445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कराड-चिपळूण हाईवे पर ST बस ने रिक्षा को टक्कर दी, 3 घायल
Satara, Maharashtra:कराड सातारा:- कराड चिपळूण राष्ट्रीय महामार्गावर चिपळूण माजलगाव या एसटी बसने अपे रिक्षाला कराड आरटीओ ऑफिस जवळ जोराची धडक दिली है. एसटी बसने पाठीमागून धडक दिल्याने अपे रिक्षा एका खड्यात पलटी झाली असून चालक हनुमंत सुर्वे यांच्यासह तीन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. एसटीच्या धडकेत अपे रिक्षा 20 ते 25 फूट लांब फेकली गेली असून एका खड्ड्यात पलटी झाले आहे. अपघातानंतर नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. जखमींना उपचारासाठी कराडला हलवले आहे.0
0
Report
रांजणगाव में पानी टैंकर चोरी: CCTV फुटेज से बदमाश गिरफ्तार
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथे पाण्याचा टँकर चोरी प्रकरण उघड झालंय, शेतकरी अशोक भुजबळ यांच्या घरासमोरून पाण्याचा टँकर चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली होती. चोरट्याने अत्यंत चलाखीने ही चोरी केली असून संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला होता. घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांनी आरोपींचा माग काढत अखेर त्यांना अटक करण्यात यश मिळवले. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत असून, वाढत्या चोरीच्या घटनांवर पोलिसांनी वचक बसवला आहे. पुढील तपास रांजणगाव पोलीस करत आहेत.0
0
Report
नागपुर में पिछले 10 दिनों में 13 अज्ञात लोगों की प्राकृतिक मौत, गर्मी से संकेत
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरात गेल्या 10 दिवसात 13 अनोळखी व्यक्तींचा नैसर्गिक मृत्यू झालाय -- एकीकडे रणरणत्या उष्णतेमुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले आहे... सर्वसामान्य उष्णतेच्या तडाख्यात होरपळत आहेत... त्यामुळे या नैसर्गिक मृत्यूकडे उष्माघाताचा संशय व्यक्त केला जात आहे मात्र ‘डेथ ऑडिट’नंतरच नेमके कारण स्पष्ट होणार आहे... - ૪૧ ते ૪५ अंश सेल्सिअस तापमानामुळे शहर होरपळत आहे . दुपारीच नव्हे तर रात्रीही उष्ण झळा जाणवत आहेत... --दरम्यान या मृत व्यक्तींमधील अनेक जण बेघर असून काही जणांना आरोग्याच्या समस्या असल्याचीही शक्यता आहे - प्रशासनाचा इशारा १२ ते ४ या वेळेत घराबाहेर पडणे टाळा, भरपूर पाणी प्या असे आवाहन केले जात आहे... तर मनपाकडून बेघरांसाठी निवारा केंद्र आणि शीतगृहांची व्यवस्था करण्यात आली आहे...0
0
Report
Advertisement
हिंगोली में येलो अलर्ट: दोपहर 12-3 बजे बाहर न निकलें, गर्मी से बचाव निर्देश
Hingoli, Maharashtra:हिंगोली जिल्ह्याला आज प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र मुंबई यांनी येलो अलर्ट जाहीर केला आहे.. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी उष्ण व दमट हवामान राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे उष्माघाताचा धोका निर्माण होण्याची शक्यता आल्याने नागरिकांनी खबरदारी घेण्याच आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे शक्यतो नागरिकांनी उन्हात जाणे टाळावे बारा ते तीन या वेळेत बाहेर पडू नये बंद चार चाकी वाहनात लहान मुले किंवा प्राणी ठेवू नयेत असे आव्हानं देखील हिंगोली प्रशासनाच्या वतीने नागरिकांना करण्यात आल आहे…0
0
Report
नाशिक के धर्मांतरण मामले में अंतरराष्ट्रीय मोड़, मलेशिया–मालेगाव कनेक्शन का दावा अदालत में
Nashik, Maharashtra:मल्टी नॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाला आंतरराष्ट्रीय वळण मलेशिया आणि मालेگाव कनेक्शनचा न्यायालयात धक्कादायक दावा फरार आरोपी निदा खानच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सोमवारी नाशिकरोड न्यायालयात सविस्तर सुनावणी पूर्ण विशेष सरकारी वकील अजय मिसर यांनी तपासात मलेशियाशी आर्थिक संबंध आणि मालेगाव कनेक्शनचे प्राथमिक धागेदोरे समोर आल्याचा दावा केला पीडित महिलेचे कथित नाव बदलून तिला मलेशियातील ‘इम्रान’ नावाच्या व्यक्तीकडे नोकरीसाठी पाठविण्याचा कट असल्याचे न्यायालयात नमूद दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने निकालासाठी २ मे तारीख निश्चित केली तोपर्यंत निदा खानच्या अटकेवरील संकट कायम, तपास यंत्रणांची नजर अधिक तीक्ष्ण प्रकरणातील डिजिटल, आर्थिक आणि बाह्य नेटवर्क तपासामुळे चौकशीचा विस्तार वाढण्याची शक्यता नाशिकातील प्रकरणाचे धागेदोरे आता थेट सीमापार पोहोचल्याच्या दाव्याने खळबळ0
0
Report
कुंभ मेले के लिए 377 एकड़ में 94 एकड़ पहले कब्जा, बाकी अधिग्रहण जारी
Nashik, Maharashtra:Nashik Breaking - - साधूग्रामसाठी तपोवनात भूसंपादन वेगात - जमीनमालकांवर अन्याय होऊ देणार नाही, महापौरांची स्पष्ट ग्वाही - सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक ३७७ एकरपैकी ९४ एकर जमीन आधीच अधिग्रहित, उर्वरित २८३ एकर संपादन प्रक्रिया सुरू - अतिरिक्त १९२ एकर भूसंपादनाचा प्रस्तावही जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य शासनाकडे पाठवला - तपोवन बैठकीत जमीनमालकांनी सेल इंडेक्सनुसार दर निश्चितीची मागणी करत भरपाईबाबत भूमिका मांडली - महापौर हिमगौरी आडके यांनी मुख्यमंत्री आणि कुंभमेळामंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न शिखर समितीसमोर मांडण्याचे आश्वासन दिले - उर्वरित जागा भाडेतत्त्वावर घेण्याचा पर्यायही चर्चेत, प्रलंबित १२.५० कोटींचे वाटप महिनाभरात करण्याचा दावा - कुंभमेळा नियोजनास वेग देताना शेतकऱ्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यावर प्रशासनाचा भर - साधूग्राम उभारणीसोबत विकासही, पण जमीनमालकांचा न्याय अबाधित ठेवण्याची मोठी परीक्षा0
0
Report
Advertisement
छत्रपती शिवाजीनगर के भुयारी मार्ग में वर्षा जलजमाव और यातायात जाम, विभागीय समन्वय सवाल
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर च्या शिवाजीनगर भुयारी मार्गात सतत होणाऱ्या वाहतूक कोंडीकडे नागरिकांनी लक्ष वेधल्यानंतरही प्रशासनातील समन्वयाचा अभाव पुन्हा उघड झाला. विविध विभागांच्या संयुक्त पाहणीचा गाजावाजा असतानाच सोमवारी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच घटनास्थळी पोहोचले. इतर विभागांनी दांडी मारली. परिणामी, कोंडी व पाणी साचण्याच्या समस्येवर ठोस निर्णय होण्याऐवजी प्रश्न आणखी लांबणीवर पडण्याची चिन्हे दिसत आहेत. छत्रपती शिवाजीनगर भुयारी मार्गाच्या पाहणीसाठी सोमवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांचा पाहणी दौरा होणार होता. मात्र, केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारीच पाहणीस आले. इतर विभागांचे अधिकारी न आल्याने काही वेळ प्रतिक्षा करून हे अधिकारी माघारी गेले. पावसाळ्यात भुयारी मार्गात पाणी साचू नये, होणारी वाहतूककोंडी, तसेच सध्या सुरू असलेल्या कामांची पाहणी सोमवारच्या पाहणीत करण्यात येणार होती.0
0
Report
इगतपुरी पंचायत समिति में लाचखोरी मामले में एसीबी ने तीन अभियंताओं को गिरफ्तार किया
Nashik, Maharashtra:इगतपुरी पंचायत समिती उपविभागात लाचखोर त्रिकूट एसीबीच्या जाळ्यात नाशिक जिल्हा परिषद इगतपुरी उपविभागातील सहायक अभियंता सतीश दराडे, सागर रावले आणि रवींद्र गायकवाड यांना अटक बिलावर स्वाक्षरी करण्यासाठी तक्रारदाराकडे ९ हजार रुपयांची लाच मागितल्याचा आरोप तडजोडीनंतर सोमवारी इगतपुरी कार्यालयात ६ हजार रुपये स्वीकारताना एसीबीने सापळा रचला सहायक अभियंत्याच्या सांगण्यावरून रक्कम ड्रॉवरमध्ये ठेवून पुढे कर्मचाऱ्याकडे देताना कारवाई शासकीय कामासाठी टक्केवारी मागणाऱ्या यंत्रणेचा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केला पर्दाफाश तीघांविरोधात गुन्हा दाखल, चौकशीला वेग जनतेच्या पैशावर डल्ला मारणाऱ्यांना आता एसीबीाचा थेट हिसका0
0
Report
छत्रपति संभाजीनगर में LPG संकट हल, गो गैस स्टेशनों पर आपूर्ति बढ़ेगी
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर शहरात एलपीजीच्या तुटवड्यामुळे रिक्षाचालकांना अनेक दिवस पंपांवरून रिकाम्या हाती परतावे लागत होते. आखातातील युद्धस्थितीमुळे पुरवठा विस्कळीत झाल्याने उपलब्ध गॅसचा साठा लवकर संपत होता. आता शहरात गॅसचा मोठा साठा शहरात दाखल झाल्याने दिलासा मिळण्याची शक्यता आहे. जिल्हा पुरवठा अधिकारी प्रवीण फुलारी यांनी सांगितले की, हा साठा शहरातील 'गो गॅस'च्या चार स्टेशन्ससाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कांचनवाडी एलपीजी स्टेशन आणि बीड बायपास स्टेशनसाठी प्रत्येकी ९ हजार लिटर साठा दिला असून, उर्वरित चिकलठाणा व साऊथ सिटी पंपांसाठी पुढील दिवशी साठा मिळणार आहे.0
0
Report
Advertisement
नगर निगम ने 2 टन प्रतिबंधित कैरीबैग जब्त कर 50 हजार का जुर्माना लगाया
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या घनकचरा विभागाने शहर कॅरिबॅगमुक्त करण्याचा निर्धार केला आहे, गेल्या आठवड्यापासून जोरदार कारवाई सुरू आहे. सोमवारी नवीन मोडा भागात दोन व्यापाऱ्यांकडून जवळपास २ टन प्रतिबंधित कॅरिबॅगचा साठा जप्त केला. त्यांच्यावर प्रत्येकी २५ हजारांप्रमाणे ५० हजारांचा दंड वसूल केला. महापालिका प्रशासनाने गेल्या चार दिवसांत ११ टनपेक्षा अधिक कॅरी बॅगचा साठा जप्त केला. हा जप्त केलेला साठा हसूल येथील कचरा प्रक्रिया केंद्रात नेऊन श्रेडिंग मशीनमध्ये त्याचे तुकडे करण्यात आले. ४० ते ५० किलोचे गड्ढे करून हा साठा ठेवण्यात येईल.0
0
Report
नगर परिषद अध्यक्ष अनुपस्थित, हार-मटके के साथ विरोध प्रदर्शन; जल आपूर्ति समस्या उजागर
Bhandara, Maharashtra:नगरसेविका भोंडेकर यांच्या नेतृत्वात “घागर जन आक्रोश मोर्चा”धडकला नगर परिषदेवर नगराध्यक्षाच्या खुर्ची वर टाकले हार व मटके. भंडारा जिल्ह्याच्या तुमसर शहरात माता वार्डात स्वछ पिण्याचे पाणी व काही ठिकाणी मुद्दाम पाणीच येत नसल्याने नगरसेविका सौ.रोशनी भोंडेकर यांच्या नेतृत्वात इतर पक्षाचेही नगरसेविका व जनतेच्या मोठ्या संख्येने घागर जन आक्रोश मोर्चा नगर परिषद वर धडकला. शहरातील पिण्याच्या पाण्याची समस्या कायमची सुटावी या साठी नगर परिषदेच्या तिजोरीतून सुवर्ण जयंती पाणी पुरवठा योजने अंतर्गत कोट्याधीश रुपये खर्च करून नवीन पिण्याच्या पाण्याची योजने अंतर्गत संपूर्ण शहरात नवीन पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन टाकण्यात आली. मात्र शहरातील बरेच वार्डातील काही भागात पाणीच येत नसल्याने नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकावं लागत आहे. घागर जन मोर्चे वेळी नगर परिषदेला नगराध्यक्ष अनुपस्थित असल्याने नगराध्यक्ष च्या खुर्ची वर हार व मटके ठेऊन निषेध करण्यात आले.0
0
Report
शिवाजी महाराज के बारे में गलत बयान से बागेश्वर महाराज के विरोध में प्रदर्शन
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल चुकीचे विधान करुन अपशब्द वापरल्याचा आरोप करत बागेश्वर महाराजांविरोधात छत्रपती संभाजीनगरमध्ये आंदोलन करण्यात आले. शहरातील क्रांती चौकात शिवप्रेमी यांनी एकत्र येत बागेश्वर महाराजांच्या प्रतिमेला जोडे मारुन आणि शेन खाऊ घालण्यात आले. तसेच यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. त्यांच्यावर कारवाईची मागणी करण्यात आली...0
0
Report
Advertisement
शासन ने यवतमाळ मध्यवर्ती सहकारी बैंक के संचालक मंडल बरखास्त कर प्रशासक नियुक्त किया
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक मंडळ शासनाने बरखास्त केले आहे. बँकेवर तातडीने प्रशासक नेमण्यात आले आहे. जिल्हा उपनिबंधक नानासाहेब चव्हाण यांनी प्रशासक म्हणून पदभार स्वीकारला आहे. शासनाच्या या धडक निर्णयामुळे सहकार क्षेत्रासह राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाची मुदत 20 डिसेंबर 2025 रोजी संपुष्टात आली आहे. त्यामुळे निवडणुक प्रक्रिया सुरु झाली होती. प्रारुप मतदार यादी आक्षेप दाखल स्वीकारण्याच्या टप्प्यावर असताना न्यायालयाने ‘जैसे थे’चे आदेश दिले. यामुळे निवडणुक प्रक्रिया लांबली. सहकार कायद्यानुसार अशा परिस्थितीत प्रशासक नेमण्याची तरतूद आहे. त्यानुसार शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे. दरम्यान शासन आदेशाविरोधात ‘स्टे’ मिळविण्याची धडपड संचालकांनी सुरु केलेली माहिती सुत्रांनी दिली आहे.0
0
Report
आवसारी खुर्द में बिबटिया पकड़ी गई; वन विभाग ने पिंजरा लगाया
Ambegaon, Maharashtra:आवसारी खुर्द में बिबटिया पकड़ी गई; वन विभाग ने पिंजरा लगाया0
0
Report
जालना: मर्चंट बैंक घोटाले के सातों आरोपी जेल भेजे गए
Jalna, Maharashtra:जालना : मर्चंट बॅंक घोटाळ्यातील सातही आरोपींची जिल्हा कारागृहात रवानगी अँकर : जालना मर्चट बँकेतील कोट्यवधी रुपयांच्या घोटाळाप्रकरणी सोमवारी सकाळी गणेश साबळे या सातव्या आरोपीला अटकण्यात आली. या आरोपीसह पोलिस कोठडीत असलेल्या अन्य सहा आरोपींना आर्थिक गुन्हे शाखेने सोमवारी न्यायालयासमोर हजर केले असता, त्यांना आणखी पोलिस कोठडी देण्यास नकार देत न्यायालयाने त्यांची जालना येथील जिल्हा कारागृहात रवानगी करण्याचे आदेश दिले. त्यामुळे मोतीराम अग्रवाल जालना मर्चंट को ऑपरेटिव्ह बॅंकेच्या घोटाळ्यातील सर्व आरोपींची आता कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.0
0
Report
Advertisement
