445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बोरीवली में जन्मदिन समारोह के दौरान हवा में गोलीबारी का वीडियो वायरल, पुलिस जांच शुरू
Mumbai, Maharashtra:बोरीवली येथील वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली भर रस्त्यात बंदुकीतून कथित हवेत गोळीबार केल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात आकाश गुप्ता नावाच्या व्यक्तीचे नाव सोशल मीडियावर चर्चेत असून, त्याच्यावर गंभीर आरोप करण्यात येत आहेत. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये सार्वजनिक ठिकाणी हवेत गोळीबार झाल्याचा दावा केला जात आहे. जर हा दावा खरा ठरला, तर सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारे शस्त्राचा वापर करणे हा कायद्याचा गंभीर भंग मानला जातो. या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याची चर्चा आहे. या व्हिडिओनंतर सोशल मीडियावर तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, संबंधित व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी जोर धरत आहे. “अशा प्रकारची संस्कृती महाराष्ट्रात खपवून घेतली जाणार नाही,” अशी भूमिका अनेकांनी व्यक्त केली असून, महाराष्ट्र पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल करून कायद्यानुसार कठोर कारवाई करावी, अशी मागणीही होत आहे. मात्र, या व्हायरल व्हिडिओतील दावे आणि घटनेची सत्यता अद्याप अधिकृतपणे स्पष्ट झालेली नाही. संबंधित व्यक्तीकडे शस्त्राचा वैध परवाना होता का, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. या संपूर्ण प्रकरणात पोलीस काय भूमिका घेतात, व्हिडिओची सत्यता तपासात काय निष्पन्न होते आणि पुढे कोणती कायदेशीर कारवाई केली जाते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
उदय सामंत: सुप्रीम कोर्ट में विरोधी भाषा नहीं चलेगी; वकील ही दलील देंगे
Kolhapur, Maharashtra:शिवसेना पक्ष और चिन्हा संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक ज्या पद्धतीने बाजू मांडत आहेत, त्यापेक्षा सत्यता असलेली बाजू आमचे वकील मंडळी कोर्टात मांडतील; त्यामुळे या संदर्भात अधिक बोलणे उचित नाही असे राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. आम्ही जे केलं आहे उसकी कागदपत्रं आमच्या वकीलांनी दाखल केली आहेत, आम्हाला योग्य तो न्याय मिळेल अशी खात्री आम्हा सर्वांना वाटते. पण सर्वोच्च न्यायालय याचिका संदर्भात सुनावणी सुरू असताना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे लोक ज्या पद्धतीने बोलतात तसे बोलून चालणार नाही असे देखील उद्या सामंत म्हणालेत. कोल्हापुरात पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही भूमिका मांडली आहे.0
0
Report
ओबीसी प्रमाणपत्र निरस्त: नागपुर से मराठवाड़ा तक सत्ता-उलटफेर का माहौल
Nagpur, Maharashtra:नागपूर विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते. (On प्रमाणपत्र रद्द झाले.. जरांगे ) - ओबीसी हे संविधानिक आरक्षण आहे....लोकसंख्येच्या 52 टक्के लोकसंख्या होती 27 टक्के आरक्षण देण्यात आले.... त्यामध्ये आता जबरदस्तीने सरसकट द्या असं म्हणत शासन प्रशासन झुकत आहे... आणि त्यांच्या इच्छापूर्ती होत आहे...पण कायद्याच्या चौकटीत बसेल तर ते ओबीसी ठरतील. कायद्यात आणि बसत नसेल प्रमाणपत्र देऊ नये... व्हॅलिडीटी काढताना 1950 च्या पूर्वीचा पुरावा दिला... पाहिजे कुटुंबाची वंशावळ पाहिजे हे दिलेले जबरदस्तीचे प्रमाणपत्र आहे. त्यामुळे नियमात बसत नसल्याने ते व्हॅलिडीटी होत नाही. पर्यायाने कास्ट सर्टिफिकेटच्या आधारावर अनेकांनी निवडणूक लढली... जिंकून आलेत... सरकारचे पैसे गेले... आज त्या स्थानिक स्वराज संस्थेत जागा रिक्त कराव्या लागतील. नागपूर जिल्हा परिषदेत पुन्हा निवडणूक घ्यावी लागलो.. तेच मराठवाड्यात प्रमाणपत्र रद्द झाल्यामुळे मराठवाड्यात सुद्धा होणार आहे - *जरांगे पाटील समाजासाठी लढत आहे... त्यावर आक्षेप नाही... जात प्रमाणपत्र रद्द होत असेल तर नियमबाह्य काम सरकारने झुकून कोणाच्या दाबावात करावे हे सरकारने ठरवावे, कायदा आणि ससविधांपेक्षा कोणीही मोठ नाही, फडणवीस सरकारने कायद्याचा चौकटीत राहून प्रपत्र द्यावे...* (On माळशेज जमीन अधिग्रह विरोध) - *अदानी जिथे बोट ठेवले तिथं जागा मिळेल.... अदानी बोले मोदी चाले...महाराष्ट्र सरकार चाले, हजार पोलीस लावून जमिनी बळकावतील, जमीन भारताची आणि वीज पाकिस्तानला देत आहे..आपले वीज संच बंद पडून अडाणी कडून विकत घेत आहे...मोदी अदानी मैत्री टिकवण्यासाठी करावे लागते हे दिसून येते.. शेतकरी उध्वस्त करण्याचा धंदा सुरू आहे. आम्ही त्या ठिकाण जाऊ शेतकरी सोबत उभं राहू.... खूप जमिनी पडीक आहे, वन विभागाची लाखो हेक्टर जामीन दिली, वन विभागाच्या जागेचा वापर करा, वीज उत्पादन, गोड तेल, विमानतळ, पोर्ट, ग्रेनस, सिमेंट, डेटा सेंटर, रियल इस्टेट यात सर्वात पुढे आहे, 7 ते 8 लाख कोटी जमीन कवडीमोल भावात अदानीच्या घशात घातल्या आहे...कर्जमुक्त देश झाला असतात ..."सेवेकरी अदानीचा असा कारभार सुरू आहे.. * (On कंत्राटदार, आदिवासी शाळा) - आदिवासी आश्रम शाळेतील कंत्राटदार पैसे थकीत आहे..980 आश्रम शाळा 600 कोटी देत नसल्यानं आश्रम शाळेत अन्न मिळत नाही आहे.. 13 हजार कोटी कंत्राटदाराला देणे आहे, इतर ठेकेदार 58 हजार कोटी आहे, आता पत ओलांडण्याची राहिली आहे... पत गळ्यापर्यंत गेली... तोंडात जायची बाकी आहे, गांधी परिवार दोष देऊन मोकळे होईल.. (On मोहन भागवत gen झी) - जेन झी संदर्भात मोहन भागवत यांच्याकडे काय विचार आहे, देशभक्तीचे डोस देऊन संघाचा शाखेत या म्हणून सांगतील.., पुन्हा सत्येत येण्यासाठी सरसंघचालक यांचे प्रयत्न आहे.. युवा नेत्यांचा पोराना बोलावून खोटे देशभक्तीचे डोस पाजले जाईल, ही नाविन उपज आहे, (On गुंगी गुडीया ट्विट वाद) - *गुंगी गुडीया शिवी आहे का? यांची गोची झाली आहे... अजित पवार सारखा नेता जातो... साधा FIR होत नाही.. सत्तेसाठी लाचार असणारे नेते, ... कोणी ब्र काढत नाही... आणि गुंगी गुडिया बोलल्या म्हणून काय करत आहे.* - *त्यांनी अधिक बोलून प्रभावीपणे काम करावे...नाहीतर या पदावर राहणार नाही असे सांगावे... विमान अपघाताची संपूर्ण चौकशी होत नाही तो प्रयन्त पदावर राहणार नाही असे सुनेत्रा पवार यांनी सांगावे... एवढं बोला तरी...राजीनामा नका देऊ, काँग्रेस राजीनामा मागणार नाही.. पण त्यांनी बोलावे..* - बलात्काराची मिरवणूक काढता त्यांनी आम्हाला महिलांच्या संदर्भात सांगावा - माणीपुर मध्ये ना गृहमंत्री गेले, ना पंतप्रधान गेले ते आम्हाला महिलांच्या संरक्षणाची गोष्टी सांगतील का रोज बलात्कार आणि अत्याचाराचे गुन्हे घडत आहे,.. - माजी खासदार ब्रिज भूषण आणि दोषमुक्त होतो..... त्याला यावरून यांची नियत काय आहे? - *राष्ट्रवादीला सांगतोय गुंगी गुडिया म्हटल्यावर ज्या ताकदीने इंदिरा गांधी आयरन लेडी म्हणून देशात नाहीतर जगात प्रसिद्ध झाल्या तसं कर्तुत्व आणि सुनेत्रा ताईनी दाखवावं यासाठी त्यात थोडासा प्रयत्न होता...* (On मंडलं यात्रा.. OBC दुसरा टप्पा ) - देशातील ओबीसींना मूर्ख बनवण्याचा पहिला टप्पा पार पडला, जनगणनेचा दुसरा टप्पा सुरू होताना त्यात ओबीसीच्या कॉलम असावा यासाठी सरकारला ही मागणी घेऊन यात्रा काढत आहे, मोदी सरकारने दिलेल्या शब्द पाळावा अशी मागणी असणार आहे.. (On धनगेकर - भाजप सत्तेत लाडकी बहिणीमुळे आहे) - *भाजपचे जे दिवस फुलले हे महाविकास आघाडीचे सरकार गेल्यामुळे... एकनाथ शिंदे यांनी शिवसेना फोडली नसती तर भाजपने सरकार स्थापन केलं नसतं.... आज भाजपचे आमदार 40- 50 च्या पलीकडे राहिले नसते.... धनगेकर सत्य बोलत आहे...त्यावेळी एकनाथ शिंदे यांनी तिजोरी खाली करून महाराष्ट्रातील जनतेला वाटले....लाडकी बहीण योजना असे मुख्यमंत्री प्रशिक्षण युवा योजना असेल तिथे यात्रा काढली जो येईल.... त्याला मुक्त हस्ताने तिजोरी रिकामी कोणी केली...त्यामुळे भाजपचे चांगले दिवस आले, महाराष्ट्रात सत्ता गेली नसती आज जनता पक्षात नसते धनगेकरचा म्हणण्याला आधार आहे...* (On ओबीसी नेते आरोप) - त्यांना कोणाला म्हणायचे माहित नाही.... जय ओबीसी मधून सरकारच्या वर्षी बिल्डिंग बांधणारे आहे... सरकारचे धन घेऊन जायचे....ओबीसी म्हणत असतील तर त्यांना आम्हाला शुभेच्छा आहे....आम्ही सरकारचं लागून चालणं चालन करण्यासाठी ओबीसीचे मेळावे देशात कुठे होत असेल तर मी जाणार नाही... (On ब्रह्मपुरी इथेनॉल वास त्रास दायक ) - तो गावाच्या जवळ प्लांट आहे. दूषित पाण्यासंदर्भात पर्यावरण विभागाच्या अधिकाऱ्यांशी बोललो आहे...त्या ठिकाणी तिथे पाठवला आहे...लोकांना त्रास होत आहे घाण वास येत आहे.. बिमाऱ्याचे प्रादुर्भाव वाढण्याची भीती आहे...नाल्यात पाणी न सोडता शुद्धीकरण करावे, माझ्या मतदारसंघातील प्रश्न जो कोणी करत असेल त्यावर कारवाई करण्यासाठी अधिकारी यांच्याशी बोललो आहे..0
0
Report
Advertisement
मराठवाड़ा में किसानों की आत्महत्याओं का भयावह आंकड़ा; छह महीनों में 465 मौतें
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्यांची धक्कादायक आकडेवारी समोर आली आहे. १ जानेवारी ते ३० जून २०२६ या कालावधीत विभागातील आठ जिल्ह्यांमध्ये एकूण ४६५ शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी २१५ प्रकरणे मदतीसाठी पात्र, २६ प्रकरणे अपात्र, तर २२२ प्रकरणे चौकशी व निर्णयासाठी प्रलंबित आहेत. या आकडेवारीत छत्रपती संभाजीनगर आणि बीड जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक शेतकरी आत्महत्यांची नोंद झाल्याचे दिसून येते. अनेक प्रकरणे अद्याप चौकशी आणि निर्णयाच्या प्रतीक्षेत असल्याने शेतकरी कुुटुंबांना मदत मिळण्यात विलंब होत असल्याचेही या अहवालातून स्पष्ट झाले आहे. जिल्हानिहाय आकडेवारी : बीड – ९५ आत्महत्या छत्रपती संभाजीनगर – १०९ आत्महत्या नांदेड – ६१ आत्महत्या परभणी – ३४ आत्महत्या धाराशिव – ६५ आत्महत्या जालना – ४० आत्महत्या लातूर – २६ आत्महत्या हिंगोली – ३५ आत्महत्या0
0
Report
नागझिरा अभयारण्य में तेंदुए के हमले से ड्यूटी पर तैनात वनरक्षक की मौत
Bhandara, Maharashtra:नागझिरा अभयारण्यात उमरझरी गेट येथे कर्तव्यावर असलेल्या वनपालावर अस्वलाने अचानक हल्ला केल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला आहे. श्यामू शरणागत असे मृत वनपालाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे कर्तव्य बजावत असताना अचानक आलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले आणि त्यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले असून, पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, मृत वनपालाच्या कुटुंबीयांना तातडीने मदत देण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे. तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींवर लक्ष ठेवण्याची मागणीही ग्रामस्थांनी केली आहे.0
0
Report
रत्नागिरी के पूर्व भाजपा जिल्हाध्यक्ष राजेश सावंत का निधन, शोक की लहर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे निधन; राजकीय व सामाजिक क्षेत्रात शोककळा. भारतीय जनता पार्टीचे दक्षिण रत्नागिरीचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांचे कोल्हापूरहून रत्नागिरीला परतताना पाली येथे हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुर्दैवी निधन झाले. सावंत यांनी आपल्या अभ्यासू वृत्तीने आणि उत्तम संघटन कौशल्याने दक्षिण रत्नागिरीत भाजपची पक्षसंघटना मजबूत करण्यात महत्त्वपूर्ण योगदान दिले होते. कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे संबंध आणि स्पष्टवक्तेपणा यामुळे लोकप्रिय असलेले एक अभ्यासू नेतृत्व हरपल्याने रत्नागिरीसह संपूर्ण कोकणातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून तीव्र हळहळ व्यक्त केली जात असून सर्वपक्षीय नेत्यांकडून त्यांना श्रद्धांजली वाहिली जात आहे.0
0
Report
Advertisement
रणजितसिंह नाईक ने अमित शाह से रेल-बुलेट ट्रेन परियोजनाओं पर तेज़ी का भरोसा लिया
Pandharpur, Maharashtra:माढयाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी लोकसभा अधिवेशन काळात नवी दिल्ली मध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची शासकीय दालनात भेट घेतली. यावेळी पश्चिम महाराष्ट्रातील राजकीय घडामोडी आणि आगामी रणनीतीवर चर्चा केली. तसेच पंढरपूर – फलटण रेल्वे प्रकल्पाला गती देणे, मुंबई हैदराबाद बुलेट ट्रेन प्रकल्प आणि फलटण शहरा लगतच्या बाणगंगा नदीचा नमामि गंगे योजनेमध्ये समावेश करणे आणि विविध विषयांवर चर्चा केली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या सोबत या विषयावर सकारात्मक चर्चा झाली आहे. वरील प्रकल्प तातडीने मार्गी लागण्यासाठी मदत करण्याची भूमिका शाह यांनी घेतल्याची माहिती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली0
0
Report
भागवत अगस्त के अंत में अमेरिका दौरे पर, वैश्विक संपर्क अभियान का हिस्सा
Nagpur, Maharashtra:नागपूर ब्रेकिंग सरसंघचालक डॉ. मोहन भागवत ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस अमेरिका दौरा करणार संघाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सरसंघचालकांचा हा दौरा शताब्दी वर्षाच्या जागतिक संपर्क अभियानाचा महत्त्वाचा भाग आहे. या दौऱ्यात अमेरिकेत एका शहरात ते संवादही साधणार आहे याशिवाय ते अजून एका शेजारील देशात जाण्याची शक्यता आहे हिंदू स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून सरसंघचालकांचचा हा दौरा आयोजित करण्यात आला आहे0
0
Report
नागपुर में सावजी समाज ने तुकाराम मुंढे से माफी मांगने के लिए प्रदर्शन किया
Nagpur, Maharashtra:तुकाराम मुंढे यांनी सावजी हलबा समाजाची माफी मागावी, त्यांनी एकदा तरी गोळीबार चौकात यावं, आमच्या घरी जेवण करावं, त्यानंतर बोलावे अशी शब्दात नागपूरात सावजी म्हणजेच हलबा समाजाने तुकाराम मुंढे यांना खुला चॅलेंज दिला आहे. सावجي समाज गेले अनेक वर्ष सावजी मसाल्याची निर्मिती करत आहे. सावजी पूर्णपणे घरगुती मसाला असून त्यात कुठल्याही प्रकारची भेसळ नाही. त्यामुळे सावजी मसाला आणि जेवणाबद्दल तुकाराम मुंढे यांचा वक्तव्य सावजी समाजाचा अवमान करणारे आहे. तुकाराम मुंढे यांनी बिनशर्त माफी मागावी अशी मागणी सावजी समाजाने केली आहे. आज नागपूरातील गोळीबार चौकावर सावजी समाजाच्या वतीने तुकाराम मुंढे यांच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले. यावेळी समाजातील तरुण कार्यकर्त्यांनी तुकाराम मुंढे यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आमच्या आया बहिणींनी वर्षानुवर्षे मेहनत करून विकसित केलेलं सावजी मसाला तुकाराम मुंढे यांनी बदनाम केल्याचा आरोप केला. तुकाराम मुंढे यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्या विरोधात तीव्र आंदोलन करू असा इशाराही यावेळी देण्यात आला. एवढंच नाही तर सावजी समाजाच्या वतीने नागपूरच्या तहसील पोलीस स्टेशनमध्ये तुकाराम मुंढे यांच्या विरोधात तक्रारही देण्यात येणार आहे.0
0
Report
Advertisement
माळशेज घाटात रात्री भीषण अपघात; कार पलटी, पाच जण गंभीर जखमी
Shirur, Maharashtra:माळशेज घाटात मध्यरात्री भीषण अपघात झाला. करंजाळे येथे रस्ता खचल्याने वाहतूक बंद करण्यासाठी टाकलेल्या खडीच्या ढिगावर कार पलटी होऊन पिकअप जीपला धडकली. या अपघातात पाच जण गंभीर जखमी झाले. प्रतिनिधि हेमंत चापुडे झी मिडीया जुन्नर पुणे0
0
Report
पुणे-नाशिक महामार्ग पर भीषण ट्रक दुर्घटना, यातायात ठप्प; देखें क्या हुआ
Chakan, Maharashtra:पुणे-नाशिक महामार्गावर भीषण अपघात झाला. नाशिककडून आलेला कंटेनर डिव्हायडर मोडून विरुद्ध दिशेला गेला आणि पुणेाच्या दिशेने येणाऱ्या ट्रकला धडकला. या भीषण धडकेत ट्रक खाली कोसळला आणि त्याखाली वेगन-आर कार दबली. सुदैवाने या अपघातात जीवितहानी झाली नाही. खेड तालुक्यातील वाकी जवळ हा अपघात सकाळी सव्वासहाच्या sुमारास झाला. कंटेनर पुणे लेनवर आल्याने पुण्याकडे येणारी वाहतूक तासाभरापासून ठप्प आहे; नाशिककडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. महामार्ग पोलीस क्रेन घेऊन घटनास्थळी पोहचले असून अपघातग्रस्त वाहनं बाजूला काढण्याचे प्रयत्न सुरु आहेत.0
0
Report
डॉ अनिल काकोडकर: कोकण के शिक्षण को देगा नया फ्रेमवर्क
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी: डॉ. अनिल काकोडकर पद्मविभूषण, अणुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर की भूमिका कोकण में शिक्षा के फ्रेमवर्क पर केंद्रित है। कोकणाला मोठा शैक्षणिक वारसा; रत्नागिरीने देशाला अनेक विचारवंत दिले – डॉ. अनिल काकोडकर श्री विठ्ठलराव जोशी विद्यापीठामुळे कोकणातील शिक्षणाला नवे फ्रेमवर्क – डॉ. काकोडकर कोकणातील विचार अधिक समृद्ध करण्यासाठी विद्यापीठ महत्त्वाचे ठरेल – डॉ. काकोडकर मानवी क्षमता आणि आकलन किती वाढले, याचे भान ठेवणे आवश्यक – डॉ. काकोडकर जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पात प्रदूषणाचा मुद्दा नाही – डॉ. काकोडकर ‘न्यूक्लिअर एनर्जी इज अ क्लीन एनर्जी’ – डॉ. अनिल काकोडकर जैतापूर प्रकल्पातील फ्रेंच तंत्रज्ञानाची किंमत जास्त; विजेची किंमत आटोक्यात असणे आवश्यक अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा परीक्षा पद्धतीत वापर झाल्यास पेपरफुटी रोखता येईल – डॉ. काकोडकर प्रगत तंत्रज्ञान परीक्षा पद्धतीत का वापरले जात नाही, हे कळत नाही – डॉ. काकोडकर ‘एज्युकेशन करायचंय की बिझनेस, हे आधी ठरवावं लागेल’ – डॉ. काकोडकर विद्यार्थ्यांनी किती आत्मसात केले, हे तपासण्यासाठी परीक्षा महत्त्वाची – डॉ. काकोडकर शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर चांगले असेल तर परीक्षणाबाबत प्राध्यापकांना निर्णय घेऊ द्यावा शिक्षण व्यवस्थेत विश्वास ठेवणे सर्वांत महत्त्वाचे – डॉ. अनिल काकोडकर0
0
Report
Advertisement
नागपुर में ऑनलाइन दोस्ती से नाबालिग के साथ गैंगरेप जैसी वारदात, आरोपी गिरफ्तार
Nagpur, Maharashtra:नागपूरच्या हुडकेश्वर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून दोन ऑगस्ट रोजी बेपत्ता झालेली अल्पवयीन मुलगी गंभीर जखमी अवस्थेत दिघोरी परिसरातील एका घरातून मिळाली आहे... तिच्या हातावर चाकूची गंभीर जखम असून शरीरावर गंभीर मारहाणीच्या खुणा ही आढळल्या आहे... पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील ठाण्यातील निर्भय उर्फ आकाश पाखरे या 19 वर्षीय तरुणाने मुलीला दिघोरी परिसरातील त्या खोलीत बोलावून जखमी केले आणि तिच्यासोबत बळजबरी ही केली... निर्भय पाखरेची पीडित अल्पवयीन मुली सोबत तीन वर्षापासून ऑनलाइन ओळख होती... त्याच ओळखीतून दोघांमध्ये मैत्री जुळली होती... दोन ऑगस्ट रोजी निर्भय पाखरेने पीडित मुलीला भेटायला बोलावले होते... दोन ऑगस्ट च्या संध्याकाळपर्यंत पीडित मुलगी मोबाईल द्वारे आपल्या कुटुंबीयांच्या संपर्कात होती आणि मी मैत्रिणीकडे आहे असे तिने कुटुंबीयांना सांगितले होते... मात्र 2 ऑगस्ट चे रात्री तिचा फोन स्विच ऑफ झाल्यानंतर कुटुबीयांची चिंता वाढली आणि त्यांनी दोन आणि तीन ऑगस्ट च्या मध्यरात्री हुडकेश्वर पोलीस स्टेशनमध्ये मुलगी बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदवली... बेपत्ता झालेली मुलगी अल्पवयीन असल्याने पोलिसांनी अपहरणाचा गुन्हा दाखल करत शोध सुरू केलं... मोबाईल लोकेशन च्या आधारे आरोपी निर्भय पाखरे आणि पीडित मुलगी दिघोरी परिसरात असल्याचे पोलिसांना प्राथमिकरित्या कळले होते... पोलीस त्या भागात शोध घेत असताना एका झोमॅटो डिलिव्हरीवर शोध पथकातील पोलिसांचा संशय बळावला... पोलिसांनी ती डिलिव्हरी करणाऱ्या झोमॅटो बॉय ला विश्वासात घेऊन घराचा पत्ता विचारल्यावर आरोपीचा मोबाईल नंबर मिळाला... झोमॅटो डिलिव्हरी बॉय च्या मदतीने पोलीस पथकाने जेव्हा त्या घराचा दार तोडून आत प्रवेश केले तेव्हा पीडित मुलगी गंभीर जखमी अवस्थेत होती... आरोपी तरुणाने तिच्या हातावर चाकूने गंभीर वार केल्याचे आणि गेल्या काही तासात वारंवार तिला मारहाण केल्याचे पोलिसांच्या लक्षात आले... पोलिसांनी तातडीने पीडित मुलीला रुग्णालयात दाखल केले असून सध्या तिची प्रकृती धोक्या बाहेर आहे... पोलिसांनी आरोपी निर्भय पाखरेला अटक केली असून तो ठाण्यातील एका अत्यंत सुखवस्तू कुटुंबातील मुलगा असल्याचे समोर आले आहे... निर्भयने पीडित मुलीला जखमी करण्यासाठी वापरलेले चाकू आणि मारहाण करण्यासाठी वापरलेल्या इतर वस्तू ठाण्यातूनच सोबत आणल्या होत्या की नागपुरात आल्यानंतर खरेदी केल्या याचा तपास पोलीस करत आहे... एवढेच नाही तर कोणत्याही ओळखी शिवाय त्याने नागपुरात खोली भाड्यावर कशी घेतली याची चौकशीही पोलिसांकडून केली जात आहे...0
0
Report
सोलापुर में देवेंद्र फडणवीस को सोलापुरी चादरी से विशिष्ट सम्मान
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सोलापुरी चादरीने करण्यात आला विशेष सन्मान. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोलापूरच्या विकासासंदर्भात घेतलेले महत्त्वपूर्ण निर्णय तसेच त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सोलापूरकरांच्या वतीने अनोखी भेट. सोलापुरी चादरीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा फोटो साकारत त्यांनी आजपर्यंत घेतलेल्या ऐतिहासिक निर्णयांचा करण्यात आला उल्लेख. आ. देवेंद्र कोठे यांच्या संकल्पनेतून मुख्यमंत्र्यांना अनोखी भेट. सोलापुरी चादर आणि त्यावरील कल्पकता पाहताच मुख्यमंत्र्यांनी केले समाधान व्यक्त0
0
Report
छत्रपती संभाजीनगर में CJP की कोर कमिटी बैठक शुरू, आंदोलन की रणनीति तय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर मध्ये आज पासून CJPच्या कोअर कमिटीची सीजेपीची २ दिवसीय बैठक आहे, या बैठकीत आंदोलनाची पुढील रणनीती ठरणार असल्याचे सांगण्यात येताय, अभिजीत दीपकेच्या घरी ही बैठक आयोजित करण्यात आलीय. या बैठकीसाठी सौरभ दास आणि CJP चे सहकारी संभाजीनगरमध्ये अभिजित दिपके यांच्या घरी रात्रीच दाखल झालेत. या बैठकीत CJPची पुढील दिशा, ध्येय-धोरणे आणि आंदोलनाबाबतची भूमिका निश्चित केली जाणार असल्याची माहिती आहे. सोबतच सीजेपीचे काही लोक देशभर दौरा करणारे या दौऱ्याची आखणी सुद्धा या बैठकीत होणार आहे दरम्यान ही सगळी लोकं अभिजीतच्या घरी गेल्यावर त्याच्या आईने औक्षण करून सगळ्यांचे स्वागत केले0
0
Report
Advertisement
