Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 03:50:11
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 03:49:55
Nashik, Maharashtra:नंबर ब्लॉक केल्याचा रागातून प्रियकराने मित्रांना सांगून युवतीवर तिखट फेकत अपहरणाचा प्रयत्न.... पालकांची संमती नसल्याने लग्नास नकार दिल्याचा आला राग... अँकर प्रेयसीने ब्लॉक केल्याच्या रागातून प्रियकराने मित्रांना तीच्या मागावर पाठवत डोळ्यात मिरची पूड टाकली, तीचे अपहरण करत हल्ला केल्याचा प्रकार कामगार नगर येथे घडला. सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून संशयित प्रियकराला अटक करण्यात आली आहे. संशयित आनंद राजभर याच्या सोबत प्रेमसंबंध होते. घरच्यांनी लग्नास नकार दिल्याने युवतीने संशयितासोबत संबध तोडले होते. त्यामुळे तिने त्याचा मोबाईल नंबरही ब्लॉक केला आहे. संशयिताचा संपर्क होत नसल्याने त्याचा राग अनावर झाला होता. 'माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही' या विचारात त्याने रागातून ३ मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. तीघांना दुचाकी देत तीच्यावर पाळत ठेवण्यास सांगितले. कुठेही दिसली तर प्राणघातक हल्ला करण्यास सांगितले होते. सायंकाळी ६.३० वाजता युवती कामगारनगर येथे किराणा दुकानात आली असता दुचाकीवरील ३ संशयितांनी युवतीला रस्त्यात आडवले. तीच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला. काही नागरिकांनी संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला असता संशयितांनी नागरिकांना शिविगाळ करत युवतीला पकडून अपहरण करण्याचा प्रयत्न केला. पोलिसांत तक्रार दिल्यानंतर तपास करत संशयित राजभर याला अटक केली. ३ संशयितांचा शोध सुरू आहे
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Feb 25, 2026 03:46:34
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:46:08
Nagpur, Maharashtra:नागपूर - - तांत्रिक प्रक्रियेमुळे ब्रिटिश एअरवेजचे विमान नागपुरात 26 तास अडकले होते - लंडनहून हैदराबादला निघालेले ब्रिटिश एअरवेजचे विमान हैदराबाद मधील खराब हवामानामुळे मंगळवारी पहाटे नागपुरात उतरवावे लागले होते - टेक ऑफ पूर्वी नियमानुसार विमानाचे जीपीएस रिसेट करणे अनिवार्य असते, ते केल्यावर त्यावर मान्यता प्राप्त इंजिनिअरची स्वाक्षरी आवश्यक असते - मुंबईहून मान्यताप्राप्त इंजिनिअर येईपर्यंत विमानाला हिरवा कंदील मिळू शकला नाही तसेच विमानातील कर्मचाऱ्यांच्या ड्युटीच्या वेळेची मर्यादा संपल्याने 'फ्लाईट ड्युटी टाईम लिमिटेशन' नुसार त्यांना विश्रांती देण्यात आली - सर्व तांत्रिक कारवाई पूर्ण झाल्यानंतर विमान आज सकाळी हैदराबाद साठी रवाना झाले
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Feb 25, 2026 03:33:11
Ahilyanagar, Maharashtra:रिपोर्टर:-लैलेश बारगजे स्लग:- अकोले लॉंग मार्च चा दुसरा दिवस फीड 2C Anc- अहिल्या नगरच्या राजुरी इथून निघालेला अखिल भारतीय किसान सभेचा लाँग मार्च आज दुसऱ्या दिवशीही सुरू राहणार आहे नऊ वाजेच्या दरम्यान लॉंग मार्च संगमनेरच्या दिशेने निघेल दरम्यान मोर्चातील शेतकरी कामगार कर्मचारी लॉंग मार्च साठी तयार होताना पाहायला मिळत काल दिवसभर राजूर ते अकोले पर्यंत प्रवास केल्यानंतर लॉंग मार्च आज अकोले ते संगमनेर पर्यंत प्रवास करणार आहे या लॉंग मार्चमध्ये हजारोंच्या संख्येने शेतकरी कामगार Angeloंगणेवाडी सेविका आशा सेविका सहभागी झाल्या आहेत शेतकरी आदिवासी कामगार अशा सेविका Angeloंगवाडी सेविका यांच्या विविध मागण्यांसाठी एप्रिल 2023 मध्ये पालघर जिल्ह्यातील चरोटी ते पालघर आणि नाशिक ते खर्डी असा लॉंग मार्च काढण्यात आला होता यात सरकारने आश्वासन देऊन पूर्तता न केल्याने अखिल भारतीय किसान सभेचे सचिव डॉक्टर अजित नवले यांच्या मार्गदर्शनाखाली राजुर ते लोणी या लॉंग मार्च आयोजन करण्यात आला आहे दरम्यान मोर्चेकर्यांना सरकारकडून चर्चेसाठी आमंत्रित केला असून आज चार वाजता मुंबई येथे मोर्चेकर्‍यांचा एक शिष्ट मंडळ चर्चेसाठी जाणार असलं तरी मोर्चा थांबून राहणार नाही अशी भूमिका मोर्चेकरांनी घेतली आहे
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Feb 25, 2026 03:32:05
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:31:34
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 25, 2026 03:31:20
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत प्रस्तावित सुपर स्पेशालिटी रुग्णालयाच्या ठरावात फेरबदल करणे अथवा प्रस्ताव रद्द करण्यासंबंधीत ठरावा महासभेत आणण्यात आला होता मात्र विरोधकांनी सभात्याग केल्याने प्रस्तावात फेरबदल किंवा ठराव रद्द करण्याचा निर्णय न घेता महापौरांनी सदर ठराव सखोल माहितीसाठी आरोग्य समितीकडे वर्ग केलाय. यासोबतच सदर प्रस्तावासाठी पाठपुरावा करणाऱ्या आमदार मंदा म्हात्रे यांना सदस्यांमार्फत रुग्णालयाच्या भूखंडात बदल करण्याची विनंती करणार असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सांगितले ,यावर आमदार मंदा म्हात्रे यांनी पत्रकार परिषद घेत संताप व्यक्त केला असून ,थेट गणेश नाईक यांना इशारा दिला आहे, मर्द असाल तर मर्दासारखे वागा कोणाच्या खांद्यावर बंदूक ठेवू नका असा इशारा दिला आहे ,25 वर्षात ते काही करू शकले नाही ते एक महिला करत असल्याने हा विरोध केला जात आहे,हॉस्पिटल हे होणारच असं मत मंदा म्हात्रे यांनी व्यक्त केले
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 03:30:48
Nashik, Maharashtra:स्थायी समितीच्या सभापतिपदी निवडणूक आज.... सानप यांच्या बिनविरोध निवडीची चिन्हे अँकर नाशिक महापालिकेच्या स्थायी समिती सभापतिपदाची निवड आज सकाळी ११ वाजता होणार असून, सध्याच्या पक्षीय बलाबलाच्या पार्श्वभूमीवर महायुतीचे उमेदवार मच्छिंद्र सानप यांची निवड जवळपास निश्चित मानली जात आहे. राष्ट्रवादीचे (अजित पवार) उमेदवार मुकेश शहाणे माघार घेण्याची शक्यता व्यक्त होत असल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. महापालिकेच्या दुसऱ्या मजल्यावरील स्थायी समिती सभागृहात ही निवडणूक पार पडणार असून, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद हे निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार सभापतिपदासाठी भाजपकडून मच्छिंद्र सानप, तर राष्ट्रवादीकडून (अजित पवार गट) मुकेश शहाणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे वरकरणी भाजप विरुद्ध राष्ट्रवादी अशी लढत दिसत असली तरी संख्याबळाच्या गणितात महायुतीचे पारडे जड आहे. स्थायी समितीवर भाजपचे ९ सदस्य आहेत, तर शिंदेगटाचे ४ सदस्य आहेत. शिंदेगटाचे गटनेते अजय बोरस्ते यांनी आपल्या सर्व सदस्यांना भाजप उमेदवाराला पाठिंबा देण्याचे निर्देश दिले आहेत. दरम्यान, सहलीला गेलेले भाजप आणि शिंदेसेनचे सदस्य थेट मुख्यालयात दाखल होतील....
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 25, 2026 03:30:29
Beed, Maharashtra:बीड: शॉर्टसर्किटने शेतकऱ्याच्या दोन घराला आग; कुत्र्याच्या भुंकण्याने शेतकरी दांपत्याला आली जाग बीड आष्टी तालुक्यातील दौला वडगाव येथे मध्यरात्रीच्या सुमारास शॉर्टसर्किटने अचानक आग लागल्याने दोन शेतकऱ्यांची घरे जळून खाक झाली. आग लागल्यानंतर पाळीव कुत्र्याने भुंकण्यास सुरुवात केली. त्यामुळे या शेतकरी दांपत्याला जाग आली. परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीने घटना आपल्या मोबाईल कॅमेरा कैद केली. या घरावरून 11 केव्ही विद्युत पुरवठा करणारी तार गेलेली आहे. याच तारेचे घर्षण होऊन आग लागल्याचं प्रथमदर्शनी सांगण्यात आलं. दरम्यान या घटनेत शेतकऱ्याच्या दोन्ही कुटुंबातील संसार उपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे. ही परिस्थिती पाहून शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले. अग्निशामक दलाच्या माध्यमातून आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 25, 2026 03:16:14
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 25, 2026 03:03:52
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या नूतन महापौर रूपाराणी निकम ॲक्शन मोडवर आलेत. कोल्हापूर शहराच्या स्वच्छतेसाठी (माझं शहर माझी जबाबदारी) या विशेष मोहिमेची त्यांनी घोषणा केली आहे. महानगरपालिकेत सर्वपक्षीय गटनेते और अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत महापौर रूपाराणी निकम यांनी या मोहिमेची घोषणा केली. येणाऱ्या 27 फेब्रुवारीला सकाळी सात वाजल्यापासून शहरात ही मोहिम राबवली जाणार असून महापालिकेच्या अधिकाऱ्यांसह सामाजिक संस्थांचे शेकडो लोक रस्त्यावर उतरणार आहेत. या मोहिमेंतर्गत मुख्य रस्ते आणि फुटपाथ यांच्या स्वच्छतेबरोबरच अतिक्रमण देखील हटवली जाणार आहेत. कोल्हापूरकरांनी या स्वच्छतेच्या मोहिमेत सहभागी होण्याचं महापौर रूपाराणी निकम यांनी आवाहन केले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top