icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Washim के Gen Z युवकों ने 10 करोड़ रुपए जुटाने का अभियान शुरू किया

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: पुण्याच्या चिमुकल्या हृदय दरेकरच्या उपचारासाठी तब्बल १० कोटी रुपयांची गरज आहे. त्याच्या मदतीसाठी राज्यभर अभियान सुरू असताना, वाशिममधील ‘Gen Z’ युवकही मदतीसाठी पुढे आले आहेत. हातात पोस्टर घेऊन हे युवक वाशिम शहरातील चौकाचौकात उभे राहत नागरिकांना हृदयच्या उपचारासाठी मदत करण्याचं आवाहन करत आहेत. सोशल मीडियासोबतच शहरात अनेक ठिकाणी मदतीचे बॅनरही लावण्यात आले आहेत. केवळ आंदोलन आणि सोशल मीडियापुरते मर्यादित न राहता, गरजूंसाठी संवेदनशीलपणे पुढे येण्याची भावना या युवकांनी दाखवून दिली आहे. बाईट : कृष्णा कदम, वाशिम
0
0
Report

कोराड़ी विद्युत केंद्र में ओव्हरहॉलिंग हादसे में कर्मचारी गंभीर घायल, मौत की पुष्टि

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूर के कोराडी विद्युत केंद्र में ओव्हरहॉलिंग के काम के दौरान बड़ा हादसा हुआ। 660 मेगावॉट के यूनिट क्रमांक 10 में बॉयलर विभाग में कोईल निकालने का काम चल रहा था। इसी समय लोहे की रॅक अचानक नीचे गिर गई और कर्मचारी मारुती मेश्राम के ऊपर आ पड़ी, जिससे वह गंभीर रूप से घायल हो गए। घायल को अस्पताल पहुँचाने के लिए एम्बुलेंस बुलाई गई, लेकिन मार्ग के दौरान उनकी मृत्यु हो गई। घटना की जानकारी मिलते ही कोराडी पुलिस घटनास्थल और मेयो अस्पताल पहुँची और घटना की जांच शुरू कर दी। हादसे के कारण और सुरक्षा व्यवस्था के बारे में पुलिस जांच कर रही है।
0
0
Report
Advertisement

शिवसेना ने स्मार्ट मीटर के विरोध में वैभव नाईक के नेतृत्व में मोर्चा निकाला

Oras Bk., Maharashtra:वैभववाडीत स्मार्ट मीटर सक्तीविरोधात आणि वाढत्या महागाईच्या निषेधार्थ शिवसेना उबाठा तर्फे मोर्चा काढण्यात आला. माजी आमदार तथा जिल्हाप्रमुख वैभव नाईक यांच्या नेतृत्वाखाली या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. शिवसेना कार्यालयातून निघालेला हा मोर्चा तहसील कार्यालयावर धडकला. त्यानंतर मोर्चा महावितरणच्या वैभववाडी कार्यालयावर नेण्यात आला. हातात बॅनर व फलक घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. स्मार्ट मीटरची सक्ती थांबवणे, महागाईवर नियंत्रण आणणे, रेशनकार्ड धारकांना सुलभ धान्य वितरण करणे तसेच गणेशोत्सव काळात गँस पुरवठा सुरळीत ठेवणे आदी मागण्या प्रशासनामार्फत शासनापर्यंत पोहोचविण्याची मागणी शिवसेनेच्या वतीने करण्यात आली.
0
0
Report

पाणी टंचाई विरोधात भाजपाचा भव्य मोर्चा: बारवी डॅम असूनही जल संकट कायम

Kalyan, Maharashtra:पाणीटंचाईविरोधात भारतीय जनता पक्षाचा भव्य पाणीबाणी मोर्चा, कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक २७ मधील पाथर्ली, गोग्रासवाडी, टिळकनगर व अंबिकानगर तसेच प्रभाग क्रमांक १९ मधील सागर्ली, एमआयडीसी, इंदिरा नगर व खांबालपाडा या परिसरातील तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ भारतीय जनता पक्षाच्या वतीने भव्य “पाणीबाणी मोर्चा” काढण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून या सर्व परिसरातील नागरिकांना प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. या गंभीर प्रश्नाबाबत भारतीय जनता पक्षाच्या नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे अनेक वेळा पत्रव्यवहार केला. महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊन या समस्येची माहिती देण्यात आली. तसेच पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क साधून संबंधित परिसरातील जलवाहिन्या व पाणीपुरवठा व्यवस्थेची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली. गोग्रासवाडी विभागासह संबंधित परिसरामध्ये पाणीपुरवठ्याच्या व्यवस्थेची तपासणी करण्यात आली असली तरी, अद्यापही परिस्थितीमध्ये अपेक्षित सुधारणा झालेली नाही. आजही नागरिकांना अनियमित व अपुरा पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. विशेष म्हणजे, गेल्या पंधरा वर्षांमध्ये या परिसरात इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणीटंचाईची समस्या कधीही जाणवली नव्हती. मात्र, गेल्या महिन्याभरापासून नागरिकांना पाण्यासाठी अक्षरशः हाल सहन करावे लागत आहेत. आपल्या परिसराला ज्या बारवी धरणातून पाणीपुरवठा होतो, ते बारवी धरण पूर्ण क्षमतेने भरलेले असतानाही नागरिकांना पुरेसा व नियमित पाणीपुरवठा मिळत नाही, ही अत्यंत गंभीर व चिंताजनक बाब आहे. बाईट, महेश पाटील, नगरसेवक भाजप,
0
0
Report

अकोला के उमरा ग्रामपंचायत में लाखों के कथित अपव्यय का मामला; जांच की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यातील उमरा ग्रामपंचायतीतील कथित आर्थिक गैरव्यवहार आणि शासकीय आदेशांची अंमलबजावणी न केल्याप्रकरणी महाराष्ट्र विधानमंडळ पंचायत राज समितीकडे तक्रार करण्यात आली आहे. ग्रामपंचायतीतील सन २०२१-२३ या कालावधीतील तत्कालीन सरपंच व सचिव यांनी लाखो रुपयांचा अपहार केल्याचा आरोप तक्रारदार राजेंद्र मावलकर यांनी केला आहे. या प्रकरणी अमरावती विभागीय आयुक्तांनी कारवाईचे आदेश दिले असतानाही अद्याप संबंधित कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई झालेली नसल्याचा दावा तक्रारीत करण्यात आला आहे. तसेच, प्रकरणातील अपहाराची रक्कम वसूल करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. याप्रकरणी तातडीने चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

चित्रा वाघ ने राहुल गांधी पर निशाना साधकर पितृसत्ता पर सवाल ठोके

Ambernath, Maharashtra:पितृसत्ताकतेवर बोलण्याआधी राहुल गांधींनी घरात डोकवावं चित्रा वाघांचा हल्लाबोल प्रियंका गांधी सक्षम असूनही त्यांना मागे का ठेवलं चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल पितृसत्ताकतेचा सर्वात मोठा लाभार्थी राहुल गांधीच चित्रा वाघांचा घणाघात मुलीला मागे ठेवून मुलाला पुढे का केलं?चित्रा वाघांचा सोनिया गांधींना सवाल राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर हुशार चित्रा वाघांचा गांधी कुटुंबावर निशाणा भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. महाराष्ट्रात येऊन राजमाता जिजाऊ आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या भूमीत राहुल गांधी पितृसत्ताकतेविरोधात बोलत असतील, तर त्यांनी आधी आपल्या पक्षातील आणि कुटुंबातील परिस्थितीकडे पाहावं, असा टोला चित्रा वाघ यांनी लगावला आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी अधिक हुशार आणि सक्षम असल्याचं म्हणत, त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. व्हिओ : महाराष्ट्रात येऊन पितृसत्ताकतेची भाषा करणाऱ्या राहुल गांधींनी आधी आपल्या कुटुंबातील राजकारणाचा विचार करावा, असं चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे. राहुल गांधींपेक्षा प्रियंका गांधी कणभर अधिक हुशार आणि सक्षम आहेत, मग त्यांना राजकारणात मागे का ठेवण्यात आलं, असा थेट सवाल त्यांनी सोनिया गांधींना केला.प्रियंका गांधी यांच्यामध्ये क्षमता असतानाही त्यांना राजकारणात पुढे का आणलं नाही, असा प्रश्न उपस्थित करत चित्रा वाघ यांनी गांधी कुटुंबावर टीका केली. प्रियंका गांधी यांचं वयाच्या पंचविशीतच लग्न करून त्यांना सासरी पाठवण्यात आलं, असा दावा त्यांनी केला.पितृसत्ताक व्यवस्थेचा सर्वात मोठा लाभार्थी कोण असेल, तर तो स्वतः राहुल गांधी आहेत, अशी बोचरी टीकाही चित्रा वाघ यांनी केली. त्यामुळे सोनिया गांधींनी देशाला याचं उत्तर द्यावं की, मुलगी सक्षम असतानाही तिला मागे ठेवून मुलाला राजकारणात पुढे का केलं, असा सवाल चित्रा वाघ यांनी उपस्थित केला.
0
0
Report

मनसे के साथ युति नहीं तो भाजपा सत्ता से बाहर, महाराष्ट्र में राजनीतिक हलचल तेज

Kalyan, Maharashtra:सेनेने मनसेसोबत युति तोडली नाही तर भाजपा सत्तेतून बाहेर पडणार भाजपा कार्यकारणीत सर्व पदाधिकाऱ्यांचा झाला निर्णय पुण्यातील कॉलेजमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो मनसे नेते अमित ठाकरे यांच्या उपस्थितीत हटवण्यात आला . यानंतर संबंध देशभरात भाजपाकडून याचा निषेध केला जातोय. दर्म्यान कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील महायुतीच्या राजकारणात तर मनसेवरून भाजप आणि शिवसेनेत संघर्ष पेटलाय. दोघांमध्ये काडीमोड होण्याची शक्यता वर्तवली जातीय.आज कल्याण डोंबिवली महापालिका मुख्यालयात उपमहापौरांच्या दालनात भाजपा पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी शिवसेनेने मनसेशी युती तोडली नाही, तर भाजपा सत्तेतून बाहेर पडेल असा पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतलाय. दरम्यान अंतिम निर्णय हा भाजपा पक्ष श्रेष्ठ घेतील अशी माहिती भाजपा उपमहापौर राहुल दामले यांनी दिली.तर ही नाटकं आहेत, सत्तेपासून हे दूर राहू शकत नाही अशी प्रतिक्रिया काँग्रेस गटनेत्या कांचन कुलकर्णी यांनी दिली.
0
0
Report

Kolhapur में महायुती की कुश्ती जारी, आंतरिक टकराव तेज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात महायुतीची सत्ता मजबूत असली, तरी महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता चव्हाट्यावर येताना दिसतोय. कोल्हापूर महापालिकेपासून गोकुळच्या निवडणुकीपर्यंत आणि आता पालकमंत्री विरुद्ध आमदार अशा राजकीय संघर्षाच्या चर्चा रंगू लागल्या आहेत. सत्ता महायुतीची कुस्तीही महायुतीतच अशी परिस्थिती कोल्हापूर जिल्ह्याच्या राजकारणात पाहायला मिळत आहे.. VO 1 : कोल्हापूर महानगरपालिकेत सध्या महायुतीची सत्ता. भाजपच्या रूपाराणी निकम महापौरपदी विराजमान… मात्र, महापालिकेच्या कारभारात महायुतीतीलच दोन घटक पक्ष आमनेसामने आल्याचं पाहायला मिळालं. शिवसेनेचे गटनेते सारंगधर देशमुख आणि राष्ट्रवादीचे गटनेते आदिल फरास… वृक्ष प्राधिकरणाच्या बैठकीत आदिल फरास यांनी मांडलेल्या भूमिकेला शारंगधर देशमुख यांनी विरोध केला आणि पाहता पाहता वाद विकोपाला गेला…दोघांमध्ये हमरीतुमरी झाली , एकमेकांना आव्हान दिले. इतकंच नव्हे तर शड्डू ठोकत थेट चौकात येऊन बघून घेण्यापर्यंत हा वाद पोहोचला…त्यामुळे पोलिसांना देखील पाचारण करावे लागले.वाद इतका वाढला की अखेर पोलिसांनाही हस्तक्षेप करावा लागला, तर महापौर रूपाराणी निकम यांना मध्यस्थी करून दोन्ही नेत्यांना शांत करण्याची वेळ आली. Byte :- महापौर रूपाराणी निकम VO 2 : महापौरांनी हा घरातील वाद असल्याचं सांगत तो घरातच मिटेल, अशी भूमिका घेतली… पण हा केवळ महापालिका पुरता मर्यादित संघर्ष नाही तर महायुतीतील वाढत्या अंतर्गत कुरघोडीचं हे उदाहरण आहे. कारण महानगरपालिका असो किंवा गोकुळ दूध संघ. महायुतीतील नेत्यांचा अंतर्गत संघर्ष वाढलेला पाहायला मिळतोय. कारण गोकुळच्या सत्तेसाठी महायुतीतीलच भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना असा संघर्ष पाहायला मिळत आहे. दूध संस्थांच्या पात्रतेवरून दुग्ध विभागाकडे दाखल झालेल्या तक्रारींच्या सुनावणीदरम्यानही महायुतीतील दुसऱ्या फळीतील नेत्यांनी भाजपाचा उल्लेख न करता अधिकाऱ्यांच्यावर आरोप केला. Vis Gondhal VO 3 :- महायुतीतील अंतर्गत धुसफूस केवळ महापालिका आणि गोकुळपुरती मर्यादित नाही…कोल्हापूर शहराचे शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांनीही काही दिवसांपूर्वी पक्षांतर्गत आणि जिल्ह्याच्या राजकारणावर भाष्य केलं. मंत्रिपद न मिळाल्याने नाराज असणाऱ्या आमदार क्षीरसागर यांनी पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांचे नाव न घेता जिल्ह्यात पक्षवाढीसाठी काय योगदान दिलं, असा अप्रत्यक्ष सवाल उपस्थित केला. इतकंच नाही, तर वरिष्ठांनी मंत्र्यांच्या कामकाजाचं ऑडिट करावं, अशी मागणीही त्यांनी केली. यामुळे क्षीरसागर आणि पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्यातील सुप्त संघर्षाची चर्चाही रंगली. Byte :- आमदार राजेश क्षीरसागर VO 4 : एकीकडे कोल्हापूर जिल्ह्यावर महायुतीची मजबूत पकड… तर दुसरीकडे याच महायुतीतील घटक पक्षांमध्ये सत्तेच्या वाट्यावरून कुरघोडी… महापालिकेत शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी… गोकुळमध्ये भाजप विरुद्ध राष्ट्रवादी-शिवसेना… आणि तर सेना आमदार विरुद्ध पालकमंत्री अशी समीकरणं. त्यामुळे प्रश्न एकच. महायुती मजबूत आहे की महायुतीतील अंतर्गत संघर्ष आता उफाळून येतोय.. BYTE – विजय पाटील, राजकीय पत्रकार VO 5 : महायुती सत्तेत असताना घटक पक्षांमध्ये सुरू असलेली ही रस्सीखेच आगामी काळात आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. कारण सत्ता एकच पण सत्तेचे दावेदार अनेक. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असोत. गोकुळची निवडणूक असो… किंवा जिल्ह्यातील आगामी राजकीय समीकरणं. प्रत्येक पक्षाला आपला प्रभाव वाढवायचा आहे. त्यामुळे नेते एकीकडे महायुतीत सगळं काही अलबेल आहे, असा दावा करत असले तरी ग्राउंडवर मात्र चित्र वेगळंच दिसतंय. सत्तेत महायुती, पण कुस्तीही महायुती मध्येच होत असल्याने या अंतर्गत संघर्षाचा फटका कोल्हापूरच्या विकासाच्या प्रश्नांना बसणार नाही ना? याकडे आता कोल्हापूरकरांचं लक्ष लागलंय. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report
Advertisement

नागपुर में DJ बैन के लिए जनचळवळ, संदीप जोशी का पहल

Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरातही DJ बंदीसाठी जनचळवळ उभारणार... माजी आमदार व माजी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार DJ चा भयानक आवाज, लेझर लाईटमुळे कानावर आणि डोळ्यावर परिणाम होतात... यामध्ये सर्वसामान्य नागरिकच भरडल्या जातो . ज्येष्ठ नागरिक लहान मुलं आणि रुग्ण भरड्या जातात.. त्यामुळे आनंद साजरा करायला कुठेही विरोध नाही.. सर्वधर्मीयांनी सर्व आनंद साजरे केले पाहिजे मात्र परंतु ते साजरे करत असताना आपल्याकडे असलेले बँड, ढोल -ताशे, संदल, भजन यांचा वापर करण्याच आवाहन... डिजे बंदीकरता चळवळ उभी करण्यासाठी डिजिटल Online पिटीशन प्रशासनाने मंडळाकडून हमीपत्र घ्यावे.. आम्हाला सात ते आठ मंडळानी DJ न वापरण्याचे हमीपत्र दिले याबाबत मुख्यमंत्र्यानाही भेटू DJ आणि लेझर लाईटवर बंदी आणावी..राजकीय नेत्यांनीही DJ बाबत थांबावे गरज पडल्यास कारवाई करावी माजी आमदार आणि भाजप नेते संदीप जोशी यांच्याशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधिनी
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top