445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक ब्रेकिंग: बीएसएनएल-महावितरण केबल चोरी आरोपी गिरफ्तार, करोड़ों का माल बरामद
Nashik, Maharashtra:नाशिक ब्रेकिंग बीएसएनएल व महावितरणच्या महागड्या यूजी केबल चोरी करणाऱ्या आरोपींना अटक... मुंबईतील भांडुप परिसरातून 17.5 टन अॅल्युमिनियम केबल, 14.5 टन कॉपर वायर जप्त एकूण 2 कोटी 88 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांच्या ताब्यात.. गुन्हेशाखा युनिट-1, गुंडा पथक आणि अंबड गुन्हेशाखेची संयुक्त मोठी कारवाई मुंबई व बिहार येथील 6 आरोपींना अटक; चोरीचा माल गोडाऊनमधून घेतला ताब्यात नाशिकरोड येथील बीएसएनएलच्या भूमिगत केबल चोरी प्रकरणाच्या तपासातून मोठा खुलासा सरकारवाडा, मुंबईनाका, इंदिरानगर आणि म्हसरूळ पोलीस ठाण्यातील 5 केबल चोरीचे गुन्हे उघडकीस0
0
Report
मनमाड-लासलगाव मार्ग पर टैंकर पलट, डीजल गळती से भारी हड़कंप, यातायात बाधित
Chandvad, Maharashtra:मनमाड-लासलगाव मार्गावर रायपूर जवळ इंधन घेऊन जाणारा टँकरने ॲपे रिक्षाला धडक दिल्यानंतर टँकर पलटी होऊन त्यातून मोठया प्रमाणात डिझेल गळती सुरु झाली. टँकर मधून डिझेल गळती होतं असल्याचे पाहून परिसरातील नागरिकांनी डिझेल घेण्यासाठी गर्दी केली होती. अपघातात टँकर, रिक्षा चालकासह 4 प्रवासी गंभीर जखमी झाले असू न त्यांना मनमाडच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेऊन टँकर आणि त्यातून गळणाऱ्या डिझेलवर पाण्याचा मारा सुरु केला. डिझेल गळतीमुळे आग लागण्याची शक्यता असल्याने दोन्ही बाजूची वाहतूक रोखून धरण्यात आली त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला.0
0
Report
नाशिक में पनीर आउट ऑफ स्टॉक, दामों में भारी बढ़त; होटल-ढाबे परेशान
Nashik, Maharashtra:नाशिकमध्ये पनीरचा तुटवडा पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक पनीर बटर मसाला गायब! नाशिकच्या हॉटेल्समधून पनीर आउट ऑफ स्टॉक! नाशिककरांच्या जिभेचे चोचले पुरवणाऱ्या हॉटेल्स आणि ढाब्यांवर सध्या एका वेगळ्याच संकटाने थैमान घातलंय. हॉटेलमध्ये जाऊन पनीरच्या पदार्थांवर ताव मारणाऱ्या खवय्यांची निराशा होत आहे. कारण नाशिकमधील हॉटेल्समधून पनीर गायब झालंय. गेल्या तीन दिवसांपासून शहरात पनीरचा मोठा तुटवडा निर्माण झाला असून, यामुळे हॉटेल व्यावसायिक आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले आहेत. या संपूर्ण प्रकारामुळे आता बाजारात शुद्ध पनीरची मागणी प्रचंड वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी असल्याने शुद्ध पनीरच्या दरात किलोमागे ८० ते ९० रुपयांची थेट वाढ झाली आहे. यामुळे घाऊक बाजारात पनीरचे दर प्रति किलो ६५० रुपयांच्या आसपास पोहोचले आहेत. १ किलो शुद्ध पनीर तयार करण्यासाठी तब्बल ५ लिटर दूध लागतं. दुधाच्या वाढलेल्या दर, वाहतूक खर्च आणि तपासणीची कडक प्रक्रिया यामुळे पनीरचे उत्पादन महागल्याचं स्थानिक दूध उत्पादकांचे म्हणणे आहे. एकीकडे भेसळयुक्त पनीर विकणाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत, तर दुसरीकडे शुद्ध पनीर महागल्यामुळे सर्वसामान्य ग्राहकांच्या खिशाला कात्री लागते आहे. तूर्तास, नाशिककरांना पनीरच्या चमचमीत चवीसाठी आणखी काही दिवस वाट पाहावी लागण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
7.25 क्विंटल आंब्यांचा नैवेद्य: संत गजानन महाराज संस्थानात भाविकांची गर्दी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील करंजा लाड येथील ममता नगरमधील संत गजानन महाराज संस्थानात अधिक महिन्यानिमित्त गजानन महाराजांना तब्बल ७.२५ क्विंटल आंब्यांचा नैवेद्य अर्पण करण्यात आला. आंब्यांच्या आकर्षक आरासीत सजलेल्या महाराजांच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली. नैवेद्यासाठी वापरलेल्या आंब्यांचा रस तयार करून भाविकांना प्रसाद म्हणून वाटप करण्यात आले. या उपक्रमात तालुक्यातील ३० गावांतील महिला सेवेकऱ्यांनी सहभाग घेतला. तसेच संस्थेशी जोडलेल्या ३ हजारांहून अधिक महिलांचा ब्लाऊज पीस देऊन सन्मान करण्यात आला. महिलांसाठी हे संस्थान माहेरघर असल्याची भावना आयोजकांनी व्यक्त केली.0
0
Report
रत्नागिरी-कोकण में मृग नक्षत्र के साथ मॉनसून की बारिश की उम्मीद, 15 जून से सक्रिय
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- मृग नक्षत्रात कोकणाला पावसाची प्रतिक्षा सुपर अल निनोच्या प्रभावामुळे १५ जूनपासून मान्सुन सक्रीय होणार कोकणात सध्या पावसाचा लंपडाव सुरु मान्सुन सक्रिय होऊन उलटले काही दिवस कडक उन, ढगाळ हवामान आणि सहस्य उकाडामुळे कोकणवासीय हैराण जून महिन्यात कोकण किनारपट्टी भागात हवेतील आर्द्रता वाढली त्यामुळे कोकणी माणूस घामाघुम उकाड्यातून सुटकेसाठी दमदार पावसाची प्रतिक्षा मान्सुन इलो पण मिरग कोरडेच गेलो..0
0
Report
मिरा भाईंदर में सी क्वीन बार पर छापा, 12 युवतियाँ मुक्त, 12 कर्मी गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर ब्रेक मिरा भाईंदर मध्ये डीसीपी राहुल चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी 'सी क्वीन बार'वर मोठी कारवाई करत छापा टाकला. या छाप्यादरम्यान बारमधून १२ तरुणींची सुटका करण्यात आली असून, व्यवस्थापक आणि कॅशियरसह १२ कर्मचाऱ्यांना अटक केली आहे. पोलिसांनी बारमधील महत्वाचे दस्तऐवज आणि पुरावे जप्त केले असून पुढील तपास वेगाने सुरू आहे. बेकायदेशीर कृत्यांवरील या धडक पोलीस कारवाईचे स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात स्वागत होत आहे.0
0
Report
Advertisement
धाराशिव में ओमराजे निंबाळकर की गैरहाज़िरी ने सियासी घमासान मचा दिया
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांच्या उपस्थितीत झालेल्या महाविकास आघाडीच्या प्रचार बैठकीत खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या अनुपस्थितीची जोरदार चर्चा रंगली आहे. गेल्या काही दिवसांपासून ओमराजे निंबाळकर शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले असतानाच त्यांनी या महत्त्वाच्या बैठकीकडे पाठ फिरवल्याने राजकीय तर्कवितर्कांना आणखी बळ मिळालं आहे. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी धाराशिवमध्ये शिवसेना नेते अंबादास दानवे यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली. मात्र या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर गैरहजर राहिल्याने चर्चांना उधाण आलं. गेल्या आठ दिवसांपासून या बैठकीची तयारी सुरू होती. तरीही ओमराजे निंबाळकर उपस्थित न राहिल्याने त्यांच्या संभाव्य पक्षांतराच्या चर्चांना पुन्हा एकदा हवा मिळाली आहे. ठाकरे गटातील काही खासदार शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू असताना ओमराजे यांचे नावही चर्चेत आहे. याबाबत अंबादास दानवे यांना विचारले असता, ओमराजे निंबाळकर वैयक्तिक कारणामुळे बैठकीला उपस्थित राहू शकले नसल्याचे त्यांनी सांगितले. तसेच पक्षांतराच्या चर्चा गेल्या दोन वर्षांपासून सुरू असून त्या केवळ अफवा असल्याचेही दानवे यांनी स्पष्ट केले. मात्र राजकीय वर्तुळात दानवे यांचा हा दौरा संभाव्य राजकीय पडझड रोखण्यासाठी आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वास निर्माण करण्यासाठीच असल्याची चर्चा रंगली आहे.0
0
Report
महाऑनलाईन पोर्टल छह दिन बंद, दाखले जारी करने की मांग तेज
Washim, Maharashtra:जात प्रमाणपत्र, नॉन-क्रीमीलेयरसह विविध दाखले महाऑनलाईन पोर्टल व सर्व्हर गेल्या सहा दिवसांपासून बंद असल्याने प्रलंबित आहेत. यामुळे जिल्ह्यातील हजारो विद्यार्थी व पालक चिंतेत असून प्रवेश प्रक्रियेसह अन्य कामांवर परिणाम होत आहे. महाऑनलाईन पोर्टलवरील तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून प्रलंबित दाखले वितरित करावेत, अशी मागणी विद्यार्थी व पालकाकडून राज्य सरकारकडे करण्यात येत आहे. मागील सहा दिवसापासून वेबसाईट बंद असल्याने सेतू संचालकाने सांगितले आहे.0
0
Report
लातूर में किसान हौसाबाई को नया सक्षम बैल, मुख्यमंत्री ने तुरंत मदद दी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... स्किप्ट ::- औत खांद्यावर घेऊन नांगरणी करणाऱ्या हौसाबाईंना अखेर मिळाला त्यांच्या पसंतीचा नवा बैल.... पहिला बैल कुपोषित निघाल्यानंतर मुख्यमंत्र्यांची तातडीने दखल घेत दिला दुसरा बैल.... AC ::- वीज पडून बैल दगावल्यानंतर स्वतःच्या खांद्यावर औत घेऊन शेताची मशागत करणाऱ्या लातूर जिल्ह्यातील हौसाबाई गायकवाड यांचा संघर्ष राज्यभर चर्चेचा विषय ठरला. ZEE 24 TAAS च्या बातमीनंतर थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत प्रशासनाला तातडीने बैल उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या. मात्र, प्रशासनाने दिलेला पहिला बैल आजारी आणि कुपोषित असल्याची बाब समोर आली आणि त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. या प्रकरणाची पुन्हा दखल घेत मुख्यमंत्र्यांनी तातडीने हस्तक्षेप केला. त्यानंतर हौसाबाई गायकवाड यांच्या कुटुंबाला त्यांच्या पसंतीचा दुसरा सक्षम बैल उपलब्ध करून देण्यात आला आहे. याबद्दल हौसाबाई आणि त्यांच्या कुटुंबीयांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच प्रशासनाचे आभार मानले आहेत.0
0
Report
Advertisement
नालासोपारा के कालंब बीच पर पर्यटक की कार समुद्र के पास पहुँची, स्थानीय ने बहादुरी से निकाल ली
Vasai-Virar, Maharashtra:कळंब बिचवर पर्यटकाला अति उत्साह चांगलाच भोवला. समुद्राच्या भारतीच्या पाण्यात कार अडकल्याचा व्हिडीओ व्हायरल नालासोपारा : नालासोपारा पश्चिमेकडील कळंब समुद्रकिनारी पर्यटकाला अति उत्साह चांगलाच भोवल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही घटना गुरुवार सायंकळची आहे. सुरक्षेच्या दृष्टीने किनाऱ्यावर कार चालवण्यास मनाई असताना देखील उत्साहाच्या भरात पर्यटकांनी आपली कार समुद्राच्या पाण्याच्या जवळून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र समुद्राला भरती आल्यामुळे पाणी वाढत गेला आणि कार पाण्यात जायची वेळ आली होती. घटनेच्या गांभीर्य लक्षात घेऊन स्थानिक रहिवासी दुकानदार आणि काही पर्यटकांनी मिळून या कारला ढकळून बाहेर काढल्यामुळे कारचे मोठे नुकसान टळले.0
0
Report
गोंदिया में जोरदार बारिश से गर्मी गई दूर, सड़कें जलमय
Bhandara, Maharashtra:गोंदियात वादळीवारासह दमदार पावसाची हजेरी... उकाड्यापासून मिळाला नागरिकांना दिलासा.. गोंदियातील जवळपास सर्वच रस्ते झाले जलमय.. मृग नक्षत्रात आगमनानंतर पहिल्यांदाच दमदार पावसाची हजेरी लागल्याने जिल्ह्यातील वातावरण थंडगार झाले आहे. गोंदिया जिल्ह्यात सोसाट्याच्या वाऱ्यासह दमदार पावसाने हजेरी लावली आणि अचानक आलेल्या वादळीवाऱ्यासह आलेल्या दमदार पावसाने जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये नागरिकांची धावपळ उडाली. मात्र दमदार पावसाच्या हजेरीने उकडापासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसापासून तापमानात सातत्याने वाढ होत असताना त्यात मान्सूनचे आगमन झाले असताना गोंदियात मात्र दमदार पावसाची वाट गोंदियाकर बघत होते आज आलेला दमदार पावसाने नागरिकांना आनंदित केले असून जिल्ह्यातील जवळपास सर्वच रस्ते जलमय झाले आहे. आलेल्या दमदार पावसामुळे आता बळीराजा सुद्धा सुखावलेला आहे. येणारा दिवसात पावसाने चांगली हजेरी लावावी अशी आशा नागरिक करत आहेत0
0
Report
चंद्रपूर में तंबाकू निर्माण केंद्र पर दबिश: 11.5 लाख का माल जब्त
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात पोलीस आणि अन्न सुरक्षा विभागाची संयुक्त कारवाई; तंबाखू निर्मिती केंद्रावर छापा मारून सुमारे साडेअकरा लाखांचा मुद्देमाल जप्त केला. गावात विजय भांडेकर या व्यक्तीकडे सुगंधित तंबाखू व हुक्का तंबाखू साठा असून ते गडचिरोली व चंद्रपूर या दोन्ही जिल्ह्यात विक्री करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. धाडीत हुक्का तंबाखू, खुला सुगंधित तंबाखू, पॅकिंग साहित्य व यंत्रसामुग्री जप्त झाली आहे. विक्रीप्रकरणाचा मुख्य सूत्रधार म्हणून गडचिरोळाचा विनय गुप्ता याचे नाव पुढे आले असून पोलिस त्याच्या मागावर आहेत.0
0
Report
Advertisement
72 घंटों बाद तेंदुए का पिल्ला माँ की गोद में लौट आया; मुरबाड में खोज सफल
Ambernath, Maharashtra:अखेर 72 तासांनी बिबट्याचे पिल्लू आईच्या कुशीत विसावले मुरबाड जिल्ह्यात बिबट्याच्या शोध मोहيمेला यश मिळाले. पिल्लू घेऊन जातांना मादी बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात कैद झाली. गावातील नागरिक ग्रामविभाग व मुंबई येथील संस्थेची टीमने 72 तासांच्या शोध मोहिमेची कथा सुरु केली. पिल्ला व मादी बिबट्याची भेट झाली आणि सुटकेचा निःश्वास टाकला. पहिल्या रात्री मादी बिबट्या ट्रॅप कॅमेऱ्यात आली, परंतु पिल्लाला न घेता परत गेली. तिसऱ्या रात्री पिल्लू सुरक्षित पिंजऱ्यासमोर आल्यावर मादी बिबट्या जंगलात निघून गेली.0
0
Report
हाईकोर्ट के आदेश के बावजूद अकला में स्कूल बंद कराने को लेकर मनसे का प्रदर्शन
Akola, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने वाढत्या उष्णतेचा विचार करून ३० जून २०२६ पूर्वी शाळा सुरू करू नयेत, असे स्पष्ट निर्देश दिले असतानाही अकोला शहर आणि जिल्ह्यातील अनेक शाळांकडून या आदेशाचे उल्लंघन होत असल्याचा आरोप महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केला आहे. याच पार्श्वभूमीवर मनसेच्या वतीने आज अकोला शिक्षण विभाग कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन करण्यात आले. तसेच संबंधित शाळांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी करत शिक्षण विभागाला निवेदन देण्यात आले. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने राज्य शासनाच्या परिपत्रकावर ताशेरे ओढत ३० जूनपूर्वी शाळा सुरू न करण्याचे आदेश दिले होते. यासंदर्भातील पूर्वीचे परिपत्रकही न्यायालयाने रद्द केले आहे. असे असतानाही अकोला जिल्ह्यातील अनेक शाळांनी न्यायालयीन आदेशाची अवहेलना करून विद्यार्थ्यांचे वर्ग सुरू ठेवल्याचा आरोप मनसेने केला आहे. वाढत्या उष्णतेमुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता असून त्यांच्या सुरक्षिततेशी खेळ करण्याचा हा प्रकार अत्यंत गंभीर असल्याचे मनसेचे म्हणणे आहे. न्यायालयीन आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या शाळांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा मनसेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.0
0
Report
खुलताबाद में शिक्षक की मौत: चार आरोपी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:खुलताबादचे शिक्षक बोरसे यांच्या मृत्यूप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे, काल झालेली घटना दुर्दैवी आहे याबाबत खुलताबाद पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल असल्याची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांनी दिली يाबाबत पुढील तपास सुरू आहे आणि दोशींवर योग्य ती कारवाई होईल असेही पोलिसांनी सांगितलं, याबाबत शिवसेना ठाकरे गटातील नेते अंबादास दानवे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले होते पोलिसांनी मारहाण केली आणि त्यानंतर या शिक्षकाला हृदयविकाराचा झटका आला असा अंबादास दानवे यांचा आरोप होता त्यानंतर पोलिसांनी हा खुलासा केला आहे0
0
Report
Advertisement
