icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445323
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow24 Aug 2024, 02:30 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

संगमनेर के भोंदू राजेंद्र गडगे के खिलाफ पुलिस ने ठगी का केस दर्ज किया

Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील वडगावपान येथे ‘दत्तधाम सरकार’ नावाने दरबार भरवणाऱ्या राजेंद्र गडगे या भोंदूवर अखेर पोलिसांनी कारवाई केली आहे.. मंत्रोच्चार, तथाकथित औषधे आणि चमत्कारांच्या नावाखाली कॅन्सरसारखे गंभीर आजार बरे करण्याचा दावा करत हा भोंदू लोकांची दिशाभूल करत होता...यामध्ये लाखो रुपयांची लूट होत असल्याचा आरोपही समोर आला आहे...अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्य सचिव ॲड. रंजना गवांदे यांच्या तक्रारीनंतर संगमनेर पोलिसांनी गुन्हा दाखल करत गडगेला ताब्यात घेतलय... या प्रकरणात फक्त राजेंद्र गडगेच नाही , तर त्याची मुलगी ज्ञानेश्वरी गडगे, सुरज शिंदे, मधुकर शिंदे आणि डॉक्टर मोहन पुरी यांच्यावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे..कॅन्सर सारखे दुर्धर आजार बरे करण्याचे खोटे दावे करून लोकांची लाखो रुपयांची लूट केली जात होती..त्याने दिलेल्या औषधांमुळे अनेक रुग्णांना त्रास झाला आहे..लोक दबावात होते, पण आता ते पुढे येत आहेत.तो लोकांच्या आरोग्याशी आणि मानसिकतेशी खेळत होता...माझ्या फोटोचा गैरवापर करून पैसे मागण्यासाठी व्हिडिओही त्याने व्हायरल केला...त्याविरोधातही मी गुन्हा दाखल केलाय..दरम्यान, कारवाई टाळण्यासाठी गडगेच्या हस्तकांकडून तडजोडीचा दबाव टाकण्याचा प्रयत्न झाला तसेच फोन करून प्रकरण मिटवण्याचा प्रयत्न करण्यात आला..इतकंच नाही, तर गडगेची मुलगी आणि एक डॉक्टर थेट गवांदे यांच्या घराबाहेर जाऊन चर्चेसासाठी आग्रह करत होते...मात्र हा दबाव स्पष्टपणे नाकारल्याच अंनिसच्याystate सचिव रंजना गवांदे यांनी म्हणटलय... रंजना गवांदे , राज्य सचिव अंनिस दरम्यान संगमनेर पोलिस ठाण्यात भोंदू गडगेवर जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत तसेच आयटी अँक्ट , ड्रग्स अँण्ड मॅजिक रेमडीज अॅक्ट , मेडीकल प्रक्ट्रीशनर अॅक्ट आणि बनावट व्हिडिओ बनवून लोकांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल केला असुन भोंदू राजेंद्र गडगे आणि मधुकर शिंदे या दोघांना पोलिसांनी अटक केलीय...ज्यांची फसवणूक झाली आहे अशा पिडीतांनी समोर येवून गुन्हा दाखल करण्याच आवाहन पोलिसांनी केलय... प्रविण साळुंके , पोलिस निरिक्षक , संगमनेर तालुका पोलिस स्टेशन सध्या पोलिसांकडून या संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.आणखी किती जण या जाळ्यात अडकले होते, आणि किती मोठी आर्थिक फसवणूक झालीय, याचा उलगडा पुढील तपासात होणार आहे...दरम्यान, अंधश्रद्धेच्या नावाखाले चालणाऱ्या अशा भोंदूगिरीवर ही कारवाई म्हणजे एक कडक इशारा मानला जातोय...श्रद्धा ठेवा… पण अंधश्रद्धेला बळी पडू नका असा स्पष्ट संदेश या कारवाईतून प्रशासन आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून देण्यात येतोय.या प्रकरणात अजून कोणकोणते धक्कादायक खुलासे समोर येणार...? आता काही महिला देखील याबाबत या भोंदूवर गुन्हा दाखल करणार का हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक में भीषण गर्मी: तापमान 40°C के पार, जलतरण तालाबों में भीड़ बढ़ी

Yeola, Maharashtra:एप्रिल के कड़े गर्मी ने राज्य में तापमान का पारा 40 अंश के पार पहुंच गया है… नाशिक के येवला निफाड सिन्नर चांदवड तालुकों में अंग की हालत डगमग हो उठी है और नागरिक परेशान हैं… ऐसी गर्मी में respite पाने के लिए बालगोपाळ के साथ युवा जलतरण तालाबों की तरफ रुख कर रहे हैं… नाशिक के अलावा येवला में जलतरण तालाबों पर अब भीड़ देखने को मिल रही है… सुबह से शाम तक बच्चे और युवक जलतरण का आनंद ले रहे हैं… गर्मी से बचने और ठंडक पाने के लिए जलतरण सबसे अच्छा विकल्प माना जा रहा है, नागरिकों ने कहा… इस संदर्भ में येवल्या जलतरण तालाबों से अवलोकन किया गया है हमारे प्रतिनिधि सुधर्शन खिल्लारे ने
0
0
Report

शिर्डी के समाजसेवक के निधन पर ग्रामस्थों ने बैठक, आरोपों पर न्याय की मांग

Shirdi, Maharashtra:शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूनंतर शिर्डी ग्रामस्थांची पत्रकार परिषद... सामाजिक कार्यकर्त्यांकडून शेळके यांच्यावर होणाऱ्या आरोपांवर ग्रामस्थांची नाराजी... शेळके यांच्यावर होणारे आरोप न्यायप्रविष्ट बाब... जितेंद्र शेळके यांच्या मृत्यूची विटंबना थांबवा... शिर्डी ग्रामस्थांची सामाजिक कार्यकर्ते आणि माध्यमांना विनंती... ग्रामस्थ बाईट मुद्दे - अशोक खरात याच्या कृत्यांचे समर्थन करत नाही... जितेंद्र शेळके हे शिवनिका या धार्मिक ट्रस्टचे उपाध्यक्ष होते... त्यांनी पदाचा राजीनामा दिलेला होता... अनेक अधिकारी आणि राजकारणी खरातच्या जाळ्यात फसले... त्याच प्रमाणे शेतकरी कुटुुंबातील शेळके हे देखील फसले... जितेंद्र शेळके यांचे सामाजिक आणि धार्मिक कार्य मोठे होते... देशभरात साई मंदिर उभारणीत त्यांचे मोठे योगदान... शेळके पोलिस चौकशीला सामोरे गेले, त्यांनी पळ काढला नाही... शेळके आरोपी असते, तर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असते... मात्र त्यांच्या निधनानंतर काही लोकांनी त्यांच्या मृत्यूचा तमाशा केला... त्यांच्या मृत्यूची देखील विटंबना केली... हे सगळं थांबलं पाहिजे... जितेंद्र शेळके यांनी सप्ताहामध्ये स्वच्छतेचे काम केले... त्यांच्या माध्यमातून 11 हजार वृक्षाची लागवड करण्यात आली... शिर्डी परिक्रमा सुरू करण्यात त्यांचे मोलाचे योगदान होते... मात्र ते केवळ एका धार्मिक स्ट्रस्टचे उपाध्यक्ष होते म्हणून त्यांची अवहेलना करणे योग्य नाही...
0
0
Report

वाशीम में डीएपी खत की बिक्री में ऐतिहासिक उछाल; 1–9 अप्रैल में 555 टन

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात यंदा डीएपी खताच्या विक्रीत मोठी वाढ झाली आहे. अवघ्या १ ते ९ एप्रिल या कालावधीत तब्बल ५५५ मेट्रिक टन खताचे वितरण झाले असून, मागील वर्षी याच कालावधीत केवळ १३ मेट्रिक टन विक्री झाली होती. यंदा खत विक्रीत सुमारे ४०३० टक्क्यांची प्रचंड वाढ नोंदवली गेली आहे. या असामान्य वाढीमुळे कृषी विभाग सतर्क झाला असून, संशयित व्यवहारांच्या पार्श्वभूमीवर तपासणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. प्रशासनाने मात्र खरीप हंगामासाठी पुरेसा खतसाठा उपलब्ध असल्याचे स्पष्ट केले असून, शेतकऱ्यांनी अनावश्यक साठेबाजी टाळावी, असे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में पानी टंकी में बंदर की मौत, गर्मी से जल सुरक्षा पर सवाल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील खिरपुरी बुद्रुक गावात पाण्याच्या टाकीत एका वानराचा मृतदेह आढळल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उन्हाळ्याच्या वाढत्या तीव्रतेमुळे पाण्याच्या शोधात आलेल्या या वानराचा पाण्यात पडून मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. गावाला पाणी पुरवठा करणाऱ्या टाकीतील पाण्यातून गेल्या काही दिवसांपासून दुर्गंधी येत असल्याची तक्रार ग्रामस्थांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे केली होती. मात्र समाधानकारक कारवाई न झाल्याने अखेर गावकऱ्यांनी स्वतः टाकीवर चढून पाहणी केली. त्यावेळी पाण्यात वानराचा मृतदेह आढळून आला. या घटनेमुळे गावात खळबळ उडाली असून पाणी पुरवठ्याच्या सुरक्षिततेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. संबंधित विभागाने तत्काळ टाकी स्वच्छ करून योग्य ती खबरदारी घ्यावी, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.
0
0
Report

शरद पोंक्षे बोले: अकबर सेक्युलर था, इतिहास छुपाया गया

Nanded-Waghala, Maharashtra:एक लाख खरात एकत्र केले तर एक अकबर होईल अस वक्तव्य सिने अभिनेते शरद पोंक्षे यांनी केले. नांदेड मध्ये भगवान परशुराम महाराज यांच्या जयंती निमित्त अखिल भारतीय ब्रह्मण महासंघा तर्फे आयोजित परशुराम तेजोत्सव कार्यक्रमा दरम्यान ते बोलत होते. यावेळी पोंक्षे यांनी मुगल ए आजम, जोधा अकबर, बाजीराव मस्तानी चित्रपटावर टीका केली. चित्रपटात खरा इतिहास लपवन्यात आला आणि अकबर कसा सेक्यूलर होता हे दाखवण्यात आले. एका वेळेला हजारो महिलांचे आयुष्य बर्बाद करणारा अकबर हा सेक्युलर कसा अस शरद पोंक्षे म्हणाले. आपलाच मराठी दिग्दर्शक जोधा अकबर बनवतो आणि तुम्ही हिंदू समाज तो हिट करता असेही पोंक्षे म्हणाले.
0
0
Report

रायगड पर अमोल खुने का वायरल वीडियो: नार्को टेस्ट और SIT जांच क्यों चाहिए

Jalna, Maharashtra:जालना | मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा मि दोषी नसेल तर जरांगेंचा करावा रायगडाच्या टकमक टोकावरून अमोल खुने यांनी बनवला व्हिडिओ माझ्या विरोधात एसपींना पत्र देणारे आमदार, खासदार कुठे हैती ? सरकारने तातडीने नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करावी मनोज जरांगे यांना धमकी दिल्याचा आरोप असलेल्या अमोल खुने यांची सरकारकडे मागणी अमोल खुने यांनी रायगडावर जाऊन घेतलं दर्शन अँकर-मी जर दोषी असेल तर माझा समाजाने रायगडावरून कडेलोट करावा, अन्यथा मनोज जरांगे यांचा करावा.. असा एक व्हिडिओ अमोल खुने यांनी रायगडाच्या टकमक टोकावरून बनवलाय.. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांना जीवे मारण्याचा कट रचल्याचा आरोप अमोल खुने यांच्यावर आहे.. काही दिवसांपूर्वी अमोल खुने यांनी नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करण्याची मागणी जालना पोलीस अधीक्षकांकडे केली होती.. माझ्यावर कारवाई करण्यासाठी एसपींना पत्र देणारे आमदार खासदार आता कुठे आहेत.. मला विनाकारण या प्रकरणात अडकवण्यासाठी प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळं सरकारने तातडीने नार्को टेस्ट आणि एसआयटी चौकशी करावी. मी जर दोषी असलो तर समाजाने माझा टकमक टोकावरून कडेलोट करावा अन्यथा जरांगे यांचा करावा अशी मागणी अमोल खुने यांनी व्हिडिओत केली आहे. बाईट- अमोल खुने,जरांगे यांच्या हत्येचा कर रचण्याचा आरोप असलेला आरोपी
0
0
Report
Advertisement

माणगाव-इंदापुर बायपास में कोकण रेलवे बाधा, गडकरी से जल्द समाधान की मांग

Chendhare, Maharashtra:माणगाव आणि इंदापूर बायपास कामात कोकण रेल्वेचा अडथळा विद्युत खांब हलविण्याच्या कामात दिरंगाई गडकरी यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार सुनील तटकरे यांनी घेतली नितीन गडकरी यांची भेट मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या माणगाव आणि इंदापूर येथील बायपासच्या कामात कोकण रेल्वेचा अडथळा आडमुठेपणा आडवा येतोय कोकण रेल्वेच्या सिग्नल यंत्रणा, विद्युत खांबामुळे बायपासवरील उड्डाण पुलाचे काम रखडले आहे यासंदर्भात रायगडचे खासदार सुनील तटकरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली आणि ही समस्या निदर्शनास आणून दिली यावर तातडीने मार्ग काढावा अशी विनंती गडकरी यांना केली मुंबई गोवा महामार्ग 31 मे पर्यंत पूर्ण क्षमतेने वाहतुकीसाठी खुला होईल असा शब्द काही दिवसांपूर्वीच दिला होता मात्र गडकरींच्या शब्दपूर्तीत कोकण रेल्वेचा अडथळा ठरतो आहे बायपासच्या कामातील समस्येचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी
0
0
Report

शिरूर के किसानों के लिए हड़ताल: कृषि विक्रेताओं का अनिश्चित बंद

Shirur, Maharashtra:शिरूर पुणे... आधीच अवकाळी पाऊस और शेतीमालाचे बाजारभाव पडल्याने राज्यातील बळीराजा शेतकरी संकटात सापडलेला असताना आता शेतकऱ्यांच्या चिंता पुन्हा वाढणार आहे, राज्यातील कृषी विक्रेत्यांनी 27 एप्रिल पासून बेमुदत बंदची हाक दिलीय, या संदर्भात महाराष्ट्र फर्टीलायझर्स पेस्टिसाइट्स सीड्स डीलर्स असोसिएशन ने राज्याच्या कृषी आयुक्तांना पत्र दिलं असून आपल्या विविध मागण्यांसाठी ही बंदची हाक पुकारलीय.... कंपन्यांकडून रासायनिक खताचा पुरवठा होताना होत असलेले लिंकिंग बंद करणे, किरकोळ खत विक्रेत्यांवर लावलेल्या जातच नियमांच्या विरोधात, अनधिकृत एचटीबीटी बियाणे विक्रीच्या विरोधात यांसारख्या विविध मागण्यांसाठी हा बंद पुकारलाय
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के चिपळूण में नर बिबटिये की संदिग्ध मौत, वन विभाग जांच कर रहा है

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या चिपळूणमधील शिरवली-गौळवाडी परिसरात एका नर बिबट्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. मानवी वस्तीच्या अगदी जवळ हा बिबट्या मृतावस्थेत सापडल्याने मृत्यूबाबत संशय व्यक्त केला जात आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह ताब्यात घेतला असून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांत चिपळूण, संगमेश्वर परिसरात वन्यप्राण्यांच्या मृत्यूचे प्रमाण वाढल्याने वन्यजीव प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे. बिबट्याचा मृत्यू नेमका कशामुळे झाला,याचा तपास आता वनविभाग करत आहे.
0
0
Report

रत्नागिरी के गोविंदरावजी निकम कृषि महाविद्यालय ने कोकण विश्वविद्यालय में सुवर्ण पदक पाया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी येथे कोकण कृषी विद्यापीठात गोविंदरावजी निकम कृषी महाविद्यालयाने ऐतिहासिक यश मिळवले आहे. नुकत्याच झालेल्या ४४ व्या पदवीदान समारंभात महाविद्यालयाच्या तीन विद्यार्थिनींनी सुवर्णपदकांवर नाव कोरले. यात साक्षी थोरात हिने बीएससी (कृषी) मध्ये संपूर्ण विद्यापीठात प्रथम क्रमांक पटकावला, तर समीक्षा बोने आणि वैष्णवी पाटील यांनी पदव्युत्तर अभ्यासक्रमात सुवर्णपदके मिळवली. कृषीभूषण डॉ.तानाजीराव चोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामीण भागातील या विद्यार्थिनींनी मिळवलेल्या यशाबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top