icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जंतर-मंतर पेपरफुटी पर तहकीकात की मांग, महासभा में राजनीति गरमाती दिखी

Kalyan, Maharashtra:जंतर-मंतर लाठीचार्ज पडसाद केडीएमसीत ! शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांचे महासभा तहकूबीसाठी महापौरांना पत्र विद्यार्थ्यांवरील कथित पोलिस कारवाईचा निषेध; शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी कल्याण दिल्लीतील जंतर-मंतर येथे कथित पेपर फुटी आणि विविध गैर प्रकरण विरोधात सुरू असलेल्या विद्यार्थ्या आंदोलनावर झालेल्या लाठी चर्च पडसाद आता कल्याण डोंबिवली महापालिकेच्या महासभेत देखील उमटण्याची शक्यता आहे . शिवसेना उभाठाचे गटनेते उमेश बोरगावकर यांनी आज होणाऱ्या  सर्वसाधारण सभेसाठी तहकुबी सूचना दाखल करणार आहेत .. महासभा तहकुबीसाठी बोरगावकर यांनी महापौरांना पत्र पाठवले आहे .तहकुबी सूचनेत म्हटले आहे की, जंतर-मंतर येथे समाजसेवक सोनम वांगचुक यांच्या नेतृत्वाखाली हजारो विद्यार्थी शिक्षण क्षेत्रातील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांविरोधात लोकशाही मार्गाने आंदोलन करत होते. मात्र, आंदोलन दडपण्यासाठी पोलिसांकडून लाठीचार्ज, अश्रुधूर आणि बळाचा वापर करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. ही कारवाई लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवर गंभीर आघात असल्याचेही सूचनेत नमूद करण्यात आले आहे. यासोबतच, या प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. जंतरमंतर येथील घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी २३ जुलै रोजीच्या केडीएमसीच्या सर्वसाधारण सभेत तहकुबी सूचना मंजूर करून या विषयावर चर्चा घडवून आणावी, अशी मागणी उमेश  बोरगांवकर यांनी केली आहे.
0
0
Report

सोलापुर कृषि उपज बाजार में बंद के कारण प्याज लिलामी ठप, किसानों में हाहाकार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - वंचित बहुजन आघाडीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदला सोलापुरातून प्रतिसाद. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांचा बंदमध्ये सहभाग. माथाडी कामगारांनी कांदा उतरवण्यास नकार दिल्याने कांदा लिलाव ठप्प. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेकडो शेतकरी रात्रीपासून ताटकळत उभे. जंतर मंतर वर सुरू असलेल्या आंदोलनाला आमचा पाठिंबा मात्र मार्केट कमिटीने बंदची कल्पना आम्हाला द्यायला हवी होती शेतकऱ्यांची भावना. याविषयीचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी
0
0
Report
Advertisement

शिरूर हवेली में स्वास्थ्य सप्ताह: आम जनता के लिए मुफ्त स्वास्थ्य जांच अभियान

Shirur, Maharashtra:सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेला बळकटी मिळावी आणि सर्वसामान्य नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळाव्यात, यासाठी स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त शिरूर हवेली मध्ये विशेष आरोग्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आलंय, या पार्श्वभूमीवर शिरूर-हवेलीचे आमदार माऊली कटके यांनी स्वतः सरकारी प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन आपली आरोग्य तपासणी करून घेतली. सरकारी आरोग्य यंत्रणेवर सर्वसामान्य जनतेचा विश्वास अधिक दृढ व्हावा, हा यामागचा मुख्य उद्देश असून, त्यांनी या माध्यमातून समाजापुढे एक आदर्श निर्माण केलाय, या आरोग्य तपासणी शिबिराला सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांचा उदंड प्रतिसाद मिळाला असून, तपासणीसाठी केंद्रांवर नागरिकांनी मोठी गर्दी केलीय.
0
0
Report

नागपूर में छात्र आंदोलन पर सरकार की दादागिरी, विपक्षी ने किया सरकार पर हमला

Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते *विद्यार्थी आंदोलन* - उनके भविष्याचा प्रश्न आता निर्माण झाला आहे. या देशात परिवर्तनाला सुरुवात होईल. सत्तेत कोण आहे, हा प्रश्न नाही; तर तरुणांच्या प्रश्नांना प्राधान्य दिले पाहिजे. सरकार संवेदनाहीन झाले आहे. - त्या मुलांवर बळाचा वापर करून त्यांना दडपण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही लोकशाही आहे की नाही? त्या मुलांच्या हातात कोणतेही शस्त्र नव्हते. ते शांततेच्या मार्गाने आंदोलन करत होते, तरी सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. *ऑन राहुल गांधी* - राहुल गांधी पत्रकार परिषद घेतली. त्यांनीही आंदोलन केले. महाराष्ट्रभर आम्ही आंदोलन केले. तालुका स्तरावरही पालक रस्त्यावर उतरले आहेत. मोदी सरकारने आणि महाराष्ट्रातील फडणवीस सरकारने जनतेच्या भावना समजून घेतल्या पाहिजेत. त्यांच्या भावनांशी खेळू नका. त्यांच्या मागण्यांवर तोडगा काढा. सरकारची ही भूमिका असली पाहिजे. दुर्दैवाने सरकार कोणतीही चर्चा करण्यास किंवा बोलण्यास तयार नाही. आंदोलन दडपण्याचा प्रयत्न सुरू आहे. - सोनम वांगचुक यांना ताब्यात घेण्यात आले. मुलींच्या खासगी अवयवांवर पोलिसांनी मारहाण केली. तरुणांशी अभद्र वर्तन करण्यात आले. काल आम्ही आंदोलन केले. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा होईपर्यंत आंदोलन सुरू राहील. अमित शहा यांनीही राजीनामा द्यावा. आम्ही सरकारसमोर पाच मागण्या ठेवल्या आहेत; मात्र सरकार त्या मान्य करण्याऐजी दडपशाही करत आहे. *ऑन नरेंद्र मोदी ट्वीट* - गेल्या दहा वर्षांत अनेक पेपरफुटी झाल्या आहेत. हजारो पुरावे आहेत. सरकार हुशार विद्यार्थ्यांचे भविष्य उद्ध्वस्त करत आहे. *ऑन अण्णा हजारे* - उशिरा सुचलेला शहाणपणा आहे. आता त्यांचे वय झाले आहे. *ऑन सरन्यायाधीश* - न्यायव्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होता कामा नये. सामान्य माणसाचा न्यायव्यवस्थेवर विश्वास आहे. तरुणांवर अमानुषपणे मारहाण होत आहे. पोलिसांनी कायदा हातात घेणे चुकीचे आहे. *ऑन नड्डा प्रेस* - नीट परीक्षा घेण्याची जबाबदारी सरकारची आहे. त्यांच्या काळात पेपरफुटी झाली म्हणून आम्ही करायची का? हजारो लीक कसे होतात? अनेक पेपरफुटी होतात, त्याची जबाबदारी कोणाची? दुसऱ्यांकडे बोट दाखवण्यापेक्षा स्वतःच्या चुका सुधारल्या पाहिजेत. - काँग्रेसच्या आंदोलनावर टीका करणाऱ्यांनी आधी स्वतःकडे पाहावे. चोर सोबत पोलिस आहे सामान्य विद्यार्थ्यांच्या मागे धावत आहे. दुसऱ्यांच्या आंदोलनावर टीका करून स्वतःचे अपयश झाकण्याचा प्रयत्न सुरू आहे. जनता हे कधीच माफ करणार नाही. - सत्तेसाठी ते हतबल झाले आहेत. काल शांततेच्या मार्गाने आम्ही आंदोलन करत होतो. अशा प्रकारे आंदोलन हाताळणे म्हणजे पोलिसांची दादागिरी आणि गुंडगिरी आहे. मला गाडीत ढकलण्यात आले. माझ्या खांद्याला दुखापत झाली. छातीतही वेदना होत होत्या. पोलिसांनी अमानुषपणे मला उचलले. या सरकारला लोकशाही मान्य नाही. सरकार हुकूमशाही पद्धतीने वागत आहे. *ऑन कराळे* - कराळे यांची भाषा चुकीची आहे. त्यांच्या वक्तव्याचे समर्थन कोणीही करत नाही. सोशल मीडियावर त्यांच्या विरोधात नकारात्मक प्रतिक्रिया येत आहेत. राहुल गांधी यांच्या मागे संपूर्ण देश आहे. पक्ष जो आदेश देईल, त्यानुसार आम्ही भूमिका घेऊ. *ऑन शरद पवार* - सर्वांना भेटता येते. ती राजकीय भेट नव्हती. काही दिवसांनी सत्य समोर येईल. अशा भेटींवर चर्चा होत असते. त्यावर अधिक भाष्य करणे योग्य नाही. *ऑन ठाकरे बंधू* - त्यांनी रामरक्षा आंदोलन केले. आम्ही गांधीवादी विचारांचे लोक आहोत. प्रत्येक जण आपल्या विचारधारेनुसार आंदोलन करत असतो. *ऑन वंचित आंदोलन* - आजच्या आंदोलनाला पाठिंबा द्यायचा की नाही, याचा निर्णय काँग्रेस प्रदेशाध्यक्ष घेतील. *ऑन दिल्ली पोलीस* - जालियनवाला बाग हत्याकांडात जनरल डायर होता. आजही विद्यार्थ्यांवर ज्या प्रकारे कारवाई झाली, ती अत्यंत निषेधार्ह आहे. तरुणांना मारहाण करण्यासाठी गुंडांचा वापर करण्यात आला. त्यांची ओळख पटत आहे. *ऑन शेतकरी कर्जमाफी* - शेतकऱ्यांच्या कर्जमाफीच्या प्रश्नांबाबत सरकार उदासीन आहे. सरकार आकडे फुगवून सांगत आहे. काल तांत्रिक बिघाडाचे कारण देत यादी प्रसिद्ध केली. ही बनवाबनवी असून शेतकऱ्यांची फसवणूक आहे. कर्जमाफीच्या यादीतून हे स्पष्ट झाले आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में बंद का व्यापक असर, वंचित बहुजन आघाडी के आह्वान पर व्यापारी बंद

Akola, Maharashtra:दिल्ली येथे विद्यार्थ्यांवर झालेल्या कथित लाठीमाराच्या निषेधार्थ देशभरात संताप व्यक्त केला जात असताना, आज अकोल्यात वंचित बहुजन आघाडीच्या वतीने बंदची हाक देण्यात आली होती. अकोल्यात या बंदला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेनेही पाठिंबा दिला. शहरात या बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र पाहायला मिळाले. वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी शहरातून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढत नागरिक आणि व्यापाऱ्यांना बंदमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. दरम्यान, काही ठिकाणी सुरू असलेल्या व्यावसायिक प्रतिष्ठानांना विनंती करून दुकाने बंद करण्यास सांगण्यात आले. बंदच्या पार्श्वभूमीवर शहरातील काही शाळा आणि शैक्षणिक संस्थांनीही कामकाज बंद ठेवले होते. शहरातील प्रमुख बाजारपेठांमध्ये शुकशुकाट दिसून आला. एकूणच, विद्यार्थ्यांवरील कारवाईच्या निषेधार्थ पुकारण्यात आलेल्या या बंदला अकोल्यात चांगला प्रतिसाद मिळाल्याचे चित्र दिवसभर पाहायला मिळाले. आग्रा शहरात मोठा पोलीस बंदोबस्त सुद्धा तैनात करण्यात आला होता.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

दिल्ली के आंदोलनों के बीच अभिजीत दिपके की माँ चिंतित, राजीनामा की मांग

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्लीत सुरू असलेल्या आंदोलनामुळे अभिजीत दिपकेची आई मात्र चांगलीच चिंताग्रस्त झाली आहे तर त्याचे वडील सुद्धा बीपीच्या त्रासामुळे आजारी पडलेले आहेत, लाठीचार्ज झाला ते चूक आहे, मुलांना असं मारायला नको होतं मात्र ते पाहून भीती वाटतं सरकारने असं करायला नको होतं असं अभिजीत दीपके यांच्या आईचा म्हणणं आहे सोबतच मुलांच्या मागण्या समजून घ्याव्या धर्मेंद्र पदांनी राजीनामा द्यावा अशी ही मागणी त्यांनी केली आहे लवकरात लवकर हे आंदोलन संपवून अभिजीत घरी यायला हवा अशी हळवी प्रतिक्रिया त्याच्या आईने झी 24 तासशी बोलताना दिली आहे अनिता दिपके यांचा सोबत बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
0
Report

रत्नागिरी में एटीएम कार्ड धोखाधड़ी: आरोपी गुजरात से गिरफ्तार, 34 कार्ड जब्त

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime एटीएम कार्ड बदलून फसवणूक करणाऱ्या सराईत आरोपीला अटक ३४ विविध बँकांची एटीएम कार्ड जप्त अँकर एटीएम कार्ड सुरू करण्याच्या बहाण्याने नागरिकांची फसवणूक करणाऱ्या गुजरातमधील सराईत आरोपीला रत्नागिरी शहर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने अटक केली आहे..संशयित आरोपीकडून विविध बँकांची तब्बल ३४ एटीएम कार्डे जप्त करण्यात आली असून न्यायालयाने त्याला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपीचे नाव धीरजकुमार मोहनलाल पांचाळ असून तो गुजरातमधील सुरत येथील आहे..त्याच्यावर यापूर्वी गुजरातमध्ये 8 गुन्हे दाखल आहेत.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

नाशिक में गिरणा- पुणद- मार्कंडी नदियों में बाढ़, स्मशान भूमि डूबी

Nashik, Maharashtra:नाशिकच्या कसमादे पट्ट्यातील गिरणा, पुणद, मार्कंडी नद्यांना पूर नाशिकच्या देवळा विठेवाडी येथील गिरणा नदीच्या काठावरील स्मशानभूमी पुर पाण्यात संरक्षक भिंतीचे नुकसान झाले असून विठेवाडी सावकी येथिल छोटा फरसी वजा पुल पाण्याखाली गेला आहे, या पुलावरून पाणी वहात आहे, नविनच बांधकाम करण्यात आलेल्या के टि वेअर च्या सावकी कडील संरक्षक भिंतीचा भरावही मोठ्या प्रमाणात खचला आहे, गिरणा, पुणद, मार्कंडी नद्यांना पूर आल्याने, तसेच चणकापुर व पुणद धरण, पाणलोट क्षेत्रात झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही धरणातुन प्रचंड प्रमाणात पाण्याचा विसर्ग सोडण्यात आला आहे, कळवण, देवळा, तसेच, बागलाण येथील तहसीलदार व व पाटबंधारे विभागाने सावधानतेचा इशारा दिला आहे.
0
0
Report
0
0
Report

राजापूर-रत्नागिरी के बाजार पर प्रशासनिक ढिलाई से व्यापारी आक्रोशित; जारी है विरोध का अलार्म

Ratnagiri, Maharashtra:राजापूर-रत्नागिरी. वैयक्तिक वादाचा आठवडा बाजाराला फटका; प्रशासनिक दिरंगाईमुळे व्यापाऱ्यांचा आंदोलनाचा इशारा! राजापूरच्या प्रसिद्ध गुरुवारी भरणार्‍या आठवडा बाजाराला प्रशासकीय जागेचा वाद वेळेवर मिटल्याने धक्का बसेला आहे. सोलापूर, कोल्हापूर व कोकणातील १५० ते २०० व्यापाऱ्यांचा धंदा ठप्प झाला. आमदार किरण सामंत यांनी व्यापाऱ्यांना आहे त्याच जागेवर बसू देण्याचे निर्देश देऊनही मुख्य अधिकाऱ्यांच्या (CO) संथ कारभारामुळे तोडगा निघालेला नाही. लोकप्रतिनिधी आणि प्रशासन केवळ राजकारण करत असल्याचा आरोप करत, न्याय न मिळाल्यास रस्त्यावर उतरू! असा आक्रमक इशारा संतापलेल्या व्यापाऱ्यांनी दिला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top