445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक में मां ने प्रेमी के लिए बच्चे की अपहरण साजिश रची, पर्दाफाश पुलिस ने किया
Nashik, Maharashtra:नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे - प्रियकरासाठी आईनेच रचला आपल्या मुलाचा अपहरणाचा कट... - नाशिकच्या मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यातील घटनेने उडाली खळबळ... - CCTV फुटेज आणि तपासाची चक्रे फिरवीत वडनेर खाकुर्डी पोलिसांनी केला या प्रकरणाचा पर्दाफाश.. ANC: विवाह झालेला असताना प्रेमीच्या आकर्षणातून एका मातेने प्रियकर आपल्याबरोबरच राहावा, यासाठी थेट त्यालाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्याचा प्रयत्न केला. मुलाला डांबून ठेवत त्याला प्रियकराने पळवून नेल्याचा बनाव रचला. मात्र, नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील वडनेर खाकुर्डी पोलिसांच्या सतर्कतेने तिचा बनाव उघड झाला आहे. पोलिसांनी तिच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून मुलाला तिच्या स्वाधीन केले आहे. याबाबत अधिक माहिती अशी येथील पंचशीलनगरातील मनीषा मयूर मोंडल (वय ३५) या महिलेचा प्रियकर मोहन साईनाथ मोरे (३२, रा. अजंग) तिच्याबरोबर राहत नव्हता, तो सोबत राहावा यासाठी तिनेच साडेपाचवर्षीय मुलाला तिच्या नातेवाइकांकडे लपविले आणि मोहनने त्याला पळवून नेल्याचा बनाव रचला. पोलिसांनी मोहनला ताब्यात घेतले, परंतु त्याने मुलगा लपविला नसल्याचे पोलिसांना पुन्हा सांगितले. पोलिसांनी मनीषाला वेळोवेळी माहिती विचारली, मात्र ती सहकार्य करीत नसल्याने पोलिसांना तिच्यावर संशय आला. वडनेर खाकुर्डीचे सहायक पोलिस निरीक्षक पुरुषोत्तम शिरसाठ यांनी तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे तपासले असता मनीषा ही तिच्या चिखलओहोळ येथील तिचा मित्र विष्णू श्रीराम सोनवणे हिच्या ताब्यात मुलगा जितेशला देत असल्याचे दिसून आले. शिरसाठ व पोलिस उपनिरीक्षक अंकुश नवले यांच्या पथकाने तेथे जाऊन मुलाला ताब्यात घेतले. पोलिसांनी जितेश मयूर मोंडल याला आई व वडिलांच्या स्वाधीन केले. मनीषाने खोटा बनाव रचल्याने तिच्यावर वडनेर खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.0
0
Report
UPSC-CSE परीक्षा में 553 रैंक हासिल करने वाली कु. आरुषा पाटील को सम्मान
Sangli, Maharashtra:Sng_mpsc_satkar UPSС व CSE परीक्षा में नेत्रदीपक संपादन कर चुकी युवतियों के गांव में सत्कार घोषित किया गया. अँकर - सांगली के ऐतवडे बुद्रक में UPSC व CSE परीक्षा में नेत्रदीपक संपादन कर युवतियों का गांवच्यावतीने घोषित सत्कार किया गया. जनसुराज्य शक्ती पक्ष के आमदार विनायक कोरे व भाजपाचे आमदार सत्यजित देशमुख व माजी आमदार मानसिंगराव नाईक इनके हस्ते यह सत्कार हुआ. UPSC में 553 रैंक पाने वाली कु.आरुषा शरद पाटील को विशेष सम्मान मिला. शिक्षणमहर्षी कर्मवीर भाऊराव पाटील के गाव की शिरपेच में मान का तारा रोवने के साथ कर्मवीर के मातृभूमी का गौरव देशभर में बढ़ाने की भावना आमदार विनय कोरे ने व्यक्त की.0
0
Report
NCERT के मराठा सम्राज्य नक्शे को हटाने पर सांगली में मराठा सम्मान मोर्चा
Sangli, Maharashtra:एनसीईआरटी विरोधात एक मे रोजी सांगलीत शिवप्रतिष्ठानचा मराठा सन्मान मोर्चा अँकर-एनसीईआरटी कडून मराठा साम्राज्याच्या इतिहासाबाबत पाठ्यपुस्तकात बदल केल्याच्या निषेधार्थ सांगलीत आंदोलन करण्यात येणार आहे. एक मे रोजी सांगलीमध्ये मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा काढण्यात येणार असल्याचं शिवप्रतिष्ठान युवा हिंदूस्तानचे संस्थापक नितीन चौगुले यांच्याकडून जाहीर करण्यात आले आहे. एनसीईआरटीच्या माध्यमातून इयत्ता आठवी मधील मराठा साम्राज्याचा नकाशा हटवण्यात आला आहे, हा प्रकार म्हणजे मराठा साम्राज्याचा इतिहास पुसण्याचा असल्याचा आरोप करत,याच्या निषेधार्थ सांगलीत मराठा साम्राज्य सन्मान मोर्चा काढण्यात येणार असून सर्वपक्षीय असणाऱ्या मोर्चात देशातल्या वेगवेगळ्या प्रांतातील मराठा समाजाचे प्रतिनिधी व कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचे नितीन चौगुलेंकडून स्पष्ट करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
बारामती उपचुनाव: दाद ausencia के बिना सभा में समर्थकों की बीजेपी-सीबीआई मांग!
Rui, Maharashtra:बारामती मंत्री अदिती तटकरे बाईट ऑन सांगता सभा आम्हाला आजही विश्वास बसत नाही दादांशिवाय ही सांगता सभा होत आहे. इथे दादांनी अर्ज दाखल केल्यानंतर फक्त शेवटची सांगता सभा नेहमी या मतदार संघाची परंपरा राहिली आहे. ज्या परिस्थितीत ही पोटनिवडणूक होत आहे आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना आजही दादा आमच्यात नाहीत दादा विना ही सभा या ठिकाणी होण आजही तितकच वेदनादायी आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार आहेत शिवसेनेच्या वतीने अर्ज दाखल करण्याच्या वेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आले होते. शिवसेनेच्या वतीने आज उदय सामंत येणार आहेत. रामदास आठवले येणार आहेत. प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे प्रफुल्ल पटेल उपस्थित राहणार आहेत. मंत्रिमंडळातील विधिमंडळातील सर्व पदाधिकारी आम्ही या ठिकाणी उपस्थित राहत आहोत. गेल्या काही दिवसापासून बारामती प्रचारासाठी येत असताना एका बाजूला कार्यकर्ता म्हणून आम्हाला वेदना वाटत आहेत. ज्य्या मतदारसंघात दादा फक्त अर्ज दाखल करण्यासाठी आणि शेवटची सभा घेण्यासाठी येत होते. राज्यातून सर्व कार्यकर्ते आम्ही प्रचारासाठी इथे येत आहोत. प्रचारासाठी इथे येण्याची गरज आहे अशी मला छोटीशी कार्यकर्ता म्हणून वाटत नाही. बारामतीकर दादांच्या पाठीशी आहेत सुनेत्रा काकींच्या पाठीशी आहेत. कार्यकर्ता म्हणून इथे येऊन बारामतीकरण सोबत संवाद साधन आणि पक्ष म्हणून काकींच्या पाठीशी एक संघटित आहोत ही भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो. सर्वजण दादांसाठी सुनेत्रा काकींसाठी मतदान करणार आहेत. कुठे ना कुठे आज दादांचा कार्यकर्ता म्हणून एक वेदना मनात आहे आज हा दिवस येतोय त्यांच्या विना ही प्रचार सभा येथे होत आहे. मंत्री अदिती तटकरी गहिवरल्या बारामतीत प्रत्येक लावलेल्या झाडाकडे जरी पाहिलं तरी दादांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. मनामध्ये वेदना आहेत आमचा नेता आज आमच्याकडे नाही. दुर्दैवान हे सत्य पचवावं लागत आहे. ऑन मताधिक्य लीड. सर्वाधिक मताधिक्याने सुनेत्रा काकींना या निवडणुकीत यश मिळावं असं आम्हाला वाटतं. त्यांना बारामतीकरांच पाठबळ मिळावं अशी आमची इच्छा राहील. ऑन देशातील रेकॉर्ड तुटेल. बारामतीची जी जनता आहे हे महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. बारामतीकर सांगतात की आम्ही मतदान करणार आहोत दादांचे आमच्यावर अनेक वर्षांचे ऋण आहेत. शरद पवार साहेबांनी या ठिकाणी साठ वर्षापेक्षा अधिक काळ प्रतिनिधित्व केल आहे. बारामती घडवण्यासाठी 35 40 वर्ष दादांनी काम केल आहे. ऑन_झिरो एफ आय आर डीजीसीए अधिकारी अटक वेगवेगळ्या माध्यमातून यंत्रणेच्या माध्यमातून दादांच्या अपघाताची प्रकरणाचा तपासून होता. आम्ही सर्वांनी वेळोवेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्याकडे मागणी केली आहे या प्रकरणाची सीबीआय सीआयडी च्या अनेक केंद्राच्या सर्व यंत्रणा आहेत त्या मार्फत तपासणी करण्यात यावी. तशी मागणी इतर पक्षाचे जसं की रोहित पवार असतील किंवा इतर सामाजिक कार्यकर्ते असतील त्यांनी केलेली आहे. यावेळी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली त्यावेळी काकींच्या लेटरहेडवरचं पहिलं पत्र आहे ते सुद्धा सीबीआयच्या माध्यमातून या प्रकरणाची चौकशी व्हावी हे पत्र होतं. चौकशी सुरू आहे. पहिला प्राथमिक अहवाल एक दीड महिन्यापूर्वी आला होता तो एका यंत्रणेचा एजन्सीचा होता. मधील काळात जय पवार यांनी देखील मधील काळात एक पत्रकार परिषद घेतली होती. सोशल मीडियाच्या माध्यमातून काही माहिती शेअर केली होती. ज्यावेळी सविस्तर अहवाल येईल त्यावेळी मी याबाबतचे सविस्तर पत्रकार परिषद घेईल असं जय पवार म्हणाले आहेत. आमच्या सर्वांची कळकळीची इच्छा आहे दादाच्या अपघात असेल घात असेल याची चौकशी होऊन सत्य बाहेर आलं पाहिजे. सीबीआयच्या माध्यमातून काही पावलं उचलली जात असेल तर ती स्वागतार्ह आहे. तपासाला चौकशीच्या दृष्टीने गती देणं गरजेचं आहे. दादांसारखं विकासाभूमिक नेतृत्व या राज्याने गमावलं आहे. प्रत्येक जण आपापली भूमिका मांडत आहेत. दादांचे कार्यकर्ते म्हणून आमची सुद्धा इच्छा आहे. या प्रकरणाची चौकशी व्हावी सत्यता पुढे यावी. ज्या यंत्रणा तपास करत आहेत त्यांचे वेगवेगळे अहवाल येण्यापेक्षा ते एकत्रित पणाने आले पाहिजे. ऑन_suneet ra Pawar मुख्यमंत्री. कार्यकर्ता म्हणून पक्ष म्हणून स्वभाविक आहे आपल्या नेत्याच्यासाठी आमच्या सगळ्यांचे एक स्वप्न राहणं आमच्यासुद्धा वाटायचं आमच्या नेत्याने राज्याचे मुख्यमंत्री व्हावं दुर्दैवाने दादांना अनेकदा उपमुख्यमंत्री पदाची संधी मिळाली पण त्यांना कधी राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री म्हणून करता आलं नाही अनेकदा त्यांनी ती खंत त्यांच्या भाषणात बोलून दाखवली होती. आम्हाला नेहमी वाटायचे का आमच्या नेत्याला त्या खुर्चीत पाहता यावं. हे राज्य त्यांच्या नेतृत्वाखाली पुढे जावं. दादांचा ते अपूर्ण राहिलेले स्वप्न होतं ते कधी ना कधी सुनेत्रा काकींच्या माध्यमातून पूर्ण व्हावं अशी एक कार्यकर्ता म्हणून मी ती भावना मांडली.0
0
Report
कल्याण पश्चिम वाडेघर में पुतण्य पर जानलेवा हमला; शादी की वजह से विवाद
Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिम वाडेघर परिसरातील धक्कादायक प्रकार. काकाने केला पुतण्यावर जीवघेणा हल्ला. दुसऱ्या जातीच्या मुली सोबत लग्न करतो म्हूणन पुतण्या आणि आईला मारहाण. कल्याण पश्चिम वाडेघर येथे राहणारे शेलार कुटूंबियांना काका कडून पुतण्याला आणि आई ला मारहाण दुसऱ्या जाती मधील मुलीशी लग्न का करतो म्हूणन संदेश शेलार याच्यावर लोखडी रॉड, चॉपर ने जीवघेणा हल्ला केला असून आईला देखील मारहाण करण्यात आली आहे तर गाडीची देखील तोडफोड करण्यात आली आहे संदेश शेलार आणि त्याच्या आईवर केडीएमसी च्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असून खडकपाडा पोलीस याप्रकरणी तपास करत आहे.0
0
Report
मिरा-भायंदर के नगरसेवक पर बलात्कार का मामला, जांच जारी
Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मिरा-भाईंदरमध्ये नगरसेवक यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल झाल्याने मोठी खळबळ उडाली आहे. लग्नाचे आमिष दाखवून जुलै २०२२ पासून पीडितेवर वारंवार अत्याचार केल्याचा आणि तिला धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. मिरा रोड पोलिसांनी आरोपीविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६९ आणि ३५१(२) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या गंभीर आरोपांमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली असून, पोलिस سध्या या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत。0
0
Report
Advertisement
आषाढ़ीवारी के लिए 1300 करोड़ का आराखड़ा मंजूर, 964 करोड़ स्वीकृत; 5000 मोबाइल शौचालय तैयार
Pandharpur, Maharashtra:मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आषाढी वारीच्या पूर्व तयारी निमित्त बैठक घेतली आहे. पालखी मार्गावरील वारकऱ्यांच्या विश्रामस्थळ सुविधा निर्मिती संदर्भात अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गातील विकास कामांसाठी एक हजार तीनशे तीन कोटी रुपयांचा आराखडा तयार करण्यात आला होता. त्यापैकी 964 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. दोन्ही पालखी मार्गावरील स्वच्छता गृहासाठी सेफ्टी टॅंक, कमानीचे बांधकाम, जमीन सपाटीकरण, हायमास्ट पोल, संरक्षक भिंतीच काम, रस्त्यांची दुरुस्ती, पालखी कट्टा तयार करणे कामे पूर्ण झाली आहेत. मागील वर्षी जर्मन हँगर व्यवस्था केली होती. त्यामुळे वारकऱ्यांच्या निवाऱ्याची चांगली सोय झाली होती. यंदाही अतिरिक्त प्रमाणात जर्मन हँगर ची संख्या वाढवण्याच्या सूचना पालकमंत्री विजयकुमार गोरे यांनी दिल्या आहेत. पालखी मार्गावर यंदा 5000 फिरती शौचालय पुरवण्याचे नियोजन करण्यात आले आहे.0
0
Report
राष्ट्रीय महिला आयोग अध्यक्ष ने नवी मुंबई जनसुनावणी में महिला सुरक्षा पर जोर दिया
Navi Mumbai, Maharashtra:story slug - महिलांच्या सुरक्षिततेसाठी अंतर्गत समिती आणि स्थानिक समितीचे सक्षमीकरण काळाची गरज;- विजय रहाटकर ftp slug - nm mahila surksha shots- byet- vijaya rahatkar reporter- swati naik navi mumbai anchor: महिलांना कामाच्या ठिकाणे सुरक्षित वातावरण मिळावे आणि त्यांच्या तक्रारींचे स्थानिक पातळीवरच निवारण व्हावे, यासाठी 'अंतर्गत समिती' आणि 'स्थानिक समिती यांचे सक्षमीकरण करणे अत्यंत गरजेचे आहे. कायदा मजबूत आहे, मात्र त्याची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी संस्थांनी केवळ ऑडिट करून न थांबता 'पोस्ट ऑडिट'वर भर दिला पाहिजे, असे प्रतिपादन राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांनी नवी मुंबईत केले. vo 1- महिलांना आपल्या तक्रारी घेऊन दिल्लीपर्यंत येणे शक्य नसते, ही बाब लक्षात घेऊन राष्ट्रीय महिला आयोगाने 'जनसुनावणी' हा उपक्रम सुरू केला आहे. मंगळवारी नवी मुंबईतील सिडको भवन येथे कोकण विभागाची जनसुनावणी पार पडली. यामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे आणि पालघर या पाच जिल्ह्यांतील महिलांच्या कौटुंबिक समस्या, मालमत्तेचे वाद आणि छळाच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले. यावेळी नवी मुंबईचे पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्यासह वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी विजया रहाटकर यांनी पत्रकारांशी संवाद साधताना महिलांच्या प्रश्नांवर प्रशासन आणि संस्थांच्या संवेदनशीलतेवर विशेष भर दिला. बाईट- विजया राहटकर- राष्ट्रीय महिला आद्यक्षा vo2-अमरावती येथील प्रकरणाचा उल्लेख करताना रहाटकर यांनी सांगितले की, "मी स्वतः या प्रकरणाचा आढावा घेतला असून पोलिस आयुक्त आणि जिल्हाधिकाऱ्यांना मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. पीडित मुलींनी न घाबरता पुढे यावे, त्यांचे नाव गुप्त ठेवले जाईल. आपण सर्वांनी मिळून लढा दिला, तरच दोषींना कठोर शिक्षा मिळेल. असे स्पष्ट केले. बाईट- विजया रहाटकर- आद्यक्षा vo2- देशभरातील २०० जिल्ह्यांमध्ये स्थानिक समित्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असल्याचे रहाटकर यांनी सांगितले. तक्रार करणाऱ्या महिलांना केवळ न्याय नव्हे, तर संवेदनशीलता आणि सुरक्षित वातावरण मिळणे आवश्यक. महिलांच्या प्रश्नांमध्ये केवळ आयोगच नव्हे, तर संपूर्ण यंत्रणेने संवेदनशील राहून एकत्र काम करण्याची गरज आहे. काही त्रुटी असल्या तरी संपूर्ण व्यवस्था सुधारण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. असेही त्यांनी स्पष्ट केले. नवी मुंबईतील जनसुनावणीत एकूण ८० नोंदणीकृत तक्रारीपैकी ५२ तक्रारी पोलिसांनी सुनावणी पुर्वी निकाली काढल्याने २८ आणि सुनावणी दरम्यान आलेल्या ३५ अशा एकूण ६३ तक्रारीवर थेट सुनावणी झाली. बाईट- विजया रहाटकर - आद्यक्षा0
0
Report
धाराशिव में अनियमित वर्षा ने किसानों की द्राक्ष-आम बागें तबाह
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये अवकाळी पावसाचा तडाखा तुळजापूर-धारूर भागात गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे द्राक्ष व आंबा बागांचे नुकसान झाले. शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून द्राक्ष आणि आंब्याच्या बागा उद्ध्वस्त झाल्या आहेत. हातात आलेले पीक वाऱ्याने व गारांनी जमीनदोस्त झाले. प्रशासनाने नुकसानभरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर के बल्लारपूर में टीवीएस शोरूम गोदाम में भीषण आग, 25 बाइक जलकर खाक
Chandrapur, Maharashtra:दुचाकींच्या गोदामाला भीषण आग , 25 वाहने जळून खाक , चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर येथील घटना. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरातील टीव्हीएस शोरूमच्या गोदामात दुपारी भीषण आग लागली. आग इतकी भीषण होती की, दूरवरूनही धुराचे लोट दिसत होते. बल्लारपूर शहरातील मुख्य रस्त्यावर काटा गेटजवळ मलिक मोटर्सचे टीव्हीएस शोरूम आहे. या शोरूमच्या शेजारी त्यांचे गोदाम आहे. त्या गोदामात सुमारे २५ नवीन दुचाकी आणि ॲक्सेसरीज होत्या. गोदामाच्या बंद शटरमधून धूर निघताना दिसल्यावर अग्निशमन दलाला तात्काळ कळवण्यात आले, पण तोपर्यंत आगीने गंभीर वळण घेतले होते. अग्निशमन दलाची वाहने घटनास्थळी पोहोचेपर्यंत, शोरूमच्या गोदामातील सर्व माल, राखा झाला होत्या. अग्निशमन दलाच्या तीन वाहनांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्यात आले. धूर जवळच्या दुकानांमध्येही शिरला होता, सुदैवाने शेजारच्या दुकानांना आग लागली नाही. शोरूम मालकाच्या मते, शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज आहे.0
0
Report
माधुरी मिसाल ने हिंजवड़ी IT पार्क की कंपनी पर धार्मिक प्रथाओं के आरोप लगाए
Pimpri-Chinchwad, Maharashtra:राज्याच्या नगर विकास परिवहन सामाजिक न्याय आणि अल्पसंख्यांक विभाग मंत्री माधुरी मिसाळ यांनी हिंजवडी आयटी पार्कमधील एक नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीवर गंभीर आरोप केलेत. नामांकित बहुराष्ट्रीय कंपनीतील जेंट्स रेस्ट रूममध्ये एका विशिष्ट धर्माच्या धार्मिक विधी करण्यात येतात आणि तिथे इतर कर्मचाऱ्यांना जाण्यास प्रतिबंध घालण्यात येतात, असा गंभीर आरोप त्यांनी केلाय. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्यांनी पुणे पोलीस आयुक्तालयाकडे व्यक्त केली आहे.0
0
Report
नवी मुंबई में अतिक्रमण अधिकारी रिश्वत लेते पकड़े गए
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेतील अतिक्रमण विभागाशी संबंधित बिल प्रकरणात उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड यांना ४२ हजार रुपयांची लाच स्वीकारताना नवी मुंबई लाचार लचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. या कारवाईमुळे महापालिका प्रशासनात एकच खळबळ उडाली असून, अधिकाऱ्यांच्या प्रामाणिकपणा आणि पारदर्शक कारभारावर पुन्हा एकदा मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर में भ्रष्टाचार और महिला शोषण के खिलाफ कोयला कर्मियों का आंदोलन
Chandrapur, Maharashtra:भ्रष्टाचार आणि महिला कर्मचाऱ्यांच्या शोषणाविरोधात चंद्रपुरात कोळसा कर्मचाऱ्यांचं आंदोलन चंद्रपूर जिल्हा हा देशातील सर्वाधिक कोळसा उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यांपैकी एक असून जवळजवळ 20 हजार कर्मचारी वेकोली या सरकारी कोळसा कंपनीत काम करतात. मात्र गेल्या काही वर्षांपासून वेकोलीच्या वरिष्ठ कर्मचाऱ्यांकडून होणाऱ्या मनमानी आणि भ्रष्ट कारभारासोबतच महिला कर्मचाऱ्यांचं शोषण केल्या जात असल्याचा गंभीर आरोप कर्मचारी संघटनेच्या वतीने करण्यात आलेला आहे.0
0
Report
गोडावऊन दस्तावेज़: रिकॉर्ड सुरक्षित रखने का दावा, अफवाहों पर लगाम
Shirdi, Maharashtra:समता नागरी सहकारी पतसंस्थेकडून गोडावूनमधील कागदपत्रांवर अधिकृत खुलासा...पत्रकाद्वारे खुलासा 40 वर्षांची सेवा, लाखो ग्राहकांचा विश्वास असल्याचा दावा... पूरस्थितीच्या धोक्यामुळे महत्त्वाचे रेकॉर्ड 2 ते 3 सुरक्षित ठिकाणी हलवले... अकाउंट ओपनिंग फॉर्म, कर्ज फाइल्स, स्टेशनरीसह इतर कागदपत्रांचा समावेश.. निवारा येथे स्वतंत्र रेकॉर्ड रूम तयार करून कागदपत्रे सुरक्षित ठेवल्याची दिली माहिती... सप्टेंबर 2025 च्या पुरानंतर काही कागदपत्रे तातडीने स्थलांतरित.. सर्व रेकॉर्ड स्कॅन करून सॉफ्टवेअरमध्येही सुरक्षित जतन केल्याचा दावा... गोडावूनमधील कागदपत्रांमध्ये कोणतेही आक्षेपार्ह साहित्य नसल्याचे स्पष्टीकरण... काही अपप्रवृत्तींनी अफवा पसरवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप... ग्राहकांनी афवांवर विश्वास ठेवू नये, विश्वास कायम ठेवण्याचे आवाहन...0
0
Report
अकोला में सरकारी हड़ताल के बीच लग्न की नोंदणी: दूल्हा-दुल्हन ने कार्यालय-प्रवास किया
Akola, Maharashtra:लग्न म्हटलं की ढोल-ताशा, फुलांची सजावट आणि आनंदाचा जल्लोष… पण अकोल्यात एका लग्नाची गोष्ट थोडी वेगळीच ठरली. इथे नवरा-नवरीने लग्नाच्या मंडपाऐवजी थेट जिल्हाधिकारी कार्यालयातच फेऱ्या मारल्या! सोलापूरचा वर आणि अकोल्याची नवरी… दोन्ही कुटुंबांनी ठरवलं – “थेट नोंदणी विवाह करूया!” ऑनलाइन अर्जही भरला, 21 एप्रिलची तारीखही फिक्स… सगळं प्लॅनिंग रेडी! पण म्हणतात ना… “लग्नात काही ना काही ट्विस्ट असतोच!” ट्विस्ट होता – कर्मचाऱ्यांचा संप! लग्नासाठी सजून-धजून आलेले वर-वधू आणि वऱ्हाडी मंडळी थेट नोंदणी अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले… पण तिथे मिळालं एकच उत्तर –“आज लग्न होणार नाही!” मग काय… नवरी-नवरदेवाने मंडपाऐवजी ऑफिस ते ऑफिस अशी फेरी सुरू केली!नोंदणी कार्यालयातून थेट जिल्हाधिकारी कार्यालय… तिथून अधिकाऱ्यांकडे… अगदी जिल्हाधिकाऱ्यांनाही भेटले, मात्र जिल्हाधिकाऱ्यांनी सुद्धा हतबलता दाखवली. पण शेवटी… ना मंगलाष्टक, ना हार… फक्त फाईल आणि चकरा..एकीकडे सरकार नोंदणी विवाहाला प्रोत्साहन देतंय…आणि दुसरीकडे, तारीख मिळूनही “संप”मुळे लग्नच होत नसेल, तर नवरा-नवरीने काय करायचं?आता या जोडप्याची अवस्था अशी झाली की “लग्न झालं नाही… पण सरकारी कार्यालयांची सगळी टूर मात्र पूर्ण झाली!” अकोल्यात लग्नाचा मुहूर्त ठरला… पण ‘सरकारी संप’ने अडथळा लागावा अशी गमतीदार चर्चा परिसरात रंगू लागली आहे.0
0
Report
Advertisement
