445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बारिश न होने से सोयाबीन सूखा, किसान स्मशान में राख, प्रदर्शन, मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: घोटा गावात पावसाअभावी सुकलेल्या सोयाबीन पिकाची शेतकऱ्यांनी चक्क स्मशानभूमीत होळी केली आहे. तालुक्यात गेल्या ४० दिवसांपासून पाऊस नसल्याने खरिपाची पिकं पूर्णतः सुकून गेली असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांसह शेतकऱ्यांनी सुकलेलं सोयाबीन स्मशानभूमीत जमा करून सरकारचा निषेध केला. तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्यांना भरीव आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. मदत लवकर जाहीर न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सरकारला दिला आहे.0
0
Report
मराठा आंदोलनाला पूर्ण समर्थन, तहसीलदाराकडे निवेदन दाखल
Rui, Maharashtra:दौंड येथून मराठा समाजाच्या वतीने मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला समर्थन : तहसीलदारांकडे निवेदन सादर... मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलनाला पूर्ण समर्थन देत, काल मराठा समाजाच्या न्याय्य व रास्त मागण्यांचा शासनाने गांभीर्याने विचार करून कायदेशीर, संवैधानिक आणि लोकशाही मार्गाने योग्य निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली. यावेळी शांततापूर्ण व लोकशाही मार्गाने आंदोलनात सहभागी राहण्याचा निर्धारही समाजाच्या वतीने व्यक्त करण्यात आला.0
0
Report
भरणे ने कहा: इंदापूर में हर्षवर्धन पाटील के साथ पुणे जिला बैंक चुनाव में फायदा होगा
Rui, Maharashtra:आता हर्षवर्धन पाटील सोबत आहेत जिल्हा बँकेच्या निवडणुकीत फायदा होईल : कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी व्यक्त केलं मत. भरणेवাডीस निवासस्थानी पार पडली सोसायटीच्या प्रतिनिधींची बैठक. पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या भरणेवाडीतील निवासस्थानी सहकारी सोसायट्यांच्या प्रतिनिधींची बैठक पार पडली. या बैठकीत मार्गदर्शन करताना पूर्वी आपण वेगळं होतो परंतु आता माजी मंत्री हर्षवर्धन पाटील आणि आपण सगळे एकत्र आहोत त्यामुळे पुणे जिल्हा बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत याचा मोठा फायदा होईल असं राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी इंदापूर मध्ये म्हटलं आहे. बँकेत काम करताना संचालक आप्पासाहेब जगदाळे आणि आपण स्वतः कधीही राजकारण केलं नाही,कधीही कोणाची अडवणूक केली नाही. सर्वांना न्याय देण्याची भूमिका आम्ही दोघांनीही घेतली असंही मंत्री भरणे यांनी म्हटलं आहे. साऊंड बाईट _कृषिमंत्री दत्तात्रय भरणे0
0
Report
Advertisement
इंदापुर में दहीहंडी समारोह में कृषि मंत्री भरणे की उपस्थिति
Rui, Maharashtra:कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांची कार्यक्रमाला उपस्थिती. पुण्याच्या इंदापूर शहरात हिंदुराज प्रतिष्ठानकडून भव्य दहीहंडी सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं; राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांची या सोहळ्याला उपस्थिती होती. प्रसिद्ध लावणी नर्तिका राधा मुंबईकर यांनी यावेळी आपल्या हटक्या अदांनी इंदापूरकरांना घायाळ केलं.0
0
Report
लातूर में किसान आंदोलन: सूखा राष्ट्रीय आपदा घोषित कर हेक्टेयर 1 लाख मुआवजे की मांग
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे शेतकरी संघटनेचे रास्तारोको आंदोलन... कोरडा दुष्काळ जाहीर करून हेक्टरी एक लाखांची नुकसानभरपाई देण्याची मागणी... पावसाअभावी लातूर जिल्ह्यासह मराठवाड्यात दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झालीय... या पार्श्वभूमीवर कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, या प्रमुख मागणीसाठी शेतकरी संघटनेच्या वतीने आज लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील तिवटग्याळ पाटी येथे रास्तारोको आंदोलन करण्यात आले... जवळपास तासभर हे आंदोलन चालले... कोरडा दुष्काळ ही राष्ट्रीय आपत्ती जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमुक्ती करावी, पीकविमा योजनेतून वगळलेल्या नुकसानीच्या बाबींचा पुन्हा समावेश करावा, पीक कापणी प्रयोग गावनिहाय घ्यावे, अश्या मागण्या यावेळी शेतकरी संघटनेने केल्या0
0
Report
मनोज जरांगे के मुंबई प्रस्थान पर गिरफ्तारी की मांग तेज, पुलिस कार्रवाई के संकेत
Pandharpur, Maharashtra:मनोज जरांगे यांच्या मुंबई कडे जाण्याची घोषणा करताच, प्रा लक्ष्मण हाके आक्रमक यांना आज उद्या जरांगे यांना अटक करावी त्यांना कायद्याचा बडगा दाखवा आजच पोलिसांनी उचलावे, प्रा लक्ष्मण हाके यांची मागणी आता शासन काय करते आम्ही पाहत आहे. आमचा मोर्चा थांबवण्याची विनंती केली आम्ही त्यांना प्रतिसाद दिला. आता जरांगे यांच्या बाबत रेड कार्पेट टाकत की काय करते बघावे लागेल. सरकला वेठीस धरण्याचा प्रयत्न आहे. गणेश उत्सव टायमिंग साधतात. मुंबईला जाणे म्हणजे सरकला वेठीस धरणे आहे. त्यांनी आता दिल्लीत जावे कारण मुंबई मध्य त्यांचं कोणी ऐकणार नाही. पंडित नावाच्या व्यक्तीला लगेच अटक होते. मग मनोज जरांगे यांची भाषा कशी आहे कारवाई का होत नाही. अमृता ताई त्यांना गोड भाषेत समजावून सांगतील अशी अपेक्षा आहे. मनोज दादा आरक्षण सामाजिक मागासच आहे अस त्यांनी सांगाव एवढे दिवस उपोषण करूनही जरांगे ठीक आहे. सलाईन घेत होते की अजून काही त्यातून घेत होते.0
0
Report
Advertisement
सातारा स्टेशन पर सामान रखने की सुविधा नहीं, अमेरिकी पर्यटक का अनोखा विरोध
Satara, Maharashtra:सातारा : सातारा रेल्वे स्थानकावर प्रवाशांसाठी सामान कक्ष (क्लॉक रूम) उपलब्ध नसल्याने संतप्त झालेल्या अमेरिके पर्यटक टोनी बाबावाला यांनी अनोखे आंदोलन केले. डोक्यावर कपड्यांची बॅग ठेवत त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधले. पर्यटनासाठी साताऱ्यात आलेल्या टोनी यांना अतिरिक्त सामान सुरक्षित ठेवण्यासाठी सुविधा नसल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी स्थानकातील प्रवाशांशी संवाद साधून सुविधांच्या अभावाबत माहिती घेतली आणि त्याचे चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले. परदेशी पर्यटकाला सामान ठेवण्यासाठी साधी सुविधाही उपलब्ध नसल्याने सातारा रेल्वे स्थानकातील मूलभूत सुविधांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. रेल्वे प्रशासनाचे म्हणणे : सातारा रेल्वे स्थानक ब्रिटिशकालीन असून सामान कक्षासाठी वरिष्ठ प्रशासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. स्थानकाचा ‘अमृत भारत योजने’त समावेश झाला असून, नव्या स्थानकात सामान कक्षाची सुविधा उपलब्ध करून दिलीJ जाईल, अशी माहिती स्टेशन मास्तर गणपत चव्हाण यांनी दिली.त्याच बरोबर या परदेशी टोनी पर्यटकाने साताऱ्याचा अनेक पर्यटनस्थळा भेट देऊन या स्थळांचे कौतुक केले आहे.0
0
Report
वाशिम में बारिश से गणेश मूर्तियों का बाजार प्रभावित, छोटी मूर्तियां प्रचलन में
Washim, Maharashtra:वाशिममध्ये गणेशोत्सवाच्या काळात पावसाच्या पृष्ठभूमीचा परिणाम आता गणेश मूर्तीनां बाजारावर दिसून येत आहे. वाशिमच्या शेलूबाजारसह जिल्ह्यातील नदी-नाले आणि जलस्रोतांमध्ये पुरेसा पाणीसाठा नसल्याने मोठ्या मूर्त्यांच्या विसर्जनाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे भक्तांकडून मोठ्या मूर्त्यांऐवजी लहान मूर्त्यांना पसंती दिली जात आहे. याचा फटका मोठ्या मूर्तिकारांना बसला असून, अनेक महिने मेहनत घेऊन तयार केलेल्या मूर्तींची विक्री कशी होणार, याची चिंता त्यांना लागली आहे. प्रशासनाने कृत्रिम विसर्जन कुंड आणि पर्यायी पाण्याची व्यवस्था उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी होत आहे.0
0
Report
चांदवड-मनमाड मार्ग पर दो ट्रकों की भीषण भिड़ंत, यातायात पांच घंटे बाधित
Chandvad, Maharashtra:चांदवड ब्रेक मालेगाव मनमाड रस्त्यावर चांदवड तालुक्यातील कानडगाव शिवारात दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात.... ओव्हरटेक करण्याच्या नादात दोन कंटेनरची समोरासमोर धडक... अपघातामुळे नगर मनमाड महामार्गावरची वाहतूक सुमारे पाच तासांपासून विस्कळीत... अपघातात दोन्ही बाजूची वाहतूक नांदगाव मार्गे वळवली.... महामार्ग पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल... अपघात ग्रस्त वाहने बाजूला करण्याची कारवाई सुरू... अपघातात दोन्ही मालवाहू ट्रक मधील चौघेजण जखमी.....0
0
Report
Advertisement
पुणे-बेंगलूर राष्ट्रीय राजमार्ग पर सातारा-खंडाळा क्षेत्र में भारी ट्रैफिक जाम
Satara, Maharashtra:सातारा :पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर पारगाव-खंडाळा परिसरात सातारच्या दिशेने जाणाऱ्या मार्गावर मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने महामार्गावर वाहतूक संथ गतीने सुरू आहे. सध्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने मुंबईहून गणेश भक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात जात असतात.सातारच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची संख्या वाढल्याने वाहनधारकांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. कोंडीमुळे वाहनचालकांचा वेळ वाया जात असून, प्रवाशांमध्येही नाराजीचे वातावरण आहे.मह महामार्गावर वाहतूक सुरळीत करण्यासाठी प्रशासन आणि महामार्ग यंत्रणेने उपाययोजना करताना पाहायला मिळत आहे。0
0
Report
अमृता फड़णवीस ने महाराष्ट्र के लिए दिल्ली दौरे और आरक्षण पर स्पष्ट टिप्पणी की
Ahilyanagar, Maharashtra:सणवाराचे दिवस लक्षात घेऊन माझा भाऊ जे करायचं ते शांतीपूर्वकच करतील असं अमृताअ फडणवीस यांनी मनोज जरंगे पाटील यांना उद्देशून म्हटल आहे. मनोज जरंगे पाटील यांनी मुंबईला येण्याचा इशारा दिला होता यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिले आहे. अहिल्यानगर येथे समर्पण चतुर्मास कार्यक्रमात त्यांनी हजेरी लावली. यावेळे त्या माध्यमांशी बोलत होत्य/, मराठा आरक्षणाचा विषय हा संवेदनशील असून राज्य सरकार त्यावर मार्ग काढेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमृता फडणवीस ऑन देवेंद्र फडणवीस दिल्ली दौरा देवेंद्र फडणवीस हे सातत्याने दिल्ली दौरा करतात, त्यामुळे भविष्यात ते दिल्लीमध्ये जाऊन राजकारण करतील अशा राजकीय चर्चा सुरू असतात... याबाबत बोलताना अमृता फडणवीस म्हणाल्यात की ते दिल्ली दौरा करतात मात्र महाराष्ट्रासाठी अनेक योजना मंजूर करून आणायचे असतात ते महाराष्ट्रासाठी झटतात याचा मला अभिमान आहे असं म्हणत त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत प्रतिक्रिया दिली आहे. अमृता फडणवीस ऑन बँक कर्मचारी संप पाच दिवसांचा बँकिंग आठवडा लागू करावा, तसेच कामगिरीशी निगडित प्रोत्साहनपर भत्त्यातील भेदभाव दूर करून द्विपक्षीय करारातील तरतुदींची प्रामाणिक अंमलबजावणी करावी या प्रमुख मागण्यांसाठी देशभरातील बँक कर्मचारी आंदोलन करत आहेत, यावर अमृता फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली असून याबाबदाबत केंद्र सरकार आणि राज्य सरकार याबत मार्ग काढेल... आंतरराष्ट्रीय बँका या शनिवार आणि रविवार सुट्टी देतात मात्र आपल्याकडे खाजगी आणि सरकारी बँक अद्याप सुट्ट्या देत नाही मात्र हा धोरणात्मक निर्णय आहे आणि त्यावरती लवकरच तोडगा निघेल असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे.0
0
Report
जनवरी-15 मई के दौरान नागपुर हवाई अड्डे ने रिकॉर्ड राजस्व दर्ज किया
Nagpur, Maharashtra:नागपूर - 1 जानेवारी ते 15 मे 2026 या साडेचार महिन्यांच्या कालावधीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाला विविध माध्यमांतून 74 कोटी 86 लाख रुपयांचा महसूल मिळाला आहे. - माहिती अधिकारातून प्राप्त झालेल्या माहितीतून ही आकडेवारी समोर आली आहे. - तेच 1 जाणवरी ते 15 मे या कालावधीत नागपूर विमानतळावर 12 लाख 22 हजारांहून अधिक प्रवाशांची ये-जा झाली. - जानेवारीत सुमारे 2.86 लाख, फेब्रुवारीत 2.82 लाख, मार्चमध्ये 2.62 लाख आणि एप्रिलमध्ये 2.51 लाख प्रवाशांची नोंद झाली. - मे महिन्याच्या पहिल्या 15 दिवसांत सुमारे 1.39 लाख प्रवाशांनी विमानतळाचा वापर केला. - प्रवासी वाहतुकीत मुंबई आणि पुणे आघाडीवर असले तरी, महसुलाच्या बाबतीत नागपूर विमानतळाची ही साडेचार महिन्यांची कामगिरी उल्लेखनीय ठरत आहे.0
0
Report
Advertisement
मुंबई के बोरिवली पूर्व होटल के खाने में कॉकरोच, वीडियो वायरल
Mumbai, Maharashtra:जेवणाच्या ताटात चक्क कॉकरोच आढळला मुंबईतील बोरिवली पूर्व परिसरातील सुस्वागत हॉटेलमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. जेवणासाठी आलेल्या एका ग्राहकाच्या नॉनव्हेज पदार्थाच्या प्लेटमध्ये चक्क कॉकरोच आढळल्याचा आरोप करण्यात आला आहे. ग्राहकाने जेवण मागवल्यानंतर प्लेटमध्ये कॉकरोच दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच ग्राहक संतापला. त्यानंतर ग्राहकाने प्लेटमधील कॉकरोचचा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेमुळे हॉटेलमधील अन्नाच्या स्वच्छतेचा आणि खाद्यपदार्थांच्या गुणवत्तेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. दरम्यान, ग्राहकांनी हॉटेलमधील अन्नपदार्थ घेताना त्यांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासणे गरजेचे असल्याचे आवाहन केले आहे. या प्रकरणी संबंधित हॉटेल प्रशासनाची भूमिका अद्याप समोर आलेली नाही.0
0
Report
BMC की कार्रवाई पर Borivali Goregaon बीच होटल में स्थानीय विरोध
Mumbai, Maharashtra:बोरिवली गोरेगाई बीच क्षेत्र के होटल पर BMC की कार्रवाई; locals विरोध मुंबई के बॉरिवली गोरेगाई बीच क्षेत्र में एक होटल पर नगर निगम (BMC) की टीम ने कार्रवाई की खबर सामने आई है. उस होटल पर कार्रवाई करते समय पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, यह सवाल अब स्थानीय लोग उठा रहे हैं. BMC की कार्रवाई के दौरान होटल में आग लगने का आरोप भी locals ने किया है. इस कार्रवाई के क्षेत्र के कुछ स्थानीय नागरिकों ने विरोध किया है, जबकि महापालिका ने किन नियमों के आधार पर यह कार्रवाई की, इसकी स्पष्टता दी जाए, ऐसी मांग की जा रही है. कारवाई से पहले आवश्यक कानूनी प्रक्रिया और पुलिस की अनुमति ली गई थी या नहीं, इसकी जांच करने की मांग locals ने की है. इस बीच, इस पूरी घटना पर BMC प्रशासन की आधिकारिक भूमिका क्या है, साथ ही होटल के खिलाफ कब-क्या कार्रवाई की गई, इसका सभी को इंतजार है.0
0
Report
सूखे से मालेगांव के किसान परेशान, सरकार से हेक्टेयर पर एक लाख मदद की मांग
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर: मालेगाव तालुक्यातील धनकुटे परिसरात पावसा अभावी शेतकऱ्यांची पिकं पूर्णतः सुकून गेली असून. चुकलेली पिकं पाहून शेतकऱ्यांच्या डोळ्यात अक्षरशः अश्रू आलेत. मोठा खर्च करून वाढवलेलं खाते येणे आधीच करपून गेल्यानंतर शेतकरी पूर्णतः खचले असून पुढचा उदरनिर्वाह कसा करायचा असा गंभीर प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिलाय. त्यामुळे आता मालेगाव तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून सरकारने हेक्टरी किमान एक लाख रुपये मदत द्यावी अशी मागणी या भागातील शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे。0
0
Report
Advertisement
