icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

16 वर्षीय अल्पवयस्क मुंबई फिल्म सिटी में काम पाने के इरादे से पहुँचा, हिरासत में

Mumbai, Maharashtra:*फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने आलेला १६ वर्षीय मुलगा पोलिसांच्या ताब्यात; आरे पोलिसांनी कुटुंबीयांशी साधला संपर्क* मुंबईतील फिल्म सिटीमध्ये मालिकेत काम करण्याच्या इच्छेने मध्य प्रदेशातून आलेल्या १६ वर्षीय अल्पवयीन मुलाला आरे पोलिसांनी सुरक्षित ताब्यात घेतले आहे. उत्तर नियंत्रण कक्षाकडून फिल्म सिटी परिसरात एक बेवारस मुलगा फिरत असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली होती. त्यानंतर आरे पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि मुलाला पोलीस ठाण्यात आणण्यात आले. चौकशीदरम्यान मुलाने आपले नाव पारस रतिराम वर्मा, वय १६ वर्षे, असे सांगितले. तो मध्य प्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यातील रहिवासी आहे. ‘तारक मेहता का उल्टा चश्मा’ या मालिकेत काम करण्याची इच्छा असल्याने तो मुंबईत आल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. मुलाने दिलेल्या माहितीनुसार, ६ ऑगस्ट रोजी तो घरातून शाळेेत जात असल्याचे सांगून निघाला. त्यानंतर छिंदवाडा येथून ट्रेनने नागपूर आणि तेथून मुंबईकडे रवाना झाला. ७ ऑगस्ट रोजी सकाळी मुंबईत पोहोचल्यानंतर लोकलने गोरेगाव स्थानक गाठले आणि तेथून पायी फिल्म सिटीमध्ये पोहोचला. पोलिसांनी मुलाकडून त्याच्या वडिलांचा मोबाईल क्रमांक घेऊन संपर्क साधला. मुलगा घरातून निघून गेल्याची माहिती वडिलांनी दिली असून, ते मुंबईत त्याला घेण्यासाठी येत आहेत. तोपर्यंत मुलाला आरे पोलीस ठाण्यात सुरक्षित ठेवण्यात आले आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में अभिजित दिपके के सुरक्षा कटे जाने को लेकर विवाद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये सी.जे.पी.चे अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे... पोलिस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय... काल दिपके यांनी एक पी एस आय या घराबाहेर हाकलले होते.. दिपके यांचं पोलीस संरक्षण काढून घ्या, अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा थेट इशाराही पोलीस बॉईज असोसिएशनने दिलाय... त्यामुळे अभिजित दिपके यांच्याविरोधातील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे...
0
0
Report

महाराष्ट्र में भू-अधिग्रहण और भ्रष्टाचार पर सवाल, नाना पटोले का आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर नाना पटोले, काँग्रेस,नेते On अमित शाह दौरा महाराष्ट्रातील शासकीय जमिनी मोदी मित्रांना द्यायसाठी आता किती संपत्ती शिल्लक राहिली आहे. किती द्यायची बाकी आहे... याची माहिती घेण्यासाठी ते महाराष्ट्रात येत असतात...भ्रष्टाचाराची जी व्यवस्था राज्यकर्त्यांमध्ये दिसून येत आहे...अमित शहाने मोदीच्या दौऱ्यातून पाहत आहे....महाराष्ट्रात येऊन लुटता कस येईल यावर त्यांचं काम राहिल्याचा आरोप केला आहे.. On सपकाळ खेद - त्यांनी खेद व्यक्त केला...त्यामुळे आता त्यात काही कमेंट करण्यासारख नाही.. खेद व्यक्त केल्यामुळे विषय संपला आहे... - शेतीचा हंगाम महाराष्ट्रात सुरू आहे खताचा बियाण्याचं मोठ्या प्रमाणात तुटवडा बोगस बियाणे आणि खतमुळे शेतकऱ्यांना लुटताना पाहत आहे. सरकारचे महामंडळ बोगस बियाणे घेतले आहे... त्यामुळे महाराष्ट्र सर्वात जास्त आत्महत्याय भ्रष्टाचारी व्यवस्थेमुळे होत आहे....सरकारी कंपन्या बोगस बियाणे विकून शेतकऱ्यांना बरबाद करून आयुष्यातून उध्वस्त करत आहे... On मोदी विद्यार्थी संवाद साधणार - परवा भागवत यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. तरुणांनी सांगितलं शिक्षण हा अधिकार आहे...आज भाजप आणि संघाने ते शिक्षण विकत देण्याचं काम करत आहे...सामान्य गरीब कुटुुंबातील मुलं शिक्षण घेऊ शकत नाही... रोजगार संधी उपलब्ध होत नाही...अशी भूमिका विद्यार्थ्यांनी बाहेर येऊन मांडली. 12 वर्षात देशभरातील विद्यार्थ्यांचे आयुष्य बरबाद करण्याचं काम मोदी सरकारने केलं. त्याचा परिणाम जेन जी रस्त्यावर आले. त्यामुळे पंतप्रधान यांना इंस्टाग्रामवर यावं लागल. हे देशात बदलाचे संकेत दिसत आहे.. On राष्ट्रवादी तटकरे प्रफुल पटेल,आणि वाद - राष्ट्रवादी मधील अंतर्गत वाद आहे.. प्रशांत किशोर कुठल्याही पक्षाला प्रमोशन कसे करतात त्यावर टेंडर घेतात.. त्यासाठी ते आले असेल. प्रफुल Patel सुनील तटकरे तो त्यांच्या पक्षाचा वाद काँग्रेस त्या वादात पडण्यांसाठी काही कारण नाही.प्रफुल पटेल मोठे भाऊ आहे त्यांचा चांगला अशी अपेक्षा आहे. On मोदी शिंदे भेट - एकनाथ शिंदे यांना फडणीसांचा त्रास आहे आणि तेच तक्रार करायला ते दिल्लीत गेले - प्रधानमंत्री यांना खासदार भेटायला जातात या राजकीय अर्थ काय घ्यायचा आम्ही यावर हस्तक्षेप करणार नाही... On मोदी पाठीशी - संजय राऊत आरोप - कुठल्या गोष्टीसाठी पाठीशी आहे... संजय राऊत यांनी काय ऐकलं. त्यावर मी काही सांगू शकणार नाही संजय राऊत यावर अधिक सांगू शकतील. On आरक्षण वाद, प्रमाणपत्र रद्द - देवेंद्र फडणवीस आणि भाजप सरकारने मराठा बंजारा धनगर या समाजाची फसवणूक केली आहे... 2014 मध्ये गडकरी फडणवीस यांनी महाराष्ट्रात फिरून राज्यात आणि केंद्रात सरकार आल्यावर त्याच्या जातीच्या मागण्या पूर्ण करू.... - सरकार येऊन 12-13 वर्ष पूर्ण झाले. बहुमताच सरकार आहे.... तरीसुद्धा समाजाला न्याय देऊ शकले नाही...मराठा वर्सेस ओबीसी धनगर विरुद्ध आदिवासी गोवारी विरुद्ध आदिवासी अशा पद्धतीचे भांडण लावून इंग्रजांच्या नीतीप्रमाणे जातीय सलोखा धार्मिक सलोखा तो संपवण्याचा काम यांनी केल आहे. घटनात्मक दुरुस्ती करून न्याय देण्याचे काम करत आलं... असतं पण लोकांना हे भांडवल ठेवत आहे. On इ 20 पेट्रोल डिझेल भेसळ - पेट्रोल डिझेलमध्ये भेसळ करणारी लोक होते... तेव्हा काँग्रेस सरकार कारवाई करायची. आता सरकारच पेट्रोल आणि डिझेलमध्ये भेसळ करत आहे. आणि लोकांच्या गाड्या खराब करत आहे...पैसे लुटत आहे स्वतः मात्र गर्भ श्रीमंत होत आहे.. लोकांचा आर्थिक नुकसान करण्याचे काम सरकार करत आहे... या सरकारचा खरा चेहरा सर्वसामान्यांच्या समोर आला आहे. सरकार भेसळीचे काम करते... त्यामुळे सरकारवरच कारवाई कराचा निर्णय घेतला आहे On cng bio गॅस - मोदी है तो मुनकी नाही म्हणायची मात्र आता मोदी है तो भेसळ असं त्याचं समीकरण झालं.. . On उपवर्गीकरण आरक्षण विषय हायकोर्ट - या सर्व समाजाला आश्वासन देऊन सगळ्यांना फसवलं आहे..विधानसभेत 2019 मध्ये फडणवीस सरकारने गायकवाड समितीचा रिपोर्ट आणून विधानसभेची फजगत केली.त्यानंतर सुप्रीम कोर्टाने फटकारले आहे. या समाजाला फसवण्याचं काम आणि आपसात लढायचं काम सुरू आहे... त्यामुळेच जरांगे हाके संघर्षामध्ये येतात आणि समाजाला दिसला जात आहे.
0
0
Report
Advertisement

नौ वर्ष के राजवीर राऊत का ऐसा जवाब वायरल वीडियो: माता-पिता नहीं आ पाए तो गुरुजी ने क्या कहा

Kolhapur, Maharashtra:सोशल मीडियावर सध्या एका नऊ वर्षांच्या चिमुकल्याचा व्हिडिओ तुफान व्हायरल होतोय… कोल्हापूरच्या तुरंबे इथल्या वारकरी शिक्षण संस्थेत शिकणाऱ्या राजवीर राऊतचा हा व्हिडिओ आहे .. पालक मीटिंगला आई-वडील येऊ शकले नाहीत.. तेव्हा गुरुजींनी राजवीरला विचारलं… मग काय करायचं? त्यावर राजवीरनं दिलेलं उत्तर ऐकून अनेकांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या…ते कामात असतील… पुढच्या पालक मीटिंगला येतील… अवघ्या नऊ वर्षांच्या राजवीरचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर का व्हायरल झाला… या व्हिडिओमागची नेमकी कहाणी काय आहे, पाहूया… राजवीरच्या याच भावनेचा एक छोटासा व्हिडिओ सोशल मीडियावर आला… गुरुजींनी राजवीरला विचारलेला एक प्रश्न… तुझे आई-वडील पालक मीटिंगला येऊ शकले नाहीत… मग काय करायचं? आणि त्यावर राजवीरचं उत्तर… ते कामात असतील… पुढच्या पालक मीटिंगला येतील… बस्स… राजवीरचं हे साधं वाक्य अनेकांच्या मनाला भिडलं… आणि पाहता पाहता हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला… नऊ वर्षांच्या मुलानं आपल्या आई-वडिलांची परिस्थिती समजून घेणं, हा त्याच्यावर झालेल्या संस्कारांचा परिणाम आहे. हाच बदल लोकांसमोर यावा, यासाठी तो व्हिडिओ गुरुजींनी केला. त्यानंतर राजवीरच्या या एका वाक्याने सोशल मीडियावर अनेक प्रतिक्रिया उमटल्या…कुणी राजवीरच्या समजूतदारपणाचं कौतुक केलं…तर कुणी त्याच्यावर झालेल्या संस्कारांचं…कारण आई-वडिलांना भेटण्याची इच्छा प्रत्येक मुलाला असते… पण आई-वडील येऊ शकले नाहीत म्हणून नाराज न होता…ते कामात असतील… असं म्हणत त्यांच्या परिस्थितीची जाणीव ठेवणारा राजवीर मात्र अनेकांना भावला…
0
0
Report

मंत्री हसन मुश्रीफ के बयानों पर राजनीति गरम, कोल्हापुर दौरे पर अहम घोषणा

Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ Byte मुद्दे *ऑन तटकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी* मी गेले दोन दिवस कोल्हापूरमध्ये असल्यामुळे काल जे प्रशांत किशोर आणि तटकरे साहेब यांच्या संदर्भात जे विधान ऐकलं त्यासंदर्भात मुंबईला गेल्यानंतर माहिती घेईन, आणि त्यानंतरच आपल्याशी बोलेन. *ऑन रूपाली ठोंबरे स्टेटमेंट*. मी गेल्यानंतर पक्षाच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांशी बोलेन, वस्तुस्थिति जाणून घेऊन त्या वर बोलेन. *ऑन प्रशांत किशोर भेट नाराजी* मुख्यमंत्री महोदयांचे तेही विधान मी ऐकले नाही.. या सर्वच प्रश्नावर मुंबईमध्ये गेल्यानंतर अभ्यास करून त्या संदर्भातील वक्तव्य मी करेन *मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री कोल्हापूर जिल्हा दौरा* केशवराव भोसले नाट्यगृह गेल्या दोन वर्षापासून आगीच्या भक्षस्थानी पडलं होत.. संपूर्ण करवीरकरांच्या मनाला मोठ्या वेदना झाल्या होत्या, त्यावेळी मी पालकमंत्री होतो. त्याचवेळी आम्ही घोषणा केली होती, वर्ष दोन वर्षांच्या आत केशवराव भोसले नाट्यगृह हे गत वैभव प्राप्त करेल. मला विशेष आनंद आहे नऊ ऑगस्ट क्रांती दिन आहे, याच दिवशी हे नाट्यगृह रंगकर्मींच्या कलाकारांच्या सेवेत रुजू होत आहे.
0
0
Report

नागपुर मंदिर चोरी CCTV फुटेज वायरल, चोर गिरफ्तार, एक घायल

Nagpur, Maharashtra:मंदिरात चोरी करने से पहले देव की माफी मांगने वाला वह चोर गैजा़ड. वंश मेश्राम और जैनिक चौरे ऐसे पकड़े गए चोरों के नाम हैं. चोरी के बाद भागते समय एक चोर के पैर पर फ्रैक्चर हुआ और उसे अस्पताल ले जाना पड़ा. नागपुर में 27 जुलाई की रात से 28 जुलाई की सुबह लकड़गंज पुलिस स्टेशन के बीच शीतला माता मंदिर और शिव मंदिर के दानपेटे के ताले तोड़कर दो चोरों ने पैसे चुराए. मंदिर में लगे CCTV कैमरों में चोरी की घटना रिकॉर्ड हुई. CCTV फुटेज में चोर से पहले कान में हाथ लगाकर देव की माफी मांगता हुआ दृश्य दिखा. इसके बाद चोरी का CCTV वायरल हुआ... और वह सीधे चोरों के मोबाईल नंबर तक पहुंच गया... चोरों को चोरी करते हुए वीडियो वायरल होते देख दोनों चोर घबरा गए... नागपुर में पकड़ाए जाने के डर से वे मध्यप्रदेश की ओर भागने के लिए बाइक पर निकले... रास्ते में उनका एक्सीडेंट हुआ और चोरों में जैनिक चौरे के पैर को गम्भीर चोट लगी... मामले में पुलिस ने तकनीकी CCTV और तकनीकी विधियों से खोज जारी रखी... वंश मेश्राम का पता लगाकर उसे गिरफ्तार किया गया और दूसरे चोर को भी पकड़ा गया...
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में अभिजित दीपके की सुरक्षा तत्काल हटाने की मांग तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anch or : छत्रपती संभाजीनगरमध्ये सी.जे.पी.चे अभिजित दिपके यांना देण्यात आलेलं पोलीस संरक्षण तात्काळ काढून घ्या, अशी मागणी महाराष्ट्र पोलीस बॉईज असोसिएशनने केली आहे... पोलिस अधिकाऱ्यांचा अपमान केल्याचा आरोप करत दिपके यांच्यावर कायदेशीर कारवाई करावी, अशीही मागणी असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे केलीय... काल दिपके यांनी एक PSI या घराबाहेर हाकलले होते.. दिपके यांचं पोलीस संरक्षण काढून घ्या, अन्यथा त्यांच्या घरासमोर आंदोलन करू, असा थेट इशाराही पोलीस बॉईज असोसिएशनने दिलाय... त्यामुळे अभिजित दिपके यांच्याविरोधातील हा वाद आता अधिक चिघळण्याची शक्यता आहे...
0
0
Report

9 साल के राजवीर राऊत का जवाब वायरल: पालक बैठक में उम्मीद जगाई

Kolhapur, Maharashtra:सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे… आणि हा व्हिडिओ आहे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या राजवीर राऊत या चिमुकल्याचा… कोल्हापूर जिल्ह्यामध्ये तुरंबे येथील ज्ञानोबा तुकाराम आध्यात्मिक वारकरी शिक्षण संस्थेमध्ये पालक बैठकीदरम्यान गुरुजीनी राजवीरला एक साधा पण मनाला भिडणारा प्रश्न विचारला… तुझे आई-वडील बैठकीला येऊ शकले नाहीत, मग काय करायचं?” यावर अवघ्या नऊ वर्षांच्या राजवीरने दिलंलं उत्तर अनेकांच्या डोळ्यांत पाणी आणणारं होतं. राजवीर म्हणाला, ते पुढच्या पालक बैठकीला येतील… ते कामात असतील… या चिमुकल्याच्या निरागसतेतून आणि समजूतदारपणातून एक हळवं चित्र समोर आलं आहे. आई-वडिलांच्या अनुपस्थितीची खंत न करता, त्यांच्या कष्टांची जाणीव ठेवत दिलेलं हे उत्तर अनेकांच्या मनाला चटका लावून जाणारं ठरत आहे. याच राजवीर राऊत या चिमुकल्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी。
0
0
Report
Advertisement

सोलापुर: हत्या प्रकरण में भाजप नगरसेविका शालन शिंदे को 7 महीने बाद जमानत मिली

Solapur, Maharashtra:सोलापूर - खूनप्रकरणी भाजप नगरसेविका शालन शिंदेंना 7 महिन्यांनी जामीन. अटकेत असलेल्या भाजप नगरसेविका शालन शिंदेंना उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने एक लाख रुपयांच्या जात मुचलक्यावर जामीन मंजूर केला आहे. सात महिन्यांच्या कोठडीनंतर शिंदे यांना जामीन मिळाला असून दोष निश्चिती होईपर्यंत जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत जाण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. शालन शिंदे यांचे राहते घर जोशी गल्लीत आहे. जय जेलरोड पोलीस ठाण्याच्या हद्दीत आहे त्यामुळे जामीन मिळवणे त्यांच्या घरी राहता येणार नाही.
0
0
Report

पोस्को मामले में अमन अंदेवार के खिलाफ FIR, नाबालिगों की पहचान उजागर का आरोप

Chandrapur, Maharashtra:महाराष्ट्र निर्माण सेनेचे कार्यकर्ता सेना जिल्हा अध्यक्ष Aman Andevar यांच्यावर पोस्कोच्या सहकलम 74 अंतर्गत गुन्हा दाखल झाले असले. दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांच्या लैंगिक अत्याचार प्रकरणात पीडितांची ओळख सार्वजनिक केल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी ही गुन्हा दाखल केला. या प्रकरणी शाळेतील दोन अल्पवयीन विद्यार्थ्यांकडूनच अनैसर्गिक लैंगिक अत्याचार झाल्याचं चार दिवसांपूर्वी बल्लारपूर पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या एका अनुदानित खाजगी आश्रमशाळेत उघडकीस आलं होतं. अमन अंदेवार यांनी पीडित मुलांची ओळख काही व्हाट्सअप ग्रुप वर आणि व्यक्तींना शेअर केली होती. त्यामुळे पीडित बालकांची प्रतिष्ठा आणि सुरक्षा धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत अमन अंदेवार यांच्यावर गुन्हा दाखल केला.
0
0
Report

बारामती में पति को जिंदा दफनाने की कोशिश: पत्नी के खिलाफ मामला दर्ज

Rui, Maharashtra:बारामतीत महिलेचा जिवंतपणि पतीला समाधी देण्याचा प्रयत्न... सासऱ्याच्या तक्रारीवरून सुनेच्या विरोधात बारामती शहर पोलिसात गुन्हा दाखल... संबंधित महिलेला बारामती शहर पोलिसांकडून अटक बारामती मधील एका महिलेने तिच्या पतीला दोन दिवस गुंगीचे औषध देत बॅटने मारहाण करीत त्याला जिवंतपणीच घरातच समाधी देण्याचा प्रयत्न केलाय. या संदर्भात पोलिसांना गोपनीय माहिती मिळतात पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि प्रवीण जगताप यांच्या खुनाचा प्रयत्न उधळून लावला आहे. याप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात प्रवीण जगताप यांचे वडील प्रकाश जगताप यांच्या फिर्यादीवरून शर्मिला प्रवीण जगताप या 38 वर्षीय महिले विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित महिलेला पोलिसांनी ताब्यात घेतल आहे. हा संपूर्ण प्रकार दिनांक 30 जुलै 2026 च्या रात्री साडे अकरा ते एक ऑगस्ट सकाळी साडे अकराच्या दरम्यान बारामती शहरातील जामदार रोड इंद्रप्रस्थ सोसायटीमधील फ्लॅट नंबर नऊ मध्ये घडला आहे。
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा मंत्रिमंडल की घोषणाओं पर खेद, कई काम अभी बाकी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंबादास दानवे : 3 वर्षांपूर्वी मराठवाड्यात मंत्रिमंडळ बैठक झालेली त्यात घोषणा केलेली किती काम झाली याची माहिती मी घेतली, मात्र काहिही झालं नसल्याचं पुढं आलाय, दुर्दैवी आहे, समाधानकारक स्थिती नाही नरेंद्र पाटील खंत बाबत : त्यांच्या बोलण्यात सत्यता आहे, अनेकांना कर्ज मिळत नाही जाचक अटी आहेत, सर्वच महामंडळाची अशीच अवस्था आहे, महामंडळ म्हणजे फक्त घोषणा असते मात्र मंडळ अपंग असते, त्यांची व्यथा योग्य आहे ते भाजपचे आहे आणि सरकार भाजपचे आता लोकांनी ठरवावे, मुख्यमंत्री कुणाचं ऐकतील असे मुळीच नाही, सरकार आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही त्यामुळं असते घडते आहे असे मला वाटते ओन प्रमाणपत्र रद्द : कुणबी प्रमाणपत्र शैक्षणिक हेतूने आपण घेतले आहे नोकरी साठी घेतले आहे या प्रमाणपत्र चा राजकीय लाभ घेऊ नये असे माझे वैयक्तिक मत आहे...
0
0
Report

नरेंद्र पाटील ने MD विजयसिंग देशमुख पर आरोप, सरकार को रोष, मराठा समाज में तनाव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नरेंद्र पाटील पत्रकार परिषदहिं.... अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळचं एमडी विजयसिंग देशमुख यांनी वाटोळं केल्याचा आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केलाय, हा एमडी सरकारला अडचणीत आणतोय, मराठा समाजाचे नुकसान करतोय असे नरेंद्र पाटील यांनी आरोप केलाय, एक व्यवस्थापकीय संचालक शासनाचे नुकसान करतोय तर शासनाने कारवाई करण्याची गरज असल्याचे पाटील म्हणाले...यांच्या पाठीशी कुणीतरी आहे त्यांना शासनाला यांच्या माध्यमातून बदनाम करायचे आहे असेही नरेंद्र पाटील म्हणाले... एमडी ने प्रमाणपत्र देतांना अटी सांगितल्या कर्ज देताना, उत्पन्नाची अट घातली, या अटी शर्ती मूळ मराठा समाज मागे पडला... एमडी च्या मनमानी मूळ फटका बसला आहे...अनेकांना कर्ज मिळू शकले नाही...2024 25 अनेक प्रमाणपत्र रद्द करण्यात आले आहे...शासनाच्या विरोधात लोकांमध्ये रोष निर्माण करण्याचे काम महामंडळाचे एमडी करताय...या मुळे मराठा समाज नाराज झालाय...याबाबत समाजाने मुख्यमंत्री सोबत बैठकीचे मागणी केलीय...मी मुख्यमंत्र्यांना अनेक वेळ सांगितले आहे आणि पुन्हा एकदा भेटणार असे नरेंद पाटील म्हणाले..अधिकार्यामुळे सरकार बद्दल रोष निर्माण होतोय असा आरोप त्यांनी केलाय..विजयसिंग देशमुख हे एमडी आहेत.. याना सरकारला अडचणीत आणण्यासाठी कुणीतरी सुपारी दिली असल्याचं आम्हाला वाटतंय, याबाबत मी मुख्यमंत्री आणि विखे पटलांकडे तक्रार केली आहे...महामंडळाचे एमडी अध्यक्षला विचारात न घेता काम करतात असे स्पष्ट आहे...अध्यक्ष पद आता शोभेचे राहिले आहे, आम्हाला वाईट वाटतेय, हाथ बांधले आहे, हे पद ठेवून करू काय, मी आता महामंडळाची सेवा वापरात नाही, त्यामुळं आता मला पद सोडावे लागेल असे दिसतेय... ( पद सोडू असे संकेत )
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top