icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

हिंगोली के सेनगाव शासकीय वस्तीगृह की मरम्मत: सिमेंट के बजाय मिट्टी-खड़कट से कार्य

Hingoli, Maharashtra:अँकर -हिंगोलीच्या सेनगाव येथील शासकीय मागासवर्गीय वस्तीग्रहाची इमारत धोकादायक बनल्याने दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आलं आहे पायाभूत कामांच्या ठिकाणी माती मिश्रित खडक टाकण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे ग्रामीण भागातील विद्यार्थी या शासकीय वस्तीगृहात शिक्षण घेत असतात मात्र इमारत धोकादायक बनली आहे आणि त्यामध्ये आता पुन्हा दुरुस्तीचं काम सुरू असताना खाली सिमेंट काँक्रीटचे काम न करता केवळ माती मिश्रित खडक टाकून दुरुस्तीचे काम होत असल्याचा प्रकार समोर आला आहे कोट्यावधी रुपये खर्च करून होत असलेल काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचा प्रकार समोर आला आहे संबंधित विभागाने या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी होत आहे
0
0
Report

ACB ने भू-करमापक सहित दो आरोपियों को लाच के साथ गिरफ्तार किया

Chandrapur, Maharashtra:शासकीय कार्यालयांत सर्वसामान्यांची अडवणूक करून मलिदा लाटणाऱ्या लाचखोरांना चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) दणका दिला आहे. नागभीड येथील भूमी अभिलेख कार्यालयातील परीरक्षण भू-करमापक रंजीत रामचंद्र कनोजकर आणि त्याचा खासगी पंटर जयंत दीपक कामडी या दोघांना १० हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे भूमी अभिलेख विभागात खळबळ उडाली आहे. तक्रारदार राहत असलेली जागा आणि त्यांच्या आजोबांच्या नावे असलेल्या घराच्या जागेचा फेरफार वडिलांच्या नावावर करावयाचा होता. या अधिकृत कामासाठी तक्रारदाराने नागभीड भूमी अभिलेख कार्यालयात रीतसर अर्ज दाखल केला होता. मात्र, हक्काच्या कामासाठीदेखील भू-करमापक रंजीत कनोजकर याने चक्क १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणीकेली. लाच देण्याची अजिबात नसल्याने इच्छा तक्रारदाराने थेट चंद्रपूर लाचलुचपत प्रतिबंधक लाचखोर भूकरमापक विभागाकडे रंजीत कनोजकर लेखी तक्रार नोंदवली. एसीबीच्या पथकाने तक्रारीची शहानिशा करण्यासाठी पंचांसमक्ष पडताळणी केली. तडजोडीअंती १० हजार रुपये लाच देण्याचे ठरले. भूकरमापक कनोजकर याने स्वतः पैसे न घेता, तळोधी येथील त्याचा खासगी माणूस जयंत कामडी याच्याकडे ही रक्कम सुपूर्द करण्यास तक्रारदाराला सांगितले. नियोजनानुसार, तक्रारदाराने लाचेची १० हजार रुपयांची रक्कम आरोपी जयंत कामडी याच्या हातात देताच दबा धरून बसलेल्या एसीबीच्या पथकाने झडप घालून त्याला रंगेहात पकडले. मुख्य सूत्रधार भू-करमापक रंजीत कनोजकर यालाही तत्काळ ताब्यात घेण्यात आले.
0
0
Report

सातारा नगरपालिका की नई भव्य इमारत का उद्घाटन जल्द; उदयनराजे भोसले ने निरीक्षण किया

Satara, Maharashtra:सातारा - सातारा नगरपालिकेची भव्य-दिव्य नवी इमारत साकार झाली आहे. या नव्या इमारतीची पाहणी खा. उदयनराजे भोसले आणि त्याचा सातारा विकास आघाडीच्या नगरसेवकांनी केली. शहराच्या वाढत्या गरजा लक्षात घेता जुन्या इमारतीची मर्यादा स्पष्टपणे जाणवत होती. नवीन जागेच्या शोधापासून ते निधी उभारणीपर्यंत अनेक अडचणी समोर होत्या. मात्र सर्व घटकांनी एकत्रितपणे प्रयत्न केल्यामुळे हा महत्त्वाकांक्षी प्रकल्प पूर्णत्वास आला. साताऱ्याच्या वैभवात भर घालणारी ही आधुनिक प्रशासकीय इमारत लवकरच नागरिकांच्या सेवेसाठी पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून, तिच्या भव्य उद्घाटनाचा कार्यक्रमही लवकरच आयोजित केला जाणार असल्याची माहिती देण्यात आली. शहराच्या विकासाचा नवा अध्याय ठरणाऱ्या या इमारतीचे श्रेय आजी-माजी सर्व नगरसेवक, पदाधिकारी आणि सातारा शहरातील नागरिकांना जात असल्याचे यावावेळी सांगण्यात आले. बाईट खासदार उदयनराजे भोसले
0
0
Report
Advertisement

गर्मी और रोग से अनार बाग उखाड़कर किसानों ने ट्रैक्टर चलाकर बाग नष्ट किया

Yeola, Maharashtra:जून महिन्याच्या पहिल्या सप्ताहामध्ये उन्हाची तीव्रता अधिक वाढल्याने फळबाग जगणे मुश्किल होत आहे त्यातच डाळिंब बागेवर तेल्या रोगाचा प्रादुर्भाव वाढल्यामुळे जळगाव नेऊर येथील डाळिंब उत्पादक शेतकरी पवन शिंदे, गोकुळ शिंदे व योगेश शिंदे यांनी आपल्या सहा एकर डाळिंब बागेवर ट्रॅक्टर फिरवून बाग नष्ट केली आहे चार वर्षे बाग उभी करण्यासाठी आलेला खर्च, उत्पादनात असलेली तफावत यामुळे शेतकऱ्यांनी हा निर्णय घेतला असून शासनाने शेतकरी हिताचे निर्णय घेऊन शेतकऱ्यांना मदत करावी अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे
0
0
Report

भीम नगर में पानी टंकी नहीं, डबकों से प्यास बुझाने पर मजबूर नागरिक

Akola, Maharashtra:एकीकडे शासनाकडून प्रत्येक नागरिकाला स्वच्छ आणि सुरक्षित पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्याचे दावे केले जात असताना, अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीमनगर परिसरात मात्र नागरिकांना आजही पिण्याच्या पाण्यासाठी हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. हे चित्र आहे अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर शहरातील भीम नगरातील धक्कादायक बाब म्हणजे, येथील नागरिकांना चक्क डबक्यात साचलेले पाणी भरून आपली तहान भागवावी लागत आहे. मूर्तिजापूर शहराच्या बायपास रोडलगत असलेल्या भीमनगर परिसरात अनेक दिवसांपासून नियमित पाणीपुरवठा होत नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. परिणामी महिलांसह लहान मुलांनाही पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. परिसरात साचलेल्या डबक्यातून नागरिक पाणी भरताना दिसत असून, यामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. हे पाणी पिण्यासाठी आणि घरगुती वापरासाठी वापरले जात असल्याने आजार पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे, वारंवार तक्रारी करूनही संबंधित प्रशासन आणि लोकप्रतিনিধींनी या समस्येकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. उन्हाळ्याच्या तीव्र झळा आणि वाढत्या तापमानामुळे पाण्याची गरज अधिक असताना भीमनगरवासीयांना मूलभूत सुविधांसाठी संघर्ष करावा लागत आहे. स्वच्छ पिण्याचे पाणी हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क असताना प्रशासनाच्या निष्क्रियतेमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. भीमनगर परिसरातील पाणीटंचाईची समस्या तातडीने सोडवून नियमित आणि स्वच्छ पाणीपुरवठा करण्यात यावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येकडे कितपत गांभीर्याने पाहते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. डबक्यातील पाणी भरून तहान भागविण्याची वेळ नागरिकांवर येणे ही प्रशासनासाठी निश्चितच चिंतेची बाब आहे. भीमनगरवासीयांच्या पाणी समस्येवर तातडीने तोडगा निघणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

अभय सिंह जगताप का स्थानीय मुद्दों पर महाविकास आघाडी का हमला

Satara, Maharashtra:सातारा: सांगली-सातारा स्थानीय स्वराज्य संस्थेचे महाविकास आघाडीचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी उमेदवारी जाहीर झाल्यानंतर प्रथमच साताऱ्यात सध्याच्या राजकीय घडामोडीवर भाष्य केले आहे. सांगली-साताराआवघड विधानसभा क्षेत्र हा क्रांतिकारी विचारांचा जिल्हा आहे. सध्या सत्ताधारी महायुतीत अंतर्गत प्रचंड धुसफुस सुरू असून, तिथल्या नगरसेवकांपासून ते मंत्र्यांपर्यंत सर्वांची निधीअभावी कोंडी केली जात आहे. केंद्रात आणि राज्यात हे पक्ष एकत्र दिसत असले, तरी स्थानिक पातळीवर त्यांच्यावर मोठा अन्याय होत आहे. त्यामुळे ही निवडणूक केवळ राजकीय नसून अन्यायग्रस्तांच्या स्वाभिमानाची लढाई आहे, असा घणाघात महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार अभयसिंह जगताप यांनी महायुतीवर केला आहे.
0
0
Report
Advertisement

मानसूनपूर्व भीषण बरसात से सातारा जिले में जनजीवन प्रभावित, बिजली आपूर्ति बाधित

Satara, Maharashtra:माण सातारा - माण तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाने झोडपून काढले आहे. म्हसवड, देवापूर, कुकुडवाड, वरकुटे-मलवडी आणि गोंदवले परिसरात पावसाने जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी मुसळधार तर कुकुडवाड परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याचे चित्र पाहायला मिळाले. या जोरदार पावसामुळे वरकुटे-मलवडी येथील आठवडी बाजार परिसर पाण्याखाली गेला. तर कुकुडवाड-मायणी मार्गावर झाड कोसळल्याने वीज खांब आणि विद्युत तारा तुटल्या. परिणामी मायणी फिडरची वीजपुरवठा यंत्रणा बंद पडली आणि म्हसवडसह परिसरातील अनेक गावांचा वीजपुरवठा खंडित झाला.महावितरणचे कर्मचारी वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. अचानक झालेल्या मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले.
0
0
Report

गंगाखेड नगर परिषद भर्ती घोटाला: बिना अनुमति 20 करोड़ की जमीन गुट्टे प्रतिष्ठान को

Parbhani, Maharashtra:अँकर -परभणीच्या गंगाखेड नगरपरिषद मध्ये शासकीय राजवटीच्या काळात बेकायदा नोकर भरती घनकचरा व्यवस्थापनातील गैरव्यवहार गंगाखेड शहरातील 20 कोटी रुपयांची जागा शासनाची परवानगी न घेता गुट्टे प्रतिष्ठानला देण्यात आल्याचा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते मिथिलेश केंद्रे यांनी पत्रकार परिषद घेत आरोप केले आहेत याशिवाय अस्तित्वात नसलेल्या बनावट आवक जावक क्रमांकाचा वापर करून चौथी जणांची नोकर भरती करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला आहे संबंधित भरती प्रक्रियेत कागदपत्रांमध्ये फेरफार करून नियमबाह्य नियुक्ती देण्यात आल्याचा दावा करत या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे
0
0
Report

रत्नागिरी में मानसूनपूर्व खतरों के बीच 181 गांव दरड़प्रवण; 6 तहसीलों में बाढ़ से चेतावनी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत मान्सूनपूर्व वारे; १८१ गावे दरडप्रवण, तर ६ तालुके पूरप्रवण क्षेत्रात. रत्नागिरी जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने हजेरी लावली असून संभाव्य आपत्तीचा सामना करण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. यंदा जिल्ह्यातील १८१ गावे दरडप्रवण तर चिपळूण,खेड,संगमेश्वर,लांजा,रत्नागिरी आणि राजापूर हे ६ तालुके पूरप्रवण क्षेत्रात जाहीर करण्यात आले आहेत. पावसाळ्यात आंबा,अनुस्कुरा,कुंभार्ली,परशुराम,भोस्ते आणि कशेडी या ६ घाटांमध्ये दरडी कोसळण्याचा मोठा धोका आहे. तसेच अतिवृष्टीमुळे अल्सुरे,कारुळ, हरचेरी,तोंणदे,सोमेश्वर,गोळप,माचाळ आणि चिंचूरटी या ८ गावांचा संपर्क तुटण्याची शक्यता आहे. या सर्व संवेदनशील भागांवर जिल्हा प्रशासन विशेष लक्ष ठेवून असून सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत..
0
0
Report
Advertisement

वरूड में बेमौसम आंधी-गारपिटी से संतरा-मोसंबी की फसलों को बड़ा नुकसान

Amravati, Maharashtra:वरूड तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपिटीने संत्रा, मोसंबी पिकाचे मोठे नुकसान; १४२ गावांना फटका, 29 हजार 770 हेक्टर शेतीचे नुकसान शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्या भाजपा आमदार उमेश यावलकर यांची मागणी अँकर :- अमरावती जिल्ह्यात 30 आणि 31 मे दरम्यान झालेल्या वादळी पाऊस आणि गारपिटीने फळबागांना मोठा फटका बसला आहे. विशेषतः संत्रा आणि मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वरूड तालुक्यात तब्बल 25 हजार 186 शेतकरी बाधित झाले असून 142 गावांना फटका बसला आहे. त्यामुळे 29 हजार 770 हेक्टरवरील संत्रा मोसंबी पिकांचे नुकसान झाल्याची प्राथमिक नोंद आहे. गारपिटीमुळे फळगळ आणि झाडांचे नुकसान झाल्याने शेतकऱ्यांसमोर आर्थिक संकट उभे ठाकले आहे. दरम्यान प्रशासनाकडून पंचनामे सुरू असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे. यावेळी वरूड विधानसभा मतदार संघाचे आमदार उमेश यावलकर यांनी पंचनाम्याचा अहवाल कृषिमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे पाठवला आहे. सोबतच नुकसान भरपाईची मागणी केली आहे. बाईट :- उमेश यावलकर, आमदार वरुड
0
0
Report

भंडारा के खोडगाव में सूर नदी में युवक की डूबकर मौत, परिजनों में शोक

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या खोडगाव येथे सूर नदीत बुडून तरुणाचा मृत्यू. शलाब मोहन कडव (वय ३२, रा. शिवनगरी, भंडारा) असे मृत तरुणाचे नाव आहे. धार्मिक कार्यक्रमानिमित्त खोडगाव येथे आलेल्या कडव कुटुंबातील शलाब हा दर्शनानंतर अंघोळीसाठी नदीपात्रात उतरला होता. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने तो प्रवाहात ओढला गेला. त्याचा भाऊ विक्रमने मदतीसाठी आरडाओरड केली, परंतु जोरदार प्रवाहामुळे त्याला वाचवता आले नाही. वरठी पोलिसांच्या सुमारे तीन तासांच्या शोधमोहिमेनंतर त्याचा मृतदेह सापडला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
0
0
Report
Advertisement

सिंहस्थ कुंभमेळे के साधुग्राम के लिए बजट: 2287 करोड़ रु भू-सम्पादन

Nashik, Maharashtra:- सिंहस्थ कुंभमेळ्यातील साधुग्राम प्रकल्पासाठी मोठा निधी मंजूर - तपोवन परिसरातील साधुग्राम उभारणीसाठी १९१.२१ एकर जमिनीच्या भूसंपादनाला मिळणार गती - राज्य शासनाकडून भूसंपादनासाठी २,२८७ कोटी रुपयांच्या निधीस मंजुरी - कुंभमेळ्यात येणाऱ्या लाखो भाविक आणि साधू-महंतांच्या सुविधांसाठी महत्त्वाचा निर्णय - निधीचा वापर केवळ भूसंपादनासाठीच करण्याची शासनाची अट - भविष्यातील वाद टाळण्यासाठी सेटलमेंटची जबाबदारी महापालिकेवर - सिंहस्थ कुंभमेळा २०२७ च्या तयारीला वेग, प्रशासनाकडून नियोजनाला चालना
0
0
Report

निलेश लंके ने पाटबंधारे कार्यालय के स्थानांतरण पर विरोध जताया, आंदोलन की चेतावनी

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर पाटबंधारे विभाग आणि मुळा पाटबंधारे विभाग कार्यालयाच्या प्रस्तावित स्थलांतराला खासदार निलेश लंके यांनी विरोध केला आहे पाटबंधारे विभागाच कार्यालय राहाता तालुक्यातील लोणी येथे स्थलांतर प्रस्तावित करण्यात आले आहेत. शहरातील मोक्याच्या जागेवर हे कार्यालय असल्यामुळे कार्यालय आपल्या सोयीच्या ठिकाणी नेऊन कार्यालयाची जागा हडपण्याचा डाव विखेंचा असल्याचा आरोप खासदार लंके यांनी केला आहे या स्थलांतराला कर्मचाऱ्याकडून देखील विरोध होतं आहे. गेल्या 100 वर्षांपासून हे कार्यालय नगर शहरात आहे आम्ही स्थलांतरीत होऊ देणार नाही वेळ पडल्यास आंदोलन करण्याचा इशारा खासदार लंके यांनी दिला आहे....
0
0
Report

Chudawa में सिमेंट स्लीपर प्लांट के विरोध में किसान, परियोजना रद्द करने की मांग

Parbhani, Maharashtra:अँकर - परभणीच्या पूर्णा तालुक्यातील चुडावा येथे होत असलेल्या सिमेंट स्वीपर प्रकल्पाला शेतकऱ्यांनी विरोध केला आहे.. चुडावा येथे कृषी शेतजमीनीवर सिमेंट स्लीपर उत्पादक Prकल्प होत असून प्रकल्पाला चुडावा सोनपेठ वाई या गावासह अनेक गावातील शेतकऱ्यांनी विरोध दर्शवला आहे या प्रकल्पामुळे बाजूच्या शेतकऱ्यांचे सिमेंट धूळ औद्योगिक उत्सर्जनामुळे पिकाचे उत्पादन भाजीपाला उभी पिके बाधित होणार असल्याने शेतकऱ्यांनी सिमेंट प्रकल्प रद्द करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top