445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वाशिम पुलिस ने चार मोटरसाइकिल चोरी के आरोपी को गिरफ्तार किया
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:वाशिम पोलिसांच्या धडक कारवाईमुळे वाहनचोरांवर मोठा आळा बसताना दिसत आहे.स्थानिक गुन्हे शाखेने मोटारसायकल चोरीच्या गुन्ह्याचा छडा लावत एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून तब्बل चार चोरीच्या मोटारसायकली जप्त करण्यात आल्या आहेत.या कारवाईमुळे जिल्ह्यातील आणखी वाहन चोरीच्या गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. वाशिम शहरातील मोटारसायकल चोरीप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेने धुमका येथील उमेश किशन राठोड याला ताब्यात घेतले.चौकशी दरम्यान त्याने वाशिम शहर व मालेगाव परिसरातून मोटारसायकल चोरी केल्याची कबुली दिली.पोलिसांनी त्याच्याकडून 1लाख 95 हजार रुपये किमतीच्या चार मोटारसायकली जप्त केल्या असून अधिक तपास सुरू आहे.0
0
Report
कृष्णा नदी में खेती के लिए पानी उपसा बंदी पर किसानों का मोर्चा
Sangli, Maharashtra:कृष्णा नदीतून शेतीसाठी पाणी उपसा करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. जलसंपदा विभागाच्या निर्णयाविरोधात पलूस तालुक्यातल्या भिलवडी येथे शेतकऱ्यांनी मोर्चा काढत निषेध नोंदवला. त्यामुळे कृष्णा नदीकाठाच्या शेती संकटात सापडली आहे; पाण्याविना पिक वाळून जाण्याची परिस्थिती निर्माण झाली असल्याने तातडीने कृष्णा नदीतील शेतीसाठी पाणी उपसा बंदी आदेश मागे घेण्याची मागणी केली गेली.0
0
Report
बागलाण में गिरणा डावा कालवे के विस्तारीकरण के विरोध में किसान अर्धनग्न प्रदर्शन
Nashik, Maharashtra:– गिरणा डावा कालवा विस्तारीकरणा विरोधात बागलाणच्याय लखमापूरमध्ये विरोध... - शेतकऱ्यांचे अर्धनग्न आंदोलन; जेसीबीचे काम बंद गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामाविरोधात बागलाण तालुक्यातील लखमापूर येथील शेतकरी आक्रमक झाले आहेत. गावातील शेतकऱ्यांनी आज सुरू असलेले जेसीबीचे काम बंद पाडत अर्धनग्न आंदोलन करून शासन आणि प्रशासनाविरोधात तीव्र निषेध व्यक्त केला. गिरणा डावा कालवा विस्तारीकरण करण्यापूर्वी नारपार योजना पूर्ण करून त्याचे पाणी गिरणा नदीपात्रात सोडण्यात यावे. त्यानंतरच कालवा विस्तारीकरणाचा निर्णय घ्यावा. उपलब्ध जलस्रोतांचे योग्य नियोजन करून शेतकऱ्यांच्या हिताचा विचार करावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. *बाईट: शेतकरी*0
0
Report
Advertisement
अकोला के अकोट में आंधी-बारिश से केला किसान भारी नुकसान, मदद की मांग
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्याच्या अकोट तालुक्यात झालेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने केळी उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान केले आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक संकटामुळे काढणीसाठी तयार असलेल्या अनेक केळीच्या बागा जमीनदोस्त झाल्या असून शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. नुकसानग्रस्त शेतकरी आता प्रशासनाकडून तातडीची मदत अपेक्षा व्यक्त करीत आहेत. अकोट तालुक्यातील पणज, बोचरा, रुईखेड, महागाव, अकोली जाहागीर आणि धामणगाव परिसरात वादळी वाऱ्याने कहर केला. अनेक ठिकाणी केळीची झाडे मुळासकट उन्मळून पडली, तर काही ठिकाणी झाडे मधोमध तुटल्याने संपूर्ण बागांचे नुकसान झाले आहे. गेल्या अनेक महिन्यांपासून मोठा खर्च आणि मेहनत घेऊन शेतकऱ्यांनी केळीची लागवड केली होती. पण कापणीच्या उंबरठ्यावर असतानाच आलेल्या अवकाळी पावसाने आणि वादळी वाऱ्याने त्यांच्या आशांवर पाणी फेरले. नुकसान झाल्यानंतरही महसूल विभाग किंवा पीक विमा कंपनीचे अधिकारी अद्याप घटनास्थळी पोहोचले नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. नुकसानग्रस्त भागाची तातडीने पाहणी करून पंचनामे करण्यात यावेत तसेच शेतकऱ्यांना योग्य ती आर्थिक मदत आणि नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी शेतकरी आणि काँग्रेस नेत्यांनी केली आहे.0
0
Report
रत्नागिरी MIDC के उद्योग जल संकट से उत्पादन ठप्प, हजारों मजदूर प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीच्या खेड लोटे MIDC वर पाणीबाणीचे संकट.. वाशिष्टी नदी आटल्याने अनेक प्लांट बंद, हजारो कामगार वाऱ्यावर! पाऊस लांबल्याचा मोठा फटका; पाणीपुरवठा करण्यासाठी MIDC युनियनची प्रशासनाकडे आर्त हाक.. पावसाने ओढ दिल्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांना आतापर्यंतचा सर्वात मोठा फटका बसला आहे. कोयना धरणातील पाणीसाठा खालावल्याने आणि वाशिष्टी नदीत अवजल न सोडल्यामुळे लोटे परशुराम, खेर्डी आणि गाणेखडपोली या तीन प्रमुख औद्योगिक वसाहतींमधील पाणीपुरवठा एमआयडीसीने अनिश्चित काळासाठी पूर्णपणे बंद केला आहे. या 'पाणी-बाणी'मुळे अनेक लघुउद्योग बंद पडले असून, मोठ्या कंपन्यांचे उत्पादन मंदावले आहे.कामगारांना पिण्याच्या पाण्यासाठीही वणवण करावी लागत आहे. या भीषण परिस्थितीचा आढावा घेणारा आमचा हा विशेष ग्राउंड रिपोर्ट.. हा रत्नागिरी जिल्ह्यातील उद्योगांचा कणा मानला जाणारा लोटे,खेर्डी आणि गाणेखडपोली औद्योगिक परिसर..पण आज या भागात कारखान्यांचे सायरन शांत पडू लागले आहेत. कोयनेत आता ९ टीएमसी चं पाणीसाठा शिल्लक राहिल्याने वीजनिर्मिती बंद केली आहे.. विजनिर्मिती ठप्प झाल्याने गेल्या चार दिवसांपासून वाशिष्टी नदीचे पात्र कोरडेठण पडले आहे. ज्यात आम्ही पोहचलो.. या नदीतून लोटे,खेर्डी आणि गाणेखडपोली एमआयडीसीसाठी दररोज तब्बल ३० दशलक्ष घनमीटर पाणी उपसले जाते. मात्र, नदीत पाणीच नसल्यामुळे एमआयडीसीने सर्व कारखान्यांचा पाणीपुरवठा अनिश्चित काळासाठी बंद केला आहे.. त्यामुळे ७५ टक्के कंपन्यांची धडधड थांबली आहे.. उद्योजक लोटे midc या जलसंकटाची सर्वात मोठी कुऱ्हाड कंत्राटी कामगारांवर कोसळली आहे.पाणी नसल्यामुळे अनेक लहान उद्योगांनी उत्पादन तात्पुरते थांबवून आपल्या कंत्राटी कामगारांना सक्तीच्या सुट्ट्या दिल्या आहेत. तर दुसरीकडे,ज्या मोठ्या कंपन्या कशाबशा सुरू आहेत,तिथे कामगारांना पिण्यासाठीही पाणी मिळेनासे झाले आहे.एमआयडीसी परिसरातील काही ग्रामपंचायतींचा पाणीपुरवठाही याच यंत्रणेवर अवलंबून असल्याने कामगारांच्या वसाहतींमध्ये पाण्यासाठी हाहाकार माजला आहे.. रत्नागिरी एमआयडीसी युनियन अध्यक्ष.. शासनाने पाण्याचा प्राधान्यक्रम ठरवताना प्रथम पिण्याचे पाणी,नंतर शेती आणि शेवटी उद्योगांना स्थान दिले आहे. त्यामुळे कोयनेतून पाणी सुटले तरी ते आधी चिपळूण शहर आणि गावांना मिळणार आहे,म्हणजेच एमआयडीसीचा नंबर सर्वात शेवटी लागणार आहे.पुढील ८ दिवसांत जर मुसळधार पाऊस झाला नाही,तर लोटे, खेर्डी आणि गाणेखडपोलीतील अब्जावधी रुपयांचे औद्योगिक उत्पादन पूर्णपणे कोलमडेल आणि उद्योगांना टाळे ठोकण्याशिवाय पर्याय उरणार नाही,अशी भीती उद्योजक व्यक्त करत आहेत.. कोकणात दरवर्षी मुसळधार पाऊस पडतो,पण आज याच कोकणातील सर्वात मोठ्या औद्योगिक पट्ट्याला पाण्यासाठी चातकासारखी वाट पाहावी लागत आहे.0
0
Report
अशोक चव्हाण का दावा: उद्धव ठाकरे को आत्मपरीक्षण करना होगा, अंदरूनी वाद उफान पर
Nanded-Waghala, Maharashtra: उद्धव ठाकरे यांनी आत्मपरीक्षण करावे, आधी आमदार गेले आता खासदार जात आहेत, ही अवस्था पक्षातील अंतर्गत वाद उफाळून आल्यानेच हे सर्व घडतय अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री विद्यमान खासदार अशोक चव्हाण यांनी दिली. लोकांना याबाबत काय वाटतं हे चार वर्षांनी कळेल. या खासदारांना एका विशिष्ट परिस्थितीत जनतेने निवडून दिले हे खरे आहे. पण याचे पॉझिटिव्ह निगेटिव्ह परिणाम चार वर्षानंतरच दिसतील असेही चव्हाण म्हणाले.0
0
Report
Advertisement
धाराशिव में ओमराजे के फैसले पर मौन समर्थन, सोशल मीडिया पर उबाल
Dharashiv, Maharashtra:सोशल मीडियावर रोष... मतदारसंघात शांतता; ओमराजेंच्या निर्णयाला धाराशिवची मूक संमती? ठाकरे गटाची साथ सोडल्यानंतर ऑनलाईन टीकेचा भडिमार... पण धाराशिवमध्ये ना आंदोलन, ना उघड विरोध. अँकर ठाकरे गटाची साथ सोडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. फेसबुक, एक्स आणि इन्स्टाग्रामवर नाराजीचा सूर उमटत असतानाच त्यांच्या धाराशिव मतदारसंघात मात्र चित्र पूर्णपणे वेगळं आहे. ना आंदोलन... ना निदर्शने... ना उघड विरोध. उलट अनेक कार्यकर्ते आणि नागरिक बोलणंही टाळताना दिसत आहेत. त्यामुळे धाराशिवची ही शांतता नेमकी वादळापूर्वीची आहे की ओमराजेंच्या निर्णयाला मिळालेली मूक संमती? पाहूया हा रिपोर्ट... धाराशिव हा बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे कट्टर शिवसैनिकांची संख्या आजही मोठी आहे. काही निष्ठावंत शिवसैनिकांनी ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयावर नाराजी व्यक्त केली असली, तरी ती अद्याप संघटित आंदोलनाच्या रूपात समोर आलेली नाही. त्यामुळे मतदारसंघातील ही शांतता अनेक प्रश्न उपस्थित करत आहे. लोक खरोखरच ओमराजेंसोबत आहेत, की योग्य वेळेची वाट पाहत आहेत? याचं उत्तर येणाऱ्या काळात स्पष्ट होणार आहे. सोशल मीडियावर टीकेचा भडिमार... आणि मतदारसंघात कमालीची शांतता... या दोन परस्परविरोधी चित्रांमुळे धाराशिवच्या राजकारणात नवी उत्सुकता निर्माण झाली आहे. ओमराजे निंबाळकर यांच्या निर्णयाला मतदारांचा मूक पाठिंबा आहे की ही शांतता आगामी राजकीय घडामोडींची नांदी आहे, याकडे आता संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
भाजपा मतदाताओं ने कांग्रेस समर्थित उम्मीदवार को वोट देकर उठे सवाल
Bhandara, Maharashtra:विधान परिषद निवडणुकीत भाजपा मतदारांनी काँग्रेस समर्थित उमेदवाराला मतदान केलं असल्याचा खळबळजनक दावा काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी केला आहे... सत्तेमध्ये राहण्यासाठी भाजप सरकार ही काहीही करत आहे साम,दाम,दंड,भेद और गुंडेशाहीच्या पद्धतीने लढण्याचा प्रयत्न केलेला आहे. आमच्या उमेदवाराला धमकावून फार्म उचलण्याचा प्रशासनाच्या माध्यमातून प्रयत्न केला याच्या विरोधामध्ये आज सगळे लोक चिडले आहेत. कुठे लोकशाही चाललेली आहे.. मूलभूत सुविधांचा अभाव आहे. महागाई वाढलेली आहे. पेट्रोल डिझेल गॅसेस चे दर वाढलेले आहेत. आणि हे अशा प्रकारची राजनीती करत आहेत कधी शिवसेना उद्धव ठाकरेचे तर कधी तृणमूल काँग्रेसचे खासदार फुटत आहेत फक्त सत्तेमध्ये राहण्यासाठी डेव्हलपमेंट यांचा काही नाही आहे. देश पूर्ण अदानीला विकण्याच्या काम हे सरकार करते आहे. मला निश्चित खात्री आहे. की या वेळेस गुंडशाहीच्या विरोधात लोकांनी यांच्या विरोधात मतदान केलेला आहे. येणाऱ्या काळामध्ये पॉझिटिव्ह रिझल्ट आणि लोकशाहीला वाचवण्यासाठी मतदाराचा तत्पर झालेला आहे.0
0
Report
बाघ के हमले में गुराखी की मौत, नागभीड़ के गिरगांव जंगल में घटना
Chandrapur, Maharashtra:वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार, चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी-बाळापूर वनक्षेत्रातील गिरगांव जंगलातली घटना, कळपात एक शेळी कमी आढळल्याने शेळी शोधण्याकरिता गेला होता जंगलात चंद्रपूर जिल्ह्यात वाघाच्या हल्ल्यात गुराखी ठार झालाय. चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील तळोधी -बाळापूर वनक्षेत्रातील गिरगांव जंगलात ही घटना उजेडात आली. आत्माराम दसरू बोरकर (52) असे मृत गुराख्याचे नाव आहे. शेळया चराई करीता तो गिरगांव जंगलात गेला होता. सर्व शेळया चराई करुन घराकडे परतल्या. मात्र कळपात एक शेळी कमी आढळल्याने गुराखी जंगलात गेला. तो परत न आल्यामुळे कुटुंबीय आणि गावकऱ्यांनी जंगल परिसरात रात्रभर शोधाशोध केली. मात्र पत्ता लागला नाही. घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन विभाग व पोलिसांनी सकाळी शोधमोहीम राबविली. अखेर कक्ष क्र 535 मध्ये त्याचे शव आढळून आले.0
0
Report
Advertisement
शिर्चूर रेलवे मार्ग परिवर्तन पर पूर्व सांसद पाटील ने मौजूदा सांसद कोल्हे पर हमला
Shirur, Maharashtra:Anc:शिरूर लोकसभा मतदारसंघातील रेल्वे आणि इतर विकासकामांवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषद घेत विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हेंवर जोरदार हल्लाबोल केला आहे. पुणे-नाशिक रेल्वे प्रकल्पाचा मार्ग बदलण्याचा निर्णय अत्यंत धक्कादायक आणि निराशाजनक असून, हा आपल्या शिवजन्मभूमीवर अन्याय करणारा काळा दिवस आहे, अशी घणाघाती टीका आढळराव पाटील यांनी केली आहे. दरम्यान, पक्षांतर्गत घडामोडींवर बोलताना, खेड तालुक्याच्या माजी सभापतींवर जेव्हा तत्कालीन आमदारांकडून आणि उद्धव ठाकरेंकडून अन्याय झाला, तेव्हा आपण त्यांच्या पाठीशी उभे राहिलो. मात्र, पक्षाच्या वरिष्ठ নেতৃত্বाला हे रुचलं नाही आणि म्हणूनच माझी शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली, असा गौप्यस्फोटही आढळराव पाटील यांनी केला आहे. या सर्व घडामोडींनंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची चिन्हं आहेत.0
0
Report
सांगली के कैफे शॉप में नाबालिग से बलात्कार, शिवप्रतिष्ठान युवा हिन्दुस्तान ने की बड़ी धाड़
Sangli, Maharashtra:स्लग - कॅफे शॉपी मधील बलात्काराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा आक्रमक, कॅफे शॉपवर टाकण्यात आल्या धाडी.. अँकर - सांगलीतील कॅफे शॉप मधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या घटनेनंतर शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान आक्रमक झाली आहे.शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्यावतीने शहरातल्या कॅफे शॉपवर धाडी टाकून तपासणी करण्यात आली आहे. विश्रामबाग परिसरामध्ये मोठ्या संख्येने कॅफे शॉप चालू असतात,या कॅफे शॉप मध्ये अश्लील चाळे सुरू असल्याच्या तक्रारी युवा हिंदुस्तानकडून पोलीसांकडे करण्यात आली होती,मात्र तरी देखील कारवाई झाली नाही, एका कॅफे शॉप मध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार झाल्याची घटनासमोर आल्यानंतर संतप्त झालेल्या शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तान कडून पोलीस मुख्यालयाच्या आवारात असणाऱ्या कॅफेशॉपवर धाडी टाकल्या, यावेळी अनेक कॅफे शॉप बंद असल्याचे आढळून आले,दरम्यान शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्तानच्या धाडीनंतर विश्रामबाग पोलीस देखील खडबडून जागे झाले. बाईट - नितीन चौगुले - अध्यक्ष ,शिवप्रतिष्ठान युवा हिंदुस्थान. बाईट - सुधीर भालेराव - पोलीस निरीक्षक - विश्रामबाग ,सांगली.0
0
Report
पालखी से पहले देहू नगरपंचायत की अतिक्रमण विरोधी तीव्र मुहिम
Varsoli, Maharashtra:संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्याला अवघे काही दिवस शिल्लक असताना देहू नगरपंचायतीने अतिक्रमणांविरोधात धडक मोहीम हाती घेतली आहे. गेल्या महिनाभरापासून संबंधितांना लेखी नोटिसा तसेच रिक्षाद्वारे सूचना देण्यात येत होत्या. अनेकांनी स्वखुशीने अतिक्रमणे हटवली, मात्र सूचना देऊनही अतिक्रमण न काढणाऱ्यांवर आज प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला. पालखी मार्ग और परिसर अतिक्रमणमुक्त करण्यासाठी ही मोहीम आणखी दोन ते तीन दिवस अधिक तीव्रतेने सुरू राहणार असल्याची माहिती देहू नगरपंचायतीने दिली आहे..0
0
Report
Advertisement
शिवसेना में संजय दिना पाटील के समर्थकों में नजदीकी, निवास स्थल पर मुलाकात
Mumbai, Maharashtra:एकीकडे दोन्ही शिवसेनेच्या बॅनर्सवर संजय दिना पाटील यांचे फोटो झळकत आहेत तर दुसरीकडे शिंदे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे खासदार संजय दिना पाटील यांच्या निवासस्थानी दाखल झाले आहेत. आज दोन्ही शिवसेनेच्या वर्धापन दिन आहे तसेच या वर्धापन दिनाच्या निमित्ताने शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांचे सज्जतीना पाटील यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली जाते आहे त्यामुळे संजय दिना पाटील आणि शिंदे यांच्या शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये जवळीक वाढली आहे असे चित्र सध्या समोर येत आहे.0
0
Report
शिवसेना के 60 साल: भरत गोगावले ने यादों को उजागर किया, मानगाव में एम्बुलेंस लोकार्पण
Chendhare, Maharashtra:शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनी भरत गोगावले भावूक. शिवसेनेच्या आठवणींना दिला उजाळा. माणगाव इथं रुग्णवाहिकेचे लोकार्पण. या पार्श्वभूमीवर राज्याचे मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेच्या जडणघडणीच्या आठवणींना उजाळा देत पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन केले. बाळासाहेबांनी लावलेले छोटेसे रोपटे आज भव्य वटवृक्षात रूपांतरित झाले आहे, अशा शब्दांत त्यांनी शिवसेनाच्या प्रवासाचे वर्णन केले. मुंबईकडे रवाना होण्यापूर्वी माणगाव येथे आयोजित कार्यक्रमात युवा सेनेच्या वतीने उपजिल्हा रुग्णालयाला रुग्णवाहिका भेट देण्यात आली. मंत्री भरत गोगावले यांच्या हस्ते या रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना त्यांनी शिवसेनेच्या संघर्षमय वाटचालीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून सामान्य माणसाच्या हक्कासाठी लढणारी चळवळ असल्याचेही त्यांनी नमूद केले.0
0
Report
मंत्रि नितेश राणे का बयान: उद्धव-आदित्य पर तंज, शिवसेना-कांग्रेस गठबंधन पर निशाना
Oras Bk., Maharashtra:मंत्री नितेश राणे byte ऑन संजय राऊत ( तुडवा )--- ऑपरेशन टायगर नंतर आता तुडवा, जुडवा बुडवा, काही बोललात तरी ह्याला जबाबदार कोण ह्याचा विचार केला पाहिजे. *तृणमूल काँग्रेस मध्ये अभिषेक बॅनर्जी होता तसा उबाठाच्या अभिषेक बॅनर्जीला का प्रश्न विचारत नाही. कधीतरी आदित्य ठाकरेला ह्याबाबत विचारलं पाहिजे. तृणमूलचा अभिषेक बॅनर्जी आणि उबाठाचा आदित्य ठाकरे यांच्यात साम्य आहे. आता अभिषेक बॅनर्जी जसा हेल्मेट घालून फिरतो? एक हेल्मेट आदित्य ठाकरेला मी पाठवणार आहे. महाराष्ट्रात फिरताना चुकून अंडी आणि चपला आल्या तर हेल्मेट हवं ना.. पेंग्विन हेल्मेट मध्ये कसा दिसेल हा संशोधनाचा विषय आहे.* ऑन हीरक महोत्सव ----- उबाठाचा पक्ष काँग्रेस मध्ये विलीन होणार होता म्हणून उबाठाचे खासदार आमदार एकनाथ शिंदेकडे जात आहेत. *बाळासाहेबांच्या सगळ्या विचारांना तिलांजली देऊन उद्धव ठाकरे काँग्रेसमध्ये आपला पक्ष विलीन करणार होते. आदित्य ठाकरे यांना काँग्रेसच्या सरचिटणीस पदाचा प्रस्ताव आलेला होता. आता तुम्ही नेहरू आणि गांधींचे गोडवे गा. बाळासाहेबांचे का गाताय..* ऑन रोहित पवार ( खासदार किंमत ) --- आता हे महाविकास आघाडीवाले शेमड्या सारखे काही बोलतील. *मुळात महाराष्ट्र वर्जन ऑफ अभिषेक बॅनर्जी ला आवरलं पाहिजे होत. हे लोक काँग्रेस विचारधारा स्वीकारणारे आहेत जिहादला स्वीकारणारे आहेत हिंदुत्व विरोधी भूमिका घेणारे लोक आहेत हे जेव्हा हिंदुत्वाच्या विचारांवर तयार झालेले सगळे मूळ शिवसैनिकानी ओळखलं म्हणून ते गेले केव्हा तरी पैशाच्या पलीकडे विचार पण महत्वाचे असतात. हे रोहित पवारला कळणार नाही तो अजून लहान आहे.* ऑन संजय राऊत ( देवेंद्र फडणवीस टीका ( संरक्षण) ) --- *म्हणून उद्धव ठाकरेंनी लवकरात लवकर संरक्षण सोडावं. गद्दारांच्या संरक्षणासाठी पोलीस असतील तर उद्धव ठाकरेला कशाला संरक्षण द्यायचं.. महाराष्ट्राचा सर्वात मोठा गद्दार मातोश्रीच्या तिसऱ्या माळ्यावर बसतो.* ऑन शिंदेंच्या सेनेचा जन्म ( अमित शहा टीका ) ----- *संजय राऊतचा राजकीय जन्म कधी झाला हे कोणाला विचारायचं. की तो राजकीय लावारिस आहे. त्याला कचऱ्याच्या डब्यातून उचलला आहे काय. दुसऱ्यांवर आरोप करण्यापेक्षा चार बोट स्वतः कडे आहेत ते बघावं.. शिंदेंनी बाळासाहेबांच्या विचारासाठी हे उचलेले पाऊल आहे. तुझ्या राजकीय धर्मांतर त्याचं झालेले नाही.* ऑन संजय राऊत ( अमित शाह टीका ) --- राऊत काय आमच्या घरी सकाळी चहा घ्यायला येतात काय? आम्ही सकाळी कोणती जडीबुटी खातो काय करतो हे बघायला येतो का आता त्याला हाउसकीपिंगच काम राहिलंय ऑन आम्ही गिरगावकर ---- हिंदुरुदय सम्राट, हिंदुत्व आणि उद्धव ठाकरे यांचा काय संबंध आहे मला माहित नाही तो संबंध आता संपलेला आहे त्याचे रक्त आता हिरवं झालेलं आहे कोणी हिंदुरुदय सम्राट आणि उद्धव ठाकरे एकत्र जोडू नये Byte ---- मंत्री नितेश राणे0
0
Report
Advertisement
