445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
संगमेश्वर के ऐतिहासिक वाडे की पुनर्बांधणी पर सरकार ने दिया बड़ा आश्वासन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी छत्रपती संभाजी महाराजांच्या संगमेश्वर येथील वाड्याची पुनर्बांधणी होणार; सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांचे आश्वासन. संगमेश्वर येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या ऐतिहासिक वाड्याची राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांनी आज प्रत्यक्ष पाहणी केली. या ऐतिहासिक वास्तूचे महत्त्व लक्षात घेऊन, शासनाच्या वतीने या वाड्याची लवकरात लवकर भव्य आणि नवीन बांधणी केली जाईल, असे स्पष्ट आश्वासन त्यांनी यावेळी दिले. ऐतिहासिक वारशाचे जतन करण्यासाठी सरकार कटिबद्ध असून या वाड्याच्या कामाला गती दिली जाईल, असा विश्वासही त्यांनी पाहणीदरम्यान व्यक्त केला.0
0
Report
कोकण में लोककला के लिए वित्तीय अनुदान दोगुना, नाट्यगृहे और सांस्कृतिक केंद्रों पर जोर
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी आशिष शेलार पत्रकार परिषद प्रशांत यादव यांनी वाशिष्ठी डेअरीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या हिताचा प्रकल्प उभारला; त्यांचे अभिनंदन. On उद्धव ठाकरे रामरक्षा आंदोलन: जो कोणी रामरक्षा म्हणेल त्याला सुबुद्धी मिळेल. आतापर्यंत घेतलेले आणि यापुढे घेण्यात येणारे निर्णय चांगले घेण्याची सुबुद्धी रामरक्षा पठणातून मिळो On कोकणातील लोककला: कोकणातील दुर्लक्षित लोककलांच्या विकासासाठी अनुदान दुप्पट. नमन आणि जाकडी या लोककलांचा अनुदान योजनेत नव्याने समावेश. प्रत्येक लोककला प्रयोगासाठी ५० हजारांचे अनुदान दिले जाणार. On नाट्यगृहे: रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात नाट्यगृहांची गरज तपासली जाणार. मुंबईत बैठक घेऊन आवश्यकतेनुसार नवीन सांस्कृतिक केंद्रे व नाट्यगृहे उभारली जाणार. On जयंत पाटील-फडणवीस भेट: दूध आणि दही एकत्र आले, ही चांगली बाब. On शरद पवार गट खासदार: अजून चर्चा सुरू आहेत, योग्य वेळी भूमिका स्पष्ट होईल. कोकणात भाजपची ताकद जनसंघाच्या काळापासून असून सेवा हेच पक्षाचे ध्येय असल्याचे मत. On दरड दुर्घटना: कोकणातील दरडी कोसळण्याच्या घटनांबाबत पालकमंत्री उदय सामंत यांच्याशी चर्चा झाली आहे. प्रशासनाकडून परिस्थितीचा आढावा घेऊन आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे सांगितले. On मुंबई-गोवा महामार्ग: मुंबई–गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होईल, असा विश्वास व्यक्त.0
0
Report
चिपळूण-रत्नागिरी: सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार ने भास्कर जाधव के कार्यालय का दौरा किया
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांची उद्धव ठाकरे गटाचे भास्कर जाधवांच्या कार्यालयाला भेट.. भास्कर जाधव यांच्या कार्यालयात आशिष शेलारंचं भास्कर जाधव यांचे स्विच सहाय्य यांनी केलं स्वागत.. रत्नागिरी दौऱ्यावर असलेक्या मंत्री आशिष शेलार यांनी चिपळूण मधल्या भास्कर जाधवांच्या कार्यालयात जाऊन भेट दिली.. भास्कर जाधव अनुपस्थित..0
0
Report
Advertisement
पंढरपुर में VIP दर्शन के दौरान मंत्री के साथ धक्का- मुक्की, दर्शन बाधित
Pandharpur, Maharashtra:पंढरपुरात शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन बंदीचा आदेश धुडकावत मंत्र्यांसोबत कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनीही घेतलं व्हीआयपी दर्शन आज पासून पंढरपुरात व्हीआयपी दर्शन बंद झाले असतानाही श्री विठ्ठल-रुक्मिणी दर्शनासाठी आलेल्या पाणीपुरवठा स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांच्यासोबत आलेल्या काही कार्यकर्त्यांनी दरवाज्यातून आत धक्काबुक्की करत जात दर्शन घेण्यासाठी चढाओढ केल्याचं पाहायला मिळालं यामुळे मंदिर समितीने जाहीर केलेल्या व्हीआयपी दर्शन बंदीचा फज्जा मंदिर अधिकाऱ्यांसमोरच उडालेलं दिसलं0
0
Report
आषाढ़ी वारी के पूर्व जलाभिषेक से पंढरपुर में रिकॉर्ड बारिश, श्रद्धालु मंत्रमुग्ध
Pandharpur, Maharashtra:आषाढ़ी वारी पूर्वीच पंढरपूर मध्ये वरून राजाचा जोरदार जलाभिषेक पंढरपूर शहरामध्ये आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास जोरदार पावसाला सुरुवात झाली. अचानक आलेल्या पावसामुळे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरामध्ये दर्शनासाठी आलेल्या वारकऱ्यांची तारांबळ उडाल्याच पाहायला मिळालं. आषाढ़ी वारी पूर्वीच वरून राजाने पंढरीत जलाभिषेक केल्याने श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या शिखरावर पडणाऱ्या पावसाची सुंदर दृश्य वारकऱ्यांना पाहायला मिळाला0
0
Report
लातूर में डॉ. मेहुल राठोड की संदिग्ध मौत, स्वास्थ्य क्षेत्र में सनसनी
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर शहरातील एम.जे. हॉस्पिटलचे संचालक आणि प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. मेहुल राठोड यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. लातूर-अंबाजोगाई महामार्गालगत त्यांच्या चारचाकी वाहनात ते मृतावस्थेत आढळून आले आहेत. त्यामुळे या प्रकरणाकडे संशयास्पद मृत्यू म्हणून पाहिले जात असून, एमआयडीसी पोलीस घटनास्थळी तपास करत आहेत. मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन्न अहवाल आणि पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे。0
0
Report
Advertisement
सुधीर मुनगंटीवार का दावा: NDA में विभाजन से नहीं बदलेगा शिंदे का असर
Pandharpur, Maharashtra:Anchor - शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए भाग होणार नाही हे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट पने सांगितले आहे. त्याला पंधरा दिवस झाले आहेत. त्यामुळे आपण वाट बघायची. मला तर ते युतीचा भाग होतात की नाही याची शंका आहे. अस वक्तव्य भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे एकनाथ शिंदे यांचं राजकीय वजन कमी होणार नाही. आज पर्यंत विरोधातून सत्तेत जाण्यासाठी बंड झाले पण शिंदे यांनी सत्तेत असताना बंड केलं. त्यामुळे त्यांचं महत्व भाजप कमी करणार नाही. जर अस झालं तर जनतेला ते खपणार नाही असा इशाराही मुनगंटीवार यांनी दिलа आहे. रामरक्षा म्हटल्याने शक्ती मिळते. जर उद्धव ठाकरे म्हणत असतील तर त्यांनाही शक्ती मिळेल. आम्ही 2 खासदार वरून आज 270 झालो. मला आर आर पाटील यांनी त्याकाळात कॅबिनेट मंत्री करण्याची ऑफर दिली होती पण आम्ही स्वीकारली नाही. त्यामुळे विचार धारा महत्वाची असते त्याला पद जोडू नका.0
0
Report
चंद्रपुर में महसूल विभाग की मंजूरी के बाद भाजपा नेता अजय सरकार निष्कासित
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात महसूल विभागाच्या मंजुरीनंतर पोलिसांनी धडक कारवाई करत भाजप नेते अजय सरकार याला 3 महिन्यांसाठी जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. यासंदर्भात प्रत्यक्ष अंमलबजावणी देखील करण्यात आली आहे. नुकत्याच झालेल्या महानगरपालिके निवडणुकीत सरकार याला मिळालेल्या भाजपच्या तिकिटावरून आ. मुनगंटीवार आणि आ. जोरगेवार गटात टोकाचा संघर्ष झाला होता. तर याच नावावरून उमेदवार यादीच बदलली गेल्याचा वाद उफाळला होता. अपक्ष लढलेल्या सरकार याचा पराभव झाला होता. सूत्रांच्या माहितीनुसार अजय सरकार याच्यावर 20 हुन अधिक गंभीर गुन्हे दाखल आहेत. जोरगेवार गटाने सतत पाठपुरावा केल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे. या कारवाईने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.0
0
Report
पार्लेमंत्री चंद्रकांत पाटलांनी जेजुरी दुर्घटनेतील वारकऱ्यांच्या कुटुंबांना धीर दिला
Sangli, Maharashtra:पालखी सोहळ्यातील मृत महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची, पालकमंत्री चंद्रकांत पाटलांनी घेतली सांत्वनपर भेट. पालखी सोहळ्या दरम्यान जेजुरी येथे ट्रक अपघातात मृत झालेल्या सांगली जिल्ह्यातल्या महिला वारकऱ्यांच्या कुटुंबाची पालकमंत्री चंद्रकांत पाटलांकडून भेट घेण्यात आली आहे. कसबे डिग्रज,कवलापूर आणि मालगाव येथील तीन महिला वारकऱ्यांचा जेजुरी येथे अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला होता. चंद्रकांत पाटलांनी मृत कुटुंबांच्या कुटुंबीयांची भेट घेत सांत्वन केले आहे. त्याचबरोबर मृत भोसले कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी दरमाह वैयक्तिक पाच हजार रुपये मदत देण्याचं जाहीर करत शासन या दुःखाच्या प्रसंगी कुटुंबियांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची गव्हाही देत अपघातात मृत्यू झालेल्या वारकऱ्यांच्या कुटुंबीयांना शासनाकडून विठ्ठल रखुमाई वारकरी योजनेंतर्गत 4 लाख रूपये व मुख्यमंत्री सहाय्यता निधी मधून 1 लाख रूपये असे एकूण 5 लाख रूपये त्वरीत मिळवून देण्यासाठीचे प्रस्ताव प्रगतीपथावर असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग मंत्री नितेश राणे के बयानों से भू-माफिया पर राजनीति गर्म
Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग, मंत्री नितेश राणे on जयंत पाटील ( भुमाफिया ) --- भू माफियाची व्याख्या मला जयंत पाटील साहेबांनी समजून सांगावी... जयंत पाटील सांगलीत जमिनी विकतात तेव्हाच भू माफिया बोलत नाहीत मात्र सिंधुदुर्ग जिल्ह्यातील लोक जे स्वतःच्या जमिनी स्वतःच विकत आहेत त्यांना भुमाफिया म्हणतात ऑन अरविंद सावंत ( मंदिराचा जिहाद केलाय ) --- हिंदू समाजात वाईट प्रवृत्तीला आम्ही समर्थन करत नाही मात्र मुस्लिम समाज एकटवतो.. अरविंद सावंत यांना कदाचित हिंदू धर्म कळलेला नाही.. त्यांनी कुराण बाजूला करुन भगवत गीता परत परत वाचावी.. चुकीला चूक म्हणणं ह्यालाच हिंदू धर्म म्हणतात.. कुरान और इस्लाम मध्ये होणाऱ्या चूका ते मानणार आहेत का? हा प्रश्न विचारण्याची हिंमत अरविंद सावंत यांनी तिकडे पण दाखवावी पश्चिम बंगाल मध्ये बाबरी मस्जिद बांधत आहेत. तिकडे पण घोटाळा झाला होता तेव्हा का उल्लेख केला नाही.. जिहाद्यांची भाषा अरविंद सावंत आणि उद्धव ठाकरे बोलत आहेत. हिंदू धर्माला बदनाम करण्याची सुपारी ह्यांनी घेतली आहे. ऑन जयंत पाटील ऑन वर्ष --- वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे पण राज्यात सबकुछ देवा भाऊ आहेत ज्यांना आयुष्य सुखकर हवयं आता त्यांनी देवा भाऊंकडे यावं पहिला राज मार्ग सागर पर्यत होता आता तो राज मार्ग है वर्षा पर्यंत ऑन सुप्रिया सुळे --- मतदार पुनररचना होणं गरजेचे आहे सुप्रिया सुळे ताईंनी सकारात्मक भूमिका घेतली असेल तर त्यांच्या आभार और अभिनंदन करतो ऑन काँग्रेस ( राम भक्त आस्था जागर ) -- जिहाद्यांची भाषा बोलणारे मुस्लिम लीगची कपडे घालून सर तन से जुदा बोलणारे राम देवते जवळ येत असतील तर त्यांचं स्वागत करू.. घरवापसी करणाऱ्या प्रत्येकाच मी स्वागत करीन काल त्यांना सर तन से जुदा शिवाय काय सुचत नाय होते. त्यांना आज जय श्री राम सुचत असेल तर हिंदू म्हणुन मला ह्याचा अभिमान आहे. काँग्रेस उबाठा असेल ज्यांना ज्यांना आपल्या धर्माकडे परत यायचं असेल हात पुढे करुन आम्ही त्यांचं स्वागत करू ऑन संजय राऊत --- त्यांचा गाडीचा ड्रायव्हर आहे का सामनाच्या संपादकाची नोकरीं सोडून एकनाथ शिंदे यांचा संजय राजाराम राऊत हा नवीन ड्रायव्हर असू शकतो0
0
Report
बोगस बीज के खिलाफ किसान संघ प्रदर्शन; मुआवजे और दोषियों पर कार्रवाई की मांग
Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोली जिल्ह्यात बोगस बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना न्याय मिळावा, दोषींवर कठोर कारवाई करावी आणि नुकसानभरपाई द्यावी, या मागण्यांसाठी क्रांतिकारी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. आपल्या आंदोलनाचा निषेध नोंदवण्यासाठी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी कृषी विभागाच्या कार्यालयासमोर पैशांच्या नोटांची उधळण करत अनोखे आंदोलन केले, जिल्ह्यात अनेक शेतकऱ्यांनी पेरलेल्या बियाण्यांची उगवण न झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात बोगस बियाणे विक्री करणाऱ्या कंपन्यावर तातडीने कारवाई करावी, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि संबंधित अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली0
0
Report
गडचिरोली में गर्भवती महिला की प्रसूति के बाद मौत, इलाज में देरी से
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील कोरची तालुक्यातल्या कोसमी गावात एका गरोदर महिलेचा प्रसूतीनंतर मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे नवजात बालिका सुखरूप असून तिच्या जन्मानंतर आईच्या मायेपासून पोरकी झाली आहे. आरोग्य विभागाने वेळेत रुग्णालयात दाखल होण्याचा सल्ला दिल्यानंतरही दुर्लक्ष झाल्याने उपचारास विलंब झाल्याचे समोर आले आहे. अमरिका महेश मडावी (वय २७) ही नऊ महिन्यांची गरोदर होती. प्रसूतीची संभाव्य तारीख जवळ आल्याने ८ जुलै रोजी बेडगाव येथील आरोग्य सेविका रेखा पेंदरे यांनी त्यांच्या घरी भेट देऊन कोरची ग्रामीण रुग्णालयात आधीच दाखल होण्याचा सल्ला दिला होता. मात्र कुटुंबीयांनी नकार दिला. १२ जुलै रोजी आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांनी पुन्हा घर टूळून प्रकृतीची चौकशी केली. रात्री सुमारे ११ वाजण्याच्या सुमारास अमरिका मडावी यांना अचानक श्वास घेण्यास त्रास सुरू झाला. त्यानंतर त्यांना उपचारासाठी घेऊन जाण्याऐवजी प्रथम मोहोगाव टोला येथील एका मांत्रिकाकडे नेण्यात आले. रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास आशा कार्यकर्त्या ललेश्री काटेंगे यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी तातडीने १०८ रुग्णवाहिकेशी संपर्क साधला. रुग्णवाहिकेच्या मदतीने अमरिका मडावी यांना मोहोगाव टोला येथून कोरची ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी प्राथमिक उपचार सुरू केले. मात्र ऑक्सिजनचे प्रमाण कमी असल्याने त्यांना तातडीने जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे रेफर करण्यात आले. गडचिरोली येथे पहाटे त्यांची शस्त्रक्रियेद्वारे प्रसूती करण्यात आली. यावेळ बालिकेचा जन्म झाला. मात्र प्रसूतीनंतर अवघ्या काही मिनिटांतच अमरिका मडावी यांचे निधन झाले. नवजात बालिका सध्या सुखरूप असून तिच्यावर वैद्यकीय देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. वेळीच रुग्णालयात दाखल झाले असते तर परिस्थिती वेगळी असण्याची शक्यता होती. उपचारासाठी उशिरा आणल्याने गुंतागुंत वाढल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम जिला अस्पताल से मोटरसाइकिल चोरी; CCTV में चोरी का दृश्य
Washim, Maharashtra:वाशीमच्या जिल्हा सामान्य रुग्णालयातून मोटारसायकल चोरी गेल्याची घटना समोर आली असून विशेष म्हणजे चोरटा मोटारसायकल घेऊन जात असतांना एक पोलीस कर्मचारी समोर येतो त्यावेळी चोरटा काहीवेळा थांबून पोलीस गेल्यानंतर लगेच मोटारसायकल घेऊन पसार होतो.या संपूर्ण घटनेचा सिसिटीव्ही समोर आला असून भर दिवसा वरदळीच्या ठिकाणावरून अगदी पोलिसांच्या समोरून मोटारसायकल चोरी होत असल्यानं कायद्याचा धाक राहिला नसल्याचं दिसून येतंय.0
0
Report
राज्यव्यापी अन्न सुरक्षा अभियान: अकोला में बड़ी कार्रवाई, प्रतिष्ठान बंद
Akola, Maharashtra:राज्यात अन्नसुरक्षा नियमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी अन्न व औषध प्रशासनाने विशेष तपासणी मोहीम हाती घेतली आहे. विभागाचे प्रमुख तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार राज्यभर खाद्य व्यावसायिकांच्या आस्थापनांची तपासणी सुरू असून, अकोल्यातही या मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई करण्यात आली आहे. आज शहरातील जठारपेठ परिसरातील प्रसिद्ध गणेश स्वीट मार्टची अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी पाहणी केली असता स्वयंपाकघरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि अन्नसुरक्षा नियमांचे उल्लंघन आढळून आले. यानंतर संबंधित प्रतिष्ठानला तात्काळ व्यवसाय बंद करून संपूर्ण परिसराची स्वच्छता करण्याचे तसेच नियमांचे पालन करूनच पुन्हा व्यवसाय सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या कारवाईमुळे शहरातील खाद्य व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडाली असून, नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध पुढेही कठोर कारवाई सुरू राहणार असल्याचे अन्न व औषध प्रशासनाने स्पष्ट केले आहे.0
0
Report
नागपुर: मोरभवन डिपो के चालकों ने लंबित मांगों के समाधान के लिए आंदोलन शुरू किया
Nagpur, Maharashtra:नागपूर 'शहर बससेवेतील आपली बस'चे चालक व कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आज मोरभवन डेपो येथे काम बंद आंदोलन पुकारले. अनेक दिवसांपासून पाठपुरावा करूनही नागपूर महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून न्याय मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. बस ऑपरेटरांकडून सातत्याने मानसिक व आर्थिक छळ होत असल्याचा आरोप करत चालक संघटनेच्या नेतृत्वाखाली मोरभवन, हिंगणा आणि वाठोडा डेपोतील चालक व कर्मचारी एकत्र आले. यावेळी बस सेवा बंद ठेवून आंदोलन करण्यात आले. मात्र, आंदोलन सुरू होऊन बराच वेळ उलटल्यानंतरही मनपाकडून कोणताही अधिकारी चर्चेसाठी आला नसल्याने कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे. मागण्यांवर तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
