icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

महाबलेश्वर बस स्टॉप पर ट्रैफिक इंस्पेक्टर के विवाद के बीच पत्रकारों से भिड़ंत, निलंबन

Satara, Maharashtra:सातारा - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये बस स्थानक आवारात वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांनी प्रवाशांनी एक तास उशिरा गाडी का सोडताय हे विचारल्याच्या कारणातून स्थानिक पत्रकारांना दलाल तर प्रवाशांना अर्वाच भाषेत शब्द प्रयोग केला होता या घटनेची प्रसार माध्यमांनी बातमी प्रसिद्ध करताच सातारा विभाग नियंत्रण प्रमुखांनी संबंधित महाबळेश्वर येथील वाहतूक निरीक्षकाचे निलंबन केले... यानंतर महाबळेश्वर बस स्थानकात स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थांनी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला घेराव घातला असता... त्याने हात जोडून मी सुद्धा एका न्युज पेपरची पत्रकारिता केली असल्याचे सांगत पत्रकारांविषयी आदर असल्याचे तो म्हणाला मात्र त्या ठिकाणी आलेले पत्रकार आणि ग्रामस्थ आक्रमक असल्यामुळे त्याने हात जोडून पत्रकारांची आणि स्थानिक ग्रामस्थांची माफी मागितली. माझ्याकडून चूक झाली मी असं बोलायला नको होतं असं देखील तो म्हणाला... यावेळी संबंधित निलंबित झालेला वाहतूक निरीक्षक हा महाबळेश्वरच्या बस स्थानकात नको अशी देखील मागणी स्थानिकांनी यावेळी केली
0
0
Report

यवतमाळ विधानपरिषद चुनाव: कांबळे की माघारी पर दबाव-चौकशी की मांग

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या माघारीवरून नगरसेवक-मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. कांबळेंची माघार स्वेच्छेने नसून राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन व अनुचित प्रभावामुळे झाली असा आरोप करत चौकशी व बिनविरोध निवडीस स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. बिनविरोध निवडीच्या नावाखाली मतदानाची संधी नाकारणे हे "निवडणूक दरोडेखोरी" स्वरूपाचे कृत्य आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या निवडणुकीतील आर्थिक व्यवहार व दबावाची भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, मतदारांचा अधिकार अबाधित राखण्यासाठी नोटा चा पर्याय द्यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.
0
0
Report
Advertisement

अनियमित बारिश से आम-काजू बागों को नुकसान, किसानों को कम मुआवजा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात 52 हेक्टर वरील आंबा-काजू वाया.. अवकाळीचा फटका शासनाची मदत तुटपुंजीच.. जिल्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोहोर गळल्यामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झाले आहे.. प्राथमिक सर्वेक्षणात 28 हजार 975 शेतकरी बाधित झाले असून त्याचा 52 हजार हेक्टर क्षेत्रावरील बागांना तडाका बसल्याचे समोर आले आहे.. दरम्यान शेतकरी हेक्टरी तीन लाखांचे आंबा उत्पन्न घेतो मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त 22 हजार 500 रुपयांचे मदत मिळणार आहे.. त्यात भरपाईला 2 हेक्टरची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे.. यंदाच्या हंगामात फक्त 20 टक्के आंबा-काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.. गेले दोन महिने कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत..
0
0
Report

सातार में सांसद उदयनराजे भोसले के साथ चिमुकला का खास फोटो-सेशन, जन्मदिन की अनोखी भेंट

Satara, Maharashtra:सातारा़: आपली कॉलर उडवण्याची स्टाईल, डॅशिंग अंदाज आणि दिलखुलास स्वभावासाठी प्रसिद्ध असलेले खासदार उदयनराजे भोसले यांचे एक वेगळेच रूप सातार्‍यात पाहायला मिळाले. पुण्याहून केवळ उदयनराजेंना भेटण्यासाठी आणि त्यांच्यासोबत फोटो काढण्यासाठी आलेल्या एका चिमुकल्याचा हट्ट स्वतः राजेंनी गाडीतून उतरून पूर्ण केला. इतकेच नव्हे, तर त्याला कडेवर घेत मनसोक्त फोटोसेशन करत राजेंनी या चिमुकल्याला वाढदिवसाची अनोखी भेट दिली. पुण्यातील एक चिमुकला मागील महिनाभरापासून आपल्या वडिलांकडे सातार््यात जाऊन उदयनराजेंना भेटण्याची इच्छा व्यक्त करत होता. स्वतःच्या वाढदिवसानिमित्त महाराजांना भेटून त्यांच्यासोबत फोटो काढायचा, असा हट्ट त्यांनी धरला होता. मुलाची ही तीव्र इच्छा पाहून अखेर त्याचे वडील त्याला सातार्यात घेऊन आले होते. उदयनराजे हे नेहमी त्यांना भेटायला येणाऱ्या लहान मुलांना आवर्जून 'कॅडबरी' चॉकलेट खाऊ घालतात हा त्यांचा नेहमीचा शिरस्ता आहे. मात्र, यावेळी पुण्याहून आलेल्या या चिमुकल्याने स्वतः खासदार साहेबांसाठी कॅडबरी आणली होती आणि गाडीच्या खिडकीतून ती राजेंना देण्याचा प्रयत्न करत होता.उदयनराजे यांच्या वाहनाचे आगमन झाल्यावर गाडीत बसलेल्या राजेंनी या चिमुकल्याची आणि हातातील कॅडबरीची लगबग दूरूनच पाहिली. ते पाहताच राजेंनी तात्काळ स्वतः गाडीतून खाली उतरले. गाडीतून उतरून राजे थेट त्या चिमुकल्यापाशी आले. त्याच्या हातातील कॅडबरी पाहत राजेंनी नेहमीच्याच मिश्किल शैलीत संवाद साधला. तूला परीक्षेत पास व्हायचे आहे की नापास? तू जर माझे व्हिडिओ पाहिले तर नापास होशील! असे म्हणत राजेंनी लहानग्याशी थट्टा केली. राजेंच्या या मजेशीर टिप्पणीमुळे तिथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये एकच हशा पिकला. त्यानंतर राजेंनी अत्यंत कौतुकाने आणि प्रेमाने त्या चिमुकल्याला थेट आपल्या कडेवर उचलून घेतले आणि फोटोसेशन केले.
0
0
Report
Advertisement

एल निनो के चलते भंडारा के किसानों ने धान के लिए बुवाई पद्धतियाँ अपनाईं

Bhandara, Maharashtra:एल निनो प्रादुर्भाव कमी करण्यासाठी भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक पद्धतीत केला बदल.. शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी कृषी विभाग शेतकऱ्याच्या बांधावर. एल निनो मुळे मान्सून वर परिणाम झाला असून पर्जन्यमान उशिरा होईल व पर्जन्यमानात अनियमितता राहण्याचा अंदाज भारतीय हवामान खात्याने व्यक्त केला आहे त्या पार्श्वभूमीवर भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या परिस्थितीचा सामना करता यावा याकरिता पीक पेरण्याच्या पद्धतीत बदल करण्यात येत आहे. कृषी विभाग शेतकऱ्यांच्या बांधावर जात कमी पाण्यावर पीक घेण्याच्या पद्धती चे प्रात्यक्षिक घेत आहेत. भंडारा जिल्ह्यातील मुख्य पीक असलेले धान पीक लावणी ची वेळ जवळ आलेली आहे मात्र एल निनो चा प्रादुर्भाव असल्याने मान्सून लांबणीवर गेलेला आहे. पर्जन्यमानामध्येही अनियमितता राहील असा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना पारंपारिक पीक पेरणी पद्धत बदलवून कमी पाण्यावर चांगले धान पीक घेण्यासाठी डीएसआर व एस आर टी या पद्धतीचा अवलंब शेतकरी करत आहेत. यासाठी आता कृषी विभाग ही शेतकऱ्यांच्या बांधावर उतरलेला असून बदलत्या वातावरणाचा सामना करण्यासाठी शेतकऱ्यांनी घ्यावयाच्या काळजीसाठी कृषी विभागाकडून मार्गदर्शन केल्या जात आहे वातावरणातील बदल शेतकऱ्यांनी सहन करत योग्य पद्धतीने धान पिक घेता यावे यासाठी नवीन पीक पेरणी पद्धतींचा अवलंब शेतकऱ्यांनी करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

गणेशोत्सव से पहले मुंबई-गोवा महामार्ग के पुल पूरे, यात्रा तेज होगी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. गणेशोत्सवात कोकणकरांचा प्रवास सुसाट; जूनअखेर मुंबई-गोवा महामार्गावरील रखडलेल्या पुलांची कामे पूर्ण होणार!.. सध्या महामार्गावरील चिपळूण,लांजा,निवळी,पाली आणि संगमेश्वर येथील सोनवी नदीवरील दुसऱ्या मार्गिकेच्या पुलांचे काम अत्यंत युद्धपातळीवर सुरू आहे.. हे पूल वाहतुकीसाठी खुले झाल्यानंतर दरवर्षी गणेशोत्सवात होणारी वाहतूक कोंडी फुटणार असून,कोकणकरांचा प्रवास कमी वेळेत आणि विनाअडथळा होणार आहे.. त्यामुळे यंदा बाप्पाच्या आगमनासाठी गावी जाणाऱ्या चाकरमान्यांना महामार्गावर मोठा दिलासा मिळणार हे नक्की!..
0
0
Report
Advertisement

संभाजी नगर बैंक चुनाव में बीजेपी-शिवसेना भिड़ंत, मंत्री ने मोर्चा संभाला

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:७०० कोटींची उलाढाल असलेल्या संभाजी नगर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत भाजप आणि शिवसेना एकमेकांसमोर आले आहेत. मनपा, जिल्हा परिषद गमावल्यानंतर शिवसेनेने निवडणूक जिंकण्यासाठी पूर्ण ताकद पणाला लावली आहे. याच कारणामुळे पालकमंत्री शिरसाट रिंगणात उतरले आहेत. मात्र, भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांच्यासह नगरसेविका हर्षदा शिरसाट यांच्या उमेदवारीवर आक्षेप घेतल्याने महायुतीमध्ये अंतर्गत संघर्ष पेटल्याचे चित्र आहे. पालकमंत्री संजय शिरसाट व भाजपचे राजू शिंदे यांच्यातील राजकीय वैर जिल्हा बँक निवडणुकीतही पाहायला मिळत आहे. त्यांनी परस्परांच्या अर्जावर आक्षेप नोंदवले आहेत. तसेच खा. डॉ. कल्याण काळे यांच्या अर्जावर वाजीद खान यांनी आक्षेप घेतला आहे. तर जवळपास सर्वच महत्वाच्या नेत्यांवर आक्षेप घेण्यात आले आहेत...
0
0
Report

छत्रपति संभाजीनगर की 2740 करोड़ जल योजना शुरू, बिल बढ़ने से महापालिका चिंतित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराच्या नव्या २७४० कोटींच्या योजनेचे पाणी मिळाल्यानंतर शहरवासीयांना दिलासा मिळणार असला तरी मनपासाठी मात्र ही योजना म्हणजे पांढरा हत्ती ठरणार आहे. योजना १०० % कार्यान्वित झाल्यानंतर वीजबिल भरताना मनपाच्या नाकीनऊ येणार आहे. एप्रिल महिन्यापासून पाणी योजनेचे घेतलेले ट्रायल यशस्वी झाल्यानंतर पाण्याचा वापर सुरू करण्यात आला आहे. त्यामुळे मनपाला दीड कोटी रुपये वीजबिल जास्तीचे भरावे लागत होते. एरव्ही पाणी योजनेचे पाच कोटी रुपये बिल येत होते, पण जूनमध्ये साडेसहा कोटी रुपये मनपाला भरावे लागणार आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणातर्फे पाणी योजनेचे काम हाती घेण्यात आले आहे. १२ जूनपासून या योजनेतून पाणी देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. मात्र जीवन प्राधिकरणाने त्यापूर्वीच पाणी पुरवठा सुरू केला आहे. १४ एप्रिलपासून या पाणी योजनेची चाचणी सुरू करण्यात आली होती.
0
0
Report

खेड में कुणबी समाज की क्रांतिकारी परिषद संपन्न, हजारों बांधव उपस्थित

Ratnagiri, Maharashtra:खेड में कुणबी समाज की क्रांतिकारी परिषद संपन्न; हजारों बांधवांची उपस्थिती! खेड तालुक्यातील भरणे येथील ‘जोगळे बंधू हॉल’मध्ये कुणबी समाजाची एक दिवसीय क्रांतिकारी परिषद मोठ्या उत्साहात पार पडली. कुणबी समाजोन्नती संघ मुंबई (खेड ग्रामीण शाखा), कुणबी युवा और महिला मंडळाच्या वतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी मुख्य मार्गदर्शक ॲडव्होकेट रोशन पाटील, निवृत्त शिक्षण विस्ताराधिकारी विजय थोरे आणि समाजनेते सहदेव बेटकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. शंकर बाईत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या परिषदेला खेड तालुक्यातील हजारो कुणबी बांधव उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top