icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर- गडचिरोली में सागवान लकड़ी से ब्रांड बना वनविकास महामंडळ, पांच साल में 6.5 करोड़ उलाढाल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर- गडचिरोली जिलेतील घनदाट जंगलातील मौल्यवान ठेवा म्हणजे सागवान लाकूड. इथले सागवान लाकूड लाकूड जगतात आता ब्रँड बनले आहे. FDCM अर्थात वनविकास महामंडळ हे वनविभागाचे एक सरकारी महामंडळ आहे. जंगलव्याप्त जिल्ह्यात इमारतीसाठी लागणारे सागवान आणि इतर प्रजातीचे लाकूड कापून ते व्यावसायिक पद्धतीने विक्रीसाठी उपलब्ध करून देणे महामंडळाचे काम आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर म्हणजे इथला मध्यवर्ती भांडार आणि बाजार आहे. चंद्रपूर FDCM प्रकल्पात आलापपल्ली येथील आरा गिरणीचा देखील समावेश आहे. 1921 पासून 2021 पर्यंत या प्रकल्पाची साधारण उलाढाल 60 लाखांची होती. आधी नवे संसद भवन मग राम मंदिर, PMO, उपराष्ट्रपती निवास यासह आता काशी विश्वनाथ मंदिरात होणाऱ्या जीर्णोद्धार कार्यात इथले जगप्रसिद्ध सागवान लाकूड वापरले जात आहे. FDCM चंद्रपूरने मागील 5 वर्षात चक्क 6.5 कोटींची उलाढाल केली आहे. आता देशभरातून ऑर्डर्सचा प्रचंड ओघ वाढला आहे. यात सरकारी आणि खाजगी खरेदीदार यांचा समावेश आहे. मूल्यवर्धन करत केवळ सागवान लाकूड उपलब्ध करून देण्याऐवजी आता वनविकास महामंडळतयार फर्निचर व्यवसायात उतरले आहे. उत्तमोत्तम यंत्रसामुग्री वापरून ग्राहकाला हवे तसे फर्निचर बनवून देण्यात इथले शेकडो कुशल हात गुंतले आहे. सरकारी खात्याने टीम म्हणून काम करायचे ठरवले तर काय होऊ शकते याचे उदाहरण FDCM चंद्रपूरने घालून दिले आहे. चंद्रपूर FDCM आता सागवान व्यवसायात एक ब्रँड बनले आहे.
0
0
Report

सांगली जिला बैंक में अध्यक्ष-पूर्व विधायक के बीच घमासान, प्रशासक नियुक्ति की मांग तेज

Sangli, Maharashtra:स्लग - जिल्हा बँकेवरून आमदार गोपीचंद पडळकर व बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांच्यात जुंपली.. अँकर - सांगली जिल्हा बँकेवरून बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक आणि भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्यात जुंपली आहे.संचालक मंडळाच्या कर्जमाफी,आरबीआयची नोटीस यामुळे पडळकरंकडून बँकेवर भ्रष्टाचाराचे आरोप करत प्रशासक आणण्याची मागणी केली आहे.मात्र बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक यांनी पडळकर यांच्या आरोपांचा खंडन करत पुरावे दाखवा राजीनामा देतो,नसेल तर तुम्ही राजीनामा द्या,असे खुले आव्हान दिले आहे... व्ही वो - सांगली जिल्ह्याच्या राजकारणामध्ये जयंत पाटील विरुद्ध आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत यांच्यातला संघर्ष सुरूच आहे,कोणत्या ना कोणत्या कारणातून पडळकर आणि खोत यांच्याकडून टार्गेटवर असतात.जयंत पाटलांच्या नेतृत्वाखाली असणाऱ्या सांगली जिल्हा बँकेवर पडळकर आणि खोतांकडून बँकेवर झालेल्या भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराच्या आरोपावरून सातत्याने टीका केली जाते. मात्र आता,रिझर्व बँकेकडून देण्यात आलेली नोटीस,संचालक कर्ज आणि नोकर भरती,यावरून राजकारण तापलय. व्ही वो - वास्तविक आमदार जयंत पाटील, काँग्रेस आमदार विश्वजीत कदम,माजी खासदार संजयकाका पाटील यांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती बँकेत सर्वपक्षीय सत्ता आहे.जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष पद हे भाजपाकडे आहे.भाजपाचे दिग्गज नेते संचालक देखील आहेत.मात्र आमदार गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत,हे दोघे जिल्हा बँकेच्या विरोधात असून बँकेवर प्रशासक आणावे,अशी मागणी सातत्याने करत आहे. व्ही वो - याला आता,आरबीआय कडून देण्यात आलेल्या कारणे दाखवा नोटिसीमुळे बळ मिळाले आहे.बँकेकडून सध्या कडे देणारी नोकर भरती आणि संचालक मंडळाला देण्यात आलेलं कर्जमाफी यावरून पडळकर यांनी पुन्हा जयंत पाटील आणि बँकेला टारगेट केलंय.बँकेने विद्यमान संचालकांना कोट्यावधीची कर्ज देऊन कर्जमाफी केली आहे,असा आरोप करत, सध्या होणाऱ्या जम्बो नोकरी भरतीवर संशय व्यक्त करत बँकेवर प्रशासक आणावी,अशी मागणी केली आहे. बाईट - गोपीचंद पडळकार - आमदार, भाजपा. व्ही वो - दरम्यान आमदार गोपीचंद पडळकरांचे आरोप आणि मागणीचे बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी खंडन करत गोपीचंद पडळकरांच्या मागणीवर संशय व्यक्त करत, एक रुपया कर्जमाफी केल्याचं पडळकर यांनी दाखवावे आपण राजीनामा देऊ,नसेल तर पडळकर यांनी राजीनामा द्यावा,असं थेट आव्हान नाईक यांने केले आहे. बाईट - मानसिंगराव नाईक - अध्यक्ष, जिल्हा बँक, सांगली. व्ही वो - सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या 444 लिपिक पदकांसाठी,सध्या नोकर भरती सुरू झाली आहे,याआधी ही जिल्हा बँकेकडून नोकर भरती करण्याचा प्रयत्न करण्यात आला,मात्र गोपीचंद पडळकर यांनी आणि खोत यांनी केलेल्या तक्रारीनंतर राज्य सरकारने नोकर भरतीला स्थगिती दिली होती,मात्र आता पुन्हा ही नोकर भरती सुरू झाली आहे,पुन्हा या नोकर भरतीवर संशय व्यक्त केला आहे. व्ही वो- खरंतर गोपीचंद पडळकर हे भाजपाचे आमदार आहेत,जिल्ह्यातील अनेक भाजपाचे दिग्गज नेते,जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक आहेत.बँकेच्या कथेत गैरव्यवहार प्रकरणी स्थगिती मिळाल्या चौकशी पडळकर यांच्यामुळे पुन्हा सुरू देखील झाली आहे.त्यामुळे जयंत पाटलांना नामोहरम करताना,भाजपाच्या जिल्ह्यातल्या दिग्गज नेत्यांची नाराजी देखील पडळकर ओढवून घेत आहेत,हे देखील नक्की आहे..
0
0
Report

नाशिक में संतोष श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज की पालखी पहुँची, वारकरी उत्साह से भरे

Nashik, Maharashtra:संतोष श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांची पालखी नाशकात दाखल झाली शहरातील पंचायत समिती येथे या पालखीचं स्वागत करण्यात आलं...हजारोच्या संख्येत वारकरी सहभागी झाले आहे... गेल्या 3 दिवसापासून पालखी पंढरच्या दिशेने प्रस्थान करत आहे... पालखी चालत असताना अनेक वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद उत्साह दिसून आला... पंढरीच्या नावाचा जयघोष करत टाळ मृदंगाच्या तालावर नाचत हा पालखी सोहळा साजरा करताना वारकरी दिसले... या संदर्भात आढावा घेत वारकऱ्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report
Advertisement

आसाम में आटपाड़ी के युवक से 55 करोड़ रुपये का सोना बरामद: पुलिस ने किया गिरफ्तार

Sangli, Maharashtra:सांगलीच्या आटपाडी येथील तरुणाला आसाममध्ये 55 कोटीचे सोने तस्करी करताना अटक. अक्षय बनसोडे असे या तरुणाचं नाव असून तो आटपाडीचा असल्याचा आसाम पोलिसांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.त्याच्याकडून तब्बल ५५ कोटी रुपयांचा सोन्याचे बिस्कीट जप्त करण्यात आले आहेत.त्याच्याकडून चार मोबाईल फोन आणि १३ ग्रॅम चांдиही जप्त करण्यात आली आहे.आसामच्या गुवाहाटीतील खारघुली परिसरात छापा टाकुन अक्षय बनसोडे याच्याकडील दोन बॅगांची झाडाझडती घेतली असता बॅगमधून ३७ किलो २४ कॅरेट सोन्याची बिस्किटे सापडली असून सोना जप्त करत अक्षय बनसोडे याला आसाम पोलिसांनी अटक केल्याचे गुवाहाटी पोलीस उपायुक्त शंभवी मिश्रा,यांनी स्पष्ट केले आहे.तर बनसोडे हा आटपाडी मधला असल्याचं समोर आल्याने,त्याच्या अटकेने सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
0
0
Report

यवतमाळ के खैरगाव में अवैध और मुदतबाह्य कीटनाशक-खत जब्त, 17.82 लाख मूल्य

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पांढरकवडा तालुक्यातील खैरगाव देशमुख येथे अवैध आणि मुदतबाह्य कीटकनाशके तसेच रासायनिक खताचा साठा जप्त करण्यात आला आहे. खरीप हंगामात शेतकऱ्यांची फसवणूक करून त्यांच्या माथी ही मुदतबाह्य खते व औषधी बनावट लेबल लावून मारल्या जात होती. कृषी विभागाने केलेल्या या कारवाईत 17 लाख 82 हजाराचा साठा जप्त करण्यात आला. यश शिवनवार या व्यक्तीच्या गोदामावर अधिकृत परवाण्याशिवाय थेट आदिलाबाद आणि सारखणी येथून मोठ्या प्रमाणात ही अवैध खते व कीटकनाशके मागविल्या जात होती. कमी दरात माल आणून तो बनावट लेबल चिटकवून शेतकऱ्यांना विकला जात होता. या कारवाईमुळे खरीप हंगामामध्ये भोळाबाबडा शेतकरी नागविला जात असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे.
0
0
Report
Advertisement

रायगड में बारिश से नदी-धाराओं के जलस्तर में उछाल, आंबा नदी ने चेतावनी लाइन पार

Chendhare, Maharashtra:पावसाने प्रमुख नद्यांच्या पाणीपातळीत वाढ आंबा नदीने ओलांडली इशारा पातळी २८ धरणातील पाणीसाठ्यात वाढ परिसरातील पाणी चिंता मिटली मागील दोन तीन दिवसांपासून बरसत असलेल्या पावसाने रायगड जिल्ह्यात सर्वत्र पाणीच पाणी झालं आहे. जिल्ह्यातील प्रमुख नद्यांच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. नागोठणे जवळील आंबा नदीने इशारा पातळी ओलांडली असून पाणी धोका पातळीच्या जवळ पोहोचले आहे. अन्य नद्यांचे पाणी इशारा पातळीच्या खाली आहे. पावसाने जिल्ह्यातील धरणाच्या पाण्यात वाढ झाली आहे. २७ धरणातील पाणीसाठा २९ टक्क्यांवर पोहोचला आहे. सुतारवाडी आणि पाभरे ही धरणे १०० टक्के भरली असून परिसरातील नागरिकांची पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली आहे.
0
0
Report

क्लॉकवाली बारिश ने कल्याण-डोंबिवली क्षेत्र में पेड़ गिराये, बिजली सेवाएं बाधित; यातायात प्रभावित

Kalyan, Maharashtra:कल्याण डोंगरी परिसरामध्ये कालपासून सत्ताधार पाऊस पावसामुळे कल्याण डोंबिवली मध्ये अनेक झाडे कोसळली डोंबिवलीच्या सुदर्शन नगर येथील विद्युत वाहिनिनवरती झाड कोसळल्याने विद्युत पुरवठा खंडित झाल्याची घटना घडली आहे कल्याण डोंबिवली मध्ये देखील एका दिवसात अनेक झाडें पडल्या च्या घटना घडल्या आहेत व गाड्यावर झाडे कोसळल्याने गाड्यांचे देखील नुकसान झालेले आहे सुदयवाने जीवितहानी नाही तर काल मुंबईमध्ये शाळेच्या बसवर झाड पडून शाळकरी विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता त्या अनुषंगाने कल्याण डोंबिवलीमध्ये देखील महानगरपालिकेने झाडांचे ऑडिट करावं असं कल्याण डोंबिवलीकरांच्या नागरिकांचं म्हणणं देखील आहे त्याचा आढावा
0
0
Report
Advertisement

आंबेगांव के एकलहरे में बिबटिये की पिंजरे में गिरफ्तारी, ग्रामीणों को मिली राहत

Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून आंबेगावच्या एकलहरे परिसरात दहशत माजवणाऱ्या बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाला अखेर यश आलंय. एकलहरे येथील लोंढेमळा आणि दरा वस्ती परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढला होता. बिबट्या थेट घरांच्या आजूबाजूला फिरत असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण होते. स्थानिक नागरिकांच्या मागणीनंतर वनविभागाने दरा वस्तीवरील रामदास लोंढे यांच्या शेताच्या कडेला पिंजरा लावला होता. अखेर हा बिबट्या पिंजऱ्यात जेरबंद झालाय,जेरबंद झालेली ही मादी बिबट्या असून तिचे वय साधारण ३ ते साडेतीन वर्षे आहे. या मादी बिबट्याला पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जुन्नरच्या माणिकडोह बिबट निवारा केंद्रात हलवण्यात आले आहे. बिबट्या जेरबंद झाल्यामुळे एकलहरे परिसरातील नागरिकांनी अखेर सुटकेचा श्वास सोडला आहे.
0
0
Report
Advertisement

अंबरनाथ तालुक्य में धान की बुवाई अंततः शुरू, बरसात के बाद 3700 हेक्टेयर में खेती शुरू

Ambernath, Maharashtra:​अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात;  ३७०० हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड  Anchor यंदा पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाचे उशिराने आगमन झाल्यामुळे लांबलेली भात शेतीच्या पेरणीची कामे आता तालुक्यात सुरू झाली आहेत. तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली. पुरेसा पाऊस न झाल्याने भाताचे बियाणे सुकण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. हवामान कोरडे राहिल्याने शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे खरिपाचा हंगाम यंदा काहीसा उशिराने सुरू झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यात एकूण 3700 हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने आता शेतकऱ्यांची बियाणे टाकणे, शेत जमीन तयार करणे आणि पेरणीची कामे करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे पर्यायाने भात लावणीची कामेही जुलै महिन्याच्या मध्यानंतर किंवा शेवटी सुरू होतील . चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top