icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भंडारा में विकसित भारत रोजगार व आजीविका सुरक्षा अभियान का शुभारम्भ, 125 दिन रोजगार

Bhandara, Maharashtra:भंडाऱ्यात ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ शुभारंभ. मजुरांना 125 दिवस रोजगाराची हमी. ग्रामीण भागातील रोजगार और शाश्वत विकासाला चालना देणाऱ्या ‘विकसित भारत रोजगार व आजीविका हमी अभियानाचा’ भंडारा जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ झाला. ग्रामपंचायत बेला येथे झालेल्या जिल्हास्तरीय कार्यक्रमात अतिरिक्त जिल्हाधिकारी राजेंद्रकुमार जाधव यांनी योजनेची प्रभावी अंमलबजावणी आणि व्यापक जनजागृतीवर भर देण्याचे आवाहन केले. या नव्या अभियानामुळे मजुरांना 100 ऐवजी 125 दिवस रोजगाराची हमी मिळणार असून, सार्वजनिक आणि वैयक्तिक स्वरूपातील 318 विकासकामांचा समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमानंतर मान्यورांच्या हस्ते वृक्षारोपण करून अभियानाची प्रत्यक्ष सुरुवात करण्यात आली.
0
0
Report

चंद्रपुर में मानव-वन्यजीव संघर्ष रोकथाम के लिए मंत्री स्तर पर ठोस कदम तय

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील वाढत्या मानव-वन्यजीव संघर्षावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्याच्या वनमंत्र्यांनी मंत्रालयात महत्वपूर्ण बैठक घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांच्या आनी अधिकारी वर्ग आणि वन्यजीव कार्यकर्त्यांची बैठकला उपस्थिती होती. वनमंत्री नाईक यांनी उपाययोजना करण्यात आलेल्या सर्व प्रस्तावांवर स्थानिक स्तरावर बैठक घेऊन आवश्यक ते सुधारित प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश दिले. वन्यजीव संवर्धन, मानव-वन्यजीव सहजीवनासाठी उपाययोजना महत्त्वाच्या असून राज्य सरकार यात सकारात्मक भूमिका घेणार असल्याचे ते म्हणाले. मानव-वन्यजीव संघर्ष तांत्रिक अहवालाची तातडीने अंमलबजावणी, जिल्ह्याला व्याघ्र जिल्ह्याचा दर्जा, घोडाझरी आणि कन्हारगाव अभयारण्यांचे हस्तांतरण, राष्ट्रीय महामार्गांवर वन्यजीवांसाठी अंडर- ओव्हर पास उभारणी अशा विविध मागण्यासंदर्भात बैठकीत चर्चा करण्यात आली.
0
0
Report

22 जुलाई तक सुनवाई, आरक्षण सीमा के कारण चुनाव टाले गए

Washim, Maharashtra:वाशिमसह राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकांबाबाबतचा निर्णय आता २२ जुलै रोजी होणाऱ्या सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीवर अवलंबून आहे.आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा अधिक झाल्याच्या कारणावरून निवडणुका स्थगित करण्यात आल्या होत्या.या प्रकरणावरील सुनावणीनंतर न्यायालयाने निवडणुकांना परवानगी दिल्यास राज्य निवडणूक आयोग पुढील प्रक्रिया सुरू करून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्याची शक्यता आहे.त्यामुळे वाशिमसह राज्यातील इच्छुक उमेदवार,राजकीय पक्ष आणि नागरिकांचे लक्ष आता २२ जुलैच्या सुनावणीकडे लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर वनविभाग घोटाले की जांच अब सीबीआई के हवाले, HC के आदेश से मामला आगे बढ़ेगा

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील बहुचर्चित वन विभागाच्या सामाजिक वनीकरणा वृक्ष घोटाळ्याचा तपास मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर बेंचने सीबीआय कडे सोपवलेला आहे या प्रकरणातील तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांच्या प्रयत्नांना मोठ यश आलेला आहे सोलापूर जिल्ह्यामध्ये सामाजिक वनीकरण विभागाच्या माध्यमातून वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या दुर्लक्ष और पाठिंबामुळे 2017 ते 2025 या काळात 109 कोटी रुपयांचा वृक्ष लागवड घोटाळा झाला होता ही बाब कागदपत्रानुसार तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी समोर आणली होती. 2022 यामध्ये पंढरपूर मधील आणि मंगळवेढा मधील वृक्ष लागवड घोटाळा प्रकरणी 8 आणि 13 असा 21 कनिष्ठ आणि वरिष्ठ अधिकाऱ्यावर गुन्हाही दाखल झाला होता. संबंधित अधिकाऱ्यांना न्यायालयाने जामीन नाकारण्यात आला होता तरीही त्यांच्यावर कोणतेही कारवाई होत नव्हती त्यामुळे यातील तक्रारदार दादासाहेब चव्हाण यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंच समोर हे प्रकरण दाखल केलं आणि यानंतर या प्रकरणाची व्याप्ती आणि पोलिसांकडून झालेल्या कारवाईचे दुर्लक्ष हे पाहता कोल्हापूर सर्किट बेंच ने या 109 कोटी रुपयांच्या घोटाळ्यांचा तपास आता सीबीआयने करावा असे निर्देश दिलेले आहेत त्यामुळे पहिल्यांदाच वनविभागाच्या घोटाळ्याला आता सीबीआय हाताळणार आहे दादा साहेब चव्हाण , तक्रारदार
0
0
Report

अमरावती नगरपालिका में पार्षद संजय गव्हाळे पर FIR, सफाई अधिकारी को गाली दी

Amravati, Maharashtra:नगरसेवक संजय गव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल; अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांना शिवीगाळ. अशी तक्रार अमरावती महानगरपालिकेचे स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांनी अमरावतीच्या राजापेठ पोलीस स्टेशनला दिली. त्या अनुषंगाने नगरसेवक संजय गव्हाळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. सुतगिरणी परिसरात महानगरपालिका आयुक्त वर्षा लड्डा, महापौर श्रीचंद तेजवाणी आणि नगरसेवक समस्याची पाहणी करण्यासाठी गेले होते. यावेळी स्वच्छतेच्या मुद्द्यावर नगरसेवक संजय गव्हाळे आक्रमक झाले आणि त्यांनी स्वच्छता अधिकारी अजय जाधव यांच्याशी वाद घालून त्यांना शिवीगाळ केली.
0
0
Report

धुळे टोल नाके पर शरद पाटील का आक्रामक भाषण वीडियो वायरल

Dhule, Maharashtra:माजी आमदार शरद पाटील यांनी धुळे चाळीसगाव दरम्यान असलेल्या टोलनाक्यावरती कर्मचाऱ्यांना अर्वच भाषेत बोलायचं व्हिडिओ समाज माध्यमांवर व्हायरल झालेला आहे. या व्हिडिओ बद्दल माजी आमदार शरद पाटील यांनी जाणीवपूर्वक हा प्रकार केला गेल्याचा सांगितलं असलं तरी व्हिडिओमध्ये ते कर्मचाऱ्यांशी अर्वाच्य भाषेमध्ये बोलताना दिसून येत आहे. मुंबईवरून धुळ्याकडे येत असताना टोलनाक्यावर हा वाद झाला आहे. माजी आमदार शरद पाटील यांची टोल न देण्यावरून टोल कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ दमदाटी केल्याचा आरोप करण्यात आला असून, कर्मचाऱ्यांना शिवीगाळ आणि दमदाटी केल्या प्रकरणी शरद पाटील वादाच्या भोवऱ्यात अडकले आहेत. धुळे ग्रामीण मतदारसंघाचे माजी आमदार शरद पाटील यांच्यावर टोल नाक्यावर टोल न भरल्याच्या वादातून कर्मचाऱ्यांना अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत दमदाटी केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. टोल नाक्यावर नियमित शुल्क भरण्याच्या मुद्द्यावरून वादाला सुरुवात झाली. यावेळी शरद पाटील यांनी टोल कर्मचाऱ्यांशी उग्र भाषेत वाद घालत शिवीगाळ केल्याचा तसेच पदाचा धाक दाखवत धमकावल्याचा आरोप करण्यात येत आहे. या घटनेचा कथित व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर राजकीय वर्तुळातही चर्चांना उधाण आले आहे. सार्वजनिक ठिकाणी लोकप्रतिनिधींनी अशा प्रकारचे वर्तन करणे योग्य आहे का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.
0
0
Report
Advertisement

राजापूर-रत्नागिरी में शिवसृष्टी ढहाने पर ठेकेदार के खिलाफ सख्त कार्रवाई के निर्देश

Ratnagiri, Maharashtra:राजापूर-रत्नागिरी.. पहिल्याच पावसात शिवसृष्टीचे बांधकाम कोसळले.. ठेकेदारावर कारवाईचे आदेश.. राजापूर शहरात पर्यटन संचालनालयामार्फत १ कोटी रुपये खर्चातून उभारण्यात येत असलेल्या 'शिवसृष्टी' प्रकल्पाचा काही भाग पहिल्याच पावसात खचून कोसळला.. बांधकाम निकृष्ट दर्जाचे असल्याचा ठपका ठेवत, राजापूर नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा ॲड. हुस्नबानू खलीफे यांनी घटनास्थळाची पाहणी केली.. या निष्काळजीपणाची चौकशी करून जबाबदार ठेकेदारावर कडक कारवाई करण्याचे निर्देश त्यांनी प्रशासनाला दिले आहेत.. तसेच,या प्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी आणि पर्यटन संचालनालयाकडे तातडीने करण्याचे आदेशही देण्यात आले आहेत..
0
0
Report

संगमेश्वर, रत्नागिरी में गव्यों के उत्पात से धान की फसल को भारी नुकसान

Ratnagiri, Maharashtra:संगमेश्वर/ रत्नागिरी कुंभारखाणी खुर्द परिसरात गव्यांचा धुमाकूळ; भातलावणीच्या हंगामात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुंभारखाणी खुर्द येथील भोजनेवाडी, गडगेवाडी आणि खडकेवाडी परिसरात सध्या गव्यांनी धुमाकूळ घातला आहे. भातलावण्याची कामे सुरू असतानाच गव्यांकडून शेतात घुसून भात पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान केले जात असल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. याबाबत वारंवार वन विभाग आणि संबंधित प्रशासनाकडे तक्रारी करूनही ठोस उपाययोजना करण्यात आलेल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. शेतकऱ्यांच्या पिकांचे संरक्षण करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात आणि नुकसानग्रस्तांना भरपाई द्यावी, अशी मागणी परिसरातील शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

ठाकरे सेना ने नागेश पाटील आष्टीकर को चुनौती देने के बाद आक्रामक रुख दिखाया

Nanded-Waghala, Maharashtra:बंडखोर खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला आव्हान दिल्यानंतर आता ठाकरे सेना देखील आक्रमक झालीये. वाय प्लस सुरक्षा बाजूला करून नागेश पाटील आष्टीकर यांनी मतदार संघात फिरावं ऑपरेशन तुडवा कसं असते त्याची प्रचिती नागेश पाटील अष्टीकर यांना येईल असे प्रति आव्हान ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांनी आष्टीकर यांना दिले. खासदार आष्टीकर यांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न अंजनखेड येथे झाला होता. त्यांनतर झालेल्या सभेत खासदार आष्टीकर यांनी ठाकरे सेनेला इशारा देत मी प्रत्येक गावात येणार आहे समोर येऊन दाखवा असा इशारा दिला होता. त्याला आता ठाकरे सेनेने उत्तर दिले आहे.
0
0
Report

नाशिक के पिंपळगाव जलाल में रेलवे गेट 72 के पास भारी पानी से परेशानी

Yeola, Maharashtra:अँकर : नाशिकच्या येवला तालुक्यातील पिंपळगाव जलाल परिसरातील रेल्वे गेट क्रमांक 72 येथील रेल्वे पुला खालील बोगद्यात पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचत असल्याने शेतकरी, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेकवेळा पाणी इतके साचते की विद्यार्थ्यांना शाळेत जाणे अशक्य होते आणि त्यांना सुट्टी घ्यावी लागते. तसेच शेतकऱ्यांनाही शेतीकामासाठी ये-जा करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या काळात तरी रेल्वे गेट क्रमांक 72 सुरू करण्यात येावं, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.
0
0
Report

लातूर में बैल जोड़ी की खरीदारी पर उठे सवाल, गोशाला में बैल क्यों रोके?

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज.... डे लाईव्ह... लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील एका शेतकऱ्यावर आईन पेरणीच्या तोंडावर मोठं संकट ओढवलं आहे... बाजारातून शेतीसाठी बैलजोडी खरेदी करून गावाकडे परत येत असताना काही गोरक्षकांनी कत्तलीसाठी नेले जात असल्याच्या संशयावरून बैल अडवले. त्यानंतर या प्रकरणी कासार शिरशी येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून बैल गोशाळेत ठेवण्यात आले आहेत. हे बैल शेतीसाठीच खरेदी केले होते, असा दावा राम बिराजदार यांनी केला आहे. इतकेच नाही, तर गोशाळेत ठेवलेले बैल दुसऱ्यालाच देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. पेरणीचा हंगाम सुरू असताना बैलजोडी नसल्याने शेतीची कामे कशी करायची, असा सवाल हा शेतकरी उपस्थित करत आहे.
0
0
Report
Advertisement

ज़ी 24 तास की रिपोर्ट के बाद लातूर किसान को बैल वापस मिले

Latur, Maharashtra:लातूर डे लाईव्ह... पेरणीच्या तोंडावर शेतकऱ्याची बैलजोडी अडवली... गुन्हा दाखल.. अखेर ZEE 24 TAAS च्या बातमीमुळे शेतकऱ्याला बैल मिळाले परत. पेरणीचा हंगाम सुरू झाला आहे... अनेक भागांत पावसाने हजेरी लावली आहे. शेतकरी नव्या आशेने शेतात उतरला आहे. मात्र, लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील कोराळी येथील शेतकरी राम बिराजदार यांच्या आयुष्यात याच काळात मोठं संकट उभं राहिलं. शेतीसाठी खरेदी केलेली बैलजोडी... कत्तलीच्या संशयावरून अडवली गेली... त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला... बैल गोशाळेत ठेवण्यात आले... आणि आपल्या कष्टाच्या साथीदारांना परत मिळवण्यासाठी त्यांना प्रशासनाचे उंबरठे झिजवावे लागले. अखेर राम बिराजदार यांना ZEE 24 TAAS च्या पाठपुराव्यानंतर त्यांची बैलजोडी परत मिळाली. मात्र, या घटनेनंतर राज्यात अशा प्रकारची अनेक प्रकरणे घडल्याचा दावा करत काही शेतकऱ्यांनी आणि शेतकरी संघटनांनी गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. अतिउत्साहातून शेतकऱ्यांचेच बैल अडवले जातात आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल केले जात असल्याच्या आरोपांची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी त्यांची मागणी आहे. तसेच, खोटी तक्रार करून किंवा चुकीची माहिती देऊन निष्पाप शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल करण्यास कारणीभूत ठरणाऱ्यांवरही कायदेशीर कारवाई व्हावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0
0
Report

सिया गोयल और चेतन चौधरी की अदालत में पेशी, पांच दिन की पुलिस हिरासत खत्म

Varsoli, Maharashtra:Headline : सिया-चेतनला न्यायालयात हजर केलं जाणार, पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत काय तपासलं? केतन अगरवाल हत्या प्रकरणात सिया गोयल आणि चेतन चौधरीची पोलीस कोठди संपणार आहे. त्यामुळं आज या دوघांना वडगाव मावळ न्यायालयात दुपारी अडीच नंतर हजर केलं जाईल. न्यायाधीश ए एम विभूतेंच्या समोर ही सुनावणी पार पडेल. सियाने तिचा युक्तिवाद वकीل विपुल दूशिंग हेचं करतील असं न्यायालयात म्हटल्यानं आता वकील आशुतोष श्रीवास्तवांनी माघार घेतल्याचं बोललं जातंय. चेतन चौधरीच्या बाजूने वकील राधिकेश उत्तरवार आणि राम शहाणे बाजू मांडतील. तर सरकारी वकील म्हणून राजश्री विरकुड कामकाज पाहतील. आज न्यायालयात हजर करण्यापूर्वी गेल्या पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत कसून तपासण्यात आला, यात पोलिसांच्या हाती लागलेले महत्वाचे धागेदोरे न्यायालयात सादर केले जाणारेत. ग्राफिक्स इन *पाच दिवसांची रिमांड कशासाठी घेण्यात आली अन कोणते धागेदोरे हाती लागले?* १) कट कुठे रचला? - पुण्याच्या लुल्लानगर येथील कॅफेत बसून कट रचला गेला, त्या ठिकाणी सियाला नेहून तपास करण्यात आला. २) हत्येचा सराव कुठे झाला? - पुण्यातील लुल्लानगर येथील टेकडीवर हत्येचा कसा सराव करण्यात आला? हे जाणून घेण्यासाठी सियाला घेऊन पोलिसांनी सरावस्थळाची पाहणी केली. ३) डिलीट डेटा रिकव्हर - फॉरेन्सिक लॅबमध्ये दोघांसह कामगार नीरज कुमारच्या पाठवलेल्या मोबाईलमधील डेटा रिकव्हर करण्यात आला. - डिजिटल पुराव्यांचा तपास केला गेला. ४) गुन्ह्यानंतर कुणाशी चर्चा? कबुली किंवा चर्चा झाली का? - गुन्ह्यानंतर सिया आणि चेतन कोणाला भेटले का? कोणाशी संवाद साधला का? त्यांच्याकडे हत्या आणि कटाबाबत काही सांगितलं ka? याची चौकशी करण्यात आली. ५) घटनाक्रमाची पुनर्रचना - सियानंतर चेतनसोबत क्राईम सिन रिक्रियेशन करण्यात आलं. - चेतनचे गेट येनेलिसिस करुन सबळ पुरावा मिळवला. ६) लोहगडावर कोणाशी संवाद साधला का? सीसीटीव्हीतील दृश्यात काय घडलं? - हत्येदिवशी लोहगडावर सिया आणि चेतनने कोणाशी संवाद साधला का? - सीसीटीव्हीत दिसणाऱ्या दृश्यात सिया आणि चेतनने नेमका कोणता संवाद साधला? याची चौकशी करण्यात आली. ७) आधीही हत्येचा प्रयत्न? - 31 मे, 4 जून आणि 14 जूनला हत्या करण्याचा प्रयत्न होता का? हे प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन चौकशी केली. ८) केतनचा पासपोर्ट - खालापूर टोल नाक्यावरील फूड मॉलवर जाऊन केतनचा पासपोर्ट शोधण्याचा प्रयत्न झाला. ९) नव्या साक्षीदारांचे जबाब - काही नवे साक्षीदार समोर आल्याचा पोलिसांचा दावा, त्यांची आणि आरोपींची समोरासमोर चौकशी. १०) लोहगडची आधी रेकी? - हत्येपूर्वी लोहगड किल्ल्याची सिया आणि चेतनने किती वेळा रेकी केली? या कटासाठी किती वेळा भेटले? याची चौकशी ११) आणखी कोण सहभागी? कटात तिसऱ्या व्यक्तीचा सहभाग? - सिया आणि चेतनच्या कटात आणखी कोणी सहभागी आहे का? याची दोघांकडे चौकशी करण्यात आली. १२) हत्येदिवशीच्या वस्तू जप्त - सियाने हत्येदिवशी वापरलेले कपडे घरी ठेवले होते, तिला मार्केटयार्ड येथील घरी नेहून कपडे जप्त केले - चेतनची हत्येदिवशीची पॅन्ट जप्त करण्यासाठी पावलं उचलली गेली. End vo : पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत रिमांडच्या बारा कारणांची उत्तरं शोधण्यात आली. यातून जे धागेदोरे हाती लागलेत, ते आज न्यायालयात सादर केले जातील. यातून काय धक्कादायक माहिती समोर येते का? याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top