icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

देहू की वारी में नन्ही बच्ची ने काठवट वाडा से परंपरा जिंदा रखी

Varsoli, Maharashtra:देहूच्या पालखी सोहळ्यात भक्ती, परंपरा आणि संस्कृतीचे अनेक रंग अनुभवायला मिळतात. आबालवृद्धांपासून ते ज्येष्ठांपर्यंत प्रत्येकजण या वारीत सहभागी होत असतो. मात्र यंदा देहू नगरीत एका चिमुकलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. मोबाईलच्या युगात हरवत चाललेले पारंपरिक 'काठवट वाडा' हे खेळणे ती अगदी उत्साहाने खेळताना दिसली. विशेष म्हणजे, हा खेळ तिला तिच्या आजीकडून शिकायला मिळाला आहे. एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे संस्कृतीचा आणि परंपरेचा वारसा अशाच प्रकारे जतन होत असल्याचे हे सुंदर चित्र देहूच्या वारीत पाहायला मिळाले. भक्तीबरोबरच संस्कार आणि लोकपरंपरा जपणारी ही चिमुकली सध्या भाविकांचे आकर्षण ठरत आहे.
0
0
Report

तुकोब की पालखी के सामने मुस्लिम मुलानी परिवार का ताशा वादन प्रेरणादायक परंपरा

Varsoli, Maharashtra:Head line: तुकोबांच्या पालखीत मुस्लिम मुलाणी कुटुंबाचा मान ताशाच्या तालातून सर्वधर्मसमभावाचा संदेश Anchor : संतीं चा वार ? भक्तीची परंपरा ? आणि सर्वधर्मसमभावाचा जिवंत संदेश! संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात अनेक परंपरा आजही तितक्याच श्रद्धेने जपल्या जातात. त्यापैकीच एक अनोखी परंपरा म्हणजे पालखीसमोर ताशा वाजविण्याचा मान मुस्लिम मुलाणी कुटुंबाकडे आहे. तब्बल चार पिढ्यांपासून हे कुटुंब ताशाच्या दमदार तालातून तुकोबांची सेवा करत आहे. पालखीच्या अग्रभागी नगारा आणि चौघड्याच्या निनादात ताशाचा दणदणाट घुमत राहतो आणि त्याच तालावर भक्तीचा सोहळा अधिकच रंगतो. धर्माच्या सीमा ओलांडून सेवाभाव आणि श्रद्धेचा वारसा जपणाऱ्या मुलाणी कुटुंबाची ही परंपरा वारीतील सर्वधर्मसमभावाचे प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे. तुकोबांची सेवा करण्याचे भाग्य लाभल्याचा आनंद व्यक्त करत, ही परंपरा पुढील पिढ्यांपर्यंत कायम ठेवण्याचा निर्धार मुलाणी कुटुं Barked.
0
0
Report
Advertisement

नदी में डूबे दो युवक; एक की मौत, दूसरा खोज जारी CCTV में कैद

Navi Mumbai, Maharashtra:पनवेल तालुक्यातील वाघाची वाडी जवळील नदीत पोहत असताना पाण्याच्या प्रवाहात एक जण वाहून गेला असून दुसऱ्याचा मृत्यू झालाय. मयत तरुणाचे नाव सुमित पवार असे आहे तर वाहून गेलेल्या तरुणाचे नाव नयन म्हात्रे असे आहे. सुमित पवार, नयन म्हातार्े आणि इतर आठ जण हे वाघाची वाडी नदी, धोदाणी गाव येथे फिरण्यासाठी गेले होते. नदीपात्रात नदीच्या प्रवाहात नयन म्हात्रे भवऱ्यात अडकला. यावेळी सुमित पवार हा त्याला वाचवण्यासाठी गेला असता तो देखील नदीच्या पाण्यातील भवऱ्यामध्ये अडकला. मुसळधार पाऊस कोसळत असल्याने पाण्याचा प्रवाहाचा वेग जास्त होता. त्यामुळे नयन म्हात्रे हा पाण्यामध्ये वाहून गेला. त्यानंतर मित्रांनी नदीपात्रात उतरून पाण्यामध्ये वाहून जाणाऱ्या सुमित पवार याला पकडले आणि नदीच्या बाहेर आणले. यावेळी त्याच्या नाका- तोंडात पाणी गेल्याने त्याला रुग्णालयात घेऊन गेले असता डॉक्टरांनी त्याला मृतघोषित केले. तर वाहून गेलेल्या नयन म्हात्रे याचा शोध बचाव पथकाकडून घेतला जात आहे.
0
0
Report
Advertisement

तेज़ मॉनसून से टमाटर और मिर्च की फसल को खतरा, किसान चिंतित

Niphad, Maharashtra:हवामान विभागाने दिलेल्या इशारानुसार निफाड तालुक्यातील खडक माळेगाव, कोटमगाव परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे टोमॅटो व मिरची उत्पादक शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. जोरदार पावसामुळे अनेक शेतांमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून, त्यामुळे टोमॅटो आणि मिरची पिकांचे नुकसान होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. टोमॅटो व मिरची ही पिके कमी पाण्यावर चांगली येणारी असल्याने शेतात दीर्घकाळ पाणी साचल्यास मुळे कुजणे, रोगांचा प्रादुर्भाव वाढणे आणि उत्पादनात मोठी घट होण्याची शक्यता असते. या पिकांसाठी शेतकऱ्यांनी मोठा खर्च करून लागवड केली असून, मुसळधार पावसामुळे केलेला खर्च वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. पावसाचा जोर कायम राहिल्यास टोमॅटो व मिरची पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होण्याची शक्यता असल्याने उत्पादक शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.
0
0
Report

लासलगांव क्षेत्र में भारी बारिश ने फसलें और जल संचय को दी राहत

Lasalgaon, Maharashtra:Anchor:- हवामान विभागाने दिलेल्या इशाऱ्यानुसार लासलगावसह परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवनासह शेतीला मोठा दिलासा मिळाला आहे या दमदार पावसामुळे लासलगावजवळील कोटमगाव येथील मानवनिर्मित तलाव शंभर टक्के भरला आहे कोटमगाव रेल्वे पुलाखालून शेतातील पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात गाढवे नाल्यात आल्याने काही काळ पूरजन्य परिस्थिती निर्माण झाली होती या पाण्याच्या ओघामुळे मानवनिर्मित तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने परिसरातील विहिरींच्या पाणीपातळीत वाढ होणार आहे समाधानकारक पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण दिसत आहे
0
0
Report
Advertisement

लातूर में डबल स्टिकर से एक्सपायर्ड दवाओं की आपूर्ति, किसानों में भारी नाराज़गी

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज..\n\nगट शेती मधून शेतकऱ्यांची फसवणूक ?... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस... डबल स्टिकर लावून एक्सपायरी औषधांचा पुरवठा करणाऱ्यावर कार्यवाही करा.. शेतकऱ्यांची मागणी....\n\nAC ::- गट शेतीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित करण्यात आलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबಳ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात आल्याचा आरोपी शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी वैभव बालकुंदे यांनी...\n\n
0
0
Report

गोवर्धन में उप तहसील कार्यालय: नागरिकों को मिलेगा सीधी सुविधा

Washim, Maharashtra:वाशीम: वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यात प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालय केनवड ऐवजी गोवर्धन येथे स्थापन करावे,या मागणीसाठी गोवर्धनसह परिसरातील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. केनवड हे गाव तालुक्याच्या एका टोकाला असल्याने नागरिकांची गैरसोय होईल, तर मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गोवर्धन येथे कार्यालय झाल्यास अधिक नागरिकांना त्याचा लाभ मिळेल,असे आंदोलकांचे म्हणणे आहे. तसेच कार्यालयासाठी आवश्यक जमीन आणि इतर सुविधा गोवर्धन येथे उपलब्ध असल्याने अप्पर तहसील कार्यालय तेथेच मंजूर करावे,अशी मागणी करण्यात आली.
0
0
Report

जालना: गाली-धमकी देने वाले के खिलाफ FIR नहीं, महिला ने घंटेभर सड़क पर प्रदर्शन किया

Jalna, Maharashtra:जालना : शिवीगाळ करणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं महिलेचं 3 तास रस्त्यावर आंदोलन अँकर: शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या व्यक्तीवर पोलीस गुन्हा दाखल करत नसल्यानं एका महिलेनं रस्त्याच्या मध्यभागी बसून तब्बल 3 तास आंदोलन केलंय.जालन्यातील मंठा शहरात ही घटना घडली.40 वर्षीय सुनीता डांगे असं आंदोलन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.दरम्यान या महिलेने आंदोलन सुरू केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी आंदोलन स्थळी धाव घेत महिलेची समजूत घालून तिला पोलीस ठाण्यात नेलं.त्यांनंतर तिची तक्रार घेऊन आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.आंदोलक महिलेच्या घरासमोर आरोपी पांडुरंग काळे याने दुचाकी उभी केली होती.घरासमोर दुचाकी उभी करण्यास या महिलेनं विरोध केला असता आरोपी पांडुरंग काळे याने या महिलेला शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिली.दरम्यान पोलीस ठाण्यात जाऊनही महिलेची तक्रार घेण्यास पोलीस तयार नव्हते. अखेरीस महिलेनं मंठा शहरातील मुख्य रस्त्यावर बसून पोलिसांविरोधात आंदोलन केलं. त्यानंतर पोलिसांनी या महिलेच्या आंदोलनाची दखल घेत आरोपी विरोधात अदखलपात्र गुन्हा दाखल केला.दरम्यान मंठा पोलीस या प्रकरणी अधिक तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement

महाड में बाढ़ का पानी घटा; MIDC के फायर फाइटर से सफाई पर जोर

Chendhare, Maharashtra:महाड शहरातील पुर ओसरला ...... स्वच्छतेसाठी एमआयडीसी तील फायर फायटर ...... विकास गोगावले यांनी केली महाडची पाहणी अँकर - सावित्री नदीला आलेल्या पुराचे पाणी आज ओसरले असून पुराचे पाणी ज्या भागात होते तेथे चिखल आणि घाणीचे साम्राज्य निर्माण झाले आहे. जिल्हा परिषद सदस्य विकास गोगावले यांनी स्वच्छतेसाठी एमआयडीसी मधील फायर फायटरचा वापर करण्याच्या सूचना या वेळी अधिकाऱ्यांना करीत तशा आशयाचे फोन कारखानदारांना केले. पुरानंतरच्या अस्वच्छतेमुळे रोगराई पसरू नये यासाठी प्रयत्न सुरु करण्यात आले आहेत. बाईट - विकास गोगावले
0
0
Report

लातूर के समूह-खेतों में एक्सपायर्ड दवाओं पर नया स्टिकर, किसानों ने धोखाधड़ी का आरोप

Latur, Maharashtra:गट शेती माध्यमातून शेतकऱ्यांना वितरित केलेल्या काही शेती औषधांवर डबल स्टिकर लावून एक्सपायरीची तारीख बदलल्याचा गंभीर प्रकार समोर आल्याने लातूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मुदत संपलेली औषधे नव्या एक्सपायरीच्या स्टिकरसह शेतकऱ्यांना देण्यात अल्याार्ा दावा शेतकऱ्यांनी केला आहे. या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत. लातूर जिल्ह्यातील विविध शेतकरी गटांना ही शेती औषधे वितरित करण्यात आली आहेत. गट शेती योजनेअंतर्गत प्रत्येक शेतकरी गटाला बियाणे आणि औषधे मिळवण्यासाठी प्रथम ऑनलाइन अर्ज करावा लागतो. त्यानंतर लॉटरी पद्धतीने पात्र गटांची निवड केली जाते आणि त्यांना बियाणे तसेच शेती औषधांचे वाटप केले जाते. एकट्या औसा तालुक्यातच २८ शेतकरी गट असून, या गटांनाही संबंधित औषधांचा पुरवठा झाल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे या औषधांचा वापर केलेल्या शेतकऱ्यांमध्ये मोठा संभ्रम निर्माण झाला आहे. म्हणून वितरित करण्यात आलेल्या सर्व औषधांची स्वतंत्र तपासणी करून वस्तुस्थिती स्पष्ट करावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. शेतकऱ्यांच्या हाती आलेल्या काही औषधांच्या बाटल्यांवर डबल स्टिकर असल्याचा प्रकार समोर आला आहे. शेतकऱ्यांच्या म्हणण्यानुसार, वरचा स्टिकर काढल्यानंतर खाली वेगळी एक्सपायरी तारीख दिसून आली. त्यामुळे मुदत संपलेल्या औषधांवर नवीन एक्सपायरीचा स्टिकर लावण्यात आला का, असा प्रश्न शेतकऱ्यांनी उपस्थित केला आहे. दरम्यान, या प्रकरणी संबंधित यंत्रणेने स्पष्टीकरण देणारे पत्र जारी केले आहे. त्यानुसार, वेळेत नवीन स्टिकर उपलब्ध न झाल्यामुळे जुने स्टिकर वापरण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे. तसेच संबंधित जैविक जीवाणू संघाचे उत्पादन मे २०२६ मध्ये करण्यात आल्याचा दावाही करण्यात आला आहे. मात्र, बाटल्यांवर डबल स्टिकर का लावण्यात आले, त्यासाठी कोणती प्रक्रिया अवलंबली गेली आणि याबाबत शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करण्याची जबाबदारी कोणाची, असे प्रश्न अद्याप कायम आहेत... एकीकडे अधिकृत स्पष्टीकरण देण्यात आले असले, तरी दुसरीकडे डबल स्टिकरमुळे निर्माण झालेला संशय अद्याप कायम आहे. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे आणि दोषी आढळल्यास कठोर कारवाई करावी, अशी मागणी आता शेतकरी करत आहेत....
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top