icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के धारणी में रेत तस्करी: एक नागरिक पर ट्रैक्टर चढ़ाने की कोशिश, प्रशासन चुप

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या धारणी तालुक्यात वाळू तस्करीचा धुमाकूळ सुरू असल्याचा आरोप करण्यात येत आहे. वाळू तस्करीला विरोध करणाऱ्या एका नागरिकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. इतकंच नाही तर संबंधित नागरिकाला काठीने मारण्याचाही प्रयत्न झाल्याची माहिती आहे. या प्रकाराची माहिती प्रशासनाला देऊनही एकही अधिकारी घटनास्थळी पोहोचला नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. धारणी तालुक्यात दिवस रात्र वाळूची वाहतूक सुरू असल्याने शासनाचा लाखो रुपयांचा महसूल बुडत असल्याचा दावा नागरिकांकडून करण्यात येत आहे. मात्र तक्रारी करूनही कारवाई होत नसल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.
0
0
Report

भाग्यश्री पटवर्धन ने गणपती मंदिर में आरती के दौरान पुजारी का सम्मान नहीं किया

Sangli, Maharashtra:अँकर - अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धन यांनी गणपती मंदिरात येऊन आरती करणे, पुजाऱ्याशी चुकीच्या पद्धतीने बोलणे हे,कृत्य हे उन्मानमत पणा आणि चुकीचे असल्याचे मत विजयसिंहराजे पटवर्धन यांनी स्पष्ट केले आहे.एकदा प्रतिष्ठापनेची पूजा झाल्यानंतर पुन्हा येऊन पूजा करणं हा प्रकार चुकीचा असल्याचे सांगत,आपली तब्येत तंदुरुस्त असून,अजून दोघांना लोळवेल,इतपत माझ्या अंगात ताकत आहे,असं स्पष्ट करत भाग्यश्रीने वडिलांची तब्येत ठीक नसल्याने आरतीची परंपरा पुढे नेण्यासाठी आपण सांगलीला आल्याचे सांगितलं होतं,यावरून विजयसिंह राजे पटवर्धन हे स्पष्टीकरण दिले आहे,तसेच 1940 च्या संस्थान कायद्यानुसारच संस्थानाचे युवराज म्हणून आदित्यराजे यांची नियुक्ती केल्याचा खुलासा,करत आरती दरम्यान पुजाऱ्यांचा अपमान भाग्यश्रीने केला असून तिने पुजारीची माफी मागावी,असे मत विजयसिंहराजे पटवर्धनांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले आहे.
0
0
Report

केडीएमसी के 100 बेड हॉस्पिटल के लिए तीसरी बार टेंडर्स जारी, जवाब कब?

Kalyan, Maharashtra:मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल उभारण्यासाठी निवेदला प्रतिसाद मिळेना केडीएमसी प्रशासनावर तिसऱ्यांदा निविदा काढण्याची वेळ १०० बेडचं मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल उभारण्याचं दिलं होतं निवडणुकीत आश्वासन कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत पश्चिमेच्या गौरीपाडा भागात आरक्षित भूखंडावर १०० बेडचं मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल उभारण्याचं आश्वासन प्रत्येक पक्षाने दिलं होतं . मात्र हे हॉस्पिटल आता निविदा प्रक्रियेत अडकून पडलं आहे. हॉस्पिटल उभारण्यासाठी केडीएमसी प्रशासनाकडून प्रोजेक्ट मॅनेजमेंट कन्सल्टंट नियुक्तीसाठी दोनदा निविदा काढण्यात आल्या. मात्र त्याला कोणताही प्रतिसाद मिळाला नाही .त्यामुळे तिसऱ्यांदा निविदा प्रक्रिया राबवण्याची वेळ महापालिका प्रशासनावर आली आहे. आता या तिसऱ्या निविदा प्रक्रियेला तरी प्रतिसाद मिळतो ka ki कल्याणकरांचीं हॉस्पिटल स्वप्न हे स्वप्नच राहतं हे पाहावं लागेल.
0
0
Report
Advertisement

AI और रोबोटिक्स पर Robo-Show 2026: IRIS ह्यूमनॉइड ने छात्रों से संवाद किया

Akola, Maharashtra:श्री शिवाजी अभियांत्रिकी व तांत्रिकी महाविद्यालय, अकोला के संगणक विभाग और मेकर्स लैब, कोची के संयुक्त प्रयास से ‘रोबो-शो २०२६’ का आयोजन किया गया है. इस उपक्रम के माध्यम से प्राचार्य, प्राध्यापक, विद्यार्थी तथा अकोलेकरों को कृत्रिम बुद्धिमत्ता और ह्यूमनॉइड रोबोटिक्स के अत्याधुनिक तकनीक का अवलोकन करने का अवसर मिला. कार्यक्रम का प्रमुख आकर्षण ‘IRIS’ AI तकनीक-आधारित ह्यूमनॉइड शिक्षण रोबोट है. IRIS विद्यार्थियों से संवाद, विविध प्रश्नों के उत्तर, पारस्परिक संवादी शिक्षण और बहुभाषिक संवाद क्षमता दिखाती है. साथ ही AI आधारित शिक्षा और विद्यार्थियों की कार्यकुशलता के विश्लेषण के तरीके भी रोबो-शो में प्रस्तुत किए गए. इस प्रकार अभियांत्रिकी छात्रों को भविष्य के AI और रोबोटिक्स की प्रत्यक्ष पहचान मिली.
0
0
Report

रत्नागिरी के दाभोल में प्रस्तावित अणुऊर्जा परियोजना के खिलाफ ग्रामीणों का तीव्र विरोध

Ratnagiri, Maharashtra:ब्रेकिंग न्यूज: रत्नागिरीत प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला ग्रामस्थांचा तीव्र विरोध; दाभोळमध्ये वातावरण तापले.. रत्नागिरीच्या दाभोळ,वनौशी-भिवबंदर येथे प्रस्तावित २८०० मेगावॉटच्या अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला आहे.. जिंदाल कंपनीसोबतच्या सामंजस्य कराराच्या घोषणेनंतर शेती,पर्यावरण आणि सागरी उपजीविका धोक्यात येण्याची भीती व्यक्त करत ग्रामस्थांनी बैठक घेतली.. प्रकल्प रद्द करण्यासाठी ग्रामदेवतेला साकडे घालत गाऱ्हाणे मांडण्यात आले असून,प्रशासनाने विशेष ग्रामसभेत वस्तुनिष्ठ कागदपत्रे सादर करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे..
0
0
Report
Advertisement

मंडणगड में सुभाष साभटे ने शिवसेना में प्रवेश किया, BJP को बड़ा धक्का

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मंडणगडमध्ये भाजपला धक्का; नगरसेवक सुभाष सापटे यांचा रामदास कदमांच्या उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश.. मंडणगड नगरपंचायतीतील नगरसेवक सुभाष सापटे यांनी शिवसेना नेते रामदास कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे.. काही दिवसांपूर्वीच भाजपमध्ये गेलेल्या सापटे यांनी आता गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या नेतृत्वावर विश्वास दाखवत हाती 'धनुष्यबाण' घेतले असून, तालुक्याच्या विकासासाठी शिवसेनेसोबत काम करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला आहे.. उद्योजक संदेश चिले, कल्पेश शिंदे, दिनेश कांबळे आणि प्रवीण दिवेकर यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या पक्षप्रवेशामुळे मंडणगड नगरपंचायत क्षेत्रात शिवसेनेचे संघटन अधिक मजबूत झाले आहे..
0
0
Report

गणेशोत्सव सजावट के दौरान विद्युत धक्का से संगमेश्वर में युवक की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणपती सजावटदरम्यान विजेचा तीव्र धक्का लागून संगमेश्वरमधील ३६ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू.. अँकर संगमेश्वर तालुक्यातील मुरडव-सुतारवाडी येथे गणेशोत्सवाच्या सजावटीदरम्यान विजेचा जोरदार धक्का लागून सहस विष्णू केळकर या ३६ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला.. घरात विजेचे तोरण लावत असताना हा अपघात घडला.. उपचारासाठी तातडीने डेरवण येथील रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी त्यांना दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले.. या प्रकरणी संगमेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून या घटनेमुळे संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे..
0
0
Report

चंद्रकांत हंडोरे का सरकार पर हमला: मराठा छात्रों के लिए ओबीसी आरक्षण में कटौती नहीं चाहिए

Yeola, Maharashtra:खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन मनोज जरांगे पाटील आंदोलन ओबीसींचे आरक्षण कायम ठेवून सरकारने वेगळ्या पद्धतीने मराठा समाजातील मुलांसाठी आरक्षणाची तरतूद करावी. तीन वर्षात जरांगे पाटलांची अनेक उपोषण झाली सरकारने आश्वासनांचे नुसते हरताळ फासले आहे. त्यामुळे जरांंगे पाटील आता पेटून उठले आहे आमचे म्हणणे एवढेच आहे की ओबीसी आरक्षणामध्ये कुठलीही काटछाट न करता मराठा समाजातील मुलांसाठी आरक्षण द्यावे आमचा त्याला पाठिंबा राहील. खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन सरकारचे अपयश विद्यार्थी आंदोलन. सरकार राजकारणात मशगुल आहे विद्यार्थ्यांचा ज्याप्रमाणे विचार करायला पाहिजे त्याप्रमाणे होत नाहीये. म्हणून जंतर-मन्त्रचे आंदोलन असेल आदिवासी विद्यार्थ्यांचे आंदोलन असेल PhD विद्यार्थ्याचे पुण्यातील आंदोलन असेल ही आंदोलन सरकारच्या दुर्लक्षितपणामुळे सुरू झाली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये साप घусayo काय..! चावतो काय..! विद्यार्थी जखमी होतो काय मृत्युमुखी होतो काय..! माझ्या कार्यकाळात मी महाराष्ट्रामध्ये फाईव्ह स्टार हॉटेल बांधली माझे स्वप्न होते आमच्या विद्यार्थ्यांना घर मिळत नाही अभ्यास करायला जागा मिळत नाही म्हणून मी महाराष्ट्रभर विद्यार्थ्यांसाठी 150 हॉस्टेल बांधली त्यामागे माझा हेतू विद्यार्थी शिकले पाहिजे हा होता. विद्यार्थी आंदोलन हे सरकारचे फेल्युअर आहे. खासदार व माजी सामाजिक न्याय मंत्री चंद्रकांत हंडोरे ऑन सरकारने आदिवासी विद्यार्थ्यांचा निधी इतर योजनांसाठी वळवला. मी सामाजिक न्याय मंत्री असताना स्कॉलरशिपचा मोठा भाग आम्ही विद्यार्थ्यांसाठी खर्च करत होतो मात्र सरकारने सामाजिक न्याय विभागाचा निधी लाडकी बहीण योजना व इतर योजनांसाठी पळवण्याचं कट करास्थान चालू ठेवला आहे ते बंद करा. आदिवासी विभाग व सामाजिक न्याय विभागाचा निधी 100% खर्च झाला पाहिजे. मी मंत्री असताना हा निधी लॅप्स होऊ दिला नाही मात्र तुम्ही आता 100% निधी हा वापरला पाहिजे. लाडक्या बहिणी सारख्या योजनेमुळे शासनाच्या तिजोरीवर तर भार पडलाच आहे मात्र सामाजिक न्याय विभागाच्या निधीवर डल्ला मारण्याचा प्रयत्न होत आहे लाडक्या बहिणी बद्दल आम्हाला आकस नाही मात्र सरकारने अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी. सात आठ लाख कोटी कर्ज घेतलं आणखी दोन लाख कोटी घ्या महिलांसाठी त्यांच्या शिक्षणासाठी त्यांच्या रोजगारासाठी पैसे उपलब्ध करून द्या. काही योजनांमुळे आदिवासी विद्यार्थ्यांवर अन्याय होत आहे म्हणून आमची विनंती आहे लाडक्या बहिणींना जरूर मदत करा मात्र अर्थसंकल्पात तरतूद करून
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के पुलिस उपनिरीक्षक की CPR से जिंदगी बची, 30 मिनट बाद हालत स्थिर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात हृदयविकाराचा जोरदार झटका आलेल्या पोलिस अधिकाऱ्याचा अर्धा तास CPR दिल्यानंतर वाचला जीव , पोलीस उपनिरीक्षक सुशील सरकार याच्या बाबतीत दैव ठरले बलवत्तर, डॉक्टर स्वप्निल पुणेकर यांच्या तत्परतेने केली कमाल अँकर:-- गणेशोत्सवाच्या कडक बंदोबस्ताची थकवणारी ड्यूटी संपवून घरी आलेल्या सुशील सरकार नामक चंद्रपूरच्या पोलिस उपनिरीक्षक अधिकाऱ्याला अचानक हृदयविकाराचा झटका आला. डॉक्टर अनुप वासाडे यांनी त्यांना चंद्रपुरातील हृदयरोग तज्ज्ञ डॉ. स्वप्नील पुणेकर यांच्या रुग्णालयात रेफर केले. रुगणाकडे जाताना त्यांची प्रकृती आणखीच बिघडली. त्यामुळे ते रुग्णालयात पोहोचताच ओपीडी काउंटरवर जाऊन पडले. डॉ. स्वप्नील पुणेकर यांना कळताच त्यांनी येऊन तपासणी केली असता, सरकार यांच्या हृदयाचे ठोके पूर्णपणे थांबले होते. वैद्यकीयदृष्ट्या रुग्ण हाताबाहेर गेल्याची स्थिती असतानाही डॉ. पुणेकर आणि त्यांच्या पथकाने हार मानली नाही. त्यांनी क्षणाचाही विलंब न करता ओपीडी टेबलवरच 'सीपीआर' देण्यास सुरुवात केली. छातीवर अविरत दाब देत सलग ३० मिनिटे जीवन-mरणाची ही लढाई सुरू होती. अखेर ३० मिनिटांनंतर थांबलेल्या हृदयात संथपणे पुन्हा ठोके पडू लागले आणि थांबलेला श्वास परतला. श्वास परतताच त्यांना तातडीने व्हेंटिलेटरवर हलवण्यात आले. रुग्णाचे हृदय पूर्ववत सुरू होताच डॉक्टरांच्या टीमने कॅथ लॅबमध्ये अँजिओप्लास्टीची प्रक्रिया सुरू केली. तपासणीदरम्यान हृदयाच्या नळीत १०० टक्के ब्लॉक असल्याचे समोर आले. डॉ. पुणेकर यांनी अत्यंत कौशल्याने त्या ब्लॉकच्या ठिकाणी 'स्टेंट' बसवून रक्तपुरवठा पूर्ववत केला. अवघ्या १२ तासांत सरकार यांना व्हेंटिलेटरवरून बाहेर काढण्यात आले असून, त्यांची प्रकृती आता पूर्णपणे धोक्याबाहेर आणि स्थिर आहे    डॉक्टरांच्या   तत्परतेमुळे एका कर्तव्यदक्ष पोलिसाला नवे आयुष्य मिळाले आहे.
0
0
Report

चंद्रपुर के सावली में बाघ हमले से वृद्ध किसान की मौत, वनपथक घटनास्थल पर

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात गुरे राखणाऱ्या इसमाचा मृत्यू, वनपथक घटनास्थळी चंद्रपूर जिल्ह्यात पावसाळ्यातही वाघाचे हल्ले सुरूच आहेत. ताज्या घटनेत सावली तालुक्यातील निलसनी -पेटगाव शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात गुरे राखणाऱ्या इसमाचा मृत्यू झाला आहे. वासुदेव लक्ष्मण वाकुडकर 68 वर्षे असे मयताचे नाव आहे. घटनेची माहिती कळताच वनपथक घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून मृतदेह सावली रुग्णालयात रवाना करण्यात आला आहे. या परिसरात कॅमेरा ट्रॅप लावून वाघाच्या हालचाली टिपल्या जात आहेत
0
0
Report
Advertisement

बारामती शुगर फैक्ट्री चुनाव: युगेंद्र पवार के नेतृत्व में उम्मीदवारों की मुलाकातें शुरू

Rui, Maharashtra:बारामती युगेंद्र पवार के नेतृत्त्व में निवडणुकांसंदर्भात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीसाठी चांगला रिस्पोन्स आहे, पाच गटामध्ये 130 ते 140 अर्ज शरद पवार पक्षांकडे आले आहेत. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालत असतो. आम्ही मुलाखती घेत असतो जे उमेदवार कारखान्याचे हित बघतील. सध्या आम्ही स्वतंत्र पॅनल उभं करत आहोत. आम्हाला कोणाकडून प्रस्ताव आला नाही. आम्ही स्वबळावर शेतकरी पॅनल उभा करत आहोत. आम्ही माळेगांव कारखान्यासाठी प्रस्ताव दिला होता. भाजप पण स्वतंत्र पॅनल टाकत आहे. दोन्ही शिवसेना पॅनल टाकत आहेत. शरद पवार यांचं म्हणणं आहे सहकारमध्ये आपण राजकारण केलं नाही पाहिजे. शेवटी हा प्रपंचाचा प्रश्न आहे. कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. चांगली उच्शिक्षित लोक आपण निवडून दिली पाहिजेत. माळेगांव कारखाना निवडणुकीच्या वेळी सांगितलं तुमचे उमेदवार घेतो. पण तस झालं नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही पक्ष एक होणार होते त्याचे नेतृत्व अजित पवार करणार होते. हे इलेक्शन सोमेश्वर कारखान्याचं आहे. प्रचाराला सगळे येतील सगळे आम्हाला मदत करतील. सहकारमध्ये सगळे सभासद एकत्र येतात. खासदार सुप्रिया सुळे इथे लक्ष घालतील. शरद पवार यांना विनंती करणार आहे. रोहित पवार लक्ष घालतील. सगळे आम्हाला ताकद देतील. युगेंद्र पवार हा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षातले वरिष्ठ असतील निर्णय घेतील.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top