445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के कुटगिरी धनगर बाड़ी में विवाद, 5 परिवार पानी से महरूम
Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर-रत्नागिरी.. रत्नागिरीच्या कुटगिरी धनगरवाडीत वैयक्तिक वादातून ५ कुटुंबांची 'कोंडी'!.. नळपाणी योजनेची पाईपलाईन कापली, विहिरीचा रस्ताही बंद;..अबालवृद्धांचा पाण्यासाठी आक्रोश.. एव्हढेच नाही तर जिल्हा परिषदेच्या विहिरीकडे जाणारी पाऊलवाटही बंद करून टाकली आहे.. त्याचाद्वारे या दुष्टकृत्यामुळे वाडीतील तब्बल ५ कुटुंबे गेल्या काही दिवसांपासून पाण्याचा थेंब अन् थेंबासाठी वंचित राहिली असून,पिण्याच्या पाण्यासाठी चिमुकल्यांपासून वृद्धांपर्यंत सर्वांचा आक्रोश सुरू आहे.. विशेष म्हणजे या गंभीर समस्येबाबत संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दाखल करूनही प्रशासनाने याकडे पूर्णपणे कानाडोळा केला आहे.. ऐन पावसाळ्यात/उन्हाळ्यात पाण्याच्या मूलभूत हक्कापासून ताटकळत ठेवणाऱ्या या प्रशासकीय अनास्थेविरोधात आणि दडपशाही विरोधात ग्रामस्थांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे..0
0
Report
पश्चिम विदर्भ में भारी जलसंकट, अभी भी जोरदार बारिश की उम्मीद
Amravati, Maharashtra:पश्चिम विदर्भातील मोठ्या सिंचन प्रकल्पांमध्ये सध्या सरासरी 42 टक्के जलसाठा असल्याने अद्यापही बहुतांश धरणे पूर्ण क्षमतेने भरलेली नाहीत। त्यामुळे आगामी काळात दमदार पावसाची आवश्यकता कायम आहे। विशेषतः बुलढाणा जिल्ह्यातील खडकपूर्णा प्रकल्प अद्यापही कोरडाच असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे। पश्चिम विदर्भातील सर्वात मोठे धरण असलेल्या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा प्रकल्पात sध्या केवळ 52 टक्के पाणीसाठा आहे। या धऱणातून शेतीसाठी मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा केला जातो। यंदा पुरेसा पाऊस न झाल्यास रब्बी हंगामात सिंचनासाठी पाण्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे। हवामानाचा अंदाज आणि पुढील काही आठवड्यांतील पावसावरच पश्चिम विदर्भातील जलस्थिती अवलंबून राहणार असून दमदार पावस न झाल्यास भविष्यात पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीही गंभीर पाणीटंचाईचा सामना करावा लागू शकतो। त्यामुळे अजूनही पश्चिम विदर्भाला दमदार पावसाची प्रतीक्षा असल्याचं दिसून येत आहे.0
0
Report
यवतमाळ के लोही गांव से देव गौ माता चोरी; सीसीटीवी में कैद, गिरोह सक्रिय?
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या लोही गावातून देव गायीला कार मध्ये कोंबून चोरी झाली आहे. चोरीचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेरात चित्रित झाला आहे. यापूर्वीही अशाच पद्धतीने लोही गावातून देव गायी चोरीला गेल्या आहेत. पहाटेच्या सुमारास चार जण कार घेऊन गावात पोहोचले, त्यांनी देव गायीला कारच्या मागच्या बाजूला कोंबून कारंजा लाडच्या दिशेने पलायन केले. लोही गावातील या देव गायींना धार्मिक आणि ऐतिहासिक महत्त्व आहे. अनेक वर्षांपासून त्या गावातील एका जुन्या गढीत वास्तव्यास असून दिवसभर गावात फिरून अन्न-चारा घेतल्यानंतर पुन्हा त्याच ठिकाणी परत येतात. या आधीही गायी चोरी गेल्याने, गो तस्करांची संघटित टोळी परिसरात सक्रिय असल्याचे स्पष्ट होत आहे.0
0
Report
Advertisement
चाँदवड-मनमाड मार्ग पर गड्ढे: कार हादसे में दो की मौत, प्रशासन से जवाब मांग
Chandvad, Maharashtra:अँकर-नाशिकच्या चांदवड- मनमाड रोडवर काही ठिकाणी रस्त्यांवर मोठे खड्डे पडले असून वारंवार तक्रारी करून प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करते, काल रात्रीच्या sमuarस स्विफ्ट गाडीचा अपघात होऊन दोन जण ठार झाले आहे,अपघात इतका भीषण होतं की खड्ड्याचा अंदाज न आल्यामुळे गाडी थेट रस्त्याच्या पलीकडे नाल्यात पडल्याने गाडीचे मोठे नुकसान झाले,या अपघातात मनमाड येथील सागर बेदाडे व त्याचा ड्रायव्हर दोन्हीही ठार झाले आहे,त्यामुळे आता तरी प्रशासनाने चांदवड- मनमाड रोडवरील खड्डे बुजवावे यावे अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे,दरम्यान चांदवड पोलीस याचा अधिक तपास करत आहे.0
0
Report
विटा में परप्रांतीय युवक की हत्या: आरोपी फरार
Sangli, Maharashtra:विटा येथील मायाक्कानगरमध्ये सेवानिवृत्त अधिकारी दयानंद साबळे यांच्या नवीन घराच्या बांधकामाच्या ठिकाणी दोन परप्रांतीय कामगारांमध्ये वादातून अशोक कुमारने राजमन कुमार यांच्या डोक्यात लाकडी दांडक्याने हल्ला करून त्याचा जागीच मृत्यू झाला. असा प्रकार घडल्यावर अशोक कुमार घटनास्थळापासून पसार झाला. विटा पोलीस तातडीने घटनास्थळी पोहोचले, तपासास सुरूवात झाली आहे आणि संशयित आरोपीचा शोध चालू आहे. कारण काय असावे याबाबत तपास चालू आहे. खुणाच्या घटनेमुळे विटा शहरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
सातारा में पानी टँकर चोरी: एलसीबी ने दो गिरफ्तार
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील लिंबखिंड परिसरात चोरीचा पाण्याचा टँकर विक्रीसाठी ग्राहक शोधत असताना स्थानिक गुन्हे शाखेने (एलसीबी) दोघांना अटक केली आहे. २६ जुलै रोजी पाडेगाव येथील शेती संशोधन केंद्राजवळून चोरीला गेलेला सुमारे १३ लाख रुपये किमतीचा टँकर पोलिसांनी अवघ्या एका दिवसात जप्त केला. या प्रकरणी अनिकेत लकडे (रा. पाडेगाव) आणि शुभम जैस्वाल (रा. निरा) यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या आणखी एका साथीदाराचा शोध सुरू आहे. आरोपींनी चौकशीत टँकर चोरीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.0
0
Report
Advertisement
कोयना धरण में भारी बारिश से जलस्तर बढ़ा; शाम पाँच बजे छह दरवाजे खुलेंगे
Satara, Maharashtra:सातारा - कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. त्यामुळे धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी आज सायंकाळी ५ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे एक फूटाने उघडण्यात येणार असून, ५,०७९ क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदीपात्रात सोडण्यात येणार आहे. सध्या धरणाच्या पायथा विद्युतगृहाचे एक युनिट सुरू असून त्याद्वारे १,०५० क्युसेक विसर्ग सुरू आहे. त्यामुळे कोयना नदीत एकूण ६,१२९ क्युसेक पाण्याचा विसर्ग होणार आहे. तसेच पावसाचे प्रमाण आणि धरणात येणाऱ्या पाण्यानुसार विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे. नदीच्या पाणीपातळीत वाढ होणार असल्याने नदीकाठच्या नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे तसेच नदीकाठावरील ग्रामपंचायती आणि संबंधित यंत्रणांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
65 लाख रुपए के गुवाहाटी दौरे पर उल्हासनगर महापालिका में विवाद
Ambernath, Maharashtra:उल्हासनगर महापालिकेच्या ६५ लाखांच्या गुवाहाटी दौऱ्यावरून वाद शहर विकास रखडला,नगरसेवकांचा ६५ लाखांचा गुवाहाटी दौरा चर्चेत नगरसेवकांसोबत पत्नी, आई, मुलांचाही प्रवास? गुवाहाटी दौऱ्यावरून खळबळ प्रशिक्षणाच्या नावाखाली नातेवाईकांची सहल? मनसे जिल्हाध्यक्ष बंडू देशमुख यांचा सवाल उल्हासनगर महापालिकेच्या नगरसेवकांचा गुवाहाटी अभ्यास दौरा सध्या वादाच्या केंद्रस्थानी झाला आहे. शहरात रस्ते, पाणी, सांडपाणी आणि आर्थिक अडचणींचे प्रश्न कायम असतानाही तब्बल ६५ लाख रुपयांचा खर्च करून नगरसेवक प्रशिक्षणासाठी गुवाहाटीला गेल्याने नागरिकांमधून आणि विरोधकांकडून टीका होत आहे. उल्हासनगर महापालिका के नगरसेवकांसाठी गुवाहाटी येथे चार दिवसीय प्रशिक्षणाचे आयोजन झाले होते. महापालिकेच्या सचिव कार्यालयानुसार, या दौऱ्यासाठी सुमारे ६५ लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. प्रत्येक नगरसेवकासाठी पंचतारांकित हॉटेलमध्ये राहण्याची व्यवस्था, भोजन, स्थानिक प्रवास, प्रकल्प भेटी, सभागृह आणि इतर सुविधांसह विमान प्रवासाचा खर्च मिळून सुमारे ७४ हजार ७२० रुपये खर्च अपेक्षित होता. दरम्यान, समाजमाध्यमांवर व्हायरल झालेल्या काही व्हिडिओंमध्ये अनेक नगरसेवक कुटुंबीयांसह गुवाहाटी दौऱ्यावर गेल्याचा दावा करण्यात आला आहे. त्यामुळे हा अभ्यास दौरा होता की पर्यटन, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने मात्र हे प्रशिक्षण मुंबईतील अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेच्या वतीने आयोजित करण्यात आल्याचे स्पष्ट केले आहे सभाशास्त्र, प्रशासकीय कामकाज, प्रभाग विकास आणि नियोजन यांसारख्या विषयांवर प्रशिक्षण देण्यात आल्याची माहितीही पालिकेने दिली आहे.मात्र,आर्थिक अडचणीत असलेल्या महापालिकेवर सुमारे ७०० कोटी रुपयांचे ओझे असताना, शहरातील रस्ते, पाणी आणि इतर नागरी प्रश्न प्रलंबित असताना एवढा खर्च करून गुवाहाटीत प्रशिक्षण घेण्याची गरज काय होती, असा सवाल विरोधी पक्षांकडून उपस्थित केला जात आहे.तसेच काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष रोहित साळवे यांनी या खर्चावर आक्षेप घेत, शहराची आणि महापालिकेची आर्थिक परिस्थिती पाहता ६५ लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यापूर्वी प्रशासनाने विचार करायला हवा होता, असे म्हटले आहे. या खर्चाची सविस्तर माहिती विरोधी पक्ष म्हणून मागविणार असून, शहरातील विकासकामे रखडलेली असताना एवढा खर्च का करण्यात आला, याचा जाब विचारणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.दरम्यान, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनेही या दौऱ्यावर जोरदार टीका केली आहे. शहरात रस्ते, खड्डे आणि इतर मूलभूत सुविधांचा अभाव असताना नगरसेवक नातेवाईकांसह गुवाहाटीला गेले.आसाममध्ये पूरस्थिती असताना नेमके कोणते प्रशिक्षण दिले जात होते,असा सवाल मनसेने उपस्थित केला आहे. महापालिका आर्थिक अडचणीत असल्याचे प्रशासन सांगते, मग ६५ ते ७० लाख रुपयांचा खर्च कशासाठी करण्यात आला आणि जनतेच्या पैशाचा हिशेब कोण देणार, असा प्रश्नही मनसेने उपस्थित करत या प्रकाराचा निषेध केला आहे. रोहित साळवे, काँग्रेस कमिटी अध्यक्ष बंडू देशमुख मनसे जिल्हाध्यक् चंद्रशेखर भुयार , उल्हासनगर0
0
Report
येवला के अंदरसुल में बंद घर से सोने-चांदी और नकदी चुराने के बाद चोर फरार
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील अंदरसुल येथील फळांचे व्यापारी चांद भाई सय्यद यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चोरट्यांनी तीन तोळे सोन्याचे दागिने व रोख दहा ते पंधरा हजार रुपये घेऊन पोबारा केला नंतर पाठीमागच्या गल्लीत बंटी भालेराव यांच्या बंद घराचे कुलूप उघडून चांदीचे दागिने व जुन्या काळातील नाणे दहा हजार रुपये रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या घटनेची माहिती पोलिसांना समजतात येवला तालुका पोलीस उपनिरीक्षक अण्णासाहेब दिघे यांनी घटनास्थळावर जाऊन पाहणी करत पंचनामा केला व पुढील तपासाचे सूत्र फिरवली असुन. मालेगाव येथील श्वान पथक मागवण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
1 अगस्त से 12 समुद्री मील से बाहर मछली पकड़ने की अनुमति
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. राज्यातील मच्छीमारांना १ ऑगस्टपासून १२ सागरी मैलापलिकडील विशेष आर्थिक क्षेत्रात मासेमारीची परवानगी देण्यात आली आहे. किनाऱ्यापासून १२ सागरी मैलांपर्यंतच्या महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात मात्र १५ ऑगस्टपर्यंत मासेमारीवरील बंदी कायम राहणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय विभागाने दिली आहे. त्यामुळे खोल समुद्रात मासेमारी करताना मच्छीमारांना नियमांचं काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. तसेच, बंदीच्या कालावधीत महाराष्ट्राच्या प्रादेशिक जलक्षेत्रात बेकायदेशीररीत्या मासेमारी करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाईचा इशाराही विभागाने दिला आहे.0
0
Report
येवला में पानी से जुड़ी भारी खुशखबरी: गंगासागर तालाब पूरी क्षमता से भरा
Yeola, Maharashtra:गेल्या दोन महिन्यापूर्वी येवला शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगासागर तलावात पाणीसाठा कमी झाल्याने शहराचा पाणी पुरवठा 4 दिवसआड करण्यात आला होता मात्र सध्या नाशिक जिल्ह्यात धरण क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होत असल्याने पालखेड धरणातून फोर फ्लो च्या पाण्याने गंगासागर तलाव भरून मिळावा अशी मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी पाटबंधारे विभागाकडे केली होती त्यानुसार पाटबंधारे विभागाने येवल्याच्या गंगासागर तलावात आवर्तन सोडले असून या आवर्तनाने गंगासागर तलाव पूर्ण क्षमतेने भरून गेला आहे त्यामुळे आता येवलेकरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता मिटली असून या तलावातील पाण्याचे जलपूजन नुकतेच संपन्न झाले याप्रसंगी नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी सह इतर मान्यवर उपस्थित होते.0
0
Report
यवतमाळ के उकणी में पेड़ गिरा, घर को नुकसान, कोई घायल नहीं
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी तालुक्यातील उकणी येथे आज सकाळी सातच्या सुमारास चिंचेचे भले मोठे झाड एका घरावर कोसळले. जिल्ह्यात सर्वदूर पाऊस धारा सुरू असून, जीवन मजगवळी यांच्या घरा शेजारी असलेले हे चिंचेचे झाड, अचानक कोसळले. झाड कोसळल्याने जीवन मजगवळी यांच्या घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, सुदैवाने कुणालाही इजा झाली नाही. कालपासून सुरू असलेल्या रिमझिम पावसामुळे हे झाड पडल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.0
0
Report
Advertisement
नागपूर में पानी भराव: हाई कोर्ट ने महापालिका को कड़े निर्देश दिए
Nagpur, Maharashtra:नागपूर - पावसाळ्यापूर्वी साफसफाईचे दावे केले असताना शहरात पाणी साचण्याला जबाबदार कोण? असा सवाल विचारत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाकडून महानगर पालिकेची झाडाझडती घेतली. - अतिवृष्टी�nंतर शहरात पाणी तुंबल्याची न्यायालयाने गंभीर दखल घेतली, दरवर्षी जुलै-ऑगस्टमध्ये शहर पाण्याखाली मग उपाययोजना कुठे? - सिमेंट रस्त्यांमुळे निर्माण झालेल्या समस्यांवरील जनहित याचिकेवर सुनावणी, मनपाच्या वकिलांना पाचारण करत न्यायालयाने विचारला जाब - "साफसफाईचे दावे करता, मग ही परिस्थिती का?" न्यायालयाचा मनपाला सवाल,"अभ्यास केला म्हणता, हा कसला अभ्यास?" मनपा अधिकाऱ्यांना न्यायालयाचे खडे बोल - शुक्रवारीपर्यंत सविस्तर उत्तर सादर करण्याचे मनपाला उच्च न्यायालयाचे आदेश, "थातूरमातूर उत्तर चालणार नाही" ठोस उपाययोजना सादर करण्याचे निर्देश - हलगर्जीपणा आढळल्यास मनपा आयुक्तांनाच उत्तर मागवणार, मनपा सोबत पीडब्ल्यूडी आणि पोलिसांनाही, उच्च न्यायालयाचे फटकार - दरवर्षी नागरिकांचे जीव धोक्यात मानवी जीवनाचे काय? - शालेय विद्यार्थ्यांनाही अतिवृष्टीचा फटका, उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता - सोमलवार शाळेसमोरील रस्त्यावरील प्रकारावरून, मनपा अधिकाऱ्यांना न्यायालयाने फटकारले - लहान मुलांच्या सुरक्षेची तरी काळजी घ्या, उच्च न्यायालयाचा मनपाला सुनावणीदरम्यान सज्जड इशारा देत पुढील सुनावणी शुक्रवारी होणार0
0
Report
जुनार में भारी बारिश से धान रोपनी तेज; पूर्व विधायक अतुल बेनके खेत में उतरकर चिकलनी कर रहे
Barav, Maharashtra:जुन्नर तालुक्यात मुसळधार पावसामुळे भात लागवडीची कामे वेगाने सुरू असून, माजी आमदार अतुल बेनके यांनी थेट शेतातील चिखलात उतरून नांगर हाकत चिकलणी केलीय. सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये कोसळणाऱ्या जोरदार पावसामुळे जुन्नरच्या आदिवासी भागात शेतकरी भात लावणीच्या कामात व्यस्त आहेत. अशा वेळी आपला लोकप्रतिनिधी स्वतः शेतात उतरून नांगरणी आणि चिकलणी करत असल्याचे पाहून स्थानिक आदिवासी शेतकऱ्यांमध्ये मोठा आनंद आणि उत्साह पाहायला मिळाला.0
0
Report
शहादा के बैंक परिसर में निर्वस्त्र चोर ने एसी वायर चोरी कर दहला दिया
Dhule, Maharashtra:शहादा शहरातील दोंडाईचा रोडवरील स्टेट बँक परिसरातील 56 गाडे व्यापारी संकुलात एका भुरट्या चोराने चोरीची भन्नाट आणि अजब शक्कल लढवली आहे. ओळख लपवण्यासाठी या चोराने स्वतःचे कपडेच काढून चेहरा झाकला. त्याने संकुलातील एसीची कॉपर वायर आणि कॉम्प्रेसरची चोरी केली. चोरीला गेलेली ही महागडी वायर आणि साहित्य साठवण्यासाठी चोराने स्वतःच्याच पॅन्टचा पोत्यासारखा वापरला आणि तिथून पोबारा केला. हा संपूर्ण निर्वस्त्र चोरट्यांचा प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. सध्या या अजब चोराची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू आहे. या भुरट्या चोरांमुळे व्यापारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, पोलिसांनी या अजब चोराचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.0
0
Report
Advertisement
