icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोकण में स्टेटस वार: दो बड़े नेता सोशल मीडिया पर निशाने साधे

Ratnagiri, Maharashtra:स्टेटस वॉर पॅकेज.. स्टेटस वॉर! उद्योगमंत्री उदय सामंत और आमदार भास्कर जाधवांच्या 'त्या' स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात खळबळबळ!.. ‘योग्य लोकांचे हात हातात असतील तर...’ उदय सामंतांचा महाविकास आघाडीला थेट टोला? ‘कस्मे वादे प्यार वफा...’ गाणं शेअर करत भास्कर जाधवांचा नेमका कोणावर निशाणा? कोकणात राजकीय वातावरण तापलं!. अँकर राज्याच्या राजकारणात सध्या 'स्टेटस' वॉर रंगल्याचे पाहायला मिळत आहे. सोशल मीडियावरील व्हॉट्सॲप स्टेटसच्या माध्यमातून नेत्यांनी एकमेकांवर निशाणा साधायला सुरुवात केली आहे. कोकणातील दोन दिग्गज नेते, म्हणजेच राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत आणि शिवसेना नेते भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे सध्या राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चांना उधाण आले आहे. उदय सामंत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या फोटोसह एक सूचक मेसेज टाकला आहे, तर दुसरीकडे भास्कर जाधव यांनी 'कस्मे वादे प्यार वफा सब बातें हैं' या गाण्याचा व्हिडिओ शेअर करत खळबळ उडवून दिली आहे.या दोन नेत्यांनी या स्टेटसच्या माध्यमातून नेमका कोणावर निशाणा साधला आहे? पाहूयात यावरील आमचा हा विशेष रिपोर्ट.. Vo राज्याच्या राजकारणात कधी काय घडेल याचा नेम नाही. पण सध्या राजकीय नेते थेट बोलण्याऐवजी सोशल मीडिया स्टेटसचा वापर करून एकमेकांवर गुगली टाकत आहेत. राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आपल्या सोशल मीडियावर ठेवलेल्या एका व्हॉट्सॲप स्टेटसने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले आहे. या स्टेटसमध्ये उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा एकत्रित फोटो असून, सोबत शिवसेना आणि भाजपचे पक्षचिन्ह दिसत आहे.. ​Graphics/TEXT ON SCREEN योग्य लोकांचे हात हातात असतील तर चुकीच्या लोकांची साथ धरायची कधीच वेळ येत नाही. Vo 2 उदय सामंत यांच्या या सूचक मेसेजमुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी थेट महाविकास आघाडीला किंवा विरोधकांना लक्ष्य करण्यासाठीच हे स्टेटसे ठेवले आहे का? अशा चर्चा आता रंगू लागल्या आहेत.. Bite भाजप/शिवसेना प्रवक्ते - स्टेटसचे समर्थन करणारी प्रतिक्रिया.. V 3 उदय सामंत यांचे स्टेटस चर्चेत असतानाच, दुसरीकडे कोकणातीलच आणखी एक डॅशिंग नेते आणि शिवसेना आमदार भास्कर जाधव यांच्या सोशल मीडिया स्टेटसमुळे राजकीय वर्तुळात जोरदार खळबळ उडाली आहे.भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर १९६७ मधील गाजलेल्या 'उपकार' चित्रपटातील एका गाण्याचा व्हिडिओ शेअर केला आहे.. AUDIO/TEXT ON SCREEN "देते हैं भगवान को धोखा, तो इन्सानों को क्या छोडेंगे... कस्मे वादे, प्यार वफा सब बातें हैं, बातों का क्या..." Vo 4 भास्कर जाधव यांनी शेअर केलेल्या या गाण्याच्या ओळी सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. राजकीय घडामोडींच्या वेगामध्ये भास्कर जाधवांनी हे स्टेटस ठेवून नेमका कोणावर बाण चालवला आहे? कोणाच्या 'कस्मे-वाद्यांवरून' त्यांचा विश्वास उडाला आहे? याबाबत आता रत्नागिरी आणि संपूर्ण महाराष्ट्रात तर्क-वितर्क लढवले जात आहेत.. Bite - महाविकास आघाडीचे नेते /राजकीय विश्लेषक - स्टेटसवर प्रतिक्रिया.. Vo "राजकारणात शब्दांपेक्षा इशाऱ्यांना जास्त महत्त्व असते आणि कोकणातील या दोन बड्या नेत्यांनी सोशल मीडिया स्टेटसच्या माध्यमातून दिलेले हे इशारे सध्या बरेच काही सांगून जात आहेत..", End p2c
0
0
Report

शिवसेना विधायक राजेश क्षीरसागर के कथित वीडियो पर SIT जांच की मांग तेज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरातील शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्या कथित टक्केवारी मागणीच्या व्हिडिओवरून राजकारण चांगलेच तापले आहे. या प्रकरणाची विशेष तपास पथक अर्थात एसआयटीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते संजय पवार आणि जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली आहे. याबाबत राज्यपाल, विधानसभा अध्यक्ष आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ई-मेलद्वारे पत्र पाठविण्यात आले आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या कथित व्हिडिओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर यांचे संभाषण असल्याचा दावा करण्यात येत आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एसआयटी नेमण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाने केली आहे. संजय पवार आणि विजय देवणे यांनी पाठविलेल्या पत्रात या व्हिडिओतील आरोप गंभीर स्वरूपाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाची सखोल चौकशी करून सत्य जनतेसमोर आणावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच चौकशीत तथ्य आढळल्यास आमदार राजेश क्षीरसागर यांची आमदारकी रद्द करण्यात यावी, तसेच अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीमार्फत चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. याचबरोबर व्हिडिओ क्लिपमध्ये राहुल आणि प्रशांत या नावांचा उल्लेख असल्याचा दावा करत, त्या व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचीही चौकशी करून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी पत्राद्वारे करण्यात आली आहे.
0
0
Report

लोकतंत्र में पैसे के खेल से खतरा: दिलीप वळसे पाटील की चेतावनी

Shirur, Maharashtra:निवडणुकीचं गणित जेव्हा पैशांच्या गणितावर मांडलं जातं, तेव्हा ती लोकशाहीसाठी धोक्याची घंटा असते, असं परखड मत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी व्यक्त केलं आहे. शिरूर बाजार समिती निवडणुकीच्या प्रचार नारळ शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उमेदवारी वाटप आणि मतदारांच्या बदलत्या सवयींवर त्यांनी चिंता व्यक्त केली. बाजार समिती श्रीमंत आहे की नाही माहिती नाही, पण पॅनेलचे उमेदवार मात्र सगळे श्रीमंत आहेत, असा टोला त्यांनी लगावला. आंबेगावमध्ये यापूर्वी अनेक निवडणुका बिनविरोध झाल्या असून कधीही पैशांचा वापर करावा लागला नसल्याची आठवण त्यांनी करून दिली. मात्र, आता जिल्हा परिषद, पंचायत समितीनंतर ग्रामपंचायतींमध्येही मतदारांना लागलेली पैशांची सवय ही उद्या सरपंच पदासाठीही तीच परिस्थिती निर्माण करेल, अशी भीती व्यक्त करत हे लोकशाहीसाठी अत्यंत घातक असल्याचं मोठं विधान वळसे पाटील यांनी केलंय. बाइट: दिलीप वळसे पाटील (माजी मंत्री) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया शिरूर पुणे...
0
0
Report
Advertisement

कल्याण में देहव्यापार रैकेट का पर्दाफाश; महिला दलाल गिरफ्तार, दो पीड़ित महिलाएं मुक्त

Kalyan, Maharashtra:Female broker arrested कल्याणमध्ये देहव्यापाराचा पर्दाफाश; महिला दलाल अटकेत,महिला वकील असल्याची माहिती दोन पीडित महिलांची सुटका ठाणे गुन्हे शाखेच्या मानव तस्करी प्रतिबंधक पथकाने कल्याण पूर्वेत मोठी कारवाई करत देहस्यापाराच्या रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत एका महिला दलालाला अटक करण्यात आली असून तिच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली आहे. पोलीस तपास दरम्यान ही महिला दलाल वकील असल्याची माहिती समोर आली आहे. कल्याण पूर्व परिसरातील तिसगाव नाका येथील उडुपी पॅलेस हॉटेलमध्ये एक महिला दलाल गरजू महिलांना आमिष दाखवून व फूस लावून देहव्यवसाय करण्यास भाग पाडत असल्याची माहिती ठाणे गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी प्रतिबंधक पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे ठाणे गुन्हे शाखेच्या पथकाने संबंधित हॉटेलवर सापळा रचला .कारवाईदरम्यान आरोपी महिला दलालाला रंगेहात अटक करण्यात आली, तरएका 24 वर्षीय आणि 25 वर्षीय अशा दोन पीडित महिलांची सुटका करण्यात आली. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिस ठाण्यात आरोपी महिला मनीषा नांदे विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. अटक करण्यात आलेली मनीषा नांदे वकील असल्याची माहिती पोलीस तपासा दरम्यान समोर आली आहे
0
0
Report

आषाढी वारी: कर्नाटक से आळंदी 315 किमी की अश्वयात्रा, पालखी अग्रभाग में

Pandharpur, Maharashtra:आषाढी वारी साठी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात सहभागी होण्यासाठी कर्नाटकातील अंकली येथील शितोळे सरकार यांच्या राजवाड्यातून माऊलींच्या मानाच्या अश्वांचे दरवर्षी आषाढी वारीसाठी आळंदीकडे प्रस्थान झाले आहे. अंकली येथील शितोळे घराण्याकडे १८३२ पासून मानाच्या अश्वांची परंपरा चालत आली आहे. अश्वांचा प्रवास: अंकली ते आळंदी हे अंतर सुमारे ३१५ किमी आहे. हे अश्व अंकली येथून पायी चालत निघतात. शितोळे सरकार यांच्या राजवाड्यात विधिवत पूजा आणि आरती करून अश्वांना निरोप दिला जातो. हे मानाचे अश्व पालखी प्रस्थानाच्या काही दिवस आधी आळंदी येथे पोहोचतात आणि पालखी सोहळ्यात अग्रभागी असतात.
0
0
Report

भाजपा विधायक सुधीर गाडगीळ की गाड़ी दुर्घटना, चार-पाँच जख्मी, एक दुचाकी सवार गंभीर

Sangli, Maharashtra:सांगलीचे भाजपा आमदार सुधीर गाडगीळ यांच्या गाडीला अपघात झाला आहे. सांगलीच्या रत्नागिरी नागपूर महामार्गावर हा अपघात झाला असून यामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्यासह चार ते पाच जण किरकोळ जखमी झाले आहेत. तर एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. कर्नाटकाच्या उगार येथून सांगलीकडे परतत असताना मिरज जवळ रत्नागिरी-नागपूर महामार्गावर हा अपघात झाला आहे. यामध्ये गाडगीळ यांच्या चारचाकी गाडीच्या दर्शनी भागाचा मोठा नुकसान झाले आहे. दुचाकीला धडकल्याने हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज असून अपघातामध्ये आमदार सुधीर गाडगीळ यांच्या बोटाला मार लागला आहे. तर गाडगीळ यांच्या वाहनाचे चालक,स्वीय सहायक,अंगरक्षकासह चौघेजण किरकोळ जखमी झाला असून त्यांची प्रकृती ठीक आहे, गंभीरपणे जखमी असणाऱ्या दुचाकीस्वराला मिरजेच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
0
0
Report
Advertisement

दिलचस्प वीडियो से कोल्हापुर की राजनीति हिल रही है: राजेश क्षीरसागर-ठेकेदार के कमीशन विवाद पर नया आरोप

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाकरे गटाचे माजी जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित टक्केवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आहे. इंगवले यांच्या दाव्यानुसार, या व्हिडीओमध्ये आमदार राजेश क्षीरसागर आणि एका कंत्राटदारामध्ये कथित कमिशन व टक्केवारीबाबत संवाद होताना दिसत आहे. व्हिडीओतील संभाषणात संबंधित कंत्राटदार “तुमचे पाच टक्के आणि आणखी दोघांचे प्रत्येकी एक टक्का कमिशन दिले” असल्याचा दावा करताना ऐकू येत असल्याचे इंगवले यांनी म्हटले आहे. तसेच, “यापूर्वी ४० लाख रुपये दिले असून आता कामच नको” असेही संबंधित कंत्राटदार संभाषणात सांगत असल्याचा दावा करण्यात आला आहे. याच व्हिडीओमध्ये “आम्हाला वरही द्यावे लागतात” असे वाक्य आमदार राजेश क्षीरसागर यांनी म्हटल्याचा आरोप इंगवले यांनी केला है. या प्रकरणावर आमदार राजेश क्षीरसागर यांची अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही. पण नव्या टक्केवारीच्या व्हिडिओमुळे कोल्हापूरच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.
0
0
Report

नागपुर महापालिका 2026-27 बजट: कर नहीं बढ़ेगा, 6202 करोड़ रुपये की विकास योजनाएं

Nagpur, Maharashtra:नागपूर स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 साठीचा 6202.99 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प सभागृहात सादर केला. नागपूरकर नागरिकांवर कोणताही कराचा वाढीव बोजा न टाकता समाजातील सर्व घटकांना विकासाच्या साखळीमध्ये सामावून घेत महापौर माहेर योजना, मजुरांसाठी ठिय्या, स्मार्ट प्रभाग, सावजी बुनकर व मारबत महोत्सव, उद्याने व मैदानांचा विकास तसेच नाग नदी प्रदूषण मुक्त करण्यासाठी कर्ज रोखे काढून रू. २०० कोटी उभारणार आहे. अशा नव्या संकल्पांसह स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी नागपूर महानगरपालिकेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी 6202-99 लाख रुपयांचा शिलकीचा अर्थसंकल्प महानगरपालिकेच्या सभागृहात महापौर निता ठाकरे यांना सादर केला. याचवेळी सन 2025-26 या आर्थिक वर्षासाठीचा सुधारित अर्थसंकल्पही स्थायी समितीच्या अध्यक्षांनी सादर केला. गेल्या 19 मे रोजी स्थगित झालेली मनपाची विशेष सभा आज कविवर्य सुरेश भट सभागृहात पार पडली. मनपा स्थायी समितीच्या सभापती शिवानी दाणी-वखरे यांनी 2026-27 या आर्थिक वर्षात मनपाचे आर्थिक उत्पन्न 5690 कोटी 37 लाख राहणार असून सुरूवातीची शिल्लक 512 कोटी 61 लाख रुपये मिळून एकूण उत्पन्न 6202 कोटी 99 लाख रुपयांचे उत्पन्न गृहित धरले आहे. यात 6202 कोटी 48 लाख रुपये खर्चाच्या बाजूला राहणार असून आर्थिक वर्षाच्या अखेरीस मनपाच्या तिजोरीत 50.18 लाख रुपयांची शिल्लक राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement

नाशिक में जलसंकट: डैमों में सिर्फ 20 प्रतिशत पानी बचा

Nashik, Maharashtra: पावसाअभावी नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईचे चटके; धरणांनी गाठला तळ! नाशिककरांवर पाणीबाणीचे संकट; धरणांमध्ये केवळ २०% पाणी साठा! आभाळ रुसले, धरणे सुकली! नाशिक जिल्ह्यात पाणीटंचाईची धग, प्रशासनाकडून टँकरची धावपळ. अँकर जून महिना संपत आला तरी वरुणराजाने नाशिक जिल्ह्याकडे पाठ फिरवली आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील मोठ्या आणि मध्यम धरणांमधील पाणीसाठ्याने तळ गाठला असून, संपूर्ण जिल्हा आता भीषण पाणीटंचाईच्या छायेत आहे. जिल्ह्यात सध्या केवळ १९.९३ टक्के, म्हणजेच जेमतेम २० टक्के पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात ३६ टक्के, तर पालखेड समूहात अवघा १२ टक्के पाणीसाठा उरल्याने चिंतेचे ढग गडद झाले आहेत. या भीषण परिस्थितीवर प्रशासनाने आता काय पावले उचलली आहेत? पाहूयात आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट... पाण्याच्या या भीषण टंचाईमुळे ग्रामीण भागात हाहाकार उडाला आहे. पाण्यासाठी महिलांना मैलोन्मैल भटकंती करावी लागत आहे. मात्र, नागरिकांची ही पाण्यासाठीची वणवण थांबवण्यासाठी आणि कुठल्याही भागात पाण्याची टंचाई भासू नये, यासाठी जिल्हा प्रशासनाने आता कंबर कसली आहे. ज्या ज्या भागात पाण्याची तीव्र टंचाई जाणवत आहे, तिथे कोणताही विलंब न करता तात्काळ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून केवळ टँकर गाड्यांवर भर न देता, भविष्यातील नियोजनासाठी ग्रामपंचायत पातळीवर सातत्याने बैठका घेतल्या जात आहेत. टंचाई आराखड्याची कडक अंमलबजावणी सुरू असून, पाण्याचा अपव्यय टाळण्याचे आवाहन केले जात आहे. परिस्थिती गंभीर असली तरी प्रशासन प्रत्येक नागरिकांपर्यंत पाणी पोहोचवण्यासाठी अहोरात्र काम करत आहे. आता वेध लागले आहेत ते फक्त एकाच गोष्टीचे... ती म्हणजे वरुणराजचे आगमन कधी होणार?
0
0
Report

बीड़ ब्रेक: सांसद पुत्र सौरभ सोनवणे की SIT चौकशी चार घंटे चली

Beed, Maharashtra:बीड ब्रेक: खासदार पुत्र सौरभ सोनवणे याची चार तास चौकशी - SIT प्रमुख व्यंकट राम यांच्याकडून चौकशी - सौरभ याचे CCTV आणि वाहनाची चौकशी झाली - सौरभरयचा देखील SIT समोर जबाब झाला - आणखीन चौकशी सुरूच राहील, चौकशीनंतर सर्वच बाबी उघड करणार - चार तासाच्या चौकशीनंतर सौरभारला सोडले - पुराव्याच्या आधारे संपूर्ण तपास सुरू आहे. - हत्येसाठी वापरलेले साहित्य, चाकू सगळं जप्त केलं आहे. - सौरव सोनवणे यांना आम्ही कालच हजर राहण्यासंदर्भात नोटीस दिली होती यानंतर हजर झाले. - आमच्या सर्व प्रश्नांची त्यांनी उत्तरे दिली त्यांचा जबाब नोंदवून घेतला आहे. - ते आम्हाला तपासात सहकार्य करत आहेत आमचा पुढील तपास सुरू आहे. - थार गाडी तिथे गेल्याचे सांगत आहेत. त्या सर्व बाजुने तपास केला जात आहे. बाईट- IPS व्यंकटराम (SIT प्रमुख)
0
0
Report

अकोला पुलिस ने नशामुक्ति के लिए छात्रों-अभिभावकों को जागरूक किया

Akola, Maharashtra:जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनाच औचित्य साधून अकोला पोलिसांकडून जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात अकोला पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विद्यार्थी आणि पालकांना अमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत मार्गदर्शन करत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेण्याचे आवाहन केले.अकोला पोलिसांच्या वतीने आयोजित या जनजागृती कार्यक्रमात मोठ्या संख्येने विद्यार्थी व पालक सहभागी झाले होते. यावेळी पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी विद्यार्थ्यांना शिक्षण, शिस्त आणि चांगल्या संगतीचे महत्त्व पटवून देत कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांपासून दूर राहण्याचा संदेश दिला. तसेच पालकांनीही आपल्या पाल्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून त्यांना योग्य मार्गदर्शन करण्याचे आवाहन करण्यात आले. कार्यक्रमादरम्यान विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्यानंतर विद्यार्थ्यांना उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणादायी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाला उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
0
0
Report
Advertisement

मुरबाड-कल्याण मार्ग पर 10 नई बसेस दाखल, यात्रियों को मिलेगा बड़ा राहत

Ambernath, Maharashtra:मुरबाड -कल्याण प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा. अत्याधुनीक सोई सुविधांनी सज्ज असलेल्या नविन 10 बसेस सेवेत दाखल परिवहन विभागाकडुन मुरबाड बस आगाराला अत्याधुनिक सुविधांनी सज्ज असलेल्या 10 नवीन बसेस दाखल झाल्या आहेत , मुरबाड आगारातील नवीन बसेसचा लोकार्पण सोहळा आमदार किसन कथोरे यांच्या हस्ते पार पडला ,विशेष म्हणजे या 10 बसेस फक्त मुरबाड - कल्याण या मार्गावर चालविण्यात येणार आहेत.त्यामुळे सुमारे ३० जास्तीच्या फेऱ्या वाढणार असल्याने या मार्गावरील प्रवासी वाहतुक क्षमता सुमारे ३० ते ३५ टक्यांनी वाढणार असल्याने या मार्गावरील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे.
0
0
Report

टीईटी पेपरफुटी: मुख्यमंत्री के आदेश पर पुलिस ने ठाणे-भिवंडी में कार्रवाई शुरू की

Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक): महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदे ने दोषी पाए जाने की आशंका को ध्यान में रखते हुए जांच शुरू कर दी है. प्रश्नपत्रिके के कुछ प्रश्न समान पाए गए हैं. संशयितों के पास मिले प्रश्नों में भी समानता दिखी. यह घटना गंभीर है और शासन ने इसे गंभीरता से लिया है. पुलिस ने तात्क्षण कार्रवाई करते हुए मामले पर कार्रवाई शुरू कर दी है. चौकशी के दौरान सामने आने वाले तथ्यों के अनुसार कठोर कार्रवाई की जाएगी. मुख्यमंत्री तथा उपमुख्यमंत्री ने पुलिस से गहन जांच के आदेश दिए हैं; दोषियों पर कठोर कार्रवाई की चेतावनी. शिक्षण मंत्री दादा भुसे ने जानकारी दी है.
0
0
Report

उदय सामंत के स्टेटस बयान से राजनीतिक हंगामा तेज

Navi Mumbai, Maharashtra:उदय सामंत ऑन msme अतिशय उल्लेखनीय कामं केलं त्यांना आम्ही आम्ही आज पारितोषिक दिले. दहा दिवसात 2200 लोकांनी पुरस्कारासाठी अप्लाय केला. पारदर्शक पणाने हा पारितोषिक वितरण समारंभ केला. उदय सामंत on स्टेटस काल ज्याप्रकारे देवेंद्रजी और ubt के पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकाच विमानाने प्रवास केला. अशा पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न होत होता की वेगळी रणनीती स्थापन केली जाईल अशा पध्दतीचं चर्चा होती. त्याला माझ्या कुवतीप्रमाणे स्टेटस ने उत्तर दिलं. देवेंद्र फडणवीस और एकनाथ शिंदे यांच्यामधील बॉण्डिंग स्टेटस मधनं मी प्रदर्शित केला आहे. आणि दोघांचाही अलायन्सचा जो हात आहे मजबूत असल्यामुळे दोघांमध्ये दुसरा कोणाच्याही गरज नाही असा त्याचा अर्थ आहे. स्टेटस मधून अनेकांना च्या भावना पोहोचवायच्या होत्या त्या पोहोचवल्या उदय सामंत ऑन ubt : ते चार वर्ष तेच करतायेत असे म्हणत म्हणत आता सहा खासदारही आमच्याकडे आले. श्रीवर्धनचे नगराध्यक्ष आमच्याकडे आले. अशा बोलण्यामुळे आम्हाला टायगर ऑपरेशन राबवावं लागत नाही. आपोआपच ubt चे लोक आमच्याकडे प्रवेश करतात. मुद्दा असा आहे चार साडेचार वर्षात अशा पद्धतीचीच भाषा वापरल्याने अनेक कार्यकर्ते दुखावले गेले गेले अनेक लोकांशी संवाद नव्हता नॅचरल अलायन्स नव्हती म्हणून आम्ही उठाव केला. परंतु त्याच्यातून आत्मचिंतन करण्यापेक्षा कायमस्वरूपी आमच्यावरती टीकाटिप्पणी करणे एकनाथ शिंदे यांना खालच्या पातळीवर जाऊन बोलणं हेच फक्त चार साडेचार वर्ष सुरू आहे . काही लोकांनी आता खरोखरच आत्मचिंतन करण्याची गरज आहे. उदय सामंत * उदय सामंत ऑन 24 आमदार महावीकस आघाडी महाविकास आघाडीची परवाची बैठक झाली त्याला 24 आमदार गैरहजर होते आता ते का आमदार गैरहजर होते याची माहिती घेतो आणि मग याच्यावर बोलतो. ... उदय सामंत ऑन टीईटी टीईटी परीक्षे बाबत प्रचंड समज गैरसमज शिक्षकांमध्ये आणि संबंधित यंत्रणेमध्ये निर्माण झाले आहेत म्हणून तो सरकारने निर्णय घेतला आहे. ... उदय सामंत ऑन संजय दिना पाटील संजय दिना पाटील हे अतिशय मैत्रीला दिलदार व्यक्तिमत्व आहे. पत्रकारांच्या बाबतीमध्ये त्यांनी तसं बोलायला नव्हतं पाहिजे त्याचा समर्थन शिवसेनेने किंवा एकनाथ शिंदे यांनी केलेले नाही. परंतु ते ज्या फेज मधनं जात आहेत त्यांच्या कुटुंबीयांच्या बाबतीमध्ये बोललं गेलं म्हणून रागात न त्यांचा उद्रेक होता. त्यांनी काल स्वतः दिलगिरी व्यक्त केली आहे. माझे देखील त्यांच्यासोबत सविस्तर चर्चा झाली आहे. पत्रकारांची जी मन दुखावले गेली आहेत त्याबद्दल आम्ही देखील दिलगिरी व्यक्त करतो परंतु त्यांचा वक्तव्याचा कोणीही समर्थन केलेलं नाही. बाईट- उदय सामंत उदय सामंत ऑन उद्धव ठाकरे याआधी ते आमच्याबद्दलही असे म्हणाले होते 80 पैकी 60 आम्ही निवडून आलो 103 पैकी 20 त्यांची निवडून आले आता परत म्हणतायेत की 14 आमच्या मार्गावर आहेत. बाईट- उदय सामंत * शिवसेना बीजेपी युती भाजपा शिवसेनेसोबत युती करावी युतीमध्ये 180 पेक्षा जास्त आमदार निवडून यावेत आणि मग काँग्रेसच्या मांडीवर जाऊन बसावं याच्यामध्ये देखील काय अर्थ आहे. त्यामुळे सुरुवात कोणी केली 2019 ला महाराष्ट्रातील जनतेने जे बहुमत दिलं होतं शिवसेना आणि भाजपाला आणि एकनाथ शिंदे यांच्या सकट आमच्या सर्व आमदारांची मागणी हीच होती नॅचरल अलायन्स मध्येच राहिलं पाहिजे. भाजपासोबत युती झाली पाहिजे त्यावेळी मतदान वेगळ्या पक्षांच्या माध्यमातून घेतलं गेलं आणि नंतर काँग्रेस सोबत कोण गेलं. तो जो काँग्रेसच्या खांद्याला लागलेला धनुष्‍यबाण होता तो एकनाथ शिंदे यांनी पुन्हा शिवसेनेकडे आणला. त्यामुळे जो काही उठाव झाला त्याबद्दल आम्हाला पश्चाताप झालेला नाही. बाईट- उदय सामंत * राजकीय संस्कुर्ति राजकीय संस्कृती हीच आहे. महाराष्ट्राची परंपरा हीच आहे. विरोधी पक्ष जरी असले तरी एकमेकांचं सुखदुःख एकमेकांना समजून घेतलं पाहिजे परंतु काही लोकांना आमच्या बाबतीत ते जमत नाही हे आमचं दुर्दैव आहे. बाकीच्यांच्या बाबतीत जमत मात्र आमच्या बाबतीत जमत नाही. कारण वर्मी असा घाव बसलेला आहे. ते आमच्या बाबतीत कधीच चांगलं बोलणार नाही याची आम्हाला पूर्ण खात्री असल्यामुळे आम्ही त्या मैत्रीची अपेक्षा देखील करत नाही. परंतु देवेंद्रजी मुख्यमंत्री म्हणून त्यांच्याशी बोलले असतील हे राजकीय संस्कृती आहे विरोधकाला बरोबर घेऊन जाण्याची परंपरा महाराष्ट्र मध्ये आहे. यामध्ये जास्त राजकीय चर्चा करण्याची आवश्यकता नाही. बाईट - उदय सामंत
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top