445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गर्मी से दूध उत्पादन 30-40% गिरे, Shirur के किसानों ने गोठों में फॉगर्स लगाये
Shirur, Maharashtra:राज्यात सध्या तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून, या वाढत्या उन्हाचा मोठा फटका पशुपालक शेतकऱ्यांना बसतोय. वाढत्या तापमानामुळे दुभत्या जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत असून, गाईंच्या दूध उत्पादनात तब्बल ३० ते ४० टक्क्यांची घट झाली आहे. इतकंच नाही, तर दुधातील फॅट आणि डिग्रीचे प्रमाणही कमालीचे घटले आहे. या कडक उन्हापासून जनावरांचे रक्षण करण्यासाठी शिरूरमधील शेतकऱ्यांनी आता आपल्या गोठ्यांमध्ये फॉगर्स (तुषार सिंचन यंत्रणा) बसवले आहेत. याद्वारे गोठ्यात गारवा निर्माण करून जनावरांना उष्णतेपासून दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र, एकीकडे घटलेले दूध उत्पादन आणि दुसरीकडे उन्हाळ्यामुळे वाढलेले चाऱ्याचे दर, अशा दुहेरी संकटात सध्या पशुपालक शेतकरी सापडला याचाच गाई गोठ्यातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
चंद्रपूर के सावली में 20 हाथियों का गांवों में प्रवेश, वन विभाग सतर्क
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात सावली तालुक्यातील करोली-आकापूर मार्गे चार पिल्लांसह २० हत्तींच्या कळपाने पुन्हा प्रवेश केल्याने सीमावर्ती गावांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. हत्तींच्या सततच्या हालचालींमुळे वनविभागाची चिंता वाढली असून कळपावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. यापूर्वी हा कळप गडचिरोली जिल्ह्यातील पोर्ला परिसराच्या दिशेने परत गेल्याचे दिसून आले होते. मात्र, करोली-आकापूर मार्गे पुन्हा सावली तालुक्यात प्रवेश झाल्याने वनविभागाने तातडीने हालचाली सुरू केल्या. सायखेडा परिसरातून हत्तींच्या कळपाला हुसकावून लावण्यात वन कर्मचाऱ्यांना यश आले असून त्यानंतर कळपाने जंगलाच्या दिशेने मार्गक्रमण केल्याचे सांगण्यात आले.0
0
Report
पालघर- बोईसर में CNG किल्लत से रिक्षाचालक 3–4 घंटे लाइन में, प्रशासन से कदम उठाने की मांग
Palghar, Maharashtra:Anch - पालघर आणि बोईसर परिसरातील सीएनजी पंपांवर सध्या सीएनजीचा मोठ्या प्रमाणावर तुटवडा जाणवत असून यबोईसर एमआयडीसी येथील पेट्रोल पंपावर रिक्षांच्या लांबच लांब रांगा लागल्याच पाहायला मिळतात . गुजरात गॅस कडून होत असलेल्या अपुऱ्या सीएनजी पुरवठ्यामुळे सध्या सीएनजी वाहन चालकांना भर उन्हात तीन ते चार तास ताटकळत उभा रहावं लागत असल्याने वाहन चालकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय . शहरांमध्ये सीएनजी वर चालणाऱ्या रिक्षांच प्रमाण जास्त असल्याने या रिक्षा चालकांना आपला दिवसभराचा व्यवसाय बाजूला ठेऊन सीएनजी पंप बाहेर भर उन्हात रांगेत उभ राहावं लागत असल्याने व्यवसायावर मोठा परिणाम होतो . प्रशासनाने संबंधित सीएनजी पंप चालकांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश द्यावे अशी मागणी या रिक्षा चालकांकडून करण्यात येत आहे .0
0
Report
Advertisement
कोकण सीट पर महायुती बनाम राष्ट्रवादी के बीच घमासान, तटकरे की पुष्टि सामने आई
Chendhare, Maharashtra:महायुतीचे ठरले... कोकणची जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला... अनिकेत तटकरे यांना उमेवारी निश्चित झाल्याची चर्चा.. अनिकेत तटकरे यांच्या एकनाथ शिंदे व सुनेत्रा पवार भेटीनंतर झाली निश्चिती... अनिकेत तटकरे यांच्या फेसबुक पोस्टची सर्वत्र चर्चा. फेसबुकवर एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार यांच्या भेटीचे फोटो केले पोस्ट. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोघांचेही आशीर्वाद घेतल्याचे पोस्टमध्ये नमूद... शिवसेनेतील बंडखोरी असफल ठरण्याची चिन्हे..0
0
Report
सोलापुर में क्रिकेट पिच बनाने के दौरान रोलर से हादसा, 15 वर्षीय छात्र की मौत
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - क्रिकेटचा पीच तयार करताना रोलरखाली गेल्याने १५ वर्षीय मुलाचा मृत्यू अँकर - बार्शीतील शिवशक्ती मैदानावर आयोजित क्रिकेट समर कॅम्पमध्ये अत्यंत हृदयद्रावक घटना घडलीय.क्रिकेट पिच तयार करण्यासाठी वापरला जाणारा रोलर अंगावर जाऊन आरव ऊर्फ वीरेन योगीराज चौधरी (वय १५) या नववीतील विद्यार्थ्याचा मृत्यू झाल आहे.शनिवारी सकाळी ७ ते ७:३० च्या दरम्यान ही घटना घडली आहे. मृत आरवचे वडील योगीराज चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार शिवशक्ती मैदानावर बार्शी तालुका क्रिकेट असोसिएशनच्या समर कॅम्पचे आयोजन करण्यात आले होते.फी भरून आरवला कॅम्पमध्ये प्रवेश दिला होता.कोच विवेक दुगम आणि अक्षय देबडवार हे मुलांना सराव देत होते. शनिवारी सकाळी सहा वाजता आरव नेहमीप्रमाणे सरावासाठी गेल्यावर ७ ते ७:३० च्या दरम्यान १२ ते १५ वर्षाच्या मुलांकडून कोचच्या सांगण्यावरून जड रोलर ओढून घेतला जात होता. त्यावेळी जवळ कोणताही प्रशिक्षक, तंत्रज्ञ किंवा मोठी व्यक्ती उपस्थित नव्हती. कोच लांब उभे होते,असे फिर्यादीत म्हटले आहे. रोलर ओढताना आरवचा तोल गेला आणि तो खाली पडला. पायापासून छातीपर्यंत रोलर अंगावरून गेल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.त्याला तत्काळ जगदाळे मामा हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले;मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले.बार्शी पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
शॉर्ट सर्किट से घर में भीषण आग, 35 हजार नकद और कागजात जलकर राख
Bhandara, Maharashtra:शॉर्टसर्किटमुळे घराला भीषण आग... 35 हजाराची रोख रक्कम जळून खाक पवनी तालुक्यातील भुयार येथे शॉर्ट सर्किटमुळे घराला आग लागून लाखो रुपयांचा नुकसान झाला. शेतकरी हरभा बाळबुधे व त्यांची पत्नी आपल्या शेताकडे गेले असताना, घरातून धूर निघताना शेजाऱ्यांना दिसले. शेजाऱ्यांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला. मात्र या आगीमध्ये 35 हजार रोख रक्कम व महत्वाची कागदपत्र व उपयोगी वस्तू जळून खाक झाले आहेत. हरबा बाळबूधे यांना आर्थिक नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते बाळू फुलबाधे यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
करंजी गरड में गन्दा पानी: डास-बीमारी का खतरा; ग्राम पंचायत की लापरवाही
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील करंजी गरड येथे ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षामुळे मुख्य रस्त्यावर अनेक महिन्यांपासून घाण पाणी साचले आहे. साचलेल्या पाणीात अळ्यांची उत्पत्ती होऊन डासांचे प्रमाण वाढल्याने संसर्गजन्य आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या समस्येबाबत वारंवार तक्रारी करूनही ग्रामपंचायतीकडून कोणतीही ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दुर्गंधी, अस्वच्छता आणि आरोग्याच्या धोक्याचा सामना करावा लागत असून पावसाळ्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
भंडारा में अवैध मोहफूल साठे पर पुलिस ने छापा, 9 लाख माल जब्त, 5 गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:भंडारा तालुक्यातील जवाहरनगर पोलिस स्टेशनचे हद्दीत शहापूर परिसरात पोलिसांनी अवैध मोहफूल साठ्यावर धडक कारवाई करत तब्बल ९ लाख १ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत आरोपी जितेंद्र युवराज थोटे याच्या ताब्यातून ८२ प्लास्टिक चुंगळ्यांमध्ये साठवलेले २,४६० किलो सडवा व मोहफूल जप्त करण्यात आले. याची बाजारमूल्य अंदाजे ६.९२ लाख रुपये आहे. तसेच मोहफूलापासून हातभट्टी दारू निर्मितीसाठी वापरल्या जाणाऱ्या २०० मन जळाऊ लाकडाचाही साठा जप्त करण्यात आला. एकूण ९ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, तसेच सूर नदीच्या किनारी अवैध दारू निर्माण करणारे तीन अड्डे उध्वस्त करण्यात आले, व पाच आरोपींना अटक करण्यात आली. मात्र ही कारवाई नागपूर एक्साईजच्या विभागाच्या अधिकाऱ्यांनी भंडाऱ्यात येऊन केल्याने, जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण झाला...0
0
Report
शिरूर पुलिस ने घरफोड़ करने वाले पति-पत्नी को गिरफ्तार किया; २४ लाख सोना-चांदी बरामद
Shirur, Maharashtra:शिरूर पोलिसांनी घरफोडीच्या एका मोठ्या गुन्ह्याचा छडा लावत धडाकेबाज कामगिरी केली आहे. शिरूरमधील एका नामांकित व्यावसायिकाच्या घरातून २४ लाख रुपयांचे सोने आणि चांदी चोरून पळालेल्या नोकर पती-पत्नीला पोलिसांनी परजिल्ह्यातून बेड्या ठोकल्या आहेत. शिरूर शहरातील आनंद सोसायटीत राहणारे व्यावसायिक नितीन मुथा यांच्याकडे घरकाम करणाऱ्या विलास खोसडे आणि सारजा खोसडे या पती-पत्नीने मालकाचा विश्वासघात केला. फेब्रुवारी महिन्यात या दोघांनी घरातून ७ किलोहून अधिक चांदी आणि ३६ ग्रॅम सोने लंपास केले होते. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच शिरूर पोलिसांनी तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपास चक्र फिरवली. आरोपी त्यांच्या मूळ गावी म्हणजेच नांदेड जिल्ह्यातील मुखेड येथे असल्याची माहिती मिळताच, शिरूर पोलिसांनी तिथे जात सापळा रचला आणि आरोपींना शिताफीने जेरबंद केले. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरीला गेलेला संपूर्ण २४ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...0
0
Report
Advertisement
वाशीम के काटेपूर्णा नदी के पुल का निर्माण अधूरा; बरसात में आवागमन का खतरा
Washim, Maharashtra:पावसाळा जवळ आला असतानाही वाशीमच्या जऊळका येथील काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचे बांधकाम अद्याप अपूर्ण आहे. नागपूर–छत्रपती संभाजीनगर महामार्गावरील या महत्त्वाच्या मार्गावर वाहनचालकांना सध्या जुन्या व जीर्ण पुलावरूनच प्रवास करावा लागत आहे.पावसाळ्यात नदीला पूर आल्यास वाहतुकीस धोका निर्माण होण्याची शक्यता असून,दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या या मार्गावर सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी नवीन पुलाचे काम पूर्ण करण्याची मागणी नागरिक व वाहनचालकांकडून होत आहे.0
0
Report
वाशिम सहित कई मंडियों में सोयाबीन की भारी आवक, कीमतें 7000 रुपए से ऊपर
Washim, Maharashtra:वाशिमः सोयाबीनची मोठी आवक सुरू आहे. काल कारंजा व वाशीम बाजार समित्यांमध्ये मिळून 13,650 क्विंटल सोयाबीनची आवक नोंदवली गेली. दरात झालेल्या वाढीचा फायदा घेण्यासाठी शेतकरी साठवलेले सोयाबीन विक्रीस आणत आहेत. कारंजा बाजार समितीत 5,150 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,325 रुपये प्रतिक्विंटल मिळाला. तर वाशीम बाजार समितीत 8,500 क्विंटल आवक झाली असून कमाल दर 7,200 रुपये प्रतिक्विंटल होता. रिसोड, मंगरूळपीर, मालेगावसह इतर बाजार समित्यांमध्येही सोयाबीनची जोरदार आवक सुरू असून बहुतेक ठिकाणी 7 हजार रुपयांपेक्षा अधिक दर मिळत आहेत.0
0
Report
महाराष्ट्र गोवा हाईवे पर हादसों की लहर, मनसे ने आक्रामक प्रदर्शन किया
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावरील अपघातांची मालिका ज्या जणांच्या मृत्यूनंतर मनसे आक्रमक झाली आहे. महाड ते पोलादपूर दरम्यान हॉटेल्स समोर उभ्या असलेल्या ट्रक वर मनसेने आक्षेप नोंदवलाय. ज्या हॉटेल समोर अपघात झाला त्या हॉटेलचे बॅनर फाडून खुर्च्यांची फेकाफेक केली. मागील १५ दिवसात महामार्गावर उभ्या असलेल्या वाहनाला धडकून दोन अपघात झाले. यात चौघांना आपला जीव गमवावा लागला.0
0
Report
Advertisement
वसई-विरार समेत ग्रामीण क्षेत्रों में सुबह से बारिश, उमस घटी और ठंडक घुली
Vasai-Virar, Maharashtra:वसई-विरार शहरासह ग्रामीण भागात आज पहाटेपासून पावसाने हजेरी लावली. पहाटे सुरू झालेल्या पावसाच्या सरी सकाळी आठ वाजेपर्यंत अधूनमधून कायम असल्याने संपूर्ण परिसरात आल्हाददायक वातावरण निर्माण झाले. गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उकाड्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते. मात्र आजच्या पावसामुळे तापमानात घट झाली असून वातावरणात गारवा पसरला आहे. पावसामुळे रस्त्यांवर आणि परिसरातील झाडाझुडपांवर ताजेपणा दिसून आला. सकाळच्या वेळी कामासाठी बाहेर पडणाऱ्या नागरिकांनाही उष्णतेपासून काहीसा दिलासा मिळाला. ग्रामीण भागातही शेतकरी आणि ग्रामस्थांनी या पावसाचे स्वागत केले. मान्सूनपूर्व पावसाच्या या सरींमुळे हवेतला कोरडेपणा कमी झाला असून आगामी पावसाळ्याची चाहूल लागल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली.0
0
Report
Chondi में Ahilya Devi Holkar की 301वीं जयंती, मुख्यमंत्री Fadnavis की मौजूदगी में उत्सव
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त अहिल्यानगरच्या चौंडी येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत जयंती उत्सव साजरा होत आहे अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चोंडी येथे मागील काही वर्षांपासून जयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे जयंतीनिमित्त अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक आणि परिसरामध्ये जय्यत तयार केलेली पाहायला मिळते अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मारक परिसरातून आढावा घेतला आहे0
0
Report
163 gram panchayats' reservation process kicks off; special Gram Sabha June 12.
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मुदत संपलेल्या १६३ ग्रामपंचायतींच्या निवडणूक प्रक्रियेला आता वेग आला आहे. राज्य निवडणूक आयोगाने सदस्यांच्या आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून १२ जून रोजी विशेष ग्रामसभेत आरक्षण सोडत काढली जाणार आहे. सन २०२४,२०२५ तसेच २५,६ मध्ये मुदत संपणाऱ्या ग्रामपंचायतींचा या प्रक्रियेत समावेश करण्यात आला आहे. ८जून रोजी विशेष ग्रामसभेची सूचना प्रसिद्ध होणार असून १९ जूनला प्रारूप आरक्षण जाहीर केले जाईल. त्यानंतर हरकती व सूचनांची प्रक्रिया पार पडणार असून १० जुलै रोजी अंतिम आरक्षण अधिसूचना प्रसिद्ध करण्यात येणार आहे. निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झाल्याने गावपातळीवरील राजकीय हालचालींना वेग येण्याची चिन्हे आहेत.0
0
Report
Advertisement
