icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

रत्नागिरी के हरने समुद्र तट पर डीज़ल तस्करी का पर्दाफाश; डाभोल कस्टम ने दो फिशिंग बोट पकड़ीं

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत डिझेल तस्करीचा पर्दाफाश.. दाभोळ कस्टमची मोठी कारवाई!.. रत्नागिरीतील दापोलीच्या हर्णे समुद्रकिनारी रात्रीच्या अंधाराचा फायदा लेते डिझेलची तस्करी करणाऱ्या दोन फिशिंग बोटींना दाभोळ कस्टम पोलिसांनी रंगेहात पकडले आहे... मिळालेल्या माहितीनुसार दाभोळ कस्टम विभागाने ही धडक कारवाई केली.. डिझेलची अवैध वाहतूक करणाऱ्या दत्त जयंती IND.MH.04.MM.2847, रत्ना माऊली IND.MH.07.MM.4531 एकूण दोन फिशिंग बोटी पोलिसांनी ताब्यात घेतल्या आहेत.. सध्या या दोन्ही बोटींचा आणि त्यावरील साहित्याचा कस्टम पोलिसांकडून पंचनामा सुरू आहे... या तस्करीमागे मोठे रॅकेट असण्याची शक्यता वर्तवण्यात येत असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
0
Report

रत्नागिरी के तीन तालुकों के 64 गाँवों में टैंकर से पानी पहुँचा, 26 हजार लोग लाभान्वित

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तीन तालुक्यातील 64 वाड्यांना टँकर चा आधार.. उन्हाची तीव्रता वाढतेय..26 हजार ग्रामस्थांना केला जात आहे पाणीपुरवठा.. वाढत्या उन्हाळ्याच्या तडाख्याने दिवसागणित पाणी टंचाईग्रस्त गावांच्या संकेत भर पडू लागली आहे..सध्या जिल्ह्यात रत्नागिरीसह चिपळूण आणि मंडनगड या तालुक्यात पाणीटंचाईग्रस्त गावांमध्ये वाढ होताना दिसत आहे..या तीन तालुक्यातील एकूण 25 गावे आणि त्यामधील 64 वाड्यातील 26 हजार 885 ग्रामस्थांना टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे..दर दिवशी वाढत्या तापमानामुळे पाणी पातळीत घट होऊ लागली आहे..परिणामी पाणीटंचाई आणखी तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत..
0
0
Report

मांडवा में 1500 करोड़ के मरिना प्रकल्प के लिए आठ दिन में टेंडर प्रक्रिया शुरू

Chendhare, Maharashtra:स्लग - मांडवा येथे उभा राहणार भव्य मरिना प्रकल्प ..... १५०० कोटी रुपये खर्च करणार ........ आठ दिवसात प्रकल्पाचा आराखडा तयार करा ...... मंत्री नितेश राणे यांचे अधिकाऱ्यांना निर्देश ...... अँकर - अलिबाग तालुक्यातील मांडवा येथे अत्याधुनिक मरिना प्रकल्प उभारण्यास गती मिळाली असून, यासाठी सुमारे १५०० कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. या प्रकल्पाचा सविस्तर आराखडा पुढील आठ दिवसांत तयार करून टेंडर प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश राज्याचे बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. मांडवा परिसरात सध्या बोटी उभी करण्यासाठी आवश्यक सुविधा अपुर्या असल्याने भरती-ओहोटीच्या काळात मोठ्या अडचणी निर्माण होत आहेत. वाढते पर्यटन आणि स्थानिक विकास लक्षात घेता जेट्टी परिसरात मरिना उभारण्याची मागणी आमदार महेंद्र दळवी यांनी केली होती. या पार्श्वभूमीवर मंत्रालयात झालेल्या बैठकीत या प्रकल्पाचा सविस्तर आढावा घेण्यात आला.
0
0
Report
Advertisement

पिंपरी चिंचवड़ में भीषण गर्मी पानी संकट, टँकर दर 800 से 1100 रुपये तक बढ़े

Pimpri-Chinchwad, Maharashtra:उन्हाळ्याची तीव्रता जसजशी वाढत चालली आहे तसा पिंपरी चिंचवड करांवरचे पाणी संकटा चावट अधिकच गडद होऊ लागले आहे. वाकड पिंपळे सौदागर पिंपळे निलख या भागात मोठ मोठ्या वसाहतींना दररोज दहा ते बारा टँकर पाणी मागवावे लागत आहे. त्यामुळे सोसायटी धारकांवर मोठा आर्थिक बोजा पडला असून लाखो रुपये पाण्यावर खर्च होत आहेत. त्यातच आता टँकर पाणीपुरवठा करणाऱ्यांनी 800 रुपये वरून थेट अकराशे ते बाराशे रुपये टँकर दर केल्याने सोसायटी धारकांना अधिकच पैसे मोजावे लागत आहेत. त्यावर तातडीने उपाययोजना करण्याची मागणी सोसायटी धारक करत आहेत. याच संदर्भात सोसायटी धारकांशी चर्चा केली आहे आमचे प्रतिनिधी कैलास पुरी यांनी...
0
0
Report

नागपूर की संस्था युवतियों पर धार्मिक नियम थोपने के आरोप, भाजयुमो ने जांच की मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर शहरातील मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत कार्यरत असलेल्या 'युनिव्हर्सल मल्टीपर्पज सोसायटी' या संस्थेत काम करणाऱ्या तरुणींवर धार्मिक नियम लादण्याचा दबावचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी सखोल चौकशीची मागणी भाजप भारतीय जनता युवा मोर्चा शिष्टमंडळाने पोलीस उपआयुक्त नविनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन दिले. या निवेदनाद्वारे भाजयुमोने या संपूर्ण प्रकरणामागे केवळ एक व्यक्ती नसून, धर्मांतराचे एखादे मोठे संघटित रॅकेट किंवा षडयंत्र असण्याची दाट शक्यता व्यक्त केली आहे. या प्रकरणाचा तांत्रिक आणि सखोल तपास करून पडद्यामागून काम करणाऱ्या सर्व संशयित सूत्रधारांना तात्काळ अटक करण्याची मागणी यावेळी केलीय
0
0
Report

नेरुल में स्लैब गिरा, जान बची; दमकल ने लोगों को सुरक्षित बाहर निकाला

Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ सेक्टर 16ए मधील वूडलँड इमारतीच्या पाचव्या मजल्यावरील स्लॅब कोसळल्याची घटना घडलेय. सुदैवाने घरातील सदस्य स्वयंपाक घरात असल्याने जीवितहानी थोडक्यात टळली आहे. स्लॅब कोसळल्यामुळे चौथ्या मजल्याचे छत पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून त्याचा दाब तिसऱ्या मजल्यापर्यंत खाली पोहोचला आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाने तात्काळ बचावकार्य राबवत सर्व रहिवाशांना सुरक्षितपणे बाहेर काढले. बाधित कुटुंबांना कुकशेत येथील बाजार संकुलात तात्पुरते ठेवण्यात आले असून काही जण त्यांच्या नातेवाईकांच्या घरी गेले आहेत. या दुर्घटनेमुळे जीर्ण झालेल्या इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलााय.
0
0
Report
Advertisement

कोल्हापूर में शराबी बेटे की हत्या: पिता ने चाकू से मारी, गिरफ्तार

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर :- दारू पिऊन घरच्यांना शिवीगाळ करणाऱ्या मुलाचा बापानेच खून केल्याची घटना कोल्हापूर शहरातील विक्रम नगर मध्ये उघडकीस आली आहे. मुलगा जुनेद मिरवणुकीत गेल्यानंतर तो जखमी झाला होता असा बनाव करत गफूर पठाण याने पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला, पण पोलिसांनी खाक्या दाखवताच आपण स्वतःच आपल्या मुलाचा चाकूने भोकसून खून केल्याची कबुली गफूर सुलतान पठाण ( वय 40 ) या बापाने दिली आहे. राजारामपुरी पोलिसांनी गफूर पठाण याला अटक केली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गफूर पठाण हे आपली पत्नी, दोन मुले, वृद्ध आईसह राहतात. मुलगा जुनेद भंगारांच्या दुकानात काम करत होता, या दरम्यान त्याला दारूचे व्यसन जडले होते, त्यातून तो दारू पिऊन घरात कुटुंबियांना शिवीगाळ करत होता, त्याचा सर्वच कुटुंबियांना कंटाळा आला होता. जुनेद सोमवारी रात्री पुन्हा दारू पिऊन घरी आला, त्याने सर्व कुटुंबीयांना शिवीगाळ करायला सुरुवात केली , त्यावेळी वडील गफूर पठाण यानी काकडी कट करण्यासाठी ठेवलेला चाकू घेऊन जुनेदच्या छातीत खुपसला, त्यामुळे जुनेद गंभीर जखमी झाला. त्यानंतर जखमी अवस्थेत पडलेल्या जुनेदला गफूर पठाण याने उपचारासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात दाखल केले, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. जुनेदच्या छातीवर धारदार शस्त्राने वार झाल्याचे पोस्टमार्टम रिपोर्ट मध्ये कळाल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला, त्यावेळी गफूर पठाण याच्या जबाबवावात तफावत आढळून आली, पोलिसांनी वडील पठाण याला पोलिसी खाक्या दाखवताच आपणच आपल्या मुलाचा खून केल्याची कबुली गफूर पठाण यांनी दिली.
0
0
Report

पिंप्रड़ हादसे में पति-पत्नी की मौत, पालखी महामार्ग पर ट्रक ने टक्कर दी

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील पिंप्रद येथे लग्नासाठी दचाकीवरून जात असलेल्या" पती-पत्नीचा भीषण अपघातात मृत्यू झाला. फलटण ते पंढरपूर ' पालखी महामार्गावर ट्रकने दुचाकीला धडक दिली. या अपघातात गजानन जाधव आणि त्यांच्या पत्नी सिंधताई जाधव रा. राजूरी चौफला, यांचा मृत्यू झाला आहे. दुर्घटनेनंतर संतप्त जमावाने ट्रकवर दगडफेक केली. पालखी महामार्गावर दोन दिवसांत तिघांचा मृत्यू झाला आहेसलग दुसऱ्या दिवशी घडलेल्या या र्र्घटनेमुळे पंढरपूर-फलटण मार्ग अपघातप्रवणक्षेत्र बनत आहे. संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थ आणि प्रवासी वर्गातून होत आहे.
0
0
Report

यवतमाळ के रालेगांव में लड़कियों की बिक्री गलत प्रचार, भाजपा नेता पर आरोप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या राळेगाव येथील मुलींच्या विक्री प्रकरणी चुकीची माहिती देऊन उगीचच अपप्रचार करण्यात आला असा आरोप भाजपाचे आमदार राजू तोडसाम यांनी केला असून त्यांनी भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा खोटा ठरविला. भाजप जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल चौहान यांनी प्रसारमाध्यमांना चुकीची माहिती सांगितली, समाजात गैरसमज निर्माण केला. आदिवासी विकास मंत्री अशोक उईके यांची भूमिका देखील चुकीची होती. याबाबत आपण पोलिस अधीक्षकांकडून माहिती घेतली असता, 34 मुली बेपत्ता असल्याच्या दाव्यात तथ्य नसल्याचे समजले. त्यामुळे जिल्ह्याची व आदिवासी समाजाची बदनामी झाली, अशी खंत आमदार राजू तोडसाम यांनी व्यक्त केली. आदिवासी विकासमंत्र्यांच्या मतदारसंघातील या प्रकरणात भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा भाजपाच्याच आमदाराने खोडून काढल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
0
0
Report
Advertisement

डी लिमिटेशन बिल बनाम महिला आरक्षण, बहस जारी; पीएम पद पर बहन को प्रधानमंत्री?

Bhandara, Maharashtra:हा महिला आरक्षण विधेयकाच्या नसून डी लिमिटेशन बिल होता. प्रधानमंत्री यांनी राजीनामा द्यावा व एखाद्या लाडक्या बहिणीला प्रधानमंत्री करावा. महिला आरक्षण विधेयकाच्या विरोधात काँग्रेस खासदार प्रशांत पडोळे यांनी मतदान केलं त्यांना त्यांची जागा महिला दाखवेल असे वक्तव्य चन्द्रशेखर बावनकुळे यांनी केले होते. प्रतिउत्तर देताना खासदार म्हणाले हा महिला विधेयक बिल होता की डी लिमिटेशन बिल होता ते आधी स्पष्ट करावा. महिला आरक्षण बिल २०२३ मध्येच पास झाला आहे. मग महिला आरक्षण का लागू केलं नाही... ज्या राज्यांनी लोकसंख्या नियंत्रित केलं त्यांच्यावर अन्याय आहे. हा बिल म्हणजे उत्तर भारतीय व दक्षिण भारतीय राज्यात वाद लावण्याचं काम करणार होता... ३५० जागा वाढवून सामान्य जनतेच्या खिशाला कात्री लावण्याचं काम ही सरकार करता होती... जर सरकारकडे पैसा आहे. तर खासदारांचा स्थानिक निधी वाढवून ३० कोटी रुपये करण्यास यावा जेणेकरून विकासकामे होतील.... दुसरीकडे जर यांना महिलांना न्याय द्याच आहे. तर मोदी साहेबांनी राजीनाम देऊन एखाद्या लाडक्या बहिणीला प्रधानमंत्री करावा.
0
0
Report

तीव्र गर्मी से स्वास्थ्य संकट, अस्पताल भर्ती बढ़े; लोग सुरक्षा उपाय अपनाएं

Shirur, Maharashtra:राज्यात तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून सूर्य आग ओकत असल्याने उन्हाच्या तीव्र झळांनी नागरिक हैराण झालेत. वाढत्या तापमानामुळे उष्माघात, डिहायडरेशन आणि पोटाच्या विकारांचे प्रमाण वाढले असून रुग्णालये हाऊसफुल्ल झालीय या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याचं आवाहन डॉक्टर करत आहेत. सध्या दुपारच्या वेळी घराबाहेर पडणे कठीण झाले आहे. वाढत्या उष्णतेमुळे उष्माघात (Heat Stroke), उलट्या-जुलाब, चक्कर येणे, तसेच किडनी स्टोनचा त्रास असलेल्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. उन्हाचा हा प्रकोप आरोग्यासाठी घातक ठरू शकतो, त्यामुळे विशेष सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.
0
0
Report

नागपुर के लेंसकार्ट ड्रेस कोड विवाद: तिलक-बिंदी पहनने पर रोक का विरोध

Nagpur, Maharashtra:चष्मा तैयार करणारी प्रसिद्ध कंपनी लेंसकार्ट सध्या एका वादात सापडली आहे. हा वाद कंपनीच्या कर्मचाऱ्यांच्या ड्रेस कोडशी संबंधित आहे. या पार्श्वभूमीवर आज नागपुरात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी ल Lensकार्टच्या शोरूममध्ये जाऊन तेथील कर्मचाऱ्यांना तिलक आणि बिंदी लावून कंपनीच्या नियमांचा निषेध केला. विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि दुर्गा वाहिनीच्या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे की कंपनीने कर्मचाऱ्यांना हातावर कलावा बांधणे, कपाळावर तिलक व बिंदी लावणे, रुद्राक्ष धारण करणे बिंदी अशा हिंदू धार्मिक चिन्हे घालून कामावर येण्यास मनाई केली आहे, तर दुसरीकडे हिजाबला परवानगी दिली आहे. त्यामुळे हा धार्मिक भेदभाव असल्याचा आरोप कार्यकर्त्यांनी केला आहे. याविरोधात त्यांनी कर्मचाऱ्यांना तिलक लावून आपला निषेध नोंदवला.
0
0
Report
Advertisement

खेड में शिवसेना ने महिला आरक्षण बिल के विरोध में प्रदर्शन किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी के खेड में शिवसेना के वतीने महाविकास आघाडी और 'उबाठा' गट का जोरदार निषेध किया गया. केंद्र सरकार ने लाये गए 'नारी शक्ति वंदन' विधेयक के विरोध में शिवसेने की महिला कार्यकर्ताओं ने आक्रामक रुख अपनाया. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ने इस विधेयक का समर्थन दिया था, जबकि 'उबाठा' गट और कांग्रेस ने महिला आरक्षण में अड़थ़ढ़ा डालने का आरोप लगाया. 'लाडकी बहिन' योजना के विरोध पर भी खेड तहसीलदार कार्यालय के आगे काळे झंडे लेकर मोर्चा किया गया. डॉ. बाबासाहेब आंबेडकर को वंदन कर निकले इस मोर्चे में महिलाओं ने विरोधी के खिलाफ जोरदार घोषणाबाजी की.
0
0
Report

इचलकरंजी के यंत्रमाग कारखाने तीन दिन बंद, सूत दर बढ़े और मांग घटे

Kolhapur, Maharashtra:मँचेस्टर नगरी अशी ओळख असणाऱ्या इचलकरंजी शहरातील यंत्रमाग कारखाने आठवड्यातून तीन दिवस बंद ठेवण्यात येणार आहेत. सुत दरात सतत होणारी वाढ आणि कापडाला नसणारी मागणी यामुळे यंत्रमाग धारकानी कापड उत्पादन घटवण्याचा निर्णय घेतला आहे. पण या निर्णयामुळे यंत्रमाग कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांना फटका बसणार आहे. अमेरिका–इराण युद्धानंतर अचानक सूत दरात वाढ होत गेले, प्रति किलो २५ ते ३० रुपयापर्यंत सुत दरवाढ झाली आहे. त्यामुळे यंत्रमाग धारकांमध्ये मोठी अस्वस्थता निर्माण झाली. सध्या मंदीचे वातावरण असल्याने कापडाला बाजारपेठेत अपेक्षित भाव नाही आणि त्याला मागणी देखील नाही अशा परिस्थितीत कापडाचं अधिक उत्पादन करून तोट्यात येणार या भूमिकेने यंत्रमाग धारकांनी थेट तीन दिवस कारखानेच बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. दररोज होत असलेली सुतदर वाढ यंत्रमाग धारकांच्या तोट्याला कारणीभूत ठरत आहे. तर याचा फायदा सूतगिरण्या आणि व्यापाऱ्यांना होत असल्याचं यंत्रमागधारकांचे म्हणणं आहे. ज्यावेळी सुतदर कमी होईल आणि कापडाला मागणी वाढेल त्यानंतरच पूर्ण क्षमतेने कारखाने सुरू करू अशी भूमिका यंत्रमाग धारकांची आहे.. पण इचलकरंजी शहरात यंत्रमाग कारखान्यावर अवलंबून असणाऱ्या कामगारांना मात्र पूर्णवेळ रोजगार मिळणार नाही. त्यामुळे सरकारने सुत दरावर अंकुश ठेवण्यासाठी उपाययोजना करण्याची मागणी सर्व स्तरातून होत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top