445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पनवेल पुलिस ने करंजाडे रेलवे प्रोजेक्ट से 1.5 करोड़ रुपये के स्टील चोरी के तीनों को गिरफ्तार किया
Navi Mumbai, Maharashtra:पनवेल पोलिसांनी करंजाडे येथील रेल्वे प्रकल्पातून 1.5 कोटी रुपयांचे स्टील चोरी केल्याप्रकरणी तिघांना अटक केली असून संपूर्ण मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. करंजाडे येथील सुरू असलेल्या रेल्वे पुलाच्या कामाच्या ठिकाणाहून सुमारे दीड कोटी रुपयांचे 67 टन स्टील चोरीला गेले होते. तपासादरम्यान हायड्रा क्रेनच्या सहाय्याने स्टील उचलून वाहतूक केल्याचे उघड झाल्यानंतर तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे गुन्हे शाखेने क्रेनच्या हालचालींचा माग काढत चालकाची चौकशी केली असता चोरीचा माल धानसर परिसरात ठेवल्याचे समोर आले. पोलिसांनी तात्काळ छापा टाकून सर्व स्टील जप्त केले. चोरी केल्याप्रकरणी पनवेल पोलिसांनी साइट मॅनेजर विजयकुमार वर्मा, स्क्रॅप व्यावसायिक अजीजुल रहमान आणि मजूर परवेज आलाव यांना अटक केलेय.0
0
Report
घर की मुश्किलों के बावजूद स्वरा खातू दहावी में 98.20% से टॉप
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिद्द और मेहनतीचे 'स्वरा'क्षर!.. घरची परिस्थिती बेताची, तरीही क्लासेसशिवाय स्वरा खातूची दहावीत उत्तुंग भरारी.. अँकर जिद्द, चिकाटी आणि कष्टाच्या जोरावर आभाळाला गवसणी घालता येते, हे पुन्हा एकदा सिद्ध झालेय. रत्नागिरीच्या चिपळूणच्या सावर्डे मध्ये एका सामान्य कुटुंबातील कन्येने यशाचं असं शिखर गाठलंय, ज्याची चर्चा आता संपूर्ण जिल्ह्यात होत आहे. कोणतंही महागडं ट्युशन नाही की अवाढव्य फी... तरीही दहावीच्या निकालात या मुलीने बाजी मारली आहे. चिपळूण तालुक्यातील सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या गोविंदराव निकम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी स्वरा महेश खातू हिने दहावीच्या परीक्षेत तब्बल ९८.२० टक्के गुण मिळवून विद्यालयात प्रथम क्रमांक पटकावला आहे. स्वराचे वडील महेश खातू हे व्यवसायाने पेंटर आहेत. घरची आर्थिक परिस्थिती तशी बेताचीच, मात्र स्वराने आपल्या परिस्थितीचे भांडवल न करता अभ्यासावर लक्ष केंद्रित केले. विशेष म्हणजे, आजच्या स्पर्धेच्या युगात जिथे विद्यार्थी हजारो रुपयांचे खाजगी क्लासेस लावतात, तिथे स्वराने एकही जादा क्लास न लावता केवळ स्वतःच्या मेहनतीवर आणि शालेय शिक्षकांच्या मार्गदर्शनावर हे यश संपादन केले आहे. स्वराच्या या यशामुळे तिचे आणि तिच्या कुटुंबाचे सर्व स्तरांतून कौतुक होत असून, "पेंटरच्या मुलीने यशाचे रंग उधळले" अशीच भावना सर्वत्र व्यक्त होत आहे. रत्नागिरीच्या या लेकीने आपल्या कष्टाने हे सिद्ध केलंय की, यश सोयीसुविधांवर नाही तर केवळ आत्मविश्वासावर अवलंबून असतं..0
0
Report
अकोला के भारत विद्यालय ने दहावी में 100% परिणाम, खुशी का माहौल
Akola, Maharashtra:Anchor : राज्यात दहावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून अनेक शाळांनी शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे. अकोल्यातील भारत विद्यालयानेही यंदा शंभर टक्के निकालाची उज्वल परंपरा कायम ठेवत यशाचा झेंडा फडकावला आहे. निकाल जाहीर झाल्या शाळा परिसरात विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. ढोल-ताशांच्या गजरात विद्यार्थिनींसह शिक्षकांनीही आनंद साजरा करत ठेका धरला. अकोल्यातील भारत विद्यालयातील यंदाच्या दहावीच्या परीक्षेत सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून शाळेचा निकाल शंभर टक्के लागला आहे. निकालानंतर विद्यार्थ्यांनी एकमेकांना मिठाई भरवत आनंद व्यक्त केला. शिक्षकांनीही विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. गेल्या अनेक वर्षांपासून उत्कृष्ट निकालाची परंपरा कायम ठेवणाऱ्या भारत विद्यालयाच्या यशामुळे पालकांमध्येही समाधानाचे वातावरण पाहायला मिळाले.0
0
Report
Advertisement
नागपुर के युवाओं में एलएसडी ड्रग्स का डर बढ़ा, पुलिस ने कड़ा कदम उठाया
Nagpur, Maharashtra:नागपुरात तरुणाईला 'एलएसडी' ड्रग्जचा धोका वाढतोय ...ब्रेन स्टीम्युलेट आणि फोकस वाढत असल्याच्या चुकीच्या धारणाेंतून तरुणाई या टिकळ्या ड्रग्सकडे वळताना दिसत आहे...... नागपूर पोलिसांनी या धोकादायक ड्रग्स पासून तरुणाईला रोखण्यासाठी शाळा महावিদ्यालयांवर विशेष लक्ष केंद्रित केले आहे आणि महत्त्वाच्या सूचनाही दिल्या आहेत.. नागपूर शहर पोलिसांनी गेल्याच महिन्यात दोन महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना एलएसडी ड्रग्जसह अटक केली होती. स्टिकर फॉरमॅट असलेल हे ड्रग्स बाळगणाऱ्यावर शहरात झालेली प्रथम कारवाई होती.. याप्रकरणी सखोल पोलिसांनी सुरु केल्यानंतर धक्कादायक माहिती पुढे येतेय .. एलएसडीमधील घातक नशा मेंदूवर थेट परिणाम करतो . आकाराने अतिशय छोटा असल्याने एलएसडी ड्रग्ज सहज लपवता येते. बाईट रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त (हा पॉईंटर बाईट वापरावा ) --- युवा मंडळी मुले किंवा मुली आम्हाला दिसताय -- हे drugs घेतल्याने मुलांना काही वेळासाठी आपण अधिक awake असल्याच वाटतं -- कॉन्सन्ट्रेशन वाढतं.. हे ड्रग्स मेंदूला सस्टीम्युलेट करते.... मेडिकल purpose करता करतो.. मात्र त्याचा harmful आहे -- ब्रेन damage होतो --जास्त फोकस होतो हीं चूकीची धारणा आहे -- काही मुलांना असं वाटतं है की हे ड्रग्स सेवन केल्यानंतर काही तासांसाठी अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन वाढते. काही तास अजिबात झोप येत नाही, केलेला अभ्यास लक्षात राहतो अश्या प्रकारची खोटी माहिती विद्यार्थ्यांमध्ये पसरवली जातं आहे. यासंदर्भात पोलिसांनी मानसोपचार तज्ञांची मते जाणून घेतली त्यावेळी त्यांनी सुद्धा हे अत्यंत चुकीचं असल्याचं मत नोंदवलले आहे या उलट एलएसडी ड्रग्सचा उपयोग शरीरासाठी हानिकारक ठरू शकतो, ---एलएसडी ड्रग्ज चा वापर विद्यार्थीांमध्ये, तरुणाईमध्ये वाढण्याची भीती आहे. त्यामुळे पोलिसांनी आत्तापासूनच उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील शाळा महाविद्यालयांना सूचना केलेल्या आहेत की विद्यार्थ्यांच्या वागण्या, बोलण्यात जर काही फरक जाणवत असेल तर तात्काळ पोलिसांना कळवा असे आवाहन केलेयं बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त vo2 --= LSD ड्रग्स सेवन करण्याची अतिशय वेगळी पद्धत दिसून आली आहे. स्टिकर स्वरूपातील एलएसडी ड्रग्स तस्करी केली जात आहे. ते स्टिकर जिभेवर ती ठेवल्याचेनंतर काही वेळानंतर हळूहळू शरीरात त्याचा प्रभाव दिसतो. इतर ड्रग्सच्या तुलनेत या एलएसडी ड्रग्स चा प्रभाव अधिक वेळ राहत असल्याने तरुणांमध्ये त्याचे चलन वाढण्याचा धोका आहे बाईट- रविंद्र सिंगल, पोलीस आयुक्त Final Vo -- कॉलेज युवकांमध्ये याचे प्रमाण वाढत असल्याची बाब अत्यंत चिंताजनक आहे. पोलिस आता एलएसडी ड्रग्स कुठून आले व कसे आले याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. झी २४ ताससाठी ब्युरो रिपोर्ट नागपूर0
0
Report
नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना; कार चालक घायल
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई के पाम बीच मार्ग ड्रिंक एंड ड्राइव से दुर्घटना। कार ने पिकअप टेम्पो को टक्कर दी। कार चालक शराब के नशे में था, जिससे वाहन नियंत्रण खो गया। कार चालक घायल, दोनों वाहनों को बड़ा नुकसान।0
0
Report
नाशिक TCS केस: फरार आरोपी निदा खान एक माह बाद गिरफ्तार
Shirdi, Maharashtra:नाशिक TCS प्रकरणातील फरार आरोपी निदा खान हिला एक महिन्यानंतर अटक झाली आहे.. नाशिक पोलिसांची विविध पथके तिचा शोध घेत होते, अखेर संभाजीनगरनगरमधून तिला ताब्यात घेण्यात आले.. तर दुसरीकडे शिर्डीतील जमीन व्यवहारात फसवणूक आणि अवैध सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरात एक महिना उलटूनही पोलिसांना सापडत नाहीये.. SIT सह अहिल्यानगर पोलिसांची पथके तिचा शोध घेत आहेत.. या प्रकरणात अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, खरातचे हस्तक अरविंद बावके, किरण सोनवणे आणि अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल आहे.. यातील बावके आणि सोनवणे हे दोन आरोपी आधीच गजाआड झालेत, तर अशोक खरात याला देखील शिर्डी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.. आज अशोक खरात आणि जमीन व्यवहारातील साक्षीदारांची समोरासमोर बसून चौकशी सुरू आहे.. या चौकशीतून काय खुलासे होतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.. तर शिर्डी पोलिसांनी चौकशी दरम्यान अशोक खरात याला कल्पना खरात कुठे आहे? असे विचारले असता, आपण 18 मार्चपासून पोलिसांच्या ताब्यात आहोत.. आपल्याकडे मोबाईल नाही तसेच बाहेरची माहिती मिळायला कुठलाही सोर्स नाही.. त्यामुळे मला कल्पना खरात बाबत माहिती नसल्याचे त्याने म्हटलंय.. त्यामुळे फरार कल्पना खरात हिचा शोध लागणार तरी कधी..? स्थानिक गुन्हे शाखा , शिर्डी पोलीस आणि SIT पोलिसांचे पथक नावालाच का..?असा प्रश्न उपस्थित होतोय.. याबाबत शिर्डी पोलीस ठाण्यासमोरून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...0
0
Report
Advertisement
बारामती में सुनेत्रा पवार के मुख्यमंत्री बनने के बैनर से उत्साह
Rui, Maharashtra:बारामतीत सुनेत्रा पवारांचे "होय मुख्यमंत्रीच" आशयाचे बॅनर..... Anchor _ बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या निकालानंतर शहरात उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचा "होय मुख्यमंत्रीच" अशा आशयाचा बॅनर झळकला आहे. महाराष्ट्राच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री म्हणून उभा महाराष्ट्र तुमच्याकडे पाहतोय प्रचंड मताधिक्याने निवडून आल्याबद्दल हार्दिक अभिनंदन असं या बॅनर वरती लिहिण्यात आला आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या वतीने हा बॅनर लावण्यात आला आहे.0
0
Report
नाले में क्रिकेट खेलते हुए मनसे ने कल्याण-डोंबिवली में नाला सफाई पर आंदोलन
Kalyan, Maharashtra:नाले सफाईबाबत मनसेचं अनोखं आंदोलन कल्याण पश्चिमेच्या स्टेशन परिसरातील जरीमरी नाल्यातील साचलेल्या कचऱ्यात चक्क क्रिकेट खेळत मनसेने अनोखं आंदोलन केलं. केडीएमसी प्रशासनाच्या नालेसफाईची पोलखोल करण्यासाठी मनसेने हे आंदोलन केलं. पावसाळ्यापूर्वी कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात अद्यापही नालेसफाई सुरू झालेली नाही. पॅनल नंबर ९ च्या मल्हार नगर परिसरातील गणेश नगर, जोशी बाग, जरी मरी त्याचबरोबर झुंजारराव मार्केट इथल्या नाल्यात मोठ्या प्रमाणात कचऱ्याचं साम्राज्य आहे. दरम्यान हि नाले सफाई वेळेवर न झाल्यास पूर परिस्थिती निर्माण होईल. शिवाय अनेक ठिकाणी नाले बंदिस्त करण्यात येणार आहेत, मग या बंदिस्त नाल्यात नालेसफाई कशी होईल अशा अनेक मुद्द्यांना घेऊन मनसेने हे आंदोलन केलं. ही नालेसफाई लवकर झाली नाही तर महापौरांच्या दालनात जाऊन कचरा टाकण्यात येईल अशा इशारा मनसेने दिला आहे.0
0
Report
शिक्षण मंत्री पंकज भोयर ने जनगणना और विज्ञान प्रदर्शनी के मोके पर निर्देश जारी किए
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - पंकज भोयर,राज्यमंत्री (शालेय शिक्षण/गृह) On शिक्षक जनगणना/SIR कार्य - राज्यात सध्या जनगणना, एसआयआर हे काम सुरू आहे आणि बीएलओ नियुक्तीच्या शिक्षकांची झाली आहे, त्यांच्याकडे प्रशिक्षणाचा काम शालेय शिक्षण विभागाकडून देण्यात आल होता - तापमान वाढलेला आहे, कामाचा ताण वाढला आहे, त्यामुळे सगळंच काम करणं शक्य नव्हतं त्यामुळे काही शिक्षक संघटना आमच्याकडे आल्या, त्यामुळे सूचना दिले आहेत जनगणना आणि एसआर च काम सुरू असल्याने प्रशिक्षणाचा काम पुढे ढकलण्यात यावं On शालेय विद्यार्थी नासा भेट - राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये शालेय शिक्षणाची,विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी यासाठी तालुका जिल्हास्तरावर बालविज्ञान प्रदर्शनीचा आयोजन करण्यात येतं, या विद्यार्थ्यांना अजून चांगला एक्सपोजर मिळावा, विज्ञानाची गोडी निर्माण व्हावी याकरिता जून 2025 मध्ये मुख्यमंत्र्यांना एक प्रस्ताव दिला होता - विद्यार्थी जिल्हा सायन्स सेंटर मध्ये भेटी देतील, इस्रो मध्ये भेट देतील आणि विज्ञानाचे अजून चांगले माहिती मिळावी यासाठी नासा येथील केंद्राला भेट देण्याची विनंती देण्याची विनंती मुख्यमंत्र्यांना केली होती - मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या निर्देशानुसार याचा शासन निर्णय निर्गमित झाला आहे - तालुका आणि जिल्हास्तरावर वर्धा जिल्ह्यातून सुरुवात केली, येणाऱ्या सत्रातील विद्यार्थी प्रदर्शनी राज्यस्तरावर होते त्यानंतर राज्यातील विद्यार्थी नासामध्ये जातील On NCRB आकडेवारी - - गुन्हे करणारे हे व्यक्ती विकृत असतात, यामध्ये सामाजिक सहभाग वाढवतो, सामाजिक जागृती झाली पाहिजे, पोलीस प्रशासन काम करतच आहे पण जोपर्यंत सामान्य नागरिकांनी सामाजिक संस्थाचा सहकार्य मिळणार नाही तोपर्यंत अशा प्रकारच्या घटना घालू शकणार नाही On सुनेत्रा पवार मुख्यमंत्री - - राजकारणात प्रत्येकाची इच्छा असते, एका पदावर जाण्याची आणि अपेक्षा बाळगणे चुकीचं नाही, कुठलेही स्पर्धा महायुतीत नाही ते नाही पक्षचे नेते एकत्रितपणे काम करत आहेत On ncrb आकडेवारी - - हे आकडेवारी सतत चेंज होत असते मात्र गुन्हेगारांवर सक्त कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत On विदर्भ शाळा चालू - - शाळांमध्ये प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांचा सिलॅबस कम्प्लीट झाला पाहिजे यासाठी हा टाइम टेबल राज्यस्तराचा करण्यात आलाय, परंतु त्या भागातील भौगोलिक परिस्थिती पाहून त्यानुसार निर्णय पुढील काळात घेण्यात येईल On निदा खान अटक - - अशा पद्धतीचे जबरदस्तीचे धर्मांतर होणे यासाठी कायदा पास केलेला आहे आणि त्यांच्यावर कारवाई देखील करणार आहोत, म्हणून अशा पद्धतीच्या चुकीच्या घटना होणे याच्यावर सप्तशती कारवाई करण्यात येईल On शालार्थ शिक्षक पगार - - यामध्ये दोन्ही गोष्टी महत्त्वाच्या आहेत, झालेला घोटाळा जे दोषी असतील त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्याच पद्धतीने ते निर्दोष आहेत त्यांचा पगार झाला पाहिजे, राज्य सरकार देखील याबाबतीत सकारात्मक आहेत, ज्यांचा दोष नाही त्यांचे पगार लवकर होतील - या संपूर्ण प्रकरणाचे सखोल चौकशी करण्याकरिता एसआयटीचा गठन करण्यात आला आहे, यासाठीचा अहवालानुसार दोषींवर कारवाई करण्यात येत आहे परंतु या शिक्षकांचा किंवा कर्मचाऱ्यांचा सहभाग नाही त्यांचे पगार नियमितपणे On आज दहावी निकाल - - दिवसेंदिवस स्पर्धा वाढल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये निराशा येते, पालकांना माझा आव्हान आहे अति महत्वकांशी अपेक्षा पाल्याकडून बाळगू नये, पाल्यांना समजून घेतलं पाहिजे आणि व्यवस्थित कौन्सिलिंग शिक्षकाने पालकांच्या माध्यमातून त्या ठिकाणी झाला पाहिजे On पुणे अत्याचार घटना - - अशा पद्धतीच्या घटना काही विकृत लोकांमुळे होतात, लोकांमध्ये जनजागृती निर्माण झाली पाहिजे, पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून जनजागृतीची मोहीम व्यापक झाली पाहिजे0
0
Report
Advertisement
विरार के नारंगी पुल का उद्घाटन, यातायात से राहत; श्रेय बंटवारे की राजनीति
Vasai-Virar, Maharashtra:विरार मध्ये रखडलेला नारिंगी उड्डाणपूल अखेर सुरू पालकमंत्री गणेश नाईक यांच्या हस्ते लोकार्पण भाजप, बवीआ च्या पदाधिकार , कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई रखडलेल्या पुलामुळे विरार शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडीत होत होती, अनेक तास वाहने पूर्व पश्चिम जोडणाऱ्या पुलावर अडकून पडायची मात्र नारंगी येथील नवीन पूल वाहतुकीसाठी खुला करण्यात अल्याने विरारकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे... या उद्घाटनावरील बहुजन विकास आघाडी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये श्रेय वादाची लढाई पाहायला मिळाली... नवीन पुलावरून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला आहे0
0
Report
लोणावळा स्कायवॉक परियोजना में सौ वर्षों पुराने पेड़ काटने का विरोध
Varsoli, Maharashtra:पर्यावरणप्रेमींकडून याचा तीव्र विरोध Anchor: सहयाद्रीच्या पर्वत रांगेत वसलेलं लोणावळा पर्यटन नगरीला निसर्गानं नैसर्गिक सुंदरता बहाल केली असून याच लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पादरम्यान कुमार चौक ते टायगर पॉईंट येथे सिमेंट काँक्रीट रस्त्याची कामे होणार आहेत. लोणावळ्यातील नंदनवन असलेल्या रायवूड येथील शेकडो वर्षापूर्वी ची झाडे तोडण्याचा मानस या प्रकल्पात आखला असून यासाठी पर्यावरणप्रेमी जागृत झाले आहेत. स्कायवॉक प्रकल्पाला विरोध नसून येथील झाडे तोडण्याला जोरदार विरोध होऊ लागलाय रस्ता रुंदीकरणाच्या नावाखालचे होणाऱ्या संभाव्य वृक्षतोडीविरोधात पर्यावरण प्रेमी राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आक्रमक झाली असून प्रशासनाच्या डोळ्यात अंजन घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे… हिरव्यागार लोणणावळ्यातील झाडे वाचवलीच पाहिजेत, असा ठाम पवित्रा घेत पर्यावरण रक्षणासाठी कडक भूमिका घेण्यात आली आहे. पर्यटननगरी लोणावळ्यातील स्कायवॉक प्रकल्पासाठी सुरू असलेल्या रस्ता रुंदीकरणामुळे मोठ्या प्रमाणात वृक्षतोड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. लोणावळा शहर ते टायगर पॉइंट दरम्यान सुरू असलेल्या सर्वेक्षणामुळे रायवुड परिसरातील हिरवळ धोक्यात येणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे शहराध्यक्ष नासिर शेख यांनी पीएमआरडीएला निवेदन देत पर्यावरण संरक्षण कायद्यांचे काटेकोर पालन करण्याची मागणी केली आहे. ट्री सर्व्हे रिपोर्ट, पर्यावरणीय परिणाम अहवाल (EIA) आणि सार्वजनिक सुनावणी घेणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. प्रकल्पाचे अलाइनमेंट बदलून शेकडो वर्षांपूर्वीची झाडे वाचवावीत, तसेच अपरिहार्य परिस्थितीत झाडतोड करावी लागल्यास 1:10 प्रमाणात वृक्षारोपण आणि ट्रान्सप्लांट करावे, अशी मागणी करण्यात आली आहे. अन्यथा या प्रकरणी कायदेशीर लढा उभारण्याचा इशाराही देण्यात आला आहे.0
0
Report
आंधी-तूफान से कांदा किसान की दर्दनाक मौत, नाशिक में दुख की लहर
Nashik, Maharashtra:कांदा वाचविण्याच्या धडपडीत शेतकऱ्याचा दुर्दैवी अंत... वादळी वाऱ्याने झाडाची फांदी कोसळली... नाशिकच्या बागलाण येथील अल्पभूधारक शेतकरी बापु जाधव यांचा जागीच मृत्यू बदलत्या वातावरणामुळे आधीच चिंतेत असलेल्या कांदा उत्पादक शेतकऱ्यावर काळाने घाला घातला. शेतातील उघड्यावर ठेवलेला कांदा झाकण्यासाठी, वाचवण्यासाठी दुचाकी वर धाव घेतलेल्या एका अल्पभूधारक शेतकऱ्याचा वादळामुळे झाडाची फांदी अंगावर पडून दुर्दैवी मृत्यू झाला. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील बिजोटे-आखतवाडे रस्त्यावर सदर घटना घडली असून यात बापु सखाराम जाधव (वय ६०) असे मृत शेतकऱ्याचे नाव असून त्यांच्या निधनाने परिसरात शोककळा पसरली आहे. संपूर्ण कुटुंबाचा उदरनिर्वाह ते करत असल्याने त्यांच कुटुंब आता उघड्यावर पडल आहे.0
0
Report
Advertisement
लोणावळा में पिता ने नाबालिग बेटी के साथ दुराचार, दीड वर्ष बाद मामला दर्ज
Varsoli, Maharashtra:लोणावळ्यात धक्कादायक घटना. जन्मदात्या पित्याकडून पोटच्या मुलीवर अत्याचार, दीड वर्षानंतर गुन्हा दाखल. पर्यटननगरी लोणावळ्यात नात्याला काळीमा फासणारी धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जन्मदात्या पित्यानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर दारूच्या नशेत अत्याचार केल्याची घटना समोर आली असून ही घटना ऑगस्ट २०२४ मध्ये घडली होती. याप्रकरणी आता तब्बल दीड वर्षानंतर लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा वर्ग करण्यात आला आहे. ऑगस्ट २०२४ मध्ये आरोपी पित्याने दारूच्या नशेत आपल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला होता. या घटनेमुळे पीडित मुलगी प्रचंड दहशतीखाली होती. सध्या तिचे वय १८ वर्षे पूर्ण झाले आहे, मात्र या घटनेची भीती अद्यापही तिच्या मनात कायम होती. अखेर तिने धाडस करून या कृत्याबाबत वाचा फोडण्याचे ठरवले. पीडितेने सुरुवातीला ३ मे २०२६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे या प्रकरणाची फिर्याद दिली होती. मात्र, घटनेचे ठिकाण लोणावळा असल्याने हा गुन्हा शून्य क्रमांकाने नोंदवून पुढील तपासासाठी लोणावळा ग्रामीण पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या संतापजनक घटनेमुळे लोणावळा परिसरात खळबळ उडाली असून, लोणावळा ग्रामीण पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.0
0
Report
Indorikar Maharaj’s daughter’s wedding: thieves loot jewelry, two arrested
Shirdi, Maharashtra:प्रसिद्ध कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीच्या विवाह सोहळ्यात चोरट्यांनी दागिन्यांवर डल्ला मारल्याची माहिती समोर आली आहे.. पोलिसांनी 2 लाख 90 हजार रुपयांच्या मुद्देमालासह दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.. कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या मुलीचा विवाह सोहळा 3 मे रोजी संगमनेर तालुक्यातील गुंजाळवाडी येथे मोठ्या थाटामाटात पार पडला.. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अनेक राजकीय नेत्यांसह राज्यभरातून आलेलेल्या हजारो लोकांनी या विवाह सोहळ्यास उपस्थिती लावली.. मोठा पोलिस बंदोबस्त तैनात असतानाही गर्दीचा फायदा उचलत चोरट्यांनी विवाह सोहळ्यात हात साफ केला.. उपस्थितांमधील एकाचे 60 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने चोरी गेल्याने त्याने संगमनेर शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.. चोरी केलेल्या सोन्याची वाटणी करण्यासाठी दोन जण मोटार सायकलवर राहाता तालुक्यातील ममदापुर फाटा येथे येणार असल्याची माहित स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.. पथकाने सापळा लावून दोन्ही आरोपींना ताब्यात घेत, त्यांच्या कडून दिड लाख रुपये किमतीचे साडेअकरा ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने, दुचाकी, मोबाईल असा 2 लाख 90 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय.. सागर सुरेश कांबळे आणि अब्दुल इब्राहिम पिंजारी अशी आरोपींची नावे असून, साथीदारांसह गुन्हा केल्याची कबुली त्यांनी दिली आहे.. सर्व आरोपी हे श्रीरामपूर शहरातील रहिवाशी असल्याचे पोलिस तपासात समोर आलंय.. पोलिस या चोरीच्या घटनेचा अधिकचा तपास करत असून आरोपींकडून चोरीच्या इतर काही गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता आहे..0
0
Report
नांदेड में सड़क सुरक्षा अभियान: हेल्मेट-सीट बेल्ट पर इनाम, नियम पालन का आह्वान
Nanded-Waghala, Maharashtra:Anchor - रस्ता सुरक्षा जनजागृतीसाठी नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरत वाहनधारकांना प्रोत्साहन दिले. जे वाहनधारक हेल्मेट वापरताहेत आणि सीट बेल्ट लावताहेत अश्या वाहधराकांना थांबवून त्यांना जिल्हाधिकारीांनी गिफ्ट दिले. अपघातातमध्ये मृत्यु होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. दुचाकी अपघातात अनेकांचा जीव जातो. चार चाकी वाहनांमध्ये सीट बेल्ट न लावल्याने अनेकाचे बळी जातात. वाहनधारकांना या नियमांची जाणीव व्हावी यासाठी नांदेडमध्ये रोड सेफटी मोहीम चालवली जात आहे. या अंतर्गत शाळा महाविद्यालयात जनजागृती केली जात आहे. याचाच एक भाग म्हणून जिल्हाधिकाऱ्यांनी नांदेड शहरातील आय टी आय चौकात वाहनधारकांमध्ये जनजागृती केली. दुचाकीवर हेल्मेट लावणाऱ्या वाहनधारकांना थांबवून त्यांना गिफ्ट देण्यात आले. जे वाहनधारक कारमध्ये सीट बेल्ट लावलेले आढळले अश्या वाहणधारकांना थांबवून त्यांनाही जिल्हाधिकारीांच्या हस्ते गिफ्ट देण्यात आले. वाहणधारकांनी हे छोटे छोटे नियम पाळल्यास जीवितहानी कमी होईल त्यामुळे सर्वानी नियम पाळण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राहुल कर्डीले यांनी केले. Byte - राहुल कर्डीले - जिल्हाधिकारी0
0
Report
Advertisement
