icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अकोला में दुल्हन सहित तीन की मौत, विवाह के दो दिन बाद दर्दनाक हादसा

Akola, Maharashtra:अकोल्यातील एक अत्यंत दु:खद बातमी समोर येत आहे. लग्नाच्या आनंदावर अपघाताचे सावट येत नववधूसह तिघांचा मृत्यू झाला आहे. पाच जन जखमी झाल्याची दुर्दैवी घटना घडल्याने अकोला शहरात दुःखाचा डोंगर कोसळला. अकोल्यातील शिवसेना वसाहत, लोकमान्य नगर येथील पूजा रवींद्र वागळकर हिला गुजरातमधील वापी येथून घरी आणत असताना जळगाव-खान्देश वरणगाव रोडवर भीषण अपघात झाला. भरधाव क्रूझर वाहनाचा टायर अचानक निखळल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि गाडी रस्त्याच्या कडेला उभ्या ट्रकवर जोरात आदळली. या धडकेत गाडीचा चुराडा झाला. या अपघातात नववधू पूजा वागळकर, तिचे काका जगदीश वागळकर आणि मामा दत्ता भागवत यांचा जागीच मृत्यू झाला. तर आकाश, प्रेम, जय, यश वागळकर आणि नितीन कडोळे हे जखमी झाले असून त्यांच्यावर अकोल्यातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत. अवघ्या दोन दिवसांपूर्वी विवाह झालेल्या पूजाच्या मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
0
0
Report

डोंबिवली घारीवली हत्याकांड: रंजिश में युवक पर हमला, पिता की मौत; 14 आरोपी गिरफ्तार

Kalyan, Maharashtra:डोंबिवली जवळील घारीवली परिसरात काल एक धक्कादायक घटना घडली. जुन्या वादातून दहा ते पंधरा जणांच्या जमावाने एका तरुणाला घराबाहेर बोलावून बेदम मारहाण केली. त्याला सोडवण्यासाठी गेलेल्या त्याचा भाऊ दिनेश जाधव यांच्यावर देखील प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात त्यांचे वडील बामा जाधव यांचा जागीच मृत्यू झाला. या प्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. अल्पवयीन मुलासह चार जणांना ताब्यात घेतलंय. या घटनेविरोधात वंचित बहुजन आघाडीने आक्रमक पवित्र घेत फरार आरोपींना तत्काळ अटक करावी अशी मागणी केली.
0
0
Report
Advertisement

कल्याण रेलवे स्टेशन पर RPF जवान की सतर्कता से मां-बाल की जीवन रक्षा

Kalyan, Maharashtra:कल्याण रेलवे स्टेशन पर RPF जवान की सतर्कता से बड़ा हादसा टल गया. 28 अप्रैल को शाम के समय धावती ट्रेन से उतरते समय गिरी महिला और उसकी एक वर्षीय बच्चा RPF के सहायक उपनिरीक्षक हेमंत भरगुडे ने तत्काळ दौड़कर सुरक्षित बचा लिया. उस महिला का नाम अंतिमा शुक्ला है और उनके बेटे सर्वज्ञ शुक्ला थे; वे प्रयागराज से मुंबई आ रहे थे. ट्रेन कल्याण स्टेशन पर आते समय उतरने के प्रयास में उसका संतुलन बिगड़ गया और वह बाळ के साथ प्लेटफॉर्म और ट्रेन के बीच फंस गई. पर ड्यूटी पर तैनात ASI हेमंत भरगुडे ने घटनास्थल पर ही तत्परता दिखाकर देर किए बिना दोनों को बाहर सुरक्षित निकाला।
0
0
Report

सड़क पर पुलिसकर्मी की दादागिरी: दुपहिया सवार की मारपीट का वीडियो वायरल

Navi Mumbai, Maharashtra:भरं रस्त्यात पोलीस अधिकाऱ्याची दादागिरी. ऐरोली दिवा गाव चौकामध्ये दुचाकी स्वाराला मारहाण करत असल्याचा व्हिडिओ समोर. संबंधीत अधिकारी नवी मुंबई वाहतूक पोलीस विभागातील असल्याची माहिती. भर रस्त्यात संध्याकाळच्या सुमारास दुचाकी स्वाराची कॉलर पकडत त्याला मारहाण करत असल्याचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अशाप्रकारे भर रस्त्यात पोलिसांकडून मारहाण होत असल्याने एका जागृत नागरिकांने हा व्हिडिओ काढलाय. मारहाणीच कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी अश्याप्रकारे दादागिरी करत सामान्य नागरिकाला मारहाण केल्याने सर्वसमान्य नागरिक संताप व्यक्त करतायत.
0
0
Report

नवी मुंबई पुलिस ने ड्रग्स विक्रेता महिला के घर पर जोरदार कार्रवाई की

Navi Mumbai, Maharashtra:नवी मुंबई पोलिसांनी ड्रग्स विक्री करणाऱ्या महिला आरोपी शांताबाई करंडकर यांच्या घरावर तोडक कारवाई केलेय. आरोपी महिलेला पोलिसांनी मागील वर्षी नोव्हेंबर महिन्यात लाखो रुपयांच्या ड्रग्ससह अटक केली होती. तिच्यावर मकोका अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. आरोपी महिलेने ड्रग्स विक्रीतून मोठ्या प्रमाणावर मालमत्ता मिळवली होती. त्या पैशातून तिने नवी मुंबईतील दिघा येथे सुमारे ३२ लाख रुपयांचे घर खरेदी केले होते. त्यावर तिने दोन मजली बांधकामही केले होते. या अनधिकृत बांधकामाबाबत सिडकोने तिला नोटीस बजावून जागा रिकामी करण्याचे आदेश दिले होते. सध्या आरोपी महिला कारागृहात असून, तिच्या कुटुंबीयांनी घर रिकामे केले नसल्याने पोलिसांनी घटनास्थळी जाऊन इमारत रिकामी करून घेत तोडक कारवाई केली. नवी मुंबई शहरात ड्रग्स विक्रेत्याच्या मालमत्तेवर अशा प्रकारची तोडक कारवाई करण्याची ही प्रथमच वेळ असून ही यामुळे ड्रग्सविरोधातील नवी मुंबई पोलिसांची ठाम भूमिका स्पष्ट होत आहे.
0
0
Report
Advertisement

गुहागर समुद्र चौपाटी पर सुरक्षा संकट: पांच जीवनरक्षक वेतन बकाया के कारण छुट्टी पर

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी..\n\nगुहागर समुद्र चौपाटीवर पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तैनात केलेल्या पाच जीव रक्षकांचा पगार थकल्याने गुरुवारपासून जीवरक्षक रजेवर गेले आहेत..\n\nपरिणामी ऐन हंगामात गुहागर मध्ये दाखल होणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..\n\nगुहागरमध्ये दिवसेंदिवस पर्यटकांची संख्या वाढत आहे..समुद्र स्नानाचा आनंद लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी नेमण्यात आलेल्या जीव रक्षक समुद्र चौपाटीवर नसल्याने सुरक्षितेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे..\n\nया जिरक्षकांचा मार्च महिन्याचा पगार थकला आहे.याबाबत नगरपंचायत कार्यालयामध्ये त्यांनी विचारणा केली असता,पगार 10 मे पर्यंत मिळू शकतो..दुसरे टेंडर होईल तेव्हा पगार मिळेल तोपर्यंत तुम्ही नाही आला तरी चालेल असे सांगण्यात आल्याचे जीव रक्षक सांगत आहेत..\n\nपगाराची टांगती तलवार असल्याने गुरुवारपासून पाचही जीव रक्षक रजेवर आहेत..\n\nयावर गुहागरच्या नगराध्यक्षा लक्ष देऊन योग्य तोडगा काढणार का असा प्रश्न उपस्थित केला जा रहा आहे..
0
0
Report
0
0
Report

नवी मुंबई में बाबा बनकर महिला से धोखाधड़ी, 24 घंटे में दो भोंदुओं की गिरफ्तारी

Navi Mumbai, Maharashtra:नवी बॉम्बईत काळी जादू और अघोरी विधीच्या नावाखाली एका महिलेलं आर्थिक फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी NRIA Wildlife पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी तातडीने कारवाई करत अवघ्या 24 तासांत दोन आरोपींना अटक केली आहे. पीडित महिलेला काही संकटे येत असल्याचे सांगत स्वतःला ‘बाबा’ म्हणूनओळख देणाऱ्या आरोपींनी तिच्यावर काळी जादू झाल्याचा बनाव केला. त्यावर उपाय म्हणून विविध पूजा व विधी करण्याचं सांगून आरोपींनी तिच्याकडून मोठी रक्कम उकळली. महिलेने रोख रक्कम तसेच ऑनलाइन व्यवहाराद्वारे सुमारे 1 लाख 90 हजार रुपये आरोपींना दिल्याचे समोर आले आहे. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर महिलेने पोलिसांत तक्रार दाखल केली. गुन्हा दाखल होताच पोलिसांनी तपासादरम्यान आरोपी नाशिक परिसरात असल्याची माहिती मिळाल्यानंतर स्थानिक पोलिसांच्या मदतीने सापळा रचण्यात आला. या कारवाईत अर्जुन भरत चव्हाण उर्फ टनटन बाबा आणि सागर शिवाजी शिंदे उर्फ एकलहरी बाबा या दोघांना अटक केलीय. या प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 318(4), 3(5) तसेच महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अटक आरोपींकडून आणखी कोणाची फसवणूक झाली आहेका, याचा तपास सुरू आहे. पोलिसांनी नागरिकांना अशा भोंदू बाबांच्या जाळ्यात न अडकण्याचे आवाहन केले आहे.
0
0
Report
Advertisement

नांदेड के मालाकोळी में जलजीवन मिशन के पाइप से आग, ब्रिगेड बुझाने में जुटी

Nanded-Waghala, Maharashtra:Satish Mohite Slug - Ned_Fire Feed on - 2C ---------------------------------- Anchor - जलजीवन मिशनच्या कामासाठी आणलेल्या पाईपला भीषण आग लागली. आगीचे लोट पसरले असून अग्निशमन दलाकडुन आग विझविण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु आहेत. नांदेड जिल्ह्यातील माळाकोळी येथे ही घटना घडली. माळाकोळी येथील गोपीनाथ मुंडे नगर परिसरात जलजीवन मिशनचे 32 कोटी रुपयांचे काम सुरु आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात पाईप कंत्राट दाराने आणून या भागात टाकले होते. या पाईपला मोठी आग लागली. पाईपला लागलेली आग मोकळ्या जागेतील झाडाझुडपांनाही लागल्याने आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केले. आगीचे मोठे लोळ या ठिकाणी उडत असल्याने भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अग्निशमन दलाच्या बंबाच्या साह्याने हे आग विझवण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. आगीचे नेमके कारण मात्र समजू शकले नाही.
0
0
Report

प्रतापगड़ किले में बदहाली, 127 करोड़ के बजट के बावजूद निर्माण गुणवत्ता पर सवाल

Satara, Maharashtra:सातारा - साताऱ्यातील ऐतिहासिक प्रतापगड किल्ल्याचे संवर्धन आणि डागडुजीचे काम sadhya सुरू आहे. मात्र हे सुरू असणारे जिर्णोद्धाराचे काम निकृष्ट दर्जाचे असल्याचा एक व्हिडिओ सध्या व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये नव्याने केलेल्या तटबंदीच्या दगडांच्या मधील भराव हा बोटांनी स्पर्श केल्यावर निघतो आहे. त्यामुळे किल्ल्याच्या या अंतर्गत तटबंदीची दुरुस्ती, बुरुजांचे मजबुतीकरण योग्य प्रकारे सुरू नसल्यास समोर आल आहे. गडाचे जतन आणि सुशोभीकरण यासाठी राज्य शासनाने 127 कोटीचा निधी दिला असून डिसेंबर पर्यंत गडाचे काम पूर्ण करायचे आहे. मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात निधी देऊन देखील निकृष्ट दर्जाचे काम होत असेल तर त्याबाबत राज्य सरकारने लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे
0
0
Report
Advertisement

गर्मी में कलिंगड़ की मांग बनी मजबूत, मौत के बाद बाजार में मामूली असर

Navi Mumbai, Maharashtra:उन्हाळात कलिंगडाला चांगली मागाणी असते परंतु आखाती युद्धामुले भारतीय कलिंगड परदेशात कमी प्रमाणात निर्यात होत आहेत. यात मुंबई मद्ये रात्री जेवणानंतर कलिंगड खाल्यानंतर प्रकृती बिघडली आणि एका कुटुंबाचा मृत्यू झाला. या कारणामुळे कलिंगड खरेदी वर तुरळक परिणाम जाणवत आहे. Vo1- मुंबई मद्ये कलिंगड खाऊन मृत्यू झाला या बातमी मुळे थोडाफार परिणाम मार्केट वर असून ,ग्राहक कमी येत आहेत पण दरावर याचा काही परिणाम झाला नाही. Vo2- नवी मुंबई एपीएमसी मार्केट मद्ये राज्यभरातून कलिंगड येत असून, रोज 50 ट्रक मार्केट मद्ये येत असून, 80 टक्के माल संपत आहे. आखाती देशातील युद्धामुळे निर्यात कमी झाली असून कलिंगडाचे भाव सध्या 15 ते 16 रुपये किलो आहेत, यातच या घटनेमुळे थोडाफार परिणाम अजून पडला नसून कलिंगड चांगले असून ग्राहकांनी कलिंगड खाण्याचे आवाहन येथील व्यापारी करत आहेत.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top