icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

मंगलवेढ़ा में विवाह धोखा: अविवाहित युवक से 2.7 लाख की ठगी

Pandharpur, Maharashtra:_solapur जिल्ह्यातील मंगळवेढा येथे लग्नाची आस धरून बसलेल्या एका अविवाहित तरुणाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत, विवाहित महिलेला अविवाहित मराठा तरुणी म्हणून सादर करत त्याच्याशी लग्न लावून देत तब्बल २ लाख ७० हजार रुपयांची केल्याचा फसवणूक धक्कादायक प्रकार मंगळवेढा तालुक्यात उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे, लग्नानंतर काही दिवसांतच नववधूने पळून जाण्याचा प्रयत्न केल्याने हा संपूर्ण बनाव समोर आला मंगळवेढा येथील विनायक अवताडे याचे लग्न जमत नसल्याने त्यांनी नातेवाईक नवनाथ लेंडवे यांच्या माध्यमातून लातूर जिल्ह्यातील उदगीर येथील सुरेखा सूर्यवंशी यांच्याशी संपर्क झाला. १६ एप्रिल रोजी उदगीर येथे भेट झाल्यानंतर, 'कुसुम' नावाची मुलगी मराठा समाजातील असून, लग्नासाठी तयार असल्याचे सांगण्यात आले. यावेळी लग्नासाठी २ लाख ७० हजार रुपयांची मागणी केली. त्यावर विश्वास ठेवून विनायक व त्यांच्या नातेवाईकांनी रोख व ऑनलाइन व्यवहाराद्वारे एकूण रक्कम सुरेखा सूर्यवंशी यांच्या ताब्यात दिली. त्याच दिवशी रात्री उशिरा लातूर येथील गणपती मंदिरात साध्या पद्धतीने विवाह लावून देण्यात आला. त्यानंतर नववधूला मंगळवेढा तालुक्यातील लेंडवे चिंचाळे येथे आणून नातेवाईकांच्या उपस्थितीत पारंपरिक पद्धतीने पु/Eय विवाह सोहळा पार पडला. नवीन संसाराची सुरुवात होत असतानाच गुरुवार, २३ एप्रिल रोजी पहाटे संशयास्पद घटना घडली. घरामागे आलेल्या कारमध्ये बसून नववधू पळून जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे गावकऱ्यांच्या लक्षात आले. पाठलाग करून मंगळवेढा येथील अवताडे पंपाजवळ वाहन अडवले. यावेळी विनायक आणि नातेवाईकांनी केलेल्या चौकशीत धक्का-दायक माहिती समोर आली. संबंधित महिला विवाहित असून, तिला मुलेही आहेत. तिचे खरे नाव कुसुमबेन बेमाभाई घाटाड असल्याचे उघड झाले. यानंतर वाहनासह सर्वांना मंगळवेढा पोलिस ठाण्यात आणण्यात आले. भारतीय न्याय संहिता २०२३च्या कलम ३१८ (४) व ३ (५) अन्वये त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ---- Byte - दत्तात्रय बोरिगिड्‌डे पोलीस निरीक्षक विनायक अवताडे फसवणूक झालेला तरुण
0
0
Report

नितेश राणे चिखल फेक केस में निर्दोष मुक्त, 504 के तहत सजा

Oras Bk., Maharashtra:नितेश राणे चिखल फेक प्रकरणावर जिल्हा सत्र न्यायालयाने नितेश राणे यांच्यासह 40 जणांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. नितेश राणे काँग्रेसमध्ये असताना अभियंता प्रकाश शेडेकर यांच्यावर चिखल फेक करण्यात आली होती. याबाबत न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. कणकवली शहरातील रस्त्यांची परिस्थिती चिख्लमेय झाली होती, त्यावेळी अभियंता प्रकाश खेडेकर यांना नितेश राणे यांनी बोलावलं होतं. त्या परिसराची पाहणी करत असताना शेडेकर यांच्यावर चिखल फेक, व मारहाण करण्यात आली अशी त्यांची तक्रार होती. भारतीय दंड अधिनियम 353, 504, 506 गुन्हा दाखल झाला होता. सर्व गुन्ह्यांमधून नितेश राणेंसह सहकाऱ्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, परंतु 504 सार्वजनिक शांततेचा भंग होणे या पाचशेच्या गुन्ह्याखाली नितेश राणे यांना न्यायालयाने दोषी ठरवलेला आहे. एक महिन्याचा कारावास आणि एक लाख रुपये दंड शिक्षा त्यांना सुनावण्यात आली आहे. आरोपीच्या वतीने त्या शिक्षेला स्थगिती मिळावी याकरिता अर्ज दिला आहे. त्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे. लवकरच आम्ही उच्च न्यायालयामध्ये रिव्हिजन दाखल करणार आहोत.
0
0
Report

मोबालगाॅव में शिवप्रेमियों का प्रदर्शन, शिवाजी महाराज के अपमान पर सख्त कार्रवाई की मांग

Nashik, Maharashtra:*Breaking... नाशिक ( मालेगाव ) विशाल मोरे बागेश्वर बाबा व संजय गायकवाड यांच्या विरोधात शिवप्रेमींचे मालेगावात निदर्शने नागपूर येथील कार्यक्रमात बागेश्वर बाबांनी छत्रपती शिवाजी महाराजांविषयी वापरलेल्या वक्तव्याचा तीव्र निषेध आ. संजय गायकवाड यांनी पुस्तक प्रकाशकाला केलेल्या शिवीगाळीचा निषेध शिवप्रेमींकडून दोघांविरुद्ध कडक कारवाईची मागणी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान सहन केला जाणार नाही असा इशारा आंदोलकांचा संबंधित व्यक्तींनी जाहीर माफी मागावी, अन्यथा आंदोलन तीव्र करण्याचा इशारा मोठ्या संख्येने शिवप्रेमी व विविध संघटनांचे कार्यकर्ते आंदोलनात सहभागी घोषणाबाजी करत छत्रपती शिवाजी महाराजांविषयी अपमानास्पद वक्तव्य करणाऱ्यांवर कारवाईची मागणी
0
0
Report
Advertisement

महंगाई के खिलाफ कोल्हापुर में रेशन दुकानदारों के साथ धडक मोर्चा

Kolhapur, Maharashtra:महागाई विरोधात आज रेशनबचाव समितीच्या वतीने कोल्हापुरातील जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात आला.. रेशनदुकानदारांसह शेकडो ग्राहकांनी भर उन्हात रस्त्यावर उतरून महागाई विरोधात निषेध व्यक्त केलायं..महागाईमुळं जीवनावश्यक वस्तूंची दरवाढ झाल्याने सर्वसामान्यांना जगणं मुश्कील झालंय..त्यामुळे सरकारने नागरिकांना घरपोच गॅस सिलेंडर द्यावा , रेशनकार्डवर 5 लिटर राॅकेलसह तुरडाळ ,साखर, गोडतेल , हरभरा डाळ या पाच जीवनावश्यक वस्तू द्याव्यात या मागण्या करण्यात आल्या..यावेळी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला..दरम्यान सरकारने तातडीने रेशनदुकानदारांच्या मागण्या मार्गी लावाव्यात अन्यथा सरकार विरोधात हल्लाबोल आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला.
0
0
Report

खटाव में पानी संकट: किसान ने नेर डैम से पानी तुरंत देने की मांग

Satara, Maharashtra:खटाव तालुका सातारा -खटाव तालुक्यात पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नेर धरणाच्या पाण्यासाठी शेतकरी आता रस्त्यावर उतरले आहेत. लाभक्षेत्रातील गावांना तातडीने पाणी सोडावे, या मागणीसाठी पुसेगाव येथे शिवसेना उभाठा गट आणि शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन छेडले.या आंदोलनामुळे पुसेगाव-वडूज मार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या. “पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.दरम्यान, पाण्याअभावी वाळून गेलेल्या उसाच्या मोळ्या रस्त्यावर जाळून आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध नोंदवला. शेती पिके जळत असताना प्रशासन मात्र झोपेत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला.वाढत्या उन्हाळ्यात पाणीटंचाई तीव्र होत असताना खटाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा संताप उफाळून आला असून, आता प्रशासन काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे..
0
0
Report
Advertisement
0
0
Report

मालेगांव में जलसंकट गहराया: 25-30 गांवों में पानी के टैंकर से आपूर्ति

Nashik, Maharashtra:नाशिक जिले में मालेगांवचा पारा 43 अंशावर पोहचला असून तालुक्यातील माळमाथा परिसरातील 25 ते 30 गावात भीषण पाणी टंचाई असून कुठे एक महिन्यात तर कुठे 15 दिवसातून पाणी येत असल्याने ग्रामस्थ पाण्याच्या टाकीवर चढून आत्मदहन करण्याचा इशारा त्यांनी दिला। शहरात आणि ग्रामीण भागात सारखीच पाणीपट्टी असली तरी पाणी पुरवठा मात्र सारखा केला जात नाही। तशीच आता जिल्ह्यातील पाण्याची परिस्थिती झाली असून 40 गावे, 87 वाड्यांना टँकरने पाणी पुरवठा केला जात आहे। मालेगाव शहर, तालुक्याला पाणी पुरवठा करणारे गिरणा, हरणबारी धरणाची पाण्याची पातळी देखील खालावली आहे। चौपाल: विशाल मोरे to शेतकरी... ग्रामस्थ
0
0
Report
Advertisement

रत्नागिरी में शादी से लौटते समय भीषण हादसा; दो युवकों की मौत

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरीत लग्नाहून परतताना भीषण अपघात.. मोबाईल बॅटरीच्या स्फोटाने दोघांचा घेतला बळी.. पांगरी वळणावर दुचाकी दरीत कोसळली...हातखंबा बौद्धवाडीवर शोककळा.. अँकर.. रत्नागिरीच्या पांगरी येथे एक थरारक आणि दुर्दैवी अपघात घडला आहे. देवरुख येथील लग्न सोहळा आटोपून घरी परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला असून, यामध्ये हातखंबा येथील दोन तरुणांचा मृत्यू झाला आहे.. चालत्या दुचाकीवर असताना मोबाईलच्या बॅटरीचा अचानक स्फोट झाला..यामुळे चालकाचा ताबा सुटला आणि दुचाकी थेट पुलाच्या कठड्याला धडकून १७ फूट खोल दरीत कोसळली. या भीषण अपघातात विकास कांबळे आणि सुमित कांबळे या दोन तरुणांनी आपला जीव गमावला आहे,तर एक जण गंभीर जखमी असून त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.. लग्नाचा आनंदाचा क्षण या तरुणांच्या आयुष्यातील अखेरचा ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे..
0
0
Report

वाशिम के दुबळवेल में जलसंकट: मॉर्चे से प्रशासन पर ठोस कदम की मांग

Washim, Maharashtra:व Washim: अँकर:वाढत्या तापमानामुळे जलस्रोतांची पातळी झपाट्याने खालावत असून वाशिम जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यात काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. विशेषतः दुबळवेल येथील ग्रामस्थांना या समस्येचा मोठा फटका बसत आहे. पाणीटंचाईची समस्या घेऊन दुबळवेल गावातील नागरिकांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयावर घागर मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधले. गावात तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मुख्य मागणी यावेळी करण्यात आली. तसेच, गावातून वाहणाऱ्या काटेपूर्णा नदीवरील प्रलंबित धरण प्रकल्प तात्काळ सुरू करावा, अशीही मागणी ग्रामस्थांनी केली. मोर्चादरम्यान महिलांचा मोठा सहभाग दिसून आला. पाणीटंचाईमुळे दैनंदिन जीवनावर गंभीर परिणाम होत असल्याची व्यथा त्यांनी मांडली. काही महिलांनी तर पाणीअभावी मुलांच्या विवाह जुळण्यात अडचणी येत असल्याची कैफियत अप्पर जिल्हाधिकाऱ्यांसमोर व्यक्त केली. प्रशासनाने लवकरात लवकर ठोस निर्णय घेऊन धरणाचे काम पुन्हा सुरू करावे, अन्यथा आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असेही इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. या मोर्चातील ग्रामस्थांशी पाणीटंचाईच्या संदर्भात संवाद साधला आमचे प्रतिनिधी गणेश मोहळे यांनी.
0
0
Report

विवाद बढ़ा: नवनीत राणा बनाम विजय वडेट्टीवार, रवि राणा ने दी कड़ी चेतावनी

Amravati, Maharashtra:पाच फाईल आहे ही बातचीत नागपूरात नवनीत राणा आणि विजय वडेट्टीवार यांच्यात सुरू असलेल्या वादाची कहाणी आहे. आमदार रवी राणा यांच्या कडून विजय समजपणाचं वक्तव्य करण्यात आलं. पती महिलांबद्दल बोलणं महाराष्ट्राची संस्कृती नाही असं रवी राणा यांनी म्हटलं आहे. या वादात नवनीत राणा यांच्या वर विजय वडेट्टीवार यांची टीका झाली, ज्यावर नवनीत राणा यांनी उत्तर दिले; त्या सी ग्रेडच्या पॉप्युलर हिरोईन असल्याचं म्हटलं गेलं. रवी राणा यांनी देखील विजय वडेट्टीवार यांना खडे बोल सुनावले आणि महिलांबद्दल अभद्र प्रतिक्रिया टाळण्याचा सल्ला दिला. हा वाद राजकारणातून वैयक्तिक टीका मर्यादेच्या पार जाऊन पोहोचला असून माहिती पाहण्यासाठी झी २४ तासचा स्पेशल रिपोर्ट दाखवत आहे.
0
0
Report
Advertisement

सोलापूर के कोंडी गांव के मुख्य मार्ग पर गड्ढे, ग्रामीण परेशान

Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील मुख्य रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांमुळे ग्रामस्थ त्रस्त - सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर तालुक्यातील कोंडी गावातील रस्त्यांची दुरावस्था - सोलापूर पुणे राष्ट्रीय महामार्गावरून कोंडी गावात येताना मुख्य रस्तावरील खड्यामुळे पंचक्रोशीतील नागरिकांना करावी लागतेय कसरत - कोंडी गावातील रस्त्याला लागूनच गटाराची व्यवस्था असल्यामुळे खड्ड्यांमुळे पाण्याचा गटारीत पडल्याच्या घटना समोर - गावातील अंतर्गत रस्ते देखील मोठ्या प्रमाणात खराब झाल्या असून लवकरच दुरुस्ती करण्याची ग्रामस्थांची मागणी याविषयीचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा यांनी....
0
0
Report

लासलगाव में 42.6°C तापमान, पोल्ट्री उद्योग पर भारी असर

Lasalgaon, Maharashtra:नाशिक जिल्ह्यातील थंड हवामानासाठी ओळखल्या जाणाऱ्या निफाड तालुक्यात यंदा उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे लासलगाव येथे गेल्या 13 एप्रिलपासून कमाल तापमान सतत 40 अंश सेल्सिअसच्या वर असून आज तापमानाने 42.6 अंश सेल्सिअसचा उच्चांक गाठला आहे या तीव्र उष्णतेचा फटका पोल्ट्री व्यवसायाला बसत आहे वाढत्या तापमानामुळे कोंबड्यांच्या शरीरातील प्रतिकारशक्ती (इम्युनिटी) कमी होत असून त्याचा थेट परिणाम त्यांच्या आरोग्यावर होत आहे उष्णतेमुळे कोंबड्यांचे अन्न व पाणी घेण्याचे प्रमाण घटले असून त्यामुळे त्यांची वाढ मंदावते आहे याशिवाय, उष्माघातामुळे कोंबड्यांच्या मृत्यूचे प्रमाणही वाढल्याने पोल्ट्री व्यावसायिक चिंतेत वाढ झाली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top