445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
सांगली शहर समेत क्षेत्र में मानसूनपूर्व वर्षा ने तेज़ रफ्तार पकड़ी
Sangli, Maharashtra:सांगली शहरासह परिसरात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी अँकर - सांगली शहरामध्ये मान्सूनपूर्व पावसाने पुन्हा जोरदार हजेरी लावली आहे. गेल्या दोन दिवसांपासून सांगली शहरासह परिसरामध्ये मान्सूनपूर्व पाऊसाची दमदार हजेरी पाहायला मिळत आहे. सकाळी उकाडा आणि सायंकाळी पाऊस असे चित्र काहीसं गेल्या दोन ते तीन दिवसांपासून सांगली शहरांमध्ये अनुभवायला मिळत आहे. आज सायंकाळी देखील विजाचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली.0
0
Report
कराड़ में विधानपरिषद प्रचार में जगताप बनाम गोर के बीच तीखी तकरार
Satara, Maharashtra:सातारा- सांगली विधान परिषदेच्या मतदारांचा कराड येथील फर्न हॉटेलमध्ये मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी विरोधी उमेदवार अभयसिंह जगतापांती उंची वाढली आहे, मात्र, अजून बौधिक वाढ झाली नाही. तसेच अदृश्य शक्तीची ताकद किती आहे, 22 तारखेला समजेल आणि भ्रमाचा भोपळा फुटेल असा टोला शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांना लगावला आहे. तर माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे 600 मतें असल्याचा दावा केला होता, त्याला जयकुमार गोरेंनी खोचक टोला लगावला आहे. धैर्यशील मोहिते पाटलांचा आकडा चुकला त्याच्याकडे 1200 मतें त्याच्याकडे दिसतायत असा खोचक टोला लगावला. शरद पवार यांनी गॅस महागाई बाबत केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया दिली आहे. शरद पवार हे खूप मोठे, जेष्ठ नेते आहेत. आखातील देशातील युद्धामुळे काही वस्तूचे भाव वाढत आहेत. मात्र तरीपण महागाईच्या बाबत सरकारकडून चांगल काम असून महागाई कंट्रोल करण्याचं काम मोदीची करत आहेत.0
0
Report
आटपाड़ी में तहसीलदार शीतल बंडगर ने अवैध रेत माफिया के खिलाफ दीर्घ पाठलाग
Sangli, Maharashtra:स्लग - अवैध वाळू वाहतुकी विरोधात महिला तहसीलदाराची धडक कारवाई, दीड तास वाळू तस्करी करणाऱ्या वाहनाचा केला थरारक पाठलाग.. मानगंगा नदीमध्ये सुरू असलेल्या अवैध वाळू तस्करीवर तहसीलदार शीतल बंडगर यांनी धाडसी कारवाई केली आहे, रविवारी आज पहाटे तब्बल दीड तास पाठलाग करून अवैध वाहतूक रोखून कारवाई केली आहे. त्यामुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत. भल्या पहाटे स्वतः महिला तहसीलदार बंडगर यांनी माणगंगा नदीत सुरू असलेले अवैध वळू उपसावर कारवाईसाठी नदीपात्राजवळ पोहोचल्या त्यावेळी त्यांच्यासमोर एक अवैध वाळू वाहतूक करणारा डंपर दिसून आला, त्यानंतर थरारक पद्धतीने तहसीलदार बंडगर यांनी गाडीचा पाठलाग केला. मात्र तहसीलदारांच्या गाडीला चकवा देत वाळू माफियाने सोलापूर जिल्ह्यात पोबारा केला. मात्र तहसीलदारांच्या थरारक पाठलागच्या घटनेमुळे वाळू माफियांचे धाबे दणाणले आहेत0
0
Report
Advertisement
ओबीसी आरक्षण बचाओ के संकेत: लक्ष्मण हाके ने दिया चेतावनी
Sangli, Maharashtra:स्लग - तुमचा डीएनए ओबीसीचा असेल,तर ओबीसींचा आरक्षण वाचवा,अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल - लक्ष्मण हाके. अँकर - तुमचा डीएनए ओबीसीचा असेल तर ओबीसींचा आरक्षण वाचवा,अन्यथा तुम्हाला घरी बसवावं लागेल,निवडणूकीत तुम्हाला बघून घेऊ,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी मुख्यमंत्र्यांना दिला आहे.बेरोजगार तरुणांना झुरळ म्हणल्यावर देशातला झेनजी,कॉकरोच जनता पार्टी एकवटला आहे,आम्ही तर 60% ओबीसी आहोत. ओबीसी हायकोर्टला तर सत्ताधारी कारखानदार भांडवलदार यांना,घरी बसावं लागेल,असा इशारा लक्ष्मण हाके यांनी दिला आहे,ते सांगलीत बोलत होते. बाईट - लक्ष्मण हक्के - ओबीसी नेते. अँकर - जे ओबीसींना,ते मराठा समाजाला,हे आम्हाला मान्य नाही,ज्या दिवशी ओबीसी राजकीय भूमिका घेईल,त्यादिवशी तुम्हाला पळता भुई थोडी होईल,असा इशारा ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी दिला आहे.ज्या दिवशी ओबीसी म्हणून ओबीसी एकत्र येईल, त्यादिवशी प्रस्थापित भांडवलदार वतनदारांना घरी बसवू,असं विधान देखील हक्के यांनी दिला आहे. बाईट - लक्ष्मण हक्के - ओबीसी नेते.0
0
Report
अकोला के सरकारी अस्पताल में इलाज न मिलने से आदिवासी महिला को अपने पति को पीठ पर उठाकर घूमना पड़ा, वीडियो वायरल
Akola, Maharashtra:अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील एका धक्कादायक प्रकाराची राज्यभर चर्चा होत आहे. ब्रेन स्ट्रोकचा झटका आलेल्या आपल्या पतीला उपचारासाठी घेऊन आलेल्या आदिवासी महिलेला रुग्णालयात कोणतीही मदत न मिळाल्याने तिला आपल्या पतीला चक्क पाठीवर घेऊन विविध विभागांमध्ये फिरावे लागले होते. या घटनेमुळे आरोग्य व्यवस्थेच्या संवेदनाहीनतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.रुग्णालयात कर्मचारी उपस्थित असतानाही संबंधित महिलेला व्हीलचेअर किंवा स्ट्रेचर उपलब्ध करून देण्यात आले नसल्याचा आरोप आहे. गंभीर अवस्थेतील रुग्णाला तातडीने उपचारांची आवश्यकता असताना ही महिला पोटाला सामानाची बॅग लटकवून आणि पाठीवर पतीचा भार घेऊन मदतीच्या शोधात भटकताना दिसली होती. या घटनेचे व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्वत्र संताप व्यक्त करण्यात आला.दरम्यान, या प्रकरणाची शिवसेना नेते राजन साळवी यांनी गंभीर दखल घेतली आहे. राज्य सरकार रुग्णांच्या सेवेसाठी मोठ्या प्रमाणात निधी खर्च करत असताना अशा प्रकारच्या घटना घडणे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. लवकरच अकोला शासकीय रुग्णालयाला भेट देऊन संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेणार असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल. चौकशीत कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा राजन साळवी यांनी दिला आहे.0
0
Report
ओबीसी नेता लक्ष्मण हाके बोले- स्थापितों को सबक सिखाने के लिए तैयार
Sangli, Maharashtra:स्लग - प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी,प्रसंगी कॉकरोच जनता पार्टीचा सदस्य होण्यास तयार - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांचे विधान अँकर - कॉक्रोच जनता पार्टी व आंदोलनाचे ओबीसी नेते लक्ष्मण हक्के यांनी समर्थन केले आहे.तसेच प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी,प्रसंगी कॉकरोच जनता पार्टीचा आपण पाहिले सदस्य होण्यासही तयार आहे,असे विधान हाके यांनी केले आहे. तसेच प्रस्थापितांना धडा शिकवण्यासाठी कोणता कारखानदार येणार नाही तर हीच तरुणाई प्रस्थापितांना धडा शिकवेल,आणि त्यांना घरी बसवेल, असा विधान हाके यांनी केले आहे,ते सांगलीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.0
0
Report
Advertisement
नाशिक के येवला में फिट इंडिया रैली: साइकिल से स्वास्थ्य और ईंधन बचत संदेश
Yeola, Maharashtra:केंद्र सरकारच्या फिट इंडिया मोहिमे अंतर्गत नाशिकच्या येवल्यात येवला शहर व तालुका पोलीस स्टेशन तर्फे सायकल रॅליचे आयोजन करण्यात आले होते आरोग्य, प्रदूषण प्रदूषण मुक्त पर्यावरण, इंधन बचतीचा संदेश या सायकल रॅलीतून देण्यात आला छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवसृष्टी येवला येथे महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल रॅलीला सुरुवात करण्यात आली यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन करून सायकल रॅली ही सेनापती तात्या टोपे यांच्या पुतळ्याकडे रवाना झाली या ठिकाणी सायकल रॅलीचा समारोप करण्यात आला याप्रसंगी तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक, शहर पोलीस निरीक्षक योगेश घोरपडे, सहाय्यक निरीक्षक सागर कोते,येवला शहर व तालुका पोलीस स्टेशनचे अधिकारी, कर्मचारी,तथा येवला सायकलिस्ट असोसिएशनचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते0
0
Report
नासिक धर्मांतरण केस में नया खुलासा, निदा खान के आश्रय देने वाले विधायक के बयान की चर्चा
Nashik, Maharashtra:नाशिकच्या बहुचर्चित मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणात आता आणखी एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे. फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप असलेल्या एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्या जबाबातील काही बाबी चार्जशीटमधून उघड झाल्या आहेत. विशेष म्हणजे, निदा खानच्या ठिकाणाबाबत विचारणा करण्यात आलेंतर मतीन पटेल यांनी "इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा" असे उत्तर दिल्याचे समोर आले आहे. या खुलाशामुळे तपासाला नवा वळण मिळाले आहे. पाहूया हा सविस्तर रिपोर्ट... नाशिकमधील मल्टिनॅशनल कंपनीतील धर्मांतर प्रकरणाचा तपास जसजसा पुढे सरकत आहे, तसतसे नवे खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील फरार आरोपी निदा खानला आश्रय दिल्याचा आरोप एमआयएमचे नगरसेवक मतीन पटेल यांच्यावर करण्यात आला आहे...या पार्श्वभूमीवर विशेष तपास पथकाने म्हणजेच एसआयटीने मतीन पटेल यांची आतापर्यंत तीन वेळा चौकशी केली आहे.....चौकशीदरम्यान एसआयटीने मतीन पटेल यांना निदा खानच्या वास्तव्याबाबत आणि तिच्या हालचालींबाबत प्रश्न विचारले. त्यावेळी "निदा खान कुठे आहे? असा प्रश्न विचारण्यात आल्यानंतर मतीन पटेल यांनी "इम्तियाज जलील साहब को पूछना पडेगा" असे उत्तर दिल्याचं चार्जशीटमध्ये नमूद करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे....या उत्तरामुळे तपास यंत्रणांचे लक्ष आता या प्रकरणातील इतर संभाव्य दुव्यांकडेही वळले आहे. याप्रकरणी आता बजरंग दलानेदेखील आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे ती आज जलील सारखा एमएम चा नेता जर अशा पद्धतीने धर्मांतराला खतपाणी घालत असेल तर त्यांची देखील चौकशी व्हावी अशी मागणी करण्यात आली आहे... याबाबत बजरंग दलाकडून मुख्यमंत्र्यांकडे मागणी करण्यात येत आहे.... बाईट-श्रीकांत क्षत्रिय.... बजरंग दल इस प्रकरणातील सर्व आरोपींविरोधात नाशिक सत्र न्यायालयात दोषारोपपत्र अर्थात चार्जशीट दाखल करण्यात आले आहे. तपासादरम्यान संकलित करण्यात आलेले जबाब, डिजिटल पुरावे आणि इतर कागदपत्रांचा त्यामध्ये समावेश करण्यात आला आहे. चार्जशीटमधील या नव्या खुलाशामुळे प्रकरणाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे....सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, एमआयएमचे माजी खासदार इम्तियाज जलील यांनाही या प्रकरणात चौकशीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे. एसआयटीकडून त्यांना नोटीस बजावली जाऊ शकते, अशी चर्चा सध्या सुरू आहे.मात्र यासंदर्भात तपास यंत्रणांकडून अद्याप कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही... यावर हिंदुत्ववादी संघटनांनी देखील आपले म्हणणे मांडले आहे... इम्तियाज जलील या प्रकरणात असेल तर त्याची चौकशी झाली पाहिजे त्यांच्यावर गुन्हे देखील दाखल झाला पाहिजे...अशी मागणी हिंदुत्व संघटनेचे कार्यकर्ते सागर शेलार व्यक्त केले... नIDA खानला आश्रय, मतीन पटेल यांचा जबाब आणि त्यामध्ये आलेला इम्तियाज जलील यांचा उल्लेख यामुळे टीसीएस धर्मांतर प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. आता एसआयटीच्या पुढील तपासातून आणखी कोणती माहिती समोर येते आणि या प्रकरणात कोणत्या नव्या घडामोडी घडतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
वाशीम: महिला अधिकारी बयान लिए साक्ष मांगे पर पुलिस कर्मी पर मारपीट, धमकी
Washim, Maharashtra:वाशीम: वाशीम पोलीस स्टेशन अंतर्गत कार्यरत असलेल्या एका पोलीस हवालदाराला आपल्याच खात्यातील एका महिला पोलीस अंमलदाराच्या सुरू असलेल्या विभागीय चौकशीतील साक्ष फिरवण्यासाठी महिला पोलीस कर्मचाऱ्याच्या मित्रानं उपविभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या कार्यालयासमोरच मारहाण करून गाडी खाली चिरडून जीवे मारण्याची धमकी दिली आणि पोलीस अधिकाऱ्यांनी त्याला थांबवण्याचा प्रयत्न केला असता एका अधिकाऱ्याला थार गाडीसोबर काही अंतर फरफटत नेल्याचा आरोप करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस हवालदार गजानन काळे यांच्या तक्रारीवरून विराज पाटील आणि महिला पोलीस अंमलदार शेख निलोफर यांच्या विरोधात वाशिम शहर पोलीस ठाण्यात बीएनएसच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आले असल्याची माहिती वाशीम शहर पोलीसाकडून देण्यात अली.0
0
Report
Advertisement
नवी मुंबई में महापालिका-पुलिस की संयुक्त कार्रवाई, बेघर बसों में भरकर स्थानांतरित
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील उड्डाण पूल और इतर फुटपाथवर मोठ्या प्रमाणात बेघर नागरिक वास्तव्य करत आहेत. महापालिकेने याआधी अनेक वेळा कारवाई करून त्यांना निवारा केंद्रामध्ये स्थलांतरित केले मात्र तरीही अनेक जण उड्डाणपूल और फुटपाथवर राहणे पसंत करतात. या बेघरांमार्फत अनेक गैरकृत्य केले जात असल्याने स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. नवी मुंबई महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने पोलिसांच्या मदतीने संयुक्त कारवाई करत या बेघर नागरिकांना फरफटत आणि लाठीचार्ज करत बस मध्ये कोंबले आणि त्यांच्या मूळ गावी स्थलांतरित केले आहे.0
0
Report
महामार्ग पर भीषण एक्सीडेंट: मोटरसाइकिल चालक 50 फुट तक घसीटा गया, हालत गंभीर
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. महामार्गावर मृत्यूचा थरार; कारच्या धडकेत दुचाकीस्वार ५० फूट फरफटत गेला, प्रकृती चिंताजनक!. चिपळूण-गुहागर महामार्गावरील गणेशखिंड-पाचाड परिसरात एक भीषण अपघाताची घटना घडली आहे.. विरुद्ध दिशेने येणाऱ्या एका सुसाट चारचाकी वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली.. ही धडक इतकी भीषण होती की,दुचाकीस्वार विजय शिरकर हे सुमारे ५० ते ५५ फूट फरफटत जाऊन रस्त्याशेजारील मोरीत फेकले गेले.. या अपघातात दुचाकीचा अक्षरशः चक्काचूर झाला असून विजय शिरकर हे गंभीर जखमी झाले आहेत.. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करून पुढील उपचारासाठी कराड येथे हलवण्यात आले असून त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे.. पोलिसांनी दोन्ही वाहने जप्त केली असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
नांदेड की हमेदिया कॉलोनी में खेलते समय खंभे के करंट से सात साल के बच्चे की मौत
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - galliyt khelat astaana rastya variya vidyut khambacha shock lagun saat varshiya chimiklyacha mrutyoo jhala. Naanded shaharatil Hamediya colonytil kaal raatri hi durdaiwi ghatana ghadli. Aadila Pathan ase mrut mulache naav aahe. Aadila kai saayinakaali gallyat khelat hota. Raatri ادهمrata parantu to n paratlyane kutumbiyaani shodashod shuru keli. To haravlyaacha WhatsApp var mesjahi firvala. Ratri andhar aslyaane to konalaahi disla nahi. Paryasaratun ek duchakiswari jatalacha headlightschya ujadeane ek mulga khambajavla padalyache tyala disle. Tyanantar nagarikaani dhaav ghetli. Pan Aadilacha mrutyoo jhala hota. Tyachya haathavar kali jakhm hoti. Tutlelya servive vairamule khambat vidyut pravah utaralyacha prathamik andaj aahe. Ya ghatname Mahavitaran virodhat ros vyakt keli jaat aahe.0
0
Report
Advertisement
नासिक के सिंनर तहसील के पिंपळगाव धनगरवाडी में मानसूनपूर्व तेज बारिश से भारी नुकसान
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील सिंनर तालुक्यातील पिंपळगाव धनगरवाडी येथे मुसळधार मानसूनपूर्व पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मोठे नुकसान झाले. अनेक घरांवरील पत्रे उडून गेल्याने शेतकरी कुटुंबांचे संसार उघड्यावर आले आहेत. घरावरील पत्रे अंगावर पडल्याने प्रांजल डुंबरे ११ वर्षीय मुलगी जखमी झाली. या घटनेमुळे शेतकरी दांपत्याला अश्रू अनावर झाले. काही जनावरेही पत्र्याखाली दबली गेली असून ग्रामस्थांनी तातडीने पंचनामे करून नुकसानभरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.0
0
Report
उरण के जासई तालाब में तीन नाबालिग लड़कियों की डूबकर मौत
Navi Mumbai, Maharashtra:शनिवारी दुपारच्या सुमारास उरण तालुक्यातील जासई गावातील तलावात बुडून तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना घडली आहे. यामध्ये, दोन सख्ख्या बहिणींचा समावेश असून अचानक घडलेल्या या घटनेमुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उन्हाच्या पाऱ्यात वाढ झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. त्यातच, गावात पाणी आले नसल्याने जासई येथील दोन महिला या शनिवारी दुपारच्या सुमारास कपडे धुण्यासाठी गेल्या होत्या. यावेळेस, त्यांच्या तीन अल्पवयीन मुली या आईसोबत तलावावर गेल्या होत्या. तलावाच्या काठावर असलेल्या एका मुलीचा पाय घसरल्याने ती पाण्यात कोसळली, यावेळेस इतर दोघीनी एकमेकांना वाचविण्याचा प्रयत्न केल्याचे मृत मुलीच्या आईने सांगितले आहे. याचदरम्यान, आईने देखील मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत खांद्यापर्यंत पाण्यात जाऊन बुडणाऱ्या मुलीला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला होता. हे ठिकाणी, मोहम्मद कुरेशी यांनी त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्याला पोहता येत नसल्याने स्थानिक गावकरी प्रशांत म्हात्रे या तरुणाने देखील पाण्यात धाव घेऊन अल्पवयीन मुलींना वाचविण्याचा प्रयत्न करीत बाहेर काढले होते. यावेळी, त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले असता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक हनिफ मुलाणी यांनी दिलی आहे. यात, रेहाना रमजान परवीन (८ वर्षे), रविना रमजान परवीन (७ वर्षे) आणि सौम्या कन्हैय्या प्रजापती (१३ वर्षे) या तीन अल्पवयीन मुलींचा मृत्यू झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. तर, या मृत अल्पवयीन मुली मूळच्या उत्तरप्रदेश आणि बिहार येथील रहिवासी असल्याचे नातेवाईकांनी सांगितले आहे. तर, मध्यरात्री उशिरा या तिन्ही मुलींचे शवविच्छेदन करण्यात आल्याचे नगरसेविका नाहीदा ठाकूर यांनी सांगितले आहे。0
0
Report
नाफेड और NCCF ने बाजार समितियों से कांदा खरीदने निर्णय किया, किसानों को राहत
Yeola, Maharashtra:कांदा उत्पादकांसाठी मोठा दिलासा. नाफेड आणि NCCF कडून थेट बाजार समित्यांमधून कांदा खरेदीचा निर्णय सोमवारपासून जिल्ह्यातील विविध बाजार समित्यांमध्ये खरेदी प्रक्रिया सुरू होणार. कांद्याला प्रतिक्विंटल १,५८० रुपये दर नाफेड आणि nccf कडून झाला आहे निश्चित. अनेक वर्षांपासून नाफेड आणि nccf ने थेट बाजार समितीत कांदा खरेदी करावी शेतकरी आणि लोकप्रतिनिधी यांची मागणी होती या संदर्भात शेतकऱ्यांच्या प्रतिक्रिया0
0
Report
Advertisement
