445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर विधानपरिषद चुनाव के लिए जिला प्रशासन ने मार्गदर्शक निर्देश जारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - विधानपरिषद निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनाकडून मार्गदर्शक सूचना जाहीर विधानपरिषद निवडणुकीत 615 मतदार, दोन उमेदवार आणि सहा ठिकाणी असणार मतदान मतदानासाठी चुकीचा पेन वापरल्यास मतदान होणार बाद, प्रशासनाकडून देण्यात जाणारा जांभळ्या रंगाचा पेन वापरणे बंधनकारक जिल्ह्यात सहा केंद्रांवर 18 जून रोजी होणार मतदान पसंतीच्या उमेदवारासमोर एक आकडा लिहिणे बंधनकारक, खुण ग्राह्य धरल्या जाणार नाहीत प्रत्येक मतदान केंद्रावर केंद्राध्यक्ष तहसीलदार आणि पाच जणांचे पथक तैनात असणार. 22 जून रोजी नियोजन भवन येथे होणार मतमोजणी0
0
Report
अकोला में नौकरी के नाम पर धोखाधड़ी: 10 लाख से अधिक फ्रॉड सामने
Akola, Maharashtra:अकोला येथील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात कायमस्वरूपी लिपिक पदावर नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवत एका महिलेने तब्बल १० लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नोकरीच्या नावाखाली बनावट कागदपत्रे देऊन आर्थिक गैरव्यवहार केल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी श्रीकांत सरदार यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल केली आहे. विशेष म्हणजे नोकरी मिळावी या आशेने त्यांनी स्वतःचे घरही गहाण ठेवल्याचे समोर आले आहे. सरकारी नोकरी मिळवण्याचे स्वप्न अनेक तरुण-तरुणी आणि त्यांच्या कुटुंबीयांचे असते. मात्र याच स्वप्नाचा गैरफायदा घेत फसवणूक करणाऱ्यांचे जाळे सक्रिय असल्याचे पुन्हा एकदा उघड झाले आहे. अकोल्यातील श्रीकांत सरदार यांच्या पत्नीची ओळख एका ब्युटी पार्लर संचालकMarार्फत स्वाती जुनगडे उर्फ इंगळे या महिलेशी झाली होती. प्रभावशाली व्यक्तींशी संबंध असल्याचा दावा करत तिने पीकेव्हीमध्ये कायमस्वरूपी लिपिक पदावर नियुक्ती मिळवून देण्याचे आश्वासन दिल्याचा आरोप आहे. नोकरीच्या प्रक्रियेसाठी मूळ कागदपत्रे आणि आगाऊ रक्कम मागण्यात आली. विश्वास संपादन केल्यानंतर आरोपी महिलेने विविध बँक खाती आणि फोनपेच्या माध्यमातून टप्प्याटप्प्याने सुमारे १० लाख रुपये स्वीकारल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. त्यानंतर मुलाखतपत्र, नियुक्ती आदेश, ओळखपत्र आणि इतर काही कागदपत्रे देण्यात आली. मात्र नंतर ही सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे उघड झाले. श्रीकांत सरदार, फिर्यादी. तक्रारदारांच्या म्हणण्यानुसार, आरोपी महिला त्यांना अनेक वेळा पीकेव्ही कार्यालयात घेऊन गेली. वैद्यकीय तपासणी, अंतिम मुलाखत, नियुक्ती आदेश आणि रुजू होण्याच्या प्रक्रियेच्या नावाखाली वारंवार अधिक पैशांची मागणी करण्यात आली. दीर्घकाळ कोणतीही नियुक्ती प्रक्रिया पूर्ण न झाल्याने संशय निर्माण झाला.यानंतर श्रीकांत सरदार आणि त्यांच्या पत्नीने पीकेव्ही प्रशासनाकडे कागदपत्रांची पडताळणी केली. त्यावेळी नियुक्तीपत्रासह सर्व कागदपत्रे बनावट असल्याचे स्पष्ट झाले. फसवणुकीची बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी आरोपी महिलेकडे पैसे परत मागितले. तक्रारीनुसार, आरोपीच्या पतीकडून ५ लाख ५० हजार रुपये परत मिळाले असले तरी उर्वरित ४ लाख ५० हजार रुपये अद्याप परत करण्यात आलेले नाहीत. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू केली असून उपलब्ध पुरावे आणि कागदपत्रांची तपासणी केली जात आहे. तपासानुसार योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. दरम्यान, आरोप करण्यात आलेली महिला घटनेनंतर फरार झाल्याची माहिती समोर आली आहे. सरकारी नोकरीच्या नावाखाली फसवणुकीच्या घटन सातत्याने समोर येत आहेत. रोजगाराच्या संधी कमी असल्यामुळे अनेकजण अशा आमिषांना बळी पडतात. त्यामुळे कोणतीही रक्कम देण्यापूर्वी संबंधित भरती प्रक्रिया अधिकृत आहे का याची खातरजमा करणे आवश्यक आहे. अन्यथा नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या कुटुंबांना आर्थिक आणि मानसिक फटका बसू शकतो. जयेश जगड झी मीडिया, अकोला0
0
Report
वाशीम कृषि बाजार में चिया पिक के दाम गिरने से किसान चिंतित
Washim, Maharashtra:वाशिम: File:1406ZT_WSM_CHIA_CROP_PRICES रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चिया पिकाच्या दरात सातत्याने घसरण होत असून शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.गेल्या महिनाभरात चियाच्या बाजारभावात سुमारे १,५०० रुपयांची घट झाली आहे.एकेकाळी प्रतिक्विंटल २० हजार रुपयांवर गेलेला दर आता १८ हजारांच्या घरात आला आहे. काल बाजार समितीत चियाला किमान १६,४५० रुपये तर कमाल १८,८९० रुपये दर मिळाला. यंदा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर चियाची लागवड झाल्याने उत्पादन वाढले असताना दर घसरल्यामुळे उत्पादक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: चिपळूण के गोविंद गड़ पर पुलिस ने स्वच्छता अभियान चलाया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..चिपळूण पोलिसां तर्फे गोविंद गडावर स्वच्छता मोहीम डी वाय एस पी बेले व पोलीस निरीक्षक मेंगडे यांचे मार्गदर्शन गोवळकोट येथील गोविंद गडावर राबवली मोहीम. गोविंदगड परिसरात नागरिकांनी स्वच्छता ठेवण्याचे आवाहन. पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचना अँकर.. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील पोलीस दलाने जिल्ह्यातील गड किल्ल्यांवर स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे। आज सकाळी चिपळूणच्या गोवळकोट येथील गोविंद गडावर चिपळूण पोलीस ठाणे तर्फे स्वच्छता मोहीम राबवण्यात आली।रत्नागिरी जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या सूचनेनुसार डी.वाय.एस.पी.प्रकाश बेले,पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्या मार्गदर्शनाने पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी ही मोहीम राबवली। गोविंद गडावरील तोफांचा परिसर,रेडजाई मंदिर,बुरुज,तटबंदी आणि पार्किंग एरियामध्ये स्वच्छता करण्यात आली।एरव्ही सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांच्या हातात काठ्या आणि बंदुकी दिसतात।आज याच पोलिस दलाने हातात झाडू आणि फावडे घेऊन किल्ला परिसर स्वच्छ केला.याचबरोबर महाराष्ट्राची अस्मिता असलेल्या गडकिल्ल्यांवर स्वच्छता राखावी कोणत्याही प्रकारचे गैरवर्तन आढळल्यास पोलिसांची संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले.0
0
Report
पंढरपुर में रोहित पवार के आंदोलन के समर्थन में किसानों ने सरसकट कर्जमाफी की मांग की
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथे सुरू असलेल्या आमदार रोहित पवार यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कर्जबाजारी शेतकरी दाखल झाले आहेत.. कर्जमाफीमध्ये आम्हाला कोणताही लाभ होत नाहीये. त्यामुळे सरकारने अटी आणि निकष काढून सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी केली आहे. याच शेतकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
मालवण के ऑटो गैरेज में भीषण आग, 15 दोपहिया और एक कार जलकर राख
Oras Bk., Maharashtra:मालवण धुरीवाडा येथे ऑटो गॅरेजच्या ठिकाणी दुरुस्तीसाठी ठेवलेल्या १५ दुचाकी व एक कार जळून खाक झाली. रात्री अचानक लागलेल्या आगीत रामेश्वर ऑटो गॅरेजमध्ये दुरूस्ती साठी ठेवलेल्या गाड्या जळून खाक झाल्या आहेत. काळुजी सदाशिव कांदळगावकर यांच्या मालकीचे हे गॅरेज असून शाॅर्टसर्कीट मुळे आग लागतल्याचे बोलले जात आहे. आग लागताच स्थानिकांनी शर्थीचे प्रयत्न करत पाण्याचा मारा करत तसेच नगरपालिकााच्या बुलेट फायरफायटर द्वारे आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले. मात्र सर्व गाड्या जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
रायगढ़ के गर्मी में वाटरपार्क में छुट्टी के दिन भीड़, पर्यटकों को राहत मिली
Chendhare, Maharashtra:रायगड़ जिले में तपती गर्मी से लोगों को राहत मिल रही है। वाटरपार्क में पर्यटकों की भीड़ लगी है। गर्मी से शरीर को ठंडक मिलती है। एंकर - गर्मी अधिक बढ़ने से नागरिक हैरान हैं। तपती गर्मी से राहत पाने के लिए नागरिकों और पर्यटकों ने अपना रुख वॉटरपार्क की ओर मोड़ दिया है। रायगड़ जिले के विभिन्न वाटरपार्क में छुट्टी के दिन तथा सप्ताहांत पर बड़ी भीड़ होती है। छोटे बच्चों के साथ युवक और परिवार जलक्रीड़ा का आनंद ले रहे हैं और कड़क गर्मी में शरीर को ठंडक पाने का प्रयास कर रहे हैं। जलक्रीड़ा, स्विमिंग पूल, रेन डांस और अन्य मनोरंजक कार्यक्रमों के कारण बच्चों भी खुश हैं। छुट्टी के दिन जिले के वाटरपार्क फूल-फूल कर रहे हैं। इसलिए वाटरपार्क चालक भी माहौल से संतुष्ट हैं।0
0
Report
हिंगोली में मानसून पूर्व पावस ने केळी बागों को भारी नुकसान
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात मान्सून पूर्व पावसामुळे केळी उत्पादन शेतकऱ्यांच मोठ नुकसान झाल आहे हिंगोलीच्या वसमत कळमनुरी सेनगाव तालुक्यामध्ये केळीच्या बागा उध्वस्त झाल्या आहेत हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागामध्ये रात्री चक्रीवादळ मान्सूनपूर्व पावसाने थेमान घातल आहे हजारो हेक्टर वरील केळीच्या बागा आडव्या झाल्या आहेत त्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी अडचणीत सापडला आहे सेनगाव तालुक्यातील चापडगाव परिसरातून नुकसानग्रस्त शेतीतून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...0
0
Report
रायगड़ में रात्री दो मोटरसाइकिलें भिड़ीं, दोनों मृत; खालापूर पुलिस मामले की जांच में
Karjat, Maharashtra:रायगड अपघात चौक कर्जत रस्त्यावर बोरगाव जवळ दोन मोटरसायकल स्वरांचा मध्यरात्री अपघातात मृत्यू. दोन्ही मोटरसायकल भरधाव वेगाने समोरासमोर एकमेकांना धडकल्याने दोघांचा मृत्यू झाला. दोघांना जखमींना चौक ग्रामीण रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले मात्र दोघांचाही मृत्यू झाला होता. यापैकी एका व्यक्तीचे नाव सिद्धार्थ जाधव असून रा. नेरळ, ता. कर्जत तर दुसऱ्या व्यक्तीची अद्याप ओळख पटलेली नाही. खालापूर पोलीस पुढील तपास करत आहे. रात्री भरधाव वेगाने दुचाकी चालवणे दोघांच्या जीवावर बेतल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येते.0
0
Report
Advertisement
पेण तालुक़े में पिसले हुए कुत्ते ने लोगों पर हमला किया, 10–15 घायल
Chendhare, Maharashtra:पेण तालुक्यात पिसाळलेल्या कुत्र्याने धुमाकूळ घालत अनेकांवर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात बोरी-शिर्की परिसरातील सुमारे 10 ते 15 जण जखमी झाले असून त्यांच्यावर पेण उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. कोळवे, बेनेघाट, बोरी, शिर्की, मसद आणि शिर्की चाळ या गावांमध्ये या कुत्र्याने नागरिकांवर हल्ले केल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, पिसाळलेल्या कुत्र्याला पकडण्यासाठी स्थानिक प्रशासन आणि संबंधित यंत्रणांकडून प्रयत्न सुरू आहेत.0
0
Report
उदययनराजे भोसले ने शहापुर में अर्जुन जाधव के परिवार से मुलाकात कर संवेदना जताई
Satara, Maharashtra:कराड सातारा -जम्मूतील उरी येथे झालेल्या स्फोटात वीरमरण आलेले जवान अर्जून जाधव यांच्या कुटुंबीयांची खा .उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शहापूर येथील जाधव यांच्या घरी झालेल्या या भेटीदरम्यान उदयनराजे यांनी जवानांच्या 11 महिन्यांच्या बालकाला हातात घेतले असता बाळ रडू लागले. त्या क्षणी उदयनराजे भावुक झाले, तर कुटुंबीयांची नियतीपुढील हतबलता पाहून ते काही काळ निशब्द राहिले.जवान अर्जुन जाधव यांच्या स्मृतिप्रित्यर्थ त्यांच्या शहापूर गावात स्मारक उभारण्याचा मानस गावकऱ्यांनी व्यक्त केला आहे. या स्मारक उभारणीसाठी भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष रामकृष्ण वेताळ तसेच छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या सहकार्य करण्याचे आश्वासन दिले आहे.0
0
Report
यवतमाळ के महागाव में दगड़ी कोयला ट्रक पर आग, चालक सुरक्षित बाहर निकला
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या महागाव तालुक्यातील हिवरा गावाजवळ दगडी कोळसा घेऊन जाणाऱ्या ट्रकला रात्रीच्या sुमारास आग लागली. धावत्या ट्रक मधून आगीचे लोळ बघताच ट्रक चालकाने प्रसंगावधान राखत ट्रक थांबविला, व ते सुखरुप बाहेर पडले. आगीमुळे ट्रक व त्यातील कोळसा खाक झाला. घटनास्थळे स्थानिक नागरिक व अग्निशमन दल दाखल झाले, त्यानंतर आग विझविण्यात आली.0
0
Report
Advertisement
चेनुस्टा खेतशिवार में बिबट्या का डर, किसानों ने सुरक्षा उपाय मांगे
Amravati, Maharashtra:चेनुस्टा शेतशिवार बिबट्याचा वावर; पेरणीची वेळ असल्याने शेतकऱ्यांमध्ये भीती, बंदोबस्त करण्याची मागणी चेनुस्टा शेतशिवार परिसरात बिबट्याचा वावर आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. अनेक शेतकऱ्यांनी शेतात बिबट्या पाहिल्याचा दावा केला असून त्याचे दृश्य मोबाईल कॅमेऱ्यातही कैद झाले आहेत. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असल्याने शेतकऱ्यांची शेतातील वर्दळ वाढली आहे. अशा परिस्थितीत बिबट्याच्या उपस्थितीमुळे शेतकऱ्यांमध्ये चिंता व्यक्त केली जात आहे. वन विभागाने तातडीने परिसरात पाहणी करून बिबट्याचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
इंद्रायणी नदी में मृत मछलियों से देहू में हलचल; भक्तों में चिंता बढ़ी
Varsoli, Maharashtra:Anchor: संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला असताना श्रीक्षेत्र देहू येथील इंद्रायणी नदीत हजारो मासे मृत्युमुखी पडल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेमुळे नदीचे पाणी दूषित झाल्याचे चित्र निर्माण झाले असून लाखो वारकरी आणि भाविकांच्या आरोग्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली जात आहे..अधिक मासामुळे देहूत भाविकांची मोठी गर्दी होत असतानाच नदीत मोठ्या प्रमाणात मृत मासे तरंगताना दिसत आहेत. काही मास्यांच्या अंगावर किडे आढळल्याने पाण्याच्या गुणवत्तेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून वारकरी आणि स्थानिक नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.. vo- नदी स्वच्छतेसाठी दरवर्षी लाखो रुपयांचा खर्च केला जात असतानाही अशी गंभीर परिस्थिती निर्माण झाल्याने स्वच्छता मोहिमांच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही शंका व्यक्त केल्या जात आहेत. आर्ट ऑफ लिव्हिंगच्या कार्यकर्त्यांनी पुढाकार घेत मृत मासे बाहेर काढून त्यांची विल्हेवाट लावली असली, तरी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर हा विषय अत्यंत संवेदनशील बनला आहे.. vo- या मृत मासे घटनेची सखोल चौकशी करून प्रदूषणास जबाबदार घटकांवर कठोर कारवाई करावी, तसेच इंद्रायणी नदी स्वच्छ आणि सुरक्षित करण्यासाठी तातडीने प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी वारकरी, नागरिक आणि विविध सामाजिक संघटनांकडून जोर धरू लागली आहे..0
0
Report
छत्रपती संभाजीनगर बैंक चुनाव: 17 जून को सभी अपीलों की सुनवाई, अंतिम तस्वीर साफ होगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत अर्ज छाननीनंतर बाद ठरलेल्या उमेदवारांकडून अपील दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू आहे. आमदार संजना जाधव, आमदार अब्दुल सत्तार यांचे चिरंजीव समीर सत्तार, प्रणिकेत पाटील, इंदुमती साहेबराव पाटील, सुवर्णा जाधव, मनीज राठोड, रितेश मुनीत, मनोज देशमुख आणि प्रदीप शिंदे यांनी विभागीय सहनिबंधकांकडे अपील दाखल झाले आहेत. सुवर्णा जाधव यांनी दोन अपील दाखल केल्याने एकूण अपीलांची संख्या दहावर पोहोचली आहे. अर्ज छाननी प्रक्रियेनंतर बाद ठरवण्यात आलेल्या उमेदवारांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निर्णयाला आव्हान दिले असून, या सर्व अपीलांवर 17 जून रोजी एकाच दिवशी सुनावणी होणार आहे. या सुनावणीनंतर जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.0
0
Report
Advertisement
