445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संजय राऊत की धमकी के बाद विक्हे पाटील पर नया हमला, शिवसेना की चेतावनी
Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash विखे पाटील लवकरच भिकेला लागणार... विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातून खा.संजय राऊत यांचा विखे पाटलांवर जहरी टीका... राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही शिवसेनेच्या नादाला लागू नका.. खा.संजय राऊत यांचे विखे पाटलांना बालेकिल्ल्यातूनच खुलं आवाहन... शिवसेनेच्या नादाला लागलात तर संजय राऊत तुमच्या मतदारसंघात ठाण मांडून बसेल... ज्या दिवशी आमची म्हणजेच उद्धव ठाकरेंची सत्ता येईल तेव्हा तुम्ही आमच्या दारात असाल... तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला एकाच वेळी केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदे याच शिवसेनेने दिलीये , हे विसरू नका.. अनेक घर बदलून तुम्ही भाजपमध्ये गेलात , त्यामुळे तुम्ही लाचारीचे काम चालू ठेवा... भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना बालेकिल्ल्यातच खा.संजय राऊतांकडून कोपरखळी...0
0
Report
संभाजी नगर महायुती में बगावत और सीट बंटवारे पर शिवसेना-भाजप के बीच घमासान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर की विधान परिषद की पारंपरिक सीट शिवसेना की मानी जाती थी, परंतु वह सीट भाजपा को मिल गई जिससे शिवसेना में नाराजगी है। इस खबर में अब्दुल सत्तार के बेटे ने सीधे उमेदवारी का अर्ज भरा और महायुती के भीतर बगावत की खबरें उभरीं। भाजपा हमारे मान-सम्मान को नहीं दे रही—यह आरोप अब्दुल सत्तार ने लगाए। इसी बीच एकनाथ शिंदे ने संभाजी नगर के शिवसेना नेताओं की बैठक बुलाने की बात कही। संभाजी नगर महायुती में बगावत, भाजपा को सीट मिली और शिवसेना ने अर्ज भरा। यह कदम शिवसेना को समाप्त करने की एक साजिश बताया गया। अब्दुल सत्तार की नाराज़गी, दानवे- सत्तार के बीच में तकरार, और वरिष्ठ नेताओं के निर्णय पर निर्भर आगे की राह दिख रही है। साथ ही किशोरी पेडणेकर ने टिप्पणी दी कि सामने आने वाले दिनों में स्थिति स्पष्ट होगी।0
0
Report
नागावे के अवैध प्लास्टिक यूनिट में आग, प्रशासन अभी तक कारण नहीं खोज पाया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(चिपळूण) नागावे अवैध प्लास्टिक युनिट आग प्रकरण.. २ महिन्यांनंतरही प्रशासन सुस्त, वरिष्ठ स्तरावर तक्रार होणार.. अँकर: नागावे येथील मोहम्मद सिराज खान यांच्या अवैध प्लास्टिक रिसायकल युनिटला २१ मार्च रोजी लागलेल्या आगीचे कारण शोधण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासनाकडून अजूनही "नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे" असेच उत्तर दिले जात आहे.हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतर काल, १३ मे रोजी MPCB ने पाहणी केली असता, २ महिन्यांनंतरही तिथे प्लास्टिक दुमसत असून विषारी धूर पसरत असल्याचे समोर आले.प्रांताधिकारी, पोलीस आणि MPCB ने कोणतीही कारवाई न केल्याने, प्रशासन अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.याप्रकरणी आता वरिष्ठ स्तरावर तक्रार केली जाणार असल्याचे समितीने म्हटले आहे.0
0
Report
Advertisement
पुणे-नाशिक महामार्गावर मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रोष: कांद्याच्या भावासाठी महाविकास आघाडीचा रास्ता रोको
Manchar, Maharashtra:गेली कित्येक दिवस घामाच्या दामासाठी बळीराजा रस्त्यावर उतरलाय. ज्या कांद्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं, तोच कांदा आज शेतकऱ्याच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आणतोय. एक किलो कांदा पिकवायला १५ ते १६ रुपये खर्च येतो, पण बाजारात भाव मिळतोय अवघा ७ ते ८ रुपये! नाफेडची खरेदी म्हणजे ऊंटाच्या तोंडात जिरं ठरणार आहे. याच संतापातून आज पुण्याच्या मंचरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर महाविकास आघाडीने विराट 'रास्ता रोको' केला. एका शेतकऱ्याने तर व्यासपीठावरच टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय. ज्या कांद्याने भल्याभल्याांचे सत्तेचे सिंहासन हलवले, तोच कांदा आज महाराष्ट्राच्या मातीत कवडीमोल झालाय! घामाचे दाम मिळेनात, आणि हक्काच्या पैशासाठी बळीराजाला रस्त्यावर उतरावं लागलंय. नाशिकच्या आंदोलनानंतर सरकारने १५ रुपये ८० पैशांनी कांदा खरेदीची घोषणा तर केली... पण ती ठरली केवळ 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात'! कारण दोन लाख मेट्रिक टन खरेदीने कोट्यवधी शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार? हाच सवाल विचारत आज पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरमध्ये जनसामान्यांचा आक्रोश फुटला! रोहित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदार) आंदोलन शांततेत सुरू होतं, पण शेतकऱ्याच्या काळजातला संताप आणि हतबलता किती भयानक आहे, याचं जिवंत आणि थरारक रूप मंचरच्या व्यासपीठावर पाहायला मिळालं! कांद्याला भाव मिळत नाही म्हणून एका हताश शेतकऱ्याने थेट भर व्यासपीठावर विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला! सुदैवाने कार्यकर्त्यांनी त्याला रोखलं, पण या घटनेने महाराष्ट्राच्या व्यवस्थेला चपराक लगावली आहे! शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार) हर्षवर्धन सपकाळ(प्रदेशाध्यक्ष कॉग्रेस) यांनी म्हटलंय, तब्बल दोन तास पुणे-नाशिक महामार्ग ठप्प होता. हजारो वाहनांच्या रांगांनी ट्रॅफिकची पंगती मोडल्या. आंदोलने अधिक धारला पाहता पोलिसांनी दडपशाहीचे अस्त्र उपसले. आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हर्षवर्धन सपकाळ आमदार बाबाजी काळे माजी आमदार अशोक पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, या आणीबाणीजनक परिस्थितीवर रोहित पवारांनी स्पष्ट इशारा दिला, “आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर हा वणवा अधिक पेटेल.” अतिरिक्त मांदियाळी मध्ये अतुल बेनके यांनी सांगितले की सरकारने कांदा २४ रुपये दराने खरेदी केली होती, पर आज महागाई वाढलीय त्यामुळे कांदा २५ ते ३० रुपये दराने खरेदी असायला हवा. नाफेडने दोन लाख नव्हे, तर दहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा, ही मागणी आता मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचली आहे. महाविकास आघाडीचे नेते शेतकरी आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झालेत. आजचा रस्ता रोको फक्त एक ठिणगी होती, सरकारने वेळीच निर्णय केला नाही, तर या ठिणगीचा वणवा पुढे पेटतोच असं दिसतंय. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मीडियाज मंचर पुणे.0
0
Report
निवडणूक प्रक्रिया़ में बाधा पर प्रणिती शिंदे के खिलाफ मामला दर्ज कराने की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आमदारांची मागणी - निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आ. देवेंद्र कोठे यांची मागणी - खा. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणल्याचा प्रशासनावर दबाव टाकल्याचा आ. देवेंद्र कोठेंचा आरोप - भाजपने काँग्रेसवर घेतलेल्या आक्षेपाबाबत निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून दबाव टाकल्याचा खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप - त्यामुळे आता खासदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे देवेंद्र कोठे ( भाजप, आमदार )0
0
Report
चिपळुण के स्कूल के पास लकड़ी में आग, दमकल ने तुरंत बुझाई, नुकसान टला
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण मध्ये नगर परिषदेच्या शाळेच्या शेजारी ठेवलेल्या लाकडांना अचानक लागली आग. ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. शाळेला लागून ठेवलेल्या लाकडांना शॉर्ट सर्किट मुळे दुपारी आग लागल्याची घटना. स्थानिकांनी तत्काळ अग्निशमन दलाला कळविल्यामुळे मोठा अनर्थ टळला. चिपळुण मधील पाग परिसरातील घटना. आगीच्या घटनेत कोणतीही हानी नाही. चिपळुण नगर परिषदेच्या अग्निशमन दलाची गाडी वेळेत पोचल्याने आग विझवण्यात यश.0
0
Report
Advertisement
MIDC कार्यालय के बाहर कचरा फेंक आंदोलन, अधिकारी ने दैनिक सफाई का भरोसा दिया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANCHOR : वाळूज MIDC भागात गेल्या तीन वर्षांपासून कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अनेकदा निवेदन देऊन आणि मागणी करून देखील एमआयडीसी कडून कचरा उचलला जात नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावे लागत आहे. त्यामुळे संतप्त नागरिकांनी आज छत्रपती संभाजीनगर शहरातील एमआयडीसी कार्यालयात कचरा फेकून आंदोलन केले. यावेळी अधिकाऱ्यांना जाब देखील विचारण्यात आले. शेवटी नागरिकांचा संताप पाहून अधिकाऱ्यांनी उद्यापासून नियमित कचरा उचलण्याचा आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे.0
0
Report
बीड में वाल्मीक कराड समर्थक की दहशत, दलीत महिला पर बेदम मारहाण
Beed, Maharashtra:बीड: वाल्मीक कराडच्या समर्थकाची रंजेगावात दहशत.. घरासमोरच लघुशंका अन् जुगाराला विरोध केल्याचा संताप; दलीत महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण, दोन चिमुकल्यांनाही फेकल्याचा आरोप! ANC - पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका दलीत महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज व त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी वाल्मीक कराडचा समर्थक आहे. वाल्मीक कराडसोबतचे फोटो देखील आता समोर आले आहेत. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होईल, असे संबंधित महिलेने म्हटले होते. शिवाय महिलेच्या घरासमोरच लघुशंका करण्यात आली याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर, शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयाण प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यावेळी महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले मात्र सुदैवाने त्यांना किरकोळ इजा झाली आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही..0
0
Report
राजापूर के धरण उपोषण पर नेताओं की चुप्पी और सरकार पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:राजापूर - रत्नागिरी.. राजापूर जामदा धरण उपोषण.. कोकण विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज करिता सर्व पक्षाचे दिग्गज नेते रत्नागिरीत आले होते त्यातील एकालाही असं वाटलं नाही की राजापुरात ही लोक भर उन्हातान्हात रस्त्यावर बसून साखळी उपोषण करतायेत..तिथं त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटले नाही.. याचा विचार कोकणातल्या लोकांनी करावा.. जे आले होते त्यांनी कमीत कमी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.. लोकांच्या अडचणी कडे आणि तक्रारींकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षातील लोकांना वाटत नाही.. कारण दिवसा घरी सत्ताधारी पक्ष हा सर्व बाजूंनी इतका मजबूत होत चाललाय त्यामुळे कुठल्याही विरोधकाची दखल घेणं त्यांना आवश्यक वाटत नाही..0
0
Report
Advertisement
राज्य सरकार ने कर्ज माफी का फैसला लिया, किसानों में विविध प्रतिक्रियाएं
Yeola, Maharashtra:राज्य सरकारकडून कर्ज माफी निर्णय घेण्यात आला आहे या निर्णयानंतर शेतकरी वर्गात विविध प्रकारच्या प्रतिक्रिया उमटत आहे0
0
Report
जालना के किसानों ने चुनाव के बाद तुरंत कर्जमाफी और नया फसल कर्ज मांगा
Jalna, Maharashtra:जालना : शेतकऱ्यांना निवडणूक झाल्यावर कर्जमाफी काय कामाची,पेरणीसाठी खते-बियाणे घेण्यासाठी तातडीने कर्जमाफी करा ,शेतकऱ्यांची मागणी अँकर :शेतकरी कर्जमाफीला कॅबिनेटने मंजुरी दिली आहे.विधान परिषद निवडणूक संपल्यांनंतर कर्जमाफी दिली जाणार आहे.सरकारच्या या निर्णयावर जालन्यातील शेतकऱ्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.निवडणूक झाल्यानंतर कर्जमाफी काय कामाची पेरणीसाठी खते बियाणे खरेदीसाठी पैसे हवेत त्यामुळे तातडीने कर्जमाफी देऊन नव्याने पीक कर्ज द्या अशी मागणी शेतकऱ्यांनी केलीय .0
0
Report
राजापूर उपचुनाव में शिवसेना का दबदबा बना रहा, भाजपा को चुनौती
Ratnagiri, Maharashtra:भास्कर जाधव.. प्रेस pointer On विधानपरिषद कोकणात शिवसेनेचे निर्विवाद वर्चस्व आहे हेच वर्चस्व शिवसेना शिंदे गटाला अडचणीचं ठरलेलं आहे भाजपा नाना प्रकारचा प्रयत्न करून कोकणामध्ये वाढू शकत नाही हे भाजपच्या नेतृत्वाच्या लक्षात आलेल आहे.. अनेक प्रकारचे प्रयोग करून बघितले परंतु कोकणातील लोकांचा शिवसेनेकडे ओढा जास्त आहे.. भाजपाकडे नाही इथे शिवसेना अजून बळकट होण्या ऐवजी हिते राष्ट्रवादी बळकट झाली तरी चालेल.. शिवसेनेचं खच्ची करण्यासाठी ही जागा राष्ट्रवादीला देण्यात आलेली आहे.. संख्याबळाच्या दृष्टीने ही जागा शिवसेनेलाच मिळायला पाहिजे होती.. On राजापूर जामदा धरण उपोषण.. कोकण विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज करिता सर्व पक्षाचे दिग्गज नेते रत्नागिरीत आले होते त्यातील एकालाही असं वाटलं नाही की राजापुरात ही लवकर रस्त्यावर बसून साखळी उपोषण करतायेत पुण्यात त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटले नाही.. याचा विचार कोकणातल्या लोकांनी करावा.. जे आले होते त्यांनी कमीत कमी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.. लोकांच्या अडचणी कडे आणि तक्रारींकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षातील लोकांना वाटत नाही.. कारण दिवसा घरी सत्ताधारी पक्ष हा सर्व बाजूंनी इतका मजबूत होत चाललाय त्यामुळे कुठल्याही विरोधकाची दखल घेणं त्यांना आवश्यक वाटत नाही.. On विधानपरिषद नाराज रामदास कदम, योगेश कदम, महेंद्र दळवी आणि गोगावले सगळं काही अलबेला नाही आहे तटकरेंची कार्यपद्धती गरज असेल तेव्हाच राम राम करायचा नाहीतर लांब लांब करायचं.. On शिवसेना जागा (विधानपरिषद) ही जागा शिवसेनेचीच.. पवार साहेबांनी ठासून सांगितलं होतं त्या जिल्ह्यातला आमदार असतो त्याच जिल्ह्यातलाच उमेदवार द्यावा लागतो.. सुनील तटकरे यांना ही जागा देण्यामागे कारणीभूत सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील त्या वेळचे राष्ट्रवादीचे नेते पदाधिकारी आणि लोक हे आहेत.. रत्नागिरी जिल्ह्याचा हक्क हा रत्नागिरी जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांमुळेच मारला गेला.. संख्याबळ असलेली शिवसेना ही बॅकफूटवर का गेली दादांच्या निधनानंतर पक्ष आता कोणताही नेता राहिलेले नाही किंवा आपल्या कार्यकर्त्यासाठी खंबीरपणे उभा राहील भांडेल.. एकनाथ शिंदे यांचे वर्चस्व कमी करायचा असेल तर राष्ट्रवादीचे एखादी जागा वाढली तर त्यांना काही वाईट वाटण्याचं कारण नाही On पुढच्या विधानसभेच्या आधी गुवाहाटी सारखी परिस्थिती घडू शकेल.. भाजपामध्ये काही मंत्र्यांसह 22 आमदार लवकरच प्रवेश करणार.. On abdul sattar एकत्रि करण अशा प्रकारच्या चर्चा या जाहीर करता येत नाहीत.. अशा प्रकारच्या चर्चा हे माध्यमांशी समोर करणं माझ्यासारख्या कार्यकर्त्याला योग्य वाटत नाही.. On उद्धव ठाकरेंना सोडून गेलेले पुन्हा त्यांच्याकडे परत येऊ शकतात का?.. संपूर्ण राजकारणाचा विचका झालेला आहे.. संपूर्ण राजकारणातली सभ्यता ही सत्ताधारी पक्षाने धुळीस घातलेली आहे.. सततरी पक्षाला हे कळून चुकलंय की आपण आपल्या विचारांचा नेतृत्व तयार करू शकत नाही म्हणून दुसऱ्या पक्षात तयार झालेली तयार नेतृत्व आपल्या पक्षात घेणे हे काम सध्या सुरू आहे.. On लाडकी बहीण.. 80 लाख लोकांची मतं त्यावेळेला या लोकांनी घेतली आणि त्या मतदारां जवळचा विश्वासघात करण्याचे काम या सरकारने केलं 80 लाख लोकांची नावं लाडक्या बहिणीमधून कमी केली जात आहे ऐंशी लाख लोकांबरोबर कुटुंबातील माणसं त्यांच्यावर अवलंबून राहणार आहे.. या सरकारने लाडक्या बहिणीच्या सोबत विश्वासघात केलेला आहे त्यामुळे हे लाडके भाऊ नाही हे विश्वासघातकी भाऊ आहेत..0
0
Report
Advertisement
चांदवड, नाशिक में बस में आग, 54 यात्री सुरक्षित बाहर, पूरी बस राख
Chandvad, Maharashtra:नाशिकच्या चांदवडमध्ये शहादाहून नाशिककडे जात असलेल्या बसने अचानकपणे घाट सोडल्यानंतर पेट घेतल्याने एकच धावपळ उडाली. बसमधील 54 प्रवाशांना मात्र सुखरूप बाहेर काढण्यास यश आले असले तरी या आगीत संपूर्ण बस जळून खाक झाली. घटनेस्थळी अग्निशामक दलाच्या जवानांनी येऊन आग नियंत्रणात आणली. या घटनेमुळे जवळपास एक तास वाहतूक ठप्प झाली होती. या घटनेत सुदैवाने जीवितहानी झाली नसली तरी बस जळून खाक झाल्याने मोठी आर्थिक हानी झाली आहे.0
0
Report
यवतमाल जिले के संकटग्रस्त किसानों ने कर्जमाफी की घोषणा का स्वागत किया
Yavatmal, Maharashtra:राज्य सरकारने शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीचा निर्णय घेतल्यानंतर सर्वाधिक शेतकरी आत्महत्याग्रस्त यवतमाळ जिल्ह्यातील संकटग्रस्त शेतकऱ्यांनी या निर्णयाचे स्वागत केले आहे. शेतकाऱ्यांना कर्जमुक्त करू असे आश्वासन महायुतीने दिले होते, हे आश्वासन पूर्ण करण्यासाठी उशीर जरी झाला असला तरी नियमित कर्ज फेड करणारे शेतकरी आणि कर्जबाजारी शेतकरी यांना पूर्णतः दिलासा दिला पाहिजे, सोबतच शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य भाव व प्रक्रिया उद्योग झाल्यास यापुढे शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवश्यकताच भासणार नाही. त्यामुळे तशा उपाययोजना करण्यातची अपेक्षा शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
शिर्डी में शिवसेना का उभार मेळावा: अहिल्यानगर जिला के पदाधिकारी उपस्थित
Shirdi, Maharashtra:शिवसेना उबाठाचा शिर्डीत मेळावा... अहिल्यानगर जिल्हा कार्यकर्ता मेळावा... खासदार संजय राऊत, विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, चंद्रकांत खैरे , सुनिल शिंदे यांच्या शिवसेनेचे अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी उपस्थित... मात्र शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे ठाकरे गटाचे खा.भाऊसाहेब वाकचौरे यांची मेळाव्याला दांडी... शिवसेना कार्यकर्त्यांना पक्षवाढीसाठी केलं जाणार मार्गदर्शन... शेकडो पदाधिकाऱ्यांची मेळाव्याला उपस्थिती...0
0
Report
Advertisement
