icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालशेज घाट में बारिश के बाद प्रकृति का नवजीवन, पर्यटकों का उत्साह

Shirur, Maharashtra:Anc:सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये निसर्गाचा अनोखा खेळ पाहायला मिळत आहे! गेल्या काही दिवसांत झालेल्या जोरदार पावसानंतर माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य पूर्णपणे बहरले असून, पर्यटकांना आकर्षित करत आहे. मात्र, गेल्या दोन दिवसांपासून पावसाने विश्रांती घेतल्यामुळे धबधब्यांचा जोर ओसरला आहे, ज्याचा परिणाम पर्यटकांच्या संख्येवर झाला आहे. ​पाऊस कमी झाल्यामुळे पर्यटकांची गर्दी काहीशी ओसरली असली, तरी स्थानिक व्यावसायिक आणि दुकानदार येणाऱ्या पर्यटकांचे उत्साहाने स्वागत करत आहेत. विशेषतः येथील निसर्गरम्य वातावरणात गरमागरम खमंग भाजलेले मका खाण्याचा आनंद पर्यटक आवर्जून घेत आहेत. ​निसर्गाच्या या सुंदर रूपाचा आणि येथील स्थानिक स्वादाचा आस्वाद घेण्यासाठी सह्याद्रीचा हा परिसर नक्कीच भेट देण्यासारखा आहे!याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... झी मिडीया जुन्नर पुणे...
0
0
Report

राजापूर पंचायत समिति ने अणुऊर्जा परियोजना के विरोध में प्रस्ताव पारित किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. अणुऊर्जा प्रकल्पाला मंजुरी नको. राजापूर पंचायत समितीचा ठराव. राजापूर पंचायत समितीच्या मासिक आढावा बैठकीमध्ये प्रस्तावित अणुऊर्जा प्रकल्प विरोधातील ठराव मांडला गेलाय. स्थानिक जनतेचा जोरदार विरोध असल्यामुळे प्रास्तावित अणुऊर्जा प्रकल्पाला मंजुरी देण्यात येऊ नये असा एकमुखी ठराव केलाय. यामुळे तालुक्यातील माडबन येथे उभारला जात असलेला जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाप्रमाणे बारसू-सोलगाव परिसरातील अणुऊर्जा प्रकल्पाचेही भवितव्य अधांतरीत राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
0
0
Report
Advertisement

चिपळूण उड्डाणपुल 95 पिलर: गणेशोत्सवापर्यंत 90% काम पूर्ण

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवाआधी चिपळूण उड्डाणपूल पूर्ण होणार.. काम अंतिम टप्प्यात, गणेशोत्सवापर्यंत काम संपण्याची अपेक्षा.. जिल्ह्यातील सर्वात लांब ९५ पिलरचा पूल.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आणि चिपळूण डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते प्रांत कार्यालय या अंतरातील जिल्ह्यातील सर्वात मोठ्या ९५ पिलरचा असलेल्या उड्डाणपूलाचे ९०% काम पूर्ण झाले आहे.. आगामी दोन महिन्यात उर्वरित काम पूर्ण करून गणेश उत्सवासाठी कोकणात येणाऱ्या गणेश भक्त चाकरमान्यांसाठी हा पूल खुला व्हावा यासाठी संबंधित ठेकेदार कंपनी व प्रशासन प्रयत्न करत आहेत..
0
0
Report

अकोला रेलवे स्टेशन के शौचालयों में गंदगी, यात्रियों ने प्रशासन पर सवाल उठाए

Akola, Maharashtra:एकीकडे भारतीय रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे स्थानक स्वच्छतेचे मोठे दावे केले जात आहेत. मात्र प्रत्यक्षात अकोला रेल्वे स्थानकावरील चित्र या दाव्यांना छेद देणारे आहे. स्थानकावरील प्रतीक्षालयातील शौचालयांमध्ये सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले असून, अनेक दिवसांपासून येथे स्वच्छता झालेली नसल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे. दुर्गंधी, अस्वच्छता आणि असुविधेमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. स्वच्छ भारत अभियान आणि प्रवाशांना दर्जेदार सुविधा देण्याच्या घोषणा केवळ कागदोपत्रीच राहिल्या आहेत का, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. दररोज हजारो प्रवाशांची वर्दळ असलेल्या अकोला रेल्वे स्थानकातील शौचालयांची अशी दयनीय अवस्था रेल्वे प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे जिवंत उदाहरण असल्याची टीका प्रवाशांकडून केली जात आहे. प्रवाशांकडून रेल्वे प्रशासनाने तातडीने या शौचालयांची स्वच्छता करून नियमित देखभाल व्यवस्था सुरू करावी, अशी जोरदार मागणी झाली आहे. अन्यथा स्वच्छतेचे दावे आणि प्रत्यक्षातील वास्तव यामधील दरी आणखी स्पष्ट होणार असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

चिकलठाणा जमीन घोटाला: एमआईएम नगरसेवक समेत 13 के खिलाफ मामला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चिकलठाणा जमीन घोटाळा; एमआयएम नगरसेवकासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट खरेदीखत्ताद्वारे ९५ प्लॉट हडपल्याचा आरोप; कोट्यवधींच्या जमीन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी सुरू. ANC : छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील गट क्रमांक ६३० मधील ९५ हून अधिक प्लॉटमालकांची कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट खरेदीखताच्या माध्यमातून हडपल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब दामोधर काकडे, एमआयएम नगरसेविकेचे पती अमजद खान तसेच मूळ जमीनमालकाच्या आठ वारसांनी संगनमत करून कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणुकीची बाब निदर्शनास आल्यानंतर प्लॉटमालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात संबंधित १३ जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर और अनधिकृत ताबा मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बहुचर्चित जमीन घोटाळ्याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.
0
0
Report

पश्चिम विदर्भ में किसानों की आत्महत्याएं: जनवरी–मई में 313 मामले, यवतमाळ में सबसे अधिक

Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भात जानेवारी ते मे या 5 महिन्यात 313 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात अँकर :- पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल 313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 105 आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडून अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंंबांना भेटीही देण्यात आलेल्या नाहीत. तर 313 प्रकरणांपैकी फक्त 76 कुटुंबे मदतीसाठी पात्र 56 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 181 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशनच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्मत्यांना - 313 यवतमाळ - 105 अमरावती - 61 अकोला - 61 वाशिम - 46 बुलढाणा - 40 लाभासाठी पात्र - 76 अपात्र - 56 प्रलंबित - 181
0
0
Report
Advertisement

गंगापुर तालुक के तुर्काबाद-खराडी-घाणेगाव रस्ते की दयनीय स्थिति, बारिश से सुधार की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी ते घाणेगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि चिखल साचल्याने विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, वाहतूक धोकादायक बनली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, प्रशासन, आमदारांनी तातडीने लक्ष घालून किमान पावसाळ्यात तरी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

मुकुंदवाडी में 15 वर्षीय ने 50 वर्षीय को चाकू से हत्या कर दी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षांच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या घराच्या ओट्यावर बसण्यावरून आणि तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यावरून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ५० वर्षांच्या व्यक्तीची चाकूने भोसकून निघृण हत्या केली. संतापलेल्या मुलाने पुन्हा त्यांच्या पोटात ३ ते ४ वेळा चाकू भोसकला. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीमध्ये घडला. रोहिदास दत्तू खकाळ असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत रोहिदास खकाळ मुकुंदवाडी भागात नशापाणी करणाऱ्या टवाळखोर टोळक्यांचा वावर वाढला आहे. रोहिदास खकाळ हे रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर ओट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसत असत. घराच्या ओट्यावर ज्येष्ठ नागरिक बसत असल्याने टवाळखोरांना तेथे फिरण्यास अडचणी येत होत्या. तसेच रोहिदास हे या तरुणांना वाईट संगतीत न जाण्याचा सल्लाही देत असत. याशिवाय खकाळ हे ओट्यावर बसून सिगारेट ओढत असल्याने संबंधित मुलाला त्यांचा राग येत होता. यातूनच त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top