icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ चुनाव: शिवसेना के उम्मीदवार पर असमंजस, राठोड़ परिवार का नाम चर्चा में

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीकडून शिवसेनेचा उमेदवार अद्याप अनिश्चित असून आता पालकमंत्री संजय राठोड यांच्या पत्नी शीतल राठोड यांचे देखील नाव अचानक चर्चेत आले आहे. स्थानिक चा उमेदवार द्यावा असा भाजपचा आग्रह आहे, शिवाय सलीम खेतानी या शिवसेनेच्या नावाला देखील भाजपचा प्रचंड विरोध असल्याची सूत्रांची माहिती आहे. त्यामुळे एन वेळेवर पालकमंत्री संजय राठोड यांना आपली पत्नी शीतल राठोड यांनाच निवडणूक रिंगणात उतरवावे लागेल अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी अवघे काही तास शिल्लक असून शिवसेना नेतृत्व काय निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अमरावती विधानपरिषद चुनाव: बीजेपी ने प्रवीण पोटे को मैदान में उतारा, कांग्रेस चुनौती देगी

Amravati, Maharashtra:अमरावती विधानपरिषद निवडणुकीसाठी रंगत; भाजपकडून प्रवीण पोटे पुन्हा मैदानात, काँग्रेसचे हर्षजित देशमुख आव्हान देणार अँकर :- अमरावती विधानपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस असून भाजपने सलग तिसऱ्यांदा प्रवीण पोटे यांच्यावर विश्वास व्यक्त करत त्यांना उमेदवारी दिली आहे. तर काँग्रेसकडून हर्षजित देशमुख यांनी यापूर्वीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे. भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे आज दुपारी 12 वाजता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे या अर्ज दाखल कार्यक्रमाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. दुसरीकडे काँग्रेसचे उमेदवार हर्षजित देशमुख यांनी 30 जून रोजीच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. दोन्ही प्रमुख पक्षांनी निवडणुकीसाठी जोरदार तयारी सुरू केल्याने राजकीय हालचालींना वेग आला आहे. अमरावती विधानपरिषद निवडणुकीत भाजप आणि काँग्रेस यांच्यात थेट लढत होण्याची शक्यता असून या निवडणुकीकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज प्रक्रियेच्या अंतिम टप्प्यात राजकीय घडामोडींना वेग आला असून आगामी काळात प्रचाराची रणधुमाळी आणखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.
0
0
Report

डोंबिवली के पिंपळेश्वर महादेव मंदिर के लिए 4.25 एकड़ जमीन मंजूर, संकल्पपूर्ती पूजन किया

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरात भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी संकल्प मूर्ती पूजन केले. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात डोंबिवलीतील श्री पिंपळेश्वर महादेव मंदिरासाठी ४ एकर २५ गुंठे जागा मंजूर करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे पिंपळेश्वर मंदिरभूमीची अनेक वर्षांची लढाई अखेर यशस्वी ठरली आहे. पिंपळेश्वर मंदिर हा डोंबिवलीकर ग्रामस्थांच्या वैयक्तिक आस्थेचा, श्रद्धेचा आणि सांस्कृतिक अस्मितेचा विषय आहे. मंदिराच्या जागेसाठीचा संघर्ष गेली १४ वर्षे सातत्याने सुरू होता. या संपूर्ण लढ्यात भारतीय जनता पार्टी ग्रामस्थांसोबत खंबीरपणे उभी राहिली. २०१२ च्या ऑगस्टमध्ये भाजपा ने या आंदोलनाला बळ देण्यासाठी डोंबिवली बंदची हाक दिली होती. आमच्या सर्वांसाठी हा अत्यंत आनंदाचा दिवस आहे; महायुती सरकारने पिंपळेश्वर मंदिराला ही जागा द्यायची असे निर्णय घेतला.
0
0
Report
Advertisement

लग्न के नाम पर दाम्पत्य पर बलात्कार: नाशिक में मामला दर्ज

Nashik, Maharashtra:लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल. अँकर लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार तसेच जातीवाचक अपमान आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याच्या आरोपावरून नाशिकच्या उपनगर पोलिस ठाण्यात एका दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. संशयित आरोपी कृष्णा जगन्नाथ साळुंखे याची तरुणीसोबत ओळख झाली होती. त्याने स्वतःचे लग्न झालेले असताना ही बाब त्याने पीडितेपासून लपवून ठेवली. आरोपीने नाशिकरोड येथील मुक्तिधामजवळील एका लॉजवर नेऊन तरुणीच्या इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध प्रस्थापित केले. त्यानंतर तरुणीने विवाहाबाबत विचारणा केली असता आरोपी टाळाटाळ करू लागला. आरोपीच्या पत्नीने तिला व तिच्या कुटुंबीयांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. संशयित आरोपीने पीडितेला वेगवेगळे आमिष दाखविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर तिने उपनगर पोलिस ठाण्यात तक्रार नोंदविली.
0
0
Report

घोड़ागांव नदी में कचरे का अंबार, पानी स्वास्थ्य के लिए खतरा बन गया

Ambegaon, Maharashtra:प्रशासकीय निष्काळजीपणाचा एक अतिशय धक्कादायक आणि भयानक प्रकार आंबेगाव तालुक्यातील घोडेगावमध्ये समोर आलाय. ज्या घोड नदीतून हजारो नागरिकांना पिण्याचं पाणी पुरवलं जातं, त्याच नदी पात्रात घोडेगाव शहरातल्या कचऱ्याचं साम्राज्य उभं राहिलंय. हॉस्पिटलच्या घातक बायो-मेडिकल वेस्टसह मृत प्राणी संपूर्ण कचरा सर्रासपणे या नदीपात्रात ओतला जातोय आणि तिथंच तो पेटवून दिला जातोय. या विषारी धुरामुळे आणि दूषित पाण्यामुळे नागरिकांच्या आरोग्याशी उघड-उघड खेळ सुरू आहे. गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक नागरिक यावर आवाज उठवत आहेत. 'येत्या दोन तीन दिवसांत हा घातक कचरा हटवला नाही, तर तो स्वखर्चाने उचलून थेट पंचायत समितीच्या दारात आणून ओतू', असा थेट इशाराच आता संतप्त नागरिकांनी प्रशासनाला दिलाय. याचाच घोड नदी पात्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

पवनी के कुराडा तालاب में गाळ उपसा रुका, मत्स्य उत्पादन प्रभावित

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या पवनी तालुक्यातील कुराडा येथे गाळ उपसा रखडल्याने तलाव उथळ....मत्स्य व्यवसायाला फटका.... भंडाऱ्याच्या पवनी येथील कुराडा (मामातलाव) तलावातील गाळ उपसा अनेक वर्षांपासून न झाल्याने तलाव उथळ झाला असून पाणीसाठवण क्षमतेत मोठी घट झाली आहे. अमृत योजनेंतर्गत सुरू असलेल्या सौंदर्यीकरण कामांमुळेही मागील दोन वर्षांपासून तलावात पुरेसे पाणी साठले नाही. परिणामी, पवनी मच्छी उत्पादक सहकारी संस्थेचे मत्स्य उत्पादन ठप्प झाले असून संस्थेला सुमारे ५० ते ६० लाखांचे नुकसान सहन करावे लागले आहे. संस्थेने जिल्हाधिकारी व जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकाऱ्यांकडे निवेदन देत ‘गाळमुक्त तलाव, गाळयुक्त शिवार’ अभियानांतर्गत गाळ उपसा करून तलावाचे खोलीकरण करावे, तसेच नुकसानभरपाई व दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top