icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राम मंदिर रामरक्षा पठण को लेकर संजय राउत की मंदिर ट्रस्ट से चर्चा

Nagpur, Maharashtra:खासदार संजय राऊत यांनी रामनगरातील राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष यांना फोन करून 18 जुलै च्या राम रक्षा पठाण साठी सहयोगाची अपेक्षा व्यक्त केली आहे. काल रात्री संजय राऊत यांनी राम मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष रवी वाघमारे यांच्याशी फोनवर संपर्क साधून 18 जुलैला उद्धव ठाकरे आणि इतर शिवसैनिकांना रामनगर येथील राम मंदिरात रामरक्षा पठण करायचे आहे, त्यासाठी मंदिर ट्रस्टने सहकार्य करावे अशी विनंती संजय राऊत यांनी केल्याची माहिती रवी वाघमारे यांनी दिली. धार्मिक भावनेतून शुद्ध मनाने राम रक्षा पठण करायचे असल्यास कोणालाही आमची अडचण नाही, मात्र हे करत असताना त्याला राजकीय स्वरूप देण्यात येऊ नये. आपल्या राजकीय विचाराच्या मंदिराच्या बाहेर ठेवून यावं असंही मंदिर ट्रस्टने संजय राऊत यांना सांगितल्याचे रवि वाघमारे म्हणाले. देवेंद्र फडणवीस यांच्या काळापासून रामनगर येथील राम मंदिरात यायचे... मंदिराच्या सहाशे सदस्यांपैकी देवेंद्र फडणवीस एक सदस्य आहेत.. त्यामुळे फडणवीस सदस्य आहेत म्हणून उद्धव ठाकरे राम रक्षा पठण करण्यासाठी या मंदिरात येत असावेत असे आम्हाला वाटत नाही असे रवि वाघमारे म्हणाले. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने राम मंदिराच्या शेजारीच असलेल्या एनआयटीच्या पटांगणावर भाजप कार्यकर्त्यांनी लक्ष्मी नृसिंह महायज्ञाचे आयोजन केले आहे... मुळात ते महायज्ञ मंदिराच्या बाहेरील एनआयटीच्या पटांगणावर आहे... मात्र, त्या आयोजनामुळे मंदिरात चे पावित्र्य आणि गरिमा कायम राहील अशी अपेक्षा मंदिर ट्रस्टने व्यक्त केली आहे.
0
0
Report

Ambabai मंदिर में अवैध संवर्धन पर Kolhapur के संतप्त लोग, नेता हर्षल सुरवे ने किया विरोध

Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी अंबाबाई मंदिरात अशास्त्रीय पद्धतीने केल्या जात असलेल्या संवर्धन प्रक्रिये बाबत कोल्हापूरकर संतप्त झाले आहेत.. अंबाबाई देवीच्या भक्ताने देखील या संदर्भात नाराजी व्यक्त केली आहे.. शिवसेनेचे स्थानिक नेते हर्षल सुर्वे यांनी देखील संवर्धनाच्या प्रक्रियेबाबत संताप व्यक्त केला आहे.. संवर्धन प्रक्रिया राबवत असताना पुरातत्वीय निकशांचे सरळ सरळ उल्लंघन केलं जात असल्याचं त्यांनी म्हटलं.. काही दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पावसानंतर अंबाबाई देवीच्या मंदिराला गळती लागली हा त्याचाच भाग असल्याचा आरोप शिवसेना नेते हर्षल सुर्वे यांनी केला आहे. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.
0
0
Report
Advertisement

जयंत पाटील पर सुरेश धस का खुला आरोप: जियो टैगिंग से महाराष्ट्र लूट

Beed, Maharashtra:बीड : जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. भाजप आ सुरेश धस मविआ सरकार मध्ये जलसंपदा मंत्री असताना जिओ टॅगिंग चा जी आर काढला महाराष्ट्राची लूट झाली.. महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. किती वाटा आहे. कोण डायरेक्टर सगळ काढणार - सुरेश धस जयंत पाटील यांनी माझ्या नादी लागू नये. मी डवचायचा माणूस नाही. मी जर उलटा फिरलो तर तुम्हाला सुद्धा नीट सोडणार नाही. दादागिरी नवंटंकी तिकडे चालवायची इकडे नाही. देवांनी तुम्हाला जेवढे डोके दिले त्याच्यापेक्षा एक टक्का आमच्या देवांनी सुद्धा जास्त दिले. तुम्हाला बाकीचे लोक गप्प बसत असतील आम्ही नाही. तुम्ही आमच्याकडे येऊन डवचण्याचे काम करता. आम्ही तुमच्याकडे येऊन डवचू अस. म्हणत भाजप आमदार सुरेश धस यांनी शरद पवार राष्ट्रवादीचे माजी मंत्री आ जयंत पाटील यांना जाहीर आव्हान दिले. दुधाच्या प्रश्नावर जयंत पाटील यांनी अधिवेशनात आरोप केलं होते त्यावर उत्तर देताना सुरेश धस यांनी थेट इशारा दिला आहे. पुढे बोलताना माविआच्या सरकार मध्ये कोण जलसंपदा मन्त्री होते. ज्यांच्या कालावधी मध्ये जिओ टॅगिंग चा जी आर काढला. त्याच्या नावाखाली महाराष्ट्राची लूट झाली. पुढच्या अधिवेशनात पहिल्यांदा पहा तसेच महालक्ष्मी सारखी कोणाची संस्था आहे. कोणाचे रजिस्टेशन आहे. त्यांच्यामध्ये कोणाचा किती वाटा आहे. कोण डायरेक्टर आहेत हे सुधा पहिल्या दिवशी कळेल जयंत पाटील यांना कळेल अस खुलं आव्हान सुरेश धस यांनी दिले आहे. बाईट- आ सुरेश धस (भाजप आमदार)
0
0
Report

आहिल्यानગર में बारिश कमी से फसलें संकटग्रस्त, किसान स्पिंकलर से पानी दे रहे

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाने अचानक पाठ फिरवल्याने बळीराजा मोठ्या संकटात सापडला आहे. पेरणीनंतर जोमाने उगवलेली पिके आता पाण्याअभावी सुकण्याच्या मार्गावर असून ती वाचवण्यासाठी शेतकरी आटोकाट प्रयत्न करत आहेत. पिण्यासाठी राखीव ठेवलेल्या विहिरींचे पाणीही स्प्रिंकलरद्वारे शेतात सोडण्याची वेळ आली आहे. मात्र पाऊस आणखी लांबला , तर विहिरीही कोरड्या पडण्याची भीती आहे. अशा परिस्थितीत पिके वाया जाण्याचाच नव्हे तर शेतकऱ्यांचा आतापर्यंतचा खर्च आणि मेहनतही पाण्यात जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा पेरणीचे संकट ओढवण्याची भीती व्यक्त होत असून, चिंताग्रस्त बळीराजा आता फक्त आभाळाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. राहता तालुक्यातील अनेक शेतकरी शेतातील पिकांना वाचवण्यासाठी स्पिंकलरच्या साहाय्याने पाणी देत असल्याचं चित्र समोर आलं असून शेतकऱ्यांच्या शेतातून आढावा घेत शेतकऱ्यांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में बारिश नहीं मिलने से कपास-सोयाबीन और सब्ज़ियाँ डूबीं, दुबार बुआई का खतरा

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा मोठा खंड कापूस -सोयाबीन आणि भाजीपाला पिकेही कोमेजली, पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास दुबार पेरणीची भीती , धान पिकांची तर अत्यंत वाईट अवस्था चंद्रपूर जिल्ह्यात पावसाचा पत्ता नसल्याने 15 दिवसांपासून शेतकरी चिंताग्रस्त आहेत. जुलै महिन्याच्या पहिल्या काही दिवसांमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरणीला सुरुवात केली चंद्रपूर जिल्ह्यामध्ये सोयाबीन आणि धान ही महत्त्वाची तातडीने पेरणी करण्याची पिके आहेत. त्यातील सोयाबीन पेरणी उत्तम स्थितीत झाली मात्र धान पिकांसाठी योग्य तो पाऊस न झाल्याने धानाची रोबणी होऊ शकलेली नाही. गेल्या काही दिवसात सतत ऊन आणि पावसाने दिलेला खंड यामुळे आता जिल्ह्याच्या विविध भागातील भाजीपाला पिके देखील कोमेजली आहेत. पुढील काही दिवसात पाऊस न आल्यास कापूस- सोयाबीन यासह सर्वच पिकांची दुबार पेरणीची भीती व्यक्त होत आहे. यामुळे शेतकरी पुन्हा एकदा कर्जाच्या सापळ्यात अडकणार असून खरीप हंगाम वाया जातो की काय असे मोठे संकट ओढवले आहे.
0
0
Report

आदिवासी क्षेत्रों में SIR मोहिम की अवधि 15 दिन बढ़ाने की मांग

Shirdi, Maharashtra:राज्यभरात सध्या मतदार पुनर्निरीषण अर्थात SIR मोहीम राबविण्यात येत आहे.. जुलै अखेरपर्यंत ही मोहीम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दीष्ट आहे.. मात्र आदिवासी बहुल तालुक्यांमध्ये SIR ला आणखी पंधरा दिवसांची मुदतवाढ द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार डॉक्टर किरण लहामटे यांनी केली आहे.. पावसाळा सुरू असल्याने, अकोले सारख्या दुर्गम भागात डोंगर दऱ्यामध्ये राहणाऱ्या आदिवासी कुटुंबापर्यंत पोहचण्यासाठी BLO ना मोठी कसरत करावी लागणार आहे.. त्यामुळे SIR पासून कुणीही वंचित राहू नये यासाठी आदिवासी तालुक्यांमध्ये SIR ला मुदतवाढ मिळावी अशी मागणी लहामटे यांनी केली आहे..
0
0
Report

घणसोली में शराबी महिला ने सड़क पर हंगामा मचाया; पुलिस ने गिरफ्तार किया

Navi Mumbai, Maharashtra:कोपरखैरणे पुलिस थाना के दायरे वाले घणसोली सेक्टर-3 सर्कल के सामने एक मद्यधुंद महिला ने सड़क पर बड़ा गोंधल मचाया। इस हाई-वोल्टेज ड्रामे से घटनास्थल पर लोगों की भारी भीड़ जुटी। सड़क के बीच में बस रिक्षा के सामने खड़ी होकर इस महिला ने बड़ा धिंगाणा किया। शुरुआती दौर में पुलिस ने उसे समझाने का प्रयास किया, पर वह किसी की नहीं सुनी। अंततः पुलिस ने धारा-प्रयोग कर उसे गिरफ्तार कर लिया और कोपरखैरणे पुलिस थाने ले गए। घटना के वहां मौजूद कुछ नागरिकों ने इस पूरी घटना का मोबाइल पर वीडियो बनाकर सोशल मीडिया पर वायरल कर दिया。
0
0
Report
Advertisement

एफडीए ने नागपुर के तीन होटल्स के लाइसेंस निलंबित; किचन में गंदगी पाई गई

Nagpur, Maharashtra:नागपूर - अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एफडीएची नागपुरातील तीन हॉटेल्सवर कारवाई. - हजारीपहाड येथील याराना फॅमिली गार्डन, काटोल मार्गावरील इंडियन तंदूर आणि कळमेश्वर मार्गावरील द हट फॅमिली रेस्टॉरंटचे परवाने तात्पुरते निलंबित. - तपासणीत नोंदणी प्रमाणपत्र न लावणे, किचनमध्ये अस्वच्छता, माशांचा प्रादुर्भाव आणि कर्मचाऱ्यांकडे टोपी-अॅप्रॉन नसल्याचे आढळले. - शाकाहारी व मांसाहारी पदार्थ एकत्र साठवले जात असल्याचेही निदर्शनास आले. - सर्व त्रुटी दूर होईपर्यंत तीनही आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आल्याची माहिती एफडीएने दिली.
0
0
Report

अमरावती में कर्ज माफी को लेकर हंगामा, खातों में रकम जमा होने से पहले बैनरबाजी

Amravati, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्या आधीच सरकारची बॅनरबाजी; सरकारने शेतकऱ्यांची दिशाभूल करू नये संतप्त शेतकरीांची प्रतिक्रिया अँकर :- अमरावतीत कर्जमाफीच्या मुद्द्यावरून राजकारण चांगलच तापलं असून शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा होण्या़ आधीच सरकारकडून मोठ्या प्रमाणात बॅनरबाजीला करण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने जनतेची दिशाभूल करू नये अशी प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. बोगस बियाणे आणि पावसाने दांडी मारल्याने शेतकरी चिंताग्रस्त असून सरकारने कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याच्या आधीच बॅनरबाजी केल्याने शेतकऱ्यांसह सर्वसामान्य नागरिक संताप व्यक्त करत असून सरकारने ही बॅनरबाजी शासकीय कार्यालय तसेच एसटी बसवर केले आहे. त्यामुळे येत्या काळात यावर काय राजकारण होते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
0
Report
Advertisement

अहिल्यानगर जिले के सांदनदरी क्षेत्र में भारी बारिश के कारण पर्यटन बंद

Shirdi, Maharashtra:पर्यटक आणि ट्रेकर्सचे आकर्षण असलेल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील सांदनदरी परिसरात सध्या पर्यटनास बंदी घालण्यात आली आहे. भंडारदरा परिसरातील घाटमाथ्यावर संततधार पाऊस सुरू असल्याने, अनुचित प्रकार टाळण्यासाठी वन विभागाने पर्यटकांना सांदनदरी परिसरात जाण्यास मज्जाव केला आहे. भंडारदरा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात असणाऱ्या कळसूबाई - हरिश्चंद्रगड अभयारण्यात साम्रद येथे अतिशय खोल अशी ही सांदन दरी आहे. पावसाळ्यात पाण्याच्या अती प्रवाहामुळे किंवा दरडी कोसळून दुर्घटना होण्याचा धोका असतो, त्यामुळे हा परिसर सध्या पर्यटनासाठी बंद ठेवण्यात आला आहे.
0
0
Report

सणसवाडी बैलगाडा हादसा: विवादाच्या वादानंतर युवकावर कारने मारण्याचा प्रयत्न CCTV मध्ये कैद

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील बैलगाडा शर्यतीच्या वादातून एका युवकाला जीवे मारण्याचा प्रयत्न झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मालशिरस येथील बैलगाडा शर्यतीदरम्यान मोडक आणि हरगुडे यांच्यात झालेल्या शाब्दिक वादाच्या रूपानंतर हिंसक हल्ल्यात झाले. चेतन हरगुडे याला कारने जोरदार धडक देत जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचा आरोप आहे. या घटनेत चेतन हारगुडे आणि त्याचा चुलत भाई अथर्व हारगुडे हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर वाघोली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दरम्यान हा संपूर्ण थरार परिसरातील CCTV कॅमेऱ्यात कैद झाला असून पोलिसांनी पुढील तपास सुरु केला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top