icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जैकवेल गेट में लीकेज से छत्रपति संभाजी नगर में पानी आपूर्ति जून तक स्थगित?

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर नवीन पाणी योजनेला पुन्हा ब्रेक; जॅकवेल गेटला गळती, पाणीपुरवठा महिनाभर लांबणार जाण्याची शक्यता ANC : छत्रपती संभाजीनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी… शहराच्या नवीन पाणीपुरवठा योजनेला पुन्हा मोठा धक्का बसला आहे. जायकवाडी धरणातील जॅकवेलच्या गेटला गळती लागल्यामुळे पाणीपुरवठा आता मेा़जवजी जूनपर्यंत लांबण्याची शक्यता आहे. शहराच्या नव्या पाणी योजनेसाठी जायकवाडी धरणात उभारण्यात आलेल्या जॅकवेलच्या गेटमध्ये गळती आढळली आहे. यासोबतच अँप्रोच ब्रिजवरील चेअरबेड्सनाही तडे गेल्याचे समोर आले आहे. या त्रुटींबाबत न्यायालयीन समितीने अडीच महिन्यांपूर्वीच तातडीने दुरुस्तीचे आदेश दिले होते. मात्र, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि जीव्हीपीआर या कंत्राटदार कंपनीकडून अद्याप काम पूर्ण झालेले नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, समितीने दाखवून दिलेल्या त्रुटींपैकी सुमारे ५० टक्के त्रुटी अजूनही प्रलंबित आहेत. दरम्यान, जॅकवेल गेटची दुरुस्ती करण्यासाठी पाणीपुरवठा तात्पुरता बंद करावा लागणार आहे.
0
0
Report

कामशेत में पुलिस ने नशीले पदार्थ के खिलाफ दबिश, दो युवक गिरफ्तार

Varsoli, Maharashtra:कामशेत येथे अंमली पदार्थांविरोधात पोलिसांची धडक कारवाई करण्यात आली असून दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक आकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून ही कारवाई करण्यात आली. आरोपींची झडती घेतली असता त्यांच्या जवळून सुमारे 6 लाख 20 हजार रुपये किमतीचा एमडी (अंमली पदार्थ) जप्त करण्यात आला. तसेच एक चारचाकी वाहन, मोबाईल फोन व इतर साहित्यही हस्तगत करण्यात आले. या कारवाईमुळे परिसरात खळबळ उडाली असून अंमली पदार्थांच्या साखळीवर मोठा आघात झाल्याचे मानले जात आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपींची कामशेत बाजारपेठेतून धिंड काढत अंमली पदार्थ गुन्हेगारी विरोधात कडक इशारा दिला असून दोन आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले असून पुढील तपास सुरू आहे...
0
0
Report
Advertisement

पुणे में नाती के साथ दुष्कर्म: 60 वर्षीय आज़ोबा गिरफ्तार, पीड़िता स्थिर

Bhor, Maharashtra:पुण्यातील पर्वती भागात काल रात्री एका ६० वर्षीय नराधम आजोबाने स्वतःच्या ९ वर्षीय नातीवर लैंगिक अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून जागरूक शेजाऱ्यांनी धाव घेत नराधमाला रंगेहात पकडले. पर्वती पोलिसांनी तातडीने कारवाई करत आरोपीला अटक केली आहे. पीडित मुलीची प्रकृती स्थिर असून आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेची वेळ आणि ठिकाण: ५ मे २०२६ रोजी रात्री ९:३० च्या sुमारास पर्वती पोलीस स्टेशनच्या हद्दीत पर्वती पायथ्याजवळ ही घटना घडली. एका वयोवृद्ध व्यक्तीने (आजोबा) आपल्या स्वतःच्या मुलीच्या ९ वर्षांच्या मुलीला (नात) खोलीत बोलावून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीच्या रडण्याचा आवाज ऐकून शेजारच्या महिलेने आणि इतर नागरिकांनी तात्काळ हस्तक्षेप करून त्या नराधमाला पकडून ठेवले. माहिती मिळताच पोलीस मार्शल घटनास्थळी पोहोचले आणि आरोपीला ताब्यात घेतले. पीडित मुलीला ससून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. वैद्यकीय तपासणीनंतर तिची प्रकृती स्थिर असल्याने तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. आरोपीविरुद्ध पोक्सो (POCSO) कलम ६, १० आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ७५, ६४, ६६ अन्वये गंभीर गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर परिसरात काही काळ संताप व्यक्त करण्यात आला, मात्र पोलीस बंदोबस्तामुळे आता परिस्थिती पूर्णपणे शांत आहे.
0
0
Report
Advertisement

वसई विरार में चार नए उड्डाणपूल से ट्रैफिक जाम जल्द खत्म होगा

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार के लिए आनंद की खबर लवकरच वाहतूक कोंडीतून होणार सुटका एम एम आर डी ए बांधणार नवे ४ उड्डाणपूल महापौर एमएमआरडीए के अधिकारीयों ने शहर की जगहों की निरीक्षण कर आढावा लिया वसई विरार में एमएमआरडीए के अधिकारी और महापौर अजीव पाटील याकडून शहर में नव्याने बनवले जाणारे महत्त्वाच्या पुलांच्या जागांची पाहणी करून आढावा घेतला.. विराट नगर, ओसवाल नगरी, अलकापुरी आणि उमेळमान या ठिकाणी नव्याने उड्डाणपूल बनवले जाणार असल्याने वसई विरारकरांची वाहतूक कोंडीतून लवकरात सुटका होणार आहे.... महापौर अजीव पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही ठिकाणी तांत्रिक अडचणी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न समोर आले असून त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. येत्या आठवड्यात ना-हरकत प्रमाणपत्र मिळण्याची शक्यता असून त्यानंतर कामांना गती दिली जाणार आहे.त्यामुळे या उड्डाणपूलांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.,.. या प्रकल्पांमुळे वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होणार असून 36 किलोमीटरच्या रिंग रूटसह भाईंदर-नायगाव दुमजली पूल, वैतरणा खाडीवरील पूल आणि सागरी महामार्गालाही चालना मिळणार आहे. स्थानिक मच्छीमार, शेतकरी आणि पर्यावरणाचे हित जपतच विकास साधला जाईल, अशी ग्वाही प्रशासनाने दिली आहे。
0
0
Report

टँकर वेल्डिंग के दौरान धमाका, एक मजदूर गंभीर रूप से घायल; CCTV में पूरी घटना कैद

Bhor, Maharashtra:ब्रेक टँकर वेल्डिंग करताना स्फोट, एक कामगार गंभीर जखमी. सीसीटीव्ही मध्ये झाला सर्व प्रकार कैद पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या माळी मळा परिसरात आज सकाळी पेट्रोलजन्य टँकरच्या वेल्डिंगचे काम सुरू असतानाही टाकीत असलेल्या गॅसमुळे अचानक झालेल्या स्फोटात भाजल्यामुळे एक कामगार गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर पुण्यातील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील माळी मळा परिसरातील ‘भारत वेल्डिंग वर्क्स’ या वर्कशॉपमध्ये टँकरच्या दुरुस्तीचे काम सुरू होते. काम सुरू असतानाच अचानक मोठा स्फोट झाला. स्फोटाची तीव्रता इतकी होती की वरील पत्र्याचे शेड तुटून पत्रे बाजूला उडून पडले. या घटनेत चांद बाबू हा कामगार गंभीर भाजला. स्फोटानंतर तो शेडखाली अडकला होता. जखमीला बाहेर काढले आणि तातडीने रुग्णवाहिका बोलावून पुण्यातील रुग्णालयात उपचारासाठी पाठवले. स्फोटात टँकरचे मोठे नुकसान झाले असून काही अंतरावरपर्यंत आवाज ऐकू गेल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. सुदैवाने इतर कोणतीही जीवितहानी झाली नाही. संबंधित टँکرचा वापर पेट्रोल व डिझेल वाहतुकीसाठी केला जात होता. टाकीत उरलेल्या ज्वलनशील वायूंच्या साठ्यामुळे वेल्डिंगदरम्यान ठिणगी पडून स्फोट झाला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. परंतु यांचे नेमके कारण शोधण्यासाठी तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में 60 साल की लड़ाई के बाद सरकारी इंजीनियरिंग कॉलेज मंजूर

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - सोलापुरात तब्बल 60 वर्षांच्या लढ्यानंतर शासकीय अभियांत्रिकी कॉलेज मंजूर - मंगळवारी मंत्रालयातील कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय - आ. देवेंद्र कोठे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केला होता पाठपुरावा - यंदाच्या शैक्षणिक वर्षापासूनच प्रवेश प्रक्रियेला होणार सुरुवात - पहिल्या बॅचमध्ये तीन शाखात 180 विद्यार्थ्यांचा होणार प्रवेश - गेल्या अनेक वर्षांपासून अभियांत्रिकी कॉलेजची मागणी पूर्ण झाल्याने सोलापुरातील मोठ्या प्रमाणात असणाऱ्या कामगार वर्गांच्या पाल्यांना होणार फायदा
0
0
Report

महात्मा फुले द्विशताब्दी महोत्सव के तहत वाशीम में चित्ररथ का जोरदार स्वागत

Washim, Maharashtra:महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी जयंती महोत्सवाच्या निमित्ताने अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेने महात्मा फुले यांच्या जीवनावर आधारित निर्माण केलेल्या चित्ररथाचे वाशिम शहरात रात्री जोरदार स्वागत करण्यात आले.महात्मा फुले समता परिषदेच्या वतीने हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरविण्यात येत असूनया चित्ररथामध्ये महात्मा जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांचे अर्धाकृती पुतळे तसेच महात्मा फुले यांचा पूर्णाकृती पुतळा,छत्रपती शाहू महाराज आणि डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचेही पुतळे साकारण्यात आले आहेत.विशेष म्हणजे महात्मा फुले लिखित पुस्तक व पेन या प्रतीकांची प्रभावी मांडणी करण्यात आली असून भिडेवाड्याची प्रतिकृती देखील साकारण्यात आली आहे.या चित्ररथाचे वाशिम शहरात आगमन होताच नगराध्यक्ष अनिल केंदळे यांच्या सह नगर सेवक आणि विविध पक्ष,सामाजिक संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि विविध जाती धर्मातील नागरिकांनी जोरदार स्वागत केले.हा चित्र रथ वाशिम शहरातील विविध मार्गांनी फिरवण्यात आला.महात्मा फुले यांच्या द्विशताब्दी वर्षानिमित्त राबविण्यात येणारा हा चित्ररथ उपक्रम सर्व धर्म आणि समाजात समतेची जाणीव दृढ करत नवचैतन्य निर्माण करणारा ठरत आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण स्मार्ट सिटी प्रोजेक्ट पांच साल बाद भी अधूरा; यातायात समस्या गहरी

Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये स्मार्ट सिटीचं काम पाच वर्षापासून संथ गतीने सुरू सॅटिसच्या अर्धवट कामामुळे कल्याणकरांची सध्या तरी वाहतूक कोंडीतून सुटका नाही गेल्या पाच वर्षांपासून स्टेशन परिसरात कासव गतीने सॅटिस प्रकल्प त्याचं एक उत्तम उदाहरण आहे. २०२१ इथे सॅटिसच्या कामाला सुरुवात झाली. मात्र पाच वर्षाचा कालावधी उलटून गेली तरीही सॅटिसचं काम अजून अर्धवट आहे. त्यामुळे स्टेशन परिसरात कल्याणकारांना रोजच वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. दरम्यान या सॅटिसचं कामाचा वेग पाहता हे काम पूर्ण होण्यासाठी अजून काही कालावधी जाऊ शकतो.परिणामी यंदाच्या पावसाळ्यात देखील वाहतूक कोंडीतून कल्याणकरांची काही सुटका होईल असं वाटत नाही. याच सॅटिसच्या कामाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अतिष भोईर यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top