445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बुलढाणा के किसानों का आक्रोश: सूखा घोषित करने की मांग तहसील कार्यालय तक पहुंची
Buldhana, Maharashtra:जळगाव जामोद | बुलढाणा कोरडा दुष्काळ जाहीर करा! शेतकऱ्यांचा तहसील कार्यालयावर आक्रोश पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे. सोयाबीन, कापूस, तूर, मूग, उडीद आणि मका यांसारखी पिके पाण्याअभावी धोक्यात आली असून, अनेक गावांमध्ये गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. कोरडा दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी जळगाव जामोद तहसील कार्यालयावर आक्रोश केला. तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना निवेदन देत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत, पीक विम्याची नुकसानभरपाईं आणि कर्जाबाबत दिलासा देण्याची मागणी करण्यात आली. तसेच जनावरांसाठी चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची मागणी करण्यात आली. दरम्यान, 30 आणि 31 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यातील नदी-नाल्यांना पूर आला होता. अनेक ठिकाणी शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले, तर जनावरेही वाहून गेली. मात्र अद्याप नुकसानभरपाई मिळाली नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. शेतीपिके आणि वाहून गेलेल्या जनावरांची तातडीने नुकसानभरपाई द्यावी, तसेच नद्यांचे खोलीकरण करावे, या मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी तहसील कार्यालयात जोरदार आक्रोश केला.0
0
Report
हिंदी में क्या होगा एक क्लिकबेट headline
Jalna, Maharashtra:जालना : जरांगे पाटलांना शिष्टमंडळाची हुलकावणी,जरांगे पाटलांकडून विखे,फडणवीस टार्गेट (पॅकेज) जालना : जरांगे पाटलांचे आमरण उपोषणाचा आज 11 वा दिवस होता.आज राज्य सरकारचं शिष्टमंडळ जरांगे यांच्याकडे चर्चेसाठी अंतरवालीत येणार असलयाची चर्चा होती.पण जरांगे यांच्याकडे शिष्टमंडळ चर्चेला जाणार नाही अशी भूमिका मराठा आरक्षण उमसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी घेतली आणि जरांगे यांना पुन्हा शिष्टमंडळाने ह Hulकावणी दिली.त्यामुळे जरांगे यांनी विखे पाटीलंवर चांगलीच आगपाखड करत फडणवीस यांना टार्गेट केलं.बघूया हा स्पेशल रिपोर्ट राधाकृष्ण विखे पाटील यांनी अंतरवाली सराटीत शिष्टमंडळ जाणार नसल्याची भूमिका मांडल्यानंतर जरांगे पाटील यांच्या आक्रमक रूप पाहायला मिळालं.त्यांनी थेट विखे यांचा एकेरी उल्लेख करायला सुरु केला. तू अंतरवालीत ये अथवा येऊ नको,तुला कुणी बोलावलं नव्हतं असं म्हणत सरकारला समजून घ्यायला सरकार आमचा बाप है का असा सवाल जरांगे यांनी विखेना केला. तसेच आमच्या नियोजित मुंबई आंदोलनासाठी फडणवीस आणि विखे या दोघांनी मिळून हल्ल्याचा प्लान तयार केल्याचा आरोप जरंगे यांनी केलाय.मात्र असा हल्ला तुम्ही करूनच दाखवा असं आव्हान जरांगे यांनी विखेना दिलंय. शिष्टमंडळ अंतरवालीत नाही आलं तर नाही आलं पण वर्षभरात तू मराठा समाजाचं वाटोळं केलं असा आरोप जरांगे यांनी विखेवर केला. तसेच फडणवीस यांचं गुणगाण गाण्यासाठी तू अंतर वालीत आला पण वर्षभर तू मराठा समाजाचे वाटोळं केलंस असा टीकेचा भडिमार जरांगे यांनी विखेवर केला विखे लुचाड आणि धोखेबाज असल्याचं जरांगे यावेळी म्हणाले यावेळी जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर देखील निशाणा साधलाय.तुमच्या समोर ताटच राहणार नाही अशी टिका जरांगे यांनी फडणवीस यांच्यावर केलीय.दोन महिन्यात तुम्ही हैदराबाद गॅझेटियर नुसार आरक्षण देणार होते त्याच काय झालं उत्तर द्या असा सवाल जरंगे यांनी फडणवीस यांना केलाय शिष्टमंडळाने चर्चेसाठी दिलेली हुलकावणी मनोज जरांगे यांच्या चांगलीच जिव्हारी लागलीय. त्यामुळे जरांगे यांना संताप अनावर झालाय.राधाकृष्ण विखे आणि देवेंद्र फडणवीस जरांगे यांच्या टार्गेटवर आलेत.अंतरवालीतील चर्चा फिस्कटल्यानंतर आता जरांगे काय निर्णय घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागलंय0
0
Report
संगमनेर विधायक खताळ के खिलाफ सोशल मीडिया पोस्ट पर अपमान के कारण कानूनी नोटिस
Shirdi, Maharashtra:संगमनेरचे आमदार अमोल खताळ यांच्याबाबत भावपूर्ण श्रद्धांजली अशी आक्षेपार्ह पोस्ट सोशल मिडीयावर व्हायरल झाल्यानंतर खताळ यांनी बदनामी करणाऱ्यावर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा दिलाय.. लोकप्रतिनिधीच्या निधनाची खोटी श्रद्धांजली सोशल मीडियावर पोस्ट करणं, हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं आमदार खताळ यांनी म्हटलंय.. संगमनेरमध्ये प्रसाद गुंजाळ नामक तरुणाने आमदार अमोल खताळ यांच्या नावाने विविध सोशल माध्यमांवर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल केल्याचं समोर आलंय.. एका पोस्टमध्ये त्याने खताळ यांना उद्देशून "माझा व्यवहार मिटवून टाक. मागच्या वर्षी तुला ट्रेलर दाखवला होता, आता लवकरच पूर्ण पिक्चर बघायला भेटेल" असं म्हटलंय.. दुसऱ्या एका पोस्टमध्ये थेट "मित्रा सहनशक्ती संपली.. लवकरच भावपूर्ण श्रद्धांजली" अशा आशयाची पोस्ट केली आहे.. या प्रकारामुळे संगमनेरमधील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.. माझी बदनामी करण्याचा सातत्याने प्रयत्न केला जात असून, आता मात्र मी शांत बसणार नाही संबंधित व्यक्तीविरोधात कायदेशीर नोटीस बजावून गुन्हा दाखल करणार असल्याचा इशारा आमदार अमोल खताळ यांनी दिलाय..0
0
Report
Advertisement
नाशिक में पहली बार घर गिराने की जगह उसे स्थानांतरित करने का अनोखा प्रयोग
Yeola, Maharashtra:रस्ता आडवा आला म्हणून घर पाडण्याऐवजी चक्क घरच स्थलांतर करण्याचा निर्णय येवला तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांच्या नव्या घराचा हा अनोखा प्रयोग sध्या परिसरात चर्चेचा विषय ठरतोय तब्बل अडीचशे जॅक आणि दहा मजुरांच्या मदतीने हे घर जागेवरून उचलून दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे पाहूया घर स्थलांतराची ही अनोखी कहाणी तालुक्यातील उद्योजक सम्राट वर्मा यांचं नव्याने बांधलेलं घर फॅक्टरीजवळ असलेलं हे घर रस्त्याच्या कामात अडथळा ठरत होतं मात्र घर पाडून नुकसान करण्याऐवजी ते दुसऱ्या ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला घर स्थलांतराच्या या अनोख्या प्रयोगासाठी हरियाणातील कुरुक्षेत्र येथील कारागिरांना बोलावण्यात आलंय तब्बल अडीचशे जॅकच्या मदतीने घर उचलण्याची प्रक्रिया सुरू आहे दहा मजुरांच्या साह्याने हे काम केलं जात असून घराला कोणताही धक्का लागू नये यासाठी अत्यंत काळजीपूर्वक प्रक्रिया राबवली जात आहे जागेवरून घर उचलून ते दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरित करण्याचं काम सुरू आहे या संपूर्ण प्रक्रियेला सुमारे एक महिन्याचा कालावधी लागणार आहे घर पाडण्याऐवजी ते वाचवण्याचा हा निर्णय आता प्रत्यक्षात उतरतोय नाशिक जिल्ह्यात संपूर्ण घर स्थलांतर करण्याचा हा पहिलाच प्रयोग असल्याचा दावा करण्यात येत आहे त्यामुळे या अनोख्या उपक्रमाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे घर पाहण्यासाठी आलेले परिसरातील नागरिक0
0
Report
पवार विरुद्ध पवार बारामती: सोमेश्वर कारखाने election में बिनविरोध की उम्मीदया बनीं
Rui, Maharashtra:बारामती में फिर एक बार पवार विरुद्ध पवार का मुकाबला रंगने की चर्चा है। सोमेश्वर सहकारी साखर कारखान्य की चुनाव की घोषणा हो चुकी है और अर्ज दाखल करने की तैयारी तेज है। लोकसभा के बाद अब कारखाना क्षेत्र की राजनीति में भी पवार परिवार का आमने-सामना होगा या नहीं, यह खबर बारामती में केंद्रित बनी है। VO 1: सोमेश्वर कारखान्य की निर्वाचन प्रक्रिया घोषित होते ही दोनों गट मोर्चाबंदी में लग गए। इस बीच सांसद सुनेत्रा पवार ने कारखाना क्षेत्र में किसान मेळावा आयोजित किया और कहा, आखिर Ajit दाद ने सोमेश्वर कारखाना को कर्जमुक्त किया, उनकी दूरदर्शिता से कारखाना आज सुस्थित है और उन्होंने परिवारवाद में राजनीति नहीं की। वर्तमान में प्रधानमंत्री मोदी, मंत्री अमित शाह और मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकार क्षेत्र को पूर्ण समर्थन दे रहे हैं; नया पैनल सर्वसमावेशी होगा और Ajit दाद का वारसा आगे बढ़ेगा। VO 2: राष्ट्रवादी कांग्रेस के युवा नेता यूगेंद्र पवार ने भी इस चुनाव में उडान भरी है और किसान पैनल खड़ा कर चुनाव लड़ने की घोषणा की है ताकि किसानों के हित सर्वोपरि हों। VO 3: इन दोनों गटों के संघर्ष में अब विधायक रोहित पवार की भूमिका निर्णायक मानी जा रही है। अजित पवार के पहले ही साल पूरे न होने के बावजूद उनके मार्गदर्शन से कारखाना अच्छी तरह चल रहा है, इसलिए बहस न कराकर यह चुनाव बिना विरोध के ही हो जाए, इसके प्रयास भी किए जा रहे हैं। SOUNDBITE 3 - आमदार रोहित पवार: RoHit Pawar ने बिनविरोध के पक्ष में सलाह दी है। End of content: इतना ही नहीं, सुनेत्रा पवार और यूगेंद्र पवार आमने-सामने आएंगे या नहीं, यह स्पष्ट होगा; बारामती में पवार विरुद्ध पवार थरार आने वाले दिनों में तय होगा। जावेद मुलाणी, झी 24 तास, बारामती0
0
Report
वनरक्षक टीम के जेरबंद के बाद वाघिणी की मौत पर उठे सवाल
Amravati, Maharashtra:वाघिणीच्या मृत्यूवर संशयाची छाया, वाघिणीला दिली तीन वेळा बेशुद्धीकरणाचे डोस; रेस्क्यू ऑपरेशनवर गंभीर प्रश्न, डॉट मारणाऱ्यांच्या संवेदना मेल्याचा वन्यजीवप्रेमींचा आरोप वाघिणीला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये बेशुद्धीकरणाच्या औषधांचा वापर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा वनविभागाच्या पथकाकडून कॅटामिन आणि झायलाझिन या औषधांचा वापर करून पहिला डार्ट मारण्यात आला. पहिल्या डार्टनंतर अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुसरा डार्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र दोन डार्टनंतर औषधांचा परिणाम होण्यासाठी वेळ देणे आवश्यक असताना त्याचदरम्यान तिसरा डार्ट देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या डार्टसाठी मेडिटोमिडीन या वेगळ्या औषधाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाघिणीने यापूर्वी पाळीव जनावरांची शिकार केल्याने तिच्या शरीरावर चरबीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत औषधाचा परिणाम होण्यास वेळ लागू शकतो, असा वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डार्टनंतर औषधाचा परिणाम होण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता का? की वाघीण तातडीने बेशुद्ध व्हावी, या दबावाखाली पुन्हा-पुशा डार्ट करण्यात आले? हा आता तपासाचा विषय ठरला आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये रेस्क्यू करणाऱ्या डॉक्टरच्या फिल्ड अनुभवाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित डॉक्टरने यापूर्वी प्रत्यक्ष फिल्डवर वाघाचे रेस्क्यू केले होते का? वाघाला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस ठरवताना कोणती वैद्यकीय पद्धत वापरण्यात आली? औषधांच्या डोसबाबत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला का घ्यावा लागला? आणि जर डोसबाबत स्थानिक अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा लागला असेल तर अनुभवी स्थानिक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हे ऑपरेशन का करण्यात आले नाही? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजकीय दबावाचा आरोप होत असून या संपूर्ण रेस्क्यू OPरेशनदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता असा आरोपही केला जात आहे. वाघिणीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी अधिकारी आणि बचाव पथकावर दबाव होता का? या दबावामुळे ऑपरेशनमध्ये घाई झाली का? आणि या घाईचा परिणाम वाघिणीच्या आरोग्यावर झाला का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे. वाघिणीला जेरबंद करण्याच्या ऑपरेशनमध्ये बेशुद्धीकरणाच्या औषधांचा वापर करण्यात आला. मिळालेल्या माहितीनुसार, परतवाडा वनविभागाच्या पथकाकडून कॅटामिन आणि झायलाझिन या औषधांचा वापर करून पहिला डार्ट मारण्यात आला. पहил्या डार्टनंतर अपेक्षित परिणाम दिसून न आल्याने दुसरा डार्ट देण्यात आल्याची माहिती आहे. मात्र दोन डार्टनंतर औषधांचा परिणाम होण्यासाठी वेळ देणे आवश्यक असताना त्याचदरम्यान तिसरा डार्ट देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. विशेष म्हणजे तिसऱ्या डार्टसाठी मेडिटोमिडीन या वेगळ्या औषधाचा वापर करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या वाघिणीने यापूर्वी पाळीव जनावरांची शिकार केल्याने तिच्या शरीरावर चरबीचे प्रमाण अधिक असल्याचे सांगितले जात आहे. अशा परिस्थितीत औषधाचा परिणाम होण्यास वेळ लागू शकतो, असा वन्यजीव क्षेत्रातील जाणकारांचा दावा आहे. त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या डार्टनंतर औषधाचा परिणाम होण्यासाठी पुरेसा वेळ देण्यात आला होता का? की वाघीण तातडीने बेशुद्ध व्हावी, या दबावाखाली पुन्हा-पुशा डार्ट करण्यात आले? हा आता तपासाचा विषय ठरला आहे. या संपूर्ण ऑपरेशनमध्ये रेस्क्यू करणाऱ्या डॉक्टरच्या फिल्ड अनुभवाबाबतही प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. संबंधित डॉक्टरने यापूर्वी प्रत्यक्ष फिल्डवर वाघाचे रेस्क्यू केले होते का? वाघाला बेशुद्ध करण्यासाठी औषधांचा डोस ठरवताना कोणती वैद्यकीय पद्धत वापरण्यात आली? औषधांच्या डोसबाबत स्थानिक पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला का घ्यावा लागला? आणि जर डोसबाबत स्थानिक अधिकाऱ्याचा सल्ला घ्यावा लागला असेल तर अनुभवी स्थानिक वन्यजीव पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीतच हे ऑपरेशन का करण्यात आले नाही? हे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. दरम्यान या संपूर्ण प्रकारावर राजकीय दबावाचा आरोप होत असून या संपूर्ण रेस्क्यू OPरेशनदरम्यान वनविभागाच्या अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव होता असा आरोपही केला जात आहे. वाघिणीला लवकरात लवकर जेरबंद करण्यासाठी अधिकारी आणि बचाव पथकावर दबाव होता का? या दबावामुळे ऑपरेशनमध्ये घाई झाली का? आणि या घाईचा परिणाम वाघिणीच्या आरोग्यावर झाला का? याचीही चौकशी होणे आवश्यक असल्याची मागणी आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे. वर्धा आणि अमरावती जिल्ह्यातील चार नागरिकांचा जीव घेणाऱ्या वाघिणीला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आले. मात्र जेरबंदीनंतर तिचा मृत्यू झाल्याने संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशनच संशयाच्या भोवऱ्यात आलं आहे. स्थानिक अनुभवी बचाव पथकाला डावलून बाहेरील टीमला पाचारण करण्याचा निर्णय, बेशुद्धीकरणासाठी तीन डार्टचा वापर, दोन वेगवेगळ्या औषधांचा वापर आणि त्यानंतर झालेला वाघिणीचा मृत्यू या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आता तपासातूनच समोर येणार आहेत. मानवी जीव वाचवण्यासाठी करण्यात आलेल्या ऑपरेशनमध्ये वाघिणीचा मृत्यू नेमका कशामुळे झाला? ही केवळ दुर्दैवी घटना होती की रेस्क्यू ऑपरेशनमध्ये काही त्रुटी राहिल्या याचा निष्पक्ष तपास होऊन सत्य समोर येईल हीच आता वन्यजीवप्रेमी आणि नागरिकांची अपेक्षा आहे.0
0
Report
Advertisement
विरार में बार्बेक्यू नेशन के फूड लाइसेंस पर FDA की बड़ी कार्रवाई
Vasai-Virar, Maharashtra:विरार ब्रेकिंग विरार मध्ये बार्बेक्यू नेशनच्या फूड लायसन्सवर FDAचा दणका! विरार पश्चिम येथील प्रसिद्ध बार्बेक्यू नेशन हॉटेलच्या डेझर्ट केकमध्ये झुरळ आढळल्याच्या प्रकरणी अन्न व औषध प्रशासनाची कारवाई. ग्राहकाने केलेल्या तक्रारीनंतर FDA पालघरकडून हॉटेलची तपासणी करण्यात आली. सम्बंधित ग्राहकाने हॉटेलमधील अस्वच्छता आपल्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद केलेली आहे हॉटेलमध्ये अस्वच्छता आढळल्याच्या तक्रारीनंतर प्रशासनाकडून कारवाई. हॉटेलचे फूड लायसन्स सस्पेंड केल्याची माहिती. ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल प्रशासनाला FDAचा दणका! या कारवाईमुळे हॉटेल व्यवसायिकांमध्ये खळबळ.0
0
Report
गणेशोत्सव के दौरान मुंबई-गोवा हाईवे पर भारी वाहन बंद, प्रवास सुगम बनाने की नीति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर होणार.. आगामी गणेशोत्सवादरम्यान कोकणात जाणाऱ्या भाविकांचा प्रवास सुरळीत व्हावा आणि महामार्गावर वाहतूक कोंडी होऊ नये,यासाठी राज्य शासनाने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर १६ टन किंवा त्यापेक्षा अधिक वजन असलेल्या अवजड वाहनांना बंदी घातली आहे.. ११ ते १५ सप्टेंबर, १८ ते २० सप्टेंबर आणि २५ ते २६ सप्टेंबर या कालावधीत ही बंदी लागू राहणार असून दूध,पेट्रोल,औषधे,भाजीपाला आणि आपत्कालीन सेवा पुरवणाऱ्या अत्यावश्यक वाहनांना या निर्बंधातून वगळण्यात आले आहे..0
0
Report
रेल्वे रुळ पर रील बनाने वाला युवक गिरफ्तार, वायरल वीडियो के बाद सुरक्षा नोटिस
Washim, Maharashtra:वाशीम: सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी रेल्वे रुळावर उभं राहून रील बनवणं वाशिमच्या पांगरी नवघरे येथील अमोल नवघरे या तरुणाला चांगलंच महागात पडलंय. वाशिम रेल्वे स्थानक परिसरात रुळावर अनधिकृत प्रवेश करून रील बनवल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. रेल्वे पोलिसांनी सोशल मीडिया अकाउंटच्या माध्यमातून तरुणाची ओळख पटवून त्याला ताब्यात घेतलं. चौकशीनंतर रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३५(३) अन्वये नोटीस बजावून त्याला सोडण्यात आलं. दरम्यान, रेल्वे रुळावर रील बनवणे जीवघेणं ठरू शकतं, त्यामुळे अशा स्टंटपासून दूर राहण्याचा इशारा रेल्वे सुरक्षा दलाने दिला आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के पांगरा में पानी न मिलने से सोयाबीन सूख, किसान होली जलाकर विरोध
Washim, Maharashtra:पांगरा बंदी परिसरात पावसाअभावी सोयाबीन पिके पूर्णपणे वाळून गेली आहेत. शेंगा आणि पानंही गळून पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याचा आरोप करत स्वाभिमानी शेतकरी संघटनेने शेतातच वाळलेल्या सोयाबीन पिकाची होळी केली. दुबार पेरणीचा फटका बसल्यानंतर आता पावसाच्या खंडामुळे उभं पीकही करपलं आहे. नुकसानग्रस्त पिकांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी किमान एक लाख रुपयांची मदत द्यावी, अशी मागणी संघटनेने केली आहे.0
0
Report
वाकोळा में मराठी लावणी वीडियो में भोजपुरी गीत जोड़ने पर बवाल
Mumbai, Maharashtra:वाकोळ्यात मराठी लावणीच्या व्हिडिओला भोजपुरी गाणं जोडल्याने वाद मुंबईतील वाकोळा परिसरात मराठी लावणीच्या व्हिडिओला भोजपुरी गाणं जोडून तो सोशल मीडियावर व्हायरल केल्याचा प्रकार समोर आला आहे… या प्रकारामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे. वाकोळ्यात मनसेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दहीहंडी कार्यक्रमात मराठी लावणी सादर करण्यात आली होती. याच लावणीचा व्हिडिओ एका व्यक्तीने एडिट केल्याचा आरोप करण्यात आला आहे. या व्हिडिओमध्ये मराठी लावणीच्या मूळ ऑडिओऐवजी भोजपुरी गाणं जोडण्यात आलं आणि त्यानंतर हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रसारित करण्यात आला. विशेष म्हणजे, या व्हिडिओला एक मिलियनहून अधिक व्ह्यूज मिळाल्याचा दावा मनसेकडून करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मनसे कार्यकर्त्यांांनी आक्रमक भूमिका घेतली. हा केवळ सोशल मीडिया व्हिडिओचा प्रकार नसून, मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी अस्मितेचा जाणीवपूर्वक अपमान करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप मनसे कार्यकर्त्यांनी केला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच मनसेच्या कलिना विधानसभा विभागाध्यक्ष संजय लक्ष्मण अडारकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन वाकोळा पोलीस ठाण्यात नेल्याची माहिती आहे. दरम्यान, या प्रकरणी पोलिसांकडून पुढील चौकशी सुरू आहे. व्हिडिओ कोणी एडिट केला, तो सोशल मीडियावर कसा व्हायरल झाला आणि त्यामागचा नेमका उद्देश काय होता, याचा तपास केला जात आहे. मराठी भाषा आणि संस्कृतीचा अपमान कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, असा इशारा मनसेकडून देण्यात आला आहे.0
0
Report
सांगली के गोटखिंडी स्पर्धा परीक्षा अकॅडमी बोर्डिंग में नाबालिग लड़कियों के साथ यौन शोषण, सुरक्षा पर सवाल
Sangli, Maharashtra:स्लग - स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षतेतेचा प्रश्न ऐरणीवर ! अँकर - आश्रम शाळांमधील मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न भेडसावत असताना आता खाजगी स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीतल्या निवासी मुलींचा सुरक्षेचा प्रश्न देखील ऐरणीवर आला आहे, याला कारण ठरलंय सांगलीच्या गोटखिंडी येथील अकॅडमीच्या निवासी शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत घडलेल्या लैंगिक अत्याचाराचा प्रकार,या धक्कादायक प्रकरणानंतर स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील मुलींच्या सुरक्षेचे मुद्दा समोर आला आहे. व्ही वो - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या गोटखिंडी येथील केतनराज स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतील तीन अल्पवयीन मुलींच्या बाबतीत लैंगिक अत्याचाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याहून धक्कादायक बाब म्हणजे ॲकॅडमीच्या संस्थापकाकडूनच हा प्रकार करण्यात आला आहे,यावर कहर म्हणजे संशयित संस्थापकाच्या पत्नीने या सर्व प्रकरणात अल्पवयीन मुलींना धमकी दिल्याचा एक प्रकार घडला,त्यामुळे या प्रकरणी आता संस्थापक काशिनाथ नांगरे सह पत्नी मनीषा नांगरे या दोघांवर पोक्सो कायद्याअंतर्गत आष्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून काशिनाथ नांगरे याला आष्टा पोलिसांनी अटक देखील केली आहे. बाईट - तुषार दोशी - पोलीस अधीक्षक, सांगली. व्ही वो - केतनराज स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीची निवासी शाळा ही गोटखिंडी येथे आहे.येथे राहणाऱ्या तीन अल्पवयीन विद्यार्थिनींच्या बाबतीत 11 जून 2026 पासून वारंवार मानसिक छळ करून त्यांच्यावर अत्याचार व विनयभंग,करण्यात आल्याचा प्रकार सुरू होता.शिक्षक दिनी गुरुदक्षिणेच्या नावाखाली देखील संस्थापक असणाऱ्या काशिनाथ नांगरे यांच्याकडून अल्पवयीन मुलींच्या बाबतीत अत्याचार करण्याच्या प्रयत्न करण्यात आला.मुलींनी या सर्व प्रकरणानंतर संस्थापक नांगरेंच्या पत्नी मनीषा नांगरे yांना सर्व हकीकत सांगितली,पण मनीषा नांगरेंनी मुलींच्यावर होणाऱ्या अत्याचाराकडे दुर्लक्ष करत,या सर्व प्रकरणावर पडदा टाकण्यासाठी मुलींना तक्रार देऊ नये अन्यथा शैक्षणिक नुकसान करण्याची धमकी दिली,मात्र वाढत्या लैंगिक अत्याचाराला कंटाळून मुलींनी पालकांना सर्व हाकिकत सांगितली,त्यानंतर पालकांनी थेट आष्टा पोलीस ठाणे गाठत, संस्थापक संचालक असणाऱ्या काशिनाथ नांगरे व त्याच्या पत्नी विरोधात गुन्हा दाखल केला. व्ही वो - दरम्यान या सर्व प्रकरणावरून स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या निवासी शाळेतल्या मुलींच्या सुरक्षतेतेचा प्रश्नाबाबत राज्य सरकारने कडक कायदे करावेत, सिसीसीटीव्ही बंधनकारक करावेत,अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्यांकडून होऊ लागली आहे. बाईट -ज्योती अदाटे - सामाजिक कार्यकर्त्या, सांगली. व्ही वो - राज्यात सध्या खाजगी निवासी स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे पेव फुटलंय,मात्र या ठिकाणी राहणाऱ्या मुलींच्या सुरक्षेचे प्रश्न या घटनेनंतर समोर आला आहे,त्यामुळे स्पर्धा परीक्षांच्या निवासी शाळेमध्ये मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य त्या उपाययोजना असणे गरजेचं, मागणी पुढे आली आहे.0
0
Report
Advertisement
MIDC के विरोध में मराठा गाँव CM से मिलने का मंच तैयार
Kolhapur, Maharashtra:संभाजी भिडे बाईट मुद्दे ऑन सैनिक टाकळी MIDC अख्खं गाव म्हणतंय आम्हाला MIDC नको. आमची पोटासाठी जगणारी जात नाही.. मराठा विना राष्ट्र घडणार नाही.. आम्ही मुख्यमंत्री यांना भेटणार आहे..आम्ही जमीन देणार नाही एवढे लक्षात ठेवा.. अखंड हिंदुस्तान निर्माण करणारी आग असणारी लोक है. मारहाण केलेल्या विरोधात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांची भेट घेणार आहे ऑन डॉल्बी सबंध देशाने डॉल्बी फेकून दिला पाहिजे. डॉल्बी जाळी पाहिजे. डॉल्बी कायमस्वरूपी जाळली पाहिजे.त्याचा उपयोग काय. काळया शक्ती नाकारण्यासाठी काही गोष्टी नाकारल्या पाहिजे.. त्यामध्ये डॉल्बी एक आहे ऑन दहीहंडीमध्ये महिलांचे नाच गाणं असले प्रकार करणारे देशद्रोही.. ते आपले असले तरी ते मूर्ख आहेत..0
0
Report
महाराष्ट्र में पेपरफुटी पर टास्क फोर्स से सवाल: क्या भर्ती प्रक्रियाएं निष्पक्ष रहेंगी?
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - संजय राऊत, नेता शिवसेना उद्धव ठाकरे सेना - इतकं मोठं सरकार आहे, महानगृहमंत्री आहेत, तरी पेपर फुटत आहेत, वारंवार फुटत आहेत. काल हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. टास्क फोर्स नेमण्याची का वेळ आली आहे? दहा वर्षांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे. तरीही मुलांच्या आयुष्यात पेपरफुटीसारखी प्रकरणे समोर येत आहेत. दुर्दैवाने सांगावं लागत आहे, NEET असो किंवा MPSC असो, इतर स्पर्धा परीक्षा असो, या सगळ्या पेपरफूटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत. UPSC प्रकरणात पुण्यात लोकांना पकडले आहे. हे सर्व लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. टास्क फोर्स काय करणार आहे? जिल्ह्या-जिल्ह्यात पोलीस यंत्रणा काय करत आहे? दुसरी यंत्रणा असेल तर काम वाढत आहे. कोणत्याही टास्क फोर्सशिवाय लोकसेवा आयोगाची सेटिंग भरती प्रक्रिया चालायची, तेव्हा मला असं वाटायचं. ऑन अयोध्या मंदिर अयोध्येत अशी वेळ आली आहे ki, प्रभू श्रीरामजींच्या मंदिरात दानपेटीच्या रांगा दिसत आहेत. भाजपच्या राज्यात दानपेटीची चोरी होत आहे, शाळा लुटल्या जात आहेत. एअर मार्शलला येऊन सीओ बनवला आहे. पहिले आमचा पुजारी सर्व काही बघत होता. एअर मार्शलला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी बसवले आहेत. राम मंदिरालासुद्धा सोडलं नाही, मग विद्यार्थ्यांना का सोडणार आहेत? DJ पश्चिम बंगाल दोन्ही सरकार राज्यात भाजपचे सरकार आहे. ममता बॅनर्जींचे सरकार तर नाही आहे ना? पश्चिम बंगालमध्ये आता म्हणता, बॅनर्जी हिंदूविरोधी आहेत. म्हटलं असतं. यामध्ये नागपुरात गाईडलाईन आली आहे. इथेही देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. कारण DJच्या आवाजाचा त्रास होतो. त्यापासून भूकंप येत आहे, त्याचा ब्रेनवर होतो, हार्टवर होतो, आजारी लोकांना त्रास होतो. त्या गोष्टीत सर्वसमावेशक गाईडलाईन सर्व देशांमध्ये हवी आणि त्याच्या पालन व्हायला हवे. गोवा भाजप बैठक एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज झाले पाहिजेत. ..त्यांच्या पार्टीचे कमांडर चीफ अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांची पार्टी नाही गट आहे. गोव्यामध्ये कधी, दिल्लीत कधी अमित शहा यांच्या पाठीमागे धावा लागतं आहे. भाजप शिंदे गट यांचे विचारधारा एक होऊ शकते मात्र बाळासाहेब ठाकरे विचारधारेत साम्य आहे मात्र आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत. MPSC लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. सर्वसमावेशक पद्धतीने प्रक्रिया आणि परीक्षा झाली पाहिजे. विश्व हिंदू परिषद गरबा समर्थन नितेश राणे तो नितेश राणे पागल माणूस आहे. पागल झालेला आहे. हे नवीन-नवीन मुल्ला बनते, जोरात मानतात हिंदुत्वाचे नवीन मूल्य आहेत या व्यक्तीचे. या व्यक्तीचे नाव घेतलं. त्याच व्यक्तीने RSSला हाफ चड्डीवाला म्हटलं होतं. वीर सावरकरांना माफीवीर म्हणणारा हाच व्यक्ती आहे. हिंदुत्व अशा पाठ लोकांना शिकवतील? देशाचे संस्कार माहिती नाहीत, संस्कृती माहिती नाही, हिंदुत्वाचे पाठ शिकवतील का? धंदे भडकावण्याचा प्रकारच्या बाते करतील. मंत्र्यांच्या माध्यमातून बोलायला पाहिजे. आपण आहेत कोण, त्यांनी सांगितलं पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण ज्या गोष्टी ठेवल्या आहेत, शंकर यासारखे यांचे मान्यता आहे का? आपल्या हिंदुत्व धर्माचे सर्व मोठे त्यांच्यासोबत गोष्ट करा. नागपुरातून मोहन भागवत यांच्यासोबत येऊन गोष्ट करा. न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांनी वेगळी गोष्ट म्हटली. आपण वेगळी गोष्ट करता. हा देश काय आहे, हिंदुत्व काय आहे? ऑन विशाखा राऊत एका नगरसेवक पदासाठी विशाखा राऊत पक्ष सोडतील असं नाही..नगरसेविका विशाखा राऊत या फक्त जुन्या जनतेच्या कळवळ्याच्या नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. सूडबुद्धीने आमच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले जात आहे. भाजपाच्या १७ नगरसेवकांच्या जात पडताळणी होत नाही. प्रमाणपत्रावर शिवसेना शिंद गटाचे सात-आठ जण जात पडताळणी होत नाही... जे विरोधात आहे त्यांची जात पडताळणी होते.. हमारे भी दिन आ जायेंगे तब देख लेंगे.. मनोज जरांगे यांची एकनाथ शिंदेंवर टीका एकनाथ शिंदे विश्वासपात्र नाहीत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते मनोज जरांगे कसे होणार भीषण संकट सोयाबीन, विदर्भ ‘विरोधक’ हा शब्द चुकीचा आहे. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. विदर्भात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातील, नागपूरचे आहेत. अनेक मंत्री विदर्भाचे कॅबिनेटमध्ये आहेत. अजूनपर्यंत दुष्काळाविषयी संवेदना व्यक्त केली असेल, असे ऐकले नाही. जो शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करतोय, त्याला दिलासा देणारे काही वक्तव्य, मदत किंवा काही जाहीर झालं का? सोयाबीनबाबत विशेषतः मुख्यमंत्री बोलत नाहीत. मंत्री गर्भावर बोलतात, मुसलमानांवर बोलतात, पाकिस्तानवर बोलतात, याच्यावर बोलतात. विदर्भातला शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर उभा आहे. दुष्काळामुळे त्याच्यावर एकही मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. नितेश राणे यांची राहुल गांधींवर टीका राहुल गांधींची तुलना कोणासोबत करता? याआधी राहुल गांधींचे बूट उचलणारे हेच लोक आहेत.0
0
Report
भंडारा में महायुति-शिंदे गट बनाम कांग्रेस के बीच तकरार तेज
Bhandara, Maharashtra:महायुति मध्ये भोंडेकराणवर अन्याय होत आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षात याव.. मुकुंद साखरकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष भंडारा भंडारा जिल्ह्यात महायुती शिवसेना शिंदे गट भाजपा यांचा वाद विकोपाला गेला आहे... यावर आता काँग्रेस कडून थेट शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना जाहीरपणे पक्षात येण्याचे आवाहन केलेले आहे. यावेळी साखरकर यांनी महायुतीचे आमदार धोंडेकर यांच्या विकास कामांची स्तुती करत त्यांच्यावर महायुती अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे सांगितले जाते आणि शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात काही छुपी युती तर नाही ना असाही आता प्रश्न निर्माण होत आहे.0
0
Report
Advertisement
