Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 09, 2025 12:52:10
Nagpur, Maharashtra:मराठवाड्यात निर्माण झालेल्या पूर परिस्थितीसंदर्भात काँग्रेस पक्ष आणि NAPM च्या तज्ज्ञांचे संयुक्त अभ्यास... * सप्टेंबरच्या पूरानंतर आम्ही ग्रामीण भागात अभ्यास दौरा केला. मेधा पाटकर आणि इतर तज्ञ त्या अभ्यास पथकात होते.. * आम्ही अहवाल तयार केला असून मराठवाड्यातील आमदारांना पाठविले आहे.. * मराठवाड्यात अद्याप पूर्ण पंचनामे झालेले नाही. * पूरग्रस्तांना नुकसानीचे पुरावे मागितले जाते.. * खरडवून गेलेली शेती पुन्हा पूर्ववत होणार नाही.. शासनाने यासाठी दिलेली मदत अत्यंत तोकडी आहे.. * Cm ने 7 ऑक्टोबर रोजी 31 हजार कोटींच्या पॅकेजची घोषणा केली.. आम्ही वाढीव दराने नुकसानभरपाई देऊ असे जाहीर केले गेले.. मात्र, या पॅकेजचे वाढीव दर कुठे ही मिळालेले नाही.. * मराठवाड्यात 1300 शाळांचे आतोनात नुकसान झाले आहे.. आम्हाला भीती आहे, या वाताहत झालेल्या शाळांना बंद केले जाऊ शकते... प्रा. प्रवीण पुरंदरे ( पांढरे केस, जॅकेट घातलेले / जल तज्ञ) * कालव्यांवरील अतिक्रमण काढले नव्हते.. * जलयुक्त शिवारच्या नावाखाते हजारो बंधारे बांधले.. मात्र त्यांचे डिजाइन चुकले. * आता अती जास्त पाऊस पडल्यानंतर पाणी लवकर बाहेर निघेल अशी स्थिती आवश्यक असते.. * मात्र, त्याची काळजी न घेता हजारो बंधारे बांधले.. कुठे ही बांधले.. * धरणांची निर्मिती करताना पूर परिस्थितीचा विचार करून नियोजन केलेलं नाही..महाराष्ट्रात फक्त 1.5 टक्के धरणांवर पूर परिस्थिती संदर्भात सोय आहे... * मराठवाड्यात पूर परिस्थिती निर्माण करण्यामध्ये जलयुक्त शिवारचे काम कारणीभूत आहे.. * जलयुक्त शिवार 2014 मध्ये सुरू केला.. आणि जलयुक्त शिवार मध्ये काम सुरू करताना माती संवर्धनाची कामे करण्यात यावे, ही सूचना 2017 मध्ये दिली.. * जलयुक्त शिवार योजना आवश्यक होती.. मात्र ती योजना जेसीबी पोकलेंड वाल्यांनी खिशात घातली..
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 09, 2025 12:51:47
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 12:49:26
Nagpur, Maharashtra:Nagpur | डि. 09 December 2025 — समाजाच्या न्याय्य हक्कांसाठी राज्य सरकारने तत्काळ अबकड आरक्षणाबाबत निर्णय घ्यावा, या मागणीसाठी आज नागपूरात विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार आंदोलन करण्यात आले. या आंदोलनाचे नेतृत्व युवा आमदार अमित गोरखे आणि आमदार जितेश अंतापूरकर, आमदार कृपाल तुमाने आणि आमदार विक्रम काळे यांनी केले. आमदारांनी वेगळा पोशाख परिधान करून आंदोलन करत सरकारचे लक्ष वेधले. ५९ जातींच्या वंचित घटकांना न्याय देण्यासाठी आरक्षणाची अंमलबजावणी विलंब न लावता तात्काळ करण्यात यावी. शिक्षण, नोकरी आणि सामाजिक न्यायाच्या संधींपासून मोठ्या प्रमाणावर समाजातील घटक वंचित राहत आहेत. सरकारकडून दिल्या जाणाऱ्या आश्वासनोंनंतरही ठोस निर्णय न घेतल्याने समाजात नाराजी वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार अमित गोरखे यांनी स्पष्ट केले की, आरक्षण हे केवळ धोरणात्मक प्रकरण नसून वंचित समाजाच्या अस्तित्वाचा व भविष्याचा प्रश्न आहे. माझा लढा बाबासाहेब आंबेडकरांच्या आरक्षणाला १००% न्याय मिळवून देण्याकरता आहे. माझ्या जडणघडणीनुसार जर काही बांधव वंचित राहत असतील तर मी त्यांच्या हक्कासाठी मी लढणारच. त्यांनी या लढ्याला आणखी तीव करणाचा निर्धार व्यक्त करत अबकड समाजाच्या हक्कांसाठीचा संघर्ष पुढील काळात अधिक व्यापक होईल, असे संकेत दिले.
61
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 09, 2025 12:33:25
24
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 11:21:07
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर ग्रोबझ गुंतवणूक आर्थिक फसवणुकीच्या बहुचर्चित प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान कोल्हापूरचे तत्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांना कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने चांगलेच झापले आहे. तब्बل 218 कोटी रुपयांचा घोटाळा असल्याचे कागदोपत्री दिसत असतानाही, तपास यंत्रणेकडून केवळ हा घोटाळा 12 कोटींवर सीमित ठेवण्यात आला का? असा थेट सवाल न्यायाधीशांनी उपस्थित केला. यामुळे तपासातील त्रुटी आणि पोलिसांची भूमिका गंभीर स्वरूपात चर्चेत आली आहे. ग्रोबझ आर्थिक गुंतवणूक प्रकरणात कोल्हापूर सर्किट बेंचचे न्यायाधीश शिवकुमार डीगे यांनी कशा प्रकारे तात्कालीन पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित आणि तपास अधिकारी यांची झाडाझडती कशी केली त्यावर एक नजर टाकूया...
137
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 09, 2025 10:51:15
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहराजवळील कात्यायनी–गिरगाव रस्त्यावर एका तरुणाने मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न केल्याची धक्का देणारी घटना आज उघडकीस आली. मुलीला एकटी पाहून संबंधित तरुणाने जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. परंतु पीडित मुलीने प्रसंगावधानाने आरडाओराड केल्याने परिसरातील नागरिक सावध झाले आणि त्यांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला पकडले. यावेळी काही महिलांनी आरोपीला बेदम मारहाण केली. विशेष म्हणजे, याच परिसरात आठवडाभरापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न झाल्याचा प्रकार घडला होता. सलग दोन घटनांमुळे स्थानिकांमध्ये प्रचंड संताप असून परिसरात पोलिस गस्त वाढविण्याची मागणी होत आहे. या प्रकरणी करवीर पोलिसात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे.
129
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 09, 2025 10:32:08
Pune, Maharashtra:अहिल्यानगर-मनमाड महामार्गाचे काम अनेक वर्षांपासून रखडलेले होते ते आता पुन्हा सुरू झाले आहे, परंतु कामगती अत्यंत संथ आहे. त्यामुळे प्रवाशांना शारीरिक त्रास आणि मनस्ताप सहन करावा लागत आहे. नगर-मनमाड महामार्गावर शिर्डी आणि शनिशिंगणापूर हे जागतिक दर्जाचे दोन तीर्थक्षेत्र आहेत; लाखो भाविक याचा खड्डेमय रस्त्यांवरून प्रवास करतात. अनेक ठिकाणी एका बाजूने रस्त्याचे काम सुरू आहे तर दुसऱ्या बाजूने दोन्ही दिशांनी वाहतूक सुरू असल्यामुळे सातत्याने वाहतूक कोंडी होते. तसेच एकेरी बाजूने सुरू असलेला रस्ता देखील खड्डेमय झाला आहे. पावसाळ्यात चिखल, तर इतर काळात उडणारी धुळ ही रस्त्याच्या कडेलाशी राहणार्या गावस्थानिक नागरिकांसाठी त्रासाचे कारण बनली आहे.
65
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 09, 2025 10:20:50
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - रस्ता दुरुस्त करण्याच्या मागणीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे धरणे आंदोलन अंकर सांगली शहरातल्या रस्त्यांच्या दुरावस्थे विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आला आहे.शहरातल्या टिंबर एरिया येथील रस्ता मंजूर होऊन सहा महिने उलटले आहेत. मात्र अद्याप देखील संबंधित ठेकेदाराकडून रस्ता करण्यात आला नाही, निधी आणि कामाची मंजुरी असून देखील रस्ता करण्यात टाळाटाळ होत असल्याने राष्ट्रवादी शरद पवार गटाच्यावतीने कॉलेज कॉर्नर येथे धरणे आंदोलन करण्यात आलं,आंदोलन मध्ये काँग्रेससह शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील सहभाग घेतला,दरम्यान आंदोलन सुरू झाल्यानंतर संबंधित ठेकेदारांनी काही वेळातच रस्त्याच्या कामाला सुरुवात करत असल्याचा भासवलं,यामुळे संतप्त आंदोलनकर्त्यांनी आणि येथील नागरिकांनी कामाला विरोध करत लेखी आश्वासन दिल्याशिवाय रस्त्याच्या कामाला सुरुवात करू देणार नाही,अशी भूमिका घेतली आहे。
82
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 10:15:18
Nagpur, Maharashtra:प्रवीण दरेकर, भाजपा नेता के बारे में महेंद्र दळवी ने स्पष्टीकरण दिया है. अगर ऐसा हो तो राजीनामा देने के लिए तैयार हैं. AI के माध्यम से ऐसे वीडियो बनाए जा सकते हैं. उन्हें आत्मविश्वास है कि किसी ने कुंभाड़ रचा नहीं. यह पैसे कौन से हैं इसकी जांच भी होगी, किसी की भी हो सकती है. सत्यता सामने नहीं आ रही—इस पर बात उचित नहीं. तटकरे के हाथों पर आरोप के बारे में पहले वीडियो असली है या नहीं, यह सवाल है. उनके राजनीतिक वैर के कारण कुछ लोग बोलते हैं, पर मुझे मजबूर कर देना उचित नहीं. वहां जिले में दो–तीन विधायक और तटकरे के बारे में स्थिति पूरी राज्य में जानकारी है. महायुती मजबूत है, चाहे कितने भी खड़े आ जाएं, महायुती अभेद्य रहेगी. उनके तटकरे के विवाद की वहां चर्चा है और वह उफन रहा है.
133
comment0
Report
SKShubham Koli
Dec 09, 2025 10:03:49
Thane, Maharashtra:भरदिवसा घरफोडी करणाऱ्या अटकेतील सराईत चोराला वागळे इस्टेट पोलिसांची गजाआड ठाण्यात दिवसा घरफोडी करणाऱ्या आणि कुलूप तोडून मिनिटांतच घरातील सोने लंपास करणाऱ्या दीपक रामगोपाळ वैश्य या सराईत चोराला वागळे इस्टेट पोलिसांना अटक करण्यात यश मिळवले आहे. एकता रहिवासी संघटना चाळ, अंबिका नगर येथील सुरेखा शशिकांत खेडेकर यांच्या घराचे कुलूप तोडून 82,000 किंमतीचे दागिने चोरीस गेल्याची तक्रार 27 नोव्हेंबर 2025 रोजी वागळे इस्टेट पोलीस स्टेशनमध्ये नोंदली होती. सिसीटीव्ही फुटेज आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपी तिन हात नाका येथे येणार असल्याची माहिती मिळताच पथकाने सापळा रचून आरोपीला जेरबंद केले. चौकशीत आरोपीवर मुंबईतील विविध 15 पोलीस ठाण्यांमध्ये घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याच्याकडून 31.480 ग्रॅम सोने, 8 ग्रॅम चांदी आणि 75,500 रोख, असा एकूण 1,92,500 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
122
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 10:01:48
Nagpur, Maharashtra:नागपूर शिवेंद्रराजे, बाईट ( on मनसे व्हिडिओ ) -- संदीप देशपांडे यांनी जो व्हिडिओ दाखवला असा प्रकार घडला असेल तर ते अत्यंत चुकीचे आहे.... त्याबाबतीत आमच्या मुंबई CE यांना सूचना दिल्यात.. माहिती घेऊन.. दोषींवर कारवाई करण्यास सांगितले आहे... जो जूनियर इंजिनियर अधिकारी आहे आणि हा प्रकार केला आहे.. असा देशपांडेंनी आरोप केला आहे.. --विभागीय कारवाई केली जाईल केली जाईल.. कोणालाही सोडले जाणार आहे -- संदीप देशपांडे यांनी मलाही... वरिष्ठांचा प्रोटेक्शन असलं तरी ही चेन मोडीत काढली जाईल -- ज्युनिअर इंजिनियर लेवल चा अधिकारी एवढ धाडस करणार नाही... ---मध्यंतरी पालघर, जवाहरचे प्रकरण आले होते... त्यावेळी FIR दाखल करून कारवाई केली होती
122
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 10:00:23
Nagpur, Maharashtra:सुधीर मुनगंटीवार बाईट (on सहा दिवस अधिवेशन) -- याचे उत्तर होय असू शकत नाही.... आचारसंहितेमुळे चर्चा होऊ शकत नाही.. माझं वैयिक मत आहे की अधिवेशन तीन आठवडे किंवा सहा आठवडे झाले पाहिजे (on विदर्भ) विदर्भाच्या विकासाची चिंता करावीच लागेल... वैधानिक विकास मंडळ बाबत अजूनही निर्णय झालेला नाही... मी स्वतः मुख्यमंत्र्यांना लक्षात आणून दिले आहे... --- तंत्र विदर्भाबद्दल मी स्वतः ठराव मांडलेला होता... मात्र त्याकरता आमच्या कोणत्याही मित्रांची तयारी नाही नाही.. मागेही उद्धव ठाकरेंची सेनेची ही आमच्या सोबत असताना तयारी नव्हती.. असा ठराव पास करायला आमच्याकडे संख्याबळ नाही... त्यामुळे तोपर्यंत थांबण्याची गरज आहे का? तर त्याकरता थांबण्याची गरज नाही... -- जेव्हा संख्याबा राहील त्यावेळेस पक्षाचे नेते सांगतील त्यावेळेस कशाचे वरिष्ठ नेते सांगतील (on बिबट् लक्षवेधी) ---साधारणता दोन हजार बिबट आहे.. बिबट हल्ले रोखण्याच्या दृष्टीने तीन गोष्टी केल्या पाहिजे... ताडोब्यात आपण AI वापर केला... त्याचा विस्तार केला पाहिजे... आर्मीकडे याबाबतची उत्तम टेक्नॉलॉजी उपलब्ध आहे.... त्यामुळे याबाबत राजनाथ सिंग यांच्याशी भेटून एआय टेक्नॉलॉजी वापर केला पाहिजे --- प्रायमरी रेस्क्यू टीम पुन्हा एकदा नियुक्त केली पाहिजे --- लोकांमध्ये जनजागृती करून सायरन व्यवस्था लावली पाहिजे --- ज्या ठिकाणी जंगल कमी आहेत तिथले बिबट जेर बंद करून सफारीत सोडले पाहिजे पाहिजे.. सफारीचा साईज वाढवला पाहिजे --- नसबंदी ही केली पाहिजे... तिचे बिबट इतर कोणत्या राज्यात हवे असेल तर तिथे सोडले पाहिजे.... --- जे काही बीबट जे हल्ले करताय त्यांना झूमध्ये सोडले पाहिजे
194
comment0
Report
Advertisement
Back to top