445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नागपुर में 12 मेजर पोर्ट समेत बड़े इंफ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स का ऐलान
Nagpur, Maharashtra:नागपूर नितीन गडकऱी 12 मेजर पोर्ट आणि 200 मायनर पोर्ट विकसित झाले पोर्टला जोडणारे रस्ते झालेय एअरपोर्ट डबल झालेय शहरात CNG पाईप महापौर आणि सगळ्यांना सांगितले आहे की alternative फ्युएल वर आपली गाडी चालवा.. पेट्रोल, डिझेल नको आता किसान डांबर बनवणार.. डांबर रोड बायो गॅसने बनणार आता सगळ्या बँक प्रॉफिटमध्ये आल्यात.. NP नाही 16 करोड नळ कनेक्शन दिलेय 1.6 लाख स्टार्टअप , 118 युनिकॉर्न झालेय 25 तारखेला नागपूर विमानतळ हॅन्ड ओव्हर होण्याची शक्यता डबल इंजिनमुळे खूप काम झालेय आतापर्यंत जेवढे काम झाले ते ट्रेलर.. अजून पिचर बाकी.. nitiन गडकरी (प्रश्न -उत्तर ) नागपूर -हैद्राबाद दृतगती मार्ग 50 टक्के झालेय नागपूर -चंद्रपूर राज्य सरकार करेल.. 6 लेंथ 100 टक्के इथेनॉलच्या फाईलवर सही केलीय.. मारुतीच्या एक गाडी 100 टक्के इथेनॉल गाडी सुरु केली इथेनॉलबाबत अपप्रचार होतेय.. नागपुरात हायड्रोजन पंप आणि दोन बसेस सुरू होणार नागपूर- वर्धा, नागपूर- नरखेड, नागपूर- भंडारा चार लाईन रेल्वे साडेचार लाख वृक्ष आम्ही लावलेय प्रत्येकाने आपल्या आईच्या नावाने वृक्ष लावावे मुंबई स्टॉक एक्सचेंज मध्ये बॉण्ड करण्यावरून नाराज होतो...युद्ध परिस्थितीवरून विपक्षला काम हवे की नाही (on उज्वला ) आम्हाला अंदमान निकोबार मध्ये गॅस मिळाले..... नागालँड मध्येही मिळाले आहे... आपल्याकडे 87 टक्के इम्पोर्ट महाराष्ट्रातील सर्व तालुक्यात remort सेन्सरने मॅपिंग करावी... आणि जिथे फोरेस्ट वाढेल ते समजेल...याबाबत गणेश नाईक यांच्याशी बोलेन (on प्रणिती शिंदे म्हणाल्या की तुम्हाला CM केले पाहिजे ) मला फटाके लावण्याचा कार्यक्रम आहे कां?0
0
Report
नागपुर में जोरदार बारिश, मानसूनपूर्व पावस ने शहर में उमंग बढ़ाई
Nagpur, Maharashtra:नागपुर नागपुरात जोरदार पाऊस मान्सूनपूर्व दमदार पावसाने नागपूरकरांना सुखद दिलासा दुपारी एक नंतर शहरातील वातावरण बदलले ढग दाटून आले व पावसाला सुरुवात0
0
Report
मावळ में देवी के मुकुट की चोरी, पुलिस ने पहन लिया फिर चोरों ने डल्ला
Varsoli, Maharashtra:मावळातील धक्कादायक प्रकार मावळातील तळेगाव दाभाडेत पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला अन त्याच रात्री चोरट्यांनी पुन्हा तोचं चांदीचा मुकुट लंपास केला. तळेगावमधील तुळजाभवानी मातेचा सव्वा किलो वजनाचा चांदीचा मुकुट चोरीला गेला होता. पुजाऱ्या देखत मुकुट लंपास करणाऱ्या चोरट्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. काल 12 जूनच्या सकाळीच पोलिसांनी चोरी गेलेला चांदीचा मुकुट देवीला परिधान केला. स्वतःची पाठ थोपटून घेण्यासाठी पोलिसांनी मोठा गाजावाजा केला. पण चोवीस तास उलटायच्या आत चोरट्यांनी पुन्हा त्याचं चांदीच्या मुकुटावर डल्ला मारला. त्यामुळं पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उभे राहिलेत..0
0
Report
Advertisement
मावल के इंदोरी के कडजाई माता मंदिर में चोरी; CCTV में तीन चोर
Varsoli, Maharashtra:मावळातील देवालयांमध्येही आता चोरट्यांचा मुक्त संचार सुरू झाल्याचे चित्र दिसत आहे. इंदोरी येथील श्री कडजाई माता मंदिरात झालेल्या धाडसी चोरीने पोलिसांच्या सुरक्षाव्यवस्थेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. विशेष म्हणजे चोरी करण्यापूर्वी चोरट्यांनी देवीसमोर हात जोडले, पादत्राणे मंदिराबाहेर काढली आणि त्यानंतर मंदिरातील मौल्यवान वस्तू चोरल्या. ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून तीन चोरटे स्पष्टपणे दिसत आहेत. एकीकडे तळेगाव दाभाडे येथील तुळजाभवानी मंदिरातील मुकुट चोरीची घटना ताजी असतानाच, दुसरीकडे एकाच रात्रीत दोन वेगवेगळ्या मंदिरांमध्ये चोरी झाल्याने तळेगाव पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. चोरट्यांचे वाढते धाडस आणि मंदिरांनाच लक्ष्य करण्याच्या घटना पाहता परिसरात पोलिसांचा धाक कमी झाल्याची चर्चा सुरू झाली असून, या चोरट्यांचा बंदोबस्त करण्याचे मोठे आव्हान आता पोलिसांसमोर उभे ठाकले आहे..0
0
Report
वाशीम में तेज आंधी-तूफान से सड़क बंद, लोग बेहाल
Washim, Maharashtra:वाशीम: असेगाव ते कोयाळी दरम्यानच्या रस्त्यावर मोठी झाडे उन्मळून पडल्याने हा मार्ग रात्रीपासून वाहतुकीसाठी बंद झाला आहे. त्यामुळे कोयाळी, वरूड तोफा आणि परिसरातील गावांतील नागरिकांना बाहेरगावी जाण्यासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून रस्त्यावर पडलेली झाडे हटविण्याचे काम हाती घेण्यात आले असून वाहतूक सुरळीत करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वादळी वाऱ्याचा फटका कोयाळी व वरूड तोफा परिसरालाही बसला आहे. अनेक घरांवरील टिनपत्रे उडाली असून काही ठिकाणी वीज खांब कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला आहे. त्यामुळे नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे.0
0
Report
चंद्रपुर में रक्त की भारी कमी, जनता से रक्तदान की अपील जोरदार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला आहे. शासकीय रक्तकेंद्राच्या माहितीनुसार, सन 2025 मध्ये 15 हजार 258 रक्तपिशव्यांचे संकलन झाले होते. मात्र चालू वर्षात आतापर्यंत केवळ 5 हजार 102 रक्तपिशव्यांचे संकलन झाल्याने रुग्णालयात रक्ताचा तीव्र तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे गरजू रुग्णांना अडचणींचा सामना करावा लागत असल्याने रक्तसंकलन वाढविण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाने पुढाकार घेतला आहे. रक्तदान सप्ताहांतर्गत 12 जून रोजी महाराष्ट्र सुरक्षा बलाचे जवान, 13 जून रोजी पदवीपूर्व विद्यार्थी आणि 15 जून रोजी महाविद्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांच्यामार्फत रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील सामाजिक स्वयंसेवी संस्था, दानशूर व्यक्ती आणि तरुण रक्तदात्यांना स्वतःहून रक्तदान शिबिरांचे आयोजन करून शासकीय रक्तकेंद्रातील रक्ताचा तुटवडा भरून काढण्यास पुढे येण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शासकीय रक्तकेंद्रात उपलब्ध होणाऱ्या रक्तपिशव्या गरजू रुग्णांना विनामूल्य दिल्या जात असल्याने रक्तदानाद्वारे समाजहितासाठी पुढे येण्याची गरज आहे.0
0
Report
Advertisement
केंद्रीय सरकार ने कांदा खरीद दर 70 पैसे बढ़ाकर 16.50 रुपये प्रति किग्राम किया
Yeola, Maharashtra:अँकर इंट्रो : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी दरात किरकोळ वाढ केली असली तरी ती शेतकऱ्यांच्या उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत अपुरी असल्याचा आरोप कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. कांदा खरेदी प्रक्रियेत शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा गंभीर आरोप करत संघटनेने सरकारला तीव्र आंदोलनाचा इशाराही दिला आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... व्हॉईस ओव्हर : केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू असलेल्या कांदा खरेदीसाठी दरामध्ये प्रति किलो 70 पैशांची वाढ करत तो 15 रुपये 80 पैशांवरून 16 रुपये 50 पैसे इतका निश्चित केला आहे. मात्र हा दर उत्पादन खर्चाच्या तुलनेत अत्यंत कमी असल्याचा दावा कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने केला आहे. संघटनेच्या म्हणण्यानुसार सध्या कांद्याचा उत्पादन खर्च किमान 22 रुपये प्रति किलो इतका येत असून शासनाने जाहीर केलेला खरेदी दर शेतकऱ्यांच्या आर्थिक हिताला धक्का देणारा आहे. बाईट : कांदा उत्पादक शेतकरी व्हॉईस ओव्हर : यासोबतच नाफेड आणि एनसीसीएफमार्फत होणाऱ्या कांदा खरेदी प्रक्रियेत अनेक ठिकाणी शेतकऱ्यांची फसवणूक होत असल्याचा आरोपही संघटनेने केला आहे. वजन, प्रतवारी आणि खरेदी प्रक्रियेत पारदर्शकता नसल्याने शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान सहन करावे लागत असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेने शासनाकडे शासकीय कांदा खरेदी दर किमान 30 रुपये प्रति किलो म्हणजेच 3 हजार रुपये प्रति क्विंटल निश्चित करण्याची मागणी केली आहे. तसेच खरेदी प्रक्रियेत कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार किंवा शेतकऱ्यांची फसवणूक होणार नाही याची हमी शासनाने घ्यावी, अशी मागणीही करण्यात आली आहे. बाईट : कांदा उत्पादक शेतकरी व्हॉईस ओव्हर : दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष न दिल्यास आणि खरेदी प्रक्रियेतअनियमितता आढळल्यास राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा कांदा उत्पादक शेतकऱ्य संघटनेने दिला आहे. त्यामुळे कांदा दराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून शासन याबाबत काय निर्णय घेते याकडे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
रामदास आठवलें का शरद पवार को भाजपा या रिपब्लिकन पार्टी में आने का संकेत
Sangli, Maharashtra:शरद पवारांनी, त्यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्या़ ऐवजी भाजपा सोबत यावे - मंत्री रामदास आठवलेंचा. शरद पवार यांनी आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करू नये, त्यांनी आमच्यामध्ये यावे, अब निमंत्रण आहेत. केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी शरद पवारांना दिला आहे. या आधी शरद पवारांना आपण काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा सल्ला दिला होता, पण आता काँग्रेसमध्ये दम राहिला नाही, काँग्रेसला लवकर भविष्य दिसेल, अशीही परिस्थिती नाही, त्यामुळे शरदवारांनी आमच्यासोबत यावं भाजपाकडे घेऊन जाऊ, असं देखील विधान रामदास आठवले यांनी केला आहे, ते सांगलीमध्ये बोलत होते.0
0
Report
नालासोपारा के यूपीआई एटीएम से 400 रुपये कम, फटी नोट मिलने मामला सामने आया
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपाऱ्यात एटीएममधून निघाली फाटलेली नोट ग्राहकाला तब्बल ४०० रुपयांचा फटका! ANC : डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात एटीएममधून सुरक्षित व्यवहार होईल या आशेने गेलेल्या ग्राहकांना आता थेट एटीएम मशिनकडूनच 'धक्का' बसला आहे. नालासोपारा येथील गालानगर भागात असलेल्या हिताची (Hitachi) कंपनीच्या युपीआय एटीएम (UPI ATM) मधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथे एका ग्राहकाने पैसे काढले असता, त्याला केवळ फाटलेली नोटच मिळाली नाही तर हिशोबापेक्षा तब्बल ४०० रुपये कमी आल्याचे उघड झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित ग्राहकाने गालानगर येथील हिताची एटीएममधून ४,००० रुपये काढण्यासाठी 'युपीआय कॅश विथड्रॉल' चा पर्याय वापरून क्यूआर कोड स्कॅन केला होता. मशिनमधून पैसे बाहेर आल्यानंतर ग्राहकाने जेव्हा नोटा तपासल्या, तेव्हा त्याला मोठा धक्का बसला. बाहेर आलेल्या नोटांमध्ये २०० रुपयांची एक नोट पूर्णपणे फाटलेली आणि अत्यंत दुरवस्थेत होती. याशिवाय आणखी धक्कादायक बाब म्हणजे, ४,००० रुपयांपैकी प्रत्यक्ष मोजणी केली असता फक्त ३,६०० रुपयेच हातामध्ये आले. म्हणजेच ग्राहकाला ४०० रुपये कमी मिळाले. त्यामुळे पैसे कमी आल्याचे आणि नोट फाटलेली असल्याचे लक्षात येताच ग्राहकाने सतर्कता दाखवून एटीएम सेंटरमध्ये असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यासमोर त्याने सर्व नोटांची मोजणी करून दाखवली, जेणेकरून हा सर्व प्रकार रेकॉर्ड व्हावा आणि बँक प्रशासनाकडे याचा भक्कम पुरावा राहावा. या संपूर्ण प्रकाराचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर समोर आला असून, एटीएमच्या विश्वासार्हतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
धाराशिव के राजनीति में ओमराजे نिंबळकर की चुप्पी क्यों राज उगल रही है?
Dharashiv, Maharashtra:धाराशिव के राजनीति में सध्या एकच चर्चा... खासदार ओमराजे निंबळकर शांत क्यों? बैठकीं को दांडी, राजकीय घडामोडीं पर मौन और ऑपरेशन टायगर की चर्चाओं से बढ़ता गूढ़... पाहूया ओमराजें की शांतते मागचं राजकारण. सध्या ऑपरेशन टायगर की जोरदार चर्चा शुरू है. और इस चर्चा में सर्वाधिक चर्चेत हैं धाराशिव के उद्धव ठाकरे गट के खासदार ओमराजे निंबळकर. इसका कारण भी वही है. पहले की तरह धाराशिव के राजकारण में सक्रिय न दिखने वाले ओमराजे पक्ष के छोटे-बड़े कार्यक्रमों और बैठकों में अनुपस्थित रहते हैं, इस से उनका वावर मतदारसंघ में कम हुआ बतलाया जा रहा है. ऑपरेशन टायगर की चर्चाओं में उनके नाम के साथ साथ मौन भी चर्चा का विषय बन रहा है. नेमकं क्या चल रहा है ओमराजें के मन में?0
0
Report
अमरावती विधान परिषद चुनाव में कांग्रेस- वंचित के समर्थन पर नया ट्विस्ट
Amravati, Maharashtra:अमरावती विधान परिषद निवडणुकीत पुन्हा आला नवीन ट्विस्ट; काँग्रेसने वंचितला पाठवलेला पाठिंब्याचा प्रस्ताव वंचित कडून गेल्या तीन दिवसांपासून वेटिंगवर ठेवण्याचा काँग्रेसचे माजी मंत्री व ज्येष्ठ नेते सुनील देशमुख यांनी म्हटला आहे त्यामुळे वंचित आणि काँग्रेसमध्ये नेमकं चाललय काय असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. तीन दिवसांपूर्वी वंचित चे उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्याशी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांची बैठक झाली होती वंचितच्या उमेदवाराला पाठिंबा देण्याबाबत चर्चा झाली यानंतर काँग्रेस नेते आणि वंचित उमेदवार निलेश विश्वकर्मा यांच्या एक गुप्त बैठक झाली तेव्हा वंचितला पाठिंबा देण्याचा प्रस्ताव काँग्रेसने दिला मात्र बाळासाहेब आंबेडकरांचा यांच्याशी बोलून निर्णय घेऊ असे निलेश विश्वकर्मा यांनी सांगितले पण आता तीन दिवस उलटूनही अजून विश्वकर्मा यांच्याकडून कोणताही निरोप न आल्याने वंचित ने काँग्रेसचा प्रस्ताव गेल्या तीन दिवसांपासून वेटिंग वर ठेवल्याचं बोलला जात आहे. बाइट :- सुनील देशमुख, माजी मंत्री व काँग्रेस नेते शाहू, फुले आंबेडकर विचारधारेला पाठिंबा द्यायचा की जातीवादी पक्षाला पाठिंबा द्यायचा हे काँग्रेसने ठरवावे; निलेश विश्वकर्मा यांचा काँग्रेस वर पलटवार वो: अमरावती विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने काँग्रेस सोबत प्राथमिक दुसरी आणि तिसरी बैठक झाली आहे. मी सुरुवातीला म्हटलं होतं काँग्रेसने मोठ्या भावाची भूमिका घेतली पाहिजे. ज्या शाहू, फुले, आंबेडकरांच्या विचारधारेला घेऊन आपण चालतो त्याला पाठिंबा करायचा की जातीवादी शक्तीला पाठिंबा द्यायचा आहे हे त्यांनी ठरवावे असे विश्वकर्मा यांनी काँग्रेसवर पलटवार केला आहे. दरम्यान पाठिंबा बाबत लवकर निर्णय होईल असेही विश्वकर्मा यांनी म्हटले आहे. बाइट :- निलेश विश्वकर्मा, उमेदवार, वंचित0
0
Report
1984 जीआर के आधार पर समाज कल्याण भर्ती की बहस गर्म
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट- आ परिणय फुके नागपूर - On समाजकल्याण विभाग आरक्षण - समाज कल्याण विभागात काढलेली भरती..१९८४ च्या जीआर नुसार भरती काढली जाते.. कोणाला काही संभ्रम असेल तर त्यांनी तो जीआर वाचन कराव.. - संजय राऊताना कोणतेही काम नसल्याने सकाळी उठून टीकाटिपणी करतात.. त्यांनी १९८४ चा जीआर त्यांना मी आज पाठवतो..त्याचा करून अभ्यास करून बोलाव.. On रोहित पवार आंदोलन - रोहित पवार यांना कर्जमाफीचा अभ्यास नाही.. कर्जमाफीचा शेतकरी लाभ घेत आहेत.. अडचण असेल तर स्थानिक जिल्हाधिकारी يांना तक्रार करून निवारण करतील. रोहित पवार यांची मागणी शेतकऱ्याची कोणतीही पोठतिडकी नाही.. On विलीनीकरण चर्चा - इतर सर्व पक्ष राज्याच्या हितासाठी आणि वेगळ्या विचारामुळे काँग्रेसमधून बाहेर पडले होते.. आज त्यांच्या राज्यात नाकारल्याने त्यांचे विचार असेल पुन्हा काँग्रेसमध्ये विलीनीकरण व्हायचं... On काँग्रेस उमेदवार माघार.. - . त्यांचे भांडण संपल्याशिवाय निवडणूक लढायची नाही असे काँग्रेस पक्षाने ठरवले असावे म्हणून काँग्रेसच्या उमेदवाराने माघार घेतली असावी..0
0
Report
Advertisement
रोहित पवार का उपोषण, राम शिंदे की तीखी टिप्पणी और कर्जमाफी मुद्दे पर बहस
Ahilyanagar, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीतील जाचक अटी रद्द कराव्या या आणि शेतकऱ्यांच्या इतर मागण्यांसाठी राष्ट्रवादी SP चे आमदार रोहित पवारांनी पंढरपूरात उपोषण सुरू केले आहे... यावरून विधान परिषदेचे सभापती राम शिंदे यांनी रोहित पवारांवर जोरदार टीका केली आहे...पंढरपूरातील आंदोलन का आणि कशासाठी सुरू आहे हे शोधण्याची गरज आहे...शेतकऱ्यांना शासनाने वेळेत कर्जमाफी दिली आहे, 22 तारखेला आचारसंहिता संपल्यावर कर्जमाफीची करावाई होईल असं असतांना विठ्ठलाच्या दारात उपोषण करून भाविकांची गैरसोय निर्माण होईल असा हा प्रकार आहे...शासनाने केलेल्या कर्जमाफीमध्ये कोणतेही त्रुटी दिसत नाही, तरी आपण काहीतरी करत आहोत हे दाखवण्याचा रोहित पवारांचा हा केविलवाणा प्रकार आहे अशी टीका राम शिंदे यांनी केली.0
0
Report
शरद पवार का काँग्रेस विलय, राज्यसभा में विपक्षी नेता बनने की चर्चा
Nagpur, Maharashtra:शरद पवार کا काँग्रेस विलय, राज्यसभा में विपक्षी नेता बनने की चर्चा— नागपुर में भाजपा की जीत। शरद पवार और उद्धव ठाकरे के खासदार महायुती में शामिल होने की अटकलें चल रही हैं। कांग्रेस में शरद पवार को विरोधी पक्ष नेता पद और उद्धव ठाकरे को प्रदेश अध्यक्ष पद देने की बात एहतेमाम है। विधान परिषद के संदर्भ में कहें तो नागपुर जिले में भाजपा को एकहाती सत्ता मिली है; भाजपा के विधान परिषद उम्मीदवार डॉ राजीव पोतदार लगभग जीतेंगे, ऐसी आशा है।0
0
Report
अल निनो से महाराष्ट्र के मराठवाड़ा में सूखे की आशंका, मानसून प्रभावी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जून मध्यावर आलाय मात्र महाराष्ट्रात अजूनही पाऊस नाहीं त्यामुळं दुष्काळ प्रवण क्षेत्र असलेल्या मराठवाड्या सारख्या भागात धडकी भरली आहे, बळीराजाचे डोळे आभाळाकडे लागले आहेत तर दुसरीकडे हवामान विभागाने प्रशांत महासागरात अल निनो परिस्थिती निर्माण झाल्याची घोषणा केलीय त्यामुळं दुष्काळचे ढग दाटून आले आहे... महाराष्ट्रासह मराठवाड्यावर भीषण दुष्काळाचे सावट. प्रशांत महासागरात अल निनो परिस्थिती निर्माण. पावसाच्या सरसरीत 25 टक्के तूट पडण्याची भीती. जून महिना मध्यावर आलाय मात्र अजूनही ढग दाटून येत नाहीय.. बळीराजा पावसाच्या प्रतीक्षेत आहे मात्र सरी कोसळत नसल्याने तो हवालदिल झालाय, एरव्ही जूनच्या पाहिल्या वा दुसऱ्या आठवड्यात पेरण्या होतात मात्र यंदा पावसाचा नेम दिसत नसल्याने पेरण्याही खोळंबल्या आहेत, त्यामुळं पाऊस कधी येणार आणि कधी पेरण्यां होणार असा प्रश्न बळीराजाला पडलाय, मराठवाड्यात तर सर्वदूर असेच चित्र आहे तर महाराष्ट्र मध्येही जवळपास असेच चित्र दिसतेय, जमिन तयार आहे मात्र प्रतीक्षा पावसाची आहे.. यामुळं काय आहे अल निनो ... प्रशांत महासागरातील पाण्याच्या पृष्ठभागाचे तापमान जेव्हा नेहमीपेक्षा जास्त वाढते, त्याला 'एल निनो' असे म्हणतात. एल निनोचा प्रभाव जागतिक असला, तरी भारतासाठी तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो: एल निनोचा थेट परिणाम भारताच्या मान्सूनवर होतो. जेव्हा एल निनो सक्रिय असतो, तेव्हा भारतात मान्सूनचा पाऊस सरासरीपेक्षा कमी पडतो. जगातील तापमानात वाढ होते आणि जगभरात उष्णतेच्या लाटां येतात. एका बाजूला भारत, ऑस्ट्रेलिया सारख्या देशात दुष्काळ पडत असतानाच, दुसरीकडे दक्षिण अमेरिकेतील देशांमध्ये मुसळधार पाऊस आणि पूर येतो. अल निनो चा मोठा फटका मान्सून ला बसणार असे चित्र दिसते या आधी 1953, 1957, 1958, 1965, 1966, 1972, 1977 ते 1980 आणि नुकताच 2015-16 मध्ये अल निनो च्या प्रभावाने दुष्काळ परिस्थिती निर्माण झाली होती..0
0
Report
Advertisement
