445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
पुणे में राष्ट्रवादी पवार गट ने महंगाई और बेरोजगारी के विरोध में प्रदर्शन किया
Pune, Maharashtra:पुण्यात आज राष्ट्रवादीच्या पवार गटाने वाढती महागाई आणि बेरोजगारी विरोधात निषेध आंदोलन केलं. पुणे कलेक्टर ऑफिस समोर हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी सर्व आंदोलक पदाधिकाऱ्यांनी कलेक्टर ना शासनाविरोधात निवेदन ही दिलं0
0
Report
पुणे: भारती विद्यापीठ की 21 वर्षीय प्रशिक्षु डॉक्टर ने नौवीं मंजिल से छलांग लगाकर आत्महत्या
Pune, Maharashtra:पुण्यातीकात्रज परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. 21 वर्षीय शिकाऊ डॉक्टर तरुणीचा इमारतीच्या नवव्या मजल्यावरून पडून मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. माया रेड्डी असं मृत तरुणीचं नाव आहे. माया रेड्डी ही भारती विद्यापीठात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाला शिक्षण घेत होती, अशी माहिती समोर आली आहे. माया ही मूळची हैदराबाद येथील असल्याची माहिती आहे. शिक्षणासाठी ती पुण्यात राहत होती. कात्रज परिसरातील एका सोसायटीमध्ये तिचा राहत होती. आज दुपारी साधारण एक वाजण्याच्या सुमारास माया रेड्डी हिने राहत्या इमारतीच्या नवव्या मजल्यावरून खाली उडी मारल्याची प्राथमिक माहिती आहे. या घटनेत तिची गंभीर जखमी झाली. घटनेची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करत पुढील तपास सुरू केला आहे. माया रेड्डीने हे टोकाचं पाऊल नेमकं कोणत्या कारणातून उचललं, याचा तपास आता पोलिसांकडून केला जात आहे. अभ्यासाचा ताण होता का, अथवा यामागे अन्य काही कारण आहे का, हे तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, या घटनेमुळे भारती विद्यापीठ परिसरातील विद्यार्थ्यांमध्येही हळहळ व्यक्त केली जात आहे. भारती विद्यापीठ पोलिसांकडून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
पुणे मेट्रो: गणेशोत्सव 2026 के लिए विस्तृत 41 घंटे सेवा जारी
Pune, Maharashtra:गणेशोत्सव २०२६ साठी पुणे मेट्रोचे वेळापत्रक आणि प्रवाशांसाठी आवाहन गणेशोत्सवाच्या काळात पुण्यामध्ये येणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक सुखकर, सुरक्षित आणि जलद व्हावा यासाठी पुणे मेट्रो सज्ज झाली आहे. उत्सव काळात प्रवाशांची होणारी प्रचंड गर्दी लक्षात घेता पुणे मेट्रो प्रशासनाने मेट्रो फेऱ्या आणि सेवेच्या वेळेत महत्त्वपूर्ण वाढ केली आहे. या काळात (14 ते 25 सप्टेंबर) संपूर्ण मेट्रो मार्गावर दर ५ मिनिटांच्या (गर्दीच्या वेळेत) अंतराने मेट्रो गाड्या उपलब्ध असणार आहेत. गणेशोत्सवाच्या सुरुवातीला म्हणजेच १४ ते १६ सप्टेंबर (गणेश चतुर्थी ते बुधवार) दरम्यान सकाळी ६.०० ते रात्री ११.०० या नियमित वेळेत मेट्रो सेवा सुरू राहील. त्यानंतर १७ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर (गौरी पूजन आणि पुढील दिवस) या कालावधीत भाविकांच्या सोयीसाठी विशेष वेळापत्रक लागू करण्यात आले असून, या दिवसांत मेट्रो सेवा सकाळी ६.०० ते मध्यरात्री २.०० वाजेपर्यंत सुरू राहील. उत्सवाचा मुख्य टप्पा असलेल्या अनंत चतुर्दशीच्या दिवशी, म्हणजेच २५ सप्टेंबर २०२६ रोजी सकाळी ६.०० वाजल्यापासून ते सलग २६ सप्टेंबर २०२६ च्या रात्री ११.०० वाजेपर्यंत (एकूण ४१ तास) पुणे मेट्रोची सेवा अखंडपणे सुरू राहणार आहे. २७ सप्टेंबर २०२६ पासून मेट्रोची सेवा पुन्हा पूर्ववत व नियमित वेळेनुसार सकाळी ६ ते रात्री ११ अशी सुरू होईल. म.फुले मंडई स्थानक प्रामुख्याने परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन: गर्दीचे नियोजन करण्यासाठी आणि मध्यवर्ती पुण्यातील गणपती दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी पुणे मेट्रो कडून विशेष आवाहन करण्यात येत आहे. मार्गिका १ वरून प्रवास करणाऱ्या भाविकांनी पेठ भागातील गणपती दर्शनासाठी उतरायला कसबा पेठ मेट्रो स्थानकाचा वापर करावा. पेठ भागात जाण्यासाठी मार्गिका २ वरून येणाऱ्या प्रवाशांनी वनाजच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी डेक्कन जिमखाना मेट्रो स्थानकावर उतरावे, तर रामवाडीच्या बाजूने येणाऱ्या भाविकांनी PMC (पुणे महानगरपालिका) मेट्रो स्थानकाचा वापर करावा. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानकात उतरून गर्दी करणे टाळावे; हे स्थानक मुख्यत्वे फक्त परतीच्या प्रवासासाठी वापरण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक हे गणेशोत्सव काळात १४ सप्टेंबर ते २६ सप्टेंबर २०२६ या काळात 'unidirectional' (एकदिशात्मक) स्वरूपात कार्य करेल. त्यानुसार, लोकमान्य टिळक पुतळा येथील द्वार क्रमांक ३ हे फक्त प्रवाशांना स्थानकात प्रवेश करण्यासाठी (आत जाण्यासाठी) खुले असेल, तर छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावरील द्वार क्रमांक २ हे प्रवाशांना बाहेर पडण्यासाठी उपलब्ध असेल. जिल्हा न्यायालय येथे Interchange टाळण्याचे गणेशभक्ताना आवाहन: गणेशदर्शनासाठी येणाऱ्या भाविकांनी मार्गिका १ आणि मार्गिका २ वरील जिल्हा न्यायालय मेट्रो स्थानक येथे येऊन मार्गिका बदलणे (interchange) टाळावे, याकरिता भविकांनी त्यांच्या मार्गिकांवर असणाऱ्या वर उल्लेखिल्या स्थानकांचा (कसबा पेठ स्थानक, PMC स्थानक, छ. संभाजी उद्यान स्थानक) वापर करावा. सर्व भाविकांनी या नियोजनाचे आणि सूचनांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन पुणे मेट्रोकडून करण्यात आले आहे.0
0
Report
Advertisement
हाईकोर्ट ने पार्थ पवार मामले में पुणे पुलिस से कड़े सवाल पूछे
Pune, Maharashtra:ब्रेकिंग मुंढवा जमीन गैरव्यवहार प्रकरण मुंबई हायकोर्टाचा पुणे पोलिसांना दणका या गुन्ह्यात पार्थ पवारला आरोपी का केलं नाही? असा विचारला जाब पार्थ हे स्वर्गीय उपमुख्यमंञी अजित पवार यांचे पूञ आहेत. म्हणून त्यांना आरोपी केलं गेलं नाही का? हायकोर्टानं थेट विचारला सवाल पुणे पोलिसांनी याप्रकरणी 15 दिवसात प्रतिञापञ दाखल करण्याचेही दिले निर्देश निलंबित तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्या अंतरिम जामीन सुणावणीदरम्यान हायकोर्टाने स्वत:हून छेडला पार्थ पवार चा विषय आता तरी पुणे पोलीस पार्थ पवार यांची चौकशी करणार का? झी 24 तासचा परखड सवाल झी 24 तासनेच उघडकीस आणलं होतं मुंढवा जमीन प्रकरण शितल तेजवानी हिने शासकीय मालकीची 40 एकर जमीन पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला विकली होती पण पुणे कोर्टानेच हा बेकायदेशीर नोंदणी दस्त रद्द करून टाकलाय0
0
Report
पुणे नगरसेवक बैठक में विरोध, मोहोळ ने पार्टी अजेंडा और अनुशासन पर जोर दिया
Pune, Maharashtra:पुण्यात आज केंद्रीय मंञी मुरलीधर मोहोळ यांच्या अध्यक्षतेखाली झालेली नगरसेवकांची बैठक चांगलीच वादळी ठरली...नाराज नगरसेवकांनी आपल्याच स्थानिक नेत्यांविरोधात तक्रांरीचा पाढाच वाचला हाच धागा पकडून मुरलीधर मोहोळ यांनी सर्वांनाच खडे बोल सुनावत आपसातले मतभेद संपवण्याच्या सूचना करत जरा सत्ताधाऱ्यांसारखे वागा, अशा शब्दात छापलं...पाहुयात भाजप नगरसेवकांच्या बैठकीतली इनसाईड स्टोरी नेमकी काय हे ती....मोहोळ यांनी घेतली नगरसेवकांची शाळा नगरसेवकांनीही आपल्याच नेत्यांविरोधात वाचला तक्रारींचा पाढा...तर मोहोळ यांनीही स्थानीय नेत्यांना सुनावले खडे बोल...व्हीओ...पुणे पालिकेत भाजपची सर्वंकष सत्ता असूनही स्थानिक नेत्यांमधे समन्वयाचा अभाव असल्याने भाजपचेच नगरसेवक नाराज आहेत ही नाराजी गेल्या आठवड्यात थेट सीएम निवासस्थान वर्षावर जाऊन पोहोचल्याने अखेर केंद्रीय राज्यमंञी मुरलीधर मोहोळ यांनी भाजपच्या नगरसेवकांची तातडीची बैठक लावली...त्यात नगरसेवकांनी आपली कामं होत नसल्याच्या जाहिर तक्रारी करत महापौर मंजुषा नागपुरे, सभागृहनेते गणेश बीडकर आणि स्टँडिंग चेअरमन श्रीनाथ भीमाले यांना अप्रत्यक्ष पणे उघडचं पाडलं...या बैठकीनंतर एकही नगरसेवक ऑन कँमेरा बोलला नाही किंबहुना तसे पक्षाचे आदेश होते...म्हणून मग केंद्रीय मंञी मुरलीधर मोहोळ यांनीच माध्यमांच्या आग्रहाखातर पालिकेत सर्वकाही आलबेल आहे, ही तर विषय पञिका ठरवणारी नेहमीचीच रुटिंग बैठक होती त्यात आज फक्त मी अँड झालो असा सारवासारवी करणारा बाईट दिला...0
0
Report
पुणे में गणेशोत्सव के दौरान तीन थाना क्षेत्रों में ड्रायडे लागू
Pune, Maharashtra:पुणे राज्य उत्पादन शुल्काचा अजब निर्णय गणेशोत्सवामध्ये threeच पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्रायडे गणेशोत्सवाच्या काळात कायदा सुव्यवस्था व्यवस्थित राहण्यासाठी ड्राय डे पाळला जातो मात्र शहरात 40 पोलीस स्टेशन असताना तीनच पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये ड्राय डे आदेश काढले आहेत पुणे पोलीस आयुक्तालयातील खडक विश्रामबाग आणि फरासखाना पोलीस स्टेशनच्या हद्दीत ड्राय डे घोषित केला आहे गणेश आगमन म्हणजे 14 सप्टेंबर ते 25विसर्जन मिरवणुकी पर्यंत ड्रायडे असल्याची घोषणा करण्यात आली आहे. शहरातील इतर पोलीस स्टेशनच्या हद्द अगदी एका पावलावर बदलतात त्यामुळे इतर ठिकाणी ड्रायडे का नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे。 पुणे राज्यस्तरीय स्वच्छ वायू नामांकनात पुणे मनपा क्षेत्रीय कार्यालयांचा डंका... राज्यस्तरीय स्वच्छ वायू नामांकनाच्या पहिल्या श्रेणीत पुणे महापालिकेच्या कोथरूड-बावधन क्षेत्रीय कार्यालयाने प्रथम, तर धनकवडी-कात्रज-आंबेगाव क्षेत्रीय कार्यालयाने द्वितीय क्रमांक पटकावत शहराच्या शिरपेचात मानाचा تुरा रोवला, महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग आणि या क्षेत्रीय कार्यालयांच्या प्रभावी समन्वयातून राबवलेल्या प्रदूषण नियंत्रण उपक्रमांमुळे पुणे शहराला हे यश मिळाले आहे. रस्त्यांवरील धूळ कमी करण्यासाठी यांत्रिक स्वच्छता, बांधकाम आणि पाडकाम कचऱ्याचे शाखीय व्यवस्थापन, घनकचऱ्याचे संकलन, हरित क्षेत्रांची देखभाल आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यामुळे क्षेत्रीय कार्यालयांना ही उत्कृष्ट कामगिरी करता आली पुणे डासोत्पत्तीप्रकरणी ४ लाख रुपये दंड महानगरपालिकेकडून २,२३१ घरे, संस्थांना नोटिसा... हवामानातील वाढती आर्द्रता आणि साचलेले पाणी यामुळे शहरात डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे शहरात डेंग्यू आणि चिकनगुनियाच्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. डासांची पैदास रोखण्याबाबत निष्काळजीपणा दाखवणाऱ्या २ हजार २३१ घरांना व संस्थांना पुणे महापालिकेकडून नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. त्यांच्याकडून ४ लाख ४६ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. पुणे संतोष पंडितला न्यायालयीन कोठडी... वादग्रस्त चित्रफीत प्रकरणी मोबाईल संच ट्रायपॉड जप्त.... उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या विषयी अमानकारक वक्तव्य करून समाज माध्यमात चित्रफीत प्रसारित केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संतोष पंडित याला न्यायालयाने 14 दिवस न्यायालयीन कोठडी देण्याचे आदेश दिले वादग्रस्त चित्रफीत तयार करताना वापरलेला मोबाईल संच आणि ट्रायपॉड पोलिसांनी जप्त केला आहे. पुणे पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी 75 टक्के जमीन ताब्यात.... विमानतळाच्या भूसंपादनापोटी शेतकऱ्यांना 3600 कोटी रुपयांचे वाटप पुरंदर येथील प्रस्तावित छत्रपती संभाजीराजे आंतरराष्ट्रीय विमानतळासाठी आवश्यक असलेल्या एकूण जमिनीपैकी सुमारे 75 टक्के जमीन म्हणजे सुमारे 850 हेक्टर जमीन जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे या जमिनीच्या बदल्यात शेतकऱ्यांच्या खात्यात 3600 कोटी रुपयांची रक्कम जमा करण्यात आली आहे. पुणे आवाजाची मर्यादा ओलांडणाऱ्यांविरुद्ध कारवाई... पोलीस आयुक्तांचा इशारा गणेशोत्सवात दोन्ही प्रदूषणाबाबत न्यायालयाने दिलेल्या नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी केली जाणार आहे नियम भंग करणाऱ्या मंडळाविरुद्ध कारवाई करण्यात येईल असा इशारा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिला. दहीहंडी नियम भंग प्रकरणी 116 खटले दहीहंडीत आवाजाची मर्यादा ओलांडले पोलिसांच्या आदेशांचे पालन न केल्याप्रकरणी 116 खटले दाखल करण्यात आले आहेत दोन्ही क्षेप यंत्रणेतील प्लाजमा साउंड प्रेशर मिड ही उपकरणे जप्त करण्यात आली आहेत. मंडळांना चार बास आणि चार टॉप वापरण्याची परवानगी देण्यात आली आहे मंडळाने नियमांचे पालन करावे नियमांची उल्लंघन करण्याविरुद्ध कारवाई करण्यात आवडले आहे. पुणे दीड महिन्यात कांदा दरात 25 रुपयांनी वाढ.... ग्राहकांना क kiman दोन महिने दरवाढीची झळ... पावसाने ओढ दिल्याने नवीन लाल कांद्याच्या लागवडीवर परिणाम झाला असून लाल कांद्याच्या हंगाम लांबणीवर पडला आहे कांद्याच्या दरात दीड महिन्यात किलोमागे 25 रुपयांनी वाढ झाली दरवाढीची ही झळ किमान दीड ते दोन महिने ग्राहकांना सोसावी लागेल... दीड महिन्यापूर्वी आगाऊ बाजारात एक किलो कांदेाला 18 ते 25 रुपये दर मिळत होता आगाऊ बाजारात सध्या एक किलो कांद्याला 42 ते 50 रुपये दर मिळत आहे किरकोळ बाजारात कांद्याची विक्री 60 ते 70 रुपये किलो दराने केली जात आहे.0
0
Report
Advertisement
धनगर आरक्षण मामले में हाके का तंज, पडळकर पर तीखा हमला
Pune, Maharashtra:सत्तेत राहून कसले आंदोलन? धनगर आरक्षणावर उत्तर द्या; लक्ष्मण हाके यांचा गोपीचंद पडळकर यांच्यावर गोपीचंद पडळकर यांच्या विरोधात घणाघाती हल्लाबोल. धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी मुंबईत केलेल्या आंदोलनावर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी कडाडून टीका केली आहे. "सत्ताधारी आमदारालाच सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरावे लागत असेल, तर ही मोठी नामुष्की आहे," असा टोला त्यांनी लगावला. हाके पुढे म्हणाले, "पडळकर मुख्यमंत्र्यांच्या जवळचे आहेत. त्यांनी मागण्या मांडण्यापेक्षा सत्ताधाऱ्यांच्या मानगुटीवर बसून प्रश्न सोडवला पाहिजे. सत्तेत राहून आंदोलन केल्याने ते विरोधक आहेत की सत्ताधारी, असा गोंधळ निर्माण झाला असून ते मूळ मुद्द्यापासून दूर गेले आहेत." हाके यांच्या या थेट हल्ल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.0
0
Report
पुणे के गणेश मंडलों पर नियम कड़ाई से लागू, उल्लंघन पर होगी कड़ी कार्रवाई
Pune, Maharashtra:पुणे के गणेश मंडलों पर नियम कड़ाई से लागू, उल्लंघन पर होगी कड़ी कार्रवाई इस भूमिका से पोलीस आयुक्त अमितेश कुमार ने संकेत दिया सभी प्रशासनिक और पुलिस अधिकारी आज सकाळी पुण्यातील मानाच्या गणेश मंडळांच्या तयारीचा पाहणी दौरा केला आणि गर्दीवर नियंत्रण आणण्याच्या दृष्टीने काही महत्वाच्या सुचनाही केल्या तसें हिमाचल? (कृपया ध्यान दें: मूल पाठ में स्पष्ट भाग) कसबा आमदार हेमंत रासणे आणि गणेश मंडळांनी हा पाहाणी दौरा आयोजित केला होता त्यानंतर पोलिस आयुक्त आणि पालिका आयुक्तांनी माध्यमांशी संवाद साधला0
0
Report
पुणे में एमपीएससी की तैयारी कर रहे युवक ने आर्थिक तंगी के कारण आत्महत्या
Pune, Maharashtra:पुण्यात एमपीएससी परीक्षेची करणाऱ्या तरुणाची आत्महत्या आर्थिक अडचणीतून आत्महत्या केल्याचा पोलिसांना संशय प्रथमेश दिलीप देशमुख असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव आत्महत्या करणाऱ्या तरुणावर अडीच लाखांचे कर्ज आत्महत्या करणारा तरुण धाराशिव जिल्ह्यातील खासापुरी - परांडा येथील रहिवासी यासंदर्भात पुण्यातील नारायण पेठ पोलीस चौकीत गुन्हा दाखल आत्महत्या करणाऱ्या तरुणाकडे मिळून आलेल्या सुसाईड नोट वरून चौकशीला सुरुवात दोन दिवसांपूर्वी हा तरुण आपल्या मूळ गावि गेला होता मराठवाड्यातील दुष्काळामुळे सोयाबीनचे पीक जळून गेल्यामुळे तो तणावात होता दुष्काळ आणि नापीकीला आणि कर्जबाजारीला वैतागून त्याने आत्महत्या केल्याचे निकटवर्तीयांनी सांगितले0
0
Report
Advertisement
Parth Pawar के नाम पर Anjali Damaniya ने सरकार से सवाल, हाई कोर्ट चर्चा
Mumbai, Maharashtra:अंजली दमानिया पार्थ पवारांच्या नावावरून अंजली दमानियांचा सरकारला सवाल! पार्थ पवार यांच्या नावावरून आता राज्याच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे… या प्रकरणात हायकोर्टाने उपस्थित झालेल्या प्रश्नावरून सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी थेट राज्य सरकारवर निशाणा साधलाय. फडणवीस सरकारच्या काळात पार्थ पवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नाही… मात्र, आता हायकोर्टानेच प्रश्न उपस्थित केला आहे की, या प्रकरणातील कागदपत्रांमध्ये पार्थ पवार यांचं नाव का नाही? हायकोर्टाच्या या प्रश्नाचं उत्तर सरकारला द्यावंच लागेल, असं अंजली दमानिया यांनी म्हटलंय. “या प्रकरणात पार्थ पवार यांचा सहभाग आहे,” असा दावा करत सरकारने आता न्यायालयासमोर स्पष्ट भूमिका मांडावी, अशी मागणीही दमानिया यांनी केली. देवेंद्र फडणवीस सरकार आता कोर्टात नेमकं काय उत्तर देणार? पार्थ पवारांच्या नावावरून सरकारची भूमिका काय असणार? याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे.0
0
Report
पुणे में गणेश उत्सव समय 12 सराईत अपराधियों को दो साल लिए तड़ीपार
Pune, Maharashtra:गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलीस अलर्ट मोडवर गणेश उत्सव काळात पुणे शहरातील सराईत गुन्हेगारांवर पोलिसांची असणार करडी नजर पुणे शहरातील परिमंडळ 2 मधील 12 सराईत गुन्हेगार दोन वर्षाकरिता तडीपार करण्यात आलेत पुणे शहर पुणे ग्रामीण पिंपरी चिंचवड हद्दीतून 12 जणांना करण्यात आले 2 वर्ष्यासाठी तडीपार पर्वती,भारती विद्यापीठ, बिबेवाडी,सहकारनगर, स्वारगेट आणि आंबेगाव पोलीस स्थानक हद्दीतील 12 सराईत गुन्हेगारांचा समावेश0
0
Report
पुणे गणेशोत्सव में डीजे बंदी पर रोहित टिळक ने पारंपरिक विधि का समर्थन किया
Pune, Maharashtra:गणेशोत्सवात डीजे आणि कर्णकर्कश आवाजाची प्रथा चुकीची....डॉ. रोहित टिळक पुणे: पुणे शहरात गेल्या काही दिवसांपासून आगामी गणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर डीजे संदर्भात वाद पाहायला मिळत असून डिजेवर पूर्ण बंदी आणावी यासाठी पुणेकर रस्त्यावर उतरले आहे.आत्ता या प्रकरणात मानाचा पाचवा श्री केसरी वाडा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तसेच लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ.रोहित टिळक यांनी प्रतिक्रिया दिली असून ते म्हणाले की गणेशोत्सवाच्या मिरवणुकांमध्ये मोठ्या डेसिबलच्या साऊंड सिस्टीम आणि डीजेच्या तालावर नाचणे ही अत्यंत चुकीची प्रथा पडली असून, गणेशोत्सवाची ही मूळ परंपरा कधीच नव्हती अस यावेळी त्यांनी सांगितल. पुण्यात आज केसरी वाडा येथे डॉ. रोहीत टिळक यांची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती.यावेळी त्यांनी याबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी डॉ. रोहित टिळक म्हणाले की मोठ मोठे सिस्टीम आणि जो मोठ्या डेसिबल गणेशोत्सवात लावला जातो ही प्रथा चुकीची लागली असून गणेशोत्सवाची ही परंपराच नव्हती.या प्रचंड आवाजामुळे लोकांच्या कानाच्या पडद्यांना त्रास होतो आणि आरोग्याच्या अनेक तक्रारी उद्भवतात.कर्णकर्कश डीजेमुळे नागरिकांच्या आरोग्यावर आणि कानाच्या पडद्यांवर गंभीर परिणाम होत असून गणेश मंडळांनी स्वतःहून यावर निर्बंध घालून पारंपरिक वाद्यांकडे वळावे तसेच लोकांना त्रास होतो म्हणूनच पुणेकर डीजेच्या विरोधात भूमिका घेत आहेत. यावर पोलीस किंवा प्रशासनाने कारवाई करण्यापेक्षा स्वतः गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांनी व अध्यक्षांनी पुढाकार घेऊन हा उत्सव शांततेत, नियमांचे पालन करून आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्याचा आदर्श निर्माण करावा अस यावेळी त्यांनी सांगितल. ते पुढे म्हणाले की लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्यलढ्यात लोकांना एकत्र आणण्यासाठी आणि जनजागृतीसाठी हा सार्वजनिक उत्सव सुरू केला. ब्रिटिशांच्या काळात लोक निर्भीडपणे देवकार्यासाठी एकत्र आले. आजही १४० कोटींहून अधिक लोकसंख्या असलेल्या आपल्या देशात सामाजिक सलोखा आणि एकजूट टिकवून ठेवण्यासाठी गणेशोत्सवासारख्या धार्मिक व्यासपीठांची नितांत गरज आहे. सोशल मीडिया किंवा वैयक्तिक गाठीभेटींमधून असा 'मास कनेक्ट' एकत्र येत नाही.आज देशात एकत्र येत उत्सवाची गरज आहे अस यावेळी त्यांनी सांगितल ते पुढे म्हणाले की धार्मिक आणि सांस्कृतिक उत्सव हे समाजाला एकत्र आणणारे महत्त्वाचे माध्यम असून, त्यातून सामाजिक एकोपा आणि परस्परांना मदत करण्याची भावना निर्माण होते. त्यामुळे हे उत्सव उत्साहात साजरे झाले पाहिजेत; मात्र त्याचवेळे त्यांनी ते पावित्र्य आणि सर्वसामान्य नागरिकांची शांतता जपणेही तितकेच महत्त्वाचे आहे.धार्मिक उत्सवांच्या माध्यमातून माणसाला मानसिक आधार आणि एक प्रकारचे सामाजिक कवच मिळते. श्रद्धा ही प्रत्येकाची वैयक्तिक बाब असली तरी एखाद्या ‘सुपरपॉवर’समोर नतमस्तक होण्याची भावना माणसाला चांगले आचरण करण्याची प्रेरणा देते. उत्सवांचे स्वरूप मोठे होत असताना त्यामध्ये अनावश्यक भपकेबाजी, मोठ्या आवाजातील साऊंड सिस्टिम आणि वाहतुकीसह नागरिकांना त्रासदायक ठरणाऱ्या बाबी वाढता कामा नयेत.पारंपरिक ढोल-ताशा संस्कृतीकडे डीजेला पर्याय म्हणून पाहिले जात आहे अस यावेळी त्यांनी सांगितल. ते पुढे म्हणाले की केसरीवाड्याने कधीच डीजे किंवा डॉल्बी सिस्टीम लावली नाही. आम्ही सुरुवातीपासूनच ध्वनीप्रदूषण होणार नाही याची पूर्ण काळजी घेतली आहे. ढोल-ताशा पथकांनाही नियमांच्या चौकटीतच सादरीकरण करण्यास सांगितले जाते. डीजे आणि अवाजवी साऊंड सिस्टीम पूर्णपणे बंद झाली तर ते अधिक उत्तम होईल अस देखील यावेळी टिळक म्हणाले.0
0
Report
Advertisement
पुणे में बोगस खेल प्रमाणपत्र घोटाला: 1 हजार फर्जी प्रमाणपत्रों से करोड़ों उड़े
Pune, Maharashtra:पुणे पुलिस ने बनावट खेल प्रमाणपत्रों के बड़े घोटाले का खुलासा किया है। कुराश खेल के लिए विभागाध्यक्ष व सचिव ने बिना किसी स्पर्धा के 1 हजार से अधिक बोगस प्रमाणपत्र वितरित कर संबंधित उम्मीदवारों से करोड़ों रुपये इकट्ठे करने के संकेत दिए हैं। इनमें से कुछ नेताओं ने इन ही फर्जी प्रमाणपत्रों के आधार पर 5 प्रतिशत खेल कोटे से सरकारी नौकरियां भी हासिल कर लीं। पुलिस ने आरोपी शिवाजी साळुंखे तथा अंकुश नागर को गिरफ्तार किया है। क्राइम ब्रांच ने आगे कहा कि अनेक प्रमाणपत्र सत्यापित न कर क्रॉस-चेक किए बिना वैध दिखाए जाते थे। कुराश और ड्रैगन बोटिंग जैसे खेलों के प्रमाणपत्रों पर भी यही घोटाला हुआ है। पुलिस के अनुसार जिलेवार प्रमाणपत्रों के नाम पर बदले गए नामों के कारण 2018 के सर्टिफिकेट भी 2025 तक बने दिखते रहे। इस घोटाले की आगे की जांच में यह स्पष्ट हुआ है कि पुणे शहर में 19 लोगों ने सिर्फ प्रमाणपत्रों के आधार पर नौकरियां पाईं; राज्य भर में यह संख्या और बढ़ सकती है। मंत्रालय स्तर पर खेल प्रमाणपत्रों की वैरिफिकेशन प्रक्रिया में खामियां पाईं गईं, जिन्हें दूर करने के लिए आगे की जांच चल रही है।0
0
Report
47 दिन बारिश नहीं: लातूर के किसानों के सपने सूखे, मदद की मांग
Latur, Maharashtra:लातूर जिल्ह्यात ४७ दिवसांपासून पाऊस गायब.. सोयाबीन पिकं वाळण्याच्या मार्गावर.... आभाळ स्वच्छ आहे, पण शेतकऱ्यांच्या डोळ्यात मात्र चिंता दाटलीय... ज्या पावसावर विश्वास ठेवून बळीराजाने पेरणी केली, ज्या पिकांकडून घरच्या संसाराची स्वप्नं पाहिली... त्याच पिकांना आता पावसाची प्रतीक्षा आहे. लातूरच्या शिवारात सोयाबीनची पिक आता शेतकऱ्याच्या डोळ्यादेखत पावसाअभावी वाळताना दिसतात... हे आहेत औसा तालुक्यातील कन्हेरी गावचे शेतकरी भलभिम बोडके... १० एकर जमिनीवर त्यांनी मोठ्या आशेने सोयाबीनची पेरणी केली... पेरणी करताना बोडकेंच्या डोळ्यांसमोर होतं चांगल्या उत्पन्नाचं स्वप्न... कुटुंबाच्या गरजा भागवण्याची आशा... आणि या सगळ्याचा आधार होता तो पाऊस... सुरुवातीला पाऊस झाला... पीकही उभं राहिलं... मात्र आता तब्बल ४७ दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. ज्या शेतात हिरवाई पाहून शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर समाधान यायला हवं, त्याच शेतात उभ्या पिकाकडे पाहताना आता चिंता दिसतेय... दिवसेंदिवस पिकाची अवस्था बदलतेय... खर्च झालाय, मेहनत झालीय... मात्र या मेहनतीचं चीज होईल का, याचीच धाकधूक बोडकेंच्या मनात आहे... दहा एकरांचं हे पीक म्हणजे केवळ सोयाबीन नाही... तर एका शेतकऱ्याचं वर्षभराचं स्वप्न आहे... आणि हे स्वप्न आता पावसाच्या एका सरीच्या प्रतीक्षेत आहे... ४७ दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यादेखत पिकं वाळत आहेत... पेरणीपासून आजवर केलेला खर्च, घेतलेली मेहनत आणि उभं केलेलं पीक आता संकटात सापडलंय. त्यातच मागील वर्षी झालेल्या नुकसानीची मदत अद्याप शेतकऱ्यांच्या हातात पोहोचलेली नाही... त्यामुळे यंदाच्या संकटाने शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे... या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे माजी आमदार धीरज देशमुख यांनी केली आहे... तर मराठवाड्यात पावसाचा मोठा खंड पडलेला असताना सरकार दुष्काळ जाहीर करण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप माजी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लातूरमध्ये केला आहे... आता प्रश्न केवळ पावसाचा नाही... तर पावसाअभावी उद्ध्वस्त होणाऱ्या शेतकऱ्याच्या वर्षभराच्या कष्टांचा आहे... ४७ दिवसांपासून पावस गायब झालाय... शेतात उभं पीक पाण्यासाठी आसुसलंय... आणि बळीराजाची नजर अजूनही आभाळाकडेच आहे. कर्ज काढून, घाम गाळून, पै-पै जमवून शेतकऱ्याने पीक उभं केलं... आज मात्र त्या पिकाचं भवितव्य एका पावसाच्या सरीवर अवलंबून आहे. मागील वर्षीच्या नुकसानीची मदत अद्याप मिळालेली नाही... आणि यंदाही संकट दारात उभं आहे. शेतकऱ्याला आता केवळ आश्वासनांची नाही, तर मदतीच्या हाताची गरज आहे... कारण पिकं वाचलं तरच शेतकऱ्याचं स्वप्न वाचेल... आणि शेतकरी वाचला, तरच शेतीचं भविष्य वाचेल! परिस्थितीला कोणतंही नाव द्या... पण बळीराजाला सरळ हाताने मदत करा एवढीच अपेक्षा....0
0
Report
आदित्य ठाकरे की मीडिया ब्रीफिंग: ठाणे डेटा सेंटर व मेट्रो पर विरोध तेज
Mumbai, Maharashtra:शिवसेना महाराष्ट्र राज्य प्रवक्ते अरुण सावंत विषय आदित्य ठाकरे यांची पत्रकार परिषद या राज्यामध्ये चार लोकांचे टोळकं महाराष्ट्राच्या विकासाला विरोध करण्याचं काम करत आहे आदित्य ठाकरे यांनी ठाण्यामध्ये डेटा सेंटर इंटरनल रिंग मेट्रो आणि क्लस्टर योजनेला विरोध केलेला आहे विकासाला विरोध करण्याचं काम हे गेले कित्येक वर्ष करत आहेत आणि म्हणून जनतेने त्यांना घरी बसवले जे आरोप त्यांनी केलेले आहेत तसे काहीही घडणार नाही जनतेला कोणताही प्रकारचा त्रास देणे हे सरकारचे उद्दिष्ट नाही0
0
Report
Advertisement
