icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी पुलिस भोंदू खरात समेत जमीन व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी करेगी

Shirdi, Maharashtra:शिर्डी पोलिस करणार भोंदू खरात सह जमीन व्यवहारातील साक्षीदारांची चौकशी... मला गोत्यात आणण्यासाठी साक्षीदारांनी भूमिका बदलली , भोंदू खरात याने दिली पोलिसांना चौकशीत माहिती... शिर्डीतील जमिनीचा व्यवहार पूर्ण कायदेशीर... सावकारी करण्यासाठी हा व्यवहार केला नाही... मी जमीन मागायला जमीन मालकाकडे गेलो नव्हतो , ते आणि त्यांचे समवेत असणारे माझ्याकडे आले... काल पाच तासांहून अधिक वेळ करण्यात आली भोंदू खरात याची चौकशी... जमीन व्यवहारातील साक्षीदार प्रभाकर गुंजाळ , भाऊसाहेब चौधरी , सचिन वाणी या साक्षीदारांची होणार चौकशी तर शिर्डीतील व्यावसायिक मयत जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके हे देखील व्यवहाराला असल्याची दिली भोंदू खरात याने शिर्डी पोलिसांना माहिती... महेंद्र शेळके यांची देखील शिर्डी पोलिसांकडून होणार चौकशी.. विश्वसनीय सूत्रांची माहिती... भोंदू खरात आणि साक्षीदारांची समोरासमोर शिर्डी पोलिस चौकशी करणार असल्याने धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता... याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report

नवी मुंबई एपीएमसी मार्केट में आयुक्त ने कचरे से अस्वच्छता पर कड़ा एक्शन लिया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा आयुक्त कैलास शिंदे यांनी एपीएमसी फळ आणि भाजी मार्केट परिसराची पाहणी केली. यावेळी आयुक्तांना ठिकठिकाणी कचऱ्याचे ढिगारे आणि अत्यंत अस्वच्छ परिस्थिती आढळून आली. भाजी मार्केटमध्ये पाहणीसाठी जात असताना आयुक्तांना चक्क कचऱ्याच्या ढिगाऱ्यातूनच मार्ग काढत जावे लागले. या प्रकारामुळे संतপ্ত झालेल्या आयुक्तांनी बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना चांगलाच दम भरला. तुम्हावर गुन्हा दाखल करायला हवा ही परिस्थिती अजिबात सहन केली जाणार नाही अशा शब्दांत आयुक्तांनी नाराजी व्यक्त करत तात्काळ साफसफाई करण्याचे आदेश दिलेत.
0
0
Report

नंदनवन पुलिस थाना क्षेत्र में मां-बेटी की आत्महत्या का रहस्य, जांच जारी

Nagpur, Maharashtra:2c ला नंदनवन पोलीस स्टेशन चा संग्रहित व्हिडिओ जोडला आहे नागपूर नंदनवन पोलीस स्टेशन हद्दीत गाडगेनगरातील एका बंद घरामध्ये आई मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडालीय. त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण समोर आले नसले तरी ही आत्महत्या आहे की काय या दिशेने पोलिसांचा तपास सुरू आहे. नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. काही दिवसांअगोदर नंदनवन पोलीस ठाण्याच्या हद्दीतच आणखी एका मायलेकीने आत्महत्या केली होती. तुलसाबाई माधवराव वाढई (65 वर्ष) व संगीता माधवराव वाढई (48 वर्ष) अशी मृतक आई-लेकीची नावे आहेत. दोघीही 2मे रोजी अखेरच्या घराजवळ दिसल्या होत्या. त्यानंतर त्यांच्या घराचा दरवाजा बंदच होता. त्यांचा मुलगा निलेश हा गुजरातमधील अहमदाबाद येथे नोकरीला आहे. त्याचे 2 मे रोजी तुलसाबाई यांच्याशी अखेरचे बोलणे झाले होते. त्यानंतर त्याचा त्यांच्याशी संपर्क झाला नव्हता. मात्र थांबलेल्या नातेवाईकांना विचारणा केली. प्रत्यक्ष घरी नातेवाईक गेल्यावर दरवाजा बंद दिसला. पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी दरवाजा उघडला असता दोघीही मृतावस्थेत पडलेल्या दिसून आला. दोघींचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले. तसेच फॉरेन्सिक पथकालादेखील पाचारण करण्यात आले. दोघींचाही मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत अद्याप स्पष्टता येऊ शकलेली नाही. मात्र ही आत्महत्या आहे का या दिशेने चौकशी करण्यात येत आहे. 1 मे रोजी व्यंकटेशनगरात संगीता श्रीराम ढबाले (52) आणि त्यांची मुलगी आकांक्षा लोकेश ब्रह्मे (29) यांनी आत्महत्या केली होती. त्या प्रकरणात आकांक्षाच्या पतीसोबत सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केलाय
0
0
Report
Advertisement

वाशीम डम्पिंग ग्राउंड में आग, धुएँ से स्वास्थ्य समस्या; स्थलांतर और वृक्षारोपण की योजना

Washim, Maharashtra:वाशीम शहरातील सर्व कचरा हिंगोली नाका परिसरातील डम्पिंग ग्राऊंडमध्ये टाकला जातो. मात्र, येथे वारंवार आग लागण्याच्या घटना घडत असल्याने कचरा जळून दुर्गंधीयुक्त धूर परिसरात पसरत आहे. त्यामुळे नागरिकांना श्वास घेण्यास त्रास होत असून विशेषतः लहान मुले, वृद्ध आणि श्वसनविकार असलेल्या रुग्णांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. लोकवस्तीजवळच डम्पिंग ग्राऊंड असल्याने नागरिकांकडून ते शहराबाहेर हलवण्याची मागणी केली जातं आहे. बाईट:भुषन गायकवाड,नागरिक बाईट:साबीर मिर्झा,नगरसेवक बाईट:आदिल अहमद,नागरिक बाईट:मोहम्मद रियाज,नागरिक बाईट:जुनेद मुल्लाजी,नागरिक बाईट:ओमप्रकाश फड,नागरिक बाईट:भागवत सावके,नागरिक व्हिओ:उन्हाळ्यात वाढलेल्या तापमानामुळे कचऱ्यातून निर्माण होणाऱ्या गॅसमुळे आग लागण्याच्या घटना घडत असल्याची माहिती नगरपरिषद प्रशासनाकडून देण्यात आली. या पार्श्वभूमीवर वारंवार उपाययोजना करण्यात येत असून डम्पिंग ग्राऊंड शहराबाहेर स्थलांतरित करण्याचा ठराव नगरपरिषदेकडून मंजूर करण्यात आला आहे. येत्य काळात सध्याचे डम्पिंग ग्राऊंड शहराबाहेर स्थलांतरित करण्यात येणार आहे. तसेच या जागेवर मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करून गार्डन विकसित करण्यात येईल. त्यामुळे परिसरातील नागरिकांची समस्या दूर होण्यास मदत होईल. असे वाशिम नगर परिषदेचे मुख्याधिकारी निलेश गायकवाड यांनी सांगितले. शहरातून येणारा कचरा योग्य प्रकारे विलगीकरण न करता डम्पिंग ग्राऊंडवर आणला जात असल्याने त्याच्या विल्हेवाट प्रक्रियेत अडचणी येत असल्याचे घनकचरा व्यवस्थापनासाठी कार्यरत NGOकडून सांगण्यात आले. डम्पिंग ग्राउंडच्या समस्येचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report

मराठवाड़े में तापमान बढ़ने से पानी संकट, 156 टैंकर से तीन लाख नागरिक पेयजल पा रहे

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याला वाढत्या तापमानाच्या झळा सोसाव्या लागत आहेत. विभागात कमाल तापमान ४० ते ४२ अंशांच्या आसपास नोंदविले जात आहे. त्याचा परिणाम जलसाठ्यांवर होत आहे. विभागातील ९२ गावे आणि वाड्यांमध्ये १५६ टँकरने पानीपुरवठा सुरू झाला आहे. मे महिना लागल्यामुळे हा आकडा वाढला आहे. छत्रपती संभाजीनगर, जालना, लातूर या तीन जिल्ह्यांतील गावांमध्ये सध्या टँकर सुरू आहेत. यात ३६ वाड्यांचा समावेश आहे. सुमारे तीन लाख नागरिकांना टँकरच्या पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. मराठवाड्याची राजधानी असलेल्या छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सर्वाधिक ११५ टैंकर सध्या सुरू आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये टँकरसाठी ३७, टँकर व्यतिरिक्त ४७ मिळून ८४ विहिरींचे अधिग्रहण केले आहे, तर जालन्यात ४२ व लातूरमध्ये २४ विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले. उर्वरित जिल्ह्यासंह २६८ विहिरी ताब्यात आहेत. १५६ खासगी, तर पाच शासकीय टँकरने सध्या पाणीपुरवठा सुरू आहे
0
0
Report
Advertisement

बढ़ते तापमान से डाळिंब बागों को नुकसान, किसानों ने शेडनेट से बचाव शुरू किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राज्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांनाही बसू लागला आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील डाळिंब उत्पादक शेतकऱ्यांनी कडक उन्हापासून फळबागांचे संरक्षण करण्यासाठी डाळिंब बागांवर मोठ्या प्रमाणात शेडनेटचे आच्छादन केले आहे. वाढत्या उष्णतेमुळे फळांची गुणवत्ता खराब होण्याची भीती असल्याने शेतकरी अतिरिक्त खर्च करून पिके वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत. दिवसेंदिवस वाढणाऱ्या तापमानामुळे डाळिंबाच्या फळांवर डाग पडणे, फळे खराब होणे आणि उत्पादन घटण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे उन्हाचा थेट परिणाम कमी व्हावा यासाठी बागांवर संरक्षणात्मक जाळी टाकण्यात आली आहे. शेतकऱ्यांकडून पिके टिकवण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जात असून वाढत्या उष्णतेने बागायतदारांची चिंता वाढली आहे. यावर्षी तापमानात वाढ झाल्यामुळे डाळिंब बागेला मोठा फटका बसला आहे. तीन एकरासाठी डाळिंब बागेवर आच्छादन करण्यासाठी जवळपास तीन लाख रुपये खर्च केले आहेत. वाढत्या तापमानामुळे 25 ते 30 टक्के उत्पादन घटनेची सुद्धा शक्यता आहे.
0
0
Report

बीड़ में चाचा ने ममेरे रिश्तेदार की नाबालिग के साथ दुष्कर्म, तीसरी घटना

Beed, Maharashtra:बीड: 29 वर्षीय भाच्च्याचा 10 वर्षीय मामाच्या मुलीवर अत्याचार; युसुफ वडगाव पोलीस ठाणे हद्दीतील गेल्या तीन दिवसातील तिसरी घटना ANC - बीडच्या केज तालुक्यात असलेल्या युसुफ वडगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत आधी आजोबांनी आपल्या नातीवर अत्याचार केले. त्यानंतर अंगणवाडी सेविकेवर गुंगीचे औषध देऊन अत्याचार करण्यात आले या दोन्ही घटना ताज्या असतानाच अत्याचाराची आणखी एक धक्कादायक घटना समोर आलीय. उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाच्या गावाला आलेल्या भाच्याने मामा - मामी रात्री शेतात पाणी देण्यासाठी गेल्याचे पाहुन संधी साधत.रात्री घरात एकटे असलेल्या मामाच्या 10 वर्षाच्या मुलीवर एकटी असल्याचा गैरफायदा घेत भाच्याने मामाच्या लहान मुलीवर अत्याचार केला.इतकेच नाही तर तो मुलगा मामा घरी येण्या अगोदर घरातून पळून गेला. यानंतर आई वडील घरी आल्यानंतर पीडितीने घडलेला प्रकार आईला सांगितला.आई वडिलांनी पोलीस ठाण्यात जाऊन भाच्या विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा दाखल होताच सदरील आरोपीस पोलिसांनी ईटकुर येथून अटक केलीये.या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में चार साल की बच्ची के अत्याचार पर जबरदस्त प्रदर्शन: संभाजी आरमार

Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापुरात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजी आरमार संघटनेचे आंदोलन नसरापूर येथे चार वर्षाच्या मुलीवर अमानुष अत्याचार करून खून करणाऱ्या आरोपीचा प्रतिकात्मक चौरंगा करून संभाजी आरमार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. जुने जिल्हाधिकारी कार्यालयाजवळ आंदोलन करत सरकारला सामान्य माणसांची भावना लक्षात यावी म्हणून चौरंगा आंदोलन करण्यात आल्याची भावना व्यक्त करण्यात आली. यावेळी संभाजी आरमार संघटनेच्या वतीने प्रतिकात्मक पुतळा तयार करून पुतळ्याचे हातपाय तोडून समाजात एक कठोर संदेश देण्याचा प्रयत्न करण्यात आला.
0
0
Report

छत्रपति संभाजी नगर में नया जल आपूर्ति योजना: 12 जून के बाद नियमित वितरण शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून शहराच्या çokतांश भागात १२ जूननंतर नियमित पाणीपुरवठा केला जाईल, असे मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात झालेल्या सुनावणीप्रसंगी स्पष्ट करण्यात आले, उच्च न्यायालय नियुक्त हावपॉवर कमिटीचे चेअरमन विभागीय आयुक्त जी. श्रीकांत यांनी २२ जूननंतर शहराला पाणीपुरवठघात तीन दिवसांपेक्षा जास्त खंड राहणार नसल्या Cheuit सुनावणीप्रसंगी न्यायालयास निवेदन केले. या वेळी न्या. रवींद्र घुगे व न्या. हितेन वेनेगावकर यांनी नवीन पाणीपुरवठा योजनेच्या पाण्याच्या वितरण आणि टेस्टिंगवाचतथा कालवद्ध कार्यक्रम दिला. त्यामध्ये १२ जूननंतर मुख्य एमवीआर ते ८ टाक्यांपर्यंत पाणी पोहोचवून प्रत्यक्ष वितरण सुरू करण्याच्या सूचना दिल्या. मजीप्रा व जीव्हीपीआरच्या वतीने १८ टाक्या तयार असल्याचे सांगितले. पश्चिम वंगालची निवडणूक झाल्याने कामगार परत येण्यास सुरुवात झाल्याने मनुष्यबळ वाढवण्यात येईल, असे न्यायालयासमोर सांगण्यात आले.
0
0
Report
Advertisement

अवैध संपत्ति के लिए अभय योजना: संभाजीनगर में अब निधि जुटाने की कोशिश तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगर विकास प्राधिकरणाच्या हद्दीतील अनधिकृत मालमत्ता आणि गुंठेवारी नियमित करण्यासाठी प्राधिकरणाने अभय योजना जाहीर केली है. यापूर्वी गुंठेवारीचे दर  जास्त असल्याने नागरिकांचा अल्प प्रतिसाद मिळत होता. मात्र, आता या नव्या अभय योजनेमुळे नागरिकांना गुंठेवारी करण्यास भाग पाडून त्या माध्यमातून प्राधिकरणाला निधी उपलब्ध करण्याचा प्रयत्न सुरू आहे. महानगरपालिकेमध्ये अभय योजनेला प्रचंड यश आल्यामुळे प्राधिकरण आयुक्तांनी या ठिकाणीदेखील प्रयत्न सुरू केले आहेत...
0
0
Report

जुन्नर में बिबट्या हमला: 10 वर्षीय बालक घायल, पिता ने बचाया

Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यात बिबट्याचा थरार; दुचाकीवर बसलेल्या 10 वर्षीय मुलावर हल्ला जुन्नर तालुक्यात पुन्हा एकदा बिबट्याच्या हल्ल्याची घटना समोर आली आहे. शिरोली बुद्रूक में गाव से घर की ओर जाते समय पिता के साथ दुचाकी पर बैठे 10 वर्षीय गणेश बोऱ्हाडे पर बिबट्ये ने हमला किया. इस हमले में लड़का घायल हो गया है और उसे ग्रामीण अस्पताल में उपचार जारी हैं. उस समय शिकारी के लिये दबा धरकर बैठे बिबट्ये ने अचानक दुचाकी के ऊपर बैठे बच्चे को निशाना बनाया. अचानक हुए इस हमले से क्षेत्र में हडकम्प मच गया. पर बच्चे के पिता ने स्थिति पर नियंत्रण रखा और बच्चे को बचा लिया. इसके बाद बिबट्या खेत की दिशा में फरार हो गया. घायल गणेश पर ग्रामीण अस्पताल में उपचार चल रहा है और घटना के बाद क्षेत्र के नागरिकों में, विशेषकर छोटे बच्चों में भय का माहौल बना हुआ है. वनविभाग से तात्कालिक उपाययोजना की मांग ग्रामस्थों द्वारा की जा रही है.
0
0
Report

जायकवाड़ी बांध से 20 टीएमसी गाद हटाने का प्रस्ताव मंजूर, पानी-सिंचाई संकट दूर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडी धरणाची साठवण क्षमता घटवणारा २० टीएमसी गाळ आता आंध्र प्रदेशच्या धर्तीवर उपसला जाणार आहे. राज्य शासनाचे हे महत्त्वाकांक्षी धोरण मंत्रिमंडळाच्या बैठकीत प्रस्ताव मंजूर होणार असून, यामुळे छत्रपती संभाजीनगर शहराच्या पिण्याच्या पॅाण्याचा आणि मराठवाड्यातील सिंचनाचा ५० वर्षांचा प्रश्न निकाली निघण्याची शक्यता आहे. जायकवाडीची मूळ साठवण क्षमता १०२ टीएमसी आहे. मात्र १९७६ पासून एकदाही गाळ न काढल्याने धरणात आता २० टीएमसी चिखल साचला आहे. शहराला वर्षाकाठी २ टीएमसी पाणी लागते. जर हा गाळ पूर्णपणे काढला, तर शहराला पुढील १० वर्षे पुरेल एवढा अतिरिक्त पाणीसाठा केवळ एका निर्णयामुळे निर्माण होईल. विशेष म्हणजे, यासाठी सरकारला कोणताही खर्च करावा लागणार नाही. उलट गाळ विकून तिजोरीत महसूल जमा होईल.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top