445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गणपति उत्सव के संदर्भ में कांजूरमार्ग पुलिस का रूट मार्च
Mumbai, Maharashtra:गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कांजूरमार्ग पोलिसांचा रूट मार्च आगामी गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगरातील झोन-७ अंतर्गत कांजूरमार्ग पोलीस ठाण्याच्या वतीने आज रूट मार्च काढण्यात आला. गणेशोत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी तसेच संवेदनशील भागांमध्ये पोलिसांची उपस्थिती वाढवण्यासाठी हा रूट मार्च आयोजित करण्यात आला. यावेळी कांजूरमार्ग परिसरातील प्रमुख मार्ग तसेच संवेदनशील ठिकाणांवरून पोलिसांनी संचलन केले. गणपती उत्सव शांततात आणि उत्साहात पार पडावा, यासाठी मुंबई पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश या रूट मार्चच्या माध्यमातून देण्यात आला. नागरिकांनी गणेशोत्सवादरम्यान पोलिसांना सहकार्य करावे आणि कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले.0
0
Report
गणेश नाईक का शिंदे पर तंज: मुद्दों से भटकना नहीं चलेगा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई ब्रेकिंग वन मंत्री गणेश नाईक यांचा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना टोला. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाच्या पाश्वभूमीवर लगावला अप्रत्यक्ष टोला. आता सध्या मुख्यमंत्री आणि सगळेच मंत्री इतके टेन्शनमध्ये आहेत. राज्यात दुष्काळ सदृश परिस्थिती, धर्माच्या आणि जातीच्या नावाने सगळं सुरु ज्याचा ताप राज्य कर्त्यांना होतोय. काही लोकांनी आगे लावल्या आता आधी भिजत नाही आहेत. बाटलीतली भूत ज्याच्यात ताकद असेल पुन्हा बंद करण्याची त्यानेच बाटलीतलीत भूत बाहेर काढावी. ज्याच्यात बंद करण्याची ताकद नाही त्यांनी या लफड्यात पडायचं नाही. तसली ढोंग सोंग कायम आणता येत नाहीत त्यासाठी रिअलॅस्टिक जीवन असलं पाहिजे. गणेश नाईक यांचं मोठं वक्तव्य. साउंड बाईट- गणेश नाईक0
0
Report
मालेगांव में मनोज जरागे पाटील के आंदोलन पर चर्चा, उपवास का विकल्प बरकरार
Nashik, Maharashtra:मालेगाव ( नाशिक ) : ब्रेकिंग... मंत्री गिरीश महाजन On मनोज जरागे पाटील मुंबई आंदोलन... - मनोज जरागे पाटील यांच्याशी बोलणे चालले आहे, प्रयत्न सुरु आहे... - गणेशोत्सव मोठा उत्सव सुरु आहे...हा सर्वात मोठा उत्सव आपला आहे... - खूप गर्दीचा उत्सव आहे, महिला मुले सर्व रस्त्यावर असतात.. - मला वाटतं ही वेळ त्यांनी टाळली पाहिजे.. - त्यांना अधिकार आहे उपोषण करण्याचा आंदोलन करण्याचा, मोर्चा काढण्याचा.. - ही वेळ काही योग्य नाही.. त्यांनी अजूनही विचार करावा...0
0
Report
Advertisement
सप्तशृंगी गढ़ घाट पर swift कार में आग, यातायात बंद, मायलेक सुरक्षित
Nashik, Maharashtra:सप्तशृंगी गढ़ घाटात संदेशनात swift कार ने आग पकड़ ली; मायलेक सुरक्षित, यातायात बंद. नाशिकच्या सप्तशृंगी गड घाटातून मोठी बातमी समोर आली आहे. दर्शनासाठी सप्तशृंगी गडावर जाणाऱ्या भाविकांच्या Swift कारने अचानक पेट घेतला. घाटातील गणपती पॉइंटजवळ रात्रीच्या सुमारास ही घटना घडली. शिरूर येथील भाविक कारमधून गडाकडे जात असताना इंजिन गरम झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. वाहन थांबवल्यानंतर काही वेळातच कारने अचानक पेट घेतला. आग लागल्यावर नांदुरी पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक बंद केली. अग्निशामक दल आणि टँकरच्या मदतीने आग विझवण्यात आली; मात्र कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे. सुदैवाने कारमधील मायलेक सुरक्षित असून कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, घाटातील वाहतूक सध्या पूर्णपणे बंद करण्यात आली असून भाविक आणि वाहनचालकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
नागपुर में बाप्पा के आगमन से बाजारों में चहल-पहल, बारिश के बावजूद उत्साह बढ़ा
Nagpur, Maharashtra:नागपूर बाप्पाचं आगमन होण्यापूर्वी नागपुरातही बाजारपेठ सज्ज झाली आहे... मात्र दुपारपासून सुरू असलेल्या पावसामुळे थोडी भक्तांची धावपळ झालीय... चितार परिसरात बाप्पाची मूर्ती घेण्यासाठी भक्त पोहोचत आहे मात्र पावसामुळं अपेक्षित गर्दी आज झालेली नाही... दरम्यान बाप्पाच्या आगमनापूर्वी सजावटीच मखर आणि इतर सजावटीचा सामान घेण्यासाठी महाल आणि इतर शहरातील बाजारपेठेत खरेदी करताना सर्वसामान्य नागरिक दिसून येत आहे दिसून येत आहे... दरम्यान उद्या रविवारच्या दिवशी बाजारपेठांमध्ये तुफान गर्दी होण्याची शक्यता आहे0
0
Report
गणेश उत्सव में आर्टिफिशियल फुलों की मांग घटने से दुकानदार चिंतित
Kalyan, Maharashtra:आर्टिफिशल प्लास्टिक फुलांची मागणी घटली.. नागरिकांनी प्लास्टिकच्या फुलांच्या खरेदीकडे फिरवली पाठ. व्यापारी चिंतेत..माल पडून गेल्या अनेक वर्षापासून गणेश उत्सवाच्या वेळेस आर्टिफिशिल प्लाटीकच्या फुलांची मागणी ही वाढत चालली होती मात्र यावर्षी आर्टिफिशल फुलांच्या खरेदीसाठी पाठ फिरवली आहे. गणपती डेकोरेशनसाठी मखर, दरवाजाला लागणारे तोरण, फुलांची आरस, बनवण्यासाठी गणेशभक्त आर्टिफिशल फुलांचा मोठ्या प्रमाणामध्ये वापर केला जात होता मात्र यंदाच्या वर्षी आर्टिफिशियल प्लास्टिक फुलाची मागणी घटल्याने व्यापारी चिंतेत सापडेले आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में गणपति उत्सव की धूम: गणेश मूर्तियों और सजावट सामग्री की खरीदारी तेज
Kolhapur, Maharashtra:विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनाला आता अवघे काही तास शिल्लक आहेत. त्यामुळं कोल्हापूरची बाजारपेठही बाप्पाच्या स्वागतासाठी सजली आहे. एका बाजूला गणेशमूर्तींची खरेदी सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूला बाप्पाच्या सजावटीसाठी लागणाऱ्या खरेदीसाठी नागरिकांची मोठी लगबग पाहायला मिळतेय.. याचाच कोल्हापुरातील महाद्वार रोड वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
शेवगाव में पति ने नहीं लौटी पत्नी के कारण बिजली तार पर चढ़कर किया जोखिमपूर्ण प्रदर्शन
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या शेवगाव शहरातील इंदिरानगर परिसरात एका व्यक्तीने विद्युत पोलवर चढून विद्युत तारेला झोका खेळण्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय... माहेरला आलेली पत्नी वापस येत नसल्याने तारेवर चालण्याचा अनोखा प्रताप या व्यक्तीने केला असल्याचं सांगितलं जात आहे... संबंधित व्यक्ती कर्जत येथील असल्याची माहिती आहे... तसेच त्याची मानसिक स्थिती खराब असण्याची शक्यता वर्तवली जात आहे... या व्यक्तीने विद्युत तारेला स्पर्श केला, त्यावेळी सुदैवाने त्यावेळी विद्युत पुरवठा बंद होता, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली... घटनेची माहिती मिळताच पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले... नागरिकांच्या मदतीने जेसीबीच्या साहाय्याने त्याला खाली उतरवण्यात आले... त्याला पुढील चौकशीसाठी शेवगाव पोलीस ठाण्यात आणण्यात आले असून, त्याने हे कृत्य का केले? या बद्दल चौकशी सुरू आहे... संबंधित व्यक्तीचे नाव सुनिल बर्डे असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.0
0
Report
अकोला Lines चौक पर डिक्की से नौ लाख रुपए चोरी, CCTV में तीन संदिग्ध
Akola, Maharashtra:अकोला शहरातील सिव्हिल लाईन चौकात दुचाकीच्या डिक्कीतून तब्बल नऊ लाख रुपयांची रोकड लंपास केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे..चोरीची ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, या फुटेजमध्ये तब्बल तीन आरोपी दिसून येत आहेत.विशेष म्हणजे रात्री सव्वानौ वाजताच्या सुमारास, वाहतूक सुरू असतानाच आणि सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर ही चोरी झाली आहे... त्यामुळे पोलिसांच्या कार्यप्रणालीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.रस्त्यावर नेहमीप्रमाणे वाहतूक सुरू आहे आणि याच गर्दीचा फायदा घेत तीन आरोपी दुचाकीच्या दिशेने येतात. लोखंडी रॉडच्या सहाय्याने दुचाकीची सीट तिरकी करून डिक्की उघडण्यात येते... आणि डिक्कीत ठेवलेली तब्बल नऊ लाख रुपयांची रोकड लम्पास केली जाते हा संपूर्ण पार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.अवघ्या काही क्षणांत चोरी करून आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. रात्री सव्वानौच्या सुमारास घडलेली ही घटना सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यापासून अगदी हाकेच्या अंतरावर आहे. त्यामुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीवरही या घटनेनंतर सवाल उपस्थित होत आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला आहे. फुटेजमध्ये कैद झालेल्या तीन संशयितांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके कामाला लागली आहेत.0
0
Report
Advertisement
चाकण में बस ने दुचाकी को टक्कर दी, पति-पत्नी और दो बच्चे घायल
Shirur, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्ग पर चाकण में बस ने समोर से आ रही दुचाकी को धक्का दिया जिससे भीषण अपघात हुआ। दुचाकी पर सवार पति-पत्नी और उनकी दो बच्चों के साथ बस ने टक्कर मारी। दुर्घटना में पति-पत्नी और उनकी दो बच्चों की हालत गंभीर है और उनकी स्थिति चिंताजनक है। घायलों को कोर हॉस्पिटल में इलाज़ जारी है। इस मामले में, बस चालक पर नशे में वाहन चलाने का आरोप है और पुलिस ने चालक को हिरासत में लिया है।0
0
Report
चिपळूण-माणगांव में गणेश उत्सव यात्री भारी जाम के शिकार
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. ब्रेकिंग न्यूज: गणेशोत्सवासाठी निघालेल्या कोकणवासीयांचा यंदाही खडतर प्रवास; मुंबई-गोवा महामार्गावर चिपळूण आणि माणगावमध्ये वाहनांच्या २ किलोमीटर लांब रांगा!.. अँकर गणेशोत्सवासाठी गावी निघालेल्या कोकणवासीयांचा प्रवास यंदाही प्रचंड तापदायक ठरत असून मुंबई-गोवा महामार्गाच्या अर्धवट कामाचा मोठा फटका गणेशभक्तांना बसतो आहे.. आधी माणगाव आणि आता चिपळूणमध्ये प्रवाशांना अक्षरशः तारेवरची कसरत करावी लागत आहे.. चिपळूणमधील बहादूर शेख नाक्यावरील उड्डाणपुलाचे काम रखडल्यामुळे वाशिष्टी पुलापासून ते थेट कळंबस्ते नाक्यापर्यंत तब्बल दोन किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.. आधीच ८ ते १० तासांचा प्रवास करून आलेल्या कोकणवासीयांना या धीम्या गतीमुळे तासनतास एकाच जागी अडकून पडावे लागत असून प्रवाशांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.. महामार्गावरील या भीषण वाहतूक कोंडीची बोलकी दृश्ये थेट ड्रोन कॅमेऱ्याच्या माध्यमातून समोर आली आहेत..0
0
Report
चंद्रपुर में डीजे डेसिबल चेक, पुलिस पास दिखाए; उत्सव में सख्त पालन की अपील
Chandrapur, Maharashtra:चंद्रपुरात उत्सवादरम्यान डीजेच्या आवाजासंदर्भात पोलिसांनी केली डेसिबल तपासणी, पहिल्या परीक्षेत डीजे चालक और साउंड ऑपरेटर झाले पास, आगामी काळातही अशाच पद्धतीने सहकार्य करावे पोलीस विभागाचे आवाहन. चंद्रपूर शहर मनपा हद्दीत गेले काही दिवस जन्माष्टमी, श्री गणेश आगमन यासह पोळा उत्साहात साजरा झाला. या उत्सवादरम्यान पोलिसांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार निश्चित करण्यात आलेल्या वाद्य आणि ध्वनिवर्धन यंत्रांच्या डेसिबलची तपासणी केली. चंद्रपूर शहरातील गांधी चौकात चंद्रपूर पोलिसांनी केलेली तपासणी नियमांचे पालन करणारी असल्याचे आढळून आले. आगाम गणेशोत्सव आणि विसर्जन मिरवणुकीत डीजेच्या आवाजासंदर्भात निर्देशांचे काटेकोर पालन करावे असे आवाहन चंद्रपूर पोलिसांनी केले आहे.0
0
Report
Advertisement
सातारा: जयकुमार गोरे ने मराठा आंदोलन के लिए संविधान की सीमा में समाधान पर जोर
Satara, Maharashtra:सातारा: ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलনের प्रतिक्रिया दिली आहे. राज्य सरकारने मराठा समाज बांधवांना न्याय देण्यासाठी आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी नेहमीच सातत्याने भूमिका घेतली आहे. या आंदोलनावर चर्चा आणि संविधानाच्या चौकटीत राहूनच मार्ग निघू शकतो. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच, आंदोलनात कोणतीही आचारसंहिता किंवा कायदा बाह्य प्रकार घडणार नाही, याची सर्वांनी काळजी घ्यावी आणि शासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मंत्री जयकुमार गोरे यांनी केले.0
0
Report
जोगेश्वरी में इडली में कीड़ा मिलने का वीडियो वायरल, नागरिक फेरीवालों से सावधान
Mumbai, Maharashtra:जोगेश्वरीत इडलीमध्ये किडा आढळल्याचा दावा; नागरिकांना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ न घेण्याचं आवाहन मुंबईतील जोगेश्वरी परिसरातील मजासवाडी भागात इडलीमध्ये किडा आढळल्याचा दावा करणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्थानिक रहिवाशाने हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार, घरोघरी जाऊन इडली विक्री करणाऱ्या एका फेरीवाल्याकडून संबंधित व्यक्तीने इडली खरेदी केली होती. मात्र, इडली खात असताना त्यामध्ये किडा आढळल्याचा दावा या व्यक्तीकडून करण्यात आला आहे. यानंतर त्याने इडली आणि त्यामध्ये आढळलेल्या किड्याचा व्हिडिओ तयार करून सोशल मीडियावर व्हायरल केला. या घटनेनंतर संबंधित व्यक्तीकडून परिसरातील नागरिकांना फेरीवाल्यांकडून खाद्यपदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे. विशेषतः घरोघरी विक्री केल्या जाणाऱ्या खाद्यपदार्थांची स्वच्छता आणि गुणवत्ता तपासण्याची गरज असल्याचंही सांगण्यात येत आहे. दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची अधिकृतपणे पुष्टी झालेली नाही. इडलीमध्ये नेमकं काय आढळलं, खाद्यपदार्थ कुठे तयार करण्यात आला होता आणि या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून कोणती कारवाई करण्यात आली आहे, याबद्दल अद्याप अधिकृत माहिती समोर आलेली नाही. त्यामुळे नागरिकांनी खाद्यपदार्थ खरेदी करताना सतर्क राहावं, असं आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
रोहित पवार ने मुंबई आंदोलन पर सरकार को चेतावनी दी, मराठा आरक्षण पर नया संघर्ष शुरू?
Latur, Maharashtra:मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर आ. रोहित पवारांचा राज्य सरकारला सल्ला... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केलीय... त्यामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहिलंय...दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनापूर्वीच सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय... लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर रोहित पवार बोलत होते... अजूनही वेळ गेलेली नाही... सरकारने आजच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून तोडगा काढावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केलीय... जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी गेल्यास आंदोलकांसोबतच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो... त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधीच सरकारने पुढाकार घेऊन चर्चा करावी, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडलीय...0
0
Report
Advertisement
