icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

माहुली के पर्यावरण प्रेमी ने 15 लाख वृक्षबीज एकत्र कर पेड़रोपण अभियान शुरू किया

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील माहुली येथील पर्यावरणप्रेमी निखिल चव्हाण यांनी उन्हाळ्यात वाया जाणाऱ्या वृक्षबियांचे संकलन करून पर्यावरण संवर्धनाचा अनोखा उपक्रम राबविला आहे. यंदा त्यांनी तब्बल १५ लाख वृक्षबियांचे संकलन केले असून त्यामध्ये कडूनिंब, बेहडा, अर्जुन, बहावा, शिरस, पांगारा, चिंच यासह २३ प्रजातींचा समावेश आहे. या बिया वन विभागाच्या वाशिम व मानोरा कार्यालयांना तसेच विविध शाळांना देण्यात आल्या आहेत. आगामी पावसाळ्यात या बियांचे बीजगोळे तयार करून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यात येणार असून विद्यार्थ्यांनाही त्यासाठी प्रशिक्षण दिले जात आहे. कमी खर्चात हरित क्षेत्र वाढविणाऱ्या या उपक्रमाचे जिल्हाभर कौतुक होत असून ‘हरित वाशीम’च्या संकल्पनेला बळ देणارا ठरत आहे.
0
0
Report
Advertisement

खेड में पेट्रोल पंप के पास मानव अवशेष मिलने से बड़ा हड़कंप

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime खेडमध्ये खळबळ: साखरोली पेट्रोल पंपाजवळ आढळले मानवी अवशेष, पोलिसांकडून तपास सुरू!.. मान्य खेड तालुक्यातील साखरोली गावाच्या हद्दीतील पेट्रोल पंपाच्या पुढील एका वळणावर रविवारी सायंकाळी ६ ते ७ वाजण्याच्या दरम्यान मानवी अवशेष (हाडे) आढळून आल्याने संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.. घटनेची माहिती मिळताच खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत हे अवशेष ताब्यात घेतले आणि घटनास्थळाचा पंचनामा केला.. हे मानवी अवशेष नेमके स्त्रीचे आहेत की पुरुषाचे,तसेच हा प्रकार घातपाताचा आहे की आत्महत्येचा,याबाबत अद्याप कोणताही उलगडा झालेला नाही.. पोलिसांनी हे अवशेष पुढील वैद्यकीय तपासणीसाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात पाठवले असून,परिसरात कसून चौकशी सुरू केली है..
0
0
Report

रत्नागिरी के लिए आज से सभी स्कूल सुबह 7:30-11:30 सत्र में चलेंगे, गर्मी के कारण निर्णय

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत आज पासून सर्व शाळा सकाळच्या सत्रात.. अँकर यावर्षी जून महिना संपत आला तरी अद्याप पावसाने हजेरी लावलेली नाही.पाऊस नसल्याने उष्णचे प्रमाणही प्रचंड वाढले आहे.. वाढत्या उकाड्यामुळे आज पासून जिल्ह्यातील सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याचा भरविण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे.. याबाबतचे परिपत्रक मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी काढले आहे.. त्यानुसार सर्व शाळा आजपासून सकाळच्या सत्रात भरतायेत.. नवीन शैक्षणिक वर्षाची सुरुवात 15 जून रोजी झाली.अद्याप पावसाची कोणतीही चिन्ह नसल्यामुळे कडाका वाढला आहे.. विद्यार्थ्यांनाही या उष्णतेचा त्रास होत असल्यामुळे जोपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत शाळा सकाळच्या सत्रात म्हणजेच सकाळी 7.30 ते 11.30 या वेळेत घेण्यात यावी अशी मागणी जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनांनी केली होती.. शिक्षक संघटनांची ही मागणी लक्षात घेऊन जिल्हा परिषदेशच्या झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर चर्चा करण्यात आली..त्यानुसार शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत एकमत झाले.. याबाबत मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी परिपत्रक जाहीर करत आज पासून सकाळ सत्रात शाळा भरविण्याचे आदेश दिले.. पाऊस सुरू झाल्यानंतर शाळा नियमित वेळेत भरवण्याची सूचनाही त्यांनी केली आहे..
0
0
Report
Advertisement

ईडी ने गोवा के अवैध खनन मामले में 1023 करोड़ संपत्ति जब्त की

Ratnagiri, Maharashtra:गोवा.. गोव्यातील बेकायदेशीर उत्खनन प्रकरणी ईडीने जप्त केली 1000 कोटींची मालमत्ता.. अँकर ईडी ने गोव्यातील कथित बेकायदेशीर लोहखनिज उत्खनन प्रकरणात सिंगापूर मधील मालमत्तेसह 1023 कोटी रुपयांवर अधिक मूल्याची मालमत्ता जप्त केली आहे.. सांगावकर ग्रुप आणि त्यांच्याशी संबंधित कंपन्यांनी (इव्हीएस) केलेल्या मोठ्या प्रमाणावरील बेकायदेशीर लोहखनिज उत्खननाच्या प्रकरणात मनी लॉडरिंग प्रतिबंधक कायदा अंतर्गत 19 जून रोजी एक तात्पुरता आदेश जारी करण्यात आला आहे..असे केंद्रीय तपस यंत्रणेने एका निवेदनात म्हटले आहे.. जप्त करण्यात आलेल्या मालमत्तेमध्ये भारतातील 99 स्थावर मालमत्ता,सिंगापूर मधील 31 स्थावर मालमत्ता आणि भारतीय कंपन्यांमध्ये इक्विटी शेअर्स यांचा समावेश आहे.. मनी लॉन्ड्रीच्या हा तपास गोवा पोलिसांच्या सीआयडीने दाखल केलेल्या एफ आय आर वर आधारित आहे.. ईडी ने माहिती दिलेय की सर्वोच्च न्यायालयाने 2014 आणि 2018 मधील निकालांद्वारे असे स्पष्ट केले आहे की 22 नोव्हेंबर 2007 नंतर गोव्यात केलेले सर्व प्रकारचे खाणकाम बेकायदेशीर होते.. बेकायदेशीरपणे उत्खनन केलेले खनिज अत्यंत कमी मूल्यावर ब्रिटिश व्हर्जिन आयלँडमध्ये नोंदणीकृत असलेल्या शेल कंपन्यांना निर्यात केले गेले..
0
0
Report

अकोला में NEET री-नीट शांतिपूर्ण, 408 छात्र अनुपस्थित, सुरक्षा कड़े इंतजाम

Akola, Maharashtra:नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट अर्थात NEET-UG ची फेरपरीक्षा रविवारी अकोला जिल्ह्यात शांततेत आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्थेत पार पडली. मात्र या परीक्षेकडे तब्बल ४०८ विद्यार्थ्यांनी पाठ फिरवल्याचे समोर आले आहे. पेपरफुटीच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या या री-नीट परीक्षेसाठी अकोला जिल्ह्यातील १७ परीक्षा केंद्रांवर व्यवस्था करण्यात आली होती. परीक्षेसाठी ६ हजार ५३८ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी ६ हजार १३० विद्यार्थी परीक्षेला उपस्थित राहिले, तर ४०८ विद्यार्थी गैरहजर होते.परीक्षा सुरळीत पार पडावी यासाठी जिल्हा प्रशासन, शिक्षण विभाग आणि पोलिस प्रशासनाकडून विशेष खबरदारी घेण्यात आली होती. परीक्षा केंद्रांवर कडक तपासणी, सीसीटीव्ही निरीक्षण आणि बंदोबस्ताची व्यवस्था करण्यात आली होती. कोणताही अनुचित प्रकार न घडता परीक्षा शांततेत पार पडल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
0
0
Report

नाशिक के कामगार नगर में छत पर युवक की हत्या, शव थैले में मिला

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कामगार नगर परिसरामध्ये इमारतीच्या टेरेसवर आढळला मृतदेह नाशिकच्या महात्मा नगर कामगार नगर भागामध्ये खळबळ हत्या करून मृतदेह पोत्यामध्ये भरून टेरेसवर ठेवल्याची प्राथमिक माहिती तरुणाचा मृतदेह असून पोलीस घटनास्थळी दाखल परिसरातील नागरिकांना दुर्गंधी येत असल्याने शोध घेतला असता रात्री उशिरा पोत्यात मृतदेह असल्याच आल समोर याच परिसरातील एक तरुण गेल्या तीन दिवसांपासून होता बेपत्ता सदर समृद्धी देह या बेपत्ता तरुणाचा की आणखी कोणाचा पोलिसांकडून तपास सुरू परिसरातील सीसीटीव्ही फुटेच्या आधारावर आतापर्यंत तीन ते चार जणांना पोलिसांनी घेतले ताब्यात रात्री आठ वाजेच्या सुमारास प्रकार आला उघडकीस
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के गणपति पुले बीच पर 5 पर्यटक डूबे, शव बरामद

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी— गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर संभाजीनगरच्या ५ पर्यटकांचा बुडून मृत्यू. पोलीस अधीक्षकांकडून नातेवाईकांचे सांत्वन. रत्नागिरीच्या गणपतीपुळेतील समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील ५ पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम राबवून या पाचही जणांचे मृतदेह समुद्राबाहेर काढले. या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ जाकदेवी आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी मृतकांच्या शोककुळ नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि प्रशासनतर्फे आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.
0
0
Report

सांगली-सातारा विधान परिषद मतगणना शुरू, मतदान 99.89% तक पहुंचा

Sangli, Maharashtra:स्लग -सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीसाठी आज पार पडणार मतमोजणी.. अँकर - सांगली,सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतमोजणी पार पडत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 99.89% इतकं मतदान झालं होतं.895 पैकी 894 इतका मतदान झालं होतं,सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा केंद्रावर एक मतदान झाले नसल्याने शंभर टक्के मतदान होऊ शकले नाही.पाच टेबलच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे.सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये ही मतमोजणी पार पडणार असून असून दहा ते साडेदहा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडुन चोख नियोजन करण्यात आले आहे.महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत झाले असून भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप हे मैदानात होते,तर किशोर धुमाळ हे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते.मात्र महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी,अशी तरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा चौपदरीकरण: धोकादायक मोड़ नहीं बदले, यात्रियों में गुस्सा बढ़ा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुम्बई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण की अपघातांना आमंत्रण?. जुनी धोकादायक वळणे कायम असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी!. अँकर मुम्बई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे,या उद्देशाने महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले.. हे काम करताना जुनी,धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ केला जाईल,असे आश्वासन देण्यात आले होते.. मात्र,प्रत्यक्षात महामार्गावरील धोकादायक वळणे 'जशीच्या तशी' ठेवण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भोस्टे घाटातील वळण आणि संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या आधीचे वळण अत्यंत धोकादायक बनले असून,येथे अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही.. प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे चौपदरीकरणानंतरही प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून,स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून या कामाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत..
0
0
Report

सोलापुर: विधान परिषद चुनाव से पहले भाजपा के राजेंद्र राऊत के विजयी बैनर लगे

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणूक निकालाआधीच सोलापूर शहरात भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे विजयाचे बॅनर्स. सोलापूर विधान परिषद निवडणूकीती भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी SP चे वसंतराव देशमुख यांच्यात आहे थेट सामना. आज सकाळी 8 वाजल्या पासून सोलापुरातील नियोजन भवन येथून निकाल होणार आहे जाहीर. मात्र निकाल येण्यापूर्वीच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे लागले आहेत बॅनर्स. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोटोसह 'गुलाल आपलाच' अशा आशयाच्या आमदाराकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागल्याचे चित्र सोलापुरात दिसून येत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के पानवल डैम में पानी की आपूर्ति संकट, ड्रोन वीडियो से दिखा सूखा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीवर पाणीटंचाईचं सावट! पानवल धरण पूर्णपणे कोरडं, पाहा ड्रोन व्हिडिओ.. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे.. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडलं असून,रत्नागिरी शहरावर पाणीटंचाईचं मोठं संकट ओढवलं आहे.. सध्या सोशल मीडियावर या धरणाचे ड्रोन दृश्य समोर आले आहेत,ज्यामध्ये धरणाचा तळ उघडा पडल्याचं स्पष्ट दिसत आहे.. कांचन माडगूळकर यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही बोलकी दृश्ये तुम्ही पाहू शकता.. एरवी हिरवाईने नटलेला हा परिसर पाण्यासाठी आसुसलेला दिसत असून,रत्नागिरीकरांना आता केवळ आणि केवळ दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top