icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सोलापुर में पानी आपूर्ति पर बजट और विश्व बैंक के सुझावों पर चर्चा शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : या देशातून काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली - मंत्री जयकुमार गोरे - सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी जे करायचे आहे ते करणार - एक प्रश्न मार्गी लागलाय दुसऱ्यावर काम सुरूय - दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 1550 किमी पाईप लाईनची आवश्यकता आहे. - पहिल्या टप्प्यात 868 कोटींची तरतूद केली होती मात्र वर्ल्ड बँकेने 1400 कोटीचे बजेट असावे असावे असे सांगितले - अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करण्याची सवय लागली आहे. - दोनी भाजप आमदार देशमुखांना टोला - कोणतीही अतिरिक्त कर वाढ होणार नाही. - त्यामुळे काही लोकं वीनाकारण माध्यमातून चर्चा करत आहेत. - वर्ल्ड बँकेचे 4-5 सजेशन आहेत ते करावे किंवा नाही हा महापालिकेचा अधिकार आहे. - आजच्या सभेत हा विषय मान्यतेसाठी येणार आहे. - पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना नाव न घेता टोला - हा प्रस्ताव आधी वाचून समजून घ्यायला हवा होती. - मात्र त्यांनी तक्रार केल्यानंतर या प्रस्तावाचे वाचन झाले असावे. - शहराच्या प्रतिनिधीनी जबाबदारीने भूमिका मांडणे अपेक्षित आहे. - हा प्रस्ताव इंग्रजीत होता पण त्यांनी योग्य ठिकाणाहून माहिती घ्यायला हवी होती - महापालिका आयुक्त, महापौर यांच्याशी चर्चा करायला हवी होती. - ऑन महेश शिंदे : महेश शिंदे यांची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार आहे. - मात्र ते जे भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे. - ऑन प्रणिती शिंदे : एका महिला खासदाराने महिला आरक्षणाला विरोध करणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक ऋ्हासाचं उदाहरण आहे. - महिलाना संधी मिळावी अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली. - साधन सुचिताच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष, महिला विधयक का होत नाही म्हणून गप्पा मारणारे आज विधेयक नामंजूर झाले म्हणून जल्लोष करणारा काँग्रेस पक्ष आहे. - या देशातून काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली - ऑन सदावर्ते विधान : गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. - मात्र सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. - ऑन क, ड कर्मचारी स्थगिती : केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना आहेत. - जनगणनेत कामाशी संबंधित आहेत त्यांच्या बदल्या स्थगित केल्या आहेत. - मात्र त्यात काही बदल विचाराधीन आहेत. - ऑन महावितरण कारभार - शेतकऱ्यांना वीज मोफत देतोय आणि ती दिवसा मिळावी असा प्रयत्न आहे. - आत्ता सोलरचे काही काम सुरु आहेत. - काही कामे होताना थोडा त्रास होईल मात्र संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र सोलरवर जाणार आहे. - हे काम सुरु असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. - थोडे दिवस वीज वितरणात अडथळा असणार आहे. - BYTE : जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
0
Report

तनपुरे बोले नहीं BJP में प्रवेश; राहुरी पोटनिवडणुकी में राजनीति तेज

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र तनपुरे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे मी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातच आहे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही त्यांनी स्पष्ट केला असंही म्हटलं आहे राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसला तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे निवडणुकीतून बाहेर पडलेल्या मात्र पक्षात असूनही प्रचारात सक्रिय नसलेले तनपुरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे प्रचार सभा आहे या सभेत भाजप मध्ये प्रवेश करशील अशी चर्चा असतानाच तनपुरे यांनी आपण प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केला आहे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती केली होती ही विनंती आपण मतदार संघातील विकास कामे गतीने व्हावीत यासाठी मान्य केली शिवाय आपण निवडून आल्यानंतर विरोधी बाकावर बसू महायुतीच्या सत्तेला कुठलाही परिणाम होणार नाही शिवाय मतदार संघात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेलं भावनिक वातावरण देखील आहे त्यामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याचं तनपुरे यांनी सांगितला आहे आपण माघार घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं असलं तरी आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे
0
0
Report
Advertisement

डॉ. नंदकुमार राऊत अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन के अध्यक्ष बने

Dharashiv, Maharashtra:धाराशिव धाराशिव मध्ये होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय झाले आहे,कंजाळ,बिलिंगा,काडकुसुंबा,हराटी आदी ग्रंथांचे विपुल लेखन श्री राऊत यांनी केले आहे,आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे, २९ व ३० मे २०२६ रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी धाराशिव मध्ये संपन्न होणार संमेलन ९०० साहित्यिक लावणार संमेलनास उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केले संमेलनाचे आयोजन
0
0
Report

Aadivaasi Navsupurti ki Anokhi Parampara: Jalte Khathe Ke Saath Biroba Mandir Pradakshina

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोठेवाठीमध्ये आदिवासी बांधव नवसपूर्तीची एक अनोखी परंपरा शेकडो वर्षापासून जपत आहेत ... अर्धवट कापलेल्या माठात जंगली वनस्पती टाकल्या जातात आणि लाकडांवर तेलाची संततधार सोडून पेटवलेले हे कठ्ठे डोक्यावर घेऊन बिरोबा मंदिराला प्रदक्षिणा मारतात... आपण देवाला काही मागणं मागितल आणी ते पुर्ण झालं तर त्याची नवसपुर्ती केली जाते... कुणी नारळ वाहतात, कुणी दानधर्म करतो नवसपुर्तीचे अनेक प्रकार आहेत मात्र आदिवासी बांधवांची ही प्रथा मात्र अनोखी आणी थरारक आहे.. अर्धवट कापलेल्या माठात जंगली वनस्पती टाकल्या जातात आणि लाकडांवर तेलाची संततधार सोडून भिजवलेल्या या माठाला कठ्ठे असे म्हणतात... देवाच्या काठिची मिरवणूक मंदिराजवळ आली कि हे कट्टे पेटवले जातात... आणी धगधगणारे हे कठ्ठे मग गावातील एक एक जण उचलतो आणी डोक्यावर घेऊन देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा सुरू होते.. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रवीवारी बिरोबा महाराजांची यात्रा भरते यावेळी रविवारीच अक्षय तृतीया असल्याने काल रात्री हि अनोखी परंपरा साजरी केली गेलीय.. वर्षानुवर्षे हि परंपरा हे लोक जपत आले आहेत या मागे त्यांची अपार श्रद्धा आहे.... धगधगणा-या कठ्ठ्यातील ओघळणारे गरम तेलानेही आजवर कुणालाही इजा झाली नाही .. माठातून खाली पडणारे विस्तव तुडवत सगळे जण चालत असतात ... देवळातील घंटानाद सुरू असताना हुई.. हुई... करत पेटलेले कठ्ठे डोक्यावर घेऊन जाणारांच्या आवाजाने परीसर अगदी दुमदुमून जातो....
0
0
Report
Advertisement

सोलापुर कृषि उपज मंडी में किसानों का हंगामा, प्याज की नीलामी बंद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ, कांद्याचा लिलाव पाडला बंद - संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारातील कांद्याचा लिलाव बंद पाडला - कांद्याला भाव मिळत नाही, कांदा चोरी, सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी आक्रमक - बाजार समितीतील कांद्याचे सर्व लिलाव पूर्णपणे बंद पाडण्यात आले - बाजार समिती प्रशासन तसेच आडत व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारतात - मात्र त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे शेतकरी संतप्त - रोज सकाळी 10 वाजता सुरु होणारे लिलाल अद्यापही ठप्प आहेत
0
0
Report

अकोला में बालू माफियाओं का बढ़ता आतंक; ट्रैक्टर चालक पर पुलिस ने केस दर्ज किया

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात वाळू माफियांचा वाढता सुळसुळाट व्हिडिओ व्हायरल अकोला जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाळू माफिया अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी म्हैसंग परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत भरधाव ट्रॅक्टर पुढे नेला. एवढेच नाही तर संबंधित चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. ट्रॅक्टरचा वेग आणि चालकाची आक्रमकता पाहता पोलिस कर्मचाऱ्याला माघार घ्यावी लागली. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report
Advertisement

तूफान-जैसा वादळ: जरुड में बड़े पैमाने पर नुकसान, बेघर लोगों की शिकायत

Amravati, Maharashtra:काल रात्री झालेल्या वादळी वाऱ्यामुळे वरूड तालुक्यातील जरुड या गावात खूप मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान झाले असून काही लोक बेघर झाले आहेत. या नुकसानीत काहींच्या घरावरील छत्रे उडून गेले तर काहींच्या घराच्या भिंती उन्मळून पडल्या तसेच काल रात्री वरूड अमरावती हायवे वर झाडे पडल्यामुळे काही वेळे पर्यंत वाहतूक विस्कळीत झाली होती. झालेल्या घटनेचा त्वरित पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी गावकऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे. सुदैवाने यामध्ये जीवित हानी झालेली नसली तरी आर्थिक नुकसान मात्र मोठ्या प्रमाणावर झाले आहे.
0
0
Report

पहले ही दिन रेलवे सेवाएं बाधित, डोंबिवली से कल्याण जाने वाली लोकल डब्बा फिसला

Kalyan, Maharashtra:आठवड्याच्या पहिल्या दिवशीच रेल्वे विस्कळीत. चाकरमान्यांचे हाल. कळवा कारशेड वरून निघालेली कल्याण ला जाणारी लोकल डोंबिवली स्थानकावरून कल्याणच्या दिशेने निघाल्यानंतरच लोकल रेल्वेचा डबा रुलावरून घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे रेल्वे प्रशासनाकडून युद्ध पातळी पातळीवर काम सुरू आहे सकाळी आठ वाजता डोंबिवली स्टेशन वरती आल्यानंतर रुलावरून डबा घसरल्याने वाहतूक विस्कळीत झालेली आहे. मुंबई त्याचप्रमाणे कल्याणच्या दोन टीम घटनास्थळी दाखल झालेले आहेत आणि युद्ध पातळीवरती काम सुरू आहे मात्र काम केव्हा पूर्ण होणार हे अद्याप अजून पर्यंत रेल्वे प्रशासना सांगण्यात आलेले नाही मात्र काल डोंबिवली आणि ठाणे यादरम्यान दहा तासाचा मेगाब्लॉक घेण्यात आले होते आणि या मेगाब्लॉकमध्ये डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म नंबर एक वरती रुलाखालचे स्लीपर बदलण्याचे काम देखील हाती घेण्यात आलेले होते दहा तासाचा मेगाब्लॉक घेऊन सुद्धा अशा प्रकारचे घटना घडत असतील तर याबाबत नागरिकांनी संताप व्यक्त केलेला आहे याचा आढावा घेतल्या आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी
0
0
Report
Advertisement

चिपळुण में एलोंदवाड़ी बाँध बनकर तैयार, पानी और खेती को नई दिशा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूणच्या विकासाला नवे पंख.. एलोंदवाडी धरण प्रकल्प अंतिम टप्प्यात!.. शिरवली येथील गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेला एलोंदवाडी धरण प्रकल्प आता पूर्णत्वाच्या मार्गावर आहे.या एका प्रकल्पामुळे परिसरातील १५ ते २० गावांचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी मिटणार आहे.".. या धरणाचे काम सध्या ८० ते ८५ टक्के पूर्ण झाले असून, प्रशासनाने उर्वरित कामालाही वेग दिला आहे.. ७५० मीटर लांबी आणि ४५ मीटर उंची असलेल्या या भव्य प्रकल्पासाठी साधारण २५० कोटी रुपये खर्च केले जात आहेत... या धरणाचे वैशिष्ट्य म्हणजे केवळ पिण्याचे पाणीच नाही,तर शेतीसाठी देखील याचा मोठा उपयोग होणार आहे... इतकेच नव्हे,तर भविष्यात या धरणाच्या पाण्यावर विद्युत निर्मिती करण्याचीही प्रशासनाची योजना आहे." या वर्षाअखेरपर्यंत हे धरण पूर्ण होऊन चिपळूणच्या विकासाला नवी गती मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top