icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमित शाह कोल्हापुर दौरे पर, ग्रीन एनर्जी प्रकल्प का भूमिपूजन करेंगे

Kolhapur, Maharashtra:केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शाह 19 और 20 सितंबर को कोल्हापूर जिला दौरे पर आएंगे। 19 सितंबर शाम 5.05 बजे उनके कोल्हापूर विमानतळ पर आगमन होगा और उसके बाद वे शासकीय विश्रामगृह में ठहरेंगे। 20 सितंबर को हु्परी इथल्या कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर सहकारी साखर कारखान्यात महालक्ष्मी ग्रीन एनर्जी कॉम्प्लेक्स के भूमिपूजन और किसान मेळाव्याला वे उपस्थित रहेंगे। उसके बाद दोपहर 4 बजे विमान से मुंबई लौटेंगे। इसके जरिए देश के पहले ग्रीन एनर्जी प्रकल्प के भूमिपूजन अमित शाह करेंगे, यह भाजप नेता प्रकाश आवाडे ने बताया।
0
0
Report

शिरूर के किसान महिलाएं बारिश के लिए पारंपरिक गीत गाकर बरसात की मांग कर रहीं

Shirur, Maharashtra:गेल्या महिनाभरापासून पावसाने पूर्णपणे पाठ फिरवल्याने बळीराजाच्या नजरा पुन्हा एकदा आभाळाकडे लागल्या आहेत. पावसाअभावी उभी पिके करपू लागल्याने अनेक भागांत दुष्काळाची भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. ​पुणे जिल्ह्याच्या शिरूर तालुक्यातील पिंपरी दुमाला येथे शेतात कांदा लागवड करताना महिलांनी थेट पारंपरिक गाणी गात वरुणराजाला पावसासाठी आर्त साकडं घातलं आहे. हाता-तोंडाशी आलेली पिके वाचवण्यासाठी आता दमदार पावसाची नितांत गरज असून, वरुणराजा कधी बरसणार याकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत.
0
0
Report

झिलपा तालाब में डूबे दो 13 साल के बालकों की दर्दनाक मौत

Nagpur, Maharashtra:गौराई विसर्जनासाठी आईसोबत तलावावर गेलेल्या दोन १३ वर्षीय बालकांचा तलावाच्या पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी सकाळी 11 च्या सुमारास झिलपा शिवारातील तलावावर घडली. आयुष हरीष कुमरे आणि दर्शन धनराज लाड दोघेही रा. झिलपा अशी मृत बालकांची नावे आहेत. या घटनेने झिलपा गावावर शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. गावातील महिला गौराई विसर्जनासाठी सकाळी झिलपा शिवारातील तलावावर गेल्या होत्या. यावेळी काही मुलेही महिलांसोबत तलावाच्या पाण्यात उतरली होती. गौराई विसर्जन सुरू असताना आयुष कुमरे व दर्शन लाड हे दोघे पाण्यात बुडाल्याचे लक्षात आले. घटनेची माहिती मिळताच नातेवाइकांसह उपस्थितांनी तत्काळ तलावाकडे धाव घेतली. आयुषचे काका आणि दर्शनचे काका यांनी पाण्यात उतरून दोन्ही बालकांना बाहेर काढले. त्यानंतर त्यांना तातडीने काटोल ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून दोघांनाही मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच काटोल पोलिसांनी नोंद घेत पुढील कार्यवाही सुरू केली. आयुष हा आठवीत, तर दर्शन हा सातवीत शिक्षण घेत होता.
0
0
Report
Advertisement

झुरकुटोला में बाघ के हमले से किसान की मौत, इलाके में दहशत

Bhandara, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात ७२ वर्षीय शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना दुपारी उघडकीस आली. वातू बकाराम राऊत असे मृत शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेने झुरकुटोला परिसरासह लगतच्या गावांमध्ये भीतीचे सावट पसरले असून, जंगलालगतच्या शेतकऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. वातू राऊत हे सकाळच्या सुमारास घरातील शेळ्यांसाठी चारा आणण्यासाठी झुरकुटोला येथील पहाडीवरील जंगल परिसरात गेले होते. हा भाग एफडीसीएमच्या कंपार्टमेंट क्रमांक ५२४ मध्ये येतो. जंगल परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानक राऊत यांच्यावर हल्ला केला. हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. राऊत यांच्यासोबत असलेल्या इतर शेतकऱ्यांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी तातडीने गावात धाव घेत गावकऱ्यांना याची माहिती दिली. गावकऱ्यांनी तत्काळ वन विभाग व पोलिसांना कळविले. माहिती मिळताच वन विभागाचे पथक आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. वन कर्मचाऱ्यांनी परिसराची पाहणी करून वाघाच्या हालचालींचा मागोवा घेण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे. वाघाच्या हल्ल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे...
0
0
Report

सानपाड़ा गैस सिलिंडर विस्फोट: दो भाइयों की हालत गंभीर, दुकानें और इमारतें क्षतिग्रस्त

Navi Mumbai, Maharashtra:anchor: removed सानपाडा सेक्टर-१ येथील प्रतीक सोसायटीतील फास्ट फूडच्या दुकानात मंगळवारी सकाळी सव्वासहाच्या सुमारास गॅस सिलेंडरचा भीषण स्फोट होऊन दोन सख्खे भाऊ गंभीररित्या भाजल्याची घटना घडली. मनिष लालबहादुर यादव (२७) आणि अर्जुन लालबहादुर यादव (४६) अशी जखमी भावांची नावे आहेत. दोघांवर ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये उपचार सुरू आहेत. सानपाडा सेक्टर-१ मध्ये प्रतीक सोसायटीतील गाळा क्रमांक १ मध्ये यादव बंधू फास्ट फूडचे दुकान चालवत होते. तसेच ते दुकानातच ते राहत होते. सोमवारी दिवसभर काम केल्यानंतर दोघे भाऊ रात्री उशिरा झोपी गेले. प्राथमिक तपासात दुकानात ठेवलेल्या तीन व्यावसायिक गॅस सिलेंडरपैकी एका सिलेंडरमधून रात्रीच्या सुमारास गॅसची गळती झाली..दुकान पूर्णपणे बंद असल्याने गळती झालेला गॅस दुकानातच साचून राहिला. मंगळवारी सकाळी सुमारे सहा वाजण्याच्या सुमारास एका भावाने कामासाठी उठून दिवा लावण्यासाठी विद्युत स्विच दाबला. स्विच दाबताना झालेल्या स्पार्कच्या संपर्कात दुकानात साचलेला गॅस येताच आग भडकल्यानंतर क्षणार्धात सिलेंडरचा bhiषण s्फोट झाला. या स्फोटात दोन्ही भाऊ गंभीररित्या भाजले. स्फोटाची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानाचे शटर उचकटून मोठे नुकसान झाले. आसपासच्या सुमारे पाच दुकानांनाही स्फोटाचा फटका बसला. रस्त्याच्या पलीकडे असलेल्या सुरज हॉस्पिटललाही स्फोटाचे हादरे जाणवले. तसेच समोरील आणि आजूबाजूच्या इमारतींमधील घरांच्या व दुकानांच्या काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि सानपाडा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य केले. दोन्ही जखमी भावांना प्रथम वाशीतील महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना ऐरोली येथील नॅशनल बर्न सेंटरमध्ये हलविण्यात आले.
0
0
Report

दीघी में देश का सबसे बड़ा ग्रीनफील्ड जहाज निर्माण प्रकल्प; 27 हजार करोड़ निवेश

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रायगडच्या दिघीत देशातील सर्वात मोठे शिपयार्ड; कोकणात २७ हजार कोटींची गुंतवणूक.. कोकणातील दिघी येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफिल्ड जहाजबांधणी प्रकल्प उभारण्यासाठी राज्य सरकार आणि ‘माझगाव डॉक’ यांच्यात २७ हजार कोटींचा ऐतिहासिक करार झाला..मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत झालेल्या या करारामुळे देशाच्या जहाजबांधणी क्षमतेत महाराष्ट्राचा वाटा ४० टक्क्यांवर पोहोचणार आहे. युद्धनौका आणि व्यापारी जहाजांची निर्मिती करणाऱ्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामुळे राज्यात सुमारे ९० हजारांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत..
0
0
Report
Advertisement

मराठा आरक्षण उपसमिती के सदस्य के बयान पर रोहित पवार का जवाब मांगा गया

Satara, Maharashtra:कराड, सातारा : मराठा आरक्षणाच्या उपसमितीचा सदस्य म्हणून सरकारने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चेदरम्यान दिलेला प्रत्येक शब्द पाळला आहे, असा दावा मंत्री शंभूराज देसाई यांनी केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी देसाईंनी मराठा आरक्षणाबाबत सत्य सांगावे, असे आव्हान दिले होते. त्याला उत्तर देताना देसाई यांनी हे वक्तव्य केले. हैदाबाद गॅझेटमधील कुणबी नोंदी शोधून त्या शिंदे समितीकडे सोपविण्याचे काम सरकारने प्रामाणिकपणे केले आहे. याबाबत आपण काय केले, हे रोहित पवारांनी मनोज जरांगे पाटील यांनाच विचारावे, असेही देसाई म्हणाले. सातारा व औंध गॅझेटबाबत कायदेशीर बाबींचा विचार करून अ‍ॅडव्होकेट जनरल आणि वरिष्ठ कायदेतज्ज्ञांच्या सल्ल्याने निर्णय घेतला जाईल, असे त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गणेशोत्सवाच्या काळात मुंबईकर आणि भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत उपोषण करू नये, अशी विनंती देसाई यांनी केली. आंदोलकांशी चर्चेसाठी सरकारची दारे नेहमीच खुली आहेत, असेही त्यांनी सांगितले.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

अकोला में सूखे के कारण किसानों ने जिलाधिकारी कार्यालय के सामने भारी प्रदर्शन किया

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण अपुरे आणि अनियमित राहिल्याने अनेक भागांत दुष्काळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे... पावसाअभावी खरीप पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. याच प्रश्नाकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शंभू सेना सामाजिक संघटनेच्या वतीने अकोल्यातील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अभिनव आंदोलन करण्यात आले. शेतकरी आपल्या काळजावर दगड ठेवून अस्मानी आणि सुलतानी संकटांचा सामना करत आहे, हे प्रतिकात्मक पद्धतीने दाखवण्यासाठी आंदोलकांनी चक्क छातीवर दगड ठेवून आंदोलन केले. पावसाअभावी नुकसान झालेल्या पिकांचे तातडीने पंचनामे करावेत, शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी आणि दुष्काळसदृश परिस्थितीची गांभीर्याने दखल घ्यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. आंदोलनानंतर जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि कृषिमंत्री यांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.
0
0
Report

गंगापुर में 1100 शिक्षक सड़क पर, भाजपा विधायक प्रशांत बंब के खिलाफ मोर्चा

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या गंगापूर तालुक्यत आज तब्बल 1100 शिक्षक रस्त्यावर उतरले , हा मोर्चा होता भाजप आमदार प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासन विरोधात, प्रशांत बंब यांनी या 1100 शिक्षकांची तालुक्यत राहत नसल्याबाबत पुराव्यासह तक्रार केली होती प्रशासनाने त्यावर कारवाई करत या शिक्षकांवर कारवाईला सुरुवात केलीय.. त्यामुळं शिक्षक विरुद्ध भाजप आमदार प्रशांत बंब हा वाद चांगलाच पेटण्याची शक्यता आहे... भाजप आमदार प्रशांत बंब विरोधात शिक्षक रस्त्यावर मोर्चा काढून प्रशांत बंब आणि प्रशासनाचा निषेध बंब यांच्या तक्रारीनंतर शिक्षकांवर कारवाईला सुरुवात शाळेत शिकवणारे हे सगळे शिक्षक आज प्रशासन आणि स्थानिक आमदार विरोधात रस्त्यावर उतरले आहेत, मोर्चा काढून त्यांनी आमदारासह प्रशासनाचा निषेध केलाय.. आणि याच कारण म्हणजे आमदारांनी शिक्षकांची केलेली तक्रार... ग्रामीण भागात राहणाऱ्या शिक्षकांनी खरंतर मुख्यालय म्हणजे ज्या गावात शिकवतात त्या गावी राहावे असा नियम आहे मात्र शहराजवळ असलेले शिक्षक गावात राहत नाही आणि शहरातून अपडाऊन करतात याच बाबत गंगापूरचे भाजप आमदार प्रशांत बंब यांनी जिल्हा परिषद प्रशासनाला तक्रार दिली, त्यांच्या तालुक्यातील अकराशे शिक्षक मुख्यालय राहत नाही असं त्यांच्या तक्रारीत होतं, मुख्यालयी न राहता गृह भत्ता सुद्धा उचलत असल्याची तक्रार त्यांनी पुराव्यानिशी सादर केली त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनानं कारवाईचा बडगा उभारला आहे, प्रथमदर्शनी चौकशी करत या शिक्षकांची वेतन वाढ रोखली आहे आणि पुढील चौकशी करून या शिक्षकांवर कारवाई करण्यात येणार आहे मात्र ही कारवाई अन्यायकारक असल्याचं शिक्षकांचे म्हणणं आहे आणि त्या विरोधात आज हे सगळे 1100 शिक्षक गंगापूर मध्ये रस्त्यावर उतरले आणि मोर्चा काढून त्यांनी प्रशांत बंब आणि जिल्हा परिषद प्रशासनाचा निषेध केला इतकच नाही तर कारवाई मागे न घेतल्यास यापेक्षा सुद्धा मोठा आंदोलन करू असा इशारा या शिक्षकांनी दिला आहे.. Byte शिक्षक संघटना Vo 2.. दुसरीकडे आमदार प्रशांत बंब यांनी या मोर्चाकडे दुर्लक्ष केले, या शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या पिढ्या उध्वस्त kele आहेत शिक्षणाला दर्जा नाही, नियम पाळत नाही त्यामुळे यांच्यावर कारवाई व्हायलाच हवी असे प्रशांत बंब यांचा म्हणने आहे.. यापुढेही तक्रार करत राहणार अशी आक्रमक भूमिका आमदार प्रशांत बंब यांनी घेतली आहे.. Byte प्रशांत बंब भाजप आमदार Vo 3.. खरंतर शिक्षकांचा आणि आमदार प्रशांत बंब यांचा हा वाद गेल्या काही काळापासून सुरू आहे मुख्यालयी राहण्याचा नियम शिक्षकांना मान्य नाही तर शिक्षक मुख्यालयी राहिले तर विद्यार्थ्यांना योग्य शिक्षण मिळेल असा आमदारांचा दावा आहे फक्त शिक्षकच नाही तर तलाठी ग्रामविकास अधिकारी आणि डॉक्टर यांनी सुद्धा मुख्यालयी राहावे अशी त्यांचा मागणी आहे आणि त्या विरोधात त्यांनी तक्रार मोहीम सुरू केली आहे मात्र दुसरीकडे आता शिक्षकच रस्त्यावर उतरले आहे त्यामुळे हा वाद यापुढेही पेटणार असं चित्र दिसतंय.. विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

केंद्र के फैसले से ऊस किसान गुस्से में, 25वीं ऊस परिषद और बड़े प्रदर्शन की तैयारी

Kolhapur, Maharashtra:केंद्र सरकारच्या निर्देशानुसार राज्य सरकारने चालू वर्षी 15 ऑक्टोबरपासून ऊस गळीत हंगाम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, शासनाचा हा निर्णय एकतर्फी असून यामुळे साखर उद्योग, कारखानदार आणि प्रामुख्याने ऊस उत्पादन शेतकरी यांचे प्रचंड नुकसान होणार आहे. या पार्श्वभूमीवर आज कोल्हापूर येथील शासकीय विश्रामगृह येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीनंतर संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी आगामी १० ऑक्टोबर रोजी जयसिंगपूर येथील विक्रमसिंह क्रीडांगणावर २५वी ऊस परिषद घेण्याची अधिकृत घोषणा केली. तसेच, साखरेचा हमीभाव आणि इथेनॉलच्या दराबाबत केंद्र सरकारवर दबाव आणण्यासाठी 29 सप्टेबर रोजी कर्नाटक राज्यातील हुबळी येथे देशाचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांच्या घरासमोर लाखो ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे भव्य धरणे आंदोलन करण्याचा मोठा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
0
0
Report
Advertisement

धुळे: महाराणा प्रताप चौक के सरकारी स्कूल में शिक्षकों की मारपीट का वीडियो वायरल

Dhule, Maharashtra:धुळे शहरातील महाराणा प्रताप चौक परिसरातील एका शासकीय शाळा व वसतिगृह परिसरात शिक्षकांमध्ये हाणामारी झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. संबंधित शिक्षकांनी दारूच्या नशेत शाळा व वसतिगृह परिसरात धिंगाणा घालल्याचा तसेच विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणी संबंधित शिक्षकांवर तातडीने निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी युवासेनेने जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमুখ मनोज मोरे यांच्या नेतृत्वाखाली युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेतली. यावेळी संबंधित शिक्षकांमधील हाणामारीचा व्हिडिओ सीईओंना दाखवत या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची मागणी करण्यात आली. महाराणा प्रताप परिसरातील शासकीय शाळा व वसतिगृहात दोन दिवसांपूर्वी विद्यार्थ्यांना अमानुष मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर दोन शिक्षकांमध्ये दारूच्या नशेत धिंगाणा होत एकमेकांना मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वारंवार अशा घटना घडत असल्याने शाळा व संस्थेची प्रतिमा मलिन होत असल्याचा आरोप युवासेनेने केला आहे. या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्यासाठी शाळा व व वसतिगृह परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तातडीने ताब्यात घेण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे. संबंधित प्रकरण दडपण्यासाठी प्रयत्न झाल्यास सीसीटीव्ही फुटेज डिलीट होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने विलंब न करता फुटेज सुरक्षित करावे, अशी मागणी युवासेनेने केली. झी 24 तास या व्हायरल सीसीटीव्ही फुटेज ची पुष्टी करत नाही.
0
0
Report

मनोज जरांगे का मुंबई दौरा स्थगित, शंभूराज देसाई ने किया स्पष्ट रोकथाम का आह्वान

Sangli, Maharashtra:मुंबईतील कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे यांनी मुंबई दौरा स्थगित करावा - मंत्री शंभूराजे देसाई. मुंबईतील गणेशोत्सव जागतिक स्वरूपाचा मानला जातो, त्यामुळे मुंबईतील शांतता व कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मनोज जरांगे-पाटलांनी त्यांचा मुंबई दौरा स्थगित करावा, असे आवाहन पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी केला आहे, मनोज-जरांगे पाटलांच्या ज्या मागण्या आहेत, त्या बऱ्यापैकी सरकारने मान्य केले आहेत. जी मागण्या राहिल्या आहेत, त्याबद्दल सरकारकडून योग्य ती पावलं उचलण्यात आली आहेत, असे देखील परड्यांमध्ये शंभूराजे देसाई यांनी स्पष्ट केला आहे, ते सांगलीच्या तासगाव मध्ये रथोत्सव सोहळ्याप्रसंगी बोलत होते. दिशा सालीयन मृत्यूप्रकरणी सीबीआयकडुन तपास सुरू झाला आहे, त्यामध्ये ज्या बाबी आढळतील, त्या सीबीआय कडून तपासण्यात येतील, पण केंद्रीय यंत्रणा असणाऱ्या सीबीआय सारख्या यंत्रणेवर राज्यातल्या आमच्यासारख्या लोकांनी बोलणं योग्य होणार नाही, असं मत पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केला आहे. दिशа सालीयन यांच्या वडिलांकडून जे नाव समोर आली आहेत, त्याबद्दल देखील योग्य तो तपास करेल, आणि सीबीआयकडून या प्रकरणात योग्य न्याय होईल, असा विश्वासही पर्यटन मंत्री शंभराज देसाई यांच्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आमची बाजू कायदेशीर आणि संविधानिक असून न्यायव्यवस्थेवर आमचा विश्वास आहे, असं मत शिवसेना सुनावणीवरून शिवसेना शिंदे पक्षाचे नेते पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई यांनी व्यक्त केलं आहे. सर्वोच्च न्यायालयात सुरू असणाऱ्या सुनावणी बाबत आपल्या पक्षाच्या वकिलांकडून बाजू मांडण्यात येत आहे, आणखी गरज पडल्यास युक्तिवाद आपल्या पक्षाच्या वकिलांकडून केला जाईल, असा विश्वास देखील मंत्री शंभूराजे यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report

चांदवड में ऋषिपंचमी पर सप्तर्षी पूजा और चंद्रेश्वर का जलाभिषेक

Chandvad, Maharashtra:पवित्र भाद्रपद महिन्यातील ऋषिपंचमीचा सण चांदवडमध्ये मोठ्या भक्तिभावात साजरा करण्यात आला. ऐतिहासिक श्री चंद्रेश्वर महादेव मंदिर परिसरात भल्याअपहाटेपासूनच सप्तर्षींच्या पूजनासाठी आणि भगवान चंद्रेश्वराच्या दर्शनासाठी महिला भाविकांची मोठी गर्दी झाली होती. यावेळी कश्यप, अत्री, भरद्वाज, विश्वामित्र, गौतम, जमदग्नी आणि वसिष्ठ या सप्तर्षींची विधिवत पूजा करण्यात आली. शिस्तबद्ध रांगेत महिलांनी सप्तर्षींचे दर्शन घेतल्यानंतर चंद्रेश्वर महादेवाला जलाभिषेक करत कुटुंबाच्या आरोग्य आणि सुख-समृद्धीसाठी प्रार्थना केली. ‘हर हर महादेव’च्या जयघोषाने मंदिर परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि भक्तिमय वातावरणात चांदवडकरांनी ऋषिपंचमी उत्साहात साजरी केली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top