icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अंधेरी बोनी प्लाझा में भीषण आग: दुकाने जलकर खाक, नुकसान कैसे होगा स्पष्ट later

Mumbai, Maharashtra:मुंबईतील अंधेरी परिसरातील बोनी प्लाझा येथे आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. या आगीत प्लाझामधील अनेक दुकाने जळून खाक झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अनेक गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाचे जवान युद्धपातळीवर आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. स्थानिक नागरिकांनीही आग विझवण्यासाठी मदत केली. परिसरात मोठ्या प्रमाणात धूर पसरल्याने खबरदारीचा उपाय म्हणून आसपासचा परिसर सुरक्षित करण्यात आला आहे. सुदैवाने, आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती समोर आलेली नाही. मात्र, आगीमुळे अनेक दुकाने पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. आग लागण्यामागील नेमके कारण आणि नुकसानीचा तपशील आग पूर्णपणे आटोक्यात आल्यानंतरच स्पष्ट होणार असून, संबंधित यंत्रणांकडून पुढील तपास सुरू करण्यात आला आहे.
0
0
Report

दौंड में चौदा ग्रामदैवत पालखों का भक्तिमय स्वागत, लेझीम-ढोल के साथ वारी उत्साह

Rui, Maharashtra:आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर परतीच्या वारीत सहभागी झालेल्या दौंड तालुक्यातील चौदा ग्रामदैवतांच्या पालख्यांच्या दौंडमध्ये भक्तिमय वातावरणात स्वागत करण्यात आले. पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष तथा दौंड गावचे पाटील वीरधवल जगदाळे यांनी पालख्यांचे स्वागत करत वारकऱ्यांसोबत लेझीम खेळली, टाळ वाजवत विठ्ठलनामाच्या गजरात सहभाग घेतला. यावेळी विविध सामाजिक संघटना, राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि नागरिकांनीही पालख्यांचे उत्स्फूर्त स्वागत केले. ढोल-ताशे, टाळ-मृदुंग आणि लेझीमच्या गजरात दौंड शहर संपूर्णपणे भक्तिमय वातावरणाने भारावून गेले...
0
0
Report

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे का श्रेय Gen Z को? क्रेडिट स्टीलर बनाम नेताओं जंग

Mumbai, Maharashtra:शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंत विषय : धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्या चे श्रेय लाटण्याचा प्रयत्न. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामेचे श्रेय फक्त आणि फक्त देशातील Gen Z चे आहे. इतर कोणीही हे श्रेय लाटण्याचा प्रयत्न करू नये श्रेय लाटण्याचा जोरदार प्रयत्न लगेच सुरू झालेला आहे. त्यात आघाडीवर आहेत श्रीमान शरद पवार साहेब, राहुल गांधीजी, उद्धव ठाकरे जी, आणि राज ठाकरे जी हे सर्व "क्रेडिट खोर" म्हणजेच "क्रेडिट स्टीलर" Credit Stealer पुढे सरसावलेले आहेत. अशा क्रेडिटखोरांचा मी निषेध करतो.
0
0
Report
Advertisement

अमरावती में कांग्रेस ने कैंडल मार्च निकाला; नीट पेपर फटने के बाद 21 विद्यार्थियों को श्रद्धांजलि

Amravati, Maharashtra:अमरावतीत काँग्रेसने कॅन्डल मार्च काढला; नीट पेपर फुटी नंतर 21 विद्यार्थ्यांनी जीव गमावलेल्या विद्यार्थ्यांना श्रद्धांजली अँकर :- केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सर्वत्र जल्लोष होत असताना अमरावतीत काँग्रेसकडून कॅन्डल मार्च काढण्यात आला. शहरातील राजकमल चौकातून काँग्रेस पदाधिकारी हाती कॅन्डल घेऊन जयस्तंभ चौकात पोहचले. जयस्तंभ चौकातील महात्मा गांधी पुतळ्याला हारअर्पण करून नीट परीक्षा पेपर फुटीनंतर 21 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. या सर्व विद्यार्थांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी भीतीपोटी राजीनामा दिला अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे शहर अध्यक्ष बबलू शेखावत यांनी दिली
0
0
Report

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे से महाराष्ट्र पर नहीं होगा प्रभाव: विखे पाटील

Sangli, Maharashtra:स्लग - विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये राजकारण आणि समाज विघातक शक्ति घुसल्या- धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याचा महाराष्ट्रावर परिणाम होणार नाही - मंत्री राधाकृष्ण विखे पाटील. अँकर - दिल्लीतील विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये मूळ मागण्या बाजूला राहिल्या, त्यामध्ये राजकारण घुसलं, काही समाज विघातक शक्ति घुसल्या, अशी प्रतिक्रिया जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावर दिली आहे. तसेच धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनामाचा कोणताही परिणाम महाराष्ट्रामध्ये होणार नाही, असे देखील मंत्री विखे पाटील यांनी स्पष्ट केले आहे.घुसखोरी करून केंद्र सरकारला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जातोय, त्यामुळे अश्या प्रवृत्तीपासून सावधान राहिले पाहिजे, ते आपल्या आंदोलनात येणार नाहीत ,याचीही काळजी घेतली पाहिजे,अशा मतही मंत्री विखे-पाटील यांनी व्यक्त केली आहेत,ते सांगलीमध्ये बोलत होते. बाईट - राधाकृष्ण विखे-पाटील - जलसंपदा मंत्री. अँकर - संजय राऊत, हा भूतकाळात गेलेला विषय आहे, काय चर्चा करायची, असा टोला जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी लगावला आहे. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला गेले आहेत, यावरून संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांना शिक्षा मंत्री केला जाणार असल्याचे वक्तव्य संजय राऊतांनी केले आहे, यावर राधाकृष्ण विखे पाटील यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. बाईट - राधाकृष्ण विखे-पाटील - जलसंपदा मंत्री。
0
0
Report

नाशिक में भारी बारिश के बीच कोटमगांव विठ्ठल मंदिर पर विकास निधि की चर्चा

Yeola, Maharashtra:अल्निनो चक्रीवादळाचा प्रभाव असताना देखील नाशिक सह राज्यभरात चांगला पाऊस पडत आहे त्यामुळे विठ्ठलाने वारकऱ्यांसह शेतकऱ्यांवर देखील अशीच कृपादृष्टी ठेवावी अशी प्रार्थना नाशिकचे माजी खासदार समीर भुजबळ यांनी प्रति पंढरपूर असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी केली याप्रसंगी डॉक्टर शेफाली भुजबळ यादेखील उपस्थित होत्या आषाढी वारी निमित्त प्रति पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या कोटमगाव विठ्ठलाचे या ठिकाणी लाखो भाविक व वारकरी भेट देत असतात येवला तालुक्यातून सुमारे साडेचारशे डिंड्या या ठिकाणी दाखल होत असल्याने पंढरपुरासारखीच भक्ती या ठिकाणी पाहायला मिळते या ठिकाणी मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून या तीर्थस्थळाला विकास कामांसाठी निधी मिळाला असल्याची माहिती देखील माजी खासदार समीर भुजबळ यांनी दिली.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में नकली नक्सली धमकी पोस्टर से भय फैलाने वाले दो गिरफ्तार

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील नक्सल चळवळ संपुष्टात आली असून गडचिरोली पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही नक्षली शिल्लक नाही. गेल्या काळात गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने सातत्याने अभियान राबविण्यात येऊन “ऑपरेशन अंतिम प्रहार” च्या माध्यमातून विशेष शोध मोहीम राबवून गडचिरोली जिल्ह्यातील नक्षल्यांची दहशत संपुष्टात आणली आहे. मात्र 12 जुलै रोजी काही अज्ञात व्यक्तींकडून नक्षली असल्याचे भासवून नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने एटापल्ली परिसरातल्या पिपली- बुर्गी पोलीस ठाणे हद्दीत पत्रके व बॅनर लावण्यात आले होते. गडचिरोली पोलीस दलाने बारकाईने तपास करत दहशत निर्माण करणा­या दोन व्यक्तींचा शोध घेऊन त्यांना अटक केली आहे. पोस्टे पिपली बुर्गी पासून साधारण 5 किमी अंतरावर जिजावंडी टोलाकडे जाणा-­या रस्त्याच्या फाट्यापुर्वी डाव्या बाजुस असलेल्या गावाच्या दिशादर्शक फलकाला एक लाल रंगाचे कापडी बॅनर आणि कागदी पोस्टर आढळून आले होते. पोस्टर - बॅनरवर नागरिकांच्या मनात भीती निर्माण करण्याच्या उद्देशाने मजकुर लिहण्यात आला होता. पोलिसांनी 1) शिवा अनिल मिस्त्री वय 48 वर्ष, रा. तरुणनगर ता. पाखांजुर जि. कांकेर (छ.ग.) आणि 2) रोहीत रंज्जीत मल्लीक वय 25 वर्ष, रा. वटेली ता. एटापल्ली जि. गडचिरोली या दोघांना अटक केली असून इतर आरोपींचा शोध सुरु आहे.
0
0
Report

धर्मेंद्र प्रधान इस्तीफे के बाद अकोला के छात्रों ने लड्डू बांटकर मनाया, मांगें जारी

Akola, Maharashtra:Anchor : केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. अकोल्यातही विद्यार्थ्यांनी लाडू आणि पेढे वाटून जल्लोष साजरा केला. मात्र, हा लढा अद्याप संपलेला नसून इतर प्रलंबित मागण्यांसाठी अकोल्यात विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण कायम असल्याचे आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केले आहे. धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर अकोल्यातील आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांनी एकमेकांना लाडू व पेढे भरवून आनंद व्यक्त केला. 'नीट' पेपरफुटी प्रकरणासह विविध शैक्षणिक प्रश्नांवर विद्यार्थ्यांनी गेल्या अनेक दिवसांपासून आंदोलन सुरू ठेवले होते. या आंदोलनाला आता मोठे यश मिळाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. मात्र, केवळ केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनामा हा अंतिम विजय नसल्याचे सांगत अकोल्यात विद्यार्थ्यांनी इतर प्रलंबित मागण्या पूर्ण होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यक्त केला. अकोल्यात विद्यार्थ्यांचे साखळी उपोषण आजही सुरू असून, सरकारने विद्यार्थ्यांच्या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

छात्र आंदोलन की जीत पर अंजली दमानिया ने जताई उत्साह

Mumbai, Maharashtra:अंजली दमानिया शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, “या देशातील प्रत्येक युवक-युवतीचे आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, सोनम वांगचूक तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. हा विजय देशातील तरुणांच्या संघर्षाचा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, अनेकांना अटक करण्यात आली, विविध प्रकारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. मात्र, इतक्या अडचणी असूनही तरुणांनी हार मानली नाही. त्यांचा हा संयम, धैर्य आणि लोकशाहीवरील विश्वास देशासाठी प्रेरणादायी आहे.” दमानिया म्हणाल्या, “देशात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत निर्माण झाली आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून सत्तेला जाब विचारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या आंदोलनाने ती ताकद देशातील तरुणांना दिली आहे.” तसेच त्यांनी उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही मनापासून अभिनंदन करत, हा विजय लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगितले.
0
0
Report

धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे पर छात्र-युवाओं का विजय, वर्षा गायकवाड़ ने कहा

Mumbai, Maharashtra:वर्षा गायकवाड केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “इतिहासाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, जेव्हा-जेव्हा या देशातील युवकांनी देशाची धुरा आपल्या हातात घेतली, तेव्हा विजय हा युवकांचाच झाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरले. शांततामय आणि लोकशाही मार्गाने त्यांनी आपला आवाज बुलंद केला. या संघर्षामुळे आज युवकांचा विजय झाला असून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.” गायकवाड यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थी, युवक आणि आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन करत, “लोकशाहीत जनतेचा आवाज सर्वात मोठा असतो. संघटित लढा आणि सातत्यपूर्ण आंदोलनामुळे हा विजय मिळाला आहे,” असेही त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

नितेश राणे पत्रकार परिषद के मुद्दे पर केंद्र-राज्य राजनीति तेज़

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्देOn प्रधान राजीनामा ----- या पुढे कोणीही पेपर लीक करण्याची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचे कठोर व महत्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेत. तरुणांचा आवाज ऐकण्याचे काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेय. भावनांचा आदर करून मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलाय. याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानायला हवेत. आता जे जल्लोष करत आहेत. काँग्रेसने आपल्या काळात पेपर लीक झाल्यानंतर किती राजमाने घेतले. राहुल गांधी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी याच उत्तर द्याव. मनमोहन सिंग यांनी कधी स्पष्टीकरण दिलं का? मोदी साहेब वारंवार बोलत आहेत. मन की बात खऱ्या अर्थाने मोदी साहेब ओळखतात. On देवेंद्र फडणवीस मुंबई --- मुख्यमंत्री असल्याने ते दिल्लीला जातात. केंद्र आणि राज्य सरकार एकच विचारच आहे. On ठाकरे ( हुकुमशहा झुकला ) --- *वाघाची भाषा करणारे आता झुरळापर्यंत आलेत. खासदार निवडणून आले तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद आणि सर तन से जुदा म्हणणारे. आता भारत माता की जय वर आलेत. बेगानी शादी मे..... काय काय दिवाना त्यातला हा प्रकार आहे. लोकांच्या बारशात जाऊन पेढे खाणारे हे लोक. या सगळ्या बाबतीत तुमचं योगदान काय? तुम्ही नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत होता का स्वतःच्या दोन मुलांसाठी आंदोलन करत होता.* On अभिनंदन ( ठाकरे ) --- आता त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. निर्णय बदलायला भाग पाडलं. जे आंदोलन करत होते त्यात नीट चे किती विद्यार्थी होते ? त्यात सर तन से जुदा वाले पाकिस्तान जिंदाबाद वाले किती होते ? औरंगजेबाचे फोटो दाखवणारे किती होते ? कुणाल कामरा ज्याने आमच्या देवतांचा अपमान केला तो ठाकरेंच्या आंदोलनात होता. ह्यांना हिंदुत्वाचा विचार मानणारे आमचे बाळासाहेब ठाकरे आणि आता देवतांचा अपमान करणारे ठाकरेंच्या मोर्च्यात असतात. तर मग ह्यांना ह्यांना देवतांचा समर्थक बोलायचं की आयेशाच्या पतीचा समर्थक बोलायचं ? On शरद पवार -- लाठीचार्ज करण्याची वेळ का आली ह्याच उत्तर पोलिस चांगल्या पद्धतीने देऊ शकतात.20पी सोशल मीडिया अकाउंट पाकिस्तान वरून चालत असल्याचे आज पोलिसांच्या प्रेस मध्ये बघितले. देश विरोधी ताकद आमच्या तरुणाच्या खांद्यावर बसून देशात अराजकता आणन्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला हे विरोधी पक्षाची मंडळी समर्थन करणार का ? On गो मांस --- टेम्पो सीमा पार कसे करतात याबाबत चौकशी होणार.. बिर्याणी खाणारे कोण आहेत त्याच्यावर आमचा बारीक लक्ष आहे. मी पालकमंत्री आहे त्यामुळे काही लोकांनी बिर्याणी सोडावी. एवढ भारी पडेल की गळ्यातली हड्डी बाहेर येणार नाही.
0
0
Report

युवाओं के आंदोलन की जीत: संसद में भ्रष्टाचार पर बहस और पेपर लीक का मुद्दा

Mumbai, Maharashtra:अहंकाराची हार झालेली आहे आणि सत्ता संविधान आणि विद्वानांची झालेली असून मला या तिन्ही सत्ता प्रथम दशमी बोलू इच्छिते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेद्र प्रधान ही झाकी आहे. अजून खूप गोष्टी बाकी आहे. जोपर्यंत या नीट पेपर मध्ये सगळे भ्रष्टाचारी लोक ज्या गजाआड तुरूंगात जाणार नाहीत तो पर्यंत ही लढाई सातत्याने लढण्याचा आमचा जो आहे तो मानस आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. या आंदोलनामध्ये ज्या ज्या मुलांवर केसेस झाल्या तो भारत सरकारने एक निर्णय घेऊन पूर्ण देशभरातल्या युवकांवर घेतलेल्या आंदोलनातील केसेस रद्द कराव्यात. दुर्दैवाने ज्यांच्या ज्यांच्या मध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला त्याठिकाणी कन्सेशन देण्याचं काम करावं आणि हा पेपर जवळपास आज बारा वर्षांमध्ये एकशे बावन्न पेपर लीक झालेत. या सिस्टम ला बदलण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार? या संदर्भामध्ये आम्ही पार्लमेंट मध्ये बोलू. पण ही लढाई सुरू केलेल्या युवांनी ही जी लढाई ज्या ज्या वेळेला आपण बघितलं की देशाच्या इतिहासामध्ये युवा ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी युवा जिंकण्याचं काम केलं होतं. त्यामुळे ही लढाई युवकांनी जिंकली. ही लढाई देशातल्या संसद मध्ये सातत्याने जिंकली आणि देशाच्या पंतप्रधानाच्या घरात जाऊन पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं कि तुम्हाला जनतेचं म्हणणं ऐकावं लागेल. स्वतःच्या मनाची गोष्ट सांगू नका. लोकांना मुलांना काय त्रास होतोय या देशाचं भविष्य आणि संपत्तीशी खेळू नका.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top