Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!

Oct 07, 2024 07:22:21
Yavatmal, Maharashtra

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.

0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PNPratap Naik1
Jan 09, 2026 14:17:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीने आपला सविस्तर जाहीरनामा जाहीर करत सर्वसमावेशक विकासाचा आराखडा मांडला आहे. प्रशासन, पायाभूत सुविधा, पर्यावरण, आरोग्य, शिक्षण, महिला-सुरक्षा आणि रोजगार या सर्व घटकांना प्राधान्य देण्यात आले आहे. महापालिकेतील सेवा डिजिटल व सुलभ करण्यासाठी myKMC अ‍ॅपच्या माध्यमातून जन्म-मृत्यू दाखले, बांधकाम परवाने, घरफाळा, बसपास आदी सुविधा एकाच अ‍ॅपवर उपलब्ध करून देण्याचा संकल्प जाहीरनाम्यात आहे. महापालिकेसाठी नवी प्रशासकीय इमारत उभारण्यासह नागरिकांच्या सूचनांवर आधारित लोकसहभागी अर्थसंकल्प सादर केला जाईल अशा आश्वासन देखील महायुतीच्या नेत्यांनी दिले आहे. उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ,आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत महायुतीचा जाहीरनामा प्रसिद्ध करण्यात आला.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 10:59:08
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इम्तियाज जलील परळीत शिंदे शिवसेना आणि MIM एकत्र - तुम्ही हे प्रश्न भाजप, एकनाथ शिंदे यांना विचारा किंवा त्यांचे जे इकडचे जे नेते आहेत त्यांना विचारा.एमआयएम जातीवादी पक्ष,असा पक्ष, तसा पक्ष मग निवडणूक झाल्यानंतर कशाला कटोरा घेऊन आमच्या लोकांचा मागे लागत आहे तुम्ही,की आम्हाला द्या आम्हाला मदत करा. - इलेक्शनच्या अगोदर खूप बोलतात इलेक्शन संपल्यानंतर कटोरा घेऊन आमच्या मागे फिरतात अकोट मध्ये तसेच केलं, परली मध्ये तसेच केलं. आमच्या लोकांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे अजित दादांनी आम्हाला बोलावून हे सांगितलं होतं की तुमच्या एरियामध्ये आपल्याला विकास करायचं असल्येल तर तुम्ही आम्हाला साथ द्या, मग आम्ही त्यांच्यावर निर्णय सोडलं होतं की स्थानिक पातळीवर काय निर्णय घ्यायचा, पण जेव्हा आम्हाला कळलं की यामध्ये एकनाथ शिंदे साहेब आहे आणि एकनाथ शिंदे आमच्या नजरेतून त तुम्हाला बघायचं असेल तर तुम्ही गुस्ताखे रसूल आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये भाजप नाही एकनाथ शिंदे नाही उमेदवारी अर्ज दाखल करताना औरंगाबाद लिहिले - यांच्याकडे मुद्दे राहिले नाही, तुमचे जे देवा भाऊ आहे हे इकडे आले होते , फुकटचे हंडे घेऊन त्यांच्या महिला नऊवारी साडी घालून महानगरपालिकेसमोर नाचत होत्या. शहराला पाणी आले का ? अतुल साहेबांना विचारा. आमचे अर्ज पाहून तुम्ही का बसला आहात,अतुल सावे तुला सांगतो शहर आमच्यासाठी औरंगाबाद होता आणि औरंगाबादच आहे. - संभाजीनगर तुझ्यासाठी झालं असेल आमच्यासाठी नाही झालं. फडणवीस यांचा टॉक शो - माझ्याकडे खूप सारे काम आहे मी का देवा भाऊचा टॉक शो बघायला बसलेला आहे ka ? भाजप MIM सोबत जाणार नाही - बसा मग कशाला आमच्या मागे कटोरा घेऊन फिरत आहात ? अंबरनाथ मध्ये काय केलं काँग्रेस आमचा विरोधी पक्ष आहे कुणाच्या सोबत गेले, काँग्रेसच्या समोर कटोरा टाकले, आम्हाला मदत करा म्हणाले, अकोट मध्ये आमच्या लोकांसमोर हे कटोरा घेऊन उभे होते आम्हाला मदत करा म्हणून, परळीतही तसेच हत्तीचे दात दाखवायचे वेगळे आणि खायचे वेगळे. एम आय एम पक्षाचा विजय - सोळा तारखेला किराड पुरा येथे एमआयएमच्या विजयाचा जल्लोष साजरा केला जाणार आहे तिथे तुम्ही या भाजपाला आमंत्रण
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Jan 09, 2026 09:33:55
Nashik, Maharashtra:नाशिक महानगरपालिकेच्या पार्श्वभूमी राज ठाकरे उद्धव ठाकरे हे पहिल्यांदाच नाशिकला येणार असून नाशিকला दोघेही एकत्र येणार असल्याने शिवसेना आणि मनसेकडून जयत तयारी सुरू झाली आहे. मात्र याआधी नाशिक महानगरपालिकेवर महाराष्ट्र नवनिर्माण ची सत्ता होती. नाशिककरांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला 40 नगरसेवक तर तीन आमदार निवडून दिले होते. त्यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून नाशिकचा कायापालट करण्याचा प्रयत्न केला होता. यात राज ठाकरे यांचा महत्त्वकांक्षी प्रकल्प असलेला गोदापार्क आणि बोटॅनिकल गार्डन तयार करण्यात आले होते. बोटॅनिकल गार्डनच्या उद्घाटनप्रसंगी टाटा समूहाचं प्रमुख रतन टाटा आले होते. मात्र महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची सत्ता गेल्यानंतर हे गार्डन देखील बंद पडले. यात गोदापार्क देखील अनेक वर्ष बंद होते, गेल्या तीन महिन्यांपासून गोदापार्कचे रिनव्हेशन केल्यानंतर पुन्हा सुरु केले गेले. तरी बोटॅनिकल गार्डन अजून बंद आहे. महापालिकेकडून याकडे लक्ष देत नसल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला. भाजपने हेतू पुरस्कर राज ठाकरे यांनी केलेल्या विकासाचे काम हे दुर्लक्ष झाले असल्याचा आरोप मनसेकडून करण्यात आला आहे. या संदर्भात मनसेच्या नेत्यांशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 09, 2026 09:20:00
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका प्रमुख तुल्यबळ लढती. 1) प्रभाग क्रमांक 9 मध्ये सर्वसाधारण गटातून शिवसेनेचे शारंगधर देशमुख विरुद्ध राहुल माने अशी काटाजोड लढत होत आहे. शारंगधर देशमुख हे काँग्रेस नेते सतेज पाटील यांचे निकटवर्ती होते. महानगरपालिकेत काँग्रेस गटनेता म्हणून देखील त्यांनी काम पाहिले होते. पण विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी शिवसेनेत पक्ष प्रवेश केला. त्यामुळे काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी शारंगधर देशमुख याचा पराभव करण्यासाठी राहुल माने यांच्या रूपाने तुल्यबळ उमेदवार दिला आहे. 2) प्रभाग क्रमांक चार मध्ये सर्वसाधारण गटामधून काँग्रेस उमेदवार राजेश लाटकर विरुद्ध भाजपा उमेदवार संजय निकम यांच्यामध्ये काटाजोड लढत होत आहे. राजेश लाटकर यांनी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली होते. लाटकर हे काँग्रेसचे महत्त्वाचे नेते मानले जातात. 3) प्रभाग क्रमांक 12 मध्ये सर्वसाधारण गटातून राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आणि मंत्री हसन मुश्रीफ याचे निकटवर्तीय आदिल फरास निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात काँग्रेसचे उमेदवार ईश्वर परमार उभे आहेत. या प्रभागात अंबाबाई मंदिर परिसर येत असल्याने या लढतीकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे 4) प्रभाग क्रमांक 7 मधून सर्वसाधारण गटातून शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांचे चिरंजीव ऋतुराज क्षीरसागर हे निवडणूक रिंगणात आहेत. त्यांच्या विरोधात अपक्ष उमेदवार विजय साळुंखे सरदार आणि शिवसेना ठाकरे गटाचे राजेंद्र जाधव निवडणूक रिंगणात आव्हान दिले आहे. 5) प्रभाग क्रमांक 19 मध्ये मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांचे निकटवर्ती राहुल चिकोडे हे भाजपाकडून निवडणूक रिंगणात आहेत. अनुसूचित जाती प्रवर्गातून ते निवडणूक लढवत आहेत. भाजपाचे शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. त्यांच्या विरोधात भाजपा बंडखोर सुभाष रामगुडे यांनी जनसुराज्य पक्षाकडून निवडणूक लढवत आव्हान दिले आहे. काँग्रेसकडून दुर्वास कदम निवडणूक लढवत आहेत. *सोलापूर महानगरपालिका तुल्यबळ लढती* 1) प्रभाग - 5 - ड - भाजपचे बिज्जू प्रधाने विरुद्ध राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गणेश पुजारी, अपक्ष राजू आलूरे कारण - भाजपाकडून नुकत्याच प्रवेश केलेल्या उमेदवाराला संधी, भाजपातील नाराज बंडखोरांनी घेतली अपक्ष उमيدवारी 2) प्रभाग - 7 - ड - भाजपाचे पद्माकर काळे विरुद्ध शिंदे सेनेचे अमोल शिंदे कारण - नवीन प्रवेश करून तिकीट दिल्याने भाजपा अंतर्गत नाराजी... शिवसेना जिल्हाप्रमुखाची प्रतिष्ठा पणाला 3) प्रभाग - 15 - ड - काँग्रेसचे चेतन नरोटे विरुद्ध भाजपचे अंबादास करगुळे कारण - चेतन नरोटे हे काँग्रेसचे शहराध्यक्ष आहेत, त्यांच्या प्रतिस्पर्धी नुकताच प्रवेश झालेले त्यांचे सहकारी भाजपातून लढत आहेत. 4) प्रभाग - 15 - क - भाजपाचे विनोद भोसले विरुद्ध काँग्रेसचे आरिफ शेख कारण - काँग्रेसचे निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून विनोद भोसले यांची ओळख होती मात्र ते आता भाजपाकडून निवडणुकीला सामोरे जात आहेत 5) प्रभाग - 20 - ड - राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे तोफिक शेख विरुद्ध भाजपचे अमीर शेख कारण - प्रभाग 20 हा मुस्लिम बहुल परिसर आहे. इतिहासात पहिल्यांदाच भाजपाने या प्रभागात मुस्लिम उमेदवार दिले आहेत. सांगली महानगरपालिकेतील तुल्यबळ लढती. 1 ) सांगलीच्या प्रभाग 11 मध्ये माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे पणतू खासदार विशाल पाटील यांचे पुतणे हर्षवर्धन पाटील आणि भाजपाचे माजी नगरसेवक मनोज सरगर यांच्या लढत होणार आहे. ( तुल्यबळ का ? - मनोज सरगर हे विशाल पाटलांचे कट्टर समर्थक होते,त्यांनी विशाल पाटलांची साथ सोडून भाजपमध्ये प्रवेश केला,त्यामुळे त्यांच्या विरोधात विशाल पाटलांनी पुतण्याला उमेदवारीच्या रिंगणात उतरवले आहे.) 2 ) सांगलीच्या प्रभाग 14 भाजपाचे विजय साळुंखे व माजी उपमहापौर शिवसेना शिंदे गटाचे युवराज बावडेकर यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. तुल्यबळ का ? - माजी उपमहापौर असणारे युवराज बावडेकर यांना भाजपाने उमेदवारी नाकारली आहे,या ठिकाणी नवखे असणारे विजय साळुंखे यांना उमेदवारी देण्यात आली आहे,त्यामुळे बावडेकर यांनी बंडखोरी केली करत शिवसेना शिंदे गटात प्रवेश करत निवडणूक लढवत असून याठिकाणी दुरंगी अशी एकास-एक लढत होत आहे. 3 ) सांगलीच्या प्रभाग 15 मध्ये काँग्रेसचे माजी नगरसेवक मंगेश चव्हाण व भाजपाचे हणमंत पवार. ( तुल्यबळ का ? - काँग्रेस उमेदवारा विरुद्ध काँग्रेस उमेदवार ,माजी नगरसेवक मंगेश चव्हाण यांच्या विरोधात काँग्रेसचेच माजी नगरसेवक राहिलेले हणमंत पवार हे भाजपा कडून मैदानात आहेत.) 4 ) मिरजेमध्ये प्रभाग 20 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी व भाजपाचे योगेंद्र थोरात आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे अभिजीत हारगे यांच्यात लढत होत आहे. (.तुल्यबळ का ? आमदार पुत्र या निवडणुकीच्या रिंगणात आहेत शिवाय जयंत पाटलांचे ते विरोधक आहेत. तिघेही माजी नगरसेवक आहे, आणि तिघेही पूर्वाश्रमीचे राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे आहेत.) 5 ) मिरजेच्या प्रभाग 6 मध्ये राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी महापौर मैनुद्दीन बागवान विरुद्ध भाजपाचे अल्लाबक्ष गडेकरी आणि काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे समीर कुपवाडे यांच्यात लढत होत आहे. ( तुल्यबळ का ? म्हणून बागवान हे राष्ट्रवादी शरद पवार गटातून ऐनवेळी अजित पवार गटात आलेत, त्यांच्या उमेदवारीला स्थानिक पातळीवर विरोध झाला होता. बागवान यांच्या उमेदवारीवर निवडणूक आयोगाकडे भाजपाने आक्षेप नोंदवला होता. पण निवडणूक आयोगाने आक्षेप फेटाळले. या प्रभागामध्ये मेनूदिन बागवान यांना पक्षांतर्गत देखील मोठा विरोध आहे,शिवाय राष्ट्रवादी शरद पवार गटाचा उमेदवार त्यांच्या विरोधात आहे)
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 09:13:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपति संभाजीनगर में अक्सर खान-की-बाण चुनाव का मुख्य विषय रहा, इस बार मुख्यमंत्री देवेंद्र फड़णवीस ने एक नया नारा दिया: अब खान नहीं, बाण नहीं, बल्कि भगवा की शान रहेगी. उन्होंने कहा भगवा ही भाजप की पहचान है और बाण का उल्लेख शिवसेना को डीवचाने के लिए किया गया. संभाजी नगर की जानकारी में भाजपा के नए नारे पर शिवसेना की प्रतिक्रिया स्पष्ट है कि खान- बाण के जरिए जीतना संभव नहीं; भगवा फडकाने का इरादा स्पष्ट है. भाजपा यह कहती है कि भगवा उनका ध्वज है, जबकि शिवसेना इसे चुनौती दे रही है. संजय शिरसाठ ने कहा, न खान, न बाण, भगव्याचि शान ही हाथ में रहेगी; धनुष- बाण का नारा अब शामत में नहीं. स्थिति साफ है कि दोनों पार्टियों के बीच भगवा किसका होगा, इस विषय पर बहस जारी है. विश्‍व करोळे, छत्रपती संभाजी नगर.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Jan 09, 2026 07:52:14
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत तिसरी आघाडी म्हणून उभी राहिलेल्या राजर्षी शाहू आघाडी प्रणित आम आदमी पार्टीच्या अधिकृत उमेदवारांनी मतदारांसमोर पारदर्शकतेची शपथ घेतली आहे. आम आदमी पार्टीच्या एकूण १४ उमेदवारांनी पाचशे रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर शपथपत्र सादर करत स्वच्छ व प्रामाणिक राजकारणाची हमी दिली आहे. या शपथपत्रामध्ये उमेदवारांनी निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार करणार नाही, टक्केवारी किंवा दलालीला थारा देणार नाही, तसेच आपला कोणताही अवैध व्यवसाय नसल्याची स्पष्ट ग्वाही दिली आहे. यासोबतच, निवडून आल्यानंतर ज्या पक्षातून निवडून आलो, तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही, अशी ठाम भूमिका शपथपत्रात नमूद करण्यात आली आहे. विशेष बाब म्हणजे, जनतेशी थेट संपर्कासाठी आपला मोबाईल फोन २४ तास सुरू ठेवण्याचे आश्वासनही उमेदवारांनी दिले आहे. लोकप्रतिनिधी म्हणून जनतेच्या प्रश्नांना तत्काळ प्रतिसाद देण्याची जबाबदारी स्वीकारत, पारदर्शक आणि जबाबदार कारभार करण्याचा निर्धार या शपथपत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 07:49:40
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : मतदानासाठी अवघा आठवडा उरला आहे मात्र संभाजीनगर मधील मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद संपता संपत नाहीय, मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा त्यांच्या विधानातून शिवसेनेला टोला लगावला आहे आणि छत्रपती संभाजी नगरात सगळ्यात मोठा पक्ष आम्ही असू महापौर आमचा असेल आणि आमचा मित्र पक्ष आमच्या मागे असेल असे विधान केल्याने पुन्हा चर्चा ना उधाण आलय संभाजी नगरातील युती शिवसेनेने तोडली - मुख्यमंत्री सेनेत गटतटाचे राजकारण, युतीला फटका संभाजी नगरात महापौर भाजपचाच - सीएम छत्रपती संभाजी नगरात तब्बल दहा बैठकांनंतर शिवसेना आणि भाजपची युती तुटली, दोन्ही पक्षांनी एकमेकांवर युती तोडल्याचा ठपका ठेवला आणि अखेर स्वतंत्र निवडणुका लढवण्याचा निर्णय घेतला.. मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी पुन्हा एकदा या वादाला फोडणी घातली आहे , संभाजीनगरची युती ही शिवसेनेने रागारागात तोडली , शिवसेनेत गटातटाच राजकारण आहे आणि त्यामुळे ही युती तुटली असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले मात्र यासोबतच या शहरात भाजपच नंबर एकचा पक्ष असेल महापौरही आमचाच असेल असे टोलाही त्यांनी लगावला आणि पुन्हा एकदा या वादाला सुरुवात झाली... छत्रपती संभाजी नगर मध्ये शिवसेना-भाजपचा प्रचारात आता दोघांकडूनही टोकाचा विरोध सुरू आहे.. त्यात मोठा भाऊ छोटा भाऊ हा वादही शिगेला पोहोचलाय एकीकडे निवडणुकीनंतर एकत्र येण्याची भाषा दोन्ही पक्षांचे नेते करताय मात्र संघर्ष इतका शिगेला पोहोचला असेल तर निवडणुकीनंतरही मोठा भाऊ छोटा भाऊ हा वाद आणखी पेटेल यात शंका नाही...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 07:33:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंबाडास दानवे PC ऑन फडणवीस टॉक शो हा फेक शो होता, नॉट टॉक.... तारीख पे तारीख दिली आहे, काल गुपचूप पम्प हाऊस उद्घाटन झाले, पण काहीही झालेला नाही, मी माहिती घेतली है.पुणे नागपूर शो देखील पाहिले सर्व सारखेच होते, प्रश्न विचारणारे त्यांचेच होते... ऑन फडणवीस म्हातारे वक्तव्य ऑन उद्धव ठाकरे 3 लाख कोटी मुंबई महानगरपालिकेला देणे आहे, फडणवीस शिंदे यांनी मुंबई लुटले आहे, 93 हजार कोटींची डिपॉझिट देखील तोडली आहे, मुंबई सुरक्षित ठाकरे बंधूंच्या हातात राहील ऑन भाजप 50 खोके घोषणा आम्ही आधी 50 खोके घोषणा देत होते, आता भाजप देत आहे, ऑन।परळी mim युती परळीत राष्ट्रवादी शिंदेच्या मांडीला मांडी लावून बसली आहे,mim सोबत देखील गेले आहे. ऑन फडणवीस भगवा शान वक्तव्य भगवा शान राखली पाहिजे, पण भगवी शान कशी असावी, शहराचा चेहरा मोहरा बदलला तरच भगवा शान आहे...भाजप हिंदुत्ववादी आहे असं कोण म्हणतं, भाजप ढोंगी हिंदुत्ववादी आहे ऑन बटगे फसेंगे वक्तव्य मला असे वाटते विकासावर बोलले पाहिजे अशा गोष्टींना अर्थ नाही, लोकांच्या मनात विश्लेषण आम्हाला मान्य नाही, निवडणुकीसाठी अशा गोष्टी दिले जातात, रिकाम्या गोष्टीवर लक्ष दिला पाहिजे नाही ऑन भाजप खोटारडा पणा भाजपच्या पाचवीला पुजलेला आहे, भाजपाला सांगण्यात पटाईत आहे, प्रत्यक्षात काही करत नाही. ऑन शिरसाट परळी उत्तर जे झालेला आहे तुमच्या समोर आहे, कलेक्टरला विचार ऑन उदय सामंत मुंबई तोडण्याची भाषा हे अस असत्य आहे उदय सामंत यांनी सांगावे, वल्लभभाई पटेल यांचे नाव मिटवून मोदींचे नाव मैदानाला देण्यात आले यावर सामंत यांनी सांगावे ऑन रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे यांनी काहीही काम केलं नाही म्हणून कल्याण काळे निवडून आले, दानवें ना चकवा म्हटले जातात, दोन आमदार मुलांचा बाप असणे ही काही विकास कामाची पावती असू शकत नाही, ऑन नितेश राणे विकासवर बोला, यांची जी पिलावळ आहे राणे ,साटम , झाटम,, विकासवर बोला
0
comment0
Report
AKAMAR KANE
Jan 09, 2026 06:50:13
kolhapur, Maharashtra:नागपुर बायट-- मंगलप्रभात लोढ़ा, भाजपा नेते (विज्ञान महोत्सव) विदर्भ विज्ञान उत्सव हा विज्ञान भारती तर्फे अत्यंत चांगला कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनामध्ये एक मार्गदर्शन ठरेल असा हा कार्यक्रम. त्यामुळे मुंबईत निवडणूक असताना या निमंत्रणाला मी आलो आहे. बाराशे पेक्षा जास्त विद्यार्थ्यांनी या प्रदर्शनीत सहभाग घेतला आहे. (मुंबई बंडखोर कारवाई) बंडखोरी करणे हे चुकीचं काम असल्याने चुकीच्या कामाला शिक्षा झाली पाहिजे. भारतीय जनता पक्ष हा पूर्वीपासून अनुशासित पक्ष आहे, म्हणून त्यांनी योग्य निर्णय केला आहे. (उद्धव ठाकरे आरोप... मुंबई-बॉम्बे) प्रत्येक निवडणुकीत त्यांचे आरोप हे पब्लिसिटी करीता असतात. त्यापेक्षा अधिक काही नाही. (ठाकरे बंधू मुलाखत भाग दोन) दुसरा भाग येऊ द्या किंवा तिसरा भाग येऊ द्या. जनतेला यावेळी महायुतीचा महापौर निवडून द्यायचा आहे. (उद्धव अदानी आरोप) धारावीचा पुनर्विकास संदर्भात तेथील लोकांना तसेच ठेवायचं का? सर्वजण आरामात असतात मात्र धारावी मधील लोक कशा स्थितीत राहतात. तिथला पुनर्विकास करायचा नाही का. सर्वात मोठी झोपडपट्टी असलेल्या भागात ते विकसित करून घरे देत असतील त्यात चुकीचं काय.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 09, 2026 06:49:16
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाट पत्रकार परिषद पॉइंटर -नवीन काय बोलताहेत हे काहीच कळलं नाही. उद्धव म्हणता शाह सेना मग तुम्ही काँग्रेस बरोबर होता तर सोनिया सेना होती की मग राहुल सेना. तुमचे युवराज भारत जोडे मध्ये जाणार.. टीका करताना आपल्या बुडाखाली काय जळत ते पाहा. -त्यानंतर संवाद राहणार. - मातोश्री वर मोठमोठे नेते यायचे आता तुम्ही लोटांगण करत आहेत. चोरांची युती - चोर हेच ठरवणार, मुंबई हेच ठरवणार, मराठी माणूस कोण याचा सर्टिफिकेट तुम्ही ठरविणार. तुमच्या चुकीमुळे मराठी माणूस बाहेर गेले, तुम्ही अनेक अदानी जन्माला घातले म्हणून मराठी माणूस बाहेर गेला, तुम्हाला अडचण ही आहे की मुंबई तुमच्या हातातून गेली आहे.. भीतीने ही वक्तव्य करतात. मुंबईचे पुन्हा बॉम्बे करतील. - हा जोक झाला नाही का? कुणाची हिंमत आहे का? त्यात सर्वच होते ना. नामकरण करायची खाज कुणाला. तुम्हाला करायचा असेल तुम्हाला मुसा चालतात. मुंबई आमचा प्राण आहे. मुंबईचं कायम राहणारं ऑन दोन्ही ठाकरे सभा. - पहिल्यांदा दोघे भाऊ एका स्टेजवरून बोलत आहेत. यावरून कळते की उद्धव ठाकरे यांचि क्रेज संपली आहे. गर्दी होणार नाही. ते च टोमणे आणि तेच ते... ऑन परळी सेना युती. - अधुरी माहिती आहे. Mim वर आम्हीच कडवट बोलतो, संभाजीनगर मधे तुम्ही १२ मामु उभे केले तुमचा हिंदुत्व कुठे चालले पहा... आम्ही mim ला महाराष्ट्र बाहेर पाठवणार. - आमचा कुठेही नेता mim मुळे झालेले नाही. ऑन फडणवीस युती विधान. - त्या दिवशी शेवटची बैठक झाली. मुख्यमंत्री उप मुख्यमंत्री देखील होते. मुख्यमंत्री यांनी विनंती केली. मी ते ऐकले. मात्र दुसऱ्या दिवशी जो प्रस्ताव येणार होता. त्यात स्थानिक नेत्यांनी खोडा घातला. त्यांचा गैर समज झाला असेल तर मी मुख्यमंत्री यांना प्रस्ताव दाखवेल. ऑन मोठा भाऊ... - पक्षाची लाइन घेणे, नेत्याची जबाबदारी असते सत्ता येईल सांगत असतात. मताच्या टक्केमध्ये वाढ होईल अशी समज असेल. शहराच्या जनतेने शिवसेनेला 1 नंबर दिला आहे. महापौर आमचा असेल.. ऑन रोहित पवार ट्विट. - बारामती पुण्याचा लोन इकडे येत आहे. ते वाईट आहे. त्याचा बंदोबस्त करू. तुम्ही तोकडे लक्ष द्या. तुम्हाला खाजवायची सवय आहे. ऑन गणेश नाईक. - गणेश नाईक काय बोलतात त्याची दखल त्याचे नेते घेत आहेत. शिंदे साहेबांवर त्यांनी टीका केली तर आम्ही देखील उत्तर देऊन. ऑन सामना भाजप mim युती बाबत .. - भाजप पक्षाने काय भूमिका घेतली फडणवीस यांनी त्यावर स्पष्टीकर दिले आहे. ऑन ठाकरे मुलाखत सायलेंट प्रचार प्रश्न. - राज ठाकरे यांच्या बोलण्याची शैली आहे. मात्र ते गेल्याने पक्ष वाढतो हे गैर समज आहे. युतीत ऑन ठाकरे म्हातारे झाले,फडणवीस विधान. - ही वस्तुस्थिती आहे. दर पावसाळ्यात मुंबई का तुंबत होती? खड्डे का होत होते? गेल्या साडेतीन वर्षात गती वाढली आहे. मुंबईकरांचा कोंडलेला श्वास आता मोकळा व्हायला लागला आहे. आता विश्वास वाटायला लागला आहे की महायुतीत विकास करू शकते. ऑन मुंबई काही भागात महायुती उमेदवार नाही. - काही prभागात असतात तेथे महायुतीचे उमेदवार नसतात. काही ठराविक भागात आमचे उमेदवार नाही तेथे आम्ही प्रचार करीत नहीं ऑन भाजप कार्यकर्ते खोके घोषणा... - भाजपचे कोण महारथी आहे त्यांना पहावं लागेल. या घोषणा देण्या अगडोदर फडणवीस यांना विचार आमच्यामुळे तुम्ही सत्तेत आहेत. ज्यांनी घोषणा दिली त्यांची भाषा कुठे गेली ते बघा.. याबद्दल फडणवीस दाखल घेतील. ऑन राऊत शिंदे भेट. - काय बोलाव या माणसाला, कधीतरी खरे बोलले पाहिजे. राज्यसभेवर जाण्यासाठी पाय पडत होते शिंदेंच्या . अर्ध्या मतांनी निवडून आलेल्यांनी उपकाराची जाणीव ठेवली पाहिजे. बदलती भूमिका, बदलता नेते अनेक दिवसापासून हेच धंदे करत आहे. नागपूर परिणय फुके विधान. - निवडणुकीत वेगवेगळे नारे येत असतांत. मतदार जागृत आहेत. क्षेत्रपुरता काय विकास पाहिजे याचा विचार मतदार करीत असतात. ऑन सुप्रिया सुळे प्रादेशिक पक्ष विधान. - सुप्रिया सुळेला हे उद्देशून बोलायचे नव्हते ते त्यांच्या राष्ट्रवादी बाबत बोलले होते. पवार एकत्र यावे याबाबत ते बोलले. - नक्कीच ना खान, ना बाण भगव्याचि शान.. हातात राखू हातात धनुष्यबाण - महापौर शिवसेनेचाच होईल... ऑन निवडणूक नंतर - जो भगव्यासाठी आमच्या बरोबर येईल त्यांना सोबत घेऊ.. ऑन उमर खालिद मृत्युदंड. - जो कुणी देशविरोधात जाईल त्याला फाशी दिलीगेली पाहिजे. धर्मगुरूंनी जे विधान केले आहे. त्यावरून विधान केले असले. - विकासाच्या आड मंदिर - मशीद येऊ द्यायला नको. त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Jan 09, 2026 05:02:06
Mira Bhayandar, Maharashtra:मीरा भाईंदर मध्ये शिंदेंच्या सेनेकडून मुख्यमंत्र्यांच्या स्वागताचे होल्डिंग्स मीरा–भाईंदरमधील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड मीरा–भाईंदरमधील राजकीय वातावरण तापत चाललं आहे. महायुती नसतानाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी शिंदेसेनेकडून लावण्यात आलेल्या फलकांमुळे नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मीरा–भाईंदरमध्ये आज प्रचार सभा होणार असून, या पार्श्वभूमीवर शहरातील प्रमुख मार्गांवर स्वागताचे होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. या बॅनर वर महायुतीचा उल्लेख मात्र नाही. हे होर्डिंग्ज मंत्री प्रताप सरनाईक यांनी लावल्याचं स्पष्ट झालं आहे. निवडणूक जाहीर झाल्यापासून प्रताप सरनाईक आणि भाजप आमदार नरेंद्र मेहता यांच्यात शाब्दिक युद्ध सुरू आहे. याच राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांच्या स्वागताचे हे फलक अधिकच लक्षवेधी ठरत असून, मीरा–भाईंदरमधील महायुतीतील अंतर्गत वाद पुन्हा एकदा उघड झाला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top