Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445323

राज ठाकरेंचे आव्हान: सत्ता द्या, राज्य कसे चालवायचे ते दाखवतो

Aug 24, 2024 02:30:00
Karegaon, Maharashtra

यवतमाळच्या वणी येथील जाहीर सभेत राज ठाकरेंनी सत्तेचे आव्हान दिले. त्यांनी म्हटले की, राज्यात कायद्याचा वचक राहिला नाही आणि सरकारच्या दबावाखाली संपूर्ण यंत्रणा काम करत आहे. एकदा सत्ता मिळाल्यास राज्य कसे चालवायचे ते दाखवून देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पोलिसांना 48 तास देऊन गुन्हेगारी साफ करण्याचे आश्वासन दिले. राजकीय वातावरण गढूळ झाल्याचे सांगून, निवडणुकीत मतदान केलेले लोक विकले जात असल्याची टीका केली. विधानसभा निवडणूक हा राग व्यक्त करण्याचा योग्य वेळ असल्याचे त्यांनी नमूद केले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 09, 2025 09:52:16
Nagpur, Maharashtra:उदय सामंत बायट, शिवसेना नेते (दानवे दळवी व्हिडिओ) दळवी यांनी स्पष्ट सांगितले की यातील तथ्य जानून घेणे गरजेचे आहे. चौकशी करणे गरजेचे आहे. अशा पद्धतीने एडिट करणं, एआयच्या माध्यमातून तयार करणे योग्य नाही. महिंद्र दळवींच्या बाबतीत झालेल्या प्रतिक्रियांची चर्चा, उद्या कोणाच्याही बाबतीत असे होऊ शकते. कोणाचे करिअर उध्वस्त करत असेल तर याची सखोल चौकशी झाली पाहिजे. देळविचे मीडियासमोर येऊन बोलण्याचा धाडस कौतुकासपद आहे. यामागे कोण आहे याची चौकशी झाली पाहिजे. थोरवे काय बोलले हे मी ऐकले नाही. दळवी स्वतः सांगत असेल की चौकशी करा आणि दूध का दूध पाणी का पानी झाल्याच पाहिजे. चौकशी अंती सर्व पुढे आले पाहिजे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 09, 2025 09:51:46
Nagpur, Maharashtra:*मी माझ्या पगारावर समाधानी आहे*... सरकारी कार्यालयातील वरिष्ठ अधिकाऱ्याच्या टेबलावर हा संदेश असलेली नेमप्लेट सध्या सोशल माध्यमांवर प्रचंड चर्चेत आहे. नागपूर विभागीय आयुक्त कार्यालयातील अतिरिक्त आयुक्त महसूल राजेश खवले यांच्या कार्यालयात त्यांच्या टेबलावर *मी माझ्या पगारावर समाधानी आहे* असा संदेश लिहलेली व त्यासोबत नाव आणि पद दाखवत असलेली ही नेमप्लेट लक्षवेधी ठरत आहे.... महत्त्वाचं म्हणजे अनेक सरकारी अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप लागत आहे... तर काही सरकारी कर्मचाऱ्यांची भ्रष्टाचाराची व्हिडिओही पुढे येत आहे...सरकारी काम आणि सहा महिने थांब वा पैशाशिवाय कामच नाही अशीच भावना सर्वसामान्यांची आहे.. मात्र सर्वसामान्य लोकांना नियमाप्रमाणे काम होत... सरकारी त्याकरताच आम्हाला पगार देते आणि मी त्याच्यावर समाधानी आहे.. असा संदेश खवले यांनी या नेमप्लेटच्या माध्यमातून देण्याचा प्रयत्न केला आहे... खवले यांनीही नेमप्लेट गेले सहा महिन्यापासून आपल्या टेबलावर लावली असून त्यांच्या त्यांच्या कार्यक्षेत्रात सहा जिल्हे आहे
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 09:46:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : छत्रपती संभाजीनगर मध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता अनेक गोरगरिबांचे पैसे तिथे अडकले त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असा आरोप इम्तियाज जलील यांनी केलाय.. रूपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असे या बँकांच्या संचालकांचे नाव आहे ... Vo 1 .. आदर्श बँक घोटाळ्यातील आरोपी शिंदेंच्या शिवसेनेत ? कोट्यवधींचा घोटाळा करणाऱ्या ना अभय मिळणार ? ही तर भाजप सारखी शिंदेंची वॉशिंग मशीन -- इम्तiyाज जलील... संभाजी नगरचा आदर्श बँक घोटाळा राज्यात गाजला, अनेक गोरगरिबांच्या पैशांना या बँकेच्या संचालकांनी चुना लावला , यात पोलीस कारवाई झाली त्यातील काहींना अटकही झाली आणि आता जामिनावर बाहेर सुद्धा आले त्यातीलच 2 संचालकांनी आता शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं पुढं आलं आहे , एमआयएम प्रदेश अध्यक्ष इम्तियाज जलील यांनी हा आरोप करीत त्यांचे प्रवेश फोटो आणि त्यांच्यावर असलेल्या गुन्ह्यांबाबत आरोपपत्र त्यांनी पुढं आणलाय, धक्कादायक म्हणजे हा प्रवेश 24 नोव्हेंबर ला पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते झाला, कुणी केला प्रवेश रुपाली शेंडगे, बँकेच्या संचालक, घोटाळ्यातील आरोपी 1 महिना जेल मध्ये सध्या जामिनावर बाहेर... सपना निर्मळ, बँक घोटाळा आरोपी, जामिनावर बाहेर... याबाबतचे फोटो खुद्द संजय शिरसाठ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर टाकले आहे आणि त्याला कॅप्शन दिलंय शिवसेनेत नव्या ऊर्जेचा प्रवेश.... यावर इम्तियाज जलील यांनी प्रश्न उपस्थित केलेय... Byte इम्तियाज जलील, एमआयएम प्रदेश अध्यक्ष Vo 2... या घोटाळ्यात त्याम्चे पैसे अडकले त्या गोर गरीब महिलांनी याबाबत नाराजी व्यक्त केलीय , घोटाळे बाजना पक्षात घेणारे आम्हाला न्याय देणार का असा सवाल त्यांनी उपस्थित।केला... Byte ठेवीदार ज्यांचे पैसे अडकले आहेत... Vo 3... कुणाला पक्षात घ्यावे आणि कुणाला नाही हा ज्या त्या पक्षाचा प्रश्न मात्र गोर गरिबांचे पैसे लुटणाऱ्या लोकांना जर राजाश्रय मिळत असेल तर निश्चितच गंभीर म्हणावे लागेल आता आरोपा नंतर शिवसेनेची काय भूमिका असेल यावर बरेच काही अवलंबून आहे... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर....
69
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 09, 2025 09:31:37
Navi Mumbai, Maharashtra:एक किरकोळ कारणावरून सलून चालकाला मारहाण केल्याची घटना कोपरखैरणे सेक्टर 4 ए मध्ये घडली है. आरोपी गणेश पार्टे हा इसम इतरत्र केस कापून सुजय पाटील यांच्या सलून मध्ये आला. आणि तेथील कर्मचाऱ्याला नाकातले केस कापण्यासाठी सांगितले. जिथे केस कापले तिथेच जाऊन नाकातील केस कापा असं कारागिराने सांगताच आरोपी गणेश पार्टे याचा पारा चढला, व कारागिराने त्याला हाताचापट्याने मारहाण केली. तसेच सलूनचे मालक सुजय पाटील यांना देखील ते घरी जात असताना लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला असून, आरोपी गणेश पार्टे विरोधात कोपरखैरणे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
63
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 09:21:02
87
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 09, 2025 08:49:22
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरमध्ये आदर्श बँक घोटाळा चांगलाच गाजला होता. अनेक गोरगरीबांचे पैसे तिथे अडकले. त्यातीलच काही प्रमुख आरोपींचा नुकताच पालकमंत्री संजय शिरसाठ यांच्या हस्ते शिवसेनेत प्रवेश झाला असे आरोप इम्तियाज जलील यांनी केले आहेत. रूपाली शेंडगे आणि सपना निर्मळ असे या बँकांच्या संचालकांचे नाव आहे जे आदर्श बँक घोटाळ्यात आरोपी आहेत. संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत हा प्रवेश झाल्याने आश्चर्य व्यक्त केले जाते. महत्त्वाचे म्हणजे याबाबत आंदोलन करणारे इम्तियाज जलील यांनी या सगळ्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केला आहे. असाच गरिबांना न्याय देणार का असा प्रश्न उपस्थित केला जातोय. नक्‍की काय आहे इम्तियाज जलील यांच्या आरोप आणि कुणी कुणी शिवसेनेत प्रवेश केला याबाबत इम्तियाज जलील यांच्या सोबत आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी संवाद केला. रुपाली शेंडगे, बँकेच्या संचालक, घोटाळा आरोपी 1 महिना जेल मध्ये सध्या जामिनावर बाहेर. सपना निर्मळ, बँक घोटाळा आरोपी, जामिनावर बाहेर. कधी झाला प्रवेश 24 नोव्हेंबर मुकुंदवाडी परिसरात संजय शिरसाठ यांच्या उपस्थितीत प्रवेश झाल्याचं बोललं जातंय.. याबाबतचे फोटो खुद्द संजय शिरसाठ यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम वर टाकले आहेत आणि त्यांना कॅप्शन दिलंय शिवसेनेत नव्या ऊर्जेचा प्रवेश.
120
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 09, 2025 08:32:27
128
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 09, 2025 08:01:27
Akola, Maharashtra:गेल्या 13 वर्षांपासून रखडलेला नरनाळा महोत्सव यंदा पुन्हा सुरू होत आहे. महोत्सवाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने मोठी तयारी हाती घेतली असताना शहानूर–पोपटखेड या रस्त्याच्या डांबरीकरणाच्या कामावर गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. लाखोंचा निधी मंजूर असतानाही या रस्त्यावर निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. डांबराऐवजी गिट्टी–चुरी टाकून तात्पुरत्या पद्धतीने काम सुरू असल्याचे दिसत आहे. कामाच्या ठिकाणी ना कोणतेही अधिकारी, ना ठेकेदार उपस्थित असल्याने मोजणी, गुणवत्ता तपासणीचा पूर्ण अभाव जाणवत आहे. फक्त मोठे दगड टाकून वरून डांबर टाकण्याची घाई केली जात असल्याने हा रस्ता कायमस्वरूपी आहे की फक्त महोत्सवापुरता तात्पुरता, असाही मोठा प्रश्न स्थानिक नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. रस्त्यावरील धूळ, गिट्टी आणि अपूर्ण कामामुळे वाहनचालकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत आहे. “खर्च प्रचंड, पण गुणवत्ता शून्य,” अशी नागरिकांची नाराजी असून त्यांनी या रस्त्याच्या कामाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. नरनाळा महोत्सव यशस्वी करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडून तयारी होत असली तरी लाखो रुपयांचा निधी वापरला जात असतानाही रस्ता मात्र निकृष्ट पद्धतीने तयार होत असल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. हा रस्ता तात्पुरता आहे की कायमस्वरूपी, याची तपासणी करून आवश्यक ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहे. आदिवासी संस्कृती आणि निसर्गाच दर्शन या हेतूने हा महोत्सव साजरा करण्यात येत आहे मात्र हे दोन्ही हित जपत या ठिकाणी काम होणे तेवढेच गरजेचे सुद्धा आहे.
143
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 09, 2025 07:17:11
Jalna, Maharashtra:जालना : पुद्दुचेरीत एका अल्पवयीन मुलीला आईच्या जातीचे प्रमाणपत्र देण्यास सर्वोच्च न्यायालयाची परवानगी. महाराष्ट्रातही आईच्या जातीच्या आधारे मुलांना जात प्रमाणपत्र द्या-जरांगे. महाराष्ट्र सरकारनेही सगे-सोयरे कायद्याची अमंलबजावणी करावी. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या मागणी. अँकर- पुद्दुचेरीत एका अल्पवयीन मुलीच्या शिक्षणाची सोय करण्याच्या उद्देशाने एका दुर्मिळ निर्णयात सर्वोच्च न्यायालयाने तिच्या आईच्या जातीच्या आधारावर जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत. त्यामुळं या निर्णयानुसार राज्य सरकारने सगे सोयरे आमच्या व्याख्येनुसार कायद्याची अमंलबजावणी करावी.. अशी मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी केलीये.. जरांगे यांनी उपोषणावेळी सरकाला दिलेल्या ड्राफ्टनुसार आईची जात त्या मुलाला किंवा मुलीला लागली पाहिजे. आणि त्यानुसार सरकारने जात प्रमाणपत्र द्यावेत अशी मागणी केली होती. असाच एका दुर्मिळ निर्णयात पुदुेचेरी येथील एका अल्पवयीन मुलीला शिक्षणासाठी तिच्या आईच्या जातीचं जात प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिलेत.. याचा जरांगे यांनी दाखला दिला आहे.
221
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 09, 2025 06:47:50
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीनंतर कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना आमनेसामने; युती असूनही पॅनलवाद तीव्र! शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही — मोरे यांचा इशारा; तर 'जशास तसे उत्तर' — भाजपचे वरुण पाटील; महायुतीत तणाव चिघळला! कल्याण–डोंबिवलीतील राजकारण पुन्हा तापलंय! डोंबिवलीतील पक्षप्रवेश बॅनर वादानंतर आता कल्याण पश्चिमेतही भाजप–शिवसेना शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले आहेत. महायुती अस्तित्वात असली, युतीतर्फे एकत्र निवडणुका लढवण्याचे आवाहन असले तरी स्थानिक पातळीवर पॅनलवाद आणि बालेकिल्ला वाचवण्याचा संघर्ष शिगेला पोहोचला आहे कल्याण मध्ये शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख अरविंद मोरे यांच्या तर थेट “शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय नाही” असा इशारा देत भाजपवर जोरदार टीका केली आहे. त्याला प्रत्युत्तर देताना भाजपचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक वरुण पाटील यांनीही “जशास तसे उत्तर देऊ… आमच्या मार्गात कोणी आडवे येणार नाही” असा पलटवार केला आहे.महायुतीच्या घरातला अंतर्गत कलह आता उघडपणे समोर आला आहे.कल्याण पश्चिमेतील पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचा पारंपरिक बालेकिल्ला मानला जातो.याच पॅनलवरून आता भाजप आणि शिंदे गट आमनेसामने उभे ठाकले असून, दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या संतप्त वक्तव्यांमुळे महायुतीतील तणाव चिघळला आहे. विधानसभा निवडणुकीत 80 पैकी 60 जागा शिंदे साहेबांच्या चेहऱ्यामुळे आम्ही जिंकल्या. तेव्हाच्या त्यांच्या नेतृत्वामुळेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री विराजमान झाले.युती झाली तरी पॅनल क्रमांक २ हा शिवसेनेचाच आहे. एकही सीट भाजपला देणार नाही. विरोधक आमचे असोत वा परके — जमिनीवर आम्हीच उभे राहणार! गीतेने शिकवलंय — शत्रू भाऊ असला तरी मारल्याशिवाय विजय मिळत नाही. आमच्या समोर युतीचा उमेदवार असो वा दुसरा, आम्ही गारद करूनच सोडणार。
250
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 09, 2025 06:34:28
134
comment0
Report
Advertisement
Back to top