445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
यवतमाल में पति को बिजली से मारने की कोशिश: विवाहबाह्य संबंध के चलते पत्नी गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:विवाहबाह्य संबंधात अडसर पडणाऱ्या पतीला विजेचा शॉक देऊन त्याला संपविण्याचा प्रयत्न करणाऱ्या पत्नी ला यवतमाळ वडगाव जंगल पोलिसांनी अटक केली आहे. पंगडी गावातील ही धक्कादायक घटना आहे. कवडी मोरे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तिचे गावातीलच विष्णू आत्राम या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती गजानन मोरे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने पत्नीने रात्रीच्या सुमारास घरी झोपून असलेल्या पतीला विद्युत वायर मधून विजेचा शॉक देवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हा कट रचला होता, मात्र सुदैवाने त्यातून पती बचावला. याप्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे.0
0
Report
चुनाव आरोप-प्रत्यारोप के बाद देशमुख, निलंगेकर और पवार एक मंच पर दोस्ती दिखे
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज़... निवडणुकीत आरोप-प्रत्यारोप... कार्यक्रमात मात्र नेत्यांची गळाभेट.... राजकीय कटुता विसरून देशमुख-निलंगेकर-पवार एकाच मंचावर.... नुकत्याच पार पडलेल्या निवडणुकांमध्ये एकमेकांवर जोरदार टीका करणारे नेते आता एका कार्यक्रमाच्या निमित्ताने एकाच मंचावर पाहायला मिळाले... राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी तापलेल्या वातावरणानंतर आता मात्र हेच नेते एकमेकांच्या गळ्यात गळे घालताना, हसताना आणि गप्पा मारताना दिसले... काँग्रेसचे माजी मंत्री तथा आमदार अमित देशमुख, भाजपाचे माजी मंत्री आमदार संभाजी पाटील निलंगेकर आणि भाजपा आमدار अभिमन्यू पवार यांच्या या भेटीची सध्या राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा रंगली आहे... निवडणुकीत विरोधक... पण कार्यक्रमात मैत्रीपूर्ण वातावरण... याकडे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत…0
0
Report
Kas Plateau में दिखे गवे; पर्यटक बढ़ने से वन विभाग ने चेतावनी जारी की
Satara, Maharashtra:सातारा - जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार परिसरात पुन्हा एकदा गव्यांचे दर्शन झालं आहे. उन्हाळी सुट्ट्यांमुळे कास परिसरात पर्यटकांची चांगलीच गर्दी वाढू लागली आहे. अशातच दुपारच्या सुमारास काही पर्यटकांना रस्त्यालगत गवे दिसून येत आहेत. अचानक समोर आलेल्या गव्यांमुळे वाहनचालकांची भांबेरी उडत आहे. कास परिसर हा जैवविविधतेसाठी प्रसिद्ध असून वन्यप्राण्यांचा वावर नेहमीच असतो. मात्र पर्यटकांची वाढती गर्दी आणि जंगल परिसरात होणारी हालचाल यामुळे गवे मानवी वस्तीकडे येत असल्याची चर्चा स्थानिकांमध्ये सुरू आहे. दरम्यान, वन विभागाने पर्यटकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून जंगल परिसरात अनावश्यक गर्दी न करण्याचे तसेच वन्यप्राण्यांना त्रास होईल असे कृत्य टाळण्याच्या सूचना दिल्या आहेत.0
0
Report
Advertisement
दक्षिण आरफळ नहर में पानी पहुंचा; किसानों ने पूजा-आनंद के साथ स्वागत किया
Sangli, Maharashtra:दीड महिन्यानंतर दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये आले पाणी, शेतकऱ्यांनी पाणी पूजन करत केलं स्वागत.. अँर्थ कॅनलचे पाणी पोहोचला आहे गेल्या दीड महिन्यांपासून अर्थ दक्षिण कॅनॉल हा कोरडा ठाक पडला होता,त्यामुळे आम्ही आसपासच्या पाच गावातील शेती हजारो एकर शेती वाळू लागली होती,त्यामुळे सामाजिक कार्यकर्ते प्रदीप माने यांच्या शेतकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला होता,अखेर पाटबंधारे प्रशासनाकडून दक्षिण आरफळ कॅनॉल मध्ये पाणी सोडले असून, गावात पाणी दाखल त्यानंतर गावकऱ्यांनी जल्लोष पाण्याचे स्वागत केले आहे.यावेळी महिलांना पाण्याचे पूजन करत आंनद व्यक्त केला आहे.0
0
Report
मोदी के आवह्न से सोने के कारोबार पर बड़ा असर, ज्वेलरी उद्योग चिंतित
Nagpur, Maharashtra:नागपूर 1 to 1 - राजेश रोकडे, अध्यक्ष, ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी डोमेस्टिक कौन्सील - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्यानंतर भारतात सराफा व्यवसायावर मोठा परिणाम होइल - ज्वेलरी व्यावसायिकांची देशातील सर्वांत मोठी संघटना असलेली ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशीलने व्यक्त केली चिंता - भारतात सोनं म्हणजे धार्मिक संस्कृती महत्व - लोकांना सोनं खरेदी बंद केलं तर एक कोटी लोकांच्या रोजगारावर परिणाम होईल - राष्ट्रहित लक्षात घेऊन पंतप्रधानांचं आवाहन त्याला आमचे समर्थन पण लोकांनी सोनं खरेदी न करणे कठीण आहे - ज्वेलरी उद्योगाचं जीडीपीमध्ये सात टक्के योगदान - महाराष्ट्र आणि पश्मिम बंगाल येथील कारागीरांना सर्वाधिक फटका बसेल - देशात दरवर्षी 700 टन सोन्याची --भारतात Gold monetisation schema implement करावी - ऍाल इंडिया जेम ॲप ज्वेलरी काउंशलचे देशात ६५ हजार सदस्य, देशभरातील २७५ संघटना जुळल्या --- युक्रेन रशिया वॉर दरम्यान युक्रेनच्या नागरिकांनी सोने विक्री करून स्वतःला उभारले0
0
Report
अंबेगांव के तीन युवाओं की साइकिल यात्रा: आळंदी से पंढरपुर तक हजारों किलोमीटर
Ambegaon, Maharashtra: भक्ती आणि जिद्द यांचा एक आगळावेगळा 'स्वॅग' पुणे जिल्ह्यात पाहायला मिळतोय! आंबेगाव तालुक्यातील तीन तरुणांनी सायकलवर स्वार होत चक्क आळंदी ते पंढरपूर आणि त्यानंतर अक्कलकोट असा शेकडो किलोमीटरचा प्रवास फत्ते केलाय. या जिद्दी तरुणांच्या सायकलवारीची सध्या जिल्ह्यात जोरदार चर्चा सुरू आहे.0
0
Report
Advertisement
वाशीम जिले में गर्मी से पपी पिक पर रोग-कीट नुकसान बढ़ने से उत्पादन घटने की आशंका
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यात वाढत्या उन्हाचा फटका आता पपई पिकालाही बसताना दिसत आहे. तीव्र उष्णता, कोरडे वातावरण आणि पाण्याच्या ताणामुळे पपई पिकावर विविध रोग व किडींचा प्रादुर्भाव वाढला आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी मोझॅक विषाणू, पानांवरील डाग रोग तसेच मुळकूज यांसारखे रोग आढळून येत आहेत.याशिवाय मावा आणि पांढरी माशी यांसारख्या किडींमुळे झाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.परिणामी पपईची पाने पिवळी पडणे,झाडांची वाढ खुंटणे आणि फळांच्या गुणवत्तेवर परिणाम होण्याच्या घटना वाढल्या आहेत.यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता निर्माण झाली असून पपई उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत.0
0
Report
पन्हाळा में गांजे की खेती करने वाले किसान गिरफ्तार, 25 किलो गांजा बरामद
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील पन्हाळा तालुक्यातील मरळी येथे उसाच्या शेतात गांजाची रोपे लावणाऱ्या शेतकऱ्याला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने अटक केली. भिकाजी शिवा पाटील असे अटकेतील शेतकऱ्याचे नाव आहे. या कारवाईत अडीच लाख रुपये किमतीचा २५ किलो ओला गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी कळे पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.0
0
Report
जेल से छूटने के बाद विजय चिंचपुरे के समर्थकों ने मिरवणूक और सत्कार निकाला
Buldhana, Maharashtra:विजय चिंचपुरे असे आरोपीचे नाव, खंडणी, अपहरण आणि ॲक्ट्रॉसिटी सारखे गंभीर गुन्हे होते दाखल... जेल मधून सुटताच समर्थकांचा जल्लोष, कायद्याचा धाक राहिला नसल्याचं चित्र... वाहनातून रॅली काढतांनाची बनवली रिल.. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल... यामुळे कायद्याचा धाक आहे की नाही असा सवाल उपस्थित केला जातोय...0
0
Report
Advertisement
मोबाइल पर प्रतिबंध: संत गजानन महाराज मंदिर में आज से कोविड नहीं बल्कि मोबाइल निषेध
Buldhana, Maharashtra:शेगाव येथील संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आज पासून मोबाईल वापरण्यास प्रतिबंध. सुलभ व शांततेत दर्शन घेता यावं म्हणून मंदिर प्रशासनाचा निर्णय. विदर्भाची पंढरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या श्री संत गजानन महाराज समाधी मंदिर परिसरात आजपासून भाविकांना मोबाईल वापरण्यास प्रतिबंध करण्यात आला आहे. मंदिर परिसरात मोबाईल वापरल्याने इतर भाविकांना त्रास होतो व मंदिर परिसरात दर्शन सुलभ व शांततेत घेता येत नाही म्हणून मंदिर प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. आजपासून मंदिर परिसरात भाविकांनी आपला मोबाईल स्विच ऑफ करूनच ठेवावा असा आवाहन मंदिर प्रशासनातर्फे करण्यात आला आहे.0
0
Report
चंद्रपुर में तीन नाबालिग बच्चे एक साथ लापता, पुलिस ने खोज तेज
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपुर शहरात खळबळ, महाकाली वॉर्ड भागातून एकाचवेळी तीन अल्पवयीन मुले बेपत्ता, पोलीस तपासण्यात आला वेगवान अँकर:- चंद्रपूर शहरातून एक अत्यंत खळबळजनक घटना समोर आली आहे. शहरातील महाकाली वॉर्ड परिसरातून 9, 13 आणि 15 वर्षे वयोगटातील तीन अल्पवयीन मुले अचानक बेपत्ता झाल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक 8 रोजी ही मुले महाकाली परिसरात खेळत होती. मात्र त्यानंतर ती घरी परतली नाहीत. मुलांचा सर्वत्र शोध घेऊनही काहीच माहिती न मिळाल्याने चिंताग्रस्त पालकांनी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली असून या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. बाईट १) जया मोकलवार, मुलाची आई बाईट २) कृणाल रामटेके , सहायक पोलीस निरीक्षक0
0
Report
सूखाग्रस्त येवला में केले की खेती ने किसानों की आय बदल दी
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुका दुष्काळग्रस्त म्हणून ओळखला जातो. पारंपरिक पिकांमधील अनिश्चितता यामुळे येथील शेतकऱ्यांना नेहमीच आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं. मात्र या परिस्थितीला छेद देत येवला तालुक्यातील नांदूर गावातील चार प्रगतशील शेतकऱ्यांनी केळीच्या लागवडीचा यशस्वी प्रयोग करून दाखवला आहे. एक वर्षात येणाऱ्या पिकाद्वारे शेतकरी आता लखपती झाला असून या केळीला स्थानिक बाजारपेठेसोबतच बाहेरील राज्यांतूनही मोठी मागणी आहे. गुजरात आणि राजस्थानमधील व्यापारी थेट शेतात येऊन केळीची खरेदी करत आहेत. एकूणच, दुष्काळी म्हणून ओळख असलेल्या येवला तालुक्यात केळीच्या लागवडीमुळे शेतीत नवसंजीवनी आली आहे. पारंपरिक पिकांना पर्याय शोधत नवनवीन प्रयोग केल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू शकते, याचं हे उत्तम उदाहरण ठरत आहे.0
0
Report
Advertisement
मोदी के आह्वान पर मंत्री भुसेन ने स्वागत किया, नागरिकों से तत्काल अमल की अपील
Nashik, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाचे मंत्री दादा भुसेंकडून स्वागत.... दादा भुसे ऑन नरेंद्र मोदी भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नागरिकांना जे आवाहन केले आहे त्याच मी स्वागत करतो... प्रत्येक नागरिकांना मी देखील आवाहन करतो की नरेंद मोदी यांनी केलेल्या आवाहनाची प्रत्यक्ष फिल्डवर जाऊन अंमलबजावणी करा.. ज्यावेळेस आपण आपल्या भारताला महासत्ता बनवायचा संकल्प करतो.. तेव्हा पंतप्रधानांनी केलेल्या आवाहनाला आपण प्रतिसाद दिला पाहिजे... पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अतिशय चांगले मुद्दे हे उपस्थित केलेले आहे..0
0
Report
शेलु बाजार में CCTV बंद, चोरी पर अंकुश नहीं, नागरिकों ने माँगी त्वरित मरम्मत
Washim, Maharashtra:शेलुबाजार येथे बसविण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे मागील अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत असल्याचा प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे परिसरात मागील काही दिवसांत चोरीच्या घटना घडूनही संबंधित यंत्रणेकडून कॅमेरे दुरुस्त करण्यात आलेले नाहीत. त्यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही बंद असल्यामुळे गुन्ह्यांच्या तपासातही अडचणी निर्माण होत आहे. त्यामुळे तातडीने सर्व कॅमेरे दुरुस्त करून सुरू करावेत अशी मागणी आता नागरिकांकडून करण्यात येत आहे.0
0
Report
दुग्ध व्यवसायी के चारे में आग, चारा जला, बैल घायल
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नायगव्हाण येथे दुग्ध व्यवसाय करणारे लहानू दत्तू सदगीर व रंजना दत्तू सदगीर यांनी जनावरांसाठी विकत घेतलेला 30 ते 35 ट्रॉली चारा साठवून ठेवला होता. मात्र अचानक लागलेल्या आगीत हा चारा पूर्णपणे जळून खाक झाला. यासोबतच शेणखत देखील जळाल्याने सदगीर यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. या जळीतात त्यांचा बैल देखील जखमी झाला आहे. अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाला मात्र तोपर्यंत पूर्ण चारा जळून खाक झाला होता.आगीचे कारण अद्याप अस्पष्ट असून घटनेची चौकशी सुरू आहे。0
0
Report
Advertisement
