445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
LED मछली捕 रोकथाम पर रत्नागिरी में रात भर कार्रवाई: सरकार का सर्जिकल स्ट्राइक
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. समुद्रात मध्यरात्री थरार! अनधिकृत LED मासेमारीवर सरकारचा सर्जिकल स्ट्राईक.. कोकणच्या विस्तीर्ण किनारपट्टीवर काल रात्री एक मोठा थरार पाहायला मिळाला. सागरी पर्यावरणाचा शत्रू ठरणाऱ्या आणि पारंपरिक मच्छिमारांच्या पोटावर पाय देणाऱ्या LED मासेमारी विरोधात राज्य सरकारने आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई केली आहे.. मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे आणि सचिव एन.रामास्वामी यांच्या आदेशानंतर प्रशासन पूर्णपणे 'ॲक्शन मोड'मध्ये आले आहे.. ८७८ किमीच्या अथांग किनारपट्टीवर काल रात्रभर विशेष गस्त घालण्यात आली... या मोहिमेत एकूण ६ बेकायदेशीर LED बोटी रंगेहाथ पकडण्यात आल्या आहेत.. या कारवाईत केवळ बोटीच नाही,तर तबल सव्वा कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.यात हाय-डेन्सिटी LED दिवे, जनरेटर आणि बॅटरीचा समावेश आहे.. पकडलेल्या बोटींकडून ३० लाख रुपयांचा दंड वसूल केला जाणार आहे.. सह आयुक्त महेश देवरे आणि उपायुक्त नागनाथ भादुले यांच्या नेतृत्वाखाली ही धडक मोहीम पार पडली.. मंत्री महोदयांनी स्पष्ट संकेत दिले आहेत की,ही तर फक्त सुरुवात आहे. इथून पुढे गस्त अधिक तीव्र केली जाईल आणि अवैध मासेमारी करणाऱ्यांचे धाबे आता दणाणणार आहेत.. पारंपरिक मच्छिमारांच्या हितासाठी सरकारने उचललेले हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे..0
0
Report
10 अप्रैल को देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग के जन्मदिन कार्यक्रम में नारायण राणे के साथ संजय दत्त- सोनू निगम भी मौजूद
Oras Bk., Maharashtra:10 एप्रिल रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सिंधुदुर्ग जिल्ह्यात.. खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासह मंत्री मंडळातील मंत्री तसेच अभिनेते संजय दत्त आणि गायक सोनू निगम राहणार उपस्थित भाजपा जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांनी दिली माहिती0
0
Report
वेंगुर्ल्या में दाभोली के घर में बिबटिया सीधे रसोईघर में घुसी
Oras Bk., Maharashtra:वेंगुर्ल्यातील दाभोली येथे बिबट्या शिरला थेट स्वयंपाक घरात दाभोली येथील विवेक जोशी यांच्या घरात जखमी अवस्थेतील बिबट्याने प्रवेश केला. अचानक घडलेल्या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. हा प्रकार लक्षात येताच विवेक जोशी यांनी घराचे दरवाजे बंद करून याची माहिती वन विभागाला दिली. त्यानुसार वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी जखमी असलेल्या या बिबट्याला जाळी टाकून वनविभागाच्या रेस्क्यू पथकाने जेरबंद केले. दरम्यान बिबट्या घरात शिरल्याने परिसरातील नागरीकांमध्ये काही काळ घबराट पसरली होती.0
0
Report
Advertisement
हिंदी में फसल की कीमतों में भारी उछाल: किसान चिंतित, व्यापारी खुश
Jalna, Maharashtra:जालना | शेतकऱ्यांकडील कापूस संपताच कापसाच्या दरात क्विंटलमागे एक ते दिड हजारांची वाढ सध्या 8 हजार 400 रुपये मिळतोय भाव कापूस साठवून ठेवलेले शेतकरी खुष, कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांची मात्र नाराजी अँकर | यावर्षीचा कापूस हंगाम संपत आला आहे.जालना जिल्ह्यातील हजारो कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी या आधीच कापूस विक्री केलाय.शेतकऱ्यांच्या घरातील कापूस संपताच "पांढऱ्या सोन्याच्या" दरात वाढ झाल्याचे दिसत आहे.शेतकऱ्यांनी कापसाच्या भावांत वाढ होईल, या आशेने घरात साठवलेला कापूस विकला.तर काहींनी शेतातील कापूसही लग्नसराईमुळे विकला. मात्र शेतकऱ्यांकडील कापूस संपताच भावांत क्विंटलमागे तब्बल 1 ते दीड हजारांची वाढ झाली आहे. जेव्हा शेतकऱ्यांकडे माल नसतो. तेव्हा भाव वाढतात. हे गणित दरवर्षीचे झाले आहे. यावर्षी कापूस संपल्यानंतर ८ हजार ४०० रुपये भाव झाला आहे. त्यामुळे व्यापारी तुपाशी आणि शेतकरी उपाशी अशी स्थिती सध्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांची झालीय.यावर्षी सीसीआय केंद्रानेही लवकरच कापूस खरेदी बंद केली.त्यामुळेही शेतकऱ्यांनी कापूस विकून टाकला. मात्र या आठवड्यात कापसाचे दर ८ हजार ४०० रुपये झाले आहेत. सुरुवातीला शेतकऱ्यांना कापसाच्या दर्जानुसार ६ हजार ८०० ते ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. सीसीआयने नोव्हेंबरपासून ७ हजार २०० ते ७ हजार ४०० रुपये प्रति क्विंटलप्रमाणे खरेदी सुरू केली. काही खासगी व्यापाऱ्यांकडून ७ हजार ५०० रुपये भाव देण्यात आला. तर आता क्विंटल मागे तब्बल एक दिड हजारांची वाढ झाल्यानं घरात कापूस साठवून ठेवलेले शेतकरी खुश झालेत तर कापूस विक्री केलेल्या शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. बाईट : शेतकरी0
0
Report
महाराष्ट्र की राजनीति में हलचल: बारामती चुनाव और मराठा मुद्दे तेज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:- छत्रपती संभाजीनगर - बाईट अंबादास दानवे ऑन घाटगे यांची भाजपात घर वापसी - धक्के आता काही बसायचे विशेष राहिले नाही, अजित दादा सारखे घरातले गेले त्यामुळे समरजीत घाटगे सारखे गेले काय आले काय पवार साहेबाला धक्का बसणार आहे. ऑन एसटी महामंडळाकडून हंगामी दहा टक्के दर वाढ. - खरंतर हे चुकीचं आहे या काळात सवलती दिल्या पाहिजे दरवाढ नाही केली पाहिजे. - सध्याची एसटीची परिस्थिती बघितली तर एसटी कर्मचाऱ्यांना पगार देऊ शकत नाही अशी एसटीची स्थिती असताना, एक तर नीट सेवा नाही सेवा नीट नसताना अशा पद्धतीने दरवाढ करणे हे चुकीचे आहे. ऑन पूर्णा नदीपत्रावर अत्याधुनिक पूल मात्र रस्ता नाही - पूल ज्याच्यासाठी बांधला त्याला कनेक्टिंग रस्ता, भूसंपादन, मालकी या सगळ्या प्रक्रिया अधिकाऱ्यांनी पूर्ण करायला पाहिजे होत्या. - हे सगळं झाल्यानंतर आता ते रस्त्याच्या अधिग्रहणासाठी काम सुरू करतील. - याचा अर्थ त्यांना पूल करण्याची जास्त घाई होते असा त्याचा अर्थ आहे पूल कशासाठी तर गुत्तेदारांसाठी गुत्तेदार कशासाठी तर कोणास तरी घर भरण्यासाठी. ऑन नांदेड खून प्रकरणात x पोस्ट - नांदेड मध्ये तीन दिवसात पाच मुडदे पडले आहेत म्हणजे कायद्याचा धाक राहिला की नाही राहिला. - सामनाने त्यावर अग्रलेख सुद्धा लिहिला आहे. - राज्यात कायदा व सुव्यवस्थेचा मला असं वाटतं दररोज खून जरी पडत असतील तरी त्याच्याकडे कोणी संवेदनशील पणे पाहत नाही. - राज्याचे गृह खाता बघत नाही राज्याचे मुख्यमंत्री बघत नाहीत. - सरकार फक्त शेतकऱ्यांसाठी घोषणा करतो प्रत्यक्षात काही मदत करत नाही. - अवकाळी पावसाचे पंचनामे करून शेतकऱ्याला मदत दिली पाहिजे. ऑन शितल तेजवानीच्या जामीन अर्जाला सरकारकडून विरोध. - सरकारची भूमिका साहजिक आहे, परंतु राज्य सरकारने जी काही चौकशी समिती नेमली आहे जे पुरावे आहेत यामध्ये सरकार बायस पद्धतीने पद्धतीने वागत आहे असं स्पष्टपणे म्हणता येईल. - कोंढव्याच्या प्रकरणात 99 टक्के शहर असलेल्या व्यक्ती बाहेर आहे. - मुद्दाम यांना वाचण्यासाठी तेजवानीला अटक केली जाते तेजवानी या दोष आहेच परंतु राज्य सरकार या सगळ्या प्रकरणात गोलमोल भूमिका घेत आहे. ऑन विट्स हॉटेलचा अहवाल राज्य शासनाकडे - खरंतर त्या संदर्भात चौकशी समिती लावण्याची मागणी माजी होती आद्य देशावर सुद्धा तसं स्पष्ट नाव होतं. - अगोदर जिल्हाधिकारी या चौकशी समितीचे अध्यक्ष होते नंतर मीच मागणी केली जिल्हाधिकारी पालकमंत्र्यांची चौकशी काय करणार. - त्यानंतर विभागीय आयुक्तांकडे चौकशी देण्यात आली विभागीय आयुक्तांनी ज्याची तक्रार होती त्याच्याकडे थोडी चर्चा करायला पाहिजे होती. - विभागीय आयुक्तांकडे मी काही पुरावे दिले असते, कारण सरकारी लोक पालकमंत्र्याच्या विरोधात कसा रिपोर्ट देणार. - त्यांनी जर आम्हाला हेरिंगला बोलावलं असतं तर आणखी बरं झालं असतं, चौकशी समितीत त्यांना वाचवण्याचा प्रयत्न झाला आहे की सत्यता मांडण्याचा प्रयत्न झाला असे मला माहित नाही. ऑन अंजली दमानिया CDR - CDR पोलिसांशिवाय कोणाला मिळत नाही त्याच्या रीतसर कायदेशीर बाबी आहेत. - असा असताना ज्या पद्धतीने अंतिम दमाने यांनी कॉल रेकॉर्ड जाहीर केले त्याची राज्य सरकारने चौकशी केली तो चौकशीचा फार्स आहे का मला माहित नाही. - त्यांनी नेमकं राजकीय लोक टार्गेट असणाऱ्या लोकांचीच कॉल रेकॉर्डची माहिती दिली. - आता राज्य सरकार चौकशी करतो असं म्हणते मात्र हे सगळं बाहेर आलं आहे. - आता राज्य सरकार या चौकशीच्या माध्यमातून काही राजकारण करू इच्छितो का काय अशी शंका जनतेच्या मनात आहे. ऑन खरात पोलीस कठडी पुन्हा मागणी - त्याचे दररोज वेगवेगळे प्रकरण समोर येत आहेत, आतापर्यंत दहा-बारा गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत. - प्रत्येक प्रकरणाचा तपास स्वतंत्र काय एकच प्रकरण नाही माझा अंदाज आहे आणखी पोलीस कोठडी वाढेल. ऑन अकरा पीडित महिलांची खराच्या विरोधात तक्रार - या भगिनी विषयी आपण काय बोलणार मला नाही वाटत यांच्या विषयी बोलणं संयुक्त होणार आहे. ऑन जे काम करतील त्यांनाच पद - एकनाथ शिंदे - कोणत्याही संघटनेचे अशीच भूमिका असते त्यात काही नवीन नाही. ऑन स्वीकृत नगरसेवक - स्वीकृत नगरसेवक पदासाठी अजून कोणते ही निकष लावले नाहीत सगळे निर्णय उद्धव ठाकरे घेतील. - जे कोणी इच्छुक आहेत त्यांची माहिती उद्धव ठाकरेंना दिली जाईल. ऑन बारामती निवडणूक काँग्रेस उमेदवार - संस्कृती वगैरे म्हणणं चुकीचं आहे, आपण कर्डिलेंविषयी का नाही संस्कृतीच्या विषयी बोलत हा माझा प्रश्न आहे. - लोकशाहीत निवडणुका होत असतात ज्यांना उभारायचं ते उभे राहायचं असतात परंतु ज्या पद्धतीने अजितदादा पवार अपघाती गेले आणि सुमित्रा वहिनी स्वतः उभे राहतात अशा महिलेच्या मागे उभे राहावं ही संस्कृती आहे. - निवडणूक बिनविरोध करावी ही काही संस्कृती नाही. - मला वाटतं अजून या विषयाला नऊ तारीख होऊ द्यावी फॉर्म वापस घ्यायची वेळ आहे त्यानंतर स्पष्ट होईल. - परंतु काँग्रेस उभे राहत असेल तर त्याला ऑपरेशन घ्यायचं कोणी कारण नाही, शिवसेनेने या निवडणुकीत कोणताही सहभाग घ्यायचा नाही अशी भूमिका घेतली आहे. ऑन येरवडा मनोरुग्नालयात रुग्णांकडून कामे - हे सगळ्याच रुग्णालयात होतं, ठिकठिकाणी अशा पद्धतीने होतं हे काय तिथेच होतं असं काही नाही फक्त तो व्हिडिओ बाहेर आल्यामुळे त्या विषयाला वाचा फुटली आहे. - हे मानवतेच्या दृष्टीने योग्य नाही असं वाटतं मला. ऑन मराठा आंदोलक - राधाकृष्ण विखे पाटील भेट - सरकारने मागच्या आंदोलनानुसार हैदराबादा गॅ Rozet लागू करण्याची भूमिका घेतली, हैदराबाद गॅजेटमध्ये कुणबीचा उल्लेख मराठवाड्याच्या ठिकठिकाणी आहे, गावनिहाय संख्येचा उल्लेख आहे. - हे पुरावे म्हणून घेतले पाहिजे असा सगळा या सरकारच्या आदेशाचा अर्थ आहे. - पण याला प्रोसेस काय असावी यासाठी समिती नेमली आहे, आता त्या समितीचा रिपोर्ट आल्यानंतर तो रिपोर्ट मान्य करायचा न मान्य करायचा याबाबत एखादी समिती होईल. - मला असं वाटतं या निमित्ताने मराठा समाजाला गंडवण्याचा काम राज्य सरकार करते की काय अशी शंका निर्माण होते.0
0
Report
अजित पवार कार्यक्रम में फ्लैक्स से फोटो गायब, राजनीतिक हलचल तेज, अमोल मिटकरी ने कहा
Akola, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांचे प्रफुल पटेल यांच्या कार्यक्रमात फ्लॅक्सवरून फोटो गायब आहेत यावरून आता राजकीय चर्चांना उधाण आला आहे. मात्र कोणी फोटो लावलं किंवा नाही लावला याचा फरक पडत नाही कारण अजित पवार प्रत्येकाच्या मनात असल्याचं अमोल मिटकरी यांनी म्हंटल आहे.. मात्र यापुढे अजित पवारांचा कार्यकर्ता दुखवला नाही गेला पाहिजे याची काळजी प्रत्येकाने घ्यावी अशी विनंती त्यांनी केली आहे.0
0
Report
Advertisement
बच्चू कडू की यात्रा: संविधान-भगवतगीता लेकर एवेरेस्ट बेस कैंप तक
Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे बच्चू कडू की यात्रा: संविधान और भगवतगीता लेकर एव्हरेस्ट बेस कैंप तक जशी स्पर्धा आकाश और पर्वताची آهي तशीच स्पर्धा बेईमानी और ईमानदारी से जीने वाले लोगों की है, ऐसा कडू ने कहा है। हमें समानता हासिल करनी चाहिए उस स्पर्धा को पार करने के लिए ही यह यात्रा निकाली गई है। बच्चू कडू अभी विश्व के सबसे ऊँचे शिखर माउंट एव्हरेस्ट के बेस कैंप की यात्रा पर गए हैं और कठिन तथा चुनौतीपूर्ण मार्ग पर उनकी अनोखी यात्रा देखने को मिल रही है। इससे पहले उन्होंने राज्य में पन्हाळगड पावनखिंड जैसी ट्रेकिंग यात्रा पूरी की है। बाइट – बच्चू कडू, माजी राज्यमंत्री0
0
Report
पैनगंगा किनाऱ्यावर अवैध वृक्षतोड, पर्यावरण प्रेमींची कडक कारवाईची मागणी
Washim, Maharashtra:वाशीमच्या रिसोड तालुक्यातील मसला पेन, किनखेड तसेच लिंगा कोतवाल परिसरातील पैनगंगा नदी काठची झाडे मोठ्या प्रमाणात तोडण्यात आली आहेत. त्यामुळे पर्यावरणाला हानी पोहोचत असून देखील याकडे वनविभाग आणि महसूल विभागाचे दुर्लक्ष होत आहे. पैनगंगा नदी काठासह इतर ठिकाणी ही मोठ्या प्रमाणात झाडे विना परवाना तोडण्यात येत असल्याने अशी झाडे तोडणाऱ्यावर कडक कारवाई करून पर्यावरणाचे रक्षण करण्याची मागणी पर्यावरण प्रेमी कडून होत आहे.0
0
Report
शिवाजी पेठ में मटन खरीदने के लिए कोल्हापुर में सुबह से भीड़, महाई के मौके पर कम कीमत
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात लागलेली एक वेगळीच रांग सध्या चर्चेचा विषय ठरतेय. आज ' निमित्त नागरिकांनी पहाटेपासून मोठी गर्दी केली आहे. विशेष म्हणजे ही रांग गॅस सिलेंडरसाठी किंवा इतर कोणत्याही वस्तूसाठी नसून चक्क मटण खरेदीसाठी लागली आहे. माहीच्या निमित्ताने मटण खरेदी करण्यासाठी ही गर्दी का झाली आहे ? पाहूया हा विशेष रिपोर्ट. VO 1 :- कोल्हापूरकर आणि मटण यांचं नातं खास आहे…आणि त्यात जर सण-उत्सवाची जोड मिळाली, तर चित्र अजूनच रंगतदार होतं… कोल्हापूर शहराच्या मध्यवर्ती भागातील शिवाजी पेठेत आज पहाटे पासून नागरिकांनी मोठी रांग लावली आहे… ही रांग कोणत्याही अत्यावश्यक वस्तूसाठी नसून चक्क मटण खरेदीसाठी आहे… ‘'म्हाई’’ निमित्त इथे मटण कमी दरात उपलब्ध करून देण्यात आलं आहे… बाजारात साधारण 800 रुपये किलो असलेलं मटण इथे फक्त 620 रुपये किलोने विकलं जात आहे… यामुळे नागरिकांनी पहाटेपासूनच रांगा लावल्या असून, मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळतेय… Byte:- शिवजी पेठेतील मटण खवय्ये Byte:- शिवजी पेठेतील मटण खवय्ये VO 2 :- पेठांची संस्कृती जपण्याच्या उद्देशाने ही ‘'म्हाई’’ची परंपरा अनेक वर्षांपासून सुरू आहे… हनुमान जयंतीनंतर महाप्रसाद आणि त्यानंतर येणाऱ्या बुधवारी 'म्हाई’ आयोजित केली जाते… महादेव शंकराव गायकवाड यांच्या माध्यमातून २००७ पासून ही प्रथा सुरू झाली… आता या परंपरेला जवळपास १९ वर्षे पूर्ण झाली आहेत… Byte:- महादेव शंकराव गायकवाड VO 3:- यंदा ‘'म्हाई’’साठी तब्बल २७० बकऱ्या आणण्यात आल्या आहेत… आणि जवळपास ५००० किलो मटण विक्रीसाठी उपलब्ध करण्यात आलं आहे… “'म्हाई’चा उद्देश एकच आहे, शिवाजी पेठ एकत्र यावी… कमी दरात मटण देऊन सगळ्यांना सहभागी करून घेण्याचा प्रयत्न असतो.. मधल्या काळात ही परंपरा काही वर्ष खंडित झाली होती…मात्र आता पुन्हा नव्या उत्साहात ती सुरू करण्यात आली आहे… महाराष्ट्रातील गावागावात जपल्या जाणाऱ्या परंपरांप्रमाणेच कोल्हापूरच्या जुन्या पेठांमध्येही अशा परंपरा आजही टिकून आहेत… आणि त्याचं जिवंत उदाहरण म्हणजे शिवाजी पेठेत पाहायला मिळालेली ही गर्दी… Byte:- दिलीप सावंत, शाहीर शिवाजी पेठ. VO 4 :- कोल्हापूरच्या पेठ संस्कृतीचं दर्शन घडणाऱ्या अनेक घटना समोर येतात.. त्यातीलच 'म्हाई’ निमित्ताने मटन खरेदी करण्यासाठी उडालेली झुंबड सध्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.0
0
Report
Advertisement
गोंदिया में NCP मेळावे में अजित पवार के फोटो न होने पर पटेल ने दिया जवाब टाल
Bhandara, Maharashtra:गोंदिया जिल्ह्याच्या तिरोडा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता मेळावा झाला यात अजित पवार यांचा फोटो नाही... यावर पटेलांनी बोलणे टाळले...0
0
Report
फर्जी सोने की नाणियों से 30 लाख रु ठगी: मालेगांव में मामला दर्ज
Washim, Maharashtra:वाशिम जिले के मालेगांव तालुक़े के डव्हा ग्राम के तीन लोगों ने सातारा जिले के एक सराफा व्यापारी से 30 लाख रुपये की फसवणुक की. आरोपियों ने पुराने सोने की नाणियाँ सस्ते में देने का आकर्षण दिखाकर पहले चार खरी नाणियाँ नमूना के लिए दीं. मुंबई में जाँच के बाद वे खरी पाई गईं, जिससे व्यापारी का भरोसा बना. 3 अप्रैल को आकोला-वाशिम महामार्ग पर एक होटल में कारोबारी ने 30 लाख रुपये देकर नाणियों की थैली ली; पर बाद में मुंबई के जाँच में सभी नाणियाँ बनावटी निकलीं. फसवणुक का एहसास होने पर उन्होंने मालेगांव थाना में शिकायत दर्ज कराई; पुलिस ने पति-पत्नी और एक अज्ञात व्यक्ति के विरुद्ध मामला दर्ज किया.0
0
Report
उमरगा के धाराशिव में चारित्र्य के शक पर पति ने पत्नी और 8 वर्षीय बेटी की हत्या — डराने वाला मामला
Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये दुहेरी हत्याकांड चारित्र्याच्या संशयावरून पत्नी आणि मुलीचा खून. उमरग्यात वडिलांनीच केला ८ वर्षांच्या चिमुकलीचा खून ANCHOR धाराशिव जिल्ह्यातील उमरगा तालुक्यातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. चारित्र्याच्या संशयावरून पतीने स्वतःच्या पत्नी आणि अवघ्या ८ वर्षांच्या मुलीची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या केली आहे. या घटनेनंतर आरोपीने स्वतःहून पोलिस ठाण्यात हजर होत गुन्ह्याची कबुली दिली आहे. VO 1 उमरगा तालुक्यातील बेडकवाडी गावात ही संतापजनक घटना घडली. पत्नी लिंबाबाई वासुदेव आणि ८ वर्षांची मुलगी मानसी यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार करत आरोपी अजित वासुदेव याने दोघांची हत्या केली. चारित्र्यावर संशय घेतल्यामुळे हा वाद विकोपाला गेला आणि त्यातूनच ही भीषण घटना घडल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. घटनेच्या वेळी घरात असलेला लहान मुलगा हा प्रकार पाहून घाबरून बाहेर पळला आणि त्यामुळे तो थोडक्यात बचावला. या दुहेरी हत्येनंतर आरोपी अजित वासुदेव स्वतः उमरगा पोलिस ठाण्यात हजर झाला आणि त्याने गुन्ह्याची कबुली दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. पती-पत्नीतील वादातून आणि चारित्र्याच्या संशयातून ही घटना घडल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी स्वतः पोलिस ठाण्यात हजर झाला असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. पुढील तपास सुरू आहे. Byte पोलीस निरीक्षक मुरूम Vo2 या घटनेमुळे संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे. एकाच कुटुंबातील आई आणि मुलीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून, नेमकं कारण काय याचा सखोल तपास पोलिस करत आहेत. Fvo धाराशिवमधील या दुहेरी हत्याकांडाने पुन्हा एकदा कौटुंबिक वाद आणि संशय किती टोकाला जाऊ शकतो याची जाणीव करून दिली आहे. ज्ञानेश्वर पतंगे , झी 24 तास धाराशिव0
0
Report
Advertisement
नेत्रहीन तैराक ईश्वरी पांडे ने श्रीलंका से धनुष्कोडी तक इतिहास रचा
Nagpur, Maharashtra:नागपूरची दृष्टीहीन जलतरणपटू ईश्वरी पांडे हिने अतिशय आव्हानात्मक तलाईमन्नार (श्रीलंका) ते धनुष्कोडी ही पाल्क सामुद्रधुनी पार करत इतिहास रचलाय .. अशी कामगिरी करणारी ईश्वरी जगातील पहिली दृष्टीहीन जलतरणपटू ठरलीय.. १७वर्षीय जलतरणपटू ईश्वरीने श्रीलंकेतील तलाईमन्नार जवळील उर्मलाई पॉईंट येथून 6 एप्रिल रोजी पहाटे 4च्या सुमारास जलतरणास सुरुवात केली.तीने सलग 11 तास 15 मिनिटे जलतरण केले. भारतातील धनुष्कोडी येथील अरिचलमुनई येथे दुपारी 03 वाजून15वाजता दाखल झाली. दरम्यान तिने समुद्रातील विशाल लाटा, भरतीओहोटी व जेलीफिशचा सामना करत ही अतुलनीय कामगिरी केलीय . दृष्टीहीन असतानाही ईश्वरीने खुल्या पाण्यातील जलतरण स्पर्धांमध्ये सातत्याने आपली क्षमता सिद्ध केलीय . ईश्वरीची ही कामगिरी जिद्द व चिकाटीचे अनेकांना प्रेरणा देणारी आहे0
0
Report
नवी मुंबई नगर निगम ने मध्यरात्रि 2 बजे अंतिम बजट मंजूर कर दिया
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचा अंतिम अर्थसंकल्प मध्यरात्री 2 वाजता मंजूर करण्यात आलाय. स्थायी समिती सभापती यांनी अर्थसंकल्प महासभेपुढे सादर केल्यानंतर त्यावर सर्व सदस्यांच्या सूचना घेण्यात आल्या. मंगळवारी 12 वाजता सुरु झालेली अर्थसंकल्पिय विशेष सभा मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सुरु होती. सर्व सदस्यांच्या सूचना ऐकून घेत मध्यरात्री 2 वाजता नवी मुंबई महानगरपालिकेचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आलाय. सर्वसमावेशक आणि विकासाभीमुख अर्थसंकल्प शहरातील नागरिकांना दिलासा देणारा तर प्रशासनाला जबाबदारी देणारा असल्याचे मत महापौर सुजाता पाटील यांनी व्यक्त केलेय.0
0
Report
शिवाजी पेठ में मटन 600 रुपये किलो: कीमत घटाकर लोगों को राहत
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरातील शिवाजी पेठेत सकाळपासून नागरिकांनी मोठी रांग लावली आहे.. ही रांग गॅस सिलेंडर घेण्यासाठी नाहीतर चक्क मटण खरेदी करण्यासाठी लागली आहे. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या शिवाजी पेठेत आज माही आहे, या माही निमित्त पेठेतल्या लोकांसाठी कमी दरात मटन उपलब्ध करून देण्यात आला आहे.. इथ 800 रुपये किलोचे मटण चक्क 600 रुपये किलोला दिले जात आहे. याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी.0
0
Report
Advertisement
