icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Mulund में पानी की किल्लत पर मणसे-आरपीआई-वंचित का संयुक्त मोर्चा

Mumbai, Maharashtra:मुलुंडमध्ये तीव्र पाणीटंचाईच्या निषेधार्थ आज मनसे, आरपीआय आणि वंचित आघाडीच्या वतीने मुलुंड टी विभाग कार्यालयावर संयुक्त हंडा मोर्चा काढण्यात आला. पाणीपुरवठ्याच्या प्रश्नावर प्रशासनाकडून वारंवार दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच आंदोलन अधिक तीव्र करत नागरिकांनी टी कार्यालयासमोर मडके फोडो आंदोलन छेडत निषेध व्यक्त केला. साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे चौक, जय शास्त्री नगर येथून या मोर्चाला सुरुवात करण्यात आली. शंकर टेकडी, राहुल नगर आणि हनुमान पाडा परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते. महिलांनी डोक्यावर हंडे आणि मडकी घेऊन रॅली काढत आंदोलनाला सुरुवात केली. यावेळी “पाणी आमचा हक्क आहे”, “घेतल्याशिवाय राहणार नाही” अशा जोरदार घोषणा देत परिसर दणाणून सोडला. नागरिकांनी थेट मुलुंड टी विभाग कार्यालयावर धडक देत प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. टी कार्यालयासमोर मोठ्या संख्येने नागरिक एकत्र जमले असून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. या आंदोलनामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र पोलिस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले. स्थानिक नागरिकांना नियमित आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा आंदोलकांनी प्रशासनाला दिला.
0
0
Report
Advertisement

Akole Taluka Child Marriage Data Sparks Questions on Administration in Maharashtra

Shirdi, Maharashtra:अकले तालुक्यातील अहिल्यानगर जिल्ह्यातील आकडेवारी केवळ धक्कादायक नाही... तर प्रशासनाच्या यंत्रणेलाच प्रश्नांच्या भोवऱ्यात उभं करणारी आहे... महिला व बालविकास विभागाच्या सर्वेक्षणात तब्बल ५५ अल्पवयीन विवाहित मुली आणि एक अविवाहित अल्पवयीन मुलगी गरोदर असल्याची बाब समोर आली आहे... काही मुलींची प्रसूतीही झाल्याने बालविवाह रोखण्यासाठी नेमकी यंत्रणा काय करत होती..? असा सवाल आता उपस्थित केला जातोय... अकोले आणि राजूर प्रकल्पांतर्गत अंगणवाडी सेविकांकडून दरमहा गरोदर आणि स्तनदा मातांचे सर्वेक्षण केले जाते. मात्र इतक्या मोठ्या प्रमाणात अल्पवयीन मुली गरोदर असल्याची माहिती समोर येईपर्यंत प्रशासनाला याची कल्पना नव्हती का..? की प्रशासनाला माहिती मिळूनही कानाडोळा केला..? अशा प्रश्न उपस्थित होत आहेत. केंद्र सरकारच्या मातृत्व वंदना योजनेसाठी आलेल्या अर्जांमध्येही अल्पवयीन मुलींची नावे आढळल्याने सरकारी यंत्रणांमधील समन्वयावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात अजूनही बालविवाह सुरू असल्याचं या प्रकरणातून स्पष्ट होत आहे. सामाजिक दबाव, बदनामीची भीती आणि कायदेशीर कारवाईच्या धाकामुळे अनेक बालविवाहांची नोंदच होत नसल्याचे सांगितले जात असले. गावपातळीवरील यंत्रणा, ग्रामसेवक, आरोग्य विभाग आणि पोलीस प्रशासन यांना याची माहिती नव्हती का..? नागरिकांकडून असा सवाल उपस्थित केला जात आहे. महाराष्ट् राज बालहक्क आयोगाने या संपूर्ण प्रकरणाची दखल घेऊन बाल हक्क आयोगाच्या कार्यालयात मुंबई येथे सुनावणी पार पडली. अहिल्यानगरचे जिल्हाधिकारी, जिल्हा महिला बालविकास अधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी ही मुंबई येथे सुनावणीला हजर होते. सुनावणी केल्यानंतर जिल्हा महिला बालविकास अधिकारी यांनी ही गंभीर गोष्ट असल्याची कबुली दिली आणि सांगितलं की अकोले तालुक्यात बालविवाहाचे प्रमाण मोठे आहे. परंतु महिला बालविकास विभाग आणि शैक्षण विभाग यांच्या दुर्लक्षामुळे बालविवाहाचे प्रमाण वाढतं चालले आहे. मुली पळून जाऊन लग्न करतील या भीतीने अनेक पालक अल्पवयातच विवाह लावत असल्याचे समोर आले आहे. बालविवाह प्रतिबंधक कायदा अस्तित्वात असताना अशा विवाहांवर कारवाई का झाली नाही..? या बाबत प्रशासन मौन का बाळगून आहे..? या गंभीर प्रकरणाची दखल घेत राज्य सरकार आणि राज्य बालहक्क आयोगाने चौकशी करून काहीतरी ठोस उपाययोजना करावी अशी मागणी बाल संरक्षण समितीचे अशासकीय सदस्य श्रीनिवास रेणुकादास यांनी राज्य सरकारकडे केलीय. श्रीनिवास रेणुकादास, अशासकीय सदस्य, बालसंरक्षण समिती अकोले. महाराष्ट्रात बालविवाहाचं प्रमाण अजूनही गंभीर असल्याचं चित्र समोर येत आहे... शासकीय आकडेवारीनुसार राज्यात दरवर्षी २२ टक्के बालविवाह होत असून, अनेक अल्पवयीन मुली बालमाता बनत आहेत... देशातील सर्वाधिक बालविवाह होणाऱ्या ७० जिल्ह्यांपैकी १७ जिल्हे महाराष्ट्रातील असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित होत आहेत... बालविवाह प्रतिबंधक कायदा कडक असला तरी त्याची प्रभावी अंमलबजावणी होत नसल्याची टीका सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केली आहे... बालविवाह रोखण्यासाठी सरकारने कायदेशीर कारवाईचा धाक निर्माण करण्याची गरज असल्याची मागणी त्यांनी केली आहे... शासन विविध योजना राबवत असताना अकोले तालुक्यात समोर आलेली ही आकडेवारी प्रशासनाच्या दाव्यांनाच छेद देणारी ठरत आहे..आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का..? आणि जागरूक राहून बालविवाह थांबवणार का..? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे... प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी २४ तास अहिल्यानगर
0
0
Report

जरांगे का आमरण उपोषण: 30 मई को अंतरवाली सराटी में नया मोड़

Jalna, Maharashtra:जालना :मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मनोज जरांगे पाटलांनी राज्य सरकारला दिलेला अल्टीमेटम उद्या संपणार,सरकारकडून अद्याप मागण्याबाबत कोणताही प्रतिसाद नाही,मनोज जरांगे आणि सरकार मध्ये मध्यस्थी करणारे आमदार प्रसाद लाडही तोंडघाशी पडणार? मागण्या पूर्ण न करणाऱ्या नेत्यांवर उलटण्याचा जरांगे यांचा इतिहास (पॅकेज) अँकर : मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटीलांनी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टीमेटम उद्या संपतोय.त्यामुळे जरांगे पाटील उद्या सकाळी साडेदहा वाजता अंतरवाली सराटीत पत्रकार परिषद घेऊन 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाची घोषणा करण्याची शक्यता आहे. भाजप आमदार प्रसाद लाड यांनी जरांगे आणि राज्य सरकारमध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा मात्र त्यांच्या मध्यस्थीला अद्याप यश आल्याचं दिसत नाही.त्यामुळे राज्य सरकार आणि जरांगे पाटील यांच्यात मध्यस्थी करणं प्रसाद लाड यांच्या चांगलंच अंगलट येण्याची शक्यताय.कारण जरांगे यांच्या अनेक उपोषणात अनेक नेते आणि मंत्र्यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला पण त्यांना यश न आल्यानं जरांगे या नेत्यांवरच उलटल्याचा इतिहास आहे.बघूया यावरचा एक स्पेशल रिपोर्ट. व्हिओ :०१: मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी राज्य सरकारला दिलेला 28 तारखेचा अल्टीमेटम उद्या संपतोय.भाजप आमदार प्रसाद लाड यांनी राज्य सरकार आणि जरांगे यांच्यात मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला खरा पण या मध्यस्थीला अजूनही यश आल्याचं दिसून येत नाहीय.कारण लाड जरांगे यांच्यासोबत चर्चा करून गेल्यानंतर लाड यांच्याकडून कोणताही निरोप अजून जरांगेंना आलेला नाही.त्यामुळे जरांगे उद्या अंतर वाली सराटी येथे सकाळी 10.30 वाजता पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या 30 मे रोजीच्या आमरण उपोषणाबाबत घोषणा करणार आहेत.30 तारखेला अंतरवाली सराटीमध्ये होणारं आमरण उपोषण हे कडक स्वरूपाचं असेल असा ईशारा जरांगेंनी सरकारला दिलाय. बाईट :मनोज जरांगे पाटील ग्राफिक्स व्हिओ :०२: ● 29 ऑगस्ट 2023 रोजी जरांगे यांनी अंतरवाली सराटीमध्ये पहिलं उपोषण केलं.या उपोषणादरम्यान गिरीष महाजन,राधाकृष्ण विखे पाटील,नितेश राणे,यांनी जरांगे आणि सरकार मध्ये मध्यसथी केली पण मागण्या पूर्ण न झाल्यानं या नेत्यांनाच जरांगे यांनी टार्गेट केलं. ●जरांगे यांचं दुसऱ्या उपोषण धनंजय मुंडे यांच्या मध्यस्थीने सुटलं.पण तरीही जरांगे यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत त्यामुळे जरांगे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर उलटत त्यांनाच टार्गेट केलं. ● जरांगे यांचं तिसरं उपोषण मुंबई तील वाशीमध्ये पार पडलं.तिथे तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मंत्री गिरीश महाजन यांनी जरांगे यांचं उपोषण सोडवलं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते तिथेच जरांगेना सगे सोयरेचा मसुदा देण्यात आला पण त्याची अंमलबजावणी झाली नाही.त्यामुळे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि गिरीष महाजन यांच्यावर जरांगे यांनी रोष व्यक्त केला... ●जरांगे यांचं चौथं उपोषण ● अगरांगे यांचं चौथं उपोषण 10 फेब्रुवारी ते 26 फेब्रुवारी असे 17 दिवस चौथं उपोषण झालं.या उपोषणादरम्यान जरांगे यांनी तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर रोष व्यक्त करत फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे कूच केली.मात्र जरांगे मराठा आंदोलकांसह भांबेरी गावातून पुन्हा अंतरवालीत परत आले आणि त्यांनी उपोषण सुरूच ठेवलं. राज्य सरकार आणि मराठा समाज यांच्यात मधयस्थी करणाऱ्या नेत्यांना टार्गेट करण्याचा इतिहास राहिलाय.त्यामुळे आता मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी पुढाकार घेणारे प्रसाद लाड यांच्यावरही जरांगे उलटतील का असा प्रश्न निर्माण झालाय...दरम्यान जरांगे यांच्या मागण्या कधीही पूर्ण होणाऱ्या नाहीत.त्यांच्या मागण्या घटनाबाह्य आहेत.मात्र शिष्टमंडळाकडून जरांगे यांना खोके मिळत नसल्यानं जरांगे या नेत्यांना टार्गेट करत असल्याचा आरोप ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी केलाय... बाईटव: नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते व्हिओ:०३: येत्या 30 मे पासून जरांगे यांनी अंतरवाली सराटीत पुन्हा आमरण उपोषणाचा ईशारा दिलाय.जरांगे यांचं अंतरवाली सराटीत होणारं हे 9 वं आमरण उपोषण असणार आहे.आतापर्यंत जरी सरकारकडून जरांगे यांच्या मागण्यांबाबत कोणताही प्रतिसाद मिळाला नसला तरी जरांगे उपोषण सुरू करण्याआधीच राज्य सरकार कडून काही हालचाली होतात का याकडे सर्वांच लक्ष लागलंय.शिवाय येत्या काळात मध्यस्थीची भूमिका घेणारे प्रसाद लाड पुन्हा जरांगेंचे टार्गेट ठरतात का हे देखील पाहायला पाहिजे.
0
0
Report
Advertisement

वाशीम में डीजेल तंगी समाप्त: सप्लाई बढ़ी, पेट्रोल पंपों पर भीड़ घटी

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशीम जिल्ह्यात मागील दहा ते बारा दिवसांपासून निर्माण झालेली डिझेल टंचाई आता नियंत्रणात आली असून पेट्रोल पंपांवरील गर्दी ओसरली आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर मशागत आणि कृषी कामांना वेग आल्याने डिझेलच्या मागणीत मोठी वाढ झाली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काही ठिकाणी अतिरिक्त साठेबाजीमुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे म्हटले होते. त्यालाच दुजोरा देत जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी एप्रिल महिन्याच्या तुलनेत मे महिन्यात ३१ टक्के अधिक डिझेल विक्री झाल्याची माहिती दिली. साठेबाजी करणाऱ्यांवर प्रशासनाने कारवाई केली असून सध्या जिल्ह्यात डिझेलचा मुबलक साठा उपलब्ध असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
0
0
Report

चंद्रपूर अस्पताल में सांसद प्रतिभा धानोरकर ने फिर निरीक्षण किया, सुधारों पर संतोष

Chandrapur, Maharashtra:सुमारे पंधरा दिवसांपूर्वी चंद्रपूरच्या खासदार प्रतिभा धानोरकर यांनी अचानकपणे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाला भेट देत तिथल्या अस्वच्छता आणि गैरकारभाराबाबत स्वतः माहिती घेतली होती. त्याचवेळी अधिकाऱ्यांना पंधरा दिवसाचा अल्टीमेटम देत पुन्हा पाहणी करणार असल्याचे सांगितले होते. खा. धानोरकर पुन्हा जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल झाल्या. त्यांनी अधिकाऱ्यांना सोबत घेत संपूर्ण सामान्य रुग्णालयाची पाहणी केली. पंधरा दिवसात केलेल्या सुधारणा बद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. यादरम्यान त्यांनी थेट रुग्णांशी संवाद साधत अडचणी जाणून घेतल्या
0
0
Report
Advertisement

गोकुळ हलाल सर्टिफिकेट मामला चुनाव से पहले गरम

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिले के सहकार और आर्थिक क्षेत्र का प्रमुख केंद्र गोकुळ दूध संघ की निवडणुकियों के बिगुल बजते ही नया विवाद सामने आ गया है। गर्जना संघटना ने गोकुळ के उत्पादनों के लिए हलाल सर्टिफिकेट लेने पर सवाल उठाते हुए तत्कालीन संचालन पर निशाना साधा है। मंत्री हसन मुश्रीफ ने आरोपों को बिनबुडा़ बताते हुए कहा है कि यह चुनावी राजनीति का हिस्सा है। ज्ञात हो कि गोकुळ ने 2018 में हलाल सर्टिफिकेट प्राप्त किया था, तब महाडिक गुट और दिवंगत विधायक पी.एन. पाटील के नेतृत्वाधीन संचालक मंडल सत्ता में थे। विवाद अगस्त-नवम्बर चुनाव के समय फिर उभरा है और उद्योगजगत व सहकार क्षेत्र में इस मुद्दे की गहराई पर चर्चा हो रही है।
0
0
Report
Advertisement

सोलापुर में 6 साल की बच्ची को आइसक्रीम के बहाने ले जाकर पैंजण चोरी

Solapur, Maharashtra:सोलापुरात 6 वर्षीय चिमुकलीला आयस्क्रीमचे आमिष दाखवून 10 तोळ्याचे पैंजण चोरले सोलापुरात 6 वर्षीय चिमुकलीला आयस्क्रीमचे आमीष दाखवून 10 तोळ्याचे पैंजण चोरले आरोपीने चिमुकलीला आयस्क्रीमचे आमीष दाखवत नेल्याची घटना CCTV कॅमेऱ्यात कैद नामकरण सोहळ्यातून आयस्क्रीमचे आमीष दाखवून निर्जनस्थळी नेत पैंजणची चोरी या प्रकरणी जोडभावी पेठ पोलिसांनी आरोपी सोमनाथ सत्यनारायण यनगंटी याला तात्काळ ताब्यात घेत गुन्हा दाखल केलाय. दरम्यान नागरिकांनी लग्नसमारम्भ किंवा इतर कार्यक्रमादरम्यान आपल्या मुलांवर लक्ष ठेवावे. आपल्या मुलांना गुड टच बॅड टच तसेच इतर गोष्टींचा प्रशिक्षण देण्याच्या आवाहन पोलिसांनी केलेय.
0
0
Report

डीएपी लिंकिंग के आरोपों के बीच खरीप की तैयारी तेज, किसानों में भारी हड़बड़ी

Washim, Maharashtra:जिल्ह्यात खरीप हंगाम तोंडावर आला असून शेतकरी सध्या पेरणीपूर्व तयारीत व्यस्त आहेत. जिल्हाभरात खत आणि बियाण्यांच्या खरेदीला वेग आला असून कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहे. जिल्ह्यात आज डीएपी खत ४९२ मेट्रिक टन, १९:१९:१९खत ४८० मेट्रिक टन आणि युरिया १हजार१७३ मेट्रिक टन असा एकूण २हजार १५१ मेट्रिक टन खतसाठा उपलब्ध असल्याची माहिती समोर आली आहे. मात्र,याच दरम्यान डीएपी खतासोबत १९:१९:१९ खताची सक्तीने लिंकिंग केली जात असल्याचा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवकप्रदेशाध्यक्ष दामू इंगोले यांनी केला आहे. तसेच पीपीएल कंपनीवर कारवाई करण्याची मागणीही त्यांनी केली आहे.या प्रकरणात कृषी विभागाने तातडीने हस्तक्षेप करून चौकशी करावी आणि शेतकऱ्यांची होणारी गैरसोय थांबवावी,अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
0
0
Report

कल्याण के काला तालाब में मृत मछलियों का ढेर, गर्मी से बढ़ता संकट

Kalyan, Maharashtra:कल्याणच्या काळा तलावात मृत माशांचा खच वाढत्या तापमानामुळे दररोज मरतायेत अनेक मासे? काल्याणच्या ऐतिहासिक काळा तलावात गेल्या काही दिवसांपासून दररोज अनेक मासे मृत्युमुखी पडत आहेत. वाढत्या तापमानामुळे मासे मृत पावत असल्याचा अंदाज व्यक्त केला जातो. दररोज ६० किलोच्या आसपास मासे ही मृत अवस्थेत आढळून येत असल्याचं इथल्या सुपरवायझरने सांगितलं .सध्या काळा तलावाच्या पाण्यावर मृत माशांचा खच पाहायला मिळतोय. या मृत माशांमुळे परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झालाय. यासंदर्भात नागरिक वारंवार केडीएमसी प्रशासनाला तक्रारी केल्या आहेत. त्यामुळे मृत झालेल्या माशांना तात्काळ तिथून काढून स्वच्छता केली जाते आहे.मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा पाण्यावर मृत मासे आढळून येत आहेत. मात्र खरच वाढत्या तापमानामुळे माशांचा मृत्यू होतोय की त्याला अन्य काही कारण आहे याचा शोध घेणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top