Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.

Aug 29, 2024 18:30:56
Yavatmal, Maharashtra

यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Feb 19, 2026 16:30:30
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरचे भाजप आमदार किशोर जोरगेवार यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे चंद्रपुरात रुग्णालयात दाखल झाले आहेत. आज सकाळपासून त्यांना अस्वस्थ वाटत होते. चंद्रपूरच्या सीएचएल हार्ट स्पेशालिटी रुग्णालयात दाखल केल्यानंतर आ. जोरगेवार यांची एनजीओप्लास्टी करण्यात आली. आ. जोरगेवार यांच्या प्रकृतीची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करून विचारपूस केली. रुग्णालयात समर्थक और कार्यकर्त्यांनी गर्दी केली है. चंद्रपूरचे जिल्हाधिकारी और पोलीस अधीक्षक यांनी रुग्णालयात जोरगेवार यांची भेट घेत प्रकृती विषयी जाणून घेतले. रुग्णालयात गर्दी न करण्याचे आवाहन कुटुंबीयांनी केले है.
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 19, 2026 15:45:37
Navi Mumbai, Maharashtra:खारघर परिसरात एका तरुणाला काही अज्ञात व्यक्तींनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आलेय. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून परिसरात खळबळ उडाली आहे. मारहाण करताना “पोलीस ठाण्यात गेलास तर तुझा मर्डर करू” अशी उघड धमकी मारहाण करणारा तरुण देत दिल्याचेही व्हिडीओमध्ये ऐकू येत असल्याचा दावा करण्यात येतोय. सदर घटना खारघरमधील एका सेक्टरमध्ये घडल्याचे सांगितले जात असून काही तरुणांनी संबंधित तरुणाला रस्त्याच्या कडेला पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे दृश्य व्हिडीओमध्ये दिसत आहे. याप्रकरणी संबंधित व्हिडीओची चौकशी करून कारवाई केली जाईल अशी माहिती खारघर पोलिसांकडून देण्यात आलेय.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Feb 19, 2026 14:34:18
Shirdi, Maharashtra:संगमनेर / अहिल्यानगर जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने नाशिक - पुणे सेमी हाईस्पीड रेल्वे मार्ग के बारे में जानकारी लेकर केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव के समक्ष प्रस्तुत करने की बात कही। यह मार्ग जो मूल सर्वे के अनुसार होना चाहिए, उसी मार्ग पर रहने के आग्रह को रेल्वेमंत्री के समक्ष रखा गया। नाशिक- पुणे सेमी हाईस्पीड रेल्वेमार्ग के संदर्भ में सिंननर, अकोले तथा संगमनेर मार्गे जाने की मांग स्थानीय नेताओं और नागरिकों की है। राज्य के मुख्यमंत्री सक्षम हैं, चुकशी/जाँच के आदेश दिए गए हैं; परिवार ने CBI चौकशी की मांग की है, सरकार भी इस पर विचार करेगी। घटना दुखद है और सभी को दुख है। इस मुद्दे को मीडिया के सामने रखने के प्रयास को क्लेशदायक माना गया। Ajit Pawar के रहते हुए उनके साथ कैसे व्यवहार किया गया, यह सवाल उठ रहे हैं। राज्य की जनता को यह जानकारी मिलनी चाहिए कि किस तरह के व्यावहारिक कदम उठाये गये थे, और जब Ajit Pawar मुख्यमंत्री पद की संभावनाओं पर थे तो उन्हें यह अवसर क्यों नहीं मिला—यह भी राजनेताओं तक पहुंचना चाहिए। अपघात या घटना पर राजनीतिक लाभ लेने की बजाय ऊँचे स्तर पर उत्तर महाराष्ट्र के हितों को प्राथमिकता देनी चाहिए।
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 19, 2026 14:03:51
Bhandara, Maharashtra:दादाचा आणि माझा शेवटच्या जे फोन आहे, काही लोकांनी त्याच्या म्हणजे अपप्रचार करण्याचा काम केलं..... ANCHOR :- लोकांना माहीत नसेल परत परत मी सांगतोय की अजित दादाचा आणि माझा शेवटच्या जे फोन आहे, काही लोकांनी त्याच्या म्हणजे अपप्रचार करण्याचा काम केलं. माझ्या मोबाईल वरून दिल्लीवरून मी फोन केला, मला माहित नव्हतं अजित दादा कोणत्या शहरांमध्ये आहेत. फक्त मी त्यांच्या लक्षात आणून द्यायचं होतं, की आमच्या या पूर्व विदर्भाच्या शेतकऱ्यांचे शासकीय धान खरेदी आणि त्याचे चुकारे पेंडिंग आहेत. खूप दिवस झाले. त्यामुळे त्यांनी लवकरात लवकर ते पेमेंट काढावे ही माझी त्यांना सूचना होती. त्याप्रमाणे त्यांनी पुढची कारवाई काय केली मला माहित नाही. लोक म्हणतात राईस मिल ची फाईल होती. पण ते चुकीचं आहे. शेतकऱ्यांचा प्रश्न आणि ते महाराष्ट्राचे अर्थमंत्री अशा व्यक्तीला फोन करणार एक जनप्रतिनिधी म्हणून माझी जबाबदारी होती कर्तव्य होता ते मी करत होतो आणि माझ्यामुळे मी काही उशिरा गेले काय गेले हे सगळ्या जे प्रश्न लोक काही समजण्याचे करत आहेत ते अतिशय दुर्दैवी आहे....... हा जो अपघात आहे हा महाराष्ट्राला आणि देशाला फार मोठा घात आहे...तो काय धक्का बसलेला आहे पण या अशा सामान्य लोकांच्या कामासाठी मी फोन केला... आणि त्यावरून अशा चुकीचा अपप्रचार करणं खूपच खेददायक आहे.... ANCHOR :- मला अशा काही गोष्टी माहित नाही, मी त्यावर भाष्य करणार नाही..... जे काय असेल सत्य समोर आलं पाहिजे.... चौकशी पूर्ण आणि निष्पक्ष झाली पाहिजे. आणि महाराष्ट्राला देशाला हे अधिकार आहे. आणि हे जाणणं महत्त्वाचं आहे की नेमकं काय झालं? परिवाराचं तर नुकसान झालेलाच आहे, पण महाराष्ट्राचा आणि देशाचाही फार मोठा नुकसान दादा गेल्यामुळे झाला आहे. आणि त्यामुळे निष्पक्ष आणि पूर्ण सत्य हे समोर यायलाच पाहिजे या मताचे आम्ही आहोत. आणि यापुढेही आमच्याकडून सतत सरकार आणि यंत्रणेकडे पाठपुरवठा आम्ही करत राहणार.... ANCHOR :- लोकांना माहित नाही हे उगीचच लोकांना असा प्रचार करण्यात येत आहे या दिवशी अपघात झाला केंद्रीय मंत्री स्वतः केंद्रीय विमान वाहतुकी मंत्री बारामतीला पोचले त्यांनी एअरक्राफ्ट एक्सीडेंट इन्वेस्टीगेशन तपासणी करण्यासाठी सूचना केली अधिकार दिला आणि काही दिवसानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्रींनी सीआयडी ची चौकशी सुद्धा जाहीर केली आणि त्यामुळे ही यंत्रणा दोन्ही कामाला लागले होते परत आम्हालाही काही असं वाटलं की अधिक काही माहिती असू शकते की बाहेरची मोठी एजन्सी इतर राज्याच्या किंवा देशाच्या बाहेरच्या देशाचा पण संबंध असू शकतो आणि त्यामुळे आम्ही चौकशी करण्याची मागणी केली आहे... (( अजित पवारांच्या मृत्यूनंतर तब्बल 21 दिवसानंतर आपण मुख्यमंत्र्यांकडे सीबीआयची मागणी केली असे विचारले असता प्रफुल पटेल बोलत होते....)) BYTE 03 :- prafull Patel (1:17) ANCHOR :- राष्ट्रीय अध्यक्षांची निवड करण्याचा, आणि ते 26 तारखेला अधिकृतपणे आम्ही सुनेत्रा वहिनी पवार यांना राष्ट्रीय अध्यक्ष करणार त्यानंतर पुढचे जे काही स्टेप आहेत राज्यसभेसाठी जे काही आम्हाला अपॉइंटमेंट करायचे आहे किंवा जे काही सिलेक्शन करायचे हे आम्ही त्याच्यावर आम्ही विचार करू.... Byte 04:- prafull Patel (0:27) ...
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Feb 19, 2026 13:21:31
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत त्रिशंकू परिस्थिती झाल्यानंतर सत्ता नेमकी कोणाची येणार यावरून सस्पेन्स कायम आहे असं असताना काहीही झालं तरी भाजपचाच जिल्हा परिषद अध्यक्ष होणार असं मंत्री जयकुमार गोरे म्हणाले होते यावर शिवसेनेचे मंत्री शंभूराज देसाई यांनी खोचक टीका करत ते आमच्यापेक्षा मोठे आणि दिग्गज मंत्री ते आहेत.त्याचा वक्तव्यावर बोलताना आम्हाला भीती वाटते म्हणून आम्ही बोलत नाही कारण लगेच त्यांच्याकडून दुसरा पालकमंत्री नेमला जातो.यावर तुम्ही दुसरा ग्रामविकास मंत्री नेमू शकता असा प्रश्न पत्रकारांनी विचारल्यावर मला तो अधिकार नाही मात्र जयकुमार गोरे यांना पालकमंत्री नेमण्याचे अधिकार आहेत अशी टीका मंत्री शंभूराजे देसाई यांनी केली आहे。
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 19, 2026 13:20:56
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Feb 19, 2026 11:52:56
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील पिंपळनेरच्या नीलकंठ नगरात लग्नसोहळ्यात रक्तरंजित संघर्ष पाहायला मिळाला. यां हल्ल्यात तिघांचा मृत्यू झळा सून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पिंपळनेर येथे आनंदोत्सवासाठी जमलेले लग्नघर अचानक भीषण हल्ल्याने हादरले. पिंपळनेर येथील नीलकंठ नगरात गोसावी समाजाच्या लग्नकार्यादरम्यान झालेल्या चाकू हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज दुपारी सुमारे एक वाजेच्या sुमारास घडली. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हळदीच्या दिवशी साखरपुड्याची तयारी सुरू असताना साक्री व सोनगड येथून आलेल्या नातेवाईकांमध्ये आधीपासूनच वादाची ठिणगी पेटलेली होती. साखरपुड्यापूर्वी काही नातेवाईकांनी व्हॉट्सअॅपवर आक्षेपार्ह संदेश व व्हिडिओ प्रसारित केल्याने तणाव वाढला होता. त्यातूनच लग्नस्थळी अचानक कुरापत काढून धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आल्याचे सांगितले जाते. या हल्ल्यात देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय ३५) आणि सुरेशगीर सुरेश मोजगीर गोसावी (वय ५५) यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तसेच साहिल सुरेश गोसावी, पंकज अशोक गीर, सुरेश सुपडू गीर आणि सागर गोसावी हे जखमी झाले असून त्यांना प्रथम ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. गंभीर जखमींपैकी एकास पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हल्ल्याप्रकरणी कानागिरी मुलागिरी गोसावी, यशवंत गोपाल गोसावी, अनिल गिरी हटुगिरी गोसावी, सोनुगिरी गोसावी, विजुगिरी हटुगिरी गोसावी, कमलेश गिरी शंभू गिरी गोसावी आणि हर्षु शंभू गोसावी यांच्यावर आरोप करण्यात आला असून पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. लग्नसोहळ्यातील या रक्तरंजित घटनेमुळे पिंपळनेर परिसरात खळबळ उडाली आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 19, 2026 11:46:38
Kolhapur, Maharashtra:टिपू सुलतान और छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भातील वादावर आता कोल्हापूरचे खासदार छत्रपती शाहू महाराज यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांच्या वक्तव्यानंतर राज्यात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर शाहू महाराजांनी आपली भूमिका स्पष्ट करताना ब्रिटिशांच्या विरोधात लढताना नेमकं ब्रिटिशांना मदत कोणी केली, याचाही अभ्यास व्हायला हवा, असं सांगत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले. VO 1:- गेल्या काही दिवसापासून राज्यामध्ये काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सकपाळ यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या संदर्भात भाष्य करत असताना टिपू सुलतान शिवाजी महाराजांच्या काळातील समक्ष होते असं वक्तव्य केलं. या वक्त्यावर नंतर राज्यभरात हिंदुत्ववादी संघटनांनी सकपाळ यांच्या विरोधात जोरदार आंदोलन केले. वाद वाढल्यानंतर हर्षवर्धन सकपाळ यांनी आपल्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. आपण मांडलेली भूमिका चुकीच्या पद्धतीने मांडली गेल्याचा दावा करत त्यांनी स्पष्टीकरण दिले. Byte:- हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष VO 2: दरम्यान आज शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर बोलताना खासदार शाहू महाराजांनी महत्त्वपूर्ण विधान केलं आहे. शाहू महाराज म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जर टिपू सुलतान यांनी काम करण्याचं ठरवलं असेल, तर ते पाहणं गरजेचं आहे. तसंच, ब्रिटिशांच्या विरोधात लढताना नेमকं ब्रिटिशांना मदत कोणी केली, याचाही अभ्यास व्हायला हवा, असं सांगत शाहू महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे शत्रू कोण होते, याकडे अप्रत्यक्षपणे लक्ष वेधले. Play Byte: छत्रपती शाहू महाराज, खासदार (काँग्रेस) VO 3 :- शाहू महाराजांनी टिपू सुलतान विषयावर भाष्य करत असताना , खूप सावध प्रतिक्रिया दिली आहे. ही प्रतिक्रिया देत असताना छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्याचा आदर्श घेऊन जर टिपू सुलतान यांनी काम करण्याचं ठरवलं असेल तर त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही असं सांगून इतिहासाच्या पानातील टिपू सुलतान यांचं महत्त्व देखील कमी होऊ दिले नाही. हे करत असताना खासदार शाहू महाराज यांनी प्रत्येकाने छत्रपती शिवाजी महाराजांचे विचार आणि आचार आपल्या जीवनात अमलात आणले पाहिजेत, अशी अपेक्षा बोलावून दाखवली. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 19, 2026 11:32:11
Thane, Maharashtra:भिवंडी महापालिका सत्ता स्थापनेत ट्विस्ट पर ट्विस्ट महापौर पदाच्या निवडणुकीत सर्वच पक्षांच्या गोटात सावळा गोंधळ भिवंडीत काँग्रेसकडून भाजपचा गेम भाजपाचा मोठा गट फुटला महापौर-उपमहापौरपदाची नावं ठरली राज्यातील महापालिका निवडणुकानंतर महापालिकेतील महापौरपदाच्या निवडनुकाही संपन्न झाल्या मात्र भिवंडीत अद्यापही महापौरपदाची निवडणूक पार न पडल्याने भिवंडी महापालिका सत्ता स्थापने दरम्यान रोज मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळत आहे भाजपचे महापौरपदाचे उमेदवार नारायण चौधरी यांनी भाजपातून पळ काढत थेट काँग्रेस सोबत हात मिळवणी केल्याने तेथील राजकीय चित्र बदलले आहे यामुळे भिवंडी महापालिका सत्ता स्थाटनेत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पहावयास मिळत आहेत भिवंडीत महापालिका निवडणुकीत सर्वाधिक जागा काँग्रेसने जिंकल्या आहेत बहुमतासाठी १६ जागा आम्हाला कमी पडल्या तिथे आम्ही सेक्युलर फ्रंट सुरू केली त्यात शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे १२ नगरसेवक आले आहेत त्यामुळे, आमची संख्या ४२ झाली याशिवाय अपक्षांची मोट बांधण्याचा प्रयत्न केला मात्र कोंडी फुटत नव्हती अशी माहिती सपकाळ यांनी दिली आम्ही भाजप आणि शिंदे शिवसेना यांचा पाठिंबा घेणार नाही ही आमची भूमिका होती भाजप सोडून स्वतःहून जर कोणी येत असेल तर आम्ही चर्चा करायला तयार आहोत असे हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटले नारायण चौधरी हे आधी कांग्रेस पक्षाचे होते ते निवडणुकांपूर्वी भाजपमध्ये गेले होते पण आता ते सेक्युलर फ्रंटमध्ये आले आहेत ९ नगरसेवकांना घेऊन ते आले आहेत यात कोणाचा अर्ज ठेवायचा यावर आम्ही निर्णय घेऊ असे हर्षवर्धन सपकाळ यांनी सांगितले नारायण चौधरी यांनी महापौरपदासाठी अर्ज भरला आहे तर आमच्याकडून तारक अन्वर यांनी अर्ज भरला आहे नारायण चौधरी यांनी भाजप सोडलेली आहे असेही सपकाळ यांनी सांगितले त्यामुळे भिंवडीत महापौर कोण होणार हे उद्याच स्पष्ट होईल काँग्रेस-राष्ट्रवादीची एकत्र चुल काँग्रेसचा आणि समाजवादीचा उपमहापौर असं सांगितलं होत विलास पाटील आले तर त्यांनाही आम्ही उपमहापौर देण्यास तयार होतो आम्ही त्यांचा मानसन्मान करायला तयार होतो जनतेचं स्पष्ट कौल असताना २५ प्रश्न प्रलंबित होते मात्र आम्ही निर्णय घेतला आहे तांत्रिक बाबी आहेत त्यामुळे गट स्थापन केला किंवा काय हे उद्या समजेल असे खासदार बाळ्या मामा उर्फ सुरेश म्हात्रे यांनी म्हटलं एक गट फुटला एवढंच आता स्पष्ट आहे असेही बाळ्या मामा यांनी म्हटले काँग्रेसकडून भाजपाचे पळून आलेले नारायण चौधरींना महापौरपदाची संधी दरम्यान भिवंडी महापौर पदाच्या निवडणुकीत वेगळा ट्विस्ट आला असून काँग्रेस राष्ट्रवादी आणि भाजपातून पळालेले उमेदवार नारायण चौधरी व त्यांचे सहकारी मिळून महापौर पदासाठी बहुमताचा आकडा गाठता आला आहे त्यामुळे काँग्रेस पक्षाकडून आज व्हिप जारी केला आहे ज्यामध्ये नारायण चौधरी यांना महापौर तर काँग्रेसचे तारीक मोमीन यांना उपमहापौर पदासाठी मतदान करण्याचे सांगण्यात आले आहे मात्र भाजपच्या व्हिपच्या विरोधात जर कोणी मतदान केले तर भाजपाकडून विरोधात मतदान करणार्‍यांवर कारवाई होण्याची शक्यता आहे भिवंडीत भाजपने महापौर पदासाठी स्नेहा मेहुल पाटील यांच्या नावाचे पत्र दिल्यानंतर अगोदर घोषित केलेल्या महापौर पदाचे उमेदवार नारायण चौधरी नाराज झाले असून ते काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस (श.प.) या पक्षांच्या भिवंडी सेक्युलर फ्रंट सोबत पळून गेले आहेत भिंवडीत एकुण संख्याबळ कसं? भिवंडी महापालिका महापौर व उपमहापौर पदाची निवड २० फेब्रुवारी रोजी होणार आहे महापालिकेच्या निवडणुकीत काँग्रेसचे ३०,भाजपा २२, राष्ट्रवादी १२ शिवसेना १२, समाजवादी ६, कोणार्क विकास आघाडी ४, भिवंडी विकास आघाडी ३ अपक्ष १ असे संख्याबळ आहे या निवडणुकीत कोणत्या पक्षाचा महापौर भिवंडी महापालिकेच्या खूर्चीत बसणार आहे हे अद्यापही गुल दस्त्यात आहे याचे कारणही तसचं आहे कारण भिवंडीच्या महापालिका सत्तेच्या निवडणुकीत रोजच वेगवेगळे ट्विस्ट पाहवयास मिळत आहेत उमेश जाधव भिवंडी प्रितिनिधी
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Feb 19, 2026 10:50:28
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त संशोधक-कलावंताने अनोखी कलाकृती साकार केली आहे. ४२२ किल्ल्यांच्या नावांतून शिवछत्रपतींचे प्रभावी पोर्ट्रेट उभे करण्यात आले असून इतिहास, कला आणि संशोधनाचा अद्वितीय संगम घडवण्यात आला आहे. ही प्रेरणादायी कलाकृती सध्या सर्वत्र चर्चेत आहे. या कलाकृतीची प्रेरणा मागील वर्षी मिळाली जेव्हा शिवकालीन १२ ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोकडून जागतिक वारसा दर्जा जाहीर झाला; त्या क्षणी महाराजांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेले सर्व किल्ले एका चित्रात साकारून भावी पिढ्यांसाठी जिवंत इतिहास निर्माण करण्याचा संकल्प केला गेला. डॉ. दिनेश गुप्ता आनंदश्री यांनी ही कलाकृती साकारली आहे.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 19, 2026 09:46:19
0
comment0
Report
Advertisement
Back to top