icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई नगरपालिका: 56 लाख खर्च कर 3 Scorpio खरीदने کا प्रस्ताव

SNSWATI NAIKJust now
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपाच्या आरोग्य समिती सभापती आणि प्रभाग समिती सभापतींना नव्या कोऱ्या स्कॉर्पिओ गाड्यांचे डोहाळे लागले असल्याने 56 लाख रुपये खर्च करुन 3 नवीन स्कॉर्पिओ गाड्या खरेदीचा प्रस्ताव आगामी महासभेत येणार आहे. यावरून मनसेने सत्ताधारी भाजपावर सडकून टीका केलेय. एकीकडे पंतप्रधान अवास्तव खर्च टाळण्याचे आवाहन करत असताना नवी मुंबई मनपा 3 इंधन गाड्या खरेदी करत पैश्याचा अपव्यय करत आहे. याविरोधात खेळण्यातील गाड्या आम्ही सभापतींना भेट देणार असून करदात्यांच्या पैश्याची उधळपट्टी थांबविण्याची मागणी मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांनी केलेय.
0
0
Report

Vadettiwar questions government on Alninno prep; ban on smart glasses-pens crackdown

Chandrapur, Maharashtra:टायटल: काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी अलनिनो तयारी बाबत सरकारला विचारले प्रश्न, केंद्र सरकारने स्मार्ट पेन -स्मार्ट चष्म्यावर घातलेली बंदी म्हणजे त्यांना वाटत असलेली भीती असल्याचे प्रतिपादन वडेट्टीवार on कमी पाऊस यंदा अलनिनोमुळे कमी पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती. त्यासाठी म्हणून सरकारने काय उपाययोजना केल्या हे माहीत नाही. विदर्भात तरी अत्यंत कमी पाऊस पडलेला आहे. धानरोवणी खोळंबलेली आहे. सोयाबीन पावसा अभावी पिवळे पडत चालले आहे. चार दिवसात पाऊस आला नाही तर खरीप हंगाम संकटात येणार आहे. यासाठी सरकारने कुठली पावले उचलली याचे उत्तर सरकारला द्यावे लागणार आहे. वडेट्टीवार on Ban on स्मार्ट चष्मा ज्या ज्या मुळे सरकारला भीती वाटते त्या सर्वांवरच सरकार बंदी आणत आहे. उपोषण, आंदोलन, भाषण, टीका यासह सरकारला भीती असलेल्या सर्व बाबी बंद केल्या जात आहेत. लोकशाही मार्ग गुंडाळून ठेवत हुकूमशहा मार्गाने देश चालवायचा असल्याने स्मार्ट चष्मा, स्मार्ट पेन आदींवर बंदी घातली जाते.
0
0
Report

अकोला में नकली बीज, पीजीआर और बायो उत्पादनों के खिलाफ किसान संगठन का ऐतिहासिक प्रदर्शन

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात बोगस बियाणे, पीजीआर, बायो उत्पादने आणि निकृष्ट खतांच्या विक्रीविरोधात क्रांतिकारी शेतकरी संघटनेने आज जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयावर अनोखे आंदोलन केले. शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या पैशांची लूट करणाऱ्या कंपन्यांवर तात्काळ कारवाई करावी, अशी मागणी करत शेतकऱ्यांनी आपल्या मेहनतीचे पैसे झाडाला चिटकवून कृषी अधिकाऱ्यांना प्रतीकात्मक भेट दिली. या अनोख्या आंदोलनाची जिल्हाभर जोरदार चर्चा रंगली आहे. क्रांतिकारी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर गवळी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले. संघटनेने जिल्हा कृषी अधिकारीांना निवेदन देत अकोला जिल्ह्यात बोगस पीजीआर, बायो उत्पादने, निकृष्ट खते आणि बोगस बियाण्यांची मोठ्या प्रमाणावर विक्री होत असल्याचा आरोप केला. या उत्पादनांमुळे बियाण्यांची उगवण न होणे, पिकांची वाढ खुंटणे, उत्पादनात घट होणे आणि शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. संघटनेने जिल्ह्यातील संशयित कंपन्यांची तात्काळ तपासणी करून त्यांच्या उत्पादनांचे नमुने प्रयोगशाळेत पाठवावावेत, तपासणी पूर्ण होईपर्यंत संबंधित उत्पादनांच्या विक्रीवर बंदी घालावी आणि दोषी आढळणाऱ्या कंपन्या, उत्पादक, वितरक व विक्रेत्यांवर कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे. त्या प्रमाणे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना कृषी विभागाने नुकसान भरपाई कंपन्यांकडून मिळवून द्यावी अशी मागणी सुद्धा करण्यात आली. या आंदोलनाची सध्या अकोला जिल्हाभर मोठी चर्चा सुरू असून प्रशासनाने याची गंभीर दखल घेऊन तातडीने कारवाई करावी, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.
0
0
Report
Advertisement

य_evla के पांच गांवों में अघोषित लोडशेडिंग, बिबटियों के हमले और मरीजों की आपात स्थिति

Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला तालुक्यातील चिचोंडी, पारेगाव, रायते, बदापूर, निमगाव मढ या गावांमध्ये गेल्या पाच दिवसांपासून रात्रीच्या वेळी महावितरण कडून अघोषित भारनियमन केले जात आहे या परिसरामध्ये बिबट्यांचा वावर मोठ्या प्रमाणात असून चोरा देखील होत आहे अशा परिस्थितीत अनेक कुटुंबांमध्ये वयोवृद्ध माणसे असून अनेकांना विविध रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहे अशा परिस्थितीत रात्रीचा सर्वसामान्यांच्या जीवावर उठत आहे संदर्भात महावितरणच्या कार्यालयात फोन केल्यानंतर तेथील संबंधित ऑपरेटर वायरमन व अधिकारी हे फोन उचलत नाही त्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी चिचोंडी सब स्टेशन वर धडक मोर्चा काडून दोन दिवसात विजेची समस्या सुटली नाही तर सबस्टेशनला टाळे ठोकण्याचा इशारा दिला आहे या संदर्भात आंदोलन स्थळावरून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report

सोलापुर में वारकरी यात्रा की तैयारियाँ पूरी, मोदी-फडणवीस के स्वागत फलक और सुविधाओं की घोषणा

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील वारकऱ्यांच्या स्वागतासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडून स्वागत फलक, वारीला राष्ट्रीय स्तरावर नेण्यासाठी ग्रामविकास विभागाचे प्रयत्न संत ज्ञानेश्वर महाराजांनी संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात 19 आणि 20 जुलै रोजी सोलापूर जिल्ह्यामध्ये माळशिरस तालुक्यात आगमन होणार आहे त्यासाठीची तयारी अंतिम टप्प्यात आली असून ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून वारकऱ्यांना सर्व मूलभूत सुविधा पुरवण्याची तयारी पूर्ण झाली आहे. ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या या तयारीवर लक्ष असल्याने वारकाऱ्यांचा प्रवास सुखकर होणार आहे. मालशिरस तालुक्यात नेतेपुते माळशिरस आणि वेळापूर या ठिकाणी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे तर अकलूज बोरगाव या ठिकाणी संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असणार आहे यासाठी 11 जागेवर जर्मन हॅनगर तयार करण्यात आले आहेत यात मुख्यमंत्री सुविधा केंद्र केले असून येथे महिलांसाठी स्वतंत्र व्यवस्था असणार आहे विशेष म्हणजे महिलांसाठी स्वतंत्रपणे 800 स्नानगृहाची सोय करण्यात आली आहे. वारीच्या वाटेवर चालणाऱ्या वारकऱ्यांना शुद्ध पाणी प्यायला मिळण्यासाठी 175 पाणी पिण्याचे टँकर पालखी सोहळ्यामध्ये उपलब्ध करण्यात आले आहेत. पालखी मार्गावर 29 ठिकाणी औषध उपचार केंद्र वारकऱ्यांसाठी उपलब्ध असणार आहेत अकलूज माळशिरस या ठिकाणाच्या उपजिल्हा रुग्णालयामध्ये 24 तास आरोग्य सेवा असणार आहे
0
0
Report

शिंगणापुर के छात्रवास में उंदरों का आतंक, छात्राओं की सुरक्षा पर बना बड़ा सवाल

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या शिंगणापूर येथील राजर्षी शाहू छत्रपती विद्यानिकेतन व निवासी क्रीडा प्रशालेत उंदरांच्या उच्छादामुळे विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून वसतिगृहात उंदर्शांचा वावर वाढला असून, रात्री झोपेत असतानाच अनेक विद्यार्थिनींना उंदरांनी चावा घेतल्याच्या घटना घडत आहेत. काही विद्यार्थिनींना तर वर्षातून तीन ते चार वेळा उंदरांनी चावा घेतल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्यामुळे पालकांमध्ये भीती आणि संतापाचे वातावरण आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील शिंगणापूर येथील निवासी क्रीडा प्रशालेच्या मुलींच्या वसतिगृहात रात्री उंदुरांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. झोपेत असताना उंदीर विद्यार्थिनींच्या हाताला, पायाला आणि बोटांना कुरतडत असल्याच्या घटना सातत्याने घडत आहेत. चावा घेतल्यानंतर संबंधित विद्यार्थिनींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात न्यावे लागत आहे. मात्र, ही समस्या अनेक महिन्यांपासून कायम असूनही ठोस उपाययोजना झालेली नसल्याचा आरोप पालकांनी केला आहे. गंभीर बाब म्हणजे काही विद्यार्थिनींना वर्षातून तीन ते चार वेळा उंदरांनी चावा घेतल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे अनेक पालक आपल्या मुलींना घरी घेऊन जात आहेत. सातत्याने होणाऱ्या या प्रकारामुळे विद्यार्थिनींच्या आरोग्यासह त्यांच्या सरावावर आणि शिक्षणावरही परिणाम होत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

मिरज सरकारी अस्पताल में आधुनिक लॉन्ड्री यूनिट और पुरुष सर्जिकल सेमी‑आईसीयू का उद्घाटन

Sangli, Maharashtra:स्लग removed अँकर removed मैत्रीपूर्ण नोट: अदालत के बाहर की बातें नहीं शासकीय रुग्णालयातील आधुनिक लॉन्ड्री यूनिट व पुरुष सर्जिकल सेमी अतिदक्षता विभागाचा उद्घाटन यावेळी करण्यात आला. प्रसंगी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे आमदार ऍड्रेस नायकवडी यांच्या सह जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस प्रमुख यांच्यासह रुग्णालय अधिकारी उपस्थित होते,या नवीन आधुनिक सुविधांमुळे गोरगरीब गरजू रुग्णांना याचा लाभ होणार असून आणखी अद्यावत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सरकार कटीबद्ध असल्याची ग्वाही मंत्री चंद्रकांत पाटलांनी यावळी दिली आहे.
0
0
Report

चंद्रकांत पाटील ने दत्ता भरणे को लेकर दिया जोरदार टोला

Sangli, Maharashtra:स्लग - विठ्ठलाला अडचणीत आणू नका,मंत्री चंद्रकांत पाटलांचा,मंत्री दत्तात्रय भरणेंना टोला..\n\nअँकर - विठ्ठलाला साकडं घालून,जर गोष्टी होतं असत्या,तर या आधी पण खूप झाले असत्या,विठ्ठलाला अशा अडचणीत आणू नका,असा खोचक टोला भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी कृषिमंत्री दत्ता भरणे यांना लगावला आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीत मोठे नेतृत्व करण्याची जबाबदारी मिळो,असं साकडे विठ्ठलाला घालणार असल्याचं कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी सांगितले आहे,त्यावरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी टोला लगावला आहे, सांगलीच्या मिरजेत शासकीय रुग्णालयातील विविध लोकार्पण सोहळ्याप्रসंगी बोलत होते.\n\nबाईट - चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री,भाजपा.\n\nअँकर - राम रक्षा म्हणायला त्यांना रोज कारण लागतं,पण आम्ही रोजच म्हणतो,असा तोलाम भाजपाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटलांनी शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना लगावला आहे.राम मंदिरातील दानपेटी मध्ये भ्रष्टाचार झाला आहे,त्याच्याशी संबंधित कर्मचाऱ्यांना कारवाई झाली पाहिजे, पण त्यामध्ये मुख्यमंत्री योगी,पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कोठे संबंध आला ? आणि राम रक्षा कोठे आली ? असं सवाल देखील चंद्रकांत पाटलांनी केला आहे.नागपूर येथे शिवसेनेकडून राम मंदिर देणगी चोरी प्रकरणी करण्यात येणार आंदोलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आंदोलनात सहभागी व्हावं, असं निमंत्रण संजय राऊतांनी दिले आहे, यावरून चंद्रकांत पाटलांनी हा टोला,लगावला आहे.
0
0
Report

नाशिक में गणवेश घोटाले की तेज़ छानबीन, 16 स्कूलों के गणवेश खराब, कार्रवाई शुरू

Nashik, Maharashtra:नाशिक - - शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात गणवेश घोटाळा उघड - नाशिक ZP च्या मोफत गणवेश योजनेत मोठा झोल - प्रयोगशाळा अहवालात १६ शाळांचे गणवेश निकृष्ट - १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा - सीईओ ओमकार पवार यांची मोठी कारवाई - दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश - गणवेश पुरवठ्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू - निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवरही कारवाईची शक्यता - नाशिक जिल्हा परिषदेत गणवेश घोटाळ्याने खळबळ (ग्लान्स: add shots of uniform and school) नाशिक - - शिक्षणमंत्र्यांच्याच जिल्ह्यात गणवेश घोटाळा उघड - नाशिक ZP च्या मोफत गणवेश योजनेत मोठा झोल - प्रयोगशाळा अहवालात १६ शाळांचे गणवेश निकृष्ट - १६ मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटिसा - सीईओ ओमकार पवार यांची मोठी कारवाई - दोषींवर कायदेशीर कारवाईचे आदेश - गणवेश पुरवठ्यातील गैरव्यवहाराची सखोल चौकशी सुरू - निकृष्ट कापड पुरवणाऱ्यांवरही कारवाईची शक्यता - नाशिक जिल्हा परिषदेत गणवेश घोटाळ्याने खळबळ
0
0
Report
Advertisement

मुंबई क्राइम ब्रांच ने मिलावटी दूध बेचने के आरोप में दो को किया गिरफ्तार

Mumbai, Maharashtra:मुंबई गुन्हे शाखेच्या कक्ष ११ ने मोठी कारवाई करत भेसळयुक्त दूध विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली आहे. ही कारवाई १५ जुलै रोजी गोरेगाव पश्चिम परिसरात करण्यात आली. गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी अन्न सुरक्षा विभागाच्या अधिकाऱ्यांसह छापा टाकला असता आरोपी नामांकित दूध कंपन्यांच्या पिशव्या उघडून त्यामध्ये अस्वच्छ पाणी मिसळत असल्याचे उघड झाले. त्यानंतर त्या पिशव्या पुन्हा सील करून नागरिकांना विकल्या जात होत्या. कारवाईदरम्यान सुमारे ५५८ लिटर भेसळयुक्त दूध, रिकाम्या दूध पिशव्या, भेसळीसाठी वापरण्यात येणारे साहित्य आणि मोबाईल फोन असा एकूण ५० हजार रुपयांहून अधिक किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपींविरोधात अन्न सुरक्षा कायदा तसेच भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास गुन्हे शाखेकडून सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना पॅकबंद अन्नपदार्थ खरेदी करताना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report

कळवण में आदिवासी बनाम पुलिस: सोलर प्लांट विरोध तेज

Nashik, Maharashtra:कळवण (नाशिक) विशाल मोरे - नाशिकच्या कळवण तालुक्यात सोलर पॅनल प्रकल्पाला आदिवासी बांधवांकडून विरोध - पोलिसांकडून बळाचा वापर... - आदिवासी बांधव व पोलिसांमध्ये बाचाबाची.. Anc: कळवण तालुक्यातील भैताने दिगर या गावात सोलर पॅनल प्रकल्प होत आहे तर या प्रकल्पाला स्थानिक आदिवासी बांधवांकडून विरोध केला जात आहे याबाबत त्यांनी वेळोवेळी शासन स्तरावर निवेदन देऊन प्रकल्प रद्द करण्याची मागणी देखील केली होती. मात्र त्या प्रकल्पाला प्रत्यक्षात सुरुवात झाल्याने ग्रामस्थ आदिवासी बांधव यांनी घटनास्थळी जाऊन तो प्रकल्पाला विरोध दर्शवला त्यावेळेस पोलीस आणि आदिवासी बांधवांमध्ये बाचाबाची होऊन पोलिसांनी बाळाचा वापर केला तसेच तहसीलदारांनी महिला सरपंच यांना यात तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही असे बोलले असल्याचा ग्रामस्थांनी आरोप केला. Pesa कायद्या अंतर्गत आदिवासी बांधवाना ही जमीन देण्याचे आश्वासन देण्यात आल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आणि त्याच जमिनीवर हा प्रकल्प उभा करण्यात येत असल्याने हा विरोध असल्याचे बोलले जाते. बाईट : महिला सरपंच
0
0
Report
Advertisement

अकोला में नकली गुटखा बनाने वाले कारखाने पर FDA ने छापा, 50 लाख रुपये का माल जप्त

Akola, Maharashtra:राज्यात अन्न व औषध प्रशासन विभागाकडून अवैध खाद्यपदार्थ आणि तंबाखूजन्य उत्पादनांविरोधात धडक कारवाई सुरू आहे. अकोला शहरातील एमआयडीसी औद्योगिक परिसरात बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासन विभागाने छापा टाकत सुमारे ५० लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, आतापर्यंत गुटख्याचा साठा करणाऱ्या गोदामांवर कारवाई होत होती, मात्र अकोल्यात थेट बनावट गुटखा तयार करणाऱ्या कारखान्यावरच धाड टाकण्यात आल्याने ही कारवाई विशेष ठरली आहे.या कारखान्यात अनेक नामांकित कंपन्यांच्या नावाने बनावट गुटख्याची पाकिटे तयार केली जात होती. छाप्यात मोठ्या प्रमाणात गुटखा, सुगंधी तंबाखू, पॅकिंगसाठी वापरण्यात येणारी यंत्रसामग्री तसेच इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे. या प्रकरणी तीन मजुरांना ताब्यात घेण्यात आले असून कारखान्याचा मालक फरार असल्याची माहिती आहे. त्याचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.अन्न व औषध प्रशासन विभागाच्या या धडक कारवाईचे सर्वत्र स्वागत होत असले, तरी शहरात इतक्या मोठ्या प्रमाणात बनावट गुटखा उत्पादन सुरू असताना त्याची माहिती संबंधित यंत्रणांना, विशेषतः पोलिसांना कशी मिळाली नाही, असा प्रश्नही उपस्थित केला जात आहे.
0
0
Report

वर्धा में 12 वर्षीय लड़की की हत्या: तीन संदिग्ध गिरफ्तार, 14 स्पेशल टीम तैनात

Wardha, Maharashtra:वर्ध्यात 12 वर्षीय अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या. हत्येमुळे परिसरात खळबळ; मुलीवर अत्याचार झाल्याचा पोलिसांचा संशय. उपविभागीय पोलीस अधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली 14 विशेष पथके तयार करण्यात आली आहेत. सावंगी पोलिसांनी पॉक्सो कायद्यासह विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला असून, तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलीस व फॉरेन्सिक पथके घटनास्थळी दाखल झाली. मुलीची आई फिर्यादीदार आहे. तपासासाठी तांत्रिक आणि सायबर पथकेही तपासात सहभागी आहेत. पुढील कारवाई वैद्यकीय अहवाल व तपासातील निष्कर्षांनुसार केली जाईल. आरोपींना लवकरात लवकर ताब्यात घेण्यासाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याचे सांगितले.
0
0
Report

विज बिल माफी की घोषणा रैली में, मंत्रिमंडल से पहले मुख्यमंत्री की बात

Mumbai, Maharashtra:आदरणीय संपादक और माझ्या पत्रकार बंधूंनो आपल्यासाठी बाईट आणि पॉइंटर. शिवसेना राज्य प्रवक्ते अरुण सावंत विषय: मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होण्याअगोदरच जाहीर सभेत मुख्यमंत्र्यांकडून विज बिल माफी जाहीर. साडेसात हॉर्स पावर पर्यंतचे जुने विज बिल मी माफ करणार. आम्ही 48 हजार कोटी रुपये माफ करणार. विज बिल माफ करणार ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे आम्ही स्वागत करतो परंतु निर्णय अगोदर मंत्रिमंडळात घेतले जातात अशी माझी माहिती आहे इथे तर अगोदर रस्त्यावर निर्णय घेतला जात आहे आणि नंतर तो मंत्रिमंडळात चर्चिला जाणार आहे हे थोडंसं मनाला पटत नाही. मुख्यमंत्रीच जर असं करायला लागले तर मग इतर मंत्र्यांनी आमदारांनी काय धडा घ्यायचा ? मी स्वतः आणि या राज्यातील लाखो युवक आदरणीय देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाहून शिकण्याचा प्रयत्न करीत असतो.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top