव ने आरटीओ कैंप में खुद ड्राइविंग टेस्ट देकर नियमों का संदेश दिया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी... आमदार भास्कर जाधव यांचा साधेपणा.. ड्रायव्हिंग टेस्टसाठी स्वतः लावली आरटीओ कॅम्पला हजेरी.. अँकर आपल्या आक्रमक शैलीसाठी ओळखले जाणारे आमदार भास्कर जाधव यांचा एक वेगळा आणि संयमी पैलू चिपळूणमध्ये पाहायला मिळाला. आपल्या ड्रायव्हिंग लायसन्सची मुदत संपल्यानंतर, जाधव यांनी कोणतीही VIP सवलत न घेता थेट आरटीओ कैंप गाठले. यावेळी त्यांनी सर्व नियमांचे पालन करत रीतसर ड्रायव्हिंग टेस्ट दिली. एका बड्या लोकप्रतिनिधीने सामान्य नागरिकाप्रमाणे रांगेत उभे राहून आणि स्वतः वाहन चालवून चाचणी दिल्याने उपस्थित सर्वांच्या भुवया उंचावल्या. "नियम सर्वांसाठी समान आहेत," हीच कृती त्यांनी या निमित्ताने अधोरेखित केली असून, सध्या त्यांच्या या साधेपणाची मतदारसंघात मोठी चर्चा रंगली.0
0
Report
बीड के मस्साजोग में सरपंच पोटनिवडणुकी के दौरान भारी तनाव, समर्थक भिड़ंत
Beed, Maharashtra:बीड: मस्साजोग मध्ये मतदान केंद्राबाहेर राडा; अपहरण करण्याआधी संतोष देशमुखांचा टीप देणारा मतदानाला आल्याचा धनंजय देशमुखांचा आरोप तर परळीच्या लोकांना मतदान करू नका अशी अफवा धनंजय देशमुख समर्थकाने पसरवल्याचा उमेदवार स्वरूपानंद देशमुखांचा आरोप.. मस्साजोग मध्ये तणाव. मस्साजोगे सरपंच संतोष देशमुख यांची 9 डिसेंबर 2025 रोजी निर्घृण हत्या झाली होती. त्यानंतर या गावातील पद रिक्त झाले होते. आज सरपंच पदासाठी मतदान प्रक्रिया सुरू आहे. या निवडणुकीत संतोष देशमुख यांच्या पत्नी अश्विनी देशमुख आणि स्वरूपानंद देशमुख यांच्यात लढत आहे. दुपारी मतदान केंद्राबाहेर एकच राडा पाहायला मिळाला. दोन्ही देशमुखांचे समर्थक आमने-सामने आल्या mुळे काही काळ तणावाचे वातावरण पाहायला मिळाले. अपहरण होण्याआधी संतोष देशमुख यांची टीप देणारा आरोपी सिद्धार्थ सोनवणे मतदानाला आला होता, त्यामुळे हा वाद उफाळला असल्याचा आरोप धनंजय देशमुख यांनी केला आहे. मस्साजोग इथल्या जिल्हा परिषद शाळेत तीन मतदान केंद्र आहेत. यातील एका मतदान केंद्रावर धनंजय देशमुख यांच्या समर्थकाने एका शिक्षकाला परळीला मतदान करू नका असे सांगत होते. त्यामुळे हा वाद झाला असल्याचा आरोप उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी केला आहे. शिवाय ही लोकशाही आहे जामिनावर सुटलेला आरोपीला मतदानाचा हक्क नाही काय? असा प्रतिसवाल उमेदवार स्वरूपानंद देशमुख यांनी धनंजय देशमुख यांना केला आहे. रस्त्यालगत असलेल्या मतदान केंद्रावर अचानक गोंधळ उडाल्याने काही काळ तणाव निर्माण झाला होता. त्यामुळे मतदारांवर थोडाफार परिणाम झाला होता. वाद विकोपाला जात असल्याचे पाहून पोलिसांनी तत्काळ मध्यस्थिची भूमिका घेतली. तब्बल 15 मिनिटं हा राडा सुरू राहिला. पोलिसांनी कायद्याचा बडगा उघरल्यानंतर मात्र दोन्ही गटातील समर्थक पांगले. राडा घालणाऱ्या समर्थकांचे व्हिडिओ फुटेज पाहून रीतसर कारवाई करणार असल्याचे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे. शेवटी, मस्साजोग गावातील या पोटनिवडणुकीदरम्यान निर्माण झालेला तणाव आणि आरोप-प्रत्यारोप यामुळे स्थानिक राजकारण पुन्हा एकदा तापल्याचं चित्र पाहायला मिळालं. पोलिसांच्या तत्पर हस्तक्षेपामुळे मोठा अनर्थ टळला असला, तरी या घटनेमुळे मतदान प्रक्रियेवर काही प्रमाणात परिणाम झाल्याची चर्चा आहे. आता प्रशासन पुढील कारवाईकडे लक्ष ठेवून आहे, या पार्श्वभूमीवर उद्या निकाल काय लागतो आणि गावाच्या राजकारणाला कोणती दिशा मिळते, हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
मल्टीनेशनल केस: निदा खान की बेल पर नई तलाशी, मलेशिया कनेक्शन पर चर्चा
Nashik, Maharashtra:अँकर नाशिकच्या बहुचर्चित मल्टी नॅशनल कंपनीतील महिला लैगिंक अत्याचार व धर्मांतर प्रकरणातील संशयित फरार आरोपी निदा खान हिच्या अटकपूर्व जामीनावर काल नाशिकरोड न्यायालयात सुनावणी पूर्ण झाली. परंतु न्यायालयाने निकाल राखीव ठेवला असून २ मे रोजी जामिनावर निकाल देणार आहे. त्यामुळे निदा खानला अटक होते की बेल मिळते याचा फैसला आता २ मे रोजीच होणार आहे. मात्र या पीडित महिलेला धर्मांतर करून मलेशियाला पाठवणार असल्याची धक्कादायक माहिती समोर येते यामुळे या प्रकरणात आता मालेगाव आणि मलेशियाचा कनेक्शन समोर आला आहे.... मल्टी नॅशनल कंपनी प्रकरणात सात महिला व एका पुरषाने तक्रारी दिल्या आहेत. त्यातील एका पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून २६ मार्च २०२६ रोजी संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार व निदा खान यांच्यावर गुन्हा दाखल आहे. यातील संशयित दानिश शेख, तौसिफ अत्तार या दोघांना अटक असून, सध्या ते मुंबई नाका पोलिस ठाणे हद्दीतील गुन्ह्यांतर्गत 'SIT'च्या ताब्यात आहेत. तर, संशयित निदा खान ही फरार आहे.फरार निदा खानने नाशिकरोड न्यायालयात जामीनसाठी अर्ज केलेला आहे. या अर्जावर काल सुनावणी झाली. सरकार पक्षातर्फे विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी प्रभावी युक्तिवाद करीत तिचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्याची मागणी केली...निदा खान हीने पीडित तरुणीवर कशापद्दतीने दबाव टाकला व पीडितेला तिच्या धर्मावरून हिणवले. तसेच पीडितेच्या मनात भीती घालून तिला धर्मांतरासाठी बुरखा, धार्मिक पुस्तके दिली. तसेच तिचे नाव बदलून हानिया ठेवण्यात आलं. पीडितेच्या धर्मांतराच्या प्रयत्न झाला. मालेगाव येथे धर्मांतरासंदर्भातील कागदपत्रे बनविण्यात आली. निदाने पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लाम धर्मासंदर्भातील रील्स, यू ट्यूब लिंक पाठविल्या गेल्या. रोजा पठण, हिजाब परिधान याबाबतची माहिती पीडितेला दिली. तिला मलेशियात पाठविण्याचेही कारस्थान निदा खानसह संशयितांचे होते, असा त्यावर महाराष्ट्रात धर्मांतराचा कायदा नाही, पण धार्मिक भावना हेतुपुरस्तर दुखावणे गुन्हा आहे. याप्रकरणात निदा खानची चौकशी होणे आवश्यक आहे. निदाच्या मोबाईलमधून अनेक माहिती मिळण्याची शक्यता आहे. निदा गरोदर असली, तरी तिला वैद्यकीय सेवा पुरविण्याची हमी शासनाची असल्याचा युक्तिवाद अॅड. मिसर यांनी केला व निदाच्या अटकपूर्व जामिनाला हरकत घेण्यात आली.दावा करीत यात 'मनीट्रेल' झाल्याचाही संशय व्यक्त केला. न्यायालयात मांडलेले मुद्दे: पीडितेची शैक्षणिक कागदपत्रे संशयितांनी ताब्यात घेतली होती. मालेगावमध्ये कार्यरत असलेल्या एका गटाच्या मदतीने तिचे नाव बदलण्याचा प्लॅन आखण्यात आला होता. पीडितेला मलेशियाला पाठवून ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे कामाला लावण्याची योजना तयार करण्यात झाली होती. पीडितेच्या मोबाईलमध्ये इस्लामिक अॅप्स डाउनलोड करून दिली होती. तिला धार्मिक शिकवणींशी संबंधित YouTube आणि Instagram लिंक सतत पाठवल्या जात होत्या. संशयित निदाने पीडितेला बुर्का आणि इस्लामविषयक माहिती असलेली पुस्तके दिली होती. धार्मिक परिवर्तनाच्या उद्देशाने ही सामग्री पुरवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ही सामग्री पोलिसांनी जप्त केली आहे. पीडितेला ‘हानिया’ हे नाव देण्यात आले होते. तसेच तिला मलेशियाला पाठवण्यासाठी एक विशिष्ट व्यक्तीशी जोडण्याची कटकारस्थान होती. पीडितेला कळाले की संशयित दानिश विवाहित आहे, तेव्हा तिला मलेशियाला पाठवण्याचे आमिष दाखवून पुन्हा जाळ्यात ओढण्यात आले. निदा या संशयिताकडून मलेशिया कनेक्शनविषयी अधिक माहिती मिळवणे अत्यंत आवश्यक आहे. बुर्का आणि धार्मिक पुस्तके नेमकी कुठून आली, कोणाने आर्थिक मदत किंवा आसरा दिला, तसेच निदाचा मोबाईल जप्त करणे या सर्व बाबींची चौकशी अद्याप सुरू आहे.दरम्यान, बचाव पक्षाचे वकील यांनी सरकार पक्षाचा युक्तिवाद खोडून काढताना महाराष्ट्रात धर्मांतरविरोधी कायदाच नाही. उत्तर प्रदेश सरकारचा कायदा आहे, अन्य राज्यांत कायदा नाही. धर्मांतराचा कोणताही प्रयत्न करण्यात आलेला नाही असे सांगत सांगत निदा खान ही गरोदर असल्याने तिच्या सुरक्षिततेच्या अनुषंगाने अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर करण्याची मागणी केलीये... मालेगावमध्ये आणि मलेशिया कनेक्शन उघड झाल्याने आता ही इंटरनॅशनल कनेक्शन समोर आलंय ..आता यात NIA आणि ATS देखील तपास करण्याची शक्यता आहे...यामुळे निदा खान च्या अटकेनंतर अनेक बाबी समोर येणार आहे....0
0
Report
अमरावती-पांढुर्णा राजमार्ग पर भीषण हादसा: विवाहयात्रा कर रहे परिवार के तीन की मौत
Amravati, Maharashtra:Amravati-Pandurna राष्ट्रीय highway पर विवाह समारोह में जा रही एक परिवार की गाड़ी का भीषण हादसा; तीन लोग मौके पर ही मृत हो गए, एक गंभीर रूप से घायल है। घटना नागपुर से अकोला जाते समय रस्ते के किनारे पेड़ से टकराने के कारण हुई, जबकि सदस्यों में एक नौ वर्ष की बच्ची भी शामिल थी जिसकी मृत्यु हो गई। घायलों का उपचार ग्रामीण रुग्णालय में चल रहा है।0
0
Report
वाशीम में विद्युत तार फटने से पानी आपूर्ति चार-पाँच दिन ठप, नगर परिषद अलर्ट
Washim, Maharashtra:वाशीम नगर परिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्राच्या विद्युत केबल जळाल्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला असून वाशिम शहराचा पाणीपुरवठा पुढील चार ते पाच दिवस पूर्णपणे ठप्प राहणार असल्याची माहिती नगरपरिषदेकडून देण्यात आली आहे. त्यामुळे तापमान वाढत असतांना नागरिकांना पाणीटंचाईचा देखील सामना करावा लागणार आहे. जलशुद्धीकरण केंद्राला जोडलेली भूमिगत वीज केबल बस्ट झाल्याने वीज पुरवठा अचानक बंद पडला आहे. वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरण कडून शर्तीचे प्रयत्न केले जात आहेत यासाठी नागपूर वरून विशेष तंत्रज्ञ सुद्धा बोलवण्यात आले आहेत मात्र तरीही चार ते पाच दिवस दुरुस्तीसाठी लागणार असल्याची माहिती नगरपालिकेकडून देण्यात आली आहे. या बिघाडामुळे पाणी शुद्धीकरण आणि वितरण प्रक्रिया पूर्णपणे थांबली आहे. या कालावधीत शहरातील सर्व भागांमध्ये नळाद्वारे पाणीपुरवठा होणार नसल्याने नागरिकांनी पाण्याचा वापर अत्यंत जपून करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
शाहिद समीर संदी ने कबूला; हिंदू लड़कियों से शारीरिक संबंध, वीडियो-फोटो डिलीट, सजा मांग
Kolhapur, Maharashtra:माझे अनेक हिंदू मुलीशी शारीरिक संबंध होते.. मी त्याचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो मोबाईल मध्ये ठेवले होते. मी आता ते सगळे डिलीट करत आहे. असल्याची कबुली स्वतः आरोपी शाहीद समीर सनदी याने दिली असल्याचे समोर आले आहे. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे असून या पुढच्या काळात हिंदू मुलीच्या नादाला लागणार नाही असे देखील आरोपी शाहीद समीर सनदी म्हणाला आहे. त्याच्या वडिलांनी देखील मुलाने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.. त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.0
0
Report
यवला में जलसंकट गहरा, 23 गाँवों को 19 टैंकर पानी पहुँचाने लगे
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, अंकाई, कोळम, अडसरे, देवठाण, भुलेगाव, आहेरवाडी यांसह एकूण 23 गावे आणि 8 वाड्यावस्त्यांना सध्या 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा करत तहान भगवली जात आहे तर नगरसुल, रेंडाळे, सोमठाणा जोश, वागळे यांसह आणखी 13 गावे व 19 वाड्यावस्त्यांसाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव येवला प्रांत कार्यालयात प्रलंबित असून या प्रस्तावांना आज बैठकीत प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे मंजुरी देणार असून उद्यापासून नव्या भागांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे त्यामुळे टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
धाराशिव में गर्मी से मवेशी बचाने के लिए फॉगर मशीन का सहारा
Dharashiv, Maharashtra:उन्हाचा कडाका वाढला; धाराशिवमध्ये जनावरांसाठी ‘फॉगर’चा आधार. जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने धरली आधुनिकतेची कास धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा फटका आता जनावरांनाही बसू लागलाय. तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादनात घट होत असतानाच उष्माघाताचा धोका वाढलाय. मात्र, पशुपालक आता आधुनिक उपायांचा आधार घेत जनावरांचं संरक्षण करताना दिसत आहेत धाराशिवच्या कळंब शिवारातील शेतकरी बाळासाहेब धस यांनी आपल्या गोठ्यात तब्बल 50 म्हशीचा सांभाळ केलाय. वाढत्या उन्हामुळे जनावरांचं आरोग्य धोक्यात आलं, दूध उत्पादन घटलं… त्यामुळे मोठं संकट उभं राहिलं. या संकटावर मात करण्यासाठी धस यांनी गोठ्यात ‘फॉगर मशीन’ बसवलंय. तुषार सिंचन पद्धतीने दिवसातून दर एका तासाला पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळे गोठ्यातील तापमान नियंत्रित राहत असून जनावरांना उष्णतेपासून दिलासा मिळतोय. या आधुनिक उपायामुळे उष्माघाताचा धोका कमी झाला असून जनावरांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येतेय. दूध उत्पादनातील घटही काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचं पशुपालक सांगतात. दुधापेक्षा जनावरांचं जगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फॉगर लावून त्यांची काळजी घेतोय.0
0
Report
Advertisement
लातूर में भीषण गर्मी से पोल्ट्री उद्योग पर असर, मौतें और अंडे उत्पादन घटा
Latur, Maharashtra:लातूर जिले में बढ़ते तापमान का पोल्ट्री व्यवसाय पर असर दिख रहा है. तीव्र गर्मी के कारण कोंबडों की मौत हो रही है और अंडे उत्पादन में कमी आई है. तापमान कम-से-कम 40 से अधिक पहुंचने पर कोंबडों के स्वास्थ्य पर असर पड़ रहा है, श्वसन विकार, भूख कमी और कमजोरी बढ़ रही है. उष्माघात से तिहाई मौतों की सूचना भी मिली है. पोल्ट्री फार्म में उत्पादन खर्च बढ़ रहा है और लाभ घट रहा है. इससे क्षेत्रीय पोल्ट्री उद्योग संकट के दौर से गुजर रहा है.0
0
Report
मीरा भाईंदर मामले में आतंकी लिंक की आशंका, महाराष्ट्र पुलिस की जाँच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर संजय निरूपम (शिवसेना नेते) On मीरा भाईंदर घटना - एक माथेफिरू आला होता ..तो आतंकवादी है की त्याचा कोणासोबत संबंध आहे.. याचा तपास सुरू आहे.. *पहलगाम येथील घटनेप्रमाणे मीरा भाईंदर येथील घटना.. सुरक्षारक्षकांना धर्म विचारून कलमा वाचण्यास सांगितल.. ते वाचू शकले नाहीत म्हणून त्याच्यावर हल्ला केला..* - ही दुर्दैवी घटना आहे.. ऐसी घटना कुठेही होता कामा नये.. महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस अधिकारी कार्यक्षम आहेत.. याची चौकशी होऊन याचे मागे कोण हे माहिती व्हायला हवं.. - लव्ह जिहाद कार्पोरेट जिहाद सारखे प्रकरण असताना एखाद्या ग्रुपचे आपल्या डोळे तर नाही ना.. किंवा महाराष्ट्रातील लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी लक्ष केले जात आहे का.. असे वाटत आहे.. मात्र अधिकारी यामागे कोण त्याला पकडून हा विषय संपवतील असा विश्वास आहे.. - आरोपीवर कोणतीही दया दाखवण्याची गरज नाही.. आरोपीच्या मागे कोण आहे.. त्याचा मास्टर माइंड कोण हे देखील तपासणं गरजेचं आहे.. हे एका व्यक्तीचे काम नाही तर यामागे एका आतंकवादी संघटन काम करत आहे.. त्याचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांसोबत काही संबंध आहे का.. त्याचा पण तपास व्हायला hवे.. On विधान परिषद - एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत.. कोणाला उमेदवारी द्यायची की नाही ते सर्व एकनाथ शिंदे पाहतात.. यावर जो निर्णय होईल ते एकनाथ शिंदे यांच्या लेव्हलवर होणार.. - दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा आहे.. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू.. गरज पडली तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांची इच्छा असली तर अजून एक उमेदवार देण्यासंदर्भात विचार होईल.. - दोन व्यतिरिक्त अजून एक उमेदवार आम्ही निवडून आणू शकू तर पुढे कोण आहे.. त्यामुळे काही फरक पडत नाही.. On उद्धव ठाकरे बिनविरोध. - *शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा फरक आहे.. शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत.. उद्धव ठाकरे इतके मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी नऊ जागांवरच निवडणुका झाल्या पाहिजे..* On मराठी सक्ती.. - या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी काल बैठक बोलावली होती.. बैठकीत मराठी भाषेचा ज्ञान सर्वांना हवा असा सर्वांचा सुर होता.. सोबतच महाराष्ट्रातील सर्वांना मराठीत संवाद साधला पाहिजे.. मात्र मराठी बोलला नाही तर तुमची परमिट किंवा लायसन रद्द करू अशी शक्ती आपण जेव्हा करतो.. ते चुकीचं धोरण दिसतो यामुळे उपवासमारीच संकट येऊ शकतो.. असाही एक सूर होता.. - त्यावर मंत्री महोदयांनी पूर्वीच्या जीआरमध्ये सुधार करण्याचा आश्वासन दिल.. ऑटो चालक टॅक्सी चालक यांना मराठी येत नाही त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करू . आणि मराठीत बोलतील अशी व्यवस्था तयार करणार...0
0
Report
एसटी में बुजुर्गों को मुफ्त यात्रा, 2 रुपयों के स्वच्छता शुल्क से नाराजगी
Nanded-Waghala, Maharashtra:ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने त्यांना मोफत सवलत दिली आहे. मात्र याच ज्येष्ठ नागरिकांकडून आता स्वच्छता अधिभाराच्या नावाखाली 2 रुपये घेतले जात आहेत. 2 रुपये किंमत जास्त नसली तरी सुट्या 2 रुपयांसाठी मात्र ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. परिवहन महामंडळाकडून चालवली जाणारी बस सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार आहे. मोडकळीस आलेल्या बसेस, कोलमडलेले वेळापत्रक, बेजबाबदार चालक, अस्वच्छता अश्या अनेक तक्रारी असल्या तरी एस टी बस आजही सर्वासामान्यांची वाहतूकीसाठीची पसंत आहे. पण एस टी महामंडळाच्या एका नव्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत 75 वर्षाखालील नागरिकांना एस टी प्रवास मोफत आहे. पण एस टी ने ज्येष्ठ नागरिकांसोबतच सर्वाना 2 रुपये स्वच्छता अधिभार लावलाय. मोफत प्रवास असला तरी 2 रुपये ज्येष्ठ नागरिकांनाही द्यावे लागत आहेत. तसे 2 रुपये फार काही जास्त नाहीत. पण 2 रुपये सुटे नसल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. स्वच्छतेच्या नावाखाळ dva दोन रुपये अधिभार लावण्यात येत आहे. मात्र हे दोन रुपये नेमके कोणत्या स्वच्छतेसाठी वापरले जात आहे हा प्रश्न आहे. बसस्थानकावर सगळीकडे अस्वच्छता दिसते. शौचालय आणि इतर जागी तर नेहमीच घाण साचलेली असते. प्रवाशांची बसण्यासाठीची व्यवस्था असलेल्या ठिकाणीही अस्वच्छता दिसून येते. बसेस मध्येही अस्वच्छता असते मग हा स्वच्छता कर नेमका लावला कशासाठी जातोय असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सुटे दो रुपये नसल्याने अनेकदा प्रवाशी आणि प्रवाशांमध्ये वादावादीच्या घटना घडत आहेत. केवळ प्रवाशीच नव्हे तर एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ज्येष्ठ नागरिकांकडून वसुल करणे अवघड होत आहे. त्यामुळे किमान ज्येष्ठ नागरिकांना या दोन रुपये स्वच्छता करातून सवलत देण्यात यावी अशी मागणी होतेय.0
0
Report
Advertisement
यवला- पुणे इंदोर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, मरीजों को परेशानी
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून पाच किलोमीटर पर्यंत लांब राहायला लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोरून हा महामार्ग जात असल्याने रुग्णसेवेला याचा फटका बसत असून अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून पडत असतात, त्यामुळे रुग्णांचा जीवदेखील धोक्यात आला आहे. त्यामुळे येवला शहराला लवकरात लवकर उड्डाणपूल अथवा बायपास मंजूर करावा अथवा महत्त्वाच्या चौकावर रुग्णांना येवला येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.0
0
Report
कोकण में पोट चुनाव: सिंधुदुर्ग की 14 ग्रामपंचायतों में मतदान शुरू
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 सरपंच पद व 9 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ही पोट निवडणूक होत आहे. आज एकूण १४ हजार २१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळ पासून अगदी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून. कोकणात लग्नाचा हंगाम असल्याने एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं.0
0
Report
धाराशिव में 29-30 मई को 32वां अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन उद्घाटन सुमित्रा पवार
Dharashiv, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन. धाराशिव मध्ये 29 व 30 मे रोजी रोजी साहित्य संमेलन होणार संपन्न. धाराशिवमध्ये साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई येथे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सुमित्रा पवार यांना अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. २९ आणि ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्षस्थानी असणार आहेत. देशभरातील सुमारे ९०० साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असून, याआधी पु. ल. देशपांडे, जावेद अख्तर, शिवाजी सावंत, शरद पवार यांसारख्या मान्यवरांनीही या संमेलनाचे उद्घाटन केले आहे.0
0
Report
Advertisement
