445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
जालना में धारदार हथियार के वीडियो बनाकर दहशत फैलाने वाले रीलस्टार की गिरफ्तारी
Jalna, Maharashtra:जालना | लूटमार करणाऱ्या रील स्टारला सोशल मीडियावर दहशत पसरवल्याप्रकरणी अटक सोशल मीडियावर धारदार शस्त्रांसह रील बनवणाऱ्या रीलस्टारला कदीम जालना पोलिसांकडून अटक नूतन वसाहत परिसरातून आरोपी ताब्यात दोन तलवारी आणि एक कोयता जप्त आरोपीवर पैशाची लूटमार केल्या प्रकरणीही गुन्हे दाखल या प्रकरणी आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्याची चौकशी सुरू आहे. या आरोपीवर यापूर्वीही लूटमारीचे 4 गुन्हे दाखल असल्याची माहिती कदीम जालना पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी दिली आहे.0
0
Report
नंदिनी नदी की सफाई के लिए मंत्री महाजन ने अभियान शुरू किया
Nashik, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त उन्नत नाशिक अभियाना अंतर्गत नाशकात पर्यावरण आणि स्वच्छता मोहीम महानगरपालिकेच्या वतीने हातात घेण्यात आली आहे या निमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिकची जुनी ओळख असलेल्या नंदिनी नदी परिसरात स्वच्छ केला.... गेल्या अनेक वर्षांपासून नंदिनी नदी परिसरात प्रदूषण आणि अस्वच्छता असल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... अनेक पर्यावरण प्रेमींनी याबद्दल आवाज उठवून नंदिनी नदीला पूर्वीसारखाच प्रवाहित करावं अशी मागणी करण्यात होत होती... या नंदिनी नदीमध्ये अनेक कंपन्यांचे सांडपाणी मिसळून या नंदिनी नदी पूर्णतः खराब झाल्याचे चित्र पाहायला मिळत होतं... पूर्वीसारखं नंदिनीला स्वरूप मिळावं यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत.... त्यानिमित्ताने मंत्री गिरीश महाजन यांनी नंदिनी नदी परिसरात उतरून स्वच्छता मोहीम घेतली... यासंदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
बेळगाव के तवंदी घाट में भारी बारिश से सड़कें बाढ़, यातायात बाधित
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातील तवंदि घाटात मुसळधार पाऊस झाला आहे. या पावसामुळे घाटामधील रस्ते पाणीच पाणी झाले होते. घाटात पावसाचा जोर इतका होता की रस्त्यावरून नदी वाहते अशी दृश्ये मोबाईल मध्ये कैद झाली आहे. या पावसामुळे काही काळ वाहतूक देखील खोळंबली होती.0
0
Report
Advertisement
चिपळुण में ठंड पेय गाड़ी पर अशुद्ध पानी के आरोप, नागरिक भड़के
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळुण में परप्रांतीय ठंड पेय की गाड़ी पर नागरिकों का उग्र प्रदर्शन.. अशुद्ध पानी के इस्तेमाल के आरोप, सीधे पुलिस तक धाव! अँकर: चिपळुण में उत्तर प्रदेश से आई ठंड पेय की गाड़ी पर स्थानीय नागरिकों ने तीव्र संतोष व्यक्त किया है.. बाज़ार भाव से सीधे आधे दाम पर यह पेय बेचा जा रहा था. फिर भी इसमें अत्यंत अशुद्ध पानी और दूषित बर्फ़ का इस्तेमाल किया गया था, ऐसा नागरिकों ने आरोप लगाया है.. हा प्रकार उजागर होते ही संतप्त चिपळुणकरों ने सीधे पुलिस में धाव लेने की मांग निवेदन के माध्यम से की है.. मई में गर्मी में लोगों के स्वास्थ्य के साथ खेल रहे इस विक्रेताओं पर अब पुलिस क्या कार्रवाई करेगी, यह सभी की निगाहें लग गई हैं..0
0
Report
सोलापुर विधानपरिषद चुनाव: शिंदे-मोहिते पाटील की बैठक से राजनीतिक हलचल तेज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरात विधानपरिषद निवडणुकीच्या हालचालींना आला वेग, खा. धैर्यशील मोहिते पाटील आज सकाळी घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - अनेक नाट्यमय घडामोडीनंतर सोलापूर विधान परिषदेची लढत स्पष्ट - भाजपचे राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे वसंतराव देशमुख यांच्यात होणार थेट लढत - निवडणुकीचे चित्र स्पष्ट होतात खा. धैर्यशील मोहिते पाटील आज घेणार काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांची भेट - विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर यांचा अर्ज बाद झाल्यानंतर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष चांगलाच ऍक्टिव्ह मोडवर - भाजपाविरुद्ध संधीचे सोने करण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सज्ज - विधानपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने पालकमंत्री जयकुमार गोरे खा. धैर्यशील मोहिते पाटील यांच्यातील राजकीय संघर्ष वाढण्याची शक्यता - काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यात निवडणुकीच्या अनुषंगाने काय चर्चा होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे0
0
Report
मराठा नेता मनोज जरांगे पाटील अस्पताल से छुट्टी लेकर शहगड के घर रवाना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांना छत्रपती संभाजीनगर येथील रुग्णालयातून सुट्टी देण्यात झाली आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना रुग्णालयातून घरी जाण्याची परवानगी दिली. डिस्चार्जनंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती संभाजीनगरहून त्यांच्या शहगड येथील निवासस्थानी रवाना झाले. दरम्यान, डॉक्टरांनी त्यांना पुढील आठवडाभर पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली में 15 पुलिस अफसरों के तबादले, कानून-व्यवस्था मजबूत
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील 15 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत, या बदल्याचे आदेश पोलीस अधीक्षक निलाभ रोहन यांनी काढले असून बदली झालेल्या अधिकाऱ्यांनी तातडीने बदलीच्या ठिकाणी रुजू होण्याच्या आदेश देण्यात आले आहेत जिल्ह्यामध्ये पोलीस प्रशासनाने कायदा व सुव्यवस्था अधिक मजबूत करण्यासाठी पोलीस अधीक्षक यांनी हिंगोलीत मोठे फेरबदल केले आहेत.0
0
Report
नागफणी पॉइंट पर बारिश की उम्मीद, पुणे-ठाणे में मौसम का बदला मिजाज
Shirur, Maharashtra:राज्यात यंदा उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात पाहायला मिळाला असून, अनेक भागांत तापमान ४५ अंशाच्या पार गेलं होतं. त्यामुळे सर्वसामान्य नागरिक घामाघूम झाले होते. मात्र, आता सर्वांनाच वेध लागलेत ते पावसाचे पुणे आणि ठाणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेले नागफणी पॉईंट वर सध्या पावसाची चाहूल लागल्याचं पाहायला मिळत आहे. या ठिकाणी ढग दाटून आले असून, लवकरच पावसाचं आगमन होईल असं वातावरण तयार झालंय. समुद्रसपाटीपासून सुमारे ३ हजार फूट उंचीवर असलेल्या या नागफणी पॉईंटवरून निसर्गाचा एक विलोभनीय नजारा पाहायला मिळतोय. याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
येवला के पुरणगाव इलाके में बिबटिए ने पशुओं पर हमला, एक गाय की मौत
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पुरणगाव या परिसरामध्ये ठोंबरे वस्तीवर बिबट्याने शेतात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून एक गाय ठार केली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाळीव प्राण्यांचा आरडा ओरडा झाल्याने शेतकरी जागे झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. शेतकरी विठ्ठल ठोंबरे यांचे यात नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
कुल्हापुर में पिता की हत्या, बेटे ने दोस्त के साथ मिलकर वारदात किया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत वडिलांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज मुजावर हे दारूच्या नशेत पत्नी व मुलाला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून त्यांचा मुलगा रेहान मुजावर याने मित्र विरपाशा सैदुलाल जहाँगीरदार याच्या मदतीने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी 29 मे च्या रात्री साडेअकराच्या सुमारास फिरोज मुजावर यांना घराच्या मागील बाजूस नेले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.. या हल्ल्यात फिरोज मुजावर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन एका विहिरीत टाकले. त्यानंतर संशय टाळण्यासाठी रेहान मुजावर याने शिरोली पोलिस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तक्रारीतील काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रेहान मुजावर आणि विरपाशा जहाँगीरदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट वडिलांच्या खुनात झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिरोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
चिपळूण नगरपरिषद पर शिंदे सेना की तेज़ धावा, सागर शेडगे पर कार्रवाई की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण नगरपरिषदेवर शिंदे सेनेची धडक.. सागर शेडगे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी.. काही दिवसांपूर्वी नगराध्य उमेश सकपाळ यांनी केबिनमध्ये बोलावून घेत अपशब्द वापरून धमकी दिल्याची तक्रार मलमत्ता पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी केली होती.. त्या तक्रारीचा विरोध करत आक्रमक झालेले शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेत मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनावर धडक दिली.. या प्रकरणात चिपळूण शहराची बदनामी झाली आहे. मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी नगराध्यक्षांवर केलेले आरोप सिद्ध करावे अन्यथा शहरातील भर चौकात त्यांनी माफी मागेल तसे न केल्यास शिवसेना स्टाईल नें त्यांना धडा शिकवू असा इशारा शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिला..0
0
Report
आयडिया: कांदा खरीद दर बढ़ाने से किसान खुश but मांग है 25 रुपये प्रतिकिलो
Lasalgaon, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अवघ्या एका आठवड्यात दोन महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहेत पहिल्या परिपत्रकाद्वारे शासकीय कांदा खरेदी दरात प्रतिकिलो ३ रुपये ४५ पैशांची वाढ करून १५ रुपये ८० पैसे दराने खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानंतर दुसऱ्या परिपत्रकात कांदा खरेदी प्रक्रियेमधील काही जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत मात्र, शासनाच्या या निर्णयांनंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही उत्पादन खर्च आणि सध्याची बाजार परिस्थिती लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्रांवर थेट बाजार समित्यांमधून क kiman २५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहे0
0
Report
Advertisement
दिल्ली के होटल- लॉज में आग सुरक्षा संकट: 1999–2026 में सिर्फ 51 NOC
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्ली येथे हॉटेलला आग लागून २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील सर्व लॉजिंगच्या अग्नीशमन एनओसीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. १९९९ पासून २०२६ पर्यंत फक्त ५१ लॉजिंग चालकांनी एनओसी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे शहरात लहान-मोठे मिळून किमान ५०० पेक्षा अधिक लॉज आहेत. बहुतांश लॉज या कोणत्याही सुरक्षेविना रामभरोसे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने तीन वेगवेगळ्या पथकांतर्फे हॉटेल, लॉजची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ५१ जणांनी अंतिम एनओसी घेतली ते नंतर पुननोंदणीसाठी आले नाहीत. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून अंतिम एनओसी घेण्याची पद्धत मागील काही वर्षात बंद झाली आहे. दिल्ली येथील घटनेनंतर पुन्हा एकदा हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
वन्यजीव संरक्षण क्षेत्र में कृत्रिम पानवटे सूखे, स्थानीय सहयोगी ने टैंकर से पानी दिया
Yeola, Maharashtra:वन्यजीव संवर्धन क्षेत्र येवला अंतर्गत येणाऱ्या विसापूर कातरवाडी वडगाव फॉरेस्ट परिसरात वनविभागाकडून बांधलेले कृत्रिम पानवटे हे कोरडे झाले होते वन्यजीवांची होत असलेली भटकंती यामुळे आणि मित्र भागवत झाल्टे यांनी आपल्या स्वखर्चाने पानवट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडून वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे0
0
Report
अनिकेत तटकरे ने सावर्डे स्थित गोविंदराव निकम की समाधी पर आशीर्वाद लिया
Ratnagiri, Maharashtra:अनिकेत तटकरे यांनी माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या सावर्डे येथील समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले..कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिनविरोध होऊन विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यावर अनिकेत तटकरे यांनी माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या सावर्डे येथील समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले..आमदार अनिकेत तटकरे यांचे चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले..0
0
Report
Advertisement
