445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में MPSC विद्यार्थियों के आक्रोश मोर्च के संदर्भ में विक्रम पाचपुते ने चर्चा की
Pune, Maharashtra:*पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा पुणे : MPSC विद्यार्थ्यांकडून उद्या पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत शिक्षकांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा उद्याचा मोर्चा संविधानिक पद्धतीने होत असेल, तर सरकारचा त्याला विरोध नाही. मोर्चाला सरकारने परवानगी दिली असून, तो रद्द करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर न करता ते सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत पाचपुते म्हणाले की, आयोग ही स्वायत्त संस्था असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. त्यामुळे सरकारला अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नाही. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे हा संबंधितांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसल्याचे सांगताना, मात्र त्या प्रश्नांचा तात्काळ राजकीय वापर करणे योग्य नसल्याचे पाचपुते यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून, सरकार सर्व प्रश्न ऐकून घेण्यास तयार असल्याचे पाचपुते यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांचा समावेश करता येईल का, याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेबाबत बोलताना पाचपुते यांनी नियमानुसार पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी झाली असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अद्याप सुरू असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
जुन्नर के स्मशानभूमि में संदिग्ध वस्तुएँ, नागरिकों में भय फैल गया
Shirur, Maharashtra:बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून चौकशीची मागणी केली जात आहे स्मशानभूमीत लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या तसंच महिला आणि पुरुषांच्या छायाचित्रांवर टोचलेल्या अवस्थेत आढळून आल्या या वस्तूंनी नेमक्या कोणी आणि कशासाठी ठेवल्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने यामागचं सत्य समोर आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी होत आहे अंधश्रद्धेला खतपाणी न घालता वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं आहे0
0
Report
सोलapur में मराठा समाज का रास्ता रोको; राष्ट्रीय महामार्ग ठप, सरकार से तात्कालिक कदम
Solapur, Maharashtra:सोलापुरात मराठा समाज आक्रमक, अक्कलकोट ते सोलापूर महामार्गावर केला रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक. सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. राज्य शासनाने मराठा समाजाचा अंत न पाहण्याची करण्यात आली विनंती. रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा.0
0
Report
Advertisement
मेलघाट में भारी बारिश से कारंजखेडा ka संपर्क टूट, पुल नहीं
Amravati, Maharashtra:मुसळधार पावसाने मेळघाटातील कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला; नाल्यावर पूल नसल्याने आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास. मुसळधार पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला ज्येष्ठ नागरिक आणि इतर ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कारंजखेडा गावातील पुलाचा प्रश्न सरकार आणि प्रशासन कधी सोडवणार. तसेच आदिवासी बांधवांचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
FDA ने कल्याण की प्रसिद्ध बेकरी सील कर दी
Kalyan, Maharashtra:कल्याण मधील नामांकित बेकरी एफडीएकडून सील Anchor- कल्याणमधील प्रिन्स या नामांकित बेकरीवर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. Vo- या बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात भट्टीत लाकडांचा वापर केला जात असल्याने ही बेकरी सील करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भाची तक्रार एफडीएला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली .या बेकरी मध्ये पाव तयार केले जातात आणि कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो .मात्र आता ही बेकारी सील करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे लाकडाचा वापर आपल्या भट्टीत करणाऱ्या बेकरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
पुणे-बेंगलुरु हाईवे पर भिड़ंत: 5-6 घायल, यातायात बाधित
Sangli, Maharashtra:स्लग - पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक.. ५ ते ६ जण जखमी.. अँकर - सांगलीच्या येडेनिपाणी फाट्याजवळ पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दोन इनोव्हा कारची अपघात झाला आहे.या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कारचे अचानक टायर फुटला.त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर गेली.यावेळी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.0
0
Report
Advertisement
कल्याण में बंजारा समाज का पारंपरिक तीज उत्सव धूमधाम से सम्पन्न
Kalyan, Maharashtra:कल्याणमध्ये बंजारा समाजाचा पारंपरिक तीज उत्सव उत्साहात संपन्न, गौरपूजनासह सांस्कृतिक कार्यक्रम आणि कौटुंबिक स्नेहमेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद, बंजारा समाजाची परंपरता, संस्कृती आणि सामाजिक एकोपा जपणारा पारंपरिक बंजारा तीज उत्सव (गौरी) सोहळा व कौटुंबिक स्नेहमेळावा रविवारी कल्याणमध्ये उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. संत सेवालाल महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कल्याण नगरीत आयोजित या सोहळ्यास बंजारा समाज बांधव भगिनींची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली. पारंपरिक पद्धतीने तीज उत्सव साजराण्यात आला. विशेषतः अविवाहित मुली व महिलांसाठी आनंद, उत्साह आणि आपुलकीचा हा सोहळा ठरला. यावेळी गायन, नृत्य, एकमेकांचा परिचय तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांमधून उपस्थितांनी उत्साहाने सहभाग घेतला. यावेळी उपस्थित बंजारा समाज बांधवांनी पारंपरिक वेशभूषेत सहभाग नोंदवत आपल्या संस्कृतीचे दर्शन घडविले. समाजातील महिला व युवतींच्या सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली. कौटुंबिक स्नेहमेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विविध घटक एकत्र येत सामाजिक ऐक्याचा संदेशही देण्यात आला. याप्रसंगी बंजारा समाज तीज उत्सव कृती समितीचे अध्यक्ष मदन जाधव, यांच्यासह समाजातील मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते.0
0
Report
ठाणे बेलापूर रोड पर रस्ता रोको: अधिकारी के खिलाफ FIR की मांग
Navi Mumbai, Maharashtra:शनिवार को संतप्त परिवार वालों ने ठाणे बेलापूर रोड पर रास्ता रोको किया और इस मामले में दोषी अधिकारी के खिलाफ FIR दर्ज करने की मांग की है। सुसाइड नोट में सहाय्यक पुलिस उपनिरीक्षक पांडुरंग पाटील ने महापे स्थित लॉज पर आत्महत्या कर ली थी, जिसमें पुलिस अधिकारी संजयकुमार पाटील (डीसीपी), सहाय्यक पुलिस आयुक्त गिरीश ठाकूर और एक हेड कॉन्स्टेबल जयवंत आहिरे के नाम भी थे। नातेवाईकों ने इन नामों के ऊपर आत्महत्या के प्रवृत्त करने का मामला दर्ज करने की मांग की है। इस बीच शव के अंतिम कर्म के संबंध में पुलिस से चर्चा चल रही है और परिवार ने स्पष्ट किया कि अन्त्यविधि के लिए कोई तिथि नहीं तय कराई जाएगी जब तक प्राथमिकी दर्ज नहीं हो जाती।0
0
Report
हिंदुत्ववादी सरकार के दौरान आंदोलन, अतिक्रमण और लव जिहाद के मुद्दों पर बवाल
Shirdi, Maharashtra:आ.गोपीचंद पडळकर बाईट मुद्दे - ऑन हिंदुत्ववादी सरकार असताना आंदोलन - समोरची लोक कायदा मानायला तयार नाहीत... सरकारी जागेवरती अतिक्रमण केली जात आहेत... ग्रामीण भागात अतिक्रमण करून प्रार्थनास्थळ उभी केलेली आहेत... नेवाशात पालिकेने अतिक्रमण कडूनही पुन्हा अतिक्रमण केली... म्हणजे तुम्ही कायदा मानत नाहीत... कायदा न मनणाऱ्या लोकांना वठणीवर आणण्यासाठी हिंदू समाज रस्त्यावर येतोय... आम्ही पाच महिन्यात 15 मुलींना लव्ह जिहादपासून परावृत्त केले... अनेक प्रकरण तर समोर पण येत नाहीत... त्यांची कार्यपद्धती संविधानाला न मानणारी... त्यामुळे आम्ही संघर्ष करतोय, सरकार आमच्या पाठीशी... ऑन ऋषीकेश शेटे हल्ला - हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर पुन्हा हल्ला करण्याची हिम्मत होऊ नये म्हणून आम्ही इथे आलोय... पोलिसांसमोर दगड घातली जात आहेत, म्हणून आम्ही रस्त्यावर आलोय... या गोष्टींना चाप बसेल असा आम्हाला विश्वास... ऑन SHRP नंबर प्लेट - मी एस एच आर पी नंबर प्लेट बनवायला दिली आहे... ऑन सोलापूर मराठा आंदोलकांनी गाडी अडवली - मी कार्यकारिणीच्या निमित्ताने सोलापूरला गेलो होतो... मराठा समाजाचे आंदोलन सुरू झाले आणि मी तिथे गेलो... त्यांनी माझी गाडी अडवली... मी तिथे माझी भूमिका स्पष्ट केली... आंदोलन करण्यात गैर नाही... मी योगायोगाने त्यांच्या आंदोलनात सापडलो... मी त्यांच्याशी चर्चा करूनच बाहेर पडलो... ऑन पुणे डीजे विरोधात मोर्चा - डीजेच्या आवाजामुळे अनेक समस्या... महाराष्ट्राला लोककला आणि परंपरा... पारंपारिक वाद्य वापरायला हवीत... गावाकडच्या लोककला बाहेर आल्या पाहिजेत... लोककलावंतांना संधी दिली पाहिजे... Byte - आ.गोपीचंद पडळकर0
0
Report
Advertisement
इंदापुर में drought के दौर में किसानों को राहत, बारिश के लिए सरकार कदम उठाएगी
Rui, Maharashtra:इंदापूर*कृषिमंत्री दत्तात्रय भरणे भाषण दगडवाडी राज्यात दुष्काळचे सावट आहे,पाऊस पडावा हे संकट दूर व्हावं असं नंदिकेश्वराच्या चरणी मी साकडं घालतो. राज्यात पाऊस पडू दे राज्यातील शेतकरी सुखी होऊ दे असं साकडं मी नंदिकेश्वर चरणी घालतो. पाऊस नाही झाला तर आपण काही करू शकणार नाही,आज राज्यातील शेतकरी अडचणीत आहे.त्याला सरकारकडून अपेक्षा आहे. मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री याबाबत सकारात्मक निर्णय घेतील. आज अजित दादांनी आठवण येते,दादांना आपल्या सर्व प्रश्नांची माहिती जाण होती, खऱ्याला खरं आणि खोट्याला खोटं म्हणणारा नेता आज आपल्यात नाही मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो की, निरवांगी दगडवाडी या भागात सिमेंटचे रस्ते केले आहेत.२८० कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे आपण या परिसरात करत आहोत. पाइपलाइन साठी रस्ते खोदू नका,त्यामुळे रस्त्याची दुरवस्था होते. इंदापूर तालुक्यातील नीरा नदीवर निमसाखर येथे पूल व्हावा इच्छा आहे त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. नीरा नदीवर पाणी अडवण्यासाठी मी अधिकाऱ्यांना बोललो आहे. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला तरच पाऊस पडेल,असा हवामान विभागाचा अंदाज आहे.एल निनो चे खूप मोठे संकट आहे.तुम्हाला झोप लागत तशी मला ही झोप लागत नाही. पाऊस नाही पडला तर काही खरं नाही,माझा जीव खूप तळमळतो मी नंदिकेश्वराची शपथ घेऊन सांगतो.आज दादांच्या उणीव जाणवते एकच विनंती करायची आहे आम्ही काम करणारी माणसं आहोत,बारीक सारीक गोष्टी सोडून द्या वाद विवाद करू नका. पाठीमागे आपण मूठ झाकायला हवी होती ती आपण उघडी केली त्यामुळे आपल्याला त्रास झाला.मी गप्प बसणारा माणूस नाही,बावीस गावचा पाणी प्रश्न सोडवला जाईल,मुख्यमंत्र्यांच्या कानावर गोष्टी घातल्या आहेत मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिल आहे तुम्हाला जिथे काही गोष्टी करायच्या असतील तिथे मी मदत करेल, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही सांगितले आहे. मला उद्घाटन वगैरेची हाव नाही असा आमदार मिळेल का शेतीच्या पाण्यासाठी भविष्यात योग्य तो मार्ग काढला जाईल हा शब्द देतो. कर्जमाफी मध्ये सर्वांच व्यवस्थित झाले ना ? आणखी २ लाखाच्या पुढच्या याद्या येत आहेत.जिल्ह्यात आपला तालुका दुसऱ्या नंबर ला आहे. दादांनी कन्हेरी मध्ये शेवटच भाषण केलं होत त्यात त्यांनी सांगितलं होतं राजकारण राजकारणपुरत करा.0
0
Report
यवला तालुक्य में पेयजल संकट, किसानों ने कालवाय से पानी सप्लाई की मांग
Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील विविध गावांमध्ये पावसाच्या पाण्याअभावी तसेच पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण होत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांनी खासदार समीर भुजबळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. येवला तालुक्यातील विसापूर, गोरखनगर, वसंतनगर, अंकाई, सावखेडे, चांदगाव, नायगव्हाण, कुसूर, कुसमाडी, जायखेडे, आहेरवाडी, लहीत, हडपसावरगाव आणि खिर्डीसाठे या गावांमध्ये पावसाच्या पाण्याशिवाय पाण्याचा कोणताही पर्यायी स्रोत उपलब्ध नसल्याने कायमस्वरूपी दुष्काळी परिस्थिती निर्माण होत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. उन्हाळ्यात या गावांमध्ये पिण्याच्या पाण्यांचीही मोठी कमतरता भासत असल्याने पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटचारी निर्माण करून पाणी उपलब्ध करून दिल्यास या गावांच्या पाणीटंचाईचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागण्यास मदत होईल. तसेच या परिसरातील शेतीला पाणी मिळाल्यास शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, अशी भूमिका शेतकऱ्यांनी मांडली. या मागणीसाठी संबंधित गावांतील शेतकऱ्यांनी स्वाक्षरीचे निवेदन खासदार समीर भुजबळ यांच्याकडे सादर करून पुणेगाव-दरसवाडी-डोंगरगाव पोहोच कालव्यातून पाटाچارि करून पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी केली आहे.0
0
Report
राणा दम्पत्ति ने दहीहंडी रद्द कर 51 लाख मदद का एलान
Amravati, Maharashtra:राणा दाम्पत्याच सामाजिक दायित्व, दहीहंडी रद्द करत गरजू व्यक्तींना केली ५१ लाख रुपयांची मदत; जिल्हा स्त्री रुग्णालयातील मृत बाळांना श्रद्धांजली अमरावतीत विदर्भ स्तरीय दहीहंडी स्पर्धा दरवर्षी आयोजित करण्यात येते. मात्र अमरावतीमध्ये जिल्हा स्त्री रुग्णालयात लागलेल्या आगीत ३ नवजात बाळांचे मृत्यू झाले होते या घटने नंतर सर्वत्र स्तरावर हळहळ व्यक्त केलं जातं आहे. त्यामुळे या संवेदनशील घटने नंतर राणा दाम्पत्याने आज होणारी दहीहंडी स्पर्धा रद्द केली आहे केली असून या दहीहंडी स्पर्धेला लागणारा ५१ लाख रुपयांचा खर्च गरजूंना वाटप केल. यावेळी जिल्हा स्त्री रुग्णालयातील ३ नवजात बाळांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. तसेच रुग्णालय दुर्घटनेतील मृतकाचे कुटुंबातील लोकांना २ लाख रुपये, जिल्हा स्त्री रुग्णालय येथील कंत्राटी परिचारिका, कर्मचारी यांचा देखील सन्मान करून त्यांना रोख रक्कम देण्यात आली आहे. आग दुर्घटनेत वाचलेल्या ३६ बाळांच्या नातेवाईकांना प्रत्येकी 10 हजार रुपये तसेच शेतकरी आत्महत्या कुटुंबातील परिवारांना रोख रक्कम. आणि जिल्हा स्त्री रुग्णालयामध्ये कर्णबधिर अंध अपंग जन्मलेल्या बालकांचा शैक्षणिक खर्च म्हणून त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात आले. अमरावती येथील राजापेठ चौकात केवळ कुठलाही गाजावाजा न करता बाल गोपालांच्या हस्ते दहीहंडीची परंपरा कायम ठेवत साध्या पद्धतीने बालगोपालांच्या हस्ते दहीहंडी फोडण्यात आली.0
0
Report
Advertisement
चांदवड के मोटरसाइकिल रिपेयर गोदाम में भीषण आग, लाखों का सामान जलकर खाक
Chandvad, Maharashtra:चांदवड ब्रेक मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास ईवेहिकल मोटरसायकल रिपेरिंगच्या गोडाऊनला भीषण आग. गोडाऊनमध्ये लाखोंचा रुपयांचा माल असल्याची माहिती. आगीचे कारण अस्पष्ट असले तरी शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज. अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्तीचे प्रयत्न करून आग आटोक्यात आणली. आगीमध्ये गोडाऊनमध्ये लाखो रुपयांचे सामान जळून खाक....0
0
Report
सोलापुर में दिनदहाड़े सफेद बिना नंबर वाहन से महिला की भेड़-बकरियाँ चोरी
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील अकलूज टेंभुर्णी रस्त्यावर भर दिवसा एका महिलेच्या कडील पाच शेळ्या आणि दोन बोकडांची चोरी वाहन क्रमांक नसलेल्या पांढऱ्या वाहनातून अनोळखी व्यक्तींनी चोरून नेलेले आहेत यानंतर लवंग गावातील तरुणांनी तात्काळ पोलिसांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणाचा तपास सुरू झाला आहे सदर महिला रस्त्याच्या कडेला शेळ्या घेऊन थांबली असताना पांढऱ्या वाहनातून आलेल्या अज्ञात व्यक्तींनी महिलेकडे पाणी मागितले मात्र आपल्याकडे पाणी नाही असे सांगितल्यानंतर त्या व्यक्तींनी आम्हाला पाणी आणून द्या असा बहाना तयार केला महिला पाणी आणायला गेल्यानंतर त्या महिलेच्या शेळ्या आणि बोकडे अज्ञात वाहनातून चोरी करण्यात आली0
0
Report
रत्नागिरी पुलिस का डीजे-मुक्त गणेशोत्सव का आह्वान, 27 मंडलों के साथ बैठक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन नितीन बगाटे, जिल्हा पोलीस अधीक्षक रत्नागिरी पोलिसांचे ‘डीजेमुक्त गणेशोत्सवा’चे आवाहन डेसिबलची मर्यादा ओलांडल्यास कारवाईचा इशारा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसोबत पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांची बैठक जिल्ह्यात शांततेत गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा कायम ठेवण्याचे आवाहन यंदा डीजेमुक्त गणेशोत्सव साजरा करून नवा आदर्श घालून द्या ध्वनीवर्धकांचा वापर करताना आवाजाची निर्धारित डेसिबल मर्यादा पाळण्याच्या सूचना नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाणार बैठकीला रत्नागिरी शहरातील २७ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचा सहभाग0
0
Report
Advertisement
