445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बदलापुर नगरपालिका ने स्टेशन क्षेत्र के अवैध फलों के विक्रेताओं पर कड़ी कार्रवाई की
Ambernath, Maharashtra:अनधिकृत फळ विक्रेत्यांवर बदलावूर नगरपालिकेची धडक कारवाई कारवाईदरम्यान फळ विक्रेत्यांची पालिका अधिकाऱ्यांसोबत अरेरावी महिला फळ विक्रेत्यांकडून कारवाई रोखण्याचा प्रयत्न Anchor - बदलापूर नगरपालिकेच्या अतिक्रमण विभागानं स्टेशन परिसरातल्या फळ विक्रेत्यांवर धडक कारवाई केलीय. बदलापूर पूर्वेकडील कात्रप रोडवर काही फळ विक्रेते वर्षानुवर्ष ठाण मांडून बसले होते. मुख्य रस्त्यावरच त्यांनी अवैधरित्या दुकानं थाटल्यामुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होत होता. अखेर पालिकेच्या अतिक्रमण विभागानं धडक मोहीम राबवत फळ विक्रेत्यांचं अतिक्रमण हटवलं. या कारवाईदरम्यान काही फळ विक्रेत्यांनी पालिका अधिकाऱ्यांशी अरेरावी करत कारवाई रोखण्याचा प्रयत्नही केला. मात्र अतिक्रमण विभागाच्या पथकानं कारवाई सुरूच ठेवली. बदलापूर पूर्वेकडील या अवैध फळविक्रेत्यांविरोधात पालिकेकडे सातत्याने तक्रारी येत होत्या. याबाबत स्थानिक नगरसेवक संभाजी शिंदे आणि नगरसेविका रती पातकरांनी सर्वसाधारण सभेत आक्रमक भूमिका घेतली होती. या फेरीवाल्यांना नेमकं कुणाचा अभय आहे असा सवाल उपस्थित करत सर्वच लोकप्रतिनिधींनी कारवाईची मागणी लावून धरली होती. त्यानुसार बदलापूर नगरपालिकाेच्या अतिक्रमण विभागाने पूर्वेकडील कात्रप रस्त्यालगत धडक कारवाई करत फळ विक्रेत्यांची दुकानं हटवली आहेत. आता ही कारवाई यापुढेही अशीच सुरू राहावी अशी अपेक्षा बदलावापुरातल्या नागरिकांनी व्यक्त केलीय।0
0
Report
प्रशांत बंब ने वाळू स्टॉक्स पर छापेमारी, घरकुल योजना के लाभार्थी परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शासनाच्या घरकुल योजनेला बांधकामासाठी शासनाकडून फुकट वाळू देण्याचे बंधन आहे मात्र ही वाळू मिळत नसल्याचं तक्रारी आहेत. भाजपा आमदार प्रशांत बंब यांनी स्वतःच्या मतदारसंघातच वाळूच्या साठ्यांवर धडक मारली. प्रशासन वाळू नसल्याचा दावा करत असताना, या साठे कुणासाठी आणि तिथे असलेले असल्याचे प्रश्न उपस्थित झाले. त्यांनी गंगापूर मतदारसंघात पाच ते सहा ठिकाणी वाळूच्या साठ्यांवर छापेमारी केली आणि प्रशासनाला ही वाळू जप्त करण्यास तसेच घरकुल योजनाच्या लाभार्थ्यांना देण्यास सांगितले. या घटनांचे राजकीय वातावरणात पोलखोल झाले आहे, सरकारची भूमिका काय असेल याबद्दल स्पष्टता घडावी अशी चर्चा सुरू आहे.0
0
Report
वाशिम में नए शैक्षणिक वर्ष का शुभारम्भ, प्रवेशोत्सव में बच्चों का उत्साह
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर :विदर्भात यंदा उन्हाळ्याची तीव्रता अधिक असल्यानं शाळा ३० जूनपासून सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.त्यानुसार आज नव्या शैक्षणिक वर्षाची उत्साहात सुरुवात झालीये.शाळेच्या पहिल्याच दिवशी जिल्हाभरात प्रवेशोत्सव मोठ्या उत्सहात साजरा करण्यात आला.वाशिम तालुक्यातील सोनखास इथं पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या स्वागतासाठी जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर स्वतः उपस्थित होते.यावेळी पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा फेटे बांधून,लेझीम आणि बँड पथकासह गावात मिरवणूक काढून पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आलं.तसेच शाळा परिसर रंगीबेरंगी फुगे, रांगोळ्या,स्वागत कमानी आणि सेल्फी पॉइंटने सजविण्यात आला होता.0
0
Report
Advertisement
जिम डंबेल विवाद में दो भाइयों पर हमला, घायल युवक अस्पताल में भर्ती
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये जिममधील डंबेलचा वाद पेटला! कल्याणच्या कोळसेवाडीत 'सोनू भाई' गँगचा लहान भावानंतर मोठ्या भावावरही जीवघेणा हल्ला; .. लहान भावाची मारहाणीचा संपूर्ण थरार CCTV मध्ये कैद.. कोळसेवाडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याची प्रक्रिया सुरू Kalyaṇ préṇeśa pōlīs toṇyāṭaṭaṭī.कल्याण पूर्वेतील کوळशेवाडी परिसरातील एका जिममधील वादातून एका तरुणावर झालेल्या बेदम मारहाणीची घटना समोर आली आहे. हर्ष राहुल पाठक या तरुणाला काही जणांनी मारहाण केल्याने तो गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात उपचार सुरू आहेत महिनाभरापूर्वी हर्षचा लहान भाऊ आदर्श पाठक हा जिममध्ये व्यायाम करत होता. त्यावेळी त्याने आरोपी राज चव्हाण उर्फ सोनू याच्यासमोर असलेला डंबेज व्यायामासाठी उचलला होता. याचा राग आल्याने राज चव्हाण उर्फ सोनू भाई आणि त्याच्या साथीदारांनी आदर्शला बेदम मारहाण केली. त्या वेळी घडलेली संपूर्ण घटना जिममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली होती. या मारहाणीत तो गंभीर जखमी झाला.जखमी अवस्थेत हर्षला तातडीने कल्याणच्या रुक्मिणीबाई रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी कोळशेवाडी पोलिसांनी घटनेची गंभीर दखल घेतली असून नेमका वाद कशामुळे झाला, मारहाणीत कोण-कोण सहभागी होते आणि घटनेमागील कारणे काय आहेत याची माहिती घेतली जात आहे. तसेच संबंधितांची तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.0
0
Report
रत्नागिरी की चिराणी नदी में जहरीं पानी से मछलियों की मौत, ग्रामीणों में आक्रोश
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिरणी नदीत मृत माशांचा खच,ग्रामस्थ संतप्त.. मुसळधार पावसाची संधी साधत काही लोटे midc तील कंपन्यांनी त्यांचे रसायनयुक्त विषारी पाणी थेट नदीपात्रात सोडल्यामुळे चिरणी येथील नदीत शकडो माशांचा तडफडून मृत्यू झाला असून,नदीकाठावर मृत माशांचा खच पडला आहे.कंपन्यांच्या या मुजोरीमुळे संपूर्ण परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली असून स्थानिक ग्रामस्थ कमालीचे संतप्त झाले आहेत.प्रदूषण नियंत्रण मंडळ या दोषी कंपन्यांवर तात्काळ कडक कारवाई करणार का,असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.0
0
Report
विदर्भ की स्कूलें आज खुलीं; शिक्षा मंत्री पंकज भोयर ने विद्यार्थियों से संवाद किया
Nagpur, Maharashtra:विदर्भातील शाळा आजपासून सुरू झाल्या। शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर नागपूर शहरातील सेवासदन शाळेत जाऊन विद्यार्थ्यांशी संवाद साधला। आरक्षणातील उपवर्गीकरण संदर्भात सरकार तोडगा काढेल। टीईटी पेपर फूट प्रकरणात परीक्षार्थ्यांपर्यंत पेपर लीक करण्याचा प्रयत्न केला गेला; शासनाच्या दुसऱ्या विभागाने त्या प्रयत्नाला तोडगा काढला आहे; एसआयटी गठीत करण्यात आली आहे आणि लवकरच पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेण्यात येईल। दोन टीम बिहार, एक टीम हरियाणा ला गेली आहेत; ते दोन्ही आरोपी लवकरच भेटतील। आजपासून सुरु होणाऱ्या एसआयआर बाबत प्रशासन पूर्वीपासून पूर्ण तयारी केली आहे; मतदारांच्या नावांत काही तक्रारी होत्या, पारदर्शक मतदार यादी तयार होतील। हिंदीमध्ये अशी मागणी होती की शाळांमध्ये मराठी भाषा अनिवार्य केली जावी; राज्यात वेगवेगळ्या बोर्डाचे शाळा असून काही तक्रारी आल्या त्या सरकारने कारवाई केली। गणवेश देण्यास सरकारने भूमिका घेतली असून शाळा समितीच्या खात्यात निधी दिला आहे आणि त्या माध्यमातून गणवेश दिले जाणार आहे। संजय राऊतांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही.0
0
Report
Advertisement
मुंबई-पुणे कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कार पर पत्थर से खिड़की टूटी, कोई घायल नहीं
Varsoli, Maharashtra:मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील कनेक्टिंग लिंक बोगद्यात धावत्या कारवर अचानक दगड कोसळल्याने कारची समोरील काच फुटली. सुदैवाने या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. मुंबई हुन पुण्याच्या दिशेने जाणाऱ्या अर्टिगा कारवर दगड पडल्याने वाहनाचे नुकसान झाले. माहिती मिळताच खंडाळा महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. चालकाने कोणतीही तक्रार नोंदवली नसून, अपघातात जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे बोगद्याच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा प्रश्न उपस्थित झाले आहेत.0
0
Report
अक्कलकोट में दो साल के बच्चे पर डुकर का हमला, कान में 14 टांके
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अक्कलकोट मध्ये दोन वर्षाच्या चिमुकल्याच्या कानाला मोकाट डुकराने घेतला चावा, चिमुकल्याला 14 टाके टाकत ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू ((( लहान मुलगा आहे चेहरा ब्लर करावा विनंती ))) - अक्कलकोट तालुक्यातून अंगावर शहारा आणणारी घटनासमोर - दोन वर्षाच्या चिमुकल्यावर मोकाट डुकराचा थरारक हल्ला - मोकाट डुकराने चिमुकल्याच्या कानाचे तोडले लचके - सार्थक काशिनाथ माळगे असे डुकराच्या हल्ल्यात जखमी झालेल्या चिमुकल्याचे नाव - अक्कलकोट तालुक्यातील जंगी प्लॉटमध्ये घडली दुर्दैवी घटना - डुकराच्या हल्ल्यामुळे चिमुकलाच्या कानाला पडले 14 टाके - मोकाट डुकराच्या थरारक हल्ल्यानंतर बराच वेळ समर्थ बेशुद्ध अवस्थेत - सार्थकवर अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू0
0
Report
जेवनाळा में स्कूल बंद कराने का प्रदर्शन, ग्रामस्थ शिक्षकों की भर्ती की मांग
Bhandara, Maharashtra:शाळेच्या पहिल्या दिवशी जेवनाळा येथील गावकऱ्यांनी पुकारले शाळा बंद आंदोलन विद्यार्थ्यांना बाहेर बसवत आंदोलनाची सुरुवात... शाळेची पहिल्या दिवशी भंडारा जिल्ह्यातील जेवनाळा येथे ग्रामस्थांनी शिक्षकांच्या मागणीसाठी शाळा बंद आंदोलन पुकारले आहे यामध्ये ग्रामस्थ व शाळा व्यवस्थापन समिती यांनी शाळेला कुलूप बंद करत आंदोलनाची सुरुवात केलेली आहे. शासनाकडे मागील दोन वर्षांपासून गावकरी शिक्षकांची मागणी करत होते मात्र शासनाकडून शाळेला पूर्णपणे शिक्षक मिळत नसल्याने गावकऱ्यांनी आज चक्क शाळेच्या पहिल्याच दिवशी शाळा बंद केली असून प्रशासनाला शिक्षकांची मागणी केलेली आहे.0
0
Report
Advertisement
पलूस के घोगाव में निजी ट्रैवल्स बस पलटी, चालक समेत 2 की मौत, 15 घायल
Sangli, Maharashtra:पलूस तालुक्यातील घोगाव येथे खाजगी ट्रॅव्हल्स बस पलटी होऊन दोघे जण ठार झाले आहेत, १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. मृतांमध्ये बस चालक आणि क्लीनरचा समावेश आहे. कराड-तासगाव मार्गावर अपघात झाला. भरधाव बस वरील चालकाचा ताबा सुटल्याने रस्त्याच्या कडेला असणाऱ्या झाडावर जाऊन बस आदळी, ज्यामध्ये बस चालकासह क्लिनरचा जागीच मृत्यू झाला आहे, तर बसमधून प्रवास करणारे १५ हून अधिक प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत. कराड-तासगाव मार्गावरील रस्त्याचे काम अपूर्ण असून अरुंद रस्त्यामुळे अचानक वेग कमी करावा लागल्याने, हा अपघात झाल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे, याप्रकरणी कुंडल पोलीस ठाण्यामध्ये अपघाताची नोंद झाली असून अधिक तपास कुंडल पोलीस करत आहेत.0
0
Report
अमरावती के कर्मचारियों की वसाहती में घटिया निर्माण, महिलाओं ने प्रशासन पर बड़ा आरोप
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हा परिषद कर्मचारी वसाहतीत निकृष्ट दर्जाचे बांधकाम; कर्मचाऱ्यांच्या गृहिणींचा आरोप पावसाळा सुरू होताच क्वार्टर्सला लागली गळती; रस्ते उखडले, नाल्या तुंबल्याने वसाहतीला नरकयातना प्रशासनाने तात्काळ समस्या सोडवाव्यात संतप्त गृहिणींची मागणी अँकर :- अमरावती जिल्हा परिषदेच्या वर्ग ३ कर्मचाऱ्यांच्या निवासस्थानांना समस्यांचा मोठा विळखा पडला असून प्रशासकीय अनास्थेचा आणखी एक धक्कादायक नमुना समोर आला आहे. अवघ्या चार-पाँच महिन्यांतच या वसाहतीमध्ये कोट्यवधी रुपये खर्च करून दुरुस्ती व देखभालाची कामे झाली होती. मात्र पहिल्याच पावसात हे संपूर्ण काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याचा आरोप येथील कर्मचाऱ्यांच्या पत्नी व गृहिणींनी केला आहे. सध्या वसाहतीमधील रस्ते पूर्णपणे उखडले असून बसवलेले पेव्हर ब्लॉक बाहेर निघाले आहेत. इतकेच नव्हे तर निकृष्ट कामामुळे पहिल्याच पावसाचे पाणी क्वार्टर्समध्ये गळत आहे. कॉलनीमध्ये लहान पाईपलाईनमुळे पिण्याचे पाणी येत नाही अंधाराचे साम्राज्य असूनही पुरेसे स्ट्रीट लाईट्स नाहीत आणि अंतर्गत नाल्या तुंबल्याने आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. वसाहतीची ही दुरवस्था दूर करून प्रशासनाने तात्काळ मूलभूत सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांनी केली आहे. बाईट :- एकूण ३, कर्मचारी पत्नी0
0
Report
इचलकरंजी में सराईत अपराधियों के खिलाफ पुलिस ने धावा कर दी, दो गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:इचलकरंजी शहरातील रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगारांविरोधात पोलिसांनी धडक कारवाई करत दोन आरोपींची शहरातील विविध भागांत धिंड काढली. खंडणी, चोरी, खून, मारामारी अशा गंभीर गुन्ह्यांमध्ये वारंवार अटक झालेल्या आरोपींना पोलिसांनी नागरिकांसमोर फिरवत गुन्हेगारीविरोधात कडक संदेश दिला. इचलकरंजीतील रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट या दोघांविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गंभीर स्वरूपाचे अनेक गुन्हे दाखल आहेत. या आरोपींवर यापूर्वीही महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा (मोका) अंतर्गत सहा वेळा कारवाई करण्यात अल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. दोन दिवसांपूर्वी या दोघांनी एका वाहनचालकाला अडवून त्याच्याकडील वाहन आणि मोबाईल फोन जबरदस्तीने हिसकावून घेतल्याचा आरोप आहे. या घटनेप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यानंतर पोलिसांनी दोघांनाही अटक केली. अटकेनंतर पोलिसांनी रुपेश नरवाडे आणि ऋषिकेश परीट यांची भोनेमाळ, जवाहरनगर, गणपती कट्टा आणि परिसरातील इतर संवेदनशील भागांत धिंड काढली. या कारवाईमागचा उद्देश शहरातील गुन्हेगारीला आळा घालणे आणि सराईत गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचा स्पष्ट संदेश देणे हा असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
1 जुलाई 2026 से चिपळूण पोस्ट विभाग स्वतंत्र, पोस्ट सेवाओं में तेज़ी
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणकरांसाठी आनंदाची बातमी; १ जुलैपासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' सुरू उत्तर रत्नागिरीतील नागरिकांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला आहे. डाक निदेशालय, नवी दिल्ली यांच्या मंजुरीनंतर १ जुलै २०२६ पासून स्वतंत्र 'चिपळूण पोस्ट विभाग' कार्यरत होणार आहे. या नव्या विभागात चिपळूण, खेड, दापोली, गुहागर आणि मंडणगड या पाच तालुक्यांतील सर्व डाकघरांचा समावेश करण्यात आला आहे. त्यामुळे विभागीय स्तरावरील पोस्टल कामांसाठी नागरिकांना रत्नागिरीला जाण्याची गरज भासणार नाही. यामुळे वेळ, पैसा आणि श्रमांची मोठी बचत होणार असून पोस्टल सेवाही अधिक जलद आणि प्रभावी होणार आहेत.0
0
Report
नीट के बाद टीईटी पेपर लीक: रत्नागिरी में कांग्रेस ने सख्त जांच की मांग
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी नीटनंतर आता टीईटीचा पेपर फुटला; सखोल चौकशीची रत्नागिरी जिल्हा काँग्रेसची मागणी नीट परीक्षेनंतर आता टीईटी परीक्षेच्या पेपरफुटीच्या प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी काँग्रेसच्या रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सोनललक्ष्मी घाग यांनी केली आहे. लाखो विद्यार्थ्यांची मेहनत आणि पालकांचा पैसा वाया जात असल्याचा आरोप करत, सोनललक्ष्मी घाग यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी चिपळूणचे प्रांताधिकारी आकाश लिगाडे यांना निवेदन सादर केले. यावेळी परीक्षा प्रक्रियेत पारदर्शकता राखून विद्यार्थ्यांना न्याय देण्याची मागणीही करण्यात आली.0
0
Report
भर बारिश में चिचोंडे गाँव में शेड नहीं, villagers की कठिनाई बढ़ी
Chendhare, Maharashtra:अँकर - म्हसळा तालुक्यातील चिचोंडे गावात भर पावसात मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली है. गावातील एका व्यक्तीचे निधन झाले त्यावर आज सकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. मात्र स्मशान भूमीवर शेड नसल्याने भर पावसात अंत्यविधी सह इतर धार्मिक विधी करावे लागले. म्हसळा तालुक्यातील पाभरे गावातील ही वाडी आहे. पंचायत समितीच्या माध्यमातून इथं स्मशानभूमीचा चौथरा बांधण्यात आला. मात्र ठेकेदाराने त्यावर शेडचे काम केले नाही. ठेकेदाराच्या हलगर्जीमुळे ग्रामस्थांची मोठी गैरसोय होते आहे. याबद्दल ग्रामस्थानी नाराजी व्यक्त केलीय. महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या मतदार संघातील हे गाव है.0
0
Report
Advertisement
