Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Dec 28, 2025 18:01:48
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 28, 2025 17:12:21
Akola, Maharashtra:अकोला महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीत पुन्हा एकदा तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी काल सोशल मीडियावरून इशारा देत महायुतीत खळबळ उडवून दिली होती. त्यानंतर आज समेट घडवून आणण्यासाठी राज्यमंत्री इंद्रनील नाईक अकोल्यात दाखल झाले आहेत.महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सन्मानपूर्वक जागा वाटप झाले पाहिजे, अशी ठाम भूमिका राष्ट्रवादीकडून मांडण्यात आली आहे.कालपर्यंत २५ जागांची मागणी करणारे अमोल मिटकरी यांनी ३५ ते ४० जागांची मागणी केली आहे.सन्मानजनक जागा न मिळण्यास उद्या आमचा स्वतंत्र निर्णय जाहीर केला जाईल, असा स्पष्ट इशाराच आमदार अमोल मिटकरी यांनी दिला आहे."पहिला पर्याय महायुतीचाच आहे, मात्र तो यशस्वी ठरला नाही तर दुसरा पर्याय आमच्याकडे तयार आहे,” असेही त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, आज राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी आमदार अमोल मिटकरी यांच्या निवासस्थानी जवळपास एक तास बंदद्वार चर्चा केली. या चर्चेतून महायुतीत समेट होणार की तणाव अधिक वाढणार, याकडे संपूर्ण अकोल्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.तर महायुतीचा घटक पक्षांसोबत चर्चा करून उद्या अकरा वाजेपर्यंत निर्णय जाहीर करणार असल्याच इंद्रनील नाईक यांनी म्हंटल आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 28, 2025 16:31:01
Akola, Maharashtra:आगामी महानगरपालिका निवडणूकच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्या राजकीय हालचालींना वेग आला आहे. दोन्ही पक्षांची भूमिका जवळपास निश्चित मानली जात असून ही निवडणूक अत्यंत चुरशीची आणि निर्णायक ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राजकीय वर्तुळात या लढतीकडे मोठ्या राजकीय मुकाबल्याच्या रूपात पाहिले जात आहे. दरम्यान, अकोल्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) यांच्यातील युती जवळपास निश्चित झाल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. दोन्ही पक्ष संयुक्तपणे निवडणूक लढवण्याच्या रणनीतीवर सक्रियपणे काम करत असून याच पार्श्वभूमीवर आज एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीला दोन्ही पक्षांचे ज्येष्ठ आणि प्रमुख नेते उपस्थित होते. काँग्रेसकडून आमदार साजिद खान पठाण, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. झीशान हुसेन, महानगर अध्यक्ष डॉ. प्रशांत वानखडे सहभागी झाले होते. तर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) कडून जिल्हाध्यक्ष संग्राम गवांडे, महानगर अध्यक्ष रफीक सिद्दीकी, प्रदेश संघटन सचिव जावेद झकरिया हे नेते बैठकीला उपस्थित होते. या बैठकीत महानगरपालिका निवडणुकीची रणनीती, संघटन अधिककटीकरणाचे उपाय तसेच युतीअंतर्गत प्रभावी निवडणूक तयारी यावर सविस्तर चर्चा करण्यात आली. एकत्रितपणे निवडणूक मैदानात उतरण्याचा आणि जनतेशी संबंधित प्रश्नांना प्राधान्य देण्याचा संकल्प यावेळी नेत्यांनी व्यक्त केला. मात्र, एका प्रभागाबाबत अद्याप अंतिम सहमती झालेली नसल्याचे सांगण्यात आले. त्या प्रभागात लवकरच तोडगा निघेल, अशी अपेक्षा नेत्यांनी व्यक्त केली असून, अन्यथा तेथे मैत्रीपूर्ण लढतीची शक्यता असल्याचेही सूचित करण्यात आले. उदया सोबत सुद्धा बैठक पार पडणार असून यामध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणूक लढणार अशी घोषणा करण्यात येणार असल्याची शक्यता आहे. तर जागा वाटपा संदर्भात चर्चा सुद्धा उद्या होणार असल्याची शक्यता आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 15:33:14
Kalyan, Maharashtra:केडीएमसी निवडणुकीमध्ये आघाडीत बिघाडी.. काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षा वंचित सोबत आघाडी.. सेना उद्धव बाळासाहेब पक्ष् व मनसे च्या युतीमध्ये काँग्रेस राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला डच्चू.. काँग्रेस–राष्ट्रवादी शरद पवार गटाची जागावाटपावर सहमती, वंचितसोबत चर्चा अंतिम टप्प्यात कल्याण–डोंबिवली शिवसेना उद्धव बाळासाहेब पक्ष आणि मनसे सोबत युती झाल्याने कॉग्रेस, राष्ट्रवादी, वंचित पक्ष महाविकास आघाडीची रणनीती जवळपास अंतिम झाली आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट यांच्यात जागावाटपावर शिक्कामोर्तब करण्यात आला असून, वंचित बहुजन आघाडीसोबत देखील सकारात्मक चर्चा सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.आगामी पालिका निवडणूक मोठ्या तयारीने लढवून महाविकास आघाडीचा महापौर बसवण्याचा निर्धार दोन्ही पक्षांनी व्यक्त केला आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 14:20:49
Kalyan, Maharashtra:डोंबिवली मध्ये मनसेला झटका.. डोंबिवली निळजे कोळे मनसे पुरस्कृत अपक्ष नगरसेवक प्रभाकर जाधव यांचा कल्याण ग्रामीण चे आमदार राजेश मोरे यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले असतांनाच मनसे चे पुरस्कृत अपक्ष नगरसेविक जाधव यांनी केला शिवसेनेत प्रवेश. मनसे चे दोन नगरसेवक राहिले होते मात्र एक नगरसेवक शिवसेनेच्या गळाला लागला आहे दोन दिवसात उमेदवारी अर्ज भरणच्या कालावधी असंतानाचं मनसे चे पुरस्कृत नगरसेविक यांनी मुंबई मध्ये शिसेनेत प्रवेश केल्याने मनसे मध्ये खळबळ. मनसे नेते राजू पाटील यांच्या निकटवर्ती असेलेल्या प्रभाकर जाधव यांच्या प्रवेशाने एकच खळबळ. मनसे चे एक मेव नगरसेवक राहिले आहे अर्ज भरण्यासाठी अवघे दोन दिवस राहिले आहे त्यामुळे पुढील दोन दिवसात सर्व चित्र स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 28, 2025 13:54:36
Baramati, Maharashtra:दौंड तालुक्यातील रोटीतील श्री रोटमलनाथ मंदिरातील पारंपरिक जावळ विधीवरून वाद....महिला आयोगाच्या अध्यक्षा चाकणकरांच्या प्रतिक्रियेनंतर रोटीत आंदोलन....महिलांना जबरदस्तीने मुंडन करायला लावत असल्याचा आरोप महिलांनी फेटाळला....कोणतीही तक्रार नसताना विकृत प्रथा असा शब्दप्रयोग केल्याने संताप...चाकणकरांनी रोटीतील महिलांची माफी मागावी....Anchor _दौंड तालुक्यातील रोटी येथील श्री रोटमलनाथ मंदिरातील पारंपरिक जावळ विधीबाबत राज्य महिला आयोगाकडे मागील दोन दिवसांपूर्वी तक्रार दाखल झाली होती. यानंतर याची दखल घेत राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी पुणे जिल्हाधिकारीांना याबत चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यानंतर दौंडच्या रोटी मध्ये चाकणकरांच्या विरोधात आज शितोळे देशमुख कुटुंबांनी आंदोलन केला आहे महि ल आयोगाचे अध्यक्ष रूपाली चाकणकर यांकडे प्राप्त झालेल्या तक्रारीनंतर याची प्रत्यक्ष चौकशी न करता चाकणकर यांनी यावरती प्रतिक्रिया दिली. जावळ काढल्या जाणाऱ्या महिलांना विश्वासात न घेता त्यांच्यावरती जबरदस्ती केली जाते. विविध रूप आणि विकृत अशी प्रथा आहे असे शब्द वापरले. मात्र चाकणकरांचे हे शब्द चुकीचे आहेत आमचंि कणखर आहोत,आमच्या घराण्यातील स्त्रिया स्वतःच्या मुलांना लढायला शिकवतात.आमच्यावर अन्याय होत आहे का ? हे विचारण्याआधी आमच्या बाबत विधान करणे अयोग्य आहे असे प्रतिक्रिया शितोळे सरदार घराण्यातील महिलांनी दिली आहे.महिला आयोगाच्या अध्यक्षांनी केलेल्या विधानाबाबत रोटीतील महिलांची आणि संपूर्ण शितोळे देशमुख घराण्याची जाहीर माफी मागावी अशी मागणी करण्यात आली आहे. बाईट _ रूपाली चाकणकर, अध्यक्ष राज्य महिला आयोग बाईट_ संतप्त महिला बाईट
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 28, 2025 13:51:24
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 28, 2025 13:49:49
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Dec 28, 2025 13:30:32
Solapur, Maharashtra:सोलापुरात तृतीयपंथीयाचा खून करणाऱ्या तीन आरोपींना केवळ सहा तासात शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - सोलापुरात काल अय्युब सय्यद नामक तृतीयपंथीयाचा करण्यात आला होता खून - केवळ चोरीच्या उद्देशाने खून करणाऱ्या तीन आरोपींना सोलापूर शहर पोलिसांनी ठोकल्या बेड्या - तृतीय पंथीयाचा खून कोणत्याही राजकीय किंवा महापालिका निवडणुका अनुषंगाने करण्यात आला नसून केवळ चोरीच्या उद्देशाने करण्यात आल्याची पोलीस आयुक्त एम. राजकुमार यांची माहिती - घटनेचा सीसीटीव्ही आणि खबरीच्या मार्फत मिळालेल्या माहितीनुसार सोलापूर शहर पोलिसांनी लातूर मधून तिघांना केली अटक - तिन्ही आरोपींना न्यायालयात हजर झाले असता मिळाली तीन दिवसांची पोलीस कोठडी - खून करण्यामागे आरोपींचा आणखी काही उद्देश होता का याचा आता तपास पोलीस करीत आहेत
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 28, 2025 12:19:47
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 28, 2025 11:51:27
Washim, Maharashtra:शिरपूर येथील जैन मंदिरातील दिगंबर पुजाऱ्यांवर झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ शिरपूर पोलीस ठाण्यावर सिद्धांत सागर महाराज यांच्या नेतृत्वात दिगंबर समाजा कडून इशारा मोर्चा काढण्यात आला होता. यावेळी आरोपींना अटक करण्याची मागणी करण्यात आली. शिरपूर येथील चार ते पाच गावगुंडांनी मंदिरातील दिगंबर पंथीय पुजाऱ्यांवर २५ डिसेंबर रोजी हल्ला केल्याची घटना घडली होती. वारंवार अन्याय होऊनही पोलीस प्रशासनाकडून ठोस कारवकारवाई होत नसल्याचा आरोप दिगंबर पंथीयांकडून करण्यात आलाय. तर या घटने संदर्भात जखमींचे जबाब घेतले असून त्यांनी आम्ही ठीक झाल्यावर पोलीस स्टेशनला येऊन गुन्हा दाखल करू अशी माहिती दिल्यानं केवळ स्टेशन डायरीला नोंद करण्यात आली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आरोपींना अटक करण्याची कारवाई करू असं पोलिसांकडून सांगण्यात आलय
0
comment0
Report
Advertisement
Back to top