icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोकण के घोणसरी जलप्रपात खुला, जंगल सफारी के साथ पर्यटकों के लिए आकर्षण

Oras Bk., Maharashtra:निसर्गाने कोकणात मुक्त हस्ताने उधळण केलीय. पावसाळ्यात तर कोकणाचे सौन्दर्य अजून öpp खुलत आणि त्याला कारण असत डोंगर दऱ्यातून खळखळत वाहणारे नयनरम्य धबधबे, तळकोकणात अनेक धबधबे प्रसिद्ध आहेत मात्र काही धबधबे प्रसिद्धीच्या प्रतीक्षेत आहेत त्यापैकी एक धबधबा म्हणजे कणकवली तालुक्यातील घोणसरी धबधबा... अगदी जंगलमय भागात असलेला घोणसरी धबधबा पर्यटकांच्या प्रतीक्षेत आहे. धबधब्या सोबत जंगल सफारीचा आनंद लुटण्याठी एकवेळ नक्की घोणसरी धबधब्याला भेट द्या आणि कसा आहे हा धबधबा याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report
Advertisement

पुणे के क्षेत्र में घोड नदी में भीषण बाढ़, कई गाँव संपर्क टूट गए

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात पावसाचा हाहाकार उडाला असून, सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे घोड नदीला भीषण पूर आला आहे. माळीन, भीमाशंकर आणि अहुपे खोऱ्यात रात्रभर कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे घोड नदीने रौद्ररूप धारण केले असून ती सध्या धोकादायक पातळीवरून वाहत आहे. घोड नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली गेल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला असून नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांच्या शेतात पुराचं पाणी शिरल्याने शेतीचं ही प्रचंड नुकसान झालंय घोड नदीचा पूरस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report

औरंगाबाद कार्बन प्रोडक्ट्स में CO2 गैस रिसाव, 10 टन गैस हवा में, इलाके में दहशत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या वाळूज MIDCतील 'औरंगाबाद कार्बन प्रॉडक्ट्स' कंपनीत मंगळवारी कार्बन डायऑक्साइड गॅसची मोठी गळती झाली. टँकरमधून टाकीत गॅस भरताना गॅसकिटमधून गळती सुरू झाली. हा गॅस प्रचंड थंड असल्याने मुख्य व्हॉल्व्हवर बर्फ साचून तो जाम झाला. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी ऑक्सिजन किट लावून व्हॉल्व्ह बंद करण्याचा प्रयत्न केला, मात्र बर्फामुळे तो हलला नाही. अखेर पाण्याचा फवारा मारून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली. टँकरमधील तब्बल १० टन गॅस हवेत संपेपर्यंत परिसरात घबराट होती. परिसरात २४ तासांतील ही दुसरी गळती असल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
0
0
Report
Advertisement

solapur ke B-2 zameen ka lamba intezar khatm, mantriyon ki baithak mein bada faisla

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूरकरांचा जिव्हाळ्याचा बी-2 जमिनींचा प्रश्न अखेर मार्गी, महसूल मंत्र्यांच्या बैठकीत घेण्यात आला महत्त्वपूर्ण निर्णय - हजारो सोलापूरकरांच्या जिव्हाळ्याचा बी-2 जमिनींचा प्रश्न अखेर मार्गी - महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री जयकुमार गोरे, आ. देवेंद्र कोठे, सोलापूरचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांमध्ये महत्त्वपूर्ण बैठक संपन्न - शहरातील जवळपास 9000 घरे होणार मालकीचे - आ. देवेंद्र कोठे यांच्या सततच्या पाठपुराव्याला अखेर मोठे यश - विशेष बाब म्हणून देण्यात येणार मंजुरी तर बी-2 च्या जमिनी होणार बी-1 - येत्या आठ दिवसात राज्य सरकारच्या मंत्रिमंडळ बैठकीमध्ये विशेष बाब म्हणून या प्रश्नावर अंतिम शिक्कामोर्तब होणार - केला अनेक वर्षांपासून रखडलेला प्रश्न जवळपास मार्गे लागल्याने सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा में मानसून ब्रेक: जुलाई के पहले दशक से बारिश घटना शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जूनपासून मराठवाड्यात सरासरी १७६ मिलीमीटर पावसाची अपेक्षा असते. मात्र, आतापर्यंत केवळ १५३.७मिलीमीटर पाऊस झाला आहे. म्हणजेच विभागात सुमारे १३ टक्के पावसाची तूट आहे. छत्रपती संभाजीनगर आणि जालना या दोन जिल्ह्यांत अनुक्रमे १००.४ आणि ११२.५ टक्के पावस झाल्याने ते अपेक्षित सरासरीपेक्षा पुढे आहेत. याउलट लातूर आणि परभणी या जिल्ह्यांत सर्वात कमी पाऊस झाला आहे. या दोन्ही जिल्ह्यांत अनुक्रमे सरासरीच्या केवळ ६६ आणि 66.3 टक्के पावसाची नोंद झाली आहे... त्यात जुलै महिन्याच्या सुरुवातीच मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्राला झोडपून काढणाऱ्या मान्सूनचा वेग आता मंदावणार आहे. हवामानातील मोठ्या बदलांमुळे राज्यात मान्सूनला 'ब्रेक' लागण्याची शक्यता असून, ८ जुलैच्या दुपारपासूनच पावसाचा जोर कमी होणार आहे. हवामान अभ्यासक यांच्या नुसार हा खंड २० जुलैपर्यंत राहण्याची शक्यता आहे त्यामुळं परिस्थिती गंभीर होणार आहे...
0
0
Report

सांगली में बारिश के कारण वारणा और कृष्णा नदी का जलस्तर बढ़ा; बाढ़ का खतरा

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यात पाऊसाची संततधर सुरूचं आहे. त्यामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळी झपाट्याने वाढ झाली आहे. गेले तीन दिवस वारणा नदी पात्रा बाहेर पडली आहे, त्यामुळे वारणा नदी काठची शेती पाण्याखाली गेली आहे. बंधारेदेखील पाण्याखाली आहेत. कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ सुरूच आहे. कृष्णा नदीचे सांगलीतील आयर्विन पूल येथे पाण्याची पातळी आता २२ फुटांवर जाऊन पोहोचली आहे. गेल्या २४ तासात ५ फुटांनी कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. वारणा आणि कृष्णा नदीच्या पाण्याची वाढती पातळी लक्षात घेता प्रशासनाकडून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

9 जुलाई को शिक्षकों का राज्यव्यापी स्कूल बंद आंदोलन जारी

Bhandara, Maharashtra:9 जुलै शिक्षकांचा शाळा बंद आंदोलन Anchor - शिक्षकांचा अंत पाहू नका... शिक्षकांचा सन्मान राखा... शिक्षण वाचवा देश वाचवा" या मागणीसाठी राज्यातील सर्व शिक्षक संघटना एकत्र आल्या आहेत. यासाठी 9 जुलै 2026 रोजी राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाची हाक देण्यात आली आहे. 'शिक्षक भारती' संघटनेच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन होत आहे. टीईटीच्या मुद्द्यावरून राज्यातील ज्येष्ठ आणि अनुभवी शिक्षकांवर अन्याय होत असल्याचा आरोप संघटनेकडून करण्यात आला आहे. टीईटी बाबत निर्णय घ्यावा. टीईटीची सक्ती सेवाज्येष्ठता आणि पदोन्नतीसाठी करू नये. मतदार यादी पुनर्निरीक्षण आणि एस.आय.आर. मॅपिंग सारख्या अशैक्षणिक कामांमधून शिक्षकांची तातडीने सुटका करावी. या कामांमुळे शिक्षकांचे मानसिक आरोग्य बिघडत असून त्याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शाळांचे अस्तित्व कायम ठेवावे. तसेच विद्यार्थ्यांना पुरेशा प्रमाणात शिक्षक उपलब्ध करून द्यावेत. अंशतः अनुदानित शाळांना नैसर्गिक टप्पावाढ त्वरित द्यावी. या राज्यव्यापी शाळा बंद आंदोलनाला 'शिक्षक भारती' संघटनेने सक्रिय पाठिंबा दिला आहे. सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई के लिए बड़ी खुशी: विहार तालाब भरने से पानी संकट घटेगा

Mumbai, Maharashtra:मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी; पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी विहार तलाव भरून वाहू लागला मुंबई : सलग सुरू असलेल्या दमदार पावसामुळे मुंबईकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. बृहन्मुंबई महानगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या सात तलावांपैकी महत्त्वाचा असलेला विहार तलाव भरून ओसंडून वाहू लागला आहे. यामुळे मुंबईच्या पाणीसाठ्यात आणखी भर पडली असून भविष्यातील पाणीटंचाईची चिंता काही प्रमाणात कमी झाली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विहार तलावाने कमाल जलसाठा क्षमता गाठली आहे. याचबरोबर उर्वरित तलावांतील पाणीसाठाही वेगाने वाढत असून मुंबईच्या जलसुरक्षेसाठी ही सकारात्मक बाब मानली जात आहे. मुंबईकरांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी असून, आगामी काळात पाणीकपातीची शक्यता आणखी कमी होण्याची आशा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

नाशिक में रेड अलर्ट, येवला में दो हादसे, ट्रक पलटने से यातायात बाधित

Yeola, Maharashtra:अँकर : नाशिक जिल्ह्यात पावसाचा रेड अलर्ट जाहीर झाल्यानंतर रात्रीपासून येवला शहरासह परिसरात रिमझिम पाऊस सुरू आहे. सततच्या पावसामुळे पुणे-इंदोर राष्ट्रीय महामार्गावर वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. दोन वेगवेगळ्या अपघातात येवला शहराजवळ डिव्हायडरवर एका कंटेनरचा अपघात झाला, तर दुसरी घटना पिंपळगाव जलाल टोलनाक्याजवळ घडली. येथे पावसामुळे मालवाहू ट्रक रस्त्यावर पलटी झाला. या दोन्ही घटनांमुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची प्रारंभी माहिती असून, पावसामुळे महामार्गावरील वाहनचालकांनी सावधगिरी बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
0
0
Report

नाशिक में धरण विसर्जन बढ़ा, गोदावरी नदी की ओर 21,965 क्यूसेक

Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात अनेक भागांमध्ये पावसाने विश्रांती घेतली असली, तरी नाशिक शहर व परिसरातून येणाऱ्या पाण्यामुळे नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाण्याची आवक वाढली आहे त्यामुळे दुपारी सुमारे चार वाजेच्या दरम्यान धरणातून पाण्याच्या विसर्गात वाढ करण्यात आली पाच व प्रकार गेटमधून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी च्या दिशेने 21 हजार 965 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे नांदूर मधमेश्वर धरणाच्या बॅकवॉटरचा फटका परिसरातील गावांना बसू नये म्हणून विसर्गात वाढ झाल्याने बॅकवॉटरचा धोका कमी होण्यास मदत होणार आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top