445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नांदेड के सक्षम-आंचल प्रेमकहानी में नया मोड़: आंचल फिर घर छोड़कर
Nanded-Waghala, Maharashtra:प्रियक्राच्या मृतदेहाशी प्रेयसीने लग्न केल्याने देशभर गाजलेल्या नांदेडच्या सक्षम - आंचल प्रेमप्रकरणात आता नवा ट्विस्ट आलाय. आजन्म सक्षमच्या घरी त्याची पत्नी म्हणून राहणार असल्याचे वचन देणारी आंचल सक्षमचे घर सोडून आपल्या स्वतःच्या घरी निघून गेलीये. आंचल घर सोडून निघून गेल्याने सक्षमच्या आईने नाराजी व्यक्त केल्याची बातमी एका वर्तमान पत्राने छापली होती. त्याला आंचाल ने प्रतिउत्तर दिले आहे. सक्षमचा लहान भाऊ गैरवर्तन करत असल्याने आपण घर सोडल्याचा दावा आंचल ने केलाय. गतवर्षी 27 नोव्हेंबर रोजी नांदेड शहरात ऑनर किलिंग घडली होती. प्रेमप्रकरणाला विरोध असल्याने सक्षम ताटे या तरुणाची गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. सक्षम आणि आंचल मामीलवार या दोघांचे प्रेमप्रकरण होते. गुन्हेगारी पाश्वभूमी असलेले आंचल चे दोन भाऊ आणि सक्षम हे मित्र होते. पण प्रेमाला विरोध असल्याने हत्याकांड घडले. आंचल चे दोन भाऊ त्याचे वडील आणि आई हे सर्व या खूण प्रकरणात आरोपी आहेत. सक्षमच्या अंत्यविधीपूर्वी आंचल त्याच्या घरी पोहोचली होती. सक्षमच्या मृतदेहाला हळद कुंकू लावत मृतदेहाशी आंचल ने लग्न केल्याने हा विषय देशभर चर्चेत आला होता. आपल्या भावांना आणि वडिलांना फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी आंचल ने केली होती. आपण आजन्म त्याची पत्नी बनून राहून त्याच्याच घरी राहीन असे वचन तिने सर्वांसमोर दिले होते. पण मार्च महिन्यातच आंचल सक्षमचे घर सोडून निघून गेली. काही दिवसांपूर्वी सक्षमच्या आईची मुलाखत एका वर्तमान पत्रात छापून आली होती. या मुलाखतीत सक्षमच्या आईने आंचल बाबत नाराजी व्यक्त केली होती. पण यावर आता आंचल ची प्रतिक्रिया समोर आलीये. सक्षमचा लहान भाऊ आपल्यासोबत गैरवर्तन करत असल्याचा गंभीर आरोप आंचल ने केलाय. सक्षमच्या वडिलांचा मृत्यू आजारपनामुळे झाल्याचे आंचल ने सांगितले. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना सांगूनच आपण घर सोडल्याचे आंचल म्हणाली. या आरोप प्रत्यारोपामुळे सक्षम आंचल प्रेमप्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलय.0
0
Report
वाशीम के तिवळी में एक परिवार के चार की मौत, पिता ने फांसी लगाई
Washim, Maharashtra:अँकर:वाशीमच्या मालेगाव तालुक्यातील तिवळी येथे एकाच कुटुंबातील चौघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. संतोष तुकाराम बकाल (३५) यांनी महावितरणच्या पॉवर ग्रीड टॉवरला गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तर पत्नी वर्षा बकाल (२८), मुलगी जान्हवी (७) आणि मुलगा सोहम (५) यांचे मृतदेह विहिरीत आढळून आले.दोन्ही मुलांचे हात बांधलेल्या अवस्थेत आढळल्याची प्राथमिक माहिती आहे.कुटुंबातील वादातून ही घटना घडल्याचा संशय व्यक्त केला जात असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.या घटनेमुळे तिवळी गावासह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.0
0
Report
बांदा चेकपोस्ट पर पुलिस ने करोड़ों रु. की गोवा बनावटी शराब पकड़ी
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बांदा चेक नाक्यावर पोलिसांनी मोठी कारवाई करत तब्बل १ कोटी ३६ लाख ६० हजार ७१६ रुपयांचा गोवा बनावटीच्या दारूचा साठा जप्त केला आहे. महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत दाखल करण्यात आलेल्या या गुन्ह्यात एका ट्रकसह मोठ्या प्रमाणात व्हिस्कीच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या आहेत. ही दारू बेकायदेशिररित्या महाराष्ट्रात वाहतूक केली जात असल्याची माहिती समोर आली असून, पोलिसांनी वाहन चालकाला ताब्यात घेतले आहे. बांदा चेक नाक्यावर पहाटेच्या सुमारास करण्यात आलेल्या या कारवाईमुळे दारू तस्करांचे मोठे रॅकेट उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या प्रकरणाचा पुढील तपास बांदा पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
Advertisement
पनवेल में बस के पीछे चाक के नीचे आत्महत्या: CCTV से खुला डरावना मामला
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल शहरातील ओरियन मॉलसमोर शुक्रवारी रात्री एका अनोळखी व्यक्तीने धावत्या एसटी बसच्या चाकाखाली स्वतःला झोकून देत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पनवेल शहर पोलिसांनी या घटनेतील मृत व्यक्तीची ओळख पटविण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारस ठाणे येथून सातारा येथे जाणारी एसटी बस पनवेल येथील ओरियन मॉलसमोरील रस्त्यावर आली असताना एका ३५ ते ४० वयोगटातील अनोळखी व्यक्तीने अचानक बसच्या मागील चाकाखाली स्वतःला झोकुन दिले. या भीषण घटनेत तो एसटी बसच्या चाकाखाली चिरडला गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पनवेल शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह ताब्यात घेतला. पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली असता संबंधित व्यक्तीने जाणीवपूर्वक एसटी बसच्या मागील चाकाखाली स्वतला झोकून दिल्याचे स्पष्टपणे दिसून आले आहे. त्यामुळे प्राथमिक तपासात आत्महत्येचा निष्कर्ष समोर आला आहे. मात्र या आत्महत्येमागचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. पनवेल शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे. या घटनेतील मृत व्यक्तीची अद्याप ओळख पटली नसल्याचे पोलिसांनी सांगितले.0
0
Report
पनवेल में आशिष शेलार की पत्रकार परिषद आयोजित
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल आशिष शेलार पत्रकार परिषद नवी मुंबई0
0
Report
सिंदेवाही में प्रतिबन्धित तंबाखू-हुक्का शिशा का बड़ा जखीरा पकड़ा, मुख्य आरोपी गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही शहरातील आझाद चौक परिसरातील छुप्या खोल्यांमध्ये अवैध विक्रीच्या उद्देशाने प्रतिबंधित सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा अवैध साठा दडवून ठेवण्यात आला असल्याची माहिती चंद्रपूर पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाला मिळाली होती. या माहितीवरुन पथकाने संशयास्पद ठिकाणी छापा टाकून कारवाई केली. या धडक छाप्यादरम्यान मुख्य आरोपी सागर प्रमोदराव केकरे वय ३४ वर्षे, रा. आझाद चौक सिंदेवाही याला पोलिसांनी घटनास्थळावरून ताब्यात घेत झडती घेतली. महाराष्ट्र राज्यात पूर्णपणे प्रतिबंधित असलेला सुगंधित तंबाखू आणि हुक्का शिशा तंबाखूचा अवैध साठा असा सुमारे 3 लाख रु. किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीला पुढील कारवाई करिता पोलीस स्टेशन सिंदेवाही यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. गुन्हयातील पुरवठादार आरोपीचा शोध घेणे सुरु आहे. गुन्ह्याचा पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.0
0
Report
Advertisement
कल्याण लोहमार्ग पुलिस ने फटका गैंग के एक सरायती चोर को गिरफ्तार किया; चोरी गया मोबाइल भी बरामद
Kalyan, Maharashtra:फटका गैंग के चोर को कल्याण लोहमार्ग पुलिस ने गिरफ्तार किया; चोरी किया गया मोबाइल भी बरामद। आरोपी का नाम हसन जफर है। आगे की जांच वरिष्ठ निरीक्षक पंढरीनाथ कांदे कर रहे हैं。0
0
Report
मोदी का केंद्रिय योगदान: चंद्रपूर में आत्मनिर्भर भारत की नयी दिशा
Chandrapur, Maharashtra:टायटल: आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळाला एक तप पूर्ण झाल्याच्या निमित्ताने चंद्रपुरात आयोजित पत्र परिषदेत भाजप नेते आ. सुधीर मुनगंटीवार यांचे प्रतिपादन अँकर:देशाचे पंतप्रधान म्हणून सर्वाधिक काळ सलग सेवारत राहण्याचा 4 हजार 399 दिवसांचा ऐतिहासिक टप्पा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केलाय. यानिमित्त भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवार यांनी चंद्रपूरात आज एक पत्रकार परिषद घेत मोदी यांच्या कार्यकाळातील ठळक वैशिष्ट्यांचा उल्लेख केला. नव्या आत्मनिर्भर भारताच्या उभारणीमध्ये प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे स्थान अढळ असून त्यांच्या 12 वर्षांच्या कारकिर्दीत महाराष्ट्राच्याही विकासाला नवी क्रांतिकारी दिशा मिळाली असं सांगत मुनगंटीवार यांनी भारत लवकरच 5 ट्रिलियन डॉलर इकॉनोमी होण्याचा टप्पा देखील मोदीजींच्या नेतृत्वात लवकरच पार करेल असा विश्वास व्यक्त केला. जगातील आर्थिक महासत्ता म्हणून आपण पुढे येत असतांनाच अनेक जागतिक संकटांमध्ये ही भारत विश्वासार्ह मित्र म्हणून पुढे आलाय. कोरोना सारख्या जागतिक संकटात भारताने जगातील शंभर देशांना व्हॅक्सिन पुरवलं. देशातील दीन, दलित शोषित, पीडित वर्गासाठी मोदीजींनी आयुष्यमान भारत, जनधन योजना, यूपीआय पेमेंट सारख्या अनेक योजना राबवून त्यांना दारिद्र्य रेषेच्या वर आणलं, 11 कोटीच्या वर शेतकऱ्यांना सन्मान निधी देत शेतीमध्ये क्रांती घडवली. इंटरनेट, रेल्वे मार्ग आणि महामार्गांचा विस्तार यासारख्या गोष्टींमुळे देश पायाभूत सुविधांमध्ये प्रचंड वेगाने पुढे जात असल्याचंही त्यांनी आवर्जून नमूद केलं. बाईट १) आ. सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते0
0
Report
संजय शिरसाठ की ठाकरे बैठक पर तीखी टिप्पणी; संवाद ही पक्ष बचाने की कुंजी
Ahilyanagar, Maharashtra:उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने उद्या बोलावलेल्या पदाधिकाऱ्यांच्या बैठकीवर मंत्री संजय शिरसाठ यांनी टीका केली आहे. ही बैठक म्हणजे उशिरा सुचलेले शहाणपण असल्याचे ते म्हणाले. पक्ष टिकवायचा असेल तर नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये सतत संवाद असणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. अनेक आमदार-खासदार पक्ष सोडत असताना आता बैठक घेऊन काहीही परिणाम होणार नाही, असा दावा शिरसाठ यांनी केला. तसेच 'ऑपरेशन टायगर'चीही गरज उरलेली नाही, कारण लोक स्वतःहून पक्ष सोडत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. अहिल्यानगर येथील शासकीय विश्रामगृहात ते माध्यमांशी बोलत होते। शरद पवारांचे राष्ट्रवादीचे काँग्रेसमध्ये विलीनीकरणाच्या चर्चेवरून मंत्री संजय शिरसाठ यांनी जोरदार निशाणा साधला आहे. सत्तेसाठी शरद पवार यांनी वेळोवेळी भूमिका बदलल्या असून आता त्यांच्याकडे काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय पर्याय उरलेला नाही, असा आरोप त्यांनी केला. सत्तेशिवाय ते राहू शकत नाहीत, असा घणाघात करत उद्या मुस्लिम लीगची सत्ता आली तरी त्यांना सत्तेतच राहायचे आहे, अशी टीका शिरसाठ यांनी केली आहे। आमदार रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील उपोषणावर मंत्री संजय शिरसाठ यांनी उपरो धी टीका केली आहे. या उपोषणामुळे रोहित पवारांचे वजन कमी होईल आणि शेतकऱ्यांच्या वेदना काय असतात, याची जाणीव त्यांना होईल, असा टोला संजय शिरसाठ यांनी लगावला आहे.. शेतकऱ्यांच्या भावना आणि त्यांच्या अश्रू आम्हाला माहिती आहेत, असे सांगत पूर्वीच्या धोरणांचे परिणाम आता शेतकऱ्यांना भोगावे लागत असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच उपोषणाचे नाटक करणाऱ्यांना शेतकरी कधीच थारा देणार नाही, असा टोला देखील शिरसाठ यांनी लगावला आहे। अनुसूचित जाती उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर निघालेल्या लॉन्ग मार्चबाबत मंत्री संजय शिरसाठ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. उपवर्गीकरणाचा विषय अद्याप अंतिम झालेला नसून बिडर समितीचा अहवाल सरकारने मंजूर केलेला नाही, असे ते म्हणाले. या विषयावर मोठ्या प्रमाणात हरकती दाखल झाल्या असून संबंधितांचे मत ऐकून त्यावर निर्णय घेण्याचे काम मंत्रिमंडळ करणार आहे. त्यामुळे या प्रक्रियेला आणखी काही काळ लागणार असल्याचे शिरसाठ यांनी स्पष्ट केले。0
0
Report
Advertisement
17 वर्षीय किशोरी के साथ निजी फुटबॉल ट्रेनर पर POCSO समेत केस दर्ज
Vasai-Virar, Maharashtra:फुटबॉलमध्ये करिअर घडवून देतो म्हणत जाळ्यात ओढलं; नंतर ३ वर्ष अत्याचार अन्..., १७ वर्षीय मुलीसोबत क्रूर कृत्य वसईतील एका खासगी फुटबॉल प्रशिक्षकाविरोधात १७ वर्षीय मुलीच्या तक्रारीनंतर पोक्सो आणि इतर गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मुम्बईत फुटबॉल विश्वात स्वत:चं नाव करु पाहणाऱ्यामुलीसोबत अंगावर काटा आणणारी घटना घडली आहे. पालघर जिल्ह्यातील वसई परिसरातून एक गंभीर प्रकरण समोर आले आहे. फुटबॉलमध्ये उज्ज्वल करिअर घडवण्याचं आश्वासन देत एका खासगी प्रशिक्षकाने १७ वर्षीय मुलीचा वारंवार बलात्कार केल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे. या तक्रारीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी संबंधित प्रशिक्षकाविरोधात पोक्सो कायद्यासह विविध कलमांखाली गुन्हा नोंदवून त्याला अटक केली आहे. अभिजित मेंडल (वय ३६, रा. वसई) असे अटक करण्यात आलेल्या शिक्षकाचे नाव आहे. तो वसई परिसरात खासगी फुटबॉल प्रशिक्षण केंद्र चालवत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तक्रारीनुसार, पीडित मुलगी २०२३ मध्ये फुटबॉलचे प्रशिक्षण घेण्यासाठी त्याच्याकडे आली होती. पोलिसांच्या माहितीनुसार, प्रशिक्षकाने मुलीला फुटबॉल क्षेत्रात चांगल्या संधी देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर तिच्याशी विश्वास संपादन करुन तीन वर्षांपासून वारंवार बलात्कार केला असे आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. यावेळी त्याने मुलीचा अत्याचार करतानाचे व्हिडिओ आणि फोटो काढल्याचा आरोप करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, काही काळानंतर मुलीने प्रशिक्षकाशी संपर्क कमी केला. त्यानंतर आरोपीने व्हिडिओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देत तिच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. या प्रकारामुळे मानसिक त्रास होत असल्याने मुलीने आपल्या कुटुंबीयांना याबाबत माहिती दिली. या त्रासाला कंटाळून कुटुंबीयांच्या मदतीने पीडितेने माणिकपूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रार पोलिसांनी प्राथमिक चौकशी सुरू करत प्रशिक्षकाविरोधात गुन्हा नोंदवला. या प्रकरणी बलात्कार, धमकी देणे तसेच बालकांचे लैंगिक अपराधांपासून संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत विविध गंभीर कलमांनुसार कारवाई झाली आहे. सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून पोलिस या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन स्थल पर सांसदों ने मुलाकात कर सरकार के जवाब की जानकारी ली
Pandharpur, Maharashtra:PPR_LANKE_BHGREAnchor - आमदार रोहित पवार यांच्या अन्नत्याग आंदोलनास्थळी अहिल्या नगरचे खासदार निलेश लंके आणि दिंडोरीचे खासदार भास्कर भगरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी आमदार रोहित पवार आणि अन्नत्याग करत असलेल्या कार्यकर्त्यांची विचारपूस केली. सरकार कडून काही प्रतिसाद आहे का. याबाबत माहिती घेतली0
0
Report
रामदास आठवले की जल मंदिर बिल्डिंग में कविता से मुस्कान बिखेरी, तस्वीर वायरल
Satara, Maharashtra:सातारा -केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची त्यांच्या जलमंदिर पॅलेस येथे सदिच्छा भेट घेतली. उदयनराजे यांच्या जलमंदिर पॅलेस मध्ये येऊन रामदास आठवले यांनी कॉलर उडवत उदयनराजेंची मारली स्टाईल..या भेटीदरम्यान नेहमीप्रमाणे आपल्या काव्यशैलीने उपस्थितांचे लक्ष वेधून घेत रामदास आठवले यांनी उदयनराजेंवर खास कविता सादर केली. भेटीनंतर माध्यमांशी संवाद साधताना आठवले म्हणाले,"माझ्या बाजूला उभे आहेत उदयनराजे...आणि आमच्या दोघांचे चित्र आहे ताजे...आठवले यांच्या या उत्स्फूर्त कवितेमुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण काव्यशैलीची पुन्हा एकदा प्रचिती आली. उदयनराजे भोसले यांनीही स्मितहास्य करत या कवितेला प्रतिसाद दिला.आठवले यांच्या कवितेनेच या भेटीची सर्वाधिक चर्चा रंगवली.दरम्यान, उदयनराजे भोसले आणि रामदास आठवले यांचा एकत्रित फोटो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में ऑटो से महिलाओं के गहने-कैश लूटने वाले गैंग का पर्दाफ़ाश; सात हिरासत
Akola, Maharashtra:अकोला शहरात ऑटो रिक्षामधून प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांना लक्ष्य करून त्यांचे दागिने आणि रोकड लुटणाऱ्या आंतरजिल्हा टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात यवतमाळ जिल्ह्यातील सहा महिलांसह एका ऑटो रिक्षा चालकाला अटक करण्यात आली आहे. आरोपींकडून चोरीसाठी वापरण्यात आलेली ऑटो रिक्षा तसेच लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अकोला शहरातील विविध भागांमध्ये मागील काही दिवसांपासून महिला प्रवाशांच्या दागिने व रोकड चोरीच्या घटना वाढल्या होत्या. याप्रकरणी विविध पोलिस ठाण्यांमध्ये तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय माहितीच्या आधारे जुने शहर पोलिसांनी यवतमाळ येथील आंतरजिल्हा टोळीचा शोध घेत सात जणांना ताब्यात घेतले. तपासादरम्यान आरोपी महिला प्रवाशांशी मैत्रीपूर्ण संवाद साधून किंवा गर्दीचा फायदा घेत त्यांचे दागिने व रोकड लंपास करत असल्याचे उघड झाले. चोरीनंतर आरोपी ऑटो रिक्षाच्या सहाय्याने घटनास्थळावरून पसार होत असत. पोलिस चौकशीत अकोला शहरातील किमान चार गुन्ह्यांमध्ये या टोळीचा सहभाग असल्याचे समोर आले आहे. आरोपींकडून चोरीतील दागिने, रोकड, ऑटो रिक्षा आणि अन्य साहित्य असा लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने इतर जिल्ह्यांमध्येही अशाच प्रकारचे गुन्हे केले आहेत का, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे.0
0
Report
भाजप की सांगली बैठक: धैर्यशील कदम के लिए पूरी रणनीति तैयारी
Sangli, Maharashtra:स्लग - विधान परिषदेसाठी भाजपाची विट्यात पार पडली बैठक.. अँकर - सांगली-सातारा विधान परिषदेच्या घडामोडींना आता सांगलीत वेग आला आहे. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्यासह मंत्री पालकमंत्री चंद्रकांत पाटील, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले,मंत्री जयकुमार गोरे यांच्यासह भाजपा आमदारांच्या उपस्थितीमध्ये विटा येथे बैठक पार पडली आहे.या बैठकीमध्ये भाजपाचे विधानपरिषद उमेदवार धैर्यशील कदम यांना निवडून होण्यासाठी सर्व पातळीवर प्रयत्न करावेत, अशा सूचना प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिल्या. सांगली जिल्ह्यातील शिवसेना शिंदे पक्ष आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्षाची असणारी नाराजी दूर करणे भाजपा समोर मोठा आव्हान बनला आहे साऊंड बाईट - रवींद्र चव्हाण - प्रदेशाध्यक्ष, भाजपा.0
0
Report
रत्नागिरी के किसानों ने ग्रामदेवतेके पास बारिश के लिए गुहार लगाई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. पावसासाठी शेतकऱ्याचे चिपळूणच्या ग्रामदेवतेला गारणे.. अँकर गेले काही दिवस वातावरणातील बदलामुळे पावसाने हुलकावणी दिली आहे.. त्यात आधी मान्सूनपूर्व सरी बरसल्यावर शेतकऱ्यांनी आपल्या शेतात पेरणी सुद्धा केली होती.. मात्र या पेरणी केल्यानंतर पावसाने हुलकावली दिली असल्याने बळीराजा संकटात आलेला आहे.. बळीराजा आपल्या शेतातून आभाळाकडे डोळे फिरवून पावसाची चातकासारखी वाट पाहत आहे.. वातावरणातील बदलामुळे sध्या तापमानाचा पारा वाढल्यामुळे शेतातील जमिनी कोरड्या झाल्या असल्याने बळीराजांनी थेट आता गावातील ग्रामदैवतेकडे धाव घेऊन आपल्या ग्रामदैवतेकडे पावसासाठी गाराने म्हटले आहे.. चिपळूणचे ग्रामदैवत श्री देव कालभैरव या देवळात जाऊन शेतकऱ्यांनी पावसासाठी गाऱ्हाण म्हटलं आहे..0
0
Report
Advertisement
