icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नांदेड दौरे पर कृषिमंत्री के काफिले को रोकने की कांग्रेस की कोशिश, हंगामा

Nanded-Waghala, Maharashtra:दुष्काळाची पाहणी करण्यासाठी दौऱ्यावर असलेले कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचा ताफा आणण्याचा प्रयत्न काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. कृषिमंत्र दत्तात्रय भरणे आज नांदेड दौऱ्यावर आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये कृषिमंत्री मराठवाडा विभागाचा दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. काल सायंकाळीच कृषी मंत्री नांदेड येथील शासकीय निवासस्थानी आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीसाठी जात असताना शासकीय विश्रामगृहात त्यांचा ताफा आणण्याचा प्रयास काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून करण्यात आला. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विठ्ठल पावडे आणि त्यांच्या शुभेच्छा सहकाऱ्यांनी गाडी समोर येण्याचा प्रयत्न करत घोषणाबाजी केली. कर्जमाफी झाली पाहिजे, शेतकऱ्यांना पिक विमा मिळाला पाहिजे अशा घोषणा देण्यात आल्या. काँग्रेस कार्यकर्त्यांनी कृषिमंत्रीची गाडी अडवण्याचा प्रयत्न केल्याने निर्माण गोंधळ निर्माण झाला होता. पोलीसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली. कृषिमंत्र्यांचा ताफा नियोजितस्थळी रवाना झाला. दुष्काळ जाहीर करण्याचे निवेदन देण्याचा प्रयत्न केला पण कृषिमंत्र्यांनी एकूण न घेता वेळ न दिल्याने ताफा अडवण्याचा प्रयत्न केल्याचे काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांनी सांगितले.
0
0
Report

सोलापूर में सूखे की फर्जी सूची वायरल, भाजपा नेताओं के नाम शामिल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्याची बनावट यादी व्हायरल, भाजपच्या अनेक महत्त्वाच्या पदाधिकाऱ्यांकडून सोशल माध्यमावर बनावट यादी व्हायरल सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर केल्याची बनावट यादी व्हायरल.. जिल्ह्यातील दहा तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती असल्याचे सांगत बनावट यादीत नावे जाहीर भाजपचे जिल्हाध्यक्ष शशिकांत चव्हाण यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाउंट वरून बनावट यादी होत आहे व्हायरल.. व्हायरल होत असलेल्या बनावट यादीत दुष्काळ सदृश्य परिस्थिती असलेल्या दक्षिण सोलापूर तालुक्याचा समावेश नसल्यामुळे चर्चेला उधाण.. एकीकडे गेल्या तीन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात पाऊस पडत नसल्यामुळे शेतकरी हैराण तर दुसरीकडे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी.. सोलापूर जिल्हा प्रशासनाने ही व्हायरल होणारी यादी बनावट असल्याचे केलं स्पष्ट.. जिल्ह्यातील अनेक भागात जिल्हा प्रशासनाकडून सध्या दुष्काळाची पाहणी सुरू..
0
0
Report

DJ चालकों का आमरण उपोषण: ध्वनी मर्यादा और नियमों में ढील की मांग

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर साऊंड , लाईट, जनरेटर असोसिएशनच्या वतीने आमरण उपोषण आंदोलन सुरू आहे...उपोषणाचा आजचा दुसरा दिवस आहे...शासनाने निश्चित केलेल्या ध्वनी मर्यादा आणि वेळेच्या नियमांचे पालन करून डीजे वाजवण्यास परवानगी द्यावी... तसेच साऊंड आणि ध्वनी यंत्रणेवरील सरसकट बंदी, अनावश्यक निर्बंध तत्काळ हटावे तसेच सार्वजनिक मिरवणुकावगळता लग्न समारंभ, शुभकार्यास पोलीस प्रशासनाने परवानगीची अट शिथिल करावी या मागणीसाठी आंदोलन असून जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचा पावित्रा आंदोलकांनी घेतला आहे...
0
0
Report
Advertisement
0
0
Report

बुलढाणा में डीजे से ध्वनि प्रदूषण के आरोप, मलकापूर पुलिस ने पहली कार्रवाई

Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्ह्यात सार्वजनिक उत्सव, मिरवणुका व इतर सांस्कृतिक व धार्मिक कार्यक्रमांमध्ये डीजे चा वापर करून ध्वनी प्रदूषण करणाऱ्या व नियमांचे उल्लंघन करणाऱ्या डीजे चालकांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येत आहे. काल मलकापूर शहरातील कर्णकर्कश व मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डीजे वाजवणाऱ्या भुसावळ येथील डीजे मालक आशिष रवींद्र अडकमोल यांच्या विरुद्ध मलकापूर शहर पोलिसांनी कारवाई करत कलम 136 महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे.. यामुळे जिल्ह्यातील डीजे मालक व चालकांमध्ये खळबळ उडाली आहे.. अलीकडच्या काळातील ही सर्वात मोठी कारवाई असून सर्वत्र डीजे बंदीची मागणी होत असताना मलकापूर मध्ये कारवाई झाल्याने खळबळ उडाली है.
0
0
Report

अकोला में सूखे से सोयाबीन फसल डूबी, किसानों ने तात्कालिक मदद की मांग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यात पावसाने पुन्हा दडी मारल्याने खरीप पिकांसह शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे. मूर्तिजापूर तालुक्यातील विरहित परिसरात पावसाच्या दीर्घ खंडाचा सर्वाधिक फटका सोयाबीन पिकाला बसला आहे. ऐन फुलोऱ्यात असलेली सोयाबीनची उभी पिके पाण्याअभावी जागेवरच वाळून जात असल्याचं चित्र आहे. जमिनीतील ओलावा कमी झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून फुले आणि शेंगाही सुकू लागल्या आहेत. पिकांना पाणी देऊन वाचवण्याचे शेतकऱ्यांकडून प्रयत्न सुरू असले तरी अपुरा आणि खंडित वीजपुरवठा त्यांच्या अडचणी आणखी वाढवत आहे, त्यामुळे हातातोंडाशी आलेलं पीक डोळ्यादेखत करपताना पाहण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.पाऊस आणखी लांबला तर सोयाबीनच्या उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. विशेष म्हणजे आता पाऊस झाला तरी करपलेल्या पिकांना त्याचा कितपत फायदा होईल, याबाबतही शेतकऱ्यांमध्ये चिंता आहे.पावसाअभावी केवळ पिकंच नाही, तर शेतकऱ्यांच्या आशाही कोमेजू लागल्या आहेत. त्यामुळे शासनाने तातडीने पीक नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर करावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर में विदर्भ ओबीसी बैठक: दिल्ली आंदोलन की रणनीति तय

Nagpur, Maharashtra:ओबीसी नेते विजय वडेट्टीवार आणि इतर ओबीसी नेत्यांच्या प्रमुख उपस्थितीत नागपुरात विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक. जातिनिहाय जनगणनेत स्वतंत्र कॉलम आणि राज्यस्तरावरील ओबीसींच्या विविध प्रश्नांवर आंदोलनाची रणनीती ठरणार. हिवाळी अधिवेशनाच्या काळात होणाऱ्या दिल्लीतील देशव्यापी आंदोलनासह राज्यभरात तालुका, जिल्हा व विभाग स्तरावर आंदोलनाची आखणी. केंद्र सरकारने आगामी जनगणनेत इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) स्वतंत्र कॉलम न देऊन ओबीसी समाजाचा मोठा विश्वासघात केला आहे. या अन्यायाविरोधात देशभरातील ओबीसी समाजात प्रचंड असंतोष खदखदत असून दिल्ली येथे होणाऱ्या देशव्यापी आंदोलनासाठी 'सकल ओबीसी महामोर्चा'च्या वतीने राज्यभर व्यापक जनजागरण करण्यात येत आहे सकाळी १०:३० वाजता नागपूर येथील MTDC हॉटेल, सिव्हिल लाइन्स येथे विदर्भस्तरीय ओबीसी, विजे-एनटी नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची अत्यंत महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक ओबीसी नेते विजय वडेट्टीवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडणार आहे. या बैठकीत प्रामुख्याने १३ सप्टेंबर रोजी दिल्ली येथे देशातील ६५ संघटनांच्या झालेल्या बैठकीतील निर्णयांवर सविस्तर चर्चा केली जाणार आहे. तसेच दिल्ली आणि महाराष्ट्र राज्यात तालुका, जिल्हा, विभाग व राज्य स्तरावर होणाऱ्या आंदोलनाची ठोस भूमिका व तारखा निश्चित करण्यात येतील. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर राज्य सरकारची दुटप्पी भूमिका आणि आंदोलकांच्या मागण्यांबाबत सरकारचा पुढाकार स्पष्टपणे दिसत असताना, दुसरीकडे ओबीसी विद्यार्थ्यांच्या हक्काच्या महाज्योती', वनार्टी' संस्थांना लोकसंख्येच्या आधारावर निधी आणि इतर मॅट्रिकपूर्व तसेच मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्तींबाबत सरकारकडून सुरू असलेली जाणीवपूर्वक चालढकल व वेळकाढूपणा आता ओबीसी समाज कदापि सहन करणार नाही, असा इशारा सकल ओबीसी महामोर्चाने दिला आहे. अनुसूचित जाती व अनुसूचित जमातींप्रमाणेच ओबीसींची स्वतंत्र कॉलमसह जातिनिहाय जनगणना झालीच पाहिजे आणि राज्य स्तरावर ओबीसींना भेडसावणाऱ्या विविध अडचणींवर मात करण्यासाठी प्रभावी कृती कार्यक्रम आखला पाहिजे, यावर या बैठकीत सखोल विचारमंथन होणार आहे.
0
0
Report

श्रीरामपुर के जानता राजा गणेशोत्सव में मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ने ढोल पर थिरककर मचाई धूम

Shirdi, Maharashtra:Anc - श्रीरामपूरच्या ‘जाणता राजा’ गणेशोत्सव मंडळात पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचा भन्नाट अंदाज पाहायला मिळाला.ढोलपथकाच्या दमदार वादनाने विखे पाटलांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.ढोल-ताशांचा आवाज आणि तरुणाईचा जोश पाहून पालकमंत्र्यांनाही मोह आवरला नाही.थेट ढोलपथकात शिरत विखे पाटलांनी ढोल हाती घेतला आणि तालावर ताल धरला.पालकमंत्र्यांचा हा उत्साही अंदाज पाहून उपस्थितांनीही जोरदार दाद दिली.सध्या विखे पाटलांच्या ढोल वादनाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आलाय...
0
0
Report
Advertisement
Advertisement

वाशिम में सूखा घोषित, खरीफ फसलें बर्बाद—किसानों को राहत की मांग तेज

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यासह मालेगाव तालुक्यात पावसाने तब्बल ५० ते ५५ दिवसांचा दीर्घ खंड दिल्याने खरीप हंगाम अक्षरशःकरपून गेला आहे. जिल्ह्याचं मुख्य पीक असलेलं सोयाबीन आता काढणीच्या उंबरठ्यावर असताना अनेक शेतांमध्ये वाळून गेलंय. यंदा या पिकातून उत्पादनाची कोणतीही अपेक्षा उरलेली नाही. डोळ्यांसमोर उभं पीक उद्ध्वस्त होताना पाहून शेतकरी हतबल झाले आहेत. वर्षभराची मेहनत आणि खर्च पाण्याअभावी वाया गेल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता अश्रू आहेत. त्यामुळे सरकारने वाशिम जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करून भरीव आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन त्यांच्या व्यथा आणि नुकसानीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top