445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गोदावरी-गंगा प्रवाह बदले विरोध में गोदा प्रेमी आक्रमक, लक्ष्मण कुंड पर रोक मांग
Nashik, Maharashtra:सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामांमध्ये दक्षिण गंगेचा प्रवाह बदलणार; गोदा प्रेमींचा आरोप... गोदाप्रेमींच्या रोषणानंतर लक्ष्मण कुंडाचे काँक्रिटीकरण काम स्थगित... सिंहस्थ कामांच्या अनुषंगाने गोदावरीचे पौराणिक महत्त्व संपुष्टात आणण्याचा घाट; गोदा प्रेमी आक्रमक... महापालिका आयुक्तांच्या सोबत चर्चा करून पुढील निर्णय घेऊ प्रशासनाचा खुलासा...0
0
Report
चंद्रपुर में जनगणना 2017 के लिए प्रशिक्षक-पर्यवेक्षक प्रशिक्षण शुरू, 16 मई तक स्वगणना विकल्प उपलब्ध
Chandrapur, Maharashtra:जनगणना 2017 च्या अनुषंगाने चंद्रपुरात प्रगणक- पर्यवेक्षकांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. 16 मे पर्यंत नागरिकांना स्वगणना पर्याय उपलब्ध आहे. त्यानंतर प्रगणक- पर्यवेक्षक घरोघरी जाऊन जनगणना करणार आहेत. यंदा प्रथमच होणाऱ्या डिजिटल जनगणनेसाठी यंत्रणा सज्ज होत आहे. प्रगणक व पर्यवेक्षकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांचे निराकरण प्रशिक्षक आणि तज्ज्ञ करत आहेत. ही सर्व माहिती काटेकोरपणे भरली जावी याकडे लक्ष राहणार आहे.0
0
Report
गर्मी में कलिंगड़ की मांग बनी मजबूत, मौत के बाद बाजार में मामूली असर
Navi Mumbai, Maharashtra:उन्हाळात कलिंगडाला चांगली मागाणी असते परंतु आखाती युद्धामुले भारतीय कलिंगड परदेशात कमी प्रमाणात निर्यात होत आहेत. यात मुंबई मद्ये रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्यानंतर प्रकृती बिघडली आणि एका कुटुंबाचा मृत्यू झाला. या कारणामुळे कलिंगड खरेदी वर तुरळक परिणाम जाणवत आहे. Vo1- मुंबई मद्ये कलिंगड खाऊन मृत्यू झाला या बातमी मुळे थोडाफार परिणाम मार्केट वर असून ,ग्राहक कमी येत आहेत पण दरावर याचा काही परिणाम झाला नाही. Vo2- नवी मुंबई एपीएमसी मार्केट मद्ये राज्यभरातून कलिंगड येत असून, रोज 50 ट्रक मार्केट मद्ये येत असून, 80 टक्के माल संपत आहे. आखाती देशातील युद्धामुळे निर्यात कमी झाली असून कलिंगडाचे भाव सध्या 15 ते 16 रुपये किलो आहेत, यातच या घटनेमुळे थोडाफार परिणाम अजून पडला नसून कलिंगड चांगले असून ग्राहकांनी कलिंगड खाण्याचे आवाहन येथील व्यापारी करत आहेत.0
0
Report
Advertisement
मिरज के वड्डी पंचायत चुनाव में जनसुराज्य शक्ती की जीत, राजू वजीर जीते
Sangli, Maharashtra:स्लग - लक्षवेधी ठरलेल्या मिरज तालुक्यातील वड्डी सरपंच पदाच्या निवडणुकीत जनसुराज्य शक्ती पक्षाची बाजी.. यामध्ये सर्वाधिक लक्षवेधी ठरली होती,ती मिरज तालुक्यातील वड्डी ग्रामपंचायतच्या सरपंच व पदाची निवडणूक, निवडणुकीमध्ये जनसुराज्य शक्ती पक्षाचे राजू वजीर हे 804 मतांची आघाडी घेऊन विजय झाले आहेत,त्यांनी भाजप पुरस्कारात उमेदवाराचा पराभव केला आहे.निवडणुकी दरम्यान वजीर यांच्या बाबतीत भानामतीचा प्रकार घडला होता,त्यामुळे तालुक्यात एकच खळबळ उडाली होती।त्यामुळे सगळ्यांचा लक्ष वड्डी निवडणुकीकडे लागून राहिला होते。0
0
Report
मालेगांव के मेडशी में बिबट्या ने दो मवेशियों पर हमला, एक की मौत
Washim, Maharashtra:मालेगाव तालुक्यातील मेडशी शिवारात बिबट्याच्या हल्ल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शेतकरी रमजान गौरवे यांच्या शेतातील गोठ्यात घुसून बिबट्याने दोन म्हशींच्या रेडकांवर (पिलांवर) हल्ला केला.या हल्ल्यात एक रेडकू ठार झाले असून दुसरे गंभीर जखमी झाले आहे.ही घटना रात्रीच्या सुमारास घडल्याचे समोर आले आहे. सकाळी गोठ्यातील परिस्थिती पाहून हा प्रकार उघडकीस आला.या घटनेमुळे परिसरातील शेतकरी आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.बिबट्याचा वावर वाढल्यामुळे जनावरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून,वनविभागाने तात्काळ कारवाई करून बिबट्याला जेरबंद करण्याची मागणी स्तानिकाकडून केली जातंय.0
0
Report
पुलाची शिरोली मामले में मुख्य आरोपी गिरफ्तार, दो संदिग्धों को न्यायालय ने हिरासत में लिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात हातकणंगले तालुक्यात पुलाची शिरोली येथे उघडकीस आलेल्या गंभीर अत्याचार प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत चालली आहे. या प्रकरणात कोल्हापूर पोलिसांनी मुख्य आरोपी शाहीद समीर सनदे याच्यानंतर त्याचा मित्र शाहरुख देसाई यालाही अटक केली आहे. दोन्ही आरोपींना पेठवडगाव न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. VO 1 :- कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पुलाची शिरोळी येथील मुख्य आरोपी शाहीद सनदे याने सोशल मीडियाच्या माध्यमातून अनेक तरुणींशी संपर्क साधून त्यांना जाळ्यात ओढल्याच प्रकरण समोर आल्यानंतर खळबळ उडाली. यानंतर शाहिदने स्वतःचा गुन्हा कबूल केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर या घटनेचं गांभीर्य आणखीच वाढले. दरम्यानच्या काळात शाहिद वेळोवेळी अत्याचार केलेल्या एका पीडित युवतीने कोल्हापूरच्या राजारामपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पीडित तरुणीच्या तक्रारीतील महत्त्वाचे मुद्दे - आरोपीने बहिणीच्या मैत्रिणीशी आधी ओळख वाढवली, तिचा इन्स्टाग्राम आयडी आणि मोबाईल नंबर मिळवला - महाविद्यालयीन कार्यक्रमात सेल्फी काढण्याची जबरदस्ती केली. पीडित युतीने नकार दिल्यानंतर चॅट व्हायरल करण्याची धमकी दिली. - इन्स्टा chat व्हायरल होईल या भीतीपोटी पीडित मुलीने शाहीद सोबत सेल्फी काढला, त्या फोटोचा आधार घेत संपर्क ठेवण्यास भाग पाडले - फोटोंच्या आधारे ब्लॅकमेल करून शरीरसंबंधांची मागणी केली. - पिढीतेची इच्छा नसताना देखील आलिशान हॉटेलमध्ये तिच्यावर वारंवार अत्याचार केला , त्याचे व्हिडिओ देखील बनवले असा तक्रार अर्जात उल्लेख आहे. - पीडित शाकाहारी असताना देखील मांसाहार करण्यासाठी जबरदस्तीचा प्रयत्न केला. पण पीडितेने त्याचे ऐकले नाही. त्याचबरोबर आमचा धर्म चांगला आहे असं आरोपी शाहीदने पीडीतेला सांगितल्याचं देखील अर्जात उल्लेख आहे. VO 2 :- मुख्य आरोपी शाहीद सनदे याच्याविरोधातील प्रकरण समोर आल्यानंतर कोल्हापुरातील शाहूपुरी पोलीस ठाण्यात आणखी एका युवतीने तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास करताना आरोपीच्या मोबाईलमधील मॅसेज हस्तगत केले. या मेसेजेसमध्ये शाहरुख देसाई याने आरोपीकडील व्हिडिओ मागितल्याचे पुरावे समोर आले. त्यानुसार पोलिसांनी कराड येथून शाहरुख देसाई याला अटक केली. त्यानंतर आज दोन्ही आरोपींना वडगाव प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी समोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने सहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. VO 3 :- या प्रकरणात शाहरुख देसाई याच्याविरोधातदेखील दोन तरुणींनी तक्रार दिली आहे. पोलिसांकडून या तक्रारींची पडताळणी सुरू असून या प्रकरणात कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणात पुढील काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुलाची शिरोली ग्रामपंचायतने आरोपींच्या घराचे नळ कलेक्शन तोडून, अतिक्रमण देखील हटवले आहे. या प्रकरणात लोकांचा रोष वाढत चालला आहे. त्यामुळे पोलीस देखील या प्रकरणाची कसून तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
साई दरबार में विजय थलपती की मौजूदगी: भक्तों की भीड़ ने बनाए सुरक्षा के रिकॉर्ड
Shirdi, Maharashtra:शिर्डी / अहिल्यानगर दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती याने आज साई दरबारी हजेरी लावली... अभिनेता ते नेता बनलेला विजय थलपती शिर्डीत येणार असल्याची माहिती मिळताच त्याच्या चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती...विजय थलपतीचे आगमन होताच चाहत्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली...चाहते आणि भाविकांच्या मोठ्या गराड्यामुळे कडक सुरक्षा व्यवस्थेत त्याला साई मंदिरात नेण्यात आले...यावेळी विजय थलपतीने सर्वप्रथम द्वारकामाई मंदिराचे दर्शन घेतले, त्यानंतर साई समाधीवर माथा टेकवत प्रार्थना केली... काही वेळ समाधीस्थळी थांबत त्याने साईबाबांचे दर्शन घेतले आणि ध्यानमंदिरात काही क्षण ध्यान करत नामस्मरणही केले... विशेष म्हणजे, मोठी गर्दी असूनही विजयने काही भाविकांना नमस्कार करत आपला साधेपणा जपल्याचे पाहायला मिळाले... आगामी निवडणुकीत पक्षाला यश मिळावे यासाठीच विजय थलपतीने साईबाबांच्या चरणी साकडं घालत आशीर्वाद घेतल्याची चर्चा सध्या रंगू लागलीय..0
0
Report
वर्धा में न्याय न मिलने पर भीम आर्मी के जिल्हाध्यक्ष ने आत्मदहन की चेतावनी दी
Wardha, Maharashtra:वर्धा: काजलसर प्रकरण में न्याय नहीं मिलने के कारण भीम आर्मी के जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे उर्फ Rana ने आत्मदहन की चेतावनी दी है. 30 अप्रैल को सुबह 11 बजे पानी की टंकी से कूदकर आत्महत्या करने की धमकी दी गई है. एंकर — वर्धा के देवळी तालुक्यामाज काजलसरा घटना में गांव वालों पर पुलिस के लाठीचार्ज के गंभीर आरोप लगे हैं, जिसमें भीम आर्मी प्रशासन के खिलाफ आक्रामक हो गया है. पिछले पांच दिनों से आंदोलन चल रहा है और न्याय नहीं मिलने पर आत्मदहन की चेतावनी दी जा रही है. घटना के बाद कई बार विरोध प्रदर्शन, निवेदन और मांगों के बावजूद प्रशासन ने ठोस कार्रवाई नहीं की, जिससे पीड़ितों को न्याय नहीं मिलने की भावना मजबूत हो रही है. भीम आर्मी के जिल्हाध्यक्ष प्रदीप कांबळे बार-बार प्रशासन की ओर संकेत कर रहे हैं, लेकिन प्रशासन कोई ठोस कदम उठाने में असफल रहा. अगर 30 अप्रैल 2026 तक ठोस कदम नहीं उठे, तो वे सुबह 11 बजे पानी की टंकी पर चढ़कर आत्महत्या कर देंगे. इस घटना की पूरी जिम्मेदारी जिला प्रशासन और पुलिस प्रशासन की होगी.0
0
Report
बुलढाणा में एक बार फिर तनाव, कांग्रेस और संजय गायकवाड़ के समर्थक आमने-सामने
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात पुन्हा राडा, काँग्रेस आणि संजय गायकवाड यांचे समर्थक समोरासमोर... दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी, काही काळासाठी निर्माण झाली होती तणावाची परिस्थिती... काँग्रेसचे आंदोलन शिवसेनेकडून उधळण्याचा प्रयत्न... Anchor - कालपासून बुलढाण्यात मोठी तणावाची परिस्थिती पाहायला मिळत आहे, आज देखील काँग्रेसच्या आंदोलनादरम्यान आमदार संजय गायकवाड यांचे समर्थक आणि काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर उभे ठाकले होते, दोन्ही गटाकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली, त्यामुळे बुलढाण्याच्या संगम चौकात काही वेळासाठी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती.. धीरेंद्र शास्त्री बागेश्वर महाराज आणि आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात निदर्शने आणि शिवाजी कोण होता या पुस्तकाचे सामूहिक वाचन करण्याचा इशारा युवक काँग्रेसच्या वतीने देण्यात आला होत, युवा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन होत असतानाच पुस्तक वाचताना छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान जनक उल्लेख करावा या मागणीसह काँग्रेसचे हे आंदोलन शिवसेनेचे पदाधिकारी आणि आमदार संजय गायकवाड यांच्या समर्थकांकडून उधळण्याचा प्रयत्न झाला.. यावेळी चांगलाच तणाव निर्माण झाला होता, मात्र पोलिसांनी मध्यस्थी करत परिस्थिती नियंत्रणात आणली... बाईट - शिवराज मोरे, प्रदेशाध्यक्ष युवक काँग्रेस0
0
Report
Advertisement
जालना में प्रतिबंधित नशे की गोलियाँ जप्त, एक गिरफ्तार
Jalna, Maharashtra:जालना : बंदी असलेल्या नशेच्या गोळ्यांची पोलिसांकडून जप्ती 325 नशेच्या गोळ्या जप्त,एक जण ताब्यात नशेच्या गोळ्या विक्रीमागे रॅकेट असल्याचा पोलिसांचा संशय(पॅकेज) जालना शहरात बंदी असलेल्या नशेच्या गोळ्यांची विक्री सुरू असल्याची बाब उघडकीस आली आहे.कदीम जालना पोलिसांनी केलेल्या कारवाईत ही बाब समोर आली आहे.या गोळ्यांच्या विक्रीमागे मोठं रॅकेट असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली आहे.याावरचा हा स्पेशल रिपोर्ट. या प्रकरणात अल्प्रा झोलम नावाच्या तरुणाची झाडाझडती घेण्यात आली.यावेळी त्याच्याजवळ अल्प्रा झोलम या गोळ्या आढळून आल्या आहेत.या गोळ्या पोलिसांनी जप्त करत सय्यद सलमान सय्यद गफूर याला ताब्यात घेतलंय. विशेष म्हणजे अल्प्रा झोलम या गोळ्या विक्री करण्यासाठी बंदी आहे.तरीही या गोळ्यांची सर्रासपणे विक्री सुरुय. या गोळ्यांमुळे नशा येऊन लवकर झोप लागत सके? या नशेच्या गोळ्या शरीरारावर विघातक परिणाम करणाऱ्या असल्यानं या गोळ्या विक्रीसाठी बंदी घालण्यात आली.दरम्यान पोलिसांनी ताब्यात घेतलेला तरुण ज्या व्यक्तिकडून या गोळ्या घेत होता तो फरार झालाय. सध्या पोलीस त्याचा कसून शोध घेत आहेत.या प्रकरणात फरार असलेल्या आरोपीला पकडण्यासाठी कंबर कसली असून हा आरोपी पकडल्यानंतरच शहरातील वेगवेगळ्या भागात होणाऱ्या नशेच्या गोळ्यांच्या विक्रीची माहिती समोर येणार आहे.0
0
Report
शिर्डी में विजय थलपती का राजनीति प्रवेश, DMK-AIDMK-TVK के त्रिकोणीय मुकाबले
Shirdi, Maharashtra:दाक्षिणात्य सुपरस्टार विजय थलपती साई दरबारी... अभिनेता ते नेता बनलेला विजय थलपती साईदर्शनासाठी शिर्डीत... विजय थलपती तामिळनाडूच्या राजकारणात सक्रिय... TVK नावाने पक्षाची स्थापना करत विधानसभा निवडणुकीत 233 उमेदवार उतरवले... तामिळनाडू मध्ये सध्या तिरंगी लढतीचे चित्र... DMK , AIDMK आणि TVK अशी तिरंगी लढत... 24 एप्रिल रोजी विधानसभा निवडणुकीसाठी मतदान पार पडले असून 4 मे रोजी निकाल... पक्षाच्या विजयासाठी विजय थलपतीचे साईबाबांना साकडं... साई मंदिराच्या ध्यान मंदिरात अभिनेता विजय थलपती याने केलं ध्यान... साई दर्शनानंतर माध्यमांशी बोलणं टाळलं... अभिनेता विजय थलपती याने घेतलं साई समाधीचे मनोभावे दर्शन...0
0
Report
सोलापूर के असिस्टेंट पुलिस इंस्पेक्टर शिवाजी ननवरे ने एवरेस्ट शिखर फतह किया
Pandharpur, Maharashtra:Anchor -सोलापूर जिल्ह्यातील करमाळा चे सुपुत्र असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी ननवरे यांनी हिमालय पर्वत रांगेतील उंच एव्हरेस्ट शिखर सर केले आहे. शिवाजी ननवरे हे नागपूर पोलीस दलात कार्यरत आहेत. यापूर्वी त्यांनी जगातील चौथ्या क्रमांकाचे उंच व तिबेटी भाषेत "दक्षिण शिखर" म्हणून ओळखले जाणारे माउंट लोहत्से, पाचव्या क्रमांकाचे उंच व चार बाजूंनी पिरॅमिडसारखा आकार असलेले माउंट मकालू आणि आठव्या क्रमांकाचे उंच माउंट मनास्लू ही शिखरेही यशस्वीरीत्या सर केली आहेत. असा विक्रम करणारे महाराष्ट्र पोलीस दलातून ते पहिलेच अधिकारी ठरले आहेत.0
0
Report
Advertisement
पवना डैम से दुपहर 2 बजे पानी छोड़ना; नदी किनारे रहें सतर्क
Varsoli, Maharashtra:पवना धरणातून आज दुपारी दोन वाजता पाण्याचा विसर्ग करण्यात येणार असून, नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले. मावळ तालुक्यातील पवना धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येणार आहे. पवना उपविभागाच्या सूचनेनुसार, सिंचन विमोचकाद्वारे 400 क्युसेक क्षमतेने पाणी नदीपात्रात सोडले जाणार आहे. तसेच रावेत येथील पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी दुपारी 2 वाजता जलविद्युत केंद्रामधून 1000 क्युसेक क्षमतेने अतिरिक्त विसर्ग केला जाणार आहे. या एकत्रित विसर्गामुळे नदीपात्रातील पाणीपातळी अचानक वाढू किंवा कमी होऊ शकते. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन पवना पाटबंधारे खात्याने केलं आहे.0
0
Report
बागेश्वर बाबा और आनंद स्वरूप पर शिवाजी महाराज के सम्मान पर चोट का मामला दर्ज
Thane, Maharashtra:बागेश्वर बाबा आणि स्वामी आनंद स्वरूप यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी फिर्याद मनोज प्रधान यांनी दिली लेखी फिर्याद सत्ताधारी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अवमान सहन करणार नाहीत, अशी अपेक्षा - मनोज प्रधान बागेश्वर बाबा आणा स्वामी आनंद स्वरूप या दोघांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत जाणीवपूर्वक अपशब्द काढून तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर बीएनएस 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान यांनी लेखी फिर्याद दिली आहे. गुन्हा दाखल न केल्यास तीव्र जनआंदोलन उभारण्याचा इशाराही मनोज प्रधान यांनी दिला आहे. धीरेंद्र शास्त्री याने, छत्रपती शिवाजी महाराज जेव्हा युद्ध करता करता थकले, छत्रपती शिवाजी महाराजांना यांना आपण आता थकलोय असे वाटू लागले, तेव्हा एक दिवस छत्रपती शिवाजी महाराज समर्थ रामदास स्वामी यांच्याकडे गेले व त्यांनी आपला मुकुट समर्थ रामदास स्वामी यांच्यासमोर ठेवला आणि म्हणाले, “मी आता थकलोय, मला यापुढे लढाई करायची नाही.”, असे विधान केले आहे. तर, स्वामी आनंद स्वरूप याने धिरेंद्र शास्त्रीचे समर्थन करताना, आनंद स्वरूप यांनी धीरेंद्र शास्त्रींच्या छत्रपती शिवाजी महाराजांबाबतच्या वादग्रस्त विधानाचे समर्थन केले आहे. त्यांनी असा दावा केला की, युद्ध पेशवे लढले आणि नाव शिवाजीचं झालं. शिवाजींनी कधी युद्ध मैदानात लढलं नाही, तर फक्त छापामार युद्ध लढले. पेशव्यांन् उपेक्षित ठेवलं गेलं कारण ते ब्राह्मण होते. बागेश्वर बाबा (धीरेंद्र शास्त्री) यांनी माफी मागायची गरज नव्हती, असे ते म्हणाले. या दोघांनी केलेली विधाने ही महापुरूषांचा अवमान करणारी आहेत. या दोघांकडून जाणीवपूर्वक दोन धर्म- जातीसमूहांमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करण्याच्या उद्देशाने अशी विधाने केली आहेत, असा उल्लेख मनोज प्रधान यांनी आपल्या लेखी फिर्यादीमध्ये केला आहे. मनोज प्रधान यांनी सांगितले की, बागेश्वर आणि स्वामी आनंद स्वरूप हे दोघे जाणीवपूर्वक वाद निर्माण करणारी विधाने करीत असल्याने त्यांच्यावर बीएनएस 356, 299, 192 अन्वये गुन्हा दाखल करण्यासाठी आम्ही फिर्याद दिली आहे. सध्या कोणताही गुन्हा दाखल करताना राजकीय इच्छाशक्तीची मर्जी पोलिसांना राखावी लागत आहे. त्यामुळे या सरकारकडून आपल्या आराध्य दैवताचा अवमान सहन केला जाणार नाही, अशी अपेक्षा ठेवायला काहीच हरकत नाही, असे वाटते. दुसरे महत्वाचे महाराजांचा अवमान जरी सत्ताधाऱ्यांनी सहन केला तरी आम्ही शिवभक्त हा अवमान सहन करणार नाही. हा धिरेंद्र शास्री आणि स्वामी आनंद स्वरूप यांना धडा शिकवू, असा इशाराही प्रधान यांनी दिला.0
0
Report
मराठा आरक्षण के मुद्दे पर बंद दरवाजे की बैठक: सामंत–जरांगे भिड़ंत नहीं, बातचीत स्पष्ट
Jalna, Maharashtra:जालना : जरांगे सामंत भेटीत दडलंय तरी काय? (पॅकेज) अँकर : मंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची अन्तरवालीत जाऊन भेट घेतलीय. सामंत हे छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांसोबत बैठक घेणार होते. पण ऐनवेळी ही बैठक रद्द करून सामंत यांनी बंद दरवाजा आड जरांगे यांच्याशी चर्चा केलीय. त्यामुळे जरांगे आणि सामंत यांच्यातील बैठकीत दडलंय तरी काय असा प्रश्न आता उपस्थित केला जातोय. बघूया या भेटीवरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ: ०१: मंत्री उदय सामंत यांनी अन्तरवाली सराटीमध्ये येऊन मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतलीय. मनोज जरांगे यांनी राज्य सरकारकडे मराठा समाजाच्या रखडलेल्या प्रश्नांबाबत आधीच अनेक मागण्या केल्यायत. या मागण्या जून महिन्याच्या आधी मान्य न झाल्यास जून महिन्यात अन्तर वाली सराटीत पुन्हा आंदोलन करण्याचा ईशारा जरांगे यांनी आधीच दिलाय. हे आंदोलन सुरू होण्याअधीच सामंत यांनी काल जरांगे यांची भेट घेऊन बंद दरवाजा आड चर्चा केल्यानं दोघांमध्ये झालेल्या बैठकीमुळे चर्चा रंगलीय. ही भेटीची चांगलीच चर्चा रंगलीय. दरम्यान ही कोणतीही राजकीय भेट नसून जरांगे पाटलांनी मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र अधिकाऱ्यांकडून देण्याबाबत टाळाटाळ होत असल्याचा आरोप केला त्यामुळे कॅबिनेट बैठकीत याबाबत चर्चा करणार असल्याचे म्हटलंय. बाइट : उदय सामंत, उद्योग मंत्री व्हिओ: ०२: मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं गेल्या आठवड्यात मनोज जरांगे पाटलांनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर चांगलच टोंडसुख घेत विखे यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. त्यामुळे सामंत यांनी भाजपवर असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी तर जरांगे यांची भेट घेतली नाही ना.? असा देखील प्रश्न उपस्थित केला जाऊ लागलाय. याशिवाय जूनमध्ये जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यास त्यांच्या नाराजीचं टार्गेट हे भाजप असावे शिवसेना असू नये यासाठी तर ही भेट नाही ना अशी चर्चा या भेटीमुळे उपस्थित होऊ लागलीय. मात्र जरांगे यांनी या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचं सांगत भाजपला टार्गेट करणं किंवा शिवसेनेला टार्गेट करणं असा आमचा कोणताही हेतू नसून समाजाचे प्रश्न सोडवणं हीच आमची जबाबदारी असल्याचं जरांगे यांनी म्हटलं आहे. बाइट : मनोज जरांगे पाटील व्हिओ : ०३: मंत्री उदय सामंत यांनी अनेकवेळा मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन चर्चा केलीय. मात्र यावेळची भेट ही सामंत यांनी छत्रपती संभाजीनगर मधील उद्योजकांची बैठक रद्द करून घेतलीय. त्यामुळे सामंत छत्रपती संभाजीनगरमध्ये उद्योजकांच्या भेटीचं निमित्त पुढे करून जरांगे यांच्यासाठी वेगळीच काहीतरी चर्चा करायला तर आले नाही ना असा देखील प्रश्न आता उपस्थित केला जातोय नितेश महाजन, झी-२४ तास, जालना0
0
Report
Advertisement
