445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा चुनाव: भाजपा के अरुण लाखानी की जीत, कांग्रेस में गुटबंदी उजागर
Wardha, Maharashtra:वर्धा स्टोरी SLUG - 0506_WARDHA_CHAN_PKG - विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये गुच्छ गोटे आणि जोडे, - चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवर भाजपचे अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय काँग्रेसच्या जिव्हारी - वर्ध्यात काँग्रेस कडून शैलेश अग्रवाल यांच्या प्रतिमेला जोडे मारो आंदोलन अँकर:चंद्रपुरात विधान परिषद निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये गुच्छ- गोटे आणि जोडे यांची चलती आहे. चंद्रपूर -गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेवर भाजपचे अरुण लाखानी यांचा बिनविरोध विजय काँग्रेसच्या जिव्हारी लागलाय. काँग्रेस उमेदवार शैलेश अग्रवाल यांनी कुणालाही विश्वासात न घेता उमेदवारी मागे घेतल्याचा आरोप केला जात आहे. वर्धा येथील कार्यकर्त्यांनी जोडेमार आंदोलन करीत पुतळा जाळून निषेध केला असून शैलेश अग्रवाल यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहेय... व्ही. ओ.- चंद्रपूर-गडचिरोली-वर्धा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधान परिषदेत भाजप उमेदवार अरुण लाखानी यांच्या विजयानंतर भाजपच्या गोटात गुलाल आहे. काँग्रेस उमेदवार शैलेश कुमार अग्रवाल आणि अपक्ष उमेदवार सुधीर कोठारी या दोन्ही उमेदवारांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यामुळे भाजप उमेदवार अरुण लखानी यांचा विजय अगदी सहज शक्य झाला. भाजपने या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात पैशाचा वापर करून आमचे मतदार फोडल्यामुळे आणि आमच्याकडे संख्याबळ नसल्यामुळे मी उमेदवारी वापस घेत असल्याचा दावा अग्रवाल यांनी केला. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्यांसोबत याबाबत बोलूनच निर्णय घेतल्याचं वक्तव्य अग्रवाल यांनी केलं. तर काँग्रेस नेते भाजपच्या विजयासाठी कार्यरत होते असे सांगत अग्रवाल यांनी खळबळ उडवून दिली. यावर आता काँग्रेस पक्षात वादळ उठले आहे. कुणालाही विश्वासात न घेता अग्रवाल यांनी माघार घेत विश्वासघात केल्याचे सांगत चंद्रपूरचे काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि माजी आमदार सुभाष धोटे यांनी थेट अग्रवाल यांच्या पक्षातून हकालपट्टीची मागणी केली. बाईट १) सुभाष धोटे व्ही. ओ. २) दुसरीकडे वर्धा येथे काँग्रेस कार्यकर्त्यांनी उमेदवार शैलेश अग्रवाल यांच्या फोटोला जोडे मारा आंदोलन करून आपला रोष प्रकट केला. कार्यकर्ता पातळीवर भाजपशी दोन हात करण्याची तयारी असताना एनवेळी अग्रवाल यांनी आश्चर्यकारित्या माघार घेतल्याने कार्यकर्ते- नेते बुचकळ्यात पडले. मैदानात शड्डू ठोकून प्रचाराला लागण्याच्या वेळेस ही अनपेक्षित घटना घडल्याने संताप व्यक्त केला जात आहे. या स्थितीसाठी जबाबदार नेत्यांवर कठोर कारवाईची मागणी रेटली जात आहे. निवडणूक जाहीर होण्याच्या आधीच भाजपने सुमारे 100 नगरसेवक पर्यटनाला पाठवून भाजपने काँग्रेसची कोंडी केली. आणि अर्ज मागे घेण्याच्या दिवशी प्रतिस्पर्धी उमेदवारांना या ना त्या प्रकारे माघार घ्यायला लावत केलेली खेळी विरोधी काँग्रेसची भंबेरी उडवून गेली आहे. राज्यभरात भाजपने राबविलेल्या बिनविरोध पॅटर्नने काँग्रेस पुरती बेजार झाली असल्यामुळे कारवाईची तलवार नेमकी कुणकुणावर पडते याकडे तळातील काँग्रेस कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे. वर्ध्याहुन मिलिंद आंडे सह आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
गोकुळ गीते के साथ महायुती की चौकसी, नाशिक विधान परिषद चुनाव में ड्रामा तेज
Nashik, Maharashtra:अँकर. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्या विरोधात अपक्षांनी शड्डू ठोकल्यामुळे महायुतीच्या नेत्यांची चांगलीच धावपळ उडाली होती. अखेरच्या क्षणापर्यंत मनधरणी आणि बैठकांचे सत्र सुरू होते. सहा उमेदवारांनी माघार घेतली असली, तरी एका नावाने मात्र शेवटच्या मिनिटापर्यंत महायुतीची धडधड वाढवून ठेवली होती... ते नाव म्हणजे गोकुळ गिते! नेमका काय घडला हा हाय व्होल्टेज ड्रामा? पाहूयात या सविस्तर रिपोर्टमध्ये. नाशिक विधान परिषद निवडणुकीमध्ये महायुतीचे अधिकृत उमेदवार नरेंद्र दराडे यांच्यासमोरील अडचणी दूर करण्यासाठी महायुतीच्या बड्या नेत्यांनी आज दिवसभर फिल्डिंग लावलीये. माघारीच्या शेवटच्या दिवशी सहा अपक्षांनी माघार घेतली मात्र दोन अपक्ष अद्याप निवडणुकीमध्ये ठाम आहेत ज्यामध्ये सर्वात आव्हानात्मक ठरणारे गोकुळ गीते तर दुसऱ्या बाजूला भाजपचेच बंडखोर प्रसाद हिरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात शूड़्डू ठोकला आहे. उदय सामंत यांनी स्वतः या दोन्ही उमेदवारांना समजावण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. माघार झाली नसली तरी महायुतीच्या उमेदवाराला पाठिंबा जाहीर करावा अशी ते मनधरणी करत आहेत. गोकुळ गीते हे गणेश गीते यांचे सखे बंधू आहेत भावाची जबाबदारी म्हणून त्यांनी भाजपचे अनेक नेते निवडून आणले आहेत नगरपालिका निवडणुकीमध्ये त्यांच्यावर महत्वपूर्ण जबाबदारी गणेश गीते यांनी दिली होती ओझर नगरपालिका आणि पिंपळगाव नगरपालिकेमध्ये भाजपची सत्ता आणण्यामध्ये त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे सध्या ते निफाड बाजार समितीचे संचालक आहेत त्यांचा उमदा स्वभाव आणि जनसामान्यांमध्ये असलेल्या दांडगा संपर्क ही त्यांची उजवी बाजू है नरेंद्र दराडे आणि गोकुळ गीते हे दोन्ही एकाच वंजारी समाजाचे आहेत.0
0
Report
यवतमाळ उपचुनाव: दुष्यंत चतुर्वेदी की निर्विरोध जीत पर शिंदे-राठोड की महफिल
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानपरिषद निवडणुकित महायुतीकडून शिवसेनेचे उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांची अविरोध निवड झाल्यानंतर पालकमंत्री संजय राठोड यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांसह चतुर्वेदी यांना घेऊन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील निवासस्थानी भेट घेतली. पालकमंत्री संजय राठोड यांनी सुरुवातीपासूनच ही निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी प्रयत्न केले. सर्वपक्षीय नेत्यांशी असलेले त्यांचे संबंध, महायुतीतील समन्वय आणि राज्यातील वरिष्ठ नेत्यांच्या मार्गदर्शनाच्या बळावर महायुतीचे अधिकृत उमेदवार दुष्यंत चतुर्वेदी यांच्या बिनविरोध निवडीचा मार्ग मोकळा झाला. अशी प्रतिक्रिया शिवसेना पश्चिम विदर्भ सह संपर्कप्रमुख पराग पिंगळे यांनी दिली.0
0
Report
Advertisement
किले रायगड पर शिवराज्याभिषेक के लिए भारी भीड़, भक्त तैयार चढ़ाई को
Chendhare, Maharashtra:उद्य्या च्या किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेक सोहळा ..... हजारो शिवभक्तांचे किल्ले रायगडाकडे कूच ...... संभाजी राजे छत्रपती यांच्यासह गड चढण्यास प्रारंभ ...... पाचाड परिसरात शिवभक्तांची मोठी गर्दी अँकर- छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा उद्य किल्ले रायगडावर साजरा होतोय. यासाठी देशभरातून हजारो संख्येने शिवभक्त किल्ले रायगडाकडे यायला सुरुवात झाली आहे. किल्ले रायगडच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड परिसरात हजारोंच्या संख्येने शिवभक्त दाखल झालेत. पाचाड ते किल्ले रायगड असा पायी प्रवास हे शिवभक्त करत किल्ले रायगडाकडे प्रस्थान करत आहेत. त्यामुळे उद्याच्या शिवराज्याभिषेक सोहळ्यासाठी गडावर मोठी गर्दी होण्याची शक्यता आहे. छत्रपती युवराज संभाजी राजे यांच्या हस्ते हा शिवराज्याभिषेक सोहळा पार पडतो. पाचाड इथं राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेऊन संभाजी राजे छत्रपती यांनी शिवभक्तांसह गड चढण्यास सुरुवात केली आहे.0
0
Report
सोलापुर में एनसीपी-भाजपा गुटबंदी, देशमुख की चुनावी राह मुश्किल
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या आमदारांची विधान परिषदेच्या निवडणुकीत थेट भाजपला पूरक भूमिका, तीन आमदार पक्ष विरोधी भूमिकेत, विधान परिषदेच्या निवडणुकीत सोलापूर जिल्ह्यात सर्वाधिक आमदार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का बसला आहे. आमदार उत्तम जानकर यांनी पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना आपला पाठिंबा नसल्याची उघड भूमिका घेतली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातील खद खद बाहेर आली आहे. या पूर्वीच करमाळ्याचे आमदार नारायण पाटील यांनी भाजप सोबत जवळीक साधली आहे. माढा चे आमदार अभिजित पाटील यांनी सुद्धा वसंतराव देशमुख यांनी पंढरपूर पंचायत समिती सभापती निवडीत भाजपला मदत केली होती त्यामुळे देशमुख यांना आता विरोध केला आहे. तर मोहोळचे आमदार राजू खरे यांनी आधीच धनुष्यबाण घेतला है. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार वसंतराव देशमुख यांना स्वकीयांची मते मिळणार नसल्याने ते आता कधी निवडणूक लढणार असा प्रश्न समोर आला है0
0
Report
दौंड के पाटस में गैंगवार: हवेत चली गोली, 2 आरोपी गिरफ्तार
Rui, Maharashtra:दौंड तालुक्यातील पाटस येथे हवेत गोळीबार... दोन्ही संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून अन्य दोन आरोपी ऊसात पळून गेले त्यांचा शोध सुरू आहे. तरुणांच्या दोन गटात वाद झाल्यानंतर गोळीबार झाल्याची माहिती... हवेमध्ये तीन ते चार राऊंड फायर केल्याची माहिती. अहिल्यानगर जिल्ह्यातील काष्टीमधील काही तरुण आणि पाटसच्या तरुणांमध्ये भर दुपारी उन्हात वाद झाला, या हाणामारीत गावठी पिस्तौलमधून 3 ते 4 राऊंड फायर करण्यात आल्याची माहिती आहे. सुदैवाने यात जीवितहानी झाली नसून दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. तर अन्य काही आरोपी ऊसात पळून गेली असून त्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी घटना स्थळावरून रिकामी काडतुसे जप्त केली आहेत. मिळत असलेल्या माहितीनुसार, पाटस येथील गडदरे कॉम्प्लेक्स समोर ही घटना घडली आहे. काष्टी येथील काही गुंड प्रवृत्तीचे तरुण गडदडे कॉम्प्लेक्स समोर आले होते. त्यांची पाटस येथील काही तरुणांशी शाब्दिक बाचाबाची झाली. पुढे हा वाद वाढत गेला, दोन्ही गटांनी एकमेकांवर दगडफेक केली. त्यानंतर दोन्ही गटातील काही तरुणांनी गावठी पिस्तौल काढून हवेत गोळीबार केला. यात 3 ते 4 राऊंड फायर झाल्याची माहिती समोर येत आहे. गोळीबाराची माहिती मिळताच यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख आणि पाटस पोलीस घटनास्थळी दाखल झाले. याप्रकरणी काही संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान, हा गोळीबार नेमका कोणत्या कारणातुन झाला ? कोणत्या पिस्तूलमधून फायर करण्यात आला आणि यामध्ये कोण जखमी झाले आहे का ? याबत पोलिसांकडून अधिकृत माहिती अद्याप मिळालेली नाही. यवत पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.0
0
Report
Advertisement
अकोला के डापुरा में गाय चोरी: बैल ने चोरों के पीछे दौड़कर बचाई
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दापुरा गावात गायीची चोरी होत असताना तिला वाचविण्यासाठी एका बैलाने केलेली धडपड सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्यरात्री काही चोरटे आलिशान चारचाकी वाहनातून दापुरा गावात आले आणि त्यांनी एका गायीची चोरी केली. गायीला वाहनात घेऊन चोरटे पळ काढत असताना तिच्यासोबत असलेल्या बैलाने मोठ्याने हंबरडा फोडत वाहनाचा पाठलाग सुरू केला. विशेष म्हणजे, या बैलाने तब्बल दीड ते दोन किलोमीटरपर्यंत चोरट्यांच्या वाहनामागे धाव घेतłaली. आपल्या साथीदार गायीला वाचविण्याचा त्याचा हा प्रयत्न पाहून परिसरातील नागरिकही भावुक झाले. मात्र, बैलाच्या अथक प्रयत्नांनंतरही चोरटे गायीला घेऊन पसार होण्यात यशस्वी झाले. या प्रकरणी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात गायीच्या चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे. दरम्यान, गायीसाठी बैलाने दाखविलेली निष्ठा आणि तिच्या सुटकेसाठी केलेली धडपड सोशल मीडियावरही चर्चेचा विषय बनली आहे.0
0
Report
पिंपरी चिंचवड मंदिर के चादर मामले में पाकिस्तानी स्टिकर, पुलिस जांच शुरू
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पिंपरी चिंचवड के चिंचवड के मोरया गोसावी गणपती मंदिर के संकष्टी चतुर्थी पर खरीदी गई चादर पाकिस्तान निर्मित होने का दावा एक महिला ने किया और शहर में भारी हलचल मच गयी है। मोरया गोसावी मंदिर राज्यभर के गणेश भक्तों का श्रद्धास्थान है। संकष्टी चतुर्थी के समय यहाँ अधिक भीड़ होती है, इसलिए फेरीवाले भी यहाँ आते हैं। एक व्यापारी से चादर लेकर धोने पर मेड इन पाकिस्तान स्टिकर होने का दावा करते हुए महिला ने संताप प्रकट किया, जिसका वीडियो वायरल हो गया। इसके बाद चिंचवड पुलिस ने घटना का संज्ञान लिया है; शिकायत अभी दर्ज नहीं हुई है, लेकिन गंभीरता के कारण एक अधिकारी समेत टीम जांच के लिए तैनात की गई है; सीसीटीवी जाँच कर व्यापारी की तलाश की जाएगी। महापालिका को अनधिकृत फेरीवालों पर कार्रवाई के लिए पत्र भेजने की तैयारी भी की जा रही है। दूसरी तरफ क्षेत्र के व्यापारियों ने फेरीवालों पर गुस्सा व्यक्त किया है कि आज चादर विकीली, कल बॉम्ब भी बेच देंगे—जागरूकता और कार्रवाई की मांग की है। चादर विक्री प्रकरण ने कई प्रश्न खड़े किए हैं कि पाकिस्तानी चादर व्यापारी कैसे मिला, किसने दिया, कौन-कौन यहाँ शामिल है—इन सभी प्रश्नों के उत्तर पुलिस को देने होंगे।0
0
Report
पनवेल में स्मार्ट मीटर विरोध: मनसे आक्रमक, मीटर फोड़े गए
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल मद्ये बसवण्यात आलेल्या स्मार्ट मीटर विरोधात मनसे आक्रमक झाले आहेत, दिपेश पोपेटा मनसे उपतालुका अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली पनवेल महावितरण कार्यालयात जाब विचारण्यासाठी आला, स्मार्ट मीटर लावल्यानंतर लाईट बिल दुप्पट येत आल्याने मीटर फोडून याचा निषेध करण्यात आला0
0
Report
Advertisement
पंचगणी में विश्व पर्यावरण दिवस: वृक्षारोपण से रक्तदान तक पर्यावरण जागरण
Satara, Maharashtra:सातारा - जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पाचगणी गिरिस्थान नगरपरिषदेच्या वतीने विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. यावेळी सातारा जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पाचगणी टेबललँड येथे भेट देऊन टेबललँड माहिती पुस्तिकेचे प्रकाशन केले.पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण, स्वच्छता अभियान जनजागृती, पथनाट्य तसेच रक्तदान शिबिराचे आयोजन झाले.संत निरंकारी मंडळ (दिल्ली झोन-सातारा) आणि पाचगणी नगरपरिषद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित या कार्यक्रमात पर्यावरण संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. नागरिकांनीही उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला.0
0
Report
यवतमाळ में बदस्तूर हत्या: 24 घंटों में दो हत्या, शहर में दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मध्ये खुनाचे सत्र सुरूच असून आता 24 तासात दोन हत्या तर दोन प्राणघातक हल्ल्याच्या घटना घडल्या. जामणकर नगर एका युवकाला घरात घुसून तीक्ष्ण शस्त्राने वार करून ठार करण्यात आले. तर पांढरी येथे पाण्याचा वापर करण्याच्या किरकोळ कारणावरून पोटच्या मुलाने वृद्ध बापाला लोखंडी रॉडने मारहाण करून त्याची हत्या केली. आर्णी रोडवर एका तरुणावर शस्त्राचे घाव घालून त्याला जखमी करण्यात आले तर दिग्रस येथे जुन्या वादातून तरुणावर प्राणघातक हल्ला करून जखमी करण्यात आले. हत्येच्या घटनेने जिल्हा हादरला आहे.0
0
Report
उल्हासनगर अस्पताल में सर्पदंश से 3 वर्षीय की मौत, इलाज में देरी पर हंगामा
Ambernath, Maharashtra:उल्हासनगरात तीन वर्षाच्या चिमुकल्याला साप चावल्याने मृत्यू वेळेत उपचार नमिळल्याने मृत्यू झाल्याचा कुटुंबाचा आरोप मध्यवर्ती रुग्णालयात कुटुंबांचा मोठा गोंधळ उल्हासनगर येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयात सर्पदंशामुळे उपचारासाठी दाखल झालेल्या 3 वर्षीय बालकाचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला. डॉक्टरांनी वेळेत उपचार न केल्यामुळेच मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप करत संतप्त कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा गोंधळ घातला. यावेळी कुटुंबियांनी जो साप चावल्याने मुलाचा मृत्यू झाला तो सापच पकडून रुग्णालयात घेऊन आले त्यामुळे अधिकच गोंधळ निर्माण झाला, याआधीही उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात उपचारा अभावी नवजात बालकांच्या मृत्यूच्या आणि रुग्णालयात तोडफोड झाल्याच्या घटना घडल्या आहेत, मुलाचे नातेवाईक0
0
Report
Advertisement
कल्याण में नाले सफाई में नाबालिग का दोहन: ठेकेदार पर कड़ी कार्रवाई की तैयारी
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेत नालेसफाई एका अल्पवयीन मुलाकडून करून घेत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली परिसरात नाले सफाईचे काम सुरु आहे. पैसे वाचवण्यासाठी ठेकेदार सुरक्षा साहित्य दिले जात नसल्याचे उघड झाले आहे. या प्रकरणात ठेकेदाराचा विरोधात ठोस आणि कडक कारवाई करणार असल्याचे उपमहापौर राहूल दामले यांनी सांगितले. या घटनेवरून केडीएमसी अधिकारीांच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. अधिकारी यांचे नालेसफाईच्या कामावर लक्ष आहे का? नालेसफाई कशी होते? त्याच बरोबर ती कोणाकडून केली जाते हे पाहणे केडीएमसी अधिकाऱ्यांचे काम आहे.0
0
Report
मुरबाड पुलिस ने अवैध हाथभट्टी शराब के तीन ठिकाने ध्वस्त, 1.2 लाख मूल्य शराब बरामद
Ambernath, Maharashtra:१ लाख २० हजारांची हातभट्टीची दारू केली नष्ट मुरबाड पोलिसांची कामगिरी दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले पुण्यातील विषारी दारू प्रकरणांने संपूर्ण महाराष्ट्रात हादरून गेलाय. या पाश्र्वभूमीवर मुरबाड पोलिस ॲक्शन मोडवर आले आहेत, आज मुरबाड पोलिसांनी खोपिवली गावाच्या हद्दीत अवैधरित्या गावठी हातभट्टीची दारू निर्माण करणाऱ्या तीन ठिकाणी धडक कारवाई केली. या कारवाईत १ लाख २० हजार किमतीचे गुळ मिश्रित रसायन जागीच नष्ट करण्यात आले असून सुमारे ८० लिटर गावठी हातभट्टीची तयार दारू जप्त करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायावर प्रभावी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात मुरबाड पोलिसांना यश आले असून संबंधितांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात आली आहे. या कारवाईमुळे अवैध दारू व्यवसायिकांचे धाबे दणाणले आहेत. मुरबाड पोलीस प्रशासनामार्फत अवैध दारू व्यवसाया विरोधातील कारवाया पुढेही अशाच करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली।0
0
Report
पुणे के शिरूर में मानसूनपूर्व बारिश से कहर, होटल के फर्नीचर उड़े, फसल नुकसान
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूर शहर आणि परिसराला आज वादळी वाऱ्याच्या मान्सूनपूर्व पावसाने झोडपलंय, वादळी वाऱ्याच्या या पावसाने चक्क हॉटेलमधील खुर्च्या टेबल महामार्ग वर उडून आलेले पाहायला मिळाले असून या वादळी वाऱ्यााच्या पावसाने शेतीमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून अनेक घरांचे फळबागांचे हि मोठ्या प्रमाणात नुकसान झालंयं..0
0
Report
Advertisement
