icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

डोंबिवली में स्मार्ट मीटर विरोध: मीटर बॉक्स पर ताला, आंदोलन की चेतावनी

Kalyan, Maharashtra:महावितरण स्मार्ट मीटर बसवण्याची शक्ती तर डोंबिवलीकरांचा स्मार्ट मीटरला विरोध, स्मार्ट मीटरला विरोध करत सोसायट्यांनी मीटर केबिनला लावले कुलूप, महावितरण कंपनीने सक्ती केली तर वेळ पडल्यास रस्त्यावर उतरू असा महावितरणला डोंबिवली घरांचा इशारा, Anc : महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबत ग्राहकांच्या मोबाईलवर मेसेज येऊ लागल्यानंतर डोंबिवलीत नागरिकांमध्ये नाराजीचा सूर उमटू लागला आहे. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल वाढेल, असा आरोप करत डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट सोसायटीच्या मीटर बॉक्सलाच कुलूप ठोकले आहे. इतकेच नव्हे तर स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी करत महावितरणला लेखी निवेदनही देण्यात आले आहे. Vo स्मार्ट मीटरच्या मुद्द्यावरून डोंबिवलीत नागरिकांचा विरोध अधिक तीव्र होताना दिसत आहे. महावितरणकडून स्मार्ट मीटर बसविण्याबाबतचे मेसेज ग्राहकांच्या मोबाईलवर येऊ लागल्यानंतर अनेक नागरिकांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. डोंबिवली एमआयडीसी निवासी परिसरातील नवसंकुलसह काही हाउसिंग सोसायट्यांनी थेट इमारतीच्या मीटर बॉक्सलाच मोठे कुलूप ठोकत अनोख्या पद्धतीने विरोध दर्शवला आहे. कोणतीही पूर्वसूचना न देता मीटर बदलले जाऊ नयेत, यासाठी हा निर्णय घेतल्याचे रहिवाशांनी सांगितले. स्मार्ट मीटरमुळे वीजबिल भरमसाठ वाढण्याची भीती तसेच अतिरिक्त आर्थिक भार पडण्याची शक्यता व्यक्त करत नागरिकांनी महावितरण प्रशासनाला लेखी पत्रही दिले आहे. आमच्या इमारतीत स्मार्ट मीटर बसवू नयेत, अशी मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. दरम्यान, कुलूप लावलेल्या मीटर बॉक्सचे फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले असून डोंबिवलीत स्मार्ट मीटरविरोधातील नाराजी आता उघडपणे समोर येऊ लागतल्याचे चित्र दिसत आहे. जर महावितरण कडून स्मार्ट मीटर बसवले गेले किंवा सक्ती केली गेली तर मोठे आंदोलन करू, असा इशारा देण्यात आला,
0
0
Report

वीटभट्टी धूल से महामार्ग पर यातायात समस्या, उपायों की मांग

Washim, Maharashtra:कारंजा ते शेलूबाजार दरम्यान एका वीटभट्टीमधून उडणारी धूळ वाहनधारकां साठी मोठी समस्या ठरत आहे. वीटभट्टीतील धूळ थेट महामार्गावर येत असल्याने वाहन चालविताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. भरधाव वाहनांमुळे धुळीचे प्रमाण वाढत असून काही वेळा समोरील वाहनही स्पष्ट दिसत नाही. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. या मार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असल्याने संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन धूळ नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी वाहनधारक व स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report
Advertisement

नांदेड के टोशनिवाल मेडिकल ने एक्सपायर्ड दवाइयां वितरित कीं; FDA ने जांच शुरू की

Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड शहरातील प्रसिद्ध तोषनिवाल मेडिकलने मुदत संपलेल्या गोळ्या एका ग्राहकाला दिल्या. घरी गेल्यावर ही बाब कळाल्यावर ग्राहकाने थेट तुकाराम मुंडे यांना मेल केला आणि तात्काळ मेल ची दखल घेत अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने मेडिकल वर तपासणी केली. हनुमंत वनाळेकर यांनी आपल्या वयोवृद्ध वडिलांसाठी मधुमेहाच्या गोळ्या तोषनिवाल मेडिकल मधून घेतल्या होत्या. पण या गोळ्यांची एक्सपायरी डेट संपल्याचे त्यांच्या मुलीला लक्षात आले. तेव्हा त्यांनी अन्न व औषध प्रशासन आयुक्त तुकाराम मुंडे यांना तक्रारीचा मेल केला. सध्या गतिमान कारभार करणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाने मेडिकलवर तपासणी केली. विशेष म्हणजे अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पुन्हा त्या ग्राहकाला त्याच गोळ्यांची मागणी करायला लावली आणि मेडिकल चालकाने पुन्हा मुदत संपलेल्या गोळ्या दिल्या. अन्न व औषध प्रशासनाने तपासणी पूर्ण केली असून मुदतबाह्य गोळ्या देणाऱ्या मेडिकल वर काय कारवाई होते हे पाहावे लागणार आहे.
0
0
Report

शिरूर के कारेगाव में युवक ने रात भर दहशत मचाई; ग्रामीणों ने उसे बांधकर नियंत्रण में किया

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील कारेगावमध्ये एका तरुणाने रात्रीघातलेल्या धुडगुसामुळे परिसरात प्रचंड भीतीचं वातावरण निर्माण झालंय. संबंधित तरुण अचानक बिथरल्यासारखा वागू लागल्याने, शेजारील रहिवासी आणि रस्त्यावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांमध्ये मोठी घबराट पसरली होती. या तरुणाचं वर्तन अनियंत्रित झाल्याने परिसरात रात्री उशिरापर्यंत गोंधळाची परिस्थिती होती. अखेर परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून स्थानिक ग्रामस्थांनी मोठं धाडस दाखवलं, आणि या तरुणाला दोरीच्या साहाय्याने बांधून नियंत्रणात आणलं. या धक्कादायक प्रकारामुळे कारेगाव परिसरात रात्री उशिरापर्यंत कमालीचा तणाव निर्माण झाला होता.
0
0
Report

शिपिंग कंपनी की लापरवाही से कांदा निर्यातकों को नुकसान, सरकार से हस्तक्षेप की मांग

Lasalgaon, Maharashtra:शिपिंग कंपनीच्या बेजाबदार कारभाराचा फटका कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांना बसला असून कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले आहे नाशिक जिल्ह्यातून मुंबई मार्गे श्रीलंकेतील कोलंबो येथे कांदा निर्यात करण्यासाठी १ जून रोजी १०५ कंटेनरचे बुकिंग करण्यात आले होते मात्र, नियोजित वेळेत जहाज उपलब्ध न झाल्याने मोठा गोंधळ निर्माण झाला यामध्ये ४० एसी कंटेनरमधील कांदा जहाजावर चढवण्यात आला, तर उर्वरित ६५ बिगर एसी कंटेनरमधील कांदा नाकारण्यात आल्याने निर्यातदार व्यापाऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले या प्रकरणात शिपिंग कंपनीने नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी कांदा निर्यातदार व्यापाऱ्यांनी केली आहे दरम्यान, आखाती देशांमध्येही कांदा निर्यातीसमोर अडचणी वाढल्या आहेत एक महिन्यापूर्वी दुबईकडे पाठवण्यात आलेले कांद्याचे जहाज अद्यापही पोहोचले नसल्याने व्यापाऱ्यांची चिंता वाढली आहे दुसरीकडे पाकिस्तान, चीन आणि तुर्की या देशांतील नवीन कांदा आंतरराष्ट्रीय बाजारात कमी दरात उपलब्ध होत असल्याने भारतीय कांद्याला तीव्र स्पर्धेला सामोरे जावे लागत आहे या सर्व परिस्थितीचा गांभीर्याने विचार करून केंद्र सरकारने शिपिंग समस्येत हस्तक्षेप करावा आणि कांदा निर्यातदारांना दिलासा देण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी जोर धरू लागली
0
0
Report
Advertisement
0
0
Report

निलंगा के पालापूर में 70 वर्षीय किसान ने साहूकार के दबाव से आत्महत्या

Latur, Maharashtra:निलंगा तालुक्यातील पालापूर येथे ७० वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याची आत्महत्या. खासगी सावकाराच्या कथित जाचाला कंटाळून शेतकऱ्याने उचलले टोकाचे पाऊल. कर्जफेडीच्या तणावातून होत होता मानसिक छळ. निलंगा पोलिसांकडून प्रकरणाचा तपास सुरू. लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील पालापूर गावातून एक धक्कादायक घटना समोर आली है. खासगी सावकाराच्या कथित जाचाला आणि मानसिक छळाला कंटाळून ७० वर्षीय अल्पभूधारक शेतकरी हणमंत पाटील यांनी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आर्थिक अडचणींमुळे त्यांनी कर्ज काढून छोटे हॉटेल सुरू केले होते. मात्र कर्जफेड न झाल्याने सावकाराकडून सततचा त्रास होत असल्याचा आरोप आहे. या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट उसळली असून संबंधित सावकारावर कठोर कारवाईची मागणी होत आहे. दरम्यान, निलंगा पोलीस ठाण्यात त्या संबधीत सावकाराच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला नाही.
0
0
Report

कोल्हापुर में नशामुक्ति शपथ: 6 लाख से अधिक लोगों ने लिया शपथ

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात सहा लाखांहून अधिक जणांनी नशामुक्तीची शपथ घेतली आहे 2026-27 या शैक्षणिक वर्षाच्या शालेय प्रथम दिनानिमित्त जिल्ह्यातील 3674 या सर्व शाळांमधील सुमारे 5 लाखांहून अधिक विद्यार्थी तर 1 लाखांहून अधिक ग्रामस्थ व पालकांनी मोठ्या दिमाखात नशामुक्त कोल्हापूर या अभियानाची शपथ घेतली जिल्ह्यात माध्यमिक व उच्च माध्यमिक स्तरावरील अनेक विद्यार्थी हे तंबाखू गुटखा गांजा सिगारेट तसेच इतर मादक पदार्थांच्या विळख्यात अडकल्याचे मोठ्या प्रमाणावर निदर्शनास आलेपर्यायाने हे व्यसन विद्यार्थ्यांपुरतेच मर्यादित न राहता याचे चटके संपूर्ण कुटुंबियासह समाजाला बसत होते नेमकी हीच बाब हेरून पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या संकल्पनेतून नशामुक्त कोल्हापूर अभियान राबवले जात आहे
0
0
Report
Advertisement

रिसोड में पुरानी रंजिश से हत्या, आरोपी गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड शहरातील माणुसकी नगर परिसरात जुन्या वादातून एका व्यक्तीची निर्घृण हत्या झाल्याची घटना समोर आली आहे.भगवान सुभाष गायकवाड (वय 38) यांची मध्यरात्री झोपेत असताना डोक्यावर दगड किंवा लोखंडी रॉडने वार करून हत्या करण्यात आल्याचा संशय आहे.घटनेची माहिती मिळताच रिसोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले.पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालयात पाठविला असून पुढील तपास सुरू आहे.या प्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले असून हत्येमागील नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे.घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे。
0
0
Report

पंचगंगा प्रदूषण रोकथाम के लिए अंकुश का आंदोलन इचलकरंजी में तेज; पुलिस से टकराव

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पंचगंगा नदी प्रदूषणासाठी आंदोलन अंकुशच्या पुढाकाराने सुरू करण्यात आलेल्या आंदोलनाला वेगळ वळण लागले. मजरेवाडी इथला इचलकरंजी शहराचा पाणीपुरवठा खंडित केल्याशिवाय शहराला जाग येणार नाही अशी भूमिका घेऊन आंदोलन करण्यासाठी आंदोलक जात असताना पोलीस आणि आंदोलकांमध्ये मोठी झटपट पाहायला मिळाली. पंचगंगा नदीचे पाणी प्रदूषण दिवसेंदिवस वाढत आहे, हे रोखाव यासाठी आंदोलन अंकुशच्या माध्यमातून प्रदीर्घ आंदोलन सुरू करण्यात आल आहे, अस असताना देखील इचलकरंजी शहरातून मोठ्या प्रमाणात पंचगंगा नदीचे प्रदूषण सुरू आहे, त्यामुळेच आंदोलन अंकुशचे आंदोलन मोठ्या प्रमाणात आक्रमक झाले होते. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी अंकुश पाटील हे आंदोलकांच्या तडाख्यात सापडले, आंदोलकांनी त्यांना घेराव घालून प्रश्नांची सरबत्ती सुरू केली, आंदोलन आक्रमक झाल्याचे पाहताच अधिकारी तिथून आपली सुटका करून निघून गेले.. यावेळी आंदोलक आणि पोलिसांमध्ये जोरदार वादावादी झाल्यानंतर पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेतले. प्रदूषण रोखावे यासाठी सनदशीर मार्गाने आंदोलन आंदोलन करत आहेत, तरीदेखील पोलीस बळाचा वापर करून हे आंदोलन कोणासाठी दडपण्यासाठी प्रयत्न करत आहेत असा सवाल आंदोलकांनी विचारला आहे.
0
0
Report

पिंपरी-चिंचवड महापालिका के लाइव प्रक्षेपण बंदी पर नया विवाद

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी-चिंचवड महापालिकाेच्या सर्वसाधारण सभा आणि स्थायी समितीच्या कामकाजाचे थेट प्रक्षेपण बंद करण्याच्या निर्णयावरून नवा वाद निर्माण झाला आहे. या निर्णयामुळे पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, सभागृहातील कामकाज आणि निर्णय प्रक्रिया नागरिकांपासून लपवण्याचा प्रयत्न तर नाही ना, असा सवाल उपस्थित केला जात आहे. कायदा अभ्यासक अॅड. असीम सरोदे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. महापालिकेला कायदेशीर नोटीस पाठवत १५ दिवसांत थेट प्रक्षेपण पुन्हा सुरू करण्याची मागणी करण्यात आली आहे. मागणी मान्य न झाल्यास उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर विधानपरिषद प्रचार अंतिम चरण: महायुति बनाम राष्ट्रवादी की सीधी भिड़ंत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात सोलापूर विधानपरिषद निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात, महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांच्याकडून सदस्यांच्या भेटीवर जोर पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत वैराग नगरपंचायत येथील भुमकर गटाने दिला महायुतीला पाठिंबा. वैराग मधील निरंजन भुमकर यांनी वैराग नगरपरिषदेच्या 15 नगरसेवकांसह भाजप महायुतीचे उमेदवार राजेंद्र राऊत यांना जाहीर पाठिंबा दिला. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे उमेदवार वसंत देशमुख यांच्याकडून प्रत्येक तालुक्यातील सदस्याची भेट घेऊन केला जात आहे प्रचार.. भाजपकडून राजेंद्र राऊत आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून वसंत देशमुख यांच्यात असणार आहे थेट लढत..
0
0
Report

मोड़गड़ गाँव में भीषण जल संकट: पीने के पानी के लिए ग्रामीण टैंकर इंतज़ाम की मांग कर रहे हैं

Amravati, Maharashtra:मेळघाट के मोरगड गाँव में अभी भी भीषण जल संकट; नदी के तल में छोटा गड्ढा खोदकर पानी निकालना मजबूर ग्रामीणों के लिए दुर्दैवी स्थिति। गांव के नागरिकों को पीने का पानी नहीं मिल रहा है, इसलिए लगभग 2 किलोमीटर दूर नदीपात्र में छोटा गड्ढा खोदकर वहाँ से पानी लाकर पीना पड़ रहा है। इस कारण महिलाएं, बुजुर्ग और बच्चों को बड़ी कठिनाइयों का सामना करना पड़ रहा है और उनके स्वास्थ्य पर भी विपरीत प्रभाव पड़ने की संभावना है। इसलिए टंकर से पानी की सप्लाई, बंद पड़ी पानीपुरवा योजना को तुरंत शुरू किया जाए तथा गांव वालों को पर्याप्त और स्वच्छ पीने का पानी उपलब्ध कराना सरकार से माँगा गया है। सरकार इस मुद्दे पर ध्यान देगी तो उचित कदम उठाने की आशा है।
0
0
Report

बीड़ के अवैध वाळू घोटाले में तहसीलदार सहित 15 दलालों पर केस

Beed, Maharashtra:बीड: राक्षसभुवन वाळू घोटाळ्यात मोठी कारवाई; तहसीलदार, तलाठी, महसूल कर्मचाऱ्यांसह 15 दलालांवर गुन्हे दाखल होणार 250 घरकुल लाभार्थ्यांचा जबाब; वाळूच मिळाली नसल्याचा केला खुलासा तहसीलदारांसह 38 जणांची दोन दिवस चालली चौकशी, तहसीलदारावर गुन्हा तथा निलंबनाच्या कारवाईची टांगती तलवार बीडच्या गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात असलेल्या राक्षसभुवन येथील बहुचर्चित वाळू घोटाळ्यात कारवाईचा फास अधिक घट्ट होताना दिसत आहे. घरकुल योजनेच्या लाभार्थ्यांच्या नावाचा गैरवापर करून गोदावरी नदीपात्रातून झालेल्या अवैध वाळू उपसा प्रकरणात जिल्हाधिकाऱ्याच्या कार्यालयात दोन दिवस तहसीलदारांसह अन्य अधिकाऱ्यांची चौकशी करून सुनावणी झाली. त्यानंतर प्रशासन अॅक्शन मोडमध्ये आलं आहे. तलाठी, कंत्राटी कर्मचारी आणि तब्बल 15 दलालांवर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. धक्का радыक बाब म्हणजे प्रत्यक्ष सर्वेक्षणात 250 लाभार्थ्यांनी आम्हाला कोणतीही वाळू मिळाली नसल्याचा जबाब दिला आहे. कागदोपत्री नोंदी आणि प्रत्यक्ष वास्तवातील तफावत उघड झाल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, तहसीलदार संदीप खोमणे यांच्यावरही गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. तसेच त्यांच्या निलंबनाचा प्रस्तावही वरिष्ठांकडे पाठवला जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिली. सध्या त्यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्यात आले आहे. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार विजयसिंह पंडित यांनी गोदावरी नदी पात्रातून घरकुल लाभार्थ्यांच्या नावाखाली अवैध वाळू उत्खनन तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाच्या संगणमताने होत असल्याचा गंभीर आरोप केला होता. आमदारांनी या प्रकरणात वरिष्ठ पातळीवर तसेच जिल्हाधिकाऱ्यांना याची तक्रार दिली होती. त्यानुसार झालेल्या चौकशीत महसूल विभागासह इतर जणांवर ही कारवाई होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top