445001
यवतमाळ : २४ ऑगस्टला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यवतमाळात
Yavatmal, Maharashtra:मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व दोन्ही उपमुख्यमंत्री हे शनिवार दि २४ ऑगस्ट रोजी यवतमाळात नारीशक्ती अभियानांतर्गत लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांशी संवाद साधणार आहेत. कीन्ही शिवारात आयोजित महिला मेळाव्याला 35 हजार महिलांची उपस्थितीती राहील, त्यादृष्टीने नियोजन प्रशासनाकडून केल्या जात आहे. तसेच आयोजनासाठी संबंधित सर्व विभाग प्रमुखांची बैठक जिल्हाधिकारी डॉ पंकज आशिया यांनी घेतली असून कार्यक्रमस्थळाची पाहणी देखील पोलीस व वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून करण्यात आली.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर जिला अस्पताल की सांसद प्रतिभा धानोरकर ने निरीक्षण किया, मरीजों से संवाद
Chandrapur, Maharashtra:खासदार प्रतिभा धानोरकर यांनी केली चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयाची पाहणी, रुग्णांशीही साधला संवाद. खासदार प्रतिभा धानोरकर यांनी आज आकस्मिकपणे चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालय आणि कर्मवीर मा.सां. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट देऊन परिसराची पाहणी केली. काँग्रेसचे नगरसेवक व पदाधिकारी उपस्थित होते. रुग्णांकडून येत असलेल्या तक्रारींचा विचार करून खासदार प्रतिभा धानोरकर यांनी वैद्यकीय महाविद्यालयाचे सविस्तर निरीक्षण केले. बेसिक सोयी-सुविधांबाबत औपचारिक तपासणी करताना एक्स-रे मशीन, डिलिव्हरी वॉर्ड तसेच ब्लड बँक येथे प्रत्यक्ष भेट देत निरीक्षण केले. विशेषतः स्वच्छतेच्या बाबतीतही तपासणी केली. निरीक्षणानंतर अधिष्ठात्यांना समस्या निवारणाबाबत पत्र देणार असल्याचे त्यांनी सांगितले. रुग्णांसोबत असलेल्या नातेवाईकांसाठी स्वच्छ पिण्याचे पाणी आणि शौचालयाची व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. यावेळी उपस्थित रुग्णांशी त्यांनी संवाद साधला.0
0
Report
सतारा- महाबळेश्वर मार्ग पर मर्सिडीज कार अचानक जलकर खाक, कोई हताहत नहीं
Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर विटा राज्य मार्गावर असणाऱ्या पुसेसावळी जवळ वडी गावच्या हद्दीत दुपारी अचानक मर्सिडीज बेंज या चार चाकी वाहनाने अचानक पेट घेतला. गाडीने पेट घेतल्या घेतल्या गाडीत बसलेले सर्व प्रवासी आपला जीव वाचवून एका बाजूला पळत गेले त्यामुळे कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र गाडीला आग लागण्याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. आग विझवण्याचा प्रयत्न केला मात्र आगीत ही गाडी जळून खाक झाली आहे.0
0
Report
येवला तालुके के नगरसूल में तेज बारिश ने किसानों को नुकसान, कांदा भीगा
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नगरसूल परिसरात अचानक झालेल्या जोरदार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या काढणी करून विक्रीसाठी शेतात साठवून ठेवलेला कांदा पावसामुळे पूर्णपणे भिजला आहे. गेल्या काही दिवसांपासून वातावरणात उकाडा वाढला असतानाच दुपारनंतर अचानक ढग दाटून आले आणि जोरदार पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची धावपळ उडाली.0
0
Report
Advertisement
श्रीरामपूर तालुक्यात भोंदू गणेश शिंदे के खिलाफ बलात्कार के आरोप, गिरफ्तारी
Shirdi, Maharashtra:नाशिक, संगमनेर पाठोपाठ श्रीरामपूर तालुक्यातील भोंदूला श्रीरामपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या. श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर येथिल भोंदु गणेश शिंदे यास पोलिसांनी ठोकल्या बेड्या. पीडित महिलेच्या तक्रारीवरून भोंदु गणेश शिंदे विरुद्ध श्रीरामपूर पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल. पोटाचा आजार बरा करून देण्याचा नावाखाली मंत्ररलेले लिंबू आणि उदी देऊन पीडित महिलेची लूट केल्याची माहिती समोर. पीडित महिलेकडून लाखों रुपये उकळत आजार बरा करून देण्याच्या नावाखाली अत्याचार केल्यााची माहिती समोर. तीन वर्षांपासून पीडित महिलेवर भोंदू शिंदे करत होता अत्याचार. गुन्हा दाखल होताच श्रीरामपूर शहर पोलिसांनी भोंदुस सापळा रचून ठोकल्या बेड्या. पोलिसांच्या चौकशीत भोंदु गणेश शिंदे याने पीडित महिलेवर पोटाचा आजार बरा करून देतो असे सांगून अत्याचार केल्याची दिली कबुली. भोंदू गणेश शिंदे याची श्रीरामपूर पोलिसांकडून कसून चौकशी सुरू. आणखी किती महिलांवर अत्याचार केलेत , किती रकमेची लूट केली याचा तपास सुरू...0
0
Report
हॉर्न से बढ़ता शोर: भारत में 6 करोड़ लोग सुनने क्षमता गंवा सकते हैं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रस्त्यावरील हॉर्नचा कर्कश आवाज नागरिकांच्या जीवावर उठले आहेत, वाढता गोंगाट आरोग्यावर गंभीर संकट बनला आहे. एक अभ्यासानुसार भारतात 6 कोटी लोकांनी आपली श्रवणशक्ती गमावली आहे, आणि गोंगाट मुलांची स्मरणशक्ति सुद्धा कमजोर करत असल्याचा निष्कर्ष समोर आला आहे. ट्राफिकमध्ये वाहनांच्या हॉर्नचा आवाज भारतातील प्रत्येक शहरात नेहमीचाच प्रश्न झाला आहे, दिल्ली मुंबई सारख्या महानगरात तर हा आवाज अधिक असतो. 2022 च्या संयुक्त राष्ट्र आकडेवारीनुसार भारतीय शहरे जगातील सर्वाधिक गोंगाटाच्या शहरांत आहेत. दिल्ली, मुंबई सारख्या महानगरांच्या रस्त्यांवर सरासरी गोंगाट 75 डेसिबल असतो; सुरक्षित मर्येयेपेक्षा चार पट जास्त. अनेकदा हा गोंगाट 100 डेसिबलच्या पुढे जातो; तो लाकूड कापण्याच्या मशीनच्या आवाजाइतका असतो. त्यामुळे गोंगाट आरोग्यास गंभीर संकट बनला आहे. भारतात 6 कोटीहून अधिक लोकांनी आपली श्रवण शक्ती गमावली आहे. संशोधनानुसार रस्त्यावरील गोंगाटामुळे हृदयविकाराचा धोका वाढतो, शरीरात तणाव निर्माण होतो आणि रक्तदाब वाढतो; त्यामुळे मानवी शरीरावर परिणाम दिसून येत आहेत. डॉ रितेश भाग्यवंत, ENT विशेषज्ञ धक्कादायक म्हणजे बार्सिलोना येथील एका अभ्यासात असे दिसून आले की वाहतुकीच्या आवाजात 5 डेसिबलने वाढ झाली तर मुलांच्या स्मरणशक्तीचा विकास 11% पर्यंत मंदावतो. हा अभ्यास तिथं झाला असला तरी भारतातही परिस्थिती तशीच असल्याचं तज्ज्ञ म्हणतात. सोबतच मिरवणुकीतील डीजे, लग्नात डीजेचा वापर आरोग्यासाठी धोका देणारा असल्याचंही अहवालात नमूद आहे. यावर उपाय म्हणून भारतात परिवहनमंत्री नितीन गडकरी यांनी हॉर्नचा कर्कश आवाज तबला किंवा बासरीसारख्या मधुर सुरांमध्ये बदलावा असे सुचवले आहे. क्वाइट इंडिया संस्थेच्या मतानुसार शिक्षण व वर्तणुकीतील बदल हा खरा उपाय आहे. जागतिक पातळीवर चीनने गोंगाट कमी करण्यासाठी साउंड बॅरियर आणि रस्ते तयार केले आहेत; व्हिएतनाममध्ये अॅप आणि सेन्सरद्वारे चालकांवर लक्ष ठेवले जाते. कमी हॉर्न वाजवणाऱ्यांना विमा सवलत देण्यात येते. पॅरिसने MEDYOUS नावाचा नॉइज रडार तयार केला आहे जो जोरात हॉर्न वाजवणाऱ्या Vehicle कडे फोटो काढून चालान पाठवतो. नेदरलँड्सने विशिष्ट रस्त्यांची निर्मिती केली ज्यात टायर घर्षणाचा आवाज शोषला जातो. हा खूप जागतिक समस्या बनला असून उपायांची गरज आहे; अन्यथा मानव ऐकण्याची क्षमता गमावून बसेल.0
0
Report
विदर्भ में तेज गर्मी: नागपुर समेत जिलों में तापमान रिकॉर्ड के पास
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग विदर्भात उष्णतेची लाट कायम अकोला, अमरावती, वर्धा आजही 46 अंश सेल्सिअसच्या वर अकोला: 46.3 अमरावती: 46.6 वर्धा: 46.5 यवतमाळ: 45.2 चंद्रपूर: 45.2 नागपूर: 45.0 वाशिम: 44.4 भंडारा: 42.0 बुलढाणा: 43.6 गडचिरोली: 43.2 गोंदिया: 41.00
0
Report
Advertisement
शिवराय के अपमान पर कांग्रेस का उग्र हमला, बागेश्वर बाबा के खिलाफ प्रदर्शन बढ़े
Kalyan, Maharashtra:छत्रपती शिवरायांच्या अवमानाने काँग्रेस आक्रमक! कल्याणमध्ये बागेश्वर बाबांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करत तुडवून नोंदवला तीव्र निषेध; गुन्हा दाखल करण्याची मागणी बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबा पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या एका वादग्रस्त विधानाचे पडसाद आता संपूर्ण महाराष्ट्रात उमटू लागले आहेत. कल्याणमध्ये आज काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेत बागेश्वर बाबांविरोधात जोरदार निदर्शनं केली. संतापलेल्या कार्यकर्त्यांनी बाबांचा फोटो जाळण्याचा प्रयत्न करत जमिनीवर तुडवत आपला निषेध नोंदवला. त्याच्या विधानामुळे काँग्रेस आणि शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट असून, बाबांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. बाईट... राजाभाऊ पातकर कल्याण जिल्हा अध्यक्ष0
0
Report
Titwala elderly couple death: suicide suspected due to property dispute
Kalyan, Maharashtra:टिटवाळ्यातील बेपत्ता वृद्ध दांपत्याचा दुर्दैवी अंत. मुरबाडच्या म्हसा परिसरात सापडले मृतदेह; प्रॉपर्टी वादातून आत्महत्येचा संशय टिटवाळ्यातील महादू घरत (८५) आणि कमलाबाई घरत (७५) हे वृद्ध दांपत्य काही दिवसांपासून होते बेपत्ता २३ एप्रिल रोजी मुलीकडून टिटवाळा पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती पोलिस शोध दरम्यान मुरबाड तालुक्यातील म्हसा परिसरात रस्त्यालगत उन्हाने जळलेल्या अवस्थे सापडले दोघांचे मृतदेह प्राथमिक तपासात विषारी पदार्थ प्राशन करून आत्महत्या केल्याचा पोलिसांचा अंदाज मुलीसोबत मालमत्तेच्या वादातून मानसिक त्रास; त्यातूनच टोकाचे पाऊल उचलल्याची पोलिसाचा संशय पोलिसांकडून सखोल तपास सुरू; घटनेमुळे परिसरात हळहळ आणि चिंतेचे वातावरण0
0
Report
गायकवाड की धमकी विवाद: बुलढाणा में सार्वजनिक पुस्तक वाचन का ऐलान
Buldhana, Maharashtra:बुलढाणा धमकी, शिवीगाळ और अब सीधे 'बुलढाणा चलो' का नारा! आमदार संजय गायकवाड के 'त्या' एक फोन कॉल ने कोल्हापूर से बुलढाणा पेटला! गायकवाड के बालेकिल्ल्यात रोहित पवार की एंट्री, उद्या बुलढाठा में पुस्तक का 'जाहीर वाचन' सोहला! Anchor - महाराष्ट्र के राजकारण में सध्या लोकप्रतिनिधियों की जीभ कब, कहाँ और कितनी घसरे, इसका कोई निश्चित बनावट नहीं। बुलढाणे के आमदारों की शिवाजी कौन था पुस्तक पर चढ़ी गरमी ने प्रकाशक प्रशांत आंबी को धमकी दी गई। प्रकाशक के खिलाफ कोल्हापूर की राजारामपुरी पुलिस में शिकायत दर्ज है। अब यह विवाद राजकीय आखाड़े तक पहुंच गया है। VO 1 - शिवीगाळ के मुद्दे पर आमदार ने दिलगिरी का नकली उपक्रम किया, लेकिन तब तक पानी पुलों के नीचे बह चुका था। प्रकाशक ने पुलिस में शिकायत दर्ज कराई। यह मामला अब पुलिस के साथ साथ सड़कों पर भी गोरखा हो गया है। VO 2 - रोहित पवार ने बुलढाणा में प्रवेश किया है। उद्या प्रकाशक के साथ हजारों कार्यकर्ता सार्वजनिक पुस्तक वाचन में भाग लेंगे। पुस्तक जिसका उल्लेख चढ़ा हुआ है, वह 'शिवाजी कौन था' है, जिसे पूर्व विधायक गायकवाड के विरोध में पढ़ा जाएगा। VO 3 - अभिव्यक्ति स्वातंत्र्य और सम्मान के बीच बुलढाणा प्रशासन उलझा है। गायकवाड ने प्रकाशक की संपत्ति जब्त करने की मांग की और चीन- पाकिस्तान का उल्लेख भी जोड़ा। VO 4 - धैरेंद्र शास्त्री के वक्तव्यों पर गायकवाड की चुप्पी इसे और भी जटिल बना रही है। Final VO - क्या कल बुलढाणा में वैचारिक विवाद राजकीय राडे में बदलेंगे? रोहित पवार पुस्तक पढ़वाने का प्रयास करेंगे या गायकवाड समर्थक माहौल बिगाड़ेंगे? महाराष्ट्र की निगाह अब इस पर है। मयूर निकम, ज़ी 24 तास, बुलढाणा.0
0
Report
Advertisement
उल्हासनगर में मनसे ने रिक्शाओं पर स्टिकर लगाकर कहा, मैं मराठी बोलता हूँ
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात मनसेने लावले रिक्षांवर स्टिकर. मला मराठी येते, मी मराठी बोलतो असे स्टिकर. परप्रांतीय रिक्षाचालकांच्या प्रस्तावित आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर उल्हासनगरात मनसेने आक्रमक भूमिका घेत प्रशासनाला इशारा देतानाच रिक्षांवर मी मराठी बोलतो, मला मराठी समजते अशा आशयाचे स्टिकर लावण्याची मोहीम सुरू केली आहे. मनसेच्या वतीने शहाड स्टेशन, म्हारळ डी मार्क रिक्षा स्टॅन्ड येतील सर्व रिक्षांना मी मराठी बोलतो, मला मराठी समजते या माझ्या रिक्षात बसा या आशयाचे स्टिकर लावण्यात आले आहेत. तसेच सर्व रिक्षाचालकांनी हे स्टिकर लावावेत आणि मराठीत संवाद साधावा असेही आवाहन ही मनसेच्या वतीने करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक: भोंदू महेश गिरी के खिलाफ समिति ने FIR, 29 अप्रैल तक पुलिस कोठडी
Nashik, Maharashtra:एका पिढीत महिलेने भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे विरोधात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मदतीने लासलगाव पोलिसात गुन्हा दाखल केला लासलगाव पोलिसांनी अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 29 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देखील सुनावली आहे दरम्यान अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने ही तक्रार मागे घेण्यात यावी याकरता समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांना भोंदू महेश गिरी याच्या नातेवाईकाने कॉल करून पैशांचे प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला यानंतर कृष्णा सांगळे यांनी नाशिकच्या इंदिरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे दरम्यान संबंधित तर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलीस सूत्रांकडून मिळाली आहे0
0
Report
धाराशिव में बागेश्वर बाबा के बयान पर शिवप्रेमियों का आक्रोश, इनाम की घोषणा
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबाबत च्या कथित वक्तव्यावरून संताप उसळलाय. छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री उर्फ बागेश्वर बाबाविरोधात धाराशिव मध्ये शिवप्रेमी आक्रमक झाले आहेत. आंदोलकांनी बागेश्वर बाबा, संजय गायकवाड आणि भगतसिंग कोश्यारी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत फोटोला जोडे मारो आंदोलन केलं. यावेळी बागेश्वर बाबाला ‘कोल्हापुरी चप्पल मारणाऱ्याला’ तब्बल 1 लाख 51 हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आलं आहे. दरम्यान, अशा प्रकारच्या वक्तव्यांमुळे राज्यातील वातावरण तापत असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेण्याची मागणी आंदोलकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
शिवाजी कौन था? किताब पर रोक, गायकवाड़ की नई मांग
Buldhana, Maharashtra:आपल्या वादग्रस्त आणि रोखठोक विधानांसाठी कायम चर्चेत असणारे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी पुन्हा एकदा एका वेगळ्याच मागणीने खळबळ उडवून दिली आहे. दिवंगत कॉ. गोविंद पानसरे लिखित 'शिवाजी कोण होता?' या प्रसिद्ध पुस्तकावर बंदी घालण्याची मागणी त्यांनी थेट बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. केवळ बंदीच नव्हे, तर या पुस्तकाच्या छपाईशी संबंधित डीटीपी ऑपरेटरला अटक करावी, प्रकाशकाची मालमत्ता जप्त करावी आणि लेखक गोविंद पानसरे यांच्यावर मरणोत्तर फौजदारी गुन्हा दाखल करावा, अशी अजब आणि आक्रमक मागणी आ. गायकवाड यांनी केली आहे. काय आहेत निवेदनातील प्रमुख मागण्या? जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात आमदार संजय गायकवाडांनी एकूण १० मुद्दे मांडले आहेत. एकेरी उल्लेखावर आक्षेप: 'शिवाजी कोण होता' असे नाव देऊन छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करत त्यांचा अपमान करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे. मरणोत्तर गुन्हा दाखल करण्याची मागणी: या पुस्तकाचे लेखक (दिवंगत गोविंद पानसरे) यांच्यावर मरणोत्तर फौजदारी केस करावी. तसेच वितरक प्रशांत आंबी यांना अटक करावी. डीटीपी ऑपरेटर आणि सॉफ्टवेअरवर कारवाई: ज्यांनी हे पुस्तक टाईप केले त्या डीटीपी ऑपरेटरला अटक करावी आणि ज्या संगणकावर हे झाले तेथील मालमत्ता आणि डीटीपी सॉफ्टवेअरही जप्त करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. परकीय फंडिंगची CID चौकशी: या पुस्तकाच्या लेखक आणि प्रकाशकाला चीन किंवा पाकिस्तान सारख्या देशांमधून फंडिंग आले आहे का? तसेच हे पुस्तक छापण्यासाठी कोणत्या जिहाद्याने मदत केली? याची सखोल CID (CID) चौकशी व्हावी. प्रेस कौन्सिल आणि RNI मंजुरी: या पुस्तकाला प्रेस कौन्सिल ऑफ इंडिया आणि RNI ची मंजुरी आहे का, याची तपासणी करावी आणि नसल्यास मुद्रकाचे प्रेस मशीन जप्त करून त्यांची संपत्ती राष्ट्रीय संपत्ती घोषित करावी. आमदार संजय गायकवाड यांनी या निवेदनाद्वारे कोल्हापूरातील प्रकाशक आणि मुद्रकांवर थेट अटक वॉरंट काढण्याची मागणी केली आहे. नेहमीच आपल्या आक्रमक भूमिकेमुळे चर्चेत राहणाऱ्या गायकवाडांच्या या नव्या आणि वेगळ्या मागणीमुळे आता राजकीय आणि साहित्यिक वर्तुळातून काय प्रतिक्रिया येतात, याकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे.0
0
Report
गोकुळ महायुती शिष्टमंडल कल मुख्यमंत्री फड़नवीस से मुलाकात के लिए पहुँचेगा
Kolhapur, Maharashtra:गोकुळमधील 'महायुती'च्या नेत्यांचे शिष्टमंडळ उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेट घेणार आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील हे शिष्टमंडळात मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री प्रकाश आबिटकर, आमदार विनय कोरे, आमदार चंद्रदीप नरके, आमदार राजेंद्र पाटील-यड्रावकर यांचा समावेश आहे. मात्र जिल्ह्यातील भाजपचा एकही नेता या शिष्टमंडळात नाही. चंदगडचे आमदार शिवाजी पाटील यांनी गोकुळमध्ये गैरव्यवहार असल्याचे आरोप केल्यानंतर गोकुळमध्ये राजकीय घडामोडी सुरु आहेत. गोकुळच्या संचालक मंडळाची मुदत संपण्यापूर्वी या हालचाली सुरु झाल्या आहेत. त्यामुळे हे शिष्टमंडळ उद्या फडणवीस यांच्याशी कोणत्या विषयावर चर्चा करणार, मुख्यमंत्री त्यांना काय 'सल्ला' देतात? याकडे जिल्ह्याचे लक्ष आहे。0
0
Report
अहिल्यानगर जिले में बारिश से तापमान गिरकर राहत, क्षेत्र में बारिश से मौसम ठंडा
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात पावसाची हजेरी. उकाड्यामुळे हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा. अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा 38 ते 40 अंशावर. पावसाच्या सरींमुळे वातावरणात गारवा. अकोले, संगमनेर, राहाता, श्रीरामपूर तालुक्यात बरसल्या पावसाच्या सरी.0
0
Report
Advertisement
