icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

विष्णू मनोहर के झालमुड़ी महोत्सव से कोलकाता स्टाइल स्वाद का धमाका

Nagpur, Maharashtra:झालमुडी महोत्सव – “विष्णू की रसोई” पश्चिम बंगालमध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता स्थापन होत असताना नागपुरात “झालमुडी महोत्सव” “विष्णू की रसोई” येथे उत्सव आयोजन करण्यात आलं.. प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी सुमारे आठशे ते हजार किलो झालमुडी तयार केली. बंगालच्या पारंपरिक आणि तिखट-चटपटीत झालमुडीला आधुनिक ट्विस्ट देत विविध फ्लेवर्समध्ये हा महोत्सव आज सायंकाळी खाद्य प्रेमीसाठी हे झालमुडी वाटप करण्यात येतेय या महोत्सवामध्ये खास कोलकाता स्टाईल झालमुडी चटपटीत स्नॅक्सचा आस्वाद घेता येतोय पारंपरिक चव, ताजे साहित्य आणि अनोखी सादरीकरण यामुळे खाद्यप्रेमींमध्ये या महोत्सवाबद्दल विशेष आकर्षण निर्माण झाले आहे. कुटुंब, मित्रमंडळी आणि तरुणांसाठी हा महोत्सव खास आकर्षण ठरत आहे... यावेळी शेफ विष्णू मनोहर यांच्याशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण के लिए मनोज जरांगे का महाराष्ट्र में बड़ा आंदोलन करने की घोषणा

Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगेंची पुन्हा आंदोलनाची घोषणा. 16 मे रोजी आंदोलनाची तारीख जाहीर करणार(पॅकेज) जरांगेंचं आंदोलन म्हणजे शिंदे सेनेकडून सरकार अस्थिर करण्याचा डाव:ओबीसी नेते नवनाथ वाघमारे जरांगेंनी आंदोलन केल्यास आम्हीही अंतरवालीत आंदोलन करू:वाघमारे अँकर : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी महाराष्ट्रात पुन्हा मराठा आरक्षणासाठी आंदोलन करणार असल्याची घोषणा केलीय.या आंदोलनाची तारीख आणि दिशा जरांगे 16 मे रोजी जाहीर करणार आहेत.बघूया संविस्तर बातमी. व्हिओ:०१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी राजभरात मोठं आंदोलन उभं करणार असल्याची घोषणा केलीय.हे आंदोलन कोणत्या स्वरूपाचं असेल ,याबाबत जरांगे 16 मे रोजी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका जाहीर करणार आहेत.पण हे आंदोलन जरांगे मराठा आरक्षणाचं केंद्रबिंदू असलेल्या अंतरवाली सराटीतच करण्याची शक्यता आहे. बाईट : मनोज जरांगे पाटील व्हिओ:०२: एका बाजूला मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटलांनी मराठा आंदोलनाची तारीख जाहीर करण्याची घोषणा केलीय.तर दुसऱ्या बाजूला ओबीसी नेते देखील सावध झालेत.जरांगे आता पुन्हा आंदोलन करणार नाही.मात्र जरांगेंनी आंदोलन केल्यास अंतरवालीत जाऊन आंदोलने करणार असे ईशारा ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी दिलाय.शिवाय राज्य सरकार अस्थिर करण्यासाठी जरांगेंचं आंदोलन हा शिंदे सेनेचा डाव असल्याचाही आरोप वाघमारेंनी केलाय. बाईट : नवनाथ वाघमारे,ओबीसी नेते, जालना व्हिओ :०३:गेल्या अडीच वर्षात मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे यांनी अंतरवाली सराटीत सात उपोषण केलीयत.यदाकदाचित जरांगे यांनी पुन्हा आमरण उपोषण केल्यास अंतर वाली सराटीतील त्यांचं हे आठवं उपोषण असेल.तर जरांगे यांच्या उपोषणादरम्यान ओबीसी आक्रमक झाल्यास मराठा आणि ओबीसी दोन्हीही आंदोलनामुळे राज्य सरकार पेचात सापडण्याची शक्यता नाकारता येत नाही.त्यामुळे जरांगे यांच्या आंदोलनाची तारीख जाहीर होण्या आधी राज्य सरकार यावर काही तोडगा काढतं का याकडे देखील राज्याचं लक्ष लागलंय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
0
Report

भंडारा में 12.65 लाख रुपये कीमत की MD जब्ती, आरोपी गिरफ्तार

Bhandara, Maharashtra:भंडारा शहरात 12 लाख 65 हजारांची MD जप्त.... स्थानीय गुन्हे शाखेच्या पथकाने केली कारवाई.... स्थानीय गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक सुट्टीवर जाताच प्रभारी अधिकाऱ्यांनी केली कारवाई.... Anchor :- भंडार‍ा शहरात स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 12 लाख 65 हजारांची MD जप्त करत कारवाई केली आहे.. स्थानिक गुन्हे शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक शिरीष भालेराव यांना गुप्त माहिती मिळाली की एक इसम भंडारा शहरात MD विक्री करीत आहे.. त्या आधारे पोलिसांनी धाड टाकत 12 लाख 65 हजार रुपयांचा MD सह आरोपी कपिल खोब्रागडे याला अटक केली आहे. भंडारा जिल्ह्यात MD मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याची ओरड खासदारांनी केली होती. ते आता कुठतरी सत्य होताना दिसतं आहे... एकीकडे_local धोरणांचीపोलिस निरीक्षक यांनी दोन वर्षात एकही कारवाई केले नाही पण ते सुट्टीवर जाताच नवीन अधिकाऱ्याने पहिल्यांदा कारवाई केली असल्याने आता या चर्चेला उधाण आले आहे...
0
0
Report

खेड में हादसा: स्विफ्ट कार ने लक्जरी बस को पीछे से टक्कर मारी, 5 घायल

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावरील खेडमध्ये आज पहाटे भीषण अपघात झाला आहे. भरणे नाका येथे एका भरधाव स्विफ्ट कारने उभ्या असलेल्या लक्झरी बसला पाठीमागून जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत कारचा चक्काचूर झाला असून, त्यातील ५ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. स्थानिक नागरिक आणि मदत पथकाने ४५ मिनिटांच्या प्रयत्नांनंतर गाडी कापून जखमींना बाहेर काढले. सध्या सर्व जखमींवर कळंबणी उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून काहींची प्रकृती चिंताजनक आहे. वेगावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.
0
0
Report
Advertisement

ठाणे की छह हजार करोड़ रुपये की सरकारी जमीन घोटाले की कानूनी जाँच शुरू

Nagpur, Maharashtra:नागपूर - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - ठाणे जिल्ह्यातील सुमारे 6 हजार कोटींची जमीन, ही मूळ जमीन राज्य सरकारची असताना दोन कंपन्यांनी संगनमत करून जागा बाल्कवण्याचा प्रयत्न केला आहे. साधारणता 254 एकर ही जागा आहे, ययामध्ये मीरा रियाल इस्टेट डेव्हलपमेंट च्या नावावर ही जमीन केली गेली आहे, 189 एकर मीरा रियाल इस्टेट च्या नावे 65 एकर, सरकारी जमिनी मिठागाराच्या होत्या, जमिनीच्या मूळ राज्य सरकारच्या होत्या 1948 पासून वारंवार या जमिनीच्या संदर्भात अभिलेखात फेरफार करण्यात आला. त्यानंतर वरील दोन्ही कंपन्या सर्वोच्च न्यायालयात गेल्या, न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांकडे निर्णय सोपवला, जिल्हाधिकाऱ्याने 18 नोव्हेंबर 2022 रोजी ही संपूर्ण जमीन मालकी हक्काच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी यांचेकडे अपील करावे असे निर्देश दिले. 18 नोव्हेंबर 2002 रोजी ठाणे जिल्हाधिकारी यांनी या कंपन्यांचा दावा फेटाळून जमीन महाराष्ट्र सरकारकडे वर्ग करण्याचे आदेश दिले. 8 ऑक्टोबर 2010 रोजी कोकण विभागाच्या आयुक्तांनी त्यांची मालकी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाविरुद्ध निर्णय देऊन या कंपनीचे नावे मालकी करण्याचा निर्णय दिला. या आदेशाला केंद्र सरकारने लीज वर जमीन दिले होते,2000 च्या आदेशानंतर कंपनीने उच्च न्यायालयात अपील दाखल केली. 6000 कोटींची मूळ मालकी असलेली ही जमीन राज्य सरकारच्या संगणमातामुळे राज्य सरकारच्या हात मिळवणेमुळे निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला. राज्य सरकारच्या वकील झोपा काढत होते का? चांगले वकील नेमून बाजू मांडली असती तर सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय या संदर्भात कंपनीच्या बाजूने लागला नसता. सरकार कमी पडले, वकील कमी पडले, यामागे राज्य सरकारची भूमिका संदिग्ध आहे, राज्य सरकार एसेलपी दाखल करू असे म्हणत आहे. राज्यावर कर्जाचा डोंगर वाढत असताना अशा जागा बिल्डरच्या घशात घालण्याचं काम महाराष्ट्राचा महायुतीचा सरकार करत आहे आणि राज्याला कंगाल होण्याच्या दृष्टीने येत आहे असा आमचा आरोप आहे म्हणून माझी अशी मागणी आहे की तातडीने मोठे वकील लावून या जमिनीच्या संदर्भात अपील सर्वोच्च न्यायालयात केले पाहिजे. या मोठ्या कंपन्या आहेत, कोणाच्या जवळ असण्यापेक्षा जमिनीची किंमत सहा हजार कोटींची आहे, राज्य सरकारला अंडरटेबल काही फायदा करून घ्यायचा असेल म्हणून दुर्लक्ष केले असेल, एवढ्या मोठ्या प्रकरणात मोठे वकीل लावायला पाहिजे, वकील आणि उत्तम बाजू का मांडलेला आहे. जर राज्य सरकार या संदर्भात जात नसेल तर आम्ही याविरुद्ध सुप्रीम कोर्टात जाण्याचा निर्णय घेतो आहे सु मोटो, कारण एस एल पी दाखल करताना पुन्हा राज्य सरकारने थातमातूर काही दाखवून या कंपन्यांना फायदा होण्याचा प्रयत्न होत असेल तर मात्र स्पष्ट होते सरकार कोणाच्या बाजूने आहे. या मिठागराच्या जमिनी जरी होत्या, मीठ वर्क्स झाल्या, मीरा सॉल्ट वरसेस नावे दाखल झाल्या, अभिलेखत वारंवार बदल झाले, जिल्हाधिकारीांची कुठेच परवानगी नव्हती, राज्य सरकारने वेळकाढूपणा केल्याने आज ही जागा राज्य सरकारच्या हातून जात आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा राजमार्ग पर जाम, 108 एंबुलेंस फंसी, जीवन खतरे में

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्ग की मृत्यूचा महामार्ग? वाहतूक कोंडीत १०८ रुग्णवाहिका अडकली! मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या कामाचा फटका आता थेट रुग्णांच्या जीवाला बसू लागला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्ह्यातील संगमेश्वरातील सोनवी चौकात भीषण वाहतूक कोंडी वारंवार गेल्या काही दिवसांपासून होत आहे. या कोंडीत शुक्रवारी रात्री ‘१०८’ रुग्णवाहिका अडकून पडल्याची धक्कादायक घटना घडली. कुरधुंडा येथील गंभीर रुग्णाला आणण्यासाठी निघालेली रुग्णवाहिका ठेकेदाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे वाहतुकीत अडकली. अर्धवट रस्ता,खड्डे यामुळे नागरिकांचा संताप वाढला असून, ‘हा विकास की मृत्यूचा सापळा?’ असा सवाल आता विचारला जात आहे.
0
0
Report

हिंगोली में बारिश-आंधी से प्याज बीज उत्पादन पर बड़ा नुकसान; किसान मुआवजे की मांग

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यात रात्री झालेल्या अवकाळी पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या कांदा बियाणे उत्पादनाला मोठा फटका बसला आहे. यंदा कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने अनेक शेतकरी कांदा बीज उत्पादनाकडे वळले होते. मात्र ऐन उत्पादनाच्या टप्प्यात आलेल्या पिकावर अवकाळी संकट कोसळल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी कांद्याचे पीक अक्षरश जमीनदोस्त झाले असून आता शासनाने पंचनामे करून मदत द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे.चार महिन्यांपूर्वी शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून शेतकऱ्यांनी कांदा लागवड केली. बियाणे उत्पादनासाठी विशेष काळजी घेत सिंचन, औषध फवारणी आणि मशागतीवर हजारो रुपये खर्च करण्यात आले.मात्र काल अचानक आलेल्या अवकाळी पावसाने आणि जोरदार वादळी वाऱ्याने शेतकऱ्यांच्या आशांवर पाणी फेरले.शेतांमधील कांदा पीक पूर्णपणे आडवे पडले असून काही ठिकाणी फुलोरा आणि बीज निर्मितीवरही परिणाम झाला आहे. त्यामुळे उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान शेतीच्या बांधावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी
0
0
Report

बीमारी पर मात करके निकिता ने सभी विषयों में 35 मार्क्स हासिल किए: सोलापुर की छात्रा ने किया इतिहास

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयात 35 गुण (1 to 1). सोलापुरातील निकिता कुचेकर या दहावीच्या विद्यार्थिनीला सर्व विषयात 35 मार्क. दुर्धर आजारावर मात करत सर्व विषयात 35 मार्क मिळाल्याने चर्चेचा विषय ठरलीय. शहरातील ज. रा. चंडक प्रशालेतील विद्यार्थिनीचे यश. मी आजारी होते त्यामुळे शाळेला नको म्हणत होते, मात्र शिक्षकांमुळे मी परीक्षेला बसले. आजारी असूनही मी परीक्षा दिली आणि पास झाले. याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी...
0
0
Report
Advertisement

अकोला के तबला वादक शांतनु माई ने रूस में भारत का प्रतिनिधित्व किया

Akola, Maharashtra:अकोल्याचा युवा तबलावादक शांतनू मायी यांनी आपल्या प्रतिभेच्या जोरावर आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी झेप घेतली आहे. नुकत्याच रशियात पार पडलेल्या “ब्रिक्स मेलोडी महोत्सवा”त त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व करत रशियन रसिकांना मंत्रमुग्ध केले. यावेळी भारतीय शास्त्रीय संगीताची वैशिष्ट्ये, रागदारी परंपरा आणि भारतीय संस्कृतीची ओळख या माध्यमातून परदेशी विद्यार्थ्यांना करून देण्यात आली. अकोल्याचे शांतनू मायी यांनी यापूर्वीही अनेक राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त केले असून विविध प्रतिष्ठित मंचांवर तबल्याची साथ दिली आहे. आयोध्या येतील श्रीराम मूर्ती प्राणप्रतिष्ठेच्या कार्यक्रमात देखील दिग्गज गायकांसोबत शंतनू यांनी तबल्याचे साथ दिली होती. रशिया येथील या महोत्सवात ब्राझील, रशिया, भारत, चीन, इजिप्त आणि इंडोनेशिया अशा देशांतील कलाकार सहभागी झाले होते. अकोल्याच्या या युवा कलाकाराच्या यशामुळे शहराच्या सांस्कृतिक क्षेत्रात आनंदाचे वातावरण असून, तरुण कलाकारांसाठी ते प्रेरणास्थान ठरत आहेत.
0
0
Report

गादेगाव में पेड़ लगाकर तापमान 43°C से घटकर 32°C

Pandharpur, Maharashtra:ऐन वैशाख वणव्यात उन्हाचा पारा 43 अंशावर गेलेला असतानाच, पंढरपूर तालुक्यातील गादेगाव येथे मात्र चक्क 32 अंश तापमान नोंदवले गेले आहे. याचे कारण म्हणजे गावात केलेली मोठ्या प्रमाणावर वृक्ष लागवड. येथील वृक्षमित्र दत्ता बागल आणि त्यांच्या सहकार्यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी लावलेली 100 हून अधिक वडाची झाडे आज मोठी झाली असून या झाडांमुळे गावातील तापमान नियंत्रीत राखण्यास मोठी मदत झाली आहे. सर्वत्र उखाडा जाणवत असताना येथे मात्र थंड हवेचा अनुभव येत असल्याचा दावा येथील ग्रामस्थांनी केला आहे. वाढते तापमान कमी करण्याबरोबरच पर्जन्यमान वाढावे यासाठी दत्ता बागल यांनी गेल्या दहा वर्षापूर्वी स्वखर्चातून गावात शंभरहून अधिक वडाची रोपे लावली होती. स्वतः त्याचे जतन आणि संवर्धन केले. दहा वर्षानंतर आज छोट्या रोपांचे रुपांतर वट वृक्षामध्ये झाले आहे. गावच्या ओढ्याकाठी लावलेल्या वडाच्या झाडांमुळे गावातील लोकांना ऐन उन्हाळ्यात एसी (वातानुकूलित) अनुभव येत असल्याचा दावा ही दत्ता बागल यांनी केला आहे. श्री. बागल यांनी गावातील रस्त्यांच्या दुर्फा, शाळा परिसर, ग्रामपंचात कार्यालयासह मोकळ्या जागी त्यांनी वड, पिंपळ, चिंच, करंज, गुलमोहर, कडूनिंब, भावा यासह सुमारे 700 ते 800 देशी वृक्षांची लागवड केली आहे. शिवाय शेजारच्या इतर दहा गावांमध्ये देखील त्यांनी वड, पिंपळ रोपांची लागवड केली आहे. दत्ता बागल या वृक्षप्रेमी तरुणामुळे गावातील पर्यावरण संतुलन राखण्यास मोठी मदत झाली आहे, शिवाय तर दहा गावात देखील त्यांनी पर्यावरण संतुलनाचा रोड मॅप तयार केला आहे. त्यांच्या वृक्षलागवड, जतन आणि संवर्धन कार्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top