icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अंबरनाथ तालुक्य में धान की बुवाई अंततः शुरू, बरसात के बाद 3700 हेक्टेयर में खेती शुरू

Ambernath, Maharashtra:​अंबरनाथ तालुक्यात भात पेरणीला अखेर सुरुवात;  ३७०० हेक्टरवर क्षेत्रात भात लागवड  Anchor यंदा पावसाने दडी मारल्यामुळे चिंतेत असलेल्या अंबरनाथ तालुक्यातील शेतकऱ्यांना अखेर दिलासा मिळाला आहे. पावसाचे उशिराने आगमन झाल्यामुळे लांबलेली भात शेतीच्या पेरणीची कामे आता तालुक्यात सुरू झाली आहेत. तालुक्यात यंदा सुमारे 3700 हेक्टर क्षेत्रात भात लागवड केली जाणार आहे. दरवर्षी जून महिन्याच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यात भात पेरणीच्या कामांना वेग येतो. मात्र, यंदा पावसाने सुरुवातीला मोठी ओढ दिली. पुरेसा पाऊस न झाल्याने भाताचे बियाणे सुकण्याची भीती असल्याने शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून ठेवल्या होत्या. हवामान कोरडे राहिल्याने शेतकरी राजा पावसाच्या प्रतीक्षेत होता. यामुळे खरिपाचा हंगाम यंदा काहीसा उशिराने सुरू झाला आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अंबरनाथ तालुक्यात एकूण 3700 हेक्टर जमिनीवर भात पिकाची लागवड झाली आहे. पाऊस उशिरा आल्याने आता शेतकऱ्यांची बियाणे टाकणे, शेत जमीन तयार करणे आणि पेरणीची कामे करण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. पेरणी उशिरा झाल्यामुळे पर्यायाने भात लावणीची कामेही जुलै महिन्याच्या मध्यानंतर किंवा शेवटी सुरू होतील . चंद्रशेखर भुयार, बदलापूर
0
0
Report
Advertisement

एसीबी ने मेयो अस्पताल के सर्जिकल विभाग के प्रमुख और स्टेनो सहित दो के खिलाफ रिश्वतखोरी के आरोप दर्ज किए

Nagpur, Maharashtra:नागपूरच्या इंदिरा गांधी शासकीय वैद्य रुग्णालय म्हणजेच मेयो हॉस्पिटलचे शल्यचिकित्सा विभागाचे विभाग प्रमुख डॉ. नंदकिशोर जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक (स्टेनो) आशिष मेटेकर यांच्या विरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली आहे... परिवहन विभागाच्या सहायक मोटर वाहन निरीक्षकाला त्यांच्या प्रदीर्घ वैद्यकीय रजेनंतर वैद्यकीय प्रमाणपत्र तसेच वैद्यकीय मंडळाची अनुकूल शिफारस देण्यासाठी दोघांनी तीस हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप होता... सहाय्यक मोटर वाहन निरीक्षकाने त्याची तक्रार एसीबी कडे केल्यानंतर लाचेची मागणी केल्या संदर्भात आवश्यक तपासणी केल्यानंतर काल रात्री उशिरा एसीबीने डॉ. जयस्वाल आणि त्यांचा लघुलेखक मेटेकर या दोघांच्या विरोधात तहसील पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविला आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement

Ashok Kharat: पहली सुनवाई वीडियो कॉन्फ्रेंस से शुरू, SIT ने 105 गवाहों के बयान दर्ज

Nashik, Maharashtra:Nashik Breaking अशोक खरात प्रकरणातील पहिल्या खटल्याची सुनावणी सुरू पहिल्या खटल्याची सुनावणी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पडली पार एसआयटीकडून आतापर्यंत १०५ साक्षीदारांचे जबाब नोंद साक्षीदारांचे जबाब आणि कागदपत्रांच्या आधारे पुढील सुनावणी होणार अशोक खरात विरोधात सध्या एकूण १९ गुन्हे दाखल त्यापैकी महिला लैंगिक शोषणाचे ८ गुन्हे, चार प्रकरणांत आरोपपत्र दाखल उर्वरित प्रकरणांचा तपास अंतिम टप्प्यात खटल्याच्या गांभीर्यामुळे न्यायालयाकडून सुनावणीला गती शासनाकडून अॅड. उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी म्हणून झाली आहे नियुक्ती
0
0
Report

रेलवे यात्रियों के मोबाइल चोरी मामले में आरोपी गिरफ्तार; 18 मोबाइल बरामद

Washim, Maharashtra:वाशीम: मालेगाव पोलिसांनी रेल्वे प्रवाशांचे मोबाइल चोरी करून कमी किमतीत विक्री करणाऱ्या सराईत आरोपीला अटक केली आहे. किशनलाल शंकरलाल तापडिया (वय ४०, रा. चाटोरी, ता. पालम, जि. परभणी) असे अटक आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून २ लाख ५३ हजार ५०० रुपये किमतीचे १८ मोबाइल जप्तण्यात आले आहेत. मेडशी येथे बिल नसलेले मोबाइल स्वस्तात विक्री होत असल्याची गुप्त माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून आरोपीला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने हे मोबाइल रेल्वे प्रवाशांकडून चोरी केल्याची कबुली दिली. आयएमईआय क्रमांकांची पडताळणी केली असता मोबाइलची चोरीची तक्रार भुसावळ रेल्वे पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे उघड झाले. याप्रकरणी आरोपीविरुद्ध मालेगाव पोलिस ठाण्यात महाराष्ट्र पोलिस कायद्याच्या कलम १२४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, जप्त मोबाइलच्या मूळ मालकांचा तसेच आरोपीने यापूर्वी आणखी कुठे-कुठे चोरी केली याचा पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

जलप्रपात: मराठवाड्यात जूनमध्ये पाऊस तुट, जालना जिल्ह्यात जास्त पाऊस; पेरण्या अजूनही खोळंबल्या

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Feed attached Csn rain av छत्रपती संभाजीनगर सह मराठवाड्यात ३० जूनच्या सकाळपर्यंत ७.२ मिलिमीटर पाऊस झाला. यामध्ये सर्वाधिक पाऊस जालना जिल्ह्यात झाला. या जिल्ह्यात १३.५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. मराठवाड्यात आजपर्यंत १११ मिलिमीटर पाऊस झाला आहे. मराठवाड्याची वार्षिक सरासरी ६७९.५ मिलिमीटर आहे. गेल्या वर्षी ३० जूनपर्यंत ७८ टक्के पाऊस झाला होता. तर, बहुतांश जिल्ह्यांनी जून महिन्याची वार्षिक सरासरीदेखील पूर्ण केली होती. यावर्षी मात्र तशी परिस्थिती नाही. पावसाची मोठी तुट आहे अनेक ठिकाणी अजूनही पेरण्या सुद्धा खोळंबल्या आहेत...
0
0
Report

जिला परिषद ने भवन फर्नीचर के लिए निधि खर्च पर विवाद खड़ा कर दिया

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषदेच्या उपकराचा निधी मुख्य प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी वापरला जावा असा ठराव सत्ताधार्यांनी जिल्हा परिषदे सर्वसाधारण बैठकीत घेतला आणि त्यामुळं आता नवा वाद निर्माण झालाय, महत्वाचे म्हणजे बैठकीत या ठरावावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतला मात्र तो झुगारून हा ठराव संमत करण्यात आला..ग्रामीण भागातील मूलभूत विकासकामांवर खर्च होणे अपेक्षित असताना तो मुख्य प्रशासकीय इमारतीच्या फर्निचर आणि विद्युतीकरणासाठी वापरला जाणे ही गंभीर बाब आहे. 'शासनाकडून इमारतीसाठी निधी आणा, सेसचा निधी येथे खर्च करू नका,' अशी मागणी विरोधकांनी केलीय..या ठरवामुळे मुळे ग्रामीण भागातील विकासकामांना मोठी कात्री बसणार असल्याने अनेक सदस्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.
0
0
Report

स्मार्ट सिटी के CCTV छह महीनों में पुलिस के हवाले, सुरक्षा-ट्रैफिक नेटवर्क में बड़ा बदलाव

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत शहरात बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॉमेरे ६ महिन्यांनंतर हस्तांतरित करण्यात येणार आहेत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडच्या बोर्डाच्या बैठकीत मंगळवारी हा निर्णय घेतला. महापौर समीर राजूरकर यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत शहरातील विविध प्रशासकीय आणि विकासात्मक प्रस्तावांवर सविस्तर चर्चा करून बोर्डाच्या सदस्यांनी अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांना आणि नियुक्त्यांना एकमताने मंजुरी दिली. सीसीटीव्ही यंत्रणा‌चे संचालन, देखभाल-दुरुस्ती आदि‌ची जबाबदारी ६ महिन्यांनंतर पोलिसांकडे हस्तांतरित केली जाणार आहे. यामुळे आगामी काळात शहरातील अंतर्गत सुरक्षेचे आणि वाहतूक नियंत्रणाचे संपूर्ण नेटवर्क थेट पोलिसांच्या ताब्यात जाणार असल्याचे बैठकीत निश्चित केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top