icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

परभणी के जिंतूर के सायखेडा गाँव में सडक नहीं पहुंची; ग्रामीण पाय-पाय को मजबूर

Parbhani, Maharashtra:स्वातंत्र्याचा अमृतकाळ साजरा होऊन गेला देश डिजिटल इंडियाच्या गप्पा मारतोय पण परभणीच्या जिंतूर तालुक्यात एक असं दुर्दैवी गाव आहे जिथे साधी सडकही पोहोचलेली नाहीजिंतूरमधील सायखेडा हे ते गाव जिथल्या ग्रामस्थांच्या नशिबी स्वातंत्र्यानंतरही केवळ पायपीट'च लिहिलेलं आहे आजतागायत या गावाला पक्का रस्ता मिळालेला नाही.पावसाळ्यात तर या गावाची अवस्था एखाद्या बेटासारखी होते विशेष म्हणजे हे गाव पालकमंत्री मेघना बोर्डीकर यांच्या मतदारसंघात येतं तरीही इथला वनवास संपलेला नाही सायखेडा गावला जायला रस्ता उपलब्ध नसल्याने गावकऱ्यांना पायपीट करत गाव गाठाव लागते याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी गजानन वाणी यांनी...
0
0
Report

धाराशिव कृषी विभाग में 22 करोड़ रुपए के घोटाले की आशंका, लाभार्थी सूची गायब

Dharashiv, Maharashtra:धाराशिवमध्ये कृषी विभागात २२ कोटींचा घोटाळ्याचा संशय; मोफत बी-बियाणे व खत वाटपाची नोंद गायब, लाभार्थी यादीही बेपत्ता! अँकर धाराशिव जिल्ह्यात कृषी विभागात मोठ्या घोटाळ्याचा संशय व्यक्त केला जातोय. खरीप आणि रब्बी हंगामासाठी शेतकऱ्यांना देण्यात येणारे मोफत बी-बियाणे, खत आणि औषधांचे किट वाटप झालेच नाहीत किंवा झाले असतील तरी त्याची अधिकृत नोंदच उपलब्ध नाही. तब्बल २२ कोटी रुपयांच्या या योजनेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. नेमका काय आहे हा प्रकार पाहूया या रिपोर्टमधून... कृषी विभागाकडून दरवर्षी हंगामापूर्वी शेतकऱ्यांना बी-बियाणे, कीटकनाशके आणि सुरक्षा साहित्याचे किट वाटप केले जाते. हे वाटप शेतकरी गट आणि अधिकृत यंत्रणेमार्फत केलं जातं. मात्र २०२५-२६ या कालावधीत धाराशिव जिल्ह्यात या किटचं वाटप झाल्याची कोणतीही ठोस नोंद नाही. धक्का... ज्यांना किट देण्यात आलं, त्यांची लाभार्थी यादीच उपलब्ध नाही. या प्रकरणाची पोलखोल जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत झाली. उभाठा गटाचे आमदार कैलास घाडगे पाटील यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला असता अधिकारी निरुत्तर झाले. २२ कोटी रुपयांच्या साहित्याचं नेमकं काय झालं, हा मोठा सवाल उपस्थित झाला आहे. झी २४ तासच्या टीमने जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांशी संवाद साधला असता अनेकांनी किट मिळालंच नसल्याचं सांगितलं. काही शेतकऱ्यांना केवळ अर्धवट किंवा कमी दर्जाचं बी-बियाणं मिळालं, मात्र खत, औषधं आणि सुरक्षा साहित्य मिळालंच नसल्याची तक्रार त्यांनी केली. आम्हाला कोणतंही किट मिळालं नाही... फक्त नावाला बी दिलं, पण औषधं आणि इतर साहित्य काहीच मिळालं नाही. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतली आहे. त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले असून दोषींवर कडक कारवाई केली जाईल, असा इशाराही दिला आहे. धाराशिवमध्ये कृषी विभागाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाला झालंय. शेतकऱ्यांच्या हक्काच्या योजनांमध्ये जर असा गैरव्यवहार होत असेल, तर जबाबदार कोण? आणि २२ कोटींचं साहित्य नेमकं कुठे गेलं? या चौकशीकडे आता संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. ज्ञानेश्वर पतंगे, झी २४ तास, धाराशिव.
0
0
Report

सोलापुर में व्यावसायिक गैस संकट: कीमतें बढ़ीं, गैस मिलना मुश्किल

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - एकीकडे कमर्शियल गैस के दरामध्ये भरमसाठ वाढ, तर दुसरीकडे सोलापुरात मात्र पैसे देऊनही गैस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक त्रस्त - एकीकडे व्यावसायिक गैसच्या दरात भरमसाठ वाढ तर दुसरीकडे पैसे देऊनही गैस मिळत नसल्याने हॉटेल व्यवसायिक त्रस्त - सोलापूरात दोन महिने उलटले तरीही व्यावसायिक गैसचा तुटवडा कायम - युद्धाच्या दोन महिन्यानंतर देखील सोलापुरातील हॉटेल व्यवसायिक अडचणीतच - व्यावसायिक गैस सिलिंडरचा तुटवड्यामुळे हॉटेल व्यवसायिक तसेच ढाबाचालकांचे मोठे आर्थिक नुकसान
0
0
Report
Advertisement

जुन्नर में 46 बिबटों का जेरबंद: वन विभाग का मास्टर प्लान सामने

Barav, Maharashtra:पुणे जिल्ह्याचा शिरूर तालुक्यातल्या पिंपरखेड गावात गेल्या काही महिन्यांपासून सूर्योदयाच्या आधी-आधी काळजाचा ठोका चुकायचा. ऊसाच्या प्रत्येक पात्यात मृत्यू दबा धरून बसला होता. पण जुन्नर वनविभागाने असं काही आव्हान दिलंय, ज्याचा डंका संपूर्ण देशात वाजतोय. भारतातीलच नाही तर जगातील सर्वात मोठे रेस्क्यू ऑपरेशन हे तुम्हाला अशक्य वाटेल, पण हे सत्य आहे! अवघ्या 3 ते 5 किलोमीटरच्या परिघातून गेल्या 120 दिवसांत तब्बल 46 बिबट्यांना जेरबंद करण्यात आलंय. एकाच परिसरात बिबट्यांची इतकी मोठी संख्या असणं निसर्जप्रेमींसाठी अभ्यासाचा विषय ठरलाय. रात्रं-दिवस गस्त, अत्याधुनिक तंत्रज्ञान आणि जीवावर उदार होऊन राबणाऱ्या वनविभागाने अखेर हा बिबट्यांचा गड सर केलाय.
0
0
Report

वाशीम में सेतु सेवा केंद्रों की तकनीकी खराबी, नागरिकों को भारी परेशानियाँ बनीं

Washim, Maharashtra:वाशीम: आपले सरकार सेतू सेवा केंद्रांची सेवा मागील पाच दिवसांपासून पूर्णपणे ठप्प झाली आहे. महा आयटीच्या पोर्टलमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे सर्व कामकाज बंद पडले असून वाशिम जिल्ह्यातील नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. उत्पन्न दाखला, अधिवास प्रमाणपत्र, जात प्रमाणपत्र, नॉन-क्रिमिलियर यांसारखी महत्त्वाची कागदपत्रे मिळत नसल्याने विद्यार्थी नागरिक आणि वयोवृद्धांना वारंवार सेतू केंद्रावर फेऱ्या माराव्या लागत असूनही काम होत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ही तांत्रिक अडचण दूर करून सेतू सुविधा सुरळीत करण्याची मागणी होत आहे.
0
0
Report
Advertisement

छत्रपती संभाजीनगर में शिंदे-राऊत के बीच राजनीति की हलचल, बच्चू कडू शिवसेना में शामिल?.

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मंत्री संजय शिरसाट यांची पत्रकार परिषद पॉइंटर ऑन सामना अग्रलेख. - बच्चू कडू यांनी शिवसेनेत सामील होण्याचा निर्णय विचारपूर्वक घेतलेला निर्णय. एकनाथ शिंदे यांच्यासोबत काम करताना त्यांना कल्पना आहे. राजकारणाची दिशा काय असेल म्हणून. यांनी काँग्रेस बरोबर केलेला घरोबा ती आत्महत्या न्हवती का!? काँग्रेस सोबत सनगत नव्हे तर शया केली. - प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने तयारी करीत असतो. 29 मध्ये भाजप किंवा शिवसेना स्वतंत्र लढू शकते. काही कोणाला थांबवले नाही. शिवसेना भाजप युती तुटताना पाहिलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करतील हे स्वप्न आहे. ते स्वप्नात आहे. आम्ही स्वप्नात नाही. ऑन महेश शिंदे विरोधकांना प्रवेश. - महेश शिंदे यांनी भाजप बरोबर सत्ता मिळविण्यासाठी जो प्रकार केला तो शिंदे साहेबांन मान्य न्हवता, मात्र शिंदे यांच्यावर निर्णय घेतील. त्याचा विरोधक आहे म्हणजे प्रवेश द्यायचा नाही असे नाही. देसाई यांनी शिंदे यांना विचारूनच निर्णय घेतला असावा. शिंदे यांचा निर्णय जाहीर करतील. - घरातील भांडण कोणत्या स्तरावर गेले मला माहिती नाही. मात्र भांडण मिटविण्यासाठी पुढील आठवड्यात बोलावले जाईल काही कटु निर्णय घ्यायचा ते शिंदे ठरवतील. - काही नेत्यांची वयक्तिक ताकद असते. ऑन संजय राऊत उद्घाटन. - एकदा काम केल्यावर त्याचा संदेश लोकांपर्यंत जायला पाहिजे त्याचा क्रेडिट घेतले पाहिज. माझे कुटुंब माझी जबाबदारी याचा किती जाहिरात केली आणि तसेच वागले. तुम्हाला विकास कामाचे दुःख होतोय, आम्ही घरात न बसणारे रस्त्यावर उतरणार लोक. ऑन शिंदे प्राण वाचवलं राऊत विधान. - यांच्या घरात का बंगाल चे बाबा बसले होते का? अनेकांना माहिती ऑक्सिजनचे टँकर कसे थांबले, रेमडोसिव्हर कशी आणल्या. कोरोनाच्या संसर्गातून शिंदे बाहेर निघाले मात्र त्यांनी सेवा सोडली नाही. ऑन सामंत जरांगे भेट दरम्यान विधानपरिषदेसाठी जरांगे यांना विचारणा? की हाकेसाठी संमती? - जरांगे पाटील यांना विधानपरिषदेच्या उमेदवारी द्यायची असे नाही. हे बोलणे चुकीचे आहे. उदय सामंत यांची भेट घेतली मात्र सध्या निवडणूकही नाही. ती वयक्तिक भेट होती. बच्चू कडू हे 2022 पासून आमच्या सोबत आहे. शिंदेवर त्यांचा विश्वास आहे. विदर्भातील चांगला जुना शिवसैनिक आणले. - लक्ष्मण हाके, जरांगे पाटील या कल्पित बातम्या आहेत. सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालण्याची भूमिका शिंदे यांची आहे. - महाराष्ट्रात सर्वांना एकत्र घेऊन जाण्याची टाकत फक्त शिंदे मधे आहे. ऑन बागेश्वर बाबा. - बाबाचा विधान चुकीचं होत त्याला आम्ही ठाम विरोध केला. खरातला देखील विरोध केला. बाहेरचे जे महाराज इथे येतात त्यांना आपले काही लोक सपोर्ट करतात. ऑन मराठीवरून नितेश राणे चेतावणी - हिंसा सगळीकडे झाली आहे. हा वाद काही आतापासूनच नाही. काही शक्ती येतात. ओवेसींच्या पिलावळ आहे.. ऑन संभाजीनगर वाढत्या हत्या घटना. - अत्यंत कमी वयातील मुलाकडून हत्या केल्या जात आहे. नशेच्या माध्यमातून अशा हत्या होत आहे. हे रोखण्यासाठी विशेष पथक निर्माण केले आहे. पोलिस आयुक्तांना सूचना देण्यात आल्या आहेत. ऑन 2029 स्वातंत्र्य लढण्याची तयारी सुरू आहे का? - कधीही कुणाचेही कोणतेही शाश्वत राजकारण नसते. अनेक युती अशा झाल्या की, कधी स्वप्नातही त्या होऊ शकत नाही. आपला पक्ष मजबूत करणे हा सर्वात मोठा उपाय. आमची भूमिका महायुती सोबत लढायची, ताकत विभागाला नको. ऑन रिक्षाचालक अशिक्षित दलवाई विधान. - असे नाही की फक्त गरीबच आणि अशिक्षितच रिक्षा चालवतो,असे म्हणणे चुकीचे आहे. उच्च शिक्षित तरुण देखील रिक्षा चालविता आहे. त्या वर्गाला खऱ्या अर्थाने कमी लेखत आहे. जो कोणी माणूस असेल त्यांनी महाराष्टात मराठी शिकवी. हुसेन दलवाई यांनी असे वक्तव्य करू नये. ऑन योगेंद्र पवार वक्तव्य. - अजितदादांची राष्ट्रवादी प्रत्येक जण स्वतःच्या डोक्यावर घेऊन पळत आहे. ते पक्ष स्वातंत्र्य आहे त्यांचा निर्णय त्यांना घेऊन द्या. ऑन भोर बलात्कार. - काही प्रकरणात आरोपीचा एन्काऊंटर करण्यात आला आहे.अशा नराधमाना चौकात येऊन शिक्षा द्यायला पाहिजे.
0
0
Report
Advertisement

पंढरपुर में भीड़ बढ़ी: गर्मी के बीच श्रद्धालु सुबह दर्शन के लिए पहुँचे

Pandharpur, Maharashtra:सलग आलेल्या सुट्ट्या और सुरू झालेली मे महिन्याची सुट्टी यामुळे पंढरपूर फुल्ल झाले. विठ्ठलाचे दर्शन रांग चंद्रभागेच्या तीरावरील सारडा भवन च्या पुढे पोचली आहे. सध्या पंढरपुरात सकाळी नऊ नंतर उन्हाची तीव्रता वाढण्यास सुरुवात होते. उष्णता असल्याने भाविकही सकाळी लवकर दर्शन रांगेत उभी राहत आहेत. या भाविकांच्या दर्शन रांगेला डोक्यावर जरी छत असले तरी पायाखालचे मॅट खराब झाल्याने भाविकांच्या पायांना उष्णतेचा त्रास होतो आहे. उजनी धरणातून सोडलेले पाणी चंद्रभागेत आल्याने चंद्रभागा ही दुथडी भरून वाहत असून पुढील काही दिवस पंढरपुरात अशीच गर्दी पाहायला मिळणार आहे.
0
0
Report
Advertisement

कटेपुरणा वन्यजीव अभयारण्य में बौद्ध पूर्णिमा पर मचान से वन्यजीव गणना हुई सफल

Washim, Maharashtra:वाशीम: बौद्ध पौर्णिमेच्या चांदण्यात मचान प्राणी गणना उत्साहात पार पडली. वन विभागाने उन्हाळ्यात पाणवठ्यांवर येणाऱ्या वन्यप्राण्यांच्या निरीक्षणासाठी कोअर व बफर क्षेत्रात एकूण ११ मचान उभारले होते. सर्व मचान लॉटरी पद्धतीने भरले गेले असून प्रत्येक ठिकाणी गाईड व सुरक्षा रक्षक तैनात होते. कृत्रिम पाणवठ्यांजवळ रात्रीभर निरीक्षण करताना सायाळ, हरिण, चितळ, बिबट, रानडुक्कर, कोल्हे, लांडगे तसेच विविध पक्ष्यांचे दर्शन झाले. या उपक्रमातून वन्यजीवांची संख्या, हालचाली व सवयींचा अभ्यास करण्यास मदत होणार असून अभयारण्यात जैवविविधतेच्या संवर्धनाला महत्त्वपूर्ण माहिती मिळणार आहे.
0
0
Report

लोणावळा के मिसिंग लिंक पर प्रवेश मार्ग को लेकर मनसे का विरोध

Varsoli, Maharashtra:मुंबई पुणे एक्सप्रेस वे पर मिसिंग लिंक ला मावळ तालुक्यातील मनसेने विरोध केला आहे. मुंबई पुणे एक्सप्रेस वे करण्यासाठी तसेच मिसिंग लिंक तयार करण्यासाठी मावळ तालुक्याच्या भूमीपुत्रांच्या मोठ्या प्रमाणात जमिनी गेल्या, मात्र लोणावळा शहरासाठी मिसिंग लिंक वर जाण्यासाठी सोयीस्कर प्रवेश नाही, लोणावळा परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश नसल्याने हा मिसिंग लिंक लोणावळा शहराचं पर्यटनाच्या फायद्याचा नाही, हा मिसिंग लिंक एक प्रकारे लोणावळा शहराचं पर्यटन कमी करण्याचा डाव आहे असा आरोप मावळ मनसेने केला आहे. राज्य सरकारला मिसिंग लींक सुरू ठेवायचं असेल तर त्यांनी लोणावळा आणि परिसरातील नागरिकांना मिसिंग लींक वर सोयीस्कर प्रवेश देणारा रस्ता कायमस्वरूपी तयार करून द्यावा अशी मागणी मावळ तालुक्यातील मनसेने केली आहे.
0
0
Report

वसई के बद्रीनाथ मंदिर में भक्तों की भीड़ सुबह से रात तक दर्शन के लिए

Vasai-Virar, Maharashtra:वसईत बद्रीनाथ मंदिरात भक्तांची प्रचंड गर्दी – सकाळपासून रात्रीपर्यंत दर्शनासाठी रांगे वसई पश्चिमेच्या नव्याने उभारण्यात आलेल्या बद्रीनाथ मंदिरात दिवसेंदिवस भक्तांची प्रचंड गर्दी वाढताना दिसत आहे. दिनांक २२ एप्रिल रोजी या भव्य मंदिराचे प्रतिष्ठापना सोहळा पार पडला असून, तेव्हापासूनच भक्तांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. उत्तरांचल मित्र मंडल वसई यांच्या अथक परिश्रमातून आणि अनेक वर्षांच्या प्रयत्नांतून हे मंदिर साकार झाले आहे. आज, शुक्रवार दिनांक १ मे रोजी पहाटे ६ वाजल्यापासूनच मंदिरात दर्शनासाठी भक्तांची मोठी गर्दी होती. दिवसभर अखंडपणे भक्तांची रांग लागलेली असून, संध्याकाळ उलटूनही हजारो भाविक बद्रीनाथ भगवानाच्या दर्शनासाठी प्रतीक्षेत उभे असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. या वाढत्या गर्दीमुळे मंदिर परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, श्रद्धा आणि भक्तीचा अनोखा संगम अनुभवायला मिळत आहे. स्थानिक भक्तांसह दूरवरूनही भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top