445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
प्यारे खान ने कहा डीजे पर रोक: दर्गों और जुलूसों में ध्वनि यंत्र नहीं
Nagpur, Maharashtra:बाईट - प्यारे खान (अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष तथा ताजुद्दीन बाबा ट्रस्ट नागपूर अध्यक्ष) 121 आणि बाईट केलाय On DJ बंदी नागपुरातील ताजुद्दीन बाबा दर्ग्यावर येणाऱ्या श्रद्धाळूंनी कोणीही डीजे घेऊन येऊ नये, असे आवाहन अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष तथा ताजुद्दीन बाबा ट्रस्ट नागपूर अध्यक्ष प्यारे खान यांनी केले आहे. कोणताही कायदा तयार होतो, तेव्हा तो सर्व धर्मीय नागरिकांना समानपणे लागू असतो. त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व दर्ग्यांवरही डीजे लावू नये, असे आवाहन त्यांनी केले. सोबतच जुलूसमध्ये कोणीही डीजे आणू नये. याबाबत अनेक मौलानांनी माझ्याकडे तक्रारी केल्या आहेत. इस्लाममध्येही डीजेला प्रोत्साहन दिले जात नाही, असे प्यारे खान यांनी सांगितले. महाराष्ट्रातील मौलाना आणि मुस्लिम नेत्यांना याबाबत जनजागृती करण्याचे आवाहन करणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. अल्पसंख्यांक आयोगाचा अध्यक्ष म्हणून पाच कम्युनिटी ना मी बोलू शकत ख्रिश्चन, जैन, पारशी मुस्लिम आणि बौद्ध यांनीपण कार्यक्रमांमध्ये डीजे वाजवू नये असे आवाहन करतो आणि याबाबत लवकरच पत्रक काढेल0
0
Report
छगन भुजबळ के ओबीसी आरक्षण पर आह्वान: आंदोलन से संविधानिक रास्ता अपनाने की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - बबनराव तायवाडे, अध्यक्ष राष्ट्रीय ओबीसी महासंघ *ऑन छगन भुजबळ समर्थन भूमिका* - राष्ट्रीय ओबीसी नेते छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषदेत समाजाबद्दलची भूमिका मांडली. जी भूमिका मी मांडत असतो, तीच भूमिका त्यांनी मांडली. ज्यांच्याकडे कागद आहेत, पुरावे आहेत, त्यांना प्रमाणपत्र देण्यासाठी कोणी थांबवू शकत नाही. कुठल्या प्रकारचे कागदपत्र नसताना, पुरावे नसताना जर त्यांनी प्रमाणपत्र वितरित करत असेल, राजकीय नेत्यांचा, अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण होत असेल, तर त्याच्या विरोधात मी अशी भूमिका त्यांनी घेतली. - दहा टक्के निधी सुद्धा ओबीसी समुदायाला मिळत नाही. ६० टक्के ओबीसी समाज असूनसुद्धा अनेक सोयी मिळत नाहीत. जर ओबीसी समाजावर अन्याय होत असल, आम्हाला सुद्धा रस्त्यावर उतरावे लागेल, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. त्यामुळे आमचे सुद्धा समर्थन आहे. समाजाला ज्येष्ठ नेत्याची आवश्यकता असते. ती भूमिका छगन भुजबळ यांनी मांडली. जर छगन भुजबळ यांनी आंदोलनाची भूमिका घेतली, संविधानिक आरक्षणाला धक्का लागला, तर आम्ही छगन भुजबळ यांच्यासोबत उभे राहू. ओबीसी समाजाच्या संविधानिक आरक्षणासाठी लढा उभारू. *ऑन नाराजी महायुती छगन भुजबळ* - संपूर्ण महाराष्ट्र अनुभवत आहे. जेव्हा आंदोलन सुरू झाले, मराठा मंत्रिमंडळ उपसमिती वारंवार मनोज जरांगे यांना भेटायला जाते. त्या ठिकाणी आंदोलन करताना समजावण्याचा प्रयत्न करीत असतात. १५ मुद्द्यांचा मसुदासुद्धा तयार करून दिला. आंदोलनकर्ते आंदोलन थांबवायला तयार नाहीत. एकीकडे ओबीसी आंदोलनकर्त्याला चर्चेला बोलावले जाते, त्यावर सुद्धा भुजबळ साहेबांची नाराजी आहे. कुठेही संविधानिक मार्गाने हा प्रश्न सोडवायला पाहिजे. *ऑन लक्ष्मण हाके* - ओबीसी आरक्षणासंदर्भात त्यांची भूमिका काय आहे, हे त्यांनी अगोदर स्पष्ट करावे.0
0
Report
SIR पुनर्परीक्षण के बाद येवला-लासलगाव के मतदाता सूची में नाम गायब
Yeola, Maharashtra:SIR पुनर्परीक्षणानंतर जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत येवला-लासलगाव मतदारसंघातील जवळपास प्रशासनाच्या माहितीनुसार यामध्ये कायमस्वरूपी स्थलांतरित, मृत, दुबार नोंदणी तसेच शोध न लागलेल्या 36 हजार मतदारांची नावे नसल्याची माहिती समोर आली आहे. येवला शहरासह तालुक्यातील अनेक पात्र मतदारांची नावे या प्रारूप मतदार यादीत समाविष्ट नसल्याने सर्वपक्षीय नगरसेवकांनी प्रांताधिकाऱ्यांची भेट घेत निवेदन दिले. दरम्यान, SIR पुनर्परीक्षणानंतर जाहीर झालेल्या या प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या पात्र नागरिकांनी घाबरून न जाता फॉर्म क्रमांक 6 भरून आवश्यक कागदपत्रांसह अर्ज करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. प्राप्त अर्जांची पडताळणी करून पात्र मतदारांची नावे पुढील सुधारित यादीत समाविष्ट केली जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे. नागरिकांनी आपले नाव SIR नंतरच्या प्रारूप मतदार यादीत आहे की नाही, याची तपासणी करून नाव नसल्यास तातडीने आवश्यक प्रक्रिया पूर्ण करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
गोकुळाष्टमी के अवसर पर गणपतीपुळे में फूलों से सजावट, भक्तिमय वातावरण
Ratnagiri, Maharashtra:गोकुळाष्टमीनिमित्त गणपतीपुळेच्या बाप्पाला मनमोहक पुष्पशृंगार; सफेद पार्वती अन् जास्वंदीच्या फुलांची देखणी आरास.. रत्नागिरीतील प्रसिद्ध तीर्थक्षेत्र गणपतीपुळे येथे आज गोकुळाष्टमीच्या पावन पर्वावर श्रींच्या स्वयंभू मूर्तीसह संपूर्ण गाभाऱ्यात नयनरम्य पुष्पसजावट करण्यात आली आहे.. बाप्पाच्या चरणी पांढऱ्याशुभ्र पार्वतीच्या फुलांची आणि लालभडक जास्वंदीच्या फुलांची आकर्षक आरास मांडण्यात आली असून,या मनमोहक रूपामुळे मंदिर परिसरातील वातावरण अत्यंत सात्त्विक आणि भक्तिमय झाले आहे.. सागराच्या तीरावर वसलेल्या या स्वयंभू पीठावर लाडक्या बाप्पाचे हे मनभावन रूप डोळ्यांत साठवण्यासाठी सकाळपासूनच भाविकांनी मंदिरात दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे..0
0
Report
वाशीम के रिसोड में गोठे में आग: दो गाय, एक बैल और एक कुत्ता मरे
Washim, Maharashtra:वाशिम च्या रिसोड तालुक्यातील कंकरवाडी येथील रामेश्वर जायभाये या शेतकऱ्याच्या चीचांबा भर शिवारातील गोठ्याला रात्री आग अचानक लागल्यामुळे दोन गीर गाई, एक बैल आणि एक कुत्रा मृत झाला असून तुषार सिंचन सह शेतीपयोगी साहित्य ही जळून खाक झाले आहे. गोठ्याला लागलेल्या आगीमुळे रामेश्वर जायभाये यांचे मोठं नुकसान झाले असून प्रशासनाने या शेतकऱ्याला भरीव आर्थिक मदत देण्याची मागणी होत आहे.0
0
Report
चांदवड में गोवंश तस्करी: 19 पिकअप पुलिस के हवाले, 48 जानवर कत्तल की आशंका
Chandvad, Maharashtra:चांदवड ब्रेक चांदवड येथे गोवंशाची वाहतूक करणारे एकोणवीस पिकअप पोलिसांच्या ताब्यात..... मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास चांदवड येथील गोरक्षकांनी गाड्या अडवून पोलिसांच्या ताब्यात दिल्या... सदरची 48 जनावरे कत्तलीसाठी जात असल्याचा संशय....0
0
Report
Advertisement
चांदवड टोल प्लाज़ा पर नई कंपनी से स्थानीय वाहनधारकों को समस्या, शिवसेना की मांग
Chandvad, Maharashtra:मुंबई-आग्रा महामार्गावरील चांदवड टोल प्लाझावर स्थानिक वाहनधारकांना मिळणारी सवलत नव्या टोल कंपनीकडून पुन्हा कागदपत्रे मागवल्याने अडचणीत आली आहे यापूर्वी पाथ कंपनीकडे जमा असलेला स्थानिक वाहनधारकांचा डाटा नव्या कंपनीकडे उपलब्ध नसल्याने वाहनधारकांना १७० रुपये टोल भरावा लागत असल्याचा आरोप करण्यात आला या प्रकारामुळे वाहनधारकांमध्ये नाराजी असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाली असून पूर्वीप्रमाणे स्थानिक सवलत तातडीने लागू करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेनेचे विलास भवर यांनी दिला दरम्यान, चांदवड टोल प्लाझावर पूर्वीप्रमाणे स्थानिक वाहनांना सवलत देण्यात येणार असून, त्यासाठी वाहनधारकांनी नव्याने आवश्यक कागदपत्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले मात्र पाथ कंपनीने डाटा उपलब्ध न केल्यामुळे हा गोंधळ निर्माण झाल्याचा आरोप करत संबंधित कंपनीवर कठोर कारवाई करण्याची मागणी शिवसेना (ठाकरे) पक्षाकडून करण्यात आली0
0
Report
विद्यार्थियों ने शिक्षक बनकर पढ़ाया, स्वयंशासन उपक्रम से नेतृत्व उभरा
Bhandara, Maharashtra:शिक्षक दिनापूर्वी विद्यार्थ्यांनी घेतला शिक्षकाचा अनुभव..स्वयंशासन उपक्रमातून सावरला येथे विद्यार्थ्यांचे अध्यापन गांधी विद्यालय व उच्च माध्यमिक विद्यालयात शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला अनोखा उपक्रम राबविण्यात आला... स्वयंशासन कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनीच शिक्षकाची भूमिका साकारत वर्गात अध्यापन केले. विद्यार्थ्यांनी वर्गासमोर उभं राहून विविध विषयांचे धडे दिले आणि शिक्षक म्हणून शिकवण्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांच्या नेतृत्वगुणांना, आत्मविश्वासाला आणि वक्तृत्व कौशल्याला वाव मिळाला. विद्यार्थ्यांच्या या अभिनव उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
सातारा में दहीहंडी उत्सव: राजे समर्थकों की स्वतंत्र दहीहंडी से मुकाबला
Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यात दहीहंडी उत्सवाची जय्यत तयारी सुरू झाली आहे. मात्र यंदाच्या दहीहंडी उत्सवाचे विशेष आकर्षण ठरणार आहे ते म्हणजे दोन्ही राजेंच्या स्वतंत्र दहीहंड्या. खासदार उदयनराजे भोसले यांच्या समर्थकांकडून एकीकडे तालिमसंघ मैदान येथे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे, तर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या समर्थकांकडूनही गांधी मैदान येथे स्वतंत्र दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दोन्ही राजे मित्र समूहाकडून दहीहंडीसाठी 5,55,555 रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे,त्याचबरोबर दोन्ही दहीहंडी कार्यक्रमाच्या ठिकाणी अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहणार आहेत,त्यामुळे साताऱ्यात दहीहंडीच्या निमित्ताने राजकीय शक्तिप्रदर्शनाचीही रंगत पाहायला मिळणार आहे. दोन्ही दहीहंडी उत्सवांमध्ये कार्यकर्ते आणि नागरिकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून, गोविंदा पथकांच्या थरारक मानवी मनोऱ्यांसोबतच कोणत्या दहीहंडीला अधिक प्रतिसाद मिळतो, याकडेही साताऱ्याचे लक्ष लागले आहे. आता दहीहंडीचा उत्साह, गोविंदांचा थरार आणि दोन्ही राजेंच्या समर्थकांची ताकद... साताऱ्यात नेमकी कोणाची दहीहंडी ठरणार आकर्षणाचा केंद्रबिंदू? याची उत्सुकता वाढली आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में दहीहंडी के लिए लाखों इनाम, नारायण राणे की मौजूदगी से हलचल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात आज अडीच हजार दहीहंड्या फुटणार असून मंडळाकडून लाखो रुपयांची बक्षीसें जाहीर झाली आहेत. चिपळूणात खासदार नारायण राणे यांची 'लाख मोलाचा खासदार' भाजपकडून दहीहंडी आयोजित केली गेली आहे. जिल्ह्यात शुक्रवारी श्रीकृष्ण जन्माष्टमी धार्मिक पद्धतीने साजरी केल्यानंतर दहीहंडीची उत्सुकता लागली आहे. विविध राजकीय पक्षांकडून तसेच मंडळांकडून लाखो रुपयांचे बक्षीस जाहीर झाले आहेत. जिल्ह्यात यावर्षी 285 सार्वजनिक तर खाजगी 2,293 अशा एकूण 2,578 दहीहंड्या फुटणार आहेत.0
0
Report
वाशीम में चाय के भाव गिरावट, कीमत 19,000 के नीचे पहुँची
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात चियाच्या बाजारभावात पुन्हा घसरण झाली आहे. २० हजार रुपयांचा टप्पा गाठण्याच्या जवळ पोहोचलेला चियाचा कमाल दर अवघ्या काही दिवसांत एक हजार रुपयांनी खाली आला आहे. ३० ऑगस्टला वाशिम बाजार समितीत चियाला १९ हजार ८०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला होता. मात्र हाच दर १९ हजार रुपयांवर आला आहे. त्यामुळे चियाच्या दरातील तेजीला अचानक ब्रेक लागला आहे. बाजारातील दरातील या चढ-उतारामुळे शेतकऱ्यांचे लक्ष आता पुढील बाजारभावाकडे लागले आहे.0
0
Report
शिरपूर में आवारा कुत्तों का खतरा: 5 वर्षीय बच्चे को काटा, CCTV वीडियो सामने
Dhule, Maharashtra:शिरपूर शहरातील सरस्वती कॉलनी परिसरात एका पाच वर्षीय लहान चिमुकल्याला भटक्या कुत्र्याने लक्ष्य करत त्याला चावा घेतल्याची घटना घडली आहे. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, ५ वर्षीय मुलगा गल्लीतून जात असताना कुत्र्याने अचानक त्याच्यावर झडप घेतल्याचे दिसून येत आहे. कुत्र्याने चावा घेतल्यानंतर मुलगा बिथरला असून मोठ्या प्रमाणात आरडाओरडा करत रडत होता. घटनेनंतर त्याला तात्काळ उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याबाबत नगरपरिषदेला वारंवार सांगूनही उपयोग होत नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. वाढत्या कुत्र्यांच्या दहशतीमुळे शिरपूरकर हैराण झाले असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
अमरावती के जिला स्त्री अस्पताल में वेंटिलेटर विस्फोट, 12 दिन बाद भी रिपोर्ट जारी नहीं; विपक्ष ने सरकार पर आरोप लगाए
Amravati, Maharashtra:जिल्हा स्त्री रुग्णालयातVENTILATOR explosion? Wait. Correction needed. अमरावती जिल्ह्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात व्हेंटिलेटरचा स्फोट होऊन 3 नवजात बालकांचा मृत्यू झाला होता. 12 दिवस झाले तरी शासनाचा अहवाल प्रकाशित न झाल्याने विरोधकांनी टीका केली आहे. आरोग्य आयुक्त संजय काटकर यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीने आरोग्यमंत्र्यांना आपला अहवाल दिला असल्याचे स्पष्ट झाले; परंतु 12 दिवस पूर्ण होत असताना कारवाई अद्याप झाली नाही. अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंत वानखडे घटनानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि चौकशीच्या अहवालाची मागणी केली. माजी मंत्री काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी विरोधकांची भूमिका मांडली आणि आत्ताच्या काळात मोठे राजकारण पेटू शकते असे मत व्यक्त केले. पालकमंत्री अमरावती येथे असताना अहवाल जाणून घेण्याचा प्रयत्न करावा; विभागाकडून अधिकृत उत्तर अपेक्षित आहे.0
0
Report
वाशीम में ई-केवाईसी अधूरी, राशन लाभ प्रभावित—लाभार्थियों से शीघ्र पूरा करने की मांग
Washim, Maharashtra:अँकर: वाशीम जिल्ह्यात रेशन लाभार्थ्यांच्या ई-केवायसीचे काम अद्याप पूर्ण झालेले नाही. जिल्ह्यातील १० लाख ३३ हजार ३३५ लाभार्थ्यांपैकी तब्बल १ लाख ८४ हजार ४४१ लाभार्थ्यांची ई-केवायसी बाकी आहे. आतापर्यंत ८२.१० टक्के लाभार्थ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. ई-केवायसी न झाल्यास आगामी काळात रेशनचा लाभ मिळण्यात अडचणी येण्याची शक्यता आहे. त्यामुळे रेशनचा लाभ सुरू ठेवण्यासाठी लाभार्थ्यांनी ई-केवायसी पूर्ण करून घेणे आवश्यक आहे.0
0
Report
सोलापुर में सूखा गहरा रहा, चार महीने तक चारे की आपूर्ति खतरे में
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद, केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक - सोलापूर जिल्ह्यावर दुष्काळाची छाया गडद, केवळ चार महिने पुरेल इतकाच चारा शिल्लक - जिल्ह्यातील चारा टंचाईच्या संदर्भात जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी घेतली बैठक - उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर, आणि अक्कलकोट मध्ये तीन महिने पुरेल इतका तर अन्य तालुक्यांमध्ये चार महिने पुरेल इतका चारा शिल्लक - चारा टंचाई होऊ नये यासाठी दक्षता घेण्याचे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांचे आवाहन - तर चारा टंचाई रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरू असल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती0
0
Report
Advertisement
