icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

साताऱ्यात लड़की के हॉस्टेल में आत्महत्या: नोट मिलने के बाद गहरे सवाल, जांच जारी

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील यशवंतराव चव्हाण सायन्स महाविद्यालयातील मुलींच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेत १९ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली आहे . रात्री सृष्टी भानुदास बिरामणे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. ती महाविद्यालयात फूड अँड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती. तिच्याजवळ एक चिठ्ठी सापडली आहे. सृष्टी ही महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहात राहत होती. वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह शब्द लिहिल्याची तक्रार झाल्यावर हॉस्टेल समितीने विद्यार्थिनींची चौकशी सुरू केली होती. या प्रकरणात संबंधित विद्यार्थिनींच्या पालकांना बोलावण्याबाबतही चर्चा सुरू होती.दरम्यान, बुधवारी रात्री सृष्टी बाथरूमला जात असल्याचे सांगून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली. त्यानंतर तिने तेथून खाली उडी घेतली. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. मात्र, उपचारासाठी रुग्णालयात नेण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.पालकांना बोलावण्यात येणार असल्याच्या चर्चेतून घाबरून तिने हे टोकाचे पाऊल उचलले असावे, अशी प्राथमिक चर्चा सुरू होती. मात्र, आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही याबाबत पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

रत्नागिरी में मतदाता सूची सत्यापन के लिए स्विप हस्ताक्षर अभियान शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत प्रारूप मतदार यादी पडताळणीसाठी ‘स्वीप’ स्वाक्षरी मोहीम; वरिष्ठ अधिकाऱ्यांचे नागरिकांना आवाहन.. रत्नागिरी विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमांतर्गत मतदारांमध्ये जनजागृती करण्यासाठी ‘स्वीप’ मोहिमेचा फलक प्रदर्शित करण्यात आला.विभागीय आयुक्त रुबल अगरवाल यांच्यासह जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सहायक पोलीस अधीक्षकांसह प्रमुख अधिकाऱ्यांनी या फलकावर स्वाक्षरी करत,नागरिकांनी मतदार यादीतील आपल्या नावाची खात्री करावी,असे आवाहन केले.
0
0
Report
Advertisement

नागपुर: अलंकार टॉकीज के पास हिट-एंड-रन में 74 वर्षीय रामदास पाटिल की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूरच्या धरमपेठ परिसरातील अलंकार टॉकीज चौकात हिट अँड रनची धक्कादायक घटना काल संध्याकाळी समोर आली. - दुचाकीवर डबल सीटने जात असलेल्या पती पत्नीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात ७४ वर्षीय रामदास पाटील यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांची पत्नी जखमी झाली आहे. - रामदास पाटील हे पत्नी सह नागपूरच्या व्होकार्ट हॉस्पिटलमध्ये उपचार घेऊन अजनी परिसरातील आपल्या घरी जात होते. अलंकार टॉकीजजवळ, नागपूर सुधार प्रन्यासच्या सभापतींच्या बंगल्यासमोर त्यांच्या दुचाकीला काळ्या रंगाच्या डस्टर कारने धडक दिली. - धडकेनंतर कारचालक घटनास्थळी न थांबता फरार झाला. या प्रकरणी पोलिसांकडून नागपूर शहरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यात येत असून, फरार कारचालकाचा शोध घेतला जात आहे. - दरम्यान, संध्याकाळच्या वेळेस ही घटना घडल्याने अलंकार टॉकीज परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून वाहतूक सुरळीत करण्यास सुरुवात केली. * रामदास पाटील निवृत्त बँक व्यवस्थापक होते...
0
0
Report

अर्धनग्न यात्रा से मनमाड हाईवे की बदहाली पर प्रशासन-विरोध प्रदर्शन

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर - मनमाड महामार्गाच्या दुरावस्थेकडे शासन-प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्ते संजय काळे यांनी कोपरगाव ते नगर अर्धनग्न यात्रा केली...आज ते अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालयात पोहचले... अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी डॉ.पंकज आशिया यांची भेट देखील त्यांनी घेतली...दरम्यान जिल्हाधिकारी यांच्याकडे संबंधित रस्ता 10 वर्ष टिकेल, रस्ता कामात तोडण्यात आलेल्या वडाच्या एका झाडाच्या बदला 5 झाडे लावून त्याचे 10 वर्ष संगोपन केले जाईल असे स्टॅम्प पेपरवर प्रतिज्ञापत्र द्यावे अशी मागणी काळे यांनी केली...मात्र आम्ही असे प्रमाणपत्र देऊ शकत नाही , राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या पत्रावर तसे देण्यास सांगू असं जिल्हाधिकारी यांनी सांगितले... मात्र यासाठी आम्ही न्यायालयात जाऊ असं काळे यांनी म्हणताच जिल्हाधिकाऱ्यांनी तुम्हाला न्यायालयात जायचे तर जा असं म्हंटल्याचे सामजिक कार्यकर्ते काळे यांनी सांगितले आहे...दरम्यान जिल्हाधिकारी आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी मिळून हा रस्ता खड्डामय ठेवण्याचं चंग बांधला असल्याचा आरोप काळे यांनी केलाय.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव में प्लाझ्मा, प्रेशर मिड और माइकिंग पर पूर्ण रोक; शांत विसर्जन के निर्देश

Ahilyanagar, Maharashtra:आगामी गणेशोत्सवात आगमन और विसर्जन मिरवणुका डीजेमुक्त ठेवण्याच्या प्रशासकीय आवाहनला अहिल्यानगर लाईट साऊंड असोसिएशनने सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. सुमारे १५० ते २०० व्यावसायिकांच्या बैठकीत त्रासदायक प्लाझ्मा, प्रेशर मिड, कॉम्पिटिशन आणि मायकिंगवर पूर्णपणे बंदी घालण्याचा एकमताने निर्णय घेण्यात आला. तर नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बाहेरील साऊंड व्यावसायिकांवर वकिलांमार्फत कायदेशीर कारवाई आणि गुन्हे दाखल करण्याचा इशारा लाईट साऊड जनरेटर असोसिएशनचे अध्यक्ष शिवदत्त पांढरे यांनी दिला. त्रासमुक्त आणि शांततापूर्ण विसर्जन मिरवणुकीसाठी लाईट साऊण्ड जनरेटर संघटनेचा पुढाकार असल्याचा विश्वास संघटनेचे चेतन अरकल यांनी व्यक्त केला.
0
0
Report

भंडारा की दूध कंपनी के दूषित पानी ने किसानों की फसलें बिगाड़ी

Bhandara, Maharashtra:दूध कंपनीच्या दूषित पाण्याचा शेतकऱ्यांना फटका! जांब-सकरला परिसरातील धान पीक धोक्यात दुर्गंधीयुक्त पाण्यामुळे शेतीचे नुकसान.... शेतकरी आक्रमक दूषित पाण्यामुळे शेतीत काम करणंही कठीण.... प्रदूषण नियंत्रण विभागाची कंपनीवर कारवाईची तयारी.... VO :- मोहाडी तालुक्यातील जांब आणि सकरला परिसरातील ही शेती... शेतकऱ्यांच्या कष्टावर उभं राहिलेलं धानाचं पीक... मात्र आता याच पिकाला दूषित आणि रसायनयुक्त पाण्याचा धोका निर्माण झाला आहे. जांब येथे गेल्या काही महिन्यांपासून दूध प्रक्रिया कंपनी सुरू आहे. दूध पावडर, पनीर, खोवा यांसारख्या पदार्थांची निर्मिती या ठिकाणी केली जाते. मात्र कंपनीतून बाहेर पडणारं सांडपाणी प्रक्रिया न करता थेट परिसरातील ओढ्यात आणि शेतीच्या दिशेने सोडलं जात असल्याचा शेतकाऱ्यांचा गंभीर आरोप आहे. या सांडपाण्यामुळे परिसरात दुर्गंधीचं साम्राज्य पसरल्याचं शेतकरी सांगत आहेत. दूषित पाणी शेतात शिरल्याने उभी धान पिकं आणि भाजीपाला खराब होत असल्याचं दावा करण्यात येतोय. इतकंच नाही तर या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर शेतात काम करणाऱ्या काही शेतकऱ्यांच्या हाताला दुखापत झाल्याचंही सांगण्यात येत आहे. दुर्गंधी आणि दूषित पाण्यामुळे परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, शेतात काम करण्यासाठी मजूरही येण्यास तयार नसल्याचं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. एकीकडे शेतीसाठी वाढता खर्च... त्यात पिकाला मिळणारा भाव अनिश्चित... आणि आता दूध कंपनीच्या सांडपाण्यामुळे पीकच धोक्यात आल्याने शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं राहिलं आहे. या दूषित पाण्यामुळे परिसरातील जलचर प्राण्यांवरही परिणाम झाल्याचं आरोप स्थानिकांकडून करण्यात येतोय. त्यामुळे कंपनी बंद करा किंवा सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच ते बाहेर सोडा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. BYTE :- किरण अंतकरी, शेतकरी BYTE :- ऋषिकांत नेरकर, शेतकरी BYTE :- शेतकरी BYTE :- शेतकरी VO :- शेतकऱ्यांच्या तक्रारीनंतर प्रदूषण नियंत्रण विभागाने दूध प्रक्रिया कंपनीची पाहणी केली. अधिकाऱ्यांनी कंपनीतून बाहेर पडणाऱ्या पाण्याचे नमुने घेतले असून ते तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. पाहणीदरम्यान काही त्रुटी आढळून आल्याचं अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे. याप्रकरणी कंपनी चालकाला नोटीस बजावण्यात आली असून, समाधानकारक उत्तर न दिल्यास पुढील कारवाई केली जाईल, असा इशारा प्रदूषण नियंत्रण विभागाने दिला आहे. BYTE :- किशोर पुसदकर, प्रदूषण नियंत्रण विभाग अधिकारी भंडारा VO : - आता या तपासणीच्या अहवालातून दूषित पाण्याचं नेमकं वास्तव समोर येणार आहे. मात्र तोपर्यंत शेतकऱ्यांच्या शेतातील उभं पीक धोक्यात आहे... शेतकऱ्यांचं नुकसान कोण भरून देणार? आणि कंपनीच्या सांडपाण्यामुळे शेती आणि पर्यावरणाचं नुकसान होत असेल, तर संबंधितांवर कठोर कारवाई कधी होणार? याकडेच आता जांब आणि सकरला परिसरातील शेतकऱ्यांचं लक्ष लागलं आहे.
0
0
Report

शिवेंद्रराजे भोसले सीधे निरीक्षण करेंगे मुंबई-गोवा महामार्ग, चिपळूण- संगमेश्वऱ के खराब रस्ते हल होंगे?

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची आज सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांकडून पाहणी; चिपळूण, संगमेश्वरमधील रखडलेल्या रस्त्यांवरून चाकरमान्यांचे हाल कायम.. गणेशोत्सवापूर्वी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्‍यांचा प्रवास सुकर व्हावा यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले आज स्वतः मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाची प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत.. रत्नागिरीपर्यंतच्या या दौऱ्यात ते संबंधित प्रशासकीय अधिकाऱ्यांसोबत जागोजागी आढावा बैठका घेणार आहेत.. चिपळूणच्या बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपूल आणि संगमेश्वरमधील तळेकांटे येथील ३०० मीटर रस्त्याचे काम अद्याप अपूर्ण असल्याने प्रवाशांना चिखल आणि वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.. या पाहणी दौऱ्यानंतर मंत्री महोदय प्रत्यक्ष कामावर काय तोडगा काढतात आणि माध्यमांसमोर कोणती भूमिका मांडतात,याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report
Advertisement

यवतमाळ के उमरखेड में मातंग समाज का महा मोर्चा, उपवर्गीकरण पर तेज बहस

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या उमरखेड येथे सकल मातंग समाजाच्या वतीने उपवा्गीकरण च्या सॅर्थनार्थ जनआक्रोश महामोर्चा काढण्यात आला. अनुसूचित जातीतील अविकसित जातींचे उपवर्गीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली. त्यामुळे उपवर्गीकरणाला विरोध आणि समर्थन करणारे दोन समाज घटक आमने-सामने आले आहे. अनुसूचित जातीतील 59 जातींचा विकास करण्यासाठी 1987 साली बार्टी ची स्थापना झाली, मात्र बार्टी ने समान न्याय न दिल्याने मातंग समाज मागे राहिला. उपवर्गीकरणाला विरोध चुकीचा आहे, 15 सप्टेंबर पर्यंत उपवर्गीकरणाचा निर्णय न घेतल्यास 29 सप्टेंबरला मुंबईत मातंग समाजाचा मोर्चा धडक देईल असा इशारा यावेळी माजी आमदार नामदेव ससाणे यांनी दिला.
0
0
Report

अमरावती के मोर्शी में बिबट्या ने वासर की शिकार कर दी; किसान दहशत में

Amravati, Maharashtra:अमरावती के मोर्शी तालुक़े के शिरलस खेत-शिवार में बिबट्याता वावर; बिबट्या द्वारा वासर की शिकार, इलाके में दहशत अमरावती के मोर्शी तालुक़े के शिरलस खेतशिवार में बिबट्या द्वारा वासर की शिकार के बारे में प्राथमिक जानकारी सामने आई है। प्रणित मावळे के खेत में कल दोपहर करीब 12 बजे यह घटना घटित हुई। वासर का शव मिलने के बाद इलाके में हड़कंप मच गया है और किसान व खेतमजदूरों में भय का माहौल बन गया है। घटना की जानकारी मिलते ही वन विभाग की टीम मौके पर पहुँचकर क्षेत्र की निगरानी और जांच कर रही है। बिबट्ट्या की उपस्थिति की पुष्टि के लिए वन विभाग द्वाराสอบ जारी है।
0
0
Report

Hingoli में मराठा आरक्षण के समर्थन में बंद, शहरों के बाजार सूने

Hingoli, Maharashtra:अँकर - मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील अनेक ठिकाणी आज बंदची हाक देण्यात आली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने या बंदचे आवाहन करण्यात आले असून, जिल्ह्यातील विविध शहरांसह बाजारपेठांमध्ये बंदला प्रतिसाद मिळताना दिसत आहे.सेनगाव शहरासह गोरेगाव येथील बाजारपेठा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच औंढा नागनाथ तालुक्यातील जवळा बाजार आणि आखाडा बाळापूर येथील बाजारपेठाही बंद ठेवण्यात आल्या आहेत.सेनगाव शहरातील व्यापाऱ्यांनी आपली दुकाने आणि प्रतिष्ठाने बंद ठेवत आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे सकाळपासून शहरातील बाजारपेठांमध्ये शुकशुकाट पाहायला मिळत आहे...
0
0
Report
Advertisement

अकोला बार्शीटाकळी में बारिश के बिना खरीफ फसलें संकट में, सोयाबीन को बड़ा नुकसान

Akola, Maharashtra:अकोला बार्शीटाकळी तालुक्यात पावसाने दीर्घ खंड घेतल्याने खरीप हंगामातील पिके गंभीर संकटात सापडली आहेत. पिंजर, भेंडीमहाल, टिटवा, बहीरखेडसह तालुक्यातील विविध भागांत सोयाबीन, कपाशी, उडीद आणि मूग पिकांनी माना टाकायला सुरुवात केली आहे. विशेषतः शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या टप्प्यात असलेल्या सोयाबीन पिकाला पावसाअभावी मोठा फटका बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जमिनीतील ओलावा झपाट्याने कमी होत असून, शेतातील पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. सोयाबीन पीक सध्या शेंगा भरण्याच्या अवस्थेत असून, याच काळात पाण्याची आवश्यकता असताना पावसाचा खंड पडल्याने उत्पादनावर थेट परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

यवला में गणेश उत्सव के लिए शांतता समिति की बैठक, कानून-व्यवस्था के निर्देश जारी

Yeola, Maharashtra:आगामी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर येवल्यात शांतता कमिटीची बैठक पार पडली. गणेशोत्सव काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी येवला शहर और तालुका पोलिसांच्या वतीने या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. येवला तालुका पोलीस ठाण्याच्या आवारात झालेल्या बैठकीला शहर आणि तालुक्यातील शेकडो गणेश मंडळांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा करण्याबाबत यावेळी मार्गदर्शन करण्यात आले. पोलिस प्रशासनाला सहकार्य करत नियमांचे पालन करावे, तसेच उत्सवाला गालबोट लागणार नाही याची काळजी घ्यावी, असे आवाहन गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना करण्यात आले.
0
0
Report

सांगली महापालिका ने खड्डे हटाने के लिए Instant Patchwork तकनीक की डेमो दिखाई; खड्डे जल्द होंगे दूर

Sangli, Maharashtra:सांगली महापालिका क्षेत्रातले रस्ते खड्डे मुक्त करण्यासाठी महापालिकेकडून पाऊले उचलण्यात येत आहेत. रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी आधुनिक ‘इन्स्टंट पॅचवर्क’ तंत्रज्ञानाची महापालिकेकडुन प्रात्यक्षिक घेण्यात आली आहे. महापालिका कार्यालयासमोरच आयुक्त व पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीमध्ये प्रात्यक्षिका घेण्यात आली, अवघ्या १५ ते २० मिनिटांत रस्त्यावरील खड्ड्यांचे डांबरी पॅचवर्क आधुनिक यंत्रणेच्यामाध्यमातून पूर्ण करता येणार असून आधुनिक यंत्रणेमुळे वेळ, पैसा व मनुष्यबळ वाचणार असल्याने लवकरच यंत्रणेबाबत महापालिकेच्या महासभेत निर्णय घेण्यात येईल, ज्यामुळे क्षेत्रातील रस्ते हे खड्डे मुक्त होतील, असा विश्वास यावेळी आयुक्त संजीता महापात्र यांच्याकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top