445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
गणेशोत्सव से पहले खारपाडा टोल बंद कराने की मांग पर गडकरी ने भी सकारात्मक संकेत
Chendhare, Maharashtra:स्लग गणेशोत्सवाआधी खारपाडा टोल बंद करा मंत्री आमदार खासदारांची नितीन गडकरींकडे मागणी गणेशभक्तांना दिलासा देण्यासाठी टोल बंद करा गडकरींचा सकारात्मक प्रतिसाद निर्णय कधी खारपाडा टोलचा गणेशोत्सवाआधी फैसला होणार अॅंकर मुंबई-गोवा महामार्गाचं काम अद्याप पूर्ण झालेलं नसतानाही सुरू करण्यात आलेल्या खारपाडा टोल नाक्याचा मुद्दा आता पुन्हा ऐरणीवर आला आहे. काम पूर्ण होईपर्यंत हा टोल नाका बंद करावा अशी मागणी रायगड जिल्ह्यातील आमदार खासदार आणि मंत्र्यांकडून करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनीही या मागणीला सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. मात्र गणेशोत्सव अवघ्या चार-पाच दिवसांवर येऊन ठेपलाय. कोकणात दाखल होणाऱ्या लाखो गणेशभक्तांचा प्रवास याच मार्गावरून होणार आहे त्यामुळे उत्सवापूर्वी तातडीने निर्णय घेऊन खारपाडा टोल नाका बंद करावा आणि गणेशभक्तांना दिलासा द्यावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. शिवेंद्रराजे भोसले वॉक थ्रू खारपाडा टोलनाक्यावरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रफुल्ल पवार यांनी0
0
Report
औंढा नागनाथ मंदिर में श्रावण सोमवार पर भक्तों की भारी भीड़, फूलों से सजावट
Hingoli, Maharashtra:अँकर - बारा ज्योतिर्लिंगांपैकी आठवे ज्योतिर्लिंग असलेल्या औंढा नागनाथ मंदिरात, श्रावणी सोमवारनिमित्त भाविकांनी दर्शनासाठी अलोट गर्दी केली आहे. आज श्रावण महिन्यातील शेवटचा सोमवार असल्याने, देशभरातून हजारो भाविक नागनाथाच्या चरणी नतमस्तक होण्यासाठी औंढा नागनाथ येथे दाखल झाले आहेत. मध्यरात्री दोन वाजता मंदिरात शासकीय महापूजा आणि दुग्धाभिषेक संपन्न झाल्यानंतर, मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी खुले करण्यात आले. काल रात्रीपासूनच भाविकांनी दर्शनासाठी लांबलचक रांगा लावल्या होत्या. बम बम बोले आणि हर हर महादेव च्या गजराने संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला आहे. या शेवटच्या श्रावणी सोमवारचे औचित्य साधून मंदिर प्रशासनाच्या वतीने नागनाथ मंदिराला आकर्षक फुलांची मनमोहक सजावट देखील करण्यात आली आहे.0
0
Report
श्रावण के चौथे सोमवार पर घृष्णेश्वर मंदिर में भक्तों की भीड़, कड़े सुरक्षा उपाय
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:श्रावण महिन्यातील चौथ्या व शेवटच्या सोमवारच्या पार्श्वभूमीवर १२ ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री घृष्णेश्वर मंदिरात भाविकांची गर्दी उसळली आहे. दोन लाखांहून अधिक भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज असून या पार्श्वभूमीवर मंदिर देवस्थान ट्रस्ट आणि जिल्हा प्रशासनाने सुरक्षेचे व सुविधांचे चोख नियोजन केले आहे. वीकेंडच्या सुट्ट्यांमुळे शनिवारपासूनच मंदिरात भाविकांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. सोमवारी पहाटेपासूनच सुरू होणाऱ्या गर्दीवर नियंत्रणासाठी पोलिस प्रशासनाकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गर्दीचे नियोजन करण्यासाठी विशेष बॅरिकेड्स आणि स्वतंत्र प्रवेश-बाहेर जाण्याचे मार्ग तयार करण्यात आले आहेत. भाविकांसाठी पिण्याचे پाणी, प्रथमोपचार आरोग्य सुविधा केल्या आहेत.0
0
Report
Advertisement
गोंदिया में मॉडिफाइड साइलेंसर वाले दोपहिया वाहन चालकों पर ट्रैफिक विभाग ने कड़ी कार्रवाई की
Bhandara, Maharashtra:फटाका सायलेंसरवर वाहतूक विभागाची धडक कारवाई....शहरात फटाका फोडणाऱ्या दुचाकींवर दणका.....वाहतूक शाखेने वाहनांना काढले शोधून....गोंदिया शहरात दुचाकींना मॉडिफाई सायलेंसर बसवून फटाक्यांसारखा कर्णकर्कश आवाज करत शहरातून फिरणाऱ्या वाहनचालकांवर जिल्हा वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात अशा मॉडिफाई सायलेंसर लावून धावणाऱ्या पाच दुचाकींवर कारवाई करण्यात आली आहे. मॉडिफाई सायलेंसरमुळे दुचाकींचा आवाज मोठ्या प्रमाणात वाढतो. विशेषतः रहिवासी भाग, बाजारपेठ आणि गर्दीच्या ठिकाणी अशा वाहनांमुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. तरुणांकडून दुचाकींच्या मूळ सायलेंसरमध्ये बदल करून फटाक्यांसारखा आवाज करणारे सायलेंसर बसविण्याचे प्रमाण वाढत असल्याने पोलिसांनी याची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी अशा वाहनांना शोधून कारवाईसाठी पुढाकार घेतला आहे. वाहतूक शाखेने ताब्यात घेतली आहे.0
0
Report
रेल्वे लाइन पर मालगाड़ी ने बिबट्या को कुचल दिया, मौके पर मौत
Bhandara, Maharashtra:रेल्वे रुळावर मालगाडीची धडक बिबट्या ठार गोंदिया ते चांदाफोर्टकडे जाणाऱ्या मालवाहू रेल्वे गाडीने वडेगाव रेल्वे स्थानक जवळ मालवाहू गाडीखाली चिरडून बिबट्या जागीच ठार झाला. या घटनेत बिबट्याचे शरीर एका बाजूला तर मुंडके दुसऱ्या बाजूला पडले होते. Railwaye विभागाने वन विभागाला माहिती देताच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी घटनास्थळी पोहचत मृत बिबट्याचा मोक्यावर पंचनामा करून स्थानिक वन आगारात बिबट्याचा मृतदेह नेऊन शव विच्छेदन प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.0
0
Report
भंडारा में गणेशोत्सव की तैयारी तेज, महंगाई से मूर्तिकार परेशान
Bhandara, Maharashtra:बाप्पाच्या आगमनाचे वेध... मूर्तिकारांची लगबग सुरू सार्वजनिक गणेश मंडळांच्या ऑर्डरनुसार मूर्तींना अंतिम रूप महागाईची झळ गणरायाच्या मूर्तींनाही... माती, रंग आणि सजावट साहित्य महागले... बाप्पोत्सवाच्या आगमनाच्या तयारीला भांडारा जिल्ह्यात वेग आला असून, शहरातील मूर्तिकारांच्या कार्यशाळा बाप्पांच्या मूर्तींनी गजबजल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळां कडून मिळालेल्या ऑर्डरनुसार मूर्ती तयार करण्यात येत असून, अनेक मूर्तिंचे मातीचे काम पूर्ण झाले. आता मूर्तींवर अखेरचे रंगकाम आणि सजावटीचा शेवटचा हात फिरवला जात आहे. मात्र यंदा मूर्ती घडवताना महागाईचा सामना करावा लागत आहे. मूर्ती तयार करण्यासाठी लागणारी लाल माती महागली आहे. त्याचबरोबर मूर्तीच्या बांधणीसाठी लागणाऱ्या तणसाच्या दरातही वाढ झाली आहे. तर मूर्तीला आकर्षक रूप देण्यासाठी वापरणाऱ्या रंग आणि सजावटीचे साहित्यही महागले आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमतींचा थेट परिणाम मूर्ती तयार करण्याच्या खर्चावर होत असल्याचं मूर्तिकार सांगत आहेत.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर की दहीहंडी विवाद: प्रतिभा धानोरकर पर भाजप की राजनीतिक चोट
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- वडेट्टीवारांच्या गावात प्रतिभा धानोरकरांची राजकीय दहीहंडी, भाजप नेत्यांनी ब्रह्मपुरीत आयोजित केलेल्या दहीहंडीला खा. प्रतिभा धानोरकर यांची हजेरी अँकर:-- चंद्रपूर जिल्ह्यातील काँग्रेस पक्षात खासदार प्रतिभा धानोरकर आणि आमदार विजय वडेट्टीवार यांच्यात राजकीय वैर आहे. गेल्या काही महिन्यात तर चंद्रपूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर या राजकीय वैमयानस्यला नव्याने धुमारे फुटले आहे. त्यातच खासदार प्रतिभा धानोरकर यांनी त्यांच्या चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात येत नसलेल्या विजय वडेट्टीवार यांच्या ब्रह्मपुरी मतदार संघातल्या दहीहंडी कार्यक्रमाला हजेरी लावली. विशेष म्हणजे दहीहंडीचा हा कार्यक्रम भाजप नेत्यांनी आयोजित केलेला होता. दहीहंडीच्या या कार्यक्रमात आमदार विजय वडेट्टीवार यांच्यावर भाजपच्या नेत्यांनी जोरदार टीकाही केली. भाजप आमदार बंटी भांगडिया यांनी तर अप्रत्यक्षपणे आपल्या भाषणात प्रतिभा धानोरकर आपल्या सोबत असल्याची आणि त्यांच्या मदतीने आपण विजय वडेट्टीवार यांचा पाडाव करू अशी घोषणाही करून टाकली. मात्र प्रतिभा धानोरकर यांनी मी चंद्रपूर जिल्ह्याची खासदार आहे असं सांगत वारंवार ब्रह्मपुरी मतदार संघातून मला निमंत्रण येत होतं आणि त्यामुळे मी दहीहंडीच्या सार्वजनिक कार्यक्रमाला होकार दिल्याचं स्पष्ट केलंय. तर दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी या सर्व प्रकरणावर "भाजपने आयोजित केलेल्या कार्यक्रमात कोणी जात असेल तर मला यावर काही बोलायचं नाही" असं म्हणत अधिक बोलण्यास नकार दिलाय. विधानसभा निवडणुकीआधी प्रतिभा धानोरकर यांनी ब्रह्मपुरी मतदार संघात आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात विजय वडेट्टीवार यांना अप्रत्यक्षपणे पराभूत करण्याचं आवाहन केल्याने मोठा गदारोळ झाला होता. त्यातच गेल्या काही दिवसात चंद्रपूर महानगरपालिकेच्या आमसभेत विजय वडेट्टीवार आणि भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांचे समर्थक नगरसेवक एकत्र आल्याचं चित्र निर्माण झालं होतं. तर आज ब्रह्मपुरीत काँग्रेस आणि भाजप मधील विजय वडेट्टीवार आणि सुधीर मुनगjaniत्यार विरोधक एकत्र आल्याचं चित्र दिसून आलं. त्यामुळे येत्या काही दिवसात चंद्रपूर जिल्ह्यातील राजकारणात अनेक बदल घडून येण्याची चिन्हे आहेत.0
0
Report
सातारा: डीजे पर बंधन संभव नहीं, आवाज पर नियंत्रण जरूरी
Satara, Maharashtra:कराड, सातारा राज्यात डीजेवर बंदी घालण्याबाबत जोरदार मागणी धरली असताना सातारा जिल्ह्याचे पोलिस प्रमुख निखिल पिंगळे यांनी डीजेवर बंदी येवूच शकत नाही, असे विधान केले आहे. त्यांनी डाॅल्बी आणि डीजे यामधील फरक सांगितला आहे. डाैल्बी ही टेक्नालाॅजी असते, त्यावर सुप्रीम कोर्टाने बंदी घालायला कुठेच सांगितले नाही. फक्त आवाजाची मर्यादा ठेवा सांगितले आहे. तर डीजे मुक्ती होवूच शकत नाही. कारण डीजे हा बाबा किंवा बाई पण असते. ती केवळ टेक्नालाॅजी चालवते. तेव्हा मुद्दा डाॅल्बीचा नाही, आवाजाचा आहे. तेव्हा ज्यांना डाॅल्बीला परवानगी पाहिजे, त्यांनी त्याच्या घरातील आज्जी- आजोबांना तेथे बसवावे मग परवानगी देवू असे अभ्यासपूर्ण मार्गदर्शन सातारा जिल्ह्याचे पोलीस प्रमुख निखिल पिंगळे यांनी गणेश मंडळांना केले.0
0
Report
सोलापुर के ऑर्केस्ट्रा बार पर ग्रामीण पुलिस का छापा, 15 महिलाएं समेत 28 गिरफ्तार
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ऑर्केस्ट्रा बारवर छापा, 15 महिलांसह 28 गिऱ्हाईकांवर ग्रामीण पोलिसांची कारवाई\n\n- सोलापुरातील भोगाव परिसरातील ऑर्केस्ट्रा बारवर ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई \n\n- अश्लील नृत्य करणाऱ्या 15 महिलांसह 26 गिऱ्हाईकांवर करण्यात आली कारवाई \n\n- सदरच्या ऑर्केस्ट्रा बार मध्ये महिला तोकडे कपडे घालत अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याची माहिती समोर \n\n- रविवार रात्री सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष पथकाने टाकला छापा \n\n- ऑर्केस्ट्रा बारवर केलेल्या कारवाईच्या दरम्यान 28 लाखांचा मुद्देमाल जप्त0
0
Report
Advertisement
पुणे में MPSC विद्यार्थियों के आक्रोश मोर्च के संदर्भ में विक्रम पाचपुते ने चर्चा की
Pune, Maharashtra:*पुणे : MPSC विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चाच्या पार्श्वभूमीवर आमदार विक्रम पाचपुते यांची विद्यार्थ्यांशी चर्चा पुणे : MPSC विद्यार्थ्यांकडून उद्या पुण्यात आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असून, त्याच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज शिक्षकांशी चर्चा केली. त्यानंतर आमदार विक्रम पाचपुते यांनी पुण्यात विद्यार्थ्यांशी संवाद साधून त्यांच्या मागण्या आणि भूमिका जाणून घेतली. मुख्यमंत्र्यांसोबत झालेल्या चर्चेत शिक्षकांनी विविध मागण्या मांडल्या असून, त्यावर सकारात्मक चर्चा झाल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा उद्याचा मोर्चा संविधानिक पद्धतीने होत असेल, तर सरकारचा त्याला विरोध नाही. मोर्चाला सरकारने परवानगी दिली असून, तो रद्द करण्याची सरकारची भूमिका नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर चर्चेतून मार्ग काढण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे पाचपुते यांनी सांगितले. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा राजकीय हेतूसाठी वापर न करता ते सोडवण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. MPSC आयोगाच्या अध्यक्षांच्या राजीनाम्याच्या मागणीबाबत पाचपुते म्हणाले की, आयोग ही स्वायत्त संस्था असून अध्यक्षांची नियुक्ती राज्यपालांकडून केली जाते. त्यामुळे सरकारला अध्यक्षांचा राजीनामा मागण्याचा किंवा घेण्याचा अधिकार नाही. चौकशीत कोणी दोषी आढळल्यास नियमानुसार कारवाई केली जाईल, तर नैतिकतेच्या आधारावर राजीनामा देणे हा संबंधितांचा वैयक्तिक अधिकार असल्याचे त्यांनी सांगितले. रोहित पवार यांनी प्रश्न उपस्थित करण्यास हरकत नसल्याचे सांगताना, मात्र त्या प्रश्नांचा तात्काळ राजकीय वापर करणे योग्य नसल्याचे पाचपुते यांनी म्हटले. विद्यार्थ्यांचा आवाज आणि त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली असून, सरकार सर्व प्रश्न ऐकून घेण्यास तयार असल्याचे पाचपुते यांनी स्पष्ट केले. या प्रकरणी चौकशी समिती स्थापन करण्यात आली असून, समितीत विद्यार्थ्यांचे प्रतिनिधी म्हणून काही सदस्यांचा समावेश करता येईल का, याचाही विचार केला जाईल, असे त्यांनी सांगितले. SIR प्रक्रियेबाबत बोलताना पाचपुते यांनी नियमानुसार पात्र नसलेल्या व्यक्तींची नावे मतदार यादीतून कमी झाली असल्याचे सांगितले. ही प्रक्रिया अद्याप सुरू असून, पात्र नागरिकांना मतदार यादीत आपले नाव समाविष्ट करता येईल, असे त्यांनी स्पष्ट केले.0
0
Report
जुन्नर के स्मशानभूमि में संदिग्ध वस्तुएँ, नागरिकों में भय फैल गया
Shirur, Maharashtra:बोरी बुद्रुकच्या स्मशानभूमीत संशयास्पद वस्तू आढळल्याने परिसरात चर्चा सुरू झाली आहे या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण असून चौकशीची मागणी केली जात आहे स्मशानभूमीत लिंबू, नारळ, काळ्या बाहुल्या तसंच महिला आणि पुरुषांच्या छायाचित्रांवर टोचलेल्या अवस्थेत आढळून आल्या या वस्तूंनी नेमक्या कोणी आणि कशासाठी ठेवल्या याबाबत अद्याप स्पष्टता नाही प्रकाराची माहिती समोर आल्यानंतर नागरिकांकडून चिंता व्यक्त केली जात असून प्रशासनाने यामागचं सत्य समोर आणण्यासाठी चौकशी करावी अशी मागणी होत आहे अंधश्रद्धेला खतपाणी न घालता वस्तुस्थिती समोर येणं गरजेचं आहे0
0
Report
सोलapur में मराठा समाज का रास्ता रोको; राष्ट्रीय महामार्ग ठप, सरकार से तात्कालिक कदम
Solapur, Maharashtra:सोलापुरात मराठा समाज आक्रमक, अक्कलकोट ते सोलापूर महामार्गावर केला रास्ता रोको आंदोलन. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सोलापुरात मराठा समाज आक्रमक. सकल मराठा समाजाच्या वतीने अक्कलकोट सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर रास्ता रोको आंदोलन. राज्य शासनाने मराठा समाजाचा अंत न पाहण्याची करण्यात आली विनंती. रास्ता रोको आंदोलनामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळासाठी ठप्प. सरकारने लवकरात लवकर दखल घ्यावी अन्यथा याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्याचा सकल मराठा समाजाचा इशारा.0
0
Report
Advertisement
मेलघाट में भारी बारिश से कारंजखेडा ka संपर्क टूट, पुल नहीं
Amravati, Maharashtra:मुसळधार पावसाने मेळघाटातील कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला; नाल्यावर पूल नसल्याने आदिवासी बांधवांचा जीवघेणा प्रवास. मुसळधार पावसामुळे नाल्याला मोठ्या प्रमाणात पाणी आले आहे. कारंजखेडा गावाचा संपर्क तुटला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना जीव धोक्यात घालून नाला ओलांडावा लागत आहे. पूल नसल्याने विद्यार्थ्यांसह महिला ज्येष्ठ नागरिक आणि इतर ग्रामस्थांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. वारंवार मागणी करूनही या प्रश्नाकडे सरकार आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून प्रलंबित असलेला कारंजखेडा गावातील पुलाचा प्रश्न सरकार आणि प्रशासन कधी सोडवणार. तसेच आदिवासी बांधवांचा हा जीवघेणा प्रवास कधी संपणार. याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
FDA ने कल्याण की प्रसिद्ध बेकरी सील कर दी
Kalyan, Maharashtra:कल्याण मधील नामांकित बेकरी एफडीएकडून सील Anchor- कल्याणमधील प्रिन्स या नामांकित बेकरीवर अन्न औषध प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली आहे. Vo- या बेकरीमध्ये मोठ्या प्रमाणात भट्टीत लाकडांचा वापर केला जात असल्याने ही बेकरी सील करण्यात आली आहे. दरम्यान यासंदर्भाची तक्रार एफडीएला मिळाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली .या बेकरी मध्ये पाव तयार केले जातात आणि कल्याण आणि आजूबाजूच्या शहरांमध्ये त्याचा पुरवठा केला जातो .मात्र आता ही बेकारी सील करण्यात आल्यानंतर अशाच प्रकारे लाकडाचा वापर आपल्या भट्टीत करणाऱ्या बेकरी चालकांचे धाबे दणाणले आहेत.0
0
Report
पुणे-बेंगलुरु हाईवे पर भिड़ंत: 5-6 घायल, यातायात बाधित
Sangli, Maharashtra:स्लग - पुणे-बेंगळुरू महामार्गावर दोन कारची समोरा-समोर जोरदार धडक.. ५ ते ६ जण जखमी.. अँकर - सांगलीच्या येडेनिपाणी फाट्याजवळ पुणे-बंगळूरु राष्ट्रीय महामार्गावर दोन इनोव्हा कारची अपघात झाला आहे.या अपघातात प्राथमिक माहितीनुसार ५ ते ६ जण जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.कोल्हापूरहून पुण्याकडे जाणारी इनोव्हा कारचे अचानक टायर फुटला.त्यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि कार कोल्हापूरच्या दिशेने जाणाऱ्या रोडवर गेली.यावेळी समोरून येणाऱ्या कारला जोरदार धडक दिली.धडकेनंतर दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले असून, त्यामध्ये ५ ते ६ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे..या अपघातामुळे महामार्गावर काही काळ वाहतूक कोंडी झाली होती.0
0
Report
Advertisement
