445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
शिंदे गुट के MLA ने मनोज जरांगे से मुलाकात कर हालत जानकारी ली
Jalna, Maharashtra:जालना : शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदार संघाचे आमदार अंतरवाली सराटी मध्ये शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंडारकर यांनी घेतली मनोज जरांगे यांची भेट दोन्ही आमदारांनी जरांगे यांची भेट घेतली असून त्यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली आज मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा 10 वा दिवस असून नेतेमंडळी त्यांच्या भेटी घेत आहे अँकर : शिवसेना शिंदे गटाचे नांदेड दक्षिण आणि उत्तर मतदार संघाच्या आमदारांनी अंतरवाली सराटीमध्ये जाऊन मनोज जरांगे यांची भेट घेतली आहे.शिवसेना आमदार बालाजी कल्याणकर आणि आमदार आनंदराव बोंडारकर यांनी मनोज जरांगे यांची भेट रात्री भेट घेतली.यावेळी दोन्ही आमदारांनी जरांगे यांच्या प्रकृतीची देखील विचारपूस केली.0
0
Report
अंबाबाई देवी दानपेटे में जुलाई-अगस्त में 2 करोड़ 15 लाख 48 हजार का दान
Kolhapur, Maharashtra:करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीच्या चरणी जुलै आणि ऑगस्ट महिन्यात तब्बल 2 कोटी 15 लाख 48 हजार रुपयांचे दान अर्पण करण्यात आले आहे. 1 सप्टेंबर ते 5 सप्टेंबर यादरम्यान या दानपेटींची मोजणी करण्यात आली. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडून ही मोजणी करण्यात आली. दर दोन महिन्याने अंबाबाई देवीच्या दानपेटीत अर्पण करण्यात आलेल्या रकमेची मोजदात करण्यात येते.0
0
Report
सोलापुर में ऊस बिल के लिए किसानों का आक्रमक प्रदर्शन, तहसीलदार ने आंसू पोंछे
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापुरात ऊस बिलासाठी शेतकऱ्यांचे अर्ध नग्न आंदोलन, आंदोलनावेळी अश्रू अनावर झालेल्या महिला शेतकऱ्यांचे प्रशासनाने पुसले अश्रू. सोलापुरात थकीत ऊस बिलाच्या मागणीसाठी शेतकरी आक्रमक. अडीच कोटी रुपयांचे ऊस बिल मिळत नसल्याने संतप्त शेतकऱ्यांनी काल झाडावर चढत केले होते आंदोलन. आंदोलनावेळी एका महिला शेतकऱ्याला अश्रू अनावर, मध्यस्थ्यासाठी आलेल्या तहसीलदार किरण जमदाडे महिला शेतकऱ्याला धीर देत पुसले शेतकऱ्याचे अश्रू. महिला शेतकऱ्याला आईप्रमाणे जवळ घेणाऱ्या आणि डोळे पुसतानाचा तहसीलदारांचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. एक तासांच्या आंदोलनानंतर प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर झाडावरचे आंदोलन अखेर मागे. प्रशासकीय अधिकाऱ्याने महिला शेतकऱ्याला जवळ घेत अश्रू पुसताच इतर शेतकरीही झाले भावुक.0
0
Report
Advertisement
रातभर चली किसान आंदोलन: चिखली महावितरण सबस्टेशन पर अनियमित बिजली आपूर्ति से किसानों का संघर्ष
Washim, Maharashtra:वाशीम: वाशिमच्या रिसोड तालुक्यातील चिखली महावितरण सबस्टेशनवर संतप्त शेतकऱ्यांनी रात्री उशिरापर्यंत मुक्काम आंदोलन केलं.पावसाने दडी मारल्याने सोयाबीनसह खरीप पिके वाळण्याच्या मार्गावर असताना, महावितरणच्या अनियमित वीजपुरवठ्यामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.वारंवार वीजखंडित होणे, अनियमित लोडशेडिंग आणि जळालेले ट्रान्सफॉर्मर वेळेत न बदलल्याचा आरोप करत घोटा, चिखली, व्याड आणि कवठा परिसरातील शेतकऱ्यांनी क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं.दरम्यान, रात्री दोन वाजता महावितरणचे अधिकारी अंजनकर यांनी आंदोलनस्थळी भेट देत शेतकऱ्यांशी चर्चा केली.0
0
Report
कोल्हापुर में दो दिन पानी आपूर्ति बंद, कई क्षेत्रों में जल संकट
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर शहरात आजपासून दोन दिवस अनेक भागात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. कोल्हापूर शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या बालिंगा ते चंबुखडी या मार्गावरील 700 मीटर व्यासाच्या पाईपलाईनचे गळती काढली जाणार असल्याने हा पाणीपुरवठा बंद असणार आहे. शहरातील ए व बी वॉर्डसह संलग्न उपनगरे, ग्रामीण भाग, लक्ष देत वसाहत यासह शहरातील अनेक भाग आणि पेठांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. त्यामुळे नागरिकांनी उपलब्ध असणारे पाणी काटकसरीने वापरावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेने केले आहे.0
0
Report
सोलापूर में दुष्काळ घोषित कराने के लिए वंचित बहुजन आघाडी का अल्टीमेटम
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग : सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आमदार खासदारांना ईशारा - सोलापूर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावा यासाठी वंचित बहुजन आघाडीचा आमदार खासदारांना ईशारा - लवकरात लवकर जिल्ह्यात दुष्काळ जाहीर न केल्यास आमदार-खासदार यांच्या घरासमोर जनावरांचा गोठा उभा करणार - वंचित बहुजन आघाडी शहर आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांकडून जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत निवेदन देण्यात आले. - गेल्या तीन महिन्यापासून सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस पडल्यामुळे शेती पिके करपू लागली आहेत. - शेतकऱ्यांना जनावरे जगवणे अवघड झाले असून तात्काळ दुष्काळ जाहीर करावा - जिल्ह्यातील ग्रामीण भागात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचीही वंचित बहुजन आघाडीची मागणी..0
0
Report
Advertisement
तीसरी राष्ट्रीय लोक अदालत 12 सितम्बर को भंडारा में आयोजित
Bhandara, Maharashtra:12 सप्टेंबरला तिसरी राष्ट्रीय लोक अदालत... एन.आय. ॲक्टसह मोटार अपघात, दिवाणी आणि कामगार कायद्यांतील प्रकरणांचा होणार निपटारा... नागरिकांनी लोक अदालतीचा लाभ घेण्याचे विधी सेवा प्राधिकरणाचे आवाहन...0
0
Report
नागपुर में शोभायात्रा के दौरान ध्वनि प्रदुषण पर पहली बार तीन अलग मामलों में FIR दर्ज
Nagpur, Maharashtra:नागपुर में DJ आवाज पहिला गुन्हा दाखल... विश्व हिंदू परिषदेच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्यानं सितांबर्डी पोलिसात गुन्हा दाखल तर इतर दोन वेगवेगळ्या कारवाईत एकूण तीन गुन्हे दाखल करण्यात आले... नागपूर शहरात डीजे आणि विविध साऊंड सिस्टिमवर बंदी असतानाही विहिंपच्या शोभायात्रेत ध्वनिप्रदूषण झाल्याचा प्रकार समोर आलाय विश्व हिंदू परिषदेच्या स्थापनादिना निमित्त रविवारी शहरात शोभायात्रा काढण्यात आली होती. या शोभायात्रेत निर्धारित मर्यादेपेक्षा अधिक आवाजात डॉल्बी वाजवण्यात आल्याचे पोलिसांच्या तपासणीत आढळले. सीताबर्डी पोलिसांनी या प्रकरणात तीन स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. पहिल्या कारवाईत वाहनावरील साऊंड सिस्टिम तब्बल ९८.६ डेसिबल आवाजात वाजत असल्याचे आढळले. याप्रकरणी महाल येथील सागर मोरेश्वर बारसिंगे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसऱ्या कारवाई साऊंड सिस्टिमच्या आवाज १०१.५ डेसिबल असल्याचे तपासणीत समोर आले. या ठिकाणी लेझर बीमचाही वापर करण्यात आल्याने अजय सोमकुंवर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिसऱ्या कारवाईत पकोडे गल्ली परिसरात साऊंड सिस्टिम ९४.७ डेसिबल आवाजात वाजवण्यात येत असल्याचे आढळले. या ठिकाणीही लेझर बीमचा वापर करण्यात आल्याने अज्ञात चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस आयुक्तांनी डीजे, डॉल्बी, प्लाझ्मा आणि प्रेशर मिड साऊंड सिस्टिमच्या वापरावर बंदी घातली आहे. बीम लाईट आणि लेझर बीम लाईटच्या वापरावरही पोलिसांनी निर्बंध लागू केले आहेत. बंदीनंतर नागपूर शहरात ध्वनिप्रदूषणप्रकरणी झालेली ही पहिलीच कारवाई असल्याची माहिती समोर आली आहे.0
0
Report
सातारा कॉलेज हॉस्टेल की छात्रा ने आत्महत्या; न्याय के लिए मशाल मार्च
Satara, Maharashtra:अँकर: साताऱ्याच्या यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सच्या वस्तीगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून १८ वर्षीय सृष्टी बिरामणे या विद्यार्थिनीने आत्महत्या केली होती. वस्तीगृह समितिच्या त्रासाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप असून, या प्रकरणी वसतिगृहाच्या रेक्टर, प्राचार्यांसह समितीवर गुन्हा दाखल करण्यात आला है. सृष्टीला लवकरात लवकर न्याय मिळावा आणि सर्व दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई व्हावी, यासाठी आज सातारा शहरात तीव्र निदर्शने करत मशाल मार्च काढण्यात आला. या मार्चमध्ये हॉस्टेलमधील विद्यार्थिनींसह अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेचा आणि मानसिक आरोग्याचा प्रश्न या निमित्ताने पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर: दक्षिणमूर्त गणेशोत्सव मंडळ में गणपति का भव्य आगमन, भक्तों की भीड़
Nagpur, Maharashtra:नागपूर नागपूरच्या ऐतिहासिक आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या 'दक्षिणमूर्ती गणेशोत्सव मंडळा' गणरायाचे वाजत गाजत आगमन झाले.अत्यंत भव्य आणि उत्साही वातावरणात श्रीगणेशाची मूर्ती स्थापनेसाठी मंडपात आणण्यात आली. यावेळी हजारो गणेशभक्त उपस्थित होते.. आकर्षक रोषणाई आणि सजावट यावेळी करण्यात झाली होती0
0
Report
हिंगोली के सेनगाव में धनगर समुदाय के लिए एसटी आरक्षण की तात्कालिक मांग
Hingoli, Maharashtra:अँकर -शासनाने धनगर समाजाच्या अनुसूचित जमाती अर्थात एसटी आरक्षणाची अंमलबजावणी करावी, या मागणीसाठी हिंगोलीच्या सेनगाव शहरात धनगर समाज बांधवांच्या वतीने तहसील कार्यालयावर आंदोलन करण्यात आले. यावेळी शासनाने धनगर समाजाच्या एसटी आरक्षणाची तातडीने अंमलबजावणी करावी, अशी मागणी आंदोलकांनी केली. तसेच मागणी मान्य न झाल्यास आगामी काळात आंदोलन तीव्र करण्याचा इशारा धनगर समाज बांधवांच्या वतीने देण्यात आला आहे0
0
Report
नागपुर से समृद्धि महामार्ग पर ट्रक में आग; चालक सुरक्षित
Nagpur, Maharashtra:नागपूर पासून सुरू होणाऱ्या समृद्धी महामार्ग एंट्रन्स समृद्धी महामार्गावरील पेट्रोल पंपाजवळ सोमवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास मालवाहू ट्रकला अचानक आग लागल्याची घटना घडली. त्यामुळे एकच खळबळ उडाली.. या आगीत ट्रक जळून खाक झाला. छत्तीसगड येथून मुंबईच्या दिशेने जात होता. चालक मोहसीन मन्सूर अन्सारी (वय ३०, रा. कलेपाट, ता. सेना, जि. लोहरदगा, झारखंड) हे विश्रांती व डिझेल भरण्यासाठी ट्रक थांबवून होते. याचवेळी ट्रकला आग लागली. काही वेळातच आगीने संपूर्ण ट्रकला वेढले.वायफळ टोल नाक्यावरील अग्निशमन वाहनाने आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र आग आटोक्यात न आल्याने एमआयडीसी बोरी तसेच मिहान येथील अग्निशमन पथकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आले. र शर्थीचे प्रयत्न करून ट्रकची आग आटोक्यात आणली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी अथवा दुखापत झाली नाही.0
0
Report
Advertisement
बीड में आंदोलन: उद्धव के निशाने पर सरकार, शिंदे-फडणवीस का साथ
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत. विषय: 'तुमसे ना हो पायेगा...' आंदोलन बीड़मध्ये होणारे आजचे आंदोलन म्हणजे उबाठाची स्टंटबाजी आहे. उद्धवजी, 'तुमसे ना हो पाया'... इसलिये जनता ने हमे चुना और हमने करके दिखाया... दुष्काळाच्या काळात मराठवाड्यातील शेतकरी हवालदिल असताना तुम्ही घराबाहेर पडला नाहीत. अडीच वर्षे घरात बसून राहिलात मंत्रालयात गेला नाहीत. तुम्ही अनेक योजना बंद केल्यात आम्ही सत्तेत आल्याबरोबर अनेक योजना सुरू केल्या. एकनाथ शिंदे जी और देवेंद्र फडणवीस जी से हर अच्छी चीज हो पायेगी... ऐसी कोई योजना नही जो इन दोनो से ना हो पायेगी...0
0
Report
जेरबंद वाघिणी इलाज के दौरान मर गई; मौत का कारण अस्पष्ट
Amravati, Maharashtra:वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू; मृत्यूचे कारण अस्पष्ट, शवविच्छेदन अहवालाची प्रतिक्षा अमरावती जिल्ह्यातील तीन नागरिकांचा बळी घेणाऱ्या नरभक्षक वाघिणीने अमरावतीच्या चांदूर बाजार तालुक्यात मोठी दहशत निर्माण केली होती. त्यामुळे या नरभक्षक वाघिणीला पकडण्यासाठी वनविभागाचे वेगवेगळे पथक तैनात करण्यात आले होते. अखेर या वाघिणीला पकडण्यात वनविभागाला यश आले होते मात्र वनविभागाने जेरबंद केलेल्या वाघिणीचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. वाघिणीला बेशुद्ध करून जेरबंद केल्यानंतर तिच्यावर उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान या वाघिणीचा मृत्यू झाला आहे. वाघिणीच्या मृत्यूचे कारण अद्याप अस्पष्ट असून वाघिणीचे शवविच्छेदन केल्यानंतर मृत्यूचे कारण समोर येणार आहे. दरम्यान 20 दिवसांमध्ये या वाघिणीने अमरावती आणि वर्धा जिल्ह्यात चार जणांचा बळी घेतला असून अमरावतीच्या चांदूर बाजार येथील शिरजगाव कसबा येथे वाघिणीला गुंगीचं औषध देऊन बेशुद्ध करून जेरबंद करण्यात आले होते. ही वाघीण अडीच वर्षांची होती मात्र ही वाघीण बेशुद्ध पडल्यानंतर तिला पुन्हा होश न आल्याने तिचा मृत्यू झाला आहे.0
0
Report
अकोला के शिवपूर में बारिश ने पानी भरा, किसान फसल को लेकर अभी भी चिंता
Akola, Maharashtra:सलग दीड महिन्याच्या विश्रांतीनंतर श्रावण महिन्याच्या शेवटच्या सोमवारी वरुणराजाने अकोला जिल्ह्यात काही भागांत हजेरी लावली. अकोट तालुक्यातील शिवपूर गावात तब्बल तीन आठवड्यांच्या प्रतीक्षेनंतर आज दुपारी पावसाने हजेरी लावल्याने परिसरात ठिकठिकाणी पाणी साचले आणि वातावरण जलमय झाले. दीर्घ प्रतीक्षेनंतर झालेल्या पावसामुळे नागरिकांना काहीसा दिलासा मिळाला असला, तरी शेतकऱ्यांची चिंता मात्र कायम आहे. पिकांना सध्या आवश्यक असलेला पुरेसा पाऊस अद्याप झालेला नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आभाळाकडे लागल्या आहेत. आज झालेला पाऊस शेतीसाठी कितपत फायदेशीर ठरतो, तसेच आगामी काळात पावसाची स्थिती कशी राहते, याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. पावसाची संततधार सुरू राहून पिकांना आवश्यक पाणी मिळावे, अशी अपेक्षा शेतकरी व्यक्त करत आहेत.0
0
Report
Advertisement
