445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के 68 जलाशयों में मात्र 34% जल भंडारण, बारिश की उम्मीद जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील धरणांत 34 टक्के पाणीसाठा.. 68 पाटबंधारे प्रकल्पांची सद्यस्थिती.. कोकणवासीयांना पावसाची प्रतीक्षा.. अँकर कोकण किनारपट्टीवर पावसाने संथ गतीने सुरुवात केली आहे.या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील लहान मोठ्या 68 पाटबंधारे प्रकल्पांमध्ये सध्या स्थिती 34.86 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.. जिल्ह्यातील एकूण 477.37 दलघमी उपयुक्त साठवण क्षमते पैकी सध्या 158.72 दलघमी पाणी उपलब्ध आहे..0
0
Report
राज्य सरकार ने दापोली कोकण कृषि विश्वविद्यालय के विकास के लिए 86 करोड़ रुपये मंजूर किए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोली कृषी विद्यापीठाला 86 कोटी.. विकास कामांना शासनाची प्रशासकीय मान्यता.. विद्यापीठाला मोठा दिलासा.. डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोलीच्या विकासाला मोठी चालना देणारा महत्त्वपूर्ण निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.. विद्यापीठाच्या विविध प्रलंबित पायाभूत सुविधा प्रकल्पांना प्रशासकीय मान्यता देत सुमारे 86 कोटी रुपयांच्या विकास कामांचा मार्ग मोकळा करण्यात आला आहे.. या निर्णयामुळे विद्यापीठातील हजारो विद्यार्थ्यांना आधुनिक वस्तीगृह सुविधा उपलब्ध होणार असून शैक्षणिक व प्रशासकीय व्यवस्थाही अधिक सक्षम होणार आहे..0
0
Report
नाशिक में महायुती नेताओं की संयुक्त बैठक: चुनावी चालें तेज
Nashik, Maharashtra:- विधान परिषद निवडणुकीसाठी महायुतीच्या नेत्यांची नाशिकमध्ये एकत्रित बैठक - बैठकीला मंत्री दादा भुसे, मंत्री नरहरी झिरवळ, आमदार पंकज भुजबळ, माजी मंत्री माणिकराव कोकाटे, आमदार राहुल ढिकले,आमदार नितीन पवार यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी उपस्थित - *नाशिक मधील मतदारांची उद्या सहल निघणार* - *बंडखोरीनंतर आता नाशिकच्या निवडणुकीत हॉटेल पॉलिटिक्स रंगणार* - मंत्री गिरीश महाजन यांच्यासह उदय सामंत यांच्या फोनवरून मतदारांना सूचना - उद्या ठाण्याच्या दिशेने नाशिक मधील मतदारांना घेऊन एकत्रित सहल निघणार - गीते बंधूंची माघार झाल्यानंतरही महायुतीच्या नेत्यांना मत विभाजनाची धाकधूक ?0
0
Report
Advertisement
उमरद के ग्रामीण इलाकों में चक्रवाती तूफान से नुकसान, घर-छप्पर उड़े, बिजली आपूर्ति प्रभावित
Nagpur, Maharashtra:नागपूर - उमरेड तालुक्यात सिर्सी गावाला वादळाचा फटका, शुक्रवारी दुपारी अचानक आलेल्या वादळाने अनेक घरांच नुकसान... - सिर्सी, केसलापूर, आमगाव देवळी, चनोडा, बोरी माजरा, किनाळा, बोथलीसह अन्य गावांत वादळामुळे - अनेक घरांची टिनाची छते उडाली; अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान - वादळाच्या तडाख्याने अनेक घरावरील टिन उडालेत,जीवनावश्यक वस्तूंची हानी, अनेकांचे मोठे नुकसान - केसलापूरमध्ये उडालेले छत थेट झाडावरून वीजतारांवर अडकले - आमगाव देवळीत सर्वाधिक नुकसान, - शेतकरी शिवदास कुकडकर यांच्या बैलजोडीतील एक बैल जागीच मृत, दुसरा जखमी - आमगाव देवळीत पाच वीज खांब कोसळले,गावाचा वीजपुरवठा खंडित झाला - अनेक घरांचे छप्पर उडाल्याने नागरिकांवर संकट, अवकाळीनंतर आता चक्रीवादळाचा फटका; शेतकरी पुन्हा अडचणीत - नुकसानग्रस्तांना तातडीची मदत देण्याची स्थानिकांची मागणी - पावसाळ्यापूर्वीच नैसर्गिक संकटाने उमरेड तालुक्यातील ग्रामीण भाग हादरला0
0
Report
यवतमाळ में MRp सुधार के लिए ग्राहक पंचायत का आंदोलन, शोषण रोकने की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये अखिल भारतीय ग्राहक पंचायतीने एमआरपी कायद्यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी घोषणाबाजी केली. एमआरपीमुळे ग्राहकांचे आर्थिक शोषण होत आहे. एकाच वस्तू वर दोन वस्तू मोफत देऊनही किंमत एमआरपीपेक्षा कमीच असते. त्यामुळे खरेदी किंमत आणि त्यावर थोडा नफा जोडून एमआरपी किंमत कायम ठेवावी. योग्य एमआरपी, ग्राहकांची पिळवणूक थांबवणे, एमआरपीवरील नियंत्रण हटवणे आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले.0
0
Report
पाचोड गाँव के शिवाजीनगर क्षेत्र में स्लैब हादसे में 24 वर्षीय युवक की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या पाचोड गावातील शिवाजीनगर भागात घराचा स्लॅब भरण्याचे सुरू असताना एका २४ वर्षीय तरुणाचा तोल जाऊन खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी घडली. प्रदीप मुकेश पिंपळे असे मृताचे नाव आहे. स्लॅब टाकण्याचे काम सुरू असताना सिमेंटने भरलेला गाडा सांभाळत असताना अचानक त्याचा तोल गेला. स्लॅबच्या कडेला उभे असताना संतुलन बिघडल्याने तो खाली कोसळला, पडताना त्यांच्या डोक्याला आणि छातीला गंभीर मार लागला आणि त्यात मृत्यू झाला...0
0
Report
Advertisement
सोलापूर में घरफोड़ि के आरोपी हिस्ट्रीवार अपराधी को शहर पुलिस ने गिरफ्तार किया
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेकडून अटक सोलापुरात घरफोडी करणारा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगाराला शहर गुन्हे शाखेने केले जेरबंद दीपक वैकुंठ श्रीगण असं अटक केलेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव सदरच्या आरोपीकडून सोन्याचे दागिने आणि लॅपटॉप असा सव्वा लाख रुपयांचा मुद्देमाल केला जप्त चोरीचे सोने विकण्यासाठी आल्यानंतर गुन्हे शाखेच्या पथकाने घेतले ताब्यात श्रीगण याच्यावर सोलापूरसह अन्य जिल्ह्यात घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत.0
0
Report
शहर में पानी चोरी पर रोक: महापालिका ने 96 अनधिकृत कनेक्शन काटे
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहरातील पाणीपुरवठा व्यवस्थेला खिंडार पाडणाऱ्या आणि सर्रासपणे पाणी चोरी करणाऱ्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेने धडक कारवाई केली आहे. शहरातील शंभूनगर परिसरातील १५० मिमी व्यासाच्या उपजलवाहिनीवरून घेतलेल्या तब्बल ९६ अनधिकृत नळ जोडण्या मनपाच्या पथकाने एकाच दिवशी खंडित केल्या. या धडक कारवाईमुळे पाणी चोरांच्या धाबे दणाणले असून, अधिकृत नळधारकांना आता पुरेसा पाणीपुरवठा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.0
0
Report
अजबनगर में धार्मिक सलोखा बिगाड़ने की कोशिश, आरोपी गिरफ्तार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील अजबनगर मध्ये आक्षकाऱ घोषणाबाजी करत धार्मिक सलोखा बिघडवण्याचा आणि औरंगजेबाचे उदात्तीकरणाचा प्रकार शुक्रवारी समोर आला. या प्रकरणी क्रांती चौक पोलिसांनी आरोपीला बेड्या ठोकल्या. शेख आसिफ शेख दादामियाँ असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असल्याची माहिती पोलिसांनी दिली, या घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.. आरोपी शेख आसिफ याने क्रांती चौक ते सिल्लेखाना रोडवरील अजबनगर येथे दुचाकीवरून नागरिकांना उद्देशून चिथावणीखोर वक्तव्ये केली. औरंगजेब आलमगीर, कान खोल के सुन लो... अशा घोषणा देत त्याने समाजात द्वेष आणि भीतीचे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में एक दिन पानी की आपूर्ति रोकी जाएगी; दरों में वृद्धि का संकेत
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील धरणांनी तळ गाठल्याने आज पासून शहरात एक दिवस आड पाणीपुरवठा होणार आहे. पाऊस सुरू होऊन धरणाची पाणी पातळी वाढेपर्यंत एक दिवस आड पाणीपुरवठा करण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला आहे. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध पाणी काटकसरीने वापरण्याचे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने केला आहे. इतकच नाही तर पाणीपट्टी दुप्पट वाढीचा प्रस्ताव देखील प्रशासनाच्या वतीने ठेवण्यात आला आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आकारत असलेल्या दराप्रमाणे या प्रस्तावात नवे दर सुचवण्यात आले आहे. त्यामुळे एकीकडे दिवसाआड पाणी आणि दुसरीकडे दरवाढीचे संकट कोल्हापूरकरांना सहन करावे लागणार आहे。0
0
Report
राष्ट्रीय खाद्य योजना के अंतर्गत 5,709 राशन कार्ड रद्द, जाँच तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील 5 हजार 729 रेशन कार्ड होणार रद्द.. मिशन सुधार मोहीम.. बनावटगिरी रोखण्यासाठी शिधापत्रिकांची पडताळणी.. राष्ट्रीय अन्न योजनेचा पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी बनावट लाभार्थी शोधण्याच्या दृष्टीने शासनाच्या मिशन सुधार मोहिमे अंतर्गत जिल्ह्यातील 23 हजार 574 रेशन कार्ड ची पडताळणी होणार आहे.. यापैकी दुबार असलेली 1 हजार 553 आणि आदर क्रमांक नसलेली अशी 4 हजार 176 मिळून 5 हजार 709 रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहेत..0
0
Report
मराठवाडा में बारिश नहीं, खरीफ की बुवाई देरी – किसानों की चिंताएं बढ़ीं
Jalna, Maharashtra:जालना : मराठवाड्यात पेरण्या रखडल्या (वाक थ्रू) पेरणीची तयारी पूर्ण,शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत अँकर : मराठवाड्यात पावसाअभावी खरीप पेरण्या रखडल्या आहेत.जालना,छत्रपती संभाजीनगरसह सर्वत्र खरीप पेरणीची तयारी जवळपास पूर्ण झाली आहे.मात्र पाऊस अजूनही न पडल्यानं शेतकरी चिंतेत आहेत.आणि खरीप पेरणीसाठी झालेल्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी नितेश महाजन यांनी. वाक थ्रू: नितेश महाजन, प्रतिनिधी0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र में ओबीसी जनगणना और आरक्षण बचाने के लिए जोरदार आंदोलन
Hingoli, Maharashtra:अँकर -ओबीसीची जात निहाय जनगणना झाली पाहिजे या मागणीसह विविध मागण्यासाठी हिंगोलीच्या सेनगाव तालुक्यातील जयपूर येथे ओबीसी आंदोलन प्रा, लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांच्या उपस्थितीत सभा पार पडली यावेळी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांनी ओबीसीची जनगणना झाली पाहिजे या मागणीसह ओबीसी बांधवानी एकत्र आलं पाहिजे आरक्षणातील घुसखोरी थांबली पाहिजे महाराष्ट्र मध्ये ज्या गोष्टी घडतायेत त्या ओबीसीचा आरक्षण संपवणाऱ्या गोष्टी घडत आहेत सरकारने ओबीसीला वाऱ्यावर सोडले आहे आम्ही राज्यभर 100 सभा घेणार असून चलो मुंबईचा नारा दिला आहे गावागावातील ओबीसी आरक्षण संपल आहे नगरपंचायत नगरपरिषद जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आरक्षण संपल असून सत्ताधारी सरकार ओबीसीवर अन्याय करत असल्याची टीका प्रा लक्ष्मण हाके यांनी केला आहे .. बाईट -प्रा, लक्ष्मण हाके (ओबीसी आंदोलन )0
0
Report
रेवदंडा वृद्धा के घर से लूट: आरोपी को तीन साल की सजा
Chendhare, Maharashtra:वृद्धेला लुटणाऱ्या आरोपीला तीन वर्षांचा कारावास अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाचा निकाल.Alibag तालुक्यातील रेवदंडा येथील ८० वर्षीय वृद्ध महिलेच्या घरात घुसून मारहाण करत सोन्याचे दागिने व रोख रक्कम लुटल्याप्रकरणी खटल्याचा निकाल लागला आहे. आरोपी मनोज प्रभाकर रोटकर याला अलिबाग मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने तीन वर्षे सश्रम कारावास व चार हजार रुपयांचा दंड ठोठावला. जुलै २०२४ मध्ये घडलेल्या या दरोडा प्रकरणात सादर झालेल्या पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने हा निकाल दिला.0
0
Report
सांगली हत्या मामले में IAS अधिकारी सचिन मोते पर गंभीर आरोप, नया मोड़
Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यातील माथाडी कामगार नेतेच्या,नातूच्या हत्या प्रकरणी आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहेत. संशयित हल्लेखोर निलेश गडडे यांच्या विरोधात घटनेच्या दिवशी गुन्हा दाखल करू नये, यासाठी जत पोलिसांवर, आयआरएस अधिकारी सचिन मोते यांच्या कडून फोन करून दबाव टाकण्यात आला. त्यामुळे पाच तास गुन्हा दाखल करण्यासाठी विलंब झाला, परिणामी जत मधून येऊन सांगलीत संशयित निलेश गडडे यांनी गोळीबार करत आपल्या नातूला मारल्याचा आरोप, मृत वेदांत बंडगर, याचे आजोबा व माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी केला आहे. त्याच बरोबर निलेश गडडे याच्याकडून धमकी देत, दहा लाखांची खंडणी मागितल्या प्रकरणी जत पोलिसांमध्ये गुन्हा दाखल करण्यासाठी गेले असता, आयआरएस अधिकारी सचिन मोटे यांनी जत पोलीस निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांच्यावर दबाव आणल्याचा आरोप लक्ष्मण खरात यांनी केला आहे. तर बाळासाहेब बंडगर यांनी जत पोलीस ठाण्याचे निरीक्षक दादासाहेब कोळेकर यांना निलंबित करून संशयित हल्लेखोर निलेश गडडे याचा एन्काऊंटर करावा, अशी मागणी देखील केली आहे. हमाल ठेका आणि खड्णीच्या वादातून संशयित निलेश गडडे यांनी आपल्या साथीदारांसह माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांच्या घरात घुसून गोळीबार करत, बंडगर यांच्या १४ वर्षीय नातूचा डोक्यात गोळ्या झाडून खून केला होता, आता या सर्व प्रकरणात सुशीयत हल्लेखोर निलेश गडडे याला पाठीशी घालण्यात आले असल्याचा गंभीर आरोप झाल्याने, हत्येच्या घटनेला नवीन वळण मिळाले आहे.0
0
Report
Advertisement
