icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मालेगांव के किदवाई रोड पर अतिक्रमण हटाने के दौरान दो युवाओं में मारपीट, वीडियो वायरल

Malegaon, Maharashtra:हाणामारी ! मालेगावी किदवाई रोडवर अतिक्रमण काढत असताना झाली हाणामारी. मालेगाव महानगर पालिकेतर्फे शहरात जोरदार अतिक्रमण मोहीम राबवली जात असून शहरातील मध्यवर्ती ठिकाण किदवाई रोड येथे अतिक्रमण काढत असताना दोन तरुणांमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. एकाचे अतिक्रमण निघत असताना दुसऱ्या तरूणाने अतिक्रमण निघत असताना मोबाईल व्हिडिओ चित्रित केला याचा राग येऊन त्या तरुणाने तू व्हिडिओ का काढत याचा जाब विचारल्याचे कारणावरून दोघांमध्ये शाब्दिक चकमक होऊन हाणामारी झाली. सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
0
0
Report

ऑपरेशन जीवन रक्षा: आरपीएफ-एमएसएफ की सतर्कता से युवक की जान बची, कल्याण स्टेशन

Kalyan, Maharashtra:कल्याण रेल्वे स्थानकावर आलेल्या एक्स्प्रेस मध्ये चढताना तोल जाऊन प्लॅटफॉर्म आणि एक्स्प्रेस च्या गॅप मध्ये पडलेल्या इसमाचे प्राण RPF आणि MSF जवानांच्या सतर्कतेमुळे वाचले सहा तारखेला रात्री सुमारे 9:36 वाजता प्लॅटफॉर्म क्रमांक 4 वर ही घटना घडली. Pune–Santragachi Humsafar Express ही रेल्वे स्थानकावर आली असताना अश्विनी कुमार बर्वे हे चहा पिण्यासाठी प्लॅटफॉर्मवर उतरले इतक्यात गाडी सुरू झाली त्यामुळे अश्विन बर्वे हे गाडी चढत असताना त्यांचा तोल जाऊन ते खाली पडले प्लॅटफॉर्म आणि गाडीच्या मधील गॅप मध्ये पडले असताना त्या ठिकाणी कर्तव्याव असलेले आरपीएफ जवान गजानन अंभोरे आणि MSF जवान विशाल जाधव यांचे लक्ष गेले . या दोघांनी क्षणाचाही विलंब न करता तत्काळ त्यांच्या दिशेने धाव घेताना सुखरूप बाहेर काढले त्यामुळे बर्वे यांचा जीव वाचला .आरपीएफ जवान गजानन अंभोरे आणि MSF जवान विशाल जाधव यांच्या या धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report

सातारा जिला परिषद की नव निर्वाचित अध्यक्ष प्रिया शिंदे के दाखले पर कानूनी चुनौती

Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषदेच्या नव निर्वाचित अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी अध्यक्ष पदाच्या निवडीवेळी सादर केलेल्या कुणबी दाखल्याला आता कायदेशीर आव्हान देण्यात आलं आहे. यासंदर्भांत ऍडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी वकीलपत्र दाखल केले असून प्रिया शिंदे यांनी दाखल केलेला जातीचा दाखला हा वैध नसून चुकीच्या कागदपत्रांच्या आधारे हा दाखला देण्यात आल्याचे ऍडव्होकेट दत्तात्रय घोडके यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. दरम्यान, यामुळे सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे。
0
0
Report
Advertisement

राजू शेट्टी ने बीजेपी पर ठोका वार: बाजार समिति विभाजन पर तीखा हमला

Sangli, Maharashtra:स्लग - भाजपावाल्यांनो सत्तेचा ताम्रपट घेऊन आला नाहीत,तुम्हालाही विरोधात बसावे लागेल,हे लक्षात ठेवा - राजू शेट्टी.. अँकर - कायदा धाब्यावर बसावा,पण सत्ता मिळावी,ही प्रवृत्ती घातक असून,तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आले नाही,कधीतरी तुम्हालाही विरोधात जावं लागेल,त्यावेळी तुमची अवस्था काय होईल ,हे लक्षात ठेवा,असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी यांनी भाजपाला दिला आहे,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजना व सातारा जिल्हा परिषद राडा प्रकरणावरून राजू शेट्टीने भाजपावर हे टीका केली आहे,तसेच बाजार समिती त्रिभाजनाला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा विरोध असल्याचा देखील राजू शेट्टींनी स्पष्ट केले आहे,ते सांगलीत बोलत होते.
0
0
Report

एलपीजी गैस सिलेंडर संकट के खिलाफ वंचित बहुजन आघाड़ी ने कल्याण तहसील में मोर्चा

Kalyan, Maharashtra:एलपीजी गॅस सिलेंडर टंचाईच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीचा कल्याण तहसील कार्यालयावर मोर्चा ANC - आखाती देशातील युद्धामुळे एलपीजी ग’स सिलेंडरची टंचाई निर्माण झाली आहे. त्याचे केंद्र सरकारने योग्य नियोजन करावे. सरकारकडून नियोजन केले जाह नसल्याने सामान्य जनतेला एलपीजी ग’स सिलेंडर टंचाईचा सामना करावा लागत आहे. ग’स सिलेंडर बुकिंग केल्यावर महिन्याबराने ग’स सिलेंडर मिळत आहे. ग’स सिलेंडर टंचाई दूर करण्याच्या मागणीसाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हाध्यक्ष विशाल पावशे यांच्या नेतृत्वात आज कल्याण तहसील कार्यावर धडक मोर्चा काढण्यात आला. डा’. बाबासाहेब आंबेडकर उद्यान ते तहसील कार्यालतापर्यंत काढलेल्या माेर्चा पश्चात तहसीलादारांना वंचितच्या वतीने एक निवेदन दिले गेले. सरकारला सामान्यांच्या भावना पोहचविण्याची मागणी वंचितच्या वतीने या वेळी करण्यात आली.
0
0
Report

सांगली की कृष्णा नदी में देश-स्तरीय बोट शर्यत में गुरुनानक देव विश्वविद्यालय ने बाजी मार ली

Sangli, Maharashtra:सांगली के कृष्णा नदी पात्र में देश पातळीवरील बोटींच्या शर्यतींचा थरार रंगला होता. कनोईंग व कयाकिंग बोट स्पर्धांमध्ये गुरुनानक देव विद्यापीठ अमृतसरने जनरल विजेतेपद पटकावले आहे. पहिल्यांदाच देश पातळीवरील बोटिंग शर्यतींचा आयोजन करण्यात आलं होतं. देशातल्या 40 विद्यापीठांनी सहभाग नोंदवला होता. 300 हून अधिक खेळाडूंनी भाग घेतला. स्पर्धेचे उद्घाटन पालकमंत्री चंद्रकांत पाटलांच्या हस्ते झाले होते. 500 मीटर अंतराच्या या शर्यतींमध्ये गुरुनानक देव विद्यापीठाने दमदार कामगिरी केले आणि कयाकिंग व कॅनॉईंग गटात विजेतेपद पटकावले. सांगलीकरांना कृष्णा नदीपात्रात असंख्य उत्साह दिसला, पण स्पर्धांचा व्यापक प्रचार-प्रसार कमी असल्यामुळे काहींचे लक्ष वेगळे झाले.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के पास कुुवारबाव में बस के सामने बाइक की भीषण टक्कर, दो घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहरानजीक मिऱ्या नागपूर महामार्गावर कुवारबाव येथे बस स्टॉप वर थांबलेल्या शिवशाही बसला वेगाने आलेल्या दुचाकीची जोरदार धडक बसली आणि भीषण अपघात झाला. यात दुचाकी स्वार आणि सहप्रवासी तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवण्यात आलं.. काल रात्री १० ते १०.३० वाजण्याच्या sुमारास अपघात झाला. रोहित राजू सावंत व साईराज संतोष धोत्रे अशी जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. रत्नागिरीच्या दिशेने जाणारी शिवशाही बस कुवारबाव येथे स्टॉपवर थांबली होती. प्रवासी बसमधून उतरत असतानाच हातखांब्याहून रत्नागिरीच्या दिशेने जाणारी दुचाकी वेगाने येत होती. त्यावरील चालकाचा वाहनावरील ताबा सुटला आणि दुचाकी चालकासह थेट बसखाली गेली आणि अपघात झाला. यात चालकासह सहप्रवासी सुद्धा जखमी झाला.. दोघांनाही तत्काळ जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
0
0
Report

शिरूर वॉटरपार्क में लापरवाही से महिला का अर्धांग क्षतिग्रस्त

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये निष्काळजीपणामुळे गंभीर दुर्घटना घडली आहे. सहलीसाठी आलेल्या महिलेचा वॉटर स्लाइडवर अपघात होऊन तिचे अर्धे शरीर निकामी झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी वॉटरपार्क प्रशासनाविरोधात शिरूर पोलीसांचे गुन्हा दाखल करण्यात आला असून करंदी येथील अश्विनी संदीप नप्ते (वय ३७) ही आपल्या कुटुंबासह मोराची चिंचोली येथील जय मल्हार कृषी पर्यटन केंद्र वॉटरपार्कमध्ये सहलीसाठी गेल्या होत्या. वॉटर स्लाइडवरून घसरताना पाण्याची पातळी अत्यंत कमी असल्याने त्या जोरात खाली आपटल्या आणि बेशुद्ध पडल्या. घटना नंतर तातडीची वैद्यकीय सुविधा किंवा रुग्णवाहिका उपलब्ध नसल्यामुळे नातेवाईकांनी त्यांना खाजगी रुग्णवाहिकेतून रुग्णालयात दाखल केले. तपासणीत त्यांच्या पाठीचे चार मणके तुटल्याचे समोर आले असून डॉक्टरांनी त्यांच्या अर्धे शरीर कायमस्वरूपी निकामी झाल्याचे स्पष्ट केले आहे. या गंभीर प्रकारामुळे वॉटरपार्कमधील सुरक्षा उपाययोजनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत. किरण नप्ते यांच्या फिर्यादीवरून शिरूर पोलीस ठाण्यात वॉटरपार्कचे मालक व व्यवस्थापकांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.
0
0
Report

चिपळूण में भाजपा के कमळ चिन्ह पर कांग्रेस ने 24 घंटे का अल्टीमेटम

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी में चिपळूण में सरकारी इमारत की दीवार पर भाजपा के 'कमळ' चुनाव चिह्न रंगे जाने से नया विवाद उफान पर आ गया है।-anchor-न‍यास-सरकारी इमारत की दीवार पर भारतीय जनता पार्टी के कमळ चिन्ह रंगे जाने से नये विवाद उफाल उठे हैं। कांग्रेस ने तीव्र आपत्ति जाहिर की है कि प्रशासनिक संपत्ति का राजनीतिक प्रचार के लिए उपयोग करना गलत है। कांग्रेस के जिलाध्यक्ष सोनल लक्ष्मी घाग ने इसके विरोध में तीखी प्रतिक्रिया दी है और चिन्ह 24 घंटे के भीतर हटाने का निर्देश दिया है। अगर ऐसा नहीं किया गया, तो कांग्रेस के स्टाइल में तीव्र आंदोलन शुरू करने की चेतावनी दी है। अब प्रशासन क्या कदम उठाता है, इस पर सभी की नजर है।
0
0
Report
Advertisement

LED मछली捕 रोकथाम पर रत्नागिरी में रात भर कार्रवाई: सरकार का सर्जिकल स्ट्राइक

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. समुद्रात मध्यरात्री थरार! अनधिकृत LED मासेमारीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक.. कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर काल रात्री एक मोठा थरार पाहायला मिळाला. सागरी पर्यावरणाचा शत्रू ठरणाऱ्या आणि पारंपरिक मच्छिमारांच्या पोटावर पाय देणाऱ्या LED मासेमारी विरोधात राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि सचिव एन.रामास्वामी यांच्या आदेशानंतर प्रशासन पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहे.. ८७८ किमीच्या अथांग किनारपट्टीवर काल रात्रभर विशेष गस्त घालण्यात आली... या मोहिमेत एकूण ६ बेकायदेशीर LED बोटी रंगेहाथ पकडण्यात आल्या आहेत.. या कारवाईत केवळ बोटीच नाही,तर तबल सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात हाय-डेन्सिटी LED दिवे, जनरेटर आणि बॅटरीचा समावेश आहे.. पकडलेल्या बोटींकडून ३० लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.. सह आयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भादुले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम पार पडली.. मंत्री महोदयांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की,ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे गस्त अधिक तीव्र केली जाईल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे आता दणाणणार आहेत.. पारंपरिक मच्छिमारांच्या हितासाठी सरकारने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे..
0
0
Report

वेंगुर्ल्या में दाभोली के घर में बिबटिया सीधे रसोईघर में घुसी

Oras Bk., Maharashtra:वेंगुर्ल्यातील दाभोली येथे बिबट्या शिरला थेट स्वयंपाक घरात दाभोली येथील विवेक जोशी यांच्या घरात जखमी अवस्थेतील बिबट्याने प्रवेश केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच विवेक जोशी यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन विभागाला दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमी असलेल्या या बिबट्याला जाळी टाकून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने जेरबंद केले. दरम्यान बिबट्या घरात शिरल्याने परिसरातील नागरीकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.
0
0
Report
Advertisement

हिंदी में फसल की कीमतों में भारी उछाल: किसान चिंतित, व्यापारी खुश

Jalna, Maharashtra:जालना | शेतकऱ्यांकडील कापूस संपताच कापसाच्या दरात क्विंटलमागे एक ते दिड हजारांची वाढ सध्या 8 हजार 400 रुपये मिळतोय भाव कापूस साठवून ठेवलेले शेतकरी खुष, कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांची मात्र नाराजी अँकर | यावर्षीचा कापूस हंगाम संपत आला आहे.जालना जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या आधीच कापूस विक्री केलाय.शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच "पांढऱ्या सोन्याच्या" दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांनी कापसाच्या भावांत वाढ होईल, या आशेने घरात साठवलेला कापूस विकला.तर काहींनी शेतातील कापूसही लग्नसराईमुळे विकला. मात्र शेतकऱ्यांकडील कापूस संपताच भावांत क्विंटलमागे तब्बल 1 ते दीड हजारांची वाढ झाली आहे. जेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो. तेव्हा भाव वाढतात. हे गणित दरवर्षीचे झाले आहे. यावर्षी कापूस संपल्यानंतर ८ हजार ४०० रुपये भाव झाला आहे. त्यामुळे व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झालीय.यावर्षी सीसीआय केंद्रानेही लवकरच कापूस खरेदी बंद केली.त्यामुळेही शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. मात्र या आठवड्यात कापसाचे दर ८ हजार ४०० रुपये झाले आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांना कापसाच्या दर्जानुसार ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. सीसीआयने नोव्हेंबरपासून ७ हजार २०० ते ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी सुरू केली. काही खासगी व्यापाऱ्यांकडून ७ हजार ५०० रुपये भाव देण्यात आला. तर आता क्विंटल मागे तब्बल एक दिड हजारांची वाढ झाल्यानं घरात कापूस साठवून ठेवलेले शेतकरी खुश झालेत तर कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाईट : शेतकरी
0
0
Report

महाराष्ट्र की राजनीति में हलचल: बारामती चुनाव और मराठा मुद्दे तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:- छत्रपती संभाजीनगर - बाईट अंबादास दानवे ऑन घाटगे यांची भाजपात घर वापसी - धक्के आता काही बसायचे विशेष राहिले नाही, अजित दादा सारखे घरातले गेले त्यामुळे समरजीत घाटगे सारखे गेले काय आले काय पवार साहेबाला धक्का बसणार आहे. ऑन एसटी महामंडळाकडून हंगामी दहा टक्के दर वाढ. - खरंतर हे चुकीचं आहे या काळात सवलती दिल्या पाहिजे दरवाढ नाही केली पाहिजे. - सध्याची एसटीची परिस्थिती बघितली तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही अशी एसटीची स्थिती असताना, एक तर नीट सेवा नाही सेवा नीट नसताना अशा पद्धतीने दरवाढ करणे हे चुकीचे आहे. ऑन पूर्णा नदीपत्रावर अत्याधुनिक पूल मात्र रस्ता नाही - पूल ज्याच्यासाठी बांधला त्याला कनेक्टिंग रस्ता, भूसंपादन, मालकी या सगळ्या प्रक्रिया अधिकाऱ्यांनी पूर्ण करायला पाहिजे होत्या. - हे सगळं झाल्यानंतर आता ते रस्त्याच्या अधिग्रहणासाठी काम सुरू करतील. - याचा अर्थ त्यांना पूल करण्याची जास्त घाई होते असा त्याचा अर्थ आहे पूल कशासाठी तर गुत्तेदारांसाठी गुत्तेदार कशासाठी तर कोणास तरी घर भरण्यासाठी. ऑन नांदेड खून प्रकरणात x पोस्ट - नांदेड मध्ये तीन दिवसात पाच मुडदे पडले आहेत म्हणजे कायद्याचा धाक राहिला की नाही राहिला. - सामनाने त्यावर अग्रलेख सुद्धा लिहिला आहे. - राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मला असं वाटतं दररोज खून जरी पडत असतील तरी त्याच्याकडे कोणी संवेदनशील पणे पाहत नाही. - राज्याचे गृह खाता बघत नाही राज्याचे मुख्यमंत्री बघत नाहीत. - सरकार फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतो प्रत्यक्षात काही मदत करत नाही. - अवकाळी पावसाचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. ऑन शितल तेजवानीच्या जामीन अर्जाला सरकारकडून विरोध. - सरकारची भूमिका साहजिक आहे, परंतु राज्य सरकारने जी काही चौकशी समिती नेमली आहे जे पुरावे आहेत यामध्ये सरकार बायस पद्धतीने पद्धतीने वागत आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. - कोंढव्याच्या प्रकरणात 99 टक्के शहर असलेल्या व्यक्ती बाहेर आहे. - मुद्दाम यांना वाचण्यासाठी तेजवानीला अटक केली जाते तेजवानी या दोष आहेच परंतु राज्य सरकार या सगळ्या प्रकरणात गोलमोल भूमिका घेत आहे. ऑन विट्स हॉटेलचा अहवाल राज्य शासनाकडे - खरंतर त्या संदर्भात चौकशी समिती लावण्याची मागणी माजी होती आद्य देशावर सुद्धा तसं स्पष्ट नाव होतं. - अगोदर जिल्हाधिकारी या चौकशी समितीचे अध्यक्ष होते नंतर मीच मागणी केली जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांची चौकशी काय करणार. - त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे चौकशी देण्यात आली विभागीय आयुक्तांनी ज्याची तक्रार होती त्याच्याकडे थोडी चर्चा करायला पाहिजे होती. - विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्याच्या विरोधात कसा रिपोर्ट देणार. - त्यांनी जर आम्हाला हेरिंगला बोलावलं असतं तर आणखी बरं झालं असतं, चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे की सत्यता मांडण्याचा प्रयत्न झाला असे मला माहित नाही. ऑन अंजली दमानिया CDR - CDR पोलिसांशिवाय कोणाला मिळत नाही त्याच्या रीतसर कायदेशीर बाबी आहेत. - असा असताना ज्या पद्धतीने अंतिम दमाने यांनी कॉल रेकॉर्ड जाहीर केले त्याची राज्य सरकारने चौकशी केली तो चौकशीचा फार्स आहे का मला माहित नाही. - त्यांनी नेमकं राजकीय लोक टार्गेट असणाऱ्या लोकांचीच कॉल रेकॉर्डची माहिती दिली. - आता राज्य सरकार चौकशी करतो असं म्हणते मात्र हे सगळं बाहेर आलं आहे. - आता राज्य सरकार या चौकशीच्या माध्यमातून काही राजकारण करू इच्छितो का काय अशी शंका जनतेच्या मनात आहे. ऑन खरात पोलीस कठडी पुन्हा मागणी - त्याचे दररोज वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत, आतापर्यंत दहा-बारा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. - प्रत्येक प्रकरणाचा तपास स्वतंत्र काय एकच प्रकरण नाही माझा अंदाज आहे आणखी पोलीस कोठडी वाढेल. ऑन अकरा पीडित महिलांची खराच्या विरोधात तक्रार - या भगिनी विषयी आपण काय बोलणार मला नाही वाटत यांच्या विषयी बोलणं संयुक्त होणार आहे. ऑन जे काम करतील त्यांनाच पद - एकनाथ शिंदे - कोणत्याही संघटनेचे अशीच भूमिका असते त्यात काही नवीन नाही. ऑन स्वीकृत नगरसेवक - स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजून कोणते ही निकष लावले नाहीत सगळे निर्णय उद्धव ठाकरे घेतील. - जे कोणी इच्छुक आहेत त्यांची माहिती उद्धव ठाकरेंना दिली जाईल. ऑन बारामती निवडणूक काँग्रेस उमेदवार - संस्कृती वगैरे म्हणणं चुकीचं आहे, आपण कर्डिलेंविषयी का नाही संस्कृतीच्या विषयी बोलत हा माझा प्रश्न आहे. - लोकशाहीत निवडणुका होत असतात ज्यांना उभारायचं ते उभे राहायचं असतात परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार अपघाती गेले आणि सुमित्रा वहिनी स्वतः उभे राहतात अशा महिलेच्या मागे उभे राहावं ही संस्कृती आहे. - निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही. - मला वाटतं अजून या विषयाला नऊ तारीख होऊ द्यावी फॉर्म वापस घ्यायची वेळ आहे त्यानंतर स्पष्ट होईल. - परंतु काँग्रेस उभे राहत असेल तर त्याला ऑपरेशन घ्यायचं कोणी कारण नाही, शिवसेनेने या निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशी भूमिका घेतली आहे. ऑन येरवडा मनोरुग्नालयात रुग्णांकडून कामे - हे सगळ्याच रुग्णालयात होतं, ठिकठिकाणी अशा पद्धतीने होतं हे काय तिथेच होतं असं काही नाही फक्त तो व्हिडिओ बाहेर आल्यामुळे त्या विषयाला वाचा फुटली आहे. - हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही असं वाटतं मला. ऑन मराठा आंदोलक - राधाकृष्ण विखे पाटील भेट - सरकारने मागच्या आंदोलनानुसार हैदराबादा गॅ Rozet लागू करण्याची भूमिका घेतली, हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीचा उल्लेख मराठवाड्याच्या ठिकठिकाणी आहे, गावनिहाय संख्येचा उल्लेख आहे. - हे पुरावे म्हणून घेतले पाहिजे असा सगळा या सरकारच्या आदेशाचा अर्थ आहे. - पण याला प्रोसेस काय असावी यासाठी समिती नेमली आहे, आता त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट मान्य करायचा न मान्य करायचा याबाबत एखादी समिती होईल. - मला असं वाटतं या निमित्ताने मराठा समाजाला गंडवण्याचा काम राज्य सरकार करते की काय अशी शंका निर्माण होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top