icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

किहीम ग्रामपंचायत ने संयुक्त कचरा प्रबन्धन केंद्र का लोकार्पण कर स्वच्छता अभियान तेज किया

Chendhare, Maharashtra:किहीम येथे कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण. किहीम ग्रामपंचायत व याज फाऊंडेशन यांचा उपक्रम. ग्रामस्थांना मोफत डसबिनचे वाटप. अँकर - रायगडच्या अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकल्पामुळे किहीम ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची दीर्घकालीन समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून गाव स्वच्छ व पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण पिनाकीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थाना डसबिनचे वाटप करण्यात आले. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.
0
0
Report

139 एकड़ जमीन अधिग्रहण के चलते एयरपोर्ट विस्तार पर किसान विरोध तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तब्बल १३९ एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, 'जमीन संपादनाचा योग्य मोबदला रेडीरेकनर किंवा बाजारमूल्याच्या चारपट मिळावा, शैक्षणिक पात्रतेनुसार पाल्यांना नोकरीत प्राधान्य मिळावे आणि पुनर्वसनाचे लाभ दिले जावेत,' अशी आक्रमक मागणी विमानतळ विस्तारीकरण कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न न झाल्यास बलिदान झाले तरी हटणार नाही, असा थेट इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळं विमानतळ जमीन भूसंपादन वाद वाढत जाणार असेच चित्र दिसतेय...
0
0
Report

भंडारा में कलाकारों का मोर्चा, बारिश में ढोल-ताश के बीच जिलाधिकारी कार्यालय पहुंचा प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.... "कलावंतांना न्याय द्या"च्या घोषणा Anchor :- भंडारा जिल्ह्यात विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनोखे आंदोलन केले. भर पावसात ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत आणि गाणी गात कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "कलावंतांच्या समितीत कलावंतांनाच प्राधान्य द्या", "2025-26 मध्ये कलावंतांची निवड का झाली नाही?" तसेच "समितीत कलेक्टर किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ नकोत" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने तातडीने निर्णय घेऊन कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

संभाजीनगर में बायोमेट्रिक उपस्थिति से डमी एडमिशन रोकने की तैयारी

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची घसरलेली उपस्थिती आणि डमी अडमिशनला चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची २ हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होत नसल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. महाविद्यालयीन वेळेतच अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विस्तार अधिकारी आता उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन अध्यापनाचे कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करणार आहेत. प्राथमिक स्तरावर केलेल्या कार्यवाहीचा अहवालही तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में बायो-बीज के फर्जीपन पर छह मुकदमे, कंपनियों के खिलाफ कार्रवाई

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीनचे बियाणे उगवण न झाल्याप्रकरणी सहा गुन्हे पोलिसांनी दाखल केले आहे. बूस्टर, पार्श्व जेनेटिक्स आणि विगर कंपनी विरोधात हे गुन्हे दाखल झाले आहेत. दारव्हा, बाभूळगाव, दिग्रस, आर्णी आणि यवतमाळ मध्ये हे गुन्हे दाखल झाले आहेत. कृषी विभागाच्या गुणनियंत्रक विभागाने दुर्लक्ष केल्यामुळे बोगस बियाण्यांचा शिरकाव झाला, ते बियाणे शेतकऱ्यांना विक्री केल्या गेले. ज्यात त्यांची फसगत झाली. जिल्ह्यात लाखो हेक्टर वरील सोयाबीन बियाण्यांची उगवण झाली नसल्याने या शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचं संकट आलं.
0
0
Report

देहू संस्थान ने पंजीकृत वारकऱ्यों के दुखद निधन पर एक लाख मदद की घोषणा

Varsoli, Maharashtra:Headline: वारकऱ्यांसाठी देहू संस्थानचा मोठा निर्णय आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकऱ्यांसाठी श्री संत तुकाराम महाराज संस्थान, देहू यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. पालखी सोहळ्यात दिंडीत चालणाऱ्या नोंदणीकृत वारकऱ्याचा अपघाती मृत्यू किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळे दुर्दैवी निधन झाल्यास, संबंधित वारकऱ्याच्या कुटुंबाला संस्थानच्या वतीने एक लाख रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. देहू संस्थानने स्पष्ट केले आहे की, ही मदत दुःखाची भरपाई नसून संत तुकाराम महाराजांच्या सेवाभावातून वारकरी कुटुंबाला दिलासा देण्याचा एक प्रयत्न आहे. दरम्यान, या आर्थिक मदतीसाठी काही नियम व अटी लागू असणार आहेत. संबंधित वारकरी हा श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात नोंदणीकृत दिंडीत सहभागी असणे आवश्यक असल्याचे संस्थानने स्पष्ट केले आहे.
0
0
Report
Advertisement

मालाड कुरार पुलिस ने तलवारधारी युवक को रंगेहात पकड़ा, बड़ा हादसा टला

Mumbai, Maharashtra:मालाडमध्ये कुरार पोलिसांची मोठी कारवाई; तलवारधारी तरुणाला अटक करून मोठी दुर्घटना टळली मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका तलवारधारी तरुणाला रंगेहात अटक केली आहे. राधेय राजेंद्र राणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या कारवाईमुळे परिसरात होणारी एक मोठी दुर्घटना टळल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.मिळालेल्या माहितीनुसार, कुरार येथील नुतन स्कूलजवळ दोन गटांत जोरदार हाणामारी सुरू होती. याच दरम्यान आरोपी राधेय राणे हातात उघडी तलवार घेऊन विरोधी गटावर जीवघेणा हल्ला करण्याच्या उद्देशाने पुढे धावला. घटनास्थळी उपस्थित असलेले पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पांचाल यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून, अत्यंत हुशारीने आणि जीवाची पर्वा न करता आरोपीला झडप घालून पकडले. त्याच्याकडची तलवारही जप्त करण्यात आली.
0
0
Report

नाशिक में Ring Road के विरोध में किसान आमरण उपोषण पांचवें दिन

Nashik, Maharashtra:कुंभमेळाच्या पार्श्वभूमीवर होणाऱ्या रिंग रोड बाधित शेतकऱ्यांचे नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अन्नत्याग आमरण उपोषण सुरू आहे. आज या उपोषणाचा पाचवा दिवस असून गेल्या पाच दिवसांपासून या ठिकाणी हे शेतकरी उपोषण करत आहेत. रिंग रोडची अलाइनमेंट नवीन मार्गाने न घेता जुन्या मार्गाने घ्यावी या प्रमुख मागणी सह शेतकऱ्यांवर लाठी चार्ज करणाऱ्या अधिकाऱ्यांची निलंबन करण्यात यावे. या सह विविध मागण्यासाठी आंदोलन केले जात असून मुख्यमंत्र्यांची भेट न झाल्यास तीव्र स्वरूपाच्या आंदोलनाचा इशारा देखील या आंदोलकांकडून देण्यात आलाय. आढावा घेतला घेत उपोषणकर्ताांशी बातचीत के लिए आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी...
0
0
Report
Advertisement

अभिजित बिचुकले बोले: आषाढ़ी वारी का खर्च सरकार उठाएगी, एकता दिखे वारकरी

Satara, Maharashtra:सातारा - आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर अभिजित बिचुकले यांनी वारकरी संप्रदायाच्या एकतेचे कौतुक करत राज्य सरकारवर निशाणा साधला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू असलेल्या वारीच्या परंपरेत सर्व जाती-धर्मांचे वारकरी कोणताही भेदभाव न ठेवता एकत्र पंढरपूरकडे मार्गक्रमण करतात. त्यामुळे समाजात जातीय तेढ निर्माण करणाऱ्या राजकारण्यांनी वारकऱ्यांकडून एकतेचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. माऊलीच्या पालखीचे दर्शन घेण्यासाठी अभिनेते अभिजित बिचुकले आले होते.वारीसाठी उभारण्यात येणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या स्वागत कमानींवर टीका करत, हा निधी वारकऱ्यांच्या अन्न, पाणी आणि मूलभूत सुविधांवर खर्च केला असता त्याचा अधिक फायदा झाला असता, असेही त्यांनी म्हटले. शासन वारकऱ्यांच्या सेवेत कमी पडत असल्याचा आरोप करत, मी महाराष्ट्राचा मुख्यमंत्री झालो तर आषाढी वारीचा संपूर्ण खर्च शासनामार्फत उचलणार आणि वारकऱ्यांच्या सेवेत कोणतीही कमतरता राहू देणार नाही,अशी घोषणा अभिजित बिचुकले यांनी केली.
0
0
Report

लोडशेडिंग के विरोध में किसानों का आक्रोश, खामखेडा में बिजली उपकेंद्र के पास प्रदर्शन

Nashik, Maharashtra:- लोडशेडिंग विरोधात शेतकऱ्यांचा हुंकार... - नाशिकच्या देवळा तालुक्यातील खामखेडा वीज उपकेंद्रावर शेतकऱ्यांचा अंधार जनआक्रोश मोर्चा गेल्या पाच-सहा दिवसांपासून शेतशिवारातील वारंवार होत असलेल्या लोडशेडिंगमुळे संतप्त झालेल्या खामखेडा व परिसरातील शेतकरी, नागरिक आणि विद्यार्थ्यांनी देवळा तालुक्यातील खामखेडा येथील ३३/११ केव्ही महावितरण वीज उपकेंद्रावर "अंधार जनआक्रोश मोर्चा" काढत महावितरणच्या कारभाराचा तीव्र निषेध केला. हातात मेणबत्त्या आणि टेंभे घेऊन काढण्यात आलेल्या या आंदोलनात शेकडोच्या संख्येने शेतकरी सहभागी झाले होते. यावेळी आंदोलकांनी लोडशेडिंगच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत “अंधार नको, वीज हवी!”, “लोडशेडिंग बंद करा, शेतकऱ्यांना न्याय द्या!” अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top