icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी में भाजप नेता महावितरण दफ्तर पर धावा बोलकर शिकायतों का जवाब मांगा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण भाजप पदाधिकाऱ्यांची महावितरणावर धडक.. वर्षा ऋतू म्हणजेच पावसाळा अगदी तोंडावर आलेला असताना, महावितरणचा भोंगळ कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे.. मान्सूनपूर्व मानली जाणारी अनेक महत्त्वाची कामे अजूनही प्रलंबित आहेत.. त्यातच विजेच्या तक्रारींसाठी फोन करणाऱ्या नागरिकांना महावितरणच्या कर्मचाऱ्यांकडून उद्धट उत्तरे दिली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर येत आहे.. याच वाढत्या त्रासाला कंटाळून आणि जनतेच्या वतीने जाब विचारण्यासाठी आज भाजप पदाधिकाऱ्यांनी महावितरणच्या कार्यालयावर थेट धडक दिली.. महावितरणच्या अधिकाऱ्यांना घेरून प्रलंबित कामांचा आणि कर्मचाऱ्यांच्या या उद्धट वर्तणुकीचा कडक शब्दांत जाब विचारण्यात आला..
0
0
Report

शिर्डी के अवैध ज़मीन खरीदी मामले में कल्पना खरात 70 दिनों से लापता, पुलिस तलाश

Shirdi, Maharashtra:शिर्डीतील बहुचर्चित बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरणातील मुख्य आरोपींपैकी एक असलेल्या कल्पना खरातचा शोध गेल्या 70 दिवसांपासून सुरू आहे. न्यायालयाने दोनदा जामीन फेटाळल्यानंतरही ती पोलिसांच्या हाती लागत नसल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत... शिर्डीतील बेकायदेशीर जमीन खरेदी प्रकरण राज्यभर चर्चेत आलं होतं. या प्रकरणात अशोक खरात आणि त्याची पत्नी कल्पना खरात यांच्याविरोधात शिर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी अशोक खरातला ताब्यात घेत तपासही केला. मात्र या प्रकरणातील दुसरी आरोपी कल्पना खरात अजूनही फरार आहे. गुन्हा दाखल होऊन तब्बल 70 दिवस उलटलें आहेत. तरीही शिर्डी पोलिसांना कल्पना खरातचा ठावठिकाणा लागलेला नाही. तिचा शोध घेण्यासाठी दोन स्वतंत्र पथके तैनात करण्यात आली आहेत. विविध ठिकाणी तपास आणि पडताळणी सुरू असली तरी पोलिसांच्या हाती अद्याप कोणतेही ठोस यश आलेले नाही. अटक टाळण्यासाठी कल्पना खरातने न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. राहता न्यायालयात जामिनासाठी अर्ज करण्यात आला. त्यानंतर संभाजीनगर न्यायालयातही प्रयत्न करण्यात आले. मात्र दोन्ही न्यायालयांनी तिचा जामीन अर्ज फेटाळून लावला. त्यामुळे तिच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असला तरी ती अद्याप पोलिसांच्या आवाक्याबाहेर आहे. प्राथमिक माहितीनुसार कल्पना खरात परराज्यात लपून बसल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्या दृष्टीने तपास यंत्रणा हालचाली करत असल्याचं सांगितलं जातंय. मात्र एवढा कालावधी उलटल्यानंतरही आरोपी सापडत नसल्याने तपासाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. एकीकडे पोलिस शोधमोहीम सुरू असल्याचा दावा करत आहेत, तर दुसरीकडे कल्पना खरात नेमकी कुठे आहे..? तिला संरक्षण तर मिळत नाही ना..? आणि या प्रकरणात कोणाचा दबाव आहे का? असे प्रश्न नागरिकांमधून उपस्थित होऊ लागले आहेत. कल्पना खरातचा शोध घेण्यासाठी पोलिसांची दोन पथके कार्यरत असल्याचा दावा केला जात असला, तरी 70 दिवसांनंतरही ती फरारच आहे. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांना यश कधी मिळणार, पोलिस तिला बेड्या ठोकणार का..? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
0
Report

भास्कर जाधव का भविष्य? मोदी-नेहरु पर जारी विवाद का है

Ratnagiri, Maharashtra:भास्कर जाधव pointer.. नरेंद्र मोदी पुर्ती.. नरेंद्र मोदींनी केलेल्या प्रत्येक कामाची तुलना प्रत्येक वेळी पंडित जवाहरलाल नेहरून बरोबर का करतात.. तुम्ही तुमचे दिवस मोजले पाहिजेत तुम्ही त्यांचे दिवस का मोजताय.. दिवस मोजून आपला मोठेपणा किंवा आपली लोकप्रियता मोठी होत नाही सिद्धही होत नाही.. त्यांना शुभेच्छा देताना राजेश खन्नाच्या सिनेमाची डायलॉग बाबूमोशाय जिंदगी लंबी नही बडी होनी चाहिये.. नाशिक गोकुळ गीते जिथे जिथे एकनाथ शिंदेंना उमेदवारी देण्यात आली तिथे भाजपने बंडखोर उमेदवार उभे केलेत.. आमच्यामुळे सगळे तुमच्यामुळे आम्ही नाही ही भाजपची जुनी पद्धत.. खत तुटवडा.. या देशात अंध भक्तांची संख्या प्रचंड वाढलेली आहे गॅस करता लागलेली प्रचंड लाईक अंध भक्तांना दिसत नाही.. डिझेल पेट्रोल करण्याकरता लागलेली मोठी राहील अंध भक्तांना दिसत नाही खता करता लागलेली लाईन अंध भक्तांना दिसत नाही.. हीच देशाची अधोगती आणि म्हणून जास्त दिवस खुर्चीवर बसण्याचा आनंद उत्सव करण्यापेक्षा आपण देश वासियांना जास्तीत जास्त आनंदाने सुख देण्याचा प्रयत्न किती वेळा केला याचा मूल्यमापन केल्यावर आपण काय करतोय आणि आपण काय आहात याची जाणीव.. राज्य सरकारचा फक्त घोषणांचा सुकाळ.. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची बारा वर्षे पूर्ण झाल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी जो लेख लिहिला या अनेक योजनांचा उल्लेख केला पण एकाही योजनेपासून देशवासीयांना काय लाभ मिळाला अशी सिंगल फिगर सुद्धा त्यांनी त्यात टाकलेली नाही.. घोषणा फक्त करायच्या आणि पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या विरोधात बोलायचं या व्यतिरिक्त काहीच केले नाही आणि टीका करायची यांनी राज्याचे प्रश्न सुटत नसतात.. तटकरे तटकरेंवरती बोलायचं आहे तर खूप आहे या आधी सुद्धा मी बोललोय महेंद्र तळवे आणि तटकरे यांच्या वादामध्ये मी बोललो अशी मला आवश्यकता वाटत नाही.. अमरावती निवडणूक या देशात समस्त देशवासिनी डोळे उघडण्याची गरज आहे या देशातला मतदानाचा हक्क आणि मत संपुष्टात आणले जातेय.. इंदिरा गांधी पंतप्रधान मोदींपेक्षा जास्त दिवस पंतप्रधान झाले परंतु मध्ये ब्रेक झाला म्हणून ते दिवस मोजले जात नाहीत.. यांचे सलग दिवस मोजले जातात याचा अर्थ स्वतःच्या सोयीने हे सलग राहिले की किती राहिले.. माजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्यापेक्षा नरेंद्र मोदींचे दिवस जास्त नाही.. भारतीय जनता पार्टीला शह देण्यासाठी या देशाच्या पंतप्रधान म्हणून एखाद्या महिला उमेदवाराचे नाव विरोधी पक्षातल्या नेत्यांनी एकत्र येऊन आणलं तर नक्कीच भविष्यात बदल घडेल. दिपके एका मोर्चावर आणि सोशल मीडियाच्या लाईक्स वर दीपक यांच्या नेतृत्वाचा मूल्यमापन योग्य होणार नाही.. दत्ता भरणे.. अशा प्रकारचे वक्तव्य करणं कितपत योग्य आहे हे त्यांनी विचार करायला हव.. गिरीश महाजन भारतीय जनता पार्टीच्या लोकांना महात्मा गांधींचा,इंदिरा गांधींचा,राजीव गांधींचा खून झाला त्याच्यामध्ये त्यांना दुःख वाटत नाही.. गिरीश महाजन यांसारखे लोक की ज्यांना समाजामध्ये काडीची प्रतिष्ठा नाही.. कोणाच्या तरी मागून सकाळ-संध्याकाळ फिरणं पण कोणीतरी हुजूरगिरी करणं म्हणून ते मंत्री आहेत.. संपूर्ण देशाने ज्या गोष्टीच्या निषेध केला आणि त्यांनी त्यांचं समर्थन केलं हे लोक राष्ट्रद्रोही आहेत.. हे राष्ट्र प्रेमी नाही राष्ट्रभक्त नाही हे राष्ट्र द्रोही आहेत.. रोहित पवार आंदोलन.. रोहित पवारांचा आंदोलन हे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे.. रोहित पवारांच्या आंदोलनाला माझा शंभर टक्के पाठिंबा आहे.. भास्कर जाधव जाणार कुठं भास्कर जाधव आगामी काळात कुठे जाणार हे चर्चा करणारे मूर्ख आहेत.. हे किती दिवस चर्चा करणार मी त्यांना किंमतच देत नाही.. चर्चा करणारे सकाळी आणि संध्याकाळी कुठे असतात त्यांना हा अधिकार दिला कुणी..
0
0
Report
Advertisement

महाड एमआईडीसी में प्रवासी मजदूर हटाने के विरोध में मनसे का भारी मोर्चा

Chendhare, Maharashtra:महाड एमआईडीसीमध्ये परप्रांतीय हटाव ...... परप्रांतीय कामगारांच्या मुद्यांवर मनसे आक्रमक ...... जिल्हाध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात मोर्चा ........ एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना विचारला जाब ...... भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीयांची भरती अँकर - रायगड जिल्ह्यात परप्रांतीय कामगारांच्या विरोधात मनसे आक्रमक झाली आहे. स्थानिक भूमिपुत्रांना डावलून परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती सुरू असल्याप्रकरणी महाड एमआयडीसी कार्यालयावर आज मनसेने मोर्चा काढत धडक दिलीय. मनसेचे रायगड जिल्हा अध्यक्ष राज पार्टे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात आला. शेकडो मनसैनिक या मोर्चात सहभागी झाले होते. स्थानिकांना रोजगार मिळावा, सांडपाण्यामुळे होणारे प्रदूषण, परप्रांतीय कामगारांची मोठ्या प्रमाणात भरती, भूमिपुत्रांना सातत्याने डावलला जात असल्याच्या मुद्द्यांवर मनसेने हे पाऊल उचललं आहे. याप्रसंगी मोठा पोलीस बंदोबस्त देखील तैनात करण्यात आला होता. येत्या २५ तारखेपर्यंत जर याबाबत कार्यवाही झाली नाही तर मनसे स्टाईल आंदोलाचा इशारा यावेळी देण्यात आला. आता मनसेच्या आंदोलनानंतर एमआयडीसी आणि ठेकेदार काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे. बाईट - राज पार्टे, जिल्हाध्यक्ष मनसे (सफेद कुर्ता) बाईट - सचिन गोळे, उपाध्यक्ष मनसे कामगार सेना ( काळा कोट)
0
0
Report

कांग्रेस ने महावितरण कार्यालय पर धावा कर स्मार्ट मीटर के विरोध में प्रदर्शन किया

Kalyan, Maharashtra:काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक.. वीज दरवाढी विरोधात काँग्रेस आक्रमक. स्मार्ट मीटरची सक्ती करु नका अन्यथा कार्यालयाला टाळे ठोकू.. महावितरण कार्यालय हे महा बोगस कार्यालय झाले आहे . Vo-वीज दरवाढ करून सुद्धा सुविधा नाही, वारंवार वीज खंडित होते, महाराष्ट्रत वीज गळती होते ,ती सर्वसामान्य नागरिकांवर टाकण्यात येते .भाजपा सरकार सतत्तेत आले तेव्हा वीजबिल कमी करु असं आश्वासन देण्यात आलं,मात्र आता स्मार्ट मीटरची सक्ती केली जातीय,मात्र या मीटरची करू अशा अनेक मागण्या घेऊन काँग्रेस कार्यकर्त्यांनी महावितरण कार्यालयात धडक देत निवेदन दिले. मागण्या मान्य केल्या नाहीत तर महावितरण कार्यालयाला टाळे ठोकू असा इशारा जिल्हा कॉग्रेस चे अध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे बाईट... नवीन सिंग कॉग्रेस जिल्हा अध्यक्ष कल्याण
0
0
Report
Advertisement

दिल्ली दौरे में मंत्री-चर्चाओं से चंद्रपुर के विकास को नई राह मिली

Nagpur, Maharashtra:Ngp Mungantiwar byte live u ने फीड पाठवले -------------------- सुधीर मुंगटीवार बाईट On Delhi भेट * दहापेक्षा जास्त मंत्री आणि आयोगांच्या अध्यक्षांची भेट घेतली.. चंद्रपूर जिल्ह्यातील अनेक प्रश्न बद्दल चर्चा केली.. सर्वांकडून आमच्या मागण्यांना सकारात्मक पाठिंबा मिळाला आहे.. राजनाथ सिंह यांची चंद्रपुरातील सैनिक शाळेच्या विस्तारा संदर्भात चर्चा केली.. सायन्स सेंटर बद्दलही जितेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली... त्याशिवाय राष्ट्रीय महिला आयोग, राष्ट्रीय ओबीसी आयोग यांच्या अध्यक्षांशीही भेट घेतली.. * गडकरी यांच्यासोबत चंद्रपुरातील रिंग रोड संदर्भात चर्चा झाली.. * मी दिल्लीला जात नव्हतो, मात्र दिल्लीमध्ये गेल्यानंतर जिल्ह्याच्या विकासासाठी फार मदत होते ही गोष्ट लक्षात आली... On दिल्ली भेट राजकीय चर्चा * ज्याची जशी दृष्टी त्याला दिसते तशी सृष्टी... मी दिल्लीला जात असतो लोकांच्या प्रश्नासाठी जातो.. पुढील पंधरा दिवसानंतर पुन्हा जाईल.. * मी फक्त चंद्रपूर नाही, तर विदर्भाच्या ही कामाला लागलो आहे... धान खरेदीचा प्रश्न उचलला, खतांचे लिंकिंग बद्दलही संबंधित मंत्र्यांशी बोललो.. On मंत्री पद * उद्या प्रत्येक जिल्ह्यासाठी केंद्रातही मंत्री पद मागितले तर हे शक्य आहे का... * एखाद्या प्रश्नाबद्दल किती मंत्री तुम्हाला मदत करतात ते महत्त्वाचे आहे.. एखाद्या जिल्ह्यात मंत्री आहे, मात्र कामच होत नाही अशा मंत्रिपदाला चाटायचे का??? On परिषद निवडणुकीत काँग्रेसची स्थिती * एखादा जीर्ण वस्त्र फाटलं म्हणून तो शिवण्याचा प्रयत्न केला, तर तो दुसऱ्यांदा फाटतं, काँग्रेसचे तसेच झाले आहे.. जोवर काँग्रेस साधे विश्लेषण करेल तोपर्यंत त्यांचे अच्छे दिन कधीच येऊ शकणार नाही.. त्यांच्या राजकारणात सामान्य माणूस केंद्रबिंदू नाही.. त्यांच्या राजकारण फक्त मोदी द्वेष एवढा आहे... याचे बाहेर जोवर ते जाणार नाही त्यांचे दिवस बदलणार नाही.. काँग्रेस त्यांची सत्ता असलेल्या राज्यात काही विकासाचे मॉडेल उभे करून दाखवणार नाही, तोवर त्यांचे दिवस बदलणार नाही.. On काँग्रेस ममता बॅनर्जी प्रस्ताव * त्यात चूक कुठे आहे?? मात्र, काँग्रेसचा प्रस्ताव ममता बॅनर्जी थोडी मान्य करणार आहे.. ममता बॅनर्जी आपला स्वतंत्र पक्ष आणि आपले अधिकार तिथे का विलीन करतील.. काँग्रेसमध्ये गेल्यावर अधिकार त्यांच्या हातात राहणार नाही हे त्यांना माहीत आहे.. * इंडिया आघाडी मधील काही नेते सल्ला देत आहे की इंडिया आघाडीमधील सर्व पक्षांनी काँग्रेसमध्ये विलीन व्हावं, मात्र हे शक्य नाही... On संजय राऊत मोदी कॉक्रोच पार्टी अमेरिका भेट * संजय राऊत यांच्याकडे काय माहिती असेल मला माहित नाही.. मात्र, ते संजय आहे, महाभारताच्या संजय ला घरी बसून युद्ध दिसत होता, यांना घरी बसून अमेरिकेचे दृश्य दिसत असेल तर मला माहित नाही... * आंदोलन करण्याचा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला अधिकार आहे, मात्र आंदोलनाचा विषय जनतेशी संबंधित असायला हवं.. भाजपला संघाला शिव्या देणे हे आंदोलन नाही... On मोदी नेहरू तुलना * मोदी कुठे म्हणाले की माझी तुलना नेहरू शी करा.. नेहरूंच्या काळातले प्रश्न आणि मोदींच्या काळातले प्रश्न वेगळे आहेत.. नेहरुंच्या काळात धान्य सुद्धा आयात करावे लागायचे... दर्जाहीन धान्य आयात करावं लागलं.. काँग्रेस गवतही तेव्हा बाहेरून आली... * नेहरूंच्या काळातली अर्थव्यवस्था आणि आजची अर्थव्यवस्था याच्यामध्ये जमीन आसमान अंतर आहे... * नेहरू आणि मोदींच्या काळाची तुलना होऊ शकत नाही.. नेहरूंनी काही संस्था उभ्या केल्या मात्र बोटावर मोजणे एवढे एम्स आज 22 झाले हे पण लक्षात ठेवा... महामार्ग वाढले, पूल वाढले.. On ऑपरेशन टायगर * मला वाघाचा चांगला अभ्यास आहे.. राज्यात 112 वाघ असताना मी सहाशे पर्यंत पोहोचवले.. ऑपरेशन टायगर जेव्हा केव्हा होते, तो कधीच अशक्य होत नाही.. वाघ शिकार करायला जातो, तेव्हा पहिल्या प्रयत्नात कदाचित त्याचा पंजा योग्य ठिकाणी लागत नाही, मात्र दुसऱ्या प्रयत्नातून नक्कीच यशस्वी होतो... एकनाथ शिंदे अचूक नेम घेणारे नेते आहे, त्यांचा अचूक नेम लागेल असा विश्वास माझ्या मनात आहे....
0
0
Report

चंद्रपुर के गोसीखुर्द घोटाले में चार वरिष्ठ अधिकारियों समेत ठेकेदार पर केस दर्ज

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात गोसीखुर्द सिंचन प्रकल्पाच्या उजव्या मुख्य कालव्यात घोटाळाप्रकरणी चार बड्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदारावर गुन्हा दाखल झाले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्यात गोसेखुर्द उजवा मुख्य कालवा बांधकामात सुमारे 14 कोटींच्या घोटाळा प्रकरणी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या फिर्यादीवरून चार बड्या अधिकार्‍यांसह कंत्राटदारावर गुन्हे दाखल करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. बनावट अनुभव प्रमाणपत्रे सादर करणे, नियमबाह्य अद्ययावतीकरण करणे, निविदेची किंमत वाढविणे यासह विविध गैरप्रकार या अधिकारी आणि कंत्राटदारांनी संयुक्तपणे केल्याचे उघड झाले आहे. जलसंपदा विभाग नागपूरचे तत्कालीन मुख्य अभियंता सोपान सूर्यवंशी, अधीक्षक अभियंता संजय कोल्हापूरकर, विभागीय लेखाधिकारी सुधाकर घेगारे, कार्यकारी अभियंता देवेंद्र शिर्के यांच्यासह दोन खाजगी कंपनी संचालकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
0
0
Report
Advertisement

ऑपरेशन टायगर पर शिंदे की भूमिका पर मची सियासी घमासान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर... मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर ऑन ऑपरेशन टायगर - आम्ही कोणतेही ऑपरेशन टायगर करीत नाही. जण यायचे त्यांना आम्ही नाही म्हणणार नाही. आता आमची मानसिकता नाही मात्र जेव्हा ऑपरेशन टायगर करायचे तेव्हा एकनाथ शिंदे ठरवतील. आमच्या संपर्कात अनेकजण आहेत. काही महिन्यात हे सर्व एकत्र राहतील असे वाटत नाही. ऑन मुंबई चालक मराठी भाषा. - सरनाईक यांनी ज्यांना मराठी येत नाही त्यांच्यासाठी काही वेळ दिला होता. अनेक राज्यात त्या त्या राज्याची भाषा बोलली जाते. मग मुंबईत मराठी का नाही. एवढे करूनही ऐकत नसतील तर ही मुजोरी म्हणावे. मग कारवाई होईल. ऑन दीपके मोदी भेट.राऊत विधान. - हवेत गोळ्या मरण संजय राऊत यांचं काम आहे. आता पर्यंत त्यांचे एकही विधान सत्य झाले नाही. ऑन रोहित पवार आंदोलन. - आमचा विरोध होण्याचा कारण नाही.राजकीय पोलिस भाजून घेण्याचे काम रोहित पवार करीत आहेत. पोलिसांनी योग्य ती कारवाई करावी. - विरोधकांच्या पाणी फिरले आहेत. आमचे 17 चे 17 उमेदवार निवडून येतील. ऑन चाकणकर पोस्ट - यावर भाष्य करणे योग्य राहणार नाही. ऑन मंत्री भरणे विवादित विधान. - मंत्री भरणे यांचा बोलण्याचा उद्देश चुकीचा न्हवতা, शेतकरी राज्याला कुणीही हिणवण्याचा प्रयत्न कुणी करू नये. ऑन वेरूळ हत्या. - वेरूळची घटनेत 307चा आरोपी होता त्याला पकडण्यासाठी पोलिस गेले होते. या प्रकरणात जो आरोपी असेल त्यावर कारवाई केली जाईल. ऑन FDA कारवाई. - Fda च्या मोहिमेचा अभिनंदन केलं पाहोजे. मोठी कारवाई सुरू आहे. त्याचा स्वागत आहे जे प्रोटेक्शन पाहिजे ते सरकार देईल. - आतापर्यंत जे अधिकारी झोपले होते, अधिकारी काय करीत होते हा प्रश्न आहे. का आपल्याकडे लॅब नाहीत, तपासणी होत नाही. काही लोकांचे लागेबांधे व्यापाऱ्यासोबत होते. ही कारवाई थांबता कामानये. ऑन खत विक्री. - मुख्यमंत्र्यांनी परवाच्या बैठकीत स्पष्ट सूचना दिल्या आहेत. आपल्याकडे मुबलक साठा आहे. असे सचिवांनी सांगितले आहे. बोगस खत विक्रीवर कठोर करावी करणार. - काँग्रेसचे अस्तित्व संपलेलेलं आहे. उमेदवार म्हणतो मी का खपू, उमेदवाराने निर्णय घेतले असेल तर गैर नाही. ऑन यशोमती ठाकूर आरोप. - तुम्ही जेव्हा सत्तेत होतात तेव्हा का आरोप केला नाही. 2019 मध्ये तुम्ही सत्तेत होता, तुम्ही किती देऊन मंत्रिपद दिले. ऑन ऑनलाइन खातविक्री आणि शेतकरी अडचणी. - ऑफलाईन खते मिळत नसल्याने शेतकरी कुठेही अडचणीत येऊ नये याबाबत सचिवाना मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट सूचना दिल्या आहेत.
0
0
Report

घाटसावळी में रेलवे पुल के लिए जमीन के मुआवजे में भारी फर्जीवाड़ा सामने: आम के पेड़ों को लाखों, घरों को कम?

Beed, Maharashtra:बीड: घरांपेक्षा आंब्याच्या रोपांना लाखोंचा मावेजा; घाटसावळी भूसंपादनावर संशयाचे सावट..! घाटसावळी येथे रेल्वे उड्डाणपुलासाठी करण्यात आलेल्या भूसंपादन प्रक्रियेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. राहत्या घरांपेक्षा आंब्याच्या छोट्या रोपांना लाखों रुपयांचा मावेजा मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. काही झाडांना लाखोंचा मोबदला, तर काहींना केवळ दोन हजार रुपये मिळाल्याने या प्रक्रियेत मोठा गैरव्यवहार झाल्याची चर्चा रंगली आहे. पाहूयात आमचा हा विशेष रिपोर्ट... हातात मावेजाची कागदपत्रे घेऊन ती तपासणारे हे ग्रामस्थ आहेत बीड जिल्ह्यातील घाटसावळी गावचे. या गावातून रेल्वेचा उड्डाणपूल गेल्याने परिसरातील अनेक नागरी वसाहतींचे भूसंपादन करण्यात आले आहे. मात्र या भूसंपादनातील मोबदल्याच्या आकडेवारीने सर्वांनाच धक्का बसला आहे. कारण राहत्या घरांपेक्षा तब्बल पाच पट अधिक मावेजा आंब्याच्या रोपांना मंजूर झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. बॅरलमध्ये लावलेल्या एका आंब्याच्या रोपाला तब्बल आठ लाख रुपयांचा मावेजा मंजूर झाला आहे. तर जमिनीत लागवड केलेल्या काही आंब्याच्या झाडांना केवळ दोन हजार रुपयांचा मोबदला मिळाला आहे. एवढी मोठी तफावत कशी, असा सवाल ग्रामस्थ उपस्थित करत आहेत. घाटसावळी गावातील अनेक नागरिकांनी घरासमोर आंब्याची झाडे लावली आहेत. परिसरात सुमारे पन्नास आंब्याची झाडे असून त्यापैकी तब्बल तीस झाडांना प्रत्येकी चार लाख रुपयांचा मावेजा मंजूर करण्यात आल्याचा दावा ग्रामस्थ करत आहेत. दुसरीकडे काही झाडांना अत्यल्प मोबदला देण्यात आला, तर काही झाडांची नोंदही करण्यात आली नसल्याचा आरोप आहे. ज्यांना चार लाख रुपयांचा मोबदला मिळाला, त्याच निकषांवर इतर पात्र झाडधारकांनाही मावेजा मिळावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. घाटसावळी गावातून गेलेल्या या रेल्वे उड्डाणपुलासाठी सर्वे क्रमांक १८ मधील सुमारे चारशे मीटर परिसरातील जमिनीचे भूसंपादन करण्यात आले आहे. या प्रक्रियेत अनेक घरे आणि नागरी वसाहतींचा समावेश आहे. मात्र इथेही मोबदल्यातील मोठी विसंगती समोर आली आहे. काही मोठ्या इमारतींना केवळ दहा लाख रुपयांचा मावेजा मिळाल्याचा दावा केला जात आहे, तर तुलनेने साध्या घरांना तब्बल चाळीस लाख रुपयांचा मोबदला देण्यात आल्याचे ग्रामस्थ सांगतात. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून यात भ्रष्टाचार झाला असावा, असा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. भूसंपादनात घोटाळा झाल्याची तक्रार ग्रामस्थानी करताच जिल्हा प्रशासन देखील आता सतर्क झाले आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमून अहवाल मागितला जाईल त्यानंतर रीतसर कारवाई करू असे आश्वासन जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी दिले आहे. त्यामुळे भूसंपादन अधिकाऱ्यांवर कारवाईची टांगती तलवार आहे. आंब्याच्या रोपांपासून ते घरांच्या मोबदल्यापर्यंत दिसून येणारी ही मोठी तफावत अनेक प्रश्न निर्माण करणारी आहे. भूसंपादन प्रक्रियेत नेमके कोणते निकष लावण्यात आले, मोबदल्याचे दर कसे ठरविण्यात आले आणि या सर्व प्रकरणात कोणाची जबाबदारी आहे, याची सखोल चौकशी करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. प्रशासन याकडे गांभीर्याने लक्ष देऊन वस्तुस्थिती जनतेसमोर आणणार का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. महेंद्रकुमार मुधोळकर Zee 24 तास बीड..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Advertisement
Back to top