445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
8:54 की जलद लोकल में शिवाजी महाराज टर्मिनस के लिए भीड़भाड़ और देरी, यात्रियों की दयनीय स्थिति
Kalyan, Maharashtra:कल्याणहुन छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ला जाणारी सकाळी 8:54 ची जलद वातानुकूलित लोकलची दयनीय अवस्था. दरवाजे बंद होत नसल्याने ac लोकल फ्लॅटफॉर्म पाच वर थांबून. सगळे दरवाजे बंद झाल्यावर एकाच दरवाज्यातून आत जाण्याची कसरत करताना चाकरमानी. त्यामुळे लोकलचा बराच वेळ खोळंबा. शेवटी रेल्वे पोलिसांनी तो दरवाजा बंद करून लोकल मार्गस्थ केली. मुंबई आणि उपनगरात सततधार पावसामुळे 10 ते 15 मिनिटे रेल्वे गाड्या उशिराने धावत आहे.0
0
Report
चंद्रपुर में मुख्यमंत्री के जन्मदिन पर भाजपा कार्यकर्ताओं ने पूजा-हवन और वृक्षारोपण किया
Chandrapur, Maharashtra:मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त चंद्रपुरात भाजप कार्यकर्त्यांकडून विशेष पूजा-हवन आणि वृक्षारोपण अँकर: चंद्रपूर शहरातील भाजप कार्यकर्त्यांनी आज विशेष पूजा-हवन आणि वृक्षारोपण करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वाढदिवस साजरा केला. मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त जाहिरातबाजी आणि पोस्टरबाजी न करण्याच्या प्रदेश कार्यालयाकडून सक्त सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि त्यामुळे अनेक प्रकारचे सामाजिक उपक्रम राबवून भाजपकडून मुख्यमंत्र्यांचा वाढदिवस साजरा केला जात आहे. त्यामुळे चंद्रपूर भाजपच्या वतीने सेवा सप्ताह साजरा केला जात आहे आणि याच अंतर्गत आज विशेष मुख्यमंत्र्यांच्या आरोग्य आणि दीर्घायुष्यासाठी विशेष पूजा-हवन करून वृक्षारोपण करण्यात आले.0
0
Report
नाशिक में रिमझिम बारिश से गोदावरी अधिक पानी में डूबी, मंदिर पानी में घिरे; ऑरेंज अलर्ट जारी
Nashik, Maharashtra:नाशिक नाशकात कालपासून रिमझिम पावसाच्या सरी नाशिक ग्रामीण भागात ही संतधार पाऊस... गोदावरी पात्रात अंशतः पाण्याची वाढ... गोदापत्रात वाढलेल्या पाण्यामुळे रामकुंट परिसरातील अनेक छोटे मोठे मंदिर पाण्याने वेढलेले.. आजही हवामान विभागाचा नाशिकला ऑरेंज अलर्ट...0
0
Report
Advertisement
Virar में बाथरूम में जहरी नाग, इलाके में दहशत
Vasai-Virar, Maharashtra:इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील घरात बाथरूम मध्ये आढळला विषारी नाग विरार मध्ये इमारतीमधील घरात नाग आढळल्याने खळबळ फुलपाडा रोड येथील सिद्धटेक सोसायटी मधील घटना घरात लहान मुलं, सदस्यांचा वावर असताना साप देखील घरातच बाथरूम मधील ड्रेनेजच्या तुटलेल्या जाळीतून साप आल्याचा अंदाज सोसायटीच्या रहिवाशांमध्ये एकच खळবळ सर्प मित्राने तातडीने धाव घेऊन सापाला पकडले0
0
Report
आनंद मठ के कथित लैंगिक अत्याचार केस में दत्तगिरी महाराज गिरफ्तार, जेल भेजे गए
Amravati, Maharashtra:आरोपी दत्तगिरी महाराजांना अटक, थेट केली कारागृहात रवानगी; आरोपीचा पीसीआर न घेता थेट एमसीआर. चांदूर रेल्वे पोलिसांनी अटक केली. गुन्हा दाखल झाल्यानंतर काही दिवसांपासून फरार असलेल्या आरोपीचा शोध पोलीस घेत होते. अखेर त्याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. अटक केल्यानंतर आरोपीला अमरावती येथील न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी (एमसीआर) सुनावली. त्यानंतर त्याची कारागृहात रवानगी करण्यात आली. दरम्यान आरोपीला अटक झाल्यानंतर तपासासाठी पोलीस कोठडी (पीसीआर) मागितली जाईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. अशा प्रकारच्या प्रकरणांमध्ये आरोपीकडून इतर महिलांचेही शोषण झाले आहे का तसेच त्यासंदर्भातील पुरावे, माहिती आणि इतर बाबींची सखोल चौकशी करण्यासाठी पोलीस कोठडी उपयुक्त ठरू शकली असती असे मत व्यक्त होत आहे.0
0
Report
वसई-विरार में भारी बारिश से जलजमाव, नागरिक परेशान
Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये काल रात्रीपासून मुसळधार पाऊस नालासोपारा गाला नगर परिसर पुन्हा जलमय रस्ते , फेरीवाल्यांच्या गाड्या पाण्याखाली गेल्याने नुकसान कामावर जाणारे नागरिक , शाळकरी मुले यांचे दूषित पाण्यातून वाट काढताना हाल रस्त्यावर सखल भागात एक ते दीaad फुटापर्यंत पाणी साचले महानगरपालिकेची यंत्रणा काम करत नसल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त0
0
Report
Advertisement
नागपुर पुलिस ने गैंगस्टरों के धड़पकड़ के साथ रोड शो; यश उर्फ गणपत सहित गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपुर - नागपुरात पोलिसांनी दोन वेगवेगळ्या कारवाईत कुख्यात गुंडांची धिंड काढत वर्दळीच्या रस्त्यांवर रोड शो केला. - गोरेवाडा–पिटेसूर मार्गावर ऑटोचालकाची हत्या व लुटीच्या प्रकरणातील मुख्य आरोपी यश ऊर्फ गणपत गावंडेसह साथीदारांची मानकापूर पोलिसांनी धिंड काढली. - आरोपींनी चाकूच्या धाकावर अनेकांना लुटत ऑटोचालक मोहम्मद काशिद यांची हत्या केली होती. - दुसरीकडे, कमाल चौकातील शनिचरा मार्केट परिसरात गँगवॉर करणाऱ्या गुंडांचा पाचपावली पोलिसांनी भर पावसात रोड शो केला. - ज्या भागात या गुंडांची दहशत होती, त्याच भागात पोलिसांनी त्यांना फिरवल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले. - गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी पोलिसांनी कठोर कारवाईचा इशारा दिला.0
0
Report
नाफेड-एनसीसीएफ खरीदे कांदे विदेश भेजेंगे, देश में बिकने पर किसान आंदोलन की धमकी
Niphad, Maharashtra:नाफेड आणि एनसीसीएफमार्फत खरेदी करण्यात आलेला कांदा देशांतर्गत बाजारात विकू नये. हा कांदा परदेशात निर्यात करावा, अशी त्यांची मागणी आहे. संघटनेच्या मते, जर हा कांदा देशांतर्गत बाजारात विक्रीसाठी आणला गेला, तर आधीच घसरलेल्या कांद्याच्या दरांवर आणखी परिणाम होईल आणि शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसेल. याचबरोबर संघटनेने कठोर इशारा देत म्हटले आहे की जर नाफेडने देशांतर्गत कांदा विक्रीचा निर्णय घेतला, तर राज्यभरातील नाफेडच्या गोदामांसमोर तीव्र आंदोलन छेडले जाईल. गरज पडल्यास गोदामे फोडण्याचे आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी दिला आहे. या संदर्भात कांदा उत्पादक शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
तांदळ भरे ट्रक चुराने वाला आरोपी गिरफ्तार, 18 लाख का माल जप्त
Bhandara, Maharashtra:तांदळाचा ट्रक पळविणारा आरोपी गजाआड.... १८ लाखाचा मुद्देमाल जप्त गोंदिया जिल्ह्यात दररोज नवनवे चोरीचे प्रकरणे उघडकीस येत आहेत. अशातच चक्क चालकाला मारहाण करून आणि झाडाला बांधून ३० टन तांदळाने भरलेला ट्रक चोरणाऱ्या टोळीचा एलसीबीने पर्दाफाश केला असून तांदळ आणि ट्रक असा एकूण १८ लाख १३ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून एका आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. मध्यप्रदेशातील चाकघाट येथून ३० टन ७६५ किलो तांदूळ भरून ट्रक गोंदियातील सडक अर्जुनीकडे निघाले होते. १६ जुलैच्या रात्री प्रचंड थकवा आल्याने चालकाने सावरी येथील बस स्टॉपजवळ ट्रक उभा केला आणि ते झोपी गेले. १७जुलैच्या पहाटे ४ वाजेच्या सुमारास एका भामट्याने पिण्याचे पाणी मागण्याच्या बहाण्याने ट्रकचा दरवाजा ठोठावला. नवीन यांनी दया दाखवून पाण्याचा बॉटल पुढे केली, पणत्याच क्षणी त्यांच्यासोबत चित्रपटासारखा भयानक थरार घडला. त्याच्या पाठीमागून आलेल्या आणखी ३ दरोडेखोरांनी नवीन यांच्यावर हल्ला चढवला. त्यांना जबर मारहाण करत खाली उतरवले, चाकूचा धाक दाखवून जवळच असलेल्या एका झाडाला हातपाय दोरीने बांधून फेकून दिले. यानंतर आरोपी १० लाखाचा ट्रक आणि ८ लाखांचा तांदूळ घेऊन सुसाट फरार झाले. ड्रायव्हरने याची तक्रार रावणवाडी पोलिसात दिली. गुप्त माहितीसारखेलाही पोलिसांनी शोध घेत अवघ्या दोन दिवसांत कोहका येथील आरोपी संजयकुमार दमाहे (२०) याला ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली. दरम्यान पोलिसांनी दरोड्यात वापरलेला १० लाख रुपये किमतीचा १ टाटा कंपनीचा ट्रक असा एकूण १८ लाख १३ हजार ६९९ रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला.0
0
Report
Advertisement
बारिश के कारण वायरल फीवर-डायरिया मरीजों की संख्या अस्पतालों में बढ़ी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:पावसाळ्यात सतत बदलणाऱ्या हवामानामुळे छत्रपती संभाजी नगर शहरात व्हायरल फीव्हर आणि जुलाबाच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ झाली आहे. जिल्हा रुग्णालयात सध्या येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी सुमारे ३० टक्के रुग्ण सर्दी, खोकला, ताप अन् व्हायरल फीव्हरने ग्रस्त असल्याचे समोर आले आहे. यामध्ये ७ वर्षांखालील लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. त्यांच्यात ताप, सर्दी, खोकल्यासोबतच जुलाबाची लक्षणे मोठ्या प्रमाणात आढळत आहेत. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने चढ-उतार होत आहेत त्यामुळे सरकारी आणि खासगी दवाखान्यांत रुग्णांची संख्या वाढत आहे.0
0
Report
किहीम ग्रामपंचायत ने संयुक्त कचरा प्रबन्धन केंद्र का लोकार्पण कर स्वच्छता अभियान तेज किया
Chendhare, Maharashtra:किहीम येथे कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण. किहीम ग्रामपंचायत व याज फाऊंडेशन यांचा उपक्रम. ग्रामस्थांना मोफत डसबिनचे वाटप. अँकर - रायगडच्या अलिबाग तालुक्यातील किहीम ग्रामपंचायतीने स्वच्छतेच्या दृष्टीने महत्त्वाचं पाऊल उचलले आहे. याज फाऊंडेशनच्या सहकार्याने उभारण्यात आलेल्या संयुक्त कचरा व्यवस्थापन केंद्राचा लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. या प्रकल्पामुळे किहीम ग्रामपंचायत हद्दीतील कचरा व्यवस्थापनाची दीर्घकालीन समस्या मोठ्या प्रमाणात मार्गी लागणार असून गाव स्वच्छ व पर्यावरणपूरक बनविण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. या कचरा व्यवस्थापन केंद्राचे लोकार्पण पिनाकीन पटेल यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी ग्रामस्थाना डसबिनचे वाटप करण्यात आले. किहीम ग्रामपंचायतीचे सरपंच प्रसाद गायकवाड यांच्या संकल्पनेतून हा प्रकल्प राबवण्यात येत आहे.0
0
Report
139 एकड़ जमीन अधिग्रहण के चलते एयरपोर्ट विस्तार पर किसान विरोध तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या चिकलठाणा विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी तब्बल १३९ एकर जमीन संपादित करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे, ज्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांमध्ये तीव्र असंतोष पसरला आहे. या पार्श्वभूमीवर, 'जमीन संपादनाचा योग्य मोबदला रेडीरेकनर किंवा बाजारमूल्याच्या चारपट मिळावा, शैक्षणिक पात्रतेनुसार पाल्यांना नोकरीत प्राधान्य मिळावे आणि पुनर्वसनाचे लाभ दिले जावेत,' अशी आक्रमक मागणी विमानतळ विस्तारीकरण कृती समितीने केली आहे. मागण्या मान्य न न झाल्यास बलिदान झाले तरी हटणार नाही, असा थेट इशारा शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनाद्वारे दिला आहे. त्यामुळं विमानतळ जमीन भूसंपादन वाद वाढत जाणार असेच चित्र दिसतेय...0
0
Report
Advertisement
भंडारा में कलाकारों का मोर्चा, बारिश में ढोल-ताश के बीच जिलाधिकारी कार्यालय पहुंचा प्रदर्शन
Bhandara, Maharashtra:ढोल-ताशांच्या गजरात नृत्य करत जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा.... "कलावंतांना न्याय द्या"च्या घोषणा Anchor :- भंडारा जिल्ह्यात विविध कला क्षेत्रातील कलावंतांनी आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी अनोखे आंदोलन केले. भर पावसात ढोल-ताशांच्या तालावर नृत्य करत आणि गाणी गात कलावंतांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. "कलावंतांच्या समितीत कलावंतांनाच प्राधान्य द्या", "2025-26 मध्ये कलावंतांची निवड का झाली नाही?" तसेच "समितीत कलेक्टर किंवा जिल्हा परिषदेचे सीईओ नकोत" अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. शासनाने तातडीने निर्णय घेऊन कलावंतांना न्याय द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.0
0
Report
कल्याण डोंबिवली में बारिश से जनजीवन प्रभावित, जलभराव की आशंका तेज
Kalyan, Maharashtra:कल्याण डोंबिवली मध्ये सकाळपासून पावसाची संततधार अधून मधून पावसाच्या जोरदार सरी. कल्याण डोंबिवली परिसरामध्ये काल पावसाची ये जा सुरू होती मात्र रात्रीपासून पावसाने विश्रांती घेतल्यानंतर पहाटेपासूनच पावसाची संततदार सुरू आहे तर अधून मधून पावसाच्या जोरदार सरी बरसत आहे मात्र पावसाचा जोर कायम राहिला तर सकल भागामध्ये पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही0
0
Report
संभाजीनगर में बायोमेट्रिक उपस्थिति से डमी एडमिशन रोकने की तैयारी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात कनिष्ठ महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांची घसरलेली उपस्थिती आणि डमी अडमिशनला चाप लावण्यासाठी शिक्षण विभागाने विद्यार्थ्यांची हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने नोंदवण्याचा निर्णय घेतला आहे. संभाजीनगर शहर आणि जिल्ह्यातील सर्व उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांची २ हजेरी बायोमेट्रिक पद्धतीने होत नसल्यास कठोर कारवाई करावी, असे आदेश माध्यमिक विभागाच्या शिक्षणाधिकारी यांनी सर्व गटशिक्षणाधिकारी आणि मनपा शिक्षणाधिकाऱ्यांना दिले. महाविद्यालयीन वेळेतच अनेक ठिकाणी कोचिंग क्लासेस चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे कनिष्ठ महाविद्यालयांतील विद्यार्थ्यांची उपस्थिती रोडावली आहे. या पार्श्वभूमीवर, शिक्षण विस्तार अधिकारी आता उच्च माध्यमिक विद्यालये, कनिष्ठ महाविद्यालयांना अचानक भेटी देऊन अध्यापनाचे कामकाज आणि विद्यार्थ्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीची पडताळणी करणार आहेत. प्राथमिक स्तरावर केलेल्या कार्यवाहीचा अहवालही तत्काळ सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
