icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow29 Aug 2024, 06:30 pm
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर में नवविवाहित महिला की मौत: दहेज के कारण हत्या का आरोप

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात एका महिन्याच्या चिमुकलीचे बारसे होण्यापूर्वीच एका विवाहितेचा संशयास्पद मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. विवाहितेच्या आईच्या तक्रारीवरून पतीसह चौघांविरुद्ध हुंडाबळीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.. या प्रकरणी पोलिसांनी आईच्या तक्रारी वरून pती, सासू, सासरे आणि नंदे विरोधात तक्रार दाखल केली आहे. कोल्हापूर शहरातील सायबर चौक परिसरात राहणाऱ्या २३ वर्षीय अस्मिता प्रतीकसिंह काटकर यांचा रविवारी राहत्या घरी मृतदेह छताच्या पंख्याला ओढणीने लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. वर्षभरापूर्वीच त्यांचा विवाह झाला होता आणि महिनाभरापूर्वी त्यांनी एका मुलीला जन्म दिला होता. घरात मुलीच्या बारशाची तयारी सुरू असतानाच ही घटना घडल्याने कुटुंबीयांसह परिसरातही हळहळ व्यक्त होत आहे. घटनेच्या वेळी पती, सासू आणि सासरे बारशासाठी हॉल पाहण्यासाठी बाहेर गेले होते. घरात परतल्यानंतर दरवाजा आतून बंद असल्याने तो तोडण्यात आला. त्यावेळी अस्मिता यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले. पण अस्मिता प्रतीकसिंह काटकर हिने आत्महत्या केली नसून हुंडा आणि मुलगा पाहिजे या हव्यासापोटी तिची हत्या केल्याची तक्रार पोलिसात दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अस्मिता यांचा पती प्रतीकसिंह काटकर, सासरे वीरेंद्र काटकर, सासू मनीषा काटकर आणि नणंद ऋतुजा काटकर यांच्याविरुद्ध हुंडाबळीसह संबंधित कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पती, सासू आणि सासरे या तिघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. तक्रारीनुसार, विवाहानंतर काटकर कुटुंबीयांकडून वारंवार पैशांची मागणी केली जात होती. तसेच मुलगा झाल्याच्या कारणावरून अस्मिता यांचा शारीरिक आणि मानसिक छळ करण्यात येत असल्याचाही आरोप करण्यात आला आहे. या सर्व आरोपांची सत्यता तपासातून स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. एका महिन्याच्या चिमुकलीला आईचा आधार गमवावा लागलेल्या या घटनेमुळे कोल्हापूर जिल्ह्यात हळहळ व्यक्त होत आहे..
0
0
Report

भावकी के विवाद में तलवार से हमला, रोहिदास दांडगे के हाथ टूटे; आरोपी गिरफ्तार

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या श्रीगोंदा तालुक्यात भावकीका वाद उफाळून आला असून या वादात एकावर तलवारीने हल्ला करत त्याचे हाताचे पंजे तोडल्याचे गंभीर घटना घडली आहे...श्रीगोंदा येथील सुपेकर वस्तीवर हा धक्कादायक प्रकार घडला असून घुगल वडगाव येथील रोहिदास दांगडे हे गंभीर जखमी झालेत... रोहिदास दांडगे आणि त्यांच्या भावकीतील विक्रम दांडगे सागर दांडगे संग्राम दांडगे यांच्याशी गेल्या अनेक दिवसापासून वाद सुरू आहेत या वादातून यापूर्वी एकमेकांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले आहेत मात्र याच वादाच रूपांतर गंभीर हाणामारीत झाला असून यात रोहिदास दांडगे यांचे दोन्ही पंजे आहेत रोहिदास यांच्यावर पुण्यातील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत तर रोहिदास यांची मुलगी राधिका दांगडे हिने श्रीगोंदा पोलीस ठाण्यात फिर्याद आहे या प्रकरणी सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय...त्यानुसार परशुराम दांगडे, अभयराज दांगडे , सागर उर्फ प्रदीप दांगडे दत्तात्रय दांगडे, विक्रम दांगडे , संग्राम उर्फ तात्याराम पवार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे...विक्रम दांगडे या आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे , तर इतर आरोपी फरार झाले आहेत...मागील भांडणाच्या कारणावरून हा प्रकार घडल्याची माहिती आहे...पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. या भागातील भावकीचे वाद सर्रास पाहायला मिळतात, अगदी शुल्लक कारणावरून सुरू झालेले वाद पिढ्याlivingपिढ्या सुरू असतात यात वादाच मोठं कारण नसलं तरी परिणाम मात्र गंभीर स्वरूपाचे असतात त्यामुळे गावातील भांडण आणि भावकीच्या भांडणाबाबत वाद घालणारांचं समुपदेशन होणे गरजेचा आहे
0
0
Report

वसतिगृहों की सचाई: रियलिटी चेक में खामियाँ उजागर

Nashik, Maharashtra:मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी असलेल्या वसतिगृहाचा रियालिटी चेक अँकर मागासवर्गीय आणि दुर्बल कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षणाचा मार्ग सुकर व्हावा याकरिता निवास, अन्न आणि निर्वाह सुविधा देणाऱ्या सरकारी आणि अनुदानित वसतिगृहाची दैना उडाल्याचे चित्र कॅगने गेल्या दोन वर्षात राज्यभर केलेल्या वसतिगृहांच्या प्रत्यक्ष पाहणीत आढळून आले आहे. काही अनुदानित वसतिगृहांमध्ये विद्यार्थीच आढळले नसल्याने ती बनावट असल्याचा ठपका कॅगने ठेवला आहे.... नाशिकच्या वसतिगृहाचा देखील झी 24 तास कडून रियालिटी चेक करण्यात आला... या रियालिटी चेक करून विद्यार्थ्यांनी अनेक तक्रारी वसतिगृहाबद्दल केल्यात...शहरातील आडगाव परिसरात असलेल्या वस्तीगृहात बांधकाम अत्यंत निष्कृष्ट असल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी केली, तर संपूर्ण वस्तीगृहाच्या इमारतीचे खिडकीच्या काचा देखील फुटल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितले.... यामुळे अनेक किडे मच्छर हे रूममध्ये घुसून विद्यार्थ्यांच्या आरोग्यास हानीकारक ठरत आहेत... पावसाळ्यात थेट पोर्चमध्ये पाणी शीरत असल्याचे देखील विद्यार्थ्यांनी सांगितला , तर वस्तीगृहात संगणक कक्ष, जिम त्याचबरोबर ती लायब्ररी देखील असल्याचं विद्यार्थ्यांनी सांगितल.. वस्तीगृहाच्या इमारतीमध्ये फक्त ग्राउंड फ्लोअरवरच सीसीटीव्ही लावलेले आहेत मात्र संपूर्ण इमारतीत सीसीटीव्ही नसल्याचीदेखील तक्रार विद्यार्थ्यांनी केली.... या संदर्भात झी 24 तास ने केलेलं रियालिटी चेक पाहुयात....
0
0
Report
Advertisement

दुध में SNF बढ़ाने के लिए पशukhoadyों में घातक रसायन, मिल्क सेफ्टी खतरे में

Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात अन्न व औषध प्रशासनाची कारवाई सुरू असताना, दुधाच्या गुणवत्तेशी संबंधित आणखी एक गंभीर प्रश्न समोर येत आहे. दुधातील SNF वाढविण्यासाठी बाजारात विविध प्रकारची पशुखाद्ये विकली जात आहेत. यातील अनेक पशुखाद्यामध्ये घातक रसायन असल्याचा संशय आहे. त्यामुळे केवळ भेसळयुक्त दुधावर कारवाई करून चालणार नाही, तर पशुखाद्याच्या गुणवत्तेवरही प्रभावी नियंत्रण असणे आवश्यक असल्याच समोर येत आहे. राज्यात भेसळयुक्त दुधावर अन्न व औषध प्रशासनाकडून सातत्याने कारवाई केली जात आहे. दूध पावडर, रसायने आणि इतर पदार्थांचा वापर करून दुधातील SNF कृत्रिमरीत्या वाढविण्याचे प्रकार यापूर्वी उघडकीस आले आहेत. मात्र आता आणखी एक धोक्याची बाब चर्चेत आली आहे. काही तपासण्यांमध्ये जनावरांच्या पशुखाद्यामध्ये घातक औद्योगिक रसायन आढळल्याची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे मेलामाइन सारखे रसायनाचे अंश दुधात येण्याचा धोका निर्माण झाला आहे. डॉ. पी एम काळे, पशु वैद्यक व पशुखाद्य अभ्यासक राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना तज्ज्ञांच्या मते, राज्यातील प्रत्येक पशुखाद्य उत्पादकाची नियमित नमुना तपासणी, प्रयोगशाळा चाचण्या, दोषी उत्पादकांवर कठोर कारवाई आणि शेतकऱ्यांमध्ये जनजागृती या गोष्टी अत्यंत आवश्यक आहेत. सुरक्षित पशुखाद्य मिळाल्यासच सुरक्षित दूध ग्राहकांपर्यंत पोहोचू शकते. त्यामुळे शेतकरी देखील जनावरांसाठी सुरक्षित खाद्यच बाजारपेठेत उपलब्ध करून द्यावे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे. भेसळयुक्त दुधाविरोधातील कारवाई जितकी महत्त्वाची आहे, तितकेच महत्त्वाचे म्हणजे दुधाच्या स्रोताची तपासणी. जर पशुखाद्यामधूनच घातक रसायनांचा प्रवेश होत असल्यास, त्यावरही तितक्याच कठोरपणे नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. ग्राहकांच्या आरोग्याचा प्रश्न लक्षात घेता, पशुखाद्याची नियमित तपासणी आणि दोषींवर कठोर कारवाई ही काळाची गरज बनली आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report

परीक्षा पारदर्शिता के लिए समिति बनी, गिरफ्तारियां और SIT कार्रवाई तेज

Nashik, Maharashtra:सम्यक विद्यार्थी संघटनेमार्फत एक निवेदन देण्यात आलं होतं.. त्यांच्या मागण्यांचे प्रत्येक प्रश्नाचे लेखी उत्तर दिले आहे.. आजच्या बैठकीत सर्व पदाधिकाऱ्यांचे समाधान झाले आहे.. परीक्षा पारदर्शक पद्धतीने कशा होतील यासाठी राज्याचे मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे.. आतापर्यंत सात ते आठ लोकांना अटक करण्यात आली आहे.. SIT मार्फत अनेक ठिकाणी चौकशी व कारवाया सुरू आहेत.. या प्रकरणाच्या खोलात जाऊन शेवटच्या माणसापर्यंत पोहोचून कोठारात कठोर शिक्षा होईल अशा प्रकारच्या आदेश दिले आहेत.. प्रशांत बोराडे,वंचित प्रदेशाध्यक्ष अध्यक्ष सम्यक विद्यार्थी संघटना पेपर फुटी नंतर राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणाहून आंदोलन झाली होती.. शिक्षण मंत्र्यांच्या घरावर आंदोलन केल्यानंतर बैठक घेतली होती.. मागील बैठकीत काही तोडगा निघाला नाही.. त्यानंतर आम्ही आठ दिवसाचा त्यांना अल्टीमेटम दिला होता.. आज त्यांनी भेटीसाठी बोलावल्याने आंदोलन थांबवलं.. थेट राज्याचे शिक्षण मंत्री बैठकीला उपस्थित असल्याने अनेक प्रश्न सुटले आणि काही प्रश्न सोडवण्यासाठी वरिष्ठ पातळीवर चर्चा करणार आहोत त्याचे आश्वासन मंत्र्यांनी दिले..
0
0
Report
Advertisement

पंढरपुर के तुळशीमाळा में चीन माळा घुसपैठ, वारकऱ्य से फर्जी माळा सावधान

Pandharpur, Maharashtra:विठ्ठलाच्या भक्तांच्या तुळशी माळेतही चायना माळांचा शिरकाव, पंढरपूर मधील तुळशी कारागिरांची संख्या घटली आषाढी वारीला आलेला विठ्ठलाचा भावीक आवर्जून तुळशीमाळ खरेदी करत असतो. मात्र सध्या चायना तुळशीमाळा विक्री होत असल्याने वारकऱ्यांची फसवणूक सुद्धा होत असते. त्यामुळे वारकऱ्यांनी असे माळा खरेदी करताना तपासून या खरेदी करण्याची गरज आहे. सध्या पंढरपूर मधील काशी कापडी समाज मोठ्या प्रमाणात तुळशी माळा बनवत आहे. गोल मनी, चक्री मणी, गुरु मणी, एक पदर , दोन पदर अशा पद्धतीने रचना असलेल्या माळा फक्त तुळशी लाकड वापरून तयार होतात. मात्र आता. चायना पद्धतीच्या सुद्धा तुळशी माळा बाजारात विक्री होत आहेत. त्यामुळे काशी कापडी समाजाच्या निम्मे कारागीर कमी झाले आहेत. तुळशीच्या लाकडा पासून तयार केलेली माळ छिद्र लहान असते, मण्यावर साल असते. तर चायना माळ चमक असते, त्याचे छिद्र मोठे असते. मणी मऊ असतात. या गोष्टींची काळजी घेऊन वारकऱ्यांनी माळा खरेदी कराव्या.
0
0
Report

नाशिक में बारिश से भाजीपाला महँगा, कोथिंबीर के दाम रिकॉर्ड ऊँचे

Nashik, Maharashtra:गेल्या आठवड्यात संपूर्ण नाशिक जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे शेतातील उभे पीक काही प्रमाणत नाशवंत झाल्याने कोथिंबीर मालाची आवक वाढली आहे. त्यातच परराज्यांतील बाजारपेठेत कोथिंबीर शेतमाल कमी पडला आणि परिणामी बाजारभाव तेजीत आले आहेत. काल नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत कोथिंबीर मालाला शेकडा २१ हजार रुपये (२१०) रुपये प्रति जुडी असा यंदा हंगामातील उच्चांकी दर मिळालाय. नाशिक मध्ये पावसामुळे नाशिकच्या शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचा दिसून येत आहे जून महिन्यात पाऊस झाला नसल्याने शेतकऱ्यांनी मोठ्या कसरतीने आपला भाजीपाला हा त्या ठिकाणी वाचवला. मात्र मागील आठवड्यात झालेल्या दोन दिवसांच्या पावसात शेतांमध्ये पाणी साचलेला उभं पीक ही खराब झाली आणि रोगांचा प्रादुर्भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढला. कोथिंबीरच्या जुडीला दोनशे रुपये भाव मिळत असून मेथी, पालक आणि वांगी, ढोबळी, फ्लावर, कोबी, शेवगा या पिकांच्या दरात देखील दुपटीने भाव वाढत झाले असून पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. वाजवी बजेटासाठी भाजीपाला भाव वाढल्याने घरातील बजेट कोलमडल असल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी दिलीये. कोथिंबीर मी ती नाही तर सगळ्याच भाजीपाल्यांचे भाव हे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. भाव वाढल्यामुळे घरात खायचं काय हाच मोठा प्रश्न उरला असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केलीये. भाव कमी झाले पाहिजे अशी मागणी नागरिकांनी केलीये. पुढील पंधरा दिवस त्याचा परिणाम बाजारपेठांवर कायम राहणार आहे मात्र नाशिकहून मुंबई गुजरात मधील सुरत अहमदाबाद या भागांमध्ये भाजीपाला जात असल्याने त्याचा परिणाम देखील इतर बाजारपेठांवर होणार असल्याची शक्यता वर्तवली जाते.
0
0
Report

बीड के ऊसतोड़ मजदूरों के विद्यार्थियों के छात्रावास में गंदगी और सुविधाओं की कमी

Beed, Maharashtra:बीड: ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात गैरसोयींचा डोंगर; अस्वच्छता, अपुऱ्या सुविधा उघड ANC - सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत चालविण्यात येणाऱ्या ऊसतोड मजुरांच्या विद्यार्थ्यांच्या निवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणावर गैरसोय होत असल्याचे पाहायला मिळाले. वसतिगृहात सर्वत्र अस्वच्छता असून, एका खोलीत चार ते पाच विद्यार्थ्यांना एकत्र राहावे लागत असल्याचे आढळून आले. विशेष म्हणजे, वसतिगृहात विद्यार्थ्यांसाठी पलंगांची व्यवस्था नसल्याने त्यांना गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. तसेच भोजनासाठी वापरल्या जाणाऱ्या अन्नाच्या भांड्यांवर माशा बसलेल्या दिसून आल्या, ज्यामुळे स्वच्छतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. याशिवाय, विद्यार्थ्यांसाठी अभ्यास करण्यासाठी टेबल तसेच वैयक्तिक सामान ठेवण्यासाठी कपाटांचीही व्यवस्था नसल्याने त्यांना कपडे दोरीवर टांगून ठेवावे लागत आहेत. याचाच आढावा घेत विद्यार्थ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी...
0
0
Report
Advertisement

सुझय विक्हे के निरीक्षण से नगर-मनमाड महामार्ग पर ट्रैफिक सुधार की उम्मीद

Shirdi, Maharashtra:झी 24 तासाच्या बातमीचा इम्पॅक्ट , नगर मनमाडच्या सुरू असलेल्या कामाच्या पाहणीला सुजय विखे महामार्गावर... नगर–मनमाड महामार्गाच्या कामाची माजी खा.सुजय विखे कडून यांची पाहणी... खड्डेमय नगर मनमाड महामार्ग या झी 24 तासच्या बातमीनंतर सुजय विखेंकडून ठेकेदारांची कानउघाडणी... सावळीविहीर येथील उड्डाणपुलाच्या कामामुळे वाहतुकीवर मोठा परिणाम... कामात ठेकेदारांकडून त्रुटी झाल्याची सुजय विखेंनी स्पष्ट कबुली... अधिकारी आणि ठेकेदारांना तातडीने सुधारणा करण्याचे निर्देश... पुढील तीन दिवसांत वाहतुकीची समस्या कमी होणार असल्याचा सुजय विखेंचा दावा... गुरु पौर्णिमेपूर्वी रस्त्याची एक बाजू वाहतुकीसाठी खुली करण्याचे नियोजन... महामार्गालगतची अतिक्रमणे हटविण्याबत प्रशासनाला सुजय विखेंच्या सूचना...
0
0
Report
Advertisement

अकोला में सोयाबीन बियाणे फेल: किसानों को भारी नुकसान, कंपनियों पर कड़ी कार्रवाई मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या तक्रारींमध्ये सातत्याने वाढ होत असून शेतकरी मोठ्या संकटात सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना न्याय मिळावा आणि दोषी बियाणे कंपन्यांवर कठोर कारवाई व्हावी, यासाठी आज बैठक आयोजित करण्यात आली. बैठकीनंतर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी कृषी विभाग, गुणवत्ता नियंत्रण यंत्रणा आणि संबंधित बियाणे कंपन्यांवर गंभीर आरोप केले आहेत. कृषी विभागाकडे शुक्रवारपर्यंत सोयाबीन बियाणे न उगवल्याच्या एकूण 1,722 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्यापैकी सर्वाधिक म्हणजे सुमारे 1,000 तक्रारी मूर्तिजापूर तालुक्यातील असल्याचे पिंपळे यांनी सांगितले. बियाणे निकृष्ट निघाल्यामुळे हजारो शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले असून त्यांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी त्यांनी केली. या वेळी बोलताना पिंपळे यांनी जिल्हा गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि तालुका गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेच्या निष्काळजीपणामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप केला. आतापर्यंत जिल्ह्यातील 183 बियाण्यांचे नमुने तपासणीसाठी घेतलेल्या असल्याचे सांगत कृषी विभाग आणि गुणवत्ता नियंत्रण यंत्रणेचे हे अपयश असल्याची टीका त्यांनी केली. दोषी बियाणे कंपन्यांवर तातडीने गुन्हे दाखल करून त्यांना ब्लॅकलिस्ट करण्यात यावे, तसेच पुढील वर्षी अशा कंपन्यांचे बियाणे विक्रीस परवानगी देऊ नये, असं इशारा त्यांनी दिला. याशिवाय शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी नियुक्त अधिकाऱ्यांनीच फसवणूक केल्याचा आरोप करत काही अधिकाऱ्यांचे कंपन्यांशी लागेबांधे असल्याचाही दावा त्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना तीन दिवसांच्या आत मदत जाहीर करावी, तसेच गुणवत्ता नियंत्रण अधिकारी आणि संबंधित कृषी अधिकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही हरीश पिंपळे यांनी केली आहे.
0
0
Report

नवी मुंबई कृषि बाजार में कोथींबर 40–50 रुपये, पालेभाजी के दाम बढ़े

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई स्थित मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में कोथींबीर तथा पालेभाजी के दाम बढ़े हैं। कोथंबीर 40 से 50 रुपये प्रति जुडी बिकली जा रही है, जबकि पालक, मेथी 30 रुपये, कांदा पत्ता, पुदीना 20 रुपये जुडी विकली जा रही है। मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती में बेलगाव, गुजरात और कर्नाटक से कोथंबीर की आवक हुई है, जिससे मुंबई मार्केट में कोथंबीर दर 40 से 50 रुपये हैं, जबकि ये दर स्थानीय मार्केट जैसे पुणे, नाशिक में 100 रुपये जुडी है, परंतु मुंबई मार्केट में परराज्यातून माल आने के कारण पालेभाजी तथा कोथंबीर के दर स्थिर हैं।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top