icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नागपूर: महिलाओं के विरुद्ध कथित अत्याचार पर कठोर सजा और चाकणकर के खिलाफ कार्रवाई

Nagpur, Maharashtra:नागपूर अरुणा सबाने, लेखिका- साहित्यिक (121 केलाय) (on खरात ) -- सुशिक्षित सुविद्य स्त्रिया या भोंदू बाबाच्या अधीन झाल्या... त्यांनी स्वतःवर अत्याचार करून घेतले... या स्त्रियांनी केलेला हा मूर्खपणा आहे... अंधश्रद्धेच टोक आहे. या स्त्रियांना कठोर शिक्षा व्हावी जेणेकरून नंतरच्या बाया अशा प्रकाराला बळी पडणार नाही.. कोणत्या भोंदू बाबाला स्वाधीन होणार नाही -- खरातला तर फाशीची शिक्षा झालीच पाहिजे...सहज फाशीची शिक्षापेक्षा जास्तीत जास्त त्रास कसा होईल अशी शिक्षा त्याला द्यायला पाहिजे. (योनी सूचीते बद्दल बोलले आहे ) ( अनेक स्त्रिया मूत्र प्यायला ) --- ज्यांच्यावर अन्याय अत्याचार झाले त्यांच्याबद्दल मला सहानुभूती आहे... माझा आक्षेप या स्वच्छने गेल्या त्या महिलांवर आहे... रूपाली चाकणकर यांना कोणी जबरदस्ती करू शकत नाही... प्रशासकीय सेवेत असलेल्या महिला या ज्या काही महिला गेल्या... बुद्धिजीवी स्त्रीयां आहेत... त्यांच्याबद्दल माझे म्हणणे आहे.त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. त्यामुळे बाकीच्या स्त्रियांचे डोळे उघडतील -- मी मुख्यमंत्र्यांना याबाबत मेल पाठवला आहे... एक-दोन दिवस पत्राच्या उत्तरची वाट पाहणार आहे... नागपूरला आले की त्यांची भेट पण घेणार आहे... आणि या प्रकरणाचा पाठपुरावा करणार आहे. शिकलेल्या बया, महिला आयोगाची बाईतर तुमच्या आमच्याकडे ढुंकून पाहत नाही. एरवी आमचे फोन उचलत नाही... मेल पाठवत होतो तर उत्तर देत नाही... स्त्रियांच्या अत्याचाराबाबत बोलत नाही... तिचं काम आहे स्त्रियांना न्याय देण... इतर स्वतःसोबत इतर महिलांनाही भोंदू बाबा कडे घेऊन जात होती... म्हणून आमचा आक्षेप आहे एका मुख्य बाईला अटक झाली... तर तिच्या नंतरच्या दहा बायांना शहाण्या होतील .. म्हणून ही कारवाई व्हावी --(on चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी ) --हो.. कारण चाकणकर बाई तिथे गेलेले आहेत... करंगळी कापण्यासारखे प्रकार समोर येत आहे... हे सिद्ध करणं माझं काम नाही... हे कायद्याचं काम आहे... त्या इतर दहा बायांना तिथे घेऊन गेल्याचे समोर आले... आपण तर फसायचं आणि आणखीन दहा बायांनाही फसवायचं.. असं असेल तर अतिशय चुकीचे आहे.. म्हणून शिक्षा व्हावी -- काही बाबतीत असं झालं असेल की मूल होत नाही म्हणून घरच्या लोकांनी टॉर्चर केलं असेल... हे काही प्रमाणात होऊ शकत हे समजू शकत -- काही ठिकाणी व्हिडिओ, फोटोमध्ये दिसत नाही की महिलांवर अत्याचार होत नाही... बळजबरी होत आहे... चेहरा फ्रेश, व्यवस्थित आहे... त्या भोंदू बाबाला रिस्पॉन्स करत आहे... म्हणून असं वाटते हा अत्याचार नाही मात्र ज्यांच्यावर अत्याचार झाला त्यांच्याबद्दल सहानुभूती आहे -- स्वच्छ ने केलील्या महिला... विशिष्ट लॉबीतील महिला.. श्रीमंत महिला यांना तर कळायलाच हवं... हा बुद्धिजीवी वर्ग आहे... त्यांनी स्वतःचे इतकं अधपतन कसं करून घेतले हा माझा विषय आहे. -- चाकणकर यांच्यावर कायदेशीर कारवाई व्हावी... कडक शिक्षा व्हायला पाहिजे
0
0
Report

अंजनगाव खेळोबा पुतला मामले में धनगर मराठा समाज का उग्र प्रदर्शन, प्रशासन पेच में

Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा प्रकरणावर आज पुन्हा धनगर मराठा समाजाने सामने आलेले आहेत.प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी देवस्थानच्या जागेवर हक्क सांगण्यासाठी बसवलेला पुतळा सन्मानाने स्थलांतर करावा अशी मागणी केली आहे.जोपर्यंत पुतळा स्थलांतरित होत नाही. तोपर्यंत इथून आंदोलन संपणार नाही अशी भूमिका घेतली आहे तर पट्टणकोडोली येथील भाकणूक सांगणारे फरांडे बाबा यांनी थेट सदर जागा देवस्थानच्या वीर पुजारी मंडळाच्या नावे असलेले उतारे दाखवलेले आहेत. त्यामुळे आता प्रशासनापुढे पेच निर्माण होण्याची शक्यता आहे नक्की काय करावे यासाठी प्रशासनाची आज दिवसभर बैठका सुरू राहणार आहेत वन टू वन लक्ष्मण हाके, आणि फरांडे बाबा
0
0
Report
Advertisement
Advertisement

वनमंत्री गणेश नाईक का तंज: शिंदे को लेकर सख्त टिप्पणी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महापालिकेत सत्ताधारी भाजपने सेवा विनियम ठराव मंजूर करुन मनपा अधिकारी कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्ती वय 58 वरून 60 वर्षं करण्याचा निर्णय घेण्यात आला होता मात्र मनपा आयुक्तांनी सदर ठराव शासनाच्या मंजुरीसाठी पाठवला असता नगरविकास खात्याने सदर ठराव निलंबित केलाय. 500 चौरसफूट घरांना कर माफिचा निर्णय देखिल नवी मुंबई महापालिकेने प्रथम घेतला त्यानंतर मुंबई महापालिकेने घेतला मात्र मुंबई मध्ये याची अंमलबजावणी सुरु झाली पण नवी मुंबईत नाही त्यामुळे आपल्या पायाखाली काय जळत ते पहिला बघायचं असा उपरोधीक टोला यावेळी वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना लगावलाय.
0
0
Report

सत्य की जीत: सतिश भोसले निर्दोष साबित, जेल से गांव लौटे भावुक

Beed, Maharashtra:बीड: अखेर सत्याचा विजय झाला, निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सतीश भोसले भावुक..! मला खोट्या गुन्ह्यात गोवले गेले. एक वर्षात मी.पूर्णपणे बरबाद झालो. माझे संपूर्ण आयुष्य आणि माझे कुटुंब उध्वस्त झाले. परंतु न्याय देवतेने मला न्याय दिला. अखेर सत्याचा विजय झाल्याचे सांगत सतीश भोसले भावुक झाल्याचे पाहायला मिळाले. निर्दोष मुक्तता झाल्यानंतर सतीश भोसले हर्सुलच्या कारागृहातून थेट त्याच्या गावी शिरूर कासार येथे आला होता. प्रशासनाने आणि काही समाजकंटकांनी उध्वस्त केलेल्या त्याच्या राहत्या घराकडे पाहून तो पुरताच गहिवरला... निर्दोष सुटल्यानंतर काय म्हणाला सतीश भोसले बघुयात...
0
0
Report
0
0
Report
Advertisement

चाकण मार्केट में बारिश से प्याज-आलू सड़कर किसान संकट में

Chakan, Maharashtra:निर्यात ठप्प, पावसाचा फटका; चाकण बाजार समितीत कांदा बटाटा सडला, शेतकरी संकटात चाकण बाजार समितीत विक्रीसाठी आणलेल्या कांद्या आणि बटाट्यावर दुहेरी संकट कोसळले आहे. आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे कांद्याची निर्यात ठप्प झाल्याने बाजार समितीत मोठ्या प्रमाणावर कांदा आणि बटाटा साठून राहिला आहे. त्यातच अवकाळी पावसाने अचानक हजेरी लावल्याने उघड्यावर ठेवलेला कांदा आणि बटाटा पूर्णपणे भिजून खराब झाला आहे. बाजार समितीत कांदा साठवणुकीसाठी पुरेशी जागा नसल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. आधीच घसरलेले बाजारभाव आणि वाढलेला उत्पादन खर्च यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे. शासनाने तातडीने मदत करावी, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
0
0
Report

पुणे से रत्नागिरी जा रही निजी ट्रॅवल्स में आग लगने से गाड़ी जलकर राख

Ratnagiri, Maharashtra:साखरपा जाधववाडी जवळ गद्रे पेट्रोल पंपासमोर खाजगी प्रवाशी ट्रॅव्हल्स जळून खाक झाली. गोविंद धोंडीराम साळुंखे (वय 35, लातूर) यांच्या ताब्यातील प्रवासी ट्रॅवल्स NL 01B 2442 पुणे ते रत्नागिरी मार्गावर काल सहा वाजण्याच्या सुमारास तीस प्रवाशांना घेऊन पुणे ते रत्नागिरी अशा रस्त्यावर जात असताना आज पहाटे साडेतीन (3.30) वाजता संगमेश्वर तालुक्यातील साखरपा जाधववाडी येथील गद्रे पेट्रोल पंपासमोर आली असता गाडीने पेट घेतल्याचे चालकाच्या निदर्शनास आले. प्रसंगावधान राखून प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. आग आगीचा कारण अद्याप स्पष्ट झाले नाही; शॉर्ट सर्किटने आग लागल्याची शक्यता वर्तवण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड़ीने आगीचे नियंत्रण मिळवले, परंतु गाडी पूर्णतः भस्मसात झाली असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले.
0
0
Report

वाशीम जिले के खेत मार्गों की समस्या गंभीर, 400 से अधिक कार्य ठप

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात शेतरस्त्यांचा प्रश्न गंभीर बनला असून ४०० हून अधिक कामे प्रलंबित अल्याचे समोर आले आहे.यामुळे शेतकऱ्यांना शेतात जाणे आणि पीक वाहतूक करणे कठीण होत आहे.अनेक ठिकाणी रस्ते अपूर्ण किंवा नसल्याने शेतीची कामे वेळेत पूर्ण करण्यात अडचणी येत आहेत.रोजगार हमी योजनेतील जाचक निकषांमुळे शेतरस्त्यांची कामे रखडल्याची तक्रार शेतकऱ्यांकडून केली जात आहे.उन्हाळा हा कामांसाठी योग्य काळ असतानाही गती नसल्याने नाराजी वाढली असून,जिल्हा वार्षिक योजनेतून निधी देऊन ही कामे तातडीने पूर्ण करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

तपोवन संस्थे में सिलेंडर कमी से कुष्ठ रोगियों की रसोई बाधित, अंतिम संस्कार संकट

Amravati, Maharashtra:तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवडयाचा मोठा फटका; सिलेंडर मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची कुष्ठरोग्यांवर वेळ कुष्ठरोग्यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमा केलेले लाकूड स्वयंपाकासाठी वापरण्याची संस्थेवर वेळ; अंत्यसंस्कार करायचे कसे संस्थेसमोर गंभीर प्रश्न निर्माण अँकर :- कुष्ठरोगी रुग्णांवर उपचार आणि पुनर्वसन करणाऱ्या अमरावतीच्या तपोवन संस्थेला सिलेंडर तुटवडयाचा मोठा फटका आहे. सिलेंडरच मिळत नसल्याने चुलीवर स्वयंपाक करण्याची कुष्ठरोग्यांवर वेळ आली आहे. जवळपास 400 पेक्षा अधिक लोकांचा रोज स्वयंपाक बनवला जातो त्यामुळे कुष्ठरोगी यांच्या अंत्यसंस्कारासाठी जमा केलेले लाकूड स्वयंपाकासाठी वापरल्याने अंत्यसंस्काराचाही प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हा प्रशासनाने व पुरवठा विभागाने सिलेंडर उपलब्ध करून देण्याची संस्थेने प्रशासनाकडे मागणी केली आहे. पोळ्या बनवण्यासाठी चालणारी मशीन ही सिलेंडरवर चालते परंतु सिलेंडर नसल्याने मशीनही बंद आहे. त्यामुळे सिलेंडर अभावी आता फक्त वरण भात भाजी पोळी एवजी मसालेभाताचे जेवण बनवावे लागत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top