icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में जलस्रोतों की गिरावट: पानी का स्तर 28.55% पर, एक माह में लगभग 15% कमी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात जलसाठा घटला असून अठ्ठावीस टक्क्यांवर येऊन ठेपला आहे. महिनाभरात पंधरा टक्के घट झाली आहे. अँकर, गेल्या काही दिवसांपासून हवामानात सततचे बदल, वाढता उष्मा आणि अनलिनोच्या प्रभावामुळे मानसून लांबवण्याची शक्यता वर्तवली जात असतानाच रत्नागिरी जिल्ह्यातील जलस्त्रोत्रांमधील पाणीसाठा चिंतेचा विषय बनला आहे. जिल्ह्यातील नदी-नाले कोरडे पडले आहेत, धरणांमधील पाणीसाठाही झपाट्याने कमी झाला आहे. एप्रिल अखेर धरणांमध्ये 43.397% पाणी होते, मे महिन्यात ते थेट 28.55% वर आल्यामुळे महिनाभरात सुमारे 15% घट झाली आहे.
0
0
Report
Advertisement

वेरुळ के श्री घृष्णेश्वर मंदिर में अधिकमास अभिषेक, 5–9 जून; गाभार दर्शन बंद

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ येथील बारावे ज्योतिर्लिंग श्री घृष्णेश्वर मंदिरात ५ ते ९ जून दरम्यान अधिकमासानिमित्त भव्य 'अतिरुद्र अभिषेक' सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. हा सोहळा सलग २४ तास सुरू राहणार असल्याने, या पाच दिवसांच्या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यातून दर्शन बंद राहील. देश-विदेशातून येणाऱ्या भक्तांना केवळ मुखदर्शनावरच समाधान मानावे लागणार आहे, श्री घृष्णेश्वर मंदिरात १९८५ पासून दर तीन वर्षांनी येणाऱ्या अधिक महिन्यात विश्वशांतीसाठी अतिरुद्र अभिषेक करण्याची परंपरा आहे. यंदा देशभरातील ४०० ब्रह्मवृंदांचा सहभाग असेल. विशेष म्हणजे, हरिद्वार येथून आणलेल्या पवित्र गंगाजलाने हा महाअभिषेक पार पडणान असून, या निमित्ताने विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचेही आयोजन करण्यात आले आहे..
0
0
Report

विप्लव बाजोरिया की उमेदवारी रद्द, पिता-पुत्र ने हाईकोर्ट जाने की धमकी दी

Amravati, Maharashtra:विप्लव बाजोरिया यांची उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्र आक्रमक; आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर दिली नाही बाजोरिया यांचा आरोप अँकर :- अमरावती विधान परिषद निवडणूक अनेक राजकीय घडामोडी पाहायला मिळत असून काल अपक्ष उमेदवार विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी बाद झाल्यानंतर बाजोरिया पिता-पुत्र चांगलेच आक्रमक झाले आहे. आम्ही हायकोर्टात जाऊ नये म्हणून आम्हाला निर्णयाची ऑर्डर दिली नाही असा गंभीर आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे. आम्हाला ऑर्डर न देता कलेक्टर पार्टीला गेले. कलेक्टरने पक्षपात करून आमचा फार्म रद्द केला आमची हीअरिंग पंधरा मिनिटं घेतली आणि विरोधकांची सात ते आठ तास घेतली असाही आरोप माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी केला आहे. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यावर बाजोरीया पिता-पुत्राने अनेक आरोप केले असून अमरावतीत विप्लव बाजोरिया यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्यानंतर हायव्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. निवडणूक अधिकाऱ्याने ऑर्डरची कॉपी देताच मी हायकोर्टात जाऊन उमेदवारी अर्ज वैध ठरवणार असे वक्तव्य बाजोरिया यांनी केले आहे.
0
0
Report

पुणे के खेड में धानोरे के गोदाम में भीषण आग, भारी नुकसान

Shirur, Maharashtra:पुणे के खेड में धानोरे के गोदाम में भीषण आग, भारी नुकसान आळंदी ग्रामीण भागातील धानोरे गावाकडे जाणाऱ्या मार्गावर ही दुर्घटना घडली. आग एवढी भीषण होती की, गोदामात असलेल्या तीन गॅस सिलिंडरचे एकापाठोपाठ एक मोठे स्फोट झाले. या स्फोटांमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली होती. तसेच गोदामाबाहेर उभी असलेली एक आयशर मालवाहू गाडी आणि एक मोटारकार देखील या आगीत पूर्णपणे जळून खाक झाली आहे. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत तब्बल साडेतीन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवले. शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
0
0
Report
Advertisement

नागपुर-मुंबई महामार्ग पर बस-ट्रक भिड़ंत, चालक सहित 2 घायल

Washim, Maharashtra:वाशिम: बस-ट्रक भिड़ंत नागपुर–मुंबई समृद्धी महामार्गावरील चॅनल क्रमांक 223 जवळ संजय ट्रॅवल्सच्या बसची एका ट्रकला जोरदार धडक बसल्याची घटना घडली. या अपघातात बस चालक, क्लिनरसह दोन प्रवासी गंभीर जखमी झाले असून अन्य चार प्रवाशांना किरकोळ दुखापत झाली आहे. बस चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. महामार्ग पोलीस आणि मदत पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेत जखमींना बाहेर काढले. सर्व जखमींना उपचारासाठी वाशिम येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
0
0
Report

भंडारा में आवारा कुत्तों का बढ़ता प्रभाव; चार महीनों में 2682 लोगों को काटा

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचा धुमाकूळ... चार महिन्यांत २ हजार ६८२ जणांना चावा, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण... भंडारा शहरातच ५६४ नागरिक कुत्र्यांच्या हल्ल्याचे बळी.... उपाययोजना असूनही भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली... नगर परिषदेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह... रस्ते, चौक आणि वसाहतींमध्ये भटक्या कुत्र्यांचे टोळके भंडारा शहरातील रस्ते, चौक, बाजारपेठा आणि निवासी भागात भटक्या कुत्र्यांचे टोळके सहजपणे दिसून येत आहेत. अनेक ठिकाणी हे कुत्रे दुचाकीस्वार, पादचारी तसेच शाळकरी मुलांवर धावून जात असल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. परिणामी नागरिकांना रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोकादायक वाटू लागले आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार जानेवारी ते एप्रिल या चार महिन्यांच्या कालावधीत भंडारा जिल्ह्यात २ हजार ६८२ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतला आहे. त्यापैकी ५६४ रुग्ण हे भंडारा शहरातील आहेत. विशेष म्हणजे २०२५ या वर्षात एकट्या भंडारा शहरात १ हजार ४७५ नागरिकांना कुत्र्यांचा चावा लागल्याची नोंद आहे. वाढत्या घटनांमुळे रेबीजचा धोका देखील वाढला असून आरोग्य यंत्रणेवर अतिरिक्त ताण निर्माण होत आहे. भटक्या कुत्र्यांचा वाढता उपद्रव हा केवळ भंडारा शहरापुरता मर्यादित नसून संपूर्ण जिल्ह्याची गंभीर समस्या बनत चालली आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनाने प्रभावी कृती आराखडा राबविण्याची गरज व्यक्त केली जात आहे. नारायण सूर्यवंशी, अधिष्ठाता मेडिकल कॉलेज भंडारा नगर परिषदेकडून भटक्या कुत्र्यांचे निर्बिजीकरण, लसीकरण आणि स्थलांतर यासारख्या उपाययोजना राबविल्या जात असल्याचा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात शहरातील अनेक भागांमध्ये कुत्र्यांची संख्या वाढलेली दिसत आहे. त्यामुळे उपाययोजनांच्या प्रभावी अंमलबजावणीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. मधुरा मदनकर, अध्यक्ष नगर परिषद भंडारा गेल्या चार महिन्यांत जिल्ह्यात २ हजार ६८२ आणि शहरात ५६४ नागरिकांना कुत्र्यांनी चावा घेतल्याची आकडेवारी प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरत आहे. आता भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या समस्येवर प्रशासन कितपत प्रभावी उपाययोजना करते, याकडे भंडारा जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

मुंबई उच्च न्यायालय औरंगाबाद खंडपीठ ने 14 कार्यालयों के स्थलांतरण याचिका खारिज की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरचे गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळाअंतर्गतच्या १४ कार्यालायच्या स्थलांतराविरोधात दाखल याचिका मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने फेटाळली. संबंधित प्रकरण दाखल करताना पक्षकाराने कोणताही अभ्यास किंवा कागदपत्रांचे संशोधन केले नाही, असे निरीक्षण खंडपीठाने नोंदवले. नदीजोड प्रकल्पाच्या पूर्णत्वासाठी आणि जलसंपदा विभागाच्या योजनांच्या व निर्णयांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी हा धोरणात्मक निर्णय असल्याचे निरीक्षण नोंदवीत खंडपीठाने याचिका फेटाळली, ही कार्यालय हलवल्याने जोरदार टीका सुरू होती...
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में यलो अलर्ट; अगले दो दिन हल्की-मध्यम वर्षा संभव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या काही दिवसांपासून पावसाळी वातावरणाला सुरुवात झाली आहे. सोमवारी वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसाने मंगळवारी विश्रांती घेतली असली, तरी हवामान विभागाने बुधवारी पावसाचा 'यलो अलर्ट' दिला आहे. या कालावधीत शहरात ताशी ३० ते ४० किमी वेगाने वादळी वारे वाहणार असून, त्यानंतर पुढील २ दिवसही शहरात हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याचा अंदाज वर्तवला आहे. सध्या मान्सूनपूर्व स्थितीमुळे कुठे ढगाळ वातावरण, तर काही ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या सरी कोसळत आहेत. हवामान विभागाच्या अंदाजानुसार, बुधवारी शहरात विजांचा कडकडाट, सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस होऊ शकतो.
0
0
Report

सिबिल अट नहीं तो किसानों को पीक कर्ज: मुख्यमंत्री के निर्देश लागू

Nashik, Maharashtra:पीककर्जासाठी 'सिबिल'ची अट लावल्यास बँकांवर होणार कारवाई अँकर मोठ्या बँका सिबिल स्कोअरचे कारण दाखवत शेतकऱ्यांना पीक कर्ज नाकारतात. शेतकऱ्यांना 'सिबिल' स्कोरची अट अजिबात लावू नये, तसेच ८० टक्क्यांच्या वर पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी गांभीर्याने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी बँकांना दिले होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यात सुरू झाली असून, तशा सूचना बँकांना दिल्या आहेत, अशी माहिती जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक यांनी दिलीये....मागील वर्षी पीककर्ज जिल्ह्यात वाटपाचे उद्दिष्ट वेळेत पूर्ण झाल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे खरीपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे कर्ज घेण्यासाठीचे हेलपाटे थांबतील.पीक कर्जासाठी सिबिलच्या नावे शेतकऱ्यांची अडवणूक होत असल्याच्या तक्रारी सहकार व कृषी विभागाकडे प्राप्त झाल्या होत्या. एखादा शेतकरी पीक कर्जासाठी पात्र असताना त्याला मागील थकबाकीचे कारण सांगून तुमचे सिबिल खराब असल्याचे सांगून माघारी पाठविले जात होते. मात्र, शासनाच्या नवीन निर्णयामुळे दिलासा मिळेल. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमानुसार पीक कर्जासाठी सिबिल स्कोअर पाहणे किंवा तिची अट घालणे बंधनकारक नाही...पीककर्जासाठी 'सिबिल'ची अट लावल्यास बँकांवर होणार कारवाई होण्याची शक्यता आहे..
0
0
Report
Advertisement

भीमाशंकर मंदिर पांच महीनों से बंद, भक्तों में भारी आक्रोश

Shirur, Maharashtra:भीमाशंकर मंदिर परिसरातील विकास आराखड्याच्या कामामुळे गेल्या ५ महिन्यांपासून भाविकांना दर्शनासाठी बंदी घालण्यात आली आहे. देशाच्या कानाकोपऱ्यातून १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकरच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येने भाविक येत आहेत, मात्र मंदिर बंद असल्याने त्यांना विनादर्शनच माघारी फिरावे लागत आहे. मुख्य महामार्गावर किंवा सोशल मीडियावर मंदिर बंद असल्याबाबतचे कोणतेही सूचना फलक लावण्यात आलेले नाहीत, त्यामुळे लांबून आलेल्या भाविकांचा मोठा हिरमोड होत असून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

शिवराज्याभिषेक के लिए रायगढ़ किले पर यातायात रोक, 5-6 जून तक योजना लागू

Chendhare, Maharashtra:स्लग - शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी वाहतुकीचे नियोजन ........ रायगडात जड-अवजड वाहनांना बंदी ..... ५ जून सायंकाळपासून ६ जून रात्रीपर्यंत आदेश लागू ....... शिवभक्तांच्या सोयीसाठी प्रशासनाचा निर्णय अँकर - किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळ्यादरम्यान वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि शिवभक्तांचा प्रवास सुरक्षित व सुरळीत व्हावा यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आलं आहे. ५ जून रोजी सायंकाळी ४ वाजल्यापासून ते ६ जून रोजी रात्री १० वाजेपर्यंत मुंबई-गोवा महामार्गावरील वाकणफाटा- नागोठणे ते कशेडी घाट या मार्गावर अवजड वाहतूक बंद असेल. तसेच माणगाव-निजामपूर-पाचाड-रायगड किल्ला,माणगाव-ढालघरफाटा-पाचाड- रायगड किल्ला आणि महाड-नातेखिंड-पाचाड-रायगड किल्ला या प्रमुख मार्गांवर सर्व प्रकारच्या जड-अवजड वाहनांच्या वाहतुकीस बंदी राहणार आहे. मात्र यातून अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना वगळण्यात आलं आहे. जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी याबाबतचे आदेश जारी केले आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top