icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Chhatrapati Sambhajinagar mein cafe ke peeche ashlil kritiyon ke khilaf police-municipal corporation ne sanyukt karyavahi

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये कॅफेच्या आडून सुरू असलेल्या अश्लील कृत्यांविरोधात अखेर पोलिस आणि महापालिकेने संयुक्त बडगा उगारला. मंगळवारी संध्याकाळी शहरात एकाच वेळी सुरू झालेल्या या महाकारवाईत वेदांतनगर, उस्मानपुरा, कॅनॉट प्लेस, टी.व्ही. सेंटर आणि हर्सल भागातील ४९ अनधिकृत, संशयास्पद कॅफे अक्षरशः उद्ध्वस्त करण्यात आले. २०२४-२५ मध्ये पोलिस, मनपाने शहरातील २९ कॅफेंवर कारवाई केली होती. कारवाईत सातत्य न राहिल्याने कॅफे चालक पुन्हा निर्धावले होते. आठ दिवसांपूर्वी शहरातील विविध कॅफेंमध्ये नेत एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटना उघडकीस आली. त्यानंतर मंगळवारी कॉफी सेंटरवर मोहीम राबविली. मनपाच्या हातोड्यांने केबिन काढून टाकले. कॅनॉट प्लेसमधील १९ आस्थापनांची पाहणी करून १२ नियमबाह्य बांधकामांवर कारवाई केली.
0
0
Report

दोंडाईचा क्षेत्र में दो दिनों की भारी बारिश से किसानों में राहत

Dhule, Maharashtra:दोंडाईचा परिसरात सलग दुसऱ्या दिवशीही मुसळधार पाऊस झाला. या पाऊसाने जनजीवन विस्कळीत केले असले तरी शेतकऱ्यांमध्ये समाधान दिसून हेत आहे. काही वेळातच शहरातील प्रमुख रस्ते, चौक व सखल भागांमध्ये पाणी साचल्याचे चित्र पाहायला मिळाले. सलग दुसऱ्या दिवशी झालेल्या दमदार पावसामुळे नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला असून शेतकरी वर्गात समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागातही पावसाने चांगली हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला असून खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. कापूस, मका, बाजरी, आदी पिकांसाठी हा पाऊस पोषक ठरणार असल्याचे शेतकरी सांगत आहेत.
0
0
Report

अकोला में मोटरसाइकिल चोरियाँ: दो आरोपी गिरफ्तार, चोरी की दो बाइकें बरामद

Akola, Maharashtra:अकोला स्थानिक गुन्हे शाखेने मोटरसायकल चोरी करणाऱ्या दोन अट्टल चोरट्यांना अटक करून त्यांच्याकडून चोरीच्या दोन मोटरसायकली हस्तगत केल्या आहेत. गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. आरोपींनी शहरातील दोन वेगवेगळ्या ठिकाणांहून मोटरसायकली चोरल्याची कबुली दिली असून, त्यांनी इतर ठिकाणीही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मोटरसायकल चोरीच्या घटनांमध्ये सहभागी असलेल्या दोन संशयितांची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून दोन्ही आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान आरोपींनी अकोला शहरातील दोन ठिकाणांहून मोटरसायकली चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी आरोपींकडून चोरीच्या दोन मोटरसायकली जप्त केल्या असून त्यांची किंमत लाखो रुपयांच्या घरात असल्याचे सांगितले जात आहे.दरम्यान, या आरोपींनी अकोला जिल्ह्यासह इतर भागांतही वाहन चोरीचे गुन्हे केले आहेत का, याचा शोध पोलीस घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

एलसीबी ने नंदूरबार में अंतरराज्यीय गैंग का पर्दाफाश किया: 15 केस, 2 आरोपी गिरफ्तार

Dhule, Maharashtra:नंदूरबार जिल्ह्यातील घरफोडी आणि मोटरसायकल चोरीच्या घटनांचा उलगडा करण्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेला मोठे यश आले आहे. शहादा तालुक्यातील सात मोटरसायकल चोरी आणि आठ घरफोडी अशा एकूण १५ गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या आंतरराज्य टोळीतील दोन संशयित आरोपींना एलसीबीने अटक केली आहे. या आरोपींकडून मोटरसायकली, रोख रक्कम आणि घरफोडीतील मुद्देमाल असा तब्बल आठ लाख २३ हजार रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला असून, आणखी एक आरोपी फरार आहे. मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील या आरोपींनी महाराष्ट्रासह गुजरात राज्यातही अनेक गुन्हे केल्याची कबुली दिलेली आहे. या संपूर्ण कारवाईमुळे आंतरराज्य गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करण्यात एलसीबीला मोठे यश आलं असून, या आरोपींकडून आणखिन काही गुन्ह्यांच्या उलगडा लागण्याची शक्यता आहे.
0
0
Report

रायगड में मानसून पूरी तरह सक्रिय, उत्तर भाग में बारिश तेज

Chendhare, Maharashtra:रायगड जिल्ह्यात मान्सून पूर्णपणे सक्रिय. जिल्ह्याच्या उत्तर भागात पावसाची संततधार. मुरूड तालुक्यात सर्वाधिक १५० मिलिमीटर पावसाची नोंद. उशिराने आलेला पाऊस आता संपूर्ण रायगड जिल्ह्यात पूर्णपणे सक्रिय झालाय. अलिबाग, पेण, मुरुड या उत्तर भागात पावसाची रिपरिप सुरू आहे. अधून मधून जोरदार सर बरसत आहेत. रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा निर्माण झाला आहे. मुरुडमध्ये सर्वाधिक १५০ मिलिमीटर तर अलिबाग मध्ये ९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. शेतात पाणी झाल्याने आता शेतीच्या कामाला वेग आला आहे. मात्र दक्षिण रायगड जिल्ह्यात पाऊस थांबला असून ढगाळ वातावरण आहे.
0
0
Report
Advertisement

मूर्तिजापूर के किसानों का आंदोलन स्थगित, लेखी आश्वासन मिलने पर वापस लौटे

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे पिक विमा, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी सुरू असलेलं शेतकऱ्यांच अन्नत्याग आंदोलन सध्या स्थगित करण्यात आला आहे. शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी हे आंदोलन पुकारलं होतं. सध्या सुरू असलेल्या अधिवेशनात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सुद्धा शेतकऱ्यांच्या या मागणीकडे सरकारचं लक्ष वेधलं होतं. अखेर भाजप आमदार हरीश पिंपळे यांनी विधिमंडळाच्या अधिवेशनात रेटून धरलेल्या प्रश्नावर कृषीमंत्र्यांसोबत केलेल्या चर्चे अखेर प्रशासनाच्या वतीने लेखी आश्वासनानंतर शेतकऱ्यांनी हे आंदोलन तात्पुरत स्थगित केलं आहे...
0
0
Report

बुलढाणा में तेज़ बारिश से खेतों में पानी जमा, पेरणी के आसार बढ़े

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेक. बुलढाणा जिल्ह्यात अनेक तालुक्यांमध्ये मुसळधार पाऊस.. शेतात साचले पाणी. . Anchor - जून महिना संपत असताना शेतकरी हा नेमका केव्हा येतो पाऊस या विवंचनेत असताना काल रात्री जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाने दमदार सुरुवात केलीय .. घाटाखालील खामगाव, शेगाव, संग्रामपूर सह इतर तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागात मुसळधार पाऊस झाला. . यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाले आहे.. नेमका हा पाऊस पेरणी करता कसा दिलासादायक ठरतो याकडे देखील बळीराजा लक्ष ठेवून आहे. . शेतीची मशागत पूर्ण केल्यानंतर पाऊस नेमका केव्हा येतो याकडे तो लक्ष ठेवून होता, आता सलग दोन ते तीन दिवस पावसाने दमदार बॅटिंग केली तर पेरणी करता देखील हा पाऊस उपयुक्त ठरू शकतो.. असे चित्र आहे.
0
0
Report

वसई-विरार और पालघर में तेज़ बारिश, पानी में डूबे भाग, यातायात अस्त-व्यस्त

Vasai-Virar, Maharashtra:पहिल्याच मुसळधार पावसाने वसई-विरारची दाणादाण; सखल भाग जलमय, जनजीवन विस्कळीत वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग जलमय झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में संरक्षक दीवार और सड़क ध्वस्त, अवैध खोदाई से पांच घर खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- संरक्षक भिंतीसह रस्ता खचला.. रत्नागिरीत गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे..पावसाच्या सुरुवातीलाच शहरातील फगर वठार येथे मंगळवारी चुकीच्या खोदाईमुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचला.. २० ते २५ फूट संरक्षक भिंत कोसळली संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होते अवैध खोदकाम मधला फगरवठार मधील ५ घरांना धोका निर्माण झाला आहे.. रत्नागिरी शहरातील फगरवठार मधून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.. रस्ता खचल्याने लागून असलेलं आंब्याचं झाड देखील कोसळलंय.. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

भंडारा के सड़कों पर गड्ढों की मार: चुनावी वादों के बाद भी हालत बदतर

Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. रस्ते शहरातील आहेत की ग्रामीण भागातील असा प्रश्न. भंडारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरात भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले. नगर परिषद निवडणुकीत रस्त्यावर राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. निवडणुकीनंतर रस्ते गुळगुळीत होतील अशी बतावणी देखिल करण्यात आली. मात्र आता पावसाळा सुरू झाला असून देखील रस्ते मातीने माखलेले दिसून येत आहेत. त्यावरून हे रस्ते शहरातील आहेत की ग्रामीण भागातील असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुस्लिम लायब्ररी ते त्रिमूर्ती चौक हा वर्दळीचा मार्ग असून मोठ्या संख्येने नागरिक ये जा करतात त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
0
0
Report

महाबळेश्वर में मानसून की पहली भारी बारिश, पर्यटन और किसान उत्साहित

Satara, Maharashtra:सातारा - राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये मान्सूनचा पहिल्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.महाबळेश्वर आणि परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. संपूर्ण परिसर आता धुक्याच्या चादरीने वेढला गेला असून, येथील निसर्गाचे रूप अधिकच खुलले आहे.या भागातील शेतकरी वर्ग या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. पेरणीच्या कामांना आता वेग येणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पावसाचा आनंद घेण्यासाठी वेण्णा लेक, आर्थर सीट पॉईंट आणि मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली. गरम चहा आणि भुट्ट्याचा (मक्याचे कणीस) आस्वाद घेत पर्यटक या वातावरणाचा आनंद पर्यटक घेत आहेत.
0
0
Report
Advertisement

सasangameshwar-Ratnagiri में पहाड़ काटने से घरों को खतरा, भारी बारिश बढ़ाने के बीच

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर -रत्नागिरी.. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे.. सुरुवातीच्या पावसातच मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणातील अपुऱ्या कामांचा फटका महामार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना बसतोय.. महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घडशीवाडी येथील महामार्गाच्या रुंदीकरणात महामार्गालगत असणाऱ्या डोंगराचा अडथळा निर्माण झाल्याने त्याची कटाई करण्यात आली.. त्याच डोंगरावरती घडशीवाडी स्थायिक असल्यामुळे त्यांच्या घरांना आता धोका निर्माण झाला आहे.. पहिल्याच पावसात अर्धवट कापलेल्या डोंगराची माती,दरड खाली आल्यामुळे डोंगरावरती असलेल्या घरांना धोका निर्माण झालेला आहे.. सध्या डोंगरावरील घडशी वाडीतील रहिवाशी जीव मुठीत घेऊन तिथे राहत आहेत.. तेथील आढावा घेतلय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

पालांदूर-कटाडा राजमार्ग पर बाघिन व उसके शावक का मुक्त विचरन, वीडियो वायरल

Bhandara, Maharashtra:पालांदूर किटाडी राज्यमार्गावर वाघिणीसह बछड्यांचा मुक्त संचार...व्हिडिओ व्हायरल. वाघाचे पिल्लू रस्त्यावर मुक्तपणे खेळत असल्याचे मनमोहक दृश्य. Anchor: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर ते काटाडी या राज्यमार्गावर संध्याकाळच्या सुमारास वाघीण व तिच्या बछड्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे.यामध्ये वाघाचे पिल्लू मुक्तपणे रस्त्याच्या मधोमध खेळत असल्याचे मनमोहक दृश्य बघायला मिळाले आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य छायांकित केली आहेत.मात्र वाघीण व तिचे पिल्यांसह होत असलेले मुक्त संचार प्रवासासाठी भीतीचे वातावरण निर्माण करणारे आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top