icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

इंदापुर में बाबीर कलशारोहण समारोह में उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ने संबोधित किया

Rui, Maharashtra:इंदापूर बाळासाहेब थोरात बाबीर कलशारोहण भाषण (राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत इंदापूर तालुक्यातील रुई येथील बाबीर मंदिराचा कलशारोहण लोकार्पण सोहळा पार पडला यावेळी ते बोलत होते) बाबीर बुवा आणि संगमनेर तालुक्याचे वेगळे नाते निर्माण झाले आहे. मंदिराच्या विकास कामात सर्वांचा सहभाग आहे. इथे केवळ जागेचा अभाव आहे,फॉरेस्ट ची जागा मिळू शकते. आज राज्यात किती भयंकर आहे पाऊस नाही शेतकरी अडचणीत आहे.शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर आनंद निर्माण व्हावा हीच बाबीर चरणी प्रार्थना करतो.
0
0
Report
Advertisement

शिवसेना-राष्ट्रवादी के बीच गोदरेज मामले पर तीखी बहस, तटकरे-थोरवे आमने-सामने

Chendhare, Maharashtra:स्लग - शिवसेना -राष्ट्रवादीत पुन्हा वादाची ठिणगी गोदरेजच्या मुद्द्यावरून तटकरे-थोरवे आमनेसामने कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका — थोरवेंचा तटकरे यांना इशारा रोजगाराच्या मुद्द्यावरून रायगडमध्ये राजकीय संघर्ष तटकरे यांच्या भूमिकेला थोरवेंचे प्रत्युत्तर; शाब्दिक युद्ध पेटण्याची शक्यता अँकर - रायगडमध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीमधील वाद पुन्हा पेटण्याची चिन्हं आहेत. खोपोलीतील गोदरेज कंपनीच्या प्रश्नावरून दोन्ही पक्ष आमने-सामने आलेत. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी कंपनीविरोधात भूमिका घेतल्यानंतर शिंदेसेनेचे आमदार महेंद्र थोरवे यांनी थेट तटकरे यांनाच लक्ष्य केलंय. माझ्या मतदारसंघातील कंपन्यांना ब्लॅकमेल करू नका, असा थेट इशाराच थोरवे यांनी दिलाय. कंपन्यांमुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, त्यामुळे विकास आणि रोजगाराच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा शिवसेना-राष्ट्रवादीत शाब्दिक युद्ध रंगण्याची शक्यता आहे. बाईट - सुनील तटकरे, खासदार बाईट - महेंद्र थोरवे, आमदार
0
0
Report

बारिश के लिए ग्राम ने गधे की शादी रचा दी, मोडनिंब में चर्चा तेज

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात सध्या पावसाने ओढ दिल्याने शेतकरी आणि ग्रामस्थ चिंतेत आहेत. पाऊस पडावा आणि बळीराजाच्या पिकांना जीवनदान मिळावे, यासाठी माढा तालुक्यातील मोडनिंब गावात ग्रामस्थांनी एक अनोखा उपक्रम राबवला आहे. चक्क दोन गाढवांचे लग्न लावून पावसासाठी साकडे घालण्यात आले. .माढा तालुक्यातील मोडनिंब गावात पावसाची प्रतीक्षा करत असलेल्या ग्रामस्थांनी पारंपरिक श्रद्धेतून गाढवाचे लग्न लावले. विधिवत लग्नसोहळा पार पडला असून, गावकऱ्यांनी मोठ्या उत्साहात या अनोख्या विवाह सोहळ्यात सहभाग घेतला. पाऊस पडावा, शेतातील पिकांना जीवदान मिळावे आणि दुष्काळाचे संकट दूर व्हावे, अशी प्रार्थना यावेळी ग्रामस्थांनी केली. या अनोख्या गाढव विवाहाची सध्या परिसरात चांगलीच चर्चा रंगली आहे.
0
0
Report

कोकण में वरुणराज की जोरदार वापसी, किसान चिंताओं से मुक्त

Ratnagiri, Maharashtra:कोकणात वरुणराजाचं दमदार पुनरागमन; पिवळ्या पडणाऱ्या भातशेतीला जीवदान, बळीराजा सुखावला!.. गेल्या काही दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने कोकणात पुन्हा एकदा जोरदार हजेरी लावली आहे.. पावसाच्या प्रदीर्घ विश्रांतीमुळे कोकणातील उभी भातशेती करपून पिवळी पडू लागली होती, ज्यामुळे शेतकरी राजा मोठ्या संकटात सापडला होता... मात्र, आज अखेर वरुणराजाने दमदार पुनरागমন करत जोरदार सरी बरसल्याने पिकांना नवसंजीवनी मिळाली आहे.. पावसाच्या या हजेरीमुळे बळीराजाच्या चेहऱ्यावर पुन्हा एकदा समाधानाचे हास्य उमटले आहे..
0
0
Report
Advertisement

वाशिम के रिसोड में अवैध बालू ट्रक पलटा, कोई नुकसान नहीं; जांच शुरू

Washim, Maharashtra:वाशिम: अँकर:वाशिमच्या रिसोड तालुक्यात अवैध वाळू वाहतुकीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. रिसोडकडून वाशिमच्या दिशेने अवैध वाळूची वाहतूक करणारा वाळूचा टिप्पर रिठदजवळ पलटी झाला आहे.वाळूने भरलेला हा टिप्पर अचानक नियंत्रण सुटल्याने रस्त्यावर पलटी झाला.सुदैवानं या अपघातात कोणतीही जीवित हानी झाली नाही मात्र या घटनेमुळं तहसीलदाराच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून वाळू उपास बंद असतांना या अवैध वाळू वाहतकीला छुपा पाठिंबा नेमका कुणाचा असाही प्रश्न उपस्थित होतोय.संबंधित टिप्परला वाळू वाहतुकीची परवानगी होती का, याबाबत आता महसूल प्रशासना कडून चौकशी होणे गरजेचे आहे. आता या टिप्परवर नेमकी काय कारवाई केली जाणार,याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report

मराठा आरक्षण पर सरकार का सकारात्मक रूख, कोर्ट के फैसलों के बीच सुलह की तैयारी

Satara, Maharashtra:सातारा-मराठा आरक्षणाच्या मुद्द्यासाठी जरांगे पाटील हे मुंबईला जाण्यासाठी निघणार आहेत. त्यांच्या या निर्णयाबद्दल सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काही महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले आहेत.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार पूर्णपणे सकारात्मक आहे. आत्ता आंदोलनाला बसल्यानंतर सुद्धा विखे पाटील,प्रसाद लाड यांनी अनेक वेळा जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे.सातारा गॅजेट बद्दल समितीचा अहवाल आपण मागितलेला आहे. हैदराबाद गॅजेट जे लागू केलं त्याला कोर्टामध्ये चॅलेंज झालेल आहे परंतु ते रद्द झालेलं नाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कायदेशीक तरतुदी करून ते टिकवलेल आहे.सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट या दोन्ही बाबत लागू होत असताना एक दिलं आणि दुसरं कोर्टाने उडवलं असं व्हायला नको हा प्रयत्न शासनाचा आहे.आपण गडबड करून निर्णय घेतले तर याला कोर्टात चॅलेंज होईल. त्यामुळे जर मिळालेला आरक्षण कोर्टामध्ये गेलं तर आता जे आंदोलन सुरू आहे त्यातून काहीच उत्पन्न होणार नाही.त्यामुळे माझी विनंती आहे की शासन आरक्षणाबाबत सकारात्मक आहे. काही कायदेशीर बाबी बघून निर्णय घ्यावे लागतात. त्यामुळे जरांगे पाटील यांनी सुद्धा थोडं शासनाला सहकार्य करावे आत्तापर्यंत ते करत आलेले आहेत.त्यामुळे विखे पाटील हे समितीचे अध्यक्ष आहेत त्यांच्याशी चर्चा करून योग्य निर्णय कायदेशीर बाजू बघून 100% होईल.शेवटी आरक्षण द्यायचा विषय हा छत्रपती घराणं म्हणून माझ्या सहीने होणार नाही त्याला शेवटी कोर्ट कायदा या सर्व गोष्टी आहेत.शिंदे समिती आहे.निवृत्त जज आहेत त्यांचाही यामध्ये सहभाग लागतो.त्यामध्ये देण्याबद्दल मी या परत परत सांगत आहे की सरकार कुठेही विरोधात नाही. कायदेशीर गोष्टी बघितल्या पाहिजेत कारण टिकणारं आरक्षण आपल्याला मिळालं पाहिजे नुसतच तोंडाला पान पुसून घेण्यात अर्थ नाही एवढीच यामागे भूमिका आहे.
0
0
Report

ठाणे खाड़ी सहित भारी बारिश के बीच केमिकलयुक्त पानी ने प्रदूषण बढ़ा दिया

Thane, Maharashtra:ठाणे जिल्ह्यात सकाळपासून मुसळधार पाऊस सुरू असतानाच ठाणे खाडीत केमिकलयुक्त पाणी वाहून आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुसळधार पावसामुळे वाहून आलेल्या पाण्यासोबत केमिकल खाडीत मिसळल्याने खाडीचे पाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषित झाल्याचे दिसून येत आहे. पाण्यावर केमिकलचा थर आणि बदललेला रंग नागरिकांच्या निदर्शनास आला आहे. या प्रकारामुळे खाडीतील जलचर आणि पर्यावरणाला धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. नेमके कोणते केमिकल खाडीत वाहून आले आणि ते कुठून आले, याचा तपास संबंधित यंत्रणांकडून होणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

नवी मुंबई: क्लस्टर पुनर्विकास पर राजकीय घमासान, वनमंत्री की चेतावनी

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईत क्लस्टर पुनर्विकासनुसार राजकीय घमासान. वनमंत्री गणेश नाईक यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा कार्यकाळ किती दिवसांचा हेच सांगितले. या शहराचा इम्पॅक्ट असेसमेंट रिपोर्ट झाल्यात शिवाय सिम्प्लेक्सचा पुनर्विकास क्लस्टरच्या माध्यमातून होणार नाही. गरज पडल्यास उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयात जाऊ. वेळ पडली तर गणेश नाईक रस्त्यावर उतरेल, या शहराची वाट लावू देणार नाही. वल्गना करणाऱ्यांचा भविष्यकाळ किती हे पहा. यांचा भविष्य काळ किती 3 महिने 6 महिने. वल्गना करणाऱ्यांच्या गाडीतल पेट्रोल 6 महिने पुरेल इतकंच आहे, चढणीला येऊन गाडी बंद पडेल. बायट- गणेश नाईक- वनमंत्री
0
0
Report

गणेशोत्सव के दौरान सातारा के अनावाड़ी टोल पर रिकॉर्ड 60 हजार वाहन

Satara, Maharashtra:सातारा - उद्या राज्यात गणरायाचं आगमन होत आहे आणि त्यासाठी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रातील गणेशभक्त मोठ्या संख्येने आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे अनेक टोल नाक्यांवर वाहनांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने आणि अवजड वाहतूक या महामार्गावरील बंद केल्याने अनेक गणेशभक्तांनी आता मुंबई-बेंगळुरू राष्ट्रीय महामार्गाचा पर्याय मार्ग म्हणून वापर करत आहेत. यामुळे मोठा प्रमाणात साताऱ्यातील आनेवाडी टोल नाक्यावर पाहायला मिळत आहे. काल तब्बल ६० हजार गणेशभक्तांची वाहने या टोल नाक्यावरून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राच्या दिशेने गेल्याची माहिती टोल प्रशासनाकडून देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गणेशोत्सवाच्या काळात हा आतापर्यंतचा विक्रमी वाहनांचा आकडा असल्याचं टोल प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे. आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी... त्याच बरोबर गणेश भक्तांना शासनाकडून मोफत टोल माफीचे पत्र मिळाले असले तरी जो गाडीवर लावलेला fasttag आहे त्यामधून देखील पैसे कट होत असल्याची तक्रार देखील गणेश भक्त करत आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपुर में कृष्ण जन्माष्टमी के बाद भी दहीहंडी क्यों जारी है?

Nagpur, Maharashtra:नागपुर में कृष्ण जन्माष्टमी हो चुकी है और आठवड़ा उलट जाने के बाद भी नागपुर में दहीहंडी जारी है। गणेश स्थापना के समय आज भी नागपुर जिले के कुछ स्थानों पर दहीहंडी फूटी जाएगी। नागपुर समेत विदर्भ के कई स्थानों पर कृष्ण जन्माष्टमी के बाद भी इतने दिनों तक दहीहंडी फोड़ने का यह उत्सव क्यों चलता है, इसका कारण जानेंगे। बाइट — सुबोध आचार्य, बडकस चौक मित्रपरिवार दहीहंडी। पॉइंटर — भंडारा-गोंदिया, छत्तीसगढ़ और नागपुर जिल्हे के कन्हान तथा आस-पास के क्षेत्रों में ठी eight से नौ पथक दहीहंडी फोड़ने के लिए उपलब्ध रहते हैं। इसलिए पथकों की सुविधाओं के अनुसार दहीहंडी आगे पीछे होती है। अधिकतम पथक भागीदारी के लिए दहीहंडी की तारीख आगे पीछे की जाती है। मैं गणेशाष्टमी के एक या दो दिनों में दहीहंडी लेने के प्रयास कर रहा/रही हूँ; लगभग 72 घंटों में दहीहंडी फूटेगा/फूटे यह हमारा प्रयास है।
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top