445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वासिम-कोंडाला सड़क खस्ताहाल, खड्डे दुर्घटना का साया, मरम्मत की मांग
Washim, Maharashtra:वाशीम ते काँडाला झामरे दरम्यानचा महत्त्वाचा रस्ता सध्या अत्यंत खराब झाला आहे.तीन वर्षांपूर्वी तयार करण्यात आलेल्या या रस्त्यावरील डांबर पूर्णपणे उखडून निघाले असून ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे बाहेर आले आहेत.त्यामुळे वाहनधारकांना मोठी कसरत करत प्रवास करावा लागत आहे.जुन्या मुंबई-नागपूर मार्गाला जोडणारा हा रस्ता असल्याने दररोज शेकडो दुचाकी, चारचाकी तसेच मालवाहतूक वाहनांची वर्दळ असते. मात्र खड्डे चुकवताना अनेक अपघात घडले असून वाहनांचेही नुकसान होत आहे.पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याची अवस्था आणखी बिकट होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने तातडीने या रस्त्याची दुरुस्ती करून खड्डे बुजवावेत,अशी मागणी नागरिक आणि वाहनधारकांकडून होत आहे0
0
Report
दापोली-हर्णे में मारपीट: सात गिरफ्तार, 1 जून तक पुलिस हिरासत में
Ratnagiri, Maharashtra:दापोली तालुक्यातील हर्णे येथे दोन जणांना मारहाण केल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी एकूण सात जणांना अटक केली असून त्यांना न्यायालयात हजर केले असता 1 जून पर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.0
0
Report
चंद्रपुर में अपने गर्भ के दो बच्चों की बिक्री का चौंकाने वाला मामला; गिरफ्तारी
Chandrapur, Maharashtra:टायटल:---चंद्रपूर शहरात स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस, पोलिसांनी सतर्कतेने केली कारवाई अँकर:-- स्वतःच्या पोटच्या दोन मुलांची एका महिलेने विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार चंद्रपुरात उघडकीस आलाय. आपल्या 15 वर्षीय अल्पवयीन मुलीच्या नवजात बाळाला विकण्याच्या तयारीत ही महिला असताना रामनगर पोलिसांनी आरोपी महिलेला अटक केली. मुख्य आरोपी असलेल्या 40 वर्षीय महिलेच्या पतीचा 4 वर्ष आधी मृत्यू झाला होता. त्यानंतर ही महिला 26 वर्षीय अजय फुलझेले या तरुणासोबत 'लिव्ह इन' मध्ये राहत होती. अजय फुलझेले पासून झालेल्या दोन बाळांची या महिलेने जून 2024 आणि ऑक्टोबर 2025 मध्ये तेलंगानाच्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील एका महिलेला अंदाजे चार ते पाच लाख रुपयांमध्ये विक्री केली. याच दरम्यान आरोपी प्रियकर अजय फुलझेले याने मुख्य आरोपी असलेली महिलेच्या 15 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केला. गर्भवती झालेल्या अल्पवयीन मुलीची नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये प्रसूती करण्यात आली. मात्र या सर्व प्रकरणाचा रामनगर पोलिसांना सुगावा लागल्याने त्यांनी पीडित अल्पवयीन मुलीचा जबाब नोंदवला. पीडितेच्या जबाबावरून रामनगर पोलिसांनी मुख्य आरोपी असलेली 40 वर्षीय महिला आणि बाळ विकत घेणाऱ्या कागजनगर आणि चंद्रपूर शहरातील दोन महिलांना अटक केली. या प्रकरणातील आरोपी प्रियकर अजय फुलझेले सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. या प्रकरणामागे नवजात बाळांची विक्री करणारं रॅकेट सक्रिय आहे का याचा देखील पोलीस शोध घेत आहेत. आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
Advertisement
दीपाली सय्यद को धमकी: कुश्ती आखाड़े के पहलवानों ने सुरक्षा का भरोसा जताया
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या कुस्ती आखाड्यातून पैलवानांचा इशारा, दीपाली सय्यद यांचे भाऊ म्हणून त्यांचे रक्षण आम्ही करू. सिने अभिनेत्री दीपाली सय्यद यांना भोंदू अशोक खरात याच्या संदर्भातील चित्रपटात भूमिक करू नये म्हणून धमकी आली. यानंतर दीपाली सय्यद थेट कुर्डुवाडी मधील कुस्ती आखाड्यात दाखल झाल्या. कुस्ती सम्राट अस्लम काझी यांनी आयोजित केलेल्या कुस्ती स्पर्धेत त्यांनी हजेरी लावली. यावेळी अस्लम काझी आणि इतर उपस्थित पैलवानांनी दीपाली सय्यद यांनी या चित्रपटात रुपाली चाकणकर यांची भूमिका करावी. त्यांनी धमकी देणाऱ्यांना आम्ही आहोत. आमच्या सारखे पैलवान भाऊ सोबत असताना दीपाली सय्यद यांना कोण धमकी देतो आणि काय करतो हे पाहू. सय्यद यांचे रक्षण करण्यास भाऊ म्हणून आम्ही तयार असल्याचे त्यांनी सांगितले0
0
Report
सोलापुर के हिप्पर्गा तालाब में युवक डूबा; मोहसीन शेख की मौत की पुष्टि
Solapur, Maharashtra:सोलापुरातील हिप्परगा तलावात पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा बुडून दुर्दैवी मृत्यू मोहसीन रशीद शेख असे 28 वर्षीय पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव मोहसीन शेखला पाण्यातून बाहेर काढून उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वच केले मृत घोषित सदर घटनेची आकस्मित मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली असून पुढील तपास पोलीस करीत आहेत0
0
Report
अंबरनाथ स्टेशन पार्किंग में 700 रुपये वसूली, 400 रुपये के आधिकारिक दर के उलट
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ स्टेशन पार्किंगमध्ये प्रवाशांची लूट ४०० च्या पाससाठी ७०० रुपयांची वसुली मराठी बोलणार नाही म्हणत कर्मचाऱ्याची मुजोरी पार्किंगमध्ये गोंधळ चाकरमान्यांच्या खिशाला कात्री पार्किंग पाससाठी ३०० रुपये जादा स्टेशन पार्किंगमध्ये ठेकेदाराची दादागिरी अंबरनाथ रेल्वे स्थानक परिसरातील पालिकेच्या पार्किंगमध्ये नागरिकांची आर्थिक लूट होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे . महिन्याच्या पार्किंग पाससाठी पालिकेने ४०० रुपये दर निश्चित केल असताना, ठेकेदाराकडून तब्बल ७०० रुपये वसूल केले जात असल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. जादा वसुलीला विरोध करणाऱ्या कर्मचारीने नागरिकांशी उर्मट वर्तन केल्याचाही प्रकार समोर आला असून मी मराठीत बोलणार नाही अशी भाषा वापरल्याने संतप्त नागरिकांनी गोंधळ घातला. नगरपालिकेने मासिक पार्किंग पाससाठी ४०० रुपये शुल्क निश्चित केलेलं असतान..., कार साईन या ठेकेदाराकडून तब्बल ७०० रुपये आकारले जात आहेत. धक्कादायक बाब म्हणजे पार्किंगमधील अधिकृत दरपत्रकावर पांढरी पट्टी मारून मूळ दर झाकण्यात आला आहे. जादा वसुलीबाबत विचारणा करणाऱ्या नागरिकांशी पार्किंगवरील कर्मचाऱ्याने उर्मटपणे वर्तन केल्याचंही सांगितलं जात आहे. तसेच मराठी बोलण्यास नकार देत, “शेठ जितके सांगतील तितकेच पैसे घेणार” अशी भाषा वापरल्याने नागरिक संतप्त झाले. यानंतर पार्किंग परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.याशिवाय पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या वाहनांचे आरसे तुटणे, स्टँड खराब होणे आणि इतर नुकसान होत असल्याच्या तक्रारीही नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे जादा वसूल केलेले पैसे परत करावेत, संबंधित ठेकेदारावर कारवाई करावी आणि पार्किंगमधील मनमानी तात्काळ बंद करावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.या सर्व प्रकारामुळे पालिकेच्या वाहनतळ व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं असून प्रशासन यावर काय कारवाई करतं, याकडे अंबरनाथकरांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के दवलामेटी में वृद्ध दंपति घर में मृत मिले, पुलिस जांच शुरू
Nagpur, Maharashtra:नागपूर वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दवलामेटी येथे वृद्ध दांपत्य घरात मृत अवस्थेत आढळले -- गंगाधर भोंगाडे वय वर्ष 75 व कौशल्याबाई गंगाधर भोंगडे वय 72 असे मयतांची नाव आहे -- गेल्या काही दिवसांपासून दोघेही आजारी होते -- घरातून येणाऱ्या दुर्गंधीमुळे हा प्रकार उघडकीस आला -- दरम्यान त्यांचा मृत्यू संशयास्पद दिसत असल्याने पोलीस सर्व दिशेने तपास करताय0
0
Report
पुणे में नकली शराब से 18 मौत: कोल्हापुर पुलिस ने हथभट्टियों पर बड़ी कार्रवाई
Kolhapur, Maharashtra:पुण्यात बनावट दारू प्राशनामुळे १८ जणांचा मृत्यू झाल्याच्या धक्कादायक घटनेनंतर कोल्हापूर पोलीस प्रशासन अलर्ट मोडवर आले आहे. या पार्श्वभूमीवर करवीर तालुक्यातील कणेरीवाडी इथ सुरू असलेल्या दोन हातभट्ट्यांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. गोकुळ शिरगाव पोलीस ठाणे आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने कणेरीवाडीतील दोन वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून अवैधरित्या दारू निर्मिती करणाऱ्या हातभट्ट्या उद्ध्वस्त केल्या. या कारवाईत दारू निर्मितीसाठी वापरण्यात येणारे रसायन, तयार दारू तसेच दारू गाळण्याचे साहित्य जप्त करून नष्ट करण्यात आले. या कारवाईदरम्यान एकूण १ लाख ५५ हजार ८२० रुपयांचा मुद्देमाल नष्ट करण्यात आला. पुण्यातील घटनेच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात बनावट व अवैध दारू निर्मितीला आळा घालण्यासाठी पोलिसांचडून विशेष मोहीम राबविण्यात येत असून, अशा प्रकारच्या अवैध व्यवसायांवर कठोर कारवाई सुरूच राहणार असल्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.0
0
Report
पुणे की जहरीली शराब से 18 मौतें, CID जांच शुरू
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुण्यात विषारी दारू मुळे आतापर्यंत 18 लोकांचा बळी गेलेला आहे तर आणखी काही जणांवर रुग्णालयात चार सुरू आहे. दरम्यान सुरुवातीला पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी मध्ये झालेले मृत्यू नैसर्गिक असल्याचा दावा करणाऱ्या दापोडी पोलीस स्टेशन मधील दोन अधिकारी आणि चार कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. दापोडी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विजय वाघमारे आणि चार कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आलं आहे तर गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक नरेंद्र ठाकरे यांना पोलीस नियंत्रण कक्षात पाठवण्यात आलं आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास गुन्हे अन्वेषण विभाग अर्थात सीआयडी कडे गेला आहे...त्या मुळे या प्रकरणाची व्याप्ती किती वाढते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे...याच संपूर्ण घटनाक्रमाची माहिती देत आहेत कैलास पुरी...0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में सस्ते राशन की बिक्री में मिनी टेम्पो पकड़ा गया
Yeola, Maharashtra:नाशिकचे येवला तालुक्यातील लौकी शिरसगाव या ठिकाणी स्वस्त धान्य दुकानातून विकला जाणारा गहू तांदूळ व भरड मका घेऊन जाणारा मिनी टेम्पो ग्रामस्थांनी अडवून पोलिसांना याबाबतची माहिती दिली यावेळी पोलिसांनी घटनास्थळीत धाव घेऊन टेम्पो मधील काहीजणांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर गुन्हा दाखल केला आहेदरम्यान गरिबांना रेशन दिले जात नाही मात्र काळ्या बाजारात ते विकले जाते असा गंभीर आरोप ग्रामस्थांनी केला असून याप्रकरणी महसूल अधिकारी अधिक तपास करत आहेत0
0
Report
नाशिक में दो दिन का यलो अलर्ट: गर्मी के साथ आंधी-बारिश की चेतावनी
Nashik, Maharashtra:Nashik breaking *नाशिक जिल्ह्याला दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट* * नाशिक जिल्ह्याला हवामान विभागाकडून पुढील दोन दिवस पावसाचा ‘यलो अलर्ट’ जारी, नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन. * जिल्ह्यात एकाकीकडे उष्णतेची लाट कायम असतानाच वादळी वारे आणि विजांच्या कडकडाटासह मध्यम पावसाचा अंदाज. * नाशिक शहर आणि परिसरात कमाल तापमानातील चढ-उतार कायम, शुक्रवारी शहराचा पारा ३६.४ अंशावर स्थिरावला. * जिल्ह्यात सकाळपासूनच उन्हाचा चटका जाणवत असल्याने उकाड्याने आणि घामाच्या धारांनी नागरिक पुरते त्रस्त. * ग्रामीण भागातही उन्हाचा कडाका तीव्र, सकाळी ११ ते दुपारी ४ या वेळेत तीव्रतेमुळे नागरिकांना घराबाहेर पडणे कठीण. * अवकाळी हवामान बदलाचा आणि कडक उन्हाचा शेतीच्या कामांवर विपरीत परिणाम, बळीराजा चिंतेत. * शनिवार (ता. ३०) व रविवार (ता. ३१) या कालावधीत ताशी ४० ते ५० किमी वेगाने वादळी वारे वाहण्याची शक्यता.0
0
Report
केंद्र के बढ़े दाम के बावजूद कांदा खरीदी धीमी, व्यवस्थागत अड़चनें प्रमुख
Lasalgaon, Maharashtra:केंद्र सरकारने वाढीव 15 रुपये 80 पैसे प्रतिकिलो दराने कांदा खरेदीची घोषणा केली असली, तरी प्रत्यक्षात खरेदीला अजूनही गती मिळालेली नाही. गेल्या 12 ते 15 दिवसांत केवळ 48 टन कांद्याची खरेदी झाली असून यातील फक्त 20 मेट्रिक टन कांदा सेंट्रल वखार महामंडळाच्या गोदमात साठवला. खरेदी प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याने लाखो मेट्रिक टन खरेदीची घोषणा प्रत्यक्षात मर्यादित राहण्याची शक्यता तसेच नाफेड आणि एनसीसीएफने थेट बाजार समितीतून कांदा खरेदी करण्याचा निर्णय स्वागतार्ह असला, तरी वखार महामंडळाची अपुरी व्यवस्था, वाहतूक खर्च आणि कांदा स्वीकारण्यात येणाऱ्या अडचणी दूर करण्याची गरज असल्याचेही कांदा विषय तज्ञ व मुंबई बाजार समितीचे संचालक जयदत्त होळकर सांगत आहे.0
0
Report
Advertisement
अमर arati में कांग्रेस को बड़ा झटका: शिंदे की शिवसेना में प्रवेश
Amravati, Maharashtra:अमरावती में कांग्रेस को बड़ा झटका, कांग्रेस के सहकार नेता एकनाथ शिंदे के गले में प्रवेश का निर्णय लिया गया और कई कार्यकर्ताओं के साथ शिंदे की शिवसेना में शामिल हुआ गया. अमरावती जिला बैकें के पूर्व अध्यक्ष, सहकार नेता सुधाकर भारसाकळे ने कल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे के हस्ते नंदनवन में भव्य शक्ति प्रदर्शन के साथ पार्टी प्रवेश किया. साथ ही दर्यापुर के कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक और अनेक कार्यकर्ताओं ने सुधाकर भारसाकडे का समर्थन जाहीर किया. दर्यापुर नगर परीक्षे की अध्यक्ष उनकी पत्नी हैं और भारसाकडे का दर्यापूर विधानसभा क्षेत्र में बड़ा प्रभाव है. बच्चू कडू ने शिवसेना में प्रवेश के बाद जिल्हे के नाराज कार्यकर्ताओं से संपर्क शुरू किया और हर पार्टी के नाराज कार्यकर्ताओं को अपने साथ जोडऩे का प्रयास किया है, जिससे शिवसेना के लिए मोर्चे बनाने का प्रयास किया जा रहा है. इस प्रवेश से स्थानीय स्वराज्य संस्थाओं के चुनावों में कांग्रेस को बड़ा नुकसान होगा.0
0
Report
ओझाटोला में ईंट भट्टी दीवार गिरने से मजदूर की मौत, 10 लाख मदद की मांग
Bhandara, Maharashtra:विटभट्टीची भिंत कोसळून युवकाचा दुर्दैवी मृत्यू पीडित कुटुंबाला १० लाख मदतीची नागरिकांची मागणी गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा तालुक्यातिल गंगाझरी पोलीस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या ओझाटोला गावात एक दुर्दैवी घटना घडली आहे. विटभट्टीची भिंत अचानक कोसळल्याने एका २८ वर्षीय मजुराचा विटांच्या ढिगाऱ्याखाली दबून मृत्यू झाला. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून नागरिकांनी विटभट्टी मालकाकडून पीडित कुटुंबाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Partition के दर्दनाक दिनों पर Sunil Ambekar ने कहा 1947 में संघ मजबूत नहीं था
Nagpur, Maharashtra:आपल्या देशाची झालेली फाळणी ही मागील शतकातील सर्वात वेदनादायी बाब होती. देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा संघ आजच्या इतका मजबूत नव्हता. जर त्या कालखंडात संघ मजबूत असता तर कधीच फाळणी झाली नसती, असे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय प्रचार प्रमुख सुनिल आंबेकर यांनी केले. नागपूरात आयोजित पत्रकार संगोष्टीदरम्यान ते बोलत होते. सिव्हील लाईन्स येथील चिटणवीस केंद्र येथे झालेल्या कार्यक्रमाला विदर्भ प्रांत संघचालक दीपक तामशेट्टीवार, नागपूर महानगर संघचालक राजेश लोया प्रामुख्याने उपस्थित होते. 1947 मध्ये संघ हवा तितका मजबूत नव्हता. मात्र तरीदेखील हिंदूचे संरक्षण, त्यांचे पुनर्वसन यासाठी संघाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केले होते. फाळणीमुळे तत्कालिन यंत्रणेविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष होता. त्यावेळी काही राजकीय पक्ष संघाला राजकीय स्पर्धक समजू लागले होते. राजकीय स्वार्थातून अनेकदा संघाबाबत विविध अपप्रचार करण्यात येतो. मात्र प्रत्यक्षात संघाकडून कुणाचाही द्वेष करण्यात येत नाही व कुणाशीही शत्रुत्व वगैरेदेखील नाही. संघ सर्वांनाच आपले मानतो व समाजातील सर्वच तत्वांशी संवाद प्रस्थापित करण्याची भावना आहे. त्यामुळेच संघ सर्वांशी संवाद व चर्चेसाठी कामय तयार असतो, असेदेखील आंबेकर म्हणाले. कम्युनिस्ट-समाजवादी संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आजकाल काही तत्वांकडून जयभीम-लालसलाम असे नारे देण्यात येत आहेत. प्रत्यक्षात जोपर्यंत जगात गौतम बुद्ध यांनी दाखविलेला शांतीचा मार्ग आहे तोपर्यंत कार्ल मार्क्स किंवा इतरांच्या मार्गावर जाण्याची आवश्यकता नाही असे खुद्द डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितले होते. त्यांचे मौलिक विचार लक्षात घेतले पाहिजे. कम्युनिस्ट आणि समाजवादी हे संविधानाचे सर्वात मोठे शत्रू आहेत, जगातील संघर्षाच्या स्थितीमुळे देशात काही क्षेत्रांत संकट जाणवत आहे. मात्र अशा स्थितीत सर्वांचे सहकार्य अपेक्षित आहे. दुसऱ्या देशातील वस्तुंची गरजच कमी पडली पाहिजे असे प्रयत्न झाले पाहिजेत. संकटाच्या संवेदनशील परिस्थितीत राजकारण मध्ये आणायला नको, असे आंबेकर यावेळी म्हणाले. कॉकरोच जनता पार्टी ला शॉक सारख घेऊ नये..लोकशाही प्रक्रियेचा एक भाग आहे. देशातील तरुणाई नकारात्मक विचारांची नसून ती आपली ऊर्जा देशाच्या विकासासाठी वापरत आहे0
0
Report
Advertisement
