Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Yavatmal445001

काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!

Oct 07, 2024 07:22:21
Yavatmal, Maharashtra

काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.

3
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Nov 25, 2025 03:16:35
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 03:16:16
Nashik, Maharashtra:मांस विक्रेत्यांकडे ३८७ वराह आढळल्यानंतर वराहपालक मांस विक्रेत्यांना महापालिका प्रशासनाकडून नोटीसा अँकर नाशिक च्या विल्होळी परिसरात आफ्रिकन स्वाईन फिवर' चे वराह आढळून आल्याने त्या पार्श्वभूमीवर महापालिकेच्या आरोग्य विभागाच्या वतीने सर्वेक्षण करण्यात आले... यामध्ये २२ वराहपालक, मांस विक्रेत्यांकडे ३८७ वराह आढळले. विल्होळी येथील महापालिकेच्या खत प्रकल्प परिसरात शरण अॅनिमल रेस्क्यू सेंटरमध्ये आफ्रिकन स्वाइन फ्लूमुळे तीन वराह मृत्यमुखी पडल्याची घटना घडली होती. यानंतर पशुसंवर्धन विभागाच्या वतीने एक किलोमीटरचा परिसर सील करण्यात आला. यानंतर याबाबत भोपाळ (मध्यप्रदेश) येथील प्रयोगशाळेत नमुने पाठविल्यानंतर मृत वराह बाधित असल्याचा अहवाल प्राप्त झाला. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयाने दहा किलोमीटर परिसरातील तपासणी करण्याच्या सूचना जिल्हा पशुसंवर्धन विभागाला दिल्या. या सूचनेनंतर महापालिकेच्या स्वतंत्र पथकांमार्फत सर्वेक्षण करण्यात आले.शहरात २२ वराह पालक व मांस विक्रेत्यांकडे ३८७ वराह आढळले. सदरचे वराह आजारी नसल्याचे प्रथमदर्शनी आढळले. तरी सर्व वराह पालक व मांस विक्रेत्यांना महापालिकेने नोटीस बजावून आफ्रिकन स्वाईन फ्लूची माहिती दिलीये. वराहमध्ये आजाराची लक्ष आढळल्यास पशुसंवर्धन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलाय...
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 25, 2025 03:15:29
Manchar, Maharashtra:Anc: माजी मंत्री आमदार दिलीप वळवे पाटलांच्या मंचर नगरपंचायत मध्ये महायुतीत बिघाडी झाली असून वळसे पाटलांच्या राष्ट्रवादीसोबत भाजपचा एक गट गेलाय तर भाजपचा एक नाराज गट स्वतंत्रनिवडणुकीला सामोरे जातोय भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष संजय थोरात यांनी नाराजी व्यक्त करत प्राची थोरात यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिलीय तर वळसे पाटलांनी राष्ट्रवादीला या ठिकाणी संधी द्या निधी चा पुर आणू असं भर सभेत विधान केल्या नंतर याला प्रत्युत्तर देताना थोरात यांनी 35 वर्ष तुम्हाला जनतेने संधी दिली एवढ्या वर्षात मग काय केलं ? असा सवाल वळसे पाटलांना केलाय.. Byte: संजय थोरात (भाजप नेते) प्रतिनिधी हेमंत चापुडे झी मिडीया मंचर पुणे...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 03:15:12
Nagpur, Maharashtra:नागपूर नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर भाजपा आणि शिवसेनेत निर्माण झालेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री, शिवसेना नेते एकनाथ शिंदे आज पूर्व विदर्भात प्रचार दौऱ्यावर आहेत... पूर्व विदर्भ भाजपाचा बालेकिल्ला मानला जातो. विदर्भातील गोंदिया,भंडारा,च नागपूर आणि चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या जाहीर प्रचार सभा होणार आहेत.. त्यांची पहिली सभा गोंदिया येथे होणार आहे.. त्यानंतर भंडारा येथे ते जाणार. भंडारा येथे शिंदे सेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांच्या पत्नी शिवसेनेच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहे. इथे भाजप विरुद्ध शिवसेना अशी लढत आहे... त्यानंतर पवनी आणि तिथून मग दुपारी तीनच्या सुमारास ते नागपूर जिल्ह्यातील उमरेड येथे भाजपामधून शिवसेनेत आलेल्या आणि निवडणूक मैदानात उतरणाऱ्या उमेदवाराच्या प्रचारार्थ जाहीर सभा घेणार आहे. दुपारी चार वाजता शिंदे चंद्रपूर मध्ये सभा घेतील.
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 03:02:31
Nashik, Maharashtra:बिबट्याला रेस्क्यू करण्यासाठी वनविभागाला हवेत जिल्ह्यासाठी ५०० पिंजरे. अँकर. बिबट्यांनी घातलेला धुमाकूळ पाहता, नाशिक जिल्ह्यातील चार तालुके आपत्तीग्रस्त म्हणून जाहीर होणार असून, बिबट्यांच्या हल्ल्यापासून संरक्षण व्हावे यासाठी वनविभागाला ५०० पिंजऱ्यांची आवश्यकता आहे. हे पिंजरे खरेदी करण्यासाठी ६ कोटी ५० लाख रुपयांची गरज आहे. याशिवाय, बिबट्यांच्या हालचालीवर नजर ठेवण्यासाठी एआय तंत्रज्ञानावर आधारित २० कॅमेरे आवश्यक असल्याचा प्रस्ताव वन विभागाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. १५ कोटी ८१ लाख रुपयांचा निधी यासाठी आवश्यक असून, तसा प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. जिल्ह्यात बिबट्यांचा वाढता वावर चिंताजनक ठरत असल्याने त्यावर उपाय करण्यासाठी आवश्यक असलेल्या बाबींचा आढावा घेतल्यानंतर वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची यादी जिल्हाधिकारी कार्यालयात निवासी उपजिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली. बचाव पथक सुसज्ज करणे, अत्याधुनिक साधने खरेदी, पिंजरे, ड्रोन, कॅमेरा ट्रॅप्स, सुरक्षा साहित्य, एआय कॅमेरे, बेस कॅम्प आणि वायरलेस कंट्रोल रूम उभारणी यासाठी तब्बल १५ कोटी ८१ लाख १५ हजार २०० रुपयांची मागणी त्यात केलीये...
87
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 03:00:28
Nashik, Maharashtra:जिल्ह्यात पुरुष नसबंदी पंधरवडा अँकर नाशिकच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागाने २१ नोव्हेंबर ते ४ डिसेंबर या कालावधीत 'पुरुष नसबंदी पंधरवडा' आयोजित केला आहे. कुटुंब नियोजनाची जबाबदारी केवळ स्त्रियांवर न टाकता, त्यात पुरुषांचा सहभाग वाढवणे हा या मोहिमेचा मुख्य उद्देश आहे. 'स्वस्थ व आनंदी कुटुंबाचे स्वप्न, पुरुषांच्या सहभागातूनच साकार' हे घोषवाक्य आहे.. पुरुष नसबंदी ही अत्यंत प्रभावी, स्त्री नसबंदीपेक्षा सोपी, सुरक्षित आणि कमी गुंतागुंतीची पद्धत आहे. शस्त्रक्रियेनंतर काही तासांतच घरी जाता येते आणि यामुळे पुरुषांच्या लैंगिक क्षमतेवर कोणताही परिणाम होत नाही, असे जिल्हा माता व बाल संगोपन अधिकारी स्पष्ट केले. आशा व आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत योग्य जोडप्यांच्या याद्या तयार करून त्यांना प्रवृत्त करणे, गैरसमज दूर करण्यासाठी प्रचार करणे यासाठी २७ नोव्हेंबरपर्यंत संपर्क आठवडा व उपजिल्हा रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 'नो स्कालपेल व्हॅसेकटॉमी' सह पुरुष नसबंदी शस्त्रक्रियेची सेवा उपलब्ध करून देणे यासाठी २८ नोव्हेंबर ते ४ डिसेंबरपर्यंत सेवा आठवडा आयोजित केला आहे. नागरिकांनी, विशेषतः पुरुषांनी सक्रिय सहभागी होऊन जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेशी संपर्क साधण्याचे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे....
40
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 02:33:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगरातील जालना रोडवरील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये शहरातील एका महिलेने तब्बल सहा महिने बनावट कागदपत्रांच्या आधारे मुक्काम ठोकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सिडको पोलिसांनी संशयाच्या आधारे कारवाई करत खोलीची झडती घेतली असता महिलेच्या बॅगेत २०१७ च्या यूपीएससी निवड यादीची प्रत आढळली, ज्यात तिचे नाव ३३३ व्या क्रमांकावर होते. आधार कार्डवरही खाडाखोड केल्याचे स्पष्ट झाले. चौकशीत तिच्या खात्यात अफगाणистанातील बॉयफ्रेंड अशरफ खलील व पाकिस्तानातील त्याचा भाऊ आवेद यांच्या खात्यांतून मोठ्या रकमा आल्यााचे समोर आले. दोघांचे पासपोर्ट, व्हिसा आणि भारतात येण्याच्या अर्जाचे फोटोही तिच्या मोबाइलमध्ये आढळले. संपूर्ण प्रकरण अत्यंत संशयास्पद ठरल्याने एटीएस व आयबीकडून महिलेची कसून चौकशी सुरू आहे。
152
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 25, 2025 02:31:55
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग – अनगर नगरपंचायत निवडणुकी संदर्भात आज सुनावणी. नगरपंचायत निवडणुकी संदर्भात सुनावणी होणार. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात केले आहे अपील. उज्वला थिटे यांचा सुचकाची सही नसल्याने अर्ज झाला होता बाद, त्यानंतर अनगर निवडणूक झाली होती बिनविरोध. नगरपंचायत निवडणूक बिनविरोध ही बेकायदेशीर असून प्रशासनावर माजी आमदार राजन पाटील यांनी माझा अर्ज बाद केला असा आरोप उज्वला थिटे यांनी केला होता. या प्रकरणावर सध्या सोलापूरच्या जिल्हा व सत्र न्यायालयात सुनावणी सुरु झाली असून निवडणूक अधिकारी, नूतन नगराध्यक्ष आणि आक्षेप घेणाऱ्या अपक्ष उमेदवार सरस्वती शिंदे यांना आज न्यायालयात शपथ पत्र दाखल करून आपलं म्हणणं सादर करावं लागणार... 3 डिसेंबरला नगरपंचायत निवडणुकीचा निकास लागल्याशिवाय निवडणूक अधिकारी बिनविरोध नगरपंचायत घोषित करावयाचं नाही. उज्वला थिटेचें वकील ऍड दत्ता घोडके यांची माहिती. त्यामुळे सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात या बहुचर्चित प्रकरणाचा काय निकाल लागतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
133
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 25, 2025 02:30:21
181
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 25, 2025 02:01:42
Bhandara, Maharashtra:भंडारा जिल्ह्यात निवडणुकीचा पारा दिवसेंदिवस चढत आहे. जिल्ह्यात मित्र पक्षच एक दुसऱ्यावर टिकास्त्र सोडताना दिसत आहे. भाजपाने तिकिट नाकारल्याने डॉक्टर विजया नंदुरकर यांनी हाताला घडी बांधली आहे... पवनी नगर परिषद निवडणुकीत डॉक्टर विजया नंदुरकर यांना भाजपाने तिकिट देणार असल्याचं सांगून दुसऱ्याला तिकिट दिली. म्हणून विजया नंदुरकर यांनी कमळाची साथ सोडत हातावर घडी बांधली आहे... मतदार संघात जनतेनी कंत्राटदार निवडून देण्यापेक्षा जन सामान्य लोकांचे प्रश्न सोडविणारा नेता निवडणून दिला पाहिजे. जेणेकरून लोकांचे प्रश्न सुटतील असे मत राष्ट्रवादीच्या उमेदवार नंदुरकर यांनी व्यक्त केला आहे... तर दुसरीकडे आधी सत्ता असणाऱ्या लोकांनी पवनी शहराचा विकास होऊ दिला नाही म्हणून आता शिवसेनेला एकदा संधी दिली तर नक्कीच पवनी शहराचा कायापालट होणार असल्याचं मत शिवसेनेनं व्यक्त केलं आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुती मध्येच एक दुसऱ्यावर हल्लाबोल सुरू आहे. पवनी शहरात महायुतीच्या तिन्ही पक्षातच तिरंगी लढत पहायला मिळत आहे... त्यामुळे या निवडणुकीत कोणाचा विजय होतो ते पाहण्यासारख असेल...
200
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 02:01:25
219
comment0
Report
Advertisement
Back to top