445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डिस्पोजेबल बंद कर स्टील के बर्तन: अकोले के दंपत्ति का पर्यावरण मिशन
Akola, Maharashtra:आज वसुंधरा दिनानिमित्त जगभरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला जात असताना, अकोल्यातून एक प्रेरणादायी उपक्रम समोर आला आहे. प्लास्टिकमुळे होणाऱ्या प्रदूषणाविरुद्ध लढा देत एक डॉक्टर दाम्पत्याने ‘डिस्पोजेबल नको, स्टील वापरा’ असा प्रभावी संदेश देत जनजागृती सुरू ठेवली आहे. अकोल्यातील डॉ. योगेश आणि डॉ. मनीषा पालीवाल या दाम्पत्याने पर्यावरण रक्षणाचा अनोखा संकल्प केला आहे. मनीषा पालीवाल यांना मल्टिपल स्क्लेरोसिस आजार झाला, यानंतर त्यांनी हा आजार कशामुळे झाला याचा तपास केला असता हे आजार तापमान आणि प्रदूषणामुळे झाला असल्याच त्यांच्या लक्षात आलं.वाढते तापमान आणि प्रदूषण यामुळे आरोग्यावर होणारे दुष्परिणाम लक्षात आल्यानंतर त्यांनी या दिशेने काम करण्याचा निर्णय घेतला. गेल्या तब्बल २२ वर्षांपासून ते सातत्याने पर्यावरण संवर्धनासाठी कार्यरत आहेत. जनजागृतीसाठी त्यांनी एक विशेष सायकल तयार केली असून, या सायकलच्या माध्यमातून ते शहरभर फिरत नागरिकांना प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करतात.‘डिस्पोजेबलऐवजी स्टीलचा वापर करा’ हा त्यांचा मुख्य संदेश आहे. लग्नसमारंभ, सामाजिक कार्यक्रम आणि दैनंदिन जीवनात मोठ्या प्रमाणावर डिस्पोजेबल वस्तूंचा वापर होत असल्याने पर्यावरणावर गंभीर परिणाम होत आहे. यावर उपाय म्हणून पालीवाल दाम्पत्य लोकांना स्टीलच्या भांड्यांचा वापर करण्यासाठी प्रोत्साहित करत आहे , कोणत्याही प्रसंगासाठी ते हे ताट आणि ग्लास निशुल्क देत असतात. सुरुवातीला ३०० ताट, चमचे आणि ग्लासपासून सुरू झालेला हा उपक्रम आज हजार स्टीलच्या ताटांपर्यंत पोहोचला आहे.आतापर्यंत सुमारे दीड लाख लोकांनी या ताटांचा वापर केला आहे. योगेश पालीवाल. याचबरोबर पालीवाल दाम्पत्याने कापडी पिशव्यांच्या वापरासाठीही व्यापक मोहीम राबवली आहे. विविध ठिकाणी नागरिकांना कापडी पिशव्या वाटप करत ते प्लास्टिकमुक्त जीवनशैलीचा संदेश देत आहेत.विशेष म्हणजे, वापरण्यात न येणाऱ्या जुन्या कपड्यांपासून ते स्वतः कापडी पिशव्या तयार करून वाटप करतात. आतापर्यंत त्यांनी सुमारे ४० हजार कापडी पिशव्या वितरित केल्या आहेत.त्यांच्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण झाली असून, अनेकांनी प्लास्टिकच्या पिशव्यांचा वापर टाळत कापडी पिशव्यांचा स्वीकार केला आहे.त्यांच्या कामामुळे समाजात एक सकारात्मक बदल दिसून येत आहे. Final Vo : वाढते प्रदूषण आणि बदलते हवामान याच्या पार्श्वभूमीवर पालीवाल दाम्पत्याचा हा उपक्रम समाजासाठी एक आदर्श ठरत आहे. वसुंधरा दिनाच्या निमित्ताने दिलेला ‘डिस्पोजेबल टाळा, स्टील वापरा’ हा संदेश केवळ एक उपक्रम नसून पर्यावरण वाचवण्याची गरज अधोरेखित करणारा आहे.0
0
Report
कर्ज वसूली के नाम पर महिला से बलात्कार: सावकार अमित सावंत गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्जवसुलीच्या नावाखाली एका महिलेवर अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी गांधीनगर पोलिसांनी अमित सावंत या सावकाराला अटक केली आहे. पीडित महिलेने २०२३ साली आर्थिक अडचणीमुळे आरोपीकडून दोन लाख रुपये दहा टक्के व्याजाने घेतले होते. मात्र, कर्जफेड करण्यात अडचणी वाढताच आरोपीने तिचा गैरफायदा घेत वारंवार अत्याचार केल्याचा आरोप आहे. आरोपीने संबंधित महिलेला वेळोवेळी हॉटेलवर नेऊन तिचे नग्न फोटो आणि व्हिडिओ काढले. त्यानंतर हे अश्लील चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी देत जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले, अशी तक्रार महिलेने पोलिसांत दिली आहे. पीडित महिलेच्या तक्रारीवरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तसेच या प्रकरणात इतर कोणाचा सहभाग आहे का याचाही तपास केला जात आहे. दरम्यान, पीडित महिलेन दोन लाख 10 हजार रुपये परत करूनही उर्वरित २५ हजार रुपयांसाठी आरोपी तिचा छळ करत होता. संबंधित सावकाराने अनेक महिलांच्यावर अत्याचार केल्याचा गंभीर आरोप केला आहे. पीडित महिलेने सावकाराचे पैसे ऑनलाइन आणि रोखीत भागवले होते. अस असताना देखील लिंग पिसाट सावकाराने संबंधित पीडित महिलेवर अत्याचार करत नरक यातना दिल्या. पीडित महिलेचे गंभीर आरोप पाहता या सावकाराचे दुष्कृत्ये गंभीर असल्याच दिसून येत आहे. त्यामुळे पोलिसांनी या प्रकरणाचा कसून तपास सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे. या सावकाराने सावकारकीच्या पैशातून आमिष दाखवून आणखी कोणा कोणााला आपल्या जाळ्यात ओढलं त्यांचा कसून तपास करावा अशी मागणी पीडित कुटुंबीय करत आहे.0
0
Report
सांगली के बुर्ली में परडी सोहळा: ढोल-ताल और पालखी मिरवणूक की धूम
Sangli, Maharashtra:सांगलीच्या पलूस तालुक्यातील बुर्ली येथील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र असणाऱ्या बंच्याप्पा बनात परडी सोहळा रंगला. दर तीन वर्षांनी हा परडी सोहळा आयोजित करण्यात येतो, कृष्णामाईला परडी सोडण्याचा परंपरा असून यानिमित्ताने बांधवांच्या वतीने विविध धार्मिक कार्यक्रम पार पडले, ढोल कैताळाच्या गजर आणि फटाक्यांच्या आतशबाजीसह कृष्णानदी पर्यंत मानाच्या पालख्यांची मिरवणूक संपन्न झाली. यानिमित्ताने बुर्ली, आमणापूर, कुंडल रामानंदनगर येळावी यासह महाराष्ट्र, कर्नाटकातील धनगर बांधव मोठया संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
नांदेड हल्दी बाजार में किसानों ने लिलाव रोककर भाव गिराने का आरोप लगाया
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - नांदेडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत हळद उत्पादक शेतकऱ्यांची लूट सुरु असून व्यापाऱ्यांनी हळदीचे भाव पाडल्याने शेतकरी संघटनेने आक्रमक होत लिलाव बंद पाडला. प्रति क्विंटल दोन ते तीन हजार रुपयांने भाव पाडल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. युद्धाचे कारण पुढे करीत व्यापाऱ्याकडून शेतकऱ्यांची खुली लूट होत असल्याचा आरोप होतोय. नांदेडच्या लगत असलेल्या जिल्ह्यात हळदीला सोळा ते साडेसोळा हजार भाव मिळतोय मात्र नांदेडच्या बाजार समितीत केवळ साडेबारा ते तेरा हजार रुपये भाव दिला जातोय. व्यापाऱ्यांनी संगणमत करून हळदीचे भाव पाडल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्यापारी हळदीचे भाव पाडत असताना बाजार समिती मात्र यामध्ये कुठलाही हस्तक्षेप करत नसल्याने शेतकरी आक्रमक झाले आहेत. व्यापारी आणि बाजार समितीच्या पदाधिकाऱ्यांचे संगणमत असल्याचाही आरोप शेतकऱ्यांनी केलाय. जोपर्यंत 16 हजार रुपये भाव मिळत नाही तोपर्यंत लिलाव प्रक्रिया सुरू न करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिलाय.0
0
Report
राजेंद्र गडडे पर PCPNDT कानून के तहत कार्रवाई की संभावना, विवाद बढ़ा
Shirdi, Maharashtra:भोंदू राजेंद्र गडगे आणखी अडचणीत येण्याची शक्यता.. PCPNDT कायद्यांतर्गत गुन्हा दाखल होणार... जिल्हा रुग्णालय अहिल्यानगरकडून संगमनेर ग्रामीण रुग्णालयाला पत्र... राजेंद्र गडगे याच्याविरोधात PCPNDT कायद्यांतर्गत कारवाईचे निर्देश... मुलगा होण्यासाठी औषधोपचार देत असल्याचा व्हिडिओ व्हायरल.. तात्काळ गुन्हा दाखल करून अहवाल सादर करण्याचे जिल्हा शल्यचिकित्सकांचे आदेश... 15 दिवसांत कारवाई न झाल्यास न्यायालयात तक्रार दाखल करणार... Anisच्या राज्य सचिव रंजना गवांदे यांचा पाठपुरावा...0
0
Report
बिल्डिंग गेट गिरने से 13 माह की बच्ची की मौत, नासिक शहर में शोक
Nashik, Maharashtra:आई के साथ कचरा फेंकने के लिए गई 13 महीने की बच्ची आराध्या दीपक मामुलकर के ऊपर बिल्डिंग का गेट गिर गया जिससे वह गंभीर रूप से घायल हो गई और बाद में उसकी मृत्यु हो गई। मृतक का नाम आराध्या दीपक मामoolकर है। घटना नासिक शहर में हुई और शहर में दुख की लहर दौड़ गई। सोमवार दोपहर करीब 1 बजे नेहा नाम की माँ अपने बच्ची आराध्या के साथ बिल्डिंग के नीचे कचरा डालने के लिए गईं थीं। कचरा फेंकने के बाद लौटते समय गेट को नीचे खींचते समय ट्रक ऊपर से गिरे गेट ने आराध्या के माथे पर चोट पहुंचाई। उसे जिला अस्पताल में भर्ती किया गया, लेकिन उपचार से पहले उसकी मौत हो गई। दुर्घटना की खबर गंगापुर पुलिस ठाणे के अकस्मात मृत्यु रिकॉर्ड में दर्ज की गई है। पुलिस ने कहा कि जो भी दोषी पाया जाएगा उसके खिलाफ कड़ी कार्रवाई होगी और जांच जारी है। बच्चों की सुरक्षा के लिए लोगों से निवेदन किया गया है कि अपने बच्चों को बाहर निकालते समय अधिक सावधानी बरतें ताकि ऐसी घटनाएं न हों।0
0
Report
Advertisement
धाराशिव में जात पंचायत के बहाने महिला पर मारपीट, 2.55 लाख दंड वसूल; पुलिस मामला दर्ज
Dharashiv, Maharashtra:तुमच्यामुळे देव कोपला, मुलाचा अपघात झाला, धाराशिव येथील महिलेला जात पंचायतीतून अडीच लाखाचा ओठावला दंड. गुन्हा दाखल ANCHOR धाराशिव जिल्ह्यात अंधश्रद्धेला खतपाणी घातणारी धक्कादायक घटना समोर आली आहे. ‘तुझ्या मुलाने आमच्या देवाच्या कार्यक्रमात जेवल्यामुळे देव कोपला आणि माझ्या मुलाचा अपघात झाला’, असा आरोप करत एका महिलेला जात पंचायतीतून बेदम मारहाण करण्यात आली. ही घटना धाराशिव शहरातील जुना बस डेपो परिसरातील पारधी वस्तीत घडली. या प्रकरणात पीडित महिला गायत्री श्याम चव्हाण (वय 35) असून, आरोपी म्हणून सांगिता जगु पवार, ज्योती ज्योतीराम पवार, ज्योतीराम जगु पवार आणि प्रियंका गणेश पवार यांची नावे समोर आली आहेत. आरोपी महिलांनी जात पंचायत बसवून गायत्री चव्हाण यांना चप्पलने मारहाण केली, तसेच तब्बल २ लाख ५५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. त्यापैकी ६० हजार रुपये तात्काळ वसूल केल्याचंही समोर आलं आहे. या प्रकरणी पीडित महिलेच्या तक्रारीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. अंधश्रद्धा आणि जात पंचायतच्या या अमानवी प्रथेविरोधात आता कडक कारवाईची मागणी जोर धरत आहे.0
0
Report
सोलापुर में दोपहर 42.7°C तापमान, शाम को 11.6 मिमी बारिश
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात दुपारी तापमानाचा पारा 42.7 अंशावर तर सायंकाळी 11.6 मिमी गारांसह जोरदार पावसाची हजेरी - सोलापूरकर अनुभवतायत लहरी निसर्ग - शहरात मंगळवारी दुपारी तापमानाचा पारा 42.7° वर तर सायंकाळी अर्ध्या तासात 11.6 मिमी गारांसह पाऊस - कमी दाबाच्या पट्ट्याचा होतोय परिणाम तर पुढील पाच दिवस असणार पूर्वमोसमीचे - दिवसभरात उन्हाची तीव्रता आणि उकाडा मोठ्या प्रमाणात जाणवत असताना सायंकाळी मात्र सोलापूरकरांना मोठा दिलासा - वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरीने शहरातील अनेक भागातील बत्ती गुल - सतत बदलणाऱ्या हवामानामुळे एकीकडे नागरिकांना उकाड्यापासून दिलासा दुसरीकडे शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत0
0
Report
रत्नागिरी के हरने समुद्र तट पर डीज़ल तस्करी का पर्दाफाश; डाभोल कस्टम ने दो फिशिंग बोट पकड़ीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत डिझेल तस्करीचा पर्दाफाश.. दाभोळ कस्टमची मोठी कारवाई!.. रत्नागिरीतील दापोलीच्या हर्णे समुद्रकिनारी रात्रीच्या अंधाराचा फायदा लेते डिझेलची तस्करी करणाऱ्या दोन फिशिंग बोटींना दाभोळ कस्टम पोलिसांनी रंगेहात पकडले आहे... मिळालेल्या माहितीनुसार दाभोळ कस्टम विभागाने ही धडक कारवाई केली.. डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या दत्त जयंती IND.MH.04.MM.2847, रत्ना माऊली IND.MH.07.MM.4531 एकूण दोन फिशिंग बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.. सध्या या दोन्ही बोटींचा आणि त्यावरील साहित्याचा कस्टम पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे... या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के तीन तालुकों के 64 गाँवों में टैंकर से पानी पहुँचा, 26 हजार लोग लाभान्वित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तीन तालुक्यातील 64 वाड्यांना टँकर चा आधार.. उन्हाची तीव्रता वाढतेय..26 हजार ग्रामस्थांना केला जात आहे पाणीपुरवठा.. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणित पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संकेत भर पडू लागली आहे..सध्या जिल्ह्यात रत्नागिरीसह चिपळूण आणि मंडनगड या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होताना दिसत आहे..या तीन तालुक्यातील एकूण 25 गावे आणि त्यामधील 64 वाड्यातील 26 हजार 885 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे..दर दिवशी वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होऊ लागली आहे..परिणामी पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत..0
0
Report
मांडवा में 1500 करोड़ के मरिना प्रकल्प के लिए आठ दिन में टेंडर प्रक्रिया शुरू
Chendhare, Maharashtra:स्लग - मांडवा येथे उभा राहणार भव्य मरिना प्रकल्प ..... १५०० कोटी रुपये खर्च करणार ........ आठ दिवसात प्रकल्पाचा आराखडा तयार करा ...... मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश ...... अँकर - अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यास गती मिळाली असून, यासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा पुढील आठ दिवसांत तयार करून टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मांडवा परिसरात सध्या बोटी उभी करण्यासाठी आवश्यक सुविधा अपुर्या असल्याने भरती-ओहोटीच्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढते पर्यटन आणि स्थानिक विकास लक्षात घेता जेट्टी परिसरात मरिना उभारण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.0
0
Report
पिंपरी चिंचवड़ में भीषण गर्मी पानी संकट, टँकर दर 800 से 1100 रुपये तक बढ़े
Pimpri-Chinchwad, Maharashtra:उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसा पिंपरी चिंचवड करांवरचे पाणी संकटा चावट अधिकच गडद होऊ लागले आहे. वाकड पिंपळे सौदागर पिंपळे निलख या भागात मोठ मोठ्या वसाहतींना दररोज दहा ते बारा टँकर पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे सोसायटी धारकांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून लाखो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. त्यातच आता टँकर पाणीपुरवठा करणाऱ्यांनी 800 रुपये वरून थेट अकराशे ते बाराशे रुपये टँकर दर केल्याने सोसायटी धारकांना अधिकच पैसे मोजावे लागत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सोसायटी धारक करत आहेत. याच संदर्भात सोसायटी धारकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...0
0
Report
Advertisement
नागपूर की संस्था युवतियों पर धार्मिक नियम थोपने के आरोप, भाजयुमो ने जांच की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या संस्थेत काम करणाऱ्या तरुणींवर धार्मिक नियम लादण्याचा दबावचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी भाजप भारतीय जनता युवा मोर्चा शिष्टमंडळाने पोलीस उपआयुक्त नविनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या निवेदनाद्वारे भाजयुमोने या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती नसून, धर्मांतराचे एखादे मोठे संघटित रॅकेट किंवा षडयंत्र असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल तपास करून पडद्यामागून काम करणाऱ्या सर्व संशयित सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केलीय0
0
Report
नेरुल में स्लैब गिरा, जान बची; दमकल ने लोगों को सुरक्षित बाहर निकाला
Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ सेक्टर 16ए मधील वूडलँड इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडलेय. सुदैवाने घरातील सदस्य स्वयंपाक घरात असल्याने जीवितहानी थोडक्यात टळली आहे. स्लॅब कोसळल्यामुळे चौथ्या मजल्याचे छत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्याचा दाब तिसऱ्या मजल्यापर्यंत खाली पोहोचला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य राबवत सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बाधित कुटुंबांना कुकशेत येथील बाजार संकुलात तात्पुरते ठेवण्यात आले असून काही जण त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. या दुर्घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलााय.0
0
Report
कोल्हापूर में शराबी बेटे की हत्या: पिता ने चाकू से मारी, गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा बापानेच खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील विक्रम नगर मध्ये उघडकीस आली आहे. मुलगा जुनेद मिरवणुकीत गेल्यानंतर तो जखमी झाला होता असा बनाव करत गफूर पठाण याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आपण स्वतःच आपल्या मुलाचा चाकूने भोकसून खून केल्याची कबुली गफूर सुलतान पठाण ( वय 40 ) या बापाने दिली आहे. राजारामपुरी पोलिसांनी गफूर पठाण याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गफूर पठाण हे आपली पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह राहतात. मुलगा जुनेद भंगारांच्या दुकानात काम करत होता, या दरम्यान त्याला दारूचे व्यसन जडले होते, त्यातून तो दारू पिऊन घरात कुटुंबियांना शिवीगाळ करत होता, त्याचा सर्वच कुटुंबियांना कंटाळा आला होता. जुनेद सोमवारी रात्री पुन्हा दारू पिऊन घरी आला, त्याने सर्व कुटुंबीयांना शिवीगाळ करायला सुरुवात केली , त्यावेळी वडील गफूर पठाण यानी काकडी कट करण्यासाठी ठेवलेला चाकू घेऊन जुनेदच्या छातीत खुपसला, त्यामुळे जुनेद गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या जुनेदला गफूर पठाण याने उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जुनेदच्या छातीवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये कळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, त्यावेळी गफूर पठाण याच्या जबाबवावात तफावत आढळून आली, पोलिसांनी वडील पठाण याला पोलिसी खाक्या दाखवताच आपणच आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली गफूर पठाण यांनी दिली.0
0
Report
Advertisement
