icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भूषण गवई के हाथों चांदूर रेलवे ई-लायब्ररी का उद्घाटन, 300 विद्यार्थियों को लाभ

Amravati, Maharashtra:माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते चांदूर रेल्वेत ई-लायब्ररीचे भव्य उद्घाटन; 300 विद्यार्थ्यांना मिळणार डिजिटल शिक्षणाचा लाभ अँकर :- अमरावती जिल्ह्यातील चांदूर रेल्वे नगरपरिषदेच्या वतीने साकारण्यात आलेल्या अत्याधुनिक ई-लायब्ररीचे उद्घाटन भारताचे माजी सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. या ई लायब्ररीला न्यायमूर्ती भूषण गवई नाव देण्यात आले. या उपक्रमामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची नवी दारे खुली झाली आहे. ग्रामीण विद्यार्थ्यांना घरबसल्या दर्जेदार शिक्षण घेता यावे आणि आधुनिक तंत्रज्ञानाची ओळख व्हावी या उद्देशाने ई-लायब्ररीची उभारणी करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या ठिकाणी सुमारे 70 संगणकांची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून तब्बल 300 विद्यार्थ्यांना याचा थेट लाभ होणार आहे. ई-लायब्ररीमुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास, स्पर्धा परीक्षा तयारी तसेच विविध शैक्षणिक साधनांचा सहज वापर करता येणार आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचे मत मान्यवरांनी व्यक्त केले. कार्यक्रमाला नगराध्यक्ष डॉ. प्रियंका विश्वकर्मा, न्यायाधीश अनिल किलोर, न्यायाधीश प्रविन पाटील, खासदार बळवंत वानखडे यांच्यासह अनेक मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. या उपक्रमामुळे चांदूर रेल्वे शहर शिक्षणाच्या डिजिटल दिशेने एक महत्त्वाचे पाऊल टाकत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
0
0
Report

नाशिक की मल्टि नेशनल कंपनी लैंगिक शोषण और धर्मांतरण के मामले में SIT के खुलासे

Nashik, Maharashtra:नाशिकमधील बहुचर्चित मल्टिनॅशनल कंपनीत लैंगिक शोषण आणि कथित धर्मांतरण प्रकरणात आता धक्कादायक खुलासे समोर येण्यास सुरुवात झाली आहे नऊ पीडित महिलांनी पुढे येत केलेल्या तक्रारीनंतर नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या विशेष तपास पथकाच्या अर्थात SIT च्या चौकशीत अनेक गंभीर धागेदोरे हाती लागल्याची माहिती समोर येत आहे पीडित महिलांना शिरखुरमा आणि थंड पेयांमधून गुंगीकारक पदार्थ देण्यात आल्याचा संशय लैंगिक अत्याचारानंतर मन परिवर्तन करून धर्मांतराचा दबाव टाकल्याचे आरोप आणि सर्वात धक्कादायक म्हणजे आरोपींच्या बँक व्यवहारांमधून काही संशयास्पद फंडिंगचे धागे तपासले जात असल्याची माहिती समोर आलीये... नऊ पीडित महिलांनी बहुराष्ट्रीय कंपनीत काम करत असताना आपल्यावर लैंगिक अत्याचार, विनयभंग, मानसिक छळ आणि धर्मांतरासाठी दबाव आणण्यात आल्याची गंभीर तक्रार नाशिक पोलिसांकडे नोंदवली होती. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत नाशिक पोलिस आयुक्तालयाने स्वतंत्र SIT ची स्थापना केली आणि गेल्या काही दिवसांपासून आरोपींची कसून चौकशी सुरू आहे... दरम्यान SIT तपासात समोर आलेल्या प्राथमिक माहितीनुसार पीडित महिलांना शिरखुरमा आणि काही थंड पेयांमध्ये गुंगी आणणारे पदार्थ मिसळून आणि ते पदार्थ पाजून महिलेवर अत्याचार केल्याचा असल्याचा संशय व्यक्त केलाय.....या प्रकरणात संशयित आरोपी तौसीफ अत्तार, दानिश शेख, एजाज शेख आणि रझा मेमन यांना शनिवारी न्यायालयात हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्यांना पुढील चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे SIT कडून आरोपींचे मोबाईल, लॅपटॉप, चॅट्स, ईमेल्स आणि डिजिटल पुरावे तपासले जात आहेत... तसेच आरोपींची बँक स्टेटमेंट्स आणि KYC दस्तावेजांचीही छाननी सुरू आहे... धर्मांतरासाठी किंवा महिलांना जाळ्यात ओढण्यासाठी कोणत्याही संघटनेकडून किंवा बाह्य स्त्रोतांकडून आर्थिक फंडिंग झाले का ? याचा तपास SIT अत्यंत गोपनीय पद्धतीने करत असल्याची माहिती दिली आहे.... दरम्यान या प्रकरणातील महिला संशयित निदा खान हिचा अटकपूर्व जामीन अर्ज देखील न्यायालयाने फेटाळला असून या गुन्ह्याचे स्वरूप अत्यंत गंभीर असल्याचे न्यायालयाने नमूद केले आहे यामुळे येत्या काही दिवसांत SIT च्या चौकशीत आणखी मोठे धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे तर आम्ही अटकपूर्व जामीन अर्जासाठी हायकोर्टात जाणार असल्याचं आरोपीचे वकील राहुल कासलीवाल यांनी म्हटलं... या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटना देखील आक्रमक झालीये.. पीडित महिलांना व मांस खाऊ घालणे त्याचबरोबर काही गुंगी धारक पदार्थ पाजून लैंगिक अत्याचार करणाऱ्यांवर जर आरोपींना कडक शासन करण्यात आले नाही तर बजरंग दल रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा देण्यात आला आहे... धर्मांतरासाठी फंडिंग ? शितापयात गुंगीकारक पदार्थांचा वापर ? आणि महिलांना टार्गेट करून रचलेलं संघटित षडयंत्र ? नाशिकच्या मल्टिनॅशनल कंपनीच्या प्रकरणात SIT च्या तपासातून उलगडणारे धागेदोरे अत्यंत धक्कादायक आहेत.. यानंतर अजून चौकशीमध्ये काय काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे...
0
0
Report
Advertisement

सोलापूर में वर्चस्व की लड़ाई: सड़क पर युवक की हत्या CCTV में कैद

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात एका तरुणाचा कोयत्याने भोसकून, दगडाने ठेचून खून, संपूर्ण घटना CCTV कॅमेऱ्यात कैद. सोलापुरात वर्चस्ववादातून भर रस्त्यात तरुणाची निर्घृण हत्या. भर रस्त्यात गाडी आडवून कोयता और दगडाने ठेचून हत्या केल्याची धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. सुरेश श्रीराम असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्ववैमनस्यातून ही हत्या झाल्याची प्राथमिक माहिती समोर आलीय. 5 जणांच्या टोळक्याने शहरातील 70 फूट रोडवर ही धक्कादायक प्रकार घडलाय. वराह पालनावरून आरोपी आणि मयतात पूर्वीपासून वाद होता. याशिवाय मृत सुरेश श्रीरामवर एकूण 10 गुन्हे दाखल असल्याची माहिती आहे. यामध्ये 6 पैकी 5 आरोपीना पोलिसांनी ताब्यात घेतले आहेत.
0
0
Report

नाशिक में बर्ड फ्लू के प्रकोप के बाद कुक्कुटपालक सावधान रहें

Nashik, Maharashtra:नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्लू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच नाशिक जिल्ह्यातील प्रशासन अलर्ट मोडवर. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधनता बाळगण्याचा जिल्हाधिकारीने दिला इशारा. नंदुरबारच्या नवापूर भागात बर्ड फ्ल्यू या संसर्गजन्य रोगाचा प्रादुर्भाव झाल्याचे समोर येताच मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील पोल्ट्री फार्म धारका मध्ये खळबळ उडून भीती निर्माण झाली आहे बर्ड फ्ल्यूचा आपल्याकडे शिरकाव होऊ नये म्हणून पोल्ट्री फार्म धारक सर्व उपाययोजना करताना दिसत असून प्रशासनदेखील अलर्ट मोडवर आले आहे. जिल्ह्यातील सर्व कुक्कुटपालक आणि पोल्ट्री फार्म चालकांना सावधगता बाळगावी अशी सूचना जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केली असून बर्ड फ्ल्यू रोग कुक्कुट पक्ष्यांमध्ये वेगाने पसरणारा असून त्याचा परिणाम मोठ्या प्रमाणात होऊ शकतो. त्यामुळे कुक्कुटपालन केंद्रांवर कोणतीही लक्षणे दिसल्यास ती तत्काळ गांभीर्याने घेणे आवश्यक आहे. पक्ष्यांमध्ये अचानक मृत्यूचे प्रमाण वाढणे, खाद्य आणि पाण्याचे सेवन कमी होणे, सुस्ती किंवा अशक्तपणा येणे अंडी उत्पादनात अचानक घट होणे ही लक्षणे आढळल्यास त्वरित संबंधित यंत्रणेला कळविण्यात यावे असे आवाहन जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में कुंभ रिंग रोड भू-संवर्धन पर किसानों का उग्र प्रदर्शन; प्रशासन पर आरोप

Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये आगामी कुंभमेळा अनुषंगाने होणाऱ्या रिंगरोड भूसंपादनावरून वाद चिघळला - मातोरी, मुंगसरा येथे मोजणीदरम्यान झालेल्या तणाव वरून शेतकरी आक्रमक - पोलिसांकडून शेतकऱ्यांना घरात घुसून मारहाणीचा स्थानिकांचा आरोप - प्रशासनाच्या विरोधात उद्या शेतकऱ्यांकडून जिल्हाधिकारी कार्यालय समोर केले जाणार शेतकरी जन आक्रोस आंदोलन - सिंहस्थ कुंभमेळ्या रिंग रोड भूसंपादनाच्या जमीन मोजणीवरून शेतकरी आणि प्रशासनामधील झाला होता वाद - शेतकऱ्यांचा महिला शेतकऱ्यांवरही पोलीस प्रशासनाकडून लाठीचार्ज करण्यात आल्याचा आरोप त्यानंतर शेतकरी आक्रमक - कुंभमेळा मंत्रांवर गंभीर आरोप करत उद्या शेतकऱ्यांकडून केले जाणार आंदोलन - प्रश्नांना मिटल्यास मुख्यमंत्र्यांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा
0
0
Report
Advertisement

अकोला में हिंदू राष्ट्र प्रचार से सियासत गरम; बैनर पर नेताओं के नाम चर्चा

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात “हिंदू राष्ट्र जनजागृती सभा”च्या प्रचारावरून राजकीय वातावरण तापले आहे. गोरक्षण मार्गावरील एकवीरा मैदानात आज (3 मे) सायंकाळी होणाऱ्या या सभेत तेलंगणातील आमदार टी. राजा सहभागी होणार आहेत. मात्र या सभेच्या प्रचारासाठी लावण्यात आलेल्या होर्डिंग्सवर वंचित बहुजन आघाडीचे पदाधिकारी निलेश देव आणि नगरसेवक सुनील इज्रानी यांची नावे झळकल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.संघ परिवाराशी संबंधित संस्थांकडून आयोजित या कार्यक्रमाला वंचित आघाडीच्या पदाधिकाऱ्यांचा अप्रत्यक्ष पाठिंबा असल्याची चर्चा रंगत आहे. वंचित बहुजन आघाडीच्या विचारधारेशी या प्रचारातील विसंगतीमुळे स्थानिक पातळीवर अंतर्गत कलह सुरू असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान, या बॅनर प्रकरणामुळे अकोल्यात वंचित आघाडीमध्ये हालचालींना वेग आला असून, आंदोलनाचा पवित्रा घेतल्यानंतर संबंधित बॅनर काढण्यात आले आहेत. मात्र काही ठिकाणी अजूनही असे बॅनर दिसत असल्याने संभ्रमाचे वातावरण कायम आहे. वंचित बहुजन आघाडीने आता सायंकाळी होणाऱ्या या सभेत काळे झेंडे दाखवणार असल्याचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement

हिरामण खोसकर ने कुंभमेळे के دوران सरकार के खिलाफ तीखा सवाल उठाया

Nashik, Maharashtra:नाशिक - - सत्ताधारी आमदारांचा सरकारला घरचा आहेर - राष्ट्रवादीचे आमदार हिरामण खोसकर यांनी शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्याच म्हणत कुंभमेळ्यावरून सरकारविरोधात व्यक्त केली नाराजी - स्थानिक शेतकऱ्यांसह लोकप्रतिनिधींना ही विश्वासात घेत नसल्याची व्यक्त केली खंत - यापूर्वी कुंभमेळे झाले नाहीका ? याच कुंभमेळ्यात असा काय बदल होणार आमदार खोसकर यांचा सरकारलाच संतप्त सवाल - शेतकऱ्यांना उघड पाडून कुंभमेळा करणार का ? - काल भूसंपादनावेळी शेतकऱ्यांवर झालेल्या लाठीचार्ज वरून आमदार हिरामण खोसकर संतप्त
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top