icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर के किसान के बैलजोड़ी विवाद में किसान ने बैल वापस माँगा, पुलिस-गोशाला पर सवाल

Latur, Maharashtra:पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याला मोठा धक्का... शेतीसाठी खरेदी केलेली बैलजोडी कत्तलीच्या संशयावरून अडवली....गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच दिल्याचा शेतकऱ्याचा गंभीर आरोप... प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मनसेची मागणी .... गुन्हा दाखल करण्यापूर्वी कागदपत्रांची पडताळणी करा... पोलिसांच्या भूमिकेवर उपस्थित झाले प्रश्न... पाहा झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट. AC::- शेतकऱ्याचं आणि बैलाचं नातं हे पैशाचं नसतं... ते कष्टाचं, विश्वासाचं आणि जगण्याचं असतं. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी म्हणजे शेतकऱ्याचा सर्वात मोठा आधार. पण हाच आधार अचानक त्याच्यापासून दूर गेला... तर‌ ? लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्याची हीच व्यथा आहे. शेतीसाठी बाजारातून बैलजोडी खरेदी केली . ही बैलजोडी घेऊन ते आपल्या गावाकडे परतत असताना काही अतिउत्साही गोरक्षकांनी बैल कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून त्यांना अडवले. त्यानंतर त्यांना पोलीस ठाण्यात घेऊन जाण्यात आले त्यानंतर त्यांच्यावर पोलिसांत गुन्हा ही दाखल करण्यात आला आणि बैल गोशाळेत ठेवण्यात आले. बाईट ::- राम बिराजदार ( शेतकरी कोराळी ) Vo 02 ::- राम बिराजदार यांचा दावा आहे की, त्यांनी बैल शेतीच्या कामासाठीच विकत घेतले होते. मात्र गोशाळेत ठेवलेले हेच बैल दुसऱ्या व्यक्तीला देण्यात आल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे आपल्या शेतीसाठी घेतलेली बैलजोडी परत मिळावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. बाईट ::- शेतकरी Vo 03 ::- दरम्यान, या प्रकरणाची महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने गंभीर दखल घेतली आहे. लातूर जिल्ह्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याचा आरोप मनसेने केला आहे. अतिउत्साहातून शेतकऱ्यांचीच बैलजोडी अडवली जाते आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक व मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. एखाद्या बैलाची किंमत ५० हजार रुपये असली, तरी तो परत मिळवण्यासाठी शेतकऱ्याला एक ते दोन लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागत असल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये पोलिसांनी अधिक गांभीर्याने चौकशी करावी, गुन्हा दाखल करण्यापूर्वी जनावरांच्या खरेदी-विक्रीची कागदपत्रे आणि इतर पुराव्यांची सखोल पडताळणी करावी, अशी मागणी मनसेने केली आहे... बाईट ::- शेतकरी राम बिराजदार बाईट ::- संतोष नागरगोजे ( मनसे ) END ::- एका बाजूला जनावरांच्या संरक्षणासाठी कायद्याची अंमलबजावणी होणे आवश्यक आहे, तर दुसऱ्या बाजूला शेतीसाठी बैलजोडी खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांवर अन्याय होणार नाही, याची काळजी घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. त्यामुळे अशा प्रकरणांमध्ये कारवाई करताना वस्तुस्थिती, कागदपत्रे आणि संबंधित सर्व बाजूंची सखोल पडताळणी होणे गरजेचे असल्याची भावना व्यक्त होत आहे.... वैभव बालकुंदे ZEE 24 TAAS Latur
0
0
Report

जालना के विलास घुले मामले में बजरंग सोनवणे के बीजेपी जाने की अफवाह

Jalna, Maharashtra:जालना: बिड मधील विलास घुले खून प्रकरणात मुलाला वाचवण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे भाजपमध्ये जाण्याची चिन्हं | ओबीसी नेते नवनाथ वाघमारे यांचा दावा अँकर :बिड मधील विलास घुले खूण प्रકરણी ओबीसी नेते नवनाथ वाघमारेनी प्रतिक्रिया दिलीय.सौरभ सोनवणेला वाचवण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे सुद्धा भाजपमध्ये जाण्याची चिन्ह आहेत असा दावा नवनाथ वाघमारेंनी केलाय. स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी सोनवणे यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली असल्याचा आरोप वाघमारेंनी केलाय.सौरभ सोनवणेला जात वाहून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे असा दावा देखील वाघमारेंने केला.मनोज जरांगे सांगतात की आम्ही जात पात पाहत नाही मग जरांगे यांनी घुले कुटुंबियांची भेट का घेतली नाही असा सवाल वाघमारेंनी जरांगे यांना केलाय. बाईट : नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते,जालना *प्रेस पॉईंटर* *ऑन विलास घुले चे कुटुंबीय आंदोलन करत आहे* विलास घुलेंना न्याय मिळू नये यासाठी बऱ्याच प्रवृत्ती कामाला लागले आहे... विलास घुले प्रकरणात आरोप करून प्रकरण रफादफा करण्याची प्रयत्न सुरू आहे... खासदार बजरंग सोनवणे यांच्या मुलाला वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू आहे.. भाजपचे आमदार सुरेश धस बजरंग सोनवणे च्या मुलाची वकिली करत आहे... मनोज जरांगे सांगतात की आम्ही जात-पात पाहत नाही पण आतापर्यंत घुले कुटुंबीयांना भेट दिली नाही... रोहित पवार या भागात येऊन सुद्धा कुटुंबाला भेट दिली नाही... या प्रकारात एसआयटी चौकशी सुरू आहे जरांगे नावाचा बिनडोक माणूस चौकशी झाली काही निघालं नाही... जरांगे एसआयटीचा प्रमुख आहे का की सदस्य आहे. त्याची जात पाहून त्याला मेल्यानंतर देखील टार्गेट केलं जात आहे... या प्रकरणात कदम बाई नावाच्या महिला आल्या, त्यादेखील बोलताना कन्फ्युज आहे, हे सगळं स्क्रिप्टेड असलेलं वाटतं... कदम बाईची सुद्धा यासाठी चौकशी केली पाहिजे.... सौरभ सोनवणेला जात वाहून वाचवण्याचा प्रयत्न सुरू आहे.. बजरंग सोनवणे जरंगेच्या मालकाच्या पक्षाचा खासदार आहे , जरांगेचे मालक पूर्वीपासून शरद पवार आहे... सौरभ सोनवणेला या प्रकरणात नसता तर बजरంగ सोनवणे मुख्यमंत्र्यांच्या भेटीला घाई केली नसती.. सौरभ सोनवणेला वाचवण्यासाठी खासदार बजरंग सोनवणे सुद्धा भाजपमध्ये जाण्याची चिन्ह आहेत, स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी मुख्यमंत्र्याची भेट घेतली....
0
0
Report

जालना से लंदन: पति-पत्नी ने 71 दिन में 17,683 किमी कार यात्रा पूरी की

Jalna, Maharashtra:जालना : पती-पत्नीची जालन्यातील लोखंडी पूल ते लंडन ब्रिज कार यात्रा जालन्यातील एका जोडप्यानं जालन्यातील लोखंडी पूल ते लंडन यात्रा कारने प्रवास करत पूर्ण केली आहे. या पूर्ण प्रवासात त्यांनी तब्बल 17 हजार 683 किलोमीटर प्रवास केला. 11 एप्रिल रोजी या जोडप्यानं ही यात्रा सुरू केली होती. राजेश बजाज आणि सोनी बजाज असं कारने प्रवास करून यात्रा पूर्ण करणाऱ्या जोडप्याचं नाव आहे. या कार प्रवासात जोडप्याच्या दिमतीला आणखी 10 कार सोबत होत्या. हे जोडपं ही यात्रा पूर्ण करून पुन्हा जालन्यात परतलं आहे. नेपाळ,तिबेट,चीन,कझाकिस्तान,रशिया,जॉर्जिया, तुर्की,हंग्री, फ्रान्स, अशा 19 देशांतून प्रवास करत हे जोडपं लंडनला पोहचलं. हा सर्व प्रवास करण्यासाठी त्यांना तब्बल 71 दिवस लागले. ही कारयात्रा पूर्ण करण्यासाठी हे जोडपं तब्बल तीन वर्षांपासून तयारी करत होतं. अखेर जालना ते लंदन कार यात्रा पूर्ण झाल्यानंतर या जोडप्यानं आनंद व्यक्त केलाय. जालन्यात परतल्यानंतर या जोडप्याचा स्वागत आणि सत्कार करण्यात आलाय.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई मुकुंद कंपनी के माथाडी मजदूर 2025 बदलाव विरोध में गेट पर प्रदर्शन

Navi Mumbai, Maharashtra:anchor -नवी मुंबईतील माथाडी कामगार बोर्डाच्या माध्यमातून विविध कंपन्यांमध्ये आणि आस्थापनांमध्ये कार्यरत आहेत. दिघा येथील मुकुंद कंपनीत अनेक वर्षांपासून काम करणाऱ्या कंपन्यांना 2025 रोजी झालेल्या माथाडी कामगार कायद्यातील बदलावानुसार कंपनी व्यवस्थापनाने लोडिंग अनलोडींगचे यांत्रिकी पद्धतीने काम करणाऱ्या हमाल कामगारांची सेवा खंडित केले आहे. एक जुलैपासून सेवा खंडित करण्यात आल्याने कामगारांनी कंपनीच्या गेटवर कंपनी व्यवस्थापनाने सरकारच्या धोरणाचा निषेध केला. वर्षांवर्ष काम करणारे 45 वर्षाहून अधिक कर्मचारी या निर्णयामुळे बेरोजगार होणार असून सर्वाधिक मराठी तरुण बेरोजगार होणार असल्याने कर्मचाऱ्यांनी संताप व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे या कर्मचाऱ्यांच्या जागे बाहेरून परप्रांतीय कर्मचारी कंपनीने सेवेत घेतल्याचा आरोप आंदोलन करता कर्मचाऱ्यांनी केला आहे त्यामुळे हा निर्णय मराठी माणसाच्या विशेष करून माथाडी कामगारांच्या सेवा हक्कावर गदा आणणारा असल्याने त्याचा निषेध करून सरकारने लक्ष देण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

दापोली-खेड हाईवे पर नशेमन कॉलनी में बड़ा गड्ढा, देर रात दुर्घटना का खतरा बढ़ा

Ratnagiri, Maharashtra:दापोली/ रत्नागिरी दापोली-खेड महामार्गावर भलंमोठं भगदाड; नशेमन कॉलनीत अपघाताचा धोका वाढला रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-खेड महामार्गावरील नशेमन कॉलनी परिसरात महामार्गाच्या मोरीचा काही भाग खचल्याने मोठे भगदाड पडले आहे. या भगदाडामुळे वाहन चालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, विशेषतः रात्रीच्या वेळी अपघाताची शक्यता वाढली आहे. स्थानिक नागरिकांनी तातडीने दुरुस्ती करून आवश्यक सुरक्षात्मक उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. प्रशासनानेही या धोकादायक ठिकाणी त्वरित लक्ष देण्याची गरज व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में कुंभ मेळे के दौरान खड्डों से हादसा: 7 से अधिक नागरिकों की मौत, मुद्दे उठे

Nashik, Maharashtra:सदोष रस्त्यामुळे अपघात.... शेकडो नागरिक जखमी तर 7 हून अधिक नागरिकांचा गेला जीव.... अँकर आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या नावाखाली सुरु असलेल्या विकासकामांनी नाशिककरांसाठी मृत्यूचे सापळे तयार केल्याचा धक्कादायक आरोप करीत काल झालेल्या महासभेत लोकप्रतिनिधींनी प्रशासनाला अक्षरशः धारेवर धरले. खोदकामातील निष्काळजीपणामुळे झालेल्या अपघातांत 7 हून अधिक नागरिकांचे जीव गेले असल्याचा संतापजनक दावा लोकप्रतिनिधींनी केला. यावर महापौर हिमगौरी आडके-आहेर यांनी कडक दोषी ठेकेदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा (कलम १०६) दाखल करा आणि पीडित कुटुंबांना महापालिकेकडून आर्थिक भरपाई द्या, असे आदेश दिले...लोकप्रतिनिधींचा आक्रोश लक्षात घेऊन महापौर हिमगौरी आडके यांनी केसनिहाय चौकशीचे आदेश दिले.. कुंभमेळ्याच्या कामामुळे गेल्या काही दिवसांपूर्वी माझी सैनिक असलेल्या प्रवीण गायकवाड यांचा रस्ता असलेल्या खड्ड्यामुळे मृत्यू झाला... शहरातील सातपूर परिसरात असलेल्या श्रमिक नगर मध्ये 6 जून रोजी रात्री दहा वाजेच्या सुमारास अपघात झाला आणि या अपघातात प्रवीण गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला....प्रवीण गायकवाड हे 1988 साली सैन्य दलातून रिटायर झालेत.... त्यांनी सात वर्ष देश सेवा बजावली... कश्मीरमध्ये देश सेवा बजावत असताना त्यांच्या पायाला गोळी लागली आणि यामुळे त्यांना आर्मीतून रिटायर झाले..त्यानंतर प्रवीण गायकवाड हे सिन्नर मधील एका खाजगी कंपनीमध्ये सिक्युरिटी ऑफिसर या पदावर काम करत होते....गायकवाड त्यांचा सहा जून रोजी अपघातात मृत्यू झाला त्यांची पत्नी भाग्यश्री गायकवाड या गृहिणी असून त्यांच्या मुलाने आत्ताच दहावीची परीक्षा दिली आहे... प्रवीण गायकवाड यांचा अचानक झालेल्या मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला... अचानक झालेल्या या घटनेमुळे प्रवीण गायकवाड यांच्या कुटुंबाला उदारनिर्वाह कसा करावा याबद्दल प्रश्न पडलाय....यामुळे आम्हाला नाशिक महानगरपालिकेकडून काहीतरी मदत मिळावी आणि माझ्या मुलाला नोकरी मिळावी अशी मागणी प्रवीण गायकवाड यांच्या कुटुंबीयांनी केली आहे...... बाईट- भाग्यश्री प्रवीण गायकवाड पत्नी बाईट - सार्थक गायकवाड .. मुलगा बाईट- शुभम गायकवाड...प्रवीण गायकवाड ,भाऊ सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहर भरात तब्बल 28 ठिकाणी रस्त्याचे काम सुरू आहे त्या रस्त्यात चाललेल्या कामांमुळे नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो शहरातील या कामांमुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर मोठमोठे खड्डे तयार झाले आहेत आणि या खड्ड्यांमध्ये पडून शेकडो नागरिकांना दुखापत झाल्याचं नाशिक महानगरपालिकच्या महासभेत गदारोळ निर्माण झाला... संबंधित ठेकेदार रस्त्यावर काम सुरू असताना कुठलाही प्रकारची माहिती देत नसल्याचा आरोप नगरसेवकांकडून केला आहे तर रस्त्यात सुरू असलेल्या कामात कुठलीही सुरक्षा ठेवत नसल्याचे देखील नगरसेवकांनी सांगितलं यामुळे या अपघाताला कारणीभूत असलेल्या ठेकेदारांवर कारवाई करावी आणि ज्या ज्या नागरिकांना या कामांमुळे त्रास होऊन अपघात घडलाय या सगळ्यांची ठेकेदारांनी भरपाई द्यावी अशी मागणी नगरसेवकांनी केलीये त्याचबरोबर मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करून नोकरीला लावून द्यावं अशी देखील मागणी करण्यात आलीये.. त्याचबरोबर संबंधित ठेकेदारांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा अशी देखील मागणी नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे... विवो/03 नाशिक महानगरपालिकेच्या कालच्या महासभेत या संदर्भात नगरसेवकांनी अनेक प्रश्न उपस्थित केले त्यावर महापौरांनी सगळा प्रश्न ऐकून त्यावर चौकशीचे आदेश दिले आहेत... चौकशीच्या दरम्यान जे जे ठेकेदार दोषी आढळले जातील त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितले... त्याचबरोबर ज्या ज्या ठिकाणी काम सुरू आहे त्या त्या ठिकाणी ठेकेदारांनी संबंधित कामाचे फलक लावावे अशी देखील सूचना महापौर आणि उपमहापौर यांनी दिलाय... बाईट- हिमगौरी आडके महापौर नाशिक महापालिका बाईट- विलास शिंदे उपमहापौर नाशिक महानगरपालिका.. वर्तमानातील भागात, सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमुळे नागरिकांना मोठा त्रास असतोय... अत्यंत संत गतीने सुरू असलेल्या कामामुळे अनेक नागरिकांचा अपघात होत आहे सिंहस्थ कुंभमेळा नाशिक साठी महत्त्वाचा असला तरी नागरिकांची काळजी घेणं हे देखील तेवढेच महत्त्वाचा आहे... जर विकासाबरोबर नागरिकांची काळजी देखील घेतली तर कुंभमेळा देखील चांगल्या पद्धतीने होईल अशी अपेक्षा नाशिककरांनी केली आहे.... देश सेवा करणाऱ्या माजी सैनिकाचा अशा पद्धतीने जर मृत्यू होत असेल तर ही अत्यंत खेदजनक बाब असल्याचं बोललं जातंय... त्यामुळे या सगळ्यांचा धडा घेऊन नाशिक महानगरपालिकेने अशा ठेकेदारांवर कारवाई करण्याची मागणी केली जातिये...
0
0
Report

मौसम की तीव्र बारिश में मंडणगड-बाणकोट मार्ग ध्वस्त, वाहन चालकों के लिए बड़ा खतरा

Ratnagiri, Maharashtra:मंडणगड/ रत्नागिरी पहिल्याच मुसळधार पावसात मंडणगड-बाणकोट मार्ग खचला; पालवाणी फाट्याजवळ मोठ्या भेगा, अपघाताचा धोका रत्नागिरी जिल्ह्यातील मंडणगड तालुक्यात पहिल्याच मुसळधार पावसाने रस्ते बांधकामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. पालवाणी फाटा परिसरातील मंडणगड-बाणकोट मार्गावर रस्त्याचा काही भाग खचून मोठ्या भेगा पडल्याने वाहनचालकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कामकाजावर स्थानिक नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त करत तातडीने दुरुस्ती आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी मोठी दुर्घटना टळल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

भिवंडी में बिजली के झटके से 26 वर्षीय युवक की मौत, सुरक्षा पर सवाल

Thane, Maharashtra:भिवंडीत विजेचा झटका लागून 26 वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू... भिवंडीतून हृदयद्रावक बातमी समोर आली आहे. चौहान कॉलनीतील 26 वर्षीय तरुणाचा विजेचा झटका लागून जागीच मृत्यू झालाय. दिड वर्षाच्या मुलीच्या डोक्यावरून पित्याचं छत्र हरपलं. भिवंडीतील चौहान कॉलनी, हनुमान मंदिरासमोर राहणारा 26 वर्षीय मुश्तफा रज्जब शेख याचा बुधवारी विजेचा झटका लागून दुर्दैवी मृत्यू झालायं. मुश्तफा हा येथील गोपाल स्वीट हाऊसाठी लग्न आणि सामाजिक कार्यक्रमांमध्ये कॅटरिंगचं काम करत होता. कार्यक्रमांसाठी लागणारी भांडी आणि साहित्य मंदिर परिसरात ठेवली जात होती. काल तोही तिथे भांडी उतरवण्यासाठी गेला होता. त्याच दरम्यान उघड्या पडलेल्या विजेच्या तारेचा स्पर्श झाल्याने त्याला जोरदार झटका बसला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. घटनेनंतर त्याला तातडीने स्वर्गीय इंदिरा गांधी मेमोरियल रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र डॉक्टरांनी तपासणी करून त्याला मृत घोषित केलं. मुश्तफाच्या पश्चात पत्नी आणि फक्त दिड वर्षाची एक छोटी मुलगी आहे. या अपघाताने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुश्तफा आमचा भाऊ होता. तो कष्टाने घर चालवत होता. मंदिराच्या ठिकाणी तारा उघड्या होत्या, कोणताही सेफ्टी नव्हता. दुकानदाराच्या निष्काळजीपणामुळे आमचा भाऊ गेला. आम्हाला न्याय पाहिजे, मुआवजा पाहिजे." बाईट- ख्वाजा खान, मृतकाचा नातेवाईक "दीड वर्षाची त्याची मुलगी आहे. आता तिचं कोण करणार? जर तिथे प्रोटेक्शन असतं, तारा झाकलेल्या असत्या तर आज मुश्तफा आमच्यात असता. प्रशासनाने कठोर कारवाई करावी." बाईट-साबिर शेख, मृतकाचा नातेवाईक मृतकाच्या कुटुंबीयांनी दुकानदाराच्या निष्काळजीपणावर आरोप केला आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा व्यवस्था नसल्यामुळे हा अपघात झाल्याचा त्यांचा दावा आहे. कुटुंबाला उचित मुआवजा आणि दोषींवर कठोर कारवाईची मागणी करत आहेत. सध्या पोलिसांनी अपघाताची नोंद करून तपास सुरू केला आहे. हादसा नेमका कसा झाला आणि यात कोणाची निष्काळजी होती याचा तपास सुरू आहे. कामाच्या ठिकाणी सुरक्षा किती महत्त्वाची आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झालंय. पोलिसांच्या तपासानंतरच खरं कारण समोर येईल.
0
0
Report

मुंबई-नाशिक महामार्ग पर सतत वर्षा से 7–8 किमी तक जाम, बचाव के उपाय जारी

Thane, Maharashtra:सतंतधार पावसामुळे मुंबई-नाशिक महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी... मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर 7-8 किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा.. भिवंडी तालुक्यात कालपासून सुरू असलेल्या संततधार कोसळणाऱ्या पावसाचा फटका मुंबई-नाशीक महामार्गाला बसला आहे. महामार्गावरील अर्धवट काम आणि पावसामुळे रस्त्यावर खड्डे आणि पाणी साचल्याने वाहतूक मंदावली आहे. राजनोली, पिंपळनेर, मानकोली ते खारीगाव टोलनाका या 7 ते 8 किलोमीटर पट्ट्यात मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांच्या प्रचंड रांगा लागल्या आहेत. गेल्या 2 ते 3 तासांपासून वाहनचालक याच कोंडीत अडकून पडले आहेत. ट्रक, बस, खासगी गाड्या सगळ्यांचीच तारांबळ उडाली आहे. पावसामुळे दृश्यमानता कमी झाल्याने अपघाताचा धोका देखील वाढला आहे. वाहतूक पोलीस घटनास्थळी पोहोचले असून मार्ग मोकळा करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मुंबई-नाशिक प्रवास करणाऱ्या नागरिकांनी पर्यायी मार्गाचा विचार करावा आणि घाई करू नये.
0
0
Report
Advertisement

शिवसंग्राम महायुती में हिस्सेदारी नहीं मिलने से नाराज़, चुनावी रणनीति पर दबाव

Beed, Maharashtra:बीड: ज्योती मेटे शिवसंग्राम ला महायुतीत दिवंगत विनायक मेटे यांच्या हयातीत जो वाटा मिळत होता तो त्यांच्या पाश्चात्य मिळताना दिसत नाही यामुळे कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड अस्वस्थता आणि नाराजी आहे त्या आगामी निवडणुकीचा परिणाम म्हणून आगामी निवडणुकात आम्हाला पाहावे लागेल महायुतीचा घटक पक्ष म्हणून आम्ही महानगरपालिका आणि नगरपालिका मध्ये महाराष्ट्रात जिथे शक्य होईल तिथे भाजपा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत काम केले तसे असताना शिवसंग्रामच्या वाट्याला उपेक्षा येत आहे त्यामुळे वेगळा विचार न करता निवडणुकांच्या माध्यमातून आपली ताकद दाखवावी लागेल वेगवेगळ्या पक्षांची भूमिका काही दिवसात पाहत आहोत तसं न करता विस्थापितांना संधी देण्यासाठी शिवसंग्राम आपलं अस्तित्व कायम राखून राजकारण करण्यावर ठाम आहे आमच्या कार्यकर्त्यांना स्थिरस्थावर करण्यासाठी महायुतीने सन्मान जनक ठेवावे महायुतीला नम्र आवाहन करतो शिवसंग्राम ला योग्य वाटा देण्याच्या दृष्टिकोनातून आगामी काळात पावलं उचलली गेली पाहिजेत अन्यथा या कार्यकर्त्याच्या मानसिकतेला थोपवणे अवघड जाईल ही खंत मुख्यमंत्र्यांना बोलून दाखवली आहे शिवसंग्राम ने विनायक मেটे यांना गमावले मात्र ताकद गमावलेली नाही याच ताकदीचा विचार करून महायुतीने योग्य तो सन्मान द्यावा जी महामंडळ जी पक्षाची धोरण असतील अन्य सहयोगी पक्षांसाठी त्यात शिवसंग्राम चा विचार झाला पाहिजे महायुती हा शब्द पाळेल की वेगळी भूमिका शिवसंग्रामच्या बाबतीत घेईल हा आशावाद आहे मात्र तसे घडताना दिसले नाही तर आगामी येऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीत कार्यकर्त्यांना आवर घालण्या कठीण जाईल अद्याप स्वबळावर लढण्याचा निर्णय घेतलेला नाही बीड नगरपालिकेत राष्ट्रवादी अजित पवार गटासोबत आम्ही लढलो मात्र जी आश्वासन देण्यात आली त्याची पूर्तता झाली नाही आता येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत बीड आहे. नगरपालिकेत दिले गेलेला शब्द न पाळल्याने कार्यकर्त्यांमध्ये असणारी अस्वस्थता उद्रेकात परावर्तित होऊ नये यासाठी महायुतीला आवाहन शिवसंग्राम ला सन्मान जनक विचार करावा अन्यथा जिल्हा परिषद पंचायत निवडणुकांमध्ये आम्ही आम्ही आमची भूमिका घेऊन लोकांमध्ये जाऊ बसल्याशिवाय राहणार नाही
0
0
Report

नेरुल में दो छात्राओं को बिजली का झटका, महावितरण की लापरवाही पर चहुंओं सवाल

Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ एलपी जवळ दोन विद्यार्थिनींना विजेचा धक्का लागल्याची धक्कादायक घटना घडली होती. विद्युत वाहिनी अचानक कट झाल्यामुळे दोन मुलींना विजेचा धक्का लागला असून विद्यार्थिनींवर डी वाय पाटील रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. दरम्यान सदर दुर्दैवी घटना महावितरणच्या निष्काळजीपणा मुळे घडली असून विद्याथीनींवर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत. नवी मुंबई मनपा महापौर सुजाता पाटील यांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थिनींच्या तबेबतीची विचारपूस केली असून भविष्यात अश्या घटना घडणार नाहीत याची दक्षता घेण्याचे स्पष्ट निर्देश दिल्याची प्रतिक्रिया व्यक्त केलीय.
0
0
Report

परशुराम घाट का गैबियन खतरे में: पेढ़े गाँव पर मंडराया संकट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. झी २४ तास ने मुंबई - गोवा महामार्गवरील चिपळूणनजीकच्या परशुराम घाटातील गॅबियन वाला पहिल्याच पावसात गेलेले तडे ही बातमी दाखवली होती.. या बातमीची प्रशासनाने दाखल घेऊन सध्या मातीने हे तडे भरले जातायत.. या ठिकाणी प्रशासकीय अधिकारी कोणीही नाही फक्त कामगार या ठिकाणी काम करीत आहेत.. परशुराम घाटाच्या पायथ्याशी पेढे गाव असून जवळपास हजारो लोकांची वस्ती आहे.. त्यामुळे गॅबियन वाला तडे गेल्यामुळे ही सध्या धोकादायक स्थितीत असल्यामुळे पेढे गावावरती एक प्रकारचं संकट उभे राहिलेय.. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top