Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.

Aug 29, 2024 18:30:56
Yavatmal, Maharashtra

यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:16:28
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:16:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या वेरूळमधील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर महादेव मंदिर मंगळवारी खग्रास चंद्रग्रहणामुळे दुपारी तीनपासून सायंकाळी सातपर्यंत दर्शनासाठी बंद राहील. ग्रहणाच्या कालखंडात मंदिराचे दरवाजे बंद ठेवण्याची परंपरा असल्याने मंदिर प्रशासनाने दर्शनाचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यामुळे दुपारी ३:०० ते ७:०० या वेळेत भाविकांना गाभाऱ्यात प्रवेश किंवा दर्शन घेता येणार नाही. दरम्यान, ग्रहण सुटल्यानंतर सायंकाळी ६:४७ ते ७:०० वाजेपर्यंत मंदिराची स्वच्छता व विशेष शुद्धीकरण पूजा केली जाईल असे मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. त्यानंतर मंदिर भाविकांसाठी खुले असेल...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 02, 2026 02:15:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाथ मंदिर परिसर में सांडपाण्य समस्या अब हल की गयी है। अनेकों वर्षों सेनाथ मंदिर परिसर के छह नालों का सांडपाणी सीधे गोदावरी नदी पात्र में मिल रहा था। नाथषष्ठी, एकादशी जैसे पवित्र अवसरों पर स्नान करने वाले भक्तों को सांडपाणी मिश्रित पानी में स्नान करना पड़ रहा था। अब नई योजना के अनुसार दो क्रमांक और एक क्रमांक के नालों के पानी को एकत्र वेतवेल में किया गया है और पंप से उठाकर गणेश घाट के पार छोड़ा जा रहा है। तीन, चार, पाँच और छह क्रमांक के नालों के पानी को भी एकत्र कर घाट से दूर छोड़ा गया है। घाट क्षेत्र साफ हो गया है और अब गोदावरी पात्र में एक भी बूंद सांडपाणी मिल नहीं पाएगी, ऐसी आशा व्यक्त की जा रही है।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:16:08
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:15:49
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:राज्यस्तरीय शरीर सौष्ठ स्पर्धेत अजिंक्य रेडेकर ठरला महाराष्ट्र श्री किताबाचा मानकरी. सांगलीमध्ये पार पडलेल्या राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धेत कोल्हापूरच्या अजिंक्य रेडेकरने महाराष्ट्र श्री किताब पटकावला आहे. तरुण भारत व्यायाम मंडळाच्या वतीने सांगलीमध्ये राज्यस्तरीय शरीर सौष्ठव स्पर्धांचा आयोजन करण्यात आलं होतं ज्यामध्ये राज्यातील जवळपास दीडशेहून अधिक शरीर सौष्ठव पट्टूनी सहभाग घेतला होता,या स्पर्धेच्या निमित्ताने पालकमंत्री चंद्रकांत पाटील भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपस्थिती लावली होती. काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांच्या हस्ते विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आलं.या स्पर्धेच्या निमित्ताने महिलांच्या देखील शरीर सौष्ठव स्पर्धा पार पडल्या.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 02, 2026 01:15:30
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 15:45:20
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - दुबईत घडत असलेल्या घडामोडी बद्दल भारतीय तरुणाने दिली सविस्तर माहिती - इराण, इजराइल, अमेरिका यांच्यात सुरू झालेल्या युद्धामुळे अनेक भारतीय परदेशात अडकल्याने व्यक्त होतेय चिंता - दुबईमध्ये जॉबसाठी गेलेल्या भारतीयांची आहे मोठ्या प्रमाणात संख्या - सध्या दुबईच्या मध्ये हल्ले होत असल्याबाबत अनेक माहिती समोर येत असताना मूळचे भारतीय मात्र सध्या दुबईमध्ये स्थायिक असलेल्याने तरुणाने दिली सविस्तर माहिती - अनेक भारतीय युद्ध सुरू असलेल्या देशांमध्ये अडकल्याने व्यक्त करण्यात येतेय चिंता तानाजी गोरड ( मूळचे - सोलापूर जिल्हा मंगळवेढ़ा ) ( सध्या वास्तव्य - दुबई )
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 01, 2026 15:34:20
Nagpur, Maharashtra:राज्य अल्पसंख्याक आयोगाने सर्वांना सुरक्षित पुन्हा आणण्यासाठी सुरू केली मोहीम. राज्यातील किमान 50 हजार ( कदाचित हा आकडा लाखापर्यंतही पोहोचेल) मुस्लिम बांधव सौदी अरब मध्ये अडकल्याची भीती राज्य अल्पसंख्याक आयोगाने व्यक्त केली आहे... "उमरा" या धार्मिक विधीसाठी या काळात (रमजानच्या काळात) मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव मक्का मदीनाला जात असतात... उमरा साठी जाणारे यात्री कोणताही रजिस्ट्रेशन सरकारकडे करून जात नाहीत, तर ते खाजगी टूर अँड ट्रॅव्हल्स ऑपरेटर्सच्या माध्यमातून सौदी अरब ला जात असतात.. त्यामुळे त्यांच्या कुठलाही निश्चित आकडा सध्या सरकारकडे नसला, तरी या वर्षी राज्यातील 500 पेक्षा जास्त टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी सौदी अरब ला पाठवले असल्याचे लक्षात आले आहे.. त्यामुळे सौदी अरब मध्ये गेलेल्या मुस्लिम बांधवांची संख्या 50,000 पेक्षा जास्त असेल असं मत राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी व्यक्त केला आहे.. अल्पसंख्याक आयोगाने सर्व टूर ऑपरेटर ची संपर्क साधने सुरू केले असून उद्यापर्यंत सौदी अरब मध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील मुस्लिम बांधवांची संख्या स्पष्ट होईल असे प्यारे खान म्हणाले... यासंदर्भात आम्ही राज्य सरकारच्या संपर्कात आहोत, सरकारने सर्वांना सुरक्षित आणण्यासाठी मदत करावी अशी अपेक्षा ही त्यांनी व्यक्त केली.. * महाराष्ट्रातील प्रत्येक गाव, शहर, जिल्हा महानगरातून उमरासाठी मुस्लिम बांधव जातात... * हजमध्ये जाणाऱ्या यात्रेची सरकारकडे नोंदणी होते. मात्र उमरासाठी जाणाऱ्यांची कुठलीही नोंद सरकारकडे नसते. त्यामुळे आकडा निश्चितपणे सांगता येत नाही.. * राज्यातील सुमारे 500 टूर ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उंबरासाठी सौदी अरबला पाठवले आहे.. * मुंबईतून सर्वाधिक 100 ऑपरेटर्सनी मुस्लिम बांधवांना उमरासाठी पाठवले आहे.. * तिथे अडकलेल्या मदत करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर काम करण्याची गरज आहे.. भारतीय दूतावास त्यासाठी काम करत आहे.. * उमरासाठी मोठ्या संख्येने गरीब मुस्लिमही जातात.. त्यांचा युद्धजन्य परिस्थितीमुळे सौदी अरब मधील थांबणं वाढलं, तर त्यांच्याकडे पैशाची अडचण निर्माण होऊ शकते.. * त्यामुळे सरकारने या प्रकरणी मदत करावी अशी अपेक्षा आहे... आम्ही यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत संपर्क साधणार आहोत..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 15:34:02
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 01, 2026 15:02:06
Kolhapur, Maharashtra:एक लाख युवकांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेण्याचे ध्येय ठेवले असल्याचे भाजपाचे नूतन युवामोर्चा प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी म्हटलय. भाजपच्या युवा मोर्चा प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाल्यानंतर आज कोल्हापुरात कृष्णराज महाडिक यांचे जंगी स्वागत करण्यात आले. कोल्हापूरच्या ताराराणी चौक ते शिवाजी चौक या दरम्यान मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणुकीमध्ये भाजपाचे राज्यसभा खासदार आणि कृष्णाराज महाडिक यांचे वडील धनंजय महाडिक आणि भाजपचे पदाधिकारी हे देखील सहभागी झाले होते. यावेळी हजारो तरुण मोटरसायकल घेऊन या रॅलीमध्ये सहभागी झाले. भाजप पक्षाने खूप मोठी जबाबदारी दिली आहे. राज्यभरातील नेत्यांकडून शुभेच्छा दिल्या जात आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब यांचे आभार मानतो. भाजपमधील सर्व वरिष्ठ नेत्यांचा विश्वास सार्थ ठरवून पक्ष वाढीसाठी काम केलं जाणार आहे असंही कृष्णराज महाडिक यांनी बोलून दाखवलं आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 14:16:37
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या बाजारपेठांमध्ये होळी आणि रंगपंचमी निमित्त नागरिकांची खरेदीची लगबग ANC- होळी आणि रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर कल्याण शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकातील बाजारपेठे ग्राहकांनी फुलून गेल्या आहेत. धुलिवंदन आणि रंगपंचमीसाठी लागणारे साहित्य खरेदी करण्यासाठी नागरिक मोठ्या संख्येने बाजारात दाखल झाले आहेत. होळी सणासाठी लागणारे एम गौऱ्या, पेंढा तसेच पूजा साहित्य खरेदीसाठी नागरिकांची विशेष गर्दी पाहायला मिळत आहे. तर रंगपंचमीसाठी लहान मुलांमध्ये पिचकारी, रंगीबेरंगी बंदुका आणि विविध प्रकारचे रंग घेण्याचा उत्साह दिसून येत आहे. कल्याणमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील बाजारपेठेत दिवसभर ग्राहकांची वर्दळ कायम होती. आज रविवारची सुट्टी असल्याने खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची संख्या आणखी वाढल्याचे चित्र दिसून आले. लहान मुलांसोबत त्यांचे पालकही खरेदीसाठी मोठ्या उत्साहात बाजारात फिरताना दिसत होते. विविध रंगांच्या पिचकार्‍या, हर्बल रंग आणि आकर्षक खेळण्यांच्या स्टॉल्सना विशेष प्रतिसाद मिळत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 01, 2026 13:46:47
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील गोविंदवाडी येथील बिस्मिल्ला मशीद परिसरात सांडपाण्याचे साम्राज्य पसरले आहे. घाण पाण्याचा निचरा होत नसल्याने दुर्गंधीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर धोका निर्माण झाला आहे. गेल्या आठवड्यात महापौरांनी परिसराचा दौरा करून पाण्याचा निचरा करण्याबाबत निर्देश दिले होते; परंतु अधिकाऱ्यांनी महापौरांच्या आदेशांकडे दुर्लक्ष केलं असल्याचा आरोप नगरसेविका समीना शेख यांनी केला. गोविंदवाडी परिसरात मोठ्या प्रमाणात तबेले आहेत, त्या तबेल्यातून निघणाऱ्या दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे परिसरात साचत आहे. रमजान महिना असल्यामुळे रोज पाच वेळा नमाज पठणासाठी नागरिक येथे येतात परंतु घाण पाण्यामुळे त्रास होतो. पूर्वरात महापौरांच्या पाहणीनंतर तात्काळ उपाययोजनांची सूचना दिली गेली होती, परंतु त्याचे पालन न झाल्याचा दावा नगरसेविका समीना शेख यांनी केला.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top