icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के चिपळूण बाजार में पेड़ गिरने से बड़ा हादसा टला; नगर निगम पर आरोप

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूण बाजारपेठेत मोठे झाड उन्मळून पडले.. दैव बलवत्तर म्हणून एकाचा थोडक्यात बचाव, नगरपरिषदेवर दुर्लक्षाचा आरोप चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसरात आज एक मोठे झाड उन्मळून पडल्याने मोठी दुर्घटना टळली. दैव बलवत्तर म्हणून एक व्यक्ती थोडक्यात बचावली. झाड पडल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी नगरपरिषदेवर गंभीर आरोप करत सांगितले की, हे धोकादायक झाड तोडण्याबाबत मागील एक महिन्यापासून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.
0
0
Report

पंढरपुर आषाढ़ी यात्रा के दौरान परप्रांतीय विक्रेताओं में भिड़ंत, हथियारों का इस्तेमाल

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर आषाढ़ी यात्रेदरम्यान विविध वस्तूंची विक्री करायला येणाऱ्या परप्रांतीय वस्तू विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. पंढरपूरातील जुना दगडी पूल चंद्रभागा नदीच्या वाळवंटाजवळ हा प्रकार घडला. या मारहाणी मध्ये काट्या तसेच कुऱ्हाडीचा वापर झाल्याचा माहिती मिळत आहे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपस्थित वारकरी नागरिक आणि इतरांनी तत्परता दाखवल्यानंतर गंभीर मारहाणी मध्ये याचे रूपांतर झाले नाही. पोलिसांनी अशा परप्रांतीय व्यापाऱ्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे
0
0
Report

JNPT बंदर में हादसा: कंटेनर उतरते समय तीन मजदूर उड़े, एक की मौत

Navi Mumbai, Maharashtra:उरण तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या भीषण हवामानाचा फटका आता जेएनपीए बंदरालाही बसला आहे. न्हावा शेवा येथील NSFT टर्मिनलमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक अपघातात जहाजावरील कंटेनर उतरविण्याचे काम सुरू असताना कंटेनरसह तीन कामगार वादळी वाऱ्यामुळे उडाल्याची माहिती समोर आली आहे. यात एक कामगार मृत झाला असून दोन कामगारांची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. उरण तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचदरम्यान जेएनपीए बंदरातील ही घटना घडल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आवश्यक आपत्कालीन सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप होत असून कामगार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.
0
0
Report
Advertisement

खवटी में दराड़ गिरने से मुंबई-गोवा हाइवे आठ घंटे ठप, भाजपा नेता ने प्रशासन पर नाराज़गी

Ratnagiri, Maharashtra:खवटी येथे दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ८ तासांपासून ठप्प प्रशासनावर भाजप नेते वैभव खेडेकर यांचा संताप; प्रवासीही संतापले अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक गेले तब्बल आठ तास ठप्प आहे. दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका केवळ देखाव्यासाठीच होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. दरम्यान, रात्रीपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांना परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती, तसेच पिण्याचे पाणी किंवा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांमध्येही संतापाचे वातावरण आहे.
0
0
Report
Advertisement

वारणा- कृष्णा नदी में जलस्तर बढ़ोतरी से सांगली में बाढ़ की चेतावनी

Sangli, Maharashtra:स्लग - संततधार पाऊसामुळे वारणा आणि कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ, वारणा नदी पात्रा बाहेर.. अँकर - सांगली जिल्ह्यात पावसाची संतधर सुरू आहे, त्यामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. वारणा नदी ही पात्रा बाहेर पडली आहे, त्यामुळे वारणा नदीवरील बंधारे पाण्याखाली गेलेले आहेत. तसेच वारणा नदी त्याची शेती देखील पाण्याखाली गेली आहे सांगलीच्या हरिपूर येथील वारणा आणि कृष्णा नदीच्या संगमावर वारणा व कृष्णा नदीचे पात्र हे विस्तीर्ण बनला असून, या ठिकाणाहून दोन्ही नद्यांच्या पाणी पातळीचा आढावा घेतला आहे, आमचे प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी ..
0
0
Report
Advertisement

मुंबई के मिसिंग लिंक को लेकर सरकार-भाजपा की जुबानी लड़ाई, भ्रष्टाचार के आरोप

Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन मिसिंग लिंक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विकासाची व्याख्या बदलली ज्या पद्धतीने संपूर्ण मुंबई देशाची आर्थिक राजधानी जी मुंबई तुम्ही पूर्णपणे बिल्डरांना विकली आहे आणि त्याची दलाली खात आहात त्या देशाच्या आर्थिक राजधानी ची अवस्था काय आहे हे मुख्यमंत्री आणि त्यांच्या उपमुख्यमंत्री यांनी रेनकोट घालून मुंबईत फिरावे काय दैना झाली आहे प्रत्येक शहराची ही भाजपच्या ताब्यात आहे विकासाचा फार गाजावाजा करता पण विकासाच्या नावाखाली दलाली आणि भ्रष्टाचार किती टोकाला गेला आहे या राज्याच्या जनतेला पाहायचा असेल तर त्यांनी पुण्याला मिसिंग लिंक ची अवस्था जाऊन पहा मला मुख्यमंत्री यांच्या आश्चर्य वाटप कौतुकही वाटत शिकला सवरलेला माणूस आहे सुशिक्षित आहे वकील आहे जग फिरला आहे पर्यटन करतात मिसिंग लिंक जर म्हणतात दोन खड्डे पडले आणि रिहाबिलिटी चेक करतात मुख्यमंत्री यांनी जाऊन पाहावं आखा मिसिंग लिंक कोसळला आहे खड्डे सोडून द्या अखा मिसिंग लिंक कोसळला आहे त्याचे कारण भ्रष्टाचार दलाल आणि आपला कोण काय वाकड करणार कोण काय उखडणार आमच्याकडे एवढ्या बहुमत आहे ठेकेदाराकडून तीस-पस्तीस टक्के आधीच घेतले आहेत आप आपल्या ठेकेदारांना काम दिली आहेत त्या ठेकेदाराने भाजपच्या पक्ष निधीमध्ये पैसे टाकले आहेत उद्याला टका मंत्री उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री यांच्या लोकांना मिळाला आहे आणि अख्खा मिसिंग लिंक तुम्ही जे ढोल वाजून कौतुक केलं विकास काय आहे हे सगळं दाखवलं तुम्ही जाऊन आता विकास पहा खरोखर जा सहकुटुंबाचा मजा घ्या एवढा विकास झाला आहे त्या धक्क्याने डेप्युटी सीएम आजारी पडले एवढ्या विकासाचा अजीर्ण झाला आहे या विकासाच्या अजीर्ण होते राजाचे डेप्युटी सीएम हॉस्पिटलमध्ये दाखल झाले संपूर्ण मुंबईत अपघात काल सहा माणसं मानखुर्द मध्ये मेली सकाळी त्या मुंबईच्या मेयर दिवसभर फिरत असतात फोटो काढत आणि तिकडे माणसं मान्सूनला मेली आणि एका बिल्डरच्या घरी बारशाला लोकांचा आक्रोश चालू आहे तिकडे मुंबई भाजपचे अध्यक्ष पेरी पेरी हसत आहेत या मुंबईचा आणि महाराष्ट्रावर दुर्योधनाचा राजा आहे दुर्योधनाचा अत्यंत वाईट अवस्था या महाराष्ट्राचे देवेंद्र फडणवीस मींध्ये आणि त्यांच्या लोकांनी केली दुसरे डेप्युटी सीएम त्यांच्या काही बोलण्याचे कारण नाही काय चाललं आहे ते नशीब काल हे आमिर खान याच्या लग्नाला गेले नाही तेवढे तेच शिल्लक होतं ऑन् ट्वीट ते सत्य है हिंदूंची मंदिर मोगल आणि लुटली औरंगजेबाने लुटली असा इतिहासामध्ये है आणि त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाने आम्ही मंदिराचे कसे संरक्षक आहोत ते दाखवलं आणि मतं मिळवण्याचा प्रयत्न केला आणि आता ज्या प्रकारे मंदिरा लुटली जात आहेत राम मंदिर असेल केदारनाथ बद्रीनाथ असेल त्यानंतर दक्षिणेतले मंदिरातील या सगळ्या मंदिराचे जे चोर आहेत दरोडेखोर आहेत ते भारतीय जनता पक्षातील लोक आहेत अकरा मंदिर कसे लुटलं हे आम्ही सांगतो सीतामाईच मंगळसूत्र चोरलं सीतामाईनला 27 महिला भक्तांनी मंगळसूत्र दान केलं होतं ते मंगळसूत्र सुद्धा या लोकांनी लुटलं शिवसेनेला काल शंख फुंकला आहे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली काल दादरला हनुमान मंदिर समोर काल आंदोलन झालं हे एका दिवसाचा आंदोलन नव्हतं हे संपूर्ण महाराष्ट्रात या आंदोलनाचा बनवा पेटल्याशिवाय राहणार नाही ऑन न्यायव्यवस्था नक्कीच या देशाच्या न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही आशेची एक किरण दिसतात तेव्हा त्या किरणांचा स्वागत केले पाहिजे न्यायव्यवस्थेमध्ये अजूनही काही रामशास्त्री आहेत ते न्यायमूर्ती माधव जमाकर यांनी दाखवून दिल म्हणून त्यांचं अभिनंदन करणं हे आमच्या जनतेच्या नागरिकांच्या कर्तव्य आहे आम्ही अनुभव घेतला या सगळ्या मुख्य न्यायाधीश यांचा एका शब्दात त्यांच्याविषयी बोलायचं सगळं भंपक होते ऑन हिंदुस्तान भाऊ मला माहित नाही ऑन मिठी नदी गेले साडेचार वर्ष मुंबई महानगरपालिका ही भारतीय जनता पक्षाच्या ताब्यात आहे साडेचार वर्षात आपण काय केलं हे मुंबईत दिसत आहे मिठी नदीमध्ये देशात आहे मिठी नदीचा घोटाळा सुरू आहे त्याचे लाभार्थी कोण आहे हे सगळे भारतीय जनता पक्षाला देणग्या देणारे ठेकेदार आहेत त्याच्यामध्ये गौतम अडाणी यांना सुद्धा मोठ् काम मिळालं त्याच्यामुळे मीटिंग झाली आता कुर्ल्यात घुसली आहे ती आख्या मुंबईत घुसू शकते ऑन् विरोधक 25 वर्षाचा सोडा आता साडेचार वर्षाचा बोला 70 वर्ष काँग्रेस सतत होती अरे नालायकांनो बारा वर्षे तुम्ही आहात ना बारा वर्षे कमी झाली ना बारा दिवस सुद्धा पुरे पडतात चार दिवस सुद्धा पुरे असतात आमचं काय काढतो साला साडेचार वर्ष चाटतो का जाऊन तिकडे अखी महापालिका साडेचार वर्षात लुटली ठेकेदारांच्या राज्य महापालिकेत आणलं पहा मुंबईचे काय दैना करून ठेवली आहे जाऊन पहा मिसिंग लिंक ची काय दैना करून ठेवली आहे मुंबई चे रस्ते कसे वाहून गेले आहेत जो भारतीय जनता पक्ष राम मंदिर लुटू शकतो त्याच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता आणि त्याच्या बाजूने काय प्रश्न विचारता ज्याने राम मंदिर लुटलं रामाचा अलंकार लुटले रामचे रामाचे जोडे लुटले सीतामाईला लुटला त्यांच्याकडून तुम्ही काय अपेक्षा करता हे चोर आहेत राम मंदिर लुटणाऱ्यांना नैतिक अधिकार आहे ka प्रभू श्रीरामाची लूट केली या लोकांनी प्रभू श्रीराम सीतामाई 3000 कोटीचा पुतळा सरदार वल्लभाई पटेल यांचा कुठे बसवला गुजरातला चीन वृत्तपत्रात आज बातमी आली आहे त्या पुतळ्याचे खरी किंमत साडेतीनशे कोटी रुपये आहे मग हे वरचे पैसे साधारण अडीच हजार कोटीच्या खाली कोणी खाल्ले साडेतीनशे कोटीच्या पुतळा 3000 कोटीला दाखवला गुजराती ठेकेदार व्यापारी सरदार पटेल यांना सोडत नाही प्रभू श्रीरामाला सोडत नाही सीतामाईला सोडत नाही हे स्वतःच नागडे झाले आहेत पावसाने नाही बांगलादेशी हटाव हे काय महापालिकेच्या काम आहे का जबाबदारी कोणाची आहे ज्यांचे राज्य आहे भारतीय जनता पक्षातील त्यांच्या आहे त्यांनी महापौर असतील किंवा इतर पदाधिकारी असतील जे महापालिकेत पैसे गोळा करत आहेत हे त्यांचे जबाबदारी आहे अधिकाऱ्यांचे बळी कशाकरता देत आहात
0
0
Report
Advertisement

मुंबई की सुबह की उड़ान रद्द, विधायक सीधे विधानसभा पहुँचकर कार्य सुचारू रखने को तैयार

Nagpur, Maharashtra:नागपूर विकास ठाकरे, आमदार, काँग्रेस - मुंबईतील सकाळची विमानसेवा रद्द झाल्यामुळे प्रवासात अडचणी आल्या. - विधानसभेचे कामकाज नियमितपणे सुरू ठेवावे; या घटनेचा कामकाजावर परिणाम होऊनये. - अनेक आमदार विमानतळावरून थेट विधानसभेत पोहोचू शकतात, त्यामुळे उपस्थितीत मोठी अडचण येणार नाही. - मुंबईत काही ठिकाणी पाणी साचले असले तरी विधानभवनात पोहोचणे शक्य आहे. - कामकाजासाठी अनेक आमदारांचे प्रश्न सूचीबद्ध असून ते महत्त्वाचे आहेत. - विधानसभेचे कामकाज स्थगित करण्याचा अधिकार केवळ विधानसभा अध्यक्षांकडे असतो.
0
0
Report

हिंगोली के सवना के जिला परिषद स्कूल में शिक्षकों की कमी पर गांव वालों ने ताला लगाकर प्रदर्शन

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सवना येथील जिल्हा परिषद शाळेत मोठ्या प्रमाणात रिक्त पदे असल्याने संतप्त गावकऱ्यांनी जिल्हा परिषद शाळेला कुलूप ठोकले आहे पाचवी चे दहावीपर्यंत असणाऱ्या या जिल्हा परिषद शाळेत केवळ तीन शिक्षक आहेत दोनशेच्या वर विद्यार्थी या शाळेत शिक्षण घेत आहेत मागील अनेक महिन्यापासून इंग्रजी विज्ञान विषयाचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होत असल्याने संतप्त पालकांनी शाळेला कुलूप ठोकले आहे वारंवार विनंती करूनही शिक्षण विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याने गावकरी संतप्त झाले आहेत.
0
0
Report

कल्याण स्टेशन पर भारी भीड़, मुंबई-ठाणे में लोकल ट्रेनों में देरी

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्टेशन वरती तूरळक गर्दी... मुंबई कडे जाणाऱ्या अप और डाऊन सर्व लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिराने. मुंबई आणि ठाणे जिल्ह्याला आज ऑरेंज अलर्ट दिल्याने मुंबईला जाणारे चाकरमानी यांनी घरीच राहणे प्रसन्न केले आहे त्यामुळे दररोज लाखो प्रवासी मुंबई ला प्रवास करतात मात्र आज घरीच राहणं पसंत केला आहे मुंबईकडे जाणाऱ्या लोकल दहा ते पंधरा मिनिटे उशिरा धावत आहे त्यामुळे रेल्वे स्थानकावर तुलक अशी गर्दी पाहायला मिळत आहे तसेच मुंबईहून पुण्याला जाणारा एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत तर काही वळवण्यात देखील आलेले आहेत खोपोली आणि लोणावळा दरम्यान रेल्वे रुलावर दरड कोसल्याने एक्सप्रेस रद्द करण्यात आलेले आहेत त्यामुळे प्रवाशांचे देखील हाल होत आहेत तर काही प्रवाशी यांनी घरी जाणे पसंत केले आहेत तर काही प्रवासी हे रेल्वे स्थानकावरती वाट पाहताना दिसत आहेत याचा आढावा घेतलाय
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top