icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वसई-विरार और पालघर में तेज़ बारिश, पानी में डूबे भाग, यातायात अस्त-व्यस्त

Vasai-Virar, Maharashtra:पहिल्याच मुसळधार पावसाने वसई-विरारची दाणादाण; सखल भाग जलमय, जनजीवन विस्कळीत वसई-विरारसह संपूर्ण पालघर जिल्ह्यात गेल्या रात्रीपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक भागांत पाणी साचल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. वसई, विरार आणि नालासोपारा शहरातील सखल भाग जलमय झाले असून अनेक रस्ते पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे वाहनचालकांसह नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. पहिल्याच जोरदार पावसाने महापालिकेच्या पावसाळापूर्व तयारीचा फज्जा उडाल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. अनेक ठिकाणी वाहतूक संथ झाली असून पाणी साचल्याने नागरिकांची तारांबळ उडाली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांतही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report

रत्नागिरी में संरक्षक दीवार और सड़क ध्वस्त, अवैध खोदाई से पांच घर खतरे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- संरक्षक भिंतीसह रस्ता खचला.. रत्नागिरीत गेले दोन दिवस पावसाची संततधार सुरु आहे..पावसाच्या सुरुवातीलाच शहरातील फगर वठार येथे मंगळवारी चुकीच्या खोदाईमुळे संरक्षक भिंतीसह रस्ता खचला.. २० ते २५ फूट संरक्षक भिंत कोसळली संरक्षक भिंतीला लागूनच सुरू होते अवैध खोदकाम मधला फगरवठार मधील ५ घरांना धोका निर्माण झाला आहे.. रत्नागिरी शहरातील फगरवठार मधून पोलीस अधीक्षक कार्यालयाकडे जाणारा रस्ता बंद झाला आहे.. रस्ता खचल्याने लागून असलेलं आंब्याचं झाड देखील कोसळलंय.. तेथील आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रविंद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

भंडारा के सड़कों पर गड्ढों की मार: चुनावी वादों के बाद भी हालत बदतर

Bhandara, Maharashtra:भंडारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था. रस्ते शहरातील आहेत की ग्रामीण भागातील असा प्रश्न. भंडारा शहरातील रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. शहरात भूमिगत गटार योजनेसाठी रस्ते खोदण्यात आले. नगर परिषद निवडणुकीत रस्त्यावर राजकारण झालं, आरोप प्रत्यारोप करण्यात आले. निवडणुकीनंतर रस्ते गुळगुळीत होतील अशी बतावणी देखिल करण्यात आली. मात्र आता पावसाळा सुरू झाला असून देखील रस्ते मातीने माखलेले दिसून येत आहेत. त्यावरून हे रस्ते शहरातील आहेत की ग्रामीण भागातील असा प्रश्न उपस्थित होत आहे. मुस्लिम लायब्ररी ते त्रिमूर्ती चौक हा वर्दळीचा मार्ग असून मोठ्या संख्येने नागरिक ये जा करतात त्यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

महाबळेश्वर में मानसून की पहली भारी बारिश, पर्यटन और किसान उत्साहित

Satara, Maharashtra:सातारा - राज्यातील प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्वरमध्ये मान्सूनचा पहिल्या मुसळधार पावसाने दमदार हजेरी लावली आहे. या पहिल्याच मोठ्या पावसामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे.महाबळेश्वर आणि परिसरात पावसाची धुवांधार बॅटिंग सुरू आहे. संपूर्ण परिसर आता धुक्याच्या चादरीने वेढला गेला असून, येथील निसर्गाचे रूप अधिकच खुलले आहे.या भागातील शेतकरी वर्ग या पावसाची आतुरतेने वाट पाहत होता. पेरणीच्या कामांना आता वेग येणार असल्याने स्थानिक शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.पावसाचा आनंद घेण्यासाठी वेण्णा लेक, आर्थर सीट पॉईंट आणि मुख्य बाजारपेठेत पर्यटकांची गर्दी पहायला मिळाली. गरम चहा आणि भुट्ट्याचा (मक्याचे कणीस) आस्वाद घेत पर्यटक या वातावरणाचा आनंद पर्यटक घेत आहेत.
0
0
Report

सasangameshwar-Ratnagiri में पहाड़ काटने से घरों को खतरा, भारी बारिश बढ़ाने के बीच

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर -रत्नागिरी.. गेले दोन दिवस जिल्ह्यात पावसाने धुवाधार बॅटिंग केलेली आहे.. सुरुवातीच्या पावसातच मुंबई-गोवा महामार्गाच्या रुंदीकरणातील अपुऱ्या कामांचा फटका महामार्गालगत राहणाऱ्या रहिवाशांना बसतोय.. महामार्गावरील संगमेश्वर तालुक्यातील घडशीवाडी येथील महामार्गाच्या रुंदीकरणात महामार्गालगत असणाऱ्या डोंगराचा अडथळा निर्माण झाल्याने त्याची कटाई करण्यात आली.. त्याच डोंगरावरती घडशीवाडी स्थायिक असल्यामुळे त्यांच्या घरांना आता धोका निर्माण झाला आहे.. पहिल्याच पावसात अर्धवट कापलेल्या डोंगराची माती,दरड खाली आल्यामुळे डोंगरावरती असलेल्या घरांना धोका निर्माण झालेला आहे.. सध्या डोंगरावरील घडशी वाडीतील रहिवाशी जीव मुठीत घेऊन तिथे राहत आहेत.. तेथील आढावा घेतلय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी..
0
0
Report

पालांदूर-कटाडा राजमार्ग पर बाघिन व उसके शावक का मुक्त विचरन, वीडियो वायरल

Bhandara, Maharashtra:पालांदूर किटाडी राज्यमार्गावर वाघिणीसह बछड्यांचा मुक्त संचार...व्हिडिओ व्हायरल. वाघाचे पिल्लू रस्त्यावर मुक्तपणे खेळत असल्याचे मनमोहक दृश्य. Anchor: भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील पालांदूर ते काटाडी या राज्यमार्गावर संध्याकाळच्या सुमारास वाघीण व तिच्या बछड्यांचा मुक्त संचार बघायला मिळाला आहे.यामध्ये वाघाचे पिल्लू मुक्तपणे रस्त्याच्या मधोमध खेळत असल्याचे मनमोहक दृश्य बघायला मिळाले आहे. या मार्गाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी आपल्या मोबाईलमध्ये ही दृश्य छायांकित केली आहेत.मात्र वाघीण व तिचे पिल्यांसह होत असलेले मुक्त संचार प्रवासासाठी भीतीचे वातावरण निर्माण करणारे आहे.
0
0
Report
Advertisement

बार्शी में विधायक दिलीप सोपल घर के पास आतिशबाजी से आग, 8 आरोपी गिरफ्तार

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री आतिषबाजीमुळे लागली आग - बार्शीचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या परिसरात मध्यरात्री आतिषबाजीमुळे लागली आग. - बार्शी पोलिसांच्या वतीने संबधित व्यक्ती वर गुन्हे दाखल - विधानपरिषद निवडणुक निकालाच्या मध्यरात्री आ. दिलीप सोपल यांच्या घराजवळ फटाक्यांचीातीषबाजी करण्यात आल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नगरसेवक नागेश अक्कलकोटे यांनी केला आहे. - दरम्यान या घटनेची दखल घेत बार्शी पोलिसांनी संबधित 8 व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे
0
0
Report
Advertisement

लोणावळ्यात मुसळधार पाऊस फिर से बरसा, पर्यटन में नई उम्मीदें जगीं

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात अखेर मान्सूनच्या पावसाने दमदार हजेरी लावली असून जून महिन्याच्या सुरुवातीपासून दडी मारून बसेलेला पाऊस पुन्हा एकदा बरसू लागला आहे. त्यामुळे लोणावळ्यातील नागरिकांसह चिक्की व्यावसायिक आणि पर्यटन व्यवसायाशी संबंधित घटकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. पावसाने दीर्घकाळ ओढ दिल्यामुळे पर्यटकांनी लोणावळ्याकडे पाठ फिरवली होती आणि पर्यटन व्यवसायही मंदावला होता. मात्र आता पावसाच्या पुनरागमनामुळे धबधबे, निसर्गरम्य स्थळे आणि पर्यटन केंद्रांकडे पर्यटकांचा ओघ वाढण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यामुळे लोणावळ्याच्या पर्यटन अर्थचक्राला नवसंजीवनी मिळण्याची चिन्हे दिसू लागली आहेत.
0
0
Report

लोहगड किले हत्या मामले में आरोपी के वकील का दावा: केतन की मौत दुर्घटना

Varsoli, Maharashtra:Anchor: लोहगड किल्ला खून प्रकरणात आरोपी चेतन चौधरी यांचे वकील राम शहाणे यांनी न्यायालयात महत्त्वाचा दावा केला आहे. त्यांच्या मते, सिया गोयल आणि केतन अग्रवाल यांचे लग्न ठरले होते आणि दोघांमध्ये चांगले संबंध होते. लोहगड किल्ल्यावर फिरत असताना केतनचा पाय घसरून तो दरीत कोसळला आणि हा प्रकार अपघाती असल्याचा दावा बचाव पक्षाने केला आहे. तसेच, केतनच्या कुटुंबीयांच्या दबावामुळे पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केल्याचेही वकिलांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास करण्यासाठी पोलिसांनी मागितलेली सात दिवसांची पोलीस कोठडी न्यायालयाने मंजूर केली असून तपास यंत्रणा आता या प्रकरणातील सर्व पैलूंची सखोल चौकशी करणार आहे।।
0
0
Report
Advertisement

भाऊसाहेब वाकचौरे ने मतदारसंघ में प्रवेश के साथ बड़ा विकास वादा किया

Shirdi, Maharashtra:बंडखोर खासदार भाऊसाहेब वाकचौरे मतदारसंघात समृद्धी महामार्गाच्या एक्झिट पॉईंटवर स्वागत उबाठाच्या इशाऱ्यानंतर वाकचौरे यांचे जोरदार स्वागत फटाक्यांची आतिशबाजी करत मतदार संघात स्वागत शिंदे गटाच्या शिवसैनिक व पदाधिकाऱ्यांनी केले स्वागत बंडखोरी केल्यानंतर वाकचौरे प्रथमच मतदारसंघात साई दर्शन घेऊन निवासस्थानकडे होणार रवाना खासदार भाऊसाहेब वाकचौरे_byte_ कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे मी घेतलेला निर्णय योग्य टीका करणारे थोडे आनंद व्यक्त करणारे जास्त मी मतदार संघात फिरणारच आणि पाय ठेवणारच आहे ठाकरे गटाला प्रतिउत्तर मतदारसंघाच्या भल्यासाठी आणि विकासासाठी मी हे पाऊल उचलले मतदारसंघात अनेक प्रोजेक्ट आणायचे आहेत प्रलंबित प्रश्नांसाठी आता निधी आणता येईल निधी खर्च न केल्याच्या बातम्या चुकीच्या 9 कोटी 54 लाख निधी मंजूर झाला त्यातील अनेक कामे प्रस्तावित डी पी डी सी आणि खासदार निधीतून अनेक कामे मंजूर आहेत पैसे कोण देतंय आणि कोण घेते हे आरोप करणाऱ्यांनाच माहीत असेल केले जाणारे आरोप धादांत चुकीचे आम्ही सहाजण मतदारसंघाच्या विकासासाठी शिंदे साहेबांसोबत गेलो राजकारणात चांगलं आणि वाईट हे निवडणूक ठरवते हा मतदारांचा विश्वासघात नाही तर त्यांच्या कामासाठी प्रवेश केलाय माझ्या दृष्टीने हा विश्वास घात नाही Byte खा.भाऊसाहेब वाकचौरे
0
0
Report

विदर्भ में हल्की बारिश से गर्मी में राहत, अकोला समेत जिलों में रिमझिम बरसात

Akola, Maharashtra:नागपूर प्रादेशिक हवामान विभागाने विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज वर्तवला होता. त्या अंदाजानुसार अकोला जिल्ह्यातही विविध भागांत रिमझिम पावसाने हजेरी लावली. गेल्या काही दिवसांपासून अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही काहीशी घट झाली आहे. त्यामुळे उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, या रिमझिम पावसामुळे शेतकऱ्यांमध्येही समाधानाचे वातावरण असून खरीप हंगामातील पेरण्यांना वेग येण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top