icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती जेल में कैदियों के बीच भारी मारामारी, तीन घायल

Amravati, Maharashtra:अमरावती मध्यवर्ती कारागृहात कैद्यांमध्ये तुफान मारामारी झाली; तीन कैदी गंभीर जखमी, दोघांची प्रकृती गंभीर. ही घटना 4 जुलैच्या पहाटे बॅरेक क्रमांक 57/26 मध्ये घडली असून न्यायालयीन बंदी जमील खान बिस्मिल्ला खान यांनी इतर तीन कैद्यांवर काठीने हल्ला केल्याचा आरोप आहे. हल्ल्यात जखमी झालेल्या कैद्यांवर उपचार सुरू आहेत. फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे सुरक्षा व्यवस्थेतील त्रुटी समोर आल्या असून कारागृहात कैद्यांमधील वाद आणि हिंसक घटना वारंवार घडत असल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
0
0
Report
Advertisement

भारी वर्षा से पुणे-मुंबई महामार्ग और लोहमार्ग पूरी तरह बंद, यातायात ठप्प

Varsoli, Maharashtra:पुणे और मुंबईकडे प्रवास करणाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची बातमी आहे. अतिवृष्टीमुळे पुण्याकडे आणि मुंबईकडे जाणारी वाहतूक पूर्णतः ठप्प आहे. नव्यानं खुला करण्यात आलेल्या कनेक्टिंग लिंकवर दरड कोसळली है. आधीच्या एक्सप्रेस हायवे वर अमृतांजन पुलाजवळ आणि खालापूर टोल नाक्याजवळ पाणीचं पाणी साचलेलं आहे. तसेच जुन्या पुणे-मुंबई महार्गावर ही दरड कोसळलेली आहे. त्यामुळं पुणे आणि मुंबई महामार्गावरुन प्रवास करणं आज अशक्य आहे. दुसरीकडे पुणे-मुंबई लोहमार्गावर ठाकूरवाडी परिसरात दरड कोसळलेली आहे. यामुळं हा पर्याय ही चाकरमान्यांसाठी बंद आहे. महामार्ग आणि लोहमार्ग हे दोन्ही मार्ग आज वाहतुकीसाठी बंद करण्यात आलंय. त्यामुळं पुणे आणि मुंबई प्रवास करणाऱ्यांनी घराबाहेर न पडण्याचा सल्ला प्रशासनाने दिलाय.
0
0
Report

नाशिक के येवला में बारिश ने किसानों की फसलें डगमगाईं, दुबारा बुवाई की आशंका

Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील मराठवाड्या येणारा येवला तालुक्याच्या उत्तर-पूर्व भागात पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांची चिंता वाढवली आहे. जून महिन्यात झालेल्या समाधानकारक पावसाच्या भरोशावर शेतकऱ्यांनी मुग, बाजरी आणि मक्याची पेरणी केली होती. पिके चांगली उगवल्यानंतर मात्र पावसाने ओढ दिल्याने अनेक ठिकाणी पिके करपू लागली आहेत. पुढील आठ दिवसांत दमदार पाऊस झाला नाही, तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट ओढवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे या संदर्भात थेट शेतकऱ्यांच्या बांधावरून आढावा घेतला आहे
0
0
Report

घर में लटकी पैंट से सांप ने डसा, 12 साल के बच्चे की हालत बिगड़ी; डॉ आनंद बेंदले ने बचाई जान

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- घरात खुंटीला टांगलेल्या पँटमध्ये शिरला विंचू, दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर, चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगाव येथील घटना, आधी गावातच गावठी उपचार केल्याने प्रकृती खालावली, चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून वाचविले प्राण अँकर:-- घरात खुंटीला टांगलेली पँट अंगात घातल्यावर आत दडून असलेल्या विंचवाने दंश करताच 12 वर्षीय मुलाचा बीपी शून्यावर आला. चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर तालुक्यातल्या विहीरगावची घटना पालकांसाठी धडा ठरली आहे. त्याचे 3 दिवस अतिदക്ഷता विभागात उपचार करण्यात आले. यात चंद्रपूरच्या डॉ. आनंद बेंदले यांनी शर्थीचे प्रयत्न करून मुलाचे प्राण वाचविले. या मुलाचे नाव अनुप ईश्वर ढोणे असे आहे. पावसाळ्याच्या दिवसात विंचू आणि साप यांच्या बाबतीत अधिक काळजी घेण्याची गरज घटनेच्या निमित्ताने व्यक्त झाली. विशेष म्हणजे मुलाच्या पालकांनी प्रकृती अत्यवस्थ होईपर्यंत त्याच्यावर गावातच गावठी उपचार केले. त्यामुळे मुलाची तब्येत आणखी खालावली. मात्र आता चंद्रपुरात डॉ. बेंदले यांच्या इस्पितळात प्रकृती सुधारत आहे. बाईट १) डॉ. आनंद बेंदले, तज्ञ चिकित्सक
0
0
Report
Advertisement
Advertisement

महायुती के विरुद्ध लाखनी नगरपंचायत में अविश्वास उछाला: अध्यक्ष-उपाध्यक्ष पर सियासी चुनौती

Bhandara, Maharashtra:लाखनी नगरपंचायतीमध्ये महायुतीत वादाची ठिणगी...नगराध्यक्ष व उपाध्यक्षावर अविश्वास ठराव मांडला... नुकत्याच पार पडलेल्या भंडारा गोंदिया विधान परिषद निवडणुकीचे पडसाद पडायला सुरुवात झाली आहे.या निवडणुकीत महायुतीचा उमेदवार निवडून आला असला तरी निवडणुकीत महायुतीचे मतदार फुकटल्याचे निकालाअंती बघायला मिळाले होते. यातूनच आता लाखनी नगरपंचायतीमध्ये राजकीय वादळ बघायला मिळत आहे.१३ नगरसेवकांनी नगराध्यक्ष व उपाध्यक्षावर अविश्वास ठराव मांडला आहे.त्यामुळे अवघे सहा महिने बाकी असताना प्रशासक बसविण्याची वेळ आता लाखनी नगरपंचायतीवर आली आहे.राष्ट्रवादी व बीजेपी चे नगरसेवकच राष्ट्रवादीच्याच अद्यक्षावर अविश्वास दाखल करत बीजेपी उपाध्यक्ष लता रोडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणत असल्याचा आरोप उपाध्यक्ष लता रोडे यांनी केलं आहे. त्यामुळे आता लाखनी नगरपंचायतीत राजकारण तापले असून अविश्वास ठराव मंजूर होते काय याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे...
0
0
Report

शिवसेना का राम रक्षा आंदोलन: राम मंदिर दान चोरी पर दोषियों के खिलाफ कार्रवाई

Beed, Maharashtra:अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरीच्या प्रकरणाच्या निषेधार्थ शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्ष आक्रमक झाला आहे. बीड शहरातील माळीवेस परिसरातील हनुमान मंदिरात पक्षाच्या वतीने 'राम रक्षा आंदोलन' करण्यात आले. यावेळी महाआरती करून भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. तसेच या प्रकरणातील दोषींवर तात्काळ कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली. यानंतर कार्यकर्त्यांनी भाजपविरोधात घोषणाबाजी करत अयोध्येतील राम मंदिरातील कथित दान चोरीच्या प्रकरणाचा निषेध व्यक्त केला. राम मंदिरातील दानावर डल्ला मारणाऱ्या दोषींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करावी. देव त्यांना सद्बुद्धी देवो. या प्रकरणात कारवाई झाली नाही, तर रामभक्त शांत बसणार नाहीत असा इशारा देखील दिला. या प्रकरणात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि रामभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

RTE: KG-1 में सीधे प्रवेश पर रोक, Nursery से शुरूआत अनिवार्य - नागपुर हाईकोर्ट

Nagpur, Maharashtra:नागपूर - आरटीई अंतर्गत थेट केजी-१ मध्ये प्रवेश देता येणार नाही, मुंबई उच्च न्यायालयाचे नागपूर खंडपीठाचा निर्णय - आरटीई प्रवेशाची सुरुवात 'नर्सरी'पासूनचकेजी-१ मध्ये थेट प्रवेशाला कायद्यात तरतूद नाही - नर्सरी प्रवेश नाकारल्यानंतर थेट केजी-१ प्रवेशासाठीची विद्यार्थ्याची याचिका फेटाळली - नर्सरी प्रवेश नाकारण्याच्या निर्णयाला सक्षम प्राधिकरणाकडे आव्हान न दिल्याने तो अंतिम ठरला - २५ टक्के आरटीई आरक्षण प्राथमिकपूर्व स्तरावर केवळ 'नर्सरी'साठीच लागू - केजी-१ मध्ये थेट प्रवेश देण्यासाठी नियम, शासन निर्णय किंवा धोरण अस्तित्वात नाही.. - न्यायालय नवीन जागा निर्माण करू शकत नाही किंवा नियमबाह्य प्रवेशाचे आदेश देऊ शकत नाही - 'कल्याणकारी अर्थ' लावताना वैधानिक चौकट डावलता येणार नाही - कायद्याने मान्यता नसलेला अधिकार न्यायालय निर्माण करू शकत नाही असेही निरीक्षण नोंदवले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top