445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापूर: किसानों ने डबल पैसे का झांसा देकर धोखाधड़ी का आरोप, जांच की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची 20 महिन्यात पैसे डबल करून देण्याचे आम्ही दाखवून मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अक्कलकोट मधील तडवळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक समर्थ क्रॉप केअर कंपनीमध्ये केली आहे. पैसे डबल करण्यासोबतच फॉरेन ट्रिप घडवण्याचे आमिष दाखवण्यात आले असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली. सदरच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.0
0
Report
पुणे के हवेली तालुका में असमय बरसात से गर्मी में राहत
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील हवेली तालुका परिसराला अवकाळी पावसाने जोरदार झोडपले. अचानक झालेल्या वादळी पावसामुळे काही काळ नागरिकांची तारांबळ उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र, या अवकाळी पावसामुळे वातावरणातील तापमानात घट झाली असून नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला, तर नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उष्णतेच्या झळांपासून नागरिकांना तात्पुरता दिलासा मिळला आहे.0
0
Report
शिरूर-रांजणगाव में मोर का डौलदार नृत्य वीडियो वायरल
Shirur, Maharashtra:सकाळचं कोवळं ऊन आणि हिरवीगार शेतं... याच शेतांच्या बांधावर जेव्हा साक्षात निसर्गाचा राजा म्हणजे 'मोराने' आपला पिसारा फुलवला, तेव्हा पाहणारेही थक्क झाले. शिरूर-रांजणगाव पट्ट्यात आजही निसर्गाचं हे वैभव कसं जिवंत आहे, याची साक्ष या 'थुई थुई' नाचणाऱ्या मोराने दिली आहे. पाऊस येण्याच्या चाहुलीने घातलेला हा फेर पाहून ग्रामस्थांच्या डोळ्यांचं पारणं फिटलंय. सध्या सोशल मीडियावरही या मोराच्या डौलदार नृत्याचाच डंका पाहायला मिळतोय! सकाळी मॉर्निंग वॉक ला बाहेर पडलेल्या बापूंनाहेब शिंदे यांनी आपल्या मोबाईल मध्ये हा व्हिडिओ चित्रित केलाय0
0
Report
Advertisement
कवठा गाँव में जलकष्ट: प्रशासन से तुरंत समाधान जरूरी
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या कवठा गाव येथे भीषण पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. गावाजवळ मन नदी, बॅरेज, आरो प्लांट आणि पाणी पाइपलाइन अशी व्यवस्था असतानाही ग्रामस्थांनी पाण्यासाठी नदीकाठी खड्डे खोदावेत लागतात. “सारा समंदर मेरे पास है, एक बूंद पानी मेरी प्यास है” या गाण्याप्रमाणे गावकऱ्यांची अवस्था झाली आहे. कवठा गावाजवळून वाहणारी मन नदी सध्या पूर्णपणे कोरडी पडली आहे. गावातील बॅरेजमध्ये पाणी नाही, पाइपलाइनचे पाणी वापरण्यायोग्य नसल्याचा आरोप ग्रामस्थ करत आहेत, तर आरो प्लांटही बंद अवस्थेत असल्याने केवळ शोभेची वस्तू ठरत आहे. वाढत्या उष्णतेमुळे तापमान ४५ अंशांपर्यंत पोहोचले असून नागरिकांना पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. गावकरी नदीकाठी दोन फूट खड्डे खोदून त्यामधून झिरपणारे पाणी काढून तहान भागवत आहेत. “पिण्यासाठी पाणी नसल्याने आम्हाला नदीकाठी जाऊन खड्डे खोदावे लागतात,” अशी व्यथा ग्रामस्थांनी व्यक्त केली. खारपानपट्ट्यातील कवठा गावात पाण्याची समस्या गेल्या अनेक वर्षांपासून कायम असल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे. मन नदीतील विहिरीतून केवळ पंधरा मिनिटे पाणी मिळते, त्यामुळे गावातील महिला आणि पुरुषांचा दिवसातील दोन ते तीन तास केवळ पाणी भरण्यात जातो. सकाळी शेतमजुरी करून परतल्यानंतर भर उन्हात नदीकाठी झिरे खोदून पाणी काढण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. गावकऱ्यांनी शासन आणि प्रशासनाकडे अनेकदा पाठपुरावा करूनही परिस्थितीत कोणताही बदल झालेला नसल्याचे सांगितले. कवठा गावातील पाणीटंचाईची ही गंभीर समस्या आता प्रशासनासाठी मोठे आव्हान बनली आहे. नागरिकांना सुरक्षित, स्वच्छ आणि नियमित पाणीपुरवठा मिळावा यासाठी तातडीने उपाययोजना करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.0
0
Report
तीन दशक बाद भी भेल प्रकल्प शुरू नहीं; किसानों ने तेरहवां पुण्य स्मरण किया
Bhandara, Maharashtra:भेल प्रकल्पग्रस्तांनी तेरा वर्षांपासून बंद असलेल्या भेल प्रकल्पाचे मुंडण करून केले 13 वे पुण्यस्मरण.... तेरा वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यातील मुंडिपार येथे भेल प्रकल्पाचे भूमिपूजन करण्यात आले होते.यावेळी ५०० एकर शेती अधिग्रहित करून थाटात काम सुरू झाले मात्र काम आवार भिंत बांधून थांबले. व स्थानिकांना आपल्या जमिनी नाही आता रोजगारही नाही त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण होत आहे तेरा वर्षे लोटूनही प्रकल्प सुरू झाले नाही या ठिकाणी कोणतेही काम झालेले नाही त्यामुळे प्रकल्पग्रस्त आक्रोश व्यक्त करत आहेत व त्यांनी आज तेराव्या वर्षी भेलचे तेराव्या पुण्यस्मरण आयोजित करून मुंडन केले आहे.0
0
Report
कल्याण डोंबिवली में मेडिकल कॉलेज और कैंसर हॉस्पिटल के निर्माण की तैयारी शुरू
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली के पास मेडिकल कॉलेज के लिए प्रयास चल रहे हैं. खासदार श्रीकांत शिंदे ने कहा कि डोंबिवली में कैंसर हॉस्पिटल का काम शुरू हो गया है और अगले दो वर्ष में कैंसर अस्पताल तैयार हो जाएगा. इसके अलावा शास्त्रीनगर और रुक्मिणीबाई अस्पताल में 500-बेड के अस्पताल बनाने की योजना डिपीआर में है. नेमा ने कहा कि कल्याण डोंबिवली में मेडिकल कॉलेज आने वाले समय में शुरू कराया जा सकता है, ऐसी सूचना महापौर और आयुक्त को दी गई.0
0
Report
Advertisement
मेहराज खान के ख़िलाफ़ 3 बच्चों के तथ्य छिपाने मामले में पुलिस कस्टडी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापालिका निवडणुकीसाठी आयोगाची दिशाभूल करून तिसरे अपत्य लपवल्याप्रकरणी एमआयएमचे नगरसेवक मेहराज खान आणि शाळेचे मुख्याध्यापक इलियास कदीर सिद्दीकी यांना १७मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. एका जुन्या प्राणघातक हल्ल्याच्या गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांना संशय आल्याने त्यांनी शाळेच्या कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी, मेहराज खान यांनी निवडणूक प्रतिज्ञापत्रात फक्त दोन मुलांचा उल्लेख केला होता, प्रत्यक्षात 3 अपत्य आढळून आली.. या संदर्भात कुठलं रॅकेट तर काम करत नाही ना याचाही तपस पोलीस करत आहेत..0
0
Report
सोयाबीन का भाव 7450 रुपये/क्विंटल; किसानों में खुशी
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला यंदाचा विक्रमी 7,450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या चार वर्षांत प्रथमच सोयाबीन दराने उच्चांक गाठला आहे. मागील काही वर्षांत 3,600 ते 5,000 रुपयांदर्यान दर मिळत असतान्यांदा यंदा वाढती मागणी आणि कमी उपलब्धतेमुळे दरात मोठी वाढ झाली आहे. हमी दरापेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सोयाबीन साठवून ठेवणाऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे。0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ महापौर ने सभा के लिए साइकिल से आने का आह्वान किया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंप्री चिंचवड के महापौर रवि लांडगे ने परदेश दौरे के रद्द होने के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कटक नीति को मन से लिया है। इसके चलते महापालिका की पंद्रह तारीख को होने वाली सामान्य सभा में संभव हो तो साइकिल से आने का आह्वान किया है। यदि साइकिल संभव नहीं हो तो मेट्रो या इलेक्ट्रिक गाड़ी से आने को भी कहा है। इसी मुद्दे पर हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने उनसे बातचीत की है।0
0
Report
Advertisement
सिल्लोड में खेत तालाब में दो चिमुकले भाई डूबे, गांव में शोक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून दुःखद घटना समोर आली आहे. शिवना गावात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव साबळे (वय १२) आणि गोपाल साबळे (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे मेंढपाळ कुटुंबातील असून शेततळ्याशेजारी खेळत असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेत दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
धर्मांतरण मामले में जमानत पर बड़ा फैसला, अदालत ने निर्णय सुरक्षित रखा
Nashik, Maharashtra:धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज मोठा फैसला जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण, निर्णय राखून ठेवला चौघा आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी लैंगिक अत्याचार, छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांवर न्यायालयाची नजर तौसीफ अत्तार अद्याप पोलीस कोठडीत, इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्या अनेक दिवसांच्या जोरदार कायदेशीर खडाजंगीनंतर निकालाचा क्षण जवळ आरोपींना दिलासा की सरकारी पक्षाला बळ, उद्याचा दिवस निर्णायक टीसीएस प्रकरणात उद्याच्या न्यायालयीन निर्णयाकडे राज्याचे लक्ष0
0
Report
मोदी के आह्वान के बाद जैविक खादों की मांग बढ़ी, वाशीम के किसान लाभान्वित
Washim, Maharashtra:अँकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनाची बचत आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा,असे आवाहन आपल्या भाषणातून केले होते.त्यानंतर गांडुळ खतासह विविध सेंद्रिय खतांची मागणी वाढत आहे. वाशीम जिल्ह्यातील नागठाणा येथील शेतकरी गजानन सोळंके यांच्याकडे गांडुळ खत आणि गांडुळांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सोळंके हे गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होतं असून सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांनी सांगितले आहे.तसेच सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
ATS ने महाराष्ट्र में 40 ठिकानों पर छापेमारी, 21 आरोपियों पर गिरफ्तारी जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि 'आयएसआय'चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे असे कळतंय, दरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठवाड्यातील १९ जण होते त्यात (छत्रपती संभाजीनगर १३, बीड २, नांदेड २, जालना १, लातूर १), आहेत.. यातील सगळ्यांना चौकशी अंती सोडल्याचे सूत्रांची माहिती आहे0
0
Report
हिंगणा तालुक के तलाव में डूबकर नागपुर के दो युवक की मौत
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा हिंगणा तालुक्यातील सलाईमेंढा तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू - पोहताना खोल पाण्यात गेले असतांना बाहेर येता न आल्याने मृत्यू - आदित्य चांदे आणि अभिषेक सिरसाम अशी मृतकांची नाव आहेत.. - तलावाच्या मध्यभागी चिखलात अडकल्यान बाहेर निघू न शकल्याने अखेर बुडून मृत्यू - सायंकाळी तलावावर गेले असताना घडली दुर्घटना - माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी, हिंगणा पोलिसांची शोधमोहीम सुरू केली.. - अग्निशमन विभागाची तातडीने धाव, शोधमोहीम सुरू केली, - दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले... - परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; हिंगणा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद..0
0
Report
येवला बस अड्डे का राजस्व रिकॉर्ड, 20 दिनों में 1.61 करोड़ रुपए
Yeola, Maharashtra:अँकर : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली संख्या येवला बस आगारासाठी लाभदायक ठरत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २२ एप्रิล ते ११ मे या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत येवला आगाराला तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या येवला आगारातून दररोज ४२ बसेसद्वारे सुमारे २४० फेऱ्या करण्यात येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी येवला आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली असून नागरिकांनी एसटी आगारातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
