icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ईजळी में बिजली कट से नाराज़ ग्रामीणों ने महावितरण कार्यालय के खिचड़ी खाकर किया प्रदर्शन

Nanded-Waghala, Maharashtra:सतत गायब होणाऱ्या विजेच्या त्रासाला कंटाळून ग्रामस्थांनी चक्क महावितरणच्या कार्यालयातच रात्री खिचडी खाऊन अनोखे आंदोलन केले. नांदेड जिल्ह्यातील मुदखेड तालुक्यातील ईजळी, वाडी, चिकाळा या परिसरात सध्या महावितरणच्या भोंगळ कारभारामुळे नागरिक हैराण झाले आहेत. नियोजित लोडशेडिंगची वेळ संपल्यानंतरही वीज गायब राहत आहे. रात्री बेरात्री कधीही विजेचा लपंडाव सुरु आहे. रात्री अचानक विज गेल्याने ईजळी येथील संतप्त तरुणांनी रात्री थेट महावितरण कार्यालय गाठले आणि कार्यालयातच बसून 'खिचडी' खात अनोखे आंदोलन केले. वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ईजळीकर प्रचंड त्रस्त झाले आहेत. या समस्येकडे महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने लक्ष देऊन वीजपुरवठा सुरळीत करावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा इजळी येथील ग्रामस्थानी दिलाय.
0
0
Report

पनवेल पानी संकट: सत्ता-भाजपा मुख्यमंत्री से मुलाकात के बाद विरोधी आंदोलन की धमकी

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मनपा क्षेत्रातील नागरिकांना यंदा भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. यातून मार्ग काढण्यासाठी सत्ताधारी भाजप आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेत त्यांच्या साकडे घालणार आहेत. सिडको प्रशासन मात्र पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नसल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संतापाची लाट आहे. पाण्यासारख्या गंभीर प्रश्नाकडे सिडको गांभीर्याने लक्ष देत नसेल तर सत्ताधारी आहोत हे विसरून आम्ही रस्त्यावर उतरू अशी भूमिका पनवेल महानगरपालिकेचे महापौर नितीन पाटील यांनी व्यक्त केलीय. विरोधीपक्ष नेते अरविंद म्हात्रे यांनी पाणी प्रश्नावर आक्रमक भूमिका घेतली असून 17 मे रोजी कळंबोली जंक्शन येथे जलवाहिनीवर मोर्चा काढून पाणी पुरवठा थांबविण्याचा इशारा दिला.
0
0
Report

प्रधानमंत्री मोदी देशहित आवाहन के बाद पिंपरी-चिंचवड़ महापौर रवि लांडगे विदेश दौरे पर चर्चा

Pimpri-Chinchwad, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परदेश दौरा टाळण्याचं आवाहन केलं आहे... त्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे यांच्या परदेश दौऱ्याची चर्चा सुरू झालीय... रवी लांडगे यांचा स्वीय सहायकासह अझरबैजान दौरा निश्चित झाला आहे. अझरबैजानची राजधानी बाकू इथ होणाऱ्या संयुक्त राष्ट्र मानव वस्ती कार्यक्रमांतर्गत वर्ल्ड अर्बन फोरमच्या १७ ते २२ मे दरम्यान होणाऱ्या संमेलनात ते सहभागी होणार आहेत... पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या आवाहनानंतर महापौर काय करणार याची चर्चा जोर धरू लागली आहे... आणि त्यानंतर काही तासांतच महाराष्ट्र शासनाने पिंपरी चिंचवडच्या महापौरांना परदेश दौऱ्याची मान्यता दिलीये. केंद्रात, राज्यात आणि पिंपरी चिंचवड महापालिकेत भाजपची सत्ता आहे, तरी सुद्धा महाराष्ट्र शासनाने पंतप्रधान मोदींचं आवाहन डावलले आहे. आता महापौर रवी लांडगे पंतप्रधानांच्या आवाहनानुसार देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे. संयुक्त राष्ट्रांच्या UN-Habitat संस्थेचे वर्ल्ड अर्बन फोरम हे तेरावे अधिवेशन आहे. यामध्ये शहरी विकास विषयक जागतिक परिषदेचं आयोजन करण्यात आलंय. बाकु अझरबैजान येथे पार पडणाऱ्या या परिषदेला रवी लांडगे आणि त्यांचे स्वीय सहाय्यक अभय चौगुले उपस्थित राहणार आहेत. 17 मे ते 22 मे दरम्यान हे जागतिक अधिवेशन पार पडणार असून पिंपरी पालिकेच्या स्थायी समितीने या दौऱ्यासाठी निधी ही मंजूर केलाय. या दौऱ्यावर 8 लाख 80 हजार 281 रुपयांची उधळपट्टी केली जाणार आहे. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी 10 मे ला देशहितासाठी जनतेला आवाहन केलं. काटकसर करण्यावर भर द्या, असं आवर्जून सांगितलं. पण दुसऱ्याच दिवशी म्हणजे 11 मे ला भाजपचं सरकार असलेल्या महाराष्ट्र शासनाने महापौरांच्या परदेश दौऱ्याला मान्यता देत पंतप्रधानांच्या आवाहनाला डावलले आहे. आता पिंपरी चिंचवडचे महापौर रवी लांडगे देशहितासाठी हा परदेश दौरा रद्द करणार ka? शहराचे प्रथम नागरिक असलेले रवी लांडगे याबाबत काय निर्णय घेतात? याकडे पिंपरी चिंचवड शहरवासीयांचं लक्ष लागून आहे.
0
0
Report
Advertisement

इचलकरंजी के पानी संकट का तात्कालिक समाधान मांगने पर शिव शाहू आघाडी का आंदोलन

Kolhapur, Maharashtra:Kop Mataka Fod Andolan Feed:- 2C Anc :- इचलकरंजी शहरातील पाणी प्रश्न तातडीने सोडवू अस आश्वासन राज्य सरकारच्या वतीने देण्यात आले होते, पण राज्य सरकार इचलकरंजी शहराचा पाणी प्रश्न सुटावा यासाठी कोणताच प्रयत्न करत नसल्याचा आरोप करत इचलकरंजी शहरातील शिव शाहू आघाडीच्यावतीने महानगरपालिकाेसमोर अभिनव आंदोलन केलं. शिव शाहू आघाडीचे नेते आणि नगरसेवकांनी सरकारच्या या उदासीन भूमिके विरोधात मटका फोड आंदोलन केलं. यावेळी पाणी प्रश्नावरून आमदार आणि खासदारांचा निषेध करण्यात आला. इचलकरंजी महानगरपालिकेच्या निवडणुकीत सरकारच्या वतीने तातडीने इचलकरंजीचा पाणी प्रश्न मार्गी लावू असं आश्वासन दिले होते, पण इचलकरंजी महानगरपालिकेत सत्तेवर येताच सरकारला याचा विसर पडला असल्याचा आरोप शिव शाहू आघाडीने केला आहे.
0
0
Report

माडवी हिडमाची के गुणगान पर रोक, समिति ने बैन और आरोपी की गिरफ्तारी मांग

Nagpur, Maharashtra:माओवाद्यांचा सर्वात क्रूर आणि त्यांच्या मिलिटरी कमांडचा कमांडर असलेल्या माडवी हिडमाची एका गाण्याच्या माध्यमातून जोरदार उदात्तीकरण सुरू आहे.. पुणे आणि गडचिरोली मध्ये त्यासंदर्भात गुन्हे दाखल झालेयं. आता नक्षल पिडीतांसाठी काम करणाऱ्या "जनसंघर्ष समिती"ने हिडमाचा उदात्तीकरण करणाऱ्या त्या गाण्यावर बंदी लावण्याची तसेच गाण तयार करणाऱ्यांना शोधून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे...एका क्रूरकर्माचे उदात्तीकरण योग्य नाही.. हिडमाच्या उदात्तीकरणाच्या माध्यमातून शहरी भागातील तरुणांमध्ये नक्सलवादी विचारसरणी नव्याने पेरण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप आता होऊ लागला आहे...
0
0
Report

सिंधुदुर्ग में ईंधन संकट: पेट्रोल डीजल की कमी से यात्राएं प्रभावित

Oras Bk., Maharashtra:अँकर ----- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील काही भागात इंधन तुटवडा जाणवू लागलाय. सिंधुदुर्ग जिल्ह्यात काही पेट्रोल पंपावर पेट्रोल डिझेल मिळण बंद झालंय तर काही पेट्रोल पंपावर कमी प्रमाणात पेट्रोल उपलब्ध आहे. दुचाकींना केवळ 200 रुपये तीन चाकी 500 आणि four चाकींना केवळ 1 हजार रुपयांच पेट्रोल दिलं जात आहे. तशा पाट्या देखील लावण्यात आल्या आहेत. लांबचा प्रवास करणाऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. येत्या दिवसात इंधन पुरवठा सुरळीत न झाल्यास सिंधुदुर्गात पेट्रोल व डिझेलचा तुडवडा निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही
0
0
Report
Advertisement

गोंदिया-कोहमारा मार्ग पर ट्रक-ट्रावेल्स हादसा: एक की मौत, 10-12 घायल

Bhandara, Maharashtra:रस्त्यावर उलटलेल्या अपघातग्रस्त ट्रकला डॅश लागून ट्रॅव्हल्सला झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा जागीच मृत्यू झाला तर 10 ते 12 प्रवासी जखमी झालेची घटना आज पहाटे गोंदिया-कोहमारा महामार्गावरील जानाटोला परिसरात घडली. फुलेल खिरवार (30) रा. खैरागड (छत्तीसगढ) असे मृतकाच े नाव आहे. ट्रक चालकाचे स्टेऱिंगवरून नियंत्रण सुटल्याने गोरेगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या जानाटोला येथील पेट्रोल पंप समोरील भागात तो ट्रक उलटला. दरम्यान पोलिसांच्या वतीने त्या ठिकाणी कुठलीही बॅरिगेटिंग करण्यात न आल्याने अपघातग्रस्त ट्रकचा अंदाज न आल्याने ट्रॅव्हल्सची त्या ट्रकला डॅश लागली त्यानंतर ट्रॅव्हल्स अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला उलटली यात एका प्रवाशाच्या मृत्यू झाला असून दहा ते बारा प्रवासी जखमी आहेत. जखमींवर गोंदिया येथे उपचार सुरू आहेत. घटनेची नोंद गोरेगाव पोलिसांनी घेतली आहे.
0
0
Report

करमाला में मुतखड़ा इलाज के नाम पर 41 हजार की धोखाधड़ी भोंदूबाबा भोसले समेत चार पर मामला

Pandharpur, Maharashtra:Anchor भोंदूबाबा मनोहर भोसले याच्या अडचणीत वाढ ; करमाळयात तिसरा गुन्हा दाखল, मुतखडा बरा करण्याच्या बहाण्याने 41 हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी 'भोंदूबाबा मनोहर भोसलेसह चौघांवर करमाळा पोलिसात गुन्हा दाखल मुतखडा पूर्णपणे बरा करण्याचा दावा करून एका शेतकऱ्याची 41 हजार रुपयांना फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार करमाळा तालुक्यातील घोटी येथे उघडकीस आला आहे. याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात मनोहर मामा भोसले आणि त्याच्या सहकाऱ्यांविरुद्ध जाडुटोणा विरोधी कायद्यासह विविध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारदार दिलीप अजिनाथ राऊत (वय 52, रा. घोटी) यांना मार्च 2025 मध्ये मुतखड्याचा त्रास सुरू झाला होता. सोलापूर येथील रुग्णालयात ऑपरेशन करूनही त्यांच्या त्रास कमी झाला नाही. दरम्यान, घोटी येथील मनोहर मामा भोसले हे मुतखड्यावर खात्रीशीर औषध देतात, अशी माहिती मिळाल्याने राऊत 20 जानेवारी 2026 रोजी त्यांच्या मठात गेले. मठात गेल्यानंतर मनोहर मामांची भेट घेण्यासाठी तेथील सेवेकऱ्यांनी राऊत यांच्याकडून 11000 रुपये घेतले, ज्याची कोणतीही पावती देण्यात आली नाही. भेटीदरम्यान मनोहर मामांनी मी तुमचा आजार पूर्णपणे बरा करतो" असे आश्वासन देऊन त्यांना एक लाल रंगाची पावडर दिली. पंधरा दिवस औषध घेतल्यावर थोडा आराम वाटल्याने राऊत पुन्हा मठात गेले असता, त्यांच्याकडून पुन्हा 80000 रुपयांची मागणी करण्यात आली. आर्थिक परिस्थिती नसल्याचे सांगितल्यावर त्यांनी 30000 रुपये रोख दिले. काही दिवसांनी पुन्हा त्रास वाढल्याने राऊत यांनी मनोहर मामांना विचारणा केली. त्यावर "तुम्हाला कोणीतरी बाहेरवसा (करणी) केला आहे, म्हणून मी आता मंत्रोच्चार केलेली पावडर देतो" असे सांगून पुन्हा फसवणूक करण्यात आली. औषधाचा काहीही उपयोग होत नसल्याचे लक्षात आल्यावर एप्रिल 2026 मध्ये राऊत यांनी आपले पैसे परत मागितले, मात्र मनोहर मामांनी पैसे देण्यास नकार देत त्यांना हाकलून दिले. दिनांक 6 मे 2026 रोजी शिवाजी शहाजी वाघमारे आणि अप्पा शिवाजी जाधव या दोघांनी राऊत यांच्या घरी जाऊन "पोलिसांत तक्रार करू नका, तुमचे पैसे परत देतो" असे म्हणून दमदाटी केली. अखेर दिलीप राऊत यांनी करमाळा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. मनोहर भोसले,शिवाजी शहाजी वाघमारे,अप्पा शिवाजी जाधव व एक जण अज्ञात यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे याप्रकरणी पोलिसांनी महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादुटोणा प्रतिबंधक अधिनियम 2013 च्या कलम 3(2), 3(3) आणि भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 318(2), 318(4), 351(2) व 3(5) अन्वये गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास करमाळा पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में मंत्रियों के काफिले का महंगा ईधन खर्च, मोदी निर्देश के बाद सवाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात दोन मंत्र्यांच्या ताब्यावर दरमहा तब्बल दहा लाखांचा खर्च... पंतप्रधानांच्या आवाहनाला राज्य सरकार ही प्रतिसाद देणार का.. अँकर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधनबचतीचे आवाहन केल्यानंतर आता राज्यातील मंत्र्यांचे दौरे आणि ताफ्यातील वाहनांसाठी होणारा इंधन खर्च आता चर्चेचा विषय झाला आहे.. रत्नागिरी जिल्ह्यात कॅबिनेट मंत्री उदय सामंत आणि राज्यमंत्री योगेश कदम यांच्या दौऱ्यात ताफ्यातील वाहनांचे इंधन आणि वाहन चालक यासाठी दरमहा रुपये दहा लाखांहून अधिक खर्च होत असल्याची बाब समोर येत आहे.. पंतप्रधानांच्या इंधन बचतीच्या हाकेला राज्य सरकार ही प्रतिसाद देणार कां? असाच प्रश्न आता केला जात आहे.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्वसामान्य लोकांना इंधन बचतीचे आवाहन केले आहे. तेच आवाहन लक्षात घेत राज्य सरकार ही मंत्र्यांच्या दौऱ्यातील ताफ्यामध्ये असलेल्या वाहनांची संख्या कमी करणार का असाच विषय आता चर्चा का झाला आहे..
0
0
Report
Advertisement

सोलापुर के पाटबंधारे विभाग की लापरवाही से किसानों को भारी नुकसान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे कॅनॉलचे पाणी शेतात शिरल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - सोलापूर पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे होतेय शेतकऱ्यांचे मोठे नुकसान - उत्तर सोलापूर तालुक्यातील देगाव येथील जाधव वस्तीत अनेक शेतकऱ्यांच्या शेतात शिरतेय कॅनॉलचे अतिरिक्त पाणी - शेतात पाणी शिरत असल्यामुळे आंबा, केळी, गहू पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान - जलसंपदा विभागाच्या पाटबंधारे विभागाच्या भोंगळ कारभारामुळे शेतकरी अडचणीत - जिल्ह्यात एकीकडे पाणीटंचाईच्या झळा बसायला सुरुवात झाली असताना दुसरीकडे मात्र लाखो लिटर पाणी वाया - शेतकऱ्याने इरिगेशन डिपार्टमेंटच्या विरोधात तक्रार केल्यानंतर उलट वारंवार तक्रार करतोय म्हणून शेतकऱ्याला 15 ते 16 हजाराचा प्रलंबित दंड असल्याचे सांगत पाठवली नोटीस
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top