icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला के मजलापुर में कर्ज के भार से तंग आकर किसान ने आत्महत्या कर ली

Akola, Maharashtra:अकोला तालुक्यातील मजलাপूर येथील अल्पभूधारक शेतकरी शेख सलीम शेख रशीद यांनी गुरुवारी आपल्या राहत्या घरी आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शेख सलीम हे अल्पभूधारक शेतकरी असून शेती व्यवसायावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून होता. मागील काही काळापासून शेतीमध्ये सातत्याने नापिकी होत असल्याने त्यांनी कर्जाचा आर्थिक भार वाढला होता. पिकांचे नुकसान आणि अपेक्षित उत्पन्न न मिळाल्याने ते आर्थिक अडचणीत सापडले होते. शेख सलीम यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे. तसेच त्यांना दोन भाऊ असून, दोन्ही भावांची मानसिक प्रकृती ठीक नसल्याची माहिती कुटुंबीयांकडून देण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट कोसळले आहे. मागील काही महिन्यांपासून पावसाची अनिश्चितता आणि पिकांचे नुकसान यामुळे शेतकरी आर्थिक संकटाचा सामना करीत आहेत. अशाच परिस्थितीत शेख सलीम यांनी टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहितीतून समोर आले आहे.घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणेने घटनास्थळी धाव घेतली असून, पुढील तपास सुरू आहे. आत्महत्येचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार आहे.
0
0
Report

अकोला में कीटनाशक फवारणी से विषबाधा, GMCH में 22 मरीज भर्ती

Akola, Maharashtra:अकोला जिले से खबर: अकोला जिले में अत्यंत चिंताजनक बातमी सामने आ रही है कि पिकांवर कीटनाशकांची फवारणी करताना काळजी न घेतल्यामुळे शेतकरी और शेतमजुरांना विषबाधा होण्या의 घटना वेगाने वाढल्या आहेत. سध्या अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या (जीएमसी) सर्वोपचार रुग्णालयात तब्बल २२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. अकोला जिल्ह्यात सध्या कपाशी, सोयाबीन और तूर पिकांवर कीटकनाशक फवारणीचा हंगाम शिगेला पोहोचला आहे. कपाशीची झाडे चार ते पाच फुटांपर्यंत वाढल्याने आणि पिके दाट झाल्याने फवारणी करताना मोठी अडचण निर्माण होत आहे. बहुतेक शेतकरी व मजुरांकडून मास्क, गॉगल, हातमोजे आणि योग्य संरक्षणात्मक साहित्याचा वापर केला जात नाही. परिणामी, कीटकनाशकांचे विषारी द्रावण नाक, डोळे व त्वचेच्या संपर्कात आल्याने विषबाधेचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे जीएमसीच्या वॉर्ड क्रमांक ३१ आणि ३२ मध्ये सध्या २२ विषबाधित रुग्ण उपचार घेत असून, यामध्ये तरुणांची संख्या चिंताजनक रित्या अधिक आहे. रुग्णालयात दररोज एक ते दोन नवीन रुग्ण दाखल होत आहेत. या गंभीर परिस्थितीवर बोलताना जीएमसीचे अधिष्ठाता डॉ. संजय सोनुने यांच्यासह रुग्ण कल्याण समिती सदस्य नितीन सपकाळ यांनी शेतकरी व मजुरांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. शासन स्तरावर अशा शेतकऱ्यांना काही आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आता शेतकरी कुटुंबीयांकडून होत आहे.
0
0
Report
Advertisement

चलती लोकल में मोबाइल चोर: मनोज पटेल गिरफ्तार, डोंबिवली GRP

Kalyan, Maharashtra:धावत्या लोकलमध्ये मोबाईल चोरी करणाऱ्या सराईत चोरट्याला अटक धावत्या लोकलमधून प्रवाशांचे मोबाईल चोरणाऱ्या एका सराईत चोरट्याला डोंबिवली जीआरपी पोलिसांनी अटक केली आहे. मनोज पटेल असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. कल्याण आणि डोंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाचा महागडा मोबाईल मनोज पटेल याने चोरल्याचा आरोप आहे. या प्रकरणाचा तपास करत असताना डोंबिवली रेल्वे पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन अटक केली. मनोज पटेल हा भिवंडी येथील रहिवासी असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणात डोंबिवली रेल्वे पोलिसांकडून पुढील तपास सुरू असून, आरोपीने अशाच प्रकारे आणखी काही चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचाही तपास केला जात आहे.
0
0
Report

सांगली के गणपति विसर्जन में भाग्यश्री की अनुपस्थिति चर्चा का केंद्र

Sangli, Maharashtra:सांगली गणपती पंचायत संस्थानच्या मानाच्या श्रींचं मोठ्या जल्लोषात विसर्जन, अभिनेत्री भाग्यश्रीची अनुपस्थिती चर्चेचा विषय. अँकर - सांगलीच्या मानाच्या गणपती संस्थानच्या गणरायाला मोठ्या भक्तीभावात आणि जल्लोषात निरोप देण्यात आला. गणपती पंचायत संस्थानचे अधिपती राजे विजयसिंह पटवर्धन, राणी राजलक्ष्मी यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरवणुकीने लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. अभिनेत्री भाग्यश्री हिची अनुपस्थिती या वेळी चर्चेचा विषय ठरली. सांगली पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या उपस्थितीत दरबार हॉल येथे श्रींचे आरती पार पडली, त्यानंतर लाकडी रथातून पारंपारिक वाद्यांच्या गजरात, ढोल ताशांच्या निनादात सांगलीच्या लाडक्या गणरायाला निरोप देण्यात आला. यावेळी हजारो सांगलीकरांनी मिरवणुकीमध्ये सहभाग घेतला होता. गणेश प्रतिष्ठापनेच्या दिवशी अभिनेत्री भाग्यश्रीने केलेल्या आरती आणि मंदिराच्या गाभाऱ्यातील प्रवेशावरून पटवर्धन कुटुंबातील कलह चव्हाट्यावर आला होता. वारसाहक्काच्या वादानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये परंपरेप्रमाणे अभिनेत्री भाग्यश्री उपस्थिती लावेल, असे अंदाज व्यक्त करण्यात होत होते. त्यामुळे सांगलीकरांचे देखील लक्ष गणेश विसर्जनाच्या मिरवणुकीत अभिनेत्री भाग्यश्रीच्या उपस्थितीकडे लागून राहिले होते, मात्र विजयसिंहराजे पटवर्धनांनी भाग्यश्रीबाबत घेतलेली भूमिका आणि झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर अभिनेत्री भाग्यश्रीने उपस्थित न राहण्याचं पसंत केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे अभिनेत्री भाग्यश्रीची अनुपस्थिती आता चर्चेचा विषय ठरली आहे
0
0
Report

परभणी में बंजारा समाज का जलसमाधी प्रदर्शन, एसटी आरक्षण की मांग तेज

Parbhani, Maharashtra:अँकर -बंजारा समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण देण्याच्या मागणीसाठी परभणीच्या येलदरी जलाशयात बंजारा समाज बांधवांच्या वतीने जलसमाधी आंदोलन करण्यात आलं आहे. जिंतूरमध्ये आरक्षणाच्या मागणीसाठी गेल्या 14 दिवसांपासून उपोषणाला बसलेले विनोद आडे यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी बंजारा समाज बांधवांनी येलदरी धरणाच्या पाण्यात उतरून शासनाचा निषेध केला. बंजारा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीची शासनाने तात्काळ दखल घेऊन एसटी प्रवर्गातून आरक्षण द्यावं, अशी मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान, आरक्षणाच्या मागणीवरून बंजारा समाज बांधव आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं आहे
0
0
Report
Advertisement

मालवणी क्षेत्र में धारदार हथियारों से हमला; एक की मौत, दो घायल

Mumbai, Maharashtra:मालवणी परिसरात धारदार शस्त्रांनी तिघांवर हल्ला; एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी मुंबईच्या मालाडमधील मालवणी परिसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. मालवणी सहा नंबर रोडवरील हाथी गार्डनजवळ तीन जणांवर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असून, दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच मालवणी पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. दरम्यान, हल्ला करणाऱ्या संशयित आरोपीला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेतल्याची माहिती आहे. मात्र, हा हल्ला नेमका कोणत्या कारणातून झाला, याबाबत अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. सूत्रांच्या माहितीनुसार, हल्लेखोर बाहेरील व्यक्ती असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, याला पोलिसांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. घटनास्थळी पोलीस उपायुक्त संदीप घुगे यांच्यासह वरिष्ठ पोलीस अधिकारी आणि पोलीस निरीक्षक दाखल झाले असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

कांदिवली के चारकोप में गैस पाइपलाइन पर आग, दमकल राहत कार्य जारी

Mumbai, Maharashtra:कांदिवली-चारकोपमध्ये गॅस पाइपलाइनला आग कांदिवलीच्या चारकोप परिसरात गॅस पाइपलाइनला आग लागल्याची घटना समोर आली आहे. आज दुपारच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. आग नेमकी कशामुळे लागली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. गॅस पाइपलाइन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून परिसरात सतर्कता वाढवण्यात आली आहे. आगीमुळे कोणतीही जीवितहानी किंवा दुखापत झाली आहे का, याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
0
0
Report
Advertisement

नागपूर के भोसला महल में 298 वर्ष पुरानी महालक्ष्मी पूजा जारी

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या ऐतिहासिक भोसला पॅलेस येथे नागपूरकर भोसले घराण्याच्या वतीने यंदाही पारंपरिक महालक्ष्मी अर्थात गौरी पूजन उत्साहात पार पडत आहे. या पूजनाला तब्बल २९८ वर्षांची ऐतिहासिक आणि धार्मिक परंपरा लाभली आहे. इ.स. 1728 मध्ये रघुजी भोसले प्रथम यांच्या काळापासून राजघराण्यात गणेशोत्सव आणि महालक्ष्मी पूजनाची परंपरा सुरू झाल्याचे सांगितले जाते. अनेक पिढ्या बदलल्या, काळ बदलला; मात्र भोसले घराण्याची ही धार्मिक परंपरा आजही अखंडपणे सुरू आहे. नागपूर भोसले घराण्याचे वंशज मुधोजी राजे भोसले यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी....
0
0
Report

अहिल्यानगर में बारिश कम, 575 गांवों तक पानी टैंकर से पहुँचा रहा है

Ahilyanagar, Maharashtra:अर्ध्यापेक्षा ज्यास्त पावसाळा सरला तरी राज्यातील मोठ्या भागात म्हणावा असा पाऊस पडलेला नाही खरिपाची पीक तर सुकली आहेतच पिण्याच्या पाणीसाठी देखील वणवण फिरण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. भर पावसाळ्यात शासनाला टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे. यात अहिल्यानगर जिल्ह्यात राज्यातील सर्वाधिक 113 टँकरच्या माध्यमातून 575 गावांना पाणीपुरवठा केला जात आहे...परतीचा पाऊस जोरदार झाला नाही तर आगामी काळात ट्रांकरची संख्या वाढणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील दक्षिण भागात यावर्षी अत्यंत कमी पाऊस झाला आहे. जून ते सप्टेंबर महिन्यापर्यंत होणाऱ्या सरासरी पावसाच्या केवळ 45 टक्के इतका पावस झाला आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यामध्ये जिल्ह्यात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे सध्या अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 113 टँकरच्या माध्यमातून 575 गाव वाड्यावर पाणीपुरवठा केला जात आहे टँकरद्वारे केला जाणारा पाणीपुरवठा देखील तुटपुंजा ठरत आहे महिलांना घागर भर पाण्यासाठी मोठे कष्ट घ्यावे लागत आहे गावात येणारा टँकर विहिरीत सोडला जातो आणि नंतर विहिरीतून पाणी शेंदून ग्रामस्थांना घरी न्यावं लागतं यासाठी वेळ आणि कष्ट लागतात. जिल्ह्याच्या पूर्व उत्तर भागामध्ये असलेल्या तालुक्यांमध्ये चांगला पाऊस झाला आहे त्यामुळे जिल्ह्यात असलेल्या धरणांची परिस्थिती चांगली दिसते मात्र दक्षिण भागातील तालुक्यात अत्यंत कमी पाऊस झाल्याने परिस्थिती बिकट आहे. शेवगाव आणि पाथर्डी या दोन तालुक्यांमध्ये 59 टँकरच्या माध्यमातून 331 गाव वाड्यावर त्यांना पाणीपुरवठा केला जात आहे जिल्हा प्रशासनाकडून पाण्याचे स्रोत आरक्षित केले जात असून अवैध पाणी उपसा करण्यास मज्जाव करण्यात आला आहे. यावर्षी आतापर्यंत पावसाळ्याने शेतकऱ्याची घोर निराशा केली आहे खरिपाचे पीक शेवटच्या घटका मोजत आहे तर पिण्याच्या पाण्यासाठी महिलांची भटकंती सुरू झाली आहे शेवटच्या टप्प्यात पावसाने कृपादृष्टी दाखवली नाही तर जिल्ह्यावर घोंगवणार दुष्काळाच संकट अधिक घट्ट होणार आहे.
0
0
Report
Advertisement

चिमूर में कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार के नेतृत्व में किसान-महिला-विद्यार्थी मोर्चा

Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चिमूर येथे तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा अँकर:- चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नेतृत्वात आज शेतकरी, महिला व विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसाठी तहसील कार्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. पंचायत समिती येथून या मोर्चाला सुरुवात झाली. या मोर्चात विजय वडेट्टीवार यांच्यासह त्यांची कन्या शिवानी वडेट्टीवार ही सहभागी झाल्या होत्या. मोर्चाच्या माध्यमातून काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी सरकारवर जोरदार टीका केली. शेतकऱ्यांना उध्वस्त करू नका, भूलथापा देऊ नका, शेतकऱ्यांची कर्ज माफी कुठ आहे, किती लोकांना कर्जमाफी झाली. कोणता माणूस कर्जातून मुक्त झाला असा सवाल वडेट्टीवार यांनी सरकारला विचारला. हा मोर्चा आमची कर्जमाफी पूर्ण करा नाहीतर खुर्ची खाली करा हा इशारा देण्यासाठी मोर्चा असल्याचं वडेट्टीवार म्हणाले.
0
0
Report

तटकोकण में गणेशोत्सव: ओवसा परंपरा आज भी महिलाओं के हाथों सजती दिखी

Oras Bk., Maharashtra:गणेशोत्सवाच्या काळात तळकोकणात विविध परंपरा आणि रूढींचे दर्शन होत असते. अशीच एक पिढ्यानपिढ्या जपली जाणारी परंपरा म्हणजे ओवसा मानवण्याची परंपरा. तळकोकणात गोरीपूजनाच्या दिवशी ओवसा मानवण्याची प्रथा आहे. आजही सवाष्ण स्त्रिया ही परंपरा जपत आहेत. जंगलातील काही वनस्पतीची फुले पाने फळे आदि घेऊन हा ओवसा सजविला जातो. मानाच्या गौरी आणि ग्रामदेवतेकडे हा ओवसा मानवला की गावातील गणपतीचे दर्शन घेऊन त्याला ओवसा मानवला जातो. सवाष्ण स्त्रिया आजही ही परंपरा जपत आहेत याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

यवतमाल घाटंजी में घर के सामने खेलते बच्चे की कार में फंसकर मौत

Yavatmal, Maharashtra:बातमी पालकांना 'खबरदार' करणारी पालकांनो, आपली मुलं घराबाहेर खेळत असताना किंवा कारमध्ये असताना पालकांनी विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे, कारण छोट्याशा निष्काळजीपणामुळे मोठी दुर्घटना घडू शकते. यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील चिखलवर्धा गावात "घरासमोर खेळत असताना शेजारी उभ्या असलेल्या कारमध्ये गेलेल्या चार वर्षीय चिमुकल्याचा कार मध्ये अडकून दुर्दैवी अंत झाला. या दुर्घटनेने समाजमन हादरले आहेत. अंश शेजारी खेळत असताना तो कार मध्ये अडकून पडला. दुसरा चिमुकला कार बाहेर पडला, परंतु दरवाजा बंद झाल्याने अंश कारमध्येच अडकला. तो बाहेर पडू शकलाच नाही. कुटुंबीयांना शोध लागायला वेळ लागला. अंशला कारमध्ये बेशुद्ध अवस्थेत आढळून आला. कडक ऊनामुळे प्रकृती खालावली होती. अंशला घाटंजी ग्रामीण रुग्णालय येथे नेऊन तपासणी केली, तेथून यवतमाळ शासकीय रुग्णालयात हलविण्यात आला. बालरोग तज्ञांनी अंशला मृत घोषित केले. हातपाय व पापणी कोरडी पडली होती; दीड तासपूर्वी मृत्यू झाला असावा असे डॉक्टरांनी सांगितले. कुटुंबीयांनी घाटंजी ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन मिळाला नव्हता असे आरोप केले आहेत. गावात शोककळा पसरली आहे. पालकांनी मुलांबाबत खबरदारी बाळगण्याची जबाबदारी अधोरेखित झाली आहे. कार नेहमी लॉक ठेवा - कार उभी ठेवत असताना ती नेहमी पूर्णपणे लॉक करून ठेवा, जेणेकरून मुले खेळता खेळता त्यात शिरणार नाहीत. कार चालवताना देखील चाइल्ड लॉक चा उपयोग करा. लहान मुलांच्या हाती कारच्या चाव्या देऊ नका, कारच्या चाव्या घरी देखील मुलां पोहोचण्यापासून दूर ठेवा. अगदी काही मिनिटांसाठीही मुलांना कारमध्ये एकटे सोडून दुकानात खरेदीसाठी किंवा बाहेर जाऊ नका. मुलांना आणीबाणीच्या प्रसंगी गाडीचा हॉर्न कसा वाजवायचा किंवा आतून लॉक कसे उघडायचे हे शिकवून ठेवा. कारचा शॉक सेन्सर सुरू ठेवा. गाडीचे हॅण्डल उघडण्याचा, काच तोडण्याचा, मोठा झटका बसल्यास हा शॉक सेंसर वाजतो. कारमधून उतरताना सर्व मुले बाहेर आली आहेत की नाही, याची नेहमी व्यवस्थित खात्री करा.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top