icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठवाड़ा में सूखा गहराने से किसान बेहाल, Hingoli सहित खरीप फसलें डगमगा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : जुलै महिना अर्धा संपत आलय, तरीही आकाशातून पावसाचा थेंबही बरसलेला नाही. पहिल्या पावसाच्या भरवशावर शेतकऱ्यांनी मोठ्या आशेने पेरण्या तर केल्या... पण आता गेल्या आठ-दहा दिवसांपासून पाऊस पूर्णपणे गायब झाला आहे. त्यामुळे उगवलेली पिके आता डोळ्यांदेखत करपू लागली आहेत. एकीकडे पेरणी कमी तर दुसरीकडे ज्यांनी पेरणी कमी केली त्यांनी करावी कधी हा प्रश्न आहे.. त्यामुळं आगामी वर्षभराच्या उदरनिर्वाहाची चिंता आता बळीराजाच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसू लागली आहे. मराठवाड्यात निर्माण झालेल्या या गंभीर परिस्थितीवर पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट भेगाळलेली जमीन, अजूनही जमिनीला पकडून असलेली छोटी रोप हे सध्याचे मराठवाड्याचे चित्र आहे.. पाऊस नसल्याने शेतकरी हवालदिल आहे... मराठवाड्यातील हे आहेत हिंगोली जिल्ह्यातील ब्रह्मपुरी गावचे शेतकरी बलदेव शुक्ला. पाहिल्याच पावसात त्यांनी पाच एकर शेतात सोयाबीन आणि तुरीची लागवड केली, वर्षभराच्या उत्पन्नाची स्वप्नं जणू त्यांनी पेरली होती. मे महिन्यापासून मशागत, महागडं बियाणे, खतं आणि मजुरीवर त्यांनी हजारो रुपये खर्च केले. मात्र, त्यानंतर पावसाने अशी काही पाठ फिरवली की, आता उगवलेली पिके सुकण्याच्या मार्गावर आहेत. गेल्या ४० वर्षांत अशी भयानक परिस्थिती फार कमी वेळा पाहायला मिळाली, असं इथले शेतकरी सांगतायत. आता पाऊस पडला नाही, पेरणी कशी करायची आणि ज्यांनी केली त्यांना दुबार पेरणीशिवाय पर्याय नाही. पण त्यासाठी पुन्हा बियाणं आणि खतांचा खर्च करायचा कुठून हाच मोठा प्रश्न आहे. Vo संपूर्ण मराठवाड्यातील शेतकऱ्यांची हीच अवस्था आहे डोळे आभाळाकडे लागले आहेत कधी येणार वरुणराजा याच प्रतीक्षेत आहेत...सगळ्यांना खरीप हंगाम वाया जाण्याची भीती वाटतेय... एकीकडे मुंबईसह राज्याच्या इतर भागांत मुसळधार पाऊस कोसळत असताना, मराठवाडा मात्र पाण्याच्या थेंबासाठी तरसतोय. पावसाची तूट तेरा टक्क्यांवर आहे तर संपूर्ण मराठवाड्यात अवघ्या 49 टक्के पेरण्या झाल्या आहेत... मराठवाडा खरिपाची आकडेवारी: एकूण खरीप क्षेत्र: ४९ लाख ७२ हजार ७६६ हेक्टर प्रत्यक्षात झालेली पेरणी: २४ लाख ५५ हजार १३३ हेक्टर (केवळ ४९%) अपेक्षित पर्जन्यमानात तूट: १३ टक्के तूट , वार्षिक सरासरीच्या तुलनेत केवळ २२.३% पाऊस... विभागातील मुख्य पीक असलेल्या कापसाची पेरणी तर अत्यंत खालावली आहे. कपाशीची केवळ २३ हजार हेक्टरवर पेरणी झाली असून, पाऊस नसल्यामुळे शेतकऱ्यांनी काळ्या आईची ओटी भरताना हात आखडता घेतला आहे. कडधान्याची (तूर, मूग, उडीद) केवळ ३२% तर सोयाबीनसह गळीत धान्याची ५४% पेरणी झाली आहे. मराठवाड्यात जिल्ह्यानुसार पेरणीची टक्केवारी पाहिली तर भीषणता अधिक स्पष्ट होते. सर्वाधिक ६३ टक्के पेरणी नांदेड जिल्ह्यात झाली आहे, तर सर्वात कमी म्हणजेच केवळ ३३ टक्के पेरणी लातूर आणि धाराशिव जिल्ह्यात झाली आहे. या भागातील शेतकरी पेरणीचे धाडस करायलाही तयार नाहीत. छत्रपती संभाजीनगर: ५९% पेरणी जालना: ५८% पेरणी बीड: ४७% पेरणी परभणी: ४६% पेरणी हिंगोली: ४७% पेरणी राज्य सरकार ही यावर लक्ष ठेवून आहे, या मधल्या दिवसात थोडं प्रोटेक्टिव्ह इरिगेशन आपण देऊ शकलो तर अडचण येणार नाही असं मला मुख्यमंत्री म्हणाले तर अलनिनोमुळे पावसात तूट आणि डिस्टन्स राहणार आहे याची कबुलीही त्यांनी दिलीय.. लास्ट vo : पाऊस आज ना उद्या येईल, मात्र तोपर्यंत शेतकऱ्याच्या मनातील आशेचा अंकुर जळणार नाही, याची काळजी आपल्याला घ्यावी लागेल. पेरणी रखडली असली तरी त्याचा धीर सुटू नये, यासाठी तात्काळ मदतीचे हात पुढे येण्याची गरज आहे. शेवटी, शेतकरी जगला तरच देश जगणार, हे सत्य आपण विसरून चालणार नाही... हिंगोली हुन गजानन वाणी सह विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

डोंबिवली डॉक्टर मारहाण केस: रमेश म्हात्रे के बेटे एक साल से फरार

Kalyan, Maharashtra:डोंबिवली डॉक्टर मारहाण प्रकरणातील शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांचा मुलगा एक वर्षापासून फरार.. राजकीय दबावामुळे पोलीस पकडत नाहीत काम असा सवाल. रमेश म्हात्रे यांचा नगरसेवक पद रद्द करण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे तक्रार केली रमेश म्हात्रे यांना शासन पाठीशी घालते त्यांचा मुलगा प्रवीण रमेश म्हात्रे यांच्या विरोधात बनावट कागदपत्र बनवून अनधिकृत इमारत इमारत बांधल्याप्रकरणी विश्व नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे मात्र वर्षभर उलटूनही प्रवीण म्हात्रे हा फरार असून पोलीस तपास करत नाहीत रमेश म्हात्रे नगरसेवक असल्याने पोलीस त्यांच्या मुलाला पाठीशी घालतात रमेश म्हात्रे यांच्या विरोधात केलेले तक्रारीची दखल घ्यावी व त्यांचे नगरसेवक पद रद्द करा ...
0
0
Report

ATS ने महाराष्ट्र में 157 ठिकानों पर छापा; भट्टी से जुड़े लोग पूछताछ में

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:काही शॉट्स जोडले आहेत संभाजी नगरचे, इतर ठिकाणचे शॉट्स वापरा, बाईट्स नागपूर हुन आले आहेत, मिड पिटीसी पाठवला आहे... Anchor : राज्यात एटीएसना शुक्रवारी कारवाई करत तब्बल 157 ठिकाणी छापे घातले या छाप्यात पाकिस्तानचा गॅंगस्टर आणि सध्या दुबईतून ऑपरेट करत असलेला शहजाद भट्टी याच्या संपर्कात असलेल्या लोकांची चौकशी करण्यात आली या लोकांचे सगळे इलेक्ट्रॉनिक गॅजेट जप्त करण्यात आले आणि त्यातून काही महत्त्वपूर्ण माहिती मिळते का यावर पुढचा तपास अवलंबून असणार आहे मात्र याच लोकांवर कारवाई का केली पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट राज्यभर एटीएसचे छापासत्र, तब्बल 150 ठिकाणी कारवाई शहजाद भट्टी चे महाराष्ट्रातील नेटवर्क उध्वस्त करण्याचा प्रयत्न तरुणांना अमिश देऊन देशविरोधी कारवाई करण्यास प्रोत्साहित करण्याचा भट्टी चा धंदा पाकिस्तानी गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी संपर्कात असलेल्या राज्यभरातील 112 जणांची एटीएसने टीम ने शुक्रवारी चौकशी केली. सकाळी सात वाजेपासून एटीएसच्या 14 युनिट्समधील 58 पथकांनी एकाच वेळी कारवाई करत 157 ठिकाणी छापेमारी केली. मरातवाड्यातही 14 ठिकाणी ही कारवाही करत 15 जणांची चौकशी करण्यात आली आहे... ही कारवाई पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध असलेल्या सोशल मीडिया नेटवर्कच्या तपासाचा भाग होता, शहजाद भट्टी फेसबुक, इन्स्टाग्राम, टेलिग्राम आणि व्हॉट्सअपसारख्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे भारतीय तरुणांशी संपर्क साधून विघातक कारवायांसाठी प्रवृत्त करण्याचा संशय आहे. या नेटवर्कमध्ये आबिद जाट ऊर्फ आबिद छल, अजमल गुजर, हम्माद मेमन, राणा हुसेन, अशरफ बशीर आलम यांच्यासह अन्य काही पाकिस्तानस्थित हँडलर्सचा सहभाग असल्याचाही यंत्रणांना संशय आहे त्यातून ही कारवाई करण्यात आली... नक्की कसा हेरायचा तरुण 18 ते 35 वर्ष वयोगटाचे तरुण हे खास टार्गेट वर असायचे, त्यांना एक टीम हेरून त्यातील कोण जाळ्यात येऊ शकते याचा अभ्यास केला जायचा अनेक तरुण दिवसातील बराच वेळ मोबाईल वर घालवतात, त्यात भट्टी आणि इतर संबंधित लोकांच्या पोस्ट कोण जास्त पाहतो, like करतो share करतो अशा लोकांना तो हेरायचा कुणी समाज माध्यमावर काही वेगळी पोस्ट केली, याबत दुःख व्यक्त केले ही लोक टार्गेट व्हायची, याना समाज माध्यमातून हेरून संपर्क केला जायचा आणि त्यांना सुरुवातीला गोड बोलून नंतर काम दिले जायचे, धार्मिकदृष्ट्या संवेदनशील विषयांचा आधार घेऊन तरुणांचे कट्टरपंथीकरण करण्याचा प्रयत्न करणे खास करून बेरोजगार तरुणांना पैशांचे आमिष दाखवून त्यांचा देशविघातक कारवायांसाठी वापर, गुप्त माहिती गोळा करणे, अमली पदार्थांची तस्करी, अवैध शस्त्रांची वाहतूक आणि स्थानिक पातळीवर स्लीपर सेल उभारण्याचे प्रयत्न या_netवर्कमार्फत करण्याचा प्रयत्न होता...याबाबत एटीएस आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे कारवाईत अनेक गंभीर गोष्टी आढळून आलेले आहेत आणि या सगळ्यावर कडक कारवाई होईल असं सरकारने स्पष्ट केलं आहे... Byte देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री Byte पंकज भोयर, गृहराज्य मंत्री Vo 2... जो शहजाद भट्टी हे सगळं घडवून आणतोय तो आहे तरी कोण हेही पाहूयात कोण आहे शहजाद भट्टी शहजाद भट्टी हा पाकिस्तानी गँगस्टर आहे, सोशल मीडिया इन्फ्लुएनसर असण्यासोबतच पाकिस्तानच्या आय एस आय चा तो डिजिटल हँडलर आहे.. तो इन्स्टाग्राम, फेसबुक आणि यु ट्यूब वर 333 , 30 आणि 33 या बॅनर खाली काम करत असल्याचे आढळून आले आहे, तो स्वतःला राष्ट्राचा आवाज आणि समाज सेवक असल्याचे भासवतो... मूळ हा पाकिस्तान च्या पंजाब प्रांत चा रहिवासी आहे, पाकिस्तानात त्यावर चोरी , दरोडा आणि बलात्कार सारखे गुन्हे दाखल आहेत, पाकिस्तान मधून पळून तो दुबईत गेला आणि तिथं फारukh खोखर गॅंग च्या संपर्कात आला आणि आता तो दुबईतून आणि इतर काही देशातून आपलं नेटवर्क चालवतोय सध्या तो आयएसआयच्या थेट संपर्कात असल्याचा बोलवलं जातंय आणि दहशतवादी अजमल गुज्जर आणि अबिद भट यांच्या सहकार्याने भारतात शस्त्रास्त्र आणि ड्रग पुरवठा करण्यात सहभागी आहे मिड पिटीसी विशाल करोळे *हा भट्टी बिष्णोई गॅंग चा ही मित्र होता मात्र पहलगाम हल्ल्या नंतर यांचे फाटले, भट्टी वर पुर्तुगाल मध्ये बिष्णोई गॅंग ने हल्ला ही केला होता , भारतातील अनेक दहशतवादी कारवायत भट्टी याचा संपर्क आढळुन आला आहे, गोरगरीब मुलं हेरणे आणि त्यांना देश विरोधी कारवाया करायला लावणे हा याचा मुख्य धंदा आहे* Vo.. तासनतास अनेक मुलं मोबाईलवर असतात मात्र हे मुलं मोबाईलवर करतात काय कुणाच्या संपर्कात येतात याकडेही लक्ष देण्याचाचा अब असं?
0
0
Report
Advertisement

जालना में सोयाबीन पिक में हिरण भगाने के लिए किसान गावठी जुगाड़ अपनाने लगे

Jalna, Maharashtra:जालना : सोयाबीन पिकामध्ये हिरणांचा उच्छाद,हरणांचा बंदोबस्त करण्यासाठी शेतकऱ्यांकडून गावठी जुगाडाचा उपाय अँकर : जालना जिल्ह्यात हजारो हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरणी करण्यात आलीय. पिकाने जमिनीतून वर मान काढताच कोवळ्या सोयाबीन पिकावर हिरणांनी ताव मारायला सुरुवात केलीय. या प्रकाराला शेतकरी मेटाकुटीला आलाय. मात्र दिवसा आणि रात्रीच्या वेळेला हिरणा उभ्या पिकात नुकसान करत असल्यानं मेटाकुटीला या आलेल्या जालना जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी गावठी उपाय शोधले. घनसावंगी तालुक्यातील बोडखा बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी पिकातून हिरणांना पळवून लावण्यासाठी अनेक ठिकाणी झाडांच्या फांद्यांना बिअर बाटली बांधल्या आहेत. वारा आल्यानंतर या बाटल्यांचं एकमेकांना घर्षण होऊन आवाज येतो. त्यामुळे हिरणा पिकातून पळ काढतात. तर काही शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी हिरण पिकावर ताव मारू नये म्हणून एका काठीला नायलॉनच्या दोरीने बॅटरी बांधली आहे. वाऱ्यांमुळे रात्रीच्या वेळी ही बॅटरी सर्व बाजूंनी फिरते. त्यामुळे शेतात शेतकरी असल्याचा भास हिरण प्राण्यांना होतो त्यामुळे हिरण पिकातून पळ काढतात आणि हिरणांमुळे नुकसान होत नसल्याचा दावा शेतकऱ्यांनी केलाय. तर काही शेतकऱ्यांनी कीटकनाशकांची बाटली कापून ही बाटली काठीला कापून जोडली आहे. वाऱ्यामुळे ही बाटली फिरून आवाज होतो. या आवाजामुळे देखील प्राणी पिकात येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितलंय. तर काही शेतकऱ्यांनी वन विभागाने हिरणांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. बाईट : बाळासाहेब ढेरे,शेतकरी(काळा टी शर्ट) बाईट : रामभाऊ दहीभाते,शेतकरी, गुलाबी टी शर्ट बाईट : नारायण वाढेकर,शेतकरी, पांढरा शर्ट
0
0
Report

कोकण से पश्चिम महाराष्ट्र तक यातायात बंद; दराड़ गिरنے का खतरा, अंबेनळी-वरंध-तम्हिणी घाट बंद

Chendhare, Maharashtra:पश्चिम महाराष्ट्रात जाणारी वाहतूक ठप्प .......सर्व प्रकारची वाहतूक बंद .......सर्व घाट रस्त्यावर दरडी कोसळण्याचा धोका .......अँकर - मागील आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीचा फटका रायगड जिल्ह्यातील वाहतूक व्यवस्थेला बसला आहे. वारंवार कोसळणाऱ्या दरडी याचं प्रमुख कारण आहे. कोकणातून महाबळेश्वरकडे जाणारा आंबेनळी घाट रस्ता सर्व प्रकारच्या वाहतुकिच्याासाठी बंद आहे. तर वराढ घाट आणि ताम्हिणी घाटातून देखील वाहतूक बंद करण्यात आली आहे त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली आहे. इथल्या परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी.
0
0
Report
Advertisement

आषाढ़ीवारी के मौके पर पंढरपूर डिपो में नई एसटी बसें पूजन के साथ शामिल

Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर पंढरपूर आगाराला नव्या कोऱ्या एसटी बस मिळाल्या आहेत. आमदार समाधान आवताडे आणि राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी यांच्या उपस्थितीत या नवीन एसटी बसचे पूजन करण्यात आले. यावेळी आमदारांसह अधिकाऱ्यांनी नव्या बस मधून फेरफटका सुद्धा मारला. ग्रामीण व शहरी भागातील प्रवाशांना अधिक चांगली वाहतूक सेवा मिळावी यासाठी राज्य शासन आणि परिवहन महामंडळ सातत्याने प्रयत्नशील आहे. नवीन बसमुळे प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, आरामदायी आणि वेळेची बचत करणारा ठरेल असे मनोगत आमदार अवताडे यांनी व्यक्त केले
0
0
Report

सांगली में राम मंदिर चंदे चोरी के विरोध में कांग्रेस का टाळ-भजन प्रदर्शन

Sangli, Maharashtra:स्लग -राम मंदिर चोरी प्रकरणी काँग्रेसचे सांगलीत टाळ-भजन आंदोलन.. अँकर - अयोध्यातील राम मंदिर देणगी चोरी प्रकरण सांगलीमध्ये काँग्रेसकडून सत्याग्रह आंदोलन करण्यात आले आहे. सांगली मिरज रस्त्यावरील हनुमान मंदिरासमोर काँग्रेस जिल्हाध्यक्ष विक्रम सावंत व शहर जिल्हाध्यक्ष राजेश नाईक यांच्या नेतृत्वाखाली टाळ-भजन आंदोलन करण्यात आले. राम मंदिर चोरी प्रकरणाचा निषेध नोंदवत भाजप सरकारचा निषेध नोंदवण्यात आला आहे,तातडीने याप्रकरणी सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करावी,अन्यथा काँग्रेसकडून पुढील काळात तीव्र आंदोलन करण्यात येईल,असा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report

पालघर केळवे रोड पर बाढ़ ने परिवार के चार घंटे तक शव छत पर रखा

Palghar, Maharashtra:पालघरच्या केळवे रोडमध्ये पुराच्या रौद्ररूपाचा असा काळीज पिळवटून टाकणारा प्रसंग समोर आला आहे. घरात शिरलेल्या पुराच्या पाण्यामुळे एका कुटुंबाला तब्बल चार तास मृतदेह घेऊन घराच्या छतावर बसण्याची वेळ आली. पालघरच्या केळवे रोड स्थानकाच्या पूर्वेकडील देवी पाड्यात समोर आली आहे. ५५ वर्षीय अनुसया मनोहर लिलका यांच्यावर धुंदलवाडी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान रविवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला. सोमवार पहाटे त्यांच्या मृतदेह रुग्णवाहिकेतून केळवे रोड येथे आणण्यात आला. परंतु पश्चिमेकडून पूर्वेकडे जाणाऱ्या रेल्वे अंडरपासमध्ये पुराचे पाणी साचल्याने मृतदेह खांद्यावरून घरापर्यंत आणावा लागला. पण सकाळी पावसाचा जोर वाढला आणि काही वेळातच पुराचे पाणी घरात शिरले. पाण्याचा प्रवाह इतका वाढला की मृतदेह वाहून जाण्याचा धोका निर्माण झाला. अखेर कुटुंबीयांनी घराच्या किचन भागातील छताचे दोन सिमेंटचे पत्रे फोडले आणि मोठ्या कष्टाने मृतदेह छतावर नेला. प्लास्टिकने मृतदेह झाकून ठेवत कुटुंबीयांनी तब्बल चार तास छतावरच आसरा घेतला. एकाच बाजूला आयुष्यभराची साथ सोडून गेलेल्या व्यक्तीचा मृतदेह... आणि दुसऱ्या बाजूला पुरापासून आपल्या कुटुंबाला वाचवण्याची धडपड... लिलका कुटुंबाने या चार तासांत अक्षरशः काळजाचा थरकाप उडवणारा प्रसंग अनुभवला. दोन तासांनंतर पुराचे पाणी हळूहळू ओसरू लागले. त्यानंतर मृतदेह पुन्हा खाली आणण्यात आला. ग्रामस्थांनी मदतीचा हात पुढे केला. देवी पाडा स्मशानभूमीत अनुसया लिलका यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. निसर्गाच्या संकटासमोर माणूस किती हतबल होतो, याचं जिवंत उदाहरण केळवे रोडच्या देवी पाड्यात पाहायला मिळालं. पुराच्या पाणीने केवळ घरंच नाही, तर एका कुटुंबाचा शेवटचा निरोप देण्याचा प्रवासही थांबवला होता.
0
0
Report
Advertisement

पालघर बाढ़ हादसे की जांच, दोषियों के खिलाफ कड़डी कार्रवाई का भरोसा — पवार

Thane, Maharashtra:पालघर पूरघटना की चौकशी करुन दोषींवर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार.. मुरबाडमध्ये आई महोत्सव व विद्यार्थी गुणगौरव समारंभ 2026 संपन्न... उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांची प्रमुख उपस्थिती.. ॲकर.. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे जिल्ह्याच्या वतीने आणि प्रियजन गुणगौरव समितीच्या आयोजनातून मुरबाड तालुक्यात "आई महोत्सव व विद्यार्थी गुणगौरव समारंभ आयोजित करण्यात आला होता यावेळी उपमुख्यमंत्री सुनीत्रा पवार यांना पत्रकारांनी पालघर येथील केळवे-धुंदलवाडी येथे पूराच्या परीस्थितीत अनुसया मनोहर लिलला ५५ वर्षीय यांचा मृत्यू झाला. रस्त्यावर पाणी साचल्याने मृत्यू देह खांद्यावर घरी आणला तर घरात ही पूराचे पाणी शिरले प्रेत वाहून जाऊ नये म्हणून चार तास घराच्या छतावर घेऊन बसले. यावर आपल्या आपात्कालीन यंत्रणा कुठे होती. त्यावर पवार म्हणाल्या की या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई करण्यात येईल. मोशी घटनेवर आमचं लक्ष असून त्यावर समिती देखील नेमली असून बचाव कार्य सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

जुन्नर से पंढरपुर तक दिंडी रवाना, ज्ञानेश्वर महाराज की परंपरा जीवंत

Barav, Maharashtra:संत ज्ञानेश्वर महाराजांनी ज्या रेड्याच्या मुखातून वेद वदवले त्या रेड्याच्या नावाने पंढरपूर ला जाणाऱ्या दिंड्याचे पुणे जिल्ह्यातल्या जुन्नर तालुक्यातून प्रस्थान झाले. संतवार्ढी येथे रेडा समाधी स्थळ असून गणबा तुकारामाच्या जय घोषात परिसर दुमदुमून निघला होता. आषाढी वारीला पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनाला जाणा-या दिंड्यांपैकी पशूच्या नावाने ही राज्यभरातील एकमेव दिंडी आहे. रेडा समाधीस्थळापासून गेल्या १८ वर्षांपासून दिंडी पंढरपूरकडे प्रस्थान करते यंदा १९ वे वर्ष आहे. श्रद्धा, इतिहास आणि वारकरी परंपरेचे दर्शन घडवणारी ही दिंडी वारकऱ्यांसाठी खास आकर्षण ठरत आहे..
0
0
Report

चंद्रपुर के वारोरा में नाली में गिरकर बाइक सवार की मौत, पुल पर रेलिंग नहीं—जन आक्रोश

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरातील टिळक वॉर्ड परिसरात नालीत पडून एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. मृत व्यक्तीचे नाव महेश गोपीचंद मेश्राम (वय ५३, रा. सरदार पटेल वॉर्ड, वरोरा) असे असून ते दुचाकीवरून जात होते. सरदार पटेल वॉर्ड व फैल वॉर्डकडे जाणाऱ्या मार्गावरील छोट्या पुलाजवळ ही घटना घडली. या पुलावर संरक्षण कठडे नाहीत व बऱ्याच वर्षापासून या नालीचे बांधकाम झालेले नाही असे नागरिकांचे म्हणणे आहे. पुलालगत असलेल्या नालीजवळून जात असताना महेश मेश्राम यांचा दुचाकीवरील ताबा सुटल्याने ते नालीत पडले. नाली मध्ये वरती फक्त त्यांचे शर्ट दिसत होते त्यामुळे आत मध्ये कोणी आहे हे फार वेळाने कळले. घटनेची माहिती मिळेपर्यंत ते नालीतील पाण्यात बुडाले आणि त्यातच त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. शहरातील गजबजलेल्या भागात अशा प्रकारे नालीत बुडून नागरिकाचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वरोरा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय, वरोरा येथे पाठविण्यात आला. या दुर्घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करत संबंधित पुलावरील संरक्षण कठडे तातडीने बसविण्याची मागणी केली आहे.
0
0
Report

अनुसूचित जाति ट्रैक्टर योजना में घोटाला: 25 नए ट्रैक्टर भाड़े पर बिक्री के आरोप

Sangli, Maharashtra:स्लग - अनुसूचित जाती जमातीच्या ट्रॅक्टर योजनेत घोटाळ्याचा आरोप, भाडेतत्त्वाच्या नावाखाली ट्रॅक्टर विक्रीचा उद्योग ? अँकर - अनुसूचित जाती जमातीसाठी देण्यात येणाऱ्या ट्रॅक्टर योजनेत घोटाळा झाल्याचा आरोप करण्यात आलााय.नांदेड-जालना जिल्ह्यातील समाज कल्याणकडून देण्यात येणारे ट्रॅक्टर,थेट सांगलीच्या मिरजेमध्ये आढळून आले आहेत,हे सर्व ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देण्याचा उद्योग सुरू असल्याचं समोर आलं आहे.मात्र भाडे तत्त्वाच्या नावाखाली विक्री करण्याचा बेकायदे उद्योग असून याची व्याप्ती राज्यभर असल्याचा आरोप स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून करण्यात आला आहे. लाभार्थ्यांना देण्यात येणारी नवे कोरे ट्रॅक्टर शोरूम मधून थेट सांगलीत 90% अनुदान तत्त्वावर समाज कल्याण विभागाकडून दिले जातात ट्रक्टर महিলা व पुरुष बचत गटांना दिले जाणारे ट्रॅक्टर व मिनी ट्रॅक्टर भाड्याने देण्याचा उद्योग व्ही वो - नांदेड आणि जालना जिल्ह्याच्या समाज कल्याण विभागाकडून अनुसूचित जाती जमातीसाठी विशेष योजनेच्या माध्यमातून अनुदान तत्वावर लाभार्थ्यांना ट्रॅक्टर देण्यात येतात,मात्र हे देण्यात आलेले,एक दोन नव्हे तर तब्बल २५ नवे कोरे ट्रॅक्टर थेट सांगलीच्या मिरज तालुक्यातल्या एरंडोली येथे आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. व्ही वो - स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे प्रशांत सदामते यांनी हा सर्व प्रकार समोर आणला आहे. तब्बल २५ नवी कोरे ट्रॅक्टर एरंडोली येथील एजंट असणाऱ्या वैभव सौंदते यांच्या घरासमोर लावण्यात आले होते,त्यापैकी 14 ट्रॅक्टर १५ वर्षांच्या भाडेकरारावर देण्यात आल्याचं समोर आले आहे.अनुसूचित जाती जमातीच्या लाभार्थ्यांसाठी अनुदान तत्वावर हे ट्रॅक्टर देण्यात येतात.मात्र हे ट्रॅक्टर नांदेड-जालना येथून आणत,भाडेतत्त्वावर देण्याच्या नावाखाली विक्री करण्यात येत असल्याचा आरोप करत एसआयटी चौकशीची,मागणी स्वाभिमानी स्वराज्य सेनेचे अध्यक्ष प्रशांत सदामते यांनी केली आहे. बाईट - प्रशांत सदामते -अध्यक्ष - स्वाभिमानी स्वराज्य सेना. व्ही वो - अनुसूचित जमातीसाठी राज्य सरकारच्या समाज कल्याण विभागाच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर देण्यात येतात.बाजारात चार ते पाच लाखांच्या आसपास किंमत आहे. 90% अनुदान देखील आहे.महिला व पुरुष बचत गटांच्या माध्यमातून हे ट्रॅक्टर वितरित केले जातात,पण ट्रॅक्टर शोरूम मधून लाभार्थ्याकडे न जाता ते थेट सांगलीमध्ये पोहचले आहेत,मग ते तीन ते साडे तीन लाखांना पंधरा वर्षांच्या भाडे करारा तत्त्वावर देण्यात येतात. व्ही वो - याबाबत नांदेड व सांगली समाज कल्याणच्या अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरुन संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला, मात्र त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही..तर ज्या एजंटच्या दारात हे सर्व ट्रॅक्टर आढळून आले आहेत, त्या एजंट कडून नांदेड व जालना जिल्ह्यातील हे ट्रॅक्टर असून भाडेतत्त्वावर देण्यासाठी ट्रॅक्टर आणल्याचं सांगण्यात आलं आहे. बाईट - वैभव सौंदते - ट्रॅक्टर एजंट - एरंडोली व्ही वो - योजनेतल्या अध्यादेशाच्या पडताळणीमध्ये लाभार्थी ट्रॅक्टर भाडेतत्त्वावर देऊ शकतो,पण त्याची विक्री किंवा ते गहाण ठेवू शकत नाही,असे स्पष्ट नमूद करण्यात आला आहे,मात्र प्रश्न हा आहे,की एकाच वेळी २५ ट्रॅक्टर एकाच एजंटकडे,लाभार्थी भाड्याने,तेही ६०० किलोमीटर लांब असणाऱ्या जिल्ह्यात कसे देऊ शकतात ? ज्या,महिला व पुरुष बचत गटांना ट्रॅक्टर मिळाली आहेत,त्याचे लाभार्थी खरंच अस्तित्वात आहेत ka ? ka केवळ महिला बचत गट बनवून लाभार्थी दाखवत ट्रॅक्टर भाड्याने देण्याच्या नावाखाली विक्री करण्याचा हा उद्योग तर नाही ना ? असे एक ना अनेक प्रश्न आता निर्माण झाल्याचे स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून उपस्थित केले आहेत. व्ही वो - हे सर्व प्रकरण पाहता यामागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता स्वाभिमानी स्वराज्य सेनेकडून व्यक्त करण्यात आली आहे.याप्रकरणी मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्र्यांनी दखल घेऊन चौकशी करावी,अशी मागणी करण्यात आली आहे,त्यामुळे राज्य सरकारच्या चौकशीनंतरच या सर्व प्रकरणाचा उलगडा होणार आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top