Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून

Aug 20, 2024 10:15:03
Yavatmal, Maharashtra

यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HPHARSHAD PATIL
Feb 28, 2026 01:32:00
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 01:16:32
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या मसुचीवाडी येथे कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे. भर दिवसा कोल्ह्याने गावातल्या सात जणांवर हल्ला चढत जखमी केल्याच घटना घडली आहे. एका महिलेचा सात जणांवर हल्ला चढवत चावा घेऊन गंभीर जखमी केले आहे, एका मागून एक अशा पद्धतीने या कोल्ह्याने ग्रामस्थांना लक्ष केलय जखमींना तातडीने ईश्वरपूर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे,या घटनेनंतर गावात भीतीच वातावरण पसरला असून ग्रामस्थांकडून कोल्ह्याला जेरबंद करण्यासाठी शोध मोहीम देखील सुरू करण्यात आली आहे,मात्र कोल्ह्याच्या या हल्ल्याच्या घटनेने गावात कोल्ह्याची दहशत निर्माण झाली आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 01:16:17
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगलीची सुकन्या बनली पुणे महानगरपालिकेची नगरसेविका व विधि समिती अध्यक्ष, निवडीनंतर पहिल्यांदा सांगलीत आलेल्या स्वरदा बापट यांचं महिलांनी जल्लोषात केलं स्वागत. सांगलीची सुकन्या व पुणे महानगरपालिकेच्या नगरसेविका स्वरदा बापट यांचा सांगलीत मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. स्वरदा बापट सांगलीच्या कन्या असून नुकत्याच पार पडलेल्या पुणे महानगरपालिका निवडणुकीत त्या नगरसेविका म्हणून भाजपाकडून निवडून आल्या आहेत, त्यांनी पुणे महानगरपालिकेच्या विधी समिती अध्यक्ष पदी देखील निवड झाली आहे, या निवडीनंतर पहिल्यांदाच स्वरदा बापट सांगलीत येत असल्याने भाजपा महिला आघाडीच्या वतीने बापट यांचे स्वागत करण्यात आलं, सांगली रेल्वे स्टेशनवर वंदेभारत एक्सप्रेसने दाखल झाल्या त्यानंतर भाजपाच्या महिला कार्यकर्त्या व नेत्या नीता केळकर यांनी स्वरदा बापट यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं. बाईट - स्वरदा बापट - नगरसेविका,पुणे, भाजपा.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Feb 28, 2026 01:15:55
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:Sng_tifin_seva स्लग - गरजूंसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत अन्नपूर्णा टिफिन सेवाचा खासदार उज्वल निकम यांच्या हस्ते लोकार्पण.. अँकर - सांगलीतील गरजूंसाठी राबवण्यात येणाऱ्या मोफत अन्नपूर्णा टिफिन सेवाचा लोकार्पण खासदार आणि प्रसिद्ध वकील उज्वल निकम यांच्या हस्ते पार पडला. संवेदना फाउंडेशनकडुन हा उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे.शहरातल्या शंभरहून अधिक गरजूंना जेवणाचे डबे या सेवेनच्या माध्यमातून मोफत पुरवण्यात येणार आहेत. खासदार उज्वल निकम यांनी संवेदन फाउंडेशनच्या माध्यमातून राबविणाऱ्या उपक्रमाचे कौतुक करत प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीचे उपक्रम राबवले पाहिजे ,असं मत यावेळी व्यक्त केले.प्रसिद्ध उद्योजक व भाजपा व्यापाड़ी आघाडीचे अध्यक्ष रोनक शहा यांच्या माध्यमातून उपक्रम राबविण्यात येत आहे. बाईट - उज्वल निकम - खासदार .
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Feb 28, 2026 01:15:41
Ambernath, Maharashtra:पोलीस भरती न होता आल्यानं तरुणीची आत्महत्या अंबरनाथमधील मनाला चटका लावणारी घटना प्रतीक्षा राणे असं या तरुणीचं नाव होतं. अंबरनाथ पश्चिमेच्या भेंडीपाडा परिसरात राहणाऱ्या प्रतीक्षाचं एम.कॉम पर्यंत शिक्षण झालं होतं. तिला सरकारी नोकरीची आवड असल्यानं तिने पोलीस भरतीत सहभाग घेतला, मात्र तिथे तिची निवड झाली नाही. याच उद्विग्नतेतून तिनं टोकाचं पाऊल उचलत घरातच गळफास घेत आत्महत्या केली. यापूर्वी तिनं सुसाईड नोट देखील लिहिली होती. २६ वर्षांची होऊनही मला कमावता आलं नाही, मला सरकारी नोकरीची आवड होती, सरकारी नोकरी लागल्यावर आईवडिलांना जे जीवन द्यायचं होतं ते देता आलं नाही, त्यामुळेच मी आत्महत्या करत असल्याचं तिने आपल्या सुसाईड नोटमध्ये नमूद केलंय. या घटनेनं राणे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. प्रतिक्षाला आणखी २ वेळा पोलीस भरती देता आली असती, पण पहिल्याच प्रयत्नात अपयश आल्यानंतर तिने हार मानली आणि हे टोकाचं पाऊल उचलं. काळजाला चटका लावणाऱ्या या घटनेनं अंबरनाथमध्ये हळहळ व्यक्त होतेय. चंद्रशेखर भुयार , अंबरनाथ
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 16:01:01
Navi Mumbai, Maharashtra: Anchor- सिडको महामंडळातर्फे राबविण्यात येत असलेल्या १६,८७६ सदनिकांच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” गृहनिर्माण योजनेत पर्याय निवडीसाठी दि. १९ मार्च२०२६ पर्यंत मुदतवाढ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. योजनेस नागरिकांकडून मिळत असलेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाचा विचार करून तसेच अधिकाधिक सर्वसामान्य नागरिकांना हक्काच्या घराचे स्वप्न साकार करण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी ही मुदतवाढ देण्यात आली आहे. “माझे पसंतीचे सिडकोचे घर – माझा फर्स्ट चॉइस नवी मुंबईमध्ये” या योजनेंतर्गत नवी मुंबईतील वाशी, बामणडोंगरी, खारकोपर, खारघर, तळोजा, मानसरोवर, खांदेश्वर, पनवेल आणि कळंबोली या नोडमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक (EWS) व अल्प उत्पन्न गट (LIG) यांच्यासाठी १६,८७६ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. या योजनेत अनामत रक्कमेचा भरणा करण्यासाठीची अंतिम तारीख 19 मार्च २०२६ तर आपले पसंतीचे पर्याय निवडण्यासाठीची अंतिम तारीख १९ मार्च २०२६ आहे. सदर योजनेत सहभागी होण्यासाठी इच्छुक नागरिकांनी योजनेत सहभागी होण्यासाठी www.cidcohomes.com या अधिकृत संकेतस्थळास भेट देण्याचे आवाहन सिडको तर्फे करण्यात आले आहे.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Feb 27, 2026 14:45:18
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 27, 2026 14:16:54
Navi Mumbai, Maharashtra:रियल इस्टेट क्षेत्रात पहिल्यांदा एका लकी ग्राहकाला मोफत घर देण्यात आले आहे, पनवेल मद्ये तयार होत असलेल्या गोदरेज सिटी मद्ये घर बुक केलेल्या ग्राहक शामकुमार नैना यांचे घराचे स्वप्न पूर्ण झालं आहे, गोदरेज सिटी मद्ये त्यांना मोफत घर देण्यात आलं आहे, पनवेल मद्ये निसर्गाच्या कुशीत उभारण्यात आलेल्या गोदरेज सिटी मद्ये गोदरेज प्रॉपर्टी कडून एका ग्राहकाला मोफत घर देण्यात आले आहे ,रियल इस्टेट च्या इतिहासात प्रथमचं असं घडत आहे की ग्राहकाला घर पूर्णपणे मोफत देण्यात येत आहे , गोदरेज प्रॉपर्टी चे भारतभर गृहप्रकल्प बांधले आहेत एक लाख घरे बांधून विक्री केल्यानंतर गोदरेज प्रॉपर्टी कडून योग्य ग्राहकाला घर पूर्णपणे मोफत देण्यात आले आहे । सामाजिक बांधिलकी म्हणून गोदरेज प्रॉपर्टी कडून हे घर देण्यात आले असल्याचे सांगण्यात येत आहो
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Feb 27, 2026 13:54:09
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Feb 27, 2026 13:24:19
Thane, Maharashtra:डंपरखाली चिरडून तरुणाचा मृत्यू...अनाधिकृत फेरीवाले व खड्डेमय रस्ते यांनी घेतला तरुणाचा जीव... अँकर... गुरुवारी संध्याकाळी पाच वाजताच्या सुमारार भार्गव पाटील २४ वर्षीय हा तरुण कामावरून आपल्या दुचाकीवरून खारबाव येथील आपल्या घरी चालला होता. याच दरम्यान तो अंजूर फाटा या ठिकाणी आला असता त्याच्या दुचाकीचा अपघात होऊन भार्गव याचा डंपरखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर या मृत्यूची नोंद नारपोली पोलिस ठाण्यात करण्यात आली असून चालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर अपघात हा अंजूर फाटा येथील राहनाळ ग्रामपंचायत हद्दीत रस्त्यातच थाट मांडलेल्या हातगाडीमुळे झाल्याचे नागरिकांमधून बोलले जात असून खड्डेमय रस्ते आणि अंजूर फाटा या ठिकाणी सततची होणारी वाहतूक कोंडी यामुळेही झाल्याची प्रतिक्रिया देखील नागरिकांनी बोलून दाखवली. तर भिवंडी महापालिका प्रशासन हद्दीतही प्रत्येक प्रभाग समिती अंतर्गत अशाच प्रकारे मोठ्या प्रमाणात मुख्य रस्त्याच्या कडेला अनाधिकृत हातगाड्या (हॅकर्स), टपर्‍या व दुकाने उभी केली जात असल़याचे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे अपघाताचे प्रमाण वाढले असून वाहतूक कोंडी सुद्धा होत आहे. त्यामुळे वाहतूक पोलिस प्रशासन,महापालिका प्रशासन अंतर्गत अतिक्रमण विभाग यांनी अनधिकृतपणे रस्त्यात थाटल्या जाणाऱ्या हातगाड्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. विवो-१ भिवंडी महापालिका क्षेत्रात जागोजाडी अनाधिकृत फेरीवाले, हातगाड्या, टपर्‍या, दुकाने व थाटली गेली आहेत. मात्र यांवर पालिका प्रशासनाकडून थातुर मातूर कारवाई करून फेरीवाल हटविण्याची प्रक्रिया केली जाते. पालिका प्रशासनाची अतिक्रमण पथक निघून जातच पून्हा फेरीवाले आपलं बस्तान बसवत असल्याचे पालिका अतिक्रमण पथक प्रमुख यांनी सांगितले. विवो-२ या अनाधिकृत फेरीवाल्यांवर ठोश कारवाई करून त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्या येऊन रस्ते मोकळे करण्यात यावेत अशा प्रतिक्रिया नागरीक व्यक्त करत आहेत. अन्यथा भार्गव सारखे तरूण रोजच या अपघाताचे शिकार होण्यापासून कधीच वाचू शकणार नाही अशा प्रतिक्रिया देखुल व्यक्त होत आहेत. विवो-३ महापालिका क्षेत्रात जागोजागी रस्ते खड्डेमय झाले असल्याचे चित्र दिसून येत आहे. या खड्ड्यांनी या आधी देखील अनेक जणांचा जीव घेतला आहे. तरी देखील प्रशासन कानाडोळा करत अल्याचे दिसून येत आहे. पालिका प्रशासनाचे प्रभाग अधिकारी या बाबीवर बोलण्याचे टाळत आहेत. पालिका प्रशासनाकडून या सर्व प्रकाराकडे जाणून बुजून कानाडोळा केला जात असल्याचे देखील नागरिकांतून बोलले जाते. एखादी दुर्घटना घडली तर या सर्व प्रकाराला सर्वस्वी पालिका प्रशासन जबाबदार राहील असा सूर देखील येथून निघत आहे. बाईट- नागरीक, बाईट- अरविंद घुगरे, अतिक्रमण पथक प्रमुख
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top