Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Oct 25, 2024 07:21:47
Yavatmal, Maharashtra
यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Nov 19, 2025 09:45:32
Ratnagiri, Maharashtra:*उदय सामंत byte पॉईंट* हा माहोल बघितल्यानंतर सात ही नगरपालिका किंवा नगरपंचायती वरती महायुती झेंडा असेल - सामंत जे फॉर्म मागे घेणार नाही त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई होईल - सामंत सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीची शक्यता धुसर दोन्ही पक्षांनी प्रचार चालू केला आहे... राणे साहेबांच्या शब्दासाठी आम्ही शेवटपर्यंत थांबलो... एकनाथ शिंदे यांचे देखील आदेश होते.... राणीसाहेबांनी सिग्नल दिल्यानंतर आम्ही फॉर्म भरले - सामंत कुणी कार्यक्रमाला हजर नाही याचा अर्थ नाराजी असा होत नाही - सामंत (( कालपासून घडत असलेल्या घटनावर )) भाजप आणि शिवसेना यांच्यातील उमेदवारांना घेऊ नका असे आदेश काल दिलेले आहेत... त्याची कार्यवाही सुरू झालेली आहे - सामंत विनायक राऊत तीन वर्षांपूर्वीचा प्रसंग विसरले नाहीत.. त्यांच्या मनातील मनसुबे पूर्ण होणार नाहीत... संवाद साधने म्हणजे नाराजी नाही... या सगळ्या गोष्टींचा असुरी आनंद एखाद्या विरोधकाला कसा असू शकतो हे काल तुम्ही बघितले - सामंत (( भाजपने शिवसेनेची कबर खोदायला सुरुवात केली आहे असं विनायक राऊत बोलले होते.. त्यावर उत्तर )) अंबादास दानवे माझ्या जवळचे मित्र... त्यांना बॉस बदलायचा असेल त्यांची प्रक्रिया सुरू झाली असेल... चंद्रकांत खैरे त्यांना व्यवस्थित राजकारण करायला देतील असं वाटत नाही... ते माझ्या मित्र म्हणून मी त्यांच्या मनातील बोलतोय त्यांना हे ऐकल्यावर समाधान वाटेल... ते बॉस बदलण्याचा प्रक्रियेमध्ये आलेले असावे - सामंत बाळासाहेब ठाकरे आणि प्रमोद महाजन आणि युतीची संकल्पना मांडली.. ती संकल्पना रत्नागिरी पूर्ण करत है.. असंच बॉण्डिंग कायमस्वरूपी असावा... एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये बॉण्डिंग आहे... पण काही बालिश लोक यामध्ये वाद लावायचा प्रयत्न करतात... त्यामुळे भक्कम नेते बाजूला होणार नाहीत... उलट 232 आमदार निवडून आलेल्या धक्क्यातून त्या अद्याप सावरले नाहीत... महाविकास आघाडीमध्ये सर्व काही अलबेल नाही... मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत याची परिस्थिती तुम्हाला येईल - सामंत राजू शिंदे यांनी सांगितले म्हणून भाजप किंवा बीजेपी संपेल असं तुम्हाला वाटते का?... राजू शिंदे भाजपमध्ये गेले आहेत त्यामुळे त्यांनी शांत रहावं... आतातयीपणा केला तर ते अडचणीत येतील... त्यांच्या बोलण्याची दखल घेण्याची गरज नाही - सामंत
103
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 19, 2025 09:39:32
Nashik, Maharashtra:नाशिकच्या तपोवन परिसरात कुंभमेळ्यासाठी उभारल्या जाणाऱ्या साधूग्राममध्ये मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड होण्याची शक्यता आहे… आणि यावरून पर्यावरणप्रेमी आक्रमक झाले आहेत. तब्बल १०० हून अधिक हरकती पालिकेकडे दाखल झाल्या आहेत. शुक्रवारी यावर सुनावणी होणार आहे. नाशिक शहरात वैष्णव संप्रदायासाठी तपोवनात 1200 एकर परिसरात साधूग्राम उभारला जाणारे… त्याच नियोजन करण्यासाठी पालिकेने १८०० पेक्षा जास्त झाडांची मोजणी केलीये. यातील ४० टक्क्यांहून अधिक झाडे तोडली जाणार असल्याने नाशिककर वृक्षप्रेमी सध्या आक्रमक झाले आहेत. यात बहुतेशी पन्नास ते शंभर वर्ष असलेली घनदाट झाडे आहेत. त्यामुळे आज तपोवनात या निर्णयाचा निषेध करत महापालिकेच्या उद्यान विभागाच्या उफराटा कारभाराबाबत नाराजी व्यक्त केलीय. नाशिक शहरात सध्या तापमानाचा पारा दिसवेदिवस वाढताना दिसत आहे. हिरवेगार नाशिक हळूहळू काँक्रिट जंगल बनत आहे. तोयामुळं साधुग्राम नियोजनासाठी वृक्षतोड आता आंदोलनाचे रूप घेत आहे. शहरातील पर्यावरणप्रेमी, सामाजिक संस्था पुढे सरसावल्या असून पालिकेकडे १०० हरकती दाखल झाल्या आहेत. तपोवनातील पालिकेच्या ताब्यातील ५४ एकर जागेतील झाडांची मोजणी पूर्ण झाली आहे. काही झाडांची छाटणी, काहींचे प्रत्यारोपण तर काही झाडे तोडण्याचा प्रस्ताव आहे. मात्र, अंतिम निर्णय हरकतींच्या सुनावणीनंतरच होणार आहे नाशिक: भारतीय संस्कृतीचा संदेश देणाऱ्या या कुंभमेळ्यात झाडांची तोड सुरू असेल तर जगाला कोणता संदेश जाणार, असा सवाल पर्यावरण कार्यकर्ते उपस्थित करत आहेत. तपोवनातील ही वृक्षतोड थांबते का, पर्यावरणप्रेमींच्या हरकतींना न्याय मिळतो का… याकडे आता संपूर्ण नाशिकचे लक्ष लागले आहे. सागर गायकवाड
31
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 19, 2025 09:39:14
Ambernath, Maharashtra:बदलापुरात काँग्रेसला मोठा धक्का काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव शिंदे गटात सामील भाजपचे अनेक पदाधिकाऱ्यांनी घेतला शिंदे गटात प्रवेश बदलापूर नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची पळवा पळवी सुरू आहे. यातच बदलापुरातील शहर काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेसचे शहराध्यक्ष संजय जाधव यांनी आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिंदे गटात प्रवेश केला, दोनच दिवसापूर्वी संजय जाधव यांनी आपल्या शहराध्यक्ष पदाचा राजीनामा दिला होता. तसच यावेळी अनेक भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी ही शिवसेना शिंदे गटात प्रवेश केला आहे.
64
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 19, 2025 09:16:11
Oros, Maharashtra:मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद सावंतवाडीकरासाठी ही निवडणूक महत्त्वाची आहे. सावंतवाडी करांचे ऐकण्यासाठी मी आज सावंतवाडीत आलोय. चारही शहरांचा विकास करण्यासाठी आम्ही ही निवडणूक लढवत आहोत. सावंतवाडी शहर आदर्श शहर बनाव हे शहर रोल मॉडेल बनाव या हेतूने ही निवडणूक आम्ही लढवत आहोत. सावंतवाडीतील राजघराण्याला परंपरा आणि इतिहास आहे त्याला आता सत्तेची जोड देऊन पुढच्या पाच वर्षात भाजपच्या माध्यातून सावंतवाडीचा विकास करू. जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या माझ्या हातात आहेत. सावंतवाडी शहर अतिशय महत्वाचं शहर आहे. हे शहर विकसित करण्याची संधी आम्हाला मिळतेय. ऑन दीपक केसरकर (युती) — युती बाबत सगळ्या गोष्टी वरिष्ठ पातळीवर ठरतात. ज्येष्ठ नेते चर्चा करतील कार्यकर्ते म्हणून जी दिशा आम्हाला दिलीय त्यावर आम्ही चालतोय. वरिष्ठांकडून जो आदेश मिळालाय त्यावर आम्ही काम करतोय. राजघराण जेव्हा निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त करत तेव्हा दीपक केसरकर यांच्याकडून मला वेगळी अपेक्षा होती. त्यांचे राजघराण्यासोबत अतिशय जुने संबंध आहेत केसरकर साहेबांना ह्या घराण्याने वांरवार आशीर्वाद दिला आहे. ही निवडणूक राजकारणाच्या पलीकडे पाहणं गरजेचं होत ही निवडणूक बिनविरोध झाली पाहिजे होती. ऑन केसरकर (बिनशर्त) राजघराण्यासोबत केसरकरांचा असलेले सबंध आणि नेहमी राजघराण कोणतीही अपेक्षा न ठेवता केसरकर यांच्या सोबत राहील आहे. केसरकर साहेबांनी बिनशर्त पाठिंबा दिला पाहिजे होता. सावंतवाडीची अस्मिता म्हणजे हे राजघराण आहे. राजघराण्यातील व्यक्ती नगराध्यक्ष म्हणून बसली तर सावंतवाडीचा विकास गतिमान पद्धतीने होईल. सगळ्या राजकीय पक्षांनी राजघराण्याला बिनशर्त पाठिंबा द्यावा. अजून दोन दिवस आहेत. सावंतवाडीला ओळख देणार राज घराणं आहे. त्याच घराण्याला मतदान करण्याचं संधी मिळतेय. नारायण राणेंच्या वेळी ज्या भावनेतून मतदान केलं त्याच भावनेतून आता मतदान करावं. ही निवडणूक जनतेने हातात घेतली पाहिजे. महायुती (केसरकर समजूत) — दीपक केसरकर यांची समजूत काढण्या एवढा मी मोठा नाही.. राज घराण्याबाबत मी सांगाव एवढा मोठा आणि अनुभवी मी नाही पण राजघराण्याचे आपल्याला जे काही दिलंय ते बघतील पाहिजे. प्रत्येकाने भावना व्यक्त करून एक निवडणूक बिनशर्त करून द्यायला हवी. पालकमंत्री फसवणूक — आमच्या श्रद्धा ताई निवडणून आल्यानंतर कोणती काम करावी ह्याची आठवण ठाकरे पक्षाने करून दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. कणकवली (शहरविकास आघाडी) — कणकवली मध्ये हे नवीन नाही जेव्हा जेव्हा सगळे राणे साहेबांच्या विरोधात उभे राहिले तेव्हा जनता राणे साहेबांच्या पाठीशी राहिली आहे. शिंदे आणि ठाकरेना एकत्र आणणे हे कोणाला जमल नाही ते राणे साहेबांच्या कणकवली ने करून दाखवलंय. कोणी कोणासोबत लढावं ह्याबत मला काही आक्षेप नाही. कोणीही मनसोक्त प्रचार करावा. प्रत्येक स्वातंत्र्य आहे त्याच मी स्वागत करतो. आम्ही राजकीय टीका करणार नाही आम्ही केवळ विकास बाबत बोलणार. सावंतवाडी विकास — पाण्याचा आरोग्याचा प्रश्न कोणी सोडवला त्याच संस्थांनाच्या घरातील सदस्य निवडणूक लढवत आहे. इतिहासाची पुनरावृत्ती करण्याची संधी आलीय श्रद्धा ताई सोबत आम्ही सगळे आहोत. श्रद्धा भोसले (मराठी ट्रॉल) — त्यांनीं आपली संस्कृती स्वीकारलीय, भाषा शिकण्याचा प्रयत्न करत आहेत ह्याच कौतुक झालं पाहिजे. निवडणुका येतील जातील पण आमच्या जिल्ह्यातील माता बघिनींचा अपमान कोणी करू नये. दीपक केसरकर यांनी आपल्या पक्षातील नेत्यांना समज द्यावी अशा पद्धतीने अपमान कोणी करू नये आम्ही ते सहन करणार नाही. ह्याच उत्तर दोन तारीखला सावंतवाडी कर देतील. त्यांची मराठी चांगली आहे ह्याच कौतुक झालं पाहिजे आज प्रत्येक घरात त्या जात आहेत. ऑन निलेश राणे यांचा पक्ष समोर — प्रत्येकाला हक्काने निवडणूक लढविण्याचा अधिकार आहे. ही निवडणूक केवळ विकासाचा मुद्दा घेऊन आम्ही लढविणार आहोत. कोणी काय कारण कोणी प्रचार करावा त्याचा विषय आहे. आदरणीय निलेश राणे तर शिवसेनेचे नेते आहेत. शिंदे गटाने तर शहर विकास आघाडीला पाठिंबा दिलाय तर निलेश राणेंना प्रचारात उतराव लागेल. आम्ही मैत्रीपूर्ण लढतीवाले आहोत. आमच्यावर संस्कार आहेत. आम्ही ज्या पक्षात असतो त्या पक्षात १०० टक्के देतो निष्ठा ठेवतो. निलेश जी 100 शिवसेनेला न्याय देत आहेत. त्याचं कौतुक करावं की त्यांच्यावर टीका करावी... प्रत्येकाने आपल्या पक्षाचं उमेदवारासाठी प्रचाराला यावं आणि आलाच पाहिजे. ऑन शिवसेना आमदार नाराजी — वरिष्ठ नेते बघतील.
207
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 19, 2025 09:13:26
Chendhare, Alibag, Maharashtra:रायगड जिल्‍हयात नागरीकांचे चोरीला गेलेले, गहाळ झालेले किंवा विरसलेले 24 मोबाईल पोलीसानी शोधून ते मूळ मालकांना परत केले आहेत. रायगड पोलीसांच्‍या सायबर पोलीस ठाण्‍याने ही कामगिरी बजावली आहे. बुधवारी या मोबाईल्‍स मुळ मालकांना हस्‍तांतरीत करण्‍यात आले. या मोबाईलची किंमत 3 लाख 47 हजार 500 रूपये इतकी आहे. यावेळी पोलीस अधिक्षक आंचल दलाल, अपर पोलीस अधिक्षक अभिजीत शिवथरे, उपस्थित होते. मोबाईल हस्‍तगत करण्‍यात रायगड पोलीस दल राज्‍यात अव्‍वल आहे. आपला मोबाईल हरवला तर तत्‍काळ जवळच्‍या पोलीस ठाण्‍याशी संपर्क साधावा तसेच या संदर्भातील अॅपवर आपली तक्रार नोंदवता येईल असे आंचल दलाल यांनी सांगितले.
70
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 19, 2025 08:57:56
Kolhapur, Maharashtra:धडपड, जिद आणि एकत्र कुटुंब पद्धतीचे संस्कार यांचा संगम साधत कोल्हापूरच्या नूल येथील सावंत बंधूंनी दुग्धव्यवसायातून अभूतपूर्व प्रगती साधली आहे. या गोमातेची प्रतिकृतीची पंचक्रोशी सध्या जोरदार चर्चा झाली.. कोल्हापुरातील गडहिंग्लज तालुक्यातील नूल या ठिकाणी राहणारे सावंत कुटुंब गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. खरंतर वडिलोपार्जित शेतीत भाजीपाला घेत असतानाही योग्य दर न मिळाल्याने सावंत कुटुंब आर्थिक संकटात सापडले होते. त्यामुळे प्रकाश आणि बाळासाहेब सावंत या भावांनी 2004 मध्ये हात उसने पैसे घेऊन फक्त दोन गायी खरेदी केल्या आणि दुग्धव्यवसाय सुरू केला. सुरुवातीचा टप्पा कठीण होता, पण जिद्द आणि परिश्रमाच्या बळावर त्यांनी हा व्यवसाय वृद्धिंगत केला. सुरुवातीला मोजक्या गाईंपासून सुरू केलेला व्यवसाय 45 जनावरांचा आधुनिक गोठा त्यांनी उभारला. वर्षानुवर्षे कष्ट आणि सुधारणा करत आज या गोठ्यात त्यांची 108 जनावरे आहेत. दररोज 700 ते 800 लिटर दूध ते स्वतःच्या गजानन सहकारी दूध संस्थेमार्फत कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळकडे पुरवतात. त्यातून त्यांना वर्षाकाठी तब्बल दीड कोटींचे उत्पन्न मिळत. त्यामुळे त्यांनी यातील एका गाईची 6 फुटी प्रतिकृती बंगल्याच्या टेरेसवर उभारून गाईच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली आहे. या दुग्ध व्यवसायात कुटुंबातीलच 18 जण रोज त्यांच्या गोठ्यात राबतात. बाहेरची एकही व्यक्ती कामगार म्हणून या ठिकाणी काम करण्यासाठी येत नाही. प्रकाश आणि बाळासाहेब सावंत त्यांचे पुत्र संतोष, ऋषिकेश, सुशांत, प्रशांत तसेच त्यांच्या पत्नी रेवती, शिवानी, ऐश्वर्या आणि राजश्री हे सर्वजण पहाटेपासून सायंकाळपर्यंत जनावरांच्या सेवेत गुंतलेले असतात. या एकजुटीमुळेच सावंत कुटुंबाचे घर आज स्वावलंबनाचे प्रतीक बनले आहे. दुग्ध उत्पन्नातून कोटींचा बांधलेला बंगला आणि बंगल्यावर गोमाताची उभी केलेली मूर्ती सध्या पंचक्रोशील चर्चेचा विषय बनली आहे.
42
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 19, 2025 08:48:51
Shirdi, Maharashtra:कोपरगाव तालुक्यात नरभक्षक बिबट्याचा धोका अजूनही कायम आहे. टाकळी फाटा परिसरात दोन जीव घेतलेल्या बिबट्याला शार्प शूटर पथकाने ठार केले… मात्र समस्या संपलेली नाही ! काल रात्री पुन्हा एकदा बिबट्याने पती–पत्नीवर हल्ला केल्याची धक्कादायक घटना घडलीय... माहेगाव देशमुख परिसरात बिबट्याने दुचाकीवरून जात असलेल्या दाम्पत्यावर झडप घातली... कोळपेवाडी येथील भाऊसाहेब वाघडकर हे आपल्या पत्नीसह कोपरगावकडे येत होते. मारुती मंदिराजवळ दाट झुडपांमध्ये दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक त्यांच्यावर हल्ला चढवला. هल्ल्यात दोघांच्या पायाला दुखापत झाली असून त्यांना तात्काळ कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वनविभागानुसार, सध्या परिसरात उसतोडीचा हंगाम सुरू असल्याने दाट उसाचे क्षेत्र आणि झाडोऱ्यांची आडोशी बिबट्यांसाठी सुरक्षित ठरत आहेत. त्यामुळे बिबटे सतत मानव वस्तीजवळ दिसत असल्याच म्हणटलय.. सलग हल्ल्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
96
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 19, 2025 08:08:35
Dharashiv, Maharashtra:धाराशिव – तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील जामीनावर बाहेर असलेल्या विनोद गंगणे यांना भाजपाने थेट नगराध्यक्ष पदाची उमेदवारी देताच तुळजापूर व जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली आहे. ड्रग्ज प्रकरणातील आरोपी रिंगणात उतरवला, आणि विरोधकांनी भाजपावर टीकेची झोड उठवली आहे. तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात अटक… धाराशिव कारागृहात महिनेभर राहिल्यानंतर फक्त तीन महिन्यांपूर्वीच मिळालेला जामीन… आणि आता त्याच विनोद गंगणेला भाजपाने एबी फॉर्म देत नगराध्यक्ष पदासाठी उमेदवार केलंय! या निर्णयानं भाजपावर विरोधकांकडून “गुन्हेगारांना अंगशी लावणारी पार्टी” अशी झोड उठली आहे. जुगारअड्डा, मटका बुकी ते ड्रग्ज तस्करी … असा गंगणे यांचा गुन्हेगारी प्रवास. एक गुन्हा अद्याप न्यायप्रविष्ट असताना, असा आरोपी निवडणुकीच्या रिंगणात — आणि तुळजापूर राजकारण अक्षरशः पेटलं! भाजपाचा खरा चेहरा उघडा पडा! ‘पार्टी विथ माफिया’ अशीच ओळख अबोला होत आहे. या वादामागे नाव घेतलं जातं ते भाजपाचे आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांचं. परंतु राणा पाटील यांनी या विषयावर मौन बाळगलं. परंतु, खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रश्न उपस्थित केल्यावर — राणांनी त्यांना थेट पत्र लिहित प्रत्युत्तर दिलंय. पत्रात म्हटलंय — पुरावे घेऊन या, चर्चा करायला मी तयार आहे! तुळजापूर ड्रग्ज प्रकरणातील आरोपीला दिलेली उमेदवारी — यावरून तुळजापूरमधलं राजकारण तापलेलं; विरोधक आक्रमक, भाजप बचावाच्या भूमिकेत… आणि आता राणा पाटील विरुद्ध सुप्रिया सुळे या नव्या टप्प्याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
130
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 19, 2025 07:47:25
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील ९ नगरपालिका आणि १ नगरपंचायतीमधील एकूण 250 जागांसाठी निवडणूक लढवली जात आहे यामध्ये 10 नगराध्यक्ष पदाच्या जागांसाठी तब्बल 119 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत तर नगरसेवकांच्या पदासाठी 250 जागांसाठी 1607 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. इच्छुकांची संख्या लक्षात घेता अनेक ठिकाणी बंडखोरी होण्याची दाट शक्यता निर्माण झालीये उमेदवारी अर्ज माघारी घेण्यास सांगण्यासाठी नेत्यांना मोठी कसरत करावी लागणार आहे. साताऱ्यातून नगराध्यक्षपद उमेदवारी न मिळाल्यामुळे खासदार उदयनराजे भोसले यांचा गट नाराज असल्याची माहिती मिळाली होती यामुळे सातारा नगरपालिकेच्या निवडणुकीत उदयनराजे गट नगराध्यक्ष पदासाठी शिवेंद्रराजे भोसले याना किती मदत करतोय हे पहाण सुद्धा महत्वाचं असणार आहे. याबाबतचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी सातारा: अमोल मोहिते (भाजप) विरुद्ध सुवर्णा पाटील (राष्ट्रवादी शरद पवार पक्ष) फलटण : अनिकेत राजे निंबाळकर शिवसेना विरुद्ध समशेर सिंह निंबाळकर भाजप महाबळेश्वर: सुनील शिंदे राष्ट्रवादी विरुद्ध डी बावळेकर अपक्ष आणि कुमार शिंदे अपक्ष रहिमतपूर : नंदिनी माने राष्ट्रवादी विरुद्ध वैशाली माने भाजप म्हसवड : पूजा विरकर भाजप विरुद्ध महाविकास आघाडी राष्ट्रवादी भुवनेश्वर राजेमाने आणि गौरी माने अपक्ष पाचगणी: दिलीप बगाडे राष्ट्रवादी विरुद्ध दीपक कांबळे संतोष कांबळे सुनील बगाडे आणि सुनील कांबळे अपक्ष वाई: अनिल सावंत भाजपा विरुद्ध डॉक्टर नितीन कदम राष्ट्रवादी, तेजपाल वाघ राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष, प्रवीण शिंदे शिवसेना मेढा नगरपंचायत : रूपали वारागडे भाजपा विरुद्ध रेश्मा करंजीकर शिवसेना आणि सुनीता पार्टी शरद पवार गट
100
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 19, 2025 07:34:42
163
comment0
Report
Advertisement
Back to top