icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में लक्ष्मी ऑरगॅनिक के खिलाफ महाआंदोलन, PFAS विरोधी मार्च 6 अप्रैल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लोकेशन - midc lote रत्नागिरीत पेटणार संघर्षाची मशाल!.. 'लक्ष्मी ऑरगॅनिक'विरोधात ६ एप्रिलला धडकणार महामोर्चा.. अँकर.. खेड तालুক्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील 'लक्ष्मी ऑरगॅनिक' कंपनीविरोधात आता जनक्षोभ उसळला आहे..मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या PFAS उत्पादनाविरोधात येत्या ६ एप्रिलला एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचकोशी पर्यावरण समितीच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारला गेला आहे.. केवळ रत्नागिरीच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांतील विविध संघटना आणि नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चाला पाठिंबा देण्याच्या सूचना केल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.. Bt उपोषणकर्ते.. Vs दिपक पाटील ( लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे वरिष्ठ उत्पादन विभाग उपाध्यक्ष)..
0
0
Report

अवकाली बारिश ने लातूर के टमाटर किसान बर्बाद, 1.5 लाख रुपए का नुकसान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांचे कंबरडे मोडले... खराब झालेले टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ... लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलंय… पण या पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना… अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे एका शेतकऱ्याने अक्षरशः रक्ताचं पाणी करून उभं केलेलं टोमॅटो पीक आता उकिरड्यावर फेकून दिले आहे.... दीड लाखांचा खर्च… दिवस-रात्र केलेली मेहनत… आणि मोठ्या आशेने घेतलंलं पीक… पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे…
0
0
Report

प्रकाश महाजन ने अंजलि दमानीया کی गिरफ्तारी और कॉल डिटेल्स کی जांच کی मांग की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंजली दमानियांना यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरात प्रकरणात आरोप केले आहे, याबाबत दमानिया याना अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.. दमानी यांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कोणी दिले याची चौकशी करा.. अंजली दमानिया या स्वतःला काय पोलीस महासंचालक समजतात का .त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात..हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.. असेही महाजन म्हणाले.. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला घोका आहे .. त्यांना कॉल डीटेल्स मिळतात कसे याची चौकशी करा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता आहे असेही महाजन म्हणाले...
0
0
Report
Advertisement

२१ लाख कर्ज के दबाव में २६ वर्षीय युवक ने छत्रपती संभाजी नगर में आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:२१ लाखांचे कर्ज काढून घेतलेला ट्रक चोरीला गेला... दीड वर्ष उलटूनही पोलिसांना तो शोधता आला नाही. मात्र, दुसरीकडे बँकेचे हप्ते फेडण्याचा तगादा सुरूच राहिला. या दुहेरी कोंडीत अडकून कर्जबाजारी झालेल्या २६ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजी नगरात   सुसाइड नोट लिहून आपली जीवनयात्रा संपवली. संदेश दिनकर गवळी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव  आहे,... संदेश हा आई-वडील, दोन भाऊ आणि बहिणीसह जयभवानीनगरमध्ये राहायचा. तो टँकरचा व्यवसाय करायचा. गुरुवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना त्याने नैराश्यातून विष प्राशन केले. ही माहिती समजताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान संदेशची प्राणज्योत मालवली.
0
0
Report

वाशीम के किसान दीपक वारकड ने जैविक खेती से खर्च घटाकर आत्मनिर्भरता दिखायी

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील खरोळा येथील शेतकरी दीपक वारकड स्वयंपूर्ण व शाश्वत शेतीचा आदर्श उभा केला आहे. त्यांनी बायोगॅस, सेंद्रिय खतनिर्मिती आणि एकात्मिक शेतीचा प्रभावी वापर करून खर्च कमी केला आहे. जनावरांच्या शेणापासून बायोगॅस तयार करून घरगुتي इंधनाची गरज भागवली असून, त्यातून मिळणाऱ्या स्लरीचा वापर सेंद्रिय खतासाठी केला जातो. १६ एकर शेतीत फळबागा, भाजीपाला व नगदी पिकांद्वारे त्यांनी वर्षभर उत्पन्नाचे स्रोत निर्माण केले आहेत. नैसर्गिक शेतीतून ते दरवर्षी सुमारे २० लाखांचे उत्पन्न मिळवत आत्मनिर्भर झाले आहेत. त्यांच्या शेतीचा अभ्यास करण्यासाठी अनेक शेतकरी व विद्यार्थी भेट देत आहेत, कमी खर्चात शेती फायदेशीर करण्याचे हे उत्तम उदाहरण ठरत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

रत्नागिरी: लक्ष्मी ऑरगॅनिक ने प्रदुषण के सभी आरोप साफ़ तौर पर खारिज किए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लक्ष्मी ऑरगॅनिक पूर्णतः सुरक्षित पत्रकार परिषदेत कंपनीकडून दावा प्रदूषणाचे सर्व आरोप फेटाळले.. अँकर खेड तालुक्यातील लोटे परशुराम येथील लक्ष्मी ऑरगॅनिक इंडस्ट्रियल लिमिटेड हा प्रकल्प पर्यावरणाचे सर्व नियम आणि सुरक्षा मानकाचे काटेकोर पालन करणारा आहे.. या प्रकल्पामुळे कोणत्याही प्रकारचे प्रदूषण होणार नाही असा दावा कंपनीचे senior उत्पादन विभाग उपाध्यक्ष दीपक पाटील यांनी रत्नागिरीतील पत्रकार परिषदेत केलाय.. तर इटलीतील त्या कर्जबाजारी कंपनीशी आमचा कोणताही थेट संबंध नाही.. ती कंपनी कर्जबाजारी झाल्याने त्यामधील यंत्रसामग्री लक्ष्मी ऑरगॅनिक ने विकत घेतली असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले..
0
0
Report

अमरावती में HTBT कपास बीज पर बैन, उल्लंघन पर 5 साल जेल और लाख का जुर्माना

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात एचटीबीटी कापूस बियाण्यांवर बंदी; नियमांचे उल्लंघन केल्यास 5 वर्ष कारावास. अँकर :- जिल्ह्यात खरीप हंगाम २०२६-२७ची तयारी सुरू झाली आहे. कापूस लागवडीसाठी शासनाची मान्यता नसलेल्या बीजी-३ (एचटीबीटी) बियाण्यांचा वापर टाळावा असे निर्देश कृषी विभागाने दिले आहे. नियमाचे उल्लंघन केल्यास पाच वर्षे कारावास आणि एक लाख रूपयांच्या दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शासनाने केवळ बीजी-१ आणि बीजी-२ या वाणांच्या कापूस बियाण्यांना मान्यता दिली आहे. राउंडअप बीटी, चोर बीटी, वीडगार्ड किंवा एचटीबीटी यासारखी बियाणे बेकायदेशीर असून ती पर्यावरणास घातक आहेत. या बियाण्यांचा वापर केल्यास पर्यावरण संरक्षण कायद्यांतर्गत दंडाची तरतूद करण्यात आली आहे. शेतकऱ्यांची फसवणूक टाळण्यासाठी कृषी विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून बियाणे केवळ अधिकृत परवानाधिकारी विक्रेत्यांकडूनच खरेदी करावे. खरेदी करताना पक्के बिल अवश्य घ्यावे. त्यात पीक, वाण, लॉट क्रमांक आणि कंपनीचे नाव असल्याची खात्री करावी. पॅकेटवर सरकारमान्य अधिकृत चिन्ह तपासावे. बीजी-२ (बोलगार्ड २) वाणाची किंमत ९०१ रूपये आहे. बियाणे पाकीट पूर्णपणे सीलबंद असल्याची खात्री करावी. पाकीटावरील बियाणे उगवणीची अंतिम मुदत तपासून पहावी. सर्व वाणांमध्ये बीजी-२ तंत्रज्ञान सारखेच असल्याने विशिष्ट वाणाचा आग्रह धरू नये. १०० मिलीमीटर पाऊस झाल्याशिवाय कापूस लागवड करू नये, पूर्व हंगामी लागवड टाळावी. विक्रेत्याने पक्के बिल देण्यास नकार दिल्यास तालुका कृषी अधिकारी किंवा कृषी अधिकारी (गुणनियंत्रण) यांच्याशी संपर्क साधावा. बेकायदेशीर बियाणे विनापावती आणि चढ्या दराने विकले जातात. त्यांच्या पाकीटावर गुणवत्तेचे विवरण, तंत्रज्ञान किंवा कोणत्या क्षेत्रासाठी शिफारस केली आहे, याचा कोणताही उल्लेख नसतो. जिल्ह्यात जर अशा बBogस बियाण्यांची विक्री किंवा लागवड करताना आढळल्यास, तात्काळ कृषी विभागाच्या क्षेत्रीय कार्यालयांना कळवावे. ही माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाते, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राहुल सातपुते यांनी केले.
0
0
Report

सीएनजी-एलपीजी महंगाई से रिक्षा चालकों की आय संकट, गैस पाने के लिए लंबी कतार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये रिक्षा चालकांवर दुहेरी आर्थिक संकट कोसळले आहे. एकीकडे सीएनजीच्या दरात वाढ झाली आहे, तर दुसरीकडे एलपीजी गॅससाठी रिक्षा चालकांना अक्षरशः जीवघेण्या रांगा सहन कराव्या लागत आहेत. शहरात एका दिवसाआड केवळ एकाच पंपावर एलपीजी उपलब्ध होत असल्याने चालकांना गॅस मिळण्याच्या आदल्या रात्रीपासून, म्हणजेच रात्री दोन वाजल्यापासूनच रांगेत उभे राहावे लागत आहे. दरम्यान, पूर्वी 61 रुपये किलोने मिळणारा एलपीजी गॅस आता तब्बल 106 रुपये किलोपर्यंत पोहोचला आहे. त्यामुळे “गॅस भरायचा की घर चालवायचं?” असा गंभीर प्रश्न रिक्षा चालकांसमोर उभा राहिला आहे. वाढत्या खर्चामुळे उत्पन्नावर मोठा परिणाम झाला असल्याचं रिक्षा चालक सांगताय...
0
0
Report
Advertisement

देवळाई की कोरड़ी खाई में पुलिस उपनिरीक्षक भीमराव घुगे की आत्महत्या:_sambhajinagar_ाम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील देवळाईतील कोरड्या विहिरीत उडीमारून निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने आत्महत्या केली आहे. अग्निशमन दलाच्या पथकाने बाहेर काढून घाटीमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. भीमराव कारभारी घुगे असे निवृत्त उपनिरीक्षकाचे नाव असल्याची माहिती चिकलठाणा पोलिसांनी दिली. याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात अली आहे. घुगे यांची मुलगी बाळापूर-देवळाई परिसरातच राहते. २ एप्रिल रोजी भीमराव घुगे हे मुलीच्या घरी गेले होते. संध्याकाळी सaharच्या सुमारास दुचाकीने तेथून निघाले. त्यानंतर बाजूला असलेल्या कोरड्या विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. सकाळी ११ वाजता एका टँकरचालकाला हा प्रकार समजला. त्याने चिकलठाणा पोलिसांना माहिती दिली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top