icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सिल्लोड में खेत तालाब में दो चिमुकले भाई डूबे, गांव में शोक

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून दुःखद घटना समोर आली आहे. शिवना गावात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव साबळे (वय १२) आणि गोपाल साबळे (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे मेंढपाळ कुटुंबातील असून शेततळ्याशेजारी खेळत असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेत दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

धर्मांतरण मामले में जमानत पर बड़ा फैसला, अदालत ने निर्णय सुरक्षित रखा

Nashik, Maharashtra:धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज मोठा फैसला जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण, निर्णय राखून ठेवला चौघा आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी लैंगिक अत्याचार, छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांवर न्यायालयाची नजर तौसीफ अत्तार अद्याप पोलीस कोठडीत, इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्या अनेक दिवसांच्या जोरदार कायदेशीर खडाजंगीनंतर निकालाचा क्षण जवळ आरोपींना दिलासा की सरकारी पक्षाला बळ, उद्याचा दिवस निर्णायक टीसीएस प्रकरणात उद्याच्या न्यायालयीन निर्णयाकडे राज्याचे लक्ष
0
0
Report

मोदी के आह्वान के बाद जैविक खादों की मांग बढ़ी, वाशीम के किसान लाभान्वित

Washim, Maharashtra:अँकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनाची बचत आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा,असे आवाहन आपल्या भाषणातून केले होते.त्यानंतर गांडुळ खतासह विविध सेंद्रिय खतांची मागणी वाढत आहे. वाशीम जिल्ह्यातील नागठाणा येथील शेतकरी गजानन सोळंके यांच्याकडे गांडुळ खत आणि गांडुळांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सोळंके हे गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होतं असून सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांनी सांगितले आहे.तसेच सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.
0
0
Report

ATS ने महाराष्ट्र में 40 ठिकानों पर छापेमारी, 21 आरोपियों पर गिरफ्तारी जारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि 'आयएसआय'चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे असे कळतंय, दरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठवाड्यातील १९ जण होते त्यात (छत्रपती संभाजीनगर १३, बीड २, नांदेड २, जालना १, लातूर १), आहेत.. यातील सगळ्यांना चौकशी अंती सोडल्याचे सूत्रांची माहिती आहे
0
0
Report
Advertisement

हिंगणा तालुक के तलाव में डूबकर नागपुर के दो युवक की मौत

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा हिंगणा तालुक्यातील सलाईमेंढा तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू - पोहताना खोल पाण्यात गेले असतांना बाहेर येता न आल्याने मृत्यू - आदित्य चांदे आणि अभिषेक सिरसाम अशी मृतकांची नाव आहेत.. - तलावाच्या मध्यभागी चिखलात अडकल्यान बाहेर निघू न शकल्याने अखेर बुडून मृत्यू - सायंकाळी तलावावर गेले असताना घडली दुर्घटना - माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी, हिंगणा पोलिसांची शोधमोहीम सुरू केली.. - अग्निशमन विभागाची तातडीने धाव, शोधमोहीम सुरू केली, - दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले... - परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; हिंगणा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद..
0
0
Report

येवला बस अड्डे का राजस्व रिकॉर्ड, 20 दिनों में 1.61 करोड़ रुपए

Yeola, Maharashtra:अँकर : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली संख्या येवला बस आगारासाठी लाभदायक ठरत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २२ एप्रิล ते ११ मे या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत येवला आगाराला तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या येवला आगारातून दररोज ४२ बसेसद्वारे सुमारे २४० फेऱ्या करण्यात येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी येवला आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली असून नागरिकांनी एसटी आगारातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी केले आहे.
0
0
Report

राज्य आदेश के बाद महापालिका आयुक्त ने चार अधिकारियों का विदेश दौरा रद्द किया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपावर १२०० कोटींचे कर्ज असताना ४ अधिकारी त्सुनामी आणि - भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी - स्वित्झरलंड आणि फ्रान्स दौऱ्यावर जाणार होते. यावर टीका झाली त्यानंतर याची दखल घेत आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार, हा दौरा महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे.. शहरात आतापर्यंत ३.३ रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. समुद्र जवळ नसल्याने त्सुनामीचा प्रश्नच नव्हता. तरी देखील मनपातील नगररचना उपसंचालक मनोज गजें, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब सिरसाट आणि नगररचनाकर कौस्तुभ भावे १६ ते २३ मे दरम्यान जर्मनीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. मात्र, राज्यातील सद्यःस्थिती पाहता शासनाने अधिकाऱ्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी चारही अधिकाऱ्यांचा आगामी दौरा अधिकृतरीत्या रद्द केल्याची माहिती दिली.
0
0
Report
Advertisement

अमरावती में किसान को हनी ट्रेप कर 70 लाख ठगे, पति-पत्नी आरोपी

Amravati, Maharashtra:अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप; बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 70 लाख अँकर :- अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून तब्बल 70 लाख रूपये उकळले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल रिचार्ज दुकानातून या हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्याने आधी एका महिलेला दहा हजार रुपयांची उसनवारीवर दिली त्यानंतर हा शेतकरी संबंधित महिलेच्या संपर्कात आला त्यानंतर महिलेने या शेतकऱ्याला आपल्या मायाजालामध्ये अडकवून शेतकऱ्याचे ब्लॅकमेलिंग सुरू केल्याने हे बिंग फुटले आहे. यामध्ये शेतकऱ्यांने या महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top