icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारामती शुगर फैक्ट्री चुनाव: युगेंद्र पवार के नेतृत्व में उम्मीदवारों की मुलाकातें शुरू

Rui, Maharashtra:बारामती युगेंद्र पवार के नेतृत्त्व में निवडणुकांसंदर्भात शरद पवार गटाच्या युगेंद्र पवार यांच्या उपस्थितीमध्ये इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती सुरू आहेत. मुलाखतीसाठी चांगला रिस्पोन्स आहे, पाच गटामध्ये 130 ते 140 अर्ज शरद पवार पक्षांकडे आले आहेत. आमचा पक्ष लोकशाही पद्धतीने चालत असतो. आम्ही मुलाखती घेत असतो जे उमेदवार कारखान्याचे हित बघतील. सध्या आम्ही स्वतंत्र पॅनल उभं करत आहोत. आम्हाला कोणाकडून प्रस्ताव आला नाही. आम्ही स्वबळावर शेतकरी पॅनल उभा करत आहोत. आम्ही माळेगांव कारखान्यासाठी प्रस्ताव दिला होता. भाजप पण स्वतंत्र पॅनल टाकत आहे. दोन्ही शिवसेना पॅनल टाकत आहेत. शरद पवार यांचं म्हणणं आहे सहकारमध्ये आपण राजकारण केलं नाही पाहिजे. शेवटी हा प्रपंचाचा प्रश्न आहे. कारखाना व्यवस्थित चालला पाहिजे. चांगली उच्शिक्षित लोक आपण निवडून दिली पाहिजेत. माळेगांव कारखाना निवडणुकीच्या वेळी सांगितलं तुमचे उमेदवार घेतो. पण तस झालं नाही. तेव्हाची परिस्थिती वेगळी होती. आताची परिस्थिती वेगळी आहे. दोन्ही पक्ष एक होणार होते त्याचे नेतृत्व अजित पवार करणार होते. हे इलेक्शन सोमेश्वर कारखान्याचं आहे. प्रचाराला सगळे येतील सगळे आम्हाला मदत करतील. सहकारमध्ये सगळे सभासद एकत्र येतात. खासदार सुप्रिया सुळे इथे लक्ष घालतील. शरद पवार यांना विनंती करणार आहे. रोहित पवार लक्ष घालतील. सगळे आम्हाला ताकद देतील. युगेंद्र पवार हा कार्यकर्ता आहे. आमच्या पक्षातले वरिष्ठ असतील निर्णय घेतील.
0
0
Report

अनंतकुमार पाटील के नेतृत्व में महाविकास आघाडी ने सूखा राहत मोर्चा निकाला

Washim, Maharashtra:वाशीम: कोरडा दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी,या मागणीसाठी महाविकास आघाडी कडून आज जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला.मोर्चात मोठ्या संख्येने शेतकरी आणि महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सहभागी झाले. गेल्या ४५ दिवसांहून अधिक काळ पावसाचा खंड असल्याने पिकांची अवस्था बिकट झाली आहे. तातडीने पंचनामे करून मदत जाहीर करावी,पीक विमा लागू करावा आणि शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च शासनाने उचलावा,अशी मागणी यावेळी करण्यात आली. ३०सप्टेंबरपर्यंत मदत जाहीर न केल्यास २ ऑक्टोबरपासून आमरण उपोषण करण्याचा इशारा माजी आमदार अनंतकुमार पाटील यांनी दिला. अनंतकुमार पाटील,माजी आमदार
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर नगर-निगम महासभा में भाजप-सेना हाई-व्होल्टेज ड्रामा, महापौर ने पाटील को निलंबित किया

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेतील महासभेत भाजपा सेनेत हाय व्होल्टेज ड्रामा भाषा नीट वापरा तुम्ही माझा बाप काढला तुमचं तीन सभेसाठी निलंबन तीन महिन्या नंतर आयोजित महासभा ठरली भाजपा सेनेच्या वादाने वादळी या वेळी प्रधान यांच्याकडून महापौर यांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द निघाले. या वरूनच महापौर आणि नगरसेवक प्रधान पाटील यांच्यात शाब्दिक वाद झाला. या वेळी प्रधान यांच्याकडून महापौर यांच्या वडिलांना उद्देशून अपशब्द निघाले. यावरून महापौर अश्विनी निकम यांनी भाषा नीट वापरा तुम्ही माझा बाप काढला असं म्हणत भाजप नगरसेवक प्रधान पाटील यांना सुनावत तीन सभेसाठी निलंबन केले.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजी नगर में उद्धव ठाकरे-फड़णवीस के बीच आमने-सामने राजनितिक युद्ध

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये उद्या राज्याचे दोन मोठे नेते आमने सामने येण्याची शक्यता आहे , मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस 17 तारखेला छत्रपती संभाजी नगर दौऱ्यावर आहेत यावेळेस मराठवाड्याच्या मुक्तिसंग्रामात बलिदान दिलेल्या शहिदांना ते मुक्ती संग्राम स्मारकावर अभिवादन करणार आहेत तर मराठवाड्यात विकासासाठी सरकारनं ज्या योजनांची घोषणा केली होती त्या योजना पूर्ण झाल्या नाहीत फक्त फसवेगिरी केली असा आरोप करत मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने उद्धव ठाकरे राज्य सरकार विरोधात निषेध आंदोलन करणार आहेत , इतकच नाही तर 17 तारखेच्या झेंडावंदनापूर्वी उद्धव ठाकरे मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकावर जाऊन शहिदांना अभिवादन सुद्धा करणार आहेत त्यामुळे मुक्तिसंग्राम दिन निमित्त राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आमें-समाने येणार असल्याचं चित्र संभाजी नगरात दिसणार आहे हे दोन्ही नेते 16 तारखेला छत्रपती संभाजी नगर मुक्कामी येत आहेत त्यामुळे 17 तारखेला दोन्ही नेत्यांमध्ये राजकीय युद्ध रंगणार असं चित्र आहे..
0
0
Report

झालिया शिवार में मधमाशा के हमले से 48 वर्षीय चालक की दुखद मौत

Bhandara, Maharashtra:मधमाशांच्या हल्ल्यात ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू...झालिया शिवारातील घटना.... अदानी पॉवर प्लांटमध्ये चालक म्हणून होते कार्यरत गोंदिया जिल्ह्याच्या आमगाव तालुक्यातील झालिया येथील शिवार परिसरात मधमाशांनी केलेल्या हल्ल्यात रवींद्र पटले ४८ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. मृतक हे अदानी पॉवर प्लांटमध्ये चालक पदावर कार्यरत आहेत. शिवार परिसरात असताना अचानक मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला केला. मोठ्या संख्येने मधमाशांनी दंश केल्याने ते गंभीर जखमी झाले. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचे शवविच्छेदन करण्यात आल्यानंतर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी कुटुंबीयांच्या स्वाधीन करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

वाशिम जिले में खरीफ फसलें सूखे के कारण बर्बाद, किसानों ने मदद की मांग

Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात मागील ४५ ते ५० दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने खरीप हंगामाला मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी अनेक भागांत सोयाबीन पीक पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर असून,अनेक ठिकाणी सोयाबीनची झाडं वाळून गेली आहेत.शेंगा भरण्याच्या महत्त्वाच्या काळातच पाण्याअभावी पिकांची अवस्था बिकट झाली आहे.कारंजा, मानोरा, मालेगाव, मंगरूळपीर आणि वाशिम तालुक्यात परिस्थिती गंभीर बनली असून, एकरी मोठा खर्च करूनही हातातोंडाशी आलेलं पीक वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांना सतावत आहे.सोयाबीनसोबतच तूर, कापूस, उडीद आणि मूग या पिकांवरही संकटाचं सावट आहे.त्यामुळे शासनाने तातडीने पिकांचे पंचनामे करून दुष्काळ जाहीर करावा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची मदत तसेच पीक विम्याचा लाभ द्यावा,अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री व कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी लक्ष देऊन शासनाने जिल्ह्यात कोरडा दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली आहे. व्हिओ:वाशिम जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये सध्या केवळ ४० टक्क्यांच्या आसपास पाणीसाठा असल्याने आणि जलस्रोतांमध्येही अत्यल्प पाणी शिल्लक असल्याने आगामी रब्बी हंगामावरही संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे वर्षभराचा संसाराचा गाडा चालवायचा कसा,असा गंभीर प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर उभा ठाकला आहे.
0
0
Report
Advertisement

निफाड में कुत्तों के विरोध पर युवासेना ने कार्यालय में घुसकर प्रदर्शन किया

Yeola, Maharashtra:अँकर:- गेल्या काही दिवसांपासून निफाड शहरात मोकाट कुत्र्यांचा उपग्रह वाढला असून वारंवार तक्रार करून देखील निफाड नगरपंचायतीने कोणतीही दखल न घेतल्यामुळे युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे च्या पदाधिकाऱ्यांनी आक्रमक होऊन मुख्याधिकारी धीरज भामरे यांच्या कार्यालयात घुसून टेबलवर कुत्रे सोडून निषेध व्यक्त केला या घटनेने कार्यालयात मोठा गोंधळ उडाला होता दरम्यान या घटनेची दखल न घेतल्याच संपूर्ण निफाड शहरांतील कुत्रे पकडून निफाड नगरपंचायत मध्ये सोडले जाईल असा इशारा या प्रसंगी युवा सेना जिल्हा अध्यक्ष विक्रम रंधवे यांनी दिला आहे बाईट :-विक्रम रंधवे , जिल्हा प्रमुख युवा सेना उद्धव बाळासाहेब ठाकरे
0
0
Report

नांदेड में 12 वर्षीय बच्ची से दुष्कर्म; आरोपी गिरफ्तार

Nanded-Waghala, Maharashtra:12 वर्षीया बच्ची पर एक 28 वर्षीय युवक ने बलात्कार किया। यह चौंकाने वाली घटना नांदेड शहर में सामने आई है। शिवाजीनगर पुलिस थाने में मामला दर्ज किया गया है। शिवाजीनगर सीमा के एक नगर में रहने वाली मानसिक रूप से अस्वस्थ बच्ची के ऊपर इसी क्षेत्र के आरोपी ने 13 सितंबर को बलात्कार किया। पीड़ित की माँ ने शक होने पर अधिक जाँच की, तो बच्चे पर बलात्कार की पुष्टि हुई। पीड़ित की माँ की शिकायत पर पुलिस ने बलात्कार, पॉक्सो अधिनियम और अन्य धाराओं के तहत मामला दर्ज किया। इस बीच पुलिस ने आरोपी आदिनाथ जाधव को गिरफ्तार किया। आरोपी अपराध प्रवृत्ति का है और धमकियाँ देने की शिकायत पीड़ित की माँ ने की है। आरोपी को फाँसी की सजा दिए जाने की मांग पीड़ित की माँ ने की है।
0
0
Report

नागपुर के प्रतापनगर में महागणपती स्वप्ननगरी थीम में विराजमान

Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपुरातील प्रतापनगरचा महागणपती यंदा स्वप्ननगरीत विराजमान झालाय.. प्रथम फाउंडेशनच्या यां गणेशोत्सव मंडळाने हा स्वप्ननगरी देखावा साकारलेला आहे. यापूर्वी चांद्रयान आणि अवतार असे देखावे साकारणाऱ्या या गणेशोत्सव मंडळांनी यंदा याच थीमवर आधारित भव्य सायंटिफिक संकल्पनेतून हा देखावा साकारलाय... महत्त्वाचं म्हणजे याकरता पर्यावरण पूरक साहित्याचाच वापर केलाय... ज्या स्वप्ननगरीत बाप्पा विराजमान झाले तिथून आढावा घेतल्या आमच्या प्रतिनिधींनी ------ बाईट --- सारंग कदम,प्रताप नगर चा महागणपती (121 केलाय... दुसऱ्या विंडोमध्ये शॉटस चालवता येईल)
0
0
Report
Advertisement

दिशा सालियन मामले में आदित्य ठाकरे पर सुदाचारण राजनीति का हमला — भास्कर जाधव

Ratnagiri, Maharashtra:हेडलाईन: दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंविरोधात सुडाचं राजकारण, भास्कर जाधव यांचा सरकारवर थेट घणाघात!. महाराष्ट्रात घडलेल्या घटनेचा तपास दिल्लीतून का? आदित्य ठाकरेंना घेरण्यासाठी भाजपचं नीच राजकारण; भास्कर जाधव यांचा हल्लाबोल मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, जरांगे पाटलांची फसवणूक अटळ; भास्कर जाधव यांचा सनसनाटी दावा मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे सरकारचा कोकणाशी दुजाभाव १८ तास चाकरमान्यांचे हाल, सरकार मात्र निर्लज्ज – भास्कर जाधव आदित्य ठाकरेंना वाढत्या लोकप्रियतेमुळे अडचणीत आणण्याचा डाव; दिशा सालियन ते जरांगेंच्या उपोषণापर्यंत भास्कर जाधव यांचा सरकारवर चौफेर हल्लाबोल!. "मनोज जरांगे पाटलांना हे सरकार फसवणार, मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही" — भास्कर जाधव यांचा देवेंद्र फडणवीसांवर थेट आरोप.. Pointer *जरांगे पाटलांची दिशाभूल व विश्वासघात:* मनोज जरांगे पाटील ११ व्यांदा उपोषणाला बसले असून, सरकार त्यांची फसवणूक आणि मराठा समाजाचा विश्वासघात करणार आहे.. *इतर नेत्यांना पुढे करून स्वतः अंग काढून घेणे:* आंदोलनाची धार कमी करण्यासाठी देवेंद्र फडणवीस इतर नेत्यांना (विखे पाटील,दरेकर, लाड, बावनकुळे, शिंदे, सामंत) पुढे करून आश्वासने द्यायला लावतात स्वतः मात्र कोणतीही हमी घेत नाहीत.. *मराठा उपोषणाला भेट नाही:* फडणवीस इतर सर्व समाजाच्या उपोषणस्थळी जातात, मात्र मराठा समाजाच्या उपोषणाला त्यांनी एकदाही भेट दिली नाही.. *आरक्षण न मिळण्याचा दावा:* सध्याच्या मंत्रिमंडळातील एका मंत्र्याने भूतकाळात केलेल्या विधानाचा संदर्भ देत, फडणवीस जोपर्यंत आहेत तोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही, असा घणाघात जाधव यांनी केला.. ............................... हेहडलाईन: दिशа सालियन प्रकरणात आदित्य ठाकरेंना गोवणे हे नीच राजकारण वाढत्या लोकप्रियतेला घाबरून सरकारकडून षडयंत्र — भास्कर जाधव.. Pointer *घाणेरड्या पातळीचे राजकारण:* दिशा सालियन मृत्यूप्रकरणी चौकशी अहवालात आदित्य ठाकरेंचा काहीही संबंध नसल्याचे स्पष्ट झालेले असताना, पुन्हा त्यांच्यावर एफआयआर (FIR) दाखल करण्याचा प्रयत्न होणे हे नीच व हीन पातळीचे राजकारण आहे.. *वडिलांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह:* काही वर्षांपूर्वी स्वतः दिशा सालियन यांच्या वडिलांनी समोर येऊन मुलीच्या मृत्यूवर राजकारण न करण्याची आणि तिने आत्महत्या केल्याची भूमिका मांडली होती मग आताच अचानक त्यांना काय जाणीव झाली, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.. *रामदास कदमांवर टीका:* ठाकरे घराण्यासोबत अनेक वर्षे काम करून त्यांच्या मुलावर अशी वेळ आल्यावर आनंद साजरा करणाऱ्या प्रवृत्तीवर जाधव यांनी संताप व्यक्त केला.. *घोटाळे बाहेर काढल्याने सूडबुद्धी:* मुंबईतील मैदाने व पालिकेच्या शाळांच्या जमिनींचे गैरव्यवहार,Gen-G आणि इतर भ्रष्टाचाराची प्रकरणे आदित्य ठाकरे सातत्याने लावून धरत असल्याने सरकार त्यांना अडचणीत आणत आहे.. *वाढत्या जनसमर्थनाला सरकारची भीती:* तिरंगा रॅली आणि महाराष्ट्र दौऱ्यांतून आदित्य ठाकरेंना सर्वपक्षीय व जनतेचा प्रचंड पाठिंबा मिळत आहे त्यामुळेच सरकार त्यांच्यावर दिशाभूल करण्यासाठी ही जुनी प्रकरणे उकरून काढत असल्याचा आरोप त्यांनी केला.. ............................... हेहडलाईन: "एका मानेला अनेक जिभा फुटल्यासारखी यांची प्रवृत्ती पोटात एक आणि ओठात भलतंच" — भाजप, संघ परिवारावर भास्कर जाधव यांचा हल्लाबोल.. Pointer *दुटप्पी भूमिकेवर प्रहार:* परदेशात गेल्यावर '''बुद्धाच्या देशातून आलोय'''' म्हणायचे आणि देशात आल्यावर राजकीय सोयीनुसार वेगवेगळी वक्तव्ये करायची, या भाजप आणि संघ परिवाराच्या दुटप्पीपणावर जाधव यांनी ताशेरे ओढले.. *एकाच मानेला अनेक जिभा:* आरएसएस, भाजप, विहिंप, बजरंग दल यांच्या वेगवेगळ्या संघटना असल्य तरी ती एकाच प्रवृत्तीची रूपे असून, एका मानेला अनेक जिभा फुटल्यासारखे हे लोक परिस्थितीनुसार वेगवेगळे बोलतात, असा टोला त्यांनी लगावला.. *एकमेव अजेंडा हिंदू-मुस्लिम:* परदेशात काय बोलतात किंवा स्वदेशात काय सांगतात यापेक्षा त्यांच्या पोटात काय आहे हे महत्त्वाचे असून, यांचा मूळ अजेन्‍डा नेहमीच फक्त हिंदू-मुस्लिम वाद पेटवणे हाच असतो.. *देशाला भोगावे लागणारे परिणाम:* यांच्या ओठात एक आणि पोटात भलतेच असते यांच्या अशा ढोंगी आणि विभाजनकारी विचारसरणीचे गंभीर परिणाम आज संपूर्ण देशाला भोगावे लागत आहेत, असा घणाघात त्यांनी केला.. .............................. हेहडलाईन: "घटना महाराष्ट्रातली, मग चौकशी अधिकारी दिल्लीतून का? आदित्य ठाकरेंविरोधात सुडाचं राजकारण" — भास्कर जाधव यांचा थेट आरोप.. Pointer *दिल्लीतून अधिकारी नेमण्यावर आक्षेप:* दिशा सालियन प्रकरणातील घटना महाराष्ट्रात घडलेली असताना आणि स्थानिक पोलीस सक्षम असताना, आदित्य ठाकरेंच्या चौकशीसाठी दिल्लीतून इन्व्हेस्टिगेशन ऑफिसर आणणे म्हणजे विशेष आदेश देऊन पाठवल्याचा संशय येतो.. *सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचा दाखला:* २०२१ मध्ये बिहार निवडणुकीच्या तोंडावर राजकीय फायद्यासाठी सुशांत सिंह राजपूत प्रकरणाचे भांडवल केले गेले पण निवडणुका संपल्यावर त्या प्रकरणाचे काय झाले, असा सवाल जाधव यांनी विचारला.. *राजकीय फायद्यासाठी नीच पातळी:* निवडणुकीच्या किंवा राजकीय लाभासाठी अशा प्रकरणांचा वापर करणे आणि विरोधकांना गोवण्यासाठी दिल्लीवरून यंत्रणा हलवणे, ही राज्यकर्त्यांची अत्यंत हीन आणि नीच पातळी असल्याचे त्यांनी म्हटले.. .............................. हेहडलाईन: "मुंबई-गोवा महामार्ग म्हणजे कोकणाकडे पाहण्याच्या दुजाभावाचा पुरावा १८-१८ तास चाकरमानी रखडले" — भास्कर जाधव यांचा संताप.. Pointer *नितीन गडकरींच्या विधानांची आठवण:* मुंबई-गोवा महामार्गाचा इतिहास म्हणजे एक पुस्तक होईल, असे गडकरी म्हणायचे नंतर त्यांनाच लाज वाटू लागला आणि आता तर ते रस्त्याच्या उद्घाटनालाही जाणार नसल्याचे सांगतात, असा टोला जाधव यांनी लगावला.. *कोकणाबाबत दुजाभाव:* कोकणच्या विकासाच्या आणि भरघोस निधीच्या केवळ बाता मारल्या जातात प्रत्यक्षात हा रखडलेला महामार्ग म्हणजे शासनाच्या कोकणाविषयीच्या नकारात्मक दृष्टिकोणाचे आणि दुजाभावाचे उत्तम उदाहरण आहे.. *चाकरमान्यांचे हाल:* गणेशोत्सवात कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना तब्बल १८-१८ तास ट्रॅफिकमध्ये अडकून राहावे लागले लहान मुले, महिला व वृद्धांचे अतोनात हाल झाले.. *सरकारच्या भूमिकेवर टीका:* तासनतास रखडलेल्या प्रवाशांच्या व्यथा ऐकल्यानंतर सरकार किती निर्लज्ज आहे, हेच या रखडलेल्या कामावरून सिद्ध होते, असा घणाघात त्यांनी केला.
0
0
Report

लातूर के शिक्षण संस्थापक की आत्महत्या; सुसाइड नोट में I AM GOOD FOOL से बढ़ा रहस्य

Latur, Maharashtra:लातूरच्या शिक्षण क्षेत्रातील namaांकित संस्थाचालक संजीव सोनवणे यांच्या आत्महत्येने खळबळ उडाली आहे... मात्र सुसाईड नोटमधील काही शब्दांमुळे आता या आत्महत्येभोवती नवं गूढ निर्माण झालंय... आणि त्यामुळे पोलिसांसमोरही एक नवं आव्हान उभं राहिलंय... नेमकं काय आहे प्रकार पाहूया या स्पेशल रिपोर्टमधून... घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले... सुसाईड नोट ताब्यात घेतली... परवानाधारक शस्त्रासह घटनास्थळावरील काही वस्तूही पोलिसांनी ताब्यात घेतल्या... सुसाईड नोटमधील हस्ताक्षराचीही तपासणी सुरू करण्यात आली आहे... कारण नोटमधील मजकूर आणि त्याचा नेमका संदर्भ तपासासाठी महत्त्वाचा ठरणार आहे... दरम्यान, सोनवणे यांची पत्नी, मुलगा आणि मुलगी अमेरिकेत वास्तव्यास असल्यामुळे, कुटुंबीय लातूरला पोहोचेपर्यंत अंत्यविधीही थांबवण्यात आले आहेत. मात्र, शिक्षण क्षेत्रात मोठं नाव असलेल्या सोनवणे यांनी असं टोकाचं पाऊल का उचललं... याचा धक्का त्यांच्या मित्रांनाही बसलाय. शेवटी त्यांच्या मनात नेमकं काय सुरू होतं ? हा प्रश्न आता त्यांच्या मित्रांसह पोलिसांपुढेही आहे... शिक्षण क्षेत्रात मोठं नाव... प्रतिष्ठेचं आयुष्य... मग आयुष्याच्या अखेरच्या टप्प्यात अशी वेळ का आली? कुणी त्यांना फसवलं होतं का? कुणाचा दबाव होता ka? सुसाईड नोटमधील त्या शब्दांमागे नेमकं कोणतं गूढ दडलंय? शेवटच्या क्षणी त्यांच्या मनात नेमकं काय होतं... हे आता कायमचं अनुत्तरित राहणार, की पोलिसांच्या तपासातून त्याचा उलगडा होणार? या प्रश्नांची उत्तरं शोधण्याचं मोठं आव्हान आता पोलिसांपुढे आहे...
0
0
Report

Solapur: Ganesh festival extortion alleges hotel owner asked for three lakh rupees

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग - सोलापुरात गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यावसायिकाला मागितली तब्बल तीन लाखांची वर्गणी, रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - सोलापुरात एका गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांनी हॉटेल व्यवसायीकाला मागितली चक्क तीन लाख रुपयांची वर्गणी. - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल मालकाला आली चक्कर. - मंडळाच्या 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे टेलर ला देण्यासाठी मागितले तीन लाख रुपये. - गणेश मंडळासाठी वर्गणी मागणाऱ्या कार्यकर्त्याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल. गणेशोत्सवाच्या वर्गणीच्या नावाखाली हॉटेल व्यावसायिकाकडे तब्बल ३ लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप समोर आला आहे. पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याचीही तक्रार करण्यात आली असून, या प्रकरणी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. निराळे वस्ती येथील क्रांती तालीम गणेशोत्सव मंडळाचा सदस्य नेताजी शिवाजी शिंदे हा हॉटेल व्यावसायिक एकनाथ सोपान घाडगे यांच्या हॉटेलवर आला होता. मंडळाच्या गणपती वर्गणीच्या नावाखाली 500 ड्रेसचे प्रत्येकी 600 ₹ प्रमाणे तीन लाख रुपये टेलरला देण्यासाठी मागितले. हॉटेल व्यवसाय एकनाथ घाडगे यांनी आपली आर्थिक परिस्थिती लक्षात घेता दरवर्षीप्रमाणे 25 हजार रुपये वर्गणी देण्याची तयारी दर्शवली. तसेच यापूर्वी मंडळाला 2 लाख रुपये दिल्याचेही सांगितले. मात्र, तक्रारीनुसार नेताजी शिंदे यांनी 3 लाख रुपयांच्या मागणीवर ठाम राहत पैसे न दिल्यास जीवे मारण्याची धमकी दिली. ज्ञानेश्वर सपाटे यांनी या घटनेच्या संदर्भात माहिती दिली आणि मंडळाचा सदस्य असल्याचा दावा केला. गणेशोत्सवासाठी वर्गणी मागताना कायद्याचे उल्लंघन होत नाही ना? पैसे न दिल्यास धमकी देण्याचा प्रकार कितपत योग्य? या घटनेमुळे उत्सवाच्या वर्गणीच्या पद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पोलिस तपासात नेमके काय समोर येते, हे पाहणे महत्त्वाचे आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top