445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंचगंगा जलस्तर स्थिर, खतरे की चेतावनी अभी भी बनी
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर काही प्रमाणात ओसरल्यामुळे नद्याची पाणी पातळी रात्रीपासून स्थिर आहे.. धरणाच्या पाणलोट क्षेत्रात देखील पाऊस काहीसा कमी झाल्याने रात्रीपासून पंचगंगा नदीची पाणी पातळी अवघ्या 2 इंचाने वाढली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 36 फूट 4 इंच इतकी आहे. असं असले तरी पंचगंगा नदीची वाटचाल हळूहळू इशारा पातळीकडे सुरू आहे. नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे. तर धोका पातळी 43 फूट आहे. जिल्ह्यातील एकूण 60 बंधारे पाण्याखाली गेले आहेत.0
0
Report
शिराला के भाटशिरगांव में ट्रक खाई में गिरा, चालक समेत 2 घायल
Sangli, Maharashtra:स्लग - ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक ओढ्यात कोसळला..चालकासह दोन जण जखमी.. अँकर - सांगलीच्या शिराळा तालुक्यातील भाटशिरगांव येथे ओढ्या मध्ये ट्रक कोसळल्याची घटना घडली आहे.चिरा विटा घेऊन जाणारया ट्रकवरील ताबा सुटल्याने ट्रक थेट ओढ्यात जाऊन पलटी झाला. यामुळे ट्रक चालकासह दोघे जण जखमी झाली आहेत.रत्नागिरीहुन शिराळयाकडे निघाला असता रात्रीच्या sुमारास हा अपघात घडला आहे.अपघातानंतर चालक हा ट्रक मध्येचे आडकुन पडला होता,ओढ्यातील पाण्याला प्रचंड वेग व पाऊसाची संततधार यामुळे चालकाला बाहेर पडता येत नव्हते, अखेर 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर क्रेनच्या माध्यमातून ग्रामस्थांनी चालकाची सुखरूप सुटक केली.भर पाऊसात हा मदतीचा थरार सुरू होता.0
0
Report
मालेगाव में जल आपूर्ति बाधित, पाइप लाइन लीक के कारण आपूर्ति तुरंत बंद
Nashik, Maharashtra:पाणी पुरवठा विस्कळीत… पाणी गळती मुळे पाणी पुरवठा विस्कळीत.. मालेगाव शहरातील जलशुद्धीकरण केंद्र येथून येणाऱ्या १२०০ एम.एम. पाईप लाईन वर रात्री १:३० वाजेचे सुमारास मिलन हॉटेल जवळ पाणी गळती सुरु झाल्यामुळे जलशुद्धीकरण केंद्र येथून सुरु असणारा पाणी पुरवठा तात्काळ बंद करण्यात आलेला आहे. त्यामुळे नियोजित असलेला पाणी पुरवठा सुरु करता येणे शक्य होणार नाही. पाईप लाईन दुरुस्ती करुन पाणी गळती बंद झालेनंतर पाणी पुरवठा सुरु करणेबाबत नियोजन करण्यात येईल. असे आवाहन मनपा प्रशासनाकडून करण्यात आले.0
0
Report
Advertisement
बोगस बीज से किसानों को दुबारा बोआई संकट, मांग तात्कालिक कार्रवाई और मुआवजा
Akola, Maharashtra:राज्यात बोगस बियाण्यांमुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावल्याचा मुद्दा विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात जोरदारपणे उपस्थित करण्यात आला. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी शेतकऱ्यांच्या नुकसानीचा प्रश्न सभागृहात मांडत दोषी बियाणे कंपन्यांवर तात्काळ कारवाई, विक्रीवर बंदी आणि बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्याची जोरदार मागणी केली आहे. पावसाळी अधिवेशनात बोलताना आमदार हरीश पिंपळे यांनी राज्यातील अनेक शेतकऱ्यांची सोयाबीन, तूर आणि कपाशीची बियाणे उगवली नसल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे सांगितले. काही सोयाबीन बियाणे कंपन्यांच्या विक्रीवर तात्काळ बंदी घालावी, दोषी कंपन्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करावेत, तसेच बियाणे न उगवलेल्या शेतांचे तातडीने पंचनामे करून शेतकऱ्यांना कंपन्या आणि शासनाकडून नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी त्यांनी केली. बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, यासाठी शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी आमदार हरीश पिंपळे यांनी अधिवेशनात लावून धरली आहे.0
0
Report
डॉक्टर मारहाण मामले में शिवसेना शिंदे गट के नगरसेवक समेत पांच पर मामला दर्ज
Kalyan, Maharashtra:डॉक्टर मारहाण प्रकरणी २४ तासांनंतर गुन्हा दाखल, शिवसेना शिंदे गटाचे नगरसेवकासह पाच जणांवर गुन्हा दाखल कुल्यम डोंबिवली महापालिकेच्या शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्सला झालेल्या मारहाणीच्या प्रकरणात विष्णूनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.२४ तासानंतर हा गुन्हा दाखल करण्यात आला. मारहाण करणाऱ्या शिवसेना (शिंदे गट)चे नगरसेवक रमेश म्हात्रे, आणि त्यांच्या चार जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. सोमवारी रात्री रमेश म्हाठे आणि त्यांच्या समर्थकांनी शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर आणि महिला नर्स यांना मारहाण केली होती, याचे सीसीटीव्ही देखील समोर आले होते.0
0
Report
बारिश से गिरणा नदी किनारे बाढ़ का खतरा बढ़ा, चेतावनी जारी
Nashik, Maharashtra:कळवण, सुरगाण्यात पावसाची संततधार... चणकापूर धरणाच्या पाणी पातळीत वाढ... 2846 क्युसेक वेगाने गिरणा नदी पात्रात विसर्ग. नाशिकच्या सुरगाणा आणि कळवण तालुक्यात सुरू असलेल्या पावसामुळे नदी नाले तुडूंब झाले आहेत. चणकापूर कळवण धरणाच्या पाणी पातळी कमालीची वाढली असून, धरणात पाण्याची आवक लक्षात घेता प्रशासनाच्यावतीने धरणातून 2846 क्युसेस पाण्याचा गिरणा नदीपात्रात विसर्ग सुरू करण्यात आला असून गिरणा नदी पूरस्थिती निर्माण झाली असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.0
0
Report
Advertisement
भद्रावती तहसीलदार-नायब तहसीलदार के खिलाफ गंभीर आरोपों पर मामला दर्ज
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावतीचे तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांचे विरुद्ध ॲट्रॉसिटीसह विविध कलमांखाली गुन्हा दाखल तक्रारीनुसार, मृतक परमेश्वर मेश्राम यांच्या मौजा कुरोडा येथील सर्वे क्रमांक ८६ व ८७ या शेतीचा फेरफार कोणताही स्थगिती आदेश नसतानाही करण्यात आला नाही. याबाबत विचारणा करण्यासाठी ते २६ सप्टेंबर २०२५ रोजी तहसील कार्यालयात गेले असता, तहसीलदार राजेश भांडारकर व नायब तहसीलदार सुधीर खांडरे यांनी त्यांना कथितरित्या जातीवाचक शिवीगाळ करून कार्यालयाबाहेर ढकलल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक धक्का बसल्याने परमेश्वर मेश्राम यांनी तहसील कार्यालयातच विषारी औषध प्राशन केले. उपचारादरम्यान ६ ऑक्टोबर २०२५ रोजी त्यांचा मृत्यू झाला. संबंधित अधिकाऱ्यांच्या वागणुकीमुळेच पतीच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याचा आरोप श्रीमती वंदना मेश्राम यांनी आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीच्या आधारे भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास भद्रावती पोलीस करीत आहेत.0
0
Report
आंबोली घाट मार्ग पर बड़े पत्थर गिरे, दुर्घटना टली, यातायात बहाल
Oras Bk., Maharashtra:आंबोली घाटमार्गात भले मोठे दगड कोसळले रस्त्यावर वाहतूक सुरू असतानाच घडला प्रकार सुदैवाने जीवितहानी टळली : एक मार्गी वाहतूक सुरू सिंधुदुर्ग ---- आंबोली घाटातील दरडी कोसळलेल्या जागेपासून काही अंतरावर असलेल्या चार नंबर धबधब्यालगत आंबोली घाटमार्गातील मुख्य रस्त्यावर भले मोठे दोन ते तीन दगड थेट रस्त्यावर कोसळले. या मार्गावर नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ सुरु होती. मात्र ज्यावेळी हे दगड कोसळले त्यावेळी सुदैवाने त्या भागात कोणतंही वाहन नसल्याने मोठी हानी टळली. सद्यस्थितीत हे दगड त्याच ठिकाणी असल्याने दुचाकी व छोट्या चारचाकी गाड्यांची एक मार्गी वाहतूक सुरू आहे.0
0
Report
देहू की वारी में नन्ही बच्ची ने काठवट वाडा से परंपरा जिंदा रखी
Varsoli, Maharashtra:देहूच्या पालखी सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या वारीत सहभागी होत असतो. मात्र यंदा देहू नगरीत एका चिमुकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोबाईलच्या युगात हरवत चाललेले पारंपरिक 'काठवट वाडा' हे खेळणे ती अगदी उत्साहाने खेळताना दिसली. विशेष म्हणजे, हा खेळ तिला तिच्या आजीकडून शिकायला मिळाला आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा अशाच प्रकारे जतन होत असल्याचे हे सुंदर चित्र देहूच्या वारीत पाहायला मिळाले. भक्तीबरोबरच संस्कार आणि लोकपरंपरा जपणारी ही चिमुकली सध्या भाविकांचे आकर्षण ठरत आहे.0
0
Report
Advertisement
तुकोब की पालखी के सामने मुस्लिम मुलानी परिवार का ताशा वादन प्रेरणादायक परंपरा
Varsoli, Maharashtra:Head line: तुकोबांच्या पालखीत मुस्लिम मुलाणी कुटुंबाचा मान ताशाच्या तालातून सर्वधर्मसमभावाचा संदेश Anchor : संतीं चा वार ? भक्तीची परंपरा ? आणि सर्वधर्मसमभावाचा जिवंत संदेश! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जातात. त्यापैकीच एक अनोखी परंपरा म्हणजे पालखीसमोर ताशा वाजविण्याचा मान मुस्लिम मुलाणी कुटुंबाकडे आहे. तब्बल चार पिढ्यांपासून हे कुटुंब ताशाच्या दमदार तालातून तुकोबांची सेवा करत आहे. पालखीच्या अग्रभागी नगारा आणि चौघड्याच्या निनादात ताशाचा दणदणाट घुमत राहतो आणि त्याच तालावर भक्तीचा सोहळा अधिकच रंगतो. धर्माच्या सीमा ओलांडून सेवाभाव आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या मुलाणी कुटुंबाची ही परंपरा वारीतील सर्वधर्मसमभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त करत, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार मुलाणी कुटुं Barked.0
0
Report
नवी मुंबई के कलंबोली में सोसाटे की वजह से निर्माण साइट के पत्रे गिरे, दुर्घटना में कोई घायल नहीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के कलंबोली में सोसाटे की वारियों से निर्माण साइट पर पत्रे गिर गए. निर्माण साइट के पत्रे सीधे रहवासी सोसायटी में गिर गए. 25 फुट के पत्रे सोसायटी में गिरने से 13 दोपहिया वाहन नुकसान हुआ. सौभाग्य से किसी की जान को नुकसान नहीं हुआ. सुरक्षा की चिंता और नुकसान भरपाई की मांग रहवासियों ने की.0
0
Report
नदी में डूबे दो युवक; एक की मौत, दूसरा खोज जारी CCTV में कैद
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला असून दुसऱ्याचा मृत्यू झालाय. मयत तरुणाचे नाव सुमित पवार असे आहे तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे असे आहे. सुमित पवार, नयन म्हातार्े आणि इतर आठ जण हे वाघाची वाडी नदी, धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते. नदीपात्रात नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे भवऱ्यात अडकला. यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले. यावेळी त्याच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. तर वाहून गेलेल्या नयन म्हात्रे याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.0
0
Report
Advertisement
गड़चिरोली में बस का पिछला भाग टूटा, 20 यात्री बच गए— बॉडी प्लास्टिक टेप से चिपकी
Gadchiroli, Maharashtra:एसटी प्रवाशांच्या सेवेसाठी नव्हे, प्रवाशांचा जीव घेण्यासाठी, गडचिरोलीत धावत्या एसटी बसचा मागचा भाग अचानक तुटला, जीवघेण्या प्रकारात वाचले प्रवासी, चक्क प्लास्टिक सेलोटेपने चिपकविला होती बॉडी आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
कृष्णा नदी में जलस्तर बढ़ा, कई बांध पानी में डूबे; ड्रोन से दृश्य कैद
Sangli, Maharashtra:स्लग कृष्णा नदीवरील पाण्याचा मनमोहक दृश्य ड्रोन कॅमरात कैद.. तर कृष्णा नदीवरील तीन बंधारे पाण्याखाली.. अँकर सांगलीच्या कृष्णा नदी पाणलोट क्षेत्रात पाऊसाची संततधार सुरूचं आहे. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहेकृष्णा नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेले आहेत. वाळवा तालुक्यातील बहे इथल्या कृष्णा नदीवरचा बंधाराही पाण्याखाली गेला आहे. या बंधाऱ्याचं ड्रोनच्या माध्यमातून रोहन माने यांनी दृश्य ड्रोन द्वारे टिपलेली आहेत.0
0
Report
मुरबाड में भारी बारिश, कनकवीरा नदी में बाढ़, हेदवली गांव संपर्क टूट गया
Ambernath, Maharashtra:मुरबाड तालुक्यात गेल्या २४ तासांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नदी-नाल्यांना पूर आला आहे. टोकावडे गावाशेजारी असलेल्या हेदवली गावात कनकवीरा नदीचे पाणी घुसल्याने गावाचा बाहेरील जगाशी संपर्क पूर्णपणे तुटला आहे. नदीचे पाणी थेट गावात आणि मुख्य रस्त्यांवर आल्यामुळे वाहतूक आणि दळणवळण ठप्प झाले असून, ग्रामस्थ घरातच अडकून पडले आहेत.0
0
Report
Advertisement
