445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोंकण के जंगलों में घणसरी झरना पर्यटकों की प्रतीक्षा पूरी कर रहा है
Oras Bk., Maharashtra:निसर्गाने कोकणात मुक्त हस्ताने उधळण केलीय. पावसाळ्यात तर कोकणाचे सौन्दर्य अजून खुलत आणि त्याला कारण असत डोंगर दऱ्यातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे, तळकोकणात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत मात्र काही धबधबे प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत त्यापैकी एक धबधबा म्हणजे कणकवली तालुक्यातील घोणसरी धबधबा अगदी जंगलमय भागात असलेला घोणसरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. धबधब्या सोबत जंगल सफारीचा आनंद लुटण्याठी एकवेळ नक्की घोणसरी धबधब्याला भेट द्या आणि कसा आहे हा धबधबा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
कोल्हापुर में बारिश थोड़ी कम, तीन बांध खुले, नदियाँ स्थिर, खेती में फिर जोश
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्यांची पाणीपातळी स्थिर आहे... यामुळे पंचगंगा नदीवरील 3 बंधारे खुले झाले आहेत, सध्या 57 बंधारे पाण्याखाली आहेत. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात कमी झालेल्या पावसामुळे नद्यांची पाणी पातळी किंचित कमी झाल्याचं दिसून आले. पावसाने काहीशी उघडीप दिल्याने जिल्ह्यात शेतीच्या कामांना मात्र पुन्हा वेग आला आहे.0
0
Report
सतत बारिश से कृष्णा नदी का जलस्तर बढ़ा, दत्त मंदिर में पानी घुस गया
Sangli, Maharashtra:स्लग - कृष्णेच्या पाणी पातळीत वाढ ,औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीच शिरले पाणी.. अँकर - संततधार पाऊसामुळे कृष्णा नदीची पाणी पातळीत वाढू सुरूच आहे.वाढलेल्या पाणी पातळीमुळे पलूस तालुक्यातील औदुंबर येथील दत्त मंदिरात कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे.आज पहाटेच्या sुमारास मंदिराच्या गाभाऱ्यात पाणी जाऊन मंदिराचा निम्मा भाग पाण्याखाली गेला आहे. गाभाऱ्यात पाणी शिरल्यानंतर दिगंबराच्या जयघोषात धार्मिक विधि पार पडले. पाण्याच्या पातळीत आणखी वाढ झाली तर औदुंबरचे दत्तमंदिर पूर्णता पाण्याखाली जाण्याची भीती आहे.सांगליत सध्या पावसाची संततधार सुरूच आहे..0
0
Report
Advertisement
नागपूर ग्रामीण पुलिस ने MARVEL-AI से वृद्धा बलात्कार-हत्या का खुलासा किया, आरोपी सुधाकर मंडपे गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूर एका वृद्ध महिलेच्या अत्याचार -हत्येच्या प्रकरणाचा उलगडा नागपूर पोलिसांनी मार्वल- एआयचा आणि चिप्स पुड्याच्या तुकड्याच्या आधारावर केलाय. याप्रकरणी 48 वर्षीय आरोपीला नागपूर ग्रामीण पोलिसांनी अटक केलीय .. बलात्कारानंतर झालेला खून, उष्णतेमुळे विद्रूप झालेला मृतदेह, मृत महिलेची न पटत असलेली ओळख, प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांचा अभाव आणि घटनास्थळी नसलेला ठोस पुरावा यामुळे रहस्यमय बनलेल्या खुनाचा गुंता अखेर नागपूर ग्रामीण पोलिसांनी 10 दिवसांच्या अथक तपासानंतर उलगडला. अत्याधुनिक कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय), न्यायवैद्यक तपास आणि तांत्रिक विश्लेषणाच्या मदतीने पोलिसांनी आरोपी सुधाकर मंडपेचा शोध घेत त्याला बोखारा येथून अटक केली. मृतदेहाजवळ पडलेल्या चिप्स पुड्याच्या पाकिटाचा छोटा तुकडा पोलिसांना तपासाला मारेकऱ्यापर्यंत नेण्यात कामी आला. 27 जूनला पाटणसावंगी शिवारात एका निर्जन स्थळी वृद्ध महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला.. अत्यंत पाशवी पद्धतीने अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती. महिलेचा चेहरा देखील पूर्णतः विद्रुप झाला होता. निर्जत स्थळी घडलेल्या घटनेतील मयत महिला कोण व कुठली तसेच आरोपीचा शोध घेणे पोलिसांसाठी मोठे आव्हानात्मक होते.महिलेचा ओळख पटवणे आधी पोलिसांसाठी सर्वांत मोठे आव्हान होते. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांनी पारंपरिक तपासासोबत अत्याधुनिक तंत्रज्ञानाचीही मदत ग्रामीण पोलिसानी घेतली. पोलिसांनी AG अग्रभाग MARVEL-AI या कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्रणालीच्या मदतीने उपलब्ध छायाचित्रांवर प्रक्रिया करून मृत महिलेचा चेहरा वास्तविकदर्शी स्वरूपात पुनर्निर्मित केला. त्यानंतर हा पुनर्निर्मित फोटो सोशल मीडियावर प्रसारित केला.त्यातून एक धागा मिळाला. एका समाजसेवकाने खापरखेडा परिसरातील ही वृद्ध महिला आढळून आल्याचे सांगितले. त्यावरून अगोदर नागपूर ग्रामीण पोलिसांनी त्या महिलेची ओळख पटवली.घटनास्थळ परिसरात एक चिप्स पॅकेट सुद्धा आढळून आले होते... त्यावरून संबंधित चिप्स कंपनीशी संपर्क साधून त्या मार्गावर कुठे कोणत्या दुकानात हे चिप्स विक्री झाली ही माहिती घेण्यात आली... त्यानंतर चिप्स पॅकेट मिळणाऱ्या दुकानांच्या मार्गावरील सर्व सीसीटीव्ही तपासण्यात आले. त्याकरता तब्बल 182 सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले.दरम्यान या प्रकरणात ही मला एका व्यक्तीबरोबर बाईकवर दिसली होती.. अशी माहिती पोलिसांना मिळाली.. तो व्यक्ती एका ट्रॅव्हलच्या च्या काउंटरवर सीसीटीव्हीत ओझرता दिसला होता. या संशयिताची प्रतिमा अस्पष्ट होती. त्यावर कृत्रिम बुद्धिमत्तेच्या सहाय्याने संशयिताचा संभाव्य चेहरा तयार करण्यात आला. एआयद्वारे तयार केलेल्या संशयिताच्या चेहऱ्याची १५ किलोमीटर परिघातील माहितीशी पडताळणी करण्यात आली. अखेर हा फोटो एका संशयिताशी जुळल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळापासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावरील बोखारा येथून सुधाकर दादाराव मंडपे (४८) याला अटक केली. यापूर्वीही केला होत लैंगिक अत्याचार धक्कादायक बाब म्हणजे पोलिसांनी ज्येष्ठ महिलेवर केलेल्या बलात्कार आणि खून प्रकरणात पोलिसांनी अटक केलेला सुधाकर मंडपे याने 20 वर्षांपूर्वी देखील एका अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचे पोलिसांना तपासात आढळले.0
0
Report
हिंगोली में 2 घंटे में चार भूकंप, लोग भयभीत
Hingoli, Maharashtra:भूकंपाचे सतत धक्के जाणवू लागले आहेत मध्यरात्री दोन तासांमध्ये चार भूकंपाचे मोठे धक्के बसले आहेत पहिला भूकंप रात्री 1:37 वाजता 4.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप भूकंपाचे केंद्रबिंदू शिरळी गावाच्या शिवारात भूगर्भात दहा किलोमीटर खोल आहे दुसरा भूकंप 2:15 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप या भूकंपाचक केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातल्या काकड दाभा गावाच्या शिवारात भूगर्भात दहा किलोमीटर खोल आहे तिसरा भूकंप 2:17 वाजता झाला है या भूकंपाची तीव्रता 3.9 रिश्टरस स्केल इतक्या तीव्रतेचा असून या भूकंपाचा केंद्रबिंदू जिल्ह्यातल्या काकड दाभा गावाच्या शिवारात भूगर्भात १० किलोमीटर खोल चौथा भूकंप पहाटे 3:23 वाजता झाला असून या भूकंपाची तीव्रता 4.1 होती या भूकंपाचे केंद्रबिंदू हिंगोली जिल्ह्यातील काकड दाभा या गावाच्या शिवारात भूगर्भात दहा किलोमीटर खोल होते हिंगोली जिल्ह्यात यापूर्वी अनेक वेळा भूकंपाचे धक्के जाणवले होते परंतु दोन तासांमध्ये चार वेळेस भूकंपाचे धक्के जाण्याची ही पहिलीच वेळ असल्यामुळे दरवेळेस भूकंपाच्या धक्क्यांमध्ये वाढ होत आहे यामुळे हिंगोली जिल्ह्यातील नागरिक भयभीत झाले आहेत या भूकंपामुळे अनेक ठिकाणी घरांचा नुकसान झाल्याची माहिती समोर येत आहे कोथळजगाव मध्ये एका घराच्या बांधकामाचा काही भाग कोसळला असून पांगरा शिंदे गावच्या शिवारात सुद्धा मातीच्या घरांचं काही प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे अनेक घरांना आतडे गेले आहेत तर काही ठिकाणी भिंतींचा काही भाग कोसळला आहे सतत भूकंपाचे धक्के जाणवत असल्यामुळे नागरिक भयभीत झाले असून नागरिकांनी घाबरू नये असं आव्हान प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे भूकंप हिंगोली जिल्हा सह नांदेड यवतमाळ परभणी जिल्ह्याला सुद्धा या भूकंपाचे धक्के जाणवले असून अनेक ठिकाणी हा भूकंप सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश से दो नदियाँ खतरे के निशान पर, प्रशासन अलर्ट
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..रत्नागिरी जिल्ह्यातल्या पूरप्रवण क्षेत्रातल्या दोन नद्या..चिपळूणची वाशिष्टी इशारा पातळीवर आणि खेड तालुक्यातील जगबुडी नदी धोका पातळीवर वाहते.. प्रशासन सध्या अलर्ट मोड वरती आहे.. नगरपरिषद भोंगा वाजवून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देत आहे.. नदीकाठच्या घरांना नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला जात आहे.. या पूर प्रवण क्षेत्रातील खेड आणि चिपळूण तालुक्यांमध्ये पावसाचा जोर जरी कमी झाला असला तरी सह्याद्रीच्या पट्ट्यात पडलेल्या पावसामुळे नद्यांना पूरस्थिती निर्माण झाली आहे..0
0
Report
Advertisement
जगबुडी नदी का खतरे का स्तर: मुंबई गोवा महामार्ग पर बाढ़ से यातायात प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:ब्रेक रत्नागिरी.. मुंबई गोवा महामार्गावरील खेड तालुक्यातील जगबुडी नदी सध्या धोका पातळीवर वाहते.. प्रशासन अलर्ट मोडवर.. तीन दिवसांपूर्वी जगबुडी नदी धोका पातळीवर वाहत होती त्यानंतर पावसाचा जोर कमी झाला आणि नदीचे पाणी ओसरलं होतं मात्र आता पुन्हा सह्याद्रीच्या पट्ट्यामध्ये पाऊस पडल्यामुळे जगबुडीची पुन्हा पाणीपातळी वाढली असून सध्या साडेसात मीटर उंचीने जगबुडी धोक्यावर वाहत आहे.. परिणामस्वरूप पुराचे पाणी काही भागांतील घरांमध्ये शिरल आहे.. जनजीवन विस्कळीत झाला आहे.. दुपारनंतर पावसाचा जोर खेड तालुक्यामध्ये वाढल्यामुळे पावसाचे पाणी मुंबई गोवा महामार्गावर आल्याने मुंबई गोवा महामार्गावरची वाहतुकीही संथ झाली..0
0
Report
रायगढ़ में दराड़ गिरने से सड़क बंद, सात गांवों की संपर्क टूट गई
Chendhare, Maharashtra:माणगावातील कुंभेवाडी कडे जाणाऱ्या रस्त्यावर दरड कोसळली. रायगडात दरड कोसळण्याचे सत्र सुरूच. माणगावातील कुंभेवाडीकडे जाणारा रस्ता वाहतूकीसाठी बंद. सात गावांचा माणगावशी संपर्क तुटला. दरड बाजूला करण्यास दोन दिवस लागण्याची शक्यता. कुंभे धबधबा पहाण्यासाठी गेलेले पर्यटकही अडकून पडल्याची भीती. काही पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले मात्र काहीजण रस्त्याच्या पलीकडे अडकले असण्याची शक्यता. घटनास्थळी तलाठी स्थानिक सरपंच दाखल. बाईट - स्थानिक नागरिक.0
0
Report
यवतमाळ अस्पताल शवागार: फ्रिजर से मृत देह सड़े मिलने पर परिजनों का हंगामा
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा रुग्णालयाच्या शवागार मध्ये ठेवलेला मृतदेह दुसऱ्याच दिवशी पूर्णतः कुजल्याने मृताच्या नातेवाईकांनी संताप व्यक्त केला. मनीष वाघमारे यांचा काल हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, त्यांना खाजगी रुग्णालयात कुटुंबीयांनी नेले, तिथून जिल्हा रुग्णालयात त्यांना आणन्यात आले. त्यावेळी त्यांचा मृत्यू झाला असल्याने, त्यांचा मृतदेह शवविच्छेदन गृहात पाठविण्यात आला, तेथील फ्रीजरमध्ये मृतदेह ठेवला, आज शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात येणार होता. मात्र फ्रिजर मधून मृतदेह बाहेर काढला असता तो पूर्णतः कुजलेला होता. मृतदेहाची नीट ओळखही पटत नव्हती. मृतदेह ठेवताना तो बंद फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याने हा संताप जनक प्रकार घडला. त्यामुळे नातेदारांनी रुग्णालयाचे अधिष्ठाता आणि संबंधित अधिकाऱ्यांना घेऊन जाब विचारला. यावेळी रुग्णालय परिसरात वातावरण तणावपूर्ण झाले होते. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला. रुग्णालय प्रशासनाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त करून संबंधितांवर कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दरम्यान शवागारातील फ्रिझर बंद असल्याबाबत विचारणा करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कुठलेही उत्तर प्रशासनाकडून देण्यात आले नाही. याप्रकरणी दोशींवर काय कारवाई होते याकडे लक्ष लागले आहे. बाईट: मेहरबान वाघमारे : मृताची पत्नी0
0
Report
Advertisement
नांदूर मधमेश्वर धरण से 55,928 क्यूसेक पानी विसर्जन; 18 आदिवासी युवाओं की सुरक्षित बचाव
Niphad, Maharashtra:नांदूर मधमेश्वर धरणातून 55,928 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू. आठ वक्राकार गेटमधून गोदावरी नदीपात्रात पाणी सोडण्यात आले. नांदूर मधमेश्वर धरणाच्या समोरील बेटावर अडकलेल्या 18 आदिवासी तरुणांची प्रशासनाकडून सुखरूप सुटका. बचावकार्यासाठी काही काळ पाण्याचा विसर्ग थांबविण्यात आला. सुटका पूर्ण होताच धरणातून पुन्हा पाण्याचा विसर्ग सुरू. गोदावरी नदीकाठी न जाण्याचे प्रशासनाक नागरिकांना आवाहन. नदीपात्रात उतरणे टाळा; प्रशासनाच्या सूचनांचे पालन करा.0
0
Report
सातारा में ऑरेंज-रेड अलर्ट: 6–10 जुलाई तक पर्यटन स्थल बंद
Satara, Maharashtra:भारतीय हवामान विभागाने सातारा जिल्ह्यासाठी 'ऑरेंज' आणि 'रेड' अलर्ट जारी केल्यामुळे वाई, खंडाळा व महाबळेश्वर तालुक्यांत मुसळधार पाऊस, पूरस्थिती और दरडी कोसळण्याची तीव्र शक्यता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी उपविभागीय दंडाधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, २०२३ च्या कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. त्यानुसार धोम धरण, मेणवली घाट, लिंगमळा धबधबा, प्रतापगड यांसह वाई, खंडाळा व महाबळेश्वरमधील सर्वच प्रमुख पर्यटनस्थळे, धरणे, नदीपात्रे आणि धबधब्यांच्या ठिकाणी ६ जुलै ते १० जुलै २०२६ या कालावधीत पर्यटकांना व नागरिकांना प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर व दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशाराही प्रशासनातर्फे देण्यात आला आहे。0
0
Report
आदित्य ठाकरे ने अस्पताल में डॉक्टरों पर हमले के विरोध में तात्कालिक गिरफ्तारी की मांग
Kalyan, Maharashtra:शास्त्रीनगर रुग्णालयाला आदित्य ठाकरे यांची भेट त्या नगरसेवांना मेंटल टेस्टिंग ची गरज. रमेश म्हात्रे यांना अटक करून परेड काढा. रमेश म्हात्रेंना तातडीने अटक करा नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केडीएमसीच्या डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर व परिचारिकांवर झालेल्या हल्ल्यानंतर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे नेते आदित्य ठाकरे यांनी गुरुवारी रुग्णालयाला भेट देत डॉक्टर, परिचारिका आणि त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. यावेळी त्यांनी हल्ल्याचा तीव्र निषेध करत आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करण्याची तसेच त्यांचे नगरसेवकपद रद्द करण्याची मागणी केली. डॉक्टर आणि परिचारिकांशी संवाद साधताना आदित्य ठाकरे म्हणाले, "आम्ही तुमच्या पाठीशी आहोत. घाबरू नका." हल्ल्याचा व्हिडिओ पाहिल्यानंतर तो अत्यंत धक्कादायक आणि भयावह असल्याचे त्यांनी सांगितले. "रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टर आणि परिचारिका रुग्णाची सेवा करत असताना त्यांच्यावर झालेली मारहाण असह्य आहे. कोणालाही कायदा हातात घेण्याचा अधिकार नाही," असे ते म्हणाले. रमेश म्हात्रे यांना अद्याप अटक का करण्यात आली नाही, असा सवाल करत ठाकरे म्हणाले की, डॉक्टर आणि परिचारिका रुग्णाची सेवा करत असताना त्यांच्यावर झालेली मारहाण असह्य आहे. कोविड महामारीपासून ते नैसर्गिक आपत्तीपर्यंत डॉक्टर आणि आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून नागरिकांची सेवा करत आले आहेत. अशा कर्मचाऱ्यांवर हल्ला करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई झाली पाहिजे. ठाकरे यांनी रमेश म्हात्रे यांना तातडीने अटक करून त्यांची धिंड काढावी, त्यांचे नगरसेवकपद रद्द करावे आणि भविष्यात त्यांना निवडणूक लढविण्यास अपात्र ठरवावे, अशी मागणी केली. मुख्यमंत्री राज्यात कायदा-सुव्यवस्था मजबूत असल्याचा दावा करतात, मात्र मुख्य आरोपी अद्याप मोकाट असल्याने या दाव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असल्याची टीकाही त्यांनी केली. दरम्यान, या घटनेच्या निषेधार्थ कल्याण-डोंबिवलीतील डॉक्टरांनी नियमित आरोग्य सेवा बंद ठेवून आंदोलन सुरू ठेवले असून केवळ आपत्कालीन सेवा सुरू आहेत. डॉक्टरांवरील हल्ल्याप्रकरणी सर्व आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी वैद्यकीय संघटनांनी पुन्हा केली आहे. बाईट आदित्य ठाकरे0
0
Report
Advertisement
पालघर में मुसलाधार बारिश से जनजीवन अस्त-व्यस्त, नुकसान भरपाई की मांग तेज
Palghar, Maharashtra:पालघर गेल्या चार दिवसापासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पालघरमधील जनजीवन विस्कळीत झालं होतं. अनेक गावपाड्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरलं. पालघरच्या केळवे येथील मोरपाड्यामध्ये पाणी शिरून कुटुंबांची मोठी गैरसोय झालीच पाहायला मिळाल. अनेकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याने घरांमध्ये असलेले साहित्य, अन्नधान्य आणि घरातील वस्तूंचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं. तीन दिवस घरामधील पाणी न ओसरला नसल्याने चिखलामध्ये राहण्याची वेळ येईल नागरिकांवर आली आहे. तीन दिवस पुरूण परिस्थिती असताना प्रशासनाचे अधिकारी इथे फिरकले नसून कुठलीही मदत मिळाली नसल्याचा आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. लवकरात लवकर पंचनामे करून नुकसान भरपाई करावी अशी मागणी येथील पीडित करीत आहेत.0
0
Report
पैसे के विवाद में मित्र की बेरहमी से पिटाई, अस्पताल में मौत; आरोपी सुरेश अग्रवाल गिरफ्तार
Akola, Maharashtra:पैसे के विवादातून आधी मित्राला बेदम मारहाण केली... त्यानंतर गंभीर जखमी झालेल्या मित्रालाच स्वतः उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केलं..मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. सुरुवातीला हा प्रकार अपघाती मृत्यू असल्याचा बनाव करण्यात आला होता. अकोला स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या तीन तासांत या खुनाचा छडा लावत मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. डाबकी रोड परिसरातील रेल्वे गेटजवळ गंभीर जखमी अवस्थेत एका युवकाला शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचा मृत्यू अपघातात झाल्याचं आरोपींकडून सांगण्यात आलं. मात्र पोलिसांना संशय आल्याने स्थानिक गुन्हे शाखेने याचा तपास सुरू केला.तपासादरम्यान मृतकाच्या अंगावरील जखमा अपघातातील नसून मारहाणीच्या असल्याचं स्पष्ट झालं. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे फिरवली. चौकशीत पैशाच्या व्यवहारातून झालेल्या वादात आरोपीने मित्रालाच बेदम मारहाण केल्याचं समोर आलं. त्यानंतर संशय टाळण्यासाठी त्यालाच उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.अवघ्या तीन तासांत स्थानिक गुन्हे शाखेाने मुख्य आरोपी सुरेश अग्रवालला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
फरार कृष्णा आंधळे: पुलिस की खोज अब भी नाकाम, प्रश्नों की गूंज
Beed, Maharashtra:सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 7 आरोपी जेलमध्ये आहेत पण आठव्या आरोपी कृष्णा आंधळे अद्याप पकडला गेला नाही. पोलिसांनी त्याला फरार घोषित करून बक्षीस जाहीर केला. तपास यंत्रणांनी बँक खाते, मोबाईल, नातेवाईकांच्या घरी छापे टाकले; तरी आंधळेचा पत्ता लागला नाही. तो देशाबाहेर पळाला का, की गावात कोणाच्या आश्रयाला आहे याचं उत्तर अद्याप पोलिसांकडे नाही.0
0
Report
Advertisement
