icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राज्य सरकार ने दापोली कोकण कृषि विश्वविद्यालय के विकास के लिए 86 करोड़ रुपये मंजूर किए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली कृषी विद्यापीठाला 86 कोटी.. विकास कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता.. विद्यापीठाला मोठा दिलासा.. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत सुमारे 86 कोटी रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.. या निर्णयामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक वस्तीगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे..
0
0
Report

नाशिक में महायुती नेताओं की संयुक्त बैठक: चुनावी चालें तेज

Nashik, Maharashtra:- विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची नाशिकमध्ये एकत्रित बैठक - बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार पंकज भुजबळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल ढिकले,आमदार नितीन पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित - *नाशिक मधील मतदारांची उद्या सहल निघणार* - *बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार* - मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून मतदारांना सूचना - उद्या ठाण्याच्या दिशेने नाशिक मधील मतदारांना घेऊन एकत्रित सहल निघणार - गीते बंधूंची माघार झाल्यानंतरही महायुतीच्या नेत्यांना मत विभाजनाची धाकधूक ?
0
0
Report
Advertisement

उमरद के ग्रामीण इलाकों में चक्रवाती तूफान से नुकसान, घर-छप्पर उड़े, बिजली आपूर्ति प्रभावित

Nagpur, Maharashtra:नागपूर - उमरेड तालुक्यात सिर्सी गावाला वादळाचा फटका, शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने अनेक घरांच नुकसान... - सिर्सी, केसलापूर, आमगाव देवळी, चनोडा, बोरी माजरा, किनाळा, बोथलीसह अन्य गावांत वादळामुळे - अनेक घरांची टिनाची छते उडाली; अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान - वादळाच्या तडाख्याने अनेक घरावरील टिन उडालेत,जीवनावश्यक वस्तूंची हानी, अनेकांचे मोठे नुकसान - केसलापूरमध्ये उडालेले छत थेट झाडावरून वीजतारांवर अडकले - आमगाव देवळीत सर्वाधिक नुकसान, - शेतकरी शिवदास कुकडकर यांच्या बैलजोडीतील एक बैल जागीच मृत, दुसरा जखमी - आमगाव देवळीत पाच वीज खांब कोसळले,गावाचा वीजपुरवठा खंडित झाला - अनेक घरांचे छप्पर उडाल्याने नागरिकांवर संकट, अवकाळीनंतर आता चक्रीवादळाचा फटका; शेतकरी पुन्हा अडचणीत - नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची स्थानिकांची मागणी - पावसाळ्यापूर्वीच नैसर्गिक संकटाने उमरेड तालुक्यातील ग्रामीण भाग हादरला
0
0
Report
Advertisement

अजबनगर में धार्मिक सलोखा बिगाड़ने की कोशिश, आरोपी गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील अजबनगर मध्ये आक्षकाऱ घोषणाबाजी करत धार्मिक सलोखा बिघडवण्याचा आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाचा प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. शेख आसिफ शेख दादामियाँ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली, या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. आरोपी शेख आसिफ याने क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडवरील अजबनगर येथे दुचाकीवरून नागरिकांना उद्देशून चिथावणीखोर वक्तव्ये केली. औरंगजेब आलमगीर, कान खोल के सुन लो... अशा घोषणा देत त्याने समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में एक दिन पानी की आपूर्ति रोकी जाएगी; दरों में वृद्धि का संकेत

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठल्याने आज पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे. पाऊस सुरू होऊन धरणाची पाणी पातळी वाढेपर्यंत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. इतकच नाही तर पाणीपट्टी दुप्पट वाढीचा प्रस्ताव देखील प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आकारत असलेल्या दराप्रमाणे या प्रस्तावात नवे दर सुचवण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे दिवसाआड पाणी आणि दुसरीकडे दरवाढीचे संकट कोल्हापूरकरांना सहन करावे लागणार आहे。
0
0
Report
Advertisement

महाराष्ट्र में ओबीसी जनगणना और आरक्षण बचाने के लिए जोरदार आंदोलन

Hingoli, Maharashtra:अँकर -ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसह विविध मागण्यासाठी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे ओबीसी आंदोलन प्रा, लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या मागणीसह ओबीसी बांधवानी एकत्र आलं पाहिजे आरक्षणातील घुसखोरी थांबली पाहिजे महाराष्ट्र मध्ये ज्या गोष्टी घडतायेत त्या ओबीसीचा आरक्षण संपवणाऱ्या गोष्टी घडत आहेत सरकारने ओबीसीला वाऱ्यावर सोडले आहे आम्ही राज्यभर 100 सभा घेणार असून चलो मुंबईचा नारा दिला आहे गावागावातील ओबीसी आरक्षण संपल आहे नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण संपल असून सत्ताधारी सरकार ओबीसीवर अन्याय करत असल्याची टीका प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे .. बाईट -प्रा, लक्ष्मण हाके (ओबीसी आंदोलन )
0
0
Report

सांगली हत्या मामले में IAS अधिकारी सचिन मोते पर गंभीर आरोप, नया मोड़

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील माथाडी कामगार नेतेच्या,नातूच्या हत्या प्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संशयित हल्लेखोर निलेश गडडे यांच्या विरोधात घटनेच्या दिवशी गुन्हा दाखल करू नये, यासाठी जत पोलिसांवर, आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्या कडून फोन करून दबाव टाकण्यात आला. त्यामुळे पाच तास गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला, परिणामी जत मधून येऊन सांगलीत संशयित निलेश गडडे यांनी गोळीबार करत आपल्या नातूला मारल्याचा आरोप, मृत वेदांत बंडगर, याचे आजोबा व माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी केला आहे. त्याच बरोबर निलेश गडडे याच्याकडून धमकी देत, दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी जत पोलीस निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप लक्ष्मण खरात यांनी केला आहे. तर बाळासाहेब बंडगर यांनी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांना निलंबित करून संशयित हल्लेखोर निलेश गडडे याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी देखील केली आहे. हमाल ठेका आणि खड्णीच्या वादातून संशयित निलेश गडडे यांनी आपल्या साथीदारांसह माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत, बंडगर यांच्या १४ वर्षीय नातूचा डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता, आता या सर्व प्रकरणात सुशीयत हल्लेखोर निलेश गडडे याला पाठीशी घालण्यात आले असल्याचा गंभीर आरोप झाल्याने, हत्येच्या घटनेला नवीन वळण मिळाले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top