icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सिया गोयल और चेतन चौधरी की अदालत में पेशी, पांच दिन की पुलिस हिरासत खत्म

Varsoli, Maharashtra:Headline : सिया-चेतनला न्यायालयात हजर केलं जाणार, पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय तपासलं? केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठди संपणार आहे. त्यामुळं आज या دوघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. न्यायाधीश ए एम विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडेल. सियाने तिचा युक्तिवाद वकीل विपुल दूशिंग हेचं करतील असं न्यायालयात म्हटल्यानं आता वकील आशुतोष श्रीवास्तवांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील. तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड कामकाज पाहतील. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपासण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले जाणारेत. ग्राफिक्स इन *पाच दिवसांची रिमांड कशासाठी घेण्यात आली अन कोणते धागेदोरे हाती लागले?* १) कट कुठे रचला? - पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत बसून कट रचला गेला, त्या ठिकाणी सियाला नेहून तपास करण्यात आला. २) हत्येचा सराव कुठे झाला? - पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येचा कसा सराव करण्यात आला? हे जाणून घेण्यासाठी सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली. ३) डिलीट डेटा रिकव्हर - फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला. - डिजिटल पुराव्यांचा तपास केला गेला. ४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा? कबुली किंवा चर्चा झाली का? - गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन कोणाला भेटले का? कोणाशी संवाद साधला का? त्यांच्याकडे हत्या आणि कटाबाबत काही सांगितलं ka? याची चौकशी करण्यात आली. ५) घटनाक्रमाची पुनर्रचना - सियानंतर चेतनसोबत क्राईम सिन रिक्रियेशन करण्यात आलं. - चेतनचे गेट येनेलिसिस करुन सबळ पुरावा मिळवला. ६) लोहगडावर कोणाशी संवाद साधला का? सीसीटीव्हीतील दृश्यात काय घडलं? - हत्येदिवशी लोहगडावर सिया आणि चेतनने कोणाशी संवाद साधला का? - सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दृश्यात सिया आणि चेतनने नेमका कोणता संवाद साधला? याची चौकशी करण्यात आली. ७) आधीही हत्येचा प्रयत्न? - 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का? हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. ८) केतनचा पासपोर्ट - खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलवर जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न झाला. ९) नव्या साक्षीदारांचे जबाब - काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी. १०) लोहगडची आधी रेकी? - हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने किती वेळा रेकी केली? या कटासाठी किती वेळा भेटले? याची चौकशी ११) आणखी कोण सहभागी? कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? - सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली. १२) हत्येदिवशीच्या वस्तू जप्त - सियाने हत्येदिवशी वापरलेले कपडे घरी ठेवले होते, तिला मार्केटयार्ड येथील घरी नेहून कपडे जप्त केले - चेतनची हत्येदिवशीची पॅन्ट जप्त करण्यासाठी पावलं उचलली गेली. End vo : पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रिमांडच्या बारा कारणांची उत्तरं शोधण्यात आली. यातून जे धागेदोरे हाती लागलेत, ते आज न्यायालयात सादर केले जातील. यातून काय धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
0
0
Report

लोणावळे के भुशी डैम में ओवरफ्लो, भारी बारिश से पर्यटन बढ़े

Varsoli, Maharashtra:लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यात मागील 48 तासांत तब्बल 229 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा दिमाखात वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लोणावळ्यातील वर्षाविहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले असून पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. भुशी धरतं ‘ओव्हरफ्लो’ झाले.
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड़ में बारिश जारी, सुबह ट्रैफिक जाम से आमजन परेशान

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड शहरात अखेर पावसाने सातत्यपूर्ण हजेरी लावत शहरवासीयांना काहीसा दिलासा दिलाय. शहरात सकाळपासूनच पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. शहराच्या विविध भागात रात्रभर पावसाची संततधार सुरु होती. काही भागात पावसाच्या मध्यम ते हलक्या सरी ही कोसळल्या. सतत पडत असलेल्या पावसामुळे काही भागात रस्त्यावर पाणी साचण्याच्या घटना घडल्या. तर कामाला जाण्याची वेळ आणि शाळेत जाण्याची वेळ एकच असल्याने सकाळी काही भागात ट्रॅफिक जाम झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. शहरात सुरू असलेल्या पावसासंदर्भात माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी
0
0
Report

गोहागर गोल्डनमैन केस: दो आरोपियों को जन्मठेप की सजा, 12 साल बाद फैसला

Ratnagiri, Maharashtra:गुहागर/ रत्नागिरी गुहागरच्या गोल्डनमॅन विश्वास खरे खूनप्रकरणी दोन आरोपींना जन्मठेप; १२ वर्षांनंतर न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निकाल अँकर रत्नागिरि जिल्ह्यातील गुहागर येथील बहुचर्चित गोल्डनमॅन तथा कासव संरक्षक विश्वास महादेव खरे यांच्या खून खटल्याचा अखेर निकाल लागला आहे. चिपळूण अतिरिक्त सत्र न्यायालयाने या prकरणातील दोन आरोपींना जन्मठेपची शिक्षा सुनावत तब्बल १२ वर्षांपासून सुरू असलेल्या खटल्याला पूर्णविराम दिला आहे. परिस्थितीजन्य पुरावे, मोबाईल सीडीआर आणि इतर साक्षींच्या आधारे न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवले. या निकालामुळे खरे कुटुंबीयांनी समाधान व्यक्त केले असून, गंभीर गुन्ह्यांमध्ये कायद्याचा धाक कायम राहील, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
0
0
Report
Advertisement

नागपुर में एक रात में दो हत्याएं, नए पुलिस कमिश्नर के बाद अपराधी सक्रिय

Nagpur, Maharashtra:नागपूर - उपराजधानी नागपुरात हत्याकांडाची मालिका सुरुच, एकाच रात्री दोन वेगवेगळ्या घटनेत महिलेची आणि सराईत गुन्हेगाराची हत्या झालीय. नवे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील आल्यानंतर खून सत्र सुरूच, शहरात सलग 3 खूनांच्या घटना. गणेश प्रेमलाल बोरकर असे भांडवाडीत मृतकांचे नाव आहे... त्याच्या डोळ्यात मिर्ची पूड टाकून धारधार शस्त्राने हत्या करण्यात झालीय. गणेश हा सराईत गुन्हेगार असून, त्याच्यावर खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहे. याच जुन्या वादातून हत्यां झालाचा अंदाज असून अज्ञात आरोपीचा शोध सुरू आहे. नवीन कामठी पोलीस स्टेशन हद्दीत गादा गावाजवळील फार्महाऊस परिसरात रस्त्याच्या कडेला गुरुवारी रात्री भाग्यश्री नावाच्या महिलेचा मृतदेह आढळला. भाग्यश्री असे मृतक महिलेच नाव आहेय. भाग्यश्रीच्या पतीवर हत्येचा संशय आहेय. याआधीच फुटाळा परिसरातंही एकाची हत्या करण्यात आली होती.
0
0
Report

हिंदी में क्लिकबेट शीर्षक: सह्याद्री के जलाशयों में पानी कमी, किसान चिंतित; मानसून देर से पहुँचेगा?

Shirur, Maharashtra:सह्याद्रीत पावसाची ओढ; रिमझिम सरी सुरू, मात्र मुसळधार पावसाच्या प्रतीक्षेत नऊ धरणे सध्या सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात अद्याप अपेक्षित पाऊस झालेला नाही. सध्या सह्याद्रीच्या डोंगररांगेामध्ये रिमझिम पाऊस सुरू असला, तरी धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा होण्यासाठी आवश्यक असलेल्या मुसळधार पावसाची प्रतीक्षा कायम आहे. कुकडी प्रकल्पातील सात आणि भीमा-भामा खोऱ्यातील तीन अशा एकूण नऊ जलाशयांतील पाणीसाठा अत्यंत खालावला असून, जुलै महिना सुरू असतानाही ही धरणे जवळपास कोरडी आहेत. दरवर्षी याच कालावधीत ३० ते ३५ टक्के भरलेली असणारी धरणे यंदा रिकामी असल्याने शेतकरी आणि नागरिकांची चिंता वाढली आहे. या धरणांवर अवलंबून असलेल्या गावांमध्ये खरीप हंगाम, सिंचन आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. येत्या काही दिवसांत सह्याद्रीच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार पाऊस झाला तरच धरणांतील पाणीसाठ्यात वाढ होऊन शेती आणि पिण्याच्या पाण्याची चिंता काही प्रमाणात दूर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

रायगड़ में विकसित भारत रोजगार योजना का जिला-स्तरीय शुभारंभ; लाभार्थियों को कार्यादेश वितरित

Chendhare, Maharashtra:रायगडात रोजगार आणि आजीविका योजनाचा रायगडात प्रारंभ ...... लाभार्थ्यांना कार्यादेशांचे वितरण ...... अँकर - केंद्र सरकारच्या विकसित भारत रोजगार आणि आजीविका हमी मिशन योजनेचा रायगड जिल्हास्तरीय शुभारंभ अलिबाग येथील जिल्हा नियोजन भवनात झाला. या कार्यक्रमात मंत्री भरत गोगावले यांनी ऑनलाइन मार्गदर्शन करत योजनेतील नव्या लाभांची माहिती दिली. या योजनेअंतर्गत नवीन कामांचे कार्यादेश यावेळी लाभार्थ्यांना वितरित करण्यात आले. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे,सभापती वैकुंठ पाटील उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

मराठवाडे में मानसून सुस्त, जुलाई तक वर्षा औसत से कम

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात मान्सूनची वाटचाल अद्याप म्हणावी तशी नाही. २ जुलैपर्यंत विभागात जून ते सप्टेंबर या वार्षिक हंगामातील सरासरीच्या केवळ १८.८ टक्के पावसाची नोंद झाली आहे. विभागात आतापर्यंत १२७.६ मि.मी पावसाची नोंद झाली. ६७९ मि.मी. विभागाची वार्षिक सरासरी असून सरासरीच्या ८७.४ टक्के ते प्रमाण आहे. पावसाळा सुरू झाल्यापासून आजवर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात १२० मि.मी., जालना जिल्ह्यात १३४, बीड १२२, लातूर १०५, धाराशिव १३०, नांदेड, १४५, परभणी ११४, हिंगोली १५२ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. २ जुलैच्या अहवालानुसार एका दिवसात ६.४ मि.मी. पावसाची नोंद विभागात झाली. गेल्या वर्षी याच कालावधीत मराठवाड्यात १४३ मि.मी. पाऊस झाला होता. यंदा आतापर्यंत ११८.७ मि.मी. पाऊस झालाय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top