icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में तीन DJ पर कार्रवाई, एक दिन में 12.5 लाख का माल जप्त

Chandrapur, Maharashtra:टायटल:---- चंद्रपुरात DJवर पोलिसांचा दणका,एकाच दिवशी 3 DJवर कारवाई, 12.50 लाखांचा मुद्देमाल जप्त चंद्रपूर जिल्ह्यात कर्णकर्कश आणि विनापरवाना डीजेविरोधात पोलिसांनी धडक कारवाई सुरू केली आहे. काल एकाच दिवशी राजुरा, दुर्गापूर आणि रामनगर पोलीस ठाण्यांच्या हद्दीत तीन डीजेंवर कारवाई करण्यात आली. रामनगर पोलिसांनी विनापरवाना उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवणाऱ्या ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे साऊंड सिस्टीम आणि प्लाझ्मा साहित्य जप्त केले. या कारवाईत एकूण 12 लाख 50 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून, संबंधित ऑपरेटर आणि वाहनचालकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. न्यायालयाच्या आदेशांचे आणि ध्वनीप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात पोलिसांची ही कारवाई सुरूच राहणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
0
0
Report

पिंपरी-चिंचवड़ में पानी विभाग की फर्जी नियुक्ति से पांच लोगों को ठगी, आरोपी गिरफ्तार

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरी लावण्याचे आमिष दाखवून आणि बोगस नियुक्तीपत्रे देऊन नागरिकांची आर्थिक फसवणूक करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराच्या खंडणी विरोधी पथकाने मुसक्या आवळल्या आहेत. प्रतीक राजेश धायींजे अस अटक करण्यात आलेल्या 28 वर्षीय आरोपीचे नाव आहे. आरोपी प्रतीक धायींजे हा अनेकांना नोकरीच आमिष दाखवून फसवत असल्याची गोपनीय माहिती खंडणी विरोधी पथकाला १२ सप्टेंबर २०२६ रोजी मिळाली. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी पीडितांशी संपर्क साधून सविस्तर चौकशी केली असता, आरोपीने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात नोकरीचे बनावट कॉल लेटर देऊन पाच जणांची १ लाख १४ हजार ११२ रुपयांची फसवणूक केल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी भोसरीतील धावडे वस्ती परिसरात असल्याची माहिती मिळताच खंडणी विरोधी पथकाने सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिक चौकशी केली असता, यापूर्वी त्याने ‘म्हाडा’मध्ये स्वस्त घर मिळवून देण्याच्या बहाण्याने अनेकांची तब्बल २२ लाख ४१ हजार ७६० रुपयांची फसवणूक केल्याच निष्पन्न झाल आहे. याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा दाखल आहे. आरोपीला पुढील तपासासाठी भोसरी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड नगरपालिका की कचरा गाड़ी से पांच वर्षीय बच्ची की दर्दनाक मौत

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड महापालिकेच्या कचरा संकलन वाहनाच्या धडकेत एका पाच वर्षीय चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. निगडी पोलीस स्टेशन हद्दीतील साईनाथ नगर येथे ही दुर्धैवी घटना काल दुपारी बाराच्या सुमारास घडली. या घटनेत संस्कृती भागवत बिरादार या पाच वर्षीय मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. महापालिकेची कचरा संकलन करणारी गाडी BVG कंत्राटदाराची असल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणात निगडी पोलिसांनी कचरा संकलन गाडीवरील २८ वर्षीय वाहन चालक राहुल प्रलाद चव्हाण आणि त्याच्यासोबत असलेला ३८ वर्षीय राजू कुमार गायकवाड या दोघांना ताब्यात घेतलंय.
0
0
Report

गणेशोत्सव सुरक्षा: 350 अपराधियों पर कार्रवाई, डीजे पर रोक, दामिनी पथक तैनात

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजी नगर शहर पोलिस आयुक्तालय सज्ज झाले असून, कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांकडून तगडा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी तब्बल ३५० सराईत गुन्हेगारांवर हद्दपार कायद्यांतर्गत आणि प्रतिबंधात्मक कारवाईचा बडगा उगारला आहे. यामध्ये झोन-१ मधील १५० आणि झोन-२ मधील २०० जणांचा समावेश आहे. तर डीजे वर बंदी आहे मात्र तरी कुणी कुठं वाजवल्यास कारवाई साठी विशेष पथक तैनात करण्यात आली आहे.. गणेशोत्सवातील गर्दीच्या ठिकाणी अनुचित प्रकार घडू नये म्हणून साध्या वेशातील पोलिसांची करडी नजर राहील. तर, महिला आणि तरुणींच्या छेडछाडचे प्रकार रोखण्यासाठी 'दामिनी पथक' संपूर्ण शहरात गस्त घालणार आहे.
0
0
Report

नागपूर दुष्काळ पर सरकार की कृषक मदद, कर्जमाफी में वृद्धि

Nagpur, Maharashtra:नागपूर - On दुष्काळ - - मागील वर्षी अतिवृष्टी झाल्यानंतर सरकारने हजार कोटी रुपयांची रक्‍म थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली होती.. आणि आता कर्जमाफीत देखील मोठ्या प्रमाणात शेतकऱ्याला मदत केली आहे. - आता उद्भवलेल्या संकटामुळे आपण प्रत्येक जिल्ह्यात लक्ष ठेवून आहोत. आम्ही शेतकऱ्यांना कधीच वाऱ्यावर सोडलं नाही. आत्तापर्यंत इतिहासात शेतकऱ्यांना मदत करण्याचा आमच्या सरकारचा विक्रम आहे. *सरकार समोर आर्थिक अडचण येत असते..मात्र आम्ही शेतकऱ्यांना ती अडचण सांगत नाही. मी शेतकऱ्यांना मदत करत असतो.* On दिशा सालीयान प्रकरण -(हिंदी) - ती एक प्रक्रिया आहे. त्याबद्दल तपास करणारे अधिकारीच बोललेले योग्य असेल. मात्र प्रत्येक घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी. On रोहित पवार - - रोहित पवार सध्या स्वतःला चर्चेत आणण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत आहे. त्यांना आमच्या शुभेच्छा. On कॅबिनेट दुष्काळ चर्चा - - दर आठवड्यात असलेल्या स्थितीवर कॅबिनेटमध्ये चर्चा होत असते. जिल्हा निहाय आढावा घेण्याच्या सर्व पालकमंत्र्यांना सूचना देण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांचे त्यावर लक्ष आहे. एकंदरीत नुकसानीची आकडेवारी तपासून त्यावर उचित निर्णय करण्यात येईल.. On मनोज जरांगे - - जरांंगे पाटील यांचा आंदोलन नॉन इशूला इशू करून होत आहे.. हे आता महाराष्ट्रातील जनतेला कळाल आहे. आपला देश कायद्यावर चालणार आहे. व्हॅलिडीटी कमिटीचं काम प्रत्येक गोष्टीची तपासणी करणे त्यांचं काम आहे. माधुरी पाटील यांचा जो निकाल आला त्यामध्ये जे आवश्यक कागदपत्रे आहेत. त्यामध्ये काही चुकीचं केलं असेल तर न्यायालयात दाद मागण्याचा तुम्हाला अधिकार आहे.. *मात्र अशा पद्धतीने अ राजकतेचे वातावरण महाराष्ट्रात निर्माण करून ज्यांनी सर्वात जास्त मराठा समाजाला न्याय दिला त्यांच्याबद्दल समाजात भ्रम निर्माण करणे योग्य नाही. कोणाच्यातरी इशारावरून आणि द्वेषावरून , पूर्वग्रही भावनेतून होत आहे..अस माझं स्पष्ट मत आहे.* - ज्यांनी आतापर्यंत मराठा समाजाला अनेक योजनांपासून वंचित ठेवलं.. आणि ज्यांनी मराठा समाजाला न्याय देण्याचं काम केलं त्यांच्याबद्दل आज जनतेत भ्रम पसरवून खोटं नेरेटिव्ह पसरविल्या जात आहे हे आज मराठा समाजातील लोकांना कळून चुकला आहे.. On गणेश नाईक - - गणेश नाईक हे वरिष्ठ नेते आहेत. एकनाथ शिंदे त्यांच्यावर कधीच वक्तव्य करत नाही त्यांचा मोठेपणा आहे. एकनाथ शिंदे साहेबांनी ते विरोधी पक्षात असताना त्यांना सत्तेत आणण्यासाठी ते टाकला. *त्यामुळे त्यांना योग्य समज दिली गेली पाहिजे..*
0
0
Report
Advertisement

अकोले के वरखड़वाड़ी क्रशर ब्लास्ट से आदिवासी परिवारों के घर क्षतिग्रस्त, स्थानीय भय बना

Shirdi, Maharashtra:Anc - अकोले तालुक्यातील देवसंथ परिसरातील वरखडवाडी येथे खडी क्रशरच्या ब्लास्टिंगमुळे आदिवासी कुटुंंबांच्या घरांना तडे गेल्याचा आरोप करण्यात आलाय... क्रशरमधील स्फोटांनंतर दूरपर्यंत धक्के जाणवत असून, ब्लास्टिंगदरम्यान उडणारे दगड थेट घरांवर पडत असल्याचंही समोर आलंय... त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय... या प्रकरणानंतर योग्य त्या उपाययोजना करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात आलीय.. या ब्लास्टिंगमुळे काही आदिवासी कुटुंंबांच्या घरांच्या भिंतींना तडे गेल्याचे व्हिडिओ सोशल माध्यमातून समोर आले असून त्यामुळे घरात राहणाऱ्या कुटुंंबांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झालाय... भविष्यात मोठी दुर्घटना घडल्यास त्याला जबाबदार कोण, असा सवालही नागरिकांकडून उपस्थित केला जातोय...
0
0
Report

सातारा में गणेश उत्सव: मंत्री और पुलिस की योजना से यातायात रहा सहज

Satara, Maharashtra:सातारा शहरात गणेशोत्सवाच्या निमित्त पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलीस प्रशासनासोबत शहरातील विविध भागाची पाहणी केली. यावेळी पोलीस प्रशासन आणि गणेश मंडळांनी केलेल्या उत्तम आणि शिस्तबद्ध नियोजनामुळे वाहतुकीची अडचण न आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. मंडळांच्या सहकार्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागला नाही आणि आनंदात गणेशोत्सव साजरा करता येत असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले. तसेच आगामी विसर्जन मिरवणुकीचे नियोजनही यशस्वीपणे पार पडेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला.
0
0
Report
Advertisement

मुंबई हाईकोर्ट ने कहा: पंजीकरण तारीख से शिष्यवृत्ति न रोकें; पीएचडी छात्र को राहत

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:केवळ नोंदणीची तारीख निर्धारित कालावधीच्या आधीची आहे, या कारणावरून पीएचडी विद्यार्थ्यांचा शिष्यवृत्ती अर्ज नाकारता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिला आहे. न्यायालयाने याचिकाकर्त्या विद्यार्थ्यांचा अर्ज तात्पुरता स्वीकारून त्यावर पुढील प्रक्रिया करण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. दादासाहेब बडे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर खंडपीठासमोर सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांच्या पीएचडी संशोधनाचा विषय पुणे विद्यापीठाने १३ मे २०२३ रोजी मंजूर केला होता. मात्र, २०२४-२५ च्या शिष्यवृत्ती जाहिरातीत १ सप्टेंबर २०२३ नंतरच्या नोंदणीची अट घातल्याने बडे यांचा अर्ज स्वीकारला जात नव्हता. यावर न्यायालयाने प्रथमदर्शनी विद्यार्थी पात्र असल्याचे नमूद करत अंतरिम दिलासा दिला. याचिकाकर्त्याचा अर्ज तात्पुरता स्वीकारून, तो इतर निकष पूर्ण करत असल्यास केवळ नोंदणीच्या तारखेवरून अर्ज नाकारू नये, असे आदेश दिले. प्रतिवादींना नोटीस बजावली. पुढील सुनावणी ५ ऑक्टोबर रोजी होणार आहे.
0
0
Report
Advertisement

मानाच्या आजोबा गणपती ट्रस्ट में सामूहिक अथर्वशीर्ष पठण से भक्तों की भारी भीड़

Solapur, Maharashtra:सोलापूर शहरात मानाच्या आजोबा गणपती मंडळामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठणाला सुरुवात. सोलापूर शहरात 1885 साली म्हणजेच 141 वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या मानाच्या श्री आजोबा गणपती ट्रस्ट मध्ये धार्मिक कार्यक्रमांना सुरुवात. श्री आजोबा गणपती मंदिरामध्ये सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला सुरुवात. सामूहिक प्रार्थनेसाठी शेकडोंच्या संख्येने गणेश भक्तांची उपस्थिती. 141 वर्षांपूर्वी मंडळाच्या वतीने इको फ्रेंडली गणेशोत्सव ही संकल्पना साकारण्यात आली होती आज देखील ती कायम. सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आणि पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी.
0
0
Report

विदर्भ दौरे में रोहित पवार ने किसानों के लिए 50 हजार राहत की मांग उठाई

Nagpur, Maharashtra:नागपूर - रोहित पवार - On विदर्भ दौरा - - जिथे अडचणी तिथे आमचं लक्ष असतं. आज विदर्भात मोठ्या प्रमाणात अडचणी येथे असणाऱ्या लोकांना जाणवत आहे. सध्या दुष्काळाची मोठी अडचण आहे. विदर्भात ४५ टक्के पाऊस कमी झाला आहे. - आज आम्ही कारंजा लाड जाणार येथे मोठा मोर्चा आहे. त्यानंतर वर्धा येथे जाणार आहे. वन्य प्राण्यांची शेतकऱ्यांना अडचण होत आहे..त्या संदर्भात मोर्चा त्यामध्ये सहभागी होणार. - दुष्काळाबद्दल मराठवाड्यात 55 टक्के पाऊस कमी झाला आहे. तर पश्चिम महाराष्ट्रात 30 ते 35 टक्के पाऊस कमी झाला आहे. महाराष्ट्र दुष्काळात होरपळत असताना सत्ताधारी राजकारणात व्यस्त आहे. त्यामुळे लोकांचा आवाज लोकांचे कार्यकर्ते म्हणून आम्ही मोर्चे काढत आहोत.. - त्यामुळे सरकारने शेतकऱ्यांना 50 हजार रुपये आणि शेतीवर अवलंबून असणाऱ्या मजुरांना प्रत्येकी कुटुंब पंचवीस हजार रुपये मदत जाहीर करावी.. On कॅबिनेट निर्णय - - हेक्टर 50 हजार रुपये मदत मिळावी ही आमची अपेक्षा आहे. मजुराला 25 हजार. विद्यार्थ्यांना परीक्षा फी मध्ये सवलत न देता अकॅडमी फी मध्ये सवलत देणे गरजेचे आहे. - ज्याप्रमाणे कर्जमाफी अर्धवट देऊन फसवेगिरी केली तशी न करता कोणत्याही अटी न टाकता मदत जाहीर करावी. - आज कॅबिनेट असल्याने तुम्ही कर्जमाफी दिली ती अर्धवट दिली आहे. त्यासाठी आम्हाला लढावा लागलं. आत्तापर्यंत बारा लाख शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपये मिळाले आहे. अजून 43 लाख शेतकऱ्यांचे 25 हजार कोटी रुपये राहिलेत.. त्यामुळे विमा कंपनीचे काढलेले चार ट्रिगर ते पुन्हा आणा आणि एक रुपयात पिक विमा कंपन्याकडून काढा अशी विनंती सरकारला करतो.. On जरांगे मुंबई दौरा - - त्यांनी तो निर्णय घेतलाय. सरकारकडून ज्या पद्धतीने चर्चा व्हायला हवी तशी चर्चा झाली नाही. कोणीही आंदोलनाला बसला तर सरकार त्यांच्यासमोर संवाद साधण्यास कुठेतरी कमी पडत आहे.. On कृषी सेवा परीक्षा आक्षेप - - एमपीएससी चा पेपर फुटेल असा कधी वाटलं नव्हतं मात्र हा पेपर फुटला तेव्हा लोकांचा प्रक्रियेवर विश्वास राहिला नाही.. त्यामुळे तिथे बसलेले अध्यक्ष एका राज्यकर्त्याचे मित्र असले म्हणून त्यांना तिथे बसवण्यापेक्षा तुकाराम मुंडे सारख्या चांगल्या अधिकाऱ्यांना तिथे बसवले सिस्टम क्लिअर होईल. - त्यामुळे पूर्वी झालेल्या परीक्षेवर विद्यार्थी आक्षेप घेतील कारण प्रक्रियेवर त्यांना विश्वास राहिला नाही.. - *अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी ही प्रमुख होती.. मात्र ती मुख्यमंत्र्यांच्या चर्चेत आली नसल्याने आता विद्यार्थी काही शांत बसणार नाही.. सध्या सणसुदीचा काळ असल्याने विद्यार्थी शांत बसलेत मात्र हा काळ संपल्यावर पुन्हा विद्यार्थी आंदोलनाला बसतील.* On जरांगे आंदोलन परवानगी- - कोणताही आंदोलन करायचा असल्यास सरकार त्याला वेळ काढन परवानगी देत असते. याला परवानगी का देत नाही हे योग्य नाही. परवानगी देणे हे सरकारच्या हातात असल्याने ते काय निर्णय देतात ते बघू. On जरांगे यांच्या बहुतांश मागण्या मान्य cm - - चर्चा ही जरांगे पाटील आणि सरकारमध्ये सुरू असल्याने त्याबद्दल आम्हाला अधिक सांगता येणार नाही. त्याबद्दतात आज सायंकाळपर्यंत सरकार स्पष्टीकरण देईल अशी अपेक्षा. On मुंबईत सणासुदचा काळ - - जरांगे पाटील हे राजकीय पक्षाचे नाही तर सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे त्यांना विनंती केली तरी ते कोणत्या राजकीय पक्षाचे ऐकेल असं वाटत नाही.. कोणत्याही व्यक्तीला त्रास होऊ नये अशी सर्वांची अपेक्षा असते. त्यांच्याही आरोग्याचा प्रश्न आहे त्यामुळे त्यांनाही त्रास होऊ शकतो.. - मागच्या वेळी आंदोलन करताना मोठा त्रास झाला होता. हॉटेल बंद पाणी बंद स्वच्छतागृहाची व्यवस्था नव्हती. याचा विचार करून सरकार आणि जरंगे पाटील यांनी चर्चा करून विचार करावा. On दिशा सालियन प्रकरण - - सुशांत सिंह राजपूत यांच्या बद्दल देखील असं झालं होतं. - *राजकीय दृष्टिकोनातून काही लोकांनी आदित्य ठाकरे यांचा नाव घेतला होता. नंतर क्लीन चीट मिळाली. या प्रकरणात देखिल त्यांना क्लिक चिट मिळेल असा विश्वास.* न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. सीबीआय वर विश्वास नसला तरी येत्या काळात ते आदित्य ठाकरे यांना क्लीन चीट देतील. *पुढील तीन वर्ष कोणत्याही निवडणुका नसताना आदित्य ठाकरे यांचा नाव घेतलं जात असेल तर लोकसभा किंवा विधानसभा निवडणुका या प्रीपोल होतील का अशी शंका आम्हाला वाटत आहे..* On शंभूराजे देसाई - - अर्ध सत्य त्यांना वाटत असेल तर पूर्ण सत्य बोलण्यासाठी देसाई साहेबांनी मिडियासमोर याव. काय चर्चा झाली आणि नाही झाली यासंदर्भात लोकांसमोर येऊन मार्ग काढणे महत्त्वाचे आहे. सत्ता आणि निर्णय घेण्याची ताकद त्यांच्यामध्ये आहे. त्यामुळे सर्व विषयात त्यांनी स्पष्टता आणली पाहिजे. On वारंवार दौरे - - या मागचा एकच अर्थ आहे. राज्यात अनेक अडचणी आहेत आणि त्या सरकारच्या माध्यमातून सुटावा हाच यामागचा अर्थ आहे. जिथे लोकांना अडचणी येतील तिथे तुम्हाला जावं लागेल असं पवार साहेबांनी आम्हाला सांगितलं आहे.. कांदा उत्पादक शेतकऱ्यांबद्दल आंदोलन केलं कर्जमाफी बद्दल आंदोलन केलं तेव्हा सरकारला निर्णय घ्यावा लागला.. आम्ही प्रामाणिकपणे लोकांसाठी लढत असल्याने सरकारचा आमच्याकडे जरा जास्त लक्ष आहे. On विरोधी पक्षनेते - - विधानसभा आणि विधान परिषदेत दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नाही. सरकार दुर्लक्ष करत असल्याने आमदार असो की सामान्य नागरिक त्यांना आता विरोधी पक्ष नेत्यासारखं काम करावे लागेल. - माझ्यासोबत इतरही आमदार लढत आहे. लढण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. काही फिल्डवर बोलतात. काहीजण भाषणाच्या माध्यमातून तर काहीजण सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांचा आवाज बनून भूमिका व्यक्त करत असतात.. On बावनकुळे जरांगे आवाहन - - ते सत्ताधारी आहेत त्यांनी एकत्र बसावं आणि संवादातून मार्ग काढावा. तरंगेच्या आरोग्याची काळजी आणि लोकांनाही सणासुदीच्या काळात होणाऱ्या त्रासाबद्दल निर्णय घ्यावा असं वाटतं.. On समान नागरी कायदा - - हे आधीच होणार होतं आता 29 वर नेलं. महाराष्ट्राचा विकास 2019 पर्यंत होणार होता त्यानंतर त्यांनी 29 पर्यंत नेला. आणि नंतर 47 पर्यंत नेले आणि अजून पुढे शंभर वर्षे येतील. या विषयावर बोलण्यापेक्षा आज महाराष्ट्रात महिलांना रात्री रस्त्यावर फिरण्यासाठी भीती वाटत आहे. या बद्दल काहीतरी करा. मी स्वतः गृहमंत्री आहात.. जबाबदारीच्या विषयावर त्यांनी बोलावं.. On महाराष्ट्र बहुभाषिक राज्य अमित शहा, एकनाथ शिंदे - - *पक्षाचा मोठा नेता आल्यानंतर त्या नेत्यासमोर बोलायला धाडस लागतं.. ते धाडस फक्त अजितदादा पवार यांनी दाखवलं होतं.. माजी राज्यपालांनी शिवाजी महाराज आणि बाबासाहेबांबद्दल चुकीच वक्तव्य केलं त्याबद्दल अजितदादांनी मोदी आणि अमित शहा समोर एक वक्तव्य केलं होतं.. ते वक्तव्य महाराष्ट्राच्या हिताचं होतं. आता गुजराती नेता आल्यावर तिथे बहुभाषिक म्हणून मराठी विसरून जात असाल तर हे योग्य नाही.. अमित शहा यांना गुजरातला भरपूर प्रोजेक्ट गेलेत ते थांबून आता महाराष्ट्रात आणून येथील बहुभाषिक आणि मराठी मुलामुलींच्या हातांना काम मिळेल असा धाडस दाखवायला पाहिजे होतं..* - *मात्र कोणाचं काहीतरी अडकलं असतं त्यामुळे एवढ्या मोठ्या नेत्यासमोर बोलायचं धाडस ना मुख्यमंत्र्यांना नाव मुख्यमंत्र्यांना राहिला हे दुर्दैव आहे..*
0
0
Report

नागपुर MIDC के निको इंजीनियरिंग कारखाने में कनवेअर बेल्ट फँसने से मजदूर की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर में एमआईडीसी में निको हेवी इंजिनिअरिंग कास्टिंग लिमिटेड के एक कारखाने में काम के दौरान वाळू-मल्टीवर चढविणाऱ्या क्रेन के कन्वेयर बेल्ट में हाथ फँस जाने से 30 वर्षीय रोहित आर. चौबे की मौत हो गई। सोमवार सुबह लगभग 8:30 बजे पंचशील नगर, इसासनी, Hingna Road के निवासी रोहित र चौबे कारखाने गया था। वहाँ उ льोह वितळवणाऱ्या भट्टी के पास स्थित वाळू-मिक्स को क्रेन से ले जाते समय उसका हाथ कनवेअर बेल्ट में फँस गया और क्षण भर में उसका हाथ कंधे से अलग हो गया। बाद में अन्य कामगारों ने क्रेन बंद कर उसे नीचे उतारा और उसके हाथ के साथ उसे डिगडोह स्थितLatam... लता मंगेशकर अस्पताल ले जाया गया। हालत गंभीर होने के कारण डॉक्टरों ने नागपूर मेडिकल कॉलेज में रिफर किया, जहाँ पहुँचते ही उसकी मृत्यु की पुष्टि हो गई। उसका विवाह हुआ है और एक चार महीने का बेटा भी है। एमआईडीसी पुलिस ने इस घटना की रिपोर्ट दर्ज कर जांच शुरू कर दी है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top