445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नवनीत राणा के घर गणपति बाप्पा का आगमन: आशीर्वाद और सुख-समृद्धि की प्रार्थना
Amravati, Maharashtra:नवनीत राणांच्या घरी गणपती बाप्पांचे आगमन; सर्वांच्या आयुष्यात आनंद दे.... बाप्पांकडे नवनीत राणांची आर्त हाक अँकर :- अमरावतीच्या माजी खासदार नवनीत राणा यांच्या घरी गणपती बाप्पांचे मोठ्या उत्साहात आगमन झाले. ढोल ताशांच्या गजरात आणि भक्तिमय वातावरणात बाप्पांची स्थापना करण्यात आली. नवनीत राणा यांनी बाप्पांची विधिवत पूजा करत गणरायाचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांनी बाप्पांकडे सर्वांच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि आनंद नांदावा अशी मनोभावे प्रार्थना केली. समाजात शांतता आणि सलोखा कायम राहावा प्रत्येकाच्या अडचणी दूर व्हाव्यात आणि सर्वांना यश समृद्धी मिळावी अशी आर्त हाक त्यांनी गणरायाच्या चरणी घातली. गणेशोत्सवानिमित्त त्यांच्या निवासस्थानी भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले.0
0
Report
मोरगांव में भाद्रपद यात्रा शुरू, लाखों भक्त जल अभिषेक के साथ दर्शन को पहुंचे
Rui, Maharashtra:अष्टविनायकातील प्रथम स्थान असलेल्या मोरगाव येथे भाद्रपद यात्रा उत्सव सुरू आहे. भाविकांना श्रींच्या मुख्य गाभाऱ्यात प्रवेश दिला जात आणि भाविकांना गणपती ला जल अभिषेक करता येतो. त्यामुळे या यात्रेसाठी राज्यभरातून लाखो गणेश भक्त मोरगाव येथे दाखल झाले आहेत. वर्षभरातील भाद्रपद व माघ महिन्यात श्री मयुरेश्वराची मोठी यात्रा भरते. या वेळी भाविकांना श्रीच्या मूर्तीला जल अभिषेक घालता येतो आणि दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली आहे।0
0
Report
पुणे के दौंड में वीरधवल जगदाळे के निवासस्थानी गणराय का भव्य स्वागत
Rui, Maharashtra:पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष वीरधवल जगदाळे यांच्या निवासस्थानी गणरायाचे वाजत-गाजत स्वागत... पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे पाटील यांच्या पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातील निवासस्थानी गणरायाचे मानाच्या पालखीतून परंपरेप्रमाणे ढोल ताशाच्या गजरात मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. बळीराजाला सुखाचे दिवस येउदेत आणि भरपूर पाऊस पडुदेत असे साकडे त्यांनी यावेळी गणरायाला घातले.0
0
Report
Advertisement
सातारा के कोयना में नाव से गणेश जी का अनोखा आगमन, भक्तों ने किया स्वागत
Satara, Maharashtra:सातारा - गणेशोत्सवाच्या सुरुवातीलाच दुर्गम आणि डोंगराळ भाग असलेल्या कोयना विभागात आगळ्यावेगळ्या पद्धतीने गणरायाचे स्वागत करण्यात आले. कोयना धरणाच्या छत्रपती शिवाजी महाराज शिवसागर जलाशयामधून चक्क बोटीतून गणरायाला आपल्या घरी आणण्यात आले. बोटीमधून गणरायाची मूर्ती घेऊन भक्तांनी आपल्या गावाकडे प्रस्थान केले आणि विधिवत गणेशाची प्रतिष्ठापना केली. यावेळी गणरायाचा जयघोष देखील करण्यात आला. कोयना विभागातील या अनोख्या गणेश आगमनाने या भागातील वातावरण भक्तिमय झाले होते.0
0
Report
ओझर में विघ्नहर जन्मोत्सव श्रद्धा और उत्साह के साथ संपन्न
Barav, Maharashtra:ओझरच्या विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात संपन्न झाला आहे. Anc: गणेश जयंतीनिमित्त अष्टविनायक क्षेत्र ओझरमध्ये श्री विघ्नहराचा जन्मोत्सव सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि जल्लोषात साजरा करण्यात येतोय. या निमित्ताने बाप्पाचा गाभारा आकर्षक विविधरंगी फुलांनी सजवण्यात आला असून गणरायाला सुवर्ण अलंकारांनी विभूषित करण्यात आले आहे. तसेच गेल्या चार दिवसांपासून सुरू असलेल्या पारंपरिक द्वारयात्रा उत्सवाचीही आज सांगता होत असून, भाविकांसाठी कीर्तन, महाप्रसाद आणि शेरण्या वाटपाचे नियोजन करण्यात आले आहे.याचाच मंदिर गाभाय्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी... प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया ओझर पुणे...0
0
Report
मराठा समाज का मुंबई पलायन: एकाकी उपोषण और डाव-पेच का तनाव
Jalna, Maharashtra:जालना |मनोज जरांगे पाटील पत्रकार परिषद पॉइंटर्स दोन महत्वाचे विषय राज्यातील मराठा समाजाला सांगायचे आहेत.सध्या मला बोलता येतं.16 दिवसांच्या उपोषणात डॉक्टरांनी सलाईन लावल्यानं मला बरं वाटत होतं.पण काल पोलिसांनी परवानगी नाकारल्याने औषधोपचार पाणी मि सोडलं आहे. आता सर्व बंद केल्यानं पोटात आग होण्यास सुरुवात झाली आहे.उद्या बोलण्यास त्रास होईल त्यामुळे महत्वाचे विषय मला सांगायचे आहेत त्याबदल कुणीही वाईट वाटून घेऊ नका *उद्या आपण सकाळी 11 वाजता मुंबईाच्या दिशेने निघणार आहोत.मुंबईला जायचा शब्द मागे घेतला जाणार नाही यामुळे समाजाच्या स्वाभिमानाला धक्का लागणार नाही.ठरलेल्या मार्गानेच मुंबईला जायचं आहे* *माझ्या सोबत 2 अँबुलनस असतील 10माणसांपेक्षा माझ्या सोबत कुणीही असणार नाही.* *देवेंद्र फडणवीस यांच्या तोडीस तोड डाव टाकावा लागतो.फडणवीस यांनी गणेशोत्सवाच्या आडून मराठ्यांवर डाव टाकला.मराठे मुंबईत येणार आणि धिंगाणा घालणार. मग दंगल घडणार,* *परवानगी नाकारली ना मग फडणवीस मला एकट्याला परवानगी देणार की नाही.?आझाद मैदानांवर आता मला परवानगी देणार का.?मि एकटा आधी खिंड लढवतो आधी एकटा मि मुंबईत जातो,समाजाने येऊ नये असं नाही,वर्गणी करून केलेल्या गाड्या तशाच ठेवा पैसे खर्च करू नका* *देव देवতांच्या आडून त्यांनी डाव टाकला आहे त्यामुळे डाव पलटतो.मि एकटा लढतो.* *मुंबईत मराठा समाजाला योग्य वेळी बोलावलं जाईल.तुम्ही तुमच्या गावात सावध आणि सुरक्षित राहा.* *मराठा समाजाने आता नाराज होऊ नये.वेळप्रसंगी निर्णय बदलावे लागतात.निर्णय फक्त तुम्ही येण्याचा बदलला आहे.* *फडणवीस यांना डाव टाकून मराठ्यांना जिंकवावं लागेल,सण उत्सव आहेत.* *सगळं सैन्य कधीच एका दिवशी गेलेलं नाही.काही घात झाला तर.मि एकटा मुंबईत जातो.मला कोण अडवतो कोण परवानगी नाकारतो ते बघतो.मराठ्यांची तिथे गर्दी होणार म्हणून तुम्ही परवानगी नाकारली ना.?आता मि एकटा येतो.आता आम्ही सरकार आणि न्यायदेवतेचा सन्मान होणार की नाही.?* जेवण्यासाठी आणलेलं साहित्य तसंच ठेवा.ते साहित्य नंतर मुंबईत कामाला येईल. मुक्कामाचे ठिकाण कायम राहील, मुक्कामाच्या ठिकाणी अंतरवालीच्या उपोषणासारखं ठिकाण तयार करा.मि तिथेच उपोषण करीन.प्रत्येक ठिकाणी अशीच व्यवस्था ठेवा.कुठेही हार तुरे ठेऊ नका. *मि एकटा सध्या मुंबईत उपोषण करत जाणार,माझ्यासोबत 10 लोक असणार,मराठा समाज मुंबईत गणेशोत्सवाच्या काळात येणार असल्यानं सरकारनं परवानगी नाकारली,त्यामुळे मि एकटा मुंबईत उपोषणाला जाणार,मराठा समाजाने सध्या मुंबईत उपोषणाला येऊ नये,जरांजे यांचं आवाहन,मि सांगेल तेव्हा मुंबईत या-जरांजे* मला आशीर्वाद देण्यासाठी मराठा समाज मि मुंबईला जाणाऱ्या मार्गावर येऊ शकतो. *मराठा समाजाच्या महिलांनी हळदी कुंकवाच्या कार्यक्रमासाठी कधी यायचं ते दोन दिवस अगोदर सांगितलं जाईल.मला माझा डाव टाकू द्या.मि समाजासाठी थांबणार नाही.रस्त्यावर काटे अंथरलेले आहेत ते आधी मला दूर करू द्या मराठा समाजाचे रस्त्यावर सांडणारे रक्त मला बघायचे नाही माझं सांडलं तरी चालेल,मराठा समाजावर अडचणी येऊ नये म्हणून हा निर्णय मि घेतला आहे* समाजाला संकटात सोडून मि मजा करणं मला योग्य वाटत नाही,संकटाच्या दाढेत मि चाललो डावाला प्रतिडाव मला टाकू द्या *"दम असेल तर आमची परवानगी आता रोखून दाखवा,नव्याने पोलिसांकडे अर्ज करा"* *मराठ्यांनी फक्त आता गावं संभाळावेत. मि आंदोलन सांभाळतो.मुंबई सांभाळतो.महाराष्ट्रभर पाठिंबा सुरू ठेवा* बोलता आलं तरच मि एखाद्या ठिकाणी भाषण करीन अन्यथा करणार नाही *माझी ही शेवटची भेट म्हणून मला भेटायला या.पण हार मानायची नाही.जातवान लढा.समाजाची हार होऊ देऊ नका.मेला पण शरण नाही गेला असा संदेश समाजात जाईल.* *छातीवर गोळ्या घेतल्या,पळून नाही गेला.असा वाटलं पाहिजे.समाजाला देऊन मेला नाही दिलं तर नाही दिलं म्हणून मेला असं लोकांनी म्हणायला पाहिजे* *मला फक्त समाजाच्या लेकरांसाठी शरण जायचं नाही.फडणवीस याचा हा शेवटचा डाव होता.त्याच्या डावाचा शेवट होत नाही.उद्या सकाळी 2 गाड्या आणि 2 अँबुलनस घेऊन मि निघतो मला कोण अडवतो ते बघतो* जोपर्यंत मि जगेल तोपर्यंत झुंज देतो.माझ्या आंदोलनाला पाठिंबा म्हणून गावा गावात शांतता फेऱ्या काढा *दगा फटकா कधी कुणासोबत होईल सांगता येत नाही.संकट किती आले आणि शत्रू कितीही मोठा असू द्या मि छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा आहे* मराठा समाजाची शक्ती सरकारला कळाली आहे.त्यामुळे मुंबईत धुराळा वाजू शकतो हे सरकारच्या लक्षात आलं आहे मराठा समाजाने आता मोहीम बदलावी,मराठा समाजाने रागावू नये.उलट मोहीम बदला माझ्या मार्गात कोणताही बदल होणार नाही. *निर्णय बदलण्याचे कारण* प्रत्येक वेळी परवानग्या नाकारूनही आम्ही तिथे गेल्यानंतर आम्हाला परवानगी दिली यावेळी त्यांनी डाव रचला *ऑन CM फडणवीस* सांगू ना मुंबईला आल्यानंतर. आता मि एकटा येत आहे.कायद्याच्या आतल्या कोणत्या आणि बाहेरच्या कोणत्या हे तिथे आल्यावर कळेल.आता डावाला प्रति डाव आहे.मर्दासारखे डाव टाका.नपुसकासारखे नको.सरकारशी मैत्री करण्यासाठी समजाची का रांगोळी करू.सरकार मला गोळ्या घालून मारणार.? समाजाचा सगळा उन्हाळा करून आपण चांगलं जगायचं असं होणार नाही.त्यापेक्षा मि गोळ्याझेलो. समाजाला मि माय बाप मानतो.समाजाचं पोरगं म्हणून जाऊ द्या माझा बळी *ऑन उपोषण* मि आतापर्यंत इथे उपोषण केलं.सरकारचं ऐकून औषधोपचार घेतले. आता मि सलाईन औषधोपचार घेणार नाही.मि मेल्यावर किंवा कोमात गेल्यावर सरकार काय करेल मला माहित नाही.पण मला समजेल तोपर्यंत मि उपचार घेणार नाही.शरीर मला दान करता येईल तेवढं करीन. पोलीस डॉक्टरांनी मला मुंबईत देखील हात लावायचा नाही. ते मुंबईत गेल्यावर ठरवू,(कोर्टाच्या उपचारांच्या निर्देशावर) राजकारणी त्यांच्या स्वार्थासाठी आपल्यात भांडण लावायला बसलेत,राजकारण्यांनी तुमच्या लेकरांचं कल्याण केलेलं नाही *जो आपल्याला आरक्षण देईल तो निवडून आणता येईल.यांना निवडुन देऊन चूक केली.आवडी असून फायदा काय.?* तुमच्या आवडीचा नेता आणि पक्षाचं करता काय,तो काही समाजाचं कल्याण करत नाही *निवडून आणण आणि मतं देणं आपल्या हातात आहे.चिन्ह असलेल्या उमेदवारापेक्षा चिन्ह नसलेल्या उमेदवाराला आपली मते मिळाली तर जास्त मतं मते पडतील* जो मराठयांना आरक्षण देईल.तो निवडून आणू *ऑन चर्चा* *कुठेही पटांगणात चर्चेला यावं आम्ही तयार आहोत. मराठे आता मुंबई कोणत्याही दिवशी जॅम करू शकतात आतां आम्हाला आरक्षण पाहिजे. सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी पाहिजे सरकार मेंगे आहे.फडणवीस विखे यांनी फसवलं आहे.शिंदेंच्या मंत्र्याने आम्हाला फसवलं आमचं वाटोळं केलं* योग्यवेळी मराठा समाजाला आणि महिलांना मुंबईत बोलावतो.आपली ही शेवटची भेट राहील.आलो तर नशिबाने परत येईल.0
0
Report
Advertisement
सातारा में गणपति आगमन: पर्यटन मंत्री Desai के साथ भक्तिमय उत्साह
Satara, Maharashtra:सातारा: राज्य पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या सातारा शहरातील 'कोयना दौलत' या निवासस्थानी पारंपारिक वाद्यांच्या गजरात आणि पालखीतून मिरवणूक काढून लाडक्या बाप्पाचे अत्यंत उत्साहात आगमन झाले. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या पत्नी स्मिता देसाई आणि यशराज देसाई कन्या ईश्वरी देसाई यांनी बाप्पाचे औक्षण केले. पिढ्यांपासून चालत आलेल्या परंपरेनुसार चांदीच्या पालखीतून गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून राज्यभरात सुजलाम सुफलाम वातावरण राहावे आणि सर्वसामान्यांच्या जीवनातील संकट दूर व्हावीत, अशी प्रार्थना मंत्री देसाई यांनी यावेळी केली.0
0
Report
वनमंत्री गणेश नाईक ने परिवार के साथ गणेश दर्शन किया और आरती उतारी
Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी सहकुटुंब घेतले गणरायाचे दर्शन. वाशी मधील नवसाला पावणाऱ्या महाराजाची गणेश नाईकांच्या हस्ते प्राणप्रतिस्थापना. संपूर्ण नाईक कुटुंबियांनी आरती करुन घेतले गणरायाचे दर्शन.0
0
Report
वाशीम में गणेश मूर्तियों के दाम 30% बढ़े, खरीदारी प्रभावित
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात लाडक्या गणरायाच्या आगमनाची धूम सुरू झाली असून,बाप्पाला घरी नेण्यासाठी बाजारपेठेत भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळतेय.मात्र, यंदा गणेशमूर्तींच्या दरात तब्बल ३० टक्क्यांनी वाढ झाल्याने त्याचा परिणाम खरेदीवर झाला आहे. कच्च्या मालाच्या दरवाढीमुळे मूर्ती महागल्या असून,अनेक भाविक मोठ्या मूर्तीऐवजी लहान मूर्तींना पसंती देत आहेत.बाजारपेठेत गणेशमूर्तींसह सजावटीचे आणि पूजेचे साहित्य खरेदीसाठीही लगबग सुरू आहे.यंदा जिल्ह्यात ७६४ सार्वजनिक गणेश मंडळं आणि ‘एक गाव, एक गणपती’ अंतर्गत २२८ गणपतींची स्थापना होणार आहे.गणेशोत्सव शांततेत पार पडावा यासाठी प्रशासनाकडून पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर राजाच आज विधिवत पूजा: प्राणप्रतिष्ठा और 32 वर्ष की परंपरा
Nagpur, Maharashtra:नागपूरचा राजाच आज विधिवत पूजा करके प्राणप्रतिष्ठा करण्यात येतेय. यंदा मंडळाचे नागपूर राजाचं 32 वे वर्ष आहे... तिथून आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधिनी0
0
Report
नासिक में गणेशोत्सव की धूम: घर-घर पहुँचा गणपति बाप्पा का उत्साह
Nashik, Maharashtra:लाडक्या गणरायाचं आज आगमन झालेलं आहे गणेशभक्तांमध्ये सकाळपासूनच उत्साह संचारला असून आपल्या लाडक्या गणरायाला घरी घेऊन जाण्यासाठी नागरिकांमध्ये उत्साह पाहायला मिळतोय...हे दहा दिवस मनोभावे गणरायाची सेवा करणार आहे...वर्षभर या दिवसांची गणेशभक्त वाट बघत असतात गणपती बाप्पा मोरया चा जयघोष करत आपल्या लाडक्या गणरायाची आज प्रतिष्ठापना करून त्याला हवे तसे नैवेद्य दाखवणार आहे...चिमुकल्यांपासून ते ज्येष्ठांपर्यंत गणरायाला घरी घेऊन जाताना चा उत्साह पाहायला मिळतोय...नाशिक मधून याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
नवी मुंबई में नितेश राणे बोले: हिंदुओं की सुरक्षा, किसी को बख्शा नहीं जाएगा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मंत्री नितेश राणे वराह जयंती निमित्त नवी मुंबईत. नितेश राणे यांच्या हस्ते वराह जयंतीनिमित्त महाआरती कोणीही हिंदूंकडे वाकड्या नजरेने बघितलं तर सरकार म्हणून आम्ही कोणालाही सोडणार नाही. आमची प्राथमिकता प्राधान्य ठरलेलं आहे. आमच्या सरकारमध्ये पहिलं हिंदूंच हित पाहिलं जाणार मग सगळ्यांना मोजणार त्यामुळे कोणीही कुठेही वळवळ करू नये. कुठल्याही हिंदुला त्रास दिला तर जसं आज वराह जयंती निमित्त आलोय ना तसं न सांगता येईल आणि पाहिजे तसा तांडव करेन. कुठल्याही प्रकारचा जिहाद आम्ही कोणालाही करू देणार नाही. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराने चालणारा देश हा एक हिंदू राष्ट्र आहे इथे सर्व धर्म समभाव चा टेपरेकॉर्डर लावायचं नाही. इथे हिंदूंना पहिलं मोजले जाणार मग सगळ्यांना अशी स्पष्ट भूमिका आहे. जेव्हा जेव्हा कोणीही हिरव्या रंगाचा राक्षस आपल्या हिंदू समाजाकडे वाकड्या नजरेने बघेल तेव्हा रक्षणासाठी प्रत्येक हिंदूंनी पुढे यावं.0
0
Report
Advertisement
हिंदी दिवस पर अमित शाह करेंगे राजभाषा सम्मेलन का उद्घाटन
Navi Mumbai, Maharashtra:केंद्रीय गृह मंत्रालयाच्या राजभाषा विभागातर्फे नवी मुंबईतील वाशी मधील सिडको एक्सिबिशन सेंटर येथे आज हिंदी दिवस आणि सहाव्या अखिल भारतीय राजभाषा संमेलनाचं आयोजन करण्यात आलेय. या संमेलनाचं उद्घाटन केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्या हस्ते होणार आहे. हिंदीचा प्रसार करण्याबरोबरच सर्व भारतीय भाषांमध्ये परस्पर सन्मान, सहकार्य आणि सहभागाची भावना मजबूत करणं हा या संमेलनाचा प्रमुख उद्देश असून या संमेलनात राजभाषा विभागाच्या बहुभाषिक ऍप भारती चे लोकार्पण देखिल होणार आहे. यावेळी केंद्रीय गृह मंत्री अमित शाह काय मार्गदर्शन करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.0
0
Report
आमगांव खेत में बिबट्या कुंपण में फंस कर मौत, घातपात की आशंका—वन विभाग जाँच
Bhandara, Maharashtra:आमगांव क्षेत्रातील शेतात तारांच्या कुंपणात बिबट्या फसल्याने मृत्यु झाला. घातपाताचा संशय असल्यामुळे वनविभाग चौकशी सुरू आहे. बिबट्याचे वय सुमारे १६ महिने असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र, हा मृत्यु कुंपणात फसल्याने झाला की मानवी हस्तक्षेपामुळे झाला याबद्दल तपास सुरू आहे. आमगाव परिसरातील एका शेतात तारांच्या कुंपणात बिबट्या फसलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक पाहणीत त्याने कुंपणात फसल्याने मृत्यू झाल्याचे दिसून आले. मात्र मृत्यूमागे घातपाताची शक्यता नाकारता येत नाही, असे वनपरिक्षेत्र अधिकारी आकरे यांनी स्पष्ट केले. मृत बिबट्याचे वय सुमारे १६ महिने असल्याची माहिती वनविभागाकडून दिली गेली आहे. या प्रकरणात मानवी हस्तक्षेप झाला आहे काय, याचा सखोल तपास सुरू आहे.0
0
Report
वाशीम में बरसात की कमी से सूखे जैसे हालात; अधिकारी अब तात्कालिक निरीक्षण करेंगे
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात पावसातील खंड आणि कमी पावसामुळे दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.पावसाअभावी करपून पिकांची वाढ खुंटल्याने खरीप हंगाम संकटात सापडला आहे.या पार्श्वभूमीवर पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी जिल्हा प्रशासनाला तात्काळ प्रत्यक्ष पाहणी करण्याचे निर्देश दिले आहेत.महसूल आणि कृषी विभागाचे अधिकारी शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पिकांची स्थिती,पावसातील खंड, जमिनीतील ओलावा आणि उपलब्ध पाण्याचा आढावा घेणार आहेत.तसेच गावांमधील पिण्याचे पाणी, जनावरांचा चारा आणि पाण्याची परिस्थिती ही तपासली जाणार आहे.शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष संवाद साधून वस्तुनिष्ठ अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले असून,या अहवालानंतर शासनाच्या निकषांनुसार मदतीसाठी प्रस्ताव सादर केला जाणार आहे.त्यामुळे प्रशासनाच्या या पाहणीकडे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
Advertisement
