icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राज्य सरकार फिश वेन्डिंग ई-रिक्शा योजना शुरू करेगी; 90% अनुदान संभव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मत्स्यविक्रीला आधुनिकतेची जोड..राज्य सरकार आणणार 'फिश वेंडींग ई-रिख्शा' योजना!.. अँकर राज्यातील मत्स्यविक्री व्यवसाय अधिक स्वच्छ,आधुनिक आणि ग्राहकाभिमुख करण्यासाठी राज्य सरकार ‘फिश वेंडींग ई-रашылықा’ हे नवे मॉडेल राबविणार आहे.या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना ९० टक्के अनुदान देण्याबाबत शासन स्तरावर सकारात्मक विचार सुरू असून प्रति लाभार्थी अंदाजे ४ लाख रुपयांचा प्रकल्प खर्च प्रस्तावित आहे.या ई-रिक्षा मॉडेलमुळे ग्रामीण आणि शहरी भागातील मत्स्यविक्री साखळी अधिक सक्षम होईल,ग्राहकांना दर्जेदार मासळी मिळेल आणि मच्छीमारांचे उत्पन्न वाढण्यास मोठी मदत होणार आहे,अशी माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली..
0
0
Report

रत्नागिरी समुद्र में अवैध ईंधन भंडारण के संकेत, 5 मछुआरों को हिरासत में लिया गया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- इंधन टंचाई असताना समुद्रात आढळला बोटीवर इंधनाचासाठा.. रत्नागिरीच्या कस्टम विभागाची मोठी कारवाई, कस्टम विभागाने पकडलेल्या बोटीचे नाव शहाना.. जयगडच्या समुद्रात इंधन साठा आढळणाऱ्या मच्छिमारी बोटीची झाडाझडती.. मच्छिमारी बोटी वर अवैधरित्या इंधनाचा साठा करून ठेवला जात असल्याचा संशय.. मच्छिमारी हंगाम संपत आला असताना बोटीवर एवढा साठा कशासाठी.. कस्टम विभागाकडून इंधनाचा साठा सापडलेली बोट चौकशीसाठी घेतली ताब्यात.. सापडलेली बोटीवर इंधनाचे 30 हून अधिक बॅरल, मच्छिमारी बोट गुहागर पडवे इथली असल्याचा संशय.. बोटीवरील 5 जणांना घेतले चौकशीसाठी ताब्यात, सर्व जणांना चौकशीसाठी रत्नागिरीत आणल्याची माहिती- सुत्रांची माहिती
0
0
Report
Advertisement

गडचिरोली में हाथियों का क़तार नदीपात्र से गाँव की ओर, भय का माहौल

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या कळपाची नदीपात्रातून गावाकडे कूच, गडचिरोली तालुक्यातील साखरा परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अँकर:  गडचिरोली जिल्ह्यात पुन्हा एकदा रानटी हत्तींच्या कळपाने नागरिकांची झोप उडवलीये. गडचिरोली तालुक्यातील साखरा गावाजवळ तब्बल 15 ते 20 हत्तींचा कळप थेट गावाच्या दिशेनं येत असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालंय. शेतातून आणि नदीपात्रातून मार्ग काढत हा कळप गावाजवळ पोहोचल्याची माहिती समोर आलीये. रात्रीच्या वेळी हत्ती गावाजवळ दिसल्यानं ग्रामस्थांमध्ये मोठी दहशत पसरली. सध्या शेतीपूर्व मशागतीची कामं सुरू असताना शेतकरी पहाटेपासून शेतात जातात. मात्र हत्तींच्या सततच्या वावरामुळे आता शेतात जाणंसुद्धा धोकादायक बनलंय. वन विभागाकडून हत्तींच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यात येत असले तरी प्रत्यक्षात नागरिकांना सतर्कतेच्या सूचना देण्यापलीकडे कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जात आहे.
0
0
Report

अकोला में गर्मी की लहर: प्रशासन ने जारी किए मार्गदर्शक निर्देश

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात २६ ते २८ मे दरम्यान उष्णतेची लाट राहण्याची शक्यता नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने वर्तवली आहे. त्यानुसार नागरिकांसाठी जिल्हा प्रशासनातर्फे मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. दु. १२ ते ४ दरम्यान उन्हात बाहेर जाणे टाळा. बाहेर तापमान अधिक असल्यास शारीरिक श्रमाची कामे टाळा. उन्हात वाहने शक्यतो चालवू नये. ज्वलनशील पदार्थापासून दूर राहावे. लहान मुले व पाळीव प्राण्यांना दरवाजा बंद असलेल्या वाहनात किंवा पार्क केलेल्या वाहनात ठेवू नये. तहान असो किंवा नसो, भरपूर पाणी प्यावे. अशक्तपणा, स्थुलपणा, डोकेदुखी, सतत येणारा घाम आदी उन्हाचा झटका बसण्याची चिन्हे ओळखावीत व चक्कर येत असल्यास तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घेण्यात यावा. पशुधनास तसेच पाळीव प्राण्यांना छावणीत ठेवण्यात यावे, तसेच पुरेसे पिण्याचे पाणी देण्यात यावे, आदी दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में महिला कांग्रेस ने महंगाई-गैस दाम के विरोध में प्रदर्शन किया

Akola, Maharashtra:वाढत्या महागाई आणि इंधन दरवाढीच्या विरोधात देशभरात विरोधकांकडून आंदोलन करण्यात येत आहे. अकोल्यातही आज राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात महिला काँग्रेसच्या वतीने अनोखे आंदोलन करण्यात आले. वाढत्या महागाईचा सर्वाधिक फटका महिलांना बसत असल्याचे सांगत महिलांनी हातात प्रतीकात्मक गॅस सिलेंडर घेऊन सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. या आंदोलनात मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या होत्या. यावेळी लाडकी बहीण योजनेत सरकारने घातलेली नवीन अट तात्काळ रद्द करून सर्व पात्र महिलांना योजनेचा लाभ द्यावा, अशी मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली. तसेच वाढती महागाई आणि इंधन दरवाढ त्वरित कमी न केल्यास तीव्र आंदोलन छेडत अकोला जिल्हा बंदचा इशारा काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनी दिला आहे.
0
0
Report

चंद्रपूर में ट्रैफिक व्यवस्थे के लिए 100 गृहरक्षा दल के जवान तैनात; दुर्घटनाओं को रोकने का निर्णय

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान झाले तैनात, दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांचा निर्णय. दररोज होणारी वाहतूक कोंडी ,बेशिस्त वाहन चालवणे याबाबत चंद्रपूर शहरातील वाहतूक व्यवस्थेच्या नियमनासाठी 100 गृहरक्षक दलाचे जवान तैनात झाले आहेत. दररोज एक या गतीने होणाऱ्या जिल्ह्यातील अपघात मृत्यूचे आकडे कमी करण्यासाठी पोलीस अधीक्षकांनी हा निर्णय घेतला आहे. पुढील दोन महिने हा प्रकल्प शहरात राबविला जाणार आहे. गृहरक्षक दलाचे जवान जुजबी प्रशिक्षणानंतर चौकाचौकात कर्तव्य बजावत आहेत. बेशिस्त वाहन चालवणे , पार्किंग, रॉंग साईड वाहन चालवणे, यााबाबत गृहरक्षक दलाचे जवान वाहतूक पोलिसांना कारवाईत मदत करणार आहेत. गृहरक्षक दलाच्या जवानांना सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षकांनी केले आहे. याशिवाय या औद्योगिक जिल्ह्यात महामार्गांवर अवजड वाहनांबाबत पोलीस आणखी सातर्कतेने कारवाई करून बेशिस्त वाहना विरोधात धडक कारवाई करत आहेत. या नव्या प्रकल्पाचे नक्की नियमनात काय होते याकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे
0
0
Report

विदर्भ में गर्मी से अलर्ट: 47°C तक ताप, तैयार रहें नागरिक

Chandrapur, Maharashtra:विदर्भातील मोबाईलवर आज मंत्रालयातील अलर्ट मेसेज धडकला. लाखो मोबाईलवर अति उष्ण तापमानाचा फ्लॅश संदेश झळकला. पुढील काही तास दिवस आणि रात्रीचे तापमान अति उष्ण राहणार असल्याचा सावधानतेचा इशारा यात देण्यात आलाय. नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याबाबत आवाहन करण्यात आले आहे. चंद्रपूर -गडचिरोली -वर्धा- नागपूर या जिल्ह्यांबाबत मंत्रालयाने हा इशारा दिला आहे या सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 47 अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचले आहे. प्रशासनाने याबाबत सविस्तर माहिती जारी केली आहे. हवामान विभाग, प्रादेशिक केंद्र नागपूर यांनी दिलेल्या इशाऱ्यानुसार या जिल्ह्यात काही ठिकाणी उष्ण लहर ते तीव्र उष्ण लहर निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दिनांक 26 ते 27 मे 2026 दरम्यान जिल्ह्यात काही भागांत उष्ण लहरसोबतच उष्ण रात्रींचीही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना पुरेसे पाणी पिण्याचा सल्ला दिला असून तहान लागली नसली तरी नियमित अंतराने पाणी पिण्याचे आवाहन करण्यात आले आहे. घराबाहेर पडताना डोके झाकण्यासाठी छत्री, टोपी किंवा ओल्या कपड्याचा वापर करावा. दुपारी 12 ते 4 या वेळेत शक्यतो घराबाहेर पडणे टाळावे. हलकी, सैल व सुताची कपडे वापरावीत तसेच प्रवासादरम्यान पिण्याचे पाणी सोबत ठेवावे, असेही सांगण्यात आले आहे. उन्हात काम करणाऱ्या मजुरांनी किंवा नागरिकांनी मध्ये-मध्ये विश्रांती घ्यावी, शरीरातील पाण्याचे प्रमाण टिकवून ठेवण्यासाठी ORS, लिंबूपाणी, ताक, लस्सी, कैरीचे पन्हे यांसारख्या पेयांचा वापर करावा. अशक्तपणा, चक्कर येणे, डोकेदुखी, जास्त घाम येणे यांसारखी लक्षणे आढळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गरोदर महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले तसेच आजारी व्यक्तींनी विशेष काळजी घेण्याबावी. पाळीव प्राणी व गुरांना सावलीत ठेवून पुरेसे पाणी उपलब्ध करून द्यावे. घर थंड राहण्यासाठी पडदे, शटर, सनशेड यांचा वापर करावा तसेच रात्रीच्या वेळी खिडक्या उघड्या ठेवाव्यात, असेही प्रशासनाने म्हटले आहे. तसंही नागरिकांनी दारू, चहा, कॉफी व कार्बोनेटेड थंड पेयांचे सेवन टाळावे. जड व गडद रंगाचे कपडे वापरू नयेत. अतिश्रमाची कामे शक्यतो टाळावीत तसेच लहान मुल किंवा पाळीव प्राण्यांना बंद वाहनात ठेवू नये, असेही सूचित करण्यात आले आहे. जिल्ह्यातील नागरिकांनी हवामान विभागाच्या सूचनांकडे लक्ष देऊन आवश्यक ती खबरदारी घ्यावी आणि उष्मालाटेपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करावा, असे आवाहन करण्यात आले आहे。
0
0
Report
Advertisement

ऑनलाइन प्रेमजाल में 140 युवतियों से धोखाधड़ी: आरोपी आदर्श म्हात्रे गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:आधी ओळख नंतर प्रेमाच्या जाळ्यात अडकून तरुणीची फसवणूक. 140 तरुणीची फसवणूक... भामट्याला मानपाडा पोलिसांच्या ताब्यात प्रेमाच्या जाळ्यात अडकवून तरुणींशी संबंध प्रस्थापित करणे, त्यांचा विश्वास संपादन करणे आणि नंतर त्यांच्या नावावर लाखो रुपयांची कर्जे काढून फसवणूक करणाऱ्या भामट्याला डोंबिवलीतील मानपाडा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. आरोपीचे नाव आदर्श म्हात्रे असे असून यापूर्वी त्याला नवी मुंबई पोलिसांनी अटक केली होती. पनवेल रसायनी येथील परिसरात राहणारा आदर्श म्हात्रे सोशल मीडियाच्या सुरुवातीला तरुणी सोबत मैत्री करून तो त्यांचा विश्वास संपादन करायचा. त्यानंतर प्रेमसंबंध निर्माण करून संबंधित तरुणींच्या नावावर विविध बँकांमधून कर्जे काढल्याचा आरोप आहे. तपासात आतापर्यंत 140 हून अधिक तरुणींना त्याने आपल्या जाळ्यात ओढल्याची माहिती समोर आली आहे. यापैकी 11 तरुणींनी पुढे येऊन अधिकृत तक्रारी दाखल केल्या असून आणखी काही पीडित महिला तक्रार देण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. विशेष बाब म्हणजे फसवणुकीला बळी पडलेल्या अनेक महिला उच्चशिक्षित असून विविध क्षेत्रांमध्ये मोठ्या पदांवर कार्यरत आहेत. आर्थिक क्षेत्र, कॉर्पोरेट आणि व्यावसायिक क्षेत्रातील महिलांची संख्या यामध्ये लक्षणीय असल्याची माहिती तपासातून समोर आली आहे. नवी मुंबई पोलिसांनी अटक केल्यानंतर डोंबिवलीतील एका तरुणीनेही फसवणुकीची तक्रार दिल्याने मानपाडा पोलिसांनी आदर्श म्हात्रेला ताब्यात घेतले आहे. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांचा तपास सुरू असून आणखी पीडित महिला पुढे येण्याची शक्यता असल्याने फसवणुकीचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणामुळे सोशल मीडियावरील ओळखी आणि ऑनलाइन नातेसंबंधांच्या माध्यमातून होणाऱ्या आर्थिक फसवणुकीचा गंभीर मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में ईंधन संकट से किसान परेशान, कांग्रेस का बड़ा ट्रैक्टर-डबकी मोर्चा सरकार पर हमला

Yavatmal, Maharashtra:यवतमाळमध्ये इंधनाचा तुटवडा, डीएपी-युरिया टंचाई, पिक विमा व खंडित वीज पुरवठ्याच्या प्रश्नांवर आमदार बाळासाहेब मांगुळकर यांच्या नेतृत्वात काँग्रेसने भव्य ट्रॅक्टर-डबकी मोर्चा काढला. जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत मोर्चेकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन सादर केले. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांसमोर उभ्या ठाकलेल्या डीएपी व युरिया खतांच्या कृत्रिम टंचाई, बोगस खते-बियाणे-कीटकनाशकांचा वाढता सुळसुळाट, रखडलेला पिक विमा, वाढते पेट्रोल-डिझेल दर तसेच अपुरा व विस्कळीत वीजपुरवठा यामुळे शेतकरी हैराण झाले असून शासन प्रशासनाने त्यांना वाऱ्यावर सोडले आहे असा आरोप आमदार बाळासाहेब मांगुळकर यांनी केला. मोर्चामध्ये माजी मंत्री शिवाजीराव मोघे यांचे सह काँग्रेस कार्यकर्ते व शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले.
0
0
Report

चंपक मैदान में बकरी ईद को लेकर बकरों की भारी बिक्री शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चंपक मैदानात बकऱ्यांच्या खरेदीची झुंबड.. बकरी ईद अवघ्या दोन दिवसांवर येऊन ठेपला आहे.त्याच्या पार्श्वभूमीवर शिरगाव येथील प्रसिद्ध चंपक मैदान येथे बकऱ्यांचा भव्य बाजार भरला आहे.खरेदीसाठी व ग्राहकांची झुंबड उडत आहे. यंदाच्या बाजारात 20 हजार रुपयांपासून थेट 1 लाख 20 हजार रुपयांपर्यंतचे डौलदार आणि देखणे बकरे विक्रीसाठी दाखल झाले आहेत.. खरेदीदारांसोबतच बच्चे कंपनी आणि सर्वसामान्यांची मोठी गर्दी होत आहे.. गल्या काही वर्षांच्या तुलनेत यंदा बाजारात बकऱ्यांचे आवक उत्तम झाली आहे.. महागाईचा किंचित परिणाम जाणवत असला तरी सणाचा आनंद साजरा करण्याच्या उत्साहात कुठेही कमतरता दिसत नाही.. बकरी ईद निमित्त मुस्लिम बांधवांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे..
0
0
Report

रत्नागिरी में पानी की किल्लत: 133 गाँव में 43 हजार लोग टैंकरों पर निर्भर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील 133 वाड्यांत 18 ट्रॅक्टर पाणीपुरवठा.. लांजा राजापूर तालुक्यात पाणीटंचाई असूनही अद्याप टँकर सुरूच नाही.. अँकर रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस उन्हाचा पारा वाढत चालल्यामुळे पाण्याची दाहकताही वाढली आहे.. जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणी पुरवठा विभागाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील 57 गावातील 133 वाड्यात 43 हजार 159 टंचाईग्रस्तांना 18 ट्रॅन्करने पाणीपुरवठा सुरू आहे.. सात तालुक्यात पाणी टँकरने सुरू आहे..मात्र लांजा,राजापूर या दोन तालुक्यात पाणीटंचाई असून सुद्धा अद्याप ट्रंकरने पाणीपुरवठा सुरू झाला नाही..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top