445001
यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
खालापूर फूड मॉल में भारी पानी जमा, खरीदारी और सुरक्षा के लिए चुनौती
Mumbai, Maharashtra:खालापूर येथील फूड मॉलमध्ये मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाणी साचल्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. मॉलच्या परिसरात आणि आत गुडघाभर पाणी साचल्याने ये-जा करणे अत्यंत कठीण झाले आहे. ग्राहक, कर्मचारी तसेच नागरिकांना या पाण्यातून चालत जावे लागत असून त्यांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाणी साचल्यामुळे सुरक्षिततेचाही प्रश्न निर्माण झाला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.0
0
Report
मूसलाधार बारिश में बोरीवली पूर्व के मेट्रो मॉल के पास स्लैब गिरा, कोई घायल नहीं
Mumbai, Maharashtra:मूसळधार पावसात, बोरिवली पूर्व येथील मेट्रो मॉलसमोर, वेस्टर्न एक्सप्रेस हायवेलगतच्या चांदक बिल्डर्सच्या बांधकाम सुरू असलेल्या जागेवरून एक स्लॅब कोसळला. अनेक वाहने चिरडली गेल्याची भीती आहे. घटनेची माहिती मिळताच, पोलीस आणि बीएमसी घटनास्थळी दाखल झाले असून कोसळलेला स्लॅब हटवण्याचे काम करत आहेत. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही.0
0
Report
गडचिरोली के बच्चों के लिए मुफ्त दिल की जांच और शल्य चिकित्सा अभियान शुरू
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील बालकांना अत्याधुनिक हार्दय रोग निदान व मोफत उपचार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे मोफत 2D Echo व बाल हृदय तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी दूरदृश्य प्रणालीद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर, सहपालकमंत्री डा. आशिष जयस्वाल आणि अन्य मान्यकार सहभागी झाले. या शिबिरात जिल्ह्यातील विविध तालुक्यांतील ३०० हून अधिक बालकांची अत्याधुनिक 2D Echo तंत्रज्ञानाद्वारे मोफत तपासणी करण्यात आली. ठाणे येथील ज्युपिटर हॉस्पिटलचे बालहृदयरोग तज्ज्ञ डॉ. आशुतोष सिंग व त्यांच्या चमूने ० ते १८ वर्षे वयोगटातील बालकांची सविस्तर तपासणी केली. या तपासणीद्वारे जन्मजात हृदयविकार, हृदयाच्या झडपांचे विकार तसेच रक्तप्रवाहातील अडथळ्यांचे निदान करण्यात आले. पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या बालकांवर मोफत उपचार करण्याची कार्यवाही करण्यात येणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली. शिबिरादरम्यान राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम (आरबीएसके) अंतर्गत अहेरी तालुक्यातील दोन वर्षीय अन्विका सूरज गौरकर हिची यशोगाथा सादर करण्यात आली. अंगणवाडी स्तरावरील नियमित आरोग्य तपासणीत आरबीएसके पथकाने तिच्यामध्ये हृदयविकाराची लक्षणे ओळखली. पुढील तपासणीत तिला व्हेंट्रिक्युलर सेप्टल डिफेक्ट (VSD) अर्थात जन्मजात हृदयाला छिद्र असल्याचे निदान झाले. शिबिरात तिची पुढील तपासणी करण्यात आली असून तिच्यावर आवश्यक शस्त्रक्रिया व उपचार पूर्णपणे मोफत करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली. गडचिरोलीसारख्या दुर्गम आणि आदिवासीबहুল जिल्ह्यात बालकांसाठी मोफत हृदय तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन होणे ही अत्यंत समाधानाची बाब असून लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, तज्ज्ञ डॉक्टर आणि आरोग्य विभाग यांच्या समन्वयातून राबविण्यात आलेला हा उपक्रम शेकडो कुटुंबांसाठी नवसंजीवनी ठरेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी व्यक्त केला. हे कार्य ईश्वरी कार्य असून अशा उपक्रमांना सातत्य मिळावे, अशी अपेक्षा व्यक्त करत या उपक्रमात योगदान देणाऱ्या सर्व घटकांचे अभिनंदन केले.0
0
Report
Advertisement
मालाड वेस्ट के मनोरी बीच से एक किलोमीटर दूर जहाज फँसा, तट रक्षक सतर्क
Mumbai, Maharashtra:मालाड वेस्ट के मनोरी बीच से लगभग 1 किलोमीटर दूरी पर एक जहाज अडकला है। गोराई पुलिस ने तटरक्षक दल को जानकारी दी है। स्थानिक मछुआरों ने कहा कि समुद्रकिनारा खडकाळ और वादळी है, इसलिए जहाज का खोजने के लिए छोटी नाव से पानी में जाना जोखिमपूर्ण है। पुलिस और तटरक्षक दल स्थिति पर नजर रखे हुए हैं。0
0
Report
मंचर में दूध मिलावट के मामले पर FDA-ग्रामीण पुलिस की बड़ी कार्रवाई, 13 गिरफ्तार
Shirur, Maharashtra:पुण्याच्या मंचरमध्ये अन्न व औषध प्रशासन (FDA) आणि पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने दूध भेसळ करणाऱ्यांविरोधात एक मोठी आणि धडक कारवाई केली आहे. याप्रकरणी पाच जिल्ह्यांमध्ये व्यापक मोहीम राबवून तब्बल १३ जणांना अटक करण्यात आली असून, त्यांच्यावर मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या सर्व १३ आरोपींना घोडेगाव न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ९ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलिसांच्या वतीने सुरुवातीला ७ दिवसांच्या कोठडीची मागणी करण्यात आली होती, मात्र आरोपींच्या वकिलांनी मांडलेली बाजू ऐकून न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी मंजूर केली आहे. या प्रकरणात आणखी काही आरोपी फरार असून पोलीस त्यांचा कसून शोध घेत आहेत. दरम्यान, या संपूर्ण कारवाईवर माजी मंत्री आणि आमदार दिलीप वळसे पाटील यांनी मंचर येथे माध्यमांशी बोलताना "दूध भेसळ करणाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाणार नाही, पुराव्यांच्या आधारे कायद्यानुसार कठोर कारवाई केली जाईल," असे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच केवळ अन्न प्रशासनच नव्हे तर उत्पादन शुल्क (एक्साईज) विभागामार्फतही अवैध धंद्यांवर मोठी कारवाई सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.0
0
Report
कांग्रेस कल आयोध्या राम मंदिर दान के कथित अपहरण के विरोध में प्रदर्शन करेगी
Nashik, Maharashtra:*काँग्रेसचे उद्या काळाराम मंदिरात आयोध्या राम मंदिर कथित अपहार प्रकरणी आंदोलन...* अँकर: अयोध्या येथील राम मंदिरात भाविकांकडून दान केलेल्या रकमेच्या कथित अपहार प्रकरणी उद्या नाशिकच्या काळाराम मंदिरात काँग्रेसकडून आंदोलन करण्यात येणार आहे. या प्रकरणातील दोषींवर कठोर कारवाई व्हावी आणि या संदर्भात देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे का बोलत नाही त्यांना सवाल करत रघुपती राघव राजाराम अशा आंदोलनाने काळाराम मंदिरात आंदोलन करत राज्यकर्त्यांना आम्ही सवाल करणार आहोत असे महाराष्ट्र काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी म्हटले आहे. बाईट: मोहन जोशी- काँग्रेस नेते0
0
Report
Advertisement
गडचिरोली जिला परिषद के नाम पर नकली नियुक्तिपत्र से बेरोजगार युवक ठگا
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- गडचिरोली जिल्हा परिषदेच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकाची लाखो रुपयांनी फसवणूक, गडचिरोली प्रशासनात मोठी खळबळ, पोलिसांनी दोन जणांना केली अटक अँकर :--- गडचिरोलीत जिल्हाधिकाऱ्यांची बनावट स्वाक्षरी करून जिल्हा खनिज प्रतिष्ठान निधीतील कथित चार कोटींच्या घोटाळ्याचं प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एक असाच धक्कादायक प्रकार समोर आला आहे. थेट जिल्हा परिषदेच्या नावाने राष्ट्रीय आरोग्य अभियानात शिपाय पदाचे बनावट नियुक्तीपत्र देऊन बेरोजगार युवकाची लाखो रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार घडल्याने एकच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासनाने पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या बनावट नियुक्तीपत्रावर मुख्य कार्यकारी अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांच्या सह्या, शिक्के, कार्यालयीन नमुना आणि नियुक्तीच्या अटी-शर्ती हुबेहूब तयार करण्यात आला आहे. एवढंच नाही, तर संबंधित उमेदवाराला ठरावीक तारखेला रुजू होण्याचे आदेशही या पत्रात देण्यात आले आहे. हा प्रकार समोर आल्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुहास गाडे यांनी हे नियुक्तीपत्र पूर्णपणे बनावट असल्याचे स्पष्ट करत संबंधितांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. काही दिवसांपूर्वीच जिल्हा परिषद शाळांमधील परिचर पदभरतीची बनावट जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. त्यानंतर आता थेट बनावट नियुक्तीपत्र समोर आल्याने गडचिरोलीत सरकारी कागदपत्रांची बनावटगिरी करणारे रॅकेट सक्रिय असल्याची गंभीर चर्चा सुरू झाली आहे.0
0
Report
वारणा नदी पूर से मांगले–सावर्डे रोड पूरी तरह बंद, यातायात ठप्प
Sangli, Maharashtra:स्लग - वारणा नदीच्या पुराचा फटका.. मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा रस्ता गेला वाहून... अँकर - सांगलीच्या वारणा नदीच्या पाणीपातळीत झालेल्या मोठ्या वाढीमुळे मांगले–सावर्डे बंधाऱ्यालगतचा संपर्क रस्ता वाहून गेला आहे. विशेषतः मांगले बाजूचा साईड रस्ता पाण्याच्या प्रचंड प्रवाहामुळे खचून वाहून गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद झाली आहे.गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदी दुथडी भरून वाहत आहे.नदीच्या वेगवान प्रवाहाने बंधाऱ्यालगतच्या रस्त्याला मोठा फटका बसेला असून रस्त्याचा काही भाग पूर्णपणे वाहून गेला आहे. त्यामुळे मांगले आणि सावर्डे परिसरातील नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.0
0
Report
येवल्यात दराडे बंधूं की शिवसेना मुश्किल, सात नगरसेवकों ने पार्टी बदली
Yeola, Maharashtra:येवल्याच्या राजकारणात पुन्हा एकदा घडामोडींना वेग आला आहे. शिंदे सेनेतील सात नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला नसला तरी शिंदे गटाला मोठा धक्का नगरसेवकांनी शिक्षक आमदार किशोर दराडे व माजी आमदार नरेंद्र दराडे यांची साथ सोडून राजकीय विरोधक असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार समीर भुजबळ यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे तांत्रिकदृष्ट्या प्रवेश केला नसला तरी नेता बदलल्यामुळे आमदार दराडे बंधूं च्या राजकीय ताकदीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे दरम्यान, विधान परिषद निवडणुकीत अपक्ष उमेदवार गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांचा पराभव केला. त्यानंतर शिवसेना नेते उदय सामंत यांनी गोकुळ गीते यांना मुंबईत नेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घडवून आणली आणि त्यांना सहयोगी सदस्य म्हणून पक्षासोबत जोडल्याने दराडे बंधूंच्या जखमेवर आणखी मीठ चोळले गेले महायुतीत मंत्री छगन भुजबळ आणि दराडे बंधू एकत्र असले, तरी येवल्यातील त्यांच्या राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. स्थानिक राजकारणात दोन्ही गटांमधील स्पर्धा कायम राहिली असून, आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या संघर्षाला आणखी धार येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राजकीय वर्तुळात अशीही चर्चा आहे की, येणारी विधानसभा निवडणूक समीर भुजबळ लढवू शकतात. तर त्यांच्या विरोधात कुणाल दराडे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. अधिकृत घोषणा अद्याप झालेली नसली, तरी दोन्ही बाजूंनी राजकीय हालचाली वेगाने सुरू असल्याचे दिसून येत आहे. सात नगरसेवकांचा पक्षप्रवेश, गोकुळ गीते यांची शिंदे यांच्याशी झालेली भेट आणि बदलत जाणारी स्थानिक राजकीय समीकरणे... या सर्व घटनांमुळे येवल्यात दराडे बंधूंची शिवसेनेतील राजकीय कोंडी होत असल्याची चर्चा रंगत आहे. मात्र, या सर्व घडामोडींना दराडे बंधू कोणत्या राजकीय रणनीतीने उत्तर देतात आणि आगामी विधानसभा निवडणुकीत नेमके कोणते चित्र उभे राहते, याकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक-उत्तर महाराष्ट्र में 48 घंटे में भारी बारिश और ऑरेंज अलर्ट: स्कूल बंद
Nashik, Maharashtra:अँकर: नाशिकसह संपूर्ण उत्तर महाराष्ट्रासाठी पुढील 48 तास अत्यंत महत्त्वाचे आणि संवेदनशील असणार आहेत. हवामान विभागाने नाशिकसह उत्तर महाराष्ट्राला ऑरेंज अलर्ट जारी केला असून, नाशिकच्या पश्चिम पट्ट्यात ढगफुटीसदृश पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसार नाशिक जिल्हा प्रशासन पूर्णपणे हाय अलर्ट मोडवर आले आहे. काय आहे नाशिकमधील सद्यस्थिती आणि प्रशासनाची तयारी, पाहूयात या सविस्तर रिपोर्टमधून. हवामान विभागाने नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार या जिल्ह्यांना पुढील 3 तासांसाठी मध्यम ते अतिजोरदार पावसाचे नाऊकास्ट इशारा दिला आहे. या वक्तव्यात त्र्यंबकेश्वर, इगतपुरी, पेठ, दिंडोरी आणि नाशिक तालुक्यात अतिवृष्टीची, तसेच त्र्यंबकेश्वर आणि इगतपुरीच्या पश्चिम भागात ढगफुटीची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 7 जुलै रोजी नाशिक शहरासह या पाचही तालुक्यांमधील शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. तसेच इगतपुरी, त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरातील आठवडे बाजारही बंद राहतील. मुख्य निर्बंध: शाळा-कॉलेज बंद, धार्मिक स्थळे बंद, बाजारपेठा बंद, पर्यटनावर बंदी. प्रशासनाने त्रंबकेश्वर व सप्तश्रृंगी देवगडावरील दर्शन बंद ठेवले आहे. धबधबे आणि गर्दीच्या ठिकाणी आज रात्रीपासूनच कडक पोलीस बंदोबस्त आणि नाकाबंदी तैनात करण्यात आली आहे. आपत्ती व्यवस्थापनासाठी NDRF सज्ज असून SDRF तुकडी तैनात आहे. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून धोकादायक घरे आणि गोठ्यांवर तातडीने कारवाई सुरू आहे. गर्भवती महिलांची प्रसूती पुढील दोन दिवसांत अपेक्षित असल्यास त्यांना आधीच रुग्णालयात दाखल होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. जलसंपदा विभागाच्या अधिकारी न ण, पाणीपुरवठा करणारे गंगापूर धरण सध्या पूर्णपणे सुरक्षित असून दरवाजे उघडण्याची गरज नाही. जिल्ह्यातील धरणांमध्ये सध्या 22% पाणीसाठा असून नवीन पाणी साठवून ठेवले जाणार आहे. परिस्थितीची गांभीर्य ओळखून जलसंपदा विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. रेल्वे विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि स्थानिक प्रशासन रस्ते व रेल्वे मार्गांवर सतत देखरेख ठेवून आहेत. 5 तालुक्यांतील BDO, तहसीलदार, सरपंच आणि आरोग्य यंत्रणा 24 तास अॅक्टिव्ह मोडवर आहेत. हवामान खात्याने दिलेला इशारा पाहता पुढील काही तास नाशिककरांसाठी कसोटीचे असणार आहेत. प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली असली तरी नागरिकांनी स्वतःची आणि कुटुंबाची काळजी घेणे गरजेचे आहे।0
0
Report
नाशिक में मोकाट कुत्तों के हमले में एक व्यक्ति की मौत, प्रशासन चुप क्यों?
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट कुत्र्यांचा सुळसुळाट पाहायला मिळतो... या मोकाट कुत्र्यांच्या हल्ल्यात एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे... तब्बल पाच ते सात कुत्र्यांनी या व्यक्तीवर हल्ला करत तब्बल 47 ते 48 वेळा चावा घेऊन जगभर जखमी केले होते उपचारादरम्यान या व्यक्तीचा मृत्यू झालाय.... नाशिकच्या सिडको परिसरातील पांडव नगरी येथे एकादा एक घटना घडली सहा ते सात कुत्र्यांच्या हल्ल्यात एका 53 वर्षीय इसमाचा मृत्यू झालाय... राजकुमार शंकर कनोजिया असं मृत्यू झालेल्या व्यक्तीचं नाव आहे...कानोजिया नेहमीप्रमाणे आपल्या घरून खुटवड नगर परिसरात असलेल्या आपल्या लॉन्ड्रीच्या दुकानात पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारे पोहोचले... रोज कनोजिया ह्याच वेळेला आपल्या दुकानात येतात ते आपलं दुकान खोलत असतानाच आजूबाजू अस लेल्या मोकाट कुत्र्यांनी त्यांना पाह ताच त्यांच्यावर हल्ला चढवला... या हल्ल्यात कनोजिया जबर जखमी झालेत...विशेष बाब म्हणजे या सहा ते सात कुत्र्यांनी कानोजिया वर तब्बल 47 ते 48 वेळा चावा घेतला... पहाटेच्या sुमारास आजूबाजूला कोणीही नसल्याने तब्बल 30 ते 35 मिनिटं ह्या कुत्र्यांनी कनोजीया यांचे लचके तोडले यामध्ये कनोजीया जबर जखमी झालेत... कानोजिया आवाज ऐकून परिसरातील नागरिक जागे झाले आणि यानंतर परिस्थितीचा गांभीर्य लक्षात आलं कानोजिया यांना परिसरातील नागरिकांनी त्या कुत्र्यांना तात्काळ तिथून हुसकलं आणि कुटुंबाशी संपर्क साधला कनोजिया यांची प्रकृती अत्यंत गंभीर होती त्यांना स्थानिक नागरिकांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केलं 25 जून रोजी पहाटेच्या सुमारास ही घटना घडली.. यानंतर नऊ दिवस कानोजिया जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र उपचारादरम्यान कानोजिया यांचा मृत्यू झाला केल्या 25 वर्षापासून खुटवड नगर परिसरात त्यांचा लॉन्ड्री चे दुकान आहे... या लॉन्ड्रीच्या दुकानातूनच त्यांचा उदारनिर्वाह चालत होता अचानक झालेल्या या गंभीरघटनेमुळे संपूर्ण कुटुंब हे दुःखाच डोंगर कोसळलं आहे...कानोजिया वरतीच संपूर्ण कुटुंुब चालत होतं.....अचानक घडलेल्या घटनेमुळे हे संपूर्ण कुटुंब रस्त्यावर आल आहे.... अचानक कनोजिया यांचा मृत्यू झाल्याने आता उदार निर्वाह कसा करावा असा प्रश्न कुटुंबासमोर आलाय.. यामुळे नाशिक महानगरपालिकेकडून काहीतरी मदत व्हावी अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.... बाईट-मनीष कानोजिया... मृत्यू झालेल्या कानोजिया चा मुलगा... मोकाट श्वानांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते..परिसरात येणाऱ्या जाणाऱ्या लहानमोठ्या वर हे मोकाट श्वान हल्ला करतात... महापालिकेला या बाबत अनेक वेळा तक्रार केली असून या कडे लक्ष दिल जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय... या मोकाट सोनांचालक लवकरात ललकर बंदोबस्त करावा अशी मागणी देखील नागरिकांनी केली आहे.... या घटनेनंतर नाशिक महानगरपालिकेच्या महापौर हिमगौरी अडके यांनी लगेच दखल घेत निरबीजीकरण करुज पुन्हा त्याच जागी श्वानांना सोडणाऱ्या ठिकेदारांवर कारवाई करणार असल्याचं महापौरांनी सांगितले आहे त्याचबरोबर येत्या महासभेमध्ये श्वानांचा प्रश्न महा सभेमध्ये घेणार असल्या.... मोकाट श्वानांचा प्रश्न पुन्हा आयराणी वर आला असून यावर कडक कारवाई करणार असल्या.... आयटीआय सिग्नल ते खुटवडनगर, कामटवाडे, स्व. मीनाताई ठाकरे विद्यालय या भागात रस्त्यांवर उघड्यावरच मांस विक्री होत असल्याने श्वनांची संख्या वाढली आहे. हे श्वान आक्रमक असून रोजच विद्यार्थी, वृद्धांच्या मागे लागतात, त्यांना जखमी करतात. वारंवार तक्रारी करूनही पालिका दखल घेत नाही. श्वान पकडणारी पथके कुचकामी ठरत आहेत. विशेष म्हणजे, निर्बीजीकरणावर २० कोटींचा खर्च होऊनही त्याची अंमलजावणी होत नसल्याने या निधीचा उपयोग नेमका कशासाठी होतोय ? असा प्रश्नच आता नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे....0
0
Report
लातूर में उपवर्गीकरण के विरोध में विशाल महामोर्चा, सरकार से निर्णय वापस लेने का आह्वान
Latur, Maharashtra:अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये प्रस्तावित उपवर्गीकरणाच्या विरोधात आज लातूर शहरात भव्य विराट महामोर्चा काढण्यात आला. कृती समितीच्या वतीने आयोजित या मोर्चाच्यामध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते... आनंदराज आंबेडकर आणि माजी मंत्री बबनराव घोलप यांची प्रमुख उपस्थिती होती... लातूर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून सुरू झालेला हा मोर्चा गंजगोलाई, गांधी चौक मार्गे जुन्या जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. यावेळी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली... सरकारने प्रस्तावित उपवर्गीकरणाचा निर्णय मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर आंदोलन तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला...0
0
Report
Advertisement
नांदेड–मुंबई नई रेल्वे शुरू, मराठवाड़ा-विदर्भ के यात्रियों के लिए मुंबई तक सीधा संपर्क
Washim, Maharashtra:नांदेड–मुंबई नवीन रेल्वे आजपासून झाली असून या रेल्वेला वाशिम रेल्वे स्थानकावर खासदार संजय देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवली.खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यानंतर ते पहिल्यांदाच वाशिम जिल्ह्यात आले होते.यावेळी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांनी रेल्वे स्थानक परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त लावला होता. तसेच या वेळी शिंदे गटाच्या शिवसैनिकांचीही मोठी उपस्थिती होती.17665 क्रमांकाची ही रेल्वे प्रत्येक सोमवार आणि बुधवार नांदेडहून मुंबईकडे धावणार असून,17666 ही रेल्वे मंगळवार आणि गुरुवारी मुंबईहून नांदेडकडे परतणार आहे.या रेल्वेमुळे नांदेड, हिंगोली, वाशिम आणि अकोला जिल्ह्यातील प्रवाशांना मुंबईशी थेट रेल्वे संपर्क मिळणार असून शिक्षण,नोकरी, व्यवसाय आणि वैद्यकीय उपचारांसाठीचा प्रवास अधिक सोयीचा होणार आहे.0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर 32 घंटे से यातायात बाधित: बारिश ने बनाया लोगों को बेहाल
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्ग 32 तासाहून अधिक काळ ठप्प असल्याची माहिती रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू असल्यामुळे नागोठणे जवळ कालपासून सुकेळी खिंडीत पाणी साचले आहे. त्यामुळे महामार्गावरील वाहतूक ठप्प आहे. तब्बल 32 तासांपासून वाहतूक खोळंबली आहे. शेकडो वाहने आणि प्रवासी अडकून पडले आहेत. प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. महामार्गाच्या आजूबाजुला कोणतेही सुविधा नसल्याने प्रवाशांची गैरसोय झाली आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूंना सात ते आठ किलोमीटरपर्यंत वाहने लांबच लांब रांगा लागल्या आहेत. मात्र या ठिकाणी कुठलीच व्यवस्था नसल्याने अडकून पडलेल्या प्रवाशांनी संताप व्यक्त केलाय.0
0
Report
रत्नागिरी में ऑरेंज अलर्ट: नदियों पर केंद्रीय जल आयोग की कड़ी निगरानी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - लांजा केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण.. अँकर रत्नागिरी जिल्ह्याला हवामान खात्याने पावसाचा आज ऑरेंज अलर्ट चा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सरींवर पाऊस पडत आहे. रत्नागिरीची काजळी नदी देखील दुथडी भरून वाहत आहे.आंबा घाटातून काजळी नदी वाहत असते दरवर्षी ही नदी पूर रेषा ओलांडते . नद्यांची पूररेषा व देखरेख करण्यासाठी 24 तास टीम तैनात करण्यात आल्या आहेत. केंद्रीय जल आयोगाच्या अधिकाऱ्यांची संपूर्ण टीम नद्यांची धोका पातळी, इशारा पातळी यांचे निरीक्षण करत आहे. नद्यांच्या पाणी पातळीची पूर्ववत माहिती या टीम कडून दिली जात आहे, सतर्क केले जात आहे, इशारा पातळी ओलांडली तर कोणती खबरदारी घ्यावी याची माहिती दिली जाते याचा सर्व अहवाल केंद्र शासनाला दिला जातो. पावसाचा दक्षिण रत्नागिरीत काहीसा जोर कमी झाला असला तरी प्रशासन सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून असल्याचे दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
