445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
दौंड में गुड़ में शक्कर मिलाने पर 20 टन शक्कर और 16 टन गुड़ जब्त
Rui, Maharashtra:अन्न आणि औषध प्रशासनाकडून दौंड तालुक्यातील गुऱ्हाळांवर कारवाई....20 टन साखर आणि 16 टन गुळ साठा जप्त....17 लाख 79 हजार 358 रुपये साठा जप्त या कारवाईत सुमारे 20 टन साखर आणि 16 टन गुळ जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेले या मालाची किंमत 17 लाख 79 हजार 358 रुपये इतकी आहे. प्रथमेश गुळ उद्योग सहजपूर, सात्विक ऑरॅनिक गूळ उद्योग सहजपूर, साहिल मलिक खामगाव फाटा, सहादत डी हुसेन दौंड या चार गुऱ्हाळांवर कारवाई करण्यात आली आहे...0
0
Report
गेवराई में खेत सड़क विवाद के कारण परिवार पर भारी हमला, वीडियो वायरल
Beed, Maharashtra:बीड: भय इथले संपणार कधी..? आता तर तहसीलदार आणि पोलिसांसमोरच रस्त्याच्या वादातून कुटुंबावर हल्ला..! बीडच्या गेवराई तालुक्यातील साठेवाडी परिसरात शेत रस्त्याच्या वादातून एका कुटुंबावर अश्लील शिवीगाळ करत 20 ते 30 लोकांकडून अचानक प्राणघातक हल्ला करण्यात आला. दगडाने हल्ला केल्याने जखमींमध्ये लहान मुलांसह महिलांचा देखील समावेश आहे. त्यांच्यावर बीडमध्ये सध्या उपचार सुरू आहेत. घटना दोन दिवसांपूर्वीची असून हल्ल्याचा व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. रस्त्याबाबतीत उपविभागीय अधिकाऱ्यांचा स्थगिती आदेश असताना सुद्धा तहसीलदार आणि पोलीस यांच्या उपस्थितीत काल दुपारी रस्ता खुला केला जात होता. स्टे ऑर्डर घेऊन दाखल झालेल्या कुटुंबराने रस्ता खुला करू नये असे म्हटल्यानंतर त्यांच्यावर हल्ला करण्यात आला. विशेष म्हणजे गेवराईचे नायब तहसीलदार आणि पोलिसांच्या पथकासमोरच हा हल्ला झाल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या प्रकरणात पीडित शेतकरी कुटुंबाने पोलीस अधीक्षकांकडे लेखी तक्रार दिली असून हल्ला करणाऱ्यांविरोधात कारवाईची मागणी केली आहे. पोलिसांसमोरच झालेल्या या भ्याड हल्ल्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.0
0
Report
रायगढ़ किले में शिवराज्याभिषेक के चलते खाद्य बिक्री पर बंदी, व्यवसायी नाराज
Chendhare, Maharashtra:बंदी आदेशामुळे किल्ले रायगडावरील स्थानिक व्यावसायिक संतप्त रायगड किल्ल्यावरील व्यवसायीकांनी घेतली महाड प्रांताधिकाऱ्यांची भेट व्यवसायावर घातलेली बंदी उठवण्याची केली मागणी शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रांताधिकारी यांचे मनाई आदेश अँकर किल्ले रायगडावर होणाऱ्या शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर दोन दिवस खाद्य पदार्थ विक्री व्यवसायावर बंदी घालण्यात आली आहे. त्या ठिकाणी गॅस अगर चुल पेटवल्यामुळे अपघाताची भिती व्यक्त करीत महाड प्रांताधिकारी यांनी बंदीचे आदेश जारी केले आहेत. या आदेशामुळे या प्रकरणी किल्ले रायगडावरील व्यवसायीक संतप्त झाले आहेत. त्यांनी महाडचे प्रांताधिकारी पोपट ओमासे यांची भेट घेतली. त्यांना बाजु समाजाऊन सांगत बंदी आदेश मागे घेण्याची विनंती केली. ही बंदी कायम ठेवली आणि स्थानिक व्यावसायिकांना त्रास झाला तर आंदोलनाचा इशारा यावेळी ग्रामस्थांनी दिला.0
0
Report
Advertisement
बारामती में महँगाई व ईंधन दर के विरोध में पवार गट का बड़ा आंदोलन
Rui, Maharashtra:बारामतीत शरद पवार गटाचे महागाई विरोधात आंदोलन. इंधन दरवाढ कांदा दर यासह विविध प्रश्नांवर आंदोलन. युगेंद्र पवारांच्या नेतृत्वात केलं आंदोलंच. बारामती मध्ये महागाई इंधन दरवाढ कांदा दर यासह विविध प्रश्नांवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून निषेध आंदोलन केले जात आहे. युवा नेते युगेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली हे निषेध आंदोलन केलं जात आहे. बारामती मधील तीन हत्ती चौकात केलं जात असून महायुती सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जात आहे. रस्त्यावर उतरण्याशिवाय कुठलाही पर्याय राहिला नाही. आम्ही आता महाराष्ट्रभर आंदोलन करत आहोत. हे आंदोलन महागाई विरोधात आहेत कांद्याला योग्यहमीभाव मिळाला पाहिजे यासाठी आम्ही आंदोलन करत आहोत. कांद्याला हमीभाव मिळाला पाहिजे अशी आमची मागणी आहे. डिझेल आणि पेट्रोलचे दर वाढत आहेत खताचे दर वाढत आहेत गॅसचे दर वाढत आहेत कांद्याला भाव नाही. कांदा उत्पादन करण्यासाठी साधारण एकरी एक लाख रुपये लागतात, पण कांदा फक्त साडेसातशे रुपये ते 1000 रुपये प्रति टन एवढाच दर आहे. त्यामुळे शेतकरी अडचणीत आहे. महागाई विरोधात आम्ही सगळे लढत आहोत. बारामती तालुक्यात गुन्हेगारी खूप वाढत चालली आहे मला महिला येऊन भेटत आहेत, त्यांना आता बारामती सुरक्षित वाटत नाही. महिला सांगतात दादा साहेबांची बारामती म्हणून दादांची बारामती म्हणून ही बारामती ओळखली जाते दादांची बारामती असल्यामुळे आम्हाला इथे सुरक्षित वाटायचं, काही महिला तर पुण्यावरून बारामतीत राहिला आलेत कारण त्यांना इथे सुरक्षित वाटायचं, परंतु आता तसं वातावरण इथे नाही. गुन्हेगारी वाढत चालली आहे ट्रक दारू नियमबाह्य भट्ट्या ही प्रकरण वाढत चालले आहेत त्यामुळे आता रस्त्यावर उतरल्याशिवाय पर्याय नाही. शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी आम्ही रस्त्यावर आलो आहोत. पेट्रोल डिझेल कुठे ग्रामीण भागात मिळत नाही गॅस सिलेंडर तालुक्यात आणि राज्यात मिळत नाहीत त्याचे टंचाई आहे. गॅसचा काळाबाजार थांबला पाहिजे. रात्री सहा ते दहा वाजेपर्यंत गेले अडीच महिने झालं बारामती तालुक्यात लोड शेडिंग सुरू आहे ते ताबडतोब बंद झाल पाहिजे. पूर्वी जेवढा मला पाणी मिळत होतो तेवढा आता मिळत नाही, तापमान वाढत चाललो आहे आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळालं पाहिजे. चारा टंचाई आहे, बारामती तालुक्यात साधारण चार ते साडेचार हजार कांदा उत्पादक शेतकरी आहे. जिरायत भागातील हे शेतकरी आहेत. सर्वात जास्त क्षेत्र मोडवे गावात होतं त्यानंतर बाबुर्डी आणि इतर गावात कांदा पिकतो. शासनाला आमच्याकडून विनंती आहे, लवकरात लवकर बारामती तालुक्यात एक नाफेडच सेंटर सुरू करा. त्यामुळे कांदा उत्पादकांना एक मार्केट मिळेल, कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे. कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कमीत कमी दीड हजार रुपये अनुदान मिळाला पाहिजे आणि कांद्याला तीन हजार रुपये प्रति क्विंटल भाव शासनाने जाहीर केला पाहिजे. ज्यावेळी शरद पवार केंद्रात मंत्री होते तेव्हा कांद्याला सात हजार रुपये भाव मिळत होता, तेव्हा भाजपचे नेते कांद्याची माळ घालून संसदेत आले होते कांद्याला आता तुम्ही सोने एवढा भाव देत आहात हे काम फक्त पवार साहेबांनी केलं, शेतकरी नेते म्हणून जर आज देशात कोणी काम केलं असेल तर ते पवार साहेबांनी केल आहे. कांद्याला भाव इतिहासात कोणी दिला असेल तर तो फक्त आणि फक्त शरद पवार यांनी दिला, तेच शेतकऱ्यांचा हित बघत आले. आम्हाला विश्वास आहे आमच्या आंदोलनाची दखल सरकार घेईल. पेट्रोल एका आठवड्यात चार ते पाच रुपये प्रति लिटर प्रमाणे वाढले जेव्हा इंधन क्रूड ऑइल वाढतो तेव्हा सर्वच खर्च वाढतो. पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झाले पाहिजेत, शरद पवार यांचा सरकार असताना याचे दर पन्नास रुपये होते आता शंभरच्या पुढे गेलेत. ऑन मागण्या पूर्ण होतील का. आमच्या मागण्या पूर्ण होतील असं वाटत नाही, कारण नेहमी शेतकऱ्याच्या विरोधातील हे सरकार राहिला आहे. शेतकऱ्यांसाठी काँग्रेस सरकार आणि पवार साहेबांचा सरकार नेहमी काम करणार सरकार होतं. मागचा दहा-बारा वर्षाचा अनुभव बघून असं वाटतंय हे सरकार आमच्या सर्व मागण्या पूर्ण करणार नाहीत पण आम्हाला रस्त्यावर उतरल्याशिवाय कोणता पर्याय राहिला नाही. जोपर्यंत आमच्या मागण्या हे सरकार पूर्ण करत नाही तोपर्यंत आम्ही हा लढाल चालू ठेव. ऑन बारामती गुन्हेगारी कमी झाली असं पोलिस म्हणतात. पोलिसांचं काम आहे गुन्हेगारी कमी करणे ते म्हणणार नाहीत गुन्हेगारी कमी झाली. बारामतीच्या जनतेला जाऊन विचारा ते सांगतील गुन्हेगारी वाढली की कमी झाली.0
0
Report
इंदापुर में प्रतिबंधित गुटखा तंबाकू पर दबिश: होटल से महंगी जप्ती
Rui, Maharashtra:अन्न व औषध प्रशासनाचा इंदापूरात गुटखा माफियांना दणका.... राज hotellवर छापा.. प्रतिबंधित गुटखा, पानमसाला आणि तंबाखूचा साठा जप्त.... वाहनासह 2 लाख 57 हजार 254 रुपयांचा मुद्देमाल जप्त... या प्रकरणी इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस करत आहेत...0
0
Report
लोणावळा टाटा डैम में पानी शून्य प्रतिशत, भीषण गर्मी से जलस्तर गिरा
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यातील लोणावळ्यातील टाटा धरणातील पाणी साठा शून्य टक्के झाले आहे. दुपारच्या तापमानात वाढ झाली असून, वाढत्या उन्हामुळे पाणी पातळ पडल्याचं वर्णन केलं जातं. पर्जन्यमानासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळ तालुक्यातील अनेक धरणे शंभर टक्के भरली होती; परंतु उष्णतेच्या झळा आणि वाष्पीभवनामुळे टाटा धरणातील पाणी साठा शून्य टक्क्यांवर आला असल्याचं सांगितलं जातं. मागील वर्षी जुलै अखेर टाटा धरण 100 टक्के भरले होते, ज्यामुळे या धरणाच्या सांडव्यावरून पाणी इंद्रायणी नदीच्या पात्रात सोडलं जात होतं; तर दुसऱ्या बाजूला टाटाचे वालवण धरणातील पाणी साठा कमी होऊ लागला आहे, ज्यामुळे टाटा धरण ओस पडलेले दिसते.0
0
Report
Advertisement
मान्सून के आगमन से मावल के किसानों में उम्मीद की लहर
Varsoli, Maharashtra:मान्सूनच्या आगमनाची चाहूल लागताच मावळ तालुक्यात शेतकरी कामाला लागले असून भात लागवडीपूर्व तयारीच्या कामांना वेग आला आहे. शेतात नांगरणी, मशागत, आणि रोपवाटिकांसाठी जमीन तयार करण्याची लगबग सर्वत्र पाहायला मिळत आहे. यंदा समाधानकारक पावसाची अपेक्षा असल्याने शेतकऱ्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून शेतीची प्रत्येक तयारी वेळेत पूर्ण करण्याची लगबग सुरू आहे. तसेच शेतांमध्ये कृषी अवजारांचा वाढलेला वापर, मशागतीची सुरू असलेली कामे आणि आगामी हंगामाबाबत शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर दिसणारा आशावाद हे चित्र सध्या मावळात पाहायला मिळत आहे. पावसाच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजा आता नव्या हंगामाच्या स्वागतासाठी सज्ज झाला असून शेतीच्या कामांमुळे गावागावांत उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे..0
0
Report
अहिल्यानगर विधानपरिषद चुनाव: करण ससाणे नहीं पहुँचे, रिंगण में मुकाबला गर्म
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक... आज अर्ज माघारीचा शेवटचा दिवस... अपक्ष उमेदवार करण ससाणे नॉट रिचेबल... करण ससाणे हे श्रीरामपूर पालिकेत काँग्रेसचे विद्यमान नगराध्यक्ष... महाविकास आघाडीचे एकमत न झाल्याने करण ससाणे हे अपक्ष म्हणून रिंगणात... भाजपकडून प्राजक्त तनपुरे, अपक्ष करण ससाणे, अपक्ष दत्ता पानसरे, मच्छिंद्र धुमाळ आणि कमलेश गांधी निवडणुकीच्या रिंगणात... निवडणूक बिनविरोध करण्याचा भाजपचा प्रयत्न... मात्र करण ससाणे सकाळपासून नॉट रिचेबल असल्याने चुरस वाढली... dup़ारी तीन वाजेपर्यंत काय घडामोडी घडतात याकडे लक्ष...0
0
Report
यवतमाळ विधान परिषद चुनाव: कांग्रेस ने उम्मीदवार वापस लेकर फारुक सय्यद को बढ़ाने की तैयारी
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधान परिषद निवडणूकितुन महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी नाट्यमय रीत्या उमेदवारी अर्ज मागे घेतल्यानंतर काँग्रेस अलर्ट मोड वर आली आहे. कुठल्याही परिस्थितीत ही निवडणूक बिनविरोध होऊ नये या दृष्टीने काँग्रेस नेत्यांनी हालचाली सुरू केल्या असून सध्या निवडणूक रिंगणात अपक्ष उमेदवारी दाखल केलेले फारुक सय्यद यांना पुरस्कृत उमेदवार करण्याची काँग्रेसची तयारी है. त्या दृष्टीने काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांच्या निवासस्थानी महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक सुरू आहे. काँग्रेस हार मानणार नाही, जय पराजयाचा विचार करणार नाही करिता निवडणुकी होईलच असा विश्वास काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी व्यक्त केला आहे.0
0
Report
Advertisement
सांगली में महायुति की रणनीति तय, बंडखोरी रोकने के लिए जोर
Satara, Maharashtra:सातारा:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील राजकीय घडामोडींना वेग आला असून महायुतीचे अधिकृत उमेदवार धैर्यशील कदम यांनी शिवसेनेचे नेते आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांची निवडणुकीच्या अनुषंगाने भेट घेतली या भेटीदरम्यान निवडणुकीच्या रणनीतीबाबत दोन्ही नेत्या मध्ये चर्चा झाली.या महत्त्वपूर्ण भेटीनंतर विशेष म्हणजे पालकमंत्री शंभूराज देसाई आणि धैर्यशील कदम हे दोन्ही नेते एकाच गाडीतून सांगलीकडे रवाना झाले. यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बंडखोरी बाबत प्रतिक्रिया दिली आहे. "सांगली जिल्ह्यात शिवसेनेचे जिल्हा प्रमुख तानाजीराव पाटील यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. या संदर्भात मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री यांच्या सूचनेनुसार महायुतीत 'युतीधर्म' पाळणे अत्यंत आवश्यक असल्याचे स्पष्ट केले आहे. आज दुपारी ३ वाजੇपर्यंत अर्ज माघारी घेण्याची अंतिम मुदत असून, बंडखोरी रोखण्यासाठी आणि अधिकृत उमेदवाराला पाठिंबा देण्यासाठी आम्ही स्वतः सांगलीला निघालो असल्याचे ते म्हणाले." सांगलीत तानाजीराव पाटील, आमदार सुहास बाबर आणि इतर स्थानिक नेत्यांशी चर्चा करून बंडखोर अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले जातील. शिवसेनेकडून युतीधर्माचे काटेकोरपणे पालन केले जाईल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली... साताऱ्यातील जिल्हा परिषद निवडणुकी नंतर महायुती मध्ये अंतर्गत नाराजीबाबत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आधी सांगलीचा हा पहिला टप्पा आणि अर्ज माघारीची प्रक्रिया पूर्ण होऊ द्या. त्यानंतर महायुतीचे सर्व प्रमुख नेते एकत्र बसून साताऱ्याच्या जागेबाबत सविस्तर चर्चा करू असा विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला बाईट: पालकमंत्री शंभूराज देसाई0
0
Report
रत्नागिरी में मध्यरात्री कार समेत बाइक जलकर खाक; बड़ा अग्निकांड
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत मध्यरात्री एक भीषण आगीची घटना घडली आहे. येथील रहिवासी सुरज संजय जाधव यांच्या बंगल्याच्या आवारात उभ्या असलेल्या मारुती सुझुकी SX4 (क्र. MH 46N7377) या कारला मध्यरात्री २ च्या सुमारास अचानक आग लागली. ही आग इतकी थरारक आणि मोठी होती की, आगीच्या ज्वालांनी रौद्ररूप धारण केले. या आगीत कारच्या शेजारीच उभी असलेली टीव्हीएस रायडर (TVS Raider, क्र. MH08BA5583) ही मोटरसायकलही होरपळली असून तिचेही प्रचंड नुकसान झाले आहे. घटनेची माहिती मिळताच MIDC अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. उप-अग्निशमन अधिकारी विवेक राणे आणि त्यांच्या पथकाने शर्तीचे प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळवले. मात्र, अग्निशमनदल आग विझवेपर्यंत मारुती कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. या आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही.0
0
Report
कांग्रेस के पूर्व विधायक जवळगावकर ने नामांकन वापस लिया, सुमठाणकर अब उम्मीदवार बनेंगे
Nanded-Waghala, Maharashtra:कांग्रेसचे माजी आमदार माधवराव पाटील जवळगावकर यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला. काँग्रेसकडून जवळगावकर आणि माजी सनदी अधिकारी रामदास पाटील सुमठाणकर यांनी सोबतच उमेदवारी दाखल केली होती. आज अर्ज मागे घेण्याचा शेवटच्या दिवशी जवळगावकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे आता काँग्रेसतर्फे सुमठाणकर यांची उमेदवारी कायम आहे. पक्षाने आदेश दिल्याने उमेदवारी मागे घेतल्याची प्रतिक्रिया जवळगावकरांनी दिली.0
0
Report
Advertisement
नागपुर में अवकाली वर्षा के लिए ऑरेंज अलर्ट; वर्धा, यवतमाल और चंद्रपूर में ओले संभव
Nagpur, Maharashtra:नागपुर क्षेत्रीय मौसम विभाग ने चेतावनी दी: वर्धा, यवतमाल और चंद्रपूर के लिए अवकाली वर्षा का ऑरेंज अलर्ट. तेज हवाओं के साथ ओलों की संभावना.0
0
Report
सांगली-सातारा उपचुनाव में तानाजी पाटील के माघार से तस्वीर बदलेगी?
Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधानसभा निवडणूकीतून शिवसेनेचे तानाजी पाटील माघार घेण्याची शक्यता,सूत्रांची माहिती.. सांगली-सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीतील अर्ज माघारीचा आजचा अंतिम दिवस आहे.या निवडणुकीतून शिवसेना शिंदे गटाचे नेते सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तानाजी पाटील उमेदवारी अर्ज माघार घेणार असल्याची शक्यता असून दुपारी 3 पर्यंत ते आपला अर्जं माघार घेतील,अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.तर काँग्रेसकडून दाखल केलेली उमेदवारी मागे घेण्याबाबत नेत्यांच्या आदेशानंतर निर्णय होणार आहे,तर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप की बाळासाहेब पाटील माघार घेणार,यावर खलबते सुरू आहेत,त्यामुळे दुपारी तीन नंतर कोणाची माघार होणार,हे समोर येणार असून त्यानंतर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे.0
0
Report
बदलापूर तालाब में प्रदूषण का कब्जा, नगरपालिका की लापरवाही से बदतर हालात
Ambernath, Maharashtra:बदलापूरच्या गाव तलावात घाणीचं साम्राज्य अस्वच्छता और दुर्गंधीमुळे नागरिक हैराण पालिकेच्या दुर्लक्षामुळे रहिवाशांचं आरोग्य धोक्यात बदलापूर पश्चिमेकडे गाव परिसरात जुना तलाव असून कमळांचा तलाव म्हणून तो प्रसिद्ध होता. मात्र गेल्या काही वर्षात या तलावाची अवस्था अत्यंत बिकट झालीय. तलावात जलपर्णी वाढली असून सांडपाण्यामुळे तलावातील पाणी दुषित झालंय. काही समाजकंटक तलावात कचरा टाकत असल्यामुळे घाणीचं साम्राज्य वाढलंय. त्यामुळे दुर्गंधी पसरत असून डासांचं प्रमाणही वाढलंय. एकीकाळी बदलापूरकरांच्या पर्यटनाचं ठिकाण असलेला हाच तलाव आता इथल्या रहिवाशांचं आरोग्य बिघडवण्यासाठी कारणीभूत ठरतोय. पालिकेच्या दुर्लक्षामुळे तलावभोवतीचे संरक्षक कठडेही गायब झाले आहेत. बदलापूरचं वैभव असलेला गाव तलाव नामशेष होत चालल्यानं नागरिकांमधून संतापाची लाट उसळलीय.0
0
Report
Advertisement
