Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत

Aug 20, 2024 06:38:06
Yavatmal, Maharashtra

यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 07:46:02
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ४१ नगरसेवकांचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ३८ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंना आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. सत्ता स्थापनेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार फील्डिंग सुरू असून, काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत महापौर पद कोणाकडे जाणार ? यावर अद्याप अंतिम निर्णय झालेला नसल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच अपक्ष उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, अकोला महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. काँग्रेसकडे तीन, वंचित बहुजन आघाडीकडे एक, तर उद्धव ठाकरे गटाकडे दोन महिला नगरसेविका असल्याने महापौर पदावरून चर्चा अडकल्याचं सांगण्यात येत आहे. महापौर पदावर एकमत न झाल्यामुळे चर्चा तात्पुरती थांबवण्यात आली असून, ५ नगरसेवकांची ताकद असलेल्या वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका मांडली आहे, ही चर्चा सकारात्मक झाली असून लवकरच आम्ही महा फोर चा उमेदवार जाहीर करू असं प्रकाश आंबेडकर यांनी म्हटल आहे. काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी सर्व विरोधी पक्षांना सोबत येण्यासाठी आवाहन केले आहे. तर वंचित बहुजन आघाडी सोबत सकारात्मक चर्चा झाली असून महापौर चा निर्णय प्रकाश आंबेडकर येथील असं काँग्रेसने म्हंटल आहे. दुसरीकडे भाजप सत्ता स्थापनेच्या अधिक जवळ असल्याचं चित्र आहे, कारण भाजपला बहुमतासाठी केवळ ३ नगरसेवकांची गरज आहे. तर भाजपकडे १३ ओबीसी महिला उमेदवार आहेत. तर भाजप लवकरच सत्ता स्थापन करणार असा दावा आमदार रणधीर सावरकर यांनी केला असून काही तासातच आम्ही सत्ता स्थापनेची घोषणा करू असं रणधीर सावरकर यांनी इन कॅमेरा प्रतिक्रिया न देता भ्रमणध्वनी द्वारे सांगितलं आहे. आता पाहूया आकड्यांचा खेळ नेमका कसा होऊ शकतो… भाजप समीकरण : भाजप – ३८ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – १ अपक्ष – १ एकूण : ४१ काँग्रेस समीकरण : काँग्रेस – २१ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ६ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ अपक्ष – १ एकूण : ३९ Graphics : अकोला महानगरपालिका – अंतिम आकडेवारी (एकूण जागा : ८०) भाजप – ३८ शिवसेना (शिंदे) – १ राष्ट्रवादी (अजित पवार) – १ शिवसेना (ठाकरे) – ६ काँग्रेस – २१ राष्ट्रवादी (शरद पवार) – ३ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ इतर – २ काँग्रेसचे आकडे पाहता, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र महायुतीतील हे मित्रपक्ष काँग्रेसला साथ देतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. जयेश जगड, झी मिडिया, अकोला
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Jan 23, 2026 06:50:43
Satara, Maharashtra:सातारा:फलटण तालुक्यातील सोमंथळी येथून एक अत्यंत थरारक घटना समोर आली आहे. अनैतिक संबंधांच्या अडथळ्यातून एका २७ वर्षीय तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. इतकेच नव्हे, तर हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपींनी मृतदेहाचे लाकूड कापण्याच्या मशीनने तुकडे करून ते नदी आणि शेततळ्यात फेकून दिल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. सतीश उर्फ आप्पा दादासो दडस, असं हत्या झालेल्या दुर्दैवी तरुणाचं नाव आहे. या क्रूर हत्याकांडाने संपूर्ण सातारा जिल्हा हादरून गेला आहे. प्रेम संबंधाच्या त्रिकोणातून फलटण तालुक्यात एक थरकाप उडवणारी आणि माणुसकीला काळिंबा फासणारी घटना घडली आहे.या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, एका महिलेसह तिच्या प्रियकराला आणि नवऱ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. या गुन्ह्यात एकूण तीन जणांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले आहे.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Jan 23, 2026 06:16:41
Shirdi, Maharashtra:मोबाइल, टीव्ही और खेळांच्या वाढत्या सवयींमुळे विद्यार्थ्यांचा अभ्यासाकडे असलेला ओढा कमी होत चाललाय. मात्र अहिल्यानगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यातील धांदरफळ बुद्रुक गावाने या समस्येवर भन्नाट उपाय शोधलाय. संध्याकाळी ठीक सात वाजता गावात वाजणारा एक भोंगा आज विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त निर्माण करतोय. हा खास रिपोर्ट. गावाच्या ग्रामपंचायत कार्यालयाच्या ईमारतीवर एक भोंगा बसवण्यात आला आहे. दररोज संध्याकाळी सात वाजता हा भोंगा वाजतो. त्या आवाजामुळे जवळपास दोन किलोमीटर परिसरात भाऊंची पांख उडते आणि गावात भान आल्यावर मुलं तात्काळ घरी परततात. सात वाजताच घरातील मोबाईल आणि टीव्ही बंद होते, आणि विद्यार्थी किमान दोन तास अभ्यासाला बसतात. आजकाल मुलं मोबाईल आणि टीव्हीत जास्त वेळ घालवतात. त्याचा अभ्यासावर परिणाम होत होता. म्हणून आम्ही हा भोंग्याचा उपक्रम सुरू केला. आता मुलं वेळेत घरी येतात आणि नियमित अभ्यास करत आहेत. उज्वला देशमाने, सरपंच: ग्रामपंचायत ने विद्यार्थ्यांच्या हितासाठी सुरू केलेल्या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये शिस्त, वेळेचे नियोजन आणि अभ्यासाची गोडी निर्माण होत असल्याचं चित्र सध्या गावात दिसून येत आहे. पूर्वी मुलं बाहेरच खेळत बसायची. आता सात वाजता भोंगा वाजला की लगेच घरी येतात आणि अभ्यासाला बसतात. ग्रामपंचायत ने सुरु केलेला हा उपक्रम उपयोगी ठरलाय. पालक: एका छोट्याशा भोंग्याच्या माध्यमातून संपूर्ण गावातील विद्यार्थ्यांच्या आयुष्यात शिस्त आणण्याचं काम सुरू आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 23, 2026 06:02:27
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 06:02:14
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेत सत्ता स्थापनेसाठी आवश्यक असलेला ४१ नगरसेवकांचा जादुई आकडा गाठण्यासाठी भाजप आणि काँग्रेस दोन्ही बाजूंनी जोरदार प्रयत्न सुरू आहेत. ३८ जागांसह भाजप सर्वात मोठा पक्ष ठरला असला, तरी कोणालाही स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी दोन्ही बाजूंना आकड्यांची जुळवाजुळव करावी लागत आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून जोरदार फील्डिंग सुरू असून, काल रात्री वंचित बहुजन आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत एका हॉटेलमध्ये सत्तास्थापनेसंदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली. मात्र या बैठकीत महापौर पद कोणाकडे जाणार ? यावर अद्याप अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती विश्वासार्ह सूत्रांनी दिली आहे. या बैठकीला काँग्रेस, वंचित बहुजन आघाडी, एमआयएम, राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन्ही गट, शिवसेना उद्धव ठाकरे गट तसेच अपक्ष उमेदवार उपस्थित होते. दरम्यान, अकोला महापालिकेत ओबीसी महिला आरक्षण जाहीर झाल्याने महापौर पदासाठी इच्छुकांची संख्या वाढली आहे. काँग्रेसकडे तीन, वंचित बहुजन आघाडीकडे एक, तर उद्धव ठाकरे गटाकडे दोन महिला नगरसेविका असल्याने महापौर पदावरून चर्चा अडकल्याचं सांगण्यात येत आहे. महापौर पदावर एकमत न झाल्यामुळे चर्चा तात्पुरती थांबवण्यात आली असून, आज ५ नगरसेवकांची ताकद असलेली वंचित बहुजन आघाडी आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. दुसरीकडे भाजप सत्ता स्थापनेच्या अधिक जवळ असल्याचं चित्र आहे, कारण भाजपला बहुमतासाठी केवळ ३ नगरसेवकांची गरज आहे. तर भाजपकडे १३ ओबीसी महिला उमेदवार आहेत. आता पाहूया आकड्यांचा खेळ नेमका कसा होऊ शकतो… भाजप समीकरण : भाजप – ३८ राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) – १ शिवसेना (एकनाथ शिंदे गट) – १ अपक्ष – १ एकूण : ४१ काँग्रेस समीकरण : काँग्रेस – २१ राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) – ३ शिवसेना (उद्धव ठाकरे गट) – ६ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ अपक्ष – १ एकूण : ३९ काँग्रेसचे आकडे पाहता, सत्ता स्थापनेसाठी काँग्रेसला राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि शिवसेना शिंदे गटाची मदत घ्यावी लागणार आहे. मात्र महायुतीतील हे मित्रपक्ष काँग्रेसला साथ देतील का, हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. अकोला महानगरपालिका – अंतिम आकडेवारी (एकूण जागा : ८०) भाजप – ३८ शिवसेना (शिंदे) – १ राष्ट्रवादी (अजित पवार) – १ शिवसेना (ठाकरे) – ६ काँग्रेस – २१ राष्ट्रवादी (शरद पवार) – ३ वंचित बहुजन आघाडी – ५ एमआयएम – ३ इतर – २
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 23, 2026 05:31:52
Nagpur, Maharashtra:नागपूर विदर्भात एकाच महिन्यात चार वाघांचा मृत्यू, उच्च न्यायालयाने घेतली गंभीर दखल, नागपूर खंडपीठाकडून जनहित याचिका दाखल करण्याचे आदेश. मागील वर्षी जानेवारीत २२ दिवसांत ११ वाघांचा मृत्यू, यंदाही वर्षाच्या सुरुवातीच चिंताजनक स्थिती. न्यायालयीन मित्र म्हणून अॅड. चैतन्य ध्रुव यांची नियुक्ती. ३१ डिसेंबरला वर्ध्यात वाघिणीचा मृत्यू, विद्युत कुंपणाचा शॉक लागून मृत्यू, मृतदेह पाणवठ्यात टाकल्याचा आरोप, १३ दिवस उलटूनही आरोपी अटक नाही, तपास यंत्रणांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह. पेंच व्याघ्र प्रकल्पात दोन बछड्यांचा मृत्यू, वाहनाच्या धडकेत मृत्यूची शक्यता, मात्र लढाईचा दावा. ११ जानेवारीला चंद्रपूरमध्ये वाघीण मृतावस्थेत, इरई नदी पात्रात मृतदेह, विद्युत कुंपणामुळे मृत्यूचा संशय, पुरावे नष्ट करण्यासाठी मृतदेह नदीत फेकल्याचा आरोप, ताडोबा अंधारी व्याघ्रप्रकल्पाजवळील घटना. वाघ मृत्यूदरात महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर, मानवी मृत्यू वाढत असतानाच वाघांचे मृत्यूही वाढले.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Jan 23, 2026 04:48:46
Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या विवाह सोहळ्यानिमित्त श्री विठ्ठल व रुक्मिणी मातेच्या गाभाऱ्यात, चौखांबी, श्री संत नामदेव पायरी, श्री विठ्ठल सभामंडप आदी प्रमुख ठिकाणी अत्यंत आकर्षक व देखणी फुलांची सजावट करण्यात आली आहे. या सजावटीसाठी सुमारे चार ते साडेचार टन फुलांचा वापर करण्यात आला असून त्यामध्ये गुलाब, आस्टर, लाल व पिवळा झेंडू, जरबेरा, ऑर्किड, शेवंती, बिजली आदी विविध प्रकारच्या व रंगांच्या फुलांचा समावेश आहे. संपूर्ण सजावट अत्यंत कलात्मक पद्धतीने साकारण्यात आली असून यासाठी 50 ते 60 कुशल कारागिरांनी अथक परिश्रम घेतले आहेत. सदरची फुलांची सजावट श्री विठ्ठल भक्त भारत दिलीप भुजबळ (पुणे) यांनी सेवाभावी वृत्तीने व पूर्णतः मोफत स्वरूपात करून दिली आहे. या आकर्षक फुलसजावटीमुळे मंदिर परिसर अधिकच मनोहारी व भक्तिमय झाल्याने भाविकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 23, 2026 04:46:00
Nagpur, Maharashtra:नागपूर - सहावीतील विद्यार्थ्याला ई-सिगारेटचे व्यसन जडले, शहरातील नामांकित शाळेत धक्कादायक प्रकार उघड, - कोचिंग क्लासच्या व्हॅनचालकाने लावले पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलाला व्यसन, धक्का दायक बाब उघडकीस... - वरुण सोनी असे आरोपीचे नाव आहे.. त्याने अल्पवयीन विद्यार्थ्याला ई-सिगारेटची लावली सवय.. - विशेष म्हणजे पोलिस कर्मचाऱ्याचा मुलगा आहे, व्यसनासाठी घरातून पैसे चोरण्यापर्यंत मुलाची गेली होती मजल - या व्यसनामुळे मुलाची प्रकृती बिघडली, शाळेच्या स्वच्छतागृहात ई-सिगारेट ओढताना सुरक्षारक्षकाच्या लक्षात आल्यानंतर प्रकार उघडकीस. - आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली, इतर विद्यार्थ्यांनाही ई-सिगारेट देण्याचा प्रयत्नात असल्याची माहिती... - गिट्टीखदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल, अल्पवयीन न्याय कायदा आणि सिगारेट-तंबाखू अधिनियमान्वये कारवाई. - पालकांमध्ये तीव्र चिंता, शाळा आणि कोचिंग परिसरातील सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Jan 23, 2026 04:33:39
Wardha, Maharashtra:हिंगणघाटच्या नांदगाव कचरा डेपोला भीषण आग अँकर - हिंगणघाट शहरालगतच्या नांदगाव (बो) येथील कचरा डेपोला भीषण आग लागली. आगीमुळे संपूर्ण परिसरात धुराचे लोट पसरले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मात्र ही आग अपघाताने लागली की जाणीवपूर्वक लावण्यात आली, याबाबत संशय व्यक्त होत आहे. प्रशासक राजवट संपल्यानंतर कचरा व्यवस्थापनातील खर्च आणि कामांची चौकशी अपेक्षित असताना ही घटना घडल्याने संशय बळावला आहे. कचरा डेपोतील संभाव्य कागदपत्रे व पुरावे नष्ट करण्याचा हा प्रयत्न असल्याचा आरोप नागरिकांकडून होत असून घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Jan 23, 2026 04:18:46
Amravati, Maharashtra:पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल; या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा पलटवार अँकर :- एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी टीका केली आहे. पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कुणी किती म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या विचाराचा रक्त घेऊन आम्ही काम करतो या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही असेही नवनीत राणा म्हणाल्या आहे. साऊंड बाईट :- नवनीत राणा, माजी खासदार व भाजप नेत्या
0
comment0
Report
WJWalmik Joshi
Jan 23, 2026 04:05:32
Jalgaon, Maharashtra:जळगाव, Anch जळगाव तालुक्यातील आव्हाणे येथील जुना मारुती मंदिर परिसरात किरकोळ वादातून एका तरुणाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना घडली. सागर अरुण बिळ्हाडे याचा एका व्यक्तीसोबत वाद झाला. या वादाचे हाणामारीत रूपांतर झाले असून ढकलल्याने डोक्याला गंभीर मार लागल्यामुळे सागरला जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दाखल करण्यात आले; मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. सागरला डॉक्टरांनी मृत घोषित करतात नातेवाईकांनी एकच आक्रोश केला. यामुळे रात्री उशिरापर्यंत जिल्हा रुग्णालयात तणावाचे वातावरण होते. तर दुसरीकडे, जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जिल्हा रुग्णालयात येऊन नातेवाईकांकडून घटनेची माहिती घेत तपास चक्रे वेगाने फिरवायला सुरूवात केली होती. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Jan 23, 2026 04:04:11
0
comment0
Report
Advertisement
Back to top