Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ : वणी मध्ये भाजप कडून कॅश फॉर वोट चा आरोप, विडिओ व्हायरल.

Nov 21, 2024 01:28:45
Yavatmal, Maharashtra

व्हायरल व्हिडिओमध्ये विरोधकांनी भाजपचे अधिकारी मतांच्या बदल्यात पैशांची देवाणघेवाण करत असल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी कारवाई करून कॅश फॉर व्होट प्रकरणात निवडणूक विभागाने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Dec 16, 2025 06:32:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. संजय शिरसाठ यांची पत्रकार परिषद पॉइंटर ऑन् संभाजी नगर युती बैठक. आज दुपारी साडेबाराच्या वाजता शिवसेना आणि भाजपची बोलणी होईल. संयुक्त बैठक भाजप कार्यालयात होणार. आमच्या आणि त्यांच्या मागण्या मॅच झाल्या पाहिजे हा आमचा प्रयत्न. महायुतीला मिळालेल्या मताचा अनादर होऊ नये असे मी सांगत आलोय, म्हणून पहिल्या फेरीच्या बोलणी करायला मी स्वतः भाजप कार्यालयात जाणार आहे. मुंबई महापालिका एवढ एक टार्गेट ubt आणि मनसेचा आहे. याचा फायदा महायुतीला होणार आहे. सर्वांचे लक्ष युती कशी होईल याकडे लागले. सगळ्या गोष्टीचा विचार करून तिन्ही नेते ठरवतील. काही ठिकाणी अपक्ष घेतलेले आहे. त्याचा सहानुभूतीचा विचार केला जाईल. मात्र महायुती बाहेरील पक्षाच्या प्रवेशाबाबतच सहानुभूती राहील. निवडणुकीत असेच काही नवनवीन फंडे येतील, मात्र मतदार खंबीर आहे. योग्य माणसाला मतदार मतदान करतील. त्यांनी हिंदुत्ववादी विचार सोडले हे आम्ही उघड सांगतो. आम्ही लपून छपून सांगत नाही. ज्यावेळी त्यांची काँग्रेसशी युती झाली त्याचवेळी त्यांनी (ठाकरेंनी) हिंदुत्व सोडले. महानगर पालिका म्हणजे तुम्ही व्यवसाय आणि उत्पादन म्हणून तुम्ही त्यांच्याकडे पाहता का? मुंबई खड्ड्यांचे शहर हे नाव बदलले. आदित्य ठाकरे नेतृत्व चांगलं आहे आदित्य ठाकरे नेतृत्व करताय मात्र तिथले वरिष्ठ त्यांचं किती ऐकतील हा प्रश्न आहे... आणि हे ( उद्धव ) राज्यात फिरणार कोण किती फिरणार हे सर्व पाहणार.. यांनी कधीही कार्यकर्त्यांसाठी निवडणूक लढविली नाही. स्वतःसाठी लढविली संजय राऊत वक्तव्य. मराठी माणसाला हद्दपार करणाऱ्या या लोकांनी मराठी माणसासाठी बोलू नये. बिल्डरच्या नादी लागून मराठी माणसाला बेघर केले पार बदलापूर विरार ला पाठवले. मराठी माणसाला मुंबईत आणण्यासाठी महायुती काम करणार आहे. आचारसंहिता भंग आरोप एका दिवसात राजीनामा पूर्वी १५०० जीआर काढणारे हे लोक आज आमच्यावर टीका करतात. हे सगळे टीका करणारे विद्वान आहेत, कोणत्याही पक्षाचा व्यक्ती असेल तो कार्यपद्धती अवलंबता. विरोधी पक्षाने देखील उद्घाटन केले. रोहित पवार. हे सर्व विद्वान आहे. शेंबड्या पोराला जरी सांगितले तरी तो सांगेल की निवडणूक आयोगाने प्रेस घेणार म्हणजे आचार सहित लागणार. संजय राऊत. संजय राऊत जो पर्यंत निगेटिव्ह बोलत नाही, तो पर्यंत त्याला जेवण जात नाही. राहेमान डाकेत तब्येतीच काळजी घ्या, बरे व्हा आणि ubt ची वाट लावा, अमीत शहा यांचा काय करायचं, आमच्या पक्षाचा आम्ही बघू... याचा सर्वस्वी अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे. जेव्हा त्यांना बदला करायचा किंवा कुठला निर्णय घ्यायचा त्याचा अधिकार एकनाथ शिंदे यांना आहे जो आरोपी होता तो पकडला गेला, त्याची 8 तास चौकशी झाली. लगेच फासावर चढवायचं असे नाही. एकाच दिवशी सर्वांना दोषी धरून शिक्षा देणे असे आपल्या कायद्यात नाही. काँग्रेसने स्पष्ट भूमिका घेतली आहे की ubt सोबत जाणार नाही. मुंबईत युती झालीच तर मनसे आणि ubt ची होईल असे संकेत आहे. शिवसेना भाजप, ubt मनसे, काँग्रेस स्वातंत्र्य आणि राष्ट्रवादी कुठे जाईल सांगता येणार नाही. त्यामुळं संजय राऊत आज भेटणार असतील.. चला हे परिवर्तन आहे. त्यांनी हे मान्य केले. Evm घोटाळा नाही. मतासाठी लाचार झाले, मराठी माणूस गेला खड्ड्यात. असा प्रस्ताव आला असेल तर पुणे चिंचवड मध्ये युती होणार नाही हे जाहीर आहे. अजितदादा काही करत असेल तर आम्हाला कल्पना नाही. भाजप चर्चा संभाजी नगर पहिली फेरी आहे. पहिल्या फेरीत आम्ही दोघे बसू आणि त्यानंतर राष्ट्रवादीशी चर्चा करून
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 06:20:10
Nagpur, Maharashtra:नागपूर चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री. महसूल खाते - मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला महसूल मंत्री पदाची जबाबदारी दिल्यानंतर जे सात लक्ष परिवारांचे घर नियमित होत नव्हते त्यांना घर देण्यासाठी आम्ही कायदा केला सनद साठी डॉक्युमेंट्स देण्यासाठी सनद काढून टाकले - आता केवळ प्रीमियम भरले की कोणाचे ऑफिसमध्ये जायचे गरज नाही. सनद आणि येणे घेण्याची गरज नाही. हा निर्णय राज्यातील सगळ्याच आरक्षणासाठी फायदा होणार आहे....पुढच्या काळात अनेक गोष्टी करण्याचा आम्ही प्रयत्न करतो आहे. - क्लिष्ट महसुली कायदे सुधारणा करण्याचा प्रयत्न करतो आहे शेतकऱ्यांच्या शेतात बांधून रस्ते बांधण्यासाठी पांदण रस्ते योजना आम्ही आणली आहे. - विद्यार्थ्यांना डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार सर्टिफिकेट कुठल्या डॉक्युमेंट साठी स्टॅम्प पेपर लागणार नाही - आपसात वाटणी करायची असेल वडिलोपार्जित प्रॉपर्टीचे तर पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर ते होईल मुद्रांक शुल्क लागणार नाही, असे अनेक निर्णय आमच्या खात्याने घेतले आहे. - महसूल विभागात जनतेच्या मालमत्तेचे रक्षण करण्यासाठी निर्णय घेण्यात आले. - सरकारी जागेवरचे बसले आहे.... 2011 च्या आधीच्या लोकांना पट्ट्या वाटप केलं जात आहे. विदर्भातील छोटी जंगल जागेत दोन लाख परिवार होते. त्या घरातील लोकांना वाटप करण्याकरिता पासून खात्याचा प्रवास बघितला तर तीन ते चार कोटी लोकांच्या मालमत्तेचा अनेक वर्षापासून असलेले प्रश्न सोडविण्यात आले आहे. त्यांना लाभ पोहोचविण्याचा आम्ही प्रयत्न केला आहे. - आमच सरकार विकसित महाराष्ट्र करता काम करता आहे. मला विश्वास आहे, पुढच्या काळात महसूल खातं राज्यात तर अग्रगण्य करूच पण देशात आधुनिकरण स्वीकारून आम्ही पुढे जाऊ जे मोजणी खात सुद्धा अपडेट केला जाणार आहे. (नागपूर महानगर पालिका*) नागपूर असो की मुंबई असो भाजप मजबूत राहिल, शिवसेना हा त्याठिकाणी पहिले पासून आमचा नैसर्गिक मित्र म्हणून काम करत आहे. त्यामुळे जिथे भाजप मजबूत आहे, तिथे भाजपला आणि जिथे शिवसेना मजबूत आहेत तिथे शिवसेनेला युती करण्याचा निर्णय वरिष्ठ स्तरावर झाला आहे. त्यामुळे त्यात आता किंतु परंतु करण्याची गरज नाही On पिंपरी चिंचवड - भाजप आणि शिवसेना महायुती आहे, राज्यामध्ये कुछ ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने महायुती अपडेट होते आहे...मात्र अनेक ठिकाणी आमची बोलणी सुरू झाली आहे. भाजप शिवसेनेचे बोलणे सुरू झाल्यानंतर इतर 13 पक्षांसोबत सुद्धा आम्ही बोलणी करणार आहोत. On युवा स्वाभिमान अमरवती - आमच्याकडे युवा स्वाभिमान हा पंधरा वर्षापासून महायुतीचा भाग आहे. रवी राणा यांनी अनेक वेळा भाजपाला पाठिंबा दिला पंधरा वर्षापासून ते मित्र पक्षात आहे. महायुतीचा प्रस्ताव आमच्या सोबत युवा स्वाभिमान शिवसेना याचा आहे, निश्चितपणे आम्ही महायुतीत जाणार आहोत. अमरावती मध्ये महायुतीमध्ये राहणार आहोत. On आदित्य ठाकरे प्रमोट - उद्धवजी जेव्हा मुख्यमंत्री होते. तेव्हाच त्यांनी आपल्या मुलाला प्रमोट केलं होतं. त्यात नवीन काय? वडील जेव्हा मुख्यमंत्री होते, तेव्हाच त्याला प्रमोट केलं त्यात नवीन काय. On पिंपरी - अजित दादांना त्यांचा महापौर व्हावा असं वाटते. आम्हाला भाजपचा व्हावा असं वाटते त्यांचा ते करतात आमचं आम्ही करतो. On संजय राऊत पोस्टर - राज्य निवडणूक आयोगाने आचारसंहिता लावल्यानंतर सगळ्यांनीच आपले पोस्टर काढले. आम्ही आमच्या पोस्टर काढले त्यांनी, काढले नसेल म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली नाही काढले म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. त्यात काही नवीन नाही त्यांनी काढायला पाहिजे....आपापल्या पक्षातील नेत्यांनी आपले पोस्टर काढले पाहिजे. त्यांनी काढले नाही म्हणून त्यांच्यावर कारवाई झाली. On गुलाबराव पाटील - गुलाबराव पाटील त्यांच्या स्वभावाप्रमाणे बोलत असतात मात्र एकनाथ शिंदे मुख्यमंत्री आणि आम्ही बसलो होतो त्यात जो निर्णय व्हायचा तो झालेला आहे. On पिंपरी चिंचवड अजित दादा वक्तव्य - त्यांच्या पक्ष त्यांनी कसा चालवायचा त्यांनी निवडणूक कशी जिंकायची यश पराजय जे व्हायचे ते होईल. निवडणूक निवडणुकीच्या तत्त्वावर लढावी लागते. त्यांना त्यांच्या पक्षाचा अधिकार आहे. त्यांना त्यांचा निर्णय घ्यायचा आहे, त्यांनी काय केलं, यावर मी बोलण्यापेक्षा आमची तयारी काय आहे. 51% मत घेऊन आम्हाला जिंकायचा आहे. महायुतीत आम्ही चांगल्या प्रकारे निवडून येऊ महायुतीला लोकांची पसंती आहे.* On अमित शहावर मुंबई घशात - त्यांना बोलायला काही मुद्दे नाहीये...त्यांना मुंबईच्या विकसित मुंबईचा प्लॅन माहिती नाही... त्यांच्याकडे विकासाचा अजेंडा नाही.... सकाळी झोपेतून उठल्यापासून त्यांचा टोमणे मारायचा कार्यक्रम सुरू होतो....जोपर्यंत चंद्र सूर्य आहे... महाराष्ट्र पासून मुंबईला कोणीही वेगळे करणार नाही, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितला आहे. - काहीतरी दिवसभर टीव्हीवर दिसल पाहिजे चाललं पाहिजे तर काय फेसबुकवर कॉमेंट केले पाहिजे, त्यासाठी ते बोलत असतात.* On पैश्याचा महापूर वाहणार - राऊत - आजपर्यंत त्यांनी तेच धंदे केल्यामुळे त्यांना तेच दिसतं.* On मुंबई दोन्ही भाऊ एकत्र - दोन्ही भाऊ एकत्र येतील हे चांगलं समीकरण आहे. ते का? एकत्र येतात या लोकांना चांगल्या तऱ्हेने माहीत आहे... जनादार संपतो तेव्हा असे समीकरण तयार होतात. ठाकरेकडे व्हिजन काय आहे...इतके वर्ष त्यांच्याकडे मुंबईचा महापौर होता, त्यांनी काय केलं अखेर देवेंद्र फडणीस आणि एकनाथ शिंदे यांना यावं लागलं..* On महाविकास आघाडी वेगवेगळी. - 2014 पूर्वीची मुंबई काढा आणि 2024 मुंबई काढा. आमचा दावा नाही की सर्व बदललं, 2029, 2035 आणि 2047 चा विकसित महाराष्ट्रचा प्लॅन देवेंद्र फडणीस यांनी तयार केला आहे... मुंबई ही जगातील सर्वात उत्कृष्ट आंतरराष्ट्रीय शहर झाल्याशिवाय राहणार नाही...* On ठाकरे - कॉंग्रेस. - त्यांना सर्वांना शुभेच्छा आहे, इंडिया आघाडीचे नाव न घेता वीस-बावीस जण हातवर करून एकत्र आले होते. त्या त्यांना सोबत घेऊन या, या सर्वांनी आलं पाहिजे आम्ही 51% मत घेण्याची तयारी केली आहे. On महायुती जागा वाटप - जागावाटप योग्य ठिकाणी चालू आहे. जेव्हा जागा वाटपाचा फार्मूला तयार होईल. तेव्हा तुम्हाला आनंद होईल.* On दिग्विजय सिंग चिन्ह गोठवले - कायदे काय आहे, केंद्रीय निवडणूक आयोगाने दोन्ही पक्षांना चिन्ह दिल त्यामध्ये काल-परवा नवीन कायदा तयार केला नाही.... संविधानाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे जे कायदे दिले आहेत, त्याच कायद्याने पक्ष चिन्ह त्यांना मिळाला आहे....तुमच्या पक्षातील लोकप्रतिनिधी तुमच्या सोबत किती आहे. याचा कायदा आहे, सुप्रीम कोर्टाचे निकाल केंद्रीय निवडणूक आयोगाची कायदे याचे चिन्ह आहे.. - आम्ही 29 ही महानगरपालिका भाजप महायुती जिंकणार आहे, किती ठिकाणी मौत्रिपूर्ण होईल त्यावेळी भाजप महायुतीचे महापौर राहतील.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 05:50:38
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 16, 2025 05:23:06
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 05:07:25
Nagpur, Maharashtra:સોલાર एक्स्प्लोसिव्ह या नागपुरातील नावाजलेल्या आणि अतिसंवेदनशील स्फोटक निर्माण करणाऱ्या कंपनी च्या परिसरात एका संशयास्पद ड्रोन ने टेहळणी केल्याच्या संशयातून पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे... 9 डिसेंबरच्या संध्याकाळी सात ते आठ वाजताच्या दरम्यान ही घटना घडली आहे... विशेष म्हणजे सोलार एक्सप्लोजिव्ह भारतीय सैन्यासाठी विविध शस्त्र और स्फोटकांची निर्मिती करते... त्यामुळे या घटनेची गांभीर्य वाढले आहे... नऊ तारखेला संध्याकाळी एक अज्ञात ड्रोन सोलार एक्स्प्लोसिव्ह च्या परिसराजवळ उडत असल्याचे लक्षात आल्यानंतर पोलिसांना सूचना देण्यात आली... पोलिसांनी त्यानुसार आजूबाजूच्या गावांमध्ये हे ड्रोन कोणी उडवले याची माहिती घेतली.. मात्र हे ड्रोन आजूबाजूच्या कुठल्याही गावातून उडवण्यात आलेले नाही असे माहित पडल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिसांनी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे... प्रत्यक्षदर्शीनुसार मलकापूर आणि सावंगा गावाच्या हद्दीत हे ड्रोन दिसून आले होते... सोलार एक्सप्लोसिव्ह कंपनीच्या सुरक्षा रक्षकांनी ही हे ड्रोन बघितले. त्यानंतर स्थानिक कोढाळी पोलिस स्टेशनला माहिती देण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी संपूर्ण परिसरात सर्च करत कॉम्बिंग ऑपरेशन राबविले.. मात्र, अनेक दिवस शोध घेऊनही ड्रोन कोणी उडवले याची स्पष्टता आली नसल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्ह्याची नोंद केली आहे...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 16, 2025 04:50:49
Khed, Maharashtra:पुण्याच्या राजगुरुनगर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाईनला गळती लागल्याने रस्त्यालगत जोरदार पाण्याचे फवारे उडू लागले. यावेळी मात्र या पाण्याच्या अपव्ययाकडे लक्ष देण्याऐवजी काही नागरिकांनी याच फवाऱ्यांचा वापर करत आपली वाहने धुण्याची हटके शक्कल लावली. रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांनी थेट पाण्याच्या फवाऱ्यातून जात ‘फ्री कार-वॉश’चा अनुभव घेतला. पाणी अक्षरशः रस्त्यावर वाहत असतानाही हे दृश्य पाहण्यासाठी अनेकांनी गर्दी केली. एकीकडे लाखो लिटर पाणी वाया जात असताना, दुसरीकडे नागरिकांची ही अनोखी आणि चर्चेचा विषय ठरणारी शक्कल राजगुरुनगरमध्ये पाहायला मिळाली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 16, 2025 04:49:30
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 16, 2025 04:47:52
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड आणि मालेगाव तालुक्यांमध्ये सध्या युरिया खताची मोठ्या प्रमाणावर मागणी निर्माण झाली आहे. मात्र उपलब्ध साठा अपुरा पडत असल्याने शेतकऱ्यांना युरिया खत वेळेत मिळत नसल्याचे चित्र दिसून येत आहे.रब्बी हंगामातील पिकांच्या योग्य वाढीसाठी युरिया खत अत्यावश्यक असताना अनेक शेतकरी खतासाठी वणवण फिरत आहेत.चार दिवसांपूर्वी जिल्ह्यात सुमारे ३ हजार ९०० मेट्रिक टन युरिया खताचा साठा दाखल झाला, मात्र वाढलेली मागणी आणि अपुरे नियोजन यामुळे हा साठा अपुरा ठरला.परिणामी अनेक शेतकऱ्यांना खत न मिळाल्याने रिकाम्या हाताने परत जावे लागले.यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून,युरिया खताची वाढती मागणी लक्षात घेता तातडीने अतिरिक्त पुरवठा करावा तसेच योग्य आणि नियोजित पद्धतीने वितरण करावे, अशी जोरदार मागणी शेतकरी वर्गाकडून करण्यात येत आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 16, 2025 04:30:48
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार गट काँग्रेस आणि भाजपाचा जनसुराज्य शक्ती पक्षाला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. मिरजेतील माजी महापौर सह 12 माजी नगरसेवकांनी राष्ट्रवादी अजित पवार गटाची वाट धरली आहे.मिरजेतील काँग्रेस-राष्ट्रवादी शरद पवार गट, जनसुराज्य व भाजपच्या माजी नगरसेवकांनी काल सायंकाळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची पुण्यात भेट घेतली आहे.यावेळी पक्षप्रवेशावर चर्चा झाली असून लवकरच मिरजेत पक्ष प्रवेशाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती आहे.काँग्रेसचे माजी महापौर किशोर जामदार,करण जामदार,राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान आरिफ चौधरी,चंद्रकांत हुलवान,नर्गिस सय्यद,आजम काजी, भाजपाचे शिवाजी दुर्वे यांच्यासह जनसुराज्यशक्ती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा समावेश असून 19 डिसेंबर रोजी या सर्वांचा मिरजेत पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणूकीत राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि भाजपा व जनसुराज्य शक्ती पक्षाला निवडणुकीत मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 16, 2025 04:16:53
Wardha, Maharashtra:वर्ध्याच्या सेलू येथे भरधाव कारची शाळकरी विद्यार्थ्यांना धडक 6 शाळकरी विद्यार्थी जखमी. शिकवणी वर्गातून घरी परत असतांना सेलू येथील पोलीस स्टेशन रोडवर घडली घटना घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद सेलू पोलिसात घटनेची नोंद. अँकर : वर्ध्याच्या सेलू येथे शिकवणी वर्गातून घरी परत जात असतांना एका भरधाव कारने सहा विद्यार्थ्यांना जोरदार धडक दिली,यामध्ये विद्यार्थी जखमी झाले असून संपूर्ण घटना cctv कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे..तेथील उपस्थितानी असलेल्या नागरिकांनी तात्काळ धाव घेत विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल केले. या घटनेची नोंद सेलू पोलिसांनी घेतली आहे.कार चालकासह चारचाकी वाहन जप्त केले आहेय..
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 16, 2025 04:16:26
Shirdi, Maharashtra:Akole News Flash अकोलेकरांचा रेल्वे मार्गासाठी एल्गार , अकोले बंदची हाक.. अकोले तालुक्यातील हजारो नागरीकांचा आज संगमनेर प्रांत कार्यालयावर मोर्चा ... नाशिक - पुणे सेमी हायस्पीड रेल्वे अकोले - संगमनेर मार्गेच न्यावी आणि अकोलेत थांबा मिळावा... नाशिक - शिर्डी शहापुर रेल्वे मार्गासाठी सर्व्हेक्षण व्हावे या दोन मुख्य मागण्या... मागण्यासाठी अकोले बंदला उस्फुर्त प्रतिसाद... या मोर्चात आमदार डॉ.किरण लहामटे , आमदार सत्यजित तांबे , खासदार भाऊसाहेब वाकचौरे , माजी आमदार वैभव पिचड , माजी आमदार सुधीर तांबे यासह सर्व पक्षातील पदाधिकारी होणार सहभागी... नेत्यांसह हजारो नागरिकांचा मोर्चात असणार सहभाग.... अकोले बंदचा आढावा घेत अकोलेकरांशी मोर्चा बद्दल बातचीत के लिये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
Advertisement
Back to top