icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

तळकोण के किसान बारिश न होने से दुबारा बुवाई कराने पर मजबूर

Oras Bk., Maharashtra:तळकोकणातील बळीराजा वरुणराजाची आतुरतेने वाट बघतोय मात्र वरूनराजाने मागील 15 दिवस दडी मारलीय. शेतात पेरलेले वाचवण्यासाठी तळकोकणातील बळीराजाने शक्कल लढविलीय. पाऊसच नसल्याने विहीरच पाणी सिंचन करुन आपलं शेत वाचविण्याचा प्रयत्न तळकोकणातील बळीराजाने शक्कल लढविलीय. मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर तळकोकणात पेरणी केली जाते. मात्र वरूनराजाने दांडी मारल्याने सिंचन करण्याची वेळ बळीराजावर आलीय. तळकोकणातील काही भागात तर शेतकऱ्यांवर दुबार पेरणीची देखील वेळ येण्याची शक्यता आहे. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी
0
0
Report

सांगोलो के राजुरी ग्रामदेवत माता लक्ष्मीदेवी मंदिर से तीन चोरों ने लाखों के गहने चुराए, CCTV में कैद

Pandharpur, Maharashtra:चोरट्यांना देवाची उरले नाही भय, सांगोल्यात मंदिरात केली लाखो रुपयांच्या दागिन्यांची चोरी, घटना सीसीटीव्ही मध्ये कैद सांगोल्या तालुक्यातील राजुरी येथील ग्रामदैवत माता लक्ष्मीदेवी मंदिरात अज्ञात तीन चोरट्यांनी धाडसी चोरी करत तब्बल २ लाख ४१ हजार रुपयांच दागिने चोरून नेले. मंदिराचे कुलूप तोडून देवीच्या अंगावरील मौल्यवान दागिने आणि सोन्याचा मुलामा दिलेला चांदीचा मुखवटा चोरट्यांनी नेला आहे. याप्रकरणी मंदिराचे पुजारी रमेश भगवान गुरव यांनी सांगोला पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली असून अज्ञात तीन चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तीन अज्ञात चोरट्यांनी मंदिराचा दरवाजा तोडून गाभाऱ्यात प्रवेश केला. देवीच्या मूर्तीवरील अंदाजे एक किलो वजनाचा, सोन्याचा मुलामा दिलेला आणि सोन्याचे डोळे बसविलेला सुमारे २ लाख १५ हजार रुपये किमतीचा चांदीचा मुखवटा चोरून नेला. याशिवाय सुमारे २२ हजार रुपये किमतीचे काळ्या मण्यांत ओवलेले सोन्याचे मंगळसूत्र तसेच ४ हजार रुपये किमतीचा पितळी पंचधातूचा घोडाही चोरट्यांनी लंपास केला. एकूण चोरीस गेलेल्या मालाची किंमत २ लाख ४१ हजार रुपये इतकी असल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

NEET परीक्षा के लिए देशभर में सुरक्षा के भारी बंदोबस्त

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशभर में आज NEET परीक्षा आयोजित हो रही है। प्रशासन ने तैयारी पूरी कर ली है। संभाजीनगर जिले के 50 केंद्रों पर यह परीक्षा होगी, 17700 विद्यार्थी भाग लेंगे। प्रत्येक केंद्र पर ड्यूटी मैजिस्ट्रेट तैनात होंगे और पुलिस के साथ पैरामिलिट्री फोर्स सुरक्षा के लिए तैनात किया गया है। पुलिस की बड़ी टीम सभी केंद्रों पर रहेगी। परीक्षा केंद्र पर छत्रपती संभाजीनगर शहर पुलिस दल द्वारा 02 उप आयुक्त, 04 सहायक आयुक्त, 17 पुलिस निरीक्षक, 50 सहायक पुलिस निरीक्षक, 582 पुलिस अमलदार का बंदोबस्त किया गया है। साथ ही CISF का भी manpower लाया गया है।
0
0
Report

वन विभाग ने विहिरी में फँसे बिबटे को सुरक्षित बाहर निकाल कर नैसर्गिक आवास में छोड़ दिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील घुसूर गावात एक बिबट्या विहिरीत पडल्याची घटना उघडकीस आली. माहिती मिळताच वन विभागाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत रेस्क्यू मोहीम हाती घेतली. अनेक तासांच्या शर्थीच्या प्रयत्नांनंतर बिबट्याला कोणतीही इजा न होता सुखरूप बाहेर काढण्यात वन विभागाला يश आले आहे. विहिरीत पडलेल्या या बिबट्याला बाहेर काढण्यासाठी विशेष पिंजरा आणि आवश्यक साधनसामग्रीचा वापर करण्यात आला. या यशस्वी मोहिमेनंतर बिबट्याची तपासणी करून त्याला नैसर्गिक अधिवासात सुरक्षित स्थळी सोडण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

हर्सूल तालाब से पानी उपसा जल्द बंद, जायकवाड़ी जलापूर्ति शुरू

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या हर्सूल तलावातील पाणी उपसा लवकरच बंद होणार आहे, आता जुन्या शहराला जायकवाडी धरणातील पाणी पुरवठा केला जाणार आहे. मागील वर्षी तुडुंब भरलेल्या हर्सूल तलावातील पाण्याचे महापालिकेने वर्षभर नियोजनबद्ध व्यवस्थापन केल्याने जून महिन्यातही तलावात तब्बल १९ फूट जलसाठा शिल्लक आहे. नक्षत्रवाडी ते हर्सूलदरम्यान टाकण्यात आलेली १५०० मिमी व्यासाची जलवाहिनी आता सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील दोन ते चार दिवसांत तलावातील पाणी उपसा पूर्णपणे बंद करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. या जलवाहिनीद्वारे शहरातील नागरिकांना जायकवाडीचे पाणी उपलब्ध होणार आहे. हर्सूल तलावातील पाणी उपसा बंद झाल्याने परिसरातील भूजल पातळी टिकून राहण्यास मदत होणार असून विंधन विहिरधारकांनाही मोठा दिलासा मिळणार आहे.
0
0
Report

अमरावती में मानसून पूर्व बुवाई तेज, किसान बुवाई के लिए आशंका से जूझ रहे

Amravati, Maharashtra:अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात; शेतकऱ्यांना पेरणीचा हंगाम निघून जाण्याची भीती अमरावतीत मान्सूनपूर्व पेरणीला सुरुवात झाली असून काही शेतकऱ्यांनी पेरणीचा हंगाम निघून जाण्याच्या भीतीने मान्सूनपूर्व पेरणी केली असल्याचे दिसत आहे. राज्यात जून महिन्याचा तिसरा आठवडा उलटला तरी मान्सून दाखल झालेला नाही. समाधानकारक वर्षा झाली नसतानाही काही ठिकाणी पाऊस झाला नाही तरी पेरणी चालू आहे. कृषी विभागाने प्रलंबित अडथळ्यांमध्ये 70% पेक्षा अधिक पाऊस झाल्यास पेरणी करण्याचे निर्देश दिले, परंतु पेरणीचा हंगाम हातातून निघून जाण्याच्या भीतीने शेतकरी पारंपरिक पद्धतीने कपाशीची पेरणी करत आहेत. या संपूर्ण परिस्थितीचा शेतकऱ्यांच्या बांधावर आढावा आमचे प्रतिनिधी अनिरुद्द दवळे यांनी घेतला.
0
0
Report
Advertisement

हिंगोली में वर्षा नहीं, किसान खरिप की बोआई पर मंडरा रहा संकट

Hingoli, Maharashtra:अँकर- जून महिना संपत आलाय, पण आकाशात ढगांचा मागमूसही नाही पावसा बरस रे अशी आर्त हाक मराठवाड्यातील शेतकरी करतोय हिंगोली जिल्ह्यात तर परिस्थिती अत्यंत विदारक झाली आहे. महिनाभरापूर्वीच शेतकऱ्यांनी शेतीची मशागत करून ठेवली,घरात बियाणे आणून ठेवली, पण पाऊसच गायब असल्याने पेरण्या पूर्णपणे खोळंबल्या आहेत. खरिपाच्या सोयाबीनवर संपूर्ण वर्षभराचं अर्थकारण अवलंबून असणाऱ्या हिंगोलीतील शेतकऱ्यांच्या डोळ्यात आता पावसाअभावी अश्रू आले आहेत. जिल्ह्यात आकाशातून पाण्याचा एक थेंबही पडलेला नाही. हिंगोली जिल्ह्यातील शेतकरी सध्या दररोज सकाळी उठून चातकासारखी आभाळाकडे डोळे लावून बसला आहे. मे महिन्याच्या सुरुवातीला उन्हातान्हात घाम गाळून जमीन तयार केली खरी, पण पाऊस नसल्याने मायबाप धरणीमाता आता कोरडीठाक पडली याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
0
Report

उल्हासनगर में मंचूरियन में मिला पाली का पिल्ला, खाने से युवती की हालत बिगड़ी

Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात मंचुरियनमध्ये आढळलं पालीचं पिल्लू. मंचुरियन खाऊन तरुणीची तब्येत बिघडली. उल्हासनगराच्या सुभाष टेकडी परिसरात मोना पठारे ही तरुणी वास्तव्याला आहे. सायंकाळच्या सुमारास तिने सुभाष टेकडी मच्छी मार्केट परिसरातील मोरे चायनीज भेळ वाल्याकडून मंचुरियन घरात आणलं. हे मंचुरियन खात असतानाच त्यात पालीचं मेलेलं पिल्लू असल्याचं तिला आढळलं. त्यामुळे तिने पुन्हा एकदा मंचुरियन वाल्याला जाऊन सांगितलं असता त्याने चटणी टेस्टिंगसाठी पाठवतो, पण तू ही गोष्ट कोणाला सांगू नको, असं तिला म्हटलं. यानंतर रात्री या तरुणीची तब्येत बिघडल्यानं तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. सध्या या तरुणीवर रुग्णालयात उपचार सुरू असून अशाप्रकारे निष्काळजीपणा करून ग्राहकांच्या जीवाशी खेळणाऱ्या चायनीज भेळ आणि मंचुरियन विक्रेत्यांवर कारवाई करण्याची आवश्यकता आहे.
0
0
Report
Advertisement

दिवा क्षेत्र के 39 अनधिकृत गोडाउनों पर निष्कासन अभियान; सर्वे जारी

Thane, Maharashtra:दिवा परिसरातील ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई सर्वेक्षण मोहीमही सुरू ठाणे महानगरपालिका हद्दीतील अनधिकृत गोडाऊनविरोधात प्रशासनाने धडक कारवाई सुरू केली असून दिवा प्रभाग समिती क्षेत्रात अनधिकृत गोडाऊनचे सर्वेक्षण आणि निष्कासन मोहीम राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 39 अनधिकृत गोडावूनवर कारवाई करण्यात आली. या मोहिमेअंतर्गत अतिक्रमण विभागामार्फत शनिवारी (दि. २० जून २०२६) शिळफाटा येथील आचार गल्ली परिसरात असलेल्या ३९ अनधिकृत गोडाऊनवर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. या कारवाईसाठी महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निष्कासन मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात रसायने, प्लास्टिक, ज्वलनशील पदार्थ तसेच स्क्रॅप साठवणूक करणाऱ्या गोडाऊनना प्राधान्य देण्यात येत असून, संभाव्य धोके टाळण्यासाठी अशा गोडाऊनवर कारवाई करण्यात येत आहे. दरम्यान, शासकीय, आरक्षित तसेच सरकारी भूखंडांवर उभारण्यात आलेल्या अनधिकृत गोडाऊनची तपासणी आणि सर्वेक्षण सुरू असून, नियमबाह्य आढळणाऱ्या गोडाऊनवर यापुढेही कठोर निष्कासनाची कारवाई सातत्याने सुरू राहणार असल्याचे उपायुक्त दीपक झिंजाड यांनी नमूद केले.
0
0
Report

शिर्डी में भगवा वादळ के बीच हिंदू समाज का सड़क प्रदर्शन

Shirdi, Maharashtra:साईंंच्या शिर्डीत भगवे वादळ. शिर्डीत सकल हिंदू समाजाच्या वतीने हिंदू जनआक्रोश मोर्चा. पश्चिम बंगालमधून कुटुंबीयांसोबत साई दर्शनासाठी आलेल्या तरुणीवर विनयभंग. साईबाबा संस्थानच्या 500 रुम भक्तनिवासातील कंत्राटी सफाई कर्मचाऱ्यांनी विनयभंग केल्याने संताप. (मुलगी हिंदू तर आरोपी मुस्लिम आहे) अमन पठाण असे कर्मचाऱ्याचे नाव; शिर्डी पोलिसात गुन्हा दाखल; आरोपी अटकेत. अहिल्यानगर जिल्ह्यातील सकल हिंदू समाज आक्रमक. अहिल्यानगरचे आ.संरंग्राम जगताप, भाजप नेते सुजय विखे, राष्ट्रीय श्रीराम संघाचे अध्यक्ष सागर बेग सांचे सह सकल हिंदू समाज उतरला रस्त्यावर. शिर्डी शहरातून मुख्य मार्गावरून काढण्यात आला मोर्चा. मोर्चानंतर सभेचे आयोजन.
0
0
Report

चंद्रपुर में अवैध मद्यपान अड्डे पर छापा, 4 ग्राहक गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरात अवैध मद्यपान अड्ड्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धाड, 4 ग्राहकांसह मालिकाविरुद्ध गुन्हा दाखल, मोठा मुद्देमाल जप्त राज्य उत्पादन शुल्क विभाग चंद्रपूरच्या पथकाने ताडोबा व्याघ्र प्रकल्प मार्गावरील कोयना गेटजवळ रस्त्याच्या बाजूला अस्थायी टिनाच्या झोपडीत सुरू असलेल्या अवैध मद्यविक्री व मद्यपान अड्ड्यावर धाड टाकून मोठी कारवाई केली. या ठिकाणी परवानगीशिवाय मद्य विक्री करून ग्राहकांना मद्यपान करण्यासाठी आवश्यक ते साहित्य/सेवा पुरविण्याची व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आढळून आले. कारवाईदरम्यान 4 ग्राहक प्रत्यक्ष मद्यपान करतांना आढळून आले. तसेच आशिष खोबरागडे, हा ग्राहकांना मद्यपानासाठी आवश्यक सर्व सुविधा पुरवित असल्याचे निष्पन्न झाले. याप्रकरणी संबंधितांविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. कारवाईदरम्यान ताब्यात घेण्यात आलेल्या सर्व ग्राहकांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली असून संबंधित वैद्यकीय अहवालामध्ये त्यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. या मोहिमेत देशी दारु, वेगवेगळ्या प्रकारच्या व्हिस्कीच्या बाटल्यासह मोठा दारू साठा जप्त करण्यात आलाय.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top