445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिंदे गुट में छह सांसदों के विलयन पर संजय देशमुख ने वाशिम में बयान
Washim, Maharashtra:वाशीम : File:1907ZT_WSM_MP_DESHMUKH रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशीम अँकर:ठाकरे गटातील सहा खासदारांच्या शिंदे गटात झालेल्या विलीनीकरणाला लोकसभा अध्यक्षांनी मंजुरी दिल्यानंतर यवतमाळ-वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी वाशिममध्ये प्रतिक्रिया दिली.हा निर्णय पूर्णपणे कायदेशीर प्रक्रियेनुसार घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले. व्हिओ:विकासकामांना गती देण्यासाठीच हा निर्णय घेतल्याचा असून सर्व कायदेशीर बाबींची पडताळणी करून,कायदेतज्ज्ञांचे मार्गदर्शन घेतल्यानंतर सहा खासदारांनी हा निर्णय घेतल्याचे खासदार संजय देशमुख यांनी सांगितले.लोकसभा अध्यक्षांचा निर्णय स्वागतार्ह असल्याचेही त्यांनी म्हटले.तसेच, लोकसभा मतदारसंघाच्या विकासासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली असून विकासकामांसाठी केंद्राकडून सहकार्याचे आश्वासन मिळाल्याची माहितीही त्यांनी दिली. बाईट:संजय देशमुख,खासदार, यवतमाळ-वाशिम.0
0
Report
वाशिम के रिसोड-माले गाव क्षेत्र में हल्की बारिश से किसानों को मिली नई उम्मीद
Washim, Maharashtra:वाशिमच्या रिसोड व मालेगाव तालुक्यात काही ठिकाणी रिमझिम पावसाचा आगमन झाले पंधरा दिवस पावसाने उघडीस दिल्यानंतर आज या रिमझिम पावसामुळे काही प्रमाणात पिकांना नवसंजीवनी मिळणार. त्यामुळे त्या परिसरातील शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळणार आहे. जिल्ह्यात सकाळपासून ढगाळ वातावरण आहे。0
0
Report
मुंबई कांदिवली की रिफ्रेंस लॉन्ड्री में दिनदहाड़े मारपीट, FIR पाँच दिन बाद दर्ज
Mumbai, Maharashtra:मंबईच्या कांदिवलीतील लोखंडवाला परिसरातील रिफ्रेंस लॉन्ड्रीमध्ये भरदिवसा धक्कादायक प्रकार घडला आहे. एका ग्राहकाने थेट लॉन्ड्रीत घुसून कर्मचाऱ्याला बेदम मारहाण केली. एवढ्यावरच न थांबता त्याच्यावर चाकूने जीवघेणा हल्ला करण्याचाही प्रयत्न केला. मात्र, प्रसंगावधान राखत कर्मचाऱ्याने चाकूऐवजी हल्लेखोराच्या हातातील कात्री पकडल्याने मोठी दुर्घटना टळली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. लॉन्ड्रीच्या मालकिणीच्या माहितीनुसार, ही घटना रविवारी घडली होती. मात्र, तक्रार करूनही पोलिसांनी तात्काळ गुन्हा दाखल केला नाही, असा आरोप करण्यात आला आहे. अखेर स्थानिक व्यापारी आणि नगरसेवकांनी हस्तक्षेप केल्यानंतर तब्बल पाच दिवसांनी पोलिसांनी संबंधित आरोपीविरुद्ध एफआयआर दाखल केला. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत असून आरोपीवर कठोर कारवाईची मागणी स्थानिक व्यापाऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी बैंक घोटाला: कदम के आरोपों पर जाँच की मांग, मंत्रिमंडल हस्तक्षेप की मांग
Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी ब्रेकिंग रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; शिवसेना नेते रामदास कदम यांचा गंभीर आरोप रामदास कदम यांच्या आरोपांमुळे रत्नागिरी जिल्ह्यासह सहकार क्षेत्रात मोठी खळबळ. कथित भ्रष्टाचाराची चौकशी करण्यासाठी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, सहकार मंत्री आणि सहकार आयुक्त यांना निवेदन. कथित गैरव्यवहाराशी संबंधित ११ प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी. बँकेच्या कार्यक्षेत्राबाहेरील_sाखर कारखान्यांना_sुमारे २५० कोटी रुपयांचे कर्जवाटप केल्याचाही केला आरोप. उपाध्यक्ष बाबाजी जाधव यांच्या कुटुंबातील पाच ते सहा सदस्यांची नुकत्याच झालेल्या भरतीत नियुक्ती झाल्याचा दावा. बँकेत मनमानी कारभार सुरू असल्याचा रामदास कदम यांचा गंभीर आरोप. संदीप आंब्रे नावाच्या व्यक्तीला परस्पर जामीनदार ठेवल्याचा आरोप. सखोल चौकशी करून दोषींवर योग्य ती कारवाई करण्याची मागणी. कथित गैरव्यवहारासंदर्भातील कागदपत्रे पुराव्यांसह निवेदनाला जोडल्याचा दावा. रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील कथित भ्रष्टाचार उघडकीस आणण्यासाठी स्वतः मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांची भेट घेणार नकली सोने, नोकरभरती आणि कर्जवाटप प्रकरणांत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप. जिल्हा परिषदेसह रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील शासकीय खाती काढून घेण्याची मागणी. या प्रकरणाबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाल्याचीही दिली माहिती बाईट: रामदास कदम, शिवसेना नेते0
0
Report
सोलापुर में डी मार्ट के पास दोपहिया दुर्घटना का वीडियो वायरल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील एखाद दुचाकी अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल सोलापूर शहरा जवळ असलेल्या सोलापूर - तुळजापूर रस्त्यावरील डी मार्ट जवळ एका दुचाकीच्या झालेल्या अपघाताचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये एक दुचाकीस्वार रस्त्यावरून जाताना दिसत आहे. तो काही अंतर गेल्यानंतर उजव्या हाताजवळील डिव्हायडरला जाऊन धडकतोय. हा व्हिडिओ मागून येणाऱ्या एका व्यक्तीने रेकॉर्ड केला आहे. सध्या या व्हिडिओमध्ये जखमीचे नाव समजू शकले नसून हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सोलापुरातील डी मार्ट जवळचा असल्याचा बोलल जात आहे. मात्र याबाबत पोलिसांकडून अधिकृत कुठलीही माहिती समोर आलेली नाही.0
0
Report
यवतमाल के बिटरगांव पुलिस ने भंगार दुकानों पर छापेमारी, मोटरसाइकिल पार्ट्स और सामग्री बरामद
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बिटरगाव पोलिसांनी ढाणकी येथील भंगार दुकानांवर विशेष तपासणी मोहीम राबविली. या तपासणीमध्ये 12 मोटारसायकली व मोठ्या प्रमाणात संशयित साहित्य आढळून आले. पोलिसांनी चार भंगार दुकानात तपासणी केली. या ठिकाणाहून 4 मोटारसायकलचे इंजिन, वायरचे बंडल आणि 2 बॅटऱ्या आढळल्या. तसेच गावातील इतर ठिकाणांहून आणखी 8 संशयित मोटारसायकलचे इंजिन ताब्यात घेण्यात आले आहेत. हा मुद्देमाल व वाहनांच्या मालकीबाबत तसेच ते चोरीचे अथवा इतर कोणत्याही गुन्ह्यातील असल्याबाबत सखोल पडताळणी सुरू असून, संबंधित व्यक्तींकडून आवश्यक कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. पोलीस स्टेशन बिटरगावमार्फत अवैध भंगार व्यवसाय, चोरीच्या वाहनांचे सुटे भाग खरेदी-विक्री तसेच मालमत्तेविरुद्धच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अशा प्रकारच्या विशेष तपासणी मोहिमा यापुढेही नियमितपणे राबविण्यात येणार असल्याचे ठाक्नेदार पांडुरंग शिंदे यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
कोकण के निवळी जलप्रपात: मानसून के बाद हरितिमा से लबालब, प्रकृति का सुंदर नजारा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - आषाढ सरीनंतर कोकणातले नयनरम्य धबधबे प्रवाहित शेकडो फुटांवरून फेसाळत कोसळणारा निसर्गरम्य निवळीचा धबधबा निवळीचा गर्द हिरवाईने नटलेला डोंगर रांगांमधून कोसळतोय धबधबा नयनरम्य धबधब्याचं डोळ्यांना सुखावणारे असं रूपडं शेकडो फुटावरून कोसळणाऱ्या हा धबधबा बघत राहावा असाच पावसाळ्यात हिरवाईन नटलेल्या कोकणातली निसर्गाची ही जन्नत पाहण्याची मजाच वेगळी0
0
Report
रत्नागिरी के खोरनीनको धबधबा मानसून में निर्मित जलप्रपात बना आकर्षण
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- लांजा तालुक्यातील खोरनीनको धबधबा प्रवाहित\n\nधरणाची रचना अशी आहे कि त्यातून हे मानवनिर्मीत धबधबे निर्माण झालेत\n\nधरण आणि तिथंच धबधबा असा दुहेरी संगम\n\nपावसाळ्यात धरण भरलं की धरणाच्या सांडव्यावरून पाणी वाहू लागतं\n\nत्यानंतर टप्प्याटप्प्याने पडणारा खोरनिनकोचा हा मानवनिर्मित सुंदर धबधबा भान हरपून टाकतो\n\nयावर्षी जुलैच्या पंधरवड्या खोरनीनकोचे धरण भरलं\nगेल्या वर्षी हे धरण जून महिन्यातच होतं भरलं0
0
Report
पुणे-ठाणे सीमा पर कालू धबधबा भारी बारिश से उफान, पर्यटक मोहित
Shirur, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वत रांगांमध्ये सुरू असलेल्या पावसामुळे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सीमेवर असलेला काळू धबधबा पूर्ण वेगाने प्रवाहित झाला आहे. तब्बल २०० ते २५० फूट उंचीवरून कोसळणारा हा पांढराशुभ्र धबधबा आणि आजूबाजूची हिरवळ पर्यटकांना भूरळ घालत आहे. हा नयनरम्य नजराणा डोळ्यात साठवण्यासाठी आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी केवळ महाराष्ट्रातूनच नव्हे, तर इतर राज्यांतूनही पर्यटक मोठ्या संख्येने येथे हजेरी लावत आहेत. धबधब्याचा परिसर आणि निसर्ग सौंदर्य अतिशय सुंदर असले, तरी पर्यटकांनी स्वतःच्या सुरक्षेची काळजी घ्यावी आणि कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम के छह गाँवों में बिजली कटौती के विरोध में महावितरण कार्यालय के बाहर प्रदर्शन
Washim, Maharashtra:वाशीम: मानोरा तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतीर्थ, सेवादासनगर, तळप बुद्रूक आणि विठोली या सहा गावांमध्ये वारंवार खंडित होणाऱ्या घरगुती व शेतीपंपाच्या वीजपुरवठ्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयात 'झोपा आंदोलन' केले. अघोषित भारनियमन तातडीने बंद करून नियमित वीजपुरवठा सुरू करावा, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला.0
0
Report
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा डिफर्ट लाइव: ताजा अपडेट जारी
Pandharpur, Maharashtra:संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा डिफर्ट लाइव्ह0
0
Report
राम शिंदे बनाम थोरात: जिला बैंक चुनाव में सत्ता की जंग गर्म
Shirdi, Maharashtra:थोरात विखे यांच्यातील संघर्ष आता पर्यंत अनेकदा समोर आलाय.. अहिल्यानगर जिल्हा बँकेत देखील या दोन नेत्यांची वर्चस्वाची लढाई असताना यावेळी सभापती राम शिंदे यांच्या जिल्हा बँक निवडणुकीत एन्ट्रीमुळे निवडणुकीत वर्चस्वाची लढाई रंगतदार होईल हे नक्की.. याच निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राम शिंदे यांनी संगमनेर तालुक्यातील बाळासाहेब थोरात यांचे समर्थक बाजीराव खेमनर यांची निवासस्थानी जात सदिच्छा भेट घेतली.. यावेळी राम शिंदे यांनी निवडणुकीचे औचित्य नसल्याचे सांगितले असले तरी भाजप नेत्याने काँग्रेस नेत्याच्या घेतलेल्या भेटीने चर्चांना उधाण आले आहे...0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में नाना पटोले प्रकरण के बाद सरकार के खिलाफ उग्र आक्रोश
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोनम वांगचूक प्रकरणात हुकूमशाही सुरु झालेली आहे - नाना पटोले Facebook Live Link ( https://www.facebook.com/share/v/1CrYCWUkdD/ ) संतांनी धर्माचे काम करायचं आणि राज्याकर्त्यांनी राज्याचे काम करायचं असत अलीकडे कांही अशोक खरात सारखे संत महाराष्ट्रात जन्माला येऊन संत परंपरेला बदनाम करतायत त्यामुळे भोंदू बाबा बाबत फार प्रतिक्रिया देऊ नये सोनम वांगचूक प्रकरणात हुकूमशाही सुरु झालेली आहे. लोकांनामध्ये सरकारच्या विरोधात उद्रेक व्हायायला सुरुवात झाली आहे. आमरण उपोषण कराल तर स्वतः ची आत्महत्या बडफळचा गुन्हा दाखल करून जेल मध्ये टाकायचा असं कायदा केंद्र सरकारने केलेला आहे. महात्मा गांधी ची तत्व केंद्र सरकारने संपावलेली आहे. दिल्लीतील पोलिसांनी जबरदस्ती चादरमध्ये बांधून हुकूमशाही पद्धतीने वागून लोकशाहीची हात्त्या करण्याचे काम सरकार करत आहे. हायकोर्टचे डायरेक्शन काय होते..? नीटमध्ये ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांना फाशीची सजा द्यावी लागते आता त्यात मार्कशीटचा घोटाळा आला आहे. तिथं मिल्ट्री लावावी लागते. देशाभारत आता मोठा उद्रेक सुरु झालेला आहे. महाराष्ट्रातील राष्ट्रवादी आणि शिवसेनेच विभाजन जेंव्हा झालं तेंव्हा schedule 3 नुसार कारवाई केली असती तर आज हे धाडस झालं नसतं. केंद्रात पाषवी बहुमताच्या आधारावर नियमात बसत नसताना सुद्धा शिवसेनेच्या 6 खासदारांना मान्यता मिळाली आहे. चोर शिरजोर असं चित्र देवेंद्र फडणवीस यांचं आपणाला पाहायला मिळत आहे. ज्या लोकांनी दान केला आहे ते सर्व बेईमान होते असं तिथल्या अध्यक्षनी म्हटलं आहे. Rss ने तिथल्या तिजोरीवर डाका घातलेला आहे. परवा माझं जयंत पाटील यांच्याशी माझं ओळण झालं, ते म्हणालेत या अफ़वा आहेत, सध्या त्यावर प्रतिक्रिया देऊ शकत नाही लोकांसाठी लढणारा कार्यकर्ता आज गेला त्यामुळे महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. महाराष्ट्रातील रत्न गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली हे सरकार शेतकरी विरोधी आहे. मुख्यमंत्री हे विद्युत पंपबिल माफ केली म्हणून घोषणा केली आणि टाळ्या वाजवून घेतल्या.. एकीकडे एक रुपया लुटायचा आणि चार आणे द्यायचे, हे बेईमानच सरकार आहे. शेतकऱ्यांची चेष्टा करण्याची काम सुरु असून भाजपा ही शेतकरी विरोधी पार्टी आहे. राजकारणात प्रत्येकाचा काळ असतो, माझे गुरु विलासराव देशमुख यांनी सांगायचे वेळेच्या पुढे आणि निशिबापेक्षा जास्त कांही मिळत नाही. उद्याच्या धर्मेंद्र प्रधानमंत्री विरोधात निघणाऱ्या मोर्चा काँग्रेस सहभागी होणार अण्णा वयोवृद्ध आहेत त्यांच्याबद्दल काय बोलणार मात्र सध्या या भ्रष्टाचार सरकार विरोधात अण्णा शांत बसले आहेत, त्यांना कधीकाळी देशाचे महात्मा गांधी असं म्हटलं जायचं बाईट - नाना पटोले ( काँग्रेस ज्येष्ठ नेते )0
0
Report
अकोला के बालापूर मंदिर से चरण पादुकाएं चोरी, CCTV से आरोपी की खोज तेज
Akola, Maharashtra:Anchor removed: अकोला जिल्ह्यातील बाळापूर तालुक्यातील वझेगाव येथील श्री रामचंद्र महाराज संस्थान मंदिरातून अज्ञात चोरट्याने चरण पादुका चोरून नेल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही संपूर्ण घटना मंदिर परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून त्याच्या आधारे चोरट्याचा शोध सुरू आहे. भरदिवसा मंदिरात चोरी झाल्याने परिसरातील भाविकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. धार्मिक स्थळांवरही चोरट्यांची हिंमत वाढत असल्याची भावना भक्तांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाची पोलिसांनी गंभीर दखल घेऊन सीसीटीव्हीच्या आधारे आरोपीला तातडीने अटक करावी आणि मंदिर परिसरातील सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत करावी, अशी मागणी भाविकांनी केली आहे.0
0
Report
अकोला में डाबकी रोड चौड़ीकरण: पेड़ काटे गए, पर्यावरण प्रेमी नाराज
Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील डाबकी रोडवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान अनेक दशकांपासून उभे असलेले आणि नागरिकांना सावली देणारे महाकाय वृक्ष तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.अकोला शहरातील डाबकी रोडवर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्यालगत अनेक वर्षांपासून उभे असलेले घनदाट आणि सावली देणारे महाकाय वृक्ष तोडण्यात आले आहेत. उन्हाळ्यात प्रवासी, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे हे वृक्ष आता इतिहासजमा झाले आहेत. वृक्षतोडीमुळे परिसरातील तापमान वाढण्याची तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी पर्यावरणाची हानी टाळण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
