445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सात महिन्यात ध्वस्त सड़क: ठेकेदार पर कठोर कार्रवाई की मांग
Nashik, Maharashtra:या रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अपघातांचा धोका वाढला असून शाळकरी विद्यार्थी, रुग्ण, गर्भवती महिला तसेच सर्वसामान्य प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एखादा मोठा अपघात होऊन जीवितहानी झाल्यानंतरच प्रशासन जागे होणार का? असा सवाल नागरिकांनी केला आहे. या रस्त्याची चौकशी करून दोषी ठेकेदार व संबंधित अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, निकृष्ट काम करणाऱ्या ठेकेदाराला काळ्या यादीत टाकावे, सदर रस्ता महिन्याभरात नवीन बनवून द्यावा अन्यथा उपोषणाचा इशारा उपसरपंच जयराम भोये (मनखेड) यांनी दिला आहे.0
0
Report
शिरूर सांसद कोल्हे के गणेश उत्सव की मांडणी ने राजनीतिक हलचल मचा दी
Shirur, Maharashtra:शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या जनसंपर्क कार्यालयातील बाप्पाचा देखावा सध्या चांगलाच चर्चेत आलाय. दरवर्षीप्रमाणे यंदाही गणेशोत्सवाचा उत्साह राज्यभरात पाहायला मिळतोय; पण खासदार कोल्ह्यांच्या कार्यालयात बसवलेल्या बाप्पाच्या मांडणीने राजकीय वर्तुळासह सर्वांचंच लक्ष वेधून घेतलं आहे. बाप्पाच्या मूर्तीशेजारीच शिरूरची ओळख असणारी पारंपरिक बैलगाडी साकारण्यात आली असून, त्यावर 'मी साहेबांसोबत' अशी ठळक अक्षरात पाटी लावण्यात आली आहे. इतकंच नाही, तर बैलगाडीवर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचा फोटोही सन्मानाने ठेवण्यात आलाय. शिरूर पट्ट्यातील बैलगाडी संस्कृती आणि साहेबांप्रती असलेली निष्ठा यांचं दर्शन घडवणारा हा देखावा पाहण्यासाठी सध्या कार्यकर्त्यांची आणि नागरिकांची मोठी गर्दी होत आहे.0
0
Report
बारिश ने किसानों की हालत खराब की; सूखा घोषित कर मदद की मांग
Buldhana, Maharashtra:पावसाने घात केला! शेतकऱ्यांच्या तोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावला; कोरडा दुष्काळ जाहीर करून मदतीची मागणी0
0
Report
Advertisement
अकोला के कानशिवणी में विवाद के बाद हवा में गोली चलाकर भीड़ हटाई गई
Akola, Maharashtra:गाडी उभी करण्याच्या कारणावरून झालेल्या वादानंतर जमलेली गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार केल्याची घटना अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथे घडली आहे. प्रवीण हुंडीवाले यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याची माहिती आहे. त्यांच्यासोबत असलेल्या पोलीस अंगरक्षकानेही हवेत गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अकोला जिल्ह्यातील कानशिवणी येथील गजानन महाराज चौकात हा प्रकार घडला. प्रवीण हुंडीवाले हे चौकात आले असताना गाडी उभी करण्याच्या कारणावरून काही नागरिकांसोबत त्यांचा वाद झाल्याची माहिती आहे. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक जमा झाले. जमलेली गर्दी अरेरावी करत अंगावर येत असल्याने भीतीची परिस्थिती निर्माण झाली त्यामुळे गर्दी पांगवण्यासाठी हुंडीवाले यांनी त्यांच्या परवानाधारक रिव्हॉल्व्हरमधून हवेत एक गोळी झाडल्याची माहिती त्यांच्या अंगरक्षकाने पोलिसांना दिली आहे. दरम्यान, हुंडीवाले यांच्या सोबत असलेल्या पोलीस अंगरक्षकानेही हवेत एक गोळी झाडल्याचे सांगण्यात येत आहे. त्यानंतर जमलेली गर्दी तेथून निघून गेली. घटनची माहिती मिळताच बोरगाव मंजू पोलीसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. त्यानंतर प्रवीण हुंडीवाले हे त्यांच्या अंगरक्षकासह बोरगाव मंजू पोलीस ठाण्यात पोहोचले आणि तक्रार दाखल केली. हुंडीवाले यांच्या जीवाला धोका निर्माण झाल्याने गर्दी पांगवण्यासाठी हवेत गोळीबार करावा लागल्याची माहिती त्यांच्या अंगरक्षकाने पोलिसांना दिली आहे. मात्र, नेमका वाद कशामुळे झाला आणि हवेत गोळीबार करण्याची परिस्थिती कशी निर्माण झाली, याचा तपास बोरगाव मंजू पोलीस करत आहेत.0
0
Report
नागपुर के प्रताप नगर का महागणपती स्वप्ननगरी थीम 'ड्रीम लैंड' में विराजमान
Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपुरातील प्रतापनगरचा महागणपती यंदा स्वप्ननगरीत विराजमान झालाय.. प्रथम फाउंडेशनच्या यां गणेशोत्सव मंडळाने हा स्वप्ननगरी देखावा साकारलेला आहे. यापूर्वी चांद्रयान आणि अवतार असे देखावे साकारणाऱ्या या गणेशोत्सव मंडळांनी यंदा याच थीमवर आधारित भव्य सायंटिफिक संकल्पनेतून हा देखावा साकारलाय... महत्त्वाचं म्हणजे याकरता पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर केलाय... ज्या स्वप्ननगरीत बाप्पा विराजमान झाले तिथून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी बाईट --- सारंग कदम,प्रताप नगर चा महागणपती (121 केलाय... दुसऱ्या विंडोमध्ये शॉटस चालवता येईल)0
0
Report
गणित शिक्षक अभाव पर तालाठोको आंदोलन, पालक छात्र आक्रोश
Bhandara, Maharashtra:गणित शिक्षक अभाव के कारण साकरीटोला जिला परिषद हाई स्कूल व विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय में गणित विषय की नियमित शिक्षिका अभाव के कारण विद्यार्थियों के शैक्षणिक नुकसान के विरोध में संतप्त पालक, विद्यार्थी, शाला सुधार समिती व व्यवस्थापन समिती ने गुरुवार शाळेला कुलूप लगाकर ‘तालाठोको’ आंदोलन किया। आगामी पंधरा दिनों में प्रथमिक सत्र परीक्षा होने के कारण विद्यार्थियों की गणित विषय की तैयारी का प्रश्न गंभीर बना था। गणित विषय के लिए नियमित शिक्षक उपलब्ध न होने के कारण विशेषतः नववी व दहावी के विद्यार्थियों के शैक्षणिक नुकसान का आरोप पालकों ने लगाया। बार-बार मांग करने के बावजूद समस्या नहीं सुलझी, इस कारण पालक व शाला व्यवस्थापन समिती ने आंदोलन का रास्ता अपनाया。0
0
Report
Advertisement
अकलूज में दूध भेसळी के विरोध में सामाजिक जागरूकता का अनोखा प्रदर्शन
Pandharpur, Maharashtra:गौराई समोर सोलापूर जिल्ह्यातील अकलूज मध्ये मोहनराव देशमुख कुटुंबीयांनी दूध भेसळीचा प्रबोधनात्मक देखावा तयार केला आहे. गौराई समोर अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांच्या कामाची झलक पाहायला मिळत आहे. देखाव्यात शेतात राबणाऱ्या दूध उत्पादन चांगले व्हावे यासाठी जनावराची देखभाल करणाऱ्या शेतकरी महिला. आणि जनावरांचा गोठा तसेच अन्न औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांचे अभार मानणारी गायीची प्रतिमा सोबत अन्न औषध प्रशासन विभागाचे अधिकारी आहेत. हा देखावा पाहण्यासाठी अनेक महिलांची गर्दी होत आहे.0
0
Report
पंढरपूर-फलटण रेलवे मार्ग पर किसानों को चौगुना मुआवजा देने की मांग
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर फलटण रेल्वे मार्गात बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांकडे केली. पंढरपूर फलटण या रेल्वे मार्गासाठी माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी सातारा सोलापूर जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक घेतली. या बैठकीमध्ये बाधित शेतजमीन तसेच रहिवासी भागाची माहिती घेण्यात आली. यानंतर माजी खासदार रणजीत सिंह नाईक निंबाळकर यांनी केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधत प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना चालू बाजारभावाच्या चौपट दराने नुकसान भरपाई देण्याची मागणी केली. यावेळी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद देण्याचे माजी खासदार नाईक निंबाळकर यांनी सांगितले.0
0
Report
एफडीए ने अकोला के खाद्य प्रतिष्ठानों पर छापेमारी में 593 किलो कालबाह्य तुप जब्त
Akola, Maharashtra:अकोला शहरातील खाद्य अस्थापनांवर अन्न व औषध प्रशासनाने दोन दिवसीय विशेष तपासणी मोहीम राबवत मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत दोन नामांकित फर्ममध्ये विक्रीसाठी ठेवण्यात आलेला तब्बल ५९३ किलो कालबाह्य तुपाचा साठा जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या तुपाची अंदाजे किंमत ४ लाख १५ हजार ९३ रुपये आहे. या प्रकरणी दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आले आहेत. एफडीएचे सहआयुक्त देवानंद वीर यांनी दिलेल्या माहितीीनुसार, अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने अकोला शहरातील विविध खाद्य प्रतिष्ठानांची तपासणी केली. यावेळी पूर्वा मार्केटिंग येथे केलेल्या तपासणीत तब्बल १५ वेगवेगळ्या प्रकारच्या कालबाह्य तुपाचा साठा आढळून आला. पथकाने ४५८ किलो तूप जप्त केले असून त्याची अंदाजे किंमत ३ लाख ३४ हजार ९३ रुपये आहे.त्यानंतर मेसर्स लिलाधर जगजीवन या फर्मवर कारवाई करण्यात आली. येथे ‘वटुला प्रीमियम घी’ या ब्रँडचा कालबाह्य तुपाचा साठा विक्रीसाठी ठेवण्यात आल्याचे आढळले. प्रशासनाच्या पथकाने १३५ किलो तूप जप्त केले असून त्याची किंमत सुमारे ८१ हजार रुपये आहे. कालबाह्य अन्नपदार्थांची विक्री किंवा साठवणूक करून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या आस्थापनांविरोधात अन्न व औषध प्रशासनाने ही कारवाई केली आहे. दोन्ही आस्थापनांचे अन्न परवाने निलंबित करण्यात आल्याने शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्येही खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
छत्रपति संभाजीनगर में जालना रोड पर सबसे लंबा उड्डाणपुल बनेगा, फडणवीस ने घोषणा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये जालना रोडवर राज्यातील सर्वात जास्त लांबीचा उड्डाणपूल बांधण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी जाहीर केले. यामुळे शहरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मोठी मदत होणार आहे महत्त्वाचं म्हणजे हा रस्ता करण्याची गेल्या कित्येक वर्षांची मागणी आहे.. या आधी दोन वेळा यासाठी भुमीपूजनही झालं मात्र प्रत्यक्षात काम सुरू होऊ शकलं नाही आणि त्यात मुख्यमंत्र्यांनी आता नव्याने घोषणा केली आहे...0
0
Report
नागपुर में गणेश मंडळों ने डीजे नहीं बजाने का भरोसा दिया, संदीप जोशी सफल
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपुरात डीजे विरुद्ध चळवळीला अनेक गणेशोत्सव मंडळांनीही प्रतिसाद दिलाय ... तब्बल 136 पेक्षा जास्त गणेश मंडळांनी डीजे वापराणार नसल्याचं हमीपत्र दिल्याची माहिती माजी आमदार संदीप जोशी यांनी दिलीय... पुण्यापासून डीजे विरुद्ध सुरू झालेल्या मोहिमेला नागपरात माजी आमदार संदीप जोशी यांनी पुढाकार घेत जनचळवळीचे रूप दिले आहे.... त्याला आता चांगला प्रतिसाद मिळत आहे... डीजेविरुद्ध मोहिमेबाबत माहिती जाणून घेवुयां संदीप जोशी यांच्याकडून0
0
Report
मराठवाडे में सूखा गहराता, बारिश कम रहने से खरीफ फसलें प्रभावित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याच्या दुष्काळी परिस्थितीचा अहवाल सादर करण्याच्या सूचना महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विभागीय प्रशासनाला केल्यानंतर प्रशासनाने शासनाला निरीक्षणात्मक अहवाल दिला. यात पाऊस, पीक परिस्थिती, चाराटंचाई याबाबत बारकाईने निरीक्षणे नोंदविली. अर्धा सप्टेंबर पावसाअभावी कोरडा गेल्याने पिके करपली असून खरीपाचे उत्पादन घटणार असल्याने दुष्काळाची छाया गडद होत चालली आहे. मराठवाड्यातील साडेआठ हजार गावांसाठी ४९६ मंडळे असून २१८ मंडळांमध्ये १५ सप्टेंबरपर्यंत मध्यम (५० ते ७५ टक्के) पाऊस झाला. तर २७८ मंडळे म्हणजेच ५,५६० गावांत ५० टक्क्यांपेक्षा कमी. ७६ पैकी ४७तालुक्यांत कमी पाऊस झाला. केवळ २ तालुक्यांत १०० टक्के पावसाच्या तुलनेत ३१ टक्के तुट आहे.0
0
Report
Advertisement
गणेशोत्सव में कोकण की लोककला शक्ती तुऱ्या डांस का जलसा, परंपरा आज भी जीवित
Chendhare, Maharashtra:गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह आणि कोकणच्या लोककलेची खास रंगत आलीच. sध्या कोकणातील गावागावात ‘बाल्या डान्स’ अर्थात शक्तीतुऱ्याची धूम पाहायला मिळतेय. ढोलकीचा ठेका, रंगणारे सवाल-जवाब आणि कलाकारांचा उत्स्फूर्त जल्लोष यामुळे गणेशोत्सवाला वेगळीच रंगत आली आहे. शक्ती तुऱ्याचा सामना पाहण्यासाठी मोठी गर्दी होतेय. आधुनिक मनोरंजनाच्या काळातही कोकणी माणसाने ही परंपरा जपली आहे. कारण बाल्या डान्स केवळ मनोरंजन नाही, त्याला पौराणिक आधार आहे. कोकणच्या मातीशी जोडलेली भावनिक नाळ आहे.. काळ बदलला, तरी या लोककलेचा ठेका आणि परंपरा अशीच जिवंत राहणार आहे。0
0
Report
गणेशोत्सव में मुंबई-पुणे मिसिंग लिंक का दृश्य, समय और ईंधन बचत का संदेश
Chendhare, Maharashtra:गणेशोत्सवात साकारली मुंबई-पुणे मिसिंग लिंकची प्रतिकृती गणरायाच्या देखाव्यातून विकासाचा संदेश मिसिंग लिंकने वाचणार वेळ अन् इंधन आयात खर्चाला अळा; परकीय चलनाची बचत अँकर - रायगडच्या माणगाव येथील निलेश थोरे यांच्या घरी गणराय विराजमान झाले आहेत. यंदाच्या गणेशोत्सवासाठी त्यांनी साकारलेला देखावा मात्र खास चर्चेचा विषय ठरतोय. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवरील मिसिंग अर्थात कनेक्टिंग लिंकचा देखावा उभारून या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले आहे. या कनेक्टिंग लिंकच्या माध्यमातून प्रवासाचा वेळ आणि इंधनाची बचत कशी होऊ शकते, यासोबतच आयातीवरील खर्च कमी होऊन परकीय चलनाची बचत कशी होऊ शकते, हे देखाव्यातून मांडण्यात आलं आहे. गणरायाच्या भक्तीसोबतच विकासाचा संदेश देणारा हा अनोखा देखावा लक्षवेधक ठरत आहे.0
0
Report
माणगाव के खरवली में संतोष खडतर के घर गणेश बाप्पा विराजमान, यादें ताजा
Chendhare, Maharashtra:माणगावच्या खरवलीत संतोष खडतर यांच्या घरी बाप्पा विराजमान ....... जुन्या आठवणींना उजाळा देणारा अनोखा देखावा ........ गोठ्या भोवरा, दोरीचा फोन अन् बालपणीचा खाऊ पुन्हा चर्चेत ........ कालबाह्य झालेला टेप रेकॉर्डरही देखाव्यातून झाला जिवंत ........ नव्या पिढीला जुन्या खेळांची ओळख करून देण्याचा प्रयत्न ....... अँकर -रायगडच्या माणगाव मधील खरवली येथील संतोष खडतर यांच्या निवासस्थानी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. सुबक आणि आकर्षक गणेशमूर्तीसोबतच यंदाचा देखावाही लक्षवेधक ठरतोय. मोबाईल आणि तंत्रज्ञानाच्या युगात नवीन पिढीच्या बालपणातून गोठ्या, भोवरा, दोरीचा फोन, बालपणीचा खाऊ अशा अनेक गोष्टी हळूहळू दूर होत चालल्या आहेत. याच जुन्या आठवणींना उजाळा देत खडतर कुटुंबीयांनी यंदाच्या गणेशोत्सवात बालपणीच्या खेळणी आणि वस्तूंचा देखावा साकारला आहे. कालबाह्य झालेला टेप रेकॉर्डर असो किंवा गोठ्या-भोवऱ्याचा खेळ... या देखाव्यातून जुन्या पिढीच्या आठवणी पुन्हा जिवंत झाल्या आहेत. त्यामुळे हा देखावा केवळ सजावट न राहता, जुन्या काळातील साधेपणा आणि बालपणाची गोडी नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा सुंदर प्रयत्न ठरतोय.0
0
Report
Advertisement
