icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाळ में Western Coalfields खदान भूस्खलन, डंपर दबे, चालक बेचे

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथे वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेडच्या उकणी खुल्या कोळसा खाणीत भूस्खलन होऊन दोन डंपर गाळयुक्त मातीच्या ढिगाऱ्याखाली दबले. ही तर तेवढीच भयावह दुर्घटना मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत झाली आहे. या दुर्घटनेत सुदैवाने दोन्ही चालकांनी प्रसंगावधान राखत डंपरमधून बाहेर पडण्यात यश मिळविले आहे. या ठिकाणी मशीनद्वारे मातीचे उत्खनन करून कोळसा काढला जातो. जवळपास १०० मीटरपर्यंत माती हटविल्यानंतर कोळशाचा थर मिळतो. उत्खननामुळे खाणीत प्रचंड खोल खड्डे तयार झाले आहेत.पावसाळ्यात या खाणीत मोठ्या प्रमाणावर पाणी साचते. हे पाणी पंपाद्वारे बाहेर काढून खाणीच्या वर तयार करण्यात आलेल्या शिल्ड मध्ये साठविले जाते. त्याच पाण्याखालील कोळसा काढण्याचे काम सुरू असताना अचानक शिल्डमधून गाळयुक्त पाणी आणि मातीचा प्रचंड लोंढा खाली आला. त्याखाली दोन डंपर पूर्णपणे गाडले गेले. या घटनेनंतर वेकोली प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर आणि कार्यप्रणालीवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के कोरची में रानडुक्कर हमला: 3 ग्रामीण घायल, एक महिला की हालत गंभीर

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिले के कोरची तालुक्यात जंगल परिसर में तेंदूपत्ता तोड़ने के लिए गए मजदूरों पर एक रानडुक्कर ने अचानक हमला कर दिया। इस हमले में तीन ग्रामीण घायल हो गए, जिनमें एक महिला की हालत गंभीर है और उसे आगे के उपचार के लिए गडचिरोली जिला सामान्य अस्पताल में भर्ती किया गया है। बोडेना गाँव से लगभग तीन किलोमीटर दूर जंगल क्षेत्र में तेंदूपत्ता तोड़ने का काम चल रहा था। इस हमले में सु. पुष्पा कालिदास भैसारे (45, कोरची) को सीने पर गंभीर चोट आई है; नंदकिशोर किशनलाल बोरकर (54, भीमपुर) के बाएं हाथ, जांघ और पेट में चोटें आईं; कृष्णा बुढ़राम पडोटी (61, कोरची) के दाहिने जांघ में चोट आई है।
0
0
Report

चंद्रपुर में मौसम बदला, आकाश भीगा, दोपहर में बारिश ने राहत दी

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात अचानक बदलला वातावरणाचा नूर ,आकाश ढगाळलेले होत बरसल्या जोरदार पाऊस सरी ( single file sent on 2C) टायटल:--- चंद्रपूरात अचानक वातावरणाचा नूर बदलला. भर दुपारी आकाश ढगाळलेले होत जोरदार पाऊस सरी बरसल्या. प्रचंड उन्हाच्या काहीलीने त्रस्त झालेल्या चंद्रपूरकरांना दिलासा मिळाला. टपोऱ्या थेंबांचं नर्तन सुमारे 15 मिनिटे सुरू होतं. जिल्ह्यातील काही भागात गेले दोन दिवस हलक्या सरी कोसळत होत्या. मात्र आज चंद्रपूर शहरात जोरदार पाऊस सरींनी दुपार आल्हाददायक केली. मे महिन्याच्या प्रारंभी आलेल्या सुखकर सरींनी नागरिक आनंदले.
0
0
Report
Advertisement

गर्मी में कबूतर बचाने पर अकोला पुलिस की इंसानियत मिसाल

Akola, Maharashtra:अकोल्यातील प्रचंड उष्म्यामुळे नागरिकांसह पशुपक्ष्यांचेही हाल होत आहेत. अशातच अकोला पोलिसांनी दाखवलेल्या माणुसकीची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. अशोक वाटिका चौक परिसरात तहानेने व्याकुळ झालेले एक कबूतर अचानक जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांच्या चमुच्या वाहनासमोर येऊन पडले. प्रसंगावधान राखत पोलिसांनी तात्काळ वाहन थांबवले आणि कबूतराला वाचवण्यासाठी प्रयत्न सुरू केले.सुमारे पाच ते दहा मिनिटांच्या प्रयत्नांनंतर कबूतराला गाडीच्या चाकाखालून सुखरूप बाहेर काढण्यात पोलिसांना यश आले. त्यानंतर त्या कबूतराला पाणी पाजून काही वेळ विश्रांती देण्यात आली. प्रकृती सुधारल्यानंतर त्याला सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आले. उन्हाच्या तीव्र झळांमध्ये एका छोट्याशा जीवासाठी पोलिसांनी दाखवलेली संवेदनशीलता आणि माणुसकी नागरिकांच्या मनाला स्पर्शून गेली असून या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report

रत्नागिरी में भारी बारिश, आम-आयात और काजू बागायतदारों पर बड़ा असर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीला पावसाने झोडपले.. आंबा-काजू बागायतदारांचे कंबरडे मोडले!.. कोकणात पावसाने रौद्र रूप धारण केले असून रत्नागिरी जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी वरुणराजाने जोरदार बॅटिंग केली आहे. विजांच्या कडकडाटासह आणि वादळी वाऱ्यासह आलेल्या या पावसाने संपूर्ण जनजीवन विस्कळीत केले असून, विशेषतः हापूस आणि काजू बागायतदारांच्या चिंतेत मोठी भर पडली आहे... रत्नागिरी शहर, चिपळूण, खेड आणि दापोली या पट्ट्यात ढगांच्या गडगडाटासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सलग तिसऱ्या दिवशी आलेल्या या अवकाळी पावसामुळे नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली आहे... सर्वात मोठा फटका फळबागांना बसला आहे. आंबा आणि काजू आता काढणीच्या शेवटच्या टप्प्यात असतानाच निसर्गाचा हा कोप पाहायला मिळाला.. पावसाचा जोर इतका आहे की, मुंबई-गोवा महामार्गावरील दृश्यमानता कमी झाली असून, महामार्गावर वाहतूक अत्यंत संत गतीने सुरू आहे. सखल भागात पाणी साचल्याने स्थानिक प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे...
0
0
Report
Advertisement

रोहित पवार बोले: सातारा बालिका हत्या का न्याय अभी नहीं, कानून सशक्त करे

Satara, Maharashtra:सातारा - ऑक्टोबर २०२५ मध्ये सातारा जिल्ह्यातील सासपडे येथे अल्पवयीन चिमुकलीवर अत्याचार करून हत्या करण्यात आली होती .सहा महिने होऊनही न्याय मिळालेला नाही .या प्रकरणाची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी आमदार रोहित पवार यांनी या पिडीत कुटुंबीयांची भेट घेतली यावेळी या कुटुंबाला न्याय कधी मिळणार असा सवाल करत शक्ती कायदा महाराष्ट्रात आणलाच पाहिजे या साठी प्रयत्न करणार असल्याचे रोहित पवार यांनी सांगितले आहे. विओ 2- कीर्तनकार भंडारे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी राष्ट्रवादीचे नेते विकास लवांडे यांच्यावर शाई फेक केल्या केल्याच्या प्रकरणावर बोलताना रोहित पवार चांगलेच भडकले आहेत. भंडारे हा भोंदू कीर्तनकार आहे. त्याच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे. वारकरी संप्रदाय हा नेहमी शांत आणि संयमी असतात आणि कोणतीही गोष्ट समजून सांगतात मात्र हा भोंदू हा शिव्या देतो. वारकरी संप्रदायांनी अशा भोंदू बाबांना का स्थान द्यावं असा सवाल देखील उपस्थित केला आहे. बागेश्वर महाराजांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता त्यावेळी हा भोंदू भंडारे दाढीचे केस उपटत बसला होता का? असा सवाल रोहित पवार यांनी विचारलाय. ही भोंदूगिरी संपली पाहिजे आणि कारवाई झाली पाहिजे असं देखील रोहित पवार म्हणाले आहेत त्याचशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी..
0
0
Report

अकोला में मध्यरात्रि बारिश से तापमान में भारी गिरावट, न्यूनतम 22°C तक

Akola, Maharashtra:Anchor : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अकोल्यातही मध्यरात्री झालेल्या पावसामुळे वातावरणात मोठा बदल जाणवला. विशेष म्हणजे शहराच्या किमान तापमानात तब्बल ५ अंश सेल्सिअसने घट झाली आहे.अकोल्यात याआधी १९ एप्रिल रोजी झालेल्या अवकाळी पावसामुळे अधिकतम तापमानात घट झाली होती, मात्र किमान तापमानात फारसा बदल झाला नव्हता. त्या काळात शहराचे किमान तापमान २७ ते २८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. मात्र काल मध्यरात्री बरसलेल्या पावसामुळे हवामानात अचानक बदल झाला असून किमान तापमान २७.५ अंशांवरून थेट २२ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे.तापमानात झालेल्या या घसरणीमुळे आज शहरात गारव्याचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान, किमान तापमानात घट झाल्यानंतर आता अधिकतम तापमानातही घट होण्याची शक्यता हवामान विभागाकडून व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

नाशिक: SIT पूछताछ में निदा खान, बहु-राष्ट्रीय कंपनी मामले के नये खुलासे संभव

Nashik, Maharashtra:- मल्टिनॅशनल कंपनीतील आरोपी निदा खान हिच्या चौकशीला सुरुवात - आज निदा खान हिची एसआयटी कडून करण्यात येत आहे चौकशी - नाशिकच्या पोलिस आयुक्त कार्यालयात निदा खानला चौकशीसाठी आणले - एसआयटी प्रमुख संदीप मिटके करणार चौकशी - काल निदा खान हिला ११ तारखे पर्यंत सुनावण्यात आली आहे पोलिस कोठडी - पीडित महिलाना धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकण्यात आल्याचा निदा खान वर आहे आरोप - पीडित महिलाना बुरखा घालण्यास प्रव Rut्त करणे बुरखा कुठून आणला आणि पीडित महिलाना नमाज आणि कलमा पठाणाचे प्रशिक्षण कसे देण्यात आले याची होईल चौकशी - निदा खानच्या मोबाईल मधून मालेगाव मधील काही लिंक आढळून आल्या याची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे करण्यात येईल चौकशी - निदा खान हिच्या चौकशीतून मल्टिनॅशनल कंपनी प्रकरणातील अनेक घडामोडींचा उलगडा होणार
0
0
Report
Advertisement

सोलापुर में 50 वर्षीय शैला शिवशेट्टी ने पहली ही बार दहावी पास किया

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग: सोलापुरातील शैला शिवशेट्टी यांनी वयाच्या पन्नासाव्या वर्षी दहावीची परीक्षा देत पहिल्याच प्रयत्नात झाली उत्तीर्ण. सोलापुरात वयाच्या पन्नाशीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण. शहरातील शैला शिवशेट्टी यांनी पहिल्याच प्रयत्नात हे यश संपादन केलेय. शालेय जीवनात घरातील परिस्थिती हालाखीची असल्याने सातवीतून शिक्षण सोडावे लागले होते. मात्र जिद्द न सोडता वयाच्या पन्नाशीत पहिल्याच प्रयत्नात दहावीची परीक्षा उत्तीर्ण. मात्र विद्यार्थ्यांनी टोकाचे पाऊल न उचलता जिद्दीने पुढे जाण्याचे आवाहन आहे. याविषयी शैला शिवशेट्टी यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report

शिर्डी जमीन घोटाले में नया खुलासा, पैसे किसके हैं? SIT जांच तेज

Shirdi, Maharashtra:शिर्डीतील बहुचर्चित जमीन खरेदी प्रकरणात धक्कादायक माहिती समोर... फिर्यादी गोंदकर यांची जमीन खरेदी करण्यासाठी अशोक खरातचा पूर्वाश्रमीचा CA ललित पोफळे आणि त्याच्या भावाने पैसे दिल्याची माहिती सूत्रांकडून समोर... ज्या बँक खात्यातून व्यवहार झाला त्या खात्यात पोफळे बंधूंनी रक्कम जमा केल्याचे शिर्डी पोलिस तपासात निष्पन्न झाल्याची माहिती... सव्वापाच कोटींच्या व्यवहारामागील पैशांचा स्रोत काय..? याचा तपास शिर्डी पोलिस करणार का..? दरम्यान , अशोक खरातची पोलिस कोठडी आज संपत असून त्याला राहाता न्यायालयात हजर केले जाणार.... कोठडी वाढणार की ताबा पुन्हा नाशिक पोलिसांकडे जाणार..? याकडे राज्याचे लक्ष... तर दुसरीकडे 40 दिवस उलटूनही आरोपी कल्पना खरात अद्याप फरारच... SIT आणि पोलिसांची कारवाई नेमकी कधी..? असा सवाल उपस्थित..
0
0
Report

सिंधुदुर्ग में दीपक केसरकर की प्रेस कॉन्फ्रेंस: धर्मांतरण विरोधी कड़े कानून

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग- दिपक केसरकर पत्रकार परिषद मुद्दे- *ऑन शाईफेक प्रकरण-* असं होताकाम नये, कारण असे प्रकार झाले तर मग कुणाला काम करणं अवघड होऊन जाईल. त्याच्यामुळे हे प्रकार घडता कामा नयेत असं मला वाटतं. *ऑन निदा खान इम्तियाज जलील* धर्मांतर विरोधामधला कायदा हा खूप कडक झालेला आहे आणि धर्मांतराचे प्रकार घडू नयेत, याच्या संदर्भात मुख्यमंत्र्यानी स्वतः स्टेटमेंट दिलेलं आहे. त्याच्यामुळे ज्या काही कारवाया होत असतात, त्या चौकशी केल्याशिवाय कोण काही कारवाई करत नाही. चौकशीमध्ये काहीतरी आढळलं म्हणून कारवाई केली आहे असा अर्थ होतो *ऑन इम्तियाज जलील सहभाग* धर्मांतर हा प्रकारच मुळात बेकायदेशीर आहे आणि त्याच्यावर कारवाई झाली असताना त्याचं समर्थन करण्याचा कोणीही प्रयत्न करू नये, असं माझं स्पष्ट मत आहे. *ऑन तामिळनाडूच्या राजकारणावर इंडीया आघाडीमध्ये फूट* मुख्यमंत्र्यांनी एखादं स्टेटमेंट केल्यानंतर त्याच्यावर मी स्टेटमेंट करणं योग्य नाही.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top