icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Koṇḍa विधान परिषद चुनाव में महायुति-शिंदे बनाम पवार का पेच जारी

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीच्या बदलत्या समीकरणांवर आधारित पक्ष कोकण विधान परिषदच्या जागेवरून महायुतीत पेच; उमेदवारीवरून शिवसेना-राष्ट्रवादीत चढाओळा! संख्याबळाच्या जोरावर शिंदे शिवसेनेचा जागेवर थेट दावा; माजी आमदार राजन साळवींच्या नावाची चर्चा! मुलाच्या राजकीय पुनर्वसनासाठी सुनील तटकरे आग्रही; अजित पवार गटही शर्यतीत! कोकणातील ८३१ मतदारांचा कौल कोणाला? महायुतीचा तिढा सोडवण्यासाठी उपमुख्यमंत्री मध्यस्थी करणार! कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद निवडणुकीचा बिगुल वाजताच आता कोकणातील राजकीय वातावरण तापू लागले आहे.या जागेवर सध्या महायुतीमध्ये अंतर्गत पेच निर्माण झाल्याची माहिती समोर येतेय. कोकणात सर्वात मोठे संख्याबळ असलेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने या जागेवर आपला थेट हक्क सांगितला आहे, तर दुसरीकडे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनेही या जागेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. शिंदे शिवसेनेकडून माजी आमदार राजन साळवी यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरू आहे. विशेष म्हणजे, राजन साळवी यांनी यापूर्वीच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या अनुषंगाने कोकणात मोर्चेबांधणी आणि आखणी सुरू केली आहे. एकीकडे शिवसेना या जागेसाठी आग्रही असताना, दुसरीकडे अजित पवार गटानेही शड्डू ठोकला आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आपले सुपुत्र अनिकेत तटकरे यांचे राजकीय पुनर्वसन करण्यासाठी पुन्हा एकदा या जागेसाठी आग्रही असल्याचे समजते. महायुतीत या एका जागेवरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी असा सुप्त संघर्ष पाहायला मिळतोय. आता महायुतीतील हा कळीचा ठरणारा जागेचा पेच सोडवण्यासाठी खुद्द उपमुख्यमंत्री शिंदे ही समन्वयाची भूमिका घेणार असून, जागावाटपाचा अंतिम निर्णय मुंबईत वरिष्ठ पातळीवर होणार आहे.
0
0
Report

खेड में मुरूम माफियाओं का कहर: गोली और ट्रक से हमला, हालत गंभीर

Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्यातील खेड सेझ औद्योगिक क्षेत्रातून एक अत्यंत धक्कादायक आणि थरारक प्रकार समोर आला आहे. खेड तालुक्यात मुरुम माफियांनी अक्षरशः धुमाकूळ घातला असून, या मुरुम माफियांच्या विरोधात तक्रार केल्याच्या रागातून एका तरुणाला थेट जीवे मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. खेड तालुक्यातील रेटवडी येथे ही खळबळजनक घटना रात्रीच्या सुमारास घडली. येथील अमोल काळे नावाच्या तरुणाने मुरुम माफियांच्या बेकायदेशीर कृत्यांविरोधात तक्रार केली होती. याच रागातून मुरुम माफियांच्या एका टोळक्याने एका हायवा ट्रकने अमोल यांच्या गाडीसह इतर अनेक वाहनांना जोरदार धडक दिली आणि ती वाहने चिरडली. एवढ्यावरच नाही तर या टोळक्याने अमोल काळे यांना बेदम मारहाण करत त्यांच्यावर पिस्तुलही रोखलं. हा संपूर्ण थरार आणि राडा परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या जीवघेण्या हल्ल्यात अमोल काळे हे गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मुरूमाच्या वादातून हा प्रकार घडला असल्याची माहिती उपविभागीय पोलिस अधिकारी अमोल मांडवे यांनी दिली.
0
0
Report

शिवनेरी हापूस को जीआई टैग मिलने के बाद निर्यात का पहला सीज़न शुरू

Shirur, Maharashtra:शिवजन्मभूमीची ओळख असलेल्या आणि जुन्नर-आंबेगावच्या मातीचा अभिमान ठरलेल्या ‘शिवनेरी हापूस’ आंब्याला केंद्र सरकारच्या भौगोलिक मानांकन विभागाकडून अधिकृत GI Tag मिळाल्यानंतरचा 'शिवनेरी हापूस' निर्यातिचा यंदाचा पहिलाच हंगाम आहे. मानांकन मिळाल्या नंतर आता स्थानिक आंबा उत्पादक बाजारपेठेत विक्रीसाठी आणण्याच्या तयारीत आहेत. याच पार्श्वभूमीवर माणिकडोह येथील विनीत फार्म येथे स्नेहमेळावा आयोजित करण्यात आला होता. आंबा तज्ञ तथा माजी आयएएस अधिकारी अभिमन्यू काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या बैठकीत ‘शिवनेरी हापूस’च्या ब्रँडिंग, पॅकिंग, मार्केटिंग आणि राष्ट्रीय पातळीवरील प्रचार-प्रसिद्धीवर सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी जुन्नर तालुक्यातील आंबा उत्पादक, कृषी क्षेत्रातील अभ्यासक आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रचार करणारे युट्युबर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर-गडचिरोली-वर्धा में महायुति और महाविकास आघाडी के बीच सीधी टक्कर; नागपुर से उम्मीदवार तय संभव

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लडत होणार आहे. दोन्ही बाजूंनी उमेदवारांची निश्चिती नागपूरहून होण्याची शक्यता आहे. अँकर:--चंद्रपूर- गडचिरोली- वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेसाठी महायुती आणि महाविकास आघाडीत थेट लढत होणार आहे. दोन्ही बाजूंनी उमेदवारांची निश्चिती नागपूरहून होण्याची शक्यता आहे. सध्या इच्छुकांची नावे गुलदस्त्यात आहेत. मात्र अपक्ष आणि स्थानिक आघाड्यांनी एकत्रित रित्या 91 जागा पटकाविल्या असल्याने दोन्ही बाजूंना त्यांची मते आपल्याकडे वळवणे महत्त्वाचे असणार आहे. व्ही. ओ. १) चंद्रपूर – गडचिरोली -वर्धा स्थानिक स्वराज्य संस्था विधानपरिषद जागेची निवडणूक 18 जून 2026 रोजी होणार आहे. यासाठी तिन्ही जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेचे 977 कार्यरत सदस्य मतदानाचा हक्क बजावणार आहे. यात सर्वाधिक चंद्रपूर जिल्ह्यातील 469 सदस्य, वर्धा जिल्ह्यातील 264 तर गडचिरोली जिल्ह्यातील 244 स्थानिक स्वराज्य संस्थेच्या सदस्य मतदारांचा समावेश आहे. चंद्रपूर, गडचिरेाली आणि वर्धा येथील जिल्हा परिषदांची निर्वाचित बॉडी नसल्याने सदस्यांची संख्या शुन्य आहे. # मतदार संख्या - 977 # पक्षीय बलाबल - महायुती :-- भाजपा - 341 शिवसेना शिंदे -39 राष्ट्रवादी AP -63 रिपाई आठवले- 2 महाविकास आघाडी :-- काँग्रेस --293 राष्ट्रवादी SP - 33 UBT SS -25 अपक्ष आणि इतर ---91 # आधीचे आमदार --- डॉ. रामदास आंबटकर, भाजप राजनीतिक आणि संख्यात्मक दृष्ट्या विचार केल्यास भाजपला या थेट लढतीत थोडा दिलासा आहे. तीनही जिल्ह्यात भाजपची यंत्रणा सक्रिय आहे. मात्र यात एखाद्या कर्णधाराची- Driving Force ची मात्र अनुपस्थिती आहे. तीनही जिल्ह्यात पक्ष संघटनेत एकीपेक्षा बेकी अधिक आहे. त्यातच प्रत्येक वेळी नागपुरातून उमेदवार निश्चितीबाबतही अंतर्गत नाराजी आहे. म्हणूनच एखाद्या संपन्न -सर्वसहमतीच्या उमेदवाराची चाचपणी पक्षातर्फे केली जात आहे. दुसरीकडे काँग्रेस पक्षातही सध्या इच्छुक आपले कार्ड राखून ठेवत आहेत. सध्या काँग्रेसचे दिग्गज नेते विजय वडेट्टीवार यांच्या खेळीकडे सर्वांचे लक्ष आहे. मतदार बांधण्याचे कसब वडेट्टीवार यांच्याकडे आहे. काँग्रेसकडून एखादा सरप्राईज उमेदवार उतरवून महायुतीची अडचण केली जाण्याची शक्यता आहे. गडचिरोली , चंद्रपूर आणि वर्धा तीनही जागी काँग्रेस खासदार आहेत. मात्र प्रत्यक्ष 977 पैकी किती मतदार काँग्रेसला कल दाखवतील हे, अर्थपूर्ण उमेदवारावर अवलंबून आहे. बाईट १) प्रमोद काकडे, राजकीय विश्लेषक ( जिल्हा प्रतिनिधी, दै. सकाळ) व्ही. ओ. २) महायुती आणि महाविकास आघाडीत नेत्यांमध्ये असलेला अंतर्गत टोकाचा विसंवाद, भाजपचे चंद्रपूर शहर मनपात उबाठा सेनेशी झालेली हातमिळवणी आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अंतर्गत सुरू असलेले बेबनाव याचा नेमका फटका कुणाला बसतो, कोण घडी मांडतो, आणि कुणांची विस्कटतो हे चित्र हळूहळू स्पष्ट होणार आहे आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report
Advertisement

गर्मी में खंडाळा घाट: माकड़ पानी के लिए भीड़, वन विभाग पर सवाल

Yavatmal, Maharashtra:सध्या वाढत्या उन्हाळ्याच्या झळा केवळ माणसांनाच नव्हे, तर वन्यप्राण्यांनाही मोठ्या प्रमाणात सोसाव्या लागत असल्याचे यवतमाळच्या पुसद येथील खंडाळा घाटात पाहायला मिळाले. वाशिमवरून पुसदकडे येणारी प्रवाशांनी भरलेली धुळे-यवतमाळ ही एसटी बस खंडाळा घाटात पोहोचताच एक माकड अचानक रस्त्यावर येऊन बससमोर उभे ठाकले. चालक व प्रवाशांनी त्या माकडाला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, मात्र ते हटण्यास तयार नव्हते. दरम्यान, काही प्रवाशांनी माकडाला तहान लागली असावी, असा अंदाज व्यक्त करत त्याला पाण्याची बाटली दिली. माकडाने पाणी पिण्यास सुरुवात करताच जंगलातील इतर माकडांची टोळीही तेथे जमा झाली. तहानेने व्याकुळ झालेली माकडे पाणी पिण्यासाठी अक्षरशः जीवाचा आटापिटा करत असल्याचे हृदयस्पर्शी दृश्य पाहायला मिळाले. basमधील प्रवाशांनी आपल्या जवळील पाण्याच्या बाटल्या पुढे करत त्या मुक्या जीवांची तहान भागविण्याचा प्रयत्न केला. त्याचा हा व्हिडिओ सध्या चर्चेचा विषय ठरत आहे. वन विभागामार्फत उन्हाळ्यात वन्यजीवांसाठी विविध ठिकाणी पाणवठ्यांची व्यवस्था केली जाते. मात्र खंडाळा घाटातील या घटनेमुळे वन्यप्राण्यांसाठी उपलब्ध पाण्याच्या सुविधांबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, वन विभागाच्या कार्यप्रणालीवरही नागरिकांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

गोपीचंद पडळकर ने संजय राऊत पर तंज किया: क्या राऊत ने शौचालय बनवाए?

Sangli, Maharashtra:स्लग - संजय राऊतांनी एखाद्या शौचालय किंवा गटार बांधला आहे,का ? आमदार गोपीचंद पडळकर यांची संजय राऊतांवर बोचरी टीका संजय राऊत फक्त अग्रलेख लिहू शकतात,पण त्या अग्रलेखाचं लहान मुलांचे ढुंगण साफ करण्याचे काम केले जाते,राऊतांनी कधी त्यांच्या अग्रलेखातून महाराष्ट्राच्या विकासाचा लिहिला आहे का,नुसती मापे काढण्याचे काम राऊत करतात,अशी बोचरी टीका देखील पडळकर यांनी केली आहे.हर्मोज ध्वनी बंद झाल्यानंतर समुद्राखालून नरेंद्र मोदी पाईपलाईन करणार असल्याचं विधान पडळकारांनी केली होती,त्यानंतर संजय राऊत यांनी जोरदार टीका केली होती,यावरून पडळकर यांनी संजय राऊतांवर टीका करताना हा टोला लगावला आहे,ते सांगली मध्ये बोलत होते.
0
0
Report
Advertisement

अकोला के सिटी अस्पताल में आग: सभी 18 ICU रोगी सुरक्षित बाहर, कोई हानि नहीं

Akola, Maharashtra:अकोला शहरातील रामदास पेठ परिसरातील असलेल्या सिटी हॉस्पिटल मधील सर्व रुग्णांना सुखरूप बाहेर काढण्यात यश मिळाला आहे. आज अचानक रुग्णालयातून निघायला सुरुवात झाली. पोलिसांनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार हे आग शॉर्टसर्किटमुळे लागली असल्याचा बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये 18 रुग्ण उपचार घेत होते. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले होते आणि बचावकार्य सुरू केले होते. या घटनेत 18 रुग्णांना सुखरoop बाहेर काढले असून इतर रुग्णांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. रुग्णालयातून बाहेर काढलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने या घटनेत अद्याप कोणतीही जीवितहानी झालेली नाही. दरम्यान, अग्निशमन विभागाकडून घटनेवरील ताबडतोब नियंत्रण मिळवण्यात यश मिळालं आहे. सुरक्षा दृष्टीने या ठिकाणी काही त्रुटी होती का याचा तपासही आता संबंधित यंत्रणा करत आहे. मात्र या बात कार्यात येथील एका रुग্ণाचं नातेवाईक किरकोळ जखमी झाला आहे.
0
0
Report

कल्याण के उद्यानों में पेड़ पर विषप्रयोग का संदेह, प्रशासन जाँच में जुटा

Kalyan, Maharashtra:कल्याण मध्ये झाडांवर विषप्रयोग केल्याचा संशय महापालिकेच्या उद्यान विभागाने केली पाहणी कल्याण परिसरात रस्त्याच्या कडेला असणाऱ्या काही विशिष्ट झाडांवर विषय प्रयोग केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. टेबेबुईया या विशेष वृक्षांना यामध्ये लक्ष केला गेलंय. वृक्षांच्या खोडांना ड्रिल कडून छिद्र पाडली गेली आहेत,आणि त्या छिद्रातून इंजेक्शनच्या माध्यमातून एक द्रव पदार्थात सोडून झाडांना मारण्याचा हा प्रयत्न असल्याचा संशय व्यक्त होतोय. दरम्यान या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्ये संतापाची लाट आहे. कल्याण पश्चिमेच्या गणपती चौक ते डीबी चौक या संपूर्ण परिसरात या विशिष्ट झाडांची जी लागवड करण्यात आली आहे.दरम्यान कल्याण डोंबिवली महापालिकेच्या उद्यान विभागाने याची गंभीर दखल घेतली असून उद्यान विभागाच्या निरीक्षकांनी पाहणी केली आहे. प्रथमदर्शनी त्यांना यात तथ्य आढळून आलं असून ट्री ऍक्ट नुसार पुढील कारवाई केली जाईल असं उद्यान निरीक्षकांनी सांगितलंय.
0
0
Report

सोलापुर विधानपरिषदे के चुनाव में कांग्रेस उम्मीदवार उतारने की मांग तेज

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग: सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवण्याची मागणी सोलापूर विधानपरिषदेच्या जागेवरून महाविकास आघाडीत वादाची ठिणगी पडण्याची शक्यता सोलापूर विधानपरिषदेची निवडणूक काँग्रेसने पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेस पदाधिकाऱ्यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे मागणी सोलापूर जिल्ह्यात काँग्रेसची वाढलेली ताकद लक्षात घेता ही निवडणूक काँग्रेसने लढवावी मागीलवेळी मित्रपक्षाने ही जागा लढवली मात्र त्यांना अपयश आले मात्र सोलापुरात काँग्रेस पक्ष ताकदीने उभा असून पक्षाची ताकद वाढली आहे त्यामुळे ही निवडणूक काँग्रेस पक्षाने लढवावी अशी मागणी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते काकासाहेब कुलकर्णी यांची प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे करण्यात आली प्रा. काकासाहेब कुलकर्णी ( काँग्रेस प्रवक्ते )
0
0
Report
Advertisement

उदय सामंत ने संभाजीनगर में गुटबाज़ी पर वार, शिवसेना में अंदरूनी टकराव उजागर

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये आज शिंदेच्या शिवसेनेचा मेळावा आयोजित करण्यात आला होता , एस आय आर बाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणे आणि संघटनेची ताकद वाढवणे याबाबत हा मेळावा होता मात्र या मेळाव्यात उपस्थित असलेले उद्योग मंत्री उदय सामंत यांनी स्थानिक शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांचे चांगलेच कान टोचले छत्रपती संभाजी नगर मध्ये पालकमंत्री संजय शिरसाट आणि उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यात वाद आहे कुणाचेही नाव न घेता मात्र गटबाजी मुळे शिवसेनेचा छत्रपती संभाजी नगरात मोठे नुकसान झाल्याचं उदय सामंत म्हणाले त्यामुळे आता बंद खोलीत निर्णय न घेता सगळ्यांसमोर निर्णय घ्या तरच पक्ष मोठा होईल असा टोलाही उदय सामान त्यांनी लावला आणि पालकमंत्री संजय शिरसाठ आणि राजेंद्र जंजाळ दोघांनाही डिवचले छत्रपती संभाजीनगर.. *मंत्री उदय सामंत भाषण पॉइंटर* ऑन SIR वरून स्थानिक पदाधिकाऱ्यांवर नाराजी. - संघटना बांधणीचे काम झालेले नाही. हा आत्मचिंतन आणि आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे. - माझ्या मतदारसंघात 100 टक्के काम झालेले आहे. सर्व लोकप्रतिनिधी माझ्या मतदार संघात निवडून आलेले आहेत. म्हणून मला सांगण्याचा अधिकार आहे. - एकनाथ शिंदे कधी 16 तर कधी 20 तास काम करतात. तुम्ही त्यांच्या दहा टक्के तरी करा. - मी माझ्या मतदार संघात मुस्लिम मोहल्ल्यात विश्वास निर्माण केला त्यामुळे 5 मुस्लिम नगरसेवक मी निवडून आणले आहे. - राज्यात दीड लाख BLA करायचे आहेत. त्यांचा मुंबईत मेळावा एकनाथ शिंदे घेणार आहेत. आणि सन्मानपूर्वक या bla यांना बक्षीस देणार आहे. ऑन संभाजीनगर मधील शिवसेनातील गटबाजीवर निशाणा. - आपल्या मतभेदामुळे कुटुंब दुभंगणार नाही याची काळजी व्यासपीठावरील सर्वांनी घ्यावी. (मंत्री शिरसाठ, खासदार भुंमरे, उप महापौर राजेंद्र जंजाल उपस्थित.) स्वतःचा गट पेक्षा शिवसेना एक गट म्हणून वागायला पाहिजे. - आम्ही संभाजीनगर मधे येत नसले तरी आमच्या कानावर येत आहे की जिल्हा परिषद आणि मनपा निवडणूक मधे कमी पडलो. - काम केल्याशिवाय शिवसेनेचे गतवैभव प्राप्त होणार नाही. - संभाजीनगर मधील बंद खोलीतील चर्चा जो पर्यंत थांबत नाही तो पर्यंत काही होत नाही. बंद खोलीतील चर्चा आता बंद करून टाकू. - आम्ही जे ऐकले त्यावरून संभाजीनगरचे पदाधिकारी संभ्रम अवस्थेत आहेत. ती दूर करण्यासाठी प्रयत्न करावे.
0
0
Report

विवेक कोल्हे की विधानपरिषद जीत के बाद शिंदे ने चप्पल पहनाकर सम्मान किया

Shirdi, Maharashtra:आपला नेता आमदार व्हावा यासाठी गेल्या सात वर्षांपासून चप्पल न घालणाऱ्या कार्यकर्त्याची इच्छा अखेर पूर्ण झाली आहे.. विवेक कोल्हे यांना भाजपने विधानपरिषदेच्या माध्यमातून आमदारकी दिल्याने कोपरगाव येथील वासुदेव शिंदे यांनी आज अखेर त्यांच्यात हस्ते पायात चप्पल घातली.. शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतल्यानंतर कोल्हे यांनी नवीन कोल्हापुरी चप्पल देऊन आपल्या कार्यकर्त्याचा सन्मान केलाय.. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत विवेक यांच्या आई माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचा अवघ्या साडे चारशे मतांनी पराभव झाला होता.. हा पराभव भाजपचे कार्यकर्ते वासुदेव शिंदे यांच्या जिव्हारी लागला होता.. जोपर्यंत कोल्हे परिवारातून कुणी आमदार होत नाही, तोपर्यंत पायात चप्पल न घालता अनवाणी राहण्याचा निर्धार शिंदे यांनी केला होता.. 2024 च्या निवडणुकीत कोपरगावची जागा राष्ट्रवादीकडे गेल्याने वरिष्ठांच्या आदेशानुसार युती धर्म पाळत कोल्हे यांनी निवडणुकीतून माघार घेतली होती.. त्यावेळी विरोधकांसह अनेकांनी आणखी पाच वर्षे वाट बघ, अशी खिल्ली उडवत वासुदेव शिंदे यांना हिणवले होते.. मात्र विवेक कोल्हे यांना विधानपरिषदेची आमदारकी मिळाल्याने सात वर्षानंतर शिंदे यांचा प्रण पूर्ण झालाय.. आज आमदार विवेक कोल्हे यांनी वासुदेव शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांसोबत साई दर्शन घेतले.. ज्या सहकाऱ्याने माझ्यासाठी त्याग केला त्याचे कौतुक वाटत असल्याचे सांगत, कोल्हे यांनी वासुदेव शिंदे यांचा कोल्हापुरी चप्पल देत सन्मान केलाय..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top