icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नोव्हेंबर 2026 तक धार्मिक आयोजनों पर बैन: आयुक्त के आदेश पर राजनीतिक घमासान

Nagpur, Maharashtra:बाईट संदीप जोशी माजी आमदार व माजी महापौर (प्रवीण दटके-DJ परिपत्रक) मी अध्यादेश अत्यंत बारकाईने वाचला आहे... त्याच्यात गणेशोत्स्व असो की ताजुद्दीन बाबांचे उरूस असो आणि इतर समाजाचे जे काही कार्यक्रम असतील त्या कार्यक्रमांवर एक नोव्हेंबर 2026 पर्यंत बंदी टाकली आहे. माझी अनौपचारिक काही जणांशी चर्चा झाली आयुक्तांना 60 दिवसांसाठीच अध्यादेश काढण्याचा अधिकार असतो... त्यानंतर पुन्हा रिनेवल होईल त्यावेळेस इतर धर्मियांचे सण असतील त्यांच्यावर लागू होईल. *त्यांनी शेण खाल्लं म्हणून मी पण शेणखाईल ही भूमिका अयोग्य आहे*. प्रवीण जी आमचे आमदार आहेत जेष्ठ नेते आहेत..त्यांनी जी भूमिका घेतली ती त्यांच्या दृष्टीने योग्य असावी
0
0
Report

गडचिरोली पुलिस ने 50 आत्मसमर्पित नक्सलियों का पुनर्वास हेतु जिलों में विदाई समारोह आयोजित किया

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील नक्षलवाद आता संपुष्टात आला असून पोलीस दलाच्या अभिलेखावर एकही सशस्त्र माओवादी शिल्लक नाही. गडचिरोली पोलीस दलाच्या प्रभावी नक्षल विरोधी अभियानांसोबतच शासनाने सन 2005 पासून जाहिर केलेल्या आत्मसमर्पण योजनेमुळे तसेच हिंसाचाराच्या जीवनाला कंटाळून 819 नक्षलवाद्यांनी अहिंसेचा मार्ग स्वीकारला. यापैकी एकूण 50 आत्मसमर्पित नक्षल सदस्यांना त्यांच्या मूळ जिल्ह्रात परत पाठविण्यात येऊन त्यांच्या निरोप समारंभाचे आयोजन करण्यात आले. आत्मसमर्पणानंतर या सदस्यांचे समाजाच्या मुख्य प्रवाहात पुनर्वसन व्हावे यासाठी केंद्र शासन व महाराष्ट्र शासनाच्या आत्मसमर्पण व पुनर्वसन धोरणानुसार त्यांना विविध लाभ देण्यात आले आहेत. यामध्ये आर्थिक सहाय्य, आवश्यक शासकीय व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता तसेच पुनर्वसनासाठी विविध रोजगार, स्वयं रोजगार, प्रशिक्षणाचा लाभ यांचा समावेश आहे.  गडचिरोली पोलीस दलाच्या प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून या पुनर्वसन कालावधीत केवळ प्रशासकीय प्रक्रिया न राबवता आत्मसमर्पित सदस्यांना नवीन ओळख, आत्मविश्वास, कौशल्य आणि सन्मानाने जीवन जगण्याची संधी उपलब्ध करुन देण्यावर भर देण्यात आला. त्यांच्या आरोग्य व शारीरिक क्षमतेकडे विशेष लक्ष देण्यात आले. ऑपरेशन रोशनी अंंतर्गत नेत्रोपचार शिबीरे व नसबंदी री-ओपनिंग सारखी आवश्यक शस्त्रक्रिया, मानसिक आरोग्यासाठी समुपदेशन आणि सामाजिक समावेशन, आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी ध्यान, योग, शिबीरे आयोजीत करण्यात आले. तसेच प्रोजेक्ट संजीवनीच्या माध्यमातून आतापर्यंत सामुहिक विवाह सोहळयाचे आयोजन करुन 46 आत्मसमर्पित माओवादी जोडप्यांचे विवाह लावून देण्यात आले. 88 आत्मसमर्पित नक्षल्याना कंपनीत कौशल्य विकास प्रशिक्षण व रोजगार उपलब्ध करुन देण्यात आलेला आहे.
0
0
Report

पुलिस ने पर्यावरण बैठक में जाने से रोका राजू शेट्टी, फिर अनुमति मिली

Kolhapur, Maharashtra:पर्यावरण संदर्भातल्या बैठकीत जातताना राजू शेट्टीना अडवलं पोलिसांनी. पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे आज कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आहे. आज सायंकाळी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात कोल्हापुरातील पर्यावरण प्रश्नावर चर्चा करण्यासाठी पंकजा मुंडे यांनी बैठक बोलावली आहे. या बैठकीला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार राजू शेट्टी आले. मात्र पोलिसांनी राजू शेट्टी यांना बैठकीत जाण्यास सुरुवातीला अडवणूक केली. काही काळ राजू शेट्टी यांनी पोलिसांमध्ये चर्चा झाल्यानंतर राजू शेट्टी यांना बैठकीला सोडण्यात आला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर-गडचिरोली में 80% स्थानीय रोजगार के लिए रोजगार हक महामोर्चा, 7 सितम्बर

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने स्थानिक भूमिपुत्रांना जिल्ह्यातील विविध उद्योगात 80 टक्के रोजगारासाठी 7 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चाचे आयोजन अँकर:-- चंद्रपूर- गडचिरोली स्थानिक लोकाधिकार सेनेच्या वतीने जिल्ह्यातील विविध उद्योगांमध्ये स्थानिक भूमिपुत्रांना 80 टक्के रोजगार मिळावा यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयावर 07 सप्टेंबर रोजी रोजगार हक्क महामोर्चा चे आयोजन करण्यात आले आहे. शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख गोमती पाचभाई यांच्या नेतृत्वात हा महामोर्चा शहरातील गांधी चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. चंद्रपूर जिल्हा कोळसा- वीज -खनिज संपत्ती आणि मोठ्या उद्योगांनी समृद्ध असलेला जिल्हा आहे. मात्र इथले सुशिक्षित बेरोजगार स्थानिक भूमिपुत्र रोजगारासाठी संघर्ष करत अन्य राज्यांमध्ये स्थलांतर करत आहेत. स्थानिक कारखान्यांमध्ये परप्रांतीयांना प्राधान्य दिले जात असून आपल्याच मातीतील तरुणांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोਸळत आहे. या विरोधात हा महामोर्चा आयोजित केला असून मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी 88 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात प्रशासनासोबत स्थानिक लोकाधिकार सेनेच्या प्रमुख नेत्यांची महत्त्वपूर्ण बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. बाईट १) गोमती पाचभाई, अध्यक्ष, स्थानिक लोकाधिकार सेना आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

नवी मुंबई के प्रथम संदर्भ अस्पताल में मरीज की मौत, तीन स्टाफ निलंबित

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या वाशी इथल्या प्रथम संदर्भ रूग्णालयात एका रूग्णाचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत रूग्णालयातील तीन कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे. परिसेविका गीता केणी, सुरभी मोडसकर, फार्मसिस्ट दिपक नलावडे अशी या तिघांची नावं आहेत. महापालिका रूग्णालयात 31 ऑगस्ट रोजी 50 वर्षीय गोपीराम खडसे या रूग्णाला मलेरिया च्या उपचारा साठी दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर मुदत संपलेलं सलाईन रूग्णाला दिल्याचा आरोप त्यांच्या नातेवाईकांनी केला. रूग्णांची प्रकृती चिंताजनक झाल्यावर त्यांना फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. आज सकाळी रूग्णाचा मृत्यू झाला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत संबंधित कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं असल्याची माहिती नवी मुंबई महानगरपालिकेच्या महापौर सुजाता पाटील यांनी दिली. तसेच हा रुग्ण मलेरियाच्या उपचारा साठी दाखल केले होते, जेव्हा महापालिका रुग्णालयात दाखल केले तेव्हा त्यांना मुदत संपलेले सलाईन चढवले त्यानंतर त्यांना त्रास झाल्याने फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मद्ये शिफ्ट झाल्यावर त्यांच्या सर्व टेस्ट केल्यावर मेंदू मधील मलेरिया दाखवण्यात आला होता,यामुळे ते गंभीर आजारी असल्याचे समोर आले असल्याचे महापौर सुजाता पाटील यांनी सगीतेल.
0
0
Report

किसानों का अहिल्यानगर जलसंपदा में वांबोरी चारी टप्पा-2 को शामिल करने का अर्धनग्न उपवास

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या नेवासा तालुक्यातील शिंगवे तुकाई गावचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागणीसाठी शेतकऱ्यांनी अहिल्यानगर जलसंपदा कार्यालयासमोर अर्धनग्न उपोषण सुरू केले आहे...संबंधित प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा करूनही दखल घेतली जात नसल्याचा आरोपही आंदोलकांनी केला आहे...शिंगवे तुकाई गावाचा वांबोरी चारी टप्पा दोन मध्ये समावेश करावा या मागण्यासाठी मागच्या सहा वर्षांपासून गावातील ग्रामस्थ आणि शेतकरी जलसंपदा विभागाकडे पाठपुरावा करत आहेत मात्र जलसंपदा विभागाकडून सकारात्मक प्रतिसाद मिळत नसल्याने शेतकरी आणि नागरिकांनी उपोषण आंदोलन सुरू केले आहे...
0
0
Report
Advertisement

गडचिरोली बस दुर्घटना: चालत्या बस के टायर टूटे, 20 यात्री बाबत घडामोडें आल्या

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील एसटी प्रवासी भगवान भरोसे, चक्क चालत्या बसचे निघाले चाक, जिल्ह्यात आणखी एका एसटी बसचा प्रताप आला पुढे अहेरी आगाराची दामरंचा ते अहेरी जाणारी बस ऐन रस्त्यात नादुरुस्त झाली. गेली 10 वर्षे दक्षिण गडचिरोली भागातील रस्ते खड्डेमय आहेत. वारंवार बैठका आणि आश्वासने दिल्यावरही जिल्हावासीयांच्या नशिबी चिखल आणि खड्डेच आहेत. आधीच भंगार बसेस त्यात सतत खड्ड्यात चालत असल्याने त्या प्रवाशांसाठी धोका ठरत आहेत. ताज्या घटनेतील बसमध्ये सुमारे 20 प्रवासी होते. यात विद्यार्थ्यांची संख्या जास्त होती。
0
0
Report

तंबाकू निषेध के दावों के बीच शिक्षा विभाग के कार्यालय में धूम्रपान वायरल

Akola, Maharashtra:शाळा, महाविद्यालय आणि इतर शैक्षणिक संस्थांच्या परिसरापासून १०० यार्ड अर्थात सुमारे ९१ मीटरपर्यंत तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास कायद्याने बंदी आहे. विद्यार्थ्यांना तंबाख嘀च्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी विविध स्तरावर जनजागृती केली जाते, शाळा-महाविद्यालये तंबाखूमुक्त परिसर घोषित केले जातात... मात्र, अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागातून समोर आलेल्या एका व्हायरल व्हिडिओने आता गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. ज्या शिक्षण विभागाकडून विद्यार्थ्यांना तंबाखूमुक्तीचा संदेश दिला जातो, त्याच कार्यालयात कर्मचारी चक्क तंबाखू खात असल्याचे व्हिडिओत दिसत आहे. अकोला जिल्हा परिषद शिक्षण विभागाचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये काही कर्मचारी कार्यालयात तंबाखूचे सेवन करताना दिसत असल्याचा दावा करण्यात येत आहे. कार्यालयीन वेळेतच हा प्रकार सुरू असल्याचे व्हिडिओतून दिसून येत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. एकीकडे शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरातून १०० यार्ड अंतरात तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीवर बंदी आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने तंबाखूचे दुष्परिणाम सांगितले जातात. शैक्षणिक परिसर तंबाखूमुक्त ठेवण्यासाठी प्रशासनाकडून नियम आणि जनजागृती मोहीम राबविली जाते. मात्र, दुसरीकडे शिक्षण विभागाच्या कार्यालयातच कर्मचारी तंबाखूचे सेवन करत असल्याचा व्हिडिओ समोर आल्याने प्रशासनाच्या नियमांवरच प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ज्यांनी विद्यार्थ्यांना तंबाखूपासून दूर राहण्याचा संदेश द्यायचा, त्यांच्याच कार्यालयात असा प्रकार होत असेल तर विद्यार्थ्यांसमोर नेमका कोणता आदर्श ठेवला जात आहे? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

कल्याण में युवा कांग्रेस और पुलिस के बीच भिड़ंत, मनुस्मृति विरोध प्रदर्शन

Kalyan, Maharashtra:काँग्रेस कार्यकर्ते और पुलिसों के बीच झटापटी कल्याण में Youth Congress का आंदोलन। इस आंदोलन को anti-Manusmriti के विरोध में होना बताया गया। यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा सरकारच्या और मनुस्मृती के विरोध में जोरदार घोषणाबाजी की. कुछ काँग्रेस कार्यकर्त्यांनी कल्याण के छत्रपती शिवाजी चौकात रस्ते पर ठिय्या मांडला. इसके बाद वातावरण तनावपूर्ण हो गया और पुलिस ने काँग्रेस कार्यकर्त्यों को नियंत्रित करना शुरू किया. जिसके बाद पुलिस द्वारा काँग्रेस कार्यकर्त्यों में झटापटी की घटनाएं सामने आईं. शहर में यही चर्चा है कि इतने دیر तक काँग्रेस के Youth कार्यकर्तों को आंदोलन करने की जगह क्यों नहीं मिली.
0
0
Report

नागपुर पुणे में डीजे-लेजर प्रतिबंध स्वीकार, संदीप जोशी ने स्वागत किया

Nagpur, Maharashtra:नागपुरात आणि पुण्यात डीजे आणि लेझर प्रतिबंधित करण्याबाबतच्या पोलीस आयुक्तांच्या आदेशाच माजी आमदार आणि माजी महापौर संदीप जोशी यांनी स्वागत केल आहे. मात्र डीजे, लेझर बंदीचा हा निर्णय केवळ दोन महिन्यांपुर्ता मर्यादित न ठेवता तो कायमस्वरूपी ठेवावा.. याकरता डीजे मुक्ती चळवळ कायम ठेवणार... याशिवाय ज्या वाहनांवर नियमांचे उल्लंघन करून डीजेच्या भिंती ठेवण्यात येतात त्यांच्यावरही कारवाई करण्यात यावी... आरटीओने याबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीही जोशी यांनी केली मागणी. संदीप जोशी यांनी नागपुरात डीजे मुक्ती करता पुढाकार घेतला असून जनळवळ उभारत आहे. बाईट -- संदीप जोशी यांचा 121 आहे
0
0
Report

रत्नागिरी के गाव में डीजे मुक्त गणेशोत्सव को लेकर विवाद, माता पुलिस सुरक्षा की मांग

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी आमच्या मुलाने डीजे विरोधात उठवलेला आवाज योग्य आहे, त्याला जी आज मारहाण झाली ती चुकीची आहे त्याला पोलीस संरक्षण मिळालं पाहिजे विद्यानंद बापट यांच्या आई- वडिलांची मागणी डीजे मुक्त गणेशोत्सवाचा आग्रह धरणाऱ्या विद्यानंद बापट यांचे मूळ गाव रत्नागिरी तालुक्यातील गोळप गोळप गाावातल्या मूळ घरी विद्यानंदच्या घरी त्यांचे आई वडील वडील सुहास बापट आणि आई कल्पना बापट यांची प्रतिक्रिया माझ्या मुलांनी घेतलेली भूमिका योग्यच आम्ही त्याच्या पाठीशी ठाम महाराणीची घडलेली घटना दुर्दैवी, आम्ही गावाकडे... त्यामुळे सांभाळून काम कर अशा आई-वडिलांच्या सूचना संविधानिक मार्गाने लढा लढत आहे, आम्ही त्याच्या पाठीशी, त्याला पोलीस संरक्षण मिळव बापट यांच्या आई-वडिलांची प्रतिक्रिया याच संदर्भात त्यांच्या आई - वडिलांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी
0
0
Report
Advertisement

पंढरपुर में श्रीकृष्ण जन्माष्टमी की पारंपारिक पोथी पूजन शुरू

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर येथे दरवर्षी श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सवाची सुरुवात विनय महाराज बडवे यांच्या घराण्यातील पारंपारिक पोथी पूजनाने होते. ही पंढरपूरमधील अत्यंत प्राचीन आणि महत्त्वाची सांस्कृतिक परंपरा आहे. पंढरपुरातील बडवे यांच्या निवासस्थानी श्रावण वद्य प्रतिपदेला या उत्सवाची सुरुवात होते.यादिवशी बडवे घराण्यात पिढ्यानपिढ्या जतन केलेल्या श्री स्वामी नरसिंह सरस्वती स्वामी यांचे हस्तलिखित ग्रंथ आहेत संस्कृत श्लोकाने श्रीकृष्णाचे वर्णन केलेले आहे.ग्रंथाच्या मूळ हस्तलिखिताचे विधीवत पूजन केले जाते. प्रतिपदेपासून ते थेट गोकुळाष्टमीपर्यंत रोज या पोथीचे वाचन आणि भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांचे कथा निरूपण केले जाते.
0
0
Report

अंबरनाथ स्टेशन पर दिव्यांग ने रेल्वे ट्रैक पार किया; ट्रेन ब्रेक लगाकर टला बड़ा हादसा

Ambernath, Maharashtra:अंबरनाथ रेल्वे स्थानकात जीव धोक्यात घालून रेल्वे रुळ ओलांडले! घाईच्या नादात अपंग व्यक्तीचा जीवघेणा प्रकार; धावत्या ट्रेनलाही लावावा लागला ब्रेक! क्षणिक वेळ वाचवण्यासाठी जीव धोक्यात; अपघात झाला असता तर जबाबदार कोण? अंबरनाथ रेल्वे स्थानकात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकार समोर आला आहे! गर्दीच्या वेळेत एका दिव्यांग व्यक्तीने वेळ वाचवण्यासाठी थेट रेल्वे रुळ ओलांडण्याचा धोकादायक प्रयत्न केला.समोरून ट्रेन येत असतानाही ही व्यक्ती रुळ ओलांडत होती. प्रसंगाचे गांभीर्य लक्षात येताच लोको पायलटने ट्रेनचा वेग कमी केला आणि मोठा अनर्थ टळला. कल्पना करा... काही सेकंदांचा विलंब झाला असता, तर या व्यक्तीचा जीवही जाऊ शकला असता!
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top