icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मतदाता सूची के गहन पुनरीक्षण में सुनवाई सभी के लिए सुनिश्चित करने के निर्देश

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मतदार यादीदेखील विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमाच्या पुढच्या म्हणजेच सुनावणीच्या टप्प्याबाबत मतदार नोंदणी अधिकारी, सहा. मतदार नोंदणी अधिकारी यांचे प्रशिक्षण छत्रपती संभाजी नगर जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडले. मतदार याद्यांचे विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात प्रारूप मतदार याद्यांच्या प्रसिद्धी पश्चात आता जुळवणी न झालेले, विसंगती वा तफावत असणाऱ्या मतदार तपशिलाबाबत संबंधित प्रत्येक मतदाराला सुनावणीची संधी कोणताही पात्र मतदार वगळला जाणार नाही याची दक्षता घ्यावी, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.. नागरिकांनी मतदार यादीतील आपले नाव आणि अन्य तपशील तपासावेत. पात्र असूनही नाव समाविष्ट नसल्यास वेळेत दावा दाखल करावा. तसेच आक्षेपार्ह अथवा अपात्र नोंद आढळल्यास त्याबाबत हरकत नोंदवावी, झाले जिल्हाधिकारी यांनी सांगितले.
0
0
Report

सोलापुर के रामलाल चॉल में सभामंडप के भूमिपूजन का सफल कार्यक्रम

Solapur, Maharashtra:सोलापूर - शहरातील रामलाल चाळ येथे सभामंडपाचे भूमिपूजन संपन्न. शहरातील रामलाल चाळ येथे सभामंडप उभारण्याची गेल्या अनेक वर्षांपासूनची मागणी अखेर पूर्ण झाली. आ. देवेंद्र कोठे यांच्या हस्ते सभामंडपाचे भूमिपूजन करण्यात आले. भजन, कीर्तन, लहान मुलांवर संस्कार वर्ग अशा विविध कामांसाठी सभामंडपाचा वापर होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून सोलापूर शहरासाठी भरघोस निधी दिला जात असून शहराच्या विकासासाठी कुठेही निधी कमी पडू देणार नाही असा विश्वास यावेळी आ. देवेंद्र कोठेनीं व्यक्त केला.
0
0
Report

नवी मुंबई: वाशी में अतिक्रमण विभाग की कार्रवाई, मार्जिनल स्पेस सहित अवैध निर्माण ढाहे गए

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातर्फे वाशी मध्ये मोठी कारवाई कारण्यात आलेय. पहिल्यांदाच दुकानदारांच्या मार्जिनल स्पेस सोबतच वाढीव बांधकामांवर देखिल कारवाई करण्यात आलेय. दुकाना बाहेर करण्यात आलेल्या काचेच्या बांधकामांना तात्काळ काढण्याचं आदेश देण्यात आले असून अन्यथा तोडक कारवाई केल्याचा इशारा दिल्याने व्यापारी धास्तावले आहेत. व्यापाऱ्यांनी स्वतःच काचेचे वाढीव बांधकाम काढण्यासाठी सुरुवात केली असून या कारवाईमुळे फुथपाथ पूर्णपणे मोकळे झालेत.
0
0
Report
Advertisement

मीरा-भाईंदर में पर्युषण के दौरान आठ दिन मांस विक्रय बंद कराने की मांग

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर मध्ये पर्युषण काळात 8 दिवस मांसविक्री बंद ठेवा! मिरा-भाईंदरमध्ये भाजप नगरसेवकाची प्रशासनाकडे मागणी जैन धर्मियांच्या पर्युषण पर्वाच्या पार्श्वभूमीवर मांसविक्रीची दुकाने आठ दिवस बंद ठेवण्याची मागणी भाजप नगरपालिका भरत कोठारी यांनी आयुक्तांकडे केली मागणी जैन समाजाच्या धार्मिक भावना, अहिंसेचा संदेश आणि जीवदयेची भावना लक्षात घेऊन निर्णय घेण्याची मागणी सरकारी आदेशानुसार पर्युषण काळात केवळ दोन दिवस मांसविक्री बंद ठेवण्याची तरतूद मात्र भाजपकडून 8 ते 16 सप्टेंबर आठ दिवस मांसविक्रे बंद ठेवण्याचा आग्रह यामुळे मिरा-भाईंदरमध्ये पुन्हा एकदा वाद निर्माण होण्याची शक्यता
0
0
Report

बिना हेलमेट दोपहिया चालकों के खिलाफ पुलिस अभियान, चार घंटे में 4746 चालान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहर पोलिसांकडून विनाहेल्मेट दुचाकीस्वारांविरुद्ध सुरू असलेल्या मोहिमेअंतर्गत कारवाईचा बडगा सलग तिसऱ्या दिवशीही कायम राहिला. गुरुवारी कार्यालयीन वेळेत सकाळी आणि सायंकाळी मिळून चार तासांत वाहतूक शाखा व स्थानिक पोलिसांनी ४ हजार ७४६ दुचाकीचालकांवर दंडात्मक कारवाई करून हेल्मेट परिधान करण्याचा सल्ला दिला. रस्ते अपघातातील जीवितहानी टाळण्यासाठी राबवलेल्या या मोहिमेमुळे शहरातील मुख्य चौक व रस्त्यांवर विनाहेल्मेट फिरणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे。
0
0
Report
Advertisement

भिंगार कैम्प पुलिस ने तलवार से केक काटने वाले युवक को गिरफ्तार किया

Ahilyanagar, Maharashtra:तळवारीने केक कापून व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याचा प्रताप दिवसेंदिवस वाढत आहे अहिल्यानगर येथे तलवारीने केक कापणाऱ्या तरुणाला कॅम्प पोलिसांनी ताब्यात घेऊन चांगलीच जिरवली आहे नगर शहराच्या जवळच असलेल्या भिंगार येथील सचिन नितीन जाधव या तरुणाने वाढदिवसाच्या निमित्ताने किंग नावाचा केक तलवारीने कापला आणि त्याची सोशल मीडियावर रील व्हायरल केला... तरुणाचा हा प्रताप भिंगार कॅप पोलिसांच्या लक्षात आल्यानंतर कॅम्प पोलीस स्टेशनच्या प्रभारी अधिकारी तेजश्री थोरात आणि त्यांच्या टीमने आरोपी तरुणाला ताब्यात घेऊन त्याच्यावर गुन्हा दाखल केला आला आहे... अशाप्रकारे कोणत्याही तरुणाने व्हिडिओ बनवलेले पोलीस प्रशासन खपवून घेणार नाही असं देखील पोलीस निरीक्षक तेजस्वी थोरात यांनी म्हटले आहे...तर सदर तरुणाला पोलीस स्थानकामध्ये आल्यानंतर पोलिसांचा खाक्या दाखवताच त्याने देखील मी केलेल्या कृत्याची माफी मागत असल्याचे आवाहन केले आहे...
0
0
Report
Advertisement

विदर्भ में वर्षा कमी से संत्रा फसल को नुकसान, गला और रोग से खतरा बढ़ा

Nagpur, Maharashtra:विदर्भात जुलै पाठोपाठ ऑगस्ट महिन्यातही पावसाची मोठी तूट आहे. संत्रा पट्टा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नागपूर जिल्ह्यात ही तूट 71 टक्के व अमरावती जिल्ह्यात 82 टक्के आहे. त्याचा परिणाम संत्र्यावर पडला आहे. मुबलक पाऊस न झाल्यामुळे संत्र्याची मोठ्या प्रमाणात गळ सुरु झाली आहे. मागच्या दोन आठवड्यात झाडावरचा गळून पडला आहे. भविष्यत पाऊस आला नाही तर ही गळ मोठ्या प्रमाणात वाढण्याची भीती शेतकऱ्यांना आहे. त्यातच एक महिन्यापासून असलेले सलगचे ढगाळ वातावरण त्यामुळे संत्रा पिकाला बुरशीजन्य रोगाची लागण झाल्याने ही गळ वेगाने होत आहे.
0
0
Report

राजगुरुनगर में पत्नी की हत्या के बाद बेटे पर हमला; आरोपी माजी सैनिक ने आत्महत्या कर ली

Khed, Maharashtra:खेड/पुणे - बायकोचा खून, मुलावर चाकूहल्ला; माजी सैनिक आरोपीची आत्महत्या, भीमा नदीकाठी आढळला मृतदेह राजगुरुनगरमध्ये पत्नीचा खून करून १७ वर्षीय मुलावर चाकूहल्ला केल्याच्या प्रकरणातील आरोपीची आत्महत्या. चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला आहे . माजी सैनिक महेंद्र दौंडकर यांनी राजगुरुनगर येथील राहत्या घरात पत्नी दीपा हिचा गळा आवळून खून केला होता. त्यानंतर त्यांनी त्यांचा १७ वर्षीय मुलगा अथर्व याच्यावर चाकूने हल्ला करून त्याच्या खुनाचा प्रयत्न केल्याचे समोर आले होते. या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली होती. दरम्यान, घटनेनंतर महेंद्र दौंडकर हा बेपत्ता होता. त्यांचा शोध घेतला जात असतानाच आज सकाळी चांडोली गावच्या हद्दीत भीमा नदीकाठी त्यांचा मृतदेह आढळून आला. नदीकाठी एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत त्यांचा मृतदेह पोलिसांच्या निदर्शनास आला.
0
0
Report
Advertisement

यवतमाल में रबीउल-अव्वल के अवसर पर वहदत-ए-इस्लामी ने पैगाम-ए-रहमत-ए-आलम अभियान शुरू किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाल मध्ये रबिउल-अव्वल या पवित्र महिन्याच्या निमित्ताने वहदत-ए-इस्लामी, हिंदतर्फे ‘पैगाम-ए-रहमत-ए-आलम ’ या विषयावर सामाजिक जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत आत्महत्या, कन्या भ्रूणहत्या, व्यसनमुक्ती आणि पर्यावरण प्रदूषण या गंभीर सामाजिक प्रश्नांवर प्रबोधन केल्या जात आहे. पर्यावरणाचा होत असलेला ऱ्हास, वाढते प्रदूषण, व्यसनाधीनता, आत्महत्या और कन्याभ्रूणहत्या या समस्यांकडे केवळ प्रशासकीय किंवा कायदेशीर प्रश्न म्हणून न पाहता सामाजिक जबाबदारीच्या भावनेतून पाहण्याची गरज असल्याचे પ્રा. वहाब मलक यांनी प्रबोधन कार्यक्रमात सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top