icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला में डाबकी रोड चौड़ीकरण: पेड़ काटे गए, पर्यावरण प्रेमी नाराज

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरातील डाबकी रोडवर सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणाच्या कामादरम्यान अनेक दशकांपासून उभे असलेले आणि नागरिकांना सावली देणारे महाकाय वृक्ष तोडण्यात आल्याने पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. विकासकामांसोबत पर्यावरणाचा समतोल राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे.अकोला शहरातील डाबकी रोडवर महापालिकेकडून रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू आहे. या कामासाठी रस्त्यालगत अनेक वर्षांपासून उभे असलेले घनदाट आणि सावली देणारे महाकाय वृक्ष तोडण्यात आले आहेत. उन्हाळ्यात प्रवासी, पादचारी आणि परिसरातील नागरिकांना दिलासा देणारे हे वृक्ष आता इतिहासजमा झाले आहेत. वृक्षतोडीमुळे परिसरातील तापमान वाढण्याची तसेच पर्यावरणाचा समतोल बिघडण्याची भीती पर्यावरणप्रेमींनी व्यक्त केली आहे. विकासकामे आवश्यक असली तरी त्यासाठी पर्यावरणाची हानी टाळण्याची जबाबदारी प्रशासनाने घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच तोडण्यात आलेल्या वृक्षांच्या बदल्यात मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करण्याची मागणीही स्थानिकांनी केली आहे.
0
0
Report

भाजपा नगराध्यक्ष पर रिश्वत मांगने का मामला दर्ज

Bhandara, Maharashtra:लाचेची मागणी करणाऱ्या भाजपाच्या नगराध्यक्षावर गुन्हा दाखल डेकोरेशन व कॅटरिंगचे बिल काढण्यासाठी १.२० लाख रुपयांची मागणी तक्रारदाराचा डेकोरेशन व कॅटरिंगचा व्यवसाय असून, त्यांनी तिरोडा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक-२०२५ करिता डेकोरेशन व कॅटरिंगची सेवा पुरविली होती. निवडणूक झाल्यानंतर २८ डिसेंबर रोजी २०२५ रोजी कामाचे हर्षल कंटरिंग नावाने सात लाख ७२ हजार रुपयांचे व उज्ज्वला डेकोरेशनच्या नावाने १७ लाख ५० हजार रुपयांचे, असे एकूण २५ लाख २२ हजार रुपयांचे बिल सादर केले होते. २१ मे २०२६ रोजी तक्रारदार बिलासाठी भेटण्यास गेले असता, नगराध्यक्ष अशोक असाटी याने तीन लाख २० हजार रुपयांची मागणी केली. मात्र, तक्रारदारास लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागात तक्रार नोंदविली. तक्रार यांच्या अनुषंगाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नगराध्यक्षावर गुन्हा दाखल केला आहे....
0
0
Report

अकोला में सोयाबीन बीज नमूनों की गुणवत्ता खराब, किसानो को नुकसान; कंपनियों पर कार्रवाई

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात सोयाबीन बियाण्यांची उगवण न झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. संबंधित बियाणे कंपन्यांचे बियाण्यांचे नमुने प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. प्रयोग शाळेतील अहवालानुसार बियाणे नमुने उगवण क्षमता चाचणीमध्ये 21 टक्के अप्रमाणित आढळून आले. मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनी सर्वप्रथम या प्रकरणी या कंपन्यांवर कारवाईची मागणी सभागृहात केली होती आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या या गंभीर तक्रारींची दखल घेत कृषी विभाग, जिल्हा प्रशासन आणि पोलीस प्रशासनाने संयुक्तपणे धडक कारवाई केली आहे. जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये तब्बल 9 बियाणे उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कृषी विभागाच्या गुणवत्ता नियंत्रण निरीक्षकांनी ही कारवाई केली असून, यामुळे बियाणे कंपन्यांचे धाबे दणाणले आहेत. या कंपन्यांवर झाली कारवाई: 1. ओसवाल सीड्स (Oswal Seeds) 2. विगर सीड्स (Vigor Seeds) 3 ईगल सीड्स (Eagle Seeds) 4 अ‍ॅश्युर सीड्स (ASSURE Seeds) 5 इनोवेज / पार्श्व जेनेटिक सीड्स (Innovage / Parshwa Genetic Seeds) 6 ग्रीन गोल्ड सीड्स (Green Gold Seeds) 7 दफ्तरी सीड्स (Daftari Seeds) 8 अंकुर सीड्स (Ankur Seeds) 9 बाफना सीड्स (Bafna Seeds) बियाण्यांची गुणवत्ता खराब असल्यामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवले आहे. या कारवाईमुळे बोगस आणि निकृष्ट दर्जाचे बियाणे विकणाऱ्या कंपन्यांना प्रशासनाने कडक इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मलकापुर में धारदार हथियार से विवाहिते के साथ अत्याचार, दो अज्ञात आरोपी फरार

Buldhana, Maharashtra:चाकू- विळ्याचा धाक दाखवून विवाहितेवर अत्याचार.. घटनाास्थळावरून आरोपी पसार.. दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल .. मलकापूर तालुक्यातील धक्कादायक घटना .. ग्रामीण पोलिस ठाण्यात दोन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींच्या शोधासाठी पोलिसांनी पाच विशेष पथके नियुक्त केली आहेत.. पीडित महिला आणि तिचे पती एका शेतात कामसाठी वास्तव्यास असून, तेथे मजुरीचे काम करतात.. रात्री दोघेही घरात असताना दोन अज्ञात व्यक्तींनी दरवाजा तोडून जबरदस्तीने प्रवेश केला.. त्यापैकी एकाच्या हातात चाकू, तर दुसऱ्याच्या हातात विळा होता.. शस्त्रांचा धाक दाखवत आरोपींनी मोबाइल फोन आणि रोख रक्कम हिसकावून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.. त्यानंतर आरोपींनी पती- पत्नीला घराबाहेर शेतात ओढत नेले.. तेथे पतीला रोखून धरत दोघांनी महिलेवर अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आला आहे.. आरोपी घटना घडल्यानंतर दुचाकीवरून पसार झाले.. पीडितेच्या तक्रारीवरून मलकापूर ग्रामीण पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे . घटनेनंतर पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पाच विशेष पथके तयार केली असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथकाने पाहणी केली आहे .. आरोपींचा शोध घेण्यासाठी विविध तांत्रिक आणि स्थानिक स्तरावरील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे..
0
0
Report
Advertisement

येवला तालुक के किसान साइकिल के चाक से जुगाड़ में कम खर्चे पर जुताई

Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील शेतात सर्वत्र कोळपणीची लगबग सुरू आहे. पिकांमधील तण काढणे आणि जमिनीची मशागत करणे या दृष्टीने कोळपणी अत्यंत महत्त्वाची मानली जाते. मात्र ट्रॅक्टर, पॉवर वीडर किंवा इतर आधुनिक यंत्रांचा खर्च परवडत नसल्याने अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतींसह स्वतःच्या कल्पकतेचा वापर करत आहेत. याचाच एक अनोखा नमुना म्हणजे सायकलीच्या जुन्या चाकांचा आणि लोखंडी अवजारांचा वापर करून तयार करण्यात आलेला देशी जुगाड. या जुगाडाच्या साह्याने कमी खर्चात आणि कमी श्रमात कोळपणीचे काम पूर्ण होत असल्याने शेतकरी समाधानी असल्याचे सांगत आहेत.
0
0
Report

मालखेडा-चांदवड में बस नहीं आने से विद्यार्थी परेशान, नियमित सेवा की मांग

Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील मालखेडा चांदवड गावात कोपरगाव आगाराची एसटी बस गावात येत नसल्याने विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. खराब रस्त्याचे कारण देत बस गावात न आणता विद्यार्थ्यांना गावाच्या फाट्यावर उतरवले जात असल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांनी केला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना दररोज पायी गावात जावे लागत असून, विशेषतः पावसाळ्यात मोठी गैरसोय होत आहे. विद्यार्थ्यांची सुरक्षितता आणि शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन महालखेडा-चांदवड गावात नियमित एसटी बस सेवा सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थ आणि पालकांनी केली आहे. बाईट : ग्रामस्थ व विद्यार्थी
0
0
Report

रायगढ़ में भात की खेती संथ गति से, भारी बारिश से क्षेत्र 2–3% पर

Chendhare, Maharashtra:रायगडात भात लागवड संथगतीने अर्धा जुलै संपला लावणीला वेग नाही ...... आतापर्यंत केवळ २ ते ३ टक्के क्षेत्रावर लागवड अतिवृष्टीमुळे २१०० हेक्टरवरील रोपवाटीकांचे नुकसान ......... अँकर - अनियमीत आणि अनियंत्रित पावसामुळे खरीप हंगामातील भात शेती संकटात सापडली आहे. आधी लांबलेल्या पावसामुळे तर नंतर अतिवृष्टीमुळे भात शेती अडचणीत सापडली आहे. अर्धा जूलै सरला असला तरी रायगड जिल्ह्यात केवळ २ ते ३ टक्के क्षेत्रावर भात लागवड करण्यात आली आहे. पावसाने दडी दिल्याने भात लागवड संथगतीने सुरू आहे. अतिवृष्टीत अनेक ठिकाणी रोपवाटिकांचे पाण्याखाली जाऊन नुकसान झालं. तर आता पावसाने ओढ दिल्याने लावणीसाठी पुरेसे पाणी नाही. अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे. मागील वर्षी ७१ हजार हेक्टरवर लागवड झाली होती मात्र यंदा तेवढी देखील होईल की नाही याबाबत शंका व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

सूखा झेलते महाराष्ट्र के जत में गांववालों ने गधे का विवाह करवाकर बारिश प्रार्थना

Sangli, Maharashtra:पाऊसासाठी दुष्काळी जतच्या सिद्धनाथ मध्ये चक्क गाढवांचं लग्नसोहळा.. पाऊस पडावा यासाठी सांगलीच्या दुष्काळी जत तालुक्यातील सिद्धनाथ येथे चक्क गाढवाचं लग्न लावण्यात आले आहे. महाराष्ट्रात सर्वदूर दमदार पावसाची हजेरी राहिली आहे.मात्र अद्यापही दुष्काळी जत तालुक्यामध्ये पाऊसाने समाधानकारक हजेरी लावली नाही.त्यामुळे वरूण राजाला प्रसन्न करण्यासाठी सिद्धनाथ येथील ग्रामस्थांनी गाढवांचं लग्न लावलं,लग्नाच्या विधीनंतर गाढवांची गावातून मिरवणूक देखील करण्यात आली,यामध्ये ग्रामस्थ मोठया संख्येने नाचार सहभागी झाले होते.गाढवाचं लग्न लावल्यावर वरून राजा प्रसन्न होतो, अशी गावात आख्यायिका आहे.दुष्काळी तालुका म्हणून जतची ओळख असून महाराष्ट्रामध्ये सगळीकडे अगदी सांगलीच्या पश्चिम भागात पावसाची दमदार हजेरी झालेली असताना जत तालुक्यामध्ये मात्र सरासरी पेक्षाही कमी पाऊस पडला आहे.
0
0
Report

इंदापुर में संत तुकाराम महाराज पालखी सोहळे का दूसरा अश्वारिंगा शुरू

Rui, Maharashtra:इंदापुरात संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यातील मानाचे दुसरे अश्वारिंगन सुरू जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा इंदापूर तालुक्यातील नागवेलीच्या वेड्याच्या पानासाठी प्रसिद्ध असलेल्या निमगाव तेथील मुक्कामाटोपून छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीरश्री मालोजीराजे भोसले यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या इंद्रेश्वर नगरीत दाखल झाल्यानंतर मानाचे दुसरे आस्वांचे गोल रिंगण पार पडत आहे... नगरखाना प्रदक्षिणा झाल्यानंतर पताका झेंडेकरी धावले तुळशी वृंदावन हंडेकरी महिला धावल्यानंतर आता काही वेळात मानाचे अश्व तीन प्रदक्षिणा पूर्ण करतील
0
0
Report
Advertisement

बारामती में शरद पवार के दौरे पर भारी भीड़, किसान कर्जमाफी के लिए दबाव

Rui, Maharashtra:बारामती : शरद पवार बाईट पॉइंटर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार हे आज बारामती दौऱ्यावरती होते यावेळी शरद पवारांना भेटण्यासाठी गोविंद बाग या निवासस्थानी नागरिकांनी गर्दी केली होती.यावेळी शरद पवार यांनी माध्यमांशी संवाद साधला... शरद पवार ऑन सोनम वांगचूक या पाच सहा दिवसांत अटक करतील अशी आम्हाला वाटतं होतं,आणि तास झाल.. त्यांची मागणी काय होती ? मंत्र्यांचा राजीनामा ? या संबध चळवळीत त्यांची जबाबदारी काळजीपूर्वक हाताळली नाही... वांगचुक यांनी मागणी केली पण केंद्र सरकार बघ्याची भूमिका घेत होते, शेवटी त्यांची मागणी एवढंच प्रश्न नव्हतं,त्यामध्ये इतर विषय देखील होते... बाकीचे राजकिय पक्ष सुद्धा त्यांच्यासोबत उभे राहिले.. काँग्रेसच्या वतीने आणि राष्ट्रवादीच्या वतीने प्रतिनिधी गेले...इतर पक्षाचे लोक गेले... त्यामुळे ही सामूहिक मागणी करत होते,ही मागणी आपल्या आवाक्याच्या बाहेर आहे हे लक्षात आल्यानंतर वांगचुक यांना सरकारने अटक केली... त्याप्रमाणे पहाटे त्यांना अटक केली... त्यांनी अटक जरी केली तरी हे आंदोलन चालू राहणार... मागणी रास्त होती,सरकारने त्यांना नोटीस दिली होती... हे आंदोलन दिल्लीमध्ये असताना देखील सरकारमधील लोक त्यांना भेटायला सुद्धा येत नाहीत... याचा अर्थ याचा अर्थ केंद्र सरकार पूर्णपणे बेजबाबदारपणे वागतेय असा आहे.. आणि हे इथे थांबणार नाही, उद्या 14 तारखेला पार्लमेंट होईल, याविषयी पार्लमेंट मध्ये बोलला जाईल... ऑन शेतकरी कर्जमाफी ठीक आहे तारीख घेतली.. राज्य सरकारने ज्या तारखा दिल्या होत्या त्या तारखा पाळायला हव्या होत्या... जोपर्यंत सरकार नवीन तारीख सरकारने नवीन तारीख दिली आहे तोपर्यंत आम्ही थांबू... शेतकऱ्यांना कर्जमुक्त करण हे आम्हाला जास्त महत्त्वाचा आहे.. हे जर केलं तर याबाबत आमची तक्रार नाही.. नाही केलं तर राज्यभर आंदोलन सुरू केलं जाईल..
0
0
Report

रामदास कदम ने सुनील तटकरे पर आरोपों के सख्त जवाब की चेतावनी दी

Ratnagiri, Maharashtra:रामदास कदम (शिवसेना नेते) खासदार सुनील तटकरे हे ऐहसानफरामोश माणूस आहेत. माझ्या घराला गटार म्हणता, मग दहा वर्षे या गटारात कशाला येत होतात? तेव्हा माझे घर गंगा झाले का? – रामदास कदम यांचा सवाल. तुझ्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी पाठीला जखम असतानाही मी वणवण भटकलो. गटार काय असते, हे सुनील तटकरे यांना दाखवून देणार. – रामदास कदम यांचा इशारा. दापोली विधानसभा मतदार संघात माझ्या मुलाविरोधात त्यांनी गद्दारी केली. सुनील तटकरे नालायक माणूस... गद्दारीचे परिणाम त्यांना भोगावे लागतील. सुनील तटकरे यांना त्यांच्या कर्माची फळे भोगावी लागतील. हा विश्वासघातकी माणूस... गटार काय असते, हे भविष्यात दाखवून देऊ. On उद्धव ठाकरे : उद्धव ठाकरेंचे रामरक्षा आंदोलन म्हणजे ते चांगले काम करत आहेत. राम मंदिरातील दानचोरी प्रकरणावर सर्वांनी आवाज उठवायला हवा. भाजपनेही यावर आवाज उठवला आहे. On मंडणगड पाणी योजना : मंडणगड पाणी योजना मंजूर करण्यात सुनील तटकरे यांचे कोणतेही योगदान नाही. गृहराज्यमंत्री योगेशदादा कदम यांनीही ही योजना मंजूर करून आणण्यासाठी प्रयत्न केले आहेत. दुसऱ्याच्या बापाला स्वतःचा बाप म्हणून पेढे वाटू नका. रामदास कदम यांचा तटकरे यांना सल्ला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top