445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोकण में बाप्पा के आगमन पर उत्साह, बाल्या नृत्य से घरों में गणेश का स्वागत
Ratnagiri, Maharashtra:पावसाळ्यात हिरवाईने नटलेल्या कोकणात आज अवघ्या महाराष्ट्राचं दैवत असणाऱ्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाचा उत्साह शिगेला पोहोचला आहे.. गावागावांत ढोल-ताशांचा गजर सुरू असून वर्षभराची प्रतीक्षा संपवून बाप्पा प्रत्येकाच्या उंबरठ्यावर पाऊल ठेवतोय.. विशेष म्हणजे, उत्सवाची लगबग आणि बाप्पाच्या सेवेची आतुरता इतकी आहे की अनेक भाविक एक दिवस आधीच आपल्या लाडक्या बाप्पाला घरी घेऊन येत आहेत.. या आनंदोत्सवात कोकणी परंपरेची ओळख असणाऱ्या पारंपरिक 'बाल्या नृत्या'चा ठेका आणि डोक्यावरून बाप्पाची मूर्ती वाजतगाजत घरी आणण्याची प्रथा कोकणच्या मातीतील भक्तीचा सोहळा किती भव्य आहे, याचीच साक्ष देत आहे.. सोबत wkt आणि बाल्या..0
0
Report
गणेश उत्सव के बीच महंगाई के बावजूद बाजार में उत्साह, नाशिक बाजार चर्चा में
Yeola, Maharashtra:गणरायाचा आगमन अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलेले असताना बाजारात ठीक ठिकाणी उत्साह पाहायला मिळत आहे यंदाच्या गणेश उत्सवावर महागाई व दुष्काळाचे सावट असले तरी बाजारात मात्र मोठा उत्साह पाहायला मिळत आहे नाशिकच्या येवल्यातील बाजारपेठेतून आढावा घेतला आहे0
0
Report
इंदापुर के बाबीर मंदिर कलशारोहण में उपमुख्यमंत्री ने विकास के ठोस वाद किए
Rui, Maharashtra:इंदापुर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर मंदिराचा कलशारोहण लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी त्या बोलत होत्या. मोठ्या संख्येने उपस्थित असणाऱ्या दादांच्या लाडक्या बहिणी बाबीर चरणी नतमस्तक होते Ajitदादांच्या पवित्र स्मृतींना अभिवादन करते गणेशोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देते. बाबीर देव केवळ मंदिर नाही हजारो भाविकांच्या श्रद्धेचे स्थान आहे. बाबीर देवाकडे कसलाही नवस केला तर तो पूर्ण होतो. नवसाला पावणारा देव म्हणून बाबीर देवाची आराधना करण्यासाठी येत असता. इथे भरणारी यात्रा मोठा उत्सव असतो. या मंदिराचा जीर्णोध्दार खूप चांगल्या प्रकारे झाला आहे. अहिल्यादेवींनी देशातील अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार केला. त्यांच्या वारसा आणि विचार आपल्याला पुढे न्यायचा आहे. मंदिरा मध्ये सुविधा असाव्यात सर्वच ठिकाणी त्या असाव्यात. इथे भाविकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.पुढील काळात आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी शासन स्तरावर मी प्रयत्न करेल. इंदापूरच्या सर्वांगीण विकासाला दादांचं नेकमीच प्राधान्य असायचे. मामांनी पाण्या बाबत वक्तव्य केलं सरकार कडून योग्य निर्णय घेतला जाईल. यावर्षी पाऊस कमी झाला सर्व धरण भरली नाहीत. पाणी सर्वांना मिळालं पाहिजे सरकार त्यावर लक्ष ठेवून आहे. बाबीर चरणी परतीचा पाऊस चांगला पडू दे असं साकडं घातलं आहे, दुष्काळ आहे मराठवाडा चिंतेत आहे. शासनस्तरावरून आम्ही प्रयत्न करीत आहोत सांगलीतील आरेवाडी येथील बिरोबा देवराजांसाठी अजित दादांनी पाठपुरावा केला होता निधी उपलब्ध करून दिला होता, दादांनी मंत्रालयात याबाबतची बैठक ही घेतली होती आणि तिथल्या विकासाचा प्रश्न मार्गी लावली होती. त्याप्रमाणे इंदापूर मधील प्रश्न मार्गी लावले जातील. बाबीर देवाची कृपा राज्यावर कायम रहावी अशी प्रार्थना करते. मंदीर परिसरात रस्ते पूल याची मागणी केली आहे त्याप्रमाणे निधी उपलब्ध करून दिला जाईल. देवस्थानाला ब वर्ग दर्जा मिळवून देण्यासाठी मी प्रयत्न करील हर्षवर्धन पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे वनविभागाची जमीन मिळवून देण्यासाठी प्रयत्न केला जाईल.0
0
Report
Advertisement
अमरावती में गणपति बाप्पा की तैयारी तेज, रोक के बावजूद आर्टिफिशियल फूलों की बिक्री
Amravati, Maharashtra:अमरावतीत गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी जोरात; बाजारपेठेत भाविकांची तुफान गर्दी, बंदी असतानाही आर्टिफिशियल फुलं हारांची सर्रास विक्री अँकर :- गणपती बाप्पाच्या आगमनाला अवघे काही दिवस शिल्लक असताना अमरावती शहरातील बाजारपेठांमध्ये गणेशभक्तांची सकाळपासूनच मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी वेगवेगळ्या प्रकारचे मखर, रंगीबेरंगी फुलं, आकर्षक लाइटिंग आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी भाविक बाजारपेठेत दाखल झाले आहेत. मात्र प्लास्टिकच्या आर्टिफिशियल फुलं आणि हारांच्या विक्रीवर बंदी असतानाही बाजारपेठेत त्यांची सर्रास विक्री होताना दिसत आहे. पर्यावरणपूरक सजावटीचा संदेश दिला जात असतानाच प्लास्टिकच्या सजावटीच्या साहित्याच्या विक्रीमुळे प्रशासनाच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. दरम्यान गणेशोत्सवाचा उत्साह भाविकांमध्ये शिगेला पोहोचला असून बाप्पाच्या स्वागतासाठी बाजारपेठेत खरेदीचा उत्साह वाढला आहे.0
0
Report
पंढरपुर में MPPSC पेपर लीक के विरोध में संभाजी ब्रिगेड का आक्रोश प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये एमपीएससी पेपर फुटी प्रकरण विरोधात संभाजी ब्रिगेड कडून आक्रोश आंदोलन करण्यात आले.एमपीएससी सचिवांना काळे फासणाऱ्या पदाधिकाऱ्यांचे यावेळी समर्थन केले. यावेळी संभाजी ब्रिगेड कार्यकारणी सदस्य किरण घाडगे यांच्यासह संभाजी ब्रिगेड कार्यकर्ते उपस्थिती होते.0
0
Report
इंदापुर में बाबीर कलशारोहण समारोह में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने संबोधित किया
Rui, Maharashtra:इंदापूर बाळासाहेब थोरात बाबीर कलशारोहण भाषण (राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर मंदिराचा कलशारोहण लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते) बाबीर बुवा आणि संगमनेर तालुक्याचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. मंदिराच्या विकास कामात सर्वांचा सहभाग आहे. इथे केवळ जागेचा अभाव आहे,फॉरेस्ट ची जागा मिळू शकते. आज राज्यात किती भयंकर आहे पाऊस नाही शेतकरी अडचणीत आहे.शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा हीच बाबीर चरणी प्रार्थना करतो.0
0
Report
Advertisement
जालना में 6 वर्षीय बच्ची से बलात्कार: आरोपी गिरफ्तार, फांसी की मांग उठी
Jalna, Maharashtra:जालना : चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून जालन्यात 6 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, रामनगर भागातील घटना. सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. आरोपीला अटक. दिनेश काशिनाथ सुवर्णकर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून दिनेश याने या 6 वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या प्रकरणी आरोपीला फाशीची शिक्षा देण्यात यावी या मागणीसाठी माजी आमदार कैलास गोरंटयाल यांनी सदर बाजार पोलीस ठाणे गाठत ठिय्या आंदोलन केलं आहे.0
0
Report
इंदापुर में कर्मयोगी शंकरराव पाटील को पुण्य स्मरण पर श्रद्धांजलि
Rui, Maharashtra:इंदापुरात कर्मयोगी शंकरराव पाटील यांना विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन..... माजी मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे यांची उपस्थिती.... येथील नारायणदास रामदास हायस्कूलमध्ये माजी खासदार स्वर्गीय कर्मयोगी शंकरराव बाजीराव पाटील यांना विसाव्या पुण्यस्मरणानिमित्त अभिवादन करण्यात आल आहे या कार्यक्रमाला राज्याचे माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील माजी मंत्री बाळासाहेब थोरात माजी आमदार सुधीर तांबे यांसह अनेकांची उपस्थिती होती.0
0
Report
शिवसेना-राष्ट्रवादी के बीच गोदरेज मामले पर तीखी बहस, तटकरे-थोरवे आमने-सामने
Chendhare, Maharashtra:स्लग - शिवसेना -राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी गोदरेजच्या मुद्द्यावरून तटकरे-थोरवे आमनेसामने कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका — थोरवेंचा तटकरे यांना इशारा रोजगाराच्या मुद्द्यावरून रायगडमध्ये राजकीय संघर्ष तटकरे यांच्या भूमिकेला थोरवेंचे प्रत्युत्तर; शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता अँकर - रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. खोपोलीतील गोदरेज कंपनीच्या प्रश्नावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंपनीविरोधात भूमिका घेतल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे यांनाच लक्ष्य केलंय. माझ्या मतदारसंघातील कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, असा थेट इशाराच थोरवे यांनी दिलाय. कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यामुळे विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. बाईट - सुनील तटकरे, खासदार बाईट - महेंद्र थोरवे, आमदार0
0
Report
Advertisement
बारिश के लिए ग्राम ने गधे की शादी रचा दी, मोडनिंब में चर्चा तेज
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. पाऊस पडावा आणि बळीराजाच्या पिकांना जीवनदान मिळावे, यासाठी माढा तालुक्यातील मोडनिंब गावात ग्रामस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. चक्क दोन गाढवांचे लग्न लावून पावसासाठी साकडे घालण्यात आले. .माढा तालुक्यातील मोडनिंब गावात पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धेतून गाढवाचे लग्न लावले. विधिवत लग्नसोहळा पार पडला असून, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या अनोख्या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. पाऊस पडावा, शेतातील पिकांना जीवदान मिळावे आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी ग्रामस्थांनी केली. या अनोख्या गाढव विवाहाची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.0
0
Report
कोकण में वरुणराज की जोरदार वापसी, किसान चिंताओं से मुक्त
Ratnagiri, Maharashtra:कोकणात वरुणराजाचं दमदार पुनरागमन; पिवळ्या पडणाऱ्या भातशेतीला जीवदान, बळीराजा सुखावला!.. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कोकणात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.. पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे कोकणातील उभी भातशेती करपून पिवळी पडू लागली होती, ज्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला होता... मात्र, आज अखेर वरुणराजाने दमदार पुनरागমন करत जोरदार सरी बरसल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.. पावसाच्या या हजेरीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य उमटले आहे..0
0
Report
वाशिम के रिसोड में अवैध बालू ट्रक पलटा, कोई नुकसान नहीं; जांच शुरू
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रिसोडकडून वाशिमच्या दिशेने अवैध वाळूची वाहतूक करणारा वाळूचा टिप्पर रिठदजवळ पलटी झाला आहे.वाळूने भरलेला हा टिप्पर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला.सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेमुळं तहसीलदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वाळू उपास बंद असतांना या अवैध वाळू वाहतकीला छुपा पाठिंबा नेमका कुणाचा असाही प्रश्न उपस्थित होतोय.संबंधित टिप्परला वाळू वाहतुकीची परवानगी होती का, याबाबत आता महसूल प्रशासना कडून चौकशी होणे गरजेचे आहे. आता या टिप्परवर नेमकी काय कारवाई केली जाणार,याकडे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
मराठा आरक्षण पर सरकार का सकारात्मक रूख, कोर्ट के फैसलों के बीच सुलह की तैयारी
Satara, Maharashtra:सातारा-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यांच्या या निर्णयाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आत्ता आंदोलनाला बसल्यानंतर सुद्धा विखे पाटील,प्रसाद लाड यांनी अनेक वेळा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे.सातारा गॅजेट बद्दल समितीचा अहवाल आपण मागितलेला आहे. हैदराबाद गॅजेट जे लागू केलं त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालेल आहे परंतु ते रद्द झालेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीक तरतुदी करून ते टिकवलेल आहे.सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबत लागू होत असताना एक दिलं आणि दुसरं कोर्टाने उडवलं असं व्हायला नको हा प्रयत्न शासनाचा आहे.आपण गडबड करून निर्णय घेतले तर याला कोर्टात चॅलेंज होईल. त्यामुळे जर मिळालेला आरक्षण कोर्टामध्ये गेलं तर आता जे आंदोलन सुरू आहे त्यातून काहीच उत्पन्न होणार नाही.त्यामुळे माझी विनंती आहे की शासन आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. काही कायदेशीर बाबी बघून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा थोडं शासनाला सहकार्य करावे आत्तापर्यंत ते करत आलेले आहेत.त्यामुळे विखे पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय कायदेशीर बाजू बघून 100% होईल.शेवटी आरक्षण द्यायचा विषय हा छत्रपती घराणं म्हणून माझ्या सहीने होणार नाही त्याला शेवटी कोर्ट कायदा या सर्व गोष्टी आहेत.शिंदे समिती आहे.निवृत्त जज आहेत त्यांचाही यामध्ये सहभाग लागतो.त्यामध्ये देण्याबद्दल मी या परत परत सांगत आहे की सरकार कुठेही विरोधात नाही. कायदेशीर गोष्टी बघितल्या पाहिजेत कारण टिकणारं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे नुसतच तोंडाला पान पुसून घेण्यात अर्थ नाही एवढीच यामागे भूमिका आहे.0
0
Report
ठाणे खाड़ी सहित भारी बारिश के बीच केमिकलयुक्त पानी ने प्रदूषण बढ़ा दिया
Thane, Maharashtra:ठाणे जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाच ठाणे खाडीत केमिकलयुक्त पाणी वाहून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या पाण्यासोबत केमिकल खाडीत मिसळल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यावर केमिकलचा थर आणि बदललेला रंग नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या प्रकारामुळे खाडीतील जलचर आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमके कोणते केमिकल खाडीत वाहून आले आणि ते कुठून आले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून होणे गरजेचे आहे.0
0
Report
नवी मुंबई: क्लस्टर पुनर्विकास पर राजकीय घमासान, वनमंत्री की चेतावनी
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत क्लस्टर पुनर्विकासनुसार राजकीय घमासान. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ किती दिवसांचा हेच सांगितले. या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट झाल्यात शिवाय सिम्प्लेक्सचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार नाही. गरज पडल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ. वेळ पडली तर गणेश नाईक रस्त्यावर उतरेल, या शहराची वाट लावू देणार नाही. वल्गना करणाऱ्यांचा भविष्यकाळ किती हे पहा. यांचा भविष्य काळ किती 3 महिने 6 महिने. वल्गना करणाऱ्यांच्या गाडीतल पेट्रोल 6 महिने पुरेल इतकंच आहे, चढणीला येऊन गाडी बंद पडेल. बायट- गणेश नाईक- वनमंत्री0
0
Report
Advertisement
