445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवी मुंबई में अवैध टेरेस जिम पर अतिक्रमण विभाग की बड़ी कार्रवाई
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील वाशी मध्ये अतिक्रमण विभागाने मोठी कारवाई केलेय. इमारतीवरील टेरेस वर वाढीव बांधकाम करुन उभारण्यात आलेल्या खाजगी व्यायामशाळेवर मनपाने तोडक कारवाई केलेय. गेली अनेक वर्ष वृद्धि बांधकाम करुन सदर व्यायामशाळा बेकायदेशीरपणे चालवली जात होती अखेर मार्जिनल स्पेस वरील कारवाईनंतर मनपाने आता आपला मोर्चा बेकायदेशीर वाढीव बांधकामांकडे वळवला आहे. मनपाच्या या धडक कारवाईमुळे वाढीव बांधकाम करणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
कांग्रेस का प्रदर्शन: भाजपा नेताओं के खिलाफ आट्रोसिटी कानून की FIR की मांग
Navi Mumbai, Maharashtra:काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या सभास्थळाचे ‘शुद्धीकरण’ करण्याचा जातीयवादी व अस्पृश्यतावादी प्रकार करणाऱ्या भाजपा नेते व कार्यकर्त्यांविरोधात ॲट्रॉसिटी कायद्यान्वये गुन्हा दाखल करावा तसेच विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर दाखल करण्यात आलेली द्वेषपूर्ण FIR तात्काळ मागे घ्यावी या मागण्यासाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस कमिटीच्या कोकण भवन येथे निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी मनुवादी विचारसरणीचा निषेध व्यक्त करत काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी कोकण विभागीय आयुक्तांना निवेदन दिलेय. नवी मुंबई0
0
Report
चंद्रपुर के डीनदयाल कैंसर अस्पताल में शिकायत-सुझाव पेटी शुरू, मरीजों से फीडबैक
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूरच्या अत्याधुनिक दीनदयाल कर्क रुग्णालयात तक्रार आणि सूचनापेटीची सुरुवात, जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातून येणाऱ्या रुग्णांचा फीडबॅक मिळावा यासाठीची सुविधा, आ. सुधीर मुनगंटीवार यांनी केला उपक्रमाचा प्रारंभ चंद्रपूर शहरात टाटा आणि राज्य सरकार यांच्या प्रयत्नातून उभारलेल्या अत्याधुनिक दीनदयाल तर कर्क रुणालयात आता रुग्णांचा मोठा ओघ सुरू झाला आहे. या रुग्णालयातील सर्व सुविधा गरीब आणि सामान्य जनतेपर्यंत पोहोचाव्या यासाठी प्रशासन प्रयत्नरत आहे. जिल्हा आणि आसपासच्या क्षेत्रातून रुग्ण इथे दाखल होत असून इथल्या सुविधांबाबत सतत फीडबॅक मिळावा यासाठी रुग्णालयात तक्रार आणि सूचनापेटीची सुरुवात करण्यात आली. आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या उपस्थितीत उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. या सुविधेमुळे पंडित दीनदयाल कर्क रुग्णालयातील सेवा अधिक सुकर, सुलभ आणि रुग्णाप्रति स्नेहपूर्ण होईल असा विश्वास सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
अल निनो से पानी की कमी महंगाई के बीच किसान पोळा सण की जंग
Yavatmal, Maharashtra:पावसाअभावी दुष्काळ आणि महागाईच्या सावटात शेतकऱ्यांना पोळा सण साजरा करावा लागत आहे. हवामानावर अल निनो चा प्रादुर्भाव झाल्यामुळे पावसाने पाठ फिरवली आहे, त्यामुळे खरीप हंगामातील पिके वाळू लागली आहे. अशा बिकट परिस्थितीत कृषी संस्कृतीत शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा सण पोळा आला आहे. उधार उसनवारी करून शेतकऱ्यांनी पिकांवर केलेला मोठा खर्च वाया जाण्याची चिन्हे आहेत, त्यामुळे आधीच आर्थिक कोंडीत सापडलेल्या शेतकऱ्यांना पोळा सण देखील साजरा करायचा आहे, बैलांना सजावटीचे साहित्य हे देखील महागले असल्याने जमेल तशी आर्थिक तजवीज करून शेतकरी पोळा सण साजरा करण्याची तयारी करीत आहे. तर दुसरीकडे हे साहित्य विक्री करणाऱ्या व्यावसायिकांना देखील फटका बसला आहे.0
0
Report
खबर में विषय स्पष्ट नहीं है
Ratnagiri, Maharashtra:0
0
Report
बारिश नहीं होने से खरीफ फसलें बर्बाद, मालेगांव के किसान जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना
Washim, Maharashtra:बारिश नहीं होने से खरीफ फसलें बर्बाद, मालेगांव के किसान जिलाधिकारी कार्यालय के सामने धरना0
0
Report
Advertisement
दोनोंळी: मुंबई-गोवा महामार्ग पर अवजड वाहनों पर प्रतिबंध, चाकरमाणों को राहत
Ratnagiri, Maharashtra:दापोली- रत्नागिरी.. गणेशोत्सवात मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांना बंदी; चाकरमान्यांचा प्रवास सुखकर करण्यासाठी प्रशासन सज्ज.. मंत्री भरत गोगावले.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांचा प्रवास सुरळीत और सुरक्षित व्हावा यासाठी मुंबई-गोवा महामार्गावर अवजड वाहनांच्या वाहतुकीवर बंदी घालण्यात आली है.. माणगावचा कुछ भाग वगळता उर्वरित महामार्ग वाहतुकीस योग्य असून, तिथे हलक्या वाहनांची ये-जा सुरू ठेवण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्न करत असल्याची माहिती रायगडचे पालकमंत्री भरत गोगावले यांनी दापोली येथे दिली.. सणासुदीच्या काळात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलीस आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला सज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले असून,या निर्णयामुळे चाकरमान्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे..0
0
Report
रोहित पवार के नेतृत्व पर भाजपा विधायक पडळकर का निशाना; पेपर फूट पर सरकार सख्त
Sangli, Maharashtra:स्लग - एमपीएससी आंदोलनवरून गोपीचंद पडळकरांची,रोहित पवारांवर टीका.. अँकर - एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं लीडरशिप करण्याचा रोहित पवारांचा प्रयत्न गेल्या चार वर्षापासून सुरू आहे,अशी टिका भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. एमपीएससी विद्यार्थी हे हुशार आणि बुद्धिमान असून,त्यांच्यासाठी काहीतरी करतोय हे दाखवून तळागाळापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न आहे.मात्र रोहित पवारांनी राजकीय हेतूने आंदोलनाकडे बघू नये,असा सल्ला देत,एमपीएससी बाबत झालेल्या आंदोलनात केवळ रोहित पवारांचीच वाहवा झाली,विद्यार्थ्यांचे प्रश्न कुठेचं आले नाहीत,असा टोला देखील लगावत,पेपर फुटी प्रकरणी केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य सरकार देखील कडक कायदा आणत आहे,असे देखील गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले आहे,ते सांगली मध्ये बोलत होते बाईट - गोपीचंद पडळकर - आमदार- भाजपा. अँकर - पेपर फुटी प्रकरणी विरोधकांपेक्षा सरकार अधिक आक्रमक आहे,संबंधित आरोपींना तुरुंगात टाकण्यात आला आहे. पेपर फुटी प्रकरणी सात सदस्य समिती देखील गठीत करण्यात आली असून यापुढे पेपर फुटू नयेत म्हणून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्याचा विचार सुरू असल्याची माहिती भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.समिती लवकरच सरकारला अहवाल देईल आणि हे सरकार विद्यार्थ्यांच्या सोबत आहे,असे देखील स्पष्ट केले0
0
Report
लातूर में सूखा घोषित कराने के लिए दानवे ने सरकार पर जोरदार हमला
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... मराठवाड्यात दुष्काळ जाहीर करा... दानवेंची सरकारकडे मागणी....पिकं उद्ध्वस्त, तरी दुष्काळ जाहीर का नाही ?.... दानवे ची सरकारवर जोरदार टीका...... मराठवाड्यात पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला जातोय... पिकं अक्षरशः उद्ध्वस्त झाली असताना सरकार मात्र दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये केलाय... शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन परिस्थिती पाहिल्याचं सांगत दानवेंनी तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केलीय... एवढंच नाही तर पावसाअभावी शेतकरी आत्महत्या करत असतानाही सरकार गप्प का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केलाय...0
0
Report
Advertisement
कुणबी जात प्रमाणपत्र के बावजूद वैधता न मिलने से मराठा छात्राओं-छात्रों को फीस देनी पड़ी
Nanded-Waghala, Maharashtra:कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले पण वैधता मिळाली नसल्याने नाईलाजाने मराठा विद्यार्थ्यांना महाविद्यालयाची पूर्ण फीस भरावी लागत आहे. नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील उंचाडा येथील उमा चव्हाण या विद्यार्थिनीला 2024 मध्ये कुणबी जात प्रमाणपत्र मिळाले. 2024 - 2025 वर्षासाठी या विद्यार्थिनीला कृषी महाविद्यालयात प्रवेश मिळाला. कुणबी जात प्रमाणपत्र मिळाल्याने ओबीसी ची शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी जात वैधता पडताळणीसाठी अर्ज करण्यात आला. पण गेल्या दोन वर्षांपासून जात पडताळणी मिळत नाही. त्यामुळे या विद्यार्थिनीला महाविद्यालयाची पूर्ण फीस भरावी लागली. जात वैधता मिळणार नसेल तर कुणबी जात प्रमाणपत्राचा फायदा काय असा सवाल मराठा समाजाने केलाय. कुणबी जात प्रमाणपत्र देऊन फक्त धुळफेक केल्याचा आरोप करण्यात येतोय. प्रमाणपत्रबाबत काय भावना आहेत हे जाणून घेतलंय आमचे प्रतिनिधी सतीश मोहिते यांनी.0
0
Report
वाशिम में किसानों के लिए बारिश की प्रार्थना: महिलाओं ने मंदिर में जल अर्पण
Washim, Maharashtra:वाशीम: पावसाने गेल्या 45 दिवसांपासून दडी मारल्याने खरीप पिके धोक्यात आली आहेत. त्यामुळे मालेगाव तालुक्यातील तपोवन येथील महादेव मंदिरात ग्रामस्थ महिलांनी पावसासाठी अनोख्या पद्धतीने साकडे घातले. महिलांनी ‘हर हर महादेव’चा जयघोष करत महादेवाच्या पिंडीवर पाणी अर्पण करून पावसासाठी प्रार्थना केली. चांगला पाऊस पडून शेतकऱ्यांचे संकट दूर व्हावे, अशी मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
पंढरपुर के किसानों ने गन्ना मूल्य भुगतान न मिलने पर आत्महत्या का प्रयास
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी ऊस गाळपासाठी पाठवूनही त्यांच्या गाळप झालेल्या ऊसासाठी जाहीर केलेला दर मिळत नसल्याने शेतकरी आक्रमक झाला आहे. आज पंढरपूर तहसील कार्यालय समोर चंद्रकांत बागल या शेतकऱ्याने अंगावर डिझेल ओतून घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. बैल पोळा सण तोंडावर आला आहे. या सणाच्या निमित्ताने घरी सण साजरा करण्यासाठी 200 रुपये प्रति टन गाळप झालेल्या उसाला बिल द्यावा अशी मागणी केली आहे0
0
Report
Advertisement
नागपूर में विश्व हिंदू परिषद ने गरबा-डांडिया के लिए गाइडलाइन जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर विश्व हिंदू परिषदेची गरबा दांडिया करता गाईडलाईन 1)तिलक अनिवार्य 2)आधार कार्ड अनिवार्य 3)वराह देवता के दर्शन 4)माता की पूजा 5)गंगा जल से स्वागत याबाबत माहिती जाणून गेली घेतली आहे विश्व हिंदू परिषदेचे नागपूर महामंत्री अमोल ठाकरे यांच्याकडून0
0
Report
नागोठणे पुल की सुरक्षा पर उबाल आती बहस, वायरल वीडियो ने बढ़ाई चिंता
Chendhare, Maharashtra:अँकर - मुंबई-गोवा महामार्गावरील नागोठणे पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. गणेशोत्सवासाठी पूल हलक्या वाहनांसाठी तात्पुरता सुरू करण्याच्या हालचाली सुरू असतानाच, पुलाच्या दुरुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमुळे पुलाच्या सुरक्षिततेबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. पाहूया, काय आहे या व्हायरल व्हिडिओमागचं वास्तव... वाढवणारे तथ्य: मुंबई-गोवा महामार्ग... कोकणात जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी महत्त्वाचा मार्ग... आणि याच मार्गावरील नागोठने पूल सध्या चर्चेत आहे. पुलाच्या दुरुस्तीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून, पुलाच्या भिंतींना एमसीलच्या सहाय्याने काचेच्या पट्ट्या लावल्या जात असल्याचं, तर तडे गेलेल्या भागात लोखंडी सळ्यांनी मजबुतीकरण केलं जात असल्याचं दिसत आहे. बाईट - यशराज शेळके, रील करणारा. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पुलाच्या सुरक्षिततेचा मुद्दा राजकीय पटलावरही आला आहे. गणेशोत्सवाच्या काळात या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढणार आहे. त्यामुळे पूल सुरक्षित असल्याची खात्री झाल्याशिवाय वाहतूक सुरू करू नये, असा इशारा विरोधकांकडून देण्यात आला आहे. बाईट - रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार. हा पूल वाहतुकीसाठी बंद केल्यानंतर महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांसह आयआयटीच्या तज्ज्ञांनीही पुलाची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे जोडमार्ग खचणे आणि सांध्यांमध्ये विभाजनाची समस्या निर्माण झाल्याचं महामार्ग प्राधिकरणाकडून सांगण्यात आलं आहे. पॅनेलच्या सांध्यांचं स्टिचिंग करून मजबुतीकरण करण्यात येत आहे. रिटेनिंग वॉलच्या पॅनेलवर हालचाल आणि विस्थापन तपासण्यासाठी निरीक्षण उपकरणं बसवण्यात आली आहेत. तसेच चोवीस तास देखरेखीसाठी पथक तैनात करण्यात आलं आहे. त्या अंतर्गत गणेशोत्सवाला आता अवघे सहा दिवस शिल्लक आहेत. त्यामुळे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी नागोठणे पूल कधी सुरू होणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. मात्र, तांत्रिक तपासणी आणि सुरक्षिततेची खात्री झाल्यानंतरच या पुलावरून हलकी वाहतूक सुरू केली जाणार आहे.0
0
Report
गणेशोत्सव के लिए कोकण में टोल माफी, 11–27 सितम्बर 2026
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या वाहनांना टोलमाफी; मात्र खड्डेमुक्त प्रवासाचा प्रश्न कायम.. अँकर गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना दिलासा देत राज्य सरकारने ११ ते २७ सप्टेंबर २०२६ या कालावधीत सर्व खाजगी वाहने आणि एसटी बसेसना महामार्गांवर पूर्ण टोलमाफी जाहीर केली आहे.. मुंबई-गोवा, मुंबई-बंगळुरू महामार्ग आणि अटल सेतू यांसह एमएसआरडीसीच्या टोलनाक्यांवर ही सवलत मिळणार आहे.. यासाठी पोलीस ठाणे, ट्रॅफिक चौकी किंवा आरटीओ कार्यालयातून ‘गणेशोत्सव २०२६ कोकण दर्शन’ पास घेणे अनिवार्य आहे.. वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज असल्या तरी, मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे आणि रखडलेले काम यामुळे टोलमाफीनंतरही प्रवाशांचा प्रवास सुरक्षित आणि सुकर होणार का, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे...0
0
Report
Advertisement
