icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पालघर के मंत्री गणेश नाईक ने वसई-विरार में बाढ़ से स्थिति का निरीक्षण किया

Vasai-Virar, Maharashtra:पालघर जिल्ह्याच्या पालकमंत्री गणेश नाईक यांनी आज वसई-विरारमधील पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी अनधिकृत बांधकामे, नाले व भरावांवरील बांधकामांमुळे पूरस्थिती गंभीर झाल्याचे सांगितले. अनेक भागांतील परिस्थिती अत्यंत वाईट असल्याचे त्यांनी नमूद केले. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षलागवडीवर भर देत भविष्यात इलेक्ट्रिक वाहनांचाच काळ असेल, असेही ते म्हणाले. अनधिकृत बांधकामे तोडण्यात तर येणार नाही मात्र महसूल विभागामार्फत आवश्यक कॅबिनेट मंजुरी घेऊन पात्र रहिवाशांना त्यांच्या राहत्या जागेचा मालकी हक्क देण्याबाबत शासन सकारात्मक असल्याची माहितीही त्यांनी दिली.
0
0
Report

मैपिंग से मालेगांव घोटाला, किरीट सोमय्या ने चुनाव आयोग से आठ दिन की मोहलत मांगी

Ahilyanagar, Maharashtra:मैपिंग से मालेगांव घोटाला, किरीट सोमय्या ने चुनाव आयोग से आठ दिन की मोहलत मांगी Oh, अहिल्यानगर महापालिकेत जुन्या नोंदीच्या नावाखाली १५ हजार बेकायदेशीर जन्म प्रमाणपत्र दिले आहेत, या १६ महिन्यात १८ हजार ७०० जुने दाखले दुरुस्त करून दिले आहेत असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला आहे...किरीट सोमय्या आज अहिल्यानगर दौऱ्यावर असताना त्यांनी जिल्हाधिकारी यांची भेट घेतली... नंतर ते माध्यमांशी बोलत होते... भाजप नेते सोमय्या म्हणाले की, या सर्व प्रकरणाची चौकशी करण्याचा निर्णय राज्य सरकारने केला... याबाबत आज जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी पंकज आशिया आणि महापालिका आयुक्त यशवंत डांगे यांच्या समवेत सर्व बाबींचा आढावा घेतला आहे. डोंबिवली येथे झालेल्या डॉक्टर मारहाण प्रकरणी संबंधितांवर कारवाई झाली पाहिजे या घटनेचा आम्ही निषेध करतो असं सोमय्या म्हणाले.
0
0
Report

दहिसर में मिलावटी दूध बनाने वाले गिरोह के एक सदस्य की गिरफ्तारी, भारी मात्रा पकड़ी

Mumbai, Maharashtra:गुन्हे शाखे युनिट १२ ने मुंबईतील दहिसर पूर्व येथे एक मोठी कारवाई केली आहे. बनावट दुधाचे उत्पादन आणि विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश करण्यात आला असून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई अन्न व औषध प्रशासन (FDA) यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आली. मिळालेल्या माहितीनुसार, दहिसर पूर्व येथील रोजारी कंपाऊंडमधील एका गोदामात नामांकित कंपन्यांच्या दुधाच्या पाऊचमध्ये बेकायदेशीरपणे पाणी आणि इतर घटक मिसळून बनावट दूध तयार केले जात होते. त्यानंतर हे पाऊच पुन्हा सील करून बाजारात अस्सल दूध म्हणून विकले जात होते, ज्यामुळे जनतेच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण झाला होता. गुप्त माहितीच्या आधारे, गुन्हे शाखा युनिट १२ आणि अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांनी घटनास्थळी छापा टाकला. या कारवाईदरम्यान, अंदाजे ४७० लिटर भेसळयुक्त दूध, दुधाचे पाऊच, पॅकिंग स्प्रेअर, सीलिंग मशीन आणि इतर उपकरणे जप्त करण्यात आली. या प्रकरणात पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. आता पोलीस त्या भागांचा तपास करत आहेत, जिथे या भेसळयुक्त दुधाचा पुरवठा केला जात होता आणि या रॅकेटमध्ये आणखी कोण सामील आहे. पोलिसांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, दूध खरेदी करताना त्याच्या पॅकेजची गुणवत्ता, सील आणि मुदतची तारीख तपासावी. जर त्यांना कोणतीही भेसळ किंवा संशयास्पद बाब आढळल्यास, त्यांनी तात्काळ पोलिस किंवा अन्न व औषध प्रशासनाला कळवावे. दहिसर पोलिसांच्या या कारवाईमुळे भेसळयुक्त अन्नपदार्थांच्या व्यापारात गुंतलेल्यांमध्ये घबराट पसरली असून, पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे सेना के नगरसेवकों ने आयुक्त को घेरा, सात दिनों में समाधान नहीं तो जनआंदोलन

Nashik, Maharashtra:नाशिकमधले रस्ते आणि साचणारे पाणी यावर ठाकरे सेनेच्या नगरसेवकांनी आयुक्तांना घातला घेराव, सात दिवसात प्रश्न निकाली निघाला नाही तर जन आंदोलन छेडणार ठाकरे सेनेचा प्रशासनाला इशारा... अँकर: नाशिक मध्ये दोन दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते फसले तर काही ठिकाणी नागरिकांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप सहन करावा लागला या संदर्भात आज उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सर्व नगरसेवक आणि पदाधिकारीांनी महापालिका आयुक्त यांना या संदर्भात जाब विचारत प्रश्नांचा भडीमार केला तात्काळ या नाशिक शहरातील रस्ते आणि साचणारे पाणी यावर निर्णय घेऊ असे आश्वासन महापालिका आयुक्तांनी दिला मात्र सात दिवसात जर प्रश्न निकाली निघाला नाही तर जनआंदोलन छेडणार असा इशारा ठाकरे सेनेकडून महापालिका प्रशासनाला देण्यात आला आहे.
0
0
Report

शिर्डी से पंढरपूर पालखी यात्रा: साईं बाबा के मार्गदर्शन में 20वां वर्ष शुरू

Shirdi, Maharashtra:राज्यभरातून हजारो छोट्या मोठ्या पायी पालखी आणि दिंड्या पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाल्या आहेत.. आज साईबाबांच्या शिर्डीतूनही पायी पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झालंय.. साई संस्थानच्या सहकार्याने आणि काशिकानंद महाराजांच्या मार्गदर्शनाखाली साईबाबा पालखी सोहळ्याचे 20 वे वर्ष आहे.. राहाता येथे पालखीचा पहिला मुक्काम असून साई संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर हे पहिल्या मुक्कामापर्यंत पायी पालखीत सहभागी झाले आहेत.. साईबाबांनी आपल्या भक्ताला विठ्ठल स्वरूप दर्शन दिल्याचा उल्लेख साईचरित्रात असून आजही शिर्डीत कोणताही व्हीआयपी आला तर पाद्य पूजा करून साई दर्शनाची सुरूवात " शिर्डी माझे पंढरपूर" या आरतीने होते.. विठुरायासह साईनामाचा जयघोष करत वारकरी शिर्डीहून पंढरपूरच्या दिशेने निघाले असून जणु काही साईबाबा विठ्ठलाच्या भेटीला निघाल्याचा अनुभव या पालखी सोहळ्यात येतोय..
0
0
Report

एमपीएससी की सभी परीक्षाएं ऑफलाइन हों: कांग्रेस का अनिश्चितकालीन उपवास

Navi Mumbai, Maharashtra:एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी एमपीएससी कार्यालया खाली काँग्रेसचे बेमुदत साखळी उपोषण.एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाइन पद्धतीने व्हाव्यात या प्रमुख मागणीसाठी नवी मुंबई जिल्हा काँग्रेस तर्फे बेमुदत साखळी उपोषण आणि ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. नवी मुंबईतील बेलापूर येथे एमपीएससी कार्यालयाच्या खालीच काँग्रेस तर्फे हे बेमुदत साखळी उपोषण करण्यात येतं आहे. ऑनलाईन परीक्षा घेतल्यास विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो अनेक विद्यार्थी परीक्षेपासून वंचित राहू शकतात त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना समान संधी मिळावी यासाठी एमपीएससीच्या सर्व परीक्षा ऑफलाईन पद्धतीनेच घेण्यात याव्यात अशी मागणी काँग्रेस तर्फे करण्यात आलेय. यावेळी जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांच्या न्याय हक्कासाठी आमचं बेमुदत साखळी उपोषण सुरूच राहील असा इशारा नवी मुंबई काँग्रेस जिल्हाध्यक्ष आबा दळवी यांनी दिलाय.
0
0
Report
Advertisement

शिर्डी दर्शन: VIP पास महंगा, अब 300 रुपये; सामान्य भक्तों के लिए पास कीमत स्थिर

Shirdi, Maharashtra:साईंच्या दर्शनासाठी देश विदेशातून दररोज हजारो भाविक शिर्डीत येतात.. मात्र अनेकदा भक्तांना घाई असल्याने ते सशुल्क पास घेऊन दर्शन घेतात.. अनेक वर्षांपासून सशुल्क पास दर्शनाला दोनशे रुपये प्रति व्यक्ती अशा पद्धतीने पास दिला जातो.. मात्र आता सामान्य भक्तांसाठी सशुल्क पास दोनशे रुपये ठेवण्यात आला असून व्हीआयपी साठी हाच पास आता शंभर रुपयांनी महागला आहे.. हा पास घेतल्यानंतर भक्ताला प्रोटोकॉल देत दर्शन दिला जाणार आहे.. साईबाबा संस्थानच्या वतीने ब्रेक दर्शन व्यवस्था सुरू केली गेली गेली.. VIP शिफारस पत्र असलेल्या भक्तांना ब्रेक दर्शन व्यवस्थेत सकाळी नऊ ते दहा दुपारी अडीच ते साडेतीन आणि रात्री आठ ते साडेआठ या वेळेत प्रति व्यक्ती 200 रुपयांना सशुल्क पास घेऊन दर्शन दिलं जातं... व्हीआयपी आणि शिफारस पत्र असलेल्या साईभक्तांना ही सुविधा मिळते.. आणि आता याच पास साठी व्हीआयपी भक्तांना आता 200 ऐवजी 300 रुपये मोजावे लागणार आहे.. निर्धारित वेळेतच या साई भक्तांना दर्शन मिळणार असून एकत्रित पद्धतीने सर्वांना दर्शन दिले जाणार आहे.. मात्र घाई असलेल्या सामान्य भक्तांच्या सशुल्क पास दरामध्ये कुठलाही बदल करण्यात आलेला नसल्याची माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्षक गाडीलकर यांनी दिली...
0
0
Report

नेवी मुंबई में घरफोड़ीत सरगर्मी: आरोपी के 62 केस, 21 लाख से अधिक सोना-चांदी जब्त

Navi Mumbai, Maharashtra:Anchor -: रबाळे एमआयडीसी परिसरात झालेल्या घरफोडी गुन्ह्याचा तपास करत असताना नवी मुंबई गुन्हे शाखेने भिवंडी येथून एका सराईत चोरट्याला ताब्यात घेत कसून चौकशी केली असता त्याच्यावर याआधी 49 घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले असून 13 गुन्हे नवी मुंबईतील विविध पोलिस ठाण्यात दाखल असल्याचे स्पष्ट झालेय. या सराईत चोरट्यावर एकूण 62 गुन्हे असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी लक्ष्मण शिवशरण कडून पोलीसांनी 21 लाख 25 हजारांचे सोने आणि चांदीचे दागिने जप्त केले आहेत. याप्रकरणी आरोपीला पोलिस कोठडी सुनावण्यात आली असून गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

महाराष्ट्र में किसान कर्ज माफी की शर्तें निरस्त करने की मांग पर विरोध प्रदर्शन

Shirdi, Maharashtra:शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द कराव्यात या मागणीसाठी महाराष्ट्रभर झालेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर परदेशी समिती बरोबर बैठक आयोजित करण्यात आली होती...मात्र ही बैठक राजकीय हस्तक्षेप करत रद्द करण्यात आली. किसान सभेच्या वतीने या घटनेचा राज्यभर निषेध करत निदर्शने करण्याचा निर्णय घेण्यात आला असून अकोले येथे यानुसार या घटनेचा तीव्र निषेध करत निदर्शने करण्यात आली. शेतकरी कर्जमाफीच्या अटी शर्ती रद्द करा ही मागणी यावेळी करण्यात आली. उद्या आणि परवा दोन दिवस सलग अशीच निदर्शने राज्यभर किसान सभेच्या वतीने करण्यात येणार असल्याच किसान सभेचे राज्यसचिव डॉ.अजित नवले यांनी म्हणटलय
0
0
Report
Advertisement
0
0
Report

रेमेश म्हात्रे की वीडियो कॉन्फरंसिंग पर कोर्ट का इनकार, प्रत्यक्ष हाज़िरी जरूरी

Kalyan, Maharashtra:रमेश म्हात्रे याचा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगला कोर्टाचा नकार? ‘फिजिकली हजर करा’, न्यायालयाचे पोलिसांना निर्देश 73 वर्षीय रमेश म्हात्रे आजारी असल्याचा दावा; तरी कोर्ट म्हणाले – समोर आणल्याशिवाय अटक वैध नाही डोंबिवलीतील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सुनावणीत आज कल्याण सत्र न्यायालयात मोठा ट्विस्ट पाहायला मिळाला. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्याची मागणी बचाव पक्षाने केली. मात्र न्यायालयाने आरोपीला प्रत्यक्ष समोर हजर करण्याचे निर्देश देत, त्याशिवाय कस्टडी आदेश देणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयातील महिला डॉक्टर, नर्स आणि कर्मचाऱ्यांवरील मारहाण प्रकरणातील मुख्य आरोपी शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांच्या सुनावणीला आज कल्याण न्यायालयात सुरुवात झाली. ठाणे सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याने रमेश म्हात्रे यांना व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे न्यायालयासमोर हजर करण्यासाठी त्यांच्या वतीने अर्ज दाखल करण्यात आला. आरोपीचे वकील अॅड. अजित पथकी यांनी म्हात्रे यांचे वय 73 वर्षे असून ते आजारी असल्याचा युक्तिवाद केला. मात्र युक्तिवाद ऐकल्यानंतर न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग तथा सरन्यायाधीश श्रीमती के. एस. कातकडे यांनी कठोर भूमिका घेत आरोपीला प्रत्यक्ष न्यायालयासमोर हजर करण्याचे निर्देश दिले. "जोपर्यंत आरोपी माझ्यासमोर प्रत्यक्ष हजर होत नाही, तोपर्यंत कस्टडी आदेश देणार नाही," असे न्यायालयाने स्पष्ट केले.दरम्यान, डॉक्टर आरोपीला न्यायालयीन प्रक्रियेसाठी फिट घोषित करतात का आणि पोलिस पुढे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. रमेश म्हात्रे यांना प्रत्यक्ष न्यायालयात आणले जाणार की न्यायालयाकडून अन्य आदेश दिले जाणार, याचा निर्णय आता पुढील सुनावणीत स्पष्ट होणार आहे. Byte.. आनंद पतकी आरोपी चे वकील
0
0
Report
Advertisement

जुन्नर वाडेज डॅम ओव्हरफ्लो: मजबूत पावसामुळे डॅम kapasity पूर्ण; मीना नदी विसर्ग सुरू, गावांना सतर्कतेचा इशारा

Shirur, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कुकडी प्रकल्पातील वडज धरण शंभर टक्के भरले आहे. धरणाची पाणीपातळी नियंत्रित ठेवण्यासाठी धरणातून मीना नदीपात्रात सुमारे 16 हजार क्यूसेक वेगाने पाण्यांचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ होण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने मीना नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागरिकांनी नदीपात्रात जाणे टाळावे, तसेच जनावरे व शेतीसंबंधित साहित्य सुरक्षित ठिकाणी हलवावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
0
0
Report

रायगढ़ में भारी बारिश से धान की फसल संकट में, MIDC पानी से रोप प्रभावित

Chendhare, Maharashtra:पावसामुळे रायगड मधील भातपिकांवर संकट... महाड खाडीपट्ट्यात रोपे कुजल्याने नुकसान पुराच्या पाण्याने वेढले तर एम आय डी सी च्या पाण्याचे संपवले.... महाड खाडी पट्टय़ातील शेतकरी हवालदिल.... रायगड जिल्ह्यात झालेल्या जोरदार पावसामुळे सलग पाच दिवस पुराचे पाणी शेतीमध्ये राहिले त्यामुळे पेरणीनंतर येणारी रोपं हि संकटात आली. त्यातच महाड एम आय डी सी चे रासायनिक दुषित पाणी पुराच्या पाण्यात सोडण्यात आल्याने आधीच पुराच्या पाण्याने संकटात आलेली रोपं रासायनिक पाण्यामुळे पुर्णपणे कुजली आहेत पावसाळ्यात भाताच्या शेतीवरती अवलंबून असणाऱ्या महाड तालुक्याच्या खाडी पट्ट्यातील शेतकऱ्यांना याचा मोठा फटका बसला आहे.
0
0
Report

राज्यभर के शिक्षक अकोला में प्रदर्शन कर मांगों पर तत्काल कार्रवाई की मांग

Akola, Maharashtra:Anchor : राज्यभरातील शिक्षकांनी आज विविध प्रलंबित मागण्याांसाठी एल्गार पुकारला. शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अकोल्यातही जिल्हाधिकारी कार्यालयावर विविध शिक्षक संघटनांनी एकत्र येत जोरदार निषेध आंदोलन केले. टीईटी अनिवार्यतेबाबत न्याय्य निर्णय, बीएलओच्या कामातून शिक्षकांची कायमस्वरूपी मुक्तता, संच मान्यता शासन निर्णय रद्द करणे आदी मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले.जिल्हाधिकारी कार्यालयासमोर महाराष्ट्र राज्य मध्यवर्ती शिक्षक संघटना, प्राथमिक शिक्षक समिती, मुख्याध्यापक संघ, खाजगी माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक संघटना तसेच महानगरपालिका आणि नगरपरिषद शिक्षक संघटनांच्या पदाधिकारी व शिक्षकांनी मोठ्या संख्येने एकत्र येत निदर्शने केली. यावेळी सरकारविरोधात घोषणाबाजी करत विविध प्रलंबित मागण्या तातडीने मंजूर करण्याची मागणी करण्यात आली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top