icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

सातारा के कालेश्वरी घाट में घायल बिबटिया वन विभाग ने सुरक्षित जेरबंद किया, उपचार शुरू

Satara, Maharashtra:सातारा-रस्त्याच्या कडेला जखमी अवस्थेत पडलेल्या अडीच वर्षांच्या नर बिबट्याला वन विभागाने शिताफीने पकडले त्यानंतर त्याच्यावर वराडे वन्यजीव उपचार केंद्रात उपचार सुरू करण्यात आले आहेत. भर पावसात साताऱ्यातील काळेश्वरी घाटात जखमी अवस्थेतील बिबट्यामुळे काही काळ परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले. रस्त्याच्या कडेला जखमी आणि अशक्त अवस्थेत बसलेल्या बिबट्याची माहिती मिळताच वन विभागाने तत्परता दिखवत अवघ्या काही वेळात बचाव मोहीम राबवली. वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली बिबट्याला सुरक्षितरीत्या जेरबंद करून उपचारासाठी कराड तालुक्यातील वराडे येथील वन्यजीव उपचार केंद्रात दाखल करण्यात आले.परळी खोऱ्यातील नित्रळ –केळवली मार्गावरील काळेश्वरी घाटात रस्त्याच्या कडेला काही कुत्री भुंकत असल्याचे पाहून अनेक वाहनचालक थांबले.जवळ जाऊन पाहिले असता समोर जखमी अवस्थेतील बिबट्या दिसताच सर्वांचीच भंबेरी उडाली. काही वेळ निरीक्षण केल्यानंतर हा बिबट्या अशक्त आणि जखमी असल्याचे लक्षात आले. त्यामुळे घटनास्थळी बघ्यांची गर्दी वाढू लागली.याची माहिती वनक्षेत्रपाल संदीप जोपळे यांना देण्यात आली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता जलद बचाव पथक, प्राथमिक प्रतिसाद चमू तसेच सातारा तालुक्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली.घटनास्थळी उपस्थित प्रवासी व ग्रामस्थांना सुरक्षित अंतरावर हलवून वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपळे यांच्या नेतृत्वाखाली मुख्य डांबरी रस्त्यालगत डंपरखाली बसलेल्या बिबट्याला जाळीच्या साहाय्याने अतिशय शिताफीने पिंजऱ्यात जेरबंद करण्यात आले. पकडण्याच्या वेळी बिबट्याने धावण्याचा प्रयत्न केल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र वन कर्मचाऱ्यांनी आणि ग्रामस्थांनी धैर्याने परिस्थिती हाताळत रेस्क्यू यशस्वी केले.
0
0
Report

راتناگيري میں موسلادھار بارش سے जलस्तर بڑھا، الرٹ جاری

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी - रत्नागिरी जिल्ह्यात सरींवर पाऊस रत्नागिरीत पडणा-या पावसामुळं धरणक्षेत्रातील पाणी पातळीत वाढ रत्नागिरी शहराला पाणीपुरवठा करणारं आणखी एक धरण भरलं रत्नागिरी पडणाऱ्या समाधानकारक पावसामुळे पानवल धरण ओव्हर फ्लो 6 जुलै पर्यंत रत्नागिरीला ऑरेंज अलर्ट मुसळधार ते अति मुसळधार पावसाची शक्यता रत्नागिरीतील धरण क्षेत्रामध्ये 70 ते 80 टक्के पाण्याची वाढ दमदार पावसामुळे नद्यांच्या पाणी पातळी मध्ये देखील कमालीची वाढ जगबुडी नदी इशारा पातळीवर नदीची सध्याची पातळी सहा मीटर इतकी काजळी नदीची सध्याची पातळी 13 मीटर वाशिष्टी शास्त्री सोनवी बावनदी दुथडी भरून वाहतात
0
0
Report
Advertisement

वसई-विरार में भारी बारिश से रेलवे सेवाएं बाधित; नालासोपारा स्टेशन पर पानी भर गया

Vasai-Virar, Maharashtra:वसई विरार मध्ये सकाळपासून दमदार पडणाऱ्या पडणाऱ्या पावसाने सर्वत्र हाहाकार माजवला आहे ...आणि रस्ते वाहतुकीनंतर आता रेल्वे सेवा विस्कळीत झाली आहे.. नालासोपारा रेल्वे स्थानकातील रुळांवर पाणी साचले आहे... त्यामुळे पश्चिम रेल्वेची वाहतूक काही काळासाठी विस्कळीत झाल्याचे चित्र आहे... सकाळपासून दमदार पडणाऱ्या पावसामुळे नालासोपारा रेल्वे स्थानकात पाणी साचू लागले आहे... पावसाने हा जोर कायम ठेवल्यास रेल्वे सेवा ठप्प होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे... त्यामुळे पश्चिम मार्गावरून धावणाऱ्या लांब पडल्याच्या गाड्यांना याचा फटका बसणार आहे..
0
0
Report
Advertisement

स(solapur) में अवैध धंदों के खिलाफ विपक्ष का प्रदर्शन तेज, सरकार पर दबाव बढ़ा

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर शहरात बेकायदा आणि अवैध धंदे आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे - उमेश पाटील - सोलापूर शहरात बेकायदा आणि अवैध धंदे आणि मोठ्या प्रमाणात सुरू आहे - या विरोधात राष्ट्रवादीचे पदाधिकारी सुहास कदम हे चार दिवसापासून उपोषणाला बसले आहेत - मात्र प्रशासनाकडून कोणत्या प्रकारची दखल घेतली गेली जात नाहीत. - बडतर्फ कर्मचारी बाळासाहेब गायकवाड नमक व्यक्तीला पोलीस खात्यात पुन्हा सेवेत घेतले गेले - त्यांच्यावर राज्यस्तरीय लाज लचकत विभागाकडून चौकशी सुरू आहे - बाळासाहेब गायकवाड हा सोलापुरातील सचिन वाजे आहे - सचिन वाझे प्रमाणे बाळासाहेब गायकवाडला तुरुंगात टाकले गेले पाहिजे अशी आमची मागणी आहे - गायकवाड कडे 400 ते 500 कोटींची बेनामी संपत्ती आहे - याबरोबरच राजू चव्हाण, भागवत शिंदे हे देखील पोलीस कर्मचारी अशाच प्रकारचे आहेत - पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ अधिकारी अशा लोकांना पाठीशी घालणार नाहीत अशी अपेक्षा आहे. - जुगार, बेटिंग, चक्री गेम, अशा बेकायदेशीर धंद्यांना हे पोलीस कर्मचारी पाठीशी घालत आहे. - त्यामुळे आमचे पदाधिकारी सुहास कदम यांनी सुरू केलेल्या आंदोलनाला पक्ष आणि आमचे राष्ट्रीय अध्यक्ष सोबत आहेत. - अवैध धंदे हे अनेक ठिकाणी सुरू असतात मात्र त्यावर आळा घालण्याचे काम पोलीस प्रशासनाचे असते. - सत्तेत असलो तरी चुकीच्या कामांना आम्ही पाठीशी घालणार नाही. - *ऑन आंदोलकावर आरोप :* - ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेवर आम्ही तक्रार दिलेले आहे त्यानंतर त्यांनी क्रॉस कंप्लेंट दिली आहे. - ज्या महिलेने आरोप केले त्या महिलेला प्रत्येक महिन्याला व्याज दिलेले आहे त्यामुळे त्यांचे आरोप खोटे आहे. - ज्या महिलेने आरोप केले ते आमच्या पदाधिकारी होत्या त्यांना कोणीतरी फितवले असेल. - *ऑन जयंत पाटील प्रश्न :* - मी पक्षाचे नेतृत्वाच्या वतीने हे अन्नत्याग आंदोलनाला पाठिंबा देतोय. - जयंत पाटील यांनी या विषयावर प्रश्न उपस्थित केला त्याचे गांभीर्य आहे. - जयंत पाटील किंवा आम्ही पवार साहेबांचे जुने कार्यकर्ते आहोत त्यांनी हा प्रश्न उपस्थित केला. - कारण हा प्रश्न महत्त्वाचा आहे, त्यामुळे त्यांनी आवाज उठवला. - अन्नत्याग आंदोलन त्यांनी करू नये अशी आमची विनंती आहे. - मात्र शहरातील सर्वच पक्षातील लोकांचा त्यांना पाठिंबा आहे
0
0
Report
Advertisement

कर्जमाफी के दावे के साथ भाजपा, राम मंदिर दान और चंद्रपुर विवाद गरमाए

Nagpur, Maharashtra:नागपूर - सुधीर मुनगंटीवार, भाजप नेते - On कर्जमाफी - - 56 लक्ष शेतकऱ्यांना 36 हजार कोटींची कर्जमाफी देत आहोत,त्यात काही उणिवा नको, कोणी सुटता कामा नये, याचा निर्णय सरकारने घेतलेला आहे, कृषी मंत्र्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की कोणताही शेतकरी नियमांचा अडचणीत सुटणार नाही - हे कर्जमाफी अहिल्यादेवी होळकर यांच्या नावाने आहे On अमित साटम - - यावर मी काही प्रतिक्रिया देणार नाही, यासंदर्भात संबंधित जे कोणी असतात त्यांनी प्रतिक्रिया देणे योग्य असत कारण त्या घटनेचा मी साक्षीदार नव्हतो On उद्धव ठाकरे - रामरक्षा पठण - - उद्धव ठाकरे काय म्हणतील आणि काय म्हणतात त्यावर प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता नाहीये, पण रामरक्षा पठण करत असतील तर मला विश्वास आहे की जो जो रामरक्षा पठण करतो प्रभू राम त्यांचं रक्षण करतो, आता जे कोणी शिल्लक असतील ते जाणार नाही, रामरक्षा म्हटल्याने असा मला विश्वास आहे On राममंदिर देणगी - - निश्चितपणे शिलापूजन करताना शिला घेऊन आम्ही गावोगावी फिरलो, तेव्हा तर व्यवस्थाही नव्हते,तेव्हा स्कूटरवर आम्ही गावात गेलो, कार सेवेत गेलो, बाबरी मज्जिद जेव्हा ध्वस्त होत होते त्याच्याही मी साक्षीदार आहे - माझ्या लग्नाच्या रिसेप्शनमध्ये माझ्या पाठीशी राम मंदिर यही बनायेंगे असा संकल्प मी विवाहातही केला होता - जर तिथे दानपात्रात चोरी झाली असेल देव त्याला जी शिक्षा द्यायची ते देईलच पण सरकार म्हणून अशांना कडक शिक्षा देण्याची जबाबदारी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी व्यक्त केली आहे - मुख्यमंत्री योगी यांनी अनेक वेळा सांगितलं की कोणी कसाही माणूस असू द्या पण राम मंदिरात चोरी करणाऱ्या कोणालाही सोडल्या जाणार नाही, योगी आरोपींना कायद्याने रोगी केल्याशिवाय राहणार नाही On चंद्रपूर भाजप अंतर्गत वाद - - मला माहित नाही कारण आता चंद्रपूर जिल्हा हा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण चालवत आहेत, यावर काही विचारायचं असेल तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांना किंवा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विचारावा - या जिल्ह्याच्या प्रश्नाबद्दल आता मला कधीच मत व्यक्त करायचं नाही - रवींद्र चव्हाण साहेब जिल्ह्याची आमची संघटना चालवत आहेत तर तुम्हाला अधिक जास्त ची माहिती पाहिजे असेल तर फिजिक्सच्या पुस्तकात केमिस्ट्रीचा पाठ वाचू नका - तुम्हाला बातमी पाहिजे का? पण मी सांगितलं मी बोलणार नाही, मी आता प्रतिज्ञा घेतली आहे तुम्हाला जर जास्तीची माहिती पाहिजे असेल तर मी पुस्तकाच्या दुकानाचं नाव सांगतो आहे ते तुम्ही त्या बुक डेपो मध्ये जा आणि माहिती घ्या - ते (रवींद्र चव्हाण) संघटना चालवत आहेत ते जिल्ह्याचे नेतृत्व करत आहेत - मी संघटनेवर लक्ष घालणार नाही पण लोकांच्या प्रश्नावर, या ठिकाणच्या उद्योग क्षेत्रातल्या बेरोजगाराच्या संदर्भात, पिण्याचे पाणी, शेतकऱ्यांचे प्रश्न मी मांडणार, कारण तो जनतेने मला अधिकार दिला आहे, पक्षाने तिकीट दिले आहे जनतेने निवडून दिले आहे - मी विदर्भाच्या जनतेचे प्रश्न मांडणार - माननीय अध्यक्ष म्हणून चंद्रपूरच्या संघटनेचा त्यांनी 'कल्याण' करण्याचा निर्णय घेतला असेल तर वाट पाहिली पाहिजे आपण, त्यांनी निर्णय केला त्यांनी निर्णय केल्यावर पुढचं सर्व काही ते पाहतील - 'कल्याण' शब्दाचा अर्थ कसा घ्यायचा तो तुम्ही घ्या, कल्याण या शब्दात दोन्ही आहे त्यांच्यावर आम्ही पूर्ण जबाबदारी दिली आहे On वैधानिक विकास महामंडळ - - आशिष शेलार यांनी सांगितला आहे मी सोबत आहे मी 51 आमदारांचं सगळ्यांचं निवेदन वैधानिक महामंडळ निर्माण करण्यासाठी माननीय अमित भाईंना दिलं आहे विदर्भ आणि मराठवाड्याच्या आमदारांनी मागणी केली आहे की वैधानिक विकास महामंडळ झालं पाहिजे On चंद्रपूर भाजप वाद - - तुमचं माझ्यावर प्रेम कमी आहे असं मला वाटतं, चंद्रपूर मध्ये मला का बंदिस्त करतायेत, महाराष्ट्र आहे माझ्यासाठी, आता यात मला गुंतवणूक आणि मी गुंतवणार नाही - चंद्रपूरचे वाघ फेमस आहे ते देशात आहेत, तुम्ही त्याला मर्यादित करून पिंजऱ्यात टाकण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना निश्चितपणे इशारा आहे On विश्वास नांगरे पाटील भेट - , - नागपूरातील घटनाच्या संदर्भात काही निवेदन आहेत, नागपूरचे असोसिएशनचे लोक मला भेटायला येतात, ज्यांच्या काही प्रश्न आहेत त्यांचे प्रश्न निकाले काढून देऊ, मी नागपूरचेही प्रश्न सोडवायचा प्रयत्न करतोय आणि तुम्ही मला चंद्रपुर्तअडकवताय
0
0
Report

297वीं पुण्यतिथि पर कान्होजी आंग्रे को अलिबाग में श्रद्धांजलि की सुरक्षा-शोभा

Chendhare, Maharashtra:मराठा आरमाराचे प्रमुख सरखेल कान्होजी राजे आंग्रे यांच्या 297 व्या पुण्यतिथी निमित्त आज अलिबाग इथं त्यांना अभिवादन करण्यात आले. भारतीय नौसेनेचे कमांडिंग ऑफिसर कमोडोर प्रशांत चंद्रशेखरन यांनी कान्होजी राजे आंग्रे यांच्या समाधीवर पुष्पचक्र वाहिले. रायगड पोलिस दलातर्फे मानवंदना देण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी किशन जावळे, कान्‍होजीराजे यांचे वंशज रघुजीराजे आंग्रे, पोलिस अधीक्षक आंचल दलाल आदिंनी कान्‍होजी आंग्रे यांच्‍या समाधीवर पुष्पमाला वाहून अभिवादन केले. यावेळी नगरसेवक, नगरपालिका कर्मचारी, शिक्षक विद्यार्थी उपस्थित होते. अलिबाग नगर पालिका आणि गाज फाउंडेशन यांनी संयुक्तरित्या हा कार्यक्रम आयोजित केला होता.
0
0
Report
Advertisement

लोणावळे के भुशी डैम में ओवरफ्लो, भारी बारिश से पर्यटन में उत्साह

Varsoli, Maharashtra:लोणावळा - खंडाळा परिसरात पावसाने चांगलाच धोर धरला आहे. लोणावळ्यात मागील 24 तासांत तब्बल 121 मिमी पावसाची नोंद झाली आहे. घाटमाथ्यावर सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे परिसरातील धबधबे पुन्हा दिमाखात वाहू लागले असून पर्यटकांचे आकर्षण वाढले आहे. लोणावळ्यातील वर्षाविहाराचे पर्यटकांचे आवडते ठिकाण असलेले भुशी डॅम ओव्हरफ्लो झाले असून पर्यटकांच्या आनंदाला उधाण आले आहे. पावसाची संततधार सुरू असल्याने इतर ठिकाणी धबधबे कोसळायला सुरुवात झाली आहे. त्यामुळे लोणावळा-खंडाळा परिसराचे निसर्ग सौंदर्य खुलले आहे. भुशी धरण ‘ओव्हरफ्लो’ झाले.
0
0
Report

शिराळा में तेज बारिश, चांदोली डैम में अतिवृष्टी से जलस्तर तेजी से बढ़ा

Sangli, Maharashtra:शिराळा तालुक्यात धुवाधार पाऊस चालू आहे, चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासात 86 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. चांदोली धरण पाणलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी झाली असून गेल्या 24 तासात 84 मीटर इतक्या पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे चांदोली धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे, 34.40 टीएमसी पाणी साठवण क्षमता असणाऱ्या धरणात आता 12.50 टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे.दरम्यान चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पावसाची संततधार कायम आहे.शिराळा तालुक्यामध्ये पडणाऱ्या पावसामुळे वारणा नदीच्या पाणी पातळी देखील वाढ झाली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top