icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भारत की पहली डिजिटल जनगणना: नागरिक स्व-गणना पर मंत्री भुसे का आग्रह

Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - मंत्री दादा भुसे यांनी परिवारासह स्व-गणना करत राष्ट्र हिताचे कामात सक्रिय योगदान द्यावे.... - शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी केले आवाहन. Anc: केंद्र शासनाने भारताची १६वी जनगणना, २०२७ चा कार्यक्रम जाहीर केला असून यावेळी होणारी जनगणना ही भारत शासनाची पहिली डिजीटल जनगणना असणार आहे. ज्यात दोन मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा घरयादी व घरगणना हा असणार आहे. १) स्व गणना:- दि.०१ मे, २०२६ पासुन दि.१५ मे, २०२६ या कालावधीत म. शासनाने नागरिकांना स्वगणना करणेसाठी सुविधा उपलब्ध करुन दिलेली आहे. ज्यात नागरिकांनी आपली व आपल्या कुटुंबाची माहिती म. शासनाचे संकेतस्थळ se.census.gov.in वर स्वतः प्रविष्ट करावयाची आहे. यात आपणास आपले कुटुंबातील कोणताही एक मोबाईल क्रमांक वापरुन OTP व्दारे लॉगईन करता येईल. आवश्यक माहिती प्रविष्ट करुन तुमच्या घराचे स्थान डिजिटल नकाशावर चिन्हांकित करावयाचे आहे आणि त्यानंतर कुटुंबाशी संबंधत माहिती प्रविष्ट करावयाची आहे. सर्व माहिती भरल्यानंतर सबमिट करावे. त्यानंतर आपणास १२ आकडी SE ID मिळेल. सदर SE ID जपुन ठेवावा आणि ज्यावेळी मनपाचे नियुक्त प्रगणक माहितीची पडताळणी करणेसाठी भेट देतील त्यावेळी SE ID त्यांस द्यावा. यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी स्वतः देखील स्व गणना करून आपले राष्ट्रीय कार्य पूर्ण केले. स्वगणना केली नसेल तरीही मनपाचे नियुक्त प्रगणक आपले घरी येऊन जनगणनेची प्रक्रिया पुर्ण करतील याची नोंद घ्यावी. जनगणना हे राष्ट्रीय कर्तव्य असुन यात प्रत्येक नागरिकाने सहभाग नोंदवुन आपली जबाबदारी पार पाडावी.
0
0
Report

कटेपूर्णा अभयारण्य में टैंकर से जलसंकट दूर, कृत्रिम पानवठे बनाए गए

Washim, Maharashtra:कटेपूर्णा अभयारण्य मध्ये वाढत्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर वन विभागाने वन्यजीवांसाठी विशेष उपाययोजना केल्या आहेत. कडक उन्हाळ्यामुळे नैसर्गिक पाणवठे आटण्याची शक्यता निर्माण झाल्याने अभयारण्यात टँकरद्वारे पाण्याचा पुरवठा वाढवण्यात आला आहे. वन विभागाकडून विविध भागात शेकडो कृत्रिम पानवठे तयार करण्यात आले असून त्यामध्ये नियमितपणे पाणी भरले जात आहे. दर तीन ते चार दिवसांनी टँकरने पाणीपुरवठा करून कोणताही पाणवठा कोरडा पडू नये याची दक्षता घेतली जात आहे. दुर्गम भागातही प्रखर उन्हात पाणी मिळत असल्याने हरण, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या वन्यजीवांना याचा फायदा होत आहे.
0
0
Report

वसई के राजवाड़ी समुद्र तट पर दुर्लभ डॉल्फिन मृत पाई गई

Vasai-Virar, Maharashtra:वसईतील राजवाडी समुद्र किनाऱ्यावर आज दुर्मिळ जातीचा डॉल्फिन मासा मृत अवस्थेत आढळून आला आहे मिळालेल्या माहितीनुसार, भरतीच्या पाण्यामुळे हा डॉल्फिन किनाऱ्यावर वाहण्यात आला. आज दुपारच्या सुमारास किनाऱ्यावर फिरणाऱ्या गावकऱ्यांना हा मोठ्या आकाराचा मासा दिसून आला आणि त्यांनी तात्काळ याची माहिती स्थानिक प्रशासनाला दिली. या मृत डॉल्फिनची लांबी अंदाजे ८ ते १० फूट असून रुंदी सुमारे ३ फूट आहे. दरम्यान, बोटीचा धक्का लागल्यामुळे या डॉल्फिनचा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता स्थानिकांकडून व्यक्त केली जात आहे. मात्र, नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, गावकऱ्यांच्या मदतीने या मृत डॉल्फिनला किनाऱ्यावरच पुरण्याची तयारी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे सागरी जीवांच्या सुरक्षिततेबाबत पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित झाला आहे. संबंधित यंत्रणांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

तुळजापुर में माता तुळजाभवानी के मंदिर में नगारा अर्पण उत्साह के साथ हुआ

Dharashiv, Maharashtra:तुळजापुरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात; आई तुळजाभवानीच्या जयघोषाने परिसर दुमदुमला धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूरमध्ये महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीच्या मंदिरात नगारा अर्पण सोहळा उत्साहात पार पडला. तुळजाभवानी पक्षाळ मंडळाच्या वतीने काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत “आई राजा उदो उदो” च्या जयघोषात नगारा मंदिरात आणण्यात आला. रात्री धूप आरतीच्या वेळी मुख्य महंत तुकोजी बुवा आणि पुजाऱ्यांच्या उपस्थितीत नगारा देवीला अर्पण करण्यात आला. परंपरेनुसार धूप आरतीदरम्यान नगारा वाजवण्याची परंपरा आजही कायम राखली जात आहे.
0
0
Report
Advertisement

नसरापूर में तीन साल की बच्ची के साथ सामूहिक दुष्कर्म-हत्या पर ब्राह्मण समाज का विरोध, कठोर सजा की मांग

Lasalgaon, Maharashtra:पुणेच्या भोर तालुक्यातील नसरापूर येथे तीन वर्षीय चिमुकलीवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या या अमानुष घटनेच्या निषेधार्थ लासलगाव येथे अखिल भारतीय ब्राह्मण समाजाचा संताप झाला असून लासलगाव पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक दीपक पाटील यांना निवेदन देत यावेळी आरोपीविरुद्ध जलद गती न्यायालयात खटला चालवून कठोरातील कठोर शिक्षा करावी तसेच यावेळी बोलतांना छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात गुन्हेगारांना ज्या प्रकारे कठोर शिक्षा दिली जात होती, त्याच धर्तीवर आरोपीला भर चौकात फाशीची कठोर शिक्षा देण्यात यावी, अशी मागणी महिला वर्गाने केली
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के दाभोळ खाड़ी में केरला जैसी बैकवॉटर हाउसबोट सेवा शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दाभोळखाडीत केरळच्या धर्तीवर हाऊस बोट सुरू अँकर रत्नागिरी जिल्ह्यातील ऐतिहासिक दाभोळ खाडीला आता पर्यटनाचा नवा आयाम मिळालाय. केरळच्या धर्तीवर विस्तीर्ण बॅकवॉटरचा वापर करत हाऊसबोट सेवा सुरू करण्यात आली असून, या हाऊसबोटीचा लोकार्पण सोहळा राज्याचे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या हस्ते दाभोळ धक्क्यावर पार पडला. सिंधुरत्न समृद्धी योजना, जिल्हा परिषद रत्नागिरी आणि उमेद अभियानाच्या माध्यमातून महिला बचत गटांना हाऊसबोट उपलब्ध करून देण्यात आली आहे. यामुळे महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणाला चालना मिळणार असून, स्थानिकांना रोजगाराच्या नव्या संधी निर्माण होणार आहेत. दाभोळ खाडी आता पर्यटन नकाशावर अधिक ठळकपणे झळकणार आहे.
0
0
Report

यवला के गोळी नदी किनारे सिद्धिविनायक गणेश मंदिर में अंगारकी चतुर्थी पर भक्तों की भीड़

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील गोळी नदीच्या तीरावर ती इच्छापूर्ती सिद्धिविनायक गणेशाचे भव्य दिव्य मंदिर असून या मंदिरात प्रत्येक चतुर्थीला भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते. आज अंगारकी चतुर्थी निमित्ताने भाविकांनी पहाटेपासूनच दर्शनासाठी ही गर्दी केली असून इच्छा पूर्ण करणारा उजव्या सोंडेचा गणपती म्हणून देशमाने येथील गणपती राज्यभरात प्रसिद्ध आहे. नवस फेडण्यासाठी भाविक अंगारकी चतुर्थीला दर्शनासाठी गर्दी करत असतात याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

अष्टविनायक ओझर में अंगारक चतुर्थी की रौनक, फूलों से सजाया गया मंदिर गाभारा

Barav, Maharashtra:अष्टविनायक ओझरची विघ्नहार नगरी आज अंगारक चतुर्थी निमित्त भाविक भक्तातील फुलली असून पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केलीय ,या वर्षातील ही पहिली अंगारक चतुर्थी असून चतुर्थी निमित्त लाडक्या बाप्पाचा गाभारा आकर्षक अशा विविधरंगी फुलांनी सजविण्यात आला असून गणरायाला आंबे पेरूचा महानैवद्य हि दाखवण्यात आलाय,विघ्नहराला सुवर्ण अलंकार हि परिधान करण्यात आले असून लाडक्या बाप्पाचे रूप विलोभनीय असंच दिसत आहे,वाढत्या तापमानापासून भाविकांचे रक्षन व्हावे यासाठी देवस्थान ने सभामंडपात फॉगर्स हि बसवलेत याचाच मंदिर गाभाय्रातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
0
Report

गणपतिपुले मंदिर में अंगारकी चौथी: भक्तों की भारी भीड़ और सुरक्षा इंतजाम

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांची गर्दी पहाटे 3.30 वाजल्यापासून श्रींचं दर्शन सुरू राज्याच्या कानाकोपऱ्यातून भाविकांची गणपतीपुळेत मोठी गर्दी दर्शनासाठी मंदिर प्रशासनाकडून चोख व्यवस्था नारळबागेत 37 दर्शन रांगा, पार्किंग परिसरात 9 रांगा आणि मंदिर व रेस्ट हाऊसच्या मधल्या भागात 3 रांगा अशा पद्धतीने भाविकांना दर्शनासाठी व्यवस्था रात्री 10.30 पर्यंत भाविकांना दर्शन घेता येणार दिवसभरात दीड लाख भाविक येण्याची शक्यता अंगारकी चतुर्थी निमित्त गणपतीपुळे मंदिरातून या साऱ्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top