445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
महाराष्ट्र में पेपरफुटी पर टास्क फोर्स से सवाल: क्या भर्ती प्रक्रियाएं निष्पक्ष रहेंगी?
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - संजय राऊत, नेता शिवसेना उद्धव ठाकरे सेना - इतकं मोठं सरकार आहे, महानगृहमंत्री आहेत, तरी पेपर फुटत आहेत, वारंवार फुटत आहेत. काल हजारो विद्यार्थी रस्त्यावर उतरले आहेत. टास्क फोर्स नेमण्याची का वेळ आली आहे? दहा वर्षांपासून राज्यात देवेंद्र फडणवीस यांचे राज्य आहे. तरीही मुलांच्या आयुष्यात पेपरफुटीसारखी प्रकरणे समोर येत आहेत. दुर्दैवाने सांगावं लागत आहे, NEET असो किंवा MPSC असो, इतर स्पर्धा परीक्षा असो, या सगळ्या पेपरफूटीच्या रॅकेटमध्ये भाजपचे कार्यकर्ते आहेत. UPSC प्रकरणात पुण्यात लोकांना पकडले आहे. हे सर्व लोक भाजपचे कार्यकर्ते आहेत. टास्क फोर्स काय करणार आहे? जिल्ह्या-जिल्ह्यात पोलीस यंत्रणा काय करत आहे? दुसरी यंत्रणा असेल तर काम वाढत आहे. कोणत्याही टास्क फोर्सशिवाय लोकसेवा आयोगाची सेटिंग भरती प्रक्रिया चालायची, तेव्हा मला असं वाटायचं. ऑन अयोध्या मंदिर अयोध्येत अशी वेळ आली आहे ki, प्रभू श्रीरामजींच्या मंदिरात दानपेटीच्या रांगा दिसत आहेत. भाजपच्या राज्यात दानपेटीची चोरी होत आहे, शाळा लुटल्या जात आहेत. एअर मार्शलला येऊन सीओ बनवला आहे. पहिले आमचा पुजारी सर्व काही बघत होता. एअर मार्शलला त्या ठिकाणी बसवलेलं आहे. मोठमोठे अधिकारी त्या ठिकाणी बसवले आहेत. राम मंदिरालासुद्धा सोडलं नाही, मग विद्यार्थ्यांना का सोडणार आहेत? DJ पश्चिम बंगाल दोन्ही सरकार राज्यात भाजपचे सरकार आहे. ममता बॅनर्जींचे सरकार तर नाही आहे ना? पश्चिम बंगालमध्ये आता म्हणता, बॅनर्जी हिंदूविरोधी आहेत. म्हटलं असतं. यामध्ये नागपुरात गाईडलाईन आली आहे. इथेही देवेंद्र फडणवीस यांचे भाजपचे सरकार आहे. नागपुरात संघाचे मुख्यालय आहे. त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. कारण DJच्या आवाजाचा त्रास होतो. त्यापासून भूकंप येत आहे, त्याचा ब्रेनवर होतो, हार्टवर होतो, आजारी लोकांना त्रास होतो. त्या गोष्टीत सर्वसमावेशक गाईडलाईन सर्व देशांमध्ये हवी आणि त्याच्या पालन व्हायला हवे. गोवा भाजप बैठक एकनाथ शिंदे भाजपमध्ये मर्ज झाले पाहिजेत. ..त्यांच्या पार्टीचे कमांडर चीफ अमित शाह आहेत. एकनाथ शिंदे यांची पार्टी नाही गट आहे. गोव्यामध्ये कधी, दिल्लीत कधी अमित शहा यांच्या पाठीमागे धावा लागतं आहे. भाजप शिंदे गट यांचे विचारधारा एक होऊ शकते मात्र बाळासाहेब ठाकरे विचारधारेत साम्य आहे मात्र आम्ही पूर्णपणे वेगळे आहोत. MPSC लोकसेवा आयोग बरखास्त केला पाहिजे. सर्वसमावेशक पद्धतीने प्रक्रिया आणि परीक्षा झाली पाहिजे. विश्व हिंदू परिषद गरबा समर्थन नितेश राणे तो नितेश राणे पागल माणूस आहे. पागल झालेला आहे. हे नवीन-नवीन मुल्ला बनते, जोरात मानतात हिंदुत्वाचे नवीन मूल्य आहेत या व्यक्तीचे. या व्यक्तीचे नाव घेतलं. त्याच व्यक्तीने RSSला हाफ चड्डीवाला म्हटलं होतं. वीर सावरकरांना माफीवीर म्हणणारा हाच व्यक्ती आहे. हिंदुत्व अशा पाठ लोकांना शिकवतील? देशाचे संस्कार माहिती नाहीत, संस्कृती माहिती नाही, हिंदुत्वाचे पाठ शिकवतील का? धंदे भडकावण्याचा प्रकारच्या बाते करतील. मंत्र्यांच्या माध्यमातून बोलायला पाहिजे. आपण आहेत कोण, त्यांनी सांगितलं पाहिजे. सगळ्यात अगोदर आपण ज्या गोष्टी ठेवल्या आहेत, शंकर यासारखे यांचे मान्यता आहे का? आपल्या हिंदुत्व धर्माचे सर्व मोठे त्यांच्यासोबत गोष्ट करा. नागपुरातून मोहन भागवत यांच्यासोबत येऊन गोष्ट करा. न्यूयॉर्कमध्ये मोहन भागवत यांनी वेगळी गोष्ट म्हटली. आपण वेगळी गोष्ट करता. हा देश काय आहे, हिंदुत्व काय आहे? ऑन विशाखा राऊत एका नगरसेवक पदासाठी विशाखा राऊत पक्ष सोडतील असं नाही..नगरसेविका विशाखा राऊत या फक्त जुन्या जनतेच्या कळवळ्याच्या नेत्या आहेत. त्यांच्या विरोधात कटकारस्थान रचले जात आहे. सूडबुद्धीने आमच्या नगरसेवकांचे सदस्यत्व रद्द केले जात आहे. भाजपाच्या १७ नगरसेवकांच्या जात पडताळणी होत नाही. प्रमाणपत्रावर शिवसेना शिंद गटाचे सात-आठ जण जात पडताळणी होत नाही... जे विरोधात आहे त्यांची जात पडताळणी होते.. हमारे भी दिन आ जायेंगे तब देख लेंगे.. मनोज जरांगे यांची एकनाथ शिंदेंवर टीका एकनाथ शिंदे विश्वासपात्र नाहीत. बाळासाहेब ठाकरे, उद्धव ठाकरे यांचे झाले नाहीत ते मनोज जरांगे कसे होणार भीषण संकट सोयाबीन, विदर्भ ‘विरोधक’ हा शब्द चुकीचा आहे. आपण महाराष्ट्राचे नागरिक आहोत. विदर्भात दुष्काळाची परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. राज्याचे मुख्यमंत्री विदर्भातील, नागपूरचे आहेत. अनेक मंत्री विदर्भाचे कॅबिनेटमध्ये आहेत. अजूनपर्यंत दुष्काळाविषयी संवेदना व्यक्त केली असेल, असे ऐकले नाही. जो शेतकरी दुष्काळाशी संघर्ष करतोय, त्याला दिलासा देणारे काही वक्तव्य, मदत किंवा काही जाहीर झालं का? सोयाबीनबाबत विशेषतः मुख्यमंत्री बोलत नाहीत. मंत्री गर्भावर बोलतात, मुसलमानांवर बोलतात, पाकिस्तानवर बोलतात, याच्यावर बोलतात. विदर्भातला शेतकरी आत्महत्येच्या कड्यावर उभा आहे. दुष्काळामुळे त्याच्यावर एकही मंत्री गांभीर्याने बोलताना दिसत नाही. नितेश राणे यांची राहुल गांधींवर टीका राहुल गांधींची तुलना कोणासोबत करता? याआधी राहुल गांधींचे बूट उचलणारे हेच लोक आहेत.0
0
Report
भंडारा में महायुति-शिंदे गट बनाम कांग्रेस के बीच तकरार तेज
Bhandara, Maharashtra:महायुति मध्ये भोंडेकराणवर अन्याय होत आहे, त्यामुळे त्यांनी आमच्या काँग्रेस पक्षात याव.. मुकुंद साखरकर काँग्रेस जिल्हाध्यक्ष भंडारा भंडारा जिल्ह्यात महायुती शिवसेना शिंदे गट भाजपा यांचा वाद विकोपाला गेला आहे... यावर आता काँग्रेस कडून थेट शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना जाहीरपणे पक्षात येण्याचे आवाहन केलेले आहे. यावेळी साखरकर यांनी महायुतीचे आमदार धोंडेकर यांच्या विकास कामांची स्तुती करत त्यांच्यावर महायुती अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. यामुळे जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापले असल्याचे सांगितले जाते आणि शिंदे गट आणि काँग्रेस यांच्यात काही छुपी युती तर नाही ना असाही आता प्रश्न निर्माण होत आहे.0
0
Report
कोल्हापुर के सैनिक टाकळी में जमीन हस्तांतरण रद्द कराने की मांग पर मोर्चा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील सैनिक टाकळी इथल्या ग्रामस्थांनी एमआयडीसी जमीन हस्तांतरणाचा शासन निर्णय रद्द करावा या मागणीसाठी पाठपुरावा करत आहेत. या मागणीला घेऊनच आज सैनिक टाकळी जल-जमीन-जीवन बचाव कृती समितीच्या वतीने शिरोळ तहसीलदार कार्यालयावर आंदोलन केले जाणार आहे. या आंदोलनाच्या माध्यमातून प्रस्तावित सैनिक टाकळी एमआयडीसीसंदर्भातील जमीन हस्तांतरणाचा शासन निर्णय रद्द करावा तसेच माजी सैनिक व शेतकऱ्यांना मारहाण व राष्ट्रध्वजाचा अवमान केल्याप्रकरणी आमदार राजेंद्र पाटील यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी देखील केली जाणार आहे. शिरोळ मधील शिवाजी पुतळा येथून तहसीलदार कार्यालयापर्यंत काही वेळेत हा मोर्चा काढला जाणार आहे.0
0
Report
Advertisement
कर्जत में कांदे के विवाद पर भाई ने तीन बहनों पर लकड़ी डंडों से हमला
Ahilyanagar, Maharashtra:शेतातील कांदा घेतल्याच्या शुल्लक कारणावरून जोरदार मारहाण केल्याची घटना अहिल्यानगर जिल्ह्यात घडली आहे... अहिल्या नगरच्या कर्जत तालुक्यातील राक्षस वाडी येथे हा धक्कादायक प्रकार घडला असून भावाच्या शेतातील कांदे न विचारता घेतल्यामुळे भावांनीच तीन बहिणींना लाकडी दांड्याने जोरदार मारहाण केली आहे या मारहाणीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असून कर्जत तालुक्यासह जिल्ह्यात या मारहाणीची चर्चा सध्या सुरू आहे दरम्यान मारहाण करणाऱ्या भावांची तक्रार पोलिसात केल्यानंतर पोलिसांकडे दोन्ही बाजूच्या तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ के माळुंगे MIDC में ड्रोन से रील बनाते चार युवक गिरफ्तार: पुलिस ने बड़ी कार्रवाई
Chakan, Maharashtra:पिंपरी-चिंचवडच्या म्हाळुंगे एमआयडीसी भागात भररस्त्यात वाहने आडवी लावून ड्रोनच्या सहाय्याने रिल्स बनवणाऱ्या हुल्लडबाजांवर पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. संत तुकाराम चौक ते भिंडेवाडी रस्त्यावर फॉर्च्युनर, स्कॉर्पिओसह चार गाड्या भरधाव व समांतर चालवून वाहतूक ठप्प करणाऱ्या चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. म्हाळुंगे पोलिसांनी यातील चारही आलिशान गाड्या जप्त केल्या असून तिघांना तात्काळ ताब्यात घेतले आहे. सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी सार्वजनिक सुरक्षितता धोक्यात घालणाऱ्यांवर आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.0
0
Report
सोलापुर में मराठा समुदाय ने पुणे-राष्ट्रीय महामार्ग पर रास्ता रोको शुरू किया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात मराठा समाज आक्रमक, सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलनाला सुरुवात मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज उतरला रस्त्यावर सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरील बाळे पुलाजवळ रास्ता रोको आंदोलन शेकडोंच्या संख्येने मराठा समाज बांधव रास्ता रोको आंदोलनात सहभागी सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा मनोज जरांगे पाटील यांची तब्येत दिवसेंदिवस खालावत असल्याने मराठा समाज बांधवांच्या भावना तीव्र0
0
Report
Advertisement
संगमनेर में मंत्री-नेता के बीच तकरार, तांबे के बयान से राजनीतिक हलचल
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि बाळासाहेब थोरात यांच्यातील राजकीय वैर सर्वश्रुत आहे.. मात्र आमदार सत्यजीत तांबे यांनी, मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच विखे पाटलांचं तोंडभरून केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.. संगमनेर नगरपालिकाेच्या वतीने विविध विकास कामांचा लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळा, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत पार पडला.. शहरात सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी, संगमनेर पालिकेला भरघोस निधी दिल्याबद्दल आमदार सत्यजीत तांबे यांनी त्यांचे जाहीर आभार मानले.. मात्र दुसऱ्यांनी याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला भाषणादरम्यान त्यांनी नाव न घेता आमदार अमोल खताळ यांना लगावलाय.. मामा बाळासाहेब थोरात यांच्या समोरच सत्यजीत तांबे यांनी विखे पाटलांचे आभार मानत कौतुक केल्याने, त्यांच्या वक्तव्याची चांगलीच चर्चा रंगली आहे..0
0
Report
गैंग ऑफ फोर के कथित अभियान से महाराष्ट्र में सतर्कता बढ़ी
Mumbai, Maharashtra:महाराष्ट्राच्या जनतेने सावध राहावे... महाराष्ट्रामध्ये "गॅंग ऑफ 4" कार्यरत झाली आहे.... अरुण सावंत. २०२९ मध्ये जर सत्तेमध्ये यायचं असेल तर मुंबई आणि महाराष्ट्राला जास्तीत जास्त बदनाम करा. हे या गॅंग ब्रीदवाक्य आहे उद्दिष्ट आहे या "गॅंग ऑफ फोर" मध्ये शामिल आहेत राहुल गांधी, संजय राऊत, आदित्य ठाकरे आणि रोहित पवार. दररोज यांचा एक कलमी कार्यक्रम ठरलेला आहे तो म्हणजे खोट्या बातम्या पसरवा, जास्तीत जास्त बदनाम करा, जनतेमध्ये भ्रम निर्माण करा. "गॅंग ऑफ फोर" कडे महाराष्ट्राच्या विकासाचा कोणताही पॉझिटिव्ह अजेंडा नाही महाराष्ट्राच्या जनतेने सजग आणि सावध राहिलेलं बरं महायुती मधील तीनही पक्षांनी आपापसातील हेवे दावे बाजूला ठेवून 2047 पर्यंतचे विकासात्मक उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवावं एकोप्याने काम करावे. श्रीमान देवेंद्र फडणवीस आणि श्रीमान एकनाथ शिंदे साहेबांचे हात बळकट करावेत. अन्यथा.... अरुण सावंत शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते "बस... अब लडना है"...0
0
Report
नाशिक में मराठा संघटन का महामंथन: SEBC आरक्षण पर सरकार घेरने की तैयारी
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये आज मराठा संघटनांचे राज्यस्तरीय महामंथन; SEBC आरक्षणावरून सरकारला घेरण्याची तयारी मराठा समाजाच्या SEBC आरक्षणाच्या मुद्यावरून राज्यातील मराठा संघटना आक्रमक झाल्या असून, आज नाशिकमध्ये राज्यस्तरीय महत्त्वाची बैठक होत आहे. नाशिकच्या कालिका माता मंदिर, मुंबई नाका परिसरातील सभागृहात दुपारी १२ वाजेनंतर ही बैठक आयोजित झाली. ज्यांच्या कुणबी नोंदी उपलब्ध नाहीत, अशा मराठा समाजातील नागरिकांना SEBC प्रवर्गातून आरक्षणाचा लाभ मिळावा, तसेच सरकारने SEBC आरक्षण कायम ठेवण्यासाठी ठोस कायदेशीर पावले उचलावीत, अशी मागणी मराठा संघटनांकडून करण्यात येत आहे. मराठा समाजाचे SEBC आरक्षण घालवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप काही संघटनांकडून करण्यात येत असल्याची दृष्टीने, या बैठकीकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.बैठकीत SEBC आरक्षणाला घटनात्मक संरक्षण, कुणबी नोंदी व प्रमाणपत्रांचा प्रश्न, शैक्षणिक सवलती, सारथीच्या योजना आणि मराठा आंदोलनातील प्रलंबित मागण्यांबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.राज्यातील विविध जिल्ह्यांतील मराठा समाजाचे समन्वयक, पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आजच्या बैठकीत कोणते ठोस निर्णय घेतले जातात आणि सरकारला कोणती भूमिका कळवली जाते, याकडे मराठा समाजाचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
बाजार घटे कोथंबीर के दाम, संगमनेर के किसान ने फसल रोटावेटर से नष्ट कर डाला
Shirdi, Maharashtra:कोथंबिरीचे भाव गडगडल्याने हवालदील झालेल्या शेतकऱ्याने उभ्या पिकावर रोटाव्हेटर फिरवलाय.. संगमनेर तालुक्यातील शेतकरी पंकज आहेर यांनी चांगल्या बारभावाच्या अपेक्षेने दीड एकर क्षेत्रात कोथंबिरीची लागवड केली होती.. मात्र अपेक्षांवर पाणी फिरल्याने शेतकऱ्याने उभं पीक स्वतः नष्ट करून टाकलंय.. काही दिवसांपूर्वी कोथंबिरीला चांगला बाजारभाव मिळत होता.. पुढेही दर टिकून राहील या अपेक्षेने संगमनेर तालुक्यातील पंकज आहेर या शेतकऱ्याने दीड एकरात कोथंबिरीची लागवड केली होती.. मशागत, बियाणे, खते, औषधं आणि मजुरीवर मोठा खर्च झाला.. रात्रंदिवस मेहनत घेतली आणि पीकही जोमदार आलं.. मात्र काढणीची वेळ आली आणि बाजारभाव अचानक कोसळला.. भाव नसल्याने व्यापाऱ्यांनीही कोथिंबीर खरेदी करण्यास नकार दिला.. त्यामुळे उत्पादन खर्चही निघणार नसल्याने हवालदील झालेल्या आहेर यांनी कोथिंबिरीच्या उभ्या पिकावरच रोटाव्हेटर फिरवला.. बाजारभावाच्या अनिश्चिततेने शेतकऱ्यांच्या मेहनतीची होत असलेली वाताहत दाखवणारे हे विदारक चित्र म्हणावं लागेल..0
0
Report
आंध्र प्रदेश-करणाटक में लाल प्याज की कमी से महाराष्ट्र में भाव बढ़ने की आशंका
Lasalgaon, Maharashtra:पिंपळगाव बसवंत कृषी उत्पन्न बाजार समितीत उन्हाळी कांद्याला तब्बल ६ हजार ६०० रुपये प्रतिक्विंटल, तर लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत ५ हजार रुपये प्रतिक्विंटलचा उच्चांकी दर मिळाला असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे बाजार समित्यांमध्ये मागणीच्या तुलनेत कांद्याची आवक कमी होत असल्याने दरात वाढ होत असून त्यातच दक्षिण भारतातील आंध्र प्रदेश आणि कर्नाटक तसेच उत्तरेकडील मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये नवीन लाल कांद्याची आवक सध्या कमी प्रमाणात येत आहे तर महाराष्ट्रात नवीन लाल कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात बाजारात येण्यासाठी अद्याप दोन ते अडीच महिन्यांचा कालावधी लागण्यात शक्यता आहे त्यामुळे मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी राहिल्यास बाजारभाव आणखी काही काळ चढे राहण्याची शक्यता कांदा निर्यातदार व्यापारी प्रवीण कदम यांनी व्यक्त केली0
0
Report
चंद्रपूर में गांजा तस्करी के मामले में महिला गिरफ्तार, 1.35 लाख का माल जब्त
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- आय फोन धारक गांजा वाहतूक करणारी mujerा ताब्यात, चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलिसांची धडक कारवाई, १ लाख ३५ हजारांचा मुद्देमाल जप्त अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांविरोधात सुरू असलेल्या कारवाईला मोठे यश मिळाले आहे. चंद्रपूरकडून भद्रावतीच्या दिशेने गांजाची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या एका महिला आरोपीला पोलिसांनी सायवन हायवे रोडवर नाकाबंदी करून ताब्यात घेतले. या कारवाईत गांजासह मोबाईल फोन आणि सुझुकी मोपेड असा एकूण १ लाख ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. पोलिसांनी मोपेड चालक महिलेस ताब्यात घेऊन तिची तपासणी केली असता तिच्याकडे दोन प्लास्टिक पुड्यांमध्ये गांजा आढळून आला. याशिवाय निळ्या रंगाचा Apple iPhone 11 मोबाईल देखील जप्त करण्यात आला. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
गोंदिया-बालाघाट मार्ग पर भिड़ंत: ट्रक-पिकअप की टक्कर में 3 की मौत, 11 घायल
Bhandara, Maharashtra:गोंदिया-बालाघाट मार्गावरील नागरा येथे ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात पिकअपमधील तीन जणांचा जागीच मृत्यू, तर 11 जण जखमी झाल्याची माहिती आहे. अपघातातील सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील रहिवासी आहेत. कामानिमित्त हैदराबादकडे निघालेल्या मजुरांच्या पिकअप वाहनाला नागरा परिसरात रात्रीच्या sुमारास भीषण अपघात झाला. गोंदिया-बालाघाट मार्गावर भरधाव ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर जोरदार धडक झाली. धडक इतकी भीषण होती की पिकअप वाहनाचा अक्षरशः चेंदामेंदा झाला. या दुर्घटनेत तीन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर 11 जण गंभीर जखमी झाले आहेत. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि ग्रामीण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वाहनात अडकलेल्या जखमींना बाहेर काढून तातडीने उपचारासाठी गोंदिया येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले. जखमींपैकी काहींची प्रकृती गंभीर आहे. दरम्यान, हे सर्वजण मध्य प्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील असून रोजगाराच्या कामासाठी हैद्राबादकडे जात असल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताची नोंद ग्रामीण पोलिसांनी केली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
शिंदे की शिवसेना: महाराष्ट्र राजनीति में एकनाथ का जबरदस्त दबदबा
Nagpur, Maharashtra:नागपुर — आशिष जयस्वाल, राज्यमंत्री के बारे में लाइव फीड/नफीड पाठवला। भूमरे वक्तव्य — मुझे इसकी जानकारी नहीं है. जो भी बोला गया है, उस विभाग के मंत्री जवाब देंगे. राज्य की आर्थिक स्थिति — राज्य में विभिन्न योजनाएं चलाई जा रही हैं. कर्ज माफी का बड़ा निर्णय लिया गया है. जनता को जो भाषण/वचन दिए गए हैं, उन्हें पूरा करने की कोशिश शुरू है. किसानों का कोई भी मुद्दा हो या लाडकी बहन योजना, इसमें कोई कट नहीं लगाया गया. आय से अधिक खर्च के कारण नई कामों को मंजूरी नहीं दे पाए जा रहे हैं, पुराने दायित्वों की पूर्ति कैसे होगी, इसके लिए प्रयास हैं. साथ ही सरकार की आय विविध माध्यमों से बढ़ाने के प्रयास भी चालू हैं. ऑपरेशन टाइगर — इन सब बातों को पूर्वकल्पना देकर हो रहा है. 2022 में उठापटक हुई, उसकी पूर्वकल्पना किसी ने नहीं की. राजनीति में कुछ भी तय होकर नहीं होता. एकनाथ शिंदे के नेतृत्व में बड़ी संख्या में लोग आगे आ रहे हैं. 2022 से आज तक ठाकरे गुट से कई लोग शिवसेना में आए हैं. पर शिवसेना में से किसी के बाहर जाने जैसी तस्वीर नहीं दिखी. एकनाथ शिंदे का प्रभावी नेतृत्व है. वे दिन-रात मेहनत करते हैं और लोगों ने उन्हें अपना लिया. भविष्य में एक ही शिवसेना होगी और वह होगी एकनाथ शिंदे की शिवसेना, यह काल-के-काल रेखा है. अगर लोगों का काम कराना है और राजनीतिक भविष्य बनाना है, तो शिंदे साहेब ने अपने काम से लोगों के मन में नाम बना लिया है. दिशा सालियन प्रकरण, वाझे माफी साक्षीदार — सचिन वाझे क्या आतंकवादी है? ऐसा वक्तव्य महाराष्ट्र के तत्कालीन मुख्यमंत्री ने किया था. जैसी पद्धति से उस समय सरकार के दौरा़ा वसूली कार्यक्रम चल रहा था, जिससे महाराष्ट्र की देशभर में बदनामी हुई थी. अब जैसी पद्धति से मामले सामने आएंगे, उसके अनुसार कार्रवाई की जाएगी.0
0
Report
चाकण सड़क: खड्डे बनी रहीं, प्री-कास्ट पैनल फेल; सरकार की घोषणाएं खोखली
Chakan, Maharashtra:पुण्यातील आंतरराष्ट्रीय ख्याती असलेल्या चाकण औद्योगिक वसाहतीमधील खड्ड्यांचं साम्राज्य आणि रस्त्यांची दुरवस्था अद्यापही कायम आहे. पायाभूत सुविधांच्या अभावामुळे तब्बल २० कंपन्यांनी थेट स्थलांतराचा इशारा दिल्यानंतर सरकारला जाग आली खरी; खुद्द उपमुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांनी तातडीने धाव घेत पाहणी केली. ३१ ऑगस्टपर्यंत सर्व खड्डे बुजवून रस्ते चकाचक करू, असा शब्द दिला गेला. इतकंच नाही तर 'प्री-कास्ट पॅनल'चा नवा प्रयोग राबवून रस्ते युद्धपातळीवर दुरुस्त करण्याच्या मोठ्या घोषणा झाल्या. मात्र, आज सप्टेंबरचा पहिला आठवडा उलटला तरी वास्तव काय आहे? ज्या रस्त्यांची मंत्र्यांनी प्रत्यक्ष पाहणी केली, तेच रस्ते आजही दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहेत. ज्या ठिकाणी पहिल्यांदाच 'प्री-कास्ट काँक्रीट पॅनल' बसवून रस्ते तातडीने दुरुस्त करण्याचा दावा करण्यात आला होता, तो प्रयोगही पूर्णपणे फसला असल्याचं चित्र आहे. मंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही प्रशासकीय यंत्रणेची सुस्ती कायम असल्याने उद्योजक आणि कामगारांमधून तीव्र संताप व्यक्त केला जातोय.0
0
Report
Advertisement
