icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ओबीसी प्रदर्शन: जातिनिहाय जनगणना और आरक्षण बचाने की मांग

Akola, Maharashtra:अकोला जिला कार्यालय के सामने आज सकल ओबीसी समाज और ओबीसी हक्क संरक्षण परिषदे की ओर से विभिन्न मांगों के लिए धरना प्रदर्शन किया गया। ओबीसी की देशभर में जातिनिहाय जनगणना करानी है, ओबीसी आरक्षण संरक्षण उपसमिति रद्द करनी है, जनसंख्या के अनुपात में आरक्षण लागू करें, तथा आंदोलन के कार्यकर्ताओं के विरुद्ध लगे मुकदमे वापस लेने सहित प्रमुख मांगें सामने आईं। अनुसूचित जाति–अनुसूचित जनजाति के समान ही ओबीसी की भी औपचारिक जातिनिहाय जनगणना करानी चाहिए—ऐसी ठोस भूमिका आंदोलनकर्ता ने रखी। ओबीसी महाराष्ट्र राज्य के प्रदेशाध्यक्ष कल्याणकाका आखाडे के नेतृत्व में यह आंदोलन हुआ। शासन इसे तात्कालिक सकारात्मक निर्णय दे, अन्यथा राज्यभर में तीव्र आंदोलन शुरू किया जाएगा—इस चेतावनी के साथ।
0
0
Report
Advertisement

नागपुर महाल हिट एंड रन में बुजुर्ग की मौत, कार अब तक नहीं मिली

Nagpur, Maharashtra:नागपूर महाल हीट अँड रन प्रकरणी 25 दिवसांनंतर वृद्धाला धडक देणारी ती कार आणि आरोपींचा अजून शोध लागला नाही... मुकुंद बाभरे या 72 वर्षीय वृद्धाला 7 जूनला बडकस चौकाकडून आयचित मंदिरकडे सकाळी मॉर्निंग वॉक दरम्यान बेदरकारपणे कार चालवणाऱ्याने उडविले... या अपघातानंतर उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला -- अपघाताला सुमारे पंचवीस दिवस झाले तरी अजूनही धडक देणारी ती कार शोधण्यास पोलिसांना यश आलेले नाही महत्त्वाचं म्हणजे बळकस चौक ते आयचीत मंदिर हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ मुख्यालय लगतचा परिसर आहे.... अतिशय संवेदनशील भाग आहे.... मात्र तेथील सीसीटीव्हीच्या माध्यमातून अजून पर्यंत पोलिसांना धडक देणारा कारचा शोध घेण्यात यश मिळालेले नाही... धीम्या तपासगतीमुळे अनेक सवाल उपस्थित होत असताना पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही सुरू असल्याचा दावा केलाय... दरम्यान व्हीआयपी मूव्हमेंट असलेल्या या परिसरातील सीसीटीव्हीच्या दर्जाबाबत मात्र आता प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे... सीसीटीव्ही कुचकामी असल्याचा आरोप होतोय या हीट अँड रन प्रकरणाच्या तपासाबाबत आमच्या प्रतिनिधींनी माहिती जाणून घेतली आहे पोलीस उपायुक्त राहुल मदने यांच्याकडून
0
0
Report

कर्जमाफी समेत अन्य मांगों पर किसान रोड जाम, आसेगाव पूर्णा टी-पॉइंट

Amravati, Maharashtra:कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आक्रमक; आसेगाव पूर्णा टी-पॉईंटवर शेतकऱ्यांचा रास्ता रोको असेगाव पूर्णा टी-पॉईंट येथे लोकविकास संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी रास्ता रोको आंदोलन करण्यात आले. गोपाल भालेराव यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात शेकडो शेतकरी सहभागी झाले. सरसकट शेतकरी कर्जमाफी, पिकविमा योजनेचा लाभ, शेतीमालाला हमीभाव तसेच इतर प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर कराव्या अशी प्रमुख मागणी आंदोलकांनी केली. आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी काही काळ रस्त्यावर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे राज्य मार्गावरील वाहतुकीवर काही काळ रस्त्याच्या दोन्ही बाजूने जाम लागला होता. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी आंदोलनस्थळी बंदोबस्त तैनात करून परिस्थिती नियंत्रणात आणली. शासनाने शेतकऱ्यांच्या मागण्यांची तातडीने दखल घ्यावी, अन्यथा आगामी काळात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा आंदोलकांनी दिला.
0
0
Report
Advertisement

साखर उद्योग संकट से जिल्हा बैंकों को बड़ा आर्थिक खतरा: पूर्व मंत्री की चेतावनी

Shirur, Maharashtra:राज्यातील आणि देशातील साखर उद्योग सध्या मोठ्या अडचणीत असून, यामुळे जिल्हा बँकांवरही गंभीर आर्थिक संकट ओढवू शकते, असा थेट इशारा माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. वळसे पाटील यांनी बँकेच्या आर्थिक ताकदीचा हिशोब मांडताना सांगितले की, १९९१ मध्ये जिल्हा बँकेत ३५० कोटींच्या ठेवी होत्या, ज्या आज साडेसतरा हजार कोटींवर पोहोचल्या आहेत. मात्र, बँकेने एकट्या साखर उद्योगाला ७ हजार कोटींचे कर्ज दिले आहे. जर कारखाने अडचणीत आले आणि हे पैसे वसूल झाले नाहीत, तर जिल्हा बँका मोठ्या चक्रव्यूहात अडकतील. यासोबतच, यंदा 'अल निनो'च्या सावटामुळे राज्यात दुष्काळासारखी गंभीर परिस्थिती उद्भवू शकते आणि जागतिक घडामोडींमुळे आर्थिक मंदीचा धोकाही निर्माण होऊ शकतो, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. या कठीण परिस्थितीचा सामना करण्यासाठी आतापासूनच नियोजन करणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
0
0
Report
Advertisement

पेरणीच्या तोंडावर बैलजोडी अडवण्याचा मामला: शेतकर्‍यांनी प्रशासनाविरोधात रोष व्यक्त केला

Latur, Maharashtra:लातूर जिलेतील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्यावर पेरणीच्या तोंडावर मोठं संकट उडवलं आहे... बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परत येत असताना काही गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून बैल अडवले. त्यानंतर या प्रकरणी कासार शिरशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैल गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. हे बैल शेतीसाठीच खरेदी केले होते, असा दावा राम बिराजदार यांनी केला आहे. इतकेच नाही, तर गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना बैलजोडी नसल्याने शेतीची कामे कशी करायची, असा सवाल हा शेतकरी उपस्थित करत आहे. याच संदर्भात शेतकऱ्याची बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी.
0
0
Report

दो घंटे की बारिश ने स्कूल में पानी घुसा दिया, बच्चों के लिए तात्कालिक छुट्टी

Kalyan, Maharashtra:दोन तासांच्या पावसात शाळा पाणी शिरले.. उंबर्डेतील विद्यार्थ्यांना द्यावी लागली तातडीची सुट्टी. कल्याण पश्चिम उंबर्डे परिसरातील शेतकरी जागृत मंडळाच्या माध्यमिक शाळेत अवघ्या दोन तासांच्या पावसामुळे गुडघाभर पाणी साचल्याने विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांची मोठी तारांबळ उडाली. शाळेच्या पटांगणासह वर्गखोल्यांमध्येही पाणी शिरल्याने प्रशासनाला शाळेला सुट्टी देण्याची वेळ आली आहे. केडीएमसी नाले सफाई करण्यासाठी करोडो रुपये खर्च केले जात आहे मात्र दोन तासाच्या जोरदार पावसामुळे शाळेत पाणी साचले आहे. शाळेच्या मागे असलेला नाला साफ न केल्याने ही परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप शाळा प्रशासनाने करण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी.
0
0
Report
Advertisement

धाराशिव में अतिवृष्टि: एक साल बाद भी किसानों को घोषित राहत अभी तक नहीं मिली

Dharashiv, Maharashtra:धाराशिव एक वर्ष उलटलं... पण अतिवृष्टीग्रस्तांना अद्याप मदतीची प्रतीक्षा... धाराशिवमध्ये तब्बल 9 हजार हेक्टर जमीन खरडून गेली... तीन लाखांच्या मदतीची घोषणा हवेतच... 27 गायी वाहून गेल्या... मदत फक्त 2 लाख 22 हजार... सरकारच्या धोरणावर शेतकऱ्यांचा संताप... अँकर : गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्यातील हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केलं. तब्बल नऊ हजार हेक्टरवरील सुपीक जमीन खरडून गेली... अनेकांची जनावरं वाहून गेली... तर पिकांचंही मोठं नुकसान झालं. राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदतीची घोषणा केली होती. मात्र एक वर्ष उलटलं तरी अनेक शेतकरी मदत मिळालेली नाही. त्यामुळे सरकारच्या आश्वासनांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. पाहूयात हा स्पेशल रिपोर्ट. गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीने धाराशिव जिल्ह्याला मोठा फटका बसला. अनेक गावांमध्ये नाले-ओढे दुथडी भरून वाहिले... रस्ते वाहून गेले... आणि हजारो हेक्टरावरील सुपीक शेती अक्षरशः खरडून गेली. जिल्ह्यात जवळपास 9 हजार हेक्टर क्षेत्रावरील जमीन पाण्याच्या प्रवाहात वाहून गेली. अनेक शेतकऱ्यांची शेती आजही पूर्ववत झालेली नाही. या नुकसानीनंतर राज्य सरकारने जमीन खरडून गेलेल्या शेतकऱ्यांना प्रत्येकी तीन लाख रुपयांपर्यंत मदत जाहीर केली होती. मात्र घोषणा होऊन एक वर्ष पूर्ण झालं तरी अनेक पात्र शेतकरी आजही मदतीच्या प्रतीक्षेत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. "घोषणा झाल्या... पण मदत मिळाली नाही," अशी भावना शेतकरी व्यक्त करत आहेत. भूम तालुक्यातील विश्वनाथ दातखिळे यांचं उदाहरण तर अधिक वेदनादायी आहे. अतिवृष्टीत त्यांच्या 27 गायी वाहून गेल्या, मात्र या मोठ्या नुकसानीच्या बदल्यात त्यांनी शासनाकडून केवळ 2 लाख 22 हजार रुपयांची मदत मिळाली. झालेल्या प्रत्यक्ष नुकसानीच्या तुलनेत ही मदत अत्यल्प असल्याचं ते सांगतात. दरम्यान, कळंब विधानसभा मतदारसंघाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना जाहीर केलीली मदत तातडीने मिळावी, यासाठी सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. मात्र त्यानंतरही प्रत्यक्षात अनेक शेतकरी मदतीपासून वंचित असल्याचं चित्र आहे. एकीकडे शेती खरडून गेली... दुसरीकडे जनावरांचं नुकसान... आणि त्यातच मदतीची प्रतीक्षा... अशा दुहेरी संकटात धाराशिवचा शेतकरी अडकला आहे. सरकारने आता कागदोपत्री घोषणा न करता तातडीने मदत वितरित करावी, अशीच मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे. एक वर्षापूर्वी अतिवृष्टीने उद्ध्वस्त झालेल्या धाराशिवच्या शेतकऱ्यांना आजही न्यायाची प्रतीक्षा आहे. घोषणांची पूर्तता कधी होणार आणि शेतकऱ्यांच्या खात्यात मदत कधी जमा होणार, हा प्रश्न अद्याप अनुत्तरितच आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी 24 तास, धाराशिव. काहींचा परिचय: गेल्या वर्षीच्या अतिवृष्टीत धाराशिव जिल्ह्यात सुमारे 9 हजार हेक्टर शेती क्षेत्र खरडून गेले. 7,500 हून अधिक शेतकरी या नुकसानीमुळे बाधित झाले. राज्य सरकारने नुकसानग्रस्तांसाठी विशेष मदत पॅकेज जाहीर केले. जिरायत (कोरडवाहू) जमीन : प्रति हेक्टर ₹3 लाख मदत जाहीर. बागायत जमीन : प्रति हेक्टर ₹5 लाख मदत जाहीर. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत थेट खात्यात जमा करण्याची घोषणा. अनेक शेतकऱ्यांना घोषित निकषानुसार पूर्ण मदत मिळालेली नाही, अशी तक्रार. काहींना अंशतः मदत, तर अनेक शेतकरी अजूनही पूर्ण मदतीच्या प्रतीक्षेत.
0
0
Report

टीसी के सवाल पर छात्र ने शिक्षक पर चाकू से हमला, स्कूल में हड़कंप

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शाळेत विद्यार्थी घडतात , संस्कार रुजतात आणि शिक्षक विद्यार्थ्यांचे आयुष्य घडवतात, मात्र छत्रपती संभाजीनगरातील एका शाळेत घडलेली घटना या संस्कृतीलाच हादरा देणारी ठरली आहे. टीसी घेण्यासाठी आलेल्या एका अल्पवयीन विद्यार्थ्याने स्वतःच्या शिक्षकावर थेट चाकूने हल्ला केला. तुझ्यामळे परीक्षेत नापास झालो या रागातून या विद्यार्थ्याने गुरुलाच भोसकले.... हे धक्कादायक सीसीटीव्ही पुढं आले आणि शाळा विश्वालाच धक्का बसला, वाद तसा किरकोळ, 2024 मध्ये हा विद्यार्थी या शाळेत नवव्या वर्गात होता त्यात तो 2 विषयात नापास झाला आणि त्याला त्याच वर्गात बसावे लागले त्यात गेल्यावर्षी त्याने शाळा सोडून दिली आणि मंगळवारी तो शाळेत टीसी घ्यायला धडकला, सुरूवातीला मुख्याध्यापक सोबत वाद घातल्यानंतर त्याने वर्ग शिक्षकाला बोलवायला सांगितले आणि शिक्षक येताच त्याने त्यांना चाकूने भोसकले, शिक्षकाने कसाबसा बचाव केला तर मुख्याध्यापकांने कसाबसा बचाव केला यानंतर हा मुलगा फरार झाला पोलिसांनी कसोशीने प्रयत्न करून त्याला ताब्यात घेतले आहे.... या घटनेने शालेय विद्यार्थी आणि शिक्षकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे, तर संवादाचा अभाव, आणि वारंवार हिंसक गोष्टी पाहिल्याने मुलं आक्रमक होत असल्याचे मानसोपचार तज्ञांचे मत आहे.. सध्या हा शिक्षक जन्म मृत्यू सोबत लढतोय, रक्तदाबाने त्यांच्यावर शस्त्रक्रिया होऊ शकत नाहीय त्यामुळं संघर्ष सुरू आहे मात्र जो शिक्षक विद्यार्थी घडवतो त्यालाच विद्यार्थ्यांच्या रागाचा असा सामना करावा लागत आहेय ही समाज म्हणून गंभीर, आणि विचार करायला लावणारी गोष्ट आहे
0
0
Report

नाशिक में आषाढी एकादशी: पालखी यात्रा और स्कूल परिसर भक्तिमय उत्सव

Nashik, Maharashtra:आषाढ़ी एकादशी निमित्त संत निवृत्तीनाथ महाराज यांची पालखीच नाशिक मध्ये आघामान झाला आहे तर दुसरीकडे नाशिकच्या फ्रवाशी टॉऊन स्कूलमध्ये दिंडीचे भव्य आजोजन करण्यात आलंय.दिंडी निमित्त विध्यार्थीन सह शिक्षकांनी शाळा परिसरात एकच आनंद उत्सव साजरा केला..यावेळी जवळजवळ 1000 पेक्षा जास्त विद्यार्थी वारकरी बनून दिंडीत सहभागी होत असून टाळ- मृदुंगाच्या तालावर नाचत तर विठुरायाच्या नावाने स्मरण करत आषाढी एकादशी साजरी केलीये.. यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठलाचे विठ्ठलाचे रुक्मणीची वेशभूषा करत पालकांचे लक्ष वेधून घेतलं तर वासुदेवाच्या वेशभूषाचा पेहराव यावेळी विद्यार्थ्यांनी केला होता.....शिक्षकांनी देखील फुगडी खेळून विध्यार्थीनामध्ये सहभाग नोंदवला...यावेळी शाळा परिसरासह परिसरातील वातावरण पूर्ण भक्तीमय झालेल्या दिसून आलं.... तर विद्यार्थ्यांनी केलेल्या प्रभावामुळे शाळा परिसरात एकच व पंढरपूर भेटी च स्वरूप प्राप्त झालंय....त्याचबरोबर वारीच मुख्य आकर्षण असलेलं गोल रिंगण देखील करण्यात आलं होतं..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top