icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

बारामती में विपक्षी एकता की मांग: भोंदू बाबा पर कार्रवाई की मांग

Rui, Maharashtra:लोकशाहीमध्ये कोणालाही अधिकार आहे कोणीही निवडणुकीसाठी उभे राहू शकतो. काही लोकांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत ते बारामती तालुक्या बाहेरचे उमेदवार आहेत ते बारामती मधील नाहीत. सर्व अपक्ष उमेदवार आहेत कुठलाही मोठा राजकीय पक्ष यात नाही. बारामतीकरांची इच्छा है की ही निवडणूक बिनविरोध व्हावी. ऑन_खेड मधील भोंदू बाबा समोर आम्ही कधीच भोंदू बाबांवर विश्वास ठेवलेला नाही. आम्ही सर्व पुरोगामी विचाराचे लोक आहोत. हा तालुका पुरोगामी विचाराचा राहिला आहे आणि पुढे देखील राहील. हे सर्व जे भोंदू बाबा आहेत आणि चुकीच्या गोष्टी पसरवत आहेत जे काही करत आहेत ताबडतोब त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. लवकरात लवकर त्यांना शिक्षा झाली पाहिजे मगच कुठेतरी हे प्रकरण थांबेल. जर त्यांनीवर कडक कारवाई होऊ शकली तरच महाराष्ट्रातील भोंदू बाबा त्यांची कामे थांबवतील. ऑन_राष्ट्रवादी अजित पवार गटाचे 25 आमदार भाजपात विलीन होतील संजय राऊत, मी त्यांचे प्रतिक्रिया ऐकलीली नाही."
0
0
Report
Advertisement

धानगर समुदाय की मांग: शिवाजी महाराज के पुतले का सुरक्षित स्थानांतरण प्रशासन से आह्वान

Pandharpur, Maharashtra:छत्रपती शिवाजी महाराज यांचा अंजनगाव मधील खेलोबा देवस्थान द्वारातील पुतळा अत्यंत आदराने शासनाने सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी धनगर समाजाचे नेते पांडूरंग मिरगळ यांनी सोलापूर जिल्हा प्रशासनाला केली आहे. आज सकाळ पासून धनगर समाजाचे गुरू फरांडे बाबा यांनी अन्नत्याग केला आहे. गावात धनगर समाजाच्या चुली पेटल्या नाहीत. महिला पुरुष यांनी आज जेवण केलं नाही. प्रशासनाला विनंती आहे उद्या सकाळी लाखो धनगर बांधव अंजनगाव मध्ये दाखल होतील. प्रशासनाने याचा विचार करून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा आदराने दुसऱ्या सुंदर ठिकाणी स्थलांतरित करावा अशी मागणी केली आहे
0
0
Report
Advertisement

खेड के आश्रम में महाराज बन गवळी ने महिलाओं के साथ शोषण; मामला दर्ज

Khed, Maharashtra:पुणे जिल्ह्याला संतांची भूमी म्हटलं जातं, पण याच भूमीला काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना खेड तालुक्यातून समोर आली आहे. अध्यात्माच्या नावाखाली महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या एका वासनांध भोंदू बाबाचा खरा चेहरा आता चव्हाट्यावर आलाय. 'अंगातील दोष काढतो' असं सांगून महिलांच्या अगतिकतेचा फायदा घेणाऱ्या अस नराधमाचा छळ अखेर जगासमोर आलाय. पाहूया यावरचा आमचा विशेष रिपोर्ट... पुणे जिल्ह्यातलं खेड तालुक्यातलं चांडोली गाव इथल्या शिवदत्त आश्रमात श्रद्धेच्या नावाखालून वासनेचा बाजार मांडला गेला होता. स्वतःला 'महाराज' म्हणवून घेणारा नवनाथ गवळी, हा प्रत्यक्षात देवाच्या नावाखालून महिलांची शिकार करत होता. एका ३४ वर्षीय महिलेने दाखवलेल्या धैर्यामुळे या भोंदूचं काळं कृत्य आता पोलीस दप्तरी नोंदवलं गेलं आहे. पीडित महिला मे २०२५ पासून आपल्या कुटुंबासह या आश्रमात दर्शनासाठी येत होती. मात्र, १७ जुलै २०२५ च्या त्या पहाटेने सर्वच बदलून टाकलं. जेव्हा ही महिला जप करत होती, तेव्हा या नराधम गवळीने तिचा विनयभंग केला. इतकंच नाही, तर "तुझ्या अंगात दोष आहेत, ते काढण्यासाठी शारीरिक संबंध ठेवावे लागतील," असं सांगून त्याने आपलं कुटील डावपेच रचले. धक्कादायक बाब म्हणजे, सामाजिक प्रतिष्ठेपोटी पीडितेने सुरुवातीला केवळ विनयभंगाची तक्रार दिली होती. मात्र, आरोपीने फोनवर त्रास देणं सुरूच ठेवलं. अखेर 'खरात' प्रकरणातून प्रेरणा घेत आणि स्वतःला सावरत या पीडितेने आता आपल्यावर झालेल्या लैंगिक शोषणाची सत्य कबुली दिली आहे. बाईट : पीडित महिला ..."माझ्यावर हे सर्व आरोप खोटे आहेत. हे षडयंत्र आहे आणि मी न्यायालयीन प्रक्रियेला सामोरे जाण्यास तयार आहे." बाईट- नवनाथ गवळी, आरोपी आरोपी जरी स्वतःला निर्दोष म्हणत असला, तरी खेड पोलिसांनी आता या प्रकरणाचा तपास अधिक तीव्र केला आहे. पोलिसांनी महिलांना आवाहन केलंय की, अशा कोणत्याही भोंदूच्या जाळ्यात अडकू नका आणि कोणी त्रास देत असेल तर न घाबरता समोर या. आम्ही संबंधित आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. जर इतर कोणत्याही महिला अशा पद्धतीने त्रासात असतील किंवाभीतीच्या छायेखाली असतील, तर त्यांनी थेट खेड पोलिसांशी संपर्क साधावा. आम्ही त्यांना पूर्ण संरक्षण देऊ आणि अशा भोंदू बाबांची गय केली जाणार नाही. बाईट- सुभाष चव्हान, पोलीस निरीक्षक, खेड श्रद्धा असावी पण ती अंधश्रद्धा नसावी. देवाच्या नावाखाळे आपल्य वासना शमवणाऱ्या भोंदूंना आता समाजात जागा नाही. पीडितेने दाखवलेल्या या धाडसाचं सर्वत्र कौतुक होतंय, पण आता गरज आहे ती या भोंदूला कठोर शिक्षा होण्याची. ब्यरो रिपोर्ट झी मिडीया खेड पुणे...
0
0
Report

ऐरोली अस्पताल में नवजात के साथ पूजा पर वीडियो वायरल: भोंदूगिरी पर सवाल

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबईतील ऐरोलीमध्ये असणाऱ्या मनपा रुग्णालयात पूजा पाठ करतानाचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. ऐरोलीतील पालिका रुग्णालयातील हा व्हिडिओ असून सध्या हा सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. महत्वाचं म्हणजे एन.आय.सी.यु मधील हा धक्कादायक व्हिडिओ आहे. यामध्ये एक महिला नवजात बाळाला कुशीत घेतल्याचं दिसत असून एक पुरुष चक्क एनआयसीयू बाहेर शंख वाजवून डमरू वाजवत पूजा करताना स्पष्ट दिसत आहे. शंख वाजवल्यामुळे रुग्णालयातील कर्मचारी देखील त्याठिकाणी जमा झाले होते. राज्यात भोंदूगिरीवर संताप व्यक्त होतं असतानाच चक्क मनपा रुग्णालयात भोंदूगिरीचा हा प्रकार समोर आल्याने पालिका प्रशासन यावर काय कारवाई karणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
0
Report
Advertisement

नाशिक के भोंदू बाबा खरात पर भूमि हड़पना और यौन शोषण का घोटाला उजागर

Nashik, Maharashtra:अँकर नाशिकचा भोंदू बाबा कॅप्टन अशोक कुमार खरात याचे काळे कारनामे आता एकामागून एक उघड होत आहेत. केवळ लैंगिक अत्याचारच नाही, तर आध्यात्मिक भीती दाखवून जमिनी बळकावण्यातही हा भोंदू माहीर असल्याचे समोर आले आहे. सिन्नरच्या एका कुटुंबाला मृत्यूची भीती दाखवून १६ लाखांची जमीन अवघ्या ४ लाखांत लाटल्याचा धक्कादायक प्रकार उघड झालाय. पाहूया या भोंदूचा आणखी एक कुटिल डाव... १६ लाखांची मालमत्ता ४ लाखांत हडपली. मृत्यूची भीती दाखवून अंधश्रद्धेचा वापर. हडपलेली जमीन पत्नी कल्पना खरातच्या नावावर. मंतरलेले पाणी आणि जडीबुटी देऊन लैंगिक शोषण. आधार कार्ड आणि पॅन कार्डचा गैरवापर केल्याचा संशय. सिन्नर तालुक्यातील मिरगाव येथील माळी कुटुंबाने १९९७ मध्ये शेतजमीन खरातने केवळ ४ लाखात हडपली... खरातने या कुटुंबाला तुमची जमीन शापित आहे, ती न विकल्यास घरात अनर्थ होईल असे सांगून घाबरविले.. दरम्यान कुटुंबातील एका तरुण मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. या दुःखाचा आणि भीतीचा फायदा घेत खरातने जमीन न विकल्यास आणखी दोघांचा मृत्यू होईल अशी मानसिक दहशत निर्माण केली आणि १६ लाखांची जमीन अवघ्या ४ लाखांत स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर करून घेतली. खरातने त्याच जमिनीवर आलिशान ईशान्येश्वर महादेव मंदिराची उभारणी केली. खरंतर घरातला ईशान्य कडे वळणाऱ्या नदीच्या कोपऱ्यावर ईशान्येश्वर मंदिर बांधायचे होते त्यासाठी त्यालाही जागा आवडली होती मात्र माळी कुटुंब ही जागा विकायला तयार नव्हते अखेर तंत्र मंत्र्यांचा वापर करून मानसिक छळ करत त्याने आवडलेली ही जागा ताब्यात घेतली. जागा हवी म्हणून एकाच्या भावाचा घातपात तर एकाच्या गोठातील अनेक म्हशी मृत्युमुखी करण्याची आरोप पीडितांनी केले आहेत. नाशिकच्या कॅनडा कॉर्नरपासून ते सिन्नरच्या शेतापर्यंत पसरलेले खरातचे मायाजाल आता पोलिसांच्या रडारवर आहे. बोंदगिरीतून फसवलेल्या या प्रकरणाचाही तक्रार आता लवकरच पोलिसांमध्ये दाखल होणारे. अशोक कुमार खरात सारख्या भोंदू बाबांनी समाजाला अंधश्रद्धेच्या गर्तेत ढकलून आपली पोळी भाजून घेतली आहे. आता पोलीस या सर्व प्रकरणाचा पर्दाफाश कसा करतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
0
Report

जालना समृद्धि महामार्ग हादसे में मृतक परिजनों को 15 लाख, जख्मी को 4 लाख

Jalna, Maharashtra:जालना ब्रेकिंग|जालन्यातील समृद्धी महामार्ग अपघात प्रकरण अपघातातील मृतांच्या नातेवाईकांना गुत्तेदाराकडून 15 लाखांची मदत, जखमींना 4 लाख आमदार अर्जुन खोतकर, नारायण कुचे यांच्या मध्यस्थीने तोडगा नातेवाईकांना गुत्तेदाराकडून प्रत्येकी 10 लाखांचा चेक सुपुर्द, उर्वरित 5 लाख एक महिन्यानंतर याआधी शासनाकडून 5 लाखांची मदत जाहीर अँकर- जालना येथील समृद्धी महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या महिलांच्या नातेवाईकांना गुत्तेदाराकडून प्रत्येकी 15 लाखांची मदत देण्यात आलीये.. काल कडवंचीजवळ झालेल्या भीषण अपघातात 8 महिलांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं समाधानकारक मदत मिळाली नाही तर मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली होती.. त्यामुळं या प्रकरणी आमदार अर्जुन खोतकर आणि आमदार नारायण कुचे यांनी नातेवाईक आणि गुत्तेदार यांच्यात मध्यस्थी करत बैठक घेतलीये. या बैठकीत मृताच्या नातेवाईकांना प्रत्येकी 15 लाख रुपयांची मदत देण्यात आली असून 10 लाखांचा चेक सुपुर्द करण्यात आलाय. तर जखमींना चार लाख रुपये देण्यात आले आहेत. याआधी शासनाकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे.. बाईट- अर्जुन खोतकर, आमदार शिवसेना बाईट- नारायण कुचे, आमदार, भाजप
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर के लिए मौसम विभाग ने ऑरेंज अलर्ट जारी किया, 23 स्कूलों में व्यवस्था

Chandrapur, Maharashtra:टायटल:-- हवामान विभागाने चंद्रपूरसाठी जारी केला ऑरेंज अलर्ट, मनपाने महाकाली यात्रेकरूंसाठी २३ शाळा केल्या सज्ज अँकर:--- नागपूर प्रादेशिक हवामान केंद्राने आज चंद्रपूर जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जारी केला असून, यामुळे चिंतेचे वातावरण पसरले आहे. या कालावधीत विजांच्या कडकडाटासह वादळी वारे (ताशी ४० ते ५० किलोमीटर वेगाने), मुसळधार पाऊस आणि गारपीट होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. चंद्रपूरच्या प्रसिद्ध देवी माता महाकाली मंदिरात सध्या वार्षिक चैत्र यात्रा जोरात सुरू आहे. या यात्रेच्या काळात हजारो भक्त दर्शनासाठी हजेरी लावतात. खबरदारी म्हणून महाकाली यात्रा भाविकांच्या निवासासाठी २३ शाळांची पर्यायी व्यवस्था जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आली आहे. एफईएसगर्ल्स हायस्कूल, छोटूभाई पटेल हायस्कूल, मराठी पूर्व माध्यमिक शाळा, महाकाली कन्या शाळासह अन्य शाळांचा यात समावेश आहे. आशीष अंबाडे झी मीडिया चंद्रपूर
0
0
Report

एलिफंटा द्वीप पर 1500 वर्ष से अधिक पुराना जलाशय और प्राचीन वस्तुएँ मिलीं

Navi Mumbai, Maharashtra:एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून सुरू झालेले उत्खननात दगड आणि विटांनी बांधलेले १,५०० वर्षांहून अधिक जुने असलेले जलाशय व विविध जुन्या वस्तू सापडल्या आहेत. या पुरातन, दुर्मीळ वस्तू व संशोधनामुळे बेटावरील ऐतिहासिक पाऊलखुणा प्रकाशात येणार आहेत. भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण विभागाचे (एएसआय) एक पथक अधीक्षक पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. अभिजीत आंबेकर यांच्या नेतृत्वाखाली एलिफंटा बेटावर चार महिन्यांपासून मोराबंदर परिसरात काम करत आहेत. उत्खननात शोध पथकाला एक आयताकृती जलाशय (टाके) आढळले. या जलाशयाला उत्तरेकडे पायऱ्यांचा एक लंबवत भाग जोडलेला आहे. या रचनेमुळे बेटावरील प्राचीन जलव्यवस्थापन पद्धती समोर येते. बंदरावरील उत्खननाचे काम आतापर्यंत ५ मीटर खोलीपर्यंत पोहोचले असून, यात २० पायऱ्या उजेडात आल्या आहेत. या पायऱ्या दगडांच्या ठोकळ्यांपासून बांधण्यात आल्या आहेत; विशेष म्हणजे, हे दगड एलिफंटा बेटावरील स्थानिक दगड नाहीत, असे आंबेकर सांगतात. तज्ज्ञांच्या मते, या वास्तूची तुलना 'पायऱ्यांच्या विहिरीं'शी होऊ शकते. विशेषतः गुजरात आणि राजस्थानमध्ये आढळणाऱ्या अशा विहिरींशी-जिथे पायऱ्या उतरून गेल्यावर मध्यभागी असलेल्या मुख्य जलाशयापर्यंत पोहोचता येते. अशा प्रकारच्या वास्तू रचनेचा उगम सातव्या शतकात झाला असावा, असे मानले जाते.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top