icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रेख में हरने बंदर जेट्टी: 40 साल प्रतीक्षा पूरी, 250 करोड़ मंजूर, काम धीमा

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ४० वर्षांची प्रतीक्षा,२५० कोटींचा निधी.. पण हर्णे बंदर जेट्टीचे काम अद्याप रखडलेलेच!.. अँकर "रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर येत आहे.हर्णे बंदरातील मच्छीमार बांधवांच्या ४० वर्षांच्या प्रतीक्षेनंतर,जेट्टीच्या कामाला मंजुरी मिळाली खरी,मात्र आता हे काम 'कासवाच्या गतीने' सुरू असल्याचा आरोप होत आहे.. ​महयोगी सरकारने या प्रकल्पासाठी २५० कोटी रुपयांचा भरघोस निधी मंजूर केला आहे.. कामाच्या सुरुवातीला मच्छीमारांमध्ये आनंदाचे वातावरण होते,मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग पाहता आता या आनंदाची जागा तीव्र नाराजीने घेतली आहे.. ​हर्णे हे कोकणातील महत्त्वाचे मच्छीमारी केंद्र आहे.कामात होत असलेल्या या विलंबामुळे मच्छीमारांच्या व्यवसायावर आणि बोटींच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.. प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष देऊन कामाला गती द्यावी,अशी मागणी आता जोर धरू लागली आहे..
0
0
Report

मराठवाड्यात पीक विमा संकट: तांत्रिक आक्षेपांमुळे कोट्यवधींचा विमा रखडला, किसान चिंतित

Latur, Maharashtra:लातूर PKG प्लिज इनपुट नुकसानीचे फुटेज स्टोक वापरावे..... मि दिलोय.... मराठवाड्यात पीक विमा पुन्हा अडचणीत.... तांत्रिक आक्षेपांमुळे विमा परतावा रखडला.... लातूर, धाराशिवसह बीडमधील शेतकरी संकटात.... कोट्यवधींचा विमा अडकला... बळीराजाची चिंता वाढली.... AC ::- मराठवाड्यातील लातूर, धाराशिव आणि बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा पीक विमा पुन्हा एकदा अडचणीत सापडला आहे… पीक कापणी प्रयोगांवर राज्यस्तरीय तांत्रिक समितीनं आक्षेप घेतल्यामुळे कोट्यवधी रुपयांचा विमा परतावा रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे… यामुळे आधीच नैसर्गिक संकटांनी त्रस्त असलेल्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे… नेमकं काय आहे हे संपूर्ण प्रकरण पाहूयात एक स्पेशल रिपोर्ट… ग्राफिक्स.... #मराठवाड्यात पीक विमा संकट गडद... #लातूर, धाराशिव, बीड शेतकरी अडचणीत... #पीक कापणी प्रयोगांवर तांत्रिक आक्षेप... #कोट्यवधींचा विमा परतावा रखडला.. VO 01 ::- मराठवाड्यातील बळीराजा… आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे मेटाकुटीला आलाय… कधी कोरडा दुष्काळ… तर कधी अतिवृष्टीचा तडाखा… या दुहेरी संकटात शेतीचं संपूर्ण अर्थचक्र कोलमडलं आहे… या सगळ्यातून सावरण्याचा एकमेव आधार… म्हणजे पीक विमा… मोठ्या अपेक्षेनं शेतकऱ्यांनी हफ्ते भरले… आशा बांधल्या… पण आता समोर आलंय धक्कादायक वास्तव… राज्यस्तरीय तांत्रिक समितीनं पीक कापणी प्रयोगांच्या अहवालावरच गंभीर आक्षेप घेतले आहेत… आणि याच प्रयोगांच्या आधारावर ठरणारा विमा… तोच आता वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे… परिणामी… कोट्यवधी रुपयांचा परतावा रखडला… आणि पुन्हा एकदा… बळीराजाच्या आशांवर पाणी फिरल्याचं चित्र समोर येतंय… बाईट ::- शेतकरी बाईट ::- शेतकरी VO 02 ::- दरम्यान, या संपूर्ण प्रकरणावर आता राजकीय आणि संघटनात्मक स्तरावरही आवाज उठू लागला आहे… खरीप २०२५ च्या पीक विम्याचा पेच लवकरच सुटण्याची चिन्हं दिसत आहेत… धाराशिव, लातूर आणि बीड जिल्ह्यातील शेतकरी बांधवांना दिलासा मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे… पीक विम्याबाबत निर्माण झालेल्या तांत्रिक अडचणी आणि विमा कंपन्यांचे आक्षेप लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती आमदार राणाजगजितसिंह पाटील यांनी दिली आहे… सध्या या प्रक्रियेची सुनावणी अंतिम टप्प्यात असून येत्या काही दिवसांत सकारात्मक निर्णय होण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली आहे… मात्र दुसरीकडे, शेतकरी संघटनांनी या संपूर्ण प्रकारावर तीव्र संताप व्यक्त केला आहे… तांत्रिक कारणांच्या आडून शेतकऱ्यांचा हक्काचा विमा अडवला जात असल्याचा आरोप करत, तात्काळ निर्णय न झाल्यास आंदोलनाचा इशाराही संघटनांकडून देण्यात आला आहे… बाईट ::- आमदार राणाजगजितसिंह पाटील बाईट ::- सत्तार पटेल ( शेतकरी संघटना ) VO 03 END ::- एकीकडे निसर्गाचा सततचा तडाखा… आणि दुसरीकडे तांत्रिक कारणांच्या जंजाळात अडकलेला पीक विमा… या दुहेरी संकटात मराठवाड्यातील बळीराजा पूर्णपणे कोंडीत सापडला आहे… पिकांचं नुकसान झालं… उत्पादन घटलं… कर्जाचा बोजा वाढला… आणि आता[h] हक्काचा विमाही रखडल्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत… हातात पैसे नाहीत… पुढचं पीक कसं घ्यायचं, हा मोठा प्रश्न उभा आहे… अनेकांना पुन्हा सावकारांच्या दारात जावं लागण्याची भीती व्यक्त होत आहे… आता शेतकऱ्यांचे डोळे लागलेत ते फक्त एका निर्णयाकडे… सरकार आणि प्रशासन नेमका काय तोडगा काढणार… आणि बळीराजाला दिलासा कधी मिळणार… याच प्रश्नांची उत्तरं येत्या काही दिवसांत मिळणार का… हेच पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे… ......................... PKG पुर्ण ....................
0
0
Report
Advertisement

आजरा में दीवार गिरने से शिक्षिका और छात्रा की मौत, एक घायल

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे दुर्दैवी दुर्घटना घडली असून भिंत कोसळल्याने एका प्राध्यापिका आणि विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आजरा महाविद्यालयाच्या शिक्षिका ज्योती नितीन कुंभार आणि आजरा हायस्कूलची विद्यार्थिनी वैष्णवी भोसले या दोघी घराच्या बाजूने चालत जात असताना अचानक भिंत कोसळली. या भीषण अपघातात दोघींचा जागीच मृत्यू झाला. या दुर्घटनेत ललिता भोसले या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. प्राथमिक माहितीनुसार, एक जुने घर जेसीबीच्या सहाय्याने पाडण्याचे काम सुरू असताना ही दुर्घटना घडली. काम सुरू असताना सुरक्षा खबरदारी न घेतल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
0
0
Report

क्या ज्योतिष विज्ञान है? शाम मानव ने 80 लाख का इनाम देकर चैलेंज दे दिया

Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग ज्योतिषशास्त्र और भेंडवळला शाम मानव यांचे ८० लाखांचे खुलं आव्हान! अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक शाम मानव यांनी ज्योतिषशास्त्र, कुंडली आणि भेंडवळच्या घटमांडणीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत थेट ८० लाखांचे आव्हान दिले आहे. "जर ज्योतिषशास्त्र हे विज्ञान असेल, तर आम्ही दिलेल्या १० कुंडल्यांपैकी ९० टक्के भविष्यवाणी अचूक सिद्ध करून दाखवा," असे आवाहन त्यांनी केले आहे. हे आव्हान स्वीकारून जे ज्योतिष किंवा अभ्यासक आपली अचूकता सिद्ध करतील, त्यांना ८० लाखांचे बक्षीस जाहीर करण्यात आले आहे. यावेळी शाम मानव यांनी पारंपरिक प्रथांवर कडाडून टीका केली. ते म्हणाले की, हवामान अंदाज आता उपग्रह आणि विज्ञानावर आधारित आहेत, जे पडताळून पाहता येतात; मात्र भेंडवळसारख्या घटमांडणीला कोणताही शास्त्रीय आधार नाही. पूर्वीच्या काळी शेतकरी अनुभवावर अवलंबून होते, पण आजच्या आधुनिक युगात अशा जुन्या प्रथांच्या नावाखाली लोकांची फसवणूक होणे दुर्दैवी आहे. श्रद्धेच्या नावाखाली चालणारी ही लूट थांबवण्यासाठी समाजाने विज्ञानाची कास धरावी, असे आवाहन करत त्यांनी या वक्तव्याद्वारे धार्मिक आणि ज्योतिषीय वर्तुळात मोठी खळबळ उडवून दिली आहे. आता या आव्हानाला ज्योतिष संघटना कशा प्रकारे उत्तर देतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

भाजपा कल्याण जिला कार्यकारिणी 70-80 सदस्यांची जम्बो नियुक्ति

Kalyan, Maharashtra:भाजप कल्याण जिला कार्यकारिणी जाहीर. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष तसेच डोंबिवलीचे रविंद्र चव्हाण यांच्या नेतृत्व खाली पक्ष वाढ सुरु आहे. कल्याण ग्रामीण येथे आज भाजप कल्याण जिल्हाध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली 70 ते 80 जणांची जम्बो कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. यामध्ये सर्व स्तरातील कार्यकर्ते प्रत्येक सेल वरील प्रमुख यांना विचारत घेऊन पक्षाची व्याप्ती वाढावी आगामी निवडणुका, समाजकार्य, मेळावे तळागाळातील लोकांना न्याय मिळण्यासाठी सामान्य कार्यकर्ता पोहचत असतो त्या धर्तीवर कार्यकारिणीची निवड करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापुर में पानी आपूर्ति पर बजट और विश्व बैंक के सुझावों पर चर्चा शुरू

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : या देशातून काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली - मंत्री जयकुमार गोरे - सोलापूर शहराला रोज पाणी पुरवठा करण्यासाठी जे करायचे आहे ते करणार - एक प्रश्न मार्गी लागलाय दुसऱ्यावर काम सुरूय - दररोज पाणी पुरवठा करण्यासाठी 1550 किमी पाईप लाईनची आवश्यकता आहे. - पहिल्या टप्प्यात 868 कोटींची तरतूद केली होती मात्र वर्ल्ड बँकेने 1400 कोटीचे बजेट असावे असावे असे सांगितले - अलीकडं माहिती न घेता काही गोष्टी करण्याची सवय लागली आहे. - दोनी भाजप आमदार देशमुखांना टोला - कोणतीही अतिरिक्त कर वाढ होणार नाही. - त्यामुळे काही लोकं वीनाकारण माध्यमातून चर्चा करत आहेत. - वर्ल्ड बँकेचे 4-5 सजेशन आहेत ते करावे किंवा नाही हा महापालिकेचा अधिकार आहे. - आजच्या सभेत हा विषय मान्यतेसाठी येणार आहे. - पालकमंत्री जयकुमार गोरे यांना भाजपचे आमदार विजयकुमार देशमुख आणि सुभाष देशमुख यांना नाव न घेता टोला - हा प्रस्ताव आधी वाचून समजून घ्यायला हवा होती. - मात्र त्यांनी तक्रार केल्यानंतर या प्रस्तावाचे वाचन झाले असावे. - शहराच्या प्रतिनिधीनी जबाबदारीने भूमिका मांडणे अपेक्षित आहे. - हा प्रस्ताव इंग्रजीत होता पण त्यांनी योग्य ठिकाणाहून माहिती घ्यायला हवी होती - महापालिका आयुक्त, महापौर यांच्याशी चर्चा करायला हवी होती. - ऑन महेश शिंदे : महेश शिंदे यांची भूमिका काय असावी हा त्यांचा अधिकार आहे. - मात्र ते जे भूमिका घेतील ती आम्हाला मान्य आहे. - ऑन प्रणिती शिंदे : एका महिला खासदाराने महिला आरक्षणाला विरोध करणे म्हणजे त्यांच्या बौद्धिक ऋ्हासाचं उदाहरण आहे. - महिलाना संधी मिळावी अशी भूमिका पंतप्रधान मोदींनी घेतली. - साधन सुचिताच्या गप्पा मारणारा काँग्रेस पक्ष, महिला विधयक का होत नाही म्हणून गप्पा मारणारे आज विधेयक नामंजूर झाले म्हणून जल्लोष करणारा काँग्रेस पक्ष आहे. - या देशातून काँग्रेसच्या ऱ्हासाला सुरुवात झाली - ऑन सदावर्ते विधान : गुणरत्न सदावर्ते काय म्हणाले हे मला माहिती नाही. - मात्र सर्वांनी एकमेकांचा सन्मान राखला पाहिजे. - ऑन क, ड कर्मचारी स्थगिती : केंद्र सरकारकडून आलेल्या सूचना आहेत. - जनगणनेत कामाशी संबंधित आहेत त्यांच्या बदल्या स्थगित केल्या आहेत. - मात्र त्यात काही बदल विचाराधीन आहेत. - ऑन महावितरण कारभार - शेतकऱ्यांना वीज मोफत देतोय आणि ती दिवसा मिळावी असा प्रयत्न आहे. - आत्ता सोलरचे काही काम सुरु आहेत. - काही कामे होताना थोडा त्रास होईल मात्र संपूर्ण ग्रामीण महाराष्ट्र सोलरवर जाणार आहे. - हे काम सुरु असल्याने वीजपुरवठा खंडित होत आहे. - थोडे दिवस वीज वितरणात अडथळा असणार आहे. - BYTE : जयकुमार गोरे (पालकमंत्री)
0
0
Report

तनपुरे बोले नहीं BJP में प्रवेश; राहुरी पोटनिवडणुकी में राजनीति तेज

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगरच्या राहुरी पोटनिवडणणुकीच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभा होत आहे या सभेत राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे भाजपमध्ये प्रवेश करतील अशी जोरदार चर्चा सुरू आहे मात्र तनपुरे यांनी भाजप प्रवेशाच्या चर्चेला पूर्णविराम दिला आहे मी निवडणुकीतून माघार घेतली असली तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षातच आहे भाजपमध्ये प्रवेश करणार नाही त्यांनी स्पष्ट केला असंही म्हटलं आहे राहुरी विधानसभा मतदारसंघातील भाजपचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनाने रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली आहे या निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल न करण्याचा निर्णय राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी घेतला तनपुरे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला नसला तरी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाकडून गोविंद मोकाटे यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवण्यात आलं आहे निवडणुकीतून बाहेर पडलेल्या मात्र पक्षात असूनही प्रचारात सक्रिय नसलेले तनपुरे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची राहुरी येथे प्रचार सभा आहे या सभेत भाजप मध्ये प्रवेश करशील अशी चर्चा असतानाच तनपुरे यांनी आपण प्रवेश करणार नसल्याचे स्पष्ट केला आहे राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीच्या उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्राजक्त तनपुरे यांची भेट घेऊन उमेदवारी अर्ज दाखल न करण्याची विनंती केली होती ही विनंती आपण मतदार संघातील विकास कामे गतीने व्हावीत यासाठी मान्य केली शिवाय आपण निवडून आल्यानंतर विरोधी बाकावर बसू महायुतीच्या सत्तेला कुठलाही परिणाम होणार नाही शिवाय मतदार संघात शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनामुळे निर्माण झालेलं भावनिक वातावरण देखील आहे त्यामुळे निवडणुकीतून माघार घेतल्याचं तनपुरे यांनी सांगितला आहे आपण माघार घेतल्यामुळे चर्चेला उधाण आलं असलं तरी आपण राष्ट्रवादी शरद चंद्र पवार पक्षातच राहणार असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे
0
0
Report
Advertisement

डॉ. नंदकुमार राऊत अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलन के अध्यक्ष बने

Dharashiv, Maharashtra:धाराशिव धाराशिव मध्ये होणाऱ्या ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत यांची निवड करण्यात आली आहे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ.शरद गोरे यांनी त्यांना त्यांच्या निवडीचे पत्र दिले मानदेशी ग्रामीण शब्दशैलीतील त्यांचे दौशाड हे आत्मकथन प्रचंड लोकप्रिय झाले आहे,कंजाळ,बिलिंगा,काडकुसुंबा,हराटी आदी ग्रंथांचे विपुल लेखन श्री राऊत यांनी केले आहे,आजवर अनेक पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आले आहे, २९ व ३० मे २०२६ रोजी लोकनेते अजितदादा पवार साहित्य नगरी धाराशिव मध्ये संपन्न होणार संमेलन ९०० साहित्यिक लावणार संमेलनास उपस्थिती अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेने केले संमेलनाचे आयोजन
0
0
Report

Aadivaasi Navsupurti ki Anokhi Parampara: Jalte Khathe Ke Saath Biroba Mandir Pradakshina

Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यात कोठेवाठीमध्ये आदिवासी बांधव नवसपूर्तीची एक अनोखी परंपरा शेकडो वर्षापासून जपत आहेत ... अर्धवट कापलेल्या माठात जंगली वनस्पती टाकल्या जातात आणि लाकडांवर तेलाची संततधार सोडून पेटवलेले हे कठ्ठे डोक्यावर घेऊन बिरोबा मंदिराला प्रदक्षिणा मारतात... आपण देवाला काही मागणं मागितल आणी ते पुर्ण झालं तर त्याची नवसपुर्ती केली जाते... कुणी नारळ वाहतात, कुणी दानधर्म करतो नवसपुर्तीचे अनेक प्रकार आहेत मात्र आदिवासी बांधवांची ही प्रथा मात्र अनोखी आणी थरारक आहे.. अर्धवट कापलेल्या माठात जंगली वनस्पती टाकल्या जातात आणि लाकडांवर तेलाची संततधार सोडून भिजवलेल्या या माठाला कठ्ठे असे म्हणतात... देवाच्या काठिची मिरवणूक मंदिराजवळ आली कि हे कट्टे पेटवले जातात... आणी धगधगणारे हे कठ्ठे मग गावातील एक एक जण उचलतो आणी डोक्यावर घेऊन देवाच्या मंदिराला प्रदक्षिणा सुरू होते.. अक्षय तृतीयेनंतर येणाऱ्या पहिल्या रवीवारी बिरोबा महाराजांची यात्रा भरते यावेळी रविवारीच अक्षय तृतीया असल्याने काल रात्री हि अनोखी परंपरा साजरी केली गेलीय.. वर्षानुवर्षे हि परंपरा हे लोक जपत आले आहेत या मागे त्यांची अपार श्रद्धा आहे.... धगधगणा-या कठ्ठ्यातील ओघळणारे गरम तेलानेही आजवर कुणालाही इजा झाली नाही .. माठातून खाली पडणारे विस्तव तुडवत सगळे जण चालत असतात ... देवळातील घंटानाद सुरू असताना हुई.. हुई... करत पेटलेले कठ्ठे डोक्यावर घेऊन जाणारांच्या आवाजाने परीसर अगदी दुमदुमून जातो....
0
0
Report
Advertisement

सोलापुर कृषि उपज मंडी में किसानों का हंगामा, प्याज की नीलामी बंद

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापुरात कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकऱ्यांचा गोंधळ, कांद्याचा लिलाव पाडला बंद - संतप्त शेतकऱ्यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजारातील कांद्याचा लिलाव बंद पाडला - कांद्याला भाव मिळत नाही, कांदा चोरी, सुविधांचा अभाव यामुळे शेतकरी आक्रमक - बाजार समितीतील कांद्याचे सर्व लिलाव पूर्णपणे बंद पाडण्यात आले - बाजार समिती प्रशासन तसेच आडत व्यापारी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात रक्कम आकारतात - मात्र त्या प्रमाणात शेतकऱ्यांना सुविधा दिल्या जात नाहीत त्यामुळे शेतकरी संतप्त - रोज सकाळी 10 वाजता सुरु होणारे लिलाल अद्यापही ठप्प आहेत
0
0
Report

अकोला में बालू माफियाओं का बढ़ता आतंक; ट्रैक्टर चालक पर पुलिस ने केस दर्ज किया

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात वाळू माफियांचा वाढता सुळसुळाट व्हिडिओ व्हायरल अकोला जिल्ह्यातील विविध नदीपात्रांमध्ये अवैधरित्या वाळू उपसा सुरू असल्याचे वारंवार समोर येत आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी वाळू माफिया अधिक सक्रिय होत असल्याचे दिसून येते. काही दिवसांपूर्वी म्हैसंग परिसरातील पूर्णा नदीच्या पात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक केली जात असताना एका पोलिस कर्मचाऱ्याने ट्रॅक्टर थांबवण्याचा प्रयत्न केला. मात्र, ट्रॅक्टर चालकाने पोलिसांच्या इशाऱ्याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत भरधाव ट्रॅक्टर पुढे नेला. एवढेच नाही तर संबंधित चालकाने पोलिस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी दिल्याचेही या व्हिडिओत स्पष्ट दिसत आहे. ट्रॅक्टरचा वेग आणि चालकाची आक्रमकता पाहता पोलिस कर्मचाऱ्याला माघार घ्यावी लागली. दरम्यान, हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर पोलिस प्रशासनाने तातडीने दखल घेत संबंधित ट्रॅक्टर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे जिल्ह्यात अवैध वाळू उत्खननाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top