Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VNVishal Nagesh More
Dec 17, 2025 07:54:21
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 17, 2025 07:50:17
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On अंबरनाथ नगरसेवक मारहाण * या संदर्भात चौकशीचे आदेश दिले, जो कोणी गुन्हेगार असेल त्यावर कारवाई करण्यात येईल... On शेतकरी किडनी विक्री..चंद्रपूर.. * चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथिल शेतकऱ्याचा घडलेल्या प्रकरणाची मी माहिती घेतली.. सदरील शेतकरी 2021 पासून वेगवेगळ्या खाजगी सावकाराकडून कर्ज घ्यायचा.. एकाचे पैसे देण्यासाठी दुसऱ्या सावकाराकडून घ्यायचा.. अशाप्रकारे कर्जाच्या विळख्यात फसत गेला.... मग कर्जाची परतफेड करण्यासाठी त्यांनी कंबोडिया मध्ये किडनी विकण्याची प्राथमिक माहिती.. * या प्रकरणात पोलिसांनी चार लोकांना अटक केली आहे . पोलिस चौकशी सुरू आहे.. यामध्ये गुन्हेगारावर लवकर कठोर कारवाई करण्यात येईल... On मध्यवर्ती बँक वर्धा.. * वर्धा जिल्हा मध्यवर्ती बँकेत अगोदर चुकीच्या पद्धतीने कर्ज देण्यात आले होते.. त्यामुळे बँक डबगाईत आली होती.. आरबीआय ने परवाना देखील रद्द केला होता.. मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी 168 कोटी रुपयांची मदत वर्धा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला केली होती.. त्यामुळे बँक आता सुरू झाली आहे.. * मागील दोन वर्षापासून कही शेतकऱ्यांना कर्ज वाटप करण्यात आले आहे.. * अजून चांगल्या शेतकऱ्यांना, संस्थांना कर्ज वाटप करून बँकेला उर्चित अवस्थेत आणण्याचा काम शासनाच्या वतीने होणार.. On संजय राऊत * स्वतःला प्रकाश झोतात आणण्यासाठी संजय राऊत असे वक्तव्य करत असतात.. परंतु एकनाथ शिंदे हे जमिनीवर काम करणारे कार्यकर्ते आहेत.. संजय राऊतानी अशी स्टेटमेंट न करता त्यांच्या कामाचा आदर्श घ्यावा.... * ते राज्याचे मुख्यमंत्री राहिलेत त्यांच्याबद्दल अशा प्रकारचे स्टेटमेंट करणे चुकीचे आहे.. On सावकार * यावर्षी अतिवृष्टी मोठ्या प्रमाणात झाली होती.. शेतकऱ्यांना यातून काढण्यासाठी सरकारच्या वतीने 32 हजार कोटीचं पॅकेज देण्यात आला आहे. यानंतर देखील शेतकरी कर्जातून बाहेर पडून स्वालंबी बनावा यासाठी एक चांगली योजना आखत आहे.. आणि निश्चित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामुळे राज्यातील शेतकरी चांगल्या दिशेने वाटचाल करेल.. On नवाब मलिक वाद * राज्यातील महायुती अबाधित आहे.. महानगरपालिका निवडणुका असल्याने कुठे युती करायची किंवा नाही.. याबद्दल तीनही मोठे नेते एकत्र बसतील आणि ते निर्णय घेतील..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 17, 2025 06:55:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - आता आमच्या पक्षात वकिलीचे ज्ञान असणे महत्त्वाचं वाटतंय - काँग्रेस आमदार विश्वजीत कदम अँकर - सध्या आपण,ज्या पक्षात आहोत तिथे आम्हाला देखील वकीलचा ज्ञान असणे महत्त्वाचं वाटतंय,कारण ती काळाची आणि परिस्थितीची गरज आहे,असे मिश्किल विधान आमदार काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी केले आहे,सांगलीमध्ये कोल्हापूर खंडपीठाच्या चार न्यायाधीशांच्या उपस्थितीत पार पडलेल्या कार्यक्रमांमध्ये विश्वजीत कदम बोलत होते,त्याच बरोबर भारतातील अनेक लोक आवाज उठवतात,पण तो दाबला जातो, त्यामुळे त्या आवाजाला न्याय देण्याचं काम झालं पाहिजे,अशी अपेक्षा काँग्रेस आमदार विश्वजीत कदम यांनी व्यक्त केली.भारताचे निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई व स्वर्गीय पतंगराव कदम यांच्यातील तैल चित्र अनावरण पार पडलं. साऊंड बाईट - विश्वजीत कदम - आमदार - काँग्रेस.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 17, 2025 06:47:17
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर महानगरपालिकेसाठी भाजप- शिवसेना शिंदे गटात प्राथमिक चर्चा, आएकत्र लढण्याचे झाले निश्चित, आ. जोरगेवार आणि शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात पार पडली महत्वाची बैठक अँकर:--चंद्रपूर महानगरपालिका निवडणूकीसाठी भाजप- शिवसेना शिंदे गटात प्राथमिक चर्चा झाली आहे. यात एकत्र लढण्याचे निश्चित झाले आहे. स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार आणि शिवसेना शिंदे गटाचे पूर्व विदर्भ समन्वयक किरण पांडव यांच्यात ही महत्वाची बैठक पार पडली. चर्चेत शिवसेना शिंदे गटाचे काही उमेदवार भाजपच्या कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची शक्यता देखील पडताळून पाहण्यात आली. या चर्चेदरम्यान भाजपने शिवसेना शिंदे गटाच्या संभाव्य उमेदवारांची यादी मागितली आहे. सध्या शिवसेना शिंदे गटाकडे चंद्रपूर महानगरपालिकेत एकही नगरसेवक नसल्याने शिवसेना शिंदे गटाला काही जागा देताना कमळ चिन्हावर निवडणूक लढवण्याची अट घातली जाऊ शकते अशीही चर्चा आहे. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 17, 2025 06:31:46
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री चंद्रशेखर बावनकुळे बाईट पॉइंटर* ऑन महसूल कर्मचारी संप. - महसूल संघटनेकडून अशा अपेक्षा नव्हती, वर्षभरात १० वर्षापासून प्रलंबित असलेल्या प्रमोशनचे प्रश्न सोडवले आहेत. पुढे त्यांचे प्रश्न निकाली काढण्याचे विचार आहे. खात्याला प्रशासनाला मजबुती देण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. - विधिमंडळातील प्रश्नावर अगोदर चौकशी सुरू होती.त्या भागातील सर्व सर्व्हेक्षण केले.१९९६,२३ पर्यंत जे तलाठी महसूळ अधिकारी होते त्यांना निलंबित ठेवले आहे. निलंबित ही अंतिम शिक्षा नाही. महिनाभरात दोषी आढळले नाही तर सेवा कुस्तिकेमधे चुकीची नोंद घेणार नाही असे आश्वासित केले आहे. - उद्या मी १२ वाजता बैठक बोलावली आहे. मात्र सरकारवर अशा पद्धतीने दबाव टाकून नोटीस देणे हे योग्य नाही. तरीही त्यांना आश्र्वासित करतो... - काल निदर्शनस आणून दिले की, ३५ हजार ब्रास वाळू उपसा करून दिले आहे. - त्या भागातील नागरिकांचे हजारो मेसेज आले आहे. या कारवाईला जनसमर्थ आहे. वाळू चोरी ,अवैध उत्खनन थांबले पाहिजे. - महसूल कर्मचाऱ्यांनी घेतलेली संपाची भूमिका वापस घ्यावी.. - वाळूचोरी होत आहे, अवैध उत्खनन होत आहे. हायवा चिरडून गेला आहे. ऑन सातव प्रवेश. - हे मला माहिती नाही, कुणीही भाजप मध्ये आले त्याचे आम्ही स्वागत करतो, सातव यांच्याशी माझी चर्चा झाली नाही. काँग्रेस मधे विसंवाद असल्याने नेते कार्यकर्ते असंतोष आहे. पुढच्या काळात काँग्रेसमध्ये भविष्य देखील नाही. काँग्रेसचे नेते सातत्याने पार्टी सोडत आहे. - कुणीही भाजपमध्ये पक्ष प्रवेश केला त्याचा स्वागत आहे. त्यांनी मन बनविले असेल तर भाजप ना म्हणणार नाही. ऑन कोकाटे अटक? - जी काही कोर्टाची संविधानिक कारवाई आहे ती होईल, मात्र त्यानं अपिल करण्याचा अधिकार आहे. ऑन मुंबई ठाकरे एकत्र - काही झाले तरी मुंबई महाराष्ट्र विकासाचे उभा आहे. महायुती ही महाराष्ट्र मुंबईची चॉईस आहे. मी तुम्हाला अस्वस्थ करतो २०३५ चा प्लान केलेला आहे. कुठेही १५ मिनिटात जाता येईल, जगातील सर्वात चांगलं शहर फडणवीस यांना बनवायचं आहे. - तोंडाच्या वाफा, पारिवारिक वाद, सकाळच्या गोष्टी यातून आता मुंबई बाहेर पडेल. ऑन भाजप सेना एकत्र राष्ट्रवादी दूर - अजित पवार यांचे पश्चिम महाराष्ट्र चिंचवड गड आहे. पश्चिम महाराष्ट्र आमचेही गड आहे. कार्यकर्त्यांच्या भावना दुखावणे योग्य नाहीं निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. नेत्यांची नाहीं. एवढे कार्यकर्ते कसे aadjest होतील. अजितदादा यांनी देखील ते मान्य केले आहे... ऑन मुस्लिम मते विषय - आम्ही मुस्लिम मतांसाठी असे करतोय असा आरोप करणारे वेड्या चे लक्षण आहे. पहिल्या पासून त्यांचे संघटन वेगळे आहे. त्यांचा पक्ष चालवणे ही मुभा त्यांना आहे. महायुती ही राज्याच्या विकासासाठी एकत्र आली आहे. विकासासाठी आम्ही तिघेही एकत्र आहोत. आम्हाला महाराष्ट्राच्या विकासाचे राजकारण करायचे आहे. - महाराष्ट्राच्या विजयासाठी काही मुद्दे बाजूला ठेवावे लागतात. - योग्य प्रकारची युती होणार आहे. टेबलवर बसून आमची युती योग्य पद्धतीने करणार आहे. ऑन पतंग आचारसंहिता उल्लंघन - त्यांची ती मागणी असेल, त्यांनी तक्रार करावी, मात्र शेवटी निवडणूक आयोगाला काय वाटते हे महत्वाच आहे. ऑन दानवे ट्विट. - मुरूड निवडणूक पुढे गेली आहे. ऑन आंबेडकर - प्रकाश आंबेडकर यांनी निर्णय घेतला ती काळाची गरज आहे. त्यांचा पक्षाचा तो निर्णय
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 17, 2025 06:30:41
Khed, Maharashtra:पुण्याच्या खेड तालुक्यातील खाजगी शिकवणी वर्गांची शिक्षण विभागाकडून सखोल तपासणी सुरू झाली आहे. राजगुरुनगर येथे दहावीच्या विद्यार्थ्याचा क्लासमध्ये गळा चिरून खून झाल्याची धक्का देणार्‍या घटना अधोरेखित झाल्यानंतर शिक्षण विभाग अलर्ट मोडवर आला आहे. खेड तालुक्यातील सर्व खाजगी शिकवणी वर्गांची तपासणी सुरू केली गेली असून विद्यार्थ्यांची सुरक्षा, सीसीटीव्ही नियंत्रण, शिक्षकांची पात्रता, विनापरवानगी सुरू असलेले क्लासेस, उपस्थिती नोंद यासह 15 मुद्यांवर शिक्षण विभागाकडून सविस्तर चौकशी केली जाणार आहे. तपासणीत अनियमितता आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 17, 2025 06:07:03
Pune, Maharashtra:पुणे वाघोली मध्ये रात्रीच्या सुमारास अज्ञात पाच तरुणांनी दहशत माजवत कोयत्याच्या साह्याने दुकानामोर लावलेल्या लाईट फोडण्याचे सीसीटीव्ही मध्ये कैद झाले आहे, तर काही गाड्यांवर देखील त्यांनी कोयता मारण्याचा प्रयत्न केला. यात शिवसेनेच्या एका पदाधिकाऱ्यांच्या घरासमोरील पार्क केलेल्या गाडीवर देखील कोयता मारल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. एकीकडे पुणे पालकमंत्री अजित पवार कोयता गॅंगची दहशत मोडून काढा असे आदेश देतात, तर दुसऱ्या कडे पुणे पोलीस आयुक्त कोयता गॅंगवर कडक कारवाई करणार असे सांगत असली तरी दहशत काही थांबत नाही. आता कोयता गॅंगची दहशत पुणे शहरातून वाघोली पर्यंत पोहोचल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 17, 2025 05:31:58
Solapur, Maharashtra:solapur ब्रेकिंग - राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाचा देखील स्वबळावर निवडणूक लढण्याकडे कल, घड्याळाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्यासाठी 122 अर्ज दाखल - राष्ट्रवादी काँग्रेस AP पक्षाकडे सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी इच्छुकांचे 122 अर्ज दाखल - राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सोलापुर महानगरपालिकेसाठी आपकी बार 75 पारचा नारा देण्यात आला आहे - महायुतीचा घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस कडून सोलापुरात स्वबळावर तयारी सुरू - माजी महापौर आणि उपमहापौरासह पाच माजी नगरसेवक आणि राष्ट्रवादीकडे मागितला उमेदवारी अर्ज - सोलापुर महानगरपालिकेवर झेंडा फडकवण्यासाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाने कसली कंबर
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 17, 2025 05:19:22
Akola, Maharashtra:निवडणुका जाहीर होताच संभाव्य उमेदवारांनी प्रचाराला सुरुवात केली असून, प्रचारादरम्यान मतदारांची दिशाभूल करणारा गैरप्रचार केला जात असल्याचा आरोप भाजपचे माजी महानगराध्यक्ष डॉ. अशोक ओळंबे यांनी केला आहे. आम्ही निवडून आलो नाही तर ‘लाडकी बहीण’ योजना बंद केली जाईल, असा प्रचार काही संभाव्य उमेदवारांकडून सुरू असल्याचा दावा त्यांनी केला आहे. अशोक ओळंबे यांना मागील विधानसभा निवडणुकीत भाजपकडून उमेदवारी न मिळाल्याने त्यांनी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने निवडणूक लढवली होती. सध्या भाजपच्या अनेक आजी-माजी नगरसेवक व पदाधिकाऱ्यांच्या वतीने ‘नागरिक संवाद मंच’चे आयोजन करण्यात आले आहे. या मंचाच्या माध्यमातून नागरिकांच्या सूचना व तक्रारींसाठी एक पेटी ठेवण्यात आली आहे. याच सूचनापेटीत एका नागरिकाने ‘लाडकी बहीण’ योजना आम्ही निवडून आलो नाही तर बंद केली जाईल, असा प्रचार सुरू असल्याची तक्रार नोंदवली. यावर प्रतिक्रिया देताना अशोक कोळंबे यांनी असा गैरप्रचार तात्काळ थांबवावा, तसेच मतदारांची दिशाभूल करू नये, असे आवाहन केले आहे. त्यांच्या या वक्तव्यातून त्यांनी अप्रत्यक्षपणे सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधल्याचे पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top