Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JMJAVED MULANI
Mar 01, 2026 07:18:27
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 01, 2026 07:18:11
Shirdi, Maharashtra:भाजपचे विवेक कोल्हे यांच्या Indian Farmers Fertiliser Cooperative Limited ( IFFCO ) संचालक पदावरून मोठा वाद... इफकोचे जनरल बॉडी सदस्य तथा सहकार भारती प्रदेश सचिव नकुल कडू यांचा गंभीर आरोप... खोट्या कागदपत्रांच्या आधारे जनरल बॉडी सदस्यत्व व संचालक पद मिळवल्याचा दावा... सहकार रत्न शंकरराव कोल्हे शेतकरी सहकारी संघ मार्फत प्रतिनिधित्व दाखवल्याचा आरोप.. संबंधित संस्थेचे संचालक किंवा चेअरमन नसल्याची माहिती RTI मधून समोर आल्याचा दावा... प्रकरणाची सुनावणी केंद्रीय निबंधकांकडे सुरू... नवी दिल्ली येथे लेखी तक्रार दाखल... कोल्हे यांचे सदस्यत्व व संचालक पद रद्द करण्याची मागणी.... भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या अडचणी वाढणार..
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 07:16:13
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला पंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप, वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून कार दामटली पुढे, बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतल्यानंतर चार किलोमीटर दूर गाडी सोडून आसेकर यांनी काढलाय पळ, सध्या तरी आसेकर आहेत बेपत्ता अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा शहरात स्वतःला pंतप्रधान घोषित केलेल्या महादेव आसेकर नामक व्यक्तीचा प्रताप पुढे आलाय. वरोरा शहरातील रत्नमाला चौकातील पोलिसांची नाकाबंदी तोडून त्याने कार पुढे दामटली. फॉर्च्यूनर कार बॅरिकेड तोडून वेगाने पुढे नेल्यावर बंदोबस्ताला असलेल्या पोलीस आणि नागरिकांनी गाडीमागे धाव घेतली. आसेकर याने चार किलोमीटर दूर गाडी पार्क करत पळ काढलाय. पोलिसांनी पीएम लिहिलेली ही गाडी सध्या ताब्यात घेतली आहे. आसेकर यांचा प्रताप माध्यमांमध्ये वायरल झाल्यानंतर पोलीसही त्याच्या मागावर होते. मात्र आता गाडी व वादग्रस्त आसेकर दोन्हीही पोलिसांच्या रडारवर आलेत. सध्या तरी आसेकर यांच्यावर नियमभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून ते गाडी सोडविण्यासाठी ठाण्यात आलेले नाहीत. ------ viral video---- अॅशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 01, 2026 06:48:29
Mumbai, Maharashtra:अमेरिका इराण इस्रायल च्या युद्धात खामोनी आणि त्यांचे कुटुंब ठार झाल्याची बातमी आहे - मोदी २ दिवसांपूर्वी इस्रायल मधून आले,इराण भारताचा मित्र होता, इस्रायल देखील आहे - काश्मीर प्रश्नावर भारताच्या बाजूने इराण उभा राहिला - अत्यंत स्वस्त दरात तेल देत होता इराण - या युद्धात भारताने एक भूमिका घेणे आवश्यक, मोदी ट्रम्प आणि नेत न्याहु यांचे मित्र त्यांनी युद्ध थांबवायला हवं होते - भारत आणि पाकिस्तान युद्ध ट्रम्प थांबवू शकतात तर मोदी इस्रायल इराण अमेरिका युद्ध का थांबवू शकत नाही याचे उत्तर द्यावे - हे अत्यंत घातक आहे, आता इराणवर अमेरिका इस्रायल ताबा घेतील, हळू हळू पावले भारताकडे वळतील - भारताने केलेल्या ट्रेड डील करून गुलाम झाला आहे - पाकिस्तान ला शस्त्र पुरविण्याचे काम राष्ट्राध्यक्ष ट्रम्प करतात - भारताचे परराष्ट्र धोरण काय आहे? की फक्त परदेशात जाऊन मोठ्या मारायच्या आणि भारतात फोटो पाठवायच्या - इतके मोठे युद्ध सुरू आहे मोठा परिणाम होईल - हे युद्ध भारताच्या दारापर्यंत आले आहे, भूगोल बदलण्याची शक्यता, भारताला चटके बसतील, तरी मोदी इस्रायलला गेले आणि दुसऱ्या दिवशी मोदी गेले, - पर्यटक अडकून पडले आहेत, विमानतळावर हल्ला झाला आहे, भारतीय परराष्ट्र खात आता काय करणार? - पुण्यातले एक कुटुंब तिकडे अडकले - अमेरिका इस्रायल कोणत्याही देशाला ताबा घेतील ऑन पुतळा - लूटियन काही राजकारणी नव्हते, Madam कामा यांनी काँग्रेसची स्थापना केली - C राजगोपाल चारी हे काँग्रेसचे नेते त्यामुळे त्यांचा पुतळा आता लावला - पटेल नावाच्या एका आर्किटेक्टकडून त्यांनी नवीन भवन बनवलं - मोदी विदेशी घड्याळ आणि गाड्या का वापरतात? इंग्लडच्या प्राईम मिनिस्टरला मीठ्या का मारतात? ऑन अजित पवार मृत्यू अहवाल - या विषयांवर रोहित पवार अत्यंत अभ्यासूपणे बाजू मांडत आहेत
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 01, 2026 06:46:06
Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपुरात नाविन्यपूर्ण योजनेतून एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्पाचा उपक्रम, विद्यार्थी शैक्षणिक सहलीस जिल्हाधिकाऱ्यांची हिरवी झेंडी अँकर:-- चंद्रपूर एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प आयोजित विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक सहलीचा शुभारंभ जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते शासकीय आश्रमशाळा, बोर्डा येथून हिरवी झेंडी दाखवून  करण्यात आला.  २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०२६ या कालावधीत चंद्रपूर व चिमूर प्रकल्पांतील शासकीय व अनुदानित आश्रमशाळांमधील एकूण ४९ विद्यार्थी व ५ शिक्षक अभ्यास सहलीस रवाना झाले आहेत. आदिवासी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी तसेच प्रत्यक्ष अनुभवातून शिक्षण मिळावे, या उद्देशाने या सहलीचे आयोजन करण्यात आले आहे.. विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी गौडा यांनी शिक्षणासोबतच नवीन ठिकाणांची ओळख, विज्ञान, इतिहास व संस्कृतीचा प्रत्यक्ष अभ्यास करण्याचे महत्त्व अधोरेखित केले. अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो व करिअरविषयक दृष्टीकोन व्यापक होण्यास मदत होते, असे त्यांनी नमूद केले. आदिवासी विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या संधी उपलब्ध करून देणे हे प्रशासनाचे प्राधान्य असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. शैक्षणिक सहलीदरम्यान विद्यार्थी राष्ट्रपती भवन, संसद भवन, ताज महल तसेच मथुरा, जयपूर, जोधपूर व उदयपूर येथील ऐतिहासिक स्थळांना भेट देणार आहेत. या स्थळांबाबतची ऐतिहासिक व सांस्कृतिक माहिती विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. विद्यार्थ्यांनीही या उपक्रमाबद्दल आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. या सहलीचे संचालन प्रकल्प अधिकारी विकास राचेलवार यांच्या नेतृत्वाखाली होत असून सहलीस जाणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रकल्प कार्यालयामार्फत ब्लेझर, शूज, बॅग व कॅपचे वाटप करण्यात आले.
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 01, 2026 06:33:01
Mumbai, Maharashtra:डिजिटल युगात लहान मुलांच्या हातात लवकर मोबाईल पडतोय त्यामुळे मैदानी खेळ, चित्रकला लोप पावत चालल्याची मुंबईच्या महापौरांनी खंत व्यक्त केली. माझी मुंबई या संकल्पनेवर आधारित जागतिक कीर्तीचे व्यंगचित्रकार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे बालचित्रकला स्पर्धा २०२५-२६ चे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी आयोजन केल. घाटकोपर येथील आचार्य अत्रे मैदानात बालचित्रकार विद्यार्थ्यांसोबत महापौर तावडे यांनी ही स्वतः चित्र काढून बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.. मुंबई महानगरातील विद्यार्थ्यांना ' तारे जमीन पर ' या चित्रपटाच्या धर्तीवर निसर्गाच्या सानिध्यात चित्रे रेखाटण्याबरोबरच रुपये साडेआठ लाखांची बक्षिसे मिळण्याची संधी उपलब्ध करून दिलीय. मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध ५१ ठिकाणी प्रामुख्याने उद्याने, मैदाने येथे आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेचे हे १७ वे वर्ष आहे. इयत्ता १ ली ते इयत्ता ९ वीचे महानगरपालिका शाळा व खाजगी अनुदानित/विनाअनुदानित शाळांतील विद्यार्थी सहभागी झालेले आहेत. विद्यार्थ्यांनी अतिशय सुंदर चित्रे रेखाटली.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Mar 01, 2026 05:07:42
Beed, Maharashtra:बीड़: दो गुटों के विवाद मिटवाने हेतु वर्तमान पत्र कार्यालय में बैठक चल रही थी; विवाद विकोपाला और जमाव ने कार्यालय में तोड़फोड़ की घटना सामने आई। बीड़ शहर के एक दैनिक समाचार कार्यालय में प्लॉटिंग के कारण उत्पन्न हुए वादों को शांत कराने के लिए एडिटर शेख मुजीब के केबिन में बैठक चल रही थी। इस दौरान दोनों गुटों को समझाने का प्रयास किया गया, पर बातचीत के बीच दोनों गुट आक्रमक हो गए और एक-दूसरे पर जबर मारपीट की गई। जमाव ने कार्यालय के इलेक्ट्रॉनिक सामान और काँच की तोड़फोड़ भी की। पुलिस घटनास्थल पर पहुंची और CCTV फुटेज के आधार पर आगे की कार्रवाई शुरू है। अफवाहें फैलने से रोकने के लिए बीड़ पुलिस ने लोगों से विश्वास न करने की अपील की है।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 01, 2026 04:46:28
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली में भारत विरुद्ध इरान कुस्ती स्पर्धा में इरान के पहलवान ने बाज़ी मारकर छत्रपति केसरी किताब जीती। सांगली के कुस्ती प्रेमी ग्रुप की तरफ से भव्य कुश्ती मैदान आयोजित किया गया था, जिसमें भारत केसरी शेरा गुज्जर बनाम मिर्जा इरान के बीच प्रमुख कुश्ती हुई। लगभग आधे घंटे चली इस कुश्ती में मिर्जा इरान ने शेरा गुजर पर कब्जा कर छत्रपति केसरी किताब जीती। डबल महाराष्ट्र केसरी के चंद्रहार पाटिल ने किताब पहनाई। महिला वर्ग में प्रतीक्षा बागड़ी बनाम सोनाली मंडालिक के बीच मुकाबला हुआ, पर कुश्ती बराबरी पर टल गई; टॉस सोनाली के पक्ष गया और राजमाता जिजाऊ केसरी किताब मिली। सांगली के कृष्णा नदी के सरकारी घाट पर कुश्तियाँ आयोजित थीं, देखने वालों की भारी भीड़ जुटी थी।
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 01, 2026 04:33:11
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 01, 2026 04:31:59
Satara, Maharashtra:सातारा:खंडाळा तालुक्यातील भादे गावाच्या हद्दीत सिद्धेश्वर मंदिराजवळील एका शेतात बेकायदेशीररीत्या अफूची लागवड केल्याचा प्रकार शिरवळ पोलिसांनी उघडकीस आणला आहे. या कारवाईत पोलिसांनी ७ किलो ९१५ ग्रॅम वजनाची अफूची बोंडे आणि झाडे जप्त केली असून, त्याची किंमत १ लाख ९७ हजार ८७५ रुपये इतकी आहे. याप्रकरणी एका ६३ वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयित आरोपीच्या शेतात छापा टाकला असता,तिथे ६३ वर्षीय संशयित आरोपीने आपल्या दोन वेगवेगळ्या शेतांमध्ये अफूची लागवड केल्याचे निदर्शनास आले. नायब तहसीलदार दत्तात्रय गवारी यांच्या उपस्थितीत हा सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी संबधित इसमावर अंमली पदार्थ विरोधी कायदा NDPS च्या कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 01, 2026 04:31:31
Satara, Maharashtra:फलटण _ कथित गैरवर्तनाचा बदला घेण्यासाठी खोटे इन्स्टाग्राम अकाउंट तयार करून एका तरुणाला प्रेमाच्या जाळ्यात ओढत त्याचा खूनण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. फलटण तालुक्यातील गोखळी येथील नीरा नदीपात्रात मृतदेह आढळून आला होता. या प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिसांनी एकाच कुटुंबातील चौघांना अटक केली आहे.अंकुश नरबट राहणार माण असे मृत तरुणाचे नाव आहे. संशयितांनी महिलेच्या नावाने बनावट सोशल मीडियावरून संपर्क साधत १५ फेब्रुवारी रोजी त्याला फलटण येथे बोलावले. तातमगिरी डोंगराच्या पायथ्याशी नेऊन मारहाण केल्यानंतर त्याचा खून करून मृतदेह नीरा नदीत फेकण्यात आला.सीसीटीव्ही फुटेज आणि मोबाईल तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावत अविष्कार भगत, श्रद्धा भगत, ज्ञानेश्वर भगत आणि अर्चना भगत यांना अटक केली आहे.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 01, 2026 04:18:59
Pandharpur, Maharashtra:लावणी म्हटली की फक्त पुरुषांनीच पाहण्याचा कार्यक्रम अशी समजूत अकलूजच्या जयसिंह मोहिते पाटील यांनी बाजूला केली. पहिल्यांदा आई आणि आता पत्नीच्या हस्ते राज्यस्तरीय लावणी स्पर्धेच उद्घाटन केलं. लावणी हा सर्वांनी एकत्र पाहण्याचा महाराष्ट्राची लोककला असल्याचे पुढे आणले. लावणी कलावंताना चार भिंती मधून थेट रंगमंचावर आणण्यासाठी जयसिंह मोहिते पाटील यांनी पहिल्यांदा १९९३ मध्ये आई रत्नप्रभादेवी यांच्या हस्ते राजस्तरीय लावणी स्पर्धेची सुरुवात केली. यामधून अनेक कलाकारांना राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर सन्मान प्राप्त झाला. २६ वर्ष चाललेली लावणी स्पर्धा काही काळ थांबली. आता पुन्हा ही स्पर्धा सुरू झाली आहे. यावेळी जयसिंह मोहिते पाटील यांनी पत्नीच्या हस्ते या स्पर्धेचं उद्घाटन केले. अकलूजच्या लावणी स्पर्धेत लाखो रुपयांची बक्षिसे कलाकारांना दिली जातात. कलावंताच्या कौतुकासाठी फक्त टाळ्या वाजतात. इथे कोणी शिट्टी वाजवत नाही की कोणी हुल्लडबाजी करत नाही. त्यामुळे कलाकारांना या रंगमंचावर सुरक्षितता वाटते. लावणी कलेला आणि कलाकारांना गेली २९ वर्ष जपण्याचे काम करणाऱ्या जयसिंह मोहिते पाटील यांना यांच्या या कला क्षेत्रातील कामगिरी बद्दल पद्मश्री किताब द्यावा अशी मागणी सुद्धा काही ज्येष्ठ लावणी कलावंतांनी केली आहे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 01, 2026 04:18:42
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top