icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में एटीएम कार्ड धोखाधड़ी: आरोपी गुजरात से गिरफ्तार, 34 कार्ड जब्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक ३४ विविध बँकांची एटीएम कार्ड जप्त अँकर एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सराईत आरोपीला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे..संशयित आरोपीकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव धीरजकुमार मोहनलाल पांचाळ असून तो गुजरातमधील सुरत येथील आहे..त्याच्यावर यापूर्वी गुजरातमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत.
0
0
Report
0
0
Report

नाशिक में गिरणा- पुणद- मार्कंडी नदियों में बाढ़, स्मशान भूमि डूबी

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील गिरणा, पुणद, मार्कंडी नद्यांना पूर नाशिकच्या देवळा विठेवाडी येथील गिरणा नदीच्या काठावरील स्मशानभूमी पुर पाण्यात संरक्षक भिंतीचे नुकसान झाले असून विठेवाडी सावकी येथिल छोटा फरसी वजा पुल पाण्याखाली गेला आहे, या पुलावरून पाणी वहात आहे, नविनच बांधकाम करण्यात आलेल्या के टि वेअर च्या सावकी कडील संरक्षक भिंतीचा भरावही मोठ्या प्रमाणात खचला आहे, गिरणा, पुणद, मार्कंडी नद्यांना पूर आल्याने, तसेच चणकापुर व पुणद धरण, पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणातुन प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, कळवण, देवळा, तसेच, बागलाण येथील तहसीलदार व व पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

राजापूर-रत्नागिरी के बाजार पर प्रशासनिक ढिलाई से व्यापारी आक्रोशित; जारी है विरोध का अलार्म

Ratnagiri, Maharashtra:राजापूर-रत्नागिरी. वैयक्तिक वादाचा आठवडा बाजाराला फटका; प्रशासनिक दिरंगाईमुळे व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा! राजापूरच्या प्रसिद्ध गुरुवारी भरणार्‍या आठवडा बाजाराला प्रशासकीय जागेचा वाद वेळेवर मिटल्याने धक्का बसेला आहे. सोलापूर, कोल्हापूर व कोकणातील १५० ते २०० व्यापाऱ्यांचा धंदा ठप्प झाला. आमदार किरण सामंत यांनी व्यापाऱ्यांना आहे त्याच जागेवर बसू देण्याचे निर्देश देऊनही मुख्य अधिकाऱ्यांच्या (CO) संथ कारभारामुळे तोडगा निघालेला नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत, न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू! असा आक्रमक इशारा संतापलेल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report

NRRF सूची में महाराष्ट्र के कृषि विश्वविद्यालय शीर्ष 40 से बाहर

Shirdi, Maharashtra:कृषी क्षेत्रात देशाला दिशा देणारा महाराष्ट्र आता कृषी शिक्षणाच्या बाबतीत मागे पडत असल्याचे चित्र समोर आले आहे. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या राष्ट्रीय संस्थात्मक क्रमवारीच्या ताज्या मानांकनात राज्यातील एकाही कृषी विद्यापीठाला पहिल्या ४० संस्थांमध्ये स्थान मिळालेले नाही. विशेष म्हणजे, यापूर्वी सातत्याने मानांकनात झळकणारे राहुरीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ यंदा यादीतून पूर्णपणे बाहेर पडले आहे. मात्र, यंदा महाराष्ट्रातील एकाही कृषी विद्यापीठाला या यादीत स्थान मिळालेले नाही. राहुरीसह दापोली, परभणी, अकोला आणि नागपूर येथील कृषी संलग्न विद्यापीठांचा समावेश नसल्याने शैक्षणिक क्षेत्रात आश्चर्य व्यक्त केले जात आहे. या मानांकनासाठी अध्यापनाचा दर्जा, संशोधनाची गुणवत्ता, नवोपक्रम, शेतकऱ्यांशी असलेला संपर्क, कृषी क्षेत्रातील योगदान, बायोटेक्नॉलॉजी, उद्यानविद्या, मत्स्यपालन, अन्नतंत्रज्ञान आणि कृषी उद्योगातील कामगिरी अशा विविध निकषांचा विचार केला जातो. राहुरी कृषी विद्यापीठात जवळपास 70 टक्के पदे रिक्त आहेत त्यामुळे गुणवत्ता ढासळण्यास हे सर्वात मोठे कारण आहे.
0
0
Report
Advertisement

जंतर मंतर हिंसक विरोध के खिलाफ बुलढाणा में रस्ता रोको, शिवसेना-ठाकरे गट का धरना

Buldhana, Maharashtra:वंचित, ठाकरे गट व काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक. जंतर-मंतरवर झालेल्या लाठीमाराच्या विरोधात जळगाव जामोद येथे एक तासापासून रास्ता रोको. दिल्ली येथे सुरू असलेल्या जंतर मंतर वरील आंदोलनात दरम्यान आंदोलन विद्यार्थी आणि विद्यार्थिनींवर पोलिसांनी केलेल्या लाठीमार व अत्याचाराच्या विरोधात बुलढाण्यातील जळगाव जामोद येथे शिवसेना ठाकरे गटाचे काँग्रेसचे वंचित चे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. कार्यकर्त्यांनी अत्याचाराच्या विरोधात रस्ता रोको केला असून गेल्या एक तासांपासून नांदुरा बुऱ्हानपूर मार्गावर कार्यकर्ते तळ ठोकून आहेत. सरकार विरोधी ही घोषणाबाजी तसेच धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मागणीच्या प्रचंड घोषणाबाजीने परिसर दणाणून उठला आहे.
0
0
Report

भंडारदरा जलाशय का पानी 85% तक पहुंचा; अन्य डैमों में भी पानी बढ़ने की चेतावनी

Shirdi, Maharashtra:Anc - उत्तर अहिल्यानगर जिल्ह्याला वरदान ठरलेल्या भंडारदरा धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 24 तासात आषाढ सरींचे जोरदार तांडव सुरू असून धरणाचा पाणीसाठा 85 टक्क्यांवर पोहोचला आहे... तर निळवंडे धरण व मुळा धरणात देखील पाण्याची आवक वेगाने सुरू असल्याने दोन्ही धरणाचा साठा देखील आज 50 टक्क्यांपर्यंत पोहोचेल.. गेल्या 24 तासात पाणलोट क्षेत्रातील घाटघर येथे 185, रतनवाडी येथे 248, तर भंडारदरा परिसरात 175 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.. आज कोणत्याही धरणातून विसर्ग सुरू नसला तरी पुढच्या दोन दिवसात पाण्याची आवक पाहता धरणातून विसर्ग सुरू होण्याची शक्यता आहे...
0
0
Report
Advertisement

नासिक जिले में भारी बारिश से जलाशयों से विसर्जन, गांवों में सतर्कता जारी

Niphad, Maharashtra:अँकर:- नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, दिंडोरी, नाशिक आणि निफाड तालुक्यात काल दुपारपासून पावसाची संततधार सुरू असल्याने गंगापूर, दारणा आणि पालखेड धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असून तसेच पावसाची पाणी निवाडू निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दाखल होत असल्याने धरणाच्या बॅकवॉटरला असलेल्या चांदोरी, सायखेडा, शिंगवे आणि करंजगाव गावांना फटका बसू नये यासाठी नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीच्या पात्रात जायकवाडीच्या दिशेने सात वक्रकार गेटच्या माध्यमातून 25 हजार 925 क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू असून पाण्याच्या निसर्गात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्याने गोदावरी नदीच्या काठावरील गावांना प्रशासनाच्या वतीने सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
0
0
Report

भास्कर जाधव को महायुती में शामिल होने की खुली ऑफर, प्रमोद जठार ने संकेत दिए

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. भास्कर जाधव नेते, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना बाईट: On भाजप ऑफरवर : प्रमोद जठार माझे खूप जुने मित्र आहेत. माझी काम करण्याची पद्धत त्यांना माहीत आहे. आदरापोटी त्यांनी मला भाजपमध्ये यावे, असे सांगितले असेल. विरोधी पक्षनेतेपद : विरोधी पक्षनेतेपदी माझे नाव जाहीर करण्याची जबाबदारी सरकारची आणि विधानसभेच्या अध्यक्षांची आहे. ती माझ्या पक्षप्रमुखांची नाही. जठार मित्र म्हणून पुढाकार घेत असतील आणि विरोधी पक्षनेतेपदासाठी मुख्यमंत्री व अध्यक्षांना माझे नाव जाहीर करण्याची विनंती करत असतील, तर मी त्यांचे आभार मानेन. रत्नागिरी.. भाजपची राजकीय गुगली! प्रमोद जठारांची भास्कर जाधवांना महायुतीत येण्याची खुली ऑफर; चिपळूणमध्ये एकत्रित वृक्षारोपण करत दिले थेट संकेत.. अँकर कोकणातील ज्येष्ठ नेते आणि ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांच्या नाराजीच्या चर्चांवरून आता राजकीय वातावरण तापले आहे. भाजप नेते प्रमोद जठार यांनी भास्कर जाधव यांना थेट भाजपमध्ये महायुतीये येण्याची खुली ऑफर दिली आहे. भास्कर जाधव हे ज्येष्ठ आमदार असून कोकणाच्या विकासासाठी त्यांच्या सत्तेची गरज आहे, असे स्पष्ट वक्तव्य जठार यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में रेशन कार्ड अब स्मार्ट कार्ड, QR कोड से वितरण और पारदर्शिता बढ़ेगी

Yeola, Maharashtra:राज्याचे अन्न व नागरी पुरवठा तथा ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या संकल्पनेनुसार रेशन कार्ड धारकांना आता स्मार्ट कार्ड मिळणार असून या स्मार्ट कार्डवर क्यूआर कोड प्रणाली देण्यात आली आहे क्यूआर कोड स्कॅन केल्यानंतर कुटुंबातील सदस्यांचा सर्व डाटा उपलब्ध होणार असून यामुळे धान्य वितरण प्रणाली अधिक सुलभ होणार आहे अन्न नागरी पुरवठा विभागाचा कारभार यामुळे पेपरलेस होणार असून या प्रणालीमुळे योग्य पद्धतीने धान्याचे वितरण देखील होणार असल्याची माहिती मंत्री छगन भुजबळ यांनी दिली. नंदुरबार व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यांमध्ये या प्रणालीचे लोकार्पण करण्यात आले असून लवकरच राज्यभर सर्व रेशन कार्ड आता स्मार्ट कार्ड मध्ये कन्व्हर्ट केले जाणार असल्याची माहिती देखील मंत्री छगन भुजबळ यांनी येवल्यात पत्रकारांशी बोलताना दिली
0
0
Report

सदाभाऊ खोत के बयान से राजनीतिक हंगामा: कराड में जोरदार विरोध

Satara, Maharashtra:कराड, सातारा दिल्लीतील जंतर मंतर वरील विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत यांनी दहशतवाद्यांची उपमा दिल्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. कराडला काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी सदाभाऊ खोत यांच्यावर जोरदार टीका करताना कोंबडीचोर असा उल्लेख करत डिवचलं आहे. यामुळे कडकनाथ कोंबडीचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. राज्यात कडकनाथ कोंबडीमुळे अनेकजण अडचणीत आले होते, तसेच सदाभाऊ खोत आणि त्याच्या मुलाला या कडकनाथ कोंबडीमुळे आरोपांना सामोरे जावे लागले होते. कराड येथे काॅंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत धर्मेंद्र प्रधानाच्या राजीनाम्यासाठी भरपावसात आंदोलन केले.यावेळी सदाभाऊ खोत यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top