445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
प्रेम त्रिकोण के कारण युवक का अपहरण, मारपीट और सिगरेट से चोट, 2 गिरफ्तार
Mira Bhayandar, Maharashtra:प्रेम त्रिकोणातून तरुणाचे अपहरण? मारहाण करत सिगारेटचे चटके भाईंदर पूर्वेतील पूजा नगर येथे १२ तारखेला रात्री फिर्यादी श्रेयस मिश्रा याला आरोपींनी इनोव्हा गाडीत बसवून शहरभर फिरवत बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरोपींनी त्याच्या अंगावर सिगारेटचे चटके दिल्याचाही आरोप आहे. सकाळी त्याला घरी सोडण्यात आल्यानंतर तो उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला. या प्रकरणी नवघर पोलिसांनी अपहरण, दरोडा आणि मारहाणीचा गुन्हा दाखल केला असून दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे, तर तीन आरोपी फरार आहेत. प्राथमिक माहितीनुसार प्रेम त्रिकोणातून हा प्रकार घडल्याची शक्यता असून पुढील तपास सुरू आहे. बाईट -राहूल चव्हाण DCP मिरा भाईंदर झोन वन0
0
Report
मराठा आरक्षण मुद्दे पर मनोज जरांगे का उपवास, विपक्ष ने कड़ा तंज किया
Ahilyanagar, Maharashtra:मनोज जरांगेंची सेटिंग पूर्ण न झाल्याने आंदोलन मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर मनोज जरांगे पुन्हा एकदा उपोषण आंदोलनाला बसणार आहेत, यावरून कधी काळीचे त्यांचे सहकारी आणि सध्याचे विरोधक अजय महाराज बारस्कर यांनी जोरदार टीकास्त्र सोडले आहे...मुंबईत करोडो मराठा बांधवांना घेऊन गेल्यानंतर हैद्राबाद गॅजेटचा जीआर मनोज जरांगे घेऊन आले, गुलाल घेतला मग आता उपोषण कशाला करता? असा सवाल त्यांनी उपस्थित केला...सोबतच मनोज जरांगे यांना स्वतःचा फायदा करता आला नाही, त्यांच्या ठरलेल्या सेटिंग पूर्ण झाल्या नाहीत म्हणूनच त्यांनी उपोषण करण्याचा निर्णय घेतल्याचा आरोप अजय महाराज बारस्कर यांनी केला. मनोज जरांगे हे "मराठा योद्धा" नाही तर "मुस्लिम योद्धा" मनोज जरांगे यांच्यामुळे मराठ्यांचे EWS आरक्षण गेल्याने अनेक मराठा युवकांचे नुकसान झाल्याचे अजय महाराज बारस्कर यांनी म्हंटले...त्यासाठी त्यांनी बीड जिल्ह्यातील पोलीस भरतीचे उदाहरण दिले...कुणबी प्रमाणपत्र मिळवलेल्या युवकांना अधिकचे गुण असताना त्यांच्यापेक्षा कमी गुण असलेल्या मुस्लिम EWS प्रमाणपत्र धारक युवकांना नोकरी मिळाली तर कुणबी युवकांना नोकरी मिळाली नाही, त्यामुळे मनोज जरांगे हे "मराठा योद्धा" नाही तर "मुस्लिम योद्धा"असल्याचे अजय महाराज बारस्कर यांनी म्हंटले आहे.0
0
Report
Wardha Bor Tiger Reserve में हिरणों के बीच शांति से चलता बाघ
Wardha, Maharashtra:हरणांच्या कळपातून ऐटीत चालणारा वाघ; बोर व्याघ्र प्रकल्पाची समृद्ध जैवविविधता पुन्हा अधोरेखित वर्धा जिल्ह्यातील बोर व्याघ्र प्रकल्पातील समृद्ध वन्यजीवसंपदेचे दर्शन घडविणारा एक अप्रतिम व्हिडिओ सध्या वन्यजीव प्रेमींचे लक्ष वेधून घेत आहे. वन्यजीव छायाचित्रकार अमेय ठाकरे (अमरावती) यांनी सफारीदरम्यान हा दुर्मिळ क्षण आपल्या कॅमेऱ्यात कैद केला. या व्हिडिओमध्ये हरणांच्या कळपामधून एक वाघ शांतपणे आणि ऐटीत चालताना दिसत आहे. विशेष म्हणजे, वाघाच्या उपस्थितीतही हरणांचा कळप काही अंतर राखून सावधपणे उभा असल्याचे दृश्य निसर्गातील संतुलन आणि वन्यजीवनातील नैसर्गिक हालचालींचे जिवंत उदाहरण ठरत आहे. काही वर्षांपूर्वी देशातील सर्वात लहान व्याघ्र प्रकल्प म्हणून ओळख मिळालेला बोर व्याघ्र प्रकल्प आज जैवविविधतेच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. कमी क्षेत्रफळ असूनही येथे वन्यजीवांची मोठी विविधता आढळून येते. वाघ, बिबट्या, अस्वल, सांबर, चितळ, नीलगाय, रानडुक्कर यांसारख्या सस्तन प्राण्यांसह अनेक दुर्मिळ पक्षी, सरपटणारे प्राणी आणि रंगीबेरंगी फुलपाखरांच्या विविध प्रजाती येथे पाहायला मिळतात. त्यामुळे बोर व्याघ्र प्रकल्पाने राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि संवर्धन केंद्रांमध्ये आपले स्थान निर्माण केले आहे.0
0
Report
Advertisement
बार्शी में IPS अंजना कृष्णा की गुटखा छापेमारी: तीन टेम्पो गुटखा जब्त
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - आयपीएस अधिकारी अंजना कृष्णा यांची बार्शीत गुटख्यावर छापेमारी, कारवाईत तब्बल 3 टेम्पो गुटखा जप्त - लेडी सिंघम आयपीएस अंजना कृष्णा यांचा बार्शीत कारवाईचा धडाका - बार्शीतील बडा गुटख्याचा व्यापाऱ्यावर आयपीएस अंजना कृष्णा आणि पथकाची धाड - बार्शीतील गुटख्याच्या या कारवाईमध्ये तब्बल तीन टेम्पो गुटखा जप्त - बार्शी शहर पोलीस स्टेशन पासून अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या अवैध व्यवसायावर कारवाई केल्याने अनेक चर्चांना उधाण - बार्शीतील अवैध धंद्यांच्या विरोधात आयपीएस अंजना कृष्णा ॲक्शन मोडवर - अंजना कृष्णा यांच्या धाडसी कारवाईचे बार्शीकरांकडून स्वागत0
0
Report
सातारा के खेतों में बैलों के बदले ट्रैक्टर, ड्रोन से दिखी दस बैलों की नांगरपीठ की परंपरा
Satara, Maharashtra:सातारा - शेतातील मशागत करणे, आता बैलांचं काम राहिलं नाही. विशेषतः नांगरट आता सर्रास ट्रॅक्टरनेच होत आहे. 1990 च्या दशकात नांगरटीसाठी बैलजोड्या बांधल्या जायच्या, आता ट्रॅक्टरने जागा घेतली. यांत्रिकीकरणाला पूर्णतः शरण गेलेल्या या युगात साताऱ्यातील कराड तालुक्यातील शेणोली या गावात सूर्याच्या उगवतीला दहा बैलाच्या नांगराच्या फाळानं रान नांगरल जात. पिढ्यान पिढ्यांची मशागतीची पारंपारिक पद्धत नामशेष होत असताना भल्या पहाटे नांगर, शिवाळं, सोलं, सापत्या, चाबूक याची जमवाजमव करून दहा बैलाच्या औताचा मेळ घातला गेला. या मशागतीचे दृश्य आपण ड्रोनमधून पाहतोय.... प्राध्यापक कणसे यांच्या यशोहिरा या शेती केंद्रावर जिल्हा परिषद पुरस्कार प्राप्त मानसी चैतन्य कणसे यांच्या शेतातील मळ्यात दहा बैलाचा नांगर चालवत शेताची नांगरठ करण्यात आली.0
0
Report
नाशिक के सिन्नर में बंधार के पानी में डूबकर महिला समेत चार की मौत
Sinnar, Maharashtra:नाशिकच्या सिन्नर मध्ये मन सुन्न करणारी घटना काल दुपारच्या सुमारास घडली आहे नांदूर शिंगोटे परिसरातील नागरे बंधाऱ्यावर कपडे धुण्यासाठी महिलेसोबत तीन मुले देखील गेली होती महिला कपडे धूत असताना मुले बंधाराच्या पाण्यात बुडत असताना महिलेने पाहिले यावेळी महिलेने देखील त्याांना वाचवण्यासाठी धाव घेतल्याने महिलेसह तिच्या मुलासह दोन भाच्यांचा बंधाऱ्याच्या खोल पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला या दुर्दैवी घटनेबाबत वावी पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस हवालदार निरगुडे हे करत आहेत मृतांची नावे :- मनीषा विजय रामजोशी (आई) कार्तिक विजय रामजोशी (मुलगा) आदित्य राहुल शिंदे (भाचा) अविनाश राहुल शिंदे (भाचा)0
0
Report
Advertisement
घाटी अस्पताल के लिए 90 करोड़ की मांग; आधुनिक लैब और कैंसर दवा योजना
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्याची जीवनवाहिनी असलेल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील आरोग्य सेवा अधिक सक्षम, आधुनिक करण्यासाठी घाटी हॉस्पिटल प्रशासनाने कंबर कसली आहे. घाटी रुग्णालयातील विविध अत्याधुनिक वैद्यकीय सुविधा, साधनसामग्री, औषध पुरवठ्यासाठी जिल्हा नियोजन समितीकडे तब्बल ९० कोटी रुपयांच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. घाटी रुग्णालयात संपूर्ण मराठवाड्यातून, आजूबाजूच्या जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने रूग्ण उपचारासाठी येतात. या वाढत्या रुग्णसंख्येला वेळेत दर्जेदार उपचार मिळावेत. प्रशासनाने ९० कोटींचा सविस्तर प्रस्ताव तयार केला आहे. या प्रस्तावामध्ये प्रामुख्याने गंभीर आजारांचे अचूक निदान करणारी मॉलिक्युलर लॅब समाविष्ट आहे. रुग्णालयात येणाऱ्या गरजू कर्करुग्णांसाठी कॅन्सरवरील महागडी औषधे उपलब्ध करून देण्याची मागणीही आहे.0
0
Report
1200 करोड़ कर्ज के बीच महापौर समेत 4 पदाधिकारी ने इलेक्ट्रिक कारें मांगीं
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अगोदरच १२०० कोटींपेक्षा अधिक कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या छत्रपती संभाजीनगर महानगरपालिकेला आता नव्या पदाधिकाऱ्यांच्या व्हीआयपी हट्टाचा फटका बसणार आहे. नियमानुसार केवळ महापौरांनाच शासकीय वाहनाचा अधिकार असताना, मनपातील इतर ४ पदाधिकाऱ्यांनीही आलिशान इलेक्ट्रिक कारची मागणी केली आहे. त्यासाठी ५ ईव्ही कार खरेदीची प्रक्रिया सुरू आहे. यासाठी आगामी सर्वसाधारण सभेत ठराव मांडण्यात येणार आहे. विशेष म्हणजे, एका पदाधिकाऱ्याने तब्बल २५ ते ३० लाख रुपयांची कार पसंत केली आहे. यामुळे आधीच रिकामी असलेल्या मनपाच्या तिजोरीवर तत्काळ १ कोटी रुपयांपेक्षा अधिकचा अतिरिक्त बोजा पडणार आहे.0
0
Report
Solapur police arrested interstate thief within 48 hours, seized goods worth 8.72 lakh
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - अंतरराज्य घरफोडी करणाऱ्या तेलंगणातील चोरट्याला अटक, कारवाईत 8 लाखांचा मुद्देमाल जप्त सोलापूर शहर पोलिसांची कारवाई, 35 घरफोडी करणाऱ्या चोरट्याला 48 तासात केलं अटक. सोलापूर शहर गुन्हे शाखेने केलेल्या कारवाईत आठ लाख 72 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त. याप्रकारण पोलिसांनी अंतरराज्य घरफोडी करणारा शिवप्रसाद आदिनारायण मंत्री उर्फ मंत्रीशंकर याला केलं आहे अटक गुन्हे शाखेच्या पथकाने मंत्रीशंकर यांच्याकडून आठ तोळ्याचे सोन्याचे दागिने, तीस तोळ्याचे चांदीचे दागिने, रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेली चारचाकी कार जप्त केली आहे.. मंत्रीशंकर याला चार दिवसाची पोलीस कोठडी देण्यात आली आहे..0
0
Report
Advertisement
डिझेल दर में तीन रुपए की बढ़ोतरी से परिवहन महामंडल पर बढ़ा वित्तीय दबाव
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:डिझेलच्या दरात तीन रुपयांनी वाढ झाल्याने राज्य परिवहन महामंडळाच्या आर्थिक ताळेबंदावर अतिरिक्त भार पडणार आहे. छत्रपती संभाजीनगर विभागातील एसटीला दररोज सुमारे १ लाख रुपयांचा अतिरिक्त भुर्दंड सहन करावा लागणार आहे. डिझेलवरील खर्च ३० लाखांवरून ३१ लाख रुपयांपर्यंत जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुमारे ५०० एसटी बस धावतात. या बसमधून दररोज सुमारे ३० हजारांहून अधिक प्रवासी प्रवास करतात. या प्रवाशांकडून एसटीला ६० लाख रुपयांपेक्षा अधिक महसूल मिळतो. या बससाठी दररोज सुमारे ३० हजार लिटर डिझेल लागते. त्यासाठी जवळपास ३० लाख रुपयांचा खर्च येतो. नुकतीच डिझेलच्या दरात झालेली वाढ हा खर्च वाढवणारी आहे0
0
Report
40°C से ऊपर गर्मी में बाघों के लिए ठंडक उपाय अपनाए गए
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरात गेल्या आठवडाभरापासून तापमानाचा पारा सातत्याने ४० अंशांच्या पार जात आहे. या वाढत्या उष्म्याचा त्रास वन्यप्राण्यांनाही जाणवत असून, सिद्धार्थ उद्यानातील प्राण्यांची विशेष काळजी घेतली जात आहे. वाघांना उष्णतेचा त्रास होऊ नये यासाठी प्राणिसंग्रहालय प्रशासनाने विविध उपाययोजना राबवल्या आहेत. खुल्या पिंजऱ्यातील कृत्रिम तलावात रोज ताजे पाणी सोडले जाते. अंगाची लाहीलाही कमी करण्यासाठी वाघ दिवसाचा बहुतांश वेळ या हौदात घालवत आहेत. मार्च महिन्यापासूनच प्रशासनाने हे नियोजन केले आहे. केवळ तलावच नाही, तर बंद आणि खुल्या पिंजऱ्यांच्या परिसरात सकाळ, दुपार आणि संध्याकाळ अशा तीनही सत्रांत पाण्याचा सतत शिडकावा केला जातो. याशिवाय, पिंजऱ्यांमध्ये वाघांसाठी कूलरही बसवण्यात आले आहेत. उन्हाळ्यात पचनसंस्थेवर ताण येऊ नये म्हणून त्यांच्या आहाराचेही काटेकोर नियोजन करण्यात आले आहे0
0
Report
पडेगाव कचरा डिपो में आग 8 दिन से धुआं, नागरिक परेशान
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या पडेगाव कचरा डेपो येथे मागील ८ दिवसांपासून कचरा पेटलेलाच आहे. परिणामी परिसरातील भीमनगर, पडेगाव, भावसिंगपुरा आदी भागांतील नागरिकांना धुराचा त्रास सहन करावा लागत आहे. या ठिकाणी मनपाच्या फायर बंबने मागील आठवड्यात तब्बल चार ते पाच वेळा आग नियंत्रणात आणण्याच प्रयत्न केला. मात्र आग अद्यापही धुमसत आहे. धुरामुळे आबालवृद्धांना श्वसनाचा त्रास होतोय, धूर पसरल्याने लहान मुले, वृद्ध, दम्याच्या रुग्णांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. डोळे जळजळणे, घशात खवखव होण्याच्या तक्रारी वाढल्या आहेत... यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होतेय...0
0
Report
Advertisement
हिंदी में क्लिक-बेट समाचार: मेडशी क्षेत्र में ट्रक-बाइक भिड़ंत, एक की मौत, दो घायल
Washim, Maharashtra:अकोला-नांदेड मार्गवरील मेडशी परिसरात ट्रक और दुचाकी میں भीषण अपघात हुआ। इस अपघात میں मालेगाव तालुक्यातील राजुरा येथील दुचाकीवरिल दोन युवक गंभीर जखमी झाले होते। त्याापैकी सत्तार पठाण यांचा उपचारदरम्यान मृत्यू झाला। तर दुसरे जखमी बबन राऊत यांच्यावर अकोला येथे उपचार सुरू आहेत। घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे。0
0
Report
कोकण में OTT सेवा की जल्द शुरुआत, अनिकेत कदम ने प्रेस कॉन्फ्रस में दी जानकारी
Ratnagiri, Maharashtra:कोकणात लवकरच ओटीटी सेवांची एन्ट्री.. अँकर मुंबईमहानगरानंतर आता कोकणातील इंटरनेटवर आधारित ओटीटी सेवेची लवकरच सुरुवात होणार असून कोकणातील मनोरंजन क्षेत्रासाठी एक महत्त्वाची घडामोड मानली जात आहे.. हातवे संलग्र हातवे साई स्टार डेटा कॉम प्रायव्हेट लिमिटेड च्या माध्यमातून कोकणवासीयांसाठी आधुनिक डिजिटल मनोरंजनाचे नवे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाणार असल्याची माहिती कंपनीचे डायरेक्टर अनिकेत सदानंद कदम यांनी पत्रकार परिषदेत दिली..0
0
Report
कर्जत कारशेड विवाद: सरकार के मध्यस्थी के बाद रेलवे काम रोके; बाढ़ सुरक्षा ठप्प
Karjat, Maharashtra:कर्जत कारशेड प्रकल्पात शासनाकडून मध्यस्थी. उपाययोजना होईपर्यंत रेल्वे काम बंद ठेवण्याचे प्रशासनाचे नागरिकांना लेखी आश्वासन. रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यात भिवपुरी कारशेड प्रकल्पाचे काम सुरू असून स्थानिक नागरिकांनी या प्रकल्पासाठी होत असलेल्या मातीच्या भारावाला तीव्र विरोध करून कर्जत तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. गावातील नैसर्गिक नाले,आणि पाण्याचा प्रवाह अडवला जात असल्याची भीती मनात बाळगून गावात यामुळे पूरपरिस्थिती उद्भवू शकते या कारणामुळे गावकऱ्यांनी भीतीपोटी गाव पाण्याखाली बुडून जाण्याच्या उद्देशाने कर्जत तहसील कार्यालयावर जोरदार धडक दिली मात्र स्थानिक प्रशासन, रेल्वे विभाग आणि पाटबंधारे विभाग यांनी गावकऱ्यांना विश्वासात घेत जो पर्यंत पूरपरिस्थिती रोखण्यासाठी आवश्यक उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत रेल्वेच्या मातीच्या भरावाचे काम पूर्णतः बंद ठेवण्यात येईल अस लेखी आश्वासन दिलं. शिवाय सर्व उपाययोजना पूर्ण होत नाहीत तोपर्यंत काम बंद राहील असा निर्णय गावकऱ्यांनी एकमताने घेतला.0
0
Report
Advertisement
