445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संसद में किसानों के सवालों के लिए केवल दो घंटे, सरकार की निष्ठा पर सवाल
Shirdi, Maharashtra:राहाता / अहिल्यानगर खासदार अमोल कोल्हे बाईट पॉईंटर ऑन शेतमाल हमीभाव संसदेत शेतकऱ्यांचा प्रश्नांवर चर्चेसाठी अवघे दोन तास देण्यात आले... सरकारला शेतकऱ्यांबद्दल किती आस्था आहे? हे लक्षात येते... हमीभावाच्या गाजर दाखवले जाते, मात्र वाढलेल्या उत्पादन खर्चाचा विचार होत नाही... हमीभावाची फेररचना झाली पाहिजे... ऑन कर्जमाफी कर्जमाफीच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसू नका... निवडणुकीत सरकारने दिलेल्या आश्वासनावर जनतेने विश्वास ठेवला... आश्वासनाची पूर्तता करा, हीच विरोधी पक्षांची मागणी... ऑन ऑफर वक्तव्य आणि संजय क्षीरसाठ महाभारतातला एक संजय ऐकला होता... दुसरे आमचे संजूभाऊ दिसताय, ज्यांना सगळच दिसतंय... गमतीने बोललो तरी त्याची ब्रेकिंग न्यूज होते... कालचे वक्तव्य हे केवळ पुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेबाबत होते... जगात 14 ठिकाणी रेडिओ टेलिस्कोप आणि रेल्वे एकत्र... विश्वगुरु म्हणवणाऱ्या भारताला ही गोष्ट का शक्य होत नाही?... कोणतीही विचारणा झाली नसल्याची माहिती GMRT च्या अधिकाऱ्यांनी दिलीये... रेल्वे मार्ग कुणाच्या हितासाठी बदलला जातोय..? हा प्रश्न आहे... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देशात इंफ्रामॅन म्हणून ख्याती... पुणे नाशिक रेल्वे जुन्या मार्गानेच व्हावी यासाठी त्यांनी ताकद लावावी... ऑन ऑपरेशन तुतारी राष्ट्रवादीचे आठही खासदार ठामपणे एकत्र... पवार साहेब सांगतील ते धोरण, बांधतील ते तोरण, हेच आमचं सूत्र... जनता ने ज्या कारणासाठी आम्हाला निवडून दिलंय, त्यासाठी आम्ही कार्यरत... कुठल्याही चर्चा आणि वावड्यांना महत्व द्यायची गरज नाही... Byte - खा.अमोल कोल्हे , राष्ट्रवादी शरद पवार गट0
0
Report
कुंभ मेळा तैयारी: नाशिक-त्र्यंबकेश्वर के मार्ग खड्डों से परेशान
Nashik, Maharashtra:कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये विकासकामांना वेग आल्याचं बोललं जात असला तरी प्रत्यक्षात मात्र काम अत्यंत संथ गतीने सुरू आहेत . गेल्या अडीच ते तीन महिन्यांपासून सुरू झालेल्या रस्त्यांच्या कामांमुळे निवृत्तीनाथ यांच्या दिंडी निमित्त आलेल्या वारकरी आणि भाविकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे... कुंभमेळ्याच्या तयारीसाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये रस्ते, ड्रेनेज आणि इतर पायाभूत सुविधांची कामे युद्धपातळीवर सुरू आहेत. मात्र अनेक ठिकाणी रस्ते खोदून ठेवण्यात आल्याने आणि खड्डे पडल्याने भाविक, वारकरी तसेच स्थानिक नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेषतः त्र्युम्बकेश्वरकडे जाणाऱ्या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्यांची अवस्था खराब झाली असून खड्ड्यांमुळे अपघाताच्या घटनाही घडत आहेत. काही भाविक खड्ड्यात पडून जखमी झाल्याच्याही घटना समोर आल्या आहेत. त्यामुळे निवृत्तीनाथ महाराजांच्या समाधीस्थळाकडे जाणाऱ्या वारकऱ्यांमध्येही नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तर कामे लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी भाविक तसेच स्थानिक नागरिकांनी केलीय. दरम्यान, कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. कुंभमेळ्यासाठी नाशिक आणि त्र्यंबकेश्वरमध्ये मोठ्या प्रमाणावर विकासकामे सुरू असून, ही कामे पूर्ण झाल्यानंतर नागरिकांच्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी सुधारणा होईल, असे त्यांनी सांगितले. काही दिवसांचा त्रास सहन करण्याची गरज असून भविष्यात याचा लाभ भाविक आणि स्थानिक नागरिकांना होणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. कुंभमेळ्याच्या दृष्टीने विकासकामे आवश्यक असली, तरी ते वेळेत पूर्ण करून भाविकांना सुरक्षित आणि सुरळीत सुविधा उपलब्ध करून देण्याचे काम हे प्रशासनाचे आहे मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमी सुरू असलेल्या कामात प्रशासन लक्ष देत की नाही हाच प्रश्न सध्या नाशिककर विचारताय.... कुंभ शहरासह जिल्ह्यातील नागरिकांना देखील महत्त्वाचा असला तरी नागरिकांचे देखील महत्त्वाचे आहे त्यावरही लक्ष दिले पाहिजे यानिमित्ताने हेच नागरिक बोलत आहे0
0
Report
चंद्रपुर महानगरपालिका सफाईकर्मचारियों के वारस बेमुदत उपोषण: महिला वारस भी शामिल
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूऱ मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांचे बेमुदत आमरण उपोषण अकराव्या दिवसात प्रवेशले, आजपासून महिला वारस बसले उपोषणाला, चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ कारभाराचा केला निषेध अँकर:-- चंद्रपूर मनपाच्या सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांचे बेमुदत आमरण उपोषण अकराव्या दिवसात प्रवेशले आहे. आजपासून महिला वारस उपोषणाला बसले आहे.त्यांनी चंद्रपूर मनपाच्या ढिसाळ कारभाराचा निषेध केला. चंद्रपूर महानगरपालिकेतील सफाई कर्मचाऱ्यांच्या वारसांना शासनाच्या आदेशानुसार नियुक्ती देण्यात यावी, या मागणीसाठी वारसांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. पात्र असूनही अनेक वर्षांपासून नियुक्तीपासून वंचित ठेवण्यात आल्याचा आरोप करत २२ जून २०२६ पासून मनपा कार्यालयासमोर बेमुदत आमरण उपोषण सुरू केले आहे. मागण्या मान्य न झाल्यास त्यास सर्वस्वी मनपा प्रशासन जबाबदार राहील, असा गंभीर इशाराही आंदोलकांनी दिला आहे. बाईट १) सुजय घडसे, आंदोलक नेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
युवा संवाद जागर यात्रा नाशिक में येवल के बाबासाहेब आंबेडकर स्मारक पर शुरू
Yeola, Maharashtra:राज्यातील जास्तीत जास्त युवकांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चामध्ये सामील करून घेण्यासाठी तथा भारतीय जनता पार्टीचे ध्येय धोरणे जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा तर्फे युवा संवाद जागर यात्रेचा आयोजन करण्यात आलं होतं यात्रेच्या तेराव्या दिवशी ही यात्रा नाशिकच्या येवल्यात दाखल झाले असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यात्रेला सुरुवात करण्यात आली0
0
Report
राम बिराजदार को बैलजोड़ि वापस मिली; लातूर में किसान के संघर्ष की जीत
Latur, Maharashtra:पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी अडवली... न्यायासाठी सुरू झाला संघर्ष. अखेर शेतकरी राम बिराजदार यांना बैलजोडी परत मिळाली. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी गावातील शेतकरी राम बिराजदार अवघी तीन एकर शेती करतात. दुष्काळ, अवकाळी आणि वाढत्या खर्चाच्या चक्रात या शेतकऱ्याचं आयुष्य संघर्षात गेले. यंदा पावसाने पेरणीची आशा जागी केली. राम बिराजदार यांनी मोठ्या रकमेत बैलजोडी खरेदी केली; कारण त्यांच्या मते, बैलजोडीशिवाय शेतीला जीव नाही. बाजारातून बैलजोडी घेतल्यास काही गोरक्षकांनी संशयावर अडवले; पोलिसात गुन्हा दाखल, बैल गोशाळेत ठेवले. शेतकरी म्हणाले बैल परत मिळावेत. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी नसल्याने शेतीची कामे ठप्प झाल्याची व्यथा ZEE 24 TAAS कडे मांडली. पोलीस प्रशासनाने राम बिराजदार यांना बोलावून बैलजोडी त्यांच्या ताब्यात दिली. शेतकरी आणि कुटुंबीयांना दिलासा मिळाला. या घटनेने व्यापक प्रश्न उभे राहिले: अशा प्रकरणांमध्ये शेतकऱ्यांना त्रास होऊ नये, तसेच जनावरांच्या संरक्षणाचा उद्देश साध्य व्हावा. विधिमंडळाच्या अधिवेशनात या प्रश्नावर मार्गदर्शक तत्त्वे तयार होतील, तर भविष्यात शेतकऱ्यांचे बैल अडवले जाणार नाहीत.0
0
Report
राष्ट्रीय महिला आयोग की अध्यक्ष ने POSH कानून के सख्त अनुपालन पर जोर दिया
Akola, Maharashtra:कामाच्या ठिकाणी महिलांसाठी सुरक्षित, सन्मानजनक आणि भेदभावमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी पॉश कायद्याची प्रभावी अंमलबजावणी होणे आवश्यक असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर यांनी अकोल्यात सांगितले. नियोजन भवन येथे आयोजित पॉश कायद्यावरील कार्यशाळेत त्या बोलत होत्या. अंतर्गत तक्रार समित्यांनी अधिक सक्रिय राहून जनजागृती करावी, तक्रार निवारण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी तसेच सरकारी, खासगी आणि असंघटित क्षेत्रातही कायद्याची काटेकोर अंमलबजावणी व नियमित ऑडिट करण्याचे निर्देश त्यांनी दिले.0
0
Report
Advertisement
Raigad में रोजगार और आजीविका हमी मिशन शुभारंभ, 125 दिन रोजगार और 318 काम
Chendhare, Maharashtra:स्लग - विकसित भारत रोजगार और आजिविका हमी मिशन योजनेचा शुभारंभ. मंत्री भरत गोगावले यांची ऑनलाइन उपस्थिती. विविध कामांच्या कार्यादेशाचे वितरण. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार और आजिविका हमी मिशन योजनेचा रायगड जिल्हास्तरीय शुभारंभ बुधवारी अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन येथे झाला. कार्यक्रमात रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कृषी सभापती वैकुंठन पाटील यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रोजगाराची मर्यादा 125 मनुष्यदिवसांपर्यंत वाढविण्यात आली असून, योजनेतील कामांची संख्या 318 करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रांमध्ये कामांना प्राधान्य देण्यात येणार असून ही योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. या योजनेतील नवीन कामांचे कार्यादेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.0
0
Report
अकोला दुर्घटनाओं में फिर से हत्या की धमकी मिलने वाले कांग्रेस विधायक साजिद खान पठाण; सुरक्षा बढ़ाने की मांग
Akola, Maharashtra:अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात "१० कोटी रुपये दे, नाहीतर जीवे मारू" अशी धमकी देणारा कॉल आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. दरम्यान, काल रात्री पुन्हा धमकीचा कॉल आल्याचे पठाण यांनी सभागृहात सांगितले. मात्र, सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना हा कॉल स्वतःला नव्हे, तर त्यांच्या नगरसेवकाला आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीमध्ये आलेला धमकीचा कॉल बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शुभम लोणकरच्या नावाने आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात "यांचा सफाया करू" असे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा धमकी आल्याेचे पठाण यांनी सांगितले. सभागृहात बोलताना, "मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, अकोल्यातील राजेश्वर मंदिरासाठी मी मागितला निधी माझ्या मृत्यूपूर्वी मंजूर करून ते काम पूर्ण व्हावे, ही माझी इच्छा आहे," अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.0
0
Report
नागपुर में जल जमाव से बिजली का झटका, 65 वर्षीय महिला की मौत
Nagpur, Maharashtra:नागपूर - - रस्त्याने चालता-चालता साचलेल्या पाण्यातून विजेचा धक्का (करंट )लागून महिलेचा मृत्यू - नागपुरात घडली धक्कादायक घटना - महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू - मृत अफ़रोज़ा बेग़म या किरायाच्या घरात एकट्याच राहत होत्या - किराणाच्या दुकानातून परतताना रस्त्यात साचलेल्या पाण्यात विजेचा झटका लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू - महानगर पालिकेच्या कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेळसांडपणा ठरला कारणीभूत - रस्त्याने चालताचालता विजेचा झटका लागून ऑन द स्पॉट मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. - बुधवारी रात्री नागपूरच्या ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या शरीरात विजेचा प्रवाह वाहत होता असे स्थानीय रहिवाशांचे म्हणणे आहे. - पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी महानगर पालिकेचा कंत्राटदार आणि इलेक्ट्रिक कंपनीच्या विरोधात नागरिकांत प्रचंड नाराजी आहे - या अपघाताला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार,अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच पीडितेचे कुटुुबाला आर्थिक भरपाई देण्याची मागणी0
0
Report
Advertisement
नांदेड में 9.7 लाख की चोरी: अवयस्क मित्र के साथ शुभम ने चोरी की
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिले के नायगाव में माधव कौठकर ने जमाकर 9 लाख 70 हजार रुपये प्लॉट के लिए जमा किए। कुछ दिनों बाद प्लॉट की रजिस्ट्री होनी थी, लेकिन दिनदहाड़े घर में चोरी हो गई और लोहे के सुरक्षित पोटेडियों में रखा पैसा चोरों के हाथ लग गया। कौठकर परिवार को झटका लगा। पुलिस ने चोर का सुराग लगाया और नगदी उनकी अल्पवयीन मित्र के घर से बरामद की गई। पुलिस सूत्रों के अनुसार चोरी की पूरी योजना 20 वर्ष के शुभम और उसकी अल्पवयीन मित्र ने बनाई थी, जिससे समाज में आक्रोश है।0
0
Report
शिवसेना ने महावितरण स्मार्ट मीटर के विरोध में अहिल्यानगर में बड़ा प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर यहाँ महावितरण के नवीन स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना के वतीने आंदोलन करण्यात आला आहे... शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महावितरण कार्यालयावर प्रचंड घोषणाबाजी करत अधीक्षक अभियंत्त्यांना निवेदन दिल... पूर्वीचे मीटर व्यवस्थित असतानाही नवीन स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहे स्मार्ट मीटरมुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होत आहे... स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती करू नये या साठी अधीक्षक अभियंता दालनात शिवसेना पदधिकाऱ्यांनी बराच वेळ गदारोळ घातला तसेच पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे अपुरी असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला... अखेर अधीक्षक अभियंता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी दिल्यानंतर शिवसैनिक कार्यालयाच्या बाहेर आले यापुढे शहरात महावितरण कार्यालयाकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकाकडून देण्यात आला आहे0
0
Report
इंदापुर नगरपालिका कार्यालय के बाहर नेता अनिल पवार पर हमला; हमलावरों की तलाश जारी
Rui, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार* यांच्यावर दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुरुवारी नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून, प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले. त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. दोघांवरही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विरोधी पक्षनेते अनिल पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पवार म्हणाले, "मी या हल्ल्यातून वाचलो असून, पोलीस प्रशासन संबंधित हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे."0
0
Report
Advertisement
रेड अलर्ट के साथ रत्नागिरी में भारी बारिश की संभावना; नदी किनारे के गाँव रहें सतर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री.. गेल्या जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद 28% झाली आहे तर जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे.. जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वरती आल आहे.. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे.. जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी।0
0
Report
नाशिक में मतदाता सूची पुनर्निरीक्षण अभियान की जिलाधिकारी आयुष प्रसाद ने समीक्षा की
Yeola, Maharashtra:राज्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येवला येथे अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार यादी पुनर्निरीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाहणीदरम्यान काही बीएलओंच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत मतदार यादीचे अचूक पुनर्निरीकरण करून ही मोहीम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित बीएलओंना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.0
0
Report
लातूर के किसान को बैल जोड़ी वापस मिलने पर राहत
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना मिळाली त्यांची बैलजोडी परत..... झी २४ तास च्या पाठपुराव्याला यश. आईन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांला मोठा दिलासा.... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी परत मिळाली आहे. सकाळपासून झी २४ तासने या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाल्याने राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपला प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी २४ तासचे आभार मानले आहेत. यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.0
0
Report
Advertisement
