445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाळ में बुलेट की टक्कर: बाइक सवार की मौत, चालक के खिलाफ़ केस दर्ज
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा मार्गावर भरधाव बुलेटच्या धडकेत दुचाकी स्वाराचा मृत्यू झाला. अपघाताची संपूर्ण घटना सीसीटीव्हीत चित्रीत झाली आहे. प्रदीप जारी असे मृत व्यक्तीचे नाव असून ते स्थानिक रेमंड कंपनीत कामगार होते. रात्री भाजीपाला घेऊन ते घराकडे जात असताना या वर्दळीच्या रस्त्यावर सुसाट बुलेट स्वराने त्यांना जोरदार धडक दिली. यात जारी हे दुभाजकावर जाऊन आदळले. तर बुलेटस्वार युवक देखील फेकला गेला. अपघातात प्रदीप जारी यांच्या डोक्याला व कमरेला जबर मार लागला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, दरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी लोहारा पोलिसांनी बुलेट चालक युवका विरुद्ध निष्काळजीपणे दुचाकी चालवून अपघात केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.0
0
Report
वासई के कलाकार ने मोरपंख पर विठ्ठल की आकर्षक चित्रकला रची
Vasai-Virar, Maharashtra:आषाढ़ी एकादशी निम्मित मोरपंखावर साकारलेले विठ्ठलाचे मनोहारी चित्र वसईतील भाताणे गावातील चित्रकार कौशिक दिलीप जाधव यांनी मोरपंखावर भगवान विठ्ठलाचे आकर्षक चित्र साकारले आहे. हे चित्र वॉटर कलर्स इस माध्यमातून अवघ्या अर्ध्या तासात रेखाटण्यात आले आहे. मोरपंख भारतीय संस्कृतीत सौंदर्य, पावित्र्य आणि निसर्गाचे प्रतीक मानले जाते. त्याच मोरपंखावर विठ्ठलाची प्रतिमा साकारल्यामुळे या कलाकृतीला आध्यात्मिक आणि कलात्मक असा सुंदर संगम लाभला आहे. मोरपंखाचा नाजूक पोत आणि त्यावरील रंगसंगती जपत इतक्या सूक्ष्म पृष्ठभागावर चित्र रेखाटणे हे मोठे कौशल्य मानले जाते. ही कलाकृती कलाकाराच्या कल्पकतेची, संयमाची आणि चित्रकलेवरील प्रभुत्वाची साक्ष देते. वारकरी परंपरेप्रती असलेली श्रद्धा आणि कलाप्रेम यांचा सुंदर मिलाफ या चित्रातून पाहायला मिळतो. ही अनोखी कलाकृती सध्या कला रसिकांचे लक्ष वेधून घेत असून, स्थानिक पातळीवर तिचे कौतुक होत आहे.0
0
Report
अंबेगांव में भारी बारिश से बाढ़, डिंभे डेम से पानी का स्तर बढ़ने की चेतावनी
Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी पट्ट्यात सुरू असलेल्या संततदार पावसामुळे ओढ्या नाल्यांना पूर आले असून अनेक भात खातरांचं नुकसान झालंय,अनेक शेतकऱ्यांच्या भात खाचरातील माती मुसळधार पावसाने वाहून गेलीय तर अनेकांच्या शेताचे बांध फुटलेत या मुसळधार पावसामुळे डिंभे धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत असून धरण 80 टक्के पेक्षा अधिक क्षमतेने भरल्याने धरणातून कुठल्या हि क्षणी पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो त्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
Advertisement
इंदिरानगर की Yes Fine Bakery में स्वच्छता उल्लंघन, लाइसेंस तात्कालिक निलंबित
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या इंदिरानगर, जुना बायजीपुरा परिसरातील 'येस फाइन बेकरी'त टोस्टचे उत्पादन अत्यंत अस्वच्छ वातावरणात करून पॅकिंगवर मात्र दुसऱ्याच बेकरीच्या नावाचे लेबल वापरून विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार अन्न व औषध प्रशासन विभागाच्या पथकाच्या नजरेस पडला. त्यामुळे या पथकाने बुधवारी रात्री या बेकरीचा परवाना तत्काळ निलंबित केला. बेकरीवर छापा मारून तेथील किळसवाण्या वातावरणाचा पर्दाफाश केला.. छापा मारला. तेव्हा, टोस्ट तयार केले जात होते, तो संपूर्ण परिसर मोठ्या प्रमाणात धूळ, कोळिष्टके, गंज व जळमटांनी माखलेला आढळला. टोस्ट उत्पादन क्षेत्रामध्ये दरवाजा नसलेले अस्वच्छ शौचालय असून, कामगारांना हात धुण्यासाठी वॉश बेसिन, लिक्वीड सोपची व्यवस्था नव्हती. बेकरी पदार्थ बनवले जात होते, तिथे कामगार तंबाखू खात होते. उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या पाण्याच्या टाक्याही आतून-बाहेरून अत्यंत अस्वच्छ दिसून आल्या.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में अखंड फ्लायओवर: 4 से 8 रॅम्प की नई योजना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील वाहतूक कोंडीवर कायमचा तोडगा काढण्यासाठी आणि पुढील २० वर्षांतील संभाव्य लोकसंख्येचा ताण पेलण्यासाठी चिकलठाणा ते वाळूज एमआयडीसी दरम्यान प्रस्तावित असलेल्या अखंड उड्डाणपुलाच्या तांत्रिक आराखड्यात बदल करण्यात आला आहे. या भव्य उड्डाणपुलावरून खाली उतरण्यासाठी आधी केवळ ४ मार्ग प्रस्तावित होते. मात्र, शहराचा विस्तार आणि औद्योगिक गरज लक्षात घेऊन आता ६ ते ८ महत्त्वाच्या ठिकाणी रॅम्प आणि आऊटलेट ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. राज्य अर्थसंकल्पात मंजुरी मिळालेल्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाचा नवा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम वेगाने सुरू असून, तज्ज्ञांच्या मदतीने तांत्रिक बाबींचा आढावा घेतला जात असल्याची माहिती पुढे आली...0
0
Report
लोणावळा में पिछले 24 घंटे में 235 मिलीमीटर बारिश दर्ज
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरूच आहे. मागील 24 तासांत लोणावळयात 235 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. यावर्षी 3531 मिलीमीटर इतका पाऊस बरसला आहे. त्यामुळे लोणावळ्यात मागील काही दिवसांत विक्रमी पावसाची नोंद झाली असून राज्यभरातून वर्षाविहारासाठी येणाऱ्या पर्यटकांना यानिमित्ताने पावसाची पर्वणी मिळाली आहे. तर येथील निसर्ग बहरला आहे.0
0
Report
Advertisement
लोणावळा के टायगर पॉइंट पर धुंध की घनी चादर
Varsoli, Maharashtra:पाऊस आणि धुक्याचा आनंद सध्या लोणावळ्यात पर्यटकांना मिळत असल्याने धर्तीवरचा स्वर्ग म्हणून प्रसिद्ध असलेल्या टायगर पॉइंटवर धुक्याची दाट चादर पसरु लागली आहे. उंच घाट माथ्यावर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या टायगर पॉइंट ला पर्यटक पावसाळ्यात मोठी पसंती देतात, सध्या टायगर पॉइंट, लायन्स पॉइंट धुग्यात हरवल्याचे चित्र पहायला मिळत आहे. थंडगार वारे आणि दाट धुकं यामुळे लोणावळ्याचा निसर्ग मनमोहक झालाय..0
0
Report
आषाढ़ी एकादशी पर मालगांव तालुक़े में विठ्ठु नाम का गजर, विद्यार्थी-शिक्षक भक्तिमय
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) विशाल मोरे - आषाढी एका दाशीच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा झाल्या भक्तिमय... - विठू नामाच्या गजराने जिल्हा परिषद शाळा दुमदुमल्या.. आषाढी एकादशीच्या निमित्ताने मालेगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये विठ्ठू नामाचा गजर झाला. विद्यार्थी आणि शिक्षक यांनी मोठ्या भक्तिभावाने पंढरीची वारी मालेगावात अनुभवली. बाल गोपाल विद्यार्थी यांनी विठू रखुमाईची भूमिका साधत अख्ख्या गावामध्ये टाळ मृदुंग वाजवत, भजन म्हणत दिंडी काढली. गावकरी देखील या मनमोहक दृश्यामुळे दिंडीत सहभागी झाले.0
0
Report
14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीसह लैंगिक अत्याचाराच्या आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा; महाराष्ट्रात ऐतिहासिक निर्णय
Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - पोटच्या अल्पवयीन मुलीवर नराधम बापाकडून लैंगीक अत्याचार - अल्पवयीन मुलीची स्वतःला जाळून घेत केली आत्महत्या - शवविच्छेदन अहवालात अल्पवयीन मुलगी गर्भवती - नराधम बापाला मालेगाव न्यायालयाने ठोठावली दुहेरी जन्मठेपेची शिक्षा (महत्वाची टीप: आरोपीचा व्हिडिओ किंवा चेहरा ब्लर करावा) संपूर्ण महाराष्ट्राला हादरवून सोडणाऱ्या नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यातील घटनेचा मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयाने ऐतिहासिक निकाल दिला. बागलाण तालुक्यातील एका नराधम बापाने आपल्या 14 वर्षाच्या अल्पवयीन मुलीवर वारंवार लैंगीक अत्याचार केल्याची घटना 7 वर्षापूर्वी घडली होती. या छळाला कंटाळून त्या मुलीने देखील स्वतःला जाळून घेत आत्महत्या केली. आजूबाजूच्या नागरिकांनी तिला तत्काळ रुग्णालयात दाखल केले असता तिला डॉक्टरांनी तपासून मयत घोषित केले. त्यानंतर तिचे शवविच्छेदन केले असता ती गर्भवती देखील होती. या संदर्भात सटाणा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणाची संपूर्ण सुनावणी ही मालेगाव अपर जिल्हा सत्र न्यायालयात चालली. आणि आज या प्रकरणावर मालेगाव न्यायालयातील न्यायाधीश कृष्णजी पालदेवार यांनी त्या आरोपीला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावत ऐतिहासिक निर्णय दिला. या खटल्यात एकूण आठ साक्षीदार तपासले गेले असून सरकार पक्षाकडून अँड संजय सोनवणे यांनी काम बघितले तर सटाणा पोलिस स्टेशनचे पोलिस अधिकारी कर्मचारी यांनी विशेष परिश्रम घेत पुरावे गोळा करत आरोपीला शिक्षा मिळवून दिली. बाईट: एड संजय सोनवणे, सरकारी वकील0
0
Report
Advertisement
पंढरी में लाखों भक्त, विठ्ठल के दर्शन को उमड़ी भारी भीड़
Pandharpur, Maharashtra:हात कमरेवर ठेवून भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा विठ्ठल. आषाढी एकादशीच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून आलेले लाखो वारकरी पंढरीत दाखल झाले आहेत. अनेक दिवसांचा पायी प्रवास करून आलेल्या या वारकऱ्यांसाठी विठुरायाचं दर्शन म्हणजे त्यांच्या वारीची खरी फलश्रुती आहे. ज्ञानोबा-तुकाराम’, ‘माऊली-माऊली’ आणि ‘विठ्ठल-विठ्ठल’च्या जयघोषाने पंढरी दुमदुमून गेली आहे. आपल्या कुटुंबासाठी, शेतकऱ्यांसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्रासाठी सुख-समृद्धीची प्रार्थना करत वारकरी विठुरायाच्या चरणी माथा टेकवत आहेत. या विठुरायाच्या चरणी प्रत्येक वारकऱ्याची एकच भावना आहे—पाऊस चांगला पडू दे, बळीराजा सुखी होऊ दे आणि महाराष्ट्राच्या जनतेवर विठ्ठलाची कृपादृष्टी कायम राहू दे. त्यामुळे हात कमरेवर ठेवून भक्तांच्या भेटीची वाट पाहणारा हा सावळा विठ्ठल… आणि त्याच्या दर्शनासाठी आसुसलेली ही लाखो भक्तांची मांदियाळी… विठ्ठल मंदिरातील गाभाऱ्यातून याच सावळ्या विठुरायाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..0
0
Report
आषाढी एकादशी पर पंढरी में भक्तों का उल्लास, विठ्ठल दर्शन की आस
Kolhapur, Maharashtra:आषाढी एकादशीच्या निमित्ताने अवघी पंढरी विठ्ठलमय झाली आहे. विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत. चंद्रभागेच्या तीरावर भाविकांची गर्दी, मंदिर परिसरात दर्शनासाठी लागलेल्या रांगा आणि वारकऱ्यांच्या टाळ-मृदंगाच्या गजराने पंढरी दुमदुमून गेली आहे. शेकडो किलोमीटरचा पायी प्रवास करून आलेल्या वारकऱ्यांसाठी आजचा दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे. पायांचा थकवा, वाटेतल्या अडचणी आणि प्रवासाचा त्रास विसरून प्रत्येक वारकरी विठ्ठलाच्या दर्शनाची आस घेऊन पंढरीत दाखल झाला आहे. ‘ज्ञानोबा-तुकाराम’ आणि ‘माऊली-माऊली’च्या जयघोषाने भक्तीचा हा महासागर आणखीच खुलून गेला आहे. आषाढी एकादशी म्हणजे वारकऱ्यांसाठी केवळ धार्मिक उत्सव नाही, तर भक्ती, समता, बंधुता आणि सेवाभावाचा संदेश देणारा हा महत्त्वाचा सोहळा आहे..0
0
Report
भायंदर अस्पताल सुरक्षा रक्षक पर परिचारिकाओं की हड़ताल, पुलिस में शिकायत
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर ब्रेक भाईंदरच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात आमदार नरेंद्र मेहता यांचा सुरक्षा रक्षक अरविंद रंजिरे यांच्या कडून परिचारिकांना दमदाटीचा आरोप झाला आहे. कुत्रा चावल्याच्या उपचारादरम्यान झालेल्या या वादाच्या निषेधार्थ परिचारिकांनी काम बंद आंदोलन पुकारले. तक्रार नोंदवण्यासाठी संतप्त परिचारिका व कर्मचाऱ्यांनी भाईंदर पोलीस ठाण्यात गर्दी केली भाईंदर पोलीसानी अरविंद रंजिरे वर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरु आहे अशी माहिती भाईंदर पोलीस स्टेशनचे सिनियर पी आय जितेंद्र कांबळे यांनी दिली आमदार नरेंद्र मेहता यांच्याशी दूरध्वनी वरून चर्चा केली असता त्यांनी सांगितले की माझा त्याच्याशी काही संबंध नाही जर त्याने असे केले असेल तर त्याचे आम्ही समर्थन करणार नाही आम्ही त्याची तात्काळ हक्कालपट्टी केली आहे0
0
Report
Advertisement
नागपुर में NSUI ने केंद्रीय शिक्षा मंत्री के इस्तीफे की मांग पर कैंडल मार्च
Nagpur, Maharashtra:नागपूर - केंद्रीय शिक्षण मंत्र्यांचा राजीनाम्याच्या मागणीसाठी NSUI च्या वतीने कँडल मार्चच - नागपुरातील रामनगर चौक ते लक्ष्मी भुवन चौकापर्यंत काढण्यात आला कॅनडल मार्च.... - NSUI महाराष्ट्र प्रदेश सचिव कुणाल चौधरी यांच्या नेतृत्वात कँडल मार्चचे आयोजन..... काँग्रेसचे शहर अध्यक्ष प्रफुल गुडधेसह पदाधिकारी झाले सहभागी...0
0
Report
सुभाष मैदान न मिलने पर कांग्रेस आंदोलन के साथ सड़क पर उतरेगी
Kalyan, Maharashtra:आंदोलनासाठी मागितलेले मैदान स्पर्धेसाठी न दिल्याने काँग्रेस संतप्त मैदान न मिळाल्यास रस्त्यावर उतरू, काँगेसचा इशारा दिल्लीच्या जंतर मंतर वर विद्यार्थ्यांवर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ कॉक्रोज जनता पार्टी और काँग्रेसच्या वतीने २५ जुलैला आंदोलन केल जाणार आहे. यासाठी आयोजकांनी महापालिकेकडे सुभाष मैदान, फडके मैदान किंवा मॅक्सी ग्राउंड ची मागणी केली होती. Vásापैकी सुभाष मैदानाला परवानगी नाकारल्यानंतर फडके मैदान उपलब्ध होईल असं आयोजकांना वाटत होतं, मात्र हे मैदान Cricket स्पर्धेसाठी बुक झाल्याची माहिती आयोजकांना मिळाली. त्यामुळे काँग्रेस नगरसेविका कांचन कुलकर्णी यांनी बाबत संताप व्यक्त केलाय. मैदान मिळाल नाही तर काँग्रेस आंदोलनकर्त्यांसह रस्त्यावर उतरेल. यावेळी कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास पोलीस प्रशासन त्यासाठी जबाबदार असेल असं काँग्रेसने सांगितले आहे. फडके मैदान जरी आंदोलनाला दिल नाही तरी तिथेच आंदोलन होणार असा निर्धार कोक्रोज जनता पार्टीने केलाय. दरम्यान आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कल्याण बाजारपेठ पोलिसांनी आयोजकांना नोटीसा बजावल्या आहेत.0
0
Report
नवी मुंबई के हजारों छात्र धर्मेंद्र प्रधान के इस्तीफे की मांग पर उतर आए
Navi Mumbai, Maharashtra:केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेावा या मागणीसाठी नवी मुंबईतील हजारो विद्यार्थी एकत्र जमले होते. वाशी मधील जुहूचौपाटी याठिकाणी हजारो विद्यार्थ्यांनी एकत्र येत पायी मोर्चा काढलाय. ज्या विद्यार्थ्यांनी यंत्रणेच्या चुकीमुळे आत्महत्या केलेय त्याविद्यार्थ्यांना श्रद्धांजली अर्पण करत सर्व विद्यार्थ्यांनी एकत्र येत शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी केलेय. या शांतता पूर्ण मोर्चात विद्यार्थ्यांनी सरकार विरोधातील आपला रोष व्यक्त करत ही व्यवस्था सुधारली पाहिजे अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.0
0
Report
Advertisement
