445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सहकारी बैंक चुनाव में घराणेशाही, नेताओं ने परिवार के सदस्यों को मैदान में उतारा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकत्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची निवडणुकात मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्यान काळे, आमदार अनुराधा चव्हाण आणि आमदार रमेश बोरनारे या विद्यमान लोकप्रतिनिधींनी स्वतःचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कार्यकत्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना, अनेक नेत्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के पाज पंढरी गाँव में भीषण जलटंचाई, 15 दिनों में सिर्फ चार बाल्टी पानी
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. अथांग समुद्र शेजारी, पण पाण्यासाठी टाहो! पाज पंढरी गावात भीषण पाणीटंचाई.. अँकर एकीकडे अथांग समुद्र... आणि दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची जीवघेणी धावपळ! रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं कोळी बांधवांचं गाव असलेल्या दापोली तालुक्यातील 'पाज पंढरी'वर आज भीषण पाणीटंचाईचं संकट कोसळलं आहे.. गावातील विहिरींनी तळ गाठला असून, बांधतीवरे नळपाणी पुरवठा योजनेतून तब्बल १५ दिवसांनी केवळ ४ हंडे पाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.. पाणी विकत घ्यायला पैसे कुठून आणायचे? या विवंचनेत येथील महिला असून, वयोवृद्ध आणि लहान मुलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात आज पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा झालाय.. यावर प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का? हाच मोठा प्रश्न आहे.0
0
Report
प्राजक्त तनपुरे का राहुरी में भव्य स्वागत: विधानसभा चुनाव में बिनविरोध जीत के बाद बड़े समारोह
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी येथे कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आपल्या विरोध निवडीच श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं आहे. विखे फॅक्टर आपण ऐकत होतो मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाला आणि आठ दिवसांत मी आमदार झालो अशा शब्दांत तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याला नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गर्दी करत त्यांचे जंगी स्वागत केले.0
0
Report
Advertisement
रायगढ़ जिला परिषद ने एक क्लिक पर खतों का स्टॉक उपलब्ध कराकर जमाखोरी पर रोक
Chendhare, Maharashtra:खतसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. साठेबाजीला आळा, वितरणात पारदर्शकता. खरेप हंगाम तोंडावर असताना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी, उपलब्धतेबाबतची अनिश्चितता आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी यावर रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रभावी उपाय शोधला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमधील खतसाठ्याची माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या विशेष ब्लॉगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची माहिती आणि त्या केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या साठ्याचा तपशील शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे एखाद्या खताच्या शोधात अनेक दुकाने फिरण्याची गरज उरणार नाही. याशिवाय साठेबाजी, काळाबाजार आणि कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे.0
0
Report
नागपुर-कामठी के महादेव घाट पर नदी डूबकर तीन की मौत, परिवार सदमे में
Nagpur, Maharashtra:कन्हान नदी महादेव घाटावर गेलेल्या दोन कुटुंबांवर काळाने घाला घातला. कामठी जवळील कन्हान नदी काठावरील महादेव घाट येथे पिकनिकसाठी आलेल्या नागपूर आणि कामठी येथील दोन कुटुंबांतील एका ६ वर्षीय चिमुरड्यासह तिघांचा नदीच्या डोहात बुडून अत्यंत दुर्दैवी मृत्यू झाला. ही मन सुन्न करणारी घटना आज रविवारी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात तीव्र हळहळ व्यक्त होती आहे.रोहित महादेव नागदेव वय ३५ वर्षे, रा. कुंभारे कॉलनी, कामठी,गौतम राजकुमार अंबादे वय ३१ वर्षे, रा. इंदिरानगर, जरीपटका, नागपूर,.चैतन्य बबलू अंबादे वय ६ वर्षे, रा. जरीपटका, नागपूर ....मिळालेल्या माहितीनुसार, कामठी येथील ई-रिक्षा चालक रोहित नागदेव हे आपल्या ठरलेल्या नियोजनाप्रमाणे कुटुंबासह महादेव घाटावर पिकनिकसाठी आले होते. त्याच वेळी नागपूरच्या जरीपटका येथील रहिवासी गौतम अंबादे हेदेखील आपल्या कुटुंबातील ३ महिला, ३ मुली आणि ३ पुरुषांसह एकूण १३ जण याच ठिकाणी आले होते.दुपारच्या सुमारास दोन्ही कुटुंबांतील सदस्य स्वयंपाकाच्या तयारीत व्यस्त होते. याच दरम्यान, ६ वर्षीय चिमुरडा चैतन्य अंबादे याचा खेळता खेळता तपाय घसरला आणि तो तेथे नदीच्या डोहात बुडू लागला. चैतन्यला बुडताना पाहून त्याला वाचवण्यासाठी त्याचा काका गौतम अंबादे याने तात्काळ डोहात उडी घेतली. मात्र, गौतमला पोहता येत नसल्याने तोही पाण्यात बुडू लागला. हा गंभीर प्रकार जवळच उभे असलेल्या रोहित नागदेव यांच्या लक्षात आला.दरम्यान रोहित यांनीही त्या दोघांना वाचवण्यासाठी डोहात धाव घेतली, परंतु दुर्दैवाने पोहता येत नसल्याने रोहित सुद्धा त्या खोल पाण्याचा अंदाज न आल्याने बुडाले.या तिघांना बुडताना पाहून गौतमचे वडील राजकुमार अंबादे वय अंदाजे ५५ हे देखील नदीत उतरले. तेही मानेपर्यंत पाण्यात बुडाले होते, परंतु त्यांनी निकराची झुंज देत कसेतरी हातपाय मारून स्वतःचे प्राण वाचवले आणि ते पाण्याच्या बाहेर आले. पोलिसांनी शोधमोहीम राबवली आणि तिन्ही मृतांचे शव पाण्याबाहेर काढले.0
0
Report
नाशिक विधान परिषद चुनाव: बंडखोरी से महायुती में पेच, आज होगा निर्णायक फैसला
Nashik, Maharashtra:Nashik Breaking नाशिक विधान परिषद निवडणुकीबाबत अपक्ष आणि भाजपच्या बंडखोर उमेदवारीवर आज होणार निर्णायक फैसला गणेश गीते यांचे बंधू गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे रिंगणात उतरल्याने महायुतीत निर्माण झाला पेच भाजप नेते गिरीश महाजन यांनी रविवारी दोन्ही उमेदवारांसोबत केली आहे स्वतंत्र चर्चा गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे यांना उमेदवारी मागे घेण्यासाठी मनधरणीचे प्रयत्न रात्री उशिरापर्यंत महाजन आणि शिवसेना नेते उदय सामंत यांच्यातही चर्चा दोन्ही उमेदवारांनी निर्णयासाठी वेळ मागितल्याची माहिती आज उमेदवारी मागे घेण्याच्या पार्श्वभूमीवर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आज पुन्हा सकाळी 11 वाजता उदय सामंत आणि गिरीश महाजन यांच्यात बैठक होणार आहे याच बैठकीनंतर अंतिम निर्णय होण्याची शक्यता आहे त्यामुळे गोकुळ गीते आणि प्रसाद हिरे हे काय निर्णय घेतात याकडे लक्ष नाशिकप्रमाणे जळगाव विधान परिषद निवडणुकीतही बंडखोरीमुळे महायुतीची डोकेदुखी वाढली0
0
Report
Advertisement
संगमेश्वर सोनवी पुल: 19 साल की प्रतीक्षा खत्म, एकेरी यातायात शुरू
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणातील प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी एक आनंदाची बातमी आहे.. मुंबई-गोवा महामार्गावरील संगमेश्वरच्या सोनवी पुलाची 19 वर्षाची प्रतीक्षा संपली.. संगमेश्वर सोनवणे नदीवरच्या नवीन पुलाचे काम पूर्णत्वास गेले आहे.. नवीन पुलावरून एकेरी वाहतूक सुरू.. अँकर मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील प्रवाशांचे आणि स्थानिक नागरिकांची तब्बल 19 वर्षाची प्रदीर्घ प्रतीक्षा अखेर संपली आहे.. संगमेश्वर बस स्थानकाजवळ सोनवी नदीवर बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे एका बाजूचे काम पूर्ण झाले असून हा पुल आता एकेरी वाहतुकीसाठी अधिकृतपणे खुला करण्यात आला आहे.. गेल्या दीड दशकांहून अधिक काळ रखडलेल्या या कामामुळे प्रवाशांना होणाऱ्या त्रासातून अखेर सुटका झाली असून परिसरात आनंदाचे वातावरण आहे..0
0
Report
परिवहन मंत्री प्रताप सरनाईक ने बस स्टेशन की अचानक जाँच में निलंबन के निर्देश दिए
Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती बसस्थानकाच्या अचानक पाहणीत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक संतप्त; दो अधिकाऱ्यांना निलंबनाचे आदेश अमरावती बसस्थानकाची अचानक पाहणी केली. या पाहणीदरम्यान बसस्थानक परिसरात पसरलेली अस्वच्छता, प्रवाशांना होत असलेला त्रास तसेच चालक-वाहकांमधील अव्यवस्था पाहून मंत्री प्रताप सरनाईक संतप्त झाले. परिसरातील ढिसाळ व्यवस्थापनाबाबत त्यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत तत्काळ कारवाईचे आदेश दिले. या प्रकरणी विभाग नियंत्रक सचिन डफळे आणि आगार व्यवस्थापक वैशाली भाकरे यांना तात्काळ निलंबित करण्याचे निर्देश त्यांनी दिले. मंत्र्यांच्या या अचानक कारवाईमुळे परिवहन विभागात एकच खळबळ उडाली असून संबंधित अधिकाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान बसस्थानकाची स्वच्छता आणि व्यवस्थापन सुधारण्याबाबतही त्यांनी संबंधितांना कडक सूचना दिल्या आहेत. बाइट-प्रताप सरनाईक, परिवहन मंत्री0
0
Report
APMC परिसर में ट्रक के नीचे दो मृत: मौत की वजह अभी स्पष्ट नहीं
Navi Mumbai, Maharashtra:वाशी सेक्टर 19 एपीएमसी बाजाराच्या परिसरात दोन जणांचा मृतदेह आढळून आल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. याठिकाणी मोठ्या प्रमाणात ट्रक पार्किंग केले जात असून या ट्रक खालीच दोघांचा मृतदेह आढळलाय. मयत इसम ट्रक चालक आणि वाहक असून नेहमी नशेत असायचे. या दोन्हींच्या मृत्यू अति नशा केल्याने झालाय की विषारी पदार्थ प्राशन केल्याने झालाय याचा तपास पोलिस करत आहेत. दोघांचे मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी रुग्णालयात दाखल केले असून याचा रिपोर्ट आल्यावरच मृत्यूचे कारण स्पष्ट होईल. एपीएमसी पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत. navi mumbai0
0
Report
Advertisement
गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलियों से प्रशासन का संवाद और पुनर्वसन सहायता
Gadchiroli, Maharashtra:राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल आणि पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्यासह वरिष्ठ अधिकायांनी आज गडचिरोलीत आत्मसमर्पित नक्षल सदस्यांशी संवाद साधला. कार्यक्रमात आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना विविध साहित्यांचे वितरण करण्यात आले तर पुनर्वसन निधी धनादेशही वितरित करण्यात आले. आत्मसमर्पितांना मुख्य प्रवाहात समावून घेत सर्वांगिण विकासासाठी राज्य शासन कटिबद्ध असल्याचे राज्याच्या मुख्य प्रशासकीय अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले. आजपर्यंत एकुण 819 नक्षलवाद्यानी गडचिरोली पोलीस दलासमोर आत्मसमर्पण केले आहे. नक्षलवाद संपुष्टात आल्यावर राज्य शासनाच्या वतीने गडचिरोली जिल्ह्रात विकास कामांवर लक्ष केंद्रीत केले जात आहे. या कामांचे नियोजन व आढावा घेण्यासाठी वरीष्ठ अधिकारी वेगाने कार्यरत आहेत. गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने विविध नक्षल पुनर्वसन उपक्रमांच्या माध्यमातून आत्मसमर्पित सदस्यांना रोजगार, शिक्षण, आरोग्य, कृषी व स्वयंरोजगाराशी संबंधित सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. पोलीस महासंचालक दाते यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून शांतता, विकास व प्रगतीचा मार्ग स्वीकारणाया आत्मसमर्पित नक्सल सदस्यांचे कौतुक करुन त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.0
0
Report
चंद्रपुर के बाबूपेठ में जंगल से भटकता चीतल वन विभाग ने बचाया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वर्दळीच्या बाबूपेठ भागातील महादेव मंदिर परिसरात जंगलातून भटकत आलेल्या चितळाची वनविभाग आणि वन्यजीव कार्यकर्त्यांनी केली सुटका चितळ जंगलातून घनदाट वस्तीच्या भागात आल्यावर भटक्या कुत्र्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला जखमी केले. हा प्रकार लक्षात येताच वनविभाग आणि इको प्रो वन्यजीव संस्था सदस्य सक्रिय झाले. सुमारे दोन तास चाललेल्या अभियानानंतर चितळाला ताब्यात घेतल्यावर त्याला वनविभागाच्या सुपूर्द करण्यात आले. या भागात पाण्याच्या शोधात चितळ भटकत आल्याचा अंदाज व्यक्त होत आहे。0
0
Report
हिंगोली में तेज बारिश, वसमत में नुकसान की आशंका; किसानों में खुशी की लहर
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील वसमत शहरासह ग्रामीण भागामध्ये आज दुपारनंतर वादळी वाऱ्यासह जोरदार स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली है हवामान विभागाने हिंगोली जिल्ह्यासाठी आज पावसाचा येलो अलर्ट दिला होता उसके अनुसार पावसाने हजेरी लावली है या वादळी वारे और पावसामुळे वसमत तालुक्यातील नुकसान शक्यता असली है मागील काही दिवसापासून उखाड्याने त्रस्त असलेल्या नागरिकांना या पावसामुळे काहीसा दिलासा मिळाला असून या पावसामुळे बळीराजांमध्ये काहीस आनंदाचे वातावरण है कारण अशाच पद्धतीने जोरदार स्वरूपाचा पाऊस लवकर बरसावं और शेतातील पेरण्या वेळेत पूर्ण हों।0
0
Report
Advertisement
विरार पूर्वी के सामंतपाडा स्थित डेकोरेशन गोदाम में भीषण आग; 3 दमकल मौके पर, कोई जीवनहानि नहीं
Vasai-Virar, Maharashtra:ANC : विरार पूर्वेतील टोकरे ग्रामपंचायत हद्दीतील सामंतपाडा परिसरात असलेल्या डेकोरेशन कंपनीच्या गोडाऊनला भीषण आग लागल्याची घटना घडली आहे . अमूल डेअरीसमोरील या गोडाऊनमध्ये ठेवलेले मोठ्या प्रमाणातील शूटिंग व डेकोरेशनचे साहित्य आगीत जळून खाक झाले. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून विरार परिसरात आगीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
जळगाव-नाशिक महायुती में घमाशान: जळगाव सीट शिवसेना को नहीं मिली
Jalgaon, Maharashtra:जळगाव विधान परिषदेत जळगावची जागा शिवसेनेला न मिळाल्याने शिवसेनेमध्ये व गुलाबराव पाटळांमध्ये नाराजी .. आमदार एकनाथ खडसे विधान परिषदे निवडणुकीतील बंडखोरीसह लाडक्या बहिणी योजनेवरून एकनाथ खडसे यांची सरकारवर टीका जळगाव आणि नाशिक विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीतील अंतर्गत संघर्ष पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला आहे. नाशिकची जागा भाजपाला आणि जळगावची जागा शिवसेनेला मिळावी, असा आग्रह शिवसेनेकडून होता. मात्र जळगावची जागा भाजपाच्या वाट्याला गेल्याने शिवसेनेत नाराजीचा सूर उमटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला आहे. गुलाबराव पाटील आपल्या मुलासाठी उमेदवारी इच्छुक होते, मात्र ती न मिळाल्याने नाराजी व्यक्त झाल्याचा दावा खडसे यांनी केला. तसेच नाशिक आणि जळगाव या दोन्ही ठिकाणी बंडखोर उमेदवार माघार घेण्यास तयार नसल्याने महायुतीसमोर मोठे आव्हान उभे राहिल्याचे त्यांनी म्हटले. भाजपचे संकटमोचक म्हणून ओळखले जाणारे गिरीश महाजन यांनाही नाशिक आणि जळगावमधील बंडखोरी रोखण्यात अपेक्षित यश मिळाले नसल्याची टीकाही खडसे यांनी केली. शिवसेना-भाजप संघर्ष नवीन नसून आमदार किशोर पाटील यांच्या प्रत्येक निवडणुकीत भाजपकडून बंडखोरी झाल्याचा दावा देखील त्यांनी केला. इतकेच नव्हे तर विधान परिषद निवडणुकांमध्ये घोडेबाजार होत असल्याच्या चर्चेवर भाष्य करत, पूर्वी उमेदवारीसाठी पैशांचे व्यवहार, पैठण्या आणि पाकिटांचे वाटप झाल्याचे गंभीर आरोपही खडसे यांनी केले. तर दुसऱीकडे लाडकी बहीण योजनेवरून सरकारवर टीका करत, निवडणुकीपूर्वी दिलेली आश्वासने आणि नंतर लाखो महिलांना योजनेतून वगळणे ही फसवणूक असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.0
0
Report
ओबीसी जनगणना की मांग तेज नहीं तो देशव्यापी आंदोलन: सावता परिषद
Washim, Maharashtra:देशात सुरू असलेल्या जनगणनेत OBC समाजाची स्वतंत्र जातनिहाय नोंद करण्यात येत नसल्याचा आरोप करत वाशिम शहरात सावता परिषदेच्या वतीने राज्यस्तरीय OBC जनगणना परिषदेचे आयोजन करण्यात आले. या परिषदेला सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे, माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार यांच्यासह OBC समाजातील विविध घटकांचे नेते उपस्थित होते.परिषदेत OBC जनगणना करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. सरकारने OBC जनगणनेची मागणी मान्य न केल्यास राज्यासह देशभर आंदोलन छेडण्यात येईल,असा इशारा कल्याण आखाडे यांनी यावेळी दिला。0
0
Report
Advertisement
