445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
डिज़ेल की कमी से नांदेड के ग्रामीण पंपों पर किसानों की लंबी कतारें
Nanded-Waghala, Maharashtra:डिझेलच्या तुटवाड्यामुळे ग्रामीण भागातील पेट्रोल पंपांवर शेतकऱ्यांची रांगा लागल्याचे चित्र नांदेड जिल्ह्यातील हदगाव, हिमायतनगर, भोकर तालुक्यात दिसून आले. खरीप हंगाम जवळ आल्यामुळे शेतीचं मशागतीचं काम सुरू आहे. कमी वेळात जास्त मशागत होत असल्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरने जमिनीची मशागत करत आहेत; परंतु डिझेल मिळत नसल्याने ते त्रस्त आहेत. तालुक्यातील अनेक पेट्रोल पंपांवर पहाटेपासूनच लांबलांगी रांगा दिसत आहेत. तसेच कॅनमध्ये डिझेल घेण्यासाठी रांगा लागल्यात. काही ठिकाणी डिझेल संपल्याचे फलक लावण्यात आले असल्यामुळे नागरिकांना एक पंपातून दुसऱ्या पंपाकडे भटकंती करावी लागत आहे. उन्हात तास काही प्रतीक्षा करूनही इंधन मिळत नसल्याने शेतकरी संतप्त झाले आहेत.0
0
Report
रिसोड में पिसलते कुत्ते ने 25 लोगों को काटा, शहर में भय फैल गया
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड शहरात पिसाळलेल्या एका कुत्र्याने २५ जणांना चावा घेतल्याने नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. जखमींमध्ये लहान मुले व महिलांचा समावेश असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. चांदणी चौक,लोणी फाटा आणि रामनगर परिसरातील नागरिकांना चावा घेतल्यानंतर सर्व जखमींना रिसोड ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. नागरिकांनी मोकाट श्वानांचा तातडीने बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.0
0
Report
अमरावती देश का सबसे गर्म शहर; तापमान 46°C पार, हीटवेव अगले पाँच दिनों तक जारी
Amravati, Maharashtra:देशात सर्वाधिक हॉट शहर म्हणून अमरावतीची नोंद; पारा पोहचला 46 अंशाच्या पुढे, पश्चिम विदर्भात पुढील पाच दिवस कायम राहणार उष्णतेची लाट अँकर :- दक्षिण अंदमानमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा भारतीय हवामान विभागाने केली असली तरी दुसरीकडे पश्चिम विदर्भात सूर्य अक्षरशः आग ओकत असल्याचे चित्र आहे. देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद अमरावती जिल्ह्यात झाली असून काल अमरावतीचा पारा तब्बल 46 अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला. त्यामुळे अमरावती देशातील सर्वाधिक उष्ण शहर ठरले आहे. विदर्भासह अमरावतीत सकाळपासूनच उन्हाचे चटके जाणवत असून दुपारच्या वेळी रस्त्यांवर शुकशुकाट पाहायला मिळत आहे. प्रचंड उकाड्यामुळे नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. Vo :१ अमरावती, अकोला, यवतमाळ, वर्धा आणि नागपूरसह संपूर्ण पश्चिम विदर्भ सध्या उष्णतेच्या लाटेच्या विळख्यात सापडला आहे. हवामान खात्याने पुढील पाच दिवस विदर्भात हीट वेव्ह कायम राहण्याचा इशारा दिला आहे. दुपारच्या वेळी गरम वाऱ्यांचे फटके बसत असून तापमानात सातत्याने वाढ होत आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. अनेक भागात रस्ते ओस पडले असून बाजारपेठांमध्येही गर्दी कमी झाल्याचे दिसत आहे. Vo:२ दरम्यान या उन्हामुळे गेल्या दोन ते अडीच महिन्यात 15 उष्माघाताचे रुग्ण अमरावती जिल्ह्यामध्ये आढळले असून जिल्हा सामान्य रुग्णालयात या रुग्णांवर उपचार करून त्यांना घरी पाठवले आहे. तसेच आतापर्यंत तीन ते चार रुग्णांचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची माहिती आहे. मात्र अजून पर्यंत अधिकृत ही आकडेवारी पुढे आली नाही. काही काम करायचे असल्यास सकाळी करून घ्यावी व बाहेर जायचे असेल तर भरपूर पाणी प्यावे तसेच पोटभर नाश्ता करून बाहेर पडावे व उन्हात गडद कपडे न घालता पांढऱ्या कपड्यांचा वापर करावा आणि बाहेरील काम करायास संध्याकाळच्या वेळेचा उपयोग करण्याचे आव्हान अमरावती जिल्हा शल्य चिकित्सक विनोद पवार यांनी केला आहे. बाईट :- डॉ. विनोद पवार, जिल्हा शल्य चिकित्सक, अमरावती Vo:३ अमरावतीत उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून शहरातील तापमान तब्बल ४६ अंशांच्या पुढे गेले आहे. अमरावती जिल्ह्यात उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. कडक ऊन आणि घामाच्या धारांमुळे नागरिक हैराण झाले आहे. त्यामुळे या कडक उन्हाळ्यात तरुण वर्ग विशेषतः बच्चे कंपनीला जलतरण तलावांचे म्हणजेच स्विमिंग पूलचे वेध लागल्याचे पाहायला मिळत आहे. शाळांना सुट्ट्या लागल्यामुळे सध्या शहरातील स्विमिंग पूलवर मुलांची प्रचंड गर्दी पाहायला मिळत आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत स्विमिंग पूल वर मोठी गर्दी केल्याचा चित्र आहे त्यामुळे सध्या तरुण तसेच बालकांनी आपला मोर्चा जलतरण केंद्रांकडे वळवल्याचं पाहायला मिळत आहे. दरम्यान उन्हाळ्यामुळे पोहायला गेल्याने आतापर्यंत जिल्ह्यात सात बालकांचतरुणण्यात बुडून मृत्यू झाल्याची ही घटना समोर आली आहे बाईट :- अथर्व डबले, पोहायला गेलेले तरुण Vo : ४ उष्णतेमुळे सर्वाधिक फटका मजूर, शेतकरी, वाहतूक कर्मचारी आणि रस्त्यावर काम करणाऱ्या कामगारांना बसत आहे. दुपारच्या वेळेत अनेक ठिकाणी कामे बंद ठेवण्याची वेळ आली आहे. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायडरेशन, चक्कर येणे, अशक्तपणा अशा तक्रारीमध्ये वाढ होत असल्याचे डॉक्टर सांगत आहेत. जिल्हा रुग्णालयासह खासगी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. दरम्यान प्रशासनाने नागरिकांना दुपारी 12 ते 4 या वेळेत अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचा सल्ला दिला आहे. भरपूर पाणी पिणे, डोक्यावर कपडा किंवा टोपी वापरणे, हलका आहार घेणे आणि लहान मुले व ज्येष्ठ नागरिकांची विशेष काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अमरावतीने देशातील सर्वाधिक तापमानाची नोंद करत उष्णतेचा विक्रम केला असला, तरी आता सर्वांचे लक्ष मान्सूनपूर्व पावसाकडे लागले आहे. पुढील काही दिवस उष्णतेची तीव्रता कायम राहणार असल्याने नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत आवश्यक बनले आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में दवा ऑनलाइन बिक्री रोकने की मांग पर आंदोलन
Nagpur, Maharashtra:नागपूर ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या आवाहनानंतर नागपूरच्या संविधान चौकात निदर्शने करत आंदोलन नागपूर जिल्हा केमिस्ट अँड ड्रगिष्ट संघटनेच्या वतीने करण्यात येत आहे आंदोलन सरकारने ऑनलाईन औषध विक्री तात्काळ थांबवावी आंदोलकांची मागणी.. काळ्या फिती बाधून मेडिकल दुकान चालक मोठ्या संख्येने आंदोलनात सहभागी.. आंदोलन आमच्यासाठी नाही तर लोकांचा आरोग्यासाठी हे आंदोलन आहे, शासनाने पाऊल उचलत हे बंद करावे...0
0
Report
अकोला में निजी बस भीषण आग से जली, लोगों की जिंदगी बची
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील बाळापूर–शेगाव मार्गावर आज सकाळी एका खाजगी प्रवासी बसला भीषण आग लागून बस पूर्णतः जळून खाक झाली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशातील प्रवासी घेऊन जाणारी ही खाजगी बस बाळापूर–शेगाव मार्गावरून जात असताना अचानक बसमध्ये तांत्रिक बिघाड झाला. बिघाडानंतर काही क्षणातच बसने पेट घेतला आणि आगीने संपूर्ण बसला वेढले. आगीची तीव्रता इतकी होती की घटनास्थळी उभी असलेली एक दुचाकीही आगीत सापडून जळून खाक झाली. घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणली. खबरदारीचा उपाय म्हणून काही काळ वाहतूकही बंद ठेवण्यात आली होती. बसमधील सर्व प्रवासी, चालक, वाहक तसेच दुचाकीवरील दोन व्यक्तींना कोणतीही दुखापत झाली नसल्याने मोठा अनर्थ टळला. अग्निशामक दल आणि पोलिसांच्या सतर्कतेमुळे परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश झाले. या घटनेमुळे परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.0
0
Report
विरार पूर्वे इमारत के स्लैब गिरने से महिला गंभीर घायल, मरम्मत में लापरवाही पर सवाल
Vasai-Virar, Maharashtra:विरार पूर्वेत इमारतीचा स्लॅब कोसळला; महिला गंभीर जखमी, निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह सोसायटीच्या दुर्लक्षामुळे दुर्घटना; स्लॅब कोसळून महिलेची प्रकृती चिंताजनक विरार : पालघर जिल्ह्यातील विरार पूर्वेतील फुलपाडा परिसरातील प्रथमेश नगर येथे र रात्री एक गंभीर दुर्घटना घडली. साई मल्हार नावाच्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावरील स्लॅबचा काही भाग अचानक कोसळून खाली पडला. या घटनेत 27 वर्षीय महिला गंभीर जखमी झाली आहे. जखमी महिलेची ओळख ज्योती सुनील बागरी (27) अशी असून, अपघातानंतर तत्काळ कुटुंबीय व स्थानिकांच्या मदतीने तिला जवळच्या साई समर्थ रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार, तिच्या डाव्या हाताला व छातीला गंभीर दुखापत झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. स्थानिक रहिवाशांच्या म्हणण्यानुसार, संबंधित इमारत बराच काळ जर्जर अवस्थेत होती. तरीही वेळेवर दुरुस्तीचे काम करण्यात आले नाही. मनपाच्या सहाय्यक आयुक्त (प्रभाग समिती ‘सी’) यांनी यापूर्वीच दुरुस्तीबाबत नोटीस बजावली होती, मात्र बिल्डर व सोसायटी प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केले. पीडित कुटुंबीयांनी असा आरोपही केला आहे की, घटनेनंतर सोसायटीतील काही पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार दाबून टाकण्याचा सल्ला दिला आणि बाहेर माहिती दिल्यास उलट कारवाईची धमकी दिली. या आरोपांमुळे प्रकरण अधिक गंभीर बनले आहे. साई मल्हार सोसायटीत अनेक कुटुंबे वास्तव्यास असून, त्यात भाडेकरूंची संख्याही मोठी आहे. त्यामुळे इमारतीच्या सुरक्षेबाबत इतर रहिवाशांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे बिल्डर, सोसायटी अध्यक्ष आणि सचिव यांच्याविरुद्ध कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. ही घटना शहरातील जर्जर इमारतींच्या समस्येकडे पुन्हा एकदा लक्ष वेधणारी ठरली आहे. वेळेत योग्य उपाययोजना न केल्यास अशा दुर्घटना पुन्हा घडू शकतात. प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
विदर्भ के हर्ष दुबे को टेस्ट टीम में जगह, अफगानिस्तान के खिलाफ डेब्यू
Nagpur, Maharashtra:विदर्भाचा क्रिकेटपटू हर्ष दुबेची भारतीय क्रिकेट संघात निवड झाली आहे. भारतीय कसोटी क्रिकेट संघात निवड झालेला उमेश यादव नंतरचा तो दुसरा विदर्भाचा क्रिकेटपटू ठरला आहे. भारतीय संघ स्थान मिळवण्यासाठी हर्षने प्रचंड संघर्ष आणि मेहनत घेतलीय. रात्रि़ झोपेत सुद्धा ते क्रिकेटची स्वप्न आणि बडबड करत असल्याच त्याचे वडील सांगता. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठी त्याने बाळगलेल ध्येय. आई-वडिलांनी मुलाच्या क्रिकेट करियर घडवण्यासाठी केलेला त्याग. हर्षने बालवयापासून क्रिकेटमध्ये आपल्या कामगिरीची देशांतर्गत क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण छाप उमटवली. आणि त्याकरता केलेल्या मोठ्या संघर्षानंतर अखेर विदर्भाच्या या क्रिकेटपटू हर्ष दुबेला भारतीय क्रिकेट कसोटी क्रिकेट संघात अफगाणिस्तान विरुद्धच्या दौऱ्यात करता स्थान मिळालं आहे. हर्षेचे वडील सुरेंद्र दुबे यांच्याशी संवाद साधलाय आमच्या प्रतिनिधींनी.0
0
Report
बीड میں PV कुलकर्णी के बिना अनुमति इमारत पर बुलडोजर, नगरपालिका ने कार्रवाई शुरू की
Beed, Maharashtra:बीड मधील पी.व्ही कुलकर्णीच्या विनापरवाना, बांधकामावर चालवणार बुलडोझर - नगरपरिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या माहिती. नीट पेपर फुटी प्रकरणातील मुख्य सूत्रधार पी.व्ही कुलकर्णी याचे बीड शहरातील शाहूनगर भागात इमारतीचे बांधकाम सुरू आहे. तक्रार प्राप्त झाल्यानंतर नगरपरिषदेच्या नगररचना कार्यालय आणि मालमत्ता कर विभागाने पाहणी आणि चौकशी केल्यानंतर गंभीर त्रुटी आणि अनियमितता आढळून आली आहेत. या बांधकामाला कुठल्याही प्रकारची परवानगी घेण्यात आलेली नाही तसेच चोहोबाजूने नियमानुसार सोडल्या जाणार्इया जागेतही बांधकाम केलेले आहे. यामुळे सर्व होल्डर्सना नोटीसा बजावून पुढील कारवाई केली जाणार आहे. तसेच या बांधकामावर now बुलडोजर चालवण्याची कारवाई देखील केली जाणार असल्याची माहिती नगर परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश फडसे यांनी दिली आहे.0
0
Report
वाशीम जलसंकट: पदमतीर्थ सूखा, पानी की कमी तेज
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम जिल्ह्यात वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जलस्रोतांची पाणीपातळी झपाट्याने घटत आहे. धरणे,विहिरी,बोअरवेलसह अनेक पारंपरिक जलस्रोत आटण्याच्या मार्गावर आहेत.वाशिम शहरातील ऐतिहासिक व धार्मिक महत्त्व असलेले पदमतीर्थही पूर्णपणे कोरडे पडले असून तळभाग उघडा पडल्याचे चित्र समोर आले आहे.यामुळे जिल्ह्यातील पाणीटंचाईची स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर में नवविवाहित फैजलाह की संदिग्ध मौत, जांच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर - अमरावती येथील नवविवाहित फैजला जबीन हिच्या नागपुरात सासरी संशयास्पद मृत्यूला नवे वळण.. - फैजलाचा मृत्यू गळ्यावर दबाव आल्यामुळे आणि श्वास रोखल्याने झाल्याचा शवविच्छेदन अहवालात प्राथमिक अंदाज.. - फैजलावर अमरावतीत अंत्यसंस्कार झाले होते, मात्र गळ्यावरील व्रण नंतर पीडितेच्या कुटुंबियांची तक्रार दाखल, घटनेचे गांभीर्य लक्षात घेता अमरावी पोलिसांनी मृतदेह कब्रस्तानातून बाहेर काढले.. - मृत्यूचे नेमके कारण काय हे स्पष्ट होण्यासाठी अंतिम वैद्यकीय अहवालानंतर होणार स्पष्टता.. - नागपूरच्या तहसील पोलिस ठाण्यात फैजला हिच्या पतीसह तिचा भासरा आणि सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल.. - 25 जानेवारी रोजी फैजलाचा नागपूरच्या मोहम्मद झुबेर हिच्याशी विवाह झाला होता.. - लग्नाला चार महिने पूर्ण झाले असताना फैजलाच्या पतीने तिचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याचा तिच्या कुटुंबियांना माहिती दिली.. - मात्र मृतदेहाच्या गळ्यावर दोरीने आवळल्यासारख्या खुणा असल्याने माहेरच्यांनी हत्येचा संशय व्यक्त केला.. - फैजलाने मृत्यू झाला त्यादिवशी शेवटचा फोन कॉल तिच्या आईला केला होता.. आणि माझा सासरी छळ होत असल्याचं सांगितलं होतं.. - याप्रकरणी नागपूरच्या तहसील पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यावर मृतकाचा पती मोहम्मद जुबेर आणि एका नातेवाईकाला चौकशीसठी ताब्यात घेतले आहे..0
0
Report
तीसरे मुंबई संदर्भ में संदीप देशपांडे ने टोल-नामांतरण पर तीखी प्रतिक्रिया दी
Navi Mumbai, Maharashtra:तीसरे मुंबई संदर्भ में संदीप देशपांडे यांनी टोल-नामांतरण मुद्द्यावर संतप्त प्रतिक्रिया दिली. रायगड जिल्ह्यात होऊ घातलेल्या तीसऱ्या मुंबई संदर्भात मनसे आक्रमक झाली असून जोपर्यंत प्रकल्प येत नाही तोपर्यंत स्थानिकांनी जमीन विकू नये आणि यासाठी मनसे जनजागृती देखील करणार असल्याची भूमिका मनसेने व्यक्त केलीय. यासोबतच मुंबई गोवा महामार्गाचे काम अपूर्ण असताना टोल सुरु करण्यात आल्याने रायगड मधील तटकरे सारख्या नेत्यांनी लाज सोडली असल्याची संतप्त प्रतिक्रिया संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलीय. तर नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि बा पाटील यांचं नाव न दिल्यास राजीनामा देईन असे वक्तव्य स्थानिक आमदारांनी केलं होतं त्यामुळे एकतर नाव द्यावं अन्यथा राजीनामा द्या अशी मागणी मनसे नेते संदीप देशपांडे यांनी व्यक्त केलेय.0
0
Report
भीड़ बढ़ने पर मंदिर प्रशासन ने पाद्यपूजा और वीआईपी दर्शन बंद कर दिए
Pandharpur, Maharashtra:अधिक महिन्यातील गर्दी लक्षात घेता श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीने पाद्य पूजा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे तसेच तुळशीपूजांची संख्या कमी केली असून जर दर्शनाचा कालावधी वाटत असेल तर तुळशी पूजा ही बंद केल्या जातील अशी माहिती मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांनी दिली आहे दोन दिवसांपासून अधिक महिना सुरू झाला आहे त्यामुळे पंढरपूरमध्ये उन्हाळी सुट्ट्या तसेच अधिक महिन्यामुळे भाविकांची मोठी गर्दी होत आहे उठायच्या पदस्पर्श दर्शनासाठी सात ते नऊ तासांचा कालावधी भाविकांना लागतोय तसेच उन्हाचे दिवस भाविकांना होणारा त्रास लक्षात घेता मंदिर समितीने पाद्यपूजा बंद केले आहेत यामुळे दर्शनाच्या वेळेमध्ये बचत होऊन दर्शन रांगेतील भाविकांचे दर्शन तातडीने करण्याचा प्रयत्न आहे सोबतच व्हीआयपी दर्शन सुद्धा मंदिर समितीने बंद केलेला आहे याचाही परिणाम सुलभ दर्शनावर होणार आहे0
0
Report
Advertisement
लातूर NEET पेपरफुटी मामले में नया खुलासा: स्पेशल क्लास और फीस
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज नीट पेपरफुटी प्रकरणात नवा ट्विस्ट... लातूरमधील ‘स्पेशल क्लास’ची धक्कादायक माहिती ZEE 24 TAAS हाती.... डॉक्टरांच्या मुलांसह मोटेगावकरांच्या मुलांसाठी खास क्लास ?... सीबीआय चौकशीत धक्कादायक माहीती समोर येण्याची शक्यता.... विद्यार्थ्यामागे ५ लाख फी... प्रश्नांचा रिव्हिजन आणि ‘स्पेशल ट्रेनिंग’वर संशय.... रिटायर प्राध्यापक पी. व्ही. कुलकर्णी प्रकरणात नवी माहिती... आज पुन्हा लातूर मध्ये त्या डॉक्टरांची चौकशी... AC ::- लातूरमधील नीट पेपरफुटी प्रकरणात आता आणखी एक धक्कादायक अपडेट ZEE 24 TAAS च्या हाती आले आहेत . सीबीआय तपासात नाव आलेल्या पी. व्ही. कुलकर्णी यांच्याबाबत नवे दावे पुढे आले आहेत. डॉक्टरांच्या मुलांसह काही विद्यार्थ्यांसाठी आणि मोटेगावकर यांच्या मुलांसाठी खासगी ठिकाणी ‘स्पेशल क्लास’ घेतले जात असल्याची माहिती सिबिआय चौकशीत समोर येल्याची माहीती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. या स्पेशल क्लाससाठी विद्यार्थ्यामागे तब्बल ५ लाख रुपये फी घेतली जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. दररोज प्रश्न सोडवून घेणे, रिव्हिजन घेणे आणि दरवर्षी वेगवेगळ्या ठिकाणी हे क्लास चालवले जात असल्याची माहिती तपासात पुढे येत असल्याने खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणात आज पुन्हा संबंधित डॉक्टरांची चौकशी केली जाणार असल्याची माहिती समोर येत आहे0
0
Report
Kolhapur के उपनगर में युवक ने सड़क पर गाड़ी तोड़ी, वीडियो बनाते पकड़ा गया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील उपनगर परिसरात एका तरुणाने भररस्त्यात चारचाकी गाडीची तोडफोड केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उपनगरातील क्रांतिसिंह नाना पाटील नगर चौकाजवळ एका घरासमोर पार्क केलेल्या चारचाकी वाहनाची संबंधित तरुणाकडून नुकसान करण्यात आले. विशेष म्हणजे, गाडीची तोडफोड केल्यानंतर संबंधित तरुण गाडीवर चढून उभा राहिला आणि स्वतःच मोबाईलवर व्हिडिओ शूट करत असल्याचे फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून आले आहे. ही घटना 15 मे रोजी घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, घटना घडून अनेक दिवस उलटूनही संबंधित तरुणाविरोधात अद्याप कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही...0
0
Report
30 मई से अनिश्चितकालीन उपोषण: मराठा मांगों पर वार्ता की स्थिति
Jalna, Maharashtra:जालना : मनोज जरांगे पाटील प्रसाद लाड से मिलने की चर्चा कर रहे हैं। प्रसाद लाड के साथ हुई बातचीत में उनकी मांगों की पूर्ति होने की आशा जताई गई ताकि उपोषण की जरुरत न पड़े। माराठा समाज के नेता जरांगे पाटील ने कहा कि अंतरवालीं चर्चा की तैयारी होने से राज्यभर की मराठा बैठकों में रुकावट आई है। भले ही बैठकों को रोक दिया गया हो, लेकिन उनकी मांगें पूरी न होने तक उपोषण जारी रहेगा। ओबीसी नेता फडणवीस के खिलाफ टिप्पणी करते हुए कहा गया है कि उन्हें मराठों की कुणबी जात प्रमाणपत्र रद्द करने के बजाय उनके बच्चों के हित के लिए आक्रामक कदम उठाने चाहिए। चंद्रशेखर बावनकुळे ने भी मराठा समुदाय के प्रमाणपत्र मुद्दे पर सावधानी बरतने की बात कही। फडणवीस के साथ कभी भी द्वेषपूर्ण व्यवहार नहीं किया गया, अगर ऐसा हुआ हो तो बताएं; उनके हैदराबाद गजेटियर निर्णय की प्रशंसा की गई। भाजपा नेता पहले हमारे पास चोराकर मिलने आते थे—ऐसा भी उल्लेख किया गया। मोदी जी ने ईंधन बचाने की अपील की, जिसके चलते आंदोलन के निर्णयों पर विचार किया गया।0
0
Report
Advertisement
