445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डोंबिवली अस्पताल पर हमले के आरोप: नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण कोर्ट में पेश होंगे
Kalyan, Maharashtra:مارकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे कल्याण न्यायालयात होणार हजर दोषारोप पत्र दाखल केल्यानंतर कल्याण न्यायालयात होणार हजर दोन महिन्यापूर्वी डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण करणारा मारकुट्या नगरसेवक रमेश म्हात्रे आज कल्याण न्यायालयात हजर होणार आहे. ६५ दिवसांमध्ये या प्रकरणाचा तपास करून १८३२ पानांचं दोषारोप पत्र कल्याण सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं .त्यानंतर आज रमेश म्हात्रे कल्याणच्या न्यायालयात या प्रकरणी हजर होणार आहे .३२ साक्षीदारांची जवाब, सीसीटीव्ही फुटेज, विविध तांत्रिक आणि फॉरेन्सिक पुराव्यांचा समावेश या दोषारोप पत्रामध्ये करण्यात आल्याची माहिती आहे. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या प्रकरणाची सुनावणी जलद गतीने होऊन लवकर निकाल लागणे अपेक्षित आहे ।शिवाय दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर आज पहिली सुनावणी पार पडणार आहे. त्यामुळे या सुनावणीत काय होतं ते पाहणं महत्त्वाचं आहे.0
0
Report
वाशिम में 45 दिन बारिश नहीं होने से सोयाबीन की फसल बर्बाद, किसान भड़के
Washim, Maharashtra:वाशिम:\n\nअँकर:वाशिम जिल्ह्यात पावसाने मागील 45 दिवसापासून दडी मारल्याने खरीप पिकं संकटात आली आहेत.पावसाअभावी सोयाबीनचं पीक करपून गेल्याने उत्पादनाची आशा मावळली आहे. त्यामुळे संतप्त शेतकऱ्याने चक्क सोयाबीनच्या शेतात जनावरं सोडली.कारंजा तालुक्यातील खानापूर येथील शेतकरी संदीप परमेश्वर कडू यांनी हा निर्णय घेतला.हजारो रुपये खर्च करून उभं केलेलं पीक पावसाअभावी वाया जात असल्याने त्यांनी संताप व्यक्त केला आहे.पिकांचं तातडीने पंचनामे करून आर्थिक मदत आणि पीक विम्याचा लाभ द्यावा, तसंच वाशिम जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावा, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.0
0
Report
ओबीसी समाज के लिए स्वतंत्र मंत्रालय की मांग; आगरी-कोळी-कराडी-भंडारी मोर्चा
Navi Mumbai, Maharashtra:ओबीसींच्या वतीने आगरी, कोळी, कराडी और भंडारी समाजासाठी स्वतंत्र मंत्रालयाची मागणी करण्यासाठी कोकण भवनावर मोर्चा काडण्यात आलाय. कोकण विभागीय आयुक्तांची भेट घेत यावेळी समाजाच्या समस्या सांगण्यात आल्या असून या समस्यांची जलद गतीने सोडवणूक करण्यासाठी स्वतंत्र मंत्रालय असावे अशी आग्रही मागणी ओबीसी नेत्यांमार्फत करण्यात आलेय. यासोबतच समाजाचे नेते दि बा पाटील यांना भारतरत्न पुरस्कार देण्यात यावा अशी देखिल मागणी यावेळी करण्यात आलेय.0
0
Report
Advertisement
गडचांदूर नगरपरिषद ने पानी की किल्लत के लिए ९१ लाख निधि रोका
Chandrapur, Maharashtra:पाण्याचं दुर्भिक्ष्य बघता गडचांदूर नगरपरिषदेने बांधकामासाठी आलेला ९१ लाखांचा निधी वळविला पाणी टंचाई कामांसाठी, पाणी नियोजन करत साठा पिण्यासाठी राखीव ठेवण्याची मागणी. सप्टेंबरचा पहिला आठवडा संपत आला असतानाही चंद्रपूर जिल्ह्यात अपेक्षित पाऊस झालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या केवळ ५०.३ टक्के पावसाची नोंद झाली असून त्या थेट परिणाम जिल्ह्यातील सिंचन प्रकल्पांच्या पाणीपातळीत झाला आहे. गडचांदूर शहरालगतच्या अंमलनाला धरणातील पाणीपातळी कमी होत असल्याचे चित्र आहे. या धरणातून सुमारे ५० हजार लोकसंख्या असलेल्या गडचांदूर शहराला आणि आजूबाजूच्या २४ गावांना देखील पाणीपुरवठा केला जातो. याशिवाय अंबुजा आणि अल्ट्राटेक सारखे सिमेंट उद्योग आणि रब्बी हंगामातील शेतीसाठीही याच धरणाच्या पाण्यावर मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावे लागते. त्यामुळे संभाव्य पाणीटंचाईचा सामना करण्यासाठी गडचांदूर नगरपरिषदेने निधी राखून ठेवलाय. नगरपालिका इमारतीसाठी आलेला ९१ लाख रुपयांचा निधी या कामासाठी वळविण्यात आला. धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षित करण्याची मागणी देखील प्रशासनाकडे करण्यात आली आहे.0
0
Report
अहिल्यानगर में सूखे से जूझते किसान, पांच एकड़ उडीद पर रोटाव्हिटर चलाने को मजबूर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात पाच एकर उडीद पिकावर रोटाव्हिटर फिरवण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. गेल्या तीन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्याने अहिल्यानगरच्या दक्षिण भागात दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. पावसाअभावी शेतातील उभी पिकं अक्षरशः जळून चालली असून, शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. सोयाबीन पेरणीनंतर चांगला पाऊस झालाच नाही त्यामुळे दैत्य नांदूर येथील शेतकऱ्याने आपल्या तब्बल पाच एकर उडीद पिकावर रोटाव्हिटर फिरवला आहे. एकीकडे पिकं जळून जात असताना दुसरीकडे जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे दक्षिण अहिल्यानगरमध्ये दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली असून, सरकारने तातडीने पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
रत्नागिरी के मंडणगड में 5 करोड़ का आधुनिक बसस्टैंड; यात्रियों की समस्या दूर होगी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मंडणगडमध्ये ५ कोटींच्या निधीतून उभारणार अद्ययावत बसस्थानक इमारत; गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते भूमिपूजन संपन्न.. रत्नागिरीच्या मंडणगड तालुक्यातील प्रवाशांची प्रदीर्घ काळाची गैरसोय दूर करण्यासाठी शहराच्या मध्यवर्ती भागात ५ कोटी रुपये खर्चाच्या अत्याधुनिक बसस्थानक इमारतीचे भूमिपूजन आणि तात्पुरत्या प्रवासी शेडचे लोकार्पण गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते पार पडले.. या कामामुळे स्वच्छतागृहांच्या प्रश्न सुटण्यासोबतच परिसराचे सुशोभीकरण होईल, असा विश्वास व्यक्त करतानाच,महिला बचत गटांसाठी स्वतंत्र मॉल उभारणे, नव्या बसेस उपलब्ध करून देणे आणि भविष्यातील ई-बसेससाठी चार्जिंग स्टेशन उभारण्याचे निर्देश त्यांनी दिले; तसेच शहरातील घराघरांमध्ये २४ तास पाणीपुरवठा करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले..0
0
Report
Advertisement
नागपुर में अवैध नायलॉन मांज बिक्री पर दबिश: 7.45 लाख का सामान जब्त
Nagpur, Maharashtra:नागपूर • नागपुरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची अवैध विक्री करणा-यांवर पोलिसांकडून कारवाई त • यशोधरानगर परिसरात विक्रीच्या उद्देशाने नायलॉन मांजाची वाहतूक करणाऱ्या मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद अन्सारी याला ताब्यात घेतले. • आरोपीकडून मोनो काईट नायलॉन मांजाच्या १८० रिल्स जप्त. • जप्त मांजाची किंमत ५ लाख ४० हजार रुपये. • ई-रिक्षा, सुझुकी मोपेड आणि मोबाईलसह एकूण ७ लाख ४५ हजारांचा मुद्देमाल जप्त. • सामाजिक सुरक्षा पथक आणि मादक पदार्थविरोधी पथकाची संयुक्त कारवाई. • फैजान अन्सारी हा आरोपी फरार. • यशोधरानगर पोलिस ठाण्यात पर्यावरण संरक्षण अधिनियम आणि भारतीय न्याय संहितेनुसार गुन्हा दाखल. • अवैध विक्रीला आळा घालण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी सुरू.0
0
Report
कर्नाटक में सूखा घोषित, देशभर के किसान संकट की गिरफ्त में
Bhandara, Maharashtra:शेतकऱ्यांवर अस्मानी आणि केंद्र आणि राज्य सरकारचे सुलतानी संकट आहे.. राज्यातील अनेक भागात पाऊस कमी आहे. कर्नाटक येथे काँग्रेस चे सरकार आहे त्यांनी दुष्काळ घोषित केलं आहे. सरकारला दुष्काळ दिसत आहे.मग दुष्काळ घोषीत करायला काय हरकत आहे... पटोले ऑन बोरिवली पोलिस स्टेशन पोलीस स्टेशनचा तो लोगो काढला गेला आणि इथं पियुष गोयल चा फोटो लावून त्या पोलीस स्टेशनचे बोरवली पोलीस स्टेशनचा एक फोटो चाललेला आहे आमदार निधी मधून खासदार निधी मधून आपण मदत करतो याचा अर्थ या काही शासकीय संस्था आहेत त्या संस्थेचे नाव पुसलं जात नाही पोलीस स्टेशनचं नाव पुसून भाजपचे कार्यालय उघडायचं काम सरकार मध्ये चाललं असेल तर तुम्ही मगाशी सांगितलं की राजकीय पक्षाला जो निधी गोळा होतो त्या निधीमध्ये भारतीय जनता पार्टीला हजारो कोटी रुपयांची निधी जमा होते आहे जमा होण्याच्या मागचा उद्देश काय.. ज्याला कोल कॉन्टॅक्ट मिळालेला आहे त्यांनी निवडणुकीच्या काळात भाजपला जवळपास 25 कोटी रुपये त्याला दिले त्याच्यामुळे त्यांनी मोठ्या प्रमाणात कोळसाल परस्पर त्यांनी वापरून घेतला आणि त्या कोळशाचा भार सगळा हा ग्राहकावर टाकला जात आहे आणि यांच्या या पद्धतीच्या पक्ष निधीच्या माध्यमातून असं कॉन्ट्रॅक्टरची घर भरली जातात आहे ते आपल्याला या भाजपच्या गळ्यात पाहिले जातात जे पक्षी निधीच्या नावाने हे जनतेला लुटायची व्यवस्था महाराष्ट्रात आणि देशात सुरू आहे नाना पटोले ऑन धान बोनस सरकारला शेतकऱ्यांशी काही घेण देणं नाही... सरकारच्या डिक्शनरी मध्ये शेतकरी शब्द नाही... विधानसभेचे जेव्हा आम्ही हा प्रश्न उपस्थित केला तर आता आम्ही नाही आम्ही कर्जमाफी केली असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलेल आहे आपल्याला त्याला विधानसभेच्या कामकाजातील पहिला मिळणार आहे माझं सांगायचं आहे की कर्जमाफी मध्ये सुद्धा सरकारने गोलमाल केलेला आहे कर्जमाफीच्या नावाने शेतकऱ्यांना फसवण्याचे काम केलेल आहे हे आपल्याला निदर्शनास येताय अनेक शेतकऱ्यांचे कर्ज दोन लाखापर्यंत आमच्या भागामध्ये जर कोणाचं 50000 हजार कुणाचे एक लाखापर्यंत आहे असं नसेल एवढं करत असेल तर सरकारच्या तिजोरीवर जास्त जनतेच्या पैशाचा जास्त होता आहे असे असेल तर काँग्रेसच्या काळामध्ये आम्ही जेव्हा 700 रुपये पर क्विंटल बोनस शेतकऱ्यांना द्यायला सुरुवात केली तर 25000 च्या वर आम्ही शेतकऱ्यांना सातशे रुपयांच्या प्रमाणे देत होतो पर हेक्टरला हे सांगतात पंधरा हजार रुपये पण तेही द्यायला हे लोक मागेपुढे पाहतात....0
0
Report
नागपुर SBI शाखा लूट: आँखों में मिर्च पाउडर फेंककर 4.53 लाख लूट, आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशन अंतर्गत एसबीआय बँकेच्या शाखेत काल संध्याकाळी रोख रखमेच्या लुटीची घटना घडली... सुरज बोरकर नावाच्या आरोपीने बँकेची वेळ संपल्यानंतर बँकेला लागून असलेल्या एटीएम मध्ये पैसे भरणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरचीची पूड टाकून त्यांच्या हातातून 4 लाख 53 हजार रुपयांची बॅग लुटून नेली... यावेळी त्याने शाखेच्या आतून प्रवेश करून तेथील कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात ही मिरचीची पूड फेकली.. त्यामुळे एकच गोंधळ उडाला होता... कर्मचाऱ्यांनी आरडाओरडा केल्यानंतर पोलिसांच्या मदतीने बँकेपासून काही अंतरावर अवघ्या काही मिनिटात सुरज बोरकर ला 4 लाख 53 हजाराच्या रोकड सह अटक करण्यात आली... त्यामुळे बँकेचे नुकसान टळले... सुरज ने आधीपासूनच एटीएममध्ये कर्मचारी केव्हा पैसे टाकतात याची रेकी केली असावी आणि तो बँकेजवळ दबा धरून बसला होता अशी प्राथमिक माहिती आहे...0
0
Report
Advertisement
योगेश कदम ने महावितरण को चेतावनी दी, बढ़े बिल न भरें शिवसेना अंदाज़ में जवाब
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. महावितरणच्या मनमानी कारभारावर मंत्री योगेश कदम चांगलेच आक्रमक झाले.. वाढीव वीजबिल ही ग्राहकांची उघड फसवणूक असून,अवाजवी बिल आले असल्यास नागरिकांनी ते भरू नये आणि वीज किंवा मीटर कापायला आल्यास त्यांना थेट ‘शिवसेना स्टाईल’ने उत्तर द्या,असा थेट आदेश त्यांनी जनतेला दिला.. महावितरण खाते मुख्यमंत्र्यांकडे असल्याने अशा कारभारामुळे सरकारची नाहक बदनामी होत असल्याचा संताप व्यक्त करत,घर बंद असताना रीडिंग न घेताच बिले पाठवणाऱ्या अधिकाऱ्यांना त्यांनी धारेवर धरले.. तसेच यापुढे जनतेची कामे न करणाऱ्या महावितरणच्या अधिकाऱ्यांची केवळ बदली न करता त्यांच्यावर थेट गुन्हे दाखल करू, असा कडक इशाराही कदमांनी दिला..0
0
Report
सोलापुर में डॉल्बी मुक्त आवाज पर पुलिस सख्त: छेड़छाड़ पर साहित्य जब्त, नीति साफ
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - डॉल्बीमुक्त सोलापुरचे राज्यभरात कौतुक, साऊंड मध्ये छेडछाड करून आवाज वाढवल्यास साहित्य जप्त करण्याचा पोलीस आयुक्तांचा इशारा डॉल्बीमुक्त सोलापूर विषय राज्यभरात ठरतोय चर्चेचा विषय आर्थिक सण उत्सवाच्या निमित्ताने पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी घेतली डीजे व साऊंड व्यवसायिकांची बैठक एक बेस चार कर्णे लावायला परवानगी मात्र साऊंड मध्ये छेडछाड करून आवाज वाढवण्याचा प्रयत्न केल्यास थेट साहित्य जप्त करण्याचा इशारा पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांनी तब्बल दोन तास बैठक घेत डीजे व साऊंड व्यवसायिकांना दिल्या सूचना पोलीस आयुक्तांच्या कठोर निर्णयाचे सर्वसामान्य सोलापूरकरांकडून उस्फूर्तपणे स्वागत0
0
Report
वाशीम जिले में खरीफ संकट: वर्षा न हो पाने से फसलों पर खतरा
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे. पावसाअभावी सोयाबीन आणि कापूस पिकांची अवस्था खालावत असून अनेक भागांत पिकं नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी जोर धरत असून, शेतकऱ्यांकडून आंदोलनं और निवेदनं दिली जात आहेत. दरम्यान, कारंजा, मानोरा मालेगाव और मंगरूळपीर तालुक्यातील पावसाच्या खंडाचा दुष्काळी निकषांच्या आधारे आढावा घेऊन अहवाल तयार करण्याच्या हालचाली प्रशासनाकडून सुरू आहेत. त्यामुळे या अहवालातून शेतकऱ्यांना दिलासा मिळतो का,याकडे लक्ष लागलं आहे।0
0
Report
Advertisement
नाशिक कुंभ के लिए सड़कें 2026 के अंत तक तैयार, ट्रैफिक बाधाओं से बचाने निर्देश
Nashik, Maharashtra:Nashik breaking - *आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामासाठी मार्च २०२७ पर्यंत थांबू नका – डिसेंबर २०२६ पर्यंतच कामे पूर्ण करा* - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश - *नाशिकच्या गरवारे ते एक्सलो पॉईंट आणि एक्सलो पॉईंट ते पपया नर्सरी या रस्त्यांच्या कामांचा आढावा* - दोन्ही रस्त्यांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन, मात्र डिसेंबर २०२६ पर्यंत रस्ते वाहतुकीसाठी सक्षम करण्याचे निर्देश - कामामुळे नागरिकांना आणि वाहतुकीला तडजोडीचा सामना करावा लागू नये, अशी सूचना - काम पूर्ण झालेल्या भागात अनावश्यकपणे वाहतूक बंद ठेवू नये - कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह आणि महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांनी पाहणी करत अधिकाऱ्यांना दिल्या सूचना - *अंबड-सातपूर औद्योगिक वसाहतीशी जोडणारे हे महत्त्वाचे मार्ग असल्याने कामाला गती देण्याचे आदेश*0
0
Report
बार्शी में 42 दिन से बारिश नहीं, सोयाबीन बर्बाद; किसान राहत मांगते
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत ४२ दिवसांपासून पावसाची दडी; सोयाबीन होरपळले, शेतकऱ्याने ३ एकर पिकांवर फिरवला रोटावेटर बार्शी तालुक्यातील नारी येथील सतीश शिंदे यांचा संताप; कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची मागणी बार्शी तालुक्यात पावसाने तब्बल ४२ दिवसांपासून दडी मारल्याने सोयाबीन पिके अक्षरशः होरपळून गेली आहेत. नारी गावातील शेतकरी सतीश शिंदे यांच्या तब्बल ३ एकर सोयाबीन पिकाचे पावसाअभावी मोठे नुकसान झाले. पीक वाचण्याची शक्यता नसल्याने शिंदे यांनी अखेर रोटावेटर फिरवून उभे सोयाबीन पीक नष्ट केले. पावसाअभावी शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जात असल्याने शेतकरी वर्गात तीव्र नाराजी आहे. दरम्यान, बार्शी तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. पावसाची प्रतीक्षा करणाऱ्या शेतकऱ्याला अखेर उभ्या पिकावर रोटावेटर फिरवण्याची वेळ आली आहे.0
0
Report
चंद्रपूर में बारिश नहीं, किसानों की धान-खेत खतरे में
Chandrapur, Maharashtra:Feed slug :- 1109ZT_CHP_CROP_IN_DANGER ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने दिली मोठी ओढ पावसाने खंड दिल्याने धान- सोयाबीन- तूर -कापूस पिके संकटात, सिंचनाचा प्रबंध असलेल्या शेतकऱ्यांनी कसेबसे पीक आहे जगवले अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाने मोठी ओढ दिली आहे. सुमारे महिनाभरापासून पाऊस बेपत्ता आहे. पावसाने खंड दिल्याने धान- सोयाबीन- तूर -कापूस पिके संकटात आहेत. विहीर, ओढे आणि कालवे असा सिंचनाचा प्रबंध असलेल्या शेतकऱ्यांनी पीक कसेबसे जगवले आहे. मात्र चंद्रपूर जिल्ह्यात पडलेल्या सरासरीच्या निम्म्या टक्केवारीच्या पावसाने आगामी काळात मोठ्या दुष्काळाची चाहूल लागली आहे. एकीकडे तोकडी कर्जमाफी, वाढलेले खतांचे दर आणि वारंवार खंडित होणारी वीज यासह लहरी निसर्गाचा शेतकऱ्यांना फटका बसतो आहे. एन शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्त्वाच्या बैलपोळ्याच्या दिवशी शेतकऱ्यांमध्ये निराशेचा सूर आहे.0
0
Report
Advertisement
