icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई हार्बर लाइन के तीन स्टेशन ट्रान्सफर सफल, सांसद नरेश म्हस्के के प्रयास

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील हार्बर लाईन वरील रेल्वे स्थानकांच्या हस्तांतरणाचा मागील 18 वर्षांपासून प्रलंबित प्रश्न लागला मार्गी. नवी मुंबईतील तरघर, बामणडोंगरी आणि खारकोपर रेल्वे स्थानकांचे झाले हस्तांतरण. तीनही रेल्वे स्थानकांचे सिडको कडून रेल्वे विभागाकडे करण्यात आले हस्तांतरण. खासदार नरेश म्हस्के यांच्या पाठपुराव्याला मोठा यश. रेल्वे स्थानकांवरील समस्यांचे निराकरण करणे होणार सुलभ, प्रवश्यांना होणार लाभ. नवी मुंबईतील हार्बर मार्गावरील इतर रेल्वे स्थकांचा देखिल पुढील 6 महिन्यात सिडको कडून रेल्वे कडे होणार हस्तांतरण.
0
0
Report

शिंदे के आदेश से Akola शिवसेना कार्यकारिणी बरखास्त, नए चेहरों को अवसर पर चर्चा

Akola, Maharashtra:शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार अकोला जिल्ह्यातील शिवसेना कार्यकारिणी पुन्हा बरखास्त करण्यात आल्याची माहिती पक्षाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून प्रसिद्ध करण्यात आली आहे. शिवसेना सचिव संजय मोरे यांच्या स्वाक्षरीने हे पत्र जारी करण्यात आले आहे. या निर्णयामुळे अकोला जिल्ह्यातील राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले असून, कार्यकारणी बरखास्त करण्यामागे पक्षातील अंतर्गत वाद कारणीभूत आहेत का, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पक्षाला मिळालेला अपयश यामागच कारण आहे का ? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर दुसरीकडे आगामी स्थानिक राजकारण आणि संघटनात्मक बांधणी लक्षात घेता नवीन चेहऱ्यांना संधी देऊन पक्ष अधिक मजबूत करण्याचा हा प्रयत्न असल्याचीही चर्चा रंगू लागली आहे. आता पुढील काही दिवसांत नव्या कार्यकारिणीची घोषणा होते का आणि पक्षात कोणाला संधी मिळते, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. मात्र गेल्या दोन महिन्यात कार्यकारिणी बरखास्त करण्याची ही दुसरी वेळ आहे..
0
0
Report
Advertisement

जयकुमार गोरे ने मित्र पक्षों को सूचक इशारा देकर हिशोब की नसीहत दी

Sangli, Maharashtra:स्लग - राजकारणामध्ये हिशोब ठेवायला शिकवलय-मंत्री जयकुमार गोरेंचा मित्र पक्षांना सुचक इशारा.. राजकारणामध्ये हिशोब ठेवायला लागतो,हे आम्हाला देवेंद्र फडणीस यांनी शिकवलंय,अशा शब्दात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगली-सातारा विधानसभेतील मत फुटींवर सूचक इशारा दिला आहे.राजकारणामध्ये अभ्यास करायचा असतो,पण तो निवडणुकीपूर्वी करायचा असतो,अभ्यास केल्यानंतर पुढे काय घडतो हा वेगळा विषय आहे,पण राजकारणात हिशोब ठेवायला देवेंद्र फडणवीस यांनी शिकवलं आहे,असं विधान मंत्री जयकुमार गोरे यांनी केला आहे सांगली सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीची 100 मतं फुटली आहेत,यावरून मंत्री जयकुमार गोरे यांनी मित्र पक्षांना सूचक इशारा दिला आहे. बाईट - जयकुमार गोरे - ग्रामविकास मंत्री.
0
0
Report

वाशिम में शिंदे गट प्रवेश से राजनीतिक हलचल तेज; ठाकरे 27 जून दौरे पर

Washim, Maharashtra:वाशिमचे खासदार संजय देशमुख यांनी शिंदे गटात प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर वाशिम जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. या पार्श्वभूमीवर उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे २७ जून रोजी वाशिम दौऱ्यावर येणार असून वाशिम जैन भवन येथे पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दौऱ्याच्या तयारीसाठी झालेल्या आढावा बैठकीत जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. खासदार संजय देशमुख यांच्यासोबत एकही प्रमुख पदाधिकारी जाणार नसल्याचा दावा सहसंपर्कप्रमुख सुधीर कव्हर यांनी केला असून, उद्धव ठाकरे यांच्या बैठकीला हजारो शिवसैनिक उपस्थित राहतील असा विश्वास व्यक्त केला.
0
0
Report

चंद्रपुर में भारी बारिश ने गर्मी से राहत दी; ऑरेंज अलर्ट जारी

Chandrapur, Maharashtra:टायटल:---दीर्घ कालावधीनंतर चंद्रपुरात बरसला मुसळधार पाऊस, नागरिकांना उकाड्यापासून मिळाला दिलासा अँकर:-- आज सकाळपासून चंद्रपूरचे तापमान उष्ण असताना दुपारी अचानक आभाळ भरून येत मुसळधार पावसाला सुरुवात झाली. गेले 20 दिवस पावसाची चातकाप्रमाणे वाट पाहणाऱ्या चंद्रपूरकरांना पावसाने चिंब भिजविले. सात जून हा चंद्रपुरात पावसाचा आगमनाचा दिवस असताना यंदा पहिला मुसळधार पाऊस आज बरसलेला दिसला. सोसाट्याचा वारा आणि विजांच्या कडकडाटासह पावसाने दमदार हजेरी लावली. जिल्ह्याच्या विविध भागात पाणीटंचाई तीव्र होत असताना जूनमध्ये पाऊस हजेरी लावणार की नाही अशी शंका शेतकरी व नागरिकांच्या मनात होती. मात्र आज सुमारे अर्धा तासापासून जोरदार पाऊस बरसत असून त्यामुळे तीव्र उन्हाच्या झळांपासून नागरिकांना दिलासा मिळाला आहे. हा पाऊस असाच सातत्याने बरसत राहावा अशीच नागरिकांची इच्छा आहे. हवामान खात्याने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला होता तो प्रत्यक्षात उतरल्याचे दिसत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

यवतमाळ के नेताजी मार्केट में अतिक्रमण हटाओ के विरोध में व्यापारी मोर्चा जिला कार्यालय पर धावा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नेताजी मार्केट मधील फुटपाथ दुकानदारांवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात विदर्भ अन्याय निवारण समितीच्या क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. "आधी पुनर्वसन, मगच कारवाई!" अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. मोर्चात शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. "यवतमाळ शहरातील शासकीय भूखंड बिल्डर लॉबीला विकण्यासाठी भूमाफियांच्या संगनमताने डाव आखला जात आहे," असा खळबळजनक आरोप यावेळी व्यापारी वर्गाकडून करण्यात आला. नेताजी मार्केटमधील ४०-५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या शेकडो लघु दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे २०० कुटुंबे आणि ३०० हून अधिक बेरोजगार तरुण यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही पुनर्वसन न करता थेट बुलडोजर कारवाई करणे अमानवी असल्याचा आरोप करण्यात आला.
0
0
Report

पंढरपुर की विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति का रासायनिक लेपन अगले आदेश तक रोक

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीस प्राणप्रतिष्ठापना केली आहे वारकऱ्यांच्या भावनेनुसार मूर्ति मध्ये प्राण आहेत त्यामुळे या मूर्ति ला रासायनिक लेप लावणे चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात लेपन प्रक्रिया थांबवण्याबाबत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेचा निकाल आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही लेपन प्रक्रिया करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिर येथील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर केला त्या बाबी ऐकून घेतल्यानंतर या लेपन प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप आपल्याकडे कोणतीही प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे ते प्राप्त झाल्यावर आपण याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. ---- Byte - धनंजय रानडे , वकील रामकृष्ण वीर, वारकरी पाईक संघ गणेश लंके याचिका कर्ते राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
0
0
Report
Advertisement

खेडशी में डंपर ने बाइक को टक्कर दे दी, महिला की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार अँकर मुंबई - गोवा महामार्गवरील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव येणाऱ्या डंपरने समोर असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या जाकादेवी येथील पांचाळ कुटुुंबापैकी महिला डंपर खाली सापडून ठार झाली आहे. अपघातानंतर डंपर महामार्गावरून थेट दहा फूट खाली कोसळला. याच डंपर खाली सापडून महिला ठार झाली. अपघातानंतर या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातापूर्वी याच ठिकाणी रिक्षाचा देखील अपघात झाला होता.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top