icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में पुलिस अधीक्षक आयुष नोपाणी के आदेश: गणेशोत्सव में डीजे पर पूर्ण बंदी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात नवे पोलीस अधीक्षक आयुष नोपाणी अॅक्शन मोडवर आले आहेत. गणेशोत्सवाच्या दरम्यान डीजेवर संपूर्ण बंदी असेल असे त्यांनी स्पष्ट केले आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची प्रभावी अंमलबजावणी करत उत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेड परिसरात त्यांनी एका पूर्वतयारी आढावा बैठकीत निर्देश दिले. या बैठकीला पोलीस विभागाचे अधिकारी, मनपाचे आयुक्त, गणेश मंडळाचे प्रतिनिधी, मूर्तिकार आणि डीजे चालक-मालक यांच्यासह मोठ्या संख्येत नागरिकांची उपस्थिती होती. गणेशोत्सवा दरम्यान डीजेवर पूर्ण बंदी असे स्पष्ट करताना त्यांनी या आदेशाचे तंतोतंत पालन होईल असेही स्पष्ट केले आहे. गणेशोत्सवा दरम्यान सीसीटीव्ही यंत्रणा उभारणे, पारंपारिक वाद्यांना प्रोत्साहन देणे, आदर्श गणेश मंडळांची स्पर्धा असेही विषय त्यांनी बैठकीत प्राधान्याने मांडले. या आढावा बैठकीनंतर चंद्रपूर जिल्ह्यात तरी गणेशोत्सवादरम्यान डीजेवर पूर्णपणे बंदी असेल हे स्पष्ट झाले आहे.
0
0
Report

राजुरा में सुमनताई मामुलकर की संपत्तियों के हस्तांतरण पर रोक

Chandrapur, Maharashtra:टायटल:---सुमनताई मामुलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती, माजी आमदार प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणात राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांचा आदेश ( single file sent on 2C) अँकर:-- सुमनताई मामुलकर यांच्या मालमत्तेच्या हस्तांतरणाला आणि विक्रीला स्थगिती देण्यात आली आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा क्षेत्राचे माजी आमदार स्व. प्रभाकरराव मामुलकर यांच्या पत्नीच्या फसवणूक प्रकरणात राजुरा उपविभागीय अधिकाऱ्यांनी हा आदेश दिला. सुमनताई प्रभाकरराव मामुलकर यांच्या अर्जावर सुनावणी करत त्यांच्या मालकीच्या नऊ स्थावर मालमत्तांच्या विक्री, हस्तांतरण किंवा अन्य कोणत्याही प्रकारच्या व्यवहारावर पुढील आदेशापर्यंत स्थगिती देण्यात आली आहे. सुमनताई मामुलकर यांनी स्वतच्या देखभालीसाठी भाचा अभिजित भुते याला आपल्या घरी ठेवले होते. त्याने इतर साथीदारांशी संगनमत करून पाच कोटी पेक्षा अधिक किंमतीच्या संपुर्ण नऊही मालमत्ता आपल्या व गैरअर्जदार यांचे नावावर करून फसवणुक केली होती. याबाबत सुमनताई यांनी राजुरा उपविभागीय अधिकारी यांचेकडे प्रकरण दाखल केले होते. त्यावर सुनावणी करतांना आज संबंधित मालमत्ता उपविभागीय अधिकारी रवींद्र माने यांनी अधिकारांचा वापर करत संबंधित नऊ मालमत्तांच्या विक्री, हस्तांतरण अथवा फेरफार करण्यास स्थगिती देण्याचे आदेश पारित केले आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

नाशिक के आश्रम स्कूल में नाबालिग ने बच्चे को जन्म दिया; प्रशासन में हड़कंप

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका आश्रमशाळेत घडलेल्या धक्कादायक घटनेने संपूर्ण महाराष्ट्र हादरला आहे. इयत्ता नववीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिल्याची धक्कादायक व काळजाचा थरका उडविणारी घटना समोर आली असून, या प्रकारामुळे आदिवासी विकास विभागाच्या देखरेख व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. संबंधित विद्यार्थिनीशी संबंध ठेवणारा आरोपी देखील अल्पवयीन व तिचाच नातेवाईक असल्याची माहिती समोर आली आहे. त्याला बाल न्याय व्यवस्थेनुसार बालसुधारगृहात पाठवण्यात आले. विशेष म्हणजे, विद्यार्थिनी गर्भवती राहिल्याची बाब इतक्या उशिरा लक्षात आली कशी? विद्यार्थिनींच्या आरोग्य तपासणीची प्रक्रिया नेमकी कशी राबवली जात होती? हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आश्रम शाळा चालवणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे त्यांची चौकशी झाली पाहिजे. हे कृत्य दबावाने कोणी लपवून ठेवलं त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. तसेच अन्य दुसऱ्या आश्रम शाळांमध्ये अशी घटना घडू नये म्हणून कडक कारवाई झाली पाहिजे अशी प्रतिक्रिया मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केली. आश्रम शाळेतील अधीक्षक आहेत, तिथे NM नेमणूक केलेली आहे. दर महिन्याला मुलींची तपासणी होते. अस असताना त्या मुलीची डिलिव्हरी होते हे कुठेतरी शासकीय आश्रम शाळांच्या बाबतीत वाईट आहे. अशी भावना खासदार भास्कर भगरे यांनी व्यक्त करत त्या शाळेचे मुख्याध्यापक, शाळेच्या अधीक्षका, त्या ठिकाणी काम करणाऱ्या नर्स, या सगळ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिल्या असून भविष्यात अशा घटना घडू नये याची देखील काळजी घेण्याचे आवाहन भगरे यांनी केले. सदर मुलीची डिलिव्हरी ही 19 जून रोजी झाली आणि त्याबाबत माहिती प्रकल्प अधिकारी यांनी 1 जुलै रोजी वरिष्ठांना दिली. या प्रकरणाची प्रकल्प कार्यालय मार्फत चौकशी करण्यात आली. यात सदर विद्यार्थिनी शाळेत निवासी विद्यार्थिनी म्हणून शिकत होती. सुट्टीमध्ये ती गावी गेली होती. तेव्हा तिची डिलिव्हरी झाली. या प्रकरणी संशयित विधी संघर्षित बालकावर कारवाई करत त्याची रवानगी बाल सुधार गृहात करण्यात आल्याची माहिती या प्रकरणात आश्रमशाळेतील संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि व्यवस्थापनाची सखोल चौकशी करण्याची मागणी विविध स्तरातून होत आहे. दोषी आढळणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जाते. शासकीय आश्रम शाळेत दर महिन्याला विद्यार्थिनींची मासिक पाळी बाबत वैद्यकीय तपासणी केली जात असते.. असे असताना देखील सदर आश्रम शाळेतील विद्यार्थिनी गर्भवती राहून थेट प्रसूती झाल्याने या व्यवस्थेवर मोठे प्रश्न चिन्ह निर्माण झाले आहे.
0
0
Report

डोंबिवली अस्पताल मामले पर राजू पाटील की तीखी टिप्पणी, रविंद्र चव्हाण पर हमला

Kalyan, Maharashtra:राजू पाटील मानसे नेता डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणी आता मानसेची उडी. मनसेचे माजी आमदार राजू पाटील यांनी कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत रुग्णालय व्यवस्थापक विचारला जाब. रविंद्र चव्हाण डोंबिवली साठी काय केलं डोंबल... कमळ लावून मयतीला आणि बारशाला जाऊन काही होत नाही त्यांना लाज वाटली पाहिजे लोकांची काम केली पाहिजे. मनसेच्या राजू पाटील यांचा रविंद्र चव्हाण यांच्यावर सडकून टीका. डोंबिवली मध्ये रुग्णालयामध्ये जो प्रकार झाला आहे त्यामध्ये राजकारण होताना पाहायला मिळत आहे. हा प्रकार का घडला रुग्णालयाचा सुविधा पुरेशे आहेत का? प्रशासन पूर्ण पडतोय का रुग्णालय पूर्ण पडत नाही हे सत्य. डॉक्टर वेळेवर नसतात स्टाफ उर्मड मध्ये वागतो अशा वेगवेगळ्या तक्रारी देखील आमच्याकडे येतात. या अनुषंगने आम्ही आयुक्तांकडे मागणी करायला आलो. डॉक्टरची हजेरी, त्याचा लेखाजोखा बेड उपलब्ध असल्याचे डॅशबोर्ड सह सोयी सुविधा व्यवस्थित आहे की नाही या सगळ्या गोष्टीवर निगराणी ठेवण्यात येवावी. आम्ही सहा वर्षापासून सत्तेत आहोत तीस वर्षापासून ज्या सत्य आहे त्यांना सध्या प्रश्न विचारायला हवं.. आम्ही सत्तेत राहून सगळं सुधारू शकतो म्हणून सत्य बरोबर आम्ही आलो आहोत. डोंबिवलीचे आमदार रवींद्र चव्हाण आहेत कुठे.. सहा दिवसापासून पाऊस पडतोय तो रवी उगवला मात्र आमचा रवी उगवला नाही. जो इमानदारीत काम करतात त्यांना प्रश्न विचारतात ज्यांना विचारायचे त्यांना कोणी प्रश्न विचारत नाही. ज्या गोष्टी शहराच्या बाहेर असले पाहिजेल ते शहरात आणत आहेत ज्यांना पाहिजे ते बाहेर नेत आहेत.. अंदागुंदी कारभार यांचा सुरू आहे आणि हेच दाखवला मी लवकर समोर आलो. सत्ताधारी जेवढे जबाबदार तेवढे प्रशासन जबाबदार. गुन्हा दाखल करायला वेळ का लागली आणि याचा संपूर्ण फुटेज काढून आम्हाला आणि सर्व लोकांना अहवाल सादर करावा. जिथे आम्हाला पटत नाही तिथे जाब विचारणार अशीच वाटचाल पुढे चालू राहणार. रविंद्र चव्हाण वैद्यकीय शिक्षक मंत्री होते चार टाईम आमदार माझा डोंबिवली साठी काय केलं डोंबल... डोंबिवलीची डोंबलवली केली आहे. कमळ लावून मयतीला आणि बारशाला जाऊन काही होत नाही त्यांना लाज वाटली पाहिजे लोकांची काम केली पाहिजे ते करा.
0
0
Report
Advertisement

वर्धा ATS कार्रवाई: शहजाद भट्टी गैंग से संपर्क में आए व्यक्ति हिरासत में

Wardha, Maharashtra:वर्धा ब्रेकिंग वर्ध्यात ATS पथकाने सकाळी 7 वाजता एकाला ताब्यात घेतले. गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी संपर्क असल्यावरून वर्ध्यात एकाला चौकशीकरिता घेतलं ताब्यात. पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्या गँगशी सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात विविध ठिकानासह वर्ध्यात ATS पथकाची कारवाई. वर्ध्यातही एका संशयिताला ताब्यात घेतल्याने खळबळ. वर्धा, नागपूर एसटीएस पथकाची संयुक्त कारवाई. पथकाकडून संबंधित संशयिताची चौकशी सुरू असल्याची सूत्रांची माहिती. 10 तासापासून कसून ATS पथकाची चौकशी सुरु. वर्ध्याच्या वडनेर येथून एकाला घेतले आहे ताब्यात.
0
0
Report

11 घंटे बाद सुरक्षित बाहर आया विजय सपकाळ, पत्नी-बच्चों की खुशी से भावुक

Pimpri-Chinchwad, Maharashtra:मोशी दुर्घटनेमध्ये इमारतीत अडकलेल्या आणि सुखरूप बाहेर पडलेल्याचे अनुभव थक्क करणारे आहेत... विजय सपकाळ ही या दुर्घटनेत इमारती मध्ये अडकला होता...! त्याचा पाय पिलर खाली अडकला होता...खडकी फुटलेल्या काचांवर तो होता.. जगणार नाही.अशी शक्यता लक्षात घेऊन त्याने पत्नीला सेल्फी, व्हिडिओ आणि मेसेज पाठवला....सुदैवाने ११ तासानंतर त्याला बाहेर काढण्यात यश आलं. बेशुद्ध अवस्थेतून बाहेर पडल्यावर पत्नी आणि मुलीला त्याने पाहिले आणि त्याला अश्रू अनावर झाले...! त्याच्या अनुभव संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...!
0
0
Report

गडचिरोली के जंगलों में हाथियों के आक्रामक मूवमेंट से नागरिकों में डर, वनविभाग चेतावनी

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील रानटी हत्तींच्या धुमाकुळानंतर वनविभाग सतर्क, रील आणि फोटोंच्या नादात जीव धोक्यात घालू नका, वनविभागाचे नागरिकांना आवाहन गेल्या काही दिवसांपासून गडचिरोली वनविभागात, विशेषतः गडचिरोली वनपरिक्षेत्रात रानटी हत्तींचा वावर आहे. मनुष्य आणि हत्ती यांच्यात कोणताही अनुचित प्रकार किंवा संघर्ष होऊ नये, यासाठी वनविभाग सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. मात्र काही नागरिक रानटी हत्तींचे फोटो, व्हिडिओ आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' बनविण्यासाठी स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. नुकतेच हत्तीने चिरडल्याने एका इसमाचा मृत्यू झाला आहे. गडचिरोलीच्या वनविभागाने नागरिकांना काळजी घेण्याचे व सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. हत्तींच्या हालचालींवर बारीक नजर ठेवण्यासाठी आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी वनविभागाचे कर्मचारी, 'प्रायमरी रिस्पॉन्स टीम' आणि 'रॅपिड रिस्पॉन्स टीम' दिवस-रात्र परिसरात गस्त घालत आहेत. यासोबतच, हत्तींच्या स्थानाबाबतची आणि हालचालींची अचूक माहिती गावकऱ्यांना सातत्याने दिली जात आहे, जेणेकरून नागरिक सतर्क राहू शकतील. मात्र काही उत्साही लोक या माहितीचा गैरवापर करत असल्याचे समोर आले आहे. वनविभागाने सुरक्षेच्या कारणास्तव उभारलेले बॅरिकेड्स (कठडे) ओलांडून काही नागरिक थेट हत्तींच्या जवळ जाण्याचा धोका पत्करत आहेत. रानहत्तींचे फोटो काढणे, व्हिडिओ बनवणे आणि सोशल मीडियासाठी 'रील्स' तयार करणे या नादात अनेक जण स्वतःचा जीव धोक्यात घालत आहेत. परिसरात हत्ती दिसून आल्यास किंवा कोणतीही अडचण निर्माण झाल्यास तात्काळ वनविभागाच्या कार्यालयाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागरिकांनी स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य देऊन अशा संवेदनशील परिस्थितीत जबाबदारीने वागावे, अशी अपेक्षा वनविभागाकडून व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

नंदुरबार में बारिश की कमी से किसान प्यासे फसलें हाथों से पानी दे रहे

Dhule, Maharashtra:नंदুরबार जिल्ह्यात पिकांना जगवण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे. वरुणराजा बरसत नसल्यामुळे शेतकऱ्यांवर पिकांना हाताने पाणी देण्याची वेळ आली आहे. स्वतःच्या मुलाबाळांप्रमाणे पिकांना जगवण्यासाठी शेतकरी राजा पिकांना घोटभर पाणी देत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत अवघा ८३ मिलिमीटर पाऊस झाला असून, पेरणीयोग्य पावसाची प्रतीक्षा अजूनही कायम आहे. पावसाळा सुरू होऊन जवळपास दीड महिना उलटला, तरीही जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झालेला नाही. सुरुवातीला पाण्याची उपलब्धता असल्यामुळे शेतकऱ्यांनी लागवड केली होती; मात्र भूजल पातळी खालावल्याने विहिरींनीही तळ गाठला आहे. जिल्ह्यात दमदार पाऊस होत नसल्यामुळे पिकांना जीवनदान देण्यासाठी शेतकऱ्यांकडून शर्थीचे प्रयत्न केले जात आहेत.
0
0
Report

चामोर्शी में ड्रोन सर्वे के विरोध में ग्रामीणों ने ग्राम पंचायत कार्यालय में डांबा

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील चामोर्शी तालुक्यात वरद फेरो अलॉय कंपनीच्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी डांबले, जमीन मोजणीच्या मुद्यावर भडकले नागरिक, मुधोली चक परिसरात येणार आहे प्रकल्प ( 2 file sent on 2C) टायटल:---गडचिरोली जिल्ह्यातील  चामोर्शी तालुक्यातील मुधोली चक गावाच्या परिसरातील शेतांवर संध्याकाळी ड्रोन कॅमेऱ्यांच्या माध्यमातून सर्व्हेक्षण करत असलेल्या तीन लोकांना गावकऱ्यांनी पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबून ठेवले. त्यांचे ड्रोनही जप्त केले. वरिष्ठ अधिकारी येत नाहीत तोपर्यंत आम्ही हटणार नाही आणि डांबून ठेवलेल्या लोकांनाही सोडणार नाही, अशी भूमिका घेत रात्री उशिरापर्यंत शेकडो नागरिकांनी ग्रामपंचायत परिसरात ठिय्या दिला. महिनाभरापूर्वी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हजारोच्या संख्येने आंदोलन करणाऱ्या विमानतळ, जेएसडब्ल्यू आणि वरद फेरो अलॅयच्या प्रकल्पबाधित गावकऱ्यांना सहपालकमंत्री आशिष जयस्वाल यांनी तीन महिनेपर्यंत कोणत्याही हालचाली होणार नाहीत, तोपर्यंत तुम्हाला आक्षेप नोंदविण्यासाठी वेळ असेल, असे जाहीरपणे सांगितले होते. असे असताना गुरूवारी ड्रोन कॅमेऱ्यांनी शेतजमिनीचे सर्व्हेक्षण सुरू असल्याचे पाहून मुधोलीच्या गावकऱ्यांमध्ये संतप्त भावना उफाळून आल्या. हे सर्व्हेक्षण वरद फेलो अलॅय या कंपनीसाठीच असल्याचा दाट संशय आल्याने त्यांनी सर्व्हेक्षण करणाऱ्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात डांबले. पाहतापाहता संपूर्ण गावकरी आणि काही शेजारच्या गावांचेही लोक त्या परिसरात जमले. दरम्यान या स्थितीची माहिती मिळाल्यानंतर तहसीलदार आणि आष्टी पोलीस स्टेशनचे पथकही गावात पोहोचले. गावकरी ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याचं पाहून वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. अहेरीचे अपर पोलीस अधीक्षक हर्षवर्धन यांनी हे सर्व्हेक्षण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करणार असल्याचे सांगत गावकऱ्यांना शांत करण्याचा प्रयत्न केला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर नगरपालिका के ठेकेदार सफाई रोकने से शहर की सफाई संकट, आंदोलन तेज

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर - नालीसफाई कामगारांची सेवा स्थगित, शहरातील स्वच्छतेचा प्रश्न ऐरणीवर, कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना सेवेत घ्या, काँग्रेस नगरसेवकांचे मनपासमोर आंदोलन चंद्रपूर महानगरपालिकेने नालीसफाई करणाऱ्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांची सेवा स्थगित केल्यामुळे गेल्या काही दिवसांपासून चंद्रपूर शहरात स्वच्छतेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. स्वच्छता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेमुळे शहरातील विविध प्रभागांतील नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कचरा साचला असून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. याशिवाय घराघरांतून कचरा संकलन करणारे स्वच्छता दूतही येत नसल्याने नागरिकांना घरातील कचरा उघड्यावर टाकण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरात अस्वच्छता वाढत असून नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्व समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी तसेच सेवेतून कमी करण्यात आलेल्या कंत्राटी स्वच्छता कर्मचाऱ्यांना तात्काळ पुन्हा सेवेत सामावून घेण्याच्या मागणीसाठी नगरसेवक सचिन कत्याल यांच्या नेतृत्वात आज चंद्रपूर महानगरपालिकेसमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी मनपासमोर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. शहरातील स्वच्छतेचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा आणि कमी करण्यात आलेल्या स्वच्छता कर्मचाऱ्यांना पुन्हा सेवेत रुजू करून घ्यावे, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान, प्रशासनाने या मागणीवर तात्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास यापेक्षाही अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी दिला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top