445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली में पुलिसकर्मी के घर चोरी, 21 तोला सोना समेत लाखों की चोरी
Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये पोलिसाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला,पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरवरील तीन फ्लॅट फोडले, 21 तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लंपास.. अँकर - सांगली मध्ये पोलीसाच्या घरीच चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे.पोलीसाच्या घरासह तीन ठिकाणी चोरी करत २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखों रुपयांची रोकड लंपास केली आहे.संजयनगर पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये भरदिवसा हा चोरट्यांनी ही चोरी केली आहे,यामध्ये संजयनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई कपिल साळुंखे यांच्या बंद घरात चोरी झाली,साळुंखे हे कुटुंबासह गावी गेले असता चोरट्यांनी हा डाव साधला आहे.त्यानंतर दोघा चोरट्यांनी शेजारी असणारे एक फ्लॅट आणि व आणखी एका अपार्टमेंट मध्ये चोरी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी करत पोबारा केला आहे,दोघा चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून पोलोस चोरट्यांचा शोध घेत आहेत,मात्र पोलीस ठाण्याच्या शेजारीच आणि पोलिसांच्या घरात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.0
0
Report
जुन्नर के नेनेघाट में धुंध की चादर, मॉनसून के पहले सैलानी जुटे
Barav, Maharashtra: пावसाळा सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आतापासूनच पावसाची चाहूल लागली आहे. जुन्नरमधील ऐतिहासिक नानेघाटात धुक्याची पांढरी चादर पसरली असून, निसर्गाचं एक विहंगम रूप पाहायला मिळत आहे. याच धुक्याचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आतापासूनच नानेघाटात गर्दी करायला सुरुवात केलीय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नानेघाटात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. जून महिना उजाडण्यापूर्वीच या भागात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून, संपूर्ण घाट परिसर पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या चादरीत वेढला गेला है. कडक उन्हाच्या चटक्यानंतर आता निसर्गाने कात टाकली असून, हवेत गारवा निर्माण झालाय0
0
Report
आळंदी में इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान: भक्तों ने हजारों टन कचरा हटाया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदी में इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या अभियानात राज्यभरातून ४००० हून अधिक भक्त, संग्राम सैनिक आणि सेवाभावी कार्यकर्ते सहभागी झाले. या उपक्रमात नदी परिसरातील हजारो टन कचरा हटवण्यात आला. पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.0
0
Report
Advertisement
सोलापूर की नई जिंदगी में कोयता हमला: पुलिस ने आरोपी को धिंड दिखाकर दबोचा
Solapur, Maharashtra:सोलापूर शहरातील नई जिंदगी भागामध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली धिंड. जैद शामू शेख असे दहशत पसरवणाऱ्या तरुणाचे नाव. आरोपीने ज्या भागात दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला त्याच भागातून हे धिंड काढण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक झाले. सोशल माध्यमांवर रील बनवत पोलिसांनाही चॅलेंज देण्याचा केला होता प्रयत्न. पोलिसांनी खाकी हिसका दाखवताच आरोपीने माफी मागत कोणीही अशा पद्धतीचे कृत्य न करण्याचे केले आवाहन. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.0
0
Report
डिजिटल जनगणना में बाधा डालने पर महापालिका ने कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशाच्या १६ व्या डिजिटल जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. जनगणनेसाठी नियुक्त केलेले जे प्रगणक अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत, त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे; अन्यथा त्यांच्यावर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याची थेट नोंद घेतली जाणार आहे.0
0
Report
मराठवाड़ा में पानी की भारी कमी, 142 गाँवों के लिए 257 टैंकर जुटाने से जल संकट गहरा रहा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हांची तीव्रता वाढल्यानंतर मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सध्या विभागातील केवळ बीड जिल्हा टँकरमुक्त असून, उर्वरित सातही जिल्ह्यांतील १४२ गावे आणि ७८ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तब्बल २५७ टँकर सुरू करावे लागले आहेत. यात सर्वाधिक १७५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या उन्हाळ्यात मार्चचा पंधरवडा संपण्यापूर्वीच विभागातील अनेक भागांतून टँकरची मागणी झाली होती. यंदा मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ गावांतून पहिली मागणी नोंदवली गेली. त्यानंतर उन्हाचा चटका वाढेल तशी टँकरच्या मागणीत वेगाने वाढ झाली. मराठवाड्यात सध्या केवळ बीड जिल्हा टँकरमुक्त आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम में आरटीई सीटों के प्रवेश: पहले लॉट में 944 चयन, 183 सीटें अभी खाली
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशीम जिल्ह्यात आरटीई अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी पहिल्या प्रतीक्षा यादीतील १४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश २३ मेपर्यंत निश्चित झाले आहेत. जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये १००७ जागा राखीव असून, एकूण २३८१ अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरीत ९४४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत एकूण ८२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अजूनही १८३ जागा रिक्त आहेत.0
0
Report
आरापूर एमआईडीसी के लिए जमीन मापन तेज, 85% हिस्से की संयुक्त मोजणी पूरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापाूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाने येथील मोजणी पथकाकडून अन्य गावांतील मोजणी केली. शेंद्रा, वाळूज आणि विडकीन येथील जागा आता संपल्याने मोठ्या उद्योगांची पावले आरापूरकडे वळणार आहेत. त्यामुळे या मोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आम्हाला दर किती मिळणार ही शेतकऱ्यांची प्रारंभीपासून मागणी होती. शासनाच्या दर निश्चित करणाऱ्या समितीने ठरवलेला दर शेतकऱ्यांना मान्य नसेल तर वाटाघाटीअंती दरनिश्चितीचा प्रस्ताव हा शासनाच्या हायपॉवर कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे.0
0
Report
इंधन अफवाहों के बावजूद आपूर्ति बढ़ी, जिल्हाधिकाऱ्योंने पंपों पर कार्रवाई शुरू की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडत आहे. प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. उलट नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित मागणीपेक्षा २० टक्के अधिक इंधन पुरवठा करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांच्या पॅनिक खरेदीमुळे इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी कठोर पावले उचलेली आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर, बेकायदा साठेबाजी करणाऱ्यांवर, स्टॉक असतानाही पेट्रोल-डिझेल न देणाऱ्या पंपचालकांवर थेट गुन्हे दाखल करून पंप सील करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सध्या १६ लाख ३७ हजार लिटर पेट्रोल आणि ११ लाख २३ हजार लिटर डिझेल उपलब्ध आहे. असे असतानाही शहरातील ३० पेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील १०० हून अधिक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागल्याचे समोर आले आहे. तसेच काही पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांशी वाद होत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही पथके अचानक भेटी देऊन साठा आणि वितरणाची तपासणी करत आहेत.0
0
Report
Advertisement
शिवाजीनगर भूमिगत मार्ग पानी निकासी के लिए चेन्नई से मडपंप आ गया; काम तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाचे पाणी अनेकदा तुंबले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, यंदा पावसाळ्याला अद्याप अवकाश असतानाच प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूüpी तोडगा काढण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. भुयारी मार्गात साचणारे पाणी काढण्यासाठी रेल्वे विभागाने चेन्नईहून विशेष 'मडपंप' मागवला आहे. हा पंप शहरात दाखल होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता याबाबत सोमवारी आढावा बैठक घेणार आहेत. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एजन्सीला काम दिले आहे. येथे १० एचपीचे दोन स्वयंचलित मडपंप बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.0
0
Report
पंतप्रधान के आह्वान पर जैस्वाल रेल यात्रा में, नागपूर-अमृतसर ट्रेन से अंबाला तक पहुँचे
Nagpur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी के आवाहन के बाद राज्यमंत्री जैस्वाल भी रेल्वे से प्रवास कर रहे हैं। उन्होंने नागपूर-अमृतसर ट्रेन से अंबाला तक का प्रवास ट्रेन से करते दिखे।0
0
Report
लातूर में शिक्षक के आक्षेपार्ह भाषे पर शिवराज मोटेगावकर फिर चर्चा में
Latur, Maharashtra:शिवराज मोटेगावकर चा कथित आक्षेपार्ह भाषेत व्हिडीओ समोर... विद्यार्थ्याना शिकवत असताना अश्लील भाषेचा वापर... व्हिडिओ व्हायरल... लातूरमध्ये मोटेगावकर पुन्हा चर्चेत... AC::- नीट पेपरफुटी प्रकरणामुळे चर्चेत आलेल्या शिवराज मोटेगावकर याच्याबाबत आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. विद्यार्थ्यांना शिकवताना अश्लील आणि आक्षेपार्ह भाषेचा वापर केल्याचा कथित व्हिडिओ आता समोर आला आहे. नीटची तयारी करणाऱ्या विद्यार्थी आणि विद्यार्थिनींसमोर शिकवताना आक्षेपार्ह भाषा वापरलयाचा दावा केला जात आहे. या व्हिडिओमुळे संताप व्यक्त केला जात असून, शैक्षणिक वातावरण आणि शिक्षकांची जबाबदारी यावरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.0
0
Report
Advertisement
संभाजीनगर में धूलभरी आँधी से शहर हाहाकर, तेज हवाओं ने लोगों को भयभीत किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरात गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होत आहेत. शनिवारी शहरवासीयांना सोसाट्याच्या वाऱ्यामुळे धुळीचा सामना करावा लागला. ऐन दुपारी ४ ते ५ या तासाभराच्या कालावधीत शहर परिसरात सरासरी ३९ किलोमीटर प्रतितास वेगाने वारे वाहत होते. या वादळी वाऱ्यामुळे शहराच्या अनेक भागांत धुळीचे लोट उसळले. प्रामुख्याने बीड बायपास, सातारा आणि देवळाई परिसरात या वादळाची तीव्रता अधिक जाणवली. त्यानंतर सायंकाळी ६ वाजता शहर परिसरात वाऱ्याचा सर्वोच्च वेग ताशी ६१.२ किलोमीटर इतका नोंदवला गेला. दुपारी ४ ते ५ या वेळेत आलेल्या या वादळामुळे क्रांती चौक, आकाशवाणी चौक, अमरप्रीत चौक आणि कोकणवाडी या भागांतील मोठमोठे बॅनर्स फाटले. वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यामुळे रस्त्यावरील धूळ आणि पालापाचोळा हवेत उडत राहिला. उन्हाळ्याच्या तीव्रतेत या धुळीच्या वादळाने भर घातल्यामुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांची मोठी तारांबळ उडाली, आज ही वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता आहे, पावसाचा अंदाज ही व्यक्त केला आहे.0
0
Report
वाशिम में बड़ा धक्का: शिवसेना नेता सुरेश मापारी भाजपा में प्रवेश, राजनीति गर्म
Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:उद्धव ठाकरेच्या शिवसेनेला वाशिम मध्ये मोठा धक्का बसण्याची शक्यता असून, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे माजी जिल्हाप्रमुख सुरेश मापारी हे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे.जिल्हाप्रमुख पदावरून पायउतार करण्यात आल्यानंतर अवघ्या दोन दिवसांत त्यांनी हा मोठा निर्णय घेतल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.त्यांच्या जागी बालाजी वानखेडे यांची जिल्हाप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली होती.सुरेश मापारी हे माजी जिल्हा परिषद सदस्य,अर्थ व बांधकाम सभापती तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती राहिलेले आहेत.ग्रामीण भागात त्यांचे मजबूत कार्यकर्ते जाळे असल्यामुळे आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.प्राथमिक माहितीनुसार, काल रात्री सुरेश मापारी हे सुमारे २०० ते २५० पदाधिकारी,सरपंच आणि कार्यकर्त्यांसह मुंबईकडे रवाना झाले.तब्बल २९ वाहनांचा ताफा मुंबईच्या दिशेने निघाल्याची माहिती मिळत आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज सकाळी ९ वाजता त्यांचा भाजपमध्ये अधिकृत पक्षप्रवेश होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.खासदार संजय देशमुख यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी असल्याची चर्चा देखील राजकीय वर्तुळात सुरू आहे.यापूर्वी सुरेश मापारी हे शिंदे गटात जाणार असल्याच्या चर्चा होत्या,मात्र आता ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती पुढे आली आहे.0
0
Report
रत्नागिरी सहित कोकण में मानसूनपूर्व बारिश से गर्मी राहत, किसानों में खुशी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी 코कणात मान्सूनपूर्व सरींची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूणसह कोकणात अनेक ठिकाणी आज पहाटेचपासूनच मान्सूनपूर्व सरीं कोसळल्या आहेत.. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे.. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे.. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे..0
0
Report
Advertisement
