icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मूर्तिजापूर में राष्ट्रीय मार्ग पर भीषण रात्री हादसा, ट्रक चालक घायल

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर येथे राष्ट्रीय महामार्गावर मध्यरात्री एक भीषण अपघात घडला. नागपूरहून गुजरातकडे लोखंडी रॉडची वाहतूक करणाऱ्या ट्रक चालकाला झोप लागल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले आणि अपघात झाला. मूर्तिजापूरमधील पॉप्युलर पेट्रोल पंपाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रकने प्रथम रस्त्यालगतच्या स्ट्रीट लाईटचे खांब उडवले आणि त्यानंतर मधील डिव्हायडर तोडून ट्रक दुसऱ्या बाजूला जाऊन धडकला. अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक चालक गंभीर जखमी झाला असून त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य केले. या अपघातामुळे काही काळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, रात्रीच्या वेळी चालकांनी पुरेशी विश्रांती न घेतल्यामुळे अशा अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने महामार्गावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report

परतवाड़ा लैंगिक अत्याचार मामले में SIT की बड़ी कार्रवाई, तीन अफसर निलंबित

Amravati, Maharashtra:आरोपी अयान बर्थडेला हजेरी लावणाऱ्या पोलिसांना दणका; पोलिस अधीक्षकांडून तिघांचे निलंबन अँकर :- परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणातील मुख्य आरोपी अयान अहमदच्या बर्थडेला हजेरी लावणाऱ्या त्या पोलिस अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना पोलिस अधीक्षकांकडून दणका देण्यात आला असून पोलिस अधीक्षकांडून तिघांचेही थेट निलंबन करण्यात आले आहे. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी अखेर एक अधिकाऱ्यासह दोन पोलीस शिपाई निलंबित करण्यात आले आहे. यामध्ये तपासात अडचणी येऊ नये म्हणून API सलिम शेख, पोलिस शिपाई शुभम वर्मा व मयूर गुरव यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलिस अधीक्षक विशाल आनंद यांनी ही कारवाई केली असून पुढील तपास सुरू केला. परतवाडा लैंगिक अत्याचार प्रकरणी SIT च्या तपासात आज काय आढळलं.. १. आरोपी अयान याने पीडितांच्या शोषणासाठी मानव सुगंधे याचा भाड्याचा कठोरा रोड स्थित फ्लॅट वापरला होता त्या फ्लॅटची झडती घेण्यात आली तसेच तेथील पंचनामा सुद्धा करण्यात आला आहे. फ्लॅट मालकाला सुद्धा चौकशी साठी बोलावण्यात आलेले आहे. २) अयान हा पीडितांना कठोरा रोड अमरावती येथील कॅफे रॉयल, अचलपूर येथील कॅफे फ्रेंड टाऊन व परतवाडा येथील कॅफे सोशल जंक्शन (आता बंद असलेला) अशा ज्या ३ कॅफे मधे भेटला होता त्या ठिकाणचा आणि वझ्झर डैम येथील गार्डनमधे भेटला होता तेथील पंचनामा करण्यात आलेला आहे. ३) कालपासून १० लोकांना SIT ने चौकशी साठी ताब्यात घेतलं, मात्र अटक करण्यात आली नाही ४) पीडितेचे/ घटनेच्या संदर्भात फोटो, व्हीडीओ प्रसारित होत असलेल्या फेसबुक, इंस्टाग्राम, टेलीग्राम, यू ट्यूब अशा सोशल मीडिया साईट्स वरून एकूण ४१ अकाउंट साइबर सेल च्या मदतीने डिलीट करण्यात आलेले आहे. ५) यातील पीडितांनी समोर येऊन आपली तक्रार/ बयान द्यावे यासाठी SIT मधील महिला पोलिस निरीक्षक श्रीमती यशोधरा मुनेश्वर यांच्यामार्फत संपर्क करण्यात येत आहे. ६) राष्ट्रीय महिला आयोगाने VC द्वारे सादर प्रकरणाचा आढावा घेतला आहे.
0
0
Report

लोकसभा में महिला आरक्षण विधेयक नामंजूर, नवनीत राणा के आंसू, मोदी से माफी की मांग

Amravati, Maharashtra:महिला आरक्षण विधेयक लोकसभेत नामंजूर झाल्याने नवनीत राणा यांना अश्रू अनावर; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली माफी नवनीत राणा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची मागितली माफी आहे. आमच्या सारख्या लोकांच्या सीट न दिल्याने हे विधेयक नामंजूर झाले झाल्याचे राणा यांनी म्हटले आहे. ज्या ज्या लोकांनी या विधेयकाला विरोध केला त्यांना महिला माफ करणार नाही पार्टीमध्ये काम करणाऱ्या सर्वसामान्य महिलांसाठी विरोधकांनी आजचा दिवस काळा ठरवला विरोधकांनी आपल्या राजकीय पोळ्या शेकण्यासाठी महिलांचा अधिकार हिरावून घेतला त्यामुळे महिला विरोधकांना कधीही माफ करणार नाही असे नवनीत राणा म्हणाल्या.
0
0
Report
Advertisement

शिर्डी पुलिस ने दीपक लोंढे से बारह घंटे पूछताछ, राजनीति संबंधों पर नया मोड़

Shirdi, Maharashtra:दिपक लोंढेची बारा तास शिर्डी पोलिसांकडून चौकशी... दिपक लोंढे अशोक खरातसह दिपक केसरकर यांचा निकटवर्तीय.. समता पतसंस्थेत दिपक लोंढे आणि पत्नीच्या नावे चार खाती... खात्यांवरून कोट्यवधींच्या व्यवहार झाल्याची पोलिस तपासात माहिती समोर... मात्र मी कधीही कागदपत्र दिले नाही आणि मला समता पतसंस्था माहित नाही... शिर्डी पोलिसांकडून दिपक लोंढेंची आज बारा तास चौकशी उद्या पुन्हा लोंढे यांना चौकशीसाठी बोलवलं... उद्याच्या चौकशीत लोंढे यांच्या जबाबातून काय खुलासे होणार याकडे लक्ष... बाईट - दीपक लोंढे केसरकर यांचे निकटवर्तीय जे अकाउंट खोलले ते माझे नाहीत , उदया पन मला चौकशीला बोलावलय... मी शेतकरी कुटूंबातील माझा राजकीय संबंध नाही... खाते चुकीचे , सह्या माझ़्या नाहीत... मोठया लोकांसोबत फोटो आहेत , मी मोठा नाही... मोठया लोकांसोबत फोटो त्यामुळे मला टारगेट केल जातय... ते फोटो व्हा़यरल होतायत त्यामुळे मी अंजली दमानिया यांचे आभार मानतो...
0
0
Report

बीयर पिलाने से इनकार पर मारे गए आदमी की अमानुष मारहाण CCTV में कैद

Ambernath, Maharashtra:बियर पाजण्यास नकार दिल्याने इसमाला अमानुष मारहाण मारहाणीची घटना सीसीटीव्हीत कैद शिवाजीनगर पोलीस ठाण्यात दोघांविरोधात गुन्हा दाखल बियर पाजण्यास नकार दिल्याच्या शुल्लक कारणावरून एका इसमास लाकडी दांडक्याने अमानुष मारहाण केल्याची घटना अंबरनाथ शहरात घडली आहे. ही सर्व घटना सीसीटीव्ही कैद झाली आहे . याप्रकरणी दोन जणांविरुद्ध शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला है. अंबरनाथ पूर्व येथील ग्रीनसिटी परिसरातील एका बियर शॉपसमोर घडली. १३ एप्रिल रोजी स्मितेश सुरेश पाटील हा 32 वर्षीय इसम बियर खरेदी करून शॉपसमोर बसून पित असताना त्याच्या ओळखीचे महेश सूर्यवंशी आणि मंगेश तपासे यांनी त्यांच्याकडे बियर पाजण्याची मागणी केली. मात्र “पैसे नाहीत” असे सांगत पाटील yeनी नकार दिला. एवढ्या कारणावरून संतापलेल्या आरोपींनी अक्षरशः अमनुषपणे पाटील यांच्यावर हल्ला चढवला. आरोपींनी प्रथम बियरची बाटली फोडून त्यांच्या खांद्यावर हल्ला केला आणि त्यानंतर त्यांना जमिनीवर पाडून लाकडी दांडक्याने तब्बल २० ते २५ वेळा निर्दयपणे मारहाण केली. या हल्ल्यात पाटील यांच्या डाव्या पायाला, खांद्याला आणि मनगटाला फ्रॅक्चर होऊन ते गंभीर जखमी झाले आहेत. सर्वात धक्कादायक बाब म्हणजे, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत स्पष्टपणे दिसत असतानाही आणि घटनास्थळी नागरिकांची वर्दळ असतानाही कोणीही पुढे येऊन मदत केली नाही. ही केवळ मानवी संवेदनांची नव्हे, तर कायद्याच्या भीतीचा पूर्णपणे लोप झाल्याची चिंताजनक बाब आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असला तरीही वारंवार अश्या घटना घडत असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.
0
0
Report
Advertisement

नागपुर के SK बार में मारपीट, 3 को गिरफ्तार; CCTV में भिड़ंत कैद

Nagpur, Maharashtra:नागपूर -- नागपूरात बारमध्ये राडा... घटना सीसीटीव्हीत चित्रित. नागपुरात बारमध्ये राडा. बार बंद होण्याची वेळ असल्याने वेटर ने दारू देण्यास नकार दिल्याने संतापलेल्या तरुणांनी बार मॅनेजरला केली जबर मारहाण. काउंटर वर ठेवलेल्या मद्याच्या बाटलीने मॅनेजर च्या डोक्यावर फोडण्याचा प्रयत्न. नागपूरच्या मानेवाडा चौक परिसरातील SK बारमधली गुरुवारी रात्रीची घटना. घटनेचा CCTV वायरल, CCTV मध्ये चित्रीत दृश्यात 3 ते 4 आरोपी बार मध्ये तोडफोड करताना दिसताय. मद्याच्या बाटलीने मॅनेजर च्या डोक्यावर फेकत असल्याचं दिसत आहे. मॅनेजरला बाटली मारत असताना तिथे एकाने बचाव केला या मारहाणीत 2 लोक जखमी झाले आहेत. या प्रकरणात हुडकेश्वर पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा नोंदवून 3 आरोपींना अटक केली आहे
0
0
Report

कल्याण में ठाकरे गुट का उद्घाटन समारोह, वरुण सरदेसाई ने कार्यालय का उद्घाटन किया

Kalyan, Maharashtra:वरुण सरदेसाई ( ठाकरे गट नेते आमदार पॉइंटर) कल्याणमध्ये शक्तीप्रदर्शन आणि कार्यालय उद्घाटन कल्याण ठाकरे गटाचे गटनेते उमेेश बोरगावकर यांच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन आमदार वरुण सरदेसाई यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. यावेळी ठाकरे गटाचे स्थानिक पदाधिकारी आणि शिवसैनिकांनी मोठी गर्दी केली होती. विधान परिषदेसाठी उद्धव ठाकरेच्या नावाला पसंती उद्धव ठाकरे यांची विधान परिषदेची टर्म संपत असल्याने रिक्त होणाऱ्या जागेसाठी वरुण सरदेसाईंनी आपली भूमिका मांडली. काल या निवडणुकीची घोषणा झाली आहे उद्धव ठाकरे सामान्य कार्यकर्ता यामुळे कोणाला संधी मिळेल हे सर्व अधिकार उद्धव ठाकरे यांचेच आहेत विधान परिषदेच्या उमेदवाराची घोषणा करत असताना महाविकास आघाडीच्या सर्व नेत्यांबरोबर चर्चा होणार आणि त्यानंतरच अधिकृत नावाची घोषणा होणार उद्धव ठाकरे यांनी नेतृत्व करावे असे माझ्यासहित सर्वच शिवसैनकांची इच्छा... मात्र त्यांनी ज्या नावाची घोषणा केली त्याला आमचा सर्वांचा पाठिंबा असेल सध्याचं राजकारण विचित्र .. निवडणूक कुठलीही लागली तरी उमेदवार पेक्षा कोणाची मत फुटणार यावर जास्त चर्चा होते हे दुर्दैवी आहे .... वरून सरदेसाई यांचा अशा शब्दांत त्यांनी महायुतीवर निशाणा साधला निष्ठा आणि इमान राखण्याचे आवाहन लोकांनी कौल दिल्यानंतर त्या ठिकाणच्या लोकप्रतिनिधींनी स्वतःच्या पक्षाची इमान राखला पाहिजे या मताचा मी आहे "कोण फुटणार आणि कोण नाही, हे पाहण्यासाठी थोडा वेळ वाट पाहावी लागत... लवकरच महाविकास आघाडीच्या वतीने अधिकृत नाव समोर येईल," असे सांगत त्यांनी सस्पेन्स कायम ठेवला बाईट.. वरुण सरदेसाई आमदार
0
0
Report
Advertisement

भुजबल के बयान: विलय पर चर्चा खत्म, प्रचार जारी

Ahilyanagar, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीत रोहित पवार आणि युगेंद्र पवारांनी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या प्रचाराला सुरुवात केली आहे. यावरून पुन्हा एकदा विधीनिकीकरणाच्या चर्चांना उधाण आल आहे. मात्र अशी कोणतीही चर्चा आमच्याबरोबर झाली नसून दोन्ही बाजूने हा विषय संपला असल्याचा जाहीर केला आहे असं मंत्री छगन भुجبळ यांनी म्हटल आहे. रोहित पवार हे त्यांचे नातेवाईक असल्याने प्रचार करत आहे त्यात काही वाईट नाही त्यांचे पक्षाने पाठिंबा दिल असल्याचं देखील भुجبळ यांनी म्हटल आहे. नाशिक येथील टीसीएस कंपनीच्या धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणी संपूर्ण टीसीएस कंपनीला बदनाम करणं हे योग्य नसल्याचं मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केलं आहे. जे प्रकरण झालं आहे त्यावर कारवाई झाली आहे. हा विषय किती ताणायचं आणि त्या कंपनीला जिल्ह्याच्या किंवा राज्याच्या बाहेरच काढून टाकायचं असा कोणाचा प्रयत्न असेल तर हे चुकीचं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जर कारवाई झाली नसेल तर उठाव करणे योग्य मात्र पोलीस त्यात पूर्णपणे कारवाई करत असल्याचे त्यांनी म्हटलंय. इराण-इस्रायल संघर्षामुळे निर्माण झालेल्या इंधन टंचाईवर मात करण्यासाठी राज्य सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्रात बंद असलेला केरोसीन पुरवठा आता पुन्हा पूर्ववत करण्यात आला आहे. राज्याकडे मोठ्या प्रमाणात केरोसीनचा साठा उपलब्ध असून जुन्या परवानाधारकांनी त्यांचे लायसन्स नूतनीकरण झाले असे समजून तात्काळ काम सुरू करावे असे आवाहन राज्याचे अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी केली. त्याचबरोबर आखाती देशांतील संघर्ष कधी संपुष्टात येतो हे आताच सांगता येत नसल्याने राज्यात केरोसीनची विक्री आणि पुरवठा यापुढे कायमस्वरूपी सुरू राहणार असल्याचे मंत्री भुजबळ यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरून मंत्री छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. नाशिक जिल्ह्याला पालकमंत्री नसला तरी कोणताही काम अडलं नाही, प्रत्येक जण प्रत्येकाचं काम करत आहे. पोलीस पोलिसांचं काम करताय तर नाशिक कुंभमेळ्यासाठी स्वतंत्र अधिकारी नेमले त्यामुळे कुठे काही अडलं नाही त्यामुळे अडचण कशाला निर्माण करायची असे स्पष्ट मत मंत्री छगन भुजबळ यांनी व्यक्त केला आहे.
0
0
Report

सातारा जिला परिषद में नए अध्यक्ष के भाषण के दौरान भाजपा-शिवसेना में तीखी बहस

Satara, Maharashtra:सातारा जिल्हा परिषदेच्या नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांच्या निवडीनंतर पार पडलेल्या पहिल्याच सर्वसाधारण सभेत सत्ताधारी(भाजप) आणि विरोधकांमध्ये (शिवसेना) यांच्यामध्ये जोरदार शाब्दिक चकमक पाहायला मिळाली. या सभेत शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य विकास बनकर हे नूतन अध्यक्षांच्या अभिनंदन ठरावावर बोलण्यासाठी उभे राहिले असता, त्यांना रोखण्यात आल्याने सभागृहात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.नूतन अध्यक्षा प्रिया शिंदे यांनी सभागृहात मांडलेल्या विषमुक्त अन्न बालसंस्कार आणि समाजसंस्कार या त्रिसूत्रीचे स्वागत करण्यासाठी आणि त्यांच्या अभिनंदन करण्यासाठी ते उभे राहिले होते. मात्र जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले यांनी त्यांना बोलण्यापासून मज्जाव केल्यामुळे हा लोकशाहीचा गळा दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शिवसेना सदस्यानी केला आहे .यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी यशनी नागराजन यांना त्याचा दालनात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या सदस्यांनी घेराव देखील घातला आणि जाब विचारला."कोणत्याही नैतिक अधिकाराखाली उपाध्यक्षांनी मला बोलण्यापासून रोखले विरोधकांना त्यांचे मत मांडू न देणे हे लोकशाहीसाठी घातक आहे यशवंतराव चव्हाणांच्या विचारांचा वारसा सांगणाऱ्या सातारा जिल्हा परिषदेत असे प्रकार घडणे दुर्दैवी आहे.सभागृहात सुरू असलेला गोंधळ आणि सत्ताधाऱ्यांनी केलेला वॉकआऊट या दरम्यान जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी देखील सभागृह सोडल्याने शिवसेना सदस्य अधिक आक्रमक झाले. एक प्रशासक म्हणून सभागृहात काय चालले आहे हे ऐकणे आणि पाहणे ही सीईओंची जबाबदारी होती. त्यांनी सत्ताधाऱ्यांसोबत सभागृह का सोडले? याचे उत्तर त्यांनी द्यावे.अशी मागणीही यावेळी करण्यात आली. बाईट: विकास बनकर शिवसेना सदस्य
0
0
Report
Advertisement

पुरंदर में पिंगोरी के पास भीषण जंगल आग, एक हजार एकड़ से अधिक वनसपदा जल

Rui, Maharashtra:पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे जंगलाला लागला वनवा. दीड हजार एकराहून अधिक डोंगरावरील वनसपदा नष्ट. शेतकऱ्याची कडब्याची गंज पेटल्याने त्याचा दीड दोन लाखाचा जाणवरांचा चारा जळून नष्ट झालाय. पुरंदर तालुक्यातील पिंगोरी येथे डोंगराला मोठा वनवा लागला असून हा वनवा जवळपास दीड हजार एकरावर पसरलाय. पिंगोरीचे पोलिस पाटील आणि सरपंच यांच्या विनंती नंतर वनविभागाने वानवा विजवण्यास सुरवात केलीय. मात्र तो पर्यंत दीड हजार एकरावरील वनसपदा नष्ट झालीय. हा संपूर्ण भाग जेऊरीच्या खंडोबा मंदिराला लागून आहे. तर या वनव्या दरम्यान एका शेतकऱ्याची कडब्याची गंज पेटल्याने त्याचा दीड दोन लाखाचा जाणवरांचा चारा जाळून नष्ट झालाय.
0
0
Report

महाबळेश्वर के पुराने मंदिर की छत गिरने से हड़कंप; मरम्मत और सुरक्षा जांच की मांग

Satara, Maharashtra:सातारा - महाबळेश्वर येथील जुन्या श्री कृष्णामाई मंदिराच्या छताचा काही भाग अचानक कोसळला. मंदिरासमोरील गोमुखाधीन कुंडाची स्वच्छता करत असताना हा प्रकार घडला असून छताचा भाग थेट कुंडात पडला. सुदैवाने काम करणारे युवक थोडक्यात बचावले. हे शेकडो वर्षे जुने हेमाडपंथी मंदिर असून ते पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीत आहे. मात्र, दीर्घकाळ देखभाल आणि दुरुस्ती न झाल्यामुळे ही घटना घडल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे. घटनेनंतर तातडीने पंचनामा करून मंदिराची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

Satara Warms Up Water Tanker Drive: Administration Fast-Tracking Supply Amid Drought

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेसोबतच अनेक भागांत पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या मान वाई पाटण तालुक्यात 17 गावांमध्ये आणि 99 वस्त्यांमध्ये 17 टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे या पार्श्वभूमीवर साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी जिल्ह्यासाठी राबवल्या जाणाऱ्या उपायोजनां मध्ये ज्या गावांनी किंवा वाड्या-वस्त्यांनी पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची मागणी केली आहे, तिथे तात्काळ टँकर सुरू करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले आहेत. प्रस्तावांमध्ये कोणतीही तांत्रिक अडवणूक न करता लोकांची तहान भागवण्याला प्राधान्य दिले जाईल. जिल्ह्यातील प्रलंबित नळ पाणीपुरवठा योजना आणि तात्पुरत्या दुरुस्तीसाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून दिला जाईल, जेणेकरून कायमस्वरूपी पाणी टंचाई कमी होईल. यामध्ये केवळ पाणीच नव्हे, तर पशुधनासाठी चारा टंचाई भासू नये यासाठीही कृषी आणि महसूल विभागाने सतर्क राहावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या. "पाणी टंचाईच्या काळात सामान्य नागरिकांचे हाल होता कामा नयेत. टँकरचे वेळापत्रक आणि पाण्याचे वितरण योग्य रीतीने व्हावे यासाठी भरारी पथके नेमली जातील. कोणत्याही प्रकारच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई केली जाईल. असा स्पष्ट इशारा यावेळी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिला
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top