445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
उल्हासनगर FDA ने बड़ी कार्रवाई: 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त
Ambernath, Maharashtra:FDA ने उल्हासनगरात मोठी कारवाई केली आहे. म्हशींना जादा दूधासाठी दिली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन जप्त झाले. उल्हासनगर कॅम्प क्रमांक 3 मधील ओटी सेक्शन, जसलोक हायस्कूल परिसरात प्रकाश वाधवानी यांच्या तबेल्यावर ही धडक कारवाई करण्यात आली. अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने छापा टाकून जादा दूध उत्पादनासाठी वापरली जाणारी 612 ऑक्सिटोसिन इंजेक्शन तसेच त्यासाठी वापरण्यात येणाऱ्या प्लास्टिकच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ऑक्सिटोसिनचा वापर जनावरांच्या आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला जातो. इतकेच नव्हे, तर अशा दुधाच्या सेवनामुळे मानवी आरोग्यावरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त केली जाते. त्यामुळे या औषधाच्या वापरावर कायद्याने बंदी घालण्यात आली आहे. राज्यात सुरू असलेल्या धडक मोहिमेचा भाग म्हणून उल्हासनगरातील ही कारवाई महत्त्वाची मानली जात असून, बेकायदेशीरपणे जनावरांच्या आरोग्याशी खेळणाऱ्यांवर अन्न सुरक्षा आणि औषध प्रशासनाच्या संबंधित कायद्यांनुसार कठोर कारवाई करण्यात आली आहे.0
0
Report
रामरक्षा पर उद्धव ठाकरे के साथ जयकुमार गोरे का तीखा हमला
Pandharpur, Maharashtra:रामाची भक्ती सोडल्यावर काय होतं याची अनुभूती उद्धव ठाकरेना आले आहे म्हणूनच त्याचा रामरक्षा म्हणू लागलेले आहेत असं खोचक टोला राज्याचे ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे. उद्धव ठाकरे यांनी नागपूर मध्ये रामरक्षा म्हणण्याचा आंदोलन सुरू केला आहे त्यावर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी जोरदार टीका केली आहे. राम भक्तीत काय ताकद आहे याची ठाकरे यांना अनुभव ती आली आहे राम भक्तीतून बाजूला गेल्यावर जी फळ मिळाली आहेत. त्यातून ते काहीतरी शिकतील. प्रभू आम्हाला त्यांना आता चांगली बुद्धी द्यावी आणि आता तरी त्यांच्याकडून चांगलं कार्य घडावं अशा पद्धतीच वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केला आहे0
0
Report
मावळ में प्रशासन-प्रतिनिधि संघर्ष से जनता मुश्किल में
Varsoli, Maharashtra:Headline : मावळात पुन्हा 'टाळेबंदी'चं राजकारण प्रशासन-लोकप्रतिनिधी संघर्षात जनतेचीच कोंडी Anchor: मावळ तालुक्यात गेल्या काही दिवसांत अधिकाऱ्यांच्या दालनांना टाळे ठोकण्याच्या सलग घटनांमुळे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लोणावळा नगरपरिषदेनंतर आता पंचायत समितीतही अशाच प्रकाराची पुनरावृत्ती झाल्याने नागरिकांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे. लोकप्रतिनिधींनी जनतेच्या प्रश्नांसाठी प्रशासनाला जाब विचारणे अपेक्षित असले, तरी कार्यालयीन कामकाज ठप्प करून प्रश्न सुटतात का, असा सवाल उपस्थित होत आहे. या संघर्षाचा फटका मात्र सर्वसामान्य नागरिकांनाच बसत असल्याची भावना व्यक्त केली जात असून, आता प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांनी परस्पर समन्वयातून जनहिताला प्राधान्य द्यावे, अशी अपेक्षा नागरिक व्यक्त करत आहेत..0
0
Report
Advertisement
श्रीरामपुर होटल व्यवसायी आकाश दुबैया हत्या के बाद पुलिस ने 28 कारवाइयां, शिकायतें सुलझाईं
Shirdi, Maharashtra:श्रीरामपुर शहरातील हॉटेल व्यवसायिक आकाश दुबैय्या यांच्या हत्येनंतर पोलिस प्रशासन अँक्शन मोडवर आले असून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी सातत्याने पोलिस कारवाया सुरू आहेत...व्यापारी आणि जनतेमधील गुंडाची दहशत संपवण्यासाठी विविध उपाययोजना पोलिस अधिक्षक मुम्का सुदर्शन यांच्या मार्गदर्शनाखाली सूरू आहेत...वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभुमीवर पोलिस अधिक्षकांनी तक्रार निवारण केंद्र सूरू केले असून नागरिकांनी पहिल्याच दिवशी उस्फूर्त असा प्रतिसाद दिलाय... जून्या आणि नवीन तक्रारींचे अवलोकन करून त्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याच पोलिस अधिक्षक एम सुदर्शन यांनी म्हणटलय...अवैध धंदे तसेच वॉंटेड गुन्हेगार अशा 28 कारवाया करण्यात आल्या असून आज 55 तक्रारदारांचे समाधान केलय...दोषी पोलिसांवर देखील कारवाई करण्याचे आश्वासन यावेळी पोलिस अधिक्षकांनी दिलय...0
0
Report
हिंदीHeadline: सोलापुर के मंत्री जयकुमार गोरे ने वारकड़ यात्रियों के लिए सुविधाओं के विस्तार पर जोर दिया और साफ-सफाई पर पूर्ण ध्यान देने की बात कही
Kolhapur, Maharashtra:पंढरपूर नगरी वारकऱ्यांचे स्वागत करत आहेत.. पंढरपूर मध्ये येणाऱ्या वारकऱ्यांना अधिक सोयी सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करण्यात आले आहेत असं सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले आहे.. आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेवर अधिक भर दिल्याचेही जयकुमार गोरे यांनी सांगितल आहे.. आज जयकुमार गोरे हे विठुरायाच्या मंदिरातील सोयी सुविधाचा आढावा घेण्यासाठी बुलेट वरून गेले. यावेळी त्यांच्या बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी..0
0
Report
चंद्रपुर में भाजपा विधायक किशोर जोरगेवार के नेतृत्व में सेवा सप्ताह और रक्तदान शिविर
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात भाजपच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आ. किशोर जोरगेवार यांच्या पुढाकाराने सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. 15 ते 22 जुलै दरम्यान वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. 56 व्या वाढदिवसाच्या निमित्ताने 56 रक्तदान शिबिर, योग शिबिर यांचेही आयोजन होत असून 56 मंदिरात राज्याच्या सुखसमृद्धीसाठी पूजा अर्चना कार्यक्रम होत आहेत. महाराजस्व अभियानाच्या निमित्ताने चंद्रपुरातील एक हजार लाभार्थ्यांना विविध उपयोगी शासकीय प्रमाणपत्र दिली जाणार असून 19 जुलै रोजी शहरात मोफत महाआरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले जात आहे.0
0
Report
Advertisement
डोंबिवली स्टेशन पर नाग की एंट्री, टिकट काउंटर पर मची घबराहट
Kalyan, Maharashtra:डोंबिवली स्टेशनवर नागाची एंट्री, तिकीट खिडकीसमोर गोंधळ. तिकीट काउंटर वरती नागरिकांची पळापळ. डोंबिवली रेल्वे स्थानकातील तिकीट काउंटरमध्ये आज एक धक्कादायक प्रकार समोर आला. तिकीट खिडकीवर भला मोठा नाग फणा काढून बसल्याने डोंबिवली स्टेशनवर एकच खळबळ उडाली. नाग दिसताच रेल्वे कर्मचाऱ्यांनी तातडीने तेथून सुरक्षित अंतर घेत सर्पमित्रांना पाचारण केले. दरम्यान, तिकीट काढण्यासाठी आलेल्या प्रवाशांची मोठी गर्दी घटनास्थळी जमली होती. नागामुळे काही काळ तिकीट वितरणावर परिणाम झाला असून डोंबिवली स्थानक परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. सर्पमित्रांच्या मदतीने नागाला सुरक्षितपणे पकडून स्थलांतरित करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली.0
0
Report
अकोला: MIDC गोदाम में नकली गुटखा निर्माण मामले में नई जानकारी सामने, लगभग 2 करोड़ रुपए के माल जब्त
Akola, Maharashtra:अकोला शहरातील एमआयडीसी परिसरात उघडकीस आलेल्या बनावट गुटखा निर्मिती प्रकरणात आता नवीन माहिती समोर आली आहे. अन्न व औषध प्रशासन विभागाने दोन दिवसांपूर्वी टाकलेल्या धाडीत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपासाचा विस्तार सुरू आहे. Vo : अकोला अन्न व औषध प्रशासन विभागाने एमआयडीसी भागातील एका गोदामावर छापा टाकून मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा तयार करण्यासाठी लागणारा कच्चा माल, पॅकिंग साहित्य आणि इतर साहित्य जप्त केले होते. या कारवाईत सुमारे सव्वा कोटी रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.या प्रकरणात एमआयडीसी पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून, आरोपींचा शोध आणि तपास सुरू आहे. या प्रकरणात अकोला महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागात कंत्राटी पद्धतीने कार्यरत असलेले कनिष्ठ अभियंता अभिषेक घई यांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अभिषेक घई हे माजी महापौर विनोद मापारी यांचे भाचे आहेत. तसेच, ज्या गोदामात बनावट गुटखा तयार केला जात होता ते गोदाम अभिषेक घई यांच्या मालकीचे असून ते भाडेतत्त्वावर देण्यात आले होते. यासाठी संबंधित भाडेकरारासह आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.दरम्यान, या प्रकरणात गोदाम मालकाची नेमकी जबाबदारी काय, तसेच त्यांना या बेकायदेशीर कारवायांची माहिती होती का, याचा तपास पोलीस आणि अन्न व औषध प्रशासन विभागाकडून केला जात आहे. या संपूर्ण प्रकरणातील पुढील तपास एमआयडीसी पोलीस करीत आहेत.0
0
Report
उत्तर नगर में फिर से बरस पड़े बादल, किसानों को मिली हल्की राहत
Shirdi, Maharashtra:उत्तर नगर जिल्ह्यात पुन्हा एकदा पावसाचे पुनरागमन झाले असून सध्या रिमझीम पाऊस सुरू आहे. उशिरा आलेल्या मान्सूननंतर गेल्या दहा दिवसांपासून पावसाने पूर्णपणे दडी मारल्याने खरिपातील पिके धोक्यात आली होती. 15 जुलैपर्यंत समाधानकारक पाऊस पडेल, अशी शेतकऱ्यांची अपेक्षा होती. मात्र, त्या काळात पावसाने साथ दिली नाही. त्यामुळे पिके वाचवण्यासाठी शेतकऱ्यांना मोठी कसरत करावी लागली. ज्या भागात थोड्याफार प्रमाणात पाण्याची उपलब्धता होती, त्या ठिकाणी टँकर आणि स्प्रिंकलरच्या माध्यमातून पिकांना पाणी देण्यासाठी शेतकरी धडपड करताना दिसून आले. मात्र, जिरायती भागात परिस्थिती अधिक गंभीर होती, कारण तेथे पावसाव्यतिरिक्त दुसरा कोणताही पर्याय उपलब्ध नव्हता. आता पुन्हा एकदा रिमझीम पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाला असला तरीही बळीराजा अद्याप दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाच्या प्रतीक्षेत आहे.0
0
Report
Advertisement
अकोला में नकली नोटों के धंधे के आरोपियों की गिरफ्तारी, मुख्य आरोपी फरार
Akola, Maharashtra:अकोला शहरात बनावट नोटांच्या व्यवहारावर स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी १७ हजार रुपयांच्या बनावट नोटांसह तीन आरोपींना अटक केली असून या प्रकरणातील मुख्य आरोपी अद्याप फरार आहे. ही कारवाई गुप्त माहितीच्या आधारे करण्यात आली. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक नितीन लेक्कर यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली. त्यानुसार गुन्हे शाखेच्या पथकाने संशयितावर नजर ठेवून त्याला ताब्यात घेतले. झडतीदरम्यान त्याच्याकडून ५०० रुपयांच्या ३४ बनावट नोटा, म्हणजेच एकूण १७ हजार रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या. चौकशीत आरोपीने या बनावट नोटा दुसऱ्या एका व्यक्तीकडून घेतल्याची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या रॅकेटचा तपास सुरू केला असून मुख्य आरोपीचा शोध सुरू आहे.0
0
Report
बदलापुर में बैनर लगाने के दौरान करंट से कर्मचारी की मौत
Ambernath, Maharashtra:बदलापूर पूर्व पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू Indresh Kumar Rajbhar असं मृत कामगाराचं नाव असून तो २५ वर्षांचा होता. इंद्रेश हा त्याच्या एका सहकाऱ्यासह बदलापूरच्या डीमार्ट जवळील ३० बाय ३० आकाराच्या फ्रेमवर बॅनर लावण्यासाठी ठाण्याहून आला होता. त्याचा सहकारी काही कागदपत्रं आणण्यासाठी स्टेशनला गेलेला असताना इंद्रेश हा बॅनर लावण्यासाठी फ्रेमवर चढला. मात्र यावेळी त्याला विजेचा जोरदार धक्का बसून त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पूर्व पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपासाला सुरुवात केली. इंद्रेश याचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून बदलापूर पूर्व पोलिसांकडून ही घटना नेमकी कशी घडली? याचा सविस्तर तपास सुरू आहे.0
0
Report
यवेल में ऑल इंडिया पैंथर सेना ने स्मार्ट मीटर के विरोध में मोर्चा निकाला
Yeola, Maharashtra:राज्यामध्ये स्मार्ट मीटर बसवण्याला सक्ती करू नये , स्मार्ट मीटर च्या माध्यमातून ग्राहकांची फसवणूक करू नये तसेच शेतकरी तसेच सर्वसामान्य ग्राहकांच्या परवानगीशिवाय स्मार्ट मीटरची सक्ती करू नये या मागणीसाठी ऑल इंडिया पॅंथर सेने तर्फे येवल्यामध्ये स्मार्ट मीटरची होळी करून महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला या संदर्भात आढावा घेतला आहे0
0
Report
Advertisement
अमरावती में बीजेपी ने सुंदर कांड पढ़कर प्रवीण पोटे ने आदित्य ठाकरे की मिमिक्री की
Amravati, Maharashtra:उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा पठण आधी अमरावतीत भाजपकडून सुंदर कांड पठणाचे आयोजन; आमदार प्रवीण पोटे यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत उडवली खिल्ली. उद्धव ठाकरे यांची अयोध्या राम मंदिर चोरी प्रकरणी आज नागपुरात राम रक्षा पठण केले जाणार आहे. त्यापूर्वी अमरावती भाजपच्या वतीने सुंदर कांड पठणाचे आयोजन करण्यात आलं होतं यावेळी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते सहभागी झाले होते. तेव्हा भाजप आमदार प्रवीण पोटे यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह आदित्य ठाकरे यांच्यावर जोरदार हल्ला चळवळ आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे. उद्धव ठाकरे आता भारतीय जनता पक्षाच्या रस्त्याने लागले आहे. जेव्हा ते काँग्रेसच्या रस्त्याने होते तेव्हा त्यांना बुद्धी आली नाही. जेव्हा रामाची प्रतिष्ठापना करण्यात आली तेव्हा त्यांनी अयोध्येत जाणं टाळलं त्यांनी सत्ता मिळवण्यासाठी हे काम केलं होतं मात्र आता त्यांच्यासोबत त्यांचा मुलगा असून पप्पा जे सांगतात तेच आदित्य ठाकरे करत असल्याचं म्हणत प्रवीण पोटे यांनी आदित्य ठाकरे यांची मिमिक्री करत खिल्ली उडवली आहे.0
0
Report
मालेगांव के डोंगराले केस की सुनवाई शुरू, नाबालिग के साथ दुष्कर्म-हत्या पर नए मोड़
Nashik, Maharashtra:राज्य को हिला देने वाले मालेगांव के डोंगराले मामले की सुनवाई शुरू हो चुकी है। अल्पवयस्क लड़की के साथ बलात्कार कर हत्या कर दी गई थी, जिससे राज्य में स्तब्धता फैल गई थी। घटना में अपराधी की साक्ष्य-परक प्रक्रिया जारी है, और आरोपी सहित विशेष सरकारी वकील एड. उज्वल वीडियो कॉन्फरेंसिंग के माध्यम से उपस्थित हैं। इस खटले की सुनवाई अब चरणबद्ध तरीके से आगे बढ़ रही है। नारापूर निकासी के बाद मालेगांव की सुनवाई पर राज्य की नजर दवाब बनाकर टिके हैं।0
0
Report
अहिल्यानगर में सूखा बन गया संकट: कपास फसल सूखी, किसान दुबारा बुवाई को मजबूर
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात सुरुवातीला झालेल्या थोड्याफार पावसानंतर मोठ्या शेतकऱ्यांनी पिकाची लागवड केली मात्र पावसाने दडी मारल्याने शेवगाव तालुक्यातील शेतकऱ्यांसमोर आता दुबार पेरणीचे संकट उभे ठाकले आहे. गेल्या १५ दिवसांपासून पाऊस नसल्याने कापसाचं कोवळ पिक शेतातच सुकू लागल आहे. हजारो रुपये खर्च करून कपाशीची लागवड केलेला शेतकरी आता आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. दोन आठवड्यांपासून कडक ऊन पडत असल्याने शेतातील ओल पूर्णपणे नष्ट झाली आहे. अंकुरलेला कापसाची कोवळी पिके आता कोमेजू लागली असून पानांवर पिवळकी पडली आहे. कपाशी वाचवण्यासाठी अनेक शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे, जी परिस्थिती कापसाची आहे तीच परिस्थिती परिसरातील इतर पिकांची देखील झालेली पाहायला मिळत आहे0
0
Report
Advertisement
