445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
केंद्र सरकार ने कांदा खरीदी दर बढ़ाई, किसान नाराज—जानिए किस कारण
Yeola, Maharashtra:अंकर इंट्रो : राज्यातील कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून सुरू केलेल्या कांदा खरेदी योजनेत पुन्हा एकदा दरवाढ जाहीर केली आहे. शासकीय खरेदी दरात 80 पैशांची वाढ करत तो आता 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. मात्र कांद्याचा उत्पादन खर्चच 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत असून हा दर अमान्य असल्याची भूमिका त्यांनी घेतली आहे. नेमकं काय आहे संपूर्ण प्रकरण, पाहूया हा रिपोर्ट... व्हीओ – 1 केंद्र सरकारने कांदा उत्पादकांना आधार मिळावा याासाठी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी सुरू केली. सुरुवातीला प्रति किलो 12 रुपये 35 पैसे दर जाहीर करण्यात आला होता. मात्र हा दर अत्यंत कमी असल्याचा आरोप करत शेतकरी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आणि विविध ठिकाणी आंदोलन छेडले. व्हीओ – 2 शेतकऱ्यांच्या आंदोलनानंतर सरकारने खरेदी दर वाढवत तो 15 रुपये 80 पैसे प्रति किलो केला. मात्र खुल्या बाजारात व्यापाऱ्यांकडून यापेक्षा अधिक दर मिळत असल्याने शेतकऱ्यांचा प्रतिसाद मर्यादित राहिला. त्यानंतर आता पुन्हा 80 पैशांची वृद्धि जाहीर करत शासकीय खरेदी दर 17 रुपये 30 पैसे प्रति किलो करण्यात आला आहे. व्हीओ – 3 मात्र या वाढीनंतरही शेतकरी समाधानी नाहीत. कांद्याचा उत्पादन खर्चच सुमारे 22 रुपये प्रति किलो असल्याचा दावा शेतकरी करत आहेत. बियाणे, खत, औषधे, मजुरी आणि वाहतूक खर्चात मोठी वाढ झाल्याने सध्याचा शासकीय दर उत्पादन खर्चापेक्षाही कमी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. व्हीओ – 4 शासकीय खरेदी दरात वाढ झाली असली तरी ती अपुरी असल्याचे मत शेतकरी संघटनांनी व्यक्त केले आहे. उत्पादन खर्च लक्षात घेऊन कांद्याला किमान 22 रुपये किंवा त्यापेक्षा अधिक दर देण्याची मागणी शेतकरी करत आहेत. दरवाढीबाबत सरकार पुढे काय निर्णय घेते, याकडे आता कांदा उत्पादकांचे लक्ष लागले आहे. पीटीसी : सुदर्शन खिल्लारे, प्रतिनिधी, येवला नाशिक साथीत शेतकऱ्यांच्या बाईट जोडलेल्या आहेत0
0
Report
महाराष्ट्र में ओबीसी जनगणना को लेकर भाजपा-ताकतें गूंज, उद्धव ठाकरे पर सवाल
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. On ओबीसी बैठक - पंतप्रधान यांनी घोषणा केली होती राहुल गांधींनी हा प्रश्न मांडला असता सरकारने घाबरून OBCची स्वतंत्र जनगणना करू अशी भूमिका स्वीकारली ती मात्र आताच्या जनगणने स्वतंत्र कॉलम नसल्याने OBCं चे हक्कावर गदा येणार आहे... OBCला आरक्षणापासून मूलभूत संरक्षणासाठी सुद्धा सरकार विरोधी राहिली आहे. यासाठी राज्यव्यापी मोठं आंदोलन OBCच्या सर्व प्रश्नांना बैठक असणार आहे. - ओबीसीची स्वतंत्र जनगणना झाली पाहिजे.... पहिला फेज झालेला आहे. दुसऱ्या फेजमध्ये ओबीसी कॉलम आला पाहिजे... सरकारचं लक्ष वेधणे आणि यासाठी आंदोलनाची सुरुवात महाराष्ट्र भर करावी... या मुद्द्यावर चर्चा अजेंड्यावर असणार आहे On उद्धव ठाकरे, - महाराष्ट्राने देश बघत आहे व नेशन वन इलेक्शन वन पार्टी हे वाटचाल सुरू आहे.... लोकशाही संपवण्याचा वेळा भारतीय जनता पक्षाने घेतलेला आहे. भविष्यात निवडणुका होणारच नाही ही परिस्थिती आता हळूहळू निर्माण करण्यात भाजपला यश आल आहे..विरोधी पक्ष शिल्लक ठेवायचा नाही. त्याला मुळापासून संपवून टाकायचं. संपूर्ण यंत्राचा वापर करायचा निवडणुकीला काही अर्थ राहणार नाही.... उत्तर कोरियात शहंशाहने जिंकल्या तेच उद्या भारतात येणार अशी शंका आहे... On पक्ष सोडयाला तयार भाजपनं ठाकरे सेना फोडली त्यामुळे उद्धव ठाकरे म्हंटले असेल.. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती आहे तशी कायम राहत नाही.... ती बदलत असते असा आमचा लोकशाहीवर विश्वास आहे. त्या पदावर कायम रहाणार आहे... आमची विनंती राहील यातून मार्ग काढू... लोक गेलेत येणं जाणं शारद राहते मात्र मूळ पक्ष काही हिसकावून घेऊ शकत नाही, ठाकरे पुन्हा पक्ष निर्माण करण्यासाठी काम करतील. On नीट परीक्षा गोंधळ - धर्मेंद्र प्रधानला पदावर कायम ठेवून नीट ची परीक्षा परदेशातच घेतली पाहिजे... देशात पेपर फुटतात... त्यासाठी तर कदाचित प्रयोग धर्मेंद्र प्रधान यांनी प्रयोग केला असावा केला असा खोचक टोला वडेट्टीवारांनी लगावला...आमची औकात नाही सांभाळण्याची धर्मेंद्र प्रधान सारख्या मूर्ख माणसाला वाटलं असेल...त्यामुळे हा प्रयोग करून पहावा... परदेशातच कोणाला पाठवून तिथेच परीक्षा द्यावी अशी काय भूमिका असेल... इतकी वाताहात शिक्षण क्षेत्राची कधीही झालेली नाही. तरुण मुलांच्या आत्महत्या होत आहे...तरी पण यांना लाज शरम वाटत नाही. लाज शरम विकूनच खाल्ली असेल आणि व्यवस्था उध्वस्त केली असेल अशा घटना घडतात. On पवनराजे निंबाळकर - कोण कुठल्या ठिकाणी जा ओमराजांच्या वडिलांचा खून झाला नंतर उद्धव ठाकरेंनी त्याला मुलाप्रमाणे सांभाळलं...कोण कुठं जात मला काही यावर फार बोलयाची गरज नाही.. यावर जे चर्चा होत आहे... हा शेवट आहे महाराष्ट्रात सध्याची परिस्थिती बिहारची लोक महाराष्ट्राचे नाव ठेवतील अशी परिस्थिती निर्माण झाली आहे....नागपूर येथील गुन्हेगारी सर्वोच्च झाली आहे. अत्याचारात महाराष्ट्र पुढे गेला आहे. अधिवेशनात प्रश्न मांडू...महाराष्ट्र सगळ बघत आहे योग्य वेळी यांचा hिशोब महाराष्ट्र चुकता करेल. On वणी बीएस इसपात - बीएससी काही राजकारणी मिळून दलाली खात आहे... त्यांचा सपोर्ट आहे... ते सर्व पक्षाची लोक आहेत...त्याची सीबीआय चौकशी सीआयडी चौकशी झाली पाहिजे. अशी आमची मागणी आहे. फार मोठा घोटाळा आहे, सगळेच लोप्रतिनिधी त्यात सहभागी आहे त्याच्याशिवाय चौकशी केली. अनेक मोठे मासे यात अडकतील - संपूर्ण यंत्रणा यात आहे.. कोणी आमदार खासदाराचे नाव घेणार नाही सर्व पक्षाचे लो आहेय.. On उद्धव ठाकरे भूमिका - दोन्ही भाषण ऐकले ... उद्धव ठाकरेंच्या महाविकास इंडिया आघाडीच्या बैठकीला सोबत असतात दोन भाषणाच्या तुलनेवर बोलण्याची गरज नाही. दोघांच्याही भाषणातून जनता जे काही उद्या ठरवणार आहे. ते मला उद्या स्पष्ट दिसत आहे. जो तरुणांचा लोकांचा उद्रेक जो भावना आहे... वाकचौरे विरोधात वयोवृद्ध शिवसैनिक महिलेने वक्तव्य केलं. वेश्येला pोट भरण्यासाठी मजबुरीने ती काय करते... हे त्यापेक्षाही खालच्या दर्जाचा राजकारण महाराष्ट्रात सुरू आहे दिसत आहे हे दुर्दैव आहे - एल निनोमुळे त्याचा प्रभाव दिसायला सुरुवात झाली आहे. हाहाकार माजला जाणार आहे. यातून महाराष्ट्र कसा सावरला जातो...आत्महत्या मुक्त महाराष्ट्र करू मराठवाड्यातील दुष्काळामुळे पासून संपुष्टात आणू..ज्या घोषणा केल्या त्या प्रश्नाचे उत्तर द्यावे दुष्काळ पडेल...लोक विचारतील. यावेळी मात्र भयंकर परिस्थितीला समोर जावं लागेल... तुमचा सरकार कसा मार्ग काढते. सरकारकडे काय प्लॅनिंग आहे.. - सत्ताधाऱ्यांची बैठक लावावी काय भूमिका आहे काय करणार आहे हे सांगितलं तर महाराष्ट्रातील लोकांना बरं होईल. धरणे कोरडे झाले आहे पुढचे 15 दिवस तर पाणी आलं नाही तर पाण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा हाहाकार पाहायला मिळेल. - मी यावर बोलणार नाही... पक्ष काय निर्णय घ्यायचा आहे. तो बोलतील मी त्यावर गटनेचा निवडीचे काम पक्षाच्या पत्रानुसार होत असतं... त्या निर्णयाला प्रदेशाध्यक्ष जो निर्णय घेतील अशा पद्धतीची चर्चा पाहायला. ते लोक पाहत आहे. त्यावर अधिक मला वाद वाढवायचा नाही. On प्रदेशाध्यक्ष बदल पत्र - कोणाच्या बदलासाठी किंवा बदलवण्यासाठी माझा काही संबंध नसतो. जमेल तेवढं आहे त्या परिस्थितीत पक्षाचा काम करत राहतो. जाणारे कोण मागणी करणारे कोण मला माहित नाही त्यावर भाष्य करणार नाही.प्रदेशाध्यक्ष त्यावर निर्णय घेतील. मला त्या भानगडीत पडायचे नाही..0
0
Report
डोंबिवली स्टेशन पर 70 वर्षीय पंडित वाघ की जान बचाने वाले पुलिसकर्मी की प्रशंसा
Kalyan, Maharashtra:धावती लोकल पकडण्याच्या नादात अनेक प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे, तर अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत. रेल्वे प्रशासनाकडून वारंवार जनजागृती केली जात असतानाही काही प्रवासी घाईघाईत जीव धोक्यात घालतात. असाच प्रकार डोंबिवली रेल्वे स्थानकात समोर आला. धावती लोकल पकडण्याच्या प्रयत्नात ७० वर्षीय पंडित वाघ हे प्लॅटफॉर्म आणि लोकलच्या मधील धोकादायक जागेत पडण्याच्या स्थितीत आले होते. मात्र डोंबिवली जीआरपीचे पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांनी प्रसंगावधान राखत त्यांना वेळीच बाहेर खेचून त्यांचा जीव वाचवला. ही घटना डोंबिवली स्थानकातील प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर घडली. या घटनेनंतर पंडित वाघ यांनी पोलीस कर्मचारी अनिल शेळके यांचे आभार मानले. दरम्यान, धावती लोकल पकडणे, चालत्या ट्रेनमधून चढणे-उतरणे हे अत्यंत धोकादायक असून प्रवाशांनी घाई न करता सुरक्षित प्रवासाला प्राधान्य द्यावे, असे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर में कल 10 केंद्रों पर नीट परीक्षा, 3301 परीक्षार्थी, सुरक्षा व्यवस्था में भारी बढ़ोतरी
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात 10 केंद्रांवर उद्या नीट परीक्षा होणार आहे. एकूण 3301 विद्यार्थी परीक्षा देणार आहेत. मागच्या पेपरफुटीनंतर सुरक्षा व्यवस्थेत मोठी वाढ करण्यात आली आहे. चंद्रपूरात प्रश्नपत्रिका वायुदलाच्या विमानाने आधीच पोचल्या असून त्या जिल्हा प्रशासनाने कडेकोट सुरक्षा बंदोबस्तात गोपनीय ठिकाणी ठेवण्यात आल्या आहेत. उद्या प्रश्नपत्रिकांची वाहतूक आणि प्रत्यक्ष केंद्रावर असणारी सुरक्षा आणि व्यवस्था याबाबत पोलीस प्रशासनाने आज चाचपणी केली. चंद्रपूरात सुमारे 300 पोलिस कर्मचारी- अधिकारी यादरम्यान तैनात असतील. प्रत्येक केंद्रावर CISF जवानांचा बंदोबस्त असणार आहे. प्रत्येक केंद्रावर जिल्हा प्रशासनाने वेगळी यंत्रणा उभारली आहे.0
0
Report
रत्नागिरी में समुद्र में डूबे संभाजीनगर के 5 यात्री: खोज गतिविधियाँ जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी में गणपतीपुळे पर्यटन स्थल पर आये संभाजीनगर के 5 लोग समुद्र में डूब गए, 5 अन्य की खोज जारी है. खोजकार्य शुरू. समुद्र के पानी का आकलन न कर पाने के कारण डूब गए. आज सुबह लगभग 10 बजे की घटना. सभी 5 लापता हैं और उनका खोज हेतु युद्धपातळी पर प्रयास जारी हैं.0
0
Report
30 जून तक जीवन प्रमाणपत्र ऑनलाइन; नहीं तो जुलाई से पेंशन बंद
Nashik, Maharashtra:मालेगाव (नाशिक) विशाल मोरे - वृद्ध, निराधार, दिव्यांग व इतर लाभार्थ्यांसाठी हयात प्रमाणपत्र करण्याची अंतिम मुदत 30 जून पर्यंत. कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यास दिव्यांग बांधवांची होते दमछाक. शासनातर्फे कुठलीच सुविधा नसल्याने दिव्यांगांचे होत आहे हाल. वृद्ध, निराधार, दिव्यांग आणि इतर पात्र लाभार्थ्यांना हयात प्रमाणपत्र सादर करण्याची प्रक्रिया यंदापासून पूर्णपणे ऑनलाइनझाली असून हयात प्रमाणपत्र सादर न केल्यास जुलैपासून पेन्शन बंद होणार आहे. शासनाच्या ‘Beneficiary Verification App’द्वारे पडताळणी बंधनकारक असणार आहे. मुदतीत पडताळणी न झाल्यास जुलैपासून अनुदान वितरण थांबणार आहे. मात्र कागदपत्रांची जुळवा जुळव करण्यात तसेच हे प्रमाणपत्र सादर करण्यात दिव्यांग बांधवांची दमछाक होऊन खूप हाल होत आहे. प्रशासनाकडून कुठलीही मदत त्यांना मिळत नसल्यामुळे साधी व्हीलचेयरदेखील उपलब्ध नसल्याने दिव्यांग बांधवांची संताप व्यक्त केला असून यावर त्वरित उपाय योजना कराव्या आणि हयात प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदत वाढ द्यावी अशी मागणी करण्यात आली.0
0
Report
Advertisement
वाशिम में सोयाबीन बीजों की उगवण क्षमता जाँच अभियान शुरू
Washim, Maharashtra:वाशिम: रिपोर्टर: गणेश मोहळे, वाशिम अँकर: खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर वाशिम जिल्ह्यात कृषी विभाग आणि पाणी फाउंडेशनच्या वतीने शेतकऱ्यांसाठी सोयाबीन बियाण्याच्या उगवण क्षमतेची तपासणी मोहीम राबविण्यात येत आहे. शेतकरी बचत गटांच्या माध्यमातून ही तपासणी केली जात असून पेरणीपूर्वीच बियाण्याची गुणवत्ता तपासण्याची संधी शेतकऱ्यांना मिळत आहे. गोणपाटावर 100 बिया ठेवून चार दिवस पाणी दिल्यानंतर उगवलेल्या बियांच्या संख्येनुसार उगवण क्षमता निश्चित केली जाते. 70 टक्क्यांपेक्षा जास्त उगवण असलेले बियाणे पेरणीसाठी योग्य मानले जाते. या उपक्रमामुळे निकृष्ट बियाण्यांमुळे होणारी दुबार पेरणी टाळण्यास मदत होत असून शेतकऱ्यांना मोठा फायदा होत आहे.0
0
Report
मराठवाड़े में मानसून देरी: किसान पेराई टाल रहे, पानी और बुवाई संकट
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात मान्सूनच्या आगमनाकडे शेतकऱ्यांचे डोळे लागले आहेत. जूनचा तिसरा आठवडा सुरू झाला असला तरी अद्याप समाधानकारक पाऊस झालेला नाही. परिणामी खरीप हंगामातील पेरण्या रखडल्या असून शेतकरी चिंतेत आहेत. सोयाबीन, कापूस, मका आणि तूर यांसारख्या पिकांच्या पेरणीसाठी आवश्यक ओलावा जमिनीत उपलब्ध नसल्याने अनेक शेतांमध्ये मशागतीची कामे पूर्ण होऊनही बियाणे पेरले गेलेले नाही. घाईघाईने पेरणी केल्यास उगवण न होण्याचा आणि दुबार पेरणीचे संकट ओढवण्याचा धोका असल्याने शेतकरी सावध भूमिका घेत आहेत.दरम्यान, मान्सूनच्या विलंबाचा परिणाम जलसाठ्यांवरही दिसून येत आहे. मराठवाड्यातील मोठ्या प्रकल्पांमध्ये केवळ ३० टक्के, मध्यम प्रकल्पांमध्ये १९ टक्के तर लघु प्रकल्पांमध्ये अवघा १६ टक्के पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्यासह शेतीसाठीच्या पाण्याचीही चिंता वाढू लागली आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना घाईघाईने पेरणी न करण्याचा सल्ला दिला आहे. पुरेसा पाऊस आणि जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाल्यानंतरच पेरणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. बाईट : दीपक गवळी, जिल्हा कृषी अधीक्षक0
0
Report
Shinde-uddhav संबंध की बहस: पैसे और सत्ता के खेल उजागर
Mumbai, Maharashtra:*संजय राऊत* ऑन दोन वर्षार्धक दिन काल खर म्हणजे मी भाषण करणार होतो उशीर झाला त्यामुळे भाषण केले नाही दोन वर्धापन दिन कसे असू शकतात ज्या कटाची स्थापना चार वर्षापूर्वी झाली टेस्ट ट्यूब बेबी अमित शहा यांनी जन्माला घातली आई बाप अमित शहा आहेत चार वर्षाच्या टेस्ट ट्यूब बेबी ला ६० वर्ष म्हणून साजरा केला मूळ शिवसेनेचा ६० वा वर्धापन दिन साजरा झाला उगाच ओरडून भाषण जबरदस्तीने माणसे आणावी लागली नाही ऑन शिंदे आमच्याकडचे कोल्हे पाळला जे लोक स्वतः विक्रीसाठी तयार झाले शिंदेकडे अफाट पैसा असल्यामुळे त्यांना हे सहा लोक मिळाले कसल ऑपरेशन घंटा हे सहा लोक शिंदेच्या दारात घंटा वाजवत बसणार एकनाथ शिंदे तुम्हाला कोण वाटले ते ठेकेदारांकडून पैसे घेऊन आले आणि माणसे विकत घेतात ऑन बाळासाहेब ठाकरे उद्धव ठाकरे भावनिक तीन वेळा बाळासाहेब ठाकरे यांनी राजीनामा दिला एकमेव मी साक्षीदार आहे उद्धव ठाकरे यांनी भावना व्यक्त केल्या त्याचा उद्रेक आम्ही पाहिला राजीनामा कोणी देऊ देणार नाही ऑन ओमराजे तो भंपक माणूस आहे त्यांची भाषण ऐका उद्धव ठाकरे यांच्या बद्दल काय बोलले ते पाहा मी स्वतः धाराशिव मध्ये उद्धव ठाकरे यांच्या सोबत धाराशिव मध्ये होतो सभा घेतल्या म्हणून ९ खासदार आले ना ती बाई शिंदेची दलाल होती nanatr तिच्यावर काय आरोप झाले हे पाहिले शेणात ला किडा शेणात गेला बेईमान गद्दार लोक आहेत badga बघा कसा असतो तसे हे सर्व बाडगे आहेत निष्ठा असायला आई बाप नेक असावे लागतात भारतीय जनता पक्ष ने आमच्यातला एक गट फोडून गोळीबार करतात समोरच्याना समजले पाहिजे त्यांच्या वापर केला जातो nanatr उकिरड्यावर फेकून देतात ज्यांना शिवसेनेचा जन्म सत्तेसाठी आणि पैशासाठी झाला अस वाटतो त्यांनी शिवसेना सोडली रोहित पवार आणि मी सांगितलेला आकडा बाहेर आलाय एक मंत्री पद आणि बाकीच्यांना जास्त पैसे प्रबोधन ठाकरे शिंदेच आजोबा आहे का राज उद्धव यांना मांडीवर खेळवले पैशाच्या जोरावर माणसे भाषण ऐकायला आणली0
0
Report
Advertisement
गजानन नगर गैस सिलिंडर विस्फोट, आग में महिला की दुखद मौत
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:गजानन नगरात गॅस सिलिंडरचा स्फोट; आगीत महिलेचा दुर्दैवी मृत्यू ANC : छत्रपती संभाजीनगर शहरातील गजानन नगर परिसरात आज पहाटे गॅस सिलिंडरचा भीषण स्फोट होऊन लागलेल्या आगीत एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. चिंतामणी परिसरातील एका घराला आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस आणि महापालिका प्रशासनाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिकांच्या मदतीने बचावकार्य राबविण्यात आले. आगीत अडकलेल्या कुटुंबातील इतर सदस्यांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले. मात्र, सुनंदाबाई राजेंद्र मोरे यांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त होत आहे. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.0
0
Report
बुलेट छब्या के निधन पर बैलगाड़ी प्रेमियों ने अंत्यसंस्कार में शोक जताया
Sangli, Maharashtra:बैलगाडी शर्यतीतील हिंदकेसरी असलेल्या सांगलीच्या मिरज तालुक्यातील हरिपूर येथील बुलेट छब्या बैलाचे दुर्दैव निधन झाले आहे. पश्चिम महाराष्ट्रातील बैलगाडी शर्यतीच्या मैदानात बुलेट छब्याचा गेल्या काही वर्षांपासून चांगला दबदबा निर्माण झाला होता. बुलेट छब्याने आपल्या वाऱ्याच्या वेगाने महाराष्ट्र आणि कर्नाटकातील सुमारे 65 मैदानी जिंकली आहेत. यात थार गाडी, ट्रॅक्टरसह लाखोंची बक्षिसे जिंकत हरिपूर गावाचे नाव संपूर्ण राज्यात केले होते. त्याच्या अकाली निधनाने बोंद्रे कुटुंबासह बैलगाडी शौकिनावरी शोककळा पसरली आहे. हजारो बैलगाडी प्रेमींच्या उपस्थितीत बुलेट छब्याच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराला पार पडले, यावेळी अनेकांना अश्रू आथव झाले होते.0
0
Report
पद की मर्यादा पर जंग: सुजय विखे ने कोल्हे पर निशाना साधा
Shirdi, Maharashtra:आमदार व्हायचं असतं तर मागच्या दोन महिन्यात झालो असतो.. नवीन पोरांना सांगतो, पदाचा आनंद मर्यादित ठेवा.. तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही, अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता भाजपचेच विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार विवेक यांच्यावर निशाणा साधलाय.. विधानपरिषदेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर, काही दिवसांपूर्वी विवेक कोल्हे यांनी शिर्डी मतदारसंघात आयोजित सत्काराच्या कार्यक्रमात मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार टीका केली होती.. गणेश सहकारी साखर कारखान्याच्या कर्ज प्रकरणात अडथळे आणू नका, संयमाला मर्यादा असते.. जब भी मै घायल होता हुं, तब मै घातक होता हुं, असं म्हणत कोल्हे यांनी विखे पाटलांना डिवचले होते.. आता सुजय विखे यांनी कोल्हे यांच्यावर पलटवार करत प्रतिउत्तर दिले आहे.. पदाचा आनंद मर्यादित ठेवा, तुम्ही ज्या पदाचा आनंद घेताय, ती आम्ही सोडून दिलेली पदं आहेत.. आम्हाला सत्कारासाठी पदांची गरज नाही.. गावात फिरलं तरी लोक विखे परिवारासाठी हार, गुच्छ घेऊन येतात.. त्यामुळं खूप भारावून जाऊ नका.. पदं यायला जायला वेळ लागत नाही.. पदाचा मान ठेवला पाहिजे, त्याचा माज येता कामा नये.. मिळाल्या पदाचा उपयोग जनतेच्या हितासाठी करा, दुरुपयोग केला तर आम्ही आहोतच.. अशा शब्दात सुजय विखे यांनी नाव न घेता आमदार विवेक कोल्हे यांच्यावर निशाणा साधला आहे.. या वार पलटवारामुळे अहिल्यानगर जिल्ह्यात विखे आणि कोल्हे यांच्यातील पक्षांतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर आला आहे..0
0
Report
Advertisement
अकोला के पातूर नगरपालिका चुनाव में महत्त्वपूर्ण मुकाबला, 69 उम्मीदवार चुनाव मैदान में
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी आज सकाळी मतदान प्रक्रियेला उत्साहात सुरुवात झाली आहे.नगराध्यक्ष पदासाठी पाच उमेदवार रिंगणात असून 20 नगरसेवक पदांच्या जागांसाठी 69 उमेदवार आपले नशीब आजमावत आहेत.तब्बल दहा वर्षांनंतर होत असलेल्या या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पातूर शहरातील विविध मतदान केंद्रांवर सकाळपासूनच मतदारांची गर्दी पाहायला मिळत आहे.एकूण 17,933 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे.मतदान शांततेत व सुरळीत पार पडावे यासाठी प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.यंदाच्या निवडणुकीत राजकीय समीकरणांनाही विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे.राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट), वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएम यांनी आघाडी करत सत्ता मिळविण्यासाठी जोरदार मोर्चेबांधणी केली आहे, त्याचप्रमाणे काँग्रेस आणि उबाठा ने आघाडी तयार केली तर राज्यात मित्र पक्ष असलेले भाजप आणि शिवसेना एकनाथ शिंदे दोन्ही एकमेकांच्या विरोधात ही निवडणूक लढत आहे.त्यामुळे मतांचे विभाजन कोणाच्या पथ्यावर पडणार आणि नगराध्यक्षपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
NEET: अब्दुल्ला के लिए नागपुर में परीक्षा केंद्र बदले जाने का आश्वासन
Nagpur, Maharashtra:नीट ची मूळ परीक्षा ज्या विद्यार्थ्याने नागपूरात दिली, त्याला अबुधाबी चा परीक्षा केंद्र कसा देऊ शकता??? असा प्रश्न अब्दुल्लाचे वडील डॉ. मोहम्मद तालीब यांनी विचारला आहे... Zee.मीडिया सोबत exclusive बातचीत करताना डॉक्टर तालीब म्हणाले की त्यांनी काल एडमिट कार्ड डाउनलोड केल्यानंतर अबुधाबी चा परीक्षा केंद्र पाहिल्यानंतर तातडीने एनटीएच्या हेल्पलाइन वर संपर्क केले.. एन टी ए च्या अधिकाऱ्यांनी सांगितल्याप्रमाणे परीक्षा केंद्र बदलून देण्यासाठी मेलही केले.. एनटीएचे अधिकाऱ्यांनी आज दुपारी चार वाजेपर्यंत परीक्षा केंद्र बदलून नागपूर देण्याचे आश्वासन दिले आहे... त्यामुळे आता एन टी ए ने आपला आश्वासन पाळावे अशी अपेक्षा अब्दुल्लाच्या वडिलांनी व्यक्त केली आहे... धक्कादायक बाब म्हणजे अब्दुल्लाकडे सध्या पासपोर्ट नाही.. त्यामुळे जर एन टी ए ने त्याला परीक्षा केंद्र बदलून दिले नाही, तर त्याला परीक्षेला मुकावं लागेल आणि त्याचा एक वर्ष वाया जाईल... यापूर्वी झालेल्या(पहिली neet परीक्षा) परीक्षेत त्याला नागपुरातील सरस्वती विद्यालय हे केंद्र मिळाले होते प्रकरण काय - * पेपर फुटी चे आरोपानंतर वैद्यकीय अभ्यासक्रमात प्रवेशासाठीची नीट ची फेरपरीक्षा उद्या होणार आहे... * त्यासाठी सर्व परीक्षार्थींना NTA कडून प्रवेश पत्र देण्यात आले आहे... * नागपुरात मात्र अब्दुल्ला नावाच्या एका परीक्षार्थीने नागपूर, वर्धा किंवा भंडारा हे पर्याय परीक्षा केंद्रासाठी निवडले असताना त्याला यूएई मधील अबुधाबी परीक्षा केंद्र प्रवेश पत्रावर देण्यात आले आहे... * संबंधित विद्यार्थी आणि त्याच्या पालकांनी या संदर्भात एनटीएच्या हेल्पलाइनवर तक्रार करत परीक्षा केंद्र बदलून देण्याची मागणी केल्याची माहिती आहे... * परीक्षा केंद्र बदलून न मिळाल्यास now अब्दुल्ला परीक्षेपासून वंचित राहण्याची शक्यता आहे...0
0
Report
खरीप सीजन से पहले सोयाबीन दाम 700 रुपये गिर गए, किसान चिंतित
Washim, Maharashtra:वाशीम: सोयाबीन बाजार में हलचल: खरीप हंगामाच्या तोंडावर सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना दरघसरणीचा फटका बसला आहे. बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचे दर गेल्या काही दिवसांत प्रतिक्विंटल तब्बल 700 रुपयांनी घसरून 7,500 रुपयांवरून 6,800 रुपयांवर आले आहेत. दरातील घसरणीमुळे शेतकऱ्यांनी विक्रीला ब्रेक दिल्याने बाजारातील आवकही कमी झाली आहे. काल रिसोड और कारंजा बाजार समित्यांमध्ये मिळून केवळ 1,317 क्विंटल सोयाबीनची आवक झाली. दर वाढण्याच्या अपेक्षेने शेतकरी माल विक्री टाळत असले तरी खरीप हंगामासाठी बियाणे,खते व इतर खर्चासाठी निधीची गरज असल्याने त्यांच्या आर्थिक नियोजनावर परिणाम होत आहे.0
0
Report
Advertisement
