445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रत्नागिरी के लाडघर समुद्र तट पर बैलगाड़ी दौड़ ने दर्शकों में मचाया धमाल
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर समुद्र किनाऱ्यावर बैलगाडी शर्यतीचा थरार नुकताच रंगला.. दापोली तालुक्यातील लाडघर समुद्रकिनाऱ्यावर रंगलेल्या बैलगाडी शर्यतीने रविवारी प्रेक्षकांना अक्षरशः थराराचा अनुभव दिला. सायंकाळच्या सुमारास सुरू झालेल्या या स्पर्धेचे उद्घाटन जालगाव ग्रामपंचायतचे सरपंच अक्षय फाटक यांच्या हस्ते करण्यात आले. विस्तीर्ण समुद्रकिनाऱ्यावर वेगाने धावणाऱ्या बैलगाड्यांनी उपस्थितांची मने जिंकली. परिसरातील अनेक नामांकित स्पर्धकांनी सहभाग घेतल्याने शर्यतीत चुरस निर्माण झाली होती. अंतिम फेरीत ओंकार आरेकर यांच्या बैलगाडीने अप्रतिम वेग आणि नियंत्रण राखत प्रथम क्रमांक पटकावला. मनीष मोरे यांनी द्वितीय तर सुनील सुर्वे यांनी तृतीय क्रमांक मिळवत आपली छाप पाडली.0
0
Report
शिरूर की सड़क पर प्रसूति: महिलाओं की मदद से बना लेबर रूम, माता- baby सुरक्षित
Shirur, Maharashtra:पुणे जिल्ह्याच्या शिरूरमधील जोशीवाडी भागात आज एका महिलेला प्रसूती कळा सुरू झाल्या. रुग्णालय गाठण्यापूर्वीच नियतीने रस्त्यावरच तिची वाट अडवली. परिस्थिती इतकी गंभीर होती की, तिला पुढच्या एका मिनिटाचाही प्रवास करणं अशक्य झालं. आणि अशातच शिरूरच्या रणरागिणी धावून आल्या... रस्त्याकडेला असलेल्या एका झाडाखाली परिसरातील महिलांनी तातडीने एकत्र येत आपल्या साड्यांचा अडोसा केला. एका रस्त्याचं रूपांतर तात्पुरत्या 'लेबर रूम'मध्ये झालं. केवळ महिलाच नाही, तर माहिती मिळताच डॉक्टरांनीही क्षणाचाही विलंब न लावता रस्त्यावर धाव घेतली आणि त्या कठीण परिस्थितीत प्रसूती शास्त्रशुद्ध पद्धतीने पार पाडली. महत्त्वाचं म्हणजे या धावपळीत आणि तणावाच्या वातावरणात माता आणि बाळ दोघेही आता सुखरूप आहेत. हा प्रसंग पाहताना अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला होता. पण जेव्हा बाळाच्या रडण्याचा आवाज आला, तेव्हा तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. आधुनिक काळात आपण डिजिटल होत असलो, तरी माणुसकीचा ओलावा आजही जिवंत आहे, हेच या घटनेने सिद्ध केलंय.0
0
Report
बार्शी भगवंत महोत्सव में आनंद Shinde की सुरों की महफिल, हजारों की भीड़
Solapur, Maharashtra:सोलापूर - बार्शीतील भगवंत महोत्सवात रंगली आनंद शिंदेंच्या सुरांची मैफिल, गाण्यांच्या कार्यक्रमाला बार्शीकरांचा तुफान प्रतिसाद बार्शीचे दैवत श्री भगवंत यांच्या प्रकट दिनानिमित्त बार्शीकरांसाठी भगवंत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. दहा दिवसांच्या या भगवंत महोत्सवामध्ये विविध प्रकारच्या आध्यात्मिक, मनोरंजनात्मक कार्यक्रमांची मेजवानी ठेवण्यात आली आहे. शुक्रवारी प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांचा गाण्यांचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमांमध्ये पावसाचा व्यत्यय येत असताना सुद्धा आनंद शिंदे यांच्या खास शैलीतील नवे जुने गाणे ऐकण्यासाठी जवळपास 25 हजारापेक्षा जास्त बार्शीकरांनी मोठी गर्दी केली होती.0
0
Report
Advertisement
Kolhapur में गर्भपात की गोलियाँ देने वाले फर्जी डॉक्टर समेत एजेंट गिरफ्तार
Kolhapur, Maharashtra:गर्भपाताच्या गोळ्या देणाऱ्या बोगस डॉक्टरसह एजंटला कोल्हापुरात अडकण्यात आली आहे. पन्हाळा तालुक्यातील माजगाव पैकी खोतवाडी इथं कारवाई झाली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि आरोग्य विभाग मिळून ही कारवाई केलीय. पोलिसांनी ऋषिकेश खोत आणि ऋषिकेश माने या दोघांना अटक केली आहे. ऋषिकेश खोत याने बीएचएमएस शिक्षण अर्धवट सोडून दवाखाना थाटल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.0
0
Report
शिरूर के जांबूत में 9 साल का बिबट पिंजरे में जेरबंद, माणिकडोह भेजा गया
Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील जांबूत येथे वन विभागाने लावलेल्या पिंजऱ्यात ९ वर्ष वयाचा नर बिबट जेरबंद झाला असून या बिबट्याची रवानगी माणिकडोह बिबट निवारण केंद्रात करण्यात आलीय, वन विभागाने गेली चार महिन्यात पिंपरखेड जांबुत चांडोह परिसरात हा ४५ वा बिबट जेरबंद केला असून इतक्या मोठ्या प्रमाणात बिबट्यांना जेरबंद करण्यात वन विभागाला यश आल्याने वनविभागाच्या मोहिमेचे परिसरात कौतुक केले जातंय.0
0
Report
गांधीनगर उपकार्यालय में 24 लाख 25 हजार 940 रुपये की गबन, जांच तेज
Nashik, Maharashtra:नाशिक मनपाच्या कर वसुलीतील २४ लाख हडपले पंचवटीपाठोपाठ गांधीनगर उपकार्यालयातही गैरव्यवहार उघड पंचवटी विभागीय कार्यालयातील कर वसुलीतील अफरातफरीचे प्रकरण ताजे असतानाच आता पूर्व विभागांतर्गत गांधीनगर उपकार्यालयातही त्याच पद्धतीने घोटाळा उघडकीस आला आहे. येथील नागरी सुविधा केंद्रात कार्यरत कनिष्ठ लिपिक शशिकांत थोरातने घरपट्टी आणि पाणी पट्टीपोटी जमा झालेल्या रकमेपैकी २४ लाख २५ हजार ९४० रुपयांचा अपहार केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. ३० नोव्हेंबर २०२१ ते १८फेब्रुवारी २०२२ या कालावधीत गांधीनगर उपकार कार्यालयात घरपट्टी व पाणीपट्टीपोटी एकूण ४६ लाख ४५ हजार ९९३ रुपये जमा झालेहोते. मात्र, कनिष्ठ लिपिक थोरातने युनियन बँक ऑफ इंडियामधील मनपाच्या खात्यात केवळ २२ लाख २० हजार ५३ रुपयेच भरले0
0
Report
Advertisement
दानिश शेख के मोबाइल से डेटा अनलॉक: फेस आईडी से बड़ी प्रगति
Nashik, Maharashtra:मल्टिनॅशनल कंपनी प्रकरणातील आरोपी दानिश शेखच्या मोबाईल तपासात मोठी प्रगती मोबाईलमधील प्रत्येक फाईल व अॅपसाठी वेगवेगळे पासवर्ड व फेस आयडी सुरक्षा तांत्रिक विश्लेषण करताना न्यायसहाय्यक प्रयोगशाळेला अडथळे न्यायालयाची परवानगी घेऊन आरोपीला प्रयोगशाळेत नेले फेस आयडीच्या साहाय्याने मोबाईल अनलॉक करण्यात यश मोबाईलमधील डेटा तपासाची पुढील प्रक्रिया सुरू0
0
Report
Lasalgaon ST डिपो में स्मार्ट कार्ड घोटाला: बुजुर्ग यात्रियों से अधिक वसूली
Yeola, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील लासलगाव एसटी आगारातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विविध शासकीय योजनांसाठी लागणाऱ्या स्मार्ट कार्डच्या नावाखाली वृद्ध प्रवाशांची लूट होत असल्याची तक्रार पुढे आली आहे. स्मार्ट कार्ड बनवण्यासाठी नियुक्त केलेल्या महिला एजंटकडून ठरलेल्या दरापेक्षा जास्त पैसे आकारले जात असल्याचा आरोप प्रवाशांनी केला आहे. साधारण दीडशे ते दोनशे रुपयांमध्ये मिळणारे स्मार्ट कार्ड तब्बल अडीचशे रुपयांना दिले जात असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली. याबाबत प्रवाशांनी थेट आगार प्रमुखांकडे तक्रार दाखल केली. तक्रारीची दखल घेत आगार प्रमुखांनी तत्काळ कारवाई करत संबंधित एजन्सीचे कॉन्ट्रॅक्ट रद्द केले आहे. यासोबतच, ज्या प्रवाशांकडून जादा पैसे घेतले गेले आहेत, त्यांना ते पैसे परत करण्याच्या स्पष्ट सूचना देखील देण्यात आल्या आहेत.दरम्यान, या घटनेमुळे एसटी प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजना करण्याची मागणी प्रवाशांकडून केली जात आहे.0
0
Report
लातूर में टोळकाकडून दो युवकों की मारपीट का वीडियो वायरल
Latur, Maharashtra:लातूर शहर के अंबाजोगाई रोड परिसर के रेनापुर नाके के पास सात-आठ लोगों के समूह ने दो युवकों की बेदम पिटाई कर दी। यह वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहा है। पिटाई का कारण अभी स्पष्ट नहीं है।0
0
Report
Advertisement
गेवराई में शिवाजी महाराज का पुतला हटाने के साथ भारी सुरक्षा, ट्रैफिक समस्या दूर
Beed, Maharashtra:बीड: गेवराई शहरातून जाणाऱ्या धुळे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या मधोमध उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर हलविण्यात आला आहे. वाहतुकीच्या दृष्टीने अडथळा निर्माण होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला. या संदर्भात शिवप्रेमी, पोलिस प्रशासन आणि नगरपालिकेमध्ये सकारात्मक चर्चा पार पडली. सर्वांच्या सहमतीने पुतळा अन्य योग्य ठिकाणी हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यामुळे कोणताही वाद निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने संयमाने भूमिका घेतली. दरम्यान, पुतळा हलविण्याच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी परिसरात मोठ्या प्रमाणावर पोलीस तैनात करण्यात आले आहेत.0
0
Report
गर्मी में कुएँ से पिल्ला बचाने वाले विनोद धोंगडे की बहादुरी, गांव में भारी प्रशंसा
Washim, Maharashtra:अशीच एक हृदयस्पर्शी घटना वाशिम जिल्ह्यातील जाऊळका येथे घटना घडली.पाण्याच्या शोधात भटकत असताना एका मांजराचे छोटे पिल्लू विहिरीत पडले.विहिरीत अडकलेल्या त्या निष्पाप जीवाने बाहेर येण्यासाठी केलेली धडपड जीवघेणी ठरत होती हे लक्षात येताचं प्राणीमित्र विनोद धोंगडे या तरुणाने धाडस दाखवत थेट विहिरीत उतरायचा निर्णय घेतला.स्वतःचा जीव धोक्यात घालून त्यांनी त्या पिल्लाला स्थानिकाच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढत त्याला जीवनदान दिले.या मानवतावादी कृतीमुळे गावकऱ्यांनी विनोद धोंगडे यांचे कौतुक केले असून त्यांच्या धाडसाची सर्वत्र प्रशंसा होत आहे.या घटनेतून उन्हाळ्यात प्राणी-पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे.0
0
Report
चंद्रपूर शहर के रामाळा तालाब में मछलियों की मौत, दुर्गंध से नागरिक परेशान
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरात एकमेव शिल्लक राहिलेल्या रामाळा तलावात माशांचा मृत्यू होत आहे. या मृत माशांमुळे आसपासच्या परिसरात दुर्गंधी पसरली असून नागरिक त्रस्त झाले आहेत. याच परिसरात हजारो चंद्रपूरकर सकाळ -संध्याकाळ फिरण्यासाठी येतात. गेली काही वर्षे रामाळा तलावाच्या सौंदर्यीकरणाच्या संदर्भात विविध प्रकल्प सुरू आहेत. यात संरक्षक भिंतीसह मलनिस्सारण प्रकल्प देखील महत्त्वाचा आहे. या तलावात दोन बाजूंनी येणारे रोजचे हजारो लिटर सांडपाणी तलावातील प्राणवायू संपवण्यास कारणीभूत ठरले आहेत. यावर उपाययोजना असलेली कामे मात्र आराखड्यानुसार होत नसल्याचा आरोप पर्यावरण अभ्यासकांनी केला आहे. शहरातील एकमेव शिल्लक राहिलेल्या गोंडकालीन रामाळा तलावाला वाचविण्यासाठी काटेकोर उपाय योजना गरजेच्या असल्याचे मत व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के तीन पुलिसकर्मी गुटखा तस्करी के मामले में निलंबित
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या तीन पोलीस कर्मचाऱ्यांना गुटखा तस्करा कडून गुटख्याची दोन पोती चोरी केल्याप्रकरणी निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. लोहारा पोलीस स्टेशनचे बबलू पठाण आणि प्रशांत राठोड तर लाडखेड पोलीस ठाण्यात कार्यरत अविनाश ढोणे या पोलिस शिपायांचे निलंबन करण्यात आले असून हे तिघेही पोलीस गुटखा तस्करीत गुंतलेले होते. गुटखा तस्कर हा अमरावती येथून गुटखा घेऊन आदिलाबाद कडे जात असताना या तिघांनी त्याला थांबवून वाहन तपासणी करून ते सोडले दरम्यान अंधाराचा फायदा घेत या वाहनातील गुटख्याची दोन पोती देखील चोरली मात्र चोरीचे हे बिंग फुटले त्यामुळे पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी या कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई केली0
0
Report
राहाता में बेटे ने पिता की हत्या, खौफनाक मामला, पुलिस ने गिरफ्तारी की
Shirdi, Maharashtra:राहाता शहरात मुलाकडून वडिलांची निर्घृण हत्या... महात्मा फुले नगर परिसरातील धक्कादायक घटना... नशेत मुलाने वडिलांच्या डोक्यात फरशी घालून केला खून... घटनेमुळे परिसरात खळबळ तसेच भितीचे वातावरण... आरोपी सचिन खैरे यास पोलिसांनी तात्काळ घेतले ताब्यात... मृत वडिलांचे नाव उत्तम खैरे... कुटुंबातील सततच्या वादातून घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज... मध्यरात्रीच्या sumarास घडली घटना... दारूचे व्यसन आणि मारहाणीचा होता त्रास... पोलिसांकडून घटनास्थळी पंचनामा... राहाता पोलिसांकडून पुढील तपास सुरू0
0
Report
गोडा ते नर्मदा जलयात्रा: अहिल्या होळकर के जन्मशताब्दी वर्ष पर जल संरक्षण का संदेश
Ahilyanagar, Maharashtra:जलसंपदा विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या 'जल व्यवस्थापन कृती पंधरवड्या'च्या निमित्ताने, तसेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून 'गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे...आजपासून ते २९ एप्रिल २०२६ दरम्यान ही यात्रेचे आयोजन असून जलसंवर्धन आणि जल व्यवस्थापनाचा संदेश देण्यासाठी श्रीक्षेत्र चौंडी आणि श्रीक्षेत्र त्र्यंबकेश्वर येथून या जलयात्रची सुरुवात होणार आहे... अहिल्यादेवी होळकर यांचे जन्मगाव असलेल्या चौंडी येथून सुरू होणाऱ्या जल यात्रेच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे अहिल्यानगर प्रतिनिधी लैलेश बारगजे यांनी.0
0
Report
Advertisement
