icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

समृद्धि महामार्ग पर लुटेरों के अंतरजिला गिरोह के छह गिरफ्तार, 9 लाख 28 हजार रुपये जब्त

Shirdi, Maharashtra:Anc - समृद्धी महामार्गावर वाहनचालकांना लक्ष्य करत दरोडे टाकणाऱ्या आंतरजिल्हा टोळीला अहिल्यानगर स्थानिक गुन्हे शाखेने अवघ्या चार दिवसांत जेरबंद करत मोठे यश मिळवले आहे. वाहनचालकांना मारहाण करून रोख रक्कम, डिझेल आणि दागिने लुटणाऱ्या या टोळीतील सहा आरोपींसह एका विधीसंघर्षित बालकाला अटक करण्यात आली असून, त्यांच्याकडून दोन कार, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा तब्बल ९ लाख २८ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या कारवाईमुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून वाहनचालकांनीही सुटकेचा श्वास सोडला आहे.
0
0
Report

कल्याण के कालाब तलाव क्षेत्र में व्यवसायिक विवाद के चलते युवक पर जानलेवा हमला; चार आरोपी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:कल्याण पश्चिमेतील काळा तलाव व्यावसायिक वादातून एका तरुणावर जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास काळा तलाव मुख्य प्रवेशद्वाराजवळ ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. कल्याण काळा तलाव परिसरात ओमकार विठ्ठल सूरोशे हे मोमोज स्टॉलचा व्यवसाय करतात. दुकान बंद करून ते आपल्या भाऊ उमेश याच्यासोबत घरली जात असताना आरोपी मुरलीधर नाडेकर, त्याचा मुलगा किरण नाडेकर, भावेश नाडेकर आणि त्यांचा साथीदार हार्दिक प्रजापती हे तेथे आले. यांच्यात पूर्वीपासून व्यावसायिक कारणावरून वाद सुरू होता. त्याच रागातून आरोपींनी ओमकार आणि उमेश यांच्याशी शिवीगाळ करत मारहाण करण्यास सुरुवात केली. यावेळी भावेश नाडेकर याने सोबत आणलेल्या चाकूने उमेश सुरेश यांच्यावर जीवघेणा हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात उमेश यांच्या चेहरा, छाती आणि पोटावर वार करण्यात आले. घटनेनंतर जखमींना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी खुनाच्या प्रयत्न केल्याच्या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, या प्रकरणातील चारही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास महात्मा फुले चौक पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

यवतमाळ विधानपरिषद चुनाव: कांबळे ने नामांकन वापस लिया, कांग्रेस में हलचल

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीतून काँग्रेस उमेदवार साहेबराव कांबळे यांनी नाट्यमयरीत्या आपला उमेदवारी अर्ज मागे घेताच जिल्ह्यातील काँग्रेस नेतृत्व खवळले आहे. उपेक्षित घटकाला न्याय देण्यासाठी अनुसूचित जातीतील हा उमेदवार काँग्रेसने दिला होता, मात्र कांबळे यांनी पक्षाचा विश्वासघात करणारं कृत्य केलं, हा लोकशाहीचा खून आहे. त्यांनी पक्षाच्या पाठीत खंजीर खुपसला आहे, लोकशाहीचे वस्त्रहरण करणारा हा प्रकार आहे. अशी संतप्त प्रतिक्रिया काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी दिली आहे. काँग्रेस हार मानणार नाही, या निवडणुकीत लढाई कशी द्यायची याचा विचार करू, संख्याबळ नाही असे म्हणण्याला काहीही अर्थ नाही अशी ही टिपणी काँग्रेस जिल्हाध्यक्ष सचिन नाईक यांनी केली.
0
0
Report
0
0
Report
0
0
Report
Advertisement

अकोला में SC उपवर्गीकरण के विरोध में बड़ा जनआक्रोश मार्च

Akola, Maharashtra:SC उपवर्गीकरण के विरोध में अकोला में बड़ा जनआक्रोश मार्च अकोला जिल्हा कार्यालय मार्गावर निघाला. अशोक वाटिका ते जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावर निघालेला मोर्चात अकोला जिल्ह्यासह विदर्भ व राज्यातील विविध भागातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. महाराष्ट्र शासनाने नियुक्त केलेल्या बदर समितीच्या अहवालाच्या आधारे आरक्षणातील उपवर्गीकरणाची प्रक्रिया राबविण्याचा आरोप आंदोलकांनी केला. समितीचा संपूर्ण अहवाल सार्वजनिक करावा, उपवर्गीकरणाची प्रक्रिया तात्काळ रद्द करावी, आरक्षणातील बॅकलॉग भरावा, कंत्राटी भरती बंद करावी आणि अनुसूचित जाती समाजाच्या संविधानिक हक्कांचे संरक्षण करावे, अशा प्रमुख मागण्या मोर्चेकऱ्यांनी केल्या. यावेळी उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जाती समाजात फूट पडण्याची आणि संविधानिक प्रतिनिधित्वावर परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली.
0
0
Report

अमरावती विधान परिषद चुनाव के लिए कांग्रेस ने रणनीति तय, हर्षजीत देशमुख को जीत का भरोसा

Amravati, Maharashtra:विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; निवडणूक प्रभारी यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेस नेत्यांची बैठक, निवडणुकीची विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी काँग्रेस सज्ज; निवडणुकीची रणनीती ठरली अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीकरिता काँग्रेस पक्षाचे उमेदवार हर्षजीत देशमुख निवडणूक रिंगणात आहे त्या अनुषंगाने अमरावतीच्या एका हॉटेलमध्ये निवडणूक प्रभारी काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांच्या अध्यक्षतेखाली महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार हर्षजीत देशमुख, काँग्रेस खासदार बळवंत वानखडे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री सुनील देशमुख, माजी आमदार वीरेंद्र जगताप उपस्थित होते. या निवडणुकीमध्ये कशाप्रकारे समोर जायचं, कशाप्रकारे निवडणूक लढायची कुठले मुद्दे आणि कशाप्रकारे प्रचार करायचा या संपूर्ण विषयावर यशोमती ठाकूर यांनी मार्गदर्शन केले. गेल्या दोन टर्म पासून अमरावती विधान परिषदेवर भाजपचे वर्चस्व आहे त्यामुळे भाजपचे उमेदवार प्रवीण पोटे पाटील यांना मात देऊन मावीआचे उमेदवार हर्षजीत देशमुख यांना विजय करण्यासाठी या ठिकाणी रणनीती करण्यात आली. ५ तारखेपासून संपूर्ण काँग्रेसचे नेते आणि महाविकास आघाडीची एकजूट दाखवून प्रचाराचा शुभारंभ करणार आहे.
0
0
Report
Advertisement

जुन्नर में बेटे ने जन्मदाता बाप और भाई की हत्या कर दी

Shirur, Maharashtra:पुण्यातून नात्याला काळिमा फासणारी आणि माणुसकीला कलंकित करणारी एक अत्यंत थरारक आणि धक्कादायक घटना समोर आली आहे! पोटच्या पोरानेच आपल्या जन्मदात्या बापाची आणि सख्ख्या भावाची दगडाने ठेचून निर्घृण हत्या केलीय. पुण्याच्या जुन्नर तालुक्यातील पारगाव तर्फे मढ इथल्या बगाडवाडी गावात ही रक्ताची होळी खेळली गेली. घरगुती वादाचं पर्यावसान थेट दुहेरी हत्याकांडात झालंय. ६५ वर्षांचे वृद्ध वडील जयराम मुकणे आणि ३० वर्षांचा सख्खा भाऊ राजू मुकणे यांची बाबाजी मुकणे या नराधमाने रात्रीच्या अंधारात अत्यंत क्रूरपणे हत्या केली. मन सुन्न करणारी बाब म्हणजे, या दोन्ही सख्ख्या रक्ताचा जीव घेतल्यानंतर हा क्रूर आरोपी रात्रभर त्या रक्ताच्या थारोळ्यात पडललेल्या मृतदेहांच्या शेजारीच घोरत झोपला होता! या अंगावर काटा आणणाऱ्या दुहेरी हत्याकांडाने संपूर्ण जुन्नर तालुका हादरलाय. ओतूर पोलिसांनी नराधम आरोपीला बेड्या ठोकल्याात.
0
0
Report

नाशिक में भारी बारिश: पूर्व तैयारी फेल, पानी भरने से लोगों को भारी नुकसान

Nashik, Maharashtra:अँकर नाशिकमध्ये काल सलग तीन तासांहून अधिक काळ झालेल्या मुसळधार पावसात सुमारे 30 मिलिमीटर पावसाची नोंद झाली. मात्र, पहिल्याच पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या मान्सूनपूर्व तयारीचा फज्जा उडाल्याचे चित्र पाहायला मिळाले. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांमुळे शहरातील अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, पावसाळ्यापूर्वी आवश्यक उपाययोजना न झाल्याने अनेक भागांमध्ये पाणी साचले, तर काही ठिकाणी घरांमध्ये आणि दुकानांमध्ये थेट पाणी शिरल्याने नागरिकांचे मोठे नुकसान झाले. युविथ परिश्रमाने पाहूया हा विशेष रिपोर्ट... सिंहस्थ कुंभमेळ्याच्या तयारीसाठी राज्य आणि केंद्र सरकारकडून हजारो कोटी रुपयांचा निधी नाशिकला मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून शहरभर विविध विकासकामे सुरू असून अनेक रस्त्यांचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, या कामांदरम्यान पावसाच्या पाण्याचा निचरा होण्यासाठी आवश्यक नियोजन करण्यात आले नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे... पहिल्याच पावसात शहरातील अनेक भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. काही ठिकाणी मेडिकल स्टोअर्स, दुकाने आणि घरांमध्ये पाणी शिरल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा नागरिकांनी केला आहे. अनेक व्यावसायिकांचे साहित्य भिजल्याने आर्थिक फटका बसला आहे. मान्सूनपूर्व गटारे साफसफाई, पाणी निचऱ्याची व्यवस्था आणि विकासकामांचे योग्य नियोजन करण्यात महानगरपालिका अपयशी ठरल्याचा आरोप आता जोर धरू लागला आहे. नागरिकांनी प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करत जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. बाईट-नागरिक याबाबत नाशिक महानगरपालिकेच्या शहर अभियंता विचारल्यावर त्यांनी याबाबत उत्तर देताना म्हटले ज्या ठिकाणी काल पाणी साचलेलं होतं त्या ठिकाणचं संपूर्ण पाणी काढण्यात आलेला आहे भविष्यात तिथे पाणी साचणार नाही अशा पद्धतीचे उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात येणार आहे यामुळे पुढे काळामध्ये कुठेच पाणी साचणार नाही याची काळजी प्रशासन घेणार असल्याचं शहर अभियंता संजय अग्रवाल यांनी म्हटले आहे... बाईट- संजय अग्रवाल....शहर अभियंता नाशिक महानगरपालिका याबत जिलााप्रमाणे मान्सून पूर्व पावसाने नाशिक महानगरपालिकेच्या तयारीची पोलखोल केली असून आगामी पावसाळ्यात अशीच परिस्थिती कायम राहिली तर नागरिकांच्या अडचणी आणखी वाढण्याची शक्यता आहे... नाशिक मध्ये सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरात अनेक ठिकाणी खड्डे खोदलेले आहेत त्यामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास हा नागरिकांना सहन करत असताना पावसाळी पूर्व ढिसाळ कामाचा प्रत्यय सध्या नाशिककरांना आलाय... आधीच सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामामुळे संपूर्ण शहरात खड्डे रस्त्याचे काम सुरू असताना पावसामुळे होणाऱ्या त्रासाला नाशिककर कंटाळले आहे यामुळे लवकरात लवकर काम व्हावे अशी अपेक्षा ना नाशिककरांनी व्यक्त केलीये…
0
0
Report
Advertisement

छत्रपति संभाजीनगर में नकली CID अधिकारी गिरफ्तार; CIDB टीम बनने का दावा झूठा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:यात पोलीस आयुक्तलायचे शॉट्स जोडले आहेत, डीसीपी byte आहे...आय कार्ड शॉट्स और आरोपी फोटो शामिल हैं... ANC: छत्रपती संभाजीनगर में पुलिसों को धोखा देने की कोशिश करने वाले 3 भामट्यां को पुलिस ने गिरफ्तार किया है, CI/DB के राष्ट्रीय अधिकारी ने बयान दिया। उन्होंने बनवेगिरी का खुलासा किया... यात आय कार्ड पर लिखा हुआ टेक्स्ट भी देखें, CIDB मतलब crime investigation detective branch... ये तीनों तोता पुलिस आयुक्त से मिलने गये, उनका दावा था कि वे CIDB टीम के राष्ट्रीय अधिकारी हैं... लेकिन उनके गले के लिस्ट और आय कार्ड से पुलिस आयुक्त को संदेह हुआ। जांच के बाद यह स्पष्ट हुआ कि वे सब नकली अधिकारी थे। इस मामले में सय्यद इशरत नूर अली, लक्ष्मण संतोष दिवसे और शेख ताहर शेख इब्राहिम को गिरफ्तार किया गया है। दिल्ली-हरिद्वार स्थित संस्था चालक के खिलाफ भी मामला दर्ज किया गया है जो नकली पहचान पत्र उपलब्ध कराता था。
0
0
Report

Sambhaji Nagar dispute escalates tension between Shiv Sena and BJP

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवसेनेचे आमदार अब्दुल सत्तार यांनी भाजपा अन्याय करत असल्याची व्यथा मांडली आणि राजकारण पेटले. शिवसेनेचे प्रमुख एकनाथ शिंदे यांनी लागलीच सर्व आमदारांची बैठक बोलावली आणि कानपिचक्या देत पुन्हा जोमानं काम करण्याचा सल्ला सुद्धा दिला मात्र या सगळ्यात चर्चा झाली ती सत्तार यांच्या आक्रमकतेची आणि त्यांनी भाजप विरोधी मांडलेल्या भूमिकेची, सत्तार पाठोपाठ इतर आमदार सुद्धा याच व्यथा घेऊन पुढे येताना दिसत आहेत त्यामुळे येणारा काळ शिवसेना-भाजपसाठी चांगलाच संघर्षाचा असेल असं चित्र दिसतंय एकनाथ शिंदे यांनी छत्रपती संभाजी नगरमध्ये सहा आमदार दोन जिल्हाप्रमुख आणि एक खासदारांना तातडीने बोलावले रात्री अकरा ते 2 अडीच पर्यंत शिंदे यांनी प्रत्येक नेत्यासोबत स्वतंत्र पणे बैठक घेत संभाजी नगर मध्ये नक्की काय चालले याचा आढावा घेतला, या बैठकीत खाजगीत अनेक नेत्यांनी पालकमंत्र्यांची तक्रार शिंदे कडे केल्याची माहिती.. विकास निधी मिळत नाही याबद्दल सत्तार सह इतरांनी तक्रार केल्याची माहिती. महापालिका जिल्हा परिषद सह इतर ठिकाणी पक्षाचे नुकसान का झाले याबाबत शिंदे यांनी बैठकीत संवाद साधला, याबाबत प्रत्येकाला स्वतंत्र सूचना दिल्या गेल्या. जिल्हा बँके निवडणुकीत जमल्यास युतीत न जमल्यास स्वतंत्र लढण्याच्या ही सूचना.. सत्तार यांचेही दोन्ही शिवसेना सेना एकत्र येण्याबत केलेल्या वक्तव्यावर सत्तार यांची कान उघडणी.. Abdul Sattar यांचा मुलगा समीर सत्तार यांनी भरलेला अर्ज मागे घेण्याच्या सूचना ही केल्या अर्ज मागे घेण्यास सत्तार यांनी सहमती दर्शवली खरी परंतु शिवसेना जिवंत ठेवायची असेल तर काम करावे लागेल सांगत संघर्षाची भूमिका ही कायम ठेवली इतकाच नाही तर थेट स्वपक्षीय पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या वरही हल्लाबोल करत तक्रारीचा पाढा वाचला आणि शिंदे सर्व अडचणी दूर करतील असा विश्वासही व्यक्त केला.. सत्तार यांच्या आक्रमकतेने आता इतर नेते ही पुढं यायला लागूले बुलढण्याचे शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अब्दुल सत्तार यांची व्यथा खरी असल्याचे सांगत शिवसेना भाजपणे एकमेकांचे खच्चीकरण करणे हे युतीसाठी हिताचे नाही असे सांगितले तर त्यांच्या री ओढत अमोल मिटकरी यांनी ही भाजप विरोधात आघाडी उघडली, अर्थ खात्यावर राष्ट्रवादीचा दावा असतानाही ते खाते मिळत नसल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केलीय तर लहान भावाला किंमत नाही का असा सवालही त्यांनी केला.. संजय गायकवाड, शिवसेना आमदार अमोल मिटकरी, राष्ट्रवादी नेते यावर भाजपने मात्र अब्दुल सत्तार यान्या पुन्हा डिवचले आहे बेगानी शादी मे अब्दुल्ला दिवाना अशी परिस्थिती आहे , सत्तार यांच्या मुलाला उमेदवार हवी होती मात्र उमेदवारी न मिळाल्याने त्यांना असे वाटत असावं असे सांगत एकनाथ शिंदे यांनी त्यांची समजूत काढली आहे असे भाजपचे नवनाथ बन म्हणाले.. नवनाथ बन, भाजप प्रवक्ते विधान परिषदेच्या उमेदवारीवरनं सुरू झालेले हे नाराजी नाट्य थेट शिवसेना-भाजपच्या वादापर्यंत गेलं सत्तार यांनी उमेदवारीच्या अनुषंगाने भाजप करत असलेल्या अन्यायाचा पाढाच वाचला अखेर एकनाथ शिंदेंना शिष्टाई करत प्रकरण शांत करावं लागलं तूर्तास प्रकरण शांत झालं ही असेल सत्तार यांची बंडखोरी शमेलही मात्र शिवसेना भाजप मधला संभाजीनगरचा वाद येणाऱ्या काळातील शिवसेना-भाजपच्या वादाचा ट्रेलर होता असं निश्चितपणे म्हणता येईल..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top