icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

MD ड्रग्स के 3 डीलर गिरफ्तार, मुंबई नाका क्षेत्र में 7.36 लाख रुपये मूल्य के ड्रग्स जप्त

Nashik, Maharashtra:3 पेडलर्स जेरबंद, ७.३६ लाख रुपये मूल्याच्या MD ड्रग्ज जप्त एमडी ड्रग्ज विक्री करणाऱ्या ३ पेडलर्सला अटक करण्यात आली. अंमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईनाका परिसरात ही कारवाई केली. संशयितांकडून ८ ग्रॅम MD ड्रग्ज जप्त करण्यात आली. मालेगावच्या पेडलर्सकडून MD तस्करी केल्याचे चौकशीत समोर आले. झाकिर रफीक शेख, शाहरुख युनूस शेख व सिराज सोहराब शेख अशी संशयितांची नावे आहे. पथकाचे चंद्रकांत बागडे यांनी तक्रार दिली. पथकाच्या वरिष्ठ निरीक्षक यांना मुंबई नाका येथे काही व्यक्ती MD ड्रग्ज विक्रीस येणार असल्याची माहिती मिळाली. पथकातील दोन कर्मचाऱ्यांनी ग्राहक बनून हॉटेल परिसरात सापळा रचला. संशयित तरुण फोनवर बोलत चहा दुकानात गेला. येथे दोन व्यक्ती होत्या. पथकातील कर्मचारी संशयितांजवळ उभे होते. एक तरुण आला. 'एक कडक चाय हो जाये' असे बोलताच संशयिताने त्याच्या हातात प्लास्टीकची पुडी दिली. चहा न घेता तो तरुण निघून गेला. पथकाने तिघांना ताब्यात घेतले. सन 2023 मध्ये ड्रग्ज माफिया ललित पानपाटील, सनी पगारे आणि नसरीन शेख ऊर्फ 'छोटी भाभी' या टोळ्यांचा पर्दाफाश झाला, तेव्हा नाशिकमध्ये MD चा दर प्रति ग्रॅम दहा ते अडीच हजार रुपये होता. पोलिसांच्या कडक कारवाईमुळे नाशिकमधील स्थानिक नेटवर्क विस्कळीत झाले आणि माल मिळणे कठीण झाले होता. मात्र तस्करांनी या टंचाईचा फायदा घेत किम्मती थेट साडेचार ते पाच हजार रुपये प्रति ग्रॅमवर पोहोचवल्या आहेत, हे वास्तव कालच्या कारवाईतून समाेर आले आहे. नुकत्याच पकडल्या गेलेल्या संशयितांनी हे ड्रग्ज थेट मालेगावातून आणल्याची कबुली दिल्याने, नाशिकमधील ड्रग्ज पुरवठ्याचा नवा मार्ग पोलिसांच्या रडारवर आला आहे. पथकाने मुंबई नाका परिसरात सापळा रचला. संशयित जाकीर रफीक शेख हा त्याच्या साथीदारांसह एका कारमधून (MH 46 X 4595) तेथे पोहोचताच पोलिसांनी त्यांना वेढा घालून ताब्यात घेतले. कारवाईत पोलिसांनी एकूण सात लाख ३६ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अटक करण्यात आलेल्यांमध्ये शाहरूख युसूफ शेख आणि सिराज सोहराब शेख, यांचा समावेश आहे. किमती वाढूनही नाशिकमध्ये ड्रग्जची खरेदी करणारे हे ग्राहक कोण? आणि मालेगावातील मुख्य सूत्रधार कोण आहे? याचा तपास मुंबई नाका पोलिस करत आहेत.
0
0
Report

मनपा की अतिक्रमण कार्रवाई: मतीन पटेल समेत याचिकाकर्ताओं की सुनवाई 15 जून

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मनपाच्या मालमत्ता निष्कासनाच्या कारवाईला आव्हान देणारे नगरसेवक मतीन पटेल, हनीफ खान युसूफ खान आणि इतरांच्या याचिकांवर आता १५ जून रोजी सुनावणी होणार आहे. ९ मे रोजी मनपाने बजावलेल्या नोटिसविरोधात याचिकाकर्त्यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली होती. १३ मे रोजी महापालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मतीन पटेल यांचेघर, दुकान आणि कार्यालय पाडल्यामुळे याचिकाकर्त्यांच्या वतीने याचिकांमध्ये दुरुस्ती करण्याची तयारी दर्शवण्यात आली. खंडपीठाने ही दुरुस्ती करण्याची मुभा दिली आहे
0
0
Report

रत्नागिरी के बुरोंडी में नया मच्छीमार जेट्टी, रोजगार और आय में उछाल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीतील बुरोंडी येथे उभारणार नवी मच्छीमार जेट्टी..मंत्री नितेश राणे यांची घोषणा.. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील बुरोंडी येथे आधुनिक मच्छीमार जेट्टी उभारणीच्या प्रस्तावाला गती देण्यात येत असल्याची माहिती मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे.. बुरोंडी येथील सुमारे २५०० हून अधिक मच्छीमारांच्या समस्या सोडवण्यासाठी आणि स्थानिक मत्स्यव्यवसायाला चालना देण्यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत आहे.. केंद्र सरकारच्या 'FIDF' योजनेच्या धर्तीवर या जेट्टीचा विकास केला जाईल,ज्यामुळे मच्छीमारांना मासळी उतरवणे सोपे होईल आणि नौकांना सुरक्षित आश्रय मिळेल.. या सुविधेमुळे वाहतूक खर्च कमी होऊन स्थानिक मच्छीमारांचे आर्थिक जीवनमान उंचावणार आहे आणि रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत..
0
0
Report
Advertisement

वर्धा में भीषण गर्मी से दो लोगों की मौत, शहर में सुरक्षा措施

Wardha, Maharashtra:वर्धा जिल्ह्यात सूर्य आग ओकत असल्याची स्थिती असून, यात मागील दोन दिवसांपासून ४६ अंश सेल्सिअसवर तापमान आहे. जनजीवन विस्कळीत झाले असल्याने शहराच्या मुख्य रस्त्यावर संचारबंदी असल्याचे चित्र आहे. परिणामी सोमवारी दुपारी साडेबारा ते दीड वाजेच्या सुमारास देवळीच्या वेगवेगळ्या भागात दोन व्यक्ती मृतावस्थेत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या दोन्ही व्यक्ती उष्माघाताचे बळी ठरल्याची चर्चा होत आहे. देवळी बसस्थानकाजवळील भोंग सभागृहाच्या बाहेर रस्त्याच्या कडेला दिलीप उर्फ बंडू साधुबाजी चांदेकर हे मृतावस्थेत आढळून आले. भरदुपारी साडेबारा वाजेच्या सुमारास ही बाब उघडात आली. तसेच दरबार हॉटेलजवळ सर्व्हिस रोडच्या कडेला दुपारी दीड वाजेच्या सुमारास महेंद्र चुनिलाल वघारे यांचा मृतदेह आढळून आला. दोन्ही व्यक्ती व्यसनाधीन असल्याची माहिती असून, उन्हाच्या तडाख्यात त्यांचा बळी गेल्याची चर्चा आहे.
0
0
Report

ईडी ने अशोक खरात की ताबेदारी के लिए कार्रवाई तेज, पीएमपीएलए कोर्ट में हाजिरी

Nashik, Maharashtra:feed send by 2c reporter-sagar gaikwad slug-nsk_kharat_ed *नाशिक ब्रेकिंग* - अशोक खरातला ताब्यात घेण्यासाठी ईडी ऍक्शन मोडवर - आज कोणत्याही क्षणी नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातून ईडी घेणार अशोक खरातचा ताबा - नाशिकमध्ये ईडीने काल सायंकाळीच न्यायालयीन प्रक्रिया केली आहे पूर्ण - नाशिक न्यायालयाचे अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी देवकर यांनी ईडीची विनंती केली होती मान्य - आज मुंबईत ईडीकडून अशोक खरातला PMPLA न्यायालयात केले जाणार हजर - काल सिन्नरच्या फसवणुकीच्या गुन्ह्यात अशोक खरातला न्यायालयीन कोठडी मिळताच ईडीच्या हालचालींना वेग • अशोक खरातशी संबंधित रूपाली चाकणकर यांच्या सह अनेकांची ED ने या पूर्वी केली आहे चौकशी • कोट्यवधीच्या जमिनीचे व्यवहार, आलिशान गाड्या, बंगले, फार्महाऊस, बनावट खात्याच्या माध्यमातून करण्यात आलेली आर्थिक उलाढाल, बँकेच्या लॉकरमध्ये सापडलेला सोनं, परदेशी चलन अशा अनेक बाबींचा ED करत आहे तपास • आज अशोक खरात याचा ED ने ताबा घेतल्यास या सगळ्या तपासाला येणार वेग
0
0
Report
Advertisement

GB क्लब मालिक के हेरासमेंट से रमण बाच्छील ने आत्महत्या; मोबाइल वीडियो में आरोप

Bhandara, Maharashtra:व्यावसायिक छळाला कंटाळून आत्महत्या..... मोबाईलमध्ये आढळलेल्या व्हिडिओत जीबी क्लब मालकावर गंभीर आरोप.... भंडारा शहरातील जीबी क्लबचे मालक गुड्डू उर्फ ललित सिंग बैस यांच्या कथित त्रासाला कंटाळून रमण सिंग बाच्छील यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येपूर्वी बाच्छील यांनी मोबाईलमध्ये एक व्हिडिओ रेकॉर्ड करून बैस यांच्या त्रासामुळे हे टोकाचे पाऊल उचलत असल्याचे नमूद केले होते. स्वतःचा व्यवसाय वाढवण्यासाठी बैस यांनी विविध प्रकारे त्रास दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर बाच्छील यांनी वैनगंगा नदीत उडी मारून आत्महत्या केली. मोबाईलमधील व्हिडिओ समोर आल्यानंतर मृतकाच्या पत्नी व भावाने भंडारा पोलिसांत तक्रार दाखल केली असून पोलिस पुढील तपास करत आहेत.
0
0
Report

गर्मी में जानवरों के लिए किसान प्रकाशराव हराळ ने गांव में पानी स्रोत बनवा दिया

Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानामुळे जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे अशा परिस्थितीत हिंगोलीच्या कापडशिंगी येथील शेतकरी प्रकाशराव हराळ यांनी पुढाकार घेत गावातील जनावरांसाठी पिण्याच्या पाण्याची हौद बांधून मोठी सोय उपलब्ध करून दिली आहे. स्वखर्चातून उभारण्यात आलेल्या या हौदमुळे परिसरातील मोठ्या प्रमाणावर जनावरे पाणी पिण्यासाठी येत आहेत वाढत्या उष्णतेमुळे तलाव नदी नाले आणि विहिरी कोरड्या पडत असताना या शेतकऱ्याने गावातील जनावरांच्या पाण्याचा प्रश्न सोडवला आहे..
0
0
Report

कोरेगाव तालुक्यात अर्धवट रस्ते कारण हादसे, हलगी आंदोलन के साथ आश्वासन मिला

Satara, Maharashtra:साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यात सातारा सोलापूर राज्य महामार्गावर वडाचीवाडी येथे मागील सात वर्षापासून अर्धवट रस्त्याचे कामामुळे या भागात अनेक अपघात होत आहेत प्रशासनाला सांगूनही दुर्लक्ष होत असल्यामुळे शिवसेना नेते राजाभाऊ बर्गे यांच्या नेतृत्वाखाली परिसरातील ग्रामस्थांच्या समवेत हलगी नाद आंदोलन केले यावेळी राज्य महामार्गाचे मेघा इंजिनिअरिंगचे समन्वयक श्रीकांत घाडगे यांनी येणाऱ्या 27 मे पर्यंत या भागातील प्रलंबित रस्त्याची कामे पूर्ण होतील असे आश्वासन यावेळी दिले. या आंदोलनात वडाचीवाडी सांगवी चिमणगाव आझादपूर चिमणगाव गोठा रामोशीवाडी खेळखंडी गोळेवाडी एकंबे गावांमधील ग्रामस्थ सहभागी झाले होते
0
0
Report
Advertisement

अकोला में भीषण गर्मी: तापमान 46°C, नागरिकों के लिए चेतावनी जारी

Akola, Maharashtra:Anchor : अकोला शहरात उष्णतेचा प्रकोप दिवसेंदिवस वाढत असून तापमानाने तब्बल ४६ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. कडक उन्हामुळे नागरिक हैराण झाले असून पुढील काही दिवस तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघाताचा धोका निर्माण झाला असून अकोला महानगरपालिकेने नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे.महानगरपालिकेच्या वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. रुची पहुरकर यांनी नागरिकांना आवश्यक ती काळजी घ्यावी, असे सांगितले आहे. चक्कर येणे, उलटी होणे, पोटदुखी, अंग गरम होणे, अशक्तपणा जाणवणे किंवा बेशुद्ध पडणे अशी लक्षणे दिसून आल्यास संबंधित व्यक्तीला तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.तसेच दुपारी १२ ते ४ या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये, भरपूर पाणी प्यावे, ओआरएसचे सेवन करावे तसेच सैल आणि सुती कपड्यांचा वापर करावा, असा सल्लाही देण्यात आला आहे. शहरातील विविध भागांत महानगरपालिकेकडून पाणपोई सुरू करण्यात आल्या असून नागरिकांना ओआरएस पावडरचे वाटपही करण्यात येत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये उष्माघातग्रस्तांसाठी विशेष सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.दरम्यान, सतत वाढणाऱ्या तापमानामुळे अकोलेकरांनी पुढील काही दिवस विशेष काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.
0
0
Report

जालना में डीजल- पेट्रोल टंकी खाली, ग्रामीण पंपों पर किसान की लंबी कतारें

Jalna, Maharashtra:जालना : ग्रामीण भागातील अनेक पंपांवर परिस्थिती बिकट, शेतीची कामे खोळंबली ४८ पेट्रोलपंप बंद; ८० पंपांवर रांगा अनेक ठिकाणी कामे थांबवून पंपांवर कॅन घेऊन शेतकरी रांगेत उभे जालना जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पेट्रोल-डिझेल टंचाईची परिस्थिती निर्माण झाल्याने वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. महिनाभरानंतर पुन्हा एकदा ८० पेट्रोल पंपांवर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसू लागल्या आहेत. विशेषतः डिझेलसाठी ग्रामीण भागात नागरिकांना तासन्‌तास प्रतीक्षा करावी लागत आहे. काल सायंकाळपासून १७० पैकी ४८ पेट्रोल पंपांवरील इंधन संपलेले होते. जालना शहरातील अनेक पेट्रोल पंपांवरही इंधनाचा साठा संपल्याने 'नो-स्टॉक'चे बोर्ड झळकत होते. जिथे इंधन उपलब्ध आहे, अशा ठिकाणी रांगा दिसून येत होत्या. सध्या ग्रामीण भागात खरीप हंगामाच्या पूर्वतयारीची कामे वेगाने सुरू आहेत. शेतकरी मशागतीसाठी ट्रॅक्टर आणि इतर कृषी यंत्रांचा वापर करत असल्याने डिझेलची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. मात्र पुरवठा कमी पडत असल्याने अनेक ठिकाणी शेतकऱ्यांना कामे थांबवून पेट्रोल पंपांवर कॅन घेऊन रांगेत उभे राहावे लागत आहे. काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागत आहेत. तर अनेक ठिकाणी इंधन मिळत नसल्याची तक्रार वाहनधारकांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला में पानी संकट रोकने के लिए उपमहापार ने जलशुद्धीकरण केंद्र की समीक्षा की

Akola, Maharashtra:अकोला शहरात पाणीटंचाईची समस्या निर्माण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर उपमहापौर अमोल गोगे यांनी महान धरण आणि महान येथील जलशुद्धीकरण केंद्राची पाहणी करत शहराच्या पाणीपुरवठा व्यवस्थेचा आढावा घेतला. धरणातील उपलब्ध पाणीसाठा, जलशुद्धीकरण प्रक्रिया आणि नागरिकांना होणारा पाणीपुरवठा यासंदर्भात संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यात आली.सध्या महान धरणात २५.४४८ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा उपलब्ध असून, उपलब्ध साठ्यानुसार शहरातील पाणीपुरवठ्याचे नियोजन काटेकोर आणि सुयोग्य पद्धतीने करण्यात यावे, अशा सूचना उपमहापौरांनी अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी जलशुद्धीकरण केंद्रातील विविध प्रक्रियांची पाहणी करून पाण्याच्या गुणवत्तेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले.शहरात कृत्रिम पाणीटंचाई निर्माण होणार नाही यासाठी प्रशासनाने योग्य नियोजन करावे, तसेच नागरिकांनाही पाण्याचा वापर जपून करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
0
0
Report

सsolapur महापालिका के अतिक्रमण विभाग में स्क्रैप चोरी के आरोप, अमोल शिंदे ने घेरा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - महापालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप चोरी होत असल्याचा शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या आरोप, आरोपनंतर अतिक्रमण विभागाच्या अधिकाऱ्यावरच गुन्हा दाखल - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील स्क्रॅप दिवसाढवळ्या चोरीला जात असल्याचा धक्कादायक प्रकार शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदेनीं आणला चव्हाट्यावर - कोणतीही अधिकृत परवानगी किंवा पावती नसताना अतिक्रमण विभागाचे अधिकारी जगन्नाथ बनसोडे यांच्या समोरच स्क्रॅप चोरी होत असल्याची धक्कादायक बाबसमोर - सोलापूर महानगरपालिकेच्या अतिक्रमण विभागातील पहिला टेम्पो निघून गेला त्यानंतर दुसरा टेम्पोत स्क्रॅप भरत असताना शिवसेना जिल्हाप्रमुख तथा नगरसेवक अमोल शिंदे यांनी टाकली धाड - महापालिकेचे अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडे यांच्यासह इतर पाच जणांवर सदर बझार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल - स्क्रॅप खाजगी वाहनात भरतानाच्या हालचाली या संशयास्पद असल्याची महापालिकाेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची कबुली - अतिक्रमण विभागाचे अधिकारी जग्गनाथ बनसोडेंनवर गुन्हा दाखल झाल्याने महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह ? - खाजगी वाहनात स्क्रॅप भरतानाचे कर्मचारी शिवसेना जिल्हाप्रमुख अमोल शिंदे यांना पाहताच पळून गेल्याने अनेक चर्चांना उधाण - संबंधितांवर कठोर कारवाई करण्यासाठी जिल्हाप्रमुख अमोल शिंदे आक्रमक
0
0
Report

पुणे से अक्कलकोट जा रही परिवार की ट्रक दुर्घटना में तीन मृत, चार घायल

Solapur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील कोंडी येथे झालेल्या भीषण अपघातात दीड वर्षाच्या चिमुकल्यासह दोन महिलांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघेजण गंभीर जखमी झाले आहेत. धावत्या ट्रकला भरधाव कारने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने झाला भीषण अपघात. पुण्याच्या देहूरोड येथील रवि खंडागळे यांचे कुटुंब अक्कलकोटला दर्शनासाठी जात होते. या अपघातात सिंधू रवि खंडागळे (वय ४२), त्यांची बहीण नंदा भाऊराव हाताळकर (वय ४५) आणि दीड वर्षाचा रुद्राक्ष मोरे यांचा जागीच मृत्यू झाला. तर रुद्राक्षचे वडील उमेश प्रकाश मोरे (वय ३२) आणि आई साक्षी मोरे हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सदर घटनेची नोंद सोलापूरच्या सिव्हिल पोलिसात झाली असून पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top