icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

KDMC के कर्मचारी SIR के काम में व्यस्त, नागरिक सुविधा केंद्र में भीड़ और परेशानी

Kalyan, Maharashtra:KDMC चे कर्मचारी SIR च्या कामात व्यस्त , कार्यालयात रिकाम्या खुर्च्या , नागरिक सुविधा केंद्रात आलेले नागरिक ताटकळले Anchor- कल्याण डोंबिवली महापालिकेतील नागरी सुरक्षा केंद्रात आलेल्या नागरिकांना सध्या ताटकळत उभं राहावं लागतंय.त्यांची काम होत नाहीयेत. Vo- त्याचं कारण म्हणजे sadhya या नागरिक सुविधा केंद्रामध्ये अधिकारी ,कर्मचारी नसल्याने खुर्च्या रिकाम्या आहेत .SIR(एसआयआर)च्या कामामध्ये अनेक कर्मचाऱ्यांच्या अधिकाऱ्यांच्या ड्युट्या लावण्यात आल्याने त्या कामात ते व्यस्त आहेत. त्यामुळे महापालिकेतील कामानिमित्त येणाऱ्या नागरिकांचे हाल होत आहेत.
0
0
Report

नागपुर में भारी बारिश: 450 बच्चों को सुरक्षित बाहर निकाला गया, ऑरेंज अलर्ट जारी

Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री - On नागपूर पाऊस - मुळात काल जवळपास 186 मिलिमीटर पाऊस हा एका दिवसात नागपुरात पडला, पण त्यातलाही जवळपास 110 मिलिमीटर पाऊस हा एक ते सव्वा तासाच्या अंतराने पडला, त्यामुळे अनप्रेसिडेंट अशा पद्धतीचा हा पाऊस होता आणि तोही ढगफुटी होते तशा काही भागातच झाला. त्यामुळे त्या भागातील जे सखल एरिया होते त्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं..विशेषतः तीन शाळांमध्ये रेस्क्यू ऑपरेशन चालवावं लागलं आणि सर्व मुलांना बाहेर काढावा लागला..सुमारे 450 मुलांना बाहेर काढलं. प्रशासनाने अतिशय चांगलं काम केलं, ज्या काही ठिकाणी झालेले नाही पण निश्चितपणे लोकांच्या घरात पाणी शिरल्यामुळे किंवा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी जमा झाल्याने काही काळा साठी जनजीवन विस्कळीत होत. अजूनही काही भागात पाणी आहे. त्यावर कारवाई सुरू आहे. आजही ऑरेंज अलर्ट नागपूरला दिला आहे, संध्याकाळ नंतर पाऊस येण्याची शक्यता आहे पाचनंतर..प्रशासनाशी माझी चर्चा झाली आहे मात्र वेदर इव्हेंट हे सगळे चिंताजनक आहेत. पालघर, नागपूर, नाशिकला आपण बघितलं की 15 किंवा एका दिवसात पाऊस येऊन राहिलाय त्यामुळे त्याचे इंटेन्ससिटी इतकी आहे की आपल्या त्याला ड्रेन करण्याच्या नॅचरल सिस्टम देखील इतक्या प्रभावी नाही की महिन्याभराचा पाऊस एक-दोन दिवसात आला तर त्यातून अनेक फ्लॅश फ्लॅट तयार होत आहेत त्यामुळे याचाही थोडा विचार भविष्याच्या दृष्टीने करावा लागेल. अर्धवट विकास कामांचा फटका - काही ठिकाणी काम चाललेली आहेत, अर्धवट आहे, त्यामुळे पाणी थांबलं, पण असं सरसकट असं नाही तर एक सोबत 110 मिलिमीटर पाऊस पडेल तर कुठलीच सिस्टम एवढ्या पावसाकरिता डिझाइन नसते, सिस्टम डिझाइन करताना गेल्या 20- 25 वर्षातील जो डेटा आहे त्याच्या दहा टक्के जास्त असं सिस्टम डिझाइन होते. अशा प्रकारचे हे सातत्याने राज्यभरात होत आहेत त्यामुळे याचा विचार अभ्यास करावा लागेल. जरांगे पाटील आंदोलन अल्टीमेटम - जात प्रमाणपत्र हे मागितल्यानंतर मिळत आणि ज्या ज्या लोकांनी जात प्रमाणपत्र मागितले त्यांना ते प्रमाणपत्र मिळालेले आहेत, माझ्या माहितीप्रमाणे पेंडन्सी अतिशय कमी आहे कोणी मागतोय आणि देत नाही अशी परिस्थिती नाही. मी पुन्हा एकदा सांगतो की आमच्या सरकारने महायुतीच्या सरकारने मराठा समाजाकरिता जे निर्णय घेतले आणि जेवढे निर्णय कार्यान्वित केले तेवढे कुठल्याही सरकारने केले नाही, अद्यापही कोणाचा रोष असेल कोणाला वाटत असेल की योग्य होत नाही तर त्यातून मार्ग काढता येईल. पिकी विमा संख्या घटली - नवीन अटी शर्ती त्याचा कारण नाहीय मुळात असं कारण आहे की एक रुपयात पिक विमा अशा पद्धतीने पिक विमा केला त्यावेळी सर्वांनीच तो पिक विमा काढला आणि त्यानंतर असं लक्षात आलं की त्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात दुर्दैवाने बोगसगिरी झाले, बीड सारख्या घटना आपल्याला पाहायला मिळाल्या म्हणून मग त्यामध्ये आपण काही सुधारणा केल्या आहेत. पूर्वीप्रमाणे शेतकऱ्यांना आता त्यांचा हिस्सा भरावा लागतो म्हणून त्यांनी संख्या आता थोडी कमी झाली आहे. राहुल गांधी - RSS - अमित शहा - मला असं वाटतं राहुल गांधींचा भाषण ऐकलं नाही, कारण माझ्याकडे तेवढा वेळ नाही की मी त्यांचा भाषण ऐकू, कारण त्यांच्या भाषणात तर काही रहात नाही, कोणताही विपक्षचा नेता जेव्हा बोलतो आरोप जरूर करावा, चुकीच असेल तर त्यावर बोलावं, टिप्पण्या करावा पण देशाच्या तरुणांसाठी कोणते सकारात्मक सूचना दिल्यात कां काय बोलले? केवळ खोटे आरोप करणे यातून काही मिळणार नाही, माझा विश्वास आहे हा बिल पास होईल तर या नव्या पद्धतीमुळे खूप सिक्युअर अशा प्रकारची परीक्षा पद्धती येणार आणि आपल्या तरुणांचं कल्याण होईल. महाराष्ट्रात आंदोलन गुन्हे मागे - महाराष्ट्रात पोलीस विभागाला आणि गृह विभागाला आणि ऑलरेडी सांगितलेला आहे की या आंदोलनाच्या दरम्यान ज्या काही केसेस झाल्या आहेत त्या केसेस परत घेतल्या पाहिजे, महाराष्ट्रात पोलिसांनी फार संयमाची भूमिका घेतली आहे साधारणपणे केसेस आपण बघितल्या तर जमावबंदीच्या केसेस लागल्या आहेत पण ज्या काही केसेस आहेत त्या परत घेण्याच्या आदेश मी दिले आहे. गडचिरोली नक्षल - पत्रक - मध्यंतरीच्या काळात नक्षलवाद्यांचे काही पत्रक लागलेले दिसले पण ज्यावेळी त्याची चौकशी करण्यात आली त्यावेळी असं लक्षात आलं की काही लोकांनी स्वतःच्या हिताकरिता आणि स्वतःच्या स्वार्थाकरिता काही गोष्टी मिळाव्या म्हणून स्वतःसाठी पत्रक लावली त्यांना जेरबंद करण्यात आली आहे. राहुल गांधी प्रल्हाद जोशी टीका - राहुल गांधी काही बोलू शकतात पण राहुल गांधी काय आहेत...हे देखील भारत ओळखतो... मोदी सरकार काय आहेत. M प्रल्हाद जोशी काय हे देखील भारताचे लोक ओळखतात.. राहुल गांधी एकच अजेंडा घेऊन निघालेले आहेत आणि तो अजेंडा आहे अराजकता जगताचा. वन विभाग एआय सिस्टम - मला अतिशय आनंद आहे की मारवल जे आपल्या महाराष्ट्राची एआय कंपनी आहेांनी एक अतिशय चांगलं मॉडेल आपल्या नागपूरचे एसपी हर्ष पोद्दार यांनी तयार केला आहे, ज्यामध्ये वाघाचा विचरण होता त्याची पूर्व मॉर्निंग देण्याची सिस्टम तयार केली आहे. वाघ जेव्हा विचरण करतो तेव्हा काही प्राणी आवाज काढून जंगलाला सांगत असतात की वाघ कुठे आहे, आदिवासी बांधव वर्षानुवर्षी वनवासात राहतात त्यांना याची नीट माहिती असल्याने ते पूर्वीच्या काळात अशा परिस्थितीत राहत असताना बरोबर त्या ठिकाणी स्वतःला वाचवायचे. तेच ज्ञान आता आपण या मध्ये आणलेले आहे त्यामुळे वाघाचा फोटो जरी नाही मिळाला तरी हे प्राणी जेव्हा आवाज करतात त्या आवाजाचा सेन्स करून वाघ कुठे आहे त्याची अर्ली मॉर्निंग देण्याचा सिस्टम तयार झाला आहे. पुढच्या काळात पूर्ण देशातील लागू करण्यात येईल. कर्जमाफी यादी... ई kYC - यासंदर्भात अगोदर स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की अकाउंट एनपी होते..यां NPA अकाउंट असतानाही बँकांनी व्याज लावलं होतं.... याबद्दल बँकांशी जत्यावेळी आमची चर्चा झाली... त्यावेळी त्यांनी दोन गोष्टी कबूल केल्या.. NPA वर व्याज ते कमी करतील.. आणि कर्जमाफीच्या दरम्यान अकाउंट आणि अकाउंट मध्ये पैसे येणे या दरम्यानच कालावधीचा व्याज ते काढून टाकतील.. त्यामुळे अकाउंट मध्ये जरी व्याज दिसत असलं तरी बँकांनी त्या व्याजाशिवाय कर्जमाफी मान्य केली आहे... म्हणून आम्ही कर्जाची जी रक्कम आहे ती बँकेत भरतो आहे.... व्याजाची रक्कम बँक स्वतः त्याच्यातून काढून घेणार आहे.... त्यामुळे अनेकांना कन्फ्युजन असं होत आहे की .... आमचे जास्त पैसे अकाउंटला दिसत आहे.... त्या मनाने आम्हाला अकाउंटला पैसे मात्र कमी आले आहे... काळजी करू नका दोन लाखापर्यंत ज्यांचं अकाउंट आहे त्या अकाउंटला आम्ही पूर्ण पैसे देणारो.
0
0
Report

कोल्हापुर विकास निधि पर आमदार बनाम जिला परिषद सदस्यों में घमासान

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विकासनिधीवरून सध्या जिल्ह्याच्या राजकारणात नवा संघर्ष सुरू झाला आहे. जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च केला जात असल्याचा आरोप विरोधकांसह सत्ताधारी सदस्यांनी केला आहे. विशेष म्हणजे या विरोधात आता सर्वपक्षीय सदस्य एकत्र आले मुक जिल्हा परिषदेमध्ये सह्यांची मोहीम सुरू करण्यात आली आहे.. पंचायत राज व्यवस्थेतील सर्वोच्च स्थान असलेल्या जिल्हा परिषदेकडे ग्रामीण विकासाची जबाबदारी असते. जिल्ह्यातील रस्ते, शाळा, पाणीपुरवठा, आरोग्य आणि इतर विकासकामांसाठी जिल्हा परिषदेला निधी दिला जातो. मात्र, हा निधी सदस्यांच्या शिफारशीनुसार न खर्च होता आमदारांच्या माध्यमातून वळवला जाणा-या आरोप जिल्हा परिषद सदस्यांनी केला आहे. त्यामुळे भविष्यातही सदस्यांच्या अधिकारी-यांवर गदा येण्याची भीती व्यक्त करत सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील सदस्यांनी एकत्र येऊन सह्यांची मोहीम सुरू केली आहे. एकूण 68 पैकी 51 सदस्यांनी या मोहिमेच्या अंतर्गत सह्या केल्या आहेत.. संग्राम पाटील जिल्हा परिषद सदस्य, काँग्रेस राजू सूर्यवंशी जिल्हा परिषद सदस्य, राष्ट्रवादी काँग्रेस. यंदा जिल्हा नियोजन समितीमार्फत सुमारे 265 कोटी रुपयांचा विकासनिधी जिल्हा परिषदेमार्फत खर्च केला जाणार आहे. या निधीला मंजुरीही मिळाली आहे. मात्र, या निधीपैकी 70 टक्के निधी आमदारांच्या शिफारशीने आणि 30 टक्के निधी जिल्हा परिषद सदस्यांच्या शिफारशीने खर्च करण्याचा फॉर्म्युला चर्चेत असल्याने सदस्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. प्रशासक कार्यकाळात बहुतांश निधी आमदारांच्या माध्यमातून खर्च झाला, यापुढे देखील अशाच पद्धतीने हा निधी खर्च करायला मिळावा अशी अपेक्षा आमदारांची आहे. त्यामुळे जिल्हा परिषद सदस्यांनी एकत्र येत आमचा निधी आम्हालाच मिळायला पाहिजे अशी भूमिका मांडली.. मंत्री हसन मुश्रीफ यांनी मात्र जिल्ह्यातील आमदार हे महायुतीचे आहेत, जिल्हा परिषद देखील महायुतीच्या ताब्यात आहे.. त्यामुळे घरातलं भांडण आम्ही घरातच मिटवू अस सांगत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. मंत्री हसन मुश्रीफ, जिल्हा परिषद सत्ताधारी नेते. जिल्हा परिषदेला मंजूर होणारा निधी हा जिल्हा परिषद सदस्यांच्या हक्काचा असून तो त्यांच्या शिफारशीनुसारच खर्च झाला पाहिजे, अशी सदस्यांची ठाम भूमिका आहे. पण आता पालकमंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री हसन मुश्रीफ यांच्यातील चर्चेनंतर निधी वाटपाचा अंतिम फॉर्म्युला ठरणार आहे. त्यामुळे 265 कोटींच्या विकासनिधीवर अखेर कोणाचा प्रभाव राहणार—आमदारांचा की जिल्हा परिषद सदस्यांचा, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे..
0
0
Report
Advertisement

गुरुपौर्णिमा पर गुरु ने शिष्यों को वृक्ष भेंट कर पर्यावरण संदेश दिया

Sangli, Maharashtra:स्लग - गुरुपौर्णिमेनिमित्ताने गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, वृक्ष संवर्धनाचा संदेश। अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील संख येथे अनोख्या पद्धतीने गुरुपौर्णिमा साजरी झाली आहे. गुरुकडून शिष्यांना वृक्ष भेट देत, गुरुपौर्णिमा साजरी करण्यात आली आहे. संख येथील श्री संत बागडे बाबा मानव मित्र संघटनेच्या माध्यमातून तुकाराम बाबा यांनी गुरुपौर्णिमेनिमित्ताने आपल्या शिष्यांना पिंपळ आणि चिंचाचे वृक्ष भेट देत वृक्ष संवर्धनाचा संदेश दिला आहे, वृक्षतोड रोखावी आणि वृक्ष लागवड करावी, अशी साद तूकाराम बाबा महाराज यांनी आपल्या शिष्यांना घातली आहे, सुमारे शंभरहून अधिक शिष्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्ष भेट म्हणून दिले।
0
0
Report

जल जीवन मिशन के खड्डे में तीन वर्षीय बच्ची की मौत, इलाके में भारी हड़कम्प

Amravati, Maharashtra:जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू; जलजीवन मिशनचे अपूर काम उठलं चिमुकल्याच्या जीवावर मेळघाटात जल जीवन मिशनच्या खड्यात पडून ३ वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अमरावतीच्या चिखलदरा तालुक्यातील कोरडा गावातील घटना असून कु. नायरा संजू बुसुम असं गड्ड्यात पडून मृत्यू झालेलेल्या चिमुकलीचे नाव आहे. कोरडा गावात जल जीवन मिशन अंतर्गत नळाची पाईपलाईन टाकण्यासाठी खड्डे करण्यात आले होते मात्र काम झाल्यानंतरही ते खड्डे व्यवस्थित न बुजवल्याने पावसाळ्याच्या दिवसांमध्ये या खड्ड्यात पाणी साचलं या दरम्यान चिमुकली खेळत असताना याच गड्ड्यात बुडून मृत्यू झाल्याची माहिती आहे त्यामुळे मेळघाटातील जल जीवन मिशनचे खड्डे चिमुकल्यांच्या जीवावर उठल्याचे पाहायला मिळत आहे. आता या जलजीवन मिशनच्या कंत्राट दरावर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागला आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण आंदोलन: जरांगे 29 अगस्त से अंतरवाली सराटी में अंतिम आमरण उपोषण करेंगे

Jalna, Maharashtra:जालना : जरांगेंचा पुन्हा आमरण उपोषणाचा एल्गार,29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटीत करणार आमरण उपोषण अँकर :मनोज जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाला 29 ऑगस्ट रोजी 3 वर्ष पूर्ण होतायत.या निमित्ताने जरांगे यांनी आज अंतरवाली सराटी येथे मराठा समाजाची राज्यस्तरीय बैठक घेतली.28 ऑगस्ट पर्यत मराठा समाजाच्या मागण्या पूर्ण करा अन्यथा 29 ऑगस्ट पासून अंतरवाली सराटी येथे शेवटचं आणि अंतिम आमरण उपोषण करणार असल्याची घोषणा जरांगे यांनी केली आहे.दरम्यान या आंदोलनात ज्या मराठा बांधवांना सहभागी व्हायचं त्यांनी अंतरवाली सराटीत यावं आणि ज्यांना यायचं नाही त्यांनी गावातच राहून रॅली काढून मराठा आरक्षण आंदोलनाला पाठिंबा द्यावा असं आवाहन देखील जरांगे यांनी केलं आहे.दरम्यान,जरांगे यांनी दिल्लीत देखील मराठा समाजाचं अधिवेशन घेण्याची घोषणा केली आहे मात्र दिल्लीत होणाऱ्या अधिवेशनाची तारीख त्यांनी जाहीर केलेली नाही. बाईट : मनोज जरांगे ऑन आंदोलन बाईट ऑन दिल्ली अधिवेशन(हा बाईट भाषणात आहे) दरम्यान, या बैठकीत जरांगे यांनी कोणत्या मागण्या केल्या आहेत त्या ग्राफिक्सच्या माध्यमातून बघूया *ग्राफिक्स : मनोज जरांगे यांच्या मागण्या* 1) राज्यात सापडलेल्या 58 लाख नोंदींचे प्रमाणपत्र द्या 2)हैदाबाद गॅजेटिअरनुसार मराठवाड्याले सगळे प्रमाणपत्र घ्यायचे 3)सातारा, कोल्हापूर, पुणे औंध आणि बाॅम्बे या पाचही संस्थानच्या गॅजेटिअरची अमंलबजावणी जीआरसहीत पाहीजे 4)मराठा आंदोलकांवरील दाखल केलेेले गुन्हे मागे घ्यावे 5)ओबीसीच्या सर्व सोई- सुविधा मराठा समाजाला लागू करा 6) अण्णासाहेब पाटील विकास महामंडळातील व्याज परतावे देण्यात यावेत 7)सारथीच्या योजना पुन्हा सुरु करण्यात याव्यात 8)मराठा समाजासाठी स्वतंत्र मंत्रालय स्थापन करण्यात यावं 9) एसईबीसीचे, ईएसबीसी आणि एसडब्लू एस मधून निवड झालेलेल्यांना नियुक्त्या द्या 10)ईसीबीसी आरक्षणातून निवड झालेल्या परिक्षार्थी,विद्यार्थ्यांना सेवेत रुजू करून घ्या 11-कुणबी जात प्रमाणपत्र मिळालेल्या मराठ्यांना व्हॅलिडीटी प्रमाणपत्र द्या
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर में बाघों की संख्या बढ़ी, मानव-बाघ संघर्ष से नई समस्याएं

Chandrapur, Maharashtra:अनकर:-- अनुकूल अधिवास असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र मानव-वाघ संघर्षाने नव्या समस्या उभ्या राहत आहेत. वाघ गावे और शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ले करत आहेत. यावर उपाय म्हणून वनविभागाने गेल्या 2 वर्षात 28 वाघ जेरबंद केले आहेत. परंतु समस्याग्रस्त वाघच पकडले गेलेत का याबाबत मात्र संदिग्धता आहे. या सर्व वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील वन्यजीव शुश्रूषा केंद्र- TTC आणि अन्य वनपरीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले. TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे. जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा परीघ , ब्रम्हपुरी प्रादेशिक व FDCM जंगलाचा समावेश आहे. या जंगल क्षेत्रात शेकडो वाघांचा वावर आहे. वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाघाने नागरिकांवर केलेले 90% हल्ले घनदाट जंगलात झाले आहेत. यामुळे मानवाचे वाघ अधिवासावर होत असलेले अतिक्रमण स्पष्ट झाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

नाशिक के गड्ढे बन गए परेशानी, नागरिकों ने महापौर से गड्ढे रोकने की मांग तेज

Nashik, Maharashtra:खड्ड्यांमुळे नाशिककर झाले हैराण... कंबर दुखी पाठ दुखीचा करावा लागत आहे त्रास सहन.... नाशिक मध्ये पडलेल्या खड्ड्यांवर बोलवावी महासभा नगरसेवकांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हा भरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास काम सुरू आहेत... शहरात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम सुरू असताना आता शहरातील सगळेच रस्ते हे खड्डेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळते.... या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना कंबर दुखी पाठदुखीचा त्रास सहन होतोय... त्याचबरोबर अनेकांचे अपघात देखील या शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेत.. आता या खड्ड्यांमुळे नाशिकचा राजकारण तापणार असून खड्ड्यांवरच महासभा बोलवावे अशी मागणी नगरसेवक करताना पाहायला मिळतायेत.. तर खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून अनेकांचे अपघात होतात याची तक्रार नाशिककर करतायेत.... त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांचा अनुभव घ्यावा आणि शहरातील सगळे रस्ते सुधारित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.... या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report

आंद्रा बांध 1248 क्यूसेक पानी छोड़ता: नदी किनारे निवासी सतर्क रहें

Varsoli, Maharashtra:आंद्रा धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आंद्रा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून तब्बल १,२४८ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकाचा अंदाज घेता, या विसर्गामध्ये कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या आवकनुसार या विसर्गात कोणत्याही वेळी वाढ किंवा घट होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे आंद्रा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

नाशिक बागलाण में इंदौर की प्याज गोण्या सड़क किनारे मिलने से किसानों में हंगामा

Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मध्यप्रदेशातील इंदोरच्या कांद्याच्या गोण्या आढळल्या फेकलेल्या अवस्थेत... - नाशिकच्या बागलाण तालुक्यातील घटनेने खळबळ.. - कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातल्या ट्रक शेतकऱ्यांनी अडवला.. नाशिकच्या बागलाण तालुक्यात साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात मध्यप्रदेशातील इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याबाबत वाद सुरू असताना आता ही नवी घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याच्या ट्रकबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या गोण्या येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, त्यांचा संबंध कांदा खरेदी प्रक्रियेशी आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top