icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के आश्रमशाळेत विद्यार्थी की मौत: शवविच्छेदन के बाद सच उजागर होगा

Amravati, Maharashtra:26 दिवसांनंतर राजेश बेठेकरचा कुरलेला मृतदेह शवविच्छेदनासाठी काढला बाहेर; राजेशच्या मृत्यूचे गूढ उलगडणार अमरावती शहरातील महर्षी पब्लिक स्कूल आदिवासी आश्रमशाळेत शिकणाऱ्या राजेश बाबू बेठेकर या विद्यार्थ्याच्या मृत्यू प्रकरणात मोठी घडामोड समोर आली आहे. तब्बल 26 दिवसांनी राजेशचा मृतदेह शवविच्छेदनासाठी बाहेर काढण्यात आला आहे. आरोग्य विभागाच्या पथकाने मृतदेहाचे शवविच्छेदन केले असून या अहवालानुसार राजेशच्या मृत्यूचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. राजेशच्या मृत्यूनंतर आश्रमशाळेतील इतर विद्यार्थ्यांनाही अन्नातून विषबाधा झाल्याचा आरोप करण्यात आला होता. या प्रकरणात शाळा प्रशासनाच्या निष्काळजीपणाचेही गंभीर आरोप झाले आहेत. अमरावतीचे अपर आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत यांनी आश्रमशाळेची पाहणी केली होती. यावेळी विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था, पिण्याचे पाणी, निवास, शालेय गणवेश आणि औषधोपचार यामध्ये अनेक त्रुटी आढळल्याचे समोर आले होते. आता शवविच्छेदन अहवालाकडे सर्वांचे लक्ष लागले असून राजेशच्या मृत्यूचे खरे कारण काय? आणि या प्रकरणात दोषी कोण? याचा उलगडा अहवालानंतर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आता दोषींवर कारवाई होणार का याकडेही मृताच्या कुटुंबीयांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

धुळे में फिर बारिश से खरीफ फसलों को मिली नई उम्मीद; किसान उत्साहित

Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यातील धुळे, शिरपूर, शिंदखेडा आणि साक्री तालुक्यात पावसाने हजेरी लावली. तब्बल एक महिन्यापासून दडी मारलेल्या पावसाने पुन्हा सुरुवात केल्याने माना टाकलेल्या पिकांना काही प्रमाणात नवसंजीवनी मिळाली असून बळीराजाला मोठा दिलासा मिळाला आहे. हवामान विभागातर्फे धुळे जिल्ह्याला यलो अलर्ट देण्यात आला होता. त्यानुसार जिल्ह्यात विविध भागांत पावसाला सुरुवात झाल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला आहे. दिवसभर अधूनमधून सुरू असलेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी शेतशिवारात पाणी साचले. यंदाच्या पावसाळ्यात जिल्ह्यात सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने खरीप हंगामातील पिकांवर संकट निर्माण झाले होते. पावसाअभावी अनेक भागांतील पिके कोमेजण्यास सुरुवात झाली होती. त्यामुळे झालेल्या या पावसामुळे शेतकर्‍यांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी पिकांच्या वाढीसाठी अद्यापही दमदार आणि सातत्यपूर्ण पावसाची आवश्यकता आहे. बळीराजाचे आता जोरदार पावसाकडे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

गणेशोत्सव के लिए एसटी बसों की कमी, मुंबई-ठाणे में यात्रियों को भारी देरी

Yeola, Maharashtra:मुंबई, ठाणे येथून कोकणात गणेशोत्सवासाठी जाणाऱ्या गणेशभक्तांची गैरसोय होऊ नये, यासाठी राज्यातील विविध एसटी आगारांमधून मोठ्या संख्येने एसटी बसेस मुंबई और ठाणे परिसरात पाठवण्यात आल्या आहेत परंतु, या बसेस संबंधित आगारातून रिकाम्या पाठवण्यात आला एसटी बसेसची संख्या कमी झाल्याने अनेक मार्गांवर प्रवाशांना तब्बल एक ते दोन तास बसची वाट पाहावी लागत आहे त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल होत असून, वेळेवर इच्छित स्थळी पोहोचणेही कठीण झाले तसेच याचा सर्वाधिक फटका शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनाही बसत आहे. शाळा-कॉलेजला जाण्यासाठी तसेच सुटल्यानंतर घरी परतण्यासाठी वेळेवर एसटी बस उपलब्ध होत नसल्याने विद्यार्थ्यांनीही नाराजगी व्यक्त केली
0
0
Report
Advertisement

बुलढ़ाणा मंत्री के बयानों पर हंगामा, महिलाओं के सम्मान पर सवाल

Buldhana, Maharashtra:ऑन दुष्काळसदृश्य परिस्थिती.. दोन दिवसांपूर्वी पालकमंत्री मकरंद जाधव पाटील यांच्यासोबत बैठक झाली. बुलढाणा जिल्ह्यातील अनेक तालुके दुष्काळग्रस्त म्हणून घोषित होतील, असे वाटते. विद्याधर महाले यांच्या वाढदिवसावरून आ. गायकवाड यांनी केलेल्या आरोपाबाबत आ. महाले म्हणाल्या की, या सगळ्या कार्यक्रमाचे नियोजन विद्याधर महाले यांच्या मित्र परिवाराने केले होते. मित्रपरिवार स्वतःच्या खर्चाने वाढदिवसाच्या सहभागी झाला, त्यामुळे कुठलाही खर्च झालेला नाही. ऑन बाप अजून मैदानात... कोण आहे बाप? माझ्यासाठी जनताजनार्दन मायबाप आहे. मी बुलढाण्याची सून तर चिखलिची लेक आहे. त्यामुळे बुलढाणाकराची सेवा करणे ही माझी जबाबदारी आहे. मला एकच सांगायचं आहे कुठल्याही, दडपशाहीला बळी पडू नका. ऑन बाप तो बाप रहेगा डान्स.. बाबा सारखं शरीर कोठून आणणार? हे महिलांबाबत केलेलं वक्तव्य म्हणजे महिलांचा अपमान आहे. तुम्ही आमदार जरी असले तरी तुम्हाला असे बोलण्याचा अधिकार नाही.
0
0
Report

विरार में भारी बारिश से जलभराव, मुंबई-आहमदाबाद राजमार्ग पर पानी भर गया

Vasai-Virar, Maharashtra:विरार गणपती उत्सवासाठी विरारहून गावाकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची मुसळधार पडणाऱ्या पावसाने वाट अडवली विरार कडून मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग कडे जाणाऱ्या रस्त्यावर पाणी साचायला सुरुवात झाली आहे गुडघाभर रस्त्यावर पाणी साचले असल्याने वाहनांची गती मंदावली असून अनेक वाहने साचलेल्या पाण्यात अडकली आहेत वसई विरार शहरात सकाळपासूनच पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केली आहे अनेक दिवसापासून विश्रांती घेतलेल्या पावसाने सकाळपासून पडायला सुरुवात केल्याने अनेक ठिकाणच्या सखल भागात पाणी साचले आहे
0
0
Report
Advertisement

सोलापूर के दुष्काळ में किसान संकट, जिलाधिकारी ने खरीफ फसलों पर समीक्षा शुरू की

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्त भागाची पाहणी सुरु, जिल्हाधिकाऱ्यांसह आमदार पोहोचले शेतकऱ्यांच्या बांधावर - यंदाच्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात पावसाने दडी मारल्यानंतर शेतकरी मोठ्या संकटात - जिल्ह्यातील मुख्य तालुक्यांमध्ये खरीपाची पिके वाया - जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने माहिती गोळा करण्यास सुरुवात - जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन, आ. सचिन कल्याणशेट्टी यांनी एकत्रितपणे अक्कलकोट तालुक्यातील खरीप पिकांची केली पाहणी - जिल्ह्यातील खरीपांची अवस्था बिकट असून दुष्काळ जाहीर करण्यासाठी निकष पूर्ण करण्याचा प्रयत्न जिल्हाधिकाऱ्यांची माहिती - शेतकऱ्यांनी खचून न जाता रब्बी हंगामाकडे लक्ष द्यावे आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचे आवाहन - सरकारकडे लवकरात लवकर पाठपुरावा करून शेतकऱ्यांना मदत करण्याचे आ. सचिन कल्याणशेट्टी यांचे आश्वासन अक्कलकोट तालुक्यातील परिस्थितीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
0
Report

गणेश उत्सव के साथ उरळ पुलिस ने नशामुक्ति और स्वच्छता का संकल्प लिया

Akola, Maharashtra:गणपती बाप्पाच्या आगमनासोबत भक्ती, उत्साह आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश देणारा उपक्रम अकोला जिल्ह्यातील उरळ पोलिसांनी राबविला आहे. गणेशोत्सव शांततेत आणि उत्साहात साजरा व्हावा, यासोबतच तरुणाईने व्यसनांपासून दूर राहावं, यासाठी पोलिसांनी गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली आणि याच बैठकीत नशामुक्ती आणि स्वच्छतेचा सामूहिक संकल्प करण्यात आला. गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, उत्साह और जल्लोष आलाच.. मात्र, याच उत्सवाला सामाजिक संदेशाची जोड देण्याचा प्रयत्न उरळ पोलिसांनी केला आहे. उरळ पोलीस स्टेशनच्या हद्दीतील गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची विशेष बैठक आयोजित करण्यात आली... यावेळी गणेशोत्सव काळात कोणत्याही प्रकारच्या अमली पदार्थांचे सेवन करणार नाही, अशी सामूहिक प्रतिज्ञा घेण्यात आली... केवळ नशामुक्तीच नाही, तर स्वच्छतेचाही संदेश या उपक्रमातून देण्यात आला... गणेशोत्सवाच्या काळात मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी आणि कार्यकर्त्यांनी श्रमदान करून परिसर स्वच्छ ठेवण्याचा ही संकल्प केला.. गणेशोत्सव हा केवळ धार्मिक उत्सव न राहता, समाजाला सकारात्मक दिशा देणारा उत्सव ठरावा... तरुणाईने व्यसनांपासून दूर राहावं आणि सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता राखावी, हा या उपक्रमामागचा मुख्य उद्देश आहे...
0
0
Report

नागपुर में ध्वनी प्रदूषण के विरोध में शांतिपूर्ण मार्च, डी.जे. बंदी की मांग तेज

Nagpur, Maharashtra:ध्वनी प्रदूषण, डी.जे. विरोधात नागपुरात शांती मार्च. लक्ष्मीभुवन चौक ते शंकर नगर चौक असणार शांती मार्च नागपुरात डी.जे. बंदी कायमस्वरूपी लागू करण्याच्या मागणी त्रिमूर्ती नगर रेसिडेंट्स एक्शन विंग फाउंडेशन (TRAW Foundation) आणि कॅग (CAG) च्या आवाहनानुसार हा शांती मार्च आयोजित करण्यात आलाय नागरिकांचा मोठ्या संख्येने सहभाग उत्सवाला विरोध नाही गोंगाट नको ध्वनी प्रदूषण नको अशी भूमिका घेत आंदोलकानी शांती मार्च काढला यावेळी सर्व धर्मीय आंदोलन सहभागी झाले माजी आमदार संदीप जोशी यांच्या नेतृत्वात हा शांती मार्च काढण्यात आला यावेळी तिथून आढावा घेतलला आमच्या प्रतिनिधींनी
0
0
Report
Advertisement

बार्शीटाकळी के किसान बेमौसमी बारिश से प्रभावित, प्रदर्शन कर सूखा घोषित करने की माँग

Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यात अपुऱ्या पावसामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढावलं आहे... हातातोंडाशी आलेला घास पावसाअभावी हिरावला जात असताना, शासनाचं लक्ष वेधण्यासाठी शेतकऱ्यांनी चक्क रात्रभर जागून आंदोलन केलं... बार्शीटाकळीच्या जुन्या बसस्थानकावर शेकडो शेतकऱ्यांनी ‘दुष्काळ जागरण आंदोलन’ करत तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करण्याची मागणी केली...शनिवारी रात्री नऊ वाजता सुरू झालेलं हे आंदोलन रविवारी पहाटे तीन वाजेपर्यंत सुरू होतं... हातात फलक, घोषणाबाजी आणि सरकारविरोधातील आक्रोश..अशा वातावरणात शेतकऱ्यांनी संपूर्ण रात्र जागून काढली... अपुऱ्या पावसामुळे सोयाबीन, कापूस, मूग, उडीद यांसह विविध पिकांना मोठा फटका बसला आहे... पिकांच्या वाढीच्या महत्त्वाच्या टप्प्यावर पावसाने दडी मारल्याने उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची भीती आहे... त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे..या पार्श्वभूमीवर बार्शीटाकळी तालुका कोरडा दुष्काळग्रस्त घोषित करावा, शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाख रुपयांची आर्थिक मदत द्यावी, अशी प्रमुख मागणी करण्यात आली... यासोबतच संपूर्ण कर्जमाफी, पीक विम्याची तातडीने मदत, जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात आणि विद्यार्थ्यांची परीक्षा फी माफ करावी, अशा विविध मागण्याही यावेळी करण्यात आल्या...
0
0
Report

कराड बालगृह में मारपीट से नाबालिग की मौत, परिजनों ने हंगामा किया

Satara, Maharashtra:कराड, सातारा: बाल निरीक्षण गृहातील मारहाण झालेल्या अल्पवयीन मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना कराडमध्ये घडली आहे. निशांत शिलवंत असे मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे. पंधरा दिवसांपूर्वी बालगृहातील मुलांमध्ये भांडण झाले होते. या भांडणात एका निशांत शिलवंत याला मारहाण झाल्याची माहिती आहे. या निशांतवर कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचार सुरू होते. प्रकृती खालावल्याने त्याला पुढील उपचारासाठी कोल्हापूरला हलविण्यात आले होते. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. कोल्हापुरातून मुलांच्या मृतदेह घेऊन आलेली ॲम्बुलन्स थेट कराडच्या बाल गृहात आणण्यात आल्याने गोंधळ उडाला. मुलाच्या मृत्यूची माहिती मिळताच नातेवाईकांनी बालगृहासमोर दिवसभर ठिय्या मारला होता. अखेर वादावादीनंतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांनि केलेल्या मध्यस्थीने नातेवाईकांनी मृतदेह ताब्यात घेतला आहे. या प्रकरणात बालगृहातील तिघांना बडतर्फ केल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे. तसेच कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आल्याने नातेवाईकांनी मुलाचा मृतदेह ताब्यात घेतला. मारहाणीचे नेमके कारण आणि या घटनेला जबाबदार कोण, याचा पोलीस तपास सुरू आहे. बाईट :- नातेवाईक
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top