icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपूर में आकाशीय बिजली ने दो लोगों की मौत, एक महिला गंभीर रूप से घायल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात आज आकाशीय वीजेने अक्षरशः कहर केला. पोंभूर्णा आणि मूल तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातून घरपरतत असताना केशव डोनु गुडी यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वैशाली गुडी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुसरीकडे मूल तालुक्यातील उसराळा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय दीपक नारायण मडावी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक आलेल्या वादळी पावसादरम्यान घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report

कोकण में गौरी उत्सव: 87 वर्ष पुरानी परंपरा, डेरवण में भक्तिमय उत्सव

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात माहेरवाशीण गौराईचे उत्साहात आगमन; डेरवणमध्ये गुरप कुटुंबीयांची दोन-दोन गौरी आणण्याची ८७ वर्षांची परंपरा!.. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर कोकणात आज लाडक्या गौराईचे मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात आगमन झाले आहे.. पुढील तीन दिवस माहेरवाशीण म्हणून राहणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी रत्नागिरीसह चिपळूण परिसरातील घराघरांमध्ये आकर्षक आरास आणि रोषणाई करण्यात आली आहे.. कोकणात कुठे एक तर कुठे दोन-दोन गौरी आणण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.. याच परंपरेनुसार डेरवण-सावर्डे येथील गिरीश गुरप यांच्या घरी तब्बल ८७ वर्षांची आणि चौथ्या पिढीची नवसाच्या दोन-दोन गौरी आणण्याची अनोखी प्रथा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.. बाप्पाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी माहेरी आलेल्या या लाडक्या माहेरवाशिणीच्या आगमनाने संपूर्ण कोकणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे..
0
0
Report
Advertisement

Modi के जन्मदिन पर महिला किसान प्रमाणपत्र पोर्टल का ऑनलाइन लॉन्च, भरणे ने कहा

Rui, Maharashtra:गणपती बाप्पाच्या चरणी कृषी मंत्र्यांचे काय साकडं. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलचं लॉन्चिंग. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झालं ऑनलाइन अनावरण. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील: मंत्री भरणे. राज्यातील शेतकरी अडचणीत, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मंत्री भरणे. नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार : मंत्री भरणे. राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेत. विशेष म्हणजे मंत्री भरणे यांच्या निवासस्थानी महिला सशक्तीकरणावर आधारित माहिती देणारा देखावा उभारण्यात आलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे मात्र सर्व निकष नियम बाजूला ठेवून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी
0
0
Report
Advertisement

नागपुर में मोदी के जन्मदिन पर ‘आशीर्वाद का दीया’ कार्यक्रम

Nagpur, Maharashtra:नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान. - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यक्रमाचे आयोजन. - नागपूरच्या अजनी मेट्रो स्टेशनवर अभियानाचा होणार कार्यक्रम होणार. - ५०० लाभार्थींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन. - ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. live फ्रेम मिळेल
0
0
Report
Advertisement

दानापूर वान नदी के उत्खनन पर नोटिस, निधि से करोड़ों के अवैध काम का आरोप

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील वान नदी पात्रातून अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील उत्खननाबाबत, सामाजिक कार्यकर्ते, जनहित व पर्यावरण विषय अभ्यासक रजनीश पोटे यांनी नुकतीच केंद्र व राज्य शासनाच्या सात प्रमुख अधिकारी व यंत्रणांना, मुख्य सचिव केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली, दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक व मुख्य अभियंता सिकंदराबाद, महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग मुख्य सचिव मंत्रालय, जिल्हाधिकारी अकोला, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला व संबंधित रेल्वे कंत्राटदार यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. अकोला–खंडवा रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत, रेल्वे कंत्राटदाराने वान नदीतून "गाळ" (Ordinary Earth) काढून तो रेल्वे भरावासाठी वापरण्याचा प्रस्ताव, आपल्या Corporate Social Responsibility (CSR) निधीतून जलयुक्त शिवार , नदी खोलीकरण , पूर नियंत्रण इत्यादी नावाखाली "मोफत काम" करून देण्याच्या नावाखाली, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सादर केला होता. अकोला जिल्हाधिकारी यांनी 05 मे रोजी या प्रस्तावास मंजुरी देत, २,५६,७९५.२५ ब्रास (सुमारे ७ लाख २६ हजार ७३० घनमीटर) इतक्या प्रचंड प्रमाणात उत्खननास परवानगी दिली होती, मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अवैधरित्या नदीतील वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून, शासनाच्याच परस्परविरोधी नोंदीं आधारे कोट्यवधींचे नैसर्गिक संपत्ती खाजगी कंत्राटदाराला मोफत बहाल केल्याचा गंभीर आरोप रजनीश पोटे यांनी केला आहे.. राज्य आणि केंद्र सरकारने याचे दखल घ्यावी अशी मागणी याचिकाकर्ते ने केली आहे.
0
0
Report

लातूर में भीषण जलसंकट: रातभर पानी के लिए लोग कतारों में

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... रात्री एक वाजता पाण्यासाठी हंड्यांच्या रांगा... वडमुरांबी गावात भीषण जलसंकट... मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या लातूर जिल्ह्यात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे... भर पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागतेय... लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वडमुरांबी गावातील लोकांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे... पावसाळ्यातच पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत असेल, तर येणाऱ्या उन्हाळ्यात परिस्थिती काय असेल, याची कल्पनाही करवत नाही... वडमुरांबी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातच पाणीसाठा शिल्लक नसल्याने गावकऱ्यांसमोर पाण्याचं गंभीर संकट उभं राहिलं आहे... त्यामुळे गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपूरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर नगरपालिका विरोध में कर्मचारियों का अनिश्चितकालीन प्रदर्शन, वेतन व नियुक्ति की मांग

Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याच्या रागातून ठेकेदाराने पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत, या कामगारांनी नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता आणि घंटागाडीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवले जात असून, कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हक्काचे वेतन आणि कामावर पुन्हा रुजू करून घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.
0
0
Report

रत्नागिरी में गणेशोत्सव से पहले नकली दारू मिनी फैक्ट्री पर छापा, करोड़ का स्टॉक जब्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई अवैध सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या मिनी दारू कारखान्यावर छापा राजापूर तालुक्यातील तळगांव इथं राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई कारवाईमध्ये १ कोटीचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त या प्रकरणी जागा मालक दिनेश जैतापकर आणि गोव्यातील चंदन पाटील यांना घेतलं ताब्यात डुप्लीकेट गोवा बनावटीची दारू तयार करण्याचा हा मिनी कारखाना.state उत्पादन शुल्क विभागाकडून उघड tाब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात करणार हजर, गणेशोत्सवात मोठी कारवाई
0
0
Report

गोकुळ दूध संघ चुनाव: महायुती बनाम समविचारी आघाडी, बिनविरोध संभव नहीं

Kolhapur, Maharashtra:Kop Satej Patil & Hasan Mushrif Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आज स्पष्ट झाले आहे.. काँग्रेस नेते आणि समविचारी आघाडीचे प्रमुख सतेज पाटील त्यांनी गोकुळ दूध संस्थेला एकमुखी नेतृत्व हव आहे, गेल्या सहा महिन्यापासून गोकुळ दूध संघाची जी हानी झाली आहे ते भरून काढण्यासाठी महायुतीला बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं म्हटलय आहे, तर गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेत्यांच्या दावे आणि प्रति दाव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.. त्याचबरोबर गोकुळची निवडणुक ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. महायुतीमध्ये आमची बार्गेनिंग पावर कमी व्हावी यासाठी महाडिक यांनी प्रयत्न केले, पण आम्ही मात्र आमच्या संस्था कशा जास्त राहतील यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे. भाजप नेत्या गोकुळच्या संचालिका शौमीका महाडिक यांनी गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत असं विधान केलं होतं. पण आता आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध सतेज पाटील समविचार आघाडी मध्ये प्रमुख लढत होणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top