445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोयाबीन का भाव 7450 रुपये/क्विंटल; किसानों में खुशी
Washim, Maharashtra:वाशिम: वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनला यंदाचा विक्रमी 7,450 रुपये प्रति क्विंटल दर मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. गेल्या चार वर्षांत प्रथमच सोयाबीन दराने उच्चांक गाठला आहे. मागील काही वर्षांत 3,600 ते 5,000 रुपयांदर्यान दर मिळत असतान्यांदा यंदा वाढती मागणी आणि कमी उपलब्धतेमुळे दरात मोठी वाढ झाली आहे. हमी दरापेक्षाही अधिक भाव मिळत असल्याने शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असून सोयाबीन साठवून ठेवणाऱ्यांना याचा मोठा फायदा होत आहे。0
0
Report
पिंपरी-चिंचवड़ महापौर ने सभा के लिए साइकिल से आने का आह्वान किया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंप्री चिंचवड के महापौर रवि लांडगे ने परदेश दौरे के रद्द होने के बाद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी की कटक नीति को मन से लिया है। इसके चलते महापालिका की पंद्रह तारीख को होने वाली सामान्य सभा में संभव हो तो साइकिल से आने का आह्वान किया है। यदि साइकिल संभव नहीं हो तो मेट्रो या इलेक्ट्रिक गाड़ी से आने को भी कहा है। इसी मुद्दे पर हमारे प्रतिनिधि कैलास पुरी ने उनसे बातचीत की है।0
0
Report
सिल्लोड में खेत तालाब में दो चिमुकले भाई डूबे, गांव में शोक
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यातून दुःखद घटना समोर आली आहे. शिवना गावात शेततळ्यात बुडून दोन चिमुकल्या सख्ख्या भावांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. गौरव साबळे (वय १२) आणि गोपाल साबळे (वय १०) अशी मृत भावंडांची नावे आहेत. हे दोघे मेंढपाळ कुटुंबातील असून शेततळ्याशेजारी खेळत असताना त्यांचा पाय घसरून ते पाण्यात पडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेनंतर स्थानिकांनी आणि ग्रामस्थांनी शोध घेत दोघांना बाहेर काढले, मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेमुळे साबळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
धर्मांतरण मामले में जमानत पर बड़ा फैसला, अदालत ने निर्णय सुरक्षित रखा
Nashik, Maharashtra:धर्मांतरण प्रकरणातील आरोपींच्या जामिनावर आज मोठा फैसला जिल्हा सत्र न्यायालयाने युक्तिवाद पूर्ण, निर्णय राखून ठेवला चौघा आरोपींसह अश्विनी चेनानीच्या जामीन अर्जावरही उद्या सुनावणी लैंगिक अत्याचार, छळ आणि धार्मिक भावना दुखावल्याच्या आरोपांवर न्यायालयाची नजर तौसीफ अत्तार अद्याप पोलीस कोठडीत, इतर आरोपी न्यायालयीन कोठडीत गेल्या अनेक दिवसांच्या जोरदार कायदेशीर खडाजंगीनंतर निकालाचा क्षण जवळ आरोपींना दिलासा की सरकारी पक्षाला बळ, उद्याचा दिवस निर्णायक टीसीएस प्रकरणात उद्याच्या न्यायालयीन निर्णयाकडे राज्याचे लक्ष0
0
Report
मोदी के आह्वान के बाद जैविक खादों की मांग बढ़ी, वाशीम के किसान लाभान्वित
Washim, Maharashtra:अँकर:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परकीय चलनाची बचत आणि जमिनीची सुपीकता वाढवण्यासाठी शेतकऱ्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय खतांचा वापर वाढवावा,असे आवाहन आपल्या भाषणातून केले होते.त्यानंतर गांडुळ खतासह विविध सेंद्रिय खतांची मागणी वाढत आहे. वाशीम जिल्ह्यातील नागठाणा येथील शेतकरी गजानन सोळंके यांच्याकडे गांडुळ खत आणि गांडुळांसाठी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात मागणी होत आहे.सोळंके हे गेल्या दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहेत. सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होतं असून सेंद्रिय शेतीमुळे उत्पादनात वाढ झाल्याचा त्यांनी सांगितले आहे.तसेच सेंद्रिय खतांच्या वापरामुळे जमिनीची सुपीकता टिकून राहण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी सांगितले.0
0
Report
ATS ने महाराष्ट्र में 40 ठिकानों पर छापेमारी, 21 आरोपियों पर गिरफ्तारी जारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पाकिस्तानस्थित गँगस्टर आणि 'आयएसआय'चा हस्तक शहजाद भट्टी याच्याशी संबंध असल्याच्या संशयावरून महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथकाने बुधवारी छत्रपती संभाजीनगरसह राज्यात ४० ठिकाणी मोठी छापेमारी केली. भट्टीच्या सिंडिकेटशी संबंधित असल्याच्या संशयावरून राज्यभरातून ५३ तरुणांना ताब्यात घेतले. यापैकी ३२ जणांना चौकशीनंतर सोडून दिले. आक्षेपार्ह डिजिटल पुरावे आणि संशयास्पद आर्थिक व्यवहार आढळल्याने उर्वरित २१ जणांवर अटकेची कारवाई सुरू आहे असे कळतंय, दरम्यान ताब्यात घेतलेल्यांमध्ये मराठवाड्यातील १९ जण होते त्यात (छत्रपती संभाजीनगर १३, बीड २, नांदेड २, जालना १, लातूर १), आहेत.. यातील सगळ्यांना चौकशी अंती सोडल्याचे सूत्रांची माहिती आहे0
0
Report
Advertisement
हिंगणा तालुक के तलाव में डूबकर नागपुर के दो युवक की मौत
Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याचा हिंगणा तालुक्यातील सलाईमेंढा तलावात बुडून दोन युवकांचा मृत्यू - पोहताना खोल पाण्यात गेले असतांना बाहेर येता न आल्याने मृत्यू - आदित्य चांदे आणि अभिषेक सिरसाम अशी मृतकांची नाव आहेत.. - तलावाच्या मध्यभागी चिखलात अडकल्यान बाहेर निघू न शकल्याने अखेर बुडून मृत्यू - सायंकाळी तलावावर गेले असताना घडली दुर्घटना - माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी, हिंगणा पोलिसांची शोधमोहीम सुरू केली.. - अग्निशमन विभागाची तातडीने धाव, शोधमोहीम सुरू केली, - दोन तासांच्या प्रयत्नानंतर मृतदेह बाहेर काढण्यात आले... - परिसरात हळहळ, कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला; हिंगणा पोलिसांकडून आकस्मिक मृत्यूची नोंद..0
0
Report
येवला बस अड्डे का राजस्व रिकॉर्ड, 20 दिनों में 1.61 करोड़ रुपए
Yeola, Maharashtra:अँकर : लग्नसराई आणि उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढलेली संख्या येवला बस आगारासाठी लाभदायक ठरत असून, मागील वर्षाच्या तुलनेत यंदा आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली आहे. २२ एप्रิล ते ११ मे या अवघ्या २० दिवसांच्या कालावधीत येवला आगाराला तब्बल १ कोटी ६१ लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. सध्या येवला आगारातून दररोज ४२ बसेसद्वारे सुमारे २४० फेऱ्या करण्यात येत आहेत. मागील वर्षाच्या तुलनेत यावेळी येवला आगाराच्या उत्पन्नात वाढ झाली असून नागरिकांनी एसटी आगारातील विविध सुविधांचा लाभ घ्यावा असे आवाहन आगारप्रमुख प्रवीण हिरे यांनी केले आहे.0
0
Report
राज्य आदेश के बाद महापालिका आयुक्त ने चार अधिकारियों का विदेश दौरा रद्द किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपावर १२०० कोटींचे कर्ज असताना ४ अधिकारी त्सुनामी आणि - भूकंपाचा अभ्यास करण्यासाठी - स्वित्झरलंड आणि फ्रान्स दौऱ्यावर जाणार होते. यावर टीका झाली त्यानंतर याची दखल घेत आणि राज्य शासनाच्या आदेशानुसार, हा दौरा महापालिका आयुक्तांनी रद्द केला आहे.. शहरात आतापर्यंत ३.३ रिश्टर स्केलपेक्षा मोठा भूकंप झालेला नाही. समुद्र जवळ नसल्याने त्सुनामीचा प्रश्नच नव्हता. तरी देखील मनपातील नगररचना उपसंचालक मनोज गजें, उपायुक्त अंकुश पांढरे, कार्यकारी अभियंता बाळासाहेब सिरसाट आणि नगररचनाकर कौस्तुभ भावे १६ ते २३ मे दरम्यान जर्मनीच्या अभ्यास दौऱ्यावर जाणार होते. मात्र, राज्यातील सद्यःस्थिती पाहता शासनाने अधिकाऱ्यांचे सर्व परदेश दौरे रद्द करण्याचे सक्त आदेश दिले आहेत. याची अंमलबजावणी करत मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी चारही अधिकाऱ्यांचा आगामी दौरा अधिकृतरीत्या रद्द केल्याची माहिती दिली.0
0
Report
Advertisement
भंडारा जिले में तूफान के कारण फार्महाउस की छत उड़ गई, भारी नुकसान
Bhandara, Maharashtra:फार्महाऊसचे छत ऊडाले, पशुखाद्यसह इतर साहित्यांचे मोठे नुकसान Anchor :- भंडारा जिल्ह्यात काल सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने हजेरी लावली. या वादळाच्या तडाक्यात पालांदूर येथील एका घरावरील छत अक्षरशः शेकडो फूट उंचावर उडाले. परिणामी घरात असलेले पशुखाद्य, सिमेंट बोरी, रासायनिक खत व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या मोठा नुकसान झाला आहे.0
0
Report
अमरावती में किसान को हनी ट्रेप कर 70 लाख ठगे, पति-पत्नी आरोपी
Amravati, Maharashtra:अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप; बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून उकळले तब्बल 70 लाख अँकर :- अमरावतीत शेतकऱ्यावर हनी ट्रॅप झाल्याची घटना उघडकीस आल्याने एकच खळबळ उडाली आहे. बलात्काराची भीती दाखवून शेतकऱ्याकडून तब्बल 70 लाख रूपये उकळले आहे. शेतकऱ्याच्या तक्रारीवरून पती पत्नी विरुद्ध नांदगाव पेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून मोबाईल रिचार्ज दुकानातून या हनी ट्रॅपचा खेळ सुरू झाल्याचे उघडकीस आले आहे. शेतकऱ्याने आधी एका महिलेला दहा हजार रुपयांची उसनवारीवर दिली त्यानंतर हा शेतकरी संबंधित महिलेच्या संपर्कात आला त्यानंतर महिलेने या शेतकऱ्याला आपल्या मायाजालामध्ये अडकवून शेतकऱ्याचे ब्लॅकमेलिंग सुरू केल्याने हे बिंग फुटले आहे. यामध्ये शेतकऱ्यांने या महिलेला लाखो रुपयांचे धनादेश दिल्याचे पोलीस तपासात समोर आले असून पुढील तपास पोलीस करत आहे.0
0
Report
शिंदोडी में तेज बारिश से एक्सप्रेस फिडर की तार टूटी, रांजणगाव में आपूर्ति संकट
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे वादळी पावसामुळे झाड कोसळून रांजणगाव औद्योगिक वसाहतीला पाणीपुरवठा करणाऱ्या एक्सप्रेस फिडरच्या तारांवर पडले. यावेळी तारा जवळ उभ्या असलेल्या ट्रॅक्टरवर कोसळल्या. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र या घटनेमुळे रांजणगाव औद्योगिक वसाहतीच्या पाणीपुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून औद्योगिक क्षेत्रालाही फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
हिंगोली के करहाळे डिग्रस क्षेत्र में आंधी-बारिश से हल्दी किसानों को नुकसान
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील करहाळे डिग्रस परिसरामध्ये रात्री अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे, हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार हिंगोली जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये रात्री पाऊस झाल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांच नुकसान झाल आहे शेतकऱ्यांनी शेतात वाळायला घातलेली हळद पावसामुळे भिजल्याने हळद उत्पादक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झाल आहे.0
0
Report
रायगड में ग्लैंडर्स से रोकथाम के लिए घोड़ों की स्वास्थ्य जाँच, एक हजार तक हेल्थकार्ड जारी
Chendhare, Maharashtra:ग्लँन्डर्सचा धोका रोखण्यासाठी घोड्यांची आरोग्य तपासणी. रायगडच्या पशुसंवर्धन विभागाचा पुढाकार. जवळपास एक हजार घोड्यांना मिळणार हेल्थकार्ड. जिल्ह्यात प्रथमच विशेष मोहीम. पर्यटक आरोग्य सुरक्षेच्या दृष्टीने महत्वाचं पाऊल. या मोहिमेचा प्रारम्भ वैकुंठ पाटील यांच्या उपस्थितीत झाला.0
0
Report
सातारा में तेज़ आंधी-बारिश से करीब 40 घर क्षतिग्रस्त
Satara, Maharashtra:सातारा : शहरातील सदर बाजार आणि लक्ष्मी टेकडी परिसरात सायंकाळी झालेल्या जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान झाले. जवळपास ४० घरांचे नुकसान झाले असून अनेक घरांचे पत्रे उडून गेले आहेत. तसेच काही ठिकाणी विद्युत पोल आणि झाडे उन्मळून घरांवर पडल्याने नुकसान वाढले आहे. घटनेनंतर नगराध्यक्ष अमोल मोहिते यांनी तात्काळ परिसराची पाहणी केली. यावेळी आपत्ती व्यवस्थापन विभाग, एमएसईबी आणि नगरपालिका अधिकाऱ्यांना नुकसानग्रस्त भागातील परिस्थिती हाताळून त्वरित निवारणाची कामे करण्याचे आदेश देण्यात आले.0
0
Report
Advertisement
