445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
FDA आयुक्त ने दवा विक्री में नफाखोरी का खुलासा, सरकार से मूल्य नियंत्रण की मांग
Pune, Maharashtra:Rugna hakka pc एफडीए आयुक्त तुकाराम मुंडे यांनी औषध विक्रीतील नफेखोरी उघडकीस आणलीच हे तर आता सरकारने यापुढे तरी औषध किंमत नियंत्रण कायदा करावा, अन्यथा आम्ही आंदोलन करू, असा इशारा रुग्ण हक्क परिषदेनं दिलाय...या परिषदेचे अध्यक्ष उमेश चव्हाण यांनी यावेळी तर हजारोंची नफेखोरी करणाऱ्या इंजेक्शनची यादीच वाचून दाखवली... औषधांच्या एमआरपी व प्रत्यक्ष विक्री किमतीतील फरक | क्र. | औषधाचे नाव | MRP | मिळणारी किंमत | | ---- | -------------------------------- | ------- | ------------- | | १ | आयव्हीआयजी (IVIG) | ₹20,000 | ₹4,000 | | २ | मेरोपेन (Meropenem) | ₹4,000 | ₹600 | | ३ | ट्रास्टूझूमॅब (Trastuzumab) | ₹61,000 | ₹8,000 | | ४ | निवॅल्यूमॅब (Nivolumab) | ₹40,000 | ₹12,000 | | ५ | डेनोसुमॅब (Denosumab) | ₹16,000 | ₹10,000 | | ६ | रितुक्सीमॅब इंजेक्शन (Rituximab) | ₹42,000 | ₹8,000 | | ७ | ओलापॅरिब टॅबलेट (Olaparib) | ₹22,500 | ₹8,000 |0
0
Report
एमपीएससी चयन: 438 सफल उम्मीदवारों ने मेन्स परिणामों के पुनः मूल्यांकन की मांग
Pune, Maharashtra:राज्य सेवा मुख्य परीक्षा उत्तीर्ण झालेले 438 परीक्षार्थी गेले महिनाभर मुलाखती वेळापञक जाहिर होण्याच्या प्रतिक्षेत आहेत...गेल्या आठवड्यात झालेल्या एमपीएससी आंदोलनातून चुकीचे चिञं उभं केलं गेल्याचा या क्वालीफाईड मुलांचा आरोप आहे...तसंच सीएमना भेटायला गेलेल्या शिष्टमंडळात क्लास चालक काय करत होते? असाही सवाल या मुलांनी उपस्थित केलाय...राज्यसेवेचे सर्वच पेपर्स सरसकट रिचेक केले जाऊ नयेत, त्याऐवजी त्यांचे नियमानुसारच रिव्ह्यँल्युएशन केलं जावं जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही, याची खबरदारी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने घ्यावी, असंही या मुलांनी म्हटलंय पहाµयात त्यांचं म्हणणं नेमकं आहे तरी काय?0
0
Report
डोंबिवली स्थित शास्त्री नगर अस्पताल में डॉक्टरों पर मारपीट मामले की सुनवाई 21 सितम्बर को
Kalyan, Maharashtra:शास्त्रीनगर रुग्णालयातील डॉक्टर मारहाण प्रकरण, पुढील सुनावणी २१ सप्टेंबरला रमेश म्हात्रे, प्रकरणी सरकारी साक्षीदाराची साक्ष नोंदविली, डोंबिवलीतील महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टरांना मारहाण केल्याच्या प्रकरणातील आरोपी रमेश म्हात्रे, यांच्या खटल्याची सुनावणी कल्याण जिल्हा सत्र जलदगती न्यायालयात सुरू आहे. शनिवारी झालेल्या सुनावणीदरम्यान या प्रकरणातील एका सरकारी साक्षीदाराची साक्ष न्यायालयात नोंदविण्यात आली. डॉक्टरांना मारहाण करण्यासाठी वापरण्यात आल्याचा आरोप असलेले रजिस्टर पोलिसांनी जप्त केले होते. या रजिस्टरच्या जप्तीचा पंचनामा करण्यात आला होता. याच जप्ती प्रक्रियेशी संबंधित सरकारी साक्षीदाराची साक्ष आज न्यायालयात नोंदविण्यात आली. सुनावणीच्या वेळी आरोपी रमेश म्हात्रे, न्यायालयात उपस्थित होते. आरोपीच्या वतीने ॲड. अनंत पत्की, ॲड. एम. के. काझी आणि ॲड. यू. झेड. काझी यांनी बाजू मांडली. सरकारी पक्षातर्फे सरकारी वकील प्रकाश साळसिंगीकर यांनी काम पाहिले. जिल्हा सत्र न्यायाधीश एन. पी. वासाडे यांच्या न्यायालयात ही साक्ष नोंदविण्यात आली. या प्रकरणाची पुढील सुनावणी २१ सप्टेंबर रोजी होणार आहे.0
0
Report
Advertisement
कृषिमंत्री दत्तात्रय भरणे ने हिंगोली के किसानों के बांध पर भोजन किया
Hingoli, Maharashtra:हिंगोली ब्रेक हिंगोलीत कृषीमंत्र्यांनी शेतीच्या बांधावर घेतला जेवणाचा आस्वाद... हिंगोलीत कृषिमंत्री शेतकऱ्यांच्या बांधावर.. हिंगोलीच्या हिवरा परिसरात कृषीमंत्र्यांनी घेतला जेवणाचा आस्वाद .. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे हिंगोली दौऱ्यावर .. कृषिमंत्री शेतामधील झाडाखाली बसून शेतकऱ्यांसोबत करत आहेत जेवण0
0
Report
राजगुरुनगर में भतीजे ने मामा की हत्या कर आत्महत्या की; नोट में त्रास का उल्लेख
Khed, Maharashtra:राजगुरुनगरमध्ये मामाचा गळा चिरून निर्घृण खून; भाच्याची आत्महत्या, सुसाईड नोटमधून मामाच्या त्रासाचा उल्लेख प Pune जिल्ह्यातील राजगुरुनगरमध्ये भाच्याने मामाचा गळा चिरून निर्घृण खून केल्यानंतर स्वतःही आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे… पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगरमधील भाड्याच्या घरात ही धक्कादायक घटना घडली… प्रविण कोहिनकर याने त्याचा मामा संदीप गडदे यांचा गळा चिरून खून केल्याचं समोर आलं असून, त्यानंतर प्रविणनेही आत्महत्या केली… आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये मामाकडून त्रास होत असल्याचा उल्लेख केल्याची प्राथमिक माहितीसमोर आलीय मात्र हा त्रास नेमका कोणत्या कारणातून होता या घटनेमागील नेमकं कारण काय, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे… घटनेची माहिती मिळताच पोलिसांचं पथक घटनास्थळी दाखल झालं असून, सुसाईड नोटसह इतर पुराव्यांच्या आधारे तपास केला जात आहे… गणेशोत्सवाच्या काळात राजगुरुनगरमध्ये घडलेल्या या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
गणेशोत्सव के समय कृष्णा नदी प्रदूषण: विसर्जन पर मुश्किल और कुंडीय विकल्प
Sangli, Maharashtra:स्लग- ऐन गणेशोत्सवात कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर,नदीचे पाणी बनलं हिरवगार.. अँकर - ऐन गणेशोत्सवात विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर सांगलीची कृष्णा नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा आता ऐरणीवर आलाय. कारण सांगलीमध्ये कृष्णा नदीचे प्रदूषण इतके वाढले आहे,संपूर्ण कृष्णा नदी हिरवंगार पडला आहे.कृष्णा नदीच्या पात्रातील पाणी हे हिरवंगार बनलं आहे.याशिवाय या पाण्याला दुर्गंधी देखील सुटली आहे.या ठिकाणी गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी येणाऱ्या भाविकांना मोठा गैरसोयीला समोर जावे लागते..हिरव्यागार आणि प्रदूषित पाण्यामध्ये बाप्पांचं विसर्जन कसं करायचं,म्हणून गणेश भक्तांकडून कृष्णा नदीत गणेशमूर्ती विसर्जित करण्याऐवजी महापालिकेच्या कुंडामध्ये गणेशमूर्ती विसर्जन करण्यात येत आहे. त्यामुळे कोयना धरणातून कृष्णा नदीत पाणी सोडण्याची मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
पाथर्डी में 40 वर्षों से गौरी-गणपति उत्सव का जोश, परिवार ने नई आरास बनाई
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर- लैलेश बारगजे स्लग- गणपती गौराई फीड 2C Anc- अहिल्या नगरच्या पाथर्डी येथे डॉक्टर उरणकर यांच्या परिवारात मागील 40 वर्षापासून गौरी गणपतीच मोठ्या उत्साहात स्वागत केलं जातं वेगवेगळ्या संकल्पना असलेल्या आरास गौरी गणपतीच्या उत्सवानिमित्त साकार केल्या जातात यावर्षी हरवलेल्या जुन्या पद्धती यावर आधारित आरास तयार करण्यात आली यात जात्यावरील दळण करणाऱ्या महिला, झोका खेळणाऱ्या मुली, विहिरीतून पाणी सेंधणाऱ्या महिला असा हलता देखावा तयार केला आहे गणेश उत्सव आणि गौराई निमित्ताने राज्यभरातील विविध ठिकाणी असलेले उरणकर परिवारातील 40 पाथर्डी येथे एकत्र येतात आणि गौरी गणपतीचा उत्सव साजरा करतात0
0
Report
रत्नागिरी में गौरी-गणपति विसर्जन का उत्सव, ढोल-नगाड़ों के साथ बाप्पा को विदाई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात गौरी-गणपती विसर्जनाचा उत्साह वाजत गाजत मिरवणुकीने दिला जातोय निरोप लाडक्या बाप्पाला भाविकांकडून जड अंतःकरणाने निरोप जिल्ह्यात आज सव्वा लाख गणेशमूर्तीसह गौराईचे विसर्जन _________________ गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशी आर्त विनवणी करत आज रत्नागिरी जिल्ह्यात बाप्पाला निरोप देण्यात येत आहे. ढोल-ताशांच्या गजरात ठिकठिकाणी बाप्पाची मिरवणूक काढण्यात येत आहे. गेले पाच दिवस जिल्ह्यात सर्वत्र गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात आला आणि आज लाडक्या बाप्पाला आणि गौराईला भाविकांकडून जड अंतःकरणाने निरोप देण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात आज १९ सार्वजनिक, एक लाख २४ हजार ९७७ घरगुती गणेशमूर्ती तर ४३ हजार ३७ गौरींचे विसर्जन करण्यात येत आहे.. कोकणात गेले पाच दिवस गणेशोत्सव काळात विविध धार्मिक, सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याने घरोघरी आनंदमय, चैतन्यमयी वातावरण होते. पाच दिवसांचा सण साजरा करून आता बाप्पाला निरोप देण्यात येत आहे.. विसर्जन शांततेत व्हावे, यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख विसर्जनस्थळांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
गोकुळ महायुती में जागा दावेदारी का खेल: क्या भाजपा 25 में 25 पर अड़ी?
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मधील धुसफूस कायम आहे. भाजपने गोकुळ दूध संघाच्या 25 पैकी 25 जागांवर उमेदवारी अर्ज भरण्याच्या निश्चित केले आहेत. त्यामुळे महायुतीमध्ये जागा वाटपाचा तिढा कायम असल्याचा दिसून येत आहे. आमच्या संस्था कमी कशा होतील, आम्ही काही संस्थांची नाराजी दूर करणार हा भाग होत आहे. गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांच्या विधानांत महायुतीमध्ये सर्व काही अलबेल नाही; राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि जनसुराज्य पक्षाच्या संस्था अपात्र ठरल्या तर महायुतीमध्ये कोणाला फायदा होईल हे स्पष्ट होते. अदृश्य शक्तीने गोकुळच्या 1400हून अधिक संस्था मतदानासाठी अपात्र ठरवण्याचा प्रयत्न केला; उच्च न्यायालयाने मतदानाचा अधिकार कायम ठेवला. महायुतीमध्ये राष्ट्रवादी, शिवसेना या दोन्ही पक्षांची जागा महत्त्वाची ठरत आहेत. भाजपालाही महायुतीमध्ये जागा मिळवण्यासाठी प्रयत्न केला, कोल्हापूरातील एका हॉटेलवर भाजपच्या इच्छुक उमेदवारांची बैठक झाली; चंद्रकांत दादा पाटील आणि अमल महाडिक उपस्थित होते. गोकुळ निवडणुकीसाठी 25 पैकी 25 जागा निश्चित झाल्या आहेत काय हा निर्णय अद्याप स्पष्ट नाही. भाजपने 25 पैकी 25 जागेवर उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा निर्णय घेतला आहे. Mahayutiमध्ये जागा वाटपास जोरदार रस्सीखेच सुरू आहे; कोण मोठा भाऊ ठरणार, ते नंतरच ठरेल.0
0
Report
Advertisement
वासिम में QR कोड लगाकर पैसे कमाने के आरोप: तीन गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशिम: गर्दीच्या ठिकाणी क्यूआर कोड लावून पैसे कमावण्याच्या उद्देशानं आरोपी तन्मय शंकर मुठाळ, युगंधर मोहन अफूने आणि सुमित कैलास भोने यांनी हे कृत्य केल्याचं पोलिसांनी सांगितलंय.वाशिम शहरातील इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे क्यूआर कोड लावण्यात आले होते का, याचाही तपास पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
नांदेड दुष्काळ बैठक में हर्षवर्धन सपकाळ ने सरकार पर सवाल उठाए
Buldhana, Maharashtra:हर्षवर्धन सपकाळ ऑन नांदेड दुष्काळ बैठक. हे सरकार मूक बहिरे आणि आंधळे आहे हे आम्ही म्हणताच होतो. लाज आणि शरम विकून यांनी भ्रष्टाचाराच्या अनुषंगाने खाल्लेली आहे. इकडे शेतकरी उपाशी आहे आणि तिकडे सत्ताधारी तुपाशी असल्याचा प्रत्यय नांदेड मधे आला तो संतापजनक आहे. दुष्काळ जाहीर करायला सरकारला फुरसत नाही. शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा काम हे सरकार करत आहे. एकीकडे सर्मजामशाही आणण्याचा प्रयत्न आणि हुकूमशाही लादण्याचा प्रयत्न आहे ..0
0
Report
धान बोनस के मुद्दे पर भाजपा को घर का झटका, किसान मोर्चा साकोलि
Bhandara, Maharashtra:धान बोनसच्या मुद्द्यावर भाजपला घरचा अहेर!... बोनससाठी ५ ऑक्टोबरला साकोलीत भव्य शेतकरी मोर्चा!... माजी खासदार सुनील मेंढेंचा शेतकरी मोर्चाला पाठिंबा!... बोनसची रक्कम खात्यावर जमा करण्याची मुख्यमंत्र्यांकडे मागणी! दरम्यान, बोनसच्या मागणीसाठी भारतीय किसान संघाच्या वतीने ५ ऑक्टोबर रोजी साकोलीत भव्य शेतकरी मोर्चा काढण्यात येणार आहे. काँग्रेस नेते नाना पटोले यांनीही मोर्चात सहभागी होण्याचे सांगितल्याचा दावा किसान संघाने केला आहे. विशेष म्हणजे, सुनील मेंढे यांनीही या मोर्चाला पाठिंबा दर्शवला आहे. त्यामुळे धानाच्या बोनसच्या मुद्द्यावरून भाजपला घरच्यांकडूनच आंदोलनाचा इशारा मिळाल्याची चर्चा सुरू झाली आहे....0
0
Report
Advertisement
NMIA पर गणेशोत्सव: नवी मुंबई एयरपोर्ट में लोककला का धमाकेदार कार्यक्रम
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर गणेशोत्सवानिमित्त ‘द फोक मराठी’ या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. महाराष्ट्राच्या समृद्ध लोकपरंपरेचे दर्शन घडवणाऱ्या या कार्यक्रमात गणपतीवरील भक्तिगीते, कोकणातील कलाकारांच्या संचाने सादर केलेले पारंपरिक बाळ्या नृत्य, तसेच विविध लोकसंगीत आणि लोकनृत्यांचे सादरीकरण करण्यात आले. संगीत आणि नृत्याच्या माध्यमातून महाराष्ट्राची समृद्ध सांस्कृतिक परंपरा साकारत या कार्यक्रमाने विमानतळावरील उत्सवी वातावरणात भर घातली. विमानतळावर येणाऱ्या प्रवाशांना महाराष्ट्राच्या विविध लोककलांची आणि सांस्कृतिक परंपरेची खास झलक अनुभवता आली.0
0
Report
नाशिक में पेयजल संकट गहराया: पूर्व हिस्से में टैंकरों की बढ़ती मांग
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका मराठवाड्याच्या सीमेलगत असल्याने पावसाच्या कमी संवेदना दिसत आहेत. यंदाही पावसाने दडी मारल्याने येवला तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे. तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पिण्याच्या पाण्यासह जनावरांच्या पाण्याचा आणि चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या पांजरवाडी, सायगाव, भुलेगाव, देवथाण, रेंडाळे, खामगाव, गवंडगाव, पिंपळखुटे, कोळम, अंकाई आणि गोरखनगर यांच्या 12 गावांना 9 टॅन्करद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. आणखी 10 गावांचा प्रस्ताव आत्ताही शासनाच्या मंजूरीच्या प्रतीक्षेत आहे. येवला उत्तर-पूर्व भागात पाणीपुरवठा काही प्रमाणात दिलासा देत असला तरी दुष्काळ कायम आहे. महिलांना पाण्याच्या शोधात भटकंती करावी लागत आहे. पिके पेरणी झाली होती, परंतु पावसाअभावी तशीच उभी पिके करपू लागली आहेत. शेतकरी तातडीने दुष्काळ घोषित करावे अशी मागणी करतात. याशिवाय शेजारी नांदगाव तालुक्यातही दुष्काळसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. नांदगावमध्ये एक महत्त्वपूर्ण बैठक झाली ज्यामध्ये टँकर मागणी नोंदवण्यात आली. एकूण नाशिक जिल्ह्यात 18 गावं आणि 37 वाड्यांना 15 खाजगी टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी परिस्थितीचा आढावा घेतला असून तातडीचे उपाययोजना केले जाण्याचे आदेश दिले आहेत.0
0
Report
कांग्रेस का विरोध: इंदोरा-चौक से दिघोरी तक फ्लायओवर के नामकरण पर हंगामा
Nagpur, Maharashtra:नागपूर में नागपूरतील इंदोरा चौक कमाल टॉकीज ते दिघोरी चौकदरम्यानच्या नवनिर्मित फ्लायओव्हरच्या नामकरणावरून काँग्रेसचा विरोध. फ्लायओव्हरला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य सरसंघचालक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांचे नाव देण्याच्या निर्णयाला काँग्रेसचा आक्षेप. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छत्रपती शिवाजी महाराज, सम्राट अशोक, महाराज अग्रसेन किंवा डागा रुग्णालयाच्या नावाचा विचार करण्याची मागणी. यूथ काँग्रेस, NSUI, महिला काँग्रेस आणि फ्रंटल संघटनांकडून विरोध प्रदर्शन. कमाल चौकात आंदोलन. नामकरणाचा निर्णय बदलण्याची काँग्रेसची मागणी..... आंदोलन पुलावर जाण्याचा प्रयत्न करत असताना पोलिसांनी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले0
0
Report
Advertisement
