445001
यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.
Yavatmal, Maharashtra:व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
विटा में नेचर केयर पुरस्कार: 11 महिला किसानों को 51 हजार नकद इनाम
Sangli, Maharashtra:स्लग नहीं: शेती करणाऱ्या महिलांचा नेचर केअर पुरस्काराने सन्मान. नेचर केअर पुरस्कार: महाराष्ट्र, गोवा व कर्नाटकातील 77 शेतकऱ्यांमध्ये থেকে 11 महिला शेतकऱ्यांना 51 हजार रुपये नकद आणि सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले. हा सत्कार विटा, सांगली येथे आयोजित झाला. नेचर केअर फर्टीलायझर कंपनीच्या वतीने हा सम्मान करण्यात आला. कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या ममता सिंधुताई सपकाळ, विटा के आमदार सुहास बाबर व अभिनेत्री भारती यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये कार्यक्रम संपन्न झाला. व्हिश्वमुक्त शेतीसाठी नेचर केअर फर्टीलायझरच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्यात येत आहे; यातून महिलामंतृशेतकऱ्यांनाही प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या कार्याचा गौरव होईल या हेतूने हा पुरस्कार सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला.0
0
Report
चंद्रपूर सीमा पर MEL वन नाका के पास दो चितळ पानी की तलाश में भटकते
Chandrapur, Maharashtra:पाण्याच्या शोधात चितळ गावात, चंद्रपूर शहराच्या सीमेवर असलेल्या MEL वन उपज तपासणी नाका परिसरात चितळांचा संचार पाण्याच्या शोधात वन्यजीव आता चंद्रपूर शहरात येऊ लागले आहेत. शहरातील स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाच्या प्रकल्पासमोरील महामार्गावर दोन चितळ भटकताना दिसून आले. हा भाग शहराच्या सीमेवर असून, त्यानंतर जंगल आहे. या जंगलात पाण्याचे स्रोत नसल्याने वन्यजीव पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. त्यातूनच हे दोन चितळ शहरात आले. बराचवेळ ते चंद्रपूर- मूल महामार्गावर भटकत राहिले. नंतर लोकांनी त्यांना जंगलाच्या दिशेने पिटाळले。0
0
Report
धाराशिव में गर्मी कहर: सरकारी अस्पताल में हीट स्ट्रेस कक्ष शुरू, 21 रोगी उपचारित
Dharashiv, Maharashtra:धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची तीव्रता दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तापमानाने चाळीशी पार केल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होऊ लागला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासनाने महत्त्वाचे पाऊल उचलत शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि जिल्हा रुग्णालयात विशेष ‘उष्माघात कक्ष’ सुरू केला आहे. या कक्षात आतापर्यंत 21 रुग्णांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन आरोग्य विभागाने तयारी केली आहे. शासकीय रुग्णालयात सुरू करण्यात आलेल्या उष्माघात कक्षात आवश्यक औषधे, थंडावा देणारी यंत्रणा आणि प्रशिक्षित वैद्यकीय कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या कक्षामुळे रुग्णांना तातडीने उपचार मिळत असून अनेकांना मोठा दिलासा मिळत आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर के विचोडा में शंकरपट: दूर से आए बैलगाडा खिलाड़ियों ने गर्मी में दिखाया धूम
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहर लगतच्या विचोडा येथे शंकरपटाचे आयोजन करण्यात आले. दूरून आलेल्या बैलगाडा स्पर्धकांनी उत्साहात सहभाग घेतला. चंद्रपूरच्या तापाच्या उन्हातही मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले. स्पर्धेच्या उद्घाटनासाठी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी बैलगाडा शर्यती दरम्यान गाडा हाती घेत चालवण्याचा अनुभव घेतला. पुढील वर्षी अधिक उत्तम आयोजन करून नागपूर विभागातील सर्वात मोठे शंकरपट आयोजित करण्यासाठी कामाला लागणार असल्याचे त्यांनी सांगितले.0
0
Report
रत्नागिरी: आमदार किरण सामânt के बॉक्साइट उत्खनन विरोध पर उदय सामंत का बयान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जी भूमिका जनतेची आहे तीच आमदार किरण सामंत यांची आहे. आणि पालकमंत्री म्हणून तीच भूमिका माझी देखील आहे... अशी प्रतिक्रिया उद्योग मंत्री आणि रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांनी दीली आहे.... राजापूर तालुक्यातील सागवे आणि नाणार येथील बॉक्साइट उत्खननाच्या विरोधात स्थानिक आमदार किरण सामंत यांनी घेतलेली भूमिका यावर विचारले असता उदय सामंत यांनी हे उत्तर दिले...0
0
Report
उजनी में पाणीय आवर्तन कम होने के कारण किसानों के लिए अल निनो का असर: इस साल केवल एक आवर्तन
Pandharpur, Maharashtra:यंदा उन्हाळी हंगामामध्ये उजनी धरणावर अवलंबून असणाऱ्या शेतकऱ्यांना दोन ऐवजी एकच पाण्याचा आवर्तन मिळणार अल निनो सक्रिय होणार असल्याने कमी पावसाची शक्यता आहे. यामुळे भविष्यात पाणीसाठा राखून ठेवण्यासाठी निर्णय पालकमंत्री जयकुमार गोरे यांची माहिती. उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील हजारो हेक्टर शेती अवलंबून आहे. मात्र यंदा उन्हाळी हंगामात दोन ऐवजी एकच आवर्तन सोडले जाणार आहे. अल निनो सक्रिय होणार असल्यामुळे यावर्षी पावसाच्या प्रमाण कमी राहण्याची शक्यता व्यक्त केली आहे. 2027 च्या जून पर्यंत पिण्याच्या पाण्यासाठी पाणीसाठा वापरण्याचं आव्हान असणार आहे. पिण्याच्या पाण्याला प्राधान्य असल्यामुळे यावर्षी उन्हाळी हंगामासाठी फक्त एक आवर्तन सोडलं जाणार आहे. अशी माहिती पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
हिंदीheadline: हातखंबा के पास मुंबई-गोवा महामार्ग पर चार वाहन दुर्घटना, ट्रक चालक घायल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - मुंबई गोवा महामार्गावर हातखंबा येथे चार वाहनांचा अपघात स्टील भरलेल्या एका ट्रकने इतर वाहनाना ठोकर देऊन रस्त्यानजिकच्या विहिरीत ट्रकाचा अर्धा कोसळला.. सदर ट्रकचा चालक हा ट्रकच्या खाली अडकला होता.. ग्रामस्थानी त्याला बाहेर काढले असून ट्रक चालकाला गंभीर दुखापत झाली आहे.. ग्रामीण पोलीस, महामार्ग पोलीस घटनास्थळी महामार्गावर वाहतूक सुरळीत सुरू आहे..0
0
Report
इंदापुर के भरणेवाड़ी में मंत्री दत्तात्रय भरणे ने विद्यार्थिनीों को पंद्रह सौ साइकिलें वितरित कीं
Rui, Maharashtra:भरणेवाडीत मंत्री दत्तात्रय भरणें यांच्या हस्ते दीड हजार सायकलींचं वाटप करण्यात आलं. शालेय विद्यार्थिनींना सायकलींचं वाटप करण्यात आलं. इंदापूर तालुक्यातील भरणेवाडी येथे राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते शालेय विद्यार्थिनींना दीड हजार सायकलींचं वाटप करण्यात आलं. यावेळी उद्योजक राणा सूर्यवंशी, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, जिल्हा परिषदेचे सीईओ गजानन पाटील उपस्थित होते.0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी में जिल्हाध्यक्ष इस्तीफा: पक्ष में हलचल
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी.. जिल्हाध्यक्षांच्या पक्षविघातक कारभारामुळे तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा.. मुराद अडरेकर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या जिल्हाध्यक्षांच्या अकार्यक्षम,विस्कळीत आणि पक्षविघातक कारभारामुळे माझ्यासारख्या कार्यकर्त्यास त्या पदावर राहणे अशक्य झाले आहे.. जिल्हाध्यक्षांच्या कार्यपद्धतीमुळे पक्षात समन्वयाचा पूर्णता अभाव निर्माण झाला असून कार्यकर्त्यांमध्ये तीव्र नाराजी आहे.. यामुळे आपण तालुका अध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्याचे मुरात आडरेकर यांनी सांगितले.. त्यांनी आपल्या अध्यक्ष पदाचा राजीनामा प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे,कोकण प्रभारी जितेंद्र आव्हाड आणि जिल्हानिरीक्षक विजय देसाई यांच्याकडे दिला आहे.. दिलेल्या राजीनाम्यात आडेकरांनी म्हटले आहे की चिपळूण तालुक्या अध्यक्ष म्हणून मी प्रामाणिकपणे व निष्ठेने पक्षासाठी काम केले आहे..मात्र जिल्हाध्यक्षांनी जाणीवपूर्वक गट-तट निर्माण करून पक्षाची एकजूट खिळखिळी केली आहे..त्यांच्या चुकीच्या आणि अहंकारी वर्तनामुळे अनेक निष्ठावंत कार्यकर्ते व नेते वारंवार तक्रारी करूनही न्याय न मिळाल्याने पक्ष सोडून गेल्याचे त्यांनी म्हटले आहे..0
0
Report
Advertisement
अमरावती में जिला परिषद के प्रवेशद्वार पर वृद्ध का शव, गर्मी से मौत का शक
Amravati, Maharashtra:अमरावतीत जिल्हा परिषदच्या प्रवेशद्वाराजवळ आढळला मृतदेह; उष्माघाताने मृत्यू झाल्याचा संशय अँकर :- शहरातील जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वाराजवळ एका 65 वर्षीय वृद्धाचा मृतदेह आढळल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मृत व्यक्तीचे नाव किशोर वासनिक असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. काल अमरावतीचे तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले होते. त्यामुळे उष्माघातामुळेच त्यांचा मृत्यू झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती स्थानिक नागरिकांनी तात्काळ पोलिसांना दिली. त्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल होत पंचनामा करून पुढील तपास सुरू केला आहे. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतर स्पष्ट होणार आहे.0
0
Report
जिला अस्पताल में लाच माँग कर गिरफ्तार शिपाय, ACP ने बड़ी कार्रवाई की
Satara, Maharashtra:साताऱ्यातील जिल्हा शासकीय रुग्णालयात जिल्हा शल्य चिकित्सक केबिन बाहेरील शिपायाला 50 हजाराची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली आहे. आनंदा गोपाळ वाळवेकर असे लाच घेणाऱ्या शिपायाचे नाव आहे. या प्रकरणातील तक्रारदाराचे हॉस्पिटल असून या हॉस्पिटलमध्ये सोनोग्राफी सेंटर, सरकार मान्य गर्भपात केंद्र कुटुंब नियोजन केंद्र या सुविधा चालू करण्यासाठी लागणारे परवाने मिळवण्यासाठी लागणाऱ्या परवाने मिळवण्यासाठी लाचची मागणी करण्यात आली होती. जिल्हा शासकीय रुग्णालयात सापळा रचून यामध्ये लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संबंधित शिपायाला अटक केली आहे.. याचा पूर्ण तपास सध्या लाचलुचपतच्या अधिकाऱ्यांकडून सुरू आहे0
0
Report
वाशीम में नेशनल हाईवे की सिमेंट सड़क धोकादायक; गड्ढे दुर्घटना का जोखिम बढ़ाते
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यातील मालेगाव–रिसोड–हिंगोली ४६१ बी राष्ट्रीय महामार्गावरील शिरपूर ते वसारी दरम्यानचा सिमेंट रस्ता सध्या अत्यंत धोकादायक अवस्थेत आला आहे.या मार्गावर अनेक ठिकाणी रस्त्याच्या मधोमध खोल भेगा पडल्या असून,त्यामध्ये दुचाकींचे टायर अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. परिणामी, दुचाकीस्वारांसाठी अपघाताचा गंभीर धोका निर्माण झाला आहे.विशेषतः रात्रीच्या वेळी या भेगा स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे अपघाताचा धोका अधिक वाढतो. स्थानिक नागरिकांकडून आणि वाहन चालकांकडून याबाबत वारंवार तक्रारी करण्यात येत असतानाही अद्याप कोणतीही दुरुस्ती करण्यात आलेली नाही.या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाने तात्काळ दखल घेऊन रस्त्याची दुरुस्ती करावी,अशी मागणी वाहनचालक आणि स्थानिकांकडून जोर धरत आहे.0
0
Report
Advertisement
सातारा में खरीफ सीजन: कृषि विक्रेताओं के लाइसेंस निलंबित, कार्रवाई तेज
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाने कडक कारवाई करत ८ कृषी विक्रेत्यांचे परवाने निलंबित केले आहेत. खत विक्रीत अनियमितता, पॉस मशीनचा वापर न करणे, साठा आणि नोंदीत तफावत आणि शेतकऱ्यांना योग्य बिले न देणे अशा कारणांमुळे ही कारवाई करण्यात आली. जिल्हास्तरीय भरारी पथकांनी एप्रिलमध्ये तपासणी करत दोषी दुकाने ओळखली. शेतकऱ्यांना खते व बियाणे योग्य दरात आणि वेळेत मिळावेत यासाठी कृषी विभाग सतर्क असून तपासण्या सुरूच राहणार आहेत.0
0
Report
रत्नागिरी से कोकण तक: मुंबई-गोवा राजमार्ग पर वृक्ष काटकर सनसनी, सावली खो गई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुंबई-गोवा महामार्गावर 'सावली' हरवली.. प्रशासनाचं वृक्षारोपणाचं आश्वासन केवळ कागदावरच!.. मुंबई-गोवा महामार्गाचा प्रवास आता प्रवाशांसाठी 'अग्निपरीक्षा' ठरू लागला आहे.एकीकडे महामार्गाचं रखडलेलं काम आधीच डोकेदुखी ठरत असताना, आता निसर्गरम्य कोकणच्या या महामार्गावरील 'सावली' देखील हरवली आहे.. महामार्गाच्या चौपदरीकरणासाठी हजारो जुन्या आणि डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात आली. 'एक झाड कापल्यास दोन झाडे लावू' असं आश्वासन देणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा (NHAI) दावा आता फोल ठरला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यासह संपूर्ण पट्ट्यात लावलेली शोभेची झाडे पाणी आणि देखभालीअभावी करपून गेली आहेत. पूर्वीच्या शीतल सावलीची जागा आता तापलेल्या सिमेंटच्या रस्त्यांनी घेतली आहे. वाढत्या पाऱ्यामुळे प्रवाशांना उन्हाच्या थेट झळा बसत असून प्रवासादरम्यान थंडाव्याचा लवलेशही उरलेला नाही.. प्रशासनाच्या या अक्षम्य दुर्लक्षामुळे हा महामार्ग भविष्यात अधिक 'उष्णतादायक' ठरण्याची भीती निर्माण झाली आहे.0
0
Report
डायल 112 के गलत इस्तेमाल पर ल Lasलगाव पुलिस की चेतावनी; नकली कॉल पर कार्रवाई
Lasalgaon, Maharashtra:अँकर :-आपत्कालीन परिस्थितीमध्ये नागरिकांना तातडीने मदत मिळावी याकरता पोलीस विभागाकडून डायल 112 हा नंबर जारी करण्यात आला आहे मात्र या नंबरावर अनेक वेळा मद्यपी, टवाळखोर, विनाकारण चुकीची माहिती देऊन कॉल करतात त्यामुळे पोलिसांचा वेळ वाया जातो, यासह इतर गरजूंना मदत वेळेत पोहोचू शकत नाही त्यामुळे डायल 112 वर चुकीच्या कारणास्तव कॉल केल्यास अथवा या नंबरचा गैरवापर केल्यास पोलीस कारवाई केली जाईल असा इशारा लासलगाव पोलिसांनी दिला आहे . केलेला कॉल हा खोटा आढळल्यास त्यावर पोलीस कारवाईदेखील केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली आहे0
0
Report
Advertisement
