445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर विधान परिषद चुनाव: तीन NCP विधायक भाजपा प्रदेशाध्यक्ष से मिले, शिंदे बोले चार दिन बचे
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या तीन आमदारांनी भाजप प्रदेशाध्यक्षांची भेट घेतलेली आहे यावर पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिला असून पक्षातल्या ज्या काही बाबी असेल ती पक्षापुढे मांडणे योग्य आहे मतदानाला अजून चार दिवस आहे तोपर्यंत हे आमदार पक्ष सोबत राहतील असा त्यांनी आशावाद व्यक्त केला असून निवडणूक झाल्यानंतर पक्षाची बैठक होईल यानंतर काय कारवाई करायची याबाबतचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी दिली0
0
Report
वाशिम में दुपहर के बाद आंधी-तूफानी बारिश से किसान खुश
Washim, Maharashtra:वाशिम जिलेतील रिसोड तालुक्यातील केशवनगर परिसरात आज दुपारनंतर हवामानात अचानक बदल होत वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. सकाळपासून कडक उन्हाचा टडाखा जाणवत असताना दुपारनंतर आकाशात ढग दाटून आले आणि काही वेळातच जोरदार पावसाला सुरुवात झाली. या पावसामुळे परिसरातील वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून दिलासा मिळाला आहे. यंदाच्या हंगामातील पहिल्याच जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर या पावसामुळे जमिनीत ओलावा निर्माण होण्यास मदत होणार असून आगामी पेरणीसाठीही हा पाऊस लाभदायक ठरणार आहे.0
0
Report
विधान परिषद चुनाव: उद्धव ठाकरे के आदेश से नागेश पाटील आष्टीकर नांदेड में रुके
Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत माझा मुलगा उभा असल्याने नांदेडमध्ये असल्याचा खुलासा खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केलाय. उद्धव ठाकरे यांच्याशी व्हिडीओ कॉलवर बोलणे झाले आहे. उद्धव ठाकरे यांच्या आदेशानेच नांदेड ला थांबलो असल्याचे स्पष्टीकरण नागेश पाटील यांनी दिले. मला यायला सांगितले तर निश्चित मुंबईला येणार असल्याचे उद्धव ठाकरे यांना सांगितले. पण त्यांनीच मला नांदेडमध्ये थांबायला सांगितले असे आष्टीकर म्हणाले. ऑपरेशन टायगर वगैरे काही नाही असेही आष्टीकर म्हणाले.0
0
Report
Advertisement
मराठवाड़ा में ट्रैक्टर मार्च, उद्धव ठाकरे की शिवसेना ने कर्ज माफी पर सरकार को घेरा
Hingoli, Maharashtra:येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर, हिंगोलीमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे' शिवसेनेची महत्त्वाची आढावा बैठक पार पडली. उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांच्या प्रमुख उपस्थितीत ही बैठक संपन्न झाली.यावेळी अंबादास दानवे आणि सरकारने कर्जमाफीत शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा आरोप केला आहे सरकारने फसवी कर्जमाफी केल्याच्या विरोधात मराठवाड्यातील संपूर्ण जिल्ह्यांमध्ये 16 जून ला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीने ट्रॅक्टर मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक जिल्ह्यामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी तहसील कार्यालयावर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचा ट्रॅक्टर मोर्चा धडकणार आहे कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या नको अटी शर्ती आम्हाला पाहिजे संपूर्ण कर्जमाफी या स्लोगन खाली मराठवाड्यामध्ये सरकार विरोधात ट्रॅक्टर मोर्चा निघणार असल्याची माहिती उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांनी हिंगोली दिली आहे...0
0
Report
सातारा में विधान परिषद चुनाव के बाद भाजपा-राष्ट्रवादी की बैठकों की हलचल जारी
Satara, Maharashtra:सातारा सांगली विधान परिषद निवडणुकीमुळे साताऱ्यातील राजकारण चांगलंच आपलं असून बैठकींचा धडाका सध्या सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळतंय काल भाजपची बैठक कराडला रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत पार पडली होती. यानंतर लगेच आज राष्ट्रवादीची बैठक साताऱ्यातील हॉटेल मध्ये पार पडतेय यामध्ये सातारा जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्य उपस्थित आहेत मंत्री मकरंद पाटील यांच्या अध्यक्षतेमध्ये आणि खासदार नितीन पाटील यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडते यामुळे या बैठकीमध्ये नक्की चर्चा काय होतीये आणि राष्ट्रवादीची भूमिका काय असणार याकडे सर्व जिल्ह्याचे लक्ष लागून राहिला आहे. या ठिकाणाहून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी.0
0
Report
निलेश राणे भाजपा में कब होंगे शामिल? शिंदे गुट से जुदाई की अटकलें तेज
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग निलेश राणे भाजपामध्ये कधी जातील ते शिंदेना देखील कळणार नाही.. येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिंदे वेगवेगळे लढणार आणि निलेश राणे भाजपात जाणार... माजी आमदार वैभव नाईक यांचा टोला.. शिवसेना आमदार निलेश राणे यांनी उद्धव ठाकरेवर केली होती टीका... त्याला प्रत्युत्तर देताना नाईक यांनी निलेश राणे भाजपात जाणार असल्याचे संकेत दिलेत...0
0
Report
Advertisement
आंबोली घाट में पत्थर गिरने से यातायात देर तक बाधित, फिर सुचारु
Oras Bk., Maharashtra:आंबोली घाटात रस्त्यावर आले दगड वाहतूक काही काळ ठप्प असून मुख्य धबधब्याच्या परिसरात आज दगड कोसळले. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला. सुदैवाने यात कोणीही जखमी झालेले नाही. रस्त्यावर असलेल्या मोठा दगड बाजूला करण्यात आला व वाहतूक सुरळीत करण्यात आली. याबाबतची माहिती गेळे सरपंच सागर ढोकरे यांनी दिली. ही घटना मुख्य धबध्यापासून समोर असलेल्या शौचालयाच्या परिसरात घडली. घटनास्थळी वाहतूक पोलीस दाखल झाले असून वाहतूक सुरळीत करण्यात आली आहे0
0
Report
वाशीम में मानसून देर से आने से जल संकट गहरा, 260 गांवों में उपाय शुरू
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम जिले में पानीटंचाई की समस्या गंभीर बनती जा रही है। पिछले दो महीनों में बढ़ते तापमान के कारण गड्ढे, बावरी और छोटे जलस्रोतों की पानीपातळी घटली है। परिस्थिती को देखते हुए प्रशासन ने 260 गांवों में 255 पानीटंचाई निवारण उपाययोजना शुरू कर दी है तथा 125 विहिरी अधिग्रहित की गई हैं। साथ ही चार गांवों में टैंकर से पानी की आपूर्ति शुरू है। वाशीम तालुक के जाहबरून परांडे में भी किसानों की दो विहिरी अधिग्रहित की गई हैं। मानसून अगर अधिक देर तक रहा तो खरीप मौसम की सिंचाई का प्रश्न और अधिक गंभीर हो सकता है।0
0
Report
900-1100 रुपये क्विंटलात कांदा: किसान मंदी के बीच हमी भाव असफल, नाराजगी बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील कांदा उत्पादक शेतकरी सध्या आर्थिक कोंडीत सापडले आहेत.वाशिमच्या बाजार कांद्याला केवळ 900 ते 1100 रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असून हा दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी आहे. राज्य सरकारने हमीभावाने कांदा खरेदीची घोषणा केली असली तरी वाशिम जिल्ह्यात नाफेडमार्फत अद्याप खरेदी सुरू झालेली नाही. त्यामुळे खरीप हंगामाच्या आर्थिक नियोजनासाठी शेतकऱ्यांना नाईलाजाने कमी दरात कांदा विकावा लागत आहे.हमीभाव खरेदीचा लाभ मिळत नसल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
मजलगांव में नाबालिग विवाहिता के गर्भपात की खबर, प्रशासन पर सवाल उठने लगे
Beed, Maharashtra:बीड जिल्ह्यातील माजलगाव येथे एका अल्पवयीन विवाहित तरुणीचा गर्भपात करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे हा गर्भपात माजलगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातच करण्यात आला असून, या प्रक्रियेदरम्यान झालेल्या अतिरक्तस्रावामुळे पीडित तरुणीची प्रकृत्ती गंभीररीत्या खालावली. प्रकृती बिघडल्यानंतर संबंधित तरुणीला एका खासगी रुग्णालयात दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, माजलगावच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला पुढील उपचारासाठी बीड जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविल्याचा दावा केला होता. मात्र चौकशीअंती संबंधित तरुणी जिल्हा रुग्णालयात दाखलच झाली नसल्याचे उघड झाल्याने या प्रकरणाला गंभीर वळण मिळाले आहे. गर्भपातासाठी शासनाने घालून दिलेले नियम आणि वैद्यकीय प्रक्रिया असताना त्या सर्व नियमांना बगल देत शस्त्रक्रिया करण्यात आल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकारामुळे जिल्हा रुग्णालयातील शल्य चिकित्सकही संभ्रमावस्थेत असून संपूर्ण घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, उपचारानंतर संबंधित तरुणीचा ठावठिकाणा लागत नसल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. तिचा शोध घेण्यासाठी रुग्णालय प्रशासनाने संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या असून शोधमोहीम सुरू करण्यात आली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून माजलगाव येथील संबंधित डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी सामाजिक नेते बाबुराव पोटभरे यांनी केली आहे. या गंभीर प्रकरणामुळे आरोग्य विभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून जिल्हाभरात खळबळ उडाली आहे. दरम्यान बालविवाह केल्याप्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिसात पती, सासू सासरे आणि पीडितेच्या आई वडिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस आरोपींचा शोध घेत आहेत.0
0
Report
किसानों के कर्ज माफ़ी पर राजू शेट्टी की बड़ी मांग: पंढरपूर आंदोलन पर सवाल
Kolhapur, Maharashtra:सरकार ने पंढरपूर में चल रहे विधायक रोहित पवार के आंदोलन को राजनीति से ऊपर देखने की स्वाभिमानी शेतकरी संघटने के नेता राजू शेट्टी ने अपील की है। उद्योगपतियों के कर्ज माफ करने के बाद क्या NCRटी के माध्यम से 13 लाख कोटी के कर्ज को 4 लाख 35 हजार रुपये में मिटवना संभव है? तो किसानों के सब-कर्ज माफ़ी क्यों नहीं? इस सवाल को उन्होंने उठाया है। विधायक रोहित पवार के आंदोलन के बारे में उनकी बातचीत हमारे प्रतिनिधि प्रताप नाईक के साथ हुई।0
0
Report
ऊस को गुलामी के प्रतीक कहकर विवाद, राजू शेट्टी ने पडळकर पर तीखा हमला
Kolhapur, Maharashtra:ऊस पिक हे गुलामगिरीचे प्रतीक असेल तर देशाचे सहकार मंत्री अमित शहा आहेत.. मग अमित शहा हे गुलामांचे सम्राट आहेस का ? हे पडळकरांनी स्पष्ट करावे अस विधान स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केले आहे. भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी ऊस पिक हे गुलामगिरीचे प्रतीक आहे, ऊस पिक घेणे बंद केले तरच राजकीय क्रांती होईल असं विधान केलं होतं. त्यावर राजू शेट्टी यांनी कडाडून टीका केली आहे.0
0
Report
Advertisement
विधान परिषद चुनाव में घेराबंदी: कर्ज माफी पर सियासी हलचल तेज
Pandharpur, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत कोण कुठे आहे. भाजपने या निवडणुकी वाट लावली आहे. देशात पहिली कर्जमाफी शरद पवार यांनी केली. जनता पक्षाचे अर्थ मंत्री मधु दंडवते यांनी सुद्धा कर्ज माफी केली. सध्या अटी घालून जी कर्ज माफी सुरू आहे चूक आहे. आज स्वतः गिरीश महाजन या ठिकाणी येऊन आमदार रोहित पवार यांच्याशी चर्चा करतील. मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा झाली आहे. ते जशा अडचणी येतील तशा सुधारण करू असे म्ह्णाले आहेत. काही अटी जरूर पडली तर शिथिल करू. लाडक्या बहीण निधी वाटपात पुरुषाने महिला दाखवून जी अनुदान घेतले त्याची चौकशी होऊन कारवाई झाली पाहिजे0
0
Report
मालेगाव में शॉर्ट सर्किट से दस ट्रॉली चारा जला, किसानों को बड़ा नुकसान
Nashik, Maharashtra:मालेगाव तालुक्यात शॉर्टसर्किटमुळे शेतात दहा ट्रॉली चारा जळून खाक झाल्याची भीषण आग लागली. या घटनेमुळे पशुपालकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. कोठरे खुर्द येथील जयसिंग रामसिंग मोरकर आणि राजेंद्र जामसिंग सावकार या शेतकऱ्यांनी शेता मध्ये जनावरांसाठी मोठ्या प्रमाणात चारा साठवून ठेवला होता. उन्हाळा आणि आगामी काळातील चाऱ्याची गरज लक्षात घेऊन त्यांनी सुमारे दहा ट्रॉली चारा गंजीच्या स्वरूपात शेतात साठवून ठेवला होता. अचानक वीजवाहिनीत झालेल्या शॉर्टसर्किटमुळे ठिणगी पडून चाऱ्याला आग लागली. आग काही क्षणांतच रौद्ररूप धारण करुन परिसरात खळबळ उडाली. धुराचे लोट आणि ज्वाला दिसताच आसपासच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवण्याचा प्रयत्न केला; परंतु चारा अत्यंत कोरडा असल्याने आग पसरली आणि संपूर्ण गंजी जळून खाक झाली. परिसरातील शेतकऱ्यांनी वीज वितरण व्यवस्थेवर देखील प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. गेल्या चार महिन्यांपासून या परिसरात वायरमनने भेट दिलेली नसल्याची भावना व्यक्त केली जाते, ज्यामुळे वीजवाहिन्यांमधील दोष वेळेवर दुरुस्त झाले नसावेत, अशी शक्यता आहे. या आगीत पशुपालकांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. चाऱ्यासाठी वर्षभरासाठी साठवून ठेवलेला चारा आता उरतोच नाही, त्यामुळे जनावरांना खाऊ घालण्यासाठी चारा आणायचा तरी कुठून, असा प्रश्न उभा राहिला आहे. दुष्काळी स्थिती, चाऱ्याच्या दरात वाढ आणि आर्थीक अडचणी यामुळे पशुपालक हवालदिल झाले आहेत. घटनेची माहिती मिळाल्यानंतर नागरिकांनी पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे. तसेच वीज वितरण कंपनीने या घटनेची चौकशी करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी वीजवाहिन्यांची नियमित तपासणी करावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून आहे.0
0
Report
भीमाशंकर मंदिर के विकास कार्यों का निरीक्षण, सुनेत्रा पवार ने कहा तेज़ प्रगति
Shirur, Maharashtra:सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पुण्यातील प्रसिद्ध ज्योतिर्लिंग क्षेत्र भीमाशंकर येथे आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी भीमाशंकर मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घेत महापुजा करून आरती केली. या दर्शनानंतर त्यांनी भीमाशंकर परिसर आणि मंदिर परिसरात सुरू असलेल्या विविध विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी केली. गेल्या काही दिवसांपासून मंदिरातील गर्दी आणि भाविकांच्या सोयीस्कर दर्शनासाठी विकास आराखडा राबवला जात आहे. या विकासकामांचा आढावा घेण्यासाठी सुनेत्रा पवार आज भीमाशंकरला उपस्थित होत्या. - भीमाशंकर ला चांगल दर्शन झालं त्यामुळे आम्ही खूप समाधानी आहोत - इथे विकास आराखड्याची पाहणी करण्यासाठी मी कालच येणार होते मात्र मला काल भीमाशंकर ला यायला जमलं नाही म्हणून मी आज आले - आज मी आराखडा पाहायला आले त्यामुळे राजकीय काही प्रश्न नको - भाविकांची सोय करण्यासाठी आम्ही प्रयत्न करीत आहोत - विकास कामे सुरू आहेत ती लवकरात लवकर पूर्ण होतील असे आमचे प्रयत्न आहे - विकास कामाचा टापू खूप मोठा आहे - दादानी मजूर केलेल्या 288 कोटीची कामे सुरू आहे - तिसरा टप्पा 11 जूनला आम्ही मंजूर केला आहे त्याचे काम होणार आहेत - येथील कामे मोठ गतीने सुरू आहेत - भीमाशंकर हे हे पवित्र स्थान असून कुंभमेळा असल्यामुळे भाविकांची रीत मोठ्या प्रमाणामध्ये इकडे आहे त्या दृष्टिकोनातून आपण लवकरात लवकर पूर्ण होतील यासाठी प्रयत्न करतो - अल निनो चे जे संकट आले आहे हे टळू दे चांगला पाऊस पडू दे ही प्रार्थना भीमाशंकर चरणी केली आहे.0
0
Report
Advertisement
