icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

नवी मुंबई: मंदा म्हात्रे ने अनधिकृत जाहिरात कमानी हटाने का दावा किया

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील पाम बीच मार्गावर उभे करण्यात आलेलेल्या अनधिकृत जाहिरात कमानी विरोधात भाजपा आमदार मंदा म्हात्रे आक्रमक झाल्या आहेत. मागील अनेक महिन्यांपासून या अनधिकृत जाहिरात कमानी काढून टाकाव्यात यासाठी आमदार मंदा म्हात्रे पाठपुरावा करत होत्या मात्र प्रशासन या मागणीकडे दुर्लक्ष करत होते. आज आमदार मंदा म्हात्रे यांनी आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन थेट जेसीबी आणून जाहिरात कमान तोडण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिस प्रशासनाने मध्यस्थी करुन रात्री कमान काढू असे आश्वासन दिल्यावर मंदा म्हात्रे यांनी आंदोलन स्थगित केलेय. या कमानी अनधिकृत आणि धोकादायक असून आताही कमानी काढल्या नाहीत तर अधिवेशनात याविरोधात आवाज उठवला जाईल असा इशारा आमदार मंदा म्हात्रे यांनी दिलाय.
0
0
Report

चंद्रपूर: भाजप उमेदवार अरुण लाखानी ने माता महाकाली के दर्शन किए

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर गडचिरोली वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदे जागेसाठी भाजप उमेदवार अरुण लाखानी यांनी चंद्रपूर शहराचे आराध्य दैवत माता महाकालीचं घेतलं दर्शन. अँकर: चंद्रपूर- गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषदे जागेसाठी भाजप उमेदवार अरुण लाखानी यांनी चंद्रपूर शहराचे आराध्य दैवत माता महाकालीचे दर्शन घेतले. यावेळी पालकमंत्री डॉक्टर अशोक उईके, आमदार किशोर जोरगेवार, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या विश्वासू आमदार श्रीकांत भारतीय, आ. भोंगळे, आ. देवतळे यांच्यासह अनेक आमदार आणि लोकप्रतिनिधी उपस्थित होते. पक्ष नेतृत्वाने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवणार असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. शरद पवारांशी कौटुंबिक संबंध आहेत मात्र त्याचा राजकारणाशी संबंध नसल्याचे स्पष्टता त्यांनी केली.
0
0
Report
Advertisement

वाशीम में डीएपी की कमी से खरीफ की तैयारी प्रभावित

Washim, Maharashtra:खरीप हंगाम तोंडावर आला असून पेरणीपूर्व तयारीला वेग झाला आहे.या काळात शेतकऱ्यांकडून डीएपी खताची मोठ्या प्रमाणावर मागणी होत असते;मात्र वाशीम जिल्ह्यातील शेतकऱ्याच्या मागणीनुसार डीएपी खताचा पुरवठा होत नसल्याने यंदा त्याचा तुटवडा जाणवण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायी खतांचा वापर करण्याचा सल्ला वाशिमच्या कृषी विभागाने दिला आहे.राज्यात गेल्या तीन वर्षात खरीप हंगामात सुमारे ४४ लाख मेट्रिक टन रासायनिक खतांचा वापर झाला आहे.यामध्ये युरिया,डीएपी,एमओपी,संयुक्त खते आणि एसएसपी खतांचा मोठ्या प्रमाणावर समावेश आहे.डीएपीमध्ये १८ टक्के नत्र आणि ४६ टक्के स्फुरद अन्नद्रव्ये असल्याने शेतकरी त्याला अधिक पसंती देतात.मात्र,अपेक्षित पुरवठा नसल्याने यंदा शेतकऱ्यांसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.
0
0
Report

नवी मुंबई में अनधिकृत गावठी दारू फैक्ट्री पर छापा, 3000 लीटर दारू नष्ट

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलीसांनी उरण येथे छापा टाकून अनधिकृतपणे हातभट्टी वरील गावठी दारू बनविण्याचा कारखाना उध्वस्त केलाय. उरण मधील चाणजे गावातील जंगलात बेकायदेशिरपणे 2 ठिकाणी हातभट्टी वरील गावठी दारू बनविण्याचा कारखाना उभारण्यात आला होता. पोलिसांनी छापा टाकत एका ठिकाणावरून 1600 लिटर तर दुसऱ्या कारखान्यातून 1400 लिटर गावठी दारू नष्ट करुन गावठी दारू बनवण्याचे साहित्य जप्त केलेय. पोलीसांनी बेकायदेशीरपणे गावठी दारू बनविण्याचा कारखाना चालविल्या प्रकरणी हिरामण म्हात्रे याच्यावर गुन्हा दाखल करत अटक करण्यात आलेय. मात्र पुणे येथे गावठी दारू पिऊन झालेल्या दुर्घटनेनंतरच नवी मुंबई पोलिसांना जाग आली का असा सवाल देखिल या कारवाई नंतर उपस्थित होत आहे.
0
0
Report
Advertisement

कांग्रेस नेता थोरात के बयान से Ahilyanagar विधानपरिषद चुनाव में महाविकास आघाडी की रणनीति उजागर

Shirdi, Maharashtra:काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात बाईट पॉइंटर ऑन अहिल्यानगर विधानपरिषद निवडणूक आज आम्ही योग्य निर्णय घेऊ.. दुपारी 3 वाजे नंतर सगळ्यांना समजेल..rाणी लंकेबाबत निर्णय महाविकास आघाडी म्हणून चर्चा करून घेऊ... ऑन लाडकी बहीण योजना अपात्र झालेल्या लाडक्या बहिणींना सरकारने धोका दिला.. लाडक्या बहिणींनी केलेल्या मतदानामुळे विधानसभेत त्यांना यश मिळालं.. मात्र त्या बहिणींची फसवणूक.. ऑन भाजप आयात उमेदवार भाजपाचं काम करणारे निष्ठावान भविष्यात तुम्हाला कुठेही दिसणार नाहीत.. राजकारणाचा स्तर आज खालावला आहे.. भ्रष्टाचारातून कमावलेला पैसा मतदारांपर्यंत पोहोचवला जातो... खऱ्या कार्यकर्त्याची किंमत आता संपली आहे.. ऑन पक्ष निष्ठा महाराष्ट्रातील सुसंस्कृत राजकारणाची पातळी घसरली आहे.. मात्र हे सगळं दुरुस्त करण्याची जबाबदारी जनतेची.. ऑन तनपुरे भाजप प्रवेश भाजपातील वाढलेल्या प्रवेशामुळे नव नेतृत्व निर्माण होण्याला संधी.. काँग्रेसच्या माध्यमातूनच नवीन नेतृत्व निर्माण होईल.. प्रादेशिक पक्ष संपत चालल्याचे चित्र देशात निर्माण झाला आहे.. भविष्यात निश्चितच जनता काँग्रेसला पाठिंबा देईल.. Bite - बाळासाहेब थोरात , काँग्रेस नेते
0
0
Report

यवला बाजार में कांदा किसानों को भारी नुकसान, सरकारी दर 1500 के अनुरोध पर बल

Yeola, Maharashtra:येवल्यात शासकीय कांदा खरेदी केंद्र नसल्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसत असल्याची भावना शेतकऱ्यांनी व्यक्त केली. शासकीय खरेदी दराच्या तुलनेत येवला बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटन २०० ते ५०० रुपये कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचे दररोज मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे येवला बाजार समितीत शासनाने नाफेड मार्फत पंधराशे ऐंशी रुपये शासकीय दराने कांदा खरेदी सुरू करावी, तसेच खरेदी केलेला कांदा देशांतर्गत विक्रीऐवजी थेट परदेशात निर्यात करावा, अशी मागणी शेतकरी वर्गातून जोर धरू लागली आहे. आज सकाळच्या सत्रात येवला कृषी उत्पन्न बाजार समितीत सुमारे साडेतीनशे वाहनांमधून कांद्याची आवक झाली होती. बाजार समितीत कांद्याला प्रतिक्विंटल जास्तीतजास्त १३५७ रुपये, कमीतकमी २०१ रुपये तर सरासरी १००० रुपये दर मिळाला. कमी दरामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजीचे वातावरण असून शासकीय खरेदी केंद्राची मागणी अधिक तीव्र होत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे. आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी
0
0
Report
Advertisement

यवतमाळ में मंत्री पद के लालच में धोखाधड़ी का मामला गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा भाजप समन्वयक नितीन भुतडा यांच्या सतर्कतेमुळे केंद्रात राज्यमंत्री पदाचा दर्जा देण्यासाठी आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीक पर्दाफाश झाला. या टोळीने मोबाईलवर झालेल्या संभाषणाची क्लिप तसेच पैसे घेत असल्याचा छुपा कॅमेरातील व्हिडिओ पुरावा म्हणून पुढे आला. केंद्र व राज्यात सत्तेत असलेल्या भाजप व मित्र पक्षांच्या नेत्यांना सत्तेत मोठ्या पदाचे आमिष दाखवून कोट्यवधी रुपये गंडा घालण्याचा हा डाव होता. केंद्रातील विविध विभागांमध्ये राज्यमंत्री पदाचा दर्जा असलेल्या 65 पदांची यादी टोळीकडे होती; नेमणुकीसाठी 20 करोड ते 35 करोड रुपये मागणी होत होते. या टोळीमधील म्होरक्या यांनी 20 कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी केली; अमित शहा यांच्या निकटवर्तीय व संघातील पदाधिकारी यांच्या मार्फत पैसे देऊन नेमणुका होतात असे सांगितले. परंतु भुतडा यांनी शंका घेऊन माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्टिंग ऑपरेशन केला; बॅगमध्ये पाचशेच्या नोटांचे बंडल ठेवले. पोलिसांनी ही बॅग घेतांना टोळीला अटक केली. या टोळीकडून पुढेही अशी फसवणूक होऊ नये यासाठी सावध राहणे गरजेचे आहे.
0
0
Report

मौसम से पहले वाशीम में गंदे नालों से जलभराव, व्यापारियों की तात्कालिक सफाई की माँग

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिमच्या मंगरुळपीर तालुक्यातील शेलुबाजार येथील मुख्य चौकातून अडाण नदी मार्गाकडे जाणारे नाले गाळ व केरकचऱ्याने भरले असून,पावसाळ्यापूर्वी त्यांची तातडीने सफाई करण्याची मागणी मागणी व्यापारी व नागरिकांकडून होत आहे.नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्याने थोडा जास्त पाऊस पडला की पावसाचे पाणी रस्त्यावरून वाहते आणि चौकातील दुकाने,बँका व अन्य व्यावसायिक आस्थापनांमध्ये शिरऊन आर्थिक नुकसान होते.दरवर्षी अतिवृष्टीच्या काळात चौक जलमय होत असल्याने नागरिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागते.नाले ओव्हरफ्लो झाल्यानंतर गुरुदेव नगर परिसरातील घरांमध्येही पाणी शिरते.यामुळे पावसाळ्यापूर्वी नाल्यांची व्यापक सफाई करून पाणी तुंबण्याच्या समस्येवर कायम स्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली जातं आहे.
0
0
Report

वाशीम-कामठवाडा सड़क पर खड्डे, यात्रियों के लिए खतरा, सरकार से त्वरित काम की मांग

Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम ते कामठवाडा रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून ठिकठिकाणी पडलेल्या मोठमोठ्या खड्ड्यांमुळे वाहनधारक, शालेय विद्यार्थी आणि शेतकरी त्रस्त झाले आहेत. रस्तावर खड्डी उखडली असून प्रवास करताना वाहनधारकांना कसरत करावी लागत अपघाताचा धोका वाढला आहे.अनेक वर्षांपासून रस्त्याचे काम संथ गतीने सुरू असल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पावसाळा तोंडावर आल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचून परिस्थिती आणखी गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे शासन आणि संबंधित विभागाने तातडीने दखल घेऊन रस्त्याचे काम पूर्ण करावे,अशी मागणी परिसरातील चार गावांतील नागरिकांकडून करण्यात येत आहे
0
0
Report
Advertisement

सीसीटीवी से खळवट लिमगाव में तीन माह में शांति, अपराध शून्य की नई कहानी

Beed, Maharashtra:CCTVचा करिष्मा! खळवट लिमगावात तीन महिन्यांपासून एकही भांडण नाही; सरपंचांच्या उपक्रमाने गावात शांततेची नांदी..! ANC - बीड जिल्ह्यातील खळवट लिमगाव हे गाव एकेकाळी सततचे वाद, भांडणे, दारूच्या नशेत होणारा गोंधळ आणि पोलिस ठाण्याच्या फेऱ्यांसाठी ओळखले जात होते. मात्र आता या गावाने शांतता आणि विकासाचा नवा मार्ग स्वीकारला आहे. गावचे सरपंच गणेश अंबुरे यांच्या पुढाकारातून संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणण्यात आले असून या उपक्रमामुळे गावातील भांडणे आणि गैरप्रकारांवर मोठ्या प्रमाणात आळा बसला आहे.. खळवट लिमगावात वाढत्या भांडणांमुळे आणि व्यसनाधीन तरुणांच्या उपद्रवामुळे गावातील वातावरण बिघडत होते. या समस्येवर कायमस्वरूपी उपाय शोधण्यासाठी सरपंच गणेश अंबुरे यांनी संपूर्ण गाव सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणीखाली आणण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार गावातील प्रमुख चौक, रस्ते आणि सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले.या उपक्रमाचा सकारात्मक परिणाम अल्पावधीतच दिसून आला. सीसीटीव्हीमुळे प्रत्येक हालचालीवर नजर असल्याची जाणीव निर्माण झाल्याने गावातील भांडणे, वाद आणि दारूच्या नशेत होणारा गोंधळ मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. विशेष म्हणजे, गेल्या तीन महिन्यांपासून गावात एकही भांडण झाल्याची नोंद नसल्याची माहिती समोर आली आहे. एरवी कचरा टाकण्यावरून महिलांची अफाट भांडणे व्हायची मात्र सीसीटीव्हीत आपण कैद होत असल्याची जाणीव होताच महिला आता कचरा कुंडीतच कचरा टाकतात. त्यामुळे महिलांचे विकोपाला गेलेले भांडणे पूर्णपणे कमी झाले आहेत. सीसीटीव्हीच्या प्रभावामुळे गावातील वातावरण अधिक शांत, सुरक्षित आणि सकारात्मक बनले आहे. सामाजिक सलोखा वाढला असून विकासकामांनाही गती मिळाली आहे. संपूर्ण गाव सीसीटीव्हीच्या निगराणीखाली आणणारे बीड जिल्ह्यातील पहिले गाव म्हणून खळवट लिमगावची ओळख निर्माण झाली आहे.
0
0
Report
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top