icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

चंद्रपुर के सावली के टीस्कर हत्ती आखिर गडचिरोली के जंगलों में लौट गया

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या सावली तालुक्यासह परिसरात महिन्याभर दहशत निर्माण करणारा आणि एका शेतकऱ्याचा बळी घेणारा टस्कर हत्ती कळपासह अखेर जंगलमार्गे गडचिरोली जिल्ह्यात परतल्याने वनविभागासह येथील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे. वनविभागाच्या माहितीनुसार, ३ जुलै रोजी सायंकाळच्याुमारास हा टस्कर हत्ती सामदा-सोनापूर मार्गे जंगलातून गडचिरोली जिल्ह्याच्या हद्दीत परत गेला. मात्र, तो पुन्हा सावली वनपरिक्षेत्रात येऊ नये यासाठी वनविभागाने कोणतीही joखीम न पत्करता सामदा-सोनापूर मार्गावर कडेकोट बंदोबस्त ठेवला असून, एक ड्रोन आणि तब्बल ५० कर्मचारी सतत गस्त घालत आहेत. हत्तींचा कळप पाहण्यासाठी विविध गावांमध्ये नागरिकांनी मोठी गर्दी केल्याने वनविभागासमोर आणखी मोठे आव्हान निर्माण झाले होते. खरीप हंगाम सुरू झाल्याने शेतकरी धान पेरणीच्या कामात व्यस्त झाले असताना हत्तींच्या धुमाकूळीने परीसरात भितीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाच्या सातत्यपूर्ण आणि नियोजनबद्ध प्रयत्नांना अखेर यश आले असून, हत्तींचा कळप आणि संबंधित टस्कर गडचिरोलीच्या जंगलात परतला आहे. मात्र, संभाव्य धोका पूर्णपणे टळलेला नसल्याने वनविभागाने सामदा-सोनापूर मार्गावर विशेष गस्त सुरूच ठेवली आहे.
0
0
Report

माळशेज घाटात मॉनसूनचा निसर्गरम्य सोहळा; धुकामय धबधबें पर्यटकांना मोहित करतात

Shirur, Maharashtra:सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या प्रसिद्ध माळशेज घाटातील निसर्ग सौंदर्य सध्या पावसाळ्यामुळे पूर्णपणे बहरलं आहे. उंचच उंच डोंगररांगा, धुक्याची दुलई आणि कड्यांवरून फेसाळत वाहणारे पांढरेशुभ्र धबधबे पर्यटकांना भुरळ घालत आहेत. उन्हाळ्याच्या तीव्र त्रासानंतर निसर्गाचा हा विहंगम नजारा डोळ्यात साठवण्यासाठी आणि गारव्याचा आनंद घेण्यासाठी माळशेज घाटात पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. जर तुम्हीही वीकेंडला कुठेतरी फिरायला जाण्याचा विचार करत असाल, तर माळशेज घाट हा तुमच्यासाठी एक पर्वणी ठरू शकतो.
0
0
Report

बेलापुर से राष्ट्रस्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक: स्वामी गोविंददेव गिरी महाराज

Shirdi, Maharashtra:अयोध्या के श्रीराम जन्मभूमि तीर्थ क्षेत्र ट्रस्ट के मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार और आध्यात्मिक जगत की प्रतिष्ठित हस्ती स्वामी गोविंददेव गिरी महाराज, लेकिन उनके इस प्रेरणादायी सफर की शुरुआत हुई थी महाराष्ट्र के अहिल्यानगर जिले के श्रीरामपुर तालुका के छोटे से गांव बेलापुर से, इसी गांव में उनका जन्म हुआ, यहीं उनका बचपन बीता और दसवीं तक की शिक्षा भी उन्होंने बेलापुर में ही प्राप्त की। बचपन से उनके स्वभाव, धार्मिक संस्कार, पारिवारिक वातावरण और एक सामान्य परिवार से निकलकर राष्ट्रीय स्तर के आध्यात्मिक नेतृत्व तक पहुंचने की उनकी यात्रा से जुड़ी कई यादें उनके चचेरे भाई रामप्रसाद विठ्ठलदास व्यास ने Zee News से विशेष बातचीत में स्वामीजी के जीवन से जुड़े कई अनसुने प्रसंग उन्होंने हमारे प्रतिनिधि कुणाल जमदाडे से बातचीत करते हुए बताए...
0
0
Report
Advertisement

बेलापुर से प्रेरित संत: स्वामी गोविंददेव गिरि महाराज की प्रेरक यात्रा

Shirdi, Maharashtra:अयोध्येतील श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टचे मुख्य कोषाध्यक्ष, प्रख्यात प्रवचनकार आणि आध्यात्मिक क्षेत्रातील मान्यवर व्यक्तिमत्त्व अशी देशभर ओळख असलेले स्वामी गोविंददेव गिरी महाराज. मात्र त्यांच्या या यशस्वी आणि प्रेरणादायी प्रवासाची सुरुवात झाली ती अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर या छोट्याशा गावातून. याच गावात त्यांचा जन्म झाला, याच मातीत त्यांचे बालपण घडले आणि दहावीपर्यंतचे शिक्षणही त्यांनी बेलापूरमध्येच पूर्ण केले. लहानपणापासूनचे त्यांचे स्वभाववैशिष्ट्य, धार्मिक संस्कार, कुटुंबातील वातावरण आणि सामान्य ते राष्ट्रीय स्तरावरील आध्यात्मिक नेतृत्वापर्यंतचा त्यांचा प्रवास या सगळ्याविषयी स्वामीजींचे चुलत भाऊ रामप्रसाद विठ्ठलदास व्यास यांनी आमच्याशी सविस्तर संवाद साधला. स्वामीजींच्या आयुष्यातील अनेक आठवणी झी 24 तासशी प्रतिक्रिया देताना सांगितल्या आहेत.स्वामीजींचे भाऊ यांच्याशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
0
Report

रत्नागिरी में भारी बारिश से बाढ़ की आशंका, 48 घंटे में खतरे से सावधान

Ratnagiri, Maharashtra:खेड/ रत्नागिरी रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे जगबुडी नदी धोकापातळीच्या वर सकाळी ११ वाजता भरणे नाका पुलाजवळ पाणीपातळी ७.३० मीटर इशारा पातळी ५.०० मीटर, धोकापातळी ७.०० मीटर खेडमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता नारंगी नदीलाही पूर; पाणी पात्राबाहेर शेकडो एकर भातशेती पाण्याखाली खेड–खाडीपट्टा मार्गावरील अनेक ठिकाणी पाणी साचले स्मशानभूमी व काही वीटभट्ट्या पुराच्या पाण्याखाली पुढील ४८ तास मुसळधार पावसाचा इशारा प्रशासनाचे नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि गरज पडल्यास सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करण्याचे आवाहन
0
0
Report
Advertisement

शहापूर के शेणवा गांव में विशाल नाग रेस्क्यू—सुरक्षित बचाया गया

Thane, Maharashtra:शहापूर शेणवा गावातील नाग रेस्क्यू.. शहापूर तालुक्यातील शेणवा गावात एका विहिरीत 3 दिवसांपासून अडकलेल्या भल्या मोठ्या नागाला स्थानिक सर्प मित्र रमेश डिगोरे यांनी जीवदान दिलं आहे. स्नेक हुकच्या मदतीने नागाला सुरक्षित बाहेर काढून रानात सोडण्यात आलं. "शहापूरच्या शेणवा परिसरात मागील 3 दिवसांपासून एक भला मोठा नाग शेतातील विहिरीत अडकून पडला होता. विहिरीची भिंत ओली आणि निसरडी असल्याने नागाला बाहेर पडता येत नव्हतं. गावकऱ्यांनी याची माहिती सर्पमित्र रमेश डिगोरे यांना दिली. रमेश यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन स्नेक रेस्क्यू हुकच्या मदतीने ऑपरेशन सुरू केलं. नाग झाडाच्या फांदीला विळखा घालून लटकला होता. अर्ध्या तासाच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर रमेश डिगोरे यांनी नागाला सुखरूप बाहेर काढलं आणि जवळच्या जंगलात सोडून दिलं. "पावसाळ्यात असे प्रकार वाढतात. सर्पमित्र रमेश डिगोरे यांनी नागरिकांना आवाहन केलं आहे की साप दिसल्यास त्याला मारू नये, तर तज्ज्ञांना बोलवावं. प्राण वाचवण्याच्या या कार्याबद्दल रमेश डिगोरे यांचं सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report

आदित्य ठाकरे के नेतृत्व पर सचिन अहिर का मोड़; रोचक बयान, राम मंदिर महाआरती की तैयारी

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग --- माजी आमदार वैभव नाईक ऑन टू द पॉईंट ( सचिन अहिर ) ऑन आदित्य ठाकरे नेतृत्व -- सचिन अहिर यांना दिलेला शब्द आदित्य ठाकरेंनी पाळलाय, सत्ता नसणे हा आदित्य ठाकरेंचा दोष नाही. महाराष्ट्रातील आश्वासक चेहरा म्हणून आदित्य ठाकरे जवळ पहिलं जात. सचिन अहिर यांनी उपसभापती पद मिळाल्यानंतर पक्षप्रवेश केल्याचे जग जाहीर आहे. आता आदित्य ठाकरेवर आरोप करण हास्यास्पद आहे. ऑन आदित्य ठाकरे आमदार बनविण्यात माझा वाटा --- आदित्य ठाकरे यांच्या विजयात सुनील शिंदे यांच्या मोठा वाटा आहे. अहिर यांच्यामुळे आदित्य ठाकरे निवडून आले हे सांगणं चुकीचं ठरेल ऑन ठाकरेंचे लोक टीका --- जे कधीच नव्हते आमचे त्यांची आस का धरावी या शब्दात संजय राऊत यांनी सांगितले आहे. सचिन अहिर यांच्यावर बोलण्यापेक्षा आम्ही आमच्या संघटना बांधणीकडे वेळ देत आहोत ऑन आम्हाला भविष्य आहे --- आदित्य ठाकरे यांचे नेतृत्व वाईट आहे किंवा आदित्य ठाकरे विश्वासात घेत नाहीत म्हणून सचिन भाऊंनी साथ सोडली नाही तर कार्यकर्त्यांना पद मिळवितासाठी त्यांनी साथ सोडली. आणि हे त्यांनी मान्य केलंय ऑन ठाकरेंसाठी सगळ केलं --- Sत्तेवर जायचं असेल तर लवकर निर्णय घ्यावा लागले असा विचार करून सचिन अहिर यांनी व्यावहारिक निर्णय घेतलाय. त्यांच्या इतर आरोपांना आता काही अर्थ राहत नाही ऑन ठाकरे आंदोलन --- आम्ही आंदोलन नाही तर राम रक्षा पठण रामंदिर किंवा हनुमान मंदिरात करणार आहोत. राम मंदिर व्हाव म्हणून हजारो कोटी रुपये गोळा झालेले त्याचा हिशोब नाही. शिवसेनेणे दिलेल्या चांदीच्या विटांचा हिशोब नाही त्यामुळे हिंदू समाजाला जागृत करण्यासाठी आम्ही आज महाआरती करणार आहोत. ऑन नितेश राणे ( उद्धव ठाकरे टीका ) --- नितेश राणेंना हा अधिकार नाही. राम मंदिर साठी लढा सुरू होता तेव्हा हे राजकारणात नव्हते. तेव्हा नितेश राणे काही काळ काँग्रेस मध्ये सत्ता उपभोगत होते. ह्याचं रामंदिरासाठी काय योगदान आहे. आमच्या वर बोलण्याचा त्यांना हक्क नाही byte --- वैभव नाईक, माजी आमदार ठाकरे गट
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर जिले के ताडोबा-अंधारी बफर क्षेत्र में किसान की मौत के पीछे आया बाघ जेरबंद; वन विभाग की सफल कार्रवाई

Chandrapur, Maharashtra:टाडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर क्षेत्रातील शेतकऱ्याचा बळी घेणाऱ्या वाघाला वन विभागाने यशस्वीपणे जेरबंद केले. चोरगाव परिसरातील वन विभागाची कारवाईची माहिती समाविष्ट असलेला घटक आता समाप्त झाले आहे. वाघ पकडण्यासाठी आमिष बांधण्यात आला; वाघाने त्या आमिषाची शिकार केली; परंतु जंगलात ओढून नेली. त्यानंतर पुन्हा मजबूत पद्धतीने दुसरे आमिष बांधण्यात आले. वाघ पुनः आमिषाजवळ आल्यानंतर ताडोबाचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. रविकांत खोब्रागडे यांच्या देखरेखीखाली शूटर अजय मराठे यांनी डार्ट गनद्वारे त्याला अचेत dili. सुमारे दोन वर्षांच्या या वाघाला बेशुद्धावस्थेत सुरक्षितरीत्या पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. तपासणीत वाघाची प्रक्रीती समाधानकारक आढळल्याने त्याला ताडोबा ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर (टीटीसी) येथे हलविण्यात आले.
0
0
Report

चिपळूण में दुर्लभ मास्क्ड बूबी पक्षी मिला, वन विभाग ने सुरक्षित रेस्क्यू किया

Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी चिपळूणात दुर्मिळ 'मास्क्ड बूबी' समुद्री पक्ष्याची नोंद; वन विभागाकडून सुरक्षित रेस्क्यू अँकर : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यात दुर्मिळ समुद्री पक्षी 'मास्क्ड बूबी' (Sula dactylatra) आढळून आला आहे. खरवते येथील कृषी महाविद्यालयाच्या मैदानावर हा पक्षी अशक्त अवस्थेत विद्यार्थ्यांना दिसून आला. विद्यार्थ्यांनी तत्काळ वन विभागाला माहिती दिल्यानंतर वनरक्षक रेश्मा कावळे यांनी घटनास्थळी धाव घेत पक्ष्याचे सुरक्षित रेस्क्यू केले. विभागीय वनाधिकारी गिरीजा देसाई पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पक्ष्याला उपचारासाठी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या ताब्यात देण्यात आले आहे. चिपळूण परिसरात या दुर्मिळ समुद्री पक्ष्याची नोंद झाल्याने पक्षीप्रेमी आणि वन्यजीव अभ्यासकांमध्ये विशेष उत्सुकता निर्माण झाली आहे.
0
0
Report
Advertisement

लोणावळा में 24 घंटे में 267 मिमी बारिश, इस सीजन की सबसे भारी बारिश

Varsoli, Maharashtra:पर्यटन नगरी लोणावळ्यात पावसाने तुफान बॅटिंग केलीये. गेल्या 24 तासांत तब्बल 267 मिलिमीटर पावसाची नोंद करत, यंदाच्या मोसमातील विक्रमी पावसाची नोंद केली. हवामान विभागाने दिलेला अंदाज अगदी तंतोतंत खरा ठरलाय. विक एंडला पावसाने कृपादृष्टी कायम ठेवल्यानं पर्यटकांच्या आनंदाला पारावर उरलेला नाही. यामुळं पर्यटनावर अवलंबून असलेला व्यापारी वर्ग सुखावलाय. लोणावळा आणि परिसरात आत्तापर्यंत 1090 मिलिमीटर पाऊस बरसलाय. या पावसाने शेतकरी वर्ग ही पेरणीच्या कामाला लागलाय. गेल्या वर्षी आजच्या तारखेपर्यंत 2392 मिलिमीटर पावसाची नोंद झाली होती. ही तुलना करता पावसाने आणखी कृपादृष्टी दाखवावी अशी अपेक्षा लोणावळाकरांना आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top