icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आषाढ़ी एकादशी पर मालगांव तालुक़े में विठ्ठु नाम का गजर, विद्यार्थी-शिक्षक भक्तिमय

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - आषाढी एका दाशीच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा झाल्या भक्तिमय... - विठू नामाच्या गजराने जिल्हा परिषद शाळा दुमदुमल्या.. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विठ्ठू नामाचा गजर झाला. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या भक्तिभावाने पंढरीची वारी मालेगावात अनुभवली. बाल गोपाल विद्यार्थी यांनी विठू रखुमाईची भूमिका साधत अख्ख्या गावामध्ये टाळ मृदुंग वाजवत, भजन म्हणत दिंडी काढली. गावकरी देखील या मनमोहक दृश्यामुळे दिंडीत सहभागी झाले.
0
0
Report
Advertisement

14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; महाराष्ट्रात ऐतिहासिक निर्णय

Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाकडून लैंगीक अत्याचार - अल्पवयीन मुलीची स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या - शवविच्छेदन अहवालात अल्पवयीन मुलगी गर्भवती - नराधम बापाला मालेगाव न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (महत्वाची टीप: आरोपीचा व्हिडिओ किंवा चेहरा ब्लर करावा) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील घटनेचा मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. बागलाण तालुक्यातील एका नराधम बापाने आपल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगीक अत्याचार केल्याची घटना 7 वर्षापूर्वी घडली होती. या छळाला कंटाळून त्या मुलीने देखील स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन केले असता ती गर्भवती देखील होती. या संदर्भात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी ही मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयात चालली. आणि आज या प्रकरणावर मालेगाव न्यायालयातील न्यायाधीश कृष्णजी पालदेवार यांनी त्या आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले गेले असून सरकार पक्षाकडून अँड संजय सोनवणे यांनी काम बघितले तर सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत पुरावे गोळा करत आरोपीला शिक्षा मिळवून दिली. बाईट: एड संजय सोनवणे, सरकारी वकील
0
0
Report

पंढरी में लाखों भक्त, विठ्ठल के दर्शन को उमड़ी भारी भीड़

Pandharpur, Maharashtra:हात कमरेवर ठेवून भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा विठ्ठल. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून आलेल्या या वारकऱ्यांसाठी विठुरायाचं दर्शन म्हणजे त्यांच्या वारीची खरी फलश्रुती आहे. ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली-माऊली’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली आहे. आपल्या कुटुंबासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना करत वारकरी विठुरायाच्या चरणी माथा टेकवत आहेत. या विठुरायाच्या चरणी प्रत्येक वारकऱ्याची एकच भावना आहे—पाऊस चांगला पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर विठ्ठलाची कृपादृष्टी कायम राहू दे. त्यामुळे हात कमरेवर ठेवून भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा हा सावळा विठ्ठल… आणि त्याच्या दर्शनासाठी आसुसलेली ही लाखो भक्तांची मांदियाळी… विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यातून याच सावळ्या विठुरायाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..
0
0
Report

आषाढी एकादशी पर पंढरी में भक्तों का उल्लास, विठ्ठल दर्शन की आस

Kolhapur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघी पंढरी विठ्ठलमय झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पायांचा थकवा, वाटेतल्या अडचणी आणि प्रवासाचा त्रास विसरून प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल झाला आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘माऊली-माऊली’च्या जयघोषाने भक्तीचा हा महासागर आणखीच खुलून गेला आहे. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी केवळ धार्मिक उत्सव नाही, तर भक्ती, समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा महत्त्वाचा सोहळा आहे..
0
0
Report
Advertisement

भायंदर अस्पताल सुरक्षा रक्षक पर परिचारिकाओं की हड़ताल, पुलिस में शिकायत

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर ब्रेक भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आमदार नरेंद्र मेहता यांचा सुरक्षा रक्षक अरविंद रंजिरे यांच्या कडून परिचारिकांना दमदाटीचा आरोप झाला आहे. कुत्रा चावल्याच्या उपचारादरम्यान झालेल्या या वादाच्या निषेधार्थ परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले. तक्रार नोंदवण्यासाठी संतप्त परिचारिका व कर्मचाऱ्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात गर्दी केली भाईंदर पोलीसानी अरविंद रंजिरे वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती भाईंदर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जितेंद्र कांबळे यांनी दिली आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की माझा त्याच्याशी काही संबंध नाही जर त्याने असे केले असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही आम्ही त्याची तात्काळ हक्कालपट्टी केली आहे
0
0
Report

सुभाष मैदान न मिलने पर कांग्रेस आंदोलन के साथ सड़क पर उतरेगी

Kalyan, Maharashtra:आंदोलनासाठी मागितलेले मैदान स्पर्धेसाठी न दिल्याने काँग्रेस संतप्त मैदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, काँगेसचा इशारा दिल्लीच्या जंतर मंतर वर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कॉक्रोज जनता पार्टी और काँग्रेसच्या वतीने २५ जुलैला आंदोलन केल जाणार आहे. यासाठी आयोजकांनी महापालिकेकडे सुभाष मैदान, फडके मैदान किंवा मॅक्सी ग्राउंड ची मागणी केली होती. Vásापैकी सुभाष मैदानाला परवानगी नाकारल्यानंतर फडके मैदान उपलब्ध होईल असं आयोजकांना वाटत होतं, मात्र हे मैदान Cricket स्पर्धेसाठी बुक झाल्याची माहिती आयोजकांना मिळाली. त्यामुळे काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी बाबत संताप व्यक्त केलाय. मैदान मिळाल नाही तर काँग्रेस आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावर उतरेल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन त्यासाठी जबाबदार असेल असं काँग्रेसने सांगितले आहे. फडके मैदान जरी आंदोलनाला दिल नाही तरी तिथेच आंदोलन होणार असा निर्धार कोक्रोज जनता पार्टीने केलाय. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण बाजारपेठ पोलिसांनी आयोजकांना नोटीसा बजावल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई के हजारों छात्र धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग पर उतर आए

Navi Mumbai, Maharashtra:केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेावा या मागणीसाठी नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. वाशी मधील जुहूचौपाटी याठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत पायी मोर्चा काढलाय. ज्या विद्यार्थ्यांनी यंत्रणेच्या चुकीमुळे आत्महत्या केलेय त्याविद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेय. या शांतता पूर्ण मोर्चात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त करत ही व्यवस्था सुधारली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.
0
0
Report

अकोला में छात्र परीक्षा-भर्ती भ्रष्टाचार के विरोध में साखळी भूख हड़ताल आज शुरू

Akola, Maharashtra:देशभरातील विद्यार्थ्यांवरील वाढता अन्याय, परीक्षा व भरती प्रक्रियेतील गैरव्यवहार, पेपरफुटी, भ्रष्टाचार, भरतीतील विलंब, शिक्षणाचे वाढते खाजगीकरण तसेच विद्यार्थ्यांच्या न्याय्य मागण्यांकडे शासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षाच्या निषेधार्थ अकोल्यातील विद्यार्थ्यांनी उद्यापासून जिल्हाधिकारी कार्यालय, अकोला येथे साखळी अन्नत्याग (उपोषण) आंदोलन प्रारंभ करणार आहे.यापूर्वी संपूर्ण देशभरात विद्यार्थ्यांनी स्वयंस्फुर्तपणे शांततापूर्ण धरणे आंदोलन करून जिल्हाधिकाराऱ्यांमार्फत केंद्र व राज्य शासनाला निवेदन सादर केले. मात्र, मागण्यांवर कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलनाची पुढील पायरी म्हणून साखळी अन्नत्याग आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. या आंदोलनाअंतर्गत दररोज एक विद्यार्थी २४ तास अन्नत्याग करून उपोषणास बसणार असून, विद्यार्थ्यांच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत हे आंदोलन अखंड सुरू राहणार आहे. आंदोलन पूर्णपणे शांततापूर्ण, संविधानिक आणि महात्मा गांधी यांच्या सत्याग्रहाच्या मार्गाने करण्यात येत असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

आकांक्षा चतुर्वेदी की माँ ने शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग दोहराई

Nagpur, Maharashtra:नागपूर - नेiit पेपरफुटी प्रकरणामुळे आत्महत्या केलेल्या नागपूरच्या विद्यार्थिनी आकांक्षा चतुर्वेदी ची आई नीलम चतुर्वेदी यांनी नागपूरातील संविधान चौकातील आंदोलनात सहभाग घेतला. नागपूरच्या संविधान चौकात सुरू असलेल्या आंदोलनात सहभागी होत त्यांनी केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. मागण्या मान्य होईपर्यंत दररोज आंदोलनात सहभागी होणार असून, गरज पडल्यास दिल्लीतील आंदोलनातही सहभागी होणार असल्याचे त्यांनी सांगितले. आकांक्षाच्या आत्महत्येनंतर आजपर्यंत सरकारकडून कोणीही भेटण्यासाठी किंवा विचारपूस करण्यासाठी आले नसल्याचा आरोप करत, या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांनी केली. बाईट – नीलम चतुर्वेदी (आकांक्षा चतुर्वेदीची आई)
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top