445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
महाबळेश्वर बस स्टॉप पर अधिकारी के आरेरावी बर्ताव से यात्रियों में नाराजगी
Satara, Maharashtra:महाबळेश्वर : महाबळेश्वर एसटी बस स्थानकातील एका वाहतूक निरीक्षकाच्या अरेरावी आणि उद्धट वर्तनामुळे प्रवासी तसेच पत्रकारांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. बससेवेतील विलंबाबाबत विचारणा करणाऱ्या प्रवाशांना समाधानकारक उत्तर देण्याऐवजी संबंधित अधिकाऱ्याने अरेरावीची भाषा वापरल्याचा आरोप करण्यात येत आहे. काल दुपारी ३.३० वाजता सुटणारी एसटी बस तब्बल एक तास उशिराने रवाना करण्यात आली. या विलंबामुळे अनेक प्रवाशांची मोठी गैरसोय झाली. काही प्रवाशांचे पुढील प्रवासाचे आरक्षण असल्याने त्यांच्यासमोर अडचणी निर्माण झाल्या. बस उशिरा का सुटत आहे, याबाबत प्रवाशांनी संबंधित वाहतूक निरीक्षकाकडे विचारणा केली असता वाद निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. त्याच बरोबर हा कर्मचारी चित्रीकरण का करताय असा जाब विचारत होता. त्यामुळे एकूणच या घटनेबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी चौकशी करणे गरजेचे आहे0
0
Report
अकोला में खरीफ के लिए यूरिया-डीएपी की खरीद में किसानों की भीड़, टोकन वितरण शुरू
Akola, Maharashtra:राज्यात मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागल्याने शेतीच्या कामांना वेग आला आहे. खरीप हंगामाच्या तयारीसाठी शेतकरी बियाणे आणि खत खरेदीसाठी कृषी सेवा केंद्रांकडे धाव घेत आहेत. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात युरिया आणि डीएपी खत खरेदीसाठी शेतकरी तसेच महिला शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामासाठी अकोला जिल्ह्याला ७ हजार १०१ मेट्रिक टन युरिया खत उपलब्ध होणार आहे. सध्या एका आधार कार्डवर पाच पोती खताचे वाटप करण्यात येत आहे. शेतकऱ्यांची गर्दी आणि गोंधळ टाळण्यासाठी कृषी सेवा केंद्रांकडून टोकन पद्धतीने खत वितरण केले जात आहे. दरम्यान, पावसाळा सुरू झाल्यानंतर खत आणि बियाणे शेतात नेणे अवघड होते. त्यामुळे पाऊस सुरू होण्यापूर्वीच खताची खरेदी करून साठा करण्याकडे शेतकऱ्यांचा कल असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.0
0
Report
अनुदीवाड़ी के खेत में मगर के पिल्ले मिले: 9 पिल्लों की मौत, 5 जीवित, प्राकृतिक आवास में छोड़ दिए गए
Sangli, Maharashtra:स्लग - अनुडीवाडीतील उसाच्या शेतात मगरीची विण; ९ पिलांचा मृत्यू, ५ पिलं नैसर्गिक अधिवासात मुक्त. अँकर - सांगलीच्या पलूस तालुक्यातील आमणापूर येथील अनुडीवाडीत एका उसाच्या शेतात १४ मगरीची पिल्ले आढळून आली आहेत. यामध्ये ९ पिल्ले मृतावस्थेत आढळून आले आहेत, तर ५ पिलं जिवंत आढळली आहेत, त्यांना नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले आहे. अनुडीवाडीच्या काळ्या ओढ्यालगत असलेल्या उसाच्या शेतात एका मगरीचा वावर दिसून आला, त्यानंतर त्या ठिकाणी असणाऱ्या महिलांनी आसपास पाहिलं असता काही मगरीची पिल्लं मृत अवस्थेत आढळून आली तर काही जिवंत दिसून आली. घटनेची माहिती गावकऱ्यांना आणि वन विभागाला देण्यात आल्यानंतर घटनास्थळी वन विभाग व गावकऱ्यांनी धाव घेत, शेजاریच असणाऱ्या कळ्या ओढ्यामध्ये जिवंत मगरींच्या पिल्लांना सोडण्यात आले आहे. मृत मगरांच्या पिल्लांना दफन करण्यात आला आहे, या पिल्लांचा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर में AC स्लीपर बस में आग से यात्रियों के जीवन खतरे, वीडियो वायरल
Nagpur, Maharashtra:नागपूर - AC स्लीपर बस मध्ये नागपुरात येणाऱ्या प्रवाशांचे जीव धोक्यात टाकल्याची घटना समोर - धावत्या बस मध्ये आग पेटवून अमली पदार्थांचे सेवन केल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर - कोटावरून नागपूरला येणाऱ्या ट्रॅवेल्स मधली धक्कादायक घटना - परिवहन विभागाचे नियम धाब्यावर ठेऊन विना परवानगी अनेकांना फूट लॉबी मध्ये झोपवलं - आग पेटवली तेव्हा अनेक प्रवासी AC स्लीपर बस मध्ये झोपलेले होते, सुदैवाने कोणताही अनुचित घटना नाही.. - AC स्लीपर बस मध्ये आग पेटवली आणि अमली पदार्थांचे सेवन करून प्रवाशांचे जीव धोक्यात टाकले, ट्रॅव्हल्स एजन्सीकडे तक्रार करणाऱ्या प्रवाशाला उडवा उडवीची उत्तर मिळाल्याची माहिती..0
0
Report
रत्नागिरी के संगमेश्वर में हाईवे का काम अटका, मुंबई-गोवा मार्ग बाधित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गाला ग्रहण: संगमेश्वरमधील 'या' गावामुळे मुंबई-गोवा हायवेचे काम रखडले! मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रखडलेल्या कामात आता रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुका मोठा अडथळा ठरत असल्याचं चित्र आहे. संगमेश्वरमधील कुरडुंदा या ठिकाणी रस्त्याचे काम अद्यापही अर्धवट स्थितीत आहे. त्यामुळे या मार्गावरून जाणाऱ्या प्रवाशांना सध्या प्रचंड धूळ, माती आणि जीवघेण्या खड्ड्यांचा सामना करावा लागत आहे. पावसाळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. जर पावसाळ्यापूर्वी कुरडुंदा येथील काम पूर्ण झाले नाही, तर प्रवाशांना थेट चिखलातून जीवघेणा प्रवास करावा लागण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. प्रशासनाच्या या संथ कारभारामुळे प्रवाशांमधून आता तीव्र संताप व्यक्त केला जात आहे..0
0
Report
मराठी चित्रपट महामंडळ के चुनाव: कोल्हापुर में 14 सीटों की मतगणना, 50% मतदान
Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या मतमोजणीला सुरुवात झाली आहे.. एकूण 17 जागांपैकी 3 जागा बिनविरोध झाले्यामुळे उर्वरित 14 जागांसाठीची मतमोजणी प्रक्रिया कोल्हापुरातील राम गणेश गडकरी सभागृहात होत आहे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकांमध्ये अवघ्या 50% मतदाराने आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. त्यामुळे चित्रपट महामंडळाची सत्ता कोणत्या पॅनलला मिळणार याची उत्सुकता लागून राहिली आहे. मतमोजणी केंद्रावरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
कोपरगांव में रात के अंधेरे में गुंडों का कहर, लोगों में दहशत
Shirdi, Maharashtra:कोपरगाव शहरात मध्यरात्रीच्या सुमारास गुंडांचा हैदोस... रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या अनेक वाहनांच्या काचा फोडल्या... रहिवासी परिसरात टोळक्याचा धुडगूस... हातात धारदार हत्यारे आणि लाकडी दांडके घेऊन टोळक्याने घातला धुडगूस... दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीमुळे रहिवाशांमध्ये दहशतीचे वातावरण... कोपरगावमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर...0
0
Report
विदर्भ में जारी तेज गर्मी, चंद्रपूर में 45.2°C रिकॉर्ड, मानसून की देरी चिंता
Chandrapur, Maharashtra:आठ जून उजाडुनही विदर्भात उन्हाचा तडाखा कायम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी येथे रविवारी 45.2 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. मॉन्सून लांबत असताना नागरिकांना उन्हाचे चटके बसत आहेत. विदर्भातील इतर शहरेही 43 अंश सेल्सिअसच्या आसपास तापमानाची आहेत. नागरिक चातकाप्रमाणे उत्तम पावसाची वाट बघत आहेत. मात्र 15 जून पर्यंत मान्सून स्थिरावणार नसल्याची स्थिती असून मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांना पेरणीची घाई करू नका असे आवाहन केले आहे. यंदा अल-निनोच्या प्रभावामुळे पाऊस काळ कमी असण्याची शक्यता असल्याने चिंतेत भर पडली आहे.0
0
Report
करमाला, देवळाली व रोशेवाडी में आंधी-तूफान से घरों की पत्रें उड़ीं, दो महिलाएं घायल
Pandharpur, Maharashtra:Anchor करमाळा शहरासह देवळाली व रोशेवाडी परिसरात झालेल्या वादळी वाऱ्यामुळे काही घरांवरील पत्रे उडून नुकसान झाले. देवळाली येथील एका घरावरील पत्रे उडाल्यानंतर त्यावरील दगड खाली पडून दोन महिला किरकोळ जखमी झाल्या. जखमी महिलांना उपचारासाठी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वादळी वाऱ्यामुळे परिसरात काही प्रमाणात मालमत्तेचेही नुकसान झाले.0
0
Report
Advertisement
समृद्धि महामार्ग पर बस-ट्रक हादसे में 20-25 घायल, दो की हालत गंभीर
Washim, Maharashtra:बुलढाणा जिले मेहकर के पास पिंपरी माळी गाँव के पास समृद्धि महामार्ग पर आज सुबह निजी लक्जरी बस और ट्रक का भयंकर अपघात हुआ। पुणे से नागपुर की ओर जा रही बस चालक के नियंत्रण खोने से टक्कर हो गई, जिससे बस के अगले हिस्से का चूरा-चूरा हो गया। प्रारंभिक जानकारी के अनुसार इस दुर्घटना में बस में मौजूद 20 से 25 यात्री घायल हुए हैं, जिनमें दो की हालत चिंताजनक है। घायलों को मेहकर ग्रामीण अस्पताल समेत अन्य अस्पतालों में भर्ती कराया गया है। इस घटना से समृद्धि महामार्ग पर दुर्घटनाओं की यह श्रृंखला फिर सामने आ गई है।0
0
Report
नांदेड-वसमत मार्ग पर हाई-टेंशन पोल गिरा, यातायात कुछ घंटे रोक; कोई हताहत नहीं
Nanded-Waghala, Maharashtra:काल सायंकाळी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे नांदेड- वसमत मार्गावरील मुख्य लाईनचे विद्युत खांब कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. काल रात्री नांदेड जिल्ह्यात मोठा पाऊस झाला. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे नांदेड- वसमत मार्गावरील मरळक पाटी जवळ हाय टेन्शन लाईनचे मोठे विद्युत खांब कोसळले. विद्युत तारा मुख्य रस्त्यावर लोंबकळत असल्याने या मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. या घटनेत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.0
0
Report
चंद्रपुर जंगल में रानगवा की मौत, उष्माघात का संदेह
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालागत असलेल्या रस्त्याच्या कडेला झाला मृत्यू, उष्माघाताचा संशय अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातल्या झरण जंगलात रानगव्याचा जंगलालगत असलेल्या रस्त्याच्या कडेला मृत्यू झाला. हा मृत्यू उष्माघाताने झाल्याचा संशय व्यक्त होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील तापमान उच्चांकी तापमानाचा फटका मानवासह वन्यजीवांना सुद्धा बसत आहे. झरण वनपरिक्षेत्र अंतर्गत , आकसापूर जंगलात भटाळी रस्त्यालगतच कक्ष क्रमांक ११७ मध्ये रानगवा मृतावस्थेत आढळला, घटनेची माहिती ग्रामस्थांनी वनविभागाला दिली. हॅबिटॅट कन्झर्वेशन सोसायटीचे सदस्य वन पथकासह घटनास्थळी पोचले. शरीरावर कुठल्याही जखमा आढळून आल्या नाही. पशु वैद्यकीय अधिकारी डॉ. प्राजक्ता लेनगुरे यांना पाचारण करण्यात आले. घटनास्थळी शवविच्छेदन करण्यात आले व प्रथमदर्शी उष्माघाताने रानगव्याचा मृत्यू झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
बुलढाणा के जळगाव जामोद हत्या मामले में वरिष्ठ पुलिस अधिकारी निलंबित
Washim, Maharashtra:बुलढाणा जिले के जळगाव जामोद तालुक्यामध्ये घडलेल्या हत्या कांड प्रकरणामध्ये हलगर्जीपणा करणं पोलीस विभागातील बड्या अधिकाऱ्यांना चांगलंच भोवल है. तत्काळ एलसीबी पुलिस निरीक्षक सुनील अंबुलकर आणि जळगाव जामोद तपास अधिकारी पुलिस निरीक्षक नितीन पाटील यांच्या अमरावती पुलिस आयुक्तांनी निलंबन केलं. या निलंबनाने पोलीस वर्तुळामध्ये मोठी खळबळ उडाली है. जळगाव जामोद हत्या कांड प्रकरणातील मृत मुलीचे अद्याप ओळख पटलेली नाही. जीवंत शिवानीला मृत घोषित करके तिच्या वडील आणि भावाला न केलेल्या खुणाबद्दल अटक करण्यात आली होती. त्यामुळेच या दोन पोलीस अधिकाऱ्यांवर ही मोठी कारवाई करण्यात आली है.0
0
Report
सोलapur की माळरान पर मानसून की प्रतीक्षा में व्याकुल काळवीट, मोबाइल पर कैद
Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात मृगाचे आगमन तरी पावसाची ओढ कायम जिल्ल्ह्यातील बोरामणी गावामध्ये माळरानावरील व्याकुळ झालेली काळवीट मान्सूनच्या प्रतीक्षेत बोरामणीच्या माळरानावर फिरणारा काळवीटांचा कळप प्रणीमित्र पप्पू जमादार यांच्या मोबाईल कॅमेऱ्यात कैद मान्सूनने महाराष्ट्रात वर्दी दिली असली तरी अजूनपर्यंत सोलापूरचा पल्ला गाठलेला नाही उजाड माळरानावर पाण्याच्या शोधात भटकंती करणारी काळवीट मोबाईल कॅमेरात कैद माणसांप्रमाणे प्राणीदेखील व्याकुळतेने मान्सूनच्या प्रतीक्षेत असल्याचे स्पष्ट0
0
Report
तुकोबांची पालखी इस वर्ष नए रथ में विराजमान होगी
Varsoli, Maharashtra:Headline : तुकोबांची पालखी यावर्षी विराजमान होणार नवीन रथात नवीन पालखी रथासाठी 250 किलो चांदा तर 150 घनफुट सागवान लाकडाचा वापर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे प्रस्थान 7 जुलै रोजी देहूतून होणार आहे. त्यासाठी यावर्षी तुकोबांची पालखी रथ हा नवीन बनविण्यात येणार आहे. त्यासाठी आता राजस्थान मधील सिहोर या गावातून लाकडावर कोरीव नक्षीकाम करण्यात आले आहे. लाकडावर कोरीव नक्षीकाम करून हा रथ आता देहू मध्ये दाखल झाला आहे. या रथासाठी तब्बल 150 घनफूट लाकडाचा वापर करण्यात आला आहे. तर 250 किलो चांदीचा वापर या रथासाठी करण्यात येणार आहे. या रथाला बरमॅटिक सागवान जातीचा लाकूड वापरण्यात आलं आहे. दाक्षिणात्य पद्धतीचा कोरीव काम या लाकडावर करण्यात आलं आहे. या रथाला वापरण्यात आलेल्या लाकडाला ऊन वारा पाऊस याचा कोणताही परिणाम होणार नाही. नक्षीकाम करून आलेला हा लाकडी रथ आता देहूच्या मंदिर परिसरात सीसीटीव्ही च्या अंतर्गत त्यावर चांदी लावण्यात येणार आहे. तर 7 जुलै पर्यंत हे संपूर्ण चांदीचे काम पूर्ण करण्याचा मानस देहू संस्थान चा आहे.0
0
Report
Advertisement
