icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे के वाघोली में पुलिस की दबिश: तडीपार आरोपी तानाजी जाधव गिरफ्तार, पिस्तौल-कारतूस बरामद

Shirur, Maharashtra:पुणे शहरात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी पोलिसांची धडक मोहीम सुरू आहे. याच दरम्यान वाघोली पोलिसांच्या तपास पथकाने मध्यरात्री केसरंद गावठाण परिसरात गस्त घालत असताना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार तानाजी अर्जुन जाधव या २६ वर्षीय तडीपार आरोपीला रंगेहात ताब्यात घेतले. आरोपीकडून ४१ हजार रुपये किमतीचे एक देशी बनावटीचे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असून, त्याच्यावर बेकायदेशीर शस्त्र बाळगणे आणि तडीपारी आदेशाचा भंग केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
0
0
Report

नागपुर में तान्हा पोळा: लकड़ी के नंदी बैल, 8 लाख तक कीमत

Nagpur, Maharashtra:नागपूर:- शेतकऱ्याचा सर्वात जवळचा, विश्वासू साथीदार असलेल्या बैलांचे प्रती कृतज्ञता व्यक्त करणारा सण म्हणजे बैलपोळा. मात्र,विदर्भात पोळा या सणाला एक आगळी- वेगळी परंपरा जोडलेली आहे आणि ती म्हणजे तान्हा पोळा. पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी अर्थात पाडव्याला लहान मुलांसाठी लाकडी नंदीबैलांचा पोळा भरवला जातो. या परंपरेला 237 वर्षांची परंपरा आहे.. 1789 मध्ये श्रीमंत राजे रघुजी भोसले यांनी बालगोपालांना बैलाची व कृषी संस्कृतीच्या महत्त्वाची जाणीव व्हावी या उद्देशाने लाकडी नंदीचा तान्हा पोळ्याला सुरुवात केली. यंदाच्या तान्हा पोळ्याच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या या लकडगंज परिसरातील लकडा बाजारात लाकडी नंदीबैलांचा बाजार सजलेला असून,इथे शंभर रुपय ते 8 लाख रुपयांपर्यतचे लाकडी नंदीबैल हे विक्रीसाठी उपलब्ध झालेले आहेत. च बाजारात ग्राहकांची गर्दी वाढू लागलेली आहे. लहान-लहान मुलांसाठी नंदीबैल खरेदी करण्याची पालकांची लगबग सुरू झाली आहे. आपल्या आवडीनुसार नंदीबैल निवडण्यासाठी ग्राहक कारागिरांच्या दुकानात मोठी गर्दी करत आहेत. वर्धा जिल्ह्यातील आष्टी शहीद येथील रहिवासी रवींद्र मुकादम यांनी तब्बल 7 फूट 5 इंच उंच व 8 फूट लांबचा लाकडी नंदी बैल तयार केलाय. त्यांना या कामासाठी 6 महिन्यांचा कालावधी लागलाय. रवींद्र मुकादम यांनी या लाकडील नंदी बैलाची किंमत 8 लाख रुपये निर्धारित केलेली आहे. हा नंदी बैल आतून पोकळ असून त्याचा उपयोग मंदिरात दानपेटी करिता देखील केला जाऊ शकतो. अतिशय बारीक नक्षीकाम यावर करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर के मातंग समाज के महाअल्गार मोर्चे में महिलाओं की बड़ी भागीदारी

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मातंग समाजाच्या महाआल्गार मोर्चामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग Anchor - आरक्षण उपवर्गीकरणाच्या मागणीसह विविध मागण्यांसाठी सोलापूरात सकल मातंग समाजाच्या वतीने महाआलगार मोर्चा काढण्यात आला होता. छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पुनम गेट पर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्च्यामध्ये महिलांचा लक्षणीय सहभाग दिसून आला. सर्वोच्च न्यायालयाच्या एक ऑगस्ट 2024 च्या निकालाची महाराष्ट्रात अंमलबजावणी करावी तसेच आरक्षण उपवर्गीकरणाचा तातडीने निर्णय घ्यावा अशी प्रमुख मागणी यावेळी करण्यात आली.
0
0
Report

सोलापुर में विमान सेवा बंद, युवक कांग्रेस ने किया आक्रामक प्रदर्शन

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद झाल्यामुळे सोलापुरात युवक काँग्रेस आक्रमक सोलापूर विमानतळासमोर कागदाची आणि फुग्यांची विमाने उडवून करण्यात आला विमानसेवा बंद निषेध इंधन दरवाढीचे कारण पुढे करत स्टार एअरलाईन्स कंपनीने सोलापूर-मुंबई विमानसेवा बंद केलीय यामुळे सोलापूरच्या विमानतळावरून सुरु असलेली प्रवासी वाहतूक सेवा पुन्हा एकदा बंद झालीय ‘शासनाने केवळ निवडणूकपुरते आश्वासन देऊन विमानसेवा चालू केली मात्र निवडणुका संपताच विमानसेवा बंद करण्यात आलीय‘
0
0
Report

सिंदुदुर्ग में एमटीडीसी पर्यटन सूचना केंद्र का उद्घाटन, पर्यटकों को दिशा-निर्देश स्पष्ट

Oras Bk., Maharashtra:पर्यटन जिल्हा आलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची कोणतीही दिशाभूल न होता त्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पर्यटन स्थळाची अचूक माहिती मिळावी यासाठी सिंधुदुर्ग ( चीपी ) विमानतळावर एमटीडीसीच्या माध्यमातून पर्यटक माहिती केंद्र उभारण्यात आलय त्याचा शुभारंभ सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते करण्यात आले असून यामुळे जिल्ह्यात येणाऱ्या पर्यटकांची दिशाभूल थांबेल व जिल्ह्याच्या विकासाला बळकटी मिळेल असा विश्वास मंत्री नितेश राणे यांनी व्यक्त केलाय.
0
0
Report
Advertisement

यशोधन अनाथ आश्रम ने रुक्मिणी भस्मे को नया सहारा दिया; खोज शुरू

Satara, Maharashtra:TUSHAR TAPASE 2 FILES SLUG NAME -SAT_AAJI_UPDATE साताऱ्याात दोन मुलांनी वाऱ्यावर सोडलेल्या रुक्मिणी भस्मे या निराधार वृद्ध मातेला साताऱ्यातील वेळे इथल्या 'यशोधन' अनाथ आश्रम संस्थेने मोठा आधार दिला आहे. गेल्या पाच दिवसांपासून त्या एका मंदिरात आश्रय घेऊन दिवस काढत होत्या. पोटच्या गोळ्यांनी नाकारले तरीही माउलीचे मन अजूनही आपल्या मुलांच्याच वाटेकडे डोळे लावून बसले आहे. याची 'यशोधन' अनाथ आश्रम संस्थेचे संस्थापक रवींद्र बोडके यांनी तातडीने दखल घेत रुक्मिणी भस्मे यांच्या संपूर्ण सांभाळाची जबाबदारी स्वीकारली आहे. दरम्यान, याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने दखल घेतली असून संबंधित दोन्ही मुलांचा शोध घेण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.
0
0
Report

सोलापूर में बारिश से अक्कलकोट के किसान की सोयाबीन बर्बाद, नुकसान भरपाई की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - जिल्ह्यात पावसाने ओढ दिली; शेतकऱ्याने उभ्या सोयाबीनवर फिरवला ट्रॅक्टर पावसाने ओढ दिल्याने अक्कलकोट तालुक्यातील घोळसगाव येथील शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांच्यावर उभ्या सोयाबीन पिकावर नाईलाजाने ट्रॅक्टर फिरवण्याची वेळ आली. मोठ्या कष्टाने आणि अपेक्षेने उभे केलेले पीक पावसाअभावी करपण्याच्या मार्गावर गेल्याने अखेर त्यांनी पीक काढून टाकण्याचा निर्णय घेतला. मागील वर्षी अतिवृष्टीमुळे पिकांचे नुकसान झाले, तर यंदा पावसांनी पाठ फिरवल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहेत. बियाणे, खते, औषधे, मशागत आणि मजुरीवर केलेला खर्चही वसूल होण्याची शक्यता नसल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. डोळ्यांसमोर उभे पीक नष्ट करताना बादोले यांच्या वर्षभराच्या मेहनतीसोबतच कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची आणि कर्जफेडीची आशाही मातीमोल झाली. पावसाअभावी घोळसगावसह अक्कलकोट तालुक्यातील नुकसानग्रस्त पिकांचे प्रशासनाने तातडीने पंचनामे करावेत आणि पात्र शेतकऱ्यांना नुकसानभरपाई व शासकीय मदत द्यावी, अशी मागणी शेतकरी पंडित शिवप्पा बादोले यांनी केली आहे.
0
0
Report
Advertisement

पेण की गणेश मूर्तियों के कारखानों में अंतिम हाथ, देश-विदेश में माँग ऊँची

Chendhare, Maharashtra:पेणच्या गणेश कार्यशाळांमध्ये लगबग लाखो गणेशमूर्ती देश, विदेशात रवाना दरवर्षी कोट्यवधी रुपयांची उलाढाल गणेशमूर्तींवर फिरतोय अखेरचा हाथ अँकर गणेशमूर्तीसाठी प्रसिद्ध असलेल्या पेण मधील कार्यशाळांमध्ये सध्या गणेशमूर्तींवर शेवटचा हात फिरवण्याचे काम सुरू आहे. विविध प्रकारच्या आणि आकाराच्या मूर्ती इथं साकारल्या जात असून हजारो कारागिरांचे हात कामाला लागले आहेत. दरवर्षी लाखो गणेशमूर्ती इथं तयार होत असतात. इथल्या मूर्तींना केवळ देशभरातच नव्ह तर परदेशातूनही मोठी मागणी असते. इथल्या व्यावसायिकांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी वन टू वन विथ सचिन समेळ
0
0
Report

मुंबई गोवा महामार्ग के सर्विस रोड पर खड्डे, धूल और टोल मुक्त कब?

Chendhare, Maharashtra:महामार्ग टोलमुक्त झाला खड्डेमुक्त कधी होणार ? महामार्गाच्या सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य खड्ड्यांमुळे प्रवास होतोय रडतखडत मुंबई गोवा महामार्गाचे काम 90 टक्के पूर्ण झाल्याचा दावा केला जात असला तरी अनेक ठिकाणी प्रवाशांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो आहे. विशेषतः उड्डाण पुलाच्या बाजूने जाणाऱ्या सर्व्हिस रोडवर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. काही ठिकाणी खड्ड्यांना पेव्हर ब्लॉकचा मुलामा दिला जातो मात्र ते फुटून पुन्हा खड्डे पडतात. त्यातच आता ऊन पडल्यामुळे धुळीचाही त्रास सहन करावा लागतो आहे. गणेशोत्सवासाठी महामार्ग टोलमुक्त केला तरी रस्ता खड्डेमुक्त कधी होणार असा सवाल प्रवासी विचारताहेत.
0
0
Report
Advertisement

हिंगोली में सूखे के चलते किसानों ने पोला उत्सव न मनाने का किया निर्णय

Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यात मागील दीड महिन्यापासून पावसाने दडी मारली आहे, शेतकऱ्याच्या शेतातील उभी पिके करपून गेली आहेत मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने हिंगोलीच्या ईडोळी येथील गावकऱ्यांनी आज पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे.. शेतामध्ये दिवस-रात्र मेहनत करून व्याजानं पैसे काढून खत बियाणे खरेदी करून शेतामध्ये सोयाबीन पिकाची लागवड केली होती मात्र आता लागवड खर्चही निघत नसल्याने शेतकरी हातबल झाला आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू येत असल्याने यावर्षी ईडोळी गावकऱ्यांनी पोळा सण साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. मातीत घालवलेली मेहनत आणि हातात आलेली शून्य कमाई या भीषण वास्तवाने शेतकरी पूर्णपणे कोलमडला आहे. ज्या घरात चुली पेटणे कठीण झाले आहे, तिथे सणाचा उत्साह आणायचा तरी कसा असा प्रश्न उपस्थित झाला आहे याच शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे हिंगोली चे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी..
0
0
Report

पुणे में 52 लाख के सोने का माल बरामद, मूल शिकायतकर्ता को लौटाया गया

Pune, Maharashtra:पुण्यातील समर्थ पोलीस ठाण्याच्या हद्दीत दाखल घरफोडीच्या गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. पोलिसांनी सुमारे 52 लाख रुपये किमतीचा चोरीला गेलेला सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आहे तांत्रिक माहिती, सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा शोध घेत त्यांना ताब्यात घेतले. आरोपींकडे चौकशी केल्यानंतर विविध गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेला सोने, चांदी आणि मौल्यवान दागिन्यांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. आणि कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर आणि न्यायालयाच्या आदेशानुसार हा जप्त मुद्देमाल मूळ तक्रारदाराला परत केला गेला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top