445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Kolhapur में अवैध गर्भपलन रैकेट का पर्दाफाश, 4 गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात गर्भलिंग निदानाच्या अवैध रॅकेटविरोधात आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. भोगावती परिसरातील एका केंद्रावर टाकलेल्या छाप्यात गर्भलिंग चाचणीसाठी वापरले जाणारे मशीन, औषधांचा साठा जप्त करण्यामुले चौघांना अटक करण्यात आली आहे. आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने संयुक्तपणे ही कारवाई केली. कोल्हापूर जिल्ह्यातील भोगावती इथ अवैधरित्या गर्भलिंग निदान सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिस आणि आरोग्य विभागाला मिळाली होती. त्यानुसार आरोग्य विभाग आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने संयुक्त छापा टाकला. या कारवाईत गर्भलिंग निदानासाठी वापरले जाणारे मशीन, काही गोळ्या आणि अन्य साहित्य जप्त करण्यात आले. या प्रकरणी महेश पाटील, अनिल टिपूगडे, सुनील पाटील और श्रीमंत पाटील या चौघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याविरोधात करवीर पोलीस ठाण्यात संबंधित कायद्यांअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या महेश पाटील हा राधानगरी तालुक्यातील रहिवासी असून, त्याच्यावर यापूर्वीही अशाच स्वरूपाचे दोन गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणामागे आणखी कोणी सहभागी आहे का, तसेच या रॅकेटचे इतर जिल्ह्यांशी काही संबंध आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.0
0
Report
रोहित पवार ने देहू संस्थान को 11 किलो चांदी अर्पण किया
Varsoli, Maharashtra:रोहित पवार कुटुंबांनी देहू संस्थानमध्ये संत तुकाराम महाराजांच्या चरणी पालखी रथाच्या कळसासाठी तब्बल ११ किलो चांदी अर्पण केली. ही चांदी संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात देहू संस्थानकडे विधिवत सुपूर्द करण्यात आली. रोहित पवार यांनी सहपरिवार देहूतील मुख्य मंदिरात जाऊन श्री पांडुरंगाचे दर्शन घेतले आणि संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिरात नमस्ते आशीर्वाद घेतला. भाविकांचीही मोठी उपस्थिती होती.0
0
Report
नेरुल एलपी के पास दो विद्यार्थिनी को बिजली का झटका, अस्पताल में भर्ती
Navi Mumbai, Maharashtra:नेरूळ एलपी जवळ दोन विद्यार्थिनींना लागला विजेचा धक्का. विद्युत वाहिनी अचानक कट झाल्यामुळे दोन मुलींना विजेचा धक्का लागलाय. एका मुलीला डी वाय पाटील रुग्णालयात तर दुसऱ्या मुलीला वाशी मनपा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलेय. प्रशासकीय अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल.0
0
Report
Advertisement
ओबीसी प्रदर्शन: जातिनिहाय जनगणना और आरक्षण बचाने की मांग
Akola, Maharashtra:अकोला जिला कार्यालय के सामने आज सकल ओबीसी समाज और ओबीसी हक्क संरक्षण परिषदे की ओर से विभिन्न मांगों के लिए धरना प्रदर्शन किया गया। ओबीसी की देशभर में जातिनिहाय जनगणना करानी है, ओबीसी आरक्षण संरक्षण उपसमिति रद्द करनी है, जनसंख्या के अनुपात में आरक्षण लागू करें, तथा आंदोलन के कार्यकर्ताओं के विरुद्ध लगे मुकदमे वापस लेने सहित प्रमुख मांगें सामने आईं। अनुसूचित जाति–अनुसूचित जनजाति के समान ही ओबीसी की भी औपचारिक जातिनिहाय जनगणना करानी चाहिए—ऐसी ठोस भूमिका आंदोलनकर्ता ने रखी। ओबीसी महाराष्ट्र राज्य के प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे के नेतृत्व में यह आंदोलन हुआ। शासन इसे तात्कालिक सकारात्मक निर्णय दे, अन्यथा राज्यभर में तीव्र आंदोलन शुरू किया जाएगा—इस चेतावनी के साथ।0
0
Report
नागपुर महाल हिट एंड रन में बुजुर्ग की मौत, कार अब तक नहीं मिली
Nagpur, Maharashtra:नागपूर महाल हीट अँड रन प्रकरणी 25 दिवसांनंतर वृद्धाला धडक देणारी ती कार आणि आरोपींचा अजून शोध लागला नाही... मुकुंद बाभरे या 72 वर्षीय वृद्धाला 7 जूनला बडकस चौकाकडून आयचित मंदिरकडे सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान बेदरकारपणे कार चालवणाऱ्याने उडविले... या अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला -- अपघाताला सुमारे पंचवीस दिवस झाले तरी अजूनही धडक देणारी ती कार शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही महत्त्वाचं म्हणजे बळकस चौक ते आयचीत मंदिर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय लगतचा परिसर आहे.... अतिशय संवेदनशील भाग आहे.... मात्र तेथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अजून पर्यंत पोलिसांना धडक देणारा कारचा शोध घेण्यात यश मिळालेले नाही... धीम्या तपासगतीमुळे अनेक सवाल उपस्थित होत असताना पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही सुरू असल्याचा दावा केलाय... दरम्यान व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या या परिसरातील सीसीटीव्हीच्या दर्जाबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे... सीसीटीव्ही कुचकामी असल्याचा आरोप होतोय या हीट अँड रन प्रकरणाच्या तपासाबाबत आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडून0
0
Report
नवी मुंबई में भारी बारिश से जलजमाव, कई इलाके पानी में डूबे
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग सकाळपासून पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे नवी मुंबईतील अनेक सखल भागात साचले पाणी. नवी मुंबईतील अनेक रस्ते जलमय नवी मुंबईतील वाशी येथे मोठ्या प्रमाणावर रस्त्यांवरती साचले पाणी नवी मुंबई महानगरपालिकेच्या नाले सफाईचा उडाला बोजवारा0
0
Report
Advertisement
कर्जमाफी समेत अन्य मांगों पर किसान रोड जाम, आसेगाव पूर्णा टी-पॉइंट
Amravati, Maharashtra:कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक; आसेगाव पूर्णा टी-पॉईंटवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको असेगाव पूर्णा टी-पॉईंट येथे लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. सरसकट शेतकरी कर्जमाफी, पिकविमा योजनेचा लाभ, शेतीमालाला हमीभाव तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्या अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतुकीवर काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाम लागला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.0
0
Report
पंढरपूर में प्रदक्षिणा जोखिम: सड़कों पर गड्ढे भक्तों के पैर कुरेद रहे
Pandharpur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या संत पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी एवढे आठ दिवस शिल्लक राहिले आहे. मात्र पंढरपूर मधून स्थानिक प्रशासन अद्याप तयारीला लागलेले नाही. पंढरपूर मध्ये आलेला वारकरी हा नगर प्रदक्षिणा केल्याशिवाय त्याची वारी पूर्ण होत नाही. मात्र पंढरपूर मधील प्रदक्षिणा मार्गावर खड्डे आहेत. रस्त्यावरची खडी उचकटली आहे. त्यामुळे अनवाणी प्रदक्षिणा घालणाऱ्या भाविकांच्या पायाला त्रास होतो. याबाबत वारकरी संप्रदायातील मंडळींनी नाराजी व्यक्त केली आहे.0
0
Report
साखर उद्योग संकट से जिल्हा बैंकों को बड़ा आर्थिक खतरा: पूर्व मंत्री की चेतावनी
Shirur, Maharashtra:राज्यातील आणि देशातील साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीत असून, यामुळे जिल्हा बँकांवरही गंभीर आर्थिक संकट ओढवू शकते, असा थेट इशारा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. वळसे पाटील यांनी बँकेच्या आर्थिक ताकदीचा हिशोब मांडताना सांगितले की, १९९१ मध्ये जिल्हा बँकेत ३५० कोटींच्या ठेवी होत्या, ज्या आज साडेसतरा हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. मात्र, बँकेने एकट्या साखर उद्योगाला ७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. जर कारखाने अडचणीत आले आणि हे पैसे वसूल झाले नाहीत, तर जिल्हा बँका मोठ्या चक्रव्यूहात अडकतील. यासोबतच, यंदा 'अल निनो'च्या सावटामुळे राज्यात दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते आणि जागतिक घडामोडींमुळे आर्थिक मंदीचा धोकाही निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
विदर्भ में अगले 72 घंटे में मौसम बदलेगा: नागपुर समेत चार जिलों में ऑरेंज अलर्ट
Nagpur, Maharashtra:नागपुर विदर्भ में अगले 72 घंटे के लिए पावस का ऑरेंज अलर्ट। गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर, वर्धा नागपुर में पावस का ऑरेंज अलर्ट। बंगाल की खाड़ी में निम्न दाब के क्षेत्र बनने से विदर्भ में तेज बारिश होगी। इस बीच नागपुर क्षेत्रीय मौसम विभाग के मौसम विशेषज्ञ प्रवीन कुमार से हमारी प्रतिनिधियों ने बातचीत की। बाइट — प्रवीन कुमार, मौसम विशेषज्ञ नागपुर क्षेत्रीय मौसम विभाग।0
0
Report
पेरणीच्या तोंडावर बैलजोडी अडवण्याचा मामला: शेतकर्यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला
Latur, Maharashtra:लातूर जिलेतील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्यावर पेरणीच्या तोंडावर मोठं संकट उडवलं आहे... बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परत येत असताना काही गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून बैल अडवले. त्यानंतर या प्रकरणी कासार शिरशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैल गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. हे बैल शेतीसाठीच खरेदी केले होते, असा दावा राम बिराजदार यांनी केला आहे. इतकेच नाही, तर गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना बैलजोडी नसल्याने शेतीची कामे कशी करायची, असा सवाल हा शेतकरी उपस्थित करत आहे. याच संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.0
0
Report
शिरूर बाजार समिति चुनाव: दिलीप वळसे पाटील ने प्रचार मैदान संभाला
Shirur, Maharashtra:शिरूर कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीच्या प्रचाराला आता वेग आला असून, महायुतीच्या प्रचारासाठी राज्याचे माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी स्वतः मैदानात उतरल्याचे चित्र दिसत आहे. मलठण येथे आयोजित बैठकीत वळसे पाटील यांनी उमेदवारांसह विविध सहकारी संस्थांच्या मतदारांची उपस्थिती तपासून निवडणुकीची रणनीती आखली. या बैठकीमुळे शिरूर बाजार समितीची निवडणुעקी आता राज्यातील राजकीय वर्तुळाचेही लक्ष वेधून घेत असल्याची चर्चा रंगली आहे。0
0
Report
Advertisement
दो घंटे की बारिश ने स्कूल में पानी घुसा दिया, बच्चों के लिए तात्कालिक छुट्टी
Kalyan, Maharashtra:दोन तासांच्या पावसात शाळा पाणी शिरले.. उंबर्डेतील विद्यार्थ्यांना द्यावी लागली तातडीची सुट्टी. कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरातील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेत अवघ्या दोन तासांच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली. शाळेच्या पटांगणासह वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरल्याने प्रशासनाला शाळेला सुट्टी देण्याची वेळ आली आहे. केडीएमसी नाले सफाई करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहे मात्र दोन तासाच्या जोरदार पावसामुळे शाळेत पाणी साचले आहे. शाळेच्या मागे असलेला नाला साफ न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.0
0
Report
धाराशिव में अतिवृष्टि: एक साल बाद भी किसानों को घोषित राहत अभी तक नहीं मिली
Dharashiv, Maharashtra:धाराशिव एक वर्ष उलटलं... पण अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप मदतीची प्रतीक्षा... धाराशिवमध्ये तब्बल 9 हजार हेक्टर जमीन खरडून गेली... तीन लाखांच्या मदतीची घोषणा हवेतच... 27 गायी वाहून गेल्या... मदत फक्त 2 लाख 22 हजार... सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप... अँकर : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं. तब्बल नऊ हजार हेक्टरवरील सुपीक जमीन खरडून गेली... अनेकांची जनावरं वाहून गेली... तर पिकांचंही मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा केली होती. मात्र एक वर्ष उलटलं तरी अनेक शेतकरी मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक गावांमध्ये नाले-ओढे दुथडी भरून वाहिले... रस्ते वाहून गेले... आणि हजारो हेक्टरावरील सुपीक शेती अक्षरशः खरडून गेली. जिल्ह्यात जवळपास 9 हजार हेक्टर क्षेत्रावरील जमीन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांची शेती आजही पूर्ववत झालेली नाही. या नुकसानीनंतर राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर केली होती. मात्र घोषणा होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरी अनेक पात्र शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. "घोषणा झाल्या... पण मदत मिळाली नाही," अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. भूम तालुक्यातील विश्वनाथ दातखिळे यांचं उदाहरण तर अधिक वेदनादायी आहे. अतिवृष्टीत त्यांच्या 27 गायी वाहून गेल्या, मात्र या मोठ्या नुकसानीच्या बदल्यात त्यांनी शासनाकडून केवळ 2 लाख 22 हजार रुपयांची मदत मिळाली. झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प असल्याचं ते सांगतात. दरम्यान, कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलीली मदत तातडीने मिळावी, यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात अनेक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचं चित्र आहे. एकीकडे शेती खरडून गेली... दुसरीकडे जनावरांचं नुकसान... आणि त्यातच मदतीची प्रतीक्षा... अशा दुहेरी संकटात धाराशिवचा शेतकरी अडकला आहे. सरकारने आता कागदोपत्री घोषणा न करता तातडीने मदत वितरित करावी, अशीच मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एक वर्षापूर्वी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे. घोषणांची पूर्तता कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव. काहींचा परिचय: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 9 हजार हेक्टर शेती क्षेत्र खरडून गेले. 7,500 हून अधिक शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले. जिरायत (कोरडवाहू) जमीन : प्रति हेक्टर ₹3 लाख मदत जाहीर. बागायत जमीन : प्रति हेक्टर ₹5 लाख मदत जाहीर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात जमा करण्याची घोषणा. अनेक शेतकऱ्यांना घोषित निकषानुसार पूर्ण मदत मिळालेली नाही, अशी तक्रार. काहींना अंशतः मदत, तर अनेक शेतकरी अजूनही पूर्ण मदतीच्या प्रतीक्षेत.0
0
Report
टीसी के सवाल पर छात्र ने शिक्षक पर चाकू से हमला, स्कूल में हड़कंप
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शाळेत विद्यार्थी घडतात , संस्कार रुजतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात, मात्र छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत घडलेली घटना या संस्कृतीलाच हादरा देणारी ठरली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वतःच्या शिक्षकावर थेट चाकूने हल्ला केला. तुझ्यामळे परीक्षेत नापास झालो या रागातून या विद्यार्थ्याने गुरुलाच भोसकले.... हे धक्कादायक सीसीटीव्ही पुढं आले आणि शाळा विश्वालाच धक्का बसला, वाद तसा किरकोळ, 2024 मध्ये हा विद्यार्थी या शाळेत नवव्या वर्गात होता त्यात तो 2 विषयात नापास झाला आणि त्याला त्याच वर्गात बसावे लागले त्यात गेल्यावर्षी त्याने शाळा सोडून दिली आणि मंगळवारी तो शाळेत टीसी घ्यायला धडकला, सुरूवातीला मुख्याध्यापक सोबत वाद घातल्यानंतर त्याने वर्ग शिक्षकाला बोलवायला सांगितले आणि शिक्षक येताच त्याने त्यांना चाकूने भोसकले, शिक्षकाने कसाबसा बचाव केला तर मुख्याध्यापकांने कसाबसा बचाव केला यानंतर हा मुलगा फरार झाला पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून त्याला ताब्यात घेतले आहे.... या घटनेने शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, तर संवादाचा अभाव, आणि वारंवार हिंसक गोष्टी पाहिल्याने मुलं आक्रमक होत असल्याचे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.. सध्या हा शिक्षक जन्म मृत्यू सोबत लढतोय, रक्तदाबाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीय त्यामुळं संघर्ष सुरू आहे मात्र जो शिक्षक विद्यार्थी घडवतो त्यालाच विद्यार्थ्यांच्या रागाचा असा सामना करावा लागत आहेय ही समाज म्हणून गंभीर, आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे0
0
Report
Advertisement
