icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जालना की जिलापरिषद शालाओं में जीर्ण दशा, पानी और टूटी क्लासरूम से छात्र भयभीत

Jalna, Maharashtra:जालना : जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांची दयनीय अवस्था,विंचू, सापाच्या सहवासात विद्यार्थ्यांना घ्यावं लागतंय शिक्षण (पॅकेज) अँकर : जालना जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांच्या वर्ग खोल्यांची दुरावस्था झालीय.अनेक वर्ग खोल्या मोडकळीस आल्यायत.काहींच्या विटा खचतायत तर काही काही शाळांची टिनपत्रे ही गळक्या अवस्थेत असल्यानं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची चांगलीच अडचण झालीय.बघूया हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ:१: जालना जिल्ह्यातील जाफ्राबाद तालुक्यातील कुंभारझरी गावची ही जिल्हा परिषाद शाळा पाहा. शाळेतील 4 वर्ग खोल्या मोडकळीस आल्यात.शाळेवरची पत्रे वाकलीय.तर काही पत्रांमधून पावसाचं पाणी थेट वर्ग खोल्यांमध्ये कोसळतय. जुन्या खोल्यांच्या अवती भोवती विंचू आणि सापांनी डोकं वर काढायला सुरुवात केलीय.शाळेत वारंवार साप निघत असल्यानं विद्यार्थी चांगलेच भयभीत झालेत. बाईट : विद्यार्थ्यांचे बाईट टाकावेत. व्हिओ :०२: .कुंभारझरी जिल्हा परिषद शाळेनं या जीर्ण झालेल्या खोल्या पाडण्यासाठी पंचायत समितीकडे प्रस्ताव पाठवलाय. पंचायत समितीने हा प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे पाठवलाय.पण त्यावर अजून कोणताही निर्णय झालेला नाही.त्यामुळे विद्यार्थ्यांनी असंच भीतीच्या वातावरणात शिक्षण घ्यायचं का असा प्रश्न निर्माण झालाय. बाईट :बी.टी.तळेकर, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद शाळा,कुंभाझरी(पांढरा शर्ट) ग्राफिक्स व्हिओ :०३: जालना जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या 1 हजार 488 शाळा आहेत.यातील 1 हजार 36 वर्ग खोल्या मोडकळीस आल्यात.काही जीर्ण झाल्यायत.अनेक वर्ग खोल्याची पत्रे गळकी असल्यानं शाळेत पाणी साचतं. त्यामुळे विद्यार्थ्यांनी शिक्षण घ्यावं तरी कसं असा प्रश्न विद्यार्थ्यांबरोबरच पालकांना पडलाय.आता कोणत्या तालुक्यातील किती वर्ग खोल्यांची अवस्था खराब आहे ते पाहूया जालना तालुक्यात 129,अंबडमध्ये 178,घनसावंगीत 115,बदनापूरमध्ये 138,मंठा तालुक्यात 65,परतुरमध्ये 76,भोकरदनमध्ये 225 तर जाफ्राबाद तालुक्यात 110 शाळा खोल्यांची अवस्था अत्यंत बिकट झालीय.जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी जीर्ण खोल्या पाडून नवीन बांधकामांसाठी तातडीने निर्णय घ्यावा अशी मागणी सरपंचांनी केलीय. बाईट : विजय परीहार,सरपंच,कुंभारझरी(निळा शर्ट असलेले) व्हिओ ०४: गेल्या अनेक वर्षांपासून जिल्ह्यातील हजारो जिल्हा परिषद शाळांच्या वर्गखोल्या शेवटच्या घटका मोजतायत. शिक्षण विभागाचे अधिकारी या जीर्ण खोल्यांची पाहणीही करतात मात्र कोणताही ठाम निर्णय होत नाही.त्यामुळे या वर्गखोल्यांची अवस्था आणखीनच बिकट होत चाललीय END P 2C -नितेश महाजन
0
0
Report

रोहित पवार ने रमेश म्हात्रे के खिलाफ कड़ी कार्रवाई की मांग की

Kalyan, Maharashtra:इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला ka ? श्रीकांत शिंदे आलेत ka ? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष आहेत कडचे आमदार आहेत चौथ्यांदा निवडून आले ते तरी आलेत ka पाठबळ देण्यासाठी .. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात ठेवी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाही असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा शंभर टक्के निवडून नाही दिला पाहिजे श्रीकांत शिंदेने ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस न पाठबळ द्यायला पाहिजे होतं हे अत्यंत दुर्दैव आहे आज संध्याकाळपर्यंत रमेश म्हात्रे याला अटक करा अन्यथा तीव्र आंदोलन करू
0
0
Report
Advertisement

डोंबिवली KDMC हॉस्पिटल में डॉक्टर-स्टाफ हड़ताल से सेवाएं ठप्प, मरीज परेशान

Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसी चे हॉस्पिटल ची सेवा ठप्प. आपत्कालीन व्यवस्था सुरू, रुग्णांचे हाल. दोन दिवसांपूर्वी डोंबिवलीच्या शस्त्रीनगर हॉस्पिटलमध्ये शिवसेनेचे नगरसेवक यांनी डॉक्टर, नर्सेस और कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याप्रकरणी कालपासून हॉस्पिटल बंद ठेवण्यात आले आहे. आजच्या दुसऱ्या दिवशीदेखील डॉक्टरांनी नर्स, कर्मचारी काम बंद आंदोलन सुरू ठेवले आहे, त्यामुळे रुग्णांची हाल होत आहे. डॉक्टर यांना मारहाण केल्याप्रकरणी नगरसेवक रमेश म्हात्रे आणि चार जणांवर विष्णूनगर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल झाला आहे, परंतु अद्याप अटक केले नसल्याने आजही काम बंद आंदोलन ठेवण्यात आलेला आहे. तसेच कल्याण आयएमए संघटना यांनी देखील खाजगी हॉस्पिटलचे ओपीडी आयपीडी सेवा देखील बंद केल्यात. जो पर्यंत आरोपी ला अटक केली जात नाही तो पर्यंत आंदोलन सुरु राहणार असे स्पष्ट केलं आहे. त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी आशिष भोईर यांनी
0
0
Report

वाशीम-हिंगोली टोल प्लाजा जप्ती: अदालत ने एनएचएआई को बढ़ा हुआ मोबदला देने के आदेश दिए

Washim, Maharashtra:वाशीम: राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला मोठा दणका दिला आहे. वाढीव मोबदला न दिल्याने वाशीम -हिंगोली महामार्गवरील धुमका-तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. वाशिम येथील शेतकरी बेबी गर्जे आणि विठ्ठल गर्जे यांच्या अकृषक जमिनीतून अकोला -नांदेड राष्ट्रीय महामार्ग गेला होता. मात्र मोबदला देताना प्लॉटचा मोबदला देण्यात आला, तर रस्ते आणि खुल्या जागेचा मोबदला देण्यात आला नव्हता. तसेच प्लॉटचाही मोबदला कमी दराने देण्यात आल्याचा आरोप करत त्यांनी न्यायालयात धाव घेतली होती.न्यायालयाने गर्जे यांच्या बाजूने निकाल देत राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला वाढीव मोबदला देण्याचे आदेश दिले. मात्र आदेशाची अंमलबजावणी न झाल्याने प्रमुख जिल्हा न्यायाधीशांनी तोंडगाव टोल प्लाझा जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.20 जुलैपर्यंत वाढीव मोबदला न दिल्यास टोल प्लाझावर प्रत्यक्ष जप्तीची कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती गर्जे यांचे वकील उदय देशमुख यांनी दिली. बाईट : उदय देशमुख,वकील बाईट : दिनकर गर्जे,शेतकरी.
0
0
Report
Advertisement

डोंबिवली के अस्पताल में डॉक्टर-नर्स के विरोध से सेवाएँ ठप, गिरफ्तारी की मांग तेज

Kalyan, Maharashtra:सलग दुसऱ्या दिवशी केडीएमसीच्या रुग्णालयातील आरोग्य सेवा ठप्प झाली आहे. डोंबिवलीतील शास्त्रीनगर रुग्णालयात डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण झाल्याच्या निषेधार्थ वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू ठेवलं आहे. आपत्कालीन सेवा सुरू असल्याने ओपीडी आणि इतर नियमित सेवा बंद असल्याने रुग्णांचे मोठे हाल होत आहेत. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात दोन दिवसांपूर्वी झालेल्या मारहाणीच्या घटनेचे पडसाद अद्याप कायम आहेत. डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांना मारहाण केल्याचा आरोप करत कालपासून रुग्णालयातील वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलन सुरू केलं आहे. आज सलग दुसऱ्या दिवशीही हे आंदोलन सुरू असून रुग्णालयातील नियमित आरोग्य सेवा ठप्प झाल्या आहेत. आपत्कालीन सेवा मात्र सुरू ठेवण्यात आल्या आहेत. मात्र ओपीडी, तपासण्या आणि इतर सेवांवर परिणाम झाल्याने रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना त्रास सहन करावा लागत आहे.
0
0
Report

हिंगणघाट में स्मार्ट मीटर विरोधी प्रदर्शन, महावितरण कार्यालय पर मोर्चा पहुँचा

Wardha, Maharashtra:अँकर : स्मार्ट मीटर बसविण्याच्या विरोधात हिंगणघाट शहरात बुधवारी नागरिकांचा तीव्र जनआक्रोश पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अतुल वांदीले यांच्या नेतृत्वाखाली संत तुकडोजी महाराज चौकातून भव्य मोर्चा काढण्यात आला. हजारो नागरिकांच्या सहभागाने निघालेला हा मोर्चा महावितरणच्या कार्यकारी अभियंता कार्यालयावर धडकला.मोर्चादरम्यान आंदोलनकर्त्यांनी स्मार्ट मीटरविरोधात जोरदार घोषणाबाजी करत सरकार आणि विद्युत विभागाविरोधात संताप व्यक्त केला.स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती तात्काळ थांबवावी, नागरिकांना पारंपरिक वीजमीटरचा पर्याय उपलब्ध करून द्यावा तसेच स्मार्ट मीटरमुळे निर्माण होत असलेल्या अडचणींचे निराकरण करावे, अशी मागणी करण्यात आली. बाईट - अतुल वांदिले, जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी शरद पवार गट
0
0
Report
Advertisement

अकोला के अकोट में भारी बारिश नालों की सफाई दावों की पोल खोल रही

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात झालेल्या धुवाधार पावसाने नगर परिषदेच्या नालेसफाई मोहिमेच्या दाव्यांची पोलखोल केली आहे. 23 जूनला आलेल्या जोरदार पावसात या ठिकाणच्या नाल्या तुंबल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले होते. त्यामुळे अनेक कुटुंबांचे मोठे नुकसान झाले होते. आज पुन्हा या ठिकाणच्या नागरिकांच्या घरात नाल्यांचा पाणी शिरलं असून नागरिकांमध्ये संतापाची भावना व्यक्त होत आहे. अंजनगाव मार्गावरील धारोळी वेस, शेख कॉलनी, गजानन नगर आदी भागांमध्ये नाल्यांमध्ये गाळ आणि कचरा साचल्यामुळे पाणी रस्त्यावरून वाहत घरांमध्ये घुसले. अचानक घरात पाणी शिरल्याने नागरिकांची धावपळ उडाली आहे. दरवर्षी पावसाळ्यापूर्वी नालेसफाई केल्याचा दावा नगर परिषदेकडून केला जातो. मात्र प्रत्यक्षात अनेक ठिकाणी नाल्यांची योग्य साफसफाई न झाल्याचे या पावसातून स्पष्ट झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे. दरवर्षी लोकप्रतिनिधी आणि संबंधित अधिकारी या ठिकाणची पाहणी करतात मात्र आतापर्यंत कोणताही ठोस उपाय यावर करण्यात आला नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे. तुंबलेल्या नाल्यांमुळे साचलेल्या पाण्याने नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला असून प्रशासनाने तातडीने उपाययोजना करून नाल्यांची संपूर्ण साफसफाई करावी, अशी मागणी होत आहे. Byte : स्थानिक नागरिक ..
0
0
Report

भीषण बारिश से बीड-मुंबई highway जलमग्न, शिक्रापुर-तळेगांव मार्ग ठप्प

Shirur, Maharashtra:Anc: पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वेळ नदीला महापूर आला असून, नदी सध्या दुथडी भरून वाहत आहे. या महापुराचा मोठा फटका वाहतुकीला बसला आहे. वेळ नदीला आलेल्या पुरामुळे बीड-मुंबई महामार्ग पूर्णपणे पाण्याखाली गेलाय. शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील पुलावरून प्रचंड प्रमाणात पाणी वाहत असल्याने शिक्रापूर-न्हावरे-तळेगाव ही वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. परिस्थिती केवळ रस्त्यांपुरती मर्यादित नसून, तळेगाव ढमढेरे शहरातही पुराचे पाणी घुसले आहे. अनेक नागरिकांच्या घरात आणि दुकानांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून असून, नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर के फुकेश्वर शिवार में चाकू दिखाकर कार लूट: चार तोला सोना चोरी

Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील फुकेश्वर शिवारात 5 जुलाई सायंकाळी कार चालकांना चाकूचा धाक दाखवत लुटपाट केली गेली. कृषी विभागाचे कर्मचारी सुहास चंद्रकांत हजारे आपल्या कारने नातेवाईकांसोबत जात असताना निर्जन ठिकाणी दोघांनी त्यांच्या कारला थांबवून चाकूचा धाक दाखवला आणि लूट केली. कारमध्ये पाठीमागे बसलेल्या सहकार्याने हा व्हिडिओ शूट केला. या घटनेत सोना आणि काही रोकड लुटल्याची माहिती आहे. सुहास हजारे आपला अल्टो कारने बुटीबोरीकडे जात होते तेव्हा दुचाकीवरून आलेल्या दोघांनी लूटमार केली. चार तोळे सोनं आणि काही रोकड लुटली गेली. पाच जुलाईची सायंकाळी साडे पाचचे समय होते; आरोपी फरार आहेत. या घटनेची तक्रार सुशांत हजारे यांनी देताना आपबीती सांगितली.
0
0
Report

शिर्डी-नगर महामार्ग पर दलदल, खड्डे ने भक्तों की यात्रा कठिन बना दी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash नगर-मनमाड महामार्ग चिखलमय ; रखडलेल्या कामामुळे प्रवाशांना मनस्ताप... सावळीविहीर ते अहिल्यानगर मार्ग चिखलाच्या विळख्यात.. शिर्डीकडे येणाऱ्या - जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांची महामार्गाहून प्रवासादरम्यान कसरत... सावळीविहीर ते शिर्डी महामार्गाचे खोदकाम करून रस्ता अर्धवट ; पावसाने महामार्ग बनला दलदलीचा मार्ग... हजारो साईभक्तांचा प्रवास धोकादायक ; दुचाकीस्वारांचा जीव मुठीत धरून प्रवास.. महामार्गावर वाहनांच्या रांगा ; चिखल, खड्डे आणि वाहतूक कोंडीने भाविकांची नाराजी... महामार्गाच्या संथ कामकाजाचा भाविकांना फटका ; महामार्ग प्राधिकरणावर प्रश्नचिन्ह..?  संथ गतीने सुरू असलेलं महामार्गाचे काम तात्काळ पूर्ण करावं , साई भक्तांसह नागरिकांची मागणी... नगर मनमाड महामार्गाहून वाहतूक कुंडीसह महामार्गाच्या दुरावास्येचा आढावा घेत महामार्गावर प्रवास करणाऱ्या साई भक्तांची बातचीत केली आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top