icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

वाशीम में 35 दोषी वाहन चालकों के लाइसेंस निलंबित, 128 नागरिकों की मौत

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात जीवघेण्या अपघातांना कारणीभूत ठरणाऱ्या ३५ दोषी वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. वाशिम पोलीस आणि उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या संयुक्त कारवाईत या चालकांचे वाहन परवाने निलंबित करण्यात आले आहेत. जिल्ह्यातील अपघातांमध्ये आतापर्यंत १२८ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेग, निष्काळजीपणा आणि बेदरकार वाहनचालक हे अपघातांचे प्रमुख कारण ठरले आहेत. त्यामुळे दोषी चालकांविरोधात कारवाईचा बडगा उगारण्यात आला असून, मद्यप्राशन करून वाहन चालवणाऱ्यां विरोधातही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. वाहनचालकांनी वाहतूक नियमांचे पालन करूनच वाहन चालवावे, असे आवाहन परिवहन विभाग व पोलिसांनी केले आहे.
0
0
Report

बांध हटाने के आदेश पर किसान भारी आक्रोश, पूर्व सूचना नहीं मिलने का दावा

Akola, Maharashtra:शेतरस्त्यावरील बांध हटविण्याच्या तहसीलदारांच्या आदेशाला एका शेतकऱ्याने आक्षेप घेतला असून, आपल्याला कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटीस न देता कारवाई प्रस्तावित करण्यात आल्याचा आरोप केला आहे. मिळालेल्या कागदपत्रानुसार, संबंधित शेतकऱ्याच्या मालकीच्या गट क्रमांक २० मधील शेतजमिनीला लागून असलेला बांध अनेक वर्षांपासून अस्तित्वात आहे. या बांधामुळे परिसरातील जवळपास २० ते २५ शेतकऱ्यांच्या शेतजमिनींची हद्द निश्चित होत असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे. दरम्यान, शिवरस्ता मोकळा करण्यासाठी रस्त्यावरील बांध नष्ट करण्याचे आदेश देण्यात आल्याचे नोटिशीत नमूद असल्याचे शेतकऱ्याने म्हटले आहे. तहसीलदारांनी २६ सप्टेंबर २०२५ रोजी आदेश पारित केला असून, त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आता कार्यवाही प्रस्तावित असल्याचे संबंधित पत्रातून स्पष्ट होत असल्याचे त्याने सांगितले. मात्र, या प्रकरणात आपण कधीही पक्षकार नव्हतो किंवा आपल्याला कोणतीही सूचना, पत्र अथवा लेखी नोटीस देण्यात आली नवती, असा दावा शेतकऱ्याने केला आहे.. सध्याच्या हंगामात हे बांध तोडू नये असे विनंती पत्र याआधी शेतकऱ्याने तहसील कार्यालयाला दिलं होतं.. मात्र तहसील कार्यालयाने पोलीस बंदोबस्तात हे बांध तोडल्याने शेतकऱ्यांचा राग अनावर झाला आणि आपण दिलेलं निवेदन थेट तहसील अधिकाऱ्याच्या तोंडावर फेकून मारलं. बांध तोडल्यामुळे शेतातील उभ्या पिकांचे मोठे नुकसान झाले असून, या नुकसानीस संबंधित अधिकारी आणि आदेशाची अंमलबजावणी करणारे जबाबदार असल्याचं आरोप शेतकऱ्याने केला आहे त्याचप्रमाणे शेत पिकाचा नुकसान झाला असून आर्थिक मदत मिळावी अशी मागणीही शेतकऱ्यानं केली आहे...
0
0
Report
Advertisement

पिंपरी-चिंचवड़ गणेश उत्सव में अजित पवार के बिना भी भक्तों ने श्रद्धांजलि दी

Pimpri-Chinchwad, Maharashtra:Anchor - ....गणेशोत्सव आणि दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे नाते वेगळेच होते... पुणे आणि पिंपरी चिंचवड मधल्या बहुतांश गणेश मंडळाना ते भेट देत असत...! पण त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला आणि यंदाचा गणेशोत्सव त्यांच्या शिवाय होतोय... लाडक्या बाप्पाच स्वागत अजित पवार करणार नाहीत ही कल्पनाच पिंपरी चिंचवड मधल्या दर्शन सोनवणे याला सहन झाली नाही... राजकारणाची कसलाही संबंध नसलेल्या आणि मायक्रोबायलोजी चे शिक्षण घेणाऱ्या दर्शन ने तीन महिने अविरत कष्ट घेत लाडक्या बाप्पाला घेऊन येणाऱ्या अजित पवार यांची प्रतिकृती साकार केलीय...! अजित पवार यांच्या वाढदिवसाला त्याने या कामाला सुरुवात केली आणि अगदी हुबेहूब प्रतिकृती सादर करत अजित पवार यांच्या आठवणीन उजाळा दिलाय..एवढेच नाही तर ज्या दुर्दैवी अपघातात अजित पवार यांचा मृत्यू झाला तो विमान अपघात ही दर्शन ने साकारलाय. त्याच्या या देखाव्याची सध्या जोरदार चर्चा परिसरात होत आहे... कामाचा माणूस ही अजित पवारांची प्रतिमा त्याने देखाव्यातून साकारली..त्याच्या याच देखाव्या संबंधी त्याच्या कडून जाणून घेतले आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
0
Report

गोंदिया जिला परिषद के भवन में चोरों ने कार्यालय कक्ष तोड़ा, सुरक्षा पर सवाल

Bhandara, Maharashtra:अज्ञात व्यक्तियों ने जिला परिषद के प्रशासनिक इमारत के कक्ष में तोड़फोड़ की। इमारत की सुरक्षा पर प्रश्न उठ रहे हैं। गोंदिया जिले की जिला परिषद प्रशासनिक इमारत में चोरों ने बांधकाम विभाग के कार्यालय के कक्ष के दरवाजे की शीशा तोड़कर अंदर प्रवेश किया, कंप्यूटर चोरी कर लिया और छत के पंखों की भी तोड़फोड़ की। इस घटना से जिला परिषद भवन की सुरक्षा पर प्रश्न चिन्ह खड़ा हो गया है। इस मामले में गोंदिया ग्रामीण थाने में अज्ञात आरोपियों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। इस घटना से अधिकारियों की सुरक्षा और जान को खतरा बताया जा रहा है।
0
0
Report

742 स्कूलों में शिक्षकों के मान्यता और ID की विशेष जांच, विभाग की सख्त directive

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ७४२ शाळांनी विशेष चौकशी पथकासाठी १६ ते १८ सप्टेंबरदरम्यान शिक्षकांच्या मान्यता आणि सेवासातत्याची सर्व कागदपत्रे सादर करावीत, असे आदेश शिक्षणाधिकारी यांनी शाळांचे अध्यक्ष, सचिवांसह मुख्याध्यापकांना बजावले आहेत. पदमपुरा येथील महात्मा फुले प्राथमिक शाळेत सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत ही कागदपत्रे कारण न देता जमा करावी लागणार आहेत. गेल्या आठवड्यात एसआयटीने छत्रपती संभाजीनगरमध्ये शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता आणि शालार्थ आयडीसंदर्भातील १० हजार ४९ संचिकांची तपासणी केली होती. आता हे पथक पुन्हा २०१६ ते २०१९ या कालावधीत रुजू झालेल्या शिक्षकांच्या कागदपत्रांची चौकशी करण्यासाठी येणार आहे. निर्धारित वेळेत कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी शाळा व्यवस्थापन व मुख्याध्यापकांवर निश्चित केली जाईल, दिरंगाई करू नये, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

3 सेमी व्यास सुपारी पर अष्टविनायक कलाकृति, डॉ. संदीप डाकवे का स्वच्छता अभियान

Satara, Maharashtra:पाटण : कलेला आकाराचे बंधन नसते, हे डाकेवाडी येथील कलाकार डॉ. संदीप डाकवे यांनी पुन्हा एकदा सिद्ध केले आहे. अवघ्या ३ सेमी व्यास आणि २ सेमी उंचीच्या सुपारीवर १ बाय १ सेमी आकारात त्यांनी संपूर्ण अष्टविनायक रेखाटले आहेत. सूक्ष्म कलाकृतीसाठी आवश्यक असलेली एकाग्रता, संयम आणि अचूकतेतून साकारलेली ही कलाकृती कौतुकाचा विषय ठरत आहे. गणेशोत्सवा डॉ. डाकवे यांनी ‘एक अक्षर गणेशा स्वच्छतादूतांसाठी’ हा उपक्रमही हाती घेतला आहे. नागरिकांनी अक्षरगणेशा रेखाटून घेण्यासाठी १०० किंवा स्वेच्छेने निधी द्यायचा असून, जमा निधी स्वच्छतादूतांच्या आरोग्य व सुरक्षेसाठी वापरण्यात येणार आहे.
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर में अनधिकृत हाथगाड़ियों के खिलाफ महापालिका ने सख्त कार्रवाई शुरू की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील मुख्य आणि व्हीआयपी रस्त्यांवर अनधिकृत हातगाड्यांमुळे होणाऱ्या वाहतूक कोंडीविरोधात महापालिका प्रशासनाने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. 'अनधिकृत हातगाड्यांवर कारवाई करताना कुणाचेही शिफारशीचे फोन आले तरी कारवाई थांबवू नका. फोन करणाऱ्याची नोंद घ्या. कारवाईला विरोध करणे म्हणजे कायद्याला विरोध करणे आहे. अशा प्रकारे हस्तक्षेप करणाऱ्यांविरोधात तात्काळ तक्रार दाखल करा,' असे स्पष्ट आदेश महापालिका आयुक्त अमोल येडगे यांनी अधिकाऱ्यांना दिले. चौकांमध्ये अनधिकृत हातगाड्यांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याचे त्यांनी निदर्शनास आणले. 'एका बाजूला कारवाई होत नाही म्हणून तक्रारी करायचे आणि कारवाई सुरू झाली की गाड्या सोडण्यासाठी फोन करायचे,' या दुटप्पी भूमिकेवर बैठकीत नाराजी व्यक्त करण्यात आली. त्यावर आयुक्तांनी संध्याकाळी ४ ते रात्री ९ या वेळेत विशेष टास्क फोर्सद्वारे कारवाई करण्याचे निर्देश दिले.
0
0
Report

पेण के खरोशी गांव में गणेश विसर्जन: मूर्ति सिर पर नाचती अनोखी परंपरा

Chendhare, Maharashtra:गणेश विसर्जनाला डोक्यावर नाचवली जाते गणेश मूर्ती पेणच्या खरोशी गावातील आगळीवेगळी परंपरा नामदेव पाटील या गणेश भक्ताची अनोखी कला गणपती बाप्पाच्या विसर्जनाला भक्तीचे अनेक रंग पाहायला मिळतात; मात्र रायगडच्या पेण तालुक्यातील खरोशी गावात बाप्पाच्या विसर्जनाची परंपरा काहीशी अनोखी आहे. इथे विसर्जनाला निघालेली गणेशमूर्ती चक्क डोक्यावर नाचवली जाते... ना हाताचा आधार, ना कोणतीही डोरी किंवा टेकू! नामदेव कृष्णा पाटील हे गेली अनेक वर्षे ही अनोखी कला श्रद्धेने जपत आहेत. गणेशमूर्ती डोक्यावर तोलून धरत, तालावर बाप्पाला अक्षरशः नाचवत ते घरापासून विसर्जन घाटापर्यंत जातात. डोक्यावर विराजमान बाप्पा आणि त्याच्या तालावर थिरकणारे नामदेव पाटील... हे दृश्य पाहण्यासाठी गावकरी आणि भाविकांची मोठी गर्दी होते. श्रद्धा, कौशल्य आणि परंपरेचा अनोखा संगम असलेली ही विसर्जन मिरवणूक खरोशी गावाच्या गणेशोत्सवाची वेगळी ओळख बनली आहे.
0
0
Report
Advertisement

उद्धव ठाकरे रात में मराठवाड़ा मुक्ती संग्राम स्मारक पहुंचे, राजनीतिक हलचल तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:17 सप्टेंबर म्हणजे मराठवाडा मुक्ती संग्राम दिन त्या निमित्ताने उद्धव ठाकरे आज छत्रपती संभाजी नगर मध्ये येणार आणि मध्यरात्री मराठवाडा मुक्ती संग्रामाच्या स्मारकाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.. एरव्ही मराठवाडा मुक्ती संग्रामच्या दिवशी मुख्यमंत्री सकाळी पहिला अभिवादन करतात मात्र उद्धव ठाकरे यावेळेस मध्यरात्रीच अभिवादन करणार आहेत त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शह देण्याचा उद्धव ठाकरे यांचा हा प्रयत्न आहे का अशा पद्धतीच्या ही चर्चा सुरू आहे , दरम्यान मराठ्यावाड्याच्या न झालेल्या विकासावर उद्धव सेनेकडून गेली दहा दिवस मराठवाड्यात आंदोलन सुरू आहे त्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे 17 तारखेला छत्रपती संभाजी नगर मध्ये आंदोलन करणार आहेत त्यासाठी ते येताय, यादरम्यान आज मध्यरात्री ते मराठवाडा मुक्ती संग्राम स्मारकावर अभिवादन करतील मात्र यामुळे नव्या राजकीय वादाला मात्र सुरुवात होऊ शकते...
0
0
Report

सोलापूर गणेशोत्सव के लिए तीन लाख मांगने पर हॉटेल व्यवसायी से खंडणी मामला दर्ज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - गणपतीसाठी तीन लाखांची वर्गणी मागितल्याने हॉटेल व्यवसायिकाला आली चक्कर, कार्यकर्ता " नेताजी " विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल - सोलापूर शहरातील एका मंडळाच्या कार्यकर्त्यांनी गणेशोत्सवानिमित्त हॉटेल व्यवसायिकाला मागितली तब्बल तीन लाख रुपयांची वर्गणी - वर्गणीची रक्कम ऐकताच हॉटेल व्यवसायिक एकनाथ घाडगे यांना आली चक्कर - मंडळाच्या नावावर पाचशे ड्रेसचे प्रत्येकी 600 रुपये याप्रमाणे तीन लाखांची करण्यात आली होती मागणी - मात्र हॉटेल व्यवसायिकांनी यापूर्वी दोन लाख रुपये दिल्याचे सांगत प्रत्येक वर्षी 25 हजार रुपये वर्गणी देण्याची दर्शवली होती तयारी - मात्र गणेश मंडळाचा कार्यकर्ता नेताजी शिवाजी शिंदे यांनी काहीही ऐकून न घेता हॉटेल व्यवसायीकाला शिवीगाळ केल्याचा आरोप - नेताजी शिंदे यांच्यावर फौजदार चावडी पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल
0
0
Report
Advertisement

नागपूर में 15 दिनों में स्वाइन फ्लू के 70 मरीज, डेंगू-मलेरिया के केस बढ़े

Nagpur, Maharashtra:नागपुरात १५ दिवसांत स्वाइन फ्लूचे ७० रुग्ण मिळून आले आहेत. बदलत्या हवामानामुळे व्हायरल तापाच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे; १ ते १५ सप्टेंबरदरम्यान डेंग्यूचे ९ तर मलेरियाचे ४ रुग्ण आढळले आहेत. यातच गणेशोत्सवाच्या गर्दीत संसर्ग वाढण्याचा धोका असल्यानं आरोग्य विभागाकडून खबरदारीचा आवाहन करण्यात आला आहे. स्वाइन फ्लूची प्रमुख लक्षणं ताप, खोकला, घसा खवखवणे, नाक वाहणे, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे आणि थकवा असल्यास डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आरोग्य यंत्रणेचं आवाहन करण्यात आलं आहे. गणेशोत्सवातील गर्दीत मास्क आणि हातांची स्वच्छता महत्त्वाची असून खोकलताना किंवा शिंकताना रुमालाचा वापर करावा, बाहेरून आल्यावर साबणाने हात धुवा किंवा सॅनिटायझर वापरा; ताप २-३ दिवसांपेक्षा जास्त राहिल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या. श्वास घेण्यास त्रास, उलट्या किंवा तीव्र डोकेदुखी असल्यास तातडीने उपचार घ्या; स्वतःच्या मनाने प्रतिजैविक औषधं घेणं टाळा. गणेशोत्सवाच्या गर्दीत आजारी व्यक्तींनी जाणं टाळण्याचं आवाहन, लहान मुले, गर्भवती महिला आणि ज्येष्ठांनी अतिगर्दीच्या वेळा टाळाव्या.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top