icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तुकाऱाम महाराज के 341वें पालखी सोहळे की तैयारी; देहू में नई चांदी का रथ

Varsoli, Maharashtra:संत तुकाराम महाराजांच्या ३४१ व्या पालखी सोहळ्याचे प्रस्थान ७ जुलै रोजी होणार असून, त्यासाठी देहू नगरीमध्ये जय्यत तयारी सुरू आहे. वारकरी संप्रदायाचे श्रद्धास्थान असलेल्या या पालखी सोहळ्याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. यंदाच्या पालखी सोहळ्याचे विशेष आकर्षण म्हणजे संत तुकाराम महाराजांच्या पादुका देहू ते पंढरपूर नेण्यासाठी नवीन चांदीचा रथ तयार करण्यात येत आहे. या रथामुळे यंदाचा पालखी सोहळा अधिक भव्य आणि दिमाखदार ठरणार आहे. या नव्या रथाच्या निर्मितीसाठी विश्वस्तांकडून युद्धपातळीवर काम सुरू असून, राजस्थानमधून आलेले कुशल कारागीर रथाच्या सुट्या भागांवर आकर्षक कलाकुसर करत चांदी मढविण्याचे काम करत आहेत. रथावरील नक्षीकाम, कलात्मक रचना आणि पारंपरिक शैली यामुळे हा रथ वारकऱ्यांसाठी विशेष आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत आहे. संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला महाराष्ट्राच्या भक्तीपरंपरेत अनन्यसाधारण महत्त्व आहे. त्यामुळे यंदाचा ३४१ वा पालखी सोहळा नव्या चांदीच्या रथामुळे अधिकच लक्षवेधी ठरणार असून, देहू नगरी भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाली आहे.
0
0
Report
Advertisement

जालना में 3 दिन से लापता युवक का खेत में शव, पत्नी ने हत्या का आरोप

Jalna, Maharashtra:जालना : 3 दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा मृतदेह शेतशिवारात आढळला. पत्नीने हत्या केल्याचा आरोप केला. वैद्यकीय अहवाल आल्यावर सत्य उघडेल, असे पोलिसांनी सांगितले. 3 दिवसांपासून बेपत्ता 34 वर्षीय कैलास गिरी यांच्या मृतदेहाची नोंद जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील गाडेगव्हाण येथे झाली. गिरी हे मागील तीन दिवसांपासून बेपत्ता होते. घरच्यांनी त्यांचा शोध घेतला, परंतु ते आढळून आले नाही. शेवटी गिरी यांच्या पत्नीने तेथील टेंभुर्णी पोलीस ठाण्यात मिसिंग तक्रार दाखल केली. नंतर पोलिसांनी गावातील शिवारात मृतदेह सापडल्याची माहिती घेतली. शवविच्छेदनासाठी मृतदेह जाफ्राबाद ग्रामीण रुग्णालयात पाठवला गेला. गावातील नागरिकांनी जागेच्या वादातून पतीची हत्या केली असल्याचा आरोप मयताच्या पत्नीने केला. शवविच्छेद अहवाल आणि पोलिस तपासानुसार सत्य बाहेर येईल, त्यानुसार दोषींवर कारवाई केली जाईल.
0
0
Report

कल्याण पूर्वी में 15 वर्षीय लड़की के साथ दो पुरुषों का लैंगिक अत्याचार; गिरफ्तारी

Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील धक्कादायक घटना 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर 60 वर्षीय दो नराधमांनी केला लैंगिक अत्याचार कोळशेवाडी पोलिसांनी आरोपीला बेड्या घातल्या. कल्याणपूर्व येथील कोळसेवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत हा प्रकार घडला. घरातच मुलीला आरडाओरडा सुरू असताना आजूबाजूला रहिवाशांनी माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी दखल घेऊन मुलीची सुटका केली व अख्तर मनियार व सलीम शेख या दोघांना ताब्यात घेतलं. दोघे रात्रीच्या वेळी एका 15 वर्षांच्या मुलीला घरात घेऊन आले होते व त्यांच्यावर लैंगिक अत्याचार केला. मुलगी गरीब कुटुंबातील असल्याचं सांगितलं जातं. आरोपी मणियार हा एपीएमसी मार्केटमध्ये चहाचा व्यवसाय करतो तर सलीम रिक्षा चालक आहे. या प्रकारानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली व पुढील तपास सुरु केला.
0
0
Report

लोणावळा में मानसून का जोरदार आगमन, पर्यटन-व्यवसाय में नई उम्मीद

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात अखेर मान्सूनचे जोरदार आगमन झाले असून मुसळधार पावसाने संपूर्ण परिसराला दिलासा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे लोणावळ्यातील पर्यटन व्यवसायावर परिणाम झाला होता आणि पर्यटकांनीही लोणावळ्याकडे पाठ फिरवली होती. मात्र आता दमदार पावसामुळे वातावरण प्रसन्न झाले असून प्रसिद्ध चिक्की व्यावसायिकांसह पर्यटनाशी संबंधित व्यावसायिकांनी पावसाचे उत्साहात स्वागत केले आहे. येत्या काही दिवसांत पर्यटकांची संख्या वाढेल, अशी आशा स्थानिक व्यावसायिकांनी व्यक्त केली आहे..
0
0
Report
Advertisement

ओमराजे निंबाळकर: 2006 से चले संघर्ष पर अदालत के फैसले पर राजनीतिक सफाई

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सगळ्यांशी चर्चा करून मतं जाणून घेतल्यानंतर उद्या मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार - खा. ओमराजे निंबाळकर *ओमराजे निंबाळकर बाईट पॉइंटर्स* - केवळ अर्थकारण आणि सत्तेच्या राजकारणावर फक्त मतं टाकली जाणार असतील आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी नेमकी काय भूमिका घ्यायची - आम्ही दिलेले स्थानिक स्वराज्य संस्थांचे उमेदवार वाईट माणसं होती का? जी माणसं काम करणारे होती तुमच्यासाठी वेळ देणारी होती *ऑन कोर्ट निकाल* - माझ्या मतदारसंघातील सर्वच कार्यकर्त्यांना मी आज बोलावलेल आहे - सगळ्यांशी चर्चा करून मतं जाणून घेतल्यानंतर उद्या मी माझी राजकीय भूमिका स्पष्ट करणार - 3 जून 2006 पासून 20 वर्ष 17 दिवसांचा संघर्ष होता... - सुरुवातीला महाराष्ट्र पोलीस या तपासात व्यवस्थित तपास करत नाहीत... यासाठी ही केस सीबीआय कडे वर्ग करण्याची मागणी केली होती - सदर प्रकरणातील आरोपी हे माजी गृहमंत्री असल्याने त्यामुळे पोलीस त्याचा तपास करत नाहीत - पोलीस तपास करत नाहीत हे सिद्ध झाल्यानंतर उच्च न्यायालयाने तपास सीबीआय कडे दिला - सीबीआयने तपास पूर्ण केला मात्र कोर्ट वैमनस्य होता का हे मान्य करत.. हत्याकांडाचा उद्देश होता का? हे देखील मान्य करत - सीबीआयने ज्या पद्धतीने तपास समोर आणला होता त्याच्या बाबतीत निकालाची निराशा झाली आहे - फार धक्कादायक निकाल आहे... यापैकी कोणीच हत्या केली नाही तर यापैकी आरोपी कोण आहे? हे घडलं कस? - मला वाटतं हे दुर्दैवी आहे याच निकालाच्या विरोधात उच्च न्यायालयात दाद मागणार आहे - निकाल विरोधात जाणे म्हणजे कुटुंबासाठी खूप मोठा आघात आहे - जे दुःख 3 जून 2006 रोजी भोगलं तेच दुःख डबल भोगण्याची वेळ आली -आई भयंकर ही झाली होती.... न्याय मिळणार कसा? - मला देखील दुःख वाटते माझ्यासारख्या माणसाला अविरत सेवा करून वीस वर्षानंतर न्याय मिळू शकत नसेल तर नेमकं दाद मागायची कुठे - हा यक्ष प्रश्न आहे... - माझ्या राजकीय जीवनाची सुरुवात केवळ आणि केवळ पवनराजे निंबाळकर यांची हत्या कुठल्या कारणासाठी झाली.. तिथूनच माझा राजकीय प्रवास सुरू झाला - सर्वसामान्य जनतेने त्या ठिकाणी मला तळ हाताच्या फोडाप्रमाणे जपलेल आहे - आज राजकारणात राहत असताना सर्वसामान्य नागरिकांच्या मध्ये राहणं हे आद्य कर्तव्य आहे... ते कर्तव्य प्रामाणिकपणे पार पाडत आहे *ऑन ट्रोलिंग* - ट्रोलिंग वाल्यांनी माणसावर काय परिस्थिती आहे याचा देखील विचार करणं गरजेचं आहे - सगळं काही 24 तास माणूस राजकीय विचाराने काम करत नसतो - दुर्दैव असा आहे की मी राजकारणात आहे.. ट्रोलिंग करायला मर्यादा असतात... - माझ्याबद्दल काही बोलायचं असेल करायचं असेल तर निश्चितपणे करा - अश्लील भाषा बोलली जात असेल तर ते दुर्दैवी आहे... मग ते कोणाच्याही बाबतीत - लोकसभेचा सदस्य म्हणून माझी दुसरी टर्म आहे.... विधानसभेचा सदस्य म्हणून मी काम केलेला आहे... - सामान्य जनतेच्या लोकप्रतिनिधी कडून काही अपेक्षा असतात - आम्ही सत्तेत नसल्यामुळे किंवा निधीच्या बाबतीत केली जाणारी कोंडी.... - साधा ट्रान्सफॉर्मर दयायचा म्हणला की शेतकऱ्याला प्रत्येक वर्षी इस्टिमेट बनवावं लागतं... मग परत पुढच्या वर्षी तेच इस्टिमेट तयार करावा लागतो... *ऑन उद्धव ठाकरे संपर्क* - मी याबाबत संपूर्ण सविस्तर बोलतो आता मला मेळाव्यासाठी वेळ देणे गरजेचे आहे बाईट - ओमराजे निंबाळकर ( खासदार, धाराशिव लोकसभा )
0
0
Report

रायगढ़ में मुस्लिम समुदाय ने रोहा-आष्टमी मैदान पर पावस के लिए सामुदायिक नमाज़ से दुआ मांगी

Chendhare, Maharashtra:पावसासाठी मुस्लिम बांधवांची ईश्वराकडे आर्जव. सामुदायिक नमाज पठण करून प्रार्थना रोह्यातील मैदानात अदा केली नमाज. रायगड जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने रोहा-अष्टमी येथील मुस्लिम समाज बांधवांनी पावसासाठी विशेष सामुदायिक नमाज अदा करून अल्लाहकडे दुवा केली. तीन दिवस उपवास पाळल्यानंतर रविवारी गौळवाडी रोडवरील क्रिकेट मैदानावर हा धार्मिक कार्यक्रम पार पडला. जामे मस्जिद रोहाचे मौलाना सादिक मुकादम यांच्या मार्गदर्शनाखाली शेकडो मुस्लिम बांधव सहभागी झाले होते. नमाजनंतर पावसासाठी विशेष प्रार्थना करण्यात आली. लांबलेल्या पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीत या प्रार्थनेची परिसरात चर्चा होत आहे.
0
0
Report

पनवेल-नेरुळ में विशेष नमाज-ए इस्तिस्का, भारी मुस्लिम सहभागिता

Navi Mumbai, Maharashtra:बारिश की रहमत के बहाने देश में शांति और व्यवस्था, साथ ही किसानों की समृद्धि के लिए आज पनवेल और नेरुळ में विशेष नमाज-ए-इस्तिस्का आयोजित की गई थी। इस सामूहिक प्रार्थना में पनवेल और Navi Mumbai के विविध हिस्सों से मुस्लिम समुदाय के लोग बड़ी संख्या में शामिल हुए। इस अवसर पर श्रद्धा और एकजुटता के साथ मौजूद लोगों ने अल्लाह तआला से लाभदायक बारिश के लिए दुवा की। नमाज के बाद देश में शांति, आम जनता के कल्याण, किसान की मेहनत को सफलता मिले, सूखे की स्थिति दूर हो और समस्त मानवजाति पर कृपा हो—इसके लिए विशेष प्रार्थना की गई।
0
0
Report
Advertisement

मोरे डैम की मुख्य जलवाहिनी से लाखों लीटर पानी चोरी, 39.89 लाख रुपए के नुकसान

Navi Mumbai, Maharashtra:मोरेबे धरणातून पानी पुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीला अनधिकृतपणे बेकायदेशीर जोडणी करून लाखों लिटर पाणी चोरी केल्याचा एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. खांदेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल झाला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पाणी पुरवठा विभागाच्या तपासणीत अज्ञात व्यक्तींनी पनवेल मधील विचु़ंबे व देवदगाव हद्दीत एक्सप्रेसवेच्या बाजूला असलेल्या मुख्य जलवाहिनीच्या वॉशआउट व्हॉल्व्ह तोडून अनधिकृत नळजोडणी करून पाणी चोरी केल्याचे निदर्शनास आले. अधिक तपासात सदर जलवाहिनीवरून ३९,८९,५८०/- रुपये किमतीच्या ३,३२,४६५ घनमीटर पाण्याची चोरी करण्यात आल्याचे आढळून आले आहे. या पाणी चोरीमुळे संपूर्ण नवी मुंबईच्या पाणी पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचे आढळून आले.
0
0
Report

गडचिरोली नगर परिषद पोटनिवडणुकी में भाजपा अंकुश नैताम 264 मतों से विजयी

Gadchiroli, Maharashtra:टायटल:---गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्य पोटनिवडणुकीत 264 मतांनी भाजपचे अंकुश नैताम विजयी, काँग्रेस उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव तर अपक्ष उमेदवार बावणे यांना फक्त 98 मते, माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर प्रभाग 9 मध्ये झाली पोट निवडणूक अँकर:-- गडचिरोली नगर परिषदेच्या सदस्यपद पोटनिवडणुकांत भाजपने काँग्रेसला जोरदार धक्का दिलाय. प्रभाग क्रमांक 9 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अंकुश नैताम यांनी तब्बल 264 मतांच्या फरकाने विजय मिळवलाय. काँग्रेसचे उमेदवार विनोद भांडेकर यांचा पराभव झाला असून अपक्ष उमेदवार बावणे यांना अवघी 98 मतांवर समाधान मानावं लागलंय. माजी सभापती मुक्तेश्वर काटवे यांच्या निधनानंतर ही पोटनिवडणूक घेण्यात आली. विशेष म्हणजे या निवडणुकीत तब्बल 75 टक्के मतदान झालं होतं आणि 2620 मतदारांनी आपला हक्क बजावला होता. दरम्यान, विजयाचा निकाल जाहीर होताच भाजप कार्यकर्त्यांनी जल्लोषाला सुरुवात केली. ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणाबाजी करत विजयी उमेदवार अंकुश नैताम यांची शहरातून भव्य विजय रॅली काढण्यात आली. गडचिरोलीतील या विजयामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला असून आगामी स्थानिक राजकारणात या निकालाची मोठी चर्चा रंगली आहे.
0
0
Report
Advertisement

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर की जतन संवर्धन शुरू, 23-24 जून दर्शन बंद

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या जतन संवर्धनासाठी उद्या रात्रीपासून होणार सुरुवात, पुरातत्त्व विभागाचे अधिकारी करणार जतन संवर्धनाचे काम, 23 आणि 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे राहणार बंद श्री विठ्ठल रुक्मिणीच्या जतन संवर्धनाच्या कामास उद्या 22 जून रात्री दहा वाजल्यापासून सुरुवात होणार आहे पहिल्यांदा मूर्तीची स्वच्छता पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडून केली जाणार आहे.यानंतर 23 जून आणि 24 जून या काळामध्ये मूर्तीवर लेखन प्रक्रिया केली जाणार आहे. यामुळे मूर्तीचे जतन संवर्धनाचे काम होणार आहे. 23 24 जून श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन पूर्णपणे बंद असणार आहे. त्यामुळे भाविकांनी याची नोंद घेण्याच आवाहन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी केला आहे.
0
0
Report

धाराशिव में ओमराजे निंबालकर कार्यकर्ता संवाद, राज्य की राजनीति पर केंद्रित चर्चा

Dharashiv, Maharashtra:धाराशिवकडे राज्याचं लक्ष; खासदार ओमराजे निंबाळकर आज कार्यकर्त्यांशी साधणार संवाद. गोवर्धनवाडीत बैठकीची जय्यत तयारी पूर्ण; दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते राहणार उपस्थित. ओमराजे निंबाळकर नेमकी कोणती भूमिका मांडणार? बैठकीत काय आवाहन करणार याची उत्सुकता शिगेला. धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महत्त्वपूर्ण बैठकीकडे आता अवघ्या राज्याचं लक्ष लागलं आहे. ओमराजेंच्या मूळ गाव असलेल्या गोवर्धनवाडीत आज दुपारी चार वाजता या बैठकीला सुरुवात होणार असून त्याची सर्व तयारी पूर्ण झाली आहे. विशेष म्हणजे दोन्ही शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. बदललेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर ओमराजे निंबाळकर कार्यकर्त्यांना नेमकं काय आवाहन करणार, तसेच पुढील राजकीय दिशा काय असणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

रायगढ़ के स्विमिंग पूल 30 जून तक बंद, जल संकट के कारण आदेश जारी

Chendhare, Maharashtra:रायगढ़ जिले के स्विमिंग पूल यापुढे ३० जून पर्यंत बंद रहेंगे। रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी तसे आदेश जारी केलेत। जिल्ह्यात कमी पर्जन्यमान, मान्सूनच्या आगमनास झालेला विलंब आणि धरणांतील घटता जलसाठा या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आलााय. जिल्ह्यातील सार्वजनिक पाणीपुरवठा योजनांवर अवलंबून असलेले सर्व जलतरण तलाव ३० जूनपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत केवळ ८.९ मि.मी. पावसाची नोंद झाली असून लघुप्रकल्पांमध्ये सरासरी १७.८९ टक्के तर हेटवणे धरणात २७.३१ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून नागरिकांनी पाण्याचा काटकसरीने वापर करावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top