445001
नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह
Yavatmal, Maharashtra:नवरात्री उत्सवानिमित्त यवतमाळ मध्ये श्रद्धा आणि भक्तीचा उदंड उत्साह अनुभवाला येत आहे. देवीच्या दर्शनासाठी गावोगावचे आणि इतर जिल्ह्यातूनही भक्त दाखल होत असल्याने यवतमाळचे रस्ते रात्रभर गर्दीने फुलून जात आहे, जगराता, भंडारा, डोबरी, गोंधळ, जत्रा यामुळे पहाटेपर्यंत देवींभक्तांची रेलचेल आहे. भव्य देखावे आणि मूर्तिकारांच्या देखण्या हातांनी साकारलेल्या जीवंत मूर्तींसाठी यवतमाळचा दुर्गोत्सव राज्यात प्रसिद्ध आहे.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ई-केवायसी में देरी: सेतु केंद्रों पर भीड़ से किसानों को हो रही परेशानी
Washim, Maharashtra:पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात वाशिम जिल्ह्यातील 52 हजार 881 शेतकरी पात्र ठरले आहेत. मात्र ई-केवायसीसाठी सेतू केंद्रांवर मोठी गर्दी होत असून वारंवार पोर्टल बंद पडणे आणि संथ सर्व्हरमुळे शेतकऱ्यांना तासन्तास रांगेत उभे राहावे लागत आहे. तांत्रिक अडचणी दूर करून ई-केवायसी प्रक्रिया सुरळीत करण्याची मागणी शेतकरी आणि सेतू केंद्र चालकांनी केली आहे.0
0
Report
चंद्रपूर में बाघों की संख्या बढ़ी, मानव-बाघ संघर्ष से नई समस्याएं
Chandrapur, Maharashtra:अनकर:-- अनुकूल अधिवास असल्याने चंद्रपूर जिल्ह्यात वाघांची संख्या वाढत आहे. मात्र मानव-वाघ संघर्षाने नव्या समस्या उभ्या राहत आहेत. वाघ गावे और शेतशिवारात ग्रामस्थांवर हल्ले करत आहेत. यावर उपाय म्हणून वनविभागाने गेल्या 2 वर्षात 28 वाघ जेरबंद केले आहेत. परंतु समस्याग्रस्त वाघच पकडले गेलेत का याबाबत मात्र संदिग्धता आहे. या सर्व वाघांना वन विभागाने चंद्रपुरातील वन्यजीव शुश्रूषा केंद्र- TTC आणि अन्य वनपरीक्षेत्रात पिंजऱ्यात जेरबंद करून ठेवण्यात आले. TTC सेंटर ला ठेवलेल्या वाघांमध्ये 6 बछडे, 4 नर वाघ व 3 मादी वाघांचा समावेश आहे. जागेच्या अभावी इतर वाघांना दुसऱ्या जिल्ह्यातील TTC सेंटरला स्थानांतरित करण्यात आले आहे. चंद्रपूर जिल्ह्यात ताडोबा परीघ , ब्रम्हपुरी प्रादेशिक व FDCM जंगलाचा समावेश आहे. या जंगल क्षेत्रात शेकडो वाघांचा वावर आहे. वाघांच्या हल्ल्यात अनेक नागरिकांचा मृत्यू झाला आहे. वाघाने नागरिकांवर केलेले 90% हल्ले घनदाट जंगलात झाले आहेत. यामुळे मानवाचे वाघ अधिवासावर होत असलेले अतिक्रमण स्पष्ट झाले आहे.0
0
Report
हैदराबाद से दिल्ली जा रहा ट्रक पलटा, झेंडू के फूलों को भारी नुकसान
Washim, Maharashtra:वाशीम जिल्ह्यातील अकोला-वाशीम महामार्गवरील मेडशी बायपासवर हैदराबादहून दिल्लीकडे झेंडूची फुले घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी ट्रकमधील झेंडूच्या फुलांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही。0
0
Report
Advertisement
अक्कलकोट में गुरु पूर्णिमा पर 25 फुट फूलों से बनी स्वामी समर्थ प्रतिमा
Solapur, Maharashtra:गुरुपौर्णिमेनिमित्त अक्कलकोट नगरीमध्ये हजारोंच्या संख्येने स्वामीभक्त दाखल - श्री अन्नछत्र मंडळाच्या वतीने साकारण्यात आली 25 फुटांची विविध फुलांची स्वामींची प्रतिमा - शेवंती, झेंडू, सुपारी अशा विविध फुलांपासून बनवण्यात आलेली श्री स्वामी समर्थांची प्रतिकृती पाहण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी - फुलांच्या साकारण्यात आलेल्या स्वामी समर्थांच्या कलाकृती सोबत सेल्फी काढण्यासाठी स्वामी भक्तांची मोठी गर्दी0
0
Report
सोनू सूद ने गुरु पूर्णिमा पर साईं दरबार में दर्शन दिए, मंदिर परिसर में भीड़
Shirdi, Maharashtra:अभिनेता सोनू सूद साई दरबारी.. गुरुपौर्णिमेच्या दिवशी साई दर्शनाला हजेरी.. दुपारी होणाऱ्या मध्यान्ह आरतीला सोनू सूद याची उपस्थिती.. सोनू सुदला पाहण्यासाठी मंदिर परिसरात गर्दी... वाढलेली दाढी आणि निळ्या शर्ट परिधान केलेला सोनुचा हटके लुक...0
0
Report
IIT बॉम्बे हॉस्टेल में द्वितीय वर्ष के छात्र ने आत्महत्या, पुलिस जांच जारी
Mumbai, Maharashtra:IIT बॉम्बेमध्ये द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या IIT बॉम्बेच्या वसतिगृहात 20 वर्षीय विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या सोहिल राजकुमार सांगवान हा मटेरियल सायन्सचा द्वितीय वर्षाचा विद्यार्थी हॉस्टेल क्रमांक 4, रूम G-4147 मध्ये बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेतल्याचा संशय घटनाची माहिती मिळताच पवई पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली बीएनएसएस कलम 194 अंतर्गत एडीआर क्रमांक 83/2026 नोंद आत्महत्येमागील नेमके कारण व परिस्थितीचा पवई पोलिसांकडून तपास सुरू0
0
Report
Advertisement
नाशिक के गड्ढे बन गए परेशानी, नागरिकों ने महापौर से गड्ढे रोकने की मांग तेज
Nashik, Maharashtra:खड्ड्यांमुळे नाशिककर झाले हैराण... कंबर दुखी पाठ दुखीचा करावा लागत आहे त्रास सहन.... नाशिक मध्ये पडलेल्या खड्ड्यांवर बोलवावी महासभा नगरसेवकांची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून नाशिक शहरासह जिल्हा भरात कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर विकास काम सुरू आहेत... शहरात देखील मोठ्या प्रमाणात रस्त्याचं काम सुरू असताना आता शहरातील सगळेच रस्ते हे खड्डेमय झाल्याचे चित्र पाहायला मिळते.... या खड्ड्यांमुळे अनेक नागरिकांना कंबर दुखी पाठदुखीचा त्रास सहन होतोय... त्याचबरोबर अनेकांचे अपघात देखील या शहरात पडलेल्या खड्ड्यांमुळे झालेत.. आता या खड्ड्यांमुळे नाशिकचा राजकारण तापणार असून खड्ड्यांवरच महासभा बोलवावे अशी मागणी नगरसेवक करताना पाहायला मिळतायेत.. तर खड्ड्यांमुळे नाशिककर हैराण झाले असून अनेकांचे अपघात होतात याची तक्रार नाशिककर करतायेत.... त्याचबरोबर कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांनी नाशिक शहरातील खड्ड्यांचा अनुभव घ्यावा आणि शहरातील सगळे रस्ते सुधारित करावे अशी मागणी नागरिकांनी केली आहे.... या संदर्भात नाशिक मधून आढावा घेत नागरिकांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....0
0
Report
आंद्रा बांध 1248 क्यूसेक पानी छोड़ता: नदी किनारे निवासी सतर्क रहें
Varsoli, Maharashtra:आंद्रा धरण शंभर टक्के भरल्याने धरणातून आंद्रा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आला आहे. सध्या धरणाच्या द्वारविरहित सांडव्यावरून तब्बल १,२४८ क्यूसेक वेगाने पाणी सोडण्यात येत आहे. पाणलोट क्षेत्रातील पावसाचा आणि धरणात होणाऱ्या पाण्याच्या आवकाचा अंदाज घेता, या विसर्गामध्ये कोणत्याही क्षणी वाढ होण्याची शक्यता असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. सध्या पाणलोट क्षेत्रातील पावसाचे प्रमाण कमी झाले असले, तरी धरणातील पाण्याची आवक लक्षात घेऊन विसर्ग सुरू ठेवण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या तीव्रतेनुसार आणि धरणात होणाऱ्या आवकनुसार या विसर्गात कोणत्याही वेळी वाढ किंवा घट होऊ शकते, असा इशारा पाटबंधारे विभागाने दिला आहे. त्यामुळे आंद्रा नदीकाठच्या गावांतील नागरिकांनी तसेच शेतकऱ्यांनी नदीपात्रात जाणे टाळावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
नाशिक बागलाण में इंदौर की प्याज गोण्या सड़क किनारे मिलने से किसानों में हंगामा
Nashik, Maharashtra:बागलाण (नाशिक) विशाल मोरे - साक्री - शिर्डी राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला मध्यप्रदेशातील इंदोरच्या कांद्याच्या गोण्या आढळल्या फेकलेल्या अवस्थेत... - नाशिकच्या बागलाण तालुक्यातील घटनेने खळबळ.. - कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातल्या ट्रक शेतकऱ्यांनी अडवला.. नाशिकच्या बागलाण तालुक्यात साक्री-शिर्डी राष्ट्रीय महामार्गावरील सावकी फाटा परिसरात मध्यप्रदेशातील इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला फेकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नुकतेच मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याबाबत वाद सुरू असताना आता ही नवी घटना समोर आल्याने अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. विशेष म्हणजे, कालच उमराणा येथील एनसीसीएफ कांदा खरेदी केंद्रावर मध्यप्रदेशातून आलेल्या कांद्याच्या ट्रकबाबत शेतकऱ्यांनी आक्षेप घेत गोंधळ घातला होता. त्या घटनेनंतर अवघ्या एका दिवसात पुन्हा इंदोर येथील कांद्याच्या गोण्या रस्त्याच्या कडेला आढळून आल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. घटनेची माहिती मिळताच सटाणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी पंचनामा व प्राथमिक चौकशी सुरू केली आहे. या गोण्या येथे कोणी आणि कोणत्या उद्देशाने फेकल्या, त्यांचा संबंध कांदा खरेदी प्रक्रियेशी आहे का, याचा तपास करण्यात येणार आहे. दरम्यान, संबंधित प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे。0
0
Report
Advertisement
दापोली-खे़ड़ मार्ग पर दुचाकी दुर्घटना: नर्सिंग छात्रा की मौत, मित्र घायल
Ratnagiri, Maharashtra:दापोली-खेड मार्गावरील शिरसिंगे फाटा येथे आज सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या भीषण दुचाकी अपघातात २२ वर्षीय नर्सिंग विद्यार्थिनीचा दुर्दैवी मृत्यू झाला. शेजल भागवत असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, तिची मैत्रीण वैष्णवी चंद्रकांत अहिरे ही या अपघातात जखमी झाली आहे. जखमीवर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दोनही मैत्रिणी दापोलीहून आपल्या गावाकडे जात असताना हा हृदयद्रावक अपघात घडला. अपघाताचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून अधिक तपास सुरू आहे. या घटनेमुळे दापोली परिसर आणि शेजलच्या गावावर शोककळा पसरली आहे.0
0
Report
सप्तशृंगगड़ में गुरु पूर्णिमा पर आदिमाये के मंदिर में फूलों की सजावट
Nashik, Maharashtra:सप्तशृंगगड ( नाशिक ) : - सप्तशृंग गडावरील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आकर्षक फुलांची आरास - गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर भाविकांची गर्दी... - भाविकांनी घेतले आदिमायेचे दर्शन... उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या व देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगगड वणी येथील आदिमायेच्या मंदिर गाभाऱ्यात आज गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने आकर्षक अशी फुलांची आरास करून सजावट करण्यात आली..फुलांच्या माळांनी मंदिर गाभारा पूर्ण सजलेला होता..गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने सप्तशृंगगडावर आज भाविकांनी आदिमायेच्या दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती..हजारो भाविकांनी मनोभावे आदिमायेचे दर्शन घेतले..सण उत्सवाच्या निमित्ताने हजारो भाविक आदिमायेच्या चरणी नतमस्तक होतात..0
0
Report
मुंबई-पुणे रेलमार्ग पर मंकी हिल में बारिश से निखरे नैसर्गिक दृश्यों का जादुई नज़ारा
Varsoli, Maharashtra:मुंबई-पुणे लोहमार्गावरील खंडाळा घाटातील मंकी हिल परिसर सध्या पावसामुळे निसर्गाच्या अप्रतिम रंगांनी खुलून आला आहे. डोंगररांगांवर पसरलेलं दाट धुकं, हिरव्यागार दऱ्या आणि उंच कड्यांवरून फेसाळत कोसळणारे असंख्य धबधबे... हे दृश्य पाहताना जणू निसर्गानेच चित्र रंगवल्याचा भास होतो. रेल्वे या घाटातून मार्गक्रमण करत असताना खिडकीतून दिसणारी ही नयनरम्य दृश्यं प्रत्येक प्रवाशाच्या कॅमेऱ्यात आणि मनात कायमची घर करून जातात.0
0
Report
Advertisement
शिर्डी में गुरुपौर्णिमा उत्सव: लाखों भक्त दर्शनों के लिए उमड़े
Shirdi, Maharashtra:साईबाबांच्या शिर्डीत आज गुरूपोर्णीमेचा मोठा उत्साह बघायला मिळत आहे.साईबाबांना गुरूस्वरूप मानणारे लाखो साईभक्त शिर्डीत दाखल झाले असून साईबाबांची शिर्डी गजबजून गेली आहे.. तीन दिवस चालणा-या उत्सवाचा आज दुसरा मुख्य दिवस असून देश विदेशातून आलेल्या भाविकांना आज साईबाबांचे दर्शन मिळावे यासाठी मंदिर रात्रभर खुले राहणार आहे...साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस गुरूपोर्णीमा उत्सव साजरा केला जातो .आज उत्सवाचा दुसरा मुख्य दिवस असून साईबाबांची काकड आरती झाल्यानंतर पादूकांच्या मिरवणूकीने आजच्या दिवसाच्या कार्यक्रमांना सुरूवात झाली आहे.साईबाबांचे मंदिर आकर्षक फुलांनी आणी विद्युत रोषणाईने सजवण्यात आले असून शिर्डी माझे पंढरपूर म्हणत हजारो साईभक्त पायी पालख्या घेऊन शिर्डीत पोहचले आहेत.आम्ही गेल्या १५ वर्षापासून दर गुरुपौर्णिमा उत्सवाला शिर्डीत येऊन आम्ही साईबाबांच्या चरणी लीन होतो , साईबाबा आमचे गुरु आहेत आणि आम्ही आमच्या गुरूंप्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी साईनगरीत येतो असल्याची प्रतिक्रिया साईभक्तांनी झी 24 तासशी बोलतांना दिलीये.साईभक्तांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी0
0
Report
कोल्हापुर में फिर बाढ़ की चेतावनी: पंचगंगा नदी तीसरे बार अपनी सीमा पार
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुर जिल्हा सर्व दूर पावसाला पुन्हा एकदा सुरुवात झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच नद्या sध्या दुधडी भरून वाहत आहेत. पंचगंगा नदीने तिसऱ्यांदा आपले पात्र ओलांडले असून जिल्ह्यातील धरण देखील पूर्ण क्षमतेंन भरू लागली आहेत. राधानगरी धरण तब्बल 97% इतके भरला आहे. याच पावसाचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रताप नाईक यांनी. कोल्हापूरची पंचगंगा नदी तिसऱ्यांदा पात्रा बाहेर पंचगंगा नदीची पाणी पातळी 31 फूट 6 इंचावर राधानगरी धरण - 97 टक्के भरले तुळशी 78 टक्के भरले वारणा 85 टक्के तर दूधगंगा 59 टक्के भरले कासारी, कडवी, कुंभी, पाटगाव चिकोत्रा, जगंहटी, धामणी यासारखे लघुपाटबंधारे प्रकल्प सुमारे 60 ते 100 टक्के इतकी भरली आहेत.0
0
Report
सांगली कृषि उत्पन्न बाजार समिती के त्रिभजन का निर्णय रद्द, भाजपा को झटका
Sangli, Maharashtra:सांगली बाजार समितीचे त्रिभजन कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द, भाजपाला धक्का. सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाकडून रद्द करण्यात आला आहे. राज्याच्या सहकार विभागाने सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे त्रिभाजन करत कवठे महांकाळ आणि जत कृषी उत्पन्न बाजार समिती नव्याने निर्माण करण्याचे आदेश दिले होते, त्यांनी विरोधात बाजार समितीच्या विद्यमान संचालक मंडळाकडुन मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठामध्ये धाव घेण्यात आली होती. ज्यावर कोल्हापूर खंडपीठाने राज्य सरकारच्या त्रिभजनाच्या आदेश रद्द केला आहे, तसेच राज्य सरकारला त्रिभाजनाबाबत फेर सुनावणी घेऊन, पुढील निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले आहेत. त्यामुळे विद्यमान संचालकांना तुर्त दिलासा मिळाला आहे, तर न्यायालयाच्या निर्णयामुळे आमदार सदाभाऊ खोत आणि गोपीचंद पडळकर यांच्यासह भाजपाला धक्का बसला आहे.0
0
Report
Advertisement
