445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शाहिद समीर संदी ने कबूला; हिंदू लड़कियों से शारीरिक संबंध, वीडियो-फोटो डिलीट, सजा मांग
Kolhapur, Maharashtra:माझे अनेक हिंदू मुलीशी शारीरिक संबंध होते.. मी त्याचे अश्लील व्हिडिओ आणि फोटो मोबाईल मध्ये ठेवले होते. मी आता ते सगळे डिलीट करत आहे. असल्याची कबुली स्वतः आरोपी शाहीद समीर सनदी याने दिली असल्याचे समोर आले आहे. सकल हिंदू समाजाने मला चांगली समज दिली आहे असून या पुढच्या काळात हिंदू मुलीच्या नादाला लागणार नाही असे देखील आरोपी शाहीद समीर सनदी म्हणाला आहे. त्याच्या वडिलांनी देखील मुलाने केलेल्या कृत्याबद्दल माफी मागितली आहे.. त्याचबरोबर पोलिसांनी त्याच्यावर कडक कारवाई करून त्याला फाशीची शिक्षा द्यावी अशी मागणी केली आहे.0
0
Report
यवला में जलसंकट गहरा, 23 गाँवों को 19 टैंकर पानी पहुँचाने लगे
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात उन्हाचा कडाका वाढल्याने भूजल पातळी मोठ्या प्रमाणात खालावली असून भीषण पाणीटंचाई निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर ममदापूर, राजापूर, खरवंडी, देवदरी, अंकाई, कोळम, अडसरे, देवठाण, भुलेगाव, आहेरवाडी यांसह एकूण 23 गावे आणि 8 वाड्यावस्त्यांना सध्या 19 टँकरद्वारे पाणीपुरवठा करत तहान भगवली जात आहे तर नगरसुल, रेंडाळे, सोमठाणा जोश, वागळे यांसह आणखी 13 गावे व 19 वाड्यावस्त्यांसाठी टँकर सुरू करण्याचे प्रस्ताव येवला प्रांत कार्यालयात प्रलंबित असून या प्रस्तावांना आज बैठकीत प्रांत अधिकारी बाबासाहेब गाढवे मंजुरी देणार असून उद्यापासून नव्या भागांमध्येही टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू होणार आहे त्यामुळे टँकरची संख्या आणखी वाढणार असल्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी0
0
Report
धाराशिव में गर्मी से मवेशी बचाने के लिए फॉगर मशीन का सहारा
Dharashiv, Maharashtra:उन्हाचा कडाका वाढला; धाराशिवमध्ये जनावरांसाठी ‘फॉगर’चा आधार. जनावरांना उष्माघातापासून वाचवण्यासाठी शेतकऱ्याने धरली आधुनिकतेची कास धाराशिव जिल्ह्यात उष्णतेची लाट तीव्र होत असून तिचा फटका आता जनावरांनाही बसू लागलाय. तापमान वाढल्यामुळे दूध उत्पादनात घट होत असतानाच उष्माघाताचा धोका वाढलाय. मात्र, पशुपालक आता आधुनिक उपायांचा आधार घेत जनावरांचं संरक्षण करताना दिसत आहेत धाराशिवच्या कळंब शिवारातील शेतकरी बाळासाहेब धस यांनी आपल्या गोठ्यात तब्बल 50 म्हशीचा सांभाळ केलाय. वाढत्या उन्हामुळे जनावरांचं आरोग्य धोक्यात आलं, दूध उत्पादन घटलं… त्यामुळे मोठं संकट उभं राहिलं. या संकटावर मात करण्यासाठी धस यांनी गोठ्यात ‘फॉगर मशीन’ बसवलंय. तुषार सिंचन पद्धतीने दिवसातून दर एका तासाला पाण्याचा शिडकावा केला जातो. त्यामुळे गोठ्यातील तापमान नियंत्रित राहत असून जनावरांना उष्णतेपासून दिलासा मिळतोय. या आधुनिक उपायामुळे उष्माघाताचा धोका कमी झाला असून जनावरांच्या आरोग्यात सुधारणा दिसून येतेय. दूध उत्पादनातील घटही काही प्रमाणात नियंत्रणात येत असल्याचं पशुपालक सांगतात. दुधापेक्षा जनावरांचं जगणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे फॉगर लावून त्यांची काळजी घेतोय.0
0
Report
Advertisement
लातूर में भीषण गर्मी से पोल्ट्री उद्योग पर असर, मौतें और अंडे उत्पादन घटा
Latur, Maharashtra:लातूर जिले में बढ़ते तापमान का पोल्ट्री व्यवसाय पर असर दिख रहा है. तीव्र गर्मी के कारण कोंबडों की मौत हो रही है और अंडे उत्पादन में कमी आई है. तापमान कम-से-कम 40 से अधिक पहुंचने पर कोंबडों के स्वास्थ्य पर असर पड़ रहा है, श्वसन विकार, भूख कमी और कमजोरी बढ़ रही है. उष्माघात से तिहाई मौतों की सूचना भी मिली है. पोल्ट्री फार्म में उत्पादन खर्च बढ़ रहा है और लाभ घट रहा है. इससे क्षेत्रीय पोल्ट्री उद्योग संकट के दौर से गुजर रहा है.0
0
Report
मीरा भाईंदर मामले में आतंकी लिंक की आशंका, महाराष्ट्र पुलिस की जाँच तेज
Nagpur, Maharashtra:नागपूर संजय निरूपम (शिवसेना नेते) On मीरा भाईंदर घटना - एक माथेफिरू आला होता ..तो आतंकवादी है की त्याचा कोणासोबत संबंध आहे.. याचा तपास सुरू आहे.. *पहलगाम येथील घटनेप्रमाणे मीरा भाईंदर येथील घटना.. सुरक्षारक्षकांना धर्म विचारून कलमा वाचण्यास सांगितल.. ते वाचू शकले नाहीत म्हणून त्याच्यावर हल्ला केला..* - ही दुर्दैवी घटना आहे.. ऐसी घटना कुठेही होता कामा नये.. महाराष्ट्र पोलीस आणि एटीएस अधिकारी कार्यक्षम आहेत.. याची चौकशी होऊन याचे मागे कोण हे माहिती व्हायला हवं.. - लव्ह जिहाद कार्पोरेट जिहाद सारखे प्रकरण असताना एखाद्या ग्रुपचे आपल्या डोळे तर नाही ना.. किंवा महाराष्ट्रातील लोकांना डिस्टर्ब करण्यासाठी लक्ष केले जात आहे का.. असे वाटत आहे.. मात्र अधिकारी यामागे कोण त्याला पकडून हा विषय संपवतील असा विश्वास आहे.. - आरोपीवर कोणतीही दया दाखवण्याची गरज नाही.. आरोपीच्या मागे कोण आहे.. त्याचा मास्टर माइंड कोण हे देखील तपासणं गरजेचं आहे.. हे एका व्यक्तीचे काम नाही तर यामागे एका आतंकवादी संघटन काम करत आहे.. त्याचा पाकिस्तानातील आतंकवादी संघटनांसोबत काही संबंध आहे का.. त्याचा पण तपास व्हायला hवे.. On विधान परिषद - एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वेसर्वा आहेत.. कोणाला उमेदवारी द्यायची की नाही ते सर्व एकनाथ शिंदे पाहतात.. यावर जो निर्णय होईल ते एकनाथ शिंदे यांच्या लेव्हलवर होणार.. - दहावा उमेदवार देण्यासंदर्भात चर्चा आहे.. आमच्याकडे असलेल्या संख्याबळानुसार दोन विधान परिषद सदस्य आम्ही निवडून आणू.. गरज पडली तर छोटे पक्ष आणि अपक्ष आमच्या संपर्कात असतात. त्यांची सर्वांची इच्छा असली तर अजून एक उमेदवार देण्यासंदर्भात विचार होईल.. - दोन व्यतिरिक्त अजून एक उमेदवार आम्ही निवडून आणू शकू तर पुढे कोण आहे.. त्यामुळे काही फरक पडत नाही.. On उद्धव ठाकरे बिनविरोध. - *शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मोठा फरक आहे.. शरद पवार महाराष्ट्रातील ज्येष्ठ नेते आहेत.. उद्धव ठाकरे इतके मोठे नाहीत की त्यांना निवडून आणण्यासाठी नऊ जागांवरच निवडणुका झाल्या पाहिजे..* On मराठी सक्ती.. - या संदर्भात प्रताप सरनाईक यांनी काल बैठक बोलावली होती.. बैठकीत मराठी भाषेचा ज्ञान सर्वांना हवा असा सर्वांचा सुर होता.. सोबतच महाराष्ट्रातील सर्वांना मराठीत संवाद साधला पाहिजे.. मात्र मराठी बोलला नाही तर तुमची परमिट किंवा लायसन रद्द करू अशी शक्ती आपण जेव्हा करतो.. ते चुकीचं धोरण दिसतो यामुळे उपवासमारीच संकट येऊ शकतो.. असाही एक सूर होता.. - त्यावर मंत्री महोदयांनी पूर्वीच्या जीआरमध्ये सुधार करण्याचा आश्वासन दिल.. ऑटो चालक टॅक्सी चालक यांना मराठी येत नाही त्यांना प्रशिक्षण देऊन तयार करू . आणि मराठीत बोलतील अशी व्यवस्था तयार करणार...0
0
Report
एसटी में बुजुर्गों को मुफ्त यात्रा, 2 रुपयों के स्वच्छता शुल्क से नाराजगी
Nanded-Waghala, Maharashtra:ज्येष्ठ नागरिकांचा प्रवास सुखकर करण्यासाठी सरकारने त्यांना मोफत सवलत दिली आहे. मात्र याच ज्येष्ठ नागरिकांकडून आता स्वच्छता अधिभाराच्या नावाखाली 2 रुपये घेतले जात आहेत. 2 रुपये किंमत जास्त नसली तरी सुट्या 2 रुपयांसाठी मात्र ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. परिवहन महामंडळाकडून चालवली जाणारी बस सेवा सर्वसामान्य नागरिकांसाठी मोठा आधार आहे. मोडकळीस आलेल्या बसेस, कोलमडलेले वेळापत्रक, बेजबाबदार चालक, अस्वच्छता अश्या अनेक तक्रारी असल्या तरी एस टी बस आजही सर्वासामान्यांची वाहतूकीसाठीची पसंत आहे. पण एस टी महामंडळाच्या एका नव्या निर्णयामुळे ज्येष्ठ नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतोय. अमृत ज्येष्ठ नागरिक योजने अंतर्गत 75 वर्षाखालील नागरिकांना एस टी प्रवास मोफत आहे. पण एस टी ने ज्येष्ठ नागरिकांसोबतच सर्वाना 2 रुपये स्वच्छता अधिभार लावलाय. मोफत प्रवास असला तरी 2 रुपये ज्येष्ठ नागरिकांनाही द्यावे लागत आहेत. तसे 2 रुपये फार काही जास्त नाहीत. पण 2 रुपये सुटे नसल्याने अनेकदा ज्येष्ठ नागरिकांना कटकट सहन करावी लागत आहे. स्वच्छतेच्या नावाखाळ dva दोन रुपये अधिभार लावण्यात येत आहे. मात्र हे दोन रुपये नेमके कोणत्या स्वच्छतेसाठी वापरले जात आहे हा प्रश्न आहे. बसस्थानकावर सगळीकडे अस्वच्छता दिसते. शौचालय आणि इतर जागी तर नेहमीच घाण साचलेली असते. प्रवाशांची बसण्यासाठीची व्यवस्था असलेल्या ठिकाणीही अस्वच्छता दिसून येते. बसेस मध्येही अस्वच्छता असते मग हा स्वच्छता कर नेमका लावला कशासाठी जातोय असा प्रश्न प्रवासी विचारत आहेत. सुटे दो रुपये नसल्याने अनेकदा प्रवाशी आणि प्रवाशांमध्ये वादावादीच्या घटना घडत आहेत. केवळ प्रवाशीच नव्हे तर एसटी कर्मचाऱ्यांसाठीही ज्येष्ठ नागरिकांकडून वसुल करणे अवघड होत आहे. त्यामुळे किमान ज्येष्ठ नागरिकांना या दोन रुपये स्वच्छता करातून सवलत देण्यात यावी अशी मागणी होतेय.0
0
Report
Advertisement
यवला- पुणे इंदोर मार्ग पर भारी ट्रैफिक जाम, मरीजों को परेशानी
Yeola, Maharashtra:नाशिकच्या येवला शहरातून जाणाऱ्या पुणे इंदोर महामार्गावर वाहतुकीची मोठी कोंडी झाली असून पाच किलोमीटर पर्यंत लांब राहायला लागल्याने नागरिक संतप्त झाले आहेत. येवला शहरात उपजिल्हा रुग्णालयासमोरून हा महामार्ग जात असल्याने रुग्णसेवेला याचा फटका बसत असून अनेक रुग्णवाहिका या ठिकाणी अडकून पडत असतात, त्यामुळे रुग्णांचा जीवदेखील धोक्यात आला आहे. त्यामुळे येवला शहराला लवकरात लवकर उड्डाणपूल अथवा बायपास मंजूर करावा अथवा महत्त्वाच्या चौकावर रुग्णांना येवला येथे कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नेमणूक करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे. या संदर्भात आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी सुदर्शन खिल्लारे यांनी.0
0
Report
कोकण में पोट चुनाव: सिंधुदुर्ग की 14 ग्रामपंचायतों में मतदान शुरू
Oras Bk., Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात १४ ग्रामपंचायतच्या पोट निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 5 सरपंच पद व 9 ग्रामपंचायतीच्या सदस्य पदासाठी ही पोट निवडणूक होत आहे. आज एकूण १४ हजार २१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सकाळ पासून अगदी शांततेत मतदान प्रक्रियेला सुरवात झाली असून. कोकणात लग्नाचा हंगाम असल्याने एक नवरदेवाने बोहल्यावर चढण्यापूर्वी मतदान केलं.0
0
Report
धाराशिव में 29-30 मई को 32वां अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य सम्मेलन उद्घाटन सुमित्रा पवार
Dharashiv, Maharashtra:उपमुख्यमंत्री सुमित्रा पवार यांच्या हस्ते साहित्य संमेलनाचे उद्घाटन. धाराशिव मध्ये 29 व 30 मे रोजी रोजी साहित्य संमेलन होणार संपन्न. धाराशिवमध्ये साहित्यप्रेमींसाठी मोठी पर्वणी ठरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद आयोजित ३२ व्या अखिल भारतीय नवोदित मराठी साहित्य संमेलनाचे उद्घाटन सुमित्रा पवार यांच्या हस्ते होणार आहे. मुंबई येथे साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शरद गोरे यांनी सुमित्रा पवार यांना अधिकृत निमंत्रण दिले. यावेळी संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरणही त्यांच्या हस्ते करण्यात आले. २९ आणि ३० मे २०२६ रोजी धाराशिव येथील छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृहात हे संमेलन पार पडणार असून, सुप्रसिद्ध साहित्यिक डॉ. नंदकुमार राऊत अध्यक्षस्थानी असणार आहेत. देशभरातील सुमारे ९०० साहित्यिक या संमेलनात सहभागी होणार असून, याआधी पु. ल. देशपांडे, जावेद अख्तर, शिवाजी सावंत, शरद पवार यांसारख्या मान्यवरांनीही या संमेलनाचे उद्घाटन केले आहे.0
0
Report
Advertisement
नाशिक जलस्तर घटाव: 26 परियोजनांमध्ये 41.61% जल शिल्लक
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - उन्हाच्या तडाख्यात नाशिकच्या धरणसाठ्यात घट - २६ प्रकल्पांत ४१.६१ टक्के पाणी शिल्लक - जिल्ह्यातील २६ मोठ्या-मध्यम धरणांमध्ये सध्या २९,३८५ दलघफू उपयुक्त जलसाठा उपलब्ध - गेल्या वर्षीच्या तुलनेत साठा दहा टक्क्यांनी जास्त असला तरी अवघ्या दहा दिवसांत ३.४२ टक्क्यांची घट नोंद - वाघाड आणि पुणेगाव धरणात जलसाठा दहा टक्क्यांच्या खाली, काही भागांत पाणीटंचाईची चाहूल - वाढते तापमान, बाष्पीभवन आणि ग्रामीण भागातील वाढती मागणी यामुळे प्रशासन सतर्क - जिल्ह्यातील काही गावांसाठी ६१ टँकरच्या फेऱ्या सुरू, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता - जलसंपदा विभागाकडून स्थानिक स्वराज्य संस्था आणि नागरिकांना काटकसरीच्या वापराचा इशारा - या संदर्भात गंगापूर डॅम वरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी0
0
Report
सोलापूर के भोंदू बाबा मनोहर भोसले के खिलाफ आर्थिक धोखाधड़ी केस में कोर्ट आज फैसला देगा
Pandharpur, Maharashtra:Anchor - सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले याच्या भोवतीचा फास पोलिसांनी आवळला, आज न्यायालयात हजर करणार पुन्हा पोलीस कोठडी की न्यायालयीन कोठडी याचा निर्णय होणार सोलापूर जिल्ह्यातील भोंदू बाबा मनोहर भोसले याला जादूटोणा अर्थिक फसवणूक गुन्ह्याखाली कुर्डूवाडी पोलिसांनी अटक केली आहे. त्याची न्यायालयीन कोठडी आज संपत आहे. याच प्रकरणात मनोहर भोसले यांच्या शिवसिद्धी ट्रस्ट चा सदस्य नरेंद्र सांगळे याला कुर्डूवाडी पोलिसांनी अहिल्या नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथून ताब्यात घेतल आहे. नरेंद्र सांगळे यांच्या माध्यमातूनच मनोहर भोसले याचे बरेचसे आर्थिक व्यवहार चालायचे. मागील तीन दिवसांमध्ये पोलिसांनी मनोहर भोसले याची चौकशी केली आहे. त्यामध्ये बारामती कर्जत उंदरगाव घोटी तसेच इतर ठिकाणच्या जमिनी कशा पद्धतीने त्याने खरेदी केल्या त्याची चौकशी झाल्याची माहिती आहे. मुळे आता पोलीस मनोहर भोसले यांच्या भोवती कारवाईचा फास आवळण्याच्या तयारीत आहेत.0
0
Report
राज्यभर में कृषि सेवा केंद्र चालक हड़ताल, इंदापुर में भी बंद
Rui, Maharashtra:राज्यात कृषी सेवा केंद्र चालकांचा संप.... पुण्याच्या इंदापुरातही राज्यव्यापी संपला प्रतिसाद राज्यभरातील खत बी बियाणे आणि कृषि औषध विक्रेते संपावर गेलेत. पुण्याच्या इंदापूर तालुक्यात ही सर्व कृषी सेवा केंद्र चालकांनी या राज्यव्यापी संपात सहभाग नोंदवत आपापली कृषी सेवा केंद्र कडकडीत बंद ठेवत या संपात सहभाग घेतला.0
0
Report
Advertisement
दौंड में मनसे का सदस्यता अभियान शुरू; तीन दिनों में दस हजार सदस्य
Rui, Maharashtra:दौंडमध्ये मनसेचे सदस्य नोंदणी अभियान.... 3 दिवसांत 10 हजार सदस्य जोडण्याचा संकल्प... ANCHOR महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सदस्य नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. दौंड शहर व तालुक्यात राबविण्यात येत असलेल्या या अभियानामध्ये, मनसेच्या पदाधिकाऱ्यांनी पुढील तीन दिवसांत तब्बल दहा हजार सदस्य जोडण्याचा संकल्प व्यक्त केला आहे. या अभियानाबाबतची माहिती यावेळी पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली...0
0
Report
मुख्यमंत्री फडणवीस ने रवि राणा को जन्मदिन की शुभकामनाएं दीं; गरीबों के लिए सेवा जारी
Amravati, Maharashtra:मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार रवी राणा यांना फोनवरून दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा; गोरगरिबांसाठी काम करतात या कामात त्यांना बळ मिळो यंदा श्रमदानातून त्यांचा वाढदिवस साजरा करणार आहे. त्यानिमित्ताने कार्यकर्त्यांनी विविध सामाजिक उपक्रम देखील राणांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केले आहे. त्यामुळे सकाळी राणा यांच्या घरासमोर गीतांचा कार्यक्रम सुरू असताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फोन करत आमदार रवी राणा यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्याचा पाहायला मिळत आहे. रवी राणा गोरगरिबांसाठी काम करतात या कामात त्यांना बळ मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना देखील मुख्यमंत्र्यांनी केल्याचं दिसून येत आहे.0
0
Report
येल्वा तालुक के नगरसुल में मौसम बदलने से किसानों को नुकसान, प्याज फसल भीगी
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील नगरसुल परिसरात हवामानाच्या लहरीपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. एकीकडे गेल्या काही दिवसांपासून कडाक्याचे ऊन पडत असून तापमानात मोठी वाढ झाली आहे. उष्णतेमुळे नागरिक त्रस्त झाले असताना, दुसरीकडे काल सायंकाळी अचानक जोरदार पावसाने हजेरी लावली. या अनपेक्षित पावसामुळे शेतात काढून ठेवलेला कांदा अक्षरशः भिजून गेला. सायंकाळी झालेल्या पावसामुळे हा कांदा ओला झाला असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.0
0
Report
Advertisement
