icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उजनी धरण से पानी छोड़ने का आदेश: बार्शी में खरीफ फसलों को राहत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उजनी धरणातून बार्शी उपसा सिंचन योजनेत पाणी सोडण्याचे आदेश, बार्शीकरांना मोठा दिलासा बार्शी उपसा सिंचन योजनेत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे पाणी सोडण्याचे आदेश.. सोलापूर विधानपरिषद आ. राजेंद्र राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटील यांच्याकडे केली होती मागणी राधाकृष्ण विखे पाटील यांनी यासंदर्भात अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन बार्शीसाठी चार दिवसात पाणी सोडण्याचे आदेश दिले. भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष रणवीर राऊत यांनी रिधोरे येथील पंप हाऊस येथे जाऊन पाहणी केली. उजनी धरणातून पाणी सोडल्यामुळे बार्शी तालुक्यातील खरीप हंगामातील पिकांना दिलासा मिळणार आहे
0
0
Report

अकोला–खंडवा ब्रॉडगेज के काम से किसानों के खेत पानी में डूबे, आंदोलन तेज

Akola, Maharashtra:अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे मार्गाच्या कामातील हलगर्जीपणाचा फटका आता शेतकऱ्यांना बसत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. योग्य निचऱ्याची व्यवस्था न केल्यामुळे हिवरखेड परिसरातील अधिग्रहण न झालेल्या तब्बल 300 हून अधिक एकर शेतीत पावसाचे पाणी साचले असल्याचा आरोप आहे. अनेक ठिकाणी 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती पूर्णपणे जलमय झाली असून पिकांसह सुपीक जमिनीचेही मोठे नुकसान झाले आहे. वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने संतप्त शेतकऱ्यांनी आज जलसमाधी आंदोलन करत प्रशासनाचा निषेध नोंदविला. हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांनी नैसर्गिक पाण्याचा निचरा अडवला गेल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. परिणामी, पावसाचे पाणी शेतांमध्ये साचून शेकडो एकर शेती पाण्याखाली गेली आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात आजही 3 ते 4 फूट पाणी साचल्याने शेती करणे अशक्य झाले आहे. पिकांचे नुकसान तर झालेच, शिवाय जमिनीच्या सुपीकतेवरही परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासन आणि संबंधित विभागाकडे अनेकदा निवेदने देऊनही कोणतीही दखल न घेतल्याने शेतकऱ्यांनी शेतात साचलेल्या पाण्यात उतरून जलसमाधी आंदोलन केले. या आंदोलनातून तातडीने पाण्याचा निचरा करावा, नुकसानीचे पंचनामे करून योग्य नुकसानभरपाई द्यावी आणि या प्रकरणातील जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली.या आंदोलनात परिसरातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. प्रशासनाने तातडीने निर्णय न घेतल्यास आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशाराही आंदोलकांनी दिला आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामुळे हिवरखेड परिसरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report

Nandurbar में भारी बारिश की दुआ: किसानों की मुश्किलें हलाने की उम्मीद

Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यात दमदार पाऊस व्हावा यासाठी मुस्लिम बांधवांची सामूहिक प्रार्थना केली. शहादा शहरातील सरकार कलंदर शाह बाबा दर्ग्यावर हजारो बांधवांनी पावस पडण्याची प्रार्थना केली. जिल्ह्यात दुष्काळाचे सावट टळावे म्हणून मुस्लिम बांधवांच्या वतीने अल्लाकडे लवकर पाऊस पडण्याची प्रार्थना केली. जिल्ह्यात पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ येणार आहे. नंदूरबार जिल्ह्यात पावसाळ्याचे जवळपास दोन महिने उलटूनही समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. खरीप हंगाम संकटात सापडला असून दुष्काळाची भीतीही व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहादा शहरातील हजारो मुस्लिम बांधवांनी कुकडेल येथून सरकार कलंदर शाह बाबा यांच्या दर्ग्याकडे पायी जात पावसासाठी विशेष सामूहिक दुआ केली. लवकर चांगला पाऊस पडावा, शेतकऱ्यांवरील संकट दूर व्हावे आणि सर्व धर्मीयांच्या जीवनात सुख-समृद्धी नांदावी, अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

कडेगांव में तुकाराम मुंडे के समर्थकों का मोर्चा, बदली रुकवाने और कार्यकाल मांग

Sangli, Maharashtra:सखल समाचार: कडेगाव में तुकाराम मुंडे के समर्थन में मोर्चा निकाला गया। अन्न औषध प्रशासन विभाग के आयुक्त तुकाराम मुंढे के समर्थन में सांगली के कडेगाव में मोर्चा काढा गया। राज्यमंत्री के अनुसार तुकाराम मुंडे की धडक कार्रवाई का स्वागत किया गया है; उनकी बदली न करके तीन वर्ष का स्थिर कार्यकाल दिया जाए और उनके कार्य की शासन द्वारा गौरवित किया जाए, ऐसी मांग किसानों और नागरिकों ने तहसील कार्यालय पर मोर्चा निकालकर ठेखी। यह मोर्चा शेतकरी संघठन के नेता रघुनाथदादा पाटील के भी शरीक होने से संगठित हुआ।
0
0
Report

नंदूरबार के शहादा में होल मोहिदा गांव में बिबट्या घर में घुसा; चार घायल

Dhule, Maharashtra:शहादा तालुक्यातील होळ मोहिदा गावातील भरवस्तीत बिबट्याचा शिरला. होळ मोहिदा गावातील एका घरात बिबट्या शिरल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बिबट्याच्या हल्ल्यात चार जण गंभीर जखमी झाले असून, शहादा ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. एक व्यक्ती स्वतः जखमी असतानाही चिमुरड्याचा जीव वाचवण्यासाठी ग्रामस्थाने बिबट्याला घरातच कोंडले. घरात शिरलेल्या बिबट्याचा थरारक व्हिडिओ समोर आला आहे. जवळपास तीन तास घरात जेरबंद असलेल्या बिबट्याला पकडण्यात वन विभागाला यश आले. घराच्या दरवाजासमोर पिंजरा लावून वन विभागाने बिबट्याचे यशस्वी रेस्क्यू केले. होळ मोहिदा गावात बिबट्या शिरल्याने एकच खळबळ असून, बिबट्याच्या रेस्क्यूदरम्यान घटनास्थळी ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती.
0
0
Report

मंदिर परिसर में VIP दर्शन को लेकर विवाद, नेताओं के समर्थक भिड़े; प्रशासन हैरान

Pandharpur, Maharashtra:Anchor - श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये व्हीआयपी दर्शना वरून गोंधळ, भाजपनेते सुधीर मुनगंटीवार यांच्यासोबत आलेल्या लोकांना व्हीआयपी दर्शन नाकारले तर मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत असलेल्या शिवसेनेच्या पदी अधिकाऱ्यांनी व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश झुगारून मंदिर समितीच्या अधिकाऱ्यांसमोरच या आदेशाचा फज्याउडाल्याचे आपल्याला पाहायला मिळाला आहे. यावर सुधीर मुनगंटीवार यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली मंदिरांनी महसूल प्रशासनामध्ये समन्वयाचा अभाव आहे. तर जे बीव्हीजी चे कमांडो आहेत त्यांच्या कार्यपद्धतीबद्दल सुद्धा नाराजी व्यक्त केली यानंतर गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांना दर्शन देण्यात आलं पाटील म्हणाले की मला असा अनुभव आलाय माझ्यासोबत आलेल्या सगळ्यांना सोडलं त्यामुळे मंदिरामध्येच व्हीआयपी दर्शनावरून सुरू असलेला गोंधळ दिसून झाला
0
0
Report
Advertisement

डोंबिवली-ठाकूर मार्ग की लोकल डब्बे में सीट विवाद से मारपीट, दो घायल

Kalyan, Maharashtra:डोंबिवली ठाकूरच्या दरम्यान रेल्वेच्या लगेच डब्यामध्ये दोघांनवर प्राण घातक हल्ला. सीएसटी वरून अंबरनाथ कडे जाणाऱ्या लोकलच्या लगेज डब्यामध्ये सीटवर बसण्यावरून आपआपसाद वाद झाला वादाचे रूपातर हाणामारी झाल्याने यामध्ये राजू वाघे, साहिल संदारे हे दोघेजण जखमी झाले असून दोघांना कल्याणच्या रुक्मिणी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते मात्र दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने सायन हॉस्पिटलला हलवण्यात आले आहे याप्रकरणी कल्याणच्या लोहमार्ग पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे.
0
0
Report

सीएम फडणवीस ने छत्रपति संभाजीनगर की पानी योजना में देरी पर नाराजगी जताई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामातील दिरंगाईवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुंबईत झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत कंत्राटदार कंपनी आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांची त्यांनी चांगलीच खरडपट्टी काढली. योजना पूर्ण करण्यासाठीचा तपशीलवार माहिती पुढील दहा दिवसांत लेखी स्वरूपात सादर करण्याचे आदेश देत, शहरवासीयांना नवीन योजनेचे पाणी लवकरात लवकर उपलब्ध करून देण्यासाठी सर्व अडचणी युद्धपातळीवर सोडविण्याच्या स्पष्ट सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या. ही बैठक महापौर समीर राजूरकर यांच्या तक्रारीनंतर घेण्यात आली असून, यामध्ये मंत्री, लोकप्रतिनिधी आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

जायकवाड़ी बांध में पानी की आवक फिर से बंद, जीवंत जलभंडार 31.42%

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जायकवाडीत पाण्याची आवक पुन्हा बंद; धरणातील जिवंत पाणीसाठा ३१.४२ टक्क्यांवर ANC : जायकवाडी धरणातील पाण्याची आवक पुन्हा एकदा थांबली आहे. १५ जुलै २०२६ रोजी मध्यरात्रीपर्यंतच्या नोंदीनुसार धरणाची पाणीपातळी १५०६.३५ फूट असून, धरणात सध्या ६८२.०४ दलघमी म्हणजेच ३१.४२ टक्के जिवंत पाणीसाठा उपलब्ध आहे. यंदाच्या पावसाळ्यात १ जूनपासून आतापर्यंत धरणात एकूण २६.१७३ दलघमी पाण्याची आवक झाली आहे. विशेष म्हणजे, गेल्या वर्षी याच दिवशी धरणातील उपयुक्त पाणीसाठा ७६.४० टक्के होता. त्यामुळे आगामी काळात गोदावरीच्या उगम व पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस होणे अत्यावश्यक असल्याचे चित्र आहे.
0
0
Report
Advertisement

वर्धा में 12 वर्षीय बच्ची की हत्या: दगड से मारने का शक, पुलिस जांच तेज

Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या हत्येनं परिसरात खळबळ;मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय वर्धा - वर्ध्याच्या रोठा शिवारातील धक्कादायक घटना घडली असून परिसरात खळबळ उडाली आहे. मृतक मुलगी दुपारच्या सुमारास परिसरात असलेल्या जिल्हा परिषद शाळेतून आपल्या राहत्या घरी आली असताना आधी मुलीवर अत्याचार करून तिचा दगडाने ठेचून खून करण्यात आल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. मुलीचे कपडे शेतातील असलेल्या कोट्याच्या कोठारामध्ये फेकून होते आणि मुलगी दुसऱ्या बाजूच्या रूममध्ये नग्न अवस्थेत पडलेली होती ही घटना मुलीचे आई-वडील व घरी आल्यावर पुढे आल्याने पोलिसांना या घटनेची माहिती देण्यात आली.स्थानिक गुन्हे शाखेने चार ते पाच लोकांना ताब्यात घेतले असल्याची माहिती सांगण्यात आलेली असून गृहराज्य मंत्र्याच्या जिल्हात कायदा व सुव्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report

हिंगणा में गैस कटर से ATM चोरी: 13.47 लाख नकदी लुटी गई

Nagpur, Maharashtra:गॅस कटरने एटीएम फोडून १३.४७ लाखांची रोकड लंपास. हिंगणा तालुक्यातील डोंगरगाव येथील बँक ऑफ इंडियाच्या एटीएमवर पहाटे चोरट्यांनी गॅस कटरने वाल्ट फोडून १३ लाख ४७ हजार रुपयांची रोकड लंपास केली. पहाटे ४.१९ ते ४.३१ या अवघ्या १२ मिनिटांत चार अज्ञात आरोपींनी एटीएममधील दोन्ही मशीन फोडून रोकड पळविली. एका एटीएममधून ७७ हजार ६०० रुपये, तर दुसऱ्या एटीएममधून १२ लाख ६९ हजार ४०० रुपये, अशी एकूण १३.४७ लाखांची चोरी झाली. तक्रारीवरून हिंगणा पोलीसांनी अज्ञात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल केला. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक पुराव्यांच्या आधारे आरोपींचा शोध सुरू आहे.
0
0
Report

छत्रपती संभाजी नगर बाबा फर्जन के बंगले से 5.26 करोड़ रुपये की नकदी SBI बैंक में जमा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या बाबा फर्जनच्या बंगल्यातून पोलिसांनी जप्त केलीली ५.२६ कोटींची रोकड बुधवारी न्यायालयाच्या आदेशाने एसबीआय बँकेत जमा केली. छावणी पोलिसांनी ४ कोठ्या भरून ही रक्कम बँकेत नेली. सुरुवातीला ५ मशीनद्वारे १६ तास मोजलेली ही रक्कम आता बँक कर्मचारी मोजत असून, बुधवारी केवळ एकच कोठी मोजून पूर्ण झाली होती. एवढी मोठी रोकड आणि शस्त्रे असल्याने छावणी पोलिस ठाण्याच्या मुख्य गेटला हातकडीचे कुलूप लावून कडक पहारा ठेवण्यात आला होता. वरिष्ठांना कोषागार विभागातील सुरक्षितता न रुचल्याने कायदेशीर परवानगी घेऊन ती छावणी पोलिसांच्या अधिकृत बँक खात्यात वळवण्यात आली. रोकड हलवली असली तरी शस्त्रे अद्याप ठाण्यातच आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपूर के रामदासपेठ होटल ड्रग्स पार्टी पर छापा, MD पावडर 1.64 ग्राम पकड़ाई

Nagpur, Maharashtra:2c ला सीताबर्डी पोलीस स्टेशनच्या संग्रहित व्हिडिओला आहे ------- नागपूरातील रामदासपेठ येथील एका नामांकित हॉटेलमध्ये सुरू असलेल्या ड्रग्ज पार्टीवर सीताबर्डी पोलिसांनी धाड टाकून गोंदियातील तीन तरुणांना एमडी ड्रग्जचे सेवन करताना ताब्यात घेतले. आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर जप्त करण्यात आली आहे.. ड्रग्जविरोधी मोहिमेदरम्यान नागपूर पोलिसांच्या सीताबर्डी पोलिस ठाण्यातील पथकाला रामदासपेठेतील हॉटेलमध्ये काही तरुण एमडी ड्रग्जचे सेवन करत असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी दोन पंचांच्या उपस्थितीत हॉटेलवर छापा टाकला. खोलीची झडती घेतली असता गोंदियातील तीन तरुण नशेच्या अवस्थेत आढळून आले. तपासादरम्यान आरोपींकडून १.६४० ग्रॅम एमडी पावडर ही जप्त करण्यात आली. चौकशीत तिघांनी मिळून सुमारे २.५ ग्रॅम एमडी खरेदी केली होती आणि त्यातील काही अंमली पदार्थाचे सेवन केल्याची माहिती समोर आली. पोलिसांनी तिघांची वैद्यकीय तपासणी करून रक्त व मूत्राचे नमुने न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहेत. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यान्वये गुन्हा दाखल करून आरोपींना अटक करण्यात आली. आता एमडीचा पुरवठा कोण, पुरवठा साखळी कशी कार्यरत आहे आणि या रॅकेटमागील मुख्य सूत्रधार कोण आहेत, याचा तपास सीताबर्डी पोलीस करत आहेत.
0
0
Report

मद्यपान कर रही हालत में रिक्षाचालक गिरफ्तार, वाहन जप्त, ड्रंक एंड ड्राइव मामला दर्ज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मद्याच्या नशेत धुंद होऊन शाळकरी मुलांची वाहतूक करणाऱ्या एका रिक्षाचालकाला छत्रपती संभाजी नगर वाहतूक पोलिसांनी शोधून काढत बेड्या ठोकल्या. या मद्यपी चालकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी आरोपीचे वाहन जप्त केले असून, त्याच्याविरुद्ध 'ड्रंक अँड ड्राइव्ह' अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. प्रदीप अशोक दाभाडे असे चालकाचे नाव आहे, ब्रेथ अनालायझरद्वारे त्याची वैद्यकीय चाचणी केली असता त्याने दारू प्यायल्याचे सिद्ध झाले. पोलिसांनी त्याची रिक्षा जप्त केलीय...
0
0
Report

अकोल्य में बोगस बीज मामले पर मिटकरी की कृषि मंत्री भरणे पर तीखी नाराज़गी

Akola, Maharashtra:अकोळ्याच्या बोगस सोयाबीन बियाणे प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार अमोल मिटकरी यांनी राज्याचे कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्यावर जाहीर नाराज़गी व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांच्या समस्या मांडण्यासाठी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न करूनही कृषिमंत्रीने फोन उचलला नाही, असा आरोप मिटकरी यांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या व्यथा आणि अडचणी ऐकण्यासाठी मंत्री उपलब्ध राहिले पाहिजेत, मात्र तसे होत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. बोगस बियाण्यांमुळे हजारो शेतकरी संकटात सापडले असून या प्रश्नावर आपण अकोळ्यात आंदोलनही केले, त्यानंतरही कृषिमंत्र्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाचा कार्यकर्ता आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी लढणाऱ्या लोकप्रतिनिधींचे फोन दुर्लक्षित होणे योग्य नसल्याचे मिटकरी म्हणाले. शेतकऱ्यांच्या अडचणी तातडीने ऐकून त्यांना न्याय देण्याची जबाबदारी कृषिमंत्रीांची आहे. मात्र फोनही न उचलल्याने शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याची भावना निर्माण होत असल्याचे सांगत मिटकरी यांनी नाराजी व्यक्त केली आहे. यामुळे अकोल्यातील बोगस बियाणेग्रस्त शेतकऱ्यांना न्याय मिळणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला असून ' मामा हे वागणं बरं नव्हे ' म्हणत त्यांनी मिश्किल टीका ही केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top