icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपुर के अग्निशमन प्रशिक्षण केंद्र में दो प्रशिक्षु सर्पदंश से अस्पताल, हालत स्थिर

Nagpur, Maharashtra:नागपुर के कलमना क्षेत्र के अग्निशमन दल के प्रशिक्षण मैदान पर कल दो प्रशिक्षणार्थियों को सर्पदंश की घटना घटी... उपचार के लिए सरकारी मेडिकल अस्पताल में दाखल... यश इडेकर और अक्षय हेलिंगे... प्रशिक्षण केंद्र के मैदान पर कल सराव के लिए एकत्र थे. विश्रांति लेते समय यश और अक्षय को कुछ चावने की अनुभूति हुई... उनके पांव पर सर्पदंश के दो निशान पाए गए... अधिकारी ने मेडिकल में दाखिल किया... यश येडेकर को सर्पदंश का अधिक संदेह होने पर तुरंत एंटी स्नेक वेनम दिया गया और ICU में निरीक्षण। दोनों की प्रकृति खतरे से बाहर है.
0
0
Report

Pankaja Munde ke baait mudde par sarkar saaf-saf samvad, Maratha आरक्षण jaari

Kolhapur, Maharashtra:मंत्री पंकजा मुंडे बाईट मुद्दे ऑन जरांगे पाटील आंदोलन जरांगे पाटील उपोषणाला बसले आहेत, मराठा आरक्षण प्रश्न संदर्भात ते वरचेवर उपोषण करत आहेत. दरवेळी जाऊन सरकार त्यांना प्रतिसाद देत आहे. सरकारने एक व्यवस्था केली आहे, त्यांना कोणी एड्रेस करायचा आहे.. त्यामध्ये विखे पाटील, उद्या सामंत आणि प्रसाद लाड यांचा समावेश है. मी दर दोन तासाला कलेक्टरांशी बोलत आहे, कलेक्टरांशी चर्चा करत आहे. संविधनाची चौकट धरून कसा न्याय देता येईल यासाठी सरकार सकारात्मक प्रयत्नात आहे. ते कोणत्या मुद्यावर ठाम आहेत त्याबाबत मी कसं काय बोलू. ऑन GDP शरद पवार भूमिका कोणी यासंदर्भात स्टेटमेंट केलं ते मी पाहिले नाही.. त्यावर मी वक्तव्य करणार नाही. आपला देश एक वेगळा प्रवासाला निघाला आहे. तो सकारात्मक प्रवास आहे. गेले दहा वर्ष चांगला विकास होत आहे.. हा विकास फक्त कागदावर नाही तर डोळ्यांनी दिसत आहे. हायवेचे जाळं विणले जात आहे, मेट्रोचे जाळे विणले जात आहे, मोठमोठे टॅनल बांधले जात आहेत. तीर्थक्षेत्राचा विकास होत आहे स्टार्टअप होत आहे. येणाऱ्या भारतासाठी नवा संकल्प दिला जात आहे, शेतकरी आनंदात आहे. लाडकी बहीणच्या माध्यमातून महिलांना समाधानकारक योजना राबवल्या जात आहेत. ऑन संजय राऊत दावा याबाबत मला माहिती नाही, संघ आणि मोदीजी बोलले असतील तर त्याच्याशिवाय ते शक्य नाही. देवेंद्र फडणवीस अत्यंत प्रभावी नेता आहे, अकॅडमीक नेता आहे, मी त्यांच्यासोबत 25 वर्षे काम करत आहे. आज ते जेथे आहेत त्याहीपेक्षा मोठे व्हावेत अशी प्रार्थना आम्ही त्यांच्यासाठी करू शकतो. पण आता ते जेथे आहेत तिथे ते आवश्यक आहेत
0
0
Report
Advertisement

इंदापुर में मराठा समर्थकों ने पुणे-सोलापुर हाईवे रोक दिया, सड़क पर जाम

Rui, Maharashtra:मनोज जरांगेंच्या समर्थनार्थ इंदापुरात पुणे-सोलापूर महामार्ग रोखला; वाहनांच्या लांबलचक रांगा मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ पुणे जिएक ल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील हिंगणगाव पाटी येथे मराठा बांधवांनी पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला होता. सकाळपासूनच मराठा समाज बांधव हिंगणगाव पाटीवर जमले होते. जरांगे पाटील यांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी हे रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलनापूर्वीच पुणे ग्रामीण पोलीस आणि सोलापूर ग्रामीण पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून आंदोलन स्थळापास्थून दोन्ही बाजूला 500 मीटर अंतरावर बॅरिकेटिंग करून हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता. त्यामुळे अनुचित प्रकार घडला नाही. मात्र, महामार्ग बंद केल्याने पुणे-सोलापूर महामार्गावर दोन्ही बाजूला वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. प्रवाशांना काही काळ खोळंबा सहन करावा लागला.
0
0
Report

मिरज में कार तोड़फोड़: चार युवक गिरफ्तार; शहर से धिंड काढी गई

Sangli, Maharashtra:स्लग - मिरजेतील गाड्यांच्या तोडफोड प्रकरणी चौघांना अटक, शहरातून धिंड काढली गेली. अँकर - सांगलीच्या मिरजेत भल्या पहाटे दहशत माजवत गाड्यांची तोडफोड करणाऱ्या हल्लेखोरांना पोलिसांनी अटक केली आहे. चौघा तरुणांना अटक करत त्यांच्याकडून धारदार शस्त्रास्त्रे जप्त करत याचा तरुणांची मिरज शहरातून धिंड देखील काढण्यात आली आहे. शहरातील शास्त्री चौक परिसरामध्ये चौघा तरूणांकडून बुधवारी पहाटेच्या सुमारास पाच वाहनांची तोडफोड करत दहशत वाजवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. त्यानंतर मिरज पोलिसांनी दहशत माजवणाऱ्या चौघा तरुणांच्या टोळीला अटक करत शहरातून धिंड काढली.
0
0
Report
Advertisement

सीना-माढा उपसा योजना के पानी नहीं मिलने से किसानों का अनशन तीसरे दिन जारी

Pandharpur, Maharashtra:Anchor -माढा तालुक्यातील उपळाई बुद्रुक येथे सीना-माढा उपसा सिंचन योजनेचे पाणी मिळावे, या प्रमुख मागणीसाठी शेतकऱ्यांनी सुरू केलेले अन्नत्याग आमरण उपोषण तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. गावातील क्रांती चौकात सुरू असलेल्या या आंदोलनाला दिवसेंदिवस नागरिकांचा वाढता प्रतिसाद मिळत असून, पाणी मिळाल्याशिवाय उपोषण मागे न घेण्याचा ठाम निर्धार आंदोलकांनी व्यक्त केला आहे. सीना-माढा उपसा सिंचन योजना सुरू होऊन दोन महिने उलटले असतानाही उपळाई बुद्रुक परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत अद्याप पाणी पोहोचलेले नाही. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे. यापूर्वीही शेतकऱ्यांनी रस्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी आश्वासने देण्यात आली; मात्र प्रत्यक्षात पाणी न मिळाल्याने शेतकऱ्यांनी आता आंदोलनाची तीव्रता वाढवली आहे. परिसरात सध्या पाणीटंचाईचे संकटही गंभीर बनले आहे. शेतीसाठी पाणी उपलब्ध नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. वारंवार आश्वासने मिळूनही पाणी न आल्याने अखेर शेतकऱ्यांनी अन्नत्याग आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारला आहे. दरम्यान, उपोषणाच्या तिसऱ्या दिवशी तहसीलदार तसेच लघु पाटबंधारे विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन आंदोलन मागे घेण्याची विनंती केली. मात्र, केवळ आश्वासनांवर समाधान मानण्यास शेतकरी तयार नसून, “सीना-माढा योजनेचे पाणी उपळाई बुद्रुकपर्यंत प्रत्यक्ष पोहोचेपर्यंत माघार नाही,” अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली. उपोषणाला गावातील शेतकरी, नागरिक आणि विविध घटकांकडून वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे आंदोलन दिवसेंदिवस अधिक तीव्र होत असून, प्रशासनाने या प्रश्नावर तातडीने ठोस निर्णय घेऊन उपळाई बुद्रुकला पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी जोर धरत आहे.
0
0
Report

कोल्हापुर साइबर पुलिस ने लगभग 1 करोड़ 25 हजार मूल्य के गुम मोबाइल बरामद कर मालिकों को सौंपे

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर सायबर पोलिसांनी सुमारे 1 कोटी 25 हजाराचे मोबाईल हस्तगत केले आहेत. जिल्ह्यात ठिकठिकाणी गहाळ झालेले मोबाईल तपास करत कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत केलेत. गहाळ झालेले मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी आज मालकांच्या स्वाधीन केले है. इतक्या मोठ्या प्रमाणात पहिल्यांदाच गहाळ झालेले मोबाईल कोल्हापूर पोलिसांनी हस्तगत करून मालकांच्या स्वाधीन केल्यामुळे अनेकांच्या चेहऱ्यावर आनंद पाहायला मिळाला. गोवा, आंध्र प्रदेश आणि शेजारील कर्नाटक राज्यातून यातील बहुतांश मोबाईल पोलिसांनी तपास करत हस्तगत केले आहेत.
0
0
Report

समृद्धि महामार्ग पर अपहरण कोशिश, युवक को पकड़कर यूपी ले जाने की योजना नाकाम

Shirdi, Maharashtra:समृद्धी महामार्गावर अपहरणाचा थरार.. पुण्यातून तरुणाचं अपहरण ; थेट उत्तर प्रदेशात नेण्याचा कट.. समृद्धी महामार्गावर पोलिसांचा आरोपींना पकडण्यासाठी ३ किलोमीटर थरारक पाठलाग.. महामार्ग पोलिसांनी कार अडवून अपहरणाचा कट उधळला... अपहृत तरुणाची सुखरूप सुटका ; ६ संशयित पोलिसांच्या ताब्यात... अपहरण करण्याचे कारण अद्याप अस्पष्ट... अर्टिगा कारमधून तरुणाला घेऊन आरोपींचा होता नागपूरच्या दिशेने पलायनाचा प्रयत्न... बाभळेश्वर महामार्ग पोलिसांची सतर्कता ; कोपरगावात कारसह आरोपी ताब्यात... पुढील चौकशी पोलिसांकडून सुरू...
0
0
Report
Advertisement

पंढरपुर के सामान्य अस्पताल में MRI-सोनोग्राफी बंद, मरीज निजी अस्पतालों की राह देख रहे

Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर मधील सामान्य रुग्णालयात MRI आणि सोनोग्राफी तपासणी मशीन बंद, गोर गरीब रुग्णांना दाखवला जातो खाजगी रुग्णालयाचा रस्ता पंढरपूर तीर्थक्षेत्र असल्याने या ठिकाणी रोज हजारो भाविक येतात. त्यांच्या आणि पंढरपूर परिसरातील रुग्णांसाठी अद्यावत सामान्य रुग्णालय आहे. आलेल्या रुग्णासाठी वेगवेगळ्या तपासणी यंत्र सामुग्री आरोग्य विभागाने दिली आहे. मात पंढरपूर मधील सामान्य रुग्णालयातील MRI आणि सोनोग्राफी तपासणी मशीन सध्या बंद असल्याचा अनुभव उपचारासाठी आलेल्या अनेक नागरिकांना येत आहे. यामुळे स्वस्तात उपचार होण्या ऐवजी अशा रुग्णांना खाजगी रुग्णालयातून तपासणी करण्याचा सल्ला दिला जातो आहे.
0
0
Report

सूखे में एक गाँव एक गणपति: मूर्ति और वृक्ष मुफ्त, अनावश्यक खर्च से बचाव

Sangli, Maharashtra:स्लग - दुष्काळी परिस्थितीत एक गाव एक गणपती साजरा करण्याचा उपक्रम.. दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने आगामी गणेशोत्सव हा साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आवाहन ह.भ.प.तुकारामबाबा महाराज यांच्याकडून करण्यात आले आहे. अनावश्यक खर्च टाळण्यासाठी एक गाव एक गणपती उत्सव साजरा करण्याच्या उपक्रमात सहभागी होण्याचे आवाहन करत एक गाव एक गणपती अभियानात सहभागी होणाऱ्या गावांना श्री संत बागडे बाबा महाराज मठाकडून गणेश मूर्ती व वृक्ष मोफत भेट स्वरूपात देण्यात येणार असून दुष्काळी परिस्थितीत अनावश्यक खर्चाला फाटा देण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत असल्याचा तुकाराम बाबा महाराजांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

भंडारा में स्कूल पोषण आहार की जांच: किचन में गंदगी और चूहों के मिलने पर कार्रवाई के आदेश

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य अन्न आयोगाची टीम भंडारामध्ये प्रत्यक्ष पाहणी केली. शालेय पोषण आहार, अंगणवाडीच्या माध्यमातून दिला जाणारा आहार आणि अन्न नागरी पुरवठा विभागामार्फत लाभार्थ्यांना मिळणाऱ्या शिधाची अंमलबजावणीची आढावा घेतला गेला. विद्यार्थ्यांना पोषण आहार देण्याची गुणवत्ता तपासण्यासाठी आयोगाच्या पाहणी समितीने जिल्ह्यातील चार शाळांना भेट दिली. विद्यार्थ्यांना दिला जाणारा जेवण अधिकारी स्वतः चाखून पाहिला आणि तपासणी केली. मात्र, दोन शाळांच्या किचनमध्ये अस्वच्छतेचा धक्कादायक प्रकार समोर आला; किचनमध्ये स्वच्छतेचा अभाव आणि काही ठिकाणी चूह्यांच्या आळ्या आढळल्याने खळबळ उडाली. या प्रकाराबाबत संबंधितांवर कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत. ही पाहणी राज्य अन्न आयोगाच्या팀ने यांद्वारे घेतली असून कोणतेही लाभार्थी अन्नाच्या अधिकारापासून वंचित राहणार नाहीत याची काळजी घेतली जाणार असल्याचे स्पष्ट केले गेले. महाविकास आघाडी राज्य शासनाच्या आरोग्य व पोषण योजनेच्या घटकांबाबत गुणवत्तेची खात्री करण्यासाठी ही चौकशी राबविण्यात आली.
0
0
Report

डिंभे-मानिकडोह बोगद्याविरोधी वळसे पाटील: डावा कालवा चालू ठेवल्यास बोगद्याची गरज नाही

Manchar, Maharashtra:डिंभे-माणिकडोह बोगद्याला वळसे पाटलांचा विरोध; “डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालवा, बोगद्याची गरज नाही” ANC: डिंभे-माणिकडोह धरणाच्या बोगद्याला प्रशासकीय मान्यता मिळाल्यानंतर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी या प्रकल्पाला विरोध कायम ठेवला आहे. बोगद्याची गरज नाही, त्यामुळे आधी हा पर्याय तपासावा, अशी त्यांची भूमिका आहे. VO: डिंभे-माणिकडोह बोगद्याला आमचा आधीपासूनच विरोध असल्याचं दिलीप वळसे पाटील यांनी स्पष्ट केलं. डिंभेचा डावा कालवा पूर्ण क्षमतेने चालला तर बोगदा करण्याची गरज नाही, असं अधिकाऱ्यांचं टेक्निकल मत असल्याचं त्यांनी सांगितलं. पुणे, नगर आणि सोलापूर जिल्ह्यांना पाणी मिळालं पाहिजे, मात्र चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतल्यास विरोध राहील, अशी भूमिका त्यांनी मांडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी परिसरातील शेतकऱ्यांवर अन्याय होऊ देणार नसल्याचं आश्वासन दिल्याचं वळसे पाटील यांनी सांगितलं. पुढेही मुख्यमंत्र्यांकडे पाठपुरावा सुरू ठेवणार असून, मुख्यमंत्री यावर मार्ग काढतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top