icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर विखे पाटील का बयान; जलसंपदा कार्यालय स्थानांतरण विवाद

Ahilyanagar, Maharashtra:राधिकाकृष्ण विखें पाटील के अनुसार रोहित पवार का अन्नत्याग आंदोलन केवल अपने अस्तित्व को बनाए रखने की कोशिश है। मुख्यमंत्री ने किसानों की कर्जमाफी की घोषणा की है और उसका आंदोलन के बिना भी संभव है, यह विखे पाटील ने कहा। रोहित पवार पंढरपूर में अन्नत्याग आंदोलन करेंगे। विरोधी अपने पक्ष की चिंता करें; NEET प्रकरण में सरकार ने कार्रवाई की है और क्लासेस पर निर्बंध लगाने की मांग भी उठ रही है। अहिल्यानगर में जलसंपदा विभाग के कार्यालय राहुरी और लोणी में स्थानांतरित होने पर भी मंत्री विखे पाटील ने सवाल उठाए कि अहिल्यानगर उत्तर जिले में है और कार्यालय दक्षिण जिलों में क्यों रखा जा रहा है।
0
0
Report

मालेगांव केस: नाबालिग बच्ची की सिजेरियन प्रसूति और नवजात बिक्री पर BJP का हमला

Nashik, Maharashtra:- मालेगावात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सिझेरियन प्रसूती व नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप आक्रमक.. - तत्कालीन वैद्यकीय अधिकारी आणि आत्ताचे 11 आरोपींपैकी मुख्य असलेल्या हिराई हॉस्पीटलचे मालक डॉ. किशोर डांगे यांच्या प्रतीकात्मक फोटोवर जोडे मारत केला या घटनेचा निषेध... - मालेगाव शहरात असलेले बोगस डॉक्टर यांचा कॉम्बिंग ऑपरेशन करून शोध घ्यावा आणि डॉ.डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी.. - डॉ.डांगे शासकीय रुग्णालय अधीक्षक असतानाच्या सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी करण्यात आली.. - मालेगावात बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेचा खेळ सुरू असल्याचा आरोप देखील आंदोलन केला..
0
0
Report

गडचिरोली में हाथियों की चाल की वैज्ञानिक निगरानी के लिए एक साल की अनुमति

Gadchiroli, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या वावरासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी विशेष उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र वन विभागाने ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी आणि संबंधित कार्यासाठी एक वर्षाची परवानगी प्रदान केली आहे. ही संस्था वन विभागाच्या समन्वयाने हत्तींच्या हालचालीची नोंद, दस्तावेजीकरण, भ्रमण मार्गांचे विश्लेषण तसेच क्षेत्रीय माहिती संकलनाचे कार्य करणार आहे. हत्तींच्या कळपांच्या हालचालांचे नियमित निरीक्षण करून त्यासंबंधीची माहिती वन विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विदर्भातील हत्तींची स्वतंत्र ओळख नोंदवही तयार करण्यात येणार असून त्यामध्ये हत्तींची छायाचित्रे, कळपांची रचना, वय-लिंग वर्गीकरण आणि वर्तनविषयक नोंदींचा समावेश असेल. यामुळे हत्तींच्या हालचालींचा अधिक अचूक अभ्यास करण्यास मदत होणार आहे. जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हत्तींच्या भ्रमण मार्गांचे नकाशे तयार करणे, विश्रांती स्थळे, रस्ते ओलांडण्याची ठिकाणे तसेच संभाव्य संघर्ष क्षेत्रांची ओळख पटविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय गावनिहाय घटनांची नोंद करून हत्तींच्या वावरासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना हत्तींच्या हालचालींबाबत वेळेवर माहिती मिळावी यासाठी जनजागृती कार्यक्रम, गावस्तरीय बैठका आणि माहिती प्रसाराचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळांसाठी माहितीपर साहित्य तयार करण्यासोबतच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत तिमाही प्रगती अहवाल, तांत्रिक नोंदी, नकाशे आणि क्षेत्रीय अभ्यास अहवाल वन विभागाकडे सादर करण्यात येणार असून त्याच्या आधारे भविष्यातील नियोजन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या हत्तींच्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम वन विभागाला हत्तींच्या हालचालींबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार असून वन्यजीव व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.
0
0
Report
Advertisement

नीमगांव केतकी में पालखी का स्थान पूर्ववत रखने का ग्रामसभा ने एकमत निर्णय लिया

Rui, Maharashtra:निमगाव केतकी ग्रामपंचायताच्या विशेष ग्रामसभेत पालखीचा मुक्काम गावातच राहावा एकमुखी ठराव. गावकरी बुधवारी १० जून रोजी पुण्याला आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांना भेटणार. पालखी मुक्काम गावातच राहावा यासाठी ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. सोमवारी ८ जून रोजी निमगाव केतकी ग्रामपंचायत कार्यालयात पालखी मुक्कामाच्या बदललेल्या ठिकाणावरून विशेष ग्रामसभा सरपंच प्रशासक प्रवीण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गेली ३४० वर्षे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी निमगावात येथे मुक्काम करत आहे. ही केवळ परंपरा नसून निमगावकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि सेवेचा अविभाज्य भाग आहे. गावातील सर्व सहकारी पतसंस्था, गणेश मंडळे, वाड्या-वस्त्यांवरील मंडळी, शेतकरी, महिला-भगिनी यांनी पालखीची व पालखीसोबत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांची अन्नदान, निवारा, पाणी, वैद्यकीय सेवा अत्यंत भक्तिभावाने केली आहे. या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या वंशज व व्यवस्थापन मंडळीनी समस्त निमगावकरांना विश्वासात न घेता पालखीचा मुक्काम अचानक निमगावपासून २ किलोमीटर अंतरावरील इरिगेशन बंगला या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निमगावकरांच्या भावना दुखावल्या आहेत.
0
0
Report

भुजबळ नाराज़, राजेंद्र जैन को उमेदवारी मिलने पर सियासी बहस तेज

Yeola, Maharashtra:महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना ऐनवेळी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली यावर मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्रिपद द्यावे अशी प्रमुख मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी लावून धरली होती मात्र राष्ट्रवादी कडून तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली यावर येवला मतदार संघातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी 'साहेब निर्णय घ्या' अशा आशयाचे पोस्टर लावले आहे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली असून भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

महामंडळ चुनाव: नीलम शिर्के की माघार के बावजूद मेघराज राजेभोसले ने जीत दावा किया

Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्के यांना माघार घ्यावी लागली असली तरी महामंडळावर आम्ही त्यांना स्वीकृत म्हणून घेणार आहोत अशी माहिती महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलने 14 पैकी 14 जागांवर विजय मिळवत चित्रकर्मी पॅनलचा धुव्वा उडवला. समर्थ पॅनलच्या विजयानंतर पॅनल प्रमुख आणि महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

अकोला के सरकारी मेडिकल कॉलेज में गड़बड़ी पर जांच की मांग

Akola, Maharashtra:अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. पतीला उपचारासाठी पाठीवर घेऊन रुग्णालयात आणणाऱ्या महिलेची बातमी झी 24 तासने प्रसारित केल्यानंतर प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी रुग्णालयाला भेट देत आहेत. शिवसेना नेते राजेंद्र साळवी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केल्यानंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनीही रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेच्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनीही रुग्णालयाला भेट देत येथील भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णांची होत असलेली गैरसोय, अस्वच्छ परिसर आणि अपुऱ्या सुविधा यावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्वच्छतेचे काम पाहणारी एजन्सी एका मंत्र्यांशी संबंधित असल्याने अधिष्ठातादेखील कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल न दिल्यास अधिष्ठात्यांविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचा इशाराही नितीन देशमुख यांनी दिला आहे. तसेच येत्या अधिवेशनात अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

वाशिम शहर में मारपीट की घटनाओं में वृद्धि, नागरिक चिंतित

Washim, Maharashtra:वाशिम शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून भररस्त्यात टोळक्यांकडून मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. आजही असाच प्रकार घडला त्यामुळे शहरातील सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रोजच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करून शहरात अधिक बंदोबस्त तैनात करावा व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
0
Report

महाराष्ट्र: एसटी स्टेशनों की सफाई और मुफ्त शौचालयों के लिए कड़ा कदम

Akola, Maharashtra:राज्यातील एसटी स्थानकांवरील स्वच्छता आणि प्रवासी सुविधांबाबत परिवहन विभागाने आता कडक भूमिका घेतली आहे. अकोला मध्यवर्ती बस स्थानकाच्या पाहणीनंतर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी महत्त्वाची घोषणा केली. जून महिन्यापासून राज्यभरातील एसटी स्थानकांची पाहणी सुरू असून अनेक ठिकाणी त्रुटी आढळल्याने व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. प्रवाशांच्या सुविधेसाठी एसटी स्थानकांवरील शौचालये मोफत करण्यात आली असून स्वच्छता, दुरुस्ती आणि मूलभूत सुविधांची कामे टप्प्याटप्प्याने पूर्ण केली जाणार आहेत. यावेळी त्यांनी खाजगी बस वाहतुकीवरही कठोर इशारा दिला. एसटी स्थानकाच्या २०० मीटर परिसरात खाजगी बस किंवा इतर वाहनांनी महामंडळाचे प्रवासी उचलल्यास संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात येतील, असे त्यांनी स्पष्ट केले. या कारवाईवर आयपीएस दर्जाच्या अधिकाऱ्यांचे नियंत्रण राहणार असल्यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्याांना तुरुंगात जावे लागेल, असा इशाराही सरनाईक यांनी दिला. त्यामुळे राज्यभरातील खाजगी प्रवासी वाहतूकदारांमध्ये या निर्णयाची मोठी चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report

एपीएमसी बाजार में काजू-बदाम की असुरक्षित प्रोसेसिंग पर वीडियो, जांच की मांग

Navi Mumbai, Maharashtra:एपीएमसी बाजार में काजू और बदाम की प्रोसेसिंग और पैकेजिंग का धक्कादायक वीडियो सामने आया है. मुंबई के एपीएमसी मसाला मार्केट में रोज करोड़ों रुपये की ड्राई फ्रूट्स की उलाढाल होती है. मगर H विंग में गटरलगत काजू पैकिंग की जानकारी है और G विंग में खुलकर बदाम प्रोसेसिंग और पैकिंग शुरू होने की बात सामने आ रही है. यहाँ के काजू-बदाम मुंबई और ठाणे के लिए बिक्री के लिए भेजे जाते हैं. असुरक्षित स्थानों पर प्रोसेसिंग और पैकिंग के कारण ग्राहक स्वास्थ्य पर प्रश्न उठ रहे हैं. यहाँ खाद्य सुरक्षा नियमों के उल्लंघन का आरोप है और खाद्य एवं औषध प्रशासन से तात्कालिक जांच कर कार्रवाई की मांग है.
0
0
Report
Advertisement

अकोला की GNM नर्सिंग छात्रा के सपने पर आर्थिक तंगी ने भारी बोझ डाला

Akola, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणानंतर विद्यार्थ्यांवरील शैक्षणिक आणि आर्थिक ताणाचा प्रश्न ऐरणीवर आला असताना अकोळ्यातून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. उच्च शिक्षणाचे स्वप्न पाहणाऱ्या एका विद्यार्थिनीने आर्थिक अडचणींमुळे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. अकोला शहरातील भूमिका धबडघाव ही द्वितीय वर्षाची जीएनएम नर्सिंगची विद्यार्थिनी होती. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही तिने शिक्षणाची वाट निवडली होती. भूमिकाचे वडील चौकीदार म्हणून काम करतात, तर आई धुणीभांडी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करते. घरची परिस्थिती हलाखीची असतानाही मुलीचे शिक्षण पूर्ण करण्यासाठी आई-वडील अहोरात्र मेहनत घेत होते. भूमिकाने नीटची परीक्षा दिली होती आणि पुन्हा परीक्षा देऊन डॉक्टर होण्याचे स्वप्न तिच्या डोळ्यांत होते. मात्र घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे तिने ते स्वप्न बाजूला ठेवत नर्सिंग शिक्षणाचा मार्ग स्वीकारला. सुरुवातीला महाविद्यालयाकडून कमी फी सांगण्यात आली होती, मात्र नंतर शुल्कात वाढ होत गेल्याचा आरोप तिच्या वडिलांनी केला आहे. आपल्या शिक्षणाचा आणि लहान भावाच्या भवितव्याचा आर्थिक भार आई-वडिलांवर पडत असल्याची चिंता भूमिकाला सतावत होती, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. घरच्या परिस्थितीची जाणीव आणि शिक्षणासाठीचा वाढता खर्च यामुळे ती मानसिक तणावात होती, असा दावा तिच्या वडिलांनी केला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, गरीब आणि होतकरू विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा वाढता खर्च हा पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. शिक्षण हे हक्काचे असताना आर्थिक अडचणींमुळे एखाद्या विद्यार्थ्याचे स्वप्न आणि आयुष्य दोन्ही संपुष्टात येणे ही समाजासाठी चिंतेची बाब असल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top