445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
कराड में इंजीनियर की हत्या: पत्नी व प्रेमी समेत चार गिरफ्तार
Satara, Maharashtra:कराड, सातारा - ठाणे येथे जलसंधारण विभागात अभियंता म्हणून कार्यरत असलेल्या लक्ष्मण मंडले या कराड येथील अभियंत्याच्या खुनाचा उलगडा करण्यात कराड पोलिसांनायश आल आहे. अभियंत्याच्या पत्नी, मेव्हुण्यानंतर आता अल्टो गाडीखाली चिरडणाऱ्या दोन्ही कॉन्ट्रॅक्ट किलरना कराड पोलिसांनी अटक केली आहे. अभियंत्याची पत्नी सारिका मंडले हिने आपला 25 वर्षीय प्रियकर प्रथमेश थोरात याला तीन लाखाची सुपारी दिली होती. प्रियकराने आपला साथीदार आकाश होनसुरे यांच्या मदतीने अभियंता लक्ष्मण मंडले याला क्रूरपणे चिरडले. या खून प्रकरणात आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली असून कॉन्ट्रॅक्ट किलराना पत्नीने माहिती पुरवली होती.0
0
Report
आळंदी में एम-परिवहन साइबर फ्रॉड: 4.76 लाख के गोरखधंदे पर GSTड
Pimpri-Chinchwad, Maharashtra:आळंदीतील 'एम-परिवहन' सायबर फसवणूक : ४.७६ लाखांचा गंडा ... आळंदी परिसरातील एका आयटी अभियंत्याला बनावट "एम-परिवहन" ट्रॅफिक चलनाच्या मेसेजद्वारे तब्बल ४ लाख ७६ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पीडित तरुणाला मोबाईलवर वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याचा बनावट चलनाचा मेसेज आला होता. चलन तपासण्यासाठी त्याने मेसेजमधील लिंकवर क्लिक केले. त्यानंतर त्याच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड झाले आणि सायबर गुन्हेगारांनी मोबाईलवर रिमोट ॲक्सेस मिळवला. काही मिनिटांतच त्याच्या बँक खात्यातून चार महागडे स्मार्टफोन खरेदी करण्यात आले. या व्यवहारातून ४.७६ लाख रुपयांची फसवणूक झाली. या प्रकरणी आळंदी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत. नागरिकांनी कोणत्याही संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये, तसेच अधिकृत संकेतस्थळावरूनच चलनाची पडताळणी करावी, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.0
0
Report
नागपुर NDPS: 52 ग्राम MD पावडर, दो गिरफ्तार, 2.29 लाख रुपए का माल बरामद
Nagpur, Maharashtra:नागपूर :- नागपूर पोलिसांनी ५२ ग्रॅम एमडी पावडर जप्त केली, एक दुचाकी सह एकूण ९ लाख ४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या NDPS पथकाने ही कारवाई केली. विजया रहांगडाले आणि शहबाज फिरोज शाह अशी आरोपींची नावे आहेत. एनडीपीएस पथक वाठोडा रिंग रोडजवळ पेट्रोलिंग करीत असताना आरोपी संचयितरित्या दिसून आले. त्यांच्याकडे अमली पदार्थ असण्याची दाट शक्यता वाटल्याने पोलيسांनी झडती घेतली. आरोपीजवळ ५२ ग्राम एमडी पावडर मिळून आल्याने पोलिसांनी दोन्हांनाही ताब्यात घेतले. त्यांच्याकडून एमडी पावडर, मोबाईल, मोपेड व रोख असा २ लाख २९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोन्ही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करत भांडेवाडी पोलिस ठाण्याच्या हवाली करण्यात आले. आरोपी विजय रहांगडाले हा कुख्यात गुन्हेगार असून त्याच्याविरोधात हत्या, दरोडा, चोरीसारखे गुन्हे दाखल आहेत. पुढील तपास सुरू आहे...0
0
Report
Advertisement
ऑनलाइन खत वितरण प्रणाली से किसान उथल-पुथल, ऑफलाइन बिक्री शुरू करने की मांग
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ऑनलाइन खत वितरण प्रणाली से किसान उथल-पुथल, ऑफलाइन बिक्री शुरू करने की मांग. खरी-प हंगामाची लगबग सुरू असतानाच केंद्र शासनाने प्रायोगिक तत्त्वावर आणलेली नवी ऑनलाईन खत वितरण प्रणाली शेतकऱ्यांच्या मुळावर आली आहे. 'फ्रेमवर्क फॉर फर्टिलायझर सेल' या नव्या ऑनलाईन ॲपमधील क्लिष्टता आणि गंभीर तांत्रिक त्रुटींमुळे जिल्ह्यातील शेतकरी आणि कृषी विक्रेते पुरते हैराण झाले आहेत. या जाचक प्रणालीविरुद्ध जिल्ह्यात तीव्र असंतोष पसरला असून, संतप्त शेतकऱ्यांचे कृषी केंद्रा चालकासोबत खटके उडत आहेत. त्यामुळे ही ऑनलाईन कटकट तत्काळ बंद करून पूर्वीप्रमाणेच 'ऑफलाईन' पद्धतीने सातबारा-आधार कार्डवर खतविक्री सुरू ठेवावी, अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.0
0
Report
सोलापुर में एक रात में 22 मिमी बारिश, किसानों के लिए राहत या फसल नुकसान?
Solapur, Maharashtra:सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात एका रात्रीत 22 मिलिमीटर पावसाची नोंद रोहिणी नक्षत्राचा सोलापूर जिल्ह्यात एकूण 22 मिलिमीटर पाऊस पडला. माळशिरस तालुक्यात सर्वाधिक 69 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. जून महिन्यात सोलापूर जिल्ह्यात एकूण 40 मिलिमीटर पावस पडल्याची माहिती हवामान विभागाच्या वतीने देण्यात आलीय. जिल्ह्यात झालेल्या पावसामुळे नागरिकांना उकाडापासून मोठा दिलासा मिळालाय तर दुसरीकडे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.0
0
Report
27 साल पूरे हुए मांडवी एक्सप्रेस: कोकण की प्रिय इंटरसिटी
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकण वासियांची लाडकी 'मांडवी' झाली 27 वर्षांची.. सकारात्मक बदलामुळे प्रवाशांच्या सर्वाधिक पसंतीस.. मांडवी एक्सप्रेस ही दिवसाची सेवा देणारी एकमेव एक्सप्रेस ठरली आहे.. मुंबई-मडगाव दरम्यान इंटरसिटी एक्सप्रेस म्हणून सुरू झालेल्या मांडवी एक्सप्रेसच्या सेवेची 27 वर्ष पूर्ण झाली आहेत.. कोकण मार्गावर नियमितपणे धावणारी मांडवी एक्सप्रेस नेहमीच हाउसफुल धावते.. मांडवी एक्सप्रेसची नियोजित वेळ सर्वच दृष्टीने प्रवाशांसाठी सोयीचे असल्याने कोकण वासियांची सर्वाधिक पसंती मिळत आहे.. रेल्वे प्रशासनाच्या पदरात सर्वाधिक उत्पन्न देणारी एक्सप्रेस म्हणून मांडवी एक्सप्रेसची नोंद झाली आहे..0
0
Report
Advertisement
लातूर के गरूड चौक में भीषण हादसा, दुचाकी सवार की मौत, CCTV कैद
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज लातूरच्या गरूड चौकात भीषण अपघात.. दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू... लातूर शहरातील गरूड चौकात भीषण अपघात झालाय. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे. भरधाव वेगाने जाणाऱ्या ट्रावेल्सच्या मागून दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या युवकाची गाडी अचानक घसरल्याने तो थेट ट्रॅव्हल्स बसच्या मागील चाकाखाली आला. या भीषण अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाला आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून मृताची ओळख पटविण्याचे आणि अपघाताच्या नेमक्या कारणांचा तपास करण्याचे काम सुरू आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
इचलकरंजी के लिए नई जल योजना: कृष्णा नदी से 60 एमएलडी पानी, 500 करोड़
Kolhapur, Maharashtra:गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असणाऱ्या इचलकरंजी शहरासाठी नवी पाणी योजना प्रस्तावित करण्यात आली आहे. शहरासाठी जुने दानवाड या ठिकाणाहून ही पाणीपुरवठा योजना राबवली जाणार आहे. नवे दानवाड इथल्या कृष्णा नदीपासून इचलकरंजीचे अंतर 26 किलोमीटर आहे. या योजनेच्या माध्यमातून 60 एमएलडी पाणी इचलकरंजी शहरासाठी उपलब्ध होणार आहे. तर या योजनेसाठी सुमारे 500 कोटीचा खर्च येणार आहे. ज्या ठिकाणाहून पाणी उपसा केला जाणार आहे त्याच ठिकाणी पुरातन राधाकृष्ण मंदिर आहे, त्यामुळे या योजनेला राधाकृष्ण योजना असं नाव देण्याचे निश्चित झाले आहे.0
0
Report
महाविद्यालयीन छात्रा के विवाह दबाव और फोटो वायरल करने की धमकी, दामिनी ने आरोपी पकड़ा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:लग्नास नकार दिल्याचा राग; विद्यार्थिनीला फोटो व्हायरल करण्याची धमकी दामिनी पथकाची तातडीची कारवाई; तरुण पोलिसांच्या ताब्यात वसंतराव नाईक चौकातून संशयिताला पकडून एमआयडीसी सिडको पोलिसांच्या स्वाधीन दीड महिन्यांपासून पाठलाग करत विद्यार्थिनीला त्रास; धमक्यांमुळे कारवाई ANC : छत्रपती संभाजीनगरमध्ये एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीला लग्नासाठी दबाव टाकत फोटो सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या तरुणाला दामिनी पथकाने ताब्यात घेतले आहे. रेल्वे स्टेशन परिसरात झालेल्या ओळखीचा गैरफायदा घेत हा तरुण गेल्या दीड महिन्यांपासून विद्यार्थिनीचा पाठलाग करत होता. वसंतराव नाईक चौकात सापळा रचून दामिनी पथकाने त्याला पकडले असून पुढील कारवाईसाठी एमआयडीसी सिडको पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
बीजेपी नागपुर नगर सेवकों का गोवा-यात्रा: चुनाव से पहले मुंबई-गोवा दौरा
Nagpur, Maharashtra:भाजप आणि नागपूर महापालिका shots वापरावे विधान परिषद निवडणुकीत भाजपची मते फुटणार नाही, याची खबरदारी म्हणून भाजप नागपूरातील त्यांच्या सर्व नगरसेवकांना तीन दिवस गोव्यात नेणार आहे.. त्यानंतर पुढील तीन दिवस मुंबईत मुख्यमंत्र्यांशी भेट आणि दोन दिवसीय प्रशिक्षण शिबिरात नगरसेवक सहभागी होणार आहे... मतदानाच्या एक दिवस अगोदर म्हणजे 17 जूनला सर्व नगरसेवक नागपुरात परत येणार आहे... 10 जून रेल्वेने नागपुरातून मुंबईकडे रवानगी... 11 जून मुंबईतून गोव्याला जाणार... 14 जून पर्यंत गोव्यात मुक्काम... 14 जून रोजी मुंबईत परत आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी भेट... 15 आणि 16 जून "रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी" येथे नगरसेवकांसाठी खास प्रशिक्षण शिबिर... 17 जूनला रेल्वेने नागपूर परत येतील... 18 जून विधान परिषद निवडणुकीचा मतदान... महापौर उपमहापौर स्थायी समिती सभापती आणि काही निवडक महत्त्वाचे पदाधिकारी यांना या प्रवासातून वगळण्यात आले आहे.. या संपूर्ण सहलीसाठी नगरसेवकांकडून काही सहकार्य रक्कम घेण्यात आल्याची माहिती आहे...0
0
Report
करमाळा पुलिस ने 2.56 लाख कीमत का गांजा पकड़ा, आरोपी गिरफ्तार
Pandharpur, Maharashtra:करमाळा पोलिसांनी दोन लाख 56 हजार किमतीचा गांजा एका व्यक्तीकडून जप्त केला आहे. करमाळा शहरातून दुचाकीवरून एक पांढरे रंगाची पिशवीमध्ये 10 किलो 248 ग्रॅम वजनाचा 2,56,200/- रूपये किंमतीचा गांजा बेकायदेशिर रित्या स्वतःचे कब्जात बाळगताना मिळुन आला आहे. याप्रकरणी करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर इसमास ताब्यात घेण्यात आले आहे.0
0
Report
महाबलेश्वर बस स्टॉप पर ट्रैफिक इंस्पेक्टर के विवाद के बीच पत्रकारों से भिड़ंत, निलंबन
Satara, Maharashtra:सातारा - थंड हवेचे ठिकाण म्हणून ओळख असणाऱ्या महाबळेश्वर मध्ये बस स्थानक आवारात वाहतूक निरीक्षक शाहरुख खान यांनी प्रवाशांनी एक तास उशिरा गाडी का सोडताय हे विचारल्याच्या कारणातून स्थानिक पत्रकारांना दलाल तर प्रवाशांना अर्वाच भाषेत शब्द प्रयोग केला होता या घटनेची प्रसार माध्यमांनी बातमी प्रसिद्ध करताच सातारा विभाग नियंत्रण प्रमुखांनी संबंधित महाबळेश्वर येथील वाहतूक निरीक्षकाचे निलंबन केले... यानंतर महाबळेश्वर बस स्थानकात स्थानिक पत्रकार आणि ग्रामस्थांनी वाहतूक निरीक्षक शाहरुख खान याला घेराव घातला असता... त्याने हात जोडून मी सुद्धा एका न्युज पेपरची पत्रकारिता केली असल्याचे सांगत पत्रकारांविषयी आदर असल्याचे तो म्हणाला मात्र त्या ठिकाणी आलेले पत्रकार आणि ग्रामस्थ आक्रमक असल्यामुळे त्याने हात जोडून पत्रकारांची आणि स्थानिक ग्रामस्थांची माफी मागितली. माझ्याकडून चूक झाली मी असं बोलायला नको होतं असं देखील तो म्हणाला... यावेळी संबंधित निलंबित झालेला वाहतूक निरीक्षक हा महाबळेश्वरच्या बस स्थानकात नको अशी देखील मागणी स्थानिकांनी यावेळी केली0
0
Report
Advertisement
यवतमाळ विधानपरिषद चुनाव: कांबळे की माघारी पर दबाव-चौकशी की मांग
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार साहेबराव कांबळे यांच्या माघारीवरून नगरसेवक-मतदारांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे चौकशीची मागणी केली आहे. कांबळेंची माघार स्वेच्छेने नसून राजकीय दबाव, आर्थिक प्रलोभन व अनुचित प्रभावामुळे झाली असा आरोप करत चौकशी व बिनविरोध निवडीस स्थगितीची मागणी करण्यात आली आहे. बिनविरोध निवडीच्या नावाखाली मतदानाची संधी नाकारणे हे "निवडणूक दरोडेखोरी" स्वरूपाचे कृत्य आहे, असा आरोप तक्रारदारांनी केला आहे. या निवडणुकीतील आर्थिक व्यवहार व दबावाची भारत निवडणूक आयोगाच्या निरीक्षकांमार्फत स्वतंत्र चौकशी करावी, मतदारांचा अधिकार अबाधित राखण्यासाठी नोटा चा पर्याय द्यावा अशा मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहे.0
0
Report
हलकर्णी में बारिश ने नया रास्ता फिर से बहा दिया, यातायात तहस-नहस
Kolhapur, Maharashtra:Kolhapur जिले के हलकर्णी में भारी बारिश के कारण नया बनाया गया वैकल्पिक मार्ग देर शाम फिर से बह गया। गड़हिंग्लज तहसील के हलकर्णी ओढ़णा पर निर्माण चल रहा है, अतः मार्ग के किनारे रहकर नागरिकों की सहूलियत के लिए वैकल्पिक मार्ग बनाया गया था। दो दिनों पहले भारी बारिश ने यह मार्ग बहा दिया था। इसलिए ठेकेदार ने इसे फिर से यातायात के लिए तैयार किया, लेकिन फिर से भारी बारिश के कारण यह मार्ग बह गया और इस मार्ग पर यातायात प्रभावित हो गया है।0
0
Report
अनियमित बारिश से आम-काजू बागों को नुकसान, किसानों को कम मुआवजा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. जिल्ह्यात 52 हेक्टर वरील आंबा-काजू वाया.. अवकाळीचा फटका शासनाची मदत तुटपुंजीच.. जिल्हा झालेल्या अवकाळी पावसामुळे आणि मोहोर गळल्यामुळे आंबा-काजू पिकाचे नुकसान झाले आहे.. प्राथमिक सर्वेक्षणात 28 हजार 975 शेतकरी बाधित झाले असून त्याचा 52 हजार हेक्टर क्षेत्रावरील बागांना तडाका बसल्याचे समोर आले आहे.. दरम्यान शेतकरी हेक्टरी तीन लाखांचे आंबा उत्पन्न घेतो मात्र शासनाकडून हेक्टरी फक्त 22 हजार 500 रुपयांचे मदत मिळणार आहे.. त्यात भरपाईला 2 हेक्टरची मर्यादा असल्याने शेतकऱ्यांची निव्वळ थट्टा असल्याचा आरोप बागायतदारांनी केला आहे.. यंदाच्या हंगामात फक्त 20 टक्के आंबा-काजू पीक शेतकऱ्यांच्या हाती आले.. गेले दोन महिने कृषी विभागामार्फत पंचनामे सुरू आहेत..0
0
Report
Advertisement
