icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

NEET पेपर लीक के विरोध में कांग्रेस का आंदोलन, मंत्री से इस्तीफा मांगने की घोषणा

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा-भाईंदरमध्ये काँग्रेसचे NEET पेपर लीक प्रकरणावर आंदोलन मिरा-भाईंदर शहरात आज काँग्रेस पक्षाच्या वतीने NEET पेपर लीक प्रकरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. पेपरफुटीमुळे विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ होत असल्याचा आरोप करत काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. यावेळी पेपर लीक प्रकरणामुळे आत्महत्या केल्याचा दावा करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांनाही श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. आंदोलनादरम्यान केंद्र सरकारवर टीका करत केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसच्या वतीने करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी तडजोड करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचीही मागणी आंदोलकांनी केली.
0
0
Report

शरद पवार ने कोल्हापुर दौरे में जयसिंगराव पवार परिवार से शोक-संवेदना व्यक्त की

Kolhapur, Maharashtra:खासदार शरद पवार हे आज सायंकाळी अचानक कोल्हापूर जिल्हा दौऱ्यावर आले आहेत. कोल्हापुरात पोहोचताच त्यांनी दिवंगत ज्येष्ठ इतिहास संशोधक जयसिंगराव पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबीयांची सांत्वनपर भेट घेतली. काही महिन्यांपूर्वी जयसिंगराव पवार यांचे निधन झाले होते. त्यानंतर शरद पवार यांचा कोल्हापुर दौरा झाला नव्हता. त्यामुळे आज कोल्हापुरात आल्यानंतर त्यांनी सर्वप्रथम पवार कुटुंबीयांची भेट घेत त्यांच्या पत्नी व मुलींचे सांत्वन केले. डॉक्टर जयसिंगराव पवार आणि शरद पवार यांच्या कुटुंबीयांचे अनेक वर्षांपासून अत्यंत जिव्हाळ्याचे आणि जवळचे संबंध आहेत. यापूर्वी खासदार सुप्रिया सुळे, आमदार रोहित पवार यांनी देखील डॉक्टर जयसिंगराव पवार यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले होते. शरद पवार यांनी जयसिंगराव पवार यांच्या संशोधन कार्याबाबतही माहिती घेतली. त्यांच्या निधनापूर्वी कोणत्या विषयांवर लिखाण सुरू होते, याची त्यांनी कुटुंबीयांकडून सविस्तर माहिती जाणून घेतली. तसेच जयसिंगराव पवार यांच्या इतिहास संशोधन क्षेत्रात दिलेल्या योगदानाचा गौरव करत त्यांच्या कार्याच्या आठवणींना उजाळा दिला.
0
0
Report

शेगाव रेलवे ट्रैक पर चलती ट्रेन से गिरकर युवक गंभीर घायल

Buldhana, Maharashtra:शेगाव रेल्वे स्टेशनवर धावत्या ट्रेनमधून पडून अकोल्याचा रहिवाशी असलेला 34 वर्षीय तरुण गंभीर जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विक्की वनतडस असे या जखमी तरुणाचे नाव असून या भीषण अपघातात त्याच्या एका हाताची बोटे कापली गेली आहेत. घटनेची माहिती मिळताच रेल्वे सुरक्षा बल आणि शासकीय रेल्वे पोलिसांच्या कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत जखमीला शेगावच्या सईबाई मोटे सरकारी रुग्णालयात दाखल केले. मात्र, जखमीची प्रकृती चिंताजनक असल्याने डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी अकोला येथे रेफर करण्याचा सल्ला दिला. या अत्यंत गंभीर प्रसंगात शासकीय '१०८' रुग्णवाहिका वेळेवर न आल्यामुळे रेल्वे पोलिसांनी वेळ न दवडता खाजगी रुग्णवाहिका बोलावली आणि जखमी तरुणाला तातडीने अकोला येथील रुग्णालयात हलवले. रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे जखमीला वेळेत उपचार मिळाले असले, तरी '१०८' रुग्णवाहिकेच्या या हलगर्जीपणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न आता पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report
Advertisement

DRI ने नागपुर में 522 किलो गांजे के साथ दो आरोपित गिरफ्तार, कीमत 2.61 करोड़

Nagpur, Maharashtra:नागपूर – डीआरआयची नागपूरात मोठी कारवाई, तब्बल २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा ५२२ किलो पेक्षा अधिक गांजा जप्त केला; दोघांना अटक. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (डीआरआय) मुंबई विभागाच्या नागपूर प्रादेशिक पथकाने, एका आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी सिंडिकेटचा पर्दाफाश केला असून, २ कोटी ६१ लाख रुपये किमतीचा ५२२ किलो किलो गांजा जप्त केला आहे. गोपनीय माहितीवर आधारित करण्यात आलेल्या कारवाईत ओडिशा-मध्य भारत कॉरिडॉरवर कार्यरत असलेल्या आणि महाराष्ट्राला पुरवठा करणाऱ्या आंतरराज्यीय अमली पदार्थ तस्करी नेटवर्कमध्ये सामील असलेल्या दोन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे. डीआरआय अधिकाऱ्यांनी नागपूर जिल्ह्यातील मौदा जवळील मथनी टोल प्लाझा येथे, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५३वरून ओडिशा-आंध्र प्रदेश सीमे कडून महाराष्ट्राकडे जाणाऱ्या वजनाच्या लाँग-प्लॅटफॉर्म ट्रकला अडवले असता त्यामध्ये गुप्त कप्यात ५२२ किलो पेक्षाही अधिक गांजा लपवण्यात आला होता.
0
0
Report
Advertisement

बारामती में तूफ़ानी वृष्टि से भारी नुकसान, उपमुख्यमंत्री ने नुकसानग्रस्त क्षेत्रों का दौरा किया

Rui, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी केली नुकसान ग्रस्त भागाची केली पाहणी... शुक्रवारी बारामती तालुक्यात वादळी वारा आणि मुसळधार पावसाने सर्वांची दैना उडाली होती अचानक आलेल्या वादळी पावसामुळे बारामती शहर व तालुक्यात नागरिकांचे आणि शेतकऱ्याच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आज उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी बारामती तालुक्यातील अनेक गावात जाऊन नुकसानग्रस्त भागाची, शेती पिकाची पाहणी केली आहे.. नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत अशा सूचना देखील संबंधित विभागातील अधिकाऱ्यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी दिल्या आहेत.. त्यामुळे माळवाडी या ठिकाणी 65 वर्षीय महिलेचा अंगावर शेड पडून मृत्यू झाला होता त्यांच्या मेंढ्या शेळ्या मृत्यू पावल्या होत्या या पार्श्वभूमीवर त्यांनी कुटुंबीयांची सांत्वन पर भेट घेतली.. यानंतर त्यांनी माध्यमांचे संवाद साधला...
0
0
Report
Advertisement

आकोला में उपवर्गीकरण के विरोध पर परिसंवाद, 59 जातियों के विकास पर जोर

Akola, Maharashtra:आकोला में अनुसूचित जातिंच्या उपवर्गीकरणाच्या विरोधात आज राज्यस्तरीय परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादात माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले, राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष बबन घोलप यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी और कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी राज्य सरकारच्या उपवर्गीकरणाच्या निर्णयावर जोरदार टीका करण्यात आली. परिसंवादात बोलताना माजी समाजकल्याण मंत्री राजकुमार बडोले यांनी सरकारवर गंभीर आरोप केले. बदर समितीने दिलेला वस्तुनिष्ठ अहवाल सार्वजनिक करण्यात यावा, अशी मागणी त्यांनी केली. हा अहवाल राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोगासमोर सादर करणे आवश्यक होते, मात्र त्याबाबत कोणतीही प्रक्रिया राबविण्यात आली नसल्याचा आरोप त्यांनी केला. उपवर्गीकरणाच्या माध्यमातून समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत बडोले म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार कोणत्याही राजकीय लाभासाठी उपवर्गीकरण करता येणार नाही. मात्र राज्य सरकारने आक्षेप नोंदविण्याची प्रक्रिया पूर्ण होण्यापूर्वीच उपवर्गीकरण लागू करण्याची घोषणा केली. त्यामुळे हा निर्णय राजकीय हेतूने घेतल्याचा संशय निर्माण होत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित वक्त्यांनी सरकारचा निर्णय न्यायालयाच्या निर्देशांच्या विरोधात असल्याचा दावा केला. अनुसूचित जातींमधील सर्व ५९ जातींचा सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकास प्रथम करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही यावेळी देण्यात आला.
0
0
Report

कल्याण के मोहने पाटील नगर में गोलीबारी: अभिषेक पवार ने साजिश रचने का दावा

Kalyan, Maharashtra:कल्याण जवळील मोहने पाटील नगर परिसरात काल रात्री घडलेल्या गोळीबाराच्या घटनेचा खडकपाडा पोलिसांनी अवघ्या काही तासांत उलगडा केला. पोलीस तपासानुसार या प्रकरणात धक्कादायक सत्य समोर आले आहे. सुरुवातीला स्वतःवर हल्ला झाल्याचा बनाव रचणाऱ्या अभिषेक उर्फ अभि पवारनेच संपूर्ण कट आखल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. व्हाट्सअॅप वर विरोधकाचा स्टेटस ठेवल्याच्या कारणावरून काही दिवसांपूर्वी अभिषेक पवार आणि मोनू फुलोरे यांच्यात वाद झाला होता. या वादाचे पर्यवसान मारहाणीपर्यंत झाले होते. काल अभिषेक पवार आणि त्याचे दहा ते बारा साथीदार एका HALDI कार्यक्रमातून रात्रीच्या सुमारास मोहने पाटील नगर येथे मोनू यांच्या भावासोबत उभा होता. मोनू ला पाहताच रात्री मोहने पाटील नगर येथील मैदानात उभ्या असलेल्या मोनू फुलोरे यांच्या दिशेने गोळीबार केला. परंतु, प्रसंगावधान राखत मोनू फुलोरे यांनी घटनास्थळावरून पळ काढल्याने त्यांचा जीव थोडक्यात बचावला. गोळीबाराचा आरोप मोनू पर यावर यावा, यासाठी अभिषेकने स्वतःच्या हातावर गोळी झाडून घेतल्याचा धक्कादायक खुलासा तपासात झाला आहे. खडकपाडा पोलिसांनी तांत्रिक आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे या प्रकरणाचा वेगाने छडा लावत अभिषेक उर्फ अभि पवार आणि त्याच्या साथीदारांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना अटक करण्यात आली असून अभिषेक पवार हा सध्या रुग्णालयात उपचार घेत आहे.या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून खडकपाडा पोलीस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

शिंदे गट की शिवसेना चाळीसगाव में ताकत बढ़ाने की कवायद

Jalgaon, Maharashtra:जळगाव, चाळीसगाव श्रीकांत शिंदे बाईट पॉइंटर्स श्रीकांत शिंदे ऑन शिवसंवाद दौरा शिव संवाद दौऱ्याच्या माध्यमातून कार्यकर्त्यांशी संवाद साधून प्रत्येक तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला जातोय. ऑन चाळीसगावात पालकमंत्र्यांनी लक्ष घालावे प्रत्येक गावापर्यंत प्रत्येक घरापर्यंत शिवसेना गेली पाहिजे. प्रत्येक तालुक्यात येणाऱ्या काळात शिवसेनेची ताकद कशाप्रकारे वाढेल यासाठी सर्वांनी काम केले पाहिजे. उन्मेष पाटील यांच्या रूपाने चाळीसगाव तालुक्यामध्ये शिवसेनेची ताकद वाढली आहे. येणाऱ्या काळात होऊ घातलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक ताकदीने लढून कशा जिंकता येतील यासाठी पक्ष काम करेल. ऑन शिवसेना शिंदे गटात विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्याचा प्रवेश एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून महाराष्ट्रभरातून लोक मोठ्या संख्येने शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत. ऑन शिवसेना बंडखोर रेश्मा काळे ! प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते की आपण निवडणूक लढली पाहिजे. परंतु अंतिम निर्णय पक्षश्रेष्ठी आणि शिंदे साहेब लवकरात लवकर निर्णय घेतील. ऑन बंडखोर रेशमा काळे यांच्यासोबत संवाद साधणार्का ? शिवसेनेचा कार्यकर्ता आदेशाचे पालन करत असतो. प्रत्येक कार्यकर्त्याची इच्छा असते विधान परिषद, विधानसभा, जिल्हा परिषदचा उमेदवारी मिळावी अशी इच्छा असते. नाशिकमध्ये देखील भाजपाचे कार्यकर्त्यांनी देखील फॉर्म कायम ठेवलेली आहेत. त्यामुळे मला वाटते वरिष्ठ लोक एकमेकांशी बोलतील आणि जळगाव नाशिकच्या बाबतीत लवकरच तोडगा काढतील. ऑन गिरीश महाजन दिल्ली रवाना नाशिक आणि मुंबई जागेचा तिढा सोडविण्याबाबत मला माहित नाही म्हणत श्रीकांत शिंदे यांनी गिरीश महाजन यांच्या प्रश्नावर बोलण्यात टाळले. ऑन विजय वडेट्टीवार नगरसेवक पाच पाच लाख रुपये देऊन फोडले जात आहेत ! त्यांचे नगरसेवक आहेत. त्यांच्या नगरसेवकांच्या बाबतीत मला विचारून काय उपयोग? ऑन कॉकरोच जनता पार्टी आंदोलन जंतर मंतर प्रत्येकाला आंदोलन करण्याचा नैतिक अधिकार बाबासाहेबांच्या संविधानाने दिलेला आहे. जंतर मंतरवर आंदोलन करण्यासाठी पोलिसांनी सर्व परवानगी दिली आहे. कुठेही आंदोलन चिरडण्याचे काम सुरू नाही. ऑन रेश्मा काळे नाशिकचा तिढा सुटत नाही त्यामुळे जळगावचाही तिढा कायम वक्तव्य ते काय बोलतात मला माहित नाही. मला माहिती नाही. पक्ष आणि वरिष्ठ नेते जो निर्णय ठरवतील, त्या गोष्टी या ठिकाणी होतील. ऑन चाळीसगावातील दादागिरी शिवसेनेची ताकद सगळीकडे वाढली पाहिजे. त्या अनुषंगाने आम्ही काम करत आहोत. ऑन आमदार किशोर पाटील वक्तव्य चाळीसगावातील बोगस मतदार एसआयआर जे होत आहे ते बोगस मतदार शोधण्यासाठी होत आहे. बोगस मतदार मतदारा जून कसे कट होतील यासाठी आम्ही विशेष लक्ष देणार.
0
0
Report
Advertisement

दापोली में घायल ऑलिव रिडले कासव इलाज के बाद समुद्र में छोड़ दिया गया

Ratnagiri, Maharashtra:दापोलीतील पाळंदे समुद्राकिनाऱ्यावर जखमी अवस्थेत आढळलेल्या एका 'ऑलिव्ह रिडले' प्रजातीच्या दुर्मिळ कासवाला वन विभाग आणि स्थानिक रक्षकांच्या मदतीने यशस्वीरित्या जीवदान देण्यात आले आहे.. दापोलीच्या पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याने या कासवावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले.. हर्णे येथील 'वाईल्ड ॲनिमल रेस्क्युअर'चे सदस्य फहाद जमादार यांच्या वॉटर टँकमध्ये या कासवावर खाऱ्या पाण्यात उपचार करण्यात आले.. ​हे कासव आता पूर्णपणे बरे झाले असून,त्याला बोटीच्या साहाय्याने समुद्रात,त्याच्या नैसर्गिक अधिवासात सुरक्षितपणे सोडण्यात आले आहे.
0
0
Report

ठाणे-पालघर विधानपरिषद चुनाव में रविंद्र फाटक की बिनविरोध जीत, हितेंद्र ठाकूर ने बधाई दी

Vasai-Virar, Maharashtra:ANC : ठाणे-पालघर विधान परिषद निवडणुकीत महायुतीचे उमेदवार रवींद्र फाटक यांची बिनविरोध निवड निश्चित झाल्यानंतर त्यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली. यावेळी हितेंद्र ठाकूर यांनी रवींद्र फाटक यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. विधान परिषद निवडणुकीत बहुजन विकास आघाडीने दिलेल्या पाठिंब्याबद्दल रवींद्र फाटक यांनी ठाकूर यांचे आभार मानले. दरम्यान, बहुजन विकास आघाडी पक्ष शिवसेनेमध्ये विनिलीकरणाचा कोणताही विषयच नाही, त्यांचा पक्ष त्यांनी वाढववा, आमचा पक्ष मी वाढवेन अशी स्पष्ट भूमिका हितेंद्र ठाकूर यांनी मंडली. तर, सर्वप्रथम आपली बिनविरोध निवड झाल्यानंतर प्रथम आप्पांनी आशीर्वाद दिला होता म्हणून त्यांचे आभार माणण्यासाठी आलो असल्याचे आणि महानगरपालिकेचे, नागरिकांचे जे काही प्रश्न असतील त्यांचे ते सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे रवींद्र फाटक यांनी म्हटले आहे.
0
0
Report

रत्नागिरी में शीळ डैम के पानी का संकट: सिर्फ 15–20 दिन बचे

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी शहराची तहान भागवणाऱ्या शीळ धरणातील पाणीसाठा आता कमालीचा खालावला असून शहरावर पाणीटंचाईचे भीषण संकट ओढवले आहे.. धरणात सध्या अवघा ०.५८ दशलक्ष घनमीटर म्हणजेच केवळ १५ ते २० दिवस पुरेल इतकाच जिवंत साठा शिल्लक राहिला आहे.. ​वाढते तापमान आणि लांबलेल्या मान्सूनमुळे परिस्थिती बिकट बनली आहे.. प्रशासनाने सध्यातरी आठवड्यातून एक दिवस पाणीकपात लागू केली आहे; मात्र येत्या काही दिवसांत पाऊस न झाल्यास शहरात 'एक दिवस आड' पाणीपुरवठા करण्याची नामुष्की ओढवू शकते.. प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन केले असून,आता संपूर्ण रत्नागिरीकरांच्या नजरा वरुणराजाच्या आगमनाकडे लागल्या आहेत..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top