icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Raigad में रोजगार और आजीविका हमी मिशन शुभारंभ, 125 दिन रोजगार और 318 काम

Chendhare, Maharashtra:स्‍लग - विकसित भारत रोजगार और आजिविका हमी मिशन योजनेचा शुभारंभ. मंत्री भरत गोगावले यांची ऑनलाइन उपस्थिती. विविध कामांच्या कार्यादेशाचे वितरण. केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार और आजिविका हमी मिशन योजनेचा रायगड जिल्हास्तरीय शुभारंभ बुधवारी अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवन येथे झाला. कार्यक्रमात रोजगार हमी योजना व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन केले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कृषी सभापती वैकुंठन पाटील यांच्‍यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते. रोजगाराची मर्यादा 125 मनुष्यदिवसांपर्यंत वाढविण्यात आली असून, योजनेतील कामांची संख्या 318 करण्यात आली आहे. यात विविध क्षेत्रांमध्ये कामांना प्राधान्य देण्यात येणार असून ही योजना शेतकऱ्यांच्या शाश्वत विकासासाठी लाभदायक ठरेल, असा विश्वास मंत्री भरत गोगावले यांनी व्यक्त केला. या योजनेतील नवीन कामांचे कार्यादेश लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले.
0
0
Report

अकोला दुर्घटनाओं में फिर से हत्या की धमकी मिलने वाले कांग्रेस विधायक साजिद खान पठाण; सुरक्षा बढ़ाने की मांग

Akola, Maharashtra:अकोला पश्चिमचे काँग्रेस आमदार साजिद खान पठाण यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचा दावा त्यांनी विधानसभेत केला आहे. यापूर्वी फेब्रुवारी महिन्यात "१० कोटी रुपये दे, नाहीतर जीवे मारू" अशी धमकी देणारा कॉल आला होता. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या सुरक्षेत वाढ केली होती. दरम्यान, काल रात्री पुन्हा धमकीचा कॉल आल्याचे पठाण यांनी सभागृहात सांगितले. मात्र, सभागृहाबाहेर माध्यमांशी बोलताना हा कॉल स्वतःला नव्हे, तर त्यांच्या नगरसेवकाला आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. फेब्रुवारीमध्ये आलेला धमकीचा कॉल बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा आरोप असलेल्या शुभम लोणकरच्या नावाने आल्याचा दावा करण्यात आला होता. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात "यांचा सफाया करू" असे वक्तव्य केल्याचा उल्लेख करत, त्याच्या दुसऱ्याच दिवशी पुन्हा धमकी आल्याेचे पठाण यांनी सांगितले. सभागृहात बोलताना, "मी अशा धमक्यांना घाबरत नाही. मात्र, अकोल्यातील राजेश्वर मंदिरासाठी मी मागितला निधी माझ्या मृत्यूपूर्वी मंजूर करून ते काम पूर्ण व्हावे, ही माझी इच्छा आहे," अशी भावनिक भावना त्यांनी व्यक्त केली.या संपूर्ण प्रकारामुळे राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला असून, लोकप्रतिनिधीच सुरक्षित नसतील तर सामान्य नागरिकांनी कोणाकडे पाहायचे, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

नागपुर में जल जमाव से बिजली का झटका, 65 वर्षीय महिला की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर - - रस्त्याने चालता-चालता साचलेल्या पाण्यातून विजेचा धक्का (करंट )लागून महिलेचा मृत्यू - नागपुरात घडली धक्कादायक घटना - महानगरपालिकेच्या कंत्राटदाराच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे 65 वर्षीय वृद्धेचा मृत्यू - मृत अफ़रोज़ा बेग़म या किरायाच्या घरात एकट्याच राहत होत्या - किराणाच्या दुकानातून परतताना रस्त्यात साचलेल्या पाण्यात विजेचा झटका लागून त्यांचा घटनास्थळीच मृत्यू - महानगर पालिकेच्या कंत्राटदार आणि वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांचा हेळसांडपणा ठरला कारणीभूत - रस्त्याने चालताचालता विजेचा झटका लागून ऑन द स्पॉट मृत्यू झाल्याची घटना नागपुरात घडली आहे. - बुधवारी रात्री नागपूरच्या ताजबाग परिसरातील गौसिया कॉलनीत एका 65 वर्षीय वृद्ध महिलेचा मृत्यू झाला तेव्हा तिच्या शरीरात विजेचा प्रवाह वाहत होता असे स्थानीय रहिवाशांचे म्हणणे आहे. - पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असली तरी महानगर पालिकेचा कंत्राटदार आणि इलेक्ट्रिक कंपनीच्या विरोधात नागरिकांत प्रचंड नाराजी आहे - या अपघाताला जबाबदार असणाऱ्या कंत्राटदार,अधिकाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी तसेच पीडितेचे कुटुुबाला आर्थिक भरपाई देण्याची मागणी
0
0
Report
Advertisement

शिवसेना ने महावितरण स्मार्ट मीटर के विरोध में अहिल्यानगर में बड़ा प्रदर्शन

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर यहाँ महावितरण के नवीन स्मार्ट मीटर सक्तीविरोधात शिवसेना के वतीने आंदोलन करण्यात आला आहे... शहरातील शिवसेना पदाधिकारी आणि नगरसेवकांनी महावितरण कार्यालयावर प्रचंड घोषणाबाजी करत अधीक्षक अभियंत्त्यांना निवेदन दिल... पूर्वीचे मीटर व्यवस्थित असतानाही नवीन स्मार्ट मीटर सक्तीने बसवले जात आहे स्मार्ट मीटरมुळे ग्राहकांच्या वीजबिलात वाढ होत आहे... स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती करू नये या साठी अधीक्षक अभियंता दालनात शिवसेना पदधिकाऱ्यांनी बराच वेळ गदारोळ घातला तसेच पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्तीची कामे अपुरी असल्याने वीजपुरवठा खंडित होण्याचे प्रमाण वाढत असल्याचाही मुद्दा उपस्थित करण्यात आला... अखेर अधीक्षक अभियंता स्मार्ट मीटर बसवण्याची सक्ती केली जाणार नसल्याचे लेखी दिल्यानंतर शिवसैनिक कार्यालयाच्या बाहेर आले यापुढे शहरात महावितरण कार्यालयाकडून सक्तीने स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न केला तरी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा शिवसैनिकाकडून देण्यात आला आहे
0
0
Report

इंदापुर नगरपालिका कार्यालय के बाहर नेता अनिल पवार पर हमला; हमलावरों की तलाश जारी

Rui, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील इंदापूर नगरपरिषदेचे विरोधी पक्ष नेते अनिल पवार* यांच्यावर दिवसाढवळ्या नगरपरिषद कार्यालयाबाहेर जीवघेणा हल्ला करण्यात आला. गुरुवारी नगरपरिषदेतील बैठक संपवून बाहेर येत असताना चार अज्ञात हल्लेखोरांनी अचानक धाव घेत चॉपर आणि चाकूने हा हल्ला केला. या हल्ल्यात अनिल पवार यांच्या डाव्या हातावर वार झाला असून, प्रसंगावधान राखल्यामुळे ते मोठ्या अनर्थातून बचावले. त्यांना वाचवण्यासाठी धावून गेलेले वसीम शेख हेदेखील या घटनेत जखमी झाले आहेत. दोघांवरही इंदापूर उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले असून, परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू केली आहे. हल्लेखोर कोण होते आणि हल्ल्यामागील नेमके कारण काय, याचा पोलीस तपास करत आहेत. दरम्यान, इंदापूर नगरपरिषदेचे नगराध्यक्ष भरत शहा यांनी उपजिल्हा रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमी विरोधी पक्षनेते अनिल पवार यांची भेट घेऊन विचारपूस केली. यावेळी पवार म्हणाले, "मी या हल्ल्यातून वाचलो असून, पोलीस प्रशासन संबंधित हल्लेखोरांना शोधून त्यांच्यावर तात्काळ कारवाई करेल, अशी अपेक्षा आहे."
0
0
Report
Advertisement

रेड अलर्ट के साथ रत्नागिरी में भारी बारिश की संभावना; नदी किनारे के गाँव रहें सतर्क

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात दुपारपासून पावसाचा जोर वाढलाय.. हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजा नुसार जिल्ह्यात पावसाची दमदार एन्ट्री.. गेल्या जून महिन्यात जिल्ह्यात सरासरी पावसाची नोंद 28% झाली आहे तर जुलैच्या सुरुवातीपासूनच पावसाने दमदार सुरुवात केली आहे.. जिल्ह्याला आज हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केल्यामुळे प्रशासन अलर्ट मोड वरती आल आहे.. नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेच्या इशारा दिला आहे.. जिल्ह्यातील पावसाच्या स्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी।
0
0
Report

नाशिक में मतदाता सूची पुनर्निरीक्षण अभियान की जिलाधिकारी आयुष प्रसाद ने समीक्षा की

Yeola, Maharashtra:राज्यासह नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनर्निरीक्षण मोहिमेचा आढावा घेण्यासाठी नाशिकचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी आज येवला येथे अचानक भेट दिली. यावेळी त्यांनी मतदार यादी पुनर्निरीकरणाच्या कामाची पाहणी करून संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेतली. पाहणीदरम्यान काही बीएलओंच्या कामकाजाबाबत जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक घराला प्रत्यक्ष भेट देत मतदार यादीचे अचूक पुनर्निरीकरण करून ही मोहीम प्रभावीपणे आणि वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित बीएलओंना दिल्या. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी देवदत्त केकान, प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे, तहसीलदार आबा महाजन यांच्यासह संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

लातूर के किसान को बैल जोड़ी वापस मिलने पर राहत

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..‌‌. अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना मिळाली त्यांची बैलजोडी परत..... झी २४ तास च्या पाठपुराव्याला यश. आईन पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्यांला मोठा दिलासा.... अखेर पीडित शेतकरी राम बिराजदार यांना त्यांची बैलजोडी परत मिळाली आहे. सकाळपासून झी २४ तासने या प्रकरणाला सातत्याने वाचा फोडल्यानंतर प्रशासनाने दखल घेत आवश्यक हालचाली सुरू केल्या. त्यानंतर पोलीस प्रशासनाच्या उपस्थितीत गोशाळेतून बैलजोडी शेतकऱ्याच्या ताब्यात देण्यात आली. पेरणीच्या तोंडावर बैलजोडी परत मिळाल्याने राम बिराजदार आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला आहे. आपला प्रश्न सातत्याने मांडल्याबद्दल आणि न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवल्याबद्दल शेतकऱ्यांनी झी २४ तासचे आभार मानले आहेत. यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.
0
0
Report
Advertisement

इंजेक्शन से गर्भवती महिला की मौत: उच्चस्तरीय जांच के आदेश

Navi Mumbai, Maharashtra:ऐरोली येथील नवी मुंबई महानगरपालिकेच्या राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झालेल्या आठ महिन्यांo्या गर्भवती महिलेचा उपचारादरम्यान बाळासह मृत्यू झाल्याने खळबळ उडाली आहे. महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी या घटनेची गंभीर दखल घेत संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ बंद करण्याचे आदेश देत उच्चस्तरीय चौकशी समिती स्थापन केली आहे. महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, ३० जून रोजी रिचा मिश्रा आणि सोनम डोंगरे या दोन्ही गर्भवती महिलांना ऐरोली येथील राजमाता जिजाऊ रुग्णालयात प्रसूतीसाठी दाखल झाले होते. दोघीही आठ महिन्यांच्या गर्भवती असल्याने प्रीमॅच्युअर प्रसूतीदरम्यान अर्भकाच्या आरोग्याच्या दृष्टीने नियमित वैद्यकीय प्रोटोकॉलनुसार आवश्यक इंजেক्शन देण्यात आले होते. मात्र, इंजेक्शन दिल्यानंतर दोन्हीजणांना अस्वस्थ वाटू लागल्याने १ जुलै रोजी त्यांना वाशी येथील नवी मुंबई महापालिकेच्या सार्वजनिक रुग्णालयात हलविण्यात आले. उपचार सुरू असताना सोनम डोंगरे यांच्या पोटीतील बाळासह मृत्यू झाला. तर रिचा मिश्रा यांच्या प्रकृती चिंताजनक असून त्यांना पुढील उपचारासाठी वाशी येथील फोर्टिस रुग्णालयात हलविण्यात आले आहे. या घटनेनंतर मृत सोनम डोंगरे यांच्या नातेवाईकांनी डॉक्टरांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्याची मागणी केली गेली आहे. या प्रकरणात महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयांमध्ये संबंधित इंजेक्शनचा वापर तात्काळ थांबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इंजेक्शनच्या गुणवत्तेची व संपूर्ण उपचार प्रक्रियेची तपासणी सुरू करण्यात आली आहे. अतिरिक्त आयुक्त सुनील पवार आणि वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. राजेश म्हात्रे यांनी वाशी सार्वजनिक रुग्णालयाला भेट देऊन संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. या प्रकरणाची निष्पक्ष आणि सखोल चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक यांच्या अध्यक्षतेखाली विशेष चौकशी समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीला जे. जे. रुग्णालयाचे विभागप्रमुख, नवी मुंबई स्त्रीरोग व प्रसूती तज्ज私य सोसायटीचे सदस्य तसेच महापालिकेचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी यांचा समावेश असून या समितीला तातडीने सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. या प्रकरणात आज सर्व पक्षांनी रुग्णालय आणि महापालिकेत आंदोळ करण्यात आला. पालिका आयुक्तांच्या दालनात शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस गटाने ठिय्या आंदोलन केले, तर मनसेने ऐरोली येथील रुग्णालयात आंदोलन केले, शिवसेनेनेही आयुक्तांना निवेदन दिले. या प्रकरणात मृतदेह जे जे रुग्णालयात पाठवण्यात येणार आहेत, दुसरी पेशंट रिचा मिश्रा यांच्या प्रकृतीही अत्यवस्थ आहे; या घटनेची चौकशी पूर्ण होईपर्यंत कायदेविषयक उपाययोजना आणि दोषी कोण, इंजेक्शनमध्ये काय त्रुटी आढळते इत्यादींविषयी स्पष्टता मिळेल. स्वाती नाईक नवी मुंबई
0
0
Report
Advertisement

जिला परिषद शालाओं के लिए नया उपक्रम: अधिकारी हर साल एक स्कूल दत्तक लेंगे

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांमधील पटसंख्या वाढविण्यासाठी आणि शिक्षणाचा दर्जा उंचावण्यासाठी शिक्षण विभागाने नवा उपक्रम सुरू केला आहे. याअंतर्गत शिक्षण विभागातील अधिकारी आणि पर्यवेक्षकीय कर्मचाऱ्यांना पुढील एक वर्षासाठी प्रत्येकी एक शाळा दत्तक घ्यावी लागणार आहे.दत्तक घेतलेल्या शाळांना नियमित भेटी देऊन विद्यार्थी गुणवत्ता,भौतिक सुविधा, शैक्षणिक वातावरण आणि पालकांच्या सहभागाचा आढावा घेऊन आवश्यक मार्गदर्शन केले जाणार आहे.या उपक्रमामुळे जिल्हा परिषद शाळांवरील पालकांचा विश्वास वाढण्यास मदत होणार असून,शाळांचा शैक्षणिक दर्जाही उंचावण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

टीईटी पेपर फूटने के खिलाफ प्रदर्शन, शिक्षा मंत्री दादा भुसे से इस्तीफे की मांग

Ahilyanagar, Maharashtra:राज्य परीक्षा परिषद आणि शालेय शिक्षण मंत्रालयाच्या ढिसाळ कारभारामुळे टीईटी परीक्षेचा पेपर फुटला...याची जबाबदारी स्वीकारून राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा या मागणीसाठी सम्मीक विद्यार्थी संघटनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली...हातात निषेधाचे बॅनर घेऊन यावेळी विद्यार्थ्यांना जोरदार घोषणाबाजी केली...टीईटी परीक्षेत मोठा घोटाळा होत असल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केला...दरम्यान काही daysांपूर्वी NEET चा देखील पेपर फुटला होता, या विरोधात दिल्लीत मोठी आंदोलने झाली तरी देखील केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही याचा आंदोलकांनी निषेध नोंदवला... दरम्यान यावेळी विद्यार्थ्यांनी बनवलेला बॅनर लक्ष वेधून घेत होते.
0
0
Report

पवार गट के आह्वान पर जिलाधिकारी कार्यालय के सामने टीईटी पेपरफुटी विरोध

Satara, Maharashtra:साताऱ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि विविध संघटनांच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर केंद्र व राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत जन आक्रोश आंदोलन करण्यात आले. NEET पेपर फुटी नंतर राज्यात अवघ्या १५ दिवसांत झालेल्या टीईटी पेपरफुटीची जबाबदारी स्वीकारून शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच, बड्या कंत्राटदारांच्या फायद्यासाठी सर्वसामान्यांवर लादलेल्या 'स्मार्ट मीटर' योजनेमागे सरकारचे मोठे आर्थिक षड्यंत्र असल्याचा घणाघाती आरोप केला गेला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top