445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक के होटल पूल में डूबे युवक की मौत, पुलिस जांच शुरू
Nashik, Maharashtra:हॉटेलच्या स्विमिंग पूलमध्ये पोहण्यासाठी गेलेल्या तीस वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली असून गणेश गायकवाड असे या तरुणाचे नाव आहे तो नाशिक येथून नातेवाईकाच्या लग्नासाठी आला होता. सायंकाळी शहराजवळील एका हॉटेलच्या स्वीमिंग पूल मध्ये मित्रा सोबत पोहण्यासाठी गेला होता पोहताना अचानक तो पाण्यात बुडू लागल्याचे पाहून त्याला बाहेर काढून सीपीआर देण्यात आले त्यानंतर त्याला तातडीने कार मध्ये घेऊन हॉस्पिटलकडे घेऊन जात असताना पुणे-इंदूर महामार्गांवर प्रचंड ट्रॅफिक जाम होते त्यामुळे काही तरुणांनी गणेशला खांद्यावर घेऊन हॉस्पिटल गाठले मात्र वेळेवर उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद करून तपास सूरू केला आहे0
0
Report
सोलापुर के हर तालुके में स्मार्ट हेल्थ सेंटर: जिला परिषद की महत्त्वाकांक्षित पहल
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्हा परिषदेच्या वतीने प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभा करण्याचा निर्णय असून ग्रामीण भागातील नागरिकांना दर्जेदार आणि आधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक तालुक्यात स्मार्ट आरोग्य केंद्र उभारण्याची महत्त्वकांक्षी संकल्पना जिल्हा परिषद स्तरावर पुढे आलीय. केंद्रावर रुग्णांना आवश्यक वैद्यकीय सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. प्रकल्पासाठी शासन अथवा जिल्हा परिषदेतून निधी उपलब्ध करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू असून या संदर्भात पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याशी चर्चा करून निर्णय घेतला जाणार आहे.0
0
Report
नांदेड-हैदराबाद-बीदर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, दो घंटे यातायात ठप
Nanded-Waghala, Maharashtra:नांदेड - हैदराबाद और नांदेड - बिदर के राष्ट्रीय मार्ग पर वाहतुकी की बड़ी कोड़ी हो गई। नायगाव तालुक्यातील नरसी चौक येथे दुपारी बाराच्या सुमारास वाहतूक ठप्प झाली। याच चौकातून हैदराबाद आणि बीदर कडे वाहन जातात. या मार्गावर तब्बल पाच किलोमीटर पर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. पोलीसांकडून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू होते. आज रविवारचा लग्नाचा मोठा मुहूर्त असल्यामुळे या मार्गावर वाहनांची संख्या वाढली होती. वाहतुकीच्या अडचणीमुळे अनेक गाड्या अडकलेल्या होत्या आणि जवळपास दोन तास या मार्गावर वाहतूक ठप्प होती.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में फ्लेमिंगो की संख्या घटी, पर्यटक फिर भी उमड़े
Navi Mumbai, Maharashtra:फ्लेमिंगो सिटी म्हणून ओळख निर्माण करू पाहणाऱ्या नवी मुंबईत यंदाच्या वर्षी फ्लेमिंगो पक्ष्यांची संख्या घटलेली पहायला मिळाली. हे फ्लेमिंगो आता परतीच्या प्रवासाला निघाले असून पावसाळ्या नंतर हिवाळ्यात फ्लेमिंगो पक्षी पुन्हा ऐरोली खाडी किनारी येतील मात्र आता त्यांच्या संख्या अधिक असावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येतेय. ऐरोली खाडीत पाण्यावर जणू गुलाबी चादर पांघरलेय अशी अनुभूती देणारे फ्लेमिंगो आता परतीच्या प्रवासाला निघालेत. खाद्याच्या शोधात हजारो मैलाचा प्रवास करुन आलेले हे परदेशी पाहुणे पाहण्यासाठी नागरिक ऐरोली येथील बायोडायवर्सिटी केंद्रात मोठी गर्दी करत असतात. या परदेशी पाहुण्यांना पाहून प्रत्येक पक्षी प्रेमी आनंद व्यक्त करत आहेत. 4 पर्यटक/पक्षी प्रेमी. नागरिकांमध्ये फ्लेमिंगो पाहण्याचा उत्साह असला तरी फ्लेमिंगो सिटी समजल्या जाणाऱ्या नवी मुंबईत फ्लेमिंगोची संख्या घटताना पहायला मिळत आहे. नवी मुंबईतील डीपीएस तलाव आणि टीएस चाणक्य येथील पाणथळ क्षेत्रात हजारोच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो यंदा आलेच नाहीत. त्यामुळे पाणथळ क्षेत्र वाचवीण्याचे आव्हान सरकार समोर आहे. ऐरोली खाडीतून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी स्वाती नाईक यांनी.0
0
Report
शिंदे गट की महिलाओं ने अंधारे के प्रतीम पर चॉकलेट खिलाकर विरोध जताया
Beed, Maharashtra:बीड: “चॉकलेट देऊन थांबवलं!” सुषमा अंधारे यांच्यावर शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांकडून जोरदार हल्लाबोल करत अंधारे यांच्या प्रतिमेला चॉकलेट भरवले..! ANC - ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्यावर शिवसेना शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी जोरदार टीका करत निषेध आंदोलन केले. सुषमा अंधारे भाजपच्या वाटेवर असल्याची माहिती उद्धव ठाकरे यांना समजल्यानेच त्यांना विधान परिषदेवर संधी देण्यात आली नाही, असा दावा शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी केला. यावेळी सुषमा अंधारे यांच्या प्रतिमेला चॉकलेट खाऊ घालत अनोख्या पद्धतीने निषेध व्यक्त करण्यात आला. “अंधारे यांना फक्त चॉकलेट देण्यात आले,” असा टोला देखील महिला पदाधिकाऱ्यांनी लगावला. तसेच, आमदार नीलम गोऱ्हे यांच्यावर बोलण्याची सुषमा अंधारे यांची लायकी नसल्याचे म्हणत, “निलमताई पक्षाशी प्रामाणिक राहिल्या म्हणूनच बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांना अनेक वेळा आमदार केले,” असेही त्यांनी सांगितले. “तुम्हाला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काही मिळाले नाही म्हणून तुम्ही उद्धव ठाकरे यांच्या पक्षात गेलात. तुमचे कारनामे महाराष्ट्राला माहीत आहेत,” असा आरोपही महिला पदाधिकाऱ्यांनी केला.यापुढे नीलम गोऱ्हे यांच्यावर टीका केल्यास “सेना स्टाईलने मस्ती जिरवू,” असा इशाराही शिंदे गटाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी दिला.0
0
Report
चंद्रपूर मुल रेलवे स्टेशन पर मालधक्का प्रकल्प रद्द, रेल मंत्री ने संकेत दिया
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील मुल रेल्वे स्थानकाजवळ प्रस्तावित मालधक्का (गुड्स यार्ड) प्रकल्प रद्द करण्याबाबत केंद्रीय रेल्वेमंत्री आश्विनी वैष्णव यांनी सकारात्मक निर्णय घेतल्याने स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी नवी दिल्ली येथे रेल्वेमंत्र्यांची भेट घेत या प्रश्नावर सविस्तर चर्चा केली. स्थानिक नागरिकांचा तीव्र विरोध, संभाव्य प्रदूषण आणि पर्यावरणीय परिणाम लक्षात घेता मुल येथे मालधक्का उभारला जाणार नसल्याचे रेल्वेमंत्र्यांनी स्पष्ट केले. मुल शहरातील प्रस्तावित गुड्स यार्ड प्रकल्पामुळे आयर्न ओअर आणि इतर खनिज पदार्थांच्या लोडिंग-अनलोडिंगमुळे मोठ्या प्रमाणावर वायूप्रदूषण होण्याची शक्यता होती. यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होईल, पिकांचे नुकसान होईल तसेच जलस्रोत दूषित होण्याचा धोका निर्माण होईल, अशी भूमिका आ. मुनगंटीवार यांनी रेल्वेमंत्र्यांसमोर ठामपणे मांडली. मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी मुल शहरातील वाढती वाहतूक, अपघातांचा धोका आणि ग्रामीण शांततेवर होणारा परिणाम लक्षात घेता हा प्रकल्प जनहिताच्या विरोधात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आ. मुनगंटीवार यांच्या या मागणीची गंभीर दखल घेत रेल्वेमंत्र्यांनी संबंधित प्रकल्प त्या ठिकाणी होणार नसल्याचे स्पष्ट करत स्थानिक नागरिक, शेतकरी आणि व्यापारी वर्गाला मोठा दिलासा दिला आहे.0
0
Report
Advertisement
पंढरपूर में अवैध शराब पर छापा; 15,200 रुपये मूल्य जप्त, दो आरोपी के खिलाफ मामला
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुका पोलिसांनी पोहोरगाव आणि शेगाव येथील अवैध दारू साठ्यावर कारवाई केली आहे. या कारवाईत 15 हजार 200 किमतीचा दारू साठा जप्त केला आहे. या कारवाईत बंडू सय्यद, नरेश दुद्धम यांच्या विरोधात मुंबई दारूबंदी कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल केला0
0
Report
कंडारी गाँव में जल जीवन मिशन ढीला, पानी के लिए महिलाएं भड़के
Buldhana, Maharashtra:सरकारने 'हर घर जल'च्या घोषणा केल्या खरं, पण बुलढाण्यातील कंडारी गावात मात्र या योजनेचा पुरता 'खेळखंडोबा' झालाय. गेल्या तीन वर्षांपासून जलजीवन मिशनचं काम सुरू आहे, पण गावकऱ्यांच्या नशिबी मात्र अजूनही तीच जुनी पायपीट आहे. निकृष्ट दर्जाचं काम, उघड्यावर पडलेले आणि फुटलेले पाईप... रणरणत्या उन्हात गावाबाहेरच्या एका हाफशीवर पाण्यासाठी महिलांच्या रांगा लागतायत, हंड्यासाठी भांडणं होतायत, पण प्रशासनाचे डोळे मात्र अजूनही उघडायला तयार नाहीत. हाफशीवर एक एक हंडाभर पाण्यासाठी भांडण लागलेल्या महिलांची बातचीत करा त्यांचे व्यथा जाणून घेतले आहेत आमचे प्रतिनिधी मयूर निकम यांनी...0
0
Report
नागपुर-मुंबई समृद्धि महामार्ग पर ट्रक सहित एक करोड़ रुपये के प्रतिबंधित गुटखा पकड़ा गया
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यातून जाणाऱ्या नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गावर महामार्ग सुरक्षा पथकाने कारंजा जवळ मोठी कारवाई करत ट्रकसह अंदाजे १ कोटी रुपयांचा प्रतिबंधित गुटखा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे कारंजा टोल नाक्यावर संशयित आयशर ट्रकची तपासणी करण्यात आली असता मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. महामार्ग सुरक्षा पथक नागपूरचे पोलीस अधीक्षक यशवंत सोळंके यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. पोलिसांनी आरोपी शेख रहमान शेत्र रहीम अमरावती याला ताब्यात घेतले असून हा प्रतिबंधक असलेला गुटखा कुठून आणला होता व कुठे नेण्यात येणार होता पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
Advertisement
चाकण मिडक के Mercedes-Benz परिसर में बिबटिया घुसा; वन विभाग ने रेस्क्यू शुरू किया
Khed, Maharashtra:पुण्याच्या चाकण औद्योगिक वसाहतीतील मर्सिडीज बेंज कंपनीमध्ये बिबट्या शिरला असून या बिबट्याला जेरबंद करण्याचं मोठ आव्हान आता वनविभागा पुढे असणार आहे. मर्सिडीज बेंज कंपनीच्या सुरक्षा भिंतीवरून बिबट्या चालत असलेला व्हिडिओ रात्री काही प्रवाशांनी आपल्या मोबाईल मध्ये चित्रित केला असून हा बिबट्या सुरक्षा भिंतीवरून पुन्हा खाली उतरून पुन्हा सुरक्षा भिंतीवरून कंपनीच्या आत मध्ये गेल्याची माहिती मिळत आहे, त्यामुळे या बिबट्याला रेस्क्यू करण्याचं काम सध्या वन विभागाकडून केलं जात असल्याची माहिती मिळत आहे.0
0
Report
बीड़ के मातंग समाज के उपवर्गीकरण के विरोध में मुंबई कूच का आह्वान—मराठवाड़ा बैठक निर्णय
Beed, Maharashtra:बीड: मातंग समाजाचा उपवर्गीकरणाचा मोर्चा मुंबईत धडकणार; मराठवाडास्तरीय बैठकीत निर्णय ANC- अनुसूचित जातीजमातीच्या आरक्षणामधून मातंग आणि मातंग समाजाच्या पोटजातीला स्वतंत्र आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर मोर्चे काढण्यात येत आहे. आरक्षणाचे अबकड मधून उपवर्गीकरण करण्यात यावे यासाठी बीडमध्ये आज मातंग समाजाच्या समन्वयकांची मराठवाडास्तरीय बैठक पार पडली. आठ दिवसात उपवर्गीकरणा बद्दल सरकारकडून अंमलबजावणी झाली नसल्यास महाराष्ट्रातील तमाम मातंग समाज मुंबईच्या दिशेने कूच करणार आहे. अबाल वृद्धासह जितराब घेऊन मुंबईच्या आझाद मैदानावर ठिय्या घालण्यात येईल असा इशार या बैठकीतून देण्यात आला आहे. त्यामुळे सरकारच्या डोकेदुखीत मात्र वाढ होण्याची शक्यता आहे.0
0
Report
तळकोकण में तीन दिन की अवकाली बारिश से जनजीवन तहस-नहस
Oras Bk., Maharashtra:तळकोकणात मागील तीन दिवस कोसळणाऱ्या अवकाळी पावसाने अक्षरशः धुमाकुळ घातलाय. वादळी वाऱ्यासह कोसळणाऱ्या पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झालेय. सिंधुदुर्गातील कणकवली तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घराची छप्पर उडून गेलीत तर आंबा काजूची झाड उन्मळून पडलीत. नुकसान ग्रस्त भागात प्रशासकीय कर्मचारी पोचले नसल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केलीय. तर नुकसानग्रस्त जनतेची व्यथा मांडण्यासाठी आलेल्या झी मीडियाचे आभार देखील मानलेत. याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी उमेश परब यांनी0
0
Report
Advertisement
कोकण में आंधी-बारिश का कहर, बिजली आपूर्ति ठप, हजारों परिवार अंधकार में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात अवकाळीचा हाहाकार! सलग तिसर्या दिवशी वादळी पाऊस.. वीज पडून दोन महिला जखमी,तर अनेक तालुके अंधारात.. रत्नागिरीसह संपूर्ण कोकणात निसर्गाचं तांडव सुरूच आहे.गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या वादळी पावसानं आता रौद्र रूप धारण केलं असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं आहे.. संगमेश्वरमध्ये घरावर वीज पडल्याची धक्कादायक घटना घडली असून,तर एका म्हैशीचा जागीच मृत्यू झाला आहे.. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा खंडित झाल्यानं हजारो कुटुंबं अंधारात आहेत.. या वादळामुळे विद्युत खांब आणि तारांवर झाडे पडल्याने अनेक तालुक्यांचा वीज पुरवठा पूर्णपणे खंडित झाला आहे.. मुसळधार पाऊस आणि अंधारामुळे दुरुस्तीच्या कामातही अडथळे येत असून,जनजीवन अक्षरशः ठप्प झाले आहे.. वादळी वाऱ्यासह झालेल्या या पावसाने आंबा,काजू आणि पपईच्या बागांना मोठा तडाखा दिला आहे... लांजा तालुक्यातील झापडे गावात समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग जमीनदोस्त झाली असून ३५ लाखांचं नुकसान झालं आहे.. केवळ शेतीच नव्हे,तर घरांचीही मोठी पडझड झाली आहे.. संगमेश्वर,मंडणगड,दापोली आणि राजापूरमधील खारेपाटणमध्ये घरांवरील कौले आणि पत्रे उडून गेले आहेत...अनेक ठिकाणी झाडे कोसळल्याने घरांचे नुकसान झाले आहे.. कोकणावर ओढवलेल्या या संकटामुळे बळीराजा हवालदिल झाला असून,प्रशासनाने तातडीने नुकसानीचे पंचनामे करून वीज पुरवठा सुरळीत करावा,अशी मागणी आता जोर धरत आहे..0
0
Report
चाय किसान परेशान: एक हफ्ते में कीमत 20000 से 18000 रुपये क्विंटल, चिंता बढ़ी
Washim, Maharashtra:वाशीम: चिया पिकाची लागवड करण्यात आली होती. सध्या चियाला मिळणारा दर शेतकऱ्यांसाठी समाधानकारक मानला जात असला तरी गेल्या काही दिवसांपासून बाजारभावात सातत्याने घसरण होत असल्याने उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. मागील आठवड्यात प्रतिक्विंटल २० हजार रुपये असलेला दर आता १८ हजार रुपयांवर आला आहे. अवघ्या एका आठवड्यात दोन हजार रुपयांची घसरण झाल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.0
0
Report
रत्नागिरी के लांजा में 11 एकड़ पपीते की बाग उजड़ गई, 35 लाख नुकसान
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लांजात अवकाळीचा तडाखा.. ११ एकर पपईची बाग भुईसपाट, शेतकऱ्याचे ३५ लाखांचे नुकसान!.. शनिवारी पडलेल्या वादळी पावासाचा तडाखा लांजा येथील शेतकऱ्याला बसला आहे.. एका प्रयोगशील शेतकरी समीर हाजु यांची ११ एकर पपईची बाग पूर्णपणे उद्ध्वस्त झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.. हातातोंडाशी आलेले पीक डोळ्यांदेखत नष्ट झाल्याने हाजु यांचे सुमारे ३५ लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.. वर्षभराची मेहनत मातीत गेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून, शासनाने तातडीने मदत देण्याची मागणी केली जात आहे.. समीर हाजु (शेतकरी).. लांजा0
0
Report
Advertisement
