icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाबळेश्वर में पर्यटकों की भारी भीड़, गर्मी में सैर-सपाटा जारी

Satara, Maharashtra:सातारा - सध्या राज्यात उन्हाचा तडाखा वाढतो आहे. असं असलं तरी थंड हवेचे ठिकाण असलेल्या आणि महाराष्ट्राचं मिनी कश्मीर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर मध्ये मात्र पर्यटकांची तुफान गर्दी होते आहे.उन्हाळी सुट्टीचा आनंद घेण्यासाठी राज्यबरोबर देशातील पर्यटकांनी मोठी गर्दी केली आहे. महाबळेश्वर मधील वेगवगेळ्या पॉईंट सोबत वेण्णा लेक परिसरात बोटींगचा, हॉर्स रायडिंग चा आनंद पर्यटक घेतायत.त्याच बरोबर वेगवेगळ्या खाद्यपदार्थांचा आनंद देखील पर्यटक या ठिकाणी घेतायत. महाबळेश्वर मध्ये पर्यटकांचा ओघ वाढत असल्याने ट्राफिकच्या समस्येला पर्यटकांना सामोरे जावे लागत आहे. महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी
0
0
Report

परशुराम घाट खुला: कोकण में यातायात राहत, मुंबई-गोवा मार्ग सुलभ

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणवासीयांना मोठा दिलासा.. परशुराम घाटातील बंद असलेली मार्गिका दोन दिवसांत खुली होणार!.. परशुराम घाटातील गॅबियन भिंतीचे काम पूर्ण.. मुंबई-गोवा महामार्गावरील प्रवास आता होणार सुसाट!.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावरून कोकणात ये-जा करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची आणि महत्त्वाची बातमी समोर येत आहे... गेल्या अनेक महिन्यांपासून चिंतेचा विषय ठरलेल्या चिपळूण जवळील परशुराम घाटातील वाहतूक आता पूर्णपणे सुरळीत होणार आहे... घाटाच्या संरक्षणासाठी उभारण्यात आलेल्या गॅबियन भिंतीचे दुरुस्तीचे काम अखेर पूर्ण झाले असून,पुढील दोन दिवसांत घाटातील महामार्गाची एक बंद असलेली मार्गिका वाहतुकीसाठी खुली केली जाणार आहे.. गेल्या वर्षीच्या पावसाळ्यात घाटाच्या सुरक्षतेसाठी बांधलेली गॅबियन वॉल कोसळल्यामुळे आणि महामार्गाला तडे गेल्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने एक मार्गिका बंद ठेवली होती... त्यानुसार वर्षभर प्रवाशांना वाहतूक कोंडीचा आणि संथ प्रवासाचा सामना करावा लागला... मात्र,आता वर्षभर चाललेले हे दुरुस्तीचे काम पूर्ण झाले असून,सध्या संबंधित ठेकेदाराकडून रस्त्याची साफसफाई आणि भेगा भरण्याचे अंतिम काम युद्धपातळीवर सुरू आहे... पावसाळा तोंडावर आलेला असतानाच हा मार्ग पूर्ण क्षमतेने सुरू होत असल्यामुळे प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.. याच संपूर्ण परिस्थितीचा थेट परशुराम घाटातून आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी.
0
0
Report

जुन्नर के आदिवासी इलाकों में जल संकट, लोगों ने MI टैंक योजना की मांग

Barav, Maharashtra:जुन्नरच्या आदिवासी पट्ट्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा गंभीर बनला आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या भागात पाणीटंचाई कायम असून आजही ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी मोठी पायपीट करावी लागत आहे. दरवर्षी उन्हाळ्यात विहिरी आणि पाणवठे कोरडे पडत असल्याने महिलांसह नागरिकांना टँकरवर अवलंबून राहावे लागत आहे. शेतीसाठीही पुरेसे पाणी उपलब्ध नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. या पार्श्वभूमीवर परिसरात एमआय टॅंक योजना तातडीने राबवावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे. पावसाचे पाणी साठवण्यासाठी प्रभावी प्रकल्प उभारल्यास या भागाचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटू शकतो, असे नागरिकांचे म्हणणे आहे. याच प्रश्नावर स्थानिक ग्रामस्थांचे म्हणणे...
0
0
Report
Advertisement

बेताला के बैकवॉटर में डूबे दो बच्चों की मौत, परिजनों में कोहराम

Bhandara, Maharashtra:बेटाळा येथे नदी घाटाच्या खोल पाण्यात बुडून दोन मुलांचा मृत्यू. मोहाडी तालुक्यातील बेटाळा येथे सायंकाळी सहा वाजताच्या दरम्यान दुर्दैवी घटना घडली. वैनगंगा नदीच्या बॅक वॉटरमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या दोन मुलांचा पाण्याचा अंदाज न आल्याने बुडून मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच मोहाडी पोलीस तसेच महसूल विभागाचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिसरात नागरिकांची मोठी गर्दी जमली असून शोककळा पसरली आहे. मृत मुलांचे मृतदेह बाहेर काढण्याचे काम सुरू असून पुढील तपास व आवश्यक कायदेशीर कारवाई मोहाडी पोलीसांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

हिंगोली के नागनाथ तालुक्यात विद्युत DP जलकर खाक, कर्मचारियों की लापरवाही पर ग्रामवासियों का आक्रोश

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या औंडहा नागनाथ तालुक्यातील नांदगाव परिसरात असलेल्या विद्युत डीपीने अचानक पेट घेतल्याने संपूर्ण विद्युत डीपी जळून खाक झाली आहे अनेक वेळा विद्युत डीपी दुरुस्त करण्याची मागणी नागरिकांनी केली होती मात्र अनेक वेळा मागणी करूनही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी याकडे दुर्लक्ष केल्याने संपूर्ण विद्युत डीपी जळून खाक झाली आहे विद्युत डीपी आग लागली असताना महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी गावकऱ्यांनी फोन केले मात्र महावितरणच्या कोणत्याही कर्मचाऱ्यांनी फोन घेतला नसल्याने संपूर्ण विद्युत जळून खाक झाली आहे विद्युत डीपी जळाल्यामुळे नांदगाव परिसरातील अनेक गावांना रात्र अंधारात काढावी लागली आहे
0
0
Report
Advertisement

CBI ने नांदेड में नीट पेपर घोटाले के घेरे में घर पर छापा

Nanded-Waghala, Maharashtra:नीट पेपरफुटी प्रकरणी सीबीआयच्या पथकाने काल नांदेड शहरातील एका कुटुंबाची चौकशी केली. सीबीआयच्या पथकाने नांदेड शहरातील विद्युतनगर भागातील कुटुंबाची चौकशी केली. एका कुटुंबाच्या निवासस्थानी तब्बल आठ तासांपेक्षा जास्त वेळ कसून चौकशी आणि झाडाझडती घेण्यात आली. या कुटुंбасाने मुलीसाठी 5 लाख रुपयांत नीटचा पेपर खरेदी केल्याचा संशय असल्याची माहिती आहे. त्यानुसार सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळीच विद्युतनगर भागातील एका घरावर छापा टाकला. या पथकाने सकाळपासूनच घरातील सर्व महत्त्वाच्या कागदपत्रांची बारकाईने तपासणी केली. आपल्या मुलीसाठी 5 लाख रुपये देऊन नीटचा पेपर विकत घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली. लातूरमध्ये शुक्रवारी एका कोचिंग क्लास चालकाची चौकशी केल्यानंतर सीबीआयचे हे पथक थेट नांदेडात दाखल झाले होते. त्याच पथकाने नांदेड मध्ये ही कारवाई केली. मात्र नांदेड मधुन सद्या तरी कोणालाही अटक केली जाईली नाही अशी माहीती सुत्रानी दिली.
0
0
Report

लासलगांव में कांदा उत्पादकों के समर्थन के लिए आंदोलन, सरकार से हस्तक्षेप की मांग

Yeola, Maharashtra:राज्यभरात सध्या उन्हाळी कांद्याची काढणी सुरू असून बाजार समित्यांमध्ये मोठ्या प्रमाणात कांद्याची आवक होत आहे मात्र कांद्याला अत्यंत कमी दर मिळत असल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्य आर्थिक संकटात सापडले आहेत अनेक ठिकाणी कांदा विक्री नंतर उत्पादन खर्चही निघत नसून काही शेतकऱ्यांना तर विक्रीनंतर एक रुपयाचेदेखील उत्पन्न हातात राहत नसल्याची गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे त्यामुळे 18 मे रोजी सकाळी 9 वाजता लासलगाव मार्केट कमिटी च्या आवारात आमदार रोहित पवार यांच्यासह कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. सरकारने तातडीने हस्तक्षेप करून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात येणार असल्याचे दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे लासलगाव येथे या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आढावा बैठकीसाठी आले असताना त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले
0
0
Report

येवल्या उत्तरपूर्व भाग में सूखा दूर, नया कालवा किसानों के लिए उम्मीद बन गया

Yeola, Maharashtra:येवल्या तालुक्याचा उत्तरपूर्व भाग हा पूर्ण पुणे दुष्काळी भाग म्हणून ओळखला जात होता राज्याचे अन्न,नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी या परिसरातील दुष्काळ दूर करण्याच्या दृष्टीने पथदर्शी मांजरपाडा हा महत्वपूर्ण प्रकल्प साकारला या प्रकल्पाचे पाणी पुणेगाव-दर्सवाडी-डोंगरगाव हा 150 किलोमीटर हुन लांबीच्या पोहच कालव्याच्या माध्यमातून डोंगरगाव साठवण तलावात सोडण्यात आले या कालव्याच्या माध्यमातून येवला व चांदवड तालुक्यातील अनेक लहान-मोठे बंधारे भरण्यात आले गेल्या तीन ते चार वर्षांपासून सातत्याने हे बंधारे भरले जात असल्याने दुष्काळी असलेल्या येवल्यातील उत्तरपूर्व भागात सिंचन क्षमतेत वाढ होऊन परिसर बागायती बनण्यास सुरुवात झाली आहे शेतीसोबत दूध व पशुपालन व्यवसायाला चालना मिळाली आहे मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून माजी खासदार समीर भुजबळ यांनी हा कालवा आठमाही करण्याच्या दृष्टीने सर्वेक्षण देखील केले आहे त्यांच्या पाठपुराव्यातून या कालव्याला आठ एस्केप गेट देखील बसविण्यात येत आहे त्यामुळे यापुढील काळात विविध गावांना या पाण्याचा लाभ होणार आहे
0
0
Report
Advertisement

नाशिक के निफाड में भीषण गर्मी: तापमान 43°C, बच्चों ने तैराकी तालाबों की राह ली

Niphad, Maharashtra:थंडीचे माहेरघर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या नाशिकच्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका मोठ्या प्रमाणात वाढला आहे १३ एप्रिलनंतर तब्बल महिनाभराने पुन्हा १३ मे रोजी कमाल तापमानाने ४३ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला विशेष म्हणजे गेल्या २५ दिवसांपासून कमाल तापमान ४० अंश सेल्सिअसच्या पुढे कायम राहत असल्याने नागरिक अक्षरशः हैराण झाले आहेत उन्हाच्या तीव्र झळांमुळे अंगाची लाही-लाही होत असून उकाड्यापासून दिलासा मिळवण्यासाठी नागरिक विविध उपाययोजना करताना दिसत आहेत. विशेषतः शालेय सुट्ट्या सुरू असल्याने लहान मुलांनी जलतरण तलावांकडे मोठ्या प्रमाणात धाव घेतली आहे निफाड तालुक्यातील नैताळे येथे असलेल्या जलतरण तलावावर सकाळपासून संध्याकाळपर्यंत बच्चे कंपनीची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे
0
0
Report

वाशिम के पाटणी चौक पर मारामारी, वीडियो वायरल, पुलिस ने शुरू की जांच

Washim, Maharashtra:वाशिम शहरातील पाटणी चौकात तुंबळ हाणामारी झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून शहरात चर्चेचा विषय ठरत आहे. किरकोळ कारणावरून काही तरुणांमध्ये वाद झाला. हा वाद पुढे वाढत जाऊन भर रस्त्यातच हाणामारीत परिवर्तित झाला. अचानक झालेल्या या प्रकारामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. वाहतूक ठप्प झाली होती. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. दरम्यान, या प्रकरणाची पोलिसांकडून चौकशी सुरू असून संबंधितांवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे.
0
0
Report
Advertisement

उल्हासनगर धिंड प्रकरण: दो महिला आरोपी को एक दिन की पुलिस कोठड़ी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर धिंड प्रकरण, दोन महिला आरोपींना एक दिवसांची पोलीस कोठडी Anchor उल्हासनगर धिंड प्रकरणात दोन महिला आरोपी ज्युली वाघरी आणि विणु वाघरी यांना न्यायालयाने एक दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. आरोपींनी राजपूत कुटुंबियातील सदस्यांना मारहाण करत महिलेची केस कापत त्यांची धिंड काढली होती. या प्रकरणी उल्हासनगर सेंट्रल पोलिसांची कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केल्यानंतर आज उल्हासनगर न्यायालयात हजर करण्यात आले होते.. यावेत पुढील तपासासाठी न्यायालयाने दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी केली दिली आहे. या प्रकरणातील आणखी ८ ते १० आरोपी अद्याप फरार असून पोलिसांकडून शोधमोहीम सुरू आहे. मानवतेला काळिमा फासणाऱ्या या घटनेनंतर शहरात संताप व्यक्त होत असून आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली जातेय , चंद्रशेखर भुयार ,उल्हासनगर
0
0
Report

नाशिक के सिन्नर में तालाब डूबने से माता सहित चार की मौत, दर्दनाक हादसा

Sinnar, Maharashtra:नाशिकच्या सिन्नर मध्ये मन सुन्न करणारी घटना दुपारच्या सुमारास घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिलेसोबत तीन मुले देखील गेली होती महिला कपडे धूत असताना मुले बंधाराच्या पाण्यात बुडत असताना महिलेने पाहिले यावेळी महिलेने देखील त्यांना वाचवण्यासाठी धाव घेतल्याने महिलेसह तिच्या मुलासह दोन भाच्यांचा बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेबाबत वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार निरगुडे हे करत आहेत मृतांची नावे :- मनीषा विजय रामजोशी (आई कार्तिक विजय रामजोशी (मुलगा) आदित्य राहुल शिंदे (भाचा) अविनाश राहुल शिंदे (भाचा)
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top