445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
नाशिक मल्टीनॅशनल मामले में SIT ने धनशोधन का खुलासा, दानिश का खाता सील
Nashik, Maharashtra:* नाशिक मल्टिनॅशनल कंपनी अत्याचार प्रकरणात नवीन अपडेट समोर * दानिश शेखकडून पीडितेकडून २ लाखांहून अधिक रक्कम उकळल्याचा SIT तपासात खुलासा * दानिशचे बँक अकाउंट SIT कडून सील; आर्थिक व्यवहारांची चौकशी सुरू * न्यायालयात दाखल दोषारोपपत्रात फसवणुकीचे पुरावे जोडले * दबावासोबतच पैशांचीही उकळपट्टी केल्याचा आरोप * मतीन पटेल व निदा खान कनेक्शनची चौकशी लवकरच पुरवणी दोषारोपपत्राची शक्यता...0
0
Report
नाशिक पुलिस ने 2,400 किलो गांजा नष्ट कर 4.8 करोड़ मूल्य रोक दिया
Nashik, Maharashtra:* नाशिक शहर पोलिसांची अमली पदार्थांविरोधात कारवाई * तब्बल ४ कोटी ८० लाखांचा २,४०० किलो गांजा केला नष्ट * भद्रकाली पोलीस ठाण्यातील २०१० च्या NDPS गुन्ह्यात करण्यात आला होता गांजा जप्त * न्यायालयाच्या आदेशानुसार पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे प्रक्रिया * महाराष्ट्र एनव्हीरो पॉवर लिमिटेडमध्ये पर्यावरणीय नियम पाळून गांजा नष्ट * उच्चस्तरीय समिती व कडक सुरक्षा व्यवस्थेत कारवाई पूर्ण0
0
Report
साकोली में दोस्त की पार्टी के कुछ क्षणों में खूनखराबा; 12 घंटे में खुलासा, 4 आरोपी गिरफ्तार
Bhandara, Maharashtra:साकोली शहरातील गडकुंबली रोड परिसरातील तलाव काठावर पहाटे रक्ताच्या थारोळ्यात पडलेला युवकाचा मृतदेह आढळल्यानंतर संपूर्ण साकोली हादरली होती.छाती, मान आणि डोक्यावर धारदार शस्त्राचे खोल वार,शेजारी उभी मोटरसायकल,बाजूला पडलेली बॅग आणि शहराच्या मध्यभागी घडलेली ही थरारक हत्या ! मात्र पोलिसांनी अवघ्या १२ तासांत तपासाची चक्रे वेगाने फिरवत उलगडा केला. ज्यांच्यासोबत मृताने शेवटची रात्र घालवली तेच 'जिवलग मित्र' मारेकरी असल्याचे समोर आले.नशेच्या अवस्थेत झालेली अश्लील शिवीगाळ,जुनी खुन्नस आणि क्षणिक संतापातून मित्रांनीच निखिल राजकुमार कांबळे (३०, मुरपार-लेंडेझरी, ता.सड़क अर्जुनी याचा निघृण खून केल्याची धक्कादायक कबुली आरोपींनी पोलिसांसमोर दिली आहे.अटक झालेल्यांमध्ये गणेश मनोहर वलथरे (२०) सागर पारधी (१९) ओंकार मेश्राम (२१, सर्व पंचशील वॉर्ड, साकोली) तसेच मानेगाव रोड (ता. लाखनी) येथील कमलेश चुन्नीलाल कुकवास (२३) याच्यासह एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.या प्रकरणी साकोली पोलिस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.न्यायालयाने आरोपींना २७ मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली असून विधीसंघर्षग्रस्त बालकाला बालसुधारगृहात पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली.0
0
Report
Advertisement
नाशिक के आडगांव में पानी से भरी बाल्टी में गिरकर एक वर्षीय बच्ची की मौत
Nashik, Maharashtra:नाशिक - - पाण्याच्या बादलीत पडून एक वर्षीय बालिकेचा मृत्यू - नाशिकच्या आडगाव परिसरात घडली घटना - घरात खेळत असताना बाथरुममधील पाण्याने भरलेल्या बादलीत पडून एका वर्षाच्या चिमुकलीचा झाला दुर्दैवी - हिंदवी दत्तात्रय भोसले असे एक वर्षाच्या मृत बालिकेचे नाव - उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून केले मृत घोषित - याप्रकरणी आडगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद0
0
Report
चंद्रपुर के सिंधेही जंगल में टी-2 बाघिनी ने चार महिलाओं पर हमला कर जेरबंद
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील सिंदेवाही तालुक्यातल्या जंगलात तेंदूपाने तोडणाऱ्या चार महिलांवर हल्ला करून त्यांना ठार मारणारी टी-2 वाघीण वनविभागाने केली जेरबंद. पवनपार जंगल कक्ष क्रमांक 282 मध्ये ही टी-2 नावाची वाघीण वनविभागाने जेरबंद केली. चार महिलांना एकाच वेळी ठार मारण्याच्या घटनेनंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेता वनविभागाने आपली संपूर्ण शक्ती या भागात ट्रॅप कॅमेरे - पायी गस्त, सीसीटीव्ही कॅमेरे लावत पणाला लावली होती. वनविभागाचे बेशुद्ध करणारे पथक देखील या भागात सतत गस्त घालत होते. याच दरम्यान त्यांना टी-2 वाघिणीचा सुगावा लागला. डार्ट मारून वाघिणीला जेरबंद करण्यात आले. मात्र या वाघिणी सोबत असलेल्या बछड्याबाबत वनविभागाने कुठलीही स्पष्टता केलेली नाही. हल्लेखोर वाघीण जेरबंद झाल्यानंतर या भागातील नागरिकांनी सुटकेचा श्वास घेतला आहे.0
0
Report
सांगली में पुलिसकर्मी के घर चोरी, 21 तोला सोना समेत लाखों की चोरी
Sangli, Maharashtra:सांगलीमध्ये पोलिसाच्या घरावर चोरट्यांचा डल्ला,पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावरवरील तीन फ्लॅट फोडले, 21 तोळे सोन्यासह लाखोंची रोकड लंपास.. अँकर - सांगली मध्ये पोलीसाच्या घरीच चोरी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.विशेष म्हणजे पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये चोरट्यांनी डल्ला मारला आहे.पोलीसाच्या घरासह तीन ठिकाणी चोरी करत २१ तोळे सोन्याच्या दागिन्यांसह लाखों रुपयांची रोकड लंपास केली आहे.संजयनगर पोलीस ठाण्याच्या शेजारी असणाऱ्या अपार्टमेंट मध्ये भरदिवसा हा चोरट्यांनी ही चोरी केली आहे,यामध्ये संजयनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असणाऱ्या पोलीस शिपाई कपिल साळुंखे यांच्या बंद घरात चोरी झाली,साळुंखे हे कुटुंबासह गावी गेले असता चोरट्यांनी हा डाव साधला आहे.त्यानंतर दोघा चोरट्यांनी शेजारी असणारे एक फ्लॅट आणि व आणखी एका अपार्टमेंट मध्ये चोरी करत सोन्याच्या दागिन्यांसह रोकड चोरी करत पोबारा केला आहे,दोघा चोरट्यांचे सीसीटीव्ही पोलिसांच्या हाती लागले असून पोलोस चोरट्यांचा शोध घेत आहेत,मात्र पोलीस ठाण्याच्या शेजारीच आणि पोलिसांच्या घरात चोरीच्या घटनेने खळबळ उडाली आहे.0
0
Report
Advertisement
जुन्नर के नेनेघाट में धुंध की चादर, मॉनसून के पहले सैलानी जुटे
Barav, Maharashtra: пावसाळा सुरू होण्यास अजून काही दिवसांचा अवधी असला, तरी सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर आतापासूनच पावसाची चाहूल लागली आहे. जुन्नरमधील ऐतिहासिक नानेघाटात धुक्याची पांढरी चादर पसरली असून, निसर्गाचं एक विहंगम रूप पाहायला मिळत आहे. याच धुक्याचा आणि निसर्गाचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांनी आतापासूनच नानेघाटात गर्दी करायला सुरुवात केलीय सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या ऐतिहासिक नानेघाटात पावसाळ्याची चाहूल लागली आहे. जून महिना उजाडण्यापूर्वीच या भागात धुक्याचं साम्राज्य पाहायला मिळत असून, संपूर्ण घाट परिसर पांढऱ्याशुभ्र धुक्याच्या चादरीत वेढला गेला है. कडक उन्हाच्या चटक्यानंतर आता निसर्गाने कात टाकली असून, हवेत गारवा निर्माण झालाय0
0
Report
आळंदी में इंद्रायणी नदी स्वच्छता अभियान: भक्तों ने हजारों टन कचरा हटाया
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदी में इंद्रायणी नदी स्वच्छता मोहिमेला उत्साहात सुरुवात झाली. रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या प्रेरणेतून आयोजित या अभियानात राज्यभरातून ४००० हून अधिक भक्त, संग्राम सैनिक आणि सेवाभावी कार्यकर्ते सहभागी झाले. या उपक्रमात नदी परिसरातील हजारो टन कचरा हटवण्यात आला. पर्यावरण संरक्षण, नदी संवर्धन आणि स्वच्छतेबाबत जनजागृती करण्याचा संदेश या अभियानातून देण्यात आला.0
0
Report
सोलापूर की नई जिंदगी में कोयता हमला: पुलिस ने आरोपी को धिंड दिखाकर दबोचा
Solapur, Maharashtra:सोलापूर शहरातील नई जिंदगी भागामध्ये कोयत्याने जीवघेणा हल्ला करून दहशत निर्माण करणाऱ्या तरुणाची पोलिसांनी काढली धिंड. जैद शामू शेख असे दहशत पसरवणाऱ्या तरुणाचे नाव. आरोपीने ज्या भागात दहशत वाजवण्याचा प्रयत्न केला त्याच भागातून हे धिंड काढण्यात आल्याने पोलिसांचे कौतुक झाले. सोशल माध्यमांवर रील बनवत पोलिसांनाही चॅलेंज देण्याचा केला होता प्रयत्न. पोलिसांनी खाकी हिसका दाखवताच आरोपीने माफी मागत कोणीही अशा पद्धतीचे कृत्य न करण्याचे केले आवाहन. शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्यात सदर प्रकरणी गुन्हा दाखल असून पुढील तपास सुरु आहे.0
0
Report
Advertisement
डिजिटल जनगणना में बाधा डालने पर महापालिका ने कर्मचारियों के खिलाफ कार्रवाई की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशाच्या १६ व्या डिजिटल जनगणनेच्या कामात टाळाटाळ करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर महानगरपालिका प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. जनगणनेसाठी नियुक्त केलेले जे प्रगणक अद्यापही कामावर रुजू झालेले नाहीत, त्यांनी सोमवारी सकाळी ११ वाजेपर्यंत कर्तव्यावर हजर व्हावे; अन्यथा त्यांच्यावर थेट पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करावेत, असे सक्त निर्देश मनपा आयुक्त अमोल येडगे यांनी दिले आहेत. तसेच, संबंधित कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिकेत राष्ट्रीय कर्तव्यात कसूर केल्याची थेट नोंद घेतली जाणार आहे.0
0
Report
मराठवाड़ा में पानी की भारी कमी, 142 गाँवों के लिए 257 टैंकर जुटाने से जल संकट गहरा रहा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उन्हांची तीव्रता वाढल्यानंतर मराठवाड्यात पाणीटंचाईच्या झळा तीव्र झाल्या आहेत. सध्या विभागातील केवळ बीड जिल्हा टँकरमुक्त असून, उर्वरित सातही जिल्ह्यांतील १४२ गावे आणि ७८ वाड्यांची तहान भागवण्यासाठी प्रशासनाला तब्बल २५७ टँकर सुरू करावे लागले आहेत. यात सर्वाधिक १७५ टँकर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सुरू आहेत. गेल्या उन्हाळ्यात मार्चचा पंधरवडा संपण्यापूर्वीच विभागातील अनेक भागांतून टँकरची मागणी झाली होती. यंदा मात्र एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ४ गावांतून पहिली मागणी नोंदवली गेली. त्यानंतर उन्हाचा चटका वाढेल तशी टँकरच्या मागणीत वेगाने वाढ झाली. मराठवाड्यात सध्या केवळ बीड जिल्हा टँकरमुक्त आहे.0
0
Report
वाशीम में आरटीई सीटों के प्रवेश: पहले लॉट में 944 चयन, 183 सीटें अभी खाली
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर: वाशीम जिल्ह्यात आरटीई अंतर्गत शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी पहिल्या प्रतीक्षा यादीतील १४१ विद्यार्थ्यांपैकी केवळ ४८ विद्यार्थ्यांचे प्रवेश २३ मेपर्यंत निश्चित झाले आहेत. जिल्ह्यात ९५ शाळांमध्ये १००७ जागा राखीव असून, एकूण २३८१ अर्ज प्राप्त झाले होते. पहिल्या लॉटरीत ९४४ विद्यार्थ्यांची निवड झाली होती. आतापर्यंत एकूण ८२४ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून, अजूनही १८३ जागा रिक्त आहेत.0
0
Report
Advertisement
आरापूर एमआईडीसी के लिए जमीन मापन तेज, 85% हिस्से की संयुक्त मोजणी पूरी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये प्रस्तावित आरापूर एमआयडीसीच्या कामाला खऱ्या अर्थाने गती मिळाली असली तरी १० दिवसांचे जमीन मोजणीचे टार्गेट असलेल्या आरापाूर, गवळीशिवरा आणि सुलतानाबाद येथील ८५ टक्केच जमिनीची संयुक्त मोजणी पूर्ण झाली आहे. या तीन गावांतून ७६२ हेक्टर जमिनीचे संपादन करण्यात येणार आहे. दहा महिन्यांपूर्वी अधिसूचना काढण्यात आल्यानंतर अखेर ६ मे रोजी मोजणीला सुरुवात झाली. प्रारंभीपासूनच सुलतानाबाद येथील शेतकऱ्यांनी जमीन मोजणीसाठी विरोध केला होता. त्यामुळे प्रशासनाने येथील मोजणी पथकाकडून अन्य गावांतील मोजणी केली. शेंद्रा, वाळूज आणि विडकीन येथील जागा आता संपल्याने मोठ्या उद्योगांची पावले आरापूरकडे वळणार आहेत. त्यामुळे या मोजणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. आम्हाला दर किती मिळणार ही शेतकऱ्यांची प्रारंभीपासून मागणी होती. शासनाच्या दर निश्चित करणाऱ्या समितीने ठरवलेला दर शेतकऱ्यांना मान्य नसेल तर वाटाघाटीअंती दरनिश्चितीचा प्रस्ताव हा शासनाच्या हायपॉवर कमिटीकडे पाठवण्यात येणार आहे.0
0
Report
इंधन अफवाहों के बावजूद आपूर्ति बढ़ी, जिल्हाधिकाऱ्योंने पंपों पर कार्रवाई शुरू की
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून इंधन टंचाईच्या अफवांमुळे पेट्रोल पंपांवर नागरिकांची झुंबड उडत आहे. प्रत्यक्षात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही. उलट नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी नियमित मागणीपेक्षा २० टक्के अधिक इंधन पुरवठा करण्यात आले आहे. मात्र, नागरिकांच्या पॅनिक खरेदीमुळे इंधनाचा कृत्रिम तुटवडा निर्माण झाला आहे. यावर नियंत्रणासाठी जिल्हाधिकारी यांनी कठोर पावले उचलेली आहेत. अफवा पसरवणाऱ्यांवर, बेकायदा साठेबाजी करणाऱ्यांवर, स्टॉक असतानाही पेट्रोल-डिझेल न देणाऱ्या पंपचालकांवर थेट गुन्हे दाखल करून पंप सील करण्याचा इशारा दिला आहे. जिल्ह्यात सध्या १६ लाख ३७ हजार लिटर पेट्रोल आणि ११ लाख २३ हजार लिटर डिझेल उपलब्ध आहे. असे असतानाही शहरातील ३० पेक्षा अधिक आणि जिल्ह्यातील १०० हून अधिक पंपांवर नो स्टॉकचे बोर्ड लागल्याचे समोर आले आहे. तसेच काही पंपांवर कॅनमध्ये डिझेल देण्यास नकार दिला जात आहे. त्यामुळे ग्राहकांशी वाद होत आहेत. या परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांनी तालुकानिहाय भरारी पथके नियुक्त केली आहेत. ही पथके अचानक भेटी देऊन साठा आणि वितरणाची तपासणी करत आहेत.0
0
Report
शिवाजीनगर भूमिगत मार्ग पानी निकासी के लिए चेन्नई से मडपंप आ गया; काम तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवाजीनगर भुयारी मार्गात पावसाचे पाणी अनेकदा तुंबले. त्यामुळे वाहतूक कोंडी झाली. दरम्यान, यंदा पावसाळ्याला अद्याप अवकाश असतानाच प्रशासनाने या समस्येवर कायमस्वरूüpी तोडगा काढण्यासाठी वेगाने काम सुरू केले आहे. भुयारी मार्गात साचणारे पाणी काढण्यासाठी रेल्वे विभागाने चेन्नईहून विशेष 'मडपंप' मागवला आहे. हा पंप शहरात दाखल होण्यासाठी आणखी चार दिवस लागणार आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता याबाबत सोमवारी आढावा बैठक घेणार आहेत. भुयारी मार्गातील पाण्याचा निचरा करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने एजन्सीला काम दिले आहे. येथे १० एचपीचे दोन स्वयंचलित मडपंप बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली.0
0
Report
Advertisement
