445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड के कपिलधार वाड़ी: पुनर्वसन नहीं, मौत का खतरा बना रहा
Beed, Maharashtra:बीड: मृत्यूच्या सावटात जगणारे कपिलधार वाडीतील 200 कुटुंुब! चारही बाजूंनी महाकाय डोंगर... आणि पायाखाली भूस्खलनाची वेळोवेळी जाणवणारी चाहूल पाहून बीड जिल्ह्यातील कपिलधार वाडी हे गाव आज जीव मुठीत धरून जगतंय. गेल्या एक वर्षापासून घरांना तडे गेलेत, रस्त्याला भेगा पडल्यात. पण जिल्हा प्रशासन मात्र पूर्णतः उदासीन आहे. यंदा पावसाने जर्का रौद्र रूप धारण केलं, तर हे गावही रायगडच्या माळीणसारखं मातीखाली गाडलं जाण्याची भीती ग्रामस्थांना सतावतेय... पाहुयात एक खास ग्राउंड रिपोर्ट! kapiladhar vadi गावाचं पोट शेती आणि श्वास पशुधनावर आधारित आहे. प्रशासन पुनर्वसनाचे बोलतंय... पण त्या घरांसोबत शेतीसह आमच्या गाय-गोठ्याचं काय? ही आर्त मागणी आहे. गेल्या वर्षी गावाचा संपर्क तुटला, प्रशासनाला पुनर्वसनाचं आश्वासन दिलं गेलं; सध्या फक्त घोषणा, प्रत्यक्ष पायात एक वीटही हलली नाही. गावातील एसटी बंद आहे, शाळा दुसऱ्या गावात हद्दपार झाली आहे. ग्रामस्थांना कायमचं घर नको, पावसाळ्यापुरतं पत्र्याचं शेड तरी बांधून द्या, अशी मागणी. पावसाच्या सरी सुरू झाल्यावरच निधी मंजूर झाल्याची माहिती मिळते. आता कपिलधार वाडीसमोरचा प्रश्न पुनर्वसनाचा नाही, तर जीविताच्या सुरक्षेचा आहे. प्रशासनाची गती थंडी, भूस्खलनाचा धोका वाढत असून दोनशे कुटुंबं अडकली आहेत. मदतीचे हात वेळेत न येण्याची भीती; मोठी दुर्घटना घडण्याआधीच संकट टाळणं हीच खरी कसोटी.0
0
Report
नांदूर मधमेश्वर से गोदावरी नदीपात्र में 300 क्यूसेक विसर्जन शुरू
Niphad, Maharashtra:राज्यातील मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामात प्रथमच गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने एका वक्राकार गेटमधून ३०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे हवामान विभागाने येत्या काही दिवसांत नाशिक मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यास विसर्गातही वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने तब्बल १०५.२० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.0
0
Report
पश्चिम घाट में भारी बारिश से कराड-चिपळूण मार्ग पर पेड़ गिरने से कई घायल
Satara, Maharashtra:कराड, सातारा सातारा जिल्ह्यातील पश्चिम घाट परिसराला आज अति मुसळधार पावसाचा इशारा दिला असून पाटण तालुक्यात पावसाचा हाहाकार पाहायला मिळतोय. कराड चिपळूण मार्गावर मल्हारपेठ येथे एक झाड पडून एक जण जखमी झाला आहे तर चाफळ उंब्रज मार्गावर प्रवासी घेऊन निघालेल्या चालत्या जीपवर बाभळीचे झाड पडून सहा जण जखमी झाले आहेत. तर ढेबेवाडी विभागातील गुडे काळगाव मार्गावर झाड पडल्याची घटना घडली आहे. या दुर्घटनेत चालक सुभाष साळुंखे, वंदना योगेश चव्हाण (साजूर), पूनम शिवाजी पाटील (दाढोली), संभाजी पाटील (दाढोली), मानसिंग बाळाराम साळुंखे (चाफळ) आणि वैशाली रविंद्र पाटील (चाफळ) हे किरकोळ जखमी झाले. घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू करण्यात आले आहे0
0
Report
Advertisement
कल्याण-डोंबिवली में तेज बारिश, सड़कों पर पानी भर गया
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवलीत एक तासापासून मुसळधार पाऊस सुरु.. सखल भागात पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम.. पावसामुले रस्त्याने गाड्या बंद. कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळ पावसाची सततधार सुरु होती तर एक तासापासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने कल्याण डोंबिवलीच्या सखल भागात पाणी साचायला सुरवात झाली आहे0
0
Report
नाशिक में गोदावरी से जायकवाडी के लिए 300 क्यूसेक पानी छोड़ा गया, मानसून की चेतावनी
Niphad, Maharashtra:राज्यातील मराठवाड्यातील नागरिकांसाठी दिलासादायक बातमी आहे नाशिकच्या निफाड तालुक्यातील नांदूर मधमेश्वर धरणातून या पावसाच्या हंगामात प्रथमच गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने एका वक्राकार गेटमधून ३०० क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे हवामान विभागाने येत्या काही दिवसांत नाशिक मध्ये मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केला असल्याने धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाल्यास विसर्गातही वाढ करण्यात येण्याची शक्यता आहे गेल्या वर्षी नांदूर मधमेश्वर धरणातून गोदावरी नदीपात्रातून जायकवाडी धरणाच्या दिशेने तब्बल १०५.२० टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता.0
0
Report
पंढरपुर के मार्ग पर संत निवृत्तीनाथ महाराज की पालखी, हजारों श्रद्धालु झूमे
Shirdi, Maharashtra:त्र्यंबकेश्वरहून निघालेली संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी मजल दरमजल करत पंढरपूरच्या दिशेने निघाली आहे.. ही पालखी आता अहिल्यानगर जिल्ह्यातून मार्गक्रमण करत आहे.. पुढील दोन दिवस ही पालखी नगर जिल्ह्यात असणार आहे.. संगमनेर तालुक्यातील पारेगाव येथे मुक्काम केल्यानंतर आज ही पालखी पुढील प्रवासासाठी रवाना झाली आहे.विठू नामाचा गजर करत हजारो वारकरी या पालखीत सहभागी झाले आहेत.. महिला वारकऱ्यांच्या डोक्यावर तुळशी वृंदावन, पुरुष वारकऱ्यांच्या हातात टाळ - मृदुंग आणि मुखी विठुरायाचे नामस्मरण असे भक्तिमय वातावरण बघायला मिळतंय. या पालखीतून आढावा घेत वारकऱ्यांशी बातचीत केली आमची प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Advertisement
मुंबई-आग्रा हाईवे के पुल पर बड़ा गड्ढा, दुर्घटना का खतरा बढ़ा
Nashik, Maharashtra:नाशिक के मालेगाव के पास मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पुलावर जोरदार पावसामुळे पडले भले मोठे भगदाड. नाशिकच्या मालेगावजवळील घटना, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण विभागाकडून दुर्लक्ष. मोठा अपघात होण्याची शक्यता. या ठिकाणी दळणवळासाठी रोज हजारो वाहनें ये-जा करतात. या स्थितीची आढावा आमचे प्रतिनिधी विशाल मोरे यांनी घेतला.0
0
Report
वाशी में भारी बारिश से घर का स्लैब गिरा, कोई जनहानि नहीं
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई में वाशी में भारी बारिश के कारण घर का स्लैब गिर गया. वाशी सेक्टर 9 में नक्षत्र सोसायटी के एक घर का स्लैब गिरा. भोर में 4 बजे स्लैब गिरा. सौभाग्य से कोई जनहानि नहीं हुई.0
0
Report
विदर्भ में अगले 48 घंटों में भारी बारिश, मुंबई में अलर्ट जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर - पुढील 48 तासात विदर्भात मुसळधार पाऊस. मुंबईत पुढील 48 तास मुसळधार पाऊस कायम राहणार, हवामान विभागाचा अंदाज, काही ठिकाणी रेड अलर्ट. 9 तारखेनंतर महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होइल. पुढील 48 तासांत विदर्भात गोंदिया, भंडारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के चिपळूण बाजार में पेड़ गिरने से बड़ा हादसा टला; नगर निगम पर आरोप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी चिपळूण बाजारपेठेत मोठे झाड उन्मळून पडले.. दैव बलवत्तर म्हणून एकाचा थोडक्यात बचाव, नगरपरिषदेवर दुर्लक्षाचा आरोप चिपळूण शहरातील बाजारपेठ परिसरात आज एक मोठे झाड उन्मळून पडल्याने मोठी दुर्घटना टळली. दैव बलवत्तर म्हणून एक व्यक्ती थोडक्यात बचावली. झाड पडल्यामुळे परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि रिक्षाचालकांनी नगरपरिषदेवर गंभीर आरोप करत सांगितले की, हे धोकादायक झाड तोडण्याबाबत मागील एक महिन्यापासून वारंवार तक्रारी करण्यात येत होत्या. मात्र नगरपरिषद प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्यामुळेच आज ही घटना घडल्याचा आरोप करण्यात आला आहे.0
0
Report
पंढरपुर आषाढ़ी यात्रा के दौरान परप्रांतीय विक्रेताओं में भिड़ंत, हथियारों का इस्तेमाल
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर आषाढ़ी यात्रेदरम्यान विविध वस्तूंची विक्री करायला येणाऱ्या परप्रांतीय वस्तू विक्रेत्यांच्या दोन गटांमध्ये फ्रीस्टाइल हाणामारी झाली. पंढरपूरातील जुना दगडी पूल चंद्रभागा नदीच्या वाळवंटाजवळ हा प्रकार घडला. या मारहाणी मध्ये काट्या तसेच कुऱ्हाडीचा वापर झाल्याचा माहिती मिळत आहे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र उपस्थित वारकरी नागरिक आणि इतरांनी तत्परता दाखवल्यानंतर गंभीर मारहाणी मध्ये याचे रूपांतर झाले नाही. पोलिसांनी अशा परप्रांतीय व्यापाऱ्यांना वेळीच आवर घालण्याची गरज आहे0
0
Report
JNPT बंदर में हादसा: कंटेनर उतरते समय तीन मजदूर उड़े, एक की मौत
Navi Mumbai, Maharashtra:उरण तालुक्यात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यांनी अक्षरशः थैमान घातले आहे. या भीषण हवामानाचा फटका आता जेएनपीए बंदरालाही बसला आहे. न्हावा शेवा येथील NSFT टर्मिनलमध्ये आज सकाळी घडलेल्या धक्कादायक अपघातात जहाजावरील कंटेनर उतरविण्याचे काम सुरू असताना कंटेनरसह तीन कामगार वादळी वाऱ्यामुळे उडाल्याची माहिती समोर आली आहे. यात एक कामगार मृत झाला असून दोन कामगारांची प्रकृति चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. उरण तालुक्यात मागील चार दिवसांपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भाग जलमय झाले असून जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे. त्याचदरम्यान जेएनपीए बंदरातील ही घटना घडल्याने कामगारांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, एवढी गंभीर घटना घडूनही घटनास्थळी आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा आणि आवश्यक आपत्कालीन सुविधा वेळेत उपलब्ध न झाल्याचा आरोप होत असून कामगार वर्गातून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या घटनेतील जखमींवर उपचार सुरू असून प्रशासनाकडून अधिकृत माहितीची प्रतीक्षा आहे.0
0
Report
Advertisement
पुणे में भारी बारिश ने पालखी यात्रा रोक दी, वारकरी पंढरपूर में ठहरे
Pandharpur, Maharashtra:Anchor - removed content: पुणे जिल्ह्यात मुसळधार पावसाने संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी वारकऱ्यांनी येऊ नये असे आवाहन केले आहे. अशातच आता पंढरपूर मध्ये दरवर्षी प्रस्थान सोहळ्यासाठी जाणारे वारकरी थांबले आहेत. जो पर्यंत आळंदी आणि देहू कडे जाण्यासाठी सुरक्षित वातावरण तयार होत नाही. तो पर्यंत हे वारकरी आता पंढरपूर मधील 65 एकर परिसरात थांबून आहेत.0
0
Report
खवटी में दराड़ गिरने से मुंबई-गोवा हाइवे आठ घंटे ठप, भाजपा नेता ने प्रशासन पर नाराज़गी
Ratnagiri, Maharashtra:खवटी येथे दरड कोसळल्याने मुंबई-गोवा महामार्ग ८ तासांपासून ठप्प प्रशासनावर भाजप नेते वैभव खेडेकर यांचा संताप; प्रवासीही संतापले अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात खवटी येथे मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने महामार्गावरील वाहतूक गेले तब्बल आठ तास ठप्प आहे. दरड हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणा तातडीने कार्यरत करण्यात आलेली नसल्याचा आरोप करत भाजप नेते वैभव खेडेकर यांनी प्रशासनाच्या कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठका केवळ देखाव्यासाठीच होत असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला. दरम्यान, रात्रीपासून महामार्गाच्या दोन्ही बाजूंना शेकडो वाहने अडकून पडली असून प्रवाशांना परिस्थितीबाबत कोणतीही अधिकृत माहिती, तसेच पिण्याचे पाणी किंवा अल्पोपहाराची व्यवस्था करण्यात आलेली नसल्याने प्रवाशांमध्येही संतापाचे वातावरण आहे.0
0
Report
रत्नागिरी रेलवे स्टेशन की छत भारी वर्षा से ढही, जीवित नुकसान नहीं
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी -मुसळधार पावस आणि सोसाट्याचा वाऱ्याचा फटका रत्नागिरी रेल्वे स्टेशनला रत्नागिरी रेल्वे स्टेशन वरील छत कोसळले रेल्वे स्थानकाच्या छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळला सार्वजनिक बांधकाम विभागाने ज्ञाती कंपनीला देण्यात आला होता कामाचा ठेका गेल्या वर्षी देखील छताला होती गळती मध्यरात्रीच्या sुमारास एका बाजूचे छत कोसळले सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही रात्रीच्या वेळेस वाहनांची वर्दळ कमी असल्यामुळे अनर्थ टळला0
0
Report
Advertisement
