icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

सातारा दौरे की तैयारी पूरी, बैनरों से महेश शिंदे का फोटो गायब मामला चर्चा में

Satara, Maharashtra:सातारा: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत.या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते तथा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी आज नियोजित अंगापूर आणि सातारा शहरातील गांधी मैदानावर होणाऱ्या सभेची पाहणी केली. दुपारी या दौऱ्यात अंगापूर येथे एका धार्मिक कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत यानंतर जिल्हा शासकीय विश्रामगृह येथे पश्चिम महाराष्ट्रातील शिवसैनिकांची बैठक एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडणार असून.. या बैठकीनंतर सातारा शहरात ऐतिहासिक गांधी मैदानावर होणाऱ्या शिवसेनेच्या सभेसाठी उपस्थित राहणार आहेत. आज होणाऱ्या कार्यक्रमात कोणतीही त्रुटी राहू नये यासाठी उपस्थित पदाधिकाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सूचना केल्या. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा हा सातारा दौरा राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे... मात्र या तयारी दरम्यान उभारण्यात आलेल्या स्वागत फलकांवर आमदार महेश शिंदे यांचे फोटो गायब झाल्याबाबत विचारणा केली असता पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बहुतांश फ्लेक्स वर आमदार महेश शिंदे यांचे फोटो असल्याचे स्पष्टीकरण दिले आहे...
0
0
Report

यवतमाल के रालेगाव में बालिकाओं की बिक्री-धर्मांतरण मामले पर विहिप-बजरंग दल ने बंद का आह्वान

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या राळेगाव येथे मुलींच्या विक्री आणि त्यानंतर त्यांचे धर्मांतरण प्रकरणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने उडी घेतली असून आज हिंदुत्ववादी संघटनानी राळेगाव बंद ची हाक दिली आहे. काल रात्री पोलीस ठाण्यात कार्यकर्त्यांनी प्रचंड गर्दी करीत संताप व्यक्त केला, यावेळी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांना दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांनी घेरावं घालून या प्रकरणाचा सखोल तपास करून आरोपीवर कडक कारवाईची मागणी केली. राळेगाव पोलिसांच्या कार्यशैलीवर विश्वास नसून स्वतंत्र यंत्रनेद्वारा चौकशीची मागणी विश्व हिंदू परिषदेचे प्रांत पदाधिकारी राम लोखंडे यांनी करीत आज राळेगाव बंद ठेवण्याचे आवाहन केले आहे. बाईट : राम लोखंडे : प्रांत सेवा प्रमुख, विहिप अशोक उईके : मंत्री, आदिवासी विकास
0
0
Report

अकोला में आंधी-बारिश से रेल सेवाओं में बहाव, ओवरहेड वायर टूटने से 2–3 घंटे देरी

Akola, Maharashtra:राज्यात हवामान विभागाने २० ते २२ एप्रिलदरम्यान वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा दिला असतानाच, त्याआधीच १९ एप्रिलच्या मध्यरात्री अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्याने जोरदार हजेरी लावली. या अचानक बदललेल्या हवामानाचा फटका थेट मध्य रेल्वेच्या वाहतुकीलाही बसल्याचं समोर आलं आहे. अकोला शहरासह जिल्ह्यात काल मध्यरात्री जोरदार वादळी वाऱ्याचा तडाखा बसला. काही ठिकाणी तुरळक पावसानेही हजेरी लावली. या वादळामुळे अकोल्यातील गायगाव ते पारस रेल्वे स्थानकादरम्यान रेल्वेचा ओव्हरहेड वायर तुटल्याची घटना घडली. या बिघाडामुळे अकोला, मूर्तिजापूर तसेच बडनेरा ते भुसावळ दरम्यान धावणाऱ्या अनेक प्रवासी गाड्या तब्बल २ ते ३ तास उशिराने धावल्या. परिणामी प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. विशेष म्हणजे, रेल्वे प्रशासनाकडून वेळेवर कोणतीही अधिकृत माहिती किंवा उद्घोषणा करण्यात आली नाही. त्यामुळे आधीच उशिरामुळे त्रस्त झालेल्या प्रवाशांमध्ये संतापाची लाट उसळली. दरम्यान, तांत्रिक पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेत दुरुस्तीचे काम हाती घेतले आणि काही वेळातच रेल्वे वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
0
0
Report
Advertisement

नाशिक के प्रभावित किसानों को राहत नहीं मिलने से नाराज़गी बढ़ी

Nashik, Maharashtra:Breaking.. नाशिक - विशाल मोरे - अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारने जाहीर केलेल्या मदतीच्या पहिल्या टप्प्यात नाशिक जिल्ह्याचा समावेश नाही... - शेतकरी संतप्त... एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज्‍यातील अनेक भागात अवकाळी पाऊस और गारपीट ने धुमाकूळ घातला होता नाशिक जिल्ह्यातील 10 तालुक्याला अवकाळीचा फटका बसून तब्बल 57 हजार 46 हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले होते.राज्य सरकार ने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत जाहीर केली मात्र त्यात पहिल्या टप्प्यात सर्वाधिक नुकसान होऊन देखील नाशिक जिल्ह्याचा समावेश करण्यात आला नाही त्यामुळे शेतकरी संतप्त झाले आहेत. *बाईट: 2 - शेतकरी* *ग्राफिक्स* *नुकसान ग्रस्त तालुक्याची संख्या -10 *सर्वाधिक नुकसानग्रस्त तालुके :-मालेगाव, बागलाण, देवळा, निफाड, सिन्नर, चांदवड *नुकसान क्षेत्र :-57 हजार 46 हेक्टर *बाधित गाव संख्या :-588 *बाधित शेतकरी :-79 हजार 797 *पीक नुकसान* *कांदा :-44 हजार 701 हेक्टर *गहू :-3 हजार 280 हेक्टर *डाळिंब :-4 हजार 847 हेक्टर *भाजीपाला :-1 हजार 186 हेक्टर *मका :-869 हेक्टर *द्राक्षे :-, 902 हेक्टर
0
0
Report

अंबरनाथ के शिवाजीनगर मार्ग पर गतिरोधक नियम उलट, यात्राओं में बढ़ी परेशानी

Ambernath, Maharashtra:गतिरोधक मुळे अंबराठकरांची वाढणार डोकेदुखी शिवाजीनगर ते स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी गतिरोधक चुकीच्या रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक स्टेशनकडे जाणारा प्रवास झाला कष्टदायक नियमबाह्य रचनेचे गतिरोधक ठरतायत धोकादायक आनकर : अंबराठ शहरात नागरिकांची डोकेदुखी दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर जागोजागी उभारण्यात आलेले गतिरोधक आता नागरिकांसाठी मोठा त्रास ठरत आहेत. व्हिओ:अंबराठ पूर्व भागातील शिवाजीनगर ते स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्यावर अचानकपणे अनेक ठिकाणी गतिरोधक टाकण्यात आले आहेत.त्यामुळे वाहनचालकांना वारंवार ब्रेक लावावे लागत असल्यामुळे प्रवास वेळखाऊ आणि असुविधाजनक बनला आहे. विशेष म्हणजे, अनेक ठिकाणी गतिरोधकांची रचना नियमांनुसार नसल्याची तक्रार नागरिकांकडून केली जात आहे. त्यामुळे दुचाकीस्वार आणि रिक्षाचालकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे.याचा सर्वाधिक फटका रोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना बसत आहे. सततच्या धक्क्यांमुळे मणक्याचे त्रास, पाठदुखी आणि शारीरिक वेदना वाढण्याची शक्यता डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. ज्येष्ठ नागरिक आणि गर्भवती महिलांसाठी हा प्रश्न अधिक गंभीर ठरत आहे.स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे योग्य मोजमाप आणि नियमांनुसार गतिरोधकांची पुनर्रचना करण्याची मागणी केली आहे. तसेच, आवश्यक त्या ठिकाणीच गतिरोधक ठेवावेत, अशीही मागणी होत आहे.आता प्रशासन याकडे कितपत गांभीर्याने पाहते आणि नागरिकांना दिलासा मिळतो का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. चंद्रशेखर भुयार ,अंबरनाथ
0
0
Report

बदलापुर की नई पानी टंकी में रिसाव, गर्मी में पानी संकट गहरा

Ambernath, Maharashtra:माणकिवली परिसरातील नव्याने बांधण्यात आलेल्या पाण्याच्या टाकीला गळती; ऐन उन्हाळ्यात पाण्याची टंचाई बदलापूरच्या जीवन प्राधिकरणाचा भोंगळ कारभार बदलापूर पूर्वेकडील शिरगांव परिसरात वाढीव बदलापूर पाणीपुरवठा योजनेअंतर्गत ही टाकी बांधण्यात आली होती. 15 दशलक्ष लिटर पाण्याची क्षमता असलेली ही टाकी भरल्यानंतर गळत असल्यामुळे या टाकीत गेल्या काही दिवसांपासून पाणी भरणे बंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाने या टाकीच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले असले तरी उद्घाटन करण्याची घाई का करण्यात आली. तसेच या भागातील नागरिकांना ऐन उन्हाळ्यात यामुळे पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याने स्थानिकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या संताप व्यक्त केला आहे. शिरगांव परिसर हा बदलापुरातील सर्वाधिक झपाट्याने विस्तृत होणारा परिसर असल्यामुळे या भागात टाकी उभारण्यात आली आहे. मात्र या टाकीचं काम निकृष्ट दर्जाचा झाल्यामुळे नागरिक आता उन्हाळ्याच्या झळा वाढत असताना पाण्यापासून वंचित राहणार आहेत. अनेक सोसायटी यांना या परिसरात आता टँकरचा आधार घ्यावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement

बारामती: धनगर समाज के समर्थन से अजित पवार की उम्मीदें तेज

Rui, Maharashtra:बारामतीत अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बांधवांची एक छोटी बैठक पार पडत आहे. बारामती पोट निवडणुकीच्या उमेदवार उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार आणि पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष विश्वास देवकाते यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडली अहिल्यादेवी होस्टेल धनगर समाज बैठक सुनेत्रा पवार भाषण. आपल्या सर्वांचे मनापासून आभार मानते. मला पाठिंबा देण्यासाठी तुम्ही एकत्र जमला तुम्ही दादांचे शिलेदार आहात दादांची प्रत्येक समाजासाठी काहीतरी करण्याची वृत्ती होती प्रत्येक समाजातील विद्यार्थ्याला सर्व सुविधा मिळाल्या पाहिजेत तो चांगला शिकला पाहिजे दादांनी तालुक्यातील प्रत्येक समाजासाठी सुख सुविधा निर्माण केल्या शिव शाहू फुले आंबेडकरांच्या विचारधारेवर चालत असताना दादांनी नेहमीच सर्वच समाज बांधवांना एकत्रपणे घेऊन जाण्याचे काम सातत्याने केलं. दोन अडीच महिन्यांपूर्वी अत्यंत दुर्दैवी घटना घडली. ती घटना आम्हा सर्वांना पोरक करून गेली. मला कधी आयुष्यातही वाटलं नव्हतं की कधी इथे येऊन अशा पद्धतीने आपल्या समोर उभी राहील बोलताना सुनेत्रा पवार भावूक झाल्या.... त्यावर वहिनी तुम्ही काळजी करू नका धनगर समाज तुमच्या पाठीशी आहोत असे कार्यकर्ते म्हणाले अमर रहे अमर रहे अजितदादा अमर रहे अशा घोषणा देण्यात आल्या मग तुम्ही पाठीशी होता म्हणूनच दादा तेवढ्या उंचीवर पोहोचले आहेत. बारामतीसाठी मी काय काय करू यासाठी दादांचा 24 तास प्रयत्न असायचा. बारामतीची लोक म्हणजे त्यांचा श्वास जी घटना घडली त्या ठिकाणी सुद्धा कागद पडले होते शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी बारामतीच्या लोकांसाठी काम केलं दादांच्या नंतर एवढं सगळं पोरख झालेलं मलाही पहावलं नाही दादांची सर्वांना शिकवण आहे की कोणत्याही संकटाला घाबरायचे नाही त्याला तोंड द्यायचे दादांच्या अंत्यविधीला जो जनसमुदाय लोटला होता सर्व रस्ते बंद झाले एवढे गर्दी जमली मग सर्वांना कळालं दादा काय होते. एखाद्या माणसाची महती कळायला मरावेच लागते का ? दादा गेल्यानंतर सगळ्या जनतेला वाटलं आमचा आधार गेला आपण दादांच्या पाठीशा कायम उभे राहिलात तसाच पाठिंबा आणि विश्वास तुम्ही द्याल याची मला खात्री आहे. दादांना अत्यंत मोठ्या मतांनी तुम्ही जर वेळेस निवडून दिल. खरतर ही वेळच यायलाच नाही पाहिजे की कोणी कोणाला मत मागायला जावं पण निवडणूक लागली आहे निवडणुकीला आपल्याला सामोरे जावे लागणार आहे. आता तुमची जबाबदारी आहे २१ एप्रिल रोजी दुपारी २ वाजता सांगता सभा आहे तुम्हांचा पाठिंबा हिच माझी शक्ती
0
0
Report
Advertisement

एकनाथ शिंदे ने मेट्रो, पानी और इन्फ्रास्ट्रक्चर से ठाणे-डोंबिवली का मामला साफ किया

Kalyan, Maharashtra:उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ज्या महापालिका मोठे निर्णय घेऊ शकत नाही हाऊसिंग मिनिस्टर आहे आपले समस्या सांगा तुम्हाला काही कमी पडू देणार नाही.. मेट्रो 5 ठाणे भिवंडी कल्याण उल्हासनगर याच डिजाइन चेज केले थोडा वेळ लागेल भिवंडी रांजणोली ते डायरेक्ट महापे मेट्रो मुळे कल्याण डोंबिवली वाहतूक कोंडी संपवून जाईल आमने जवळून रस्ता जातो तो समृद्धी मार्गाला जोडून कल्याणला कामेट्टीविटी देणार.. आपल्याला पाणी समस्या आहे या करिता काळू धरण बांधतोय या साठी MMRDA ने 450 कोटी भरले आहे ते काम युद्धः पातळीवर सुरू आहे पाणी रस्ते वाढवले पाहिजे MCHI यांनी रस्ता बनवायला घ्या 2 FSI आम्ही देतो तुमचा आणि लोकांचा फायदा होईल बाकी दुसरा काही अजेंडा आमचा नाहीये आणि म्हणून अडीच वर्षांच्या मुख्यमंत्री काळामध्ये मी अनेक प्रकल्प केले आताही आमच्या माहिती सरकारचं काम सुरू आहे ही अडीच वर्षांच्या काळामध्ये आम्ही खूप निर्णय घेतले इन्फ्रावर आज इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट देशांमध्ये महाराष्ट्रामध्ये नंबर वन इन्फ्रा प्रोजेक्ट एक नंबर आहे लाडकी बहीण साठी आम्ही केलं लोक MHANALE कसा होणार महाराष्ट्र मोठा आणि आमच्या लाडक्या बहिणीसाठी आम्ही नाही करणार कोणासाठी करायचा .. विरोध केला ते खड्ड्यात गले पंतप्रधान यांच्या 33% महिला आरक्षण आणलं मात्र विरोधकांनी विरोध केला लाडल्या बहिणी यांना पाडतील ठाण्याला जो निकष लावलाय जो निर्णय लावला आहे तो कल्याण डोंबिवलीला देखील लागला पाहिजे जिल्हा अधिकाऱ्य सोबत बैठक घेणार
0
0
Report

सांगली में भारी ओलों की बारिश, आंधी-बारिश से शहर में अफरा-तफरी

Sangli, Maharashtra:सांगली ब्रेकिंग स्लग - सांगलीमध्ये गारांचा वर्षाव, वादळी वाऱ्यासह जोरदार गारपीट.. अँकर - सांगलीमध्ये प्रचंड अशी गारपीट झाली आहे. गारांचा वर्षाव जणू सांगली वर झाल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे.वादळी वाऱ्यासह आणि विजांच्या कडकडाटा हा गारांचा पाऊस पडला आहे. गारांचा वर्षाव होऊन रस्त्यांवर अक्षरशः गारांचा खच पडला होता. गारांच्या वर्षावामुळे रस्त्यांवर अक्षरशा गारांची चादर पसरल्याचं चित्र निर्माण झाले होते. सकाळपासून सांगली शहराचा परिसरामध्ये प्रचंड उखाडा निर्माण झाला होता आणि सायंकाळ नंतर अचानक ढगाळ वातावरण होऊन अनेक ठिकाणी अवकाळी पावसाची जोरदार हजेरी लागली होती. सांगली शहरांमध्ये मात्र प्रचंड अशी गारपीट झाल्याचे पाहायला मिळालेला आहे, सुमारे अर्धा तास या ठिकाणी गारपीट सुरू होती.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top