icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मेहबूब शेख ने सरकार पर टीका करते हुए निंबादैत्य नांदूर में चारा डिपो शुरू की पहल

Ahilyanagar, Maharashtra:सरकारला जनाची नाहीतर मनाची थोडीशी लाज वाटत असेल , तर त्यांनी पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य नांदूरला त्यांचे प्रतिनिधी पाठवून येथील परिस्थिती पहावी... इथल्या युवकांना लोकवर्गणीतून चारा डेपो का सुरू करावा लागला? हे पाहावे असं म्हणत राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे युवा नेते मेहबूब शेख यांनी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडलं... निंबादैत्य नांदूर येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विकास वाघ यांनी लोकसहभागातून चारा डेपो सुरू केला आहे या चारा डेपोला मेहबूब शेख यांनी भेट दिली. मागील महिन्यांपासून अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने पाठ फिरवली आहे... त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न उपस्थित झाला आहे... हीच गोष्ट लक्षात घेऊन पाथर्डी तालुक्यातील निंबादैत्य नांदूर येथील युवकांनी सातत्याने प्रशासनाकडे पाठपुरावा करून देखील चारा डेपो सुरू न झाल्याने त्यांनी लोकसहभागातून चारा डेपो सुरू केला आहे... या चारा डेपोला भेट देत मेहबूब शेख यांनी सरकारवर टीका केली आहे
0
0
Report

अहिल्यानगर गणेशोत्सव: 400 ने ली शांतता प्रतिज्ञा, 492 लोगों पर तडीपार की चेतावनी

Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- गणेश उत्सव पोलीस कारवाई फीड 2C Anc- गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर अहिल्यानगर पोलिसांकडून कायदा आणि सुव्यवस्था अबाधित रहावा यासाठी 400 जणांकडून शांतता राखण्याचे प्रतिज्ञापत्र घेण्यात आले आहे... तर ज्यांच्यावर यापूर्वी गुन्हे दाखल आहेत, अशा 492 जणांना गणेश स्थापना आणि गणेश विसर्जनाच्या दिवशी तडीपार करण्यात येणार असल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप टिपरसे यांनी दिली आहे... तसेच गणेश मंडळांनी मंडपाच्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरा लावावेत असे आवाहन पोलिसांच्या वतीने करण्यात आले आहे... गणेश उत्सव काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात असणार आहे असे देखील टिपरसे यांनी सांगितले आहे... अहिल्यानगर शहरात जवळपास छोट्या मोठ्या 350 मंडळाकडून गणेश स्थापना होणार आहे... तर जिल्ह्यातील शहर आणि ग्रामीण भागाचा विचार करता 3312 गणपतीची स्थापना होणार आहे... अहिल्यानगर जिल्ह्यात गणेश स्थापना ते गणेश विसर्जन आणि घटस्थापना ते दसरा या सणाच्या कालावधीत मिरवणुकीत डॉल्बी वापरण्यावर बंदी घालण्यात आलीये... अप्पर जिल्हा दंडाधिकारी दादासाहेब गीते यांनी याबाबत आदेश दिलेत... आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर भारतीय न्याय दंड संहिता कलम 223 तसेच इतर लागू असलेल्या कायद्यान्वये कारवाई करण्यात येणार आहे... अहिल्यानगर शहर आणि ग्रामीण भागात डॉल्बी सिस्टीम वापरावर बंदी घालण्यात आलीये... गणेशोत्सव हा शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाने तयारी पूर्ण केलीये.
0
0
Report
Advertisement

वसई-विरार में आधी रात से तेज बारिश, जलजमाव से यातायात ठप्प

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार शहरात काल मध्यरात्रीपासून पावसाने चांगलाच जोर पकडला होता. सकाळपर्यंत पावसाची संततधार सुरू राहिल्याने शहरातील सखल भाग पुन्हा एकदा जलमय झाले आहेत. विरार पश्चिमेकडील विवा कॉलेज परिसर तसेच नालासोपारा पूर्वेतील आचोळे परिसरातील अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साचल्याने शहरातील वाहतूक व्यवस्था विस्कळीत झाली आहे. अनेक ठिकाणी वाहनचालकांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागत आहे. तर काही ठिकाणी पाण्यात वाहने बंद पडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे.
0
0
Report

सोलापुर में ओबीसी नेता लक्ष्मण हाके के विवाद पर मामला दर्ज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंशी वाद घालणाऱ्या दोघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - मराठा आरक्षणावरून ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासोबत वाद घालणाऱ्या दोघांवर मोहोळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - दोन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील पाकणी परिसरातील एका हॉटेलमध्ये मराठा तरुण आणि लक्ष्मण हाके यांच्यामध्ये झाला होता वाद - शाब्दिक वादाचे रूपांतर झटापटीत झाल्यानंतर दोघा तरुणांवर गुन्हा दाखल - मराठा आरक्षणाविषयी विचारणा करणाऱ्या दोघा तरुणांची घटनास्थळावरील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करण्याची मागणी
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव कोकण रेल्वे टाइमटेबल बिगड़: कई ट्रेनें 3–12 घंटे देरी, यात्री परेशान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - ऐन गणेशोत्सवात कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं गणेश उत्सवासाठी सोडल्या गेलेल्या जादा फेऱ्यांमुळे कोकण रेल्वेच्या बहुतांश गाड्यांना लेट मार्क नियमित गाड्या दोन ते तीन तास उशिरा तर गणपती स्पेशल दहा ते बारह तास उशिरा कोइंबतूर एक्सप्रेस तब्बल बारा तासाने रत्नागिरी स्थानकात दाखल कोकण कन्या 3 तास 17 मिनीटे , तुतारी एक्सप्रेस 3 तास , जनशताब्दी दिड तास उशीरा तर सांवतवाडी एक्सप्रेस 6 तास उशीरा गणेशोत्सव काळात कोकण रेल्वे मार्गावर 300 हून अधिक फे-या मात्र गाड्या लेट होत असल्याने प्रवाशांचा खोळंबा प्रवासी बाईट
0
0
Report

चंद्रपुर में उमेद मार्ट: गणेशोत्सव की नई खरीदारी का ठिकाना

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात गणेशोत्सवाच्या खरेदीचे नवीन डेस्टिनेशन तयार झाले आहे. जिल्ह्यातील महिला बचत गटांनी तयार केलेल्या वस्तूंंचे स्थायी ठिकाण आहे. शहरातील ज्युबिली शाळेच्या बाजूला मुख्य मार्गावर असलेल्या राणी हिराई उमेद मार्ट मध्ये शाडूच्या गणेशमुर्त्यांपासून सजावटीचे सामान, घरगुती वस्तू, मसाले, लोणची आणि इतर खाद्यपदार्थही विक्रीला आहेत. सध्या या मार्टमध्ये जिल्हाभरातून आलेल्या बचत गटाच्या महिलांनी आपापले स्टॉल्स देखील लावले आहेत. चंद्रपूरकरांनी उमेद मार्ट ला भेट देत ग्रामीण भागातील महिलांद्वारे निर्मित वस्तूंना पाठींबा देत खरेदी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

आलू के बोरे में विषैला नाग मिलने से हड़कंप; सर्पमित्र ने सुरक्षित छोड़ दिया

Lasalgaon, Maharashtra:लासलगावमध्ये बटाट्याच्या गोणीतून चक्क विषारी घोणस साप निघाल्याने खळबळ उडाली आहे. बाजारतळ परिसरातील संजय शिंदे यांच्या गुदाममध्ये बटाट्याची गाडी खाली करत असताना एका गोण्यमध्ये हालचाल दिसली. गोणी उघडताच त्यातून घोणस बाहेर आल्याने कामगारांची चांगलीच धावपळ उडाली. मात्र प्रसंगावधान राखत सर्पमित्र आसिफ patेल यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी घोणसला सुरक्षितपणे पकडून नैसर्गिक अधिवासात सोडून दिले. बटाट्याच्या वाहतुकीदरम्यान हा साप गाडी अथवा गोणीमध्ये शिरला असावा, असा प्राथमिक अंदाज आहे. साप आढळल्यास त्याला मारण्याचा किंवा पकडण्याचा प्रयत्न न करता सुरक्षित अंतर ठेवावे आणि तातडीने प्रशिक्षित सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधावा.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर: 10 लाख की मांग कर काम रोकने और जान से मारने की धमकी—FIR

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर पोलिसांनी रविकिरण इंगवले यांच्यासह फारुख बाबू खान, आनंद पाटील आणि अन्य दोन साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. गडहिंग्लज इथल्या खुतबुद्दीन गैबिसो शेख यांनी याबाबत तक्रार दिली आहे. शेख यांनी कोल्हापूर शहरातील हरी ओमनगर परिसरातील सर्व्हे नं. १०९३ मधील सुमारे आठ एकर जागा विकसनासाठी घेतली असून, तेथे विकासकाम सुरू केले होते. तक्रारीनुसार, ऑगस्ट २०२५ मध्ये शेख हे त्यांच्या मित्रासोबत विकासाच्या ठिकाणी असताना पाच जण कारमधून तेथे आले. रविकिरण इंगवले यांच्या परवानगीशिवाय काम कसे सुरू झाले, असा सवाल करत इंगवले यांच्याशी विषय मिटविण्यास सांगितल्याचे तक्रारीत नमूद आहे. त्यानंतर फारुख खान याच्या मोबाईलवरून इंगवले यांच्याशी शेख यांचे बोलणे झाले. यावेळी पैसे देण्याची मागणी करण्यात आली. पैसे न दिल्यास महापालिकेकडे तक्रार करून काम बंद पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप शेख यांनी केला आहे. वेळोवेळी पैसे देऊन सुद्धा ज्याचे मारण्याची धमकी सुरू ठेवल्यामुळे तक्रारदाराने अखेर कोल्हापुरातील जुना राजवाडा पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.
0
0
Report

अमरावती में 35 दिन से बारिश नहीं: खरीप फसलों पर भारी असर

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात 35 दिवस पावसाची दडी; सहा तालुक्यांत सरासरीच्या 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस अमरावती जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामावर पावसाच्या लहरीपणाचा मोठा फटका बसला आहे. जिल्ह्यात तब्बल 35 दिवस पावसाने दडी मारल्याने अनेक भागात दुष्काळजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील 23 महसूल मंडळांमध्ये केवळ 25 ते 50 टक्क्यांपर्यंतच पाऊस झाला. 6 तालुक्यांमध्ये सरासरीच्या केवळ 50 टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली आहे. सलग पावसाच्या खंडामुळे नगदी पीक असलेले सोयाबीन मोठ्या प्रमाणात हातचे गेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा हजेरी लावली असली तरी त्याचा फायदा आता प्रामुख्याने कपाशी आणि तुरीला होणार आहे.. पावसाअभावी कपाशीची वाढ खुंटली असून तूर आणि कपाशीच्या उत्पादनावरही परिणाम होण्याची शक्यता शेतकरी व्यक्त करत आहे. एकूणच पावसाच्या तुटीमुळे अमरावती जिल्ह्यात खरीप हंगाम संकटात सापडला. जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी अशी मागणी आता जोर धरत आहे..
0
0
Report

गोंदिया में गणेश उत्सव के उत्साह के बीच रूट मार्च से सुरक्षा का संदेश

Bhandara, Maharashtra:गोंदिया शहर पोलिसांचा रूट march शहरात शांतता व कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांचे शक्तिप्रदर्शन गणपती उत्सवानिमित्त गोंदिया शहरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी, यासाठी शहर पोलिस ठाण्याच्या वतीने शहरातील प्रमुख बाजार परिसरातील मुख्य मार्गांवर रूट मार्च काढण्यात आला. या रूट मार्चमध्ये शहर पोलिस ठाण्यातील अधिकारी व पोलीस कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शहरातील प्रमुख चौक, बाजारपेठा तसेच गणेश मंडळांच्या परिसरातून पोलिसांनी संचलन केले. गणपती उत्सव शांततेत व उत्साहात पार पडावा, यासाठी पोलिस प्रशासनाकडून आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

पाकिस्तानी हैंडलर से धमकियाँ देने वाले आरोपी की मुंबई में गिरफ्तारी

Satara, Maharashtra:सातारा: मुंबईतील एका व्यावसायिकाला धमक्या दिल्याप्रकरणी पाचगणी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मोहम्मद शफीक मोहम्मद अकबर लोन या ३९ वर्षीय व्यक्तीला मुंबई गुन्हे शाखेने अटक केली आहे. या कारवाईत आरोपीचे पाकिस्तानमधील प्रतिबंधित दहशतवादी संघटना 'लष्कर-ए-तोयबा'शी थेट संबंध असल्याचे उघड झाले असून, त्याचा भाऊ याच संघटनेत कमांडर आहे. आरोपीने सोशल मीडियाच्या माध्यमातून पाकिस्तानी हँडलरशी संपर्क साधून धमक्या दिल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. पोलिसांनी त्याच्याकडून दोन मोबाईल व एक डायरी जप्त केली असून, या रॅकेटमधील अन्य सहकाऱ्यांचा कसून शोध घेतला जात आहे.
0
0
Report

वाशिम के पांगरी-धनकुटे मार्ग की दुरुस्त नहीं, ग्रामस्थों ने प्रशासन विरोध किया

Washim, Maharashtra:वाशिम के मालेगाव तालुक्यातील पांगरी धनकुटे ते काटा दरम्यानच्या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी ग्रामस्थांकडून अनेक वेळा करण्यात आली, मात्र अद्याप रस्त्याचे काम सुरू झालेले नाही. विशेष म्हणजे या रस्त्यावर ठिकठिकाणी खडी टाकून रस्ता तयार करण्यात आला असल्यामुळे नागरिकांना प्रवास करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. या मार्गावर शाळकरी विद्यार्थी, ग्रामस्थ आणि नागरिकांची मोठी वर्दळ असते. तसेच जवळच रेल्वे स्टेशन असल्याने अनेक नागरिक या रस्त्याचा प्रवासासाठी वापर करतात. वारंवार मागणी करूनही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम सुरू न झाल्याने ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. अखेर ग्रामस्थांनी रस्त्यावरच बसून प्रशासनाचा निषेध केला असून, तातडीने रस्त्याचे काम सुरू करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top