445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर से समृद्धि महामार्ग पर ट्रक में आग; चालक सुरक्षित
Nagpur, Maharashtra:नागपूर पासून सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्ग एंट्रन्स समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.. या आगीत ट्रक जळून खाक झाला. छत्तीसगड येथून मुंबईच्या दिशेने जात होता. चालक मोहसीन मन्सूर अन्सारी (वय ३०, रा. कलेपाट, ता. सेना, जि. लोहरदगा, झारखंड) हे विश्रांती व डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवून होते. याचवेळी ट्रकला आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण ट्रकला वेढले.वायफळ टोल नाक्यावरील अग्निशमन वाहनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने एमआयडीसी बोरी तसेच मिहान येथील अग्निशमन पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. र शर्थीचे प्रयत्न करून ट्रकची आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.0
0
Report
बीड में आंदोलन: उद्धव के निशाने पर सरकार, शिंदे-फडणवीस का साथ
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय: 'तुमसे ना हो पायेगा...' आंदोलन बीड़मध्ये होणारे आजचे आंदोलन म्हणजे उबाठाची स्टंटबाजी आहे. उद्धवजी, 'तुमसे ना हो पाया'... इसलिये जनता ने हमे चुना और हमने करके दिखाया... दुष्काळाच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल असताना तुम्ही घराबाहेर पडला नाहीत. अडीच वर्षे घरात बसून राहिलात मंत्रालयात गेला नाहीत. तुम्ही अनेक योजना बंद केल्यात आम्ही सत्तेत आल्याबरोबर अनेक योजना सुरू केल्या. एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी से हर अच्छी चीज हो पायेगी... ऐसी कोई योजना नही जो इन दोनो से ना हो पायेगी...0
0
Report
जेरबंद वाघिणी इलाज के दौरान मर गई; मौत का कारण अस्पष्ट
Amravati, Maharashtra:वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू; मृत्यूचे कारण अस्पष्ट, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा अमरावती जिल्ह्यातील तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे वेगवेगळे पथक तैनात करण्यात आले होते. अखेर या वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आले होते मात्र वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून वाघिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. दरम्यान 20 दिवसांमध्ये या वाघिणीने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला असून अमरावतीच्या चांदूर बाजार येथील शिरजगाव कसबा येथे वाघिणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते. ही वाघीण अडीच वर्षांची होती मात्र ही वाघीण बेशुद्ध पडल्यानंतर तिला पुन्हा होश न आल्याने तिचा मृत्यू झाला आहे.0
0
Report
Advertisement
अकोला के शिवपूर में बारिश ने पानी भरा, किसान फसल को लेकर अभी भी चिंता
Akola, Maharashtra:सलग दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी वरुणराजाने अकोला जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली. अकोट तालुक्यातील शिवपूर गावात तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आणि वातावरण जलमय झाले. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे. पिकांना सध्या आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आज झालेला पाऊस शेतीसाठी कितपत फायदेशीर ठरतो, तसेच आगामी काळात पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पावसाची संततधार सुरू राहून पिकांना आवश्यक पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.0
0
Report
इंदापुर में हजारों ने मोबाइल टॉर्च से अजित पवार को श्रद्धांजलि दी
Rui, Maharashtra:इंदापुरात हजारो मोबाईल टॉर्च लावून वाहिली अजितदादान सामुदायिक श्रद्धांजली. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत वाहिली दादांना श्रद्धांजली. इंदापुरात राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणेंच्या प्रमुख उपस्थितीमध्ये नगराध्यक्ष भरत शहा मित्र परिवाराची दहीहंडी पार पडलीय. यावेळी मंत्री भरणे यांसह हजारो इंदापूरकरांनी मोबाईल टॉर्च लावून सामुहिक रित्या राज्याचे माजी उपमुख्यमंत्री दिवंगत नेते अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे. यावेळी सबंध इंदापुरात मोबाईल टॉर्च चा एकच लखलखाट पहायला मिळाला.0
0
Report
बुलढाण्यात आमदार कीचड-फलक नहीं, जनता के लिए काम की लड़ाई तेज़
Buldhana, Maharashtra:बुलढाणा आमदार संजय गायकवाड, बाईट्स .. एक महिला आमदार आहे, मेरी बहन है, ताई है, मुझे सामने आकर बोलो कहा गया। बँक निवडणुकीत आमही सोबत होतो, एका ताटात आम्ही एका चमचाने जेवण केले, त्यामुळे समोर येण्याचा काही प्रश्न नाही। वाढदिवसाला स्पर्धा करणे हा काही विषय नव्हता। त्यांनी बुलढाणा मध्ये भाजपा वाढवावी आम्ही चिखलीत शिवसेना वाढवू . कशाला विरोध करता. फक्त इकडची भाजपा काँग्रेसच्या दावणीला बांधल्या जाणार नाही याची काळजी घ्या। महायुती एकसंघ आहे। फक्त अब्दुल्ला शादी मे बेगाना दिवाणा, ज्यांना कुत्रे हुंगत नाही ते नाचायला लागला। संजय गायकवाडच्या रॅली लोकांनी पाहिलेल्या आहेत , मी कशाला घाबरू . आमच्याही कार्यक्रमात लाईट जाते . मी कर्नाटकला होतो, माझा काही संबंध नाही . मी वाढदिवसाच्या रॅलीला प्रतिउत्तर देत नाही. मला फाईट करता, तर तुम्ही माझ्याशी विकासाची फाईट करा. मी जर एखाद्या शेतकऱ्याला मदत केली तर तुम्ही त्याला मदत द्या. वाढदिवसाला खर्च केल्यापेक्षा एखादे गरीबाला मदत करा. आम्ही अशी उधळपट्टी कधी करत नाही. आमचेही वाढदिवस होतात पण आम्ही एव्हढे कधी खर्च करत नाही. ऑन आमदार महाले यांनी धनुष्यबाण ताणला. बाप तो बाप रहेगा, हे माणसाने बोलले तर बरं आहे. एखाद्या बाईने म्हटले की मी बाप आहे तर बापासारखे शरीर कुटून आणणार आहे. हे शोभते का बोलायला . राजकारणातला बाप कोण आहे हे योग्यवेळी दाखवून देऊ.0
0
Report
Advertisement
ATM मशीन पर फेविक्विक लगाकर पिन चुराकर लूटने वाली टोली का पर्दाफाश, तीन गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:ATM मशीन पर फेविक्विक लगाकर नागरिकों की लूट करने वाले गिरोह का पर्दाफाश। पटना एक्सप्रेस में पीछा कर पुलिस ने तीन लोगों को गिरफ्तार किया। कल्याण कोळशेवाडी गिरोह ने पुलिस को यह जानकारी दी कि बिहार जानेवाली ट्रेन में आरोपी उतरेंगे। इसके अनुसार पुलिस ने एक्सप्रेस में जाकर आरोपियों को गिरफ्तार किया। ये आरोपी ATM मशीन पर फेविक्विक लगाते थे, जिससे कभी-कभार पैसे निकालने वाले व्यक्ति का कार्ड मशीन में फंस जाता था; फिर मदद के बहाने आरोपी ATM केंद्र में घुसकर पिन कोड जानकर उसे लूट लेते थे।0
0
Report
वाशीम के मंगरूळपीर में शिव कवड़ यात्रा पारंपरिक धुनों के बीच
Washim, Maharashtra:भोलेबाबा शिव कावड यात्रा वाशीमच्या मंगरूळपीर तालुक्यातील तर्हाळा येथे भक्तिमय आणि पारंपरिक वातावरणात पार पडली. विशेष म्हणजे डीजेचा वापर टाळत पारंपरिक वाद्ये, लेझीम आणि डमरूच्या गजरात ही यात्रा काढण्यात आली. पुर येथील पुरातन महादेव मंदिरातून कावड घेऊन आलेल्या यात्रेत भाविकांनी मोठी गर्दी केली होती. आठ आकर्षक सजविलेल्या बैलगाड्यांमधून भगवान शिव-पार्वती आणि विविध संतांच्या वेशभूषा साकारण्यात आल्या होत्या. भक्ती, संतपरंपरा आणि ग्रामीण संस्कृतीचा सुंदर संगम घडविणारी ही कावड यात्रा परिसरात चर्चेचा विषय ठरली.0
0
Report
पंढरपुर कॉरिडोर परियोजना: मंदिर परिसर के पास 65 मीटर भूसंपादन, सुविधाओं का विस्तार
Pandharpur, Maharashtra:तीर्थक्षेत्र पंढरपूर येथे होणाऱ्या संभाव्य कॉरिडॉर प्रकल्पाचे सादरीकरण आज पंढरपूर मध्ये उपजिल्हाधिकारी संतोष देशमुख यांनी केले कॉरिडॉर अंतर्गत मंदिरापासून दोन्ही बाजूला 65 मीटर इतके भूसंपादन केले जाणार आहे यामध्ये देण्यात येणाऱ्या सुविधा घरमालक व्यावसायिक भाडेकरू यांना देण्यात येणारा मोबदला याबातची माहिती देण्यात आली. तसेच हा कॉरिडॉर कसा असेल याचे एक ॲनिमेटेड चित्रफीत तयार केली आहे ती सुद्धा प्रशासनाने नागरिकांच्या साठी पाहण्यास दाखवली आहे यामध्ये श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर चंद्रभागा नदीवरील घाट पंढरपूर परिसरामधील वाहन तळ पालखी तळ येथे होणाऱ्या सुविधा रस्त्यांचे रुंदीकरण याचा समावेश आहे0
0
Report
Advertisement
यवतमाढ के आदिवासी बेरोजगार युवाओं के आंदोलन पर केंद्रीय मंत्री ने संकेत दिए
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये आदिवासी बेरोजगार युवक आणि विद्यार्थ्यांनी जिल्हा परिषद कार्यालया समोर गेल्या वीस दिवसांपासून सुरू असलेले ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी या विद्यार्थ्यांसोबत सविस्तर चर्चा करून त्यांच्या मागण्यांबाबत सकारात्मकता दर्शवली, त्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन थांबविले. आदिवासींच्या 12 हजार 500 रिक्त जागांची तात्काळ भरती व्हावी, पेसा व नॉन पेसा पदभरतीत संवर्ग घ्यावे, एमपीएससीच्या गट क मधील तलाठी पदाच्या पेसा व नॉन पेसा जिल्हा निहाय जागा उपलब्ध करून जाहिरात द्यावी, पवित्र पोर्टल प्रणाली द्वारे घेण्यात येत असलेल्या शिक्षक भरतीत पेसा आणि नॉन पेसा जागा उपलब्ध करून द्याव्या या मागण्या मान्य करण्यात आले असून, मुख्यमंत्री त्याबाबत लवकरच निर्णय घेतील असे आश्वासन आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी दिले.0
0
Report
बारामती में अचानक बारिश, किसानों के लिए राहत की उम्मीद
Rui, Maharashtra:कई दिनों की विश्राम के बाद बारामती शहर और उसके आसपास बारिश मिली। अचानक बारिश ने नागरिकों को चौंका दिया। कुछ दिनों से तेज गर्मी बढ़ी थी, आज सुबह मौसम बदला और दोपहर में बारामती शहर व उसके आसपास बारिश देखने को मिली। बारिश हल्की रही, लेकिन किसानों के लिए भारी बारिश की उम्मीद है।0
0
Report
वाशीम कांग्रेस का ज्ञापन: कोरडा़ दुष्काळ घोषित कराओ, 75 हजार/हेक्टेअर मदद
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात मागील महिनाभरापासून पावसाने दडी मारल्याने खरिपाची पिकं करपून गेली आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य शासनाचे लक्ष वेधण्यासाठी काँग्रेसच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देतं निवेदन देण्यात आले. जिल्ह्यात तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी 75 हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना दिवसा वीजपुरवठा करावा, अशा प्रमुख मागण्या काँग्रेसने केल्या आहेत. यासोबतच जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसविण्यास विरोध करत महावितरणच्या अधिकाऱ्यांनाही निवेदन देण्यात आले. यावेळी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
उजनी के मछुआरों का एक दिवसीय लाक्षणिक उपोषण, ई-टेंडर नियम रद्दीकरण की मांग
Rui, Maharashtra:चालीसहून अधिक गावात मच्छीमारांचं एक दिवसीय लाक्षणिक उपोषण..... उजनीतील मासेमारीचा ठेका पद्धत रद्द करण्याची मागणी..... उजनी धरणातील मासेमारीसाठी राज्य सरकारकडून ई-टेंडर प्रक्रिया राबवली जात आहे याला विरोध दर्शवण्यासाठी आज इंदापूर दौंड तालुक्यातील भीमा पट्ट्यात 40 हून अधिक गावात मच्छीमारांनी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण केल आहे. शासनाने तात्काळ ही ठेका पद्धत रद्द करावी अशी मागणी मच्छीमारांनी केली आहे.0
0
Report
युगेंद्र पवार के नेतृत्व में सोमेश्वर कारखाने के लिए नई पीढ़ी का पैनल चयन
Rui, Maharashtra:बारामती: युगेंद्र पवार पत्रकार परिषद. पवार साहेबांचे मार्गदर्श आणि अजितदादांच्या कष्टामुळे सोमेश्वर कारखाना चांगल्या पद्धतीने चालला. अजितदादांचा कारखान्यावर वचक होता; गैरप्रकार आढळल्यास तातडीने कारवाई आणि चौकशी केली जात होती. अजितदादा नसले तरी पवार साहेबांनी कारखान्याकडे लक्ष द्यावे, अशी सभासदांची इच्छा आहे. माळेगाव कारखिण्यातील डिस्टिलरी बंद असल्यासारख्या अडचणी निर्माण झाल्या. माळेगांव कारखान्यात प्रशासक नेमण्याची वेळ येत असेल तर सभासदांनी निवडून दिलेल्या संचालकांची भूमिका काय, संचालक मंडळावर प्रभावी वचक आणि योग्य देखरेख असणे गरजेचे. पवार साहेबांना सहकार आणि साखर कारखानदारीचा मोठा अनुभव. पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली सोमेश्वर कारखान्यासाठी शेतकरी पॅनल उभे करण्याचा निर्णय. पॅनलमध्ये उच्चशिक्षित, तरुण, ज्येष्ठ आणि अनुभवी उमेदवारांचा समावेश केला जाणार. स्वच्छ प्रतिमेचे आणि सभासदांच्या प्रश्नांसाठी काम करणारे उमेदवार देण्याचा दावा. मागील १०-१५ वर्षांपासून, काही ठिकाणी ३० वर्षांपासून तेच लोक संचालक असल्याचा आरोप. तरुण सभासदांना आणि नव्या नेतृत्वाला संधी देण्याचा पॅनलचा प्रयत्न. ऊस उत्पादक शेतकरी, सभासद आणि कारखाना कामगारांचे हित केंद्रस्थानी ठेवण्याचा दावा. विद्यमान संचालक मंडळात बदल होणे गरजेचे असल्याचे मत0
0
Report
भाजपा विधायक मंदा म्हात्रे ने पुलिस आत्महत्या समेत अन्य मुद्दों पर कार्रवाई की मांग की
Navi Mumbai, Maharashtra:भाजपा आमदार मंदा म्हात्रे यांनी नवी मुंबई शहरातील विविध प्रश्नांसंदर्भात नवी मुंबई पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांची भेट घेतलेय. या भेटी मध्ये शाळा कॉलेज परिसरात होत असलेली अमली पदार्धांची विक्री, ध्वनी प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पोलिस कर्मचाऱ्याने केलेल्या आत्महत्ये प्रकरणी कारवाई करण्याची मागणी करण्यात आलेय. यावेळी शाळा कॉलेज परिसरात पोलिसांची गस्त वाढविण्यात येईल, ध्वनी प्रदूषण रोखण्यासाठी गणेश मंडळांशी संवाद साधून शहरात डीजे वाजणार नाही याची दक्षता घेतली जाईल, वाहतूक कोंडी वर तोडगा काढण्यासाठी विविध आस्थापनांसोबत चर्चा करून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल तसेच पोलिस आत्महत्या प्रकरणी चौकशी करुन योग्य ति कारवाई करण्याचे आश्वासन पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आमदार मंदा म्हात्रे यांना दिलेय.0
0
Report
Advertisement
