445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड में गोल्डन ट्रायंगल के ओलीस 20-30 युवक, मित्र की सुरक्षित वापसी की मांग
Beed, Maharashtra:बीड : 'गोल्डन ट्रॅंगल'मध्ये महाराष्ट्रातील 20-30 तरुण ओलीस बीडच्या मित्राला आला मदतीचा फोन मुख्यमंत्र्यांनी ओलीस ठेवण्यात आलेल्या माझ्या मित्राला सुखरूप मायदेशी परत आणावे ओलीस ठेवण्यात आलेल्या मित्राने केली मागणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रॅंगल' परिसरात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओलीस असलेल्या या तरुणाने आपल्या बीडमधील मित्राला व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल करून मदतीची आर्त हाक दिली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा, ऑनलाइन सायबर फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा आणि नकार दिल्यास बंदुकीचा धाक दाखवला जात असल्याचा दावा त्याने केला आहे. या मित्रानेच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली असून महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
चंद्रपूर: जिव्हती तालुक्यात लक्ष्मणगुडा गाँव में 6 वर्ष के बच्चे की सर्पदंश से मौत
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. आहे. घरी झोपेत असताना विषारी सापाने त्याला दंश केला.समीर मारोती आत्राम असे सहा वर्षीय मृत चिमुकल्याचे नाव आहे. घटना लक्षात आल्यावर उपचारासाठी धावाधाव सुरू झाली. मात्र वेळेत शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तालुकाविशेष डॉक्टरांनी मात्र सर्पदंशाचा प्रकार कुटुंबाच्या उशिरा लक्षात आल्याने उपचारास विलंब होत मृत्यू ओढविला असल्याचे म्हटले आहे。 आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
मुंबई-गोवा महामार्ग पर भीषण दुर्घटना: अल्टो चालक घायल, टाटा कार की भिड़ंत
Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला, अल्टो कार कणकवली हून गोव्या च्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी टाटा कार यांची समोरासमोर धडक बसली या धडके मध्ये अल्टो कार चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कार चा चालक गंभीर रित्या जखमी झाला असून नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मुकई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटना स्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली, अपघातचे नेमके कारण काय आणि हा अपघात कशाने झाला याचा तपास कुडाळ पोलिस करत आहे0
0
Report
Advertisement
सांगली बैंक अध्यक्ष ने पडळकर पर आरोप, राजीनामा की मांग
Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश अँकर - गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील नावाची कावीळ झाली आहे,अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोणत्याही संचालकाला शंभर रुपये देखील कर्जमाफी केली नाही, पडळकरांनी कर्जमाफी केल्याचे दाखवावे, आपण राजीनामा देऊ नाही,नसेल तर पडळकरांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान देखील मानसिंगराव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही,पण गेल्या सहा महिन्यापासून प्रशासक येणार,असं ऐकतोय,मात्र अद्यापही पडळकर यांना यश आलं नाही,असा टोला लगावत पडळकरांना स्वतः नोकर भरती करण्यासाठी प्रशासक आणायचा आहे,असा आरोप नाईक यांनी पडळकरांवर केला आहे. बाईट - मानसिंगराव नाईक - अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.0
0
Report
नागपुर के सेंट्रल एवीीन्यू पर इमारत का मलबा गिरा, एक व्यक्ति गंभीर जख्मी
Nagpur, Maharashtra:नागपूर सेंट्रल एव्हेन्यूवर गीतांजलि टॉकीजच्याजवळ एका इमारतीचा काही मलबा कोसळला शिकस्त इमारतीचा मलबा कोसळला एक जण गंभीर जखमी एका कारसह काही दुचाकीचेही नुकसान0
0
Report
उरण के एक ही दिन तीन शव: तीन जगहों पर मिले, इलाके में खलबली
Navi Mumbai, Maharashtra:उरण परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. यापैकी दोघांची ओळख पटली असून, एका अज्ञात पुरुषाच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेडब्ल्यूआर कंपनीच्या बाजूला रस्त्यालगत खारफुटीत मुरारी कुमार (३८) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो ऑफकॉन कंपनीत काम करीत होता. तो मद्याच्या नशेत खाडीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरा मृतदेह सारडे येथील प्रमोदिनी पाटील (७०) या मनोरुग्ण महिलेचा आहे. एप्रिल महिन्यात त्या लग्नाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. सारडे गावाजवळ रानभाज्या गोळा करणाऱ्या आदिवासी दाम्पत्याला झुडपांमध्ये त्यांचा मृतदेह दिसला. तिसरा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ खारफुटीत सापडला. तो एका ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा असून, त्याची ओळख पटलेली नाही.0
0
Report
Advertisement
सिया-चेतन की पुलिस हिरासत 3 जुलाई तक बढ़ी; जांच पर सरकार बनाम बचाव की तकरार
Varsoli, Maharashtra:सिया-चेतनची पोलीस कोठडी ३ जुलैपर्यंत वाढली. तपासावरून कोर्टात सरकारी आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद. ANCHOR: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने तपास अद्याप अपूर्ण असल्याचं सांगत आरोपींची आणखी चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयात मांडलं. चेतनची घटनास्थळी पुनर्रचना, काही वस्तूंची जप्ती, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येचा सराव नेमका कुठे करण्यात आला, याचा तपास बाकी असल्याचं सरकारी पक्षाने सांगितलं. मात्र या मागणीला बचाव पक्षाने जोरदार विरोध केला. पोलिसांनी याच कारणांसाठी आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती. मग त्याच मुद्द्यांसाठी पुन्हा कोठडी का मागितली जाते, असा सवाल सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात उपस्थित केला. दुसरीकडे, चेतन चौधरीच्या वकिलांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासासाठी पुरेसा वेळ मिळूनही आवश्यक कारवाई झाली नसल्याचा दावा करत, केवळ कोठडी वाढवण्यासाठी जुन्याच कारणांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला.0
0
Report
नवी मुंबई के कोपरखैरणे में बारहवीं के छात्र की दिल का दौरा से मौत
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील कोपरखैरणे सेक्टर-५ येथील स्वामी विवेकानंद महाविद्यालयात इयत्ता बारावी शिकणाऱ्या १७ वर्षीय विद्यार्थ्याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मृत विद्यार्थ्याचे नाव शिव पाल असे असून तो पावना येथील रहिवासी होता. आज सकाळी नेहमीप्रमाणे तो महाविद्यालयात आला होता. सकाळी साडेसातच्या सुमारास महाविद्यालयाच्या तळमजल्यावर तोला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि तो खाली कोसळला. घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कर्मचाऱ्यांनी त्याला तातडीने जवळील खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, तपासणीअंती डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.दरम्यान, मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणी आणि शवविच्छेदनासाठी वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या घटनेमुळे महाविद्यालय परिसरात शोककळा पसरली असून विद्यार्थ्यांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
नवी मुंबई विमानतळ का नाम दिबा पाटील के नाम पर रखने की मांग
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लावण्यात यावे यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनी स्वतःच्या रक्ताने पत्र लिहिले आहे. पनवेल- नवी मुंबई परिसरात नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होऊन अनेक महिने झाले तरी अद्याप देखील या विमानतळाचे नामकरण झालेले नाही. येथील प्रकल्पग्रस्त, भूमिपुत्रांनी या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव द्यावे अशी वारंवार मागणी केली. मात्र अद्याप देखील या विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव देण्यात आलेले नाही. यासाठी अनेक आंदोलने मोर्चे काढण्यात काढण्यात आले असून, उपोषणदेखील करण्यात आले मात्र शासन दरबारी फक्त आश्वासन देण्यात आले. केंद्र शासनाकडून विमानतळाचे नामकरण केले जाईल असे सांगण्यात येत आहे. मात्र विलंब होत असल्याने शेतकरी कामगार पक्षाचे नेते राजेंद्र पाटील यांनीदेखील नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबा पाटील यांचे नाव लावण्यात यावे, यासाठी स्वतःच्या रक्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहिले आहे. आणि आता तरी दिबा पाटील यांचे नाव विमानतळाला द्यावे अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे。0
0
Report
Advertisement
वडाळीभोई में एसटी स्टॉप न मिलने पर ग्रामीणों ने मुंबई-आग्रा महामार्ग पर रोका
Yeola, Maharashtra:एसटी बस थांब्यासाठी वडाळीभोईचे ग्रामस्थ आक्रमक झाले असून संतप्त नागरिकांनी रस्त्यावर उतरून मुंबई-आग्रा महामार्गांवर रस्ता रोको आंदोलन केले. वडाळीभोई या गावाची 15 हजार लोकसंख्या असून गावातून शेकडो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी चांदवडसह इतर गावाला जातात शिवाय इतर छोट्या गावातील ग्रामस्थ देखील वडाळीभोईला ये-जा करतात मात्र एसटी थांबा नसल्याने सर्वांचे हाल होत असल्याचे सांगत नागरिकांनी रस्ता रोको केला. आंदोलनामुळे महामार्गांवरील वाहतूक विस्कळीत झाल्यामुळे वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला..0
0
Report
नागपुर के नए पुलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील ने संविधान के साथ प्रतिबद्धता जताई
Nagpur, Maharashtra:माझी संविधानासोबत पूर्ण कटिबद्धता असल्याच स्पष्टीकरण नागपुरात पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारल्यानंतर विश्वास नागरे पाटील यांनी दिलय..त्या कार्यक्रमात जाऊन कुठल्याही सेवाशर्तींचे उल्लंघन केलेले नसल्याचा दावाही विश्वास नांगरे पाटलांनी केलाय --==== ------ आयपीएस अधिकारी विश्वास नागरे पाटील यांनी आज नागपूर पोलीस आयुक्त पदाचा पदभार स्वीकारला... ( पदभार स्वीकारताना चे आणि सलामी स्वीकारताना चे शॉट दाखवावेत) मात्र तत्पूर्वी नवी मुंबईत हिंदू संमेलनात राष्ट्रीय स्वयंसेवक संघासंदर्भात केलेल्या स्तुतीपर भाषणाच्या व्हिडिओमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते...राज ठाकरे यांनी तर त्यांच्यावर निशाणा साधला होता.... नागपूरचे काँग्रेस शहराध्यक्ष प्रफुल्ल गुडधे यांनीही भाजपने मला अर्बन नक्षल ठरवले असून नागरे पाटील माझा एन्काउंटर करू शकतात अशी भिती व्यक्त केली होती आणि त्यांच्या निष्पक्षतेवर सवाल उपस्थित केले होते ... आमदार विकास ठाकरे काँग्रेस नेता ... मात्र या संपूर्ण टीक केवर नवनियुक्त पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केलीय . संघाच्या कार्यक्रमात जाऊन मी कुठल्याही सेवाशर्तींचे उल्लंघन किंवा कायद्याचा भंग केलेला नाही. माझी संविधानासोबत पूर्ण कटिबद्धता आहे असे त्यांनी सांगितले. नागपूरात दीक्षाभूमी असून डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार माझे मार्गदर्शक आहे. पोलीस अधिकारी असल्याने विविध संघटना, संस्था यांच्या कार्यक्रमामध्ये जाणे आणि तिथे उपस्थित लोकांना भेटणे स्वाभाविक आहे. जे नागरिक सकल हिंदू समाजातर्फे निमंत्रण घेऊन आले होते, त्यात अनेक प्रतिष्ठित नागरिकांचा समावेश होता. मी ३० वर्षांपासून पोलिस सेवेत आहे. रमजान ईदला जातो, जैन, शीख धर्माच्या कार्यक्रमात जातो, त्याच अनुषंगाने मी तिथेदेखील गेलो होतो. तेथे जीएसटी, अध्यात्म इत्यादी विषयांवर मार्गदर्शन झाले होते. त्यात मी मानवी कल्याणासाठीच्या सामूहिक प्रार्थना बोलून दाखविल्या. त्या भाषणामध्ये मी ज्ञानेश्वरीतील प्रार्थनादेखील म्हटली होती. तसेच अंमली पदार्थांमुळे तरुणाईचे होणारे नुकसान, पोलीस दलातील संधी याबाबतदेखील बोललो होतो. तो कार्यक्रम वंदे मातरम गीताला दीडशे वर्ष व संघाला शंभर वर्ष झाल्याबत होता. ड्युटी संपल्यावर गेलो होतो.. त्यामुळे मी कुठल्याही नियमाचे उल्लंघन केले आहे असे वाटत नाही, असे विश्वास नांगरे पाटील म्हणाले.0
0
Report
अकोला: शिक्षा क्षेत्र में निजीकरण-भ्रष्टाचार के खिलाफ कांग्रेस का तीखा हमला
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथे आयोजित 'विद्यार्थ्यांचा आवाज – शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचार व नफेखोरी' या छात्र संवाद कार्यक्रमात अकोला जिल्हा काँग्रेसने शिक्षण क्षेत्रातील वाढते खाजगीकरण, नफेखोरी आणि भ्रष्टाचारावर तीव्र टीका केली आहे. शिक्षण हे नफा कमावण्याचे साधन नसून विद्यार्थ्यांना सक्षम बनविण्याचे माध्यम असल्याचे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. यावेळी काँग्रेसने केंद्र सरकारच्या परीक्षा यंत्रणेवर निशाणा साधत NEET व JEE परीक्षांमधील कथित गैरप्रकारांमुळे गुणवंत व गरीब विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप केला गेला. शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचाराविरोधात विद्यार्थ्यांनी संघटित व जागरूक होण्याचे आवाहनही यावेळी करण्यात आले..0
0
Report
Advertisement
जालना के ढोकसाळ में भारी बारिश, अधूरे पुल पर नागरियों का दर्दनाक सफर
Jalna, Maharashtra:जालना : मंठा तालुक्यातील ढोकसाळ तांडा भागात मुसळधार पाऊस झालाय. या पावसामुळे ढोकसाळ तांडा गावातील नाल्यावर असलेल्या अर्धवट पुलावरून नागरीक जीवघेणा प्रवास करतायत. पावसामुळे नाल्याला आलेल्या पुरामुळे पुलावरून प्रवास करता येत नाही. मात्र तरीही गावातील नागरीक या धोकादायक पुलावरून प्रवास करता दिसतायत. या भागात झालेल्या पावसामुळे नाल्याचं पाणी ढोकसाळ गावात शिरलंय.0
0
Report
वालधुनी में बुद्धभूमी फाउंडेशन के विरोध के बीच केडीएमसी मुख्यालय पर जनआक्रोश मोर्चा
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील वाढती वाहतूक कोंडी फोडण्यासाठी प्रेम ऑटो ते विठ्ठलवाडी दरम्यान चार पदरी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. या प्रकल्पासाठी आवश्यक जागेवरील अडथळे हटवण्याची मोहीम कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून राबवण्यात येत आहे. मात्र, या मोहिमेदरम्यान वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या परिसरात करण्यात आलेल्या कारवाईमुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.महापालिकेने कोणतीही पूर्वसूचना न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई केल्याचा आरोप बुद्धभूमी फाउंडेशनने केला आहे. या निषेधार्थ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेबाहेर आंदोलन सुरू केले असून त्याचाच एक भाग म्हणून आज शेकडो कार्यकर्त्यांनी केडीएमसी मुख्यालयावर जनआक्रोश मोर्चा काढला.मोर्चादरम्यान आंदोलकांनी खासदार श्रीकांत शिंदे यांच्या विरोधात घोषणाबाजी करत संपादित करण्यात आलेल्या जागेचा योग्य मोबदला देण्याची मागणी केली. तसेच कारवाईस जबाबदार असलेल्या संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी अशीही मागणी आंदोलकांनी केली.दरम्यान, या प्रकरणी वालधुनी येथील बुद्धभूमी फाउंडेशनच्या जागेबाबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. या बैठकीत बोधगयाच्या धर्तीवर आंतरराष्ट्रीय दर्जाचे भव्य बौद्ध स्मारक उभारण्याबाबत सकारात्मक निर्णय झाल्याची माहिती समोर आली आहे.तथापि, केवळ तोंडी आश्वासनांवर समाधान मानणार नसल्याचे स्पष्ट करत, मागण्यांबाबत लेखी स्वरूपात हमी मिळाल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. या पार्श्वभूमीवर कल्याण-डोंबिवली परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठ्या प्रमाणात पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
आकोला महापालिका स्थायी समिति बैठक में तीखी बहस, सुरक्षा अधिकारी निलंबित
Akola, Maharashtra:Anchor : अकोला महानगरपालिकेच्या स्थायी समितीच्या सभेदरम्यान आज मोठा वाद निर्माण झाला. सभा सुरू असतानाच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट)चे जिल्हाध्यक्ष तथा काँग्रेसच्या नगरसेविका स्मिता कांबळे यांचे पती गजानन कांबळे यांनी थेट सभागृहात प्रवेश केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले.या घटनेमुळे सभागृहात शाब्दिक खडाजंगी झाली.नियमानुसार स्थायी समितीची सभा सुरू असताना समिती सदस्य आणि संबंधित अधिकाऱ्यांशिवाय इतर कोणालाही सभागृहात प्रवेश करण्यास परवानगी नसते. मात्र, गजानन कांबळे यांनी सभागृहात प्रवेश केल्याने सभापती विजय अग्रवाल यांनी तीव्र संताप व्यक्त करत त्यांना चांगलेच खडसावले. तसेच सुरक्षा व्यवस्थेतील हलगर्जीपणाबद्दल नाराजी व्यक्त करत संबंधित सुरक्षारक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, गजानन कांबळे यांनी सत्ताधाऱ्यांकडून दलित वस्ती विकास निधीच्या वाटपात भेदभाव केला जात असल्याचा आरोप केला आहे. या आरोपांमुळे सभागृहात काही काळ जोरदार शाब्दिक वाद रंगला. अखेर परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर स्थायी समितीचे कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले.0
0
Report
Advertisement
