445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर के SK बार में मारपीट, 3 को गिरफ्तार; CCTV में भिड़ंत कैद
Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपूरात बारमध्ये राडा... घटना सीसीटीव्हीत चित्रित. नागपुरात बारमध्ये राडा. बार बंद होण्याची वेळ असल्याने वेटर ने दारू देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणांनी बार मॅनेजरला केली जबर मारहाण. काउंटर वर ठेवलेल्या मद्याच्या बाटलीने मॅनेजर च्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरातील SK बारमधली गुरुवारी रात्रीची घटना. घटनेचा CCTV वायरल, CCTV मध्ये चित्रीत दृश्यात 3 ते 4 आरोपी बार मध्ये तोडफोड करताना दिसताय. मद्याच्या बाटलीने मॅनेजर च्या डोक्यावर फेकत असल्याचं दिसत आहे. मॅनेजरला बाटली मारत असताना तिथे एकाने बचाव केला या मारहाणीत 2 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून 3 आरोपींना अटक केली आहे0
0
Report
पनवेल के कलंबोली में रॉयल स्टैग लाइव कॉन्सर्ट पर विरोध; भाजपा नगरसेविका ने पुलिस को पत्र लिखा
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल के कलंबोली में 25 अप्रैल को रॉयल स्टॅग लाइव कॉन्सर्ट होने वाला है. भाजपा नगरसेविका मनाली ठाकूर ने पुलिस को पत्र लिखकर विरोध जताया. महिलाओं ने पुलिस से इस कॉन्सर्ट को अनुमति न देने की मांग की. कलंबोली शहर में नशामुक्त वातावरण बनाए रखने के लिए यह पहल की गई है और विरोध के संकेत दिए गए हैं.0
0
Report
कल्याण में ठाकरे गुट का उद्घाटन समारोह, वरुण सरदेसाई ने कार्यालय का उद्घाटन किया
Kalyan, Maharashtra:वरुण सरदेसाई ( ठाकरे गट नेते आमदार पॉइंटर) कल्याणमध्ये शक्तीप्रदर्शन आणि कार्यालय उद्घाटन कल्याण ठाकरे गटाचे गटनेते उमेेश बोरगावकर यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेच्या नावाला पसंती उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म संपत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेसाठी वरुण सरदेसाईंनी आपली भूमिका मांडली. काल या निवडणुकीची घोषणा झाली आहे उद्धव ठाकरे सामान्य कार्यकर्ता यामुळे कोणाला संधी मिळेल हे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांचेच आहेत विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा करत असताना महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा होणार आणि त्यानंतरच अधिकृत नावाची घोषणा होणार उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावे असे माझ्यासहित सर्वच शिवसैनकांची इच्छा... मात्र त्यांनी ज्या नावाची घोषणा केली त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल सध्याचं राजकारण विचित्र .. निवडणूक कुठलीही लागली तरी उमेदवार पेक्षा कोणाची मत फुटणार यावर जास्त चर्चा होते हे दुर्दैवी आहे .... वरून सरदेसाई यांचा अशा शब्दांत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला निष्ठा आणि इमान राखण्याचे आवाहन लोकांनी कौल दिल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पक्षाची इमान राखला पाहिजे या मताचा मी आहे "कोण फुटणार आणि कोण नाही, हे पाहण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागत... लवकरच महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत नाव समोर येईल," असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला बाईट.. वरुण सरदेसाई आमदार0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में विश्व हिंदू परिषद- बजरंग दल का कॉरपोरेट जिहाद विरोध प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:नाशिक में कॉरपोरेट जिहाद के विरोध में हिंदुत्ववादी संगठन द्वारा निषेध आंदोलन किया गया. नवी मुंबई के कोकण भवन में विश्व हिंदू परिषद और बजरंग दल के कार्यकर्ताओं ने रस्ते पर उतरकर राष्ट्रव्यापी निषेध आंदोलन किया. इस अवसर पर उन्होंने आरोपी के खिलाफ कठोर कार्रवाई की मांग करते हुए जोरदार घोषणाबाजी की. इसी संदर्भ में निवेदन को कोकण आयुक्त को भी सौंपा गया.0
0
Report
भुजबल के बयान: विलय पर चर्चा खत्म, प्रचार जारी
Ahilyanagar, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीत रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावरून पुन्हा एकदा विधीनिकीकरणाच्या चर्चांना उधाण आल आहे. मात्र अशी कोणतीही चर्चा आमच्याबरोबर झाली नसून दोन्ही बाजूने हा विषय संपला असल्याचा जाहीर केला आहे असं मंत्री छगन भुجبळ यांनी म्हटल आहे. रोहित पवार हे त्यांचे नातेवाईक असल्याने प्रचार करत आहे त्यात काही वाईट नाही त्यांचे पक्षाने पाठिंबा दिल असल्याचं देखील भुجبळ यांनी म्हटल आहे. नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी संपूर्ण टीसीएस कंपनीला बदनाम करणं हे योग्य नसल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. जे प्रकरण झालं आहे त्यावर कारवाई झाली आहे. हा विषय किती ताणायचं आणि त्या कंपनीला जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेरच काढून टाकायचं असा कोणाचा प्रयत्न असेल तर हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर कारवाई झाली नसेल तर उठाव करणे योग्य मात्र पोलीस त्यात पूर्णपणे कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटलंय. इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात बंद असलेला केरोसीन पुरवठा आता पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. राज्याकडे मोठ्या प्रमाणात केरोसीनचा साठा उपलब्ध असून जुन्या परवानाधारकांनी त्यांचे लायसन्स नूतनीकरण झाले असे समजून तात्काळ काम सुरू करावे असे आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्याचबरोबर आखाती देशांतील संघर्ष कधी संपुष्टात येतो हे आताच सांगता येत नसल्याने राज्यात केरोसीनची विक्री आणि पुरवठा यापुढे कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसला तरी कोणताही काम अडलं नाही, प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करत आहे. पोलीस पोलिसांचं काम करताय तर नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले त्यामुळे कुठे काही अडलं नाही त्यामुळे अडचण कशाला निर्माण करायची असे स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
सातारा जिला परिषद में नए अध्यक्ष के भाषण के दौरान भाजपा-शिवसेना में तीखी बहस
Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी(भाजप) आणि विरोधकांमध्ये (शिवसेना) यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास बनकर हे नूतन अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिले असता, त्यांना रोखण्यात आल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी सभागृहात मांडलेल्या विषमुक्त अन्न बालसंस्कार आणि समाजसंस्कार या त्रिसूत्रीचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी ते उभे राहिले होते. मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी त्यांना बोलण्यापासून मज्जाव केल्यामुळे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना सदस्यानी केला आहे .यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांना त्याचा दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घेराव देखील घातला आणि जाब विचारला."कोणत्याही नैतिक अधिकाराखाली उपाध्यक्षांनी मला बोलण्यापासून रोखले विरोधकांना त्यांचे मत मांडू न देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे.सभागृहात सुरू असलेला गोंधळ आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला वॉकआऊट या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी देखील सभागृह सोडल्याने शिवसेना सदस्य अधिक आक्रमक झाले. एक प्रशासक म्हणून सभागृहात काय चालले आहे हे ऐकणे आणि पाहणे ही सीईओंची जबाबदारी होती. त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत सभागृह का सोडले? याचे उत्तर त्यांनी द्यावे.अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बाईट: विकास बनकर शिवसेना सदस्य0
0
Report
Advertisement
पुरंदर में पिंगोरी के पास भीषण जंगल आग, एक हजार एकड़ से अधिक वनसपदा जल
Rui, Maharashtra:पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे जंगलाला लागला वनवा. दीड हजार एकराहून अधिक डोंगरावरील वनसपदा नष्ट. शेतकऱ्याची कडब्याची गंज पेटल्याने त्याचा दीड दोन लाखाचा जाणवरांचा चारा जळून नष्ट झालाय. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे डोंगराला मोठा वनवा लागला असून हा वनवा जवळपास दीड हजार एकरावर पसरलाय. पिंगोरीचे पोलिस पाटील आणि सरपंच यांच्या विनंती नंतर वनविभागाने वानवा विजवण्यास सुरवात केलीय. मात्र तो पर्यंत दीड हजार एकरावरील वनसपदा नष्ट झालीय. हा संपूर्ण भाग जेऊरीच्या खंडोबा मंदिराला लागून आहे. तर या वनव्या दरम्यान एका शेतकऱ्याची कडब्याची गंज पेटल्याने त्याचा दीड दोन लाखाचा जाणवरांचा चारा जाळून नष्ट झालाय.0
0
Report
महाबळेश्वर के पुराने मंदिर की छत गिरने से हड़कंप; मरम्मत और सुरक्षा जांच की मांग
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर येथील जुन्या श्री कृष्णामाई मंदिराच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. मंदिरासमोरील गोमुखाधीन कुंडाची स्वच्छता करत असताना हा प्रकार घडला असून छताचा भाग थेट कुंडात पडला. सुदैवाने काम करणारे युवक थोडक्यात बचावले. हे शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी मंदिर असून ते पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, दीर्घकाळ देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटनेनंतर तातडीने पंचनामा करून मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Satara Warms Up Water Tanker Drive: Administration Fast-Tracking Supply Amid Drought
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच अनेक भागांत पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या मान वाई पाटण तालुक्यात 17 गावांमध्ये आणि 99 वस्त्यांमध्ये 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपायोजनां मध्ये ज्या गावांनी किंवा वाड्या-वस्त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे, तिथे तात्काळ टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रस्तावांमध्ये कोणतीही तांत्रिक अडवणूक न करता लोकांची तहान भागवण्याला प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील प्रलंबित नळ पाणीपुरवठा योजना आणि तात्पुरत्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून कायमस्वरूपी पाणी टंचाई कमी होईल. यामध्ये केवळ पाणीच नव्हे, तर पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये यासाठीही कृषी आणि महसूल विभागाने सतर्क राहावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. "पाणी टंचाईच्या काळात सामान्य नागरिकांचे हाल होता कामा नयेत. टँकरचे वेळापत्रक आणि पाण्याचे वितरण योग्य रीतीने व्हावे यासाठी भरारी पथके नेमली जातील. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशारा यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला0
0
Report
Advertisement
विक्रोळी ड्रग्स तस्कर तस्सू के ठिकानों पर पुलिस की दबिश; तीन मंजिला इमारत तोड़ी
Mumbai, Maharashtra:विक्रोळी मधील कुख्यात ड्रग्स तस्कर मोहम्मद तस्वर यासिन कुरेशी ऊर्फ तस्सू याच्या कार्यालय, जिम आणि घरावर म्हाडा आणि पोलिसांची संयुक्त तोडक कारवाई सुरू आहे. गोरेगाव ड्रग्स प्रकरणांनंतर पोलीस आणि प्रशासन मुंबई मधील ड्रग्स तस्करांच्या मुसक्या आवळताना दिसत आहे. तस्सू हा मुंबई उपनगरातील कुख्यात ड्रग्स तस्कर असून सध्या पोलिसानी त्याला तडीपार केला आहे. मात्र विक्रोळी मध्ये त्याने मोठ्या प्रमाणात अनधिकृत घरे, जिम, कार्यालय उभे केले आहेत. या अगोदर त्याच्या घरावर तोडक कारवाई करण्यात आली होती. मात्र तो आणि त्याचे सहकारी निघून त्याचे काम करीत होते, त्या बॉBombे जिम वर आज म्हाडा आणि पोलिसानी हातोडा मारला.तीन मजली असलेल्या या बांधकामावर हातोडा मारल्याने इथे तणावाचची स्थिती निर्माण झाली आहे. मात्र कायदा सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
बदलापूर एमआईडीसी में डाईंग कंपनी में आग, फायर ब्रिगेड ने आग पर नियंत्रण पाया
Ambernath, Maharashtra:बदलापूर एमआईडीसीत डाईंग कंपनीला आग अग्निशमन दलाच्या चार गाड्यांनी आग विझवली बदलापूर एमआईडीसीतील इको नीट नावाच्या कपड्याच्या डाईंग कंपनीला आज सायंकाळच्या सुमारास आग लागली. आगीची माहिती मिळताच बदलापूर नगरपरिषदेच्या अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आणि त्यांनी तासाभरात ही आग आटोक्यात आणली. ही आग नेमकी कशी लागली? हे अजूनही स्पष्ट होऊ शकलेलं नाही. आग लागली त्यावेळी कंपनीतील सर्व कामगार बाहेर पडले. तसंच कंपनीत असलेला कच्चा माल बाहेर काढून आग वाढणार नाही, याची कंपनीकडून काळजी घेण्यात आली. या आगीत कुणालाही इजा झालेली नसून आग कशी लागली, याचा तपास सुरू असल्याची माहिती अग्निशमन अधिकाऱ्यांनी दिली आहे.0
0
Report
नागपुर में नारीशक्ति वंदन अधिनियम पर महिला बुद्धिजीवी सम्मेलन
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात नारीशक्ती वंदन अधिनियम महिला बुद्धिजीवी संमेलन होतेय अमृता फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत कविवर्य सुरेश भट सभागृहात हे सम्मेलन होतेय0
0
Report
Advertisement
पंद्रह महिन्यांनंतर वाल्मीक कराड जेलबाहेर पडला, अचानक अस्पताल में भर्ती, हालत स्थिर
Beed, Maharashtra:ANC - सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी वाल्मीक कराड याची प्रकृती आज अचानक ढासाळली. त्याला बीडच्या जिल्हा रुग्णालयात तात्काळ हलवण्यात आले. विविध तपासल्यानंतर वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सर्व काही नॉर्मल असल्याचे सांगत वाल्मीक ला पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. तब्बल 15 महिन्यानंतर वाल्मीक पहिल्यांदाच जिल्हा कारागृहाबाहेर आला होता. पोलीसांच्या चोक बंदोबस्तात जिल्हा रुग्णालयात दाखल होत असलेला हा आहे वाल्मीक कराड. संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मीक कराड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. शकाळी नऊ वाजता वाल्मीक कराड ला अस्वस्थ वाटू लागले. जिल्हा कारागृहातील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी केली. त्रास वाढत असल्याने अखेर त्याला जिल्हा रुग्णालयात हलवण्याचा निर्णय कारागृह प्रशासनाने घेतला. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी वाल्मीक कराड याला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. सुरुवातीला त्याचे रक्ताचे नमुने घेण्यात आले. त्यानंतर त्याचा सिटीस्कॅन देखील काढण्यात आला. अस्वस्थ वाटू लागल्याने वैद्यकीय अधिकाऱ्यांनी ईसीजी देखील काढला. तब्बल साडेतीन तास जिल्हा रुग्णालयात त्याच्यावर उपचार देखील करण्यात आले. मात्र थोड्याच वेळात सर्व चाचण्याचा अहवाल आला. चाचण्यात जरूरी काहीही समोर आले नाहीत त्यामुळे आरोपी वाल्मीक कराडला पुन्हा एकदा जिल्हा कारागृहात पाठवण्यात आले. वाल्मीकची सध्याची प्रकृती पाहता वाल्मीक पूर्णपणे थकलेल्या लीन अवस्थेत दिसून आला. वाल्मीकच्या चेहऱ्यावर पश्चातापाचे भाव दिसून आले. त्यामुळेच कुठलाही गुन्हा करताना गुन्हेगारांनी चार वेळा विचार केला पाहिजे असेच वाल्मीकच्या या संपूर्ण परिस्थितीकडे पाहता दिसून येईल...0
0
Report
112 कॉल पर पुलिस पहुंची: नात ने दादी जनाबाई सुरवसे की हत्या कर दी
Pandharpur, Maharashtra:गस्तीसाठी असलेल्या पोलिसांना 112 वर कॉल आला, घटनास्थळी जाई पर्यंत नातिने घेतला आजीचा जीव आज्जी सारखी किरकिर करते म्हणून नातिने 82 वर्षांच्या आजीचा जीव घेतला. मध्यरात्री दगडावर डोकं आपटून खून केला. करमाळा तालुक्यातील विहाळ येथे ही धक्कादायक घटना घडली आहे. जनाबाई भगवान सुरवसे असे मृत वृद्धेचे नाव आहे. या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. जनाबाई सुरवसे या विहाळ येथे कुटुंबीयांसह राहात होत्या. त्यांना पक्षाघात झालेला होता. विहाळ येथील यात्रा बंदोबस्तासाठी पोलीस पथक कार्यरत होते. रात्री उशिरा डायल 112 पोलिसांना कॉल आला आणि एका वृद्धेला तिची नात मारहाण करत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत पाहणी केली पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांना लग्न झालेलली नात मनीषा रवींद्र लवंगारे हिने आजीचे हातपाय मोडून आणि दगडावर डोके आपटून खून केल्याच निदर्शनास आले. पोलिसांना मृतदेहाजवळ रक्ताचे डाग आढळले. तसेच डोक्याच्या मागील बाजूला गंभीर जखमा असल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणी नातीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.0
0
Report
अंबरनाथ के गोविंद पुल नाले में रासायनिक अपशिष्ट, नमूने लेकर कड़ी कार्रवाई की बात
Ambernath, Maharashtra:अंबरनाथच्या गोविंद पुलाखालील नाल्यात रासायनिक सांडपाणी? प्रदूषण नियंत्रण मंडळाने घेतले पाण्याचे नमुने गोविंद पुलाखालून वाहणारा नाला पुढे शिवगंगा नगर, समर्थ गृह सोसायटी, स्वामी देवप्रकाश सोसायटी, मोहन पुरम, गुरुकुल शाळा, भिडेवाडी या भागाच्या मागून एएमपी गेटकडे वाहत जातो. या नाल्यात रात्रीच्या वेळी केमिकलयुक्त सांडपाणी सोडलं जात असल्याचा संशय होता. ज्यामुळे या भागातल्या नागरिकांना उग्र दर्पाचा त्रास होत होता. याबाबत नागरिकांनी नगरसेवक कुणाल भोईर यांच्याकडे समस्या मांडताच भोईर यांनी कल्याणच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या कार्यालयात प्रादेशिक अधिकारी जयंत हजारे यांची भेट घेत लेखी तक्रार केली. या तक्रारीची दखल घेत उपप्रादेशिक अधिकारी प्रवीण पाटील आणि सुधीर भताने यांनी गुरुवारी रात्री उशिरा या नाल्याची प्रत्यक्ष पाहणी करत नाल्यातील पाण्याचे नमुने घेतले. हे नमुने प्रयोगशाळेत पाठवून तपासणी केली जाणार आहे. या नाल्यात प्रदूषण करून स्थानिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी नगरसेवक कुणाल भोईर यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
