icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

Advertisement

अकोला के अकोट तालुके में सातबारा अनिवार्य, यूरिया-डीएपी वितरण पारदर्शी और शिकायत कम

Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अकोट तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून युरिया आणि डीएपी खतासाठी शेतकऱ्यांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र पाहायला मिळत होते. खतांच्या उपलब्धतेबाबत माध्यमांमध्ये बातम्या प्रसारित झाल्यानंतर प्रशासन आणि कृषी विभागाने परिस्थितीवर लक्ष केंद्रित केले. सुरुवातीला आधार कार्डच्या आधारे टोकन पद्धतीने युरिया वाटप सुरू करण्यात आले होते. मात्र या निर्णयावर शेतकऱ्यांनी आक्षेप घेत, केवळ आधार कार्डच्या आधारे शेती नसलेले लोकही युरिया खरेदी करून साठेबाजी किंवा काळाबाजार करू शकतात, अशी भीती व्यक्त केली होती. दरम्यान, शेतकऱ्यांच्या मागणीची दखल घेत प्रशासनाने निर्णयात बदल केला असून आता युरिया खरेदीसाठी आधार कार्डसोबत सातबारा उतारा सादर करणे अनिवार्य करण्यात आले आहे. त्यामुळे खऱ्या शेतकऱ्यांनाच खताचा लाभ मिळणार असल्याचे सांगितले जात आहे.अकोला जिल्ह्यासाठी एकूण 7 हजार 101 मेट्रिक टन युरियाचा साठा उपलब्ध होणार असून, अकोट शहरात आज 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा करण्यात आला आहे. त्यामुळे युरियाचा तुटवडा मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. तसेच सातबारा अनिवार्य केल्यानंतर कृषी सेवा केंद्रांवरील गर्दीही लक्षणीयरीत्या कमी झाल्याचे दिसून येत आहे.अकोट तालुक्यात खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर युरिया आणि डीएपी खतांची मागणी वाढली होती. पुरवठा कमी पडत असल्याने कृषी सेवा केंद्रांवर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने टोकन पद्धत सुरू केली.मात्र केवळ आधार कार्डच्या आधारे खत वाटप केल्यास गैरव्यवहार होण्याची शक्यता असल्याचे शेतकऱ्यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर आधार कार्डसोबत सातबारा उतारा बंधनकारक करण्यात आला.आज अकोट शहरात 818 मेट्रिक टन युरियाचा पुरवठा झाल्याने खत उपलब्धतेची समस्या मोठ्या प्रमाणात सुटली आहे. तसेच नवीन नियम लागू झाल्यानंतर कृषी केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याने शेतकऱ्यांनाही दिलासा मिळाला आहे. Final Vo : सातबारा अनिवार्य केल्याने युरियाच्या वितरणात पारदर्शकता वाढणार असून साठेबाजीक आणि काळाबाजाराला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

जालना में पूर्व सरपंच पर 17 वर्षीय के दुष्कर्म का मामला दर्ज

Jalna, Maharashtra:जालना | माजी सरपंचाचा एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार\nजालना जिल्ह्यातल्या आष्टी पोलीस स्टेशनमध्ये पोक्सोतंर्गत गुन्हा दाखल\nनवनाथ सोपान आयंदे असं संशयित आरोपीचं नाव\nअँकर- जालना जिल्ह्यातल्या एका गावात माजी सरपंचाने एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची घटना घडलीये.. या प्रकरणात पीडितेच्या फिर्यादेवरून जिल्ह्यातल्या आष्टी पोलिस स्टेशनमध्ये पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आलाय.. नवनाथ आयंदे असं संशयित आरोपीचे नाव आहे.. पीडित मुलीचे वडील आरोपीचे मित्र आहेत.. या ओळखीचा फायदा घेऊन आरोपीने मुलीला पैशांचे अमिष दाखवून अत्याचार केला. पीडितेचे 12 वीचे शिक्षण पूर्ण झाले असून ती पालकांना शेती कामात मदत करत असे. संशयित आरोपी नवनाथ आयंदे हा पीडितेच्या वडिलांचा मित्र असल्याने शेतात आणि घरी येणे-जाणे होते. चार महिन्यांपूर्वी पीडिता शेतात काम करत असताना आरोपीने शरिरसुखाची मागणी केली. तरुणीने वारंवार नकार दिला. तरिही आरोपीने तिच्यावर वारंवार बळजबरीने अत्याचार केला. काही दिवसांपासून पीडितेला उलट्या आणि पोटदुखीचा त्रास सुरु झाला. उपचारासाठी तिला रुग्णालया नेले असता पीडित चार महिन्यांची गरोदर असल्याचं डाॅक्टरांनी सांगितलं. पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता तिने घडलेला प्रकार सांगितला. दरम्यान या प्रकरणी आष्टी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
0
0
Report
0
0
Report
Advertisement

मिरा भाईंदर: शिवाजी महाराज के पुतले के पास खुलेआम दारू, संदीप राणे ने कड़ी चपत दी

Mira Bhayandar, Maharashtra:मिरा भाईंदर मधील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ उघड्यावर दारू पिणाऱ्या तळीरामांना भरचौकात मनसे शहर अध्यक्ष संदीप राणेने दिला चोप. काशिमिरा नाका परिसरात उघड्यावर मद्यपान करून महिला व ज्येष्ठ नागरिकांना त्रास देणाऱ्यांचा सुळसुळाट वाढला होता. मनसे कडून बॅनर लावण्यात आला आहे कीं दारू पिणाऱ्या बेवड्यानो सावधान इथे दारू पियाल्यास चांगलाच चोप दिला जाईल. नागरिकांच्या तक्रारीनंतर मनसे शहराध्यक्ष संदीप राणे आणि कार्यकर्त्यांनी थेट घटनास्थळी धाव घेत तळीरामांना चांगलाच चोप दिला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या pुतळ्याच्या परिसरात दारू पिऊन पावित्र्य भंग करणाऱ्यांना कोणतीही दया दाखवली जाणार नाही, असा सज्जड दम मनसेने दिला.
0
0
Report

एकबुर्जी पर्यटन स्थल की हालत सुधारने की मांग तेज़

Washim, Maharashtra:वाशीम शहरालगत असलेल्या एकबुर्जी प्रकल्पावरील पर्यटन स्थळाची सध्या दयनीय अवस्था झाली असून पर्यटकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पाटबंधारे विभागाच्या वतीने येथे गार्डन, लहान मुलांसाठी खेळण्यांची सुविधा तसेच बोटिंगची व्यवस्था करण्यात आली होती. मात्र गेल्या तीन वर्षांपासून या पर्यटन स्थळाकडे दुर्लक्ष झाल्याने ते धूळखात पडले आहे. पावसाळ्यात एकबुर्जी प्रकल्पावरील धबधब्याचा आनंद घेण्यासाठी जिल्हाभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येथे येतात. मात्र लगतचे पर्यटन स्थळ बंद अवस्थेत असल्याने पर्यटकांची निराशा होत आहे. त्यामुळे पावसाळ्यापूर्वी हे पर्यटन स्थळ तातडीने सुरू करून आवश्यक दुरुस्ती व सुविधा उपलब्ध करून द्याव्यात,अशी मागणी जोर धरू लागली आहे.
0
0
Report

पोल्ट्री फार्म में नाग ने चूजे खाये, मौके पर रेस्क्यू के बाद सुरक्षित बचाव

Lasalgaon, Maharashtra:लासलगाव येथील एका पोल्ट्री फार्ममध्ये नागाने अचानक शिरकाव केल्याने एकच खळबळ उडाली खाद्याच्या शोधात आलेल्या नागाने कोंबड्यांच्या तीन ते चार पिल्लांना फस्त केल्याची घटना घडली यावेळी शेकडो पिल्लांमध्ये मुक्तपणे फिरणारा नाग पाहून काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते कोंबडीचे पिल्ले पचवण्यासाठी नागाने पोल्ट्रीमध्ये असलेल्या लोखंडी गल्डरला घट्ट विळखा घालून बसलेलो होता याची माहिती सर्पमित्राला मिळतात त्या ठिकाणी येऊन सर्पमित्राने यशस्वीरित्या या विषारी नागाचे रेस्क्यू केले पोल्ट्री फार्ममध्ये अशा प्रकारे नागाचा प्रवेश होत असल्याने पोल्ट्री व्यवसायिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे
0
0
Report
Advertisement

शिर्डी साई संस्थान नियुक्ति पर बहस, कुंभ तैयारी पर असर

Shirdi, Maharashtra:देश विदेशातील भाविकांचे श्रद्धास्थान शिर्डीचे साईबाबा..राज्यातील सर्वात श्रीमंत असणाऱ्या या देवस्थानला गेल्या सात वर्षांपासून विश्वस्त मंडळ नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाने जिल्हा न्यायाधीश अध्यक्ष असलेली त्रिसदस्यीय समिती विश्वस्त मंडळाचा कारभार पाहत आहे. मात्र अनेकदा मोठे धोरणात्मक निर्णय घेताना न्यायालयाच्या परवानगीची गरज असल्याने अनेक निर्णय प्रलंबित आहे. त्यातच आगामी कुंभमेळा लक्षात घेता विश्वस्त मंडळ लवकर यावे अशी अपेक्षा आजी-माजी खासदारांनी माध्यमांशी बोलतांना व्यक्त केलीय... जगाला श्रद्धा आणि सबुरीचा मंत्र देणाऱ्या साईंच्या देवस्थानलाच विश्वस्त मंडळासाठी गेल्या सात वर्षांपासून सबुरी ठेवण्याची वेळ आलीये. गेल्या सात वर्षांपासून विश्वस्त मंडळाचा कारभार उच्च न्यायालयाच्या आदेशाने सुरू आहे. राज्यात महायुती सरकार आल्यावर विश्वस्त मंडळ येईल अशी अपेक्षा होती मात्र अद्याप विश्वस्त मंडळ घोषणेला मुहूर्त मिळालेला नाही. अनेक मोठे निर्णय घेताना न्यायालयाची परवानगी आवश्यक असल्याने अनेक महत्त्वाचे निर्णय प्रलंबित आहेत... त्यातच आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर होणारी गर्दी लक्षात घेता व नियोजनासाठी विश्वस्त मंडळ असणे गरजेचे असल्याचे मत शिर्डीचे खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी व्यक्त केलं... बाईट - भाऊसाहेब वाकचौरे , खासदार शिर्डी V/O - विश्वस्त मंडळ याव ही शिर्डी ग्रामस्थांची आधीपासूनच मागणी आहे.मात्र मुख्यमंत्री लवकरच काम करणारे विश्वस्त मंडळ देईल असा मला विश्वास असल्याचे सांगताना सुजय विखे यांनी कोणतीही निवड करायची वेळ आली کی माझं नाव चर्चेत येतं.. कृपा करून माझं नाव चर्चेत आणू नका हे स्पष्ट केले.. तर पद्मभूषण, विभूषण सह अभ्यासू व्यक्तींना विश्वसमंडळात स्थान दिले पहिजे अशी मागणी सुजय विखे यांनी केली... बाईट - सुजय विखे, माजी खासदार, अहिल्यानगर V/O - साईबाबा संस्थान हे केवळ धार्मिक श्रद्धेचं केंद्र नसून देशातील सर्वात महत्त्वाच्या देवस्थानांपैकी एक आहे. दरवर्षी कोट्यवधी भाविक शिर्डीत दाखल होत असताना संस्थानच्या कारभारासाठी सक्षम आणि निर्णयक्षम विश्वस्त मंडळ असणं गरजेचं मानलं जात आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर वाढणारी भाविकांची संख्या, पायाभूत सुविधा, नियोजन आणि विविध विकासकामांसाठी प्रलंबित निर्णय तातडीने घेण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे. त्यामुळे गेल्या सात वर्षांपासून रखडलेली विश्वस्त मंडळाची नियुक्ती आता तरी होणार का, याकडे साईभक्तांसह जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. प्रतिनिधी कुणाल जमदाडे झी 24 तास शिर्डी अहिल्यानगर
0
0
Report

नांदेड़ के सोनखेड पेट्रोल पंप पर हत्या, सीसीटीवी से आरोपी की तलाश

Nanded-Waghala, Maharashtra:भरदिवसा पेट्रोल पंपावर एकाचा खूण करण्यात आला. नांदेड जिल्हयातील लोहा तालुक्यातील सोनखेड येथे ही घटना घडली. नांदेड शहरातील पिरबुर्हान नगर येथील राहीवाशी साजिद अली हे प्लंबरचे काम करत होते. पेट्रोल पंपावर पाईपने पाणी मारण्याच काम साजीद अली करत होते. पेट्रोल पंपावर आलेल्या दोघानी साजीद अली याच्यासोबत वाद घातला. दोघांनी त्यांना मारहाण करण्यास सुरुवात केली. लोखंडी रॉडने साजिद अली याच्या डोक्यावर वार करण्यात आले. डोक्याला जबर मार लागल्याने त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी सोनखेड पोलीसांनी गुन्हा दाखल केला असून सीसीटिव्हीच्या आधारे आरोपींचा शोध सुरु आहे. खुनाचे कारण अजुन स्पष्ट झाले नाही.
0
0
Report

वाशीम में 650 मीट्रिक टन डीएपी खत का बफर स्टॉक वितरण के लिए खुला

Washim, Maharashtra:जिल्ह्यात डीएपी खताची वाढती मागणी लक्षात घेता जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या विशेष मान्यतेने जिल्ह्यातील ६५० मेट्रिक टन राखीव (बफर) डीएपी खताचा साठा वितरणासाठी खुला करण्यात आला आहे. हा साठा आज दुपारी ३ वाजेपासून जिल्ह्यातील ४३ अधिकृत विक्रेत्यांमार्फत उपलब्ध होणार आहे. कारंजा, मालेगाव, मंगरुळपीर, रिसोड, वाशिम आणि मानोरा तालुक्यांमध्ये खताचा हा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना वेळेत खत मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला असून, शेतकऱ्यांनी कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत विक्रेत्यांकडूनच खत खरेदी करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी केले आहे.
0
0
Report
Advertisement

अकोला के समशेरपूर में अधिक मास स्नान के दौरान मां-बेटे की डूबकर मौत

Akola, Maharashtra:Anchor removed content: मिळालेल्या माहितीनुसार, गावातील काही महिला आणि एक दहा वर्षीय मुलगा नदीवर आंघोळीसाठी गेले होते. यावेळी स्वराज खोत याला पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात जाऊन बुडू लागला. आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आई वृषाली खोत यांनी तत्काळ पाण्यात उडी घेतली. मात्र दोघांनाही पोहता येत नसल्याने ते पाण्याच्या प्रवाहात वाहू लागले. हे पाहून त्यांच्यासोबत असलेल्या माधुरी खोत आणि मीरा चौधरी यांनीही मदतीसाठी नदीत उडी घेतली. मात्र त्याही पाण्यात अडकल्या. आरडाओरडा ऐकून नदी जवळ उपस्थित युवकांनी घटनास्थळी धाव घेत पाण्यात उडी मारली आणि मोठ्या प्रयत्नांनंतर माधुरी खोत व मीरा चौধरी यांना सुखरूप बाहेर काढले. दरम्यान, वृषाली खोत आणि स्वराज खोत यांचा शोध सुरू करण्यात आला. काही वेळानंतर दोघांचेही मृतदेह पाण्यात आढळून आले. या दुर्घटनेत बचावलेल्या महिलांना पुढील उपचारासाठी अकोला येथे रवाना करण्यात आले आहे. अधिक मासाच्या धार्मिक स्नानासाठी गेलेल्या कुटुंबावर काळाने घाला घातल्याने समशेरपूर गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
0
0
Report

बारिश मौसम में कोकण की रात्री फेरी सेवाएं 15 जून से 31 जुलाई बंद

Ratnagiri, Maharashtra:पावसाळ्यात रात्रीची विशेष फेरीबोट सेवेमहिनाभर बंद.. पावसाळी वातावरण आणि महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या सूचनानुसार कोकणातील विविध ठिकाणच्या रात्रीच्या विशेष (जादा) फेरीबोट सेवा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याच्या निर्णय सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन सर्विसेस प्रायव्हेट लिमिटेड यांनी घेतला आहे.. या निर्णयामुळे दाभोळ-धोपावे,जयगड-तवसाळ आणि वेसवी-बागमंडले या मार्गावरील रात्रीची अतिरिक्त फेरी सेवा काही काळासाठी उपलब्ध राहणार नाही.. कंपनीने प्रसिद्ध केलेल्या सूचनेनुसार 15 जून ते 31 जुलै या कालावधीत संबंधित मार्गावरील रात्रीच्या वेळेतील ज्यादा फेऱ्या पूर्णपणे बंद राहतील.. पावसाळ्यात समुद्र आणि खाड्यांमधील बदलते हवामान,वाढलेला वारा तसेच प्रवाशांच्या सुरक्षाेतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आल्याचे कंपनीने स्पष्ट केले आहे..
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top