icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे: दुचाकी से मंगलसूत्र चोरी करने वाले चोर गिरफ्तार; चार लाख रुपये का माल बरामद

Pune, Maharashtra:पुणे दुचाकी वर येऊन महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र पळवणाऱ्या चोरट्याला दरोडा आणि वाहन चोरी पथक युनिट दोन ने पाठलाग करून पकडले.. स्वप्निल सतीश आहेर राहणार पापडे वस्ती असं महिलांच्या गळ्यातील चोरी करणाऱ्या चोरट्यांचे नाव .आरोपी आहेर याने वडगाव शेरी मांजरी आणि इतर भागातून रस्त्यावरून जाणाऱ्या महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र दुचाकी वरून येऊन ओरबाडून न्यायचा याबाबत आरोपी स्वप्निल आहेर यांच्या विरोधात चंदन नगर आणि मांजरी पोलिसात गुन्हे दाखल होते. या चोरीच्या घटनांचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक अंजुम बागवान यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होता.. आरोपीची गुप्त माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याला ताब्यात. आरोपी स्वप्नील आहेर यांच्याकडून पोलिसांनी तब्बल चार लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे.
0
0
Report

हिंगोली के जिल्हाधिकारी ने निरीक्षण किया: शिक्षा और स्वास्थ्य सेवाओं का सीधे आकलन

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यातील विकास कामे आणि नागरिकांना उपलब्ध होणाऱ्या शैक्षणिक व आरोग्य सुविधांचा प्रत्यक्ष आढावा घेण्यासाठी हिंगोलीचे जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी जिल्ह्यातील गोरेगाव सवना येथील आपले सरकार सेवा केंद्र, आयुष्मान केंद्र आणि जिल्हा परिषद शाळांच्या सुरू असलेल्या कामांची स्वतः जाऊन पाहणी केली आहे, जिल्हाधिकाऱ्यांच्या अचानक भेटीमुळे प्रशासकीय यंत्रणेत चांगलीच धावपळ उडाल्याच पाहायला मिळाल आहे.. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळेस नागरिकांशी संवाद देखील साधला आहे नागरिकांना काही अडचणी असतील तर थेट तक्रार नोंदवा तात्काळ कारवाई केली जाईल असा आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना दिले आहे..
0
0
Report

अकोला में खरीफ फसलें संकटग्रस्त, सोयाबीन और कपास सूखने लगे

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात गेल्या महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामावर मोठे संकट ओढावले आहे. मुर्तीजापूर, बाळापूरसह जिल्ह्यातील विविध तालुक्यांमध्ये सोयाबीन आणि कपाशी या प्रमुख पिकांनी पावसाअभावी माना खाली टाकल्या आहेत. अनेक भागांमध्ये सोयाबीनचे पीक अक्षरशः सुकून चालले असून, तोंडाशी आलेला घास निसर्ग हिरावून घेत असल्याची परिस्थिती निर्माण झाली आहे. गेल्या महिनाभरापासून समाधानकारक पाऊस न झाल्याने जमिनीत ओलावा शिल्लक राहिलेला नाही. परिणामी, सोयाबीन आणि कपाशीच्या पिकांवर त्याचा मोठा विपरीत परिणाम दिसून येत आहे. विशेषतः सोयाबीनच्या शेंगा भरण्याच्या अत्यंत महत्त्वाच्या टप्प्यातच पावसाने दडी मारल्याने उत्पादनात मोठी घट होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी मोठ्या खर्चातून बियाणे, खते आणि औषधांची फवारणी करत पिके जगविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता पावसाअभावी उभी पिके डोळ्यादेखत करपताना दिसत आहेत. काही भागांमध्ये सोयाबीनचे पीक पूर्णपणे सुकल्याची स्थिती असून कपाशीची वाढही खुंटली आहे. एकीकडे आधीच नैसर्गिक संकटे आणि वाढत्या उत्पादन खर्चामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला असताना, आता पावसाच्या प्रदीर्घ खंडाने त्याच्या अडचणीत आणखी भर पडली आहे. आगामी काही दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर जिल्ह्यातील खरीप उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता आहे.दरम्यान, नुकसानग्रस्त भागांची शासनाने तातडीने पाहणी करून पिकांचे पंचनामे करावेत आणि परिस्थितीची गांभीर्याने दखल घेत अकोला जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. सध्या अकोला जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या असून, आता दमदार पाऊसच त्यांच्या उभ्या पिकांना जीवदान देऊ शकतो.
0
0
Report
Advertisement

मुंबई पुलिस ने दहीहंडी उत्सव के लिए चौकसी कड़ी कर दी; ड्रोन-सीसीटीवी निगरानी

Mumbai, Maharashtra:मुंबई पोलीस दलातर्फे सर्व मुंबईकरांना दहीहंडी उत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. दहीहंडी उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांकडून शहरात सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामध्ये वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांपासून ते अतिरिक्त पोलीस आयुक्त, उपायुक्त, सहाय्यक पोलीस आयुक्त, पोलीस ठाण्यांचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक तसेच इतर पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी होणार आहेत. ज्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी होणार आहे, अशा संवेदनशील आणि महत्त्वाच्या ठिकाणांवर मुंबई पोलीस विशेष लक्ष ठेवणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोनच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणांवर बारकाईने नजर ठेवली जाणार असून, नियंत्रण कक्षातून संपूर्ण परिस्थितीवर लक्ष ठेवण्यात येणार आहे. सर्व दहीहंडी मंडळांनी मानवी मनोरे रचताना प्रशासनाने ठरवून दिलेल्या उंचीच्या मर्यादेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच अल्पवयीन मुलांना मानवी मनोऱ्यांमध्ये सहभागी करून घेऊ नये. सर्व नागरिकांनी उत्सव साजरा करताना स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे आणि डीजेचा वापर करू नये. कोणतीही अनुचित घटना घडल्यास तात्काळ पोलिसांच्या नियंत्रण कक्षाशी १०० किंवा ११२ या क्रमांकावर संपर्क साधावा. तसेच कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये आणि केवळ पोलिसांकडून मिळणाऱ्या अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा.
0
0
Report

अगले दस सालों में मुंबई झोपडपट्टी मुक्त, महायुती के सपनों पर मुख्यमंत्री का विश्वास

Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय : पुढील दहा वर्षात मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार. मुंबई झोपडपट्टी मुक्त होणार म्हणजे प्रत्येक गोरगरीबाला झोपडपट्टीत राहणाऱ्याला सन्मानाचे सुरक्षित पक्के घर मिळणार. मुंबईकरांतर्फे मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानतो. उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गोरगरीब जनतेसाठी पुनर्विकासाची दिशा दिली तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईच्या परिवर्तनाचे लक्ष दिले आहे. पुढील दहा वर्षात मुंबई हे खरेखुरे आंतरराष्ट्रीय दर्जाचे जागतिक दर्जाचे शहर झालेले पहावयास मिळेल. पुढील दहा वर्षे सुद्धा महाराष्ट्राची जनता महायुती सरकारवर विश्वास ठेवेल. त्यांच्याच हातात सत्तेच्या चाव्या असतील आणि जर का मुंबईला आंतरराष्ट्रीय दर्जाचे शहर केलं तर त्या पुढील दहा वर्षे सुद्धा महायुतीची सरकारच सत्तेमध्ये असेल असा मला ठाम विश्वास आहे.
0
0
Report

750 से अधिक गोविंदा पथक, मागाठाणे में दहीहंडी महोत्सव भव्य तैयारी

Mumbai, Maharashtra:मुंबईच्या बोरीवली मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या भव्य दहीहंडी महोत्सवाची जय्यत तयारी सुरू आहे. तारामती चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने, आमदार प्रकाश सुर्वे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नगरसेवक राज सुर्वे यांच्या नेतृत्वाखाली या दहीहंडी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे. विशेष म्हणजे यंदाच्या दहीहंडीच्या माध्यमातून मराठी शाळा वाचवण्याचा आणि मराठी भाषेच्या संवर्धनाचा संदेश देण्यात येणार आहे. दहीहंडी म्हटलं की मुंबईतील गोविंदा पथकांचा उत्साह, थरार आणि जल्लोष डोळ्यासमोर येतो. मागाठाणे विधानसभा मतदारसंघातही उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी गोविंदा पथकांनी जोरदार सराव सुरू केला आहे. उंचच उंच मानवी मनोरे रचत हंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकं सज्ज झाली आहेत. यंदाच्या महोत्सवात ७५० हून अधिक गोविंदा पथकं सहभागी होणार असून, यामध्ये तब्बल २० ते २५ महिला गोविंदा पथकांचाही सहभाग असणार आहे. मुंबई उपनगरातील मोठ्या दहीहंडी उत्सवांपैकी एक म्हणून मागाठाणे येथील दहीहंडी महोत्सवाकडे पाहिलं जातं. दरवर्षी हजारो गोविंदा आणि नागरिक या उत्सवाला उपस्थित राहत असतात. यंदाही दहीहंडीला मराठी कलाकार, अभिनेता, रील स्टार आणि विविध क्षेत्रातील सेलिब्रिटींची उपस्थिती पाहायला मिळणार आहे. त्यासोबतच राजकीय क्षेत्रातील अनेक मान्यवरही या महोत्सवाला उपस्थित राहणार आहेत. या संपूर्ण दहीहंडी महोत्सवासाठी तब्बल ८५ लाख रुपयांचा खर्च करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. सहभागी गोविंदा पथकांना मानधनही देण्यात येणार आहे. मात्र यंदाच्या दहीहंडीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे मराठी शाळा वाचवण्यासाठी पुढाकार घेण्यात आला आहे. दहीहंडीच्या माध्यमातून मराठी भाषा, संस्कृती आणि मराठी शाळांच्या संवर्धनाचा संदेश देण्याचा प्रयत्नण्यात येत आहे. मागाठाणे विधानसभा मतदारसंघात उद्याच्या दहीहंडी महोत्सवासाठी सध्या जोरदार तयारी सुरू आहे. गोविंदा पथकांचा सराव अंतिम टप्प्यात आला असून, ७५० हून अधिक गोविंदा पथकं या महोत्सवात सहभागी होणार आहेत. महिला गोविंदा पथकांचाही मोठ्या प्रमाणात सहभाग असणार आहे. त्यामुळे यंदाची दहीहंडी अधिक भव्य आणि आकर्षक ठरण्याची शक्यता आहे. एकूणच, गोविंदांचा थरार, ढोल-ताशांचा गजर, सेलिब्रिटींची उपस्थिती आणि मराठी शाळा वाचवण्याचा संदेश… या सर्वामुळे मागाठाण्यातील उद्याची दहीहंडी भव्यदिव्य ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

गोरगांव वेस्टर्न एक्सप्रेस हाईवे पर आरे मेट्रो स्टेशन के पास बस आग में जल गई

Mumbai, Maharashtra:गोरेगाव पूर्वेकडील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर आरे मेट्रो स्टेशनखाली धावत्या बसला अचानक भीषण आग लागल्याची घटना समोर आली आहे. पाहता पाहता काही मिनिटांतच आगीने संपूर्ण बसला आपल्या कवेत घेतलं आणि बस जळून अक्षरशः खाक झाली. बसला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. आगीची तीव्रता मोठी असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांनी शार्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवलं. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. मात्र, बस पूर्णपणे जळून खाक झाली आहे. बसला नेमकी आग कशामुळे लागली, याचा तपास अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे.
0
0
Report

13वें वर्ष के दहीहंडी उत्सव में विशेष बच्चों ने दिखाया धूमधड़ाका

Pune, Maharashtra:विशेष मुलांच्या 'खेळण्यांच्या दहिहंडी' सोहळ्याला १३ व्या वर्षी मोठा उत्साह; कामायनी संस्थेतील मुलांनी लुटला मनसोक्त आनंदपुणे:ताल वाद्य पथक आणि श्री पोटसुळ्या मारुती मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने यंदाही कामायनी संस्थेत विशेष मुलांसाठी 'खेळण्यांची दहीहंडी' अत्यंत उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाचे हे १३ वे वर्ष होते. ढोल-ताशांचा गजर, श्रीकृष्णाची गाणी आणि मुलांचा उत्साह यामुळे संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता.या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर उपस्थित होते. तसेच कामायनी संस्थेच्या श्रीकेखा कुलकर्णी यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम उत्साहात पार पडला.विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेलकार्यक्रमाची सुरुवात संस्थेतील बालगोपाळ आणि शिक्षकांनी एकत्र येऊन पारंपरिक पाळणा गाऊन केली. यानंतर विशेष मुलांनी श्रीकृष्णाच्या विविध गाण्यांवर अतिशय सुंदर नृत्य सादरीकरण केले. ताल वाद्य पथकाच्या ढोल-ताशा पथकाने खेळवलेल्या बहारदार ठेक्यावर मुलांनी मनसोक्त नृत्य करत आनंद लुटला.मुलीने फोडली दहीहंडीया संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण म्हणजे दहीहंडीचा थरार. यंदाच्या १३ व्या वर्षी संस्थेच्या एका विद्यार्थिनीने (मुलीने) अत्यंत उत्साहात दहीहंडी फोडली. हंडी फुटताच मुलांनी एकच जल्लोष केला.हा सोहळा यशस्वी करण्यासाठी ताल वाद्य पथक आणि श्री पोटसुळ्या मारुती मंडळाचे सर्व कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांच्या सहकार्याने विशेष मुलांच्या चेहऱ्यावर एक आगळावेगळा आनंद या निमित्ताने पाहायला मिळाला.
0
0
Report
Advertisement

पुणे में बजाज समूह के भूमिपूजन के साथ डिजिटल इंडिया की नई ऊँचाईयां

Pune, Maharashtra:पुणे - देवेंद्र फडणवीस साऊंड बाइट: आज आनंदाची गोष्ट आहे बजाजच्या मुख्य कार्यालयाचे भूमिपूजन करत आहोत महाराष्ट्राचा विचार करताना काही नाव अशी आहे जी महाराष्ट्र आणि तिथली औद्योगिकता काय हे सामोरं आणतात यात बजाज यांच्या नाव आहे थोर स्वातंत्र्य सेनानी असलेले बजाज भारताच्या औद्योगिक यात्रेत महत्त्वाचं योगदान देणारे उद्योजक होते त्यांनी बजाज समूहाला दिशा दिली आज 100 वर्षानंतर नवनवीन शिखर पादक्रांत करत आहोत बजाज समूह फक्त उद्योगबाबत मर्यादित नाही बाकी सामाजिक दायित्वाचे काम बजाजने केले आहे मागील अनेक वर्षांत वित्तीय क्षेत्रात काम करत आहे डिजिटल अर्थव्यवस्थे मध्ये नवे रेकॉर्ड केले Upi मुळे डिजिटल काम सुरु झाला आता भारताने डिजिटल ट्रांसेक्शन करणारा भारत अव्वल आहे अनेक क्षेत्रात अनेकांना लोन मिळत तेव्हा हाच भारत आहे का असा प्रश्न पडतो आता लोनसाठी 10 चक्रा माराव्या लागत नाही फिनटेक मध्ये आता मुंबई अव्वल आहे मी पुण्याला तीन चलोकांची टीम दिली आहे आउटर आणि inner रिंगरोड सगळं करतोय परंतु टनेल देखील करणार पुण्याला fastest मोबिलिटी शहर म्हणून तयार करतोय आधुनिक शहर म्हणून पुण्याला तयार करू *पुणे - BYTE देवेंद्र फडणवीस* - फिनटेक मध्ये महाराष्ट्र इतरांच्या समोर आहे - काही लोक या बाजूने काही लोक त्या बाजूचे असू शकतात पण जेंव्हा सन साजरा करतो तेंव्हा पारंपरिक पद्धतीने केला पाहिजे.. त्या पद्धती कायद्याच्या पद्धतीने बंद करता येतात अस नाही - ज्या गोष्टींचा लोकांना त्रास होतो भूकंप आल्यासारखा आवाज येतो तो कमी झाला पाहिजे - पोलिसी ही एकदम तयार होणार नाही. चर्चेतून हे घडवायचं आहे थोडा वेळ दिला पाहिजे - मराठीचा उत्तम नमुना बापट यांच्या भाषेतून समोर आला. पण भूमिका घेताना मांडताना सर्वसमावेशक विचार करतील अशी आशा करतो. मला तर ट्युशन लावावं लागलं..
0
0
Report

पुणे के लाल महाल चौक में दहीहंडी उत्सव: 31 मंडलों का संयुक्त आयोजन

Pune, Maharashtra:पुण्यास्‍थित ऐतिहासिक लाल महाल चौक में दरवर्षीप्रमाणे याही वर्षी ऐतिहासिक दहीहंडी होणार आहे.. पुनीत बालन यांच्या पुढाकाराने 31 दहीहंडी मंडळ एकत्र येऊन ही दहीहंडी संयुक्तरित्या और DJ मुक्त साजरी केली जाते.. DJ मुक्त गणेशोत्सवासाठी पुनीत बालन यांनी यापूर्वीच पुढाकार घेतला आहे.. हीच परंपरा त्यांनी दहीहंडीत देखील कायम ठेवली आहे.. इतकच नाही तर या दहीहंडीत वारकरी संप्रदायाची ओळख असणारे टाळ मृदुंग यांचा देखील समावेश असणार आहे.. दहीहंडी फोडणाऱ्या गोविंदा पथकाला एक लाख 11 हजार रुपये पारितोषिक दिले जाणार आहे त्याशिवाय सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला पुनीत बालन ग्रुप कडून पंधरा हजार रुपयाचं बक्षीस दिले जाणार आहे... पुनीत बालन यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांनी....
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर दौरे पर दिलीप वळसे पाटील फिर से शिक्षक बनकर स्कूल पहुंचे

Ambegaon, Maharashtra:शिनोलीच्या शाळेत पुन्हा शिक्षकाच्या भूमिकेत दिसले दिलीप वळसे पाटील; विद्यार्थ्यांशी साधला मनमोकळा संवाद Anchor - माजी मंत्री तथा आमदार दिलीप वळसे पाटील आज भीमाशंकर दौऱ्यावर होते. यावेळी त्यांनी भीमाशंकर विकास आराखड्याच्या संदर्भात महत्त्वाची बैठक घेतली. बैठकीनंतर परतीच्या प्रवासात त्यांनी शिनोली येथील शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. शाळेत दाखल झाल्यानंतर वळसे पाटील नकळत आपल्या शालेय आठवणींमध्ये रमले. विद्यार्थ्याशी संवाद साधताना त्यांनी विविध विषयांवर चर्चा केली आणि विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनीही त्यांच्याशी मनमोकळेपणाने संवाद साधला. विधानसभेचे अध्यक्ष म्हणून आपल्या शिस्तप्रिय आणि संयमी कार्यशैलीसाठी ओळखले जाणारे दिलीप वळसे पाटील या भेटीत मात्र पुन्हा एकदा शिक्षकाच्या भूमिकेत दिसले. विद्यार्थ्यांशी साधलेल्या या अनौपचारिक संवादामुळे शाळेतील वातावरणही आनंदी झाले. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया आंबेगाव पुणे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top