445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली जिल्हा केंद्रीय सहकारी बैंक को महाराष्ट्र की नंबर-1 बैंक बनाने के लिए आह्वान
Sangli, Maharashtra:सांगली जिल्हा मध्यवर्ती बँक ही पश्चिम महाराष्ट्रात एक नंबरची बँक असून भविष्यात महाराष्ट्रातील एक नंबरची बँक कशी होईल यासाठी काम करावे,असा आवाहन राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केले आहे,सांगलीमध्ये जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शताब्दी महोत्सवी वर्ष शुभारंभ प्रसंगी आयोजित मेळाव्यामध्ये ते बोलत होते.सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला 100 वर्ष पूर्ण झाले आहेत या निमित्ताने जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून शताब्दी वर्ष महोत्सव पार पडत आहे, यानिमित्ताने शताब्दी महोत्सव वर्ष शुभारंभ कार्यक्रमा आयोजित करण्यात आला होता. यावेळी खासदार विशाल पाटील, काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, माजी आमदार मानसिंगराव नाईक यांच्यासह बँकेचे संचालकांसह जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेते व सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
आष्टा में ड्रग्स और अवैध शराब के ख़िलाफ जयंत पाटिल ने पुलिस अधीक्षक से मुलाकात
Sangli, Maharashtra:आष्टयातील नशेखोर व अवैध व्यवसाय विरोधात जयंत पाटलांचे पोलीस अधीक्षकांना निवेदन. सांगलीच्या वाळवा तालुक्यातील आष्टा येथील वाढत्या अवैध व्यवसाय विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी थेट सांगली पोलीस अधीक्षकांची भेट घेतली आहे. नूतन पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची आमदार जयंत पाटलांनी आष्टयाचे नगराध्यक्ष व शिष्टमंडळासह भेट घेत आष्टा शहरामध्ये मोठ्या प्रमाणात ड्रग्ज,अवैध दारू विक्री, नशेखोरी,वाढत्या गुन्हेगारीचा पाढा वाचत,अवैध व्यवसाय व गुन्हेगारी रोखण्यासाठी पोलीस दलाकडून कठोर कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.या मागणीचा निवेदन देखील जयंत पाटलांकडून सांगली पोलिसांना देण्यात आले आहे.0
0
Report
अंबरनाथ में फार्मिंग- जंगल भूमि पर अवैध जींस वॉश फैक्ट्रियाँ, सरकारी कब्जे की जांच
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये फार्मिंग आणि फॉरेस्टच्या जागेवर अनधिकृत जीन्स वॉश कारखाने उभे राहिल्याचं समोर आलंय. या कारखान्यांना काही भूमाफियांनी चक्क सरकारी जागा परस्पर भाड्याने दिल्या असून याकडे सरकारी यंत्रणांनी मात्र कानाडोळा केला आहे. अंबरनाथमधील लोकनगरी ते बारकूपाडा रस्त्याला लागून फॉरेस्टची जागा आहे. तसंच पूर्वेतील स्मशानभूमीच्या मागेही फॉरेस्ट आणि फार्मिंग सोसायटीची जागा आहे. या जागांवर अनधिकृतपणे जीन्स वॉश कारखाने उभारण्यात आले आहेत. या कारखान्यांमध्ये वॉश केलेल्या जीन्स लोकनगरी समोरच्या जागेत उघड्यावर वाळत घातलेल्या पाहायला मिळतात. धक्कादायक बाब म्हणजे जीन्स वॉश केल्यानंतरचं केमिकलयुक्त रंगीत पाणी एकतर वालधुनी नदीत सोडलं जातं, किंवा जमिनीत खड्डा करून त्यात मुरवलं जातं. यामुळे नदी नाल्यांसोबत जमिनीच्या पोटातलं पाणीही नासवणाऱ्या या प्रदूषणकारी जीन्स वॉश कारखान्यांवर आता सरकारी यंत्रणांनी कारवाई करण्याची गरज व्यक्त होतेय.0
0
Report
Advertisement
नसरापूर गांव के ग्रामस्थ शिंदे से स्पेशल कोर्ट बनाकर फांसी जल्दी चाहते
Mumbai, Maharashtra:भोर मधील नसरापूर गावातील ग्रामस्थ आणि माजी सरपंचांनी काल रात्री राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. या वेळी मूळचे भोरचे असलेले शिवसेना आमदार दिलीप लांडेही उपस्थित होते. या घटनेतील आरोपीला विशेष न्यायालय स्थापन करून महिन्याभरात फाशी देण्यात यावी अशी मागणी या ग्रामस्थांनी आणि आमदार दिलीप लांडे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. या बाबत एकनाथ शिंदे यांनी सकारात्मक प्रतिसाद दिल्याची माहिती त्यांनी दिली.0
0
Report
रत्नागिरी के दापोली में रात के समय भीषण आग, घर और किराना दुकान जलकर राख
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. दापोलीच्या साखरोळीत भीषण आग.. घर आणि दुकान जळून खाक.. अँकर रत्नागिरीच्या दापोली तालुक्यातील साखरोळी गावात रविवारी मध्यरात्री भीषण आग लागली. स्थानिक रहिवासी जगदीश तलाठी यांचे घर आणि किराणा दुकान या आगीत पूर्णपणे जळून खाक झाले आहे.. घटनेची माहिती मिळताच दापोली पोलीस आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली.जवानांनी घरातील चार गॅस सिलेंडर वेळीच बाहेर काढल्यामुळे मोठा स्फोट टळला,तर अथक प्रयत्नांनंतर शेजारील पिठाची चक्की वाचवण्यात यश आले.. तब्बल ८ तासांच्या प्रयत्नांनंतर ही आग आटोक्यात आली असून,या दुर्घटनेत तलाठी यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे..0
0
Report
वाशीम में बीजेपी की जीत का जश्न, तीन राज्यों में विजय के बाद उत्साह
Washim, Maharashtra:देशातील पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्षाला तीन राज्यांत मोठा विजय मिळाल्याच्या पार्श्वभूमीवर वाशिममध्ये आनंदोत्सव साजरा करण्यात आला.वाशिम शहरातील पाटणी चौकात भाजप कार्यकर्त्यांनी फटाके फोडून तसेच एकमेकांना पेढे भरवून विजयजल्लोष केला.यावेळी भाजपा आमदार श्याम खोडे, पक्षाचे पदाधिकारी तसेच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
Advertisement
सोलापुर में कैंडल मार्च: नराधम के लिए फांसी की मांग जारी
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात नसरापूर घटनेच्या निषेधार्थ काढण्यात आला कॅण्डल मोर्चा - नसरापूर घटनेचा निषेध नोंदवण्यासाठी सोलापूरकर उतरले रस्त्यावर - शहरातील चौपाड परिसरात एकत्रित येत नोंदवण्यात आला निषेध - निषेध सभेनंतर विठ्ठल मंदिर परिसरातून नवी पेठ मार्गे काढण्यात आला कॅण्डल मोर्चा - उद्या सकल हिंदू समाजाच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर नोंदवण्यात येणार निषेध - सदर प्रकरणातील नराधम आरोपीला त्वरित फाशी देण्याची सोलापूरकरांची मागणी0
0
Report
पश्चिम बंगाल की ऐतिहासिक विजय पर सोलापुर भाजपा कार्यालय के बाहर शांतिपूर्ण जश्न
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नसरापूर घटनेच्या दुःखामुळे भाजपच्या वतीने कोणताही गाजावाजा न करता पश्चिम बंगालच्या विजयानिमित्त जल्लोष साजरा - पश्चिम बंगालमध्ये मिळालेल्या ऐतिहासिक यशाचा सोलापुरातील भाजपा पदाधिकाऱ्यांच्या वतीने जल्लोष - नसरापूर घटनेचे दुःख व्यक्त करत गुलालाची उधळण टाळत, ढोलीबाजाला फाटा देत अत्यंत शांततेत साजरा केला जल्लोष - नसरापूर घटनेच्या निषेधार्थ जल्लोषापूर्वी जिल्हाधिकारी आणि पोलीस आयुक्तांना देण्यात आले निवेदन - शहरातील भाजपा कार्यालयबाहेर एकत्रित येत पश्चिम बंगालच्या ऐतिहासिक विजयाचा व्यक्त केला आनंद0
0
Report
वर्धा में 723 नकली खाद के बैग जप्त, कृषि विभाग ने की बड़ी कार्रवाई
Wardha, Maharashtra:वर्ध्यात 723 बोगस खतांच्या बॅगा जप्त, कृषी विभागाची मोठी कारवाई नाचणगाव आणि इंझाळા येथे गोडाऊनवर भरारी पथकाची छापेमारी डुप्लिकेट व रेती मिश्रित खतांचा मोठा साठा उघड जप्त खतांचे सॅम्पल तपासणीसाठी अमरावतीला पाठवले अहवाल आल्यानंतर संबंधित कंपनीवर कठोर कारवाई होणार काही कृषी केंद्रातही बोगस खत आढळण्याची शक्यता शेतकरी सतीश बोरसे पाटील यांनी प्रकरण उघडकीस आणले0
0
Report
Advertisement
गडचिरोली के ग्रामीण-शहरी क्षेत्रों में कल्याण योजनाओं की जानकारी चित्ररथ से जागरूक
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील ग्रामीण व शहरी भागांतील नागरिकांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी चित्ररथाद्वारे जनजागृतीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. सहाय्यकमंत्री अॅड. आशिष जयस्वाल यांनी उपक्रमाचे उद्घाटन केले. या माध्यमातून नागरिकांनी योजनांची सविस्तर माहिती जाणून घेत त्याचा लाभ घेण्याचे आवाहन त्यांनी केले. जिल्हा प्रशासन, सामाजिक न्याय विभाग आणि जिल्हा माहिती कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक गावापर्यंत शासनाच्या योजनांची माहिती पोहोचविण्याचा उद्देश आहे. यावेळी शासनाच्या विविध योजनांवर आधारित माहितीपर घडीपत्रिकेचेही मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले. चित्ररथाच्या माध्यमातून बिरसा मुंडा कृषी क्रांती योजना, महाराजस्व अभियान, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना, मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधी योजना, आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना आदी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे. तसेच सामाजिक न्याय विभागांतर्गत डॉ. बाबासाहेब आंबेडकर कृषी स्वावलंबन योजना, रमाई घरकुल योजना, अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांसाठी निवासी शाळा, आंतरजातीय विवाह प्रोत्साहन योजना, मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती, स्वाधार योजना तसेच कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना यांचा समावेश असून या योजनांची माहिती बॅनर, ऑडिओ जिंगल्स व घडीपत्रिकेद्वारे दिली जात आहे.0
0
Report
पश्चिम बंगाल, असम और पांडिचेरी में बीजेपी की जीत के बाद देशभर में जलसा
Yeola, Maharashtra:पश्चिम बंगाल सह , असाम, पाँडिचेरी या तीन राज्यात भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश मिळवले असून या विजयाचा जल्लोष देशभरात साजरा होत आहे या पार्श्वभूमीवर नाशिकच्या येवल्यातील विंचूर चौफुली या ठिकाणी देखील भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी नाचात गाजत ढोल वाजून फटाके फोडून मोठा जल्लोष साजरा केला0
0
Report
सोलापुर घटना पर संभाजी ब्रिगेड का प्रदर्शन: प्रतिकात्मक पुतला दहन
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - नरसापूर घटनेच्या निषेधार्थ संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर, भीमा कांबळे नराधमच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन सोलापुरात नरसापूराच्या घटनेवरून संभाजी ब्रिगेड उतरली रस्त्यावर अत्याचार पीडित चिमुकलीला न्याय मिळवून देण्यासाठी नराधम भीमा कांबळेच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे केले दहन महाराष्ट्रात महिलांवर अत्याचार वाढत असल्याची खंत व्यक्त करत तात्काळ अधिवेशन बोलावण्याची केली मागणी संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनात महिलांनी देखील सहभागी होत नोंदवला निषेध0
0
Report
Advertisement
अक्षय कर्डिले की जीत से पश्चिम बंगाल में परिवर्तन की उम्मीद जगी
Ahilyanagar, Maharashtra:अक्षय कर्डिले की विजय के साथ राधाकृष्ण विखे पाटील बेहद खुश हुए। यह ऐतिहासिक जीत शिवाजी कर्डीले के संघर्ष का फल मानी गई। देवेंद्र फडणवीस ने समय पर उचित कदम उठाए। प्राजक्ता तनपुरे का विशेष आभार और उनके सहयोग ने भी भूमिका निभाई।WEST बंगाल में जंगल राज खत्म होने की बात कही गई है; वहां कानून का शासन शेष नहीं रहा था, और अंदरुनी सुरक्षा के लिए खतरा पैदा हो गया था। ममता बनर्जी के नेतृत्व वाली सरकार पर तंज के साथ कहा गया कि जनता के हितों के बजाय वे राजनीतिक महत्व को प्राथमिकता दे रहा था। पश्चिम बंगाल के विकास के लिए लोगों ने मोदी पर विश्वास जताया।0
0
Report
राहुरी उपचुनाव में अक्षय कर्डीले मतों से विजयी, संग्राम जगताप ने श्रेय दिया
Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप ऑन अक्षय कर्डीले विजय अहिल्यानगरच्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत भाजपचे उमेदवार अक्षय कर्डीले यांनी 1 लाख 12 हजार 587 एवढ्या मताधिक्याने विजय मिळवला...अक्षय कर्डीले यांचे मेव्हणे आणि राष्ट्रवादी AP चे आमदार संग्राम जगताप यांनी या विजयाचे श्रेय राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांना दिले आहे...देवेंद्र फडणवीस हे खंबीरपणे अक्षय कर्डीले यांच्या पाठीमागे उभे राहिल्याने तसेच जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी अक्षय यांचे पालकत्व स्वीकारल्याने हे यश मिळवता आल्याचे संग्राम जगताप यांनी म्हंटले आहे.0
0
Report
पश्चिम बंगाल में बीजेपी जीत: जयंत पाटल ने दी प्रशंसा, राजनीतिक दिशा क्या बदलेगी?
Sangli, Maharashtra:पश्चिम बंगाल मधल्या विजयाबद्दल जयंत पाटलांनी भाजपाचे केले अभिनंदन.. पश्चिम बंगाल मध्ये भाजपाने प्रचंड मेहनत घेऊन विजय मिळवला आहे,या विजयाबद्दल त्यांचे प्रथमदर्शनी अभिनंदन केले पाहिजे,अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी दिली आहे, विजयानंतर या गोष्टीचा विश्लेषण होईल विवेचन होईल त्यानंतर त्याच्यावर अधिक बोलता येईल,असे देखील स्पष्ट केलंय,ते सांगलीमध्ये बोलत होते。0
0
Report
Advertisement
