icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

छत्रपति शिवाजी महाराज टर्मिनस पर प्लेटफॉर्म विस्तार: ट्रैफिक ब्लॉक 85 से 108 दिन, ट्रेनें प्रभावित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रेल्वे प्रशासनातर्फे विविध पायाभूत सुविधांच्या सुधारणेसाठी सध्या महत्त्वाच्या प्रकल्पांची कामे हाती घेण्यात आली आहेत. यासाठी घेण्यात येत असलेल्या ट्रॅफिक ब्लॉकमुळे छत्रपती संभाजीनगरमार्गे धावणाऱ्या काही प्रमुख रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात, मार्गात तात्पुरते बदल केले आहेत. याचा सर्वाधिक परिणाम मुंबईकडे जाणाऱ्या प्रवाशांवर होणार आहे. मुंबई येथील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या प्लॅटफॉर्म क्रमांक १६ व १७ च्या विस्तारीकरण व नूतनीकरणासाठीचा ट्रॅफिक ब्लॉक आता ८५ दिवसांवरून १०८ दिवसांपर्यंत वाढविला आहे. या तांत्रिक कामामुळे  बल्लारशाह छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (नंदीग्राम) एक्स्प्रेस ही गाडी १८ मे या कालावधीत दादर स्थानकापर्यंतच धावेल. दादर ते सीएसएमटी दरम्यानचा प्रवास रद्द राहणार आहे.. सोबतच ओखा एक्सप्रेस  आणि इतर काही गाड्यांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे..
0
0
Report

बारिश के साथ ताडोबा-अंधारी वन्यजीव गणना: रातभर ऊँचे मचान पर प्रेमी जुटे

Chandrapur, Maharashtra:पावसाच्या साथीने ताडोबा परिघात पार पडली वन्यजीव गणना, आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्य आणि जिल्हाभरातून रात्रभर बसले हौशी प्रगणक, दुधाळ चंद्रप्रकाशात घेतला जंगलाचा अवर्णनीय आनंद अँकर:--पावसाच्या साथीने चंद्रपूर जिल्ह्यातील ताडोबा-अंधारी व्याघ्र परिघात बुद्धपौर्णिमेनिमित्त हौशी वन्यजीव गणना पार पडली. ताडोबा प्रशासनाने आधीच सज्ज केलेल्या उंच मचाणीवर देश-राज्य आणि जिल्हाभरातून हौशी प्रगणक रात्रभर नोंदी करत बसले. या सर्व हौशी वन्यजीवप्रेमींनी दुधाळ चंद्रप्रकाशात जंगलाचा अवर्णनीय आनंद घेतला. यात त्यांना शेकडोच्या संख्येत पक्षी -प्राणी यांचे दर्शन झाले. मात्र ऐन मध्यरात्र्री जोरदार बरसलेल्या पाऊससरींनी आनंदात काही काळ व्यत्यय आणला. निसर्गानुभव असे नाव असलेल्या या उपक्रमात ताडोबाच्या बफर क्षेत्रातील 57 लोखंडी मचाण सज्ज करण्यात आल्या होत्या. एका मचाणीवर क्षमतेनुसार 2 ते 4 प्रगणक बसू शकतील अशी सोय करण्यात आली होती. कोअर म्हणजे गाभा क्षेत्रात वन विभागाचे कर्मचारी आणि अधिकारीवर्ग यांनी प्राणीगणना केली. या गणनेतून जी आकडेवारी समोर येते, तिला शास्त्रीय मान्यता नसली, तरी कोणत्या प्राण्यांचे वास्तव्य कोणत्या भागात आहे हे ढोबळमानाने सिद्ध होते.  बुद्ध पौर्णिमेचा चंद्र तेजोमय असल्याने त्यात जंगलाचा आणि वन्यजीवांचा अनुभव घेणे ताडोबात दाखल झालेल्या वन्यजीवप्रेमींसाठी पर्वणी ठरली.
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर की जलयोजना विवाद के बीच कार्य तेज़ी से कराने का निर्देश

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या नवीन पाणी योजनेमधील वाद संपता संपत नाहीये त्यामुळे सातत्याने बैठका प्रशासनाला घ्याव्या लागतात.. नवीन पाणीपुरवठा योजनेच्या कामांना गती द्या. कंत्राटदाराने छोट्या-छोट्या कारणांसाठी कामे थांबवू नयेत. प्रलंबित देयके योग्य ती कागदपत्रे तपासून आणि पडताळणी करूनच अदा करावीत, अशा निर्देश विभागीय आयुक्त जी. श्रीकांत आणि महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे सदस्य यांनी दिले आहेत. प्रकल्प कंत्राटदाराने देयके प्रलंबित असल्याबाबत न्यायालयात तक्रार केली होती. या पार्श्वभूमीवर विभागीय आयुक्त कार्यालयात आढावा बैठक झाली. या वेळी योजनांच्या पूर्ण आणि अपूर्ण कामांचा आढावा घेण्यात आला. बैठकीला मजीप्राच्या मुख्य अभियंता यांच्यासह कंत्राटदार आणि अधिकारी उपस्थित होते. कंत्राटदाराने मुदतीत पाणी पोहोचेल हे लक्षात घेऊन प्राधान्यक्रमाने कामे मार्गी लावावीत, अशा सूचना करण्यात आल्या.
0
0
Report

सोलापुर में पहले स्मशानभूमि के निर्माण को प्राथमिकता, गोरे ने प्रशासन को निर्देश दिए

Solapur, Maharashtra:सोलापूर - मागणीच्या ठिकाणी प्रथम स्मशानभूमी उभारण्यास प्राधान्य द्या - मंत्री जयकुमार गोरे Anchor - महाराष्ट्र राज्याच्या स्मशानभूमी समितीची पहिली बैठक मुंबईत पार पडली. या समितीचे सदस्य म्हणून निवड झालेले आमदार देवेंद्र कोठे यांनी या बैठकीत सहभाग घेतला. यावेळी ग्रामविकास मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी प्रशासनाला नवीन स्मशान म्हणून संदर्भात विविध निर्देश दिले आहेत. राज्यातील स्मशानभूमीची सद्यस्थिती परिसर सुशोभीकरणाबाबत सखोल अभ्यास करून आवश्यक उपाययोजना सूचनासाठी राज्यस्तरीय अभ्यास समिती गठीत करण्याबाबत या बैठकीत चर्चा करण्यात आली.
0
0
Report

छत्रपती संभाजी नगर में नई कंपनी से कचरा संकलन शुरू, 29 वार्डों में साफ-सफाई

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरात आजपासून कचरा संकलनाचं काम नवी कंपनी करणार आहे जुन्या कंपनीच्या बऱ्याच तक्रारी होत्या त्यामुळे त्यांचं कंत्राट रद्द झालं होतं आता नव्या कंपनीला कंत्राट दिलाय महत्त्वाचा म्हणजे ही कंपनी रोज कचरा उचलणार आहे छत्रपती संभाजी नगर शहरात कचरा संकलनासाठी आतापर्यंत २५० ते ३०० कोटी रुपयांचा खर्च १० वर्षांसाठी होत होता. आता यासाठी १००० ते ११०० कोटींचा खर्च होणार आहे. गुजरातमधील एक कंपनीला कंत्राट दिले आहे. महाराष्ट्र दिनानिमित्त १ मे रोजी या कामाचा शुभारंभ झाला. २ मेपासून शहरातील २९ प्रभागांतून प्रत्यक्ष कचरा संकलन सुरू होणार आहे. कंपनीने काम सुरू करण्यापूर्वी सर्वेक्षण केले अहे. त्यात ५ लाख २ हजार मालमत्ता असल्याचे समोर आले आहे. यात ४ लाख ५६ हजार ८०४ निवासी मालमत्ता, तर ४५ हजार ३७५ व्यावसायिक मालमत्ता आहेत. त्यानुसार कंपनीने रोडमॅप तयार केला. सकाळी ६ ते दुपारी २ वाजेपर्यंत २ शिफ्टमध्ये कचरा उचलला जाणार आहे. २९ प्रभागांतील प्रत्येक घराघरापर्यंत या गाड्या पोहोचतील. त्यासाठी घंटागाड्यांना रुट ठरवून दिला आहे. जीपीएसद्वारे त्यांच्यावर देखरेख ठेवण्यासाठी कंपनीने कंट्रोल रुमही उभारली आहे.
0
0
Report
Advertisement

पालघर में मिनी ट्रैवलर बस हादसा, 16 घायल और एक महिला की मौत

Palghar, Maharashtra:पालघर _पालघर तालुक्यातील चिंचपाडा परिसरात मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मिनी ट्रॅव्हलर बसचा शुक्रवारी भीषण अपघात झालाय. गुजरातहून मुंबईकडे येत असताना बसचा टायर फुटल्याने नियंत्रण सुटले आणि मागून येणाऱ्या भरधाव वाहनाने ट्रॅव्हलरला जोरदार धडक दिली. या अपघातात मिनी ट्रॅव्हलरमधील १६ प्रवासी गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी कासा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघातामुळे काही काळ महामार्गावर मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. यामध्ये पुष्पा लाड या महिलेचा मृत्यू झाला आहे. तर बाकी किरकोळ जखमी असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे。
0
0
Report

गर्मी में रक्तदान शिबिर घटने से अस्पतालों में रक्त संकट

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हाळ्यामध्ये शिबिरांची संख्या घटल्याने शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रक्तपेढीत रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. सध्या घाटीत केवळ १५० बॅग रक्त शिल्लक असून हा साठा अवघे ३ ते ४ दिवस पुरेल इतकाच आहे. हीच परिस्थिती जिल्हा रुग्णालय आणि खासगी रुग्णालयांतही आहे. रक्तटंचाईचा परिणाम शस्त्रक्रियांवर होऊ शकतो. दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटते. मात्र, यंदा तापमानाचा पारा ४० अंशांच्या पार गेल्याने सामाजिक संस्थांकडून आयोजित केली जाणारी शिबिरे जवळपास ठप्प झाली आहेत. कडाक्याच्या उन्हामुळे रक्तदातेही केंद्रावर येण्यास टाळाटाळ करत आहेत. त्यामुळं रक्त तुटवडा जाणवत आहे...
0
0
Report
Advertisement

नागपुर पुलिस ने ड्रग टेस्टिंग किट से पांच मिनट में रिपोर्टिंग शुरू करने का दावा किया

Nagpur, Maharashtra:Ngp Drugs Test live u ने फीड पाठवले (विडिओ आहे नागपूर पोलिसांकडे आता ड्रग टेस्टिंग किट प्राप्त झाल्या आहेत. बरेचदा आरोपीने ड्रग सेवन केल्यानंतरही वैद्यकीय तपासणीला उशीर व्हायचा... मात्र आता अत्याधुनिक ड्रग टेस्टिंग किट्स मशीनमुळे ऑन द स्पॉट संबंधित व्यक्तीने किती आणि कोणते अमली पदार्थ सेवन केले याचा अहवाल नागपूर पोलिसांना प्राप्त होणार आहे. ड्रग्स वा कुठलही अमली पदार्थ सेवन करणाऱ्याला पोलिसांनी धरल्यानंतर त्याच्यावर गुन्हा दाखल करताना त्या व्यक्तीला वैद्यकीय तपासणीसाठी नेले जाते,या प्रक्रियेत बराच कालावधी हा निघून जातो. मात्र, आता पोलिसांना दोन अत्याधुनिक ड्रग्स टेस्टिंग किट्स व ब्रेथ अँनालायझर्स प्राप्त झाले आहेत. ड्रग टेस्टिंग किट्स मुळे अवघ्या पाच मिनिटांच संबंधित व्यक्तीने कोणते अमली पदार्थांचे सेवन केले आहे आणि किती प्रमाणात सेवन केलेले आहे,याचा अहवाल पोलिसांनी प्राप्त होईलया मशीन सेव्हलाईफ फाऊंडेशनने,मर्सिडीज-बेंझ इंडियाच्या सहकार्याने नागपूर पोलिसांना प्राप्त झाल्या आहेत. यसापूर्वी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी जो वेळ लागायचा असे तो आता अवघ्या पाच मिनिटांवर आल्यामुळे आरोपीना शिक्षा लवकर होईल व महत्वाचे गुन्हा सिद्धीचे प्रमाण देखील वाढणार आहे. बाईट:- रवींद्र कुमार सिंघल- पोलीस आयुक्त, नागपूर शहर
0
0
Report
Advertisement

शिवाजी कौन थे? शिवतीर्थ पर सामूहिक पठन के साथ विरोध प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:गोविंद पानसरे लिखित ‘शिवाजी कोण होता?’ या पुस्तकाचे यवतमाळच्या शिवतीर्थावर सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी आमदार संजय गायकवाड यांच्या विरुद्ध निषेध आंदोलन देखील करण्यात आले. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या सर्वसमावेशक धोरणांचा जागर करण्यासाठी आणि त्यांच्याबद्दल चुकीची विधाने करणाऱ्या प्रवृत्तींना निषेध करण्यासाठी पुरोगामी संघटनांच्या वतीने ‘शिवाजी कोण होता?' या पुस्तकाचे सामूहिक वाचन आणि त्यानंतर जाहीर निषेध आंदोलन करण्यात आले. ‘शिवाजी कोण होता?' ह्या पुस्तकात महाराजांनी १८ पगड जाती-धर्माच्या मावळ्यांना सोबत घेऊन स्वराज्य कसे उभे केले, याचा वस्तुनिष्ठ इतिहास या मांडलेला आहे. त्यामुळे याच पुस्तकाचे सामूहिक वाचन करून शिवरायांचे विचार लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top