Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PTPRAVIN TANDEKAR
Nov 22, 2025 02:18:52
Bhandara, Maharashtra:नेहमी परिवारवाद म्हणणाऱ्या भाजपा स्वतः परिवार वादात अडकली आहे.... म्हणून परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे नाना पटोले म्हणाले आहे..... भंडारा जिल्ह्यातील साकोली नगर परिषदेत सर्वांचे लक्ष लागलेलं आहे. कारण काँग्रेस नेते नाना पटोले यांचा मतदार संघ आहे. त्यामुळे सर्वांच केंद्रबिंदू ठरत आहे.. भंडारा जिल्ह्यातून गल्ली पासून दिल्ली पर्यंत आपली छाप सोडणाऱ्या नाना पटोले यांचा साकोली विधानसभा मतदार संघ आहे याच मतदार संघातील साकोली नगर परिषदेकरिता निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. साकोली मतदार संघात भाजपची एकहाती सत्ता होती पण भाजपने विकास केला नाही अशी ओरड स्वतः मित्र पक्षातून होत आहे.. नेहमी परिवारवाद अशी काँग्रेसवर भाजपाने टीका केली आहे. पण नगर परिषद निवडणुकीत भाजपने स्वतः माजी आमदार हेमकृष्ण कापगते यांच्या सुनेला मैदानात उतरविला आहे. त्यामुळे नेहमी परिवार वादात अडकली आहे.. सर्वच राजकीय पक्ष स्थानिक समस्या घेऊन निवडणुकीत जात आहे. नगर परिषदेत गुलाल आपलाच अशी भूमिका सर्वच राजकीय पक्षांची आहे... देवश्री कापगते, भाजपा उमेदवार भारती लंजे, राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा असं पक्ष आहे. की एक दुसऱ्यावर आरोप लावत आहे. पण त्यांना माहिती नाही की एक बोट दुसऱ्याकडे केलं तर चर बोट आपल्याकडे असतात. नीतिमत्तेमध्ये भाजप राहिलेली नाही. कशाच प्रकारे सत्ता सत्तेतून भ्रष्टाचार अशी भाजपा राहिली आहे. सर्वसामान्य लोकांचा सन्मान व लोकांच्या हिताचं काम काँग्रेस करतं आहे. म्हणून परिवर्तनाची लाट आपल्याला पाहायला मिळणार आहे. असे नाना पटोले म्हणाले आहे. नाना पटोले, आमदार काँग्रेस
16
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 22, 2025 02:18:04
71
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 22, 2025 02:02:34
:सिन्नर के नायगाव में गावगुंडों का हैदोस: इलेक्ट्रिकल व्यवसायी को खंडणी की धमकी। सिन्नर तालुक्यातील नायगाव परिसर में गावगुंडांनी पुन्हा हैदोस घातल्याची घटना समोर आली आहे। एका इलेक्ट्रिकल व्यवसायी को मारहाण करके और सीधे दुकान को जलाने की धमकी देकर खंडणी माँगने का मामला सिन्नर MIDC पुलिस थाने में दर्ज किया गया है। आरोपी ने व्यवसायी को पचास हजार देने के लिए कहा, नहीं तो दुकान जलाने की धमकी दी। नायगाव में गावगुंडांचा बढ़ता उपद्रव और हैदोस के कारण नागरिकों में भय का वातावरण है। इस गंभीर प्रकरण में सिन्नर MIDC पुलिस थाना में संबंधित आरोपियों के खिलाफ खंडणी का अपराध दर्ज किया गया है。
162
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 22, 2025 02:01:04
165
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 22, 2025 02:00:32
Jalna, Maharashtra:FEED NAME : 2211ZT_JALNA_ELECTION(3 FILES) जालना :अंबड,भोकरदन नगर परिषदेत तिरंगी लढत,परतूरमध्ये महायुती समोरा-समोर अँकर :राज्यात एकत्रित सत्तेत असलेल्या भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी या पक्षांनी जालन्यातील नगर परिषद निवडणुकीत  स्वतंत्र चुली मांडल्या आहेत, एकाही नगरपालिकेत हे तिन्ही पक्ष एकत्र येऊन विरोधकांसोबत लढणार नाहीत. दुसरीकडे महाविकास आघाडीची स्थितीही यापेक्षा वेगळी नाही. या आघाडीतील तिन्ही पक्ष प्रत्येक नगर परिषदेत सोयीनुसार एकत्र आले आहेत. यात भोकरदनला काँग्रेस आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्ष शेवटपर्यंत एकत्र आले नाही. तर परतूरला हे दोन्ही पक्ष एकत्र आले, तर अंबडमध्ये महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र आले. नगर परिषद निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी शुक्रवारी अंतिम मुदत होती. यात नगराध्यक्षपदाचा निवडणुकीत प्रमुख पक्षात  बंडखोरी झाली नाही. उमेदवारांचे रुसवे-फुगवे काढून अतिरिक्त अर्ज मागे घेण्यात राजकीय पक्षांना यश आले आहे. त्याशिवाय या निवडणुकीत अपक्ष उमेदवारांची संख्या गतवेळपेक्षा कमी झाली आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आणि नगरसेवक पदासाठी निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांची संख्या भोकरदन नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार 1. आशाताई एकनाथ माळी,भाजप 2. प्रियंका प्रतीक देशमुख,काँग्रेस 3. मिर्झा समरीन वसीम बेग,राष्ट्रवादी श.प. 4. कुरेशी सानिया कौसर,राष्ट्रवादी अ.प. नगरसेवकपदासाठी अर्ज-76 अंबड नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार 1. देवयानी केदार कुलकर्णी भाजप 2. श्रध्दा शिवप्रसाद चांगले,राष्ट्रवादी शरद पवार 3. पटेल सनाअनम मुस्तकीम,शिवसेना शिंदे 4. दर्शना Rahul खरात,अपक्ष नगरसेवकपदासाठी अर्ज 75 परतूर नगर परिषद नगराध्यक्षपदाचे उमेदवार 1. प्रियंका शहाजी राक्षे,भाजप 2. शांताबाई बाबूराव हिवाळे,राष्ट्रवादी अ.प. 3. प्रतिभा सिध्दार्थ बंड,काँग्रेस 4. माधवी संतोष पवार,शिवसेना उबाठा नगरसेवकपदासाठी अर्ज-110
100
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Nov 22, 2025 01:15:57
Khopoli, Maharashtra:रायगडच्या खोपोली नगरपालिकाच्या निवडणुकीत ठाकरेंची सेना आणि अजित दादांची राष्ट्रवादी एकत्र लढणार होती मात्र अंतर्गत उमेदवारीवरून वाद झाल्याने आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी आघाडीत बिघाडी झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. ठाकरेंच्या सेनेचे उपजिल्हाप्रमुख नितीन सावंत यांनी खोपोली मधून आपली नाराजगी व्यक्त करत 11 नगरसेवकांसह स्वतंत्र लढणार असल्याची घोषणा केलीय त्यामुळे अजित दादांच्या राष्ट्रवादीला सुद्धा स्वतंत्र लढण्याची वेळ आलीय. अजित दादांच्या राष्ट्रवादीकडून डॉ सुनील पाटील हे युतीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार असुन त्यांच सुद्धा टेन्शन वाढण्याची शक्यता आहे.
235
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 22, 2025 01:15:33
Palghar, Maharashtra:पालघर विक्रमगड तालुक्यातील उटावली आदर्श विद्यालयात पाचवीत शिक्षण घेत असलेल्या मयंक विष्णु कुवरा या शाळकरी मुलावर बिबट्याने हल्ला केला. मयंक शाळा सुटल्यावर आपल्या इतर मित्रांसोबत जंगलातील रस्त्याने घरी जात असताना बिबट्याने त्याच्यावर पाठीमागून झडप घातली. मात्र ती झडप मयंक याच्या पाठीवर असलेल्या दफ्तरावर आली. त्या क्षणी मयंक आणि मुलाने आरडा ओरड केला, तसेच जोडीला असलेल्या मुलाने बिबट्याला दगड मारले, आवाजामुळे आजूबाजूला असलेल्या लोकांनीही धाव घेतल्या पर बिबट्या तेथून जंगलात पळून गेले. दरम्यान या घटनेत मयंक जखमी झाला असून त्याच्यावर विक्रमगड ग्रामीण रुग्णालयात उपचार आहेत. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाने बिबट्याला पकडावे, अशी मागणी होत आहे.
135
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 21, 2025 18:05:51
Navi Mumbai, Maharashtra:राज्यात भाजपा आणि शिवसेना शिंदे गटात सुरु असलेला का रे दुरावा आपल्याला नवी मुंबईतही पहायला मिळाला. नेरुळ मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे अनावरण आज वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते संपन्न झाले मात्र या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाठ फिरवल्याने विविध चर्चाना उधाण आलेय. मनसे नेते अमित ठाकरे यांनी शिवस्मारकाचे अनावरण केलं होत मात्र त्यानंतर अमित ठाकरे यांच्यासह 70 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. आज नवी मुंबई मनपा तर्फे या शिवस्मारकाचे अधिकृत उदघाटन वनमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते करण्यात आले. या उदघाटन कार्यक्रमाला शिवसेना शिंदे गटाच्या सर्व प्रमुख नेत्यांनी दांडी मारली असून एकदा उदघाटन झाले असताना पुम्हा उदघाटन करायची आवश्यकता नाही असे पत्रकच खासदार नरेश म्हस्के यांनी काढत अमित ठाकरे यांच्या कृत्याचे समर्थन केले. दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी देखिल अमित ठाकरे यांना पाठीशी घालत त्यांच्यावरील गुन्हे आयुक्तांनी मागे घ्यावेत अशी मागणी केलेय. खासदार नरेश म्हस्के यांनी दिलेल्या समर्थना बद्दल मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी खासदार नरेश म्हस्के यांच्या भूमिकेचे स्वागत केले. शिवस्मारकच्या उदघाटनानंतर देखिल नवी मुंबईतील राजकारण अधिक तापताना पहायला मिळत आहे.
178
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:32:55
Baramati, Maharashtra:सरडेवाडी टोलनाक्यावर मांगुर माशांची बेकायदेशीर तस्करी उघड — 20 लाख 45 हजारांचा मुद्देमाल इंदापूर पोलिसांच्या ताब्यात.... इंदापूर तालुक्यातील सरडेवाडी टोलनाक्यावर बेकायदेशीर पद्धतीने मांगुर माशांची मोठ्या प्रमाणात वाहतूक करणाऱ्या दोघांना इंदापूर पोलिसांनी ताब्यात घेतले. रात्री उशिरा संशयित वाहन अडवून तपास केला असता, प्रतिबंधित मांगुर माशांचा मोठा साठा आढळून आला.मांगुर मासे पर्यावरण आणि मानवी आरोग्यास अपायकारक असल्याने राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाने त्यांच्या पैदाशीस, विक्रीस आणि वाहतुकीस संपूर्ण बंदी लागू केली आहे. हीच बंदी मोडून मोठ्या प्रमाणावर वाहतूक होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर तातडीने ही कारवाई करण्यात आली. या कारवाईत पंधरा लाख 50 हजार रुपये किमतीचे वाहन आणि चार लाख 90 हजार रुपये किमतीचे मांगुर मासे असा मिळून एकूण 20 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, इंदापूर पोलिसांनी पुढील तपास चालू आहे...
109
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 21, 2025 16:15:43
Baramati, Maharashtra:बारामती नगरपालिका निवडणूक प्रचार शुभारंभ बारामती उपमुख्यमंत्री अजित पवार भाषण पॉईंटर बारामती नगरपरिषद प्रचार शुभारंभ देव दिवाळीच्या शुभम भारतावर आज आपण प्रचाराचा शुभारंभ करत आहोत. ही निवडणूक वर्षां होत आहे. मागील काळात पौर्णिमा तावरे यांना निवडून दिलं होतं. चल आता जवळपास नऊ वर्ष होऊन गेली... बारामतीचा चेहरा मोहरा बदलण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी केला. सरकार आपले विचारात होतो त्यामुळे निधी मोठ्या प्रमाणावर आणायला पण यशस्वी झाले. चाळीस कोटीचं बारामती करंज उत्पन्न आणि त्यातून आपण कोरोड रुपयाची कामे केली. अनेकांच्या मुलाखती घेऊन मग 41 लोकांना संधी दिली... विरोधकांनी काही ना काही वेगळ्या प्रकारच्या बातम्या पेरण्याचा प्रयत्न केला बारामती करून तुम्ही मला 1991 ला पहिल्यांदा खासदार केले त्यानंतर पवार साहेबांचे आपण नेहमी १९६७ सालापासून त्यांना निवडून देण्याचं काम केलं. साहेबांनी देखील त्यांच्या काळात त्यांना बारामतीकरणात जेवढे काही भरभरून देता येईल तेवढे देण्याचा प्रयत्न केला नंतरच्या काळात मी पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवायला लागलो. त्यामध्ये आपण काही निर्णय घेता येतात, एखाद्या नगरसेवकांनी नाही ऐकलं तर मला त्याला व्हिप बजावता येतो. तुमच्या विकासाच्या करिता आपल्या बारामतीकरांच्या विकासाकरिता हा तुमच्यासमोर बोलणारा अजित पवार कटिबद्ध आहे याची तीळ मात्र शंका मनात बाळगू नका ही निवडणूक बारामतीच्या पुढील विकासाची दिशा ठरवणारी निवडणूक आहे सर्वांची आपल्याला साथ असली तरी आपण गाफिल राहता कामा नये. काहींनी निनावी पत्र देत म्हणाले तुम्ही जो उमेदवार दिला त्याच्या बॅकग्राऊंड तपासलं नाही, मी सर्वांचे बॅकग्राऊंड तपासली जर कोणाचा राहिला असेल तर मला सांगा तेही दुरुस्त करेल मी कामाचा माणूस आहे बिनकामाचा नाही बारामतीची निवडणूक म्हटल्यावर मीडिया येणार विरोधक आपल्यावर टीका करणारा प्रत्येकाला अधिकार आहे पण मला त्या गोष्टीला उत्तर द्यायचं नाही गेल्या काही वर्षात बारामतीचा चेहरा मोहरा बदलला आहे. बारामतीच्या शारदा प्रांगणात गोरगरिबा करिता सीबीएससी स्कूल करत आहोत. पूर्वी साहेबांना व्यापारी भेटायला इच्छुक साहेब सोमेश्वर छत्रपती माळेगावचं पेमेंट काढा त्याशिवाय मार्केटमध्ये ग्राहक नाही पण आज तशी वेळ नाही शहरात आज अनेक कामे सुरू आहेत.पण काहीजण अफवा उठवतात,पण मी तुम्हाला विश्वासात घेतल्याशिवाय काही करत नाही. काही मंदिर मला बाजूला करावी लागली पण त्याच्यासाठी सुंदर मंदिर बनवत आहोत. मी अंधश्रद्धा मानत नाही पण श्रद्धाला महत्व देतो कधीकधी काही मिनिटात काही इंचा पाऊस पडतो लगेच आपले मित्र तेवढीच स्क्रीन दाखवतात बघा बारामतीत किती पाणी बारामती तुंबली तुंबली अरे पण बाकीची शहरात जाऊन बघा तुमचं बस स्थानक चांगलं केल्या नंतर रेल्वे स्टेशन कोणी एकानेही सांगितले नाही ते चांगले करा पण मी केले का नाही. मी पण बारामती कर आहे माझं लहानाचं मोठेपण इथे गेले आहे. अनेक गोष्टी आपल्याला करायच्या आहेत. प्रशासकीय भवन समोर दहा बारा एकरात गार्डन करत आहोत, त्यासाठी एक पैसा नगरपरिषदेचा घालत नाही. सर्व पैसे बाहेरून आणत आहे. 30 35 एकरात शिवसृष्टी निर्माण करत आहोत. आपल्या बारामती मधील सिद्धेश्वराच्या मंदिरातील जो नंदी आहे तासा नंदी देशात नाही. बर जगात नाही,देश तरी कशाला जगात नाही च्या मायला देश तरी कशाला. अनेक गोरगरिबाण करिता घरबांधणीचा कार्यक्रम या टर्मला आम्ही हातात घेणार आहोत. अजून ही कचरा ची विल्हेवाट लावण्याकरता इंदूरच्या धर्तीवर तीन शहर निवडले आहेत त्यात बारामती आहे मी शेवटच्या प्रचार सभेला येणार आहे पण पुढील आठ दहा दिवसात अशा काही कंड्या पेटले असत्या सांगायलाच नको म्हणून त्याच्या करता आजच प्रचाराचा शुभारंभ केला चार जागा स्वीकृतच्या माझ्या हातात आहेत. मी योग्य माणसाला संधी देईल. सचिन सदाशिवराव सातव हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत बारामती मध्ये 1 लाख 2 हजार मते आहेत रेकॉर्ड करायचे. माझ्या पद्धतीने काम नाही झाले तर मग मी बघणार त्याच्यासमोर सांगतो. याच्यानंतर मी बारामती सहकारी बँकेला दुसऱ्याला संधी देणार बारामती अर्बन बँकेत फार प्रॉब्लेम होते मी आज ते काढत बसत नाही पण सचिनने चांगले बँका चालवली काही कठोर निर्णय घ्यावे लागले काही नाराज झाले, काहींच्या वसुली करावी लागली्. काही जण म्हणाले आपल्याजवळच्या आहेत तरी त्यांची वसुली अरे अजित पवार असला तरी वसुली करणार बारामती करांनाकुठेही कमीपणा येणार नाही बारामती करांनी त्याच्यावर टाकलेल्या विश्वासाला कुठेही तडा जाणार नाही हा शब्द त्याच्या साक्षीनं देतो. ही बारामती अशीच पाहिजे असेल तर 41 च्या 41 नगरसेवक आणि नगराध्यक्ष देखील निवडून द्या ज्यांना उमेदवारी मिळाले नाही त्यांनी नाराज होऊ नका. देशातील सुंदर हरित आणि स्वच्छ शहर म्हणून बारामतीचा नावलौकिक हवा आहे माझं स्वप्न आहे यासाठी मला तुमची साथ हवी आहे मी आता काही करू शकत नाही. यात माझा स्वार्थ काहीही नाही, मी सकाळी सहा वाजल्यापासून उठून फिरतो पाहतो. इतरांच्या तुलनेत हे एक अग्रेसर शहर म्हणून याची ओळख व्हावी यासाठी माझा प्रयत्न असतो. मला तुम्ही आठ वेळा वेगवेगळ्या पदावर बसून आहे आमदार केलं आहे आज देखील मी पंतप्रधानांच्या बरोबरीने बसतो हे कशामुळे शक्य झालं तर बारामतीकरण म्हणू शक्य झालं, चढउतार आले कधीकधी तुमच्यापुढे ग्रहण प्रश्न निर्माण झाला परंतु त्यातूनही तुम्ही वाट काढली सुप्रियाला निवडून देऊन साहेबांना खुश केलं मला निवडून देऊन मलाही खुश केलं तुम्ही मला मागे खासदार केलं तेव्हा मी 25 50 वर्ष डोळ्यासमोर ठेवून कामे केली . पालखी मार्ग बाहेरून गेल्याने वाहतूक कोंडीवर परिणाम झाला की नाही जेवढा ट्राफिक कमी करता येईल तेवढा प्रयत्न करत आहे. विकास झाला असला तरी मला परिपूर्ण विकास करायचा आहे आणखी काही गोष्टी राहिल्या आहेत, ते करण्यासाठी मला माझ्या घड्याळावरील उमेदवार निवडून द्या की 1991 पासून तुम्ही माझे पाठीशी उभा राहिला आहात तुमच्या विश्वासाला मी कुठेही तडा जाऊ दिला नाही. माझ्याकडे बघून माझ्या उमेदवारांना मतदान करा पूर्वी कॅनोन ने जाताना काय वाटायचं आता कसं वाटतंय गार गार वाटतंय गार गार वाटतय. आज अजित पवार आहे अजित पवार काय ताम्रपट घेऊन जन्माला आलेला नाही पण हे पुढे टिकवायचं माझ्या पुढच्यांच्या नंतर घामच निघणार आहे घड्याळाशिवाय दुसरा कुठल्याही उमेदवाराचा तुम्ही या शहरात विचार करू नका यंदा मी बेरजेचं राजकारण करण्याचा प्रयत्न केला आहे, कोणी कोणाचा 그ांचा शत्रू नसतो. माळेगाव मध्ये पण रंजन तावरे यांना बरोबर घेतल आहे. चांगलं काम करणार असेल तर माझी काय हरकत आहे. निवडणुकीत जागृत रहा शहराच्या विकासासाठी बनण्यासाठी वैयक्तिक नाराजी पुढे आणू नका. विरोधकांना पण कधीही कमजोर समजलं नाही काही विरोधक बाहेरून आले होते तरी देखील त्यांना आपण कमजोर समजले नाही या निवडणुकीत लाडक्या बहिणींनी साथ दिली पाहिजे, माझ्या निवडणुकीला तुम्ही कसं घरणंघर फिरता तसे या निवडणुकीलाही फिरा पत्रकारांनी खऱ्या बातम्या देत चला. काय काय जमानाले प्रत्येकाला वर्षाला दहा हजार रुपये देणार आईला म्हटलं नितीश कुमारांना भेटून आले की काय अशा काही गोष्टी होत आहेत. 1975 कोटी रुपये बारामती नगर परिषदेसाठी या कार्यकाळात आणलेले आहेत. ही निवडणूक गावकी भावकीची नाही विकासाचे आहे प्रचार करताना कोणालाही उलट बोलायचं नाही जर कोणी प्रश्न विचारला तर समजून सांगायचं ऐकलं ठीक काही जण तुम्हाला उचकवण्याचा प्रयत्न करतील, कुठल्याही जाती धर्माला ठेच पोहोचेल भावना दुखावल्या जातील अशा पद्धतीचे वक्तव्य तुमच्या सभेत बोलायचं नाही, पुढची समारोपाची सभा आपण शारदा प्रांगणात घेऊ मतदारांचा मान सन्मान ठेवा. जसं विधानसभेला माझ्या खांद्यावर मतांचा बोजा टाकल्यामुळे मी जसं पुन्हा कामाला सुरुवात करतो तसंच या नगर परिषदेच्या निवडणुकीला या सर्व घड्याळाच्या उमेदवारांना एवढं प्रचंड मतांनी विजयी करा
141
comment0
Report
Advertisement
Back to top