icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा के स्कूल के नववीं कक्षा के छात्र स्वप्नील आवकिरकर की हृदयाघात से मौत, गाउँ में शोक

Satara, Maharashtra:सातारा: ठोसेघर येथून शिक्षणासाठी दररोज पहाटे क्लासला जाणाऱ्या आदर्श माध्यमिक विद्यालयातील नववीचा विद्यार्थी स्वप्नील नामदेव आवकिरकर याचे अवघ्या 15 व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. नेहमीप्रमाणे घराबाहेर पडण्यापूर्वीच काळाने घातलेल्या या घालामुळे आवकिरकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. शालेय वयातील उमद्या विद्यार्थ्याच्या अशा अकाली जाण्याने ठोसेघर परिसरात आणि विद्यालयात तीव्र हळहळ व्यक्त होत असून संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे.
0
0
Report

भीषण बारिश से वेण्णा तालाब पूरी तरह भर गया, महाबळेश्वर-पाचगणि में पानी समस्या समाप्त

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर मध्ये गेल्या काही दिवसांपासून धुवाँधार पाऊस सुरु आहे. या जोरदार कोसळणाऱ्या पावसाने महाबळेश्वरची जीवनवाहिनी असलेला वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरला आहे.आज सायंकाळी चार वाचण्याच्या सुमारास सांडव्यावरून पाणी वाहू लागले, त्यामुळे महाबळेश्वर आणि पाचगणीवासियांचा पाण्याचा प्रश्न मिटला आहे. गतवर्षी इतका पाऊस जून महिन्यात पडला नाही मात्र जुलै महिन्याच्या प्रारंभापासूनच शहर आणि परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढले. आजही पावसाची धुवाँधार बॅटिंग सुरूच आहे. गेल्या तीन ते चार दिवसांपासून महाबळेश्वर तालुक्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाने महाबळेश्वर-पाचगणीकरांची तहान भागविणारे, पर्यटकांच्या आकर्षणाचे ठिकाण आणि नौकावiharासाठी प्रसिद्ध असलेला वेण्णा तलाव तुडुंब भरला आहे. वेण्णा तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने समाधान व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

उच्चदाब टॉवर के लिए खोदे खड्डे में डूबे एक मजदूर की मौत, वसई

Vasai-Virar, Maharashtra:उच्चदाब टॉवरसाठी खोदलेल्या खड्ड्यात बुडून मजुराचा मृत्यू वसई पश्चिमेच्या मधुबन परिसरातील घटना वसई पूर्व च्या मधुबन येथील सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात एका भीषण अपघातात, पाण्याने भरलेल्या खड्ड्यात एक २० वर्षीय मजूर बुडून मरण पावला. मृताची ओळख सुमित कुमार सुरेश मंडल (२०) अशी असून, तो मूळचा बिहारच्या भागलपूर जिल्ह्यातील होता. सुरक्षा स्मार्ट सिटी संकुलात उच्चदाब टॉवर बसवण्यासाठी एमएसईबीच्या (MSEB) डीसीएल (DCL) कंपनीने खोदलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचले होते. पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पडून सुमित मंडलचा मृत्यू झाला. मृताचा मोठा भाऊ, रितेश कुमार सुरेश मंडल (२४) याने पोलिसांना या घटनेची माहिती दिली. त्याने सांगितले की, सुमित कंपनीच्या साइटवर काम करत होता आणि कर्तव्यावर असताना हा अपघात घडला. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. वसई तालुक्यात पावसाचा हा दुसरा बळी आहे ..
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर शहर महापालिका की आमसभा रद्द करने के निर्णय पर भाजपा के दो गुटों के बीच टकराव, किशोर जोरगेवार की प्रतिक्रिया

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपाची आमसभा रद्द करण्याप्रकरणी मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी करण्यात आली, चंद्रपूर शहर महानगरपालिकेतील भाजपचं दोन गटांच्या राड्या संदर्भात स्थानिक भाजप आमदार किशोर जोरगेवार यांची प्रतिक्रिया अँकर:-- चंद्रपूर शहर महानगरपालिकेची आमसभा रद्द करण्यावरून भाजपचे दोन गट चंद्रपूर महापालिकेतच भिडले. मूळ मुद्दा स्वीकृत सदस्यांमध्ये केवळ स्वीकृत सदस्यांची दोन नावे मर्जीतील नव्हती म्हणून सभा रद्द करण्याची कृती म्हणजे मनमानी करता आली नाही म्हणून बेईमानी केली असे म्हटले. बाईट १) किशोर जोरगेवार, आमदार, चंद्रपूर विधानसभा आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

राम मंदिर ट्रस्ट के कोषाध्यक्ष गोविंद देव गिरी पर आरोप, परिवार दावा मजबूत

Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि देशभरातील लाखो भाविकांच्या श्रद्धेचे केंद्र असलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आहेत. राम मंदिरातील कथित चोरीप्रकरणी त्यांच्यावर आरोप झाले असले, तरी त्यांच्या कुटुंबीयांनी हे आरोप ठामपणे फेटाळून लावत सत्य समोर येईल, असा विश्वास व्यक्त केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून सुरू झालेला स्वामीजींचा आध्यात्मिक प्रवास नेमका कसा घडला. या स्पेशल रिपोर्ट ... बेलापूरच्या साध्या घरातून सुरू झालेला प्रवास देशातील सर्वात मोठ्या धार्मिक प्रकल्पाच्या व्यवस्थापनापर्यंत पोहोचला. आजही आपल्या मूळ गावाशी जोडलेले आहेत. सध्या त्यांच्यावर आरोपांचे सावट असले तरी सत्य काय, हे तपासानंतर स्पष्ट होणार आहे. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील बेलापूरच्या मातीतून घडलेले स्वामी गोविंद देव गिरी महाराज आज राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाचे धार्मिक नेतृत्व मानले जातात. त्यांच्या कार्याचा गौरव जितका मोठा आहे, तितकीच सध्या त्यांच्याभोवती सुरू असलेली चर्चा देखील महत्त्वाची ठरत आहे. आता तपासातून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement

अंधेरी में भारी बारिश से मुख्य मार्ग बंद, जलभराव से यातायात ठप

Mumbai, Maharashtra:मुंबईत सुरू असलेल्या मुसळधार पावसाचा फटका अंधेरी परिसराला बसला आहे. अंधेरी पश्चिमकडे जाणारा मुख्य मार्ग सध्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. सततच्या पावसामुळे अंधेरी सबवे तसेच अंधेरी मार्केट परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी साचले असल्यामुळे नागरिकांची मोठी गैरसोय होत आहे. परिस्थितीची गंभीरता लक्षात घेऊन मुंबई पोलीस आणि महानगरपालिकेचे अधिकारी घटनास्थळी तैनात झाले आहेत. नागरिकांनी या मार्गाचा वापर करू नये, तसेच पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. पाणी साचल्यामुळे वाहनांची वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून अनेक वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. महानगरपालिकेकडून पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि साचलेला कचरा हटविण्यासाठी युद्धपातळीवर काम सुरू आहे. ड्रेनेज लाईनची साफसफाई तसेच पंपांच्या सहाय्याने पाणी बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
0
0
Report

मुंबई उपनगर में भारी बरसात, अंधेरी सबवे जलमग्न; मार्ग बंद, यातायात प्रभावित

Mumbai, Maharashtra:मुम्बई उपनगरात गेल्या तीन दिवसांपासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. अनेक सखल भागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले असून वाहतुकीवर त्याचा गंभीर परिणाम झाला आहे. अंधेरी सबवे पुन्हा एकदा पाण्याखाली गेला असून सुरक्षिततेच्या कारणास्तव प्रशासनाने सबवे सर्व प्रकारच्या वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद केला आहे. त्यामुळे पूर्व-पश्चिम जोडणारा हा महत्त्वाचा मार्ग बंद झाल्याने वाहनचालकांना मोठा फटका बसत आहे. मुंबई वाहतूक पोलिसांनी नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले असून, अंधेरी सबवेऐवजी गोखले पूल मार्गे प्रवास करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, पावसाचा जोर कायम असल्याने नागरिकांनी अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, तसेच पाणी साचलेल्या रस्त्यांवरून वाहन चालवताना विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. हवामान विभागानेही पुढील काही तास मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली असून नागरिकांनी अधिकृत सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top