icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ दूध संघ: 441 इकाइयाँ अपात्र, 235 के निर्णय बाकी, मतदान अधिकार समाप्त

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या अवसानातील 644 संस्था पात्र तर 441 संस्था अपात्र करण्यात आले आहेत. उर्वरित 235 संस्थांचा निर्णय प्रलंबित आहेत. अपात्र ठरलेल्या संस्थांमध्ये सर्वाधिक फटका हया राष्ट्रवादी, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाशी संबंधित आहेत. तर तालुका निहाय विचार केल्यास भुदरगड मधील अपात्र ठरलेल्या सर्वाधिक संस्था आहेत. अपात्र ठरलेल्या या संस्थांना गोकुळच्या निवडणुकीत आता मतदानाचा अधिकार नसणार आहे, दूध संघाला दूध कमी आल्याने या संस्था अवसानात निघाल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

शालार्थ ID घोटाले में 15–18 हजार पन्नों के आरोपपत्र की संभावना

Nashik, Maharashtra:शालार्थ आयडी घोटाळा प्रकरणात १५ ते १८ हजार पानांचे दोषारोपपत्र होणार दाखल. बहुचरित शालार्थ आयडी घोटाळ्याच्या तपासाला पुन्हा वेग आला असून, सुमारे ९०० संशयितांना पुन्हा चौकशीसाठी सामोरे जावे लागणार आहे. बनावट कागदपत्रांच्या आधारे बोगस शालार्थ आयडी तयार करून शासनाची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप या प्रकरणात आहे. यापूर्वी या घोटाळ्यात माजी शिक्षण उपसंचालक, काही संस्थाचालक तसेच संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तपासादरम्यान मोठ्या प्रमाणात कागदपत्रे, नियुक्ती नोंदी आणि आर्थिक व्यवहारांची छाननी करण्यात येत आहे. प्रकरणाची व्याप्ती लक्षात घेता दोषारोपपत्र विक्रमी १५ ते १८ हजार पानांचे असण्याची शक्यता तपास अधिकारीांनी व्यक्त केली आहे. शालार्थ प्रणाली ही शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाशी संबंधित असल्याने बनावट आयडींच्या माध्यमातून शासन निधीचा अपहार केल्याचा संशय आहे.
0
0
Report

अकोला के रिलायंस गैस प्लांट के पीछे आग, कोई घायल नहीं

Akola, Maharashtra:अकोला शहरातील पातूर रोडवरील चांदूर गावाजवळ असलेल्या रिलायन्स गॅस प्लांटच्या मागील परिसरात आग लागल्याची घटना घडली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दल आणि पोलीस प्रशासनाच्या पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले होते. प्राथमिक माहितीनुसार, ही आग प्लांटच्या मागील भागात ठेवलेल्या साहित्याला लागली होती. सुदैवाने, या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा मनुष्याhानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही त्यामुळे स्थानिक नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. आग लागण्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून संबंधित विभागाकडून याबाबत चौकशी सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर पुलिस ने प्रशिक्षित कुत्तों की मदद से 700 ग्राम गांजा पकड़ा; 4 आरोपी गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:टायटल:---प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला गांजा, रामनगर पोलिसांची चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात केली कारवाई अँकर:-- प्रशिक्षित श्वान पथकाच्या मदतीने चंद्रपूर पोलिसांनी गांजा हुडकून काढला. रामनगर पोलिसांनी चंद्रपूर शहरातील बगड खिडकी परिसरात ही कारवाई केली. कारवाई दरम्यान आरोपींनी ओसाड भागात लपवून ठेवलेला 700 ग्राम गांजा जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली. आरोपींनी अतिशय शिताफीने जमिनीखाली गांजा लपवून ठेवला होता. मात्र प्रशिक्षित श्वानांनी पुरून ठेवलेला गांजा हुडकून काढला. चंद्रपूर पोलिसांनी जिल्ह्यात अंमली पदार्थांच्या वाढत्या तस्करी आणि विक्री वर आळा घालण्यासाठी प्रशिक्षित श्वान पथक सज्ज केले आहे.  याच प्रशिक्षित श्वान पथकाने जिल्ह्यातील पहिली यशस्वी कारवाई केली。
0
0
Report

एमआयएम की बैठक से एकजूटता का संदेश: विधान परिषद चुनाव के लिए तैयार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने एम आय एम पक्षाची बैठक झाली या बैठकीत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी उपस्थित नगरसेवकांना मार्गदर्शन केले आणि संख्याबळ नसलं तरी विधान परिषद निवडणूक स्वबळावर लढायचं असा निश्चय एमआयएम पक्षाने केला इम्तियाज जलील ON विधान परिषद निवडणूक बैठक - राजकारणात काहीही शक्य आहे, आम्ही जेव्हा ही निवडणूक लढवण्याचा ठरवलं त्यावेळी देखील आम्हाला माहीत होतं की आमच्याकडे आकडे किती आहेत, आणि समोरच्या पक्षाकडे किती मतं आहेत - मात्र तरी देखील आम्हाला एक संदेश द्यायचा होता, की एमआयएमपक्षाची मते ही एकजूट आहेत, कुठल्याही परिस्थितीत ते फुटणार नाही आणि कुणालाही ते मतदान करणार नाही - आमच्यावरही खूप दबाव होता, मात्र तरी आमच्या सर्व सदस्यांनी निर्णय घेतला होता की आम्हालाही निवडणूक लढवायची आहे, आणि आता आम्ही ती निवडणूक लढत आहे - आम्हाला जेवढे मत पाहिजे त्यापेक्षा अधिक मतं आम्हाला मिळतील असा आम्हाला विश्वास आहे ON ऑपरेशन टायगर आणि TMC - 2029 ही देशातील शेवटची निवडणूक असणार आहे, त्यांनतर पुन्हा भाजप जर निवडून आली तर या देशात निवडणूक होणार नाही - कारण ज्या प्रकारे विरोधी पक्ष मुक्त भारत करत आहेत पैशाच्या जोरावर, जसे त्यांनी पश्चिम बंगाल मध्ये केले, आणि आज महाराष्ट्र मध्ये जे सुरू आहे, हा सर्व त्याचाच एक भाग आहे. - हा लोकशाहीचा देश आहे आपण 1947 पासून आपल्याला हेच माहीत होतं की या देश जे आहे ते लोकशाही आहे पण दुर्दैवाने मागच्या काही वर्षात या लोकशाहीला संपवून हुकूमशाही दादागिरी आणण्याचा घातक प्रयत्न सुरू आहे - आम्ही या सर्व गोष्टी ंची थट्टा करतो, जे या पक्षामध्ये जात आहे त्यांच्यावरही कसा दबाव आणला जातो, तुम्ही आमच्या सोबत जर नाही आले तर तुमच्यावर कशाप्रकारे गुन्हे दाखल करतो, हे सर्व दमदाटी करून सुरू आहे हे देशासाठी चांगले नाही. ON कलीम कुरेशी - मी जेव्हा आमदार होतो त्यानंतर मी खासदार होतो, तेव्हापासून मी सतत बोलतोय की हा राशन दुकानाचा जो कारभार आहे, ते सरकारच्या आणि मंत्र्यांच्या देखरेख मध्ये सुरू आहे सर्वच शहरांमध्ये असं सुरू आहे. - आमच्या शहरातील देखील पुरवठा अधिकारी या सर्व गोष्टींमध्ये सामील आहे, फक्त पोलिसांना हे माहीत नव्हतं. - हा फक्त आपल्या शहरापुरतं मर्यादित विषय नाही तर हा संपूर्ण राज्यभरात जाळे पसरलेला विषय आहे - महाराष्ट्रातून हे धान्य कशाप्रकारे गुजरातला जाते, गुजरात मध्ये यात भेसळ कशी होते, आणि हेच धान्य एक्सपोर्ट कसे होते, आणि पुन्हा बाजारात कसे येते, यामागे खूप मोठे रॅकेट आहे - यात अनेक शाळांचे मुख्याध्यापक आणि शिक्षक हे सहभागी आहेत. - एका शाळेला खिचडी तयार करण्यासाठी किती तांदूळ देण्यात येतो, आणि त्यातील अर्धा तांदूळ त्यांच्याकडे पोहोचतो आणि अर्धा तांदूळ विकून त्याचं कमिशन मुख्याध्यापकांना मिळते, हे सर्वात मोठे रॅकेट आहे - मी मागे देखील सांगितले होते की यामध्ये भारतीय जनता पार्टीचा मोठा नेता आणि आता छगन भुजबळ साहेब आणि त्यांचे समीर भुजबळ ते सर्व ठरवतात की या शहराचं काम एका माणसाला द्यायचा आहे, प्रामाणिकपणे यांच कमिशन त्यांच्यापर्यंत जातं आता जेव्हा मी यांच्यावर bोट ठेवला तर त्यांना मी एक विनंती करतो तुम्ही एक पत्र सीबीआयला पाठवा, जे काही औरंगाबाद मध्ये घडलं आहे, ते चुकीचं झालेला आहे लोक आमच्यावर बोट ठेवत आहेत. - याची जर चौकशी झाली तर अनेक राशन दुकानदार हे जेलमध्ये असतील, अनेक शाळांचे मुख्याध्यापक हे जेलमध्ये असतील. - आमची विनंती आहे पोलीस आयुक्तांना की यासाठी एक विशेष एसआयटी स्थापन करून त्याची चौकशी करा तेव्हा तुम्हाला कळेल की किती मोठे रॅकेट आहे ON निदा खान - जेव्हा सविस्तर बोलावसं वाटेल तेव्हा यावर सविस्तर बोलू. (बोलणे टाळले)
0
0
Report
Advertisement

गुहागर किनारपट्टी सफाई अभियान पर प्रमोद जठार के बोल से राजनीतिक उबाल

Ratnagiri, Maharashtra:गुहागर - रत्नागिरी.. भास्करराव तुम्ही आमचे मित्र आहात, तुम्ही गुहागरमध्ये कितीही कचरा केलात तरी साफ कारण्याचे काम भाजपचे कार्यकर्ते करतील..... प्रमोद जठार देखील तुम्हाच्या तालमीत वाढलाय लवकरात लवकर भेटू..... भाजप आमदार प्रमोद जठार यांच्या वक्तव्यामुळे चर्चाना उधाण. गुहागर किनारपट्टी स्वच्छता मोहीम करताना भाजपचे विधानपरिषद आमदार प्रमोद जठार यांची गुहागरचे आमदार भास्कर जाधवांबद्दल बोलताना आमदार जठार यांचे विधान. लवकरात लवकर भेटू या जठार यांच्या विधानामुळे राजकीय चर्चांना उधाण
0
0
Report

अकोला जिले में मानसून की तेज शुरुआत, सातपुड़ा क्षेत्र में नदी-नाले उफान पर

Akola, Maharashtra:अकोला जिले में गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विविध ठिकाणी हजेरी लावण्यास सुरुवात केली असून आज अकोट तालुक्यातील सातपुडा परिसरात जोरदार पाऊस बरसला. या पावसामुळे परिसरातील नद्या-नाले वाहू लागले असून खिरखुड येथील नदीही पहिल्याच पाण्यात दुथडी भरून वाहताना दिसली. नदीत मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह सुरू झाल्याने परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. सातपुडा परिसरात यावर्षीच्या मान्सूनचा जोरदार प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना गती मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, खिरखुड येथील नदीला आलेले पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पहिल्याच पावसात नदी वाहू लागल्याने गावकऱ्यांनी आनंद व्यक्त करत मान्सूनचे स्वागत केले आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top