445001
यवतमाळ बोरीच्या पुलावरून दुचाकी गेली वाहून
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा तालुक्यातील बोरीअरब येथील पुलावरून नदीचे वाहत्या पाण्यात एक दुचाकी वाहून गेली आहे. परिसरात झालेल्या जोरदार पावसामुळे यवतमाळ दारव्हा मार्गावरील बोरीचा पूल पाण्याखाली आला. पुलावरून पाणी वाहत असताना देखील त्यातून दुचाकी टाकण्याचे धाडस एका युवकाने केले. मात्र हे धाडस त्याच्या अंगलट आले. आणि दुचाकी वहायला लागली, दुचाकीस्वार दोघांनी दुचाकी वाचविण्याचा प्रयत्न केला मात्र पाण्याच्या जोरदार प्रवाहात दुचाकी वाहून गेली, सुदैवाने दोघांचे जीव मात्र बचावले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
11 लाख बुंदी लाडू आणि 75 हजार राजगिरा प्रसाद से भक्तों की भीड़ बढ़ी
Pandharpur, Maharashtra:Anchor - सध्या आषाढी यात्रा सुरू असून श्री विठ्ठल-रुक्मिणी मातेच्या दर्शनासाठी राज्यासह देशभरातून लाखो भाविक दाखल होत आहेत. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन श्रींचा प्रसाद म्हणून मंदिर समितीमार्फत बुंदी व राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध करून देण्यात येत असल्याची माहिती श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली. दर्शनानंतर प्रत्येक भाविक श्रींचा प्रसाद म्हणून लाडू प्रसाद खरेदी करतो. ही बाब लक्षात घेऊन मंदिर समितीने 11 लाख बुंदी लाडू प्रसाद व 75 हजार राजगिरा लाडू प्रसाद उपलब्ध ठेवण्याचे नियोजन केले आहे. यामध्ये बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती मंदिर समितीमार्फत करण्यात येत असून, राजगिरा लाडू प्रसाद आऊटसोर्सिंग पद्धतीने खरेदी करण्यात येत आहे. भाविकांसाठी 70 ग्रॅम वजनाचे दोन बुंदी लाडू प्रति पाकीट रु. 20 दराने, तसेच 25 ग्रॅम वजनाचे दोन राजगिरा लाडू प्रति पाकीट रु. 10 दराने उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या प्रसाद विक्रीसाठी उत्तरद्वार व श्री संत तुकाराम भवन येथे दोन विक्री केंद्रे सुरू असून ती 24 तास भाविकांच्या सेवेत कार्यरत आहेत. बुंदी लाडू प्रसादाची निर्मिती एमटीडीसी भक्तनिवास येथील लाडू उत्पादन केंद्रात हरभरा डाळ, साखर, शेंगदाणा डबल रिफाइंड तेल, काजू, बेदाणे, वेलची आदी दर्जेदार साहित्याचा वापर करून केली जात आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या सर्व नियमांचे काटेकोर पालन करण्यात येत असून, लाडू प्रसादाची शासकीय प्रयोगशाळेमार्फत तपासणी करून तो खाण्यास योग्य असल्याचे प्रमाणित करण्यात आले आहे. सुमारे 110 कर्मचारी व स्वयंसेवक 24 तास भाविकांच्या सेवेसाठी कार्यरत आहेत0
0
Report
पंढरपुर में रिक्षा भीड़: आषाढ़ी वारी के दौरान वारकियों की सुरक्षा खतरे में
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी काळात पंढरपूर मध्ये रिक्षा मधून वारकऱ्यांची धोकादायक वाहतूक, परिवहन मंत्र्यांच्या सूचनेनंतरही आरटीओ पथकाकडून कारवाई कडे कानाडोळा आषाढी वारी काळात आलेले वारकरी आपल्या मठ धर्मशाळा एस टी स्टँड , रेल्वे स्थानक वरून प्रवास करण्यासाठी रिक्षा वापर करतात. मात्र पंढरपूर मध्ये तीन आसन क्षमता असतानाही तब्बल 10 ते 12 वारकरी रिक्षा मध्ये कोंबून बसवले जातात. यामध्ये काही रिक्षा या घरगुती एलपीजी गॅस सिलेंडर वापरून सुरू आहेत. अशाच लवकर पोहोचण्यासाठी रिक्षा चालकामध्ये स्पर्धा सुरू आहे. अनेक रिक्षा या परवाना नसलेल्या सुद्धा वाहतूक करत आहेत आरटीओ विभागाने मात्र या नियमबाह्य रिक्षा वाहतुकीकडे कानाडोळा केल्याचे दिसत आहे. सुदैवाने कोणताही अप्रिय घटना घडत नाहीत. मात्र वारकऱ्यांची सुरक्षित वाहतूक करणे गरजेचं आहे.0
0
Report
बीड के टास्क फोर्स से थाईलैंड-म्यांमार सीमा पर 25 युवाओं की रिहाई के लिए कार्रवाई
Beed, Maharashtra:बीड ब्रेक - म्यानमार मधील ओलिस ठेवलेल्या तरुणांच्या सुटकेसाठी टास्क फोर्स. - बीडच्या पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्याकडे असणार मोहिमेची जबाबदारी. - टास्कफोर्स मध्ये असणार एटीएस,आयबी चे अधिकारी. - थायलंड म्यानमार सीमेवर सायबर माफियांनी ओलीस ठेवलेल्या राज्यातील 25 तरुणांच्या सुटकेसाठी शासन आता ॲक्शन मोड मध्ये. - राज्यातील सर्व तक्रारदार राज्यगृह विभाग व परराष्ट्र मंत्रालय यांच्यात समन्वय साधण्यासाठी पोलीस महासंचालक कार्यालयाने बीड पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांची नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केली. या टास्क फोर्समध्ये एटीएस आणि आयबी चे अधिकारी देखील असणार आहेत. - मोठ्या पगाराच्या आमिषाने राज्यातील तरुणांना एजंटांमार्फत थायलंड येथे नेऊन त्यांचे अपहरण करत म्यानमार सीमेवर ओलीस ठेवले. हा प्रकार बीडच्या तरुणामुळे समोर आला या तरुणाचा छळ करून सायबर फसवणुकीचे कामे करून घेतली जात आहेत. - भारतातील सुमारे 700 व राज्यातील सुमारे 25 तरुण ओलीस असून त्यांच्या सुटकेसाठी प्रत्येकी 7000 डॉलरची खंडणी मागितली जात असल्याचा प्रकार समोर आला होता. याबाबतची सूत्रांनी माहिती दिली आहे.0
0
Report
Advertisement
मंदिर दर्शन रांगे में सांप मिलने से भक्तों में खौफ, सुरक्षा कर्मियों ने पकड़ा
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शन रांगेमध्ये सापांचा वावर असल्याचे समोर आलेला आहे. पत्रा शेड जवळील दर्शन रांगेमध्ये हे साप आढळून आले आहेत. साप आढळून आल्यानंतर भाविकांमध्ये घबराट निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले. भाविक चालत असलेल्या रांगेमध्येच हा सापांचा दर्शन भाविकांना झाल्यानंतर मंदिर समितीच्या सुरक्षा रक्षकांना याबाबत कळवण्यात आलं त्यानंतर सर्व मित्रांच्या मदतीने हे साप पकडण्यात आला.0
0
Report
महाराष्ट्र के ग्रामीण इलाकों में बारिश के लिए धोंडी-धोंडी रीति, किसान चिंतित
Akola, Maharashtra:Anchor : राज्यातील अनेक भागांत पावसाने पुन्हा एकदा दडी मारल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पावसासाठी आता ग्रामीण भागात पारंपरिक श्रद्धा आणि लोकपरंपरांचा आधार घेतला जात असल्याचे चित्र दिसून येत आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण संस्कृतीत पाऊस पडावा म्हणून 'धोंडी धोंडी पाणी दे' ही परंपरा आजही जपली जाते. यंदा मान्सूनच्या सुरुवातीला झालेल्या जोरदार पावसानंतर शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावर पेरणी केली. मात्र त्यानंतर पावसाने अचानक पाठ फिरवल्याने पिके कोमेजण्याची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे वरुणराजाला साकडे घालण्यासाठी अनेक गावांमध्ये धोंडी काढली जात आहे. धोंडीच्या परंपरेत कडुनिंबाचा पाला, मुसळ आणि बेडूक यांना विशेष महत्त्व दिले जाते. दोन व्यक्ती धोंडीचे रूप धारण करून गावभर फिरतात, तर त्यांच्या मागे ग्रामस्थांचा ताफा असतो. गावातील महिला बेडकाची पूजा करून वरुणराजाकडे पावसाची प्रार्थना करतात. अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातही असेच भावनिक आणि पारंपरिक चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे, पाऊस लवकर यावा आणि शेतकरी सुखी व्हावा, या भावनेतून मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांनीही बेडकावर पाणी टाकून वरुणराजाला साकडे घातले. पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या आशा आता वरुणराजाच्या कृपेवर टिकून आहेत.0
0
Report
GI टैग से लोणावळा चिक्की को वैश्विक संरक्षण मिला, परंपरा सुरक्षित
Varsoli, Maharashtra:लोणावळ्याची चिक्की ही केवळ गोड पदार्थ नाही... तर शंभर वर्षांहून अधिक इतिहास जपणारी परंपरा आहे. मुंबई-पुणे रेल्वेमार्गाच्या घाट विभागाचं बांधकाम सुरू असताना कामगारांना झटपट ऊर्जा मिळावी म्हणून गूळ आणि शेंगदाण्यांपासून तयार होणारा हा पौष्टिक गोड पदार्थ विकला जात होता. पुढे स्थानिक व्यावसायिकांनी त्याला व्यापारी स्वरूप दिलं... आणि रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांमुळे लोणावळा चिक्की देशभर प्रसिद्ध झाली. कालांतराने "लोणावळा चिक्की" हे नावच एक विश्वासार्ह ब्रँड बनलं. आज लोणावळ्यात शेंगदाणा, काजू, बदाम, पिस्ता, तीळ, नारळ, ड्रायफ्रूट अशा अनेक प्रकारच्या चिक्की तयार केल्या जातात. दरवर्षी लाखो पर्यटक लोणावळ्यात येतात आणि परतीच्या प्रवासात चिक्कीची खरेदी आवर्जून करतात. आता GI टॅग मिळाल्यामुळे या चिक्कीच्या अस्सलपणाला कायदेशीर संरक्षण मिळणार आहे. त्यामुळे बनावट उत्पादनांवर आळा बसण्यास मदत होईल, तर स्थानिक उत्पादकांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी संधी उपलब्ध होणार आहे. GI टॅगमुळे व्यापाऱ्यांमध्येही उत्साहाचं वातावरण आहे. या निर्णयामुळे ग्राहकांचा विश्वास वाढेल, निर्यातीला चालना मिळेल आणि लोणावळ्याच्या पारंपरिक उद्योगाला मोठा आधार मिळेल, अशी अपेक्षा व्यापारी व्यक्त करत आहेत. पर्यटकांसाठीही ही आनंदाची बातमी आहे. लोणावळ्याला भेट म्हणजे चिक्कीची खरेदी, हे समीकरण अनेक वर्षांपासून कायम आहे. आता GI टॅगमुळे जगभरातील ग्राहकांना अस्सल लोणावळा चिक्कीची खात्री मिळणार आहे, अशी भावना चिक्कीप्रेमी आणि पर्यटक व्यक्त करत आहेत. लोणावळ्याची ओळख फक्त निसर्गसौंदर्यापुरती मर्यादित नाही... तर चिक्कीमुळेही ती जगभर पोहोचली आहे. आता GI टॅग मिळाल्यामुळे या शंभर वर्षांच्या परंपरेला अधिकृत संरक्षण मिळालं आहे. त्यामुळे स्थानिक उद्योग, व्यापारी आणि ग्राहक या तिघांनाही याचा मोठा फायदा होणार आहे..0
0
Report
Advertisement
यवला के नागडे में बिबट्या पकड़, इलाके में हड़कंप के बीच वन विभाग ने पिंजरा लगाकर जेरबंद किया
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नागडे येथे गेल्या काही दिवसांपासून बिबट्याने दहशत माजवली होती स्थानिक नागरिकांनी बिबट्याच्या दहशतीमुळे येवला वनविभागाला नागडे परिसरात पिंजरा लावण्याची विनंती केली होती दरम्यान वनविभागाने आप्पासाहेब साताळकर यांच्या शेतात लावलेल्या पिंजरामध्ये काल मध्यरात्रीच्या सुमारास बिबट्या जेरबंद झाला असून सर्वांनी सुटकेचा निष्वास टाकला Yावेळी पिंजऱ्यात असलेला बिबट्याला पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांनी एकच गर्दी केली आहे0
0
Report
यवतमाल में नकली बीज-ख़ाद से किसान परेशान, आत्महत्याएँ बढ़ीं; राजू उंबरकर लगाए सरकार पर आरोप
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये शेतकऱ्यांच्या माथी बोगस बियाणे आणि खते मारल्या गेल्याने शेतकऱ्यांची फसवणूक झाली असून शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत आहेत. यासाठी सरकार सोबतच कृषी विभागातील अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप मनसे नेता राजू उंबरकर यांनी केला आहे. वाणी, मारेगाव तालुक्यातील अनेक गावांमध्ये त्यांनी दौरा करून शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली. ज्या शेतकऱ्यांची फसगत झाली त्यांनी मनसेकडे तक्रारी कराव्यात, जेणेकरून मनसैनिक शेतकऱ्यांना न्याय मिळवून देईल. कृषी विभागाचा गुणनियंत्रण विभाग बोगस बियाणे व खतांच्या कंपन्यांशी हात मिळवणी करून असल्याने शेतकऱ्यांचा विश्वासघात झाला आहे, त्यामुळे या शेतकऱ्यांना तत्काळ दर्जेदार बियाणे मोफत उपलब्ध करून द्यावे अन्यथा मनसैनिकांच्या रोशाला समोर जावे असा इशाराही राजू उंबरकर यांनी दिला आहे.0
0
Report
गोंदिया में 5 वर्ष की बच्ची पर भटकते कुत्तों का वीडियो CCTV में कैद
Bhandara, Maharashtra:6 कुत्र्यांनी केला 5 वर्षाच्या मुलीवर हल्ला.... घटना सीसीटीव्ही मध्ये कैद..... गोंदिया शहरात एका 5 वर्षाच्या मुलीवर भटक्या कुत्र्यांनी हल्ला चढविला आहे.. ही मुलगी रोडवर उभी असताना अचानक 6 कुत्र्यांनी तिच्यावर हल्ला केला. तिला चावा देखील घेतला मुलगी मोठ्याने ओरडू लागल्याने परिसरातील नागरिकांनी आरडाओरड केल्याने कुत्रे पाळले. सुदैवाने मुलीला गंभीर इजा झाली नसली तरीही तिला रुग्णालयात नेण्यात आले आहे. कुत्र्यांच्या हल्ल्याचा व्हिडिओ सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. त्यामुळे गोंदिया शहरात भटक्या कुत्र्यांचा हैदोस वाढला आहे....0
0
Report
Advertisement
स्वामी समर्थ मंदिर चोरी: 7–8 लाख के सामान, CCTV DVR भी चोरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बजाजनगर परिसर स्थित स्वामी समर्थ मंदिर में अज्ञात चोरों ने चोरी करते हुए लगभग 7 से 8 लाख रुपए मूल्य का सामान चुरा लिया। चोरों ने मंदिर की CCTV DVR भी साथ ले गए। चोरी में 1.5 किलो वजन की चांदी की चरण पादुकाएं, स्वामी समर्थ के 1 तोला सोने का लॉकेट और दानपेटियों से लगभग 2 लाख रुपए की नकद राशि भी चोरी हो गई। आज सुबह 5 बजे सफाई कर्मचारी मंदिर पहुंचे तो मुख्य दरवाजे का ताला टूटा हुआ पाया गया। सेवा कर्मचारियों ने पुलिस को सूचित किया। जानकारी मिलते ही वाळूज MIDC पुलिस टीम घटनास्थल पर पहुंचकर जांच में जुटी है।0
0
Report
जवाहरनगर थाने में PSI हरिश खटावकर के खिलाफ शिक्षिका से बलात्कार का मामला दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शहर पोलीस दलातील एका पीएसआय ने एका खाजगी शाळेत कार्यरत असलेल्या ४८ वर्षीय विवाहित शिक्षिकेला धमकावून, हॉटेल आणि घरात नेऊन तिच्यावर वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी ५३ वर्षीय पोलीस उपनिरीक्षक (PSI) हरीश खटावकर याच्याविरुद्ध जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पीडितेने विरोध केला असता तिला धावत्या कारमध्ये बेदम मारहाण करून, तिचा मोबाईल हिसकावून मध्यरात्री रस्त्यावर सोडून देण्यात आले. आरोपी पीएसआय हरीश खटावकर आणि पीडितेची चार वर्षांपूर्वी ओळख झाली होती. याचा गैरफायदा घेत खटावकरने मे २०१५ मध्ये तिला एका हॉटेलमध्ये बोलावून पहिल्यांदा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. त्यानंतर ऑक्टोबर २०१५ मध्ये घराच्या इंटिरिअरचे काम पाहण्याच्या बहाण्याने स्वतःच्या घरी बोलावून तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. हे जाहीर केल्यास कुटुंबात बदनामी करण्याची धमकी देऊन तो पीडितेला सतत ब्लॅकमेल करत होता.. या गंभीर गुन्ह्यानंतर उपायुक्त कार्यालयाने पोलीस यांच्याकडे कठोर कारवाईसाठी अहवाल सादर केला आहे...0
0
Report
सोलापुर में धनंजय मुंडे के जन्मदिन पर ग्रामदैवत मंदिर में 51 किलो मोतीचूर लड्डू वितरित
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' सोलापुरात माजी मंत्री धनंजय मुंडेचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने करण्यात आला साजरा.. धनंजय मुंडेचे कार्यकर्ते सन्नी देवकातेने माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्या प्रतिमेची केली *'लाडूतुला'* सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात करण्यात आली आहे 'लाडूतुला' धनंजय मुंडे यांच्या 51 व्या वाढदिवसानिमित्त तब्बल 51 किलो मोतीचूर लाडुची करण्यात झाली तुला लाडूतुला झाल्यानंतर सिद्धरामेश्वर मंदिरातील भक्तांसाठी प्रसाद म्हणून लाडूचे करण्यात आले वाटप0
0
Report
Advertisement
यवतमाळ की सूतगिरणी ने उच्च गुणवत्ता से रोजगार बढ़ाए; धागा चीन तक गया
Yavatmal, Maharashtra:विदर्भातील इतिहास पाहता बऱ्याच सूतगिरण्या पंजीबद्ध होऊन ही उत्पादनाखाली आल्या नाही परंतु दिग्रस येथील रामदास आठवले मागासवर्गीय सहकारी सूतगिरणी ही 2019 मध्ये पंजिबद्ध होऊन 2025 मध्ये उत्पादनाखाली आलेली आहे आणि अल्पावधीतच उत्कृष्ट दर्जाचे सूत तयार करणारी अव्वल दर्जाची गिरणी ठरली आहे. गिरणीतील उत्कृष्ट धाग्याच्या गुणवत्तेमुळे हा धागा थेट चायना च्या बाजारपेठेत जहाज मार्गे रवाना झाला. परिणामी मोठ्या संख्येने रोजगार निर्माण झाला आहे. कापसावरील प्रक्रिया उद्योग निश्चितच कापूस उत्पादक जिल्ह्यांसाठी वरदान ठरू शकतो, सूतगिरणीच्या उत्कृष्ट नियोजनामुळे यवतमाळ मध्ये तयार झालेला धागा, थेट साता समुद्रा पार पोहोचला आहे. त्यामुळे पांढऱ्या सोन्याचा जिल्हा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या यवतमाळ मधील कापसाचा धागा हा उच्च प्रतीचा असतो हे पुन्हा सिद्ध झाले आहे.0
0
Report
लोणावळा में फिर से तेज बारिश, पर्यटन नगरी में हरियाली लौट रही है
Varsoli, Maharashtra:Headline: विश्रांतीनंतर पावसाची दमदार हजेरी Anchor: ६ ते ८ जुलैदरम्यान झालेल्या मुसळधार पावसाने लोणावळा अक्षरशः जलमय झाला होता. पूरस्थितीमुळे अनेकांचे संसार उद्ध्वस्त झाले आणि जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले. त्यानंतर काही दिवस पावसाने विश्रांती घेतल्याने शहर पुन्हा पूर्वपदावर येऊ लागले. मात्र गेल्या दोन दिवसांपासून पावसाने पुन्हा पर्यटननगरीत दमदार पुनरागमन केले आहे. या सरींचे पर्यटकांनीही उत्साहात स्वागत केले असून, हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर आणि बहरलेला निसर्ग लोणावळ्याच्या सौंदर्यात पुन्हा भर घालत आहे..0
0
Report
राज्य सरकार ने 7.5hp तक के कृषिपंपधारक किसानों का बिल माफ किया
Washim, Maharashtra:राज्य सरकारने साडेसात अश्वशक्ती पर्यंतच्या कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे जुने थकीत वीज बिल माफ करण्याचा निर्णय जाहीर केला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत घोषणा केली असून राज्यभरातील कृषिपंपधारक शेतकऱ्यांचे तब्बल ४८हजार कोटी रुपयांचे जुने वीज बिल माफ करण्यात येणार आहे.या निर्णयाचा वाशिम जिल्ह्यातील ६६ हजार ८६० शेतकऱ्यांना लाभ होण्याची शक्यता आहे. त्यांच्या नावावर असलेली १ हजार १२ कोटी ५२लाख रुपयांची थकबाकी माफ होणार आहे. या संदर्भातील शासनाचे अधिकृत आदेश प्राप्त झाल्यानंतर महावितरणमार्फत जिल्ह्यात या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार पावसाची अनिश्चितता,वाढलेला शेती खर्च आणि आर्थिक अडचणींच्या पार्श्वभूमीवर या निर्णयामुळे शेतकऱ्यांना आधार होणार आहे。0
0
Report
Advertisement
