icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंदी में शीर्षक: जुन्या जमीन विवाद में कार से जानलेवा हमला, CCTV में कैद

Shirur, Maharashtra:Anc : चाकण जवळील खालूब्रे परिसरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. जुन्या जमिनीच्या वादातून एका व्यक्तीच्या अंगावर कार घालून त्याला जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, याचे थरारक फुटेज आता समोर आले आहे. Vo : या प्रकरणी उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपी खंडू बापू पवार, माजी व्हाईस चेअरमन पोपट बापू पवार आणि त्यांच्यासोबत असलेल्या एका अनोळखी इसमावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी दोघांना अटक केला आहे. फिर्यादी किरण बबन शिंदे हे आपल्या घराकडे जात असताना, आरोपींनी त्यांच्याशी वाद घालून "आमचे जुन्या जमिनीच्या गटांच्या वादावरून घरा शेजारी दबा धरून फिर्यादी घराजवळ येताच" त्यांच्या अंगावर भरधाव वेगाने गाडी घातली. Vo : सुदैवाने फिर्यादी बाजूला झाल्यामुळे या हल्ल्यात त्यांच्या जीव वाचला आहे. मात्र, आरोपींचा हा जीवघेणा प्रयत्न सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत आहे. महाळुंगे पोलिसांनी भारतीय न्याय संहिताेच्या विविध कलमान्वये हा गुन्हा दाखल केला असून, पोलीस उपनिरीक्षक सचिन महाडिक या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

इगतपुरी में भोंदू बाबाकी गिरफ्तारी; वन विभाग ने अवयव जप्त, 2 दिन पुलिस कोठडी

Nashik, Maharashtra:नाशिक/इगतपुरी ब्रेक - इगतपुरीत भोंदू बाबाचे वास्तविक पर्दाफाश वन विभागाने केला - इगतपुरी परिसरातील गिरणारे (बनवाडी) येथील चंद्रकांत राजेंद्र माळी वय 33 वर्ष याला केली अटक - मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे इगतपुरी वन विभागाने केली कारवाई - भोंदू बाबाच्या घरातून वन्यजीवांचे अवयव जप्त - यात रानडुकराचे दात, सांबर शिंग, काळवीट शिंग, घुबडाचे अवयव, सालिंदर काटे, मोरपिस, तलवार इत्यादी जवळ जवळ अंदाजे दोन लाख रुपये किमतीचे अवयव जप्त - वनविभाग आरोपीच्या घरी सर्च वॉरंट घेऊन गेल्यावर आरोपीने सर्च वॉरंटच खाऊन टाकले - न्यायालयात भोंदू बाबाला हजर केले असता न्यायालयाने दिली दोन दिवसांची पोलिस कोठडी
0
0
Report

छत्रपती संभाजीनगर महापालिका ने कम कर के लाखों मालमत्ताओं पर फेरतपासणी की योजना शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात तब्बल २० हजार मालमत्तांना १ हजार रुपयांपेक्षा कमी मालमत्ता कर लावलेला आहे. एवढा कमी कर असूनही बहुतांश नागरिक कर भरतच नाहीत. मागील २० वर्षामध्ये मनपाने मालमत्तांचे फेरतपासणीच केलेली नाही असे पुढे आले आहे.. शहरात ३ लाख १९ हजार मालमत्ता असल्याची नोंद आहे. ४० ते ५० हजार मालमत्तांची नोंदच मनपाकडे नाही. खुल्या प्लॉटलासुद्धा कर असतो, हे मनपा अधिकारी, कर्मचारी आणि प्लॉटधारकांच्याही पचनी पडत नाही. २०२५-२६ या वर्षात १ लाख ४२ हजार मालमत्ताधारकांनी २१० कोटी ८२ लाख रुपये कर भरला. मालमत्ता करावरील व्याज ९५ टक्के माफ केल्याने ६० ते ७० कोटींची वसुली अधिक झाली. १ लाख ७७ हजार मालमत्ताधारकांनी मागील वर्षी करच भरला नाही. त्यामुळे कमी कर असलेल्या मालमत्ताची आता महापालिका फेर तपासणी करणार असल्याचा निर्णय झाला आहे..
0
0
Report
Advertisement

निदा खान के स्पॉट पंचनामे से मल्टिनैशनल केस की जांच तेज़

Nashik, Maharashtra:निदा खानला न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या एसआयटी पथकाने काल तत्कालीन कार्यालयात तिला नेऊन 'स्पॉट पंचनामा' पूर्ण केला. तसेच निदा व तिच्या पालकांकडे पोलिसांनी शनिवारी आयुक्तालयात बोलवून चौकशी केली. धार्मिक भावना दुखविणे तसेच धर्मपरिवर्तनाचा कट रचून त्यामध्ये सहभागी झाल्याप्रकरणी संशयित निदा खान हिच्याविरुद्ध देवळाली कॅम्प व मुंबई नाका पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून ती फरार होती. पोलिसांकडून तिचा सर्वत्र शोध घेतला जात होता. देवळाली कॅम्पच्या गुन्ह्यात पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरामधून अटक करून न्यायालयात हजर केले होते. ती सध्या पोलिस कोठडीत असून, या गुन्ह्याचा पोलिस यंत्रणा कसोशीने तपास करत आहे. काल निदाला घेऊन पोलिसांनी पुन्हा वडाळा शिवारातील तत्कालीन मल्टिनॅशनल कंपनीतील कार्यालय जे गुन्ह्याचे घटनास्थळ आहे, ते गाठले. तेथे पोलिसांनी पंचनामा पूर्ण केला. यानंतर दुपारी तिला पोलिस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांपुढे हजर करण्यात आले. यावेळी तिच्याकडे व तिचे आई, वडील, भावाकडेसुद्धा पोलिसांनी चौकशी केली. अडीच वाजेपासून सायंकाळी सहा वाजेपर्यंत हे चौकशीसत्र सुरू होते. यावेळी नीता खान यांचा संपूर्ण मोबाईलचा डेटा रिकव्हर करण्यात आलाय त्याचबरोबर तिने जे फोन वापरले ते देखील एसआयटीने तपासले असून त्याचा सीडीआर देशील तपासला असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
0
0
Report
Advertisement

यवतमाल के नेर तालुके में नौ वर्षीय अन्वी भोसले की मौत पर जांच शुरू

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नेर तालुक्यातील आजंती पारधी बेड्यावर नऊ वर्षीय अन्वी अनाडी भोसले या मुलीचा मृत्यू झाला. पाणीटंचाई असल्याने पाणी आणण्यासाठी गेलेल्या अनवीचा अचानक मृत्यू झाल्याने, हा मृत्यू उ Ush्माघाताने झाला असावा अशी शंका कुटुंबीयांनी व्यक्त केली होती. तर प्रशासनाने हा उष्माघाताचा बळी नसल्याचे म्हटले होते. अन्वीची कोणतीही वैद्यकीय तपासणी न करता तिचा मृतदेह दफन करण्यात आला होता, त्यामुळे अन्वीचा मृत्यू नेमका कशाने झाला याचा तपास करण्यासाठी यंत्रणा कामाला लागली. तिचा मृतदेह जमिनी बाहेर काढून तेथेच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पाडली. अकस्मात झालेल्या मृत्यूची नोंद पोलिसात न करता अंत्यसंस्कार कसे करण्यात आले. प्रशासनाने अखेर चौकशीची पावले उचलली आहे. तहसील प्रशासन, फॉरेन्सिक पथक आणि आरोग्य विभागाचे अधिकारी स्मशानभूमीत दाखल झाले. त्यांनी पुरलेला मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर घटनास्थळीच शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नांदूर मध्यमेश्वर अभयारण्य के जलाशय में कमल फूलों का उफान, पर्यटकों के लिए बोट-गाइड सेवा

Niphad, Maharashtra:अँकर:-जैवविविधतेसाठी देशभर प्रसिद्ध असलेल्या नांदूरमध्यमेश्वर पक्षी अभयारण्य परिसरातील जलाशयात यंदा निसर्गाने अनोखी उधळण केली असून सुमारे अदीच एकर क्षेत्रफळाच्या बेटावर तब्बल दोन ते तीन हजार सहस्त्र कमळपुष्पे फुलली आहेत. विशेष म्हणजे जुलै-ऑगस्ट महिन्यात बहरणारी ही कमळपुष्पे यंदा मे महिन्यातच उमलल्याने पर्यटक आणि पक्षीप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली आहे यंदा जलाशयातील जलस्तर दीर्घकाळ टिकून राहिल्यामुळे कमळपुष्पांच्या वाढीस पोषक वातावरण निर्माण झाले परिणामी गेल्या वर्षांच्या तुलनेत यावर्षी कमळफुलांचे प्रमाण जवळपास दुपटीने वाढल्याचे वन्यजीव विभागाकडून सांगण्यात आले आता हा फुलांचा बहर ऑक्टोबर महिन्यापर्यंत हंगाम सुरु राहणार आहे सहस्र कमळपुष्पांचा हा अद्भुत नजारा पर्यटकांना जवळून अनुभवता यावा यासाठी वन्यजीव विभागाच्या वतीने बोट व गाईडची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे जास्तीतजास्त पर्यटकांनी या नैसर्गिक सौंदर्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन नांदूरमध्यमेश्वर वन्यजीव विभागाकडून करण्यात आले आहे
0
0
Report

यवला तालुक़े में सूखे से भूजल संकट, 33 गाँवों में पानी टैंकरों से पहुँचा

Yeola, Maharashtra:दुष्काळग्रस्त म्हणून ओळखल्या जाणाऱ्या येवला तालुक्यात उन्हाची तीव्रता वाढत असल्याने भूजल पातळीत मोठी घट झाली असून पाणीस्रोत कोरडे पडल्याने अंकाई परिसरासह ३३ गावे आणि ३७ वाड्या-वस्त्यांवर भीषण पाणीटंचाई निर्माण झाली असून नागरिकांना हंडाभर पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे अंकाई येथील कोळस टेकडी, गोरख नगर, बोराडे वस्ती आणि गोरे वस्ती येथे विहिरी व बोरवेलनी तळ गाठल्याने पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेता प्रशासनाच्या वतीने संबंधित भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून नागरिकांची तहान भागविण्यासाठी ३३ गावे आणि ३७ वाड्या-वस्त्यांवर ३३ टँकरांच्या माध्यमातून दररोज तब्बल ५५ फेऱ्या करून पाणीपुरवठा केला जात आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top