icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सुप्रिया सुळे ने साई दरबारी दर्शन किया; महाविकास आघाडी के साथ आंदोलन की तैयारी

Shirdi, Maharashtra:Anc - राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी आज साई दरबारी हजेरी लावत साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. संभाजीनगर येथे आयोजित आंदोलनाला जाण्यापूर्वी सुप्रिया सुळे साईचरणी.natamastak झाल्या..यावेळी त्यांच्या हस्ते साईबाबांच्या पादुका पूजन करण्यात आले.. राज्यात आणि देशात चांगला पाऊस पडावा असे साकडे यावेळी सुप्रिया सुळे यांनी साईबाबांना घातले..दर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी खासदार फूटी सोबत विविध विषयांवर भाष्य केले.. सुप्रिया सुळे बाईट पॉइंटर ऑन महाविकास आघाडी एकत्रित आंदोलन महाविकास आघाडी एकत्र आहेच.. राज्याची परिस्थिती अडचणीची आहे.. गुन्हेगारी देखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे..शिक्षणाचे माहेरघर ओळख असलेल्या माझ्या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात गुन्हेगारी वाढलीय.. हे मला जड Endःअंतःकरणाने सांगावे लागते.. आणि मी लोकप्रतिनिधी असणाऱ्या जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असेल तर त्याची अधिक चिंता वाटते.. ऑन TET पेपर फुटी आणि खासदार फूटी प्रकरण कालच एक व्हिडिओ पाहिला.. एक महिला अंडे विकत घेते..त्यावर महिला दुकानदाराला म्हणते ही अंडी घरी जाईपर्यंत फुटणार नाही ना ? त्यावर दुकानदार म्हणतो हे खासदार आमदार नाही फुटायला.. हे दुर्दैव आहे की एवढी चेष्टा लोकप्रतिनिधींची होते.. प्रत्येकाला त्याच मत किंवा पक्ष बदलायचा अधिकार घटनेने दिलाय.. मात्र ज्या पद्धतीने सत्तेचा वापर करून ही केले जाते ते दुर्दैव.. ऑन उबाठा गट खासदार फुट आम्ही उद्धवजी यांच्या सोबत व संपर्कात.. संजय राऊत यांच्या बरोबर देखील रोजच बोलण होत.. आम्ही देखील त्यांचा दौरा पाहतोय.. ज्यांना मोठे केले ते असे वागत असतील तर ते दुःখ देणारे.. महाराष्ट्राच्या राजकारणाची पातळी घसरतेय का असे आता वाटते.. शाहू फुले आंबेडकरांच्या राज्यात ही परिस्थिती आली ती खूप अवघड.. ऑन राजकारण भाषा दर्जा.. ज्यावेळी भाषेच्या दर्जावरून प्रश्न समोर येतात तेव्हा अरुण जेटली यांचं वक्तव्य आजही आठवत.. तुम्ही दाखवणं बंद करा..हे बोलण बंद करतील असे ते म्हणायचे.. भाषा आणि मराठी भाषेचा आम्हाला सार्थ अभिमान.. मात्र जेटलींनी त्यावेळी सांगितलेल्या गोष्टी आज खऱ्या ठरल्या.. ऑन राष्ट्रवादी आमदार फुटी चर्चा.. आमदार कश्याला खासदार फुटणार ही देखील चर्चा आहे.. त्यामुळे आम्हाला काय ते नवीन वाटत नाही.. ऑन म्यानमार सीमा भारतीय ओलीस प्रकरण.. मी विरोधात असले तरी चांगल्याला चांगलं म्हणते.. परराष्ट्र मंत्रालय चांगले काम करत आहे... ज्यावेळी देशात किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर देशाचा प्रश्न येतो तेव्हा देशाचे ऐक्य महत्त्वाचे.. अशा प्रसंगी देशाबद्दल एका स्वरात बोलले पाहिजे.. ऑन पिक हमीभाव फेरआढावा.. काळया मातीशी ईमान राखणाऱ्या शेतकऱ्याच कंबरडे मोडण्याचे पाप या सरकारने केले आहे.. सत्ता आहे मात्र मदतीला कोणी धावून जात नाही.. लाडकी बहीण योजनेत एक कोटी महिलांची नावे कमी झाली.. निवडणुका संपल्या की बजेटची सावरसावर केली गेली.. आज अनेक राज्यांसह देशाची आर्थिक परिस्थिती अडचणीत आहे..
0
0
Report

रायगढ़ में बारिश फिर शुरू, किसानों को मिली संजीवनी; नदी-नाले बढ़े जलस्तर

Chendhare, Maharashtra:दोन दिवसांच्या विश्रांती नंतर बरसला पाऊस. रायगडच्या काही भागात पावसाच्या सरी. पावसामुळे भातरोपांना मिली संजीवनी. नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ. तीन दिवसांच्या विश्रांतीनंतर रायगड जिल्ह्यात पावसाचे आगमन झालं आहे. अलिबागसह जिल्ह्याच्या काही भागात अधून मधून पावसाच्या हलक्या ते मध्यम सरी बरसत आहेत. रात्री उशिरा ढगांच्या गडगडाटासह जोरदार पाऊस झाला. आज सकाळपासून पावसाचा जोर कमी झाला आहे. मात्र या पावसाने नदी नाल्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेय. पावसाने विश्रांती घेतल्याने शेतकरी चिंतेत होते मात्र आता झालेल्या पावसाने उगवून वर आलेल्या रोपांना संजीवनी मिळाली आहे.
0
0
Report

KDMC की लापरवाही: वाया जा रहा पानी, कल्याण में पाइपलाइन लीकेज

Kalyan, Maharashtra:एकीकडे पाणी बचतीचे आवाहन तर दुसरीकडे पाण्याचा अपव्यय . पाणी गळतीकडे KDMCचे दुर्लक्ष , कल्याण बेतुरकर पाडा परिसरात पाईपलाईन लिकेज, हजारो लिटर पाणी वाया यंदा पावसाळा उशिरा आल्याने नद्यांनी धरणांनी तळ गाठला त्यामुळे नागरिकांवर पाणी कपातीचे संकट आहे . कल्याण डोंबिवली महापालिकाेने 20 टक्के पाणी कपात लागू केली आहे . पाणी बचत करण्याचे आवाहन कल्याण डोंबिवली महापालिकेकडून नागरिकांना केले जाते तर दुसरीकडे पाणी गळतीकडे मात्र महापालिका कानाडोळा करत असल्याचे दिसून आले आहे . कल्याण बेतुरकरपाडा परिसरात आज रस्त्याच्या कडेला गटाराचे काम सुरू असताना पाण्याची पाईपलाईन लिकेज झाली आहे हजारो लिटर पाणी वाया जात होते तक्रारी करून देखील केडीएमसी चा कोणताही कर्मचारी त्या ठिकाणी फिरकला नाही . त्यामुळे नागरिकांकडून संताप व्यक्त करण्यात येत होता
0
0
Report
Advertisement

पीएम किसान योजना के लाभार्थी खाते में एक पैसा, सिस्टम चूक पर किसानों का रोष

Bhandara, Maharashtra:पीएम किसान योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यावर आला चक्क एक पैसा.....शेतकाऱ्यांची थट्टा की सिस्टिमचा घोळ?... केंद्र सरकार कडून पात्र शेतकऱ्यांना अर्थ सहाय्य करण्यासाठी पीएम किसान योजना राबविली जाते यात शेतकऱ्यांना वर्षाला तीन हप्ते प्रति दोन हजार प्रमाणे अर्थ सहाय्य दिले जाते मात्र भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील जेवनाळा येथील लाभार्थी शेतकऱ्याच्या खात्यात चक्क एक पैसा आल्याचा संदेश मोबाईल वर प्राप्त झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्याकडून संताप व्यक्त होत आहे. ही आर्थिक मदत आहे का आमची थट्टा असा सवाल आता शेतकरी करत आहे.
0
0
Report

उद्धव ठाकरे का दो दिन में छह जिलों का दौरा, शिंदे गुट के लिए संकेत

Shirdi, Maharashtra:गेल्या दो दिवसांपासून उद्धव ठाकरे सहा मतदारसंघाचा दौरा करताय.. उबाठाला जय महाराष्ट्र करून शिंदे गटात गेलेल्या खासदारांच्या मतदारसंघात हा दौरा असून आज साईंच्या शिर्डीत या दौऱ्याची सांगता होईल... साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेऊन उद्धव ठाकरे आजच्या मेळाव्याला संबोधित करतील.. राहता शहराजवळील सिद्ध संकल्प लॉन्स या ठिकाणी मेळाव्याची तयारी पूर्ण झाली आहे.. दोनदा बंडखोरी केलेल्या भाऊसाहेब वाकचौरे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंची तोफ आज धडाडणार असून आजच्या दौऱ्याविषयी संपर्कप्रमुख आमदार सुनील शिंदे यांनी अधिक माहिती दिली... विशेष म्हणजे उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याच्या पूर्वसंध्येला काल शिर्डी लोकसभा मतदारसंघातील माजी पदाधिकाऱ्यांनी ठाणे येथे उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केलाय...
0
0
Report
Advertisement

बीड़ में दुबार बोआई के डर के बीच किसान बोआई शुरू, बारिश पर निर्भर फसल

Beed, Maharashtra:Beed: दुबार पेरणीचा धोका; तरीही लिंबागणेश परिसरात शेतकऱ्यांनी केली पेरणीला सुरुवात..! ANC - दुबार पेरणीचा धोका डोळ्यासमोर असतानाही लिंबागणेश परिसरातील शेतकरी जिवावर उदार होऊन खरीप पेरणीला सुरुवात करत आहेत. मका, उडीद आणि मूग या पिकांची पेरणी सध्या सुरू असून, जमिनीत ओलावा कमी असल्याने पेरणी करताना "खरखर" होत आहे. तरीही लवकरच चांगला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी पेरणी पूर्ण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, अपेक्षित पाऊस वेळेत न आल्यास दुबार पेरणीची वेळ येण्याची शक्यता असून त्याचा थेट उत्पादनावर आणि आर्थिक स्थितीवर परिणाम होऊ शकतो. सर्व अडचणींचा सामना करत शेतकरी पावसाच्या आशेवर शेतीची कामे सुरू ठेवत आहेत.
0
0
Report

केशवराव भोसले नाट्यगृह के काम की समीक्षा आज सांसद शाहू महाराज के सामने

Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित टक्केवारीच्या व्हिडिओ मुळे केशवराव भोसले नाट्यगृहाची कामे चर्चेत आली आहेत. आमदार क्षीरसागर यांनी यापूर्वीच पत्रकार बैठक घेऊन संबंधित व्हिडिओचा AI करून डब केल्याचे आरोप केला आहे, तरीदेखील आज सकाळी 11 वाजता खासदार शाहू महाराज छत्रपती यांच्या उपस्थितीत केशवराव भोसले नाट्यगृहात कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. या आढावा बैठकीत ज्या कंपनीकडे केशवराव भोसले नाट्यगृहाचे काम आहेत त्या कंपनीचे नाव या व्हिडिओमध्ये घेतले गेल्याने तो संदर्भ जोडला जात आहे. त्यामुळे आजच्या बैठकीत नेमकं काय होतंय याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में जलापूर्ति बंद, दस दिन बाद भी गैप बढ़ रहा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या नक्षत्रवाडी पंपहाऊस येथील 'स्लॅब'ला गळती लागल्याने नवीन पाणीपुरवठा योजना बंद आहे. त्यामुळे शहराला मिळणारे २५ ते ३० एमएलडी वाढीव पाणी चार दिवसांपासून बंद झाले आहे. जुन्या पाणीपुरवठ्याच्या योजनांवरच पाणी शहरात येत असल्याने विविध वसाहतींचे 'गॅप' हळूहळू वाढले आहेत. आता दहा दिवसांनंतर काही वसाहतींना पाणी मिळत आहे. काही दिवसांपासूस पाणीपुरवठ्यातील गॅप कमी करण्यासाठी मनपाची कसरत सुरू होती. आता या कसरतीवरही पाणी फेरले गेले आहे त्यामुळे ऐन पावसाळ्यात पुन्हा पाणीपुरवठा दहा ते बारा दिवसाआड होण्याची शक्यता वाढलीय..
0
0
Report

नागपुर में मetro स्टेशन के पास कार ने पोहेवाले दुकान में घुसकर भारी नुकसान

Nagpur, Maharashtra:नागपूर - *नागपुरात वासुदेव नगर मेट्रो स्टेशन लगतच्या पोहेवाला शॉपमध्ये बेदाराकपणे घुसली कार* - मध्यरात्री दीड वाजताच्या सुमारास भरधाव कार अचानक पणे रोडच्या लगत असलेल्या दुकानाचे शेडमध्ये घुसली - कारचा वेग इतका अधिक होता की यामध्ये दुकानाच्या परिसरात असणाऱ्या लोखंडी साहित्य आणि पोलही वाकून गेले - सुदैवाने मध्यरात्री ही घटना घडल्यामुळे दुकानाचे नागरिक नव्हते मात्र दुकानाच मोठं नुकसान झालं, - मध्यरात्री शहरात रेसिंग कार रस्त्यावर उतरतात आणि त्यामधून अशा पद्धतीची घटना घडत असल्याची चर्चा आहे... - त्यामुळे ही गाडी ही भरधाव रेसिंगच्या नादात तर कार घुसली नाही ना? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
0
0
Report
Advertisement

फलटण में सामाजिक कार्यकर्ता अतुल लाळगे की आत्महत्या: मानसिक उत्पीड़न का आरोप, कैन्डल मार्च

Satara, Maharashtra:सातारा: पुण्यातल्या फुरसुंगी येथील निवारा गृहात कार्यरत असलेल्या २६ वर्षीय सोशल वर्कर अतुल लाळगे यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटण तालुक्यातील वडले गावात ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त होत आहे. वरिष्ठांकडून होणारा कथित मानसिक छळ, धमक्या आणि अतिरिक्त कामाच्या ताणामुळे अतुलने जीवन संपवल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या पत्राच्या आधारे दोषी संस्थाचालकांवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करत ग्रामस्थांनी वडले गावामध्ये कॅन्डल मार्च काढला. घटना घडूनही प्रशासन कारवाईत दिरंगाई करत असल्याने नातेवाईकांनी संताप व्यक्त केला असून, या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

पालखी सोहळे में बैल जोड़ी विवाद समाप्त, रानवडे परिवार की जोड़ी को मान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या दरम्यान रथाला जोडण्यात येणाऱ्या बैलजोडी वरून सुरू असलेला वाद अखेर मिटला आहे. माऊलींच्या रथाला यंदा आळंदीतील रानवडे कुटुंबातील तिघांच्या बैल जोडीला मान मिळाला आहे. पुणे जिल्ह्यातून पालखी प्रवास करत असताना जाताना आणि येताना हर्षवर्धन प्रदीप रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. सातारा जिल्ह्यात रथाला उमेश लक्ष्मण रानवडे यांची तर सोलापूर जिल्ह्यात पालखी जाताना येताना तुळशीराम न्यानोबा रानवडे यांची बैल जोडी रथाला जुंपण्यात येणार आहे. बैल जोडीचा मान देण्यात दावल गेल्याचा आरोप करत उमेश रानवडे यांनी नाराजी व्यक्त करत काही दिवसांपूर्वी आंदोलन केलं होतं. अखेर त्यावर तोडगा काढत हा वाद मिटवण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top