icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बिश्नोई संदर्भ पर संग्राम जगताप के बयान से उठा नया राजनीतिक विवाद

Ahilyanagar, Maharashtra:स्लग- संग्राम जगताप लॉरेन्स बिष्णोई ट्रॅव्हल्समधील महिलांच्या छेडछाडीच्या कथित प्रकारांविरोधात काढण्यात आलेल्या मोर्चादरम्यान शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी कुख्यात गँगस्टर लॉरेन्स बिश्नोई याचा संदर्भ देत केलेल्या वक्तव्यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. मोर्चात बोलताना जगताप म्हणाले, “बिश्नोई समाज काळवीट हरणाला दैवत मानतो. त्याला जर कुणी ठार मारले, तर त्याला जशास तसे उत्तर दिले जाते. त्याच धर्तीवर हिंदू समाज गाय आणि महिलांना माता मानतो. त्यांच्यावर जर कुणी वाकडी नजर टाकली, तर त्यालाही तसेच उत्तर दिले गेले पाहिजे.” नगर–पुणे महामार्गावर ट्रॅव्हल्सविरोधात आयोजित करण्यात आलेल्या रास्ता रोको आंदोलनात त्यांनी हे विधान केले. महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा उपस्थित करत त्यांनी कठोर कारवाईची मागणी केली. मात्र, लॉरेन्स बिश्नोईचा संदर्भ देत केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, विरोधकांकडून यावर तीव्र प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता आहे.
0
0
Report

नवी मुंबई अस्पताल में बाहरी मरीजों के लिए शुल्क बढ़ाने की तैयारी, मंत्री का निर्देश

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना नवी मुंबईतील मनपा रुग्णालयात उपचार घेणे होणार खर्चिक, बाहेरील रुग्णांना खाजगी रुग्णालयाप्रमाणे दर आकरण्याचे वनमंत्री गणेश नाईक यांचे प्रशासनाला निर्देश. नवी मुंबई मनपा क्षेत्रा बाहेरील रुग्णांना खर्चिक होणार आहे. नवी मुंबई मनपा रुग्णालयात बाहेरील रुग्णांची संख्या 60 टक्के असून यामुळे कर भरणाऱ्या नवी मुंबईकरांना योग्य उपचार आणि सेवा देण्यास अडचणी निर्माण होतायत. अधिकारी आणि नगरसेवकांच्या आढावा बैठकीत वनमंत्री गणेश नाईक यांनी नवी मुंबई क्षेत्रा बाहेरील रुग्णांकडून खाजगी रुग्णालयांप्रमाणे दर आकारा असे निर्देश दिलेत. आगामी महासभेत तश्या प्रकारचा ठराव मंजूर करुन घ्यावा जेणेकरून नवी मुंबईतील रुग्णांना अधिक चांगली आरोग्य सेवा देणे शक्य होणार आहे.
0
0
Report

वीरार जेटी पर मद्यधुंद हालत में डूबते व्यक्ति को बचाने वाला कर्मचारी CCTV में कैद

Vasai-Virar, Maharashtra:विरार जेटीवर आज दुपारी घडलेल्या थरारक घटनेत एका सतर्क कामगाराने प्रसंगावधान दाखवत मद्यधुंद अवस्थेत समुद्रात पडलेल्या व्यक्तीचा जीव वाचवला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. आज दुपारी एकच्या सुमारास एक व्यक्ती विरार जेटीच्या टोकावर फिरत असताना अचानक त्याचा तोल जाऊन तो खोल पाण्यात पडला. त्याचवेळी रो-रो सेवेत कार्यरत असलेले कामगार आदेश नाईक यांनी पाण्यात पडल्याचा आवाज ऐकताच क्षणाचाही विलंब न लावता समुद्रात उडी घेतली. लाटांचा सामना करत त्यांनी बुडणाऱ्या व्यक्तीपर्यंत पोहोचून त्याला सुखरूप बाहेर काढले. आदेश नाईक यांच्या धाडसामुळे मोठी दुर्घटना टळली असून स्थानिकांकडून त्यांच्या शौर्याचे कौतुक होत आहे. ही सर्व घटना जेट्टी वरील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे...
0
0
Report
Advertisement

वनमंत्री गणेश नाईक ने वाशी में मानसून पूर्व समीक्षा बैठक आयोजित

Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी आज वाशी येथे सर्व मनपा अधिकारी आणि नगरसेवकांची मान्सून पूर्व कामांसंबंधी आढावा बैठक घेतली. क्वारी असलेल्या ठिकाणी दुर्घटना होणार नाही याची दक्षता घ्यावी, नाले गटर यांची स्वच्छता करण्यात यावी, मोकळ्या वायर आणि डीपी यांची दुरुस्ती करावी, शाळांचे लिकेज दुरुस्त करावे शाळेत स्वच्छता करावी असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. यावेळी उपस्थित नगरसेवकांनी देखिल प्रभागातील समस्या मांडल्या असून यासर्व समस्या सोडविण्याचे निर्देश नाईकांनी अधिकाऱ्यांना दिलेत.
0
0
Report

CIDCO के अधिकारियों पर संताप जताते हुए वन मंत्री गणेश नाईक ने पाणथळ क्षेत्र के मामले की जाँच की मांग की

Navi Mumbai, Maharashtra:वनमंत्री गणेश नाईक यांनी CIDCO अधिकाऱ्यांविरोधात आपला संताप व्यक्त केलाय. पाणथळ क्षेत्र असणारी 8 ते 10 ठिकाण सिडकोच्या समितीने पाणथळ क्षेत्र नाहीत असा अहवाल दिला. आम्ही आवाज उठवला नसता तर सदर अहवाल मंजूर होऊन या पाणथळ क्षेत्रावर भूखंड बनवून ते विक्रीसाठी काढले असते. सिडको मध्ये बिल्डर लोकांचे दलाल आहेत हे मी विधान भवनात आमदार असताना बोललो होतो आता मंत्री असताना बोलतोय. गावातील लोकांनी घरे दुरुस्त करायला घेतली की हे अधिकारी येऊन करावी करतात आणि लगेचच तो भूखंड विकतात इतकी नालायक लोकं आहेत अशी जहरी टीका वनमंत्री गणेश नाईक यांनी केलेय.
0
0
Report

उल्हासनगर के केंद्रीय अस्पताल में कैदी ने हंगामा किया, अपने सिर से शीशा तोड़ा

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर मध्‍यवर्ती रुग्णालयात कैद्याचा राडा; स्वतःच्या डोक्याने फोडली काच ! उल्हासनगरच्या मध्यवर्ती रुग्णालयात धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आधारवाडी जेलमधील आरोपी अजबिल अन्सारी याला पोटदुखीच्या तक्रारीमुळे उपचारासाठी रुग्णालयात आणण्यात आलं होतं. डॉक्टरांनी तपासणीनंतर पुन्हा जेलमध्ये पाठवण्याचा निर्णय घेतल्यावर आरोपीने संताप व्यक्त करत थेट रुग्णालयातील 13 नंबर कॅबिनची काच स्वतःच्या डोक्याने फोडली. "आता तरी मला ऍडमिट करा" असा हट्ट धरत आरोपीने रुग्णालयात गोंधळ घातल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेमुळे रुग्णालय परिसरात काही काळ तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं.
0
0
Report
Advertisement

सासवड में शिवसेना का बड़ा जनआक्रोश हंडा मोर्चा, पानी योजना तेज शुरू करने की मांग

Rui, Maharashtra:सासवडमध्ये पाण्यासाठी शिवसेनेचा भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ पुरंदर तालुक्यातील सासवड शहरात पिण्याच्या पाण्याचा प्रश्न भेडसावत असून सासवड वासियांना पाणीटंचाईचा सामना करावा लागताय. या पार्शभूमीवर शिवसेने शिंदे गटाच्या वतीने आज भव्य ‘जनआक्रोश हंडा मोर्चा’ काढण्यात आला. या मोर्चामध्ये महिला जेष्ठ नागरिक युवक आणि विविध भागातील रहिवाशी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. २७ वर्षे जुन्या पाणीपुरवठा योजनेमुळे शहरात पाच-पाच दिवस पाणी मिळत नसल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला असून तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून मंजूर झालेल्या १४३ कोटींच्या नवीन पाणी योजनेचे काम तातडीने सुरू करण्याची मागणी यावेळी करण्यात आली.दरम्यान,आंदोलनामुळे सासवड शहरातील पाणीप्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.
0
0
Report

अकोला में बंदूकधारी डकैती: 70 लाख की लूट, आरोपी गिरफ्तार

Akola, Maharashtra:अकोला शहरातील गौरक्षण रोड परिसरात एका सराफा व्यावसायिकाला बंदुकीचा धाक दाखवून तब्बल ७० लाखांचा ऐवज लुटणाऱ्या आरोपीला अटक करण्यात अकोला पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. भरदिवसा घडलेल्या या धाडसी दरोड्यामुळे शहरात खळबळ उडाली होती. या प्रकरणाचा तपास करताना पोलिसांसमोर मोठे आव्हान उभे राहिले होते.या आरोपीचा माग काढण्यासाठी अकोला पोलिसांनी तब्बल ७०० किलोमीटरचा प्रवास केला आणि ५८० हून अधिक सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली. अखेर पोलिसांनी आरोपीला भुसावळ येथून अटक केली. पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी गेल्या सहा दिवसांपासून अकोला शहरात वास्तव्यास होता. चादर विक्रीचा व्यवसाय करत तो परिसराची रेकी करत असल्याची माहिती समोर आली आहे.दरम्यान, पोलिसांनी आरोपीकडून २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर के नागभीड़ में घोड़ाझरी कालवे में भगदाड़, लाखों लीटर पानी बर्बाद—किसान चिंतित

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यातील नागाभेड तालुक्यातल्या घोडाझरी कालव्याला भगदाड पडलेले असून लाखो लिटर पाणी वाया जाऊन शेतीवर परिणाम झाला आहे. उन्हाळी धान व इतर पिकांच्या सिंचनासाठी यावर्षी कालव्यातून पाणी सोडण्यात आले; मात्र शेवटल्या टोकावर पाण्याची उपलब्धता कमी झाली आहे. कालवा फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी शेतात आणि परिसरात वाहून जाऊन पाण्याची नासाडी झाली आहे. शेवटच्या टोकावर असलेल्या शेतकऱ्यांना पाणी मिळण्याची समस्या जशीची तशी असून या घटनेमुळे पाणीपुरवठ्यात अडथळा निर्माण झाला आहे. संबंधित सिंचन विभागाने तात्काळ दखल घेऊन फुटलेला कालवा दुरुस्त करावा, पाण्याची नासाडी थांबवावी आणि शेवटच्या टप्प्यातील शेतकऱ्यांना नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी व नागरिकांकडून होत आहे.
0
0
Report

कल्याण के आचार्य अत्रे रंगमंदिर में इंतजामों पर कलाकारों का गुस्सा वायरल वीडियो से उजागर

Kalyan, Maharashtra:कल्याणमधील आचार्य प्रल्हाद अत्रे रंगमंदिर येथील गैरसोयी आणि दुरवस्थेबाबत अनेकदा कलाकारांनी संताप व्यक्त केला आहे. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी या रंगमंदिरातील गैरसोय आणि दूरवस्थेसंबधी तयार केलेला व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या दुरवस्थेबाबत वारंवार तक्रारी करूनही त्याचं पुढे काहीच होत नसल्याने आता या नाट्यगृहात प्रयोग बंद करण्याची वेळ आल्याचे कलाकारांनी म्हटले आहे. कल्याणचे हे नाट्यगृह शहरातील प्रमुख सांस्कृतिक merkez असून विविध मराठी नाटकांचे प्रयोग नियमितपणे इथे होत असतात. मात्र नाटकातील कलाकारांना येथे गैरसोयीचा सामना करावा लागतो. आता तर अलबत्या गलबत्या नाटकाच्या कलाकारांनी तयार केलेल्या व्हिडिओमध्ये नाट्यगृहातील अनेक समस्यांकडे लक्ष वेधले आहे. अभिनेत्री श्रद्धा हांडे यांनी याबाबত नाराजी व्यक्त केलीय.
0
0
Report

पत्नी ने पति की हत्या के लिए बिजली से मारने की साजिश रची, प्रेमी गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वडगाव जंगल पोलिसांनी याप्रकरणी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. यवतमाळच्या पंगडी गावातील एक पत्नी पतीच्याच जीवावर उठली. झोपेत असलेल्या पतीला जीवे मारण्यासाठी तिने भन्नाट कट रचला. विजेच्या वायरला अल्युमिनियम तार जोडून पतीला विजेचा शॉक देऊन जीवाणीशी संपवायचे अशी योजना पत्नी आणि तिच्या प्रियकराने आखली. कवडी मोरे असे आरोपी पत्नीचे नाव आहे. तिचे गावातीलच विष्णू आत्राम या व्यक्तीसोबत अनैतिक संबंध होते. या दोघांच्या विवाहबाह्य संबंधात पती गजानन मोरे हा अडथळा ठरत होता. त्यामुळे त्याचा काटा काढण्याच्या दृष्टीने पत्नीने रात्रीच्या सुमारास घरी झोपून असलेल्या पतीला विद्युत वायर मधून विजेचा शॉक देवुन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. प्रियकराच्या सांगण्यावरून तिने हा कट रचला होता. सुदैवाने पत्नीचा कट फसला पती बचावला. गजाननच्या हाताच्या दोन्ही दंडांना पत्नीने विद्युत प्रवाहित तार आवळला, मात्र वेळीच जागी झालेल्या पतीने हे तार दूर केले. त्याच्या दोन्ही हातांना जखमा झाल्या आहेत. या प्रकरणी पतीच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्नी व तिच्या प्रियकराला अटक केली आहे. पती पत्नीचा सुखाचा संसार सुरू असताना त्यात गावातील तिसऱ्याची एन्ट्री झाली. पती-पत्नीच्या नात्याला पत्नी विसरली आणि तिसऱ्याच्या नादाला लागून विवाहबाह्य संबंधात अडकली. त्यासाठी पत्नीचा ही जीव घ्यायला ती धजावली. पती-पत्नीच्या नात्याला कलंकित करणाऱ्या घटनेमुळे समाजमन हादरले आहे.
0
0
Report
Advertisement

मोदी का प्राकृतिक और जैविक खेती का आह्वान, किसानों की अनिच्छा जारी

Yavatmal, Maharashtra:पश्चिम आशियातील इराण अमेरिका इस्राईल या देशामधील संघर्षामुळे निर्माण झालेल्या जागतिक संकट आणि खतांच्या तुटवड्याच्या पार्श्वभूमीवर, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शेतकऱ्यांना रासायनिक खतांचा वापर कमी करून नैसर्गिक व सेंद्रिय शेतीकडे वळण्याचे आवाहन केले आहे. या आवाहनाला मात्र शेतकऱ्यांमधून फारसा प्रतिसाद दिसून येत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे हे सरकार पुढे आव्हान ठरणार आहे. आखाती देशांमधील युद्धामुळे जागतिक स्तरावर खतांच्या किमतीत प्रचंड वाढ झाली आहे. खतांच्या कच्च्या मालाचा पुरवठा विस्कळीत झाल्यामुळे भारतात खतटंचाई निर्माण होण्याची भीती आहे, त्यामुळे खतांचा संतुलित वापर करणे गरजेचे आहे. खतांचा अतिवापर टाळून मिश्र खते आणि सेंद्रिय खतांचा वापर वाढवण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. याआधी देखील प्रधानमंत्री नैसर्गिक शेतीवर भर देण्याचा सल्ला दिला. मात्र शेतकऱ्यांकडून त्याला फारसा प्रतिसाद नाही. कारण शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित करणे सरकारसाठी एक मोठे आव्हान ठरणार आहे. रसायनिक शेतीच्या तुलनेत सेंद्रिय शेतीत सुरुवातीची 3-4 वर्षे उत्पादन कमी होण्याची शक्यता आहे, परंतु त्यामुळे मजुरांची गरज वाढते, बाजारपेठ सेंद्रिय मालासाठी उणे असते, आणि प्रशिक्षण मिळणेही अलीकडे अचूक झालेले नाही. सरकारच्या उपाययोजना देखील तोकड्या असल्याचा भूमिका शेतकऱ्यांनी व्यक्त केली. युद्धामुळे सेंद्रिय शेतीचा आग्रह प्रधानमंत्री यांनी केला असला तरी, शेतीत रासायनिक खतांचा अति वापर जमिनीची सुपीकता नष्ट करत असल्याचे स्पष्ट झाले आहे. नैसर्गिक शेतीमुळे खर्च कमी होतो, पिकांची गुणवत्ता वाढते आणि जमिनीचे पोत सुधारणे शक्य होते. रासायनिक शेतीमुळे जमिनीतील सूक्ष्मजीव नष्ट होतात, अन्नातील पोषक घटक कमी होतात, तसेच शेतमाल मानवी जीवनासाठी हानिकारक झाला आहे. टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीकडे कल वाढवावा म्हणून सरकारनेदेखील प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्याच्या युद्धजन्य परिस्थितीत खतांनयाच्या परदेशी पुरवठा विस्कळीत असल्याने, देशांतर्गत अन्नसुरक्षा टिकवण्यासाठी नैसर्गिक आणि सेंद्रिय शेती हीच आत्मनिर्भर भारतासाठी गुरुकिल्ली आहे. परंतु यासाठी सरकारचे पूर्व नियोजन नसल्यामुळे सेंद्रिय शेतीचे महत्त्व समजून देखील शेतकरी त्यासाठी फारसे उत्सुक नाही.
0
0
Report

PM Modi तेल कम करने का आह्वान: महंगाई से जूझते देश पर प्रभाव

Kolhapur, Maharashtra:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नुकतेच खाद्य तेलाच्या बाबतीत विधान केले आहे. खाद्य तेलाचा वापर कमी करावा ज्याच्यामुळे आपल्या शरीराला देखील फायदा होईल आणि त्याची मागणी देखील कमी होईल, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं... आपला देश पाम ऑइलसाठी इंडोनेशिया, मलेशिया या देशांवर अवलंबून आहे. तर सूर्यफुलासाठी रुस आणि युक्रेन या देशांवर आपण अवलंबून आहोत.. युद्धाच्या पार्श्वभूमीवर खाद्यतेल महाग केलं आहे. त्यामुळे आपल्या देशासाठी आपण सर्वांनी खाद्य तेलाचा वापर खूप कमी करावा असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून करण्यात आले. मात्र मार्केटमधील नेमकी परिस्थिती काहीशी वेगळी आहे. तेलाचे दर वाढणार असल्याच्या भीतीने अनेकांनी आधीच भरमसाठ तेल घेऊन ठेवलं आहे. त्याशिवाय लग्न समारंभाला खाद्यतेलाचा वापर मोठ्या प्रमाणात होतो,
0
0
Report

नारायण राणे का दलीय हमला: राहुल गांधी-खडसे पर तीखा प्रहार

Oras Bk., Maharashtra:सिंधुदुर्ग खासदार नारायण राणे on Rahul Gandhi/ Ek Nath Khadse ( Narendra Modi taika ) राहुल गांधींला यश आणि अपयश यातील फरक समजत नाही. एवढा बुध्दु राजकारणी मी पाहिला नाही, लोकसभेत कसा वावरतो कसा बोलतो यावर्षीची भाषणे बघा, काय भयानक बोलतो पंतप्रधानांना काय उद्देशायच ते पण त्याला कळत नाही. काँग्रेसची सत्ता होती तेव्हा यश मिळवलं असत तर तुमच्या पक्षाची ही अवस्था झाली नसती. on Khadse -- Khadseला BJPने बाहेर काढलं म्हणून त्यांना शहाणपणा सुचतोय. आता रिटायरमेंट कडे चाललेत. मोदींना अडचणीत आणण्यासाठी हे टीका आणि प्रयत्न करत आहेत पण मोदी कधीच अडचणीत येणार नाहीत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top