Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह

Oct 11, 2024 06:50:24
Yavatmal, Maharashtra

नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
TTTUSHAR TAPASE
Mar 16, 2026 07:53:28
Satara, Maharashtra:सातारा -फलटण पंचायत समितीच्या सभापती-उपसभापती निवडीत मोठा राजकीय ट्विस्ट पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना शिंदे गटाला धक्का देत राष्ट्रवादीच्या तीन सदस्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. या राजकीय घडामोडींमुळे भाजपने सभापती पद आपल्या ताब्यात घेतले.माजी सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना शिंदे गटालाही धक्का बसला. त्यांच्या गटातील एका सदस्यानेही भाजपची साथ दिली. त्यामुळे अखेरीस रामराजे निंम्बाळकर यांना एक पाऊल मागे घेत शिवसेना शिंदे गटाकडे उपसभापती पद स्वीकारावे लागले.या संपूर्ण घडामोडींमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांची राजकीय रणनीती यशस्वी ठरल्याचे बोलले जात आहे.दरम्यान, भाजपच्या शिवांजली भोसले यांची फलटण पंचायत समितीच्या सभापतीपदी बिनविरोध निवड झाली आहे.
91
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 16, 2026 07:49:54
Jalna, Maharashtra:जालना : खानावळींचा गॅस पुरवठा संपला,इलेक्ट्रीक शेगडीसह चुलीवर मदार अँकर : व्यावसायीक गॅस सिलेंडर वापरामुळे गदा आल्यामुळे जालन्यात खानावळी चालकांसमोर अडचणी निर्माण झाल्या आहेत.शहकाशतचंदनझिरा भागात असलेल्या एमआयडीसीमध्ये परप्रांतीय कामगार मोठ्या संख्येने राहतात.या कामगारांना जेवण पुरवण्याचं काम हे खानावळी चालक करतात.मात्र गॅस संपल्यामुळे खानावळी चालकांना आता थेट चुली पेटवाव्या लागल्या असून चुलीवर स्वयंपाक करण्यासाठी उशीर होत असल्यानं या खानावळी चालकांनी ईलेक्ट्रीक शेंगड्याांचा आधार घेतला आहे.स्वयंपाक करण्यासाठी उशीर होत असल्यानं ग्राहकांच्या नाराजीला देखील या खानावळी चालकांना सामोरं जावं लागतंय. बाईट:श्याम खरात,खानावळ मालक बाईट : शंकर तिडके,स्वयंपाकी,
85
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 16, 2026 07:36:21
Chakan, Maharashtra:जागतिक पातळीवर सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इंधन व गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असताना त्याचे पडसाद आता चाकण औद्योगिक पट्ट्यातही उमटू लागले असुन HPCL कंपनीच्या प्लँटवर गँस गाड्यांच्या रांगा लागल्यात चाकण औद्योगिक क्षेत्रात घरगुथी गॅसची टंचाई निर्माण झाली असून काळ्या बाजाराला साठेबाजीला ऊत आल्याचे चित्र आहे. त्यामुळे दिवसाभर कष्ट करून काम करणाऱ्या कामगारांना स्वयंपाकासाठी गॅस मिळवणे ही अवघड झाले आहे. काही ठिकाणी तर 500 ते 700 रुपये किलो दराने गॅस विकला जात असल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. नक्कीच चाकण औद्योगिक परिसरातील काय परिस्थिती आहे याचा एचपी कंपनी समोरून आढावा घेत कामगारांशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी..
150
comment0
Report
AAASHISH AMBADE
Mar 16, 2026 07:35:47
98
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 16, 2026 07:34:45
Vasai-Virar, Maharashtra:नालासोपारा पूर्व येथील आचोळे परिसरातल्या साई हायट्स इमारतीत सकाळी भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. इमारती खाली असलेल्या गाड्यांमध्ये आग लागल्यामुळे इमारतीमधील रहिवाशांची एकच तारांबळ उडाली. माजी नगरसेविका नीलिमा गायकवाड यांच्या बंगल्या शेजारी असलेल्या या इमारतीतील एका दुकानात ठेवलेल्या स्टोरेज फ्रिजच्या गॅस टाकीचा स्फोट झाल्याने आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि अग्निशामक दल घटनास्थळी दाखल झाले असून अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न सुरू केले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती मिळालेली नाही. मात्र स्फोटामुळे दुकानातील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून आगीचे नेमके कारण शोधण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.
199
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:07:01
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील महापे येथे टेक्नोसिटी या आलिशान इमारतीत डीजी शेअर मार्केट रिसर्चच्या नावाने सुरू असलेली मोठी फसवणूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे उघडकीस आली आहे. सायबर पोलिस आणि इकॉनॉमिक इंटेलिजन्स युनिटने संयुक्त छापा टाकून हायटेक फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे तर यात सहभागी असलेल्या इतरांचा शोध सुरू आहे. ही टोळी शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग आणि इक्विटी स्टॉकमध्ये गुंतवणूक करून काही दिवसांत दुप्पट नफा कमावण्याचे आमिष दाखवत नागरिकांना फसवत होते. या कॉल सेंटरमध्ये 22 तरुण-तरुणी संगणक आणि व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून देशभरातील लोकांना टार्गेट करुन एक्स-लाइट डायल पॅड वापरून लोकांना कॉल करायचे आणि नंतर 18 वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्यास भाग पडून त्यांची फसवणूक करायचे. पोलिसांच्या प्राथमिक तपासात 1 कोटी 2 लाख 58 हजार 818 रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आलेय. पोलिसांनी घटनास्थळावरून 12 मोबाईल फोन, 19 सिमकार्ड, लॅपटॉप आणि एक सिम बॉक्स अशी तांत्रिक उपकरणे जप्त केली आहेत.
154
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 16, 2026 07:05:27
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरातील इस्कॉन चे अन्नछत्र बंद होण्याच्या मार्गावर गॅस सिलेंडरचा तुटवडा चुलीवर स्वयंपाक करायला लाकडांची ही कमतरता पंढरपूर शहरात चंद्रभागा नदीच्या पूर्व काठावर इस्कॉन संस्थेचे राधा पंढरीनाथाचे मोठे मंदिर आहे. या ठिकाणी राज्यभरातून भावიკ दर्शनासाठी येत असतात. इस्कॉन संस्थेकडून या ठिकाणी येणाऱ्या भाविकांना मोफत अन्नछत्र सुरू असते. सकाळी आणि सायंकाळच्या वेळेमध्ये भाविकांना अन्नदान केले जाते. मागील काही दिवसांपासून या संस्थेला आवश्यक असणारे या सिलेंडर मिळत नाहीत. त्यामुळे अन्नछत्र बंद करण्याची वेळ येत्या काही दिवसात येऊ शकते. चुलीवर स्वयंपाक करायचा तर त्यासाठी लाकडांचा पुरवठा सुद्धा होत नाही.तसेच लाकडे तोडून स्वयंपाक करणे हे इस्कॉनच्या विचारात बसत नाहीत त्यामुळे जर आवश्यक गॅस सिलेंडरचा पुरवठा झाला नाही तर अन्नछत्र बंद ठेवावे लागेल
181
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 16, 2026 07:04:59
Akola, Maharashtra:अकोला शहरातील जुने शहर परिसरातील राजेश्वर गॅस एजन्सीसमोर सध्या नागरिकांचा प्रचंड संताप पाहायला मिळत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गॅस सिलेंडरचे बुकिंग करूनही ग्राहकांना एजन्सीच्या वारंवार चकरा माराव्या लागत आहेत. गॅस मिळत नसल्याने नागरिकांना तासन्तास लांबच लांब रांगेत उभे राहावे लागत आहे. विशेष म्हणजे एजन्सीवर येणाऱ्या वृद्ध नागरिकांसाठी बसण्याची किंवा पिण्याच्या पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आलेली नाही. त्यामुळे उन्हात उभे राहून नागरिकांची प्रचंड गैरसोय होत आहे. गॅस मिळत नसल्यामुळे अनेक कुटुंंबांचे स्वयंपाकाचे नियोजन विस्कळीत झाले आहे. परिस्‍थिती इतकी बिकट झाली आहे की काही कुटुंंबांनी पर्याय म्हणून पुन्हा घरगुती चुलीचा वापर सुरू केला आहे. दरम्यान, काही ग्राहकांनी गंभीर आरोप करत एजन्सीकडून बुकिंग असतानाही सिलेंडर इतर ग्राहकांना जास्त दराने विकले जात असल्याचा आरोप केला आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर सुरू असलेल्या युद्धामुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचे सांगितले जात असले तरी नागरिकांनी शासनाने तातडीने हस्तक्षेप करून गॅस सिलेंडरची टंचाई दूर करावी आणि सर्वसामान्यांना घरगुती गॅस उपलब्ध करून द्यावा, अशी जोरदार मागणी केली आहे.
180
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:03:48
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील सानपाडा परिसरातील पाम बीच रोडवर भरधाव वाहनाने दुचाकीला धडक दिल्यानं झालेल्या भीषण अपघातात डोके धडापासून वेगळे होऊन एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी झाली होती. मात्र आता या अपघातात मृत्यू झालेल्या प्रशांत जमदाडे यांच्या कुटुंबियांनी पोलिसांच्या तपासावर संशय व्यक्त केलाय. आरोपींनी आमच्या मुलाचा खून केला आहे त्याला मारल आहे, मात्र पोलिसांनी फक्त गुन्हा दाखल करून आरोपींना सोडून दिले. आरोपी बिल्डरच्या घरातील असल्यामुळे पोलीस प्रशासन आरोपींना पाठीशी घालत आहेत. असे आरोप जमदाडे कुटुंबीयांनी केले आहेत. पोलिसांच्या म्हणण्यानुसार ही हिट अँड रन ची घटना नाही. तसंच वाहन चालकांनी मद्य प्राशन देखील केलं नव्हतं त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करून नोटीस देण्यात आली आहे. तीन मार्चला अपघात झाला होता आणि आरोपींना पोलिसांनी पाच मार्चला अटक केली. त्यानंतर त्यांची टेस्ट केली तर त्यामध्ये मद्यप्राशन केलं असल्याचं आढळलं नाही. त्यामुळे पोलिसांच्या भूमिकेवर देखील प्रश्न चिन्ह उपस्थित केलं जात आहेत. बाईट- विजय जमदाडे, मृत तरुणचे वडील बाईट - आई, मृत तरुणाची
132
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 16, 2026 07:01:47
117
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 16, 2026 06:46:55
Hingoli, Maharashtra:अँकर - हिंगोली जिल्ह्यांमध्ये वाढत असलेल्या तापमानामुळे जिल्ह्यातील शाळांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आलेला आहे सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शाळा भरवल्या जाणार असून वाढत्या तापमानाचा विद्यार्थ्यांच्या आरोग्यावर परिणाम होऊ नये यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला असून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी तसे आदेश काढले आहेत आजपासून सकाळी आठ ते दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शाळा भरवल्या जाणार असून जिल्ह्यातील सर्व प्राथमिक माध्यमिक उच्च माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयामध्ये अशा पद्धतीने सकाळच्या सत्रामध्ये शाळा भरली जात आहे
138
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 16, 2026 06:15:10
304
comment0
Report
Advertisement
Back to top