445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला में खरीप सामग्री की सप्लाई सुनिश्चित करने के लिए कड़ा नियोजन; कालाबाजारी पर सख्त कार्रवाई की चेतावनी
Akola, Maharashtra: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बी-बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अचूक नियोजन करावे, तसेच निविष्ठांचा काळाबाजार अथवा लिंकिंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला आहे. 1: अकोल्याचे पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, तालुकानिहाय बियाणे व खतांची मागणी, उपलब्धता आणि नियोजनाची अचूक माहिती प्रशासनाने सादर करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे, जेणेकरून राज्यस्तरावर योग्य पाठपुरावा करता येईल. जिल्ह्यात कुठेही निविष्ठांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निविष्ठांचा काळाबाजार, लिंकिंग किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणारे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी जिल्हा वॉररूमसारख्या यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.आपत्तीच्या काळात पंचनामे अचूक व पारदर्शक व्हावेत, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महावितरणने वितरण रोहित्र संच तालुकास्तरावर उपलब्ध ठेवावेत, जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाला गती देऊन पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बियाण्यांची उगवण न झाल्यास संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, कापूस लागवडीसाठी ७ लाख २५ हजार बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच विविध खतांचे एकूण मंजूर आवंटन १ लाख १४ हजार २०० मेट्रिक टन इतके आहे.0
0
Report
मेळघाट के चिखलदरा में भीषण पानी संकट, 9 गावों को 20 टैंकर पानी पहुँचा रहा है
Amravati, Maharashtra:मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाई; ९ गावांसाठी २० टँकरने पाणीपुरवठा सुरू अँकर :- अमरावती जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पाणीटंचाईची समस्याही गंभीर बनली आहे. विशेषतः मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांना सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत टँकरग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाल्यानंतर चिखलदरा तालुक्यातील २५० हून अधिक गावांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून मे महिन्याच्या मध्यावरच परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गेल्या वर्षीही चिखलदरा तालुक्यातील १९ गावांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेळघाटात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.0
0
Report
पुणे ग्रामीण क्षेत्र में CNG की कीमत दो रुपये बढ़ी, 96.50 रुपए पहुंचे
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात CNG दोन रूपयांनी महाग झालाय,पुण्याच्या ग्रामीण भागात आता CNG 96.50 रूपयांवर पोहचलाय,CNG च्या दरांचा भडका उडाल्याने सर्वसामान्य वाहन चालकांना याचा मोठा फटका फसणार आहे,गँस भरण्यासाठी आधीच तासंतास रांगेत वाहने घेऊन थांबावे लागत असताना तो हि CNG वेळेवर मिळत नव्हता आता त्यात हि नविन दर वाढ आमच्या खिशाला परवडणारी नसल्याच्या प्रतिक्रिया वाहन चालक देत आहेत.0
0
Report
Advertisement
पेट्रोल-डीजल की दरों में एक सप्ताह में फिर वृद्धि, नागपुर के पंपों पर ताज़ा भाव
Nagpur, Maharashtra:आठवड्याभरात पुन्हा एकदा पेट्रोल डिझेलची दरवाढ झाली आहे याबाबत सर्वसामान्य जनतेशी पेट्रोल पंपावर संवाद साधला आहे आमच्या प्रतिनिधींनी नागपूर पेट्रोल -- 108.04 (आधी 107.16, आधी(1) 104.2) डिझेल -- 94.61 ( आधी 93.70,आधी (1)90.59)0
0
Report
ATM रिजेक्ट नोटों से नकली मुद्रा रैकेट का भंडाफोड़, गडचिरोली में चार गिरफ्तार
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली शहर में ATM में पैसे जमा करते समय मशीन ने रिजेक्ट की गई कुछ सौ रुपए की नकली नोटों के बारे में बड़े नकली मुद्रा रैकेट का भंडाफोड़ किया। गडचिरोली पुलिस के जांच के अनुसार नागपुर के एक फ्लैट में शुरू हुए इस बनावट नोटों के मिनी प्रिंटिंग प्रेस का खुलासा हुआ, जिसमें गडचिरोली के दो उच्च शिक्षित भाइयों समेत चार लोग गिरफ्तार गए। गडचिरोली के कारगिल चौक क्षेत्र के Bank of Maharashtra के ATM में कुछ संदेहास्पद नोट जमा करने का प्रयास किया गया। मशीन ने नोट स्वीकार नहीं किए, जिसके बाद बैंक अधिकारियों ने जाँच की तो नोट नकली पाए गए। स्थानीय अपराध शाखा की जांच से प्रमोद कोवे तक इस नकली मुद्रा मामले का लिंक मिला। पूछताछ में प्रमोद कोवे ने आदित्य रेचनकर से यह रकम प्राप्त करने की कबूल की। इसके बाद रिकॉर्ड नागपुर की तरफ बढ़े और पुलिस ने मध्यरात्रि को दबिश देकर पूरी योजना का पर्दाफाश किया। नागपुर के किराए के फ्लैट में नकली नोटों के छपाई केंद्र से 50, 100 और 200 रुपये के नकली नोट, हाई-टेक कलर प्रिंटर, बॉन्ड पेपर, कटिंग सामग्री और अन्य उपकरण जप्त किए गए। इस कार्रवाई में मयूर डोईजड और आदित्य डोईजड, ये दोनों सगे भाई, को गिरफ्तार किया गया। एक व्यक्तिCivil Engineer और दूसरा Mechanical Engineering की शिक्षा ले रहा है। पिछले चार वर्ष से वे नकली नोट छाप कर बाजार में जारी कर रहे थे, यह पुलिस ने शक जताया है। न्यायालय ने आरोपियों को छह दिन की पुलिस हिरासत में भेज दिया है और आगे तZZपचल द्वारा विस्तृत जाल के बारे में जांच जारी है।0
0
Report
मराठी फिल्म महामंडळ की चुनाव की नई तिथि तय, 7 जून को मतदान, 8 जून को मतगणना
Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षापासून रखडलेली अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाची निवडणूक 7 जूनला होणार आहे. 17 जागांसाठी आजपासून उमेदवारी अर्ज भरले जाणार असून 7 जूनला मतदान आणि त्यानंतर लगेचच 8 जूनला मतमोजणी होणार आहे. विविध कारणाने चित्रपट महामंडळाची निवडणूक रखडली होती. पण आता मुंबई उच्च न्यायालयाच्या सर्किट बेंच च्या आदेशानुसार सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयाच्या निवडणूक निर्णय अधिकारी रागिनी खडके यांनी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. मतदानाची प्रक्रिया कोल्हापूरसह पुणे आणि मुंबई केंद्रावर पार पडणार आहे. तर मतमोजणीची प्रक्रिया कोल्हापुरात पार पडणार आहे. या मतदानासाठी एकूण 3403 सभासद पात्र धरण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
गोपीचंद पडळकर बोले: मोदी समुद्र के नीचे पाइपलाइन से भारत का सवाल हलाएंगे
Sangli, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी समुद्राचा खालून पाईपलाईन करून भारताचा प्रश्न मिटवणार - गोपीचंद पडळकर हुर्मुज ध्वनी बंद पडल्यावर भारताचा नव्हे तर अनेक राष्ट्रांचे तेल थांबले होते. त्यामुळे आता मोदी साहेब समुद्राचा खालून पाईपलाईन करून भारताचा प्रश्न कायमचा मिटवता येतोय का याचा विचार करत आहेत,असे विधान भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी केले आहे,तर ज्यांना ईश्वरपूर- सांगली रस्ता करारयाची अक्कल नाही, त्यांनी मोदी साहेबांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही,ज्यांना साधे खड्डे मुजवता आले नाहीत,ते समुद्राच्या खाली कधी जाणार,असा टोला गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटलांना लगावला आहे,ते सांगली मध्ये आत्मनिर्भर परिषदेत बोलत होते.0
0
Report
करजत के टोरेंट-पोशीर-शिलार बांधों के विरोध में विशाल आंदोलन, हजारों किसान-आडिवासी शामिल
Karjat, Maharashtra:सहा धरण प्रकल्पांविरोधात कर्जतमध्ये विराट आंदोलन…. टोरेंट, पोशीर, शिलार प्रकल्प रद्द करण्याची मागणी; हजारो नागरिकांचा सहभाग कर्जत तालुक्यातील टोरेंट, पोशीर, शिलार, कोंढाणे, पाली-भुतिवली धरण तसेच टाटा जलविद्युत प्रकल्पांविरोधात टिळक चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात सुमारे दीड ते दोन हजार शेतकरी, आदिवासी, पर्यावरणप्रेमी आणि ग्रामस्थ सहभागी झाले. “जल, जंगल आणि जमीन वाचवा”च्या घोषणांसह सह्याद्रीच्या जैवविविधतेला धोका निर्माण करणारे हे प्रकल्प तातडीने रद्द करण्याची मागणी करण्यात आली. शासनाने दखल न घेतल्यास मंत्रालयावर मोर्चा काढण्याचा इशाराही देण्यात आला असून तहसीलदार धनंजय जाधव यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन मुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन स्वीकारले.0
0
Report
नीट पेपर खरीद मामले में कदम परिवार पर CBI की आज पुणे पूछताछ
Nanded-Waghala, Maharashtra:नीट चा पेपर विकत घेतल्याचा संशय असलेल्या नांदेडच्या कदम कुटुंबाची आज पुन्हा पुण्यात सीबीआय कडून चौकशी होणार असल्याची माहिती आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युत नगर भागात धाड टाकून कदम कुटूंबाची आठ तास चौकशी केली होती. कदम त्यांनी आपल्या मुलीसाठी पाच लाख रुपयात नीट चा पेपर विकत घेतला होता असा संशय आहे. कदम कुटुंबीय पुणेतील एका एजंटच्या संपर्कात होते तिथूनच त्यांनी व्यवहार केल्याचे समोर आले आहे. शनिवारी सीबीआयच्या पथकाने कदम कुटुंबांच्या प्रत्येक सदस्याची कसून चौकशी केली होती. त्यानंतर आज पुन्हा त्यांना पुणे येथील सीबीआय कार्यालयात चौकशीसाठी बोलण्यात आल्याची सूत्रांची माहिती आहे. आज अकरा वाजता कदम कुटुंबीय पुणे येथील सीबीआय कार्यालयात हजर होणार आहेत.0
0
Report
Advertisement
आंबेगाव के केले पर भीषण गर्मी का कहर, निर्यात-बाजार पर बड़ा असर
Ambegaon, Maharashtra:आखाती देशात सुरू असलेल्या महायुध्दाचा आधीच मोठा फटका जुन्नर आंबेगाव शिरूर च्या केळी उत्पादक शेतकय्रांना बसला असून केळीची निर्यात ठप्प झाल्याने केळी चे बाजारभाव मोठ्या प्रमाणात गडगडल्याने केळी उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडले असताना आता वाढत्या तापमानामुळे केळी उत्पादक शेतकय्रांची डोकेदुखी वाढलीय, वाढत्या तापमानामुळे केळी वरती दाग चट्टे पडून केळी मोठ्या प्रमाणात खराब झालीय परिणामी वाढत्या उष्णतेमुळे शेतकय्रांच मोठ्या प्रमाणात नुकसान होतंय याचाच नुकसान ग्रस्थ शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी0
0
Report
अर्नाळा में तोड़फोड़ के विरोध में आक्रोश, आमदार राजन नाईक के घर पर मोर्चा
Vasai-Virar, Maharashtra:वैरार विरार? अर्नाळ्यात महसूल विभागाने केलेल्या तोडक कारवाईच्या विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले असून लालबावटा पक्षातर्फे आमदार राजन नाईक यांच्या निवासस्थानी मोर्चा काढण्यात आला. मात्र पोलिसांनी हा मोर्चा नाळा मच्छी मार्केट परिसरात अडविल्यानंतर आंदोलकांनी रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू केले. काही दिवसांपूर्वी महसूल विभागाने विरार येथीलअर्नाळा परिसरातील शासकीय जागेवरील अनधिकृत बांधकामांवर कारवाई केली होती. या कारवाईत अनेक आदिवासी,कातकरी कुटुुंबे बेघर झाल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. पावसाळ्याच्या तोंडावर ही कारवाई करण्यात आल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. आमदार राजन नाईक यांनी विधानसभेत अर्नाळा येथील जागेवर अतिक्रमणाबाबत मुद्दा उपस्थित केला होता त्यानंतर ही कारवाई करण्यात अायली गेली असल्याने आदिवासी बांधव संतप्त झाले.. आंदोलकांच्या म्हणण्यानुसार, ही कारवाई राजकीय दबावातून करण्यात आली असून काही ठराविक घरांनाच लक्ष्य करण्यात आले. तसेच बेघर झालेल्या कुटुंबांचे तात्काळ पुनर्वसन करावे, अशी मागणी आंदोलकांनी केली आहे.0
0
Report
नागपुर के कोठीरोड महाल गोलीबारी में 3 आरोपी गिरफ्तार, छह के खिलाफ मामला दर्ज
Nagpur, Maharashtra:नागपूर कोठीरोड महाल य गोळीबार प्रकरणी 3 आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. गंगा काकडे, खोब्रागडे आणि कदम असे गोळीबार प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे. याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोठी रोड महाल परिसरात रविवारी रात्री तीन बाईकवर आलेल्या सहा जणांनी गोळीबार केला होता. दोन गोळ्याझाडल्या होत्या त्यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. याप्रकरणी मुख्य आरोपी गंगाला पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले त्याच्यासह अजून दोन आरोपींनाही पोलिसांनी ताब्यात घेतली असून सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ड्रग तस्करी आणि वर्चस्वाच्या वादातून हा गोळीबार करण्यात आला.0
0
Report
Advertisement
छत्रपती संभाजीनगर के ग्रामीण इलाकों में पेट्रोल टंचाई जारी, किसान लंबी कतारों में
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ग्रामीण भागात अजूनही पेट्रोल टंचाई कायम असल्याचे चित्र आहे. छत्रपती संभाजीनगर परिसरातील जावळे आडगाव येथील पेट्रोल पंपावर रात्री उशिरापर्यंत वाहनधारकांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळाल्या. आपला नंबर लावण्यासाठी ग्राहकांनी चक्क कॅन घेऊन रांगा लावल्या. यातील बहुतेक शेतकरी होते. पावसाळा तोंडावर असल्याने शेतात नांगरसह इतर कामे सुरू आहे. त्यामुळे ट्रॅक्टरला डिझेलची गरज असते. पण इंधन मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांना पेट्रोल पंपावर अशा रांगा लावा लागत आहे.0
0
Report
वार्धा बोर प्रकल्प में बाघ ने पाणवठे से प्लास्टिक बाहर फेंका; वीडियो वायरल
Wardha, Maharashtra:वर्धा बोर प्रकल्पात वाघोबाने प्लास्टिक पिशवी/बादली बाहेर टाकली तिचे दृश्य वाईल्ड लाईफ फोटोग्राफर अनुराग हजबे यांच्या कॅमेऱ्यात कैद झाले. या घटनेबद्दलचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. वन्यजीवांना जंगलात पाणवठे उभारून तहान भागवावी यासाठी वन विभागाकडून उपाययोजना केली जात आहेत; मात्र या घटनेची आठवण ताडोबातील नयनतारा वाघिणीच्या प्रसंगाशी झाली आहे. हा घटनाक्रम बोर व्याघ्र प्रकल्पातील असून, पाणवठ्यातील प्लास्टिकचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. दरम्यान, जंगलात प्लास्टिक नको हा नियम जाहीर असून त्याची अंमलबजावणीची आवश्यकता उरत आहे.0
0
Report
वाशीम कारंजा पुलिस ने चोरी की eight दोपहिया और एक एपे वाहन पकड़ा: तीन गिरफ्तार
Washim, Maharashtra:वाशीम: कारंजा शहर पोलिसांनी चोरीच्या वाहनांविरोधात मोठी कारवाई करत ८ दुचाकी आणि १ ॲपे वाहन जप्त केले. या कारवाईत ३लाख ४२ हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. तसेच तीन जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी राहुल सोळंके, करण चव्हाण आणि चेतन पवार यांच्याकडून ही वाहने ताब्यात घेतली. वाहनेची कागदपत्रे आणि मालकीबाबत समाधानकारक माहिती न मिळाल्याने महाराष्ट्र पोलीस कायद्याच्या कलम १२४ अंतर्गत कारवाई करण्यात आली. प्राथमिक तपासात काही वाहने अमरावती जिल्ह्यातील गुन्ह्यांशी संबंधित असल्याचे समोर आले असून पुढील तपास कारंजा शहर पोलीस करीत आहेत。0
0
Report
Advertisement
