445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम में संत गजानन महाराज की पालखी का स्वागत, 700 वारकरी मौजूद
Washim, Maharashtra:शेगाव के संत श्री गजानन महाराज की पालखी आषाढी एकादशी के अवसर पर पंढरपूर की ओर मार्गक्रमण कर रही है. आज संत गजानन महाराज की पालखी वाशिम जिले में दाखिल हुई, 700 वारकरी गजर कर रहे थे. पालखी वाशिम के मेडशी परिसर में दाखिल होते ही पालखी के स्वागत के लिए तथा दर्शन के लिए हजारों भक्त जमा हो गए. यह पालखी वाशिम जिले में अगले चार दिनों तक विभिन्न स्थानों पर रुकेगी और फिर शेणगांव मार्गे मराठवाडा की ओर प्रस्थान करेगी.0
0
Report
उदय सामंत के स्टेटस से राजनीति गर्म, शिंदे-फडणवीस के साथ भाजपा-शिवसेना संकेत
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. योग्य लोकांचे हात हातात असतील तर...मंत्री उदय सामंत यांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण! राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्टेटसमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असून, सोबत शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्ह दिसत आहे. या फोटोवर खाली एक सूचक संदेश लिहिण्यात आला आहे - योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी थेट विरोधकांना किंवा महाविकास आघाडीला लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटस ठेवले आहे का? अशा विविध चर्चा आता राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत..0
0
Report
कल्याण के पत्रीपूल में विषैला नाग मिला; सर्पमित्र ने सुरक्षित रेस्क्यू कर जंगल भेजा
Kalyan, Maharashtra:कल्याणच्या पत्रीपूल रहेजा कॉम्प्लेक्समध्ये विषारी नाग आढळला. सर्पमित्राने केले सुरक्षित रेस्क्यू ANC- कल्याण पश्चिमेतील पत्रीपूल परिसरातील रहेजा कॉम्प्लेक्समध्ये विषारी नाग आढळल्याने काही काळ रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. इमारतीच्या विंगमधील जिन्याजवळ नाग जातीचा विषारी साप दिसताच रहिवाशांची एकच धावपळ उडाली. घटनेची माहिती मिळताच इमारतीतील एका रहिवाशाने तातडीने सर्पमित्र संदीप पंडित यांच्याशी संपर्क साधला. घटनास्थळी पोहोचलेल्या संदीप पंडित यांनी अत्यंत सावधगिरीने आणि सुरक्षित पद्धतीने नागाचे रेस्क्यू केले. रेस्क्यू केल्यानंतर सापाला कोणतीही इजा न होता वनक्षेत्रात सुरक्षितपणे सोडण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. दरम्यान, पावसाळ्यात साप बिळांमध्ये पाणी शिरल्यामुळे मानवी वस्तीकडे वळण्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे नागरिकांनी साप आढळल्यास घाबरून न जाता किंवा त्याला मारण्याचा प्रयत्न न करता तात्काळ सर्पमित्र किंवा वनविभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन सर्पमित्र संदीप पंडित यांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
ठाकरे के छह सांसद शिंदे के साथ, वाशिम दौरे में पार्टी की असल ताकत दिखेगी
Washim, Maharashtra:यवतमाळ–वाशिम दौऱ्यावर आहेत. बंडखोर खासदार संजय देशमुख यांच्या मतदारसंघातून संघटना पुनर्बांधणीचा संदेश देण्याचा प्रयत्न केला जात आहे. सकाळी यवतमाळ येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर दुपारी वाशिमच्या जैन भवनात संवाद मेळावा होणार आहे. सहा खासदाराच्या पक्षांतरानंतर प्रथमच उद्धव ठाकरे स्थानिक पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून संघटना बळकट करणे, कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवणे आणि पक्षाची पुढील भूमिका स्पष्ट करणार आहेत. या सहा बंडखोर खासदाराना संवाद मेळाव्यातुन काय बोलणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले या दौऱ्यात आदित्य ठाकरे, संजय राऊत, अरविंद सावंत यांच्यासह पक्षाचे वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. वाशीम येथील सभास्थळावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.0
0
Report
शिर्डी में छुट्टियों के कारण भक्तों की भारी भीड़, मोहरम से गूंजी साईं नाम
Shirdi, Maharashtra:सलग आलेल्या सुट्यांमुळे शिर्डीत भाविकांची गर्दी... पर्यटन स्थळांबरोबर धार्मिक स्थळांवर देखील गर्दी.. मोहरम व त्याला जोडून आलेल्या सलग सुट्यांमुळे शिर्डीत साईनामाचा जयघोष.. अनेक भागात मान्सून सुरू झाल्याने पर्यटन स्थळां सोबतच धार्मिक स्थळी देखील भाविकांची गर्दी...0
0
Report
कामण में दुखद सड़क हादसा; महिला की मौके पर मौत
Vasai-Virar, Maharashtra:कामणमध्ये दुर्दैवी अपघात; महिलेचा जागीच मृत्यू वसई : वसई तालुक्यातील कामण येथील पोमण गावातील डोंगरीपाडा परिसरात झालेल्या भीषण अपघातात जयवंती पडवले (रा. बामणपाडा) यांचा जागीच मृत्यू झाला. कामावरून घरी परतत असताना दुचाकीवरून त्यांचांचा तोल जाऊन त्या रस्त्यावर पडल्या. त्याचवेळी त्यांच्या अंगावरून आयशर ट्रक गेल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, सध्या कामण-भिवंडी रोडवर सिमेंट काँक्रीटीकरणाचे काम सुरू असल्याने कुठे कुठे दोन्ही लेनच्या गाड्या एका लेनवर चालू असतात. एका लेनवरुन दुसऱ्या ऐकेरी लेनवर जात असताना हा अपघात घडला. ठेकेदाराने सुरक्षेचे दृष्टीने योग्य नियोजन न केल्याचा आरोप होत आहे. या अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत असून, पोलिसांनी घटनेची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.0
0
Report
Advertisement
येवला रेलवे स्टेशन सुविधाओं के अभाव पर DRM का दौरा, पुणे-अमरावती एक्सप्रेस ठहराव मांग
Yeola, Maharashtra:पैठणी प्रसिद्ध असलेल्या येवला शहराचे रेल्वे स्थानक हे अनेक सुविधांपासून वंचित आहे केंद्रीय रेल्वे मंत्रालयामार्फत येवला रेल्वे स्थानकात विविध विकास कामे सुरू असून प्लॅटफॉर्म क्रमांक दोन चे बांधकाम पूर्णत्वास गेले आहेत या संदर्भात पाहणी करण्यासाठी पुणे डिव्हिजनल चे डी आर एम राजेश कुमार वर्मा, वाणिज्य व्यवस्थापक अनिल कुमार पाठक आदींनी येवला रेल्वे स्थानकाला भेट दिली. मात्र या ठिकाणी काही आवश्यक बाबी अपूर्ण असल्यामुळे पुणे अमरावती या एक्सप्रेसला थांबा अद्याप सुरू झालेला नाही तसेच आरक्षण खिडकी लवकरात लवकर सुरू करावी यासह आषाढी वारीनिमित्त या रेल्वे स्थानकावर पंढरपूर स्पेशल रेल्वे गाड्यांना थांबा मिळावा या विविध मागण्यांचे निवेदन डी आर यु सी सी सदस्य योगेश सोनवणे, प्रवासी संघटनेचे सदस्य अविनाश कुकर आदींनी डी आर एम राजेश वर्मा यांना दिले याप्रसंगी या निवेदनांची दखल घेऊन लवकरात लवकर पुणे अमरावती एक्सप्रेसला थांबा मिळवण्यासाठी प्रयत्न केले जातील अशी माहिती वर्मा यांनी दिली0
0
Report
प्लेज़ेंट पार्क में एयरबैग खुलने से 25 वर्षीय मोहित सोनी की मौत, पुलिस जांच
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक प्लेजंट पार्कमध्ये गाडीतील एअरबॅग उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू; पोलिसांकडून तपास सुरू मिरा-भाईंदर : प्लेजंट पार्क परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली असून, होंडा सिटी गाडीतील एअरबॅग अचानक उघडल्याने २५ वर्षीय युवकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. मृत युवकाचे नाव मोहित सोनी (२५) असे असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. प्राथमिक माहितीनुसार, गाडीत चालवताना , गाडीतील एअरबॅग अनपेक्षितपणे उघडली. या घटनेत मोहित सोनी यांच्या मानेवर गंभीर दुखापत झाली. त्यानंतर त्यांची प्रकृती खालावल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मोहित सोनी यांच्या मृत्यूमागील नेमके कारण काय, गाडीतील एअरबॅग नेमकी कशामुळे उघडली आणि या घटनेत अन्य कोणते तांत्रिक कारण आहे का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. वैद्यकीय अहवाल, तांत्रिक तपासणी आणि इतर पुराव्यांच्या आधारे पुढील चौकशी करण्यात येत असून, अधिक तपशीलवार माहितीची प्रतीक्षा आहे.0
0
Report
Shirur DP theft hits farmers as cables stolen; approx. 3 lakh loss
Shirur, Maharashtra:ऐन दुष्काळाच्या सावटात शिरूर तालुक्यातील पिंपरखेड येथे अज्ञात चोरट्यांनी धुमाकूळ घातलाय. घोडनदीवरील विद्युत रोहित्र म्हणजेच डीपी अज्ञात चोरट्यांनी फोडल्याची घटना घडली आहे. एवढंच नाही, तर या भागातील सुमारे २० हून अधिक शेतकऱ्यांच्या विद्युत पंपाच्या केबलही चोरट्यांनी लंपास केल्या आहेत. या चोरीत शेतकऱ्यांचे सुमारे ३ लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. दुष्काळामुळे आधीच शेतकरी संकटात असताना, आता या चोरीमुळे त्यांच्यासमोरील अडचणी आणखी वाढल्या आहेत. दरम्यान, या भागात चोरण्यांचे प्रमाण प्रचंड वाढले असून, शेतकऱ्यांनी पोलिसांकडे वारंवार रात्रगस्त घालण्याची मागणी केली होती. मात्र, टाकळी हाजी पोलिसांना या घटनांचे गांभीर्य नसल्याचा संतप्त आरोप आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केला जातोय. पोलीस या चोरांचा बंदोबस्त कधी करणार? असा सवाल आता उपस्थित होतोय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
Advertisement
यवतमाळ में उद्धव ठाकरे की रैली: शिवसेना प्रमुख आज संबोधित करेंगे
Yavatmal, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा आज यवतमाळ येथे दोघ असून, ते सभेला संबंधित करणार आहेत0
0
Report
पिंपरी-चिंचवड पुलिस ने अवैध हथियार के साथ दो शस्त्रधारी आरोपी गिरफ्तार
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेच्या युनिट-२ ने बेकायदा शस्त्रांविरोधातील कारवाईत यश मिळवत दोन सराईत आरोपींना अटक केलीय. या कारवाईत आरोपींकडून तीन पिस्तुल आणि दोन जिवंत काडतुस जप्त करण्यात आली आहेत. आरोपी बावधन परिसरात शस्त्रांसह येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आर्यन जाधव आणि ओमकार मोरे या दोघांना ताब्यात घेतले. ओमकार मोरे याच्यावर यापूर्वीही आर्म्स ॲक्टसह गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली. आरोपींविरुद्ध बावधन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल असून गुन्हे शाखेकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
धाराशिव में मल्हार पाटील ने ओमराजे निंबाळकर को चुनौती दी; MP2029 बैनर विवाद
Dharashiv, Maharashtra:धाराशिव: भाजपा आमदार राणाजगजितसिंह पाटलांचे पुञ मल्हार पाटलांनी खासदार ओमराजे निंबाळकर यांना डिवचले मल्हार पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भावी खासदार अशा आशयाचे धाराशिव शहरात लावले बॅनर खासदार ओमराजे यांनी महायुतीमध्ये प्रवेश केल्यानंतर भाजपाचे युवा नेते मल्हार पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून MP2029 अशी केली बॅनरबाजी मल्हार पाटलांकडून ओमराजे निंबाळकर यांना खासदारीला चॅलेंज देण्यासाठी सज्ज झाल्याची शहरभर च चर्चा मल्हार पाटलांची खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या विरोधात लढण्याची तयारी?0
0
Report
Advertisement
कराड बस स्ट Stand पर धमकी देकर मंगलसूत्र झपटे; दंपति गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड बसस्थानक परिसरात महिलेस जीवे मारण्याची धमकी देत तिच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र हिसकावून पळ काढणाऱ्या पती-पत्नीच्या मुसक्या आवळण्यात कराड शहर पोलिसांना यश आले आहे. या बंटी बबली आरोपींकडून सुमारे दीड लाख रुपये किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र जप्त करण्यात आले असून, तपासादरम्यान या रेकाॅर्डवरील गुन्हेगारांकडून आणखी तीन गुन्हे उघडकीस आणण्यात कराड पोलिसांना यश आले आहे. आरोपी श्रावण कांबळे आणि त्याची पत्नी पूनम कांबळे यांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून न्यायालयाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
भंडारा के मातोश्री पांदण रस्तों में गुणवत्ताहीन काम, आरोपित ठेकेदार और भ्रष्टाचार
Bhandara, Maharashtra:अंदाजपत्रकाला डावलून मातोश्री पांदण रस्त्यांची कामे?... निकृष्ट दर्जाच्या कामांवर ग्रामस्थांचा आक्षेप.... पांदण रस्ते ठरत आहेत कंत्राटदाराचे कुरण.... Anchor : भंडारा जिल्ह्यात मातोश्री पांदण रस्ता योजनेअंतर्गत अनेक गावांमध्ये रस्त्यांची कामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या गुणवत्तेवर आता प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. निकृष्ट दर्जाचे काम, मनरेगाच्या नियमांचे उल्लंघन आणि यंत्रसामग्रीचा वापर केल्याचे आरोप ग्रामस्थांनी केले असून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारीही दाखल करण्यात आल्या आहेत. VO : ग्रामीण भागातील कच्च्या रस्त्यांचे सक्षमीकरण करण्यासाठी मातोश्री पांडण रस्ता योजना राबविण्यात येत आहे. या योजनेत लाखो रुपयांचा निधी खर्च करून रस्त्यांवर मुरूम व खडी टाकण्याची कामे केली जात आहेत. मात्र भंडारा जिल्ह्यात अनेक ठिकाणी ही कामे निकृष्ट दर्जाची होत असल्याचा आरोप होत आहे. मजुरांना रोजगार देण्याऐवजी यंत्रसामग्रीचा वापर होत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. तसेच बोगस मजूर दाखवून केवळ फोटो काढले जातात आणि प्रत्यक्ष काम यंत्रांद्वारे केले जाते, असा दावाही तक्रारीत करण्यात आला आहे. यामुळे स्थानिक गरजू मजूर रोजगारापासून वंचित राहत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे. तुमसर तालुक्यातील रूपेरा आणि मोहाडी तालुक्यातील नवेगाव येथील नागरिकांनी या प्रकरणी जिल्हाधिकारी‑ंकडे लेखी तक्रार सादर केली आहे. या योजनेतील कामे काही कंत्राटदार आणि राजकीय नेत्यांसाठी 'कुरण' ठरत असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. BYTE : मनोहर बिसने, तक्रारदार रूपेरा BYTE :- रत्न पुंडे, ग्रामपंचायत सदस्य नवेगाव VO : तांत्रिक मंजुरीनुसार पांदण रस्त्याच्या कामात प्रथम ६ इंच जाडीचा मुरूम टाकून त्याची योग्य दबाई करणे आवश्यक असते. त्यानंतर ८० एमएम व ४० एमएम खडीचे थर टाकून दबाई आणि शेवटी घोटाई करणे अपेक्षित आहे. मात्र अनेक ठिकाणी या निकषांचे पालन होत नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. यामुळे शासनाचा निधी वाया जात असून कामांच्या गुणवत्तेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. BYTE : प्रशांत पडोळे, खासदार Vo : ग्रामस्थांच्या तक्रारींनंतर प्रशासन या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
एमआईडीसी के लिए अरापुर के पास जमीन माप पूरी, किसान मुआवजे पर चर्चा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:प्रस्तावित एमआयडीसीसाठी आरापूर जवळपास दीड महिन्यानंतर जमीन मोजणीचे काम पूर्ण झाले आहे. आता दरनिश्चितीच्या वाटाघाटी होणार असून या संदर्भात मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. सुलतानाबाद, आरापूर आणि गवळीशिवरा येथील शेतकऱ्यांची ही बैठक सकाळी ११ वाजता होईल. नमोजणीदरम्यान काही शेतकऱ्यांनी फळझाडे आणि बांधकामांचा प्रश्न उपस्थित केला होता. 'आधी जमिनीचे दर निश्चित करा, मगच मोजणी करा,' अशी मागणी त्यांनी केली होती. आता मोजणी पूर्ण झाली असली तरी मोबदल्याची योग्य रक्कम मिळावी यावर शेतकरी ठाम आहेत. दुसरीकडे, ज्या शेतकऱ्यांच्या जमिनीची मोजणी झालेली नाही त्यांची जमीन एमआयडीसीतून वगळणार का, हा प्रश्नही या बैठकीत चर्चेला येण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
