445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अकोला के पारस थर्मल पावर प्लांट में बॉयलर धमाके से दो कर्मचारी गंभीर घायल
Akola, Maharashtra:Anchor : अकोला जिलेतील बाळापूर तालुक्यातील पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात भीषण अपघाताची घटना घडली आहे. वीज केंद्रातील बॉयलरमध्ये बिघाड झाल्याने दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजल्याची माहिती समोर आली आहे. यातील एका कर्मचाऱ्याची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पारस औष्णिक वीज निर्मिती केंद्रात नेहमीप्रमाणे कामकाज सुरू असताना अचानक एका बॉयलरमध्ये जोरदार स्फोट झाला. या स्फोटामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. स्फोटाच्या वेळी ड्युटीवर असलेले दोन कर्मचारी गंभीररीत्या भाजले गेले. अपघाताची माहिती मिळताच वीज केंद्रातील सुरक्षा यंत्रणा आणि इतर कर्मचाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले. जखमी कर्मचाऱ्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, या स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून संबंधित यंत्रणांकडून घटनेची चौकशी सुरू करण्यात आली आहे. या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.0
0
Report
सोलापुर नगरपालिका चुनाव: भाजपा के पास सिर्फ 450 मत, विपक्ष एकजुट हों तो भी खलबली
Pandharpur, Maharashtra:निवडून येण्यासारखी परिस्थिती असेल तर जरूर लढा, पण सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिनविरोध करून सहकार्य करा, पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे विरोधकांना आवाहन सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक मध्ये फक्त भाजपाचे 450 मतदार आहेत. यात राष्ट्रवादी आणि शिवसेना यांना सोबत घेतल्यानंतर ही संख्या अधिक वाढणार आहे. त्यामुळे बोटावर मोजण्या एवढे विरोधक यांचे संखबळ आहे. निवडणूक येण्यासारखी परिस्थिती असेल तर निवडणूक लढवावी. पण व्यवस्थेवर ताण आणू नका. सोलापूर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक बिन विरोध करावी असे आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. आता विरोधक या आवाहनाला प्रतिसाद देतात का पहावं लागेल0
0
Report
पंढरपुर्ण: गोरे ने महाराज मंडळी से सुविधाओं पर चर्चा की आषाढ़ी वारी के लिए
Pandharpur, Maharashtra:आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज पंढरपूर मधील महाराज मंडळी यांची भेट घेतली आहे. आषाढी एकादशी पूर्वी पंधरा दिवस आणि आषाढी एकादशी नंतर 15 दिवसा असे एकमहिना श्री विठ्ठल रुक्मिणी व्हीआयपी दर्शन बंद राहणार मागील वर्षी आषाढी एकादशीचा सोहळा निमित्त वारकऱ्यांना विविध सुविधा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या सूचनेनंतर प्रशासनाने दिल्या होत्या. त्यामुळे वारी सुखकर झाली होती. यावर्षी सुद्धा आषाढी वारी मध्ये काय सुविधा वारकऱ्याना द्याव्यात यासाठी आज पालकमंत्री जय कुमार गोरे यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याचे राणा महाराज वासकर तसेच इतर महाराज मंडळी यांची भेट घेतली त्यांच्या कडून सूचना घेतल्या. आषाढी वारी चांगली होण्यासाठी महाराज मंडळी यांच्याशी चर्चा केल्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी सांगितले0
0
Report
Advertisement
त्र्यंबकेश्वर में विराम दर्शन: VIP टिकट 2500 रुपये, सामान्य भक्तों पर असर
Nashik, Maharashtra:अँकर: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या नाशिकच्या प्रसिद्ध त्र्यंबकेश्वर मंदिरात विराम दर्शनासाठी अडीच हजार मोजावे लागणारे. दर्शनाचा काळा बाजार आणि दलालांची लुबाडणूक रोखण्यासाठी देवस्थान ट्रस्टने एक नवीन प्रस्ताव आणला आहे. या नव्या प्रस्तावामुळे आता एकच नवा वाद निर्माण होण्याची चिन्हं आहेत. काय आहे हा 'विराम दर्शनाचा' नवा प्लॅन? पाहूयात या विशेष रिपोर्टमध्ये. त्र्यंबकेश्वर मंदिरात व्हीआयपी दर्शनाचा नवा फॉर्म्युला विराम दर्शना'साठी मोजावे लागणार तब्बल २,५०० रुपये! प्रत्येक तासाला सामान्य रांग ५ मिनिटांसाठी घेणार विराम तिकिटासाठी आधार कार्ड आणि हायटेक 'मनगटी बँड' अनिवार्य; मनगटावरील बँड स्कॅन करूनच मिळणार थेट प्रवेश! श्रीमंतांनाच लवकर दर्शन मिळणार का? देवस्थान ट्रस्टच्या २५०० रुपयांच्या प्रस्तावावर भाविकांच्या संमिश्र प्रतिक्रिया कसे असेल विराम दर्शन स्वतंत्र खिडकी: विराम दर्शनाच्या तिकिटासाठी मंदिर प्रवेशद्वारावर स्वतंत्र खिडकी असेल. ओळखपत्र अनिवार्य: तिकीट खरेदीसाठी आधार कार्ड दाखवणे सक्तीचे असेल. मनगटी बँड: तिकिटासोबत संगणकीय कोड असलेला खास रिस्ट बॅंड दिला जाईल. स्कॅनिंग प्रवेश: मनगटावरील बँड स्कॅन केल्यानंतरच भाविकाला आत थेट प्रवेश मिळेल. मर्यादित वैधता: एकदा घेतलेले तिकीट केवळ त्याच दिवसापुरते वैध कैलास घुले विश्वस्त त्र्यंबकेश्वर संस्थान या निर्णयामुळे त्र्यंबकमध्ये सुरू असलेल्या दर्शनाचा लिलाव आणि त्यासाठी तयार झालेली गुंडांची साखळी मोडीत निघेल असा संस्थांचा दावा आहे. पंचवीसशे रुपयांच्या दर्शन उत्पन्नातून त्र्यंबकेश्वरातील भाविकांसाठी अन्नदान आणि अत्याधुनिक वैद्यकीय सुविधांचे हॉस्पिटल सुरू करण्याची त्र्यंबकेश्वर संस्थानने तयारी सुरू केली आहे. दरम्यान, या सुविधेचे पर्यटन असोसिएशनने स्वागत केले आहे MIDPTC केवळ तिकीट वाढवण्याऐजी मंदिरात मोफत आणि २०० रुपयांच्या रांगेत अंदाजे किती प्रतीक्षा वेळ लागेल हे दाखवणारे डिजिटल फलक, टोकन दर्शन पर्याय आणि मंदिर उघडणे-बंद होण्याचे स्पष्ट वेळापत्रक लावण्याची मागणीही भाविकांमधून जोर धरू लागली आहे. दलालांना चाप लावण्यासाठी डिजिटल सिस्टीम आणण्याचा देवस्थानचा प्रयत्न कौतुकास्पद असला, तरी अडीच हजार रुपयाचा हा भार सर्वसामान्य भाविकांच्या खिशाला परवडणारा नाही. आता हा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू होणार की भाविकांच्या रोषामुळे देवस्थानला पाऊल मागे घ्यावे लागणार, हे येणारा काळच ठरवेल.0
0
Report
किसानों के लिए मेळावे में मांग: दाम न मिल पाने पर आंदोलन की चेतावनी
Yeola, Maharashtra:कांद्यासह शेतीमालाला बाजार भाव मिळत नसल्याने तीन हजार रुपये कांद्याला बाजार भाव मिळाला पाहिजे यासाठी येवला तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते या मेळाव्याला काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी मार्गदर्शन केले यावेळी बोलताना राज्य आणि केंद्र सरकारवर हल्लाबोल करण्यात आला शेतीमालाला बाजार भाव नसल्याने शेतकरी हवालदिल आहे अशावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तो मी नव्हे असे म्हणत लखोबा लोखंडे चे पात्र रंगवत आहे ते त्यांनी सोडावे जबाबदार सरकार म्हणून त्यांनी पुढे जावे डिझेल टंचाई दूर करावी, शेतकऱ्यांची कर्जमाफी तात्काळ पूर्ण करावी सरकार विरोधात असंतोष असल्याने काँग्रेस रस्त्यावर उतरेल असा इशारा यावेळी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला0
0
Report
अकोल्यात विनयभंगप्रकरणी पोलीस कर्मचाऱ्यावर गुन्हा; सिटी कोतवालीला तात्काळ अटक
Akola, Maharashtra:अकोल्यात एका पोलीस कर्मचाऱ्यावर विनयभंगासह गंभीर आरोपांप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अकोल्यातील सिटी कोतवाली पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस कर्मचारी सचिन गायकवाड यांच्याविरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. एका महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी पोलीस कर्मचारी गेल्या अडीच वर्षांपासून लग्नाचे आमिष दाखवत तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता तसेच तिला मानसिक त्रास देत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. महिलेच्या तक्रारीनंतर सिटी कोतवाली पोलिसांनी आरोपी पोलीस कर्मचाऱ्याविरुद्ध विनयभंगासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू आहे.0
0
Report
Advertisement
बीड़ शहर के विवाह समारोह में पटाखे फटने से पांच फोटोग्राफर घायल
Beed, Maharashtra:बीड़ शहरात एका विवाह सोहळ्यात फटाक्याचा जमिनीवर स्फोट; पाच फोटोग्राफर जखमी. जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबाने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर घटना उघडकीस आली; व्हिडिओ आणि ड्रोनमधले धक्कादायक क्लिप्स समोर आले. बीड़ शहरात गेल्या काही दिवसांपूर्वी मोठ्या थाटात विवाह सोहळा पार पडला. फटाक्यांची आतीषबाजी मोठ्या प्रमाणात केली जात होती. या दरम्यान एक दारूगोळा फटाक्याचा जखडून फोटोग्राफरच्या अंगावर पडला; पाच फोटोग्राफर जखमी झाले; अभिषेक कदम नामक फोटोग्राफरचा डोळा व चेहरा भाजले. त्याचा विवाह अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपला होता. या घटनेनंतर जखमी फोटोग्राफरच्या कुटुंबीयांनी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांना निवेदन देऊन आयोजक, इव्हेंट मॅनेजर, फायर वर्क्स चालकांवर कारवाईची मागणी केली.0
0
Report
अल्पवयीन लड़की से छेड़छाड़ के आरोप पर रिश्तेदारों की हत्या, तीन गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:अल्पवयीन मुलीची छेड. पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून मामाची हत्या तिघांना अटक. टिटवाळा परिसरातील म्हारळ गावात एका तरुणीची छेड काढल्याच्या प्रकरणातून संतापजनक हत्याकांड उघडकीस आले आहे. दीपक डांगे या तरुणाने मुलीची छेड काढल्याच याच प्रकरणात मुलीच्या आई ला मामाने पोलीस ठाण्यात तक्रार करण्याचा सल्ला दिल्याच्या रागातून रविंद्र अहिरे याची निर्घृण हत्या करण्यात आली. टिटवाळा पोलिसांनी दीपक डांगे, विजय भिडे आणि परशुराम भिडे या तिघांना अटक केली आहे. म्हारळ गावातील दीपक डांगे याने आपल्या मानलेल्या बहिणीच्या अल्पवयीन मुलीची छेड काढल्याचा प्रकार घडला होता. या घटनेनंतर संबंधित मुलीच्या कुटुंबीयांमध्ये संतापाचे वातावरण होते. रविंद्र अहिरे याने मुलीच्या आईला आरोपी विरोधात पोलीस ठाण्यात तक्रार केली म्हारळ गावातील मलखांब कंपाऊंड परिसरात रविंद्र अहिरे याच्यावर तिघांनी धारदार शस्त्रांनी हल्ला केला गंभीर जखमी अवस्थेत रविंद्रला रुग्णालयात नेण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. कल्याण कोर्टात हजर केले असता चार दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.0
0
Report
भिमाशंकर मंदिर 1 जून से दर्शन के लिए खुलेगा? प्रशासन निर्णय देगा
Shirur, Maharashtra:३१ मेपर्यंत बंद भिमाशंकर मंदिर; १ जूनला दर्शन सुरू होणार का? भिमाशंकर मंदिरातील विकासकामे अंतिम टप्प्यात पोहोचली असून आज जिल्हा administrationाकडून मंदिर परिसराची पाहणी केली जात आहे. ३१ मेपर्यंत बंद असलेलं मंदिर १ जूनपासून भाविकांसाठी खुलं होणार का, याकडे शिवभक्तांचं लक्ष लागलं आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विकासकामांसाठी ९ जानेवारी २०२६ पासून भिमाशंकर मंदिर दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं होतं. सभामंडप, घुमट, पायरी मार्ग आणि भाविक सुविधांची कामे आता अंतिम टप्प्यात पोहोचली आहेत. आज जिल्हा प्रशासन, बांधकाम विभाग आणि मंदिर ट्रस्टकडून प्रत्यक्ष पाहणी करून सुरक्षेसह भाविक व्यवस्थेचा आढावा घेतला जाणार आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत बंद असलेलं मंदिर १ जूनपासून सुरू करण्याबाबत प्रशासन काय निर्णय घेतं, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.0
0
Report
Advertisement
चंद्रपूर पुलिस ने बकरीद के मद्देनजर 293 गोतस्करों की परेड कराई, कार्रवाई की चेतावनी
Chandrapur, Maharashtra:टायटल:--- आगामी बकरीद सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलीस सतर्क ,पोलीस मुख्यालयातील ड्रिल शेडमध्ये 293 सराईत गो तस्कर गुन्हेगारांची घेतली परेड, या सर्वांना नियमांचे उल्लंघन झाल्यास कठोर कारवाईचा पोलीस अधीक्षक आयुष नोपानी यांचा इशारा अँकर:-- गो तस्कर आणि कत्तली बाबत चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी आज एक मोठा निर्णय घेतला. आगामी बकरीत सणाच्या पार्श्वभूमीवर चंद्रपूर जिल्हा पोलिसांनी सतर्क होत जिल्हा पोलीस मुख्यालयाच्या ड्रिल शेडमध्ये जिल्ह्यातील 293 सराईत गो तस्कर आणि गुन्हेगारांची चक्क ओळख परेड घेतली. या सर्वांकडून गोतस्करीत सहभागी न होण्याचे निर्देश स्पष्टपणे देण्यात आले. याशिवाय या सर्वांकडून भारतीय न्याय संहिते अंतर्गत बंधपत्रही भरून घेण्यात आले. बंध पत्रानंतरही एखाद्या कारवाईत गो तस्कर सहभागी असल्याचे आढळल्यावर त्यांच्यावर थेट मकोका अंतर्गत रीतसर गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. बाईट १) आयुष नोपानी, पोलीस अधिक्षक, चंद्रपूर आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर0
0
Report
यवतमाल के पुסद में विहार लॉज से नकली नोट छापने वाला गैंग गिरफ्तार
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद येथील विहार लॉज मध्ये बनावट नोटा छापणाऱ्या टोळीला पोलिसांनी अटक केली आहे. तेलंगणातील मंचेेरियाल येथील चौघेजण या लॉज मध्ये बनावट नोटा छापत होते. कारवाईत दोन लाख 880 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. हे आरोपी पाचशे रुपयांच्या बनावट नोटा तयार करताना रंगेहात आढळले. छाप्यामध्ये टीचर आयोडीन, सोडियम थायोसल्फेट, स्पिरिट, कागद, प्रिंटर, विविध रासायनिक साहित्य आणि बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरले जाणारे साहित्य जप्त करण्यात आले. सर्व आरोपी तेलंगणातील मंचरियाल येथील असल्याची माहिती पोलिसांनी दिली.0
0
Report
दिल्ली diesel स्टॉक के बावजूद कुछ पंपों पर बिक्री बंद, प्रशासन ने शुरू की जांच
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यात डिझेलचा पुरेसा साठা उपलब्ध असतानाही काही पेट्रोलपंपांवर इंधनविक्री बंद ठेवण्यात आल्याने शेतकरी आणि नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतोय. डिझेलसाठी लांबच लांब रांगा लागल्या असताना साठा असूनही वाटप का बंद ठेवण्यात आले, याबाबत संतप्त नागरिकां प्रश्न उपस्थित करताय. दरम्यान, पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी संबंधित पेट्रोलपंपाला भेट देत परिस्थितीची पाहणी केली. त्यांच्या हस्तक्षेपानंतर बंद असलेला पंप पुन्हा सुरू करण्यात आला आणि इंधनविक्री पूर्ववत झाली. यानंतर पुरवठा विभाग आणि प्रशासनातील अधिकाऱ्यांनी पंपाची सखोल तपासणी सुरू केली आहे. उपलब्ध साठा, विक्रीची नोंद, वितरण प्रक्रिया आणि पंप बंद ठेवण्यामागील कारणांची कसून चौकशी करण्यात येत आहे. तपासणीचा सखोल अहवाल तयार करून नियमानुसार योग्य ती कारवाई केली जाईल, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या माहितीनुसार जिल्ह्यात डिझेल व पेट्रोलचा पुरेसा साठा उपलब्ध असून कृत्रिम टंचाई निर्माण करणाऱ्यांविरोधात कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या अधिकृत माहितीकडे लक्ष द्यावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. Byte प्रवीण फुलारी, जिल्हा पुरवठा अधिकारी0
0
Report
Advertisement
अरुणावती परियोजना से नदी में एक लाख घन मीटर पानी छोड़ने का आदेश
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या आर्णी तालुक्यातील अरुणावती नदीकाठावरील तीन ग्रामपंचायतींमध्ये निर्माण झालेल्या पाणीटंचाईच्या निवारणार्थ ग्रामस्थ व जनावरांकरिता पिण्याच्या पाण्याची उपलब्धतेसाठी अरुणावती प्रकल्पातून एक दशलक्ष घनमीटर पाणी नदीपात्रात सोडण्याचे आदेश जिल्हाधिकारी विकास मीना यांनी दिले आहेत. गटविकास अधिकारी, पंचायत समिती आर्णी यांनी सन २०२५-२६ मधील उन्हाळी टंचाई कालावधीसाठी आरक्षित दोन दलघमी पाणीसाठ्यातून एक दलघमी पाणी सोडण्याची विनंती केली होती. हे पाणी संबंधित गावांतील नागरिक व जनावरांच्या पिण्याच्या गरजांसाठी वापरण्यात येणार आहे. प्रकल्पातून पिण्याच्या पाणीकरिता विसर्ग होणार असून नदी काठावरील गावातील नागरिकांनी नदी पात्रात जनावरे किंवा स्वतः जाण्याचा प्रयत्न करु नये, असे आवाहन जिल्हा प्रशासनाचे वतीने करण्यात येत आहे0
0
Report
डोंबिवली के खोणी पलावा उच्चभ्र सोसाइटी से २४ नाइजीरियाई गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:डोंबिवलीतील खोणी पलावा उच्चभ्र सोसायटीत २४ नायजेरियना घेतला ताब्यात डोंबिवलीच्या खोणी पलावा या उच्चभ्र सोसायटीमध्ये वास्तव्य करणाऱ्या 24 नायजेरियांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. नवी मुंबई ,ठाणे आणि डोंबिवली मानपाडा पोलिसांनी ही कारवाई केली. या कारवाई मध्ये 24 नायजेरियन त्यात महिला आणि पुरुषांचा समावेश आहे. या ताब्यात घेण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकां वर नवी मुंबई आणि ठाणे पोलीस ठाण्यात ड्रग संदर्भात गुन्हे दाखल आहेत. दरम्यान या नायजेरिया नागरिकांकडे पासपोर्ट विजा संदर्भातले कागदपत्र आहेत का? याची तपासणी पोलिसांकडून सुरू आहे. यातील सात नायजेरियन रहिवाशांकडे हे कागदपत्र असून आठ नायजेरियन रहिवाशांकडे या संदर्भाची कागदपत्र नसल्याचे पोलिसांनी सांगितले .दरम्यान डोंबिवली आणि कल्याण परिसरात अशाप्रकारे मोठ्या प्रमाणात नायजेरियन नागरिक वास्तव्य करत असून पोलिसांमार्फत त्याची तपासणी सुरू आहे .शिवाय घर भाड्याने देताना आपण कोणाला घर भाड्याने देत आहोत याची मालकांनी चौकशी करणे गरजेचे आहे. अन्यथा त्यांच्यावर किंवा एजंट वर कारवाई केली जाईल अशी माहिती पोलिसांनी दिली.0
0
Report
सांगली के अस्पताल में 108 रुग्णवाहिका के डॉक्टरों की लापरवाही से मौत
Sangli, Maharashtra:सांगली मध्ये मिरज तालुक्यात देशिंग येथे अरविंद कुंभार नामक रुग्णाला वेळेत उपचार मिळावे म्हणून शेजारील लोकांनी 108 रुग्णवाहिका बोलावली होती. रुग्णाला शुगर कमी असल्याबाबत त्रास होता. परंतु रुग्णवाहिकेवरील डॉक्टराने रुग्णाची कोणत्याही प्रकारची तपासणी न करता थेट मिरज शासकीय रुग्णालयात घेऊन आले. रुग्ण अरविंद हा ज्यावेळी रुग्णवाहिकेत स्वतःहून चढला होता, त्यावेळी तपासणी झाली नाही. डॉक्टर हे रुग्णासोबत न बसता ड्रायव्हर सीट शेजारी बसले आणि तपासणी व प्राथमिक उपचार न दिल्याने रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप शासकीय रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ अविनाश रकटे यांनी केला. यापूर्वीही असे प्रकार घडले असल्याचा खुलासा डॉक्टरांनी केला आहे. या रुग्णाचे काहीच दिवसांपूर्वी वडिलांचे निधन झाले आहे. आता एकुलता एक मुलगा डॉक्टराच्या हलगर्जीपणाने दगवल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला. हॉस्पिटल आवारात मयत अरविंद ची आईने हंबर्डा फोडून सांगत होती.. तो व्यवस्थित होता त्याला शुगरचा त्रास होता. रुग्णवाहिकेतील डॉक्टरांनी त्याला कोणतेही उपचार दिले नाहीत किंवा तपासले नाही, असे आरोप मयत रुग्णाच्या आईने केले.0
0
Report
Advertisement
