icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भास्कर जाधव ने तटकरे पर तीखा हमला, भानामती की धार पर सवाल

Chiplun, Maharashtra:चिपळूण - रत्नागिरी.. तटकरेंकडे नक्की कौनती भानामती? भास्कर जाधवांचा जोरदार टोला!.. अँकर आमदार भास्कर जाधव यांनी खासदार सुनील तटकरे यांच्यावर अत्यंत शेलक्या शब्दांत निशाणा साधला आहे.. शिवसेनेच्या जागेवर हक्क: सरळ सरळ ही जागा शिवसेनेचीच होती आणि ती शिवसेनेलाच मिळायला हवी होती, असा स्पष्ट दावा भास्कर जाधव यांनी केला है.. तटकरे यांच्या भानामतीवर प्रश्नचिन्ह: सुनील तटकरे यांच्यावर खोचक टीका करताना जाधव म्हणाले, "तटकरे यांच्याकडे नक्की कोणता जादूटोणा किंवा कोणती भानामती आहे,हेच कळायला मार्ग नाही." विरोधाभासावर आश्चर्य: ज्य पक्षाची मतं सर्वात जास्त आहेत, त्या पक्षाला ही जागा मिळाली; परंतु पूर्वी टोकाचा विरोध करणारे लोकसुद्धा आता या गोष्टीचे समर्थन करत आहेत. रहस्य शोधण्याची गरज: तटकरे यांच्या कडे अशी कोणती जादू किंवा भानामती आहे, जी विरोधकांनाही आपल्या बाजूने वळवून घेते, हे आता समजून घ्यावे लागेल, अशी टोमणा जाधव यांनी लगावला..
0
0
Report

शिवसेना उभरते गट में वाकचौरे की अनुपस्थिति पर खैरे ने कहा, निष्क्रिय नहीं रहेंगे

Shirdi, Maharashtra:शिवसेना उभाता गटाच्या वतीने आज साईंच्या शिर्डीत अहिल्यानगर जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ता मेळावा पार पडला... मात्र इस मेळाव्यात विद्यमान सेना खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांची अनुपस्थिती याची चर्चा दिसून आली.. गेल्या काही दिवसांपासून वाकचौरे शिंदे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरू आहे आणि त्यातच त्यांच्या अनुपस्थिती असल्याने चंद्रकांत खैरे यांनी भाषणातून त्यांना वेगळे न वागण्याचा सल्ला दिला... चंद्रकांत खैरे भाषण पॉइंटर ऑन वाकचौरे अनुपस्थिती आज मेळाव्याला खासदार दिसत नाही... कदाचित कुठे गावाला गेले असतील.. यापूर्वी देखील असे एकदा झालं होतं.. त्यावेळी मी दोघा नवरा बायकोला दिल्लीला बोलावून चर्चा केली होती.. ( सेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केल्याचा किस्सा ) त्यावेळी त्यांना तिकीट देण्यात माझा सर्वात मोठा वाटा होता.. त्यावेळी तुम्ही गेले.. मात्र त्यांनंतर उद्धव साहेबांनी तुम्हाला माफ केलं.. आता आज तुम्ही पुन्हा सेनेचे खासदार झालेात.. मात्र ते कार्यकर्त्यांना भेटत नाही अशा तक्रारी येतात.. त्यांच्या अपरोक्ष हा मेळावा आज घेतला त्याबदल अभिनंदन.. मला वाटत नहीं ते आजही अधिकृतपणे गेले नाहीत.. त्यांनी जाऊ नये ही माझी विनंती. बाकी त्यांची मर्जी.. मात्र अस बरोबर नाही, स्टेज स्पीच - चंद्रकांत खैरे
0
0
Report
Advertisement

सोलपुर विधान परिषद उम्मीदवारों के ऑडियो क्लिप वायरल: दबाव के आरोप

Solapur, Maharashtra:सोलापुर ब्रेकिंग : सोलापुर विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार आदित्य फत्तेपूरकर आणि सूचक अनुमोदक उमेदवाराची ऑडिओ क्लिप व्हायरल - सोलापूरात विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार आणि सूचक अनुमोदक यांच्यातील ऑडिओ क्लिप व्हायरल - नागेश भोसले यांच्यावर दबाव असल्याची ऑडिओ क्लिप काँग्रेसच्या आदित्य फत्तेपूरकर यांच्याकडून व्हायरल - सूचक नागेश भोसले यांच्यावर भाजपच्या तीन लोकांचा दबाव असल्याचे ऑडिओ क्लिप मध्ये असल्याचा दावा - नागेश भोसले यांच्या सह्याची तपासणी करण्यात यावी. दोन्ही सह्या एकच आहेत. निवडणुकीवर दबाव असल्याने ही निवडणूक प्रक्रिया थांबवण्याची केली मागणी
0
0
Report

धाराशिव के शंभू महादेव कारखाने में 665 कर्मचारियों के नाम पर बोगस कर्ज मामला

Dharashiv, Maharashtra:धाराशिव शंभू महादेव साखर कारखान्याच्या 665 कर्मचाऱ्यांच्या नावावर करोडो रुपयांचे बोगस कर्ज. बँकांच्या वसुलीसाठी कर्मचाऱ्यांना नोटिसा. शंभू महादेव कारखाना कर्ज घोटाळा. धाराशिव जिल्ह्यातील शंभू महादेव साखर कारखान्यात तब्बल 665 कर्मचाऱ्यांच्या नावावर बोगस कर्ज उचलल्याचा धक्कादायक आरोप समोर आला आहे. बनावट कागदपत्रे, खोटे सातबारा आणि बनावट सह्या वापरून कोट्यवधींचे कर्ज मंजूर झाल्याचा दावा करण्यात येत असून, केनरा बँकेच्या नोटिसा कर्मचाऱ्यांच्या घरी पोहोचताच खळबळ उडाली आहे. सुमारे 40 कोटी रुपयांच्या या कथित कर्ज घोटाळ्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट ओढवले आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.
0
0
Report

महाराष्ट्र में राष्ट्रीय बाज़ार योजना लागू, जयकुमार रावल बनें राष्ट्रीय बाजार समिति के अध्यक्ष

Navi Mumbai, Maharashtra:महाराष्ट्र कृषी उत्पन्न पणन अधिनियम १९६३ मध्ये सुधारणा करून राज्यात राष्ट्रीय बजाराची अंमलबजावणी करण्यात आलेय. मुंबई बाजार समिती मधील संचालक मंडळ आजपासून बरखास्त करत राज्यात राष्ट्रीय बाजार समिती लागू करण्यात आलेय. पणनमंत्री जयकुमार रावल यांची राष्ट्रीय महत्वाचे बाजाराच्या अध्यक्षपदी नेमणूक करण्यात आली असून जयकुमार रावल यांनी आज नवी मुंबईतील एपीएमसी बाजार समितीमध्ये आपला पदभार स्वीकारलाय. यामुळे शेतकऱ्यांना त्यांचा माल ऑनलाईन पद्धतीने देशभरातील व्यापाऱ्यांना विकता येणे शक्य होणार आहे. राज्य सरकारचे धोरण शेतकऱ्यांना केंद्रस्थानी ठेवून काम करण्याचे आहे. शेतीमालाला अधिक भाव मिळावा यासाठी पीक काढणीनंतरची संपूर्ण साखळी मजबूत केली जाणार. कोल्ड स्टोरेज, गोदामे, कृषी उत्पन्न बाजार समित्या आणि निर्यात व्यवस्था बळकट करण्यावर भर. राष्ट्रीय महत्त्वाच्या बाजारपेठा (Market of National Importance) विकसित करण्याचा सरकारचा मानस. भविष्यात सुमारे ११०० ते १२०० एकर क्षेत्रावर जगातील सर्वात मोठी कृषी बाजारपेठ महाराष्ट्रात उभारण्याचा संकल्प. या बाजारपेठेद्वारे महाराष्ट्रातील शेतीमाल जागतिक बाजारपेठेत पोहोचवण्याचा प्रयत्न. एअरपोर्ट, सीपोर्ट, कंटेनर पोर्ट, रेल्वे आणि महामार्गाशी जोडलेली आंतरराष्ट्रीय दर्जाची बाजारपेठ उभारण्याची संकल्पना. देशातील प्रभावी बाजार समित्यांचे आधुनिकीकरण आणि उन्नतीकरण करण्यात येणार. अनुभवी अधिकारी, माजी संचालक, माजी अध्यक्ष आणि क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सल्ल्याने कामकाज केले जाईल. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीची निवड शेतकऱ्यांची पिळवणूक आणि कथित भ्रष्टाचाराच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याचा दावा.
0
0
Report
Advertisement

संजय राऊत की धमकी के बाद विक्हे पाटील पर नया हमला, शिवसेना की चेतावनी

Shirdi, Maharashtra:Shirdi News Flash विखे पाटील लवकरच भिकेला लागणार... विखे पाटलांच्या बालेकिल्ल्यातून खा.संजय राऊत यांचा विखे पाटलांवर जहरी टीका... राधाकृष्ण विखे पाटील तुम्ही शिवसेनेच्या नादाला लागू नका.. खा.संजय राऊत यांचे विखे पाटलांना बालेकिल्ल्यातूनच खुलं आवाहन... शिवसेनेच्या नादाला लागलात तर संजय राऊत तुमच्या मतदारसंघात ठाण मांडून बसेल... ज्या दिवशी आमची म्हणजेच उद्धव ठाकरेंची सत्ता येईल तेव्हा तुम्ही आमच्या दारात असाल... तुमच्या वडिलांना आणि तुम्हाला एकाच वेळी केंद्रात आणि राज्यात मंत्रीपदे याच शिवसेनेने दिलीये , हे विसरू नका.. अनेक घर बदलून तुम्ही भाजपमध्ये गेलात , त्यामुळे तुम्ही लाचारीचे काम चालू ठेवा... भाजपचे मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांना बालेकिल्ल्यातच खा.संजय राऊतांकडून कोपरखळी...
0
0
Report

संभाजी नगर महायुती में बगावत और सीट बंटवारे पर शिवसेना-भाजप के बीच घमासान

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर की विधान परिषद की पारंपरिक सीट शिवसेना की मानी जाती थी, परंतु वह सीट भाजपा को मिल गई जिससे शिवसेना में नाराजगी है। इस खबर में अब्दुल सत्तार के बेटे ने सीधे उमेदवारी का अर्ज भरा और महायुती के भीतर बगावत की खबरें उभरीं। भाजपा हमारे मान-सम्मान को नहीं दे रही—यह आरोप अब्दुल सत्तार ने लगाए। इसी बीच एकनाथ शिंदे ने संभाजी नगर के शिवसेना नेताओं की बैठक बुलाने की बात कही। संभाजी नगर महायुती में बगावत, भाजपा को सीट मिली और शिवसेना ने अर्ज भरा। यह कदम शिवसेना को समाप्त करने की एक साजिश बताया गया। अब्दुल सत्तार की नाराज़गी, दानवे- सत्तार के बीच में तकरार, और वरिष्ठ नेताओं के निर्णय पर निर्भर आगे की राह दिख रही है। साथ ही किशोरी पेडणेकर ने टिप्पणी दी कि सामने आने वाले दिनों में स्थिति स्पष्ट होगी।
0
0
Report

नागावे के अवैध प्लास्टिक यूनिट में आग, प्रशासन अभी तक कारण नहीं खोज पाया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..(चिपळूण) नागावे अवैध प्लास्टिक युनिट आग प्रकरण.. २ महिन्यांनंतरही प्रशासन सुस्त, वरिष्ठ स्तरावर तक्रार होणार.. ​अँकर: नागावे येथील मोहम्मद सिराज खान यांच्या अवैध प्लास्टिक रिसायकल युनिटला २१ मार्च रोजी लागलेल्या आगीचे कारण शोधण्यात प्रशासन अपयशी ठरले आहे. प्रशासनाकडून अजूनही "नेमके कारण शोधण्याचे काम सुरू आहे" असेच उत्तर दिले जात आहे.हिंदू राष्ट्र समन्वय समितीच्या पाठपुराव्यानंतर काल, १३ मे रोजी MPCB ने पाहणी केली असता, २ महिन्यांनंतरही तिथे प्लास्टिक दुमसत असून विषारी धूर पसरत असल्याचे समोर आले.प्रांताधिकारी, पोलीस आणि MPCB ने कोणतीही कारवाई न केल्याने, प्रशासन अवैध धंदेवाल्यांना पाठीशी घालत असल्याचा संशय निर्माण झाला आहे.याप्रकरणी आता वरिष्ठ स्तरावर तक्रार केली जाणार असल्याचे समितीने म्हटले आहे.
0
0
Report
Advertisement

पुणे-नाशिक महामार्गावर मंचरमध्ये शेतकऱ्यांचा रोष: कांद्याच्या भावासाठी महाविकास आघाडीचा रास्ता रोको

Manchar, Maharashtra:गेली कित्येक दिवस घामाच्या दामासाठी बळीराजा रस्त्यावर उतरलाय. ज्या कांद्याने अनेकांच्या डोळ्यात पाणी आणलं, तोच कांदा आज शेतकऱ्याच्या डोळ्यात रक्ताचे अश्रू आणतोय. एक किलो कांदा पिकवायला १५ ते १६ रुपये खर्च येतो, पण बाजारात भाव मिळतोय अवघा ७ ते ८ रुपये! नाफेडची खरेदी म्हणजे ऊंटाच्या तोंडात जिरं ठरणार आहे. याच संतापातून आज पुण्याच्या मंचरमध्ये पुणे-नाशिक महामार्गावर महाविकास आघाडीने विराट 'रास्ता रोको' केला. एका शेतकऱ्याने तर व्यासपीठावरच टोकाचं पाऊल उचलण्याचा प्रयत्न केलाय. ज्या कांद्याने भल्याभल्याांचे सत्तेचे सिंहासन हलवले, तोच कांदा आज महाराष्ट्राच्या मातीत कवडीमोल झालाय! घामाचे दाम मिळेनात, आणि हक्काच्या पैशासाठी बळीराजाला रस्त्यावर उतरावं लागलंय. नाशिकच्या आंदोलनानंतर सरकारने १५ रुपये ८० पैशांनी कांदा खरेदीची घोषणा तर केली... पण ती ठरली केवळ 'बोलाचीच कढी आणि बोलाचाच भात'! कारण दोन लाख मेट्रिक टन खरेदीने कोट्यवधी शेतकऱ्यांचे पोट कसे भरणार? हाच सवाल विचारत आज पुणे-नाशिक महामार्गावरील मंचरमध्ये जनसामान्यांचा आक्रोश फुटला! रोहित पवार (राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आमदार) आंदोलन शांततेत सुरू होतं, पण शेतकऱ्याच्या काळजातला संताप आणि हतबलता किती भयानक आहे, याचं जिवंत आणि थरारक रूप मंचरच्या व्यासपीठावर पाहायला मिळालं! कांद्याला भाव मिळत नाही म्हणून एका हताश शेतकऱ्याने थेट भर व्यासपीठावर विष प्राशन करून जीवनयात्रा संपवण्याचा प्रयत्न केला! सुदैवाने कार्यकर्त्यांनी त्याला रोखलं, पण या घटनेने महाराष्ट्राच्या व्यवस्थेला चपराक लगावली आहे! शशिकांत शिंदे (प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार) हर्षवर्धन सपकाळ(प्रदेशाध्यक्ष कॉग्रेस) यांनी म्हटलंय, तब्बल दोन तास पुणे-नाशिक महामार्ग ठप्प होता. हजारो वाहनांच्या रांगांनी ट्रॅफिकची पंगती मोडल्या. आंदोलने अधिक धारला पाहता पोलिसांनी दडपशाहीचे अस्त्र उपसले. आमदार रोहित पवार आणि खासदार निलेश लंके, प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे हर्षवर्धन सपकाळ आमदार बाबाजी काळे माजी आमदार अशोक पवार यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पण, या आणीबाणीजनक परिस्थितीवर रोहित पवारांनी स्पष्ट इशारा दिला, “आवाज दाबण्याचा प्रयत्न केला, तर हा वणवा अधिक पेटेल.” अतिरिक्त मांदियाळी मध्ये अतुल बेनके यांनी सांगितले की सरकारने कांदा २४ रुपये दराने खरेदी केली होती, पर आज महागाई वाढलीय त्यामुळे कांदा २५ ते ३० रुपये दराने खरेदी असायला हवा. नाफेडने दोन लाख नव्हे, तर दहा लाख मेट्रिक टन कांदा खरेदी करावा, ही मागणी आता मंत्र्यांच्या दालनापर्यंत पोहोचली आहे. महाविकास आघाडीचे नेते शेतकरी आता आरपारच्या लढाईसाठी सज्ज झालेत. आजचा रस्ता रोको फक्त एक ठिणगी होती, सरकारने वेळीच निर्णय केला नाही, तर या ठिणगीचा वणवा पुढे पेटतोच असं दिसतंय. प्रतिनिधी हेमंत चापुडे, झी मीडियाज मंचर पुणे.
0
0
Report

निवडणूक प्रक्रिया़ में बाधा पर प्रणिती शिंदे के खिलाफ मामला दर्ज कराने की मांग

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आमदारांची मागणी - निवडणूक प्रक्रियेत अडथळा आणल्याप्रकरणी खा. प्रणिती शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची भाजप आ. देवेंद्र कोठे यांची मागणी - खा. प्रणिती शिंदे यांनी निवडणूक प्रक्रियेमध्ये अडथळा आणल्याचा प्रशासनावर दबाव टाकल्याचा आ. देवेंद्र कोठेंचा आरोप - भाजपने काँग्रेसवर घेतलेल्या आक्षेपाबाबत निर्णय घेण्यापूर्वी प्रशासनावर लोकप्रतिनिधी म्हणून दबाव टाकल्याचा खा. प्रणिती शिंदे यांच्यावर आरोप - त्यामुळे आता खासदार प्रणिती शिंदेंवर गुन्हा दाखल होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे देवेंद्र कोठे ( भाजप, आमदार )
0
0
Report
Advertisement

बीड में वाल्मीक कराड समर्थक की दहशत, दलीत महिला पर बेदम मारहाण

Beed, Maharashtra:बीड: वाल्मीक कराडच्या समर्थकाची रंजेगावात दहशत.. घरासमोरच लघुशंका अन् जुगाराला विरोध केल्याचा संताप; दलीत महिलेच्या गुप्तांगावर अमानुष मारहाण, दोन चिमुकल्यांनाही फेकल्याचा आरोप! ANC - पिंपळनेर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील रंजेगाव येथे धक्कादायक आणि मानवतेला काळीमा फासणारी क्रूर घटना समोर आली आहे. गावातील जुगाराच्या अड्ड्याला विरोध केल्याच्या कारणावरून एका दलीत महिलेला अमानुष मारहाण करण्यात आली आहे. या प्रकरणात आरोपी निखिल आबूज व त्याच्या चार ते पाच साथीदारांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित आरोपी वाल्मीक कराडचा समर्थक आहे. वाल्मीक कराडसोबतचे फोटो देखील आता समोर आले आहेत. गावात सुरू असलेल्या जुगाराच्या डावामुळे लहान शाळकरी मुलांवर वाईट परिणाम होईल, असे संबंधित महिलेने म्हटले होते. शिवाय महिलेच्या घरासमोरच लघुशंका करण्यात आली याच कारणावरून संतप्त झालेल्या आरोपींनी महिलेला बेदम मारहाण केली आहे. इतकेच नव्हे तर, शरीरावर मारहाणीच्या खुणा दिसू नयेत म्हणून तिच्या गुप्तांगावर बेल्टने मारहाण करण्यात आल्याचा क्रूर आणि भयाण प्रकार समोर आला आहे. या हल्ल्यावेळी महिलेच्या दोन लहान मुलांनाही आरोपींनी उचलून फेकले मात्र सुदैवाने त्यांना किरकोळ इजा झाली आहे. त्यामुळे परिसरात संतापाची लाट उसळली आहे. मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या महिलेवर सध्या बीडच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गुन्हा दाखल झाला असला तरी आरोपींना अद्याप अटक करण्यात आलेली नाही..
0
0
Report

राजापूर के धरण उपोषण पर नेताओं की चुप्पी और सरकार पर सवाल

Ratnagiri, Maharashtra:राजापूर - रत्नागिरी.. राजापूर जामदा धरण उपोषण.. कोकण विधान परिषद निवडणूक उमेदवारी अर्ज करिता सर्व पक्षाचे दिग्गज नेते रत्नागिरीत आले होते त्यातील एकालाही असं वाटलं नाही की राजापुरात ही लोक भर उन्हातान्हात रस्त्यावर बसून साखळी उपोषण करतायेत..तिथं त्यांना जाऊन भेटावं असं अजिबात वाटले नाही.. याचा विचार कोकणातल्या लोकांनी करावा.. जे आले होते त्यांनी कमीत कमी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन सौजन्य दाखवायला पाहिजे होतं.. लोकांच्या अडचणी कडे आणि तक्रारींकडे लक्ष देण्याची गरज सत्ताधारी पक्षातील लोकांना वाटत नाही.. कारण दिवसा घरी सत्ताधारी पक्ष हा सर्व बाजूंनी इतका मजबूत होत चाललाय त्यामुळे कुठल्याही विरोधकाची दखल घेणं त्यांना आवश्यक वाटत नाही..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top