445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी दापोली के भाटी गांव के राज प्रवीण लवंदे ने थाईलैंड में सुवर्ण जीते
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीच्या दापोली तालUk्यातील भाटी गावचा राज प्रवीण लवंदे याने थायलंड (बँकॉक) येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय पॉवर लिफ्टिंग स्पर्धेत पाच सुवर्णपदकांना गवसणी घातली आहे.. याबद्दल त्याचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे..0
0
Report
रत्नागिरी के गणपति पुले बीच पर 5 पर्यटक डूबे, शव बरामद
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी— गणपतीपुळे समुद्रकिनाऱ्यावर संभाजीनगरच्या ५ पर्यटकांचा बुडून मृत्यू. पोलीस अधीक्षकांकडून नातेवाईकांचे सांत्वन. रत्नागिरीच्या गणपतीपुळेतील समुद्राच्या पाण्याचा अंदाज न आल्यामुळे छत्रपती संभाजीनगर येथील ५ पर्यटकांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. प्रशासनाने तात्काळ शोधमोहीम राबवून या पाचही जणांचे मृतदेह समुद्राबाहेर काढले. या भीषण दुर्घटनेनंतर संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त होत असून, रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांनी तात्काळ जाकदेवी आरोग्य केंद्राला भेट दिली. त्यांनी मृतकांच्या शोककुळ नातेवाईकांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले आणि प्रशासनतर्फे आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले. पर्यटकांनी समुद्रात उतरताना काळजी घ्यावी, असे आवाहनही प्रशासनाकडून पुन्हा एकदा करण्यात आले आहे.0
0
Report
सांगली-सातारा विधान परिषद मतगणना शुरू, मतदान 99.89% तक पहुंचा
Sangli, Maharashtra:स्लग -सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीसाठी आज पार पडणार मतमोजणी.. अँकर - सांगली,सातारा विधान परिषदेच्या निवडणुकीचे मतमोजणी पार पडत आहे. सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होणार आहे. 99.89% इतकं मतदान झालं होतं.895 पैकी 894 इतका मतदान झालं होतं,सांगलीच्या खानापूर तालुक्यातील विटा केंद्रावर एक मतदान झाले नसल्याने शंभर टक्के मतदान होऊ शकले नाही.पाच टेबलच्या माध्यमातून मतमोजणी होणार आहे.सांगलीतील तरुण भारत स्टेडियम मध्ये ही मतमोजणी पार पडणार असून असून दहा ते साडेदहा वाजेपर्यंत निकाल अपेक्षित आहे. मतमोजणीसाठी प्रशासनाकडुन चोख नियोजन करण्यात आले आहे.महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी,अशी लढत झाले असून भाजपकडून धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी शरद पवार पक्षाकडून अभयसिंह जगताप हे मैदानात होते,तर किशोर धुमाळ हे अपक्ष उमेदवार देखील रिंगणात होते.मात्र महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी,अशी तरंगी लढत या ठिकाणी पाहायला मिळाली.0
0
Report
Advertisement
मुंबई-गोवा चौपदरीकरण: धोकादायक मोड़ नहीं बदले, यात्रियों में गुस्सा बढ़ा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. मुम्बई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण की अपघातांना आमंत्रण?. जुनी धोकादायक वळणे कायम असल्याने प्रवाशांमध्ये तीव्र नाराजी!. अँकर मुम्बई-गोवा महामार्गावरील प्रवास सुखकर व्हावा आणि अपघातांचे प्रमाण कमी व्हावे,या उद्देशाने महामार्गाचे चौपदरीकरण करण्यात आले.. हे काम करताना जुनी,धोकादायक वळणे काढून रस्ता सरळ केला जाईल,असे आश्वासन देण्यात आले होते.. मात्र,प्रत्यक्षात महामार्गावरील धोकादायक वळणे 'जशीच्या तशी' ठेवण्यात आल्याने प्रवाशांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.. विशेषतः रत्नागिरी जिल्ह्यातील खेड येथील भोस्टे घाटातील वळण आणि संगमेश्वर येथील सोनवी पुलाच्या आधीचे वळण अत्यंत धोकादायक बनले असून,येथे अपघातांचे सत्र थांबायला तयार नाही.. प्रशासनाच्या या अजब कारभारामुळे चौपदरीकरणानंतरही प्रवाशांचा जीव टांगणीला लागला असून,स्थानिक नागरिक आणि वाहनचालकांकडून या कामाबाबत संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत..0
0
Report
सोलापुर: विधान परिषद चुनाव से पहले भाजपा के राजेंद्र राऊत के विजयी बैनर लगे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर विधान परिषद निवडणूक निकालाआधीच सोलापूर शहरात भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांचे विजयाचे बॅनर्स. सोलापूर विधान परिषद निवडणूकीती भाजप उमेदवार राजेंद्र राऊत विरुद्ध राष्ट्रवादी SP चे वसंतराव देशमुख यांच्यात आहे थेट सामना. आज सकाळी 8 वाजल्या पासून सोलापुरातील नियोजन भवन येथून निकाल होणार आहे जाहीर. मात्र निकाल येण्यापूर्वीच सोलापूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात भाजप उमेदवार राजेंद्र राऊत यांच्या विजयाचे लागले आहेत बॅनर्स. पालकमंत्री जयकुमार गोरे आणि आमदार देवेंद्र कोठे यांच्या फोटोसह 'गुलाल आपलाच' अशा आशयाच्या आमदाराकीच्या शुभेच्छा देणारे बॅनर्स लागल्याचे चित्र सोलापुरात दिसून येत आहे.0
0
Report
रत्नागिरी के पानवल डैम में पानी की आपूर्ति संकट, ड्रोन वीडियो से दिखा सूखा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीवर पाणीटंचाईचं सावट! पानवल धरण पूर्णपणे कोरडं, पाहा ड्रोन व्हिडिओ.. रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पानवल धरणाची स्थिती सध्या चिंताजनक बनली आहे.. गेले काही दिवस पावसाने दडी मारल्यामुळे हे धरण आता पूर्णपणे कोरडं पडलं असून,रत्नागिरी शहरावर पाणीटंचाईचं मोठं संकट ओढवलं आहे.. सध्या सोशल मीडियावर या धरणाचे ड्रोन दृश्य समोर आले आहेत,ज्यामध्ये धरणाचा तळ उघडा पडल्याचं स्पष्ट दिसत आहे.. कांचन माडगूळकर यांनी ड्रोन कॅमेऱ्यातून टिपलेली ही बोलकी दृश्ये तुम्ही पाहू शकता.. एरवी हिरवाईने नटलेला हा परिसर पाण्यासाठी आसुसलेला दिसत असून,रत्नागिरीकरांना आता केवळ आणि केवळ दमदार पावसाचीच प्रतीक्षा आहे..0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में मानसून की धमाकेदार एंट्री, किसानों की फसलें खिले, येलो अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात पहाटे मान्सूनची दमदार एन्ट्री.. विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडासह पावसाच्या जोरदार सरी.. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती..त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांवर संकट ओढवलं होतं.. काही ठिकाणी पेरणी करून उगवलेलं भाताचं रोप कडक उन्हामुळे करपून जाण्याची भीती शेतकऱ्यांच्या मनात होती.. मात्र या पावसाच्या जोरदार सरी बरसल्याने शेतकरी सुखावला आहे.. हवामान विभागाने आजपासून पुढील दोन दिवस जिल्ह्याला पावसाचा येलो अलर्ट जाहीर केला आहे..0
0
Report
नागپور में मतगणना: राजीव पोतदार बनाम अतुल लोंढे की सीधी भिड़ন্ত
Nagpur, Maharashtra:नागपूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद पोटनिवडणूक मतमोजणी सकाळी आठ वाजता सुरू होतेय.भाजपचे राजीव पोतदार कॉंग्रेसचे अतुल लोंढे या दोघात प्रमुख लढत आहे मतमोजणीसाठी चार टीम सज्ज असून प्रत्येक टीम मध्ये यात मतमोजणी पर्यवेक्षक, मतमोजणी सहाय्यक, मायक्रो ऑब्सर्व्हर यांचा समावेश आहे.चार टेबलवर ही मतमोजणी होईल. यात टॅब्यूलेशन साठी एक टेबल राहील.या निवडणुकीसाठी ८३६ मतदारांपैकी ८२३ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. या निवडणुकीत एकूण सुमारे ९८.४४ टक्के मतदान झाले. ८३६ मतदारमध्ये ४१९ पुरुष मतदार तर ४१७ महिला मतदार आहेत.0
0
Report
अकोला के दुर्गा चौक स्थित होटल के किचन में अचानक आग, कोई जनहानि नहीं
Akola, Maharashtra:अकोला शहरातील दुर्गा चौक परिसरातील एका नामांकित हॉटेलच्या स्वयंपाकघरात काल सायंकाळी अचानक आग लागल्याची घटना घडली. या आगीत स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले असले, तरी सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, काल सायंकाळच्या सुमारास हॉटेलच्या स्वयंपाकघरातून मोठ्या प्रमाणात धूर बाहेर येऊ लागल्याचे कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आले. धूर आणि आगीची माहिती मिळताच कर्मचाऱ्यांनी तत्काळ सुरक्षित ठिकाणी धाव घेतली. दरम्यान, आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी प्राथमिक स्तरावर प्रयत्न करण्यात आले. त्यानंतर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले. काही वेळाच्या प्रयत्नांनंतर आग पूर्णपणे आटोक्यात आणण्यात यश आले. या घटनेत स्वयंपाकघरातील साहित्याचे नुकसान झाले असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. घटनेनंतर अग्निशमन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. आग नेमकी कशामुळे लागली याचा शोध घेतला जात आहे व हॉटेलमध्ये आवश्यक अग्निसुरक्षा उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, याचीही चौकशी सुरू आहे.0
0
Report
Advertisement
शिरूर में FDA की संभावित कार्रवाई से व्यापारी नदी में खाद्य पदार्थ फेंकते दिखे
Shirur, Maharashtra:शिरूर शहरातून एक धक्कादायक आणि चिंताजनक प्रकार समोर आला आहे. अन्न व औषध प्रशासन म्हणजेच FDA च्या संभाव्य कारवाईच्या भीतीने व्यापाऱ्यांनी मोठ्या प्रमाणात बिस्किटांचे पुढे, मॅगी आणि इतर खाद्यपदार्थ थेट नदीत आणि कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्याजवळ फेकून दिले आहेत. विशेष म्हणजे पाण्यात फेकण्यात आलेला हा सर्व अन्नसाठा कालबाह्य म्हणजेच एक्स्पायरी डेट संपलेला होता. कारवाईतून वाचण्यासाठी हा घाट घालण्यात आल्याचे बोलले जात आहे. शिरूर परिसरात अशा प्रकारे मोठ्या प्रमाणावर खाद्यपदार्थ उघड्यावर किंवा नदीत फेकून देण्याची ही पहिलीच घटना असून, यामुळे पाण्याच्या प्रदूषणाचा आणि आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. यावर आता प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
शिरूर के सांसद निलेश लंके ने बलिदानभूमि पर प्रेरणा पाई, जल-संकट पर बचत आह्वान
Shirur, Maharashtra:निलेश लंके खासदार बलिदान भूमीतून प्रेरणा: खासदार निलेश लंके यांनी वढू बुद्रुक आणि तुळापूर येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान भूमीला भेट दिली. ही भूमी अत्यंत ऊर्जादायक असून गड-किल्ले हे केवळ प्रेक्षणीय स्थळ नसून आपल्या सर्वांसाठी प्रेरणा आणि ऊर्जेचे स्रोत असल्याचे त्यांनी सांगितले. 'वाघासोबतच्या' व्हिडिओवर मिश्किल टिप्पणी: 'लोक कुत्र्यांना घेऊन फिरतात, पण आम्ही टायगरला घेऊन फिरतो.' शंभूराजांनी वाघाचे जबडे फाडले होते, तीच आपली प्रेरणा असल्याचे सांगत 'वाघालाही मी माझ्या चालीने चालायला लावले,' अशी दमदार प्रतिक्रिया त्यांनी दिली. राजकीय प्रश्नांना बगल: राष्ट्रवादीतील 'ऑपरेशन' आणि राजकीय घडामोडींवर बोलणे लंके यांनी स्पष्टपणे टाळले. 'मी येथे खासदार किंवा पदाधिकारी म्हणून नाही, तर केवळ शिवरायांचा मावळा म्हणून आलो आहे. या पावन भूमीत राजकीय भाष्य करणे माझ्यासारख्या शिवभक्ताला शोभणार नाही,' अशी ठाम भूमिका त्यांनी मांडली. दुष्काळावर भाष्य आणि वरुणराजाला साकडे: राज्यात असलेल्या पाणीटंचाईवर चिंता व्यक्त करत निलेश लंके यांनी 'धो-धो पाऊस पडून बळीराजा सुखी होऊ दे' अशी प्रार्थना केली. तसेच धाराशिवसारख्या भागातील पाणीटंचाईचा दाखला देत नागरिकांना पाण्याची काटेकोरपणे बचत करण्याचे आवाहन केले.0
0
Report
जुन्नर के ओतूर में भयावह दुर्घटना: दो की मौत, एक बच्ची समेत
Shirur, Maharashtra:ओतूरजवळ भीषण अपघात; लहान चिमुरडीसह दोन जणांचा जागीच मृत्यू या घटनेत आयषर टेम्पो नगरकडे जात होता, तर दुचाकी कल्याणच्या दिशेने प्रवास करत होती. दोन्ही वाहनांचा वेग व अचानक धडक यामुळे अपघात अत्यंत भीषण ठरला. या अपघातात दुचाकीवरील एका लहान मुलासह दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. अपघातानंतर घटनास्थळी नागरिकांनी गर्दी केली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला. सीसीटीव्ही कॅमेऱ्यात या घटनेची संपूर्ण घटना कैद झाली असून पुढील तपास सुरू आहे. प्रतिनिधी Hemant Chapude, Zee Media Junnar Pune.0
0
Report
Advertisement
पहली बारिश में महाड के सड़क जलमय, अपूर्ण पाइपलाइन-गटार कार्य से नागरिक परेशान
Chendhare, Maharashtra:पहिल्याच पावसात महाडची दाणादाण अर्धवट कामामुळे पाणी रस्त्यावर अपूर्ण कामामुळे बोजवारा नागरिकांची गैरसोय पहिल्याच जोरदार पावसाने महाड शहरातील रस्ते जलमय झाल्याने नागरिकांची मोठी गैरसोय झाली. पाईपलाईन व गटारांची कामे अपूर्ण राहिल्यामुळे काही ठिकाणी पावसाचे पाणी थेट रस्त्यावर साचले. परिणामी वाहनचालक आणि पादचाऱ्यांना पाण्यातून मार्ग काढताना मोठी कसरत करावी लागली. या प्रकाराची दखल घेत महाड नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष संदीप जाधव यांनी पाणी साचलेल्या भागांची पाहणी केली. रस्त्यालगत टाकण्यात आलेला मातीचा भराव तातडीने हटवून गटारे मोकळी करण्याचे आदेश त्यांनी संबंधित यंत्रणेला दिले. पहिल्याच पावसात शहरातील अपूर्ण कामांचा बोजवारा उडाल्याने नगरपालिकेच्या नियोजनावर नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
रत्नागिरी में भारी बारिश ने किसानों की चिंता हराई
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात जोरदार पावसाची एन्ट्री.. चिपळूण, खेड, दापोलीत आणि संगमेश्वर मध्ये दमदार पावसाची सुरुवात.. तर उर्वरित तालुक्यात पावसाच्या हलक्या सरी.. या पडलेल्या पावसाच्या सरिमुळे बळीराजा सुखवाला.. गेले काही दिवस पावसाने दडी मारली होती.. त्यामुळे बळीराजा संकटात आला होता.. शेतात केलीली भाताची पेरणी कडक उन्हात करपून जाण्याची भीती निर्माण झाली होती.. आज पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा सुखावलेला आहे..0
0
Report
महाड में भारी बारिश, आकाश गरजगर्ज के साथ गूंजा
Chendhare, Maharashtra:रायगड ब्रेकिंग ढगांच्या गडगडाटासह महाडमध्ये जोरदार पाऊस. ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाची हजेरी. दुपारी तीन वाजल्यापासून पावसाची संततधार. जवळपास तीन तास झालेल्या पावसाने हवेत चांगलाच गारवा. उन्हामुळे हैराण नागरिकांची कडाक्याच्या उष्म्यातून सुटका. पावसाची चातकासारखी वाट पाहणाऱ्या बळीराजाला दिलासा.0
0
Report
Advertisement
