445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई एयरपोर्ट के नाम DB पाटील रखने की मांग पर भारी प्रदर्शन
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि बा पाटील यांचं नाव देण्यात यावंयासाठी प्रकल्पग्रस्तांनी एल्गार पुकारला आहे. येत्या 7 जुलै रोजी हजारोच्या संख्येने प्रकल्पग्रस्त रस्त्यावर उतरणार असून विधिमंडळाला घेराव घालणार आहेत. पनवेल मधील चिंचपाडा ते विधिमंडळ पायी पदयात्रा काढत विधिमंडळाला घेराव घालून प्रकल्पग्रस्त विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव देण्याची मागणी करणार आहेत. नागरिकांमध्ये जनजागृती करत मोठ्या संख्येने या आंदोलनात प्रकल्पग्रस्थान्नी सहभागी होण्याचे आवाहन यावेळी प्रकल्पग्रस्थान्नी आयोजित केलेल्या बैठकीत करण्यात आलेय.0
0
Report
पुणे-अहिल्यानगर महामार्ग पर भारी बरसात, पानी भरा, यातायात बाधित
Shirur, Maharashtra:मुसळधार पावसाचा मोठा फटका पुणे-अहिल्यानगर महामार्गाला बसला आहे. कारेगाव परिसरात महामार्गावर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने वाहनचालकांची चांगलीच तारांबळ उडालीये. रस्त्यावरून पाण्याचे लोंढे वाहात असल्याने दुचाकीस्वार आणि पादचाऱ्यांना रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. या पाणी साचल्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा वेग मंदावला असून वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने प्रशासनाने वाहनचालकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
चंद्रपुर के पडोली में 5 वर्षीय बच्ची के साथ बलात्कार का प्रयास; आरोपी पूर्व विधायक गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरालगतच्या पडोली पोलीस ठाणे हद्दीत चिमुकलीवर अत्याचाराचा प्रयत्न, शेजारी राहणारी 5 वर्षीय चिमुकली घरल्यावर तिला चॉकलेटचे आमिष दाखवून स्वतःच्या सदनिकेत अत्याचाराचा केला प्रयत्न. सोबत असलेल्या वयाने मोठ्या बहिणीने पळ काढत ही घटना कुटुंबियांना सांगितली. यानंतर परिसरातील नागरिकांनी धिटाईने पोलिसांना माहिती दिली. यातील आरोपी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा बल्लारपूर क्षेत्राचा माजी विधानसभा प्रमुख असल्याची माहिती पुढे आली आहे. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य बघता तातडीने कारवाई करत आरोपी ओंकार गेडाम (64) याला ताब्यात घेतले. पोलिसांची गुन्हे अन्वेषण पथक, फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. दरम्यान परिसरातील नागरिकांनी या घटनेवर संताप व्यक्त करत अशा मानसिकतेच्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पडोली पोलीस घटनेचा अधिक तपास करीत आहेत.0
0
Report
Advertisement
कल्याण रिंग रोड पर कार डिवाइडर चढ़ी, चालक ने नियंत्रण खोया; जान बची, पुलिस जांच शुरू
Kalyan, Maharashtra:कल्याण की रिंग रोड गांधारी पुल के पास अटाली के नजदीक घटनास्थल पर कार चालक का नियंत्रण खो गया, जिससे कार डिवायडर पर चढ़ गई. सौभाग्य से जानमाल का नुकसान नहीं हुआ, सिर्फ कार को नुकसान हुआ है. रिंग रोड पर कई गाड़ियाँ अव्यवस्थित और ढीले-ढाले तरीके से ड्राइविंग कर रही थीं, कई दुर्घटनाएं भी सामने आईं. चालक के ड्राइविंग के दौरान डिवायडर चढ़ने से नियंत्रण खो गया; पुलिस की जांच जारी है.0
0
Report
चाकण में भारी बारिश से पुणे-नाशिक हाईवे डूबा, यातायात बेहाल
Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर चाकण शहराला पावसाने जोरदार झोडपले असून, या मुसळधार पावसामुळे पुणे-नाशिक हायवे पूर्णपणे जलमय झाला आहे. रस्त्यावरील गटारी पुन्हा एकदा तुंबल्याने पावसाचे पाणी थेट मुख्य रस्त्यावर आले आहे, ज्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्या वाहनधारकांना प्रचंड कसरत करावी लागत आहे. पाण्याचा अंदाज येत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वेग कमालीचा मंदावला असून, हायवेवर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या नालेसफाईच्या दाव्यांचे या पावसाने पुरते वाभाडे काढले असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही पहिल्याच मोठ्या पावसात चाकणकरांना जलमय रस्त्यांचा सामना करावा लागत आहे.0
0
Report
नाशिक के मोरया ज्वेलर्स में चोरी: सीसीटीवी से पकड़ी गई महिला
Nashik, Maharashtra:सोन्याच्या दुकानात दागिने खरेदी करण्याचा बहाणा करून हात सफाईने चोरी करणारे एका महिलांना अंबड पोलिसांनी अटक केलीये... ही घटना नाशिकच्या छत्रपती शिवाजी चौक जुने सिडको येथील मोरया ज्वेलर्स या दुकानांमध्ये घडलीये.. चोरीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे...सदर महिला दागिने घेण्यासाठी या दुकानात आली होती... सेल्समनचे लक्ष विचलित करून या महिलेने या दुकानातील तीन अंगठ्या चोरी केल्या होत्या.. मात्र सीसीटीव्ही फुटेज मुळे ही महिला पोलिसांच्या जाळ्यात अडकली आहे सदर महिलेला कोणी ओळखत असेल व याआधी असा चोरीचा प्रकार कुठे घडला असेल तर त्यांनी अंबड पोलीस स्टेशन नाशिक येथे संपर्क करावा असे आवाहन पोलिसांनी करण्यात आले आहे。0
0
Report
Advertisement
डोंबिवली कॉलेज पास ट्रैफिक चेक के दौरान चालक ने पुलिसकर्मी से मारपीट, वीडियो वायरल
Kalyan, Maharashtra:डोंबिवली पेंढारकर कॉलेज परिसरात भर रस्त्यात राडा वाहतूक तपासणीसाठी गाडी थांबवल्याने चालकाचा संताप अनावर आपल्या साथीदारासोबत मिळून वाहतूक पोलिसाला शिवीगाळ आणि भर रस्त्यात मारहाण करत मोबाईल हिसकावला मध्यस्थी करणाऱ्या नागरिकांसमोरही आरोपींची हुज्जत .. यानंतर संतप्त जमाव आणि वाहतूक पोलिसांनी आरोपींना चोप देत शिकवला धडा ..संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. मानपाडा पोलिस ठाण्यात वाहतूक पोलिसांच्या तक्रारीनंतर सरकारी कामात अडथळा, शिवीगाळ , मारहाण सह इतर कलम अंतर्गत गुन्हा दाखल पोलीस तपास सुरू0
0
Report
सोशल मीडिया पोस्ट के कारण मदापूर ग्राम में तनाव, घायल, सीसीटीवी से आरोपियों की तलाश
Shirdi, Maharashtra:Anc - राहाता तालुक्यातील ममदापूर येथे सोशल मीडियावरील एका पोस्टच्या वादातून दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाल्याची घटना समोर आलीय.. या वादातून एका तरुणाला अडवून मारहाण करण्यात आली, तर दुसऱ्या दिवशी संबंधिताच्या मोबाईल दुकानात घुसून तोडफोड केल्याचा आरोप करण्यात आलाय..या घटनेनंतर गावात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकाराच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी आज ममदापूर गाव बंद ठेवत मारहाणीच्या घटनेचा निषेध नोंदवत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केलीय...या प्रकरणी लोणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल असून CCTV च्या आधारे आरोपींचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
तळकोकण में पिछले दो दौर کی बारिश से किसान खुश; यलो अलर्ट जारी
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील दोन उसंत घेतलेल्या पावसाने आज दुपारपासून हजेरी लावलीय. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली कुडाळ आणि देवगड तालुक्यातील काही भागात दुपारपासुन पावसाची संततधार सुरु आहे. पावसामुळे जिल्ह्यातील काही भागात लावणीची काम खोलंबलीं होती. मात्र आज पडलेल्या पावसामुळे शेतीच्या कामाला वेग येण्याची शक्यता आहे. जिल्ह्यात आज पावसाचा यल्लो अलर्ट जाहीर करण्यात आला असून दोन दिवसांच्या विश्रांती नंतर आलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र खुश झालाय...0
0
Report
Advertisement
आषाढ़ी वारी में खाद्य पदार्थों की कड़ी जांच के निर्देश एफएसएसएआई के तहत
Pandharpur, Maharashtra:आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांच्यामुळे अन्न औषध आणि प्रशासन विभाग चांगला चर्चेत आलेला आहे. आता पहिल्यांदाच आषाढी वारीच्या निमित्ताने अन्न औषध प्रशासन विभागाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी वारी काळामध्ये भगर, दुग्धजन्य पदार्थ तसेच खाण्याचे इतर पदार्थ यांची कडक तपासणी करण्याचे निर्देश अन्न औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना दिलेले आहे. गरज पडल्यास अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना सुद्धा याबाबत कळवून कडक कारवाई करण्याबाबत सूचना दिल्या जातील असे मंत्री खोरे यांनी स्पष्ट केले आहे त्यामुळे पहिल्यांदाच आषाढी वारीमध्ये खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या दुकानांची कडक तपासणी होणार आहे.0
0
Report
आरबीआई ने सांगली जिला केंद्रीय बैंक को नोटिस भेजा; गोपीचंद पडळकर के आरोप
Sangli, Maharashtra:आरबीआई ने सांगली जिला केंद्रीय बैंक को कारणे दाखवा नोटिस जारी किया है, यह जानकारी भाजपा विधायक गोपीचंद पडळकर ने दी। बैंक द्वारा संचालक को गलत तरीके से दिया गया कर्ज, कर्ज माफी और ग़ैरकारभार के कारण RBI नोटिस जारी किया गया है। सहकार कानून के अंतर्गत 35,35 अ,46,47 अ के अंतर्गत नोटीस जारी करने की बात गोपीचंद पडळकर ने स्पष्ट की। जयंत पाटलाओं के नेतृत्व में बैंक के संचालन पर प्रशासनिक नियंत्रण मांगने की बात कही गई है; आरबीआई की नोटीस और भर्ती मुद्दे मुख्यमंत्री के ध्यान में लाने की बात भी सामने आई है, जल्द परिणाम दिखेंगे, ऐसा पडळकर ने कहा।0
0
Report
शिरूर तालुक़े कान्हूर मेसाई में भारी बारिश ने जनजीवन अस्त-व्यस्त कर दिया, खेत-खलिहान पानी में डूबे
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील कान्हूर मेसाई येथे ढगफुटीजन्य पावसाने अक्षरशः हाहाकार माजवला आहे. अवघ्या काही वेळात झालेल्या या मुसळधार पावसामुळे संपूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय. या ढगफुटीसदृश पावसामुळे गावातील शेतशिवार पूर्णपणे पाण्याखाली गेले असून, शेतातून वाहणाऱ्या पाण्याला ओढ्याचं स्वरूप आलं आहे. याशिवाय गावातील प्रमुख रस्तेही पाण्याखाली गेल्याने वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, गावातील ग्रामदेवतेच्या मंदिरातही मोठ्या प्रमाणावर पाणी शिरल्याने गावकऱ्यांची प्रचंड तारांबळ उडाली असून नागरिकांमध्ये कमालीचे चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे..0
0
Report
Advertisement
उद्धव ठाकरे के दौरे से शिर्डी सीट पर वार, वाकचौरे के विरोध में विपक्ष
Shirdi, Maharashtra:एकीकडे फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केला असून, 29 जून रोजी ते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात सभा घेणार आहेत.. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील शिर्डीत वाकचौरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. वाकचौरे यांनी मतदारांचा केलेला विश्वासघात, 2024 च्या निवडणुकीत मांडलेला जाहीरनामा आणि दोन वर्षातील निष्क्रियता हे मुद्दे घेऊन पुन्हा जनतेत जाणार असल्याचं राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय.. महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्याने उत्कर्षा रुपवते यांनी वंचितच्या माध्यमातून 2024 ला वाकचौरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली होती.. उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर घणाघाती टीका करत, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.. वाकचौरे यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे निवडणुकीपूर्वी मविआच्या नेत्यांची भेट घेऊन सांगितले होते.. निवडणुकीच्या वेळी वाकचौरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत आश्वासन दिलेल्या चाळीस मुद्यांच्या बाबत त्यांची निष्क्रियता दिसून आली.. सात वेळा पक्ष बदलणाऱ्या वाकचौरेंनी निवडणुकीत जनतेला विकास कामांचे आश्वासन देण्याऐवजी पक्षांतर न करण्याचे वचन दिले पाहिजे, असा टोला रूपवते यांनी लगावलाय.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी हीच खऱ्या अर्थाने मुख्य विरोधकाची भूमिका बजावत आहे.. वाकचौरे निवडून आले तरी तुमचे कधीच होणार नाहीत, हे शिवसैनिकांसह मी देखील उद्धव ठाकरेंना सांगितले होते.. तरी त्यांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे आता ठाकरेंनी, वाकचौरेंच्या मतदारसंघात दौरा करून काहीही फायदा होणार नाही.. त्यांच्या मुलाला मुंबई मेट्रोच्या कामात शंभर कोटींहून अधिकचे टेंडर मिळाल्याच्या चर्चा आहेत.. वैयक्तिक फायद्यासाठी वाकचौरे यांनी पक्षांतर केले असून, जनता त्यांना जाब विचारेल असं उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या वंचित बहुजन आघाडी मतदारांमध्ये संरक्षण घेऊन फिरावं लागतयं, मग हे निवडणुका कशा जिंकतील?.. जनतेत रोष आहे, त्यामुळे पक्षांतर करणारे पुन्हा निवडून येणार नाहीत.. शिर्डी मतदारसंघात विरोधक म्हणून वंचित शिवाय कुणीही बोलत नाही.. शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार होते, मात्र आज ते हतबल झालेत.. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रबळ विरोधक म्हणून इथे उभी आहे आणि आम्ही पुढची निवडणूक अधिक ताकदीने लढणार आहोत.. वाकचौरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान उत्कर्षा रुपवते यांनी दिले आहे.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या वंचित बहुजन आघाडी वाकचौरे यांनी निधी न मिळाल्याची कारणे सांगून जबाबदारी झटकू नये.. विरोधी पक्षातील इतर खासदार काम करत नाहीत का?.. वाकचौरेंची अवस्था कहेना क्या चाहते हो? अशी झाली आहे.. वाकचौरेंनी मतदारांना फसवले असून, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये चीड आहे.. तुम्ही कितीही संरक्षण घेऊन फिरले, तरी लोक जाब विचारणारच आहेत असा घणाघात रूपवते यांनी खासदार वाकचौरे यांच्यावर केलाय ..0
0
Report
लोहगड हत्याकांड की थरार पुनर्निर्मिती: सिया-चेतन ने घटनाक्रम स्पष्ट किया
Varsoli, Maharashtra:लोहगडावर आज सिया ला सिन recreation करण्यात आलं. यावेळी जस जसा घटनाक्रम घडला तस तसा सिया ला घेऊन जाण्यात आले. केतनचा पुतळा बनविण्यात आला आणि कशा पद्धतीने केतन ला ढकलून देण्यात याची पुर्ननिर्मिती करण्यात आली. यावेळी सिया ने आपण शूज ची लेस बांधायला खाली बसण्याचे नाटक केल्यानंतर चेतन ने केतन ला धक्का मारून खाली ढकलले अस सिया ने घटनास्थळी पोलिसांना कबुली दिली. याचाच आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी... Wkt Chaitralli (file no.02)0
0
Report
आषाढ़ी वारी से पहले विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति संरक्षण पर उम्मीद; अदालत फैसले से देरी संभव
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन संवर्धन काम आषाढी वारी पूर्वी करण्याचे ठरवले होते. मात्र याला वारकरी संघटनांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या विलंब लागू शकतो. न्यायालयाने परवानगी दिली नाही तरी आषाढी वारी नंतर मूर्ती संवर्धन केले जाईल अशी भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तिचे दर पाच वर्षांनी जतन संवर्धन करणे आवश्यक आहे. या पूर्वी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन खाली ही प्रक्रिया पार पडली आहे. आषाढ़ी वारी पूर्वी ही प्रक्रिया समितीला पूर्ण करायची होती. मात्र काही वारकरी संघटना रासायनिक लेप लावण्याच्या विरोधात न्यायालयात गेल्या आहे. याबाबत न्यायालयाला विनंती केली जाईल. अशी पालकमंत्री जय कुमार गोरे म्हणाले. पण जर तसे झाले नाही तर आषाढी वारी नंतर ही प्रकिया करू अशी भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली आहे0
0
Report
Advertisement
