icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कांग्रेस विधायक सतेज पाटील ने कानून-व्यवस्था पर सवाल उठाए, स्वतंत्र गृह मंत्री की मांग

Kolhapur, Maharashtra:कांग्रेस आमदार सतेज पाटील बाईट मुद्दे आमदार सतेज पाटील ऑन कायदा सुव्यवस्था कायदा व सुव्यवस्था राज्यातील बिघडलेली आहे हे मी सातत्याने सांगतोय या राज्याला स्वतंत्र गृहमंत्री असल्याशिवाय कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहणार नाही, मत व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येक व्यक्तीला आहे पुण्यात बापट यांना जी मारहाण झाली ती राज्याच्या दृष्टीने निषेध करण्यासारखी आहे, अशा गोष्टी होत गेल्या तर उद्या कोण कुणाला काहीही करेल अशी अवस्था आहे राज्यातल्या जनतेला वाटले पाहिजे की आम्ही सुरक्षित आहोत त्यासाठी स्वतंत्र गृहमंत्री नेमावा अशी मागणी आहे आमदार सतेज पाटील ऑन मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना हरताल फासण्याचं काम सरकारने केलं आहे, फसवायचं काम सरकारने केलं नवी मुंबईत मराठा समाज मोठ्या संख्येने आला तेव्हा मागण्या मान्य झाल्या, गुलाल उधळून त्यांना फसवण्यात आलं की भावना मराठा समाजाची आहे मराठा समाजाने शांततेत 58 मोर्चे काढण्याचे काम केलं, परंतु सरकार या विषयाचा खेळ खंडोबा करत आहे, शिष्टमंडळात माणसे बदलली जातात दरवेळी वेगळे शिष्ट मंडळ चर्चेला जातं हा प्रश्न सोडवण्याची मानसिकता सरकारची नाही, यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या तब्येतीला काय झालं तर त्याला शासन जबाबदार असेल आमदार सतेज पाटील ऑन धनंजय महाडिक महापालिकेचा निकाल ही त्यांनी सांगितला होता, चार-पाच नगरसेवक आमचे येतील असेही ते म्हणाले होते आमदार सतेज पाटील ऑन गोकुळ महायुतीच्या भांडणामुळे गोकुळ अडचणीत आल आहे, दररोज उठून डेऱ्यांना कोर्टात जावं लागत आहे महायुतीतील गोकुळ, जिल्हा परिषदेची आणि इचलकरंजी महापालिकेतील भांडण बघता गोकुळचा उत्पादक शहाणा आहे एक मुखी दूध उत्पादक आमच्या बाजूने राहतील अशी मला खात्री आहे...
0
0
Report

धामणगाव में बस ने दुचाकी सवार बचाते समय नाली में गया, छात्रों को चोट नहीं

Yeola, Maharashtra:अँकर : येवला तालुक्यातील धामणगाव येथे दुचाकीस्वाराला वाचवण्याच्या प्रयत्नात स्कूल बस रस्त्यालगतच्या नाल्यात गेल्याची घटना घडली. सुदैवाने या अपघातात बसमधील विद्यार्थी आणि इतर प्रवाशांना कोणतीही दुखापत झाली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धामणगाव परिसरातून स्कूल बस विद्यार्थ्यांना घेऊन जात असताना अचानक समोर दुचाकीस्वार आल्याने त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात बस चालकाने वाहनाचा ताबा वळवला. यावेळी बस रस्त्याच्या कडेला असलेल्या नाल्यात गेली. घटनेच्या वेळी स्कूल बसमध्ये दोन ते तीन विद्यार्थी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. मात्र, सुदैवाने कोणत्याही विद्यार्थ्याला किंवा बसमधील व्यक्तीला दुखापत झाली नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
0
0
Report
Advertisement

चंद्रपुर में गणेश उत्सव: हर मंडळ के पीछे एक कॉन्स्टेबल, सुरक्षा और संवाद की नई पहल

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर पोलीस उपविभागात पोलीस प्रशासन अनोखा उपक्रम राबवत आहे: गणेश मंडळ कार्यकर्ते आणि पोलीस प्रशासन यांच्यात संवादासाठी प्रत्येक मंडळामागे एक कॉन्स्टेबल नियुक्त केला जाला. या उपविभागात सुमारे 400 मंडळे आहेत. प्रत्येक मंडळामागे नियुक्त कॉन्स्टेबल गणेशोत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात विसर्जन मिरवणुकीसह नियमानुसार साजरा करण्यासाठी जबाबदार राहील. या कॉन्स्टेबलकडे या गणेश मंडळाचे पूर्ण पालकत्व राहणार आहे. याशिवाय मोठ्या मंडळांची जबाबदारी थेट अधिकारी वर्गाकडे राहणार आहे. गणेशोत्सव परंपरेला धरून कोणताही गालबोट न लागता पार पडावा haey yachi धुरा देखील या पालकत्व दिल्या गेलेल्या कॉन्स्टेबल कडे असणार आहे. मंडप नियोजन, डीजे अथवा रोषणाई यासह विसर्जन मार्गाच्या नियोजनाची धुरा देखील पालकत्व घेतलेल्या कॉन्स्टेबलकडे राहील. त्यामुळे नियम उल्लंघनाला चाप बसेल आणि प्रशासकीय सूचना उत्सव साजरा करणाऱ्या कार्यकर्त्यांपर्यंत नियमितपणे पोहोचतील.
0
0
Report

वर्धा जिले में त्योहारों के दौरान लेज़र लाइट और हाई-पावर लेज़र शो पर पूर्ण प्रतिबंध

Wardha, Maharashtra:वर्धा सण-उत्सवांत लेझर लाईट्सवर वर्धा जिल्ह्यात पूर्ण बंदी! दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा अन् गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये लेझर शोला सक्त मनाई; उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई अँकर - आगामी दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर वर्धा जिल्हा प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. जिल्ह्यातील सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये लेझर लाईट, हाय-पॉवर लेझर बीम तसेच कोणत्याही प्रकारच्या लेझर शोच्या वापरावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS), 2023 मधील कलम 163 अन्वये हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हा आदेश 4 सप्टेंबर 2026 ते 28 सप्टेंबर 2026 या कालावधीत संपूर्ण वर्धा जिल्ह्यात लागू राहणार आहे. डोळ्यांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाचा निर्णय सण-उत्सवांच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या क्षमतेच्या लेझर लाईट्स आणि तीव्र लेझर बीमचा वापर केला जातो. या प्रकाशाच्या थेट संपर्कामुळे मानवी डोळ्यांना गंभीर इजा होण्याची शक्यता असते. विशेषतः रेटिना आणि कॉर्नियाला इजा होण्याचा धोका लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. वर्धा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी सण-उत्सवांच्या काळात लेझर लाईट्सच्या वापरावर निर्बंध घालण्याबाबत प्रस्ताव सादर केला होता. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून संपूर्ण जिल्ह्यासाठी हे आदेश लागू केले आहेत. मिरवणुकांमध्ये लेझर वापरल्यास कारवाई आदेशाच्या कालावधीत दहीहंडी, पोळा, तान्हा पोळा आणि सार्वजनिक गणेशोत्सवाच्या मिरवणुकांतर तसेच संबंधित कार्यक्रमांमध्ये लेझर लाईट किंवा हाय-पॉवर लेझर बीमचा वापर करता येणार नाही. कोणत्याही प्रकारचा लेझर शो आयोजित करण्यासही निर्बंध असतील. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांवर लागू कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे. आदेशाची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना संबंधित विभागांना देण्यात आल्या आहेत. सण उत्साहात साजरे करा; मात्र डोळ्यांची सुरक्षितता आणि कायदा-सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी लेझर लाईट्सचा वापर टाळा, असा स्पष्ट संदेश या आदेशातून प्रशासनाने दिला आहे.
0
0
Report
Advertisement

नागपुर के पुलिस आयुक्त के निर्देश: मल्टी-लेयर डीजे साउंड सिस्टम पर पाबंदी

Nagpur, Maharashtra:---पोलीस आयुक्त या नात्याने भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत कलम 163 अन्वये ही अधिसूचना काढण्यात आली आहे... *पोलीस आयुक्तांना जास्तीत जास्त 60 दिवसापर्यंत ची अधिसूचना काढण्याचा अधिकार आहे...* या काळातील सण उत्सवांचा त्यात उल्लेख आहे.. *त्यामध्ये Multi लेअर डीजे सह लेझर लाईट, बीम लाईट चा उल्लेख आहे*... *अधिसूचनेच्या शेवटच्या पॅराग्राफ मध्ये जी साऊंड सिस्टिम कायदेशीर मर्यादेच्या आत आवाज निर्माण करेल, त्याला बंदी घालण्यात आलेली नाही*... *मल्टी लेयर साऊंड सिस्टिम बद्दल अधिसूचनेत उल्लेख आहे... त्यामध्ये बेस, मिडीयम आणि टॉप असे तीन लेअर असतात... त्यामधील बेस जो आहे, तो कंपन निर्माण करतो, त्यामुळे शारीरिक नुकसान होते*.. साठ दिवसांपर्यंत अशा मल्टीलेयर साऊंड सिस्टिम, प्लाझ्मा aani प्रेशर मिड श्रेणीतील साउंड सिस्टम विरोधात कारवाई होईल आणि त्यानंतरही अधिसूचनेचे शंभर टक्के नूतनीकरण केलं जाईल.. उत्सव साजरा करताना पारंपरिक वाद्यांना बंदी नाही, संगीताला बंदी नाही, फक्त मर्यादेच्या पलीकडे ध्वनी प्रदूषण करणाऱ्या मल्टीलेयर साऊंड सिस्टिम ला, प्लाजमा आणि प्रेशर मिड वर बंदी लावली आहे..
0
0
Report

कल्याण स्टेशन रोड पर गड्ढों से ट्रैफिक जाम, केडीएमसी की गुणवत्ता पर सवाल

Kalyan, Maharashtra:कल्याण स्टेशन रोड मुख्य बाजारपेठेत रस्त्याच्या मधोमध भलाभोथा खड्डा.. keडीएमसीच्या कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्न चिन्ह.. 24 तासात पुन्हा खड्डा.. रस्त्याच्या मधोमध पडलेल्या खड्ड्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी. कल्याणच्या स्टेशन रोडच्या मुख्य रस्त्यावरती भला मोठा खड्डा पडल्याने वाहतूक कोंडी होत आहे दोन दिवसापूर्वीच याच ठिकाणी भला मोठा खड्डा पडला होता तो काल रात्री केडीएमसी कडून खड्डा बुजवण्यात आला मात्र 24 तासाच्या आत पुन्हा खड्डा पडल्याने महापालिकेच्या कामावरती प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे या खड्यामुले स्टेशनला जाणारया आणि येणाऱ्या रस्त्यावर ट्राफिक जाममुले नागरिकांना मनस्ताप करावा लागतं है. याचा आढावा घेतला आहे
0
0
Report
Advertisement

गडचिरोली के 30 साल के विकास का क्षेत्रीय नक्शा एक साल में पूरा करें: अधिकारी

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्याच्या पुढील ३० वर्षांच्या नियोजनबद्ध विकासाची दिशा निश्चित करणारा नवीन प्रादेशिक आराखडा तयार करण्याची प्रक्रिया कालबद्ध पद्धतीने राबवून कोणत्याही परिस्थितीत एका वर्षाच्या आत पूर्ण करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा प्रादेशिक नियोजन मंडळाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी दिले. गडचिरोली स्वतंत्र प्रादेशिक नियोजन मंडळाच्या पहिल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीत जिल्ह्याच्या पुढील तीन दशकांच्या विकासाची दिशा निश्चित करण्यावर भर देण्यात आला. नवीन प्रादेशिक आराखड्याची कार्यपद्धती व कालमर्यादा, अद्ययावत बेस मॅप, विद्यमान व प्रस्तावित जमीन वापर, भौगोलिक माहितीचे संकलन, नियोजन तज्ज्ञांची नियुक्ती, तांत्रिक संस्थेची निवड तसेच संभाव्य ‘ग्रोथ सेंटर’ आदी विषयांवर सविस्तर चर्चा झाली. आमदार डॉ. मिलिंद नरोटे आणि नगराध्यक्षा प्रणोती निंभोरकर यांनीही जिल्ह्याच्या भविष्यातील विकासाच्या अनुषंगाने विविध सूचना मांडल्या. गडचिरोली जिल्ह्यासाठी १९९१ मध्ये तयार करण्यात आलेला प्रादेशिक आराखडा तीन दशकांहून अधिक जुना आहे. या कालावधीत जिल्ह्यातील रस्ते व दळणवळण, पायाभूत सुविधा, उद्योग आणि विकासाच्या गरजांमध्ये मोठे बदल झाले आहेत. या बदलांसह पुढील ३० वर्षांतील संभाव्य विकास लक्षात घेऊन नवीन प्रादेशिक आराखडा अद्ययावत, वस्तुस्थितीदर्शक आणि भविष्यवेधी असावा, यावर बैठकीत भर देण्यात आला. जिल्ह्याचे वनबहुल व आदिवासी स्वरूप, उपलब्ध जमीन, जलस्रोत, रस्ते व दळणवळण व्यवस्था, विद्यमान वसाहती, पायाभूत सुविधा आणि भविष्यातील विकासाची संभाव्य केंद्रे यांचा समन्वय साधून आराखडा तयार करण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.
0
0
Report

सातारा में गणेशोत्सव के लिए सुरक्षा तैयारियाँ तेज, पुलिस निरीक्षण में मार्ग सुरक्षा सुनिश्चित

Satara, Maharashtra:सातारा: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सातारा पोलिसांकडून तयारी तीव्र करण्यात आली आहे. पोलिस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी पोलीस अधिकाऱ्यांसमवेत शहरातील मुख्य मिरवणूक मार्ग आणि विसर्जन तळ्याची प्रत्यक्ष पाहणी केली. राजवाडा ते मोती चौक, राधिका रोड असा पायी दौरा करत त्यांनी सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना व सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. यादरम्यान अपर पोलिस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्यासह प्रमुख अधिकारी उपस्थित होते.
0
0
Report

भामाठाण में बिबट्या हमला: युवक घायल, वन विभाग से कड़ी कार्रवाई की मांग

Shirdi, Maharashtra:Anc - उसाच्या फडात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक केलेल्या हल्ल्यात एका तरुण शेतकऱ्याचा थरारक बचाव झाला आहे. श्रीरामपूर तालुक्यातील भामाठाण येथे गुरुवारी रात्री ही घटना घडली. बाप्पूसाहेब जगताप असे बिबट्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव असून, बिबट्याने केलेल्या हल्ल्यात जगताप यांच्या हाताला आणि मांडीला गंभीर इजा झाली आहे. त्यांना तातडीने श्रीरामपूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती सध्या स्थिर आहे. विशेष म्हणजे दोन दिवसांपूर्वीच याच परिसरात बिबट्याने भरदिवसा एका शेतकऱ्याची शेळी पळवून नेली होती. लागोपाठ घडणाऱ्या या हल्ल्यांमुळे भामाठाण आणि लगतच्या परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे. वनविभागाने या भागात तातडीने पिंजरा लावून या बिबट्याचा कायमचा बंदोबस्त करावा, अशी तीव्र मागणी संतप्त ग्रामस्थांमधून होत आहे.
0
0
Report
Advertisement

एमपीएससी पेपरफुटी विरोधी छात्रों का अमरावती में प्रदर्शन, जिलाधिकारी कार्यालय के बाहर भारी मोर्चा

Amravati, Maharashtra:MPSC पेपरफुटीविरोधात अमरावतीत विद्यार्थी उतरले रस्त्यावर; सरकार अन् आयोगाविरोधात तुफान घोषणाबाजी, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला विद्यार्थ्यांचा भव्य मोर्चा MPSC परीक्षांमधील पेपरफुटीच्या प्रकरणावरून अमरावतीमध्ये विद्यार्थ्यांचा मोठा जनखोभ उसळला आहे! MPSC चा अभ्यास करणारे हजारो परीक्षार्थी व विद्यार्थी आज थेट रस्त्यावर उतरले असून पंचवटी चौकातून या धडक मोर्चाला सुरुवात झाली व थेट अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला व MPSC आयोगा विरोधी जोरदार घोषणा दिल्या. विद्यार्थ्यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) आणि राज्य सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करत परिसर दुमदुमून टाकला. पेपरफुटीची सखोल चौकशी करा आणि दोषींवर कठोर कारवाई करा या मागणीसाठी विद्यार्थ्यांचा हा अजस्र मोर्चा थेट जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार आहे. या आंदोलनामुळे शहरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे。
0
0
Report

GDP दाव्यांवर सवाल: मोदी सरकारला विपक्षाची तीखी प्रतिक्रिया

Kolhapur, Maharashtra:संजय राऊत पत्रकार परिषद मुद्दे *ऑन GDP दावा* देशाचे पंतप्रधान जेव्हा एखादा दावा करतात, तेव्हा त्यांच्या दाव्यावर जनतेचा विश्वास असायला हवा कारण ते देशाचे पंतप्रधान आहेत, पण दुर्दैवाने ज्या पंतप्रधानाची ओळख जागतिक पातळीवर थापेबाज अशी असेल त्यावर जनता कशी विश्वास ठेवेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी इतके खोटे बोलतात, देशालाही खोटं ऐकण्याची सवय लावली आहे. पण गेल्या काही काळापासून देशातला चित्र बदलले आहे त्यामुळे जनता हा खोटेपणा स्वीकारणार नाही. या देशाचा जीडीपी वाढलाय म्हणजे काय झालं, हे देशाच्या पंतप्रधानाला तरी सांगता येईल का. देशाचा जीडीपी वाढला याचा अर्थ अर्थव्यवस्था मजबूत झाली, पंतप्रधान ट्रिलियनचे आकडेवारी सांगतात.. ते आमच्या आकलनाच्या पलीकडे आहे. आम्हाला इतकच कळतं की देशातील शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे आणि त्यांच्या आत्महत्या थांबल्या पाहिजेत. त्याला दोन वर्षात या देशात साडेसात हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत, हे काय जीडीपी वाढण्याचे लक्षण आहे का. या देशातील 85 कोटी जनता आजही नरेंद्र मोदींनी फेकलेल्या दहा किलो अन्नावर जगत आहे. हे जीडीपी वाढल्याचे लक्षण नाही. गेल्या बारा वर्षापासून आपण दोन कोटी रोजगार देऊ असं सांगताय, किती रोजगार निर्माण झाला ? कोट्यावधी बेरोजगार तरुण आज रस्त्यावर आहेत. त्यांच्या देखील आत्महत्या सुरू आहेत निवडणूक आल्या की लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये द्यायचे आणि मत विकत घ्यायचे. हे जेडीपी वाढल्याचे लक्षण अजिबात नाही. *जेव्हा आपण जीडीपी वाढला असा दावा करतो त्यावेळेला देशातील जनतेचा राहणीमान सुधारलं पाहिजे. देशातील शेतकऱ्याला आर्थिक स्थैर्य मिळाला पाहिजे. पण या देशात अशा प्रकारचे चित्र काहीच नाही* *असं जर देशातील चित्र असेल आणि याला जर जीडीपी वाढला असं पंतप्रधान म्हणत असतील तर जीडीपीची व्याख्या जागतिक पातळीवर बदलावी*. ही लोकच आभासी आहेत.. पंतप्रधान मोदींचा जन्म देखील आभासी आहे. त्यांचा जन्म आपल्यासारखा आईच्या पोटातून झाला नाही. ते विष्णूचे अवतार आहेत.. ते नॉन बायलॉजिकल आहेत. त्यांना त्यामध्ये आनंद मिळतो. त्यामुळेच ते राम रहीम यांना वारंवार जामीनावर बाहेर सोडत आहेत. उजवीकेस्थान या देशातून व्हिडिओ करत रील करत ते सांगत आहेत देशाचा जीडीपी वाढला आहे. त्यांनी देशात येऊन बोलावं. त्यांनी जाहीर पत्रकार बैठक घेऊन बोलावं. *ऑन विकास झालाय दावा* देवेंद्र फडणवीस यांना सांगा पुण्यावरून कोल्हापुरात या म्हणून. मग रस्त्याचं जाळ काय आहे हे त्यांना कळल. नवी मुंबई येथे इंटरनॅशनल एअरपोर्ट बांधले आहे, मला इंटरनॅशनल एअरपोर्टला पोहोचायला अडीच तास लागले. हे त्यांचे इन्फ्रास्ट्रक्चर. भाजपवाल्यांच्या वर काय विश्वास ठेवता त्यांचा खेळ संपलेला आहे. 2029 च्या आधीच त्यांचा खेळ संपलेला आहे *ऑन डी जे* नागपूरला पोलीस आयुक्त यांनी एक भूमिका घेतली आहे आम्ही डीजे बंद करणार. पुण्यामध्ये देखील त्यांचेच राज्य आहे. नागपूरचे आयुक्त हे पूर्वी पुण्याचे आयुक्त होते, हा धोरणात्मक निर्णय असायला हवा होता ,एका शहरापुरतं नाही. डीजे असेल किंवा लेझर असेल यामुळे या राज्यातील नागरिकांना अडचणी येत असतील, आरोग्य बिघडत असेल. तर गृहमंत्र्यांना धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी पुढाकार घ्यायला पाहिजे. हे म्हणतात कायद्याच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ. पण हे स्वतःच कायद्याची चौकट पाळत नाहीत. पुण्यातील लोक असो किंवा नागपूर मधील लोक असो यांनी डीजेला विरोध केला आहे. सरकार जर लोक भावनेचा आदर करणार असेल तर, त्यांनी लोकभावनेचा विचार करायला हवा. हे सरकार रोज हजारो निर्णय घेत.. *नागपूरला एक निर्णय.. पुण्याला एक निर्णय.. याला कायद्याची चौकट म्हणत नाहीत मिस्टर देवेंद्र फडणवीस* *ऑन देवेंद्र फडणवीस उपपंतप्रधान*. मराठी माणूस उपपंतप्रधान होणार असतील तर आनंद व्हायला पाहिजे. राष्ट्रीय राजकारणात उलथापाळथ व्हायची जास्त शक्यता आहे, तुम्ही पण पहा. *पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मंत्रिमंडळात मोठ्या प्रमाणात बदल करायचा आहे पण ते करू शकत नाहीत. कारण त्यांच्या पक्षात आणि त्यांच्या सरकारमध्ये बंडाळी सुरू झाली आहे* *केंद्रातले प्रमुख जूने चार मंत्री हे राजीनामा द्यायला तयार नाहीत.ओरिजनल भारतीय जनता पक्षाच्या चार प्रमुख मंत्र्यांनी मोदींच्या आवाहनाला प्रतिसाद दिलेला नाही, त्यांची भूमिका आहे आधी अमित शहा यांचा राजीनामा घ्या. त्यामुळे अद्याप फेरबदल झालेला आहे* राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची भूमिका अशी आहे, फेरबदलामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळात उपपंतप्रधान हे पद निर्माण करा, आरएसएसला मानणाऱ्या एका व्यक्तीला त्या ठिकाणी उपपंतप्रधान करा. जो पुढला वारस असेल. अमित शहा नव्हे. अमित शहा यांचा खेळ संपलेला आहे.. *On मुख्यमंत्री दिल्ली दौरा* सध्या ते दिल्लीला रोज जात आहेत.. महाराष्ट्राचा किंवा एखाद्या राज्याचा मुख्यमंत्री ७२ तासाने दिल्लीला का जावं लागतं याचं मला आश्चर्य वाटतं. उठ सूट दिल्लीला जाऊन नेमकं काय चर्चा करत आहेत.. ते काय चर्चा करत आहेत हे मी तुम्हाला सांगू शकतो. ते त्यांच्या पक्षामध्ये ठरवू शकत नाहीत.. मुख्यमंत्री व्हायचं हे त्यांनी ठरवलं होतं का.. त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. ते दिल्लीत जावेत आणि सर्वोच्च पदी जावेत अशी एकनाथ शिंदे यांचीच नाही तर अनेकांची देखील इच्छा आहे. माझ्याकडे जे इंटेलिजन्स आहे.. ते चोख इंटेलिजन्स आहे. मी सांगू शकेन एकनाथ शिंदे आणि अमित शहा यांच्यामध्ये काय चर्चा झाली. *उपमुख्यमंत्री दिल्ली दौरा* त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे दिल्लीमध्ये आहेत, त्यामुळे त्यांना दिल्लीला जावं लागतं. त्यांच्या पक्षाचे प्रमुख हे अमित शहा आहेत. त्यामुळे हाय कमांड यांना भेटण्यासाठी त्यांना जावं लागतं.. शिवसेना ही मातोश्रीतून काम करत होती, शिवसेना भवनातून काम करत होती, अमित शहा यांनी स्थापन केलेली असे दोन पक्ष महाराष्ट्रात आहेत. अजित पवार यांचा राष्ट्रवादी पक्ष आणि मीध्ये यांचा पक्ष. या पक्षाच्या प्रमुखांना आदेश घेण्यासाठी दिल्लीला जावं लागतं.. *पुणे बापट हल्ला" या राज्यामध्ये कोणत्याही प्रकारची कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नाही. देवेंद्र फडणवीस यांच्याकडे जे ग्रह खात आहे, ती कशासाठी आहे हेच कळत नाही. या राज्यामध्ये कोणत्याही विषयावर गृहखात्याची भूमिका स्पष्ट नाही. *फक्त आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देण्यासाठी या खात्याचा वापर होत आहे. विरोधकांच्यावर पाळत ठेवण्यासाठी या गृहखात्याचा वापर होतो. विरोधकांचे फोन ऐकण्यासाठी त्याचा वापर होत आहे.* एका आंदोलकाला टीव्हीच्या कॅमेरासमोर मारलं जात, याचा अर्थ कायद्याची भीती राहिलेली नाही. *देवेंद्र फडणवीस हे पूर्ण वेळ गृहमंत्री नाहीत. आता ते राज्याचे पूर्णवेळ मुख्यमंत्री म्हणून देखील काम पाहत नाहीत.इतका गोंधळ त्यांच्या सरकारमध्ये सुरू आहे" महाराष्ट्रासारख्या इतक्या मोठ्या राज्याला पूर्णवेळ गृहमंत्री नसेल तर या राज्यात अशा प्रकारच्या दुर्घटना घडत राहतील. खुण होतील, हत्या होतील. कायद्याचं भय राहिलेलं नाही. आमचा गट नाही तर आमची शिवसेना आहे. ही बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना आहे याला एक भूमिका आहे. ज्या गटाचा उल्लेख तुम्ही करता तो गट कोर्टात आहे. तो अमित शहा यांचा गट आहे. शक्तीपिठा संदर्भात आमच्या पक्षाने घेतलीली भूमिका चे बाधित आहेत ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जबरदस्तीने घेतल्या जात आहेत त्याच्या बाजूचे आहे. आधीचे केलेले रस्ते तुम्ही आधी बघा. मग शक्ती पिठाची गरज आहे की नाही हे तुम्हीच सांगा. कमिशन घेण्यासाठी हजारो कोटीची कामे काढली जात आहेत. विकास लोकहित कल्याण हा विषय काहीच नाही. *कोल्हापूर जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढली का* निवडणुका येतात निवडणुका जातात आमचा भर हा पक्ष संघटनेच्या बाधणीवर आहे.. माझ्या शेजारी बसलेला गडी लोकसभा जिंकणारा होता. दिल्ली मधून जी यादी आली होती. ती यादी ही जागा ए प्लस म्हणून दिली होती. पण शेवटच्या क्षणी काही गोष्टी घडल्या. पैशाने माणसे विकली गेली. दिल्लीतून फोन येतो आणि निकाल जाहीर करा असं सांगितलं जातं आता हे होणार नाही. *ऑन मराठा आरक्षण शिवसेना भुमिका* या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी भूमिका घेतली पाहिजे, त्यांचे भांडण सरकारशी आहे. ते सरकारच्या विरोधात उपोषणाला बसले आहेत, मुख्यमंत्र्यांनी सांगितला आहे संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेतला जाईल. एरवी ते संविधानाची मोडतोड करतात.. संविधान पाळत नाहीत.. संविधान बदलायला निघालेत.. पण जेव्हा अडचणीचा विषय येतो त्यावेळेला संविधानाच्या चौकटीत राहून निर्णय घेऊ असं सांगितले जाते. मनोज जरंगे पाटील हे समर्थ आहेत त्यांच्याशी लढायला. सरकार त्यांच्याशी प्रश्न सुटावा म्हणून बोलत नाही तर त्याचं राजकारण करत आहे.. सरकार नेहमीप्रमाणे त्यांच्या उपोषणाचे त्यांच्या प्रश्नाचे राजकारण करत आहे. (((((गालावर हात फिरवत.)))) ते तुमचे डेप्युटी सीएम.. श्रेय घेतात ना.. आता कुठे आहेत.. आता विखे पाटलांना पाठवतात.. उदय सामंतांना पाठवतात त्यातून हा प्रश्न मिटणार आहे का सुटणार आहे का. हा सामाजिक आणि आर्थिक विषय आहे. यासाठी त्यांना या राज्यातील प्रमुख पक्षाच्या नेत्यांना बोलून तोडगा काढावा लागेल*. *याच राज्यातील प्रमुख नेत्यांना बसवून चर्चा करून या संदर्भात निर्णय घ्यावा लागेल. त्यातून सर्वसमावेशक मार्ग काढणं गरजेचं आहे. पण याबाबत मुख्यमंत्र्यांना तेवढी अक्कल आहे का* *ऑन राहुल गांधी नाकेबंदी* राहुल गांधी यांना मी खूप जास्त ओळखतो.. हा ग्रहस्थ सरकारच्या अशा बाबतीत घाबरणारा व्यक्ती नाही. उत्तराखंड सरकार भारतीय जनता पक्षाचा आहे.. राहुल गांधी विरोधात घेतलेली प्रत्येक ॲक्शन भारतीय जनता पार्टी नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांना खड्ड्यात घालणारी असेल. *मोहन भागवत कार्यक्रमाला विरोध* मोहन भागवत कार्यक्रम करत आहेत.. त्यांना त्यांचं म्हणणं मांडू दिलं पाहिजे. आपण लोकशाही मानतो. *ऑन अजित पवार अपघात सुनेत्रा पवार स्टेटमेंट* *खरं म्हणजे सुनेत्रताई पवार यांनी हा विषय जोरात मांडायला हवा.* आमच्यासारखे लोक दादांच्या प्रेमाखातर हा विषय मांडत आहेत, एफ आय आर का होत नाही असं विचारत आहेत. अमित ठाकरे यांच्यावर एफ आय आर होतो.. आमच्या वरती एफ आय आर होतो. पण इतका मोठा नेता संशयास्पदरीत्या एका अपघातात मरण पावला.. तो एफ आयआर होत नाही. *त्यांच्या पत्नी राज्याच्या उपमुख्यमंत्री आहेत, कोणीही प्रसिद्धीसाठी करत नाही. कोणाला प्रसिद्धीची गरज नाही. आमच्या बाजूला तरी, मृताच्या टाळवरचं लोणी खाण्याची परंपरा नाही, ती सत्ताधाऱ्यांमध्ये आहे*
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top