Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत

Aug 20, 2024 06:38:06
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
LBLAILESH BARGAJE
Mar 03, 2026 02:46:01
Ahilyanagar, Maharashtra:शनि शिंगणापूर देवस्थानच्या कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी बेमुदत साखळी उपोषण सुरू केलंय... कायम कर्मचारीांचा 2025 चा दिवाळीचा बोनस मिळालेला नाही तो मिळावा, वेतनबदलातील फरक कर्मचाऱ्यांना वेतनासोबत अदा करण्यात यावा, वेतनासोबत इ.पी.एफ., एलआयसी, कामगार सोसायटी वेतनातील कपातीचे चेक उशिरा दिले जातात किंवा दिलेले नाहीत या कारणामुळे कर्मचाऱ्यांना कामगार सोसायटीचा व्याजाचा वाढीव भुर्दंड पडलेला आहे. कपातींचे चेक देय वेतनासोबतच अदा करावेत,कर्मचाऱ्यांना मासिक वेतन महिन्याच्या 5 तारखेपर्यंत अदा करावे अशा विविध मागण्यांसाठी हे साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय...जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत उपोषण आंदोलन सुरूच राहील असं कर्मचाऱ्यांनी सांगितले आहे...शनिशिंगणापूर मंदिर परिसरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर कर्मचारी आंदोलनाला बसले आहेत.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 03, 2026 02:32:48
Shirur, Maharashtra:पुण्याच्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीलगत असलेल्या गावांमध्ये सायंकाळच्या सुमारास सौम्य धक्का जाणवल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी दिलीय, अचानक जमिनीला हलकासा कंपन जाणवल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, काही घरांच्या भिंतींना अतिशय किरकोळ स्वरूपाच्या चिरा पडल्याचे दिसून आले असून या घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. धक्के नेमके भूकंपामुळे जाणवले की औद्योगिक परिसरातील यंत्रसामग्री, स्फोटक कामे अथवा अन्य कारणांमुळे निर्माण झाले, याबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती मिळालेली नाही. दरम्यान, नागरिकांनी संबंधित प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन विभागाने तात्काळ पाहणी करून घटनेचे कारण स्पष्ट करावे तसेच परिसरातील सुरक्षिततेबाबत खात्री द्यावी, अशी मागणी केली आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Mar 03, 2026 02:00:52
Yeola, Maharashtra:पैठण येथे संत एकनाथ महाराज यांच्या नाथ षष्टी सोहळ्यास निमित्त गेल्या 50 वर्षापासून ह.भ.प कै विठ्ठलतात्या खिल्लारे यांनी सुरु केलेल्या पारेगाव ते पैठण या दिंडी सोहळ्यास आज 51 वर्षे पूर्ण झाली आहे दिंडीचे यावर्षीचे प्रस्थान पारेगाव येथून झाले असुन् यानंतर कोटमगाव,गवंडगाव,वैजापूर महालगाव,गंगापूर,ढोरेगाव,इसारवाडी आदी गावे एकूण 140 किमी चा पायी चालत कडक उन्हाची तमा न बाळगता नाथभाजनाच्या जय घोष करत आणि टाळ मृदुंगाच्या तालावर ठेका घेत घेत असा 8 दिवसांचा मुक्काम करत दिंडी सोहळा नाथ षष्ठीच्या दिवशी पैठण येथे पोहोचणार आहे . दिंडीत एकूण शेकडो भाविक सहभागी झाले आहे यात महिला आणि अबालवृद्धांची संख्या लक्षणीय आहे दिंडी सोबत प्रत्येक मुक्कामाच्या ठिकाणी पंचाक्रोशीतील प्रसिद्ध कीर्तनकरांच्या कीर्तनाची मेजवानी भाविकांना मिळणार आहे ।
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 03, 2026 01:01:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली महापालिकेची पहिलीच महासभा ठरली वादळी, सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धरलं धारेवर.. अँकर - सांगली महापालिकेची पहिल्याच महासभा प्रचंड वादळी ठरली.पहिल्याच पार पडलेल्या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले, शहरातल्या स्वच्छता, पाणी पुरवठा, उद्यानांची दुरवस्था, ड्रेनेज योजना, आणि एलइडी प्रकल्पासह प्रशासकीय काळातील कारभारावरून अधिकारयांना चांगलेचं धारेवर धरले. तर प्रशासकीय काळात महासभा घेऊन करण्यात आलेले ठराव रद्द करण्याची जोरदार मागणी देखील महासभेत करण्यात आली,यावर महापौर धीरज सूर्यवंशी यांनी याबाबत पडताळणी करून बेकायदेशीर असणारे ठराव विखंडित करण्याचा प्रस्ताव राज्य शासनाकडे पाठवण्यात येईल,असा आश्वासन या सभेमध्ये दिले. तसेच एलइडी बाबत महापौरांच्या अध्यक्षतेखाली समिती नियुक्त करण्याचा निर्णय महासभेत घेण्यात आला. बाईट - मंगेश चव्हाण - विरोधी पक्ष नेते - सांगली महापालिका.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 01:00:51
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा आज तिसरा दिवस; बच्चू कडू यांच्या मेळघाट संघर्ष यात्रा आणि कर्जमाफी आठवण पदयात्रेला मोठा प्रतिसाद 30 जून पर्यंत शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली नाही तर 1 जुलैपासून एकही रेल्वे फिरू देणार नाही; AI तंत्रज्ञानाचा वापर करून बच्चू कडू करणार आंदोलन अँकर :- देशाला स्वतंत्र मिळून 75 वर्ष झाले मात्र अमरावतीच्या मेळघाट मधीलआदिवासी लोकांना त्यांच्या मूलभूत सुविधा मिळत नाही, अजूनही मेळघाट्यातील आदिवासी समाज मागासलेच आहे त्यांच्या अस्तित्वासाठी व शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीची सरकारला आठवण करून देण्यासाठी मेळघाटातील अतिदुर्गम भागातून बच्चू कडू यांनी संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे, ही संघर्ष यात्रा नऊ तारखेपर्यंत चालणार असून 9 तारखेला सलोना ते चिखलदरा या यात्रेचा स्वरूप बदलणार आहे... सरकारने आमच्या प्रश्नाची दखल न घेतल्यास 9 तारखेला सरकार हतबल केल्याशिवाय आम्ही राहणार नाही, आणि 9 तारखेला भगतसिंग च्या विचाराच पाऊल टाकू असा इशारा प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांनी राज्य सरकारला इशारा दिला...प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडूंची मेळघाट मध्ये 250 किलोमीटरची मेळघाट संघर्ष व कर्जमाफीसाठी आठवण पदयात्रा सुरू झाली असून याला उस्फुर्त प्रतिसाद मिळाला आहे 1 ते 9 मार्च पर्यंत बच्चू कडूंची मेळघाटातील मूलभूत प्रश्नांवर आणि सरकारला कर्जमाफीची आठवण करून देण्यासाठी ही पदयात्रा आहे, मेळघाटातील समस्या आदिवासींच्या मूलभूत गरजा रस्ते पाणी,रोजगार, माता मृत्यू कुपोषण यासाठी बच्चू कडूंची यात्रा आहे,9 मार्चला सलोना ते चिखलदरा महापदयात्रा काढून करणार यात्रेचा समारोप होणार आहे. दरम्यान 30 जून पर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली नाही तर एक जुलैला एकही रेल्वे रुळावर फिरू देणार नाही तसेच AI तंत्रज्ञानाचा वापर करून आंदोलन करण्याचा इशारा बच्चू कडू यांनी दिला आहे बाईट :- बच्चू कडू, माजी राज्यमंत्री
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 02, 2026 16:47:24
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीकर सीआयएसएफ जवान बसंत सिंग यांचे हैदराबाद येथे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन डोंबिवलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार डोंबिवलीतून एक अत्यंत दु:खद घटना समोर आली आहे. डोंबिवली येथील सीआयएसएफचे जवान बसंत सिंग यांचे प्रशिक्षणादरम्यान हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ही घटना हैदराबाद येथे घडली असून, त्यांच्या आकस्मिक निधनाने डोंबिवली परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. बसंत सिंग हे सीआयएसएफच्या प्रशिक्षणासाठी हैदराबाद येथे गेले होते. प्रशिक्षणादरम्यान अचानक त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आला. तातडीने वैद्यकीय मदत पुरवण्यात आली, मात्र उपचारांदरम्यान त्यांच्या निधन झाले. त्यांचे पार्थिव डोंबिवलीत आणण्यात आले. येथे शासकीय इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी शासकीय अधिकारीांसह स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि कुटुंबीय मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशसेवेत कार्यरत असलेल्या जवानाला अखेरचा निरोप देताना वातावरण भावुक झाले होते. बसंत सिंग यांच्या पश्चात पत्नी, आई-वडील आणि दोन मुले असा परिवार आहे. कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, परिसरात शोककळा पसरली आहे. देशसेवेसाठी योगदान देणाऱ्या या जवानाच्या निधनाबद्दल सर्व स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 02, 2026 16:32:58
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बार्शिटाकळी येथे शेतकरी एल्गार समितीच्या वतीने आज होळीच्या दिवशी अनोख्या पद्धतीने निषेध आंदोलन करण्यात आले. अमेरिका-भारत शेतकरी व्यापारी करार रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी समितीच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी एकत्र येत प्रतीकात्मक स्वरूपात कराराची होळी साजरी केली. यावेळी आंदोलकांनी सरकारविरोधात घोषणाबाजी करत हा करार शेतकऱ्यांच्या हिताविरोधात असल्याचा आरोप केला. या करारामुळे स्थानिक शेतमालाच्या किमतींवर परिणाम होऊन शेतकरी अडचणीत येतील, अशी भीती व्यक्त करण्यात आली. गावातील अनेक नागरिक आणि शेतकरी एल्गार समितीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top