445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
तडवळे के बैलगाड़ी पर दिल्ली आंदोलन की झलक, कला से सामाजिक संदेश
Satara, Maharashtra:सातारा -ज्याच्या खांद्यावर शेतकऱ्याचं आयुष्य उभं राहतं... ज्याच्या घामावर शेती फुलली... आणि ज्याला आपल्या घरातील सदस्याप्रमाणे जपलं जातं, त्या बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस म्हणजे बेंदूर सण. परंपरा, संस्कृती and शेतकऱ्यांच्या भावविश्वाशी जोडलेला हा सण यंदा सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील तडवळे गावात एका वेगळ्याच कारणाने चर्चेत आला आहे. या गावातील बैलजोडीच्या अंगावर दिल्लीतील जंतर-मंतरवरील आंदोलनाचे चित्र साकारत सामाजिक संदेश देण्याचा अनोखा प्रयत्न या गावातील चित्रकार निवास कांबळे यांनी केला आहे. परंपरेला आधुनिक सामाजिक जाणीवेची जोड देणारा हा उपक्रम पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी होत असून, या अनोख्या कलाकृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.0
0
Report
बिबट्यों के खतरे से परेशान किसानों ने दुग्ध पशुओं के लिए बंद गोठा बनवाया
Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील निफाड तालुक्यातील देवगाव हे गाव द्राक्ष, ऊस आणि दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध आहे. मात्र, या परिसरात वाढलेल्या बिबट्यांच्या वावरा मुळे शेतकरी चिंतेत आहेत. बिबट्यांनी पाळीव जनावरांवर हल्ले करून अनेक जनावरे ठार केल्याच्या घटना घडल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दुग्ध उत्पादक शेतकरी प्रशांत कुलकर्णी यांनी आपल्या गाईंच्या सुरक्षेसाठी बंदिस्त गोठा उभारला आहे. गोठ्यात जनावरांना त्रास होऊ नये म्हणून हवा खेळती राहण्यासाठी फॅनची ही व्यवस्था करण्यात आली आहे. बिबट्यांच्या धोक्यामुळे शेतकऱ्यांनी सुरक्षिततेचा हा नवा मार्ग स्वीकारल्याचे चित्र देवगाव मध्ये पाहायला मिळत आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
दापोली-रत्नागिरी में 115 किलोग्राम टाकाऊ जाल हटाकर समुद्री जीवों को राहत
Ratnagiri, Maharashtra:दापोली-रत्नागिरीसमुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेली तब्बल ११५ किलो टाकाऊ मासेमारीची जाळी हटवून सागरी जीवांना मोठा दिलासा देण्यात आला.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील हर्णे समुद्रकिनारी वनविभागाच्या मार्गदर्शनाखाली जागतिक कांदळवन दिनानिमित्त ‘घोस्ट नेट हटाव’ मोहीम राबवण्यात आली.. समुद्रकिनाऱ्यावरील खडकांमध्ये अडकलेली तब्बल ११५ किलो टाकाऊ मासेमारीची जाळी हटवून सागरी जीवांना मोठा दिलासा देण्यात आला.. या मोहिमेत वनविभागाचे अधिकारी व कर्मचारीही सहभागी झाले.. सागरी जैवविविधतेचे संरक्षण,प्रदूषण रोखणे आणि किनारपट्टी स्वच्छ ठेवण्याचा संदेश या उपक्रमातून देण्यात आला..0
0
Report
Advertisement
सरकार ने ग्रामीण इलाकों में सीधे सेवाएं देकर भ्रष्टाचार रोकने का संकल्प जताया
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी राज्यमंत्री योगेश कदम ग्रामीण भागातील अशिक्षित नागरिकांची पिळवणूक आता खपवून घेतली जाणार नाही. गावागावात नागरिकांच्या अज्ञानाचा फायदा घेणाऱ्यांना सरकारचा इशारा. हे काम मी करून देतो म्हणत फसवणाऱ्यांवर अप्रत्यक्ष निशाणा. सातबारा दुरुस्तीसारख्या साध्या कामासाठी नागरिकांना हेलपाटे मारावे लागू नयेत. महसूल कार्यालयाच्या फेऱ्यांमुळे होणारा नागरिकांचा त्रास संपवण्याचा सरकारचा निर्धार. अनावश्यक कागदपत्रांच्या नावाखाली होणारी पिळवणूक थांबवण्यावर भर. Ashिक्षित आणि सर्वसामान्य नागरिकांना थेट शासकीय सेवा देण्यावर सरकारचा भर. 'छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान' नागरिकांसाठी दिलासादायक उपक्रम. 'समाधान शिबिरां'मधून एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध. नागरिकांची कामे दलालांशिवाय आणि पारदर्शक पद्धतीने व्हावीत, ही सरकारची भूमिका. जनतेच्या साधेपणाचा गैरफायदा घेणाऱ्यांचे प्रकार थांबलेच पाहिजेत. शासनाच्या योजना आणि सेवा थेट जनतेच्या दारापर्यंत पोहोचवण्याचा संकल्प. 'नागरिकांना हेलपाटे नव्हे, तर थेट न्याय' हा सरकारचा संदेश.0
0
Report
जनते की योजनाओं को अंतिम तक पहुंचाने के लिए कठोर कार्रवाई के निर्देश योगेश कदम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..अधिकाऱ्यांना वारंवार सांगून काम झाले नाही तर माझ्या अंगात रामदास भाई येतात अशा शब्दात योगेश कदम यांनी अधिकाऱ्यांना जनतेच्या योजनेसंदर्भात स्पष्ट शब्दात दापोलीत सुनावले ,छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर दाखले वाटप कार्यक्रमात ते बोलत होते शासन आणि प्रशासनात समन्वय असेल, तरच जनतेला न्याय मिळेल. शासन आणि प्रशासन हे एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. माझी काम करण्याची पद्धत स्पष्ट आणि शिस्तबद्ध आहे. पहिल्यांदा अधिकाऱ्यांना नम्रपणे समजावून सांगतो. दुसऱ्यांदा स्पष्ट शब्दांत शेवटचा इशारा देतो. तरीही काम झाले नाही, तर माझा रुद्रावतार पाहायला मिळतो. मग माझ्यात रामदासभाई कदम उतरतात,असे मिश्कील पण ठाम वक्तव्य. तिसऱ्याDा सांगण्याची वेळ आली, तर मग मागेपुढे पाहत नाही. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांची कोणतीही गय केली जाणार नाही. जनतेच्या कामात अडथळा आणणाऱ्यांवर कठोर कारवाई अपरिहार्य. शासनाच्या प्रत्येक योजनेचा लाभ शेवटच्या घटकापर्यंत पोहोचलाच पाहिजे. अधिकाऱ्यांनी लोकाभिमुख आणि जबाबदारीने काम करावे, असे स्पष्ट निर्देश. जनतेच्या हिताशी तडजोड अजिबात सहन केली जाणार नाही. काम करणाऱ्यांना पूर्ण पाठबळ, पण दिरंगाई करणाऱ्यांना माफी नाही.0
0
Report
गंगा-गोदावरी पूजन के साथ कावनाई में वैदिक मंत्रोच्चार और भूमिपूजन सम्पन्न
Nashik, Maharashtra:ब्रेकिंग इगतपुरी तालुक्यातील कावनाईच्या क्षेत्र कपिलधारा येथे पार पडले गंगापूजन सिंहास्थ सोहळ्याच्या निमित्ताने कुंभमेळ्याचे मानले जाते मूळ स्थान गंगा गोदावरी पूजनाप्रसंगी वैदिक तिथीनुसार भूमिपूजनयावेळी उपस्थित होते साधू महंत पुढील महिन्यात पार पडणार आहे नाशिक त्रंबकेश्वर चे ध्वजारोहण या पार्श्वभूमीवर गोदावरी कपिला नद्यांच्या पवित्र संगम स्थळी सांख्य योगाचे उगमस्थान म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या सगळ्यात वैदिक मंत्र उच्चार धार्मिक विधी करण्यात आले जिल्ह्यातील अधिकारी लोकप्रतिनिधी होते उपस्थित0
0
Report
Advertisement
लातूर-उमरगा हाईवे पर अंधेरा, यात्रियों को खतरा; नागरिकों ने तात्कालिक पथदिवे शुरू करने की मांग
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... लातूर-उमरगा महामार्गावर अपघातांचा धोका वाढला.... किल्लारीच्या ग्रामीण रुग्णालयासमोर अंधाराचं साम्राज्य... पथदिवे तात्काळ सुरू करण्याची मागणी.... लातूर-उमरगा महामार्गावरील किल्लारी परिसरात बंद पथदिव्यांमुळे वाहनधारकांचा प्रवास धोकादायक बनला आहे. विशेषतः ग्रामीण रुग्णालयासमोरील पथदिवे सातत्याने बंद असल्याने रात्री या परिसरात अंधाराचे साम्राज्य पाहायला मिळत आहे. महामार्गालगतच ग्रामीण रुग्णालय असल्याने रुग्ण, नातेवाईक आणि नागरिकांची सतत ये-जा असते. मात्र अंधारामुळे या परिसरात वारंवार अपघात होत असून काही अपघातांमध्ये जीवही गेले आहेत. त्यामुळे आणखी एखादी दुर्घटना घडण्याची वाट न पाहता प्रशासनने तात्काळ पथदिवे सुरू करावेत, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे...0
0
Report
गणेशोत्सव के लिए कोकण रेलवे ने विशेष गाड़ियाँ और नए स्टॉप घोषित किए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात गावी जाण्याची चिंता मिटली.. कोकण रेल्वेची मोठी भेट..विशेष गाड्या,नवीन थांब्यांची घोषणा.. गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या लाखो चाकरमान्यांसाठी आणि गणेश भक्तांसाठी कोकण रेल्वे व मध्य रेल्वेने मोठा दिलासा दिया है.. यंदाच्या गणेशोत्सवानिमित्त विशेष रेल्वे गाड्या,मेमू सेवा और काही महत्त्वाच्या एक्सप्रेस गाड्यांना नवीन थांबे जाहीर करण्यात आले आहे.. त्यामुळे मुंबई,ठाणे,दिवा,पुणे और इतर शहरातून कोकणात येणाऱ्या प्रवाश्यांचा प्रवास अधिक सोयीस्कर होणार है..0
0
Report
सातारा में नेर फाटा के पास ट्रक-कार भिड़ंत: विजय भोसले और पत्नी की मौत, बेटा बच गया
Satara, Maharashtra:सातारा: कोरेगाव–पुसेगाव मार्गावरील नेर फाटा परिसरात एका पेट्रोल पंपाजवळ रात्री अडीच वाजता आयशर ट्रक आणि कारची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पुसेगाव येथील विजय भोसले आणि त्यांची पत्नी समृद्धी भोसले यांचा जागीच मृत्यू झाला आहे तर त्यांचा मुलगा बचावला आहे. ओव्हरटेक करताना हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती असून, पुसेगाव पोलिस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
सोलापुर से मुंबई उड़ानें फिर से 2 अगस्त से शुरू, सोलापुरवासियों में खुशी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज, सोलापूर - मुंबई खंडित झालेली विमानसेवा पुन्हा एकदा 2 ऑगस्टपासून सुरू - सोलापूरकरांसाठी मोठी गुड न्यूज - सोलापूर ते मुंबई खंडित झालेली विमानसेवा पुन्हा एकदा 2 ऑगस्ट पासून सुरू - अचानकपणे विमानसेवा बंद केल्यानंतर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतली होती आक्रमक भूमिका - अखेर कंपनीला प्रशासनाकडून कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर सेवा पुरवत करण्याचा कंपनीचा निर्णय - 2 ऑगस्टच्या उड्डाणासाठी चाळीस प्रवाशांनी मुंबईला जाण्यासाठी केले तिकिटांचे बुकिंग - पुन्हा एकदा विमान सेवा सुरू झाल्याने सोलापूरकरांमध्ये आनंदाचे वातावरण0
0
Report
रत्नागिरी में बरसात घटने से जलाशयों का संचय 76.49%, नदियाँ नियंत्रण में
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी जिल्ह्यात पावसाचा जोर पूर्णतः ओसरला आहे..त्यामुळे जिल्ह्यातील पाटबंधारे प्रकल्प भरून वाहण्याच्या संकेत घट झाली आहे.. रत्नागिरी पाटबंधारे मंडळाच्या अहवालानुसार जिल्ह्यातील लहान मोठ्या 72 धरण प्रकल्पात सध्या 76.49 टक्के उपयुक्त पाणीसाठा जमा झाला आहे.. यामध्ये 34 धरणांमधून विसर्ग सुरू झालेला आहे.. पावसाचा जोर ओसरल्यामुळे नद्यांची पातळी नियंत्रणात आले असून पावसाची आतापर्यंत 51.26% नोंद झाली आहे..0
0
Report
पुणे-इंदौर हाईवे पर ट्रक पलटा, यातायात बाधित; क्रेन से हटाने के बाद ट्रैफिक चालू
Yeola, Maharashtra:पुणे-इंदूर महामार्गावरील येवला तालुक्यातील अंकाई शिवारात मालवाहतूक ट्रक रस्त्यावर पलटी झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती. या घटनेमुळे तब्बल तीन ते चार तास महामार्गावरील वाहतुकीचा खोळंबा झाला. दरम्यान, घटनास्थळी क्रेनच्या सहाय्याने पलटी झालेला ट्रक बाजूला करण्यात आला असून, आता महामार्गावरील वाहतूक सुरळीत सुरू झाली आहे.0
0
Report
Advertisement
नीट पेपर विवाद के बाद तनाव में गोदिया में कैंडल मार्च, श्रद्धांजलि
Bhandara, Maharashtra:नीट पेपर फुटी प्रकरणात मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गोंदियात नागरिकांनी कॅण्डल मार्च काढून एक मिनिटाचा मौन धारण करून श्रद्धांजली वाहिली. नीट पेपरफुटी प्रकरणात मानसिक तणावाखाली आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांना गोंदिया शहरात कॅन्डल मार्च काढून मृतक विद्यार्थ्यांच्या बॅनर खाली कँडल लावून एक मिनिटाचा मौन धारण करून श्रद्धांजली वाहण्यात आली आहे. मोठ्या संख्येत याप्रसंगी नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवली होती. श्रद्धांजली दरम्यान सर्वत्र शोकाकुल वातावरण निर्माण झाले होते. या प्रसंगी विद्यार्थी, शिक्षक आणि नागरिकांनी आपली उपस्थिती दर्शवून दोशींवर लवकरात लवकर कठोर कारवाईची मागणी सुद्धा या निमित्ताने करण्यात आली.0
0
Report
सहयाद्री की भारी बारिश से डिंबे डैम ओवरफ्लो, लोगों को सतर्क रहने की सलाह
Ambegaon, Maharashtra:सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये झालेल्या मुसळधार पावसामुळे आंबेगाव तालुक्यातील डिंबे धरण पूर्ण भरून ओव्हरफ्लो झाले आहे. खबरदारीचा उपाय म्हणून धरणातून घोड नदीच्या पात्रात ७,००० क्यूसेक वेगाने पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. १३.५ टीएमसी क्षमता असलेले हे धरण जुलै अखेरीसच भरल्यामुळे आंबेगाव आणि शिरूर परिसरासह पुणे व सोलापूर जिल्ह्यातील शेती आणि पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे. दरम्यान, धरणाच्या पाणीळट क्षेत्रात अजूनही पाऊस सुरू असल्याने पाण्याचा विसर्ग अधिक वाढवला जाण्याची शक्यता आहे, ज्यामुळे प्रशासनाकडून नदीकाठच्या सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. याच परिस्थिती चा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
हिंगोली के पिंपळखुटा में जलसंकट: जलजीवन मिशन के काम अधूरे, ग्रामीण पानी के लिए तरस रहे
Hingoli, Maharashtra:हिंगोलीच्या पिंपळखुटा गावामध्ये भर पावसाळ्यात पाणीटंचाई निर्माण झाल्याने महिलांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे पिंपळखुटा गावात जलजीवन मिशनचे काम अपूर्ण झाल्याने निकृष्ट दर्जाचे काम झाल्याने गावात शासनाच्या योजनेचे पाणी मिळत नसल्याने गावकऱ्यांना गावापासून दूर असलेल्या विहिरीवरून पाणी आणावे लागत आहे गावात शासनाच्या योजनेतून अनेक टाक्या बांधण्यात आल्या आहे मात्र त्यात पाणीच नसल्याने शासनाचा योजनेचे पाणी गावकऱ्यांना मिळत नसल्याने गावकऱ्यांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याने शासनाच्या योजनेच हक्काच पाणी देण्याची मागणी गावकरी करत आहेत.0
0
Report
Advertisement
