icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

दो नाबालिगों के साथ बलात्कार कर हत्या: 70 वर्षीय आरोपी को फांसी

Sangli, Maharashtra:दो अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून एकीचा खून केल्याप्रकरणी सांगलीच्या विटा न्यायालयाने एका वृध्द नराधमास फाशीचे शिक्षा ठोठावली आहे. शिवाजी काळेल वय ७०, असे वृद्ध आरोपीचे नाव आहे. आटपाडी तालुक्यातल्या गळवेवाडी येथे ७ सप्टेंबर २०१८ रोजी गावातील एक आठ वर्षीय चिमुरडी खेळण्यासाठी गेली असता, बेपत्ता झाल्याचा प्रकार घडला होता, या प्रकरणी पोलिसांकडून शोध घेतला असता आरोपी शिवाजी काळेल यांच्या घरातील एका पत्र्याच्या डब्याला रक्ताचे डाग आढळून आले होते, त्यानंतर काळेल याला ताब्यात घेऊन त्याची पॉलीग्राफ आणि नार्कोटेस्ट करण्यात आलेणंतर त्याने दोन अल्पवयीन मुलींवर लैंगिक अत्याचार करून, त्यापैकी एका मुलीचा खून करत मृतदेह एका पडक्या विहिरीत टाकल्याचे समोर आलं होतं. या प्रकरणी काळेला याला अटक करत त्याच्यावर विरोधात आटपाडी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या खटल्याची सुनावणी विटा न्यायालयामध्ये पार पडली, यामध्ये विटा न्यायालयाने 19 साक्षीदारांची साक्ष आणि सबळ पुराव्यांच्या आधाराने आरोपी शिवाजी काळेल याला खून प्रकरणी फाशी आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी मरेपर्यंत जन्मठेपेची, शिक्षा सुनावली आहे. बाईट - आरती देशपांडे-साटविलकर - सरकारी वकील.
0
0
Report

8 दिन बारिश नहीं, चंद्रपूर के धान किसान भारी संकट में

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत ,फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे, 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून जाणार हंगाम, पावसाने दगा दिल्याने शेतकरी भयंकर संकटात अँकर:--  मशागत, बिजाई, रोवणी, लावणी, मजूर खर्च, खत , फवारणी आणि केवळ पावसाकडे डोळे अशी आहे चंद्रपूर जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्याची स्थिती. पुर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर हे जिल्हे भाताचे कोठार मानले जातात. मात्र यंदा अल निनो प्रभावाने पाऊसमान कमो होणार याची शक्यता असताना शेतकऱ्यांनी धाडसाने पेरणी- लावणी करत आभाळाकडे डोळे लावले. मात्र यंदा लहरी पाऊस शेतकऱ्याची जणू परीक्षा घेत आहे. अधे मध्ये दोनदा आलेला पाऊस धान पीक कसाबसा जगवून गेला मात्र आता 8 दिवसात पाऊस आला नाही तर धान शेतक-याच्या हातून हा हंगाम जाणार आहे. पावसाने दगा दिल्याने चंद्रपूरचा धान उत्पादक शेतकरी भयंकर संकटात सापडला असून विहिरी, कालवे आणि नाले- नदी यांचे सिंचन असलेले शेतकरी शिवारात ओलावा टिकवून ठेवत आहेत. धान पिकाला भरपूर पावसाची गरज असल्याने यंदाचा हंगाम शेतकऱ्यांची धडधड वाढविणारा ठरला आहे. बाईट १) चिंताग्रस्त धान शेतकरी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

सरकारी फाइलें सात दिन से अधिक लंबित नहीं रहेंगी; तत्काल निपटारे के निर्देश

Nagpur, Maharashtra:नागपूर सरकारी फाईल सात दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवल्यास कारवाई, शासकीय कामकाजातील दिरंगाईला लगाम घालण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय घेण्यात आला.. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाच्या निर्देशानुसार सामान्य प्रशासन विभागाकडून आदेश जारी सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे स्पष्ट निर्देश, कोणतीही फाईल एका कर्मचाऱ्याकडे सात कामकाजाच्या दिवसांपेक्षा अधिक प्रलंबित ठेवता येणार नाही. तातडीची फाईल शक्यतो एका दिवसात किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी निकाली काढण्याचे निर्देश, तातडीच्या स्वरूपाची फाईल शक्यतो चार दिवसांत निकालात काढावी लागणार आहे. एकाच विभागातील फाईलवर ४५ दिवसांत निर्णय घेणे बंधनकारक, दुसऱ्या विभागाकडे पाठवावी लागणारी फाईल तीन महिन्यांत निकाली काढण्याचे निर्देश आहे. विहित मुदतीत काम न करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई केली जाईल.. विलंबास प्रतिबंध अधिनियमाच्या कलम १० नुसार कारवाई करण्याचे शासनाचे निर्देश नागपूर खंडपीठाच्या आदेशानंतर सामान्य प्रशासन विभागाकडून अतिरिक्त सूचना, जिल्हा परिषदांमधील निवेदने आणि तक्रारींवर सात दिवसांत कार्यवाही न झाल्याने न्यायालयाची नाराजी व्यक्त केली होती.. संबंधित मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश झाल्याचा शासन परिपत्रकात उल्लेख प्रलंबित अर्ज, निवेदने आणि प्रकरणांचा विभागप्रमुखांनी दर महिन्याला आढावा घ्यावा दिरंगाई टाळण्यासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी विशेष प्रशिक्षण कार्यक्रम घेण्याचे निर्देश, ११ सप्टेंबरला सामान्य प्रशासन विभागाकडून शासन परिपत्रक जारी करण्यात आले आहे..
0
0
Report
Advertisement

नाशिक जेल में अबू सालेम से मुलाकात पर विश्व हिंदू परिषद चौकशी मांगती

Nagpur, Maharashtra:नागपूर महाराष्ट्र राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांनी नाशिक मध्यवर्ती कारागृहात अबू सालेमची भेट घेतल्यावरून त्यांच्या चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय संवेदनशील घटनात्मक पदावर कार्यरत असलेल्या व्यक्तींन गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीची भेट घेणे गंभीर बाब असल्याचे नमूद करत प्यारे खान यांना पदावरून हटवावे तसेच प्रकरणाची एन आय ए आणि सीबीआय मार्फत चौकशी करावी अशी मागणी विश्व हिंदू परिषदेने केलीय यासंदर्भात विश्व हिंदू परिषदेच्या वतीने नागपूर जिल्हा अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले
0
0
Report

कवठळ की महिलाएं पानी की बारिश के लिए जलाभिषेक, किसानों के लिए राहत की मांग

Buldhana, Maharashtra:धोंडी धोंडी पाणी दे...! पावसासाठी कवठळच्या महिलांचा आर्त टाहो...! Anchor : गेल्या तब्बल ४० ते ४५ दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने बुलढाणा जिल्ह्यातील कवठळ परिसरात शेतकऱ्यांवर मोठं संकट ओढावलंय... पावसाअभावी पिकं वाळण्याच्या मार्गावर आहेत, तर दुसरीकडे विजेचा लपंडाव आणि अनियमित लोडशेडिंगमुळे शेतकरी पुरते हैराण झालेत. या संकटातून मार्ग काढण्यासाठी कवढळमधील महिलांनी चक्क डोक्यावर पाण्याने भरलेले हांडे घेत गावातून मिरवणूक काढली... आणि त्यानंतर महादेवाला जलाभिषेक करत जोरदार पावसासाठी साकडं घातलं. पिकं पूर्णपणे हातातून जाण्याची वाट न पाहता प्रशासनाने तातडीने शेताच्या बांधावर जाऊन पंचनामे करावेत, नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरघोस आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी महिलांनी केली आहे. त्यासोबतच शेतीसाठी सुरळीत वीजपुरवठा करा आणि अनियमित लोडशेडिंग थांबवा, अशीही मागणी आहे. महागडी बियाणं, खतं आणि मशागतीचा खर्च करून उभं केलेलं पीक आता डोळ्यादेखत वाळतंय... महादेवाच्या चरणी महिलांनी साकडं घातलंय... आता सरकार आणि प्रशासन शेतकऱ्यांचा हा आक्रोश ऐकणार का हा महिलांचा प्रश्न आहे... Byte - शेतकरी महिला
0
0
Report
Advertisement

सांगली में MD ड्रग्स जब्त, एक आरोपी गिरफ्तार

Sangli, Maharashtra:सांगलीच्या विटा येथे ४२ लाखांच्या किमतीचा एमडी ड्रग्ज जप्त; एकाला अटक. सांगलीच्या स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली आहे. विटा-तासगाव रस्त्यावर एमडी ड्रग्जची तस्करी होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने सापळा रचून एका संशयास्पद वाहनाची तपासणी केली असता ९६५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि रिकामे कॅप्सूल आढळून आले. यावर दत्तात्रय अंकुश पाखरे याला अटक करत ४२ लाख ८२ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. प्राथमिक तपासानुसार सदर_MD ड्रग्ज हे केरळमधील कासारगोड येथून विक्रीसाठी आणल्याची माहिती समोर आली असून अधिक तपास चालू असलेल्या स्थितीमध्ये आहेत.
0
0
Report

NCMC कार्ड अनिवार्यता 30 सितम्बर तक टाली गई; वरिष्ठ नागरिक और महिला यात्री अब भी छूट पाएंगे

Washim, Maharashtra:वाशीम: वरिष्ठ नागरिक और महिला प्रवाशांसाठी सवलतीची बातमी आहे. एसटी महामंडळाने सवलतीच्या प्रवासासाठी अनिवार्य करण्यात आलेल्या NCMC कार्डची सक्ती आता ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे. त्यामुळे कार्ड नसले तरी ज्येष्ठ नागरिक आणि महिला प्रवाशांना जुन्या पद्धतिने सवलतीचे तिकीट मिळणार आहे. NCMC कार्ड काढताना सर्व्हर डाऊन आणि तांत्रिक अडचणींमुळे प्रवाशांसह वाहकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. या तक्रारींची दखल घेत एसटी महामंडळाने हा निर्णय घेतला आहे.
0
0
Report
Advertisement

अमरावती में किसानों 13 किमी पदयात्रा मोर्चा, सूखा घोषित और कर्ज माफी की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती में किसानों ने drought घोषित कराने के लिए आक्रामक मोर्चा निकाला। फत्तेपूर से तिवसा तहसील कार्यालय तक लगभग 13 किलोमीटर की पादचल मोर्चा निकला, जिसमें ट्रैक्टर और बैलगाड़ियाँ भी शामिल रहीं। उन्होंने मांग की: सूखा घोषित किया जाए, फसल बीमा राशि समय पर दी जाए, नियमित कर्ज चुकाने वाले किसानों को दो लाख रुपए का अनुदान दिया जाए। अमरावती जिले में लगातार 35 दिन से बारिश नहीं होने के कारण फसलें संकट में पड़ गई हैं। सरकार से तात्कालिक उपायों की घोषणा और किसानों की आत्महत्या रोकने के लिए ठोस कदम उठाने की मांग की गई।
0
0
Report
Advertisement

त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर 16 सितम्बर तक खुले; अफवाहों की पुष्टि नहीं

Nashik, Maharashtra:Nashik breaking - त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग मंदिर भाविकांसाठी खुलेच राहणार - १६ सप्टेंबरपासून त्र्यंबकेश्वर मंदिर बंद राहणार असल्याच्या चर्चांना पूर्णविराम - मंदिर बंद राहणार असल्याची माहिती सोशल मीडिया आणि विविध माध्यमांमधून प्रसारित - यामुळे भाविकांमध्ये निर्माण झाला होता संभ्रम - मंदिर बंद ठेवण्याबाबत अद्याप कोणत्याही अधिकृत सूचना प्राप्त झालेल्या नाहीत - कुंभमेळा प्राधिकरण, जिल्हाधिकारी कार्यालय, महाराष्ट्र शासन किंवा पुरातत्त्व विभागाकडून सूचना नाहीत - १६ सप्टेंबर २०२६ रोजी मंदिर नेहमीप्रमाणे भाविकांसाठी खुले - त्यानंतरही मंदिर भाविकांसाठी खुले राहणार - अफवा आणि अप्रमाणित माहितीवर विश्वास न ठेवण्याचे देवस्थान ट्रस्टचे आवाहन - भाविकांनी शांततेने आणि भक्तिभावाने त्र्यंबकराजाचे दर्शन घेण्याचे आवाहन
0
0
Report

वाशीम में 35 दोषी वाहन चालकों के लाइसेंस निलंबित, 128 नागरिकों की मौत

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ३५ दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाशिम पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अपघातांमध्ये आतापर्यंत १२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालक हे अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहेत. त्यामुळे दोषी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यां विरोधातही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन परिवहन विभाग व पोलिसांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top