icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उद्धव ठाकरे के दौरे से शिर्डी सीट पर वार, वाकचौरे के विरोध में विपक्ष

Shirdi, Maharashtra:एकीकडे फुटलेल्या सहा खासदारांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरेंनी दौरा सुरू केला असून, 29 जून रोजी ते खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या शिर्डी मतदारसंघात सभा घेणार आहेत.. तर दुसरीकडे वंचित बहुजन आघाडीने देखील शिर्डीत वाकचौरे यांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.. वाकचौरे यांनी मतदारांचा केलेला विश्वासघात, 2024 च्या निवडणुकीत मांडलेला जाहीरनामा आणि दोन वर्षातील निष्क्रियता हे मुद्दे घेऊन पुन्हा जनतेत जाणार असल्याचं राज्य प्रवक्त्या उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय.. महाविकास आघाडीने उमेदवारी डावलल्याने उत्कर्षा रुपवते यांनी वंचितच्या माध्यमातून 2024 ला वाकचौरे यांच्या विरोधात लोकसभा निवडणुक लढवली होती.. उत्कर्षा रुपवते यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांच्यावर घणाघाती टीका करत, महाविकास आघाडीतील नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत.. वाकचौरे यांच्यावर विश्वास ठेवू नका, हे निवडणुकीपूर्वी मविआच्या नेत्यांची भेट घेऊन सांगितले होते.. निवडणुकीच्या वेळी वाकचौरे यांनी जाहीरनामा प्रसिद्ध करत आश्वासन दिलेल्या चाळीस मुद्यांच्या बाबत त्यांची निष्क्रियता दिसून आली.. सात वेळा पक्ष बदलणाऱ्या वाकचौरेंनी निवडणुकीत जनतेला विकास कामांचे आश्वासन देण्याऐवजी पक्षांतर न करण्याचे वचन दिले पाहिजे, असा टोला रूपवते यांनी लगावलाय.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या, वंचित बहुजन आघाडी वंचित बहुजन आघाडी हीच खऱ्या अर्थाने मुख्य विरोधकाची भूमिका बजावत आहे.. वाकचौरे निवडून आले तरी तुमचे कधीच होणार नाहीत, हे शिवसैनिकांसह मी देखील उद्धव ठाकरेंना सांगितले होते.. तरी त्यांना उमेदवारी दिली गेली, त्यामुळे आता ठाकरेंनी, वाकचौरेंच्या मतदारसंघात दौरा करून काहीही फायदा होणार नाही.. त्यांच्या मुलाला मुंबई मेट्रोच्या कामात शंभर कोटींहून अधिकचे टेंडर मिळाल्याच्या चर्चा आहेत.. वैयक्तिक फायद्यासाठी वाकचौरे यांनी पक्षांतर केले असून, जनता त्यांना जाब विचारेल असं उत्कर्षा रुपवते यांनी म्हटलंय.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या वंचित बहुजन आघाडी मतदारांमध्ये संरक्षण घेऊन फिरावं लागतयं, मग हे निवडणुका कशा जिंकतील?.. जनतेत रोष आहे, त्यामुळे पक्षांतर करणारे पुन्हा निवडून येणार नाहीत.. शिर्डी मतदारसंघात विरोधक म्हणून वंचित शिवाय कुणीही बोलत नाही.. शिंदे सेनेचे सदाशिव लोखंडे दहा वर्ष खासदार होते, मात्र आज ते हतबल झालेत.. त्यामुळे वंचित बहुजन आघाडी प्रबळ विरोधक म्हणून इथे उभी आहे आणि आम्ही पुढची निवडणूक अधिक ताकदीने लढणार आहोत.. वाकचौरे यांनी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढवावी असे आव्हान उत्कर्षा रुपवते यांनी दिले आहे.. उत्कर्षा रुपवते, राज्य प्रवक्त्या वंचित बहुजन आघाडी वाकचौरे यांनी निधी न मिळाल्याची कारणे सांगून जबाबदारी झटकू नये.. विरोधी पक्षातील इतर खासदार काम करत नाहीत का?.. वाकचौरेंची अवस्था कहेना क्या चाहते हो? अशी झाली आहे.. वाकचौरेंनी मतदारांना फसवले असून, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये चीड आहे.. तुम्ही कितीही संरक्षण घेऊन फिरले, तरी लोक जाब विचारणारच आहेत असा घणाघात रूपवते यांनी खासदार वाकचौरे यांच्यावर केलाय ..
0
0
Report

आषाढ़ी वारी से पहले विठ्ठल-रुक्मिणी मूर्ति संरक्षण पर उम्मीद; अदालत फैसले से देरी संभव

Pandharpur, Maharashtra:श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तीच्या जतन संवर्धन काम आषाढी वारी पूर्वी करण्याचे ठरवले होते. मात्र याला वारकरी संघटनांनी जिल्हा न्यायालयात आव्हान दिले आहे. त्यामुळे या विलंब लागू शकतो. न्यायालयाने परवानगी दिली नाही तरी आषाढी वारी नंतर मूर्ती संवर्धन केले जाईल अशी भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली आहे. श्री विठ्ठल रुक्मिणी मूर्तिचे दर पाच वर्षांनी जतन संवर्धन करणे आवश्यक आहे. या पूर्वी पुरातत्व विभागाच्या मार्गदर्शन खाली ही प्रक्रिया पार पडली आहे. आषाढ़ी वारी पूर्वी ही प्रक्रिया समितीला पूर्ण करायची होती. मात्र काही वारकरी संघटना रासायनिक लेप लावण्याच्या विरोधात न्यायालयात गेल्या आहे. याबाबत न्यायालयाला विनंती केली जाईल. अशी पालकमंत्री जय कुमार गोरे म्हणाले. पण जर तसे झाले नाही तर आषाढी वारी नंतर ही प्रकिया करू अशी भूमिका पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी मांडली आहे
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के विधायक क्षीरसागर पर वायरल वीडियो: आरोप-प्रत्यारोपों की राजनीति तेज

Kolhapur, Maharashtra:कोल्हापूरच्या राजकारणात एका व्हायरल व्हिडिओने मोठी खळबळ उडवून दिली आहे. शिवसेना शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांच्यावर एका कंत्राटदाराकडून पैसे घेतल्याचा आरोप करणारा व्हिडिओ समोर आल्यानंतर आरोप-प्रत्यारोपांचे राजकारण तापले आहे. हा व्हिडिओ खरा की एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला बनावट? यावरून आता सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. राजेश क्षीरसागर यांच्यावर एका व्यावसायिकाकडून पैसे घेतल्याचा दावा व्हिडिओमध्ये दाखवण्यात आला. व्हिडिओ व्हायरल होताच राजकीय आरोप-प्रत्यारोपांना वेग आला. मात्र हा व्हिडिओ एआय-तंत्रज्ञानाचा वापर करून डबिंग करण्यात आल्याचा दावा राजेश क्षीरसागर यांनी केला. त्यांना राजकीय बदनामी करण्याच्या उद्देशाने हा प्रकार घडवण्यात आल्याचा आरोप झाला. यापूर्वी महानगरपालिका निवडणुकीच्या काळात अशा व्हिडिओ प्रसारित झाले होते परंतु त्यातून तथ्य न सापडल्याचे त्यांनी स्पष्ट केले. या व्हिडिओची सखोल पोलिस चौकशी व्हावी, यासाठी ते स्वतः पाठपुरावा करणार असल्याचे त्यांनी सांगितले. राजेश क्षीरसागर यांच्या समर्थनार्थstate मंत्री चंद्रकांत पाटील मैदानात उतरले आहेत. क्षीरसागरांना राजकीयदृष्ट्या रोखणे शक्य नसल्याने अडचणीत आणण्यासाठीचया षडयंत्र रचण्यात आल्याचा आरोप चंद्रकांत पाटील यांनी केला आहे. काँग्रेसचे आमदार सतेज पाटील यांच्यावर tvr... काँग्रेसचे युवा नेते आणि नगरसेवक राजेश लाटकर यांनी पत्रकार परिषद घेऊन हा व्हिडिओ एआयच्या माध्यमातून तयार करण्यात आलेला नसून तो वास्तविक असल्याचा दावा केला. तसेच, केशवराव भोसले नाट्यगृहातील एका कामाच्या टेंडरप्रकरणात संबंधित ठेकेदाराकडून पैसे घेतल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. स्वयं स्वतःची पापे लपवण्यासाठी सतेज पाटील यांच्यावर टीका करू नका असं देखील लाटकर म्हणालेत. शिवसेना आमदार राजेश क्षीरसागर यांच्याशी संबंधित यापूर्वीही विविध वादग्रस्त प्रकरणे समोर आली असल्याचा दावा करत या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होऊन सत्य जनतेसमोर यावे, अशी मागणी काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तर शिवसेना ठाकरे पक्षाचे नेते सुनील मोदी यांनी हा व्हिडिओ सतेज पाटील यांनी नाहीतर ठाकरे पक्षाने समोर आणल्याचे स्पष्ट केले आहे... इतकच नाही तर ठाकरे शिवसेनेच्या वतीने विधानसभेत राजेश क्षीरसागर यांच्या विरोधात स्थगन प्रस्ताव आणणार असल्याचे देखील म्हटले आहे. एका व्हायरल व्हिडिओमुळे कोल्हापूरचे राजकारण पुन्हा एकदा तापले असून, हा व्हिडिओ खरा की बनावट याचा निर्णय आता चौकशीनंतरच स्पष्ट होणार आहे. मात्र या प्रकरणाचे राजकीय पडसाद अधिवेशनातही उमटण्याची शक्यता असून, त्यामुळेच या प्रकरणाकडे कोल्हापूरसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे.
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी के आरवली में मासळीवाहू कंटेनर पलटा, चालक गंभीर

Ratnagiri, Maharashtra:मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर आरवली जवळ मासळीवाहू कंटेनर पलटी. चालक गंभीर, लाखों रुपयांच्या मासळीचे नुकसान. रत्नागिरी जिल्ह्यातील मुंबई-गोवा महामार्गावरील आरवली येथे मासळीची वाहतूक करणाऱ्या एका कंटेनरचा bhiषण अपघात झाला. अनियंत्रित झालेला कंटेनर महामार्गावर पलटी झाल्याने चालक गंभीर जखमी झाला असून, त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बाहेरगावी निर्यातीसाठी नेण्यात येणारी लाखो रुपयांची मासळी या अपघातात rस्त्यावर सांडल्याने मोठे नुकसान झाले आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती.. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने धाव घेत मदतकार्य सुरू केले. दरम्यान, अपघातग्रस्त कंटेनरमधील मासळी दुसऱ्या वाहनात भरताना कामगारांकडून सुरक्षा नियमांचे सर्रास उल्लंघन होत असल्याचे पाहायला मिळाले. हातमोजे, सुरक्षा टोपी आणि बुटांशिवाय आरोग्याला घातक ठरेल अशा पद्धतीने मासळीची हाताळणी केली जात असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.. पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत..
0
0
Report

रत्नागिरी के तळेकटे गाँव ने महामार्ग किनारे बड़े पैमाने पर वृक्षारोपण कर पर्यावरण संरक्षण का नया मॉडल पेश किया

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. तळेकाटे गावाची पर्यावरण पूरक पाऊल.. मुंबई गोवा महामार्गाच्या कडेला भव्य वृक्षारोपण.. अँकर मुंबई-गोवा महामार्गावरून प्रवास करणाऱ्यांसाठी एक सुखद और कौतुकास्पद बातमी.. महामार्गाच्या चौपदरीकरणात झालेले वृक्षतोड भरून करण्यासाठी तळेकाटे गावाने एक आदर्श पाहून उचललंय.. शासकीय यंत्रणेची वाट न पाहता संपूर्ण गावाने एकत्र येत महामार्गाच्या कडेला भव्य वृक्षरोपण केलं आहे.. केवळ झाडे लावलीच नाहीत तर जगण्यासाठी गावकऱ्यांनी ट्री गाईड्स आणि पावसाच्या टँकरची खास सोयही केली आहे.. लोकसहभागातून उभ्या राहिल्या या हरित पॅटर्न चं सध्या सर्वत्र कौतुक होतंय..
0
0
Report
Advertisement

शिवेंद्रराजे भोसले ने सातारा के विकास दौरे में बैलगाड़ी चलाईं; समन्वय पर किया स्पष्टीकरण

Satara, Maharashtra:सातारा नगरपालिका हद्दीतील राज्य शासनाच्या वतीने चालू असलेल्या विकास कामांचा पाहणी दौरा आज सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी केला. त्याचबरोबर भविष्यात नगरपालिकेकडून करण्यात येणाऱ्या उपाययोजनांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. यावेळी एका विकासकामाचा ठिकाणी चक्क मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी बैलगाडीचा कासरा हातात घेत बैलगाडी देखील चालवली. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना नगरपालिकेतील विकास कामांवरून खासदार उदयनराजे भोसले आणि नगराध्यक्ष अमोल मोहिते यांच्यामध्ये समन्वय नसल्याचे प्रश्नावर बोलताना मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी हा आरोप फेटाळून लावला. खासदार उदयनराजे असतील किंवा मी आम्ही सातारा शहराच्या विकास कामांसाठी प्रयत्न करत आहोत. दरम्यान एखाद्या पाहणी दौऱ्या दरम्यान कोणी उपस्थित नसेल तर समन्वय नाही असा त्याचा अर्थ होत नाही असा निर्वाळा मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी दिला. तर उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यावरून विचारले असता उद्धव ठाकरे यांनी असे दौरे खासदार फुटण्यापूर्वी केले असते तर आज त्यांच्यावर ही वेळ आली नसती, असा टोला मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी लगावला आहे.
0
0
Report
0
0
Report

महामार्ग के किनारे ग्रामस्थों ने वृक्षारोपण शुरू किया: एक हजार से अधिक पौधे लगाए गए

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी-तळेकांटे मधील ग्रामस्थांनी महामार्गावर उतरत रस्त्याच्या दुतर्फा केली वृक्ष लागवड अँकर - मुंबई गोवा महामार्गावर तळेकांटे येथील ग्रामस्थांनी एकत्र येत महामार्गाच्या दुतर्फा झाडं लावण्याचा उपक्रम हाती घेतला आहे. उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या प्रमुख उपस्थितीत या उपक्रमाचा शुभारंभ झाला. प्रशासनावर आणि ठेकेदारावर अवलंबून न राहता ग्रामस्थांनी स्वत: रस्त्यावर उतरत झाडे लावली आहेत. पहिल्या टप्प्यात जवळपास एक हजार झाडे लावण्यात येत आहेत.यामध्ये कोकणातील झाडांना प्रामुख्याने प्राधान्य देण्यात आलं आहे, यात वड , पिंपळ, आंबा , जांभूळ , फणस, बेलफळ यांसारखी झाडं आहेत.
0
0
Report
Advertisement

आषाढ़ी वारी में पानी की कमी नहीं होगी, गोरे ने जल-सुरक्षा के कड़े निर्देश दिए

Pandharpur, Maharashtra:यंदा जरी दुष्काळाचे सावट असले तरी आषाढी वारीसाठी चालणाऱ्या वारकऱ्यांना पाणी कमी पडणार नाही, ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी निर्णय आषाढी वारी पार्श्वभूमीवर ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर मध्ये वाखरी पालखी तळ, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, दर्शन रांग या ठिकाणी देण्यात येणाऱ्या सुविधांची पाहणी केली. वारीची कामे वेळेत पूर्ण करण्याचे अधिकाऱ्यांना सक्त सूचना दिल्या आहेत. यंदा पाऊस कमी असला तरी वारी मार्गावर 500 पिण्याचे पाणी उपलब्ध असणारे टँकर असणार आहेत. पाण्याची कमतरता पडू देणार नाही. उजनी धरणातून आषाढी वारी काळात वारकऱ्याना स्नानासाठी पाणी सोडण्यासाठी आजच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र देणार असून वारी काळात पाणी उपलब्ध ठेवले जाईल असे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले
0
0
Report

चंद्रकांत पाटील: RSS देशद्रोही नहीं—शाखा में भी जाना चाहिए

Sangli, Maharashtra:RSS ही देशद्रोही संघटना नहीं, विश्वास नांगरे पाटलांनी कार्यक्रमातच नव्हे तर शाखेत पण जावं - मंत्री चंद्रकांत पाटील. अँकर - राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,ही देशद्रोही संघटना नहीं,ते देश प्रेम शिकवणार संघटना, त्यामुळे विश्वास नांगरे पाटील यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात गलेते काही चुकीचं नाही,उलट त्यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शाखेत देखील जावं,असं विधान माझ्याशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले आहे.नागपूर येथे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटלांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत आरएसएस बद्दल स्तुती सुमन उधळले होते,यावरून सुरू असलेल्या टीकेवरून मंत्री चंद्रकांत पाटलांनी हे विधान करत विश्वास नांगरे पाटलांची पाठराखण केले आहे,ते सांगलीमध्ये बोलत होते. चंद्रकांत पाटील - उच्च व तंत्र शिक्षण मंत्री.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top