445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के दो आरोपी ऑनलाइन बैंकिंग धोखाधड़ी में मुंबई से गिरफ्तार
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. Crime ऑनलाईन फसवणूक.. दोघे मुंबईत गजाआड.. जयगडमधील प्रकार.. लाखांचा अपहार.. अँकर ऑनलाइन बँकिंग द्वारे तब्बल 4 लाख 82 हजारांची फसवणूक करणाऱ्या दोघांच्या रत्नागिरी पोलिसांनी मुंबईतील दहिसर येथून मुस्क्या आवळल्या..देवगड पोलीस स्थानक हद्दीतील साखरी बौध्दवाडी येथील एकाच्या बँक खात्यातून या भामट्यांनी दिनांक 17 फेब्रुवारी ते 9 मार्च 2026 या कालावधीत ही रक्कम काढून घेतली होती..0
0
Report
अक्षय तृतीया पर Ahirani गीत और पुरणपोळी की परंपरा के साथ ग्रामीण महाराष्ट्र में जश्न
Nashik, Maharashtra:अक्षय तृतीया- अहिराणी गीत, पुरणपोळी स्पेशल बातमी। अक्षय तृतीया मतलब आखाजी हा खरा तर माहेर वाशिनींचा सण है। ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून आहे। सासरवाशिनी सासर वरून आखाजीला माहेरी येतात, झोका खेळतात, रात्री पुरणपोळी बनवत अहिराणी गाणी म्हणतात। या सणाला आंब्या सोबत मांडा म्हणजेच पुरणपोळिलादेखील खूप महत्व। साडेतीन मुहूर्तापैकी एक अक्षय तृतीया हा सण महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात उत्साहात पारंपारिक पद्धतीने साजरा केला जातो… घरातील जे व्यक्ती नोकरी व्यवसाय निमित्त बाहेरगावी असतात तेही या दिवशी सणासाठी घरी येत असतात. तसेच सासर वाशिन महिला या सणा निमित्त माहेरी येतात. जुन्या परंपरेनुसार ग्रामीण भागात आजही आखाजी सणाची जुनी परंपरा टिकून असून महिला आपल्या माहेरी येत झोका खेळत, रात्रभर पुरणपोळी बनवत अहिराणी गीत म्हणत असत। आमरस और पुरणपोळी शिवाय अक्षय तृतीया सण साजरा होत नाही। तेव्हा ग्रामीण भागात कशी पुरणपोळी बनवतात त्याची रेसिपी देखील आपण बघू…0
0
Report
वाशी बाजार में अक्षय तृतीये के मौके पर 94 हजार आंबा पेटियों की भारी आवक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. वाशी बाजार समितीत 94 हजार आंबा पेट्या दाखल.. अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला बाजार समितीत आंब्याचा घमघमाट.. अन्य राज्यातील आंबाही दाखल,कोकणातील हापूसचा वाटा मोठा.. अक्षय तृतीयेचा मुहूर्त गाठण्यासाठी कोकणासह राज्यभरातून तब्बल 94 हजार आंबा पेट्या वाशी बाजारात दाखल झाल्यात.. गतवर्षीच्या तुलनेत हे प्रमाण कमी असले तरी या पेटांमुळे अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला वाशी बाजारपेठेत आंब्याचा दरवळ सुटला आहे.. अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर आंबा खाण्याची प्रथा आजही मोठ्या प्रमाणात पाळली जाते..त्यामुळे या दिवसासाठी आंब्याला मागणी वाढते.. सध्या आंबा पेटीला पंधराशे ते चार हजार रुपये दर आहे..गतवर्षीच्या तुलनेत आंबा कमी आहे त्यामुळे यावर्षी दर टिकून आहे..0
0
Report
Advertisement
महाराष्ट्र बाल अधिकार आयोग ने सभी जिलों में स्वतंत्र बाल पुलिस इकाइयां स्थापित निर्देश दिए
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी. बाल पोलीस पथकासाठी आता प्रत्येक जिल्ह्यात विशेष स्वतंत्र कक्ष. बालकांच्या सुरक्षेसाठी राज्य बाल हक्क आयोगाचे राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना निर्देश. राज्यातील बालकांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटना आणि गुंतागुंतीची कायदेशीर प्रक्रिया पाहता, महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाने एक ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. राज्यातील सर्व पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक कार्यालयातर्गत आता स्वतंत्र विशेष बाल पोलीस पथक कक्ष स्थापन करण्याचे निर्देश आयोगाचे सचिव पंकज देवरे यांनी राज्यातील सर्व पोलीस अधीक्षकांना पत्राद्वारे दिले आहे. हा कक्ष बालस्नेही स्वरूपाचा असावा असेही म्हटले आहे.0
0
Report
माणगाव-इंदापूर बायपास में कोकण रेल्वे अड़चन, डेडलाइन फिर से टलने की संभावना
Chendhare, Maharashtra:माणगाव आणि इंदापूर बायपास कामात कोकण रेल्वेचा अडथळा. सिग्नल यंत्रणा आणि विद्युत खांब हलविण्याच्या कामात दिरंगाई. गडकरी यांनी दिलेली डेडलाइन पुन्हा हुकणार. सुनील तटकरे यांनी नितीन गडकरी यांची भेट घेतली.0
0
Report
आदिवासी आश्रम शाळाओं के पहले दिन किताब-गणवेश और एएनएम परिचर सेवा, मंत्री उईके का ऐलान
Yavatmal, Maharashtra:राज्यातील आदिवासी आश्रम शाळांचा शैक्षणिक दर्जा सुधारावा यासाठी यंदा शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पुस्तके, गणवेश, विद्यार्थिनींच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी एएनएम आणि परिचर देणार असल्याची घोषणा राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर अशोक उईके यांनी केली आहे. तसेच 500 आश्रम शाळांमध्ये आतापर्यंत 1771 शिक्षक नियुक्त केले असल्याने केवळ घोषणा न करता अंमलबजावणीवर आपला भर असल्याचे मंत्री अशोक उईके यांनी सांगितले. याशिवाय शैक्षणिक सत्राच्या पहिल्या दिवशी व वर्षातून तीन वेळा स्वतः मंत्री, आदिवासी आमदार, आणि आदिवासी विभागाचे अधिकारी आश्रम शाळांमध्ये मुक्कामी थांबतील असेही मंत्री अशोक उईके यांनी जाहीर केले.0
0
Report
Advertisement
भंडार के जंगल में हाथभट्टी शराब निर्माण पर पुलिस धाड, 1.19 लाख का माल जप्त
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या दावेझरी जंगलात हातभट्टी दारूवर पोलिसांची धाड. 1.19 लाखांचा मुद्देमाल जप्त. भंडाऱ्याच्या आंधळगाव पोलिसांनी दावेझरी लगतच्या जंगल परिसरात मोहफुल हातभट्टी दारू निर्मितीवर धाड टाकून मोठी कारवाई केली. करण्यात आलेल्या या कारवाईत 200 लिटर दारू, 30 लिटर तयार दारू, तसेच 360 किलो सडवा मोहफास असा एकूण 1 लाख 19 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मनोज मरसकोल्हे याला ताब्यात घेण्यात आले असून दिपक धुर्वे व बंडू प्रधान हे आरोपी फरार आहेत. पोलिस निरीक्षक नितीन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने ही कारवाई केली असून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला आहे.0
0
Report
अमेरिका-ईरान-इजरायल युद्ध से भारत में रसायनिक खाद की कीमतें बढ़ीं
Shirur, Maharashtra:अमेरिका इराण इजराइल यांच्यात सुरू असलेल्या महायुद्धाचा परिणाम भारतातील रासायनिक खतांच्या आयातीवर झाला असून खतांच्या किंमती मोठ्या प्रमाणात वाढल्याात तर ऐन खरीप हंगामाच्या तोंडावर रासायनिक खतांचा तुटवडा निर्माण होण्याचा हि धोका वाढलाय, तर दुसरीकडे शेतीमालाचे बाजारभाव गडगडल्याने शेतकऱ्यांनी खते बियाणे खरेदीकडे पाठ फिरवल्याने याचाही मोठा फटका विक्रेत्यांना बसतोय याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..0
0
Report
यवतीयाळ के रालेगांव-केळापूर-कलंब: 34 लड़कियों की तस्करी-धर्मांतरण के आरोप, जांच की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव, केळापूर व कळंब तालुक्यातील 34 मुलींची राज्य व परराज्यात विक्री करून त्यांचे धर्मांतरण केल्या गेल्याचा खळबळजनक आरोप भाजपाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी केला आहे. हा प्रकार मानव तस्करी सोबतच बालविवाह आणि लव्ह जिहादच्या माध्यमातून धर्मांतरण चा असल्याचाही गंभीर आरोप भाजपा ने केला आहे. या हिंदूविरोधी षडयंत्राचे केंद्रबिंदू राळेगाव असून येथील मजहर कुरेशी नामक व्यक्ती जो अनेक अवैध धंद्यांमध्ये लिप्त आहे, त्याने 200 ते 250 हिंदू मुलींचा छळ केला असूनतो त्याच्या सात ते आठ साथीदारांच्या माध्यमातून लव जिहाद च्या कृत्यामध्ये गुंतला आहे, पुराव्या दाखल याबाबतची एक ऑडिओ क्लिप पोलिसांना दिली असल्याचे तसेच या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांनी देखील प्रकरणाची गंभीरतेनी चौकशी करण्याचे आदेश पोलिसांना दिले असल्याचे भाजप जिल्हाध्यक्ष ॲड. प्रफुल्ल चव्हाण यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
नाशिक: सप्तशृंगी गड़ परिसर में युवक ने आत्महत्या, क्षेत्र में शोक
Nashik, Maharashtra:- कळवण तालुक्यात सप्तशृंगी गड परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जयेश शामलाल कुमावत या तरुणाने राहत्या घरात गळफास घेऊन जीवन संपवल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. वडिलांना संपर्क होत नसल्याने ते नाशिकहून सप्तशृंगी गडावर आले असता, भाड्याच्या घरात मुलगा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. घटनेची माहिती मिळताच कळवण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी वणी ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आला आहे. या टोकाच्या निर्णया मागील नेमके कारण अद्याप समजू शकले नसून पोलीस पुढील तपास करत आहेत.0
0
Report
अंबरनाथ में क्रिकेट पिच के कारण राजनीति गरमाई; मनसे का आरोप
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ में क्रिकेट पिच के कारण राजनीति गरमाई; मनसे का आरोप गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच - मनसेची तक्रार खेळाडू म्हणतात खेळात राजकारण आणू नका! अंबरनाथमध्ये सध्या क्रिकेटच्या पिचवरून राजकीय वातावरण तापलं आहे. एका क्रिकेट टीमने टुर्नामेंट आयोजित करण्यासाठी गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच तयार केला असून मैदानात बांधकामाला परवानगी नसल्याचं म्हणत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी याबाबत पालिकेत तक्रार केलीये. तर खेळाडूंनी मात्र खेळत राजकारण आणू नका, असं आवाहन केलंय. अंबरनाथच्या गावदेवी मैदानात २५ एप्रिल ते ३ मे असे ९ दिवस सायली एक्स क्रीडा मंडळाच्या वतीने क्रिकेट टुर्नामेंट आयोजित करण्यात आलीय. या स्पर्धेसाठी पालिकेची परवानगी घेण्यात आली असून यानंतर या मंडळाने गावदेवी मैदानात सिमेंट काँक्रीटचा पिच तयार केलाय. मात्र या पिचला परवानगी नसल्याचं सांगत मनसे शहराध्यक्ष शैलेश शिर्के यांनी अंबरनाथ पालिकेत तक्रार केलीये. तसंच यामुळे इतर खेळ खेळणारे खेळाडू आणि मैदानात येणाऱ्या नागरिकांना त्रास होत असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. तर शिर्के यांच्या या तक्रारीनंतर सायली एक्स मंडळाच्या खेळाडूंनी नगराध्यक्षा तेजश्री करंजुले यांची भेट घेत आपली बाजू मांडली. याठिकाणी आधीच एक सिमेंटचा पिच होता, त्याचीच दुरुस्ती करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं, तसंच खेळात राजकारण न आणण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान, सायली एक्स क्रीडा मंडळ हे नगरसेवक संदीप लकडे यांच्याशी संबंधित असून मनसेच्या विरोधाला हे देखील आणखी एक कारण असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.0
0
Report
शिरूर में पुलिस थाने के सामने महिला-पुरुष के बीच मारपीट; कानून-व्यवस्था पर सवाल
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर शहरातील पोलीस ठाण्याच्या समोरच आज सायंकाळी महिला व पुरुषांमध्ये तीव्र वाद होऊन मारामारी झाल्याची घटना घडली. महिलांचा आरडा-ओरडा झाल्याने परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. प्राथमिक माहितीनुसार, संबंधित पक्षांमध्ये यापूर्वीपासून न्यायालयीन वाद सुरू असल्याचे समजते. पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली व दोन्ही बाजूंच्या व्यक्तींना ताब्यात घेऊन पुढील कारवाईसाठी ठाण्यात नेले. पोलीस ठाण्याच्या आवारातच अशी घटना घडल्याने शहरातील कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.0
0
Report
Advertisement
बारामती उपचुनाव में शर्मिली पवार ने सुनैत्रा पवार के प्रचार की शुरूआत
Rui, Maharashtra:बारामती पोटनिवडणुकीसाठी शर्मिली पवारांकडून सुनेत्रा पवारांचा प्रचार.... युगेंद्र पवारांचं कुटुंब ही प्रचारात.... सुनेत्रा पवारांच्या प्रचारासाठी जाऊबाई मैदानात.... Anchor _ बारामती पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार यांचा प्रचार केला गेला त्यानंतर आता शरद पवार गटाचे युवानेते युगेंद्र पवार यांच्या आई शर्मिला पवार यांनी देखील सुनेत्रा पवार यांचा प्रचार केलाय. शर्मिली पवार या दिवंगत नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सख्या भाऊजई आहेत. सुनेत्रा पवार यांच्या त्या जाऊबाई असल्याने प्रचारात उतरल्या आहेत. अतिशय भावनिक आणि वेदनादायी निवडणूक होणार आहे. आम्ही जरी कॅमेरासमोर नसलो तरी आम्ही गाठीभेटी घेत आहोत मतदारांच्या घरी जाऊन भेटी घेत आहोत गेल्या आठवडाभरापासून जय पवार युगेंद्र पवार प्रचारात उतरले आहे. रोहित पवार यांनीही प्रचार केलाय. मी सर्वच कुटुंबीय निवडणुकीत सहभागी झालो असं शर्मिली पवार यांनी म्हटलं आहे. आमच्यावरती शरद पवार साहेबांचा संस्कार आहे की कधीही कुठेही काहीही अडचण येऊ किंवा कोणाला मदत हवी असेल त्या ठिकाणी आपण सर्वांनी एकजुटीने उभा राहिला पाहिजे असंही शर्मिली पवार यांनी म्हटलं आहे बाईट_ शर्मिली पवार (युगेंद्र पवार यांच्या मातोश्री सुनेत्रा पवार यांच्या जाऊबाई) * *ऑन_प्रत्येक निवडणुकीत कुटुंंब एकत्र दिसते त्यामुळे कार्यकर्त्यांची अडचण होते* मला असं वाटतं दादा वेगळे आहेत का साहेब वेगळे आहेत का दोघेही एकच आहेत.. शेवटी दोघांचंही रक्ताचं नातं आहे आता तुमही ठरवा कोणाची बाजू घ्यायची आणि कोणाची नाही घ्यायची. मला असं वाटत नाही की आपण त्यामध्ये दुजाभाव केला पाहिजे. दादा देखील तेवढेच प्रिय आहेत जेवढे साहेब आहेत. आणि आज जे पवार कुटुंब तुम्ही पाहत आहात दादाच्या प्रेमासाठी प्रेमापोटी आम्ही आज येथे सर्वजण आलो आहेत. त्यामुळे तर कवितर्क किंवा काही मतभेद आहेत बाजूला ठेवून मनभेद आम्ही कधीही आमच्यामध्ये आणणार नाही. आणि पुढे देखील त्याची काळजी घेऊ. * *ऑन_मतदारांना बाहेर पाडण्यासाठी काय प्रयत्न करणार* बारामतीकरांना मतदान करा हे सांगण्यासारखे बारामतीकर नाहीत बारामतीकर सुज्ञ आहे. त्यांना माहित आहे योग्य वेळेला कोणता योग्य निर्णय घ्यायचा आहे. आज दादांचे असंख्य जिवाभावाचे कार्यकर्ते या निवडणुकीत दिवस रात्र कष्ट घेत आहेत. या सर्वांनी ही निवडणूक हातात घेतली आहे. उन्हाळा आहे खूप ऊन आहे सकाळच्या वेळेला सर्वांना बाहेर काढला आणि मतदान जास्तीत जास्त करून घेतलं तर ते योग्य आणि सोयीचे ठरेल. * *ऑन_आगामी काळात पवार कुटुंब एक येणार ka* आता जो तुम्ही विषय घेतला आहे तो राजकारणाचा हे राजकारणात दररोज डायनामिक्स बदलत असतात दादा असते तर कदाचित विलीनीकरण झालं असतं आपण सर्वजण त्याचे साक्षीदार झालो असतो परंतु दुर्दैवाने हे घडलं नाही. आता हे सर्व निर्णय आमचे जे वरिष्ठ नेते आहेत पक्षश्रेष्ठ असतील ते घेतील विलीनीकरण जर झालं तर त्याचं स्वागताचा आहे. लोक दादा आपल्यात नाहीत हे मानायला तयार नाहीत. प्रत्येकाला असं वाटत राहतं आता कुठून तरी दादांचा आवाज येईल दादांचा फोन येईल बारामती अजून खूप सुन्न हे दुखातून बाहेर पडले नाही 23 तारखेला आपल्याला मतदानाला समोर जावं लागणार आहे वहिनींना भरघोस मतदान करावा लागेल आणि दादांना मतदान रुपये श्रद्धांजली वहावी लागेल. *ऑन_अजित पवारांशिवाय निवडणूक* कधीच असं वाटलं नव्हतं बारामती मध्ये पोटनिवडणूक होईल. स्वप्नामध्ये देखील वाटलं नव्हतं की दादा आपल्याबरोबर कोणत्याही निवडणुकीला नसतील. नक्कीच दादांची खूप आठवण येते. जे काही घडलं ते घडायला नको होतं, दादा परत यावेत.0
0
Report
चव्हाण ने महिलाओं के आरक्षण पर विरोधियों पर कड़ा प्रहार, मोदी के सशक्तिकरण को सराहा
Akola, Maharashtra:अकोल्यात भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी महिलांच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार टीका केली आहे. लोकसभेतील तीन दिवसीय अधिवेशनात महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. भारताची भीमज्योत कार्यक्रमानिमित्त अकोल्यात आले असता माध्यमांशी संवाद साधताना चव्हाण म्हणाले की, महिलांना समान हक्क आणि संधी मिळण्यासाठी आरक्षण अत्यंत आवश्यक आहे. संसदेत अनेक विरोधी सदस्यांनी समर्थन दर्शवले असले, तरी काँग्रेस आणि यूपीएतील काही सदस्यांची भूमिका लोकशाहीसाठी घातक असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महिलांच्या sक्षमीकरणासाठी विविध उपक्रम राबवून मातृशक्तीला बळकटी दिली असल्याचेही त्यांनी नमूद केले. विरोधकांची भूमिका चुकीची असून त्याचा निषेध व्हावा, असेही त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
पहलगाम आतंकी हमले के शहीदों के परिजन नौकरी और मानसिक सहायता की मांग
Pune, Maharashtra:पहलगाम के आतंकवादी हमले को आज एक वर्ष हो गया है, लेकिन अब भी हल्ले में अपने पती को गमाने वाली संगिता गणबोटे खुद को संभाल नहीं पातीं; उन्हें हर घड़ी अपने पति की याद सताती है, और यहां तक कि खेल में भी बच्चों की बंदूक दिखे तो वे चिल्ला उठती हैं। पहलगाम के शहीद कौत्सुभ गणबोटे के बेटे के लिए शासन ने पहले सरकारी नौकरी देने की पेशकश की थी, जिसे उन्होंने ठुकरा दिया। आज भी वह इस हल्ले का वर्णन करते समय आंसुओं को रोक नहीं पातीं; वे शासन से शहीद पीड़ितों को मानसिक सहायता provide करने की उम्मीद रखती हैं। पुणे के संगिता एकबोटे से हमारा यह भावुक संवाद पहलगाम अटैक की पहली स्मृति दिवस पर किया गया।0
0
Report
Advertisement
