icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चिपळुण में एलोंदवाड़ी बाँध बनकर तैयार, पानी और खेती को नई दिशा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या विकासाला नवे पंख.. एलोंदवाडी धरण प्रकल्प अंतिम टप्प्यात!.. शिरवली येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला एलोंदवाडी धरण प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.या एका प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.".. या धरणाचे काम सध्या ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले असून, प्रशासनाने उर्वरित कामालाही वेग दिला आहे.. ७५० मीटर लांबी आणि ४५ मीटर उंची असलेल्या या भव्य प्रकल्पासाठी साधारण २५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत... या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पिण्याचे पाणीच नाही,तर शेतीसाठी देखील याचा मोठा उपयोग होणार आहे... इतकेच नव्हे,तर भविष्यात या धरणाच्या पाण्यावर विद्युत निर्मिती करण्याचीही प्रशासनाची योजना आहे." या वर्षाअखेरपर्यंत हे धरण पूर्ण होऊन चिपळूणच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

उंबर्डा बाजार के अवैध ईंट भट्टे, लोगों की सेहत पर गंभीर असर—कार्यवाही की मांग

Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील उंबर्डा बाजार परिसरात विनापरवाना सुरू असलेल्या वीटभट्ट्यांमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होत आहेत.दगडीकोळसा जळल्याने हवेत सल्फर डायऑक्साइड,कार्बन मोनोऑक्साइड आणि नायट्रोजन ऑक्साइडसारखे घातक वायू पसरत असून, डोळ्यांची जळजळ,श्वसनाचे आजार व त्वचारोग वाढल्याच्या तक्रारी येत आहेत. लहान मुले व ज्येष्ठ नागरिक अधिक प्रभावित होत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. नियमभंग करून सुरू असलेल्या भट्ट्यांकडे प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने स्थानिकांनी तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
0
0
Report

पेण तालुक्यात भीषण पानी की किल्लत: 18 गाँव, 29 बस्तियाँ पानी को तरस रहीं

Chendhare, Maharashtra:अँकर रायगड जिल्ह्यातील पेण तालुक्यात सध्या भीषण पाणीटंचाईचं गंभीर चित्र पाहायला मिळत आहे. खारेपाट विभागातील तब्बल 18 गावे आणि 29 वाड्या पाण्यासाठी अक्षरशः तहानलेल्या असून ग्रामस्थांना मोठ्या हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. जलजीवन मिशनसारख्या महत्त्वाच्या योजनांचा बोजवारा उडाल्याने या योजना देखील गावकऱ्यांची तहान भागवण्यात अपयशी ठरल्या आहेत. ऐन उन्हाळ्यात गावांमध्ये पाच-पाच दिवसांनी पाणीपुरवठा केला जात असला तरी तो अत्यंत अपुरा आहे. त्यामुळे नागरिकांना घराशेजारी पाण्याचे पिंप साठवून ठेवावे लागत आहेत. इतकंच नव्हे तर भांडी घासण्यासाठीही दूषित पाण्याचा वापर करण्याची वेळ ग्रामस्थांवर आली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे लोकप्रतिनिधींविरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी असून त्यांनी संताप व्यक्त केला आहे.
0
0
Report
Advertisement

स्कूलों में शालेय सामग्री एक दुकान से खरीदने के दबाव पर शिक्षा विभाग की चेतावनी

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यात काही खासगी शाळांकडून विद्यार्थ्यांना ठरावीक दुकानांतूनच शालेय साहित्य खरेदी करण्यास भाग पाडले जात असल्याच्या तक्रारीनंतर शिक्षण विभाग सतर्क झाला आहे.शिक्षणाधिकारी संजय ससाने यांनी स्पष्ट केले आहे की, वह्या, पुस्तके, गणवेश किंवा इतर साहित्य विशिष्ट दुकानातून घेण्याची सक्ती केल्यास संबंधित शाळांवर कठोर कारवाई करण्यात येईल. नवीन शैक्षणिक सत्र सुरू होताच बाजारात खरेदीची गर्दी वाढली असताना, ‘फिक्स दुकान’ पद्धतीविरोधात परिपत्रक काढून सक्तीला नकार देण्यात आला आहे. या निर्णयामुळे पालक व विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असून, शाळांच्या मनमानीवर आता लगाम बसणार का याकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report

कोयना प्रकल्प ने 1956 मेगावॉट की क्षमता को पार कर इतिहास रचा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीजिल्ह्यातील पोफळी येथील कोयना प्रकल्पाने सध्या पूर्ण क्षमतेने वीज खेचली जात आहे. या प्रकल्पाची अधिकृत क्षमता 1956 मेगावॅट असताना, प्रत्यक्षात तब्बल 2005 मेगावॅट विक्रमी वीजनिर्मिती करण्यात आली आहे. प्रकल्पाच्या इतिहासात पहिल्यांदाच क्षमतेपेक्षा जास्त वीज निर्माण झाली. अवघ्या सव्वा तासात 49 मेगावॅट अतिरिक्त वीज तयार करून प्रकल्पाने आपली ताकद सिद्ध केली आहे. विजेची मागणी वाढलेली असताना ही कामगिरी झाल्याने पोफळी वीज संकुलात अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी चक्क केक कापून हा आनंद साजरा केला. या विक्रमामुळे कोयना प्रकल्प केवळ राज्याची गरजच भागवत नाही, तर तो तांत्रिकदृष्ट्या किती सक्षम आहे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
0
0
Report
Advertisement

राहुरी विधानसभा उपचुनाव: बीजेपी प्रत्याशी अक्षय करडेले के प्रचार में मुख्यमंत्री फडणवीस की उपस्थिति संभव

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकी च्या प्रचाराची रणधुमाळी शिबिला पोहोचली आहे आज सायंकाळी भाजप उमेदवार अक्षय कर्डिले यांच्या प्रचार सभेसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे प्रचार सभा होणार आहे भाजपा आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने राहुरी विधानसभेची जागा रिक्त झाली होती याच जागेवर शिवाजीराव कर्डिले यांचे चिरंजीव अक्षय कर्डिले यांना भाजपने उमेदवारी दिली आहे तर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून गोविंद म Mokate आणि वंचित बहुजन आघाडी कडून संतोष चोळके हेदेखील निवडणूक रिंगणात आहेत या निवडणुकीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी उमेदवारी केली नाही मात्र त्यांचा मोकाटे यांच्या प्रचारात सक्रिय सहभागदेखील पाहायला मिळाला नाही प्राजक्त तनपुरे आज आपल्या कार्यकर्त्यांची बैठक घेणार असल्याची देखील माहिती आहे कार्यकर्त्यांची बैठक घेऊन मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश करतील अशी देखील चर्चा आहे
0
0
Report
Advertisement

सोलपुर में तेज़ हवाओं के कारण पत्रिए शेड गिरने से 12 वर्षीय फरहान असलम की मौत

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरातील तळे हिप्परगा येथे वादळी वाऱ्यात पत्र्याचे शेड उडून लोखंडी अँगल डोक्यावर पडल्याने चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू - जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा येथे हृदयद्रावक घटना - वादळी वाऱ्यामुळे पत्राचे शेड उडाले, लोखंडे अँगल डोक्यावर पडल्याने बारा वर्षीय चिमुकला ठार - फरहान असलम कल्याणी असे मृत चिमुकल्याचे नाव असून तो एकुलता एक होता - वादळाचा वेग इतका प्रचंड होता की त्यांच्या घराच्या पत्राचे अक्षरशः शेड उडाले अन लोखंडी अँगल थेट फरहानच्या डोक्यात पडल्याने जागीच मृत्यू - दुर्दैवी घटनेने संपूर्ण गावावर शोककळा पसरलीय
0
0
Report

बीड़ के शिरूर में बाढ़ से क्षतिग्रस्त जिला परिषद की स्कूलों का ग्रामवासियों ने पुनर्निर्माण

Beed, Maharashtra:बीड:सिंदफना नदीच्या महापुरात नुकसान झालेल्या जिल्हा परिषदेच्या तीन शाळेच्या वर्ग खोल्या आणि अंगणवाडीचे ग्रामस्थांच्या पुढाकारातून नूतनीकरण बीडच्या शिरूर तालुक्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसाने सिंदफणा नदीला महापूर आला होता. याच महापुरात शिरूर, कोळवाडी, ढोकवड आणि टेंभुर्णी इथल्या जिल्हा परिषदेच्या शाळेचे मोठे नुकसान झाले होते. आता याच शाळेचं नूतनीकरण गावातील ग्रामस्थ जयेश कासट यांच्या निरंजन सेवाभावी संस्था आणि लोकनीधीतून करण्यात आले. नव्याने उभारलेल्या अंगणवाडी आणि वर्गखोल्यांचे उद्घाटन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, तहसीलदार आणि विद्यार्थ्यांच्या माध्यमातून पार पडले. या चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या शाळेची नव्याने उभारणी झाल्याने लेझीम पथकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांचे स्वागत केले. शिरूर कासार येथील अंगणवाडी, कोळवाडी गावातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेची वर्गखोली, टेंभुर्णी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच ढोकवड येथील जिल्हा परिषद शाळा 15 लाख 48 हजारांच्या निधीतून उभारल्या आहेत. जिल्ह्यातील अनेक शाळा या आजही दुरावस्थेत पाहायला मिळत आहे. परिणामी याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर दिसून येतो. मात्र त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून निधी उपलब्ध केला जात असल्याचं जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सांगितले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top