icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

जायकवाड़ी डैम का जलस्तर 41.43% रहा, गर्मी में पानी बचाने की तैयारी तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण येथील जायकवाडी धरणातील पाणीसाठा झपाट्याने घटत असून सध्या धरणात केवळ ४१.४३ टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे... वाढत्या उन्हामुळे पाण्याचे बाष्पीभवन मोठ्या प्रमाणात होत असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे... मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, जालना, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यांना याच धरणातून पिण्याचे पाणी, शेती आणि औद्योगिक वापरासाठी पाणीपुरवठा केला जातो... त्यामुळे आगामी काळात पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे..
0
0
Report

देवगांव तालाब में मछलियाँ मरने लगीं: पानी दूषित होने की आशंका से ग्रामवासी चिंतित

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील देवगाव येथील लघु सिंचन तलावात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून मासे मृत अवस्थेत आढळून येत असल्याने परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. तलावाच्या कडेलादररोज मोठ्या प्रमाणावर मासे मृत अवस्थेत पडलेले दिसत असून दुर्गंधीही पसरू लागली आहे. या घटनेमुळे तलावातील पाणी दूषित झाल्याची शक्यता व्यक्त केली आहे. देवगावसह रजापूर आणि ब्राम्हणगाव या गावांच्या पाणीपुरवठ्याची मदार याच तलावावर असल्याने ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.
0
0
Report
Advertisement

मिलिंद एकबोटे ने लव जिहाद पर बाजीराव-मस्तानी पैटर्न अपनाने का किया आह्वान

Barav, Maharashtra:लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून पुण्यात आता एक नवा वाद पेटण्याची चिन्हं आहेत. समस्त हिंदू आघाडीचे कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी आता थेट 'बाजीराव-मस्तानी' पॅटर्न राबवण्याचं आवाहन केलंय. 'जर मुसलमान लव्ह जिहाद करत असतील, तर हिंदूंनी बाजीराव-मस्तानी केलं पाहिजे', असं विधान एकबोटे यांनी केलं आहे. इतकंच नाही, तर मुस्लिम मुलीशी लग्न करून तिला घरी आणणाऱ्या हिंदू तरुणाला १ लाख रुपये रोख आणि चांदीचं कडे बक्षीस देण्याची घोषणाही त्यांनी जाहीर सभेत केली आहे. या विधानामुळे आता राजकीय आणि सामाजिक वर्तुळात मोठी खळबळ उडाली असून, यावर आता काय कायदेशीर कारवाई होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलंय.
0
0
Report
Advertisement

इंग्लिश में शपथ लेने पर मनसे की तीखी टीका, मराठी महाराष्ट्र में चर्चा तेज

Navi Mumbai, Maharashtra:झिशान सिद्दीकी यांनी इंग्रजीतुन घेतलेली शपथ हि राज्य शासनाच्या कानाखाली चपराक, मनसेची टीका. मनसेचे प्रवक्ते योगेश चिले यांनी इंग्रजीतुन घेतलेली शपथ हि राज्य शासनाच्या कानाखाली चपराक असल्याचे म्हटलंय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे महाराष्ट्रात मराठीच चालणार म्हणतात रिक्षा वाल्यांना मराठी आली पाहिजे म्हणतात मात्र त्यांच्या समोरच झिशान सिद्दीकी इंग्रजीत शपथ घेतात याच्या सारखं दुसरं दुर्दैव नाही अशी टीका मनसे प्रवक्ते योगेश चिले यांनी केलेय.
0
0
Report

पंढरपुर में समाधान आवताडे की होर्डिंग के कारण गडकरी स्वागत खर्च पर भाजपा नाराज़

Pandharpur, Maharashtra:आमदार समाधान आवताडे यांची नितीन गडकरींच्या स्वागतासाठी पोस्टरबाजी; पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला भाजप आमदाराचा हरताळ आर्थिक संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आर्थिक काटकसर करण्याचे आव्हान केले आहे. मात्र पंढरपूरातील भाजपचे आमदार समाधाना आवताडे यांनी मात्र पंतप्रधानांच्या या आवाहनाला हरताळ फासल्याचे चित्र दिसून येत आहे. केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी आज पंढरपूर दौऱ्यावर आहेत त्यांच्या दौऱ्याच्या निमित्ताने आमदार समाधान आवताडे यांनी पंढरपूर शहरांमध्ये स्वागताचे मोठमोठे होर्डिंग आणि बॅनर लावलेले आहेत. यासाठी त्यांनी लाखो रुपयांची उधळपट्टी केल्याची चर्चा शहरात सुरू आहे. आज दुपारी नितीन गडकरी पंढरपूरमध्ये पालखी मार्गाची पाहणी करण्यासाठी येणार आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी वाखरी पासून ते पंढरपूर पर्यंतच्या आठ किलोमीटर रस्त्याच्या दुतर्फा स्वतःच्या छायाचित्रासह नितीन गडकरी यांच्या स्वागताचे होर्डिंग व बॅनर लावले आहेत. आमदार समाधान आवताडे यांनी मोठ्या प्रमाणात लावलेल्या होर्डिंग व बॅनर्जी चर्चा सुरू आहे. दरम्यान अवताडे यांनी केलेल्या पोस्टरबाजी बद्दल भाजपच्या वरिष्ठ नेत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे
0
0
Report
Advertisement

सांगली में तूफानी हवा: जत और मिरज के घर ढहें, दो घायल

Sangli, Maharashtra:सांगली जिल्ह्यातल्या जत आणि मिरज तालुक्याला वादळी वाऱ्याचा प्रचंड तडाखा बसला आहे. सुमारे दीडशेहून अधिक घरांचे, गोट्यांचे, शेडचे पत्रे व कौल उडून गेली आहेत. त्यामुळे दोन जण जखमी देखील झाले आहेत. जत तालुक्यातील कुणीकोनूर सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याने घरांचा मोठी पडझड झाली आहे. जत तालुक्यात जवळपास 100 हुन अधिक घरे, गोट्यांचे छत उडून गेले आहेत, तर काही ठिकाणी भिंती देखील कोसळले आहेत, त्याचबरोबर अनेक ठिकाणी विद्युत खांब कोसळली असून अनेक रस्त्यांवरील झाड देखील उन्मळून पडले आहेत. मिरज तालुक्यातील पूर्वभागाला देखील वादळी वारयाचा मोठा फटका बसला आहे, खटाव, बेलंकी, लिंगनूर, सलगरे सह आसपासच्या गावांमध्ये वादळी वाऱ्याचा कहर झाला आहे, त्यामुळे घरे, शेड, गोठयांची पत्रे उडून गेली आहेत, तसेच अनेक ठिकाणी झाडे देखील उन्मळून पडली आहेत. विद्युत खांबे देखील वाकल्याने अनेक ठिकाणी विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. तर या पडझाडीचे तातडीने पंचनामे करून मदत मिळावी, अशी मागणी होत आहे.
0
0
Report

सातारा में पीएम आवास योजना: 5 लाख घरों का उद्घाटन, 10000 करोड़ रुपये वितरित

Satara, Maharashtra:सातारा: प्रधानमंत्री आवास योजना अंतर्गत महाराष्ट्रासाठी मंजूर झालेले ३० लाख घरांपैकी पूर्ण झालेल्या ५ लाख घरांचा भव्य लोकार्पण सोहळा आणि याच कार्यक्रमात योजनेच्या पुढील कामांसाठी तब्बल १० हजार कोटी रुपयांच्या निधीचे वितरण उद्या १५ मे रोजी साताऱ्यात सैनिक स्कूल मैदानावर मान्यवरांच्या हस्ते केले जाणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आव्हान केल्यानंतर उद्याच्या सभेला देखील काटकसर करण्यात येणार असल्याची माहिती मंत्री जयकुमार गोरे यांनी दिली आहे.. ५० हजार लाभार्थ्यांना न बोलवता उद्या १५ हजार लाभार्थ्यांना बोलवून काटकसर करून हा लोकार्पण सोहळा संपन्न होणार आहे. या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर आज राज्याचे ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी कार्यक्रमाच्या ठिकाणाची प्रत्यक्ष पाहणी करून तयारीचा आढावा घेतला. उद्या होणाऱ्या या सोहळ्यास केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. प्रशासनाकडून या भव्य सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

प्रधानमंत्री के इंधन बचत आह्वान पर प्रशासनिक अधिकारी भी साइकिल डे अपनाने लगे

Chendhare, Maharashtra:पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांचा सायकलवरून प्रवास निवासस्थान ते कार्यालय प्रवासासाठी सायकलचा वापर म्हसळा तहसीलदार खाडे यांनी केला सायकल प्रवास पंतप्रधान मोदी यांच्या इंधन बचत आवाहनाला प्रतिसाद रायगडच्या पोलिस अधीक्षक आँचल दलाल यांनी सरकारी निवासस्थान ते कार्यालय असा प्रवास सायकल वरून करण्यास सुरुवात केली आहे. तर म्हसळा तहसीलदार सचिन खाडे यांनीही सायकलवरून कार्यालय गाठले. अशा छोट्या प्रवासासाठी पायी किंवा सायकल वरून प्रवास केल्यास मोठी इंधन बचत होऊ शकते हे लक्षात घेऊन आठवड्यातील एक दिवस सायकल डे राबवण्याचा मानस प्रशासनात व्यक्त होत आहे.
0
0
Report

केंद्र ने चीनी निर्यात पर पूर्ण रोक लगाई, किसानों और उद्योग पर बड़ा असर

Shirdi, Maharashtra:केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील व देशभरातील साखर उद्योगावर अत्यंत प्रतिकूल परिणाम करणारा व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आणखीन संकटात ढकलणारा हा निर्णय आहे. साखरेचे किमान विक्री मूल्य गेले अनेक वर्ष मागणी करूनही वाढवण्यात न आल्यामुळे अगोदरच साखर उद्योग संकटात सापडला आहे. वाढत्या प्रक्रिया खर्चाचा परिणाम व साखरेला योग्य भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांचे एफआरपीचे पैसे सुद्धा अनेक कारखान्यांना देता येणार नाहीत अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. अशा पार्श्वभूमीवर साखरेचे किमान विक्री मूल्य वाढवून سाखर निर्यातीला प्रोत्साहन देण्याची आवश्यकता होती. या ऐवजी नियंत्रित हा शब्द हटवून प्रतिबंधित हा शब्द टाकत केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीला संपूर्णपणाने बंदी जाहीर केली आहे. हा निर्णय मागे घेण्याची मागणी किसान सभेचे नेते डॉ. अजित नवले यांनी केलीय..
0
0
Report

वणी की निर्गुडा नदी दूषित, पानी संकट गहरा गया

Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या वणी शहराची जीवनदायिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निर्गुडा नदीची अवस्था भयानक झाली आहे. पालिका प्रशासन संबंधित विभागांनी नदीला दुर्लक्षित केल्यामुळे नदीचे पात्र गटारगंगा बनले आहे. तर उन्हाळ्यात ही नदी कोरडी पडल्याने पाण्याचा देखील प्रश्न निर्माण झाला आहे. नदीच्या पात्राची विदारक परिस्थिती झाली आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचीही समस्या निर्माण झाली आहे. नवरगाव धरणाचे पाणी निर्गुडा नदीसाठी आरक्षित ठेवण्यात आले आहे, मात्र हे पाणी देखील सोडल्या जात नाही. जीवनदायीणी असलेल्या निर्गुडा नदीत चक्क नागरी वसाहतीतील अतिशय घाण पाणी सोडले जात असल्याने पात्र दूषित झाले आहे. नदीच्या दूषित पाण्यामुळे नागरिकांत गंभीर आजार बळावण्याची भीती व्यक्त केली जात आहे. येथे पालिकेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. मात्र या केंद्रात पाण्याचे शुद्धीकरण केल्या जात नाही. अनेक भागातील सांडपाणी नालिद्वारे मोठ्या प्रमाणावर नदीत सोडले जाणे दिसत आहे. नदी पार करताना नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागतो. गणेशपूर पुलाच्या दोन्ही बाजुच्या पात्रातून मोठ्या प्रमाणावर खुलेआम रेतीची चोरी देखील केली जात आहे. परंतु शासन प्रशासनातील कुणीही या गंभीर बाबीकडे लक्ष द्यायला तयार नाहीत. काही वर्षांपूर्वी नदीच्या उद्धारासाठी वणीकरांनी 'मिशन निर्मल निर्गुडा' अंतर्गत लोकसहभागातून नदी स्वच्छ केली. नदीचे पात्र मोठे केले. त्यावेळी उर्वरित कामे शासनाकडून केल्या जातील असे लोकप्रतिनिधींनी सांगितले. मात्र ही आश्वासने हवेत विरली. परिणामी नदीची अवस्था विदारक झाली असून आता पुन्हा प्रशासनासोबत नागरिकांनीही जागरूक होऊन निर्गुडा पुन्हा निर्मल करण्याची वेळ आली आहे.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top