445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ में पुलिस की संयुक्त कार्रवाई: शराब दुकान से तीन नाबालिग बाल मजदूर बचाए गए
Beed, Maharashtra:बीड: गेवराईत धडक कारवाई: मद्याच्या दुकानातून तीन अल्पवयीन बालमजूरांची सुटका\n\nANC- गेवराई येथे पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक आणि दामिनी पथकाने संयुक्त कारवाई करत एका मद्याच्या दुकानावर छापा टाकला. या कारवाईदरम्यान उत्तर प्रदेशातील तीन अल्पवयीन मुलांना कामाला ठेवण्यात आल्याचं उघड झाले. पोलिसांनी तत्काळ तिन्ही बालमजुरांना ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवले. या प्रकरणी बालमजुरीस प्रोत्साहन दिल्याबद्दल मद्य विक्री करणाऱ्या चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर बालकामगारांना पुढील कारवाईसाठी बालकल्याण समितीपुढे हजर करण्यात आले असून, लवकरच त्यांना त्यांच्या मूळ गावी परत पाठवण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांच्या या कारवाईमुळे बालमजुरीविरोधातील मोहिमेला अधिक बळ मिळाले आहे.0
0
Report
सोलापूर के लिए 1378 करोड़ रुपए की जलापूर्ति योजना मंजूर, 2060 तक पाइपलाइन विस्तार की घोषणा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरला पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी 1378 कोटींची योजना मंजूर - सोलापूर शहराच्या संपूर्ण पाणीपुरवठा व्यवस्थेचा होणार कायापालट - सोलापूर महानगरपालिकेच्या सभागृहात पाणीपुरवठा साठी 1378 कोटींची योजना मंजूर - सोलापूर शहराला सुरळीत पाणीपुरवठा करण्यासाठी 2060 पर्यंतचा विचार करण्यात आल्याची पालकमंत्री जयकुमार गोरेंची घोषणा - शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी जवळपास 1850 किमी च्या पाइपलाइन करण्याची आवश्यकता - महापौर विनायक कोंड्याल यांनी नवीन पाणीपुरवठा योजनासाठी ही सभागृहात मंजूर झाल्याची केली घोषणा - जागतिक बँकेच्या मार्गदर्शनानुसार होणार पाणीपुरवठा योजनेचे काम0
0
Report
यवला के किसानों को पीएम फसल बीमा योजना से कम भुगतान, विरोध की चेतावनी
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील नगरसुल मंडळातील 15 ते 20 गावातील शेतकऱ्यांनी प्रधानमंत्री फसल बीमा योजना खरीप हंगाम 2025 मध्ये जमिनीच्या प्रकारानुसार एक ते दोन हजार रुपये विमा शुल्क भरले होते दुर्दैवाने 2025 यावर्षी अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे शेती पिकाचे मोठे नुकसान झाले शासनाकडून पंचनामे झाल्यानंतरही शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळणे अपेक्षित असताना आठ रुपये, दहा रुपये, पंधरा रुपये अशी नीचांकी रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होईल असे शासनाच्या पोर्टलवर दिसत आहे त्यामुळेच शेतकऱ्यांच्या तोंडाला पाणी पुसली गेली असून संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी येवला कृषी विभागाचे कार्यालय गाठत कृषी अधिकाऱ्यांना जाब विचारला यावेळी कृषी अधिकाऱ्यांनी माहिती घेऊन आपल्याला खुलासा करतो असे उत्तर दिले त्यामुळे शेतकरी संतप्त झाले असून आम्हाला न्याय मिळावा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे0
0
Report
Advertisement
चंद्रपूर जिले के चौथी कक्षा के छात्र की अचानक मौत, हृदयाघात की आशंका
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील चौथी विद्यार्थ्याचा अचानक मृत्यू, हृदयविकाराच्या झटक्याची शक्यता. चंद्रपूर जिल्ह्यातल्या ब्रम्हपुरी तालुक्यातील देलनवाडी गावात शाळेत जाण्यासाठी तयार होत असलेल्या एका 10 वर्षीय विद्यार्थ्यांचा अचानक मृत्यू झालाय. ईशान सत्यपाल आत्राम असं मृत विद्यार्थ्यांचं नाव आहे. चौथ्या वर्गात शिकणारा ईशान सकाळी शाळेत जाण्यासाठी तयार होत असतानाच अचानक खाली कोसळला. पालकांनी त्याला तातडीने शहरातीलच एका रुग्णालयात दाखल केले मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. ईशानचा मृत्यू हृदयरोगाच्या झटक्याने झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. मात्र मृतदेहाचे शवविच्छेदन न झाल्यामुळे मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकलेले नाही.0
0
Report
गोकुळ दूध संघ पैनल विवाद: महायुती बनाम विपक्षी खेमे तीव्र
Kolhapur, Maharashtra:गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांना वगळून गोकुळ दूध संघात पॅनल करावे अशी भूमिका भाजपच्या काही नेत्यांनी मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्याकडे मांडली असल्याचा आरोप मुश्रीफ गटाच्या स्थानिक नेत्यांनी केलाय. त्यामुळे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मित्र पक्षाचे संयुक्त पॅनल बनवावे अशी मागणी मुश्रीफ समर्थक गोकुळचे संचालक युवराज पाटील आणि जिल्हा बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने यांनी पत्रकारद्वारे केली आहे. या संदर्भात भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी राष्ट्रवादीचे भाजपा, शिवसेना आणि जनसुराज्य पक्ष सोडून आणखी कोण मित्र आहे हे जाहीर करावे असं आव्हान दिले आहे. त्यामुळे गोकुळमध्ये महायुती मध्येच आव्हान प्रतिअव्हान दिले जात असल्याने दोन भूमिका समोर येत आहे.0
0
Report
नांदेड जिले में लगातार तूफानी बारिश और आंधी ने फलों को नुकसान पहुँचाया
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने तडाखा दिला. नांदेड आणि भोकर तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला. दोन दिवसापासून नांदेड जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. हवामान खात्याने येलो अलर्ट दिलाय. रविवारी मध्यरात्री नंतर अवकाळी पावसाने तडाखा दिला होता. काल सायंकाळी आणि रात्री पुन्हा अवकाळी पाऊस झाला. वादळी वाऱ्यामुळे भोकर तालुक्यातील भोसी गावात फळबागांचे नुकसान झाले. वादळी वाऱ्यामुळे एका शेतकऱ्याच्या सहा एकरवरील केशर अंब्याचे नुकसान झाले.0
0
Report
Advertisement
सटवाई देवी यात्रा के दौरान लाखनगांव में बैलगाड़ी रेस का धमाका, हजारों लोग शामिल
Ambegaon, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे सटवाई देवीच्या यात्रा उत्सवानिमित्त बैलगाडा शर्यतींचा थरार रंगला असून या बैलगाडा शर्यतीत शेकडो बैलगाडा मालकांनी सहभागी होत शर्यतीचा आनंद लुटला, यावेळी शर्यंत प्रेमींनी हि बैलगाडा घाटात तोबा गर्दी केली होती.0
0
Report
लातूर में सास-बहू विवाद ने बहु और बच्चों को आत्महत्या के लिए मजबूर किया
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... गैस पर स्वयंपाक का केला? किरकोळ वादातून आईसह दोन चिमुकल्यांची आत्महत्या.... lातूर जिल्ह्यातील खरोसा येथे धक्कादायक घटना.... सासू-सुनेच्या वादाने घेतलं भीषण रूप..... गॅसवर स्वयंपाक का केला ? चुलीवर का केला नाही? या कारणावरून सासू आणि सुनेमध्ये झालेल्या वादाने भीषण रूप घेतलं… आणि सुनेने आपल्या दोन चिमुकल्यांसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना लातूर जिल्ह्यातील खरोसा येथे घडली आहे. या प्रकरणात आता किल्लारी पोलिसांनी सासरच्या तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मयत निकिता हिच्यावर लग्नानंतर माहेरून पैसे आणि सोने आणण्याचा दबाव टाकत सासरच्या मंडळींकडून सतत मानसिक आणि शारीरिक छळ केला जात होता. या छळातूनच हा वाद उफाळून आला आणि त्याचा शेवट या दुर्दैवी घटनेत झाला. या प्रकरणी पती दीपक अशोक भुरे, सासू सुनिता अशोक भुरे आणि सासरा अशोक ईश्वर भुरे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
कोल्हापुर शिवजयंती मिरवणुका में भोंदू बाबा और अशोक खरात के दुष्कृत्यों का वीडियो वायरल
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात शिवजयंती निमित्त काढण्यात आलेल्या मिरवणुकीमध्ये भोंदू बाबा व अशोक खरातची दुष्कृत्ये पाहायला मिळाली.. कोल्हापूरकर नेहमीच जयंती और उत्सवाच्या निमित्ताने समाज प्रबोधनात्मक देखावे मिरवणुकीत आणत असतात. संयुक्त मंगळवार पेठ शिवजयंती उत्सव समितीने देखील अशाच पद्धतीचा देखावा उभारून खरात सारख्या भोंदू बाबापासून सावध राहावे असं प्रबोधन केलं. सध्या या जनजागृतीवरील सजीव देखाव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.. या देखाव्याच्या माध्यमातून खरात कोल्हापुरात पण असं म्हणत हा व्हायरल होत आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर उच्च न्यायालय ने संघ प्रमुख की सुरक्षा खर्च से जुड़ी याचिका खारिज कर दी
Nagpur, Maharashtra:नागपूर उच्च न्यायालय संग्रहित व्हिडिओ वापरावा - नागपूर - * राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालय व सरसंघचालकांना ‘झेड प्लस’ सुरक्षेचा खर्च वसूल करण्याची मागणी करणारी याचिका फेटाळलीय ..मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली होती - *सरसंघचालक मोहन भागवत यांच्या सुरक्षेचा खर्च सरकारी तिजोरीवर नको... याचा खर्च संघाकडूनच वसुलीची मागणी करणारी याचिकa मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली होती .* मात्र ही याचिका विशिष्ट हेतूने दाखल केली असल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने ती फेटाळून लावली0
0
Report
विहिप और बजरंग दल के निषेध प्रदर्शन में महिलाओं के शोषण और जबरदस्ती धर्मांतरण के खिलाफ कड़े कानून की मांग
Bhandara, Maharashtra:महिलांचे शोषण... विहिंप व बजरंग दलचे निषेध आंदोलन विश्व हिंदू परिषद व बजरंग दल भंडारा जिल्हातर्फे त्रिमूर्ती चौक येथे विविध मुद्द्यांवर निषेध आंदोलन करण्यात आले. देशात महिलांची फसवणूक, जबरदस्ती धर्मांतर व शोषणाच्या घटनांविरोधात कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यावेळी मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी सावनकुमार यांना देण्यात आले. देशात काही ठिकाणी समोर आलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर कठोर कायदे करावेत, तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी प्रभावी उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी आंदोलकांनी केली. या निवेदनात संबंधित प्रकरणांची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, तसेच जबरदस्ती धर्मातर रोखण्यासाठी स्पष्ट व कडक कायदा करावा. असा विविध मागण्या या ठिकाणी निवेदनात नमूद होत्या...0
0
Report
सोलापुर में नौ माह की गर्भवती महिला की गला दबाकर हत्या, शहर में हड़कंप
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात नऊ महिन्याच्या गर्भवती महिलेचा गळादाबून खून, घटनेने संपूर्ण शहर हादरले - सोलापुरात 9 महिन्यांच्या गर्भवती महिलेचा गळा दाबून खून - लग्नास नकार दिल्याचा राग मनात धरत भिंतीवर डोक आपटत, गळा दाबत निर्घृण खून - सोनी गणेश रामपुरे वय 19 असे हत्या झालेल्या गर्भवती महिलेचे नाव - बापू सुरेश आरगोड या आरोपीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून सध्या त्याची पोलीस कोठडीत रवानगी करण्यात आलीय - गर्भवती महिला आणि तिच्या पोटातील नऊ महिन्याच्या बाळाचा मृत्यू झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येतेय0
0
Report
Advertisement
वाशीम में चिया की कीमत 15,400 से 17,650 रुपये प्रति क्विंटल, किसान खुश
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात रब्बी हंगामात हरभरा आणि गहू या पारंपरिक पिकांना पर्याय म्हणून अनेक शेतकऱ्यांनी चिया पिकाची लागवड केली. कमी खर्चात अधिक उत्पादन मिळाल्याने हे पीक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरत आहे. सुरुवातीला चियाच्या दरात घसरण होऊन तो १३ हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत खाली आला होता. मात्र आता दरात सुधारणा झाली असून वाशिम कृषी उत्पन्न बाजार समितीत चियाला १५ हजार ४०० ते १७ हजार ६५० रुपये प्रति क्विंटल दर मिळत आहे. त्यामुळे चिया उत्पादक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
मावळ जंगल में 32 कृत्रिम पाणवठे, वन्यजीवों को राहत की नई पहल
Varsoli, Maharashtra:मावळमध्ये वाढत्या उन्हाचा कहर दिसून येत आहे. तापमान तब्बल ३९℃ पार झाले आहे. तर नैसर्गिक पाणीस्रोत आटल्याने वन्यजीवांची पाण्यासाठी वणवण होऊ नये याच पार्श्वभूमीवर मावळ वनविभागाने पुढाकार घेतला आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी प्रकाश शिंदे यांनी जंगल परिसरात तब्बल ३२ कृत्रिम पाणवठ्यांची निर्मिती केली असून या पाणवठ्यांमुळे पाण्यासाठी भटकंती करणाऱ्या वन्यजीवांना मोठा दिलासा मिळणार असून, वन्यप्रेमींनीही या उपक्रमाचं स्वागत केलं आहे. निसर्ग आणि वन्यजीव संवर्धनासाठी मावळ वनविभागाचं हे पाऊल सध्या कौतुकाचा विषय ठरत आहे…0
0
Report
Satar Devlai me garmi ke chalte tanker daron me uchhal, nagrikon par bhari kharcha
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सातारा देवलाई परिसरात बाराही महिनिने विकतच्या टँकरच्या पाण्यावरच अवलंबून असताना ऐन उन्हाळ्यात खासगी टैंकर चालकांनी दर वाढवल्याने आर्थिक भार सहन करण्याची वेळ सातारा देवळाई परिसरातील नागरिकांवर आली आहे. उन्हाचा पारा वाढत असताना विहिरीतील पाणी कमी होत असल्याने पाणी विकणाऱ्याने पाण्याचे दर वाढवले. त्यामुळे टँकर चालकांनीही आपल्या दरात वाढ केली. यामुळे नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. उन्हाळ्याआधीच सातारा-देवळाई परिसरातील अनेक नागरिकांच्या बोअरवेलचे पाणी हे डिसेंबर महिन्यातच संपले. काही नागरिकांचे बोअरवेल फेब्रुवारी महिन्यात आटल्याने पाणीाची कमतरता जाणवू लागली. यामुळे टँकरची मागणी वाढली. एप्रिल महिन्यातच टँकरचे दर वाढले. मे महिन्यात आणखी दर वाढण्याची शक्यता आहे. 2 हजार लिटर पाण्याचा टँकर आता 300 हुन 600 रुपयांवर गेला आहे..0
0
Report
Advertisement
