445001
यवतमाळ : नॅशनल हायवेवर गॅसचोरी, वडकी पोलिसांची पोलीस गस्त कुचकामी.
Yavatmal, Maharashtra:यवतमाळजवळ नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस टँकरमधून स्वयंपाकाच्या गॅसची अवैध चोरी उजेडात आली आहे. झी 24 तासच्या प्रतिनिधींनी हा प्रकार उघडकीस आणला आहे. दररोज 200 पेक्षा जास्त व्यावसायिक गॅस सिलेंडरमध्ये टँकरमधील गॅस भरला जातो आणि नंतर हा गॅस अवैधपणे धाबे आणि हॉटेलमध्ये विकला जातो. राष्ट्रीय महामार्गावर पोलिसांच्या सततच्या गस्तीनंतरही हा प्रकार कसा काय सुरू आहे, याबाबत अन्न व नागरी पुरवठा विभाग अनभिज्ञ का आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खारघर तालाब में 17 वर्षीय युवक की डूबकर मौत, बारिश ने बढ़ा दिया खतरा
Navi Mumbai, Maharashtra:खारघर भारती विद्यापीठ के पीछे डोंगर की पहाड़ी के तलाव में पोहने उतरे 17 वर्षीय आश्रफ शेख (मुंबई धारावी) की डूबकर मृत्यु हो गई। यह घटना मंगलवार को घटी जब मुसळधार वर्षा के कारण तलाव पूरी तरह भर गया था और कुछ युवक पानी में उतर गए। तलाव की गहराई का अंदाजा न लग पाने के कारण आश्रफ पानी में डूब गया। उसे बचाने के प्रयास किए गए, but देर हो चुकी थी। घटना की जानकारी Belpada गाँव के पूर्व सरपंच संजय घरत को मिली तो उन्होंने खारघर पुलिस को सूचित किया। पुलिस तुरंत घटनास्थल पर पहुंची और शव को बाहर निकालने की कोशिशें जारी हैं; मौत के कारण और अन्य बिंदुओं की जांच जारी है। मौसम विभाग के अनुसार बारिश के मौसम में खारघर के डोंगर क्षेत्र के तलाव, धबधबे और नदियों में पानी का प्रवाह और गहराई अचानक बढ़ जाती है, अतः नागरिकों और पर्यटकों से ऐसे स्थानों पर न जाने और तालाबों में न उतरने की अपील बार-बार की जा रही है।0
0
Report
भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, रद्द नहीं
Chandrapur, Maharashtra:भाजपा प्रदेशाध्यक्ष ने चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारिणी स्थगित की, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी प्रतिक्रिया दी; कार्यकारिणी फक्त स्थगित झाली है, रद्द नहीं। अँकर: भाजप प्रदेशाध्यक्षांकडून चंद्रपूर जिल्हा ग्रामीण कार्यकारणीला स्थगिती देण्यात आली आहे. भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष हरीश शर्मा यांनी यावर प्रतिक्रिया देत कार्यकारिणी फक्त स्थगित असल्याचे स्पष्ट केले. यामध्ये फक्त काही नवीन नाव समाविष्ट करण्याचा विषय आहे आणि या कार्यकारणीत काही सेल के प्रमुख चंद्रपूर शहरातून घेतलेले आहेत. आक्षेप असल्यास फेरबदल केला जाईल. बाकी या कार्यकारणीत काही गंभीर त्रुटी नाहीत. चंद्रपूर महानगरातील कार्यकर्ते हे ग्रामीण कार्यकारणीत घेतलेले आहेत; हा आक्षेप दुरुस्त केला जाईल. कोणतेही मनभेद किंवा गटबाजी नाही असे स्पष्ट केले. बायनाटा: हरीश शर्मा, जिल्हाध्यक्ष, भाजप, ग्रामीण, चंद्रपूर0
0
Report
रायगड में रेड अलर्ट: अगले तीन घंटों में भारी बारिश की संभावना
Chendhare, Maharashtra:रायगडात पावसाचा रेड अलर्ट. तीन तासात जोरदार पावसाची शक्यता. हवामान खात्याने रायगड जिल्ह्यासाठी पावसाचा रेड अलर्ट दिलाय. पुढील तीन तासात रायगड सह पुणे आणि घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आज सकाळपासूनच जिल्ह्यात दाट ढगाळ वातावरण असून पावसाचा जोर वाढला आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत आहे. नागरिकांनी सतर्क रहावे आणि अतिमहत्वाचे काम नसेल तर घराबाहेर पडू नका अशा सूचना करण्यात आल्या आहेत.0
0
Report
Advertisement
लोकल ट्रेन हत्या के बाद मुंबई लोहमार्ग पर सुरक्षा सख्त, वाशी स्टेशनों पर चेकिंग
Navi Mumbai, Maharashtra:बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर मुंबई लोहमार्ग पोलिसांनी सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली आहे. त्याच पार्श्वभूमीवर वाशी रेल्वे पोलिसांनी आपल्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर सरप्राईज चेकिंग मोहीम सुरु केली आहे. मंगळवारी दुपारी वाशी रेल्वे स्थानकात पोलिसांनी प्रवाशांच्या बॅगांची सखोल तपासणी केली. यावेळी संशयास्पद वस्तू घेऊन प्रवास करणाऱया तसेच मद्यसेवन करुन वावरणाऱया काही लोकांवर कारवाई केली. बोरिवली येथे लोकल ट्रेनमध्ये एका तरुणाची चाकूने भोसकून हत्या करण्यात आल्याच्या घटनेनंतर रेल्वे पोलिस अधिक सतर्क झाले आहेत. लोकलमध्ये चाकू, सुरा, कात्री किंवा अन्य घातक शस्त्रs, तसेच ज्वलनशील अथवा स्फोटक पदार्थ घेऊन कुणी वावरु नये, यासाठी वाशी रेल्वे पोलिस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकावर रेल्वे पोलिसांकडुन प्रवाशांच्या बॅगेची तपासणी करण्यात येत आहे. तसेच संशयास्पद वस्तूंसह प्रवास करणारया व्यक्तींवर कायदेशीर कारवाई करण्यात येत आहे. मुंबई लोहमार्ग पोलिस आयुक्त यांच्या आदेशानुसार वाशी रेल्वे पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सर्व रेल्वे स्थानकांवर ही व्यापक तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रत्येकाच्या बॅगांची तपासणी केली जात असून शस्त्रs, ज्वलनशील पदार्थ किंवा स्फोटक साहित्य बाळगणाऱयांविरोधात कठोर कारवाई केली जात असल्याची माहिती वाशी रेल्वे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी दिली. याशिवाय रेल्वेत मद्यप्राशन करुन किंवा अमली पदार्थांचे सेवन करुन प्रवास करणाऱया प्रवाशांवरही विशेष लक्ष ठेवण्यात येत असून अशा प्रवाशांवर कायदेशीर कारवाई सुरु असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी ही विशेष मोहीम पुढील काळातही सातत्याने सुरू राहणार असून, प्रवाशांनी तपासणीदरम्यान रेल्वे पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणतीही संशयास्पद व्यक्ती किंवा वस्तू आढळल्यास तात्काळ रेल्वे पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन वरिष्ठ पोलिस निरीक्षक किरण उंदरे यांनी केले आहे.0
0
Report
डोंबिवली–ट Tata पॉवर रोड पर चार युवकों का खतरनाक स्टंट, लोग chute रहे
Kalyan, Maharashtra:कल्याण शिळ रोड सूचक नाका ते टाटा पावर दरम्यान तरुणांचा दुचाकीवर जीवघेणा स्टंट एकाच दुचाकीवर चक्क चौबल सीट ,बसता येईना तर खांद्यावर बसून भरधाव प्रवास .. कल्याण पूर्वेतील सूचक नाका ते टाटा पॉवर मार्गे डोंबिवलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर एका दुचाकीवर चार तरुण प्रवास करत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय धक्कादायक म्हणजे हा स्टंट सुरू असताना बाईकवर बसायला जागा नाही म्हणून एक तरुण चक्क दुसऱ्या तरुणाच्या खांद्यावर बसून भरधाव वेगाने चार तरुण दुचाकीवरून प्रवास करत असल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे . अशाप्रकारे जीवघेणा स्टंट करत हे तरुण स्वतःचा जीव जर धोक्यात घालतच आहेत मात्र इतरांचा जीव देखील धोक्यात घालतताना दिसून येत आहेत . अशा टवाळखोर तरुणांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून केली जातेय ..0
0
Report
पनवेल में डम्पिंग ग्राउंड, खंडित बिजली- दूषित पानी के विरोध में बड़ा जनआक्रोश मोर्चा
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल में नागरी वस्तीत उभारण्यात येणारे प्रस्तावित डम्पिंग ग्राउंड तथा खंडित वीज पुरवठा, दूषित पाणी पुरवठा और खड्डेमय रस्त्यांविरोधात पनवेल महानगरपालिकेवर सामाजिक संस्था और करदात्यांनी भव्य जनआक्रोश मोर्चा काढला. नागरीकांनी स्वच्छ पानी, अखंडित वीज, खड्डेमुक्त रस्ते आणि नागरीवस्तीपासून दूर डम्पिंग करावे अन्यथा अधिक तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.0
0
Report
Advertisement
पत्नी के मानसिक उत्पीड़न से नाराज़ युवक ने आत्महत्या कर ली; सास-ससुर गिरफ्तार
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - पत्नीच्या मानसिक छळाला कंटाळून पतीची आत्महत्या... नाशिकच्या मालेगाव येथील घटनेने उडाली खळबळ... सासू, सासरे अटक पत्नी मात्र फरार... त्या पत्नीला अटक करा अन्यथा आत्मदहन करू - मयत पतीच्या कुटुंबियांचा इशारा नाशिकच्या मालेगाव येथील कॅम्प भागातील साने गुरुजी नगरात अनिकेत बाळासाहेब जगताप (वय २७) या तरुणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी कॅम्प पोलिसांनी तपास करत पत्नीसह सासू-सासरे व मामेसासू यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे. अनिकेत जगताप याचा वर्षभरापूर्वी पंचशील नगरातील श्रुती जगताप (वय २२) हिच्याशी विवाह झाला होता. मात्र, विवाह झाल्यापासूनच दोघांमध्ये सतत वाद होत होते. श्रुती ही नांदायला येत नव्हती तसेच तिने अनिकेतविरुद्ध पोलिसात तक्रार केल्याने तो गेल्या काही महिन्यांपासून मानसिक तणावाखाली होता. याच त्रासाला कंटाळून अखेर त्याने टोकाचे पाऊल उचलत राहत्या घरात गळफास घेतला. या प्रकरणी सुरुवातीला पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती. मात्र, अनिकेतचे वडील बाळासाहेब जगताप यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कॅम्प पोलिसांनी अनिकेतचा मानसिक छळ केल्याप्रकरणी पत्नी श्रुती जगताप, सासू वंदना सुभाष धिवरे, सासरे सुभाष सुकदेव धिवरे आणि मामेसासू उज्वला सतीश पवार (सर्व रा. पंचशील नगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या घटनेत सासू आणि सासरे यांना पोलिसांनी अटक केली असून पत्नी श्रुती आणि मामसासूला फरार झाले आहे. श्रुतीला आणि मामसासूला तत्काळ अटक करा अन्यथा आत्मदहन करू असा इशारा मयत अनिकेच्या कुटुंबीयांनी दिला आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज निकम पुढील तपास करीत आहेत. दरम्यान या प्रकरणात पत्नी श्रुती ही त्याच्या पतीला, निरनिराळ्या केस मध्ये अडकवून तुझे हाल करून टाकू, समाजात बदनामी करून टाकू, तू मरून जा, त्या काही कामाचा नाही, मला तुझ्यासोबत रहायचे नाही... असे बोलून वागून मयत अनिकेतचा त्याच्या पत्नीने छळ केला या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद असल्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक यांनी सांगितले. दरम्यान त्या श्रुतीचा तपास करून तिला तत्काळ अटक करावी अशी मागणी कुटुंबियांनी केली आहे. त्यात श्रुतीने कोर्टात अटक पूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केल्याचे समजते. लोहगडची घटना नुकतीच ताजी असताना आता मालेगावच्या या घटनेमुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला असून त्या कुटुंबियांना न्याय मिळावा अशी मागणी आता केली जात आहे.... विशाल मोरे झी मिडिया मालेगाव0
0
Report
शाहू कुस्ती आघाडे की पुनर्निर्माण खबर में नया विवाद: पोलादी गर्डर हटाने से इतिहास पर सवाल
Kolhapur, Maharashtra:राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा आणि संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृहाच्या पुनर्बांधणीवरून आता नवा वाद निर्माण झाला आहे. पुनर्बांधणीदरम्यान शाहू महाराजांच्या काळातील मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचा आरोप होत असून, शाहूद्वेषी, कुस्तीप्रेमी आणि इतिहास अभ्यासकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. या ऐतिहासिक वारशाच्या जतनावरच आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. VO1 : कोल्हापूरच्या सांस्कृतिक आणि क्रीडाि इतिहासात दोन वास्तूंना विशेष स्थान आहे… एक म्हणजे संगीत सूर्य केशवराव भोसले नाट्यगृह आणि दुसरी म्हणजे ऐतिहासिक शाहू कुस्ती आघाडा अर्थात खासबाग मैदान. या दोन्ही वास्तूंना राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे प्रतीक मानल्या जातात. सन 1912 मध्ये शाहू महाराजांनी रोममधील आखाड्यांच्या धर्तीवर खासबाग कुस्ती मैदानाची उभारणी केली. त्या काळातील अत्याधुनिक अभियांत्रिकीचा नमुना म्हणून या वास्तूकडे पाहिले जात होते. शाहू महाराजांनी कुस्तीला केवळ राजाश्रयच दिला नाही, तर जागतिक दर्जाची सुविधा उपलब्ध करून दिली. विशाल छत उभारण्यासाठी विदेशातून पोलादी गर्डर मागवण्यात आले. या गर्डरच्या साहाय्याने मधोमध एकही खांब नसलेली भव्य रचना उभारण्यात आली. ही रचना त्या काळात अभियांत्रिकी क्षेत्रातील एक अद्भुत प्रयोग मानली जात होती, मात्र 8 ऑगस्ट 2024 रोजी लागलेल्या भीषण आगीत केशवराव भोसले नाट्यगृहासह शाहू कुस्ती आघाड्याच्याही काही भागाचे नुकसान झाले. त्यानंतर मूळ ऐतिहासिक स्वरूप कायम ठेवून पुनर्बांधणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु आता पुनर्बांधणीदरम्यान मूळ पोलादी गर्डर भंगारात टाकल्याचे समोर आले आहे. विशेष म्हणजे हे गर्डर आगीत गंभीररीत्या बाधित झाले नव्हते, असा दावा कुस्तीप्रेमी करत आहेत. त्यामुळे ऐतिहासिक वारसा जपण्याऐवजी तो नष्ट केल्याची भावना व्यक्त करून शाहूप्रेमी आणि कुस्ती प्रेमी संताप व्यक्त करत आहेत. Byte : अशोक पाटील – कुस्तीप्रेमी Byte:- कुस्तीपटू VO 2:- कुस्तीप्रेमींच्या मते, हे गर्डर केवळ लोखनाचे तुकडे नव्हते. ते शाहू महाराजांच्या दूरदृष्टीचे, कोल्हापूरच्या वैभवशाली कुस्ती परंपरेचे आणि शंभर वर्षांहून अधिक इतिहासाचे जिवंत साक्षीदार होते. त्यामुळे त्यांचे जतन करणे आवश्यक होते. इतिहास संशोधकांच्याही मते, ऐतिहासिक वास्तूंच्या पुनर्बांधणीत मूळ साहित्य, रचना आणि पुराव्यांचे जतन करणे अत्यंत महत्त्वाचे असते. कारण याच गोष्टी पुढील पिढ्यांसाठी इतिहासाचे दस्तऐवज ठरतात. त्यामुळे या प्रकरणाची सखोल चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी होत आहे. VO 3:- आजही कोल्हापूरची ओळख देशभरात ‘कुस्तीची पंढरी’ म्हणून आहे. या परंपरेचा मजबूत पाया राजर्षी शाहू महाराजांनी घातला. त्यामुळे शाहू कुस्ती आघाड्यातील प्रत्येक दगड आणि प्रत्येक गर्डर हा इतिहासाचा अविभाज्य भाग मानला जातो. हा वाद केवळ पोलादी गर्डरचा नाही, तर राजर्षी शाहू महाराजांनी उभारलेल्या ऐतिहासिक वारशाच्या संवर्धनाचा आहे. पुनर्बांधणीच्या नावाखाली इतिहासाचे मूळ पुरावेच नष्ट होत असतील, तर भविष्यात हा अमूल्य वारसा कोणत्या स्वरूपात पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचणार, हा प्रश्न आता प्रत्येक शाहूप्रेमी, कुस्तीप्रेमी आणि इतिहासप्रेमी विचारत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
एक घंटे की बारिश में कल्याण-डोंबिवली के घरों में पानी, पार्षद ने प्रशासन पर निशाना
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली महापालिकेच्या आडीवली, ढोकळी आणि पिसवली परिसरात अवघ्या एक तासाच्या पावसाने अनेक नागरिकांच्या घरांमध्ये पाणी शिरल्याची घटना घडली. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये संतापाची लाट उभरली. या पार्श्वभूमीवर शिवसेनेचे नगरसेवक कुणाल पाटील यांनी आज झालेल्या महासभेत प्रशासनावर जोरदार टीका केली. नालेसफाईची कामे योग्य प्रकारे झाली नसल्याचा आरोप केला. नियमित व प्रभावी नालेसफाई न झाल्यामुळेच अल्प पावसातही नागरिकांच्या घरांमध्ये पाणी घुसल्याचा दावा त्यांनी केला. महापालिकेने नालेसफाईची कामे पूर्ण झाल्याचे सांगितले असले, तरी प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असल्याचे कुणाल पाटील यांनी सभागृहात निदर्शनास आणून दिले. नालेसफाईच्या कामाचा शहर अभियंता अनिता परदेशी यांनी पाहणी केली मात्र आजही परिस्थती तशीच आहे. अवघ्या तासभराच्या पावसात गटारे, नाले तुंबले, नाल्याचे पाणी नागरिकांच्या घरात शिरले. नागरिकांचे हाल झाले. यंदा जर नागरिकांच्या घरात पाणी शिरले तर अधिकारीांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा दिला.0
0
Report
Advertisement
ओसरगाव टोल नाका कल से शुरू, एक जुलाई से टोल वसूली, 50% छूट
Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गांवरील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाका उद्या पासून सुरु होणार असल्याची शक्यता आहे. मागील अनेक वर्ष शुभारम्भाच्या प्रतीक्षेत असलेल्या ओसरगाव टोल नाका सुरु करण्याच्या हालचालीना वेग आलाय. एक जुलै पासून या टोलवर टोल वसुली सुरु होणार असल्याची चर्चा सिंधुदुर्ग जिल्ह्यात रंगलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गाडयांना टोल माफी मिळावी ही प्रमुख मागणी जिल्हावशीयांची आहे. त्यात पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एम एच 07 गाड्यांना विशेष लेन तर व्यावसायिक गाड्यांना 50 टक्के सवलत जाहीर केलीय. उद्या पासून सुरु होण्याची शक्यता असलेल्या टोल वसुली नंतर स्थानिक काय भूमिका घेतात हे पाहणं उत्सुकतेच असेल. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
यवतमाळ के 3324 स्कूलों में नए शैक्षणिक वर्ष की रंगारंग शुरुआत, 34 हजार विद्यार्थी प्रवेश
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये जिल्हापरिषद, नगरपालिका, अनुदानित, विनाअनुदानित, आश्रमशाळा अशा एकूण 3324 शाळांमध्ये आजपासून विद्यार्थ्यांचा किलबिलाट सुरू झाला. शाळेच्या पहिल्या दिवशी जिल्हाधिकारी विकास वमीना यांनी शासकीय माध्यमिक विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात उपस्थित राहून विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत केले. अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी प्रवेशोत्सव साजरा करण्यात आला. नवीन शैक्षणिक वर्षात 34 हजारांवर विद्यार्थी पहिली प्रवेश घेणार असून या विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी शाळांमध्ये विविध उपक्रम राबविण्यात आले. अनेक गावांमधून विद्यार्थ्यांच्या निवडणुका काढण्यात आल्या.0
0
Report
कल्याण के आधारवाडी में भारी पिकअप का चेसिस टूटना; ट्रैफिक बाधित
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील आधारवाडी परिसरात क्रोमासमोर एक धक्कादायक घटना घडली. अतिप्रमाणात सामान भरलेल्या पिकअप वाहनाची चेसिस मधूनच तुटल्याने वाहन रस्त्यातच बंद पडले. त्यामुळे या मार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून काही काळ वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.0
0
Report
Advertisement
नागपुर में आरक्षण उपवर्गीकरण के विरोध पर बड़ा मोर्चा, मातंग समाज समेत कई समुदाय
Nagpur, Maharashtra:नागपूर में अनुसूचित जाती आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात मोर्चा निघाला. नागपूरात उपवर्गीकरणाच्या समर्थनात मोर्चा काढण्यात आला. मातंग समाजासह अनुसूचित जातीतील अनेक लाभवंचित समाजघटकांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाची तातडीने अंमलबजावणी करण्याची मागणी करत मोर्चा काढलाय. नागपूरातील यशवंत स्टेडियम चा संविधान चौक पर्यंत हा मोर्चा करण्यात आला. या मोर्चात फलक घेऊन अनेक पदाधिकारी तसेच मातंग समाजाचे मुख्य व्यवसाय असलेला बँड पथकही या मोर्चात सहभागी झाले होते. मातंग समाजासह चर्मकार, खाटीक, वाल्मिकी उपवर्गीकरण समर्थनार्थ समाजांनी सहभाग घेतला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेच आव्हानही मोर्चाच्या माध्यमातून मोर्चेकरांनी केला.0
0
Report
जालना जिले की 1488 जिला परिषद स्कूलों के छात्रों को मुफ्त दप्तर नहीं मिले
Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील 1 हजार 488 जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थी मोफत दप्तरापासून वंचित जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा मात्र शाळा सुरू होऊन 15 दिवस उलटले तरीही जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना अजूनही मोफत दप्तर मिळालेले नाही. त्यामुळे या विद्यार्थ्यांना पालकांकडूनच दप्तर विकत घेऊन शाळेत यावं लागतंय. जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा असून या सर्वच शाळातील विद्यार्थी दप्तरापासून वंचित आहेत. त्यामुळे तातडीने सरकारने दप्तरापासून वंचित असलेल्या विद्यार्थ्यांना दप्तर द्यावे अशी मागणी विद्यार्थ्यांसह प्रहार शिक्षक संघटनेच्या वतीने करण्यात आलीय0
0
Report
बदलापुर नगरपालिका ने स्टेशन क्षेत्र के अवैध फलों के विक्रेताओं पर कड़ी कार्रवाई की
Ambernath, Maharashtra:अनधिकृत फळ विक्रेत्यांवर बदलावूर नगरपालिकेची धडक कारवाई कारवाईदरम्यान फळ विक्रेत्यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी महिला फळ विक्रेत्यांकडून कारवाई रोखण्याचा प्रयत्न Anchor - बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरातल्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केलीय. बदलापूर पूर्वेकडील कात्रप रोडवर काही फळ विक्रेते वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले होते. मुख्य रस्त्यावरच त्यांनी अवैधरित्या दुकानं थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक मोहीम राबवत फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलं. या कारवाईदरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी अरेरावी करत कारवाई रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरूच ठेवली. बदलापूर पूर्वेकडील या अवैध फळविक्रेत्यांविरोधात पालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. याबाबत स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगरसेविका रती पातकरांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेतली होती. या फेरीवाल्यांना नेमकं कुणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित करत सर्वच लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यानुसार बदलापूर नगरपालिकाेच्या अतिक्रमण विभागाने पूर्वेकडील कात्रप रस्त्यालगत धडक कारवाई करत फळ विक्रेत्यांची दुकानं हटवली आहेत. आता ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा बदलावापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केलीय।0
0
Report
Advertisement
