icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भंडारदरा बांध क्षेत्र में तेज बारिश से हरियाली खिल उठी, पानी 30% तक पहुंचा

Shirdi, Maharashtra:Anc - निसर्गाची अद्भुत देणगी लाभलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील भंडारदरा धरण परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे.धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस झाल्याने भंडारदरा धरणाची पाणीपातळी जवळपास ३० टक्क्यांवर पोहोचली आहे.या दमदार पावसामुळे भात पिकाला मोठा दिलासा मिळाला असून संपूर्ण परिसराने हिरवाईची शाल पांघरली आहे.वसुंधरा फॉल , कोळटेंभे फॉल , नेकलेस फॉल , रिव्हर्स फॉल्ससह अनेक ओढे-नाले आणि धबधबे खळखळून प्रवाहित झाले आहेत.छोट्या-छोट्या बंधाऱ्यांनाही पाणी आले असून संपूर्ण परिसर नवचैतन्याने बहरला आहे. निसर्गाचे हे मोहक आणि मनमोहक रूप अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले पुन्हा एकदा भंडारदरा परिसराकडे वळू लागली आहेत....
0
0
Report

कुपटा घाट में भारी हादसा: कार और टिपर की भिड़ंत, दो की मौत

Washim, Maharashtra:वाशीम: कारंजा-मानोरा मार्गावरील कुपटा घाटात भीषण अपघात झाला.कუპटा येथून मानोराकडे जाणाऱ्या कारची टिप्परशी समोरासमोर धडक होऊन कारमधील दोघांचा जागीच मृत्यू झाला. कुपटा येथून मानोराकडे जात असताना घाटात समोरून येणाऱ्या टिप्परची जोरदार धडक बसली.धडक इतकी भीषण होती की कारचा चुराडा झाला आणि कारमधील दोघांचा घटनास्थळावरच मृत्यू झाला.घटनेची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेचे तातडीने घटनास्थळी दाखल झाले.त्यानंतर दोन्ही मृतदेह पुढील कार्यवाहीसाठी मानोरा ग्रामीण रुग्णालयात हलविण्यात आले.अपघाताची माहिती मिळताच पोलीसही घटनास्थळी दाखल झाले आहे पंचनामा आणि पुढील तपास सुरू आहे.मृतांची ओळख आणि अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
0
0
Report
Advertisement

वळसे पाटील बोले: सरकार कर्जमाफी संभव, जनगणना के बाद आरक्षण-निर्णय

Pandharpur, Maharashtra:प्रत्येक पक्ष आपला पक्ष विस्तार करण्याचा प्रयत्न करतोय. कुठल्या मार्गाने जायचं हे जे काय चाललय ते तुम्हाला आम्हाला दिसतय प्रत्येक पक्षाचे धोरण आहे त्या पद्धतीने ते सुरू आहे.दर पाच वर्षांनी निवडणूक होत असतात त्यामुळे जनता त्यावेळी निर्णय देत असते. अस मत माजी मंत्री राष्ट्रवादी नेते दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे राष्ट्रवादी विलनीकरणाच्या चर्चा सुरू आहेत. अनेक लोकांच्या भावना तशा आहेत.त्याबाबतचा निर्णय पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. असे वळसे पाटील म्हणाले. सरकारला तिजोरीचा अंदाज घेऊन सर्व निर्णय घ्यावे लागतील सरसकट कर्जमाफीची अपेक्षा असली तरी जे शक्य होतं ते सरकारने करायचा प्रयत्न केला आहे आणखी यात सुधारणा होतील असे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे. भारत सरकारने जनगणनेच काम सुरू केलं आहे जनगणना त्यानंतर मतदार संघ पुनर्रचना आरक्षण या सर्व गोष्टी जनगणना झाल्यानंतर होतील. 2019 पूर्वी ही सर्व प्रक्रिया व्हायला पाहिजे तर वीस वर्षानंतर हे होणं घटनेतील तरतुद आहे त्या पद्धतीने ही प्रक्रिया सुरू झाली आहे. महाराष्ट्र समोर चिंतेचे बाब आहे अनियमित पावसाचा अंदाज आहे कमी पाऊस होणे असे सांगितले जात आहे. असे ही वळसे पाटील यांनी सांगत पावसाबद्दल चिंता व्यक्त केली आहे
0
0
Report

वारणा नदी के मांगले-सावर्डे बांध पर पानी बढ़ा, ट्रैफिक बंद; किसान वैकल्पिक मार्ग चुनें

Sangli, Maharashtra:सांगलीच्या शिराळा तालुक्यात गेल्या तीन दिवसांपासून पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळे मांगले येथील सावर्डे-मांगले बंधारा पाण्याखाली गेला आहे. पावसामुळे नदीचे पाणी पातळीत वाढ झाल्याने बंधाऱ्यावरून पाणी वाहू लागला आहे. त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने कडून बंधाऱ्यावरून होणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. त्यामुळे मांगले व सावर्डे गावाच्या शेतकरी व ग्रामस्थांना अन्य मार्गाचा पर्याय घेण्याच्या सूचना देखील प्रशासनाकडून करण्यात आले आहेत.
0
0
Report

देवगढ़-निपाणी राजमार्ग पर खड्डों का साम्राज्य, बारिश भी रोक नहीं पाई

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग देवगड निपाणी राज्यमार्गावर खड्ड्यांचे साम्राज्य हा मार्ग कणकवली तालुक्यातील फोंडा घाट येथून जातो; त्याचं ठिकाणी सुमारे एक किलोमीटर अंतरापर्यंत रस्त्याची पूर्णतः चाळण झालीय. यंदा पाऊस ७६ टक्केच पडला मात्र तरीही या पावसाने रस्त्याची चाळण केली आहे. पावसाच्या काळात या खड्ड्यामध्ये पाणी साचते त्यामुळे हे खड्डे वाहनचालकांच्या लक्षात येत नाहीत आणि रात्रीच्या वेळी अंधारात देखील खड्डे दिसत नसल्याने छोटे मोठे अपघात या मार्गावर घडत असतात. पाऊस जर सातत्याने मुसळधार कोसळू लागला तर या रस्त्याची आणखीनच बिकट परिस्थिती होऊ शकते. त्यामुळे लवकरात लवकर पावसाळी डांबर वापरून हे खड्डे बुजवण्याची मागणी वाहनचालक करत आहेत.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर महापालिका सत्ता-संघर्ष पर नागरिकों का अनोखा बैनर, विकास पर बहस

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर मनपातील सत्तासंघर्षाचा कळस, नागरिकांनी लावलेले अनोखे बॅनर चर्चेत, नेत्यांच्या भांडणात शहर विकासाचा बळी चंद्रपूरमधील एका जागरूक नागरिकाने महानगरपालिकेत चाललेल्या राजकीय राड्यासंदर्भात शहरात एक उपरोधिक बॅनर लावले आहे. याची शहरात चर्चा आहे. चंद्रपूर महानगरपालिका निवडणुक तिकीट वाटपापासून ते सत्ता स्थापनेपर्यंत सातत्याने चर्चेत राहिली आहे. सत्ताधारी भाजप आणि विरोधी काँग्रेस या दोन्ही पक्षांतील अंतर्गत गटबाजीमुळे महापालिकेचे राजकारण गढूळ झाले आहे. काँग्रेसने अंतर्गत वादामुळे आपल्या हातची सत्ता गमावली, तर सत्तेत असूनही भाजपमध्ये दोन गटांतील संघर्ष उघडपणे समोर येत आहे. काल नियोजित महासभा रद्द झाल्यानंतर भाजपमधील आ.सुधीर मुनगंटीवार गट आणि आ.किशोर जोरगेवार गट आमनेसामने आले. शाब्दिक वाद, धक्काबुक्की आणि त्यानंतर पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेले प्रकरण यामुळे महापालिकेतील राजकीय संघर्ष पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला. मात्र या सगळ्या राजकीय घडामोडींमध्ये शहरातील नागरिकांच्या मूलभूत समस्या, विकासकामे आणि नागरी सुविधांकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याची भावना नागरिकांमध्ये आहे. याच पार्श्वभूमीवर हे उपरोधिक बॅनर लावले असून, त्यामधून महानगरपालिकेतील सध्याच्या राजकीय परिस्थितीवर भाष्य करण्यात आले आहे. बॅनरद्वारे नागरिकांच्या नाराजीला वाचा फोडली जात आहे.
0
0
Report

चंद्रपूर के अयान अजाणी ने CA फाउंडेशन में ऑल इंडिया रैंक द्वितीय पाया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचा अयान अजाणी सीए फाउंडेशन परीक्षेत ऑल इंडिया रँक द्वितीय स्थानी आला आहे. त्याच्या जिल्हाभरातून कौतुक होत आहे. त्याला 91.75 टक्के गुण मिळाले आहेत. दहावी आणि बारावीतही त्याने सर्वोत्तम गुण प्राप्त करून आपल्या प्रतिभेचा परिचय दिला होता. आता सीए फाउंडेशन मध्येही त्याने चमकदार कामगिरी केली आहे. कुठल्याही कोचिंग संस्थेच्या सहकार्याशिवाय स्व-अभ्यास, वेळेचे नियोजन आणि प्रत्येक विषयाची तयारी यासह अभ्यासातील सातत्य यामुळे त्याने हे यश पटकावले आहे. अयान याने आता सीए इंटरमिजिएटसाठी तयारी सुरू केली आहे. बाइट १) अयान अजाणी, यशस्वी विद्यार्थी
0
0
Report
Advertisement

सांगली जिला केंद्रीय बैंक भर्ती स्थगिती पर हाई कोर्ट में याचिका, नाईक ने कहा

Sangli, Maharashtra:जिल्हा बँकेच्या नोकर भरती स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार - मानसिंगराव नाईक. सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या नोकर भरतीला सहकारी विभागाकडून देण्यात आलेल्या स्थगितीवर जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून आक्षेप घेण्यात आले आहे. सहकार विभागाच्या स्थगिती विरोधात उच्च न्यायालयात धाव घेणार असल्याचा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केलं आहे. बँकेचकडून होणारया 444 कनिष्ट लिपिक भरतीला सहकार विभागाकडून निवडणूक प्रक्रिया सुरू असल्याचं कारण देत स्थगिती देण्यात आली आहे,मात्र कोणत्या कायदेशीर तरतुदीनुसार नोकर भरती थांबवण्यात आली याचा स्पष्ट उल्लेख नसल्याने,सहकार विभागाच्या नोकर भरती स्थगिती आदेशा विरोधात उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडे दाद मागण्यात येणार असल्याचे बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

इंडिया आघाडी के पत्र से लोकतंत्र बचाने की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर - नाना पटोले,काँग्रेस नेते - On इंडिया आघाडीकडून सरन्यायाधीश पत्र - आपल्या सगळ्यांच्या लक्षात येत असेल लोकांच्या मतांनी सरकार आलं पाहिजे आणि लोकनियुक्त सरकार आला पाहिजे असं आपल्या संविधानातील मूळ गाभा आहे - सन 2014 च्या नंतरच्या निवडणुका पाहिल्या तर मुख्य निवडणूक आयुक्त असेल किंवा पूर्ण यंत्रणा असेल, ईव्हीएम मशीनला हॅक करून निवडणुका जिंकतात हे सांगण्याची गरज नाही, हा काही आरोप नाही ही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांच्या समोर आहे - देशातील सरकार असो किंवा राज्यातील भाजपच्या सरकार असो या सरकारचा लोकांशी वागणूक यातून स्पष्ट होतात, सरकार यांना घाबरत नाही, लोकशाहीत जनता ही राजा असते - मात्र सरकार लोकांना घाबरवत आहे, दूध का दूध पाणी का पाणी व्हावा म्हणून इंडिया आघाडीकडून देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश यांना पत्र लिहिलाय की आपण हस्तक्षेप करा - या पद्धतीला आळा घालून देशाची लोकशाही वाचवा अशा पद्धतीचे पत्र इंडिया आघाडीने सरन्यायाधीश यांना लिहिलेलं आहे आणि याच्यातील वास्तविकता जनतेसमोर आली आहे - On कर्जमाफी निर्णय तारीख पुढे - - हे सरकार खोटारडे सरकार आहे, शेतकऱ्यांचे सर्रास फसवणूक करत आहे, लाडक्या बहिणी सारखा शेतकऱ्यांची फसवणूक करत आहे,काम करणाऱ्या महिलांनाही शेतकरी म्हणून घोषित केल्याचा सरकारने सांगितलं - अर्धा एकर जमीन असलेल्या आपण शेतकरी मानतो, भूमिहीन शेतकरी मोठ्या प्रमाणात आहे, कर्जमाफीसाठी अटी आणि शर्ती काय, राज्यातील केवळ 25 टक्के शेतकऱ्यांचा कर्ज माफ करायचा आणि इतरांच्या तोंडाला पाने पुसायचं अशा प्रकारचे सरकारचे कृती पुढे आली आहे - कंत्राटदारांचे 90 हजार कोटी थकबाकी आहे, 55 टक्के कमिशन या लोकांना द्यावा लागतो, भ्रष्ट व्यवस्था राज्याची तिजोरी लुटण्याची व्यवस्था आता आपण महाराष्ट्रात पाहतो आहे - शेतकऱ्यांचा तात्पुरता कर्ज माफ करता येतंका, एक लाखाचा कर्ज असेल तर पहिले ते कर्ज भरावे लागेल नाहीतर कर्जमाफी मिळणार नाही, शेतकऱ्यांचा फसवणूक करणारा हे सरकार आहे - On अमित साटम ---मिसिंग लिंक - - कोल्हापूरात झालेल्या अधिवेशनात कंत्राटदारांनी 95 टक्के कमिशन द्यावे लागतात असं म्हटलं होतं, सरकारचा पितळ उघड झालेला आहे सरकार जवळ पैसेच नाही राज्याला कंगाल करून टाकला आहे, 89 हजार कोटींच्या पुरवण्या मागण्या - - लुटपातचे सरकार, 55% कमिशन खाणारे सरकार आहे - On राम मंदिर - - हिंदूंच्या श्रद्धा आणि आस्थेवर आरएसएस, भाजपने धक्का लावलेला आहे, आता साधुसंत बोलायला लागले, आरटीआयच्या बाहेर ठेवणारे मोदी, झेंडा फडकवायचा असेल तर मोदी, माणसं ठेवणारे नरेंद्र मोदी - - सीसीटीव्ही मध्ये 40 दिवसांत 70 वेळा चोरी करताना आपण पाहतो आहे, अयोध्येत जमीन घोटाळा आहे,माहितीच्या अधिकारात माहिती द्यायला तयार नाही, एसआयटी केवळ त्यांच्या सरकारची लाज वाचवण्यासाठी तयार झाले आहे - - केंद्र आणि राज्य सरकार आणि आरएसएस त्यासाठी जबाबदार आहे कारण ते त्यात होते, आता लुटीचेही श्रेय त्यांनी घ्यायला पाहिजे, जेव्हा शीळेसाठी पैसे गोळा केले होते ते पैसे कुठे गेले त्यांची माहिती नाही - - भाजपच्या लोकांना हिंदूंच्या मंदिरांपासून दूर केला पाहिजे कारण हे मंदिरांना लुटणारी टोळी आहे - On फुके - - त्यांचा राज्य पातळीवर जन्म नशिबामुळे झाला आम्ही निमित्त मात्र होतो, आमच्या धक्क्याने आणि नशिबाने ते आमदार झाले, त्यांनी चांगलं काम करावे आता त्याचे बोलत असतील त्यांच्या पक्षाचा मत आहे, ज्यांना आपण पुढे केलं असेल आणि सगळं चांगलंच व्हावं अशी आमची अपेक्षा आहे
0
0
Report

भीषण बारिश से मलंगगड चक्कीनाका क्षेत्र जलमय, कल्याण-डोंबिवली मार्ग पर यातायात बाधित

Kalyan, Maharashtra:कल्याण श्री मलंगगड चक्कीनाका मार्ग जलमय. कल्याण डोंबिवलीत दोन तासापासून मुसळधार पावसामुळे श्री मलंगगड कडून कल्याणकडे येणारा मार्गावरील चक्कीनाका परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. चेतना स्कूल परिसरात गुडघाभर पाणी साचल्याने वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. पाण्याखालून मार्ग काढत दुचाकी, रिक्षा आणि चारचाकी वाहनचालकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. साचलेल्या पाण्यामुळे अनेक वाहनचालक पर्यायी मार्गांचा वापर करत असून काही ठिकाणी वाहतूक संथ गतीने सुरू आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास या मार्गावरील परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून आहे.
0
0
Report

मानसून सक्रिय, कोल्हापुर धामोड़ में छात्रों ने खेत बीच शिवार क्लास का अभ्यास किया

Kolhapur, Maharashtra:राज्यभरात मान्सून सक्रिय झालेल्या असून कोल्हापूर जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली आहे. अशा वातावरणात राधानगरी तालुक्यातील धामोड येथील कोते माध्यमिक विद्यालयाने विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा आणि अनुभवाधारित शैक्षणिक उपक्रम राबवला. वर्गखोलीत नव्हे, तर थेट शेताच्या बांधावर विद्यार्थ्यांचा ‘शिवार वर्ग’ भरवण्यात आला. बळीराजाच्या सोबतीने विद्यार्थ्यांनी चिखलात उतरून भात शेतीतील तरवा काढणी आणि रोपलावणीची प्रत्यक्ष प्रात्यक्षिके केली. डोक्यावर कोसळणाऱ्या पावसाच्या सरी, पायाखाली मऊ चिखल आणि आजूबाजूला हिरवागार निसर्ग अशा उत्साही वातावरणात विद्यार्थ्यांनी शेतीची कामे प्रत्यक्ष अनुभवली. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना केवळ शेतीची माहिती मिळाली नाही, तर अन्नदात्या शेतकऱ्याच्या कष्टांचीही जाणीव झाली. आधुनिक शिक्षणासोबतच पारंपरिक शेतीचे महत्त्व समजून घेण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे मत व्यक्त होत आहे. सर्वच शाळांनी अशा प्रकारचे शिवार शिक्षण राबविल्यास विद्यार्थ्यांना निसर्ग, शेती आणि शेतकऱ्यांच्या जीवनाशी अधिक जवळून परिचित होण्याची संधी मिळू शकते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top