icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

लातूर में सूखा-उत्पन्न किसान आत्महत्याएं, सरकार से मदद की मांग तेज

Latur, Maharashtra:राज्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस कोसळत आहे. काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील अनेक भाग आजही पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. पेरणी खोळंबली आहे, कर्जाचा डोंगर वाढत आहे आणि आर्थिक विवंचनेत शेतकरी सापडला आहे. या नैराश्याच्या वातावरणात निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने चिंता अधिकच वाढली आहे. पावसाची प्रतीक्षा, कर्जाचा फास आणि वाढते शेतकरी संकट... पाहूया याच संदर्भातील स्पेशल रिपोर्ट. रिपोर्टर वैभव बालकुंदे जून महिना संपला... जुलैचा पहिला आठवडाही सुरू झाला... पण लातूर जिल्ह्यात अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. अनेक शेतकरी अजूनही पेरणीच्या प्रतीक्षेत आहेत, तर काहींनी कर्ज काढून बी-बियाणे आणि खते खरेदी केली आहेत. मात्र, पाऊस नसल्याने शेतात ओलावा नाही आणि खरीप हंगाम धोक्यात आला आहे. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांच्या अडचणी दिवसेंदिवस वाढत आहेत. बँकांचे हप्ते, खासगी सावकारांचा तगादा आणि वाढता घरखर्च यामुळे अनेक कुटुंबे आर्थिक संकटात सापडली आहेत. या वाढत्या नैराश्याच्या पार्श्वभूमीवर निलंगा तालुक्यात अवघ्या आठ दिवसांत चार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. त्यामुळे लातूरमधील शेतकरी संकट पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. शेतकरी पाऊस लांबल्याने शेतकरी आर्थिक संकटात अधिकच अडकत चालला आहे. पेरणीसाठी काढलेले कर्ज, वाढते व्याज, खासगी सावकारांचा तगादा आणि उत्पादनाची अनिश्चितता यामुळे अनेक शेतकरी नैराश्याच्या गर्तेत जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सरकारने तातडीने आर्थिक मदत जाहीर करावी, कर्जबाजारी शेतकऱ्यांना दिलासा द्यावा आणि सुरू असलेल्या विधिमंतळ अधिवेशनात खासगी सावकारांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी क्रांतिकारी शेतकरी संघटनेने केली आहे. राजू कसबे (प्रदेशाध्यक्ष, क्रांतिकारी शेतकरी संघटना) एका बाजूला राज्यातील काही भागात पुराचे संकट आहे, तर दुसऱ्या बाजूला लातूरमध्ये शेतकरी आकाशाकडे डोळे लावून पावसाची वाट पाहत आहे. वेळेत पाऊस झाला नाही, तर खरीप हंगामासह शेतकऱ्यांचे आर्थिक गणित पूर्णपणे कोलमडण्याची भीती आहे. पाऊस, कर्जमाफी आणि तातडीच्या मदतीची अपेक्षा घेऊन शेतकरी सरकारकडे आशेने पाहत आहे. आता येणारे काही दिवस पाऊस आणि सरकारची भूमिका, दोन्ही शेतकऱ्यांचे भविष्य ठरवणार आहेत...
0
0
Report

सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच

Pandharpur, Maharashtra:सोलापूर के भोंदू बाबा भोसले के खिलाफ मामला, 3 करोड़ के लेनदेन की जांच एक महिला आरोग्याच्या तक्रारीसाठी आराम मिळावा यासाठी भोंदू म्हणून बाबाकडे आली होती आरोग्याच्या कारणाचे निराकरण करण्यासाठी ही अमावस्येला पूजा घालावी लागेल. या साठी पीडित महिलेकडून अश्लील कृत्य करण्याचे काम मनोहर मामा भोसले याने केले आहे. याबाबत त्याच्या घोटी आश्रमातून काही पुरावे सापडले आहेत. मनोहर भोसले प्रकरणाची एसआयटी कडून तपासणी आणि चौकशी सुरू आहे. यामध्ये मनोहर भोसले यांच्या 20 बँक खात्यातून तपासणी केली असता. तीन कोटी पेक्षा अधिक रूपयांचे व्यवहार समोर आले आहे.
0
0
Report
Advertisement

उरण में बेमौसम बारिश से चिरनेर समेत गांवों में पानी घूसा, घर तबाह

Navi Mumbai, Maharashtra:आज सकाळपासून उरण शहर व तालुक्यात जोरदार पाऊस सुरू झाल्याने या पावसाने चांगलीच दाणादाण उडाली आहे. अनेक सखल भाग जलमय झाले आहेत. चिरनेर गावात पुरपरिस्थिती निर्माण झाली असून चिरनेर, नागाव तसेच तालुक्यातील इतर गावातील रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरले असल्याने जीवनावश्यक वस्तूंचे नुकसान झाले आहे. उरण तालुक्यात दरवर्षी मुसळधार पाऊस पडत पडतो. यावेळी पुरग्रस्त रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी नेण्याचे काम हे प्रत्येक गावातील रहिवासी करत होते. तरी शासनाने पुरग्रस्तांना नुकसान भरपाई देऊन,यापुढे रहिवाशांच्या घरात पुराचे पाणी शिरणार नाही यासाठी खबरदारी घ्यावी अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे. Navi Mumbai
0
0
Report

भीमाशंकर में छुट्टी के कारण भारी बारिश में भक्तों की भीड़

Shirur, Maharashtra:भीमाशंकर/पुणे भिमाशंकर येथे सुट्ट्यांमुळे भर पावसात भाविकांची मोठी गर्दी पुणे जिल्ह्यातील भिमाशंकर येथे सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या भिमाशंकर परिसरात गेल्या काही दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू असून धुक्याची चादर आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना आकर्षित करत आहे. मुसळधार पावसाची पर्वा न करता राज्याच्या विविध भागांतून भाविक आणि पर्यटक भिमाशंकरमध्ये दाखल होत आहेत. अनेक भाविक पावसात भिजतच भगवान भिमाशंकराचे दर्शन घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया भिमाशंकर पुणे...
0
0
Report
Advertisement
Advertisement

यवतमाळ से दिव्यांगों की वारी विठ्ठल के दर्शन के लिए पंढरपुर पहुँचेगी

Yavatmal, Maharashtra:पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी यवतमाळहून दिव्यांगांची वारी विठ्ठलाच्या दारी निघाली आहे. सेवा समर्पण प्रतिष्ठानचा हा उपक्रम असून वारीचे हे तिसरे वर्ष आहे. मोठ्या संख्येने दृष्टिहीन वारकरी आषाढिनिमित्त हरी नामाचा गजर करत पंढरपूर येथे चंद्रभागेच्या वाळवंटात दाखल होण्यासाठी निघाले. पूर्णत: दिव्यांगांची पंढरपूरात जाणारी ही महाराष्ट्रातील पहिलीच वारी आहे. माजी मंत्री मदन येरावार व नगराध्यक्ष प्रियदर्शनी उईके यांनी संत सूरदास यांची प्रतिमा व पादूका असलेली पालखी घेऊन वारीला सुरुवात केली. पंढरपूरकडे प्रस्थान केलेल्या या वारीचे ठिकठिकाणी स्वागत करण्यात आले. २२ दिवस ५२१ किमीचा हा पायदळ प्रवास करून दिव्यांग वारी पंढरपूर येथे पोहचणार आहे. मार्गात भजन, कीर्तन असे कार्यक्रमही हे बांधव घेणार आहे.
0
0
Report

मिसिंग लिंक केबल स्टैंड पुल में पहली बारिश में गड्ढे, उद्घाटन पर सवाल

Varsoli, Maharashtra:Headline : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते गाजावाजा करत उद्घाटन झालेल्या मिसिग लिंक केबल स्टॅन्ड दरी पुलावर पहिल्याच पावसात पडले खड्डे, मिसिंग लिंकचे काम निकृष्ट झाल्या आरोप Anchor : राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मागील दोन महिन्यां पूर्वी मुंबई पुणे एक्सप्रेस वे वरील मिसिंग लिंक चे उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र याच मिसिंग लिंकचे पहिल्याच पावसात चाळण झाली आहे. Vo : मिसिंग लिंक वरील केबल स्दटँड दरी पुलावर पडलेला खड्ड्यांमुळे मिसिंग लिंक च काम निकृष्ट झाल्याचा आरोप नागरिक करत आहेत. पहिल्याच पावसात जर अशा प्रकारे मिसिंग लिंक वर खड्डे पडत असतील तर या मार्गावर अतिशय वेगाने प्रवास करणाऱ्या वाहनांचा प्रवास सुरक्षित आहे का ? असे एक ना अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित करण्यात येत आहेत. याच मिसिंग लिंक वरून आढावा घेतला आहे आमच्या प्रतिनिधी चैत्राली राजापूरकर यांनी...
0
0
Report
Advertisement

मानसिक विक्षिप्त व्यक्ति ने दो घंटे तांडव मचाया; पुलिस ने गिरफ्त में लिया

Yeola, Maharashtra:माधवराव संकुल परिसरात एका मनोरुग्णाने तब्बल दोन तास धुडगूस घालत परिसरात भीतीचे वातावरण निर्माण केले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित व्यक्तीने अनेक चारचाकी आणि दुचाकी वाहनांच्या काचा फोडल्या. एवढेच नाही तर परिसरातील सीसीटीव्ही यंत्रणेची तोडफोड करत टेबल-खुर्च्यांचीही मोडतोड केली. अचानक झालेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. अखेर स्थानिक नागरिकांनी डायल 112 वर संपर्क साधत पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलीस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले आणि संबंधित व्यक्तीला ताब्यात घेऊन येवला पोलीस ठाण्यात नेण्यात आले आहे.
0
0
Report

सातारा के कालेश्वरी घाट में घायल बिबटिया वन विभाग ने सुरक्षित जेरबंद किया, उपचार शुरू

Satara, Maharashtra:सातारा-रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या अडीच वर्षांच्या नर बिबट्याला वन विभागाने शिताफीने पकडले त्यानंतर त्याच्यावर वराडे वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. भर पावसात साताऱ्यातील काळेश्वरी घाटात जखमी अवस्थेतील बिबट्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या कडेला जखमी आणि अशक्त अवस्थेत बसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाने तत्परता दिखवत अवघ्या काही वेळात बचाव मोहीम राबवली. वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून उपचारासाठी कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.परळी खोऱ्यातील नित्रळ –केळवली मार्गावरील काळेश्वरी घाटात रस्त्याच्या कडेला काही कुत्री भुंकत असल्याचे पाहून अनेक वाहनचालक थांबले.जवळ जाऊन पाहिले असता समोर जखमी अवस्थेतील बिबट्या दिसताच सर्वांचीच भंबेरी उडाली. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर हा बिबट्या अशक्त आणि जखमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागली.याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जलद बचाव पथक, प्राथमिक प्रतिसाद चमू तसेच सातारा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हलवून वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य डांबरी रस्त्यालगत डंपरखाली बसलेल्या बिबट्याला जाळीच्या साहाय्याने अतिशय शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. पकडण्याच्या वेळी बिबट्याने धावण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धैर्याने परिस्थिती हाताळत रेस्क्यू यशस्वी केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top