445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
ब्राह्मणगाव में किसानों ने विधायक दिलीप बोरसे के खिलाफ घेराव किया
Malegaon, Maharashtra:*विशाल मोरे, बागलाण (नाशिक)* - ब्राह्मणगाव जहाँ शेतकऱ्यांचा आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घातला आहे, गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणास तीव्र विरोध दर्शवला गेला. - पाणी मिळाल्याशिवाय काम होऊ देणार नाही, शेतकऱ्यांचा इशारा ठामपणे. - रावळगाव MIDC साठी पाणी वळविण्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला, संताप व्यक्त केला. - मी शेतकऱ्यांसोबत असल्याची आमदार बोरसे यांची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन देण्यात आले. - आवश्यकती पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका बोरसे यांनी मांडली आहे. Anc - बागलाण तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे शेतकऱ्यांनी आमदार दिलीप बोरसे यांना घेराव घालत नार-पार गिरणा नदी जोड प्रकल्पांतर्गत गिरणा डावा कालवा विस्तारीकरण व अस्तरीकरणाच्या कामास तीव्र विरोध दर्शविला आहे..पाणी उपलब्ध होत नाही तोपर्यंत काम होऊ देऊ नये, अशी ठाम भूमिका ब्राह्मणगाव, लखमापूर, आरई, नवी शेमळी, जुनी शेमळी आणि ठेंगोडा येथील शेतकऱ्यांनी घेतली आहे. दरम्यान, रावळगाव MIDC साठी ५०० दशलक्ष घनफूट पाणी वळविण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करत संताप व्यक्त केला. यावेळी आमदार दिलीप बोरसे यांनी मी शेतकऱ्यांसोबत असल्याचे सांगत त्यांच्या भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचवण्याचे आश्वासन दिले. तसेच वेळ पडल्यास शेतकऱ्यांसोबत रस्त्यावर उतरू, अशी स्पष्ट भूमिका देखील आमदार बोरसे यांनी मांडली आहे..0
0
Report
अमरावती में हनुमान जयंती पर कांग्रेस की विशाल शोभायात्रा, नेताओं ने ढोल बजाकर उत्साह जताया
Amravati, Maharashtra:हनुमान जयंती निमित्ताने अमरावती शहर में काँग्रेस की भव्य शोभायात्रा का आयोजन किया गया। ढोल पथक विविध महापुरुषों की झलकियाँ और युवाओं का प्रचंड उत्साह इस मिरवणूक की खास विशेषता थी। काँग्रेस सांसद बळवंत वानखडे और काँग्रेस नेता व माजी मंत्री यशोमती ठाकूर की उपस्थिति रही। बळवंत वानखडे और यशोमती ठाकूर ने ढोल बजाकर जल्लोष व्यक्त किया, जबकि ठाकुर ने गला और ताळ के साथ हरिनाम के गजार में फुगड़ी खेलते दिखे। हनुमान के रूप में आकर्षित करने वाला बहुरूपी इस मिरवणुका में केरळ से भी शामिल व्यक्ति मौजूद था। अमरावती शहर के साथ अकोला, वर्धा, नागपूर जिले के ढोल पथक भी इस शोभायात्रा का हिस्सा बने। अंबा गेट के पुराने शहर के आझाद हिंद मंडळ के प्रांगण से भव्य शोभायात्रा निकलकर अमरावती के राजकमल चौक पर हनुमान आरती और हनुमान चालीसा का पाठ भी हुआ।0
0
Report
पुलिस ने शिवप्रेमी पर लाठीचार्ज, महेश डोंगरे ने अधिकारियों पर कार्रवाई की मांग
Pandharpur, Maharashtra:माढा तालुक्यातील अंजनगाव खेळोबा मधील वाद दलाल लक्ष्मण हाके मुळे चिघळला, हाकेच्या दबावामुळे पोलिसांनी शिवप्रेमीवर लाठी चार्ज केल्याचा आरोप मराठा राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केला आहे. तसेच शिवप्रेमीवर लाठी चार्ज करणाऱ्या पोलिस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी डोंगरे यांनी केली0
0
Report
Advertisement
गार्पी से लाखनगांव-पोंदे देवगांव क्षेत्र में मल्चिंग पेपर और ठिबक सिंचाई को बड़ा नुकसान
Ambegaon, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्याच्या लाखनगाव पोंदेवाडी देवगाव परिसरला गारपिटीच्या पावसाने झोडपल्याने मल्चिंग पेपर ठिंबक सिंचन वरती लावलेल्या वालवड पिकाचे अतोनात नुकसान झालं असून वालवडच्या पिकाचे शेंडे माना तुटून गेल्यात तर ठिबक सिंचन चा मल्चिंग पेपरही तुटलाय, गारपीट होऊन बारा तास उलटले तरी अद्यापही या परिसरातल्या गारा विरघळलेल्या नाहीत,याचाच नुकसान ग्रस्त शेतातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी हेमंत चापुडे यांनी.0
0
Report
गोकुळ दूध संघ की जांच: 1108 दावों पर आपत्ति, 427 संस्थाओं की जांच तय
Kolhapur, Maharashtra:Kop Gokul Choukashi Feed:- File Anc:- कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ अर्थात गोकुळची चौकशी होणार आहे. पुणे विभागाच्या विभागीय उपनिबंधक सहकारी संस्थांकडून या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. गोकुळ दूध संघाची निवडणूक तोंडावर असतानाच हा निर्णय झाल्याने जिल्ह्यात चर्चेला उधाण आलं आहे. गोकुळच्या मतदार यादीतील तब्बल 1108 संस्थांवर आक्षेप नोंदवण्यात आला असून, त्यापैकी 427 संस्थांच्या नोंदणी आणि सभासदत्वाची चौकशी केली जाणार आहे. वडकशिवाले येथील संस्थेचे संचालक प्रकाश बेलवाडे यांनी या संस्थांना सभासद करताना नियम डावलल्याचा आरोप केला आहे. दरम्यान, ही चौकशी नियमित प्रक्रियेचा भाग असल्याचा दावा गोकुळचे चेअरमन नवीद मुश्रीफ यांनी केला असून, कुणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहनही त्यांनी केलं आहे. मात्र, निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही चौकशी होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.0
0
Report
वाशीम में आंधी-वर्षा से बिजवाई प्याज की फसल नुकसान, किसानों ने मुआवजे की मांग
Washim, Maharashtra:वाशीम : अँकर:वाशीम जिल्ह्यात वाशिम,मालेगाव आणि रिसोड तालुक्यात काल सायंकाळी झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे बिजवाई कांद्याच नुकसान झाल्याच समोर आल आहे,रिसोड तालुक्यातील लोणी बुद्रुक येथे बीजवाई कांद्याच नुकसान झाल्याबरोबर कांदा पूर्णपणे आडवा पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने पुन्हा हिरावून घेतला आहे, त्यामुळं शेतकऱ्यांनी नुकसान भरपाई देण्याची मागणी केली आहे.0
0
Report
Advertisement
नागपुर के गवळीपुरा हनुमान मंदिर में महाप्रसाद ने लाखों भक्तों को जोड़ा
Nagpur, Maharashtra:हनुमान जयंतीला नागपूरातील टेकडी मार्गावरील गवळीपुरा हनुमान मंदिर येथे भक्ती आणि लोकसहभागाचा अद्भुत संगम दिसून येतो... येथे आयोजित महाप्रसादाला तब्बल अडीच लाख भाविक महाप्रसादाचा लाभ घेतात.हे अन्नदान यज्ञ नागपूरच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैभवात मोलाचं ठरतं. महाप्रसादासाठी शेकडो हातांची सेवा आणि मदत होते. कोणी स्वतःहून भाजीपाला तर कोणी धान्य आणि कोणी आर्थिक मदत करत कोणी श्रम सुद्धा करतो.. अशाप्रकारे शेकडो हातांची सेवा हनुमानाला अर्पण करतात. महत्त्वाचं म्हणजे शहरातील अंध विद्यालय, विविध वस्तीगृह आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील गरजू रुग्ण यांच्याकरतता महाप्रसाद सन्मानाने पोहोचवला जातो... महाबली हनुमान चा या महाप्रसादात बाबत माहिती जाणून घेतली आमचे प्रतिनीधी अमर काणे0
0
Report
अंजनगांव खेळोबा में पुतला हटवाने के दौरान पुलिस लाठीचार्ज, मराठा युवक घायल
Pandharpur, Maharashtra:अंतरवाली सराटी प्रमाणे माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा मध्ये पोलिसांनी लाठी चार्ज केला. फक्त मराठा समाजाला मारहाण केली. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक धनंजय साखळकर यांचा आरोप माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून वाद झाला. काल रात्री पुतळा हटवण्यासाठी क्रेन आणली. त्याच्या पुढं शिवप्रेमी पडले. यानंतर त्यांना हटवताना झटापट झाली. याचे रूपांतर पुढे दगडफेक आणि लाठीचार्झ मध्ये झाले. या मध्ये मराठा समाजातील तरुण जखमी झाले आहेत. या प्रकरणाची न्यायालयीन चौकशी करा. दोषी लोकांवर कारवाई करा. अंतरावली सराटी प्रमाणे हा प्रकार झाला आहे. असा आरोप साखळकर यांनी केला.0
0
Report
पारेगांव–बदापूर के पास बिबटों ने दहशत; चालक ने मोबाइल कैमरे में कैद किया
Yeola, Maharashtra:गेल्या काही दिवसांपासून येवला येवला शहराजवळ असलेल्या पारेगाव, बदापूर या परिसरामध्ये बिबट्याची मोठी दहशत पसरली असून रात्रीच्या सुमारास एका जेसीबी चालकाला बिबट्या नजरेस पडला आहे या चालकाने आपल्या मोबाईलच्या कॅमेरात बिबट्याला कैद केले असून या ठिकाणी पिंजरा लावण्याची मागणी होत आहे0
0
Report
Advertisement
यवेला के किसान ने पेरू बाग में शेड नेट से तापमान नियंत्रित किया
Yeola, Maharashtra:उन्हांचा तडाका दिवसेंदिवस तीव्र होत असून याचा परिणाम थेट शेतीवर दिसून येत आहे. विशेषतः पेरू उत्पादक शेतकरी या वाढत्या तापमानामुळे चिंतेत होते. मात्र, या परिस्थितीवर मात करण्यासाठी येवल्यातील शेतकऱ्यांने आधुनिक उपायांचा अवलंब केला आहे. एक एकर पेरूच्या बागेवर क्रॉप कव्हर (शेड नेट) लावण्याचा प्रयोग केल्याने झाडांवर थेट उन्हाचा परिणाम कमी होत असून तापमान नियंत्रणात राहते. परिणामी, झाडांची वाढ चांगली होते आणि फळांची गुणवत्ता टिकून राहते.याशिवाय, फळांना उन्हामुळे होणारे डाग, तडे आणि गळ यावरही नियंत्रण मिळते.0
0
Report
गंगापुर तालुक़े में लकड़ी की बल्ले से युवक की पिटाई, वीडियो वायरल; केस दर्ज
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील गंगापूर तालुक्यातील रांजणगाव परिसरात एका तरुणाला लाकडी बॅटने मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. श्रृत्विक मच्छिंद्र गाडे यांना आरोपींनी शिवीगाळ करत बेदम मारहाण केली आणि जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी सतीश पावरे, इरफान पठाणसह अन्य एकावर वाळुज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संबंधित घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून परिसरात खळबळ उडाली आहे. याप्रकरणी पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
वाशीम के NCC कैडेट्स की इंधन बचत मुहिम: नागरिकों के लिए आसान उपाय
Washim, Maharashtra:वाशीम: अँकर:आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जागतिक स्तरावर इंधन पुरवठ्यावर परिणाम होत आहे. गॅस, पेट्रोल आणि डिझेलचा तुटवडा जाणवू नये यासाठी वाशीम येथील श्री बाकलीवाल विद्यालयाच्या एनसीसी कॅडेट्सनी ‘इंधन बचत’ विषयावर जनजागृती मोहीम राबवली. या मोहिमेत कॅडेट्सनी पोस्टर्सच्या माध्यमातून गॅस बचतीचे सोपे आणि उपयुक्त उपाय नागरिकांपर्यंत पोहोचवले. ‘इंधन वाचवा, देश वाचवा’ या घोषणांनी परिसरात जागर निर्माण केली. विद्यार्थ्यांनी स्वयंपाक करताना भांड्यावर झाकण ठेवणे, प्रेशर कुकरचा वापर करणे, बर्नर स्वच्छ ठेवणे तसेच फ्रिजमधील पदार्थ थेट गॅसवर न ठेवता आधी सामान्य तापमानाला आणणे यांसारखे उपाय सुचवले. यासोबतच सुरक्षिततेच्या दृष्टीने स्वयंपाकानंतर गॅसचा रेगुलेटर बंद ठेवण्याचे महत्त्वही त्यांनी अधोरेखित केले.0
0
Report
Advertisement
लातूर में नल का पीला पानी: नागरिकों में नाराज़गी, आपूर्ति की जांच की मांग
Latur, Maharashtra:लातूर शहरातील काही भागात नळाला पिवळसर पाणी आले... नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण... महापालिका प्रशासनाविरोधात व्यक्त केली नाराजी लातूर शहरातील काही भागात आज नळाला पिवळसर पाणी आले... हे पाणी पिण्यायोग्य आहे की नाही, असा प्रश्न या भागातील नागरिकांना पडला असून, महापालिका प्रशासनाविरोधात त्यांनी नाराजी व्यक्त केलीय…लातूर शहरातील शिवाजी नगर, सिग्नल कॅम्प, बोधे नगर, विवेकानंदपुरम आणि समता नगर या भागांमध्ये आज दुपारच्या सुमारास नळाला पिवळसर पाणी आल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत.. बदललेल्या पाण्याच्या रंगामुळे नागरिकांमध्ये संभ्रम आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे… महापालिका प्रशासनाने तात्काळ पाणीपुरवठ्याची तपासणी करून स्वच्छ पाणी पुरवठा करण्याची मागणी नागरिकांनी केलीय0
0
Report
मेळघाट में भीषण आग: दो घर जले, एक वृद्ध महिला की मौत
Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मेळघाटात भीषण अग्नितांडव; दोन घरे जळून खाक, एका वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू. अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा तालुक्यातील आकी गावात काल रात्री भीषण अग्नितांद पाहायला मिळाले आहे. गावात रात्री तीन घरांना अचानक लागल्याने गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. या भीषण आगीत दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली असून दुर्घटनेत एका वृद्ध महिलेचा आगीत जळून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे गावात हळहळ व्यक्त केली जात आहे. रात्रीच्या सुमारास गावातील तीन घराला अचानक आग लागल्याने आगीने काही वेळात रौद्ररूप धारण करत शेजारील दुसऱ्या घरालाही वेढा दिला. यामध्ये दोन घरे पूर्णतः जळून खाक झाली आहे तर एक घर काही प्रमाणात जळले आहे. घटनेनंतर गावकऱ्यांनी तत्परता दाखवत घराघरातून पाणी आणून आग विझवण्याचा प्रयत्न केला गावकऱ्यांच्या athak प्रयत्नांमुळे काही वेळात आग आटोक्यात आणण्यात यश आले. दरम्यान अचलपूर येथून अग्निशामक दलाची गाडी घटनास्थळी दाखल झाली व त्यांनी आगीवर पूर्णपणे नियंत्रण मिळवले या आगीमुळे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.0
0
Report
बीड में RTI कार्यकर्ता पर निर्घृण हमला: पैर टूटे, हाथ फ्रैक्चर; शिंदे गट के कार्यकर्ताओं पर मामला दर्ज
Beed, Maharashtra:बीड:माहिती अधिकार कार्यकर्त्यावर निर्घृण हल्ला; पाय तोडून हात फ्रॅक्चर.. शिवसेना शिंदे गटाच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल ANC - एक धक्कादायक बातमी आहे बीडमधून... माहितीचा अधिकार टाकणाऱ्या एका आरटीआय कार्यकर्त्याचे चक्क पाय तोडण्यात आलेत. एवढेच नाही तर हात देखील फॅक्चर करण्यात आल्याची धक्कादायक घटना बीडमध्ये घडली आहे. मारहाण करणारे शिवसेना शिंदे गटाचे कार्यकर्ते असल्याने राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे. बीडच्या भाटसांगवी आणि औरंगपूर या गावांच्या ग्रुप ग्रामपंचायतीत गेल्या १५ वर्षांपासून विकासाचा अभाव असल्याची तक्रार स्थानिकांकडून होत असताना, माहिती अधिकाराचा वापर करून याबाबत आवाज उठवणाऱ्या बलभीम बोरवडे यांच्यावर निर्घृण हल्ला करण्यात आलाय. मोठ्या प्रमाणात निधी येऊनही गावात अपेक्षित विकास न झाल्याने बलभीम बोरवडे यांनी माहिती अधिकारांतर्गत माहिती मागवली होती. याच कारणावरून संतप्त झालेल्या शिंदे गटाशी संबंधित काही कार्यकर्त्यांनी आठ ते दहा जणांसह बोरवडे यांच्यावर थेट हल्ला चढवला. या हल्ल्यात त्यांचा पाय तोडण्यात आला असून एक हात फ्रॅक्चर करण्यात आला आहे. ही अमानुष मारहाणी सुरू असताना वडिलांना वाचवण्यासाठी मुलगा विजय घटनास्थळी धावून आला, मात्र त्यालाही निर्दयपणे मारहाण करण्यात आली. دوघांनाही गंभीर जखमी अवस्थेत बीड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी पिंपळनेर पोलीस ठाण्यात शिंदे गटाचे नेते श्यामराव पडूळे यांच्यासह आठ जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र अद्यापपर्यंत एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. गावगुंडांकडून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटना सर्वसाधारण मानल्या जात असताना, आता थेट सत्ताधारी पक्षाशी संबंधित पदाधिकारींकडून कायदा हातात घेतला जात असल्याने कायदा व सुव्यवस्थेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. बाईट: विजय बोरवडे, पीडित0
0
Report
Advertisement
