Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 08:36:36
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 08:34:27
Baramati, Maharashtra:सीआयडीच्या तपासाला एक महिना होऊन गेला. खूप अगोदर चौकशीसाठी त्यांना बोलवायला पाहिजे होतं. जे पुरावे आमच्या समोर येत आहेत आम्ही ते पुरावे तुमच्या सर्वांच्या समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत आणि आम्हाला यश मिळेल असं वाटतं. ही चौकशी खूप अगोदर व्हायला पाहिजे होती असं वाटतं. फक्त लेयर जेट नको तर त्यांची सर्वच विमान ग्राउंड झाली पाहिजेत. त्या कंपनीच्या मालकावर आणि कंपनीच्या संचालकांवर कारवाई झाली पाहिजे. चौकशी लवकरात लवकर पार पाडली पाहिजे अशी आमची सर्वांची मागणी आहे. सर्वात जास्त अनुभव शरद पवार यांकडे आहे. साठ वर्ष आता त्यांची राजकारणात पूर्ण झाली आहेत. आपल्या देशाला अशा एका नेतृत्वाची गरज आहे. महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांचे मनापासून आभार मानतो त्यांनाही त्यांची जाणीव झाली आहे. सर्वांनी पवार साहेबांना पाठिंबा दिला आहे. देश हित डोळ्यासमोर ठेवून त्यांनी पवार साहेबांना राज्यसभेला पाठवला आहे. मी घटनास्थळी सुरुवातीला पोहोचलो होतो. ज्या ठिकाणी विमानतळ आहे तो भाग दुष्काळी पडतो, तिथे पाण्याचा प्रश्न आहे. तुम्ही आज जरी त्या ठिकाणी गेला तरी तुम्हाला मोठी जाडी दिसणार नाही जी आहे ती अगदी छोटीशी लहान झुडुप आहेत. सर्व प्रश्न आम्ही लोकांसमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय आम्ही लढत आहोत. प्राथमिक हा जो त्यांचा अहवाल होता त्याचं स्वागत असेल पण खूप काही गोष्टी आहेत खूप काही प्रश्न आमचे राहिले आहेत ज्याला उत्तर मिळालं नाही. लवकरात लवकर या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळावी. लोकांच्या मनात संभ्रम आहे संशय आहे नक्की काय झालं महाराष्ट्राच्या जनतेला याचे उत्तर मिळावं. आता उन्हाळा सुरू झाला आहे बारामती तालुक्यात उन्हाळ्यात पाण्याचा प्रश्न निर्माण होतो. 32 गावात जिथे व्यवस्थित पाणी मिळत नाही. त्यामुळे मार्च महिन्यापासूनच पाण्याचे नियोजन करायचा प्रयत्न करत आहोत. पूर्वी बारामतीच्या हक्काचं पाणी आपल्याला मिळत होतं दादा तिथे पालकमंत्री होते त्यांना तालुक्याची माहिती होती. कुठून पाणी आणि कसं आणायचं होतं हे दादांना तिथे माहिती होतं. आता आपला सर्वांना एकत्र येऊन काम करावे लागेल. बारामती तालुक्याचा जो जिराईत भाग आहे त्या भागाला या उन्हाळ्यात पाणी कमी पडू दिले नाही पाहिजे. चाऱ्याचा प्रश्न सोडवावा लागेल. शरद पवार यांनी आमदार असताना मुख्यमंत्री असताना जानाई शिरसाई उपसा सिंचन योजना या ठिकाणी आणली होती. शिरसाई भागाची पाहणी करून त्या योजनेची आज मी माहिती घेणार आहे पाहणी करणार आहोत. या उन्हाळ्यात शेतकऱ्यांना पाण्याची किती आवश्यकता जाणवत आहे ते आपण समजून घेणार आहे त्यांच्यासाठी पुन्हा काम करणार आहे. पुढील आठवड्यात जाणाईची पाहणी असेल किंवा पुरंदर उपसा योजने ची पाहणी असेल ती करेल. नाझरे धरणा मधून देखील खूप पाणी बारामती तालुक्यात येत होतं हे सर्व पाणी आता येत राहिले पाहिजे. त्यामुळे उन्हाळा सुरू होण्यापूर्वीच आपण याचा आढावा घेणार आहोत. आता सर्वांनी एकत्र येणे गरजेचे आहे. बारामतीच्या हक्कासाठी या जिल्ह्यासाठी लढत राहिला पाहिजे. दादांसारखी दूरदृष्टीचे नेते आज आपल्यात राहिले नाहीत. बारामतीच्या हक्काचं सर्व पाणी आणण्याची जबाबदारी आता आपली सर्वसामान्य नागरिकांची आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 05, 2026 08:30:53
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Mar 05, 2026 08:17:52
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 05, 2026 08:03:51
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरूळपीर तालुक्यातील येडशी कुंड येथे बिबट्याने गाईवर हल्ला केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. महादेवराव बारड यांच्या मालकीच्या गाईवर मध्यरात्री हा हल्ला झाला असून या घटनेत गाईचा मृत्यू झाला आहे.मध्यरात्रीच्या सुमारास हा प्रकार घडला.सकाळी गावकऱ्यांना गाईचा मृतदेह आढळून आला.गाईच्या शरीरावरील जखमांवरून बिबट्याने हल्ला केल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.घटना गावाच्या परिसरातच घडल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.तसेच शेतकरी वर्गातही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचा वावर असल्याची चर्चा ग्रामस्थांमध्ये सुरू असून वन विभागाने तातडीने दखल घेऊन तपास करावा,अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 05, 2026 07:52:08
Satara, Maharashtra:सातारा - ई-चलनातील अन्यायकारक दंड आणि मनमानी कारवाईच्या विरोधात महाराष्ट्र राज्य मालवाहतूक संघटनेने आज 5 मार्चपासून राज्यव्यापी बेमुदत संप पुकारला आहे. या संपाला साताऱ्यातही मोठा प्रतिसाद मिळाला. कालिदास पेट्रोल पंप ते पोलीस कवायत मैदान दरम्यान ट्रक, टेम्पो, टॅक्सी आणि खाजगी बस एका ओळीत उभ्या करून वाहतूकदारांनी निषेध नोंदवला. वाहनांवर काळे झेंडे लावून शासनाच्या धोरणाविरोधात आंदोलन करण्यात आले. महाराष्ट्र ट्रान्सप्शन ॲक्शन कमिटी (M-TAC) च्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या संपामुळे मालवाहतूक ठप्प झाली असून जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शासनाने ई-चलन धोरण रद्द करेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा वाहतूकदारांनी दिला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 05, 2026 07:51:48
Nagpur, Maharashtra:स्फोटाच्या प्रत्यक्षदर्शी महिलेचा दोन्ही दिवसांनी मृत्यू... दुर्घटनेनंतर खालावली होती प्रकृती... रुग्णालयात दाखल होण्यापूर्वीच झाले मृत्यू.. नागपूर जिल्ह्यातील काटोल तालुक्यातील राऊळगावमधील एसबीएल एनर्जी लिमिटेड या दारूगोळा व स्फोटके तयार करणाऱ्या कारखान्यात 1 मार्च रोजी झालेल्या भीषण स्फोटात 19 कामगारांचा मृत्यू झाला. हा स्फोट प्रत्यक्ष पाहिलेल्या मात्र त्या वेळेस घटनास्थळापासून काही अंतरावरील प्लांट मध्ये कार्यरत एका महिला कामगाराचा दोन दिवसांनी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संगीता भोयर असे मृत महिलेचे नाव आहे. स्फोटानंतर परिसरात पाहिलेली परिस्थिती बघितल्यानंतर संगीता भोयर यांना जबर मानसिक धक्का बसला होता. घाबरलेल्या अवस्थेत त्या तातडीने घरी परतल्या. 2 मार्च रोजी त्यांच्या प्रकृती अचानक बिघडली. छातीत वेदना जाणवू लागल्या आणि अस्वस्थता वाढत गेली. 3 मार्चला प्रकृती अधिकच खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना नागपूर येथील मेडिकल रुग्णालयात नेले पण तिथे वैद्यकीय तपासणीत त्यांच्या मृत्यू आधीच झाल्याचे स्पष्ट झाले.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 05, 2026 07:34:58
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:पुरुषांची येथेच्छ् धुलाई करत गोसावी समाजातील महिलांची अनोखी होळी सांगलीच्या मिरजेत साजरी झाली आहे. धुळवड नंतर तिसऱ्या दिवशी होळीचा सण साजरा करण्याची गोसावी समाजामध्ये परंपरा आहे,दरवर्षी गोसावी समाजातील महिला आणि पुरुष हे दोघेही एकत्रित होळीचा सण साजरे करतात, या वेळी झेंड्याचा खेळ खेळला जातो,ज्यामध्ये महिलांच्या हातातील झेंड्याची काठी काढून घेण्याचा प्रयत्न, पुरुषांकडुन केला जातो,या दरम्यान महिला पुरुषांना बदडुण काढतात.यावेळी पुरुष कोणताही प्रतिकार न करता महिलांच्या हातून मार खातात, कृष्णानगर मध्ये दरवर्षी महिलांच्या हातून मार खाऊन होळी साजरी करण्याचे अनोखी परंपरा गोसावी समाजाकडून जोपासली जाते.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 05, 2026 07:16:47
Nashik, Maharashtra:आज महाराष्ट्र ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने राज्यभर इ चलन विरोधात आंदोलन करण्यात येत असून नाशिक मध्ये देखील ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने आंदोलन करण्यात येत आहे खोटे व कोणत्याही पुराव्या शिवाय टाकलेले इ चलन त्वरित सरकारने मागे घ्यावेत 2017 पासून फक्त सरकार आश्वासन देते मात्र त्यांचे ई चलन द्वारे जे तिजोरी भरण्याचे काम चालू आहे ते चालू आहे असा देखील आरोप ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या वतीने करण्यात आला आहे र आमची मागणी मान्य नाही झाली तर आम्ही आमच्या या पेक्ष्या ही मोठ्या स्वरूपाच आंदोलन करण्याचा इशारा दिलाय...याचाच आढावा घेतलाय आमचे नाशिकचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 05, 2026 07:06:49
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 05, 2026 06:49:19
Kolhapur, Maharashtra:महाराष्ट्र शासन व केंद्र शासनाकडून आधीच बसेसवर विविध प्रकारचे कर लावले जातात. यात भरीस भर म्हणून ई चलनाद्वारे अन्यायी व जुल्मी अशा प्रकारची दंड आकारणी केली जात असल्याचा आरोप करत या विरोधात कोल्हापूर जिल्हा बस वाहतूक संघटनेच्या वतीने देखील आंदोलन केलं जात आहे. कोल्हापुरातील दाभोळकर कॉर्नर येथून प्रादेशिक परिवहन कार्यालयापर्यंत बससह मोर्चा काढला जाणार आहे. या आंदोलकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत यावर एक नजर टाकूया.. 1) ई चलनाद्वारे आकारणेत आलेले आतापर्यंतचे सर्व दंड तात्काळ रदद् करणेत यावेत व नव्याने नियमावली तयार करावी. 2) जागोजागी फोटो काढून दंड आकारणे ताबडतोब बंद करावे. 3) 50 % आगाऊ दंड भरणेची सक्ती तात्काळ रदद् करावी. 4 ) दंड वसुलीचा महसुल केंद्रीत दृष्टीकोन तात्कálne थांबवावा. 5) रोड टॅक्स व टोल अशाप्रकारे एकाच रस्त्यासाठी दुहेरी कर आकारणी बंद करणेत यावी. GRF Out Play Byte:- 1) सतीशचंद्र कांबळे, वाहनधारक 2) प्रदीप राठोड , वाहनधारक 3 अशोक शिंदे, वाहनधारक
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 05, 2026 06:47:50
0
comment0
Report
Advertisement
Back to top