445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवापूर तालुक्यात जलसंकट खत्म: नागझरी धरण ओवरफ्लो, पानी-खेत में राहत
Dhule, Maharashtra:जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्याने नवापूर तालुक्यावर भीषण पाणीटंचाईचे सावट निर्माण झाले होते. नागझरी धरणातील पाणीसाठा तळाला गेल्याने आणि रंगावली नदी कोरडी पडल्याने नागरिक आणि शेतकरी चिंतेत होते. मात्र, जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात पावसाने दमदार पुनरागमन करत सलग हजेरी लावली. यामुळे नागझरी धरण पूर्ण क्षमतेने भरून ओसंडून वाहू लागले आहे. धरणात मुबलक साठा झाल्याने पिण्याच्या पाण्याची आणि शेतीची चिंता मिटली आहे. या पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा आधार मिळाला असून, तालुक्यातील नद्या-नाले दुथडी भरून वाहत आहेत. धरण ओव्हरफ्लो झाल्याने नवापूरकरांमधून समाधान आणि आनंदाचे वातावरण व्यक्त होत आहे.0
0
Report
अमरावती में भारी बारिश, उपमुख्यमंत्री ने राहतकार्य शुरू कराने के निर्देश दिए
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी घेतला आढावा; तातडीने मदत कार्य सुरू करण्याचे दिले आदेश अंबरावती जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांतील नद्या-नाल्यांना पूर आला असून काही गावांचा मुख्य रस्त्यांशी संपर्क तुटला आहे. पुरामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून प्रशासनाकडून तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी परिस्थितीची दखल घेतली आहे. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज अमरावतीचे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून जिल्ह्यातील पूरस्थितीची सविस्तर माहिती घेतली. नागरिकांना तातडीने मदत पोहोचवण्यासाठी व कोणतीही जीवित किंवा वित्तहानी होऊ नये यासाठी प्रशासनाला अत्यंत सतर्क राहून आवश्यक त्या सर्व उपाययोजना करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत.0
0
Report
यवतमाळ- अमरावती में बारिश से बेंबला डैम के सभी गेट खुले, गाँव सतर्क
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ व अमरावती जिल्ह्यात सुरु असलेल्या पावसामुळे नदी नाले दुथडी भरून वाहायला लागले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वात मोठे बेंबळा धरणात देखील जलस्तर वाढल्याने बेंबळा चे सर्व २० दरवाजे १५० सेंटीमीटर उघडण्यात आले असून 2500 घनमीटर क्युसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे. दर अर्धा तासाने जलासाठा वाढत असल्याने सर्व २० दरवाजे उघडण्यात आले. त्यामुळे पाण्याचा प्रवाह वाढला आहे. बेंबळा नदीलगतच्या गावांना सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
मालेगांव- पंढरपुर बस में बारिश में कांच टूटा, चालक गाड़ी चलाता रहा
Nashik, Maharashtra:मालेगाव पंढरपूर बसमध्ये प्रवाशांच्या जीव धोक्यात... भर पावसात गाडीची काच तुटलेली व्हायपर बंद, तरीही वाहनचालक गाडी चालवतोय... गाडीतील सतर्क प्रवाशांकडून व्हिडिओ व्हायरल... नाशिकच्या मालेगाव बस डेपो मधून मालेगाव पंढरपूर येथे जाणाऱ्या बसची काच तुटलेली, तिचे व्हायपर देखील बंद आहे. आणि त्यात बाहेर जोरात पडणारा पाऊस यामुळे समोर रस्त्यावर काही दिसत नसताना.vehicle चालवत असल्याने गाडीत बसलेल्या प्रवाशांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने तत्काळ गाडी थांबवून आम्हला गाडी बदलून देण्याची मागणी प्रवासी करत आहे. मात्र बसचे अधिकारी कर्मचारी काही जीवित हानी बघायची वाट बघत आहे. का? असा सवाल आता विचारला जात आहे..0
0
Report
नागपूर के सावनेर में कर्ज से परेशान दो भाइयों ने रेलगाड़ी के सामने आत्महत्या कर दी
Nagpur, Maharashtra:नागपूर / सावनेर रेल्वे अपघात अपडेट.. - नागपूर जिल्ह्यातील सावਨੇरजवळ दोन सख्ख्या भावांची रेल्वेखाली येऊन आत्महत्या केल्याचा घटनेनं एकच खळबळ उडाली आहेय ... - माळेगाव टाऊन रेल्वे रुळावर दोघांचे मृतदेह आढळल्यानंतर पोलिसानी घटनास्थळी पोहचून तपास सुरू केलाय... - मृतांची ओळख निरंजन फिरके (४०) आणि योगेश फिरके (३७) पटली आहे... - बेकरी व्यवसायासाठी घेतलेल्या कर्जामुळे कुटुंब आर्थिक संकटात सापडले... कर्जाची परतफेड न झाल्याने घर जप्तीची नोटीस बजावल्याची माहिती समोर आलो... - घर जप्तीच्या भीतीमुळे दोघेही मानसिक तणावात असल्याची माहिती यातूनच दोघांनी आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे... - गुरुवारी सकाळी शेतीत जात असल्याचे सांगून दोघे घराबाहेर पडले होते त्यानंतर धावत्या मालगाडीसमोर उडी घेतल्याचा प्राथमिक अंदाज - सावनेर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून तपास सुरू केला आहे.. - आकस्मिक मृत्यूची नोंद पोलिसांकडून करण्यात आली - कर्जबाजारीपणा आणि घर जप्तीच्या नोटिशीचा आत्महत्येशी संबंध आहे का? तपास सुरू आहे... - दोन्ही भावांनी पत्नी आणि मुलाला घटनेच्या एक दिवसा आधी माहेरी सोडून दिले होते... त्यानंतर काल त्यांनी टोकाचे पाऊल उचलेलेो..0
0
Report
बारिश से नांदगांव खंडेश्वर में पुल टूटे, 15 गाँव संपर्क से कटे
Amravati, Maharashtra:पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील वाघोडा गावाजवळील नागरिकांचं मोठं नुकसान; मुसळधार पावसाने पूल गेला वाहून,शेतातील पीक खरडली पावसामुळे नांदगाव खंडेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. पाऊस एवढा भयंकर होता की शेतीमधील माती वाहून गेली असून शेती पिके खरडून गेली आहे. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असल्याचा पाहायला मिळत आहे. तसेच तालुक्यातील वाघोडातील हा पुल वाहून गेल्याने जवळपास पंधरा गावांचा संपर्क तुटला आहे. रात्री अनेक नागरिकांना मंगल कार्यालयामध्ये ठेवण्यात आले असून प्रशासनाकडून अद्यापही आम्हाला कोणतीही मदत मिळाली नाही त्यामुळे प्रशासनाकडून लवकरात लवकर मदत मिळावी अशी आमची मागणी गावकरी करत आहे.0
0
Report
Advertisement
लातूर में तीन दिन से रिमझिम बारिश, खरीफ फसलें फिर मिलीं संजीवनी
Latur, Maharashtra:लातूरमध्ये तीन दिवसांपासून रिमझिम पाऊस... सुकणाऱ्या खरीप पिकांना मिळालं ‘जीवदान’... लातूर जिल्ह्यात गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसाने खरीप पिकांना मोठा आधार दिलाय... तर जिल्ह्यातील काही भागात दमदार पावसानेही हजेरी लावली आहे... गेल्या दोन महिन्यांपासून पावसाने दडी मारल्यामुळे सोयाबीनसह खरीप पिकं सुकण्याच्या मार्गावर होती... त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली होती... मात्र आता तीन दिवसांपासून पडणारा रिमझिम पाऊस पिकांसाठी अक्षरशः संजीवनी ठरतोय.0
0
Report
सोलापुर के शेळगी में ST बस-ट्रक हादसा: चालक और एक महिला यात्री की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात सोलापूर शहरातील शेळगी परिसरात एसटी आणि ट्रकचा भीषण अपघात अपघातात एसटी चालक आणि एक प्रवासी महिलेचा जागीच मृत्यू तर जवळपास 10 प्रवासी जखमी सोलापुरातील शेळगी परिसरात पहाटे 5 च्या सुमारासची घटना या घटनेत एसटी चालक दादाराव भालचंद्र बनसोडे (वय ४३), आणि नागुबाई राम रेवगे या दोघांचा मृत्यू झालाय पुण्यातल्या कुरकुंभहून धाराशिव जिल्ह्यातील उमरग्याला हि बस जातं होती, पहाटे 4.30 वाजताच्या सुमारास बस सोलापूर एसटी स्टॅन्डवर पोहोचली सोलापुरातून उमरग्याच्या दिशेने बस निघालेली असताना सोलापूर-हैद्राबाद राष्ट्रीय महामार्गवरील शेळegi जवळ हा भीषण अपघात झाला0
0
Report
खेड में पानीपुरवठा योजना काम का फज्जा, पाइप सड़क पर पड़े; जांच की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये पाणीपुरवठा योजनेच्या कामाचा फज्जा; काम पूर्ण होण्यापूर्वीच पाईपांचा चुराडा,चौकशीची मागणी.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील खेड शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात नगरपालिकेच्या पाणीपुरवठा योजनेचे काम वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे.. नळ योजनेतून पाणी सुरू होण्याआधीच रस्त्यावर टाकलेल्या पाईपांवरून वाहनांची ये-जा सुरू झाल्याने पाईपांचा मोठ्या प्रमाणात चुराडा झाला आहे.. काम नगरपालिकेकडे हस्तांतरित झाले नसल्याचे सांगत लोकप्रतिनिधी हात वर करत असले,तरी सार्वजनिक निधीचा अपव्यय आणि वाढत्या अपघाताच्या धोक्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.. प्रशासनाने या निकृष्ट कामाची तात्काळ चौकशी करून जबाबदारी निश्चित करावी,अशी जोरदार मागणी आता खेडवासीयांकडून केली जाते..0
0
Report
Advertisement
राजुरा के मोखड़ नदी की भीषण बाढ़ में फंसे सात लोग DDRF ने सुरक्षित निकलवाए
Amravati, Maharashtra:मुखेड नदी की पुर में अ डकलोली सात जणांची DDRF पथकाकडून सुखरूप सुटका; राजुरा येथील घटना अमरावती जिल्ह्यातील राजुरा येथील मोखड नदीला आलेल्या भीषण पुरात अडकलेल्या सात जणांना जिल्हाधिकारी कार्यालयाच्या डी.डी.आर.एफ. (DDRF) शोध व बचाव पथकाने धाडसी कारवाई करत सुखरूप बाहेर काढले. गुरुवारी रात्री साडेआठच्या sुमारास सात जण पुराच्या पाण्यात अडकल्याची माहिती नियंत्रण कक्षाला मिळताच जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्या आदेशानुसार शोध व बचाव पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मुसळधार पाऊस, अंधार, पुराच्या प्रवाहात वाहून आलेली मोठी झाडे, लाकडे आणि विषारी साप अशा जीवघेण्या अडथळ्यांवर मात करत गोताखोरांनी रबर बोटीच्या सहाय्याने अवघ्या ३० मिनिटांत चार महिला, दोन पुरुष आणि दोन वर्षांच्या एका बालकासह एकूण सात जणांची जीवंत सुटका केली. त्यानंतर सर्वांना पुढील कार्यवाहीसाठी तहसील प्रशासनाच्या ताब्यात देण्यात आले. या धाडसी मोहिमेदरम्यान पोलीस आणि महसूल प्रशासनाचेही मोलाचे सहकार्य लाभले असून, घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. बचाव मोहिमेतील पथकाच्या शौर्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.0
0
Report
गडचिरोली में बाढ़ से कुंभी के तीन नागरिक सुरक्षित बचाए गए, सुविधाओं की व्यवस्था की गई
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने पुरातून काढले बाहेर, नोकरीसाठी, परीक्षेसाठी व उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध अँकर:-- अतिवृष्टीमुळे संपर्क तुटलेल्या गडचिरोली तालुक्यातील मौजा कुंभी येथील तिघा नागरिकांना जिल्हा प्रशासनाने तातडीने बचावकार्य राबवून सुरक्षित बाहेर काढत आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या. कुंभी येथील श्री. समीर विजय गेडाम (वय 25) यांची राजस्थान येथे बँक मॅनेजर म्हणून नियुक्ती झाली असून, रुजू होण्यासाठी त्यांना तातडीने प्रवास करणे आवश्यक होते. तसेच कु. तुलसी नवबोध गेडाम (वय 21) यांची नागपूर येथे परीक्षा असल्याने त्यांनाही गावाबाहेर काढणे गरजेचे होते. याशिवाय श्री. दिलीप पितांबर गेडाम (वय 50) यांची प्रकृती अस्वस्थ असल्याने त्यांना पुढील वैद्यकीय उपचारासाठी बाहेर काढण्याची आवश्यकता होती. मदत मागितल्यावर जिल्हा प्रशासनाने तात्काळ SDRF पथक आणि जिल्हा पोलिसांचे बचाव पथक बोट व आवश्यक साहित्यांसह घटनास्थळी रवाना केले. समन्वयाने बचाव मोहीम राबवून तिन्ही नागरिकांना सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर संबंधितांना त्यांच्या आवश्यकतेनुसार पुढील प्रवास व वैद्यकीय उपचारासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या.0
0
Report
आकोला जिले के तेल्हारा में भारी बारिश से नाले बाढ़, पानी घरो में प्रवेश
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या तेल्हारा तालुक्यात सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे माळेगाव बाजार येथील नाल्याला पूर आला असून, नाल्याचे पाणी गावात शिरल्याने अनेक भाग जलमय झाले आहेत. रस्त्यांवर पाणी साचल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत असून, काही घरांमध्येही पाणी शिरल्याची माहिती मिळत आहे. स्थानिक प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी तसेच विनाकारण पूरग्रस्त भागात जाऊ नये, असे आवाहन करण्यात आले आहे. पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
Virar Hospital Delivery Mishap: Newborn Falls During Birth, Condition Critical
Vasai-Virar, Maharashtra:विरारमध्ये गर्भवती महिलेचे बाळ जमिनीवर पडून अपघात डॉ. जोगळेकर रुग्णालयाचा हलगर्जीपणा? महिलेच्या गर्भाशयातून बाळ अडीच ते तीन फुटांवरून जमिनीवर कोसळले महिलेने बाळ येत असल्याची करून दिली जाणीव , मात्र रुग्णालयाचे दुर्लक्ष जखमी बळावर ठाणे येथील NICU सेंटर मध्ये उपचार सुरू रुग्णालयातील डॉक्टर, नर्सेस च्या निष्काळजीपणामुळे अपघात झाल्याचा महिलेचा आरोप विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात वैद्यकीय हलगर्जीपणाचा आरोप करत संतापजनक घटना समोर आली आहे. सात महिन्यांची गर्भवती असलेल्या महिलेच्या पोटातील नवजात बालक प्रसूतीदरम्यान थेट जमिनीवर पडल्याचा गंभीर प्रकार समोर आला आहे . या अपघातानंतर नवजात बालकाची प्रकृती चिंताजनक असून त्याच्यावर ठाणे येथील एनआयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता होत आहे。 मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित गर्भवती महिला बुधवारी प्रसूतीच्या वेदना सुरू झाल्याने विरार पश्चिमेतील डॉ. जोगळेकर रुग्णालयात दाखल झाली होती. त्यावेळी तिने वारंवार डॉक्टर आणि परिचारिकांना पोटातून बाळ बाहेर येत असल्याची जाणीव होत असल्याचे संगितले. मात्र रुग्णालय प्रशासनाने तिच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याचा दावा करण्यात आला आहे. याचदरम्यान, महिलेच्या गर्भाशयातून महिला उभी असताना नवजात बालक थेट अडीच ते तीन फूट उंचीवरून जमिनीवर पडले .. या अपघातात बालक गंभीर जखमी झाल्याने त्याला तातडीने ठाणे येथील एनआयसीयूमध्ये हलविण्यात आले असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. या घटनेनंतर नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला असून, या प्रकरणात वैद्यकीय हलगर्जीपणा झाला असल्यास संबंधित डॉक्टर आणि जबाबदार कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी केली आहे. दरम्यान या रुग्णालयाचे डॉक्टर जोगळेकर यांना या प्रकरणابाबत विचारणा करायचा प्रयत्न केला असता त्यांनी माध्यम प्रतिनिधींशी भेटणे टाळले . त्यामुळे या प्रकरणाची पालिका आयोग्य विभागाने गंभीर दखल घ्यावी अशी मागणी होत आहे..0
0
Report
चाकण-शिक्रापूर हाईवे पर ट्रक खराब, 10–12 किमी जाम; MIDC के कर्मियों की परेशानी
Chakan, Maharashtra:चाकण-शिक्रापूर महामार्गावर आज पहाटेपासूनच प्रचंड वाहतूक कोंडी निर्माण झाली आहे. महामार्गावर एक ट्रक बंद पडल्यामुळे तब्बल १० ते १२ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सकाळीच ही कोंडी झाल्याने चाकण औद्योगिक वसाहतीत (MIDC) कामावर निघालेल्या कामगारांना याचा मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. अद्यापही या मार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू असून, कामगारांसह सर्वसामान्य प्रवाशांचे हाल होत आहेत. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया चाकण पुणे...0
0
Report
ओतूर पुलिस ने पिकअप चालक के खतरनाक ड्राइविंग पर की बड़ी कार्रवाई
Barav, Maharashtra:जूनार तालुक़े के डिंगोरे गाँव में पुष्पावती नदी के पुल पर तेज़ गति और खतरनाक मोड़दार ड्राइविंग कर रहे एक पिकअप चालक ने नागरिकों की जान जोखिम में डाल दी। ओतूर पुलिस ने चालक के खिलाफ बड़ी कार्रवाई करते हुए मामला दर्ज किया है। आरोपी के खिलाफ कानूनी कार्रवाई की जाएगी। 'सड़क पर ऐसे स्टंट या खतरनाक ड्राइविंग नहीं करें, अन्यथा सख्त कार्रवाई होगी', यह चेतावनी पुलिस ने दी है।0
0
Report
Advertisement
