icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

विदर्भ की स्कूलें आज खुलीं; शिक्षा मंत्री पंकज भोयर ने विद्यार्थियों से संवाद किया

Nagpur, Maharashtra:विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या। शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर नागपूर शहरातील सेवासदन शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आरक्षणातील उपवर्गीकरण संदर्भात सरकार तोडगा काढेल। टीईटी पेपर फूट प्रकरणात परीक्षार्थ्यांपर्यंत पेपर लीक करण्याचा प्रयत्न केला गेला; शासनाच्या दुसऱ्या विभागाने त्या प्रयत्नाला तोडगा काढला आहे; एसआयटी गठीत करण्यात आली आहे आणि लवकरच पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। दोन टीम बिहार, एक टीम हरियाणा ला गेली आहेत; ते दोन्ही आरोपी लवकरच भेटतील। आजपासून सुरु होणाऱ्या एसआयआर बाबत प्रशासन पूर्वीपासून पूर्ण तयारी केली आहे; मतदारांच्या नावांत काही तक्रारी होत्या, पारदर्शक मतदार यादी तयार होतील। हिंदीमध्ये अशी मागणी होती की शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली जावी; राज्यात वेगवेगळ्या बोर्डाचे शाळा असून काही तक्रारी आल्या त्या सरकारने कारवाई केली। गणवेश देण्यास सरकारने भूमिका घेतली असून शाळा समितीच्या खात्यात निधी दिला आहे आणि त्या माध्यमातून गणवेश दिले जाणार आहे। संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.
0
0
Report

अक्कलकोट में दो साल के बच्चे पर डुकर का हमला, कान में 14 टांके

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानाला मोकाट डुकराने घेतला चावा, चिमुकल्याला 14 टाके टाकत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू ((( लहान मुलगा आहे चेहरा ब्लर करावा विनंती ))) - अक्कलकोट तालुक्यातून अंगावर शहारा आणणारी घटनासमोर - दोन वर्षाच्या चिमुकल्यावर मोकाट डुकराचा थरारक हल्ला - मोकाट डुकराने चिमुकल्याच्या कानाचे तोडले लचके - सार्थक काशिनाथ माळगे असे डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव - अक्कलकोट तालुक्यातील जंगी प्लॉटमध्ये घडली दुर्दैवी घटना - डुकराच्या हल्ल्यामुळे चिमुकलाच्या कानाला पडले 14 टाके - मोकाट डुकराच्या थरारक हल्ल्यानंतर बराच वेळ समर्थ बेशुद्ध अवस्थेत - सार्थकवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू
0
0
Report
Advertisement

जेवनाळा में स्कूल बंद कराने का प्रदर्शन, ग्रामस्थ शिक्षकों की भर्ती की मांग

Bhandara, Maharashtra:शाळेच्या पहिल्या दिवशी जेवनाळा येथील गावकऱ्यांनी पुकारले शाळा बंद आंदोलन विद्यार्थ्यांना बाहेर बसवत आंदोलनाची सुरुवात... शाळेची पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथे ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे यामध्ये ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी शाळेला कुलूप बंद करत आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. शासनाकडे मागील दोन वर्षांपासून गावकरी शिक्षकांची मागणी करत होते मात्र शासनाकडून शाळेला पूर्णपणे शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी आज चक्क शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद केली असून प्रशासनाला शिक्षकांची मागणी केलेली आहे.
0
0
Report

पलूस के घोगाव में निजी ट्रैवल्स बस पलटी, चालक समेत 2 की मौत, 15 घायल

Sangli, Maharashtra:पलूस तालुक्यातील घोगाव येथे खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन दोघे जण ठार झाले आहेत, १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि क्लीनरचा समावेश आहे. कराड-तासगाव मार्गावर अपघात झाला. भरधाव बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन बस आदळी, ज्यामध्ये बस चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बसमधून प्रवास करणारे १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कराड-तासगाव मार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असून अरुंद रस्त्यामुळे अचानक वेग कमी करावा लागल्याने, हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, याप्रकरणी कुंडल पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास कुंडल पोलीस करत आहेत.
0
0
Report

अमरावती के कर्मचारियों की वसाहती में घटिया निर्माण, महिलाओं ने प्रशासन पर बड़ा आरोप

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम; कर्मचाऱ्यांच्या गृहिणींचा आरोप पावसाळा सुरू होताच क्वार्टर्सला लागली गळती; रस्ते उखडले, नाल्या तुंबल्याने वसाहतीला नरकयातना प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवाव्यात संतप्त गृहिणींची मागणी अँकर :- अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडला असून प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. अवघ्या चार-पाँच महिन्यांतच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व देखभालाची कामे झाली होती. मात्र पहिल्याच पावसात हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांच्या पत्नी व गृहिणींनी केला आहे. सध्या वसाहतीमधील रस्ते पूर्णपणे उखडले असून बसवलेले पेव्हर ब्लॉक बाहेर निघाले आहेत. इतकेच नव्हे तर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी क्वार्टर्समध्ये गळत आहे. कॉलनीमध्ये लहान पाईपलाईनमुळे पिण्याचे पाणी येत नाही अंधाराचे साम्राज्य असूनही पुरेसे स्ट्रीट लाईट्स नाहीत आणि अंतर्गत नाल्या तुंबल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वसाहतीची ही दुरवस्था दूर करून प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बाईट :- एकूण ३, कर्मचारी पत्नी
0
0
Report
Advertisement

इचलकरंजी में सराईत अपराधियों के खिलाफ पुलिस ने धावा कर दी, दो गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींची शहरातील विविध भागांत धिंड काढली. खंडणी, चोरी, खून, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक झालेल्या आरोपींना पोलिसांनी नागरिकांसमोर फिरवत गुन्हेगारीविरोधात कडक संदेश दिला. इचलकरंजीतील रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत सहा वेळा कारवाई करण्यात अल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एका वाहनचालकाला अडवून त्याच्याकडील वाहन आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट यांची भोनेमाळ, जवाहरनगर, गणपती कट्टा आणि परिसरातील इतर संवेदनशील भागांत धिंड काढली. या कारवाईमागचा उद्देश शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश देणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
0
0
Report

1 जुलाई 2026 से चिपळूण पोस्ट विभाग स्वतंत्र, पोस्ट सेवाओं में तेज़ी

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणकरांसाठी आनंदाची बातमी; १ जुलैपासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' सुरू उत्तर रत्नागिरीतील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२६ पासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' कार्यरत होणार आहे. या नव्या विभागात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरील पोस्टल कामांसाठी नागरिकांना रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार असून पोस्टल सेवाही अधिक जलद आणि प्रभावी होणार आहेत.
0
0
Report

नीट के बाद टीईटी पेपर लीक: रत्नागिरी में कांग्रेस ने सख्त जांच की मांग

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी नीटनंतर आता टीईटीचा पेपर फुटला; सखोल चौकशीची रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप करत, सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन सादर केले. यावेळी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

भर बारिश में चिचोंडे गाँव में शेड नहीं, villagers की कठिनाई बढ़ी

Chendhare, Maharashtra:अँकर - म्हसळा तालुक्यातील चिचोंडे गावात भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली है. गावातील एका व्यक्तीचे निधन झाले त्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशान भूमीवर शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी सह इतर धार्मिक विधी करावे लागले. म्हसळा तालुक्यातील पाभरे गावातील ही वाडी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून इथं स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यात आला. मात्र ठेकेदाराने त्यावर शेडचे काम केले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते आहे. याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केलीय. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील हे गाव है.
0
0
Report

केतन अग्रवाल हत्या मामले में नया अपडेट: जुपिटर बाइक पुलिस ने की जप्त

Varsoli, Maharashtra:केतन अग्रवाल हत्या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना आणखी एक महत्त्वाचा धागा हाती लागला आहे. चेतन पुण्याहून लोहगडवर ज्या ज्युपिटर दुचाकीवरून आला होता, ती दुचाकी पोलिसांनी जप्त केली असून, गुन्ह्यात वापरण्यात आलेले महत्त्वाचे वाहन म्हणून तिची नोंद करण्यात आली आहे. तपासादरम्यान समोर आलेल्या माहितीनुसार, सिया आणि चेतन यांनी आधीच संपूर्ण कट रचला होता. चारचाकी वाहनाने प्रवास केल्यास सोमाटणे फाटा आणि उर्से टोलनाक्यांवर वाहनाची नोंद होऊन पोलिसांना चालक व वाहनाचा माग काढणे सोपे जाईल, ही शक्यता लक्षात घेऊन चेतनने चारचाकीऐवजी ज्युपिटर दुचाकीने पुणे ते लोहगड असा प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. पुणे पोलीसानी याच MH 12 BW 1274 क्रमाका च्या दुचाकी वाहनावर मोबाईल वर बोलताना आढळल्याने १००० रुपयाचा दंड देखील आकारला आहे. ठरल्याप्रमाणे चेतन लोहगडवर पोहोचला. त्यानंतर केतनची हत्या करून तो त्याच दुचाकीवरून पुन्हा पुण्याच्या दिशेने रवाना झाला. टोलनाक्यांवरील नोंदी टाळण्यात आरोपी यशस्वी झाले असले, तरी लोहगड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये चेतन आणि सिया यांच्या संशयास्पद हालचाली कैद झाल्या. याच सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी संपूर्ण कटाचा उलगडा केला. रात्री उशिरा पोलिसांनी शोधमोहीम राबवून ही ज्युपिटर दुचाकी ताब्यात घेतली. केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील हा महत्त्वाचा पुरावा मानला जात असून, पुढील तपासात या वाहनाची निर्णायक भूमिका राहणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

गोवा के छह युवक नदी के उफान में फंसे, जंगल में बचाव दल ने सुरक्षित निकाला

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्ह्यात वर्षा पर्यटनासाठी आलेले गोवा येथील सहा युवक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्यामुळे दोडामार्ग येथील जंगलात अडकून पडले होते. संपूर्ण रात्र जंगलात घालवल्यानंतर पहाटे वनविभाग और अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांनी बचाव मोहीम राबवून त्या युवकांची सुखरूप सुटका केली. दोडामार्ग येथील वझरा सकला धबधब्यावर हे तरुण आले होते. मात्र अचानक नदीच्या पाण्याचा प्रवाह वाढल्याने हे युवक जंगलात अडकून पडले होते. नेटवर्क नसल्याने संपर्क ही तुटला होता. त्या युवकांनी आपला चित्तथरारक अनुभव व्हिडिओ द्वारे सोशल मीडियावर व्हायरल केलाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top