445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशीम के मानोरा घाट में कार दुर्घटना, महिला गंभीर घायल, चालक सुरक्षित
Washim, Maharashtra:वाशीम: अमरावती येथून पुसदकडे जात असताना वाशीम जिल्ह्यातील मानोरा घाटामध्ये एका चारचाकी वाहनाचा अपघात झाला. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने गाडी थेट दरीत कोसळली. या अपघातात गाडीतील एका महिलेला गंभीर दुखापत झाली असून एक पुरुष किरकोळ जखमी झाला आहे. अपघातानंतर स्थानिक नागरिकांच्या मदतीने जखमींना तातडीने मानोरा येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या जखमींवर उपचार सुरू असून पुढील तपास सुरू आहे. या अपघातात कारचे नुकसान झाले.0
0
Report
चंद्रपूर-गडचिरोली मार्ग पर इलेक्ट्रिक बस आग लगने से राख, यात्रियों में हड़कंप
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर - गडचिरोली राष्ट्रीय महामार्गावर एक धक्कादायक घटना: राज्य परिवहन महामंडळाची इलेक्ट्रिक एसटी बस अचानक पेटली. धूर निकलते पाहताच प्रवासी तातडीने बसमधून उतरे. घटना घंटा चौकी जवळ घडली. या इलेक्ट्रिक बसमधून मोठ्या संख्येने प्रवासी प्रवास करत होते; आगीमुळे बस जळून राख झाली. इलेक्ट्रिक एसटी बसेसच्या देखरेखीबाबतचा मोठा प्रश्न ऐरणीवर आला. आशीष अम्बाडे, झी मीडिया, चंद्रपूर.0
0
Report
चंद्रपुर के वारोरा नगर पालिका में कांग्रेस पार्षक का आक्रोश, नाली-स्वच्छता पर विरोध
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुर जिल्ह्यातील वरोरा नगर परिषदेच्या सत्ताधारी काँग्रेस नगरसेवकाचा संताप, स्वच्छता आणि नालसफाईवरुन उचलले टोकाचे पाऊल, नाल्यातील घाण न. प. इमारतीत आणून टाकत प्रशासनाच्या निष्क्रियतेचा केला निषेध अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील प्रभाग क्रमांक ७ मध्ये गेल्या अनेक दिवसांपासून कचरा साचून राहिल्याने आणि नाल्यांची साफसफाई होत नसल्याच्या मुद्द्यावरून नगरपालिकेत मोठा गदारोळ पाहायला मिळाला. काँग्रेस पक्षाच्या सत्ताधारी नगरसेवकांनी आपल्या कार्यकर्त्यांसह नगरपालिकेच्या कार्यालयात नालीतील घाण टाकून प्रशासनाविरोधात तीव्र निषेध नोंदवला. प्रभागातील कचरा व नाल्यांच्या साफसफाईचा प्रश्न अनेक वेळा सभागृहात मांडण्यात आला होता. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नाही. वारंवार तक्रारी करूनही परिस्थितीत सुधारणा न झाल्याने त्यांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागला. दरम्यान, मुख्याधिकारी सिद्धार्थ मेश्राम यांनी या घटनेची गंभीर दखल घेत पोलिसांकडे लेखी तक्रार दिली आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
वाशिम में अचानक अवकाली बारिश से गर्मी में राहत, मौसम ठंडा
Washim, Maharashtra:वाशिम : अँकर:वाशिम शहरासह तालुक्यातील काही भागांत आज दुपारनंतर अवकाळी पावसाने हजेरी लावली. अचानक आलेल्या या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला आहे. मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात तापमानात मोठी वाढ झाली होती.त्यामुळे नागरिक त्रस्त झाले होते.या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला आहे.0
0
Report
नागपुर नगर निगम ने गर्मी से बचाव के लिए सिग्नल चौकों पर मिस्ट लागू किया
Nagpur, Maharashtra:नागपूर - - नागपूर महानगर पालिकेकडून हिट ॲक्शन प्लॅन अंतर्गत सिगनवर ग्रीन नेटच्या खाली लावण्यात आली मिस्ट सिस्टीम - नागपूरच्या टेलिफोन एक्सचेंज चौकातील सिग्नलवर लावण्यात आले स्प्रिंकलरच्या माध्यमातून पाण्याचे तुषार - नागपूरात एप्रिलच्या सुरुवातीपासूनच उन्हाचा पारा ४५ डिग्री सेल्सिअस पार ओलांडला त्यामुळे दुपारच्या वेळी सिग्नलवर वाहनचालकांना उन्हाचे तीव्र चटके लागतात.. त्यामुळे उन्हापासून बचावासाठी पालिकेकडून काही चौकात ग्रीन नेट तर काही ठिकाणी ग्रीन नेटच्या खाली पाण्याचे तुषार सोडण्यात आलेत.. स्प्रिंकलरच्या माध्यमातून मिस्ट सिस्टीम लावण्यात आली आहे..0
0
Report
बदलापुर की विकी वाइन शॉप में चोरी; CCTV में कैद तीन चोर
Ambernath, Maharashtra:बदलापुरात वाईन शॉपचं शटर उचकटून चोरी कात्रपच्या विकी वाईन्समधून रोकड आणि दारूच्या बाटल्या चोरल्या चोरटे सीसीटीव्हीत कैद, पोलिसांकडून तपास सुरू कात्रपच्या मुख्य चौकात विकी वाईन शॉप हे दुकान आहे. गुरुवारी मध्यरात्री २ वाजताच्या सुमारास तीन चोरटे या दुकानाबाहेर आले आणि त्यांनी दुकानाचं शटर उचकटलं, यानंतर त्यापैकी एकाने दुकानात प्रवेश केला. दुकानातील काउंटरमधून ७३ हजार रुपयांची रोख रक्कम आणि तीन मोबाईल, तसंच काही महागड्या दारूच्या बाटल्या या चोरट्यांनी चोरून नेल्या. ही बाब सकाळी वाईन श-shop मालकाच्या लक्षात येताच त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं असता रात्री ३ चोरट्यांनी चोरी केल्याचं स्पष्ट झालं. याप्रकरणी बदलापूर पूर्व पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास करतायत. दरम्यान, विकी वाईन शॉप हे कात्रपच्या मुख्य चौकात आणि अतिशय गजबजलेल्या रस्त्यावर असून तिथे चोरट्यांनी चोरी केल्यानं चोरट्यांची हिंमत वाढल्याचं दिसत असून पोलिसांनी या चोरट्यांना लवकरात लवकर पकडण्याची मागणी वाईन शॉप मालकांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
47 साल के मोहम्मद जमील ने 31 साल बाद दहावी पास, परिवार में खुशियों की लहर
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील रिसोड येथील 47 वर्षीय मोहम्मद जमील नूर मोहम्मद यांनी 31 वर्षांनंतर पुन्हा दहावीची परीक्षा देत यश मिळवले आहे. 1995 मध्ये अपयश आल्याने त्यांचे शिक्षण अर्धवट राहिले होते. मात्र शिक्षण पूर्ण करण्याची जिद्द कायम ठेवत त्यांनी यंदा आपल्या मुलांच्या वयाच्या विद्यार्थ्यांसोबत परीक्षा दिली आणि उत्तीर्ण होत शिक्षणाला वयाची मर्यादा नसते हे सिद्ध केले. गादी व्यवसाय करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या मोहम्मद जमील यांच्या तीन मुलांपैकी एक डॉक्टरी, दुसरा इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत असून धाकटा बारावीत शिकत आहे. निकाल जाहीर होताच कुटुंबात आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून पेढे वाटून आनंद साजरा करण्यात आला.0
0
Report
नाशिक के TCS मामले में निडा खान गिरफ्तारी, मंत्री ने लव जिहाद रोक की मांग
Ahilyanagar, Maharashtra:राज्यभरात खळबळ उडवणाऱ्या नाशिकमधील बहुचर्चित TCS कंपनीतील लैंगिक अत्याचार आणि बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील मुख्य सूत्रधार मानल्या जाणाऱ्या संशयित आरोपी निदा खानला अटक करण्यात आली आहे. अशा प्रकारची ‘लव्ह जिहाद’सारखी प्रकरणे थांबली पाहिजेत, अशी भूमिका जलसंधारण मंत्री तथा अहिल्यानगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केली. यासोबतच अटक करण्यात आलेली आरोपी एमआयएमच्या नगरसेवकांच्या संपर्कात होती, असा गंभीर दावा त्यांनी केला. संभाजीनगर हे पूर्वी सिमीचे केंद्र होते, त्यामुळे एमआयएमचे काही कार्यकर्ते सिमीच्या संपर्कात आहेत का, याचीही सखोल चौकशी होणे आवश्यक असल्याचे विखे पाटील यांनी म्हटले आहे.0
0
Report
पन्हाळगड के सदोबा दरगाह पर अतिक्रमण हटाने के लिए प्रशासन का विशेष अभियान
Kolhapur, Maharashtra:Anc :- कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळगडावरील सादोबा दर्गा परिसरातील उर्वरित अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासन उद्या सकाळपासून विशेष मोहीम राबविणार आहे. या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी प्रशासनाने रविवारपर्यंत पन्हाळगड परिसरात जमावबंदी आदेश लागू केला आहे. प्रशासनाने यापूर्वी हजरत पीर शहादुद्दीन खतालवल्ली पन्हाळा ट्रस्टला अतिक्रमणाबाबत नोटीस बजावली होती. नोटिसीनंतर ट्रस्टने स्वच्छतागृह आणि पत्र्याचे शेड स्वतः हटविले होते. मात्र, तलाव परिसरातील उर्वरित प्रार्थनास्थळ कायदेशीर असल्याचा दावा ट्रस्टकडून करण्यात येत आहे. दुसरीकडे, हिंदुत्ववादी संघटनांनी या बांधकामावर आक्षेप घेत तो भाग बेकायदेशीर असल्याचा दावा केला आहे. अतिक्रमण हटविण्यासाठी प्रशासनाने दिलेली मुदत संपल्यानंतर आता उर्वरित बांधकामांवर कारवाई केली जाणार आहे. दरम्यान, वीकेंडमुळे पन्हाळगडावर मोठ्या प्रमाणात पर्यटकांची गर्दी होण्याची शक्यता असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून प्रशासनाने रविवारपर्यंत जमावबंदी आदेश लागू केला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के जुड़वां बहन-भाई ने दहावी में सेम टू सेम 97.8% हासिल किया
Nagpur, Maharashtra:दहावीच्या निकालात नागपूरातल्या जुळ्या बहिण भावाने मिळवलेलं सेम टू सेम यश सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.... रामदासपेठ सोमलवार हायस्कूलचे विद्यार्थी खिलज व ख़ुशी चांदेवार या जुळ्या बहिण-भावांनी दहावीच्या परीक्षेत अगदी सारखे म्हणजे 97.8टक्के गुण मिळवलेय... पाचव्या वर्गापासूनच दोघेही बहिण भावांमध्ये अभ्यासाची चांगलीच चुरस आहे... यापूर्वीच्या परीक्षांमध्ये एक दोन मार्कांनी ते मागे पुढे राहणारे हे दोघेही बहिण भावानी दहावीत मात्र सेम टू सेम मार्क मिळवत वेगळाच योगायोग साधला आहे... या जुळ्या बहिण भावांशी व त्यांच्या आई व शिक्षक वर्गशिक्षिकेशी संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी0
0
Report
जालना में नवरदेव के बूट पळवाने पर वर-वधू में हंगामा, पुलिस मामला दर्ज
Jalna, Maharashtra:जालना : नवरदेवाचा बूट पळवण्यावरून वधू आणि वर पक्षात राडा झाला. अंबड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. नांदी गावात लग्नात नवरदेवाचा बूट पळवल्याची परंपरा असल्याची माहिती दिली जाते; परंतु या वेळी नवरदेवाच्या भावाने नवरीच्या बूटही पळवले आणि वाद वाढला. दोन्ही गटात शाब्दिक चकमकनंतर तुंबळ राडा झाला; महिलादेखील जखमी झाल्या. या घटनेत दागिने चोरीचा आरोपही चर्चाात आला. पोलिस तपास करत आहेत आणि अटकाची तयारी दर्शविली.0
0
Report
वाशीम के दो खंभों के विरोध ने करोड़ों का बिजली उपकेंद्र प्रोजेक्ट रोक दिया
Washim, Maharashtra:वाशीम के मंगरुळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे उभारण्यात आलेले नवीन वीज उपकेंद्र केवळ दोन वीज खांबांच्या अडचणीमुळे रखडले आहे. ३३केव्ही वीजवाहिनी जोडणीसाठी आवश्यक खांब उभारणीला एका शेतकऱ्याचा विरोध असल्याने प्रकल्प सुरू होऊ शकलेला नाही. शेलूबाजार उपकेंद्रावरील ताण कमी करून परिसरातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी हे उपकेंद्र उभारण्यात आले आहे. मात्र प्रकल्प रखडल्याने शेतकऱ्यांना अनियमित व कमी दाबाच्या वीजपुरवठ्याचा फटका बसत असून सिंचनात अडचणी निर्माण होत आहेत. बहुतेक काम पूर्ण असूनही केवळ दोन खांबांमुळे कोट्यवर्धक रुपयांचा प्रकल्प ठप्प आहे. महावितरणच्या अधीक्षक अभियंत्याने सांगितले आहे.0
0
Report
Advertisement
लातूर विभागीय शिक्षण मंडळ का दहावी परिणाम 88.42%, लड़कियों ने फिर मारी बाजी
Latur, Maharashtra:इयत्ता दहावी परीक्षेचा ऑनलाईन निकाल आज जाहीर झाला असून लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा एकूण निकाल ८८ पूर्णांक ४२ टक्के इतका लागला आहे. विशेष म्हणजे, यंदाही मुलींनीच निकालात बाजी मारली आहे. लातूर मंडळांतर्गत येणाऱ्या लातूर, नांदेड आणि धाराशिव या तीन जिल्ह्यांपैकी लातूर जिल्ह्याचा सर्वाधिक ९२ पूर्णांक ८० टक्के निकाल लागला आहे. त्याखालोखाल धाराशिव जिल्ह्याचा ९१ पूर्णांक २९ टक्के, तर नांदेड जिल्ह्याचा ८३ पूर्णांक ६२ टक्के निकाल लागला आहे. मात्र, गतवर्षीच्या तुलनेत यंदा लातूर मंडळाच्या निकालात जवळपास २ पूर्णांक ३० टक्क्यांची घसरण झाली आहे.0
0
Report
बीड़ भूसंपादन घोटाले: अविनाश पाठक की गिरफ्तारी से हड़कंप
Beed, Maharashtra:पोलिसांच्या तावडीत असलेल्या या व्यक्तीचा हा चेहरा नीट निरखून पहा... व्हिडिओतील हा अधिकारी कदाचित तुमच्या ओळखीचा असेल.. एकेकाळी बीड जिल्ह्याचा कारभार हाताळणारे, अधिकाराच्या खुर्चीतून संपूर्ण यंत्रणा चालवणारे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना आजच नामाच्या आधारावर गंभीर घोटाळ्याचे आरोप आहेत. राष्ट्रीय महामार्गाच्या भूसंपादन आणि मावेजा वाटपात गैरव्यवहार झाल्याचा संशय नव्या जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी उघडकीस आणला आणि प्रशासनात खळबळ उडाली. त्यानंतर शिवाजीनगर पोलिस ठाण्यात 10 जणांविरोधात गुन्हा दाखल झाला, एसआयटी स्थापन झाली आणि तपासाची चक्र वेगाने फिरू लागली. अखेर अधिकाराच्या शिखरावर पोहोचलेला तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक याला काल लातूर येथील निवासस्थानातून पोलिसांनी अटक केली या घटनेमुळे सबंध राज्यभरात एकच खळबळ उडाली.. तत्पश्चात नव्याने जिल्हाधिकारी म्हणून रुजू झालेले विवेक जॉन्सन यांना भूसंपादनातील घोटाळ्याची फाईल हाती लागली. त्यांनी याप्रकरणी तत्कालीन जिल्हाधिकार्यांच्या बनावट सयाच्या आधारे राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन प्रकरणी ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी गेल्या त्या शेतकऱ्यांना देण्यात आलेल्या मावेजात मोठा घोटाळा झाल्याचे लक्षात आणले आणि त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला. या प्रकरणात धनंजय देशमुख यांचे देखील योगदान असल्याचा दावा करण्यात आला. आता एसआयटीच्या तपासात दिवसेंदिवस धक्कादायक माहिती समोर येऊ लागली आहे... भूसंपादनाच्या प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार, बनावट स्वाक्षऱ्या, तसेच जमिनींच्या मोबदल्याच्या रकमेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याचा संशय व्यक्त केला जातोय... तर भूसंपादन घोटाळ्यात जिल्हाधिकारी अविनाश पाठक हाच आरोपी झाल्याने आता त्याच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी मनसेनी केलीय. काही प्रकरणांमध्ये मूळ शेतकऱ्यांना कमी रक्कम देऊन इतरांच्या खात्यात कोट्यवधी रुपयांचा मावेजा वळवण्यात आल्याची माहिती तपास यंत्रणांच्या हाती लागत आहे... दरम्यान, तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांच्या अटकेनंतर प्रशासन आणि राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आलंय... राज्यभरातील विविध महामार्ग भूसंपादन प्रकरणांकडे आता संशयाच्या नजरेतून पाहिलं जात असून, अनेक जिल्ह्यांतील जुन्या फाईल्सची पडताळणी सुरू होण्याची शक्यता आहे..0
0
Report
नाशिक धर्मांतरण मामले में निदा खान को मदद, इम्तियाज जलील की भूमिका प्रमुख
Sangli, Maharashtra:नाशिकच्या धर्मांतरण प्रकरणी अटक केलेल्या निदा खान हिला मदत करण्यात इम्तियाज जालील यांचा मुख्य रोल आहे, असा आरोप भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.निदा खान ही संभाजीनगर मध्ये सापडणं यामागे खूप मोठे षडयंत्र असून याप्रकरणी इमत्याज जलिल व एमआयएम नगरसेवकाची,पोलिसांनी चौकशी करावी,अशी मागणी देखील गोपीचंद पडळकर यांनी केली आहे,ते सांगलीच्या जत मध्ये बोलत होते.0
0
Report
Advertisement
