445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सोलापुर के मालशिरस में पुल से गाड़ी गिरने से तीन की मौत
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील नातेपुते जवळ निरा उजवा कालव्याच्या पुलावरून एक ईरटीका गाडी कालव्यात पडले असून त्यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला आहे. ही मुंबईवरून फोंडशिरस कडे जाणारी जात असताना थेट कालव्यात पडली. यात तीन जण गाडीत अडकले असून ते मयत झाल्याची घटना घडली आहे. पाटबंधारे खात्याचे शाखाअधिकारी घटनास्थळी पहाटेपासून हजर असून फाॅकलेनद्वारे गाडी कुठे अडकली हे शोधले जात आहे. गाडीत प्रवाशी मूळचे सातारा जिल्ह्यातील दूधबावी येथील असून ते मुंबई येथे नोकरी निमित्त स्थायिक झाले आहेत. फोंडशिरस येथे येत असताना आज पहाटे पाचच्या सुमारास ही घटना घडली आहे. गाडी चालक सुनील टिळेकर हा बचावला असून या गाडीत त्याची पत्नी व सासू, सासरे मयत झाले आहेत.0
0
Report
वाशीम के उमरदरी गांव में जियो मोबाइल टॉवर के विद्युत कक्ष में आग, तकनीकी खराबी से लगी
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या उमरदरी गावात जिओ कंपनीच्या मोबाईल टॉवरशी संबंधित विद्युत खोलीला आग लागल्याची घटना घडली.ही आग तांत्रिक बिघाडामुळे लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.घटनेमुळे काही काळ गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.स्थानिक नागरिकांनी तत्काळ याची माहिती संबंधित यंत्रणेला दिल्यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यात आली.या घटनेमुळे टॉवरचा वीज पुरवठा खंडित झाला असून परिसरातील मोबाईल सेवांवर त्याचा परिणाम झाला आहे0
0
Report
जुनार में अनियमित बारिश से किसानों के कांदे पानी में डूबे
Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यातील रामवाडी पारगाव परिसरात अवकाळी पावसाने शेतकऱ्यांना अक्षरशः हवालदिल केलं आहे. कष्टाने उभं केलेलं कांद्याचं पिक पाण्यात जात असून, शेतात काढून ठेवलेला कांदा पावसात भिजत आहे. डोळ्यासमोर मेहनतीचं नुकसान होत असताना, नाईलाजाने शेतकऱ्यांना घराचा आश्रय घ्यावा लागत आहे. पावसाने शेतकऱ्यांची ही दैनीय अवस्था निर्माण केली आहे.0
0
Report
Advertisement
सोलापुर में मागासवर्गीय शिक्षकों के मुंडन आंदोलन को लेकर प्रशासन पर दबाव बढ़ा
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू झालेल्या आंदोलनाची दखल घेत नसल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटना करणार मुंडन आंदोलन - गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या आंदोलनाची दखल प्रशासन घेत नसल्याने मागासवर्गीय शिक्षक संघटना आक्रमक - अक्कलकोट तालुक्यातील गटशिक्षण अधिकाऱ्यांच्या विरोधात जिल्हा परिषदेच्या बाहेर सुरु आहे आंदोलन - विभागीय आयुक्तांचे अधिकार वापरून शिक्षकांच्या बदल्या केल्याचा गटशिक्षण अधिकाऱ्यांवर आरोप - प्रशासनाने आंदोलनाची दखल न घेतल्यास लवकरच मुंडन आंदोलन करण्याचा इशारा0
0
Report
बिबट्या ने मोटरसाइकिल सवार युवक पर हमला; युवक बचाव कर अस्पताल में भर्ती
Shirur, Maharashtra:आंबेगाव तालुक्यातील लोणी धामणी परीसरात मोटार सायकलवरून चाललेल्या अक्षय विधाटे या पंचवीस वर्षीय तरुणावर बिबट्याने हल्ला केला. यामध्ये अक्षय थोडक्यात बचावला असून प्राथमिक उपचारासाठी त्याला मंचर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे.0
0
Report
लातूर में स्ट्रीट लाइट बंद, दुर्घटनाओं में वृद्धि पर नागरिकों ने रात में विरोध प्रदर्शन किया
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... किल्लारीत स्ट्रीट लाईट बंद... अपघातांच्या घटनांमध्ये वाढ.. नागरिकांचा संताप... रात्री रस्त्यावर उतरून आंदोलन... ‘बोंब मारो’ आंदोलन करत प्रशासनाचा निषेध... AC ::- लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथे नागरिकांचा संताप उफाळून आला आहे... लातूर–उमरगा राज्य महामार्गावर गेल्या अनेक दिवसांपासून स्ट्रीट लाईट बंद असल्यामुळे वारंवार अपघात घडत असल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे... वारंवार तक्रारी करूनही प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे... याच पार्श्वभूमीवर रात्री किल्लारीतील नागरिक आक्रमक होत थेट रस्त्यावर उतरले... प्रशासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत ‘बोंब मारो’ आंदोलन करत निषेध व्यक्त करण्यात आला... तसेच, प्रशासनाने या आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी, अन्यथा यापुढे याहून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही नागरिकांनी दिला आहे...0
0
Report
Advertisement
नागपुर में रिश्वत मांगने का मामला: एसीबी ने उपव्यवस्थापक और लिपिक को गिरफ्तार किया
Nagpur, Maharashtra:नागपूर हात गमावलेल्या कर्मचाऱ्याकडून अडीच लाखांची लाच मागितल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, मनुष्यबळ विकास विभागाचे उपव्यवस्थापक आणि लिपिक एसीबीच्या जाळ्यात, MIDC पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. वैद्यकीय बिल मंजुरी आणि एरिअर्स देण्यासाठी लाचेची केलीं होती मागणी कर्तव्यावर असतांना अपघातात कर्मचाऱ्याने गमावला होता उजवा हात संबंधितांना मदत करण्याऐवजी लाच मागितल्याने संताप, तक्रारदाराने एसीबीकडे धाव घेत केली तक्रार, तक्रारीची पडताळणी करून एसीबीने सापळा रचला तक्रारदाराच्या घरीच कारवाई करत आरोपी रंगेहाथ पकडले अडीच लाखांची रक्कम स्वीकारताना उपव्यवस्थापक अटक, कनिष्ठ लिपिकाचाही सहभाग उघड0
0
Report
सतारा के महिला डॉक्टर आत्महत्या मामले में पुलिस उप निरीक्षक गोपाळ बदने जमानत पर बाहर
Satara, Maharashtra:सातारा -फलटण येथील महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात अटकेत असलेल्या पोलिस उपनिरीक्षक गोपाळ बदने याला कोल्हापूर सर्किट बेंच न्यायालयाने ५० हजारांच्या वैयक्तिक बॉण्डवर जामीन मंजूर केला आहे. बदने गेल्या पाच महिन्यांपासून अटकेत होता. २३ ऑक्टोबर २०२५ रोजी फलटण येथे एका महिला डॉक्टरने हॉटेलमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली होती. मृत्यूपूर्वी तिने आपल्या हातावर बदने आणि प्रशांत बनकर यांची नावे लिहून मानसिक आणि शारीरिक छळाचा आरोप केला होता. त्यानंतर दोघांना पोलिसांनी अटक केली होती. जामीन मंजूर करताना न्यायालयाने काही अटी घातल्या असून साक्षीदारांवर दबाव न आणणे, पुराव्यांमध्ये फेरफार न करणे आणि सुनावणीस हजर राहणे बंधनकारक केले आहे. अटींचे उल्लघन झाल्यास जामीन रद्द करण्याचा इशाराही न्यायालयाने दिला आहे.0
0
Report
यवतमाल में गैस सिलिंडर वितरण में अराजकता; शहर-ग्रामीण में प्रतीक्षा बढ़ने से आक्रोष
Yavatmal, Maharashtra:यवतमाळात जिल्ह्यात गॅस सिलिंडर वितरणाचा पूर्णतः बोजवारा उडाल्याने एका संतप्त गाणी चक्क सिलेंडर फेकून देत प्रशासनाचा निषेध नोंदविला आहे. शहरी भागात तब्बल २५ दिवसांनी तर ग्रामीण भागात ४५ दिवसांनी गॅस सिलिंडर मिळत असल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे. ऑनलाइन नोंदणी करूनही गॅस मिळत नसल्याने ग्रामीण भागातील ग्राहक शहराकडे धाव घेत आहेत.0
0
Report
Advertisement
मुंबई गोवा महामार्ग पर नागोठणे के पास बस पलटी, दो की मौत, 8 घायल
Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्ग पर नागोठणे के पास सुकेळी खिंडीत हुए हादसे में दो लोगों की घटनास्थल पर मौत हो गईं, 8 लोग घायल हो गए। घायल नागोठणे के सरकारी अस्पताल में उपचार कर रहे हैं। सुबह के समय यह हादसा हुआ। एक निजी ट्रैवल्स कंपनी की बस 38 यात्रियों को गोवा की तरफ ले जा रही थी, चालक का नियंत्रण खो गया और बस पलट गई। हादसे के बाद कोकण की ओर जाने वाली यातायात कुछ समय के लिए बाधित रही।0
0
Report
शिरुर के कान्हूर पाबळ क्षेत्र में भारी बारिश से गेहूं-आलू की फसलें बर्बाद, किसान संकट में
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील कान्हूर पाबळ परिसराला ढगफटी सदृश्य पावसाने झोडपल्याने काढणीला आलेला गहू कांदा या पिकांचे प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी मोठ्या संकटात सापडलाय. या पावसाने शेतांना तळ्याचं स्वरूप आलं असून काढून ठेवलेला कांदा पूर्णपणे पाण्यात भिजल्याने हा ही कांदा आता खराब होणार असल्याने शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढलीय. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडिया शिरूर पुणे..0
0
Report
वाघों के आवास खतरे में: मानवी हस्तक्षेप और जंगल कटाई से मानव-वन्यजीव संघर्ष बढ़ा
Yavatmal, Maharashtra:वाघांच्या अधिवासात मानवी हस्तक्षेप, जंगलतोड आणि शहरीकरणामुळे वन्यजीवांचे नैसर्गिक क्षेत्र कमी होऊन मानव-वन्यजीव संघर्ष (Human-Wildlife Conflict) वाढला आहे. यामुळे वाघांचा अधिवास नष्ट होऊन ते अन्नाच्या शोधात मानवी वस्तीत शिरतात, परिणामी वाघांचे हल्ले आणि त्यांच्या शिकारीच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे [१०, ११, १२]. महाराष्ट्रात, विशेषतः ताडोबा आणि टिपेश्वरसारखी भागात, वाघांच्या वाढत्या संख्येमुळे अधिवासावर ताण येऊन हा संघर्ष तीव्र झाला आहे0
0
Report
Advertisement
महानगरपालिका में स्वीकृत सदस्य: टिकट नहीं पाने वाले समर्थकों की दावेदारी तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महानगरपालिकेत स्वीकृत सदस्य म्हणून समाजातील विविध क्षेत्रांतील दिग्गजांना संधी मिळणे अपेक्षित आहे. मात्र छत्रपती संभाजी नगरात हा मार्ग पराभूत आणि निष्ठावान नेत्यांसाठी वापरला जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. बुधवारी रात्री उशिरापर्यंत झालेल्या अर्जाच्या छानणीत ५२ अर्ज वैध ठरले. आता या जागांवर वर्णी लावण्यासाठी राजकीय नेत्यांमध्ये रस्सीखेच सुरू झाली आहे....कायद्यानुसार स्वीकृत सदस्यपदी डॉक्टर, वकील, इंजिनिअर किंवा निवृत्त प्रशासकीय अधिकारी यांची निवड होणे अपेक्षित असते. मात्र, ८० अर्जापैकी बहुतांश अर्ज हे अशा कार्यकर्त्यांचे आहेत ज्यांना मुख्य निवडणुकीत तिकीट मिळाले नाही किंवा जे निवडणुकीत पराभूत झाले आहेत. विशेष म्हणजे, प्रशासनाकडून १८० जणांनी अर्ज नेले होते, पण प्रत्यक्ष राजकीय गॉडफादरचा पाठिंबा असलेल्या ८० जणांनीच हिंमत दाखवली. पराभूत, तिकीट न मिळालेले आणि नेत्यांचे जवळचे पुत्र बहिणी असे सगळे या स्वीकृत सदस्यांच्य इच्छुकांच्या यादीत आहेत...येत्या सर्वसाधारण सभेत स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर होणार आहेत...0
0
Report
सोलापुर के नए जिलाधिकारी के तौर पर एस. कार्तिकेयन आज पदभार संभालेंगे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची बदली तर नवे जिल्हाधिकारी म्हणून एस. कार्तिकेयन आज स्वीकारणार पदभार - सोलापूरचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची नागपूर येथे जिल्हाधिकारी म्हणून बदली - तर कोल्हापूर जिल्हा परिषदेचे सीईओ एस. कार्तिकेयन आज सोलापूरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून स्वीकारणार पदभार - गुरुवारी सायंकाळी राज्य सरकारच्या सामान्य प्रशासन विभागाच्या वतीने काढण्यात आले आदेश - एस. कार्तिकेयन हे मूळचे तामिळनाडूचे असून 2020 च्या बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत - एस. कार्तिकेयन आज दुपारी बारा वाजता सोलापूर जिल्हाधिकारी पदाचा स्वीकारणार पदभार0
0
Report
नरभक्षी बाघ के कहर से तीन जगहों पर मौत, माया सोनवाने की दर्दनाक मौत
Bhandara, Maharashtra:अखेर माया सोनवानेची मृत्यूशी झुंज संपली.... उमरझरी शेतशिवारात वाघाच्या हल्ल्यात झाली होती गंभीर तीन घटनांमध्ये दोघांचा बळी, परिसरात आक्रोश साकोली तालुका हादरला असून पंधरवाड्यातच नागझिरा वन्यजीव अभयारण्यातील लाखनी वनपरिक्षेत्राअंतर्गत येणाऱ्या बाम्पेवाडा, उमरझरी व आमगाव बुज अशा लागोपाठ तीन ठिकाणी तिघांवर या नरभक्षी वाघाने जीवघेणे हल्ले केल्याने परिसरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. विशेष म्हणजे यातील बाम्पेवाड़ा येथील पहिल्या घटनेतील वसंत मेश्राम या शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. आमगाव बुज येथील महिलेवर पुन्हा एकदा वाघाचा जीवघेणा हल्ला झाल्याची घटना ताजी असतांनाच त्याचदिवशी दुसऱ्या घटनेतील उमरझरी येथील गंभीर जखमी महिलेची नागपूर येथे उपचारादरम्यान मृत्यूशी झुंज संपली . माया रामकृष्ण सोनवाने वय ५५ असे या गरीब शेतकरी महिलेचे नाव असून या घटनेमुळे सोनवाने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. उमरझरी गाव नागझिरा वन्यजीव अभयारण्यालगत आहे. या परिसरात अन्य वन्य प्राण्यांसह हिंस्त्र प्राण्यांचा संचार असतो. वन्यप्राण्यांच्या हैदोसाने व आता नरभक्षी वाघाच्या हैदोसाने शेतकरी, पशुपालक व नागरिकांमध्ये चांगलीच धडकी भरली आहे,0
0
Report
Advertisement
