icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना में तीन महीने के वेतन के लिए घंटाघाड़ी चालकोंने किया ठिय्या आंदोलन

Jalna, Maharashtra:जालना : तीन महिन्यांचा पगार थकला,घंटागाडी चालकांनी पुकारला संप अँकर : जालन्यात कचरा वाहतुक करणाऱ्या महापालिकेच्या घंटागाडी चालकांनी संप पुकारला आहे.घंटा गाडी चालकांचा तीन महिन्यांचा पगार रखडला आहे.त्यामुळे घंटागाडी चालकांनी संपाचं हत्यार उपसलं आहे.पगार मिळण्याच्या मागणीसाठी सर्व घंटागाडी चालकांनी शहरातील मस्तगड भागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केलं आहे.3 महिन्यांपासून पगारच नसल्यानं घर चालवायचं कसं असा सवाल आंदोलन कर्त्यांनी केलाय.दरम्यान तातडीने पगार न झाल्यास आणखी आंदोलन तीव्र करण्याचा ईशारा देखील आंदोलनकर्त्यांनी दिलाय.दरम्यान या संपामुळे शहरातील स्वच्छतेवर मोठा परीणाम होण्याची शक्यता आहे
0
0
Report

बीड में गोदावरी नदी में भाविकों की नाव पलटी, एक महिला और एक बच्चा लापता

Beed, Maharashtra:बीड: गोदावरीत भाविकांची बोट बुडाली; अतिभारामुळे दुर्घटना, महिला व चिमुकली बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती... ANC - एक धक्कादायक बातमी बीड मधून येतेय... माजलगाव तालुक्यातील प्रसिद्ध पुरुषोत्तमपुरी येथे भाविकांना घेऊन जाणारी बोट गोदावरी नदीच्या पात्रात पलटल्याची धक्कादायक घटना घडली आहे. बोटीमध्ये क्षमतेपेक्षा अधिक भाविक बसवण्यात आल्याने ही दुर्घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. पुरुषोत्तमपुरी येथील एका मंदिराच्या दर्शनासाठी भाविक बोटीने नदी पार करत होते. गोदावरी पात्राच्या मध्यभागी पोहोचल्यानंतर बोट अचानक असंतुलित होऊन अक्षरशः बुडाली. बोटीत 35 पेक्षा जास्त भाविक प्रवास करत होते. दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरातील इतर बोट चालकांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेतली आणि बचावकार्य सुरू केले. वेळीच मदत मिळाल्यामुळे अनेक भाविकांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आले. मात्र, या दुर्घटनेत एक महिला आणि एक लहान बाळ बेपत्ता असल्याची प्राथमिक माहिती असून नागरिक आणि स्थानिक प्रशासनाकडून त्यांचा शोध सुरू आहे. पुरुषोत्तमपुरी येथे दोन मंदिरे असून त्यापैकी एका मंदिरात जाण्यासाठी भाविकांना बोटीचा आधार घ्यावा लागतो. भाविकांच्या म्हणण्यानुसार, काही बोट चालकांकडून वारंवार क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी घेऊन वाहतूक केली जाते. भाविकांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष करून अतिभाराने प्रवास केल्यामुळेच ही दुर्घटना झाल्याचा आरोप होत आहे. बाईट: महिला भाविक ( बुडालेली महिला ) एकूण दोन बाईट्स आहेत.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के अहेरी नगर परिषद के कर संकलन अधिकारी पर हमला, अधिकारी गंभीर घायल

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर हल्ला हल्ल्यात अधिकारी गंभीर जखमी चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यातील अहेरी नगरपंचायतीच्या कर संकलन अधिकाऱ्यावर आज सकाळी 4 इसमांनी प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यात अधिकारी वैभव पांढरे गंभीर जखमी झाले आहेत. या प्रकरणी माजी जि. प..अध्यक्ष अजय कंकडालवारसह चार जणांविरोधात गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.  अवैध इमारतीच्या मुद्द्यावरून वाद झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मॉर्निंग वॉकला गेले असताना वाद उकरून काढत हल्ला करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. पोलिसांनी तपास प्रक्रिया वेगवान केली आहे.
0
0
Report

सोलापुर में मंत्री के बयान से सियासी घमासान, दर्शन की बहस तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत, मंत्री जयकुमार गोरे यांची खा. धैर्यशील मोहिते यांचे नाव न घेता जोरदार टीका *ऑन पंतप्रधान नरेंद्र मोदी तपपूर्ती* - जनसामान्यांना बळ देणारे , देशाला विकसित राष्ट्र बनवण्याचा संकल्प करणारे पंतप्रधान देशाला लाभले आहेत - मोदींच्या भविष्यातील कालखंडासाठी श्री सिद्धरामेश्वर यांना साकड घातलं *ऑन ग्रामपंचायत निवडणुका* - लवकरच ग्रामपंचायतच्या निवडणुका घेतोय - सर्व ग्रामपंचायत यांना लवकरच लोकनियुक्त बॉडी देण्याचा प्रयत्न करू *ऑन धैर्यशील मोहिते पाटील* - ते काय म्हणतात याला मी अन्सरेबल नाही - धैर्यशील मोहिते पाटलांना मला प्रश्न विचारण्याचा अधिकार आहे की नाही हे मला माहिती नाही - मी सामान्य जनतेचा पोस्टमन आहे... ते पोस्टमन म्हणून घ्यायला मला लाज वाटत नाही - सामान्य जनतेचे प्रश्न समजून घेणार आणि ते सरकार दरबारी घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे - मग ही भूमिका पोस्टमन, आमदार, पालकमंत्री स्वरूपात करेन - सामान्य माणसांचा प्रश्न सोडवत असताना मला पोस्टमनची भूमिका मिळाली तरी यात वाईट वाटायचं कारण नाही *ऑन विधानपरिषद निवडणूक* - आम्हाला तयारी करण्याची खूप काही आवश्यकता नाही... - आमच्याकडे विजयासाठी लागणारे मतदान ऑलरेडी भारतीय जनता पार्टी म्हणून आहे - महायुती म्हणून आम्ही लढतोय आणि तसेच पुढे आलो तर काही शिल्लक राहील असे मला वाटत नाही - तरीदेखील पाचशे पार जाण्याचा आमचा संकल्प आहे *ऑन डीसीसी बँक* - राजेंद्र राऊत यांनी डीसीसी बँकेच्या भ्रष्टाचारा संदर्भात आवाज उठवला म्हणून त्यांना मतदान पडणार नाही असा नरेटीव सेट केला जातोय - भ्रष्टाचारावर आवाज उठवल्यावर मत पडतात की कमी होतात हे एकदा तपासलं पाहिजे - ज्यांनी भ्रष्टाचार केला त्यांची अडचण आहे... ज्यांनी भ्रष्टाचार केला नाही ते सर्व संचालक व्यवस्थित आहेत.. त्यांना आनंद आहे - त्याच संचालकांची इच्छा होती की चौकशी व्हावी.. ज्यांनी भ्रष्टाचार केलाय त्यांच्यावर कारवाई व्हावी - भ्रष्टाचार कुठे झालेला आहे कोणत्या टोकाला झालेला आहे हे तुम्हाला माहिती आहे *ऑन विधान परिषद विजय आकडा* - अबकी बार 500 पार *ऑन मोहिते पाटील* - तुम्ही जे नाव घेताय ते नाव मी कधीच घेत नाही - मी जेव्हापासून पालकमंत्री झालो तेव्हापासून मला केव्हा आवश्यकता भासली नाही... आजही वाटत नाही.. - त्यामुळे ही निवडणूक आम्हाला विचारला असता तर बिनविरोध झाली असती... आमच्याकडे आले असते तर बिनविरोध झाली असती... आमचे दर्शन घेतले असोत - मात्र आता दर्शन घेण्याचे दिवस संपलेले आहेत... - आता स्वतःच अस्तित्व शिल्लक रहावं किंवा आमच्याशिवाय काही घडत नाही हे दाखवण्याचा प्रयत्न आहे हे मोडीत निघेल - आणि ही निवडणूक त्याला उत्तर असेल... बाईट - जयकुमार गोरे ( पालकमंत्री, सोलापूर )
0
0
Report
Advertisement

गोवा के अंबाबाई मंदिर में 1.5 किलो सोने का कलश स्थापित करने की तैयारी

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी आई अंबाबाईच्या मंदिरावर सोन्याचा कळस बसवण्यात येणार आहे. गोव्यातील एका भक्ताने दीड किलो सोन्यात डेऱ्यासह साडेतेरा फुटाचा कळस बनवला आहे. सध्या अधिक मास सुरू आहे, तो संपायला काही दिवस शिल्लक राहिले आहेत, त्यामुळे येत्या शुक्रवारी हा कळस मंदिरावर बसावा यासाठी फक्त प्रयत्न केला जात आहे. गोव्यातील याच भक्ताने अंबाबाईला यापूर्वी सोन्याचा अलंकार देणगी म्हणून दिला होता.. आता हाच भक्त अंबाबाई देवीच्या कळसासाठी दीड किलो वजनाचा सोन्याचा शिखर अर्पण करणार आहे. हा सोन्याचा कळस व डेरा कर्नाटक मधील मेंगलोर इथल्या कारागराने बनविला आहे. आधी कळसाचे तांब्यातील मॉडेल बनवले, हे मूळ कळसावर बसवून माप घेतले गेले. त्यासाठी 200 किलो तांबे वापरण्यात आले. याच तांब्यावर दीड किलो सोन्याचा पत्रा लावण्यात आला आहे. हा कळस बनवण्यासाठी तब्बल दीड महिन्याचा कालावधी लागला. अंबाबाई मंदिर परिसरातून याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report

दिल्ली बुलावे के बावजूद गोकुळ गीते शिंदे से मिलने पर अडिग

Nashik, Maharashtra:Nashik breaking गोकुळ गीते byte points - काल मी प्रचारात असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा माझ्या भावाला फोन आला होता - मला काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलवले होते - *आज ते दिल्ली ला आहेत मात्र मी आज एकनाथ शिंदे यांना भेटणार आहे* - *मी आता देखील निवडणूक लढण्यावर ठाम आहे* - मला जर दिल्लीला बोलावले तरी मी जाईन मुख्यमंत्री याना भेटायला - *काल किशोर दराडे भेटायला आले होते पण मी त्यांना भेटलो नाही* - काल त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली - आधी बोलायचं आणि नंतर दिलगिरी व्यक्त करायची ही काही संस्कृती नाही - मी भाजपात सक्रिय नाही माझे बंधू गणेश गीते भाजपात आहेत त्यामुळे मी काम करत होतो - माझ्या उमेदवारी वर जळगाव चा प्रश्न अवलंबून नाही - *दराडे यांच्या विरोधात मतदार आहेत मागच्या सहा वर्षात दराडे कुठलेही काम केले नाहीत* - आजच्या भेटीत देखील काही मार्ग निघेल अस वाटत नाही - मी तडजोड करणार नाही - *इथले जे आमदार आहेत ते निष्क्रिय आहेत त्यामुळे मतदार मला लढण्यासाठी सांगत आहेत* - *नेत्यांचा मान राखण्यासाठी मी थांबू शकतो घरात बसू शकतो पण पाठिंबा देऊ शकत नाही* - दराडे यांना जिंकून आण्यासाठी त्यांना पाठिंबा हवं आहे - माझं आणि गिरीश महाजन यांचे फार काही संबंध नाही पण माझे बंधू गणेश गीते यांचे महाजन यांच्या सोबत जवळचे संबंध आहेत - गणेश गीते यांनी देखील थांबण्यासाठी सांगत आहेत - *गेल्या 8 दिवसापासून मला प्रलोभन येत आहेत पण मला ते नको आहे भीक घेणार नाही* - मध्यस्थी मार्फ़त प्रलोभने दिले जात आहेत
0
0
Report

वसई पश्चिम में unknown आरोपी ने महिला का पीछा कर विनयभंग किया, खोज जारी

Vasai-Virar, Maharashtra:महिलेचा पाठलाग करून इमारतीतच विनयभंग; अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल वसई : नालासोपारा पश्चिम परिसरात एका महिलेचा पाठलाग करून तिचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित महिला वसई पश्चिम येथील एका हॉटेलमधून आपल्या राहत्या घरी जात असताना एका अज्ञात व्यक्तीने तिचा पाठलाग केला. त्यानंतर आरोपी महिलेच्या इमारतीपर्यंत पोहोचला. इमारतीच्या परिसरात आरोपीने महिलेच्या फ्रॅाकमध्ये खालून हात घालत, महिलेचा विनयभंग करत तिच्याशी अश्लील कृत्य केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर महिलेने पोलिसांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 74, 75 आणि 78 अंतर्गत अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा नोंदवला आहे. आरोपीने फिकट गुलाबी रंगाचा टी-शर्ट, काळ्या रंगाची जीन्स आणि पायात सँडल घातल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास पोलीस करीत आहेत.
0
0
Report
Advertisement

अकोला में यूरिया-डीएपी की बेहतर सप्लाई से खरीप तैयारी तेज

Akola, Maharashtra:अकोला जिलेतील अकोट शहरासह तालुक्यात युरिया आणि डीएपी खतासाठी मोठी गर्दी होताना दिसत आहे. खतांचा पुरेसा साठा उपलब्ध होणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर शेतकऱ्यांनी मध्यरात्रीपासूनच कृषी सेवा केंद्रांसमोर रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि डीएपी खतांच्या उपलब्धतेबाबत शेतकऱ्यांमध्ये चिंता निर्माण झाली होती. खतांचा पुरवठा कमी असल्याच्या भीतीने अनेक कृषी सेवा केंद्रांसमोर शेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने परिस्थितीची दखल घेत तालुक्यासाठी आवश्यक खतसाठा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली सुरू केल्या. आज युरिया डीएपी खताचा नवीन साठा कृषी सेवा केंद्रांना वितरित केला जाणार असल्याची माहिती मिळताच शेतकरी मध्यरात्रीपासूनच केंद्रांसमोर दाखल झाले. अनेक ठिकाणी लांबच लांब रांगा लागल्याचे दिसून आले. खरीप हंगामाच्या तोंडावर खतांचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि वेळेत खत मिळावे यासाठी शेतकरी प्रयत्न करत आहेत. मात्र वाढती गर्दी पाहता सर्वांना खत मिळेल का, याबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम आणि चिंता कायम आहे. प्रशासनाने खतांचे नियोजनबद्ध वितरण करून कोणत्याही शेतकऱ्याला अडचण येऊ नये, अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
0
0
Report

काली हल्दी के दामों में भारी गिरावट; किसानों की आर्थिक चिंता बढ़ी

Washim, Maharashtra:अँकर: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समिति में काली हल्दी (कोचा) पिक के दाम गिरावट की तस्वीर दिख रही है। पिछले सप्ताह हुए लिलाव में काली हल्दी को प्रतिक्विंटल 21 हजार रुपये का अधिकतम दाम मिला था। लेकिन वर्तमान लिलाव में दाम लगभग 4 हजार रुपये गिरकर किसान चिंतित हो उठे हैं। औषधीय गुणों के कारण काली हल्दी को महत्त्वपूर्ण नगदी फसल माना जाता है। इस पिक की बाजार में आम तौर पर अच्छी मांग रहती है। परंतु अभी बाजार में आपूर्ति बढ़ने और मांग घटने के कारण दामों पर प्रभाव पड़ रहा है, व्यापारियों के अनुसार। इस गिरावट से काली हल्दी उत्पादक किसानों की आर्थिक गणित पर असर पड़ने की सम्भावना है।
0
0
Report
Advertisement

अमरावती में कांग्रेस उम्मीदवार हर्षजीत देशमुख पांच दिन से गायब, Zee 24 ने पुष्टि

Amravati, Maharashtra:अखेर झी 24 तास च्या बातमीवर शिक्कामोर्तब; काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख पाच दिवसांपासून गायब, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांचा गौप्यस्फोट अँकर :- अमरावती विधान परिषदेचे उमेदवार हर्षजीत देशमुख गायब असल्याची बातमी झी 24 तास ने दिल्यानंतर अखेर झी 24 तास च्या बातमीवर शिक्कामोर्तब झाले आहे. काँग्रेस उमेदवार हर्षजीत देशमुख गेल्या पाच दिवसापासून अमरावती जिल्ह्यातून गायब असल्याची खळबळ जनक माहिती काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे जिल्ह्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून अमरावतीत ऐन निवडणुकीच्या काळात काँग्रेसला मोठा धक्का बसल्याचा बोलल जात आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून उमेदवाराशी आमचा संपर्क झाला नाही, ते खाजगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती आहे. गेल्या चार-पाच दिवसांपासून हर्षदीप देशमुख यांचा जिल्ह्यातील कोणत्याच प्रमुख नेत्यांशी संपर्क नाही. त्यामुळे वरिष्ठ वंचित आणि काँग्रेसच्या नेत्यांची बोलणी सुरू आहे. वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुखांनी दिली आहे. त्यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुध्द दवाळे यांनी
0
0
Report

सांगली में कृष्णा नदी पर आपदा प्रबंधन की समीक्षा, पानी की स्थिति जाँच

Sangli, Maharashtra:कृष्णा नदीत पार पडला आपत्ती यंत्रणा आढावा..संभाव्य पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हा प्रशासनाने व महापालिकेच्यावतीने आपत्ती यंत्रणेचा आढावा घेण्यात आला आहे. शहरातील कृष्णा नदीच्या काठावर यानिमित्ताने बोट प्रात्यक्षिका व आपत्ती यंत्रणा सज्जतेची रंगीत तालीम घेण्यात आली. जिल्हाधिकारी डॉक्टर मैनाक घोष व महापालिका आयुक्त संजीता महापात्र यांच्या उपस्थितीमध्ये आपत्ती यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा पार पडला. जिल्हाधिकारी व आयुक्त या दोघांनीही बोटीतून कृष्णा नदीची पाहणी करत पूर्व परिस्थितीतील निर्माण होणाऱ्या पाणी पातळीची माहिती देखील अधिकाऱ्यांकडून घेतली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top