445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
युद्ध के कारण डीजल की कमी, कोकण में सूखी मछली के दाम आसमान छू रहे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. आखाती युद्धाची झळ कोकणच्या ताटाला; डिझेल टंचाईमुळे सुकी मासळी महागली!.. अँकर कोकणात सध्या पावसाळ्यापूर्वीची सुकी मासळी साठवण्याची लगबग सुरू आहे,मात्र यंदा खवय्यांच्या खिशाला मोठा चटका बसणार आहे. आखाती देशांतील युद्धामुळे निर्माण झालेल्या डिझेल टंचाईचा थेट फटका मासेमारीला बसला असून,पुरवठा घटल्याने सुक्या मासळीचे दर गगनाला भिडले आहेत.. पुरेशा इंधनाअभावी मासेमारी नौकांच्या फेऱ्या कमी झाल्या आणि परिणामी बाजारात मासळीची आवक घटली आहे.रत्नागिरी,खेडसह कोकणच्या बाजारपेठांमध्ये विक्रेते आणि ग्राहक दोघेही हवालदिल झाले असून,सोड्यांसारख्या मासळीने तर हजाराचा टप्पा ओलांडला आहे.. बाजारातील सध्याचे दर (प्रत्यिलो).. बाजारातील दर आगामी दिवसांत प्रचंड वाढण्याची भीती व्यक्त होत आहे.. यंदा ढोमा ₹२००, चेवनी ₹३००, कोलिम ₹२००, आंबड काड ₹४००, बोंबील ₹४००, बगी ₹६००, आणि सोडे तब्बल ₹१००० प्रति किलोने विकले जात आहेत.0
0
Report
गोकुळ मामले में कोल्हापुर कोर्ट ने सरकार से 18 मई तक प्रतिज्ञापत्र मांगा
Kolhapur, Maharashtra:गोकुळ प्रशासक नेमणुकी संदर्भात राज्य सरकारने 18 मे पर्यंत आपले प्रतिज्ञापत्र सादर करावे असे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचने राज्य सरकारला दिले आहेत. यासंदर्भातील सुनावणी 19 मे रोजी ठेवण्यात आले आहे. कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या प्रशासकीय मंडळाला आव्हान देणाऱ्या माजी संचालकांच्या सुनावणीत हायकोर्टाने हे आदेश दिले आहेत. माजी संचालकांच्याकडून न्यायालयात बाजू मांडत असताना प्रशासकीय मंडळाची नियुक्ती चुकीची आहे त्याचबरोबर कोणतीही नोटीस दिली नाही, त्यामुळे ही एकतर्फी कारवा झाली आहे असं माजी संचालकांच्या वकिलान मार्फत कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले, तर महाराष्ट्र शासनाची बाजू मांडताना एडवोकेट सतीश रेळेकर यांनी वेळ कमी असल्यामुळे कोणतीही नोटीस न देता प्रशासकीय मंडळाची नियुक्ती केली अशी बाजू मांडली. इतकेच नाही तर पुढे निवडणुका असल्यामुळे या निवडणुका पारदर्शी होण्यासाठी संचालकांना मुदतवाढ दिलेली नाही ते देखील कोर्टाला पटवून देण्याचा प्रयत्न केला.0
0
Report
अतिक्रमण नियमितीकरण में देरी: नागरिकों की लंबी प्रतीक्षा से गंभीर नाराजगी
Amravati, Maharashtra:जिल्हा परिषदेत नागरिक अधिकाऱ्यांच्या प्रतीक्षेत ताटकळत; वृद्धांसह नागरिकांनी काढल्या केबिन समोरील पोर्च मध्ये झोपा अँकर :- अमरावती जिल्हा परिषदेत अतिक्रमण नियमित करणाच्या मागणीसाठी आलेल्या नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे समोर आले आहे. अचलपूर तालुक्यातील पथ्रोड गावातून सकाळपासून उपाशीपोटी आलेले नागरिक अधिकाऱ्यांची वाट पाहत तासंतास जिल्हा परिषद कार्यालयात बसून असल्याचे दिसून आले आहे. काही वृद्ध व्यक्ती तसेच लहान लेकरांसह आलेल्या महिलांना थकवा आल्याने त्यांनी जिल्हा परिषद परिसरातच झोपा काढल्याचे पाहायला मिळाले आहे. या प्रकारामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात असून अतिक्रमण नियमित करून मिळावे यासाठी अनेक नागरिक गेल्या अनेक वर्षांपासून जिल्हा परिषदेत पायपीट करत असल्याचे सांगण्यात येत आहे. शासनाचे आदेश तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांचे निर्देश असूनही अद्याप अनेक अतिक्रमणधारकांना नियमितीकरणाचा लाभ मिळालेला नाही. त्यामुळे प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
प engan्गली बीजेपी ने मोदी के इंधन बचाओ संदेश पर सायकल व ई बाईक रैली निकाली
Sangli, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून करण्यात आलेल्या इंधन वाचवण्याच्या आवाहानाला सांगली भाजपाने प्रतिसाद दिलाय,भाजपा नेत्या नीतीताई केळकर यांच्या नेतृत्वाखाली सांगलीमध्ये भाजपाच्यावतीने सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली काढण्यात आली. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते रॅलीचा शुभारंभ करण्यात आला. शहरातला पुष्पराज चौक पासून प्रमुख मार्गांवरून ही सायकल व इलेक्ट्रिक बाईक रॅली काढत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलेल्या अहवानानुसार पर्यावरण आणि इंधन वाचवा असा संदेश देण्यात आला आहे,पंतप्रधान मोदींच्या आवाहनानुसार महाराष्ट्रातील मंत्र्यांच्या ताफयातील वाहन कमी करण्यात आले असल्यामुळे विरोधकांनी देखील, अशा परिस्थितीमध्ये कबा आरोप करणं सोडून साथ दिली पाहिजे, व काटकसरीने इंधन वापरण्याची गरज असल्याचे असं मत मंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले आहे.0
0
Report
सोलापूर में गंधक बॉक्स रखते समय विस्फोट, मालिक पर मामला दर्ज; एक घायल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना झालेल्या स्टफ रकरणात गुन्हा दाखल सोलापुरात एअर गनच्या काडतूससाठी वापल्या जाणाऱ्या गंधकाचा बॉक्स गाडीत ठेवताना झालेल्या स्टफ रकरणात गुन्हा दाखलण्यात आलाय सहारा एअर गनचे मालक बाळासाहेब प्रभाकर फुले यांच्याविरोधात सोलापुरातल्या फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलाय सोमवार 11 मे रोजी एअर गनमध्ये वापरल्या जाणाऱ्या कॉन्सनट्रेटेड स्लफर अर्थात गंधकाचा बॉक्स ठेवताना खाली पडल्याने मोठा स्टफ झाला या घटनेत सहारा एअर गन दुकानात कामगार असलेले केदारनाथ छत्रे हे अत्यंत गंभीर जखमी झाले कामागराची सुरक्षिततेची कोणतीही खबरदारी न घेता त्याला स्टफक पदार्थ हाताळण्यास दिला त्यामुळे मानवी जीवितास धोका निर्माण झाल्याचा ठपका आरोपी बाळासाहेब फुले यांच्यावर ठेवण्यात आलाय0
0
Report
वाशीम में रमेश टॉकीज परिसर में गुप्तधन के लिए अवैध खोदाई: 6 गिरफ्तार, मेटल डिटेक्टर जब्त
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम शहरातील बंद पडलेल्या रमेश टॉकीज परिसरात गुप्तधनाच्या शोधासाठी सुरू असलेल्या बेकायदेशीर खोदकामावर शहर पोलीस स्टेशनच्या डीबी पथकाने सायंकाळी अचानक धाड टाकून 6 जणांना ताब्यात घेतले. या कारवाईदरम्यान गुप्तधन शोधण्यासाठी वापरण्यात येणारे मेटल डिटेक्टर मशीनही जप्त करण्यात आले. ताब्यातील व्यक्तींची रात्री उशिरापर्यंत चौकशी सुरू होती. मात्र, या प्रकरणात पोलिसांकडून अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. या प्रकरणात काही राजकीय व्यक्तींची नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत असून पुढील तपासाकडे शहरवासीयांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
तापीषण से मोर खेत-शिवार में, Shirur में वीडियो वायरल
Shirur, Maharashtra:उन्हाचा तडाखा वाढल्याने व डोंगर दऱ्यातील पाणवठे आटल्याने मोर सध्या अन्नपाण्याच्या शोधत शेत शिवारात दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. शिरूर तालुक्यातील शिंदोडी भागात असाच शेत शिवारात फिरणाऱ्या मोरांचा एक थवा स्थानिकांनी कॅमेऱ्यात कैद केला असून मोरांचा हा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.0
0
Report
अकोला: जलरथ से पेड़ों को पानी देकर शहर को हरियाला बनाने का अनोखा प्रयास
Akola, Maharashtra:एकीकडे देशभरात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपणाचे कार्यक्रम राबवले जात असताना दुसरीकडे लावलेल्या झाडांच्या संगोपनाकडे मात्र अनेकदा दुर्लक्ष होताना दिसते. अशा परिस्थितीत अकोल्यातील अकोला गार्डन क्लब या संस्थेने वृक्ष संवर्धनासाठी अनोखा पुढाकार घेतला आहे. गेल्या 52 वर्षांपासून पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत असलेल्या अकोला गार्डन क्लब तर्फे झाडांना पाणी देण्यासाठी फिरता ‘जलरथ’ तयार करण्यात आला आहे. अकोला शहरातील वाढते तापमान आणि उष्णतेची तीव्रता लक्षात घेता शहर पुन्हा हिरवेगार व्हावे, या उद्देशाने गार्डन क्लबचे सदस्य रस्त्याच्या कडेला, मोकळ्या मैदानात तसेच दुर्लक्षित ठिकाणी लावलेल्या झाडांचे संगोपन करत आहेत. पर्यावरणपूरक पद्धतीने तयार करण्यात आलेल्या या विशेष रिक्षाच्या माध्यमातूनदररोज सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत शहरातील विविध भागांमध्ये जाऊन झाडांना पाणी दिले जाते.केवळ वृक्षारोपण न करता त्यांचे संवर्धन आणि जतन करण्यावर भर देणाऱ्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. सध्या अकोल्यातील तापमान 45 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असताना “सर्वाधिक उष्ण शहर” अशी ओळख पुसून अकोल्याला हिरवे शहर बनवण्याचा निर्धार गार्डन क्लबने केला आहे.0
0
Report
भंडारा PWD कार्यालय में बिजली बचत के बैनर के बावजूद अधिकारी कुलर-फैन-लाइट चालू
Bhandara, Maharashtra:भंडारा PWD कार्यालयात “वीज जपून वापरा” फलकांचा फज्जा. अधिकारी खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सुरूच. सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी. प्रश्न विचारताच संबंधित अधिकाऱ्यांचे मौन. “खर्रा खाऊन थुंकू नये, खाण्यास मनाई नाही”; अधिकाऱ्यांचे अजब उत्तर. गुटखा बंदीच्या फलकांनंतरही कार्यालयात सर्रास खर्रा सेवन. एकीकडे भंडारा येथील PWD विभागात “वीज जपून वापरा” अशा सूचना देणाऱ्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. मात्र दुसरीकडेमार कार्यालयातील अधिकारी आपल्याच खुर्चीवर नसतानाही कुलर, फॅन आणि लाईट सर्रास सुरू असल्याचे चित्र पाहायला मिळाले. शासनाच्या वीज बचतीच्या आवाहनाला अधिकारी-कर्मचारीच हरताळ फासत असल्याचे दिसून येत आहे. विशेष म्हणजे, एकीकडे सामान्य नागरिकांना वीज बचतीचे धडे दिले जात असताना सरकारी कार्यालयातच विजेची उधळपट्टी होत असल्याचे दिसून येत आहे. याबाबत संबंधित अधिकारी भैसारे यांना विचारणा केली असता त्यांनी हसत मौन बाळगणे पसंत केले. तर दुसरीकडे कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर “तंबाखू, गुटका खाऊन थुंकू नये” अशा सूचना लावण्यात आल्या आहेत. मात्र त्याच कार्यालयात अधिकारी सर्रास खर्रा खाताना दिसून येत आहेत. याबाबत विचारणा केली असता “खर्रा खाऊन थुंकू नये असे लिहिले आहे, खर्रा खाण्यास मनाई नाही” असे अजब उत्तर संबंधित अधिकाऱ्यांकडून देण्यात आले.0
0
Report
Advertisement
भीमा नदी पर 14 बैरेज बनाकर पानी आपूर्ति सुनिश्िचित करने का नया प्रस्ताव
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीवर पाणी अडवण्यासाठी बॅरेज बांधा , अन्यथा जन आंदोलन उभं करू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कल्याणराव काळे यांनी दिला आहे. सध्या भिमा नदीतून शेती सिंचनासाठी पाणी सोडण्यात येत नाही केवळ शहराच्या पाणी पुरवठ्यासाठी पाणी सोडून त्या काळात वीज पुरवठा खंडित करण्याची पद्धत सुरु झाली आहे त्यामुळे नदीकाठच्या शेतकऱ्यांना शेती साठी पाणी उपलब्ध होत नाही. भीमा नदीवर 14 ठिकाणी बॅरेज बांधून घ्यावेत यामुळे शेतीसाठी पाणी उपलब्ध होईल. पावसाळा शिवाय फक्त सोलापूर पंढरपूर शहरांना पिण्यासाठी पाणी नदीत सोडले जाते. इतर वेळी नदीत पाणी सोडले जात नाही. याचा फटका नदीकाठच्या शेतकऱ्यांना बसत आहे0
0
Report
नाशिक में अगले दो दिन गर्मी चरम पर, पारा 45 डिग्री के आसपास
Nashik, Maharashtra:नाशिक जिल्ह्यात पुढील दोन दिवस उष्णतेचा तडाखा कायम राहणार असल्याचा हवामान विभागाचा इशारा. मालेगाव तालुक्यात तापमानाचा पारा सर्वाधिक ४३.८ अंशांवर पोहोचल्याने नागरिक घामाघूम. नाशिक शहरात सलग दुसऱ्या दिवशी ४१.२ अंश सेल्सिअस तापमानाची विक्र्रमी नोंद. वाढत्या उन्हामुळे निफाडच्या द्राक्षपंढरीत पिकांचे नुकसान, जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत. दुपारी १२ ते ४ या वेळेत उन्हाचा कडाका जास्त असल्याने नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले. वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाकडून नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन. जळगावमध्ये पारा ४५.५ अंशांवर, तर विदर्भातील अकोल्यात ४५.६ अंशांची नोंद0
0
Report
गोवा और महाराष्ट्र सीमा पर विदेशी शराब की अवैध ढुलाई पकड़ी, 1.47 करोड़ रुपये जप्त
Yeola, Maharashtra:गोवा राज्यात निर्मित व महाराष्ट्रात वाहतूक तसेच विक्रीस प्रतिबंधित असलेल्या विदेशी मद्याच्या अवैध वाहतुकीविरोधात राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या येवला पथकाने धडक कारवाई केली. नंदुरबार जिल्ह्याकडे ट्रकमधून मोठ्या प्रमाणात मद्याची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर येवला विंचूर चौफुलीजवळ सापळा रचण्यात आला. तपासणीदरम्यान ट्रकमध्ये सुमारे ५७ हजार ६०० प्लास्टिक विदेशी मद्याच्या बाटल्या आढळून आल्या. या कारवाईत वाहनासह विदेशी मद्यसाठा असा एकूण १ कोटी ४७ लाख ३४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेतला आहे0
0
Report
Advertisement
सातारा के महामार्ग 965D के रुंदीकरण में शिरवळ-लोणंद के पास अवैध पेड़ काटने का आरोप
Satara, Maharashtra:सातारा : शिरवळ-लोणंद-सातारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ९६५ डीच्या रुंदीकरणाच्या कामादरम्यान शिवथर ते वाढे फाटा परिसरात नियमबाह्य वृक्षतोड झाल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते मदन साबळे यांनी केला आहे. रस्त्याच्या हद्दीबाहेरील अनेक जुनी झाडे तोडण्यात आल्याने संबंधित ठेकेदार आणि जबाबदार अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे. महामार्गासाठी आवश्यक झाडतोडीची پرवानगी असतानाही अडथळा नसलेली झाडेही तोडल्याचा आरोप आहे. संबंधित ठेकेदाराने “झाडांचे पुनर्जीवन करण्यात येईल” असे स्पष्टीकरण दिले असले तरी पर्यावरणप्रेमींनी त्यावर टीका केली आहे. नव्याने लावलेल्या झाडांची देखभाल होत नसल्याने पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याची नाराजी नागरिकांनी व्यक्त केली आहे.0
0
Report
पालघर किसान-आंदोलन: जल-जंगल-ज़मीन के अधिकार के लिए बड़े मोर्चे की आवाज
Palghar, Maharashtra:पालघर कडक उष्णीची पर्वा न करता हजारो शेतकरी, आदिवासी, महिला आणि युवकांनी पालघरमध्ये जल, जंगल आणि जमिनीच्या हक्कांसाठी एल्गार पुकारला. माकप आणि अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली पालघर प्रांत कार्यालयावर भव्य मोर्चा काढण्यात आला. लाल झेंडे आणि जोरदार घोषणांनी पालघर शहर दणाणून गेले. यावेळी वनपट्टे, गायरान आणि सरकारी जमिनी कसणाऱ्यांच्या नावावर करण्याची मागणी करण्यात आली. तसेच विराज प्रकल्पाच्या दूषित सांडपाण्याविरोधात आणि एमआयडी मधील प्रदूषण थांबवण्याची मागणीही आंदोलनकर्त्यांनी केली.0
0
Report
सोयाबीन पिक विमा प्रकरण: बीजेपी-शिवसेना में तीखी बहस, राठोड पर आरोप
Yavatmal, Maharashtra:सोयाबीन पिकाच्या विम्यापासून यवतमाळ जिल्ह्याला वगळल्याप्रकरणी सत्ताधारी भाजप आणि शिवसेनेत चांगलीच जुंपली आहे. भाजपने यासाठी शिवसेनेचे पालकमंत्री संजय राठोड यांच्या विरोधात टोकाची भूमिका घेत त्यांच्यावर टिकेची झोड उचलविली आहे. जिल्ह्यातील ३ लाख ६९ हजार ३६२ शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत २७ कोटी रुपये प्रीमियम भरला. यासोबतच केंद्र व राज्य सरकारने मिळून १०७ कोटी रुपयांचा हिस्सा अग्रिकल्चर इंशुरन्स कंपनी ऑफ इंडियााकडे जमा केला. मात्र एवढा मोठा निधी जमा होऊनही शेतकऱ्यांना फुटक्या कवडीचाही विमा लाभ मिळालेला नाही, ही अत्यंत गंभीर व संतापजनक बाब असून यासाठी पालकमंत्री संजय राठोड यांच्या अक्षम्य दुर्लक्ष कारणीभूत आहे, ते उगाचच मुख्यमंत्री व केंद्र सरकारवर खापर फोडून शेतकऱ्यांची दिशाभूल करीत आहेत असा आरोप भाजप नेते देवानंद पवार यांनी केला आहे. पीक काढणी प्रयोगाच्या वेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी आवश्यक ती दक्षता घेतली नाही. त्यामुळे पालकमंत्री जिल्हाधिकारी आणि कृषी अधिकारी हेच विमा न मिळण्यास कारणीभूत आहे. त्यांची भूमिका संशयास्पद असून या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी अशी मागणी भाजपाने केली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेने भाजपवर पलटवार केला. भाजप मध्ये आलेल्या उपऱ्या नेत्यांनी पालकमंत्री संजय राठोड यांच्या प्रति द्वेषाचा चष्मा घातला आहे, भाजपला पिक विमा जाहीर होण्याची पद्धत समजत नाही, भाजपचे आरोप बघितले तर ते प्रधानमंत्री मुख्यमंत्री व त्यांच्या मंत्र्यां विरोधातले आहे. त्यामुळे जाणून-बुजून पालकमंत्र्यांवर टीका कराल तर शिवसेना स्टाईल उत्तर मिळेल असा इशारा शिवसेनेचे संपर्कप्रमुख हरिहर लिंगनवार यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
