icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उरण के जासई तालाब में तीन नाबालिग लड़कियों की डूबकर मौत

Navi Mumbai, Maharashtra:शनिवारी दुपारच्या सुमारास उरण तालुक्यातील जासई गावातील तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच, गावात पाणी आले नसल्याने जासई येथील दोन महिला या शनिवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळेस, त्यांच्या तीन अल्पवयीन मुली या आईसोबत तलावावर गेल्या होत्या. तलावाच्या काठावर असलेल्या एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात कोसळली, यावेळेस इतर दोघीनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे मृत मुलीच्या आईने सांगितले आहे. याचदरम्यान, आईने देखील मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत खांद्यापर्यंत पाण्यात जाऊन बुडणाऱ्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. हे ठिकाणी, मोहम्मद कुरेशी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने स्थानिक गावकरी प्रशांत म्हात्रे या तरुणाने देखील पाण्यात धाव घेऊन अल्पवयीन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत बाहेर काढले होते. यावेळी, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिलی आहे. यात, रेहाना रमजान परवीन (८ वर्षे), रविना रमजान परवीन (७ वर्षे) आणि सौम्या कन्हैय्या प्रजापती (१३ वर्षे) या तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, या मृत अल्पवयीन मुली मूळच्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील रहिवासी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर, मध्यरात्री उशिरा या तिन्ही मुलींचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे नगरसेविका नाहीदा ठाकूर यांनी सांगितले आहे。
0
0
Report
Advertisement

मालेगांव में नाबालिग प्रसूति के बाद नवजात की विल्हेवाट: 11 पर POCSO समेत आरोप

Nashik, Maharashtra:• मालेगावात अल्पवयीन मुलीची बेकायदेशीर प्रसूती आणि नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा धक्कादायक प्रकार. • अल्पवयीन मुलीची प्रसूती करून जन्मलेल्या बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा डॉ.किशोर डांगे यांच्यासह 11 जणांवर गुन्हा दाखल. • अटक करण्यात आलेले डॉक्टर हे मालेगाव सामान्य रुग्णालयाचे तत्कालीन वैद्यकीय अधीक्षक असल्याची माहिती. • एका खाजगी रुग्णालयात प्रसूती करून नवजात बालकाची परस्पर विल्हेवाट लावल्याचा आरोप फिर्यादीत नमूद. • या प्रकरणात दोन नामवंत डॉक्टरांसह ११ जणांविरुद्ध पॉक्सो आणि बेकायदेशीर प्रसूतीसंदर्भातील गुन्हे दाखल. • अल्पवयीन मुलीच्या प्रसूतीनंतर जन्मलेल्या बालकाची विक्री केल्याचाही गंभीर आरोप. • या संपूर्ण प्रकरणामुळे आरोग्य विभागात मोठी खळबळ उडाली असून शहरात संतापाची लाट.
0
0
Report

कर्जमाफी के फैसले के विरोध में किसान मोर्चा होली मनाता

Beed, Maharashtra:राज्य शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफीच्या निर्णयाची बीड तालुक्यातील खांडे पारगाव या गावी होळी करण्यात आली... शेतकरी हक्क मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी या निर्णयाची होळी करत निषेध नोंदवला... सरकारने जीआर मध्ये स्पष्ट सांगितले आहे की ज्या शेतकऱ्यांची 2019 ला कर्जमाफी झाले असेल त्यांना केवळ पन्नास हजार रुपयापर्यंत कर्जमाफी दिली जाईल... नागपूर येथे झालेल्या आंदोलनात सरकारने शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू असे आश्वासन दिले होते. मात्र तसे न करता ही शेतकऱ्यांची फसवणूक असून याचा आम्ही निषेध नोंदवत आहोत.. या कर्जमाफीने शेतकऱ्याच्या पदरात काही पडलं नाही.. तर सरकारमध्ये आमदार झालेल्या बच्चू कडू च्या पदरात पडलंय.. बच्चू कडूंनी शेतकऱ्यांचं आंदोलन मातीत घालून स्वतःच्या आमदारकीचे चोचले पुरवलेत त्यामुळे आमदार बच्चू कडू ची आमदारकी रद्द करून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी अशी मागणी शेतकरी हक्क मोर्चाच्या वतीने करण्यात आली. यावेळी सरकारच्या विरोधात घोषणाबाजीदेखील करण्यात आली...
0
0
Report
Advertisement

अकोला गांधी चौक पर नोवल्टी आइसक्रीम शॉप से चोर ने 80 हजार चुराए

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गांधी चौक परिसरात चोरीची घटना समोर आली आहे. गांधी चौकातील नोव्हेल्टी आइसक्रीम या दुकानाचे शटर फोडून अज्ञात चोरट्याने सुमारे 80 हजार रुपयांची रोकड लंपास केली. या घटनेमुळे व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, अज्ञात चोरट्याने मध्यरात्रीच्या सुमारास नोव्हेल्टी आइसक्रीम दुकानाचे शटर उचकटून आत प्रवेश केला. त्यानंतर दुकानातील गल्ला फोडून त्यामधील सुमारे 80 हजार रुपयांची रोकड चोरून नेली. सकाळी दुकान उघडण्यासाठी आलेल्या मालकाला चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तत्काळ पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. शहरात रात्री पोलिसांची गस्त सुरू असतानाही भरवस्तीत चोरीची घटना घडल्याने पोलिसांच्या गस्त व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. पोलिसांकडून पुढील तपास करण्यात येत आहे.
0
0
Report

कराड के पास बने उड्डाणपुल का काम पूरा, 20 जून तक यातायात खुलने की उम्मीद

Satara, Maharashtra:अँकर -पुणे बेंगलोर महामार्गावरील कराड जवळील सहापदरी साडेतीन किलोमीटर लांब अंतराच्या उड्डाणपुलाचे काम अंतिम टप्प्यात आले असून 20 जून पर्यंत पुलाचं काम करण्याची अंतिम मुदत देण्यात आली आहे. या पुलाच्या कामाची खासदार उदयनराजे भोसले, आमदार अतुल भोसले, आमदार मनोज घोरपडे यांनी पाहणी करून पुल लवकरात लवकर वाहतुकीसाठी खुला करण्याबत संबंधित कंपनीला सूचना केल्या .कराड जवळ होणाऱ्या वाहतूक कोंडी वर उपाय म्हणून या पुलाचे काम हाती घेण्यात आलं होतं. पुल पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणची वाहतूक आणि प्रवास सुरळीत होईल अशी प्रतिक्रिया उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केली
0
0
Report

मुलुंड के मिठागर पर निर्माण प्रस्ताव के विरोध से मैदान में आक्रोश

Mumbai, Maharashtra:मिठागर बचावासाठी मुलुंडकरांचा एल्गार मुलुंड मध्ये भव्य जनआंदोलनातून सरकारला इशारा मुलुंडच्या मिठागरांवर गृहनिर्माण प्रकल्पाला विरोध नागरिक रस्त्यावर धारावी पुनर्वसनानंतर आता मिठागरांचा मुद्दा तापला मुलुंडकर आक्रमक प्रस्तावित प्रकल्पाविरोधात जोरदार आंदोलन व्हिओ : मुलुंड,भांडुप आणि कांजूरमार्ग परिसरातील मिठागरांच्या हजारो एकर जमिनींवर गृहनिर्माण प्रकल्प उभारण्याच्या हालचाली गेल्या काही वर्षांपासून सुरू आहेत.केंद्र सरकारच्या विविध गृहनिर्माण योजनांसाठी या जमिनींचा वापर करण्याचे प्रस्ताव वेळोवेळी पुढे आले आहेत.मात्र पर्यावरणवादी, स्थानिक रहिवासी आणि विविध सामाजिक संघटनांनी या प्रस्तावांना सातत्याने विरोध केला आहे.मिठागरे ही नैसर्गिक जलसाठा क्षेत्रे असून मुसळधार पावसाच्या काळात अतिरिक्त पाणी साठवून ठेवण्याचे महत्त्वाचे काम करतात. त्यामुळे या जागांवर मोठ्या प्रमाणावर बांधकाम झाल्यास मुंबईतील पूरस्थितीचा धोका वाढू शकतो, अशी भीती पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.मुंबईच्या विकास आराखड्यात मिठागरांच्या संवर्धनाचा मुद्दा अनेकदा चर्चेत आला आहे. पर्यावरणीय मंजुरी आणि जमीन हस्तांतरणाच्या मुद्द्यांवरून यापूर्वीही वाद निर्माण झाले आहेत. त्यामुळे मिठागरांच्या भवितव्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.धारावीतील अपात्र प्रकल्पबाधितांच्या पुनर्वसनाच्या मुद्द्यावरून आधीच मुलुंडकरांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. त्यात आता मिठागरांवरील प्रस्तावित गृहनिर्माण प्रकल्पामुळे स्थानिकांच्या चिंतेत भर पडली आहे. या दोन्ही प्रकल्पांमुळे वाहतूक,पाणीपुरवठा आणि इतर पायाभूत सुविधांवर अतिरिक्त ताण पडेल,अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत.यावेळी आंदोलनकर्त्यांनी मिठागर वाचवा,मुलुंड वाचवा अशा घोषणा देत सरकारने हा प्रस्ताव तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement

अंतरराज्यीय कृषि उपकरण चोर गैंग का पर्दाफाश, तीन गिरफ्तार

Washim, Maharashtra:वाशिम पुलिस ने खेत उपकरण चोरियों के लिए अंतरराज्यीय गैंग का पर्दाफाश कर तीन बदमाशों को गिरफ्तार किया है. उनके कब्जे से 3 लाख 45 हजार रुपये का माल जप्त किया गया. 2 जून को कलंबा महाली के किसान प्रल्हाद महाले के खेत से 60 हजार रुपये के दो सोलर प्लेट चोरी हुई थीं. जांच के दौरान पुलिस ने गुप्त सूचना के आधार पर विठ्ठल मंगलदास भगत को हिरासत में लिया. पूछताछ में उसने अपने दो साथियों के साथ चोरी करना कबूल किया. आरोपी के पास से दो सोलर प्लेट, 100 कट्टे हल्दी बेण, दो मोटर साइकिलें और एक मोटर पंप आदि 3 लाख 45 हजार रुपय का माल जप्त किया गया. इस गिरफ्तारी से जिले में खेती-सामग्री चोरी घटनाओं के खुलासे की संभावनाएं बढ़ गईं.
0
0
Report
Advertisement

साइकिल चलाओ, शहर बचाओ: केडीएमसी की रैली में सैकड़ों साइकिलिस्ट शामिल

Kalyan, Maharashtra:सायकल चालवा, शहर वाचवा. केडीएमसी आयोजित सायकल रॅलीमध्ये शेकडो सायकलिस्ट सहभागी आंतरराष्ट्रीय सायकल दिन और जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत कल्याण डोंबिवली महानगरपालिका, पोलीस विभाग आणि बिर्ला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सायकल रॅलीचे आयोजन केले, “सायकल चालवा, शहर वाचवा” हा संदेश देणाऱ्या या रॅलीमध्ये कल्याण आणि डोंबिवली शहरातील शेकडो सायकलप्रियांनी सहभाग नोंदवला. वाढते प्रदूषण, वाहतूक कोंडी आणि पर्यावरणीय समस्यांबाबत जनजागृतीसाठी नागरिकांनी दैनंदिन जीवनात अधिकाधिक सायकलचा वापर करावा आणि पर्यावरणपूरक जीवनशैली स्वीकारण्याचे आवाहन केले आहे या रॅलीमध्ये कल्याण सायकलिस्ट ग्रुप, डोंबिवली सायकलिस्ट ग्रुप, बाईक पोर्ट सायकलिस्ट ग्रुप, एव्हरग्रीन सायकलिस्ट ग्रुप, पलावा सायकलिस्ट ग्रुप, हिरकणी महिला सायकल क्लब, पेडल रिपब्लिक सायकल क्लबसह इतर सायकलप्रेमी संघटनांनी सहभाग घेतला.
0
0
Report

शेती के विवाद में शिक्षक सहित तीन ने हमला किया; भाइयों की हालत गंभीर

Beed, Maharashtra:शेतीच्या वादातून शिक्षकाचा हैदोस; तिघांच्या अमानुष मारहाणीतील दोन भावांच्या बरगड्या तुटल्या, मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल ANC - बीड जिल्ह्यात गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असून खून, खुनाचा प्रयत्न और अमानुष मारहाणीच्या घटना नित्याच्या बनल्या आहेत. एका दलित महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीची घटना ताजी असतानाच आता शेतीच्या वादातून दोन भावांना बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडवणी तालुक्यातील चिखलबीड येथील शेतीच्या वादातून एका शिक्षकासह तिघांनी दोन भावांवर हल्ला केला. या मारहाणीत बाळासाहेब तोगे आणि लक्ष्मण तोगे हे गंभीर जखमी झाले असून मारहाणीत अक्षरशः त्यांच्या बरगड्या तुटल्या आहेत. जखमींवर सध्या बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा व्हिडिओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून त्यामध्ये संबंधितांना निर्दयपणे मारहाणी करण्यात आल्याचे दिसून येत आहे. घटनेमुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान या प्रकरणी वडवणी पोलिस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

बारामती में विश्व पर्यावरण दिवस पर साइकिल रैली, नागरिकों का उत्साह बढ़ा

Rui, Maharashtra:जागतिक पर्यावरण दिनानिमित्त बारामतीत सायकल रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने एन्व्हायरमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती हेल्थ क्लब आणि बारामती सायकल क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने बारामती येथे सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले. या रॅलीचे उद्घाटन उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. यावेळी पर्यावरण संवर्धन, प्रदूषणमुक्त जीवनशैली आणि सायकल वापराला प्रोत्साहन देण्याचा संदेश देण्यात आला. नागरिकांनी मोठ्या उत्साहात या रॅलीत सहभाग घेत पर्यावरण संरक्षणाची सामूहिक जबाबदारी अधोरेखित केली. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी पर्यावरणपूरक उपक्रमांमध्ये नागरिकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन केले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top