icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपती संभाजीनगर समेत जिले में मानसून सक्रिय, बारिश और आंधी की संभावना

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरासह परिसरात मान्सून सक्रिय झाला असून, पावसाचा जोर आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, २७ जून रोजी शहरात दुपारनंतर किंवा सायंकाळच्या सुमारास हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. या काळात विजांच्या कडकडाटासह ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याचा इशारा देण्यात आला आहे. शुक्रवारी शहराचे कमाल तापमान ३४.६ अंश सेल्सियस, तर किमान तापमान २३.६ अंश सेल्सियस नोंदवले गेले. आगामी २८ जून ते २ जुलै या कालावधीत आकाश अंशतः ढगाळ राहणार
0
0
Report

शिवसेना ने मंत्री संजय राठोड को राष्ट्रीय नेता नियुक्त कर विमुक्त-भटक्या समाज के सशक्तिकरण का लक्ष्य दिखाया

Yavatmal, Maharashtra:विमुक्त व भटक्या जमाती समाजाच्या सक्षमीकरणासाठी शिवसेनेने मंत्री संजय राठोड यांची राष्ट्रीय नेतेपदी निवड केलीयानंतर मसानजोगी, पारधी, बंजारा, लोहार, गवळी, गोंधळी, जोशी, बहुरूपी आदी भटक्या समाजाकडून राठोड यांचे पारंपारिक पद्धतीने जल्लोषात स्वागत करण्यात आले. भटक्या विमुक्त जमातीतील ही मंडळी आपापल्या पारंपारिक वेशभूषेत आले होते. यावेळी संजय राठोड यांनी किंगरी घंटा खजेरी आदी वाद्य वाजवून यापुढील काळात अनेक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या मोठ्या सामाजिक घटकाला सामाजिक, आर्थिक आणि राजकीय मुख्य प्रवाहात आणण्याचा व्यापक प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. देशभरातील विमुक्त, भटक्या व अर्धभटक्या समाजाची लोकसंख्या अंदाजे 10 ते 12 कोटी असून महाराष्ट्रात हा आकडा जवळपास 1.5 कोटी इतका आहे. एवढी मोठी लोकसंख्या असूनही हा समाज आजही शिक्षण, आरोग्य, रोजगार, निवास, जातप्रमाणपत्र, आरक्षण आणि मूलभूत सुविधांपासून मोठ्या प्रमाणावर वंचित आहे. त्यामुळे त्यांच्या सक्षमीकरण हेच पुढील ध्येय असल्याचे देखील संजय राठोड म्हणाले.
0
0
Report

मराठवाड़ा में जून तक मानसून की बारिश उम्मीद के मुताबिक नहीं

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनचे आगमन झाले असले तरी अपेक्षित वेगाने पाऊस बरसत नसल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये जून महिन्यात आतापर्यंत सरासरीच्या केवळ 60.9 टक्के पाऊस झाला आहे. विभागाची जून महिन्याची सरासरी 116.1 मिमी असताना प्रत्यक्षात केवळ 70.7 मिमी पावसाची नोंद झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत 96 मिमी पाऊस झाला होता. जिल्हानिहाय पाहता धाराशिवमध्ये सर्वाधिक 94.8 मिमी (86.2%) पाऊस झाला आहे. त्यापाठोपाठ बीडमध्ये 80.7 मिमी (72.5%) पाऊस नोंदविण्यात आला आहे. तर लातूरमध्ये सर्वात कमी 59.8 मिमी (51%), परभणीत 61.9 मिमी (49.2%), नांदेडमध्ये 71 मिमी (52.7%), हिंगोलीत 76.2 मिमी (52%), छत्रपती संभाजीनगरमध्ये 63.1 मिमी (58.2%) आणि जालना जिल्ह्यात 66.9 मिमी (58.2%) पावसाची नोंद झाली आहे. सध्या पावसाने अनेक भागात उघडीप दिल्याने खरीप पिकांच्या पेरण्या, उगवण आणि पुढील शेतीकामांबाबत शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पुढील काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर पिकांसह पिण्याच्या पाण्याच्या उपलब्धतेवरही परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. जून महिना संपत आला तरी मराठवाड्यात पावसाने अपेक्षित हजेरी लावलेली नाही. विभागातील आठही जिल्ह्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

कळमजापूर के खेत में बिजली गिरने से महिला की मृत्यु, छह महिलाएं अस्पताल में भर्ती

Amravati, Maharashtra:कळमजापूर येथे शेतात काम करणाऱ्या महिलेवर वीज कोसळून महिलेचा मृत्यू; सहा महिला जखमी काल झालेल्या वादळी पावसात कळमजापूर येथील शेतात काम करणाऱ्या महिलांवर वीज कोसळून दुर्दैवी घटना घडली. या दुर्घटनेत सुनंदा नरेश सहारे (वय ३७, रा. कळमजापूर) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहा महिला जखमी झाल्या आहेत. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. मृत महिलेच्या कुटुंबाला नैसर्गिक आपत्ती अंतर्गत तात्काळ आर्थिक मदत देण्यात यावी जखमी महिलांच्या उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाने उचलावा आणि त्यांना योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी ग्रामस्थ व शेतकरी वर्गातून होत आहे.
0
0
Report

यवतमाड़ दौरे पर राठोड की तीखी टिप्पणियाँ, सरकार पर दबाव बनाए रखने का दावा

Yavatmal, Maharashtra:जो गरजते है वो बरसते नही अशा शब्दात मंत्री संजय rाठोड यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या यवतमाळ दौऱ्याबाबत आणि ऑपरेशन तुडवा बाबत टीका केली. कोणी कितीही धमक्या दिल्या, टीका टिपणी केली तरी त्याचे उत्तर आम्ही कामाने देऊ. आम्ही 40 आमदारांनी उठाव केला होता, त्याचे 60 आमदार झालेो अजूनही संख्या वाढत आहे. शिवसेनेत बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारावर विश्वास ठेवून अनेक जण यायला तयार आहेत. आगामी काळात अनेक प्रवेश शिवसेनेत बघायला मिळतील... त्यामुळे कुणाच्याही टीकेला उत्तर न देता आम्ही काम करत राहू असे संजय राठोड यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई में 56 करोड़ के ड्रग्स नष्ट, अभियान को मिली तेज़ रफ्तार

Navi Mumbai, Maharashtra:नशामुक्त नवी मुंबई अभियानाला अधिक बळ देत नवी मुंबई पोलीस आयुक्तालयाने जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनाचे औचित्य साधून तब्बल 56 कोटी 69 लाख 55 हजार 192 रुपये किमतीचे जफ्त केलेला अंमली पदार्थाचा साठा कायदेशीर प्रक्रियेनुसार नष्ट केला. समाजातील अमली पदार्थांचे वाढते जाळे उद्ध्वस्त करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी उचललेले हे महत्त्वाचे पाऊल मानले जात आहे. तळोजा येथील शासनमान्य मुंबई वेस्ट मॅनेजमेंट कंपनीच्या प्रकल्पात हा अमली पदार्थाचा साठा शास्रोक्त पद्धतीने नष्ट करण्यात आला. यावेळी नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे, सहपोलीस आयुक्त दीपक साकोरे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) प्रमोद शेवाळे आणि गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त सचिन गुंजाळ उपस्थित होते. पोलीस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार, नशामुक्त नवी मुंबई अभियानांतर्गत आतापर्यंत 166 गुह्यांची नोंद करण्यात आली असून, त्यामधील जवळपास 57 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त करुन ते नष्ट करण्यात आले आहे. त्याच मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून 26 गुह्यांतील जप्त अंमली पदार्थांची विल्हेवाट लावण्यात आली.
0
0
Report

नाशिक में अवैध रेत डम्पर दुर्घटना, दो दोस्त घायल, चालक फरार

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यात अवैधरित्या वाळू व मुरूम वाहतूक करणाऱ्या डम्परांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पाटोदा ठाणगाव रस्त्यावर मोटरसायकलने जात असलेल्या दोघा मित्रांना वाळू वाहतूक करणाऱ्या एका ढंपरने चिरडले असून ऋषिकेश रावसाहेब भुजाडे राहणार विखरणी याची प्रकृती चिंताजनक आहे तर साहिल बंडू सूर्यवंशी राहणार ठाणगाव येथील गंभीर दुखापत झाली असून ऋषिकेश भुजाडे याच्यावर नाशिक येथील रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत अपघात झाल्यानंतर डंपर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहे
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र लोक सेवा आयोग पूर्व परीक्षा अब कम्प्यूटर आधारित, अंतिम परीक्षा ऑफ़लाइन रहेगी

Navi Mumbai, Maharashtra:anchor- महाराष्ट्र लोकसेवा आयोग कडून घेण्यात येणारी गट 'क' सेवा संयुक्त पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित होणार असल्याची माहिती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष विवेक भिमनवार यांनी आज नवी मुंबईतल्या बेलापूर इथल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत दिली. यावेळी आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर, सह सचिव सरीता देशमुख उपस्थित होते. पूर्व परिक्षा ही केवळ संगणक प्रणालीवर आधारित असणार आहे मात्र मुख्य अंतिम परीक्षा मात्र ऑफ लाईन होणार आहे. राज्य शासनाकडून भरती प्रक्रियेमध्ये व्यापक सुधारणा करण्यात आल्या असून आयोगामार्फत घेण्यात येणा-या सेवा, संवर्ग, पदसंख्या व उमेदवारांची संख्या यामध्ये पुढील काळात मोठ्या प्रमाणावर वाढ होणार आहे. ओफलाईन परीक्षांसाठी केंद्रांची मर्यादित उपलब्धता, शैक्षणिक सत्रांमुळे केंद्रे उपलब्ध न होणं, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतुक, सुरक्षा व मनुष्यबळ यांमुळे परीक्षा प्रक्रियेस विलंब होण्याची शक्यता वाढते. या पार्श्वभूमीवर आयोगाने पूर्व परीक्षा संगणक प्रणालीवर आधारित पद्धतीने घेण्याचं नियोजन केलं आहे. या पद्धतीमुळे परीक्षा प्रक्रियेमध्ये पारदर्शकता, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि वेग वाढण्यास मदत होईल. उत्तरपत्रिकांचे संगणकीय मूल्यमापन, जलद निकाल प्रक्रिया, प्रश्नपत्रिकेची गोपनीयता आणि डिजिटल सुरक्षा यामुळे भरती प्रक्रिया अधिक विश्वासार्ह व कालबध्द होईल. आयोगाच्या प्रत्येक संवर्गाची भरती प्रक्रिया शक्यतो त्याच वर्षात पूर्ण करण्याचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी संगणक प्रणाली आधारित परिक्षा पद्धत अत्यंत उपयुक्त ठरणार असल्याचं भिमनवार यांनी सांगितलं. तसंच लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अनेक विद्यार्थी उत्तीर्ण होतात, सर्वांना सरकारी नोकरी मिळत नाही. अशा विद्यार्थ्यांना आता त्यांच्या क्षमतांनुसार खाजगी औद्योगिक कंपन्यांमध्ये नोकरी उपलब्ध होणार आहे. त्यासाठी उद्योग विभागाशी संपर्क करण्यात आला असल्याची माहितीही त्यांनी दिली.
0
0
Report

धाराशिव में 28 जून की उद्धव ठाकरे रैली, ओमराजे के भविष्य पर निर्णय होंगे

Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे की जाहीर सभा. सभेच्या तयारीसाठी जिल्ह्यात ठाकरे गटाच्या बैठका सुरू असून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकवटताना दिसत आहेत. ओमराजे बाबतची भूमिका ठरणार असं आमदार कैलास घाडगे पाटील यांनी स्पष्ट केलं. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर धाराशिवमधील राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. या पार्श्वभूमीवर येत्या २८ जून रोजी उद्धव ठाकरे धाराशिवमध्ये जाहीर सभा घेणार आहेत. सभेच्या तयारीसाठी जिल्हाभर ठाकरे गटाच्या बैठका सुरू असून शिवसैनिक मोठ्या संख्येने एकवटताना दिसत आहेत. ओमराजे निंबाळकर यांच्या पक्षांतरानंतर नाराज झालेल्या शिवसैनिकांना एकत्र आणण्याचा आणि संघटनात्मक ताकद दाखवण्याचा प्रयत्न या सभेतून केला जाणार आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे या सभेत नेमकी कोणती भूमिका मांडणार, ओमराजेंवर किती आक्रमक टीका करणार आणि पुढील राजकीय रणनीती काय असेल, याकडे राज्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या सभेनंतरच ओमराजे निंबाळकर यांच्या संदर्भात पुढील राजकीय दिशा निश्चित केली जाईल, अशी माहिती आमदार कैलास घाडगे पाटील यांनी दिली आहे. त्यामुळे २८ जूनची सभा धाराशिवच्या राजकारणासाठी निर्णायक ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में केंद्र की काजू कलमे योजना की शुरुआत, चार लाख कलम मुफ्त वितरित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीत 'मागेल त्याला काजू कलमे' योजनेचा शुभारंभ खा. नारायण राणे यांच्या हस्ते प्रारंभ; जिल्ह्यात ४ लाख काजू कलमांचे मोफत वाटप अँकर रत्नागिरी जिल्ह्यात काजू लागवडीला मोठी चालना देणाऱ्या केंद्र Governmentच्या 'मागेल त्याला काजू कलमे' या महत्त्वाकांक्षी योजनेचा आज शुभारंभ झाला. केंद्रीय मंत्री तथा खासदार नारायण राणे यांच्या हस्ते भाट्ये येथील प्रादेशिक नारळ संशोधन केंद्रात शेतकऱ्यांना काजू कलमांचे वितरण करण्यात आले. या योजनेअंतर्गत जिल्ह्यात चार लाख मोफत काजू कलमांचे वाटप होणार असून, सुमारे दोन हजार हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली येणार आहे. त्यामुळे भविष्यात जवळपास शंभर कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी खा. राणे यांनी शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन मेहनतीच्या जोरावर उत्पन्न वाढवावे, असे आवाहन केले.
0
0
Report

उद्धव ठाकरे का नागपूर से यवतमाल तक दौरा, तैयारी और चर्चा पर जोर

Nagpur, Maharashtra:नागपूर - शिवसेना (ठाकरे गट) पक्षातील सहा खासदारांच्या फुटीनंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज महाराष्ट्र दौरा.. विदर्भपासून सुरु होणार - काही वेळातच नागपूर विमानतळावर उद्धव ठाकरे यांचे आगमन होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी UBT शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी - विमानतळ परिसरात ढोल-ताशांच्या गजरात कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत असून, जोरदार घोषणाबाजीसह स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. - दौऱ्यात उद्धव ठाकरे नागपूरहुन लगेच यवतमाळला जाणार, उद्या यवतमाळ येथे कार्यकर्त्यांशी संघटनात्मक चर्चा करणार आहेत. तिथून आढावा घेतला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report

चंद्रपुर में इरई बांध पर आपदा व्यवस्थापन का विशेष प्रशिक्षण आयोजित

Chandrapur, Maharashtra:टायटल: चंद्रपुरात जिल्हाधिका-यांच्या उपस्थितीत आपत्ती व्यवस्थापनाचे धडे, इरई धरणावर विशेष प्रशिक्षणाचे आयोजन अँकर: मान्सून पूर्वतयारीच्या अनुषंगाने तसेच आपत्तीच्या काळात तात्काळ व प्रभावी प्रतिसाद देणे, स्थानिक प्रशासनाच्या क्षमतेत वाढ करणे, या उद्देशाने जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणच्यावतीने चंद्रपूर शहरातील इरई धरणावर आपत्ती प्रतिसाद दलाच्या विशेष प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हाधिकारी वसुमना पंत आणि निवासी उपजिल्हाधिकारी दगडू कुंभार यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामध्ये विविध आपत्तींच्या परिस्थितीत प्रभावी उपाययोजना कशा कराव्यात, याबाबत प्रत्यक्ष मार्गदर्शन करण्यात आले. आपत्तीच्या काळात सर्व यंत्रणांनी सज्ज राहावे तसेच पूर परिस्थिती व एलनिनोची परिस्थिती लक्षात घेता इरई धरणातील पाण्याच्या विसर्गावर नियंत्रण ठेवण्याचे सूचना जिल्हाधिका-यांनी संबंधित विभागांना दिल्या. यावेळी प्राथमिक बचाव व शोध मोहीम, प्राथमिक उपचार, हृदय व फुफ्फुसांचे पुनरुज्जीवन (सीपीआर), पूर्वसूचना प्रणाली व समुदाय जनजागृती, आपत्ती काळातील समन्वय व बचाव कार्य, आपत्कालीन उपकरणांचा वापर व सुरक्षा-विधी, इम्प्रोवाईज डिवाइस, स्टॅंडर्ड डिवाइस, CPR व विविध प्रकारच्या बँडेज कशा प्रकारे बांधतात अशा विविध आपत्ती व्यवस्थापन विषयक माहिती देण्यात आली. तसेच उपलब्ध आपत्ती निवारण साहित्याची तपासणीसुध्दा करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top