icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

यवतमाल MIDC में ट्रक लूट: चाकू दिखाकर चालक बंधक, 22 लाख की तूर चोरी

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या एमआयडीसी परिसरात उभा असलेला तुरीचा ट्रक शस्त्राच्या धाकावर पळविणाऱ्या टोळीला लोहारा पोलिसांनी अटक केली आहे. आरोपींनी चाकूचा धाक दाखवीत ट्रक चालकाचे हातपाय बांधून ठेवत ट्रक व त्यातील 22 लाख रुपयांची 250 क्विंटल तुर चोरी केली होती. चोरीच्या या घटनेमुळे एमआयडीसी परिसर व पोलीस वर्तुळात खळबळ उडाली होती. दरम्यान पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तांत्रिक तपास करून आरोपींचा शोध घेतला. यात कारंजा वाशिम येथील कलीमोद्दीन ख्वाजा मिराजुद्दीन, मोहम्मद अक्रम मोहम्मद सलीम बाळापुरे, सलीमोद्दीन कलीमोद्दीन, इमरान हसन अब्दुल हसन या आरोपींचा सहभाग आहे. पोलिसांनी आरोपींकडून 234 क्विंटल तूर जप्त केली आहे.
0
0
Report
Advertisement

पारनेर–श्रीगोंदा में अनावृष्टि बरसात से 18 हजार हेक्टेयर फसलें डूबीं, किसान तनाव

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून पारनेर, श्रीगोंदा, संगमनेर, अकोले, श्रीरामपूर, राहता, नगर तालुक्यासह परिसरात अवकाळी पाऊस आणि गारपिटीने शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. यात सुमारे १८ हजार ३५० हेक्टर क्षेत्र बाधित झाले असून, साधारण ३५ हजार शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे... नुकसानीमध्ये प्रामुख्याने गहू, कांदा, मका, भाजीपाला, टोमॅटो, शेवगा या पिकांच तर आंबा, डाळिंब टरबूज फळबागांच मोठं नुकसान झाले आहे. ज्या शेतकऱ्यांची पिके काढणीच्या अवस्थेत आहेत, त्यांनी तातडीने शेतमाल सुरक्षित ठिकाणी हलवावा असे आवाहन कृषी विभागाने केले आहे. तसेच भविष्यातील आर्थिक नुकसान टाळण्यासाठी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा कृषी अधीक्षक सुधाकर बोराळे यांनी केले आहे...
0
0
Report

आखाती युद्ध से डीजल महंगाई के कारण रत्नागिरि के मछुआरों पर संकट

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी... आखाती युद्धाचा मत्स्यव्यवसायाला फटका; डिझेल दरवाढीमुळे रत्नागिरीतील नौका किनाऱ्यावर! अँकर.. रत्नागिरीच्या मच्छीमारांवर आता एका मोठ्या जागतिक संकटाचे सावट आले आहे. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती भडकल्या आहेत, ज्याचा थेट परिणाम आपल्या कोकण किनाऱ्यावर दिसून येतोय. डिझेलच्या दरात मोठी वाढ झाल्यामुळे मच्छीमारीचा खर्च आवाक्याबाहेर गेला आहे. मासळी मिळण्याचे प्रमाण आधीच कमी असताना, इंधनावर होणारा अवाढव्य खर्च मच्छीमारांना परवडत नाहीये. परिणामी, रत्नागिरीतील शेकडो नौकांनी समुद्रात न जाता किनाऱ्यावरच थांबणे पसंत केले आहे. या 'ब्रेक'मुळे मासेमारी व्यवसायाचे अर्थचक्र थांबले असून, बाजारात मासळीची आवक घटल्याने मासे महागण्याची शक्यता आहे. रत्नागिरीच्या मिठी बंदरावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी रवींद्र कोकाटे यांनी.
0
0
Report

शिरूर में असमय बरसात ने Sheep-Goat मरने और प्याज बर्बाद होने मजबूर कर दिया

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यात सुरू असलेल्या अवकाळी पावसाचा फटका शेती पिकांसोबत मुक्या प्राण्यांना ही बसलाय, उघड्या आभाळाखाली रानावनात शेळ्या मेंढ्यांना घेऊन फिरणाऱ्या मेंढपाळांना गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाने मोठा फटका बसलाय, मोठ्या प्रमाणात शेळ्या मेंढ्यांचा गारपिटीनं झोडपल्याने आणि थंडीची हुडहूडी भरल्याने मृत्यू झालाय तर अवकाळीच्या संकटांने कांद्याची पात सडून खराब झाल्याने आता चाराचाही मोठा प्रश्न निर्माण झालाय याच संदर्भात मेंढपाळाशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी
0
0
Report
Advertisement

भोले-भंडारा के साकोली में बाघ का कहर: पिछले 15 दिनों में 3 लोगों पर हमला, 2 की मौत

Bhandara, Maharashtra:साकोली तालुक्यात वाघाचा धुमाकूळ सुरू असून गेल्या १५ दिवसांत तीन जणांवर हल्ला झाला आहे. यात दोन जणांचा मृत्यू झाला असून एक महिला गंभीर जखमी झाली आहे. परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे आणि शाळेतदेखील मुले जात नाहीत. वनविभागाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या गावात नेहमीच जंगली प्राण्यांचा वावर असतो. 19 मार्च रोजी बांपेवाडा येथील वसंत मेश्राम मोहफुल संकलन करण्यासाठी शेतावर गेला होता; वाघाने त्याचे हल्ले केले त्यात तो ठार झाला. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. 27 मार्चला जवळच असलेल्या उमरझरी येथील माया सोनवणे या महिलेवर वाघाने हल्ला केला. महिलेने आरडाओरड केली असता गावकरी धावून आले परंतु महिला गंभीर जखमी झाली. तिसरी घटना आमगाव येथे घडली; छाया मुंगमोडे या महिलेवर वाघाने हल्ला केला. दोन्ही महिलांवर नागपूर येथे उपचार सुरू असताना माया सोनवणे या महिलेचा मुत्यू झाला; छाया मुंगमोडे अजूनही जखमी आहेत. परिसरातील ५ किलोमीटर अंतरावर असलेल्या बांपेवाडा, उमरझरी, आमगाव तिन्ही गावात तिघांवर हल्ला झाल्याने नागरिक भीतीच्या वातावरणात राहत आहेत. मागील १५ दिवसांपासून शेतकरी शेतीवरून फिरकले नाहीत. ग्रामीण भाग असल्याने उमरझरी येथील मुले २ किलोमीटर अंतरावरील बांपेवाडा गावी सायकलने शिक्षणासाठी जावत होत्या; परंतु भीतीपोटी पालकांनी मुलांना शाळेत पाठविणे थांबवले आहे. येणाऱ्या तीन दिवसात वनविभागाने वाघाला जेरबंद केले नाही तर मोठे आंदोलन करून वनविभागाच्या चौक्यांवर गावकऱ्यांनी ताबा घेण्याचा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement

पालघर में शिवसेना इतिहास पर गणेश नाईक का तंज, शिंदे पर निशाना

Palghar, Maharashtra:पालघर जिल्ह्यातील शिवसेनेचा इतिहास जसा सांगितला जातो, तो पूर्णपणे खरा सांगितला जात नाही, असा टोला राज्याचे वनमंत्री तथा पालघरचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी लगावला. काही जण पदासाठी जातात, काही लपण्यासाठी तर काही वाचण्यासाठी जातात, असे म्हणत त्यांनी अप्रत्यक्षपणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर निशाणा साधला. पालघर येथे शिवसेनेचे माजी ठाणे जिल्हाप्रमुख व सध्याचे उबाठा उपनेते उदय बंधू पाटील यांच्या 75 व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर बहुजन विकास आघाडीचे हितेंद्र ठाकूर, शिवसेना उबाठाचे राजन विचारे, नेते विनायक राऊत , माजी मंत्री मनीषा निमकर, उबाठाच्या उपनेत्या, ज्योती ठाकरेतसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report

मिरा-भाईंदर मेट्रो स्टेशन के नाम के मुद्दे पर भारी विरोध

Mira Bhayandar, Maharashtra:मेट्रो उद्घाटनापूर्वीच मिरा-भाईंदरमध्ये वाद पेटला आहे. दहिसर–मिरा-भाईंदर मेट्रो ९ अ मार्गावरील पहिल्या स्थानकाच्या नावावरून स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सदर स्थानकाला ‘पांडुरंग वाडी’ नाव देण्यात आल्यामुळे स्थानिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. वारंवार पत्रव्यवहार करूनही प्रशासनाकडून कोणतेही उत्तर न मिळाल्याने नागरिकांनी थेट स्थानकावर जाऊन आंदोलन केले. आंदोलानादरम्यान ‘पांडुरंग वाडी’ या नावावर ‘पेनकरपाडा’चे पोस्टर लावून स्थानिकांनी आपली नाराजी उघडपणे व्यक्त केली. तसेच ६ तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना काळे झेंडे दाखवून निषेध करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. स्थानकाचे नाव ‘पेनकरपाडा’ करण्याची मागणी स्थानिकांनी पुन्हा एकदा ठामपणे मांडली आहे.
0
0
Report
Advertisement

पवनी गेट पर वाघों के पूरे परिवार के दर्शन, पर्यटन उन्नति

Bhandara, Maharashtra:वाघाच्या एका कुटुंबामुळे पवनी गेट पर्यटनासाठी हाउसफुल. भंडारा आणि नागपूर जिल्ह्याला लागून असलेला उमरेड पवनी कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेट सध्या शॅडो वाघीण, N 4 वाघ आणि त्यांच्या 2 छाव्यांमुळे वन्यजीव पर्यटकांच्या आकर्षणाचा केंद्र बनलेला आहे. एरवी उमरेड कऱ्हांडला व्याघ्र प्रकल्पातील गोटनगाव, कऱ्हांडला या गेटवरची सफारी बुकिंग नेहमी फुल असते. मात्र सध्या पवनी गेटला पर्यटक पहिली पसंती देत आहेत. या मागे कारणही तसंच आहे, मागील एक आठवड्यापासून वाघाचे अख्ख कुटुंब प्रत्येक सफारीला आपले दर्शन देत आहे. कधी एकत्र तर कधी वेगवेगळ्या ठिकाणी चारही वाघ पर्यटकांना दिसत असल्यामुळे सध्या पवनी गेटवरील बुकिंग मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पवनी उमरेड करंड्याला व्याघ्र प्रकल्पातील पवनी गेटमधील हे वाघाचं अख्ख कुटुंब पर्यटकांचा केंद्रबिंदू झालेला आहे. एरवी सफारीला गेलेल्या पर्यटकांना बरेचदा तासंतास जंगल सफारी करूनही वाघाचे दर्शन होत नाही. जंगलातील इतर प्राणी पाहून पर्यटक समाधान व्यक्त करतात मात्र ज्या वाघाला ते पाहायला येतात त्याचे मात्र दर्शन होत नाही. मात्र पवनी गेटवरमध्ये हे चित्र पालटले आहे. सफारीच्या अगदी पाच दहा मिनिटातच या वाघाच्या कुटुंबापैकी एक तरी वाघ पर्यटकांना सहज दिसतो.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top