445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
देवगिरी किले में बिबट के बछड़े को पकड़ा गया, माँ की तलाश जारी; खोज अभियान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऐतिहासिक देवगिरी किल्ल्यात गेल्या चार-पाच महिन्यांपासून वावर असलेल्या बिबट्याच्या एका बछड्याला पकडल्यानंतर त्याच्या आईचा शोध घेण्यासाठी वन विभागाचे पथक किल्ला परिसरात तळ ठोकून आहे. थर्मल ड्रोनद्वारे शोध घेतल्यानंतरही बिबट्याचा ठावठिकाणा लागलेला नाही. या शोधमोहिमेला ४८ तासांहून अधिक काळ उलटला आहे, दिवस रात्र शोध सुरु आहे, दरम्यान बिबट्यासाठी लावलेला पिंजऱ्यात सोमवारी बिबट्याचा छोटासा पिल्लू अडकलं होतं त्याची तपासणी करून त्याला सोडून देण्यात आलेला आहे मात्र मादी बिबट्याचा शोध अजूनही परिसरात सुरू आहे पर्यटकांनी फिरायला येताना काळजी घ्यावी असा आवाहन वनविभाग आणि पर्यटन खात्यांना केले आहे..0
0
Report
नाशिक नगरपालिका ने अस्वच्छता के आरोपियों पर छह महीनों में 41 लाख का दंड
Nashik, Maharashtra:अस्वच्छता करणाऱ्यांना सहा महिन्यांत ४१ लाखांचा दंड अँकर नाशिक महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाने अस्वच्छता करणाऱ्यांविरोधात कठोर मोहीम राबवत १ जानेवारी ते १० जुलै २०२६ या कालावधधीत ८ हजार ७५१ jणांवर कारवाई करून ४१ लाख २८ हजार ८० रुपये दंड वसूल केलाय...यामध्ये ओला-सुका कचरा विलगीकरण न करणाऱ्या ४,०६७प्रकरणांत १४.८८ लाख रुपये, प्रतिबंधित प्लास्टिक वापराच्या १८३ प्रकरणांत ९.४० लाख रुपये, मोकळ्या जागेत बांधकाम मलबा टाकणाऱ्या ७९ प्रकरणांत ६.३९ लाख रुपये, तसेच सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणाऱ्या ३,३०७ जणांकडून ७.०३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला. याशिवाय कचरा जाळणे, सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करणे आणि जैववैद्यकीय कचऱ्याची अयोग्य विल्हेवाट लावणाऱ्यांवरही कारवाई करण्यात आली.....0
0
Report
नागपूर: BLO पद पर तैनाती के बावजूद ड्यूटी न मानकर 9 शिक्षकों के खिलाफ मामला दर्ज
Nagpur, Maharashtra:नागपूर निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष संक्षिप्त मतदार पुनरिक्षण मोहीम म्हणजेच SIR मध्ये हलगर्जीपणा करणाऱ्या आणि BLO म्हणून नियुक्ती होऊन ही ड्युटीवर गैरहजर राहणाऱ्या 9 शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांविरोधात नागपुरात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.... नागपूर दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक अधिकाऱ्यांनी या संदर्भात सदर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली होती... बो म्हणून नियुक्ती झालेल्या या सर्व शिक्षक आणि शैक्षणिक कर्मचाऱ्यांना निवडणुकीच्या कामासाठी हाजिर राहण्याचे स्पष्ट आदेश दिल्यानंतरही संबंधित शिक्षक ड्युटीवर हजर झाले नाही... त्यामुळे 13 जुलै रोजी दक्षिण नागपूरच्या निवडणूक अधिकाऱ्यांनी तक्रार दिली... त्यानंतर प्राथमिक चौकशी करून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे...0
0
Report
Advertisement
सातारा पुलिस ने बनावटी पुलिस बनाकर लूटने वालों का पर्दाफाश, लाखों रकम जब्त
Satara, Maharashtra:सातारा :- माऊलींच्या पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर सातारा पोलिसांनी मोठी आणि धडक कारवाई करत पोलिसांची बनावट वेशभूषा करून नागरिकांना लुटणाऱ्या सात जणांच्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. सांगली आणि कोल्हापूर येथील आरोपी पुसेगाव पोलिस असल्याची बतावणी करून रात्रीच्या वेळी नाकाबंदी लावत वाहनचालकांकडून कारवाईची भीती दाखवत पैसे उकळत होते. वर्धनगड येथील नायरा पेट्रोल पंपाजवळ सुरू असलेला हा प्रकार गोपनीय माहितीच्या आधारे पुसेगाव पोलिसांनी उघडकीस आणला. या कारवाईत चार पुरुष आणि तीन महिलांना अटक करण्यात आली असून दोन चारचाकी वाहने, आठ मोबाईल, रोख रक्कम असा तब्बल २१ लाख १९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. माऊलींच्या दर्शनासाठी येणाऱ्या वारकरी आणि प्रवашांच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही अत्यंत महत्त्वाची कारवाई मानली जात आहे. बाईट - पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे0
0
Report
हिंगोली के कलमनुरी में मसोड फाटा में कॉलेज छात्र का शव फांसी पर, हड़कंप
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील मसोड फाटा शिवारात ढोलक्याचीवाडी येथील महाविद्यालयीन शिक्षण घेणाऱ्या तरुणाचा मृतदेह गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच कळमनुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. हा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की अन्य काही कारण आहे, याचा तपास कळमनुरी पोलीस करत आहेत...0
0
Report
नाशिक महापालिका सभा में निदा खान मामले पर भाजपा-एमआईएम के नेताओं की तीखी बहस
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती मनपा महापालिका सभेत नाशिक धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खानवर कारवाईचा विषय निघताच MIM आणि भाजप नगरसेवक यांच्यात वाद रंगला, संभाजीनगर येथे निदा खान लपून बसलेल्या घरावर कारवाई करणाऱ्या मनपा अधिकाऱ्यांचा स्वागताचा प्रस्ताव काही नगरसेवकांनी मांडला आणि त्यानंतर एमआयएम नगरसेवक मात्र संतापले...भाजप आणि एमआयएम नागरसेवकात यावेळी बाचाबाची झाली, नंतर महापौरांनी विषय आटोपता घेतला...0
0
Report
Advertisement
पानी नहीं बरसा, मराठवाड़ा के किसानों की सोयाबीन फसल बर्बाद, पुनः बुवाई संकट
Parbhani, Maharashtra:परभणी जिल्ह्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी हातबाळ झाला आहे सेलू तालुक्यातील कुपटा शिवारातील शेतकरी श्रीराम कुलकर्णी यांनी आपल्या १८ एकर शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र पेरणी करूनही पाऊस पडत नसल्याने पीक करपो लागल्याने हताश झालेल्या शेतकऱ्याने आपल्या अठरा एकर शेतातील सोयाबीन पिकावर रोटाव्हेटर फिरवला आहे..रोटाव्हेटर फिरून आपल्या 18 एकर शेतीमधील पीक नष्ट केले आहे मशागतीसह पेरणीसाठी बियाणासाठी हजारो रुपये खर्च करूनही पिक करपो लागल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत परिसरामध्ये पाऊस नसल्याने शेतकरी चिंतेत सापडले असून येत्या दो-तीन दिवसांमध्ये पाऊस नाही पडला तर अनेक शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचा संकट येण्याची शक्यता निर्माण झाली आहे..0
0
Report
नाशिक के चांदवड में खेती विवाद: मल्चिंग पेपर क्षतिग्रस्त; 25-30 पर मामला दर्ज
Chandvad, Maharashtra:अँकर:- नाशिकच्या चांदवड मध्ये शेतीच्या वादातून दोन गटात वाद झाल्यानंतर एका गटाने शेतकऱ्याच्या शेतात टोमॅटो शेतीसाठी टाकलेल्या मल्चिंग पेपरचे नुकसान केले आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून 25 ते 30 जणांच्या विरोधात वडनेर भैरव पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे0
0
Report
मुख्यमंत्री फडणवीस को राष्ट्रीय हथमाग दिन के समारोह के लिए आमंत्रण मिला
Yeola, Maharashtra:व्या राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे होणाऱ्या विशेष कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आग्रहाचे निमंत्रण देण्यात आले आहे. भाजप विणकर प्रकोष्टचे प्रदेश संयोजक मनोज दिवटे यांनी मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मयूर मेघराज यांच्या माध्यमातून निमंत्रण पत्र सुपूर्द केले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचा पारंपरिक पैठणी शाल परिधान करून सत्कार करण्यात आला. विणकर समाजासाठी राज्य सरकारने सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजनांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, ७ ऑगस्ट रोजी राष्ट्रीय हातमाग दिनानिमित्त येवला येथे आयोजित कार्यक्रमाला उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत कार्यक्रमाला शुभेच्छा दिल्या असून, उपस्थित राहण्याबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती मयूर मेघराज यांनी दिली0
0
Report
Advertisement
श्रीरामपूर में बढ़ती अपराधों के विरोध में बड़ा मोर्चा, हत्या के आरोपी गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:Anc - अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूरमध्ये वाढती गुन्हेगारी आणि हॉटेल व्यवसायिक अकाश दुबैय्या यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज महामोर्चाचे आयोजन करण्यात आलंय.. हत्येतील तीन आरोपींना पोलिसांनी तात्काळ अटक केली आहे.. मात्र मुख्य सूत्रधारांना देखील अटक करून मकोको कायद्यांतर्गत कारवाई करावी, या मागणीसाठी गेल्या तीन दिवसांपासून श्रीरामपूर शहर कडकडीत बंद ठेवण्यात आले आहे.. आज याच मागणीसाठी हजारोंच्या संख्येने नागरिक आणि शहरातील व्यावसायिक मोर्चात सहभागी होणार आहेत.. शहरात वाढलेली गुन्हेगारी आणि हॉटेल व्यावसायिक तरुणाच्या हत्येनंतर श्रीरामपूरमध्ये संतापाची लाट उसळली आहे..या मोर्चाबाबत आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
रायगड़ जिला परिषद 75% अनुदान पर बीज उपलब्ध कराएगी
Chendhare, Maharashtra:अतिवृष्टीत नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा. रायगड जिल्हा परिषदेचा मदतीचा हात. ७५ टक्के अनुदानावर मिळणार बियाणे. योजनेच्या लाभासाठी ५० लाखांची तरतूद. ज्यांच्या शेतात पाणी साचून रोपवाटिकांचे नुकसान झाले त्यांना ७५ टक्के अनुदानावर भात बियाणे उपलब्ध करून दिलं जाणार आहे. यासाठी ५० लाखांची विशेष तरतूद करण्यात आल्याचे कृषी सभापती वैकुंठ पाटील यांनी सांगितलं. यातून साधारण १२ ते १५ हजार शेतकऱ्यांना लाभ होणार आहे. यंदा जिल्ह्यात साडेसहा हेक्टरवर भात रोप वाटिका करण्यात आल्या होत्या, त्यातील दोन हजार हेक्टर इतके क्षेत्र पाण्याखाली गेले होते.0
0
Report
यवतमाल में भारी सूखा: वर्षा नहीं हुई, किसानों की फसलों पर संकट
Yavatmal, Maharashtra:गेल्या दहा ते बारा दिवसांपासून यवतमाळ जिल्ह्यात पावसाने दडी मारली आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस आला मात्र जुलै च्या पहिल्या आठवड्यात पावसाने खंड दिला. वार्षिक सरासरीच्या केवळ 28 टक्के पाऊस झाला असल्याने पावसाची मोठी तूट निर्माण झाली आहे. दिवसा ऊन ताप लागल्याने वातावरणात उकाडा निर्माण झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. शेतकऱ्यांच्या शेतात उगवलेले पीक पाण्यामुळे आणि उष्णतेमुळे कोमेजू लागले आहे. आणखी पुढील चार ते पाच दिवस पाऊस येणार नसल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविल्याने शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन कपाशी तूर ही पिके करपल्यास शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढावण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपुर के सरकारी रेत ठेके पर रंगदारी मांगे जाने के बाद कर्मी पर हमला, हालत गंभीर
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील अजनसोंड येथील शासकीय वाळू ठेक्यावरिल कर्मचाऱ्यावर जीवघेणा हल्ला करण्यात आला आहे. अजून सोंड येथे जिल्हाधिकारी सोलापूर यांच्या आदेशाने शासकीय वाळू ठेका सुरू आहे. हा ठेका चालू ठेवायचा असेल तर पाच लाख रुपयांची खंडणी तुषार उर्फ बालाजी नागटिळक आणि त्यांच्या साथीदारांनी याने मागितली होती. याप्रकरणी पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनमध्ये त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. याचा राग मनात भरून त्याने व त्याच्या साथीदाराने बबन सोपान माने यांच्यावर जीवघेणा हल्ला केला आहे. यामध्ये बबन माने गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून नागटिळक आणि त्याच्या साथीदाराकडून वाहनांचेही मोठे नुकसान करण्यात आले आहे.0
0
Report
मालेगाव-नाशिक में बारिश से खरीफ फसल खतरे में, किसानों की चिंता बढ़ी
Nashik, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग ( नाशिक ) - मालेगाव सह नाशिकच्या ग्रामीण भागात पुन्हा बळीराजाची चिंता वाढली.. - पावसाने दांडी मारल्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर.. - पावसाने दांडी मारल्याने खरीप हंगामावर परिणाम होण्याची शक्यता... मालेगाव तालुक्यात पावसाने अचानक विश्रांती घेतल्याने बळीराजाची चिंता पुन्हा वाढली आहे. सुरुवातीला झालेल्या समाधानकारक पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहात पेरणी पूर्ण केली. मात्र आता अनेक दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने नव्याने उगवलेली पिके करपण्याच्या मार्गावर आहेत. शेतकऱ्यांच्या नजरा आता आकाशाकडे लागल्या असून, लवकरच दमदार पाऊस न झाल्यास खरीप हंगामावर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. राज्यात सध्या मान्सूनचा कमकुवत टप्पा सुरू असल्याने अनेक भागांत पावसाची उघडीप दिसून येत आहे.0
0
Report
तीन महीनों से आतंक मचाने वाला पट्टेदार बाघ आखिर वन विभाग ने जेरबंद किया
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यातील जवाहरनगर येथील ऑर्डनन्स फॅक्टरी, सावरी आणि परिसरातील गावांमध्ये गेल्या तीन महिन्यांपासून दहशत निर्माण करणाऱ्या पट्टेदार वाघाला अखेर वनविभागाने यशस्वीरित्या जेरबंद केले. या वाघाच्या सततच्या वावरामुळे परिसरातील शेतकरी, नागरिक आणि शेतमजूर भयभीत झाले होते. जवाहरनगर ऑर्डनन्स फॅक्टरी परिसरात तसेच सालेबर्डी–सावरी मार्गावर अनेक वेळा वाघाचे दर्शन झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या वाघाने पेवठा परिसरातील शेतकऱ्यांच्या बैलांवर हल्ला करून त्यांचा बळी घेतला होता. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले होते. अनेक गावांमध्ये जनावरे चारण्यासाठी जाणाऱ्या शेतकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. अखेर वनविभागाने रात्री रेस्कु करून वाघाला जेरबंद केले...0
0
Report
Advertisement
