445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपूर: भाजप उमेदवार अरुण लाखानी ने माता महाकाली के दर्शन किए
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदे जागेसाठी भाजप उमेदवार अरुण लाखानी यांनी चंद्रपूर शहराचे आराध्य दैवत माता महाकालीचं घेतलं दर्शन. अँकर: चंद्रपूर- गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदे जागेसाठी भाजप उमेदवार अरुण लाखानी यांनी चंद्रपूर शहराचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय, आ. भोंगळे, आ. देवतळे यांच्यासह अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शरद पवारांशी कौटुंबिक संबंध आहेत मात्र त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्टता त्यांनी केली.0
0
Report
वाशीम में डीएपी की कमी से खरीफ की तैयारी प्रभावित
Washim, Maharashtra:खरीप हंगाम तोंडावर आला असून पेरणीपूर्व तयारीला वेग झाला आहे.या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते;मात्र वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मागणीनुसार डीएपी खताचा पुरवठा होत नसल्याने यंदा त्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला वाशिमच्या कृषी विभागाने दिला आहे.राज्यात गेल्या तीन वर्षात खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे.यामध्ये युरिया,डीएपी,एमओपी,संयुक्त खते आणि एसएसपी खतांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्ये असल्याने शेतकरी त्याला अधिक पसंती देतात.मात्र,अपेक्षित पुरवठा नसल्याने यंदा शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.0
0
Report
मालेगांव के बिजली संकट पर नागरिकों का उग्र प्रदर्शन, जल्द सुधार की चेतावनी
Nashik, Maharashtra:मालेगावातील वीज वितरण कंपनीच्या विरोधात नागरिकांचा संताप.. पहिल्याच पावसात वारंवार वीज पुरवठा खंडित.. संतप्त नागरिकांनी वीज कंपनीच्या कार्यालयात धडक दिली.. घोषणाबाजी करीत आंदोलकांनी अधिकाऱ्यांना धरले धारेवर.. तातडीने सुधारणा करा अन्यथा तीव्र आंदोलनाचा इशारा.. वारंवार खंडित होणाऱ्या वीजेमुळे नागरिक त्रस्त.. पावसाळ्यापूर्वी नियोजन कुठे गेले? असा सवाल नागरिकांचा..0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में अनधिकृत गावठी दारू फैक्ट्री पर छापा, 3000 लीटर दारू नष्ट
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलीसांनी उरण येथे छापा टाकून अनधिकृतपणे हातभट्टी वरील गावठी दारू बनविण्याचा कारखाना उध्वस्त केलाय. उरण मधील चाणजे गावातील जंगलात बेकायदेशिरपणे 2 ठिकाणी हातभट्टी वरील गावठी दारू बनविण्याचा कारखाना उभारण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकत एका ठिकाणावरून 1600 लिटर तर दुसऱ्या कारखान्यातून 1400 लिटर गावठी दारू नष्ट करुन गावठी दारू बनवण्याचे साहित्य जप्त केलेय. पोलीसांनी बेकायदेशीरपणे गावठी दारू बनविण्याचा कारखाना चालविल्या प्रकरणी हिरामण म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेय. मात्र पुणे येथे गावठी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेनंतरच नवी मुंबई पोलिसांना जाग आली का असा सवाल देखिल या कारवाई नंतर उपस्थित होत आहे.0
0
Report
लातूर में नीट पेपरफुटी का बड़ा मामला: स्पेशल बैच फॉर्मूला और सीबीआई जांच
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.. डॉक्टर बनवण्याच्या स्वप्नांचा लातूरमध्ये सौदा ? नीट पेपरफुटी तपासात धक्कादायक खुलासे. स्पेशल बॅच चा संशयास्पद फॉर्म्युला. लाखो रुपये भरणाऱ्यांसाठी स्वतंत्र ग्रुप, गेस पेपर आणि विशेष नोट्स. विद्यार्थ्यांची मूळ कागदपत्रेच ठेवली जात होती तारण. सीबीआय तपासात धक्कादायक माहिती समोर. ५० हजारांपासून ते लाखो रुपयांची उकळपट्टी. नीटचे प्रश्न मिळवून देण्याच्या आमिषाचा आरोप. शिवराज मोटेगावकराच्या क्लासेसवर तपासाची धार0
0
Report
कांग्रेस नेता थोरात के बयान से Ahilyanagar विधानपरिषद चुनाव में महाविकास आघाडी की रणनीति उजागर
Shirdi, Maharashtra:काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉइंटर ऑन अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक आज आम्ही योग्य निर्णय घेऊ.. दुपारी 3 वाजे नंतर सगळ्यांना समजेल..rाणी लंकेबाबत निर्णय महाविकास आघाडी म्हणून चर्चा करून घेऊ... ऑन लाडकी बहीण योजना अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना सरकारने धोका दिला.. लाडक्या बहिणींनी केलेल्या मतदानामुळे विधानसभेत त्यांना यश मिळालं.. मात्र त्या बहिणींची फसवणूक.. ऑन भाजप आयात उमेदवार भाजपाचं काम करणारे निष्ठावान भविष्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत.. राजकारणाचा स्तर आज खालावला आहे.. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा मतदारांपर्यंत पोहोचवला जातो... खऱ्या कार्यकर्त्याची किंमत आता संपली आहे.. ऑन पक्ष निष्ठा महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरली आहे.. मात्र हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी जनतेची.. ऑन तनपुरे भाजप प्रवेश भाजपातील वाढलेल्या प्रवेशामुळे नव नेतृत्व निर्माण होण्याला संधी.. काँग्रेसच्या माध्यमातूनच नवीन नेतृत्व निर्माण होईल.. प्रादेशिक पक्ष संपत चालल्याचे चित्र देशात निर्माण झाला आहे.. भविष्यात निश्चितच जनता काँग्रेसला पाठिंबा देईल.. Bite - बाळासाहेब थोरात , काँग्रेस नेते0
0
Report
Advertisement
यवला बाजार में कांदा किसानों को भारी नुकसान, सरकारी दर 1500 के अनुरोध पर बल
Yeola, Maharashtra:येवल्यात शासकीय कांदा खरेदी केंद्र नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासकीय खरेदी दराच्या तुलनेत येवला बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटन २०० ते ५०० रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे दररोज मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे येवला बाजार समितीत शासनाने नाफेड मार्फत पंधराशे ऐंशी रुपये शासकीय दराने कांदा खरेदी सुरू करावी, तसेच खरेदी केलेला कांदा देशांतर्गत विक्रीऐवजी थेट परदेशात निर्यात करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. आज सकाळच्या सत्रात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे साडेतीनशे वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीतजास्त १३५७ रुपये, कमीतकमी २०१ रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून शासकीय खरेदी केंद्राची मागणी अधिक तीव्र होत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
यवतमाळ में मंत्री पद के लालच में धोखाधड़ी का मामला गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे केंद्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यासाठी आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीक पर्दाफाश झाला. या टोळीने मोबाईलवर झालेल्या संभाषणाची क्लिप तसेच पैसे घेत असल्याचा छुपा कॅमेरातील व्हिडिओ पुरावा म्हणून पुढे आला. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांना सत्तेत मोठ्या पदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गंडा घालण्याचा हा डाव होता. केंद्रातील विविध विभागांमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या 65 पदांची यादी टोळीकडे होती; नेमणुकीसाठी 20 करोड ते 35 करोड रुपये मागणी होत होते. या टोळीमधील म्होरक्या यांनी 20 कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी केली; अमित शहा यांच्या निकटवर्तीय व संघातील पदाधिकारी यांच्या मार्फत पैसे देऊन नेमणुका होतात असे सांगितले. परंतु भुतडा यांनी शंका घेऊन माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केला; बॅगमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल ठेवले. पोलिसांनी ही बॅग घेतांना टोळीला अटक केली. या टोळीकडून पुढेही अशी फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहणे गरजेचे आहे.0
0
Report
मौसम से पहले वाशीम में गंदे नालों से जलभराव, व्यापारियों की तात्कालिक सफाई की माँग
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील मुख्य चौकातून अडाण नदी मार्गाकडे जाणारे नाले गाळ व केरकचऱ्याने भरले असून,पावसाळ्यापूर्वी त्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्याने थोडा जास्त पाऊस पडला की पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि चौकातील दुकाने,बँका व अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरऊन आर्थिक नुकसान होते.दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात चौक जलमय होत असल्याने नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.नाले ओव्हरफ्लो झाल्यानंतर गुरुदेव नगर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरते.यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची व्यापक सफाई करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जातं आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम-कामठवाडा सड़क पर खड्डे, यात्रियों के लिए खतरा, सरकार से त्वरित काम की मांग
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम ते कामठवाडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. रस्तावर खड्डी उखडली असून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत अपघाताचा धोका वाढला आहे.अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे,अशी मागणी परिसरातील चार गावांतील नागरिकांकडून करण्यात येत आहे0
0
Report
सीसीटीवी से खळवट लिमगाव में तीन माह में शांति, अपराध शून्य की नई कहानी
Beed, Maharashtra:CCTVचा करिष्मा! खळवट लिमगावात तीन महिन्यांपासून एकही भांडण नाही; सरपंचांच्या उपक्रमाने गावात शांततेची नांदी..! ANC - बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी सततचे वाद, भांडणे, दारूच्या नशेत होणारा गोंधळ आणि पोलिस ठाण्याच्या फेऱ्यांसाठी ओळखले जात होते. मात्र आता या गावाने शांतता आणि विकासाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. गावचे सरपंच गणेश अंबुरे यांच्या पुढाकारातून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात आले असून या उपक्रमामुळे गावातील भांडणे आणि गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.. खळवट लिमगावात वाढत्या भांडणांमुळे आणि व्यसनाधीन तरुणांच्या उपद्रवामुळे गावातील वातावरण बिघडत होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सरपंच गणेश अंबुरे यांनी संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसून आला. सीसीटीव्हीमुळे प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची जाणीव निर्माण झाल्याने गावातील भांडणे, वाद आणि दारूच्या नशेत होणारा गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झाल्याची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. एरवी कचरा टाकण्यावरून महिलांची अफाट भांडणे व्हायची मात्र सीसीटीव्हीत आपण कैद होत असल्याची जाणीव होताच महिला आता कचरा कुंडीतच कचरा टाकतात. त्यामुळे महिलांचे विकोपाला गेलेले भांडणे पूर्णपणे कमी झाले आहेत. सीसीटीव्हीच्या प्रभावामुळे गावातील वातावरण अधिक शांत, सुरक्षित आणि सकारात्मक बनले आहे. सामाजिक सलोखा वाढला असून विकासकामांनाही गती मिळाली आहे. संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणणारे बीड जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून खळवट लिमगावची ओळख निर्माण झाली आहे.0
0
Report
भाजप ने सातारा- सांगली विधानपरिषद के लिए धैर्यशील कदम की उम्मीदवार घोषित की; एकता का आह्वान
Satara, Maharashtra:सातारा - सांगली-सातारा विधानपरिषद निवडणुकीसाठी भाजपने धैर्यशील कदम यांची अधिकृत उमेदवारी जाहीर झाली आहे. उमेदवारीनंतर कदम यांनी महायुतीतील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडीवेळी झालेल्या राजकीय घडामोडी आणि मतभेद आता मागे टाकून पुढे जाण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. महायुतीच्या विजयासाठी सर्व घटक पक्षांनी एकत्रितपणे प्रयत्न करावेत, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.0
0
Report
Advertisement
लातूर मंदिर में CPR से युवक ने एक की जान बचाई; CCTV में कैद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज देव तारी त्याला कोण मारी.!तरुणाच्या प्रसंगावधानामुळे वाचले एकाचे प्राण. हृदयविकाराचा तीव्र झटका, तरुणाने दिला CPR, घटना सीसीटीव्हीत कैद... लातूरच्या औसा येथे एका मंदिरात देवदर्शनासाठी आलेल्या एका व्यक्तीला अचानक हृदयविकाराचा तीव्र झटका आला, असाह्य वेदनेमुळे ही व्यक्ती जमिनीवर कोसळली, इतर व्यक्तींनी धावाधाव केली, मात्र त्याच ठिकाणी असलेल्या चेतन सदरे या युवकाने प्रसंगावधन ओळखून तात्काळ, त्या व्यक्तीला CPR दिला आहे, वेळीच सीपीआर मिळाल्याने या व्यक्तीचे प्राण वाचले आहेत,0
0
Report
नाशिक विधान परिषद चुनाव: दराडे ने दाखिला देकर महायुती की भिड़ंत तेज की
Nashik, Maharashtra:नाशिक विधान परिषद निवडणुकीचा तिढा अखेर सुटला असून महायुतीकडून शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे उमेदवारी अर्ज दाखल करत आहेत.. दरम्यान एकनाथ शिंदे यांनी मला शब्द दिला होता आणि एकनाथ शिंदे आपला शब्द पाळतात हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे असं नरेंद्र दराडे म्हणाले.. तसेच भाजपकडून गणेश गीते यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे महायुतीतील वरिष्ठ नेते त्यावर निर्णय घेतील गेल्या निवडणुकीत देखील विकासाच्या मुद्द्यावर मी निवडणूक लढविली होती यंदा देखील विकासाचे मुद्दे घेऊन जाणार आहे... महाविकास आघाडीचे उमेदवारांचे मला आव्हान वाटत नसल्याची प्रतिक्रिया शिंदेच्या शिवसेनेचे उमेदवार नरेंद्र दराडे यांनी दिली आहे... त्यांच्या सोबत संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...0
0
Report
भंडारा-गोंदिया: विधानसभा चुनाव से पहले कांग्रेस को बड़ा झटका, 5 नगरसेवक भाजपा में शामिल
Bhandara, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसला धक्का.... ५ नगर सेवकांचा भाजपा मध्ये प्रवेश.... Anchor :- भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकी करीता महायुतीकडून अविनाश ब्राह्मणकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. तर निवडणूक समोर असताना भंडारा जिल्ह्यात काँग्रेसला धक्का बसला आहे.. नाना पटोले यांच्या मतदार संघातील लाखांदूर नगर पंचायतीचे 5 नगर सेवक यांनी भाजपा मध्ये प्रवेश केला आहे.... लाखांदूर नगरपंचायतीतील काँग्रेसचे नगरसेवक १) मुकेशजी सहजवानी, २) निशाताई बगमारे, ३) लोपाताई शिलार, ४) लताताई कुडेगावे ५) प्रमोदभाऊ कुडेगावे यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे....0
0
Report
Advertisement
