Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

लोही गाँव में ग्रामस्वच्छता अभियान को मिला उत्साही समर्थन

Oct 03, 2025 12:10:51
Yavatmal, Maharashtra
दारव्हा तालुका के लोही गाँव में मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान के अंतर्गत ग्रामस्वच्छता अभियान बड़े उत्साह के साथ आयोजित किया गया। इस अभियान में ग्रामवासी, महिला बचत समूह, युवक मंडल, सामाजिक संगठन और स्कूल के विद्यार्थी बड़ी संख्या में शामिल हुए। "स्वच्छ और सुंदर गाँव बनाएं" के नारों से पूरा गाँव गूंज उठा। गाँव की सड़कों, स्कूल परिसरों और सार्वजनिक स्थानों की सफाई की गई। ग्रामवासियों के उत्साह की सराहना करते हुए, भविष्य में भी ऐसे अभियान नियमित रूप से आयोजित करने का संकल्प लिया गया। स्वच्छ और सुंदर लोही गाँव बनाने के संकल्प के साथ अभियान का समापन हुआ।
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
YKYOGESH KHARE
Oct 03, 2025 13:50:29
Nashik, Maharashtra:संशयित आरोपी श्रीकांत निकम याने आपल्या जन्मदात्या पिता पंडित कौतिक निकम (वय 70) यांच्यावर लाकडाच्या दांडक्याने जबरदस्त प्रहार केला… डोक्यावर झालेल्या गंभीर जखम पंडित निकम यांचा जागीच मृत्यू झाला. वडिलांशी सतत दारू, पैशे, किंवा काहीनाकाही कारणावरून श्रीकांत हा भांडण करत असल्याची चर्चा आहे. आणि याच वादातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती आहे. आरोपी श्रीकांत निकम यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्याला आज मालेगाव कोर्टात दाखल केले असता त्याला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक प्रीतम चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी करत आहेत.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Oct 03, 2025 13:17:04
Nanded, Maharashtra:Anchor - कर्जबाजारीपणाला कंटाळून आणि एस टी प्रवर्गात धनगर आरक्षण मिळत नसल्याने वैफल्यग्रस्त झालेल्या मेंढपाळाने आत्महत्या केल्याचा दावा त्यांच्या नातेवाईकांनी केलाय. नांदेड जिल्हयातील अर्धापूर तालुक्यातील देगाव कुराडा येथे 45 वर्षीय मेंढपाळाने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. रामराव डोके असे मयताचे नाव आहे. कर्ज आणि धनगर आरक्षणासाठी त्यांनी आत्महत्या केली असुन तशी चिट्टी त्यांनी लीहली. अर्धापूर पोलीसांनी चिट्टी जप्त केली असुन आकस्मिक मृत्यूची नोंद केलीये. रामराव डोके यांच्यावर खाजगी कर्ज होते. शिवाय ते धनगर आरक्षण लढ्यात सक्रिय होते. जालना येथील आमरण उपोषणालाही त्यांनी भेट दिली होती. कर्जबाजारीपण आणि अनुसूचित जमाती मध्ये आरक्षण मिळत नसल्याच्या कारणानेच त्यांनी आत्महत्या केल्याच्या दावा नातेवाइकानी केला.
5
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Oct 03, 2025 12:05:45
Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील सोनगीर पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये एका तीन वर्ष चिमुरडी वर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकारानंतर संतप्त नागरिकांनी मोर्चा काढत दोषीला कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे.या नराधमाला सोनगीर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. सोनगीर गावात राहणाऱ्या महिलेने पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार तीन वर्षाच्या मुलीला आरोपी हा त्याच्या घरी घेवून गेला. तेथे त्याने तिच्यावर अत्याचार केला. तक्रारदार महिलेच्या फिर्यादीवरुन आरोपी विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे यासंदर्भात विविध सामाजिक संघटना आणि महिलांनी सोनगिरी गावामध्ये मोठा मोर्चा काढला होता आरोपीला अटक करून त्याला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 03, 2025 12:05:29
Nagpur, Maharashtra:नागपूर *मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या ओबीसी बैठकीला काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार उपस्थित राहण्याबाबत प्रश्नचिन्ह* मुख्यमंत्र्यांनी उद्या राज्यातील विविध ओबीसी संघटनांची बैठक बोलावली आहे या बैठकीला ओबीसी नेते बबनराव तायवाडे यांना देखील बोलवण्यात आले आहे, तायवाडे यांनी सरकारने २ सप्टेंबर रोजी काढलेल्या जीआरला पाठिंबा दिला आहे जेव्हा की हा जीआर रद्द करावा हीच प्रमुख मागणी सर्व ओबीसी संघटनांची आहे नागपुरात झालेल्या ओबीसी संघटनांच्या बैठकीत तायवाडे यांना बोलावल्यामुळे उद्याच्या बैठकीला जाऊ नये असा सूर त्यामुळे उद्याच्या ओबीसी बैठकीला काँग्रेस विधिमंडळ नेते विजय वडेट्टीवर उपस्थित राहणार की नाही यावर प्रश्नचिन्ह!
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 03, 2025 11:48:54
1
comment0
Report
SKShubham Koli
Oct 03, 2025 11:20:01
Thane, Maharashtra:नरेश म्हस्के बाईट पॉइंटर ऑन ठाकरे आदानी ज्यांनी या मुंबई महापलिकेला आतापर्यंत लुटून खाल्ला मुंबईच्या विकासामध्ये रिपेरिंग ही एवढीच पुरती मर्यादित मुंबई ठेवली ज्यांनी कोविडमध्ये खिचडी सारख्या भ्रष्टाचार केला त्यांचे डावे उजवे भ्रष्टाचारामध्ये आत होते.. ज्यांनी आतापर्यंत मुंबई महापालिका लुटून खाल्ली त्यांनी आमच्यावर टीका करणे हे योग्य आहे का यांचं कशावर चालला आहे.. जे स्वतः भ्रष्टाचारात अडकले आहेत रस्त्यावरचे खड्डे आणि पावसाळ्यात ते भरायचे आणि त्यावरची मलिदा खायची त्यांनी आमच्यावर आरोप करू नये.. ऑन गणेश नाईक.. गणेश नाईक ज्येष्ठ नेते आहेत आपली ताकत असेल सर डिक्लेअर करा म्हणून तुम्ही बोलत आहात तुम्ही म्हणजे भाजप नाही आणि लायक कोण नालायक कोण हे वेळोवेळी नवी मुंबई मधील जनतेने दाखवल आहे.. तुमच्या जेष्ठत्वाचा मान आम्ही ठेवतो म्हणून आमच्या तोंडून अपशब्द येणार नाहीत परंतु आपण सुद्धा बोलताना भान ठेवा जरी आम्ही बोललो नाही तरी सर्वसाधारण खालचा कार्यकर्ता तुमच्या विरोधात बोलला तशा पद्धतीने शब्द वापरले तर या वयात तुम्हाला ते आवडणार नाहीत.. तुम्हाला ते पटणार नाहीत खूप यातना होतील..बोलताना बोलताना तारतम्य बाळगा आपण ज्येष्ठ आहात जेष्ठत्वाचा मान आम्ही कायम ठेवतो.. कोकणातील काल उभा टाचे उमेदवार आणि नेते रत्नागिरीतील नेते शहर प्रमुख जिल्हाप्रमुख उमेदवार अशी सर्व मंडळी एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेत प्रवेश करत आहेत.. उद्धव ठाकरे यांनी समजावा आपले योग्यता काय आहे. ऑन संजय राऊत हा भांडी घापा सा संजय राऊत जो आदेश शरद पवारांच्या घरची भांडी घासायचा आणि नंतर राहुल गांधी यांच्या घरची भांडी घासायला लागला आहे.. काही दिवसांनी राहुल गांधी यांच्या घरातील वॉशरूम देखील साफ करायला जातील अशी प्रवृत्ती संजय राऊत यची आहे.. एकनाथ शिंदे रिक्षावाले होते त्यांनी स्वतः कबूल केलं तू काय होता आधी दोन गुंडांच्या मध्ये मांडवली करणारा तू त्यांना मंत्रिपद दिलं नगर विकास मंत्री दिलं मेहरबानी केली नाही या शिवसेनेचे आमदार निवडून येण्याकरिता रात्रंदिवस त्यांनी केलं शिवसैनिकांना ते अटेंड करत होते तुम्ही घरात बसले होते.. शाखाप्रमुखांपसून एकदा शिंदे यांनी प्रवास सुरू केला अशी वाटचाल आहे भांडी घासा.. तुझी वाटचाल काय आहे तू खासदार झालास कधी शिवसैनिक म्हणून काम केलस लाठीकाठी खाल्ल्यास कधी आंदोलन केलं कुठल्या शाखेत तू शिवसैनिक होतास... याउलट तू बसून शिवसेना आणि बाळासाहेबां विरोधात तू लिहीत होतास तू पगारी नोकर आहेस सामनाचा पगार सुरू झाल्यानंतर तू शिवसेनेचे नाव घ्यायला लागलास.. संजय राऊत यांना उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या लायकी ठेवलं... बाळासाहेब ज्यावेळेस होते तेव्हा हे कार्यकारी संपादक होते त्यांना स्वतःचं काही लेखनाचे ज्ञान नाही बाळासाहेबांनंतर उद्धव ठाकरे साहेब संपादक झाले तुला कार्यकारी संपादक ठेवला.. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर रश्मी ठाकरे संपादक झाले तुला कार्यकारी संपादक ठेवला.. आणि आता पुन्हा मुख्यमंत्रीपदी उतरल्यानंतर उद्धव ठाकरे संपादक झाले तो कार्यकारी संपादक ठेवला अरे.. अरे शिपाई सफाई कामगार जरी इतके वर्ष काम केल्यानंतर त्याचं प्रमोशन होतं तुझी लायकीच नाहीये तू भांडी घासा आहेस थोडे दिवसांनी टॉयलेट साफ करणार आहेस त्यामुळे तुला आहे त्या जागेवरती उद्धव ठाकरे यांनी ठेवलाय त्यामुळे तुझी लायकी आधी बघ आणि त्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यावरती टीका करण्याचा प्रयत्न कर.. तुम्ही काय टीका करता दिल्लीमध्ये आतापर्यंत जेव्हा शिवसेना एक संघ होती तू कुणाला पुढे येऊन दिला नव्हता कुठल्या आमदाराला आमदार खासदाराला बोलून दिले नाही तुला तुझी योग्यता कळाली आणि श्रीकांत शिंदेने दिल्लीचा राजकारणात त्यांची पात्रता सिद्ध केली.. श्रीकांत शिंदे यांचे पाय धून पाणी पी.. पाय धू आणि पाणी पी म्हणजे तुला अक्कल येईल.. ऑन उद्धव ठाकरे.. त्यांना गाढव काय म्हणतात तुम्ही उंदीर आहात कोविड आलं तेव्हा बिळात घरात घुसून लपला होतात हाच एकनाथ शिंदे ज्या ज्या वेळी महाराष्ट्रावर शिवसेनेवर संकट आलं तेव्हा हाच एकनाथ शिंदे बाहेर येऊन वाघासारखा काम करत होता तुम्ही गाढव म्हणून ते गाढव होणार नाहीत ते वाघ आहे आणि ते वाघाने सिद्ध केला आहे तुम्ही उंदीर आहात बिळात लपून बसणारे.. ऑन ठाकरे युती.. टिजर आला होता दोन वेळा गर्दी जमवण्यासाठी ठाकरेंचा मेळावा काल आले होते एकत्र.. शिवाजी पार्क दिसल नाहीका.. काल भाषण झालं राज ठाकरे यांचं तुम्ही नाही ऐकलं संजय राऊत यांनी फक्त ऐकलं.. राज ठाकरे यांचं कालचं भाषण आम्ही ऐकलं आहे काल शिवाजी पार्कच्या मेळाव्यात मनसे आणि त्यांची युती काल जाहीर झाली आहे.. काय राज ठाकरे यांनी शिवाजी पार्कच्या मेळाव्य जे भाषण केलं ते कसं वाटलं हे उद्धव ठाकरेंना विचारावं.. काल लोकांना सांगत होते युती होणार एकत्र येणार काल आम्ही पाहिलं टाळ्या वाजवल्या आम्ही.. ऑन रामदास कदम वक्तव्य रामदास कदम शिवसेनेचे जेष्ठ नेते बाळासाहेबांचे अतिशय विश्वास पात्र असणारे नेते त्यांना काही गोष्टी माहित होत्या.. ते त्या ठिकाणी उपस्थित होते काही झाले असेल काल त्यांनी जाहीरपणे सांगितला आहे.. त्यांनी मृत्यूवर संशय नाही घेतला.. ते म्हणाले की बाळासाहेबांचा मृत्यू दोन दिवस आधी झाला होता परंतु तो दोन दिवस नंतर जाहीर केला.. आता यांना उत्तर द्यायला काही नाही म्हणून रामदास कदम यांच्यावर अशा टीका करत आहेत.. हिम्मत असेल तर रामदास भाईंनी जी टीका केली आहे केव्हा जी सत्य गोष्ट सांगितली आहे दोन दिवस आधी बाळासाहेबांचा मृत्यू झाला होता.. यावर उद्धव ठाकरे यांनी स्पष्टीकरण करावं..झाला होता की नाही रामदास कदम खरं बोलत आहे की खोटं बोलत आहेत हे त्यांनी जाहीर करावं भांडी घश्यांनी बोलून त्याचा उपयोग नाही.. भांडी घशाला उद्धव ठाकरे त्यावेळेस जवळही करत नव्हते.. रामदास कदमांनी जे वक्तव्य केले आहे ते सत्य आहे की असत्य ते उद्धव ठाकरे यांनी जाहीर करावं..
0
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 03, 2025 10:51:26
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Oct 03, 2025 10:38:04
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:उद्धव ठाकरे के akara तारखेला संभाजी नगरात होणारा मोर्चा म्हणजे शेतकऱ्यांची थट्टा करायला उद्धव ठाकरे येत असल्याचा टोला संजय शिरसाठ यांनी लावलाय... ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी काय दिलं असा सवाल त्यांनी केला त्यामुळे या मोर्चा मधून वगैरे काही होणार नाही सरकार मदत करते सरकार दिवाळीपूर्वी मदत करेल म्हणून एक क्रेडिट घ्यायला येत असल्याचा संजय शिरसाठ म्हणाले तरे पावसातलं भाषण म्हणजे शरद पवारांची कॉपी करणं होतं दुसरं काही नाही निवडणुका जवळ आल्या की हे असे मेळावे घेतात आणि त्यात काहीही बोलतात टोमणे मारतात असेही शिरसाठ म्हणाले तरे रामदास कदम जे म्हणाले त्यात निश्चितपणे सत्य आहे दोन दिवसांपूर्वी सरण रचलं होतं तिथे काय झालं हे उद्धव ठाकरेंनी सांगावं आम्ही जवळ होतो आम्हाला सगळं माहिती आहे असं शिरसाट म्हणाले...
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Oct 03, 2025 10:37:44
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Oct 03, 2025 10:37:29
Amravati, Maharashtra:परतवाडा पोलिसांवर फायरिंग करणाऱ्या कुख्यात गुंडांची टोळी अखेर जेरबंद; 13 चोरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या, एका आरोपीचा बिश्नोई गंगशी संबंध असल्याचा संशय पोलिसांनी हा प्रकार उघडकीस आणला; पोलिसांनी या कुख्यात चोरांच्या जोडीला 24 तासाच्या आत बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांनी आतापर्यंत 13 जणांना अटक केली असून मुंबई पुणे शाखेच्या माहितीवरून अमरावती ग्रामीण गुन्हे शाखा व नागपूर गुन्हे शाखेच्या पोलिसांनी परतवाडा येथे ही कारवाई केली आहे. आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांनी हवेत गोळीबार केल्याची सूत्रांची माहिती असून आरोपी यांना आयुर्वेदिक औषध विकत असल्याचा सांगून खापर्डे प्लॉट व ब्राह्मनसभा कॉलनी येथे घर भाडेाने घेतल्याची माहिती आहे. ताब्यात घेतलेल्या आरोपींकडे आयुर्वेदिक औषधी सापडल्यामुळे अटक करण्यात आलेल्या आरोपींपैकी एक आरोपी बिश्नोई गॅंग शी संबंधित असल्याचा तपास सुरू आहे. मुंबई क्राइम ब्रांच, नागपूर क्राइम ब्रांच आणि अमरावती क्राइम ब्रांच ची ही संयुक्त कारवाई असून मुंबई गुन्हे शाखेच्या पथक परतवाडा येथे दाखल झाले आहेत. या आरोपींना मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात देण्यात आले असून पुढील तपास मुंबई गुन्हे शाखा करत आहे.
0
comment0
Report
Dussera 2025
Advertisement
Back to top