icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर में रेड अलर्ट: स्कूल बंद, बारिश ने बनाई हलचल

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपुरात पावसाचा रेड अलर्ट, शाळांना सुटी मात्र पावसाची हुलकावणी चंद्रपूर जिल्ह्यात आज हवामान विभागाने अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून या रेड अलर्टमुळे जिल्हा प्रशासनाने आज शाळा महाविद्यालये, अंगणवाडीसह सर्वच कोचिंग क्लासेसना सुट्टी जाहीर केली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात मॉन्सून आगमनापासून आतापर्यंत केवळ 28 टक्के एवढाच पावस पडला आहे. हा पावस शेत पिकांसाठी देखील अपुरा असून पाणीपुरवठा योजना सुरळीत होण्यासाठी दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. अशा परिस्थितीत आजही पावसाने हुलकावणी दिली आहे. शाळांना सुट्टी जाहीर झाल्याने बच्चे कंपनी आनंदात आहे. नक्की रेड अलर्ट प्रत्यक्षात येतो का याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

शिंदे गुट में बड़ी इनकमिंग, नवी मुंबई एयरपोर्ट का नाम दि. बा. पाटील के नाम रखने की शिवसेना की मांग

Navi Mumbai, Maharashtra:उलवे विभागात शिवसेना शिंदे गटात मोठी इनकमिंग झाली असून वहाळ ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच आणि 21 गाव समितीचे कार्याध्यक्ष सचिन केणी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह शिवसेना शिंदे गटात पक्ष प्रवेश केलाय। उद्योग मंत्री उदय सामंत आणि मंत्री भरत गोगावले यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडलाय। यावेळी शिवसेना पुरस्कृत ऑल इंडिया एअरपोर्ट एव्हिएशन एम्प्लॉईज युनियन संलग्न लोकनेते दि. बा. पाटील सामाजिक संस्था शिवभूमी रायगड 21 गाव युनियनचा उद्घाटन सोहळा देखील मोठ्या उत्साहात पार पडला। दरम्यान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचं नाव देण्यात येईल यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाठपुरावा करत असून त्यांच्याच मुख्यमंत्रीपदाच्या कार्यकाळात राज्य सरकारने हा निर्णय घेतला होता त्यामुळे विमानतळाला दि. बा. पाटील यांचं नाव मिळावं ही शिवसेनेची ठाम भूमिका असल्याची प्रतिक्रिया उद्योग मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केलेय。
0
0
Report

नागपूर में मुसलाधार बारिश ने एक परिवार के जीवन को तहस-नहस कर दिया; नुकसान भरपाई की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूरात मंगळवार झालेल्या मुसळधार पावसाने एका कुटुंबाचे आयुष्य अक्षरशः उद्ध्वस्त केले... हातावर पोट असलेल्या मेस, खानावळ व्यावसायिकाच्या घरात आणि खानावळीत पाणी शिरलं... तयार अन्न, धान्य, संसारोपयोगी वस्तू आणि उदरनिर्वाहाचं साधनही पाण्यात वाहून गेलं. नागपूरच्या स्नेहा नगरातील निलेश चिंचोळकर यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, रात्रभर शेडमध्ये आश्रय घेत त्यांनी जीव वाचवला. आता डोळ्यांसमोर उभं आहे ते फक्त उद्ध्वस्त झालेलं घर, पाण्यात बुडालेली स्वप्नं आणि उद्याच्या उदरनिर्वाहाची चिंता... प्रशासनाने तातडीने पंचनामा करून नुकसानभरपाई द्यावी आणि या परिसरातील पाणी साचण्याच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढावा, अशी आर्त मागणी त्यांनी केली आहे. या संपूर्ण संदर्भात आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी.
0
0
Report
Advertisement

लातूर पेपरफुटी विवाद में कांग्रेस नेता पर पुलिस केस: राजनीति गरमाती

Latur, Maharashtra:MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला आहे... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औषाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे....
0
0
Report

महाराष्ट्र CET-MPSC पेपर फूटे मामले में दादा भुसे से इस्तीफे की मांग; Tower पर प्रदर्शन

Yavatmal, Maharashtra:महाराष्ट्रातील CET व MPSC परीक्षांमधील कथित पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनाम्ता द्यावा, अशी मागणी करीत यवतमाळ मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी टॉवरवर चढून आंदोलन सुरू केले आहे. मंगरूळ साखर कारखाना येथे असलेल्या या टॉवरवर सकाळीच युवक काँग्रेसचे दहा ते पंधरा कार्यकर्ते हाती काँग्रेसचा झेंडा घेऊन चढले. सरकार लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करीत आहे. CET व MPSC पेपर फुटी प्रकरणातील आरोपींना लवकरात लवकर शिक्षा मिळावी आणि शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी नैतिकता जोपासत राजीनामा द्यावा अशी मागणी युवक काँग्रेसने केली आहे.
0
0
Report

पुणे-मुंबई हाईवे विस्तार पर 5–6 हजार करोड़ खर्च, टोल से वसूली योजना

Pimpri-Chinchwad, Maharashtra:मुंबई पुणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी खुश खबर ...जुन्या पुणे-मुंबई महामार्गाच्या विस्तारीकरणाचा मार्ग अखेर मोकळा झालाय.... महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने हा मार्ग सहा पदरी व्हावा या कामासाठी सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचे काम सुरू केलंय...या साठी तब्बल ५ हजार ते ६ हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. हा खर्च टोलच्या माध्यमातून वसूल करण्याचा एमएसआरडीसीचा विचार आहे. सध्या २०३५ पर्यंत असलेली टोलवसुलीची मुदत आणखी १० ते १५ वर्षांनी वाढवली जाऊ शकते. याचीच माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी कैलास पुरी...
0
0
Report
Advertisement

लातूर पेपरफुटी विवाद: सपकाळ के खिलाफ मामला दर्ज, पवार ने आरोप लगाए

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून राजकीय वाद पेटला... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांविरोधात औसा पोलिसांत गुन्हा दाखल... MPSC अन्न व औषध निरीक्षक कथित पेपरफुटीवरून आता राजकीय वाद पेटला है... काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टनंतर औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी थेट पोलिसांत धाव घेतली आहे... पेपरफुटी प्रकरणाशी आपला कोणताही संबंध नसताना आपल्यावर संशय निर्माण होईल अशा पद्धतीने पोस्ट करून बदनामी केल्याचा आरोप पवार यांनी तक्रारीत केला आहे... त्यांच्या तक्रारीवरून औसा पोलिसांनी हर्षवर्धन सपकाळ यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय... त्यामुळे पेपरफुटीच्या आरोपांपासून सुरू झालेला हा वाद आता थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे
0
0
Report

चिपळूण में ग्रामीण एकजुटता से भातलावणी पूरी, मरीजों को राहत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या खेर्डीत फुलला माणुसकीचा हिरवा अंकुर; ग्रामस्थांकडून सामूहिक भातलावणी.. संकटाच्या काळात माणुसकी और एकजुटी किती मोठा आधार ठरू शकते, याचं एक प्रेरणादायी उदाहरण चिपळूण तालुक्यातील खेर्डी-देऊळ-वरचीवाडीत पाहायला मिळालं आहे.. मुंबईत वैद्यकीय उपचार घेत असलेल्या गजानन उर्फ आप्पा शेवेकर यांच्या शेतीतील भातलावणीचे काम अडकू नये, म्हणून संपूर्ण गाव एकत्र आलं.. महिला, पुरुष और युवकांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता एकत्र येत श्रमदानातून शेवेकरांच्या शेतातील भातलावणी अवघ्या काही वेळात पूर्ण केली.. ग्रामस्थांच्या या सामाजिक बांधिलकीमुळे आजाराशी लढा देणाऱ्या शेवेकर कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला असून, कोकणातील पारंपरिक एकोपा और ग्रामीण संस्कृतीचे दर्शन पुन्हा एकदा घडले आहे..
0
0
Report
Advertisement

करंजी घाट के किसान दो महीनों से बारिश नहीं मिलने से संकट का सामना

Ahilyanagar, Maharashtra:पावसाळा सुरू होऊन दोन महिने होत आले आहेत तरी राज्यातील अनेक भागांमध्ये म्हणावा असा पावस झालेला नाही अहिल्यानगरच्या करंजी घाट परिसरातील शेतकरी अजूनही चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत आहेत या परिसरात सुरुवातीपासून अत्यंत कमी पाऊस झाला थोड्या पावसावर शेतकऱ्यांनी शेतामध्ये पेरणी केली मात्र चांगला पाऊस होत नसल्याने शेतकऱ्यांपुढे पीक जगवण्याचं मोठं आव्हान उभा राहिला आहे करंजी घाट परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात फळबागा आहेत या फळबागांना उन्हाळ्यात पाणी कमी पडत असल्याने मोठ्या प्रमाणात शेततळे देखील तयार करण्यात आली आहेत मात्र चांगला पाऊस पाऊस नसल्याने शेततळ्यांनी देखील तळ गाठला आहे परिसरातील शेतकरी आभाळाकडे डोळे लावून चांगल्या पावसाची वाट पाहत आहेत
0
0
Report

राम मंदिर चोरी के आरोप पर भास्कर जाधव का हमला; राज्य में हलचल

Ratnagiri, Maharashtra:गुहागर -रत्नागिरी.. रामाच्या नावावर सत्तेत आले अन् मंदिरातच चोरी केली!; गृहमंत्री अहंकारी; आमदार भास्कर जाधवांचा घणाघात.. गुहागरच्या रामपूर गुडे फाटा येथील राम मंदिरात रामरक्षा आंदोलनाच्या सभेत बोलताना ठाकरे गटाचे आक्रमक नेते आमदार भास्कर जाधव यांनी सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे.. प्रभू रामचंद्राच्या नावाने जे सत्तेवर आले, त्यांनीच राम मंदिरात चोरी केली,असा थेट आणि गंभीर आरोप भास्कर जाधव यांनी केला आहे.. एवढ्यावरच न थांबता, प्रभू रामचंद्र अशा लोकांचा नक्कीच निपटारा केल्याशिवाय राहणार नाहीत,असा टोलाही त्यांनी लगावला.. राज्यातील कायदा-सुव्यवस्था आणि राजकीय घडामोडींवर भाष्य करताना त्यांनी गृहमंत्र्यांवरही थेट निशाणा साधला.. राज्याचे गृहमंत्री अत्यंत अहंकारी झाले आहेत,अशी घणाघाती टीका त्यांनी केली.. गुहागरच्या रामपूर गुडे फाटा येथील राम मंदिरात रामरक्षा आंदोलनाच्या सभेत बोलताना भास्कर जाधव यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात नवा वाद पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में 30.29 लाख का गुटखा जप्त; तीन भाइयों के खिलाफ मोकोका मामला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरच्या मोतीकारंजा, नवाबपुरा भागात गुटखा तस्करांच्या अड्ड्यांवर अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांच्या कारवाईत ३०.२९ लाखाचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. या प्रकरणी तीन भावांसह पुरवठादार, कंपन्यांविरुद्ध दोन वेगवेगळ्या पोलिस ठाण्यांत गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. या प्रकरणात आरोपिंविरुध्द 'मोकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्याची विनंती अन्न व औषध प्रशासनाने पोलिसांना केली आहे. पथकाने मोतीकारंजात आरोपींच्या घरावर छापा मारला, तेव्हा तेथे रजनीगंधा, गोवा, बाजीराव, विमल, पानपराग, राजनिवास, डायरेक्टर, व्ही-१ मस्तानी सुगंधी तंबाखू या बॅण्डचा १४ लाख २ हजार ४०५ रुपयांचा साठा आढळून आला. या पथकाने तो साठा जप्त केला आहे. अन्न व औषध प्रशासनाच्या 3 छापेमारीचा कानोसा लागताच सय्यद वाजेद, सय्यद माजेद व सय्यद साजेद हे तिन्ही भाऊ फरार झाले. क्रांती चौक व जिन्सी पोलिसांनी या तीन गुटखा तस्करासह पुरवठादार, तसेच उत्पादक कंपन्यांविरुद्ध गुन्हे दाखल केले
0
0
Report

श्रावण मास में घृष्णेश्वर मंदिर: सभामंडप में अभिषेक, भक्तों को दर्शन संभव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:वेरूळ च्या 12 वे ज्योतिर्लिंग असलेल्या घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टने श्रावणमासाच्या पार्श्वभूमीवर भाविकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. श्रावणमासात भाविकांची होणारी गर्दी लक्षात घेता, दि. ३० जुलै ते १५ ऑगस्ट या कालावधीत भाविकांना गाभाऱ्यात अभिषेक न करता सभामंडपात अभिषेक करता येणार आहे. अभिषेक संपन्न झाल्यानंतर भाविकांना गाभाऱ्यातील जल, पंचामृत व बेलफूल थेट शिवलिंगावर अर्पण करता येईल व दर्शन घेता येणार आहे. त्यामुळे गाभाऱ्यात अभिषेकासाठी होणारी गर्दी होणार नाही. तसेच भाविकांना गाभाऱ्यात प्रत्यक्ष शिवलिंगाचा स्पर्श व दर्शन घेता येईल. गाभाऱ्यात अभिषेक होणार नाही. या व्यवस्थेमुळे श्रावणमासात मंदिरात येणाऱ्या भाविकांना सुलभ व सुरळीत दर्शनाचा लाभ मिळणार असल्याचे श्री घृष्णेश्वर मंदिर देवस्थान ट्रस्टच्या वतीने कळविण्यात आले आहे.
0
0
Report

स्कूल बस चालक के अचानक चक्कर से 40 विद्यार्थियों की बस दुभाजक पर चढ़ी, दुर्घटना टली

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:विद्यार्थ्यांनी भरलेली शाळेची बस दुभाजकावर; चालकाला अचानक चक्कर, मोठी दुर्घटना टळली ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील जळगाव रोडवर मोठी दुर्घटना थोडक्यात टळली. इंग्रजी माध्यमाच्या एका शाळेच्या बसच्या चालकाला अचानक चक्कर आल्याने सुमारे ४० विद्यार्थ्यांनी भरलेली बस पिरॅमिड चौक ओलांडल्यानंतर दुभाजकावर चढली. काळा गणपती मंदिरासमोर अचानक चालकाला  चक्कर आल्याने बसवरील नियंत्रण सुटले. मात्र गाडीतील मावशीने तातडीने परिस्थितीचा गांभीर्य लक्षात घेत धावत जाऊन बस चा हॅन्ड ब्रेक ओढला,  सुदैवाने बसचा वेग कमी   होता, त्यामुळं बस नियंत्रित होऊन दुभाजकावर जाऊन थांबली आणि संभाव्य भीषण अपघात टळला. घटनेनंतर विद्यार्थी घाबरून गेले. स्थानिक नागरिकांनी तत्काळ चालकाला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर दुसऱ्या चालकाच्या माध्यमातून सर्व विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे त्यांच्या घरी पोहोचविण्यात आले. या प्रकरणी निष्काळजीपणे वाहन चालवल्याप्रकरणी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top