icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अल निनो से मानसून पर असर की आशंका: रायगढ़ प्रशासन सतर्क, किसानों को दिशा-निर्देश

Chendhare, Maharashtra:अलनिनोच्या पार्श्वभूमीवर रायगड जिल्हा प्रशासन सतर्क, कृषी सभापतींनी अधिकाऱ्यांची बैठक घेतली. अल निनोमुळे मान्सूनवर परिणामाची भीती असून शेतकऱ्यांना सावधगिरीच्या सूचना देण्याचे निर्देश दिले गेले. नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या. अँकर की खबर—अलनिनोच्या प्रभावामुळे मान्सूनवर विपरीत परिणाम होण्याची शक्यता लक्षात घेऊन रायगड जिल्हा प्रशासन सतर्क झाला. जिल्हा परिषदेचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी याबाबत अधिकाऱ्यांची बैठक घेतली. विशेषतः पेरणीचा हंगाम जवळ आल्याने शेतकऱ्यांनी मानसूनचा अंदाज घेऊनच पेरण्या कराव्यात, अन्यथा बियाणे वाया जाऊ शकते. शेतकऱ्यांचं नुकसान टाळण्यासाठी यासंदर्भात अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे अशी सूचना सभापतींनी दिल्या. तसेच परिस्थितीबाबत स्थानिक लोकप्रतिनिधींना अवगत करण्यास सांगण्यात आले.
0
0
Report

मानसून के पूर्व SDRF ने आपदा बचाव के लिए बहु-स्तरीय प्रशिक्षण का आयोजन किया

Akola, Maharashtra:आगामी मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापनासाठी विविध यंत्रणा सज्ज राहाव्यात यासाठी अकोला जिल्ह्यातील काटेपूर्णा प्रकल्प, महान येथे राज्य आपत्ती प्रतिसाद दल अर्थात एसडीआरएफच्या वतीने शोध व बचाव प्रशिक्षण तसेच प्रात्यक्षिकांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षण कार्यक्रमात अकोला, मूर्तिजापूर, बार्शीटाकळी, पातूर आणि बाळापूर तालुक्यातील तलाठी, ग्रामसेवक, पोलीस कर्मचारी, होमगार्ड, अग्निशमन विभागाचे कर्मचारी, विविध स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी तसेच आपदा मित्रांनी सहभाग घेतला. प्रशिक्षणादरम्यान पूरस्थितीत शोध व बचाव कार्य कसे करावे, आपत्कालीन परिस्थितीत प्रथमोपचाराची पद्धत, आधुनिक बचाव साहित्याचा वापर, बोट हाताळणी व जल बचाव तंत्र याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी एसडीआरएफच्या जवानांनी प्रत्यक्ष बचाव कार्याची प्रात्यक्षिके सादर करून उपस्थितांना प्रशिक्षण दिले.मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य आपत्तींचा प्रभावीपणे सामना करण्यासाठी विविध स्तरांवरील अधिकारी, कर्मचारी आणि स्वयंसेवक प्रशिक्षित असणे आवश्यक आहे. या दृष्टीने आयोजित करण्यात आलेले हे प्रशिक्षण अत्यंत उपयुक्त आणि महत्त्वपूर्ण ठरल्याचे मत सहभागींकडून व्यक्त करण्यात आले.
0
0
Report

जैक्की श्रॉफ ने वृक्षारोपण के संदेश के साथ ट्री आर्मी का शुभारंभ किया

Sangli, Maharashtra:स्लग - मातीशी दोस्ती करा,झाडावर प्रेम करा,वृक्षणारोपण सोहळ्यात जॅकी श्रॉफची जोरदार डायलॉगबाजीतून झाडे लावण्याची साद.. अँकर - "भिडूलोग,मेरे भावा,मातीशी दोस्ती करा,फूल फेकायचं आणि फूल घ्यायचं दगड टाकला की दगड येतो,भानगडी नको,बाहेर पण घरी पण" अशी जोरदार डायलॉगबाजी मराठीतून करत अभिनेता जॅकी श्रॉफ याने झाडे लावा,असा संदेश दिला आहे. सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या गार्डी येथे आमदार सुहास बाबर यांच्या संकल्पनेतून सुरू झालेल्या 'ट्री आर्मी' या उपक्रमाचा शुभारंभ सोहळ्यामध्ये ते बोलत होते. बाबर यांची संकल्पनेतून वर्षभर एक लाख 78 हजार वृक्षांची लागवड करण्यात येणार आहे, लोकसहभागातून होणाऱ्या वृक्षारोपण सोहळ्याच्या उपक्रमासाठी अभिनेता जॉकी श्रॉफ यांच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. कार्यक्रमासाठी जॅकी श्रॉफ आणि आमदार सुहास बाबर हे बैलगाडीतून कार्यक्रमाच्या ठिकाणी दाखल झाले,कार्यक्रमानंतर जॅकी श्रॉफने स्वतः खड्ड्यामध्ये बसून झाडाचे पूजन करत वृक्षारोपण केलं. बाईट - जॅकी श्रॉफ - अभिनेता
0
0
Report
Advertisement

अकोला में मिशन उड़ान के तहत फिट इंडिया योग-ध्यान सत्र में पुलिस-नागरिक भागीदारी

Akola, Maharashtra:अकोला शहरात भारतीय खेळ प्राधिकरण आणि पोलिस विभागाच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन उडान’ अंतर्गत ‘फिट इंडिया अभियान’ साजरे करण्यात येत आहे. या अभियानाअंतर्गत योग व ध्यान सत्राचे आयोजन करण्यात आले होते. या योग व ध्यान सत्रात पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी, त्यांच्या कुटुंबीयांसह अनेक नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. योगामुळे आनंद, मानसिक शांतता आणि आरोग्य लाभते, असा संदेश यावेळी देण्यात आला.‘फिट इंडिया अभियान’ अंतर्गत विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
0
0
Report

प्राजक्त तनपुरे बिनविरोध विधान परिषद जीत, राहuri में समर्थकों ने जलसा

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- राहुरी तनपुरे विजय जल्लोष Anc- अहिल्यानगर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर भाजपचे उमेदवार प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड निश्चित होताच राहुरीत त्यांच्या समर्थकांनी मोठा जल्लोष साजरा केला. तनपुरे यांच्या संपर्क कार्यालयाबाहेर कार्यकर्ते मोठ्या संख्येने एकत्र आले होते. यावेळी फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली तसेच एकमेकांना पेढे भरवून आनंद व्यक्त करण्यात आला. "प्राजक्त तनपुरे आगे बढो, हम तुम्हारे साथ हैं" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. समर्थकांनी हा विजय विकासाच्या राजकारणाचा विजय असल्याची भावना व्यक्त करत आनंदोत्सव साजरा केला.
0
0
Report

Ahilyanagar Legislative Council election: Tanpure unopposed win, Panjare's withdrawal stirs drama

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद निवडणूक... भाजपचे प्राजक्त तनपुरे बिनविरोध....मोठ्या हाय व्होल्टेज ड्रामेनंतर प्राजक्त तनपुरे बिनविरोध...अपक्ष उमेदवार दत्तात्रय पानसरे यांनी यांच्या उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरून झाला होता मोठा गोंधळ....प्राजक्त तनपुरे यांच्या विरोधात चार अपक्ष उमेदवार होते रिंगणात....चारही जणांनी उमेदवारी अर्ज घेतले माघारी...राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे दत्तात्रय पानसरे यांनी बंडखोरी करत भरला होता अपक्ष उमेदवारी...दत्तात्रय पानसरे यांचा उमेदवारी अर्ज नगरसेवक शहबज अहमद सय्यद यांनी घेतला मागे...दत्तात्रय पानसरे यांनी सय्यद यांना प्राधिकृत केल्याने उमेदवारी अर्ज अर्ज मागे...पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यशस्वी खेळी....अहिल्यानगर विधान परिषद स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपच्या प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड
0
0
Report
Advertisement

राष्ट्रवादी महिला कांग्रेस अध्यक्ष के मोबाइल हैक, APK से निजी डेटा चुराने की योजना

Vasai-Virar, Maharashtra:लग्न पत्रिका पाठवून राष्ट्रवादीच्या महिला जिल्हाध्यक्षांचा मोबाईल हॅक हजारो जणांना गेले संशयास्पद मेसेज ANC : वसई-विरारमध्ये सायबर गुन्हेगारांच्या नव्या फसवणूकचा बळी आता राजकीय क्षेत्रातील व्यक्ती देखील पडू लागल्या आहेत. राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षा अश्विनी अनिल गुरव यांचा मोबाईल हॅक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. व्हॉट्सॲपवरील काही संदेश पाहत असताना अचानक त्यांचे खाते बंद पडले आणि काही वेळातच त्यांच्या मोबाईलवरून तब्बल ३ ते साडेतीन हजार संपर्कांना संशयास्पद 'लग्नपत्रिका' संदेश पाठवण्यात आल्याचे उघड झाले. सायबर गुन्हेगार सध्या लग्नसराईचा हंगाम साधत नागरिकांना 'Invitation Card.apk' नावाची फाईल पाठवत आहेत. “आमच्या घरी लग्न आहे, पत्रिका पाहून सांगा” असा संदेश देत ही फाईल पाठवली जाते. अनेकजण ती खरी लग्नपत्रिका समजून डाउनलोड करतात; मात्र ती प्रत्यक्षात मालवेअरयुक्त APK फाईल असल्याने मोबाईलमधील वैयक्तिक माहिती, बँकिंग तपशील आणि ओटीपी सायबर चोरट्यांच्या हाती जाण्याचा धोका निर्माण होतो. विशेष म्हणजे अश्विनी गुरव या मुख्याध्यापिका असल्याने त्यांच्या संपर्कातील तहसीलदार, पोलीस अधिकारी, शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकारी आणि अनेक प्रतिष्ठित व्यक्तींनाही हे मेसेज पोहोचले आहेत. या घटनेनंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली असून सायबर गुन्हे शाखेत तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. दरम्यान, व्हॉट्सॲपवर आलेल्या कोणत्याही अज्ञात '.APK' फाईल्स डाउनलोड किंवा इन्स्टॉल न करण्याचे आवाहन पोलिसांनी नागरिकांना केले आहे.
0
0
Report

गडचिरौली में शराबबंदी हटाने की मांग: पूर्व मंत्री आत्राम ने सीएम से मुलाकात की

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी हटवण्याची मागणी असे माजी कॅबिनेट मंत्री तथा अहेरीचे विद्यमान आमदार धर्मराव बाबा आत्राम यांनी केली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांना भेटून गडचिरोलीतील दारूबंदी हटवण्यासंदर्भात चर्चा करणार असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. गडचिरोली जिल्ह्यात 1992 पासून दारूबंदी आहे. मात्र या दारूबंदीचे विविध दुष्परिणाम दिसून येत असून बनावट दारूमुळे अनेकांचा जीव जात आहे, आरोग्यावर परिणाम पडत आहे. मात्र या घटना समोर येत नसल्याचे सांगत पुण्यासारखी घटना गडचिरोली जिल्ह्यात घडू नये, यासाठी जिल्ह्यातील दारूबंदी हटवली पाहिजे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बनावट दारूचा दुसऱ्या जिल्ह्यातून पुरवठा होत असून दारूबंदीमुळे गडचिरोली जिल्ह्याचा महसूल बुडत आहे. गडचिरोली जिल्ह्यात सध्या मोठमोठे उद्योग येत आहेत, अनेक हॉटेल्स उघडले जात आहेत. त्या दृष्टिकोनातून गडचिरोलीतील दारूबंदी हटवली पाहिजे. दारूचा असो किंवा कोणताही कारखाना, गडचिरोलीत स्थापन झाला पाहिजे. कारखानीयाच्या माध्यमातून अनेकांना रोजगार मिळेल, असेही धर्मराव बाबा आत्राम यांनी म्हटले आहे.
0
0
Report

अंबरनाथ सांडपाणी केंद्र पर करोड़ों के बिल, ठेकेदार की ब्लैकलिस्ट की मांग

Ambernath, Maharashtra:अंबरनाथचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र बंद, तरीही ठेकेदाराला कोटींची बिलं? भाजपा नगरसेवक मनीष म्हात्रेंचा गंभीर आरोप ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी अंबरनाथच्या वडोळ गावातील नगरपालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया केंद्राबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. हे केंद्र पूर्ण क्षमतेने कार्यरत नसतानाही संबंधित ठेकेदाराला कोट्यवधी रुपयांची बिलं अदा करण्यात आल्याचा आरोप भाजपा नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबंधित ठेकेदाराला ब्लॅकलिस्ट करण्याची मागणी त्यांनी नगरपालिकेकडे केली आहे. अंबरनाथच्या वडोळ गावात नगरपालिकेचं ४५ एमएलडी क्षमतेचं सांडपाणी प्रक्रिया केंद्र कार्यरत आहे. या केंद्राचं संचालन करण्याचं काम ओम इंडस्ट्रीज या ठेकेदाराला जानेवारी २०२६ ते २०२८ या कालावधीसाठी देण्यात आलं असून त्यासाठी दरमहा सुमारे ८ लाख रुपये मोबदला दिला जातो. या केंद्रामध्ये चार टाक्यांच्या माध्यमातून ब्लोअर, एरीएशन, डिकँडिंग आणि क्लोरीनेशन अशी प्रक्रिया सांडपाण्यावर केली जाते. मात्र सध्या चारपैकी केवळ एकच टाकी सुरू असल्याचा, तसेच क्लोरीनेशन प्रक्रिया पूर्णपणे बंद असल्याचा आरोप नगरसेवक मनीष म्हात्रे यांनी केला आहे.याशिवाय केंद्रातील अत्यंत महत्त्वाची मानली जाणारी SCADA प्रणालीदेखील कार्यरत नसल्याचं त्यांनी सांगितलं. अशा परिस्थितीत प्रक्रिया केंद्र अपेक्षित पद्धतीने चालत नसताना संबंधित ठेकेदाराला यापूर्वी ३ कोटी रुपये आणि नुकतंच आणखी १ कोटी रुपयांचं बिल कशाच्या आधारावर देण्यात आलं, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र आणि निष्पक्ष चौकशी व्हावी, यासाठी व्हीजेटीआयसारख्या तज्ज्ञ संस्थेकडून थर्ड पार्टी ऑडिट करण्यात येावं आणि ऑडिट अहवालानंतरच कोणतंही बिल मंजूर करण्यात यावं, अशी मागणीही मनीष म्हात्रे यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

आजरा तालुक़ा में एक ही परिवार के चारों की दर्दनाक मौत

Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिले के अजरा तालुक्‍ा के उत्तुर-बहिरेवाडी मार्ग पर भयावह दुर्घटना में एक ही परिवार के चौघों की मौके पर मौत हो गई। बाइक और ट्रक के बीच टक्कर से यह हादसा हुआ। मिली जानकारी के अनुसार वोन्याली गांव के चांदे परिवार दुंडगे गांव की ओर जा रहे थे। इस दौरान उनकी बाइक सामने से आने वाले वाहन से जोरदार टक्कर हो गई। इस दुर्घटना में दीपक चांदे (वय 39), पत्नी शोभा चांदे और उनकी दो बेटियां जय चांदे और पूर्वा चांदे (वय 7) की मौके पर ही मौत हो गई। चांदे परिवार मूल वोन्याली गांव के थे और मुंबई में निवास करते थे। गर्मी की छुट्टियों के लिए वे कुछ दिन पहले गांव आए थे। गांव में नया मकान बनने के बाद वे पहली बार आठ दिन के लिए मुक्काम पर आए थे। कल वे मुंबई लौटने के प्लान बना रहे थे। इसके पहले रिश्तेदारों व अतिथियों से मिलने के लिए वे दुंडगे गांव की ओर निकले, पर नियति ने घात किया और रास्ते में ही पूरे परिवार ने काल के ग्रहीण कर दी। इस घटना से अजरा तालुका समेत क्षेत्र में शोक की लहर है।
0
0
Report

नवी मुंबई में मनसे ने बीजेपी के 100 दिन के काम का पंचनामा किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेतील सत्ताधारी भाजपच्या 100 दिवसांच्या कामाचा पंचनामा आज नवी मुंबई मनसेने केलाय. सत्ताधारी भाजपच्या 100 दिवसाच्या कामाची तुलना 100(हंड्रेड) डेज या हिंदी चित्रपटाशी करत नालेसफाई, शिक्षण, आरोग्य, गढूळ आणि अपुरा पाणी पुरवठा अश्या प्रत्येक क्षेत्रात सत्ताधाऱ्यांचे कामकाज सपशेल फेल ठरल्याचे सांगत अपयशाचा पाढा आयोजित पत्रकार परिषदेत वाचला. सत्ताधाऱ्यांना जेव्हा 200 दिवस पूर्ण होतील तेव्हा तरी यासमस्या सुटलेल्या असतील अशी माफक अपेक्षा आहे अशी प्रतिक्रिया मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी व्यक्त केलेय.
0
0
Report

राजर्षी शाहू पुरस्कार 2026: मराठा इतिहास के प्रख्यात विद्वान डॉ. जयसिंगराव पवार को मरणोपरांत सम्मान

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार - २०२६' ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ.अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना १९८४ पासून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंती दिनी, म्हणजेच २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा. शाहू स्मारक येथे या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या सर्वोच्च पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगami विचार जगभरात पोहोचवण्यासाठी समर्पित केले. सांगली जिल्ह्यातील तडसर येथे ३० डिसेंबर १९४१ रोजी जन्मलेल्या डॉ. पवारांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून उच्च शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठातून इतिहासात प्रथम क्रमांकाने एम.ए. आणि त्यानंतर पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले असून विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. डॉ. पवार यांनी मराठा इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलूंवर सखोल प्रकाश टाकत ४० हून अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. त्यांनी संपादित केलाला तब्बल १२५० पानांचा 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' हा इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधनीच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र मराठीसह अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध जो रोमहर्षक आणि देदिप्यमान लढा दिला, त्याचा साधार इतिहास डॉ. पवार यांनी जगासमोर आणला. त्यांच्या या अविरत ज्ञानसाधनेची दखल घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सन २००९ मध्ये महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवन व कार्यावरील ग्रंथांचे विमोचन देशाच्या तत्कालीन मा.राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते, तर २०१३ मध्ये मा.राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यांना 'आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार', 'डी. लिट.' पदवी यांसह ३० पेक्षा जास्त प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. 'महाराणी ताराबाई', 'छत्रपती शिवाजी महाराज', 'सेनापती संताजी घोरपडे' आणि 'राजर्षी शाहू एक दृष्टीक्षेप’ ही त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा आजही इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. यापूर्वी हा ऐतिहासिक पुरस्कार भाई माधवराव बागल, ना. ग. गोरे, बाबा आढाव, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग, तसेच डॉ. जब्बार पटेल यांसारख्या थोर विचारवंतांना व समाजसेवकांना प्रदान करण्यात आला आहे. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट गेल्या ३९ वर्षांपासून शाहू महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य व्याख्यानमाला व विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. यंदाच्या ४० व्या पुरस्कारासाठी शाहू विचारांचे खरे पाईक असणाऱ्या डॉ. जयसिंगराव पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि इतिहासप्रेमींकडून अत्यंत समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर के नागरगाव में ट्रांसफॉर्मर ले पानी की आपूर्ति ठप्प, किसान चिंतित

Shirur, Maharashtra:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक शिरूर तालुक्यातील नागरगाव परिसरात नदीकाठच्या शेतांना पाणीपुरवठा करणारा वीज ट्रान्सफॉर्मर अचानक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या ट्रान्सफॉर्मरवर अनेक शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने सिंचन व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांनी महावितरणकडे तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

रत्नागिरी के आवाशी में भंगार गोदाम में भीषण आग, लाखों का नुकसान, हताहत नहीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग.. लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली!.. ​रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील आवाशी येथे एका भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी बसथांब्याजवळ असलेल्या या गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि रासायनिक कारखान्यांचे रिकामे ड्रम असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.. घटनेची माहिती मिळताच घरडा केमिकल्स आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. स्थानिक तरुणांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश झाले.. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असले,तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.. आग नेमकी कशामुळे लागली,याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top