icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मराठा नेता जरांगे का आमरण उपोषण खत्म हुआ, सरकार ने समाधान का आश्वासन दिया

Jalna, Maharashtra:जालना : मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांचं आमरण उपोषण पहिल्याच दिवशी सोडवण्यात विखे, लाड यांच्या शिष्टमंडळाला यश उपोषणानंतर जरांगे उपचारासाठी छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात दाखल 3 दिवसांत सर्वच मागण्यांच्या सरकार, अध्यादेश आणि सूचना काढणार-जरांगे सरकारने मागण्याची अंमलबजावणी केली नाही तर पुन्हा मुंबई-जरांगे सातारा गॅझेट लागू करण्यासह मराठा आंदोलकांवरील सर्व केसेस मागे घेण्यासाठी जरांगेंनी दिली सरकारला 1 महिन्यांची मुदत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रणरणत्या उन्ह्यात बसून आमरण उपोषण सुरु केलं होतं. जरांगे यांचं हे उपोषण सोडवण्यात राज्य सरकारच्या राधाकृष्ण विखे पाटील आणि आमदार प्रसाद लाड यांच्या शिष्टमंडळाला पहिल्याच दिवशी सोडवण्यात यश आलं आहे. जरांगे यांना ज्यूस पाजून हे उपोषण सोडवण्यात रात्री उशिरा यश आलं. सातारा गॅझेट लागू करण्यासह मराठा आंदोलकांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी जरांगे यांनी एक महिन्याची मुदतवाढ सरकारला दिली आहे. तर उर्वरीत सर्वच मागण्यांची सूचना आणि अध्यादेश राज्य सरकार कडून 3 दिवसांत काढण्यात येणार आहे. त्यामुळे जरांगे यांनी अखेर त्यांचं उपोषण मागे घेतलं आहे.दरम्यान उपोषण सोडल्यानंतर जरांगे यांना छत्रपती संभाजीनगरच्या खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. मागण्यांची पूर्तता न झाल्यास मुंबई आंदोलनाचा ईशारा जरांगे यांनी राज्य सरकारला दिला आहे.तर जरांगे यांच्या नेतृत्वाखाली समाजाला न्याय मिळतो अशी प्रतिक्रिया राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यांबाबत सकारात्मक भूमिका घेतल्यानं मि त्यांचे आभार मानतो असं विखे पाटलांनी म्हटलं आहे. राधाकृष्ण विखे फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली आरक्षण देण्याची भूमिका घेतली होती... या आंदोलनात त्यांनी केलेल्या मागण्याबाबत त्यांनी सकारात्मक भूमिका घेतली, फडणवीस यांची। आभार मानतो, त्यांनी मराठा समाजाच्याबाबत सतत भूमिका घेतली आहे.... जरांगे यांच्या भूमिकेमुळे समाजाला न्याय मिळतो, जरांगेांनी आपले उपोषण स्थगित करावे ही विनंती करतो...
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा सीट के लिए कांग्रेस ने शैलेश कुमार अग्रवाल को उम्मीदवार घोषित किया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषद निवडणुकीसाठी काँग्रेसकडून शैलेश कुमार अग्रवाल यांचं नाव निश्चित झाले आहे. चंद्रपूर शहरातील एका हॉटेलमध्ये काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांची गुप्त बैठक झाली. याच बैठकीत वर्धा जिल्ह्यातील काँग्रेस नेते शैलेश कुमार अग्रवाल यांचं नाव निश्चित करण्यात आलं. या बैठकीला काँग्रेसचे गटनेते विजय वडेट्टीवार, खासदार प्रतिभा धानोरकर, माजी राज्यमंत्री रणजीत कांबळे आणि काँग्रेसचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष सुभाष धोटे यांची उपस्थिती होती. शैलेश अग्रवाल सोमवारी चंद्रपूर येथे उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याची माहिती सुभाष धोटे यांनी दिली आहे. शैलेश कुमार अग्रवाल हे काँग्रेस प्रदेश कार्यकारणी चे सदस्य आणि काँग्रेस च्या किसान मोर्चाचे राष्ट्रीय समन्वयक आहेत.
0
0
Report

यवतमाळ पुलिस ने मंत्री पद के लालच में करोड़ों की धोखाधड़ी गैंग को गिरफ़्तार किया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ केंद्रात राज्यमंत्री दर्जाचे पद मिळून देण्यासाठी आर्थिक फसवणूक करणाऱ्या टोळीला यवतमाळ पोलिसांनी अटक केली आहे. भाजपा जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची या टोळीने पन्नास हजार रुपयांनी फसवणूक केली. केंद्रात राज्यमंत्रीपद देण्याचे आमिष दाखवून 20 कोटी पन्नास लाख रुपयांची मागणी भुतडा यांना करण्यात आली होती, करिता टोकन अमाऊंट म्हणून एक कोटी रुपये मागितले. दरम्यान फसवणूक होत असल्याचे निदर्शनास आल्याने भुतडा यांनी माजी मंत्री मदन येरावार यांच्या कार्यालयात स्पाय वायफाय मेटल क्लॉक बसवून फसवणूक करणाऱ्या आरोपींची रेकॉर्डिंग केली. आरोपींनी 42 महामंडळांची बनावट यादी व कागदपत्र दाखवून केंद्रीय राज्यमंत्री दर्जाच्या पदाचे आमिष दाखविले. भूतडा यांनी बॅग मध्ये खाली कागदी रिम ठेऊन त्यावर 50 हजार रुपये ठेवून बॅग आरोपींना दिली होती. लौकिक फुलकर गणेश राठोड व विश्वजीत राठोड, सर्व राहणार यवतमाळ ही आरोपींची नावे आहेत.
0
0
Report

खेड में डंपर की टक्कर, एक व्यक्ति की मौत, रिक्षाचालक घायल—पुलिस जांच शुरू

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. खेडमध्ये भीषण अपघात! भरधाव डंपरची रिक्षाला जोरदार धडक.. एकाचा जागीच मृत्यू, रिक्षाचालक गंभीर जखमी!.. खेड तालुक्यातील भरणे-खेड मार्गावरील आठवडा बाजार परिसरात सायंकाळी एका भरधाव डंपरने रिक्षाला पाठीमागून जोरदार धडक दिली.. या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला आहे,तर रिक्षाचालक गंभीर जखमी झाला आहे.. ​धडक इतकी भीषण होती की रिक्षाचा मागील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला आहे.. संतोष भिलारे असं गंभीर जखमी झालेल्या रिक्षाचालकाचं नाव असून,त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.. मात्र,मृत व्यक्तीची ओळख अद्याप पटलेली नाही.. ​अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि खेड पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केलं.. या अपघाताचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत..
0
0
Report
Advertisement

2035 तक ST पूरी तरह इलेक्ट्रिक, किराया बढ़ने के संकेत

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-रत्नागिरी २०३५ पर्यंत एसटी पूर्णपणे इलेक्ट्रिक होणार.. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांचे तिकीट दरवाढीचे संकेत!.. राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक सध्या कोकण दौऱ्यावर असून त्यांनी एसटी महामंडळाबाबत अत्यंत महत्त्वाच्या घोषणा केल्या आहेत. चिपळूण बस स्थानकाचे काम तात्काळ पूर्ण करून त्यासाठी वाढीव निधी देण्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. तसेच पुढील ३ महिन्यांत काही बस स्थानकांचा पीपीपी तत्त्वावर विकास केला जाईल,अशी माहिती त्यांनी दिली. दरम्यान,वाढत्या इंधन दरांमुळे एसटीचा खर्च वाढल्याने,आगामी काळात एसटी तिकीट दरात वाढ होण्याचे संकेत मंत्र्यांनी दिले आहेत.. मात्र,प्रवाशांना दिलासा देण्यासाठी २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या सर्व बसेस टप्प्याटप्प्याने इलेक्ट्रिक करण्याचा मोठा संकल्पही त्यांनी जाहीर केला आहे..
0
0
Report

2035 तक एसटी फ्लीट इलेक्ट्रिक, PPP से बस स्टेशनों का विकास

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या रत्नागिरी दौऱ्यातील महत्त्वाचे मुद्दे: बस स्थानकांचे आधुनिकीकरण आणि पाहणी दौरा.. कोकण दौरा... नवी मुंबईपासून पाली, महाड,माणगाव, चिपळूण करत थेट गोव्याच्या सीमेपर्यंतच्या सर्व बस स्थानकांची प्रत्यक्ष पाहणी करणार.. चिपळूण बस स्थानक.. चिपळूण बस स्थानकाचे काम लवकरात लवकर पूर्ण केले जाईल. या कामासाठी निधी कमी पडत असल्यास,राज्य शासनाच्या माध्यमातून वाढीव निधी उपलब्ध करून दिला जाईल. *लोकार्पण रखडले:* एसटी महामंडळाची काही कामे पूर्ण झाली आहेत, परंतु आचारसंहितेमुळे त्यांचे लोकार्पण करता येत नाहीये. *PPP मॉडेल:* पुढील ३ महिन्यांत काही महत्त्वाच्या बस स्थानकांच्या विकासासाठी पीपीपी (PPP - Public Private Partnership) तत्वावर निविदा प्रक्रिया राबवली जाईल. इलेक्ट्रिक आणि सीएनजी बसेसबाबत मोठे निर्णय *इलेक्ट्रिक बसेसचे लक्ष्य:* २०३५ पर्यंत एसटी महामंडळाच्या ताफ्यातील सर्व बसेस इलेक्ट्रिक (Electric) करण्याचे उद्दिष्ट. *चार्जिंग स्टेशनची अडचण:* काही तालुक्यांमध्ये इलेक्ट्रिक बसेसची मोठी मागणी आहे,मात्र चार्जिंग पॉईंट्स उपलब्ध नसल्यामुळे सध्या तिथे बसेस देता आलेल्या नाहीत. *सीएनजी मेंटेनन्स:* सीएनजीचे दर वाढल्यामुळे सध्या सीएनजी बसेसची देखभाल (Maintenance) करणे महामंडळाला कठीण जात आहे. कर्मचारी भरती *कंत्राटी पद्धत:* एसटी महामंडळात कर्मचाऱ्यांची संख्या अपुरी आहे.हा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या ठेकेदार पद्धतीने (Contract Basis) कर्मचारी भरती केली जाणार आहे. एसटी तिकीट दर वाढीचे संकेत *दरवाढीची शक्यता:* गेल्या काही दिवसांत पेट्रोल,डिझेल आणि सीएनजीचे दर कडाडले आहेत. त्यामुळे एसटीची दरवाढ करता येईल ka? यासाठी राज्य शासनाकडे मागणी करण्यात आली आहे. *परिवहन मंत्र्यांचे संकेत:* इंधन दरवाढीचा मोठा फटका बसत असला, तरी सध्या तिकीट दरात वाढ केलेली नाही. मात्र, शासनाकडून सकारात्मक निर्णय न झाल्यास एसटी प्रवासात दरवाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही, असे स्पष्ट संकेत परिवहन मंत्र्यांनी दिले.
0
0
Report

अकोला में गावठी शराब के अवैध व्यवसाय पर पुलिस का बड़ा ऑपरेशन, 2 गिरफ्तार

Akola, Maharashtra:Anchor : पुणे येथे विषारी दारू पिल्याने मृत्यू झाल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे छापेमारी अभियान सुरू झाले आहे. या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यातील चन्नी पोलिसांनी अवैध गावठी हातभट्टी दारू व्यवसायावर मोठी कारवाई करत दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अकोला जिल्ह्यातील चन्नी पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे नवगाव शेतशिवारात छापा टाकण्यात आला. यावेळी दोन आरोपी हे गावठी हातभट्टी दारू गाळत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी घटनास्थळावरून सुमारे 525 लिटर सडवा मोहाफुलाचा माल, 30 लिटर गावठी हातभट्टी दारू तसेच दारू तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त केले आहे. जप्त करण्यात आलेल्या मुद्देमालाची अंदाजे किंमत 84 हजार 570 रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.या प्रकरणी दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम 1949 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में गर्भ के दो बच्चों की बिक्री का मामला; आरोपी महिला समेत तीन गिरफ्तार

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात स्वतः च्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी सतर्कतेने केली कारवाई अँकर:-- स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचा 4 वर्ष आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होती. अजय फुलझेले पासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली. याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेल्या महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मेडिकल कॉलेजने पोलिसात याची तक्रार केली. पोलिसांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली 40 वर्षीय महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील 3 महिलांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे नवजात बाळांच्या विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. "बाईट १) प्रभावती एकुरके, पोलिस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे (हिंदी/मराठी न्यूज सामग्री)
0
0
Report

नागपूर महाल क्षेत्र में आशिष NX कपड़ों की दुकान में आग, दमकलों का भारीinsatz

Nagpur, Maharashtra:नागपूर महाल परिसरातील जुन्या हिस्लॉप कॉलेज समोर असलेल्या आशिष NX कपड्यांच्या दुकानाला लागलेली आग दहा तासानंतर धूमसत आहे. सकाळी साडेआठच्या सुमारास ही आग लागली होती. मात्र सायंकाळी सात वाजेपर्यंत ही दुकानातील आग धुमसत आहे. दरम्यान दुकानाच्या आजूबाजूच्या परिसरात राहणाऱ्या इमारतीतील लोकांनाही सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आले आहे. अग्निशमन दलाच्या 12 गाड्यांच्या अनेक फेऱ्या झाल्या असून सातत्याने येऊन कूलिंग करण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र अजूनही आग धुमसत आहे. दुकानाच्या आत जाऊन आग पूर्णपणे नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला अनेक अडचणी येत आहेत.
0
0
Report

महिला डिब्बे में मद्यप मिले तो सीधे निकाल दें: सांसद सुरेश म्हात्रे

Ambernath, Maharashtra:महिला डब्यात मद्यपी शिरला तर ‘डायरेक्ट झोडपून काढा’; अशा सूचना भिवंडी मतदारसंघाचे खासदार सुरेश म्हात्रे यांनी RPF आणि रेल्वे पोलिसांना दिल्या. आज बदलापूर रेल्वे स्टेशनावर प्रवाशांच्या समस्या और महिला सुरक्षा विषयक खासदार सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रें यांनी एक बैठक घेतली; यावेळी त्यांनी महिला डब्यात मद्यपी, नशेडी या व्यक्तींना आढळल्यास कारवाई न करत थेट झोडपून काढण्याची सूचना RPF आणि रेल्वे पोलिसांना दिली. महिला प्रवाशांकडून येणाऱ्या वाढत्या तक्रारी, रात्रीच्या वेळेतील असुरक्षितता आणि मद्यपींच्या वावराची दखल घेत त्यांनी महिला डब्यांमध्ये नियमित गस्त वाढवण्याचे निर्देश रेल्वे पोलिसांना दिले. यावेळी त्यांनी बदलापूर परिसरातील रेल्वे प्रवाशांच्या विविध समस्या, गर्दी आणि सुरक्षेच्या मुद्द्यांवर अधिकाऱ्यांशी चर्चा केली. चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
0
Report
Advertisement

तुलसी बीच रिसॉर्ट में सुरक्षा चूक से 13 महीने के बच्चे की मौत: वसई की खबर

Vasai-Virar, Maharashtra:वसईत रिसॉर्ट चालकांच्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी स्विमिंग पूलमध्ये बुडून १३ महिन्यांच्या बालकाचा मृत्यू सुरक्षा व्यवस्थेअभावी चिमुकल्याचा बळी गेल्याचा आरोप वसईतच्या कळंब गावातील तुलसी बीच रिसॉर्ट मधील धक्कादायक घटना चौवीस तास उलटून देखील गुन्हा दाखल नाही.. रिसॉर्ट चालकाला पोलिस पाठीशी घालत असल्याचा आरोप.. ANC : नालासोपारा पश्चिमेतील कळंब येथील तुलसी बीच रिसॉर्ट मध्ये सुरक्षा व्यवस्थेच्या अभावामुळे १३ महिन्यांच्या आयुष ईभाड या चिमुकल्याचा स्विमिंग पूलमध्ये बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. आई-वडील फार्म हाऊसमध्ये कामात व्यस्त असताना चिमुरडा खेळता-खेळता स्विमिंग पूलपर्यंत पोहोचून पाण्यात पडल्याचे येथील सीसीटीव्ही कॅमेरा दिसत आहे. स्विमिंग पूल परिसरात, लाइफगार्ड किंवा इतर आवश्यक सुरक्षा उपाययोजना होत्या का, याबाबत प्रश्न उपस्थित होत असून यापूर्वीही परिसरातील रिसॉर्टमध्ये अशा दुर्घटना घडल्या आहेत. त्यामुळे वसई तालुक्यातील समुद्रकिनारी असलेल्या रिसॉर्ट चालकांकडून व्यावसायिक सुरक्षा दिशेने झालेल्या दुर्लक्षामुळे निष्पाप जीवांचा बळी जात असल्याचा आरोप होतोय.. विशेष म्हणजे अशा दुर्घटना वाढत असताना अर्नाळा पोलिसांकडून मात्र घटनेला २४ तास उलटून देखील केवळ एकास्मात मृत्यूची नोंद करण्यात आल्याने पोलीसांकडून रिसॉर्ट चालकाला पाठीशी घातले जाते का? असा सवाल उपस्थित केला जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top