icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चिपळुण में दूषित पानी के खिलाफ ग्रामीणों ने MPCB कार्यालय के बाहर प्रदर्शन

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. लोटे एमआयडीसीतील दूषित पाण्याविरोधात चिपळूणमध्ये जनक्षोभ; एमपीसीबी कार्यालयावर शेकडो ग्रामस्थांचा ठिय्या.. पावसाचा फायदा घेत लोटे एमआयडीसीतील रासायनिक कंपन्यांनी दूषित पाणी थेट नदीपात्रात सोडल्याने संतप्त झालेल्या शेकडो ग्रामस्थांनी आज चिपळूण येथील महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या (एमपीसीबी) कार्यालयावर जोरदार ठिय्या आंदोलन छेडले.. वारंवार तक्रारी करूनही प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी या गंभीर समस्येकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी शिवसेना (उबाठा) नेते भास्कर जाधव आणि माजी खासदार हुसेन दलवाई यांच्यासह स्थानिक लोकप्रतिनिधी प्रत्यक्ष घटनास्थळी उपस्थित होते.. आंदोलकांनी कार्यालयाच्या परिसरात जोरदार घोषणाबाजी करत प्रदूषणकारी कंपन्यांवर आणि हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.. प्रशासनाने त्वरित पावले उचलली नाहीत तर आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला..
0
0
Report

केसनंद ग्रामपंचायत के सामने कचरा मोर्चा; 2.11 करोड़ भ्रष्टाचार के आरोप पर प्रदर्शन

Shirur, Maharashtra:केसनंद ग्रामपंचायतीसमोर 'कचरा मोर्चा'; ढोल-ताशांच्या गजरात अजब आंदोलन Anc:​हवेली तालुक्यातील केसनंद ग्रामपंचायतीतील घनकचरा व्यवस्थापन प्रकल्पात सुमारे २.११ कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत आज एक अनोखे आंदोलन करण्यात आले. पंचायत समिती सदस्य कुशल सातव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलकांनी ढोल-ताशांच्या गजरात, फटाक्यांची आतषबाजी आणि गुलालाची उधळण करत कचऱ्याचा मोर्चा काढला. ग्रामपंचायत कार्यालयासमोर कचरा ओतून, तसेच ग्रामसेवक आणि प्रशासकांच्या खुर्चीला कचऱ्याचा हार घालून प्रशासनाचा तीव्र निषेध करण्यात आला. या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी सातव यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

माळशेज घाट मार्ग बंद, मुंबई के लिए वैकल्पिक मार्ग घोषित

Shirur, Maharashtra:माळशेज पुणे... पुणे अहिल्यानगरकडून मुंबईच्या दिशेने प्रवासाला निघणार असाल, तर ही अत्यंत महत्त्वाची बातमी तुमच्यासाठी आहे. माळशेजघाट मार्गे मुंबईकडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. कल्याण- अहिल्यानगर महामार्गावरील माळशेज घाट राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६१ वरील जुन्नर तालुक्यातील करंजाळे गावाजवळ रस्ता खचल्यामुळे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पुणेचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी वाहतूक बंद करण्याचे अधिकृत आदेश जारी केले आहेत. काय आहे पर्यायी मार्ग? माळशेजघाट बंद असल्यामुळे या मार्गावरील वाहतूक आता आळेफाटा - नारायणगाव - खेड - चाकण - तळेगाव (MIDC) - लोणावळा - खोपोली - मुंबई अशा पर्यायी मार्गाने वळवण्यात आली आहे. त्यामुळे, जर तुम्ही आज या मार्गाने प्रवास करणार असाल, तर कृपया नोंद घ्या आणि प्रशासनाने दिलेल्या पर्यायी मार्गाचाच वापर करा!
0
0
Report

सांयची सांगली में निर्माण विभाग के विरोधी ठिय्या आंदोलन: निधि घोटाले का आरोप

Sangli, Maharashtra:स्लग - बांधकाम विभागाच्या विरोधात सामाजिक कार्यकर्त्यांचे ठिय्या आंदोलन.. अँकर - सांगलीच्या मिरजेत बांधकाम विभागाच्या कार्यालयामध्येच सामाजिक कार्यकर्त्यांकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले आहे.महापालिका क्षेत्रात दलित वस्ती विकासासाठी लोकशाहीर आण्णाभाऊ साठे दलित वस्ती सुधार योजने अंतर्गत नऊ कोटींचा निधी मिळाला आहे,मात्र हा निधी अन्यत्र वळवला जात असून निविदा प्रक्रिये मध्ये देखील गैरकारभार करण्यात आल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते दीपक माने यांच्याकडून करण्यात आला है.सत्ताधारी नेते व बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांکارून ही निविदा प्रक्रिया मॅनेज करण्यात आल्याचा आरोप करत,मिरजेतील बांधकाम विभागाच्या विरोधात धरणे आंदोलन करण्यात झाले.तत्पूर्वी गांधीगिरी मार्गाने बांधकाम विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुलाब पुष्प देत, निधी अन्य ठिकाणी न वळवता,निविदा प्रक्रिया रद्द करावी,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

कर्नाटक के साई भक्तों ने चांदी 2 लाख रुपये कीमत की मूर्ति अर्पण किया

Shirdi, Maharashtra:साईंच्या चरणी भाविक आपल्या भक्तीभावातून विविध स्वरूपातील दान अर्पण करत असतात. अशाच एका अनोख्या आणि भावपूर्ण देणगीतून कर्नाटकातील उडपी येथील साईभक्तांनी श्री साईबाबांप्रती असलेली निस्सीम श्रद्धा व्यक्त केली आहे. तब्बल एक किलो 204 ग्रॅम वजनाची, साईबाबा महाप्रसाद तयार करतानाची प्रतिमात्मक चांदीची मूर्ती आज श्री साईबाबांच्या चरणी अर्पण करण्यात आली. सुमारे 2 लाख 14 हजार रुपयांहून अधिक किमतीच्या या आकर्षक चांदीच्या मूर्तीने साई मंदिर परिसरात भाविकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. देणगी स्वीकारल्यानंतर श्री साईबाबा संस्थानच्या वतीने देणगीदार साईभक्तांचा सत्कार करून कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
0
0
Report

शिर्डी में गुरुपौर्णिमा उत्सव: लाखों भक्तों की भीड़, मंदिर रातभर खुला

Shirdi, Maharashtra:लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या साईबाबांच्या दर्शनासाठी अनेक भाविक शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यभरातून अनेक पालख्या साईदर्शनासाठी शिर्डीत दाखल होत असतात. यंदाही गुरूपौर्णिमा निम्मित साईबाबांच्या नामाचा जयघोष करत असंख्य पालख्या पायी शिर्डीत दाखल होण्यास सुरुवात झालीय. श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी 28 जुलै ते 30 जुलै या काळात गुरूपौर्णिमा उत्‍सव साजरा होत असून या उत्‍सवात सर्व साईभक्‍तांनी मोठ्या संख्‍येने सहभागी व्‍हावे असे आवाहन संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केलंय. V/O - श्री साईबाबा हयातीत असल्यापासुन गुरुपौर्णिमा शिर्डीत मोठया उत्‍साहात साजरी केली जात आहे. त्‍यामुळे या दिवसाला आजही अनन्‍य साधारण महत्‍व आहे. श्री साईबाबांवर श्रध्‍दा असणारे लाखोंच्या संख्येने भाविक दरवर्षी गुरुपौर््णिमेला शिर्डीला येऊन समाधीचे दर्शन घेतात व या उत्‍सवास हजेरी लावतात. तीन दिवसीय गुरूपौर्णिमा उत्सव साजरा होणार असून सोमवारी गुरुपौर्णिमा साजरी केली जाणार आहे. बुधवारी उत्सवाचा मुख्य दिवस असल्याने साईमंदिर भाविकांसाठी रात्रभर खुलं राहणार असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी माध्यमांना दिलीये..
0
0
Report

धाराशिव महायुती में मतभेद उजागर; ओमराजे निंबाळकर व तानाजी सावंत कार्यक्रम से बाहर

Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्यात महायुती मधील मतभेद चव्हाट्यावर आपला जीव धाराशिव या जिल्हापरिषद च्या कार्यक्रमातुन खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार तानाजी सावंत यांना वगळले ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या दौऱ्या निमित्ताने स्वागतासाठी भारतीय जनता पार्टी व जिल्हा परिषद अध्यक्ष अर्चना पाटील यांच्या कडून लावण्यात आले बॅनर बॅनर वरून खासदार ओमराजे निंबाळकर आमदार तानाजी सावंत यांचे फोटो वगळले केवळ पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा फोटो टाकला जिल्हा परिषदवर महायुती ची सत्ता तानाजी सावंत यांच्या 12 सदस्य व शिवसेना पक्ष्यांच्या 8 सदस्यानि पाठिंबा च्या जोरावर अर्चना पाटील आहेत अध्यक्ष तर खासदार ओमराजे निंबाळकर हे महायुती मध्ये सामील झाले असताना त्यांना ही कार्यक्रम पासून ठेवले दूर खासदार ओमराजे निंबाळकर व आमदार तानाजी सावंत यांच्या कार्यकर्त्यांत नाराजी कार्यक्रमा वर बहिष्कार टाकण्याची चर्चा
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर जिले में 585 प्राथमिक शिक्षकों की भर्ती प्रक्रिया तेज़, पवित्र पोर्टल पर विज्ञप्ति

Chandrapur, Maharashtra:टायटल:---'पवित्र'वर शिक्षक भरतीची घंटा; ५८५ नव्या शिक्षकांची मिळणार सेवा शिक्षकांच्या रिक्त पदांवर तोडगा चंद्रपूर जिल्हा परिषदेने केली २५१ सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती अँकर: चंद्रपूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षक भरती प्रक्रियेला गती दिली असून, महाराष्ट्र शासनाच्या पवित्र पोर्टलवर primary शिक्षकांच्या ५८५ पदांची जाहिरात अपलोड केली आहे. मागील सहा महिन्यांपासून शासन निर्णयातील तरतुदींनुसार बिंदुनामावली तयार करण्याचे काम पूर्ण केल्यानंतर ही प्रक्रिया पुढे नेण्यात आली आहे.पवित्र पोर्टलवरील तांत्रिक तपासणी पूर्ण झाल्यानंतर या ५८५ पदांसाठी पवित्र पोर्टलअंतर्गत परीक्षा दिलेल्या पात्र उमेदवारांना पर्याय भरण्यासाठी संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पुढील एक ते दीड महिन्यात पूर्ण होण्याची शक्यता शिक्षण विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.
0
0
Report

NEET में कम अंकों से मानसिक तनाव, जलालपूर की छात्रा अंकिता सांगळे ने आत्महत्या

Ahilyanagar, Maharashtra:NEET परीक्षेत कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे Ahilyanagar च्या कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सांगळे या विद्यार्थिनीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे...अंकिता ला NEET परीक्षेमध्ये 166 गुण मिळाले आहेत... अपेक्षित गुण मिळाले नाहीत म्हणून मानसिक तणावात तिने शनिवारी सायंकाळी साडेचार वाजता गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे घरच्यांचे म्हणणे आहे...अंकिता हिला अभ्यासासाठी स्वतंत्र खोली देण्यात आलेली होती आणि ती त्यामध्येच बसून अभ्यास करत होती...बराच वेळ झाला तिचा काही आवाज किंवा हालचाल दिसली नाही म्हणून तिच्या घरच्यांनी खोलीचा दरवाजा उघडून पाहिलं तर अंकिताने गळफास घेतल्याचे समोर आले... अंकिताच्या आत्महत्यामुळे घरातील कुटुुंब अस्वस्थ झाल आहे
0
0
Report

कल्याण-नगर महामार्ग पर शराबी पिकअप चालक ने मचाया धूम, लोगों की सुरक्षा दांव पर

Shirur, Maharashtra:कल्याण-मुरबाड-अहिल्यानगर महामार्गावर शिवळे गावाजवळ एका मद्यधुंद पिकअप चालकाने अक्षरशः धुमाकूळ घातल्याचा अतिशय धक्कादायक प्रकार समोर आला आहे.भरधाव पिकअप घेऊन चालकाने रस्त्यावरील नागरिकांच्या जीवाशी थेट खेळ मांडला. या बेफाम गाडीने रस्त्यावरून जाणाऱ्या दोन दुचाकीस्वारांना हुलकावणी दिली, मात्र सुदैवाने हे दुचाकीस्वार थोडक्यात बचावले आणि एक मोठी दुर्घटना टळली.चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याचे आणि गाडी नागमोडी वळणे घेत असल्याचे पाहुन, पाठीमागून येणाऱ्या इतर वाहनधारकांनी आणि स्थानिक नागरिकांनी तात्काळ धाव घेत या पिकअप चालकाला अडवले. गाडी थांबवून पाहणी केली असता चालक नशेत धुंद असल्याचे उघड झाले. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली असून, रस्त्यावर इतरांचा जीव धोक्यात घालणाऱ्या अशा बेजबाबदार चालकावर कडक कारवाई करण्याची जोरदार मागणी आता केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाल के रालेगांव में कर्जमाफी सूची में नाम न आने पर किसान ने आत्महत्या कर ली

Yavatmal, Maharashtra:शासनाने शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या यादीत नाव नसल्याने यवतमाळ च्या राळेगाव तालुक्यातील भांब इथल्या शेतकऱ्याने आत्महत्या केली आहे. शासनाने कर्जमाफीची घोषणा करून अनेक दिवस उलटले आहे, कर्जमाफी मिळालेल्या शेतकऱ्यांची पहिली यादी देखील जाहीर झाली, मात्र या यादीत नाव न आल्याच्या नैराश्यातून कर्जबाजारी शेतकरी राजू चुहुके यांनी विष प्राशन करून जीवन संपवले. राजू चुहुके यांच्या कडे चार एकर शेती आहे. त्यांच्याकडे थकित कर्ज असल्याने कर्जमाफीच्या यादीत नाव येईल या आशेने ते मध्यवर्ती बँकेत गेले होते. मात्र यादीत त्यांचे नाव नव्हते. तेव्हापासून ते चिंतेत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले. मयत राजू चुहुके यांच्या मागे पत्नी आणि दोन लहान मुले आहेत.
0
0
Report
0
0
Report

तडवळे के बैलगाड़ी पर दिल्ली आंदोलन की झलक, कला से सामाजिक संदेश

Satara, Maharashtra:सातारा -ज्याच्या खांद्यावर शेतकऱ्याचं आयुष्य उभं राहतं... ज्याच्या घामावर शेती फुलली... आणि ज्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे जपलं जातं, त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर सण. परंपरा, संस्कृती and शेतकऱ्यांच्या भावविश्वाशी जोडलेला हा सण यंदा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या गावातील बैलजोडीच्या अंगावर दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचे चित्र साकारत सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न या गावातील चित्रकार निवास कांबळे यांनी केला आहे. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top