445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पिंपरी-चिंचवड़ में बारिश जारी, सुबह ट्रैफिक जाम से आमजन परेशान
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात अखेर पावसाने सातत्यपूर्ण हजेरी लावत शहरवासीयांना काहीसा दिलासा दिलाय. शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शहराच्या विविध भागात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. काही भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी ही कोसळल्या. सतत पडत असलेल्या पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर कामाला जाण्याची वेळ आणि शाळेत जाण्याची वेळ एकच असल्याने सकाळी काही भागात ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरात सुरू असलेल्या पावसासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी0
0
Report
गोहागर गोल्डनमैन केस: दो आरोपियों को जन्मठेप की सजा, 12 साल बाद फैसला
Ratnagiri, Maharashtra:गुहागर/ रत्नागिरी गुहागरच्या गोल्डनमॅन विश्वास खरे खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप; १२ वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अँकर रत्नागिरि जिल्ह्यातील गुहागर येथील बहुचर्चित गोल्डनमॅन तथा कासव संरक्षक विश्वास महादेव खरे यांच्या खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. चिपळूण अतिरिक्त सत्र न्यायालयाने या prकरणातील दोन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावत तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावे, मोबाईल सीडीआर आणि इतर साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. या निकालामुळे खरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याचा धाक कायम राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.0
0
Report
नागपुर में एक रात में दो हत्याएं, नए पुलिस कमिश्नर के बाद अपराधी सक्रिय
Nagpur, Maharashtra:नागपूर - उपराजधानी नागपुरात हत्याकांडाची मालिका सुरुच, एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत महिलेची आणि सराईत गुन्हेगाराची हत्या झालीय. नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आल्यानंतर खून सत्र सुरूच, शहरात सलग 3 खूनांच्या घटना. गणेश प्रेमलाल बोरकर असे भांडवाडीत मृतकांचे नाव आहे... त्याच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून धारधार शस्त्राने हत्या करण्यात झालीय. गणेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. याच जुन्या वादातून हत्यां झालाचा अंदाज असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत गादा गावाजवळील फार्महाऊस परिसरात रस्त्याच्या कडेला गुरुवारी रात्री भाग्यश्री नावाच्या महिलेचा मृतदेह आढळला. भाग्यश्री असे मृतक महिलेच नाव आहेय. भाग्यश्रीच्या पतीवर हत्येचा संशय आहेय. याआधीच फुटाळा परिसरातंही एकाची हत्या करण्यात आली होती.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के कुंभार्ली घाट की सड़क धंसी, मिट्टी भराव बह गया, यातायात बंद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीचा कुंभार्ली घाटातला रस्ता खचला. मुख्य रस्त्याच्या खालची जवळपास पंधरा ते 20 फुटाचा मातीचा भराव गेला वाहून. खोल खड्डा पडल्याने घाटातील वाहतूक बंद होण्याची भीती.... तात्काळ उपाय योजनेची गरज. मुसळधार पावसाचा घाटातील अनेक ठिकाणी मोठा दण्का0
0
Report
हिंदी में क्लिकबेट शीर्षक: सह्याद्री के जलाशयों में पानी कमी, किसान चिंतित; मानसून देर से पहुँचेगा?
Shirur, Maharashtra:सह्याद्रीत पावसाची ओढ; रिमझिम सरी सुरू, मात्र मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत नऊ धरणे सध्या सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगेामध्ये रिमझिम पाऊस सुरू असला, तरी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन अशा एकूण नऊ जलाशयांतील पाणीसाठा अत्यंत खालावला असून, जुलै महिना सुरू असतानाही ही धरणे जवळपास कोरडी आहेत. दरवर्षी याच कालावधीत ३० ते ३५ टक्के भरलेली असणारी धरणे यंदा रिकामी असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये खरीप हंगाम, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तरच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
रायगड़ में विकसित भारत रोजगार योजना का जिला-स्तरीय शुभारंभ; लाभार्थियों को कार्यादेश वितरित
Chendhare, Maharashtra:रायगडात रोजगार आणि आजीविका योजनाचा रायगडात प्रारंभ ...... लाभार्थ्यांना कार्यादेशांचे वितरण ...... अँकर - केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन योजनेचा रायगड जिल्हास्तरीय शुभारंभ अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनात झाला. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करत योजनेतील नव्या लाभांची माहिती दिली. या योजनेअंतर्गत नवीन कामांचे कार्यादेश यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
ई-केवाईसी बाध्यता से पीएम किसान योजना की अगली किस्त अटक, किसानों की मांग तेज
Washim, Maharashtra:प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता मिळण्यासाठी ई-केवायसी अनिवार्य आहे. मात्र, पीएम किसानच्या संकेतस्थळावर वारंवार तांत्रिक अडचणी येत असल्याने वाशिम जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना ई-केवायसी पूर्ण करता आलीली नाही. सेतू सेवा केंद्रांवर जाऊनही संकेतस्थळ बंद असल्याने शेतकऱ्यांना माघारी परतावे लागत आहे. त्यामुळे पुढील हप्ता मिळणार की नाही, याबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता असून ई-केवायसीसाठी मुदत वाढवून संकेतस्थळ तातडीने सुरळीत सुरू करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
कोल्हापुर में बारिश से नदी-नालों में उछाल, बांधों के जलस्तर बढ़ने की आशंका
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची संततदार सुरू झाली आहे. अनेक भागात समाधानकारक पाऊस सुरू झाल्याने बळीराजा सुखावला आहे. या पावसामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. विशेषता धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने धरणांमध्ये देखील पाणी पातळी वाढू लागली आहे. जिल्ह्यातील पश्चिम भागात असणाऱ्या राधानगरी आणि गगनबावडा या तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस पडत आहे...0
0
Report
महाराष्ट्र में गाय-भैंसों के लिए ईयर टैगिंग अनिवार्य, बिना टैग लाभ नहीं
Washim, Maharashtra:राज्यातील गाय आणि म्हैसवर्गीय जनावरांसाठी इअर टॅगिंग बंधनकारक करण्यात आले आहे. 12 अंकी इअर टॅग नसलेल्या जनावरांना शासकीय योजनांचा लाभ, नुकसानभरपाई तसेच खरेदी-विक्री व वाहतुकीसंदर्भातील सुविधा मिळणार नाहीत. वाशिम जिल्ह्यातील ४ लाख ९१ हजार जनावरांपैकी आतापर्यंत ३ लाख ९० हजार जनावरांचे इअर टॅगिंग पूर्ण झाले असून, उर्वरित जनावरांचे टॅगिंग सुरू आहे. प्रत्येक जनावराची स्वतंत्र ओळख निश्चित करून त्याची माहिती भारत पशुधन प्रणालीवर नोंदविण्यासाठी ही मोहीम राबवली जात आहे.0
0
Report
Advertisement
मराठवाडे में मानसून सुस्त, जुलाई तक वर्षा औसत से कम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अद्याप म्हणावी तशी नाही. २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या वार्षिक हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली. ६७९ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी असून सरासरीच्या ८७.४ टक्के ते प्रमाण आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० मि.मी., जालना जिल्ह्यात १३४, बीड १२२, लातूर १०५, धाराशिव १३०, नांदेड, १४५, परभणी ११४, हिंगोली १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात ६.४ मि.मी. पावसाची नोंद विभागात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मि.मी. पाऊस झालाय...0
0
Report
रत्नागिरी में तेज बारिश, अगले तीन दिन अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात दमदार पाऊस.. जुलै च्या सुरुवातीपासूनच दमदार पावसामुळे बळीराजा सुखावाला.. शेतात पाणीच पाणी.. पुढील तीन दिवस मुसळधार पावासाची शक्यता..हवामान विभागाचा अंदाज.. प्रशासन अलर्ट मोड वर.. नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा.. पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..0
0
Report
शिरूर के बैल की अनोखी दोस्ती: जुंपणी टूटने पर भी साथ दौड़ा वीडियो वायरल
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बैलगाडा शर्यतीदरम्यान मुक्या प्राण्यांच्या निष्ठेचं एक हृदयस्पर्शी उदाहरण समोर आलं आहे. घाटातून गाडा सुटल्यानंतर काही अंतरावरच धुरेकरी बैलाची जुंपणी अचानक निखळली. मात्र, गाड्यापासून मुक्त होऊनही या बैलाने बाजूला न सरकता आपल्या सहकारी बैलाची साथ सोडली नाही. जुंपणी नसतानाही त्याने त्याच वेगाने खांद्याला खांदा लावून शेवटपर्यंत धाव घेतली आणि आपल्या सोबत्यासह शर्यत पूर्ण केली. मुक्या प्राण्यांमधील ही अथांग मैत्री आणि काळजी पाहून मैदानातील बैलगाडा शौकीन भावूक झाले असून, सध्या या इमानदार बैलाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.0
0
Report
Advertisement
मालशेज घाट में भारी बरसात, धुंध और जलप्रपात लुभा रहे पर्यटकों को
Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या जुन्नर तालुक्यातील माळशेज घाट परिसरात मुसळधार पावसाने जोरदार बॅटिंग सुरू केली आहे. सतत कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे घाटातील निसर्गाला जणू नवसंजीवनी मिळाली असून, येथील उंचच उंच धबधबे आता काहीसे खळखळून वाहू लागले आहेत. सध्या संपूर्ण माळशेज घाट परिसर पांढऱ्याशुभ्र आणि दाट धुक्याच्या चादरीत हरवून गेला आहे. धुक्याने वेढलेला हा संपूर्ण परिसर आणि त्यात कोसळणारे फेसाळणारे धबधबे पर्यटकांना भुरळ घालत असून, येथील विलोभनीय दृश्य डोळ्यांचे पारणे फेडणारे ठरत आहे. पावसामुळे घाटातील सौंदर्य आणखीनच खुलले असले, तरी प्रशासनाकडून वाहनचालकांना घाटातून प्रवास करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
कोल्हापुर में 85 इमारतें धोकादायक, 34 खतरनाक, नागरिकों ने हटाने की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात तब्बल 85 इमारती धोकादायक स्थितीत आहेत. धक्कादायक बाब म्हणजे यातील 34 इमारती ह्या अतिशय धोकादायक असून कधीही कोसळू शकतात. त्यामुळे या इमारती तातडीने उतरून घ्याव्यात अशी मागणी या धोकादायक इमारती परिसरात राहणाऱ्या नागरिकांनी केली आहे.. कोल्हापूर महानगरपालिका प्रशासन पावसाळ्यापूर्वी या इमारतीच्या मालकांना नोटीसा देऊन इमारतीवर फक्त धोकादायक इमारत अशी नोटीस चिकटवतात.. पण इमारती उतरून घेण्यासाठी योग्य त्या उपयोजना करत नाही, त्यामुळे नागरिकांच्या मधून संताप व्यक्त केला जात आहे.0
0
Report
मुंबई-गोवा हाइवे पर पानी भरा; यातायात बाधित, नागरिकों में नाराजगी बढ़ी
Chendhare, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावरील पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा होत नसल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचत आहे. पहिल्या पावसापासून निर्माण झालेली ही समस्या अद्याप कायम असून वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यातून दुचाकी, रिक्षा, कार आणि अवजड वाहने मार्ग काढत असल्याने वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघाताचा धोका वाढला आहे. विशेषतः समोरून येणाऱ्या वाहनांचा अंदाज न आल्याने किरकोळ वादही होत आहेत. वारंवार ही परिस्थिती उद्भवत असतानाही महामार्ग प्रशासनाकडून कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नसल्याने वाहनचालक आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. पाण्याचा तातडीने निचरा करून सुरक्षित वाहतुकीसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
