icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राजर्षी शाहू पुरस्कार 2026: मराठा इतिहास के प्रख्यात विद्वान डॉ. जयसिंगराव पवार को मरणोपरांत सम्मान

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- राजर्षी शाहू छत्रपती मेमोरियल ट्रस्ट, कोल्हापूरच्या वतीने दिला जाणारा अत्यंत प्रतिष्ठेचा आणि मानाचा ४० वा 'राजर्षी शाहू पुरस्कार - २०२६' ज्येष्ठ इतिहासकार आणि शाहू विचारांचा राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर जागर करणारे विचारवंत डॉ. जयसिंगराव पवार यांना मरणोपरांत प्रदान करण्याचे ट्रस्टने जाहीर केले आहे. या पुरस्काराची घोषणा ट्रस्टचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात केली. यावेळी ट्रस्टचे विश्वस्त तथा महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड, डॉ.अशोक चौसाळकर, सदस्य सचिव तथा निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव, विश्वस्त तथा जिल्हा माहिती अधिकारी सचिन अडसूळ उपस्थित होते. समाज प्रबोधन, समाजसेवा, साहित्य, कला, संस्कृती, संगीत, शिक्षण आणि क्रीडा या क्षेत्रांत उल्लेखनीय योगदान देणाऱ्या महनीय व्यक्तींना १९८४ पासून हा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते. यंदा राजर्षी शाहू महाराजांच्या १५२ व्या जयंती दिनी, म्हणजेच २६ जून २०२६ रोजी सायंकाळी ६.३० वा. शाहू स्मारक येथे या भव्य पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. एक लाख रुपये, स्मृतिचिन्ह व मानपत्र असे या सर्वोच्च पुरस्काराचे स्वरूप आहे. महाराष्ट्रातील ज्येष्ठ आणि व्यासंगी इतिहास संशोधक म्हणून डॉ. जयसिंगराव पवार यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य मराठेशाहीचा इतिहास आणि राजर्षी शाहू महाराजांचे पुरोगami विचार जगभरात पोहोचवण्यासाठी समर्पित केले. सांगली जिल्ह्यातील तडसर येथे ३० डिसेंबर १९४१ रोजी जन्मलेल्या डॉ. पवारांनी कोल्हापूरच्या राजाराम कॉलेजमधून उच्च शिक्षण घेऊन शिवाजी विद्यापीठातून इतिहासात प्रथम क्रमांकाने एम.ए. आणि त्यानंतर पीएच.डी. पूर्ण केली. त्यांनी शिवाजी विद्यापीठाच्या इतिहास विभागात प्राध्यापक म्हणून प्रदीर्घ काळ काम केले असून विद्यापीठाच्या राजर्षी शाहू संशोधन केंद्राचे मानद संचालक म्हणूनही त्यांची कारकीर्द अत्यंत उल्लेखनीय राहिली आहे. डॉ. पवार यांनी मराठा इतिहासातील अनेक दुर्लक्षित पैलूंवर सखोल प्रकाश टाकत ४० हून अधिक ग्रंथांचे लेखन व संपादन केले आहे. त्यांनी संपादित केलाला तब्बल १२५० पानांचा 'राजर्षी शाहू स्मारक ग्रंथ' हा इतिहास संशोधनातील एक महत्त्वाचा मैलाचा दगड मानला जातो. एवढेच नव्हे तर त्यांच्या पुढाकाराने आणि महाराष्ट्र इतिहास प्रबोधनीच्या माध्यमातून शाहू महाराजांचे चरित्र मराठीसह अनेक भारतीय व परकीय भाषांमध्ये अनुवादित करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर तब्बल २५ वर्षे मराठ्यांनी औरंगजेबाच्या बलाढ्य सैन्याविरुद्ध जो रोमहर्षक आणि देदिप्यमान लढा दिला, त्याचा साधार इतिहास डॉ. पवार यांनी जगासमोर आणला. त्यांच्या या अविरत ज्ञानसाधनेची दखल घेत राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांचा गौरव करण्यात आला आहे. सन २००९ मध्ये महाराष्ट्र विधानमंडळातर्फे प्रकाशित राजर्षी शाहू छत्रपतींच्या जीवन व कार्यावरील ग्रंथांचे विमोचन देशाच्या तत्कालीन मा.राष्ट्रपती श्रीमती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते झाले होते, तर २०१३ मध्ये मा.राष्ट्रपती श्री. प्रणव मुखर्जी यांच्या हस्तेही त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला होता. त्यांना 'आचार्य अत्रे साहित्य पुरस्कार', 'डी. लिट.' पदवी यांसह ३० पेक्षा जास्त प्रतिष्ठित पुरस्कार लाभले आहेत. 'महाराणी ताराबाई', 'छत्रपती शिवाजी महाराज', 'सेनापती संताजी घोरपडे' आणि 'राजर्षी शाहू एक दृष्टीक्षेप’ ही त्यांची प्रमुख ग्रंथसंपदा आजही इतिहास अभ्यासकांसाठी दीपस्तंभ ठरत आहे. यापूर्वी हा ऐतिहासिक पुरस्कार भाई माधवराव बागल, ना. ग. गोरे, बाबा आढाव, डॉ. जनार्दन वाघमारे, डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग, तसेच डॉ. जब्बार पटेल यांसारख्या थोर विचारवंतांना व समाजसेवकांना प्रदान करण्यात आला आहे. राजर्षी शाहू मेमोरियल ट्रस्ट गेल्या ३९ वर्षांपासून शाहू महाराजांना अभिप्रेत असणाऱ्या पुरोगामी विचारांचा प्रसार व प्रचार करण्याचे कार्य व्याख्यानमाला व विविध उपक्रमांच्या माध्यमातून करत आहे. यंदाच्या ४० व्या पुरस्कारासाठी शाहू विचारांचे खरे पाईक असणाऱ्या डॉ. जयसिंगराव पवार यांच्या नावाची घोषणा झाल्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रभरातून आणि इतिहासप्रेमींकडून अत्यंत समाधान व आनंद व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

शिरूर के नागरगाव में ट्रांसफॉर्मर ले पानी की आपूर्ति ठप्प, किसान चिंतित

Shirur, Maharashtra:नागरगावात ट्रान्सफॉर्मर जळून खाक शिरूर तालुक्यातील नागरगाव परिसरात नदीकाठच्या शेतांना पाणीपुरवठा करणारा वीज ट्रान्सफॉर्मर अचानक जळून खाक झाल्याची घटना घडली आहे. या ट्रान्सफॉर्मरवर अनेक शेतकऱ्यांची सिंचन व्यवस्था अवलंबून असल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. सध्या पिकांना पाण्याची गरज असताना वीजपुरवठा खंडित झाल्याने सिंचन व्यवस्था ठप्प झाली आहे. त्यामुळे पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जाते. शेतकऱ्यांनी महावितरणकडे तातडीने नवीन ट्रान्सफॉर्मर बसवून वीजपुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के आवाशी में भंगार गोदाम में भीषण आग, लाखों का नुकसान, हताहत नहीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये भंगार गोडाऊनला भीषण आग.. लाखोंचे नुकसान, जीवितहानी टळली!.. ​रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील आवाशी येथे एका भंगार गोडाऊनला भीषण आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे.. मुंबई-गोवा महामार्गावरील आवाशी बसथांब्याजवळ असलेल्या या गोडाऊनमध्ये प्लास्टिक आणि रासायनिक कारखान्यांचे रिकामे ड्रम असल्याने आगीने रौद्ररूप धारण केले होते.. घटनेची माहिती मिळताच घरडा केमिकल्स आणि एमआयडीसीचे अग्निशमन बंब तातडीने घटनास्थळी दाखल झाले.. स्थानिक तरुणांच्या मदतीने तब्बल दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आणण्यात यश झाले.. या आगीत लाखोंचे नुकसान झाले असले,तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही.. आग नेमकी कशामुळे लागली,याचा तपास सध्या पोलीस करत आहेत.
0
0
Report

गोहे बुद्रुक में माँ ने दो बच्चों के साथ कुएँ में छलांग लगाई

Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील गोहे बुद्रुक येथे एका आईने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी मारून जीवन संपवलं आहे. या दुर्दैवी घटनेत आईसह दोन्ही निष्पاص मुलांचा मृत्यू झाला असून, या घटनेमुळे संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे आणि हळहळ व्यक्त होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अश्विनी वाळकोळी या महिलेने तिची मुलगी अक्षिता आणि मुलगा कार्तिक या दोन्ही लहान मुलांसह विहिरीत उडी घेतली. स्थानिक नागरिकांनी तिघांनाही तातडीने विहिरीबाहेर काढून घोडेगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. महिलेने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. सध्या घोडेगाव पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून आत्महत्येमागचं कारण शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. एकाच कुटुंबातील तिघांच्या अकाली जाण्याने गोहे बुद्रुक गावावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report

शिरूर में 350 किलो मिलावटी खवा फेंकता पल्ला, एफडीए की कार्रवाई की तैयारी

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथे अन्न आणि औषध प्रशासन एफडीएच्या धास्तीने तब्बल ३५० किलो भेसळयुक्त खवा शेतात फेकून टोळीने पळ काढल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, शिरसगाव काटा येथील एका शेताशेजारी हा मोठ्या प्रमाणावर खवा फेकून देण्यात आला होता. अन्न भेसळविरोधी पथक कारवाई करणार असल्याची कुणकुळ लागताच, कारवाईच्या भीतीने अज्ञात इसमांनी हा साठा तिथेच फेकला आणि तिथून पळ काढला. ऐन सणासुदीच्या काळात किंवा वाढत्या मागणीच्या पार्श्वभूमीवर हा एवढा मोठा भेसळयुक्त खव्याचा साठा कुठे सप्लाय केला जाणार होता, याबाबत आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळणाऱ्या या रॅकेटचा पर्दाफाश करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन आता या प्रकरणी पुढील तपास करत आहे.
0
0
Report
Advertisement

ATS ने आतंकवादी समर्थक पोस्ट पर कार्रवाई करते हुए लातूर के युवक से पूछताछ शुरू किया

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज ... दहशतवादी समर्थक पोस्टवर एटीएसची नजर.... सोशल मीडियावरील लाईक, कमेंट, स्टेटस तरुणाला भोवले... पाकिस्तानचा दहशतवादी समर्थक शहजाद भट्टी याच्याशी संबंधित सोशल मीडियावरील पोस्ट, स्टेटस, लाईक आणि कमेंट करणाऱ्यांविरोधात एटीएसने कारवाईचा बडगा उगारला आहे. या कारवाईदरम्यान लातूर जिल्ह्यातील एका तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे... त्यामुळे एटीएसच्या या कारवाईमुळे जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सोशल मीडियावर दहशतवादाचे समर्थन करणाऱ्या किंवा त्याला प्रोत्साहन देणाऱ्या कोणत्याही कृतीवर एटीएसकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून, अशा प्रकरणांवर पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे संकेत या कारवाईतून मिळत आहेत.
0
0
Report

कोल्हापुर के कैसीनो वीडियो के बाद ठाकरे-शिंदे गट के बीच नया विवाद

Kolhapur, Maharashtra:गोव्यातील एका कॅसिनोमधील कथित व्हिडिओमुळे कोल्हापुरच्या राजकारणात नवा वाद पेटला आहे. शिदे सेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र आणि नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर कॅसिनोमध्ये जुगार खेळत असल्याचा आरोप ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी केला आहे. या आरोपांमुळे कोल्हापुरातील ठाकरे सेना आणि शिंदे सेना यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रविकिरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत कॅसिनोमधील एक कथित व्हिडिओ सार्वजनिक केला. या व्हिडिओमध्ये नगरसेवक ऋतुराज क्षीरसागर गोव्यातील कॅसिनोमध्ये दिसत असल्याचा दावा करण्यात आला. जनतेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या लोकप्रतिनिधीने अशा ठिकाणी जुगार खेळणे योग्य आहे का, असा सवाल इंगवले यांनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी क्षीरसागर कुटुंबावरही टीका केली.
0
0
Report

जालना में 1,903 लीटर मिलावट वाला तुप जप्त: FDA ने Mundda Industries पर छापा

Jalna, Maharashtra:जालन्यात 1 हजार 903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त 13 लाखांचं तूप जप्त अँकर : जालन्यात 1 हजार 903 लिटर भेसळयुक्त तूप जप्त करण्यात आलं आहे.अन्न आणि औषधी प्रशासन विभागाने ही कारवाई केली आहे.या कारवाईत एकूण 13 लाखांचं तूप जप्त करण्यात आलं आहे.मुंदडा इंडस्ट्रीजवर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली आहे.तुपात खाद्यतेल टाकून ही भेसळ करण्यात येत असल्याचे या कारवाईतून समोर आलं आहे.घनसावंगी तालुक्यातील तिर्थपुरी येथे ही कारवाई करण्यात आली आहे.भेसळयुक्त तुपाचे नमुने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत आहे.दरम्यान तुपात भेसळ करणाऱ्या मुंदडा इंडस्ट्रीजला अन्न आणि औषधी प्रशासनाकडून सील ठोकण्यात आलं असल्याची माहिती देखील समोर आली आहे.
0
0
Report
Advertisement

चुनाव बिनविरोध कराने की भाजप-युवी रणनीति पर महाविकास आघाडी का बड़ा आरोप

Buldhana, Maharashtra:बुलढाणा हर्षवर्धन सपकाळ बाईट्स... उद्विग्न प्रतिक्रिया महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून आम्ही अनेक ठिकाणी उमेदवार उभे केले आहेत... कुठे घातपाताने तर कुठे विश्वासघाताने.. तर कुठे पैसा फेक तमाशा देख अशा पद्धतीने ही निवडणूक बिनविरोध करण्यासाठी महायुती लागलेली आहे. महायुतीची अंतर्गत जी धुसफूस आहे तिचा केव्हाही स्फोट होऊ शकतो. सदर विरोधात कुणीही ठेवायचं नाही अशी व्ह्यूहरचना सत्ताधारी व विशेषता भाजपने केली असल्याचे आढळून येत आहे. या निवडणुकीत सिलेक्टिव्ह मतदार असतात ही सार्वत्रिक निवडणूक नाही त्यामुळे या निवडणुकीत निवडून आलेला उमेदवार हा प्रचंड पैसा खर्च करून निवडून येतो. पैसे वाटून हा मतदार निर्माण झालेला आहे.. विकृत पद्धतीने महायुती या निवडणुकीला सामोरे जात आहे. हा पैसा मतदारांना देण्याऐवजी उमेदवारांना देऊन त्यांनाच माघार घ्यायला भाग पाडल्या जात आहे. सर्व पैसा आपसात वाटून घेऊन हमने सब नंगे अशा प्रकारची व्यू ह रचना भाजपने केली आहे.. आम्ही तीव्र शब्दात याची निंदा करतो भाजपला सत्तेची पराकोटीची हाव आहे... उमेदवारांचे विड्रॉल असतील किंवा माघार असतील या अनुषंगाने मी हा लोकशाहीचा काळा पर्व सुरू आहे. आता निकोप लोकशाहीसाठी नागरिकांनी रस्त्यावर उतरले पाहिजे... निवडणूक आयोग आणि भाजप अशी एक पाशवी युती आहे त्यातून ते बहुमताकडे जात असतात.. बिनविरोध निवडणूक का होऊ द्यावी? आम्ही त्यांच्या मताच्या विरोधात आहोत.. आमचे सदस्य कमी असो किंवा जास्त एकेकाळी तुमचे दोनच लोकसभा सदस्य होते... त्यावेळेस आम्ही असं म्हटलं नाही.... आता तुम्ही असं म्हणताय म्हणजे त्याचा अर्थ स्पष्ट आहे की तुम्हाला लोकशाही गुंडाळून ठेवायची आहे.... निवडणूक पद्धत बंद करून तुम्हाला नॉमिनेशन सिस्टीम सुरू करायची आहे.. बाईट - हर्षवर्धन सपकाळ..
0
0
Report

कोकण विधान परिषद में बिनविरोध के बाद अनिकेत तटकरे की शेखर निकम से पहली मुलाकात

Ratnagiri, Maharashtra:सावर्डे - रत्नागिरी.. बिनविरोध झाल्यानंतर अनिकेत तटकरेची पहिलीच भेट आमदार शेखर निकमाना.. अँकर कोकण विधान परिषद निवडणուք बिनविरोध झाल्यानंतर आमदार अनिकेत तटकरे यांनी चिपळूण सावर्डे येथे राष्ट्रवादीचे आमदार शेखर निकम यांची प्रथम भेट घेतली आणि दिवंगत माजी खासदार गोविंदरावजी निकम यांच्या समाधी स्थळाला भेट दिली.. अनिकेत तटकरे पॉइंटर कोकणासाठी अधिकाधिक काम करण्याचा माझ्याकडून प्रयत्न होईल.. महायुती या निवडणुकीच्या माध्यमातून पुन्हा एकदा सक्षम झाली आहे.. बाळ मानेनी स्वतःहून त्यांची भूमिका या ठिकाणी घेतल्यामुळे मी त्यांचे मनापासून आभार मानतो.. भास्करराव जाधव जर बोलले असतील तर तटकरे साहेबांचा करिष्मा त्यांनी त्यांच्या वक्तव्यातून दाखवून दिला आहे.. Bt - अनिकेत तटकरे..
0
0
Report

पुणे में महाविकास आघाडी पर धोखाधड़ी के आरोप, राजनीति गर्म

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड बाईट-रोहित पवार,आमदार ऑन महाविकास आघाडी फसवणूक.. -प्रशांत जगताप अशात खूपच भावनिक होतायत. अहिल्यानगर, सोलापूर येथे काय झालं?, असे निर्णय नेते घेत असतात. त्यांनी उत्तर देण्याऐवजी नेत्यांनी बोलावं, मग याच्यावर बोलू, -एकनाथ शिंदे आणि स्वर्गीय अजित दादांचा पक्ष समुद्रासारखा मोठा असला तरी तो पक्ष पेल्यातच भाजपने ठेवला आहे. -निवडणूका आल्या की, नाराज होतात...निवडणुका संपल्या की जैसे थे.. -2029 मध्ये ह्यांना भाजप लाथ मारेल. त्यांच्या पक्षातील 40 आमदार भाजप घेईल. -पुणे विधान परिषद कोट्यवधी पैशांचा वापर होतोय, हे बघून श्रीकांत पाटील यांनी माघार घेतली असेल. -आम्हाला कर्ज कुणी देत नाही. बँकेतून कर्ज घेतो. 10 कोटी कर्ज देत असतील नेत्यांना विचारायला हवं. उमेदवारीसाठीच दिले का? असा प्रश्न आहे. जय पवार ला पैसे दिले असे नाही, इतरांना ही दिले आहेत. काकडे बँक च चालवत आहेत. निवडणुकीत पैशांचा उतमात होईल. -कोक्रोज पार्टीचे मुद्दे महत्वाचे आहेत. तो सोशल मिडियावरील ग्रुप आहे. त्यांना पाठिंबा देण्याची गरज नाही. -रोहित पवारांना बोलवू नये म्हणून पीडित कुटुंबावर दबाव टाकला. 14 वर्षीय मुलीला 21 वर्षीय मुलाने पळवून नेले आहे. सांगवी पोलीस तपास करत आहेत. आता अधिकारी बदलून तपासला गती देतील. -5-10 टक्के पोलिस अधिकारी चुकीचे आहेत. सर्व तसे नाहीत... -पुण्यातील हडपसर येथील विषारी दारू प्रकरणी आकडे दाबण्यात आलेत. -अवैध दारू प्रकरणी पोलीस हप्ते घेतात. -पोलीस ठाण्यात गरीब आणि श्रीमंत असा भेदभाव केला जातो. -पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात हवा.
0
0
Report
Advertisement

गोरे बनाम मोहिते पाटील: भाजपा की जीत की औपचारिकता

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधानपरिषदेच्या विजयाचा आकडा देखील सांगेन फक्त मला एक दिवस द्या - मंत्री जयकुमार गोरे जयकुमार गोरे (पालकमंत्री) विधानपरिषद निवडणूक लागली आहे, विरोधाला विरोध म्हणून उमेदवार उभे असली तरी भाजप गांभीर्याने ही निवडणूक लढवणार आता फक्त विजयाची औपचारिकता बाकी आहे. ज्या उमेदवारांना बोलणं अपेक्षित होत त्यांच्याशी बोलणे झाले पण कांही लोकांशी मला बोलू वाटलं नाही. ज्या उमेदवारांनी अर्ज मागे घेतला आहे ते उमेदवार भाजपचा उमेदवार जिंकण्यासाठी मदत करणार आहेत. भाजपचा विजय होणार याची विरोधकांना पूर्ण जाणीव आहे. ही निवडणूक कशी लागली आणि कोणी लावली यादृष्टीने बोलणे आता उचित नाही. आपण ताकदीने ही निवडणूक लढली पाहिजे,मी आज सांगतो,या निवडणुकीतील मार्जिन बघून पुढील निवडणुकीत विरोधक उमेदवार देणार नाहीत. विजयाचा आकडा सुद्धा सांगेन फक्त मला एक दिवसाचा अवधी द्या.. या निवडणुकीत झारीतला शुक्रचार्य कोणीही नाहीये,वसंत देशमुख हे निवडणूक लढवत आहेत मात्र त्यांच्या मागे जे आहेत त्यांची आता ताकद राहिलेली नाहीये. कोण पाठीमागे आहे आणि कोण पुढे आहे हे बघायचं कारण नाहीये.. लोकशाहीमध्ये विरोधक एकवेळ उभा राहिला की त्याला कमी समजण्याचे कारण नाही. ही निवडणूक गांभीर्याने लढली पाहिजे ती आम्ही लढू ऑन गोरे विरुद्ध मोहिते पाटील लढत ज्यांच्याकडे 616 पैकी 16 मत नाहीत अशांशी लढत होण्याचं काय कारण नाही ही निवडणूक म्हणजे फक्त औपचारिकता आहे आणि ती आम्ही 18 तारखेला पूर्ण करू. विनाकारण कोणाचे तरी नाव घेऊन कोणाला मोठं करू नका ज्या कारणासाठी निवडणूक लागली ते कारण साध्य होऊ देऊ नका माध्यमांना दिला जयकुमार गोरे यांनी सल्ला. भारतीय जनता पक्षाने मला काही उद्दिष्ट ठेवून येथे पाठवला आहे ते उद्दिष्ट मी पूर्ण करणार आहे. ऑन बिनविरोध निवडणूक हे अपयश तुमचंच आहे . लोकशाहीत निवडणूक लागली पाहिजे व मतदान देण्याचा अधिकार बाबासाहेबांनी दिला आहे. ऑन अदृश्य शक्ती बिलकुल सगळ्या अदृश्यशक्ती वरती माझं बारकाईने लक्ष आहे. या दृश्य शक्ती संदर्भात काळजी करण्याचं काही कारण नाही या अदृश्य शक्तीवर बारकाईने आपण लक्ष ठेवून काम करू बाईट - जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
0
Report

यवतमाळ विधान परिषद चुनाव: दुष्यंत चतुर्वेदी की अविरोध जीत, महायुती का मजबूत प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीत महायुतीकडून शिवसेनेचे दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाली, ही निवडणूक अविरोध व्हावी अशी सर्वपक्षीय नेत्यांची इच्छा होती. महाविकास आघाडीचे संख्याबळ तर नव्हतेच शिवाय कुठलेही नियोजन नव्हते, त्यामुळेच त्यांच्या उमेदवाराने माघार घेतली. त्यांच्यासह इतरही अपक्षांवर कुठलाही दबाव नसल्याची प्रतिक्रिया पालकमंत्री संजय राठोड यांनी दिली आहे. निवडणूक अविरोध झाल्यानंतर लवकरच सर्व समर्थक मतदारांचा व महायुतीचा मेळावा घेणार असल्याचे देखील त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top