icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

आंबेगाव में तूफानी हवा ने पोल्ट्री कारोबार सहित फसलें उजाड़ दीं

Shirur, Maharashtra:आंबेगाव पुणे... आंबेगाव तालुक्यातील लाखनगाव येथे वादळ वाऱ्याच्या पावसाने शेतीमालासह फळबागांचे पोल्ट्री व्यवसायिकांचे प्रचंड नुकसान झाले असून वादळी वाऱ्याने संदीप मिंडे या शेतकऱ्याची पोल्ट्री जमीन दोस्त झाली असून 5 हजार पक्षांचा मृत्यू झालाय त्यामुळे पोल्ट्री व्यवसायिकाचं तब्बल वीस ते पंचवीस लाख रुपयांचे नुकसान झालंय, वादळी वाऱ्याने सर्व संसार उघड्यावरती आला असून घर आणि पोल्ट्री जमीनदोस्त झाल्याने शेतकरी हातबल झालाय याचाच आढावा घेतलाय आंबेगाव ते सेमित्री प्रतिनिधी हैंदेमंत चापुडे यांनी...
0
0
Report
Advertisement

जारांगे पाटील का आंदोलन विधानपरिषद चुनाव में हलचल क्यों मचा रहा है?

Bhandara, Maharashtra:भंडारा न्यूज निवडणूक आली की जरांगे पाटील आंदोलन पुकारतात - आमदार परिणय फुके निवडणूक आली की जरांगे पाटील आंदोलन करतात। मला असं वाटते की आता कुठलेही निवडणूक नाही। विधानपरिषद निवडणुकीमध्ये या आंदोलनाचा काही फरक पडत नाही। पण कुठलीही निवडणुक आली की जरांगे पाटील आंदोलन पुकारतात। एखादा निवडणूक आयोगाने पत्र काढला की निवडणूक लागणार आहे। जिल्हा परिषद, विधानसभा, लोकसभा असो जारांगे पाटील आंदोलन पुकारतात। आता विधानपरिषद निवडनुकीची घोषणा झाली आणि जारांगे पाटील ने आंदोलनाची घोषणा केली आहे। (मराठा आरक्षणाच्या मुद्यावर प्रसाद लाड जारांगे पाटील यांना भेटायला गेले होतें यावर परिणय फुके यांची प्रतिक्रिया.) परिणय फुके कॉकरोच पार्टीचे संस्थापक दिपके हे विदेशात राहतात... देश विरोधी जे मोठे षडयंत्र चालतं, भारत विकसित होऊ नये यासाठी इंटरनॅशनल रॅकेट आहे... भारत पुढे जातं त्यावेळी दिपके सारखे कॉकरोच भारतात सोडताच आणि अस्थिरता, अराजकता पसरवण्याचे काम करतात... ज्याप्रमाणे बांगलादेशमध्ये याच प्रकारे कॉकरोजेस सोडून कुठेतरी हलचल केली, चायनाने सुद्धा नेपाल मध्ये केलं, अमेरिकेने बांगलादेशमध्ये केलं त्या प्रकारे काही विदेशी लोक आपल्या देशात करायला बघत आहेत... हा देश सहिष्णु आहे पण तितका शक्तिशाली सुद्धा आहे या प्रकारचं देश विरोधी कृत्य कोणी करत असेल तर त्यांना हिट स्प्रे मारून संपवण्याचं काम करणार... देशविरोधी कृत्य करणाऱ्यांना हे सरकार सोडणार नाही... परिणय फुके
0
0
Report

सावित्रीबाई फुले के शिक्षण संदेश का चित्ररथ अकोला पहुँचा

Akola, Maharashtra:महात्मा ज्योतिबा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुण्यातील भिडेवाडा येथे सुरू केलेल्या भारतातील पहिल्या मुलींच्या शाळेच्या स्मृती जतन करण्यासाठी राज्याचे ज्येष्ठ नेतेछगन भुजबळ यांच्या संकल्पनेतून विशेष चित्ररथ तयार करण्यात आला आहे. हा चित्ररथ महाराष्ट्रभर फिरत असून आज अकोला शहरात त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले. भिडेवाडा येथील ऐतिहासिक शाळेचा वारसा, सावित्रीबाई फुले यांचे स्त्री शिक्षणासाठीचे योगदान आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश जनतेपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने हा चित्ररथ राज्यभर दौरा करत आहे. चित्ररथावर सावित्रीबाई फुले, महात्मा ज्योतिबा फुले यांच्या कार्याचे दर्शन घडविण्यात आले असून मुलींच्या शिक्षणाचे महत्त्व प्रभावीपणे मांडण्यात आले आहे. अकोल्यात चित्ररथ दाखल होताच सामाजिक कार्यकर्ते, विविध संघटनांचे पदाधिकारी, विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. अनेकांनी चित्ररथासमोर छायाचित्रे काढत सावित्रीबाई फुले यांच्या कार्याला अभिवादन केले.यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले की, सावित्रीबाई फुले यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत मुलींच्या शिक्षणासाठी लढा दिला. त्यांचे कार्य आजच्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता आहे. हा चित्ररथ समाजाला शिक्षण, समता आणि सामाजिक परिवर्तनाचा संदेश देणारा ठरत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
0
0
Report

रायगढ़ में मानसूनपूर्व बारिश, महाड- माणगाव- म्हसळा में तेज बारिश, आंबा पिक को नुकसान

Chendhare, Maharashtra:स्लग - रायगडात मान्सूनपूर्व पावसाच्या सरी ...... महाड माणगाव, म्हसळा भागात पाऊस ...... कर्जत खालापूरात पावसाच्या जोरदार सरी ..... पावसामुळे हवेत गारवा, नागरिकांना दिलासा ...... अँकर - हवामान खात्याचा अंदाज खरा ठरवत रायगड जिल्ह्यात आज संध्याकाळच्या सुमारास मान्सून पूर्व पावसाच्या सरी कोसळल्या. रायगडच्या दक्षिण भागात महाड , माणगाव, म्हसळा, श्रीवर्धन परिसरात जोरदार वाऱ्यासह पावसाच्या मध्यम सरी कोसळल्या. कर्जत खालापूर तालुक्यात देखील जोरदार पाऊस झाला आहे. पावसामुळे हवेत गारवा निर्माण झालाय. उन्हाच्या काहिलीने हैराण झालेल्या रायगडकरांना आजच्या पावसाने दिलासा मिळाला आहे.अचानक आलेल्या पावसाने नागरिकांची एकच तारांबळ उडाली तर शेवटच्या टप्प्यातील आंबा पिकाचे नुकसान झालंय. दरम्यान पावसाबरोबरच विजांचा कडकडाट सुरू असल्याने नागरिकांनी सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा, असं आवाहन जिल्हा प्रशासनाने केलं आहे.
0
0
Report
Advertisement

इंदापुर में चाय पे चर्चा: राजू शेट्टी और सदाभाऊ खोत 14 साल बाद मिले

Rui, Maharashtra:राजू शेट्टी सदाभाऊ खोत यांची इंदापुरात चाय पे चर्चा.. जुन्या आठवणींना दिला उजाळा.. शेट्टी खोत यांच्यातील वैर क्षमणार..? Anchor- स्वाभिमानीचे शेतकरी संघटनेचे माजी खासदार आणि आमदार सदाभाऊ खोत यांच्यातील राजकीय वैर सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. एकेकाळी मित्र असणारे हे दोन्ही नेते आता एकमेकांच्या विरोधात आहेत. मात्र हे दोन्ही नेते आज चक्क एकमेकांना भेटून चहाचा आनंद घेताना पाहायला मिळाले . यापूर्वीही त्यांनी पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर न्यायालयामध्ये शेतकरी संघटनेच्या आंदोलनाच्या तारखेसाठी हे दोन्ही नेते जुने मित्र एकत्र आले होते. मात्र एकमेकांकडे बघणे देखील टाळले होते पण आज त्यांनी एकत्रित चहा घेत जुन्या आठवणींना उजाळा दिला.. 2011 मध्ये झालेल्या आंदोलनातून राजू शेट्टी आणि सदाभाऊ खोत यांच्यावर गुन्हे दाखल झाले होते, त्यातून इंदापूर न्यायालयामध्ये याचा खटला सुरू आहे,या खटल्याच्या निमित्ताने हे दोन्ही नेते तब्बल 14 वर्षांनंतर इंदापूरच्या न्यायालयात एकत्रित आले,त्यानंतर दोघांनीही एकत्रित न्यायालयामध्ये हजेरी लावली,त्यानंतर दोघांनीही चहाचा अस्वाद घेत चाय पे चर्चा देखील केली,तर दोन्ही नेत्यांनी मात्र ही भेट केवळ 'जुन्या आठवणींना उजाळा' देणारी असल्याचे सांगितले. " आंदोलनाच्या काळात आम्ही एकत्र होतो. खटला एकच असल्याने आज भेट झाली. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आम्ही आजही एक आहोत,"अशी प्रतिक्रिया दोघांनीही दिली.
0
0
Report

यवतमाळ दरव्हा पंचायत समिति में बीडीओ के खिलाफ भीड़ ने अर्धनग्न प्रदर्शन किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या दारव्हा पंचायत समितीत सतरा वर्षांपासून प्रभारावर असलेल्या बीडीओंच्या विरोधात संतप्त नागरिकांनी अर्धनग्न भंडारा आंदोलन केले. यावेळी ईश्वर राठोड यांनी पोतराजाची वेशभूषा करून व भंडारा उधळून बीडीओंच्या मनमानी कारभाराचे वाभाडे काढले. पंचायत समितीतील भोंगळ कारभाराबाबत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. प्रभारी गटविकास अधिकारी आणि प्रभारी गटशिक्षणाधिकारी यांच्या सततच्या अनुपस्थितीमुळे रखडलेली कामे, तसेच मनरेगा अंतर्गत पांदण रस्ते कामांमध्ये झालेली मोठी आर्थिक अनियमितता, यासोबतच वैयक्तिक सिंचन विहीर योजनेत बोगस लाभार्थी दाखवून बोगस जॉब कार्ड तयार करण्यात आल्याचा गंभीर आरोपही यावेळी करण्यात आला आहे.
0
0
Report

साकोली के तलाव किनारे अज्ञात युवक की हत्या, तेज धार हथियार से हमला संकेत

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या साकोलीत तलावाजवळ अनोळखी युवकाचा मृतदेह आढळलेला आहे. तीक्ष्ण हत्याराने हल्ल्याची शक्यता चर्चेत आली.ANCHOR :- भंडाऱ्याच्या साकोली येथील गडकुंभली रोडलगत शिवाजी वार्ड परिसरातील तलावाजवळ शुक्रवारी सकाळी एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. क्रिकेट खेळण्यासाठी आलेल्या युवकांना तलावाच्या काठाशी मृतदेह दिसून आला. त्यांनी तत्काळ “साकोली मिडीया” तसेच पोलिसांना माहिती दिली. मृत युवकाचे अंदाजे वय ३५ वर्ष असून त्याच्या पोटावर, मानेवर व डोक्यावर तीक्ष्ण हत्याराने वार केल्याच्या जखमा आढळल्या. घटनास्थळी MS 40K 5099 क्रमांकाची स्प्लेंडर दुचाकी व एक बॅगही आढळून आली. पोलीस नायक चंद्रकांत थेर घटनास्थळी दाखल झाले असून पंचनामा करून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

दिलचस्प खुलासा: लातूर सीबीआय पेपरफुटी जांच तेज, डॉ. मनोज शिरूरे के संबंध बने केंद्र

Latur, Maharashtra:लातूर PKG स्किप्ट ::- नीट पेपरफुटी प्रकरणात तपासाचा फास आवळला.... लातूरमध्ये सीबीआय तपासाला वेग डॉ. मनोज शिरूरेच्या संपर्कांची चौकशी; काही पालकही सीबीआयच्या रडारवर? पी. व्ही. कुलकर्णी कनेक्शनची पडताळणी; तपासात नवे धागेदोरे समोर लातूरमध्ये सीबीआयची कारवाई वाढली; आणखी चौकशीची शक्यता.... नीट पेपरफूटी प्रकरणात सीबीआयचा तपास आता आणखी खोलात जाताना दिसत आहे. डॉ. मनोज शिरूरे याला अटक केल्यानंतर तपास केवळ एका व्यक्तीपुरता मर्यादित राहिलेला नाही. लातूरमध्ये रात्री उशिरापर्यंत सीबीआयची कारवाई सुरू होती. आर्थिक व्यवहार, कथित लाभार्थी आणि संबंधित व्यक्तींची माहिती गोळा करण्यावर तपास यंत्रणांचा भर असल्याचे समोर येत आहे. त्यामुळे या प्रकरणात आणखी मोठी नावे समोर येण्याची शक्यता व्यक्त होत आहे. पाहुयात याच संदर्भातील एक स्पेशल रिपोर्ट... डॉ मनोज शिरूरे यांच्या पत्नीची CBI कडून चौकशी... डॉ मनोज शिरूरे यांनी आपल्या पाल्यांसाठी पेपर विकत घेतला होता... डॉ मनोज शिरूरे ला अटक झाल्यानंतर सीबीआयने तपासाचा वेग वाढवला आहे. लातूरमध्ये विविध ठिकाणी तपास यंत्रणांची हालचाल वाढली असून प्रकरणाशी संबंधित पुरावे आणि कागदपत्रांची पडताळणी सुरू आहे. पेपरफुटी प्रकरणाशी संबंधित साखळी उलगडण्याचा प्रयत्न तपास यंत्रणांकडून सुरू आहे. डॉ . शिरूरे यांच्या पत्नीची रात्री उशिरापर्यंत चौकशी करण्यात आली. त्यानंतर त्यांच्या निकटवर्तीय डॉक्टर नातेवाईकाच्या घरावरही तपास यंत्रणा पोहोचल्याची माहिती आहे. या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींमधील संपर्क आणि व्यवहारांची माहिती तपास यंत्रणा तपासत आहेत. वैभव बालकुंदे रिपोर्टर या संपूर्ण प्रकरणात आता आर्थिक व्यवहारांचाही तपास सुरू झाला आहे. कथित आर्थिक लागेबांधे, पैशांचा व्यवहार आणि पेपर विकत घेतलेले पालक कोण ? याचा तपास सीबीआयकडून केला जात आहे. त्यामुळे नीट पेपरफुटी प्रकरणातील तपासाची व्याप्ती आता आणखी वाढल्याचे दिसून येत आहे..... वैभव बालकूंदे ZEE 24 TAAS
0
0
Report

रत्नागिरी, कोकण में मानसूनपूर्व सरी शुरू; गर्मी से नागरिकों को राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी कोकणात मान्सूनपूर्व सरींची दमदार हजेरी; उकाड्यापासून नागरिकांना दिलासा अँकर : हवामान विभागाने व्यक्त केलेला अंदाज अखेर खरा ठरला असून रत्नागिरी जिल्ह्यासह कोकणात आज सायंकाळपासून मान्सूनपूर्व सरींना सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून उकाड्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना या पावसामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. वातावरणात गारवा निर्माण झाल्याने नागरिकांसह शेतकऱ्यांमध्येही आनंदाचे वातावरण आहे. आगामी काळात अशाच स्वरूपाचा पाऊस कायम राहिल्यास शेतीच्या कामांना वेग येणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

शिरूर में वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने किसानों को बड़ा नुकसान

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... उत्तर पुणे जिल्ह्याच्या शिरूर आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यातील अनेक गावांना आज वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने झोडपलंय, विजांच्या कडकडाटासह काही ठिकाणी गारपिट हि झालीय, वादळी वाऱ्याच्या या मुसळधार पावसाने अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाली असून विद्युत वाहक खांब तसेच फळबाग हि जमीन दोस्त झाल्यात, वादळी वाऱ्याच्या या पावसाने शेतीमालाच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून उकड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मात्र दिलासा मिळालाय, मात्र या मान्सूनपूर्व पावसाने खरिप हंगामापुर्वींच्या शेती मशागतीच्या कामांना आता वेग येणार आहे.
0
0
Report

ठाणे में ड्रग्स गिरोह पठाण गैंग के पांच गिरफ्तार, 34 करोड़ की हेरोइन जप्त

Kalyan, Maharashtra:ठाणे जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई कुख्यात ड्रग्स तस्कर ‘पठाण गॅंग’ गजाआड कल्याण पोलिसांकडून तब्बल ३४ कोटी १८ लाखांची हिरोईन अमली पदार्थ जप्त मुख्य पुरवठादारासह पाच आरोपी अटक, मुख्य आरोपी अमजद पठाण वर मर्डरचा गुन्हा दाखल, जामिनीवर असल्यानंतर ही करायचा ड्रक्स सप्लाय. नाशिकहुन यायचं हिरोईन कल्याणच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने ९ किलो ७६८ ग्राम वजनाची तब्बल ३४ कोटी १८ लाख रुपयांची हीरोइन अमली पदार्थ जप्त केलंय. तसेच या अमली पदार्थाच्या मुख्य पुरवठादारासह एकूण पाच जणांना पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. धक्कादायक बाब म्हणजे नाशिकहून या सगळ्या ब्राऊन शुगरचा पुरवठा कल्याण शहरात केला जायचा आणि कल्याण शहरा मार्गे मुंबई हे अमली पदार्थ पाठवलं जायचं. कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्याच्या हद्दीत अंमली पदार्थ संदर्भात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यासाठी पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी पोलिसांना सूचना केल्या होत्या. त्यानुसार पोलिसांची गस्त सुरू होती. याच वेळेस या पथकाला कल्याण पश्चिमेच्या सांगळेवाडी कडे जाणाऱ्या रोडवर स्मशानभूमी जवळ सकाळी ७.२०च्या दरम्यान दोन इसम बॅग घेऊन संशयास्पद रित्या हालचाल करतांना दिसले. पोलिसांनी त्यांची विचारपूस करण्याचा प्रयत्न केला असता ते पळून जाण्याचा प्रयत्न करू लागले. त्यामुळे पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं शिवाय त्यांच्या बॅगेची झडती घेतली असता त्यात हीरोइन हा अमली पदार्थ पोलिसांना मिळून आले. याप्रकरणी पोलिसांनी कासिम अब्दुल सत्तार वसईकर, आणि कृष्णा हरेमनी या दोघांना अटक केली. चौकशी दरम्यान यातील वसईकर यांच्या शहापूरच्या घरावर पथकाने झाडाझडती घेतली असता तिथे देखील १ कोटी ८५ लाख ८५ हजारांचे हिरोईन अमली पदार्थ जप्त करण्यात आले. शिवाय तपासा दरम्यान या अमली पदार्थाचा मुख्य पुरवठादार अमजद युसूफ पठाण असून तो गणेश जंगमार उर्फ अण्णा याला हे सगळे अमली पदार्थ देत होता. शिवाय पठाण याला अमली पदार्थाची विक्री करणाऱ्या व्यावसायिकापर्यंत पोहोचवण्याचं काम वसईकर आणि त्याचे साथीदार करत होते. या प्रकरणी पोलिसांनी मुख्य पुरवठादार अहजद पठाण, गणेशन उर्फ अण्णा, सद्दाम शेख अशा एकूण पाच जणांना अटक केलीय. अमजद पठाण याला दहा दिवसाची पोलीस कोठडी मिळाली आहे. पूर्वी अहमद पठाण आणि कासिम वसईकर त्याचबरोबर सद्दाम शेख यांच्यावर मुंबई आणि उपनगरांच्या विविध पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. त्याचबरोबर नार्कोटिक्स सेल मुंबईत देखील यांच्या विविध गुन्हे दाखल आहेत. दरम्यान ठाणे जिल्ह्यातील अमली पदार्थात ही मोठी कारवाई म्हणावी लागेल. दरम्यान या रॅकेटमध्ये आणखीन मोठी टोळी असल्याची शक्यता पोलिसांनी वर्तवलीय जात आहे. संजीय जाधव (अप्पर पोलीस आयुक्त)
0
0
Report

NEET पेपरफुटी के बावजूद लातूर का विश्वजीत डॉक्टर बनने का सपना जिंदा रखे

Latur, Maharashtra:लातूर PKG डॉक्टर होण्याचं स्वप्न... त्यासाठी दिवस-रात्र अभ्यास... तीन वर्षांचा संघर्ष... पण या संघर्षात अशी एक किंमत मोजावी लागली... जी कोणालाही हादरवून टाकेल... NEET च्या तयारीदरम्यान एका विद्यार्थ्याच्या आयुष्यात नेमकं काय घडलं... पाहूयात याच संदर्भातील पाहुयात स्पेशल रिपोर्ट... एका बाजूला NEET पेपरफुटी प्रकरणामुळे गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे... तर दुसऱ्या बाजूला लातूरचा विश्वजीत तेलंगे डॉक्टर होण्याचं स्वप्न उराशी बाळगून वेदनांशी झुंज देत आहे... गेली तीन वर्षे NEET परीक्षेसाठी दिवस-रात्र मेहनत... सततचा अभ्यास... आणि स्वतःच्या आरोग्याकडे झालेलं दुर्लक्ष... या सगळ्यात विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या... आयुष्य अचानक बदललं... पण वेदना, उपचार आणि संघर्ष यांच्यातही डॉक्टर होण्याचं स्वप्न मात्र त्याने जिवंत ठेवलं आहे..परिस्थिती इतकी गंभीर झाली की विश्वजीतच्या दोन्ही किडन्या निकामी झाल्या... उपचारासाठी रुग्णालय, डायलिसिस, औषधं आणि वेदनांचा प्रवास सुरू झाला... पण एवढ्या संकटानंतरही त्याने हार मानली नाही... आजींनी किडनी दान करून त्याला नवजीवन दिलं... आणि उपचार सुरू असतानाही त्याने अभ्यास थांबवला नाही... कारण डॉक्टर होण्याचं स्वप्न आणि पांढरा कोट घालण्याची जिद्द त्याने अजूनही जिवंत ठेवली आहे... बाईट – विश्वजीत तेलंगे – विद्यार्थी या भागातील माहिती आणखी स्पष्ट करण्यासाठी VO 02, VO 03 इत्यादी विभागांमध्ये आयुष्य, कुटुंबीयांची माहिती, वैद्यकीय खर्च, शासनाकडून सवलतीची मागणी या गोष्टींचा समावेश आहे. यातNEET पेपरफुटीमुळे गुणवत्तेवर प्रश्न, आजारपण, वेदना आणि संघर्ष यांचं वर्णन आहे. डॉक्टर्स होण्याचं स्वप्न जिवंत ठेवणाऱ्या विश्वजीत च्या या संघर्षात मेहनत, जिद्द आणि संघर्षाची ही कहाणी अनेक प्रश्न उपस्थित करते... मात्र डॉक्टर होण्याचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्याची लढाई अजूनही सुरूच आहे... वैभव बालकुंदे Zee 24 TAAS Latur
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top