445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
स्वामी मुक्तानंद विद्यालय के शिक्षक संग्रामसिंग जाधव रेल हादसे में निधन
Yeola, Maharashtra:येवला शहरातील स्वामी मुक्तानंद विद्यालयात कार्यरत असलेले शिक्षक संग्रामसिंग तीरसिंग जाधव यांना रेल्वेची धडक बसून यात त्यांचा जागीच मृत्यू झाला संग्राम सिंग जाधव हे स्वामी मुक्तानंद विद्यालयात हसतमुख व मनमिळाऊ स्वभावाचे शिक्षक म्हणून सर्वांना परिचित होते त्यांच्या मृत्यूमुळे मुक्तानंद विद्यालयात तसेच पटेल कॉलनी परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे0
0
Report
50 से अधिक नवयुवकों ने भाजप में प्रवेश कर मोदी के समर्थक बनने का संकल्प लिया
Yeola, Maharashtra:येवला व परिसरातील सुमारे 50 पेक्षा अधिक नवयुवकांनी आपल्या राजकीय जीवनाची सुरुवात भारतीय जनता पार्टी पासून करण्याचा निर्णय घेत शासकीय विश्रामगृह येवला या ठिकाणी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यक्षमतेवर विश्वास ठेवून भाजपमध्ये प्रवेश केला या प्रसंगी भारतीय जनता पार्टीचे नाशिक उत्तर जिल्हा महामंत्री आनंद शिंदे, भाजपा येवला शहराध्यक्ष मिननाथ पवार, तालुका अध्यक्ष संतोष काटे, ज्येष्ठ नेते श्रावण दादा जावळे आदी मान्यवर उपस्थित होते0
0
Report
नागपुर जिला ग्रामीण कांग्रेस के अध्यक्ष पद पर नियुक्त: सलील देशमुख
Nagpur, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार पक्षाचे नेते सलील देशमुख यांची नागपूर जिल्हा ग्रामीण पक्षाच्या अध्यक्षपदी अधिकृत नियुक्ती करण्यात आलीय. मुंबई येथे पक्षाचे जेष्ठ नेते आ. जयंत पाटील यांच्या हस्ते सलील देशमुख यांना नियुक्तीचे अधिकृत पत्र प्रदान करण्यात आले. सलील देशमुख यांनी यापूर्वी राष्ट्रवादी युवक काँग्रेसमध्ये विदर्भ प्रमुख राहिलेय. सलील देशमुख यांनी नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून काम केलेयनागपूर जिल्ह्यात पक्ष मजबूतीकडे त्यांना लक्ष केंद्रित करावे लागेल.0
0
Report
Advertisement
चिकलठाणा जमीन घोटाला: एमआईएम नगरसेवक समेत 13 के खिलाफ मामला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:चिकलठाणा जमीन घोटाळा; एमआयएम नगरसेवकासह १३ जणांविरुद्ध गुन्हा दाखल. बनावट खरेदीखत्ताद्वारे ९५ प्लॉट हडपल्याचा आरोप; कोट्यवधींच्या जमीन व्यवहाराची पोलिसांकडून चौकशी सुरू. ANC : छत्रपती संभाजीनगरातील चिकलठाणा परिसरातील गट क्रमांक ६३० मधील ९५ हून अधिक प्लॉटमालकांची कोट्यवधी रुपयांची जमीन बनावट खरेदीखताच्या माध्यमातून हडपल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणात एमआयएमचे नगरसेवक काकासाहेब दामोधर काकडे, एमआयएम नगरसेविकेचे पती अमजद खान तसेच मूळ जमीनमालकाच्या आठ वारसांनी संगनमत करून कट रचल्याचा आरोप करण्यात आला आहे. फसवणुकीची बाब निदर्शनास आल्यानंतर प्लॉटमालकांनी पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार एमआयडीसी सिडको पोलिस ठाण्यात संबंधित १३ जणांविरुद्ध फसवणूक, बनावट कागदपत्रांचा वापर और अनधिकृत ताबा मिळवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, या बहुचर्चित जमीन घोटाळ्याचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
पश्चिम विदर्भ में किसानों की आत्महत्याएं: जनवरी–मई में 313 मामले, यवतमाळ में सबसे अधिक
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भात जानेवारी ते मे या 5 महिन्यात 313 शेतकऱ्यांच्या आत्महत्या; सर्वाधिक आत्महत्या यवतमाळ जिल्ह्यात अँकर :- पश्चिम विदर्भात शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न पुन्हा एकदा गंभीर बनला आहे. जानेवारी ते मे या पाच महिन्यांत तब्बल 313 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. यामध्ये यवतमाळ जिल्ह्यात सर्वाधिक 105 आत्महत्या नोंदवल्या गेल्या आहेत. धक्कादायक बाब म्हणजे वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशनकडून अनेक आत्महत्याग्रस्त कुटुंंबांना भेटीही देण्यात आलेल्या नाहीत. तर 313 प्रकरणांपैकी फक्त 76 कुटुंबे मदतीसाठी पात्र 56 प्रकरणे अपात्र ठरली आहेत. 181 प्रकरणे अद्यापही प्रलंबित असून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मिशनच्या कार्यपद्धतीवर यामुळे गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. एकूण पश्चिम विदर्भातील शेतकरी आत्मत्यांना - 313 यवतमाळ - 105 अमरावती - 61 अकोला - 61 वाशिम - 46 बुलढाणा - 40 लाभासाठी पात्र - 76 अपात्र - 56 प्रलंबित - 1810
0
Report
छत्रपती संभाजीनगर में प्रतिबंधित प्लास्टिक के खिलाफ भारी एक्शन; 25 हजार जुर्माने
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने प्रतिबंधित प्लास्टिकविरोधात धडक मोहीम राबवत एक मोठी आंतरजिल्हा कारवाई केली आहे. जिल्हा अहिल्यानगर येथील एका प्लास्टिक दुकानदाराने छत्रपती संभाजीनगरमध्ये पाठवलेले ५० किलो प्रतिबंधित प्लास्टिक जप्त करत मनपाने संबंधिताला २५,००० रुपयांचा मोठा दंड ठोठावला आहे. मनपा केली काही दिवस सातत्याने कशा कारवाई करत आहे यापुढेही प्लास्टिक व्यापाऱ्यांवर कारवाई सुरूच राहील असा इशारा मनपाने दिला आहे0
0
Report
Advertisement
गंगापूर तालुक्या देवळी में बिजली के जोरदार झटके से 70 वर्षीय महिला की मौके पर मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गंगापूर तालुक्यातील देवळी येथे विजेचा जोरदार धक्का लागून एका ७० वर्षीय वृद्ध महिलेचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घराच्या खिडकीत वीजप्रवाह उतरल्याने वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झालाय, छायाबाई चंद्रभान तायडे वय ७० असे मृत महिलेचे नाव असून, या प्रकरणी शिल्लेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.0
0
Report
गंगापुर तालुक के तुर्काबाद-खराडी-घाणेगाव रस्ते की दयनीय स्थिति, बारिश से सुधार की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील तुर्काबाद खराडी ते घाणेगाव या रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे आणि चिखल साचल्याने विद्यार्थी, शेतकरी, ग्रामस्थांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. पावसामुळे रस्त्याची अवस्था आणखी बिकट झाली असून, वाहतूक धोकादायक बनली आहे. वारंवार मागणी करूनही प्रशासन आणि लोकप्रतिनिधींनी या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. या रस्त्याचा व्हिडिओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल होत असून, प्रशासन, आमदारांनी तातडीने लक्ष घालून किमान पावसाळ्यात तरी रस्त्याची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
मुकुंदवाडी में 15 वर्षीय ने 50 वर्षीय को चाकू से हत्या कर दी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:15 वर्षाच्या अल्पवयीन मुलाकडून 50 वर्षांच्या व्यक्तीची चाकूने भोसकून हत्या घराच्या ओट्यावर बसण्यावरून आणि तरुणांना वाईट संगतीपासून दूर राहण्याचा सल्ला देण्यावरून एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलाने ५० वर्षांच्या व्यक्तीची चाकूने भोसकून निघृण हत्या केली. संतापलेल्या मुलाने पुन्हा त्यांच्या पोटात ३ ते ४ वेळा चाकू भोसकला. हा प्रकार छत्रपती संभाजीनगर शहरातील मुकुंदवाडीमध्ये घडला. रोहिदास दत्तू खकाळ असे या घटनेतील मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत रोहिदास खकाळ मुकुंदवाडी भागात नशापाणी करणाऱ्या टवाळखोर टोळक्यांचा वावर वाढला आहे. रोहिदास खकाळ हे रात्रीच्या वेळी आपल्या घराबाहेर ओट्यावर मित्रांसोबत गप्पा मारत बसत असत. घराच्या ओट्यावर ज्येष्ठ नागरिक बसत असल्याने टवाळखोरांना तेथे फिरण्यास अडचणी येत होत्या. तसेच रोहिदास हे या तरुणांना वाईट संगतीत न जाण्याचा सल्लाही देत असत. याशिवाय खकाळ हे ओट्यावर बसून सिगारेट ओढत असल्याने संबंधित मुलाला त्यांचा राग येत होता. यातूनच त्यांच्यात सातत्याने खटके उडत होते.0
0
Report
Advertisement
पुणे के जुन्नर में भारी बारिश से सोयाबीन फसल भारी नुकसान
Barav, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे सोयाबीन पिकाचे अतोनात नुकसान झाले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणची पिके वाहून गेली आहेत, तर काही ठिकाणी शेतांना तळ्याचे स्वरूप आल्याने पिके कुजण्याच्या मार्गावर आहेत. यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. मात्र, शेतातून पाण्याचा निचरा होत नसल्याने सध्या पेरणी करणेही अशक्य झाले असून, बियाणे आणि मजुरीचा खर्च वाया गेल्याने शेतकरी हवालदील झालाय याचाच नुकसान ग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.प्रतिनिधी हेमंत चापुडे0
0
Report
भंडारा अस्पताल के ऑर्थोपेडिक विभाग के करोड़ों के घोटाले, शासन की चुप्पी भारी
Bhandara, Maharashtra:Pravin Tandekar Bhandara slug - 1107_BHA_HOSPITAL_SCAM FILE - 3 VIDEO, 6 IMAGE भण्डारा जिलेया सामान्य रुग्णालयात आर्थोपेडिक विभागातील कोट्यवधींच्या साहित्य खरेदी घोटाळ्याचा आरोप... चौकशीत अनियमितता निष्पन्न, तरीही दोन वर्षांपासून कारवाईचा पत्ता नाही...! Anchor :- भण्डारा जिला सामान्य रुग्णालय पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. यावेळी आर्थोपेडिक विभागातील साहित्य खरेदीत कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्याचा आरोप समोर आला आहे. २०२० ते २०२३ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत साहित्य खरेदी करताना नियमांना हरताळ फासल्याचा आरोप आहे. विशेष म्हणजे, चौकशी समितीने अनियमितता झाल्याचा अहवाल दिल्यानंतरही दोन वर्षांपूर्वी संबंधितांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे अखेर या प्रकरणात पाणी मुरतंय कुठे? असा सवाल उपस्थित होत आहे. VO :- भण्डारा जिल्हा सामान्य रुग्णालयातील आर्थोपेडिक विभागात २०२० ते २०२३ या कालावधीत महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत करण्यात आलेल्या साहित्य खरेदीवर गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आरोप असा की, ऑनलाईन ई-टेंडर प्रक्रिया राबविण्याऐवजी लिफाफा पद्धतीचा अवलंब करून विशिष्ट ठेकेदाराला लाभ मिळेल अशा पद्धतीने प्रक्रिया पार पाडण्यात आली. याचबरोबर बाजारभावापेक्षा तब्बल तीन ते चार पट अधिक दराने साहित्य खरेदी करण्यात आल्याचाही आरोप आहे. विशेष म्हणजे, २०२४ मध्ये याच प्रकारचे साहित्य त्यापेक्षा खूपच कमी दरात खरेदी करण्यात आल्याने जुन्या खरेदी प्रक्रियेवर संशय अधिकच गडद झाला आहे. माहिती अधिकारातून संबंधित कागदपत्रे समोर आल्यानंतर या संपूर्ण प्रकरणाची तक्रार करण्यात आली. त्यानंतर चार वरिष्ठ डॉक्टरांची चौकशी समिती नियुक्त करण्यात आली. समितीने सादर केलेल्या अहवालात खरेदी प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचे नमूद करण्यात आले. मात्र, चौकशी अहवाल सादर होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी उलटूनही संबंधित अधिकारी किंवा डॉक्टरांवर कोणतीही कारवाई झालेली नाही. त्यामुळे या प्रकरणात नेमकं कोणाला अभय दिलं जात आहे? दोषींना संरक्षण कोण देत आहे? आणि चौकशी अहवाल धूळ खात का पडला आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत. रुग्णांच्या उपचारासाठी असलेल्या जनआरोग्य योजनेतील निधीवरच डल्ला मारल्याचा आरोप होत असताना प्रशासनाची ही शांत भूमिका संशयाला अधिक खतपाणी घालत आहे. आता या प्रकरणात आरोग्य विभाग आणि शासन दोषींवर कठोर कारवाई करणार की हा घोटाळाही फाईलमध्येच गाडला जाणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. BYTE :- अजय मेश्राम, तक्रारदार0
0
Report
नगर–दौंड रोड पर खंडाळा के पास ट्रकों की भिड़ंत, आग लग गई
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नगर दौंड रोड वर खंडाळा येथे दोन्ही ट्रकची सामोरा-समोर धडक होऊन भीषण अपघात झाला. सकाळी 6 वाजता ट्रकचा हा भीषण अपघात झाला. अपघातानंतर दोन्ही ट्रकने पेट घेतला; जवळच राहत असलेल्या नागरिकांनी ट्रकमधील दोन्ही चालकांना बाहेर काढत त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल केले. अपघाताचे कारण अस्पष्ट आहे; दरम्यान अग्निशमन विभागाचे दोन बंब घटनास्थळी दाखल झाले असून आग विझवण्यात आली. नगरहून दौंडच्या दिशेने जाणाऱ्या ट्रकमध्ये लोखंडी सळई होत्या, तर दौंडकडून नगरकडे जाणाऱ्या ट्रकमध्ये कापड असल्याने ट्रकने पेट घेतला. दरम्यान अपघातात जखमी झालेल्या चालकांना रुग्णालयात दाखल करून घेतले जात नव्हते असा आरोप माजी जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी केले.0
0
Report
Advertisement
अतिवृष्टि ने पेण के गणेश मूर्ति उद्योग पर भारी नुकसान डाला
Chendhare, Maharashtra:अतिवृष्टी का गणेश मूर्ति उद्योग पर बड़ा असर पड़ा। पेण में गणेश मूर्तियाँ भिजने से नुकसान हुआ। कर्ज कैसे चुकायेंगे, मूर्तिकारों की चिंता है। मूर्तियों की कमी होने के डर से भी चिंता बढ़ रही है। पेण के ग्रामीण क्षेत्रों में गणेश मूर्ति उद्योग प्रभावित हुआ। बारिश के पानी में मूर्तियाँ भीगीं, जिससे मूर्तिकारों को बड़ा नुकसान उठाना पड़ा। कैसे कर्ज चुकायें और गणेश भक्तों की मांग पूरी कैसे हो, यह चिंता है। कळवे के मूर्तिकार कैलास पाटिल से हमारे प्रतिनिधि प्रफुल्ल पवार ने बात की।0
0
Report
वैजापुर के इंदिरानगर में ट्रैक्टर दुर्घटना, घर पर चढ़ने से नुकसान, कोई जानहानि नहीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वैजापूर शहरातील इंदिरानगर परिसरात एक धक्कादायक अपघात घडला. भरधाव ट्रॅक्टर थेट एका घरावर चढल्याने घरासमोर उभी असलेली दुचाकी आणि घराचे नुकसान झाले. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले, तरी ट्रॅक्टर चालकाने धोकादायकरित्या वाहन चालवून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण केल्याचा आरोप स्थानिकांनी केला असून, संबंधितावर कठोर कारवाईची मागणी होत आहे.0
0
Report
कामोणे के पशुवैद्यकीय दवाखाने की इमारत जर्जर, स्लैब टूटे; लोग मरम्मत की तत्काल मांग
Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यातील कामोणे येथील पशुवैद्यकीय दवाखान्याची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून, या दवाखान्याच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली. सुदैवाने, या वेळी दवाखान्यात कोणीही नसल्याने मोठी दुर्घटना टळली. सध्या या दवाखान्याची अवस्था अत्यंत दयनीय झाली असून, इमारतीचे प्लास्टर आणि स्लॅबचे तुकडे वारंवार खाली पडत आहेत. यामुळे येथे येणारे पशुपालक आणि जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या दिवसात ही इमारत अधिकच धोकादायक बनली आहे. या परिसरातील शेतकऱ्यांसाठी हा एकमेव पशुवैद्यकीय दवाखाना असल्याने, प्रशासनाने तत्काळ दखल घेऊन इमारतीची डागडुजी करावी किंवा नवीन इमारत बांधावी, अशी मागणी कामोणे ग्रामस्थांनी आणि पशुपालकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
