445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पंढरपूर कॉरिडोर विकास से पर्यटन और रोजगार को मिलेगी नई गति
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत भाजप सह सर्वपक्षीय नगरसेवकांनी कॉरिडॉर ठरावाला मंजुरी देण्याचा विरोध केल्यानंतर बहु चर्चित पंढरपूर अतिरिक्त क्षेत्र कॉरिडॉर बद्दल ग्रामविकास मंत्री आणि सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी एक सूचक पोस्ट केली आहे त्यामुळे भविष्यात कॉरिडॉर प्रकल्पाला गती देण्याच्या स्पष्ट संकेत त्यांच्या पोस्ट मधून दिसत आहेत. त्यामुळे नगरपालिकेतून विरोध झाला तरी कॉरिडॉर होणार हे आता स्पष्ट आहे विकसित महाराष्ट्राच्या दिशेने ऐतिहासिक पाऊल! पंढरपूर हे कोट्यवधी वारकऱ्यांच्या श्रद्धेचे आणि भक्तीचे पवित्र केंद्र आहे. या पवित्र भूमीचा विकास करताना वारकरी परंपरा, संस्कृती आणि अध्यात्माचा गाभा जपत, भविष्यातील गरजा लक्षात घेऊन ₹४,१५०.४६ कोटींचा सर्वसमावेशक पंढरपूर कॉरिडॉर विकास आराखडा साकारला जात आहे. याआराखड्यांतर्गत आधुनिक पायाभूत सुविधा, स्कायवॉक, चंद्रभागा घाटांचा विकास, वारकऱ्यांसाठी अधिक दर्जेदार सुविधा आणि तीर्थक्षेत्राचे नियोजनबद्ध सुशोभीकरण यावर विशेष भर देण्यात आला आहे. हा विकास केवळ पायाभूत सुविधांपुरता मर्यादित नसून, स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणे, पर्यटनाला बळकटी देणे आणि रोजगाराच्या नव्या संधी निर्माण करणे, हे देखील या प्रकल्पाचे महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. श्रद्धेचा सन्मान, परंपरेचे जतन आणि विकासाची नवी दिशा यांचा समतोल साधत पंढरपूरला जागतिक दर्जाच्या तीर्थक्षेत्राच्या दिशेने नेण्याचा हा महत्त्वाकांक्षी संकल्प आहे.0
0
Report
पुणे मेगा ब्लॉक से त्योहार के दौरान कई ट्रेनें रद्द, इंटरसिटी समेत एक्सप्रेस मार्ग बदले
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवासात विघ्न, हुतात्मा, सिद्धेश्वर, इंटरसिटी गाड्या काही दिवस रद्द - ऐन उत्सवाच्या काळात रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बॅड न्यूज - पुण्यातील मेगाब्लॉकचा हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा फटका - 19 सप्टेंबर ते 4 ऑक्टोबरच्या दरम्यान पुण्यातील मेगाब्लॉकमुळे हुतात्मा एक्सप्रेस, सिद्धेश्वर एक्सप्रेस आणि इंटरसिटी काही दिवस रद्द - हडपसर ते घोरपडी दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाचे काम सुरू असल्याने घेण्यात आला मोठा निर्णय - तब्बल 42 रेल्वे गाड्या रद्द तर 25 रेल्वे गाड्यांच्या मार्गात बदल0
0
Report
विरार में सुरक्षा रक्षक ने राज ठाकरे के खिलाफ अपशब्द बोले; मामला जांच में
Vasai-Virar, Maharashtra:राज ठाकरेंविरोधात अपशब्द; मनसे कार्यकर्त्याने सुरक्षा रक्षकाला सुनावले विरार पश्चिम येथील म्हाडा वसाहतीत देव व्यास नावाच्या सुरक्षा रक्षकाने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात अपशब्द वापरल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेचा संपूर्ण प्रकार मोबाईल कॅमेऱ्यात चित्रीत झाला असून, संबंधित व्हिडिओ सध्या चर्चेत आहे. ही बाब समोर आल्यानंतर मनसेचे विरार शहर सचिव जय जैतापकर यांनी संबंधित इमारतीत जाऊन सुरक्षा रक्षकाला चांगलेच धारेवर धरले. राज ठाकरे यांच्याबाबत अशा प्रकारे अपशब्द वापरणे खपवून घेतले जाणार नाही, असा इशारा देत त्यांनी सुरक्षा रक्षकाला चांगलाच दम दिला व माफी मागायला लावली... सध्या संबंधित सुरक्षारक्षकावर शिस्तभंगाची कारवाई करण्यात आली असून त्याला कामावरून काढण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
बुलढ़ाणा में सूखा गहरा रहा है; किसानों ने कोरडा दुष्काळ घोषित करने की मांग की
Buldhana, Maharashtra:पावसाने पाठ फिरवला, पिकांनी मान टाकली! बुलढाण्यावर दुष्काळाचं सावट; शेतकऱ्यांची कोरड्या दुष्काळाची मागणी पावसाने पाठ फिरवल्याने संपूर्ण राज्यावर आता दुष्काळाचं सावट गडद होताना दिसतंय... डौलाने उभी असलेली पिकं आता पाण्याअभावी माना टाकू लागली आहेत... सोयाबीन आणि कापसाचा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुलढाणा जिल्ह्यातही परिस्थिती गंभीर बनली आहे. पावसाने दडी मारल्याने शेतातील पिकं सुकू लागली असून, शेतकऱ्यांसमोर मोठं संकट उभं ठाकलं आहे. हातातोंडाशी आलेलं पीक पाण्याअभावी वाया जाण्याची भीती असल्याने हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी आता सरकारकडे कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. नेमकी काय आहे शेतकऱ्यांची व्यथा? आणि पावसाअभावी बुलढाण्यात शेतीची परिस्थिती किती गंभीर झाली आहे? जाणून घेतली आहे आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी0
0
Report
अमरावती में बारिश नहीं, सोयाबीन फसल भारी नुकसान का खतरा
Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात पावसाचा अभाव सोयाबीन उत्पादक शेतकर्यांसमोर मोठे संकट बनला आहे. खरीप हंगामात जिल्ह्यात सर्वाधिक सोयाबीन लागवड असली तरी पावसाने उघडीक दिल्यानंतर पेरणीच्या फील्ड्सवर अडचण आली आहे. पीक बहरात आल्यानंतर पावसाने दडी मारल्याने शेंगा भरल्या नाहीत, ज्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. भातकูลि तालुक्यातही स्थिती इतकी गंभीर झाली आहे की काही शेतकर्यांनी शेतात बैलचारण्यास सुरुवात केली आहे. जिल्ह्यातील इतर तालुक्यांमध्येही अशीच परिस्थिती निर्माण होण्याची भीती व्यक्त होत आहे. पेरणीसाठी बँका- सावकारांकडून घेतलेल्या कर्जाच्या फेडीच्या प्रश्नाने शेतकर्यांची काळजी वाढवली आहे. शासनाने तातडीने परिस्थितीची पाहणी करून पंचनामे करावेत आणि शेतकर्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे.0
0
Report
वाशीम के मंगरुळपीर तालुक़े दाभा में ग्रामीणों ने चोरों को पकड़ लिया; पुलिस गश्त बढ़ाने की मांग
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम के मंगरुळपीर तालुक़े दाभा में ग्रामीणों ने चोरों को पकड़ लिया तथा चोरी के उद्देश्य से आए चोरों को गाँव वालों ने देखते ही उनका पीछा शुरू कर दिया। गाँव वालों के पीछा करते देख चोरों ने भाग खड़े हुए। इसके बाद क्षेत्र में बढ़ती चोरी की घटनाओं के प्रष्ठभूमि पर पुलिस ने रात की गश्त और पेट्रोलिंग बढ़ाने की मांग गांव वालों ने की है।0
0
Report
Advertisement
उदयनराजे भोसले ने जल मंदिर पैलेस में दहीहंडी फोड़कर परंपरा निभाई
Satara, Maharashtra:सातारा शहरात श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या सप्ताह निमित्ताने छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट १३वे वंशज खा.उदयनराजे भोसले यांनी जलमंदिर पॅलेस येथे निवासस्थानी पारंपरिक दहीहंडी फोडली. आठवडाभर चालणाऱ्या या उत्सवाचा एक भाग म्हणून आयोजित या सोहळ्यात राजघराण्यातील परंपरा कायम राखत त्यांनी हंडी फोडल्याने उपस्थितांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळाला. यावेळी साताऱ्यातील कार्यकर्ते उपस्थित होते.0
0
Report
बुलढाणा में भाजपा नगरसेवक पर तलवार से हमला करने की कोशिश—सीसीटीवी फुटेज जारी
Buldhana, Maharashtra:बुलढाण्यात भाजप नगरसेवकावर तलवारीने हल्ल्याचा प्रयत्न! सीसीटीव्हीत हल्लेखोर पळतानाचा व्हिडिओ नगरसेवक आकाश दळवीची बुलढाणा पोलिसांत तक्रार अँकर - बुलढाण्यातील भाजपचे नगरसेवक आकाश दळवी यांच्यावर तलवारीने हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचा आरोप होत आहे. ८ सप्टेंबरच्या रात्री ९ वाजता शहरातील कारंजा चौक परिसरात ही घटना घडलीय. हल्लेखोरच्या हातात तलवार असून तो पळतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली असून, दळवी यांच्यासोबत शिवीगाळ, मारहाण, धमकी तसेच शस्त्र दाखवून दहशत निर्माण करण्याचा प्रकार घडल्याचा आरोप करण्यात आला आहे. निखिल शर्मा, आर्यन निखिल शर्मा व वंश निखिल शर्मा यांनी शिवीगाळ करून हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याचे तक्रारीत म्हटले आहे.0
0
Report
बुलढाणा जिला केंद्रीय सहकारी बँक के अध्यक्ष डॉ. राजेंद्र शिंगणे निर्वाचित
Buldhana, Maharashtra:बुलढ़ाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी डॉ. राजेंद्र शिंगणे उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड; तब्बल १६ वर्षानंतर बँकेची निवडणूक तब्बल १६ वर्षानंतर झालेल्या बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या निवडणुकीनंतर आज अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवड करण्यात आली. माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांची बँकेच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून, उपाध्यक्षपदी गोविंद मिरगे यांची निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेच्या २१ संचालकांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली. यापैकी १२ संचालक बिनविरोध निवडून आले होते. यामध्ये केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री आकाश फुंडकर, माजी मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि आमदार संजय गायकवाड यांच्यासह प्रमुख नेत्यांचा समावेश होता. तर उर्वरित ९ जागांसाठी प्रत्यक्ष मतदान पार पडलं. या निवडणुकीत सहकार पॅनलने ७ जागांवर विजय मिळवत आपलं वर्चस्व सिद्ध केलं, तर शेतकरी परिवर्तन पॅनलला अवघ्या २ जागांवर समाधान मानावं लागलं. दरम्यान, आज झालेल्या निवडीत डॉ. राजेंद्र शिंगणे यांच्या नावावर अध्यक्षपदासाठी शिक्कामोर्तब करण्यात आलं. विशेष म्हणजे, बुलढाणा जिल्हा केंद्रीय सहकारी बँकेच्या ६५ वर्षांच्या इतिहासात शिंगणे परिवाराकडे तब्बल ३१ वर्षे सत्तेची धुरा राहिली आहे. बाईट : डॉ. राजेंद्र शिंगणे — नवनिर्वाचित अध्यक्ष0
0
Report
Advertisement
जगतलाई आश्रम सर्पदंश मामले में संस्थापक समेत तीन की अटकपूर्व जमानत याचिका नागपुर खंडपीठ ने खारिज
Nagpur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील जपतलाई आश्रमशाळेतील सर्पदंश आणि त्यामुळे तीन मुलींच्या मृत्यू प्रकरणी आरोप लागलेले जपतलाई आश्रम शाळेचे संस्थाचालक आणि गडचिरोलीचे माजी खासदार मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा व संस्थेचे सचिव विश्वजीत कोवासे, महिला वसतिगृहाची अधीक्षिका भाग्यश्री चिलमवार या तिघांना अटकपूर्व जामीन देण्यास नागपूर खंडपीठाने नकार दिले आहे.... तिघांनी वकिलांच्या माध्यमातून खंडपीठांसमोर अटकपूर्व जामीनासाठी अर्ज दाखल केले होते.. मात्र नागपूर खंडपीठाने त्यांच्या अर्ज गुणवत्ताहीन ठरवून फेटाळून लावले... * 10 ऑगस्ट 2026 रोजी जगतालाई आदिवासी आश्रम शाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थिनींच्या मृत्यूची घटना घडली होती.. * त्यानंतर शासनाने गंभीर दखल घेत आश्रम शाळेची मान्यता रद्द केली होती... * कर्तव्यात कसूर केल्याप्रकरणी संस्थाचालक आणि अधीक्षिकेविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता... * त्याच प्रकरणी अटकपूर्व जामीन घेऊ पाहणाऱ्या मारोतराव कोवासे, त्यांचा मुलगा आणि वसतिगृह अधीक्षिका यांचे अटकपूर्व जामीन अर्ज नागपूर खंडपीठाने फेटाळून लावले आहे...0
0
Report
पर्यूषण के दौरान सेवेन स्क्वेअर अकॅडमी ने प्याज-लहसुन-बटाटा न लाने का आह्वान; मनसे ने किया आक्रामक रुख
Mira Bhayandar, Maharashtra:सेवन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सॲप ग्रुपवर पर्यूषण काळात कांदा, लसूण, बटाटा आणि बीट यांसारखे पदार्थ डब्यात न आणण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या मेसेजवरून मनसेने आक्रमक पवित्रा घेतला असून, विद्यार्थ्यांनी काय खावे हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल केला आहे. दरम्यान, शाळेतर्फे कोणतीही सक्ती करण्यात आलेली नसून, केवळ पालकांना विनंती करण्यात आल्याचे आमदार नरेंद्र मेहता यांनी स्पष्ट केले आहे. मिरा रोड पूर्वेतील सेवेन स्क्वेअर अकॅडमी शाळेच्या पालकांच्या व्हॉट्सफ़ ् ग्रुपवर पर्यूषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर एक मेसेज पाठवण्यात आला आहे. या मेसेजमध्ये विद्यार्थ्यांनी डब्यात कांदा, लसूण, बटाटा, बीट यांसारखे कंदमूळ पदार्थ आणू नयेत, अशी पालकांना विनंती करण्यात आली आहे. तसेच, पर्यूषण काळात शाळेच्या कॅन्टीनमध्येही कांदा, लसूण आणि बटाट्याशिवाय खाद्यपदार्थ देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. काही पालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर हा मेसेज मनसेचे सचिन पोपळे यांना पाठवला. त्यानंतर मनसेने या आवाहनावर आक्षेप घेतला आहे. मराठी माणसांची मुलं आणि विद्यार्थी काय खाणार, हे ठरवणारे शाळा कोण, असा सवाल सचिन पोपळे यांनी उपस्थित केला. ही शाळा स्थानिक आमदार नरेंद्र मेहता यांची असल्याचा दावा करत, उद्या एखाद्या मराठी उद्योजकाने शाळा सुरू केली आणि गटारीच्या वेळी विद्यार्थ्यांना चिकन, मटण आणि अंडी आणण्यास सांगितले, तर ते मान्य केले जाईल का, असा प्रश्नही मनसेकडून उपस्थित करण्यात आला. दरम्यान, आमदार नरेंद्र मेहता यांनी या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना शाळेतर्फे कोणत्याही प्रकारची सक्ती करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट केले. पर्यूषण हा पवित्र काळ असून, या काळात पशू आणि प्राण्यांवर अन्याय होऊ नये, त्यांची कत्तल होऊ नये, या उद्देशाने पालकांना केवळ विनंती करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच शाळेकडून व्हॉट्सअप ग्रुप मध्ये पाठवण्यात आलेल्या मेसेज मध्ये आम्ही विनंती केली आहे. कुठल्याही प्रकारची आम्ही सक्ती केलेली नाही असे त्याने स्पष्ट केले. या प्रकरणात दुसरा कोणताही उद्देश नसून, यामध्ये राजकारण करू नये, असे आवाहनही नरेंद्र मेहता यांनी केले आहे.0
0
Report
माध्यमिक शिक्षा मंडळ ने 2027 दहावी-बारावी परीक्षा केंद्रों की पुनर्रचना और कड़ाई तेज की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून फेब्रुवारी-मार्च २०२७ मधील दहावी, बारावी परीक्षेसाठी केंद्रांची पुनर्रचना केली जात आहे. विभागीय मंडळाकडून परीक्षा केंद्रांच्या प्रत्यक्ष तपासणीनंतर जिल्हानिहाय केंद्रांचा आढावा घेतला जात आहे. यामध्ये गैरप्रकार आढळलेल्या केंद्रावरील कारवाई, पायाभूत सुविधा नसलेली परीक्षा केंद्रे बंद करणे, पर्यायी केंद्रांची निवड करणे आदींचा समावेश आहे. शिक्षण मंडळाकडून दहावी, बारावी परीक्षेदरम्यान गैरप्रकार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येतात. परीक्षा केंद्रांवरील पायाभूत सुविधांबाबत मंडळाची नियमावली, निकष आहे. परंतु, त्याकडे बहुतांशी केंद्रांवर दुर्लक्ष होते.. विभागातील पाच जिल्ह्यांत ११०० परीक्षा केंद्रे आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसह केंद्रांवरील पायाभूत सुविधांवरही मंडळाकडून भर दिला जात असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मागील परीक्षेत ज्या केंद्रांवर कॉपीचे गैरप्रकार आढळले ती रद्द करणे, पर्यायी केंद्र निश्चित करणे यावरही काम सुरू आहे. गेल्या वर्षी कारवाईत ५१ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत. १०३ अधिकारी, कर्मचाऱ्यांना निलंबित केले आहे. तसेच विभागीय शिक्षण मंडळात २४ जणांवर गुन्हे दाखल केले असून गैरप्रकारातील केंद्रे रद्द करण्यात आली होती.0
0
Report
Advertisement
गोंदिया के पुलिस कप्तान के घर 8 फुट सांप सर्प मित्र ने रेस्क्यू कर छोड़ा
Bhandara, Maharashtra:पोलिस अधिक्षक यांच्या घरी निघाला 8 फुटाचा साप.... सर्प मित्राने सापाचा रेस्क्यू करू जंगलात सोडले... गोंदिया जिल्ह्याचे पोलिस निरीक्षक गोरख भामरे यांच्या घरी 8 फीट लांबीचा धामण (रेट स्नेक) निघाल्याने एकच खळबळ उडाली तर याची माहिती पोलिस कर्मचाऱ्यांनी तत्काळ सर्प मित्र बंटी शर्मा यांना पाचारण करण्यात आले. सर्प मित्र बंटी यांनी मोठ्या शिफातीने सापाच्या रेस्क्यू केला व त्याला पकडून गोंदिया शहरातील बाहेर दहेगाव जंगलात त्या सापाला निसर्गाच्या सुखरूप सोडण्यात आले. तो पोलिस अधिक्षक यांच्या घरावर तैनात असलेल्या पोलिसांनी सर्प मित्र यांचा आभार मानले..0
0
Report
छत्रपति संभाजी नगर महापालिका: 25 नगरसेवक अपात्रता याचिका पर सुनवाई तेज, अगली तारीख जल्द तय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालिकेच्या २५ नगरसेवकांविरुद्ध दाखल ३८ अपात्रता याचिकांवर मनपा प्रशासनासमोर सुनावणीचे सत्र सुरूच आहे. मुंबई महानगरपालिकेत अशाच प्रकरणांत जलदगतीने निर्णय झाल्याने छत्रपती संभाजीनगरातील तक्रारदारांनीही आपला पाठपुरावा अधिक तीव्र केला आहे. केवळ तारखांवर तारखा न देता या प्रकरणांचा निकाल कधी लागणार, असा थेट सवाल तक्रारदारांकडून उपस्थित केला जात आहे. या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी स्पष्ट केले की, येत्या दोन ते तीन दिवसांत संबंधित नगरसेवक व तक्रारदारांना पुढील सुनावणीची निश्चित तारीख कळवण्यात येईल. दोनपेक्षा जास्त अपत्ये असणे, अतिक्रमण, अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणाला प्रोत्साहन दिल्याप्रकरणी दाखल गुन्हे अशा विविध कारणांवरून हे २५ नगरसेवक अपात्रतेच्या फेऱ्यात अडकले आहेत. या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात मोठी अस्वस्थता पसरली आहे.0
0
Report
विदर्भ में तान्हा पोळा पर लकड़ी के बैलों की शोहरत महंगाई से प्रभावित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरसह विदर्भात बैल पोळ्याच्या दुसर्या दिवशी प्रचंड उत्साहात साजरा होतो तान्हा पोळा, या दिवशी लाकडी बैलांची पूजा करून परिसरातल्या मंदिरात सजवलेल्या लाकडी बैलांसह निघते मिरवणूक, घराघरातून बच्चेकंपनी उत्साहात सजावट स्पर्धेत होतात सहभागी, मात्र महागाईमुळे कमी ग्राहकीने लाकडी बैल विक्रेते नाराज बाईट १) ,२),३) लाकडी बैल विक्रेते आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
