445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
NSUI के प्रदर्शन में कल्याण काळे ने शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:NEET परीक्षेतील कथित गैरव्यवहार आणि परीक्षा रद्द झाल्याच्या पार्श्वभूमीवर, नॅशनल स्टुडन्ट युनियन ऑफ इंडिया (NSUI) तर्फे आज क्रांती चौक येथे तीव्र आंदोलन करण्यात आले. विद्यार्थ्यांनी शासनाच्या कारभाराचा निषेध करत घोषणाबाजी केली. काँग्रेसचे खासदार कल्याण काळे यांनी प्रत्यक्ष सहभाग नोंदवून केंद्र सरकारवर कडक शब्दांत टीका केली. काळे यांनी शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली. 'परीक्षेतील गैरव्यवहाऱ्यामुळे प्रामाणिक विद्यार्थ्यांचे भविष्य टांगणीला लागले आहे...' असे त्यांनी उपस्थित केले. केंद्र सरकार केवळ श्रीमंतांच्या हिताचे निर्णय घेत असल्याचे ते म्हणाले. आगामी लोकसभा अधिवेशनात जोरदार आवाज उठवण्याची भूमिका त्यांनी स्पष्ट केली. या आंदोलनात विद्यार्थी, पालक आणि क्लास चालक मोठ्या संख्येने सहभागी झाले. पेपर फुटीच्या आणि गैरव्यवहाराच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप असून, दोषींवर कठोर कारवाई करून पारदर्शक परीक्षा पद्धत राबवावी, अशी मागणी NSUI कडून करण्यात आली.0
0
Report
पनवेल में पानी टंचाई पर सत्ता-विरोध की भिड़ंत, मुख्यमंत्री से मिलने की मांग
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल महानगरपालिका क्षेत्रात भीषण पाणी टंचाई उद्भवली असून नवी मुंबई महापालिका ने देखील पाणी देण्यास नकार दिल्याने यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन साकडे घालणार आहेत. पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी भाजप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याची तयारी दर्शवित आहेत आणि त्यांना साकडे घालणार आहेत. सिडको प्रशासन मात्र पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट आहे. पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी स्पष्ट केले की पाणी समस्येवर रस्त्यावर उतरून उपाय करावे लागतील. विरोधीपक्ष देखील आक्रमक झाला असून केंद्र, राज्य आणि मनपा मध्ये भाजपाची सत्ता असतानाही पाणी प्रश्न का सुटत नाही असा प्रश्न विरोधीपक्ष उपस्थित करत आहे. पनवेलला नवीन मुंबई मनपाने पाणी द्यावे अशी मागणी केली असता दुर्लक्षित केल्याने 17मे रोजी कळंबोली जंकशन येथे जलवाहिनीवरील मोर्चा काढून पाणी थांबविण्याचा इशारा विरोधीपक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी दिला. पनवेल चा पाणी प्रश्न सुटावा यासाठी सत्ताधारी आणि विरोधक आक्रमक झाले असले तरी पाणी प्रश्न सुटणार कसा याच उत्तर दोघांकडे नाही.0
0
Report
अचानक अवकाळी बारिश से संगमनेर क्षेत्र के गांवों में भारी नुकसान
Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील आश्वीसह पंचक्रोशीतील गावांना काल सायंकाळी अवकाळी पावसाने तडाखा दिला.. अचानक विजांचा कडकडाट, वादळी वारा आणि गारांसह झालेल्या जोरदार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालयं.. अनेक ठिकाणी झाडे उन्मळून पडली आहेत, त्यामुळे वाहनांचे देखील नुकसान झालयं, तर काही ठिकाणी घराचे पत्रे उडून गेले आहेत.. या अवकाळी पावसाने काढणीला आलेला तसेच शेतात साठवून ठेवलेल्या कांदा पिकांचे नुकसान झाले आहे.. यासह वादळी वाऱ्याचा फटका आंबा, जांभूळ आणि डाळींब या फळपिकांना देखील बसला आहे.. लोहारे येथे वीज पडून 42 वर्षीय लताबाई सोनवणे या महिलेचा मृत्यू झालाय.. तर डिग्रस येथे घराची भिंत अंगावर पडल्याने 70 वर्षीय महादू माळी यांचा मृत्यू झालाय.. अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची जनावरे दगावल्याची माहिती आहे..0
0
Report
Advertisement
कान्हा रिजर्व में कैनाइन डिस्टेंपर से बाघिन व शावकों की मौत; नागपुर बाग सुरक्षा कदम
Nagpur, Maharashtra:मध्य प्रदेशातील कान्हा टायगर रिझर्व्हमध्ये एका वाघिणीचा आणि तिच्या चार शावकांचा कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर नागपुरातील महाराज बाग प्राणी संग्रहालयात वन्य प्राण्यांच्या आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने पाऊल उचलण्यात आलेय. मध्य प्रदेशातील कान्हा टायगर रिझर्व्हमध्ये एक वाघीण आणि तिच्या चार शावकांचा कॅनाइन डिस्टेंपर व्हायरसमुळे मृत्यू झाल्यानंतर व एकच खळबळ उडाली... याचा धोका लक्षात घेऊन या पार्श्वभूमीवर शहरातील महाराजबाग प्राणीसंग्रहालय अलर्टवर आहे. प्राणिसंग्रहालय प्रशासनाकडून संपूर्ण संग्रहालयात विशेष स्वच्छता आणि सुरक्षा मोहीम राबवली जात आहे. महाराज बागेत वाघांपासून ते पक्ष्यांपर्यंत सर्वांच्या पिंजऱ्यांचे पूर्ण सॅनिटायझेशन केले जात आहे. प्राण्यांच्या पिंजऱ्यांच्या आसपासचा परिसर विषाणूमुक्त करण्यासाठी कीटकनाशकांची फवारणी केली जात आहे. तज्ज्ञांच्या मते, हा विषाणू मुख्यतः संक्रमित कुत्र्यांच्या माध्यमातून वाघांपर्यंत पोहोचतो. त्यामुळे आसपासच्या परिसरावरही लक्ष ठेवण्यात येत आहे की प्राणिसंग्रहालय परिसरात कुत्र्यांचा प्रवेश होऊ नये. वन्य प्राण्यांच्या सर्व पिंजऱ्यांचे निर्जंतुकीकरण करण्यात आले असून, सुरक्षा रक्षकांनाही सतर्क करण्यात आले आहे, महाराज बाग प्राणिसंग्रहालयात वाघ, बिबट्याच्या पिंजऱ्यांवर विशेष लक्ष दिले जात आहे, कारण हा आजार विशेषतः याच प्राण्यांमध्ये आढळतो. डॉक्टरांचे एक पथक सतत या प्राण्यांवर नजर ठेवून आहे. आत जाऊन साफसफाईसह इतर कामे करणाऱ्यांना प्रोटेक्शन किट देण्यात आले आहे. सध्या नागपूरच्या प्राणिसंग्रहालयातील वन्य प्राणी स्वस्थ आहेत. प्राणिसंग्रहालयाला अलर्ट मोडवर ठेवण्यात आले असून, सर्व प्रकारची खबरदारी घेतली जाट आहे.0
0
Report
कोल्हापुर की नदियों से गाद हटाने के लिए मंत्रालय में आज अहम बैठक
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्ह्यातील नद्यांमधील गाळ काढण्यासाठी मंत्रालयात आज बैठक होणार आहे... जिल्ह्यातील नद्यांमध्ये गाळ साठल्याने त्यांची बेटे तयार झाली आहेत. त्यामुळेच नद्यांचे पाणी लवकर गावांमध्ये शिरते. यासाठी नद्यांमधील गाळ काढणे गरजेचे आहे. याबाबत धोरणात्मक निर्णय तातडीने घेणे आवश्यक असल्याचं नदीतील गाळ पाहिल्यानंतर दिसून येत आहे. कोल्हापूरच्या पंचगंगा नदीवरून याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
संगली में वादली हवाओं से दीवार गिरने से आठ महीने के बच्चे की मौत
Sangli, Maharashtra:स्लग - वादळी वारा व पावसाने भिंत पडून आठ महिन्याच्या मुलाचा दुर्दैवी मृत्यू.. अँकर - सांगलीच्या जत तालुक्यामध्ये काल पुन्हा झालेल्या वादळी वाऱ्यासह पाऊसामुळे खलाटी गावात भिंत कोसळ आठ महिन्याच्या चिमुरडयाचा दुर्दैव मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.श्रीवर्धन शेजूळ,वय 8 असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. सायंकाळच्या सुमारास प्रचंड वादळी वारा सुरू झाला,यामध्ये शेजुळ यांच्या घरावरील पत्रे उडाले आणि त्यानंतर घराची समोरच्या भागाची असणारी भिंत कोसळली यामध्ये घरात असणाऱ्या आठ महिन्याच्या बाळाच्या डोक्यावर विटा कोसळल्या,यामध्ये त्याचा मृत्यू झाला आहे.जतच्या मोटेवाडी येथे वादळी वाऱ्याने भिंत कोसळून सहा भाविक ठार झाल्याची घटना,ताजी असतानाच पुन्हा एक दुर्घटना घडल्याने तालुक्यात भीतीच वातावरण पसरले आहे.0
0
Report
Advertisement
किशोरी के प्रेमी के खिलाफ अश्लील वीडियो वायरल, POSCO के तहत गिरफ्तारी
Kolhapur, Maharashtra:अल्पवयीन मुलीनेच केले स्वतःचे अश्लील व्हिडिओ व्हायरल.. प्रियकर फोन उचेलत नसल्याच्या रागातून केले कृत्य, प्रियकराला पोलिसांनी केली अटक. कोल्हापूर :- जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीने प्रियकर आपला फोन उचलत नाही या रागातून टोकाचे पाऊल उचलले आहे.. स्वतःचे प्रियकरा सोबत असलेले अश্লील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत.. या त्यामुळे शिरोळ तालुक्यात खळबळ उडाली आहे. शिरोळ पोलिसांनी संबंधित तरुणाविरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. संबंधित अल्पवयीन तरुणी आणि युवकाचे गेल्या काही महिन्यांपासून प्रेम संबंध होते. यादरम्यान ते हातकणंगले तालुक्यातील एका लॉजवर गेले होते. त्यानंतर काही कारणाने या दोघांमध्ये भांडण झाली. त्यातून संबंधित प्रियकराने प्रेयसी चे फोन उचलने बंद केले. प्रियकर आपला फोन उचलत नाही आणि टाळाटाळ करतो या रागातून संतापलेल्या मुलीने स्वतःकडे असलेले अश्लील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केले. संबंधित हे व्हिडिओ वाऱ्यासारखे शिरोळ तालुक्यात पसरले. त्यानंतर तालुक्यात खळबळ उडाली. या बाबतची माहिती शिरोळ पोलिसांना मिळताच या व्हिडिओची खात्री करत पोलिसांनी संबंधित युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली, त्यानंतर या युवकावर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा नोंद केला आहे.0
0
Report
नया पुल धीमी गति से बन रहा, पुराने पुल से सफर खतरे में
Washim, Maharashtra:वाशीम:\n\nजाऊळका येथील काटेपूर्णा नदीवरील नवीन पुलाचे काम अद्यापही संथ गतीने सुरू असल्याने वाहनचालकांना जीर्ण झालेल्या जुन्या पुलावरून जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. विशेषतः पावसाळ्यात हा पूल अधिक धोकादायक बनला आहे. या महामार्गावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असताना पुलाचे रखडलेले काम नागरिकांसाठी मोठी अडचण ठरत आहे. पावसाळा तोंडावर आला असल्याने कोणतीही दुर्घटना घडण्यापूर्वी प्रशासनाने पुलाचे कामाला गती देऊन पूर्ण करण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून केली जातं आहे.0
0
Report
आरेवाड़ी के श्री बिरोबा देवस्थान के विकास के लिए 150 करोड़ का आराखड़ा मंजूर
Sangli, Maharashtra:स्लग - आरेवाडीच्या प्रसिद्ध श्री बिरोबा देवस्थान विकासासाठी 150 कोटींचा आराखडा मंजूर. अँकर - सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यातील आरेवाडीच्या प्रसिद्ध श्री बिरोबा देवस्थानाच्या विकासासाठी 150 कोटींचा आराखडा मंजूर करण्यात आला आहे. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या बैठकीमध्ये आराखड्यास मंजूरी देण्यात आली असून अंतिम मंजुरीसाठी सदर आराखडा राज्य शासनाकडे पाठवण्याच्या सूचना यावेळी मंत्री पाटील यांनी प्रशासनाला दिल्या.देवस्थान परिसराचा सर्वांगीण विकास, भाविकांसाठी आवश्यक सुविधा,रस्ते, पाणीपुरवठा,स्वच्छता,पार्किंग व्यवस्था तसेच पर्यटनाच्या दृष्टीने विविध विकासकामांबाबत यावेळी सविस्तर चर्चा करण्यात आली.0
0
Report
Advertisement
सोल AP दौरे में गडकरी के ताफे में 50% कमी, सिर्फ तीन वाहन इस्तेमाल
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या ताफ्यातील वाहनांत 50 टक्के कपात; दौऱ्यात प्रशासनातील केवळ तीन वाहने अँकर - केंद्रीय रस्ते व महामार्ग वाहतूक मंत्री नितीन गडकरी हे आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून, गडकरी यांनी आपल्या ताफ्यातील वाहनांची संख्या तब्बल 50 टक्क्यांनी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे.आजच्या दौऱ्यात ते पंढरपूर आणि अक्कलकोट येथे विविध विकास कामांची पाहणी करणार असून, काही महत्त्वाच्या प्रकल्पांचे भूमिपूजनही त्यांच्या हस्ते पार पडणार आहे. विशेष म्हणजे, या दौऱ्यात प्रशासनाकडून केवळ तीन वाहनांचाच वापर केला जाणार आहे.यामध्ये जिल्हाधिकाऱ्यांचे एक वाहन, प्रांताधिकारी आणि तहसीलदारांसाठी एक वाहन, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे एक वाहन अशा मर्यादित वाहनांचा समावेश असणार आहे.दरम्यान, अधिकाऱ्यांनी शक्य असेल त्या बैठका व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे घ्याव्यात, कार्यालयीन कामासाठी इलेक्ट्रिक वाहनांचा वापर करावा आणि सार्वजनिक वाहतुकीला प्राधान्य द्यावे, अशा स्पष्ट सूचना देण्यात आल्याची माहिती सोलापूरचे जिल्हाधिकारी यांनी दिली आहे.0
0
Report
20 साल बाद पवनराजे हत्याकांड का फैसला आज सुनाया जाएगा
Dharashiv, Maharashtra:धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष आजच्या निकालाकडे Anchor राज्यात एकेकाळी गाजलेल्या पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल अखेर आज, 14 मे रोजी जाहीर होणार आहे. तब्बल वीस वर्षांपासून सुरू असलेल्या या खटल्यात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व 9 आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे या बहुचर्चित हत्याकांडात नेमका कोण दोषी ठरणार, याकडे धाराशिवसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. पवनराजे निंबाळकर हे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे वडील असून, या प्रकरणातील आरोपी असलेले माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील हे पवनराजे निंबाळकर यांचे चुलत भाऊ आहेत. त्यामुळे या प्रकरणाला राजकीय आणि कौटुंबिक संघर्षाचीही मोठी पार्श्वभूमी आहे. 2006 मध्ये नवी मुंबई येथील कळंबोली परिसरात पवनराजे निंबाळकर आणि त्यांच्या चालक समद काझी यांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. या दुहेरी हत्याकांडाने राज्यभर मोठी खळबळ उडाली होती. या खटल्यात माफीचा साक्षीदार असलेला-parasmal jain, गुरूर दिगेश तिवारी, पिंटू सिंह यांच्यासह माजी मंत्री डॉ. पद्मसिंह पाटील अशा एकूण 9 आरोपींवर सुनावणी सुरू होती. अनेक वर्षांच्या न्यायालयीन प्रक्रियेनंतर आता विशेष न्यायालय आज, 14 मे रोजी या प्रकरणाचा निकाल जाहीर करणार आहे. दरम्यान, याआधी काही आरोपींविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले असून सर्व आरोपींना न्यायालयात हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या प्रकरणाचा तपास महाराष्ट्र पोलिस, सीबीआय आणि इतर तपास यंत्रणांनी केला होता. खटल्यादरम्यान अनेक महत्त्वाच्या साक्षी आणि पुरावे न्यायालयासमोर मांडण्यात आले आहेत. राजकीय वर्तुळात मोठी चर्चा घडवून आणणाऱ्या पवनराजे हत्याकांडाचा निकाल आता काही तासांवर येऊन ठेपलाय. तब्बल २० वर्षांनंतर न्यायालय काय निर्णय देणार, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.0
0
Report
राज ठाकरे के आदेश पर मनसे ने चंद्रपुर के जंगलों में पाणवठे बनाए
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आदेशावरून मनसे कार्यकर्त्यांनी चंद्रपूरच्या प्रादेशिक जंगलात प्राण्यांसाठी तयार केले पाणवठे अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यात सध्या उन्हाचा पारा अतिशय वेगाने वाढतोय. विशेषतः एप्रिल महिन्यातच चंद्रपूर जिल्ह्यात लोकांना हीटवेव्हचा सामना करावा लागला होता. या उन्हाच्या वाढत्या पाराामुळे चंद्रपूर जिल्ह्यातील जंगलांमधील अनेक पानवठे आटलेले आहेत. त्यामुळे अनेक वेळा जंगली जनावरं पाण्यासाठी शहराकडे म्हणजेच मानवी वस्तीकडे धाव घेताना दिसतात. मानवी वस्ती कडे जंगली प्राणी आल्याचा असाच एक व्हिडिओ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या नजरेस पडला. त्यानंतर त्यांनी चंद्रपूर जिल्ह्यातील आपल्या कार्यकर्त्यांना जंगलामध्ये पणनवठे तयार करण्याचा आदेश दिला. त्याप्रमाणे मनसेच्या कार्यकर्त्यांनी चंद्रपूर शहरालगत असलेल्या जंगलात 16 पाणवठे तयार केलेले आहेत. मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या आवाहनाला चंद्रपूरकर सैनिकांनी तत्परतेने प्रतिसाद दिलाय.0
0
Report
Advertisement
Belgaon नगर पालिका सभागृह में सीमावाद पर हंगामा, महाजन रिपोर्ट विरोध से माहौल गरमाया
Belagavi, Karnataka:बेळगाव महानगरपालिकेच्या सभागृहात सीमाप्रश्नावरून मोठा गदरोळ निर्माण झाला. सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या सीमावादाच्या पार्श्वभूमीवर ‘महाजन अहवाल’ विषय सभागृहात आणण्याचा प्रयत्न झाल्याने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी तीव्र विरोध नोंदवला. यावेळी सभागृहात तसेच बाहेरही तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. महापालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान कन्नड संघटनांनी ‘महाजन अहवाल’ लागू करण्याच्या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढला. पण महाराष्ट्र एकीकरण समितीच्या नगरसेवकांनी या दबावाला न जुमानता ठाम भूमिका घेत प्रशासनाला धारेवर धरले. सभागृहात महाराष्ट्र एकीकरण समितीचे नगरसेवक रवी साळुंखे यांनी आक्रमक भूमिका घेत महाजन अहवालाचा मुद्दा सभागृहात मांडण्यास जोरदार विरोध केला. “बेळगाव हा महाराष्ट्राचाच भाग असून, सीमावप्सा सध्या सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित आहे. अशा परिस्थितीत महाजन अहवालावर चर्चा करणे किंवा ठराव आणणे हा सर्वोच्च न्यायालयाचा अवमान ठरू शकतो,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. नगरसेवक शिवाजी मंडोळकर यांनीही या प्रक्रियेवर तीव्र आक्षेप घेतला. “प्रश्न न्यायप्रविष्ट असताना हा विषय सभागृहाच्या पत्रिकेत कसा आला?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला. या दोन्ही नगरसेवकांच्या भूमिकेमुळे सभागृहात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.0
0
Report
रेेंगेपार कोहळी में मधुमाश्याओं के हमले में युवक घायल, अस्पताल में भर्ती
Bhandara, Maharashtra:रेंगेपार कोहळी येथे मधमाश्यांचा हल्ला... एक युवक जखमी... भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील रेंगेपार कोहळी येथे गावातील नागरिकांना नळाचे पाणी पुरवठा करण्यासाठी पाण्याची टाकी सुरु करण्यासाठी गेलेल्या युवकावर मधमाश्यांनी हल्ला चढविला. यात भजनदास पंधरे जखमी झाले असून त्यांना ग्रामीण रुग्णालय लाखनी येथे उपचारासाठी दाखल केले गेले. जखमी युवकाची प्रकृती स्थिर असल्याची माहिती देण्यात आली.0
0
Report
सोलापूर: किसानों ने डबल पैसे का झांसा देकर धोखाधड़ी का आरोप, जांच की मांग
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - डबल पैसे करून देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी शेतकऱ्यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सोलापूर जिल्ह्यातील अक्कलकोट तालुक्यातील 60 पेक्षा अधिक शेतकऱ्यांची 20 महिन्यात पैसे डबल करून देण्याचे आम्ही दाखवून मोठी फसवणूक करण्यात आल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. अक्कलकोट मधील तडवळ परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी लाखो रुपयांची गुंतवणूक समर्थ क्रॉप केअर कंपनीमध्ये केली आहे. पैसे डबल करण्यासोबतच फॉरेन ट्रिप घडवण्याचे आमिष दाखवण्यात आले असल्याची माहिती देखील शेतकऱ्यांनी दिली. सदरच्या कंपनीवर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.0
0
Report
Advertisement
