icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कशेडी घाटी में दराड़, मुंबई-गोवा राजमार्ग पर यातायात ठप

Ratnagiri, Maharashtra:कशेडी घाटात आज पुन्हा दरड कोसळली; मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प. मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात आज पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातील पोलादपूरजवळ धामणदिवी गावच्या हद्दीत ही दरड कोसळली असून,यामुळे कोकणातून मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक घटनास्थळी दाखल झाले असून युद्धपातळीवर दरड हटवण्याचे काम सुरू आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही, मात्र प्रवाशांना मोठ्या कोंडीचा सामना करावा लागत आहे.
0
0
Report

आंबेगाव में भारी बारिश से किसानों की फसलें डूबीं, लाखों का नुकसान

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील लोणी धामणी परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे संपूर्ण शेतांना तळ्याचे स्वरूप आले असून, खरीप हंगामातील पिके पूर्णपणे पाण्याखाली गेली आहेत. यात प्रामुख्याने मका, बाजरी, ज्वारी आणि गवार यांसारखी महत्त्वाची पिके पाण्यात बुडाल्याने कुजून खराब झाली आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. हा परिसर मुळात दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो, अशातच शेतकऱ्यांनी उपलब्ध असलेल्या कमी पाण्यात ही पिके जगवली होती. मात्र, काही तासांतच झालेल्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेतला आहे. आता या नुकसानग्रस्त पिकांचे तात्काळ पंचनामे करून प्रशासनाने आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी येथील शेतकरी करत आहेत.
0
0
Report

अमरावती में चार युवकों ने युवक का हाथ काटा, अस्पताल में भर्ती

Amravati, Maharashtra:तीन ते चार तरुणांनी छाटला एका तरुणाच्या हाताचा पंजा; अमरावतीत खळबळ, तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू अमरावती शहरातील राजेंद्र नगर परिसरात एका युवकाचा तीन ते चार युवकांनी हाताचा पंजा पूर्णपणे छाटून टाकला जखमी युवकाला अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेले आहे. दरम्यान हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू असून पोलिसांना आरोपी निष्पन्न झाले असून लवकरच अटक केले जाणार असल्याचे माहिती पोलीस उपायुक्त यशवंत सोळंके यांनी सांगितले आहे. या घटनेने शहरात मोठी खळबळ आहे.
0
0
Report
Advertisement

धाराशिव पहुँची संत गजानन महाराज की पालखी, भक्तों ने किया भव्य स्वागत

Dharashiv, Maharashtra:शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी धाराशिव शहरात दाखल झाली. शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत! शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी आज धाराशिव शहरात दाखल झाली. धाराशिव शहरात पालखीचे मोठ्या उत्साहात जोरदार स्वागत करण्यात आले. यावेळी भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. त्यामुळे संपूर्ण धाराशिव शहरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. आज धाराशिव शहरातच पालखीचा मुक्काम असणार आहे. यंदा या पालखीचे 57 वे वर्ष असून तब्बल 700 किलोमीटर पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होते. अत्यंत शिस्तबद्ध पालखी म्हणून या पालखी सोहळ्याची ओळख आहे. टाळ मृदंगाचा गजर आणि गण गण गणात बोते च्या जय घोषात शेकडो वारकरी या वारीमध्ये सहभागी झाले असून मजल तर मजल करीत पंढरीच्या दिशेने मार्गक्रमण करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

श्रद्धा वाळकर हत्याकांड: चार साल बाद भी न्याय नहीं, अफताब पूनावाला आरोपित

Vasai-Virar, Maharashtra:देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वाळकर हत्याकांडाला चार वर्षे पूर्ण झाली असून, अद्याप न्याय मिळालेला नाही. श्रद्धाचा लिव्ह-इन पार्टनर आफताब पूनावाला याच्यावर तिची हत्या करून मृतदेहाचे तुकडे केल्याचा आरोप आहे. मात्र, खटल्याची सुनावणी संथ गतीने सुरू असल्याने कुटुंबीयांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आरोपीला एमए परीक्षेसाठी, दातांच्या उपचारांसाठी आणि मानसोपचारतज्ज्ञांच्या सल्ल्यासाठी सुनावणीतून वारंवार सवलती देण्यात आल्याचा आरोप केला जातो. आतापर्यंत २१५ हून अधिक सुनावण्या होऊनही पुरावे सादर करण्याची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. न्यायाच्या प्रतीक्षेत श्रद्धाचे वडील आणि आजी यांचे निधन झाले, तर तिच्या अवशेषांवर अद्याप अंत्यसंस्कारही होऊ शकलेले नाहीत. श्रद्धाची आत्या राजल नाईक यांनी खटल्याची जलदगतीने सुनावणी पूर्ण करून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

छह महीनों में साइबर ठगों ने 743 नागरिकों से ऑनलाइन धोखा, करोड़ों की ठगी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..crime जिल्ह्यात 6 महिन्यात 743 जणांना ऑनलाईन गंडवले.. पावणे आठ कोटी हातोहात लांबवले..ज्येष्ठांचे फसण्याचे प्रमाण अधिक.. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जितका वाढला आहे तितका सायबर गुन्हेगारांचा सुळसुळाटही वाढला आहे.. गेल्या सहा महिन्यात सायबर भामट्यांनी जिल्ह्यातील तब्बल 743 नागरिकांना फसवले असून सात कोटी 92 लाख 73 हजार 636 रुपयांचा गंडा घातला आहे.. यात ज्येष्ठ नागरिक विशेषतः पेन्शनधारक फसण्याचे प्रमाण लक्षणीय आहे.. आयुष्यभराची कुंजी बँकेत जमा असलेल्या या जेष्ठ नागरिकांना विविध अमिषे दाखवून किंवा भीती घालून त्यांच्या बँक खात्यावर डल्ला मारला जात आहे..
0
0
Report

वाशीम में चोरी की घटनाओं से भय, सीसीटीवी ने चोरों को बेनकाब

Washim, Maharashtra:वाशीम शहरात चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गणेश नगर, काटा रोड परिसरात मंगळवारी रात्री 2 वाजण्याच्या दरम्यान अमोल वानखेडे यांच्या घरात चोरीचा प्रयत्न झाला. मात्र, घरावर बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यामुळे चोरट्यांचा डाव फसला. या घटनेतील संशयितांच्या हालचाली सीसीटीव्ही कॅमेऱ्यात स्पष्टपणे कैद झाल्या आहेत. याच परिसरातून अज्ञात चोरट्यांनी दोन दुचाकीही लंपास केल्याची घटना घडली आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढली असून वाढत्या चोरीच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे संशयितांचा शोध घेऊन त्यांना तातडीने जेरबंद करावे, तसेच शहरातील रात्रीची पोलीस गस्त वाढवून चोरीच्या घटनांवर आळा घालावा, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में भावली डैम के पास पर्यटकों पर हमला, वीडियो वायरल

Nashik, Maharashtra:- नाशिक के भावली डैम परिसर में पर्यटकांना मारहाण प्रकरणातील आणखी एक धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. - या पर्यटकांना इगतपुरीच्या भावली परिसरातील टवळखोरांनी पाठलाग करत मारहाण केल्याचा हा व्हिडिओ समोर आला आहे. - या व्हिडिओमध्ये या हल्लेखोरांपैकी एकाने या पर्यटकांच्या चालत्या गाडीला लटकून हल्ला केला. - हा सगळा थरार नाशिक- मुंबई- आग्रा महामार्गावर सुरू असल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. - ज्या व्हिडिओ स्पष्टपणे हल्लेखोर गाडीला लटकलेला दिसतोय आणि त्यानंतर काही अंतरावर जाऊन तो लटकलेल्या गाडीवरून highway/हायवेवर पडताना दिसतोय. - या प्रकरणात आत्तापर्यंत पोलिसांनी नऊ ते दहा जणांना अटक केली आहे तर आणखी काही आरोपींचा शोध पोलिसांकडून घेतला जातोय. - या प्रकरणातील फिर्यादींनी देखील त्यांच्या फिर्यादीत या घटनेचा उल्लेख केला होता. - आता त्याच घटनेचा व्हिडिओ समोर आला आहे हा व्हिडिओ रस्त्यावरच्या नागरिकांनी त्यांच्या मोबाईलमध्ये कैद केल्याचे दिसते.
0
0
Report

कोल्हापूर विमानतळ पर चरस केस में जिम ट्रेनर समेत तीन गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर विमानतळावरील पोलिसांच्या तपासणीत सापडण्याच्या भीतीने प्रवाशाने कचऱ्याच्या डब्यात 71 ग्रॅम चरस टाकले. ते चरस घेऊन विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या विमानतळ कर्मचारी ओमकार अर्जुन मिठारी याच्यासह आणखी दोघा जणांना कोल्हापूर पोलिसांनी अटक केली आहे. इतकच नव्हे तर कचऱ्याच्या डब्यात चरस ठेवणारा दिल्लीचा जिम ट्रेनर असल्याचे उघड झाले आहे. पोलिसांनी आता या जिमट्रेनरचा शोध सुरू केला आहे.. पोलिसांना कडून मिळालेल्या माहितीनुसार कोल्हापुरात आलेला जिम ट्रेनर आकाश हा विमानाने दिल्लीला परतणार होता, शनिवारी तो मुंबईला जाण्यासाठी विमानतळावर आला. यावेळी त्याच्याजवळी असणारी चरसची पुडी स्वच्छतागृहाच्या डब्यात फेकली, काही वेळाने त्याने बिपिनकुमार या मित्राला फोन करून याची माहिती दिली. त्याने मयूर माने यांच्या मदतीने विमानतळावर काम करणाऱ्या ओंकार मिठारी यांच्याशी संपर्क केला. आणि तिथून हे चरस विमानतळाच्या बाहेर आणण्यात आले. दरम्यान पोलिसांनी संशयित आरोपी ओंकार मिठारी, मयूर माने आणि बिपिन कुमार सैरावत याला कोर्टात हजर केला असता दोन दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. सध्या कोल्हापूर पोलीस विमानतळावर चरस ठेवणाऱ्या जिम ट्रेनरचा शोध सुरू केला आहे.
0
0
Report

नागपूर: काँग्रेस ने रामभक्त आस्था जागरण यात्रा शुरू की; रामटेक–मनसर–कन्हान–कामठी मार्ग तय

Nagpur, Maharashtra:नागपूर - शिवसेना UBTच्या रामरक्षा पठण उपक्रमानंतर आता काँग्रेसने 'रामभक्त आस्था जागरण यात्रा - १९ जुलै ला रामटेक येथील गड मंदिरातून यात्रेला प्रारंभ होणार आहे. - हम नहीं भूले प्रभु के प्रण को, कब न्याय मिलेगा जन-गण को... चाहें जान ہماری जाये, चंदा चोर ना बचने पाये" असा घोषवाक्य काँग्रेसने दिला आहे. - यात्रेदरम्यान श्रीराम पूजन, आरती, प्रतिज्ञा स्मरण कार्यक्रम तसेच झुणका-भाकर प्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. - रामटेक–मनसर–कन्हान–कामठी असा यात्रेचा मार्ग निश्चित करण्यात आला आहे. - नागपूर शहर व ग्रामीण काँग्रेस कमिटीच्या वतीने आयोजन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top