Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.

Aug 29, 2024 18:30:56
Yavatmal, Maharashtra

यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 26, 2025 10:15:12
kolhapur, Maharashtra:नागपूर: नागपूरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या आभा पांडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना आदेशानुसार उमेदवारी अर्ज दाखल होत असल्याची माहिती आभा पांडे यांनी दिली. नागपूर महापालिका निवडणुकीत महायुतीत भाजपा व शिवसेना एकत्र लढत असताना राष्ट्रवादीच्या आभा पांडे यांनी प्रभाग 21 मधून अर्ज दाखल केला. नागपुरात भाजपा-शिवसेना महायुतीच्या उमेदवाराविरुद्ध राष्ट्रवादीच्या आभा पांडे ही लढणार असल्याचा दावा. जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल. आमच्या प्रतिनिधी अमर काणे यांनी याविषयी संवाद साधला. बाइट -- आभा पांडे, उमेदवार नागपूर महानगरपालिका
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 26, 2025 10:01:25
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 26, 2025 09:51:19
Pandharpur, Maharashtra:Solapur जिल्ह्यातील मोहोळ पंढरपूर सांगोला तालुक्यातील गावातून जाणारा शक्तिपीठ महामार्ग बदलल्याने बाधित शेतकरी आक्रमक, जुन्याच सर्वेक्षण पद्धतीने मार्ग जाण्यासाठी या तालुक्यातील आजी माजी आमदार मुख्यमंत्र्यांना भेटणार शक्तिपीठ महामार्ग शेतकरी विरोधामुळे सोलापूर जिल्ह्यात त्याचा नवा मार्ग माढा पंढरपूर माळशिरस माण खटाव असा असणार आहे. पंढरपूर मोहोळ सांगोला तालुक्यातील मार्ग बदलल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. यानंतर आमदार राजाभाऊ खरे आमदार बाबासाहेब देशमुख माजी आमदार प्रशांत परिचारक यांच्यासह बाधित शेतकरी यांनी पंढरपूर मध्ये बैठक घेतली. या बैठकीत जुन्याच मार्गाने शक्तिपीठ नेण्याची मागणी करण्यात आली. आठ दिवसात मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन शेतकऱ्यांची बाजू मांडणार असून जुन्याच मार्गाने शक्तिपीठ न्यावा असा आग्रह आजी माजी आमदार करणार आहेत. त्यामुळे आता सभागृहात केलेल्या घोषणेनंतर मुख्यमंत्री जुन्या बाधित शेतकऱ्यांना काय आश्वासन देतात पहावे लागेल
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 09:49:09
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 09:37:48
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजी नगर महायुति में घमासान शुरू है. सीट बंटवारे को लेकर शिवसेना और भाजपा का विवाद खत्म नहीं हो रहा है. इसी बीच राष्ट्रवादी कांग्रेस ने अलग से लड़ने की घोषणा की है, जिससे संभाजी नगर में महायُति पूरी तरह फिसकने की संभावना है. 7 बैठकों के बावजूद भी समन्वय नहीं बन रहा है. यदि जगह-वितरण सम्मानजनक हो, तभी महायुति संभव है—संभाजी नगर के वरिष्ठ नेता संजय शिरसाठ ने कहा. कुछ सीटों पर खटपट है, पर नतीजा निकल जाएगा और यूनिटी बनेगी—भाजपा नेता चंद्रशेखर बावनकुले ने कहा. इन दोनों के संघर्ष में राष्ट्रवादी कांग्रेस ने सीधे भूमिका लेकर भाजपा पर धोका देने का आरोप किया और स्वतंत्र लड़ाई की घोषणा की. संभाजी नगर में महायुति के 3 दल अलग-अलग दिशाओं में चल रहे हैं; एनसीपी बाहर निकली तो शिवसेना-भाजप का विवाद खत्म नहीं होगा—ऐसे संकेत हैं. विशाल करोलें
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 26, 2025 09:20:55
Shirur, Maharashtra:भिमाकोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिन सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात. प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांच्याकडून प्रशासकीय आढावा. कोरेगाव भिमा येथील जयस्तंभ शौर्यदिन सोहळ्यानिमित्त देशभरातून येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही, याची विशेष दक्षता सर्व संबंधित विभागांनी घ्यावी, अशा स्पष्ट सूचना सामाजिक न्याय विभागाचे प्रधानसचिव हर्षदीप कांबळे यांनी दिल्या. पेरणे येथे आयोजित प्रशासकीय समन्वय समितीच्या बैठकीत त्यांनी सोहळ्याच्या तयारीचा सविस्तर आढावा घेतला. या बैठकीत वाहतूक व्यवस्थापन, सुरक्षा व्यवस्था, आरोग्य सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा तसेच आपत्कालीन सेवा याबाबत विभागनिहाय चर्चा करण्यात आली. शौर्यदिन सोहळा शांततेत, शिस्तबद्ध आणि आनंददायी वातावरणात पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याचे निर्देश कांबळे यांनी दिले. यावेळी समाजकल्याण आयुक्त दिपा मुंडे, बार्टीचे महासंचालक सुनिल वारे, पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक संदिपसिंह गिल, पोलिस उपायुक्त सोमय मुंडे, जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते. भक्त आणि अनुयायांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देण्यात येणार असून, प्रशासन सज्ज असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 26, 2025 09:20:13
Washim, Maharashtra:अँकर: गरिब,अनाथ आणि वृद्धांच्या मदतीसाठी इंग्लंडची ४१ वर्षीय धावपटू हना लोक्स भारतभर धावण्याचा अनोखा उपक्रम राबवत आहे.‘प्रोजेक्ट सॉल्ट रन’ अंतर्गत सुरू असलेली ही धावयात्रा वाशीम जिल्ह्यात दाखल झाली आहे. रिसोड तालुक्यातील वाकद येथे हनाने आपल्या प्रवासातील २४०० किलोमीटरचा महत्त्वाचा टप्पा यशस्वीपणे पूर्ण केला.फिरोजपूर (पंजाब) येथून सुरू झालेला हा प्रवास कोलकात्याजवळील बांगलादेश सीमेपर्यंत पूर्ण होणार आहे.या उपक्रमात हना दररोज सुमारे ४२ किलोमीटर अंतर धावण्याचे नियोजन करून सामाजिक कार्याचा संदेश देत आहे.तिच्या या धाडसी आणि प्रेरणादायी उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 08:46:29
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 26, 2025 08:46:19
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये दहशत आणि नाद या वाक्यावरून चांगलीच जुंपली आहे .फलटण येथे झालेल्या भाजपच्या विजयी सभेत मंत्री जयकुमार गोरे यांनी दाढीवर हात फिरवत कोणतरी फलटण मध्ये आलं आणि शिवसेना दहशत खपवून घेणार नाही असं म्हणाले त्यांना मला सांगायचे आहे दहशत आम्हाला पण चालत नाही आणि मला पण दाढी आहे असं सांगत आमच्या नादाला लागायचे नाही असा इशारा दिला होता. ज्यांनी ज्यांनी माझा नाद केला त्यांना मी सोडत नाही अशी नाव न घेता टीका मंत्री शंभूराज देसाई यांच्यावर केली होती.या टीकेला मंत्री शम्भूराज देसाई यांनी देखील उत्तर देत माझा नाद करायचा नाही असं जयकुमार गोरे म्हणतायत याचाच अर्थ दहशत कोणाची आहे हे समजून जावं आणि मी जिल्ह्याचा पालकमंत्री आहे त्यामुळे दहशत खपवून घेणार नाही.निवडणुका असो नसो मोकळ्या वातावरणामध्ये सगळ्यांनी काम केलं पाहिजे.नाद नाही करायचा असे गोरे मंत्री म्हणत असतील तर अप्रत्यक्ष त्यांनी मान्य केले आहे की दहशत त्यांची आहे.दहशत हा जिल्हा कधीच खपवून घेणार नाही .त्यामुळे इथून पुढे दादागिरी,दमदाटी,दहशतीची भाषा केली तर त्याला जशाच तसे उत्तर दिलं जाईल अशा शब्दात शंभूराज देसाई यांनी गोरे यांना उत्तर दिलं आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 26, 2025 08:16:59
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचे पॉइंटर्स भाजप सेना युती ही अंतिम टप्प्यात आहे उद्या रात्रीपर्यंत सर्व निर्णय होतील आज आम्ही बसणार आहोत, मराठवाड्यातील सर्वच महानगरपालिका बद्दल अतुल जी आणि आम्ही बसणार आहोत मला असं वाटतं खूप काही अडचणी नाही निर्णय होऊन जाईल ज्या ज्या जागेवर आमची ताकद किती आहे ते बघून आम्ही असे चार-पाच पॅरामीटरवर आम्ही चर्चा करत आहोत आज रात्रीपर्यंत मी अतुल सावे यांच्याबरोबर बसणार आहे त्याचबरोबर शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांसोबत देखील चर्चा करू आणि अंतिम करू एकनाथ जी आणि देवेंद्रजी यांनी बसून युतीची संकेत दिले आहे आणि त्या पद्धतीने काम सुरू झाले आहे मुंबईतला तिढा सुटलेला आहे लवकरच आम्ही त्या ठिकाणच्या उमेदवार जाहीर करू काही ठिकाणी थोडं राहील त्या ठिकाणी चर्चा करू, मात्र 90 ते 95 टक्के जागांवर काही तिढा नाही त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी करायचा आमच्या पक्षाचा निर्णय आम्ही करणार आहोत त्यांच्या पक्षाचा अधिकार आम्हाला नाही त्यामुळे त्यांच्या पक्षाचा निर्णय त्यांनी केला आहे २ राष्ट्रवादी एकत्र त्यांच्यासाठी त्यांनी कोणाला सोबत घ्यायचं याचा सर्व अधिकार त्यांना आहे काही ठिकाणी भाजपसोबत येत आहेत अकोल्यामध्ये भाजपसोबत येत आहेत तीन ते चार ठिकाणी अजित पवार साहेब हे आमच्या सोबत आहेत एनडीए चे अधिकार घेण्याचा निर्णय तुम्हाला नाही तो फक्त केंद्रीय भाजपाला आहे माझे पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, अमित शहाजी, नड्डाजी आमचे वरिष्ठ हे ठरवतील महाराष्ट्र मध्ये आम्ही स्थानिक स्वराज्य निवडणुकीमध्ये भाजप सेना तर एकत्रित लढत आहोत नगरपालिकेत आम्ही वेगवेगळे लढलो त्या त्या स्थानिक लेवलला काय परिस्थिती निर्माण होईल, याचे जास्त अधिकार आम्ही स्थानिक लेवलला दिले आहेत याचा अर्थ राज्यातील महायुतीवर काहीच परिणाम होणार नाही काही नाराज नाहीत, त्यांच्याबद्दल चुकीचे गैरसमज निर्माण करतात त्यांच्या मनातही काही नाही आणि आमच्या मनातही काही नाही, ते-amचे नेते आहे त्यांच्या नेतृत्वात आम्ही विदर्भ आणि चंद्रपूरच्या महानगरपालिका लढत आहोत काही पक्ष होत असल्यामुळे काही नवीन काही जुने असे करताना जुने कार्यकर्ते काही प्रमाणात नाराज होतात भाजपाचा डीएनए असा आहे कुणी भाजपमध्ये आले तर त्यांना सामावून घेतो आणि आमचं काम चालू ठेवतो १३ मित्र पक्षांची चर्चा सुरू आहे, त्यामुळे आम्ही आरपीआयशी आणि आमच्या गटात पक्षांची चर्चा करत आहोत नागपूरला योगेंद्र कवाडेजी आहे त्यांच्याशी देखील आम्ही चर्चा करत आहोत मुंबईत देखील चर्चा सुरू आहे त्यामुळे त्या त्या पक्षाची चर्चा करून ज्यांची क्षमता आहे, त्यावर निर्णय घेतोय ज्या ठिकाणी आमच्या कोट्यातून शक्य आहे त्या ठिकाणी आमच्या, जिथे एकनाथ शिंदेंच्या शक्य तिथे त्यांच्या पोलिसांच्या चौकशीचा हा भाग आहे त्यावर मी टिप्पणी करणे योग्य नाही मला ते बघावे लागेल न बघता बोलणे योग्य नाही पंधरा वर्ष भाजप माहिती सोडून जाणार नाही त्यांच्याकडे जेवढे काही कार्यकर्ते शिल्लक आहेत ते आता एकनाथ शिंदे कडे जात आहे उबाठा आता क्षमताही नव्हती लढण्याची, पुढच्या काळातही असेच राहील
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 26, 2025 07:52:20
0
comment0
Report
Advertisement
Back to top