445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
वन विभाग ने बिबटिया की खाल तस्करी के मामले में दो गिरफ्तार किया
Vasai-Virar, Maharashtra:वसईत बिबٹ्याच्या कातडीची तस्करी उघडकीस आली असून वनपरिक्षेत्र भाताणेच्या पथकाने धाडसी कारवाई करत दोघांना अटक केली आहे. गुप्त माहितीनुसार खानिवडे टोलनाक्याजवळ ही सापळा रचून कारवाई करण्यात आली. वनाधिकारी विजय बारब्दे आणि वनपाल नितीन खुळपे यांनी स्वतः ग्राहक बनून तस्करांना जाळ्यात ओढले आणि कातडीसह त्यांना ताब्यात घेतले. अंधाऱ्या आणि जोखमीच्या ठिकाणी ही कारवाई पार पडली. या प्रकरणामुळे संरक्षित वन्यजीवांची तस्करी अद्याप सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे. यापूर्वीही याच पथकाने मांडूळ साप तस्करी प्रकरणात कारवाई केली होती. दरम्यान, वन्यजीव संरक्षण कायद्यानुसार बिबट्यासारख्या शेड्युल-१ प्राण्यांच्या कातडीची तस्करी गंभीर गुन्हा असून दोषींना ३ ते ७ वर्षांपर्यंत तुरुंगवास आणि दंडाची तरतूद आहे. या प्रकरणी पुढील तपास सुरू असून आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले आहे.0
0
Report
अकोला महापालिका सभा में पत्रकारों की नाराज़गी, तकनीकी खामियों से कवरेज बाधित
Akola, Maharashtra:अकोला महानगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेदरम्यान माध्यम प्रतिनिधींमध्येही तीव्र नाराजी पाहायला मिळाली. माध्यम प्रतिनिधींसाठी स्वतंत्रपणे व्यवस्था करण्यात आलेल्या हॉलमध्ये लावलेल्या टीव्ही स्क्रीनवर सभेचे थेट प्रक्षेपण वारंवार खंडित होत असल्याने पत्रकार संतप्त झाले. याविरोधात पत्रकार संघटनांनी ठिय्या आंदोलन सुरू केले. महानगरपालिका प्रशासनाच्या तांत्रिक त्रुटीमुळे आज माध्यम प्रतिनिधींना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. पत्रकारांसाठी स्वतंत्र हॉलमध्ये बसण्याची व्यवस्था करण्यात आली असली तरी सभेचे थेट प्रक्षेपण सतत बंद पडत होते. यामुळे सभेतील घडामोडींची अचूक माहिती मिळण्यात अडथळे निर्माण झाले. यावेळी पत्रकारांनी महापौरांवरच संताप व्यक्त करत प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले. शासकीय कॅमेरामन हे महानगरपालिका आयुक्तांच्या इशाऱ्यावरच चित्रीकरण करत असल्याचा आरोपही पत्रकारांकडून करण्यात आला. तसेच सभेचे पारदर्शक आणि सुरळीत प्रक्षेपण करण्याची मागणी पत्रकारांनी केली. दरम्यान, पत्रकारांच्या ठिय्या आंदोलनाची माहिती मिळताच स्थायी समिती सभापती विजय अग्रवाल यांनी आंदोलनस्थळी भेट देत पत्रकारांच्या समस्या समजावून घेतल्या आणि त्या सोडवण्याचे आश्वासन दिले. या सर्व गोंधळामुळे आजची आमसभा चांगलीच वादळी ठरली असून महत्त्वाच्या विषयांवरील चर्चा आणि निर्णय प्रक्रियेवरही याचा परिणाम झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र सभागृहात जागा कमी असल्याने पत्रकारांना सभेत बसू देता येत नाही हे कारण नेहमी समोर केला जात आहे. मात्र सभागृहात घडलेल्या घटना नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी पत्रकारांनाच अडवल जात आहे असा प्रश्नही उपस्थित होत आहे.0
0
Report
जयंत पाटील ने केंद्र सरकार पर पेट्रोल-गैस की आपूर्ति को लेकर निशाना साधा
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:अखाती देशात युद्ध सुरू आहे, पण आपल्या देशात घराघरात चिंता गॅस आणि पेट्रोलची आहे. अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेस गटाचे नेते जयंत पाटील यांनी केंद्र सरकारला टोला लगावला आहे. तिकडे किती लोक मरतात, याची चिंता नाही, पण आपल्याकडे पेट्रोल आणि सिलेंडर मिळणार का, याची चिंता लागून राहिली आहे, असे देखील आमदार जयंत पाटील म्हणाले, ते सांगलीच्या ईश्वरपुरमध्ये घरगुती पीएनजी गॅस वितरण प्रकल्पाच्या उद्घाटन प्रसंगी बोलत होते.0
0
Report
Advertisement
पानी में उतरते विद्युत प्रवाह से किसान सुरेश थोरात की मौत; महावितरण पर आरोप
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे Anc - आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावातील 44 वर्षीय सुरेश पांडुरंग थोरात हे शेतकरी त्यांच्या शेतात पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा Shock लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. मयत सुरेश थोरात यांच्या शेताशेजारी असणाऱ्या महावितरणच्या खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सदर खांब वाकला होता. वाकलेला हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती. मात्र महावितरण कडून कुठलीही उपाययोजना झाली नसल्याने सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.0
0
Report
तालासरी पुल पर भारी हादसा: बारातियों से भरा टेम्पो खड़े कंटेनर से टकराया, 20-22 घायल
Palghar, Maharashtra:पालघर मुंबई अहमदाबाद महामार्गावर तलासरी येथील उड्डाणपुलावर भीषण अपघात. लग्नाच्या वराडांनी भरलेला टेम्पो ची उभ्या कंटेनरला धडक. धडके 20 ते 22 वऱ्हाडी गंभीर जखमी. जखमींवर तलासरी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू. घटनास्थळी पोलीस दाखल. महामार्गावर नादुरुस्त वाहने हटविण्यात महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष.0
0
Report
जुन्नर-आंबेगाव-खेड में तेज बारिश-ओलों से फसलें बर्बाद
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.0
0
Report
Advertisement
केडीएमसी ने 14 करोड़ बकाया वसूलने BOT प्रकल्प सील, लग्न समारोह ठप्प
Kalyan, Maharashtra:कर वसुलीसाठी केडीएमसी ची धडक कारवाई.. 14 कोटी थकबाकीमुळे वाधवा BOT प्रकल्प सील माधव बँक्वेट, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेलला टाळे..लग्नसमारंभ ठप्प, आयोजक अडचणीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत केडीएमसी ने वाधवा बिल्डरला BOT प्रकल्पांमधील विविध व्यावसायिकासाठी देण्यात आलेल्या प्रॉपर्टी सील करण्यात आले आहे वाडेघर जलकेंद्र BOT प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या प्रॉपर्टींचे मासिक भाडे अनेक वर्षांपासून थकले होते. याबाबत पालिकेकडून 2023 पासून नोटीस बजावण्यात अल्या होत्या मात्र, वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली न गेल्याने अखेर पालिकेने कठोर पाऊल उचलत सुमारे 14 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली.या कारवाईत माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेल यांना सील करण्यात आले.अचानक झालेल्या या कारवाईमुळे येथे सुरू असलेले व्यवसाय आणि कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत0
0
Report
अकोला में अचानक बारिश: मौसम बदला, गर्मी से राहत, किसानों की फसलें खतरे में
Akola, Maharashtra:राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असून अकोल्यातही आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.Gेल्या काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत होता. तापमान तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.0
0
Report
नवी मुंबई बजट 6704 करोड़, टैक्स नहीं बढ़ेगा; कई योजनाओं की घोषणा
Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई महानगरपालिकेचा सन 2026-27 चा अर्थशंकल्प स्थायी समिती सभापती अशोक पाटील यांनी महासभेत सादर केलाय. तब्बल 6704 कोटी रुपयांचा अर्थशंकल्प सादर करण्यात आला असून शहरातील प्रत्येक घटकाचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात आलाय. रहिवासी क्षेत्रात कुठलीही करवाढ न करता प्रत्येक विभागात वन टाईम प्लॅनिंग अंतर्गत काम, प्रत्येक नगरसेवकांना प्रभाग समिती निधी म्हणून 1 कोटींचा निधी, सिग्नल मुक्त रस्ते, महिलांना उद्योग सहाय्य, ठोक मानधनावरील कर्मचाऱ्यांना वेतनवाढ अश्या विविध योजना आणि प्रकल्पाची घोषणा या अर्थसंकल्पात करण्यात आलेय.0
0
Report
Advertisement
नाशिक में कोडवर्ड का पर्दाफाश, पुलिस की जांच तेज हो जाएगी
Nashik, Maharashtra:भोंदूगिरीच्या आडून सुरू असलेलं हे काळं साम्राज्य किती खोलवर पसरलंय, हे आता पोलिसांच्या तपासात स्पष्ट होईलच. मात्र, या कोडवर्डचं रहस्य उलगडल्यानंतर नाशिकमध्ये मोठी खळबळ उडणार, हे मात्र निश्चित.0
0
Report
वाशिम में अनसीज़नल बारिश से नागरिकों को राहत मिली
Washim, Maharashtra:वाशिम जिले के रिसोड शहर व आसपास के तालुकों में दुपहर अवकाळी बारिश हुई। पिछले कुछ दिनों से बढ़ी गर्मी से परेशान नागरिकों को इस बारिश से राहत मिली। दुपहर अचानक मौसम में बदलाव हुआ, आकाश बादलों से घिर गया और कुछ स्थानों पर हल्की से मध्यम वर्षा हुई। इससे माहौल ठंडा हो गया और लोगों को गर्मी से कुछ राहत मिली।0
0
Report
सतारा के पुलिस आयुक्त की छुट्टी पर चुनाव प्रक्रिया में उठे सवाल
Satara, Maharashtra:सातारा:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजे विषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा.. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे. तर त्याने तसे समजून घ्यावे. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे... मला आपणाकडूनच माहिती मिळाली पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खर आहे. पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केल आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवेदावे काही नाही ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत.. राहिला निवडणुकीचा प्रश्न ते त्यांच्या पक्षाचे काम करतात मी माझ्या पक्षाचे काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे. माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतं नोंद झाली असती तरी 30+2= 32 झाले असते आमचे 33 होतात.. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बादा आणायची होती. हे मात्र नक्की. सभापती निवडीमध्ये मी बरोबर घेणारा मी कोण. मलाच फोन बरोबर घेत नाही. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे हा आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत. किंवा याबाबत मला कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते मुख्यमंत्री निर्णय घेतात0
0
Report
Advertisement
अंबिका माता पालखी यात्रा ने सातारा शिरवळ में भक्तों की भीड़ के बीच उत्साह जताया
Satara, Maharashtra:सातारा - शिरवळ गावची ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेच्या पालखी सोहळ्याला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून शासनकाठीसह तुळजापूरकडे पायी वारीचे प्रस्थान करण्यात आले. या वारीत शिरवळ गावातील काटकर समाजासह हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत. अंबिका माता ही जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीसह बाहेरगावांहूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान शिरवळ गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. पारंपारिक ढोल-लेझीम, तुतारी, हलगी, संबळ यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिभावाने देवीचे पूजन करून हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. जय अंबिका माता च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक असलेला हा पालखी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.0
0
Report
मुंबई के बाहर प्रवासी मजदूरों को गैस सिलेंडर देने के विरुद्ध मनसे ने वितरण रोका; भांडूप में हंगामा
Mumbai, Maharashtra:अँकर मुंबई बाहेरील गॅस ग्राहकांना कमर्शिअल सिलेंडर देण्याचा मुद्दा आता चांगलाच भेटला आहे पाच किलोचे आणि 14 किलोचे कमर्शियल सरेंडर हे मुंबईमध्ये फक्त स्थलांतरित गॅस ग्राहकांना त्यांची कागदपत्रे तपासून देण्याचे सर्क्युलर गॅस वितरण कंपन्यांना गॅस कंपन्यांकडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर आता गॅस एजन्सी या पाच किलोचे सिलेंडर हे मुंबई बाहेरून आलेल्या स्थलांतरित कामगारांना सिलेंडरचे वाटप केले जाते मनसे ने आक्रमक पवित्रा घेत या गॅस सिलेंडरचे वितरण थांबविले आणि गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रकार भांडुप मध्ये समोर आला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी0
0
Report
नामकरण आवारे के खरात से संबंधों पर नया खुलासा, मंत्री के साथ जुड़ाव चर्चित
Shirdi, Maharashtra:सुषमा अंधारेनी आरोप केलेला नामकरण आवारे आता भोंदूबाबा खरातच्या प्रकरणांमध्ये चर्चेत आलाय. एकीकडे आवारे याने अशोक खरात यांच्याशी कुठलेही संबंध नसल्याचं म्हणल असले तर दुसरीकडे मात्र नामकरण आवारे आरोपी खरातचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलंय. सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत प्रत्येक फोटोत दिसणारा नामकरण कोण..? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चर्चेत आलेले नामकरण आवारे याचे अशोक खरात समवेत असणारे घनिष्ठ संबंध अधोरेखित झालेत आहेत... विशेष म्हणजे नामकरण आवारे याने 2012 साली लिहिलेल्या "असा मी नामकरण" या पुस्तकाचे प्रस्तावना अशोक खरात याने लिहिले तर नामकरण आवारे याने अशोक खरात याला ब्रम्हांडनायक म्हणत तो सिद्धपुरुष असल्याचं त्याच्या पुस्तकात मांडलय. झी 24 तासने मागील दोन दिवसांपूर्वी नामकरण आवारे यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत अशोक खरात आणि रूपाली चाकणकर हे मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत पाहुणे म्हणून सिन्नर औद्योगिक वसाहतिला भेट देण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया दिली होती. खरात आणि आवारे यांच्या संबंधाबाबत सविस्तर माहिती दिलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....0
0
Report
Advertisement