445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के बागलाण में अवैध गैस सिलेंडर की तस्करी पकड़ी: पुलिस ने 5.92 लाख का माल जप्त किया
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बागलाण मध्ये अवैध गॅस सिलेंडरची वाहतूक... - पोलिसांकडून वाहनासह विविध कंपनीचे गॅस सिलेंडर जप्त... नाशिकच्या बागलाण तालुक्यातील ताहाराबाद–अंतापूर चौफुली परिसरात जायखेडा पोलिसांनी धडक कारवाई करत अवैधरीत्या व्यावसायिक गॅस सिलिंडरची वाहतूक करणाऱ्या वाहनाचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पिकअप वाहनासह विविध कंपन्यांचे रिफिल केलेले गॅस सिलिंडर असा एकूण 5 लाख 92 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून एका संशयिताविरुद्ध अत्यावश्यक वस्तू अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामध्ये भारत गॅस, एचपी गॅस आणि इंडेन कंपनीचे रिफिल केलेले व्यावसायिक गॅस सिलिंडर आढळून आले. वाहन चालक अन्वर खान अहमद खान (वय 35, रा. वडाळागाव, नाशिक) याच्याकडे या गॅस सिलिंडरच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेला कोणताही वैध परवाना किंवा अधिकृत कागदपत्रे नसल्याचे उघड झाले. या कारवाईमुळे परिसरात अवैध गॅस साठा व वाहतूक करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली असून, अत्यावश्यक वस्तूंच्या काळाबाजार आणि बेकायदेशीर वाहतुकीविरोधात प्रशासनाने कठोर भूमिका घेतल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.0
0
Report
छत्रपती संभाजीनगर के ऐतिहासिक वटवृक्ष का टूटना; सुफी परंपरा को बड़ा आघात
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराच्या ६०० वर्षांच्या इतिहासाचा आणि सुफी परंपरेचा साक्षीदार असलेला पाणचक्कीतील ऐतिहासिक वटवृक्ष मंगळवारी कोसळला. हा केवळ वृक्ष नसून सुमारे सहा शतकांपूर्वी सुफी संत बाबा शहा मुसाफीर यांनी शहरात आल्यावर याच झाडाखाली पहिला विसावा घेतला होता. पुढे हे ठिकाण सुफी विचारांच्या प्रसाराचे मुख्य केंद्र बनले. औरंगजेबाने दिलेल्या मोठ्या निधीतून या परिसराचा विस्तार झाला आणि भाविकांच्या सोयीसाठी येथे एका प्रशस्त धर्मशाळेची निर्मिती करण्यात आली. हा वृक्ष शहराच्या आध्यात्मिक परंपरेचा मूक साक्षीदार होता, हा वृक्ष कोसळल्याने हळहळ व्यक्त होतेय...0
0
Report
मोहन भागवत का संघ-कार्यकर्ता विकास वर्ग-२ समापन नागपुर मैदान पर
Nagpur, Maharashtra:नागपूर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ‘कार्यकर्ता विकास वर्ग-२’चा समारोप आज रेशीमबाग मैदानावर असणार - सरसंघचालक मोहन भागवत स्वयंसेवकांना मार्गदर्शन करणार असून त्यांच्या भाषणाकडे देशभरातील स्वयंसेवकांचे लक्ष लागले आहे. - संघाच्या शताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणाऱ्या ‘पंचपरिवर्तन’ उपक्रमाचा उल्लेख भाषणात होण्याची शक्यता आहे. - जागतिक युद्धजन्य परिस्थिती, महागाई, युवकांशी संबंधित प्रश्न आणि सामाजिक विषयांवरही भागवत भाष्य करू शकतात. - ११ मे पासून सुरू असलेल्या या २५ दिवसीय प्रशिक्षण वर्गात देशभरातील ८८० स्वयंसेवक सहभागी. - उद्योगपती कुमारमंगलम बिर्ला प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.0
0
Report
Advertisement
मीठा नमक ज्यादा बताने पर रिक्षाचालक पर तवा और पत्थर से हमला, वीडियो वायरल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पोह्यात मीठ जास्त झाल्याचे सांगितल्याच्या कारणावरून एका रिक्षाचालकावर तवा आणि दगडाने हल्ला करण्यात आला. छत्रपती संभाजी नगरातील सिडको परिसरात ही घटना घडली. आरोपींचीच पोह्यांची गाडी असून ग्राहकाने मीठ जास्त असल्याचे सांगितल्याच्या रागातून त्यांनी ही मारहाणी केली. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी सराईत गुन्हेगार असलेल्या मुख्य आरोपीला अटक केली असून, एका अल्पवयीन आरोपीची रवानगी बालसुधारगृहात केली आहे.0
0
Report
बाजोरिया पिता-पुत्र ने निर्वाचन अधिकारी के साथ धक्का-मुक्की में व्हिडीओ वायरल, मामला दर्ज
Amravati, Maharashtra:गोपीकिशन बाजोरिया यांचा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सोबत चा वाद घालताना चा व्हिडीओ अखेर समोर; निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना केली शिवीगाळ अँकर :- महायुतीचे बंडखोर उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर माजी आमदार विप्लव बाजोरिया, व माजी आमदार गोपिकिशन बाजोरिया यांनी निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या सोबत वाद घालत मोठ्या प्रमात शिवीगाळ केल्याचे बोलले जात होते त्यानंतर हा वादाचा व्हिडिओ अखेर समोर आला आहे. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयात बाजोरिया पिता पुत्रांनी मोठ्या प्रमाणात घातला वाद घातल्याचे या व्हिडिओत पाहायला मिळत आहे. त्यामुळे बाजोरिया पिता पुत्रावर अमरावतीच्या गाडगेनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शासकीय कामात अडथळा आणल्याचा आरोप बाजोरिया यांच्यावर करण्यात आला असून परवा जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन बाजोरिया पिता पुत्रांनी हा गोंधळ घातला होता.0
0
Report
वाशीम में अवैध शराब के खिलाफ 78 ठिकानों पर कार्रवाई, 18 लाख रुपये माल जब्त
Washim, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील विषारी दारू प्रकरणानंतर राज्यभरात अवैध दारूविरोधात मोहीम तीव्र करण्यात आली आहे.त्याच पार्श्वभूमीवर वाशिम जिल्हा पोलिसांनी गावठी हातभट्टी दारू निर्मिती व विक्री करणाऱ्यांविरोधात धडक कारवाई करत अवघ्या पाच दिवसांत ७८ ठिकाणी छापे टाकले आहेत.या कारवायांमध्ये देशी, विदेशी तसेच गावठी हातभट्टी दारूसह सुमारे १८ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.पोलिसांच्या या मोहिमेमुळे अवैध दारू व्यवसाय करणाऱ्यांवमध्ये खळबळ उडाली असून, पुढील काळातही अशाच प्रकारच्या कारवाया सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
Advertisement
मालेगाव पोलिसांचा नया एक्शन प्लान: व्हॉट्सअपवर तक्रार करा, आरोपींचे प्रोफाइल तयार
Nashik, Maharashtra:गुन्हेगारी रोखण्यासाठी मालेगाव पोलिसांचा ॲक्शन प्लॅन. 7588931112 या व्हॉट्सअप नंबरवर नागरिकांना तक्रारी करण्याचे आवाहन; माहिती देणाऱ्याची ओळख व नंबर राहणार गोपनीय. मालेगाव शहरातील तरुण पिढी नशेच्या आहारी जाण्याचे वाढते प्रमाण आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलिसांनी चांगलीच कंबर कसली. नशामुक्तीसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार. NDPS कायद्यांतर्गत दाखल गुन्ह्यातील आरोपींवर लक्ष ठेवण्यासाठी होणार आरोपींची मॅपिंग. अवैध धंदे आणि नशेच्या पदार्थांची विक्री रोखण्यासाठी या नंबरचा उपयोग होणार. कोणीही नागरिक व्हॉट्सअपवर मेसेज करून माहिती देऊ शकणार. वारंवार गुन्हे करणाऱ्या आरोपींना रोखण्यासाठी ‘अॅक्युज मॉडेल’ सुरू करणार. आरोपींची सर्व माहिती मॅपिंग करून त्याचे प्रोफाइल तयार करण्यात येणार. मालेगाव पोलिसांच्या या आगळ्यावेगळ्या प्लॅनचे शहरभर कौतुक.0
0
Report
सोलापूर में मौलाना उमर राजवी नाबालिग से दुष्कर्म के आरोप में हिरासत में भेजा गया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विनयभंग करणाऱ्या मौलानाची न्यायालयीन कोठडीत रवानगी - मदरशामध्ये धार्मिक शिक्षण घेण्यासाठी येणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर मौलानाने केला होता विनयभंग - मौलाना उमर रजवी याची पोलीस चौकशी पूर्ण झाल्यानंतर न्यायालयीन कोठडीत रवानगी - मौलानाने आपला गुन्हा कबूल केल्याने पोलिसांचा तपास जवळपास पूर्ण - मौलानाने मदरशामध्येच असे कृत्य केल्याने सोलापूर जिल्ह्यात होती संतापाची लाट - मौलानावर कठोर कारवाई करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे0
0
Report
पैठण के इंदिरा नगर में किरकिरा विवाद के चलते 17 वर्षीय अनमोल आहिरे की चाकू से हत्या
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पैठण शहरातील इंदिरानगर भागात किरकोळ वादातून १७ वर्षीय अनमोल आहिरे या मुलाचा त्याच्या आई वडिलांच्या समोरच चाकूने भोसकून निघृण हत्या करण्यात आली या घटनेने पैठण शहर हादरले. या प्रकरणी शिंदेसेनेचे नगरसेवक तथा पालिकेतील गटनेते ईश्वर दगडे, विकास पवार आणि एका अल्पवयीनविरुद्ध हत्येसह अॅट्रॉसिटी कायद्यान्वये बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी दोघांना अटक केली असून नगरसेवक ईश्वर दगडे अद्याप फरार आहे. याबाबत हत्येचा सीसीटीव्ही सुद्धा आता पुढे आला आहे तर मृतांच्या नातेवाईकांनी रात्री पोलीस ठिय्या आंदोलन सुद्धा केले...0
0
Report
Advertisement
वाशीम में मान्सूनपूर्व बारिश से गर्मी कम, किसानों को मिली राहत
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील विविध भागांत मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावल्यामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मालेगाव, मंगरूळपीर, कारंजा आणि वाशिम तालुक्यात रात्री वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला. काही ठिकाणी वीजपुरवठा खंडित झाला होता त्यामुळे नागरिकांना रात्र अंधारात काढावी लागली. या पावसामुळे खरीपपूर्व शेती मशागतीच्या कामांना गती मिळणार आहे.0
0
Report
नाशिक धर्मांतरण केस: निदा खान के साथ एमआईएम पार्षद मातीन पटेल पर आरोप
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खान ला छत्रपती संभाजी नगर मधून अटक झाली त्यात एमआयएम नगरसेवक मतीन पटेल याने तिला आसरा दिला होता त्यालाही आरोपी करण्यात आले आहे तर चार्जशीट मध्ये मातीन याने इम्तियाज जलील यांचे नाव घेतल्याने जलील यांचेही नाव आले असल्याच्या चर्चा होत्या न्यानंतर आतापर्यंत गायब असलेल्या मातीन ने आपली प्रतिक्रिया दिलीय, या प्रकरणात इम्तियाज जलील यांचा काहीही संबंध नाही असे सांगत पालकमंत्र्यांना जलील यांच्यावर विशेष प्रेम आहे म्हणून ते सारख सारख नाव घेतात, निदा खान ही इम्तियाज जलील यांचे नातेवाईक नाहीृ, जो कुणी सांगतोय ते खोट बोलतोय असे ही मातीन म्हणाला तर निदा खान वास्तव्याला होत्या तेंव्हा इम्तियाज जलील यांचा फोनच झाला नाही, माझ्या फोन मध्ये रेकॉर्डींग्स आहेत, इम्तियाज जलील यांचा काही संबंध नाही असे मातीन म्हणाला, मी पोलिसांना म्हणालो की मला इम्तियाज जलील यांना कॉल करू द्या त्यावेळी इम्तियाज जलील यांना काहीही माहिती नव्हती, इम्तियाज जलील हे माझे नेता आहेत, मला काहीही अडचण आली तर मी जलील यांना फोन करतो म्हणूज केला असल्याचा खुलासा मातीन यांनी केला आहे0
0
Report
नागपुर विधान परिषद चुनाव: राजीव पोतदार बनाम अतुल लोंढे के बीच मुकाबला
Nagpur, Maharashtra:नागपूर विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्यासाठी आज अखेरचा दिवस आहे. नागपुरात पाच उमेदवारांनी नामनिर्णयपत्र दाखल केलेय. भाजपाकडून डॉ राजीव पोतदार तर काँग्रेसकडून अतुल लोंढे यांच्यात प्रमुख लढत असणार आहे. याशिवाय काँग्रेसचे दिनेश ढोले आज अर्ज मागे घेण्याची शक्यता आहे. याशिवाय अपक्ष राजेश जंगले, सुरेंद्र लोही यांनी अर्ज दाखल केला आहे0
0
Report
Advertisement
16 करोड़ रुपये बकाया: ऊस ट्रैक्टर मालिकाओं ने फलटण-कोल्हापूर में आंदोलन की चेतावनी दी
Satara, Maharashtra:सातारा - फलटण येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांचे सुमारे 16 कोटी रुपये थकीत असल्याचा आरोप ऊस वाहतूकदार संघटनेने केला आहे.वारंवार मागणी करूनही कारखाना प्रशासनाकडून दखल घेतली जात नसल्याने वाहतूकदारांमध्ये तीव्र नाराजी आहे. श्रीराम सहकारी साखर कारखाना आणि कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील जवahar साखर कारखाना यांच्यातील भाडेतत्त्वावरील करार संपुष्टात येण्याच्या मार्गावर असल्याने थकीत रकमेची जबाबदारी कोण घेणार, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे. थकीत रक्कम तातडीने अदा न केल्यास शनिवारपर्यंत फलटण आणि कोल्हापूर येथे तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा ऊस वाहतूकदार संघटनेने दिला आहे. सरकारने आमच्या कष्टाच्या घामाचे पैसे मिळवून द्यावेत, अशी मागणीही वाहतूकदारांनी केली आहे.0
0
Report
जालना मर्चेंट बैंक घोटाला: 54 करोड़ से अधिक ऋण घोटाला, 8 करोड़ संपत्ति फ्रीज़
Jalna, Maharashtra:जालना : मर्चंट बँक प्रकरणात ८ कोटींची संपत्ती गोठवली; ५ संचालकांना अटक होणार बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून बँक कर्ज अपहरण जालना मर्चंट बँकेतील ५३ कोटी रुपयांच्या अपहार प्रकरणात कारवाईचा फास घट्ट होत आहे. १७७ बनावट खात्यांच्या माध्यमातून झालेल्या या घोटाळ्यात १२ आरोपींना अटक करण्यात आली आहे. परंतु, मुख्य आरोपी अर्थात बँकेचा अध्यक्ष गोपाल अग्रवाल अद्याप फरार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणात एमपीआयडी प्रस्ताव केला. यानुसार आरोपींच्या मालमत्ता गोठवल्या जात आहेत. पोलिसांचा तपास खोलवर गेला असून आणखी पाच संचालकही आरोपी होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्यावर अटकेची टांगती तलवार आहे. दरम्यान, मुख्य आरोपी असलेल्या रायचंद कुरंगळ, नीलेश्वर भोसले या दोघांची ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली आहे. जालना आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने एमपीआयडी प्रस्ताव केला आहे. या बँकेत वेअर हाऊसच्या नावे १७७ बनावट खातेदार दाखवून तब्बल ५४ कोटीपेक्षा जास्त रुपयांचा बँक कर्ज घोटाळा झाल्याचे उघडकीस आले आहे. धक्कादायक बाब म्हणजे या प्रकरणात फिर्याद देणारेच बँकेचे महाव्यवस्थापकच आरोपी निघाले आहेत. या प्रकरणात पोलिसांनी 'एमपीआयडी' कायदा लावल्यामुळे आरोपींना पळवाट मिळणे कठीण आहे. यात त्यांना ३ ते ५ वर्षे अतिरिक्त कैद होऊ शकते. या कायद्यानुसार ठेवीदारांची फसवणूक केल्याबद्दल स्वतंत्र शिक्षेची तरतूद आहे. तसेच जशी आता ८ कोटींची संपत्ती गोठवण्यात आली, तशीच सर्व आरोपींची स्थावर-जंगम मालमत्ता जप्त केली जाईल. कोर्टाच्या आदेशाने या मालमत्तेचा लिलाव करून बँकेच्या खातेदारांचे पैसे परत केले जातील.0
0
Report
शिरूर में पेयजल संकट गहराने से गन्ने की फसलें बर्बाद, किसान परेशान
Shirur, Maharashtra:वाढत्या तापमानामुळे पाणीटंचाईचं संकट अधिकच गडद झाले असून या वाढत्या उन्हाचा आणि दुष्काळाचा मोठा फटका शेती पिकांना बसतोय. पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यात पाण्याच्या टंचाईमुळे ऊसाचं पीक डोळ्यादेखत जळून खाक झालं आहे. वेळेवर कालव्याव्दारे वेळेवर पाणी न मिळाल्याने विहिरींनी तळ गाठला असून पाण्याअभावी पिके करपून गेलीय. यामुळे बळीराजा पुरता हवालदिल झाला आहे. हेमंत चापुडे यांनी याचाच आढावा घेतला.0
0
Report
Advertisement
