icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जंगलना-खत टंचाई: किसान परेशान? डीएपी-यूरिया की कमी पर सरकार एक्शन लेle

Jalna, Maharashtra:जालना : जालना,हिंगोली,परभणी जिल्ह्यात खतांची टंचाई,डीएपी,युरीया मिळत नसल्यानं शेतकरी हतबल(पॅकेज) खतांचं लिंकिंगही होत असल्याच्या तक्रारी अँकर :मराठवाड्यातील जालना,परभणी आणि हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना ऐन पेरणीच्या काळात खत टंचाईच्या समस्येला सामोरं जावं लागतंय.तर काही ठिकाणी खतांचं लिंकिंग होत असल्याचं समोर आलंय.बघूया यावरचा स्पेशल रिपोर्ट व्हिओ:०१: मराठवाड्यात तीन दिवसांपूर्वी चांगला pाऊस झालाय.त्यामुळे शेतकरी पेरणी आणि लागवडीच्या कामात गुंतलाय.मात्र ज्या पिकांच्या पेरणीसाठी डिएपी आणि युरीया खतांची आवश्यकता आहे त्याच खतांची सध्या जालना, हिंगोली आणि परभणी जिल्ह्यात टंचाई असल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. बाईट : किसन गिते, शेतकरी,हिंगोली (पाठीमागे दुकानचा बोर्ड) बाईट : भरत उंडे, शेतकरी(पांढरा शर्ट, खांद्यावर रुमाल,) बाईट : प्रकाश सुरवसे,शेतकरी, जालना(पिवळा शर्ट) व्हिओ ग्राफिक्स :०२: परभणी : १६ हजार टन कमी पुरवठा परभणी जिल्ह्यात सरासरी खतांचा वापर १ लाख १२ हजार ११ टन आहे. त्यानुसार खरिपातील गरज लक्षात घेऊन एप्रिल ते ग्रेडच्या १ ७७ हजार सप्टेबर कालावधीसाठी विविध खतांची मागणी कृषी आयुक्तालयाकडे नोंदविली होती. मागणीच्या तुलनेत १६ हजार ६५० टन कमी खते मंजूर झाली आहेत. युरिया, सिंगल सुपर फॉस्फेट, पोटॅश, डीएपी ही खते कमी तर कमी तर संयुक्त खते जास्त मंजूर झाली आहेत. जालना : डीएपीसोबत युरिया घेण्याची शेतकऱ्यांना सक्ती जालना जिल्ह्याला ३ लाख ०९ हजार ११९ मेट्रीक टन खताची गरज असून २लाख ०९ हजार २४१ मेट्रीक टन साठा उपलब्ध आहे. सध्या प्रामुख्याने युरिया, डीएपी या खतांचा तुटवडा जाणवतो आहे. तसेच खतांची लिंकिंग होत असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. २ हजार २०० रुपयांच्या डीएपीसोबत ७३० रुपयांचे सल्फर किंवा ५५० रुपयांचा लिक्विड युरिया दिला जात असल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. हिंगोली : मागणी वाढल्याने डीएपी खताची सध्या टंचाई जिल्ह्यात डीएपी खताची टंचाई असून सध्या युरिया व संयुक्त खते मुबलक उपलब्ध आहेत. खरीप हंगामासाठी जिल्ह्यात सरासरी ८१ हजार मेट्रीक टन खतांचा वापर केला जातो. त्यानुसार कृषी खात्याने ९० हजार हेक्टरसाठी मागणी नोंदवली होती. आयुक्त कार्यालयाने ९८ हजार मेट्रीक टनाचे आवंटन मंजूर केले आहे. मात्र कृषी केंद्र चालकाकडे डीएपी आणि युरीया उपलब्ध नसल्यानं सरकारने डीएपी खतांचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी कृषी केंद्र चालकांनी केलीय. बाईट : बाईट - हरीश झंवर,कृषी केंद्र चालक,हिंगोली(लायनिंग शर्ट) व्हिओ :3: दरम्यान जालना जिल्ह्यातील खत टंचाई बरोबरच खतांच्या लिंकींग वरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झालीय. कृषी विभागाने साठे बाजी करणाऱ्यावर कारवाई न keल्यास स्वाभिमानी शेतकरी संघटना खतांच्या गोडाऊनवर धाडी टाकून आंदोलन करेल असा ईशारा स्वाभिमानीने दिलाय. bाईट :सुरेश काळे,जिल्हाध्यक्ष ,स्वाभिमानी शेतकरी संघटना, जालना(पांढरा लायनिंग शर्ट, थोडं टक्कल असलेले) व्हिओ :०4: ऐन पेरणीच्या हंगामात डीएपी आणि युरीया ही महत्वाची खते मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर पेरणी करावी कशी असा प्रश्न उभा राहिलाय.शेतकरी खत टंचाईमुळे हतबल झालाय. END
0
0
Report

रोहित पवार बोले, डीलिमिटेशन कानून पास होते ही विधायक भाजपा में जाएंगे

Hingoli, Maharashtra:अँकर - खासदार और आमदार फोडले जात आहेत असा प्रश्न रोहित पवार यांना विचारला असता भाजप लवकरच राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या या दोन्हीही कुबड्या बाजूला काढून टाकेल आणि अमित शहा म्हणल्याप्रमाणे एकला चलो चा नारा दिला जाणार आहे तेव्हा विरोधातलेच नाही तर सत्ताधारी पक्षातले आमदार फुटून भाजपमध्ये जातील असं भाकित रोहित पवार यांनी व्यक्त केला आहे ते हिंगोली मध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते हा तमाशा थोड्या दिवसासाठी आहे आता आमदारांना फोडले जाणार नाही अगोदर खासदारांना फोडलं जाणार आहे त्याचा मुख्य कारण आहे डीलिमिटेशन कायदा हा कायदा पास तर होणार नाही जोपर्यंत हा कायदा पास होत नाही तोपर्यंत एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाची आणि अजित दादांच्या पक्षाची किंमत आहे आणि तोपर्यंतच खासदारांची किंमत आहे चुकून जर तो कायदा झाला तर या पक्षांची कुठेही किंमत राहणार नाही अमित शहा ज्याप्रमाणे मानले होते की एकला चलो त्याप्रमाणे या दोन कुबड्यांना बाजूला टाकल्या जाणार आहे यापुढे विरोधातलेच नाही यापुढे एकनाथ शिंदे साहेबांच्या पक्षाचे आणि अजितदादांच्या पक्षाचे सुद्धा आमदार फुटणार आहेत यातले बहुतांश आमदार हे भाजप पक्षामध्ये
0
0
Report
Advertisement

सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाठ ने वस्तीगृह का निरीक्षण किया, 5 करोड़ निधि मंजूर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सामजिक न्याय मंत्री तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी आज समाज कल्याण वस्तीगृहाची पाहणी केली. मंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी याच वस्तीगृहाला भेट दिली होती. त्यावेळी वस्तीगृहाची दयनीय अवस्था पाहून त्यांनी पाच कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. आज त्या निधीतून सुरू असलेल्या विकासकामांची प्रत्यक्ष पाहणी करत पालकमंत्र्यांनी कामांचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या, तसेच संबंधित कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीची माहिती घेतली. पालकमंत्री प्रतिक्रिया एका युनिटचे काम अंतिम टप्प्यात असून, ट्रायल बेसिस वर एका युनिट चे काम हाती घेतले होते उर्वरित चार युनिटची कामे पुढील दोन महिन्यांत सुरू करण्यात येणार आहेत. पुढील चार युनिट साठी जवळपास 20 कोटी रुपयांचा निधी लागणार आहे तो मी आता एकत्रच मंजूर करून देणार आहे. मात्र कामांमध्ये झालेल्या दिरंगाईबाबत त्यांनी नाराजी व्यक्त करत अधिकाऱ्यांना पुढील शनिवारपर्यंतची मुदत दिली आहे. त्यानंतरही विलंब झाल्यास तो खपवून घेतला जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
0
0
Report

परशुराम घाट में गैबियन वॉल धंस गया; भारी सुरक्षा खतरे की आशंका

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. परशुराम घाटात पावसाच्या सुरुवातीला गॅबियन वॉलची माती सरकली; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर!.. मुंबई-गोवा महामार्गावरील परशुराम घाटातील ९५ टक्के काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात असतानाच,पावसाच्या सुरुवातीच गॅबियन वॉलखालची माती सरकू लागल्याने खळबळ उडाली आहे.. प्रशासनाने रॉक बोल्टिंग आणि गॅबियन वॉलचे काम १०० टक्के पूर्ण केल्याचे म्हटले असले,तरी अवघ्या पाच-सहा दिवसांच्या पावसाने या कामाच्या टिकाऊपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.. घाटाच्या वरून येणारे पावसाचे पाणी थेट गॅबियन वॉलच्या परिसरात येत असल्याने मोठ्या प्रमाणावर मृदाक्षरण (मातीची धूप) होत असल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.. घाटाच्या खाली पेढे-परशुराम गाव असल्याने मुसळधार पावसात मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत आहे.. अद्याप अडीच ते तीन महिन्यांचा पावसाळा शिल्लक असल्याने,संबंधित यंत्रणांनी तातडीने याची पाहणी करून उपाययोजना करावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.. चिपळूणच्या परशुराम घाटातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी
0
0
Report
Advertisement

नाशिक में जल आपूर्ति संकट गहरा, गंगापुर बांध में केवल 30% पानी बचे

Nashik, Maharashtra:जून अखेर पावसाला सुरुवात न झाल्याने नाशिक जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठला आहे, जिल्ह्यात छोटे-मोठी एकूण 26 प्रकल्प असून या प्रकल्पांमध्ये केवळ 20 टक्के इतका पाणीसाठा शिल्लक असून गतवर्षी हाच पाणीसाठा तब्बल 38 टक्के इतका होता, तर नाशिक शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आणि मराठवाड्याची तहान भागवणाऱ्या गंगापूर धरणात देखील 30 टक्के इतका पाणीसाठा असून हा पाणीसाठा गतवर्षी 60 टक्के इतका होता जिल्ह्यात पावसाची परिस्थिती अशीच राहिली तर जिल्ह्यात भीषण पाणीटंचाई निर्माण होऊ शकते, गंगापूर धरणात गतवर्षीच्या तुलनेत निम्माच पाणीसाठा असल्याने शहरात एक वेळ पाणी कपात देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र परिस्थिती अशीच राहिली तर आठवड्यातून दोन वेळा पाणी कपात करण्याची वेळ येणार आहे,नाशिक मधील याच पाणीसाठ्याचा गंगापूर धरणावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी.
0
0
Report

हुंडा प्रताड़ना से विवाहित महिला ने दी आत्महत्या, 3 साल के बेटे के सामने त्रासदी

Buldhana, Maharashtra:धक्कादायक....हुंडाबळी हुंड्यासाठी विवाहितेचा छळ; तीन वर्षांच्या बाळाला सोडून आईची गळफास घेऊन आत्महत्या. बुलढाण्यातील मेहकरमधून एक हृदयद्रावक बातमी समोर येत आहे. हुंड्यासाठी होणाऱ्या छळाला कंटाळून बालाजी नगर येथील २६ वर्षीय विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, ज्यावेळी या माऊलीने हे टोकाचे पाऊल उचलले, तेव्हा तिचा अवघ्या तीन वर्षांचा मुलगा घरातच होता. मृत वैष्णवी मेरत हिच्याकडे सासरच्या मंडळींकडून सतत १० लाखांची मागणी केली जात होती. या त्रासाला कंटाळून तिने वडिलांशी फोनवर संवाद साधला आणि काही वेळातच आपली जीवनयात्रा संपवली. याप्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी पतीला अटक केली आहे. सासरच्यांच्या जाचाला कंटाळून एका मातेला आपल्या तीन वर्षांच्या मुलाला वारंवार सोडून जावे लागल्याने परिसरातून संताप व्यक्त होत आहे. मेहकर पोलीस प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

वाशिम में बंद दुकानों की चोरी: खेत्राजी माणिक पवार नामक आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशिम शहरातील बंद दुकानांचे कुलूप तोडून चोरी करणाऱ्या सराईत चोराला शहर पोलिसांनी अटक केली आहे.खेत्राजी माणिक पवार (वय ५२, रा. खरबी, जि. हिंगोली) असे अटक आरोपीचे नाव आहे.आरोपी दिवसा बंद दुकानांची रेकी करून रात्री अंगावर चादर घेऊन ओळख लपवत दुकानफोडी करत असल्याचे तपासात समोर आले.पोलिसांनी त्याच्याकडून चोरीतील रोकड, लोखंडी रॉड, पेचकस,कुलूप तोडण्याची हत्यारे, बॅटरी, टोपी, स्कार्फ आणि चोरीसाठी वापरलेले कंबल जप्त केले आहे.तपासादरम्यान आरोपीने गेल्या तीन वर्षांतील वाशिम शहरातील पाटणी चौक, अकोला रोड, रिसोड नाका, हिंगोली रोड, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक आणि लव्हाळा परिसरातील सात दुकानफोडींची कबुली दिली आहे.डी.बी.पथकाने तांत्रिक व भौतिक पुराव्यांच्या आधारे त्याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

बीड़ में प्रीतम मुंडे का हमला: प्रकाश सोळंके पर निशाना साधा

Beed, Maharashtra:बीड : पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदारकी, अब गरळ ओकता ; प्रीतम मुंडेंचा नाव न घेता प्रकाश सोळंकेंवर निशाणा माजलगावात प्रीतम मुंडे आक्रमक; ‘शतप्रतिशत भाजप’चा नारा बीडच्या राजकारणात पुन्हा एकदा माजी खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. माजलगावमधील कार्यक्रमात त्यांनी नाव न घेता विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांच्यावर निशाणा साधला. पंकजा मुंडेंच्या जीवावर आमदारकी मिळवून, ती पचवून आता त्यांच्याविरोधात गरळ ओकणारे आमदार या मतदारसंघाला नकोत, असा टोला लगावत, माजलगावमध्ये शतप्रतिशत भाजपाच हवा आणि त्यासाठी जमिनीची मशागत सुरू आहे,असंही त्या म्हणाल्या... आठ दिवसापूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांच्या वरती आमदार प्रकाश सोळुंके यांनी टीका केली होती या टीकेला आता प्रीतम मुंडे यांनी चांगलंच उत्तर दिले. प्रीतम मुंडे यांच्या या वक्तव्यानंतर बीडच्या राजकारणात नव्या राजकीय संघर्षाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली आहे.. बाईट : प्रीतम मुंडे, माजी खासदार
0
0
Report
Advertisement

नाशिक रोड स्टेशन पर 6 लाख के चोरी का पर्दाफाश; डमी प्रवासी बनाकर आरोपी गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिकरोड स्थानकावरील ६ लाखांची बॅग चोरीचा गुन्हा उघड. - रिक्षाचालकासह दोन आरोपी पोलिसांच्या जाळ्यात. - ४ लाखांची रोकड व रिक्षासह ६.१५ लाखांचा मुद्देमाल जप्त. - काठे गल्लीतील रहिवासी सौरभ आहेर यांनी पत्नीच्या उपचारासाठी सहा लाख रुपये घेऊन रेल्वे स्थानक परिसरात आले असता रिक्षा चालकाने शिताफीने केली होती चोरी - गुन्हे शोध पथकाने 'डमी प्रवासी' बनून आरोपींचा शोध लावला. - सीसीटीव्हीत धागादोरा न लागल्याने पोलिसांची अनोखी रणनीती. - मुख्य आरोपी मोईन कुरेशी व साथीदार शहबाज सय्यद अटकेत. - चोरीची रक्कम वाटून घेतल्याची आरोपींची कबुली. - उर्वरित २ लाखांसह तिसऱ्या साथीदाराचा पोलीस शोध घेत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top