icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

5 साल पुराने दोस्त की हत्या: मुंबई क्राइम ब्रांच ने चार आरोपी गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबई क्राइम ब्रांचचा मोठा खुलासा: 5 वर्षांपूर्वीच्या मित्राच्या हत्येप्रकरणी 4 आरोपी अटक, रस्ता अपघाताचा खोटा बनाव रचला होता मुंबई क्राइम ब्रांचच्या युनिट-7 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक आत्माजी सावंत यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ येथे पाच वर्षांपूर्वी झालेल्या एका हत्येच्या प्रकरणाचा पर्दाफाश करत 4 आरोपींना अटक केली आहे. आरोपींनी आपल्या मित्राची हत्या केल्यानंतर मृतदेह आणि त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली होती आणि त्याला रस्ता अपघाताचे स्वरूप देण्याचा प्रयत्न केला होता. पोलिसांच्या माहितीनुसार, मृताची ओळख अशपाक मुलाणी उर्फ निहाल, रा. माळशिरस, जि. सोलापूर अशी झाली आहे. प्राथमिक तपासात हे प्रकरण रस्ता अपघात म्हणून नोंदविण्यात आले होते. मात्र, मुंबई क्राइम ब्रांचला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे या प्रकरणाचा पुनर्तपास सुरू करण्यात आला. चौकशीदरम्यान आरोपींनी कबूल केले की, पैशांच्या व्यवहारावरून झालेल्या वादातून त्यांनी सिंधुदुर्गमधील कुडाळ येथील एका हॉटेलमध्ये अशपाक मुलाणी उर्फ निहाल याला बोलावले होते. उशिरा रात्री सर्वांनी मिळून त्याची हत्या केली आणि पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह तसेच त्याची मोटारसायकल फोंडा घाटातील खोल दरीत फेकून दिली, जेणेकरून हे प्रकरण रस्ता अपघात असल्याचे भासावे. अटक आरोपी: सुरेश चंद्रहास सोनावडेकर मनोज नारायण भंडगे अतिश भगवान मोरे ऋतुराज शेट्टी हे प्रकरण मूळतः सिंधुदुर्गमधील कणकवली पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आले होते. अटक करण्यात आलेल्या सर्व आरोपींना पुढील कायदेशीर कारवाईसाठी कणकवली पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
0
0
Report

सोलापूर विधान परिषद चुनाव: आमदार उत्तम जानकर और मोहिते पाटील के बीच राजनीतिक संघर्ष शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीवरून आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटलांमध्ये राजकीय संघर्षाला सुरवात - सोलापूर विधानपरिषदेच्या निवडणुकीवरून मोठ्या राजकीय घडामोडींना वेग - महायुतीला पाठिंबा दिल्याच्या कारणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार उत्तम जानकर आणि मोहिते पाटील यांच्यात राजकीय संघर्षाला सुरुवात - माझी भूमिका मी स्पष्ट केलेले आहे वसंत देशमुख यांना मी मतदान करणार नाही... त्यावरून माझा विश्वासघात झालेला आहे - माझ्या मुलाला उमेदवारी अर्ज दिलेला असताना त्यांनी गैरविश्वास दाखवून उमेदवारी अर्ज दाखल केला - माळशिरस तालुक्यामध्ये राजकारण करत असताना मोहिते पाटलांची भूमिका सातत्याने अशीच राहिली आहे - राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष आणि शेकापमने मिळून राजेंद्र राऊत यांना पाठिंबा जाहीर केला *ऑन माळशिरस तालुका मोहिते पाटील संघर्ष* - आता राजकीय संघर्षाला सुरुवात झाली आहे - विधानसभेला मी आमदार होऊ नये यासाठी मोहिते पाटलांनी वेगवेगळ्या योग्या केल्या - माझ्या विरोधात देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जाऊन जातीचा दाखला रद्द करण्याची मागणी केली - जास्त काळ मोहिते पाटील कुटुंबासोबत कोणी राहू शकत नाही - खासदार धैर्यशील मोहिते पाटील निर्णय करतात मात्र त्यांच्याच कुटुंबातील मागचे निर्णय फिरवतात *ऑन रोहित पवार पंढरपूर आंदोलन* - रोहित पवार यांच्या आंदोलनासंदर्भात मला माहिती नाही *ऑन पक्ष कारवाई* - पक्षाने माझ्या मुलाचे नाव उमेदवार म्हणून फिक्स केले होते - मात्र विधानपरिषदेच्या निवडणुकीमध्ये ज्या घडामोडी घडल्या त्याचे परिणाम हे आहे बाईट - उत्तम जानकर ( आमदार, राष्ट्रवादी )
0
0
Report
Advertisement

कांग्रेस हाय कमांड ने नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा तेज की

Bhandara, Maharashtra:कांग्रेस के पूर्व प्रदेशाध्यक्ष नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा चल रही है; कांग्रेस हाई कमांड ने दिल्ली बुलाने की अफवाहें राजकीय वर्तुलों में गूँज रही हैं। नाना पटोले ने कहा कि मुझे दिल्ली बुलाने की कोई नई योजना नहीं थी, मैं पहले से योजना के बारे में जानता था। उन्होंने यह भी कहा कि किसी भी राजनीतिक निर्णय के लिए ऐसा न कहें। राज्य में कांग्रेस के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ के बारे में नाराजगी की चर्चा भी चल रही है और इससे कांग्रेस के आंतरिक कलह की अटकलबाजियाँ तेज हैं, क्योंकि नाना पटोले को दिल्ली बुलाने की चर्चा से कांग्रेस के भीतर विवाद उठ रहे हैं।
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर: सतेज पाटिल का दावा, शक्तिपीठ महामार्ग रद्द, किसानों के लिए लाभ?

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे सतेज पाटील ऑन शक्तिपीठ महामार्ग आंदोलन सरकारने शक्तीपीठ बाबत अधिसूचना काढली अशी आमची माहिती आहे पण सरकारला एक संधी आहे की हा महामार्ग रद्द करून गडकोट किल्ल्यांना निधी द्या आणखी काही जनहिताचे मुद्दे आहेत त्यासाठी पैसा खर्च करता येईल हा महामार्ग मागे घेतला म्हणजे तुमचा पराभव झाला असे नाही तर जनभावना या सरकारने ऐकून घेतली अशी इतिहासात नोंद होईल केवळ कंत्राटदारसाठी हा महामार्ग आहे, शेतकऱ्यांचे हित यामध्ये नाही प्रशासनाचा वापर करून घेतला जातोय पोलीस पहाटे पहाटे बंदोबस्त घेऊन येतात, हा दबाव नाही तर काय? तुम्ही सोईन पोलीस अधीक्षक आणाल, जिल्हाधिकारी आणाल, तहसीलदार आणाल पण शेतकरी जमीन देण्यास तयार नाहीत सतेज पाटील ऑन विधान परिषद लोकशाहीत प्रत्येक मताला अधिकार आहे त्यामुळे संख्याबळ माहित असतानाही ही निवडणूक लढवण्याचा निर्णय महाविकास आघाडीने घेतला काँग्रेसच्या उमेदवारांवर हाय कमान नाराज आहे अशी कोणतीही गोष्ट नाही प्रत्येक उमेदवार ताकतीने या निवडणुकीत उतरলা आहे काँग्रेसचे उमेदवार देशमुख हे दुर्दैवाने आजारी पडले त्यामुळे दोन-तीन दिवस प्रचाराला येऊ शकले नाहीत मात्र लवकरच ते प्रचारात सक्रिय होण्यार आहेत सतेज पाटील ऑन सुप्रिया सुळे पक्ष विलीन विधान देश पातळीवर राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली 2024 ला एक विश्वासाचे वातावरण निर्माण झालं म्हणून इंडिया आघाडीचा निर्मिती झाली त्यातला प्रमुख ड्रायव्हिंग पार्टी म्हणून काँग्रेस होते काँग्रेसमुळं इंडिया आघाडीचे इतर घटक पक्ष एकत्र आलेत राज्यातले प्रादेशिक पक्ष संपवणे हा अजिंठा भाजपचा आहे उद्या भविष्यात सगळे एकत्र काँग्रेस सोबत आलेत तर या चुकीचं काय आहे? असं वाटत नाही तर हा निर्णय हाय कमांड आणि दिल्लीचा आहे हे सर्व पक्ष ज्या पद्धतीने 24 मध्ये राहिलेत त्याच पद्धतीने भाजप विरोधात हे सर्व पक्ष एकसंघ राहावेत आणि सगळेच त्या विचाराने राहतील सतेज पाटील ऑन दिपके आंदोलन संजय राऊत खासदार आहेत त्यांनी जो फोटो ट्विट केला तो सत्य आहे असे समजून मी बोलत आहे या आंदोलनात नीट आणि सीबीएससीचे आंदोलन हा मुद्दा या देशामध्ये राहुल गांधींनी पहिला उचलला आहे ज्या मुलांना यात लक्ष घातलं तो सार्थक याच्यासोबत चर्चाही केली पहिली सुरुवात ही काँग्रेसने देशभर केली एन एस यू असेल युथ काँग्रेस असेल यांनी धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा ही भूमिका मांडली आता कॉकरोच पार्टीचा हा विषय समोर आलेला आहे त्याला ऑनलाईन पद्धतीने चांगला प्रतिसाद मिळाला परंतु जंतर-मंतरच्या आंदोलनाला दिशा मिळाली का पुढच्या काळात ते आंदोलन दिशेने चालले आहे का अशा शंका निर्माण झालेल्या आहेत त्यामुळे सीबीएससी आणि नीटचा हा विषय आहे पहिला काँग्रेसला प्रश्न हातला आहे लॉजिकल एंड पर्यंत हा लढा घेऊन जाणं ही ताकद फक्त काँग्रेसमध्ये आहे सतेज पाटील ऑन कोल्हापूर बलात्कार आरोपी सध्या राजकारण्यांसोबत उभे राहून फोटो काढणे, रील करणे हा ट्रेंड निर्माण झालेला आहे त्या माणसाने पोलिसांची भीती सुद्धा राहिलेली नाही पोलीस खात्याने योग्य ती काळजी अशा लोकांची घेतली पाहिजे पोलिसांची भीती राहिली पाहिजे या पद्धतीची कारवाई अशा नराधमांवर झाली पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन गुळ उत्पादन कारवाई एफ एस एस आय ने जी कारवाई सुरू केलेली आहे मुंडेंनी जी कारवाई सुरू केलेली आहे त्या कारवाईच मी सर्वात प्रथम स्वागत करतो एडल्टशन हा एक मोठा विषय या राज्यातला राहिलेला आहे मुख्यमंत्र्यांना देखील आमचं सांगणं आहे किमान वर्षभर त्यांना राहू द्या जिथे भेसळ होते दूध, मसाले, खाद्यपदार्थ यामधली किमान भेसळ थांबेल मुंडेना माझी आयुक्त म्हणून विनंती आहे प्रत्येकाला थोडा टाईम पिरेड द्यावे खरे उद्योग करतात खऱ्या पद्धतीने जे काम करत आहेत त्यांना नियमांची सवय नाही त्यांना ती सवय लागून द्यावी गुळाबाबत सरसकट कारवाई न करता काही सॅम्पल्स सापडले तर कारवाई करायला हरकत नाही पण सरसकट सगळा गुळ खराब आहे असं म्हणल्यानं त्याच्यावर अवलंबून असणारी एक अर्थव्यवस्था आहे ती अर्थव्यवस्था धोक्यात येऊ शकते त्यामुळे दोन कॅटेगरी करावी यात एक एफएसएसआय कडे असणाऱ्या रजिस्टर असणाऱ्या लोकांची संख्या ही अन्न औषध प्रशासन विभागाकडे आहे त्या लोकांची मीटिंग घेऊन या नियमावलीप्रमाणे तुमचे पदार्थ तयार करता का त्यात भेसळ आहे का अशा सूचना त्यांना द्याव्यात त्याचा गैरफायदा घेऊन जे भेसळ करत आहेत त्यांच्यावर कडक कारवाई करावी याबद्दल अजिबात दुमत नाही कारण या सर्व गोष्टींमध्ये दिवाळी, सणांमध्ये खवा आर्टिफिशियल तयार होतो गुजरात मध्ये दुधाची आर्टिफिशियल फॅक्टरी सापडली कारवाई एडल्टशन वर झाली झाली पाहिजे परंतु चांगल्या लोकांना त्याचा त्रास होऊ नये याची दक्षता मुंडेनी घ्यावी अशी आमची अपेक्षा आहे सतेज पाटील ऑन इचलकरंजी जवाहर साखर कारखाना नाव बदल गेले 50 वर्षे ज्या ज्या सहकारी संस्था झाल्या त्या काँग्रेसच्या काळात झाल्या इचलकरंजीत जवाहर साखर कारखान्याचे नाव बदलायला नको, कारण माजी खासदार कल्लाप्पांना आवाड्यांचे काम मोठे आहे इतर उद्योगांना त्यांचं नाव आहे वस्त्रोद्योग, सूतगिरणी आणि जवाहर साखर कारखाना हा काँग्रेसच्या काळात झालेला आहे पण जवाहर साखर कारखाना नाव बदलायला नको हवं आहे अमित शहा यांनी सांगायला पाहिजे होतं की हे नाव बदलू नका कारण जवाहरलाल नेहरू यांचं हे नाव आहे आता तुमची पक्ष भूमिका वेगळी झालेली आहे त्याबद्दल मी काय बोलणार नाही पण जवाहरलाल नेहरूंचं नाव बदलणं हे मला संयुक्तिक वाटत नाही आवाडे कुटुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुुंयांची खूप मोठी ताकद आहे आणखी एक दोन कारखाने घेऊन त्या कारखान्याला ते कलाप्पांना आवडे यांचं नाव देऊ शकतात
0
0
Report

सोलापुर विधान परिषद चुनाव: रविंद्र चव्हाण से मिलने पहुंचे शरद पवार गट के तीन विधायक

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - सोलापूर विधान परिषदेसाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या भेटीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार दाखल - यामध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माळशिरसचे आमदार उत्तम जानकर, माढ्याचे आमदार अभिजीत पाटील आणि करमाळ्याचे आमदार नारायण पाटील उपस्थित आहेत. - विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने आज सोलापुरात महायुतीच्या स्थानिक नेत्यांची बैठक प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत होणार आहे - या बैठकीला सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे हे देखील उपस्थित आहेत - मात्र बैठकीच्या पूर्वीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे 3 आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत - सोलापुरात विधानपरिषद निवडणुकीत भाजपा उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांच्यात सामना होतोय - मात्र राष्ट्रवादीने वसंतराव देशमुख यांना उमेदवारी दिल्याने आमदार उत्तमराव जानकर यांनी उघडपणे नाराजी व्यक्त केली होती - तसेच विधानपरिषद निवडणुकीत मतदानावर बहिष्कार टाकणार असल्याचे देखील जाहीर केले होते - मात्र आज भाजप आणि महायुतीच्या नेत्यांची बैठक सोलापुरात आयोजित असताना राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रवींद्र चव्हाण यांच्या भेटीला पोहोचल्याने राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगतेय
0
0
Report
Advertisement

सांगली में किसान सभे ने देवस्थान इनाम जमीन परिपत्रक के विरोध में प्रदर्शन किया

Sangli, Maharashtra:सांगली में अखिल भारतीय किसान सभेच्यावतीने देवस्थान इनाम जमिनी बाबत काढण्यात आलेल्या परिपत्रकाच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. देवस्थान इनाम निर्मुलन २०२६ च्या ८ जूनच्या परिपत्रकाची सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर होळी करण्यात आली आहे. देवस्थान इनाम वर्ग 3 च्या जमिनी खालसा करून त्या कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या मालकीच्या कराव्यात, याआधी प्रसिद्ध झालेला, शासनाचा मसुदा कायम ठेवावा, त्याचबरोबर नव्याने जारी करण्यात आलेले, परिपत्रक रद्द करावे,अशी मागणी यावेळी अखिल भारतीय किसान सभेच्या वतीने करण्यात आली.
0
0
Report

यवतमाळ के घरकुल लाभार्थी को दूसरी किस्त न मिलने पर पंचायत कार्यालय ठिय्या आंदोलन

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये विविध घरकुल लाभार्थ्यांना पहिल्या हप्त्यानंतर पुढील हप्ते रखडल्याने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेतृत्वात पंचायत समिती कार्यालयात ठिय्या आंदोलन करण्यात आले. घरकुल लाभार्थ्यांना १५ हजार रुपये देऊन घरबांधणी सुरू करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. त्यानुसार अनेक लाभार्थ्यांनी कर्ज काढून वीट, सिमेंट, गज व इतर बांधकाम साहित्य खरेदी करून काम सुरू केले. मात्र पहिल्या हप्त्यानंतर पुढील निधी न मिळाल्याने घरकुलधारक आर्थिक संकटात sапडले आहेत. दुसरा हप्ता तातडीने मंजूर करून घरकुलधारकांना निधी द्यावा, अशी मागणी घरकुल लाभार्थ्यांसह शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाने केली.
0
0
Report

वेरूळ में शराबी हुड़दंग के बाद शिक्षक की मौत, परिवार ने कठोर कार्रवाई की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वेरूळ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फक्त किरकोळ वादातून निष्पाप शिक्षकाला आपला जीव गमवावा लागला आहे असा आरोप मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केलाय, वेरूळ येथील जिल्हा परिषद शाळेत कार्यरत असलेले शिक्षक सुरेश रूपचंद बोरसे यांचा मध्यरात्री झालेल्या वादानंतर मृत्यू झाला आहे. बुधवारी रात्री onların घराबाहेर मोठा गोंधळ सुरू असल्याचा आवाज ऐकून शिक्षक सुरेश बोरसे बाहेर आले. यावेळी काही जण मद्यप्राशन करून धिंगाणा घालत असल्याचे दिसून आले. बोरसे यांनी त्यांना समज देण्याचा प्रयत्न केला. मात्र, याचाच राग आल्याने १० ते १५ जणांच्या जमावाने त्यांच्यावर बेदम हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे.या हल्ल्यात जखमी झालेल्या सुरेश बोरसे यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी मृत शिक्षकांच्या कुटुंबीयांनी केली आहे दरम्यान पोस्ट मार्टम मध्ये शिक्षकाचा मृत्यू हृदय विकाराच्या झटक्याने झाला असा दावा पोलिसांनी केलात तर शिक्षकाला मारहाण झाली नसल्याची माहिती छत्रपती संभाजी नगर ग्रामीण पोलिसांनी दिलीय, दरम्यान याबाबत सखोल तपास सुरू आहे कुणी दोषी असेल तर त्यावर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांचे म्हणणे आहे...
0
0
Report
Advertisement

कोकण में बारिश नहीं, किसानों की दुबारा पेरणी संकट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बळीराजाच्या डोळ्यात पाणी! कोकणात पावसाची हुलकावणी, दुबार पेरणीचे संकट.. कोकणात पावसाने हुलकावणी दिल्याने अखेर बळीराजाच्या डोळ्यात पाणी आले आहे.. रोहिणी नक्षत्रात मोठ्या आशेने केलेली भात पेरणी आता पावसाअभावी पूर्णपणे धोक्यात आली आहे.. पेरणी होऊन आठ ते दहा दिवस उलटले तरी समाधानकारक पाऊस झालेला नाही.. कडक उन्हामुळे जमिनीला भेगा पडल्या असून, हजारो रुपये खर्च करून पेरलेले महागडे बियाणे जमिनीतच करपून जाण्याची भीती निर्माण झाली आहे.. हवामान विभागाचा 'येलो अलर्ट' असूनही पाऊस गायब असल्याने, कोकणातील शेतकऱ्यांवर आता थेट दुबार पेरणीचे संकट घोंगावत आहे.. कर्जबाजारी झालेला शेतकरी आता शासनाकडून मदतीची अपेक्षा करत, चातकासारखी पावसाची प्रतीक्षा करतोय.. शेताच्या बांधावरून शेतकऱ्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

कोल्हापुर में चार युवकों ने कॉलेज छात्रा के साथ सामूहिक अत्याचार, वीडियो वायरल की धमकी

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी इथल्या चार तरुणांनी अश्लील व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत कॉलेज तरुणीवर अत्याचार केला होता. या प्रकरणातील एका आरोपीने आज पोलिसांसमोरच माज केल्याचे दिसून आले आहे. न्यायालयात घेऊन जात असताना यातील एका आरोपीने माध्यमांच्या कॅमेरासमोरच पोलीस गाडीत बसून पोलिसांसमोर मिश्या पिळत असताना दिसला. पोलिसांच्या समोरच दिलेल्या या खल्लाशीमुळे कोल्हापूर पोलिसांची दहशत कमी झाली आहे का? असा प्रश्न सामान्य नागरिक विचारत आहेत. आरोपींना आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर म्हटले गेले आहेत. या चार संशयितांनी 10 महिन्यात फोटो व्हायरलची धमकी देत विविध ठिकाणी तरुणीवर सामुदायिक अत्याचार केले होते.
0
0
Report

नागपूर रेलवे स्टेशन के पास MP Bus डिपो में निजी ट्रैवल्स की बस में आग, 12 बसें सुरक्षित स्थानांतरित

Nagpur, Maharashtra:नागपूर रेल्वे स्थानक लगत असलेल्या MP BUs डेपो येथे खासगी ट्रॅवल्स बसला आग, बस जळून खाक. मध्यप्रदेशकडे जाणाऱ्या अमिना ट्रॅवल्सच्या बसला आज अचानक आग लागली. प्रवासासाठी बसची तयारी सुरू असताना चालकाने वाहन सुरू करताच इंजिनमधून धूर निघू लागला. काही क्षणांतच आगीने रौद्ररूप धारण केले. आग लागल्याचे लक्षात येताच वाहनतळावरील इतर सुमारे 12 बस तातडीने सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आल्यात. त्यामुळे मोठी दुर्घटना टळली. स्थानिकांनी आग विझवण्याचे प्रयत्न केले, मात्र आग वेगाने पसरल्याने बस पूर्णपणे जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले. तोपर्यंत बसचे मोठे नुकसान झाले होते. प्राथमिक माहितीनुसार, इंजिनमधील बिघाडामुळे आग लागल्याचा संशय व्यक्त केला जातो. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top