icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वसई पालिका के डंपिंग ग्राउंड से प्रदूषित पानी औद्योगिक बस्तियों में स्वास्थ्य संकट

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार पालिकेच्या भोईदापाडा येथील डंपिंग ग्राउंडच्या नियोजन शून्य कारभाराचा फटका डंपिंग ग्राउंड शेजारी असलेल्या औद्योगिक वसाहतींना बसत आहे .. पावसाळा सुरू झाल्यापासून डंपिंग मधून येणारे केमिकल युक्त सांडपाणी कंपन्यांच्या रस्ते व परिसरातून वाहत आहे .. वाहणाऱ्या पाण्यात एक विशिष्ट फेस तयार होत असून प्रचंड दुर्गंधी येत असल्याने येथील कंपनी चालक आणि कामगारांना नाक मुठीत धरून काम करावे लागत आहे. आणि या वातावरणामुळे कामगारांच्या आरोग्यावर मोठा परिणाम होत आहे ... पालिकेने डंपिंग मधून येणाऱ्या सांडपाणी ड्रेनेजचे योग्य नियोजन न केल्याने संताप व्यक्त केला जात आहे .. खरतर अनेक वर्ष ही समस्या कायम आहे , त्यामुळे येथील १०० हून अधिक कंपन्या आता स्थलांतर करण्याच्या मार्गावर असल्याचे मत येथील कंपनी चालकांनी व्यक्त केले आहे ...
0
0
Report

अकोला के तेल्हारा में वाणी कीड़ों से फसलों को भारी नुकसान, किसानों पर आर्थिक संकट

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा तालुक्यात अंकुरलेल्या पिकांवर वाणी किडीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. दुबार पेरणीचे संकट एका बाजूला असतानाच अब सोयाबीन, कपाशी आणि तूर पिकांवर वाणी किडीने हल्ला चढवला आहे. कोवळे अंकुर फस्त होत असल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली असून, कृषी विभागाने तातडीने उपाययोजना करून मोफत कीटकनाशके उपलब्ध करून द्यावीत, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.यंदा पावसाच्या उशिरानंतर अकोल्यासह विदर्भातील अनेक भागात शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या. पिकांना अंकुर फुटताच तेल्हारा तालुक्यात मोठ्या प्रमाणात वाणी किडीचा प्रादुर्भाव दिसून आला आहे. हा कीटक सोयाबीनच्या कोवळ्या रोपांसह कपाशी आणि तूर पिकांचेही मोठे नुकसान करत आहे. महागडी बियाणे आणि खतांसाठी उधारी करून पेरणी केलेल्या शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा आर्थिक संकट उभे ठाकले आहे. वाणी किडीपासून बचावासाठी काही शेतकरी थिमेटचा वापर करत आहेत, तर काही जण किडीला हाताने वेचून नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, या किडीवर प्रभावी नियंत्रणासाठी योग्य तांत्रिक मार्गदर्शन आणि शिफारस केलेल्या उपाययोजनांची माहिती बहुतांश शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेली नाही,त्यामुळे कृषी विभागाने तातडीने शेतपातळीवर पाहणी करून शेतकऱ्यांना योग्य मार्गदर्शन करावे, आवश्यक कीटकनाशके उपलब्ध करून द्यावेत आणि वाढत्या प्रादुर्भावावर नियंत्रणासाठी विशेष मोहीम राबवावी, अशी मागणी आता जोर धरत आहे. हंगामाच्या सुरुवातीलाच वाणी किडीच्या संकटामुळे शेतकऱ्यांच्या आशांवर पुन्हा एकदा पाणी फिरण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

कराड-विटा मार्ग पर कृष्णा पुल पर कार में अचानक आग, यातायात बाधित

Satara, Maharashtra:सातारा :- कराड-विटा मार्गावरील कृष्णा पुलावर रात्री धावत्या कारला अचानक आग लागल्याने काही काळ एकच खळबळ उडाली. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी आगीत कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. घटनेमुळे काही काळ कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही परिणाम झाला होता. Vo :-धावत असलेल्या कारमधून अचानक धूर येऊ लागतला आणि काही क्षणांतच आगीने उग्र रूप धारण केले. चालकाने प्रसंगावधान राखत वाहन तात्काळ रस्त्याच्या कडेला थांबवून बाहेर पडल्याने पुढील अनर्थ टळला.घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी अग्निशामक दल आणि कराड शहर पोलिसांना कळवले. त्यानंतर अग्निशामक दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले आणि कारला लागलेली आग नियंत्रणात आणली.या घटनेमुळे कृष्णा पुलावरील वाहतुकीवरही काही काळ विस्कळीत झाली. पुलावर वाहनांच्या रांगा लागल्या, तर घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली. कराड शहराला जोडणारा हा पूल अत्यंत वर्दळीचा असल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला.
0
0
Report
Advertisement

आकोला जिले के नागोली-नागठाणा में पानी भरते वक्त युवक बिजली के झटके से मौत

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तीजापूर तालुक्यातील नागोली-नागठाणा गावात अत्यंत दुर्दैवी घटना घडली आहे. ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेलेल्या २१ वर्षीय आयटीआय विद्यार्थ्याचा विजेचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून, सोळंके कुटुंवावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आदर्श सुनील सोळंके हा नागोली-नागठाणा येथील रहिवासी असून तो शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) मध्ये मेकॅनिकल ट्रेडच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता,तो गावातील ग्रामपंचायतीच्या सार्वजनिक बोअरिंगवर पाणी भरण्यासाठी गेला असता, बोअरिंग सुरू करताना अचानक विद्युत प्रवाह आल्याने त्याला जोरदार विजेचा शॉक बसला. हा शॉक इतका तीव्र होता की त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र तोपर्यंत आदर्शचा मृत्यू झाला होता. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त होत असून, एका होतकरू आणि तांत्रिक शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाल्याने सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या प्रकरणाची माहिती संबंधित प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे. सार्वजनिक ठिकाणी असलेल्या विद्युत उपकरणांची नियमित तपासणी आणि सुरक्षिततेच्या उपाययोजना करण्याची मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
0
Report

जीएमआर एयरपोर्ट नागपूर एयरपोर्ट को आधुनिक एवीएशन हब बनाने की योजना का ऐलान

Nagpur, Maharashtra:नागपूर डॉ. बाबासाहेब आंबेडकर नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळाचे रूपांतर एका आधुनिक एव्हिएशन तसेच कार्गो हब आणि एअरपोर्ट सिटीमध्ये होणार आहे. नागपूर विमानतळाच्या खाजगीकरणानंतर आता जीएमआर एअरपोर्ट लिमिटेडने विमानतळाच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वकांक्षी आराखडा जाहीर केला. टप्प्याटप्प्याने राबविण्यात येणाऱ्या विस्तारानुसार नागपूर विमानतळाची वार्षिक प्रवासी हाताळणी क्षमता तीस लाख प्रवाशांवरून तीन कोटी पर्यंत वाढवण्यात येणार आहे. करारांतर्गत विमानतळ मध्य भारताचे एक मोठे व्यावसायिक आणि आर्थिक केंद्र म्हणून नावारूपास येणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यात कंपनी विद्यमान टर्मिनल इमारतीच्या नूतनीकरणासाठी तीनशे कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहे. पुढील बारा ते अठरा महिन्यांत प्रवाशांच्या सोयीसाठी अतिरिक्त चेक-इन काउंटर्स, सेल्फ चेक-इन किओस्क, विस्तृत सुरक्षा क्षेत्र, अपग्रेड केलेले वॉशरुम्स आणि विशेष लाउंज तयार केले जातील. त्यानंतर, पुढील काही वर्षांत मिहान-एसईझेड आणि विमान दुरुस्ती केंद्राजवळ (एमआरओ) एक भव्य नवीन एकात्मिक टर्मिनल इमारत बांधली जाईल. भविष्यातील विमानांची वाढती वाहतूक आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणे लक्षात घेऊन दुसरी समांतर धावपट्टी आणि नवीन एअर ट्रॅफिक कंट्रोल टॉवर उभारला जाणार आहे. तसेच विद्यमान टर्मिनल इमारतीचे नूतनकरण होणार आहे. नागपूर विमानतळाचा होणाऱ्या कायापालट बाबत आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली आहे. जीएमआरचे कार्यकारी संचालक एस जी के किशोर यांच्याकडून
0
0
Report

नाशिक आश्रम स्कूल में नाबालिग छात्रा ने बच्चे को जन्म दे दिया; महाराष्ट्र में हड़कंप

Nashik, Maharashtra:महाराष्ट्राला हादरवणारी घटना ;आश्रम शाळेत शिकणाऱ्या अल्पवयीन ९ वीच्या मुलीने दिला बाळाला जन्म सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या एका धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरका उडविणारी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आल्याची माहिती आदिवासी विकास विभागाचे अप्पर आयुक्त दिनकर पावरा यांनी दिली आहे. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, आरोग्य आणि सुरक्षिततेसाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला जातो. आश्रमशाळांमध्ये विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीसाठी विविध सुविधा उपलब्ध असल्याचा दावा केला जातो. मात्र, या आश्रमशाळेतील घटनेमुळे या यंत्रणेच्या प्रभावी अंमलबजावणीबाबत अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? तसेच संबंधित जबाबदार अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या भूमिकेची चौकशी होणार का? असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत. बाईट: अपर आयुक्त दिनकर पावरा आदिवासी विकास भवन नाशिक
0
0
Report
Advertisement

केडीएमसी में महिला नगरसेविकाओं के बीच भय, डॉक्टर पर हमला मामला गरमाया

Kalyan, Maharashtra:मारहाण करणाऱ्या नगरसेवकासोबत सभागृहात बसायचं कसं? केडीएमसीत महिला नगरसेविकांमध्ये भीतीचे वातावरण! शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टरला शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्याकडून मारहाण प्रकरणानंतर केडीएमसीच्या महिला नगरसेविकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचा दावा काँग्रेसच्या गटनेत्या कंचन कुलकर्णी यांनी केला आहे. महिला डॉक्टरवर हात उचलणारा लोकप्रतिनिधी सभागृहात बसण्याच्या लायकीचा नसून त्याला तात्काळ निलंबित आणि पदावरून हटविण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. सामान्य नागरिकाला अटक झाल्यानंतर अशा रुग्णालयात राहायची सुविधा मिळत नाहीत, मात्र आरोपी नगरसेवकाला रुग्णालयात ठेवून सत्तेचा गैरवापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. राज्य सरकार 'लाडकी बहीण' योजनेची जाहिरात करत असताना त्याच पक्षाचा नगरसेवक एका महिला डॉक्टरला मारहाणा करतो, ही अत्यंत लाजिरवाणी बाब असल्याचे कुलकर्णी म्हणाल्या. सीसीटीव्ही सुरू असल्याची जाणीव असूनही डॉक्टरांवर हल्ला करणारा व्यक्ती सभागृहात महिला नगरसेविकांच्या सुरक्षेसाठी धोका ठरू शकतो, त्यामुळे महासभेत विरोधी पक्ष आणि महिला नगरसेविकांना विशेष सुरक्षा देण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान, डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून या प्रकरणावरून केडीएमसी सभागृहात देखील हा विषय चांगलाच गाजणार असल्याचं दिसून येत आहे
0
0
Report

नांदगांव में भुजबळ-कांडे बयानबाजी: भुजबळ का लिखित स्पष्टीकरण सामने

Yeola, Maharashtra:नांदगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सुहास कांडे यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते तथा माजी खासदार समीर भुजबळ यांच्यावर अन्न व नागरी पुरवठा विभागाच्या कथित 4000 कोटींच्या टेंडरमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप केला यावेळी माजी खासदार समीर भुजबळ यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी लिखित स्वरूपात स्पष्टीकरण पाठवले आहे 'या टेंडर संदर्भात माझ्यावर केलेले आरोप हे खोटे असून हे प्रकरण सध्या नाही प्रविष्ट आहे त्यामुळे वैफल्यग्रस्त असलेल्या व्यक्तीने राजकीय सूडबुद्धीने केलेल्या आरोपांकडे लक्ष देण्याची गरज नाही असे प्रत्युत्तर समीर भुजबळ यांनी दिले आहे दरम्यान नांदगाव विधानसभेमध्ये समीर भुजबळ व आमदार सुहास कांडे यांच्यात शिवीगाळ देखील झाली होती तेव्हा भुजबळ विरुद्ध कांदे हा वाद पेटला होता यानंतर दोन्ही नेते महायुतीमध्ये सत्तेम आल्यानंतर हा वाद काहीसा क्षमला होता. मात्र आज आमदार सुहास कांडे यांच्या आरोपांमुळे भुजबळ कांडे वाद पुन्हा पेटणार अशी शक्यता निर्माण झाली है
0
0
Report
Advertisement

बीड़ में विलास घुले हत्या मामले केज में बड़ा मोर्चा, हजारों जुटेंगे

Beed, Maharashtra:बीड : विलास घुले खून प्रकरणी उद्या न्यायिक मागणीसाठी केजमध्ये निघणार मोर्चा 25 ते 30 हजार लोकांचा जनसमुदाय मोर्चात होणार सहभागी सर्वपक्षीय नेतेही असणार या मोर्चात सहभागी विलास घुले हत्या प्रकरणाला तब्बल दोन आठवडे उलटलेत. मात्र अद्यापी म्हणावी तशी कारवाई पोलिसांनी केली नसल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. विलास घुले यांना आणि कुटुंबीयांना न्याय मिळावा यासाठी उद्या केजमध्ये सर्व धर्मीय आणि सर्वसमावेशक संघटनांचा मोर्चा आयोजित करण्यात आला आहे. सकाळी दहा वाजता या मोर्चाचा आयोजण्यात आलेला आहे.. मोर्चाला राज्यभरातून सर्वपक्षीय नेते उपस्थित असणार आहेत. या मोर्चामध्ये पीडित घुले कुटुंबीय देखील उपस्थित राहणार आहे. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोपर्यंत हा लढा सुरूच राहील असं घुले कुटुंबीयांचं म्हणणं आहे.. तर उद्याच्या या विराट मोर्चाला सर्वपक्षीय सर्व धर्मीय तमाम नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन सामाजिक नेते बाळासाहेब सानप यांनी केले आहे..
0
0
Report

रत्नागिरी के रघुवीर घाट में दरड़ गिरने से यातायात बंद, भारी बारिश जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रघुवीर घाटात दरडी कोसळल्या.. वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद!.. अँकर रत्नागिरीतून एक अत्यंत महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे.रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेला रघुवीर घाट वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.. गेल्या काही तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे रघुवीर घाटात ठिकठिकाणी मोठ्या दरडी कोसळल्या आहेत.. एवढेच नव्हे तर घाटात काही ठिकाणी भीषण भूस्खलन झाले असून,मुख्य रस्त्याची एक बाजू थेट दरीत वाहून गेल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.. या गंभीर परिस्थितीमुळे प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून घाटातील वाहतूक दोन्ही बाजूंनी पूर्णपणे रोखली आहे.. सध्या पावसाचा जोर कायम असल्यामुळे पर्यटकांनी आणि प्रवाशांनी या मार्गावरून प्रवास टाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..
0
0
Report

नागपुर में मनसे का रोड रोको: खड्डों पर बैठकर प्रशासन से तत्काल सुधार मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरात पश्चिम नागपुरातील गोंधनी परिसरातील रस्त्यांच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधण्यासाठी मनसेकडून रस्त्यांवरील खड्ड्यात बसून आंदोलन करण्यात आलं... - परिसरातील खड्ड्यांमुळे नागरिकांचे जगणे अक्षरशः खडतर झाले आहे...या भागात तीन शाळा असल्यानं तसेच स्थानिक नागरिकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप मनसेने केला - गणपती नगर, शिव किराणा टॉवर लाईन परिसरातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात आज मनसेने हे 'रस्ता रोको' आंदोलन केले - प्रशासन आणि महापालिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी करत नागरिकांसह मनसैनिकांनी रस्त्यावर उतरून तात्काळ दुरुस्तीची मागणी केली. - प्रशासनाने त्वरित कारवाई न केल्यास यापुढे आणखी तीव्र आंदोलनाचा इशाराही मनसेकडून देण्यात आला. -
0
0
Report
Advertisement

संगमनेर में भीषण कार हादसे के बाद अवैध गुटखा रैकेट का पर्दाफाश

Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील क-हे घाटात झालेल्या एका भीषण कार अपघाताने अवैध गुटखा वाहतुकीचं मोठं रॅकेट उघड झालय...राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही “गुटखा किंग” अलिशान कारमधून गुटखा कसा पोहोचवतात याचं धक्कादायक वास्तव या अपघातातून समोर आलय...अपघातानंतर कार दरीत कोसळली आणि पोलिसांनी ती वर काढताच कारच्या आत लाखोंचा गुटखा साठा आढळून आल्याने एकच खळबळ उडालीय… त्यामुळे या प्रकरणामागील मोठं जाळं उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जातेए... पोलिसांनी क्रेनच्या सहाय्याने दरीत कोसळलेली इनोव्हा कार वर काढली. मात्र कारची तपासणी करताच पोलिसांनाही धक्का बसला… कारण गाडीमध्ये मोठ्या प्रमाणात अवैध गुटखा साठा आढळून आला..पान मसाल्याच्या नावाखाली जवळपास 8 लाख 37 हजार रुपयांचा गुटखा या कार मध्ये आढळून आला..राज्यात गुटखा विक्रीवर बंदी असतानाही अशा पद्धतीने परराज्यातून माल आणून संगमनेरमध्ये विक्री केली जात असल्याचं स्पष्ट झालं आहे. या प्रकरणी संगमनेर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.दरम्यान,जखमी आरोपींची प्रकृती चिंताजनक असून हा गुटखा नेमका कुठून आला आणि कोणाच्या सांगण्यावरून कुठे नेला जात होता,याचा तपास पोलीस करतायत...विशेष म्हणजे, याआधीही सायखिंडी फाट्याजवळ तालुका पोलिसांनी स्कॉर्पिओ गाडीतून लाखोंचा गुटखा जप्त केला होता. त्यामुळे संगमनेर परिसरात अवैध गुटखा रॅकेट सक्रिय असल्याचे स्पष्ट संकेत मिळतायत...
0
0
Report

दूध पैकेटों में भेसळ: 470 लीटर भेसळयुक्त दूध पकड़ा गया, एक आरोपी गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:गुन्हे शाखेने नामांकित दूध कंपन्यांच्या दुधाच्या पाकिटांमध्ये भेसळ करून विकणाऱ्या टोळीतील एका आरोपीला अटक केली आहे. अँकर: गुन्हे शाखा युनिट १२ ने मुंबईतील दहिसर पूर्व येथे एक मोठी कारवाई केली आहे. बनावट दुधाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील रोजारी कंपाऊंडमधील एका गोदामात नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊचमध्ये बेकायदेशीरपणे पाणी आणि इतर घटक मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. त्यानंतर हे पाऊच पुन्हा सील करून बाजारात अस्सल दूध म्हणून विकले जात होते, ज्यामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट १२ आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, अंदाजे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, दुधाचे पाऊच, पॅकिंग स्प्रेअर, सीलिंग मशीन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आता पोलीस त्या भागांचा तपास करत आहेत, जिथे या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध खरेदी करताना त्याच्या पॅकेजची गुणवत्ता, सील आणि मुदतची तारीख तपासावी. जर त्यांना कोणतीही भेसळ किंवा संशयास्पद बाब आढळल्यास, त्यांनी तात्काळ पोलीस किंवा अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. दहिसर पोलिसांच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांमध्ये घबराट पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

पालघर के मंत्री गणेश नाईक ने वसई-विरार में बाढ़ से स्थिति का निरीक्षण किया

Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज वसई-विरारमधील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनधिकृत बांधकामे, नाले व भरावांवरील बांधकामांमुळे पूरस्थिती गंभीर झाल्याचे सांगितले. अनेक भागांतील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीवर भर देत भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचाच काळ असेल, असेही ते म्हणाले. अनधिकृत बांधकामे तोडण्यात तर येणार नाही मात्र महसूल विभागामार्फत आवश्यक कॅबिनेट मंजुरी घेऊन पात्र रहिवाशांना त्यांच्या राहत्या जागेचा मालकी हक्क देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top