Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445323

राज ठाकरेंचे आव्हान: सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे ते दाखवतो

Aug 24, 2024 02:30:00
Karegaon, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी सत्तेचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही आणि सरकारच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. एकदा सत्ता मिळाल्यास राज्य कसे चालवायचे ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना 48 तास देऊन गुन्हेगारी साफ करण्याचे आश्वासन दिले. राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे सांगून, निवडणुकीत मतदान केलेले लोक विकले जात असल्याची टीका केली. विधानसभा निवडणूक हा राग व्यक्त करण्याचा योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 10:23:52
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : सध्या सर्वच वयोगटात मोबाईल पाहण्याचा प्रमाण वाढलंय मात्र याचा सर्वात मोठा फटका लहानग्यांना बसतोय, मोबाईलच्या अति वापरामुळे त्याच्यावर सातत्याने हलणारी चित्र पाहिल्यामुळे मुलांच्या डोळ्यावर परिणाम होतोय इतकाच नाही तर त्यांच्या मेंदूवर सुद्धा भीषण परिणाम होत असल्याचं आता पुढे आलंय त्यामुळे लहान मुलांच्या हातात मोबाईल देऊ नका असंच आवाहन तज्ञांकडून करण्यात येते आहे.. लहानग्यांच्या हातातील मोबाईल टाईम बॉम्ब मोबाईलच्या अतिवापरामुळे 30% मुलांचे डोळे खराब मोबाईलचा वापर मेंदूवर करतोय भीषण परिणाम मोबाईल प्रत्येकाला हवीहवीशी वाटणारी वस्तू, उगाच वेळ घालवायला उत्तम साधन, त्यामुळे सर्वच वयोगटात तो पहिला जातो, खरं तर अति मोबाईल वापराने सगळ्यांना त्रास होतो मात्र सगळ्यात जास्त फटका बसतोय तो लहानग्यांचा; जेवताना, मूल रडत असेल तर त्याला मोबाईल देण्याचा प्रकार सर्रास दिसतो आणि नेमका याच मूळ मोबाईल पाहण्याची आसक्ती मुलांमध्ये दिसतेय.. मोबाईल दिल्यावर काही प्रमाणात सुरुवातीला मुलांचा हट्ट कमी होतो मात्र नंतर हा वाढतो खास करून दोन ते पाच वर्षांपर्यंत मुलांना मोबाईल वरील हलणारी चित्र पाहायला दिल्याने त्यांच्या डोळ्यावर भीषण परिणाम होतोय, डोळ्यातून पाणी येतंय, डोळे तिरळे होत आहेत मुलांना अकाली चष्मा लागतोय डोळ्याचे स्नायू दुखावताय अशा रुग्णांचे प्रमाण आता डोळ्यांच्या दवाखान्यात वाढलेला आहे.. 2 ते 5 वयोगटात मुलांना ही स्क्रीन अर्धा तास पेक्षा जास्त नको मात्र हे पाळले जात नाही, त्यामुळे लहानगांच्या हातात मोबाईल देऊच नका असं डोळ्यांचे डॉक्टर सांगतात. मोबाईल फक्त डोळ्यांपर्यंतच मर्यादित नाही तर मेंदूवर सुद्धा परिणाम करतोय.. मोबाईलच्या वापरामुळे मुलं चिडचिडे होत आहेत, निद्रानाश होतोय, एकाग्रता राहत नाही, अभ्यासात लक्ष राहत नाही त्यामुळे पालक वेगळ्या आजाराकडे वळतात म्हणून मानसोपचार तज्ञ सुद्धा मोबाईल टाळा म्हणतात. जागतिक आरोग्य संघटनेने 18 ते 24 महिन्यापेक्षा छोटा बाळाला स्क्रीन टाइम शून्य असावा, 2 वर्षांच्या मुलाला फक्त 20 मिनिटे, 2 ते 5 वर्षापर्यंत आठवड्यात 2 ते 3 तास, 6 ते 12 वयोगटात 2 तासांपेक्षा कमी वेळ, 20 मिनिटांच्या स्क्रीन टाइम नंतर 20 फूट दुरवरील वस्तू किमान 20 सेकंद पाहावी, 20-20-20 नियम लागू. अंधत्व झाले नाही, परंतु नजीक दिसण्याच्या समस्या myopia वाढत आहेत.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 29, 2026 10:08:22
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर महापालिकेच्या महापौरपदाच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर सोलापूर महानगरपालिकेच्या महापौर आणि उपमहापौर पदाच्या निवडणुकीसाठी 2 फेब्रुवारी रोजी उमेदवारी अर्ज दाखल होणार आहेत. पार्थ दाखल करण्यासाठी सोमवारी सकाळी दहा ते साडेअकरा पर्यंतची वेळ देण्यात आलीय. पुणे विभागीय आयुक्तांनी महापौर, उपमहापौर निवडीसाठी 6 फेब्रुवारी रोजी सर्वसाधारण सभा घेण्याचे आदेश महापालिका आयुक्तांना दिले होते. त्यानुसार नगरसचिव प्रवीण दंत काळे यांनी बुधवारी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यामुळे आता सोलापूरचा महापौर कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Jan 29, 2026 09:46:59
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 29, 2026 09:46:47
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बोरगाव मंजू ते मूर्तिजापूर रोडवर आज सकाळी भीषण अपघात घडला. या अपघातात एकाच कुटुंबातील दोघांचा जागीच मृत्यू झाला असून चार जण गंभीर जखमी झाले आहेत. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, हे कुटुंब नाशिकहून परतवाडा येथे जात असतान बोरगाव मंजू जवळ वाहनाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला.अपघात इतका भीषण होता की चारचाकी वाहनाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या दुर्घटनेत दोन जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले आहेत. तसेच वाहनाच्या धडकेत तीन जनावरांचाही मृत्यू झाला आहे.अपघाताची माहिती मिळताच 108 रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमी व मृतांना तातडीने अकोला येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींवर सध्या उपचार सुरू असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या भीषण अपघातामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Jan 29, 2026 09:16:15
Chendhare, Alibag, Maharashtra:स्लग - अलिबाग मतदार संघात सेना भाजप युतीचा प्रयत्न फसला. जागा वाटपावर एकमत न झाल्याने युती फिस्कटली. दहा पैकी सहा जागांवर आमने सामने लढाई. अँकर - रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी अलिबाग विधान सभा मतदार संघात शिवसेना आणि भाजपमधील युतीचा प्रयत्न फसला आहे. युती व्हावी अशी दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची इच्छा होती. त्यासाठी दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये चर्चेच्या अनेक फेऱ्या झाल्या मात्र जागा वाटपावर एकमत न झाल्याने युती फिस्कटली जिल्हा परिषदेच्या दहापैकी सहा जागांवर दोन्ही पक्षांचे उमेदवार आमने सामने असून त्याला मैत्रीपूर्ण लढत असं गोंडस नाव देण्यात आलंय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 08:33:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अकाली निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हदरला. कालपासून सगळीकडे शोकाकुल वातावरण पहायला मिळत आहे. आज छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट परिसरातील अनेक व्यापाऱ्यांनी  आपली दुकान बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केली. अजित पवार यांच्यावर शासकीय इतमामत अंतिमसंस्कार पार पडले. याच दुःखात छत्रपती संभाजीनगर शहर सुद्धा आहे. शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग म्हणून ओळख असलेल्या केनॉट परिसरात देखील मोठा शुकशूकाट बघायला मिळाला. राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर असल्याने केनॉट परिसरातील देखील अनेक दुकाने बंद आहेत. व्यापाऱ्यांनी आपले दुकानें बंद ठेऊन अजित पवार यांना श्रद्धांजली वाहिली.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Jan 29, 2026 08:33:29
Jalna, Maharashtra:जालना | 23 वर्षीय तरुणावर प्रेमप्रकरणातून चाकू हल्ला. तरुणाची प्रकृती गंभीर. अँकर : जालन्यात 23 वर्षीय तरुणावर चाकू हल्ला करण्यात आलाय. दोन जणांनी हा हल्ला केल्याची माहिती समोर आलीय. जालना - छत्रपती संभाजीनगर महामार्गावर असलेल्या विशाल कॉर्नर परिसरात ही घटना घडलीय. बळीराम रंगळे असं जखमी तरुणाचं नाव आहे. प्रेमप्रकरणातून ही घटना घडल्याची माहिती देखील समोर आली आहे. दोन जणांनी येऊन 23 वर्षीय तरुणाच्या पोटात चाकूने वार केले या घटनेत हा तरुण गंभीर जखमी झाला. यानंतर घटनास्थळी असलेल्या रिक्षा चालकांनी जखमी तरुणाला घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यानंतर खाजगी रुग्णालयात त्याला उपचारासाठी रेफर करण्यात आलं. दरम्यान तरुणाची प्रकृती गंभीर असून हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरु केल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Jan 29, 2026 08:24:07
Nashik, Maharashtra:राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा यांच्या निधनामुळे नाशिकमध्ये देखील शोकाकुल वातावरण, नाशिक जिल्हा बाजार समिती बंद बारामतीत काल झालेला विमाम अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे दुःखद निधन झालं... या घटनेनंतर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नाशिकमध्ये देखील अतिशय शोकाकुल वातावरण असल्याचं पाहायला मिळत आहे... नाशिक जिल्ह्यात असीत अजित दादा यांना मानणारा एक मोठा वर्ग आहे. त्यामुळे या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त होत असताना या घटनेनंतर नाशिक जिल्ह्यातील बाजार समिती बंद ठेवण्यात आली आहे. तसेच अनेक गावांमध्ये नागरिकांनी दैनंदिन व्यवहार देखील पूर्णपणे बंद ठेवले आहेत. नाशिकच्या बाजार समितीने आज दिवसभर सर्व लिलाव आणि बजाज समिती प्रक्रिया बंद ठेवत अजित दादांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 08:19:45
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर शहरातील कॅनॉट प्लेस परिसरात धिंगाणा घालून दहशत निर्माण करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांची पोलिसांनी धिंड काढली आहे. नागरिकांची मोठी वर्दळ असलेल्या कॅनॉट प्लेस येथे काही दिवसांपूर्वी केवळ धक्का लागल्याच्या कारणावरून दोन गटांमध्ये तुंबळ हाणामाऱ्या झाली होती. या वादातून चाकू आणि धारदार शस्त्रांचा वापर करत हत्येचा प्रयत्न करण्यात आला होता. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. या प्रकरणी सिडको पोलिसांनी तातडीने कारवाई करत संबंधित तिघा आरोपींना अटक केली. त्यानंतर ज्या ठिकाणी आरोपींनी राडा घातला, त्याच ठिकाणी आणून पोलिसांनी त्यांची धिंड काढत नागरिकांसमोर इशारा दिला की, शहरात गुंडगिरी खपवून घेतली जाणार नाही. या कारवाईमुळे स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून पोलिसांच्या भूमिकेचे स्वागत केले आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 29, 2026 08:19:24
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:महापौर निवडणुकीला अद्याप उशीर आहे. त्यामुळे भाजपने नवनिर्वाचित नगरसेवकांना जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारात जुंपले आहे. सर्व ५७ नगरसेवकांकडे प्रचाराची जबाबदारी सोपवली आहे. या निवडणुकीत यश मिळवून देणाऱ्यांचाच महापालिकेतील पदांसाठी विचार करण्यात येणार असल्याचे पक्षातील उच्चपदस्थ सूत्रांनी सांगतिले. मनपा निवडणुकीत भाजपने प्रथमच बहुमतापर्यंत मजल मारत ५७ जागा जिंकल्या. आता अनेकांना महापौर, उपमहापौर, प्रभाग समितीचे सभापती, स्थायी समिती सभासती होण्याचे वेध लागले आहेत. ५ फेब्रुवारीला जि. प. व पं.स.निवडणुकीसाठी मतदान आहे. मनपातील नगरसेवकांना भाजपने प्रचाराला जुंपले आहे. चांगली कामगिरी झाली तर मनपात पदासाठी विचार केला जाईल, असे गाजर दाखवलेले आहे
0
comment0
Report
Advertisement
Back to top