445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अमरावती बस स्टेशन के निरीक्षण के बाद निलंबन; अकोला स्टेशन में सफाई अभियान तेज
Akola, Maharashtra:राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी अमरावती मध्यवर्ती बस स्थानकाला अचानक भेट देत तेथील परिस्थितीची पाहणी केली. यावेळी बसस्थानक परिसरात अस्वच्छता आढळून आल्याने त्यांनी दोन अधिकाऱ्यांना निलंबित करण्याची कारवाई केली. या कारवाईनंतर राज्यभरातील एसटी प्रशासनात खळबळ उडाली आहे.याच पार्श्वभूमीवर अकोला मध्यवर्ती बस स्थानकातही तातडीने स्वच्छता मोहीम हाती घेण्यात आली आहे. बसस्थानक परिसर, फलाट, प्रवासी प्रतीक्षालय तसेच इतर भागांची साफसफाई करण्यात येत असून कर्मचाऱ्यांकडून विशेष लक्ष दिले जात आहे. अमरावतीत झालेल्या कारवाईची धास्ती घेत अकोला बसस्थानक प्रशासनाने ही मोहीम सुरू केल्याची चर्चा रंगू लागली आहे. मात्र ही स्वच्छता नियमित उपक्रमाचा भाग असल्याचे प्रशासनाकडून सांगितले जात आहे. तरीही मंत्र्यांच्या अचानक दौऱ्यांच्या पार्श्वभूमीवर बसस्थानक प्रशासन सतर्क झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.0
0
Report
पुणे में अवैध शराब विरोधी अभियान तेज, पुलिस ने कार्रवाई का ऐलान
Pimpri-Chinchwad, Maharashtra:अवैध मद्यविक्री आणि हातभट्ट्यांचे जाळे पूर्णपणे नष्ट करण्यासाठी पुणे शहर, ग्रामीण आणि पिंपरी-चिंचवड पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. यासंदर्भात नुकतीच पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयात एक महत्त्वाची समन्वय बैठक पार पडली असून, यामध्ये अवैध दारूच्या व्यवसायावर कठोर कारवाई करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. भेसळयुक्त दारू आणि बेकायदेशीर हातभट्ट्या शोधून त्यावर तातडीने कारवाई करण्यात येईल. तसेच या मोहिमेची व्याप्ती वाढवण्यासाठी आता पोलीस आणि उत्पादन शुल्क विभाग एकत्रितपणे काम करणार आहेत.0
0
Report
रत्नागिरी में पूर्व मानसून: नदियों से गाद साफ, बाढ़ की आशंका कम
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरीकरांना मोठा दिलासा! पावसाळ्यापूर्वी नद्यांमधील गाळ उपसा पूर्ण; पूरप्रवण तालुक्यांना मिळणार दिलासा.. यंदाच्या पावसाळ्यात रत्नागिरी जिल्ह्यातील पूरप्रवण तालुक्यातील नद्या मोकळा श्वास घेणार आहेत कारण प्रशासनाकडून पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील प्रमुख नद्यांमधील गाळ उपसण्याचे काम आता पूर्णत्वास आले आहे.. दरवर्षी पावसाळ्यात नदीपात्रात गाळ साचल्यामुळे पाणी परिसरातील गावांमध्ये आणि शहरांमध्ये घुसत होते ज्यामुळे मोठे नुकसान व्हायचे. मात्र यंदा पावसाळा सुरू होण्यापूर्वीच प्रशासनाने वेगाने पावले उचलत नद्यांमधील गाळ बाहेर काढला आहे.. नदीपात्र मोकळे झाल्यामुळे पाण्याचा निचरा वेगाने होईल आणि पूरस्थितीवर नियंत्रण मिळवणे सोपे जाणार आहे.. प्रशासनाच्या या यशस्वी कामगिरीमुळे नदीकाठच्या रहिवाशांना खूप मोठा दिलासा मिळाला असून, त्यांच्यावरील पुराचे संकट काहीसे सुसह्य होण्याची शक्यता आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर बैलगाड़ी दौड़ में अजिंक्य कोपर्डेकर ने जीता पहला स्थान
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरात पार पडलेल्या सतेज ऋतू केसरी भव्य बैलगाडी शर्यत स्पर्धेत पहिला क्रमांक लिंगनूरच्या अजिंक्य कोपर्डेकरांनी पटकावला. त्यांना महिंद्रा ट्रॅक्टर व निशान देऊन गौरविण्यात आलं. यासह विविध गटातील विजेत्यांना बक्षीस व निशान देऊन सन्मानित करण्यात आलं. कार्यक्रमास आमदार सतेज पाटील आणि माजी आमदार ऋतुराज पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बेंदूर सणानिमित्त या स्पर्धेचं आयोजन करण्यात येत. याही वर्षी जिल्ह्यातील नेर्ली गावाच्या मैदानावर या स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी भर उन्हात अलोट गर्दी केली होती.0
0
Report
पिंपरी मालिम गावाजवळ निजी प्रवासी बस का भीषण अपघात; 25 यात्री घायल, दो की हालत गंभीर
Buldhana, Maharashtra:मेहकर जवळील पिंपरी माळी गावाजवळ खाजगी प्रवासी बसचा भीषण अपघात. 25 प्रवाशी जखमी, दोघांची प्रकृती गंभीर.. बाबा travels ची बस पुण्यावरून नागपूरला जात होती.. अपघातात अनेक प्रवासी गंभीर जखमी. समोर जाणाऱ्या ट्रकला पाठीमागून खाजगी प्रवासी बसची धडक होऊन झाला अपघात. पोलीस आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल. खाजगी प्रवासी बस पुण्याहून नागपूरच्या दिशेने जाताना झाला अपघात0
0
Report
रत्नागिरी में मॉनसून सुस्त, किसानों की खेती प्रभावित
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी रत्नागिरीकर यांना दमदार पावसाची प्रतीक्षा. गतवर्षीच्या तुलनेत पावसाची मंद गती. पावसाचे आगमन न झाल्याने शेतीची कामे राखडली. गतवर्षी पहिला आठवड्याभरात 6.32 मि.मी पाऊस. गतवर्षी 20 मे पासून जिल्ह्यात हजेरी लावणाऱ्या पावसाने मात्र जून उजाडला तरी अद्याप हजेरी लावलेली नाही. त्यातच शासनाच्या महावेद प्रणालीने दिलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार जिल्ह्यात यावर्षी पावसाची गती अत्यंत मंद आहे. गतवर्षी 1 जून ते 7 जून या कालावधीत 632.70 मिली मीटर म्हणजेच 2.09 टक्के इतका पाऊस पडला होता. मात्र यावर्षी 121.50 म्हणजेच 0.40% इतकाच पाऊस पडला आहे.0
0
Report
Advertisement
कोल्हापुर में मराठी फिल्म महामंडळ चुनाव: मतगणना आज शुरू
Kolhapur, Maharashtra:Kop Chitrapat Mahamandal अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळासाठी 49.90 टक्के इतके मतदान झाले आहे. राज्यातील 12 केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली असून आज कोल्हापूरात मतमोजणी प्रक्रिया पार पडणार आहे. सकाळी 9 नंतर कोल्हापूर शहरातील राम गणेश गडकरी सभागृहात ही मतमोजणी प्रक्रिया सुरू होणार आहे.पूर्वीच्या काही संचालक मंडळाने एक मेकावर आरोप प्रत्यारोप केले होते, त्यामुळं ही निवडणूक ईर्षेने झाली होती. त्यामुळे या निवडणूक कडे राज्यातील चित्रकर्मीचे लक्ष लागून राहिले होते. चित्रपट महामंडळाच्या कार्यकारणीच्या एकूण 17 जागांसाठी 44 उमेदवार निवडणूक लढत झाली आहे. पण मुख्य लढत माजी अध्यक्ष मेघराज भोसले याचे समर्थ पॅनल आणि ज्येष्ठ दिग्दर्शक सतीश रणदिवे याचे चित्रक्रमी पॅनल मध्ये पाहायला मिळाली.0
0
Report
मानिकपूर पुलिस की तत्परता से युवक की आत्महत्या के प्रयास रोका गया
Vasai-Virar, Maharashtra:प्रेमप्रकरणातून आत्महत्येचा प्रयत्न; माणिकपूर पोलिसांच्या प्रसंगावधानाने तरुणाचे प्राण वाचले मुलीच्या आई-वडिलांनी लग्नास नकार दिल्याने नैराश्यात गेलेल्या एका तरुणाने वसई रेल्वे स्थानकाजवळील स्कायवॉकवरून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. मित्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे माणिकपूर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत तरुणाला बोलण्यात गुंतवून ठेवले. त्याचवेळी एका पोलिस कर्मचाऱ्याने मागून जाऊन त्याला सुरक्षितपणे पकडत स्कायवॉकच्या कठड्यावरून खाली आणले. त्यानंतर पोलीस ठाण्यात समुपदेशन करून तरुणाला त्याच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात आले. पोलिसांच्या या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.0
0
Report
छत्रपति संभाजी नगर में पानी आपूर्ति बढ़ाने के लिए नीति लागू, मीटर और शुल्क के साथ नया वितरण नियम
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर शहरातील नागरिकांना वाढीव पाणी देण्याच्या प्रक्रियेला गती आली आहे. गेल्या ४ दिवसांत शहरात २५.५० एमएलडी वाढीव पाणी उपलब्ध झाले आहे. त्यासाठी जलकुंभाची उभारणी करण्यात आली आहे. शहरातील ज्या भागांनी सर्वाधिक अधिकृत नळ कनेक्शन घेतले आहेत, त्या वसाहतींना प्राधान्यानाने पाणीपुरवठा करण्याचे धोरण आता मनपाने स्वीकारले आहे. याशिवाय पाण्याचा अपव्यय रोखण्यासाठी टप्याटप्याने मीटर बसवण्याची सक्ती करण्यात येणार आहे. तर नो नेटवर्क भागाला काही दिवसात पाणी मिळणार आहे. त्यासाठी महापालिकेकडून प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. मनपाने पाणी वितरणाचे नियोजन सुरू केले आहे. आता मोफत पाणी दिले जाणार नाही. संपूर्ण शहरात तसेच नो नेटवर्क भागात नवीन नळ जोडणीसाठी नियमानुसार शुल्क भरणे अनिवार्य आहे. ज्या वसाहती किंवा गल्लीमध्ये सर्वाधिक नळ जोडण्या असतील, तेथे प्राधान्यक्रमाने पाणी सोडले जाईल. पहिल्या टप्यात सर्व व्यावसायिक मालमत्तांना पाण्याचे मीटर लावले जातील आणि त्यानंतर दुसऱ्या टण्यात घरगुती मालमत्तांना मीटर बसवले जाणार आहेत.0
0
Report
Advertisement
दिल्ली-नोएडा के डिजिटल अरेस्ट धोखे से 1.23 करोड़ की ठगी: रत्नागिरी साइबर पुलिस ने पर्दाफाश
Ratnagiri, Maharashtra:सव्वा कोटींची फसवणूक.. दिल्लीतून आरोपीस अटक.. रत्नागिरी पोलिसांची कामगिरी.. डिजिटल अरेस्टची भीती दाखवून गंडा.. अँकर बंगळुरू पोलीस आणि नवी दिल्लीतील सीबीआय अधिकारी असल्याचे भासवून एका व्यक्तीला डिजिटल अरेस्टची भीती घालत तब्बल 1 कोटी 23 लाख रुपयांना गंडवणाऱ्या आंतरराज्य टोळीचा रत्नागिरी सायबर पोलिसांनी पर्दाफास केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दिल्लीतून गगनदीप भारद्वाज राहणार नोएडा दिल्ली या मुख्य आरोपीला अटक केली आहे.. न्यायालयाने त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे..0
0
Report
शिवाजीनगर भुयारी मार्ग में पानी भरने की आशंका, रेलवे तीन दिन में मरम्मत का दावा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर महापालने रेल्वेला भुयारी मार्गात मडपंप बसवण्यासाठी दिलेली १० दिवसांची मुदत संपली आहे. अद्याप मडपंप बसवण्यात आलेला नाही. त्यामुळे पावसाळ्यात शिवाजीनगर भुयारी मार्गात पुन्हा पाणी तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाणी उपسण्याची कोणतीही पर्यायी यंत्रणा उपलब्ध नसल्याने वाहनचालकांना पुन्हा गैरसोयीचे होणार आहे, दरम्यान Railway ठेकेदाराने पंपासाठी लागणारे साहित्य वेगवेगळ्या ठिकाणाहून मागवले असल्याने ते पोहोचण्यास विलंब झाला. पुढील ३ दिवसांत काम पूर्ण करण्यात येईल असा दावा रेल्वे विभागाने केला आहे...0
0
Report
सहकारी बैंक चुनाव में घराणेशाही, नेताओं ने परिवार के सदस्यों को मैदान में उतारा
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पारंपरिकदृष्ट्या कार्यकत्यांची निवडणूक मानली जाते. मात्र, यंदाच्या निवडणुकीत कार्यकर्त्यांना डावलून दिग्गज नेते, त्यांची निवडणुकात मुले-मुली, भाऊ आणि इतर कुटुंबीयांनाच अधिक संधी दिली जात असल्याचे चित्र आहे. विधानसभा, महापालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांप्रमाणेच आता सहकार क्षेत्रातही घराणेशाहीचा शिरकाव झाल्याने निष्ठावान कार्यकत्यांमध्ये नाराजीचे वातावरण आहे. पालकमंत्री संजय शिरसाट, ओबीसी कल्याण मंत्री अतुल सावे, खासदार संदिपान भुमरे, खासदार डॉ. कल्यान काळे, आमदार अनुराधा चव्हाण आणि आमदार रमेश बोरनारे या विद्यमान लोकप्रतिनिधींनी स्वतःचे उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. यासोबतच अनेक नेत्यांनी आपल्या कुटुंबीयांनाही निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहे. कार्यकत्यांना संधी मिळेल अशी अपेक्षा असताना, अनेक नेत्यांनी स्वतःसह आपल्या कुटुंबीयांना उमेदवारी दिल्याने जिल्हा बँक निवडणुकीत घराणेशाहीचा प्रभाव ठळकपणे दिसून येत आहे.0
0
Report
Advertisement
रत्नागिरी के पाज पंढरी गाँव में भीषण जलटंचाई, 15 दिनों में सिर्फ चार बाल्टी पानी
Ratnagiri, Maharashtra:दापोली - रत्नागिरी.. अथांग समुद्र शेजारी, पण पाण्यासाठी टाहो! पाज पंढरी गावात भीषण पाणीटंचाई.. अँकर एकीकडे अथांग समुद्र... आणि दुसरीकडे घोटभर पाण्यासाठी ग्रामस्थांची जीवघेणी धावपळ! रत्नागिरी जिल्ह्यातील सर्वात मोठं कोळी बांधवांचं गाव असलेल्या दापोली तालुक्यातील 'पाज पंढरी'वर आज भीषण पाणीटंचाईचं संकट कोसळलं आहे.. गावातील विहिरींनी तळ गाठला असून, बांधतीवरे नळपाणी पुरवठा योजनेतून तब्बल १५ दिवसांनी केवळ ४ हंडे पाणी मिळत असल्याचं धक्कादायक वास्तव समोर आलं आहे.. पाणी विकत घ्यायला पैसे कुठून आणायचे? या विवंचनेत येथील महिला असून, वयोवृद्ध आणि लहान मुलांचे पाण्यासाठी प्रचंड हाल होत आहेत.. मासेमारीसाठी प्रसिद्ध असलेल्या या गावात आज पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा झालाय.. यावर प्रशासन तातडीने काही उपाययोजना करणार का? हाच मोठा प्रश्न आहे.0
0
Report
प्राजक्त तनपुरे का राहुरी में भव्य स्वागत: विधानसभा चुनाव में बिनविरोध जीत के बाद बड़े समारोह
Ahilyanagar, Maharashtra:अहिल्यानगर विधान परिषद निवडणुकीमध्ये बिनविरोध निवडून आलेल्या भाजप उमेदवार प्राजक्त तनपुरे यांचा राहुरी येथे कार्यकर्त्यांकडून सत्कार करण्यात आला. राहुरी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती येथून भव्य मिरवणूक काढून बाजारपेठेमध्ये सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आलं होतं. या सत्कार समारंभासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील उपस्थित होते. आपल्या विरोध निवडीच श्रेय राधाकृष्ण विखे पाटील यांना दिलं आहे. विखे फॅक्टर आपण ऐकत होतो मात्र प्रत्यक्षात पाहायला मिळाला आणि आठ दिवसांत मी आमदार झालो अशा शब्दांत तनपुरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. या सोहळ्याला नागरिक, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी प्रचंड गर्दी करत त्यांचे जंगी स्वागत केले.0
0
Report
रायगढ़ जिला परिषद ने एक क्लिक पर खतों का स्टॉक उपलब्ध कराकर जमाखोरी पर रोक
Chendhare, Maharashtra:खतसाठ्याची माहिती आता एका क्लिकवर. रायगड जिल्हा परिषदेचा उपक्रम. साठेबाजीला आळा, वितरणात पारदर्शकता. खरेप हंगाम तोंडावर असताना खतांसाठी कृषी सेवा केंद्रांवर होणारी गर्दी, उपलब्धतेबाबतची अनिश्चितता आणि कृत्रिम टंचाईच्या तक्रारी यावर रायगड जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने प्रभावी उपाय शोधला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रांमधील खतसाठ्याची माहिती आता शेतकऱ्यांना एका क्लिकवर उपलब्ध होणार आहे. कृषी विभागाने तयार केलेल्या विशेष ब्लॉगद्वारे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील कृषी सेवा केंद्रांची माहिती आणि त्या केंद्रांमध्ये उपलब्ध असलेल्या विविध खतांच्या साठ्याचा तपशील शेतकऱ्यांना घरबसल्या पाहता येणार आहे. त्यामुळे एखाद्या खताच्या शोधात अनेक दुकाने फिरण्याची गरज उरणार नाही. याशिवाय साठेबाजी, काळाबाजार आणि कृत्रिम टंचाईला आळा बसणार आहे.0
0
Report
Advertisement
