445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
राम मंदिर चोरी केस: गोविंद देवगिरी पर आरोप, परिवार ने उन्हें बिन आरोप बताया
Shirdi, Maharashtra:Anc - राम मंदिरातील चोरी प्रकरणी कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी यांच्यावर आरोप होत असताना त्यांच्या कुटुंबियांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले आहेत.चांगलं काम करणाऱ्या वर नेहमी आरोप होतात हा आतापर्यंतचा इतिहास आहे त्यामधून कोणीही सुटलं नाही..संत महात्म्यांना त्रास देणारी मंडळी पूर्वीही होती आणि आताही आहे. आरोप होणे स्वाभाविक आहे राजकीय लोकांकडे मुद्दे नसले की धार्मिक मुद्द्यांवर हात घालून चिखलफेक केली जाते. आम्हाला विश्वास आहे दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल.यातील जे दोषी आहेत त्यांना शिक्षा होईल असा आम्हाला विश्वास असल्याची प्रतिक्रिया गोविंद देव गिरी यांचे चुलत बंधू आचार्य महेश व्यास यांनी झी 24 तासशी बोलतांना दिली आहे..त्यांच्याशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
स्वामी गोविंद देवगिरी महाराज पर आरोप, परिवार ने निष्पक्ष जाँच की मांग की
Shirdi, Maharashtra:Anc - जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के मुख्य कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देवगिरी महाराज पर लगाए जा रहे आरोपों को उनके परिवार ने सिरे से खारिज कर दिया है..स्वामी जी के चचेरे भाई आचार्य महेश व्यास का कहना है कि जो लोग अच्छा काम करते हैं , उन पर आरोप लगना कोई नई बात नहीं है..इतिहास गवाह है कि संत-महात्माओं को पहले भी परेशान किया गया और आज भी किया जा रहा है..उनका कहना है कि जब राजनीतिक लोगों के पास कोई मुद्दा नहीं बचता , तब धार्मिक विषयों पर आरोप लगाकर कीचड़ उछालने की कोशिश की जाती है..उन्होंने विश्वास जताया कि इस मामले में निष्पक्ष जांच होगी, "दूध का दूध और पानी का पानी" हो जाएगा, और जो भी दोषी होगा उसे कानून के अनुसार सजा मिलेगी.. आचार्य महेश व्यास से बात की है हमारे संवाददाता कुणाल जमदाडे ने..0
0
Report
लोणावळा टायगर पॉइंट पर बारिश के बीच पर्यटकों की भारी भीड़
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यातील टायगर पॉईंटवर पर्यटकांची प्रचंड गर्दी लोणावळ्यात दमदार पावसाने हजेरी लावताच प्रसिद्ध टायगर पॉईंटवर पर्यटकांची मोठी गर्दी उसळली आहे. धुक्याची चादर, कोसळणारे धबधबे आणि आल्हाददायक वातावरणाचा आनंद घेण्यासाठी राज्याच्या विविध भागांतून पर्यटक मोठ्या संख्येने दाखल होत आहेत. विकेंड असल्याने वाहनांचीही मोठी वर्दळ पाहायला मिळत असून, पर्यटकांनी सुरक्षिततेचे नियम पाळण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
मावळ में भारी बारिश, 13 गांवों का संपर्क टूट गया
Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यात मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झालं असून अनेक गावांचा संपर्क पूर्णपणे तुटला आहे. इंगळून–पारिठेवाडी हा मुख्य रस्ता पावसाच्या पाण्याखाली गेल्याने 13 गावांचा संपर्क तुटला आहे. स्थानिक नागरिकांना अत्यावश्यक सेवा, विद्यार्थ्यांना शाळा आणि रुग्णांना उपचारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. विशेष म्हणजे या रस्त्याच्या साईड पट्ट्या आणि रस्त्याचं काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असूनही ते अद्याप पूर्ण झालेलं नाही. परिणामी, दरवर्षी पावसाळ्यात नागरिकांना याच संकटाला सामोरं जावं लागत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. दरम्यान, प्रशासनाने तातडीने या भागाची पाहणी करून वाहतूक सुरळीत करण्यासाठी उपाययोजना कराव्यात आणि रखडलेल्या रस्त्याचं काम युद्धपातळीवर पूर्ण करावं, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
चंद्रपूर्ण के मूल गाँव में सीएम फड़नाविस शतचंडी यज्ञ में भाग लेने पहुंचे
Chandrapur, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चंद्रपूर जिल्ह्यातील मूल गावात दाखल. त्यांच्या काकू आणि माजी मंत्री शोभाताई फडणवीस यांनी निवासस्थानी वाड्यात आयोजित शतचंडी यज्ञासाठी मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. हा कौटुंबिक विधी आणि पूजा दरवर्षी आयोजित होते. मुख्यमंत्री या पूजेत सहभागी होतील. या कौटुंबिक कार्यक्रमाला निवडक लोकांनाच प्रवेश आहे. पालकमंत्री डॉ. उईके, यांच्यासह अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी स्वागतप्रसंगी उपस्थित होते. मुख्यमंत्री इथे एक तास थांबणार आहेत.0
0
Report
आंबोली के झरनों में मानसून का जलज्वाला: सभी जलप्रपात पूरी धार से बह रहे
Oras Bk., Maharashtra:जैवविविधतेने समृद्ध असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली मुख्य धबधब्यासह घाटमार्ग परिसरातील सर्वच धबधबे पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाले आहेत. त्यामुळे पहिला वीकेन्डला वर्षा पर्यटकांची गर्दी होताना दिसतेय. आंबोलीतील पांढऱ्या शुभ्र फेसाळणाऱ्या धबधब्यांवर भिजण्याची मज्जा घेत आहेत. उन पाऊस आणि धुकं असं आल्हादायक वातावरण आहे.0
0
Report
Advertisement
रायरगढ़ में अतिवृष्टि चेतावनी: पुलिस ने घर में रहने की अनुमति दी
Chendhare, Maharashtra:हवामान विभाग ने रायगड जिले में अतिवृष्टि का अलर्ट जारी किया है। रायगड जिला प्रशासन तथा पुलिस प्रशासन सतर्क हो गया है। पानी में फँसे नागरिक और वाहन चालकों को बाहर निकालने का काम यंत्रणा कर रही है। जिल्हा के विभिन्न स्थानों पर पुलिस वाहन से घोषणाएं कर नागरिकों को सतर्क रहने की सूचना दी जा रही है। अत्यावश्यक काम न हो तो घर से बाहर न निकलें, यह निर्देश पुलिस की तरफ से जारी किया गया है।0
0
Report
राम मंदिर निधि घोटाले की निष्पक्ष जांच की मांग, ठाकरे गट ने घंटानाद प्रदर्शन किया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:रामाच्या नावाने भक्तांकडून जमा झालेल्या निधीच्या कथित गैरव्यवहाराचा निषेध... आणि दोषींवर कारवाईची मागणी... या मुद्द्यावरून आज ठाकरे गट रस्त्यावर उतरला आहे. राज्यभर सुरू असलेल्या घंटानाद आंदोलनाचा भाग म्हणून छत्रपती संभाजीनगरमध्ये माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्या नेतृत्वाखाली सुपारी हनुमान मंदिरात घंटानाद आंदोलन करण्यात आले, या आंदोलनातून राम मंदिर निधी प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आलीय...0
0
Report
सचिन अहिर के आरोप पर अंबादास दानवे का तीखा जवाब, ठाकरे गुट पर हमला
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:सचिन अहिर यांच्या आरोपाला अंबादास दानवे यांनी जोरदार उत्तर दिले आहे , अहिरानी सूर्यावर थुंकण्याचा प्रयत्न करू नये असे अंबादास म्हणाले 1-पक्षाचं नेतृत्व करण्यात आदित्य ठाकरे कमी पडले-अहिर,अहिरांचा आदित्य ठाकरेंवर 'टू द पॉईंट' निशाणा,फक्त मेळावे घेऊन होणार नाही-सचिन अहिर,जिल्हाप्रमुखांशी थेट संपर्क असला पाहिजे-अहिर,ठाकरेंच्या शिवसेनेत अशी परिस्थिती नव्हती-अहिर उत्तर : दिवसभर हे आदित्य ठाकरे यांच्या गाडीत फिरत होते चिकटून राहत होते, आमची लोक ही म्हणायची इतके चिकटून का राहतात आणि आता याना हे सुचतय का.. 2-आदित्य ठाकरेंना आमदार बनवण्यात माझा वाटा-अहिर,वरळीवर कुणाचा सातबारा नाही उत्तर : कसला वाटा आणि काय आणि सातबारा कुणाचा नसतो यांच्या मणी पैसे आहेत आता म्हणून सातबारा आणि असले शब्द बोलताय.. तुमचं आडनाव पवार ठाकरे नाही आम्हाला माहिती आहे, पण तुम्ही उगाच असले बोलून ठाकरेंवर टीका करण्याचा मोहात पडू नका, तुम्ही खूप लहान आहेत जाणीव ठेवा...0
0
Report
Advertisement
नागपूर में गृहराज्यमंत्री पंकज भोयर के बयान पर राजनीति
Nagpur, Maharashtra:नागपूर पंकज भोयर, गृहराज्यमंत्री On लिंगाडे आमदार - आमदार हे सुशिक्षित पदवीधर मतदारसंघातून निवडून आले आहे चुकीच्या पद्धतीचे काम त्यांच्या हातून होणार नाही. संजय राऊत हे स्वतःच्या पक्षातील लोकांबद्दल विश्वास निर्माण करू शकले नाही. त्यामुळे अनेक जण पक्ष सोडून चालले आहे. - आतापर्यंत उबाठामध्ये जे लोकप्रतिनिधी बाहेर पडले. त्यांनी देखील हाच आरोप केलेला आहे. याचा चिंतन स्वतः संजय राऊत आणि उद्धव ठाकरे यांनी केलं पाहिजे. - रामाचे सगळे भक्त आहे.... त्यांनी देखील रामाची भक्ती करू नये असा आपण म्हणू शकत नाही. इतक्या सगळ्या घडामोडी पक्षांमध्ये का होत आहे याचा आत्मचिंतन केलं पाहिजे.0
0
Report
नागपुर टीईटी पेपर फ्रॉड में SIT जांच शुरू, हत्या प्रकरण भी चर्चा में
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - पंकज भोयर, राज्य गृहराज्यमंत्री (on TET ) - टीईटीची परीक्षा 28 जूनला होणार होती. त्यापूर्वी या संदर्भातील पेपर परराज्यातील व्यक्तीने विकण्याचा प्रयत्न केल्याचे लक्षात येताच पोलीस प्रशासनाने तपास सुरू केला. देशातील इतर राज्यांतही याचे पाय पसरल्याचे लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दखल घेत सखोल चौकशीसाठी एसआयटीची स्थापना केली असून चौकशी सुरू आहे. - *आतापर्यंत 10 जणांना अटक करण्यात आली आहे. हा नेमका प्रकार कुठून सुरू झाला, यासंदर्भातील अहवाल लवकरच समोर येणार आहे. तत्पूर्वी 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली आहे* - *या प्रकरणात आरोपी मिळाले असून काही महत्त्वाचे धागेदोरेही हाती लागले आहेत. सर्व आरोपी परराज्यातील आहेत. संपूर्ण चौकशी आणि अहवालानंतर नेमका कोणाचा काय सहभाग आहे, हे स्पष्ट होईल*. *ऑन लोहगड हत्या प्रकरण* - एका तरुणाचा त्या ठिकाणी जीव गेला आहे. या प्रकरणाची पोलीस प्रशासनाकडून सखोल चौकशी सुरू आहे. मुख्य आरोपीला अटक झाली असून, या घटनेमागे कोणता कट होता का, याचाही तपास सुरू आहे. *सचिन अहिर–वरळी–आदित्य ठाकरे वाद* - सचिन अहिर हे वरळी भागातील वरिष्ठ नेते आहेत. त्या भागातून आदित्य ठाकरे निवडून येतात. त्यामुळे त्यांनी बोलणे स्वाभाविक आहे. विकासाची कामे व्हावीत म्हणून सचिन अहिर यांनी शिंदे गटात सहभाग घेतला असावा. आदित्य ठाकरे यांनी आत्मचिंतन करावे की त्यांचे सहकारी त्यांना का सोडून जात आहेत, असा टोला राज्य गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांनी आदित्य ठाकरे यांना लगावला.0
0
Report
बदलापुर में उल्हास नदी का जलस्तर बढ़ा, चौपाटी पानी में डूबी: भारी बारिश का असर
Ambernath, Maharashtra:बदलापुरात उल्हास नदीचा प्रवाह वाढला नदीकाठची चौपाटी पाण्याखाली बदलापुरात पावसाचा जोर मंदावला बदलापूरात पावसाचा जोर कमी झाला असला तरी कर्जत परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा परिणाम आता बदलापूरमध्ये दिसून येत आहे. बदलापूर शहरातून वाहणाऱ्या उल्हास नदीच्या पाणीपातळीत लक्षणीय वाढ झाली असून नदीकाठावरील चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली आहे. त्यामुळे प्रशासनाकडून नागरिकांना नदीपात्र आणि नदीकिनाऱ्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गेल्या दोन ते तीन दिवसांपासून घाटमाथा, रायगड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे नदीच्या प्रवाहात मोठी वाढ झाली आहे. परिणामी बदलापूरमधील उल्हास नदी चौपाटी पूर्णपणे पाण्याखाली गेली असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. नदीचा वेगही वाढलेला आहे. उल्हास नदीची धोक्याची पातळी १७.५० मीटर इतकी मानली जाते. सध्या प्रशासन नदीच्या पाणीपातळीवर सातत्याने लक्ष ठेवून असून नागरिकांनी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के सावली के टीस्कर हत्ती आखिर गडचिरोली के जंगलों में लौट गया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या सावली तालुक्यासह परिसरात महिन्याभर दहशत निर्माण करणारा आणि एका शेतकऱ्याचा बळी घेणारा टस्कर हत्ती कळपासह अखेर जंगलमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परतल्याने वनविभागासह येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळच्याुमारास हा टस्कर हत्ती सामदा-सोनापूर मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परत गेला. मात्र, तो पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात येऊ नये यासाठी वनविभागाने कोणतीही joखीम न पत्करता सामदा-सोनापूर मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, एक ड्रोन आणि तब्बल ५० कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. हत्तींचा कळप पाहण्यासाठी विविध गावांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वनविभागासमोर आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी धान पेरणीच्या कामात व्यस्त झाले असताना हत्तींच्या धुमाकूळीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांना अखेर यश आले असून, हत्तींचा कळप आणि संबंधित टस्कर गडचिरोलीच्या जंगलात परतला आहे. मात्र, संभाव्य धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने वनविभागाने सामदा-सोनापूर मार्गावर विशेष गस्त सुरूच ठेवली आहे.0
0
Report
माळशेज घाटात मॉनसूनचा निसर्गरम्य सोहळा; धुकामय धबधबें पर्यटकांना मोहित करतात
Shirur, Maharashtra:सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य सध्या पावसाळ्यामुळे पूर्णपणे बहरलं आहे. उंचच उंच डोंगररांगा, धुक्याची दुलई आणि कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र त्रासानंतर निसर्गाचा हा विहंगम नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर माळशेज घाट हा तुमच्यासाठी एक पर्वणी ठरू शकतो.0
0
Report
बेलापुर से राष्ट्रस्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक: स्वामी गोविंददेव गिरी महाराज
Shirdi, Maharashtra:अयोध्या के श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार और आध्यात्मिक जगत की प्रतिष्ठित हस्ती स्वामी गोविंददेव गिरी महाराज, लेकिन उनके इस प्रेरणादायी सफर की शुरुआत हुई थी महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के श्रीरामपुर तालुका के छोटे से गांव बेलापुर से, इसी गांव में उनका जन्म हुआ, यहीं उनका बचपन बीता और दसवीं तक की शिक्षा भी उन्होंने बेलापुर में ही प्राप्त की। बचपन से उनके स्वभाव, धार्मिक संस्कार, पारिवारिक वातावरण और एक सामान्य परिवार से निकलकर राष्ट्रीय स्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक पहुंचने की उनकी यात्रा से जुड़ी कई यादें उनके चचेरे भाई रामप्रसाद विठ्ठलदास व्यास ने Zee News से विशेष बातचीत में स्वामीजी के जीवन से जुड़े कई अनसुने प्रसंग उन्होंने हमारे प्रतिनिधि कुणाल जमदाडे से बातचीत करते हुए बताए...0
0
Report
Advertisement
