Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445323

राज ठाकरेंचे आव्हान: सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे ते दाखवतो

Aug 24, 2024 02:30:00
Karegaon, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी सत्तेचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही आणि सरकारच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. एकदा सत्ता मिळाल्यास राज्य कसे चालवायचे ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना 48 तास देऊन गुन्हेगारी साफ करण्याचे आश्वासन दिले. राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे सांगून, निवडणुकीत मतदान केलेले लोक विकले जात असल्याची टीका केली. विधानसभा निवडणूक हा राग व्यक्त करण्याचा योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAASHISH AMBADE
Nov 23, 2025 15:48:56
Gadchiroli, Maharashtra:टायटल:-- गडचिरोली जिल्ह्यातील भामरागड तालुक्यातल्या अतिदुर्गम टोकावरच्या फुलनार येथे नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना, 1000 सी–60 कमांडो, 21 बीडीडीएस टीम, नवनियुक्त पोलीस जवान, 500 विशेष पोलीस अधिकारी व खाजगी कंत्राटदार यांच्या मदतीने 24 तासात उभारले नवीन पोलीस मदत केंद्र अँकर:-- नक्षल्यांचा हिंसक कारवायांना आळा बसावा यासाठी गडचिरोली पोलीस दलाच्या वतीने आज भामरागड तालुक्यातील अतिदुर्गम फुलनार (कॅम्प गुंडूरवाही) या ठिकाणी नवीन पोलीस मदत केंद्राची स्थापना करण्यात आली. भामरागड पासून 20 किमी. व छत्तीसगड सिमेपासुन फक्त 07 किमी अंतरावर असलेल्या अति-दुर्गम भागातील नागरिकांची सुरक्षा व सर्वांगीण विकासाला हातभार लागून ते विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याकरीता पोलीस मदत केंद्र फुलनार मैलाचा दगड ठरणार आहे. 11 डिसेंबर 2024 रोजी पेनगुंडा येथे नवीन पोलीस मदत केंद्र, दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी नेलगुंडा येथे नवीन पोलीस स्टेशन, दिनांक 09 मार्च 2025 रोजी याच भागात कवंडे येथे नवीन पोलीस स्टेशनची स्थापना करण्यात आली होती. गडचिरोली पोलीस दलाच्या नागरी कृती उपक्रमांद्वारे या भागातील नागरिकांच्या सर्वांगीण विकासासाठी याद्वारे प्रयत्न केले जात आहे. या पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यासाठी गडचिरोली पोलीस दलाचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. त्यात एकुण 1050 मनुष्यबळ, 04 जेसीबी, 07 ट्रेलर, 02 पोकलेन, 25 ट्रक इत्यादीच्या सहाय्याने अवघ्या एका दिवसात पोलीस मदत केंद्राची उभारणी करण्यात आली. या पोलीस मदत केंद्रामध्ये पोलीस बलाच्या सुविधेसाठी वायफाय सुविधा, 12 पोर्टा कॅबिन, जनरेटर शेड, पिण्याच्या पाण्यासाठी आर ओ प्लांट, मोबाईल टॉवर, टॉयलेट सुविधा, पोस्ट सुरक्षेसाठी मॅक वॉल, बी.पी मोर्चा, 08 सँड मोर्चा इत्यादींची उभारणी करण्यात येत असून यासोबतच पोलीस मदत केंद्राच्या सुरक्षेसाठी गडचिरोली पोलीस दलाचे 03 अधिकारी व 50 अंमलदार, एसआरपीएफ ग्रुप 14, संभाजी नगर सी कंपनीचे 02 प्लाटुन तसेच सिआरपीएफ 37 बटा. एफ कंपणीचे 01 असिस्टंट कमांडन्ट व 62 अधिकारी/अंमलदार, विशेष अभियान पथकाचे 08 पथक (200 कमांडोज) तैनात करण्यात आले आहेत. पोलीस मदत केंद्राच्या उभारणी कार्यक्रमादरम्यान जनजागरण मेळावा आयोजित करुन पोलीस मदत केंद्र फुलनार (कॅम्प गंुडूरवाही) हद्दीतील उपस्थित नागरिकांपैकी महिलांना जीवनावश्यक आणि क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. फुलनार येथील नवीन पोलीस मदत केंद्राच्या उभारणीमुळे फुलनार आणि कोपर्शी येथील अडकलेले मोबाईल टॉवरचे बांधकाम पुर्ण करण्यास मदत होणार आहे. भविष्य काळात या अतिदुर्गम भागात नवीन रस्ते बांधकाम तसेच एस. टी बस सेवा सुरु करणे शक्य होणार आहे. आशीष अम्बाडे झी मीडिया गडचिरोली
173
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 23, 2025 15:32:32
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत नगर परिषद निवडणुकीच्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका,  एका मतदाराने चक्क आपल्या घरासमोर लावले पॉम्प्लेट गडचिरोली नगरपरिषदेची 2 डिसेंबर रोजी सार्वत्रिक निवडणूक होत आहे. परंतु प्रभाग क्रमांक 5 अंतर्गत मतदार गुरुदास पगाडे यांनी आपल्या घरासमोर चक्क एक पोम्प्लेट लावले आहे.  या पॉम्प्लेटची सध्या जोरात चर्चा आहे.  निवडणुकीत उभे असलेल्या कोणत्याच उमेदवाराला आमच्या घरात प्रवेश नाही, कृपया मत मागायला येऊ नका  असे या पॉम्प्लेट मध्ये नमूद करण्यात आले आहे. निवडून आल्यानंतर कुठलाही नगराध्यक्ष किंवा नगरसेवक आमच्या वॉर्ड मध्ये येऊन पहात सुद्धा नाही. मागील कित्येक महिन्यांपासून नाल्यांची सफाई झालेली नाही, पथदिवे नाहीत. पाणीपुरवठयाची समस्या आहे. अशा बहुतेक समस्यांकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे कुठल्याही उमेदवाराने आमच्या घरी मत मागायला येऊ नये अशी संतापाची भावना गुरुदास पगाडे यांनी व्यक्त केली आहे.  दरम्यान उभा भागातील काँग्रेस नगरसेवकाने मात्र ही आपल्याला बदनाम करण्याचा कट असल्याचे म्हटले आहे. भाजप बहुमत असलेल्या गडचिरोली नगर परिषदेत आपण विरोधी नगरसेवक होतो. सत्तेला धारेवर धरल्याने निधी देण्यात आला नसल्याचे सांगितले. बाईट १) गुरुदास पगाडे, त्रस्त नागरिक बाईट २) सतीश विधाते, माजी नगरसेवक
93
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 23, 2025 15:31:02
Pune, Maharashtra:Headline : लोणावळ्यात चित्रा वाघ यांचं मतदारांना कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण... असे अजब आवाहन Anchor: लोणावळ्यात भाजपचा प्रचार आता पूर्ण जोरात सुरू झाला आहे. भाजप नेत्या चित्रा वाघ थेट पर्यटन नगरीत दाखल झाल्या आणि नगराध्यक्ष पदाचे उमेदवार गिरीश कांबळे तसेच नगरसेवक उमेदवारांच्या प्रचाराला सुरूवात केली. यावेळी भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांनी त्यांचे औपचारिक स्वागत केले. यानंतर शहरातील विविध ठिकाणी कोपरा सभांचे आयोजन करण्यात आले. या सभांमध्ये मतदारांनी आपापल्या स्थानिक समस्या चित्रा वाघ यांच्या समोर मांडल्या.दरम्यान, लोणावळ्यात आमदार सुनील शेळकें यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला या निवडणुकीत कोंडीत पकडण्यासाठी भाजपकडून खास व्यूहरचना आखण्यात आल्याची चर्चाही रंगली आहे…तर दुसरीकडे, आमदार सुनील शेळके यांचे नाव न घेता राष्ट्रवादीवर चित्रा वाघ यांनी खरमरीत निशाणा साधला. नेत्याचं डोकं खराब झालं की हारण्याची भिती समोर येते. आणि मग एका महिलेच्या खासगी आयुष्यात डोकावण्याची हिंमत सुचते. असं वागलात तर तुम्ही घासून नाही तर ठासून येणार याशिवाय त्यांनी भाजप कार्यकर्त्यांना अजब सल्ला दिला कोणाचेही खा मटण… पण दाबा कमळाचं बटण... बाईट : चित्रा वाघ, भाजप नेत्या
138
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 23, 2025 13:16:48
Kalyan, Maharashtra:अर्णव खैरे आत्महत्ये प्रकरणी पोलिस ऍक्शन मोडवर,सर्व दिशानी तपास सुरू कल्याण मध्ये राहणारा अर्णव खैरे आत्महत्ये प्रकरणी तपासाला वेग आला अर्णवचा मोबाईल फोन फॉरेन्सिक लॅबमध्ये पाठवण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला असून डिजिटल पुरावे शोधण्यासाठी तज्ज्ञांची मदत घेण्यात येत आहे. मोबाईलचा पासवर्ड उपलब्ध नसल्याने अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने फोन डेटा उघडण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अर्णव खैरेला मराठी बोलता येत नाही का? या कारणावरून रेल्वेत अज्ञात प्रवाशांनी मारहाण केल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर मानसिक धक्काातून अर्णवने घरी आल्यानंतर आत्महत्या केल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. याप्रकारणी पोलिसांनी अज्ञात आरोपींवर आत्महत्या प्रवृत्त केल्याचा गुन्हा कोळसेवाडी पोलिसांनी दाखल केला आहे. GRP, RPF यांच्यासह स्थानिक पोलिसांच्या दोन विशेष पथकांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. अर्णवने प्रवास केलेल्या लोकल ट्रेनमधील प्रवाशांच्या हालचालींची चौकशी वेगाने सुरू असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे १० ते १५ प्रवाशांची ओळख पटवण्याचे प्रयत्न कोळसेवाडी पोलिसांकडून सुरु आहेत.अर्णवच्या मृत्यूपूर्वीच्या शेवटच्या हालचाली, मोबाईलमधील माहिती, प्रसंगातील प्रत्यक्षदर्शी प्रवासी यांची एकत्रित तपासणी करून त्याच्या आत्महत्येमागील खरे कारण शोधण्याकडे पोलिसांचा कल आहे. कल्याण झोन-3 चे वरिष्ठ अधिकारी स्वतः या तपासावर लक्ष ठेवून असून सर्व शक्य कोनातून सखोल चौकशी सुरु आहे.
153
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 23, 2025 13:03:52
Pune, Maharashtra:लोणावळा नगरपरिषद निवडणूक चांगलीच रंगात आली असून भाजप प्रचारसभेत भाजपच्या माजी नगराध्यक्षा सुरेखा जाधव यांच्या वादग्रस्त विधानामुळे राजकीय खळबळ उडाली. आमदार सुनील शेळकें यांचे नाव न घेता बेताल व्यक्तव्य केलं असून मावळात आमच्या विचारांचा आमदार नसला तरी आमदारांचा बाप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आमच्याकडे आहे असे वक्तव्य त्यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत केले. या विधानावर नागरिकांमध्ये जोरदार चर्चा सुरू असून, त्यांनी आमदार सुनील शेळके यांच्यावर केलेल्या एकेरी भाषेतील टीकेलाही विरोध होत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि भाजप यांच्यातील राजकीय संघर्ष आणखीच वाढले आहे. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युतीचे संकेत दिल्याची चर्चा असताना, लोणावळा भाजपने स्वतंत्र लढण्याचा निर्णय घेतला आहे. आश्चर्याची बाब म्हणजे भाजपच्या कमळ चिन्हावरील काही उमेदवारांनीच राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांना उघडपणे पाठिंबा दिल्याचे समोर आलंय...
145
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 23, 2025 13:00:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी ब-balराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे - उमेश पाटील - मोहोळ मध्ये पंडित देशमुख यांची संतोष देशमुख यांच्यापेक्षाही निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती. - त्यात बाळराजे पाटील हा मुख्य तर इतर एकूण 13 आरोपीना निर्दोष सोडण्यात आले होते. - पोलिसात ज्या साक्षीदारांनी साक्ष दिली ते कोर्टात फुटले. त्यातील साक्षीदारांना कारखान्यात नोकरी, टेंडर, सोलापुरात गाळे देण्यात आले त्याचा तपास झाला पाहिजे. - सरकारी पक्षाने हायकोर्टात दाखल केलेले अपील 20 वर्षात कोर्टाच्या बोर्डावार आली नाही. - त्यामुळे यामध्ये नेमकं सरकारी यंत्रणेतील कोण मॅनेज झालेय का हे तपासावे - चुकीला माफी नाही, याचा बदला घेतला जाईल असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले - एकनाथ शिंदे यांच्या विधानाचे मी स्वागत करतो. तसेच आमची एकट्याची नव्हे तर संपूर्ण मोहोळ तालुक्याची मागणी आहे की - दहशत आणि गुंडागर्दी संपवण्यासाठी बाळराजे पाटील याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे - सरकारी पक्षातर्फे हरिष साळवी ही केस लढवतील ही जबाबदारी एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे - पंडित देशमुख यांच्या हत्येचा न्यायालयीन मार्गाने बदला घेतल्यानंतर मोहोळ तालुक्याला न्याय मिळेल.
200
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 23, 2025 12:49:19
Baramati, Maharashtra:बारामती के राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष के युवा नेते युगेंद्र पवार के प्रचार का विश्लेषण जारी है। आज prabhag 20 में एक पदयात्रा हुई, जिसमें कांग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी और अपक्ष उम्मीदवार सभी एक साथ प्रचार कर रहे हैं। अजित पवार गट के आठ नगरसेवक बिनविरोध हैं और चार सीटों पर मौजूदा उम्मीदवारों के साथ चर्चा है कि कुछ उम्मीदवारों को रुपये देकर उम्मीदवार बनवाया गया है। ऐसे दावों के बीच हमारे उम्मीदवार सामान्य घरों से हैं और वे मेहनत करके काम करना चाहते हैं; उन्होंने कहा कि पैसा देकर उम्मेदवारी मिलना सामान्य है, पर बारामती के लोग समझदार हैं और अत्याधिक पैसा वाला प्रचार टिक नहीं पाएगा। कुछ उम्मीदवार नए हैं जो किसी पार्टी में नहीं थे; उन्होंने कहा कि यदि उन्हें अवसर मिला तो वे अच्छा काम करेंगे। प्रचार के दौरान दबाव, अफवाह और धनबल का प्रयोग हुआ है, जिसे स्थानीय लोग महसूस कर रहे हैं। बारामतीकरणों से कहा गया है कि सामान्य घरों के लोगों को अवसर दिया जाए और लोकतंत्र को जीवंत रखने के लिए मजबूत विपक्ष को आगे आना चाहिए। कुछ लोग यह भी कह रहे हैं कि अजित पवार गट के आठ नगरसेवक इस वर्ष बिनविरोध क्यों elected हुए, जबकि पहले से प्रयास चल रहा था। 25 लाख रुपये जैसी बड़ी राशियाँ एक उम्मीदवार को दी जा रही थीं, हमारे पास सभी उम्मीदवारों के लिए इतने पैसे नहीं हैं। नगरपालिका के निर्माण के बाद यह पहली बार है कि ऐसी स्थिति उत्पन्न हुई है, जबकि सत्ताधारी पक्ष स्थानीय लोगों के प्रेम और पहचान के साथ चुनाव जीतना चाह रहा है। लोकतंत्र की साख बनाए रखने के लिए आम जनता से सहयोग चाहा गया ताकि बारामती के लोग समझदारी दिखाते हुए सही निर्णय लें।
173
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 23, 2025 12:34:47
Ambernath, Maharashtra:माजी नगरसेविका शुभांगी बहनवाल यांच्या पतीवर शिवसेना कार्यकर्त्यांचा हल्ला झाला. मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. भाजप मध्ये गेल्याने हल्ला केल्याचा आरोप यात आहे. शिवसेना सोडून भाजपमध्ये प्रवेश केलेल्या माजी नगरसेविका शुभांगी बेहनवाल यांच्या पतीवर शिवसेना महानगर प्रमुख राजेंद्र चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी याप्रकरणी हल्ला केला. उल्हासनगरमध्ये घडलेल्या घटनेची नोंद मध्यवर्ती पोलीस ठाण्यात झाली. बेहनवाल यांच्या कार्यकर्त्यांचा रात्रौ 11 वाजता योगेश पवार यांच्या येण्याबरोबरच चौधरी यांच्या कार्यकर्त्यांनी पवार याला मारहाण केली, आणि शिलरत्न जाधव व आणखी एकाने सचिन आहेर यांना मदत केली. परिसरात दशहत पसरवण्यासाठी आरडा ओरडा व मारहाण करण्यात आली. या घटनेचा गुन्हा मध्यवर्ती पोलीस ठाण्यात दाखल झाला. याप्रकरणी शीलरत्न जाधव, रतन उर्फ बाळा गायकवाड, सचिन आहेर व इतरांच्या विरोधात गुन्हे नोंदवण्यात आले.
87
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:22:01
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यातील ३१५ शेतकऱ्यांच्या ई-केवायसी नसल्यामुळे नुकसानाच्या अनुदानापासून वंचित आहे. जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, प्रशासनाकडून नुकसानीचे पंचनामे करण्यात आले होते, पंचनामे करून अहवाल शासनाकडे पाठवण्यात आलेला होता, या नुकसानीत ९१८ शेतकऱ्यांच्या नुकसान झालं होतं, त्यापैकी ६०३ शेतकऱ्यांना नुकसानाची भरपाई मिळालेली आहे. मात्र अजूनही ३१५ शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नसल्यामुळे सप्टेंबरपासून नुकसान झालेल्या शेतकरी अजूनही नुकसान भरपाई पासून वंचित असल्याने तातडीने ई-केवायसी करून घ्यावा जेणेकरून शासनाची मदत मिळण्यास मदत होणार आहे. प्रशांत परदेशी, नंदूरबार.
95
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:21:18
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात उसाच्या पाठोपाठ पपईच्याही दरांचा मोठा प्रश्न उभा राहिलेला आहे. व्यापारी पपईला योग्य दर देत नसल्याने शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केलीली आहे. नंदुरबार जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर पपईची लागवड करण्यात आलेली असून आता पपई काढणीवर आली आहे. मात्र पपईला चांगला दर मिळत नसल्याने पपई उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडले असून, व्यापाऱ्याकडून पपईला आठ रुपये 11 पैसे देण्याच्या निर्णय घेतला होता मात्र ऐन वेळेस व्यापाऱ्यांनी ठरवून दिलेला दर शेतकऱ्यांना देत नसल्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला असून पपई तोडणी बंद करण्यासाठी विचार केला जात आहे. नंदुरबार जिल्ह्यातील पपई घेण्यासाठी उत्तर भारतातून व्यापारी येत असतात, मात्र व्यापाऱ्यांच्या मनमानीमूळ शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याने पपई नाशवंत फळ असल्यामुळे व्यापाऱ्यांकडून मनमानी केली जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून केला जात आहे यामुळे शेतकऱ्यांना योग्य भाव द्यावा अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहेत.
100
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 23, 2025 12:19:16
Dhule, Maharashtra:नंदुरबार जिल्ह्यात कांद्याला योग्य भाव मिळत नसल्याने कांदा उत्पादक शेतकरी अडचणी सापडला आहे कांद्याला ५०० ते १,२०० रुपये प्रतिक्विंटलच्या दर मिळत असल्याने कांद्यावर केलेला खर्चही निघत नसल्याची परिस्थिती उद्भवली आहे नंदुरबार तालुक्यातील पूर्व पट्ट्यात मोठ्या प्रमाणावर कांद्याची लागवड करण्यात येत असते तिघेही हंगामात कांदा लागवड होत असतो, परंतु यावर्षी कांद्याला अपेक्षित भाव मिळत नसल्याने बाजार समितीत देखील कांद्याची आवक घटले असल्याचे दिसून येत आहे. कांद्याला योग्य भाव आणि वेळेवर खरेदी व्हावी यासाठी कांद्याची स्वतंत्र बाजारपेठ सुरू करण्यात आलेली आहे मात्र कांद्याला दर मिळत नसल्याने बाजार समितीत कांदा पिकाची ओस पडले असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारने मध्यस्थी करत कांद्याला योग्य हमीभाव देऊन सरकारने स्वतः खरेदी करावा अशी मागणी शेतकरी राजा करू लागला आहे.
105
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 23, 2025 12:19:01
137
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 23, 2025 12:16:23
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मतदार यादीत विचित्र वाढ? मनसेचे गंभीर आरोप – प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निवडणूक आयोगाकडून “एक जुलै 2025 रोजीची मतदार नावेच ग्राह्य धरली जातील” अशी अधिकृत माहिती देण्यात आली होती. मात्र तरीही 17 नोव्हेंबर 2025 रोजी नव्याने नोंदवलेली मतदारांची नावे 20 नोव्हेंबर 2025 रोजी जाहीर झालेल्या प्रारूप यादीत समाविष्ठ झाल्याचा दावा कदम यांनी केला आहे. मनसेच्या म्हणण्यानुसार, प्रभाग क्रमांक 14 मधील यादी भाग क्रमांक 297 मध्ये तब्बल 116 नावे वाढविण्यात आली आहेत. एका प्रभागात साधारण 15 ते 20 याद्या ग्राह्य धरल्या जात असल्याने एकाच प्रभागात 2 ते 3 हजार मतदार वाढण्याची शक्यता निर्माण होत आहे. उल्हासनगरातील एकूण 20 प्रभाग आणि 78 वॉर्डमध्ये ही वाढ किती मोठी असेल, याचा अंदाज लावणे अशक्य असल्याचे कदम यांनी सांगितले. या वाढीमागे राजकीय हस्तक्षेप आहे का, अशी शंका देखील त्यांनी व्यक्त केली. विशेषतः उल्हासनगरात भाजपकडून “एम वाय पॅटर्न” राबवला जात आहे का, असा थेट सवाल करत मनसेने प्रशासनाची भूमिकाच संशयाच्या भोवऱ्यात आणली आहे.
63
comment0
Report
Advertisement
Back to top