445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
छात्र आंदोलन की जीत पर अंजली दमानिया ने जताई उत्साह
Mumbai, Maharashtra:अंजली दमानिया शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. अंजली दमानिया म्हणाल्या, “या देशातील प्रत्येक युवक-युवतीचे आणि या आंदोलनाचे नेतृत्व करणारे अभिजीत दिपके, सोनम वांगचूक तसेच त्यांच्या सहकाऱ्यांचे मनापासून अभिनंदन. हा विजय देशातील तरुणांच्या संघर्षाचा आहे.” त्यांनी पुढे सांगितले की, “या आंदोलनादरम्यान विद्यार्थ्यांवर लाठीमार झाला, अनेकांना अटक करण्यात आली, विविध प्रकारचा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. मात्र, इतक्या अडचणी असूनही तरुणांनी हार मानली नाही. त्यांचा हा संयम, धैर्य आणि लोकशाहीवरील विश्वास देशासाठी प्रेरणादायी आहे.” दमानिया म्हणाल्या, “देशात सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारण्याची हिंमत निर्माण झाली आहे. लोकशाही केवळ मतदानापुरती मर्यादित नसून सत्तेला जाब विचारणेही तितकेच महत्त्वाचे आहे. या आंदोलनाने ती ताकद देशातील तरुणांना दिली आहे.” तसेच त्यांनी उपोषणाला पाठिंबा देणाऱ्या सर्व आंदोलनकर्त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही मनापासून अभिनंदन करत, हा विजय लोकशाही आणि विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा असल्याचे सांगितले.0
0
Report
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे पर छात्र-युवाओं का विजय, वर्षा गायकवाड़ ने कहा
Mumbai, Maharashtra:वर्षा गायकवाड केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर काँग्रेस नेत्या वर्षा गायकवाड यांनी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. वर्षा गायकवाड म्हणाल्या, “इतिहासाने पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की, जेव्हा-जेव्हा या देशातील युवकांनी देशाची धुरा आपल्या हातात घेतली, तेव्हा विजय हा युवकांचाच झाला आहे.” त्या पुढे म्हणाल्या, “शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी देशभरातील विद्यार्थी आणि युवक रस्त्यावर उतरले. शांततामय आणि लोकशाही मार्गाने त्यांनी आपला आवाज बुलंद केला. या संघर्षामुळे आज युवकांचा विजय झाला असून धर्मेंद्र प्रधान यांना राजीनामा द्यावा लागला.” गायकवाड यांनी या आंदोलनात सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थी, युवक आणि आंदोलनकर्त्यांचे अभिनंदन करत, “लोकशाहीत जनतेचा आवाज सर्वात मोठा असतो. संघटित लढा आणि सातत्यपूर्ण आंदोलनामुळे हा विजय मिळाला आहे,” असेही त्यांनी सांगितले.0
0
Report
नितेश राणे पत्रकार परिषद के मुद्दे पर केंद्र-राज्य राजनीति तेज़
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे पत्रकार परिषद मुद्देOn प्रधान राजीनामा ----- या पुढे कोणीही पेपर लीक करण्याची हिंमत करणार नाही अशा पद्धतीचे कठोर व महत्वाचे निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेत. तरुणांचा आवाज ऐकण्याचे काम नरेंद्र मोदी साहेबांनी केलेय. भावनांचा आदर करून मंत्री प्रधान यांनी राजीनामा दिलाय. याबाबतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारचे आभार मानायला हवेत. आता जे जल्लोष करत आहेत. काँग्रेसने आपल्या काळात पेपर लीक झाल्यानंतर किती राजमाने घेतले. राहुल गांधी आणि त्यांच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्यांनी याच उत्तर द्याव. मनमोहन सिंग यांनी कधी स्पष्टीकरण दिलं का? मोदी साहेब वारंवार बोलत आहेत. मन की बात खऱ्या अर्थाने मोदी साहेब ओळखतात. On देवेंद्र फडणवीस मुंबई --- मुख्यमंत्री असल्याने ते दिल्लीला जातात. केंद्र आणि राज्य सरकार एकच विचारच आहे. On ठाकरे ( हुकुमशहा झुकला ) --- *वाघाची भाषा करणारे आता झुरळापर्यंत आलेत. खासदार निवडणून आले तेव्हा पाकिस्तान जिंदाबाद आणि सर तन से जुदा म्हणणारे. आता भारत माता की जय वर आलेत. बेगानी शादी मे..... काय काय दिवाना त्यातला हा प्रकार आहे. लोकांच्या बारशात जाऊन पेढे खाणारे हे लोक. या सगळ्या बाबतीत तुमचं योगदान काय? तुम्ही नीटच्या विद्यार्थ्यांसाठी आंदोलन करत होता का स्वतःच्या दोन मुलांसाठी आंदोलन करत होता.* On अभिनंदन ( ठाकरे ) --- आता त्यांच्याकडे पर्याय उरलेला नाही. निर्णय बदलायला भाग पाडलं. जे आंदोलन करत होते त्यात नीट चे किती विद्यार्थी होते ? त्यात सर तन से जुदा वाले पाकिस्तान जिंदाबाद वाले किती होते ? औरंगजेबाचे फोटो दाखवणारे किती होते ? कुणाल कामरा ज्याने आमच्या देवतांचा अपमान केला तो ठाकरेंच्या आंदोलनात होता. ह्यांना हिंदुत्वाचा विचार मानणारे आमचे बाळासाहेब ठाकरे आणि आता देवतांचा अपमान करणारे ठाकरेंच्या मोर्च्यात असतात. तर मग ह्यांना ह्यांना देवतांचा समर्थक बोलायचं की आयेशाच्या पतीचा समर्थक बोलायचं ? On शरद पवार -- लाठीचार्ज करण्याची वेळ का आली ह्याच उत्तर पोलिस चांगल्या पद्धतीने देऊ शकतात.20पी सोशल मीडिया अकाउंट पाकिस्तान वरून चालत असल्याचे आज पोलिसांच्या प्रेस मध्ये बघितले. देश विरोधी ताकद आमच्या तरुणाच्या खांद्यावर बसून देशात अराजकता आणन्याचा प्रयत्न करत असतील तर त्याला हे विरोधी पक्षाची मंडळी समर्थन करणार का ? On गो मांस --- टेम्पो सीमा पार कसे करतात याबाबत चौकशी होणार.. बिर्याणी खाणारे कोण आहेत त्याच्यावर आमचा बारीक लक्ष आहे. मी पालकमंत्री आहे त्यामुळे काही लोकांनी बिर्याणी सोडावी. एवढ भारी पडेल की गळ्यातली हड्डी बाहेर येणार नाही.0
0
Report
Advertisement
युवाओं के आंदोलन की जीत: संसद में भ्रष्टाचार पर बहस और पेपर लीक का मुद्दा
Mumbai, Maharashtra:अहंकाराची हार झालेली आहे आणि सत्ता संविधान आणि विद्वानांची झालेली असून मला या तिन्ही सत्ता प्रथम दशमी बोलू इच्छिते. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे धर्मेद्र प्रधान ही झाकी आहे. अजून खूप गोष्टी बाकी आहे. जोपर्यंत या नीट पेपर मध्ये सगळे भ्रष्टाचारी लोक ज्या गजाआड तुरूंगात जाणार नाहीत तो पर्यंत ही लढाई सातत्याने लढण्याचा आमचा जो आहे तो मानस आहे. मला या ठिकाणी सांगायला पाहिजे. या आंदोलनामध्ये ज्या ज्या मुलांवर केसेस झाल्या तो भारत सरकारने एक निर्णय घेऊन पूर्ण देशभरातल्या युवकांवर घेतलेल्या आंदोलनातील केसेस रद्द कराव्यात. दुर्दैवाने ज्यांच्या ज्यांच्या मध्ये मृत्यू झाला त्यांच्या कुटुंबाला त्याठिकाणी कन्सेशन देण्याचं काम करावं आणि हा पेपर जवळपास आज बारा वर्षांमध्ये एकशे बावन्न पेपर लीक झालेत. या सिस्टम ला बदलण्यासाठी काय उपाययोजना केल्या जाणार? या संदर्भामध्ये आम्ही पार्लमेंट मध्ये बोलू. पण ही लढाई सुरू केलेल्या युवांनी ही जी लढाई ज्या ज्या वेळेला आपण बघितलं की देशाच्या इतिहासामध्ये युवा ज्यावेळी मैदानात उतरतो त्यावेळी युवा जिंकण्याचं काम केलं होतं. त्यामुळे ही लढाई युवकांनी जिंकली. ही लढाई देशातल्या संसद मध्ये सातत्याने जिंकली आणि देशाच्या पंतप्रधानाच्या घरात जाऊन पंतप्रधानांना त्यांनी सांगितलं कि तुम्हाला जनतेचं म्हणणं ऐकावं लागेल. स्वतःच्या मनाची गोष्ट सांगू नका. लोकांना मुलांना काय त्रास होतोय या देशाचं भविष्य आणि संपत्तीशी खेळू नका.0
0
Report
संभाजीनगर क्रांती चौक पर वंचित बहुजन आघाडी ने धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे पर जश्न
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या क्रांती चौकात वंचित बहुजन आघाडीकडनं धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला त्याबाबत जल्लोष करण्यात आला, हा विजय युवकांचा असल्याचा सांगत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली आणि विद्यार्थ्याची यापुढे या देशाचे प्रश्न असेच सोडवले जातील असेही कार्यकर्त्यांनी सांगितलं यावेळी पेढे वाटून आणि फटाके फोडून वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी संभाजीनगर मध्ये आनंद व्यक्त केला...0
0
Report
जंतर-मंतर के छात्रों के आंदोलन की बड़ी जीत, धर्मेंद्र प्रधान ने दिया इस्तीफा
Akola, Maharashtra:दिल्लीतील जंतर-मंतरवर सुरू असलेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला मोठे यश मिळाल्याचा दावा करण्यात येत असून, केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विविध विद्यार्थी संघटनांनी आणि विरोधी पक्षांनी त्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जंतर-मंतरवर आंदोलन छेडले होते. या आंदोलनाला देशभरातून मोठा पाठिंबा मिळाला.या आंदोलनात अकोला पश्चिम मतदारसंघाचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांनीही सहभाग नोंदवला होता. आंदोलनाच्या यशानंतर त्यांनी प्रतिक्रिया देताना विद्यार्थ्यांचे आणि देशवासीयांचे आभार मानले. हा विजय कोणत्याही जाती-धर्माचा नसून संपूर्ण भारतीयांचा असल्याचे त्यांनी सांगितले. आंदोलनानुसार या विद्यार्थींच्या बलिदान व्यर्थ गेले नसल्याचे सांगत, हा विजय देशातील प्रत्येक नागरिकाचा असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्यामुळे विद्यार्थ्यांचा आवाज अधिक प्रभावीपणे देशासमोर पोहोचला आणि अखेर आंदोलनाला यश मिळाल्याचेही साजिद खान पठाण यांनी आपल्या प्रतिक्रियेत म्हटले आहे.0
0
Report
Advertisement
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद सोलापुर में युवकों ने जमकर जल्लोष मनाया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सोलापुरात युवकांकडून मोठा जल्लोष - केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा नंतर सोलापुरात जल्लोषाला सुरुवात - शहरातील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात युवकांनी एकत्रित येत फटाके फोडत व्यक्त केला आनंद - धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामाच्या निमित्ताने देशातील तरुणाईचा मोठा विजय झाल्याची व्यक्त केली भावना - राजीनाम्या नंतर देखील युवकांची जोरदार घोषणाबाजी0
0
Report
पंढरपुर की विटे पर युवक ने विठ्ठल-रखुमाई की जीवंत प्रतिमा बनाई, भक्तों ने देखा चमत्कार
Yeola, Maharashtra:पंढरपूरच्या विठ्ठलाच्या विटेवरील उभ्या रूपाला अनोखे महत्त्व आहे. याच विटेवर युवा वारकऱ्यांनी आपल्या कलाकौशल्यातून विठ्ठल-रखुमाईची सुंदर प्रतिमा साकारली. अत्यंत बारकाईने आणि आकर्षक पद्धतीने काढण्यात आलेल्या या चित्रातून भक्ती आणि कलेचा सुंदर संगम पाहायला मिळाला.0
0
Report
जंतर मंतर पर आंदोलन के बाद शिक्षामंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफे पर युवाओं ने पटाखे फोड़े
Yeola, Maharashtra:दिल्लीतील जंतर मंतर या ठिकाणी पेपर फुटी प्रकरणानंतर सीजेपीच्या माध्यमातून तरुणांनी मोठे आंदोलन उभे केले होते या आंदोलनातील प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान इस्तीफे दिलेले यांच्या संदर्भात येवल्यातील तरुणाईने फटाके फोडून जल्लोष व्यक्त केला आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
Advertisement
शिक्षा मंत्री के इस्तीफे के बाद छात्रों की जीत, पेपर लीक पर SIT जांच की मांग
Bhandara, Maharashtra:विद्यार्थ्यांचा विजय झाला... नाना पटोले. केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा देताच राजकीय वर्तुळातून देखील प्रतिक्रिया येत आहेत. विद्यार्थी महिना भारतापासून दिल्लीच्या जंतर मंतर वर आंदोलन करत होते. देशात पेपर लीक होत होते. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी ही सरकार खेळत होती. ही मुजोर सरकार आहे. अश्रू धुळ्याच्या कांड्या, पाण्याचा मारा, करण्यात आला. एका मुलीला आपला जीव गमवावा लागला. आज राजीनामा होताच विद्यार्थ्यांचा विजय झाला आहे. पण यापुढे पेपर लीक होणार नाही याची हमी सरकारने द्यावी. तसेच पेपर लीक मध्ये आपलीच SIT नेमावी व आपलीच चौकशी करावी अशी भूमिका सरकारने घेतली होती. पेपर लीक करणारे हे भाजपाचे होते.. तर २०१४ मध्ये नरेंद्र मोदी सत्तेत आले. देशातील जनतेने मोदींना मतदान केलं. म्हणून त्यांनी सुद्धा राजीनामा द्यावा अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे...0
0
Report
धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे के बाद छात्रों की प्रमुख मांगें: मुआवजा और मुकदमे वापस
Kalyan, Maharashtra:केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनामा नंतर विद्यार्थ्यांनी मानले आभार. पोलिसांनी विद्यार्थ्यांवरती गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घेणे यावे. विद्यार्थी मरण पावले त्यांना मदत मिळावी.. विद्यार्थीची मागणी. गेल्या अनेक दिवसापासून दिल्लीच्या जंतर-मंतर येथे कॉकरोज जनता पार्टी यांनी आंदोलन केले त्यानंतर पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर संपूर्ण देशामध्ये आंदोलन सुरू झाली धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी प्रमुख मागणी विद्यार्थ्यांकडून केली जात होती अखेर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्यानंतर कल्याण मध्ये विद्यार्थ्यांनी सांगितले आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला आहे मात्र पोलिसांनी विद्यार्थ्यांसाठी गुन्हे दाखल केले आहेत ते मागे घ्यावे जे विद्यार्थी मरण पावलेले आहेत त्यांना मदत मिळावी अशा दोन प्रमुख मागण्यां आहेत त्या सरकारने पूर्ण कराव्या अशी मागणी विद्यार्थ्यांनी करण्यात आलेली आहे याचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी0
0
Report
चिपळूण रेलवे स्टेशन के पास प्रमुख मार्ग में गड्ढे, यात्री और वाहन चालक परेशान
Ratnagiri, Maharashtra:कोकण रेल्वे मार्गावरील अत्यंत महत्त्वाचे स्थानक असलेल्या चिपळूण रेल्वे स्थानकाकडे शहरातून जाणाऱ्या मुख्य रस्त्याची दुरवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून पावसामुळे चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे रेल्वे प्रवासी आणि वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. दररोज हजारो प्रवासी या मार्गाचा वापर करत असतानाही रस्त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त केली जात आहे. या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ में 'कामगार सुरक्षा निवारा' का लोकार्पण, श्रम पूजा के साथ सम्मान
Yavatmal, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने यवतमाळ मध्ये शिवसेनेकडून कामगार बांधवांसाठी उभारण्यात आलेल्या "कामगार सुरक्षा निवारा" या लोकोपयोगी उपक्रमाचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला. यवतमाळच्या पोस्टल मैदानाजवळ दररोज सकाळी कामगार एकवटतात, या ठिकाणी कामगारांना बसण्यासाठी व्यवस्था व्हावी याकरिता 'कामगार हाच विठ्ठल, श्रम हीच पूजा' या संकल्पनेतून कामगार सुरक्षा निवारा हा सेवाभावी उपक्रम सुरू करण्यात आला. या निमित्ताने कामगार बांधवांसाठी भोजनदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी बेघर मनोरुग्णांची सेवा करणाऱ्या समाजसेवी संदीप व नंदिनी शिंदे या दांपत्याचा विठू माऊलीच्या रूपात गौरव करण्यात आला. कामगारांचे पाय धुवून त्यांचा सन्मान करण्यात आला तर कामगारांच्या गुणवंत पाल्यांचा देखील सत्कार पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते करण्यात आला.0
0
Report
माळशेज घाट पर खस्ताहाल सड़क से महामार्ग पर खतरा, यातायात प्रभावित
Barav, Maharashtra:कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर माळशेज घाटात तब्बल १०० फूट लांब आणि ८ फूट खोल रस्ता खचल्याने भीषण अपघाताचा धोका निर्माण झालाय. सुदैवाने रस्ता खचताना कोणतंही वाहन नसल्याने मोठा अनर्थ टळला; मात्र या प्रकारामुळे महामार्गावरील वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली असून जवळच असलेल्या घरांनाही धोका निर्माण झाला आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही याच ठिकाणी रस्ता खचला होता. स्थानिकांनी वारंवार तक्रारी करूनही NHAI आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने दुर्लक्ष केल्याने कामाच्या दर्जावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. माळशेज घाटातील या धोकादायक परिस्थितीचा थेट आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
जंतरमंतर आंदोलन में विनयभंग के लिए तफ्तीश और कार्रवाई की मांग
Chandrapur, Maharashtra:जंतरमंतर आंदोलन में लड़कियों के विनयभंग के मामले की उचित चौकशी कर कार्रवाई की जाए—चंद्रपुर कांग्रेस सांसद प्रतिभा धानोरकर ने यह मांग की। पीएमओ के सामने कांग्रेस के आंदोलन में भी महिला सांसदों के साथ धक्काबुक्की और मारपीट की घटना होने का आरोप उन्होंने लगाया। जंतरमंतर के आंदोलन अब किसी एक के नहीं हैं, छात्र-छात्राओं ने इसे उठाया है—उन्होंने यह दावा किया।0
0
Report
Advertisement
