icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ठाणे के डॉ. ओंकार पावसकर के क्लिनिक में दूसरी बार चोरी, CCTV में चोर की हलचल कैद

Thane, Maharashtra:ठाण्यातील कावेसर येथील डॉ. ओंकार पावसकर यांच्या प्राण्यांच्या दवाखान्यात वर्षभरात दुसऱ्यांदा चोरीची घटना घडली आहे. गुरुवारी पहाटे अज्ञात चोरट्याने दवाखान्याचे शटर उचकटून रोकड व मांजरींचे खाद्य असा सुमारे 96 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. यावेळी चोरट्याने सीसीटीवी कॅमेरेही फोडले. मात्र एका कॅमेरात त्याच्या हालचाली कैद झाल्या आहेत.यापूर्वी एप्रिल 2025 मध्येही याच दवाखान्यात चोरी झाली होती. दोन्ही घटनांतील चोर एकच असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. या प्रकरणी कासारवडवली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन दिवस उलटूनही आरोपी फरार आहे.
0
0
Report

नांदेड के कृषि विभाग ने खत बिक्री करने वाले केंद्रों के लाइसेंस छह महीने के लिए निलंबित किए

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - चढ्या दराने खत विक्री करणाऱ्या कृषी सेवा केंद्रांवर नांदेडच्या कृषी विभागाने कारवाई केली. नांदेड जिल्ह्यातील नायगाव मधील सात कृषी सेवा केंद्रांचे खत विक्री परवाने सहा महिन्या साठी निलंबित करण्यात आले. कृषी विभागाने संबंधित दुकानदारांना नोटीस देऊन कार्यवाही केल्याने कृषी व्यापाऱ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. कारवाई झालेल्या दुकानदारांमध्ये मातोश्री ऍग्रो एजन्सी, शिवकृपा कृषी सेवा केंद्र, गजानन कृषी सेवा केंद्र, केदार कृषी सेवा केंद्र, वसंत ऍग्रो सर्विस सेंटर, हनुमान कृषी सेवा केंद्र, आणि दशरथ कृषी सेवा केंद्र यांचा समावेश आहे. या करावाईमुळे चढ्या दराने खत विक्री करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.
0
0
Report

मराठा- कुणबी आरक्षण पर कोल्हापुर गॅझेट से नया मोड़: सरकार का निर्णय अब आएगा

Kolhapur, Maharashtra:मराठा आरक्षणाच्या लढ्याला आता नवं वळण मिळालं आहे. हैदराबाद गॅझेट आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची चर्चा जोर धरू लागली आहे. ब्रिटिशकालीन 1886 च्या कोल्हापूर गॅझेटमध्ये मराठा आणि कुणबी समाजाबाबत करण्यात आलेल्या उल्लेखांच्या आधारे मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याची मागणी पुढे आली आहे. मराठा आरक्षणाचा प्रश्न राज्यात गेल्या अनेक वर्षांपासून चर्चेत आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनानंतर मराठा समाजाला कुणबी नोंदींच्या आधारे ओबीसी प्रवर्गात समाविष्ट करण्याचा मार्ग शोधण्याचा प्रयत्न सुरू झाला. यासाठी हैदराबाद संस्थानातील गॅझेटचा आधार घेतला गेला. आता त्याच धर्तीवर कोल्हापूर संस्थानातील 1886 च्या गॅझेटची चर्चा सुरू झाली आहे. सकल मराठा समाजासह विविध संघटनांनी सरकारकडे कोल्हापूर गॅझेट स्वीकारण्याची मागणी केली आहे. या गॅझेटमध्ये तत्कालीन कोल्हापूर संस्थानात सुमारे 2 लाख 99 हजार कुणबी आणि सुमारे 62 हजार मराठा असल्याची नोंद असल्याचा दावा करण्यात येत आहे. तसेच मराठा आणि कुणबी यांच्यात बेटी व्यवहार, शेती व्यवसाय आणि सामाजिक संबंध समान असल्याचे उल्लेख असल्याचे सांगितले जात आहे. मराठा संघटनांचा दावा आहे की, ज्या पद्धतीने हैदराबाद गॅझेटच्या आधारे कुणबी नोंदी शोधण्यात आल्या, त्याच पद्धतीने कोल्हापूर गॅझेटचा विचार झाल्यास पश्चिम महाराष्ट्रातील लाखो मराठा कुटुंबांना लाभ मिळू शकतो. त्यामुळे कोल्हापूर, सांगली, सातारा आणि परिसरातील समाजाचे लक्ष या गॅझेटकडे लागले आहे. दिलिप देसाई, समन्वयक सकल मराठा समाज. मराठा आरक्षणाच्या लढ्यात हैदराबाडे आणि सातारा गॅझेटनंतर आता कोल्हापूर गॅझेटची एन्ट्री झाली आहे. या दस्तावेजातील ऐतिहासिक नोंदींमुळे आरक्षणाच्या चर्चेला नवे परिमाण मिळाले असले तरी अंतिम निर्णय हा शासन, मागासवर्ग आयोग आणि न्यायालयीन प्रक्रियेवर अवलंबून असणार आहे. त्यामुळे कोल्हापूर गॅझेट हा मराठा आरक्षणाच्या प्रश्नातील महत्त्वाचा संदर्भ ठरतो की निर्णायक पुरावा, हे येत्या काळात स्पष्ट होणार आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर..
0
0
Report
Advertisement

आकोला में अगले दो दिनों में आकाशीय बिजली और बारिश की चेतावनी, नागरिक सतर्क रहें

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात पुढील दोन दिवस वातावरणात बदल होण्याची शक्यता असून नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. नागपूरच्या प्रादेशिक हवामान केंद्राने दिलेल्या अंदाजानुसार 30 मे ते 1 जून दरम्यान जिल्ह्यात काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यात आज आणि उद्या ढगाळ वातावरणासह काही भागांमध्ये मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच या कालावधीत ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. संभाव्य वादळी वाऱ्यांमुळे नागरिकांनी आवश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.जनावरांना झाडाखाली किंवा विद्युत तारेखाली बांधू नये, तसेच वीज, वारा आणि पावसापासून बचावासाठी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. वीजांचा कडकडाट सुरू असताना झाडाखाली उभे राहणे टाळावे. याशिवाय पाऊस व विजांच्या परिस्थितीत मोबाईल फोनचा वापर शक्यतो टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.दरम्यान, शेतकऱ्यांनी काढणी केलेला शेतमाल, कृषी अवजारे आणि अन्य साहित्य सुरक्षित ठिकाणी ठेवावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. हवामानातील या बदलामुळे नागरिकांनी सतर्कता बाळगून प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असेही प्रशासनाने म्हटले आहे.
0
0
Report

महायुती 17 में से सभी सीटें जीतने का दावा, महाविकास को क्लीन स्वीट

Pandharpur, Maharashtra:राज्यातील विधान परिषदेच्या सर्वच्या सर्व 17 जागा महायुती जिंकणार असून महाविकास आघाडीला क्लीन स्वीट मिळणार ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांना विश्वास सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात भाजपला 616 पैकी 520 मते भाजप उमेदवाराला मिळतील. महाविकास आघाडी मधील अनेक हितचिंतक आपल्या सोबत आहेत असा दावा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केला काँग्रेस कडे स्वतःच्या चिन्हावर उभा रहायला उमेदवार नाही. जरी मिळाला तरी त्यासाठी लागणारे सूचक अनुमोदक मिळणार नाहीत. सातारा भाजपवर निधी बाबत आणण्यात आलेला आहे मात्र सोलापुरात साताऱ्यापेक्षाही जास्त निधी शिवसेना पदाधिकाऱ्यांना दिलेला आहे. साताऱ्यात निधी वाटपात अन्याय होत असल्याचे मंत्री गोरे म्हणाले. शिवसेना आणि माझ्या कोणताही वादन आहे उदय सामंत असतील शंभूराज देसाई असतील हे माझे चांगले मित्र आहेत ते त्यांचा पक्ष वाढवण्याचे काम करत आहेत मी माझा पक्ष वाढवायचं काम करत आहे. महायुती मधील जागावाटप आज सायंकाळपर्यंत पूर्ण होईल आणि उमेदवारांच्या नावाची घोषणा केली जाईल सातारा सांगली विधान परिषदेच्या जागेवर आपले बंधू शेखर गोरे इच्छुक आहेत तसेच भाजपमधील इतर उमेदवारी इच्छुक आहेत मात्र पक्ष देईल त्याच्या पाठीशी आपण उभे राहू त्याला निवडून आणण्यासाठी आपण प्रयत्न करू असं मंत्री गोरे म्हणाले
0
0
Report
Advertisement

सचिन आहेर ने महाऑयूती सरकार पर जोरदार हमला, कांदा भाव और शराब दुर्घटना का मुद्दा

Shirur, Maharashtra:महायुती सरकारवर सचिन आहेरांचा कडाडून हल्लाबोल! कांदा उत्पादक शेतकऱ्यांची झालेली दैना, मनोज जरांगे पाटील यांची पुन्हा सुरू झालेली कोंडी आणि पुण्यात झालेल्या विषारी दारू दुर्घटनेवरून राज्यातील राजकीय वातावरण चांगलंच तापलंय. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे नेते सचिन आहेर यांनी या तिन्ही मुद्द्यांवरून महायुती सरकारवर घणाघाती आरोप केले आहेत. 'कांद्याला हमीभाव न देणं ही सरकारची फसवणूक असून, आगामी अधिवेशनात सरकारला रस्त्यावर आणि सभागृहात धारेवर धरू', असा इशारा आहेर यांनी दिला आहे. इतकंच नाही, तर पुण्यातल्या हडपसर भागातील विषारी दारू दुर्घटनेला पोलीस आणि प्रशासनाचा वरदहस्त असल्याचा खळबळजनक आरोपही त्यांनी केलाय.
0
0
Report

उदय सामंत: अणुऊर्जा पर स्थानीय विरोध नहीं, आगे की बैठक तय

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दळवी यांच्या मुलीने नेमका कशासाठी फॉर्म भरला याबाबत महेंद्र दळवी यांच्याशी मी चर्चा करेन. ते स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील. mahendra dalvi यांची मुलीने अर्ज भरल्याचा प्रश्नांवर मंत्री उदय सामंत यांची प्रतिक्रिया. उदय सामंत on जरांगे पाटील जरांगे पाटील यांच्यासोबत विखेपाटील यांच्यासोबत चर्चा झाली. कागदपत्रांचा अभ्यास करून जरांगे पाटील संध्याकाळ पर्यंत सांगतील : उदय सामंत अणुऑर्जा प्रकल्पाच्या बाबतीत जनतेच्या मनात काय आहे तेच होईल... स्थानिक लोकांच्या विरोधात काहीही होणार नाही. स्थानिक लोकांच्या विरोधात काहीही होणार नाही. - उदय सामंत आचारसंहिता संपल्यावर ग्रामस्थांसोबत बैठक घेऊन पुढचा निर्णय घेणार : पालकमंत्री उदय सामंत यांची अणुऊर्जा संदर्भात प्रतिक्रिया. गोपाळगडाच्या बाबतीत 25 तारखेनंतर किल्ला ताब्यात घेण्याच्या बाबतीत आम्ही निर्णय घेऊ.... गोपाळ गड राज्यसरकारच्च्या ताब्यात घेण्याबाबत निर्णय घेई : उदय सामंत.
0
0
Report

सांगली-सातारा विधान परिषद चुनाव: महायुती को बिघटन की आशंका?

Sangli, Maharashtra:सांगली-सातारा विधान परिषद निवडणूकीत महायुती मध्ये बिघाडीची शक्यता ? सांगलीतून शिवसेना शिंदे पक्षाने महायुतीत फडकवला बंडाचा झेंडा ! शिवसेना शिंदे पक्षाचे नेते व सांगली जिल्हा मध्यवर्ती बॅंकेचे संचालक तानाजी पाटलांनी भरला उमेदवारी अर्ज शक्ती प्रदर्शन करत तानाजी पाटील यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज आटपाडी तालुक्यातील शिवसेना शिंदे पक्षांच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा दाखल केला उमेदवारी अर्ज सांगली-सातारा स्थानिक स्वराज्याचे जागा भाजपाच्या वाट्याला गेली आहे. पक्षाच्या भूमिकेनंतर आणि आदेशानंतर पुढची भूमिका घेऊ तानाजी पाटलांचा स्पष्टीकरण.. बाईट - तानाजी पाटील - -इच्छुक उमेदवार - विधान परिषद- सांगली-सातारा.
0
0
Report
Advertisement

रोहित शेलार को तीन दिनों के बाद गिरफ्तार: डोंबिवली खंबाळपाडा- Kantnagaon हत्याकांड

Kalyan, Maharashtra:डोंबिवली खंबाळपाडा कांचनगाव हत्याकांडातील आरोपी तीन दिवसांनंतर जेरबंद. टिळकनगर पोलिसांची कारवाई. कल्याण परिसरातून आरोपीला रोहित शेलार याला ठोकल्या बेड्या. डोंबिवली पूर्वेकडील खंबाळपाडा-कांचनगाव परिसरात घर बांधकामाच्या किरकोळ वादातून झालेल्या थरारक हत्याकांडातील आरोपी रोहित शेलार याला अखेर टिळकनगर पोलिसांनी तीन दिवसांच्या शोधमोहीमेनंतर अटक केली आहे. कल्याण परिसरातून आरोपीला ताब्यात घेत पोलिसांनी कारवाई केली. मंगळवारी संध्याकाळी सुमारे पाच वाजण्याच्या sयाार्य ह्या घटनेची हळहळ. प्रताप चौधरी आणि आरोपी रोहित शेलार हे दोघे शेजारी राहत होते. घराच्या बांधकामावरून दोघांमध्ये गेल्या अनेक महिन्यांपासून वाद सुरू होता. रोहित शेलार यांच्या घराच्या बांधकामाबाबत प्रताप चौधरी यांनी तक्रार केली होती. या तक्रारीमुळे स्वतःचे घर तयार असूनही रोहितला भाड्याच्या घरात राहावे लागत होते. त्यातूनच दोघांमध्ये सतत वाद वाढत होता. मंगळवारी हा वाद पुन्हा उफाळून आला आणि संतापाच्या भरात रोहित शेलार याने थेट प्रताप चौधरी यांच्या घरात घुसून धारदार चाकूने सपासप वार केले. या हल्ल्यात प्रताप गंभीर जखमी झाले. मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. या निर्घृण हत्येनंतर आरोपी रोहित घटनास्थळावरून फरार झाला होता. घटनेनंतर टिळकनगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आरोपीचा शोध सुरू केला होता. अखेर तीन दिवसांच्या अथक पाठपुराव्यानंतर पोलिसांनी कल्याण परिसरातून आरोपी रोहित शेलार याला बेड्या ठोकल्या आहेत.
0
0
Report
Advertisement

हेलीकॉप्टर दौरे पर मंत्री संजय राठोड की ईंधन खर्च चर्चा तेज

Washim, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन बचतीचे आवाहन केले असताना राज्यातील मंत्री मंडळातील काही सदस्यांच्या दौऱ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांनी नागपूर ते पोहरादेवी हा दौरा हेलिकॉप्टरने केल्याने चर्चा रंगली आहे.पोहरादेवी येथे बंजारा विरासत संग्रहालय व विविध विकासकामांची पाहणी तसेच आढावा बैठकीसाठी मंत्री राठोड हेलिकॉप्टरने दाखल झाले.त्यांच्या सुरक्षेसाठी व स्वागतासाठी सुमारे २० ते २२ सरकारी वाहने तसेच अनेक खाजगी वाहनांचा ताफा तैनात करण्यात आला होता.पोहरादेवी येथील दौरा पूर्ण केल्यानंतर मंत्री राठोड हे यवतमाळ येथील एका खाजगी कार्यक्रमासाठीही हेलिकॉप्टरने रवाना होणार असल्याची माहिती आहे.या व्हीआयपी दौऱ्यामुळे इंधन बचत आणि सरकारी खर्चाबाबत विविध स्तरांतून चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top