icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संजय राऊत पर सादाभाऊ खोत का हमला: शिवसेना को लेकर उकसाने वाले आरोप

Sangli, Maharashtra:संजय राऊत शिवसेना जिवंत ठेवतील असं वाटत नाही. राख करून फुंकून टाकणार - आमदार सदाभाऊ खोत. संजय राऊत हे शिवसेना जिवंत ठेवतील, असं वाटत नाही. त्यांच्या हयातीमध्ये शिवसेना फुकून, राख सुद्धा फुकुन ठेवतील, असं वाटतंय, अशी घणाघाती टीका आमदार सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर केली आहे. जे गेले ते विकाऊ होते, का ? त्यांना तुम्ही बाजारातले जनावर समजता, का ? तसेच मातोश्रीच्या बाहेर अनेक आमदार प्रदक्षिणा घालायचे, तुम्ही गोशा लावून घरात झोपणार, आणि सामान्य माणसाला रस्त्यावर लढायला लावणार आणि तुम्ही सत्तेचा गाजर हातात घेणार, त्यामुळे लोकप्रतिनिधी आणि सर्वसामान्य कार्यकर्ता शहाणा झाला आहे, असा टोला देखील आमदार सदाभाऊ खोत यांनी लगावला आहे. शिवसेना ठाकरे गटाचे सहा खासदार फुटल्यानंतर संजय राऊतां कडून करण्यात आलेल्या पंधरा कोटीच्या आरोपांवरून सदाभाऊ खोत यांनी संजय राऊतांवर निशाणा साधला आहे, ते सांगली मध्ये बोलत होते.
0
0
Report

रामदास कदम के बयान से शिवसेना में घमासान: संजय राऊत के खिलाफ बढ़ती बयानबाजी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रामदास कदम pointer.. महाराष्ट्र राज्य हे कायद्याने चालतं.. आतापर्यंत संजय राऊत यांच्या वरती किती केसेस आहेत किती लोकांचे हातपाय तोडले किती लोकांचे मर्डर केले.. कोणीही काहीही बोलतोय.. शिवसेना आम्ही वाढवली आतापर्यंत आम्ही किती केसेस घेतल्यात.. ही भाषा कोणालाही शोभते का काल राऊत यांनी शिवीगाळ केली महाराष्ट्र त्यांना आज थुंकतोय.. एक सुशिक्षित माणूस सामनाचा संपादक आणि शिवराळ भाषा आणि तेही खासदारांना.. हे करण्यापेक्षा ते का गेले याचं तुम्ही आत्मचिंतन करायला हेवं होतं.. *संजय राऊत तुमच्यामुळेच ही उद्धव ठाकरेंवरती वेळ आली* तुमच्या पायाखालची वाळू आता घसरलेली आहे.. कायदा आणि संविधानापेक्षा कोणीही मोठा नाही.. कुठून गेलेल्या खासदारांनी वेगळा गट स्थापन केल्यानंतर तुमच्या निर्णयाची किंवा निर्णयाचा प्रश्न येतच कुठे.. *उद्धवजी शिवसेना मराठी माणसाची होती तुमच्या आणि आदित्य ठाकरे यांची एकट्याची नव्हती* तुम्ही त्यांच्यावर हुकूमशाही चालवली त्याचे हे परिणाम आहेत.. तुम्ही काय बघताय तुम्ही कसे बोलताय तुमची आता कुवत आहे का.. (संजय राऊत) अशी वायफळ भाषा तुम्ही बोलू नका हे बिहार नाही.. *ही लोकशाही आहे इथे कायद्याचा धाक आहे अशी बडबड पुन्हा केली तर पुन्हा आत मध्ये जाऊन बसाल..संजय राऊत यांना रामदास कदम यांचा सल्ला..*
0
0
Report

राजेश क्षीरसागर ने मंत्रिपद न मिलने पर नाराजगी जताई

Kolhapur, Maharashtra:शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर यांनी मंत्रिपद न मिळाल्याबाबत उघडपणे नाराजी व्यक्त केली आहे. 2024 च्या निवडणुकीनंतर मंत्रिपदाची अपेक्षा होती, मात्र पक्षासाठी सातत्याने संघर्ष करूनही आपल्याला डावलण्यात आल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. 2022 मध्ये एकनाथ शिंदे यांच्या भूमिकेला कोल्हापुरातून सर्वप्रथम पाठिंबा दिल्याचे सांगत, पक्ष वाढीसाठी आपण मोठे कष्ट घेतल्याचा दावा त्यांनी केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर दोषारोप नसल्याचे स्पष्ट करत, अडीच वर्षांनंतर मंत्रिपद देण्याचे आश्वासन मिळाले असून त्याची अपेक्षा कायम असल्याचे क्षीरसागर म्हणाले. तसेच नवीन येणाऱ्यांपेक्षा जुन्या आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी आपण आग्रही असल्याचे त्यांनी सांगितले。
0
0
Report
Advertisement

न नागपुर नगर निगम चुनाव: निरीक्षक के अनुपस्थित रहने से कांग्रेस नगरसेवकों में नाराज़गी

Nagpur, Maharashtra:नागपूर परिषद पोटनिवडणूक मतदान सुरु असताना काँग्रेसमधील अंतर्गत नाराजी उघड झालीय निवडणूक निरीक्षक म्हणून नियुक्त झालेले ज्येष्ठ नेते नितीन राऊत मतदान केंद्रावर अनुपस्थित असल्याने काँग्रेसच्या नगरसेवकांनी नाराजी व्यक्त. महापालिकेतील काँग्रेस नगरसेवक विवेक निकोसे यांनी निरीक्षकांच्या गैरहजेरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. निवडणुकीसारख्या महत्त्वाच्या प्रक्रियेदरम्यान निरीक्षकांची उपस्थिती आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. भविष्यात निरीक्षकांची नियुक्ती करताना पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांनी अधिक काळजी घेण्याची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त. आगामी निवडणुकीत जबाबदार व कार्यकर्त्यांसाठी उपलब्ध राहणाऱ्या व्यक्तीची निरीक्षक म्हणून नियुक्ती करावी, अशी मागणी निकोसे यांनी व्यक्त केली. या संदर्भातील माहिती काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांना देणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. बाईट - विवेक निकोसे, काँग्रेस नगरसेवक
0
0
Report

मालेगांव-नाशिक: महायुती के उम्मीदवार के पक्ष में दमदार बयान, जीत की उम्मीद

Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकींग... - मी केवळ कागदोपत्री उमेदवार आहे ; मी महायुतीसोबतच.. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही.. - माहयुतीचाच विजय होणार ; मतदानाच्या अगोदर प्रसाद हिरे यांची प्रतिक्रिया.. - भारतीय जनता पक्ष म्हणून मला निवडणूक लढवायची होती, आणि निवडून यायचं होती..परंतु माझ्या नेत्यांनी दिलेल्या शब्दासाठी मी महायुतीसाठी जीवाचे रान करील..मी महायुतीबरोबर आहे..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मंत्री गिरीश महाजन यांच्या शब्दाच्या पलीकडे मी नाही..ही निवडणूक भाजपकडून लढवावी, आणि निवडून यावं अशी आशा होती..शिवसेनेने दिलेला उमेदवार कुचकामी आहे,अकार्यक्षम आहे ही वस्तुस्थिती आहे..पण आमच्याकडून युती धर्म म्हणून कुठलीही प्रतारणा होणार नाही.. महायुतीचाच उमेदवार विजयी होईल याची मला खात्री आहे..
0
0
Report

महायुती की एकजुटता बनाम सत्ता के बीच: सांगली-सातारा चुनाव में उठा शिंदे-शंकर का मुद्दा

Satara, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणुकीचे मतदान आज पार पडले. महायुतीचे उमेदवार धैर्यशील कदम आणि महाविकास आघाडीचे उमेदवार अभय जगताप यांच्यात थेट लढत झाली. संख्याबळाच्या गणितानुसार महायुतीचे पारडे जड मानले जात असले, तरी सातारा जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर निर्माण झालेली नाराजी आणि त्यातून मंत्री शंभूराज देसाई व मंत्री मकरंद पाटील यांची भूमिका काय राहणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले होते. मात्र मतदानाच्या दिवशी महायुतीने एकजुटीचे प्रदर्शन करत सर्व चर्चा थांबवण्याचा प्रयत्न केला. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्वाभिमानाचा मुद्दा पुन्हा उपस्थित करत महायुतीवर निशाणा साधला. जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीदरम्यान झालेल्या गदारोळानंतर महायुतीतील नाराजी उघडपणे समोर आली होती. मंत्री शंभूराज देसाई यांनी "येऊ नको तर कोणत्या गाडीत बसू अशी आमची अवस्था झाली आहे," असे वक्तव्य करत आपली नाराजी बोलून दाखवली होती. त्यामुळे विधान परिषद निवडणुकीत या नाराजीचा परिणाम दिसणार का, याची उत्सुकता राजकीय वर्तुळात होती. मात्र निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी हस्तक्षेप करत महायुतीचा उमेदवार कोणत्याही परिस्थितीत विजयी झाला पाहिजे, असा स्पष्ट संदेश दिला. त्यानंतर मंत्री मकरंद पाटील आणि मंत्री शंभूराज देसाई यांनी बैठका घेऊन आपल्या सदस्यांना युतीधर्म पाळण्याच्या सूचना दिल्या. मतदानाच्या दिवशी महायुतीची ताकद दाखवण्यासाठी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, खासदार उदयनराजे भोसले आणि उमेदवार धैर्यशील कदम एकत्र दिसले. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि मित्रपक्षांचे सदस्य एकत्र आणत महायुतीने एकसंघतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला. या वेळी मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी महायुतीच्या विजयाबाबत पूर्ण विश्वास व्यक्त केला. आमच्याकडे असलेल्या मतांपेक्षाही अधिक मतदान मिळेल आणि महायुतीत कोणतेही मतभेद नाहीत, असा दावा त्यांनी केला. एकीकडे महायुती एकजूट दाखवत असताना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी मात्र जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी महायुतीचाच उमेदवार व्हावा म्हणून आम्ही सहकार्याची भूमिका घेतली होती. मात्र तुमच्याच मित्रपक्षाने तुम्हाला होऊ दिले नाही. त्या संघर्षात महिला सदस्यांच्या मनात निर्माण झालेली खंत आजही कायम आहे, असे शिंदे म्हणाले. स्वाभिमानाला ठेच पोहोचते तेव्हा पक्ष, विचारधारा किंवा धर्म पाहिला जात नाही. त्यावेळी एकच धर्म असतो, तो म्हणजे स्वाभिमान, असा पलटवार करत शिंदे यांनी महायुतीतील नाराजीच्या जखमा अद्यాపभर नाहीत असे सूचीत केले. महायुतीतील नाराजीच्या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी आज भाजप नेत्यांनी प्रयत्न केले मात्र शशिकांत शिंदे यांनी पुन्हा स्वाभिमानाचा मुद्दा उपस्थितल्याने जिल्हा परिषद अध्यक्षपदाच्या निवडणुकीतील वाद अजूनही राजकीय चर्चेच्या केंद्रस्थानी असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता या निवडणुकीच्या निकालातून महायुतीची एकजूट किती भक्कम आहे, याचे उत्तर निकालानंतर मिळणार की महाविकास आघाडीला महायुतीतील वादाचा अप्रत्यक्ष फायदा होणार हे पहावे लागणार आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई-पुणे एक्सप्रेसवे के आडोसी बोगद्य के पास खतरे वाले पत्थर हटाकर सुरक्षा मजबूत

Varsoli, Maharashtra:मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरील आडोशी बोगद्याजवळील सुरक्षा जाळीत अडकलेले दगड काढण्यात यश. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर डोंगरकड्यावरील धोकादायक दगड आणि दरडी हटविण्याचे काम प्रशासनाकडून सुरू होते. त्यासाठी आज दुपारी १२ ते ४ या कालावधीत विशेष ब्लॉक घेऊन मुंबईकडील आणि पुण्याकडील वाहतूक पर्यायी मार्गांवर वळविण्यात आली होती. या कारवाईदरम्यान धोकादायक दगड सुरक्षितपणे पाडण्यात प्रशासनाला यश मिळाले असून उर्वरित कामही अंतिम टप्प्यात पोहोचले आहे. त्यामुळे आगामी पावसाळ्यात एक्सप्रेस वे वरील प्रवास अधिक सुरक्षित होण्यास मदत होणार आहे...
0
0
Report

नाशिक विधान परिषद चुनाव: नरेंद्र दराडे को भारी समर्थन, जीत के संकेत

Yeola, Maharashtra:नाशिक विधान परिषदेसाठी आज मतदान होत असून महायुतीचे उमेदवार नरेंद्र दराडे यांचे बंधू आ. किशोर दराडे यांनी येवला येथील मतदान केंद्रावर भेट दिली.. या भेटीदरम्यान महायुतीचे उमेदवार व बंधू नरेंद्र दराडे हे ५०० हून अधिक मताने निवडून येतील, सुरुवातीला झालेल्या बंडखोरीचा कुठलाही परिणाम मतदारांवर होणार नाही, मतदार हे सुज्ञ असतात त्यामुळे नरेंद्र दराडे यांचा चांगल्या मताने विजय होईल असा दावा आ. किशोर दराडे यांनी केला आहे.. आणि जे उमेदवार सुरुवातीला रिंगणात होते त्यांनी नरेंद्र दराडे यांना पाठिंबा दिलेला आहे.. त्यामुळे नाशिकची जागा महायुती जिंकेल.. त्याचप्रमाणे राज्यातील इतरही महायुतीचे सर्व उमेदवार विजयी होतील असाही दावा आ. किशोर दराडे यांनी केला आहे. यासंदर्भात आमदार किशोर दराडे यांच्यासोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

पुणे के रांजणगांव में 3 साल के बच्चे की हत्या, प्रेमी गिरफ्तार

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील रांजणगाव औद्योगिक वसाहतीत एका ३ वर्षांच्या चिमुकल्या मुलाची निर्घृण हत्या करण्यात आलीय. आईसोबत लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या २० वर्षांच्या नराधम प्रियकरानेच या निष्पाप बालकाचा जीव घेतलाय. मृत मुलगा, त्याची आई आणि आरोपी हे रांजणगाव परिसरात एकत्र राहत होते. या मुलाला त्याच्या वडिलांकडे सोडून ये', असा तगादा आरोपीने या महिलेकडे लावला होता. आज सकाळी मुलाची आई कंपनीत कामावर गेली, त्याच वेळी घरात एकट्या असलेल्या ३ वर्षांच्या चिमुकल्याची आरोपीने दारू च्या नशेत निघृरपने हत्या केली. या क्रूर घटनेमुळे रांजणगाव परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. पोलिसांनी तातडीने देवांशी साहू या २० वर्षीय नराधम आरोपीला ताब्यात घेतले असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत से जुड़ी मांग: क्या उन्हें इस्तीफा देना चाहिए?

Beed, Maharashtra:खासदार ज्योती वाघमारे ... तोंड पाटीलकी करणाऱ्या संजय राऊत यांना उत्तर तोंड सांभाळून बोला अन्यथा तोंड कसे फोडायचे हे शिकवण्याची गरज नाही तुम्हाला तुमचे खासदार सांभाळता येत नाही नाचता येईना अंगण वाकडे असे झाले आहे मुख्यमंत्री पदासाठी काँग्रेस और राष्ट्रवादीला डोळे मांडत होता शिंदे साहेब ढाण्या वाघ आहेत तुम्हाला केवळ खासदार नाही सोल्ड तर जनतेनं सुधा सोडले आहे तुम्ही कुणाला दलाल म्हणता तुम्ही कुणाची दलाली करता तुमच्या खासदारांना काँग्रेस मध्ये विलीन करणाची भीती वाटली म्हणून त्यांनी सोडलं तुमच्या केवळ तोंडांत दम आहे पत्रकार परिषद घेऊन बोलण्या पेक्षा निवडणूक लढा मौदनात उतरा तुम्ही कुठेच प्रचारात बाहेर पडले नाही केवळ मुम्बईत राहिला तुमच्या कार्यकर्त्यांना वाऱ्यावर सोडले तुमची दार बंद केली त्यामुळे लोक सोडून गेली कावळ्याच्या शापाने गाय कधीच करत नसते खासदारांची भांडण तुम्हाला सोडवता येत नाही राऊत यांनी राजीनामा द्यावा मग समोर यावं नेतृत्वाने कार्यकर्त्यांसाठी रिच व्हावे घरातली धुणी घरात ठेवावी व्हिप देखील खासदार जुमानत नाही
0
0
Report

बीड़ में उद्धव ठाकरे की शिवसेना, छह सांसदों के बगावत के बाद प्रदर्शन तेज

Beed, Maharashtra:बीड : बीडमध्ये उद्धव ठाकरेंची शिवसेना आक्रमक; सहा खासदारांच्या बंडखोरीनंतर बीडमध्ये ठाकरे सेनेचा संताप, प्रतीकात्मक पुतळे जाळून तीव्र निषेध..! Anc - उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील सहा खासदारांनी बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. शिंदे गटाच्या कथित ‘मिशन टायगर’ची चर्चा सुरू असतानाच बीडमध्ये ठाकरे समर्थक शिवसैनिक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. बंडखोर खासदारांविरोधात शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्यांचे दहन केले. यावेळी कार्यकर्त्यांनी तीव्र संताप व्यक्त करत संबंधित खासदारांच्या भूमिकेचा निषेध नोंदवला. आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी इशारा देत, “या सहा खासदारांना बीड जिल्ह्यात येऊ देणार नाही,” अशी भूमिका मांडली. त्यामुळे या बंडखोरीचे पडसाद आता रस्त्यावरही उमटू लागल्याचे चित्र दिसून येत आहे. बाईट : गणेश वरेकर, जिल्हाध्यक्ष, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे)
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top