icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

पुणे नगरपालिका को बड़ा फायदा: 700 करोड़ की बचत, बायोगैस-सीएनजी परियोजना आगे बढ़ेगी

Pune, Maharashtra:कचरा बायोगँस प्रकल्पात पुणे मनपाचे तब्बल 700 कोटी वाचणार बीपीसीएल कंपनी 12 एकर जागेच्या बदल्यात 300 मेट्रिक टन बायोगँस सीएनजी गॅस प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव दिल्याने 765 कोटींची निविदा पालिका आता गुंडाळणार कचऱ्यापासून बायोगँस सीएनजी प्रकल्प उभारण्यासाठी स्थायी समितीने प्रस्ताव आणताच एका कचरा वाहक कंञाटदारांने तब्बल 756 कोटींचे टेंडर भरेले होते यावर टीका होताच बीपीसीएल कंपनीचा CSR फंडेड झीरो बजेट प्रस्ताव पुढे आल्याने पालिकेचे किमान 500 - 600 कोटी रुपये वाचणार आहेत... फक्त या प्रकल्प उभारण्याच्या बदल्यात पालिकेला 12 एकर जागा बीपीसीएल कंपनीला नाममाञ भाडेकरारावर उपलब्ध करून घ्यावी लागणार आहे...
0
0
Report

पुणे के खड्डे से बालक की मौत; महापौर ने जांच के आदेश दिए

Pune, Maharashtra:पुणे म्हाळुंगे भागात खड्यामुळे झालेल्या अपघातात एका 11 वर्षीय चिमुरड्याचा बळी गेला. याबद्दल पुणे महापौर मंजुषा नागपूरे यांनी दु:ख व्यक्त केलंय तसंच या अपघातग्रस्त रस्त्याचे काम नेमकं कशामुळे रखडलं याचीही चौकशी करण्याचे आदेश प्रशासनाला दिलेत. हा अपघातग्रस्त रस्ता याआधी पीएमआरडीएच्या हद्दीत होता त्यामुळे तांत्रिक अडचणीमुळे काही पुणे पालिका अधिकारीांनी या रस्त्याचं दुरुस्तीचं टेंडरचं काढलं नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. त्याच रस्त्यावरील खड्ड्यात पडून एका 11 वर्षीय चिमुरड्याचा नाहक बळी गेलाय.महापौर: मंजुषा नागपूरे, महापौर, पुणे
0
0
Report
Advertisement

ठाणे महापालिका बजट: एकमत से करवाढ मंजूर, आय बढ़ाने की तैयारी तेज

Thane, Maharashtra:सभागृहामध्ये हा जो विषय आला त्यावेळी कुठलाही सहभासदांनी विरोधात मतदान नोंदवला नाही. सभागृहात हा विषय एकमताने मंजूर झाला... एक अजेंडा ठरवला जातो.सभागृहामध्ये जो काही विषय मंजूर होतो त्याआधी सर्वपक्षीय गटनेत्यांची एक बैठक होते त्यामध्ये या चर्चाप्रमाणे सहभागृह चालवलं जातं... कालचा महासभेत सभागृहामध्ये करवाढ संदर्भात कोणीही विरोध केला नाही. तो बहुमताने नाही तर एकमताने तो विषय मंजूर झालेला आहे. अजेंडा ठरवल्यानंतर या विषयावर मंजुरी मिळते. शिवसेनेने कोणाशीही गद्दारी केलेली नाही. जे काही घटनाच्या बैठकीमध्ये ठरतं त्याची अंमलबजावणी शिवसेना पक्ष करत असतं. त्याला जर गद्दारी म्हणत असाल तर त्याबद्दल आम्ही बोलू शकत नाही. सभागृहामध्ये सगळेच सगळ्यांचे विषय बोलत होते. सगळ्यांना चांगलं माहित आहे ठाणे महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती... याबाबत काय करायला पाहिजे आज विकासाच्या दृष्टीने काय केलं पाहिजे... गेल्या ११ वर्षापासून करवाढ झाली नाही. 500 कोठी मायनस बजेट सादर झाला आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर बऱ्याच बैठका आम्ही महापालिकेत घेतलेले आहेत... विश्वस्त या नात्याने आम्ही यासंदर्भात आम्ही चर्चा केलेली आहे. सोळाशे कोटी रुपये ची कारवाढ संदर्भात महसूल विभागाची प्रोव्हिजन ठेवली आहे. आमचं आताच उत्पन्न 900 ते 1100 कोटीचा उत्पन्न आहे. ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नाही त्या ठिकाणी करवाढ करायची आहे. ज्याचा वापर रेसिडेन्शिअल मध्ये होत असताना त्या ठिकाणी कमर्शियल काम होत आहे त्या ठिकाणी कर वसुली करायची. करवाढ मुळे महसूल मध्ये उत्पन्न होईल त्यासाठी प्रोव्हिजन केलेला आहे. मुंब्रा आणि दिवा विभागापासून आम्ही शिबिर आयोजन करणार आहोत. ज्या ठिकाणी कर आकारणी झाली नसेल त्या ठिकाणी कर आकारणी करायची आहे. ज्यांचा यूज कमर्शिअल असेल त्यांचं कर आकारणी करायची आहे. त्या दराची कर आकारणी करण्याची भूमिका आम्ही घेतलेली आहे. प्रत्येक विभागांनी जर काम केलं तर महापालिकेची आर्थिक परिस्थिती सुधारणार.. महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती तुम्हाला माहित आहे. अतिशय खूप वाईट परिस्थिती आहे. त्या परिस्थितीमध्ये आपल्याला मात करायचं असेल. विश्वस्त या नात्याने सगळ्यांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.
0
0
Report
Advertisement

VNIT में युवा क्रिएटिविटी ने समाज के सवालों को दिया मंच

Nagpur, Maharashtra:मंथन फॉर युवा या कार्यक्रमासाठी मी आज व्ही एन आय टी मध्ये आले अनेक विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला याचा आनंद वाटतो हॅकथॉन आयडिया थॉन, एक्झिबिशन, स्टार्टअप या ठिकाणी आहे या मुलांची क्रिएटिव्हिटी आयडियाज नॉलेज हे लोकांपुढे आणतात आहेत त्यात लोकउपयोगी प्रोजेक्ट्स पण आणले आहे याचा सोसायटी म्हणून आपल्याला फायदा होऊ शकतो। वंदे मातरम हे राष्ट्रगाणं आहे ते राष्ट्रगीता बरोबर आपण म्हणायचं असं पार्लमेंट मध्ये मध्ये पास झाला आहे आणि जर आपण आपल्या कॉन्स्टिटुटचा आदर करत नाही तर जो पालन करत नाही त्याच्यावर कारवाई व्हायला पाहिजे असा मला वाटतं। अन फॉर्च्यूनर इन्सिडेंट...जे इनसिडन्स होतात त्याचा पाठलाग करून त्याचं कारण काय आहे याचा शोध आपण घेतला पाहिजे त्यासाठी प्रयत्न केले पाहिजे स्त्रियांचा किंवा मुलींचा अत्याचार होतो त्याचेही कारण काय त्याची कारणे शोधून त्यावर निर्णय घ्यायला पाहिजे। मी आधी सुद्धा हे बोलले आहे जंतर-मंतरवर आंदोलनाची सुरुवात झाली ती पेपर लीक पासून झाली ती बरोबर होते पण त्यामध्ये नंतर वेगवेगळे सोशल एलिमेंट जॉईन झाले आणि त्यांनी एक वेगळं वातावरण निर्माण केलं त्यांनी आंदोलनच केलं असतं तर ते रिलेव्हनट होत. मेक इन इंडिया बद्दल बोलतो आहे हे पूर्ण तेव्हाच होते जेव्हा जेन झी त्यामध्ये सहभागी असेल त्यांना ज्या फॅसिलिटी पाहिजे त्या मिळाल्या पाहिजे त्या नागपूर सारख्या शहरात असो किंवा मुंबईसारख्या शहरात असो शिक्षणात किंवा इतर त्याच्यामध्ये त्यांना फॅसिलिटी मिळाल्या पाहिजे आपण युवकांच्या प्रगतीला दिशा दिली पाहिजे। धर्म स्वतंत्र कायदा - धर्म स्वतंत्रता कानून च्या माध्यमातून स्त्री स्वतंत्रता स्त्रीयावर न्याय केला तिला डिसिजन घेता आलं पाहिजे ते या कायद्यामुळे मिळणार आहे लग्न झालेली महिला असो किंवा मग मुलगी असो तिला तिथे डिसिजन घेता आले पाहिजे ते या कायद्यामुळे मिळणार आहे। काँग्रेस - काँग्रेस आपली नवीन कॉन्स्टिट्यूशन बनवत आहे त्याच ते उदाहरण वंदे मातरम आहे ऑन तिरंगा केक - तिरंगा चा केक कापताना मी आजपर्यंत पाहिला नाही आपण तिरंगा घालू शकत नाही तर मग ते कापणं कसं योग्य होऊ शकते ऑन दिव्या देशमुख - दिव्या देशमुख ने ज्याप्रमाणे बुद्धिबळात प्रगती केली तिला राष्ट्रपती च्या हस्ते पदक मिळत आहे तिच्यामागे आपण सगळे उभे राहिला पाहिजे तिच्यावर आम्हाला अभिमान आहे ऑन पुणे घटना - पुण्यामध्ये जी घटना घडली हे फार दुःखद आहे मला त्याचं फार दुःख आहे ऑन फडणवीस केंद्र - देवेंद्रजी नागपूरचे महाराष्ट्राचे सेवक आहे त्यांना येथे काम करू द्या सेवा करू द्या त्यांना का पाठवताय तिकडे महाराष्ट्राचे सगळ्यात मोठी जबाबदारी आहे महाराष्ट्र हा देशातील लिडिंग स्टेट आहे
0
0
Report

नाशिक मध्ये पुराने प्रेमी के मोहभंग के कारण हत्या, चार आरोपि गिरफ्तार

Nashik, Maharashtra:नाशिक - जुन्या प्रियकराचा अडथळा येत असल्याने काढला काटा - जुना प्रियकर वसंत सातपुते घरात झोपलेला असताना गळा आवळून चाकूने वार करत हत्या - दोन आरोपींना पोलिसांनी घेतले ताब्यात ,एकूण चार आरोपींचा सहभाग निष्पन्न - साय्यायक पोलिस आयुक्त संदीप मिटके यांची माहिती - बाईट - संदीप मिटके, एसीपी, गुन्हे शाखा - जवळपास 15 वर्ष ते सोबत राहत होते, - नवीन प्रियकर साहिल सोबत हसीनाचे संबंध जुळले - त्यामुळे जुन्या प्रियकराचा अडथळा येत असल्याने जुन्या प्रियकराचा काटा काढला. - पाच तारखेला रात्री तीन वाजता वसंत हा घरात झोपला असताना साहिलने गळ्यावर चाकूने वार करत त्याची हत्या केली. - विशेष म्हणजे 24 तास मृतदेह घरातच पडून होता. दुसऱ्या दिवशी मध्यरात्री एर्टीगा गाडीत टाकून तो मृतदेह कसारा घाटात फेकून विल्हेवाट लावण्यात आली.. - एकूण चार आरोपींचा सहभाग निष्पन्न झाला आहे
0
0
Report
Advertisement

नागपुर के 12 स्कूलों और जिला कोर्ट को बम धमकी, सुरक्षा तैनाती बढ़ी

Nagpur, Maharashtra:नागपूरात twelve शाळांसह जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी ई-मेल आल्यानं खळबळ. नागपूरात आज सकाळी 12 प्रतिष्ठित शाळा आणि जिल्हा न्यायालयाला बॉम्बस्फोटाची धमकी देणारा ई-मेल आल्याने मोठी खळबळ उडाली. शाळा सुरू झाल्यानंतर सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास अधिकृत ई-मेलवर धमकीचा संदेश आल्याचं समोर आलं. धमकीनंतर पोलिसांनी तातडीने सर्व संबंधित ठिकाणी धाव घेतली. बॉम्ब शोध आणि नाशक पथकांसह श्वान पथकाला पाचारण करण्यात आलं असून, शाळा परिसराची कसून तपासणी करण्यात आली. अद्याप तरी कुठेच काही मिळून आले नाही. या धमकीमागे नेमकं कोण आहे? ई-मेल कुठून पाठवण्यात आला? याचा तपास सायबर पोलिसांकडून सुरू आहे. नागपूर शहरातील प्रतिष्ठित शिक्षण संस्था असलेल्या 12 शाळांमध्ये मंगळवारी सकाळी 10 च्या सुमारास बॉम्ब ठेवण्यात आला असून तो फुटणार अशी धमकी मिळाल्याने पोलीस दलात खळबळ उडाली. शहरातील 12 शाळांच्या अधिकृत ईमेल वर सकाळी हा मेल पाठवण्यात आला होता. सकाळी शाळा उघडल्यानंतर मुख्याध्यापकांनी संगणक उघडताच खळबळ उडाली. शाळांना बॉम्बस्फोटाने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याने या शाळा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे विचार शाळेतील मुलांवर लादत असल्याची आगपाखड मेलमध्ये केली असल्याची माहिती समोर येतेय. त्यामुळे या शाळा बॉम्बने उडवून देण्याची वेळ आल्याचा उल्लेख धमकीतून करण्यात आला आहे. बॉम्बची धमकी मिळालेल्या शाळांमध्ये सेंटर पॉईंटच्या भांडेवाडी, सदर शाळेसह केंद्रीय विद्यालयाच्या अजनी, काटोल, वायुसेना नगर येथील शाळांचा समावेश आहे. सोबतच जिल्हा न्यायालयाचाही समावेश आहे. बॉम्बची धमकी मिळाल्यानंतर संबंधित पोलिस ठाण्यांच्या पथकाला अलर्ट देण्यात आला. पोलीसांच्या पथके त्वरित शाळांमध्ये दाखल झालीं धमकीच्या मेलची तात्काळ गंभीर दखल घेत सर्व शाळांमध्ये बॉम्ब शोध व नाशक पथकाला पाचारण करण्यात आले. पथकाने संपूर्ण परिसर रिकामा करत तपासणी सुरू केली. सोबतच पोलिसांनी बॉम्बचा नेमका ठिकाणा शोधण्यासाठी दुपारी 12च्या sुमारास श्वान पथकाला देखील पाचारण केले. सायबर विभागाकडून मेलची तपासणी सकाळी धमकीचा ई-मेल मिळाल्यानंतर सायबर शाखेने मेल पाठवणाऱ्या आयपी पत्त्याची तपासणी सुरू केली आहे. हा मेल नेमका कुठून आला तो कोण पाठवला याचा तपास केला जात आहे. शाळा परिसरात अचानक पोलीस पथके दाखल झाल्याने परिसरात खळबळ उडाली. दरम्यान गोंधळ उडू नये म्हणून पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त तैनात केला.
0
0
Report

ओबीसीआरक्षण पर राजनीती तेज, आंदोलन और पुरानी 58 लाख नोंदों पर बहस

Nagpur, Maharashtra:परिणय फुके, ओबीसी नेते, भाजप नेते - कॉक्रोज जनता पार्टी चे आंदोलन बघून मनोज जरांगे यांना अति उत्साह आला आहे. मात्र आरक्षण हे संविधानाच्या चौंकतीत राहून देता येते...जोर जबरदस्तीने करून आरक्षण मिळत नाही. सरकार उलथून टाकण्याची भाषा आराजतेला खतपाणी देणारी आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाने ओबीसी आरक्षणाला कुठलाही धोका नाही. 58 लाख नोंदी जुन्या आहे. गडचिरोली सर्पदंश - त्या मुलीच्या आई वडिलांना तिथे योग्य उपचार होत नाही असे वाटत असेल त्यामुळे त्यांनी नागपुरात उपचार दिले जात आहे...ते योग्य आहे. चांगले उपचार होणे महत्वाचं आहे. महिला आरक्षण अडचण - एक टक्का कमी असला तरी पक्षीय स्तरावर महिलांना ओपन मधून निवडणूक लढवू शकतात..यात खूप पेच निर्माण न करता लवकरात लवकर निवडणूका घ्याव्यात.... निवडणुकासाठी पुढे गेले पाहिजे... महिलांना 33 टक्के आरक्षण असल्यानं खुल्या प्रवर्गातून आरक्षण देता येईल. दिल्ली नक्षल - अराजकता पसरवणारे, देशाचं नाव क्रॅब करणारे नवीन नवीन काही तरी करत असतात याचा काही फरक पडत नाही.. कंत्राटदार आंदोलन - भरपूर पैसे शासनाकडे प्रलंबित आहे. वर्षभरात तोडगा काढून त्यांना पैसे देणार आहे...
0
0
Report

कांग्रेस के आरोप: मोदी ब्रांड की हवा क्यों फटी, देशभक्ति पर सवाल

Nagpur, Maharashtra:नागपूर ऑन वंदे मातरम् आरोप - मला असं वाटतं की भाजपची परिस्थिती अशी आहे की नरेंद्र मोदी नावा असलेल्या ब्रँडची हवा खराब झाली आहे. लाल किल्ल्यावरून देशाचे पंतप्रधान भाषण देतात, पण भाजपच्या संघटन मंत्र्यासारखे भाषण दिल्यासारखे वाटते. ज्या पद्धतीने देशाच्या सैनिकांचा अपमान केला जातो, त्यांच्या जॅकेटवर असलेल्या तिरंग्यावर आणि जॅकेटवर मोठा पैसा खर्च केला जातो. दुसऱ्या देशाचा तिरंगा त्यांच्या जॅकेटवर दिसला. अशा परिस्थितीमध्ये काँग्रेस मुख्यालयामध्ये वंदे मातरम्‌चा मुद्दा घेऊन देशप्रेमाचे आम्ही आहोत, असा सिद्ध करता. प्रभू श्रीरामाचे नाव घेऊन हे देश लुटत आहेत. जिथे नाव घेतात, तिथे लुटतात. भाजपने आम्हाला देशप्रेम शिकवू नये. देशासमोर असलेल्या परिस्थितीवर चर्चा करावी. ऑन नक्षल पक्ष - आपल्याकडे एक मन आहे गिधड पर मुसिबत आती है तब गिधड शहर की और भागता है अशा प्रकारचे वक्तव्य करून तरुण-तरुणींचा अपमान ज्या पद्धतीने चालला आहे, देशाच्या तरुणांना गटार म्हटलं जातं, दिमाखी नक्षल म्हटलं जातं. भाजपच्या लोकांचा आता शेवटचा काळ आहे. परिणाम मोदी यांच्यावर होत आहे. हे घाबरलेले आहेत. सत्तेतून यांना आता दूर जाणार आहेत. घाबरलेल्या परिस्थितीत तरुणांना नक्षल, गटार, आंदोलनजीवी, दिमाखी नक्षल म्हणणं योग्य नाही. प्रधानमंत्री देशाबद्दल भाषण देतात तेव्हा जागतिक पातळीवर विश्लेषण होतं, भारतात काय चाललं आहे, विदेशी नीती काय आहे, यावर चर्चा होते. देशाच्या तरुणांना, त्यांच्या भविष्याला दिमाखी नक्षल म्हणणं... हे बरोबर नाही कोणाची दिमाकी हालत खराब आहे, हे समजून घेणं आवश्यक आहे. ऑन मुख्यमंत्री अधिकार - मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असतात. मंत्रिमंडळाचा एखादा चुकीचा निर्णय झाला, तर त्याला रद्द करण्याचे अधिकारा मुख्यमंत्र्यांना असतो.मुख्यमंत्री, ‘मी किती भारी आहे,’ हे सांगण्याचा प्रयत्न सुरू आहे. संविधानात तरतूद आहे. मुख्यमंत्री हे महत्त्वाचे असतात. विधानसभेतसुद्धा सांगितलं की मंत्र्यांना काहीच अधिकार नाहीत. त्यांनी रेकॉर्डवर आणलं आहे. ऑन एकनाथ शिंदे चित्रपट गाणे - त्यांनी काही केलं तर ते वॉशिंग मशीनमध्ये आहेत, वॉशिंग मशीनमधली पार्टी आहे. अशी चर्चा करण्यापेक्षा खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचे प्रश्न आहेत, बेरोजगारांचे प्रश्न आहेत, महागाई आहे, देशाच्या सीमा सुरक्षित राहिल्या नाहीत. हे विषय काँग्रेससाठी महत्त्वाचे आहेत. अनेक प्रश्न समोर आहेत. काँग्रेसला त्यामध्ये रस आहे. ऑन हसन दलवाई - मला असं वाटतं की पृथ्वीराज चव्हाण साहेब असतील, या सर्वांनी हे वक्तव्य केलं आहे. हे मोठे नेते आहेत. त्यांच्या लेव्हलवर काही चर्चा झाली असेल, त्यांना माहिती असेल. आमच्या लेव्हलवर अशी चर्चा झाली नाही.आमच्यासमोर अशी चर्चा झाली नाही. ऑन नरेंद्र भोंडेकर आरोप, रेती घाट - ३०० कोटींपेक्षा जास्त घोटाळा त्या ठिकाणी झाला आहे.अनेक पेपर्स आम्ही महसूलमंत्र्यांना दिले. बावनकुळे साहेबांनी प्रॉपर लक्ष दिलं पाहिजे. विकासासाठी रस्ते नाहीत, शेतकऱ्यांसाठी पैसे नाहीत, खड्ड्यांचे साम्राज्य आहे. मुठभर लोकांचं मोदी सरकार, मुठभर लोकांचं लाडाचं करत आहेत. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पुढाकार घ्यावा. भंडारा जिल्ह्यातल्या डीपीडीसी मध्ये काय झालेलं आहे, अत्यावश्यक माहिती त्यांना दिली आहे. त्यांनी कारवाई करावी. ऑन दिल्ली आंदोल(नक्षल ) - भाजप मध्ये अनेक नेते समाविष्ट आहेत. बिहारचे मुख्यमंत्री असतील, अनेक उदाहरण देता येतात. त्यांच्यावर किती गुन्हे दाखल आहेत? किती गुन्हे दाखल आहेत, काय स्थिती आहे, हे आपण पाहिलं आहे. या सर्व गोष्टींमध्ये भाजपमध्ये किती विध्वंस व्यवस्था आहे, याचा अंदाज आहे. हे सॅम्पल आहे दुसऱ्यावर बोट दाखवण्यापेक्षा आपल्याकडेसुद्धा भाजपने बोट दाखवलं पाहिजे. ऑन एसआर प्रकरण - मी काही आढावा घेतला. असं लक्षात आलं की १० टक्के वोटर संख्या आहे. काही लोक उपस्थित मिळाले नाहीत, काही मृत्युमुखी आहेत. पुन्हा एकदा महिन्याभरानंतर संधी प्राप्त होणार आहे. या यादीनंतर त्यांना एक महिन्याची मुदत राहणार आहे. ही प्रक्रिया चालत राहणार आहे. या सर्व यादीमध्ये संपूर्ण स्ट्रक्चर उभं होईल. त्याच्यामध्ये गडबड दिसेल. निवडणूक आयोगाने यात सुधारणा केली पाहिजे. ऑन नाशिक कुंभ - नाशिकच्या मंत्र्यांच्या परिवारातील लोक सामील होत आहेत. नकली टेंडर काढून वर्क ऑर्डर दिली जाते. सरकार ज्या पद्धतीने दिवसाढवळ्या लोकांचे घर लुटले जात आहेत. नाशिकच्या कुंभमेळ्याच्या नावाने सरकार पैसे खर्च करीत आहे. परस्पर लुटले जात आहे. सरकारचा यामध्ये सहभाग आहे. या सर्व गोष्टींमध्ये कशी बाहेर येईल, त्याच्यावर आमचं लक्ष आहे. जर साधुसंतांनी या संदर्भात बाहेर चर्चा केली तर, सनातन धर्माची बदनामी आणि महाराष्ट्राची बदनामी होईल.
0
0
Report
Advertisement

72 करोड़ के रेती घोटाले के बाद मंत्रियों की चुप्पी पर आक्रोश, निलंबन मांग

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट नरेंद्र भोंडेकर, आमदार भंडारा, शिवसेना - मागील मार्च महिन्यात रेती घाटा संदर्भातला प्रश्न मी लक्षवेधीमध्ये उपस्थित केला होता. यामध्ये सुधीर मुनगंटीवार यांनीसुद्धा भाग घेतला होता. राज्यचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट आदेश दिले होते की, ३४ हजार ब्रास रेतीचे अवैध उत्खनन झालेले आहे. ७२ कोटी रुपयांचा दंड ठेवण्यात आलेला आहे. जे जे अधिकारी यात आरोपी आहेत, त्यांच्यावरसुद्धा कारवाई झाली होती. उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) सस्पेंडसुद्धा करण्यात आले होते. - मंत्र्यांनी हे सुद्धा सांगितले होते की, ७२ कोटींचा घोटाळा ३०० कोटींवर झाला असता, दंड व्हायला हवा होता. एवढा मोठा घोटाळा झाल्या नंतर सुद्धा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) निर्णय देत असेल, तर हा सभागृहाचा अवमान आहे. सभागृहापेक्षा जिल्हाधिकारी किंवा उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) मोठा होत नाही. - ज्या कंपनीला मंत्र्यांनी ब्लॅकलिस्ट केलेलं आहे, ज्या कंपनीवर ७२ कोटींचा दंड ठेवण्यात आलेला आहे, त्याच कंपनीला पुन्हा टेंडर दिलेलं आहे. त्या सर्व आमदारांनी मागणी केली, त्या कंपनीकडून दंड वसूल करा. - जिल्हाधिकारी चार महिने हा संपूर्ण प्रश्न ओळवत आहेत. उपविभागीय महसूल अधिकारी, जिल्हाधिकारी हे मंत्र्यांपेक्षा मोठे होऊ शकत नाहीत. तहसीलदारानेसुद्धा आदेश काढले असतील, मंत्री महोदयांच्या आश्वासनानंतर काढला असेल, तरी पूर्वपरवानगी मंत्र्यांची किंवा सभागृहाची घेतली का?बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की, उपविभागीय महसूल अधिकारी (HDO) आणि कलेक्टर यांनी नाकारलं. - हा सर्वात मोठा घोटाळा आहे. हा ३०० कोटींचा घोटाळा आहेच. एक हजारो कोटींचा घोटाळा दाबण्यासाठी हा संपूर्ण प्रकार सुरू आहे. - जिल्हाधिकारी, खनिकर्म अधिकारी यातील मुख्य सूत्रधार कोण? जिल्हाधिकारी यांची हिंमत कशी काय? धृतराष्ट्र सारखा डोळ्याला पट्टी बांधून ठेवणारा हा जिल्हाधिकारी आहे. जिल्हाधिकारी यांना तत्काळ निलंबित केलं पाहिजे.
0
0
Report

बुद्धिजीवी नक्षलवाद पर केंद्र सरकार से सवाल, कांग्रेस का आरोप

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट – श्यामकुमार बर्वे, खासदार, रामटेक लोकसभा, काँग्रेस नेते -ऑन बुद्धिजीवी नक्षलवाद पक्ष- काँग्रेस पक्ष देशात सर्वात मोठा झाला, ही निवडणूक लढण्यासाठी मोठा झाला नाही. बुद्धिजीवी नक्षलवाद पार्टी उदयास आली आहे. लातूरमध्ये फॉलोअर्ससुद्धा तयार झाले आहेत. हे केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदी यांनी समजून घेतले पाहिजे. हुकूमशाहीच्या राजकारणाला सुरुवात झाली आहे. यासाठी जनभावना त्यांच्या विरोधात झालेली आहे. जनतेमध्ये राग आहे. अशा प्रकारे सोशल मीडियाच्या माध्यमातून हा राग समोर येत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सद्बुद्धी आली पाहिजे. ‘बुद्धिजीवी नक्षलवाद’ असे काय-काय शब्द त्यांनी वापरले आहेत. त्यांनी यापूर्वीसुद्धा नवीन-नवीन शब्द वापरले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आत्मचिंतन करून कार्यशैली सुधारण्याची आवश्यकता आहे. ऑन ایسआयआर - संसद लेव्हलवर, कोर्टातसुद्धा ایسआयआर प्रक्रिया राबवली जात आहे. ती चुकीची पद्धत आहे. दोन कोटी नावे वगळण्यात येत आहेत. दहा-दहा वर्षे मतदान केलेल्या लोकांना शुद्ध करावे लागत आहे की मी मतदार आहे म्हणून. पहिल्यांदा जेव्हा निवडणूक झाली, त्यावेळी नाव आणि मतदानासाठी लोकांना प्रोत्साहित केले. ते प्रोत्साहन सोडून आता नावे कशी कमी होतील, यामध्ये निवडणूक आयोग इंटरेस्टेड आहे. ऑन वंदे मातरम् - वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे. देशाचे पंतप्रधान ज्यांच्या पॅकेटला तिरंगा लागला होता, त्यावरसुद्धा अनेक लोकांनी भाष्य केले आहे. वस्तुस्थिती पाहिली पाहिजे. हा यायचा जमाना आहे. त्यामुळे कोण कुठे जळून घेतो, त्यांची भावना काय आहे, हे लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार निर्णय घेतला पाहिजे.
0
0
Report

आशिष जयस्वाल के बयानों पर राजनीति गर्म, ठाणे में विवाद जारी

Nagpur, Maharashtra:नागपूर आशिष जयस्वाल, राज्यमंत्री, शिवसेना नेते - प्रत्येक माणूस राजकारणात अस्तित्व जिवंत आहे हे दाखवण्यासाठी अशा पद्धतीचे वक्तव्य करत असतात. हे खोटे भ्रम आणि स्टंट करणारे वक्तव्य आहे. विनाकारण कोणाची बदनामी करून स्वतःला लाईम लाईट मध्ये आणण्याचा हा प्रकार आहे...एका जबाबदार राजकारणाने अशा पद्धतीचे वक्तव्य करू नये.... अशा माणसाचा हसा करायला पाहिजे इतके दिवस तुम्ही चुपचाप का बसले होते. चुकीचे वक्तव्य करणाऱ्याचे घेणे ह्या चुकीच्या बालिशपणा आहे... - ठाणे कार्यक्रम भाजपला निमंत्रण नाही - राजकारणात प्रत्येकाचा आपल्या पक्ष वाढला पाहिजे परंतु नेमकं तिथं काय घडलं हे मला माहित नाही.... शिंदे साहेबांच्या नेतृत्वात ठाण्यात शिवसेना मजबूत आहे.. आनंद दिघे ते साहेबांचं शिवसेनेवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे...याच भान प्रत्येकाने ठेवावं... - कंत्राटदार आंदोलन - मागच्या सरकारमध्ये लोकहिताचे निर्णय घेतले... तेव्हा अंदाजीत खर्चपेक्षा खूप जास्त खर्च झाला आहे. कृषी पंपाची वीज बिल माफी ती कमी अपेक्षित होते आतापर्यंत ती 32000 कोटी पर्यंत गेली आहे.... शेतकरी कर्जमाफी लेक लाडकी योजना लाडकी बहीण योजना मुलींची फीमाफीच्या योजना सरकारने राबवला मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधांचे काम सुद्धा त्या दरम्यान सुरू होते₹ थोडी आर्थिक घडी हे अडचणीची झाली होती. त्या परिस्थितीला मात करून सव्वा वर्षात टप्प्याटप्प्यात सर्व गोष्टी क्लिअर करत आहोत. नवीन काम घेण्यासंदर्भात आम्ही थांबवल आहे... वेगवेगळ्या पद्धतीने मार्ग काढून सगळ्यांचे दिले जात आहें. - नरेंद्र भोडेकर आरोप रेती घोटाळा - भंडारा जिल्ह्याचा विषय आहे मी त्या खात्याचा मंत्री नाही... रेती घरकुल धारकांना घाटातून लाभ देण्यासाठी धोरण राबवलेला आहे वाळू राखून सुद्धा ठेवली आहे. भविष्यात वाळूची चोरी कमी व्हावी या दृष्टीने शासनाचा प्रयत्न असतो डिमांड आणि सप्लाय चा रेशो बिघडल्याने काही लोक अशा पद्धतीने गैरव्यवहार करतात शासन त्याच्यावर कारवाई करत आहे... - मुख्यमंत्री मुख्यमंत्री हस्तक्षेप करून निर्णय बदलू शकतात.. - मुख्यमंत्री शेवटी बॉस असतात त्यांना कुठले विभागाच्या निर्णय बदलण्याचा अधिकार आहे. त्याच्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करण्याचा विषय नाही.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top