icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

2016 में 24 गांव जोड़ने के बाद अकोला महानगरपालिका के विस्तार के बावजूद नागरिक नाराज़

Akola, Maharashtra:सन २०१६ में २४ गावांचा समावेश करून अकोला महानगरपालिकेची हद्दवाढ करण्यात आली; मात्र “हद्दवाढ म्हणजे विकास” हे स्वप्न आजही अपूर्णच राहिल्याची तीव्र नाराजी नागरिकांमध्ये पाहायला मिळत आहे. मूलभूत सुविधांचा अभाव आणि वाढते कर यामुळे नागरिक संतप्त झाले आहेत.हद्दवाढीतील प्रभाग क्रमांक ३, ४, ५, १२, १३ आणि १४ मध्ये आजही पाणीटंचाई, खराब रस्ते, अपुरी स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्न कायम आहे. नागरिकांना अपेक्षित असलेल्या सोयीसुविधा मिळालेल्या नाहीत. उलटपक्षी, मालमत्ता करासह विविध करांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याने नागरिकांचा रोष अधिकच तीव्र झाला आहे.या पार्श्वभूमीवर वंचित बहुजन आघाडी, अकोला पूर्व शहराच्या वतीने गांधी-जवाहर बाग ते महानगरपालिका असा भव्य मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मोठ्या संख्येने नागरिकांनी सहभाग घेत आपल्या समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नागरिकांच्या या वाढत्या संतापामुळे प्रशासनावर दबाव वाढत असून, आता महानगरपालिका यावर काय भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report
Advertisement

सप्तशृंगी गढ़ मंदिर की चांदी में 22 किलो की कमी, जांच जारी

Nashik, Maharashtra:सप्तशृंगी गडावरील आदिशक्तीची चांदी गायब झाल्याचा दावा... अंमळ अपडेट... देवीच्या साडेतीन शक्ती पीठांपैकी पूर्णपीठ असलेल्या श्री सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गर्भगृहातील चांदीमध्ये २२ किलोची तफावत चौकशीत आढळून आली आहे. मंदिरातील ही २२ किलो चांदी नेमकी कुठे गायब झाली? सध्या कळवण प्रथम वर्ग दंडाधिकारी यांच्याकडे चौकशी सुरू आहे. १३-१४ किलोचा फरक असल्याचे निष्कर्ष या चौकशेत आढळले आहेत. गेल्या २२ वर्षात चांदीत घट झाली असल्याचा दावा सप्तशृंग गड व्यवस्थापनाने केला आहे. वास्तव्य वजनानुसार ४०६ किलो असलेली चांदी ३८६ किलो झाली असल्याने २२ किलोची तफावत आढळली. विश्वस्तांनी वजन तपासताना ही बाब समोर आली. या प्रकरणी ट्रस्टचे तत्कालीन अध्यक्ष, विश्वस्तांसह संबंधित जबाबदार अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी झाली आहे. भाविकांनी दान केलेली चांदी मंदिर गाभऱ्यात ठेवली जाते. सन १९९८ ते २०१४ या काळात ४०६ किलो चांदी नसून ३९७ किलो चांदी विश्वस्त मंडळाने गाभाऱ्यात लावली होती; पुढे काहीकाळात ३८३ किलो भरली होती. १३-१४ किलोचा फरक तीन महिन्यांपासून चौकशीत उघड होत आहे. चांदीमध्ये कुठेही अपहार झाला नाही असे ट्रस्टच्या प्रभारी व्यवस्थापक म्हणाले. श्रद्धास्थान असलेल्या सप्तशृंगी गडावर भाविकांची गर्दी... दान केलेली चांदी गाभाऱ्यात ठेवली जाते. १४ किलोची तफावत असल्याची तक्रार शंकास्पद. चौकशीमध्ये सत्य समोर येईल. अंतिम निष्कन्न होईपर्यंत चौकशी चालणार आहे.
0
0
Report

जगताप धमकी मामले पर नेताओं की संयमित प्रतिक्रिया; आबिटकर बाईट मुद्दे पर जाँच के निर्देश

Kolhapur, Maharashtra:मंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे ऑन बीड जिल्ह्यात महिला रुग्ण जमिनीवर बेड मी तिथल्या अधिकारांशी बोललो, संबंधित पेशंटची देखील बोललो, दर महिन्याला जो कॅम्प आयोजित करतात, त्या कॅम्पमध्ये पेशंट संख्या अचानक वाढली, त्यामुळे पेशंटला थोडासा त्रास झाला. डेप्युटी डायरेक्टरांना वस्तुस्थिती काय ? याची चौकशी करायला सांगितले आहे. अशा प्रकारच्या घटना घडू नयेत यासाठी जी कारवाई करावी लागेल ते करायच्या सूचना दिल्या आहेत. On जगताप प्रशांत आंबी धमकी प्रकरण लोकप्रतिनिधी म्हणून अशा घटना होणे बरोबर नाही. हा विषय ज्या पद्धतीने झाला तो अपेक्षित नाही. अशा घटनेबाबत आम्हा मंडळींनी संयमाने जायला हवे. अशा प्रकारच्या घटना घडल्यानंतर प्रतिक्रिया उमटणे स्वाभाविक आहे. प्रत्येकाला मनाप्रमाणे मागणी करण्याची मुभा आहे. सार्वजनिक जीवनात लोकप्रतिनिधी यांनी अतिशय संयमाने गेले पाहिजे. कारण त्यांना साठी सामुदायिक आचारसंहिता असते, त्यामुळे समज द्यायला पाहिजे असं काही नाही. या घटने संदर्भात आमचे मुख्य नेते त्यांच्याशी बोलतील आणि त्यांना सूचना देतील.
0
0
Report

शिवाजी महाराज के सम्मान को अडिग रखने की मांग, नेताओं ने माफीनामा जारी किया

Buldhana, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराजांचा सन्मान अबाधित ठेवावा. प्रकाशाला केलेल्या अयोग्य शब्दांबद्दल गायकवाडांची दिलगिरी. तर पुस्तकांमधील एकेरी नाव न घेता आदराने घ्या, आणि महाराजांचे एकेरी नाव घेऊन करोडो हिंदूंचा अपमान करू नका. शिवाजी कोण होता या पुस्तिकेचे प्रकाशक प्रशांत आंबी यांना आमदार संजय गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली होती. यांबद्दल त्यांनी आता दिलगिरी व्यक्त केलीय. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराजांचा उल्लेख नेहमी सन्मानपूर्वकच व्हावा, ही आपली ठाम भूमिका असल्याचे आमदार संजय गायकवाड यांनी स्पष्ट केले आहे. Related पुस्तकातील एकेरी उल्लेखांवर आक्षेप घेत त्यांनी हा विषय वादाचा नसून संस्कार आणि आदराचा असल्याचे मत व्यक्त केले. दरम्यान, अलीकडील वादात आपल्या तोंडून काही अयोग्य शब्द गेले असल्याची जाणीव व्यक्त करत त्यांनी मनापासून दिलगिरीही व्यक्त केली. तसेच, छत्रपती शिवरायांविषयी निष्ठा आणि सन्मान कायम ठेवत संबंधितांनी योग्य ती दुरुस्ती करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलीय. महाराजांचा अपमान करून करोडो हिंदूंचा अपमाना करू नये अशी अपेक्षा सुद्धा त्यांनी केलीय.
0
0
Report
Advertisement

महिला आरक्षण पर राजनीति तेज, कांग्रेस ने बीजेपी पर प्रचार-झूठ का आरोप लगाया

Akola, Maharashtra:महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून पुन्हा एकदा राजकारण तापताना दिसत आहे. भाजपकडून “नारीवंदन”च्या नावाखाली दिशाभूल केली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर यांनी केला आहे. यशोमती ठाकूर म्हणाल्या की, “नारीवंदन” या नावाचा कोणताही उल्लेख संबंधित अमेंडमेंट बिलमध्ये नाही. तरीही भाजपकडून खोटा प्रचार केला जात आहे. 2023 मध्ये महिला आरक्षणाचा कायदा लोकसभा आणि राज्यसभेत सर्वानुमते मंजूर झाला होता, मग आता भाजप हे नाटक का करत आहे, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. त्या पुढे म्हणाल्या की, भाजप दुहेरी भूमिका घेत आहे. जर खरंच महिलांना आरक्षण द्यायचं असेल, तर 2023 च्या कायद्याच्या आधारे ते तात्काळ लागू करता येऊ शकते. मात्र भाजप महिलांच्या नावाखाला पुनर्रचना (डिलिमिटेशन) प्रक्रियेला पुढे रेटत आहे. काँग्रेसचा महिला आरक्षणाला विरोध नसल्याचं स्पष्ट करत ठाकूर यांनी सांगितलं की, आरक्षण देण्याआधी संविधानानुसार जातनिहाय जनगणना, पुनर्रचना आयोगाची नियुक्ती आणि त्यानंतर डिलिमिटेशन प्रक्रिया पार पडली पाहिजे.
0
0
Report

लासलगाव में लैंगिक शोषण व जादू टोणा के आरोप: भोंदू महेश गिरी निफाड अदालत में पेश किया गया

Yeola, Maharashtra:लासलगाव (नाशिक) :ब्रेकिंग - लैंगिक शोषण व जादू टोणा संदर्भात है लासलगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल... भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे याला केले निफाड न्यायालयात हजर... निफाड येथील प्रथम वर्ग न्यायाधीश श्रीमती एस.एस. सुक्रे यांच्या समोर केले हजर... सरकारी अभियोक्ता ॲड. मनोज तोरणे यांनी लैंगिक शोषण व जादू टोणा सारखे गंभीर स्वरूपाचा गुन्हा असल्याचे केले होते युक्तिवाद... 7 दिवसांची तपास कामी पोलीस कोठडीची केली होती मागणी.... 5 दिवसांची भोंदू महेश गिरी उर्फ महेश दिलीप काकडे ला निफाड न्यायालयाकडून पोलीस कोठडी... बाईट:- दिपक पाटील - सहाय्यक निरीक्षक लासलगाव पोलीस ठाणे
0
0
Report

टेंबा अस्पताल में 1.65 करोड़ रुपये की एक्सपायर्ड दवाओं का घोटाला; मंत्री ने जांच के आदेश दिए

Mira Bhayandar, Maharashtra:मीरा-भाईंदरमध्ये टेंबा रुग्णालयातील तब्बल १ कोटी ६५ लाखांच्या एक्स्पायरी औषधांच्या कथित घोटाळ्यामुळे खळबळ उडाली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज टेंबा रुग्णालयाची अचानक पाहणी करत हा प्रकार उघड केल्याचा दावा केला. २७ मार्च रोजी सक्षम फाउंडेशनमार्फत रुग्णालयात देण्यात आलेल्या औषधांची एक्सपायरी अवघ्या ४८ तासांवर असल्याचे समोर आले. विशेष म्हणजे ही औषधे रुग्णालयाने मागवलेली नव्हती. डॉक्टर आणि अधिकाऱ्यांच्या सतर्कतेमुळे ही औषधे वापरण्यास नकार देण्यात आला आणि संभाव्य धोका टळला. या प्रकरणात काही लोकप्रतिनिधींच्या उपस्थितीत आणि दबावाखाली हा प्रकार घडल्याचा आरोपही करण्यात आला आहे. मंत्री सरनाईक यांनी संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश देत, “गोरगरिबांच्या जीवाशी खेळणाऱ्यांना सोडणार नाही,” असा इशारा दिला आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में आयरन ओर मालढक्का से प्रदूषण बढ़ेगा; विरोध शुरू

Chandrapur, Maharashtra:टायटल: प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का, पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी मूल रेल्वे स्थानकावर हा मालधक्का प्रस्तावित, नगर परिषद और नागरिकांनी सुरू केलाय प्रचंड विरोध अँकर: प्रदूषणाच्या क्रमवारीत अव्वल असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यात आणखी एक मालधक्का येऊ घातलाय. पोलाद निर्मितीसाठी लागणाऱ्या आयर्न ओरच्या वाहतुकीसाठी हा मूल रेल्वेस्थानकावर हा मालधक्का प्रस्तावित असून, याला नागरिकांनी प्रचंड विरोध सुरू केलाय. व्हीओ १) चंद्रपूर जिल्ह्यातील मूल या तालुक्याच्या ठिकाणच्या रेल्वेस्थानकावर रेल्वेकडून मालधक्का प्रस्तावित आहे. प्रारंभी हा मालधक्का तांदळाच्या वाहतुकीसाठी नियोजित होता. मुल तालुका तांदूळ उत्पादक भाग असल्याने त्याची वाहतूक देशात सर्वत्र व्हावी, यासाठी या मालधहक्‍याचे प्रयोजन होते. मात्र आता वेगळाच घाट घातला जात आहे. मुल रेल्वे स्थानक परिसरात रेल्वेरुळाच्या बाजूलाच प्रदूषणात मोठी भर घालणाऱ्या खनिजासाठी हा मालधक्का निर्माण करण्याचे प्रयत्न काही राजकारणी करीत आहेत. सुरजागड इथून उत्खनन केलेल्या लाल रंगाच्या लोहयुक्त दगडांची (आयर्न ओर) वाहतूक देशभरातील लोह निर्मिती प्रकल्पांना करता यावी, यासाठी हा प्रयत्न चाललाय. गडचिरोली जिल्ह्यातील अनेक भाग या लोहखनिज वाहतुकीने लाल झाले आहेत. नदी नाल्यातील पाणीही लाल होऊन प्रदूषित झाले आहे. यावर पर्यावरणवादी ओरड करीत असतानाच हे खनिज सुरजागड इथून मुलला आणला जाणार आणि रेल्वेने तो देशभर पाठवले जाणार आहे. यासाठी हा मालधक्का प्रस्तावित आहे. मूल नगरपालिका ने एकमताने ठराव घेत हा मालधक्का विरोध केला असून, गरज पडल्यास रस्त्यावर उतरू असा इशारा नगराध्यक्षांनी दिला.
0
0
Report

अहिल्यानगर में गर्मी से पानी की किल्लत: 43 गांवों में 20 टैंकर

Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यात उन्हाचा कडाका दिवसेंदिवस वाढत असून अनेक तालुक्यांमध्ये पाणीटंचाई जाणवू लागली आहे. जिल्ह्यात सध्या 43 गावांमध्ये पाणीपुरवठ्यासाठी 20 टँकर सुरू करण्यात आले आहेत. यामध्ये पारनेर आणि संगमनेर तालुक्यांमध्ये सर्वाधिक टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे. संगमनेर तालुक्यात 7 तर पारनेरमध्ये 8 टँकर सुरू आहेत. अकोले तालुक्यात 2 आणि नगर तालुक्यात 3 टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू आहे. जिल्ह्यातील पाणीटंचाई लक्षात घेऊन आवश्यक त्या ठिकाणी टँकर सुरू केले आहेत. नवीन प्रस्ताव प्राप्त होताच त्यानुसार तातडीने कारवाई करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी पंकज अशा यांनी म्हटला आहे. तसेच इतर गावांमधूनही टँकरसाठी प्रस्ताव दाखल होत असून प्रशासनाकडून त्यावर तत्काळ कार्यवाही सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे.
0
0
Report
Advertisement

रायगड़ पुलिस में अश्लील बातचीत के मामले में एक अधिकारी और एक कर्मचारी निलंबित

Chendhare, Maharashtra:रायगड़ पुलिस दलात एक अधिकारी आणि एका कर्मचाऱ्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. महिलेशी असभ्य भाषेत संभाषण केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला आहे. खोपोली पोलिस ठाण्यात कार्यरत सहाय्यक पोलिस निरीक्षक नितीन मोहिते आणि पेण पोलिस ठाण्यातील हवालदार प्रकाश कोकरे यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करत त्यांना सेवेतून निलंबित करण्यात आलं आहे. एका राजकीय पक्षाची पदाधिकारी असलेल्या महिलेला व्हॉट्सअप कॉल करून असभ्य भाषेत संभाषण केल्यावरून ही पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी ही कारवाई केली आहे.
0
0
Report

नाशिक मल्टीनेशनल कंपनी मामले में चार आरोपी फिर से पूछताछ के लिए ताब्यात

Nashik, Maharashtra:नाशिक मल्टिनॅशनल कंपनीतील अत्याचार, विनयभंग आणि धर्मातर प्रयत्न प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेल्या चार आरोपींना एसआयटीने अन्य गुन्ह्याप्रकरणी काल दुपारी पुन्हा चौकशीसाठी ताब्यात घेतले. तीन तास त्यांची कसून चौकशी करण्यात आली. वेगवेगळे गुन्हे अटकेतील सातही संशयितांवर दाखल आहेत. देवळाली येथे दाखल गुन्ह्यातील प्रमुख संशयिताच्या घराची एसआयटीने झडती घेता आली आणि घरातून मल्टिनॅशनल कंपनीतील 피해तिचे आधारकार्ड, पॅनकार्ड तसेच 피해ची कपडे ताब्यात घेण्यात आल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिलीये. 피해तिची वैयक्तिक महत्त्वाची ओळखपत्रे संशयिताने आपल्याजवळ का बाळगली होती, याच्या तपासावर आता जोर देण्यात आलाय. २६ मार्च २०२६ रोजी २५ वर्षीय महिला कर्मचाऱ्याने दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान यांच्याविरुद्ध देवळाली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर धार्मिक भावना दुखावणे, धर्मातराचा प्रयत्न तसेच अत्याचाराचा गुन्हा दाखल केलाय. या गुन्ह्याचा तपास जवळपास एसआयटीने पूर्ण केला असून लवकरच आरोपपत्र दाखल केले जाणार आहेत. काही महत्त्वाचे पुरावे या गुन्ह्याप्रकरणी पोलिसांना प्राप्त झाले आहे. या गुन्ह्यातील महिला कर्मचाऱ्याने दिलेल्या जबाबानंतर यातील मुख्य आरोपीच्या घरातून तिची काही महत्त्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिलीये. संशयित आरोपीने पीडिताच्या नावावर बँक अकाऊंट उघडल्याचाही संशय आहे. यातल्या सगळ्या संशयतांना आज न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.
0
0
Report

रास्ता नहीं मिलने से शव ग्राम पंचायत कार्यालय के सामने लाया गया; प्रशासन पर आक्रोश

Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने संतप्त नातेवाईकांनी मृतदेह थेट ग्राम पंचायत कार्यालयसमोर नेत सरन रचले. नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील दापशेड येथील ही घटना आहे. रस्त्याच्या मागणीसाठी अनेकदा ग्रामपंचायत व महसूल प्रशासनाला निवेदने देऊनही कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. काल गावातील एका महिलेचे दुःखद निधन झाले. मात्र, स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्यामुळे तिच्या अंत्यसंस्कारासाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. अंत्यसंस्कारासारख्या अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील विधीलाही अडथळे निर्माण झाल्याने ग्रामस्थांनी प्रशासनाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. संतप्त नातेवाईक आणि ग्रामस्थांनी मृतदेह थेट ग्रामपंचायत कार्यालयात आणून ठेवत समोरच सरन रचले. दरम्यान घटनास्थळी पोलीस पोहोचले असून नातेवाईकांची समजूत काढणे सुरु आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top