icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बुलढाणा में ATS ने नागपुर-आकोला के साथ बड़े कारवाई; पिस्टल-92 कारतूस बरामद

Buldhana, Maharashtra:बुलढाणा जिल्ह्यात नागपूर आणि अकोला एटीएस ची मोठी कारवाई. दोन पिस्टलसह 92 जिवंत काडतूस जप्त. तीन जणांना ATS ने केली अटक. बुलढाणा जिल्ह्यातील रायपूर पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या अंत्रीकोळी या गावातून नागपूर आणि अकोला एटीएसने तीन जणांना ताब्यात घेऊन त्यांची चौकशी केली असता त्यांच्याकडून दोन पिस्टल व 92 काडतूस जप्त केले आहे. अकोला आणि नागपूर एटीएसला मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली. या कारवाई बाबत मात्र बुलढाणा पोलीस अनधिज असल्याची माहिती मिळाली आहे. नागपूर आणि अकोला एटीएसला बुलढाणा जिल्ह्यात येऊन केलेल्या कारवाईमुळे मात्र बुलढाणा पोलिसांवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिल आहे. शुभम सागर पवार राहणार वर्धा व रोहित शिंदे असं अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून ते काळ्या रंगाच्या कारमधून या परिसरात फिरत असल्याची माहिती अकोला आणि नागपूर एटीएसला मिळाली होती त्यानुसार काल सायंकाळी ही कारवाई करण्यात आली दोन पिस्टल व 92 जिवंत काडतूस जप्त केल्याने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे
0
0
Report

रत्नागिरी-कोकण सीट पर महायुती में पेच, शिंदे-शिवसेना बनाम अजित पवार की भिड़ंत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- कोकण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषदेच्या जागेवरून महायुतीत पेच शिंदे शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत उमेदवारीवरून चढाओढ शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची चर्चा राजन साळवी यांनी यापुर्वीच सुरु केली आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुशंघाने आखणी कोकण विभागात या मतदार संघात शिंदे शिवसेनेचे पारडे जड रायगड,रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तिन्ही जिल्ह्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्था मिळून एकूण 831 मतदार सदस्य यातमध्ये एकट्या शिंदेच्या शिवसेनेच्या सदस्यांचे 236 संख्याबळ श शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी ही पाडलेल्या संख्याबळाच्या जोरावर या मतदारसंघावर ,सांगितलाय हक्क राज्यातील बदललेली राजकीय समीकरणे आणि कोकणातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये पक्षनिहाय संख्याबळ पाहता या निवडणुकीत चुरस सुनील तटकरे आपल्या मुलगा अनिकेत तटकरे याचे राजकीय पुर्वुनवस करण्यासाठी पुर्व एकदा आग्रही महायुतीतील हा जागेचा पेच सोडण्यासाठी मुख्यमंत्री समन्वयाची भूमिका घेणार
0
0
Report
Advertisement

नाशिक–पुणे महामार्गावर सीएनजी पंपांवरील गॅस असंयोजनामुळे लांबच लांब रांगा, गाडीचालकांची नाराजी

Sinnar, Maharashtra:नाशिक-पुणे महामार्गावरील सिन्नर येथील सीएनजी पंपावर गॅस भरण्यासाठी वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. अनेक ठिकाणी सीएनजी गॅस उपलब्ध नसल्यामुळे वाहनधारकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही ठिकाणी तासन्तास लाईनमध्ये थांबल्याने वाहनचालकांनी नाराजी व्यक्त केली. प्रत्येक पंपावर नियमितपणे सीएनजी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी वाहनधारकांकडून करण्यात येत आहे. तासनतास सीएनजी गॅस मिळवण्याकरता थांבण्याचे वेळात असल्याने प्रवाशांसह वाहन चालकांनी संताप व्यक्त केला आहे.
0
0
Report

वाशीम में पेट्रोल-डीजल का तुटवड़ा कायम, पंप बंद, प्रशासन ने खपत रोकने को कहा

Washim, Maharashtra:वाशीम: File:1905ZT_WSM_FUEL_SHORT_DM_BT रिपोर्टर:गणेश मोहळे,वाशीम अँकर:एकीकडे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा एकदा वाढ झाली असताना, दुसरीकडे वाशिम जिल्ह्यात सलग पाचव्या दिवशीही पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा कायम असल्याचे चित्र आहे.जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंप आजही बंद असून, ज्या ठिकाणी डिझेल उपलब्ध आहे त्या ठिकाणी वांधारकाने मोठ्या प्रमाणात खरेदीसाठी सकाळी सहावाजल्या पासूनच रांगा लावल्याचे दिसून आले.नागरिकांना घाबरून अतिरिक्त इंधन साठा न करण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यंदाच्या या महिन्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा 20 टक्क्यांनी अधिक झाल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.तसेच इंधनाचा पुरवठा नियमित सुरू असल्याचेही सांगण्यात आले आहे गरजेपेक्षा अधिक पेट्रोल-डिझेल खरेदी करू नये, जेणेकरून कृत्रिम तुटवडा निर्माण होणार नाही,असे आवाहन वाशिमचे जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे. बाईट:योगेश कुंभेजकर,जिल्हाधिकारी वाशीम
0
0
Report
Advertisement

खरीप हंगाम के समय डीजल संकट से चंद्रपूर के किसान परेशान, पंपों पर रातभर कतार

Chandrapur, Maharashtra:खरीप हंगाम पुढ्यात असताना पेट्रोल डिझेलच्या टंचाईने शेतकरी त्रस्त, चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास पंपांवर लागत आहेत लांबच लांब रांगा खरीप हंगाम पुढ्यात असताना पेट्रोल डिझलच्या टंचाईने शेतकरी त्रस्त झाले आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात रात्रीच्या सुमारास पंपांवर लांबच लांब रांगा बघायला मिळत आहेत. शेतीमध्ये चालविली जाणारी उपयोगी वाहने पंपावर आणणे शक्य नसल्याने शेतकरी विविध उपायाचा अवलंब करत आहेत. मात्र पेट्रोल डिझेलच्या टंचाईने शेतकरी हतबल आहेत. हंगामाच्या पुढ्यात यातून मार्ग काढून शेतकऱ्यांना प्राधान्याने पेट्रोल डिझेल देण्याची मागणी केली जात आहे.
0
0
Report

करमाळा तालुक्यात केळी लागवड 3204 हेक्टर घट, इस साल सिर्फ 20768 हेक्टर पर सीमित

Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यात यंदा केळीच्या क्षेत्रात मोठी घट ; लागवड 3 हजार 204 हेक्टरने कमी केळीचे आगार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या करमाळा तालुक्यात यंदा केळी लागवडीबाबत शेतकऱ्यांमध्ये कमालीची अनास्था पाहायला मिळत आहे. चालू हंगामात तालुक्यात केळीचे क्षेत्र तब्बल 3 हजार 204 हेक्टर घटले असून, यंदा केवळ 20 हजार 768 हेक्टरवरच केळीची लागवड झाली आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत ही मोठी घट मानली जात आहे.मागच्या वर्षी 23,972 हेक्टर करमाळयात केळीची लागवड होती.करमाळा तालुक्यातील केळी उत्पादक पट्ट्यात गेल्या वर्षी आणि चालू वर्षी झालेल्या लागवडीची तुलना केली असता, चित्र चिंताजनक आहे
0
0
Report
Advertisement

आमदार चिखलीकर ने नांदेड की सीट राष्ट्रवादी कांग्रेस को सौंपने की मांग की

Nanded-Waghala, Maharashtra:स्थानिक स्वराज्य संस्थेची नांदेडची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सोडण्याची मागणी आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी केलीये. मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्याकडे आपण तशी मागणी केल्याचे आमदार चिखलीकर म्हणाले. तिन्ही पक्षाचे नेते बसून जागा वाटपाचा निर्णय घेतील , तो निर्णय मान्य असेल. मात्र राष्ट्रवादीची ताकद देखील जिल्हयात आहे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याला संधी मिळावी यासाठी प्रयत्न करणे माझं काम आहे असं चिखलीकर म्हणाले. नांदेड जिल्हयात स्थानिक स्वराज्य संस्थेत सर्वाधिक भाजपाचे सदस्य आहेत त्यामूळे या जागेवर भाजपचा दावा आहे. मात्र ही जागा राष्ट्रवादीला सोडन्याची मागणी चीखलीकर यांनी केल्याने युतीत धुसपुस होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादीत सर्व चांगले, पक्ष फुटणार नाही - चिखलीकर राष्ट्रवादी मध्ये कुठलीच धुसपुस नाही आमच्या पक्षामध्ये इतर लोकांनी बोलण्याची आवश्यकता आहे असं मला वाटतं नाही अशी प्रतिक्रिया आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. पक्षात नाराजी असेल तर एकत्र बसुन दूर करू असं सुनेत्रा पवार यांनी सांगितले आहे, पक्ष फुटणार नाही , पुर्ण राष्ट्रवादी सुनेत्रा पवार यांच्या पाठीशी आहे , असं चीखलिकर म्हणाले.
0
0
Report

भीमाशंकर के कायापालट के लिए 172 करोड़ की नई आदर्श ग्राम योजना मंजूर

Shirur, Maharashtra:पवित्र ज्योतिर्लिंग असलेल्या श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थानच्या कायापालटासाठी मुंबईत एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भीमाशंकरच्या विकासासाठी तब्बल १७२ कोटी २२ लाख रुपयांच्या 'आदर्श ग्राम विकास आराखड्याला' मंजुरी देण्यात आली आहे. वाढती गर्दी लक्षात घेऊन मंदिर परिसरातील वाहतूक कोंडी सोडवणं, पर्यावरणपूरक EV शटल बस सुरू करणं आणि भाविकांना अत्याधुनिक सोयी-सुविधा देण्याचा निर्णय यात घेण्यात आलाय. या बैठकीला उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार आणि एकनाथजी शिंदे यांच्यासह अनेक मंत्री प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

अकोला में खरीप सामग्री की सप्लाई सुनिश्चित करने के लिए कड़ा नियोजन; कालाबाजारी पर सख्त कार्रवाई की चेतावनी

Akola, Maharashtra: आगामी खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्यात बी-बियाणे, खते आणि इतर कृषी निविष्ठांचा पुरेसा व सुरळीत पुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने अचूक नियोजन करावे, तसेच निविष्ठांचा काळाबाजार अथवा लिंकिंग आढळल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राज्याचे कामगार मंत्री तथा अकोल्याचे पालकमंत्री आकाश फुंडकर यांनी दिला आहे. 1: अकोल्याचे पालकमंत्री ॲड. फुंडकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरीप हंगामपूर्व आढावा बैठक पार पडली. यावेळी जिल्ह्यातील आमदार, खासदार तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.बैठकीत बोलताना पालकमंत्र्यांनी सांगितले की, तालुकानिहाय बियाणे व खतांची मागणी, उपलब्धता आणि नियोजनाची अचूक माहिती प्रशासनाने सादर करावी. लोकप्रतिनिधींच्या सूचनांचा विचार करूनच नियोजन करण्यात यावे, जेणेकरून राज्यस्तरावर योग्य पाठपुरावा करता येईल. जिल्ह्यात कुठेही निविष्ठांची टंचाई निर्माण होऊ नये, यासाठी प्रशासनाने दक्ष राहावे, असे निर्देश त्यांनी दिले. तसेच, निविष्ठांचा काळाबाजार, लिंकिंग किंवा शेतकऱ्यांची फसवणूक करणारे प्रकार आढळल्यास संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल, असा इशाराही त्यांनी दिला. कृषी विभागाने शेतकऱ्यांना वेळोवेळी माहिती देण्यासाठी जिल्हा वॉररूमसारख्या यंत्रणेचा प्रभावी वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.आपत्तीच्या काळात पंचनामे अचूक व पारदर्शक व्हावेत, एकही शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये याची खबरदारी घेण्याचे निर्देश देण्यात आले. तसेच महावितरणने वितरण रोहित्र संच तालुकास्तरावर उपलब्ध ठेवावेत, जेणेकरून वीजपुरवठा खंडित झाल्यास तत्काळ दुरुस्ती करता येईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.याशिवाय खरीप हंगामासाठी पीककर्ज वितरणाला गती देऊन पात्र शेतकरी वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेण्याच्या सूचना देण्यात आल्या. बियाण्यांची उगवण न झाल्यास संबंधित कंपन्यांवर तात्काळ कारवाई करण्याचे निर्देशही बैठकीत देण्यात आले.कृषी विभागाच्या माहितीनुसार, यंदाच्या खरीप हंगामासाठी जिल्ह्यात ४ लाख ३७ हजार १०० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित असून, कापूस लागवडीसाठी ७ लाख २५ हजार बीटी कापूस बियाण्यांच्या पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. तसेच विविध खतांचे एकूण मंजूर आवंटन १ लाख १४ हजार २०० मेट्रिक टन इतके आहे.
0
0
Report
Advertisement

मेळघाट के चिखलदरा में भीषण पानी संकट, 9 गावों को 20 टैंकर पानी पहुँचा रहा है

Amravati, Maharashtra:मेळघाटातील चिखलदरा तालुक्यात भीषण पाणीटंचाई; ९ गावांसाठी २० टँकरने पाणीपुरवठा सुरू अँकर :- अमरावती जिल्ह्यात उन्हाचा तडाखा वाढत असताना पाणीटंचाईची समस्याही गंभीर बनली आहे. विशेषतः मेळघाटातील चिखलदरा तालुक्यातील ९ गावांना सध्या २० टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात असून १७ गावांमध्ये खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्यात आले आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार येत्या काही दिवसांत टँकरग्रस्त गावांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. एप्रिल महिन्यात तापमानात वाढ झाल्यानंतर चिखलदरा तालुक्यातील २५० हून अधिक गावांमध्ये पाणीटंचाईची झळ जाणवत आहे. मार्च महिन्यापासूनच टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू करण्यात आला असून मे महिन्याच्या मध्यावरच परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. गेल्या वर्षीही चिखलदरा तालुक्यातील १९ गावांना जुलै आणि ऑगस्टपर्यंत टँकरने पाणीपुरवठा करावा लागला होता. यंदाही अशीच परिस्थिती कायम राहण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान मेळघाटात जलजीवन मिशनअंतर्गत मोठ्या प्रमाणावर कामे झाल्याचा दावा केला जात असला तरी प्रत्यक्षात कायमस्वरूपी उपाययोजना नसल्याने दरवर्षी उन्हाळ्यात पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top