icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow25 Oct 2024, 07:21 am

यवतमाळ : राळेगाव मतदारसंघात भाजपचे माजी मंत्री अशोक उईके यांनी भरला उमेदवारी अर्ज

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव मतदारसंघातुन भाजपचे आमदार माजी मंत्री अशोक उईके यांनी नामांकन अर्ज दाखल केला. कळंब येथील चिंतामणी चे दर्शन घेतल्यानंतर राळेगाव मध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करीत उइकेंनी उमेदवारी अर्ज भरला. यावेळी आदिवासी लोकनृत्य लक्षवेधी ठरले. मध्यप्रदेशचे मंत्री व निवडणूक प्रभारी प्रल्हाद सिंह पटेल, माजी खासदार रामदास तडस हे यावेळी उपस्थित होते. मी दहा वर्ष लोकांची सेवा केली. लोकांचा माझ्यावरती विश्वास आहे त्यामुळे मी यावेळी हॅट्रिक मारणार यात शंका नसल्याचे अशोक उईके म्हणाले.
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के लांजा में 11 एकड़ पपीते की बाग उजड़ गई, 35 लाख नुकसान

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लांजात अवकाळीचा तडाखा.. ११ एकर पपईची बाग भुईसपाट, शेतकऱ्याचे ३५ लाखांचे नुकसान!.. शनिवारी पडलेल्या वादळी पावासाचा तडाखा लांजा येथील शेतकऱ्याला बसला आहे.. एका प्रयोगशील शेतकरी समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने हाजु यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. वर्षभराची मेहनत मातीत गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.. समीर हाजु (शेतकरी).. लांजा
0
0
Report

वाशिम में फुलों के दाम बढ़े, शादी-विवाह की सजावट महँगी

Washim, Maharashtra:वाशीम: लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार आवक कमी असल्यामुळं वाशिम जिल्ह्यात फुलांच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता हार, गाडी आणि मंडप सजावटीवरही दिसून येत आहे. गुलाब, मोगरा, काकडा आणि शेवंती या फुलांच्या किमती २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी हार, वधू-वरांची गाडी सजावट तसेच मंडप डेकोरेशनसाठी नागरिकांना अधिक खर्च करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली असून मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गुलाब ६०० रुपये प्रति किलो, मोगरा १२०० रुपये प्रति किलो तर काकडा १४०० रुपये प्रति किलो दराने विक्रेत्यांना खरेदी करावे लागत आहेत. फुलांच्या वाढत्या मागणीमुळे विक्रेते आणि उत्पादकांना आर्थिक फायदा होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांचे बजेट मात्र कोलमडत आहे.
0
0
Report

उल्हासनगर महापालिका ने 27 अवैध गाळे गिराकर अतिक्रमण पर कड़ा कदम उठाया

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेचा ‘हातोडा’; रेजन्सी प्लाझातील २७ अवैध गाळे जमीनदोस्त. कारणे दाखवा नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. उल्हासनगर शहरात बढ़ती अवैध बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन अब अ‍ॅक्शन मोडमध्ये आया है. कैंप नंबर ३ मधील रेजन्सी प्लाझा येथील तब्बल २७ अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत ते निष्कासित केले. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असली, रेजन्सी प्लाझा ‘बी’ विंगमध्ये संपूर्ण एक मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. नगररचना विभागाने संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, नोटीसनंतरही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी दुपारी या २७ अवैध गाळ्यांवर पाडकाम कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत का, की फक्त वरवरची कारवाई करण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, अर्धवट कारवाई झाल्यास भविष्यात ही बांधकामे पुन्हा उभी राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में जलसंकट गहराया; एकबुर्जी 24% और सोनल 12.71% जलसंचय बचा

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असून,पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,तर सोनल मध्यम प्रकल्पात केवळ १२.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून,प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
0
0
Report

सिल्लोड में कुएँ की गिरावट से एक ही परिवार के तीन लोगों की मौत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यतील धानोरा येथे शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत उतरून मोटर पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचली आणि त्याखाली दबून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकाच वेळी घरातील तीन आधारस्तंभ गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

यवयमाळ के टिपेश्वर अभयारण्य के संवेदनशील क्षेत्र में अवैध रिसॉर्ट-एग्रो टूरिज्म के विरुद्ध याचिका; अदालत ने जवाब मांगा 11 जून तक

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येत अवैध रिसॉर्ट्स व अॅग्रो टुरिझम केंद्रे चालविली जात असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नैताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या ११ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय यासह जैवविविधता आढळते. मात्र वन विभागाच्या उदासीनतेमुळे वन्यजीव व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरात अवैध बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रमांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना जिल्हास्तरीय निरीक्षण समिती व इतर सक्षम प्राधिकरणांची आवश्यक परवानगी नाही. याशिवाय, खाणकाम व वृक्षतोडही सर्रास केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचा हास होत असून, वन्यजीवांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढत आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, वन विभाग व पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.
0
0
Report

लातूर में इंस्टाग्राम धमकियों से 25 वर्षीय युवक ने आत्महत्या; सात गिरफ्तार

Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस दिलीप घोडके असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिल्या सुसाइड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तेजसने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में नाबालिग से विनयभंग: अनुराग मोरे, उसकी माँ और अरबाज तांबोळी पर मामला दर्ज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल - सोलापुरात पोलीस वसाहतीच्या गेट समोरच अल्पवयीन मुलीचा विनयभंग - विनयभंग प्रकरणी अनुराग मोरे, त्याची आई, आणि मित्र अरबाज तांबोळी या तिघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - पीडित अल्पवयीन मुलगी कामानिमित्त जातं असताना दुचाकीवरून पाठलाग करत केला विनयभंग - विशेष म्हणजे सदर प्रकरणातील संशयित आरोपी अनुराग मोरे यांच्या आईने देखील दमदाटी केल्याची माहिती समोर - सदर प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे
0
0
Report

खानापूर के सुरज उर्फ गजू भाई ने 35 में 35 अंक पाए, गाँव में जश्न

Sangli, Maharashtra:स्लग - भावाचा नादच खुळा.. दहावीतील 35 पैकी 35 गुण, शुभेच्छाचा वर्षाव, गावात बॅनर बाजी. अँकर - सांगलीच्या एका पट्याने दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळवत काठावर का होईना पण पास होण्याचा बहुमान मिळवलाय. खानापूर तालुक्यातल्या कमळापूर येथील सुरज उर्फ गजूभाई योगेंद्र साळुंखे या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळवलेत. त्यामुळे त्याच्या घवघवीत यशाची सध्या तालुक्यात बोलबाला आहे. व्ही वो - दहावीच्या परीक्षेत सगळ्यात जास्त गुण मिळवल्यावर त्या विद्यार्थ्यांचा कौतुक होतं पण सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या कमळापूर येथील सुरज उर्फ गजू भाई साळुंखे या विद्यार्थ्याचं कौतुक थोड्या वेगळ्या पद्धतीने होत आहे. कारण सुरज उर्फ गजू भाई काठावर पास झालाय. पस्तीस टक्के गुण सूरजने मिळवल्या म्हणजेच सर्व विषयात 35 पैकी 35 गुण सूरजला मिळाले आहेत. त्यामुळे गजूभाई दणकेबाज यशाचं गावात जल्लोष सुरू आहे. गावामध्ये सुरज अर्थात गजू भाईच्या या यशाचे आणि त्यांनी मिळवलेल्या गुणाचे बॅनर झळकलेत इतकंच नव्हे तर गजूभाईच्या मित्रा परिवाराकडुन सत्कार देखील करण्यात आला आहे. गजू भाईच्या गुणांचं सर्वत्र कौतुक होत असून 35 टक्यांमुळे सुरज उर्फ गजू आता पंचक्रोशीत चांगलाच फेमस झाला असून त्याला भेटायला मित्रमंडळी आता घर घडीत गर्दी करतायत. बाईट :- सुरज उर्फ गजू योगेंद्र साळुंखे - विद्यार्थी. बाईट -योगेंद्र साळुंखे - वडील bait - बहीण बाईट :- मित्र
0
0
Report

धाराशिव में 29 मई को अजितदादा पवार पर कविता गौरवग्रंथ का भव्य प्रकाशन

Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये २९ मे रोजी होणार भव्य प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार या शीर्षकाखाली साकारलेला भव्य काव्य गौरवग्रंथ लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. देशभरातील पाच राज्यांमधील तब्बल १५६ दिग्गज आणि नवोदित कवींनी अजितदादा पवार यांच्या कार्यावर कविता लिहिल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी केले आहे. २९ मे २०२६ रोजी धाराशिव येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी ना. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असून, साहित्य आणि राजकारणाचा संगम घडवणारा हा अनोखा सोहळा ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

खेड़ में 80 वर्षीय वृद्धी की दागिनों के लोभ में हत्या, आरोपी गिरफ्तार

Khed, Maharashtra:पुणे जिले के खेड़ तालुक्यातील करंजविहीरे परिसरात घडलेली ही अत्यंत क्रूर घटना समाजाला चटका लावणारी आहे. केवळ दागिन्यांच्या हव्यासापोटी 36 वर्षीय नराधमाने 80 वर्षाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. यानंतर तो पुरावे नष्ट करण्यासाठी वृद्धेचा मृतदेह गोणीत भरला आणि भामा नदीच्या पात्रात फेकला. मयत सिंधुबाई मरगज ही 2 मे रोजी संध्याकाळी आपल्या गावातून जात असताना त्यांच्याच गावातील कैलास मरगज यांनी त्यांच्यावर हल्ला करून दागिन्यांच्या लुटीचा प्रयत्न केला आणि जीव घेतला. उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनागमने आणि खेड परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीती पसरली आहे.
0
0
Report

सोशल मीडिया से मिली दोस्ती: 26 वर्षीय युवती के साथ होटल में दुष्कर्म

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सोशल मीडियावरील आभासी मैत्री किती भयानक असू शकते, याचा प्रत्यय छत्रपती संभाजी नगर शहरात पुन्हा एकदा आला आहे. अवघ्या १५ दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर ओळख झालेल्या एका २६ वर्षांच्या तरुणीला थार गाडीतून फिरवण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलिसांनी आरोपी कपिल पाटेकर याच्या मुसक्या आवळल्या आहेत. कपिलने ७ मे रोजी सकाळी तरुणीला मुकुंदवाडी भाजीमंडई परिसरात बोलावले. तिथून त्याने तिला जीपमधून बीड बायपासवरील हॉटेल मध्ये नेले. हॉटेलमध्ये त्याने तरुणीला मद्यप्राशन करण्यासाठी प्रचंड बळजबरी केली. नशा आल्यामुळे तरुणीची प्रकृती बिघडली आणि तिला उलट्या होऊ लागल्या. तिच्या या असहायतेचा फायदा घेत कपिलने हॉटेलच्या खोलीत तिच्यावर अत्याचार केला. पीडितेने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला असता, नराधमाने तिच्या मानेला चावा घेत तिला जखमीही केले. या धक्क्यातून सावरल्यानंतर पीडितेने शुक्रवारी पोलिसांत धाव घेऊन आपबिती सांगितली आणि त्यानंतर गुन्हा दाखल झाला...
0
0
Report

आरापूर MIDC के औद्योगिक विस्तार को गति, 90% किसानों ने भू-संपादन की मंजूरी दी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराच्या औद्योगिक विस्तारासाठी महत्त्वाची मानल्या जाणाऱ्या प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला आता गती मिळाली आहे. गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या संयुक्त मोजणी मोहिमेत प्रशासनाने २४२.६ हेक्टर जमिनीचा टप्पा यशस्वीपणे पार केला आहे. शनिवारपर्यंत एकूण मोजणीचे ३२ टक्के काम पूर्ण झाले आहे. पुढील आठवड्यापर्यंत सर्व ७६२ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण करून दरनिश्चितीच्या प्रक्रियेला सुरुवात करण्याचे नियोजन प्रशासनाकडून करण्यात येत आहे. शेंद्रा, वाळूज आणि बिडकीन येथील औद्योगिक भूखंड आता संपल्याने अनेक नामांकित कंपन्या आणि मोठे उद्योग जागेच्या प्रतीक्षेत आहेत. या पार्श्वभूमीवर मौजे आरापूर, गवळी शिवरा आणि सुलतानाबाद येथील ७५३ हेक्टर खासगी आणि ९.६० हेक्टर सरकारी अशा एकूण ७६२.०९ हेक्टर क्षेत्रावर नवीन औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात येत आहे. २४ एप्रिल रोजी प्रशासन आणि शेतकरी यांच्यात झालेल्या सकारात्मक चर्चेनंतर ९० टक्के शेतकऱ्यांनी भूसंपादनास संमती दर्शविली असून, त्यानुसार मोजणीची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top