445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाघोली–ओव्हळवाडी रस्त्याच्या विकासासाठी 6 कोटी निधी मंजूर; आमदार कटके उपोषण पूर्ववत
Shirur, Maharashtra:सत्तेत भागीदार असूनही स्वतःच्या मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरवस्थेविरोधात उपोषणाला बसलेले शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर (माऊली) कटके यांनी अखेर आपले उपोषण मागे घेतले आहे. वाघोली ते ओव्हळवाडी रस्त्याच्या कामासाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी ६ कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. निधी मंजुरीचे अधिकृत आश्वासन मिळाल्यानंतर आमदार कटकेंनी प्रशासनाच्या उपस्थितीत उपोषण सोडले. सत्तेतील आमदारालाच रस्त्यासाठी उपोषणाला बसावे लागल्याने प्रशासनात मोठी खळबळ उडाली होती, मात्र निधीच्या मंजुरीनंतर या हायव्होल्टेज राजकीय नाट्यावर अखेर पडदा पडला आहे.0
0
Report
अमरावती में धुवाधार बारिश से पेड़ गिरें, शहर में यातायात बाधित
Amravati, Maharashtra:अमरावतीत वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाची जोरदार बॅटिंग; शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर झाडे पडल्याने वाहतुकीची कोंडी, झाडे उचलण्याचे काम युद्ध स्तरावर सुरू. अमरावती शहरात वादळी वाऱ्यासह धुवाधार पावसाने जोरदार बॅटिंग केली असून अमरावती शहरातील प्रत्येक प्रमुख रस्त्यावर मोठ्या प्रमाणात झाडे उन्मळून पडली असून संपूर्ण शहरात २० ते २५ पेक्षा जास्त झाडांची पडझड झाली असून मुख्य रस्त्यावर झाडे कोसळली असल्याने शहरात मोठ्या प्रमाणात वाहतुकीला अडथळा निर्माण झाला आहे. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी झाडे पडली असल्याने अनेक ठिकाणी अपघात झाले असल्याची माहिती आहे. दरम्यान शहरातील अनेक घरांवरील छपरे उडून गेली असून अनेकांच्या संसार उघड्यावर पडले आहे तर पोलीस पेट्रोल पंपा समोरील सिग्नलही तुटून पडले आहे या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतला.0
0
Report
शिरूर हवेली विधायक ने सड़कों की खराब स्थिति के विरोध में भूख हड़ताल शुरू की
Shirur, Maharashtra:राज्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्तेत भागीदार असतानाही, स्वतःच्याच मतदारसंघातील रस्त्यांच्या दुरावस्थेविरोधात शिरूर-हवेलीचे आमदार ज्ञानेश्वर कटके यांना थेट उपोषणाचे हत्यार उपसावे लागले आहे. वाघोली ते ओव्हळवाडी रस्त्याच्या दुरवस्थेकडे प्रशासकीय अधिकारी सातत्याने दुर्लक्ष करत असल्याचा आरोप आमदारांनी केला आहे. वारंवार पाठपुरावा करूनही प्रशासन ढिम्म राहिल्याने, संतप्त झालेल्या आमदार कटकेंनी अखेर आजपासून प्रत्यक्ष उपोषण सुरू केले आहे. सत्तेत असणाऱ्या आमदारावरच आपल्या भागातील कामासाठी उपोषणाला बसण्याची वेळ आल्याने आता राजकीय वर्तुळात आणि प्रशासनात मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
सीना नदी के रुंदीकरण के लिए 20 करोड़ की योजना
Ahilyanagar, Maharashtra:सीना नदी रुंदीकरण जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज अहिल्यानगरच्या सीना नदी हद्द निश्चिती कामाची पाहाणी केली, या कामासाठी 20 कोटी रुपये निधी प्राप्त झाला असून सीना नदीच्या रुंदीकरण आणि सुशोभिकरण करण्यात येणार आहे. यात शहरातील नदीपत्राचे साधारणत: तीन किलोमीटरचे काम होणार आहे, सुरुवातीला 20 कोटी रुपये महानगरपालिकेच्या निधीतून हे काम होत असून जलसंपदा विभागाकडूनही निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करेल असं विखे पाटील म्हणाले.0
0
Report
इंदापुर में खरीफ की शुरुआत, कृषि विभाग ने हुमणी नियंत्रण व प्रशिक्षण कार्यक्रम शुरू किए
Rui, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यात ह्यावर्षी खरीप हंगामाची कृषि विभागामार्फत सुरु झाली आहे. खरीप हंगाम 2026 मध्ये कृषी विभागामार्फत ऊस पिकासाठी हुमणी कीड नियंत्रण सापळे, बिजप्रक्रिया, उगवण क्षमता, महाविस्तार एआय अँप, माती परीक्षण अहवालानुसार खते देणे, पाऊस कमी असल्याने करावयाची उपाययोजना, प्रशिक्षण, शेतीशाळा ह्याचे कार्यक्रम घेण्यात येत आहेत. म्हसोबावाडी येथे कृषि खरीप हंगाम शेतकरी प्रशिक्षण घेण्यात आले. शेतकऱ्यांना हुमणी कीड सापळे कसे तयार करावे, बिजप्रक्रिया, उगवण क्षमता प्रात्यक्षिक करून दाखविले. कृषि विभागाच्या योजनाची सविस्तर माहिती दिली.0
0
Report
रोहित पवार के अन्नत्याग आंदोलन पर विखे पाटील का बयान; जलसंपदा कार्यालय स्थानांतरण विवाद
Ahilyanagar, Maharashtra:राधिकाकृष्ण विखें पाटील के अनुसार रोहित पवार का अन्नत्याग आंदोलन केवल अपने अस्तित्व को बनाए रखने की कोशिश है। मुख्यमंत्री ने किसानों की कर्जमाफी की घोषणा की है और उसका आंदोलन के बिना भी संभव है, यह विखे पाटील ने कहा। रोहित पवार पंढरपूर में अन्नत्याग आंदोलन करेंगे। विरोधी अपने पक्ष की चिंता करें; NEET प्रकरण में सरकार ने कार्रवाई की है और क्लासेस पर निर्बंध लगाने की मांग भी उठ रही है। अहिल्यानगर में जलसंपदा विभाग के कार्यालय राहुरी और लोणी में स्थानांतरित होने पर भी मंत्री विखे पाटील ने सवाल उठाए कि अहिल्यानगर उत्तर जिले में है और कार्यालय दक्षिण जिलों में क्यों रखा जा रहा है।0
0
Report
Advertisement
मालेगांव केस: नाबालिग बच्ची की सिजेरियन प्रसूति और नवजात बिक्री पर BJP का हमला
Nashik, Maharashtra:- मालेगावात - १६ वर्षीय अल्पवयीन मुलगी सिझेरियन प्रसूती व नवजात बालक विक्री प्रकरणात भाजप आक्रमक.. - तत्कालीन वैद्यकीय अधिकारी आणि आत्ताचे 11 आरोपींपैकी मुख्य असलेल्या हिराई हॉस्पीटलचे मालक डॉ. किशोर डांगे यांच्या प्रतीकात्मक फोटोवर जोडे मारत केला या घटनेचा निषेध... - मालेगाव शहरात असलेले बोगस डॉक्टर यांचा कॉम्बिंग ऑपरेशन करून शोध घ्यावा आणि डॉ.डांगे यांची चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी.. - डॉ.डांगे शासकीय रुग्णालय अधीक्षक असतानाच्या सर्व प्रकरणांची चौकशीची मागणी करण्यात आली.. - मालेगावात बोगस डॉक्टरांमुळे आरोग्य सेवेचा खेळ सुरू असल्याचा आरोप देखील आंदोलन केला..0
0
Report
गडचिरोली में हाथियों की चाल की वैज्ञानिक निगरानी के लिए एक साल की अनुमति
Gadchiroli, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यात वन्यजीव व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील हत्तींच्या हालचालींचे शास्त्रीय पद्धतीने निरीक्षण करण्यासाठी आणि त्यांच्या वावरासंबंधी अचूक माहिती संकलित करण्यासाठी विशेष उपक्रमाला गती देण्यात आली आहे. या अनुषंगाने महाराष्ट्र वन विभागाने ‘फार्मर्स फॉर फॉरेस्ट्स’ या संस्थेला गडचिरोली जिल्ह्यात हत्तींच्या हालचालींच्या निरीक्षणासाठी आणि संबंधित कार्यासाठी एक वर्षाची परवानगी प्रदान केली आहे. ही संस्था वन विभागाच्या समन्वयाने हत्तींच्या हालचालीची नोंद, दस्तावेजीकरण, भ्रमण मार्गांचे विश्लेषण तसेच क्षेत्रीय माहिती संकलनाचे कार्य करणार आहे. हत्तींच्या कळपांच्या हालचालांचे नियमित निरीक्षण करून त्यासंबंधीची माहिती वन विभागाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. या उपक्रमांतर्गत विदर्भातील हत्तींची स्वतंत्र ओळख नोंदवही तयार करण्यात येणार असून त्यामध्ये हत्तींची छायाचित्रे, कळपांची रचना, वय-लिंग वर्गीकरण आणि वर्तनविषयक नोंदींचा समावेश असेल. यामुळे हत्तींच्या हालचालींचा अधिक अचूक अभ्यास करण्यास मदत होणार आहे. जीआयएस तंत्रज्ञानाच्या सहाय्याने हत्तींच्या भ्रमण मार्गांचे नकाशे तयार करणे, विश्रांती स्थळे, रस्ते ओलांडण्याची ठिकाणे तसेच संभाव्य संघर्ष क्षेत्रांची ओळख पटविणे यावर विशेष भर दिला जाणार आहे. याशिवाय गावनिहाय घटनांची नोंद करून हत्तींच्या वावरासंबंधी माहितीचे विश्लेषण करण्यात येणार आहे. स्थानिक नागरिकांना हत्तींच्या हालचालींबाबत वेळेवर माहिती मिळावी यासाठी जनजागृती कार्यक्रम, गावस्तरीय बैठका आणि माहिती प्रसाराचे उपक्रम राबविण्यात येणार आहेत. शाळांसाठी माहितीपर साहित्य तयार करण्यासोबतच वन विभागाचे अधिकारी, कर्मचारी, स्वयंसेवक आणि स्थानिक समुदायासाठी प्रशिक्षण कार्यक्रमांचे आयोजनही करण्यात येणार आहे. या प्रकल्पांतर्गत तिमाही प्रगती अहवाल, तांत्रिक नोंदी, नकाशे आणि क्षेत्रीय अभ्यास अहवाल वन विभागाकडे सादर करण्यात येणार असून त्याच्या आधारे भविष्यातील नियोजन आणि व्यवस्थापन अधिक परिणामकारकपणे करता येणार आहे. गडचिरोली जिल्ह्यात वाढत असलेल्या हत्तींच्या वावराच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात आलेला हा उपक्रम वन विभागाला हत्तींच्या हालचालींबाबत अचूक आणि अद्ययावत माहिती उपलब्ध करून देण्यास मदत करणार असून वन्यजीव व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक आणि प्रभावी करण्याच्या दिशेने हे महत्त्वपूर्ण पाऊल मानले जात आहे.0
0
Report
नीमगांव केतकी में पालखी का स्थान पूर्ववत रखने का ग्रामसभा ने एकमत निर्णय लिया
Rui, Maharashtra:निमगाव केतकी ग्रामपंचायताच्या विशेष ग्रामसभेत पालखीचा मुक्काम गावातच राहावा एकमुखी ठराव. गावकरी बुधवारी १० जून रोजी पुण्याला आयुक्त जिल्हाधिकारी जिल्हा परिषद यांच्या अधिकाऱ्यांना भेटणार. पालखी मुक्काम गावातच राहावा यासाठी ग्रामसभेत एकमुखी ठराव मंजूर करण्यात आला. सोमवारी ८ जून रोजी निमगाव केतकी ग्रामपंचायत कार्यालयात पालखी मुक्कामाच्या बदललेल्या ठिकाणावरून विशेष ग्रामसभा सरपंच प्रशासक प्रवीण डोंगरे यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. गेली ३४० वर्षे जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची पालखी निमगावात येथे मुक्काम करत आहे. ही केवळ परंपरा नसून निमगावकरांच्या श्रद्धेचा, भक्तीचा आणि सेवेचा अविभाज्य भाग आहे. गावातील सर्व सहकारी पतसंस्था, गणेश मंडळे, वाड्या-वस्त्यांवरील मंडळी, शेतकरी, महिला-भगिनी यांनी पालखीची व पालखीसोबत चालणाऱ्या लाखो वारकऱ्यांची अन्नदान, निवारा, पाणी, वैद्यकीय सेवा अत्यंत भक्तिभावाने केली आहे. या वर्षी संत तुकाराम महाराजांच्या वंशज व व्यवस्थापन मंडळीनी समस्त निमगावकरांना विश्वासात न घेता पालखीचा मुक्काम अचानक निमगावपासून २ किलोमीटर अंतरावरील इरिगेशन बंगला या ठिकाणी घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निमगावकरांच्या भावना दुखावल्या आहेत.0
0
Report
Advertisement
भुजबळ नाराज़, राजेंद्र जैन को उमेदवारी मिलने पर सियासी बहस तेज
Yeola, Maharashtra:महाराष्ट्रातील रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेसाठी मंत्री छगन भुजबळ यांचे नाव चर्चेत असताना ऐनवेळी राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली यावर मंत्री छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चांना उधाण आले होते समीर भुजबळ यांना महाराष्ट्रात मंत्रिपद द्यावे अशी प्रमुख मागणी मंत्री छगन भुजबळ यांनी लावून धरली होती मात्र राष्ट्रवादी कडून तसा प्रतिसाद न मिळाल्यामुळे राजेंद्र जैन यांना उमेदवारी देण्यात आली यावर येवला मतदार संघातील नाराज झालेल्या कार्यकर्त्यांनी 'साहेब निर्णय घ्या' अशा आशयाचे पोस्टर लावले आहे या पोस्टरची जोरदार चर्चा सुरू झाली असून भुजबळ काही वेगळा निर्णय घेतात का याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
महामंडळ चुनाव: नीलम शिर्के की माघार के बावजूद मेघराज राजेभोसले ने जीत दावा किया
Kolhapur, Maharashtra:अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीतून अभिनेत्री नीलम शिर्के यांना माघार घ्यावी लागली असली तरी महामंडळावर आम्ही त्यांना स्वीकृत म्हणून घेणार आहोत अशी माहिती महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांनी दिली आहे. चित्रपट महामंडळाच्या निवडणुकीत समर्थ पॅनलने 14 पैकी 14 जागांवर विजय मिळवत चित्रकर्मी पॅनलचा धुव्वा उडवला. समर्थ पॅनलच्या विजयानंतर पॅनल प्रमुख आणि महामंडळाचे माजी अध्यक्ष मेघराज राजेभोसले यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
अनिकेत तटकरे: अलिबाग में राजमाळे के साथ मुद्दों का समाधान ढूंढेंगे
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अनिकेत तटकरे मला मदत केलेल्या सर्वांचे आभार महायुतीच्या शिलेदारांचे, नेत्यांचे आणि मतदारांचे आभार पालकमंत्री पदाबाबत मी बोलण्याबाबत मी मोठा नाही वरिष्ठ पातळीवर जे ठरेल ते आम्हाला मान्य असेल काळाच्या ओघात सर्व गोष्टी शांत होतील ते काय बोलतात यावर मी उत्तर द्यावं.. यापेक्षित मी कधीतरी अलिबागला राजमाळ्यावर जाईन, त्यांच्यासोबत चहा पिईन आणि विषय संपवेन - अनिकेत तटकरे0
0
Report
Advertisement
रत्नागिरी: अनिकेत तटकरे को विधायक का प्रमाणपत्र मिला, चुनाव बिनविरोध
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- अनिकेत तटकरे यांना दिले आमदारकीचं प्रमाणपत्र जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी दिले प्रमाणपत्र कोकण विधान परिषद निवडणूक बिनविरोध आमदार किरण सामंत अनिकेत तटकरे यांच्यासोबत जिल्हा परिषद अध्यक्ष उपाध्यक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी उपस्थित0
0
Report
अकोला के सरकारी मेडिकल कॉलेज में गड़बड़ी पर जांच की मांग
Akola, Maharashtra:अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तथा रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा मुद्दा आता अधिकच तापला आहे. पतीला उपचारासाठी पाठीवर घेऊन रुग्णालयात आणणाऱ्या महिलेची बातमी झी 24 तासने प्रसारित केल्यानंतर प्रशासनासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची दखल घेत विविध पक्षांचे नेते आणि लोकप्रतिनिधी रुग्णालयाला भेट देत आहेत. शिवसेना नेते राजेंद्र साळवी यांनी चौकशी करून दोषींवर कारवाईची मागणी केल्यानंतर काँग्रेसचे आमदार साजिद खान पठाण यांनीही रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनेच्या दिवशी उपस्थित असलेल्या सर्व कर्मचाऱ्यांची बुधवारी बैठक घेण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना दिले. दरम्यान, आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार नितीन देशमुख यांनीही रुग्णालयाला भेट देत येथील भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली. रुग्णांची होत असलेली गैरसोय, अस्वच्छ परिसर आणि अपुऱ्या सुविधा यावर त्यांनी प्रशासनाला धारेवर धरले. स्वच्छतेचे काम पाहणारी एजन्सी एका मंत्र्यांशी संबंधित असल्याने अधिष्ठातादेखील कारवाई करत नसल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला.या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर अहवाल दोन दिवसांत सादर करण्याचे आदेश देण्यात आले असून, अहवाल न दिल्यास अधिष्ठात्यांविरोधात कारवाईची मागणी करणार असल्याचा इशाराही नितीन देशमुख यांनी दिला आहे. तसेच येत्या अधिवेशनात अकोला जिल्हा सामान्य रुग्णालयातील गैरव्यवस्थेचा मुद्दा उपस्थित करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
वाशिम शहर में मारपीट की घटनाओं में वृद्धि, नागरिक चिंतित
Washim, Maharashtra:वाशिम शहरात किरकोळ कारणांवरून होणाऱ्या हाणामारीच्या घटनांमध्ये वाढ होत असून भररस्त्यात टोळक्यांकडून मारहाणीचे प्रकार वारंवार घडत आहेत. आजही असाच प्रकार घडला त्यामुळे शहरातील सामाजिक शांतता व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत असल्याची चिंता नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. रोजच छोट्या-मोठ्या कारणांवरून वाद निर्माण होऊन त्याचे रूपांतर हाणामारीत होत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. काही समाजकंटक व गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तींकडून सामाजिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचाही आरोप केला जात आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने अशा घटनांवर कठोर कारवाई करून शहरात अधिक बंदोबस्त तैनात करावा व कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.0
0
Report
Advertisement
