445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना के कृषी केंद्र चालक आज से बेमुदत बंद, अन्यायपूर्ण शर्तों के विरोध में
Jalna, Maharashtra:जालना | कृषी केंद्र चालकांचा आजपासून बेमुदत बंद अन्यायकारक अटी आणि वाढत्या प्रशासकीय हस्तक्षेपाला विरोध जालना जिल्ह्यातील सर्व कृषी केंद्र चालकांचा बंदमध्ये सहभाग अँकर- राज्यभरातील कृषी सेवा चालकांपासून बेमुदत बंद पुकारलाय.. जालना जिल्ह्यातही सर्व कृषी सेवा केंद्र बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. खरीप हंगामाच्या तोंडावर शासनाने लादलेल्या अन्यायकारक अटी आणि वाढत्या प्रशासकीय हस्तक्षेपामुळं कृषी केंद्र चालकांनी हे पाऊस उचललंय.. यासह किटक नाशक कंपन्यांकडून मुदत संपलेले मटेरिअल परत न घेतले जाणे, प्रशासनाकडून इन्स्पेक्टर राजमध्ये झालेली वाढ यामुळं प्रामाणिक विक्रेते आर्थिक व मानसिक दबावाखाली आले आहेत.. विशेष म्हणजे सीलबंद पॅकिंगमध्ये दोष आढळल्यास विक्रेत्यांवर होणारी दंडात्मक कारवाई अत्यंत अन्यायकारक आहे. त्यामुळं या मागण्यांवर तोडगा निघत नाही तोपर्यंत बंद असाच सुरु राहणार असल्याची भूमिक कृषी केंद्र चालकांनी घेतली आहे.. बाईट- ओमप्रसाद अग्रवाल, कृषी केंद्र चालक, (काळा शर्ट) बाईट- राजेश माने, कृषी केंद्र चालक(पिवळा शर्ट) बाईट- गोविंद जाधव, कृषी केंद्र चालक (पांढरा शर्ट)0
0
Report
येवला के नागडे रेल्वे गेट के पास scrap yard में भीषण आग, भारी नुकसान
Yeola, Maharashtra:येवला शहराजवळील नागडे रेल्वे गेट जवळ असलेल्या मोकळ्या जागेमध्ये असलेल्या भंगाराच्या सामानाला भीषण आग लागण्याची घटना घडली असता यावेळी या आगीत मोठ्या प्रमाणात भंगार सामान हे जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून तोफिक बेग भंगार खरेदी विक्रीचा व्यवसाय करता त्यांनी मोकळ्या जागेमध्ये ठेवलेले भंगार आगीच्या भक्षस्थानी सापडले असता यावेळी स्थानिकांनी त्वरित अग्निशामक दलाला याची माहिती देताच अग्निशामक दलाने आग आटोक्यात आणली मात्र तोपर्यंत या भंगार विक्रेत्याचे मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
गुहागर में पोस्टमैन के टपाल वितरण में लापरवाही, दो पोती टपाल मिलीं
Ratnagiri, Maharashtra:गुहागर - रत्नागिरी.. दीड वर्ष टपाल न वाटणारा वेळेश्वर चा पोस्टमन बडतर्फ.. पोस्टमनच्या घरात सापडली तब्बल दोन पोती टपाले.. अँकर गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर येथे गेले दीड वर्ष पोस्टात आलेले टपाल वितरित न करणारा पोस्टमन करण थोरात याला बडतर्फ करण्यात आले आहे.. त्याच्या घरात तब्बल दोन पोती टपल सापडले आहे.. गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर पोस्ट कार्यालयामध्ये बीड येथील करण थोरात नामक पोस्टमन कार्यरत आहे.. आपल्यासाठी आलेल्या टपलांबाबत मोबाईलवर ट्रेकिंग रिपोर्ट येत असला तरी टपाल आतापर्यंत पोहोचवत नाही म्हणून ग्रामस्थांनी वेळणेश्वर पोस्टात विचारणा सुरू केली..तेथे नव्यावे रोजी झालेले पोस्टमास्टर प्रसाद दिवडकर यांच्याकडे अनेक तक्रारी आल्याने त्यांनी पोस्टमन करण थोरात यांच्याकडे विचारणा केली..मात्र त्यावर तो काहीच उत्तर देत नव्हता अखेर त्याच्या घरी जाऊन त्यांनी पाहणी केली असता तेथे दोन पोती टपाल आढळले.. या टपालांमध्ये अनेकांची बँकांचे लिलाव नोटीस,पासबुक,चेक बुक,आधार कार्ड,एटीएम कार्ड,एलआयसी सर्टिफिकेट आदी असे तब्बल दीड वर्षांपेक्षा जास्त कालावधी मधील टपाल सापडले.. सध्या या पोस्टमनला बडतर्फ करण्यात आले आहे अशी माहिती समोर येत आहे..0
0
Report
Advertisement
लगभग 85,000 कृषि用品 दुकानदार आज से बेमुदत हड़ताल पर; कड़े नियमों के विरोध में
Yeola, Maharashtra:राज्यातील जवळजवळ 85000 कृषी निविष्ठा विक्री करणारे दुकानदार आज पासून बेमुदत संपावर गेले आहेत. शासनाने कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या दुकानदारांसाठी काही जाचक अटी लावून कठोर कायदे तयार केले आहेत. यामध्ये बियाणे विक्रीचे सॅम्पल हेच कंपन्याकडून पॅकिंग होऊन येत असताना त्याला विक्रेत्याला जबाबदार धरले जाईल. तसेच खतांची लिंकिंग व पोर्टल वरील नोंद यामुळे बियाणे विक्रेत्यांची पिळवणूक होत असून या विरोधात विक्रेत्यांनी हा बेमुदत संप पुकारला आहे. त्या संदर्भात येवल्यातील कृषी निविष्ठा विक्री करणाऱ्या विक्रेत्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी. टीप: सोबत दोन शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया देखील जोडल्या आहेत0
0
Report
सेवली में अपर तहसील कार्यालय की मांग पर गावों ने बेमुदत बंद का ऐलान
Jalna, Maharashtra:जालना : सेवलीत अप्पर तहसील कार्यालयासाठी तीव्र आंदोलन; गावकऱ्यांकडून गाव बंदची हाक जालना तालुक्यातील सेवली येथे अप्पर तहसील कार्यालय सुरू करण्यात यावं या मागणीसाठी आज सेवली गावात गावकऱ्यांनी गाव बंदची हाक दिली आहे.सेवली सर्कलमधील नागरिकांनी एकत्र येत सेवली गाव बंदची हाक दिली असून, प्रशासनाला इशारा देत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.अप्पर तहसील कार्यालय नसल्यामुळे नागरिकांना शासकीय कामांसाठी दूरवर जावे लागते. यामुळे वेळ, पैसा आणि श्रम यांचा मोठ्या प्रमाणात अपव्यय होत आहे. विशेषतः शेतकरी, विद्यार्थी आणि सर्वसामान्य नागरिकांना याचा मोठा फटका बसत आहे.या पार्श्वभूमीवर सेवली सर्कलमधील सर्व गावांनी एकमुखाने अप्पर तहसील कार्यालयाची मागणी करत आंदोलनाचा मार्ग स्वीकारला आहे.जोपर्यंत सेवली येथे अप्पर तहसील कार्यालयाचा प्रस्ताव मंजूर होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार आहे. गरज पडल्यास उपोषण, मोर्चे आणि बेमुदत बंद यांसारखी तीव्र आंदोलने केली जातील, असा इशाराही गावकऱ्यांकडून प्रशासनाला देण्यात आला आहे.0
0
Report
तुमसर के गोवारीटोला–पिटेसुर में जलसंकट, महिलाएं पानी के लिए तरस रहीं
Bhandara, Maharashtra:गोवारीटोला–पिटेसुर ग्रामपंचायत हद्दीत भीषण पाणीटंचाई ने ग्रामस्थ हैराण झाले आहेत. गावात पिण्याच्या पाण्याची कोणतीही ठोस व्यवस्था नसल्याने महिलांना एक ते दीड किलोमीटर अंतरावरील विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे. भर उन्हात डोक्यावर हंडे घेऊन महिलांची पाण्यासाठी रोजची वणवण सुरू आहे. प्रादेशिक पाणीपुरवठा योजना कार्यान्वित असल्याचे सांगितले जात असले, तरी गावात केवळ पाण्याचा ढोला उभारण्यात आला असून अद्याप पाईपलाईन टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत असून तातडीने कायमस्वरूपी पाणीपुरवठ्याची व्यवस्था करण्याची जोरदार मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
सातारा में रिकॉर्ड तापमान: अधिकतम 41.5°C, लोगों ने गर्मी से बचाव शुरू किया
Satara, Maharashtra:सातारा - सातारा जिल्ह्यात उष्णतेची तीव्र लाट निर्माण झाली असणाऱ्या उन्हाळ्यातील उच्चांकी 41.5 तापमानाची नोंद झाली आहे. थंड हवेचे महाबळेश्वरही देखील तापले असून पारा 34°C अशावर गेला. दरम्यान वाढत्या तापमानामुळे नागरिकांची त्रास वाढली असून दुपारच्या वेळी रस्त्यावरची वर्दळ कमी झाली आहे. दिवसेंदिवस उन्हाची तीव्रता वाढतच चालली आहे. सकाळी 9 वाजल्यापासूनच उन्हाचा तडाखा जाणवत असून टोपी, गॉगल, स्कार्फ आणि शीतपेयांचा आधार नागरिकांना घेावा लागत आहे.0
0
Report
यवतमाड़ के 1700 कृषि सेवा केंद्र सरकार की नीतियों के खिलाफ हड़ताल का ऐलान
Yavatmal, Maharashtra:राज्यातील बळीराजाचा कणा असलेल्या कृषी निविष्ठा विक्रेत्यांनी आता सरकारच्या जाचक धोरणांविरुद्ध एल्गार पुकारला आहे. विविध प्रलंबित मागण्यांकडे सरकार जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, यवतमाळ जिल्ह्यातील तब्बल १७०० कृषी सेवा केंद्रे आजपासून बेमुदत बंद ठेवण्याचा निर्णय 'माफडा' संघटनेने घेतला आहे. यामुळे ऐन खरीप पूर्वहंगामात कृषी साहित्याचा पुरवठा विस्कळीत होण्याची चिन्हे आहेत. याबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी श्रीकांत राऊत यांनी.0
0
Report
विदर्भ में भीषण हीटवेव: पारा 46.5°C, ऑरेंज अलर्ट जारी
Nagpur, Maharashtra:विदर्भात उष्णतेचा कहर केलाय.. सकाळपासूनच अंगाची लाहीलाही करणार ऊन आहे... अकोला अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात तर आजही ऑरेंज अलर्ट असून तेथे अगोदरच पारा 46.5 अंश सेल्सिअसवर पोहचला आहे.... दुपारी तर उन्हाचे अक्षरशः चटके बसत आहे.... विदर्भातील या उष्णतेच्या प्रकोपाचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
Advertisement
खेड में भीषण आग लगी, दमकलों की तत्परता से बड़ा नुकसान टला
Ratnagiri, Maharashtra:खेड मध्ये भीषण वणवा; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठी दुर्घटना टळली.. खेड शहरातील कुवार साई परिसरात रविवारी संध्याकाळी मोठ्या प्रमाणात वणवा लागल्याची घटना घडली..आग वेगाने पसरत असल्याने परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. विशेषतः ही आग जवळील घरांच्या दिशेने सरकत असल्याने रहिवाशांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ भाजपचे नेते ॲड. वैभव खेडेकर यांना फोनद्वारे दिली.परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेत तत्काळ खेड नगरपरिषदेच्या अग्निशमन विभागाने कोणताही विलंब न करता घटनास्थळी धाव घेतली. अग्निशमन कर्मचाऱ्यांनी शर्थीचे प्रयत्न करत आगीवर नियंत्रण मिळवले. आग घरांपर्यंत पोहोचण्यापूर्वीच ती विझवण्यात यश आल्याने मोठी दुर्घटना टळली आणि अनेक घरे सुरक्षित राहिली.0
0
Report
खेडमध्ये गोठ्यात भीषण आग, विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन उद्ध्वस्त; आर्थिक संकट गहरले
Ratnagiri, Maharashtra:खेडमध्ये गोठ्याला भीषण आग.. दोन विधवा महिलांचे उपजीविकेचे साधन हिरावले!.. रत्नागिरीच्या खेड तालुक्यातील मांडवे येथे काल रात्री ९ वाजता एका गोठ्याला भीषण आग लागली. श्रीमती गायत्री मोरे आणि शारदा मोरे यांचा हा गोठा पूर्णपणे जळून खाक झाला असून सुमारे १.५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. ग्रामस्थांनी प्रसंगावधान राखत गोठ्यातील गुरांना सुखरूप बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळला.. मात्र,दुग्ध व्यवसायावर उदरनिर्वाह करणाऱ्या या दोन्ही विधवा महिलांसमोर आता मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.. या पीडित कुटुंबाला तातडीने शासकीय मदत मिळावी,अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत..0
0
Report
संगमनेर कोर्ट में फिर से पेशी, 9 दिन से पुलिस कस्टडी, मास्टरमाइंड फरार
Shirdi, Maharashtra:संगमनेर कोर्ट में फिर से पेशी, 9 दिन से पुलिस कस्टडी, मास्टरमाइंड फरार0
0
Report
Advertisement
गुहागर समुद्र चौपाटी: पांच जीवनरक्षक वेतन न मिलने पर छुट्टी पर, सुरक्षा पर सवाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पगार थकल्याने जीव रक्षक रजेवर.. गुहागर समुद्र चौपाटीवरील पर्यटकांची सुरक्षा वाऱ्यावर.. नगराध्यक्ष योग्य तोडगा काढणार का.. अँकर गुहागर समुद्र चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीव रक्षकांचा पगार थकल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत.. परिणामी ऐन हंगामात गुहागर मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. गुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे..समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीव रक्षक समुद्र चौपाटीवर नसल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.. या जिरक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे.याबाबत नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी विचारणा केली असता,पगार 10 मे पर्यंत मिळू शकतो..दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल तोपर्यंत तुम्ही नाही आला तरी चालेल असे सांगण्यात आल्याचे जीव रक्षक सांगत आहेत.. पगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीव रक्षक रजेवर आहेत.. यावर गुहागरच्या नगरपालिका लक्ष देऊन योग्य तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे..0
0
Report
अमरावती में 10 कृषी निविष्ठा विक्रेत्यों के परवाने निलंबित, 6 को ताकीद
Amravati, Maharashtra:जिल्ह्यातील दहा कृषी निविष्ठा विक्रेत्यांचे परवाने निलंबित; जिल्हा कृषी अधीक्षक अधिकारी यांची कारवाई. अमरावती जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी व कृषी निविष्ठांची गुणवत्ता राखण्यासाठी धडक मोहीम प्रारंभ केली आहे. या मोहिमेमध्ये नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दहा कृषी सेवा केंद्रांचे परवाने निलंबित करण्यात आले असून अन्य सहा केंद्रांना सक्त ताकीद दिली आहे. ऐन हंगामात शेतकऱ्यांची बियाणे व खत विक्रीत फसवणूक करण्याची माहिती उघडकीस आली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागते. कृषी विभागाने अशाप्रकारची शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी निविष्ठा विक्री केंद्रांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. रासायनिक खत विक्री केंद्रातील ई-पास मशीनवर शिल्लक असलेल्या खतसाठ्याची व प्रत्यक्ष शिल्लक साठ्याची तपासणी गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांमार्फत केली. तपासणीमध्ये तफावत आढळल्याने 17 कृषी निविष्ठा विक्री केंद्रांत दोष आढळल्याचे निदर्शनास आले. त्यांच्या विरुद्ध प्रस्ताव सादर केला गेला; सुनावणी नंतर दहा रासायनिक खत विक्रेत्यांचे परवाने निलंबित करण्यात आले तर सहा खत विक्रेत्यांना सक्त ताकीद देण्यात आली. जिल्हा कृषी अधिकारी यांनी ही माहिती दिली. आजपासून कृषी सेवा केंद्र चालकांनी बेमुदत बंदचा इशारा दिला आहे.0
0
Report
अमरावती में ड्रग्स तस्कर के घर पर पुलिस का छापा; 53 ग्राम ड्रग्स जप्त
Amravati, Maharashtra:अमरावतीमध्ये पोलीस कोठडीत असलेल्या तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा; सुमारे ७.९५ लाख किमतीचा ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त. अँकर :- अमरावतीत पोलीस कोठडीत असलेल्या ड्रग्स तस्कराच्या घरावर गुन्हे शाखेचा छापा टाकत मोठी कारवाई केली आहे यामध्ये ५३ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त काण्यात आले असून याची किंमत सुमारे ७.९५ लाख रुपये इतकी आहे. साकिब जावेद मोहम्मद आसिफ कुरेशी असे आरोपीचे नाव असून या आधी २ किलो ८० ग्रॅम एमडी जप्त प्रकरणाशी या संबंध असल्याचे तपासात पुढे आले आहे. २३ एप्रिलला दोन मुख्य आरोपींना अटक करण्यात आली असून त्यामुळे ड्रग्ज रॅकेटचे मोठे जाळे उघड होण्याची शक्यता आहे. दरम्यान पुढील तपास पोलीस करत असून आणखी काय खुलासे समोर येतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
