icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर में विवाहित महिला के साथ अत्याचार और धर्मांतरण के प्रयास के आरोप; 2 गिरफ्तार, 1 फरार

AKAMAR KANEJust now
Nagpur, Maharashtra:नागपूर विवाहित महिला को गुंगीचे औषध दिल्यानंतर अत्याचार करण्यात आला. धर्मांतरणाचा प्रयत्न असल्याचा धक्कादायक प्रकार झाला असल्याचा आरोप पीडित महिलेने सांगितला. सोनेगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे; अन्य एक आरोपी फरार आहे. आरोपींची नावे आय्याज मदारे आणि आमीन शेख आहेत; फरारी आरोपीचे नाव हजरत मौलाना आहे. पीडित विवाहितेचा पती विदेशात तैनात आहे; पीडिता प्रॉपर्टी डिलिंगचे काम करते. बालपणापासून परिचित असलेला आय्याज गेलेल्या वर्षी विवाहितेशी पुन्हा संपर्कात आला. प्लॉट खरेदीसाठी त्याने तिच्याशी संपर्क साधला; वर्धा मार्गावरील एका हॉटेलमध्ये भेट झाली. खोलीत गेल्यावर त्याने तिला गुंगीचे औषध असलेला ज्यूस दिला, ती बेहोशीला आली आणि अत्याचार झाला. त्याने मोबाईलद्वारे तिचे चित्रीकरण केले व छायाचित्र काढले. नंतर विनंती-अनुदान देऊन छायाचित्र व व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत तिचे शारीरिक शोषण चालू ठेवले. तिचे धर्मांतराचा प्रयत्न मध्यप्रदेशातील तांमिणी घाट परिसरात झाल्यानंतर विवाहिता नकार देऊ शकेन. दरम्यान त्यांनी काही वर्ज असलेल्या गोष्टी खायला दिल्याचा तक्रार दाखल झाली. सोनेगाव पोलिसांनी दोघांना अटक केली असून, एका आरोपीचा शोध मध्यप्रदेशात तपास केला जात आहे.
0
0
Report

महाराष्ट्र एसटी कर्मचारियों ने रिसोड आगर में घंटानाद आंदोलन, जल्द न्याय की मांग

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:विविध आर्थिक प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी कामगार संयुक्त कृती समितीच्या वतीने आज रिसोड आगारात घंटानाद आंदोलन करण्यात आले. प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आणि प्रलंबित मागण्यांबाबत तातडीने निर्णय घेण्याची मागणी करत कामगारांनी निदर्शने केली.यावेळी एसटी कामगार संयुक्त कृती समितीचे पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.कामगारांच्या विविध आर्थिक मागण्या तत्काळ मंजूर कराव्यात,अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल,असा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
0
Report

रत्नागिरी MIDC में कुछ कंपनियों ने दूषित जल नाली में डाला, ग्रामीण भड़के

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहराजवळील मिरजोळे एमआयडीसीमधील काही कंपन्यांनी आपलं दूषित सांडपाणी वहाळात सोडल्याचा प्रकार उघडकीस आला. हा प्रकार समजताच परिसरातील ग्रामस्थांनी संताप व्यक्त केला. जांभूळ फाटा परिसर ते करंदीकर वाडी या भागातून जाणाऱ्या नैसर्गिक वहाळात दूषित पाणी सोडल्याने संपूर्ण परिसर काळवंडून गेला आहे. या पाण्याला केमिकलसारखा वास येत असल्याने परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा परिणाम लोकवस्तीमधील पिण्याच्या पाण्याच्या विहिरींवर झाला असल्याचं स्थानिक ग्रामस्थांचं म्हणणं आहे. पावसाळ्याच्या तोंडावर थेट पिण्याच्या पाण्याचे स्त्रोतच धोक्यात आल्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला. यापूर्वीही अनेकदा कंपन्यांनी पावसाचे पाणी आणि ओढ्याच्या प्रवाहाचा गैरफायदा घेत रासायनिक पाणी सोडल्याच्या तक्रारी स्थानिक ग्रामस्थांनी केल्या होत्या. मात्र, दरवेळी केवळ पोकळ आश्वासमांशिवाय ग्रामस्थांच्या हाती काहीही लागलेलं नाही. हे पाणी सोडणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कारवाई, करावी अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी केली.
0
0
Report
Advertisement

चिपळूण में स्मार्ट मीटर रोक, राष्ट्रवादी के दबाव के बाद महावितरण ने स्थगित किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला तूर्तास स्थगिती..राष्ट्रवादीच्या आंदोलनाला मोठे यश! अँकर २४ तासांत स्मार्ट मीटर बदला, अन्यथा वीज कापली जाईल, असे मेसेज व्हायरल झाल्याने चिपळूणमध्ये एकच खळबळ उडाली होती.. यावर चिपळूण तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आक्रमक झाला असून,त्यांनी थेट महावितरणचे कार्यालय गाठले.. राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे मुख्य कार्यकारी अभियंता भांबरे यांची भेट घेऊन त्यांना जाब विचारला आणि निवेदन सादर केले.. यानंतर अभियंता भांबरे यांनी तातडीने वरिष्ठ अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून चर्चा केली.या चर्चेअंती, चिपळूणमध्ये स्मार्ट मीटर बसवण्याच्या मोहिमेला तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे,अशी अधिकृत माहिती महावितरणने शिष्टमंडळाला दिली आहे.. राष्ट्रवादीच्या या आक्रमक पवित्र्यामुळे चिपळूणवासीयांना मोठा दिलासा मिळाला आहे..
0
0
Report

सातारा-पंढरपूर राज्यमार्ग पर ठेकेदार की लापरवाही से 300 हादसे, 50 से ज्यादा मौतें

Pandharpur, Maharashtra:महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या दुर्लक्ष आणि ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे सातारा पंढरपूर राज्यमार्गावर आतापर्यंत 300 लहान मोठे अपघात झाले आहेत. 50 पेक्षा अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सातारा पंढरपूर राज्यमार्गाचे नूतनीकरण करताना हा मार्ग MSRDC कडे वर्ग करण्यात आला. काळ्या यादीत असलेल्या Roadways Solution Company ने राजकीय वरदहस्त असल्याने काम मिळवले. मात्र कामाची गुणवत्ता टिकवता आली नाही. या रस्त्यावरील बहुतेक पूलांची कामे अद्याप अपूर्ण आहेत. अनेक ठिकाणी दिशादर्शक फलक बसवले नव्हते, धोकादायक वळने, फलक, की गतिरोधक नाहीत. ग्रामस्थांनी तक्रारी केल्या, परंतु काहीच कारवाई झाली नाही. खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी याबाबत आवाज उठवला आहे. या प्रकरणी रोडवेज सोल्यूशन Companyविरुद्ध गुन्हा दाखल झाला.
0
0
Report

विधान परिषद चुनाव के दौरान नगरसेवकों की छुट्टियाँ और नेताओं की बयानबाजी

Nanded-Waghala, Maharashtra:विधान परिषद निवडणूक लागली आणि नगरसेवक असलेले मतदार सहलीला निघून गेले. चतुर झालेल्या या नगरसेवकांच्या सहलीचे फोटो सोशल मिडियावर झळकले नसले तरी त्यांच्या सहलीवरून खुमासदार चर्चा सुरु झाल्यात. नेत्यांमध्ये कलगीतूराही रंगल्याचे पाहायला मिळत आहे. विधान परिषद निवडणूक म्हटलं की मतदार असलेल्या नगरसेवकांची पर्वणीच असते. आपापल्या मतदारांना सहलीवर पाठवून त्यांची शाही बडदास्त ठेवली जात असल्याचे चित्र काही नवीन नाही. नांदेड जिल्ह्यातील बहुतांश नगरसेवक आधीच सहलीवर रवाना झाले आहेत. या नगरसेवकांच्या सर्वाधिक पसंतीचे ठिकाण गोवा आहे. तर काही नगरसेवक कोकण आणि हैद्राबाद ला सहलीचा आनंद घेताहेत. अनेक नगरसेवक सहकुटुंब सहलीला गेले आहेत. नगरसेविकाना एकटे जाण्याची अडचण असल्याने त्यांना सर्व कुटुंबासोबत सहलीला पाठवण्यात आले आहे. यापूर्वी झालेल्या सहलिंचे फोटो व्हायरल झाले आणि माध्यमातून टीका झाल्याने नगरसेवक चतुर झाले आहेत. सहलीचा आनंद घेतानाचा फोटो सापडता सापडत नाही. पण बहुतांश नगरसेवक पर्यटनाला गेलेल्यांचा काही लपून राहिलेले नाही. कोणाला कुठे जायचे ज्याचा त्याचा प्रश्न आहे, सध्या शाळांना सुट्ट्या आहेत, कुटुंब बरोबर आहे, काही दिवस तर एन्जॉय करतील ना अशी प्रतिक्रिया यावर माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. खा. अशोक चव्हाण यांच्या या प्रतिक्रियेचा उद्धव ठाकरे सेनेचे नेते अंबादास दानवे यांनी समाचार घेतला. निवडणूक काळात मतदार नगरसेवकांना फिरायला नेण्यावर बंदी आहे मग निवडणूक अयोग झोपला का असा सवाल दानवे यांनी केला. दरवर्षी शाळांना सुट्टी असते मग तुमचे नगरसेवक दरवर्षी सहलीवर जातात का असा माझा अशोक चव्हाण यांना सवाल असल्याचे दानवे म्हणाले. तुम्हाला भीती असल्यामुळे घोडेबाजार सुरु केल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान मतदार नगरसेवकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता कुणीही भेटत नाही, त्यांचा संपर्क होत नाही. त्यांना अमिष दाखवून नेने, किंवा त्यांना डांबून ठेवणे हा आचार संहितेचा भंग असल्याची तक्रार वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार प्रशांत इंगोले यांनी निवडणूक निरीक्षकांकडे दाखल केलीये. विधान परिषद उमेदवार प्रशांत इंगोले - विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार सुरु आहे, पैश्याशिवाय कुणीही मतदान करत नाही अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे आमदार हेमंत पाटील यांनी दिली होती. सत्ताधारी पक्षातील आमदाराने वक्तव्य केल्याने या निवडणुकीत काय चालते हे वेगळे सांगायची गरज नाही. पण निवडणूक म्हणजे मतदारांची मौज हे चित्र लोकशाही साठी काही भूषणावह नाही. याचा विचार सर्वच पक्षातील नेतेमंडळीनी करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर-जालना निर्वाचन: भाजपा की ताकद बनाम महायुती की पूर्व-घटनाक्रम चर्चा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर-जालना स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीसाठी 18 जून ला मतदान होणार आहे. मात्र त्याआधीच महायुती आणि महाविकास आघाडी वातावरण तापायला लागले आहे, रविवारी भाजप ने मतदानाची तालीम करून घेतली त्यांच्या कडे 419 मतदान असताना तालमीत 455 लोकांनी मतदान केले त्यामुळं महाविकास आघाडीचे मतदान निवडणूक पूर्वीच फुटले की काय आशा चर्चा सुरू झाली आहेत. निवडणुकीपूर्वीच माविआ चे मतदान फुटले ? भाजपच्या रंगीत तालमीत 455 जणांचे मतदान महायुती कडे 419 मते आहेत, वरचे झालेले मतदान कुणाचे असे चर्चे सुरू आहेत. संभाजीनगर जालना विधान परिषद निवडणुकीत महायुती कडे बहुमत आहे त्यामुळे भाजपचा उमेदवार सुहास शिरसाठ जिंकून येणार हे जवळपास निश्चित आहे. तरीही भाजपने रविवारी संभाजी नगरात सर्वच मतदारांची मतदानाची रंगीत तालीम घेतली. महायुती कडे 419 मते आहेत, महाविकास आघाडी कडे 145 मत आहेत, मात्र या तालमीत पहिल्या पसंतीची 455 मत पडली. काही मतदार ज्यांनी प्रशिक्षणाला प्रतिसाद दिला नाहीत तेही मतदान करतील अशी चर्चा आहे. या दाव्यावर महायुती नेते आणि विरोधी पक्षांकडून प्रतिक्रिया आल्या. अंबादास दानवे यांनी या दाव्यामध्ये भाग घेतला. असा विचार केला जातो की भाजपची ताकदावरील धावा माविआसाठी धोक्याची घंटा ठरणार आहे.
0
0
Report

नवी मुंबई अस्पताल उद्घाटन समारोह में हंगामा, मंत्री के सामने विधायक मंदा म्हात्रे नाराज

Navi Mumbai, Maharashtra:anchor- नवी मुंबई मनपा रुग्णालयात विविध आरोग्य सुविधांचे उदघाटन आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत पार पडलं यावेळी उदघाटन कार्यक्रमा वरून मानअपमान नाट्य पहायला मिळाले ,शिवसेनीकांनी रुग्णालयाच्या गेट वर आंदोलन करत वनमंत्री गणेश नाईक यांना काळ्या फिती दाखवल्या असताना ,स्थानीय आमदार मंदा म्हात्रे कार्यक्रमातून रागावून गेल्याची घटना समोर आली, आमदार मंदा म्हात्रे यांना फीत कापताना धक्काबुक्की झाल्याचा आरोप केला असून, वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत मनपा आयुक्तांना जाब विचारत कार्यक्रम सोडऊन आमदार मंदा म्हात्रे निघून गेल्या यावेळी पालिका आयुक्त कैलास शिंदे यांनी त्याची विनवणी केली परंतु त्या थांबल्या नाहीत , बेलापूर मतदार संघात त्यांचा आमदार निधी वापरला.मी स्थनिक आमदार असताना हा प्रकार सुरू आहे ,हा अहंकार आणि मस्ती आहे नाईक यांना. मी पक्षाला याबाबत सगीतेल आहे मी अत्ता गप्प बसणार नाही ,असा राग यावेळी मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केला.
0
0
Report

शहाजी पाटील की टिप्पणी से ठाकरे-शिंदे गुट में घमासान, ठाणे स्वास्थ्य सूची विवाद

Pandharpur, Maharashtra:गणेश नाईक कुद्र्या मनाचे अल्पसंतुष्ट माणूस, हा माणूस भाजपाचा निष्ठावंत नाही. मनोहर जोशी यांचे सरकार पडण्यासाठी पवारांना सुद्धा मदत केली होती. माजी आमदार शहाजी पाटील यांनी डागली तोफ. ठाणे जिल्ह्यातील आरोग्य सेवा कार्यक्रमाच्या पत्रिकेमध्ये पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव वगळल्याने शिवसेनेचे माजी आमदार शहाजी बापू पाटील हे आक्रमक झाले आहेत त्यांनी भाजपचे मंत्री गणेश नाईक यांच्यावर शेलक्या या शब्दात टीका केली आहे. एक दिवस गणेश नाईक नवी मुंबई राजकारणातून संपलेले दिसतील. संजय राऊत यांनी मुंबईत नारळाच्या झाडाखाली बसून काहीतरी कल्पना करायचा आता सोडून द्यावं, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांना औरंगजेबाला जसे संताजी धनाजी दिसत होते त्या प्रमाणे एकनाथ शिंदे जिथे तिथे दिसत आहेत.फक्त खासदारच नाही हळूहळू संपूर्ण उबाठा गट हा शिवसेनेमध्ये आलेला दिसेल. सोलापूर विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत हे 550 इतक्या विक्रमी मताने विजयी झालेला दिसतील मोहिते पाटील हे आता राजकीय दृष्ट्या विरघळलेलं घराणं आहे. त्यात काय दम राहिलेला नाही. कोणी नाराज असण्यावर राजकारणात विजय मिळत नसतो म्हणत. मोहिते पाटील यांच्या विधान परिषद निवडणुक लावण्यावर टीका केली आहे
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर नगरपालिका में 16 नगरसेवकों ने राजेश अडूर हटाने के लिए पत्र पर हस्ताक्षर किए

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर महानगरपालिकेतील 16 नगरसेवकांनी वडेट्टीवार समर्थक असलेल्या काँग्रेस गटनेते राजेश अडूर यांना पदावरून हटवण्यासाठी पत्रावर सही केली. उद्या नागपूर विभागीय आयुक्तांना Rajesh Adur यांच्या गटनेते पदावरून हटवण्याबाबत हे पत्र दिलं जाणार आहे. या बैठकीची आयोजनाचं वृत्त काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांच्या प्रमुख उपस्थितीत झाली. या बैठकीत वडेट्टीवार समर्थक असलेले राजेश अडूर यांना पदावरून हटवण्याच्या प्रस्तावावर सहमती झाली. अशाच प्रकारे खासदार प्रतिभा धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात आयोजित केलेल्या बैठकीला कोणतेही नगरसेवक उपस्थित राहणार नाहीत आणि कोणत्याही प्रस्तावावर सही करू नये असे स्पष्ट निर्देश राजेश अडूर यांनी दिले असून, उपस्थित राहिल्यास कारवाईची होणार आहे. धानोरकर यांच्या जनसंपर्क कार्यालयात बोलवलेल्या बैठकीचा अहवाल बेकायदेशीर असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. यासंदर्भात कॅमेऱ्यावर बोलण्यास काँग्रेस नेत्यांनी नकार दिला.
0
0
Report

आरक्षण कोटे पर स्पष्ट नीति, राष्ट्रवादी-कांग्रेस गठबंधन और दारूबंदी पर राजनीति तेज

Nagpur, Maharashtra:बाईट - धर्मराव बाबा आत्राम (माजी मंत्री) On आरक्षण उपवर्गीकरण - आरक्षणामध्ये कोणत्याही प्रकारची कमतरता होणार नाही.. आमचा न्याय देण्यासाठी झालेला सरकार आहे. - प्रत्येक जिल्ह्यात ज्या पद्धतीने आरक्षणाचा कोटा असेल त्यानुसार राहील.. तो कमी होणार नाही. - कोणत्या जाती आहेत ते पाहणे महत्त्वाचे नाहीत.. - यामध्ये एस सी एस टी oबीडीस आणि व्हीजन्ट यांना न्याय मिळतो की नाही हे महत्त्वाचं. आम्ही आरक्षण प्रवर्गातून येत असल्यामुळे त्यांना संरक्षण देणे हे आमचं काम आहे.. On राष्ट्रवादी- काँग्रेस एकत्रीकरण - काँग्रेस हा बुडता जहाज आहे. त्या जहाजात बसले तर ते पण बुडतील.. त्यांना पर्याय म्हणून ओरिजनल राष्ट्रवादी काँग्रेस आम्ही आहोत.. सुनेत्रा ताई यांच्या नेतृत्वात एकत्र यावं.. त्यांचेही काम होतील.. - विराम दिला तरी तो तात्पुरता असतो राजकारणामध्ये नेहमी करिता नसतो.. On रोहित पवार आंदोलन मागे - मी आंदोलन बघितलं नाही.. कर्जमाफी झाली ती चांगलीच झाली.. On टायगर कॉरिडोर उत्खनन - जिथे टायगर कॉरिडोर असेल तिथे उत्खनन होणार नाही.. यामध्ये लोकांनी विरोध दर्शविणे हा चुकीचा आहे.. On एनसीपी विधान परिषद निवडणूक सक्रियता.. - आमच्या दोन जागा बिनविरोध निवडून आल्यात.. दोन भाजपा आणि दोन शिवसेनेच्या आले आहेत.. On Gadchiroli दारू बंदी - दारूबंदी उठविण्यासाठी मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी मी मुंबई जात आहे.. जिल्ह्यात दारूबंदी करून काय उपयोग झाला.. उलट बाहेरून अवैध दारू येत आहे.. ते थांबावं कारण लोक मरत आहे.. त्यापेक्षा चांगल्या प्रकारचा दारू असेल तर लोक व्यवस्थित राहू शकतील..
0
0
Report
Advertisement

नितेश राणे ने मोदी 12 साल बदलाव पर हिंदू सुरक्षा का जोर दिया

Oras Bk., Maharashtra:मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मोदी साहेबांनी 12 वर्षात परिवर्तन आणलं त्याबाबत विस्तृतपणे मुख्यमंत्री साहेबांनी माहिती दिली आहे. 2014 पासून देशात झालेले परिवर्तन ह्याच अनुभव सर्वांनी घेतलाय. अल्प संख्यांक मतदान सुरक्षित ठेवण्याचं एकमेव काम काँग्रेस सरकारने केले. ह्यापूर्वी काँग्रेसच्या काळात कोणताही पंतप्रधान महाआरती करताना दिसला होता काय तेव्हा टीळा लावताना 10 वेळ विचार केला जायचं. हिंदू हित की बात करेगा वही देश पे राज करेगा हे लक्षात घेऊन मोदींनी काम केले आमची देवतांची मंदिरे सुरक्षित राहिली पाहिजेत यासाठी मोदी साहेबांनी अनेक निर्णय घेतले વक्फ बोर्डकडे असलेल्या हिंदूंच्या जमिनी हिंदूंना परत देण्याचे पुण्य काम मोदींनी केले हिंदू समाजाला ताकद देण्याचे काम आदरणीय मोदी साहेबांनी 12 वर्षात केले. आमच्या देशाचे पंतप्रधान आपण हिंदू असल्याचे लपवत नाहीत काँग्रेसच घाणेरड राजकारण होत त्यामुळे देशातील हिंदूंना 2014पूर्वी आपला कोण वाली नाही अस वाटत होत जो आपल्या देशाकडे वाकड्या नजरेने पाहील त्याला ऑपरेशन सिन्दुर सारखं उत्तर मिळेल काँग्रेस सरकारला पाकिस्तानला जाब विचारण्याची हिंमत झाली नाही आपल्या देशाकडे कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही ही आदरयुक्त भीती मोदी साहेबांनी 12 वर्षात निर्माण केलीय. भगव्याला मान देण्याचं काम 12 वर्षात मोदींनी केले. पाकिस्तान आणि बांगलादेश मधील हिंदूंना आपला भारत देशच सुरक्षित वाटतोय भाजपाचा कार्यकर्ता म्हणून मला मोदी साहेबांचा अभिमान आहे सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या वतीने मी अभिनंदन करतो ते अजून रेकॉर्ड करणार आहेत या ते शूरवात है. आखाती देशातील युद्धामुळे बाहेरील देशातील तुलनेत भारत देशातील नागरिक सुरक्षित आहेत. आपला आयुष्य सुरळीत सुरू आहे ऑन आंदोलन --- आंदोलनाची रिमोट कंट्रोल कोणाकडे आहेत ते समजेल लाखो सांगून शेकडो तरुण येतात म्हणजे देशातील तरुण मोदी साहेबासोबत आहेत. त्यामुळे कोकरोज झुरळ साप यांना महत्व नाही येणाऱ्या काळात सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक प्रकल्प येणार मुंबई स्थित तरुणांनी बॅग भरून ठेवावी मुख्यमंत्री साहेबांचे आभार मला दोन महत्त्वाची खाती दिली मी आंध्रप्रदेशला जाणार आहे तिकडच्या मत्स्य विभागाचे कार्य पहायला समान नागरी कायद्याचा मुहूर्त ठरलेला आहे योग्य वेळी येईल ऑन आडाळी midc --- माझ्या वडिलांनी घोषणा केलेल्या midc चा 2029 मध्ये कायापालट होईल विरोधी पक्षात काम करण्याचे फायदे आहेत त्यामुळे जनतेची भावना कळते ऑन संजय राऊत ( मोहन भागवत टीका) --- *ज्यांचं रक्त भगव आहे ज्यांच्या साठी राष्ट्र प्रथम आहे. जे आपलं आयुष्य हिंदू राष्ट्रासाठी घालवतायेत त्यांना मी कसं काय पाकिस्तानच्या जवळ घेऊन जाऊ तुमच्या मालकाला पाकिस्तानी एजंट म्हटलं तर वावग ठरणार नाही. त्याच रक्त हिरव झालेलं आहे. त्याबाबतीत संजय राऊत यांनी चिंता करावी. मोहन भागवत यांच्या कडून प्रेरणा घेऊन स्वतःच रक्त भगव होत का यासाठी प्रयत्न करावा* ऑन राहुल गांधी पंतप्रधान उमेदवार ( संजय राऊत ) --- संजय राऊत पगार उद्धव ठाकरे कडून घेतात ना, संजय राजाराम राऊत हे उद्धव ठाकरेचे आहेत की राहुल गांधीचे, पगार एकाकडून आणि बोनस दुसऱ्या कडून असा प्रकार नाही ना? ऑन शर्मिला ठाकरे --- त्यांनी स्वतःच मत व्यक्त केलं त्या राजकारणात कुठल्याही पदावर नाहीत. काही लोकांना चौकटीच्या बाहेर ठेवा ऑन रोहित पवार ( आंदोलन मागे )--- *बर झालं अन्न त्यागाचा परिणाम दिसत नव्हता. त्यांना बर्गर आणि प्राईस खायची सवय आहे. उगाच अन्नत्याग करून शरीराला त्रास करून घेऊ नये. आता गमवलेल वेट परत कमवू नये.* ऑन शंभू राजे --- त्यांच्या भावनांची दखल आमचे पक्षश्रेष्ठी घेतील. ऑन सिंधुदुर्ग जिल्हा परिषद ( बनावट सह्या ) --- प्रक्रिया सुरू आहे, परत सह्या करताना हात कापतील. नितेश राणे पालकमंत्री आहे हे कोणी विसरू नये.
0
0
Report

अकोला में SIR नियुक्ति के विरोध में कर्मचारियों की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात मतदार यादी विशेष सघन पुनरीक्षण (SIR) कार्यक्रमासाठी नियुक्त झालेल्या कर्मचाऱ्यांनी आपल्या नियुक्ती आदेश रद्द करण्याची मागणी केली आहे. जनगणनेच्या अतिरिक्त जबाबदाऱ्यां आणि प्रशासकीय अडचणींचा दाखला देत कर्मचाऱ्यांनी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे निवेदन सादर केले आहे. अकोला पूर्व विधानसभा मतदारसंघांतर्गत मतदार यादीच्या विशेष सघन पुनरीक्षण कार्यक्रमासाठी विविध विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मात्र, संबंधित कर्मचाऱ्यांनी या नियुक्तीला विरोध दर्शवत जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदन दिले आहे. निवेदनात कर्मचाऱ्यांनी म्हटले आहे की, केंद्र शासनाच्या जनगणना प्रक्रियेशी संबंधित विविध महत्त्वाच्या कामांची अतिरिक्त जबाबदारी त्यांच्याकडे आधीच सोपविण्यात आली आहे. जनगणनेचे काम अत्यंत वेळखाऊ, अचूकता आणि निश्चित मुदतीत पूर्ण करावयाचे असल्याने त्यावर मोठा ताण असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. तसेच मतदार यादी पुनर्रक्षणाच्या कामात घरोगरी जाऊन सर्वेक्षण करणे, माहिती संकलन करणे आणि डिजिटल प्रणालीवर माहिती अपलोड करणे यासारख्या जबाबदाऱ्या आहेत. त्यामुळे दोन्ही राष्ट्रीय महत्त्वाच्या कामांवर परिणाम होण्याची शक्यता कर्मचाऱ्यांनी व्यक्त केली आहे. निवेदनात बुलढाणा जिल्ह्याचा संदर्भही देण्यात आला असून, तेथील प्रशासनाने जनगणनेच्या कामात गुंतलेल्या कर्मचाऱ्यांना मतदार यादी पुनरीक्षणाच्या कामातून वगळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्या धर्तीवर अकोला जिल्ह्यातही जनगणना काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांची SIR मधील नियुक्ती रद्द करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top