445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कांग्रेस के आरोप: मोदी ब्रांड की हवा क्यों फटी, देशभक्ति पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर ऑन वंदे मातरम् आरोप - मला असं वाटतं की भाजपची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी नावा असलेल्या ब्रँडची हवा खराब झाली आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान भाषण देतात, पण भाजपच्या संघटन मंत्र्यासारखे भाषण दिल्यासारखे वाटते. ज्या पद्धतीने देशाच्या सैनिकांचा अपमान केला जातो, त्यांच्या जॅकेटवर असलेल्या तिरंग्यावर आणि जॅकेटवर मोठा पैसा खर्च केला जातो. दुसऱ्या देशाचा तिरंगा त्यांच्या जॅकेटवर दिसला. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये वंदे मातरम्चा मुद्दा घेऊन देशप्रेमाचे आम्ही आहोत, असा सिद्ध करता. प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन हे देश लुटत आहेत. जिथे नाव घेतात, तिथे लुटतात. भाजपने आम्हाला देशप्रेम शिकवू नये. देशासमोर असलेल्या परिस्थितीवर चर्चा करावी. ऑन नक्षल पक्ष - आपल्याकडे एक मन आहे गिधड पर मुसिबत आती है तब गिधड शहर की और भागता है अशा प्रकारचे वक्तव्य करून तरुण-तरुणींचा अपमान ज्या पद्धतीने चालला आहे, देशाच्या तरुणांना गटार म्हटलं जातं, दिमाखी नक्षल म्हटलं जातं. भाजपच्या लोकांचा आता शेवटचा काळ आहे. परिणाम मोदी यांच्यावर होत आहे. हे घाबरलेले आहेत. सत्तेतून यांना आता दूर जाणार आहेत. घाबरलेल्या परिस्थितीत तरुणांना नक्षल, गटार, आंदोलनजीवी, दिमाखी नक्षल म्हणणं योग्य नाही. प्रधानमंत्री देशाबद्दल भाषण देतात तेव्हा जागतिक पातळीवर विश्लेषण होतं, भारतात काय चाललं आहे, विदेशी नीती काय आहे, यावर चर्चा होते. देशाच्या तरुणांना, त्यांच्या भविष्याला दिमाखी नक्षल म्हणणं... हे बरोबर नाही कोणाची दिमाकी हालत खराब आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. ऑन मुख्यमंत्री अधिकार - मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळाचा एखादा चुकीचा निर्णय झाला, तर त्याला रद्द करण्याचे अधिकारा मुख्यमंत्र्यांना असतो.मुख्यमंत्री, ‘मी किती भारी आहे,’ हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात तरतूद आहे. मुख्यमंत्री हे महत्त्वाचे असतात. विधानसभेतसुद्धा सांगितलं की मंत्र्यांना काहीच अधिकार नाहीत. त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे. ऑन एकनाथ शिंदे चित्रपट गाणे - त्यांनी काही केलं तर ते वॉशिंग मशीनमध्ये आहेत, वॉशिंग मशीनमधली पार्टी आहे. अशी चर्चा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या नाहीत. हे विषय काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. अनेक प्रश्न समोर आहेत. काँग्रेसला त्यामध्ये रस आहे. ऑन हसन दलवाई - मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी हे वक्तव्य केलं आहे. हे मोठे नेते आहेत. त्यांच्या लेव्हलवर काही चर्चा झाली असेल, त्यांना माहिती असेल. आमच्या लेव्हलवर अशी चर्चा झाली नाही.आमच्यासमोर अशी चर्चा झाली नाही. ऑन नरेंद्र भोंडेकर आरोप, रेती घाट - ३०० कोटींपेक्षा जास्त घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे.अनेक पेपर्स आम्ही महसूलमंत्र्यांना दिले. बावनकुळे साहेबांनी प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. विकासासाठी रस्ते नाहीत, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुठभर लोकांचं मोदी सरकार, मुठभर लोकांचं लाडाचं करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घ्यावा. भंडारा जिल्ह्यातल्या डीपीडीसी मध्ये काय झालेलं आहे, अत्यावश्यक माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी कारवाई करावी. ऑन दिल्ली आंदोल(नक्षल ) - भाजप मध्ये अनेक नेते समाविष्ट आहेत. बिहारचे मुख्यमंत्री असतील, अनेक उदाहरण देता येतात. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? किती गुन्हे दाखल आहेत, काय स्थिती आहे, हे आपण पाहिलं आहे. या सर्व गोष्टींमध्ये भाजपमध्ये किती विध्वंस व्यवस्था आहे, याचा अंदाज आहे. हे सॅम्पल आहे दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडेसुद्धा भाजपने बोट दाखवलं पाहिजे. ऑन एसआर प्रकरण - मी काही आढावा घेतला. असं लक्षात आलं की १० टक्के वोटर संख्या आहे. काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही मृत्युमुखी आहेत. पुन्हा एकदा महिन्याभरानंतर संधी प्राप्त होणार आहे. या यादीनंतर त्यांना एक महिन्याची मुदत राहणार आहे. ही प्रक्रिया चालत राहणार आहे. या सर्व यादीमध्ये संपूर्ण स्ट्रक्चर उभं होईल. त्याच्यामध्ये गडबड दिसेल. निवडणूक आयोगाने यात सुधारणा केली पाहिजे. ऑन नाशिक कुंभ - नाशिकच्या मंत्र्यांच्या परिवारातील लोक सामील होत आहेत. नकली टेंडर काढून वर्क ऑर्डर दिली जाते. सरकार ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या लोकांचे घर लुटले जात आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाने सरकार पैसे खर्च करीत आहे. परस्पर लुटले जात आहे. सरकारचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व गोष्टींमध्ये कशी बाहेर येईल, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. जर साधुसंतांनी या संदर्भात बाहेर चर्चा केली तर, सनातन धर्माची बदनामी आणि महाराष्ट्राची बदनामी होईल.0
0
Report
72 करोड़ के रेती घोटाले के बाद मंत्रियों की चुप्पी पर आक्रोश, निलंबन मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा, शिवसेना - मागील मार्च महिन्यात रेती घाटा संदर्भातला प्रश्न मी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला होता. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा भाग घेतला होता. राज्यचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, ३४ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झालेले आहे. ७२ कोटी रुपयांचा दंड ठेवण्यात आलेला आहे. जे जे अधिकारी यात आरोपी आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली होती. उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) सस्पेंडसुद्धा करण्यात आले होते. - मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले होते की, ७२ कोटींचा घोटाळा ३०० कोटींवर झाला असता, दंड व्हायला हवा होता. एवढा मोठा घोटाळा झाल्या नंतर सुद्धा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) निर्णय देत असेल, तर हा सभागृहाचा अवमान आहे. सभागृहापेक्षा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) मोठा होत नाही. - ज्या कंपनीला मंत्र्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, ज्या कंपनीवर ७२ कोटींचा दंड ठेवण्यात आलेला आहे, त्याच कंपनीला पुन्हा टेंडर दिलेलं आहे. त्या सर्व आमदारांनी मागणी केली, त्या कंपनीकडून दंड वसूल करा. - जिल्हाधिकारी चार महिने हा संपूर्ण प्रश्न ओळवत आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी हे मंत्र्यांपेक्षा मोठे होऊ शकत नाहीत. तहसीलदारानेसुद्धा आदेश काढले असतील, मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर काढला असेल, तरी पूर्वपरवानगी मंत्र्यांची किंवा सभागृहाची घेतली का?बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की, उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) आणि कलेक्टर यांनी नाकारलं. - हा सर्वात मोठा घोटाळा आहे. हा ३०० कोटींचा घोटाळा आहेच. एक हजारो कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. - जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यातील मुख्य सूत्रधार कोण? जिल्हाधिकारी यांची हिंमत कशी काय? धृतराष्ट्र सारखा डोळ्याला पट्टी बांधून ठेवणारा हा जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकारी यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे.0
0
Report
बुद्धिजीवी नक्षलवाद पर केंद्र सरकार से सवाल, कांग्रेस का आरोप
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट – श्यामकुमार बर्वे, खासदार, रामटेक लोकसभा, काँग्रेस नेते -ऑन बुद्धिजीवी नक्षलवाद पक्ष- काँग्रेस पक्ष देशात सर्वात मोठा झाला, ही निवडणूक लढण्यासाठी मोठा झाला नाही. बुद्धिजीवी नक्षलवाद पार्टी उदयास आली आहे. लातूरमध्ये फॉलोअर्ससुद्धा तयार झाले आहेत. हे केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतले पाहिजे. हुकूमशाहीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जनभावना त्यांच्या विरोधात झालेली आहे. जनतेमध्ये राग आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राग समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी आली पाहिजे. ‘बुद्धिजीवी नक्षलवाद’ असे काय-काय शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यांनी यापूर्वीसुद्धा नवीन-नवीन शब्द वापरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करून कार्यशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. ऑन ایسआयआर - संसद लेव्हलवर, कोर्टातसुद्धा ایسआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. ती चुकीची पद्धत आहे. दोन कोटी नावे वगळण्यात येत आहेत. दहा-दहा वर्षे मतदान केलेल्या लोकांना शुद्ध करावे लागत आहे की मी मतदार आहे म्हणून. पहिल्यांदा जेव्हा निवडणूक झाली, त्यावेळी नाव आणि मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित केले. ते प्रोत्साहन सोडून आता नावे कशी कमी होतील, यामध्ये निवडणूक आयोग इंटरेस्टेड आहे. ऑन वंदे मातरम् - वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान ज्यांच्या पॅकेटला तिरंगा लागला होता, त्यावरसुद्धा अनेक लोकांनी भाष्य केले आहे. वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. हा यायचा जमाना आहे. त्यामुळे कोण कुठे जळून घेतो, त्यांची भावना काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे.0
0
Report
Advertisement
आशिष जयस्वाल के बयानों पर राजनीति गर्म, ठाणे में विवाद जारी
Nagpur, Maharashtra:नागपूर आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - प्रत्येक माणूस राजकारणात अस्तित्व जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात. हे खोटे भ्रम आणि स्टंट करणारे वक्तव्य आहे. विनाकारण कोणाची बदनामी करून स्वतःला लाईम लाईट मध्ये आणण्याचा हा प्रकार आहे...एका जबाबदार राजकारणाने अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये.... अशा माणसाचा हसा करायला पाहिजे इतके दिवस तुम्ही चुपचाप का बसले होते. चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे घेणे ह्या चुकीच्या बालिशपणा आहे... - ठाणे कार्यक्रम भाजपला निमंत्रण नाही - राजकारणात प्रत्येकाचा आपल्या पक्ष वाढला पाहिजे परंतु नेमकं तिथं काय घडलं हे मला माहित नाही.... शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेना मजबूत आहे.. आनंद दिघे ते साहेबांचं शिवसेनेवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे...याच भान प्रत्येकाने ठेवावं... - कंत्राटदार आंदोलन - मागच्या सरकारमध्ये लोकहिताचे निर्णय घेतले... तेव्हा अंदाजीत खर्चपेक्षा खूप जास्त खर्च झाला आहे. कृषी पंपाची वीज बिल माफी ती कमी अपेक्षित होते आतापर्यंत ती 32000 कोटी पर्यंत गेली आहे.... शेतकरी कर्जमाफी लेक लाडकी योजना लाडकी बहीण योजना मुलींची फीमाफीच्या योजना सरकारने राबवला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुद्धा त्या दरम्यान सुरू होते₹ थोडी आर्थिक घडी हे अडचणीची झाली होती. त्या परिस्थितीला मात करून सव्वा वर्षात टप्प्याटप्प्यात सर्व गोष्टी क्लिअर करत आहोत. नवीन काम घेण्यासंदर्भात आम्ही थांबवल आहे... वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढून सगळ्यांचे दिले जात आहें. - नरेंद्र भोडेकर आरोप रेती घोटाळा - भंडारा जिल्ह्याचा विषय आहे मी त्या खात्याचा मंत्री नाही... रेती घरकुल धारकांना घाटातून लाभ देण्यासाठी धोरण राबवलेला आहे वाळू राखून सुद्धा ठेवली आहे. भविष्यात वाळूची चोरी कमी व्हावी या दृष्टीने शासनाचा प्रयत्न असतो डिमांड आणि सप्लाय चा रेशो बिघडल्याने काही लोक अशा पद्धतीने गैरव्यवहार करतात शासन त्याच्यावर कारवाई करत आहे... - मुख्यमंत्री मुख्यमंत्री हस्तक्षेप करून निर्णय बदलू शकतात.. - मुख्यमंत्री शेवटी बॉस असतात त्यांना कुठले विभागाच्या निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा विषय नाही.0
0
Report
मेळघाट के आदिवासी छात्र की मौत पर हड़कंप, स्कूल में जांच शुरू
Amravati, Maharashtra:मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्यांचा मृत्यू; अमरावतीच्या महर्षी पब्लिक स्कूल मधील धक्कादायक घटना, पाच विद्यार्थ्यांवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू अमरावतीच्या मेळघाटातील आदिवासी विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याने अचानक खडबड उडाली आहे. अमरावती येथील महर्षी पब्लिक स्कूल मधील ही धक्कादायक घटना आहे. चिखलदरा तालुक्यातील कारंजखेडा येथील इयत्ता अकरावीत शिकत असलेला विद्यार्थी राजेश बाबू बेठेकर याचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या विद्यार्थ्याच्या पोटात दुखत असल्याने व उलट्या आणि मळमळ होत असल्याने हतरू येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रात उपचारासाठी दाखल केले असता उपचारादरम्यान राजेशचा मृत्यू झाला आहे. दरम्यान पाच आदिवासी विद्यार्थी खासगी रुग्णालयात उपचार घेत असल्याची माहिती समोर आली असून विद्यार्थ्यांना डायरिया झाला होता की अन्नातून विषबाधा असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे. विद्यार्थ्यांच्या मृत्यू आणि काही विद्यार्थ्यांच्या आजाराबाबत आदिवासी विभागाकडून चौकशी सुरू असून विद्यार्थ्यांना तीव्र डोकेदुखी, उलटी आणि जुलाबाचा त्रास सुरू झाला असल्याचा आरोप केला जात आहे.0
0
Report
श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा: मुआवजे लिए पारदर्शी समिति के साथ निष्पक्षता पर जोर
Kolhapur, Maharashtra:श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील बाधित होणाऱ्या मालमत्ताधारकांच्या भूसंपादनासंदर्भात एक महत्त्वपूर्ण बैठक राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. या तीर्थक्षेत्र विकास आराखडा दरम्यान मालमत्ता धारकांवर अन्याय होणार नाही असा विश्वास आमदार राजेश क्षीरसागर यांनी बैठकीदरम्यान दिला आहे. हा विकास आराखडा तयार करताना कोणत्याही स्थानिक नागरिकावर किंवा मालमत्ताधारकावर अन्याय होणार नाही अशी प्रशासनाची स्पष्ट भूमिका आहे. बाधित होणाऱ्या सर्व रहिवाशी आणि व्यावसायिक मालमत्ताधारकांना योग्य तो मोबदला मिळावा आणि शक्तीपीठ महामार्गाच्या धर्तीवर, जर भूसंपादनाबाबत काही तक्रारी किंवा अडचणी असतील, तर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली एक विशेष समिती स्थापन करण्यात या यावी अशी सूचना ही क्षीरसागर यांनी केलीय. दरम्यान या समितीद्वारे पारदर्शक पद्धतीने प्रक्रिया राबवून आणि कोणावरही अन्याय न करता तीर्थक्षेत्राचा विकास केला जाईल अस क्षीरसागर यांनी म्हटल आहे..0
0
Report
Advertisement
नागपुर ग्रामीण RTO भ्रष्टाचार याचिका अब जनहित याचिका में बदली: उच्च न्यायालय के निर्देश
Nagpur, Maharashtra:नागपूर ग्रामीण RTO तील कथित भ्रष्टाचाराची याचिका आता जनहित याचिका करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश. नागपूर ग्रामीण आरटीओतील कथित भ्रष्टाचार आणि व्यावसायिक वाहनांकडून बेकायदा वसुलीच्या आरोपांप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. आरटीओतील कथित ‘एंट्री लिस्ट’ किंवा एक्सेल शीटच्या माध्यमातून काही वाहनांना कारवाईपासून संरक्षण दिल्याचा आरोप करणाऱ्या फौजदारी रिट याचिकेचे जनहित याचिकेत रूपांतर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. वाहतूक व्यावसायिक नीलेश सहदेव नायक यांनी ही याचिका दाखल केली होती. या प्रकरणाच्या स्वतंत्र चौकशीसाठी विशेष तपास पथक म्हणजेच SIT स्थापन करण्याची मागणी याचिकेत करण्यात आली आहे. काही अधिकाऱ्यांच्या संवेदनशील पथकांवरील सलग नियुक्त्या आणि परिवहन आयुक्तांच्या रोटेशन धोरणाच्या अंमलबजावणीवरही याचिकेत प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. मात्र, या आरोपांच्या सत्यतेबाबत न्यायालयाने कोणतेही मत व्यक्त केलेले नाही. आता जनहित याचिकेच्या रुपात या प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.0
0
Report
मेळघाट के टोक पर गारपठार जलप्रवाह, पर्यटकांची गर्दी
Amravati, Maharashtra:मेळघाटच्या टोकावरील गारपठार धबधबा प्रवाहित; धबधब्याची पर्यटकांना भुरळ, मध्य प्रदेशाने अमरावती जिल्ह्यातील पर्यटकांची धबधब्यावर गर्दी अँकर :- महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या सीमेवर असलेला मेळघाट्याच्या टोकावरील गारपथार धबधबा प्रवाहित झाल्याने पर्यटकांना मोठ्या प्रमाणात भुरळ घालत आहे त्यामुळे मध्य प्रदेशाने महाराष्ट्रातील पर्यटक या धबधब्यावर गर्दी करत असल्यास पाहायला मिळत आहे. सावलमेंढा ते डोमा मार्गावर हा धबधबा असून अनेक पर्यटकांना हा धबधबा माहीत नसल्याचा दिसून येत आहे. मेळघाटात मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने मेळघाटाचा निसर्ग सौंदर्य फुलल असून हा धबधबा मेळघाटाच्या निसर्ग सौंदर्यात आणखी भर घालत आहे. या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी.0
0
Report
आदिवासी विद्यार्थियों के निर्णय वापस; कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार की चर्चा
Nagpur, Maharashtra:आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय तात्काळ मागे घ्या.. विजय वडेट्टीवार यांची मागणी आदिवासी विकास विभागाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थी, आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींविरोधात विदर्भातील आदिवासी विद्यार्थी संघाने केले आंदोलन.. तिथे जाऊन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भेट देत चर्चा केली य विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग नागपूर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारले आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची भेट घेऊन केली चर्चा आश्रमशाळा आणि वसतिगृहां ही केवळ निवास व भोजनाची व्यवस्था नाही,ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सामाजिक विकास, सुरक्षितता आणि भविष्यासाठीची आधारव्यवस्था आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे कोणतेही निर्णय पारदर्शक चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय लादणे अन्यायकारक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विजयवाडी तिवारी यांनी आदिवासी खात्याच्या सचिवांशी टेलिफोनिक संवाद साधला विद्यार्थ्यांच्या संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या १) विद्यार्थ्यांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींची तात्काळ पुनर्तपासणी व पुनर्विचार करावा. २) विद्यार्थ्यांना शांततामय लोकशाही मार्गाने प्रश्न मांडण्याचा अधिकार अबाधित ठेवावा. ३) आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, भोजन, पाणी आणि आरोग्य सुविधाएं सक्षम कराव्यात. ४) विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र, गोपनीय आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी. ५) वसतिगृह प्रवेशासाठी लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक अटींचा पुनर्विचार करावा. ६) अभ्यासक्रम किंवा फॅकल्टी बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची हमी द्यावी. ७) प्रत्येक आश्रमशाळा व वसतिगृहात पालक-विद्यार्थी संवाद समिती स्थापन करावी. ८) विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांबाबत नियमित मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. ९) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा, ग्रंथालय, इंटरनेट, क्रीडा व स्पर्धा परीक्षा सुविधा वाढवाव्यात. १०) PESA कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी.0
0
Report
Advertisement
जुन्नर सांसद डॉ. अमोल कोल्हे की प्रेस कॉन्फ्रेंस: हायवे-रेल फ्रेट कॉरिडोर संकेत
Barav, Maharashtra:खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्रकार परिषदेतील पॉईंटर १. पक्षांतर्गत बैठक व जयंत पाटील यांची अनुपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली बैठक ही केवळ जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक होती. बैठकीला सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते; जयंत पाटील यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे याचे कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नयेत. एकत्र प्रवास केल्याने गोष्टी बदलत नसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. २. पुणे-नाशिक हायवे (एलिव्हेटेड कॉरिडोअर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भूसंपादनाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. १० हेक्टरपैकी ६.९१ हेक्टर (PMRDA क्षेत्र) जमिनीच्या लँड रिवॉर्डचे पैसे जमा झाले आहेत; उर्वरित ३.९१ हेक्टर (PCMC क्षेत्र) जमिनीसाठी मुख्य सचिवांकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील १५ दिवसांत नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडोअरचे काम सुरू झालेले दिसेल. ३. भगवा रंग आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यापासून माझ्याकडे भगवा रंग आहे; माझ्यासाठी भगवा हा तिरंग्याचा पहिला रंग आहे." पक्षांतर किंवा इतर राजकीय अफवांना काहीही आधार नाही. ४. पुणे-नाशिक रेल्वे आणि फ्रेट कॉरिडोअर जुना सर्व्हेक्षण मार्ग: पुणे-नाशिक रेल्वे जुन्या सर्व्हेनुसारच व्हावी, यासाठी नेमलेल्या समितीसमोर आणि पंतप्रधानांकडे संपूर्ण अभ्यास सादर केला आहे. वाकीपर्यंत कनेक्टिव्हिटी: तळेगाव-उरुळी कांचन मार्गाला स्थानिक गावांचा विरोध असल्याने तो मार्ग वाकीच्या बाजूला (चाकण चौकाच्या अलीकडे) आणला आहे, ज्यामुळे जुन्नर-आळेफाट्यावरून अवघ्या ३५ मिनिटांत रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. पीएम गतिशक्ती टर्मिनल: आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर 'पीएम गतिशक्ती टर्मिनल' तसेच छत्रपती संभाजीनगर ते जेएनपीटी (JNPT) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरची मागणी केंद्राकडे केली आहे. ५. पालकमंत्री पदाचा वाद व विरोधकांच्या टीकेला उत्तर पालकमंत्री पदाची रस्सीखेच हा सत्ताधारी तीन पक्षांचा अंतर्गत प्रश्न असून त्यांनीच तोडगा काढावा. केवळ आंदोलने आणि विधाने करून प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष शासन दरबारी पाठपुरावा करून कामे मार्गी लागतात. आम्ही आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस काम करत आहोत. Byte: डॉ अमोल कोल्हे (खासदार शिरूर लोकसभा) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...0
0
Report
Kolhapur की इचलकरंजी में हर घर तिरंगा रैली, विद्यार्थियों ने देशभक्ति का संदेश दिया
Kolhapur, Maharashtra:नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रसन्मान जागृत करण्यासाठी ’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये शहर व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तिपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यвар, सर्वच शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आल्याने संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय होऊन गेला होता.0
0
Report
कोल्हापुर पुलिस ने गोवा बनावटी अवैध दारू 1.95 करोड़ रुपये का माल जप्त
Kolhapur, Maharashtra:गोवा बनावटीचा अवैध दारू साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला 1 कोटी 75 लाखांची दारू जप्त जयसिंगपूरात सापळा रचून कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई डाक पार्सल लिहिलेल्या ट्रकातून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक एकूण 1 कोटी 95 लाखाचा मुद्देमाल जप्त0
0
Report
Advertisement
नाशिक में शिवसेना का मोर्चा: खड्डे, भ्रष्टाचार और सत्ता के निशाने
Nashik, Maharashtra:सर्व नाशिककरांना जय महाराष्ट्र खड्ड्यातून वाट काढून, खड्डे तुडवत आलात ते आयुष्यातील खड्डे बुजविण्यासाठी ही रस्त्यावरची शिवसेना आहे आत मधली शिवसेना वेगळी आहे समोर महापौर आणि आयुक्त यांना संवेदना असतील तर निवेदन घ्यायला या आम्ही यमाला घेऊन आलो आहे आतमध्ये जे माजुरडे लोकं आहेत त्यांच्यावर हा रेडा सोडायचा उद्धव ठाकरेंच्या आदेशाने हा मोर्चा भाजप आणि मिंध्ये यांचे नगरसेवक कुठे गेले माझ्याकडे दहा नाव आहेत एक खून केला तर खुनाचा गुन्हा दाखल होतोय 302 चा गुन्हा गिरीश महाजन जे इकडचे चंपात रॉय वर दाखल करा पाच लाख दिले हे हसत हसत सांगत आहे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये द्या जे जखमी झाले त्यांना 50 लाख द्या डुप्लिकेट वर्क ऑर्डर जामनेर पॅटर्न, भ्रष्ट्राचाराचा पॅटर्न डुप्लिकेट नोटा 35 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले माझ्याकडे मगाशी कागद आले यांच्या जावायला दुसऱ्या कंपनीच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट मिळाले 27 कोटी खाल्ले, मखमलाबादला स्विमिंग पूल केले एक मोठा खड्डा दिसला त्यात भाजपचे 72 नगरसेवक टाकू म्हंटले बाकी खड्ड्यात मिंध्येचे नगरसेवक दत्तक पिता फडणवीस म्हणाले इराणच्या युद्धामध्ये डांबर मिळत नाही म्हणे दत्तक घेतलंय ना नाशिकला तुम्ही बाप आहेत हा मोर्चा इशारा आहे रेडा तुमच्या घरात घालू रस्त्यावरचे शिवसैनिक आम्ही आहोत रस्त्यावर शिवसेनेचा जन्म गिरीश महाजन येऊन सांगेल यांना काही कळत नाही, रेडा तुझ्या मागे लावणार सगळ्या भानगडी समोर आल्या आहेत आता नाशिकमध्ये समोर आणू सगळे घाबरले आहेत गेट लावून घेतला देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे त्याला माहीती नाही कितीही बंदोबस्त करा, सगळे घुसले होते दिल्लीत मोदी शहा पळून गेले, तू कोण लागून गेला आम्ही आतमध्ये घुसू हा संताप चीड राग आणि आग ही अशीच पेटती ठेवा नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही पैसे घेऊन मतदान केलं एक बाई म्हणाली भाजपचे नगरसेवक आंदोलन करत आहे राजीनामा देऊन आमच्या मोर्चात सहभागी व्हा अयोध्या आणि दुसरी अयोध्ये जिथं रामाचं वास्तव्य अयोध्येत सीतामाईचं मंगळसूत्र लुटूल त्यांचीच इथं पिलावळ आहे आईध्येतील रामाला सोडलं नाही ते पंचवटीतील रामाला काय सोडणार पण आपण यांना सोडायचे नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन घेरायचे आहे ऐकलं नाहीत, मन्मानी केली तर गेट तोडून आतमध्ये येऊ गेट तोडायचा अनुभव मला सगळ्यात जास्त एकजुट दाखवली नाशिककरांसाठी आयुक्तांना जाऊन भेटा, खड्डे बुजविण्यास कालमर्यादा द्या हवेतील शब्द नकोत खड्डे बुजवले नाहीतर आम्ही आणि तुम्ही आहोत सगळं कुंभमेळा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत जामनेर आहेत, कुंभमेळा करायला जळगाव सेना आणली आहे श्रावणातील सोमवार रस्त्यावर लोकं अडकले आहेत ही लढाई संपलेलं नाही, आतमध्ये जाऊन तारीख घ्या0
0
Report
जालना में मराठा-ओबीसी विवाद: वाघमारें के बयान से उबाल, प्राथमिकी की मांग
Jalna, Maharashtra:जालना : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं मराठा मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य, मराठा समाज आक्रमक, वाघमारेंवर गुन्हा दाखल (पॅकेज) अँकर : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.या वक्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय.शिवाय जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ : 01: जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मराठा समाजात तीव्र संताप पाहायला मिळतोय. ओबीसीांची सुंदर,गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं वक्तव्य वाघमारेंनी केलंय.दोन दिवसांपूर्वी पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक होती.या बैठकीनंतर एका माध्यमाशी बोलताना वाघमारेंनी हे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बाइट : नवनाथ वाघमारें,ओबीसी नेते(व्हायरल झालेला व्हिडीओ टाकावा) व्हिओ : 02:वाघमारेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत वाघमारेंविरोधात घोषणाबाजी केली.शिवाय पोलिसांनी वाघमारेंवर कारवाई न केल्यास वाघमारेंना प्रसाद देण्याचा ईशारा दिलाय. बाइट : मराठा आंदोलक व्हिओ : 03: वाघमारेंच्या याच वक्तव्यानंतर मराठा समाज संघटना ठिकठिकाणी आक्रमक झाल्यायत.मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांना साडी बांगड्यांचा आहेर आणलाय. वाघमारे जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढू असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे. बाइट- महेश डोंगरे, मराठा क्राती मोर्च राज्य समन्वयक व्हिओ : 04:वाघमारेंच्या व्हायरल व्हिडीओनंतर मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिली.त्यामुळे मराठा आंदोलकांचा तीव्र संताप पाहून पोलिसांनी वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाइट : अनंत कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना व्हिओ : 05: गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा लढा उभा राहिल्यापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय.त्याच लढ्यातून निर्माण झालेला वाद आता या ना त्या कारणातून ओबीसी आणि मराठा नेत्यांमधून रोज उभा राहतोय.मात्र हा वाद आता ओबीसी किंवा मराठा समाजातील लेकीबाळीपर्यत जायला नको एवढीच राज्यातील जनतेकडून अपेक्षा0
0
Report
ओबीसी आरक्षण पर एकजुटता की मांग, मराठा समुदाय के नेताओं का बयान: आरक्षण रद्द नहीं
Nagpur, Maharashtra:रामदास आठवले: आज नागपंचमी, नागपुर भंडारा दौरे पर आया हूँ. देशात काही लोक आरक्षण रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र आरक्षण रद्द करण्याचा कोणाला अधिकार नाही. ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण द्या अशी मागणी होऊ शकते. मात्र आरक्षण रद्द करावा अशी मागणी कोणी करू नये. बाबासाहेबांनी दलीत, शोषित आदिवासी लोकांना न्याय देण्याच्या उद्देशाने आरक्षण दिलं. उच्चवर्णीय जातीमध्ये आर्थिक परिस्थिती कमी असणाऱ्याना आरक्षण मिळाव बाबासाहेबांचं विचार होता. मुस्लिम समाजातील ८० टक्के जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या काळात ओबीसी समाजातील अनेक जातीला आम्ही बॅकवर्ड आहोत असे म्हणणे आवडत नव्हते. आज राहुल गांधी ओबीसी बद्दल फार बोलत आहे. मात्र काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहून ओबीसी समाजाला न्याय देऊ शकला नाही. व्हीपी सिंग प्रधानमंत्री असताना त्यावेळी देशात ५२ टक्के ओबीसी संख्या असण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्या Sc st लोकसंख्या १६.६० टक्के आहे. आणि ओबीसी ५३ जवळपास असेल. जनगणना झाल्यावर आकडा स्पष्ट होईल. कोणीही आरक्षणाला विरोध न करता आरक्षणात काही सुधारणा करण्याची मागणी करू शकता. मात्र आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यावर सरकारनी कारवाई करावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ नये ही सरकारची आणि आमची भूमिका. मराठा समाजाला विद्यार्थ्यांना हॉस्टेल सह ईतर अनिल सुविधा आहेत. मराठा समाजाला जो आरक्षण दिला त्याचा फायदा मराठा समाजाने घ्यावा. नक्की मराठा समाज, ओबीसी, ब्राम्हण, बौद्ध समाज किती याची माहिती जनगणना झाल्यावर होईल. शिक्षण आणि नौकरी साठी असलेल्या आरक्षणाला लोकसभा आणि राज्यसभेत दहा वर्षात बील येत त्यांमध्ये वाढ करून मिळते. जातीयवाद संपत नाही तोपर्यंत जातीवर आमचा आरक्षण राहाव. अन्यथा देशात मोठा आंदोलन उभारू. OBC हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, गरीब मराठ्याला न्याय मिळावा. ओबीसी असणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना फायदा व्हावा. महाराष्ट्र ओबीसी जाती केंद्र आरक्षण कान्हा मात्र मध्ये चूक झालेल्या अनेक जाती आहेत. दीक्षाभूमीचा वाद अनेक पदावरून आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर. हा वाद मिटवावा. दीक्षाभूमीचा विकास करेल.0
0
Report
Advertisement
