445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
केनवड़ में बोरवेल तार चोरी: 35-40 किसान पानी संकट से जूझे, गिरफ्तारी की मांग
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nFile:1605ZT_WSM_MOTORWIRES_STOLEN\nरिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम \n\nअँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यातील केनवड परिसरात अज्ञात चोरट्यांनी 35 ते 40 शेतकऱ्यांच्या शेतातील विहीर व बोरवेलवरील मोटारींचे वायर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे.या चोरीमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून पिकांच्या पाण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण असून, चोरट्यांना तातडीने अटक करण्याची मागणी करण्यात येत आहे.0
0
Report
त्रिपुरा वन विभाग भ्रष्टाचार के कथित घोटाले में नासिक के सरपंच गिरफ्तार
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील एका सरपंचाला तब्बल साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केल्याने मोठी खळबळ उडाली आहे. त्रिपुरा राज्यातील वन विभागातील कथित भ्रष्टाचार प्रकरणात ही कारवाई करण्यात आली असून, अटकेत असलेला सरपंच हा डीएफओ गौरव वाघ यांचा मामा असल्याची माहिती समोर आली आहे. नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून... व्हीओ 1 : त्रिपुरा राज्यातील वन विभागामध्ये कोट्यवधी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा संशय व्यक्त होत असताना आता या प्रकरणाचे धागेदोरे थेट नाशिक जिल्ह्यापर्यंत येऊन पोहोचले आहेत. येवला तालुक्यातील कोटमगावचे विद्यमान सरपंच राजेंद्र चिंतामण काकळीज यांना अग्रतळा रेल्वे स्थानकावर सुमारे साठ लाख रुपयांच्या रोकडसह त्रिपुरा पोलिसांनी अटक केली. व्हीओ 2 : राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा राज्यात वन विभागात डीएफओ पदावर कार्यरत असलेल्या गौरव रवींद्र वाघ यांचे मामा असल्याची माहिती तपासात समोर आली आहे. वन विभागातील विविध प्रकल्पांमधून आर्थिक गैरव्यवहार करून कोट्यवधींची माया जमवल्याचा संशय गौरव वाघ यांच्यावर व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर त्रिपुरा पोलिसांच्या गुप्तचर यंत्रणा काही दिवसांपासून गौरव वाघ यांच्या हालचालींवर बारीक लक्ष ठेवून होत्या. व्हीओ 3 : २५ एप्रिल २०२६ रोजी अग्रतळा रेल्वे स्थानक परिसरात पोलिसांनी सापळा रचत राजेंद्र काकळीज यांना रोकडसह ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान एका वनरक्षकासह डीएफओंच्या सरकारी वाहन चालकाला देखील चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली आहे. व्हीओ 4 : दरम्यान, डीएफओ गौरव वाघ यांच्या त्रिपुरातील शासकीय निवासस्थानी पोलिसांनी छापेमारी केली. या छाप्यात महत्त्वाची कागदपत्रे, सीसीटीव्ही फुटेज आणि एक ड्रोन कॅमेरा जप्त करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. व्हीओ 5 : गेल्या वीस दिवसांपासून राजेंद्र काकळीज हे त्रिपुरा पोलिसांच्या कोठडीत असून त्यांचा जामीन अर्जही न्यायालयाने फेटाळला आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आल्याने राज्य पोलिसांची विशेष शाखा आणि शासकीय रेल्वे पोलीस संयुक्तपणे या प्रकरणाचा तपास करत आहेत. व्हीओ 6 : तपास अधिकारीांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणाचा तपास अत्यंत गंभीर स्वरूपाचा असून आणखी काही कनिष्ठ अधिकारीांची नावे पुढे येण्याची शक्यता आहे. मात्र तपासाच्या हितासाठी अधिक माहिती देण्यास पोलिसांनी सध्या नकार दिला आहे.0
0
Report
चंद्रपुर में मिर्ची का बंपर उत्पादन, किसानों की जिंदगी में आई खुशहाली
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात लाल सुक्या मिरची ने शेतकऱ्याच्या आयुष्यात गोडवा आणलाय. यंदा मिरचीचे बंपर उत्पादन झाल्याने चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीत मिरचीची मोठी आवक बघायला मिळत आहे. महिनाभर आधी पहिल्या टप्प्यात 29 हजार रुपये प्रति क्विंटल भाव मिळाला होता. मात्र अवकाळी पावसाच्या फटक्यानंतर आता भाव खाली आला आहे. तरीही मोठ्या प्रमाणात मिरचीची या हंगामात चंद्रपूर बाजारात आवक झाली आहे. मिरचीने हात दिल्याने शेतकरी सुखावला आहे. चंद्रपूर जिल्हा धान- कापूस -सोयाबीन यासाठी ओळखला जातो. मात्र रब्बी हंगामात चंद्रपूर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात मिरचीचे उत्पादन घेतले जाते. राजुरा उपविभागात व वरोरा- भद्रावती या भागात उत्तम मिरची पीक घेतले जाते. लागवड करणाऱ्या शेतकऱ्यांमध्ये वाढ होत असल्याने जिल्ह्यात मिरचीचे बंपर उत्पादन होत आहे. सुकी लाल मिरची याआधी नागपूर अथवा मध्यप्रदेशच्या बाजारपेठेत विक्रीस न्यावी लागत होती. तिला भाव देखील कमी मिळत होता. याशिवाय वाहतूक व निवास याचा खर्च वजा करता हा तोट्याचा सौदा ठरत होता. शेतकऱ्यांची अडचण लक्षात घेता चंद्रपूर कृषी उत्पन्न बाजार समितीने मिरची मार्केटमध्ये पाऊल टाकले. मिरची व्यापार तेजीत असून दिल्ली -राजस्थान -मध्य प्रदेश -आंध्र प्रदेश -तेलंगणा या राज्यातून मिरची व्यापारी चंद्रपुरात दाखल होत आहेत. बाजार समितीने शनिवार हा दिवस मिरची लिलावासाठी निश्चित केला असून शेतकरी आपला माल या बाजारात आणत आहेत. व्यापारीवर्गाचा याला चांगला प्रतिसाद मिळत आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में डीजल संकट: 60% पेट्रोल पंपों पर डीजल नहीं, किसान-व्यवसायी परेशान
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशीही डिझेल टंचाई कायम असून, जिल्ह्यातील जवळपास 60 टक्के पेट्रोल पंपांवर डिझेल उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. यामुळे शेतकरी,वाहन चालक आणि ट्रान्सपोर्ट व्यावसायिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ज्या पेट्रोल पंपावर पेट्रोल व डिझल काही प्रमाणात उपलब्ध रांगा लागल्या आहेत. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतीची कामे सुरू असताना डिझेलअभावी ट्रॅक्टर व कृषी यंत्रणा ठप्प पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तसेच मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकीवरही याचा परिणाम होत आहे. त्यामुळे इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
कोल्हापुर में दूधगंगा डैम के पानी की कमी, अगस्त तक संकट गहरा
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पाणी संकटाचे सावट गडद होताना दिसत आहे. जिल्ह्यातील शेती आणि पाणीपुरवठ्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या दूधगंगा धरणातील पाणीसाठ्यात यंदा कमालीची घट झाली आहे. सध्या धरणात केवळ साडेचार टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून त्यातील साडेतीन टीएमसी पाणीसाठाच वापरता येणार आहे. या परिस्थितीमुळे पुढील काही महिने काटकसरीने पाणी वापराचे नियोजन करावे लागणार आहे. ऑगस्ट महिन्यापर्यंत उपलब्ध पाणीसाठा पुरवण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे आहे. दूधगंगा धरणावर राधानगरी, कागल, भुदरगड आणि करवीर तालुक्यातील काही भाग अवलंबून आहे. ऊसासह विविध पिकांसाठी देखील या धरणातील पाणी महत्त्वाचे मानले जाते. याशिवाय कोल्हापूर शहरालाही याच धरणातून पाणीपुरवठा केला जातो. त्यामुळे पाणीसाठ्यातील घट ही शेतीसह नागरिकांसाठीही चिंतेची बाब ठरत आहे. याचाच दूधगंगा धरणावर जावून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
पिंपरी चिंचवाड़ के फर्नीचर शोरूम में गोलीबारी: लॉरेन्स बिश्नोई गैंग का नाम सामने, उद्यमी को धमकी
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड़ के रावेत क्षेत्र में एक फर्निचर शोरूम पर गोलीबारी की घटना में लॉरेन्स बिश्नोई गैंग का नाम सामने आने से शहर में हलचल मची है। आमतौर पर सेलिब्रिटी टार्गेट करने वाले इस गैंग ने एक उद्यमी को निशाना बनाने का संकेत दिया है, जिससे कई सवाल उठ रहे हैं। घटना शुक्रवार रात करीब 9:30 बजे दुचाकी पर आए दो व्यक्तियों ने गोली चला दी। लॉरेन्स बिश्नोई गैंग के शुभम लोणकर ने इसकी जिम्मेदारी ली और कहा कि यह सिर्फ ट्रेलर है। शोरूम के मालिक को MD ड्रग्स के तस्कर और हवाला कारोबारी बताकर हत्या की धमकी दी। पुलिस ने मामले की गंभीरता से लेते हुए जांच शुरू कर दी है। आगे की जांच जारी है।0
0
Report
Advertisement
35 भोंदूबाबाओं के खिलाफ कार्रवाई, अंधविश्वास विरोधी समिति ने दावा
Nashik, Maharashtra:भोंदू अशोक खरात प्रकरणाला आज दोन महिने पूर्ण दोन महिन्यात राज्यभरात ३५ भोंदू बाबांविरोधात गुन्हे दाखल महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची माहिती अनेक ठिकाणी पोलिसांकडून भोंदू बाबांचे दरबार उद्ध्वस्त ग्रामीणसह शहरी भागातही भोंदूगिरीचे प्रकार उघड महिलांच्या लैंगिक शोषण आणि आर्थिक फसवणुकीची अनेक प्रकरणे समोर खरात प्रकरणानुसार पीडित महिलांना पुढे येण्याची हिंमत मिळाल्याचा दावा विविध धर्मातील भोंदू बाबांवर कारवाई झाल्याने अंनिसचा मोठा दावा जादूटोणा विरोधी कायद्यांतर्गत आणि इतर कलमांखाली गुन्हे दाखल अंनिसकडून राज्यभरातील ३५ प्रकरणांची यादी जाहीर सूची: 1) अशोक कुमार खरात , नाशिक 2)गडगेबाबा राजेंद्र गडगे, संगमनेर , अहिल्यानगर 3) चेतन सुनील माळी,मूर्तिजापूर, अकोला 4) पंकज देवराम घोलप, येडगांव, पुणे 5)मोहन मामा भोसले, कुर्डुवाडी, सोलापूर 6)नाना बर्डे , आळे फाटा , पुणे 7) ऋषिकेश वैद्य ,वसई ,मुंबई 8) अल्ताफ रईस खान ,मालाड, मुंबई 9) रिधम पांचाळ, मालाड, मुंबई 10) गणेश शिंदे ,श्रीरामपुर, अहिल्यानगर 11) अर्जुन चव्हाण उर्फ टनटन बाबा , नवी मुंबई 12)विठोबा वाल्मीक जाट, सातपूर, नाशिक 13)किसन तळपे मंदोशी, खेड 14) महेशगिरी उर्फ महेश काकडे,लासलगाव ,नाशिक 15) अब्दुल रशीद शेख, खालापूर, रायगड 16) इरफान नियाज अहमद , कांदिवली , मुंबई 17) अनिल सोलोमन सिंग ( पादरी), पुणे 18)शिवराम पराश सावर, पालघर 19)अल्ताफ हसन मदारी, जळगाव 20)नाना महाराज उर्फ गुरु माऊली वीरकर, टेंभुर्णी . सोलापूर 21) पिंटू धुमाळ बारामती, पुणे 22) हेमदास किसन बावणे,अड्याळ,भंडारा 23) चंद्रकांत राजेंद्र माळी , इगतपुरी, नाशिक 24) अशोक मधुकर आढाव, श्रीरामपूर,अहिल्यानगर 25) औदुंबर गडदे, स्वारगेट, पुणे 26)नवनाथ गवळी, खेड, पुणे 27) शाहिद शेख, खडकपाडा,कल्याण 28) शिव भाऊ सोनवणे, सर्जेपुरा, अहिल्यानगर 29) ज्ञानेश्वर नागोराव कोरडे, बिलोली, नांदेड 30) रमेश गुप्ता , मालाड , मुंबई 31)हरिगिरी दत्तगिरी महाराज , भाग्यनगर, नांदेड 32) मंजुनाथ शेट्टी उर्फ दीक्षित , ठाणे 33) कृष्णा उर्फ भगत सुभाष चित्ते, पश्चिम देवपूर, धुळे 34) यशवंत एकनाथ थोरात, पारनेर, अहिल्यानगर 35) श्याम महाराज राठोड , दिघी , पुणे0
0
Report
ईंधन दर बढ़े, किसानों का बजट डगमगा; खरीफ से पहले संकट गहरा
Shirur, Maharashtra:एन खरीप हंगामाच्या पूर्व मशागतीच्या कामांच्या दरम्यानच इंधनाचे दर वाढल्याने शेतकऱ्यांचं बजेट कोलमडलंय. आधीच शेतीमालाच्या बाजारभाव गडगडल्याने आधीच संकटात सापडलेल्या बळीराजा च्या जखमेवर इंधन दरवाढ करून सरकारने मिठ चोळलंय असा उव्दीग्न सवाल शेतकरी करताय. याचाच थेट शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी. Wkt+121: प्रतिनिधी हेमंत चापुडे To सचिन जोरी (शेतकरी). प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे....0
0
Report
नांदगाव में लाखों भक्त शनी दर्शन के लिए उमड़े, २५ वर्ष का दुर्लभ योग
Nashik, Maharashtra:नस्तनपूर येथे शनीच्या दर्शनासाठी लाखो भाविकांची गर्दी... शनी जयंती व शनी अमावस्या असा दुर्मिळ योग.. शनेश्वर ट्रस्टने ठेवली भाविकांची चोख व्यवस्था.. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावण झालेल्या व साडेतीन शनी पिठापैकी एक असलेले संपूर्ण पीठ नस्तनपुर ( ता.नांदगाव ) येथे भाविकांनी शनी दर्शनासाठी आज मोठी गर्दी केली होती..शनी जयंती व शनी अमावस्या हा २५ वर्षांनी आलेला दुर्मिळ योग असल्याने लाखो भाविकांनी आज शनी देवाचे दर्शन घेतले.पहाटेपासूनच दर्शनासाठी शनिभक्तांच्या रांगा लागल्या होत्या.अमावस्या कालावधीत शनीचे दर्शन घेतल्याने शनीदेवाची कृपाद्रुष्टी लाभते अशी धारणा असल्याने अमावस्या कालावधीत दर्शन घेण्याचा प्रयत्न शनी भक्तांनी केला..पंचक्रोशीतील शनिभकतांसह जळगाव, संभाजी नगर, नाशिक,अहिल्या नगर आदी उत्तर महाराष्ट्रातील शनि भक्त मोठ्या संख्येने दर्शनासाठी आले होते..संस्थांचे स्वयंसेवक यावेळी स्वयंशिस्तिने भाविकांच्या सेवेसाठी हजर होते..0
0
Report
Advertisement
लातूर NEET पेपर लीक: कुलकर्णी के नाम से इलाके में हड़कंप, सीबीआई हिरासत में
Latur, Maharashtra:लातूर के NEET पेपर लीक मामले में अब चौंकाने वाली जानकारी सामने आ रही है। पी. व्हि. कुलकर्णी का नाम सामने आने के बाद इलाके के लोगों को भी बड़ा झटका लगा है। “कुलकर्णी ने ही पेपर लीक किया, यह सुनकर हमें भी धक्का लगा,” ऐसी प्रतिक्रिया पड़ोसियों ने दी है। फिलहाल CBI ने उन्हें हिरासत में लिया है और अब जांच में क्या सच सामने आता है, इस पर सभी की नजरें टिकी हैं。0
0
Report
कचरा उठाने वाली ट्रक ने दो साल के बच्चे को टक्कर दी, मौत
Kalyan, Maharashtra:कचरा उचलणाऱ्या ट्रकने दोन वर्षाच्या मुलाला दिली धडक मुलाचा दुर्दैवी अंत कचरा उचलणाऱ्या ट्रकने एका दोन वर्षाच्या मुलाला धडक दिल्याची घटना कल्याण मलंग रोड परिसरात घडली. भाल गावात कल्याण डोंबिवली महापालिकेची कचरा उचलणारी गाडी आली होती.यावेळी या गाडीने दोन वर्षाचा शिवा राठोड या मुलाला धडक दिली.जखमी शिवाला उपचारार्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वी मुलाचा दुर्दैवी अंत झाला.याप्रकरणीपो लिसांनी गुन्हा दाखल केला आहे.0
0
Report
सोलापुर में विपक्षी प्रदर्शन, शिक्षा मंत्री से इस्तीफा मांग—पेपर फूटे मामले में घिरी सरकार
Solapur, Maharashtra:- सोलापुरात डाव्या आघाडीकडून केंद्रीय शिक्षणमंत्र्याविरुद्ध निदर्शने - यावेळी शिक्षण मंत्र्यांची प्रतिमा जाळण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांमध्ये आणि पोलिसांमध्ये झटापट - नीट पेपर फुटीच्या अपयशाची जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा द्यावा. - DYFI या विद्यार्थी संघटनेकडून केंद्र सरकार विरोधात निदर्शने - NEET पेपर फुटी प्रकरणात तात्काळ अटक करून कारवाई करण्याची मागणी. - देशभरात तीन विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली त्यामुळे शिक्षण मंत्रावर सदोष मनुष्यबदाचा गुन्हा दाखल करा.0
0
Report
Advertisement
दुषित पानी से नागेशवाडी में डायरिया का प्रकोप, मेहकर अस्पताल में 20 भर्ती
Buldhana, Maharashtra:बुलढाणा - मेहकर बुलढाण्यातील आदिवासी बहुल नागेश वाडी गावांमध्ये डायरियाचा फैलाव गावामध्ये 100 रुग्णांना लागण .. नागेशवाडी येथे दूषित पाणीामुळे गॅस्ट्रोची मोठी लागण.. जिल्ह्यातील मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात 20 रुग्णांना केले भरती .. Anc-मेहकर तालुक्यातील आदिवासी बहुल नागेशवाडी गावांमधील विहिरीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांना गॅस्ट्रोची मोठ्या प्रमाणावर लागण झाली असून उपचारासाठी मेहकर येथील ग्रामीण रुग्णालयात 20 रुग्ण भरती करण्यात आले आहे नागेशवाडी येथे गावातील विहिरीतून नागरिकांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. सदर विहिरीतील पाणी दूषित झालेामुळे गावातील 100 पेक्षा जास्त स्त्री-पुरुषांना काल सायंकाळी गॅस्ट्रोची लागण झाली. गॅस्ट्रोची लागण झालेल्या रुग्णांवर गावात उपचार केले गेला तर काही रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र मेहकर येथे उपचारासाठी नेले असून विशेष आरोग्य पथकाकडून उपचार सुरू असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. दरम्यान आरोग्य विभागाकडून नागेशवाडी येथील विहिरीतील पाण्याचे नमुने घेण्यात आले असून ते पुढील तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहेत.0
0
Report
पनवेल महापालिका: एक सरकारी प्रस्ताव स्थगित, एक रद्द; विपक्ष का हंगामा
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेत भाजपला एक शासकीय ठराव स्थगित तर एक रद्द करण्याची नामुष्की ओढवलेय. केवळ 20 फिरते शौचालय 5 कोटी 46 लाख रुपयांना घेण्याचा ठराव सत्ताधारी भाजपला स्थगित करावा लागला असून तलावातील जलपरणी काढण्यासाठी त्रयस्थ संस्थेला 4 कोटी 34 लाख रुपये देण्याचा ठराव विरोधीपक्षाने केलेल्या आक्रमक विरोधामुळे रद्द करावा लागलाय. हे ठराव नागरिकांच्या पैशांचा चुराडा करणारे होते असा आरोप विरोधीपक्ष नेत्याने केला असून जनतेच्या पैशाचा अपव्यय होऊ देणार नाही अशी प्रतिक्रिया स्थायी समिती सभापतीनी व्यक्त केलेय.0
0
Report
कानापुर में ट्री आर्मी के तहत 500 आम के पेड़ लगाए जाएंगे
Sangli, Maharashtra:खानापूर तालुक्यात सुरू झाला पट्री आर्मी उपक्रम.. अँकर - सांगलीच्या खानापुर तालुक्यातील आळसंद येथे"ट्री आर्मी"उपक्रमा अंतर्गत पाचशे आंब्यांच्या झाडांच वृक्षारोपण करण्यात आले आहे.आमदार सुहास बाबर यांच्या पुढाकारातून वृक्षसंवर्धन अंतर्गत ट्री उपक्रम हाती घेण्यात आला आहे. पिंपळाचे झाड तोडण्याऐवजी त्याची पुनर्स्थापना करण्याच्या विचारातून या उपक्रमाची सुरुवात झाली आहे.ज्यातून २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत मिळालेल्या मताधिक्याएवढी झाडे लावण्याचा संकल्प आमदार बाबर यांनी केला आहे.ज्यामुळे एक अनोखी हरित लोकचळवळ उभी राहत आहे.0
0
Report
Advertisement
