icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

राहाता के पिंप्रीनिर्मळ में अवैध गर्भ-गणना निदान: डॉक्टर समेत 13 गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:पिंप्रीनिर्मळ शिवारात एका निर्जनस्थळी असलेल्या फार्महाऊसवर पोलिसांनी 29 एप्रिल रोजी टाकला होता छापा... फार्महाऊस येथे बेकायदेशीरपणे सुरू होते गर्भलिंगनिदान... अपर पोलिस अधीक्षक कार्यालय श्रीरामपूर आणि लोणी पोलिसांची संयुक्त कारवाई... गर्भलिंग निदानासाठी महिलांकडून 10 हजार रुपये घेत असल्याची माहिती... कारवाईत डॉक्टर राहुल भनगे आणि एजंट अभिजित भुसाळ यांचेसह 10 जणांवर दाखल आहे गुन्हा... या कारवाईत आत्तापर्यंत सुमारे 25 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त... तपासात आणखी दोन एजंट प्रदीप ढगे आणि निलेश भवर यांचा सहभाग उघड... आरोपींच्या चौकशीत श्रीरामपूर येथील डॉ. रविंद्र कुटे यांचाही सहभाग समोर... डॉ. रविंद्र कुटे यांनाही पोलिसांनी केली अटक...आरोपींची संख्या 13 वर या प्रकरणात आणखी एजंट आणि डॉक्टरांचा सहभाग असण्याची शक्यता.... लोणी पोलिसांकडून अधिकचा तपास सुरू....
0
0
Report

अमरावती के चिरोडी जंगल में पांच कृत्रिम पाणवठे, वन्यजीवों के लिए पानी की सुविधा

Amravati, Maharashtra:अमरावतीत वनविभागाच्या कृत्रिम पानवठ्यामुळे वन्यप्राण्यांना दिलासा; वन विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून स्वागत अमरावती जवळील चिरोडी जंगल परिसरात कृत्रिम पाणवठे तयार करून प्राणीांसाठी पाण्याची सोय करण्यात आली आहे. या जंगलात बिबट्या, हरीण, रानडुक्कर, मोर तसेच वाघ यांसारख्या विविध वन्य प्राण्यांचा वावर आहे. उन्हाळ्यात पाण्याअभावी हे प्राणी गावांकडे वळण्याची शक्यता वाढते. ही बाब लक्षात घेऊन वन विभागाने पाच ठिकाणी पाणवठे तयार केले आहेत. या कृत्रिम पाणवठ्यांमुळे वन्य प्राण्यांना जंगलातच पाणी उपलब्ध होत असून त्यांची भटकंती कमी होत आहे. तसेच मानव-प्राणी संघर्ष टाळण्यासही मदत होणार आहे. वन विभागाच्या या उपक्रमाचे स्थानिकांकडून स्वागत केले जात आहे.
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर में अवैध संरचना: अदालत ने 15 दिन का नोटिस दिया, नगरपालिका की कार्रवाई टिकी

Kolhapur, Maharashtra:Anc:- कोल्हापूर शहरामधील तावडे हॉटेल ते गांधीनगर या परिसरात करण्यात आलेली बेकायदेशीर बांधकामे सात दिवसात काढून घ्यावी असं कोल्हापूर महानगरपालिकेने अतिक्रमण धारकांना बजावले होते. पण कोल्हापूर सर्किट बेंचने सात दिवसाऐवजी संबंधितांना पंधरा दिवसाची नोटीस द्यावी अशी सूचना न्यायमूर्तींनी दिली आहे, त्यामुळे कोल्हापूर महानगरपालिकेचे तोडकाम कारवाई पुढे गेली आहे. तावडे हॉटेल ते गांधीनगर या दरम्यानची जागा कोल्हापूर महानगरपालिका मालकीची असल्याचा निर्णय कोर्टाने दिल्यानंतर, कोल्हापूर महानगरपालिका ॲक्शन मोडवर आली आहे, पण आता सर्किट बेंचने संबंधित बांधकाम धारकांना पंधरा दिवसाचा अवधी देण्याचे निर्देश दिल्याने महानगरपालिकेच्या वतीने केली जाणारी कारवाई काही दिवसांसाठी थांबली आहे.
0
0
Report

राहता में दाढ गाँव में तलवार-लाठी से मारपीट, महिला घायल, पुलिस ने मामला दर्ज किया

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील राहता तालुक्यातील दाढ गावात तलवारींचा नंगानाच , कायदा सुव्यवस्थेचे धिंधवडे..? गाडीला कट का मारला..? यावरून वाद मात्र तलवारी , लाठ्या काठ्या घेऊन दोन गटांची एकमेकांना मारहाण... धक्कादायक प्रकारानंतर लोणी पोलिस ठाण्यात मारहाणीचा गुन्हा दाखल... गाडीला कट का मारला यावरून आरोपींकडून शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा आरोप... घरासमोर येऊन दमदाटी करत मारहाण... तलवार, कत्ती , लाठाबुक्क्यांनी आणि काठीने मारहाण केल्याची नोंद.. जखमी महिलेस उपचारासाठी रुग्णालयात करण्यात आले दाखल... लोणी पोलिसांकडून विविध कलमान्वये गुन्हा दाखल, पुढील तपास सुरू.. खुले आम शस्त्र बाळगल्याने परिसरात भितीचे सावट...
0
0
Report
Advertisement

म्हाडा घोटाले में बढ़ी गिरफ्तारी: नगर निर्माण विभाग के अधिकारी समेत दो गिरफ्तार

Nashik, Maharashtra:- म्हाडा घोटाळ्यात आणखी दोन अधिकाऱ्यांना अटक - मनपाच्या नगर रचना विभागाचे सहाय्यक संचालक कल्पेश पाटील आणि भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे गुन्हे शाखेच्या ताब्यात - दोन दिवसांपूर्वी तहसीलदार दीपक पाटील यांना अटक झाल्यानंतर तपासाची व्याप्ती आणखी वाढली - नाशिक शहर गुन्हे शाखेकडून म्हाडा घोटाळ्याची सखोल चौकशी सुरू - प्रशासकीय मंजुरी, जमीन व्यवहार आणि आर्थिक देवाणघेवाणीचे धागेदोरे तपास यंत्रणांच्या रडारवर - अटकेच्या मालिकेमुळे महसूल आणि नगररचना विभागात मोठी खळबळ - म्हाडा घोटाळ्यात आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता - आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी २० टक्के राखीव क्षेत्र ठेवण्याच्या नियम धाब्यावर बसवत घोटाळ्याचा आरोप - यापूर्वी बिल्डर सोनू मनवाणी, दीपक करमचंदानी यांना झालीये अटक - तर भूमी अभिलेख विभागाचे उपअधीक्षक बिपीन काजळे हेच होते फिर्यादी - फिर्यादीलाच नाशिक पोलिसांनी आरोपी केल्यानं मोठी खळबळ
0
0
Report

तापमान बढ़ा, हिंगोली में कोबी की फसल बर्बाद; किसानों पर आर्थिक संकट मंडराने लगा

Hingoli, Maharashtra:मराठवाड्यासह हिंगोली जिल्ह्यात वाढत्या तापमानाचा फटका आता फळबागांसोबत भाजीपाला पिकांनाही बसू लागला आहे.हिंगोली जिल्ह्यातील नवलगव्हाण येथील शेतकरी जगन कोरडे यांनी जानेवारी महिन्यात अर्ध्या एकर क्षेत्रावर कोबी पिकाची लागवड केली होती.उन्हाळ्यात चांगला बाजारभाव मिळेल, या अपेक्षेने त्यांनी ही लागवड केली होती.मात्र यावर्षी तापमानात झालेल्या मोठ्या वाढीमुळे कोबी पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.वाढत्या उष्णतेमुळे कोबीवर काळे डाग पडले असून पिक सुकून गेले आहे.तसेच कोबीचे संरक्षण करणारी पानेही वाळून गेल्याने पिकाची गुणवत्ता पूर्णत खालावली आहे.यामुळे बाजारात या कोबीला अपेक्षित दर मिळणार नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.आधीच वाढत्या खर्चाचा सामना करणाऱ्या शेतकऱ्यांपुढे आता निसर्गाच्या या बदलत्या परिस्थितीमुळे नवीन संकट उभे ठाकले आहे.
0
0
Report
Advertisement

आगामी सप्ताह भोंदू खरात के खिलाफ पहला आरोपपत्र दाखिल की तैयारी, SIT तेज जांच

Nashik, Maharashtra:भोंदू खरातविरोधात पुढील आठवड्यात पहिले दोषारोपपत्र अँकर भोंदू अशोक खरात याच्याविरोधात एसआयटीने दोषारोपपत्र दाखल करण्याची प्रक्रिया वेगाने सुरू केलीये.... पुढील आठवड्यात न्यायालयात दोषारोपत्र सादर केले जाण्याची शक्यता असून, एसआयटीने खरातच्या कार्यालयातून पुन्हा काही पुरावे गोळा केले. त्याशिवाय पीडितेची भेटदेखील घेतली. त्यामुळे खरातच्या अडचणी अधिक वाढणार आहेत.एसआयटीकडून दोषारोपत्रात पीडितांचे जबाब, वैद्यकीय अहवाल, तांत्रिक पुरावे तसेच साक्षीदारांची विधाने यांचा समावेश केला जाणार आहे. तपासादरम्यान गोळा करण्यात आलेले डिजिटल पुरावे आणि घटनास्थळाशी संबंधित माहितीही महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर न्यायालय त्याची छाननी करून आरोप निश्चित करण्याची प्रक्रिया सुरू करेल. त्यानंतर खटल्याच्या सुनावणीला प्रत्यक्ष सुरुवात होईल.कायद्यानुसार, जर पहिल्या गुन्ह्यातील लैंगिक अत्याचाराचा आरोप सिद्ध झाला, तर भारतीय दंड संहिताेतील संबंधित कलमान्वये आरोपीस किमान १० वर्षापासून आजीवन कारावासापर्यंत शिक्षा होऊ शकते. काही गंभीर परिस्थितीत दंडाची तरतूदही लागू होऊ शकते...हे प्रकरण संवेदनशील आणि गंभीर स्वरूपाचे असल्याने न्यायालयीन प्रक्रिया वेगाने पार पडण्याची शक्यता आहे. गुन्हा सिद्ध झाला तर पीडितांना न्याय मिळण्यासाठी दोषारोपपत्र निर्णायक ठरणार आहे.
0
0
Report

मावळ तालुक्यात विषमुक्त सेंद्रिय खेती के लिए दशपर्णी अर्क अभियान

Varsoli, Maharashtra:मावळ तालुक्यातील कृषि विभाग आणि पाणी फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महादशपर्णी अर्क सोहळा निमित्त मावळ तालुक्यातील शिलाटणे, जांभूळ, नानोली तर्फे चाकण, यागावातील महिला शेतकरी गटांनी उत्साहात दशपर्णी अर्क तयार केला. या सर्व गटांच्या एकजुटीमुळे पाणी फाउंटेशन मेनटॉर कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांच्या मार्गदर्शनामुळे मावळ तालुक्यात एकूण 800 लिटर दशपर्णी अर्क बनविण्यात आला आहे. शेतकऱ्यांना दशप्रणी अर्क पिकामध्ये कीड रोगासाठी कसा फायदेशीर आहे हे कृषि अधिकारी स्मिता कानडे व प्रियांका पाटील यांनी सांगितले. या उपक्रमातून विषमुक्त शेतीच्या चळवळीत आपला सहभाग नोंदविला आणि गटशेती मध्ये वाटचाल करण्याचा दृढ संकल्प अधिक बळकट झाला..
0
0
Report

भंडारा में बिना नंबर प्लेट वाहनों के इस्तेमाल पर प्रशासन पर प्रश्नचिह्न

Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात सुरूलेल्या भूमिगत गटारे व रस्ते कामांमध्ये नियमांचे उल्लंघन करत भंगार अवस्थेतील विनानंबरची वाहने वापरली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या वाहनांवर नंबर प्लेटऐवजी ‘नगरपरिषद भंडारा’ आणि ‘मांगूकिया ब्रदर्स’ अशी नावे लिहिलेली दिसत आहेत. वाहतूक विभाग व आरटीओच्या नियमांना धाब्यावर बसवत सर्रासपणे ही वाहने रस्त्यावर धावत असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. सामाजिक कार्यकर्त्यांच्या तक्रारीनंतर वाहतूक पोलिसांनी एका वाहनावर कारवाई केली असली, तरी अशा अनेक वाहनांचा वापर सुरू असल्याची शक्यता आहे. या प्रकरणात संबंधितांवर कठोर कारवाईची मागणी होत असून प्रशासन आता काय पावले उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

वन विभाग ने सीतेपार में पांच वर्षीय बच्ची हत्या करने वाले बिबटिए को जेरबंद किया

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या सीतेपार परिसरात पाच वर्षीय चिमुकलीचा बळी घेणाऱ्या हल्लेखोर बिबट्याला अखेर वनविभागाने जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. काही दिवसांआधी पहाटे मक्याच्या शेतात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अंशिका मिरी हिच्यावर हल्ला करून तिचा जीव घेतला होता. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. वनविभागाने तातडीने पिंजरे लावून शोधमोहीम राबवली आणि अखेर बिबट्याला पकडण्यात यश आले. जेरबंद केलेल्या बिबट्याला नंतर सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले असून नागरिकांनी दिलासा व्यक्त केला आहे.
0
0
Report

कुही में तहसीलदार को JCB से चार किलोमीटर तक फरफटाने का मामला

Nagpur, Maharashtra:नागपूर जिल्ह्यातील कुahi तालुक्यात नायब तहसीलदार कारवाईसाठी गेले असताना जेसीबी न थांबवता मुरूम माफियांनी तहसीलदारांना जेसीबीला लटकवत चार किलोमीटरपर्यंत फरफटत नेल्याचा संतापजनक प्रकार घडलाय. कुही तालुक्यातील बोरी नाईक परिसरात मुरूम माफियांनी महसूल पथकावर हा हल्ला चढवला. सोमवारी रात्रीच्या सुमारास झाला हल्ला. नायब तहसीलदार बुद्धभूषण निकाळजे यांना बोरी नाईक परिसरात अवैध उत्खननाची माहिती मिळाली... त्यामुळे त्यांनी तातडीने पावले उचलत कारवाई सुरू केली. कारवाईदरम्यान जेसीबी चालकाने महसूल यंत्रणेला न जुमानता जेसीबी घेऊन तिथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. यावेळी नायब तहसीलदार निकाळजे यांनी जेसीबिवर चढले व तो थांबवण्याचा प्रयत्न केला.. मात्र जेसीबी चालकाने निकाळजे यांना चालत्या जेसीबीला लटकवून तीन ते चार किलोमीटरपर्यंत लटकून, फरफटत नेले, त्यांच्या जीवाला धोका निर्माण केला. घटनेचा माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखল झाले. कुही पोलिसांनी जेसीबी चालक मयूर थोटे याला अटक केली केली.
0
0
Report

जालना मर्चेंट बैंक घोटाला: भोकरदन शाखा प्रबंधक गिरफ्तार, मुख्य सूत्रधार पहले गिरफ्तاري

Jalna, Maharashtra:जालना मर्चंट बँक घोटाळा : भोकरदन शाखा व्यवस्थापकाला केली अटक आरोपीला सहा दिवसांची पोलिस कोठडी; मुख्य सूत्रधाराला यापूर्वीच अटक कलमाताही वाढ अँकर : जालना शहरातील जालना मर्चेंट को-ऑपरेटिव्ह बँकेची बनावट कागदपत्रांच्या आधारे २३ कोटी ३३ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. त्यामुळे गुन्ह्याची व्याप्ती पाहून पोलिस अधीक्षकांनी सखोल तपासाबाबतचे आदेश आर्थिक गुन्हे शाखेला दिले आहेत. आर्थिक गुन्हे शाखेने तपासादरम्यान गुन्ह्याचा मुख्य सूत्रधार आणि त्याच्या इतर साथीदारांना यापूर्वीच करण्यात आली आहे. या प्रकरणात भोकरदन शाखेचा अटक केली आहे. बुधवारी भोकरदन शाखेच्या व्यवस्थापकास व्यवस्थापक नटवर सत्यनारायण (४७, वसुंधरानगर, दायमा जालना) याचा कटामध्ये सहभाग निष्पन्न झाला. तसे पुरावे पोलिसांना मिळाले. त्यामुळे त्यासही गुन्ह्यात अटक करण्यात आली आहे. या गुन्ह्यात आजपर्यंत मुख्य आरोपी रायचंद सखाराम कुरंगळ यास अटक करण्यात आली आहे.तसेच गुन्ह्यात आरोपींनी कर्जाची रक्कम विशिष्ट खात्यावर वर्ग केली आहे. त्या माध्यमातून बँकेची आर्थिक फसवणूक केली आहे. त्यामुळे बाधा निर्माण झाली आहे. म्हणून नमूद गुन्ह्यात महाराष्ट्र ठेवीदारांचे गुन्ह्यात ठेवीदारांच्या हितसंबंधांना हितसंबंध जोपासणारा कायदा, कलम ३, ४ व५ ही वाढ करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top