icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

गोकुळ दूध संघ के चुनाव: आज आख़िरी दिन, 15 जुलाई तक मतदाता सूची बनेगी

Kolhapur, Maharashtra:गोकुळ दूध संघासाठी ठराव दाखल करण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज अखेर 5 हजार 333 इतके ठराव दाखल झाले आहेत. सभासदत्व रद्द केलेल्या संस्था वगळता 4 हजार 575 संस्था निवडणुकीसाठी पात्र आहेत. पण सहाय्यक निबंधक कार्यालयाकडे 758 ठराव अधिक आले आहेत. आज ठराव दाखल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर ठरावांची छाननी होईल आणि त्यानंतर दुबार ठराव बाजूला करून त्या ठरावांची सुनावणी होईल, त्यानंतरच गोकुळचे पात्र ठरावधारक किती हे स्पष्ट होईल. या सर्व प्रक्रियेला 15 दिवस लागणार असून 15 जुलै नंतरच गोकुळची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध होणार आहे.
0
0
Report

कल्याण-डोंबिवली में एक दिन में 18 से अधिक पेड़ गिरे, कारें और स्कूटर क्षतिग्रस्त

Kalyan, Maharashtra:अवघ्या एका दिवसात १८ हून अधिक झाडे कोसळली, काळातलाव येथे भलेमोठे झाड पडून तीन कार व दोन दुचाकींचे नुकसान कल्याण-डोंबिवलीत सुरू असलेल्या पावसामुळे अवघ्या एका दिवसात १८ हून अधिक झाडे कोसळल्याच्या घटना घडल्या आहेत. या घटनांमध्ये अनेक ठिकाणी वाहनांचे नुकसान झाले असले तरी सुदैवाने कुठलीही जीवित हानी किंवा कुणीही जखमी झालेलं नाही .काल मध्यरात्रीच्या sुमारास कल्याणमधील काळातलाव परिसरात शत्रुंजय टॉवर इमारतीलगत असलेले भलेमोठे झाड अचानक संरक्षक भिंतीवर कोसळले. या दुर्घटनेत तेथे उभ्या असलेल्या तीन चारचाकी आणि दोन दुचाकी वाहनांचे मोठे नुकसान झाले. सुदैवाने घटना मध्यरात्री घडल्याने कोणतीही जीवितहानी झाली नाही.दरम्यान, हे झाड धोकादायक अवस्थेत असल्याबाबत स्थानिक नागरिकांनी यापूर्वी अनेक वेळा केडीएमसीकडे तक्रारी केल्याचा दावा केला आहे. मात्र, वेळेत कारवाई न झाल्याने अखेर झाड कोसळून नुकसान झाल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.
0
0
Report

करवीर में बिल्ली बचाते समय मोटर से स्पर्शाकर विद्युत झटका, 13 वर्षीय शाहू की मौत

Kolhapur, Maharashtra:कुत्र्याच्या तावडीतून मांजराला वाचवण्यासाठी गेलेल्या मुलाचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला आहे. ही घटना कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर तालुक्यात असणाऱ्या कंदलगाव मध्ये घडली आहे. शाहू संदीप पाटील असं मृत्युमुखी पडलेल्या तेरा वर्षीय मुलाचे नाव आहे. शाहू हा इयत्ता सातवी शिकत होता, दुपारी शाळा सुटल्यानंतर घरी आला, घरात जेवण करत असताना पाळीव मांजराच्या पाठीमागे कुत्रा लागल्याचे दिसताच शाहू मांजराला वाचवायला गेला, पण दरम्यान पाणी भरण्यासाठी मोटार सुरू करण्यात आली होती, त्या मोटारी जवळ मांजरी गेल्याने शाहू देखील तिथे गेला. याच दरम्यान मोटारीच्या विद्युत वायरला शाहूचा हात लागला आणि त्याला विजेचा तीव्र झटका बसला. कुटुंबीयांनी शाहूला तातडीने कोल्हापूरातील छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल केले पण डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले.
0
0
Report
Advertisement

भंडारा के किसानों के लिए डायरेक्ट भात पेरणी से पानी और खर्च बचत

Bhandara, Maharashtra:एलनिनोचे सावट... पावसाअभावी कृषी विभागाची 'डायरेक्ट भात पेरणी' मोहीम... शेतकऱ्यांना पाणी आणि खर्च बचतीचा सल्ला... याच पार्श्वभूमीवर कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन 'डायरेक्ट भात पेरणी' पद्धतीचे प्रात्यक्षिक आणि जनजागृती मोहीम सुरू केली आहे. भंडारा जिल्ह्यात धान हे प्रमुख पीक असून पारंपरिक लागवड पद्धतीस मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता असते. मात्र यंदा पावसाने उशिरा हजेरी लावल्याने शेतकऱ्यांसमोर खरीप हंगामाचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. यामुळे कृषी विभागाने 'डायरेक्ट भात पेरणी' या आधुनिक पद्धतीचा अवलंब करण्याचे आवाहन केले आहे. या पद्धतीमुळे पाण्याची बचत होते, मजुरीचा खर्च कमी होतो आणि वेळेचीही बचत होते. कृषी अधिकारी प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन या पद्धतीचे प्रात्यक्षिक दाखवत आहेत. शेतकऱ्यांना या तंत्रज्ञानाचे फायदे समजावून सांगत अधिकाधिक शेतकऱ्यांनी याचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात येत आहे. कृषी विभागाच्या माहितीनुसार, पारंपरिक भात लागवडीपेक्षा डायरेक्ट भात पेरणीमध्ये खर्च कमी येतो. एका एकरासाठी लागणारा मजुरीचा खर्चही लक्षणीयरीत्या कमी होत असल्याने ही पद्धत सध्या परिस्थितीत अधिक फायदेशीर ठरत आहे. एलनिनोमुळे पावसाचे प्रमाण कमी राहण्याची शक्यता लक्षात घेता, उपलब्ध पाण्याचा कार्यक्षम वापर करून उत्पादन टिकवून ठेवण्यासाठीही ही पद्धत उपयुक्त असल्याचे कृषी विभागाने सांगितले आहे.
0
0
Report

अकोला में एक ही दिन में दो हत्याएं, बार्शीटाकळी इलाके में हड़कंप

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यात एकाच दिवशी दुसऱ्या हत्येची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. बार्शीटाकळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील निंबी चेडका येथे अनिकेत इंगळे या युवकाची निर्घृण हत्या करण्यात आली. या प्रकरणात चार ते पाच संशयितांचा सहभाग असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. घटनेची माहिती मिळताच बार्शीटाकळी पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. एकाच दिवशी सलग दोन हत्यांच्या घटनांमुळे अकोला जिल्ह्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू आहे. हत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून, पोलिसांकडून सर्व बाजूंनी तपास सुरू आहे. मात्र एकाच दिवशी अकोला जिल्ह्यात दोन हत्यांच्या घटना घडल्याने कायदा-सुव्यवस्थेबाबत चिंता व्यक्त केली जात आहे.
0
0
Report
Advertisement

सांगली के बेकरी और दवा दुकानों में भेसळ रोकथाम के लिए कड़ी जांच की मांग

Sangli, Maharashtra:सांगलीतील रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंडें यांच्या कारवाईचे समर्थन करण्यात आले आहे. तसेच सांगली जिल्ह्यातील बेकरी पदार्थ विक्री करणारे व औषध दुकानांची तपासणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. या बाबतचा निवेदन सांगलीच्या अन्न व औषध प्रशासनाला देण्यात आले आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बेकरी दुकानात भेसळयुक्त पदार्थ विकले जात आहेत. तसेच हॉस्पिटल कडून ठराविक औषध दुकानातूनच औषध खरेदीची सक्ती केली जाते, याशिवाय परवानाधारक व्यक्ती शिवाय औषध दुकान चालवली जात आहेत, असे आरोप करत अन्न व औषध प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व बेकरी व औषध दुकानात तपासणी करावी, अन्यथा अन्न व औषध प्रशासना विरोधात आंदोलन करण्याचा इशारा आरपीआयचे माजी जिल्हाप्रमुख पोपट कांबळे यांनी दिला आहे.
0
0
Report

बिन बरसात कृष्णा नदी सूखी, सांगली-मिरज में पानी संकट गहराया

Sangli, Maharashtra:सांगली जिले में कृष्णा नदी ऐन पाऊसाळ्यात कोरडी पडी आहे. सांगलीमध्ये कृष्णा नदीने पाणी टंचाई निर्माण केली आहे आणि तर मिरज, अंकली येथे कृष्णा नदीचे पात्र कोरडठाक पडले आहे. त्यामुळे कृष्णा काठावर असणाऱ्या नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. पुढील काही दिवसात पाऊस समाधानकारक नसल्यास सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात पाणीटंचाईला सामोरे जावे लागणार आहे, असे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. 10 जुलै नंतर एक एक दिवस शहराला पाणीपुरवठा करणे शक्य होईल—याची माहिती आमच्या प्रतिनिधी सरफराज सनदी यांनी घेतली.
0
0
Report

केतन अग्रवाल मामले के बाद लोहगढ़ किले पर पर्यटकों की भीड़ बढ़ी

Varsoli, Maharashtra:Headline:\nकेतन अग्रवाल मामले के बाद लोहगढ़ किले पर पर्यटकों की बढ़ती भीड़ \n\nAnchor:\nपुणे के चर्चित केतन अग्रवाल हत्याकांड के बाद ऐतिहासिक लोहगढ़ किले पर पर्यटकों की संख्या में उल्लेखनीय बढ़ोतरी देखने को मिल रही है। इतिहास, प्राकृतिक सौंदर्य और ट्रेकिंग के लिए मशहूर लोहगढ़ अब इस हत्याकांड की वजह से भी चर्चा का केंद्र बन गया है। स्थानीय लोगों का कहना है कि कई पर्यटक किला देखने के साथ-साथ उस कथित जगह को भी देखने पहुंच रहे हैं, जहां से केतन अग्रवाल को नीचे धक्का देने का आरोप है। स्थानीय दुकानदारों के अनुसार, पिछले कुछ दिनों में पर्यटकों की संख्या पहले की तुलना में बढ़ी है। \n\nVO:\nबारिश के मौसम में अपने मनमोहक प्राकृतिक सौंदर्य के लिए प्रसिद्ध लोहगढ़ किला इन दिनों एक अलग ही वजह से सुर्खियों में है। केतन अग्रवाल हत्याकांड के बाद देशभर से बड़ी संख्या में लोग यहां पहुंच रहे हैं। कुछ पर्यटक ऐतिहासिक धरोहर और प्राकृतिक सुंदरता का आनंद लेने आते हैं, जबकि कई लोगों की उत्सुकता कथित घटनास्थल को देखने की भी है, ऐसा स्थानीय लोगों का कहना है। सोशल मीडिया पर भी इस स्थान से जुड़े कई वीडियो तेजी से वायरल हो रहे हैं, जिसके बाद इस पूरे मामले और लोहगढ़ किले को लेकर लोगों के बीच चर्चा और बढ़ गई है।
0
0
Report
Advertisement

कल्याण-डोंबिवली में पाणीपुरी पुऱ्यों के कारखाने पर छापा, सील

Kalyan, Maharashtra:धक्कादायक!कल्याणच्या काटेमावलीत घाणीत तयार होत होत्या पाणीपुरीच्या पुऱ्या; केडीएमसीचा कारखान्यावर छापा... निकृष्ट तेलाचा वापर उघड,कारखाना सील. राज्यभरात अन्न सुरक्षेबाबत FDA चे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कठोर कारवाईचे सत्र सुरू असताना कल्याण-डोंबिवली महापालिकेने देखील मोठी कारवाई करत काटेमानिवली परिसरातील शेवपुरी-पाणीपुरीच्या पुऱ्या तयार करणाऱ्या कारखान्यावर छापा टाकून तो करखाना सील केला आहे. काटेमानवली स्टेट बँक ऑफ इंडिया मागील परिसरात सुरू असलेल्या या कारखान्यात शेवपुरी व पाणीपुरीसाठी लागणाऱ्या पुऱ्यांचे उत्पादन केले जात होते. केडीएमसी चे उपायुक्त रामदास कोकरे यांच्या आदेशानुसार सहाय्यक आयुक्त सविता हिले यांच्या पथकाने या कारखान्यावर छापा टाकला . कारखान्याची पाहणी करताना धक्कादायक प्रकार समोर आले. उत्पादनाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अस्वच्छता आणि घाण साचलेली होती. अन्नपदार्थ तयार करताना कामगारांकडून आवश्यक स्वच्छता व सुरक्षिततेच्या नियमांचे पालन केले जात नसल्याचेही निदर्शनास आले.याशिवाय, कारखान्यात बेकायदेशीर भट्टी सुरू असून त्यामध्ये लाकडाचा वापर केला जात असल्याचे आढळले. खाद्यपदार्थ तळण्यासाठी निकृष्ट व खराब तेलाचा वापर होत असल्याचेही पथकाच्या तपासात स्पष्ट झाले.अनियमितता लक्षात घेऊन महापालिकेने संबंधित कारखाना तात्काळ सील केला असल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या विरोधात भविष्यातही अशाच धडक कारवाया सुरू राहणार असल्याचे संकेत प्रशासनाने दिले आहेत.
0
0
Report

चंद्रपुर के सावली में बाघ का शव मिला; विद्युत तार से मौत का शक

Chandrapur, Maharashtra:चंद्रपुर जिले के सावली तालुक्यातल्या कन्हाळगाव जंगलात संदिग्ध स्थितीत आढळला वाघाचा मृतदेह, अंगावर विद्युत तार आढळल्याने शिकारीचा संशय व्यक्त केला जात आहे. अँकर के अनुसार, वाघ सावली रेंज के कन्हाळगाव बिट परिसर के सिंदेवाही मार्ग पर पाया गया। वाघ के सभी अंग शाबूत थे। हाल के तूफान और वर्षा के कारण क्षेत्र में बिजली के खंभे गिर गए थे, जिससे विद्युत आपूर्ति बाधित थी। बिजली तारें शायद अवैध रूप से लगाई गई थीं ताकि वन्य प्राणियों को deter किया जा सके। वन विभाग ने शव का पोस्टमार्टेम किया और आगे की जांच कर रहा है।
0
0
Report

डोंबिवली में शिवसेना शाखा के सामने पेड़ गिरा; रिक्षा और दोपहिया वाहन क्षतिग्रस्त

Kalyan, Maharashtra:डोंबिवलीत शिवसेना शाखेसमोर झाड कोसळले रिक्षा आणि काही दुचाकींच्या नुकसान सुदैवाने जीवितहानी टळली, कल्याण-डोंबिवली परिसरात सकाळपासून ढगाळ वातावरण असून अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत. या पावसामुळे डोंबिवलीत एक धक्कादायक घटना समोर आली आहे. डोंबिवली पूर्व येथील शिवसेना मध्यवर्ती शाखेसमोर असलेले मोठे झाड अचानक कोसळले. झाड कोसळल्याने एक रिक्षा आणि काही दुचाकी रस्त्यावर उभ्या असल्याने नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
0
0
Report
Advertisement

गडचिरोली रेलवे मजदूरों ने काम बंद आंदोलन, ठेकेदार पर शोषण का आरोप

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोलीत रेल्वे कामावरील मजुरांचे कामबंद आंदोलन, प्रकल्प व्यवस्थापकाकडून मजुरांची पिळवणूक होत असल्याचा आरोप अँकर : गडचिरोलीत सुरू असलेल्या रेल्वे कामावर प्रकल्प व्यवस्थापकाकडून मजुरांची पिळवणूक होत असल्याचा आरोप करत पन्नासहुन अधिक मजुरांनी कालपासून काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे. सध्या बहुप्रतिक्षित देसाईगंज-गडचिरोली या रेल्वे मार्गाचे काम सुरू आहे. 58 किलोमीटरच्या या रेल्वे मार्गाचे कंत्राट बाहेर राज्यातील दोन कंपन्यांना दिले असून पोर्ला ते गडचिरोली रेल्वे मार्गाचे काम झांजरिया निर्माण लिमिटेड करीत आहे. या कामावर साहित्य ने-आण करण्यासाठी पन्नास हून अधिक ट्रक चालक राज्यातील तसेच परराज्यातील आहेत. मात्र अनियमित वेतन देणे, कोणतीही सूचना न देता कुणालाही कामावरून काढणे, असा प्रकार प्रकल्प व्यवस्थापकाकडून सुरू असल्याचा आरोप करत मजुरांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.
0
0
Report

डोंबिवली गणेश घाट स्मशानभूमी में शव विटंबना, सुरक्षा रक्षक नियुक्ति की मांग

Kalyan, Maharashtra:मन सुन्न करणारी घटना! डोंबिवली कुंभारखान पाडा राजू नगर गणेश घाट स्मशानभूमीत जळत्या प्रेताची श्वानांकडून विटंबना सुरक्षा रक्षक नसल्याने स्मशानभूमीत जळत्या प्रेताची विटंबना स्मशानभूमीसाठी तत्काळ सुरक्षा रक्षक नेमण्यात यावेत -शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांची मागणी डोंबिवली शहरातील कुंभारखान पाडा, राजू नगर येथील गणेश घाट स्मशानभूमीत अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. स्मशानभूमीत अंत्यसंस्कारानंतर जळत असलेल्या प्रेताची भटक्या श्वानांनी विटंबना केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल होत असून, नागरिकांमध्ये संतापाची लाट उबालली आहे. स्मशानभूमीत कायमस्वरूपी सुरक्षा रक्षक नसल्यामुळे भटकी श्वाने आणि इतर जनावरे मुक्तपणे परिसरात वावरत असतात. या प्रकरणाची गंभीर दखल घेत शिवसेना नगरसेवक विकास म्हात्रे यांनी प्रशासनावर नाराजी व्यक्त केली. मृत व्यक्तीच्या पार्थिवाचा सन्मान राखणे ही प्रशासनाची जबाबदारी आहे. अशा घटना पुहा घडू नयेत यासाठी गणेश घाट स्मशानभूमीत तात्काळ सुरक्षा रक्षकांची नियुक्ती करण्यात यावी, तसेच आवश्यक सुरक्षा व्यवस्था उभारण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली. महापौरांसह आयुक्तांची भेट घेतली असता लवकरात स्मशानभूमीसाठी सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील असे आश्वासन महापौरांनी दिले.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top