icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नालासोपारा में भारी बारिश से मुख्य मार्ग पानी में डूबे, यातायात प्रभावित

Vasai-Virar, Maharashtra:अवघ्या तासाभराच्या पावसात नालासोपारा जलमय तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना करावा लागतोय मोठ्या गैरसोयीचा सामना ANC: नालासोपारा शहरात सकाळी झालेल्या मुसळधार पावसाने नालासोपارا रेल्वे स्थानक पूर्वीच्या तुळींज ब्रिज ते अलायन्स हॉस्पिटलकडे जाणारा मुख्य रस्ता पाण्याखाली गेला आहे . विशेष म्हणजे काल रात्रीपासून सुरू असलेल्या रिमझिम आणि अधूनमधून जोरदार सरी कोसळत होत्या परंतु पहाटे पर्यंत या मार्गावर पाणी साचले नव्हते, मात्र त्यानंतर तास भर झालेल्या मुसळधार पावसाने संपूर्ण परिसर जलमय झाला. परिसरात पाणी तुंबल्यामुळे कामावर जाणाऱ्या नागरिक आणि वाहनचालकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असून, शहरातील. वाहतूकही संथ गतीने सुरू आहे.
0
0
Report

अण्णा हजारे ने नियमों में बदलाव के कारण आंदोलन स्थगित किया

Ahilyanagar, Maharashtra:ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी पाच जुलै रोजी पुकारलेलं आंदोलन स्थगित केला आहे माहिती अधिकार कायद्यातील नियमांमध्ये बदल केल्यामुळे अण्णा हजारे यांनी उपोषणाचा इशारा दिला होता. मात्र काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधिमविधिमंडळ निवेदन करत नियमांमध्ये केलेल्या बदलांना स्थगिती दिल्याचं जाहीर केलं त्यामुळे अण्णा हजारे यांनी आपलं आंदोलन देखील स्थगित केलं असल्याचं म्हटलं आहे मात्र माहिती अधिकार कायदा हा जनतेसाठी असून लोकशाही जिवंत राहण्यासाठी अशा कायद्यातील बदलांना तरुणांनी आणि जनतेने विरोध करायला हवा असं म्हटलं आहे सोबतच सरकारने केवळ नियमांना स्थगिती न देता नवीन नियम रद्द करावेत अन्यथा पुन्हा आंदोलन करावे लागेल असे देखील अण्णा हजारे यांनी म्हटले आहे
0
0
Report
Advertisement

भंडारा में पेपरफुटी के विरोध में विद्यार्थियों का आक्रोश; जिल्हाधिकारी कार्यालय पर NCP प्रदर्शन

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात पेपरफुटी विरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार... जिल्हाधिकारी कार्यालयावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) ची धडक. या परीक्षां घोटाळ्यांच्या विरोधात आणि प्रामाणिकपणे अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या हक्कासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार) आणि पीडित विद्यार्थ्यांच्या वतीने भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक आंदोलन करण्यात आले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी फाळके यांच्यामार्फत मुख्यमंत्र्यांना विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
0
0
Report

पहली बारिश में भंडारा शहर की सड़कों पर गडडे, नागरिक बेहाल

Bhandara, Maharashtra:पहिल्याच पावसात भंडारा शहरातील रस्त्यावर पडले खड्डे... नागरिक जीव मुठीत घेऊन करतात प्रवास.... Anchor :- पहिल्याच पावसात राष्ट्रीय महामार्गाचे पितळ उघडे पडले आहे... भंडारा शहरातून जाणाऱ्या शीतलामाता मंदिर ते खांबतलाव रस्त्यावर खड्डे पडले आहे.. भंडारा शहरातील खामतलाव चौकात मोठ मोठे खड्डे पडले असून त्यात पाणी साचून आहे.. या रस्त्यासाठी आधी सुद्धा आंदोलन करण्यात आले होते. पण गेली अनेक वर्षापासून हा रस्ता काही बनत नाही आहे.. राष्ट्रीय महामार्गाकडे रस्ता असल्याने नगर परिषद देखील दुर्लक्षित करत आहे. या खड्ड्यात पडून एखाद्याचा कीव गेल्यावर प्रशासनाला जाग येणार का हा प्रश्न उपस्थित होत आहे.... याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी wkt - प्रविण तांडेकर
0
0
Report

अकोला में प्लास्टिक मुक्त दिवस पर कपड़े की थैली के उपयोग का आह्वान

Akola, Maharashtra:आज, ३ जुलै हा आंतरराष्ट्रीय प्लাস্টिक कॅरीबॅग मुक्त दिन म्हणून साजरा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर अकोल्यातील माय वसुंधरा विकास संस्थेच्या वतीने नागरिकांना प्लास्टिक पिशव्यांऐवजी कापडी पिशवीांचा वापर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. संस्थेने आतापर्यंत ४४ हजार ३०० मोफत कापडी पिशव्यांचे वितरण केले असून, प्लास्टिकमुक्त समाजासाठी जनजागृती सुरू ठेवली आहे. पावसाळ्यात प्लास्टिक कॅरीबॅगमुळे नाले तुंबणे, पाण्याचा निचरा अडणे आणि पर्यावरणासह नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होत असल्याने प्लास्टिकचा वापर टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. पालीवाल दांपत्य हे अभिनव उपक्रम गेल्या पंधरा वर्षांपासून राबवित आहे. गेल्या अनेक वर्षांपासून सुरू असलेल्या या उपक्रमामुळे नागरिकांमध्ये सुद्धा जनजागृती होत असून अनेक जण आता प्लास्टिकच्या कॅरीबॅग ऐवजी कापडी पिशवी वापरत असल्याचा आनंदही आज त्यांनी व्यक्त केला आहे. अकोला शहरातील विविध भागात ही दांपत्य आणि त्यांचे सहकारी नागरिकांना मोफत कापडी पिशव्यांचे वितरण करीत असतात.
0
0
Report
Advertisement
Advertisement

रोहित पवार ने हितेंद्र ठाकूर से मुलाकात कर ठाणे बैंक पर विजय का जश्न मनाया

Vasai-Virar, Maharashtra:राष्ट्रवादीचे रोहित पवार यांनी घेतली हितेंद्र ठाकूर यांची भेट, ठाणे जिल्हा बँकेत विजय मिळवल्याबद्दल अभिनंदन करण्यासाठी घेतली भेट... सोशल मीडियावर रोहित पवारांनी पोस्ट केल भेटीचे कारण. ठाणे पालघर जिल्ह्यात भाजपाला धोबीपछाड देत बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी ठाणे ठाणे बँकेवर आपलं वर्चस्व कायम राखल्यामुळे आमदार रोहित पवार यांनी हितेंद्र ठाकूर यांची भेट घेतली.. वसई-विरार शहराला विकासकामांच्या माध्यमातून एक आकार देणारे ज्येष्ठ नेते आणि बहुजन विकास आघाडीचे प्रमुख मा. हिंतेंद्र ठाकूर साहेब यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. तसंच जिल्हा बँकेवर सत्ता आणल्याबद्दल त्यांचं अभिनंदन केलं. यावेळी माजी. आ. क्षीतिज ठाकूर माजी. आ. सुनील भुसारा उपस्थित होते...अशी पोस्ट रोहित पवारांनी आपल्या सोशल मीडिया हँडलवर केली आहे ...
0
0
Report

पोलादपूर-अंबेनळी घाट में दराड़ गिरा; मार्ग मलबे से अवरुद्ध, प्रशासन सतर्क

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ब्रेकिंग स्लग : पोलादपूर-आंबेनळी घाटात पुन्हा दरड कोसळली; बावळी टोक परिसरात रस्ता मलब्याखाली रायगड जिल्ह्यात रेड अलर्ट जाहीर करण्यात आला असून गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. पोलादपूर तालुक्यातील आंबेनळी घाटातील बावळी टोक परिसरात पुन्हा एकदा दरड कोसळल्याची घटना घडली आहे. सततच्या पावसामुळे डोंगराचा काही भाग खचून मोठे दगड आणि मातीचा मलबा रस्त्यावर कोसळला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र, घाट परिसरात वारंवार दरडी कोसळण्याच्या घटना घडत असल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. प्रशासनाने नागरिक आणि वाहनचालकांना अत्यावश्यक काम असल्यासच आंबेनळी घाटमार्गाचा वापर करण्याचे आवाहन केले आहे. तसेच हवामानाची परिस्थिती आणि सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यकतेनुसार घाटमार्ग तात्पुरता बंद करण्याची शक्यताही वर्तविण्यात येत आहे. प्रशासनाकडून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात असून संबंधित विभागांची पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली आहेत.
0
0
Report

सातारा जिले में बारिश तेज, महाबलेश्वर में 158 मिमी रिकॉर्ड, जलस्तर बढ़ना चिंता

Satara, Maharashtra:सातारा -सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे.महाबळेश्वर मध्ये एका दिवसात 158 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे तर पाटण ,कोयना, नवजा भागात देखील पावसाचा जोर वाढला आहे . मिनी काश्मीर म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर मध्ये सर्वाधिक 158 मिलिमीटर पाऊस झाला आहे.त्याचबरोबर धरणाच्या पाणी पातळीत देखील झपात्याने वाढ होत आहे.. सातारा जिल्ह्यातील प्रमुख धरण ओळखल्या जाणाऱ्या महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोयना धरणात देखील पाण्याची आवक वाढत आहे त्याचबरोबर कण्हेर, धोम बलकवडी, उरमोडी धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. घाट रस्त्यावर प्रवास करताना सुरक्षित प्रवास करण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के आंबा घाट में दराड़ गिरने से एकेरी मार्ग बंद, चालक सतर्क रहें

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीच्या आंबा घाटात दरड कोसळली.. महामार्गावर एकेरी वाहतूक बंद,चालकांना सतर्कतेचे आवाहन.. रत्नागिरी-नागपूर महामार्गावरील आंबा घाटात दक्खन ते कळकदारा दरम्यान आज सकाळी नऊच्या सुमारास अचानक दरड कोसळल्याची घटना घडली आहे.. सुदैवाने,चारपदरी रस्त्याच्या मधोमध असलेल्या लोखंडी कंपाउंडमुळे मुख्य दरड वाहतुकीच्या मार्गावर आली नाही,मात्र काही दगडांचे तुकडे रस्त्यावर आल्याने वाहतुकीला मोठा धोका निर्माण झाला आहे.. खबरदारीचा उपाय म्हणून दक्खन ते कळकदारा दरम्यानचा एकेरी मार्ग सध्या बंदण्यात आला असून,परिसरात मुसळधार पाऊस सुरू असल्याने वाहनधारकांनी आपली वाहने अत्यंत सावधगिरीने चालवावीत,असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे..
0
0
Report

भंडारा में विकसित भारत रोजगार व आजीविका सुरक्षा अभियान का शुभारम्भ, 125 दिन रोजगार

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ शुभारंभ. मजुरांना 125 दिवस रोजगाराची हमी. ग्रामीण भागातील रोजगार और शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ भंडारा जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ झाला. ग्रामपंचायत बेला येथे झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. या नव्या अभियानामुळे मजुरांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार असून, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपातील 318 विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर मान्यورांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
0
0
Report

चंद्रपुर में मानव-वन्यजीव संघर्ष रोकथाम के लिए मंत्री स्तर पर ठोस कदम तय

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याच्या वनमंत्र्यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या आनी अधिकारी वर्ग आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची बैठकला उपस्थिती होती. वनमंत्री नाईक यांनी उपाययोजना करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांवर स्थानिक स्तरावर बैठक घेऊन आवश्यक ते सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव सहजीवनासाठी उपाययोजना महत्त्वाच्या असून राज्य सरकार यात सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे ते म्हणाले. मानव-वन्यजीव संघर्ष तांत्रिक अहवालाची तातडीने अंमलबजावणी, जिल्ह्याला व्याघ्र जिल्ह्याचा दर्जा, घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्यांचे हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांसाठी अंडर- ओव्हर पास उभारणी अशा विविध मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top