445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में राहुल गांधी के स्वागत के लिए रोहित पवार ने पोस्टरबाजी की
Pune, Maharashtra:पुण्यात राहुल गांधी यांच्या स्वागतासाठी रोहित पवारांनी बँनरबाजी... शहराच्या मध्यवर्ती केली पोस्टरबाजी रोहित पवारांच्या मनात नेमकं चाललंय तरी काय?0
0
Report
अंबेगांव में आंगनवाड़ी सेविका के निलंबन पर घमासान; मसाला घोटाले की मांग तेज
Ambegaon, Maharashtra:शालेय पोषण आहाराच्या निकृष्ट दर्जाची पोलखोल करणाऱ्या आंबेगावमधील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावरील निलंबनाची कारवी तत्काळ मागे घेण्याची मागणी खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी केली आहे. 'चोर सोडून संन्याशाला फाशी' देण्याचा हा प्रकार असून, कारवाई सेविकांवर नाही तर निकृष्ट माल पुरवणारे कंत्राटदार आणि दर्जा तपासणाऱ्या अधिकाऱ्यांवर झाली पाहिजे, असा घणाघात त्यांनी केला आहे. आंबेगावपाठोपाठ जुन्नरमध्येही शालेय पोषण आहारात भेसळयुक्त मसाले आढळल्याचे सांगत, मुलांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या गैरव्यवहाराची मुख्यमंत्र्यांनी सखोल चौकशी करावी; अन्यथा तीव्र आंदोलन छेडू, असा इशाराही डॉ. कोल्हेंनी दिला आहे.0
0
Report
झी २४ तास के दवाब पर रेश्मा पारधी की कार्रवाई वापस ली गई
Ambegaon, Maharashtra:अंगणवाडीच्या विद्यार्थ्यांना दिला जाणारा आहार निकृष्ट दर्जाचा असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या आंबेगावच्या चास येथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्या वरती झालेल्या कारवाईचा मुद्दा झी 24 तास ने लावून धरल्यानंतर अखेर झी 24 तास च्या दणक्यानंतर पारधी यांच्यावरील बडतर्फीची कारवाई मागे घेण्यात आली असून झी 24 तास च्या जस्टीस देवयानी मोहिमेलायश आलं असून झी 24 तास शी बोलताना रेश्मा पारधी यांना अश्रू अनावर झाले असून पारधी यांनी झी 24 तास चे आभार मानलेत त्यांच्याशी एक्सक्लिझीव बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
देवयानी पारधी के निलंबन की कार्रवाई वापस, पुणे जिला परिषद अध्यक्ष ने जानकारी दी
Pune, Maharashtra:देवयानी पारधी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई मागे घेण्यात येत आहे.. पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांची माहिती0
0
Report
पुणे में MH12 खत्म, MH12 1A के साथ नया नंबर-प्लेट क्रम शुरू!
Pune, Maharashtra:एमएच १२' ही पुण्याची ओळख कायम राहणार वाहनांसाठी लवकरच नवी सिरीज पुणे: पुण्यातील वाहनांची ओळख असलेली ‘एमएच १२’ ही इंग्रजी अक्षरांची मालिका संपत आली असली, तरी पुणेकरांची ही हक्काची ओळख कायम राहणार आहे. त्यासाठी आता 'एम एच १२ १ ए' या नव्या मालिकेचा पर्याय समोर आला आहे. देशात प्रथमच वाहनांच्या नंबरप्लेटवरील अक्षरांच्या सिरीजमध्ये ‘अंक’ आणि ‘अक्षर’ यांचा एकत्रित वापर केला जाणार आहे. सध्या पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडे (आरटीओ) ‘एमएच १२’ अंतर्गत शेवटची ‘झेड झेड’ ही सिरीज सुरू असून लवकरच ती संपणार आहे. ही मालिका संपल्यानंतर आरटीओकडे तीन अक्षरी सिरीज सुरू करणे शक्य नव्हते. त्यामुळे पुणे आरटीओने रस्ते व महामार्ग मंत्रालयाला 'एमएच १२' च्या पुढे '१ ए' अशी मालिका सुरू करण्याचा प्रस्ताव पाठवला आहे. तत्पूर्वी, नवीन मालिका सुरू होईपर्यंत वाहन खरेदी करणाऱ्या पुणेकरांना 'एमएच ६१' या आरटीओ कोडने वाहनांचे रजिस्ट्रेशन करून दिले जाईल. सणासुदीच्या मुहूर्तावर वाहन खरेदी करण्यास इच्छुक ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही काळानंतर या वाहनांना नव्या मालिकेत ट्रान्सफर करण्याची सुविधा किमान निर्धारित शुल्क आकारून उपलब्ध करून दिली जाणार आहे. सुरुवातीला 'एमएच ६१' या नव्या क्रमांकाची चर्चा सुरू झाल्यामुळे 'एमएच १२' ही पुण्याची ओळख पुसली जाण्याची शंका व्यक्त केली जात होती. ही बाब लक्षात घेत केंद्रीय नागरी विमान वाहतूक व सहकार राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पुण्याची ही ओळख जपण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. यासंदर्भातील मसुदा लवकरच प्रसिद्ध केला जाणार असून त्यावर नागरिकांच्या हरकती सूचना मागवण्यात येणार आहेत. त्यानंतर नव्या मालिकेला सुरुवात होण्याची शक्यता आहे.0
0
Report
पुणे में राहुल गांधी कार्यक्रम से उत्साह, सत्यजीत तांबे कांग्रेस में आना चाहते थे
Pune, Maharashtra:राहुल गांधी के कार्यक्रम के कारण पुणे में उत्साह निश्चित रूप से है... पर मेरा भाई सत्यजीत तांबे आज कांग्रेस में होना चाहता था, आज भी उसका कांग्रेस में स्वागत है, ऐसा जयश्री थोरात ने Zee 24 Taas से बातचीत में कहा। उनसे हमारी एक्सक्लूसिव बातचीत की। जयश्रीताई थोरात, नेता, युवा कांग्रेस0
0
Report
Advertisement
नाना पटोले ने इथेनॉल मुद्दे पर गडकरी को निशाना, पेट्रोल घटे पर चीनी महंगी
Pune, Maharashtra:नाना पटोले जी ने भी इथेनॉल के मुद्दे पर गडकरी पर निशाना साधा... इस केंद्र सरकार ने पेट्रोल के दाम कम किए बल्की चीनी महंगी कराई0
0
Report
आंगनवाड़ी में खराब पोषण आहार का वीडियो वायरल, सेविका पर कार्रवाई, पालक मांगें
Ambegaon, Maharashtra:अंगणवाडीतील निकृष्ट पोषण आहाराची पोलखोल करणाऱ्या आंबेगाव तालुक्यातील चास ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविकेवर कारवाईचा बडगा उगारल्याने आता पालक आणि ग्रामस्थांमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ठाकरवाडी येथील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांनी खराब पोषण आहाराचा पर्दाफाश करणारा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल केल्यानंतर शासनाने त्यांच्यावर थेट बडतर्फीची कारवाई केली. मात्र, या कारवाईविरोधात आता पालक आक्रमक झाले असून, प्रामाणिक सेविकेवरील कारवाई तात्काळ मागे घेण्याची मागणी लावून धरली आहे. गेल्या १८ वर्षांपासून ठाकरवाडीतील चिमुकल्यांना घडवणाऱ्या अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्यावर शासनाने बडतर्फीची कारवाई केल्याने खळबळ उडाली आहे. दररोज ४ ते ५ किलोमीटरची पायपीट करून त्या या दुर्गम भागातील मुलांना घडवण्याचं काम करत होत्या. मात्र, अंगणवाडीत पुरवला जाणाऱ्या पोषण आहार अत्यंत निकृष्ट दर्जाचा होता. ७ ते ८ शिट्ट्या देऊनही वटाणा शिजत नव्हता, तर लापशीचा भरडा चिंगमसारखा चिकट लागत असल्याने तो खाऊन लहान मुलांची पोटं दुखत असल्याच्या तक्रारी पालकांनी केल्या होत्या. शासनाकडून येणारे निकृष्ट धान्य बाजूला ठेवून रेश्मा पारधी यांनी स्वतःच्या पदरचे पैसे खर्च करून चिमुकल्यांसाठी चांगला भरडा आणून खाऊ घातला. हा संपूर्ण प्रकार चव्हाट्यावर आणणारा व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केला. मात्र, निकृष्ट दर्जाचा पुरवठा करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाने उलट रेश्मा पारधी यांच्यावरच बडतर्फीची कुऱ्हाड चालवली. यामुळे पालकांनी प्रशासनाविरोधात प्रचंड संताप व्यक्त केला असून मुलांनीही निकृष्ट आहाराच्या हकिगतीला दुजोरा दिला आहे. याचाच थेट शाळेतून एक्सक्लिझीव आढावा घेत पालकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
आंगनवाड़ी बदतर्फी मामले पर देवदत्त निकम ने प्रशासन पर किया तीखा हमला
Ambegaon, Maharashtra:आंबेगावमधील अंगणवाडी सेविकेच्या बदतर्फी वरून आता राजकीय वातावरण तापलं असून राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवदत्त निकम यांनी प्रशासनावर जोरदार निशाणा साधला आहे. अंगणवाडीतील बालकांना दिल्या जाणाऱ्या निकृष्ट दर्जाच्या आहाराचा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकल्यामुळे अंगणवाडी सेविका रेश्मा उर्फ देवयानी पारधी यांना सेवेतून थेट काढून टाकण्यात आलं. या कारवाईवर तीव्र संताप व्यक्त करत निकम यांनी, निकृष्ट अन्न पुरवणाऱ्या ठेकेदारांवर आणि टेंडर मंजूर करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याऐजी सत्य समोर आणणाऱ्या सेविकेवर झालेली ही कारवाई अत्यंत अन्यायकारक असल्याचं देवदत्त निकम यांनी म्हटलं आहे. तसंच अशा प्रकारचा निकृष्ट आहार देण्यापेक्षा शासनानं 'लाडकी बहीण' योजनेप्रमाणे आहाराचे पैसे थेट पालकांच्या खात्यात जमा करावेत, जेणेकरून बालकांना सकस आहार मिळेल अशी मागणीही त्यांनी केली. दरम्यान, झी २४ तासने सुरू केलेल्या 'जस्टिस फॉर देवयानी' या मोहिमेला आणि पीडित सेविकेला निकम यांनी जाहीर पाठिंबा दर्शवला आहे.0
0
Report
Advertisement
देवयानी पारधी यांच्यावर निलंबन रद्द करण्याची माहिती पुणे जिल्हा परिषद अध्यक्षांनी दिली
Ambegaon, Maharashtra:देवयानी पारधी यांच्यावर केलेली निलंबनाची कारवाई अखेर मागे घेण्यात येत आहे, अशी माहिती पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांनी दिली. तसेच सोमवार पर्यंत ड्राईव्ह घेऊन सगळी माहिती घेणार.0
0
Report
अंबेगांव में आंगनवाड़ी सेविका के निलंबन पर ठाकरे शिवसेना का प्रशासन पर हमला
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील अंगणवाडी सेविका रेश्मा पारधी यांच्या निलंबनावरून आता राजकीय वातावरण तापू लागलं असून, ठाकरे शिवसेना या प्रकरणात आक्रमक झाली आहे. निकृष्ट पोषणाहाराविरोधात आवाज उठवल्यामुळेच प्रशासनाने ही सूडबुद्धीची कारवाई केल्याचा थेट आरोप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुरेश भोर यांनी केला आहे. १४ जून रोजी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांच्या दौऱ्यादरम्यान हा निकृष्ट दर्जाचा आहार निदर्शनास आणून देण्यात आला होता. जनावरेही खाणार नाहीत अशा दर्जाचा पोषण आहार चिमुकल्यांना दिला जात असताना, सत्य समोर आणणाऱ्या सेविकेवर कारवाई करणे हा लोकशाहीचा गळा घोटण्याचा प्रकार असल्याचं भोर यांनी म्हटलं आहे. रेश्मा पारधी यांचे निलंबन तात्काळ मागे न घेतल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही ठाकरे सेनेने दिला आहे.0
0
Report
सांगली में केसरेकर दंपति हत्या के विरोध में बड़ा हिंदू मोर्चा
Kolhapur, Maharashtra:सांगलीच्या कुपवाड मधील केसरेकर दाम्पत्याच्या हत्येच्या निषेधार्थ सकल हिंदू समाजाचा वतीने सांगली शहरातून मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा आमदार गोपीचंद पडळकर,आमदार संग्राम जगताप आणि आमदार महेश लांडगे यांच्या उपस्थितीत काढण्यात आला आहे. या मोर्चाला सकल हिंदू कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहिले आहेत. सांगली शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते सांगली महानगरपालिका चौकापर्यंत हा मोर्चा काढण्यात आला. हा मोर्चा महानगरपालिका चौकात पोहोचल्यानंतर आक्रमक हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत प्रशासनाच्या वतीने आरोपीला फाशीची शिक्षा दिल जाईल असे आश्वासन प्रशासनाच्या वतीने दिले जात नाही तोपर्यंत ठिय्या आंदोलन मागे घेतले जाणार नाही अशी भूमिका घेत आंदोलन सुरू केल आहे.0
0
Report
Advertisement
खेड़ में दुर्लभ विषैला बांबू पिट वैपर का सुरक्षित रेस्क्यू, लोगों से सावधानी अपील
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये दुर्मिळ व विषारी ‘बांबू पिट वायपर’ सापाचे सुरक्षित रेस्क्यू.. खेडमधील महात्मा फुले नगर परिसरात अत्यंत दुर्मिळ आणि विषारी 'बांबू पिट वायपर' (चापडा) साप आढळून आला.. स्थानिक वन्यजीव रक्षक व लोकप्रतिनिधींनी तत्परता दाखवत या सापाला सुरक्षितपणे रेस्क्यू करून नैसर्गिक अधिवासात मुक्त केले.. हा साप अत्यंत विषारी असल्याने मानवी वस्तीत साप दिसल्यास त्याला न छेडता तात्काळ सर्पमित्रांशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे..0
0
Report
नागपूर में समोसा-पकोड़े: किस तेल से तलना है आपकी सेहत का सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर के खाद्य प्रेमियो मे समोसा और मुंग पकोडे खासे पसंद किये जाते है. दोबारा युज ऑइल से युज तले हुए समोसे और पकोडे शरीर के लिए हानिकारक हो सकते है. इसीलिए खाद्य प्रेमी जहाँ अच्छे क्वालिटी का और अच्छे तेल मे तले हुए समोसे और पकोडे होते है इसलिए खाना पसंद करते है. नागपूर मे ऐसेही कुछ समोसा और पकोडे पसंद लोगो की प्रतिक्रिया हम देखते है0
0
Report
पुणे कार्यक्रम में राहुल गांधी के समर्थन में युवाओं की भीड़, फडणवीस की मदद पर चर्चा
Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले -काँग्रेस बाईट On पुणे कार्यक्रम - - छात्र की गुंज या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस एका प्रकारची मदत करत आहेत असं म्हटलं तर वावग ठरणार नाही. पुणे शिक्षणाचा हब आहे. तिथे शिकण्यासाठी बाहेरून मोठ्या प्रमाणात मुले मुली येतात. राहुल गांधी विद्यार्थ्यांसाठी येत आहेत.. त्यामुळे त्यांचं मत ऐकून घेण्यासाठी ग्राउंडच्या मैदानापेक्षा पाच पट जास्त तरुण तरुणी स्वयपुर्तीने येणार. - त्यामुळे काँग्रेसच्या कॉलेजचे विद्यार्थी येतील असा समज टाकून विद्यार्थ्यांमध्ये प्रेरणा देण्याचं काम फडणवीस यांनी केलं आहे.. त्यामुळे राहुल गांधींच्या सभेला एका प्रकारे देवेंद्र फडणवीस मदत करत आहे.. असं वाटत आहे. On नागपूर मनपा वंदे मातरम - - ही चूक आहे म्हणता येणार नाही. वंदे मातरम या गीताला महात्मा गांधी, पंडित नेहरू सारखी महान नेत्यांनी मान्यता दिली. सर्व समाजाला उद्देशून हे गाणे होते. - ज्यांचा स्वातंत्र्यलढ्यात सहभाग नाही. त्यांनी 53 वर्ष तिरंग्याचा सन्मान न करता अपशकुनी म्हणणारी ही लोक.. हे वंदे मातरम देखील म्हणणारी लोक नव्हती. - त्यामुळे वंदे मातरम चे राजकारण न करता आज देशातील शेतकऱ्यांचे ,बेरोजगार, महागाई आणि देशांची सीमा सुरक्षित नाहीत हे प्रश्न महत्त्वाचे आहेत. आमच्यासाठी जनतेचे हे प्रश्न महत्त्वाचे त्यामुळे आम्ही ते प्रश्न घेऊन चालू. On पृथ्वीराज चव्हाण - सुप्रिया सुळे - पृथ्वीराज चव्हाण जेष्ठ नेते आहे. त्यांच्या काळात काय घडामोडी झाल्यात त्याबद्दल त्या पातळीचे नेते चर्चा करू शकतात. त्यांच्या समोर घडलं असेल ते त्यांनी मांडलं असेल आमच्यासमोर काही घडलं नसल्याने त्यावर आम्ही बोलणे योग्य नाही. - सुप्रिया ताई यांनी आम्हाला समन्वय सांगण्याची गरज नाही. - त्यावेळी पृथ्वीराज चव्हाण आणि शरद पवार यांच्यात काही घडामोडी झाल्या असतील. त्याबद्दल त्यांनी वक्तव्य केलं असेल त्यामुळे त्यांच्या लेव्हलच्या नेत्यांनी त्यांच्याबद्दल वक्तव्य करावे. माझ्यासारख्यांनी बोलणे योग्य नाही. On पृथ्वीराज सत्ताबदल दावा - - या देशाला पर्याय हा काँग्रेसचाच आहे. नरेंद्र मोदी यांनी दाखविलेले स्वप्न बारा वर्षात एकही स्वप्न पूर्ण केले नाही. सर्वात जास्त पंतप्रधान राहण्याची संधी मिळाली. सोबत सर्वात जास्त जग फिरण्याचा वाटा त्यांचा राहिला. - मात्र जग फिरून त्यांनी देशाच्या हितासाठी काय केले. आता चीन आपल्या देशाची सीमा ताब्यात घेण्याचं काम करतोय. त्यामुळे भाजप आणि नरेंद्र मोदी यांचे सरकार देशाचा हिताच नव्हे तर घातक आहे. - देशातील जनता काँग्रेसला आणि आमचे नेते राहुल गांधी यांना पर्याय समजतात. त्यामुळे येणाऱ्या काळात काँग्रेस सत्तेत येईल.. On अंगणवाडी सेविका - - अंगणवाडी सेविकेने पोषण आहारातील प्रकरण समोर आणलं त्यामध्ये चौकशी व्हायला पाहिजे होती. पुरवठा करणारे सरकारचे लोक आहेत. महाराष्ट्रातील मुलाच्या तोंडातील घास खाणार हे भाजप सरकार आहे. या प्रकरणात चौकशी करून पुरवठा दारावर कारवाई व्हायला पाहिजे होती मात्र चोराला सोडून संन्यासाला फाशी असा भाजप आणि माहितीचा खेळ या निमित्ताने पुढे आला आहे.. On निधी वाटप - या तीनही पक्षांमध्ये निधी वाटपावरून मोठ्या प्रमाणात भांडण सुरू आहे. त्यामुळे यांचं बहुमताचं सरकार असतानाही महाराष्ट्र हा गड्ड्याचं महाराष्ट्र बनला आहे. 56 टक्के कमिशन द्यावं लागतं असा आरोप स्वतः कंत्राटदार करत आहे. On साखर दरवाढ - - महागाईची चर्चा करायची नाही अशी परिस्थिती भाजपने तयार करून ठेवली आहे. नकली देशप्रेम आणून वंदे मातरमर चर्चा चालली आहे. सनासुदीच्या काळात गोरगरिबांना गोडधोड खाता यावं नाही. निर्मला सीतारामन कांदे खाण्याची गरज काय म्हणत होत्या आता उद्या म्हणतील गोडधोड खाण्याची गरज काय. - भाजपला बेरोजगार महागाई आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नाशी घेणेदेणे नाही. मात्र काँग्रेस या सगळ्या प्रश्नांना घेऊन एक मोठी लढाई उभ करण्याचे प्लॅन करत आहे. On पुणे विरोध - कोणताही संघर्ष नाही. देवेंद्र फडणवीस हे मदतच करत आहे. पुणे शहर शिक्षणाचा माहेर घर आहे. राहुल गांधी यांचं युवा पिढीत आकर्षण असल्याने मोठ्या प्रमाणात मुला मुलीची गर्दी पाहायला मिळेल.0
0
Report
Advertisement
