icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अंबाबाई मंदिर में सोने का कलश, अमित शाह ने 1500 करोड़ निधि आवंटन घोषणा

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर चंद्रकांत दादा पाटील byte मुद्दे On सोन्याचा कळस परमेश्वर आपल्याला सगळं देतो आपण त्याला काय देणार मात्र आपण जे काही मिळवतो ते तुझ्या चरणी देतो अशी भावना असते अंबाबाई मंदिराला सोन्याचा कळस असला पाहिजे ही भाविकांची अनेक दिवसापासून ची इच्छा होती आश्चर्यकारकरीत्या ती पूर्ण झाली आहे त्यामुळे मी देणार यांचे आणि हे काम करणाऱ्यांचे आभार मानतो । On अमित शहा अमित शहा यांची अंबाबाई वर अपार श्रद्धा आहे त्यामुळे अंबाबाई मंदिरासाठी त्यांनी केंद्रातून पंधराशे कोटी दिले आहेत यातून सुरू झालेल्या कामाच्या पायाभरणीला यावं अशी त्यांची इच्छा होती मात्र महाराष्ट्रात सारख्या आचारसंहिता लागत असल्यामुळे ते येऊ शकत नव्हते आता येत आहेत धन्यवाद अमितजी असं या कार्यक्रमाचे नाव असेल काम पाहून ते आणखीनही काही निधीची घोषणा करू शकतील ऑन रोहित पवार मी याला इव्हेंट म्हणणार नाही मात्र विरोधकांना आता असे कार्यक्रम करण्याला पर्याय नाही कर्जमाफी बद्दल डिटेलिंग सुरू आहे रांगा लावून कर्जमाफी होणार आहे का हे असे मुद्दे घेऊन रस्त्यावर येणं, प्रेस पब्लिसिटी मिळवणे इतकाच त्यांचा हेतू आहे On विधान परिषद महायुती नाशिकची बंडखोरी संपली आहे जळगावची ही संपेल प्रत्येकाचं आपापलं म्हणणं आहे ते वेळेत ऐकून घेतलं तर प्रश्न संपतात काही वेळा जास्तच आडमुठेपणा होतो त्यामुळे प्रश्न ताणला जातो मात्र जळगाव चां विषयी लवकरच संपेल On काँग्रेस राष्ट्रवादी एकत्र कधी दोन राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा होते तर कधी दोन काँग्रेस एकत्र येण्याची चर्चा होते या चर्चांमध्ये काही तथ्य नाही आधीच काँग्रेस बुडती नाव आहे त्यात राष्ट्रवादी काँग्रेस जॉईन झाली तर सगळे शरद पवार यांच्या नावेतून पळून जातील आणि जिथे चांगला चॉईस आहे तिकडे जातील सध्या चॉईस हा फक्त बीजेपीचा आहे आगामी वीस पंचवीस वर्ष ग्रामपंचायत ते लोकसभा भाजपला काही प्रॉब्लेम दिसत नाही नावेतून बाहेर पडणारी ही लोक काँग्रेस प्रेफर करतील की भाजप प्रेफर करतील ऑन काँग्रेस उमेदवार हायकमांड नाराज काँग्रेस ही बुडती नाव आहे त्या मुळे जो तो नाव बुडण्यापूर्वी पळतो आहे अमरावतीचा उमेदवार ऍडमिट आहे... इतर उमेदवार संपर्कात नाहीत या निवडणुका बिनविरोधच व्हायला हव्या होत्या विरोधकांनी या निवडणुका का लढवल्या हेच कळत नाही या लढाईत विरोधकांना यश कुठेच नाही On सोलापूर राष्ट्रवादीच्या आमदारांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या घेतलेली भेट ही स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीपुरती होती त्याच्यापुढे काही आहे का हे मी उद्या रवींद्र चव्हाण यांच्यासोबत असेल तेव्हा त्यांना विचारेन On शक्तिपीठ कुठे दरवेळेला अदानी आणताय महाराष्ट्रातील सगळे तीर्थक्षेत्र जोडण्यासाठी हा शक्तिपीठ होत आहे समृद्धी महामार्ग वेळी असाच विरोध झाला मात्र नुकसान भरपाईची रक्कम जाहीर झाली त्यावेळी लोकांनी रांगा लावून जमिनी दिल्या त्यामुळे किती नुकसान भरपाई देणार आहोत हे आठवडाभरात जाहीर होईलत्या नंतर लोक स्वतःहून जमिनी देतील राजू शेट्टी आणि काँग्रेसवाल्यांनी शक्तीपीठाला महामार्गाला विरोध करताना याआधी राज्याची धरण झाली जी विकास प्रकल्प झाले त्यात भूसंपादन झालं नाही का याचा विचार केला पाहिजे त्यावेळी भाजप, मोदी, फडणवीस सत्तेत होते का? कोयना धरणात जमिनी गेलेल्या लोकांचा आजही पुनर्वसन झालेलं नाही On पाणी संकट माणूस आजुन निसर्गावर मात करू शकलेला नाही माणूस रक्त आणि पाणी बनवू शकला नाही शरीरातील अवयव एकमेकांना देऊ शकतो मात्र अवयवही स्वतः माणूस बनवू शकलेला नाही पाऊस पडला तर पाणी मिळणार आहे जून जुलै कोरडा जाईल असं अंदाज आहे ऑगस्टमध्ये अतिवृष्टी होईल असंही कळत आहे अतिवृष्टी झाली नाही आणि धरण भरले नाहीत तर पुढच्या वेळेस जानेवारी महिन्यापासूनच पाणी कपात होऊ शकते सरकार म्हणजे परमेश्वर नाही on नाव बदलणे भारतीय जनता पार्टी कोणाचीही नाव बदलत नाही कल्लाप्पाण्णा आवाडे यांनी हा कारखाना उभा केला आहे त्यामुळे त्यांचं नाव या कारखान्याला देण्यात काही गैर नाही नाव बदलण्याचा हा निर्णय त्या समूहाने घेतलेला आहे हा निर्णय या आधीच झाला आहे अमित शहा कोल्हापूर दौऱ्यावर आहे या निमित्ताने हा औपचारिक कार्यक्रम होणार आहे प्रकाश आवाडे यांचा हट्ट असल्यामुळे अमित शहा या कार्यक्रमाला येत आहेत
0
0
Report

शेगाव के प्रसिद्ध कचोरी सेंटर पर छापा, नमूनों में भेसळ का संदेह

Buldhana, Maharashtra:शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटरवर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाचा छापा.. कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे घेतले नमुने.. भेसळ युक्त पदार्थ आढळल्यास कारवाई निश्चित आल्याचे अन्न आणि औषध प्रशासनचे मत.. शेगाव येथील प्रसिद्ध कचोरी सेंटर असलेल्या तीरथराम करमचंद शर्मा या प्रतिष्ठानावर बुलढाणा अन्न आणि औषध प्रशासनाने छापा टाकून या कचोरी सेंटर वरील कचोरी बनवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या कच्च्या मालाचे नमुने तपासनीसाठी घेतले.. अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या आदेशाने राज्यभर भेसळयुक्त खाद्यपदार्थांची तपासणी करण्याची मोहीम हाती घेण्यात आली आहे.. त्यानुसार शेगाव येथील कचोरी ही प्रसिद्ध आहे व शेगाव येथे आल्यानंतर लाखो भाविक ही कचोरी खातात.. मात्र ही कचोरी कशी बनवल्या जाते, त्यासाठी कोणता कच्चामाल वापरला जातो..? हे तपासण्यासाठी काल सायंकाळी अचानक अन्न व औषधी प्रशासनाचे निरीक्षक गुलाबसिंग वसावे यांच्या नेतृत्वात अचानक छापा टाकून कचोरी बनवण्यासाठी साहित्य व त्याचे नमुने घेण्यात आले तपासणीनंतर या नमुन्यात जर भेसळ आढळून आली तर शेगाव कचोरी सेंटरवर कारवाई करण्यात येईल असंही अन्न और औषध प्रशासनाकडून सांगण्यात आलं..
0
0
Report

अमरावती विधान परिषद उम्मीदवार हर्षजीत देशमुख अस्पताल में भर्ती, किडनी स्टोन की पुष्टि

Nagpur, Maharashtra:नागपूर हर्षजीत देशमुख अपडेट( अमरावती विधान परिषद काँग्रेस उमेदवार ) *हर्षजीत देशमुख अमरावती विधान परिषदेत निवडणुकीच्या मैदानातून माघार घ्यायला तयार नाही... काँग्रेस पक्षाने जरी वंचित बहुजन आघाडी किंवा इतर दुसऱ्या उमेदवाराला आपला पाठिंबा जाहीर केला तरी मी निवडणुकीच्या मैदानातून हटणार नाही... तब्येतीच्या कारणावरून मी रुग्णालयात दाखल आहे हे पक्षाने समजून घ्यावं* अशी भूमिका त्यांनी व्यक्त केली आहे... दरम्यान हर्षजीत देशमुख यांच्या सोनोग्राफी रिपोर्ट मध्ये किडनीमध्ये दोन स्टोन असल्याचे समोर आले असल्यामुळे त्या यांची आज च्या संदर्भातील आवश्यक उपचार होण्याची शक्यता आहे... त्यामुळे हर्षजीत देशमुख यांचा रुग्णालयातील मुक्काम आणखी वाढण्याची शक्यता आहे...
0
0
Report
Advertisement

सोलापुर विधानपरिषद चुनाव में नया मोड़, विरोधी गुट के विधायक भाजपा को समर्थन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट, विरोधी गटाच्या आमदारांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिल्याने मोठी खळबळ सोलापूर विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये नवा ट्विस्ट समोर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर, आमदार अभिजीत पाटील, आमदार नारायण पाटील यांचा भाजपला जाहीर पाठिंबा महाविकास आघाडीतील नेते विधान परिषदेच्या निवडणुकीबाबत कोणती चर्चा करत नसल्याने नाराजी व्यक्त करत दिला भाजपला पाठिंबा अचानकपणे तीन आमदार भाजपच्या गळाला लागल्याने शहरात अनेक चर्चांना उधान याविषयी अधिक माहिती देण्यासाठी थेट सोलापुरातून आपल्या सोबत जोडले गेले आहेत आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा
0
0
Report

कांग्रेस-NCP गठबंधन पर बड़ा संकेत: लोकतंत्र बचाने के लिए एकता की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले --काँग्रेस नेते - मी दिल्ली डिपार्टमेंट मिटिंग साठी जातोय पण गाजावाजा का होतेय माहिती नाही - राष्ट्रवादीला काँग्रेसमध्ये विलीनीकरणाचा प्रस्ताव आधीच दिला होता, काही कारणांनी त्याला उशीर झाला, देश विकला जातोय, संविधान व्यवस्था संपत चाललेली आहे अशा वेळी मतांचा विभाजन थांबविण्यासाठी, धर्मनिरपेक्ष विचारांच्या सर्व पक्षांनी एकत्रित यावं अशा पद्धतीची प्रक्रिया देशपातळीवर सुरू असून त्याच प्रक्रियेचा भाग म्हणून तृणमूल काँग्रेस, राष्ट्रवादी शरद पवार गट यांनी सोबत येऊन पक्ष विलीनीकरणाची मानसिकता आणि भाव पाहायला मिळत आहे - विलीनीकरण haa प्रस्ताव आज नाही खूप आधी देण्यात आला त्या प्रक्रियेला सुरुवात झालेली आहे - राहुल गांधी, सोनिया गांधी खरगे यांनी याबाबतीत कामाला सुरुवात केली आहे आणि तेच आपण पाहतोय - छगन भुजबळ आता काय बोलताहेत मला माहिती नाही, त्यांना काय प्रस्ताव होता याची मला माहिती नसल्यामुळे मी त्यावर कुठली प्रतिक्रिया देऊ शकत नाही, पण भुजबळ साहेबांची ती क्षमता होती ते ओबीसी चे मोठे नेते आहेत त्यांनी ती संधी गमावली असेच मी म्हणेल - देश आणि संविधान संपवीणारी केंद्रात सरकार आहे, त्या मोदी सरकारला सत्तेतून बाहेर काढणं हा एकमेव अजेंडा देशासमोर आहे आणि त्यासाठी काँग्रेस काम करत आहे - देशभरातील सर्व पक्ष त्या पक्षांची गत नरेंद्र मोदी सरकारने काय केले हे आपण पाहतोय महाराष्ट्रात शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्या घरात भांडण लावली ही सगळी प्रक्रिया पाहिली तर लोकशाही ची पाळामुळे खोदण्याचे काम भाजप केंद्रात बसून करत आहे हे आपण उघडा डोळ्यांनी पाहतोय - धनंजय मुंडे च्या बाबतीत सरकार आणि त्यांच्या पक्षाची जबाबदारी आहे त्यांच्या पक्षाने काय निर्णय घ्यायचा ती त्यांची भूमिका आम्ही त्यावर बोलणार नाही - पक्ष विलीनीकरणाची आम्ही ऑफर कोणाला दिली नाही हा गैरसमज आहे, ही जी काही परिस्थिती आहे त्याचा शरद पवार आणि सुप्रिया सुळे सर्वांना वाटते की मतांचे विभाजन थांबविण्यासाठी देशहितासाठी काँग्रेसच्या सोबत राहायला पाहिजे असा अनेक राज्य पातळीच्या पक्षाला वाटायला लागलेला आहे - राज्याच्या संघटनेत काय निर्णय व्हायचे ते प्रदेशाध्यक्ष घेतात हर्षवर्धन सपकाळ यशस्वी ठरत आहे की अयशस्वी हा आमच्या पक्षचा अंतर्गत प्रश्न आहे, जेव्हा पक्षाची मीटिंग होईल त्यावेळी आम्ही यावर चर्चा करू, मूल्यांकन करण्याचं माझं काम नाही, हाय कमांड या सगळ्या गोष्टींवर लक्ष ठेवते पक्षाच्या बैठकीमध्ये या विषयावर आम्ही चर्चा करू - हाय कमांडला सगळ्या घडामोडी माहिती असतात मी स्वतः महाराष्ट्र अध्यक्ष होतो, हाय कमांडचा प्रत्येक गोष्टीवर लक्ष असतं संघटनात्मक गोष्टीवर लक्ष असतं आम्हाला सांगण्याची गरज नाही जे चांगला होईल वाईट होईल त्या सगळ्या गोष्टींची नोंद हाय कमांड घेत असते - मी भंडारा गोंदिया मध्ये दहा वर्ष होतो, त्यामुळे उमेदवारी वापसी वरून अमरावती, यवतमाळ, चंद्रपूर मध्ये काय झालं हे सगळं बघण्याचं काम सध्या माझं नाही जे चाललं ते सगळे चुकीचे चालले आहे इतकाच मला वाटतं
0
0
Report

हिंगोली में शववाहिका धुलखात गिरने की खबर, स्वास्थ्य विभाग ने ट्रांसफर के आदेश जारी

Hingoli, Maharashtra:हिंगोली जिले में आरोग्य विभागाकडून शववाहिका धुळखात पडल्याची बातमी; आरोग्य विभागाला जाग आली असून धुळखात पडलेल्या शववाहिका हस्तांतरित करण्याचे आदेश सर्व आरोग्य अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत; राजाच्या सर्व जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकाऱ्यांना आदेश काढल्यात आले आहेत; राज्यभरात 132 शववाहिका जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे वितरित करण्यात आलेले आहेत; त्यापैकी अनेक शववाहिका हस्तांतर अभावी धुळखात पडल्या आहेत; जिल्हा आरोग्य अधिकारी कडे असलेल्या सर्व शववाहिका मागणी असलेल्या नगरपंचायत पालिका यांच्याकडे हस्तांतरित करण्यात याव्यात असे आदेश आरोग्य विभागाच्या उपसंचालकाने काढले आहेत; याची बातमी आता प्रचंड चर्चेत आहे; आरोग्य विभागाला जाग आली आहे.
0
0
Report
Advertisement

राज्य शिक्षक परिषद: शिक्षकों पर शाला के बाहर काम का बोझ खत्म करने की मांग

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर च्या राळेगणसिद्धी येथे राज्य प्राथमिक शिक्षक संघटनेच्या वतीने शिक्षण हक्क परिषद घेण्यात आली या परिषदेसाठी राज्यभरातून हजारो शिक्षक सहभागी झाले होते शिक्षकांना केवळ शिक्षणाचा काम द्यावं ही प्रमुख मागणी या परिषदेत करण्यात आली. ज्येष्ठ समाज सेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या उपस्थितीत झालेल्या या परिषदेत शिक्षकांच्या शाळाबाह्य कामांवर आवाज उठवणार असल्याची भूमिका सर्व मान्य करण्यात आली शिक्षकांना मोठ्या प्रमाणात शाळाबाह्य शैक्षणिक कामे लावली जातात यातून त्यांना अध्यापनासाठी पुरेसा वेळ मिळत नाही याचाच परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होतो यासोबतच सेवेतील शिक्षकांना शिक्षक पात्रता चाचणी रद्द करावी यासह शिक्षकांच्या विविध मागण्यांवर या परिषदेमध्ये चर्चा करण्यात आली ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे आणि पद्मश्री पोपटराव पवार यांच्या माध्यमातून आम्ही सरकारशी संवाद साधणार असल्याचं संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितल आहे
0
0
Report

काटेपूर्णा अभयारण्य में पानी संकट, वन्यजीव पानी के लिए भटकने लगे

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील राजाकीन्ही परिसरातील काटेपूर्णा अभयारण्यात अनेक नैसर्गिक पाणवठे कोरडे पडल्याने वन्यप्राण्यांच्या पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मान्सूनला झालेला विलंब आणि वाढत्या उष्णतेमुळे जंगलातील जलस्रोत आटले असून हरिण,नीलगाय,रानडुक्कर यांसह विविध वन्यप्राण्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. अभयारण्य परिसरातील काही बोअरवेलमध्ये पाणी उपलब्ध असतानाही ते पाणवठ्यांपर्यंत पोहोचविले जात नसल्याची खंत व्यक्त केली जात आहे. त्यामुळे वन विभागाने तातडीने बोअरवेलचे पाणी पाणवठ्यांमध्ये सोडून वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यातची मागणी प्राणी प्रेमी कडून होत आहे.
0
0
Report

15 अगस्त से रायगढ़ के पालकमंत्री पद की पुष्टि, दळवी का दावा

Chendhare, Maharashtra:विधान परिषदेच्या बदल्यात शिवसेनेला रायगडचं पालकमंत्री पद मिळणार अशी चर्चा सुरू असताना आता अलिबागचे आमदार महेंद्र दळवी यांनी याबाबत महत्त्वपूर्ण विधान केलंय. मंत्री भरत गोगावले हे येत्या १५ ऑगस्टपूर्वी रायगडचे पालकमंत्री म्हणून विराजमान होतील, असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केलाय. भरत गोगावले यांनी कोकणच्या विधानपरिषदेच्या जागेसाठी जो काही निर्णय घेतलाय यावरून आमचा तो अधिकार आहे. आणि याबाबत राज्याचे मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील येत्या आठ-दहा दिवसात निर्णय घेऊन आम्हाला न्याय देतील आणि भरत गोगावले यांच्या रूपात आम्हाला रायगडचे पालकमंत्री पद मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केलाय。
0
0
Report
Advertisement

पुणे के खेड में भीषण एक्सीडेंट, बाइक चालक की मौत, एक घायल

Shirur, Maharashtra:पुणे के खेड तालुक्यातील जैदवाडी हद्दीत पुणे - नाशिक महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. भरधाव वेगातील टाटा सफारी कारने दुचाकीला पाठीमागून धडक दिली. अपघाताचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला. या अपघातात दुचाकीवरील अनिकेत वाघ यांचा मृत्यू झाला, तर धनेश जाधव हे गंभीर जखमी झाले आहेत. दोन्ही वाहनांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. रांजणी येथील अनिकेत एकनाथ वाघ वय २७ वर्षे आणि आंबेगाव तालुक्यातील धनेश बबन जाधव वय २८ वर्षे हे दोघे मोटारसायकल क्रमांक MH 14 GJ 2006 वरून राजगुरुनगरच्या दिशेने जात होते. यावेळी त्यांच्या पाठीमागून येणाऱ्या टाटा सफारी कार क्रमांक MH 14 JEU 5455 वरील चालक अजितकुमार विनोदकुमार बाजपेयी ने भरधाव वेगाने आणि निष्काळजीपणे वाहन चालवत दुचाकीला जोरदार धडक दिली. या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात कार चालकाविरोधात मोटार वाहन कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

महा-ऑनलाइन पोर्टल की तकनीकी गड़बड़ी: प्रवेश, छात्रवृत्ति और अन्य सेवाओं में भारी देरी

Nashik, Maharashtra:सलग तिसऱ्या दिवशी 'महा-ऑनलाइन' बंद... शिष्यवृत्ती व विविध अर्ज प्रक्रियांवर परिणाम... अँकर प्रवेश हंगामाच्या ऐन तोंडावर विद्यार्थ्यांमध्ये मोठी डोकेदुखी ठरली आहे महा-ऑनलाइन पोर्टलची तांत्रिक बिघाडाची समस्या. सलग दुसऱ्या दिवशीही पोर्टल ठप्प असल्याने जात प्रमाणपत्र, उत्पन्न दाखला, नॉन-क्रीमीलेयर, अधिवास आणि राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रांसह विविध शासकीय सेवांचे अर्ज रखडले आहेत. अकरावी प्रवेश, शिष्यवृत्ती आणि व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश प्रक्रियेदरम्यान सर्व्हर बंद पडल्याने विद्यार्थी, पालक आणि महा-ई-सेवा केंद्रचालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. पोर्टल कधी सुरू होणार याकडे आता हजारो विद्यार्थ्यांचे आणि पालकांचे लक्ष लागले आहे...
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के अंबाबाई मंदिर में 1.5 किलो सोने का कलश स्थापित, भक्तजनों में उत्साह

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिराच्या वैभवात आज आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिरावर दीड किलो सोन्याचा कळस विधीवत बसवण्यात आला आहे. अधिक महिन्यातील शुक्रवार आणि देवीच्या पूजनासाठी अत्यंत शुभ मानल्या जाणाऱ्या दिवशी हा सोहळा पार पडल्याने भाविकांमध्ये विशेष उत्साहाचे वातावरण आहे. गोव्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्या वतीने हा सोन्याचा कळस अर्पण करण्यात आला आहे. गुरुवारी रात्री 9 वाजल्यानंतर कळस बसवण्याच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती. पहाटेपासून सुरू असलेले हे काम आज सकाळी सुमारे सात वाजेपर्यंत सुरू होते. कळस बसवण्यासाठी विशेष तांत्रिक कौशल्य असलेले सुमारे २५ कर्मचारी कोल्हापूरमध्ये दाखल झाले होते. मंदिराच्या शिखरावर अत्यंत काळजीपूर्वक आणि धार्मिक विधींच्या उपस्थितीत हा कळस बसवण्यात आला. या कळसासाठी सुमारे २०० किलो तांब्याचा डेरा आणि कळस तयार करण्यात आला असून त्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा चढवण्यात आला आहे. या संपूर्ण कळसाची किंमत अंदाजे अडीच ते तीन कोटी रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे. मंदिराच्या ऐतिहासिक आणि धार्मिक महत्त्वाला साजेसा हा सोन्याचा कळस आता मंदिराच्या सौंदर्यात भर घालणार आहे. विशेष बाब म्हणजे, हा कळस प्रतापसिंह राणे यांच्या वतीने अर्पण करण्यात आला असला तरी कळसारोहणाच्या वेळी राणे कुटुंबातील एकही सदस्य उपस्थित नव्हता. तरीही धार्मिक विधी आणि मंदिर प्रशासनाच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला. आजपासून अंबाबाई मंदिरावर झळकणारा हा सोन्याचा कळस भाविकांना दर्शनासाठी खुला झाला असून, अधिक मासातील या शुभ दिवशी देवीच्या दर्शनासाठी आलेल्या हजारो भाविकांचे तो विशेष आकर्षण ठरत आहे. करवीर नगरीच्या धार्मिक वैभवात भर घालणारा हा ऐतिहासिक क्षण भाविकांसाठी अविस्मरणीय ठरला आहे.
0
0
Report

नाशिक के 21 अस्पतालों को कारण बताओ नोटिस जारी, 15 टीमों से एक महीने की छापेमारी

Nashik, Maharashtra:नियम धाब्यावर बसवणाऱ्या २१ रुग्णालयांना नाशिक महानगरपालिकेची कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. शहरातील ६७४ रुग्णालयांच्या तपासणी मोहिमेत २१ रुग्णालयांच्या कामकाजात आणि कागदपत्रांमध्ये अनियमितता आढळल्याने या रुग्णालयांना कारणे दाखवा नोटीस बजावली जाणार आहे. मुंबई नाका परिसरातील एका IVF सेंटरचा बदलापूर येथील स्त्री-बीज तस्करी प्रकरणातील संशयास्पद सहभाग आणि महात्मानगरच्या एका रुग्णालयात उघडकीस आलेले बेकायदेशीर गर्भलिंग निदान व गर्भपाताचे प्रकार, यामुळे मनपाने १५ विशेष पथके स्थापन करून महिनाभर रुग्णालयांची झाडाझडती घेतली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top