icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

यवतमाळ के नेताजी मार्केट में अतिक्रमण हटाओ के विरोध में व्यापारी मोर्चा जिला कार्यालय पर धावा

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या नेताजी मार्केट मधील फुटपाथ दुकानदारांवर सुरू असलेल्या अतिक्रमण हटाव मोहिमेविरोधात विदर्भ अन्याय निवारण समितीच्या क्रांती राऊत यांच्या नेतृत्वात अतिक्रमणधारक व्यापाऱ्यांचा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला. मोर्चात व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभाराविरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र नाराजी व्यक्त केली. "आधी पुनर्वसन, मगच कारवाई!" अशी ठाम भूमिका मोर्चेकऱ्यांनी घेतली. मोर्चात शेकडो अतिक्रमणधारक तसेच व्यापारी व त्यांच्या कुटुंबीयांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. "यवतमाळ शहरातील शासकीय भूखंड बिल्डर लॉबीला विकण्यासाठी भूमाफियांच्या संगनमताने डाव आखला जात आहे," असा खळबळजनक आरोप यावेळी व्यापारी वर्गाकडून करण्यात आला. नेताजी मार्केटमधील ४०-५० वर्षांपासून व्यवसाय करणाऱ्या शेकडो लघु दुकानदारांच्या उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला असून, सुमारे २०० कुटुंबे आणि ३०० हून अधिक बेरोजगार तरुण यावर अवलंबून आहेत. अशा परिस्थितीत कोणतेही पुनर्वसन न करता थेट बुलडोजर कारवाई करणे अमानवी असल्याचा आरोप करण्यात आला.
0
0
Report

पंढरपुर की विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति का रासायनिक लेपन अगले आदेश तक रोक

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी च्या मूर्तीस प्राणप्रतिष्ठापना केली आहे वारकऱ्यांच्या भावनेनुसार मूर्ति मध्ये प्राण आहेत त्यामुळे या मूर्ति ला रासायनिक लेप लावणे चुकीचा आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंदिर महासंघाने याबाबत पंढरपूर जिल्हा व सत्र न्यायालयात लेपन प्रक्रिया थांबवण्याबाबत याचिका दाखल केली होती. आज या याचिकेचा निकाल आला असून पुढील आदेश येईपर्यंत ही लेपन प्रक्रिया करू नये असे न्यायालयाने म्हटले आहे. उज्जैन महाकालेश्वर मंदिर येथील सर्वोच्च न्यायालयाच्या एका निकालाचा आधार घेत महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या वकिलांनी आपला युक्तिवाद न्यायालयासमोर केला त्या बाबी ऐकून घेतल्यानंतर या लेपन प्रक्रियेला पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. याबाबत मंदिर समितीच्या कार्यकारी अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता अद्याप आपल्याकडे कोणतीही प्रत प्राप्त झालेली नाही त्यामुळे ते प्राप्त झाल्यावर आपण याबाबत निर्णय घेऊ असे त्यांनी सांगितले आहे. ---- Byte - धनंजय रानडे , वकील रामकृष्ण वीर, वारकरी पाईक संघ गणेश लंके याचिका कर्ते राजेंद्र शेळके, कार्यकारी अधिकारी
0
0
Report
Advertisement

खेडशी में डंपर ने बाइक को टक्कर दे दी, महिला की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडशी येथे डंपरने दुचाकीला उडवले; डंपरखाली सापडून महिला ठार अँकर मुंबई - गोवा महामार्गवरील हातखंबा ते रत्नागिरी मार्गावर खेडशी येथे सोमवारी सकाळी भीषण अपघात घडला. भरधाव येणाऱ्या डंपरने समोर असलेल्या दुचाकीला जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवर असलेल्या जाकादेवी येथील पांचाळ कुटुुंबापैकी महिला डंपर खाली सापडून ठार झाली आहे. अपघातानंतर डंपर महामार्गावरून थेट दहा फूट खाली कोसळला. याच डंपर खाली सापडून महिला ठार झाली. अपघातानंतर या ठिकाणची वाहतूक विस्कळीत झाली होती. या अपघातापूर्वी याच ठिकाणी रिक्षाचा देखील अपघात झाला होता.
0
0
Report
Advertisement

ठाणे: सुलेखा चौहान के जाति प्रमाणपत्र मामले में कार्रवाई के आदेश

Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक पाच मधील बहुचर्चित बिनविरोध निवडून आलेल्या शिंदे शिवसेनेच्या नगरसेविका सुलेखा चव्हाण यांचे नगरसेवक पद धोक्यात.. बोगस जात प्रमाणपत्र बाबत धुळे जात पडताळणी विभागाने सुलेखा चव्हाण यांचे आदिवासी जात प्रमाणपत्र अवैध ठरवले असून ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला सदरची घटना निदर्शनात आणून देत कारवाईचे आदेश देखील दिले आहे.. लकी जाधव अखिल भारतीय विकास परिषद राष्ट्रीय युवक अध्यक्ष यांनी ही घटना उघडकीस आणली असून येणाऱ्या काळात कारवाई न झाल्यास शिंदे सेना व ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय विरोधात आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले... या बाबत लकी जाधव यांना ठाकरेंच्या सेनेने देखील पाठिंबा दिला आहे... केदार दिघे UBT ठाणे जिल्हा प्रमुख
0
0
Report

टीडीसीसी चुनाव प्रचार के बीच हितेंद्र ठाकूर ने हार्दिक राऊत पर तीखा हमला

Vasai-Virar, Maharashtra:टीडीसीसी बँणडणूक : सहकार पॅनलच्या सभेत हितेंद्र ठाकूरांचा संताप ठाणे-पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (टीडीसीसी) निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचला असून राजकीय वातावरण तापले आहे. वसई येथे झालेल्या सहकार पॅनलच्या प्रचार सभेत बहुजन विकास आघाडीचे प्रमुख व माजी आमदार हितेंद्र ठाकूर यांनी पक्षाशी बंडखोरी करून विरोधी पॅनलमधून निवडणूक लढवणारे माजी नगरसेवक हार्दिक राऊत यांच्यावर तीव्र टीका केली. “ज्यांना आपण सर्व काही दिले, तीच माणसे आज विरोधात उभी आहेत,” असे म्हणत ठाकूर यांनी राऊत यांच्यावर मतांसाठी कार्यकर्त्यांकडे याचना केल्याचा आरोप केला. तसेच “जे गेले ते मेले, आता कोणतीही तडजोड नाही,” असा इशारा देत त्यांनी भर सभेतच हार्दिक राऊत यांची पक्षातून थेट हकालपट्टी करण्याचे आदेश ज्येष्ठ नेते काशिनाथ पाटील यांना दिले. दरम्यान, ठाकूरांच्या आदेशानंतर राऊत यांच्यावरील कारवाईचे पत्र लवकरच काढण्यात येणार असल्याची माहिती काशिनाथ पाटील यांनी दिली. या घडामोडींमुळे टीडीसीसीची निवडणूक अधिकच प्रतिष्ठेची बनली आहे. बाईट- हितेंद्र ठाकूर,
0
0
Report

ओमराजे के बगावत से महाविकास आघाड़ी को बड़ा झटका; बसवराज पाटील की जीत

Dharashiv, Maharashtra:ओमराजेंच्या बंडाचा महाविकास आघाडीला मोठा फटका? विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे तब्बल 150 फुटली . भाजपाचे बसवराज पाटील मराठवाड्यात सर्वाधिक मताधिकांनी विजयी. धाराशिव-बीड-लातूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील यांनी तब्बल 720 मतांच्या विक्रमी फरकाने विजय मिळवला आहे. बसवराज पाटील यांना 844 मते, तर महाविकास आघाडीचे काँग्रेस उमेदवार महेश देशमुख यांना केवळ 125 मते मिळाली. या निकालानंतर महाविकास आघाडीची सुमारे 150 मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या महायुतीत प्रवेशानंतर ही क्रॉस व्होटिंग झाल्याचा दावा महायुतीकडून केला जात असून, ओमराजेंच्या निर्णयाचा हा पहिला राजकीय परिणाम मानला जात आहे. मात्र, या मतफुटीबाबत महाविकास आघाडीतील नेते अद्याप अधिकृत भूमिका घेण्यास टाळाटाळ करत आहेत. आता या निकालानंतर धाराशिवच्या राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement

येवला में अवैध मुरुम उत्खनन के विरोध में अधिकारी घायल, मामला दर्ज

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पारेगाव येथे गावालगतच्या तळ्यात सुरू असलेल्या कथित अवैध मुरूम उत्खनन व वाहतुकीची माहिती मिळाल्यानंतर कारवाईसाठी गेलेल्या निवासी नायब तहसीलदार आणि ग्राम महसूल अधिकाऱ्याला मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी येवला शहर पोलीस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेच्या निषेधार्थ येवला तालुका तलाठी संघ तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी एकदिवसीय कामबंद आंदोलन केले. हल्लेखोरांविरुद्ध कठोर कारवाई करावी, तसेच महसूल कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची हमी द्यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. या घटनेमुळे महसूल विभागात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0
0
Report

बीड में अवैध रेत माफियाओं ने सरपंच नारायण शिंदे पर हमला, ग्रामीणों ने सड़क पर एक घंटे रास्ता रोको

Beed, Maharashtra:बीड: वाळू माफियांचा सरपंचावर जीवघेणा हल्ला ; आरोपींच्या अटकेसाठी ग्रामस्थांचा राष्ट्रीय महामार्गावर एक तास रास्ता रोको. - संतोष देशमुखांसारखाच तुझा मर्डर करू अशी धमकी देत घरात घुसून हल्ला.. ANC- अवैध वाळू उपशाविरोधात सातत्याने आवाज उठवणारे नागझरी गावचे सरपंच नारायण शिंदे यांच्यावर वाळू माफियांनी घरात घुसून हल्ला केल्याच्या घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली आहे. हल्लेखोरांना अद्याप अटक करण्यात पोलिसांना यश न आल्याने संतप्त ग्रामस्थांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर तब्बل एक तास रास्ता रोको आंदोलन करत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. गेल्या काही महिन्यांपासून गोदावरी नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा सुरू असल्याची तक्रार सरपंच नारायण शिंदे यांनी वारंवार प्रशासनाकडे केली होती. या तक्रारींचा राग मनात धरून वाळू माफियांनी त्यांच्यावर घरात घुसून हल्ला केला. हल्ल्यानंतर गुन्हा दाखल होऊनही आरोपींना अटक करण्यात आली नसल्याने ग्रामस्थांचा रोष अनावर झाला. आरोपींना तात्काळ अटक करावी आणि वाळू माफियांची मुजोरी कायमची थांबवावी, या मागण्यांसाठी ग्रामस्थांनी धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन छेडले. या आंदोलनामुळे महामार्गावरील वाहतूक जवळपास एक तास ठप्प झाली होती. परिणामी दोन्ही बाजूने सुमारे तीन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. दरम्यान आम्हाला निवेदन प्राप्त झाले असून जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची माहिती दिली आहे अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. बाईट- नारायण शिंदे, सरपंच बाईट- सुभाष कट्टे, नायब तहसीलदार
0
0
Report

वाशिम में भारी बारिश ने किसानों को दी बड़ी राहत, खरीफ की उम्मीद जगी

Washim, Maharashtra:वाशिम: आज शहरासह जिल्ह्यात आज अनेक ठिकाणी जोरदार पावसाने हजेरी लावली. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.विशेषतःहळद लागवड केलेल्या शेतकऱ्यांसाठी हा पाऊस फायदेशीर ठरणार असून पिकांना नवसंजीवनी मिळणार आहे.गेल्या काही दिवसांपासून वाढलेल्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.मात्र आज झालेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून नागरिकांना उकाड्यापासून मोठा दिलासा मिळाला आहे.शहरासह ग्रामीण भागात समाधानाचे वातावरण पाहायला मिळत आहे.या पावसामुळे शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या असल्या तरी खरीप हंगामातील पेरण्यांना वेग मिळण्यासाठी आणखी समाधानकारक पावसाची आवश्यकता आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top