445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
येवला के पुरणगाव इलाके में बिबटिए ने पशुओं पर हमला, एक गाय की मौत
Yeola, Maharashtra:येवला तालुक्यातील पुरणगाव या परिसरामध्ये ठोंबरे वस्तीवर बिबट्याने शेतात बांधलेल्या पाळीव प्राण्यांवर मध्यरात्रीच्या सुमारास हल्ला करून एक गाय ठार केली आहे. मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास पाळीव प्राण्यांचा आरडा ओरडा झाल्याने शेतकरी जागे झाले, त्यामुळे पुढील अनर्थ टळला आहे. शेतकरी विठ्ठल ठोंबरे यांचे यात नुकसान झाले आहे. दरम्यान परिसरात बिबट्याच्या पावलांचे ठसे आढळल्याने शेतकरी वर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
कुल्हापुर में पिता की हत्या, बेटे ने दोस्त के साथ मिलकर वारदात किया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील एका धक्कादायक घटनेत वडिलांचा खून करून मृतदेह विहिरीत टाकल्याप्रकरणी मुलगा आणि त्याच्या मित्राला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस तपासात ही घटना उघडकीस आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिरोज मुजावर हे दारूच्या नशेत पत्नी व मुलाला वारंवार मारहाण करत असल्याचा आरोप आहे. या प्रकाराला कंटाळून त्यांचा मुलगा रेहान मुजावर याने मित्र विरपाशा सैदुलाल जहाँगीरदार याच्या मदतीने कट रचल्याचे तपासात समोर आले आहे. या दोघांनी 29 मे च्या रात्री साडेअकराच्या सुमारास फिरोज मुजावर यांना घराच्या मागील बाजूस नेले. त्यानंतर त्यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला.. या हल्ल्यात फिरोज मुजावर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर पुरावे नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह मोटारसायकलवरून नेऊन एका विहिरीत टाकले. त्यानंतर संशय टाळण्यासाठी रेहान मुजावर याने शिरोली पोलिस ठाण्यात वडील बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण बेपत्ता प्रकरणाचा तपास करताना पोलिसांना तक्रारीतील काही बाबी संशयास्पद वाटल्या. त्यानंतर पोलिसांनी सखोल चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान दोघांच्या जबाबात विसंगती आढळून आली. पोलिसांनी कसून तपास केल्यानंतर रेहान मुजावर आणि विरपाशा जहाँगीरदार यांनी गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून कौटुंबिक वादाचे पर्यवसान थेट वडिलांच्या खुनात झाल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. शिरोली पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
चिपळूण नगरपरिषद पर शिंदे सेना की तेज़ धावा, सागर शेडगे पर कार्रवाई की मांग
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. चिपळूण नगरपरिषदेवर शिंदे सेनेची धडक.. सागर शेडगे यांच्यावर कारवाईची जोरदार मागणी.. काही दिवसांपूर्वी नगराध्य उमेश सकपाळ यांनी केबिनमध्ये बोलावून घेत अपशब्द वापरून धमकी दिल्याची तक्रार मलमत्ता पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी केली होती.. त्या तक्रारीचा विरोध करत आक्रमक झालेले शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी पालिकेत मुख्य अधिकाऱ्यांच्या दालनावर धडक दिली.. या प्रकरणात चिपळूण शहराची बदनामी झाली आहे. मालमत्ता विभागाचे पर्यवेक्षक सागर शेडगे यांनी नगराध्यक्षांवर केलेले आरोप सिद्ध करावे अन्यथा शहरातील भर चौकात त्यांनी माफी मागेल तसे न केल्यास शिवसेना स्टाईल नें त्यांना धडा शिकवू असा इशारा शिंदे सेनेचे नगरसेवक व पदाधिकाऱ्यांनी दिला..0
0
Report
Advertisement
आयडिया: कांदा खरीद दर बढ़ाने से किसान खुश but मांग है 25 रुपये प्रतिकिलो
Lasalgaon, Maharashtra: कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने अवघ्या एका आठवड्यात दोन महत्त्वाचे परिपत्रक जारी केले आहेत पहिल्या परिपत्रकाद्वारे शासकीय कांदा खरेदी दरात प्रतिकिलो ३ रुपये ४५ पैशांची वाढ करून १५ रुपये ८० पैसे दराने खरेदी करण्याचे निर्देश देण्यात आले त्यानंतर दुसऱ्या परिपत्रकात कांदा खरेदी प्रक्रियेमधील काही जाचक अटी शिथिल करण्यात आल्या आहेत मात्र, शासनाच्या या निर्णयांनंतरही कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे समाधान झालेले नाही उत्पादन खर्च आणि सध्याची बाजार परिस्थिती लक्षात घेता शासकीय खरेदी केंद्रांवर थेट बाजार समित्यांमधून क kiman २५ रुपये प्रतिकिलो दराने कांदा खरेदी करण्यात यावा, अशी मागणी शेतकरी सातत्याने करत आहे0
0
Report
दिल्ली के होटल- लॉज में आग सुरक्षा संकट: 1999–2026 में सिर्फ 51 NOC
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:दिल्ली येथे हॉटेलला आग लागून २१ जणांचा मृत्यू झाल्याची घटना बुधवारी घडली. या घटनेनंतर छत्रपती संभाजी नगर शहरातील सर्व लॉजिंगच्या अग्नीशमन एनओसीचा गंभीर प्रश्न उपस्थित झाला. १९९९ पासून २०२६ पर्यंत फक्त ५१ लॉजिंग चालकांनी एनओसी घेतल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. विशेष बाब म्हणजे शहरात लहान-मोठे मिळून किमान ५०० पेक्षा अधिक लॉज आहेत. बहुतांश लॉज या कोणत्याही सुरक्षेविना रामभरोसे सुरू आहेत. त्यामुळे महापालिकेच्या अग्नीशमन विभागाने तीन वेगवेगळ्या पथकांतर्फे हॉटेल, लॉजची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. महत्त्वाचं म्हणजे ज्या ५१ जणांनी अंतिम एनओसी घेतली ते नंतर पुननोंदणीसाठी आले नाहीत. महापालिकेच्या अग्नीशमन विभागाकडून अंतिम एनओसी घेण्याची पद्धत मागील काही वर्षात बंद झाली आहे. दिल्ली येथील घटनेनंतर पुन्हा एकदा हॉटेल, लॉजमध्ये राहणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.0
0
Report
वन्यजीव संरक्षण क्षेत्र में कृत्रिम पानवटे सूखे, स्थानीय सहयोगी ने टैंकर से पानी दिया
Yeola, Maharashtra:वन्यजीव संवर्धन क्षेत्र येवला अंतर्गत येणाऱ्या विसापूर कातरवाडी वडगाव फॉरेस्ट परिसरात वनविभागाकडून बांधलेले कृत्रिम पानवटे हे कोरडे झाले होते वन्यजीवांची होत असलेली भटकंती यामुळे आणि मित्र भागवत झाल्टे यांनी आपल्या स्वखर्चाने पानवट्यांमध्ये टँकरद्वारे पाणी सोडून वन्यजीवांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय केल्याने त्यांच्या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे0
0
Report
Advertisement
अनिकेत तटकरे ने सावर्डे स्थित गोविंदराव निकम की समाधी पर आशीर्वाद लिया
Ratnagiri, Maharashtra:अनिकेत तटकरे यांनी माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या सावर्डे येथील समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले..कोकण स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिनविरोध होऊन विधानपरिषद आमदार म्हणून निवड झाल्यावर अनिकेत तटकरे यांनी माजी खासदार शिक्षण महर्षी स्वर्गीय गोविंदराव निकम यांच्या सावर्डे येथील समाधीस्थळी जाऊन आशीर्वाद घेतले..आमदार अनिकेत तटकरे यांचे चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांनी अभिनंदन केले..0
0
Report
भंडारा में एफएसएआई की धडक छापेमारी, 2.08 लाख रुपये के प्रतिबंधित खाद्य पदार्थ जप्त
Bhandara, Maharashtra:भंडारा जिले में अन्न व औषध प्रशासनाने मागील आठ दिवसांत जिल्हाभरात राबविलेल्या धडक मोहिमेत प्रतिबंधित अन्नपदार्थ, संशयित कमी दर्जाची सुपारी, खाद्यतेल तसेच इतर अन्नपदार्थांचा एकूण २ लाख ८ हजार रुपयांहून अधिक किमतीचा साठा जप्त केला आहे. भेसळयुक्त, कमी दर्जाचे व जनतेच्या आरोग्यास हानीकारक ठरणाऱ्या अन्नपदार्थांविरोधात ही कारवाई करण्यात आली असून विविध ठिकाणी तपासण्या, नमुना संकलन, दंडात्मक कारवाया आणि सुधारणा नोटिसाही बजावण्यात आल्या आहेत.0
0
Report
जिला बैंक चुनाव: सभी पार्टियाँ मैदान में, 67 उम्मीदवार दाखिल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ग्रामीण राजकारणाचा पाया असलेल्या जिल्हा बँक निवडणुकीच्या मैदानात आता सर्वपक्षीय मातब्बर उतरले आहेत. राज्याचे ओबीसी कल्याणमंत्री अतुल सावे, काँग्रेसचे खा. डॉ. कल्याण काळे यांच्यासह राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष अभिजित देशमुख, भाजपचे शहराध्यक्ष किशोर शितोळे यांच्यासह अनेक दिग्गजांनी गुरुवारी उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक संचालक मंडळाच्या निवडणुकीसाठी ४ जुलै रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. त्यासाठी गुरुवारी ६७ जणांनी विविध मतदारसंघांतून अर्ज दाखल केले. आज शिंदेंच्या शिवसेनेतून आमदार अब्दुल सत्तार यांचा मुलगा समीर सत्तार हे अर्ज भरणार आहेत...0
0
Report
Advertisement
रत्नागिरी में बाळ माने की घरवापसी: बीजेपी में प्रवेश की चर्चा तेज
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. बाळ माने करणार घरवापसी.. अँकर कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी घेतलेल्या नाट्यमय माघारी नंतर आता कोकणाच्या राजकीय वर्तुळातून आणखी एक मोठी आणि खळबळ जनक बातमी समोर येत आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातून हकालपट्टी झालेले ज्येष्ठ नेते बाळ माने हे लवकरच भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश करणार असल्याची चर्चा सध्या सुरु आहे..0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में 200 एमएलडी पानी परियोजना से शहर में आपूर्ति शुरू
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहराचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी राबवण्यात येत असलेल्या नवीन पाणीपुरवठा योजनेतून अखेर शहरासाठी पाणी मिळण्यास सुरुवात झाली आहे. गुरुवारपासून महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य 'एमबीआर'मधून महापालिकेच्या पाणीपुरवठा यंत्रणेत १० एमएलडी १० एमएलडी म्हणजे रोज १ कोटी लिटर, पाणी घेण्यास सुरुवात करण्यात आली. त्यामुळे शहरातील पाणीपुरवठ्यातील खंड १ दिवसाने कमी होण्यास मदत मिळणार आहे. केंद्र शासनाच्या 'अमृत-२' योजनेअंतर्गत शहरासाठी २,७४० कोटी रुपये खर्चाची नवीन पाणी योजना राबविली जात आहे. या योजनेतून पहिल्या टप्प्यात २०० एमएलडी पाणी देण्याचे नियोजन आहे. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर जायकवाडी धरणातील जॅकवेलमधून पाण्याची चाचणी सुरू झाली होती. जायकवाडी ते नक्षत्रवाडी या ३८ कि.मी. अंतराच्या मुख्य जलवाहिनीची चाचणीही झाली आहे.0
0
Report
रत्नागिरी-रेगाड- सिंधुदुर्ग सीट पर बिनविरोध उम्मीदवार तटकरे की जीत पक्की
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तटकरेंच्या बिनविरोध निवडीची घोषणा.. बाळ माने यांच्यासह पाच उमेदवारांची माघार.. जिल्हाधिकारी यांची माहिती.. महाराष्ट््र विधानसभा विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी -सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या निवडणुकीत गुरुवारी अखेरच्या दिवशी पाच जणांनी माघार घेतली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) उमेदवार अनिकेत सुनील तटकरे यांचे बिनविरोध निवड झाली आहे. भारत निवडणूक आयोगाने दिलेल्या अधिकारानुसार जिल्हा अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून याची अधिकृत घोषणा करत आहे असे मनुज जिंदल यांनी स्पष्ट केले.0
0
Report
Advertisement
अंबाबाई मंदिर पुनर्विकास: पहले चरण में 5 एकड़ भूमि कब्जे में, दो चरणों में भू-सम्पादन
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर परिसर पुनर्विकास आराखडा अंतर्गत दोन टप्प्यात भूसंपादन केलं जाणार आहे. पहिल्या टप्प्यात मंदिरालगतच्या दहा मीटर परिसरातील सुमारे 5 एकर जागा ताब्यात घ्यावी लागणार आहे, त्यासाठी प्राथमिक सर्वेक्षण केले असून यामध्ये 136 मिळकतींचा समावेश आहे. दुसरा टप्प्यात मंदिर परिसरातील आणखी पाच एकर जमीन संपादित करण्याबाबत जिल्हा प्रशासनाचा विचार सुरू आहे.0
0
Report
रत्नागिरी में अनिश्चित मानसून के बावजूद पानी संकट, 61 गांवों में 44 हजार लोग प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. अवकाळी पाऊस.. तरीही पाणी टंचाई तीव्रच.. जिल्ह्यात 61 गावातील 145 वाड्यामध्ये पाणीटंचाई.. मागील आठवड्यात अनेक ठिकाणी चार दिवस मुसळधार अवकाळी पाऊस पडूनही जिल्ह्यात पाणीटंचाईग्रस्त गावे आणि वाड्यांमध्ये घट न होता वाढ झाली आहे.. सध्या स्थितीत जिल्ह्यात 61 गावातील 145 वाड्यांमधील 44 हजार 702 ग्रामस्थांची पाण्यासाठी हाल सुरू आहेत.. या टंचाईग्रस्तांना केवळ 18 ट्रॅन्करणे पाणीपुरवठा करण्यात येत आहे..0
0
Report
बहन छेड़छाड़ का बदला लेते युवक की हत्या, अमरावती में हलचल; दो गिरफ्तार, पांच फरार
Amravati, Maharashtra:बहिन की छेडछाड का जाब विचारणाऱ्या तरुणाची निर्घृण हत्या; अमरावतीت खळबळ, दोन्ही आरोपी अटकेत, पाच आरोपी फरार अमरावतीच्या जय सियाराम नगर परिसरात बहिनची छेडछाडचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या २६ वर्षीय प्रज्वल खरे याची धारदार शस्त्राने भोसकून निर्घृण हत्या करण्यात आली. या घटनेमुळे शहरात संतापाची लाट उसळली असून पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले आहेत. यामध्ये सात आरोपी होते पाच जण फरार आहेत, आपल्या बहिनिचे AI मार्फत अश्लील व्हिडिओ आरोपीने बनवले होते या संदर्भात आरोपीला जाब विचारण्यासाठी प्रज्वल गेला होता मात्र त्याची हत्या करण्यात आली. मुख्य हल्लेखोरांचा शोध सुरू असून या प्रकरणाचा तपास युद्धपातळीवर केला जात आहे.0
0
Report
Advertisement
