445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोकण में आंधी-बारिश का कहर, बिजली आपूर्ति ठप, हजारों परिवार अंधकार में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात अवकाळीचा हाहाकार! सलग तिसर्या दिवशी वादळी पाऊस.. वीज पडून दोन महिला जखमी,तर अनेक तालुके अंधारात.. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात निसर्गाचं तांडव सुरूच आहे.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसानं आता रौद्र रूप धारण केलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.. संगमेश्वरमध्ये घरावर वीज पडल्याची धक्कादायक घटना घडली असून,तर एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे.. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो कुटुंबं अंधारात आहेत.. या वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवर झाडे पडल्याने अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत असून,जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे.. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने आंबा,काजू आणि पपईच्या बागांना मोठा तडाखा दिला आहे... लांजा तालुक्यातील झापडे गावात समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग जमीनदोस्त झाली असून ३५ लाखांचं नुकसान झालं आहे.. केवळ शेतीच नव्हे,तर घरांचीही मोठी पडझड झाली आहे.. संगमेश्वर,मंडणगड,दापोली आणि राजापूरमधील खारेपाटणमध्ये घरांवरील कौले आणि पत्रे उडून गेले आहेत...अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे.. कोकणावर ओढवलेल्या या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून,प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी आता जोर धरत आहे..0
0
Report
चाय किसान परेशान: एक हफ्ते में कीमत 20000 से 18000 रुपये क्विंटल, चिंता बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम: चिया पिकाची लागवड करण्यात आली होती. सध्या चियाला मिळणारा दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक मानला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल २० हजार रुपये असलेला दर आता १८ हजार रुपयांवर आला आहे. अवघ्या एका आठवड्यात दोन हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.0
0
Report
रत्नागिरी के लांजा में 11 एकड़ पपीते की बाग उजड़ गई, 35 लाख नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लांजात अवकाळीचा तडाखा.. ११ एकर पपईची बाग भुईसपाट, शेतकऱ्याचे ३५ लाखांचे नुकसान!.. शनिवारी पडलेल्या वादळी पावासाचा तडाखा लांजा येथील शेतकऱ्याला बसला आहे.. एका प्रयोगशील शेतकरी समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने हाजु यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. वर्षभराची मेहनत मातीत गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.. समीर हाजु (शेतकरी).. लांजा0
0
Report
Advertisement
वाशिम में फुलों के दाम बढ़े, शादी-विवाह की सजावट महँगी
Washim, Maharashtra:वाशीम: लग्नसराई आणि धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर मागणीनुसार आवक कमी असल्यामुळं वाशिम जिल्ह्यात फुलांच्या दरात मोठी वाढ झाली असून त्याचा परिणाम आता हार, गाडी आणि मंडप सजावटीवरही दिसून येत आहे. गुलाब, मोगरा, काकडा आणि शेवंती या फुलांच्या किमती २० टक्क्यांनी वाढले आहेत. त्यामुळे लग्न समारंभासाठी हार, वधू-वरांची गाडी सजावट तसेच मंडप डेकोरेशनसाठी नागरिकांना अधिक खर्च करावा लागत आहे. वाढत्या तापमानामुळे बाजारात फुलांची आवक कमी झाली असून मागणी मात्र मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे गुलाब ६०० रुपये प्रति किलो, मोगरा १२०० रुपये प्रति किलो तर काकडा १४०० रुपये प्रति किलो दराने विक्रेत्यांना खरेदी करावे लागत आहेत. फुलांच्या वाढत्या मागणीमुळे विक्रेते आणि उत्पादकांना आर्थिक फायदा होत असला तरी सर्वसामान्य नागरिकांचे बजेट मात्र कोलमडत आहे.0
0
Report
उल्हासनगर महापालिका ने 27 अवैध गाळे गिराकर अतिक्रमण पर कड़ा कदम उठाया
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेचा ‘हातोडा’; रेजन्सी प्लाझातील २७ अवैध गाळे जमीनदोस्त. कारणे दाखवा नोटीसकडे दुर्लक्ष केल्याने अतिक्रमण विभागाची धडक कारवाई. उल्हासनगर शहरात बढ़ती अवैध बांधकामांविरोधात महापालिका प्रशासन अब अॅक्शन मोडमध्ये आया है. कैंप नंबर ३ मधील रेजन्सी प्लाझा येथील तब्बल २७ अनधिकृत गाळ्यांवर महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने धडक कारवाई करत ते निष्कासित केले. या कारवाईमुळे भूमाफियांमध्ये खळबळ उडाली असली, रेजन्सी प्लाझा ‘बी’ विंगमध्ये संपूर्ण एक मजला बेकायदा उभारण्यात आल्याच्या तक्रारी महापालिकेकडे प्राप्त झाल्या होत्या. नगररचना विभागाने संबंधित विकासकाला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. मात्र, नोटीसनंतरही कोणतीही दखल न घेतल्याने अखेर महापालिका प्रशासनाने कठोर पाऊल उचलले. महापालिका आयुक्त मनिषा आव्हाळे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त अजय साबळे आणि अतिक्रमण विभाग प्रमुख गणेश शिंपी यांच्या नेतृत्वाखाली पथकाने गुरुवारी दुपारी या २७ अवैध गाळ्यांवर पाडकाम कारवाई केली. या कारवाईमुळे शहरातील अवैध बांधकामधारकांचे धाबे दणाणले आहेत. मात्र, ही बांधकामे पूर्णपणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत का, की फक्त वरवरची कारवाई करण्यात आली आहे? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. कारण, अर्धवट कारवाई झाल्यास भविष्यात ही बांधकामे पुन्हा उभी राहण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त होत आहे.0
0
Report
वाशीम में जलसंकट गहराया; एकबुर्जी 24% और सोनल 12.71% जलसंचय बचा
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मध्यम प्रकल्पांमधील पाणीसाठा झपाट्याने घटत असून,पाणीटंचाईची चिंता वाढू लागली आहे. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या एकबुर्जी मध्यम प्रकल्पात सध्या २४ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे,तर सोनल मध्यम प्रकल्पात केवळ १२.७१ टक्के जलसाठा उपलब्ध आहे.वाढत्या तापमानामुळे प्रकल्पातील पाण्याची पातळी दिवसेंदिवस कमी होत असून,प्रशासनाने नागरिकांना पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन केले आहे.उन्हाळ्याच्या शेवटच्या टप्प्यात पाण्याचे योग्य नियोजन करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.0
0
Report
Advertisement
सिल्लोड में कुएँ की गिरावट से एक ही परिवार के तीन लोगों की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यतील धानोरा येथे शनिवारी रात्री एक अत्यंत हृदयद्रावक घटना घडली आहे. विहिरीत उतरून मोटर पंप बसवण्याचे काम सुरू असताना अचानक विहीर खचली आणि त्याखाली दबून एकाच कुटुंबातील तिघांचा दुर्दैवी अंत झाला. बाजीराव सर्जेराव काकडे, आजिनाथ बाजीराव काकडे आणि शाम बाजीराव काकडे अशी मृतांची नावे असून, या घटनेने संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे. रात्री साडे नऊच्या सुमारास घडलेल्या या अपघाताने गावावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, एकाच वेळी घरातील तीन आधारस्तंभ गेल्याने हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
वाशीम के महात्मा फुले बाजार में गंदगी का राज, व्यापारी और नागरिक परेशान
Washim, Maharashtra:वाशीम : वाशीम शहरातील महात्मा फुले भाजी बाजार व व्यापार संकुलात सध्या घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. बाजार परिसरात कचऱ्याचे ढीग, sांडपाणी व दुर्गंधीमुळे व्यापारी आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित साफसफाई होत नसल्याचा आरोप व्यापाऱ्यांकडून केला जात असून, नागरिकांच्या आरोग्याचाही प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे बाजार परिसराची नियमित स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
यवयमाळ के टिपेश्वर अभयारण्य के संवेदनशील क्षेत्र में अवैध रिसॉर्ट-एग्रो टूरिज्म के विरुद्ध याचिका; अदालत ने जवाब मांगा 11 जून तक
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील टिपेश्वर वन्यजीव अभयारण्याच्या संवेदनशील क्षेत्रामध्ये मोठ्या संख्येत अवैध रिसॉर्ट्स व अॅग्रो टुरिझम केंद्रे चालविली जात असल्याचा प्रकार पुढे आल्यानंतर आदिवासी मंचाचे अंकित नैताम यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल केली आहे. त्यामुळे न्यायालयाने राज्य सरकारला नोटीस बजावून यावर येत्या ११ जूनपर्यंत उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. टिपेश्वर अभयारण्य व्याघ्र संरक्षित क्षेत्र आहे. या ठिकाणी वाघ, बिबट्या, अस्वल, नीलगाय यासह जैवविविधता आढळते. मात्र वन विभागाच्या उदासीनतेमुळे वन्यजीव व पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील परिसरात अवैध बांधकामे आणि व्यावसायिक उपक्रमांचा सुळसुळाट झाला आहे. त्यांना जिल्हास्तरीय निरीक्षण समिती व इतर सक्षम प्राधिकरणांची आवश्यक परवानगी नाही. याशिवाय, खाणकाम व वृक्षतोडही सर्रास केली जात आहे. परिणामी, पर्यावरणाचा हास होत असून, वन्यजीवांच्या मार्गामध्ये अडथळे निर्माण होत आहेत. मानव-वन्यजीव संघर्षाचा धोका वाढत आहे, असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. तसेच, वन विभाग व पोलिसांनी यासंदर्भातील तक्रारींची दखल घेतली नाही, याकडेही लक्ष वेधण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
लातूर में इंस्टाग्राम धमकियों से 25 वर्षीय युवक ने आत्महत्या; सात गिरफ्तार
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यातील रेणापूर तालुक्यात धक्कादायक घटना घडली आहे. मोरवड येथे प्रेमप्रकरणातून सुरू झालेल्या वादानंतर इंस्टाग्रामवरून होत असलेल्या धमक्या आणि मानसिक त्रासाला कंटाळून 25 वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तेजस दिलीप घोडके असे मृत तरुणाचे नाव आहे. आत्महत्येपूर्वी लिहिल्या सुसाइड नोटमध्ये काही जणांकडून सतत मानसिक त्रास दिला जात असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या त्रासाला कंटाळून तेजसने गळफास घेत आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी रेणापूर पोलीस ठाण्यात सात जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
वरुड में युवक पर चौघों की मार: वीडियो वायरल, कारण अस्पष्ट
Amravati, Maharashtra:अमरावती के वरुड में एक युवक को चौघों ने बेदम मारहाण की गई. मारहाण का कारण अस्पष्ट है; नागरिक पूछते हैं कि पुलिस का दबदबा खत्म क्यों हो गया. मारहाण का वीडियो सोशल मीडिया पर वायरल हुआ है; वीडियो में चार लोगों द्वारा एक युवक पर लात-घूसों से अचानक मारहाण की गई है. मारहाण के कारण अस्पष्ट हैं और घटना दिन के उजाले में हुई है, जिससे स्थानीय लोग परेशान हैं.0
0
Report
सोलापुर में नाबालिग से विनयभंग: अनुराग मोरे, उसकी माँ और अरबाज तांबोळी पर मामला दर्ज
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग, तिघांवर गुन्हा दाखल - सोलापुरात पोलीस वसाहतीच्या गेट समोरच अल्पवयीन मुलीचा विनयभंग - विनयभंग प्रकरणी अनुराग मोरे, त्याची आई, आणि मित्र अरबाज तांबोळी या तिघांवर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - पीडित अल्पवयीन मुलगी कामानिमित्त जातं असताना दुचाकीवरून पाठलाग करत केला विनयभंग - विशेष म्हणजे सदर प्रकरणातील संशयित आरोपी अनुराग मोरे यांच्या आईने देखील दमदाटी केल्याची माहिती समोर - सदर प्रकरणी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे0
0
Report
Advertisement
खानापूर के सुरज उर्फ गजू भाई ने 35 में 35 अंक पाए, गाँव में जश्न
Sangli, Maharashtra:स्लग - भावाचा नादच खुळा.. दहावीतील 35 पैकी 35 गुण, शुभेच्छाचा वर्षाव, गावात बॅनर बाजी. अँकर - सांगलीच्या एका पट्याने दहावीच्या परीक्षेत 35 टक्के गुण मिळवत काठावर का होईना पण पास होण्याचा बहुमान मिळवलाय. खानापूर तालुक्यातल्या कमळापूर येथील सुरज उर्फ गजूभाई योगेंद्र साळुंखे या विद्यार्थ्याने सर्वच विषयात 35 पैकी 35 गुण मिळवलेत. त्यामुळे त्याच्या घवघवीत यशाची सध्या तालुक्यात बोलबाला आहे. व्ही वो - दहावीच्या परीक्षेत सगळ्यात जास्त गुण मिळवल्यावर त्या विद्यार्थ्यांचा कौतुक होतं पण सांगलीच्या खानापूर तालुक्यातल्या कमळापूर येथील सुरज उर्फ गजू भाई साळुंखे या विद्यार्थ्याचं कौतुक थोड्या वेगळ्या पद्धतीने होत आहे. कारण सुरज उर्फ गजू भाई काठावर पास झालाय. पस्तीस टक्के गुण सूरजने मिळवल्या म्हणजेच सर्व विषयात 35 पैकी 35 गुण सूरजला मिळाले आहेत. त्यामुळे गजूभाई दणकेबाज यशाचं गावात जल्लोष सुरू आहे. गावामध्ये सुरज अर्थात गजू भाईच्या या यशाचे आणि त्यांनी मिळवलेल्या गुणाचे बॅनर झळकलेत इतकंच नव्हे तर गजूभाईच्या मित्रा परिवाराकडुन सत्कार देखील करण्यात आला आहे. गजू भाईच्या गुणांचं सर्वत्र कौतुक होत असून 35 टक्यांमुळे सुरज उर्फ गजू आता पंचक्रोशीत चांगलाच फेमस झाला असून त्याला भेटायला मित्रमंडळी आता घर घडीत गर्दी करतायत. बाईट :- सुरज उर्फ गजू योगेंद्र साळुंखे - विद्यार्थी. बाईट -योगेंद्र साळुंखे - वडील bait - बहीण बाईट :- मित्र0
0
Report
धाराशिव में 29 मई को अजितदादा पवार पर कविता गौरवग्रंथ का भव्य प्रकाशन
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये २९ मे रोजी होणार भव्य प्रकाशन सोहळा महाराष्ट्राचे शिल्पकार लोकनेते अजितदादा पवार या शीर्षकाखाली साकारलेला भव्य काव्य गौरवग्रंथ लवकरच रसिकांच्या भेटीला येणार आहे. देशभरातील पाच राज्यांमधील तब्बल १५६ दिग्गज आणि नवोदित कवींनी अजितदादा पवार यांच्या कार्यावर कविता लिहिल्या आहेत. या ग्रंथाचे संपादन अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा साहित्यिक डॉ. शरद गोरे यांनी केले आहे. २९ मे २०२६ रोजी धाराशिव येथे होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनात या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा पार पडणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या पत्नी ना. सुनेत्राताई पवार यांच्या हस्ते ग्रंथाचे प्रकाशन होणार असून, साहित्य आणि राजकारणाचा संगम घडवणारा हा अनोखा सोहळा ठरणार आहे.0
0
Report
खेड़ में 80 वर्षीय वृद्धी की दागिनों के लोभ में हत्या, आरोपी गिरफ्तार
Khed, Maharashtra:पुणे जिले के खेड़ तालुक्यातील करंजविहीरे परिसरात घडलेली ही अत्यंत क्रूर घटना समाजाला चटका लावणारी आहे. केवळ दागिन्यांच्या हव्यासापोटी 36 वर्षीय नराधमाने 80 वर्षाच्या वृद्धेचा गळा दाबून खून केला. यानंतर तो पुरावे नष्ट करण्यासाठी वृद्धेचा मृतदेह गोणीत भरला आणि भामा नदीच्या पात्रात फेकला. मयत सिंधुबाई मरगज ही 2 मे रोजी संध्याकाळी आपल्या गावातून जात असताना त्यांच्याच गावातील कैलास मरगज यांनी त्यांच्यावर हल्ला करून दागिन्यांच्या लुटीचा प्रयत्न केला आणि जीव घेतला. उत्तर महाळुंगे पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्यावर भारतीय दंड विधानाच्या नवीन कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोपनागमने आणि खेड परिसरातील नागरिकांमध्ये संताप आणि भीती पसरली आहे.0
0
Report
Advertisement
