445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
Modi के जन्मदिन पर महिला किसान प्रमाणपत्र पोर्टल का ऑनलाइन लॉन्च, भरणे ने कहा
Rui, Maharashtra:गणपती बाप्पाच्या चरणी कृषी मंत्र्यांचे काय साकडं. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलचं लॉन्चिंग. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झालं ऑनलाइन अनावरण. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील: मंत्री भरणे. राज्यातील शेतकरी अडचणीत, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मंत्री भरणे. नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार : मंत्री भरणे. राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेत. विशेष म्हणजे मंत्री भरणे यांच्या निवासस्थानी महिला सशक्तीकरणावर आधारित माहिती देणारा देखावा उभारण्यात आलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे मात्र सर्व निकष नियम बाजूला ठेवून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी0
0
Report
रायगढ़ में गौरी का पारंपरिक आगमन, महिलाओं में उत्साह की लहर
Chendhare, Maharashtra:रायगढ़ जिल्ह्यात गौरीचे पारंपारिक पद्धतीने आगमन झाले आहे. ढोलताशांच्या गजरात गौरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी गौरीचे सामूहिक पूजन करून तिचे स्तवन केले. गौरी आगमनाने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. कोकणात माळरानावरून तेरडा वनस्पतीच्या गौरी आणण्याची प्रथा आहे. गौरीचा मुखवटा परातीत घेऊन कुंकवाची पाच पावले उमटवत तुळशीपाशी तिची पूजा केली जाते. पानाफुलानी सजवून गौरीला आनंदाने घरात आणली जाते. यात गौरीची गाणी म्हणतानाचा व्हिडिओ देखील आहे.0
0
Report
गडचिरोली में सड़क न होने से गर्भवती आशा सेविका को खाट पर ले जाना पड़ा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात गर्भवती आशा सेविकेला 3 KM खाटेवरून नेले, एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा गावात रस्ता नसल्याने या गर्भवतीला खाटेवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले, वाटेतच झाली प्रसूती0
0
Report
Advertisement
नागपुर में मोदी के जन्मदिन पर ‘आशीर्वाद का दीया’ कार्यक्रम
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान. - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यक्रमाचे आयोजन. - नागपूरच्या अजनी मेट्रो स्टेशनवर अभियानाचा होणार कार्यक्रम होणार. - ५०० लाभार्थींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन. - ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. live फ्रेम मिळेल0
0
Report
कोकण बचाओ, प्रकृति बचाओ: वैजी में अम्ब्रे परिवार का पर्यावरण जागरूकता प्रदर्शन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ‘कोकण वाचवा, निसर्ग वाचवा!’: चिपळूणच्या वैजी येथे आंब्रे परिवाराने साकारला पर्यावरण संवर्धनाचा जिवंत देखावा.. या देखाव्यात कोकणातील समृद्ध निसर्ग, डोंगर-दऱ्या आणि पारंपरिक घरांचे सौंदर्य दाखवतानाच वाढते प्रदूषण,जंगलतोड आणि निसर्गाच्या विनाशावर थेट भाष्य करण्यात आले आहे.. 'कोकण वाचवा, निसर्ग वाचवा आणि जैवविविधता जपा' अशी साद घालणारा हा पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह निसर्गप्रेमी मोठी गर्दी करत आहेत..0
0
Report
भरत गोगावले और चंद्रहार पाटील ने महेंद्र दळवी के निवास पर गणेश के दर्शन किए
Chendhare, Maharashtra:भरत गोगावले यांनी महेंद्र दळवी यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन. पैलवान चंद्रहार पाटील यांचीही उपस्थिती. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे आज मंत्री भरत गोगावले और महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी अलिबाग येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांचे शिवप्रतिमा देऊन आमदार दळवी यांच्या स्वागत केलं0
0
Report
Advertisement
दानापूर वान नदी के उत्खनन पर नोटिस, निधि से करोड़ों के अवैध काम का आरोप
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील वान नदी पात्रातून अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील उत्खननाबाबत, सामाजिक कार्यकर्ते, जनहित व पर्यावरण विषय अभ्यासक रजनीश पोटे यांनी नुकतीच केंद्र व राज्य शासनाच्या सात प्रमुख अधिकारी व यंत्रणांना, मुख्य सचिव केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली, दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक व मुख्य अभियंता सिकंदराबाद, महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग मुख्य सचिव मंत्रालय, जिल्हाधिकारी अकोला, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला व संबंधित रेल्वे कंत्राटदार यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. अकोला–खंडवा रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत, रेल्वे कंत्राटदाराने वान नदीतून "गाळ" (Ordinary Earth) काढून तो रेल्वे भरावासाठी वापरण्याचा प्रस्ताव, आपल्या Corporate Social Responsibility (CSR) निधीतून जलयुक्त शिवार , नदी खोलीकरण , पूर नियंत्रण इत्यादी नावाखाली "मोफत काम" करून देण्याच्या नावाखाली, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सादर केला होता. अकोला जिल्हाधिकारी यांनी 05 मे रोजी या प्रस्तावास मंजुरी देत, २,५६,७९५.२५ ब्रास (सुमारे ७ लाख २६ हजार ७३० घनमीटर) इतक्या प्रचंड प्रमाणात उत्खननास परवानगी दिली होती, मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अवैधरित्या नदीतील वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून, शासनाच्याच परस्परविरोधी नोंदीं आधारे कोट्यवधींचे नैसर्गिक संपत्ती खाजगी कंत्राटदाराला मोफत बहाल केल्याचा गंभीर आरोप रजनीश पोटे यांनी केला आहे.. राज्य आणि केंद्र सरकारने याचे दखल घ्यावी अशी मागणी याचिकाकर्ते ने केली आहे.0
0
Report
लातूर में भीषण जलसंकट: रातभर पानी के लिए लोग कतारों में
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... रात्री एक वाजता पाण्यासाठी हंड्यांच्या रांगा... वडमुरांबी गावात भीषण जलसंकट... मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या लातूर जिल्ह्यात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे... भर पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागतेय... लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वडमुरांबी गावातील लोकांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे... पावसाळ्यातच पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत असेल, तर येणाऱ्या उन्हाळ्यात परिस्थिती काय असेल, याची कल्पनाही करवत नाही... वडमुरांबी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातच पाणीसाठा शिल्लक नसल्याने गावकऱ्यांसमोर पाण्याचं गंभीर संकट उभं राहिलं आहे... त्यामुळे गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपूरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.0
0
Report
चंद्रपूर जिले के नागभीड़ में धान उत्पादक किसान आक्रोश ट्रैक्टर मोर्चा; हजारों किसान ट्रैक्टर मोर्चा में शामिल हुए
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के नागभीड़ में धान उत्पादक किसान आक्रोश ट्रैक्टर मोर्चा; हजारों किसान ट्रैक्टर मोर्चा में शामिल हुए. धान को उचित भाव और बोनस मिलने की मांग के साथ नागभीड़ के किसानों ने आक्रोश का प्रदर्शन किया. तलोधी, नागभीड़ और ब्रह्मपुरी तालुकों के किसान बड़ी संख्या में आंदोलन में शामिल थे. आंदोलन के नेतृत्व में किसानों ने अपनी मागताओं के लिए जोरदार आक्रोश व्यक्त किया. किसानों को राहत मिले और शासन उनकी मागों पर तुरंत निर्णय ले.0
0
Report
Advertisement
शिरूर नगरपालिका विरोध में कर्मचारियों का अनिश्चितकालीन प्रदर्शन, वेतन व नियुक्ति की मांग
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याच्या रागातून ठेकेदाराने पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत, या कामगारांनी नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता आणि घंटागाडीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवले जात असून, कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हक्काचे वेतन आणि कामावर पुन्हा रुजू करून घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.0
0
Report
रत्नागिरी में गणेशोत्सव से पहले नकली दारू मिनी फैक्ट्री पर छापा, करोड़ का स्टॉक जब्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- ऐन गणेशोत्सवात राज्य उत्पादन शुल्क शाखेची मोठी कारवाई अवैध सुरु असलेल्या गोवा बनावटीच्या मिनी दारू कारखान्यावर छापा राजापूर तालुक्यातील तळगांव इथं राज्य उत्पादन शुल्क शाखेच्या रत्नागिरी सिंधुदुर्ग भरारी पथकाची कारवाई कारवाईमध्ये १ कोटीचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त या प्रकरणी जागा मालक दिनेश जैतापकर आणि गोव्यातील चंदन पाटील यांना घेतलं ताब्यात डुप्लीकेट गोवा बनावटीची दारू तयार करण्याचा हा मिनी कारखाना.state उत्पादन शुल्क विभागाकडून उघड tाब्यात घेतलेल्या दोघांना न्यायालयात करणार हजर, गणेशोत्सवात मोठी कारवाई0
0
Report
गोकुळ दूध संघ चुनाव: महायुती बनाम समविचारी आघाडी, बिनविरोध संभव नहीं
Kolhapur, Maharashtra:Kop Satej Patil & Hasan Mushrif Anc:- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दुध संघाची निवडणूक बिनविरोध होणार नाही हे आज स्पष्ट झाले आहे.. काँग्रेस नेते आणि समविचारी आघाडीचे प्रमुख सतेज पाटील त्यांनी गोकुळ दूध संस्थेला एकमुखी नेतृत्व हव आहे, गेल्या सहा महिन्यापासून गोकुळ दूध संघाची जी हानी झाली आहे ते भरून काढण्यासाठी महायुतीला बाजूला काढल्याशिवाय पर्याय नाही त्यामुळे आम्ही या निवडणुकीला सामोरे जात असल्याचं म्हटलय आहे, तर गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी नेत्यांच्या दावे आणि प्रति दाव्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होणे अशक्य असल्याचे स्पष्ट केले आहे.. त्याचबरोबर गोकुळची निवडणुक ही महायुती म्हणूनच लढणार असल्याचा पुनरुच्चार केला आहे. महायुतीमध्ये आमची बार्गेनिंग पावर कमी व्हावी यासाठी महाडिक यांनी प्रयत्न केले, पण आम्ही मात्र आमच्या संस्था कशा जास्त राहतील यासाठी प्रयत्न केल्याचे म्हटलं आहे. भाजप नेत्या गोकुळच्या संचालिका शौमीका महाडिक यांनी गोकुळची निवडणूक बिनविरोध होण्यासाठी नेत्यांनी प्रयत्न करावेत असं विधान केलं होतं. पण आता आमदार सतेज पाटील आणि मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलेल्या विधानामुळे गोकुळ दूध संघाची निवडणूक होणार हे निश्चित झाले आहे. गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध सतेज पाटील समविचार आघाडी मध्ये प्रमुख लढत होणार आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में पारंपरिक गौरी आगमन, पाणवाठे से गौरी लाने की अनोखी परंपरा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत माहेरवाशीण गौराईचं पारंपरिक उत्साहात आगमन; पाणवठ्यावरून खड्यांच्या गौरी आणण्याची अनोखी प्रथा.. गणेशोत्सवाच्या धामधुमीत आज जिल्ह्यात लाडक्या माहेरवाशीण गौराईचं वाजतगाजत आगमन झालं आहे.. संगमेश्वर तालुक्यातील करजुवे गावासह ग्रामीण भागात पाणवठ्यावरून खडे आणि मुखवटे ताम्हनात घेऊन गौरी घरी आणण्याची जुनी परंपरा महिलांनी मोठ्या उत्साहात जपली आहे.. पारंपरिक गाण्यांच्या सुरांमध्ये झालेल्या या 'गवर' आगमनामुळे बाप्पाच्या उत्सवाचा आनंद द्विगुणित झाला आहे..0
0
Report
ऑपरेशन प्रहार: अकोला में अवैध जुगार अड्डे पर छापा, 27 लाख 62 हजार का माल जब्त
Akola, Maharashtra:ऑपरेशन प्रहारअंतर्गत अकोला पोलिसांनी अवैध जुगार अड्ड्यावर धडक कारवाई करत तब्बल २७ लाख ६२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केलाय. खदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील क्लासमेट हॉटेल अँड बारमध्ये अवैध जुगार सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाली होती,त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला.या कारवाईत पोलिसांनी १५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, त्यामध्ये एका अल्पवयीन मुलाचाही समावेश आहे. आरोपींकडून ९ वाहने, ८ मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा एकूण २७ लाख ६२ हजार ८१० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. गोपनीय माहितीच्या आधारे करण्यात आलेल्या या कारवाईनंतर संबंधित आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात आली असून, या प्रकरणाचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
इंदापुर में 500 किलो कार्डबोर्ड से शिव मंदिर, 12 ज्योतिर्लिंग दिखे
Rui, Maharashtra:इंदापुरात 500 किलो कागदी पुठ्ठ्यापासून साकारलं प्राचीन शिवमंदिर.. ANCHOR इंदापूर शहरातील श्री संत नामदेव मंदिरात श्री नरसिंह प्रसादिक गणेश मंडळाने तब्बल 500 किलो कागदी पुठ्ठ्यापासून आकर्षक प्राचीन शिवमंदिराचा देखावा साकारला आहे... या देखाव्यात बारा ज्योतिर्लिंगांसह श्री हनुमंतराय आणि नागराजाचं दर्शन होतंय... विशेष म्हणजे या गणेश मंडळाचं यंदाचं 106 वं वर्ष आहे... त्यामुळे हा अनोखा देखावा इंदापूरकरांच्या चर्चेचा विषय ठरतोय...0
0
Report
Advertisement
