icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सीवूड रेलवे स्टेशन के पास अवैध भंगार दुकान से ड्रग्स तस्करी खत्म, पुलिस ने बुलडोजर चलाया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांचा बुलडोजर आता अमली पदार्थ तस्करांच्या अवैध मालमत्तेवर पूर्ण क्षमतेने फिरू लागला आहे. दिघा परिसरातील शांताबाई करंडेकर टोळीचे साम्राज्य उद्ध्वस्त केल्यानंतर, आता नेरूळमधील सीवूड रेल्वे स्थानक परिसरात अमली पदार्थांचा अड्डा बनलेले भंगाराचे दुकान नवी मुंबई पोलिसांनी जमीनदोस्त केले आहे. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर सुरू झालेल्या या कारवाईमुळे नवी मुंबईतील अमली पदार्थ तस्करांमध्ये प्रचंड खळबळ उडाली आहे. सीवूड रेल्वे स्थानकाच्या बाजूला असलेल्या सेक्टर २८ मध्ये राजू राठोड नावाचा इसम भंगार व्यवसाय करायचा. त्याच्यावर अमली पदार्थ विरोधी पथकाने अंतर्गत दोन गंभीर गुन्हे दाखल केले असून, तो सध्या कारागृहात आहे. मात्र, त्याच्या कारावासाचा फायदा घेऊन त्याची पत्नी त्याच ठिकाणी भंगार व्यवसायाच्या नावाखाली गुपचूप अमली पदार्थांची तस्करी करत होती. पोलिसांच्या निगराणीत ही बाब निदर्शनात आल्यानंतर त्यांनी तातडीने पावले उचलली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप निगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी या परिसराची पाहणी केली. अंमली पदार्थांचा अड्डा म्हणून वापरले जाणारे हे भंगाराचे दुकान बेकायदेशीर असल्याचे स्पष्ट होताच, पोलिसांनी नवी मुंबई महापालिकेशी समन्वय साधला. त्यानंतर आज सकाळच्या सुमारास पोलिसांनी बुलडोझरच्या साहाय्याने हे दुकान पूर्णपणे निष्कासित केले. दुकानातील सर्व भंगार साहित्य टेम्पोमध्ये भरून थेट डम्पिंग ग्राउंडला रवाना करण्यात आले असून, हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे.
0
0
Report

नवी मुंबई में महाराष्ट्र दिवस पर महापौर ने राष्ट्रध्वज वंदन कर्मचारियों को सम्मानित किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा मुख्यालयात महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनानिमित्त राष्ट्रध्वजवंदन समारंभ उत्साहात पार पडला. महापौर सुजाता पाटील आणि आयुक्त कैलास शिंदे यांच्या उपस्थिती मध्ये हा समारोह पार पडला. यावेळी कामगार दिनाच्या निमित्ताने महानगरपालिकेतील विविध विभागांमध्ये कार्यरत कर्मचाऱ्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. विशेषतः सफाई कर्मचारी, पाणीपुरवठा विभागातील कर्मचारी तसेच इतर महत्त्वाच्या सेवेत योगदान देणाऱ्या कर्मचाऱ्यांचे कौतुक करत प्लास्टिक मुक्त नवी मुंबईचा संकल्प करण्यात आलाय.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

बीड़ पुलिस ने महा चोर को पकड़ा; कर्नाटक-गुजरात सहित 35 चोरी मामले दर्ज

Beed, Maharashtra:बीड़: अनेक राज्यों के पुलिस को चुनौती देने वाला महा चोऱटा बीड़ पुलिस ने पकड़ा। महाग़ड़ों वस्तुओं पर ध्यान देकर अत्यंत शातिर तरीके से चोरी करने वाला कल्याण के एक चोर को बीड़ पुलिस ने गिरफ्तार किया है। बीड़ की साई मोबाइल शॉप में लाखों रुपए के महंगे फोन चोरी हुए थे। सीसीटीवी के आधार पर उसे कल्याण से बड़ी चतुराई से गिरफ्तार किया गया है। रामानिवास मंजू गुप्ता नाम है उस चोर का। महाराष्ट्र के साथ कर्नाटक, गुजरात पुलिस उसे खोज रही थीं। उसने अब तक 35 से अधिक चोरी के मामले किए हैं। वह किसी गैंग से जुड़ा नहीं है। देश भर में जाकर वह अकेला चोरी की घटनाएं करता है। इसलिए अन्य राज्यों की भी पुलिस ने उसे चुनौती दी थी। आखिर बीड़ पुलिस ने उसे गिरफ्तार कर लिया है और उसे अदालत ने पाँच दिनों की पुलिस हिरासत सुनाई है।
0
0
Report
0
0
Report
Advertisement

सांगली में मराठा सम्मान मोर्चा: नकाशा बदलाव के विरोध में भारी प्रदर्शन

Sangli, Maharashtra:मराठा साम्राज्य नकाशा बदला जाने के निर्णय के विरोध में सांगली में मराठा सम्मान मोर्चा निकला। छत्रपती शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने यह सर्वपक्षीय मोर्चा काडण्यात आला। सातारयाचे छत्रपती कल्पनाराजे भोसले यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढण्यात आला। शहरातील स्टेशन चौक पासून छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापर्यंत मोर्चामध्ये मोठ्या संख्येने शिवप्रेमी मावळे सहभागी झाले होते। मोर्चानंतर आयोजित सभेमध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील काँग्रेस आमदार विश्वजीत कदम हे देखील सहभागी झाले होते, तर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोर्चाचा सभेच्या ठिकाणी येऊन निवेदन स्वीकारत पाठपुरावा करण्याचा आश्वासन दिले.
0
0
Report

भुजबळ के मराठी भाषा और गैस दर पर राजनीति गर्म: महाराष्ट्र की राजनीति में नया मोड़

Yeola, Maharashtra:येवला मंत्री छगन भुजबळ प्रेस पॉईंट छगन भुजबळ ऑन राज ठाकरे (मराठी भाषेला नेते जबाबदार आहे) ठीक है पर ये एका दिवसात झाले का,एक वर्षात झाले,याच्या मागील इतिहासात जावे लागेल.... एक मात्र बरोबर आहे ज्या राज्यात राहतो ती भाषा आलीच पाहिजे... आमचे मराठी भाषिक व्यवसायासाठी दुसऱ्या राज्यात जातात ते तिकडची भाषा बोलतात... कुठलीही भाषा ही आलीच पाहिजे,पहिल्या पासूनच लक्ष दिले असते तर ही वेळ आली नसती.. मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे,माझे असे मत आहे की आठवड्यातून एक दिवस किंवा 1 तास मराठी भाषा जुजबी मराठी भाषा बोलता आलेच पाहिजे... आणि मग कोणी म्हटले की मी मराठी बोलणार नाही मग ते बरोबर आहे आज जे चालले आहे,...जे लोक काही करतात त्याला नाईलाज आहे छगन भुजबळ ऑन मुख्यमंत्री मराठी भाषा हिंसा मान्य नाही मात्र मराठीचा जर कोणी अपमान करत असेल... ठीक आहे तुम्ही सांगा मी शिकेल.... भाषेचा अपमान करता येणार नाही... छगन भुजबळ ऑन गॅस दरवाढ गॅस कुढून येतो कसा येतो, आपल्या सगळ्यांना माहित आहे.. इराण या गावातील सगळे येतात... आपल्याकडे महाग आहे मात्र बाकीच्या ठिकाणी मिळतच नाहीये.... बांगलादेश पाकिस्तान तिकडे तर मिळतच नाहीये... एखाद्या गोष्टीत डिमांड आणि सप्लाय मध्ये फरक पडला तर नक्कीच त्याच्या किमती कमी- जास्त होत असतात... मात्र मोदी साहेबांच्या प्रयत्नांमुळे, पहिले 27 देशातून गोळा करत होता, आता 40-45 देशातून करतोय... त्यामुळे आपल्या चाललंय... ज्यांचे चार-पाच कोटीचे देश आहे त्यांचे बंद पडले,मात्र आपल्या 140 कोटीचा देश असून देखील भारत सरकारच्या प्रयत्नांमुळे चाललाय सर्व... छगन भुजबळ ऑन सुप्रिया सुळे चांगली गोष्ट आहे स्वागत आहे त्यांच.... त्याच्यात काहीही वाईट नाही... त्यांनी एक रोड मॅप आखून दिला आहे.पवार विरुद्ध पवार कुटुंबीयांनी लढायचं नाही चांगली गोष्ट आहे... चांगली गोष्ट आहे. छगन भुजबळ ऑन बच्चू कडू शिवसेना प्रवेश त्यांनी शिंदे शिवसेनेत प्रवेश केला आमदार झाले मला एवढेच माहित आहे.... छगन भुजबळ ऑन फसल विमा योजना मला काही कल्पना नाही चौकशी करतो काय आहेत ते.... छगन भुजबळ ऑन महाराष्ट्र दिन 1960 साली मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र मिळाला.. 107 हुतात्मे यावेळी आपल्याला कामी आले.... अनेक नियम टाकून दिलेले होते... महाराष्ट्र काही होत नव्हता मुंबई र आम्हाला गुजरात पाहिजे बाईट : छगन भुजबळ
0
0
Report
Advertisement

गैस दर बढ़ने से महंगाई की नई चपेट, आम आदमी की परेशानियाँ बढ़ीं

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, बाईट (on व्यावसायिक गॅस दरवाढ ) -- ही तर आता सुरुवात आहे.. लवकरच घरगुती गॅस सिलेंडरचे किमती वाढतील.. निवडणुका संपल्या आहेत... -- गरज सरो वैद्य मरो... गेल्या पंधरा दिवस देश होता कुठे. सर्व प्रचारात होते सगळे... गृहमंत्री, पंतप्रधान,राज्याचे मुख्यमंत्री पश्चिम बंगालच्या आमच्या ममता दीदीला हरवण्यासाठी भाजपने घाम गाळला... जुमलेबाजी, एसआयआरच्या नावाखाली अनेकांची मत कापल्या गेली -- त्यानंतर आता महागाईचा नवा अध्याय सुरू होत आहे... त्याची सुरुवात झाली आहे... गॅस दर वाढ झाल्यामुळे महागाई प्रचंड वाढेल.... सामान्यांना न परवडणारे दर सोसावे लागतील... या सरकारला निवडणुका जिंकण्यापलीकडे सामान्य माणसाबाबत काहीच वाटत नाही... हे सिद्ध झालंय जनता अंत बघत आहे.याचा कुठे ना कुठे अंत होईल. शेवट होईल सहन तरी किती होईल (on स्वगणना) -- स्वगणना असो जनरल जनगणना यामध्ये ओबीसीला कुठे स्थान दिलं नाही ओबीसीचा कॉलम नाही.. पंतप्रधानांनी फार मोठी घोषणा करून ओबीसीच्या तोंडाला पान पुसण्याचे काम केलं... आम्ही ओबीसीची स्वतंत्र जनगणना करू असे म्हटले... आता मात्र ते घोषणेला विसरून गेले... ओबीसीला वाऱ्यावर सोडवण्याचे काम केले.. तोंडाला पान पुसले -- ओबीसीच्या लोकसंख्येप्रमाणे त्यांच्या वाट्याला बजेटमध्ये तरतूद करून त्यांच्या हिस्स्याचे दिले गेले पाहिजे ही मागणी राहुल गांधी यांनी अनेक वर्ष केल्यानंतर सरकार झुकलं... देतो म्हणून सांगितलं करतो म्हणून सांगितलं... मात्र तो वेळ काढूपणा होता... ओबीसीची धोकेबाजी होती हे सिद्ध झालं आहे... जर देशाचे पंतप्रधान स्वतःला ओबीसी म्हणून घेत असतील... तर जनगणनेमध्ये ओबीसीचा कॉलम का ठेवला नाही याचे उत्तर पंतप्रधानांनी दिलं पाहिजे
0
0
Report

पंढरपुर में एक ही दिन गुमशुदा और हत्या, पति पर हत्या का आरोप पुख्ता

Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात एकाच दिवशी महिला बेपत्ता झाल्याची व एक अनोळखी महिला मृत्यू पावल्याची पोलिसात नोंद झाली होती. या दोन्ही घटनांचा पोलिसांनी तपास केल्यानंतर बेपत्ता झालेली व मृत पावलेली महिला एकच असल्याचे सिद्ध झाले. मात्र यामध्ये खरा ट्विस्ट पुढे आला. महिलेचा म्हणजेच एश्वर्या सरवदेचा मृत्यू कसा झाला ? याचा तपास पोलिसांनी सुरू केल्यावर instagram , फेसबुक, व्हाट्सअप स्टेटस अशा माध्यमातून तपास सुरू केला. आणि इंस्टाग्राम व व्हाट्सअप स्टेटस च्या आधारे मोबाईल एक्टिवेशनची माहिती समोर आली. यावेळी मयत एश्वर्याच्या पतीकडे चौकशी केल्यावर एश्वर्याची हत्या तिचा पती हरी सरवदे यानेच केल्याचे पुढे आले. यामध्ये व्हाट्सअप इंस्टाग्राम वर संबंधित महिला सातत्याने चॅटिंगच करते. हा राग मनात धरून हे कृत्य केल्याचेही पोलीस तपासात पुढे आले आहे. चारित्र्याचा संशय देखील या प्रकरणात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असल्याची माहिती सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रशांत डगळे यांनी दिली...
0
0
Report
Advertisement

नंदूरबार में बर्ड फ्लू: 1.4 लाख मुर्गों की किलिंग, कंटेनमेंट Joन घोषित

Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यामध्ये पुन्हा बर्ड फ्लूचा उद्रेक झाल्याचा समोर आलेला आहे. तीन पोल्ट्री फार्ममध्ये बर्ड फ्यूचे लागण झालेले आहे. या संपूर्ण परिसराला प्रतिबंधित करण्यात आलेला आहे. बर्ड फ्ल्यू नियंत्रणासाठी प्रशासन सज्ज झाला असून उपाययोजनांना सुरुवात करण्यात आलेली आहे. बर्ड फ्ल्यू च्या शिरकाव झाल्याने एक लाख ४० हजार कोंबड्यांचे किलिंग केले जाणार आहे. तीन पोल्ट्री फार्मचे सॅम्पल इंदूरच्या प्रयोगशाळात पाठवले होते ते सॅम्पल पॉझिटिव्ह आले आहे. एक तालुकास्तरीय समिती तयार करण्यात आली असून, नवापूरच्या परिसरातील सर्व पोल्ट्री फार्म ची आता सॅम्पल घेतले जाणार आहेत.... पॉझिटिव्ह आलेल्या पोल्ट्री फार्मच्या एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्यांची किलिंग केली जाणार आहे.... एक किलोमीटरच्या परिसरात असलेल्या सहा पोल्ट्री फॉर्ममध्ये एक लाख ४० हजार कोंबड्या आहेत त्यांच्या कलिंग होणार.... येथे नवापूरच्या परिसरात दहा लाख कोंबड्या आहेत त्यामुळे या सर्व कोंबड्यांना आता धोका होण्याची शक्यता आहे.... बर्ड फ्लू च्या शिरकाव होऊ नये यासाठी तीन किलोमीटरच्या कंटेनमेंट जॉन आणि पाच किलोमीटरच्या बफर झोन म्हणून मार्किंग करण्यात येणार आहे..... बर्ड फ्ल्यू च्या शिरीगाव झाला आहे त्यामुळे निष्काळजीपणा करणाऱ्या पोल्ट्री फार्म संचालकांवर कारवाई होणार.... ज्या पोल्ट्री फार्म च नुकसान होणार त्यांच्या माहिती शासनाकडे पाठवून शासनाच्या नियमानुसार त्यांना मदत दिली जाणार आहे....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top