445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नीट पेपर विवाद के बाद तनाव में गोदिया में कैंडल मार्च, श्रद्धांजलि
Bhandara, Maharashtra:नीट पेपर फुटी प्रकरणात मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गोंदियात नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून एक मिनिटाचा मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली. नीट पेपरफुटी प्रकरणात मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गोंदिया शहरात कॅन्डल मार्च काढून मृतक विद्यार्थ्यांच्या बॅनर खाली कँडल लावून एक मिनिटाचा मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मोठ्या संख्येत याप्रसंगी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. श्रद्धांजली दरम्यान सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून दोशींवर लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली.0
0
Report
सहयाद्री की भारी बारिश से डिंबे डैम ओवरफ्लो, लोगों को सतर्क रहने की सलाह
Ambegaon, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून घोड नदीच्या पात्रात ७,००० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १३.५ टीएमसी क्षमता असलेले हे धरण जुलै अखेरीसच भरल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर परिसरासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, धरणाच्या पाणीळट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग अधिक वाढवला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच परिस्थिती चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
हिंगोली के पिंपळखुटा में जलसंकट: जलजीवन मिशन के काम अधूरे, ग्रामीण पानी के लिए तरस रहे
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या पिंपळखुटा गावामध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पिंपळखुटा गावात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने गावात शासनाच्या योजनेचे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना गावापासून दूर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे गावात शासनाच्या योजनेतून अनेक टाक्या बांधण्यात आल्या आहे मात्र त्यात पाणीच नसल्याने शासनाचा योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शासनाच्या योजनेच हक्काच पाणी देण्याची मागणी गावकरी करत आहेत.0
0
Report
Advertisement
घाटी अस्पताल के डागडुजी खर्च पर विवाद, 60 करोड़ खर्च पर सवाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय म्हणजेच घाटी गेल्या तीन आठवड्यांपासून चर्चेत आहे, डागडुजीच्या अनागोंदी खर्चामुळे. पालकमंत्री संजय शिरसाट यांनी सर्जिकल इमारतीची पाहणी केल्यानंतर घाटीतील सगळ्या डागडुजीच्या कामांचा खर्च संशयाच्या भोवऱ्यात आला आहे. मागील दोन वर्षात घाटीतील विविध डागडुजीच्या कामांवर ६० कोटींच्या आसपास रक्कम खर्च झाला आहे. हा सगळा खर्च जिल्हा नियोजन समिती, घाटी फंड आणि सार्वजनिक बांधकाम विभागाला शासनाकडून आलेल्या अनुदानातून झाला आहे. एवढ्या खर्चातून घाटीत एखादी नवीन इमारत उभारली गेली असती. २०२३मध्येही घाटीतील डागडुजीच्या खर्चाच्या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले होते. घाटीवर आजवर २०२० ते २०२६ या सहा वर्षात केलेल्या खर्चात टोलेजंग इमारती उभ्या राहिल्या असत्या, मात्र यात फक्त डागडुजी दाखवण्यात आली आहे, याबाबत चौकशी ची मागणी होतेय..0
0
Report
नासेर खान तारेख अहमद की हत्या: कई आरोपी गिरफ्तार, एक फरार
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नासेर खान तारेख अहेमद (२१, रा. शहाबाजार) असे मृतांचे नाव आहे. आरोपींमध्ये शाहीद नुरुद्दीन चारनीया (२३, रा. हिमायतबाग), शेख कदीर शेख रहीम उर्फ अमीज उर्फ माया (२३, रा. महेमुदपुरा), उबेद रहेमान पटेल (२३, रा. रोजेबाग), अविनाश अमोल भोसले उर्फ क्रिश बाबा (१८, डी-सेक्टर, एन-१३, हडको), शेख राफे रईसुद्दीन खान (२०, रा. जयसिंगपुरा), अक्षय विजय शिरसाठ (२१, रा. हरिओमनगर, हर्सल) यांच्यासह एका अल्पवयीन आरोपीस अटक केली, तर शाहेबाज (रा. सिद्धार्थनगर, एन-१२) हा आरोपी पसार झाला. मृताचा भाऊ फिर्यादी आमेर खान तारेख खान (२६, रा. शाहबाजार) याच्यासोबत झालेले वाद मिटविण्यासाठी आरोपी शाहीद चारनीया याने शनिवारी रात्री १२ वाजता त्याला आझाद कॉलेज परिसरात बोलावले. तेथे आमेर गेला नाही. त्याने ही बाब भाऊ नासेरला सांगितली. शाहीदने स्थळ बदलत रोजबाग येथील घराजवळ पु الأحा बोलावले. नासेर दोन मित्रांना सोबत घेऊन तिकडे गेला. भावाला टोळके मारहाण करीत असल्याची माहिती मित्रांनी आमेरला दिली. तो मित्रांसह घटनास्थळी पोहचला. आरोपि लाकडी दांडक्यांनी नासेरला मारहाण करीत होते. आमेरने भावला दुचाकीवर बसवून तेथून पळ काढला., परंतु एका आरोपीने पाठलाग करीत खाली ओढले0
0
Report
हाईकोर्ट ने FDA की कार्रवाई में 8 दूध डेयरी के लाइसेंस निलंबन पर अंतरिम रोक लगाई
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गेल्या दीड ते दोन महिन्यांपासून अन्न व औषध प्रशासनाने राज्यभर दूध आणि अन्न विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. मात्र, या कारवाईदरम्यान नियमांचे उल्लंघन झालेले समोर आले असून, मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने छत्रपती संभाजीनगर, जळगाव, अहिल्यानगर आणि जालना येथील ८ दूध डेअरींवरील कारवाईला अंतरिम स्थगिती दिली.. दूध डेअरीची तपासणी केल्यानंतर आढळलेल्या त्रुटी दूर करण्यासाठी संबंधितांना १४ दिवसांची मुदत देणे कायद्यानुसार बंधनकारक आहे. एफडीए आयुक्तांच्या मार्गदर्शक तत्त्वांमध्येही याचा स्पष्ट उल्लेख आहे. मात्र, ही मुदत न देताच थेट परवाने निलंबित करण्याची कारवाई बेकायदा असल्याचा युक्तिवाद न्यायालयात करण्यात आला. डेअरी चालकांनी अनेक त्रुटी दूर केल्याचेही याचिकेत स्पष्ट केले. प्राथमिक सुनावणीनंतर न्यायालयाने या निलंबन कारवाईला स्थगिती दिली आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक के कळवण में मैक्स कार और दुचाकी भिड़ंत; नवविवाहित दंपति की मौत
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवण तालुक्यातील पिळकोस फाट्यावर आज मॅक्स गाडी व दुचाकी यांच्यात समोरासमोर झालेल्या अपघातात नवविवाहित दाम्पत्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय, आपल्या नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी प्रतापपूर येथे जात असताना हा अपघात घडला, अपघातानंतर स्थानिकांनी त्यांना तातडीने कळवण उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, तेथून त्यांना नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले मात्र उपचारादरम्यान दोघांचा मृत्यू झाला, दिनेश गावित व कीर्ती गावित अशी दोघांची नावे असून मे महिन्यात दोघांचे लग्न झाले होते, त्यांच्या सोबत असलेली तिसरी व्यक्ती त्रिशा गावित या गंभीर जखमी झाल्या आहेत.0
0
Report
आकोला जिला मतदाता पुनरीक्षण में राज्य के पांच में, फॉर्म वितरण 96.18% डिजिटाइजेशन 62.26%
Akola, Maharashtra:मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात अकोला जिल्ह्याने राज्यात उल्लेखनीय आघाडी घेतली आहे. जिल्ह्यातील एकूण १५ लाख ९५ हजार ६४४ मतदारांच्या पुनरीक्षणासाठी आतापर्यंत १५ लाख ३४ हजार ७३७ फॉर्मचे वितरण करण्यात आले असून, हे प्रमाण ९६.१८ टक्के इतके आहे. तसेच ९ लाख ९३ हजार ४४९ फॉर्मचे डिजिटायझेशन पूर्ण झाले असून, त्याचे प्रमाण ६२.२६ टक्के आहे. विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेत जिल्ह्यातील १ हजार ७४१ मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) कार्यरत असून, जिल्हाधिकारी वर्षा मीना यांच्या मार्गदर्शनाखाली ही प्रक्रिया वेगाने सुरू आहे. जिल्हाधिकारी व उपजिल्हाधिकाऱ्यांनी स्वतः जिल्ह्यातील विविध भागांचा दौरा करून मतदान केंद्रांना भेटी दिल्या. तसेच मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांशी संवाद साधून कामाचा आढावा घेतला. फॉर्म वितरणाचे काम जवळपास पूर्णत्वास आले आहे. या कामगिरीच्या जोरावर अकोला जिल्ह्याने राज्यातील क्रमवारीत पहिल्या पाच जिल्ह्यांमध्ये स्थान मिळविले आहे. मतदारसंघनिहाय प्रगतीचा विचार करता, मूर्तिजापूर विधानसभा मतदारसंघात ९९.२८ टक्के फॉर्म वितरण आणि ७८.४० टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे. अकोट मतदारसंघात ९९.९८ टक्के फॉर्म वितरण आणि ७०.५५ टक्के डिजिटायझेशन झाले आहे. तर बाळापूर मतदारसंघात अनुक्रमे ९९.६० टक्के फॉर्म वितरण व ६४.२६ टक्के डिजिटायझेशन, अकोला पश्चिम मतदारसंघात ८६.६१ टक्के फॉर्म वितरण व ३९.३१ टक्के डिजिटाईझेशन, तर अकोला पूर्व मतदारसंघात ९९.२० टक्के फॉर्म वितरण व ६१.३९ टक्के डिजिटायझेशन पूर्ण झाले आहे.0
0
Report
पेपर लीक मामले में अब नया कानून, दोषी किसी हालत में बख्शे नहीं जाएंगे
Mumbai, Maharashtra:एकनाथ शिंदे शिवसेनेचे नेते आपला वाढदिवस समाज उपक्रम राबवून साजरे करत असतात रामदास कदम यांच्या वाढदिवसानिमित्त सिद्धेश कदम यांनी शासन आपल्या दारी उपक्रम राबवला वीस हजार पेक्षा अधिक लोकांना याचा लाभ झाला पेपर लीक होणं ही दुर्दैवी घटना याचे गांभीर्य पंतप्रधानांनी घेतलं पेपर लीग करणारे सर्व आरोपी अटक आहेत सीबीआय त्याची चौकशी करत आहे उद्या यावर नवा कायदा येईल यात दोषी असणारा कोणीही सुटणार नाही धर्मेंद्र प्रधान यांनी देखील आपले नैतिकता समजून राजीनामा दिला आहे विद्यार्थ्यांचा आंदोलन हे नॉन पोलिटिकल होत काही लोकांनी ते राजकीय आंदोलन केलं काही लोक जंतर-मंतरवर न जाता प्रधानमंत्री यांच्या निवासस्थानावर गेले पंतप्रधानांचे घर हे हाय सिक्युरिटी झोन मध्ये येतं इंदिरा गांधीजींची हत्या झाल्यानंतर एसपीजीने विशेष कायदा केला पंतप्रधानांच्या घराच्या परिसरात आंदोलन करण्यास बंदी असताना देखील राहुल गांधींनी तिथे हजारो लाखो लोकांना बोलावलं पंतप्रधानांच्या घरात घोषणा मोठा घातपात करणे त्यांची मनशा होती नेहमी म्हणतात बांगलादेश होईल नेपाळ होईल श्रीलंका होईल देशात अराजकता पसरवण्याचा त्यांचा उद्देश आहे यापूर्वी देखील देशाने दोन पंतप्रधान गमावले आहेत आंदोलन जंतर मंतरवर असताना ते पंतप्रधान आवास आकडे लाखो लोकांना बोलवत होते त्यांचा दुष्ट हेतू होता त्याचा मी कठोर शब्दात निषेध करतो महाराष्ट्रातील काही लोकांना जनतेने नाकारला आहे (ठाकरे बंधूंवर) ते पेटवा पेटवीची भाषा करत होते आता आग लागलेली आहे भिजून देऊ नका त्यांचा असं झालं बेगाने शादी मे अब्दुल्ला दिवाना (ठाकरेंना टोल) विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत त्यांचा आंदोलन यशस्वी झालंय त्यामुळे त्यांचे दुष्ट हेतू असफल ठरले आहेत विद्यार्थ्यांनी आपल्या व्यासपीठाचा राजकीय वापर होऊ देऊ नये0
0
Report
Advertisement
ठाकरे बंधुवर्ग के बीच मुलाकातों की चर्चाओं में मातोश्री की भूमिका सामने
Mumbai, Maharashtra:रामदास कदम ठाकरे बंधू शेजारच्या घरात मुल झालं म्हणून हे पेढे वाटत आहेत उद्धव ठाकरे एक वेळ होती मातोश्रीवर मोठे मोठे व्यक्ती यायचे केजरीवालांना भेटत आहे राहुल गांधी यांनी यांना वेळ दिली नाही हुकूम शाह तुम्ही आहात; मोदी हुकूम शाह असते तर धर्मेंद्र प्रधान यांचं राजीनामा घेतला नसता0
0
Report
गडकरी के बयान पर सियासी घमासान, विपक्ष ने सवाल उठाए
Mumbai, Maharashtra:सचिन अहिर दुर्दैवी आहे वरात कुणाची घोडा कोणाचा आणि बसतोय कोण याचा श्रेय झेनझिनचा आहे दुसरा श्रेय सरकारने ही गोष्ट मान्य केली मोठी गोष्ट आहे तुम्ही त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने नाव ठेवत होते हीच लोकशाही आहे लोकशाही संपली आहे लोकशाही दोन्ही बाजूने दाखवली आहे नाहीच केलं असतं तर त्यांचा प्रश्न रास्त राहील असतं काही लोक असं दाखवत आहेत आमच्यामुळेच राजीनामा झाला आहे झेंझि लीडर नी सांगितलं मला श्रेय देऊ नका. हे श्रेय लोकांचा आहे शिक्षण क्षेत्रात कमतरता आहे केंद्र सरकार राज्य सरकारने बदल करान सकारात्मक बाब आहे काही लोक राजकीय भांडवल करत आहेत झेंझि हुशार आहे त्यांना माहित आहे कोण वापर करतोय कोण गैरवापर करत आहे विजय मेळावा केला त्याला जास्त काही महत्त्व राहणार नाही जास्त काही टिकणार नाही ऑन नितीन गडकरी काल पर्यंत कौतुक करत होते आज अचानक बोलाव लागलं विरोधक म्हणून बोलाव लागत नंतर फोन वर त्यांच्याशी बोलून मी का बोलो का बोलू नये असे होता कामा नये युती मध्ये असताना चांगला मंत्री म्हणून कौतुक करायचं परिस्थिती नुसार आपण टीका करायला गेलो तर त्यांच्या चांगल्या कामाला अन्याय होईल सर्व खासदारांना माहिती नितीन गडकरी यांच्या सारखा काम कोणीच करू शकत नाही0
0
Report
शिंदे का व्यापक आश्वासन: शिफ्टिंग पीड़ितों के लिए फॉर्म भरवाने की गारंटी
Mumbai, Maharashtra:SIR च्या माध्यमातून शिफ्टिंग झालेले लोक आहेत ज्याची घरे तुटली आहेत भाडयाने गेली आहेत दुसरीकडे त्यांची फॉर्म भरून घेत नाही आहेत त्यांना मतदानापासून वंचित करणार का अजिबात तसं होणार नाही मी त्यांना इन्स्ट्रक्शन देतो त्या लोकांचे सुधा फॉर्म भरले जातील आश्वासन एकनाथ शिंदे यांनी दिले आहे हा विद्यार्थ्यांचा विजय आहे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाचा विजय आहे त्यांचं श्रेय त्यांनाच दिले पाहिजे0
0
Report
Advertisement
NRC की धंसती सुरक्षा दीवार से रिक्षा पर गिरावट, चालक घायल अस्पताल में भर्ती
Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील आंबिवली स्टेशन रोड ते बल्याणी दरम्यान NRC कंपनीची संरक्षक भिंत रस्त्यावर धावणाऱ्या रिक्षावर कोसळली रिक्षा चालक किरکوळ जखमी रिक्षाचे नुकसान शिवसेना ठाकरे गटाच्या नगरसेविका तेजश्री गायकवाड यांनी जखमी रिक्षाचालकाला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलं NRC कंपनीच्या धोकादायक संरक्षक भिंतीचा प्रश्न ऐरणीवर0
0
Report
विखे पाटील ने ठाकरे बंधूंवर प्रहार, कहा—उनका राजनीतिक अस्तित्व खत्म
Satara, Maharashtra:कराड : मुंबईतील ठाकरे बंधूंच्या जल्लोष सभेनंतर राज्यातील राजकारण चांगलंच तापलं आहे. ठाकरे बंधूंनी केलेल्या टीकेला आता राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी कराडमधून जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. "ठाकरे बंधूंच्याच झिंज्या लोकांनी उपटल्या आहेत," असा घणाघात विखे पाटील यांनी केला. कराडमध्ये माध्यमांशी संवाद साधताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी ठाकरे बंधूंवर सडकून टीका केली. "ठाकरे बंधूंचं राजकीय अस्तित्व आता संपलं आहे. सध्या त्यांची ही अस्तित्वाची लढाई सुरू आहे. महाराष्ट्रासह मुंबईतील जनतेने त्यांना नाकारलं आहे. त्यांच्या झिंज्या लोकांनीच यापूर्वी उपटल्या आहेत. त्यामुळे अशा प्रकारची भाषा त्यांच्या तोंडी शोभत नाही," असा टोला विखे पाटील यांनी लगावला.दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली दौऱ्याबाबत विचारलेल्या प्रश्नावर मात्र विखे पाटील यांनी प्रतिक्रिया देणं टाळलं.0
0
Report
करमाळा के चिखलठाण में आठ किसानों ने बिजली हेतु आमरण अनशन शुरू किया
Pandharpur, Maharashtra:करमाळा तालुक्यातील चिखलठाण येथे आठ शेतकऱ्यांचे विजेसाठी आमरण उपोषण सुरू उजनी काठच्या धरणग्रस्त शेतकऱ्यांचा शेतीचा नियमित आठ तास वीज पुरवठा सोडण्यासाठी आमरण उपोषण सुरू मागणी मान्य न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा उपोषणकर्त्यांच्या इशारा0
0
Report
Advertisement
