445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नगर परिषद ने भाजी बाजार के तीन दुकानों को सील किया; शुल्क नहीं चुकाने पर कड़ी कार्रवाई
Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील महात्मा फुले भाजी बाजारात नगर परिषदेने तीन दुकानवर कारवाई केली आहे. या तीन दुकानदारांनी बाजार शुल्क भरली नाही. नगर परिषदेने वारंवार नोटीस दिल्यानंतरही दुकानदार प्रतिसाद देत नव्हते म्हणून नगर परिषदेने तिन्ही दुकाने सील केली आहे...0
0
Report
यवला शहर में भारी बारिश से खेल मैदान पानी में डूबा, प्रशासन से निचारण की मांग
Yeola, Maharashtra:गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या मुसळधार पावसाने येवला शहरात सकल भागात पाणी साचले असल्याने स्वामी मुक्तानंद विद्यालयाच्या क्रीडांगणावर पाणी साचल्याने विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी जागा कमी पडत आहे प्रशासनाने या पाण्याचा निचरा करण्याची व्यवस्था करावी अशी मागणी होत आहे0
0
Report
प्री-स्कूल-डे केयर पर कड़ी निगरानी; ऑनलाइन पंजीकरण अनिवार्य
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको परिसरातील प्री स्कूलमध्ये एका २३ महिन्यांच्या चिमुकल्याला वर्गातीलच दुसऱ्या मुलाने तब्बل २५ ठिकाणी चावे घेतल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली. या प्रकारामुळे पालकांमध्ये पाल्यांच्या सुरक्षेविषयी तीव्र चिंता निर्माण झाली आहे. याची गंभीर दखल घेत, आता गल्लीबोळात नियमांचे उल्लंघन करून सुरू असलेल्या सर्व डे केअर आणि प्री-प्रायमरी शाळांची शिक्षण विभागामार्फत कडक तपासणी केली जाणार आहे. प्री-प्रायमरीसाठी ऑनलाइन नोंदणी आवश्यक आहे. तसेच, डे केअर सुरू करण्यासाठी स्थानिक प्रशासन, मनपा आणि धर्मादाय आयुक्तालयाची मान्यता लागते असे असतानाही केवळ प्री-प्रायमरीच्या नावाखाली अनधिकृतपणे डे केअर चालवणाऱ्या संस्थांचे वास्तव या तपासणी मोहिमेतून समोर आणले जाईल. त्यानंतर त्या संबंधित संस्थाचालकांवर कारवाई केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
इसापुर में सफाई के दौरान कुलर से बिजली का झटका, विवाहित महिला की मौत
Bhandara, Maharashtra:घरात साफसफाई करताना कुलरचे करंट लागून महилеचा मृत्यू, लाखनी तालुक्यातील ईसापुर येथील घटना. इसापूर येथील वंदना उत्तम गिरमारे वय 50 ही महिला घर काम करत असताना कूूलर ला स्पर्श झाल्याने विद्युत धक्का लागुन गंभीर जखमी झाल्या त्यानंतर त्यांना ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचार दरम्यान त्यांचा मृत्यू झाला असून परिवारावर शोककाळा पसरली आहे.0
0
Report
वाशिम के रिसोड में पालखी का भव्य स्वागत, 40 हजार लड्डुओं का महाप्रसाद
Washim, Maharashtra:वाशिम: रिसोड शहरात आज शेगावच्या संत गजानन महाराजांची पालखी दाखल होणार आहे. पालखीच्या स्वागतासाठी शहरात जय्यत तयारी करण्यात आली असून, रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीने वारकरी व भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली आहे.यासाठी तब्बल ४० हजार लाडू तयार करण्यात आले असून, हजारो वारकरी आणि भाविकांना महाप्रसादाचे वाटप केले जाणार आहे.रिसोड हा पालखीचा वाशिम जिल्ह्यातील चौथा व शेवटचा मुक्काम असून, उद्या सकाळी पालखी हिंगोली जिल्ह्याकडे प्रस्थान करणार आहे。0
0
Report
नाशिक के निफाड़ तालुक़े में बिबटियों का डर: किसानों ने मोबाइल कैमरे में देखा बिबट्या, गांव में भय
Niphad, Maharashtra:नाशिकचा निफाड तालुका़ा म्हणजे बिबट्यांचे माहेरघर असून गोंदेगाव, देवगाव, मुखेड परिसरात दररोज बिबट्या कुठे ना कुठे निदर्शनास येतो. गोंदेगाव येथील हरिभाऊ सांगळे यांच्या द्राक्ष बागेमध्ये बिबट्या निदर्शनास आल्यानंतर शेतकऱ्यांनी आपल्या मोबाईलच्या कॅमेऱ्यात बिबट्याचे दर्शन चित्रित केले आहे. याप्रसंगी भितीचे वातावरण पसरले असून बिबट्या जेरबंद करावा अशी मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
कांचन नदी बांध पर कचरे ने बना बड़ा अड़चन, किसानों की फसलें खतरे में
Washim, Maharashtra:वाशिम अँकर: वाशिमच्या नेतंसा परिसरातून वाहणाऱ्या कांचन नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला कचऱ्याचा मोठा विळखा पडलाय. पुराच्या पाण्यात वाहून आलेला झाडांचा पालापाचोळा आणि कचरा या बंधाऱ्यासमोर मोठ्या प्रमाणात अडकल्यामुळं पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात मोठा अडथळा निर्माण झाला असून, नदीचे पाणी आता थेट परिसरातील शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेलं बियाणे वाहून जाण्याचा आणि कुजण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ हा कचरा हटवावा आणि नदीचा मार्ग मोकळा करावा,अशी मागणी आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.0
0
Report
नाशिक ग्रामीण इलाकों में महिला गला सोने की चेन की चोरी बढ़ी; दो आरोपी गिरफ्तार
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती निफाड, सायखेडा दिंडोरी ,लासलगाव ,ओझर वावी यास अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनांची घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशाल पोपट सांगळे, गणेश मनोहर कापसे दोघे राहणार नाशिक या चोरट्यांना सापळा रचून अटक केली आहे या दोघा सराईत गुन्हेगारावर नाशिक जिल्ह्यासह शहरात देखील अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत0
0
Report
रत्नागिरी में 1 जून से 15 अगस्त तक मासेमारी बंदी बढ़ी, मत्स्य क्षेत्र सुरक्षित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. १५ ऑगस्टपर्यंत मासेमारी बंदी मत्स्य व बंदरे मंत्री नितेश राणे यांची विधानसभेत माहिती.. मच्छीमारांची सुरक्षा,मत्स्यसंपदा संवर्धनासाठी निर्णय.. राज्याच्या सागरी क्षेत्रात पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी वाढविण्यात आला आहे..१ जून ते १५ ऑगस्ट कालावधीत आता मासेमारी बंदीचा असणार आहे..अशी महत्त्वाची माहिती राज्याचे मत्स्य व्यवसाय व बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी सोमवारी विधानसभेत दिली..0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में सुबह से बारिश, लोगों के कामकाज प्रभावित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकींग नवी मुंबई मद्ये सकाळी पावसाची हजेरी सकाळी सहा वाजल्यापासून नवी मुंबई मधील काही भागात पाऊस पडत आहे。 सकाळी पावसाने हजेरी लावल्याने कामावर जाणाऱ्या चाकरमान्याची चांगलीच तारांबळ उडाली0
0
Report
मानसून सक्रिय, कोकण में अगले सप्ताह भारी वर्षा की चेतावनी; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदि क्षेत्र प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. पावसाचा आजपासून आठवडाभर मुक्काम. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. मान्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार पुनरागम केले आहे. आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम कायम राहणार असून मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुधवारी आणि शुक्रवारी किंचित विश्रांती घेईल. मान्सूनच्या नवीन प्रवाहामुळे या हंगामातील सर्वात मोठा पाऊस कोकणात अपेक्षित आहे. 30 जून ते ३ जुलै दरम्यान सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगडमध्ये आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.0
0
Report
AISF का बड़ा धरना: नीट पेपर लीक के विरोध में मंत्रियों से तत्काल इस्तीफा माँगा
Bhandara, Maharashtra:पेपर लिक वाली सरकार नहीं चलेगी अबकी बार... केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षणमंत्री भुसे यांनी राजीनामा द्यावा... AISF संघटनेची मागणी... नीटचा पेपरचा गोंधळ अजून थांबलेला नाही लगेच आता टीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे काम सरकारने केले आहे. ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली ही केवळ प्रशासनाची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची त्यांच्या आई-वडिलांनी घाम गाळून केलेल्या खर्चाची किंमत या सरकारच्या दृष्टीने शून्य झाली आहे का असाही प्रश्न AISF संघटनेने केले असून एकामागून एक पेपर फुटत आहेत परीक्षा रद्द होत आहेत तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे पण सत्ताधाऱ्यांना मात्र खुर्च्या वाचवण्यात जास्त रस दिसून येत असून पक्ष फोडण्यात आणि सत्तेचे गणित जुळवण्यातच अधिकच मजा येत आहे. हा केवळ पेपर लीक नाही तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या भविष्याचा केलेला विश्वासघात आहे. विद्यार्थ्यांना न्याय हवा दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे पाटील यांनी गांभीर्य आणि नैतिकता समजून तात्काळ राजीनामा द्यावा अश्या मागणी साठी जिल्हातील AISF संघटनेने भूंदाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला आहे.0
0
Report
Advertisement
सातारा–पुणे बेंगळूर National Highway पर नागठाणे में बड़ा गड्ढा, मार्ग बंद
Satara, Maharashtra:सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरून धावणाऱ्या काही जागरूक प्रवाशांच्या हे भगदाड वेळेत निदर्शनास आल्यामुळे एक भीषण अपघात बालंबाल टळला. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी तात्काळ बॅरिकेड्स लावून ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे.0
0
Report
शिरूर कृषि उपज बाजार समिती चुनाव में महायुति का तेज प्रचार
Shirur, Maharashtra:Rep: Hemant Chapude(Shirur) Anc:शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला असून, तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत महायुती शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत प्रचाराचा झंझावात सुरू केलाय. आमदार माऊली कटके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार सध्या गावोगावी फिरत आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार थेट ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या संचालकांशी संवाद साधत असून, मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जातीय...0
0
Report
बीड में गोल्डन ट्रायंगल के ओलीस 20-30 युवक, मित्र की सुरक्षित वापसी की मांग
Beed, Maharashtra:बीड : 'गोल्डन ट्रॅंगल'मध्ये महाराष्ट्रातील 20-30 तरुण ओलीस बीडच्या मित्राला आला मदतीचा फोन मुख्यमंत्र्यांनी ओलीस ठेवण्यात आलेल्या माझ्या मित्राला सुखरूप मायदेशी परत आणावे ओलीस ठेवण्यात आलेल्या मित्राने केली मागणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रॅंगल' परिसरात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओलीस असलेल्या या तरुणाने आपल्या बीडमधील मित्राला व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल करून मदतीची आर्त हाक दिली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा, ऑनलाइन सायबर फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा आणि नकार दिल्यास बंदुकीचा धाक दाखवला जात असल्याचा दावा त्याने केला आहे. या मित्रानेच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली असून महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
