icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

शिर्डी साई संस्थान ने ब्रेक दर्शन शुल्क बढ़ाकर प्रति व्यक्ति 300 किया

Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या 'ब्रेक दर्शन' शुल्कात 100 रुपयांची वाढ... साईबाबा संस्थानचा मोठा निर्णय... प्रोटोकॉल दर्शन पाससाठी प्रतिव्यक्ती 200 ऐवजी आता लागणार 300 रुपये... साई संस्थानमार्फत सकाळी, दुपारी आणि रात्री, तीन वेगवेगळ्या वेळेत दिले जाते सशुल्क प्रोटोकॉल दर्शन... सामान्य सशुल्क दर्शन पास आणि प्रोटोकॉल दर्शन पाससाठी एकच दर असल्याने भाविकांमध्ये होती नाराजी... साई संस्थानने घेतला प्रोटोकॉल दर्शन शुल्क वाढवण्याचा निर्णय... प्रोटोकॉल दर्शन घेणाऱ्या भाविकांना आता मोजावे लागणार प्रतिव्यक्ती 300 रुपये...
0
0
Report

सोलापूर में बी2 भूमि निर्बंध हटाने पर आज विधानसभा में बयान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - शहरातील बी 2 प्रकारात अडकलेल्या मिळकतीची सुटका करण्याचा निर्णय महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मंगळवारी निश्चित केला आहे. या संदर्भात आज विधानसभेत निवेदन देण्यात येणार असल्याची माहिती आ. देवेंद्र कोठे यांनी दिलीय. शहरातील महसुली जमिनीच्या प्रश्नांवर महसूलमंत्र्यांनी मंगळवारी मंत्रालयात बैठक घेतली होती यावेळी शहरातील बी - 2 च्या जमिनींची सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. सोलापूरकरांच्या अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर आमदार देवेंद्र कोठे यांनी मंत्रालयात तसेच मुख्यमंत्र्यांकडे सतत याचा पाठपुरावा केला होता अखेर या पाठपुराव्याला मोठे यश मिळाले आहे.
0
0
Report

अमरावती में बोगस बीज घोटाला: किसानों की 200 से अधिक शिकायतें

Amravati, Maharashtra:अमरावती जिल्ह्यात बोगस बियाण्यांचा सुळसुळाट पाहायला मिळत असून पेरणी करूनही दहा दिवसापासून बियाणे उगवलेच नसल्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आहेत. जिल्ह्यातील अमरावती, तिवसा, नांदगाव खंडेश्वर, मोर्शी, चांदुर रेल्वे तालुक्यात बियाणे उगवल्या नसल्याच्या तक्रारी कृषी विभागात आल्या असून शेतकरी तक्रारीचा आकडा २०० पेक्षा अधिक असल्याची माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने यांनी दिली आहे. एसडीओ यांच्या अध्यक्षतेखाली समिती तयार करून पंचनामे सुरू झाले आहेत, बियाणांच्या नमुन्यांची तपासणी पाठवण्यात आली आहे; तपासणी अहवाल आल्यावर पुढील कारवाई ठरणार असे कृषी अधीक्षकांनी सांगितले. शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याबाबत पाठपुरावा करणार असून अमरावती जिल्ह्यात ६ लाख ८२ हजार हेक्टेअर खरीप हंगामाचे क्षेत्र असून यापैकी ७५ टक्के ५ लाख ९ हजार हेक्टेअरवर पेरण्या झाल्या आहेत. अशीही माहिती जिल्हा कृषी अधीक्षक अर्चना निस्ताने यांनी दिली आहे. दरम्यान बोगस बियाणे निर्मिती करणाऱ्यांवर काय कारवाई केली जाते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

संभाजी नगर में सड़क चौड़ाई के लिए 1510 करोड़ फंड मांग; CM ने संकेत दिए

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजी नगर शहर के मार्गों की रुंदीकरण के लिए अतिक्रमण हटाओ अभियान शुरू किया गया था। लेकिन निधि के अभाव के कारण पिछले एक वर्ष से यह कार्य प्रलंबित है। महापालिका ने 1510 करोड़ रुपये की निधि की मांग की है। बुधवार को संभाजी नगर के शिष्टमंडल ने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस से मुलाकात कर यह मांग रखी। मुख्यमंत्री ने सकारात्मक संकेत दिए। पड़गाव, जालना रोड समेत महत्त्वपूर्ण मार्ग संकीर्ण होने से नागरिक परेशान हैं। रोज यातायात जाम होता है। एक वर्ष पहले शहर के 10 प्रमुख मार्ग खुले थे। इस पृष्ठभूमि पर रस्ते रुंदीकरण और सुशोभीकरण का मुद्दा प्राथमिकता पर है।
0
0
Report

धुळे में एल निनो के असर से किसान रहें सतर्क, ड्रिप सिंचन करें

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात एल निनोचा प्रभाव जाणवणार असल्याने, कृषी विभागाने शेतकऱ्यांना अलर्ट दिला आहे. राज्यात पावसाचा जोर सुरू असताना धुळे जिल्ह्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस पडणार असल्याने अलनिनोचा प्रभाव धुळे जिल्ह्यात जाणवणारा असल्याने कृषी विभागातर्फे शेतकऱ्यांना अलनिनो बाबद अलर्ट दिला आहे, धुळे जिल्ह्यात 23 जूनपासून मान्सूनच्या पावसाला सुरुवात झाली असून, 7 जुलैपर्यंत जिल्ह्यात सरासरी 122 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे, हा पाऊस खरीप हंगामातील पेरणीसाठी अत्यंत पोषक आणि योग्य ठरला असून, या पावसामुळे बळीराजा सुखावला आहे, परंतु अलनिनो संदर्भात धुळ्याचे जिल्हा कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी शेतकऱ्यांना सतर्क राहून ठिबक सिंचनाचा वापर करण्याची महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे, सध्या जिल्ह्यात पेरणीयोग्य पावस झाला असल्याने शेतकऱ्यांनी पेरणी करण्यास कोणतीही हरकत नाही, मात्र अल निनोचे संभाव्य सावट लक्षात घेता, एका विशेष बाबीकडे लक्ष वेधणे गरजेचे आहे, ज्या शेतकऱ्यांकडे ठिबक सिंचनाची सोय उपलब्ध आहे, त्यांनी यावर्षी पेरणी करताना किंवा त्यानंतर सिंचनासाठी ठिबकचाच जास्तीत जास्त वापर करावा, असे महत्त्वपूर्ण आवाहन कृषी अधीक्षक सुरज जगताप यांनी केले आहे.
0
0
Report

सोलापुर के निजी hospital में लूट का मामला, अरबाज शेख का भावुक वीडियो वायरल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात लूट होत असल्याची सैराट चित्रपटातील अरबाज शेखने सोशल माध्यमावर व्यक्त केली खंत सैराट चित्रपटाच्या माध्यमातून ससल्या म्हणून प्रसिद्धीस आलेल्या अरबाज शेख याने रडत केलं भावनिक आवाहन खासगी रुग्णालयात होणारी लूट व्हिडिओच्या माध्यमातून अरबाज शेख यांनी आणली समोर तब्बल 40 हजार रुपयांची औषधे हॉस्पिटलच्याच मेडिकल मधूनच खरेदी करण्याचे हॉस्पिटलकडून सूचना देण्यात आल्याची माहिती वडिलांच्या उपचारासाठी होणाऱ्या खर्चासाठी केलेली मदतीची याचना अरबाज शेख यांच्या व्हिडिओच्या निमित्ताने सोलापुरातील खाजगी हॉस्पिटलमध्ये होणारी बेसुमार लूट पुन्हा एकदा उघडकीस
0
0
Report
Advertisement

महापालिका अब निजी एजेंसी से मालमत्ताओं के पुनर्पर्वेक्षण कराएगी; प्रस्ताव कल सामान्य सभा में

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मालमत्ता चे सर्वेक्षण आता खाजगी एजन्सी करणार आहे याबाबतचा प्रस्ताव सर्वसाधारण सभेत मनपा प्रशासन ठेवणार आहे.. शहरात ५७ हजार मालमत्तांना ३०० ते १२०० रुपये कर आकारणी केलेली आहे. या मालमत्तांच्या जागांवर किमान तीन ते पाच मजली इमारती उभ्या आहेत. मनपाला कर १९९० च्या आकारणीनुसार मिळत आहे. त्यामुळे शहरातील सर्वच मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षण करण्याचा निर्णय यापूर्वी घेण्यात आला होता. त्यासाठी खाजगी एजन्सी नियुक्त करावी लागेल. निविदा प्रक्रिया राबवून एजन्सी नियुक्त करण्याचा आणि या कामासाठी लागणाऱ्या खर्चाला मंजुरी द्यावी म्हणून मनपा प्रशासनाने प्रस्ताव सर्वसाधारण सभेसमोर ठेवला आहे. १४ जुलै रोजी या प्रस्तावावर चर्चा होईल. महापालिकेने मागील ४० वर्षात मालमत्तांचे पुनर्सर्वेक्षणच केलेले नाही. त्यामुळे उत्पन्नावर मोठा फरक पडला आहे..
0
0
Report

अकोला के विधायक साजिद खान पठाण को गैंग से मारने की धमकी, सुरक्षा बढ़ी

Akola, Maharashtra:अकोला पश्चिमचे काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांना बिष्णोई गँगकडून जीवे मारण्याची धमकी मिळाल्यानंतर त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढण्यात आली आहे. कॅनडातून फोन करून १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती. पैसे न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने राज्य यंत्रणा सतर्क झाली असून आमदार खान यांना Y प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. त्यांच्या अकोला येथील निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात कडेकोट सुरक्षा व्यवस्था करण्यात आली आहे. या प्रकरणाचे पडसाद आता विधिमंडळातही उमटले असून विरोधी पक्षाने या घटनेचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक अर्थात एसआयटी नेमण्याची मागणी केली आहे. आमदार साजिद खान पठाण यांना लॉरेन्स बिष्णोई गँगशी संबंधित असल्याचा दावा करणाऱ्या शुभम लोणकर याने कॅनडातून फोन करून १० कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न दिल्यास गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याने खळबळ उडाली होती. या घटनेची गंभीर दखल घेत राज्य सरकारने आमदार खान यांना Y प्लस सुरक्षा मंजूर केली आहे. त्यांच्या निवासस्थानाबाहेर अतिरिक्त पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून परिसरात सातत्याने पोलीस गस्त वाढविण्यात आली आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची तपासणी केली जात असून सुरक्षेच्या दृष्टीने विशेष खबरदारी घेतली जात आहे.दरम्यान, या धमकी प्रकरणाचे पडसाद विधिमंडळातही उमटले आहेत. विरोधी पक्षाने राज्यातील लोकप्रतिनिधींच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत या प्रकरणाचा सखोल तपास करण्यासाठी विशेष तपास पथक (SIT) नेमण्याची मागणी केली आहे. धमकीमागील नेमके सूत्रधार कोण, याचा तपास यंत्रणांकडून सुरू असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

मराठवाड़ा में छह महीनों में 465 किसान आत्महत्या: मदद नहीं मिली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शेतीमालाला मिळणारा मातीमोल भाव, वाढता कर्जाचा डोंगर, नैसर्गिक आपत्ती आणि निसर्गाचा लहरीपणा यामुळे पार खचून गेलेल्या मराठवाड्यातील तब्बल 465 शेतकऱ्यांनी गेल्या अवघ्या 6 महिन्यांत , जानेवारी ते जून २०२६ या काळात मृत्यूला कवटाळले आहे. त्यात प्रशासनाच्या लालफितीच्या कारभाराने या पीडित कुटुंबांना अजूनही मदत दिलेली नाही. अहवालानुसार, 465 पैकी केवळ 215 प्रकरणे मदतीसाठी पात्र ठरली, तर 26 अपात्र ठरली. अद्याप 222 कुटुंबे चौकशीच्या प्रतीक्षेत असून, आतापर्यंत फक्त 108 कुटुंबांच्या पदरात प्रत्यक्ष मदत पडली आहे. एकट्या जून महिन्यात 91 शेतकऱ्यांनी जीवनयात्रा संपवली. त्यापैकी केवळ एकाच कुटुंबाला पात्र ठरवण्यात आले असून, तब्बल 90 फाइल सरकारी कार्यालयांत पडून आहेत. जिल्हानिहाय आकडेवारी पाहता सर्वाधिक मृत्यूचे तांडव छत्रपती संभाजीनगर (109) आणि बीड (95) जिल्ह्यात आहे. याखालोखाल धाराशिव 65, नांदेड 61, जालना 40, हिंगोली 35, परभणी 34 तर लातूरमध्ये 26 शेतकऱ्यांनी आत्महत्ये केल्या आहेत. गेल्या वर्षी याच काळात 520 आत्महत्या झाल्या होत्या.
0
0
Report

संभाजी नगर में FDA की दबिश: प्रसिद्ध होटल के किचन में गंदगी, लाइसेंस निलंबित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अन्न आणि औषध प्रशासनाकडून संभाजी नगरात सलग जोरदार कारवाई सुरूच आहे, जालना रोडवरील वडोद फाट्याजवळील एक प्रसिद्ध हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाने टाकलेल्या छाप्यात किचनमध्ये प्रचंड अस्वच्छता आढळून आली आहे. अन्नपदार्थ तयार करताना आणि ते साठवताना स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवल्याचे समोर आल्याने प्रशासनाने या हॉटेलचा परवाना पुढील आदेशापर्यंत निलंबित केला आहे. शहरातील मोठ्या हॉटेल्सवर एफडीआने केलेली ही सलग तिसरी मोठी कारवाई आहे. शहरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि खाद्य व्यावसायिकांची अशीच अचानक तपासणी मोहीम यापुढेही तीव्र गतीने सुरूच राहणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में गोदावरी नदी बाढ़, जायकवाड़ी डैम में जलस्तर बढ़ेगा—पानी विसर्जन तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:नाशिक जिल्हा आणि गोदावरी नदीच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे नाशिक जिल्ह्यात गोदावरी नदीला पूर आला आहे. या पुरामुळे नाशिकमधील नांदूर मधमेश्वर बंधाऱ्यातून जायकवाडी धरणाच्या दिशेने १८ हजार ४०३ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. हे पाणी आज सकाळी जायकवाडी धरणाच्या जलाशयात दाखल झाले आहे. यामुळे धरणाच्या जलसाठ्यात लक्षणीय वाढ होणार आहे. मराठवाड्यात पाऊस नसल्याने अनेक धरणांची पाणीपातळी चिंताजनक बनली आहे. मात्र, जायकवाडी धरणात होत असलेल्या पाण्याच्या आवकमुळे दिलासा मिळाला आहे.
0
0
Report

अकोला में जीर्ण इमारत गिरने से दहशत, तीन दोपहिया क्षतिग्रस्त

Akola, Maharashtra:अकोला शहर के काली मस्जिद परिसर में एक मंजिला जीर्ण इमारत अचानक गिर पड़ी. सौभाग्य से इस इमारत में किसी भी निवासी के मौजूद न होने से जानमाल का बड़ा नुकसान नहीं हुआ. इमारत के ढहने से नीचे खड़ी तीन दोपहिया वाहन क्षतिग्रस्त हो गए. घटना के बाद इलाके में थोड़े समय तक डर का माहौल रहा. फायर ब्रिगेड की टीम और स्थानीय प्रशासन मौके पर पहुंची. स्थानीय नागरिकों की मदद से मलबा हटाने का काम किया गया और क्षेत्र को सुरक्षित किया गया. स्थानीय लोगों के अनुसार यह इमारत पहले से ही जीर्ण अवस्था में थी. घटना के बाद शहर की खतरनाक और जीर्ण इमारतों की तात्कालिक सर्वेक्षण कर जरूरी कार्रवाई की मांग उठी.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top