445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कोल्हापुर के सोळांकूर गाँव में माकड़ हमला: 63 घायल, ऑपरेशन मॉंकी तेज
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी तालुक्यातील सोळांकूर गावात एका माकडामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार दिवसांत या माकडाने तब्बल 63 जणांना चावा घेत जखमी केले असून, दोन जणांना सीपीआर रुग्णालयात दाखल करावे लागले आहेत. त्यामुळे गावात अक्षरशः कर्फ्यूसदृश्य स्थिती निर्माण झाली आहे. माकडाला पकडण्यासाठी वनविभाग, रेस्क्यू टीम आणि गावातील तरुण हातात काठ्या घेऊन शोधमोहीम राबवत आहेत. वनविभागाने भूल देण्यासाठी ट्रॅंक्विलायझर डार्टचा वापर केला, मात्र माकडाने तो क्षणार्धात काढून फेकल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. या माकडाला यापूर्वी इजा झाल्याने ते आक्रमक झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. दरम्यान, ग्रामसभेत “ऑपरेशन मंकी” अधिक तीव्र करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, गावकरी अजूनही दहशतीखाली आहेत.0
0
Report
नाशिक में सिंहस्थ कुंभ के दौरान सड़क निर्माण, सुरक्षा इंतजाम न के बराबर, नागरिक चिंतित
Nashik, Maharashtra:अँकर सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात अनेक ठिकाणी रस्त्याची कामे सुरू आहेत... मात्र हे रस्त्याचे काम सुरू होत असताना नागरिकांना मोठा मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागतोय... गेल्या अनेक दिवसांपासून हे काम संतगतीने होत असल्याचा आरोप नागरिकांनी व्यक्त केलाय... सिंहस्थ कुंभमेळा नाशिक साठी महत्त्वाची गोष्ट असली तरी शहराचा विकास करत असताना नाशिककरांची काळजी घेणे देखील महत्त्वाची असल्याचं नागरिकांनी सांगितले... रस्त्याचं काम सुरू असताना अनेक ठिकाणी रस्त्याच्या काम सुरू असताना सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाही...यामुळे रस्त्यात अनेक मोठे अपघात होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे... तर रस्त्यात एका बाजूला काम सुरू असताना दुसऱ्या बाजूने राहणारे सुरू असते मात्र त्या ठिकाणी देखील रस्त्याच्या कडेला मोठ-मोठे खड्डे खंदून ठेवल्यामुळे अपघाताला निमंत्रण मिळत असल्याची भावना नागरिकांनी व्यक्त केली आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
परळी में तलवारों के साथ भिड़ंत: दो गुटों के बीच विवाद, पुलिस ने दर्ज किया मामला
Beed, Maharashtra:बीड़: परळी के धर्मापुर रोड पर तलवारें खींची गईं; दो समूहों के बीच विवाद परळी ग्रामीण थाना में दर्ज मामला, तलवारों का वीडियो सामने आया है।0
0
Report
Advertisement
शिक्रापुर पुलिस ने नवजात को सुरक्षित लौटाकर मानवता की मिसाल कायम की
Shirur, Maharashtra:शिक्रापुर तालुक्यात शिक्रापूर में मानवता की मिसाल बनते हुए एक संवेदनशील घटना घटी। शिक्रापुर नदी किनारे एक अज्ञात ने नवजात बालक छोड़ दिया था। स्थानीय पत्रकार शेरखान शेख और शिक्रापुर पुलिस की सतर्कता से चिमुकड़े को समय पर उपचार मिला और नवजीवन मिला। ग्रामीण अस्पताल के डॉक्टरों ने बालक को प्राथमिक उपचार दिया। इसके बाद बालक को बाल कल्याण समिति के ज़रिये पुणे की भारतीय समाज सेवा संस्था में दाखिल किया गया। पुणे जाते समय शिक्रापुर पुलिस ने सरकारी वाहन को फूलों से सजाया और बालक के लिए नए कपड़े और सामान खरीदे गए। पुलिस की इस संवेदनशीलता से 'खाकी में मानवता' की एक अनोखी तस्वीर सामने आई, शहर में पुलिस के प्रति प्रशंसा बढ़ी। इस प्रकरण में अज्ञात पालकों के खिलाफ अपराध दर्ज करने की प्रक्रिया शुरू है。0
0
Report
सहजपूर-खामगाव सड़क दुरुस्त न होने पर उमेश मेहत्रे का मुंडन आंदोलन
Rui, Maharashtra:सहजपूर फाटा ते खामगाव फाटा रस्त्याची दुरावस्था....शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेश मेहत्रे यांचं मुंडण आंदोलन Anchor_ दौंड तालुक्यातील सहजपूर फाटा ते खामगाव फाटा दरम्यान रस्त्याची दुरावस्था झाली असून या बाबीकडे प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी उमेश मेहत्रे यांनी मुंडण आंदोलन केलं आहे.वेळोवेळी सार्वजनिक बांधकाम विभागाला रस्त्याच्या दुरुस्तीसाठी मागण्या करून देखील मागणी पूर्ण होत नसल्यास मुंडन आंदोलन करत त्यांनी याचा निषेध नोंदवला आहे. याशिवाय सहजपूर रेल्वे गेटच्या उड्डाणपूल रखडलेलं काम ही तात्काळ सुरू कराव अशी मागणी त्यांनी केली آهي.0
0
Report
गडचिरोली में गर्मी के कहर से पानी की कमी: सैकड़ों चमगादड़ों की तड़फड़ कर मौत
Gadchiroli, Maharashtra:टायटल:--- वाढत्या तापमानाचा कहर, पाण्याअभावी शेकडो वटवाघळांचा तडफडून मृत्यू, गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागील घटना अँकर:-- गडचिरोली जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत आहे.या उष्णतेची सर्वात मोठी झळ आता पक्षी आणि वन्यजीवांना बसत आहे. पाण्याअभावी तब्बल 500 हून अधिक वटवाघळांचा तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिरोंचा तालुक्यात समोर आलीये. सध्या गडचिरोली जिल्ह्यात तापमानाचा पारा 47 अंशांच्या उंबरठ्यावर पोहोचलेला आहे. मात्र जंगल परिसरात कृत्रिम पाणवठ्यांची कोणतीही व्यवस्था नसल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय. सिरोंचा जिल्हा परिषद शाळेच्या मागे वन विभागाच्या कंपाउंडमधील झाडांवर शेकडो वटवाघळाचे वास्तव्य आहे. मात्र वटवाघळांनी पाण्यासाठी अक्षरशः जीव सोडल्याचं चित्र पाहायला मिळालं. विशेष म्हणजे, दरवर्षी उन्हाळ्यात वन्यप्राण्यांसाठी उपाययोजनांच्या घोषणा केल्या जातात. मात्र प्रत्यक्षात पाण्याची सोयच नसल्यामुळे शेकडो वन्यजीवांचा बळी गेल्यानं वन विभागाच्या नियोजनावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहेत.0
0
Report
Advertisement
शिक्रापुर में 2.03 करोड़ रुपये के अवैध शराब का बड़ा जखीरा पकड़ा गया
Shirur, Maharashtra:पुणे अहिल्यानगर महामार्गावरील शिक्रापूर येथे राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत तब्बल 2 कोटी 3 लाख रुपयांचा अवैध दारू साठा जप्त केला असून गोवा मध्य प्रदेश कर्नाटक या राज्यातून अवैधरीत्या महाराष्ट्रात विक्रीसाठी आलेल्या दारूच्या साठ्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोठी कारवाई करत जप्त केलाय.0
0
Report
चांदवड में कांदा उत्पादक किसानों के महा मोर्चे में अंबादास दानवे पहुंचे
Chandvad, Maharashtra:चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा क्रांती महामोर्चा आयोजित करण्यात आला असून याप्रसंगी महाविकास आघाडीच्या वतीने शिवसेनेचे माजी विरोधी पक्षनेते तथा आमदार अंबादास दानवे मोर्चा स्थळी दाखल झाले असल्याची माहिती आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी दिली0
0
Report
नाशिक के चांदवड़ में प्याज किसानों का मोर्चा; सरकार के खिलाफ प्रदर्शन
Chandvad, Maharashtra:नाशिकचा चांदवड मध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांचा मोर्चा आंदोलनाकडे राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे लक्ष.. आमदार रोहित पवार , शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची उपस्थिती0
0
Report
Advertisement
सातारामधील कारंडवाडी भंगार दुकान में भीषण आग, दमकल ने बुझाई आग
Satara, Maharashtra:सातारा - सातारा नवीन एमआयडीसी येथील कारंडवाडी या ठिकाणी एका भंगार दुकानाला आज सकाळी अचानक भीषण आग लागली. या आगीमध्ये भंगार चे दुकान पूर्णपणे जळून खाक झाले असून सातारा नगरपालिकेची अग्निशामक दलाची गाडी आणि स्थानिक नागरिकांच्या मदतीने ही आग विझवली यावेळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.0
0
Report
लातूर में विलासराव देशमुख की 81वीं जयंती पर श्रद्धांजलि कार्यक्रम
Latur, Maharashtra:महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्या ८१ व्या जयंतीनिमित्त लातूर जिल्ह्यातील बाभळगाव येथील विलास बाग येथे अभिवादनाचा कार्यक्रम पार पडला आहे. यावेळी वैशालीताई विलासराव देशमुख, माजी मंत्री दिलीपराव देशमुख, आमदार अमित देशमुख, धीरज देशमुख आणि खासदार डॉ. शिवाजी काळगे उपस्थित राहून त्यांनी विलासराव देशमुख यांना आदरांजली वाहिली. यावेळी कार्यकर्ते आणि नागरिकांनी मोठी गर्दी करत आपल्या नेत्याप्रती आदरभाव व्यक्त केला. विलासराव देशमुख यांच्या आठवणींना उजाळा देत बाभळगाव परिसरात भावनिक वातावरण पाहायला मिळत आहे.0
0
Report
वसई बोळींज अस्पताल में भारी गड़बड़, विपक्ष ने किया पर्दाफाश
Vasai-Virar, Maharashtra:वसई पालिकेच्या बोळींज रुग्णालयाचा भोंगळ कारभाराचा पर्दाफाश. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांकडून रुग्णालयातील वस्तुस्थितीचा भांडाफोड. कोट्यावधीची सामग्री, औषधे अनेक वर्ष धुळखात पडून. विरार महानगरपालिकेच्या बोळींज माता बालसंगोपन रुग्णालयाचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आला आहे. विरोधी पक्ष नेते मनोज पाटील, गटनेते अशोक शेळके यांनी विरार पश्चिमेकडील बोळींज रुग्णालयात भेट दिल्या नंतर भयानक वास्तव समोर आले आहे ... कोट्यावधीं किंमत असलेली सामग्री, औषधे, प्रोटीनचे डबे, अनेक वर्ष धूळ खात असलेल्या अवस्थेत आढळून आले. रुग्णालयाच्या या इमारतीला लिकेज होऊन पाणी गळती सुद्धा मोठ्या प्रमाणात होत आहे.. तसेच विविध उपकरणे धुळखात पडले आहेत. बेड खुर्च्या.. रुग्णांसाठी देण्यात येणारे बेडशीट असताना सुद्धा रुग्णांना ते देण्यात येत नव्हते.. त्यांना घरून कपडे आणायला सांगितले जात असल्याचा आरोप विरोधी पक्ष नेते मनोज पाटील यांनी केला आहे.0
0
Report
Advertisement
खेड ग्रामपंचायत की सरपंच लता फरांदे निलंबित, 17 लाख की वित्तीय गड़बड़ी की पुष्टि
Satara, Maharashtra:साताराः खेड ग्रामपंचायतीच्या सरपंच लता फरांदे यांच्यावर अखेर प्रशासकीय कारवाईचा मोठा बडगा उगारण्यात आला आहे. तब्बल पावणे सतरा लाखांच्या आर्थिक अनियमितता आणि गंभीर गैरव्यवहार प्रकरणी पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पार पडलेल्या सुनावणीत त्यांना सरपंच पदावरून निलंबित करण्याचा अंतिम आदेश जारी करण्यात आला आहे. खेड ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या प्रमाणावर आर्थिक गैरव्यवहार आणि अधिकारांचा गैरवापर होत असल्याच्या तक्रारी ग्रामस्थांनी आणि विरोधकांनी प्रशासनाकडे केल्या होत्या. या तक्रारींची दखल घेत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती स्तरावर या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात आली होती. प्राथमिक तपास आणि त्यानंतर सादर करण्यात आलेल्या फेरचौकशी अहवालात सरपंचांवर ठेवण्यात आलेले काही आरोप अत्यंत गंभीर स्वरूपाचे असल्याचे सिद्ध झाले असून तक्रारदारांनी सरपंच यांच्यावर झालेल्या या कारवाईमुळे राजकीय क्षेत्रात चांगलीच खळबळ उडाली आहे.0
0
Report
अण्णा हजारे: कांदा उत्पादन लागत के बराबर भाव मिलने चाहिए
Ahilyanagar, Maharashtra:केंद्र सरकारने कांद्याच्या दरात वाढ केली आहे, 1580 रुपये प्रतिक्विंटल कांद्याला भाव दिला जाणार आहे...मात्र तरी देखील शेतकऱ्यांना कांद्याचा उत्पादन खर्च मिळणार नसल्याचे शेतकरी सांगत आहे...यावर जेष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांनी प्रतिक्रिया दिली असून शेतीमालाचे भाव हे उत्पादन खर्चावर असले पाहिजे असं अण्णा हजारे यांनी म्हंटले आहे...शेतीप्रधान भारत देशात शेतकऱ्यांची जी अवस्था आहे ही दुर्दैवी आहे,एकीकडे कृषीप्रधान भारत देश म्हणतो आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव नाही...शेतकरी जेवढा खर्च करतो त्यात भर घालून शेतकऱ्यांना उत्पन्न मिळाले पाहिजे असे मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलंय.0
0
Report
अधिक मास में पंढरपुर: VIP घुसखोरी पर प्रशासन की कड़ी कार्रवाई
Pandharpur, Maharashtra:अधिक मासानिमित्ताने पंढरपुरात लाखो भाविक दाखल झाले आहेत विठ्ठल रुक्मिणी पदस्पर्श दर्शनाची रांग चार किलोमीटर अंतरापर्यंत गेली आहे दरम्यान दर्शन रांगेमधील घुसकोरी करणाऱ्या व व्हीआयपी दर्शन देणाऱ्या कर्मचारी किंवा खाजगी एजंटांवर कडक कारवाई करण्याचा इशारा जिल्हाधिकारी कार्तिकीएन एस यांनी आज पंढरपूरात दिली. मागील दोन-तीन दिवसांपासून दर्शन रांगेमध्ये भाविकांचे हाल होत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यानंतर आज जिल्हाधिकारी कार्तिकीऐन एस यांनी प्रत्यक्ष दर्शन रांगेची पाहणी करून भाविकांची संवाद साधला. अधिकमासामुळे पंढरपुरात भाविकांची गर्दी वाढली आहे. कमी वेळेमध्ये सुलभ दर्शन व्हावे यासाठी दर्शनाचा वेळ कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. यासाठी व्हीआयपी दर्शन बरोबरच दर्शन रांगेतील घुसखोरी रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. व्हीआयपी दर्शन देणाऱ्या व घुसखोरी करणाऱ्या लोकांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाणार असल्याचे यावेळी जिल्हाधिकारी कार्तिकीयेन एस यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
