445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
आदिवासी विद्यार्थियों के निर्णय वापस; कांग्रेस नेता विजय वडेट्टीवार की चर्चा
Nagpur, Maharashtra:आदिवासी विद्यार्थ्यांच्या हक्कांवर गदा आणणारा निर्णय तात्काळ मागे घ्या.. विजय वडेट्टीवार यांची मागणी आदिवासी विकास विभागाने ४ ऑगस्ट २०२६ रोजी जारी केलेल्या शासन निर्णयातील विद्यार्थी, आश्रमशाळा व शासकीय वसतिगृहांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींविरोधात विदर्भातील आदिवासी विद्यार्थी संघाने केले आंदोलन.. तिथे जाऊन काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार भेट देत चर्चा केली य विद्यार्थ्यांनी अप्पर आयुक्त, आदिवासी विभाग नागपूर यांच्या कार्यालयाबाहेर आंदोलन पुकारले आहे काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवार यांनी आंदोलनाची भेट घेऊन केली चर्चा आश्रमशाळा आणि वसतिगृहां ही केवळ निवास व भोजनाची व्यवस्था नाही,ती आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षण, सामाजिक विकास, सुरक्षितता आणि भविष्यासाठीची आधारव्यवस्था आहेत त्यामुळे विद्यार्थ्यांच्या हिताला बाधा आणणारे कोणतेही निर्णय पारदर्शक चर्चा आणि विद्यार्थ्यांच्या सहभागाशिवाय लादणे अन्यायकारक आहे. दरम्यान विद्यार्थ्यांशी चर्चा केल्यानंतर विजयवाडी तिवारी यांनी आदिवासी खात्याच्या सचिवांशी टेलिफोनिक संवाद साधला विद्यार्थ्यांच्या संघटनेने मांडलेल्या प्रमुख मागण्या १) विद्यार्थ्यांशी संबंधित वादग्रस्त तरतुदींची तात्काळ पुनर्तपासणी व पुनर्विचार करावा. २) विद्यार्थ्यांना शांततामय लोकशाही मार्गाने प्रश्न मांडण्याचा अधिकार अबाधित ठेवावा. ३) आश्रमशाळा व वसतिगृहांमध्ये सुरक्षा, स्वच्छता, भोजन, पाणी आणि आरोग्य सुविधाएं सक्षम कराव्यात. ४) विद्यार्थ्यांच्या तक्रारींसाठी स्वतंत्र, गोपनीय आणि प्रभावी तक्रार निवारण यंत्रणा उभी करावी. ५) वसतिगृह प्रवेशासाठी लादण्यात येणाऱ्या अन्यायकारक अटींचा पुनर्विचार करावा. ६) अभ्यासक्रम किंवा फॅकल्टी बदलामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही, याची हमी द्यावी. ७) प्रत्येक आश्रमशाळा व वसतिगृहात पालक-विद्यार्थी संवाद समिती स्थापन करावी. ८) विद्यार्थ्यांच्या घटनात्मक अधिकारांबाबत नियमित मार्गदर्शन व जनजागृती कार्यक्रम घ्यावेत. ९) आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आवश्यक असलेल्या शिष्यवृत्ती, डिजिटल सुविधा, ग्रंथालय, इंटरनेट, क्रीडा व स्पर्धा परीक्षा सुविधा वाढवाव्यात. १०) PESA कायद्याच्या तरतुदींची प्रभावी अंमलबजावणी करावी.0
0
Report
जुन्नर सांसद डॉ. अमोल कोल्हे की प्रेस कॉन्फ्रेंस: हायवे-रेल फ्रेट कॉरिडोर संकेत
Barav, Maharashtra:खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या पत्रकार परिषदेतील पॉईंटर १. पक्षांतर्गत बैठक व जयंत पाटील यांची अनुपस्थिती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची झालेली बैठक ही केवळ जिल्हाध्यक्षांची आढावा बैठक होती. बैठकीला सुप्रिया सुळे आणि रोहित पवार उपस्थित होते; जयंत पाटील यांचे पूर्वनियोजित कार्यक्रम असल्याने ते येऊ शकले नाहीत, त्यामुळे याचे कोणतेही वेगळे राजकीय अर्थ काढू नयेत. एकत्र प्रवास केल्याने गोष्टी बदलत नसतात, असा टोलाही त्यांनी लगावला. २. पुणे-नाशिक हायवे (एलिव्हेटेड कॉरिडोअर) केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत झालेल्या बैठकीत भूसंपादनाचा तिढा सुटण्याच्या मार्गावर आहे. १० हेक्टरपैकी ६.९१ हेक्टर (PMRDA क्षेत्र) जमिनीच्या लँड रिवॉर्डचे पैसे जमा झाले आहेत; उर्वरित ३.९१ हेक्टर (PCMC क्षेत्र) जमिनीसाठी मुख्य सचिवांकडून हमीपत्र घेण्याचे निर्देश दिले आहेत. पुढील १५ दिवसांत नाशिक फाटा ते राजगुरुनगर एलिव्हेटेड कॉरिडोअरचे काम सुरू झालेले दिसेल. ३. भगवा रंग आणि भाजप प्रवेशाच्या चर्चा "छत्रपती शिवाजी महाराजांची भूमिका साकारल्यापासून माझ्याकडे भगवा रंग आहे; माझ्यासाठी भगवा हा तिरंग्याचा पहिला रंग आहे." पक्षांतर किंवा इतर राजकीय अफवांना काहीही आधार नाही. ४. पुणे-नाशिक रेल्वे आणि फ्रेट कॉरिडोअर जुना सर्व्हेक्षण मार्ग: पुणे-नाशिक रेल्वे जुन्या सर्व्हेनुसारच व्हावी, यासाठी नेमलेल्या समितीसमोर आणि पंतप्रधानांकडे संपूर्ण अभ्यास सादर केला आहे. वाकीपर्यंत कनेक्टिव्हिटी: तळेगाव-उरुळी कांचन मार्गाला स्थानिक गावांचा विरोध असल्याने तो मार्ग वाकीच्या बाजूला (चाकण चौकाच्या अलीकडे) आणला आहे, ज्यामुळे जुन्नर-आळेफाट्यावरून अवघ्या ३५ मिनिटांत रेल्वे कनेक्टिव्हिटी मिळेल. पीएम गतिशक्ती टर्मिनल: आंबेगाव आणि खेड तालुक्याच्या सीमेवर 'पीएम गतिशक्ती टर्मिनल' तसेच छत्रपती संभाजीनगर ते जेएनपीटी (JNPT) डेडिकेटेड फ्रेट कॉरिडोअरची मागणी केंद्राकडे केली आहे. ५. पालकमंत्री पदाचा वाद व विरोधकांच्या टीकेला उत्तर पालकमंत्री पदाची रस्सीखेच हा सत्ताधारी तीन पक्षांचा अंतर्गत प्रश्न असून त्यांनीच तोडगा काढावा. केवळ आंदोलने आणि विधाने करून प्रश्न सुटत नाहीत, तर प्रत्यक्ष शासन दरबारी पाठपुरावा करून कामे मार्गी लागतात. आम्ही आदरणीय शरद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठोस काम करत आहोत. Byte: डॉ अमोल कोल्हे (खासदार शिरूर लोकसभा) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे...0
0
Report
Kolhapur की इचलकरंजी में हर घर तिरंगा रैली, विद्यार्थियों ने देशभक्ति का संदेश दिया
Kolhapur, Maharashtra:नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना आणि राष्ट्रसन्मान जागृत करण्यासाठी ’हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातील इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने वस्त्रनगरी इचलकरंजी शहरात भव्य तिरंगा रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. रॅलीमध्ये शहर व परिसरातील हजारो विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी हातात तिरंगा घेऊन देशभक्तिपर घोषणांच्या माध्यमातून परिसरात राष्ट्रभक्तीचा संदेश दिला. या रॅलीमध्ये लोकप्रतिनिधी, विविध क्षेत्रांतील मान्यвар, सर्वच शाळांतील विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि नागरिक सहभागी झाले होते. विशेष म्हणजे संपूर्ण उपक्रमात राजकीय पक्षांच्या झेंड्यांऐवजी केवळ राष्ट्रध्वजाला स्थान देण्यात आल्याने संपूर्ण रॅली मार्ग तिरंगामय होऊन गेला होता.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर पुलिस ने गोवा बनावटी अवैध दारू 1.95 करोड़ रुपये का माल जप्त
Kolhapur, Maharashtra:गोवा बनावटीचा अवैध दारू साठा कोल्हापूर पोलिसांनी पकडला 1 कोटी 75 लाखांची दारू जप्त जयसिंगपूरात सापळा रचून कोल्हापूर पोलिसांची मोठी कारवाई डाक पार्सल लिहिलेल्या ट्रकातून अवैध गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक एकूण 1 कोटी 95 लाखाचा मुद्देमाल जप्त0
0
Report
नाशिक में शिवसेना का मोर्चा: खड्डे, भ्रष्टाचार और सत्ता के निशाने
Nashik, Maharashtra:सर्व नाशिककरांना जय महाराष्ट्र खड्ड्यातून वाट काढून, खड्डे तुडवत आलात ते आयुष्यातील खड्डे बुजविण्यासाठी ही रस्त्यावरची शिवसेना आहे आत मधली शिवसेना वेगळी आहे समोर महापौर आणि आयुक्त यांना संवेदना असतील तर निवेदन घ्यायला या आम्ही यमाला घेऊन आलो आहे आतमध्ये जे माजुरडे लोकं आहेत त्यांच्यावर हा रेडा सोडायचा उद्धव ठाकरेंच्या आदेशाने हा मोर्चा भाजप आणि मिंध्ये यांचे नगरसेवक कुठे गेले माझ्याकडे दहा नाव आहेत एक खून केला तर खुनाचा गुन्हा दाखल होतोय 302 चा गुन्हा गिरीश महाजन जे इकडचे चंपात रॉय वर दाखल करा पाच लाख दिले हे हसत हसत सांगत आहे ज्यांचा मृत्यू झाला त्यांच्या नातेवाईकांना 1 कोटी रुपये द्या जे जखमी झाले त्यांना 50 लाख द्या डुप्लिकेट वर्क ऑर्डर जामनेर पॅटर्न, भ्रष्ट्राचाराचा पॅटर्न डुप्लिकेट नोटा 35 हजार कोटी कुणाच्या खिशात गेले माझ्याकडे मगाशी कागद आले यांच्या जावायला दुसऱ्या कंपनीच्या नावावर कॉन्ट्रॅक्ट मिळाले 27 कोटी खाल्ले, मखमलाबादला स्विमिंग पूल केले एक मोठा खड्डा दिसला त्यात भाजपचे 72 नगरसेवक टाकू म्हंटले बाकी खड्ड्यात मिंध्येचे नगरसेवक दत्तक पिता फडणवीस म्हणाले इराणच्या युद्धामध्ये डांबर मिळत नाही म्हणे दत्तक घेतलंय ना नाशिकला तुम्ही बाप आहेत हा मोर्चा इशारा आहे रेडा तुमच्या घरात घालू रस्त्यावरचे शिवसैनिक आम्ही आहोत रस्त्यावर शिवसेनेचा जन्म गिरीश महाजन येऊन सांगेल यांना काही कळत नाही, रेडा तुझ्या मागे लावणार सगळ्या भानगडी समोर आल्या आहेत आता नाशिकमध्ये समोर आणू सगळे घाबरले आहेत गेट लावून घेतला देशाचा स्वातंत्र्यदिन कितवा हे त्याला माहीती नाही कितीही बंदोबस्त करा, सगळे घुसले होते दिल्लीत मोदी शहा पळून गेले, तू कोण लागून गेला आम्ही आतमध्ये घुसू हा संताप चीड राग आणि आग ही अशीच पेटती ठेवा नाशिककरांनी आपल्याला मतदान केलं नाही पैसे घेऊन मतदान केलं एक बाई म्हणाली भाजपचे नगरसेवक आंदोलन करत आहे राजीनामा देऊन आमच्या मोर्चात सहभागी व्हा अयोध्या आणि दुसरी अयोध्ये जिथं रामाचं वास्तव्य अयोध्येत सीतामाईचं मंगळसूत्र लुटूल त्यांचीच इथं पिलावळ आहे आईध्येतील रामाला सोडलं नाही ते पंचवटीतील रामाला काय सोडणार पण आपण यांना सोडायचे नाही प्रत्येकाच्या घरी जाऊन घेरायचे आहे ऐकलं नाहीत, मन्मानी केली तर गेट तोडून आतमध्ये येऊ गेट तोडायचा अनुभव मला सगळ्यात जास्त एकजुट दाखवली नाशिककरांसाठी आयुक्तांना जाऊन भेटा, खड्डे बुजविण्यास कालमर्यादा द्या हवेतील शब्द नकोत खड्डे बुजवले नाहीतर आम्ही आणि तुम्ही आहोत सगळं कुंभमेळा भ्रष्टाचाराने बरबटलेले आहेत सगळे ठेकेदार गुजरातचे आहेत जामनेर आहेत, कुंभमेळा करायला जळगाव सेना आणली आहे श्रावणातील सोमवार रस्त्यावर लोकं अडकले आहेत ही लढाई संपलेलं नाही, आतमध्ये जाऊन तारीख घ्या0
0
Report
जालना में मराठा-ओबीसी विवाद: वाघमारें के बयान से उबाल, प्राथमिकी की मांग
Jalna, Maharashtra:जालना : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंचं मराठा मुलींबाबत वादग्रस्त वक्तव्य, मराठा समाज आक्रमक, वाघमारेंवर गुन्हा दाखल (पॅकेज) अँकर : ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलींबाबत एक वादग्रस्त वक्तव्य केलंय.या वक्त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.त्यामुळे मराठा समाज आक्रमक झालाय.शिवाय जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिल्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल झालाय.बघूया यावरचा हा स्पेशल रिपोर्ट. व्हिओ : 01: जालन्यातील ओबीसी नेते नवनाथ वाघमारेंनी मराठा समाजाच्या मुलीबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानं मराठा समाजात तीव्र संताप पाहायला मिळतोय. ओबीसीांची सुंदर,गोंडस मुलं पाहून मराठा समाजाच्या मुली ओबीसींच्या घरात घुसतात असं वक्तव्य वाघमारेंनी केलंय.दोन दिवसांपूर्वी पुण्यात ओबीसी नेत्यांची बैठक होती.या बैठकीनंतर एका माध्यमाशी बोलताना वाघमारेंनी हे वक्तव्य केलं आणि या वक्तव्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. बाइट : नवनाथ वाघमारें,ओबीसी नेते(व्हायरल झालेला व्हिडीओ टाकावा) व्हिओ : 02:वाघमारेंच्या या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर जालन्यातील मराठा क्रांती मोर्चाचे पदाधिकारी आक्रमक झाले आणि त्यांनी पोलीस ठाणे गाठत वाघमारेंविरोधात घोषणाबाजी केली.शिवाय पोलिसांनी वाघमारेंवर कारवाई न केल्यास वाघमारेंना प्रसाद देण्याचा ईशारा दिलाय. बाइट : मराठा आंदोलक व्हिओ : 03: वाघमारेंच्या याच वक्तव्यानंतर मराठा समाज संघटना ठिकठिकाणी आक्रमक झाल्यायत.मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी नवनाथ वाघमारे यांना साडी बांगड्यांचा आहेर आणलाय. वाघमारे जिथे दिसेल तिथे त्याला ठोकून काढू असा इशारा डोंगरे यांनी दिला आहे. बाइट- महेश डोंगरे, मराठा क्राती मोर्च राज्य समन्वयक व्हिओ : 04:वाघमारेंच्या व्हायरल व्हिडीओनंतर मराठा क्रांती मोर्चा तसेच मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी जालन्यातील कदीम जालना पोलीस ठाण्यात वाघमारेंविरोधात तक्रार दिली.त्यामुळे मराठा आंदोलकांचा तीव्र संताप पाहून पोलिसांनी वाघमारेंविरोधात गुन्हा दाखल केलाय. बाइट : अनंत कुलकर्णी,उपविभागीय पोलीस अधिकारी, जालना व्हिओ : 05: गेल्या दोन वर्षांपासून महाराष्ट्रात आरक्षणाचा लढा उभा राहिल्यापासून मराठा विरुद्ध ओबीसी असा संघर्ष निर्माण झालाय.त्याच लढ्यातून निर्माण झालेला वाद आता या ना त्या कारणातून ओबीसी आणि मराठा नेत्यांमधून रोज उभा राहतोय.मात्र हा वाद आता ओबीसी किंवा मराठा समाजातील लेकीबाळीपर्यत जायला नको एवढीच राज्यातील जनतेकडून अपेक्षा0
0
Report
Advertisement
ओबीसी आरक्षण पर एकजुटता की मांग, मराठा समुदाय के नेताओं का बयान: आरक्षण रद्द नहीं
Nagpur, Maharashtra:रामदास आठवले: आज नागपंचमी, नागपुर भंडारा दौरे पर आया हूँ. देशात काही लोक आरक्षण रद्द करण्याची मागणी करत आहेत. मात्र आरक्षण रद्द करण्याचा कोणाला अधिकार नाही. ज्यांना मिळत नाही त्यांना आरक्षण द्या अशी मागणी होऊ शकते. मात्र आरक्षण रद्द करावा अशी मागणी कोणी करू नये. बाबासाहेबांनी दलीत, शोषित आदिवासी लोकांना न्याय देण्याच्या उद्देशाने आरक्षण दिलं. उच्चवर्णीय जातीमध्ये आर्थिक परिस्थिती कमी असणाऱ्याना आरक्षण मिळाव बाबासाहेबांचं विचार होता. मुस्लिम समाजातील ८० टक्के जाती ओबीसी मध्ये आहेत. त्या काळात ओबीसी समाजातील अनेक जातीला आम्ही बॅकवर्ड आहोत असे म्हणणे आवडत नव्हते. आज राहुल गांधी ओबीसी बद्दल फार बोलत आहे. मात्र काँग्रेस अनेक वर्ष सत्तेत राहून ओबीसी समाजाला न्याय देऊ शकला नाही. व्हीपी सिंग प्रधानमंत्री असताना त्यावेळी देशात ५२ टक्के ओबीसी संख्या असण्याची शक्यता व्यक्त केली होती. सध्या Sc st लोकसंख्या १६.६० टक्के आहे. आणि ओबीसी ५३ जवळपास असेल. जनगणना झाल्यावर आकडा स्पष्ट होईल. कोणीही आरक्षणाला विरोध न करता आरक्षणात काही सुधारणा करण्याची मागणी करू शकता. मात्र आरक्षण रद्द करण्याची मागणी करणाऱ्यावर सरकारनी कारवाई करावी. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींवर अन्याय होऊ नये ही सरकारची आणि आमची भूमिका. मराठा समाजाला विद्यार्थ्यांना हॉस्टेल सह ईतर अनिल सुविधा आहेत. मराठा समाजाला जो आरक्षण दिला त्याचा फायदा मराठा समाजाने घ्यावा. नक्की मराठा समाज, ओबीसी, ब्राम्हण, बौद्ध समाज किती याची माहिती जनगणना झाल्यावर होईल. शिक्षण आणि नौकरी साठी असलेल्या आरक्षणाला लोकसभा आणि राज्यसभेत दहा वर्षात बील येत त्यांमध्ये वाढ करून मिळते. जातीयवाद संपत नाही तोपर्यंत जातीवर आमचा आरक्षण राहाव. अन्यथा देशात मोठा आंदोलन उभारू. OBC हा माझ्या मंत्रालयाचा विषय आहे. मराठा समाजाला आरक्षण द्यावे, गरीब मराठ्याला न्याय मिळावा. ओबीसी असणाऱ्या कुटुंबातील मुला मुलींना फायदा व्हावा. महाराष्ट्र ओबीसी जाती केंद्र आरक्षण कान्हा मात्र मध्ये चूक झालेल्या अनेक जाती आहेत. दीक्षाभूमीचा वाद अनेक पदावरून आहे. त्यांच्याबद्दल आम्हाला आदर. हा वाद मिटवावा. दीक्षाभूमीचा विकास करेल.0
0
Report
हसन मुश्रीफ बोले: नंदुरबार के खराब रोड्स पर आधुनिक तकनीक से समाधान जरूरी
Kolhapur, Maharashtra:हसन मुश्रीफ बाईट मुद्दे मी नंदुरबार जिल्ह्याचा पालकमंत्री आहे महिन्यातून एक दोन वेळा मी नंदुरबारला जात असतो सुरतवरून नंदुरबारला तीन तासाचा रस्ता आहे त्यापैकी दोन तास गुजरात मधील रस्ते चांगले आहेत आणि एक तास नंदुरबार जिल्ह्याचा रस्ता आहे त्या ठिकाणी अतिशय खराब रस्ता असल्याने मी हे वक्तव्य केलं आहे त्यामुळे मी त्या दिवशी सांगितलं आपल्याला आता दर्जेदार रस्ते करायला पाहिजेत त्यामुळे तिथल्या रस्त्यांची जी अवस्था आहे ती पालक मंत्री म्हणून मला लाज वाटते रस्त्यांच्या मुद्द्यावर विरोधक आंदोलन करणार ते त्यांचं कामच आहे मात्र सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी देखील आता राज्यातील नेते रस्ते दर्जेदार होण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ज्या पद्धतीने पावसाळ्यानंतर रस्ते खराब होतात ते खराब न होता अत्याधुनिक यंत्रणेचा वापर केला पाहिजे हे माझं म्हणणं होतं सरकार येतात आणि जातात कोणतेही सरकार आले तरी पावसाळ्यामध्ये खड्डे पडतात त्यामुळे नवीन टेक्नॉलॉजी वापरून खड्डे पडणार नाहीत असे रस्ते तयार केले पाहिजेत --- कोणत्याही पक्षाकडे एसआयआर बाबत कुठलं सॉफ्टवेअर असेल असं मला वाटत नाही ज्यांची डबल नाव आहेत किंवा ज्यांच्याकडे पुरावे नाहीत किंवा ज्यांनी अर्ज भरून दिलेला नाही यांचीच नाव कमी झाली असणार बी एल ओ जागृक असतील तर हा धोका वाढणार नाही आपले लोकप्रतिनिधी देखील जागरूक असणे गरजेचे आहे आपल्या जिल्ह्यातील अनेक लोक मुंबईमध्ये देखील कामानिमित्त आहेत त्यांनी आता ठरवायचं आहे मतदान मुंबईत करायचा आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही कर्नाटकातून देखील स्थलांतरित झाले आहेत ------ मुंबई अध्यक्षाबाबत आमच्या पक्षांमध्ये अजून कुणाचेही नाव ठरलेलं नाही उद्या मंगळवारी मुंबईत गेल्यानंतर मी त्याची माहिती घेईन ----- आपण मूलभूत विकासासाठी घेतलेलं कर्ज हे 15 टक्केच्या आसपास आहे आम्ही कोणताही नियम मोडलेला नाही सकल उत्पन्नामध्ये जे कर्ज घेतलेलं आहे ते योग्य आहे मुलभूत विकासासाठी आपण कर्ज घेतलेलं आहे ---- Imp विरोधी पक्ष नेते राहुल गांधी हे विरोधी पक्ष नेते आहेत ती त्यांची भूमिका त्यांनी वटवावी मात्र देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांना एकेरी भाषेत बोलत आहेत असं बोलणं राहुल गांधी यांना शोभत नाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांचा सन्मान ठेवला पाहिजे विरोधी पक्षनेते असतील मात्र त्यांना कुणाचाही अपमान करण्याचा अधिकार नाही किंवा शिव्या देण्याचा अधिकार नाही राहुल गांधी यांचे वय खूप लहान आहे त्यांच्यापेक्षा नरेंद्र मोदी आणि अमित शहा हे वयाने खूप मोठे आहेत त्यामुळे त्यांनी वयाचा आणि पदाचा सन्मान ठेवला पाहिजे ----- इथेनॉलचं धोरण सर्वात आधी अटलबिहारी वाजपेयी देशाचे पंतप्रधान असताना आणले त्याचे आपण स्वागत केले पाहिजे ऊस उत्पादक शेतकरी यांचं खूप मोठे भलं या इथेनॉल धोरणामुळे झाला आहे राहुल गांधी यांना शेतकऱ्यांचे फार मोठे नुकसान करून काय मिळणार आहे मला माहिती नाही शरद पवार यांनी मला गोविंद बागेतील उसाच्या तंत्रज्ञानाची पाहणी करण्यासाठी बोलवलं आहे त्यावेळी मी पवार साहेबांना विनंती करणार आहे इथेनॉल धोरणाबद्दल जरा राहुल गांधी यांना सांगा राहुल गांधी यांना इथेनॉलच्या मुद्द्यावर शहाणे करा असं पवार साहेबांना सांगणार आहे शेतकऱ्यांची एफ आर पी देण्याचं काम या इथिენॉलच्या पैशातून होत आहे धान्य उत्पादक शेतकऱ्यांना देखील याचा खूप मोठा फायदा होतो इथेनॉलच्या वापरामुळे वाहनांचे नुकसान होतं असं एकाही कंपनीने सांगितलं नाही मायलेज थोडं कमी होतं हे सांगितलं आहे ---- सातारा ते कागल महामार्गाचे काम घेतलेल्या कंत्रालादाराला ब्लॅकलिस्ट केलं पाहिजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वारंवार याबद्दल बोलले होते अशा माणसाला कुठेच काम मिळाले नाही पाहिजे अशी भूमिका आपण सगळ्यांनी घेतली पाहिजे ----- गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी आपापल्या सोयीने हे संचालक मतदारांना भेटत असतील कोल्हापूर जिल्हा कव्हर करायचा असल्याने प्रत्येक जण सोयीने फिरत आहेत मात्र गोकुळ दूध संघाची निवडणूक ही महायुती म्हणूनच लढवली जाणार आहे सुप्रीम कोर्टाने सांगितल्यामुळे आता गोकुळची निवडणूक 60 दिवसांमध्ये घ्यावीच लागेल मंडळाचे काउंट डाऊन आता सुरू झालं आहे प्रशासक मंडळाने पशुखाद्याचे दर परवडत नसतील तर जरूर वाढवायला हवे मात्र शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन वाढवलं पाहिजे कमिशन मध्ये मात्र थोडीशी गडबड असल्याचे माझ्या कानावर आलं आहे ----- गोकुळ आणि जिल्हा बँकेच्या निवडणुकीमध्ये कार्यकर्त्यांनाच संधी दिली जाते प्रमुख म्हणून दोन-तीन नेते असतात मात्र कार्यकर्त्यांना संधी मिळत असते दहा वर्ष संचालक राहिलेल्यांना बँकेमध्ये निवडणूक लढवता येणार नाही याची अंमलबजावणी अजून सुरू झालेली नाही गोकुळ बाबत अजून बिनविरोधची कोणतीही चर्चा सुरू झालेली नाही ---- एकाच कार्यक्रमात आम्ही चौघेजण व्यासपीठावर होतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला नांदा सौख्यभरे म्हणून शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणूक मी लढणार आहे पुढची लोकसभा जनतेने आशीर्वाद दिला तर लढणार आहे रेल्वेमंत्री होण्याची माझी इच्छा आहे ---- मुंबईला गेल्यानंतर कोल्हापूर शहराच्या जवळ असलेल्या गावांबाबत नोटिफिकेशन काढण्यासाठी मी प्रयत्न करणार आहे कोल्हापूर शहराची हद्द वाढ व्हावी या भूमिकेचा मी आहे ज्या गावांचा विरोध नाही त्या गावांना लवकरात लवकर सामावून घ्यावे अशी माझी मागणी सातत्याने राहिली आहे यासाठी मी निश्चित प्रयत्न करेन0
0
Report
कोल्हापुर सर्किट बेंच बनना स्वप्नपूर्ति, भूषण गवई बोले
Kolhapur, Maharashtra:मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ ही केवळ औपचारिकता उरली आहे असं निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांनी म्हटले आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित केलेला कार्यक्रमात भूषण गवई बोलत होते. कोल्हापूरात सर्किट बेंच होणे हे कोलापूरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापुरात सर्किट बेंच होणे हे कोल्हापुरकरांच्या दृष्टीने स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. कोल्हापूर, सांगली, सोलापूर सातारा, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पक्षकार, वकील आणि जनतेने साथ दिल्याने या लढ्याला मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले असं देखील भूषण गवई म्हणाले. या कार्यक्रमानिमित्त निवृत्त सरन्यायाधीश भूषण गवई यांचा महाधिवक्ता मिलिंद साठे, कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर, गायमूर्ती भारती डांगरे, न्यायमूर्ती सुमनश्याम, प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे अन्य मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कोल्हापूर खंडपीठ इमारतीसाठी 75 एकर जमिनीचा सातबारा मुंबई उच्च न्यायालयाचे प्रभारी मुख्य न्यायमूर्ती रवींद्र घुगे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.0
0
Report
Advertisement
सिंधुदुर्ग के ओसरगांव टोल पर आज से वसूली शुरू, तकनीकी बाधा के कारण देरी
Oras Bk., Maharashtra:अँकर नेहमीच वादाच्या भोवऱ्यात राहिलेला सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ओसरगाव येथील टोल नाक्यावर आज पासून टोल वसुली सुरु होणार अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या होत्या मात्र काही तांत्रिक बिघाडामुळे आजची टोल वसुली उद्या पासून सुरु असल्याची शक्यता आहे. गणेशोत्सवापूर्वी ही कोकणवीयांवर टोल धाड टाकली जाणार असून महामारगाचे काम मात्र अद्याप पूर्ण झालेले नाही.0
0
Report
श्रावण सोमवार पर कोल्हापुर के महादेव मंदिरों में भक्तों की भीड़, वटेश्वर मंदिर में जलाभिषेक
Kolhapur, Maharashtra:श्रावण सोमवारनिमित्त कोल्हापुरातील विविध महादेव मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भक्तगण महादेवाच्या दर्शनासाठी मंदिरांमध्ये दाखल होत आहेत. शहरातील मध्यवर्ती बस स्थानक परिसरा शेजारी असणाऱ्या वटेश्वर महादेव मंदिरातही सकाळपासून भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. पहाटेपासूनच मंदिरात पूजा-अर्चा आणि विविध धार्मिक विधींना सुरुवात झाली. भाविकांकडून महादेवाच्या पिंडीवर जलाभिषेक आणि दुग्धाभिषेक करण्यात येत असून, हर हर महादेवच्या जयघोषाने मंदिर परिसर भक्तिमय झाला आहे.0
0
Report
गंगापुर के सावखेडा में मछली पकड़ते समय बिजली का झटका, दो भाइयों की मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील सावखेडा परिसरातील जुन्या सावखेड शिवारात एक हृदयद्रावक घटना घडली. जायकवाडी बॅकवॉटरमध्ये मासेमारीसाठी गेलेल्या दोन सख्या भावांचा पाण्यात उतरताच विजेचा जोरदार धक्का लागून दुर्दैवी मृत्यू झाला. महावितरणच्या निष्काळजीपणामुळेच हे घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. कैलास नंदू पवार आणि ज्ञानेश्वर नंदू पवार अशी या घटनेत मृत्यू झालेल्या भावंडांची नावे आहेत. पवार बंधू मासेमारीचा व्यवसाय करत. शनिवारी सायंकाळी त्यांनी गोदावरी नदीपात्रात मासेमारीचे जाळे टाकले होते. रविवारी सकाळी दोघे भाऊ जाळे काढण्यासाठी पुन्हा पाण्यात उतरले. मात्र, पाण्यात उतरताच त्यांना विजेचा तीव्र झटका लागला आणि या दोन्ही तरुण भावंडाचा यात मृत्यू झाला0
0
Report
Advertisement
गोकुळ दूध से जुड़ी 300 संस्थाओं पर आज फैसला संभव; 410 संस्थाओं की सुनवाई पूरी
Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संस्थेशी सलग्न असणाऱ्या अवसायनातील 300 संस्था बाबत आज निर्णय होण्याची शक्यता आहे. विभागीय उपनिबंधकांसमोर या संस्थांची सुनावणी पूर्ण झाली असून त्याचा निर्णय आज होण्याची शक्यता आहे. त्याच बरोबर सभासदत्व रद्द करण्यासंदर्भातील 410 संस्थांना आज सहकार न्यायालयात आपले म्हणणे सादर करावे लागणार आहे.0
0
Report
नाशिक में खड्डों के मुद्दे पर उबाठा का जन आक्रोश, 7 मौतों के बाद मोर्चा
Nashik, Maharashtra:Nashik breaking शहरात पडलेल्या खड्ड्यांच्या मुद्द्यावरून उबाठाचा आज पालिकेवर जन आक्रोश महामोर्चा संजय राऊत यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमध्ये आंदोलन सकाळी 11 वाजता शिवसेना कार्यालयापासून मोर्चाला सुरुवात राजीव गांधी भवनातील महापालिका मुख्यालयावर धडक खड्ड्यांमुळे गेलेल्या 7 बळींवरून उबाठा आक्रमक 35 हजार कोटींच्या विकासकामांची उच्चस्तरीय चौकशीची मागणी0
0
Report
भीमाशंकर मंदिर में पहले श्रावण सोमवार पर श्रद्धालुओं की भारी भीड़
Ambegaon, Maharashtra:पवित्र श्रावण महिन्याला सुरुवात झाली असून आज पहिल्या श्रावणी सोमवार निमित्त बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात पहाटेपासूनच भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी पाहायला मिळतीय. पहाटेची महापूजा आणि आरती संपन्न झाल्यानंतर मंदिर दर्शनासाठी खुले करण्यात आले असून 'बम बम भोले' 'हर हर महादेव'च्या जयघोषाने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला असून बारा ज्योतिर्लिंगांपैकी एकमेव 'अर्धनारीश्वर' स्वरूप असलेल्या या ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून लाखो भाविक भीमाशंकर नगरीत दाखल झालेत.याचाच ज्योर्तिलिंग भिमाशंकर मंदिर गाभाय्रून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी...0
0
Report
Advertisement
