445001
यवतमाळ मध्ये बेलविक्रेत्याचा खून, लोहारात दहशत
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात खुनाचे सत्र सुरूच असून आता लोहारा परिसरात एका बेल विक्रेत्यांचा धारदार शस्त्राने भोसकून खून करण्यात आला आहे। भर वस्तीत अनेकांसमक्ष हा खून झाल्याने परिसरात दहशतीचे वातावरण आहे। रामनाथ सोनटक्के असे मृताचे नाव आहे, लोहाराच्या देवी नगर मध्ये तो बेल विक्री करून सायकल ने जात असताना अज्ञात व्यक्तीने त्याच्या छातीत चाकु भोसकला, ज्यात तो जागीच गतप्राण झाला. मृतक हा कोळंबी चा मूळ रहिवासी असून ह्या खुनामागे अनैतिक संबंधाची किनार असल्याची चर्चा आहे।
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिरूर में 42°C तापमान से किसान परेशान, कांदा उत्पादन पर संकट
Shirur, Maharashtra:राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य आग ओकतोय. पुणे शिरूरमध्ये तापमान 42 अंशापर्यंत पोहोचलं असून वाढत्या तापमानामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसतोय. सध्या शेतकऱ्यांची कांदा काढणीची लगबग सुरू आहे; मात्र वाढत्या तापमानामुळे शेतात कामासाठी मजूरच येत नाहीत, आलेले मजूर कांदा काढणी अर्धवट सोडून गावाकडे परत जात आहेत. याच आढाव्याची शिर्ष बातमी.0
0
Report
नाशिक के सिंहस्थ कार्यों में नियमों उल्लंघन पर महापौर ने दी कड़ी चेतावनी
Nashik, Maharashtra:नाशिक शहरात सिंहस्थाच्या कामांचा सध्या धडाका बघायला मिळतोय.. मात्र हे काम होत असताना नियमांचे पालन होत नसल्याने नागरिकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय.. याच पार्श्वभूमीवर नाशिकची महापौर आणि उपमहापौर यांनी या कामांची अधिकाऱ्यांसोबत अचानक पाहणी करत अधिकाऱ्यांना धारेवर धरले.... शहरात अनेक ठिकाणी कामांमुळे रस्ते बंद आहे त्याचबरोबर शहरात या कामांमुळे प्रचंड वाहतूक जा होताना पाहायला मिळते... या सगळ्याचा मानसिक आणि शारीरिक त्रास हा नागरिकांना होताना पाहायला मिळतोय...विकास काम होत असताना नाशिककरांना त्याचा त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी अन्यथा थेट कारवाई करण्याचा इशारा महापौरांनी दिलाय...0
0
Report
महाराष्ट्र में किसान चिंतित: उर्वरक कीमतें बढ़ीं, सब्सिडी की मांग
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - अनिल देशमुख *ऑन खत दरवाढ* महाराष्ट्रातील shेतकरी अडचणीत आहे. सोयाबीनला भाव नाही. खतांच्या किमतींमध्ये भरमसाठ वाढ झालेली आहे. २५ टक्क्यांपासून थेट 85 टक्क्यांपर्यंत वाढ करून शेतकऱ्यांचे कंबरडे मोडण्याचे काम केले जात आहे. खतांच्या किमती सरकारने लवकरात लवकर कमी केल्या पाहिजेत किंवा सबसिडी दिली पाहिजे. लिंकिकमध्ये वेगळाच प्रकार आहे.कृषी केंद्राला दोषी ठरवले जाते... कारखानदार हा या सर्व बाबींमध्ये दोषी आहे. कृषी केंद्रावर कारवाई न करता कारखानदारावर कारवाई करण्यात यावी. *ऑन बच्चू कडू पक्ष विलीनीकरण चर्चा* बच्चू कडू यांना सल्ला देण्याची आवश्यकता नाही. ते शेतकऱ्यांसाठी काम करत असतात. योग्य तो निर्णय ते घेतील. स्वतःच्या निर्णयाबाबत त्यांच्या कार्यकर्त्यांचे काय म्हणणे आहे, त्यानुसार ते निर्णय घेतील. *ऑन सायबर पोलीस पथक भांडण* माझ्या कानावर काही गोष्टी आलेल्या आहेत. सविस्तर माहिती देतो आणि मग बोलतो. *ऑन ऑटो चालक मराठी सक्ती* मराठी सक्तीचा विषय आहे. १ मेपासून लागू होणार होता. चर्चा झाली आणि पुढे ढकलण्यात आलेला आहे. मराठी सक्तीच्या बाबतीत जुजबी मराठी तरी बोलता आली पाहिजे..आठ दहा वाक्येतरी मराठीत बोलता आल पाहिजेत त्या टॅक्सीधारकाला ती यायला पाहिजेत... तेही बोलणार नाही, तर ही भावना बरोबर नाही. महाराष्ट्रात जेव्हा तुम्ही राहता, तिथली मराठी भाषा. मराठी भाषेचे आठ-दहा वाक्ये शिकायला अडचण नसली पाहिजे... निबंध थोडीच लिहायचा आहे. मराठी भाषेचे किमान आठ दहा शब्द त्यांना बोलता यायला हवे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर किडनी रैकेट: डॉक्टर रविंद्रपाल सिंग की जमानत नागपुर हाईकोर्ट ने ठुकराई
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड येथील रोशन कुडे याच्या किडनी विक्रीतून उघडकीस आलेल्या रॅकेटमधील मुख्य संशयित आरोपी डॉ. रविंद्रपाल सिंगचा अटकपूर्व जामीन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने सोमवारी फेटाळून लावला. या निर्णयामुळे त्याच्या अटकेचा मार्ग मोकळा झाला असून, स्थानिक गुन्हे शाखेचे पथक डॉ. सिंगच्या अटकेसाठी रवाना झाले आहे. नागभीड येथील रोशन कुडे याची किडनी कंबोडिया येथे काढल्याचे समोर आल्याच्यापर्यंत या प्रकरणाची व्याप्ती वाढली होती. भारतातील त्रिची येथील STAR KIMS हॉस्पिटलमध्ये डॉ. रविंद्रपाल सिंग आणि डॉ. राजरत्नम गोविंदसामी हे किडनी प्रत्यारोपण शस्त्रक्रिया पार पाडत असल्याचे तपासात उघड झाले होते. डॉ. सिंग याला दोनदा अंतरिम जामीन मिळाला होता. मात्र, कायदेशीर पेच निर्माण झाल्याने दोन्ही बाजूंनी जोरदार युक्तिवाद झाला. तब्बल २० सुनावण्यांनंतर न्यायालयाने हा अटकपूर्व जामील अर्ज फेटाळला आहे.0
0
Report
घरगुती गैस सिलेंडर की किल्लत से ग्राहक उखड़े, काउंटर पर हंगामा
Nagpur, Maharashtra:घरगुती गॅस सिलेंडरचा मिळत नसल्याने किंबहुना प्रतीक्षा वाढल्याने संतापलेल्या गॅस एजन्सीच्या काउंटरवर ग्राहकांनी महिला कर्मचाऱ्यासमोर आपला संताप व्यक्त केला. तसेच एजन्सी मधील काउंटर समोरील कार्यालयीन टेबल उलटविला. याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. घरगुती गॅसच्या वेटिंग चा आकडा वाढत असल्याने सर्वसामान्य ग्राहकांचा संयमाचा बांध सुटत असल्याचे दिसून येत आहे0
0
Report
कोल्हापुर के शिरोली में प्रेम जाल में फँसाकर युवतियों के साथ अत्याचार, आरोपी गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:प्रेमाच्या नावाखाली तरुणींना जाळ्यात ओढून अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकरणाने कोल्हापूर हादरलंय…हातकणंगले तालुक्यातील पुलाची शिरोलीत हे प्रकरण उघडकीस आल असून एका युवतीच्या तक्रारीनंतर आरोपीला अटक करण्यात आले आहे. या प्रकरणाची व्याप्ती मोठी असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. त्यामुळे शिरोली मधील संतप्त ग्रामस्थांनी गाव बंद ठेवत निषेध नोंदवला. शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी 10 हून अधिक तरुणी या आरोपीच्या जाळ्यात अडकल्याची शक्यता हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी वर्तवली आहे. घटनेनंतर पुलाची शिरोली गावात संताप उसळलाय. या घटनेच्या निषेधार्थ आज पुलाची शिरोली गाव पूर्णपणे बंद ठेवण्यात आले. हिंदुत्ववादी कार्यकर्ते एकत्र येत आरोपीला कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी मागणी केली आहे. राजकीय पातळीवरही या प्रकरणाचे पडसाद उमटलेत. भाजप आमदार अमल महाडिक यांनी आंदोलन स्थळी भेट देत मुख्यमंत्र्यांकडे या प्रकरणाची SIT मार्फत सखोल चौकशी करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले. प्राथमिक तपासात शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील अनेक तरुणी या जाळ्यात अडकल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला जात असून, पीडितांना पुढे येण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेत काहींकडून ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला असून कोणताही निष्कर्ष अद्याप जाहीर केलेला नाही. एका युवतीच्या तक्रारीनंतर या प्रकरणाचे बिंग फुटले आहेत… आता हे प्रकरण किती मोठे आहे... संबंधित आरोपीने अजून किती पिढीताच्यावर अशाप्रकारे अत्याचार केलेत हे पोलीस तपासात पुढे येईल. त्यामुळेच कोल्हापूरच्या या घटनेकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपुर के गोंडपिपरी में Scrap चोर गैस कटर से खंभे काटकर चोरी; 10 लाख के माल के साथ दो गिरफ्तार
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यात भंगारचोरांचे धाडस बघायला मिळाले. या परिसरात सोमनपल्ली ते धाबा जाणाऱ्या मार्गावर बंद पडलेली महावितरण डीपी कापून चोरून नेल्याची तक्रार धाबा पोलीस ठाण्यात प्राप्त झाली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी गस्त वाढविली होती. या दरम्यान एक बोलेरो वाहन संशयास्पद रीतीने फिरताना पोलिसांना आढळले. वाहनाची झडती आणि सोबतच्या इसमांची विचारपूस केली असता ते महावितरणच्या बंद पडलेल्या वाहिन्या विविध साहित्याने कापून लंपास करत असल्याचे उघड झाले. साहित्यात चक्क गॅस कटर , ग्लोव्हज, घरगुती सिलिंडर, ऑक्सिजन सिलिंडर आदींचा समावेश होता. हे संपूर्ण साहित्य घेऊन चोरटे विजेचे खांब आणि अल्युमिनियम तारांची चोरी करत होते. पोलीसांनी चंद्रपूर शहरातील मोहम्मद वहाब आणि जमील शेख या भंगार दुकान चालविणाऱ्या आरोपींना 10 लाखांच्या मुद्देमालासह अटक केली आहे.0
0
Report
महाड में एक रात में तीन घरफोड़ियाँ, दो ज्वेलर्स-एक फर्नीचर दुकान के शटर तोड़े गए
Chendhare, Maharashtra:स्लग - महाडमध्ये एकाच रात्री तीन घरफोड्या लोखंडी शटर तोडून चोरी घटनेमुळे व्यापारी वर्गात घबराट अँकर - रायगडच्या महाड शहरात चोरट्यांनी एकाच रात्री तीन ठिकाणी घरफोड्या केल्या आहेत. यात दोन दुकान ज्वेलर्सची तर एक दुकान फर्निचरचे आहे. तीनही दुकानांचे लोखंडी शटर्स तोडण्यात आले आहेत. घरफोडीच्या या घटनांमुळे परिसरातील रहिवाशी आणि व्यापाऱ्यांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीनही घटनांची अद्याप पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नसून किती मुद्देमाल चोरीला गेला या बाबतचा तपशील समोर आलेला नाही.0
0
Report
कोंकण में चार महीनों में लाचखोरी के 34 मामले सामने
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लाचखोरीत कोकण चिंताजनक.. चार महिन्यात 34 प्रकरणे उघड.. ठाणे आघाडीवर..रायगडात 4 कारवाया.. अँकर टेबलाखालून पैसे दिल्याशिवाय सरकारी काम होत नाही असा प्रत्येक नागरिकांना वेळोवेळी येत असून भ्रष्टाचाराची व्याप्ती वाढत असल्याचे चित्र आहे.. कोकण विभागात एक जानेवारी ते 22 एप्रिल 2026 या पावणेचार महिन्यांच्या कालावधीत लाचखोरीची 34 प्रकरणे उघडकीस आली आहेत.. यामध्ये ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभाग कारवाईत आघाडीवर असून १४ सापळा कारवाया करण्यात आल्या आहेत.. तर रायगड लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 4 प्रकरणात कारवाई केली आहे.. सिंधुदुर्ग आणि पालघर विभागात प्रत्येकी तीन प्रकरणात सापळे रचून सर्वात कमी कारवाई करण्यात आली आहे.. भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी लाचलुचपत विभाग प्रतिबंधक विभाग कार्यरत असला तरी लाचखोरी कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र आहे..0
0
Report
Advertisement
अकोला रेलवे क्रॉसिंग पर ग्रीन नेट से गर्मी में राहत
Akola, Maharashtra:विदर्भात उष्णतेची लाट दिवसेंदिवस तीव्र होत चालली आहे. सर्वच जिल्ह्यांमध्ये तापमान 42 अंशांच्या पुढे गेले असून अकोल्यात पारा 46 अंशांवर पोहोचला आहे. अशा कडाक्याच्या उन्हात नागरिकांना दिलासा देणारे एक प्रेरणादायी उदाहरण अकोल्यात पाहायला मिळत आहे. अकोला शहराला न्यू तापडिया नगरशी जोडणाऱ्या उड्डाणपुलाचे काम गेल्या दहा वर्षांपासून सुरू आहे. त्यामुळे या ठिकाणी पर्यायी रस्ता आणि रेल्वे क्रॉसिंगचा वापर नागरिकांना करावा लागतो. मात्र रेल्वे गाडी येताच गेट बंद होत असल्याने नागरिकांना प्रखर उन्हात बराच वेळ उभं राहाव लागतं. हीच अडचण ओळखून समाजसेवक निलेश देव यांनी आपल्या मित्रांच्या सहकार्याने या ठिकाणी दुचाकी चालकांसाठी ग्रीन नेटच्या माध्यमातून सावलीची व्यवस्था उभी केली आहे. गेल्या दहा वर्षांपासून ते सातत्याने हा उपक्रम राबवत असून प्रत्येक वर्षी उन्हाळ्यात नागरिकांसाठी दिलासा निर्माण करत आहेत. न्यू तापडिया नगर येथील रेल्वे क्रॉसिंगवर उभारण्यात आलेली ही ग्रीन नेट सावली सध्या नागरिकांसाठी वरदान ठरत आहे. कडक उन्हात गेट उघडण्याची वाट पाहणाऱ्या शेकडो दुचाकी चालकांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळत आहे. स्थानिक नागरिकांकडूनही निलेश देव यांच्या या कार्याचे कौतुक होत असून, “खऱ्या अर्थाने समाजसेवा म्हणजे काय” याचे उत्तम उदाहरण त्यांनी घालून दिली जात आहे.0
0
Report
रत्नागिरी में जनशताब्दी एक्सप्रेस में अवैध शराब पकड़ी गई; 191 बोतलें जब्त
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये मद्याचा महापूर.. रत्नागिरीत १९१ बाटल्यांसह दोघे गजाआड.. अँकर कोकण रेल्वेमार्गावर रेल्वे सुरक्षा दल (RPF) आणि 'सी अँड आय' विभागाने अवैध मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई केली आहे.मडगाव-मुंबई जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये रत्नागिरी स्थानकावर ही धाड टाकण्यात आली. संशयास्पद हालचालींवरून दोन प्रवाशांच्या सामानाची झडती घेतली असता १९१ मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.. याप्रकरणी दोन प्रवाशांना रंगेहात पकडण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.. हा मद्यसाठा गोवामार्गे मुंबईत विक्रीसाठी नेला जात असल्याचा प्राथमिक अंदाज आहे... रेल्वे प्रशासनाने या कारवाईनंतर प्रवाशांना कडक इशारा दिला असून,रेल्वेतून प्रतिबंधित वस्तूं抵ँच वाहतूक केल्यास कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल,असे स्पष्ट केले आहे..0
0
Report
चिपळूण में बागेश्वर बाबा के विरोध पर शिवप्रेमियों ने banner पर रोष जताया
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणमध्ये 'बागेश्वर बाबा' विरोधात संताप; बॅनरला घातला जोड्यांचा हार!.. अँकर रत्नागिरीच्या चिपळूणमध्ये शिवप्रेमींचा प्रचंड संताप पाहायला मिळाला...बागेश्वर धामचे प्रमुख धीरेंद्र शास्त्री यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या कथित वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद आता उमटू लागले आहेत.. चिपळूणच्या वडनाका परिसरात संतापलेल्या नागरिकांनी धीरेंद्र शास्त्रींच्या निषेधार्थ बॅनर लावले.. या निषेधाचे स्वरूप इतके तीव्र होते की,नागरिकांनी या बॅनरला जोड्यांचा हार घालून आपला रोष व्यक्त केला.. या घटनेमुळे शहरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते,मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत परिस्थिती नियंत्रणात आणली.. स्थानिक शिवप्रेमींनी अशा वक्तव्यांचा जाहीर निषेधान केला असून,संबंधितांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरत आहे...0
0
Report
Advertisement
हातकणंगले में प्रेम जाल में फंसाकर युवतियों के साथ अत्याचार, SIT जांच की मांग
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात असणाऱ्या पुलाची शिरोली मधील एका तरुणाने प्रेमाच्या जाळ्यात ओढून सुमारे 10 हून अधिक तरुणींवर अत्याचार केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या प्रकरणामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संशयित आरोपी शाहीद समीर सनदी (वय २२, रा. पुलाची शिरोली) याने सोशल मीडियाच्या माध्यमातून १८ ते २२ वयोगटातील तरुणींशी ओळख वाढवली. त्यानंतर त्यांना प्रेमाच्या जाळ्यात अडकवून लॉजवर नेऊन अश्लील व्हिडीओ तयार केले. या व्हिडीओच्या आधारे बदनामीची धमकी देत त्याने संबंधित तरुणींचे वारंवार शारीरिक व मानसिक शोषण केल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाची सुरुवात राजारामपुरी पोलीस ठाण्यात २० वर्षीय पीडित तरुणीने दिलेल्या तक्रारीतून झाली. तक्रार मिळताच हातकणंगले पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली. न्यायालयाने आरोपीला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्राथमिक तपासात शिरोली, हुपरी आणि हातकणंगले परिसरातील आणखी अनेक तरुणी या जाळ्यात अडकल्याचा दावा हिंदुत्ववाद्यांनी केला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा तपास अधिक व्यापक केला जात असून, पीडितांना पुढे येण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. या घटनेत काहींकडून ‘लव्ह जिहाद’चा संशय व्यक्त केला जात असला, तरी पोलिसांनी सध्या सर्व बाजूंनी तपास सुरू ठेवला असून कोणताही निष्कर्ष अद्याप जाहीर केलेला नाही. असे असले तरी पुलाची शिरोली ग्रामस्थांनी या घटनेच्या निषेधार्थ आज गाव बंद ठेवले आहे. त्याचबरोबर आरोपीला जास्तीत जास्त शिक्षा व्हायला हवी अशी मागणी केली आहे.. भाजपा आमदार अमल महाडिक यांनी आंदोलन स्थळी भेट ठेवून मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणाचा तपास करण्यासाठी SIT ची स्थापना करावी अशी मागणी करणार असल्याचे सांगितले.0
0
Report
सीएम फड़णवीस का सोलापुर दौरा: महापूजा के बाद सार्वजनिक सभाओं पर जोर
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस आज सोलापूरच्या दौऱ्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बार्शीचे ग्रामदैवत श्री भगवंतांच्या महापूजेचे आयोजन महापूजेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सोलापूर शहरातील जाहीर सभेकडे होणार रवाना सोलापूर जिल्ह्यातील सर्व स्थानिक निवडणुकांमध्ये घवघवीत यश प्राप्त केल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते स्थानिक पदाधिकाऱ्यांचा होणार सत्कार सत्कारानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कार्यकर्त्यांना संबोधित करणार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष0
0
Report
यवतमाड़ जिले में 10 ग्राम पंचायतों में मतदान शुरू; 3 सरपंच व 15 पंचायत सदस्य पदों के लिए चुनाव
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्ह्यात 47 ग्रामपंचायतील चार सरपंच आणि 79 सदस्यांची पदे विविध कारणामुळे रिक्त आहेत. त्यापैकी दहा ग्रामपंचायतीमध्ये तीन सरपंच आणि 15 ग्रामपंचायत सदस्य पदासाठी ही निवडणूक प्रक्रिया पार पडत आहे. ग्रामपंचायत पोटनिवडणुकीकडे उमेदवारांनी पाठ फिरवल्याने 67 सदस्यांच्या जागा रिक्तच राहणार आहेत.0
0
Report
Advertisement
