icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला: अलंकार मार्केट में युवक पर धारदार हथियार से हमला, मौत

Akola, Maharashtra:अकोला शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या रामदास पेठ पोलीस स्टेशनच्या हद्दीत काल रात्री एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी तपास चक्र वेगाने फिरवली आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील अलंकार मार्केट परिसरात एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले. या हल्ल्यात तो तरुण गंभीर जखमी झाला , त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आला मात्र त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच रामदास पेठ पोलीस स्टेशनचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मृत तरुणाचे नाव राहुल सारासर असल्याचे समोर आले आहे.पोलीस सीसीटीव्ही फुटेज आणि इतर पुराव्यांच्या आधारे हल्लेखोरांचा शोध घेत आहेत. हल्ल्याचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट नसले तरीही ही हत्या जुन्या वादातून झाला असावा असा संशय व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

उल्हास नदी में जलपर्णी का फैलाव; प्रदूषण बढ़ा, पर्यावरण चिंतित

Ambernath, Maharashtra:उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पाण्यावर जलपर्णीचा थर ,नदीतील जलचारांचे अस्थीत्व धोक्यात बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीला जलपर्णीचा विळखा पडलाय. एरंजाड ,आंबेशिव परिसरातील नदी पात्रात पाण्यावर जलपर्णींच आच्छादन पाहायला मिळते आहे, त्यामुळे नदीतील जलचारांचे अस्थीत्व धोक्यात आले आहे . उल्हास नदीत बदलापूरच्या खरवई परिसरातून मोठ्या प्रमाणात शहराचे आणि एमआयडीसीतील सांडपाणी नदीत सोडलं जातं त्यामुळे उल्हास नदीच्या प्रदूषणात दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होतेय .त्यामुळे आता उल्हास नदीमध्ये मोठ्या प्रमाणात जलपर्णी वाढलीय. उल्हास नदीतून अंबरनाथ, बदलापूर आणि ठाणे जिल्ह्याला पाणीपुरवठा केला जातो. मात्र आता नदीच्या प्रदूषणात भर पडल्यानं पर्यावरण प्रेमी संताप व्यक्त करतायेत. मागील वर्षी सुद्धा उल्हास नदीत मोठ्याप्रमाणात जलपर्णी वाढली होती. आता पुन्हा एकदा नदीत जलपर्णी वाढू लागलीय मात्र या जलसंपदान विभाग मात्र या कडे गांभीर्याने पहातांना दिसत नाहीये चंद्रशेखर भुयार , बदलापूर.
0
0
Report
Advertisement

बदलापुर में अवैध मछली विक्रेताओं पर प्रशासन की कार्रवाई, शिवसेना–भाजपा आमने-सामने

Ambernath, Maharashtra:बदलापूरमध्ये चौकाचौकातील मच्छी विक्री बंद होणार? मच्छीविक्री बंदी वरून शिवसेना भाजप आमने सामने बदलापूर शहरातील बेकायदेशीर मच्छी विक्रेत्यांविरोधात आता नगर पालिका प्रशासन आक्रमक झालं आहे. मच्छी विक्रीमुळे दुर्गंधी आणि अस्वच्छता वाढत असल्याच्या तक्रारीवरून नगरपालिका प्रशासनाने कठोर भूमिका घेत, अधिकृत जागेवरच मच्छी विक्री करण्याचे आदेश दिले आहेत. तर मच्छी विक्री करणाऱ्या महिला अनेक वर्षांपासून उदरनिर्वाहासाठी व्यवसाय करत आहेत. त्या भूमिपुत्र आहेत. बदलापूरमध्ये अद्ययावत मच्छी मार्केट नसल्यामुळे त्या चौकांमध्ये बसतात. त्यामुळे मच्छी विक्रेत्यांवर अन्याय होऊ देणार नाही, त्यांच्या पाठीशी शिवसेना ठामपणे उभी असल्याचं मत शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी व्यक्त केलं आहे. त्यामुळे आता बदलापुरात मच्छी विक्रेत्यांवरून शिवसेना आणि भाजप आमने-सामने आले आहेत
0
0
Report

वसई-विरार में गर्मियों में पानी की कटौती नहीं, मानसून पूर्व तैयारी तेज

Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरारकरांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. मान्सूनच्या पार्श्वभूमीवर वसई-विरार महानगरपालिकेने आतापासूनच तयारीला वेग दिला असून यंदाच्या उन्हाळ्यात शहरात कोणतीही पाणी कपात केली जाणार नसल्याची माहिती महापालिका आयुक्त बी. पी. पृथ्वीराज यांनी दिली आहे. शहरात सध्या मुबलक पाणीसाठा उपलब्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, मान्सूनपूर्व कामांमध्ये नालेसफाईला गती देण्यात आली असून तब्बل ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. नालेसफाईतील अडथळे दूर करण्यासाठी तिवर झाडांच्या पुनर्वसनाचा पाठपुरावा सुरू आहे. तसेच पावसाळ्यातील आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी अग्निशमन दलाचे जवान एनडीआरएफकडे विशेष प्रशिक्षणासाठी रवाना झाले आहेत. शहराच्या पुढील दहा वर्षांच्या विकासासाठी जागतिक बँकेकडून निधी मिळणार असल्याने विकास आराखड्यालाही गती मिळणार आहे.
0
0
Report
Advertisement

नीट पेपर लीक पर नेताओं की प्रतिक्रियाएं और मोदी की महंगाई पर आह्वान

Nashik, Maharashtra:नाशिक (मालेगाव) विशाल मोरे (47 सेकंदाचा बाईट महत्वाचा) रामदास आठवले पत्रकार परिषद on Neet पेपर leak - मला वाटते की Neet संदर्भात समझतील काही लोक जबाबदार असतात.. सरकार त्याकडे लक्ष देतील.. त्यांना सरकार कडून शिक्षा केली जाईल.. पेपर leak होणे योग्य नाही असे होणे चांगले नाही.. On महागाई..मोदी आवाहन - नरेंद्र मोदींनी देशाच्या आर्थिक बाबींवर लक्ष ठेवून आहे.. अमेरिका आणि इराण युद्धमालेमुळ इंधन पुरवठा अडचणी वाढल्या आहेत. आमचे सरकार आल्यापासून पेट्रोल डिझेल एवढे वाढले नाहीत. केंद्राने लक्ष घालावे.. सर्व सामन्यांना त्रास होऊ नये म्हणून काही निर्णय घेतला जात आहे.. राज्य सरकारला एक्साईज कमी करण्याचा अधिकार आहे. On नेते पेट्रोल बचत.. - प्रधानमंत्र्यांनी जर पेट्रोल डिझेल वाचवण्यासाठी भूमिका घेतली तर त्याचे अनुकरण केला.. सर्व मंत्री देखील त्याचे अनुकरण करतील.. सर्वांनी पेट्रोल डिझेल वापरले जाणे आवश्यक आहे.. नितीन गडकरी यांनी देखील बस ने प्रवास केला.. कोविड मध्ये देखील इकॉनॉमी टिकवून ठेवण्यासाठी प्रयत्न केले तसेच आताही प्रयत्न आहे.. देशाची आर्थिक स्थिती टिकवण्याची जबाबदारी आहे.. सर्व नेते आणि उद्योजकांनी देखील सिक्युरिटी कमी केली पाहिजे.. On मालेगाव कविता.. राजकारणात मला बनण्याची अजिबात नाही हाव म्हणून मी आलो मालेगाव ..
0
0
Report

शिंदखेडा-डोंडाईचा में गैस सिलेंडर लेकर लंबी कतार, आक्रोश के साथ रास्ता रोको

Dhule, Maharashtra:दोंडाईचा शहरात गॅस सिलेंडर घेण्यासाठी गॅस सिलेंडर सह नागरिकांच्या तब्बल अर्धा किलोमीटर लांब रांगा लागल्या होत्या. पहाटेपासून गॅस सिलेंडर घेण्यासाठी रांगेमध्ये उभे असताना देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप झाल्याचे पहायला मिळाले. भर उन्हामध्ये तासन्तास रांगेत उभे राहून देखील गॅस सिलेंडर मिळत नसल्यामुळे नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केल. शिंदखेडा दोंडाईचा रस्त्यावर संतप्त नागरिकांनी रास्ता रोको केले. या रास्ता रोको दरम्यान संतप्त नागरिकांचा आक्रोश बघावयास मिळाला. पोलिसांनी मध्यस्थी करत नागरिकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पेट्रोल डिझेल भाव वाढीनंतर घरगुती गॅस देखील मिळत नसल्यामुळे नागरिकांचा संताप अनावर झाला आहे .
0
0
Report
Advertisement

खेत में दवा छिड़कते समय बिजली का झटका, मामा-भाचा की मौके पर मौत

Sangli, Maharashtra:शेतामध्ये औषध फवारणी करत असताना विजेचा शॉक लागून मामा-भाच्याचा जागीच मृत्यू. शेतामध्ये पिकावर औषध फवारणी करीत असताना हा विजेचा शॉक लागला आहे. ज्यामध्ये विशाल पांडुरंग माळी व त्यांचा भाचा अथर्व रवींद्र माळी या दोघांचा मृत्यू झालाय. आरग येथील रवींद्र माळी यांच्या शेतामध्ये असणाऱ्या वांगी पिकावर मामा - भाचे औषध फवारणी करण्यासाठी गेले होते. यावेळी औषध फवारत असताना रवींद्र माळी यांच्या शेतामध्ये असणाऱ्या महावितरणच्या ट्रांसफार्मरच्या वायरचा दोघांना स्पर्श झाला. यावेळी विजेचा शॉक लागल्याने दोघांचा जागीच मृत्यू झाला. मामा-भाच्याचा दुर्दैवी मृत्युच्या घटनेने आरग परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

उल्हासनगर में परिवार पर हमला: महिलाओं को मारा, बाल काटे जाने का आरोप

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात तक्रार दिल्याचा राग महिलांसह कुटुंबावर हल्ला केस कापून जीवे मारण्याची धमकी महिल्यांच्या गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली धिंड कथन: उल्हासनगरमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जाणाऱ्या कुटुंबाला अडवून आरोपींनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली असून यामध्ये महिलांनाही मारहाण झाली आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. व्हिओ -उल्हासनगर-३ येथील वाघेलानगर चौक परिसरात १४ मे २०२६ रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास ही गंभीर घटना घडली. फिर्यादी आपल्या बहिण गीता राजपूत आणि मुलगी अंजली यांच्यासह मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी जात होते. त्यावेळी तरुण मित्र मंडळ परिसरातील सार्वजनिक रस्त्यावर आरोपींनी बेकायदेशीर जमाव जमवत त्यांना अडवले. गीता राजपूत यांनी यापूर्वी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रार दिल्याचा राग मनात धरून आरोपी नितीन थोरात याने फिर्यादीच्या डोक्यात लाकडी दांडक्याने जोरदार मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच इतर आरोपींनी तोंडावर आणि पाठीवर लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच महिलांना गळ्यात चप्पलांचा हार घालत काढली धिंड काढली या हल्ल्यात आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांनी फिर्यादीचे डोक्याचे केस कापल्याचा धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. फिर्यादीची बहिण गीता आणि मुलगी अंजली यांनाही हाताने व लाठाबुक्क्यांनी मारहाण करून जखमी करण्यात आले. तसेच “पोलीसाकडे तक्रार दिल्यास तुम्हाला बघून घेऊ” अशी धमकी देत शिवीगाळ करण्यात आल्याचे फिर्यादीने तक्रारीत नमूद केले आहे. या प्रकरणी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक किर्वे करीत आहेत.
0
0
Report

Mulund Kalidas Kriida Sangkul में भ्रष्टाचार: महापौर ने खुद जांच कराई

Mumbai, Maharashtra:मुलुंडमधील कालिदास क्रीडा संकुलातील कथित भ्रष्टाचाराचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या संकुलात मोठ्या प्रमाणात आर्थिक गैरव्यवहार आणि अनधिकृत बांधकाम झाल्याचा आरोप केल्यानंतर आता मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी स्वतः या ठिकाणी पाहणी करत गंभीर आरोप केले आहेत. तात्कालीन महापौर किशोरी पेडणेकर यांच्या कार्यकाळात मेघराज हॉस्पिटॅलिटी या संस्थेला दिलेलं १५ वर्षांचं कंत्राट अनधिकृत असल्याचा दावा करत, संकुलात मोठमोठे हॉल, हॉटेल आणि बांधकाम नियमबाह्य पद्धतीने उभारण्यात आल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. सामान्य नागरिकांसाठी असलेल्या जागेचा गैरवापर करत महापालिकेचा ठराव डावलण्यात आल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. याप्रकरणी संबंधित अधिकारी आणि जबाबदार व्यक्तींवर एफआयआर दाखल करण्याची मागणी करत अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाईचे आदेश देण्यात आल्याची माहिती रितू तावडे यांनी दिली. दरम्यान, पाणी कपातीच्या निर्णयावर बोलताना एल निनोमुळे पावसाला उशीर होत असल्याने मुंबईकरांनी पाणी जपून वापरण्याचं आवाहनही त्यांनी केलं आहे。
0
0
Report
Advertisement

नीट पेपरफूट पर अमरावती में युवक कांग्रेस का प्रदर्शन, इस्तीफा की मांग

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर युवक काँग्रेसचे आंदोलन; केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या पोस्टरची जाळपोळ, नीट परीक्षा पेपर फुटी प्रकरणी युवक काँग्रेस आक्रमक. यावेळी भाजप सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली; नीट परीक्षेचा पेपर फुटल्यामुळे देशभरातील २४ लाख विद्यार्थ्यांच शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान झालं असल्याची माहिती देण्यात आली. या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी तात्काळ राजीनामा द्यावा. विद्यार्थ्यांना नुकसानभरपाई देण्यात यावी अशी मागणी.
0
0
Report

कणकवली में अल्पवयस्क युवती से छेड़छाड़ के आरोप पर प्रवासी युवकों की बेदम पिटाई

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग — अल्पवयीन युवतीची छेड काढल्याच्या रागातून परप्रांतीय युवकांना बेदम मारहाण.... कणकवली शहरात घडली घटना..कणकवली येथील एका खाजगी दुकानात काम करणाऱ्या दोन परप्रांतीय युवकांनी अल्पवयीन युवतीची छेड केली; युवतीनी घडलेला प्रकार कथन करताच स्थानिक युवकांनी आक्रमक भूमिका घेत दोन्ही युवकांना बेदम मारहाण केली; दोन्ही युवकांना पोलिसांच्या ताब्यात देत गुन्हा दाखल करण्याची केली मागणी; कणकवली शहरातील नागरिक एकटावले, पोलीस स्थानकात परप्रांतीय युवकांवर गुन्हा दाखल करण्याची केली होतेय मागणी; अखेर पोलीसांनी दोन्ही युवकांना ताब्यात घेतले; सदर घटनेमुळे कणकवली शहरात काही काळ तणाव होता.
0
0
Report

अर्थतंत्र के बिना राजनीति नहीं चलेगी: वनमंत्री गणेश नायक ने साफ विचारों पर किया जोर

Chendhare, Maharashtra:स्‍लग - स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. वनमंत्री गणेश नाईक यांचे महत्‍वपूर्ण विधान. आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही. पेण येथे राष्‍ट्रीय आगरी अध्‍यात्मिक संमेलन. अँकर – आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काही चालत नाही. तुम्‍ही स्‍वच्‍छ विचारसरणीचे असाल तर लोक तुम्‍हाला निवडून देतील याची गॅरंटी नाही. हे वि धान केलंय राज्‍याचे वनमंत्री गणेश नाईक यांनी. अखिल भारतीय आगरी समाज संस्‍थेने आज पेण इथं राष्‍ट्रीय आगरी अध्‍यात्मिक संमेलनाचे आयोजन केले होते. या कार्यक्रमात ते बोलत होते. तुमचं मन स्‍वच्‍छ असेल, मानसिक स्थिरता राहील मग शारीरीक स्थिरता मिळते त्‍यातून समाजकार्य होतं मग अर्थकारण होतं. और आजच्‍या राजकारणात अर्थकारणाशिवाय काहीच चालत नाही असं गणेश नाईक म्‍हणाले. पेणचे आमदार रवींद्र पाटील हे यावेळी उपस्थित होते. साऊंड बाईट – गणेश नाईक, वनमंत्री
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top