445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पवार परिवार एक साथ, 2029 में पवार बनाम पवार नहीं होगा—विलय पर निर्णय
Rui, Maharashtra:जय पवार बाईट पॉईंट्स मागणी आमच्या लोकांची आहे मला पक्षासाठी काम करायचं आहे लोकांची जर इच्छा असेल की २९ मध्ये उमेदवारी द्याव तर ही त्यांची इच्छा आहे मी आधीपासून बोलत आलो आहे की मी छोटा कार्यकर्ता म्हणून काम करणार रोहित दादा काहीतरी बोलले, युगेंद्र दादा बोलले म्हणून प्रतिक्रिया आल्या ते एका कामासाठी परदेशात गेले आहेत पवार कुटुंबाची इच्छा आहे की आम्ही सगळ्यांनी एकत्र राहावं पक्षाचे वरिष्ठ नेते विलीनीकरण बाबत निर्णय घेतील २०२९ मध्ये पवार विरुद्ध पवार हा सामना होणार नाही सिल्व्हर ओक वर आहेत त्यांची तब्येत ओके आहे0
0
Report
मुंबई में 16 नंबर पोस्टर फैले, कहाँ-कहाँ दिखे रहस्यमय पोस्टर?
Mumbai, Maharashtra:मुंबईत लागले १६ नंबरचे पोस्टर \n\nराहुल गांधी यांनी लोकसभेतील भाषणात १६ नंबरचे कोडे टाकले होते \n\nआज मुंबईत ठिकठिकाणी १६ या गूढ क्रमांकाचे पोस्टर लागले आहेत \n1) Ghatkopar Station \n\n2) SEEPZ \n\n3) Bandra Linking Road \n\n4) Khar Station \n\n5) Vashi Naka Bus Stand \n6) Chembur Naka \n\n7) Pant Nagar \n8) Pump House Subway, Andheri \n\n9) Balasaheb Thackeray Trauma Hospital, Jogeshwari \nया ठिकाणी पोस्टर लागले आहेत0
0
Report
मुंबई की पहली महिला आयुक्त अश्विनी भिडे से मनसे नेताओं की अहम मुलाकात
Mumbai, Maharashtra:मनसे महिला सेनेनी घेतली मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्तांची भेट. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सरचिटणीस शालिनी ठाकरे व रिटा गुप्ता यांनी मनसेच्या महिला नगरसेविकांसह मुंबई महानगरपालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची भेट घेतली. अश्विनी भिडे यांनी मुंबईच्या पहिल्या महिला आयुक्त होण्याचा मान मिळवला आहे. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी व मुंबईतील महिलांच्या प्रश्नावर चर्चा करण्यासाठी आम्ही त्यांची भेट घेतल्याची शालिनी ठाकरे यांनी सांगितले.0
0
Report
Advertisement
वसई-विरार के गणपति मंदिर परिसर में छेड़छाड़: आरोपी ने खुद को पुलिसकर्मी बताया
Vasai-Virar, Maharashtra:वसई–विरारमध्ये धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विरार पश्चिमेतील गणपती मंदिर परिसरात रस्त्यावरून चालत जाणाऱ्या एका तरुणीची छेड काढल्याचा आरोप एका तरुणावर करण्यात आला आहे. या प्रकारानंतर संतप्त झालेल्या तरुणीने संबंधित तरुणाला चांगलाच चोप दिला. विशेष म्हणजे, आरोपी तरुणाने स्वतःचे वडील, भाऊ आणि मामा हे मीरा-भाईंदर वसई-विरार पोलीस आयुक्तालयात पोलीस असल्याचे सांगत तरुणीवर दादागिरी करण्याचा प्रयत्न केल्याची माहिती समोर आली आहे. हा प्रकार पाहण्यासाठी घटनास्थळी नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. पोलीस प्रशासनाचे नाव बदनाम करणाऱ्या अशा व्यक्तीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. घटनेची माहिती मिळताच बोलींज पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत संबंधित तरुणाला चौकशीसाठी ताब्यात घेतले असून, त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.0
0
Report
विश्व पुस्तक दिवस पर भंडारा पब्लिक लाइब्रेरी ने 'वाचन आनंद' कार्यक्रम शुरू किया
Bhandara, Maharashtra:जागतिक पुस्तक दिनानिमित्त विशेष उपक्रम ... जागतिक पुस्तक दिनाच्या निमित्ताने २३ एप्रिलला सार्वजनिक वाचनालय भंडाऱ्याच्या वतीने ‘वाचू आनंदे’ या विशेष उपक्रमाची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमांतर्गत नूतन कन्या शाळेतील १६३ विद्यार्थिनींनी पुस्तक वाचनाचा आनंद घेतला.पुस्तक वाचना नंतर नियमित पुस्तक वाचनाचा संकल्प विद्याथिनींनी केला. २ मे पर्यंत चालणाऱ्या या उपक्रमात जास्तीत जास्त शाळांनी सहभागी व्हावे असे आवाहन सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने करण्यात आले.0
0
Report
वारकरी संप्रदाय के विवाद के बीच गिरफ्तारी की मांग तेज
Akola, Maharashtra:Anchor : वारकरी संप्रदायात 20 लोकांची ' घुसखोरी ' झाल्याची सूची राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी जाहीर केल्या नंतर आता वाद निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर हिंदू जनजागृती समितीने विकास लवांडे यांच्या अटकेची मागणी केली आहे. वारकरी संप्रदाय ही महाराष्ट्राची समृद्ध धार्मिक परंपरा असून त्यामध्ये कोणत्याही प्रकारे हस्तक्षेप किंवा परंपरांचा अवमान होऊ नये, अशी भूमिका समितीने मांडली आहे. विकास लवांडे यांनी केलेल्या वक्तव्यांमुळे वारकरी संप्रदायाच्या भावना दुखावल्या असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. तसेच, अशा प्रकारच्या घटनांमुळे समाजात गैरसमज पसरू शकतात, त्यामुळे प्रशासनाने तात्काळ कारवाई करून विकास लवांडे यांना अटक करावी, अशी मागणी हिंदू जनजागृती समितीने केली आहे. याशिवाय, धार्मिक परंपरा आणि श्रद्धांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणाऱ्या व्यक्तींविरोधात कठोर भूमिका घेण्याची गरज असल्याचेही एका निवेदनात नमूद करण्यात आले आहे.दरम्यान, या प्रकरणामुळे वारकरी संप्रदायात नाराजीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काळात या वादावर प्रशासन कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्य सरकारने देखील या विषयाला गंभीरतेने न घेतल्यास रस्त्यावर उतरणार असल्याचा इशारा वारकऱ्यांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
प्रशांत अंबी ने MLA संजय गायकवाड़ के खिलाफ धमकी का आरोप दर्ज कराया
Kolhapur, Maharashtra:शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी अश्लील शिवीगाळ करून जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप करत प्रशांत आंबी यांनी कोल्हापुरातील राजारामपुरी पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला आहे. प्रशांत आंबी यांनी आपल्या तक्रारीत नमूद केले आहे की, आमदार गायकवाड यांनी फोनवर अश्लील भाषेत शिवीगाळ केली, तसेच छत्रपती शिवाजी महाराजांबाबत अपमानास्पद वक्तव्य केले. यासोबतच जीभ कापण्याची व जीवे मारण्याची धमकी दिल्याचा तक्रार अर्जात उल्लेख केला आहे. तक्रार अर्जानुसार, 26 एप्रिल 2026 रोजी मध्यरात्री 12:51 वाजता आमदार गायकवाड यांनी फोन करून धमकी दिल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम 351, 352, 356, 192 तसेच मानवी हक्क संरक्षण कायद्याअंतर्गत फौजदारी गुन्हा दाखल करण्याची मागणी तक्रारदाराने केली आहे. तसेच, आमदार गायकवाड व त्यांच्या सहकाऱ्यांकडून स्वतःला व आपल्या कुटुंम्बीयांना धोका असल्याचेही आंबी यांनी तक्रारीत म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणी राजारामपुरी पोलिसांकडून तक्रारीची पडताळणी सुरू आहे.0
0
Report
हेल्प फाउंडेशन ने छह फीट के अजगर को सुरक्षित बाहर निकाला
Chendhare, Maharashtra:कोंबड्यांच्या खुराड्यात शिरलेल्या सहाफुट लांबीच्या अजगराला हेल्प फाउंडेशनच्या स्वयंसेवकांनी सुखरूप बाहेर काढले. खोपोली जवळच्या हाळ गावातील अमजद सोंडे यांच्या गावठी कोंबड्यांच्या खुरड्यात सहा फुटी अजगर शिरल्याची बाब आज सकाळी निदर्शनास आली. हेल्प फाउंडेशनचे गुरुनाथ साठेलकर आणि अमोल ठकेकर यांनी या अजगराला सुरक्षित बाहेर काढून नैसर्गिक अधिवासात सोडले.0
0
Report
कल्याण के प्रेम ऑटो क्षेत्र में पानी दीवार गिरने से खतरा; महापौर का बयान
Kalyan, Maharashtra:कल्याण के प्रेम ऑटो क्षेत्र में पानी दीवार गिरने से खतरा; महापौर का बयान0
0
Report
Advertisement
अंत्री में श्रीराम महाराज मेहुणकर जन्मशताब्दी के भव्य दिव्य धार्मिक उत्सव का समापन
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील अंत्री (मलकापूर) येथील श्री स्वयंभू महादेव मंदिरात सध्या भव्य दिव्य असा धार्मिक सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विदर्भ भूमीचे दैदिप्यमान संत श्रीसंत श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या जन्मशताब्दी उत्सवानिमित्त हा पवित्र कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.१६ ते २३ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या उत्सवात ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सप्ताह, कीर्तन, प्रवचन तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सोहळ्याला हजारो भाविकांनी उपस्थिती लावत भक्तिभावाने सहभाग नोंदवला.सप्ताहभर सुरू असलेल्या या धार्मिक उत्सवामुळे अंत्री परिसर पूर्णपणे भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता. संत श्रीराम महाराज मेहुणकर यांच्या विचारांचा आणि अध्यात्मिक वारशाचा जागर या माध्यमातून करण्यात आला.एकूणच, या भव्य सोहळ्याने भाविकांना अध्यात्मिक समाधान देत अंत्री परिसरात श्रद्धा आणि भक्तीची एक वेगळीच उंची गाठली.0
0
Report
कल्याण में 108 एम्बुलन्स की 40 मिनट की देरी से मौत, स्थानीय लोगों ने लगाया आरोप
Kalyan, Maharashtra:ANC- कल्याण पश्चिमेतील दीपक हॉटेल परिसरात एका व्यक्तीच्या मृत्यूवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. मेवालाल गुप्ता नावाच्या व्यक्तीचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती असून, 108 ॲम्बुलन्स उशिरा पोहोचल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. आम्ही ॲम्बুলन्स घेऊन 12 मिनिटात पोहोचलो होतो नागरिक आम्हाला मारणार होते आमच्याकडून कोणत्याही प्रकारचा निष्काळजीपणा झालेला नाही अशी प्रतिक्रिया आहे. मेवालال गुप्ता कामानिमित्त कल्याणमध्ये आले होते. अचानक छातीत वेदना सुरू झाल्याने त्यांनी 108 क्रमांकावर ॲम्बुलन्ससाठी कॉल केला. काही स्थानिक नागरिकांनीही तातडीने ॲम्बुलन्सला संपर्क साधला. मात्र, ॲम्बुलन्स तब्बल 40 मिनिटांनी घटनास्थळी पोहोचल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. यामुळे परिसरात संतापाचे वातावरण निर्माण झाले. घटनेनंतर गुप्ता यांना रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. मृतदेहाचे पोस्टमार्टमही करण्यात आले असून, या संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. या प्रकरणात 108 ॲम्बুলन्सवरील डॉक्टर मोहम्मद तोफिक आणि चालक प्रकाश चोरगे यांनी वेगळीच बाजू मांडली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, रात्री 10 वाजून 29 मिनिटांनी कॉल मिळाल्यानंतर ते केवळ 12 मिनिटांत घटनास्थळी पोहोचले होते. त्यांनी संबंधित व्यक्तीची तपासणी केली असता तोपर्यंत त्यांचा मृत्यू झालेला होता. तसंच, घटनास्थळी मोठी गर्दी जमली होती आणि संतप्त नागरिकांकडून हल्ला होण्याची भीती निर्माण झाल्याने तेथून निघून जावे लागले, असेही त्यांनी स्पष्ट केले. आमच्याकडून कोणताही निष्काळजीपणा झालेला नाही,असा दावा त्यांनी केला आहे. दीपक हॉटेल परिसरात पोहोचायला अवघ्या काही मिनिटांचा वेळ लागतो, मग 40 मिनिटांचा उशीर कसा झाला? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित करण्यात येत आहे. या प्रकरणाची संबंधित विभागाकडून चौकशी सुरू असून, प्रत्यक्षात विलंब झाला का? हे चौकशीनंतर स्पष्ट होणार आहे. बाईट -डॉक्टर तोफिक 108 ॲम्बुलन्स बाईट - प्रकाश चोरगे ॲम्बुलन्स चालक p2c... आतिश भोईर कल्याण0
0
Report
रत्नागिरी के संगमेश्वर में तेज बारिश, अवकाली मॉनसून के साथ ऑरेंज अलर्ट जारी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी- संगमेश्वर तालुक्यात विजांच्या गडगडाचा सह अवकाळी पाऊस तुरळ इथं मेघगजनेसह जोरदार पावसाच्या सरी मुंबई गोवा महामार्गावर ची वाहतूक मंदावली हवामान विभागाचा अवकाळी पावसाचा अंदाज खरा कोकणासाठी आज हवामान विभागांना दिला होता अवकाळी पावसाचा ऑरेंज अलर्ट दुपारनंतर अवकाळी पावसाला सुरुवात गेल्या अर्ध्या तासापासून बरं असतात पावसाच्या दमदार सरी पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा हवामान विभागाचा अंदाज अवकाळी पावसामुळे एप्रिल महिन्यातील आंबा पीक धोक्यात0
0
Report
Advertisement
उष्णते का कहर: धाराशिव के खवा-पेड़ा उद्योग संकट में
Dharashiv, Maharashtra:उष्णतेचा फटका; धाराशिवचा खवा क्लस्टर डळमळीत – कुंतलगिरीचा पेढा झाला महाग! दूध उत्पादक शेतकरी ही संकटात धाराशिव जिल्हा खवा उत्पादनासाठी देशभर ओळखला जातो… पण आता वाढत्या उन्हामुळे हाच खवा आणि पेढा उद्योग संकटात सापडला आहे. तापमान 40 अंशांच्या पुढे गेल्याने जनावरांवर ताण वाढलाय… पाणी आणि चाऱ्याचा गंभीर प्रश्न निर्माण झालाय… आणि याचा थेट परिणाम दुधाच्या उत्पादनावर होतोय. परिणामी, खव्याच्या किमती वाढल्या असून कुंतलगिरीचा देशभर प्रसिद्ध पेढा देखील महागला… शेतकरी ते ग्राहक सगळेच या संकटाच्या फटक्यात सापडले आहेत. धाराशिव जिल्ह्यातील भूम परिसरात दररोज मोठ्या प्रमाणावर दूध उत्पादन होतं… मात्र सध्या तीव्र उष्णतेमुळे उत्पादन निम्म्यावर आलं आहे. जिल्ह्यात साधारण 5 ते 6 लाख लिटर दूध उत्पादन होत असताना, आता त्यात मोठी घट झाली आहे. दुसरीकडे, धाराशिवचा खवा उद्योग हा कोट्यवधींची उलाढाल करणारा उद्योग मानला जातो… मात्र दुधाच्या कमतरतेमुळे खवा उत्पादन घटलं आहे आणि त्याचा थेट परिणाम पेढा उद्योगावरही दिसून येतोय. एकीकडे उष्णतेचा वाढता तडाखा… दुसरीकडे घटलेलं दूध उत्पादन… आणि त्यातून महागलेला खवा व पेढा… धाराशिवचा हा प्रसिद्ध उद्योग सध्या मोठ्या संकटात सापडला आहे. जर परिस्थिती अशीच कायम राहिली, तर येत्या काळात दूध व्यवसायासोबतच धार्मिक प्रसाद व्यवस्थेवरही गंभीर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.0
0
Report
भीमा नदी में पानी तुरंत न छोड़े जाने पर किसान 28 अप्रैल को जल समाधि का ऐलान
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीत जर तातडीने पाणी सोडले नाही तर 28 एप्रिल रोजी उजनी धरणात शेतकरी जल समाधी घेणार, माजी खासदार राजू शेट्टी यांचा इशारा. सध्या उन्हाळा सुरू आहे. उन्हाळी पिकांना पाण्याची गरज आहे. भीमा नदी कोरडी आहे. उजनी धरणात पाणी कशासाठी साठवले आहे. वाळू चोरणाऱ्या लोकांसाठी नदी कोरडी ठेवली आहे का ? जर पाणी तातडीने सोडले नाही तर 28 एप्रिल रोजी शेतकरी जल समाधी घेतील असा इशारा दिला आहे0
0
Report
चंद्रकांत पाटील ने जल प्रबोधन के लिए जलव्यवस्थापन कृती पंधरवडा का उद्घाटन किया
Sangli, Maharashtra:सांगलीमें जलसंपदा विभागाच्या माध्यमातून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलव्यवस्थापन कृती पंधरवडा कार्यक्रम संपन्न झाला आहे। पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीमध्ये वारणाली येथील पाटबंधारे कार्यालयामध्ये जल व्यवस्थापन व पीक पद्धतीवर कार्यशाळा पार पडली; यावेळी मध्ये चंद्रकांत पाटलांनी बोलताना जल व्यवस्थापनाचे प्रभावी नियोजन केल्यास दुष्काळी परिस्थितीवर मात करता येऊ शकते. त्यामुळे उपलब्ध पाण्याचे काटेकोर नियोजन करून काटकसरीने पाणी वापरण्याची गरज व्यक्त करत शेतकरी व नागरिकांच्या जलप्रबोधनासाठी जलव्यवस्थापन कृती पंधरवडा दिशादर्शक ठरेल, असा विश्वास मंत्री पाटील यांनी व्यक्त केला.0
0
Report
Advertisement
