445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
धुळे में शरद पवार को कृतज्ञता सम्मान, श्रद्धेय नेता उपस्थित
Dhule, Maharashtra:धुळे शहरातील इतिहासाचार्य वि.का. राजवाडे संशोधन मंडळाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार शरद पवार यांचा कृतज्ञता सोहळा संपन्न झाला. यावेळेस शास्त्रज्ञान डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांचा कृतज्ञाता सन्मान केला. यावेळी महाराष्ट्रातील दिग्गज नेते उपस्थित होते. संस्थेने केलेल्या या सत्कार सोहळ्या बद्दल शरद पवार यांनी आभार व्यक्त करत. इतिहासाचार्य वि.का. राजवाडे यांनी इतिहास संशोधनांमध्ये मोठे योगदान दिलं असून, त्यांचे योगदान हे येणारे पिढ्यासाठी मार्गदर्शक आहे, असं शरद पवार यांनी सांगितल. तर शास्त्रज्ञ डॉक्टर अनिल काकोडकर यांनी शरद पवार यांच्या बद्दल गौरवोद्गार काढताना, अनेक संस्थांना शरद पवार यांनी मदत केली, मात्र त्यांच्या कार्यात हस्तक्षेप केला नाही, असं सांगितले.0
0
Report
अनुमति न मिलने के बावजूद ओबीसी महामोर्चा 1 सितंबर को पटस से मुंबई रवाना
Pune, Maharashtra:परवानगी नाकारली तरीही १ सप्टेंबरचा ओबीसी समाजाचा महामोर्चा निघणारच असा निर्धार ओबीसी समाजाचे नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी व्यक्त केला आहे. तसेच नियोजनात कोणताही बदल होणार नाही. त्यामुळे ठरल्याप्रमाणे एक तारखेला सकाळी दहा वाजता ओबीसी समाजबांधवांनी पाटस टोल नाक्यावर लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहनही हाके यांनी केले आहे. १ सप्टेंबर रोजी ओबीसींच्या विविध प्रश्नावरती प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या नेतृत्वाखाली ओबीसी समाजाने महामोर्चा आयोजित केला आहे. हा महामोर्चा पाटसहून निघणार असून तो मुंबईच्या दिशेने आगेकूच करणार आहे. मात्र सोशल मीडियामध्ये काही ओबीसी समाजाचे विरोधक या मोर्चा संदर्भात अफवा पसरवत आहेत. असा आरोप हाकेंनी केला दरम्यान पाटस येथे पोलीस प्रशासनाबरोबर सकारात्मक बैठक झाली असून कायद्याच्या चौकटीत राहून, घटनेने दिलेल्या अधिकाराप्रमाणे कायदा आणि सुव्यवस्था यांचे पालन करत हा मोर्चा निघणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले आहे.0
0
Report
पुणे के वाघोली में भीषण ट्रैफिक जाम, चार किलोमीटर तक वाहनों की कतार
Pune, Maharashtra:वाघोलीत वाहतूक कोंडीचा बोजवारा! पुण्याच्या वाघोली मध्ये वाघोलीत आज वाहतूक कोंडीने अक्षरशः तीन तेरा वाजले आहेत. वाघेश्वर चौक, आव्हाळवाडी फाटा, केसनंद चौक, केसनंद गाव आणि बीजीएस फाटा परिसरात वाहनांच्या चार किलोमीटर पर्यंत लांबच लांब रांगा लागल्या आहेत. वाघोली मध्ये दोन किलोमीटर अंतर पार करण्यासाठी लागतो एक तास. यामुळे नगर रोड ही झाला जॅम वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलिसांनी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनचालक आणि नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
सरकार ओबीसी-मराठा आरक्षण मुद्दे पर सकारात्मक बातचीत कर रही है
Rui, Maharashtra:कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ऑन जरांगे पाटील उपोषण... सरकार तोडगा... विखे पाटील जरांगे यांच्याशी बोलता येत सरकार जरांगे पाटलांच्या प्रश्नाबाबत सकारात्मक आहे. एक-दोन दिवसात तोडगा निघेल... ऑन खासदार सुप्रिया सुळे पक्ष स्थापना.. पक्षाच्या प्रमुख सुनेत्रा वहिनी आहेत ते जो निर्णय घेतील तो मान्य असेल... ऑन लक्ष्मण हाके ओबीसी मोर्चा मुंबई हाके यांच्या मागणी संदर्भात मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री त्यांच्याशी चर्चा होईल मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल ऑन सुनेत्रा पवार निवडणूक मध्यस्थी लक्ष्मण हाके राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री आहे तो जो निर्णय घेतील ते आम्हाला मान्य असेल, ऑन छगन भुजबळ छगन भुजबळ साहेबांशी चर्चा करू ओबीसी आणि मराठा यांच्यासाठी काय करणं गरजेचं आहे याबाबत सरकार सकारात्मक आहे. जातीय सलोखा जपलं पाहिजे गुण्या गोविंदाने काम केलं पाहिजे सरकारची भूमिका ऑन हाके आरक्षण गेलं लखा्मण हाके आणि भुजबळ साहेब यांच्याशी चर्चा करून समजून घेईल ऑन जरांगे पाटील मागणी प्रमुख विखे पाटील यांना जबाबदारी दिली है ते यातून नक्की तोडगा काढतील... ऑन कर्जमाफी यादी कागदपत्र जसे पूर्ण होतील केवायसी पूर्ण होतील त्याप्रमाणे यादी लागतील शेतकरी बांधवांना सांगतो काळजी करू नका सरकारने आणि मुख्यमंत्र्यांनी जे आश्वासन दिला आहे ते नक्की पूर्ण होईल... शेतकरी अडचणीत आहे पाऊस पडत नाही... चार आठ दिवसात पाऊस नाही पडला तर संपूर्ण पीक वाया जाईल... पिकावर शेतकऱ्याने स्वप्न रंगवले आहेत ऑन बायोमेट्रिक कोणालाही वंचित ठेवणार नाही .. ऑन मयत शेतकरी मयत शेतकऱ्याला सुद्धा आम्ही वंचित ठेवणार नाही... ऑन सुप्रिया सुळे शेतकरी कंबरड मोडलं याबाबतीत मी माहिती घेतली नाही माहिती घेतल्यावर मी बोलेल.... ऑन सुप्रिया सुळे सरकार धोरण ताई देशाच्या ज्येष्ठ नेते आहेत ते काय बोलल्या ते मी ऐकून घेतले नाहीत.... माहिती घेतल्यावर मी त्यावर बोलेल...0
0
Report
पुणे महापालिका के कनिष्ठ इंजीनियर भर्ती पेपर लीक: पुनःपरीक्षा की मांग
Pune, Maharashtra:कनिष्ठ अभियंता भरती प्रक्रिया रद्द करा; फेरपरीक्षा घ्या — प्रमोद नाना भानगिरे पुणे : पुणे महानगरपालिकेच्या कनिष्ठ अभियंता पदाच्या भरती प्रक्रियेत प्रश्नपत्रिका फुटल्याचे प्रशासनाने मान्य केले असून, पुरावे समोर आल्यानंतर तीन उमेदवारांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. त्यामुळे संपूर्ण भरती प्रक्रिया रद्द करून पारदर्शक पद्धतीने फेरपरीक्षा घ्यावी, अशी मागणी शिवसेना पुणे शहर प्रमुख प्रमोद नाना भानगिरे यांनी केली आहे. “तीन उमेदवारांवर कारवाई झाली म्हणजे गैरप्रकार केवळ त्यांच्यापर्यंत मर्यादित होता, असे कसे मानता येईल? प्रश्नपत्रिका आणखी किती जणांपर्यंत पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची सखोल चौकशी झाली आहे का? त्याच निकालाच्या आधारे नियुक्त्या करणे म्हणजे प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय आहे,” असा सवाल भानगिरे यांनी उपस्थित केला. या प्रकरणात महापालिका प्रशासनातील काही बड्या व्यक्तींच्या सहभागाबाबत खात्रीदायक माहिती असल्याचा दावा करत, “प्रश्नपत्रिका बाहेर कशी गेली, ती कोणाकडे पोहोचली आणि त्याचा लाभ कोणी घेतला, याची निष्पक्ष चौकशी झाली पाहिजे. दोषी कोणत्याही स्तरावर असो, त्यांच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड केली जाणार नाही. भरती प्रक्रिया रद्द करून फेरपरीक्षा घेतली नाही, तर तीव्र आंदोलन उभारू,” असा इशारा भानगिरे यांनी दिला.0
0
Report
पुणे में गणेशोत्सव के दौरान ध्वनि प्रदूषण रोकथाम की मांग, नागरिक मोर्चा निकला
Pune, Maharashtra:पुण्यात गणेशोत्सव डिजेमुक्त व्हावा, यासाठी अभिनव चौकात काही जागरूक पुणेकर जमा झालेत. डिजे आणि डॉल्बीच्या आवाजाला आता सहन होत नाही तो बंद झालाच पाहिजे असे या ज्येष्ठ नागरिका्चा म्हणणं होतं. आयोजक संघटनेनं आजचा मोर्चा रद्द केला असूनही पुणेकर डिजेविरोधात निषेध नोंदवण्यासाठी रस्त्यावर उतरलेत. अभिनव चौक ते शनिवारवाडा हा मोर्चा निघत आहे. ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी केली जावी, एवढीच आमची मागणी आहे. सण उत्सवात ध्वनीप्रदुषण कायद्याची अंमलबजावणी झालीच पाहिजे. उत्सव हवा प्रदुषण नको.0
0
Report
Advertisement
पुणे गणेशोत्सव में डीजे बैन की मांग तेज; ढोल-ताश की परंपरा जरूरी
Pune, Maharashtra:पुणे गणेशोत्सव हा परंपरेचा उत्सव असल्याने तो ढोल ताशांच्या गजराजच साजरा झाला पाहिजे, त्यात डिजे सारख्या कर्णकर्रश्श वाद्याला कुठेही स्थान असता कामा नये, त्यामुळे पुणे शहरात डिजे बंदी ही झालीच पाहिजे, अशी मागणी गुडलक चौकात जमा झालेल्या पुणेकरांनी केलीय0
0
Report
पुणे में ध्वनि प्रदुषण पर विद्यानंद बापट की भाषा, गणेश मंडळों का विरोध कायम
Pune, Maharashtra:ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकरांनी आवाज उठवल्याबद्दल व्हिसल ब्लोअर विद्यानंद बापट यांनी आनंद व्यक्त केलाय...पण गणेश मंडळांनी टोकाचा विरोध करूनही ते लाउडस्पीकर बंदी आणि रस्त्यात मंडप न टाकण्याच्या भूमिकेवर आजही ठाम आहेत...गणेश मिरवणुका थेट रिंगरोड नेण्यात याव्या, या त्यांच्या अतिशय टोकाच्या भूमिकेवर गणेश मंडळांकडून प्रचंड टीका झाली पण विद्यानंद बापट आजही आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...त्यांचं साधं म्हणणंय की, तुमच्या सण उत्सवाचा इतरांना ञास नको, पाहूयात पुण्यातील ध्वनीप्रदुषण लढ्याचा आवाज बनलेले विद्यानंद बापट नेमकं काय म्हणतात ते...त्यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...0
0
Report
पुणे के डीजे समर्थकों की चौपाल: ढोल की आवाज़ पर बहस
Pune, Maharashtra:Pune dj supporters chaupal डिजे समर्थक गणेश मंडळांनी माञ आम्ही यावर्षीही डिजे वाजवणारच अशी भूमिका मांडलीय...तुम्हाला डॉल्बीच्या आवाजाचाच प्रॉब्लम आहे तर मग ढोल पथकं आवाज वाढवत नाहीत का? असा उलटसवाल ही डीसे समर्थक मंडळं करतात... उदय महाले, डिजे समर्थक मंडळ0
0
Report
Advertisement
पुणे गणेशोत्सव पर डीजे विवाद: शिंदे पर मनसे का आरोप, ठाणे तक गया मामला
Pune, Maharashtra:दरम्यान, पुण्यातील या निर्बंध मुक्त गणेशोत्सवाला तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे हेच जबाबदार असल्याचा गंभीर आरोप मनसेचे सरचिटणीस हेमंत संभोस यांनी केलाय... कोविडनंतर एकनाथ शिंदे यांनी पुण्यात येऊन निर्बंधमुक्त गणेशोत्सव साजरा करा, ही घोषणा केली नसती तरी आज कदाचित ध्वनीप्रदुषणाच्या बाबतीत एवढी भयानक परिस्थिती ओढवली नसती, असंही मनसेच्या संभोस यांनी म्हटलंय...त्यांच्या आरोपामुळे पुण्याज गणेशोत्सव डीजे दणदणाटाचा वाद आता ठाण्यात जाऊन पोहोचलाय0
0
Report
पुणे में गणेशोत्सव के ध्वनि प्रदुषण के खिलाफ नागरिकों की रैली
Pune, Maharashtra:पुण्यात आज गणेशोत्सवातील वाढत्या ध्वनी प्रदुषणाविरोधात सामान्य पुणेकर उस्फुर्तपणे रस्त्यावर उतरल्याचं बघायला मिळाले, ज्येष्ठ नागरिकांनी तर अभिनव चौक ते शनिवारवाडा असा मोर्चाही काढला इकडे गुडलक चौकातही डिजेमुक्तीचा आवाज घुमला....पाहुयात पुण्यात ध्वनीप्रदुषणावरून कसं रण पेटलंय ते...उत्सव हवा पण प्रदुषण नको संघटनांनी मोर्चा रद्द करूनही पुणेकर उतरले रस्त्यावर...व्हीओ...पुणे पालिकेत विद्यानंद बापट यांना गणेश मंडळ कार्यकर्त्यांनी सभागृहाबाहेर काढल्यापासून पुण्यात डिजेविरोधातला आवाज चांगलाच वाढू लागलाय...विशेष म्हणजे आंदोलन पुकारणाऱ्या संघटना गणेश मंडळांना मॅनेज होऊनही सामान्य पुणेकर स्वयंस्फुर्तिने रस्त्यावर उतरले...अभिनव चौकातून शनिवार वाड्यावर मोर्चा काढलेल्या ज्येष्ठ पुणेकरांची मागणी अतिशय साधी सिंपल होती, ध्वनीप्रदुषण कायद्याचीं अंमलबजावणी करा, एवढीच त्यांची मागणी होती पुण्यात डिजे विरोधात एवढा आवाज घुमूनही डिजे समर्थक गणेश मंडळं माञ, आपल्या भूमिकेवर ठाम आहेत...डिजे हा वाजणारच अशी भूमिका वडारवाडीतील गणेश मंडळाचे अध्यक्ष उदय महाले यांनी मांडली...तुम्हाला ढोलताशाचे ध्वनी प्रदुषण चालते मग डिजेचाच काय ञास होतोय, आणि मुळात पारंपरिक वाद्यांचा आग्रह धरणारे आम्हाला ढोल पथकं आणून देणार आहेत का? आणि तेवढी ढोलपथकं आहेत का? असे परखड उलट सवाल माजी नगरसेवक उदय महाले विचारतात...डीजे विरोधापेक्षा समर्थकांची संख्या जास्त असल्याचा दावा ही महाले करतात...दरम्यान, पुणे गणेशोत्सवात वाढलेल्या या ध्वनी प्रदुषणाला तत्कालीन मुख्यमंञी एकनाथ शिंदे जबाबदार असल्याचा आरोप मनसे सरचिटणीस हेमंत संभुस यांनी केलाय...कोविडनंतर एकनाथ शिंदे सीएम म्हणून पुण्यात आले आणि निर्बंधमुक्त गणेशोत्सवाची घोषणा करून गेले, तेव्हापासून पुणेकरांना या उत्सव कालीन ध्वनीप्रदुषणाचा ञास सहन करावा लागताय, असं संभोस म्हणतात. काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनीही या डिजेवादात उडी घेतलीय, लाउडस्पीकर विरोधात आवाज उठवणाऱ्या विद्यानंद बापटांना भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे दमबाजी करत असतील तर सामान्य पुणेकरच भाजपला सत्तेतून खाली खेचतील, असा इशारा जगताप देतात व्हीओ..."डिजे आवाज वाढव तुला आयची शपथ हाय..." हे गाणं तुम्ही ऐकलंत असेल पण पुण्यात याच डिजेवरून रण पेटल्याचं बघायला मिळतंय...पण याच वादाला डिजे विरूद्ध ढोलताशा या पारंपरिक वाद्य पथकांच्या अंतर्गत स्पर्धेची किनार असल्याचं ऐकायला मिळतेय...पण ध्वनी प्रदुषणाच्या या दणदणाटात राजकीय कार्यकर्त्यांचा व परस्परविरोधी कलकलाट भलताच वाढल्याचा बघायला मिळतोय...0
0
Report
नाशिक कांग्रेस कैंप शुरू, भ्रष्टाचार-अशांत वातावरण गवल्या जाते
Nashik, Maharashtra:नाशिक नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाचे शिबिर सुरू आहे त्यासाठी आलो नाशिकमध्ये मी आलो मात्र रस्त्यांचे परिस्थिती अतिआय बिकट आहे. नाशिकध्ये चार मंत्री आहे. आम्ही पुढच्या काळात नाशिककरांना आणि सिंहस्थ कुंभमेळ्याच्या अनुषंगाने येणाऱ्या नागरिकांना मिठी अडचण निर्माण होत आहे. ही अर्धवट कामे पूर्ण होईल का असा प्रश्न पडला आहे ऑन सरकार मॅच फिक्सिंग करून हे सरकार आले आहे. एकीकडे सनातन धर्माचे सिंहस्थ आहे.. हिंदू धर्माचे आम्हीच पाईक आहोत हा बनाव हे सरकार करत आहे. गोबल टेंडर फडणवीस यांनी काढायला पाहिजे. बनावट वर्क ऑर्डर प्रकरण समोर आले मंत्र्याच्या घरातील संशयित आरोपी निघाले रस्ते अपघात मध्ये नागरिक मृतमुखी पडले सरकार वर गुन्हा दाखल झाला पाहिजे माजलेल सरकार आहे. श्री रामाला देखील त्यांनी सोडले नाही विकासाठी मोठा खर्च होत आहे साधू महंत यांना ही बोलू देत नाही. सरकार मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारांना बरबटलेला आहे ऑन आदिवासी मंत्री आदिवासी विद्यार्थी आंदोलन करत आहे. पुण्यामध्ये राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना सोबत चर्चा केली. काल मुख्यमंत्री यांनी आंदोलन संपले असे जाहीर केले राहुल गांधी हे येणार आहे आणि विद्यार्थ्यांना भेटणार आहे. आदिवासीच्या पैशांवर यांनी डल्ला मारली. सरकारने जनाची नाहीतर मनाची ठेवली पाहिजे. ऑन कोर्ट परीक्षा भाजपाचा मंत्री कधी राजीनामा देणार नाही अशी सिंह गर्जना हे सरकार करत होते दिल्लीत झालेल्या विद्यार्थी आंदोलनामुळे Gen Z मुळे काय झालं हे आपण बघितले. अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत काय झाल सरकार मधले मंत्री त्याचे कुटुंबीय यात सहभागी आहे अन्न आणि औषध प्रशासनाच्या परीक्षेत जे झाले त्यात कुंपण शेण खात आहे अशी परिस्थिती मुख्यमंत्री यांनी लक्ष घालून ह्या मंत्र्याचे राजीनामे घेतले पाहिजे मुख्यमंत्री गांधारी सारखे पट्टी बांधून बसले आहे. ऑन राहुल गांधी दौरा अजून प्रोग्राम आलेला नाही त्यावर मी लगेच काही बोलणार नाही ऑन आदिवासी विद्यार्थी आंदोलन मी भेटणार त्याचसोबत चर्चा करणार. ऑन मोहन भागवत ते मोहन भागवत आहे, काहीही बोलू शकता ते 75 वर्ष झाले नंतर रिटायर अशी आणत आहे त्यांनी भारतात बोले पाहिजे ते इतर देशात वेगळे बोलता इकडे बोलता ऑन सुप्रिया सुळे विकास कामात कधी राजनकरण झाले नाही सत्तेच्या मतदार संघात काम इतर खड्डे असे नको ऑन मनोज जरांगे पाटील - हे सरकारचे पाप आहे - देवेंद्र फडणवीस यांनी घोषणा केली आम्ही सत्तेत आलो की मराठा, धनगर यांना आरक्षण देऊ आज सत्तेत आहे - ओबीसी vs मराठा, धनगर vs आदिवासी असे खूप जाती आहे यावर ते बोले - जनतेचे मूळ प्रश्न बाजूला ठेवण्यासाठी हे असे मुद्दाम करत आहे हा हा प्रश्न आम्हाला पडला. - हाके, मनोज जरांगे यांना समोरासमोर आणता - ही नूराकुस्ती सुरू आहे. फडणवीस शिंदे यांच्यात आपण निवडणुकीत पहिले. - राज्यात कायदा व सुव्यवस्था कुठ राहिले आहे. - नागपूर मध्ये गुन्ह्याचा आलेख वाढला आहे. - IPS लॉबी मध्ये चांगल्या अधिकारी यांना बाजूला ठेवायचे असे सुरू आहे ऑन रोहیت पवार ते आमच्या जवळ आले नाही, त्यांनी राहुल गांधी यांची भेट झाली होती अजित पवार यांच्या मृत्यू नंतर राज्यात गुन्हा दाखल नाही म्हणून कर्नाटक मध्ये गुन्हा दाखल करून घेतला आजही अजित पवार यांच्या अपघात करून घेतला असा समज आहे अपघात की घातपात यावर अजूनही शाश्वती नाही. मला सुळे किंवा रोहित यांच्यावर यांच्या पक्षात किंवा कुटुंबात बोलणार नाही ऑन नाशिक पालकमंत्री सत्तेत भाजप भारी आहे. नाशिकमध्ये भुजबळ यांना मोठा अभ्यास आहे छगन भुजबळ यांना संधी मिळाली पाहिजे होती सरकार मध्ये देवेंद्र फडणवीस यांनी वजन दाखवलं. मंत्री नाही तर मीच मुख्यमंत्री म्हणून काहीही करू शकतो हे त्यांनी दाखवून दिले ऑन मराठी एकीकरण समिती मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिला मात्र त्याचा कुठेही फायदा नाही उद्योग आणण्यामध्ये एक नंबर की जाण्यामध्ये एक नंबर हे देखील फडणगेस यांनी सांगितले पाहिजे. देशात सर्वात जास्त बेरोजगार हे महाराष्ट्रात आहे. एमपीएससी परीक्षेत जागा भरायच्या होत्या 17 लाख अर्ज आले 6हजार जागासाठी. बेरोजगार मोठ्या प्रमाणात आहे. ऑन एकनाथ खडसे एकनाथ खडसे यांना दीर्घायुष्य लाभो अशी माझी प्रार्थना भाजपने त्यांच्यावर अन्य का केला हे एकनाथ खडसे देखील विचारत आहे आणि आम्ही देखील विचारतो भाजपसाठी खूप मोठे काम एकनाथ खडसे यांनी केले मात्र आज त्यांचे कोणतेही भाजपचे नेते कार्यक्रमासाठी नाही.0
0
Report
Advertisement
नाशिक परीक्षा केंद्रात मोबाईलने नकल: बूटात लपला फोन पकडा गया
Nashik, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या शिपाई पदासाठी घेण्यात आलेल्या परीक्षेत गैरप्रकाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नाशिकच्या कॉलेज रोडवरील एसएमआरके महाविद्यालयातील परीक्षा केंद्रावर परीक्षार्थीने चक्क बुटात मोबाईल लपवून कॉपी केलीये...26 एप्रिल 2026 रोजी दुपारी 4.30 ते सायंकाळी 6 वाजेदरम्यान परीक्षा हॉल क्रमांक 11 मध्ये हा प्रकार घडला. परीक्षा सुरू झाल्यानंतर काही वेळातच हॉलमधील परीक्षार्थींना मोबाईलवर मेसेज आल्याचा आवाज ऐकू आला. त्यानंतर सुपरवायझरने सर्व परीक्षार्थींना मोबाईल, स्मार्टवॉच किंवा इतर इलेक्ट्रॉनिक साधने जमा करण्याच्या सूचना दिल्या. मात्र, कोणत्याही परीक्षार्थीने मोबाईल जवळ असल्याचे मान्य केले नाही. त्यानंतर मुख्य कंडक्टर, सहाय्यक कंडक्टर, सुपरवायझर आणि पोलिसांच्या उपस्थितीत सर्व परीक्षार्थींची अंगझडती घेण्यात आली. यावेळी बैठक क्रमांक पी-151621 वरील परीक्षार्थी मनोज निवृत्ती वाघ, याच्या उजव्या पायाच्या बुटात मोबाईल आढळून आला. त्याच्याकडे विचारणा केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. मोबाईल, प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका पुढील कारवाईसाठी जप्त करण्यात आल्या. परीक्षा उत्तीर्ण होण्याच्या उद्देशाने मोबाईलचा वापर करून प्रश्नपत्रिकेतील उत्तरे सोडवण्याचा प्रयत्न केल्याचा प्रथमदर्शनी आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी मनोज निवृत्ती वाघ याच्याविरुद्ध गंगापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे....0
0
Report
सोलापुर ब्रेकिंग: विधायक ने सामान्य कर्मचारियों के घर जाकर मन की बात सुनी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सर्वसामान्य कार्यकर्त्याच्या घरी जात आमदारांनी ऐकला ‘मन की बात’ कार्यक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘मन की बात’ या कार्यक्रमाच्या माध्यमातून देशवासीयांना संबोधित केले. आपल्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या घरी उपस्थिती लावत शहर मध्यचे आ. देवेंद्र कोठे यांनी सदर कार्यक्रमाचा लाभ घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ‘मन की बात’च्या माध्यमातून देशातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती, सामाजिक उपक्रम तसेच देशाच्या विकासाशी संबंधित विविध विषयांवर नागरिकांशी संवाद साधतात. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण आज देशभरात करण्यात आला. आमदारांनी सामान्य कार्यकर्त्याच्या घरी जाऊन कार्यक्रम ऐकल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. यावेळी स्थानिक कार्यकर्ते व नागरिक उपस्थित होते. पंतप्रधान मोदी यांच्या विचारांमधून प्रेरणा घेऊन समाजाच्या आणि देशाच्या विकासासाठी प्रत्येकाने आपापल्या परीने योगदान द्यावे, असा संदेश यावेळी देण्यात आला.0
0
Report
रत्नागिरी में 10 बाइक सवारों पर कार्रवाई, तेज शोर वाले सिलेंसर जप्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत १० दुचाकीस्वारांवर कारवाई.. कर्कশ্য आवाज करणारे सायलेन्सर केले जप्त लोकांना होणारा त्रास लक्षात न घेता कर्णकर्कश आवाज करत ऐटीत गाड्या चालवणाऱ्यांना रत्नागिरी पोलिसांनी चांगलाच दणका दिला आहे. रत्नागिरी शहरात अशा १० दुचाकीस्वारांवर कारवाई करुन त्यांना तब्बल २९ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे. तसेच कर्कश्य आवाज करणारे सायलेन्सरही जप्त केले आहेत.. गाडीच्या मूळ सायलेन्सरमध्ये बदल करुन मोठा आवाज करत गाड्या चालवण्याची तरुणांमधील क्रेझ इतर लोकांसाठी त्रासदायक ठरत आहे. त्यातही रात्रीच्यावेळी हुल्लडबाजी करुन शांतताभंग करत अशा गाड्या फिरवणाऱ्यांची संख्याही वाढली आहे. अशा दुचाकीस्वारांबाबत रत्नागिरी शहर पोलिसांकडे अनेकदा तक्रारी आल्याामुळे त्याची गंभीर दखल घेत रत्नागिरी शहर पोलिसांनी ही कारवाई केली. दुचाकीच्या सायलेन्सरमध्ये बदल केलेल्या आणि शांतताभंग करणाऱ्या दहा दुचाकीस्वारांना पोलिसांनी दणका दिला आहे. त्या सर्वांकडून २९ हजार रुपये दंड वसुल करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
