icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल में ट्रक ने साइकिल सवार को कुचला; सड़क सुरक्षा पर सवाल

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर एका भरधाव ट्रकने सायकल स्वारास चिरडले. रात्रीच्या सुमारास ही दुर्घटना घडली. तुरीचे पोते घेऊन जाणारा ट्रक सायकल स्वार व्यक्तीच्या अंगावरून गेल्याने रस्ता रक्ता मासाने माखला होता. यवतमाळचा व्हीआयपी रोड म्हणून या परिसराची ओळख आहे. जिल्हाधिकाऱ्यांसह बांधकाम विभागाचे अधिकाऱ्यांची निवासस्थाने व शासकीय कार्यालये या ठिकाणी असताना जड वाहतुकीने सायकल स्वाराचा बळी घेतल्याने हळहळ व्यक्त होत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा सुरक्षित वाहतुकीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. विशेष म्हणजे अपघातस्थळी असलेले हाय मास्ट व रस्ता दुभाजकावरील लाईट बंद होते. शिवाय या ठिकाणी सीसीटीव्ही देखील नसल्याचे निदर्शनास आले.
0
0
Report

गडचिरोली के लिए गोसे खुर्द डैम से 40 क्यूसेक पानी जारी, प्यास बुझाने तैयारी

Bhandara, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवणार भंडारा जिल्ह्यातील गोसे खुर्द धरण. गडचिरोली जिल्ह्याची तहान भागवण्यासाठी सोडण्यात आले गोसे खुर्द धरणाचे पाणी. विदर्भात उन्हाचा कडाखा वाढलेला असून अनेक जिह्यात पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण झाली आहे. त्याचप्रमाणे गडचिरोली जिल्ह्यातील वडसा आरमोरी व गडचिरोलीच्या भागांमध्ये नागरिकांना पिण्याचे पाण्याची अडचण होती ही बाब लक्षात घेत गडचिरोली जिल्हा प्रशासनाने गोसे खुर्द धरण प्रकल्पाला पाण्याची मागणी केली होत. या आधारे आज प्रकल्पातून 40 क्यूसेक पाणी पुरवठा सुरू करण्यात आला आहे. या पाण्याच्या माध्यमातून गडचिरोली जिल्ह्याची तहान भागणार आहे.
0
0
Report

महाराष्ट्र की जिल्हा परिषदों के ऑनलाइन पेमेन्ट ठप, मैन्युअल लेनदेन से काम चले

Chendhare, Maharashtra:राज्यातील जिल्हा परिषदांचे ऑनलाइन आर्थिक व्यवहार ठप्प झाले आहेत. मागील दोन महिन्यांपासून ही परिस्थिती ओढवली आहे. त्यामुळे आर्थिक व्यवहार करणे अडचणीचे झाले आहे. मंत्रालय स्तरावरून एक सेवा पुरवठादार कंपनी आणि बँक ऑफ महाराष्ट्र यांच्यात करार झाला होता. त्यानुसार ही कंपनी मागील चार वर्षांपासून सॉफ्टवेअर सेवा पुरवत होती. परंतु महाराष्ट्र बँक आणि या कंपनीतील वादामुळे कंपनीने 31 मार्चपासून आपली सेवा बंद केली. त्यामुळे जिल्हा परिषदांना मॅन्युअली व्यवहार करावे लागत आहेत. ही प्रक्रिया वेळखाऊ आणि गैरसोयीची ठरत आहे. जिल्हा परिषदेकडून पंचायत समिती, ग्राम पंचायतींना मिळणारा विकास निधी विलंबाने जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

भाजपा के चार पूर्व नगरसेवक शिवसेना में प्रवेश, डोंबिवली राजनीति तेज

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत राजकीय घडामोडींना वेग आला असून भाजपच्या चार माजी नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत डोंबिवली पिंपळेश्वर मंदिर परिसरात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. भाजपचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक, मनीषा धात्रक, श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी मोठ्या संख्येने कार्यकर्ते देखील शिवसेनेत दाखल झाले. केडीएमसी निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने शैलेश धात्रक आणि मनीषा धात्रक यांनी मनसेच्या तिकिटावर निवडणूक लढवली होती. तर श्रीकर चौधरी आणि प्रमिला चौधरी यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरत आपले नशीब आजमावले होते. या पक्ष प्रवेशामुळे डोंबिवलीतील सेनेची राजकीय ताकद वाढणार आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में महायुती उम्मीदवारों के बीच बगावत, सामंत ने अर्ज वापस लेने का दावा किया

Nashik, Maharashtra:विधान परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये महायुतीत बंडखोरी होताना पाहायला मिळत आहे... या बंडखोरीला आळा घालण्यासाठी मंत्री उदय सामंत गेल्या 24 तासांपासून नाशकात तळ ठोकून आहे.... सकाळपासूनच उदय सामंत यांनी शिंदे यांच्या शिवसेनेच्या उमेदवारांसमोर उमेदवारी करणाऱ्या महायутиच्या उमेदवारांची भेट घेतली आहे... याबाबत बोलताना उदय सामंत यांनी तीन वाजेपर्यंत हे सगळे उमेदवार अर्ज मागे घेतील असा विश्वास व्यक्त केलाय... उद्या विधान परिषदेच्या उमेदवारी अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे या अनुषंगाने उदय सामंत हे नाशकात आहेत... गिरीश महाजन यांचे निकटवर्तीय असलेले गणेश गीते आणि गोकुळ गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय... याबाबत देखील गिरीश महाजन आणि बोलणं झालं असून याबद्दल योग्य तो निर्णय होणार असल्याचा विश्वास उदय सामंत यांनी व्यक्त केलाय...महायुतीमध्ये सगळ्या ठिकाणी अलबेल सुरू असून महायुतीमध्ये मध्ये कुठल्या प्रकारची नाराजी नाही असे देखील सामंत म्हणालयेत.. उद्या तीन वाजेपर्यंत पॉझिटिव्ह असा रिझल्ट असेल असं उद्या सामंत म्हणालय
0
0
Report
Advertisement

पंकजा मुंडे ने खेत में ट्रैक्टर चलाकर खेती का संदेश दिया

Beed, Maharashtra:‘बापाचा वारसा, मातीतला विश्वास!’ पंकजा मुंडेंनी ट्रॅक्टर हाती घेत शेतात केली नांगरणी; व्हिडिओ समोर आल्यानंतर राज्यभर चर्चेला उधाण..! ANC- लोकनेते दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या पुण्यतिथीनिमित्त पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी आज केलेला संकल्प आज प्रत्यक्षात उतरवला. "मी शेतीकडे अधिक भर देणार आणि ट्रॅक्टरही चालवणार," अशी घोषणा त्यांनी केली होती. त्यानुसार आज त्या थेट परळीच्या देशमुख टाकळी गावातील एका शेतात उतरल्या आणि स्वतः ट्रॅक्टर चालवत नांगरणी केली. पंकजा मुंडे यांच्या हाती ट्रॅक्टरचे स्टेरिंग पाहून उपस्थित अनेकजण आश्चर्यचकित झाले. त्यांच्या डाव्या बाजूला त्यांच्या मुलगा तर उजव्या बाजूला त्यांच्या भगिनी माजी खासदार प्रीतम मुंडे बसल्या होत्या. कुटुंबीयांच्या उपस्थितीत त्यांनी शेतात नांगरणी करत शेतीशी असलेले नाते अधिक दृढ असल्याचा संदेश दिला. गोपीनाथ मुंडे यांनी आयुष्यभर जपलेल्या ग्रामीण आणि शेतकरी विचारधारेचा वारसा पुढे नेत असल्याचे या कृतीतून दिसून आले. पंकजा मुंडे यांच्या या अनोख्या संकल्पामुळे केवळ जिल्ह्यातच नव्हे, तर संपूर्ण राज्यभर चर्चेला उधाण आले असून सामाजिक माध्यमांवरही या उपक्रमाची मोठी चर्चा रंगली आहे. सेंद्रिय शेतीकडे वळले पाहिजे, सरकार शेतकऱ्यांसाठी सातत्याने काम करत आहे अशा भावना मंत्री पंकजा मुंडे यांनी व्यक्त केल्या. बाईट: पंकजा मुंडे, मंत्री
0
0
Report

मुंबई महानगरपालिका निधि आवंटन पर विरोधियों के आरोप, कांग्रेस नेता ने अधिकारीयों पर सवाल उठाए

Mumbai, Maharashtra:मुंबई महानगरपालिकेत निधी वाटपावरून विरोधक पालिका प्रशासनावर आरोप करीतच आहेत. अश्यात आता पालिका अधिकारी विरोधी नगरसेवकांचे काम ही करीत नसल्याच्या आरोप काँग्रेस नेते नसीम खान यांनी केला आहे. आज कुर्ला विभागातील विविध समस्यांबाबत त्यांनी परिमंडळ पाच च्या उपायुक्त संध्या नांदेडकर यांची भेट घेतली. या वेळी त्यांनी पालिका एल विभागाच्या अधिकाऱ्यांची तक्रार केली. पालिका भ्रष्टाचाराचा अड्डा झाला आहे. अधिकाऱ्यांनी सर्व लोकप्रतिनिधीना समान वागणूक द्यायला हवी, अधिकाऱ्यांची व्हिजिलन्स च्या माध्यमातून चौकशी करायला हवी अशी प्रतिक्रिया या वेळी नसीम खान यांनी दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top