445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोदावरी में उच्च विसर्ग, जायकवाडी के लिए 8.68 टीएमसी पानी—बाढ़ की चेतावनी
Niphad, Maharashtra:गेल्या तीन दिवसांपासून नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात मुसळधार तर कधी संततधार पाऊस कोसळत असल्याने दारणा गंगापूर आणि पालखेड धरणातून तसेच गोदावरीच्या उपनद्यातून पुराचे पाणी निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडी च्या दिशेने गोदावरी नदी पात्रात आठ व प्रकार गेटच्या माध्यमातून 88 हजार क्यूसेक पाण्याचा या पावसाच्या हंगामातील उच्चांकी विसर्ग सुरू आहे मोठा विसर्ग सुरू असल्याने गोदावरी नदीने रुद्र रूप धारण केले आहे यामुळे प्रशासनाच्या वतीने गोदावरी काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे तर या पावसाच्या हंगामात आज सकाळी सहा वाजेपर्यंत नांदूर मधमेश्वर धरणातून जायकवाडीच्या दिशेने 8.68 टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आल्याने जायकवाडी धरणाच्या लाभ क्षेत्रातील गावांना पिण्यासाठी आणि सिंचनासाठी फायदा होणार आहे Yासंदर्भात धरण क्षेत्रातून आढावा घेतला है0
0
Report
आषाढ़ी एकादशी पर 24 घंटे की भव्य दर्शन कतार, भक्तों में उमंग
Pandharpur, Maharashtra:आषाढीच्या एकादशी आदल्या दिवशीच भाविकांना पदस्पर्श दर्शनासाठी लागतात तब्बल 24 तास, विठोबाचे दर्शन झाल्यानंतर आता भाग शीण थकवा निघून जाईल अशी भावना दर्शन रांगेत आलेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
सोलापुर में दूषित पानी से महिला की मौत, 40-50 लोग प्रभावित
Solapur, Maharashtra:सोलापुर शहरामध्ये दूषित पाणी पिल्याने एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे। शहरातील एस बी आयकॉन अपार्टमेंट मधील 40 ते 50 रहिवाशांना दूषित पाणी पिल्याने उलटी- जुलाबाचा त्रास होत असल्याची माहिती प्राथमिक तपासणीत समोर आली आहे। बोरच्या पाण्यात गटारीचे पाणी मिसळल्याने गंभीर प्रकार घडल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे। एकाच अपार्टमेंटमधील अनेकांना त्रास होत असल्याने परिसरात भीतीचे वातावरण आहे। उलटी, जुलाब, पोटदुखीचा त्रास होणाऱ्या नागरिकांवर महापालिका आरोग्य विभागाकडून उपचार सुरू आहेत.0
0
Report
Advertisement
हंगामे के बीच छह कृषि केंद्रों के लाइसेंस रद्द, 53 केंद्र निलंबित
Bhandara, Maharashtra:नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द,५३ कृषिकेंद्रांचे परवाने निलंबित. भंडारा जिल्ह्यात खरीप हंगाम सुरू होताच बियाणे खते व कीटकनाशकांच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून कृषी विभागाने भरारी पथकाच्या माध्यमातून धाड मारत कृषी केंद्रावर कार्यवाही केली आहे.यामध्ये सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द व ५३ निलंबित करण्यात आले आहेत. जिह्यात सध्या ८६२ बियाणे व खत विक्री कृषी केंद्र व ७५४ कीटकनाशक विक्रेते नोंदीकृत आहे.यापैकी ८०२ कृषी केंद्रांची तपासणी पूर्ण झाली आहे.यामध्ये नियमभंग करणाऱ्या सहा कृषी केंद्रांचे परवाने कायमचे रद्द करण्यात आले असून ५३ केंद्राचे परवाने निलंबित करण्यात आले आहे.या धडक कार्यवाही मुळे ऐन हंगामात कृषी केंद्र चालक धास्तावले आहेत.0
0
Report
आरापूर एमआईडीसी: किसानों के मुआवजे पर संघर्ष, जिला-प्रशासन की बैठक अगले सप्ताह
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये नव्याने होणाऱ्या आरापूर औद्योगिक वसाहतीसाठीची काही भागाची मोजणी पूर्ण झाली असली तरी शेतकऱ्यांच्या मोबदल्याच्या मागणीनंतर दराबाबत कोंडी कायम आहे. ही कोंडी सोडवण्यासाठी जिल्हा प्रशासन, लोकप्रतिनिधी आणि एमआयडीसीचे अधिकारी शेतकऱ्यांची मनधरणी करणार आहेत. यासंदर्भात येत्या आठवड्यात होणाऱ्या बैठकीला आमदार प्रशांत बंब, एमआयडीसी, महसूल विभागातील अधिकाऱ्यांची उपस्थिती राहणार आहे. शहरापासून २२ किमी असलेल्या आरापूर येथे ७६२ हेक्टर जागेवर एमआयडीसी उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावित एमआयडीसीसाठी बहुतांश मोजणीही पूर्ण झाली असून, या संदर्भात काही आठवड्यांपूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयात शेतकऱ्यांसोबत मोबदल्यासंदर्भात बैठक घेण्यात आली होती.0
0
Report
डीपीसी हर काम के जियो टैगिंग से भ्रष्टाचार पर रोक, राज्यभर में लागू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून होणाऱ्या प्रत्येक विकासकामाचा अचूक आणि पारदर्शक लेखाजोखा ऑनलाइन ठेवण्यासाठी शासनाने मोठा निर्णय घेतला आहे. एकाच कामासाठी वेगवेगळ्या यंत्रणांकडून परस्पर निधी लाटण्याच्या प्रकार रोखण्यासाठी आता डीपीसीच्या प्रत्येक कामाचे जिओ टॅगिंग बंधनकारक केले आहे. 'कामाचे जिओ टॅगिंग आणि 'महा युनिव्हरसल आयडी' प्रक्रिया पूर्ण होत नाही, तोपर्यंत बिल दिले जाणार नाही, याची अंमलबजावणी आता छत्रपती संभाजी नगरात सुरू झाली आहे... धुळे जिल्ह्यात हा उपक्रम पथदर्शी प्रकल्प म्हणून राबवला होता. तेथे भ्रष्टाचाराला लागूलेला चाप पाहून आता छत्रपती संभाजीनगरसह राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये ही प्रणाली लागू केली आहे. महापालिका आणि ग्रामीण भागातील हद्दीत डीपीसीच्या निधीतून झालेल्या प्रत्येक लहान-मोठ्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करून त्याचे जिओ टॅगिंग करण्याचे काम सध्या वेगाने सुरू आहे.0
0
Report
Advertisement
मालेगाव-उमरठी अवैध हथियार नेटवर्क का बड़ा पर्दाफाश पुलिस ने
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - कोम्बिंग ऑपरेशनमध्ये हिफजू इद्रीसच्या कनेक्शनचा उलगडा - धुळे, जळगाव, आणि मालेगावच्या पोलिसांकडून मध्यप्रदेशात कोम्बिंग ऑपरेशन... - पोलिसांकडून देशी कट्ट्याच अवैध शस्त्र पुरवठा कनेक्शन उध्वस्त उमरठी गावाबाबत माहिती लोकसंख्या सुमारे दोन हजाराच्या आसपास आहे. उमरठी हे दोन गावे असून एक गाव महाराष्ट्रात तर दुसरे गाव मध्य प्रदेशात येते, मध्य प्रदेशात उमरठी गाव हे डोंगराळ भागात आहे. या गावात काही जण घरातच गावठी कट्टे बनवतात. तेव्हा पोलिसांनी पहाटेच्या सुमारास 400 पोलिसांसह हे कॉम्बिंग ऑपरेशन राबविले. याठिकाणी 45 संशयितांच्या घरांची झडती घेतली, 20 व्यक्तीची चौकशी केली. 12 संशयीतांकडून दोन देशी कट्टे, चार जिवंत काडतूस तसेच कट्टे तयार करण्यात येणारा कच्चा माल व साहित्य जप्त केले आहे. 27 फरार संशयितांच्या घरांची जिओ टॅगिंग करण्यात आली. बाईट: सिद्धार्थ बरवाल, DYSP मालेगाव0
0
Report
सावित्री नगर में भटकते कुत्तों का आतंक, CCTV में कैद घटना, लोगों में भय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सावित्रीनगरात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ; घटना सीसीटीव्हीत कैद ANC : छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका प्रभाग क्रमांक ९ मधील सावित्री नगर परिसरात भटक्या कुत्र्यांचा वाढता त्रास पुन्हा एकदा समोर आला आहे. गजानन महाराज मंदिर रोडवर एका भटक्या कुत्र्याने रस्त्याने जाणाऱ्या व्यक्तीच्या पायाला चावा घेतल्याची घटना घडली असून हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून लहान मुले, ज्येष्ठ नागरिक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भटक्या कुत्र्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी महानगरपालिकेकडे केली आहे.0
0
Report
कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन, नदी किनारे सतर्कता जारी
Varsoli, Maharashtra:कासारसाई डैम 94% भर गया; 300 क्यूसेक विसर्जन शुरू. पवना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. मावळ आणि मुळशी तालुक्यासाठी महत्त्वाचं असलेलं कासारसाई धरण आता 94 टक्के भरलं असून धरणातून सध्या 300 क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हा विसर्ग थेट पवना नदीपात्रात सोडला जात असल्याने नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन पाटबंधारे विभागाकडून करण्यात आले आहे. कासारसाई धरणावरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी यांच्याकडून.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में बारिश घट, पंचगंगा नदी जलस्तर 6 इंच घटकर 31 फुट 9 इंच
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिल्ह्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला आहे, पंचगंगा नदीची पाणी पातळी 6 इंचांनी कमी झाली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 9 इंच इतकी झाली आहे. रात्री हीच पाणी पातळी 32 फूट 3 इंच इतकी होती. असे असले तरी जिल्ह्यातील 29 बंधारे पाण्याखाली आहेत. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस सुरू झाल्याने चिंतेत असणारा बळीराजा काहीसा सुखावला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी。0
0
Report
मावल तालुक़े में खरीफ पिक बीमा के लिए किसानों में जबरदस्त उत्साह
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात खरीप हंगाम 2026 साठी पंतप्रधान पिक विमा योजना सुधारित लागू करण्यात आली असून त्या अंतर्गत भात, सोयाबीन, भुईमूग पिकासाठी पिक विमा भरण्याच्या कामाला वेग आला आहे. मौजे शिरगांव येथे कृषि अधिकारी विकास गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली पिक विमा भरण्याचे प्रगती पथावर आहे. शिरगांव आणि परिसरातील गावामध्ये विविध कार्यकारी सोसायटी, ग्रामपंचायत, कृषि सेवा केंद्र, दूध संकलन केंद्रावर पिक विमा भरण्याबाबत प्रचार प्रसिद्धी करण्यात येत आहे. पिकांचे नैसर्गिक आपत्ती, वातावरणातील बदल यामुळे पिकांचे नुकसान होते त्यासाठी शेतकऱ्यांना आपल्या पिकासाठी सुरक्षा कवच हे पिक विमा भरल्यामुळे मिळते त्यामुळे शेतकऱ्यांनी हे पीक विमा भरण्यासाठी गर्दी केली आहे.0
0
Report
औंढे में विद्युत तार टूटने से तीन जानवरों की मौत
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मागील काही दिवसाहून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजवाहक तारा तुटून पडण्याच्या घटना घडत आहेत. त्यातच औढे गावात मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे महावितरणची ओव्हरहेड वीजवाहक तार तुटून शेतात पडली. या तारेच्या संपर्कात आल्याने एक दुभती गाय, एक वासरू आणि एक रेडा अशा तीन जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही जनावरे औढे गावातील नारायण मांडकेर यांच्या मालकीची असून, या दुर्घटनेमुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. महावितरण कंपनीने या घटनेची दखल घेऊन संबंधित शेतकऱ्याला तातडीने योग्य नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी पीडित शेतकऱ्यांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई: दहिसर पूर्व में तेज कार ने लोगों को कुचला, एक महिला गंभीर घायल
Mumbai, Maharashtra:मुंबईतील दहिसर पूर्व येथील आर.टी. परिसरात भरधाव कारने अचानक अनेकांना धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून, इतर काही जणांनाही किरकोळ दुखापत झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने पोलिस आणि रुग्णवाहिकेला घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि जखमी महिलेला उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या प्रकरणी पोलिसांनी कार चालकाला ताब्यात घेतले असून, अपघाताचे नेमके कारण काय होते याचा तपास सुरू आहे. तसेच या घटनेप्रकरणी पुढील कायदेशीर कारवाईही सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
मुंबई के कांदिवली पूर्व ठाकूर कॉम्प्लेक्स में मध्यरात्री चोरी: चार दुकानों के शटर तोड़े
Mumbai, Maharashtra:मुंबईतील कांदिवली पूर्व येथील ठाकूर कॉम्प्लेक्समधील गोकुळ नगरी-१ या उच्चभ्रू परिसरात मध्यरात्री धक्कादायक चोरीची घटना घडली आहे. अज्ञात चोरट्यांनी सलग चार दुकानांचे शटर आणि कुलूप तोडून दुकानांमध्ये प्रवेश केला आणि रोख रक्कम तसेच मौल्यवान वस्तूंवर हात साफ केला.\n\nया घटनेनंतर संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून व्यापाऱ्यांमध्येही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे ही संपूर्ण चोरीची घटना परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. या फुटेजमध्ये चोरटे अत्यंत शांतपणे आणि नियोजनबद्ध पद्धतीने चोरी करताना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.\n\nघटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी परिसराची पाहणी करत सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून त्याच्या आधारे आरोपींचा शोध सुरू केला आहे. तसेच फॉरेन्सिक पथकालाही घटनास्थळी पाचारण करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.\n\nया घटनेमुळे परिसरातील व्यापाऱ्यांनी रात्रीच्या गस्तीमध्ये वाढ करण्याची आणि सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, पोलिसांनी लवकरच आरोपींना अटक करण्यात येईल, असा विश्वास व्यक्त केला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Versova में पानी की पाइप फटने से जल जमाव, यातायात प्रभावित
Mumbai, Maharashtra:मुंबईच्या वर्सोवा परिसरातील जे.पी. रोडवरील संजीव एन्क्लेव्ह, ७ बंगलो येथे आज पाण्याची मुख्य पाईपलाईन फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती झाली. काही क्षणांतच हजारो लिटर पाणी रस्त्यावर वाहू लागल्याने परिसर जलमय झाला आणि वाहनचालकांसह पादचाऱ्यांनाही मोठा त्रास सहन करावा लागला. या घटनेमुळे काही काळ वाहतूकही मंदावली. स्थानिक नागरिकांनी तत्काळ महापालिकेला याची माहिती दिल्यानंतर संबंधित अधिकारी आणि कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पाईपलाईन दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले असून पाणीपुरवठा काही काळासाठी प्रभावित होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान, एवढ्या मोठ्या प्रमाणात पाण्याची नासाडी झाल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला असून, अशा घटना टाळण्यासाठी पाईपलाईनची नियमित तपासणी व देखभाल करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू केले आहे.0
0
Report
Advertisement
