icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कांचन नदी बांध पर कचरे ने बना बड़ा अड़चन, किसानों की फसलें खतरे में

Washim, Maharashtra:वाशिम अँकर: वाशिमच्या नेतंसा परिसरातून वाहणाऱ्या कांचन नदीवर असलेल्या कोल्हापुरी बंधाऱ्याला कचऱ्याचा मोठा विळखा पडलाय. पुराच्या पाण्यात वाहून आलेला झाडांचा पालापाचोळा आणि कचरा या बंधाऱ्यासमोर मोठ्या प्रमाणात अडकल्यामुळं पाण्याच्या नैसर्गिक प्रवाहात मोठा अडथळा निर्माण झाला असून, नदीचे पाणी आता थेट परिसरातील शेतशिवारात घुसून शेतकऱ्यांनी नुकतीच पेरणी केलेलं बियाणे वाहून जाण्याचा आणि कुजण्याचा मोठा धोका निर्माण झाला आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून तात्काळ हा कचरा हटवावा आणि नदीचा मार्ग मोकळा करावा,अशी मागणी आता स्थानिक शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
0
Report

नाशिक ग्रामीण इलाकों में महिला गला सोने की चेन की चोरी बढ़ी; दो आरोपी गिरफ्तार

Niphad, Maharashtra:नाशिक जिल्ह्याच्या ग्रामीण भागात महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी ओढण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली होती निफाड, सायखेडा दिंडोरी ,लासलगाव ,ओझर वावी यास अनेक ठिकाणी महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरीच्या घटनांची घडल्या होत्या या पार्श्वभूमीवर नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेने विशाल पोपट सांगळे, गणेश मनोहर कापसे दोघे राहणार नाशिक या चोरट्यांना सापळा रचून अटक केली आहे या दोघा सराईत गुन्हेगारावर नाशिक जिल्ह्यासह शहरात देखील अनेक महिलांच्या गळ्यातील सोनसाखळी चोरण्याचे गुन्हे विविध पोलीस स्टेशनमध्ये दाखल आहेत
0
0
Report
Advertisement

मानसून सक्रिय, कोकण में अगले सप्ताह भारी वर्षा की चेतावनी; रत्नागिरी, सिंधुदुर्ग आदि क्षेत्र प्रभावित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. पावसाचा आजपासून आठवडाभर मुक्काम. कोकण किनारपट्टीला ऑरेंज अलर्ट. मान्सून सक्रिय झाल्याने मुंबईसह राज्यात पावसाने जोरदार पुनरागम केले आहे. आणखी आठवडाभर पावसाचा मुक्काम कायम राहणार असून मंगळवार आणि शुक्रवार असे दोन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज आहे. बुधवारी आणि शुक्रवारी किंचित विश्रांती घेईल. मान्सूनच्या नवीन प्रवाहामुळे या हंगामातील सर्वात मोठा पाऊस कोकणात अपेक्षित आहे. 30 जून ते ३ जुलै दरम्यान सिंधुदुर्ग,रत्नागिरी आणि रायगडमध्ये आठवडाभर मुसळधार पावसाची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
0
0
Report

AISF का बड़ा धरना: नीट पेपर लीक के विरोध में मंत्रियों से तत्काल इस्तीफा माँगा

Bhandara, Maharashtra:पेपर लिक वाली सरकार नहीं चलेगी अबकी बार... केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षणमंत्री भुसे यांनी राजीनामा द्यावा... AISF संघटनेची मागणी... नीटचा पेपरचा गोंधळ अजून थांबलेला नाही लगेच आता टीईटी परीक्षेचाही पेपर फुटल्याने महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर पुन्हा एकदा घाला घालण्याचे काम सरकारने केले आहे. ठाण्यात पेपर लीक झाल्याने परीक्षा रद्द करण्याची वेळ आली ही केवळ प्रशासनाची चूक नाही तर संपूर्ण व्यवस्थेचे अपयश आहे. वर्षानुवर्षे रात्रंदिवस अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीची त्यांच्या आई-वडिलांनी घाम गाळून केलेल्या खर्चाची किंमत या सरकारच्या दृष्टीने शून्य झाली आहे का असाही प्रश्न AISF संघटनेने केले असून एकामागून एक पेपर फुटत आहेत परीक्षा रद्द होत आहेत तरुणांच्या आयुष्याशी खेळ सुरू आहे पण सत्ताधाऱ्यांना मात्र खुर्च्या वाचवण्यात जास्त रस दिसून येत असून पक्ष फोडण्यात आणि सत्तेचे गणित जुळवण्यातच अधिकच मजा येत आहे. हा केवळ पेपर लीक नाही तर महाराष्ट्राच्या तरुणाईच्या विश्वासाचा, त्यांच्या स्वप्नांचा आणि त्यांच्या भविष्याचा केलेला विश्वासघात आहे. विद्यार्थ्यांना न्याय हवा दोषींना कठोर शिक्षा व्हावी आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रदान आणि राज्य शिक्षण मंत्री दादा भुसे पाटील यांनी गांभीर्य आणि नैतिकता समजून तात्काळ राजीनामा द्यावा अश्या मागणी साठी जिल्हातील AISF संघटनेने भूंदाऱ्यातील त्रिमूर्ती चौक येथे घोषणाबाजी करत सरकारचा निषेध नोंदवला आहे.
0
0
Report
Advertisement

सातारा–पुणे बेंगळूर National Highway पर नागठाणे में बड़ा गड्ढा, मार्ग बंद

Satara, Maharashtra:सातारा: पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील नागठाणे गावच्या हद्दीत मुख्य रस्त्यावर अचानक एक मोठे भगदाड पडल्याची धक्कादायक घटना घडली आहे. विशेष म्हणजे अवघ्या दोन महिन्यांपूर्वीच या रस्त्याचे काम पूर्ण झाले होते, ज्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या निकृष्ट दर्जाच्या कामावर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. महामार्गावरून धावणाऱ्या काही जागरूक प्रवाशांच्या हे भगदाड वेळेत निदर्शनास आल्यामुळे एक भीषण अपघात बालंबाल टळला. प्रशासनाने सुरक्षेचा उपाय म्हणून घटनास्थळी तात्काळ बॅरिकेड्स लावून ती मार्गिका वाहतुकीसाठी बंद केली आहे.
0
0
Report

शिरूर कृषि उपज बाजार समिती चुनाव में महायुति का तेज प्रचार

Shirur, Maharashtra:Rep: Hemant Chapude(Shirur) Anc:शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीचा आखाडा चांगलाच तापला असून, तब्बल नऊ वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीत आरोप-प्रत्यारोपांच्या जोरदार फैरी झडू लागल्या आहेत. या निवडणुकीत महायुती शेतकरी विकास पॅनलच्या माध्यमातून भाजप, शिवसेना आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसनं एकत्र येत प्रचाराचा झंझावात सुरू केलाय. आमदार माऊली कटके आणि भाजप जिल्हाध्यक्ष प्रदीप कंद यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार सध्या गावोगावी फिरत आहेत. निवडणुकीत विजय मिळवण्यासाठी उमेदवार थेट ग्रामपंचायत सदस्य आणि सोसायटीच्या संचालकांशी संवाद साधत असून, मतदारांना आपल्याकडे खेचण्यासाठी दोन्ही बाजूंनी जोरदार मोर्चेबांधणी केली जातीय...
0
0
Report

बीड में गोल्डन ट्रायंगल के ओलीस 20-30 युवक, मित्र की सुरक्षित वापसी की मांग

Beed, Maharashtra:बीड : 'गोल्डन ट्रॅंगल'मध्ये महाराष्ट्रातील 20-30 तरुण ओलीस बीडच्या मित्राला आला मदतीचा फोन मुख्यमंत्र्यांनी ओलीस ठेवण्यात आलेल्या माझ्या मित्राला सुखरूप मायदेशी परत आणावे ओलीस ठेवण्यात आलेल्या मित्राने केली मागणी बीड जिल्ह्यातील एका तरुणाला म्यानमार-थायलंड-लाओस सीमेवरील कुख्यात 'गोल्डन ट्रॅंगल' परिसरात ओलीस ठेवण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ओलीस असलेल्या या तरुणाने आपल्या बीडमधील मित्राला व्हॉट्सअॅप व्हॉइस कॉल करून मदतीची आर्त हाक दिली. नोकरीचे आमिष दाखवून फसवणूक करत म्यानमारमध्ये नेण्यात आल्याचा, ऑनलाइन सायबर फसवणुकीची कामे करण्यास भाग पाडले जात असल्याचा आणि नकार दिल्यास बंदुकीचा धाक दाखवला जात असल्याचा दावा त्याने केला आहे. या मित्रानेच ही माहिती पोलिसांपर्यंत पोहोचवली असून महाराष्ट्रातील 20 ते 30 तरुण अडकल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. आता त्यांच्या सुटकेसाठी शासनाने तातडीने पावले उचलावीत, अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर: जिव्हती तालुक्यात लक्ष्मणगुडा गाँव में 6 वर्ष के बच्चे की सर्पदंश से मौत

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिलेतील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षाच्या मुलाचा सर्पदंशाने मृत्यू अँकर:-- चंद्रपूर जिल्हयातील जिवती तालुक्यात लक्ष्मणगुडा गावात 6 वर्षीय मुलाचा मृत्यू झालाय. आहे. घरी झोपेत असताना विषारी सापाने त्याला दंश केला.समीर मारोती आत्राम असे सहा वर्षीय मृत चिमुकल्याचे नाव आहे. घटना लक्षात आल्यावर उपचारासाठी धावाधाव सुरू झाली. मात्र वेळेत शासकीय रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने मुलाला खासगी वाहनातून रुग्णालयात हलवावे लागल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. मात्र उपचार मिळण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. तालुकाविशेष डॉक्टरांनी मात्र सर्पदंशाचा प्रकार कुटुंबाच्या उशिरा लक्षात आल्याने उपचारास विलंब होत मृत्यू ओढविला असल्याचे म्हटले आहे。 आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

मुंबई-गोवा महामार्ग पर भीषण दुर्घटना: अल्टो चालक घायल, टाटा कार की भिड़ंत

Oras Bk., Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर पावशी बेल नदी नजीक भीषण अपघात घडला, अल्टो कार कणकवली हून गोव्या च्या दिशेने जात होती तर विरुद्ध दिशेनी येणारी टाटा कार यांची समोरासमोर धडक बसली या धडके मध्ये अल्टो कार चे मोठया प्रमाणात नुकसान झाले असून अल्टो कार चा चालक गंभीर रित्या जखमी झाला असून नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, मुकई गोवा महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती घटना स्थळी कुडाळ पोलीस स्टेशनचे पोलिस कर्मचारी दाखल झाले असून त्यांनी वाहतूक सुरळीत केली, अपघातचे नेमके कारण काय आणि हा अपघात कशाने झाला याचा तपास कुडाळ पोलिस करत आहे
0
0
Report

सांगली बैंक अध्यक्ष ने पडळकर पर आरोप, राजीनामा की मांग

Sangli, Maharashtra:सांगली फ्लॅश अँकर - गोपीचंद पडळकर यांना जयंत पाटील नावाची कावीळ झाली आहे,अशी टीका सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष माजी आमदार मानसिंगराव नाईक यांनी केली आहे. तसेच जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या कोणत्याही संचालकाला शंभर रुपये देखील कर्जमाफी केली नाही, पडळकरांनी कर्जमाफी केल्याचे दाखवावे, आपण राजीनामा देऊ नाही,नसेल तर पडळकरांनी राजीनामा द्यावा, असं थेट आव्हान देखील मानसिंगराव नाईक यांनी गोपीचंद पडळकर यांना दिले आहे. बँकेमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाही,पण गेल्या सहा महिन्यापासून प्रशासक येणार,असं ऐकतोय,मात्र अद्यापही पडळकर यांना यश आलं नाही,असा टोला लगावत पडळकरांना स्वतः नोकर भरती करण्यासाठी प्रशासक आणायचा आहे,असा आरोप नाईक यांनी पडळकरांवर केला आहे. बाईट - मानसिंगराव नाईक - अध्यक्ष जिल्हा मध्यवर्ती बँक,सांगली.
0
0
Report
Advertisement

उरण के एक ही दिन तीन शव: तीन जगहों पर मिले, इलाके में खलबली

Navi Mumbai, Maharashtra:उरण परिसरात एकाच दिवशी तीन वेगवेगळ्या ठिकाणी तीन मृतदेह सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. मृतांमध्ये दोन पुरुष आणि एका वृद्ध महिलेचा समावेश आहे. यापैकी दोघांची ओळख पटली असून, एका अज्ञात पुरुषाच्या नातेवाइकांचा पोलिस शोध घेत आहेत. न्हावा-शेवा पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जेडब्ल्यूआर कंपनीच्या बाजूला रस्त्यालगत खारफुटीत मुरारी कुमार (३८) या व्यक्तीचा मृतदेह सापडला. तो ऑफकॉन कंपनीत काम करीत होता. तो मद्याच्या नशेत खाडीत पडला असावा, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. दुसरा मृतदेह सारडे येथील प्रमोदिनी पाटील (७०) या मनोरुग्ण महिलेचा आहे. एप्रिल महिन्यात त्या लग्नाला जात असल्याचे सांगून घराबाहेर पडल्या. तेव्हापासून त्यांचा शोध सुरू होता. सारडे गावाजवळ रानभाज्या गोळा करणाऱ्या आदिवासी दाम्पत्याला झुडपांमध्ये त्यांचा मृतदेह दिसला. तिसरा मृतदेह उरण रेल्वे स्थानकाजवळ खारफुटीत सापडला. तो एका ३५ ते ४० वयोगटातील व्यक्तीचा असून, त्याची ओळख पटलेली नाही.
0
0
Report

सिया-चेतन की पुलिस हिरासत 3 जुलाई तक बढ़ी; जांच पर सरकार बनाम बचाव की तकरार

Varsoli, Maharashtra:सिया-चेतनची पोलीस कोठडी ३ जुलैपर्यंत वाढली. तपासावरून कोर्टात सरकारी आणि बचाव पक्षात जोरदार युक्तिवाद. ANCHOR: केतन अग्रवाल हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी सिया गोयल आणि चेतन चौधरी यांच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने ३ जुलैपर्यंत वाढ केली आहे. आज झालेल्या सुनावणीत सरकारी पक्षाने तपास अद्याप अपूर्ण असल्याचं सांगत आरोपींची आणखी चौकशी आवश्यक असल्याचं न्यायालयात मांडलं. चेतनची घटनास्थळी पुनर्रचना, काही वस्तूंची जप्ती, या गुन्ह्यात आणखी कोणाचा सहभाग आहे का, तसेच हत्येचा सराव नेमका कुठे करण्यात आला, याचा तपास बाकी असल्याचं सरकारी पक्षाने सांगितलं. मात्र या मागणीला बचाव पक्षाने जोरदार विरोध केला. पोलिसांनी याच कारणांसाठी आधीच सात दिवसांची पोलीस कोठडी घेतली होती. मग त्याच मुद्द्यांसाठी पुन्हा कोठडी का मागितली जाते, असा सवाल सियाचे वकील विपुल दुशिंग यांनी न्यायालयात उपस्थित केला. दुसरीकडे, चेतन चौधरीच्या वकिलांनीही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. तपासासाठी पुरेसा वेळ मिळूनही आवश्यक कारवाई झाली नसल्याचा दावा करत, केवळ कोठडी वाढवण्यासाठी जुन्याच कारणांची पुनरावृत्ती होत असल्याचा आरोप त्यांनी केला.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top