445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
बीड़ के बशीरगंज में वृद्ध महिला के सब्ज़ी लूटते नगर निगम कर्मी: वीडियो वायरल
Beed, Maharashtra:बीड़ शहरातील बशीरगंज परिसरात घडलेल्या एका हृदयद्रावक घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. रस्त्यामध्ये कडेला बसून भाजीपाला विकून उदरनिर्वाह करणाऱ्या एका वृद्ध आजीबाईंंचा भाजीपाला नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी थेट कचऱ्याच्या वाहनात भरल्याचा धक्कादायक व्हिडिओ समोर आला आहे. व्हिडिओमध्ये वृद्ध महिला हात जोडून विनवणी करताना दिसत आहेत. माझा माल घेऊ नका, माझं पोट यावर चालतं, अशी आर्त हाक त्या देत होत्या. मात्र कर्मचाऱ्यांनी कोणतीही दया न दाखवता तिचा भाजीपाला वाहनात टाकल्याचे दृश्य पाहून अनेकांचे डोळे पाणावले. या घटनेदरम्यान आजीबाईंना अश्रू अनावर झाले होते. आयुष्याच्या संध्याकाळी दोन वेळच्या भाकरीसाठी रस्त्यावर भाजी विकणाऱ्या या महिलेची झालेली ही अवहेलना नागरिकांच्या मनाला चटका लावणारी ठरली आहे. दरम्यान, हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला असून नगरपरिषदेच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.0
0
Report
वाशिम में पुलिस ने मंगरुळपीर में 38.304 किलो गांजा गिरफ्तार, लाखों का माल जब्त
Washim, Maharashtra:वाशिमच्या स्थानिक गुन्हे शाखेने मंगरूळपीर शहरात कारवाई करत एका व्यक्तीकडून ३८ किलो ३०४ ग्रॅम गांजा जप्त केला.या कारवाईत १९ लाख १५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गुप्त माहितीच्या वरून पोलिसांनी कारवाई करण्यात आली असून,यावेळी शेख राजिक ऊर्फ सोनू शेख मोहम्मद याला ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपीविरुद्ध संबंधित कलमान्वये मंगरूळपीर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.0
0
Report
करवीर तालुक्यात वडगाव ग्रामस्थों ने पंचायत समिति कार्यालय सामने मोर्चा निकाला और ताला जड़ दिया
Kolhapur, Maharashtra:कोल्हापुरच्या करवीर तालुक्यातील दऱ्याचं वडगाव ग्रामस्थांनी पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढून टाळे ठोक आंदोलन केले. रोजगार हमी योजनेअंतर्गत लाभार्थी शेतकऱ्यांना मदत मिळत नसल्याच्या निषेधार्थ दऱ्याचे वडगाव ग्रामस्थ आक्रमक झाले. गेल्या दीड वर्षापासून रोजगार हमी योजनेअंतर्गत कामांना मंजुरी मिळत नसल्याच्या निषेधार्थ ग्रामस्थांनी जोरदार घोषणाबाजी करत करवीर पंचायत समिती कार्यालयावर मोर्चा काढला. यावेळी ग्रामस्थ आणि अधिकाऱ्यांमध्ये जोरदार शाब्दिक चकमक उडाली. आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी रोजगार हमी योजनेच्या अधिकाऱ्यांना बाहेर काढून कार्यालयाला चक्क टाळे ठोक आंदोलन केलं.0
0
Report
Advertisement
नाले की सफाई में कमी: शिवसेना ठाकरे गुट आक्रामक, पानी आने की आशंका
Navi Mumbai, Maharashtra:नालेसफाईच्या अपूर्ण कामा विरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक. नाल्यांमधील गाळ काढलाच गेला नसल्याचा शिवसेना ठाकरे गटाचा आरोप. कार्यकर्ते उतरले थेट नाल्यात. गुडघाभर गाळ दाखवत महापालिकेच्या नाले सफाईची केली पोलखोल. नालेसफाई झाली नसल्याने पावसाळ्यात घरांमध्ये पाणी शिरण्याची शक्यता. तात्काळ गाळ काढा अन्यथा हाच गाळ अधिकाऱ्यांना देणार. Byte -: नंदा काटे (माजी नगरसेविका)0
0
Report
खरीप हंगाम में डीज़ल दर बढ़ी, ट्रैक्टर भाड़े से किसान परेशान, बैलजोडी लौट रहे
Akola, Maharashtra:अकोला जिले में किसान पेराईपूर्व मशाति़ती के काम में व्यस्त हैं। डीज़ेल दरों में लगातार वृद्धि के कारण ट्रैक्टर भाड़े में भारी बढ़ोतरी हुई है, जिससे खेती के खर्च बढ़ रहे हैं और सामान्य किसान आर्थिक कठिनाई में हैं। बढ़ते खर्च के कारण कई किसान अब पारंपरिक बैलगाड़ी के ज़रिये खेती करने लगे हैं। खरीप हंगाम के सामने ईंधन दर वृद्धि सीधे खेती व्यवस्था पर पड़ रहा है। खरीप हंगाम के लिए किसान अभीखरनी और पेराईपूर्व तैयारी कर रहे हैं। पहले बैलगाड़ियों से ज़्यादा काम करने के चलते आधुनिक यंत्रों को अपनाया गया, पर डीज़ेल की बढ़ती कीमतों से ट्रैक्टर मालिकों ने प्रति एकड़ मशागात के दाम बढ़ाए हैं। बीज, उर्वरक और दवाओं की महंगाई के कारण किसान मुश्किल में हैं और कुछ किसान समय पर मशागात पूरी करने में कठिनाई महसूस कर रहे हैं। कुछ किसान मजबूरी में बैलगाड़ी के तरीके अपनाने लगे हैं。 दूसरी ओर शासन द्वारा किसानों को अवरोधन योजनाओं पर चल रही हैं, पर बढ़ती ईंधन दरों से किसान परेशान हैं। ट्रैक्टर भाड़े में बढ़ोतरी छोटे और मध्यम किसानों के लिए आर्थिक गणित बिगाड़ रही है, जिससे कई किसान कम खर्च वाले विकल्प की तलाश कर पारंपरिक बैलगाड़ी की तरफ लौट रहे हैं। इससे ट्रैक्टर चालकों और मालिकों पर असर पड़ रहा है और काम घटने से ट्रैक्टर आमने-सामने खड़े हो रहे हैं। ट्रैक्टर ऋण भुगतान, देखभाल खर्च और बढ़ते ईंधन दरें किसानों को भारी आर्थिक दबाव में डाल रहे हैं। खरीप हंगाम के प्रकाश में डीज़ल दरों की बढ़ोतरी खेती पर सीधा असर डाल रही है और ट्रैक्टर के बढ़े हुए भाड़े किसानों के लिए बड़ी चिंता बन रहे हैं। आधुनिक तकनीक के उपलब्ध होने के बावजूद बढ़ती ईंधन दरों के कारण किसान फिर पारंपरिक पद्धतियों की ओर लौट रहे हैं। इसलिए कृषि के लिए ईंधन दर में सब्सिडी या वैकल्पिक उपायों की मांग ग्रामीण क्षेत्र से तेज हो रही है।0
0
Report
रोहित पवार ने देहू के मुख्य मंदिर में अचानक भेट दी, राजनीति में गूंजे संकेत
Varsoli, Maharashtra:Headline : आमदार रोहित पवार यांनी दिली देहूच्या मुख्य मंदिरात अचानक भेट संत तुकोबारायांच्या पवित्र देहूनगरीत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी देहू संस्थानला भेट देत संत तुकाराम महाराजांच्या चरणी नतमस्तक होत आशीर्वाद घेतले. यावेळी देहू संस्थानच्या वतीने काळ्या पाषाणातील संत तुकाराम महाराजांची मूर्ती देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला. अध्यात्म, परंपरा आणि राजकारणाचा सुंदर संगम यावेळी पाहायला मिळाला. “कॉक्रोच जनता पार्टी 2029 च्या निवडणुकीत प्रस्थापितांना भारी पडेल का?” असा प्रश्न विचारला असता रोहित पवार यांनी भाष्य केलं. “कॉक्रोच जनता पार्टी ही प्रत्यक्षात कुठली राजकीय पार्टी नसून सोशल मीडियावर निर्माण झालेली लोकांच्या भावना व्यक्त करणारी एक लाट आहे. पण त्या मागे सामान्य माणसाच्या मनात साचलेला रोष, खदखद आणि असंतोष आहे,” असं त्यांनी स्पष्टपणे सांगितलं. “आज विरोधी पक्षांनी जर लोकांच्या भावना समजून घेतल्या नाहीत, रस्त्यावर उतरून संघर्ष केला नाही, तर लोकांचा हा संताप कुठल्या ना कुठल्या स्वरूपात उफाळून येणारच. सरकारच्या विरोधात न घाबरता लढण्याची भूमिका घ्यावी लागेल,” असा थेट इशाराच रोहित पवार यांनी दिलाय.0
0
Report
Advertisement
सोलापुर में सूरज नहीं दिखा, गर्मी से मिली राहत
Solapur, Maharashtra:सोलापुरात आज सकाळपासून सूर्यदर्शन नाहीच यंदाच्या आठवड्यात सोलापूरचे तापमान 44 अंशापर्यंत जाऊन आल्यानंतर सोलापूरकरांना मोठा दिलासा हवेत गारवा असल्याने सोलापूरकरांना एका दिवसासाठी उकाड्यापासून सुट्टी गेल्या दोन महिन्याच्या तुलनेत आज तापमान अत्यंत कमी असल्याने शहरातील प्रमुख मार्गांवर सोलापूरकरांची वर्दळ वाढली मोठ्या प्रतीक्षेनंतर सोलापूरकरांना कडक उन्हापासून मोठा दिलासा0
0
Report
उल्हासनगर में गोलीबारी: दो भाइयों की मौत, क्षेत्र में तनाव
Ambernath, Maharashtra:गोळीबारान उल्हासनगर हादरलं भर रस्त्यात गोळीबारात दोन सख्ख्या भावांची हत्या पूर्व वैमनस्यातून भररस्त्यात थरार, एक जण गंभीर उल्ल्हासनगर शहरातील कॅम्प ५ परिसरातील कैलाश कॉलनी चौकात रात्रीच्या सुमारास जुन्या वादातून झालेल्या अंदाधुंद गोळीबाराने संपूर्ण उल्हासनगर हादरले आहे. ८ ते १० जणांच्या टोळीने वर्दळीच्या ठिकाणी केलेल्या या हल्ल्यात दोन सख्ख्या भावांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला, या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. उल्ल्हासनगर शहरातील अत्यंत वर्दळीच ठिकाण असलेल्या कैलास कॉलनी परिसरात गोळीबाराची घटना घडली, अचानक ७ ते ८ जणांचे टोळके हत्यारांसह तिथे आले आणि त्यांनी काही समजण्याच्या आतच चौहान कुटुंबीयांवर थेट गोळीबार सुरू केला.हल्लेखोरांनी रस्त्यावर उघडपणे अनेक राऊंड फायर केले. गोळ्यांच्या आवाजाने परिसरात एकच खळबळ उडाली, नागरिकांनी जीव वाचवण्यासाठी सैरावैरा धावपळ सुरू केली अचानक झालेल्या या भीषण हल्ल्यात अनिल चौहान आणि त्याचा सख्खा भाऊ अमन चौहान या दोघांचा जागीच मृत्यु झाला, तर त्यांचे काका अर्जुन सुरजबली चौहान गंभीर जखमी झाले आहेत त्यांची प्रकृती गंभीर आहे. नातेवाईक या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले . घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात करत परिसर सील केला आरोपींचा शोध सुरू केला , रात्री उशिरा या दोन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतलं. चंद्रशेखर भुयार उल्हासनगर0
0
Report
पेट्रोल-डीज़ल संकट से किसानों की सुबह: नाशिक के ग्रामीण इलाकों में लाइनें
Yeola, Maharashtra:आखाती देशातील तणावामुळे भारतात पेट्रोल डिझेल टंचाईचा सामना करावा लागत असून राज्यात देखील ठीक ठिकाणी पेट्रोल पंप बाहेर नो स्टॉकचे बोर्ड आहे नाशिकच्या येवल्यातील ग्रामीण भागामध्ये पहाटेपासूनच शेतकरी डिझेल साठी रांगा लावून उभे असून अन्न पाण्या वाचून शेतकरी तासनतास रांगेमध्ये ताटकळत उभा है0
0
Report
Advertisement
डोंबिवली के ठग के 15 करोड़ कर्ज घोटाले का पर्दाफाश; गिरफ्तार
Kalyan, Maharashtra:‘लोन किंग’ बनून फिरणारा भामट्याला विष्णू नगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या 15 कोटींचे कर्ज मिळवून देण्याचे आमिष. बिल्डरसह नामांकित वकील, रिटायर्ड पोलीस साहाय्य्क आयुक्त यांची फसवणूक. “कोणालाही कितीही मोठे कर्ज मिळवून देतो” असे आमिष दाखवत लोकांना गंडा घालणाऱ्या डोंबिवलीतील निखिल भोईर या भामट्याला अखेर विष्णुनगर पोलिसांनी अटक केली आहे. स्वतःची मोठी प्रतिमा निर्माण करण्यासाठी तो कायम बाउन्सरची टीम आणि गनमॅनसोबत फिरत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. डोंबिवलीतील एका नामांकित बिल्डरला तब्बल 15 कोटी रुपयांच्या कर्जाची गरज होती. त्याच वेळी त्याची ओळख निखिल भोईर याच्याशी झाली. “मैं मोठमोठी कर्जे मंजूर करून देतो” असा विश्वास देत निखिलने बिल्डरकडून 15 कोटींच्या व्यवहारावर सव्वा टक्का कमिशन आधीच उकळले. त्यानंतर त्याने बिल्डरला 5 कोटी रुपयांचा चेक दिला. मात्र, तो चेक बाउन्स झाल्यानंतर संपूर्ण फसवणुकीचा पर्दाफाश झाला.या प्रकरणी संबंधित बिल्डरने विष्णुनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. पोलिसांनी तपास सुरू केला असता निखिल भोईर याने केवळ एका बिल्डरलाच नव्हे, तर डोंबिवलीतील नामांकित वकील, सेवानिवृत्त ACP आणि इतर अनेकांना अशाच प्रकारे फसवल्याचे उघड झाले.निखिल भोईर याच्यावर यापूर्वीही सहा गुन्हे दाखल असून त्यातील चार गुन्हे फसवणुकीचे आहेत. विष्णुनगर पोलिसांनी डोंबिवली पश्चिमेतील गुप्ते रोड परिसरातून निखिल भोईर याला अटक केली. दरम्यान, निखिल भोईरने आतापर्यंत किती जणांची फसवणूक केली आहे, याचा सखोल तपास आता विष्णुनगर पोलीस करत आहेत.0
0
Report
लासलगाव कांदा बाजार में डीज़ल कमी के कारण लिलाव बंदी की आशंका
Lasalgaon, Maharashtra:लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समिती में सोमवारपासून कांदा और धान्याचे लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इंधन तुटवड्यामुळे राज्यात आणि परराज्यात शेतीमाल वाहतुकीसाठी ट्रक उपलब्ध होत नसल्याचे कारण देत व्यापारी असोसिएशनने लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे पत्र बाजार समितीला दिले आहे. आधीच घसरलेले कांद्याचे दर, निर्यात ठप्प आणि वाढत्या उष्णतेमुळे कांदा खराब होत असताना आता लिलाव बंदच्या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट... लासलगाव बाजार समितीत दररोज हजारो क्विंटल कांद्याची आवक होत असते... मात्र आता सोमवारपासून कांदा आणि धान्य लिलाव बेमुदत बंद राहण्याची शक्यता निर्माण झाली आहे... व्यापारी असोसिएशनने बाजार समिती प्रशासनाला पत्र देत लिलाव प्रक्रियेत सहभागी होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे... या निर्णयामागे इंधन तुटवडा हे मुख्य कारण असल्याचे व्यापाऱ्यांनी म्हटले आहे... राज्यात आणि परराज्यात डिझेलची कमतरता जाणवत असल्याने शेतीमाल वाहतुकीसाठी ट्रक मिळत नसल्याचा दावा करण्यात आला आहे... त्यामुळे कांदा आणि धान्याची खरेदी करून माल बाहेर पाठवणे अशक्य होत असल्याचे व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे... आधीच कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या संकटात सापडला आहे... आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे कांद्याच्या निर्यातीवर परिणाम झाला आहे... तर दुसरीकडे गेल्या एक ते दीड वर्षांपासून बांगलादेशमध्ये कांदा निर्यात ठप्प असल्याने बाजारात कांद्याची मागणी घटली आहे... त्यामुळे लासलगाव बाजार समितीमध्ये कांद्याचे सरासरी बाजारभाव सहा ते दहा रुपये किलोपर्यंत खाली आले आहेत... उत्पादन खर्चही निघत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे... उष्णतेच्या लाटेमुळे मोठ्या प्रमाणात कांदा खराब होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान आणखी वाढले आहे... दरम्यान, लिलाव बंदच्या निर्णयामुळे हजारो कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे... सरकारने तातडीने इंधन पुरवठा सुरळीत करून कांदा वाहतुकीसाठी पर्यायी व्यवस्था करावी, अशी मागणी आता शेतकऱ्यांकडून केली जात आहे... पीटीसी :- सुदर्शन खिल्लारे प्रतिनिधी झी 24 तास ,लासलगाव नाशिक0
0
Report
बुलढाणा में पेट्रोल नहीं मिलने पर पंप कर्मी पर तलवार-कोयता से हमला
Buldhana, Maharashtra:बुलढाणा ब्रेकिंग बुलढाण्यात पेट्रोल - डिझेल साठी निघाल्यात तलवार आणि कोयता. कॅन मध्ये पेट्रोल का देत नाही.? या कारणावरून पेट्रोल पंप वरील कर्मचाऱ्याला तलवार आणि कोयत्याने केली मारहाण. खामगाव ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल. बुलढाणा जिल्ह्यात इंधन टंचाईच भीषण रूप आता समोर येत आहे....चक्क पेट्रोल आणि डिझेल मिळवण्यासाठी आता तलवार आणि कोयते सुद्धा बाहेर निघाले आहेत... खामगाव अकोला मार्गावरील पिंप्राळा फाट्यावरील केके रिलायन्स पंपावरील कर्मचाऱ्याला काही वाहनधारकांनी पेट्रोल आम्हाला कॅन मध्ये का देत नाही...? या कारणावरून तलवार आणि कोयता घेऊन मारहाण केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यात पेट्रोल पंप कर्मचारी सागर दिलीप आचार हा जखमी झाला असून खामगाव ग्रामीण पोलिसात आरोपी वाहन चालक अमोल जाधव,अक्षय जाधव, चेतन जाधव व अनोळखी एक अशा चौघांवर कलम 4/25 आर्म ऍक्ट, 15(2), 352, 351(2)3(5)BNS नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्यापही फरार आहेत.0
0
Report
Advertisement
वाशिम में डीज़ल संकट: किसानों-चालकों की लंबी लाइनें, आपूर्ति बाधित
Washim, Maharashtra:वाशिम जिल्ह्यात सलग आठव्या दिवशीही पेट्रोल-डिझेल तुटवडा कायम असल्यामुळे शेतकरी व वाहनचालकाची चिंता वाढत चालली आहे. वाशिम जिल्ह्यातील पेट्रोल पंपावर डिझेल उपलब्ध होताच शेतकरी आणि वाहनधारकांनी मोठी गर्दी केली आहे. सकाळपासूनच हातात कॅन घेऊन नागरिकांनी रांगा लावल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे डिझेल मिळवण्यासाठी लागलेल्या कॅनच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. खरीप हंगामाच्या तोंडावर शेतकऱ्यांना डिझेलची मोठी गरज असताना तुटवड्यामुळे अडचणी वाढल्या आहेत. अनेक जण तासनतास प्रतीक्षा करत असून इंधन पुरवठा सुरळीत करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे.0
0
Report
मुंबई उपनगर में हल्की बारिश से मौसम ढला; सुबह से बादल बने रहे
Mumbai, Maharashtra:मुंबई उपनगरात पावसाच्या हलक्या सरी पडल्या भांडुप नाहूर कांजूर मुलुंड परिसरामध्ये पावसाच्या हलक्या सरी दिसणाऱ्या सकाळपासून वातावरण ढगाळ आहे त्यात आता पावसाच्या सरी बर असल्यामुळे हवेत काहीसा गारवा निर्माण झाला आहे0
0
Report
कोकण विधान परिषद सीट पर महायुती में रस्सीखेल, निकम का दावा
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी ब्रेकिंग विधान परिषदेच्या कोकणातील जागेवरून महायुतीमध्ये रस्सीखेच... कोकणातील जागा पूर्वीपासून आमचीच; ती जागा आम्हालाच मिळावी – आमदार शेखर निकम भास्कर जाधव ते अनिकेत तटकरे; जागा राष्ट्रवादीकडेच सिटिंग जागा असल्याने दावा राष्ट्रवादीचाच – निकम कोकणातील विधान परिषद जागेवरून महायुतीत संघर्षाची शक्यता शिवसेनेच्या सदानंद चव्हाण यांनीदेखील केला दावा कोकणातील विधान परिषद जागेवर राष्ट्रवादीचाच दावा; महायुतीत तोडगा निघेल – आमदार शेखर निकम अँकर : महयूतीत विधान परिषदेच्या कोकणातील जागेवरून रस्सीखेच सुरू असताना चिपळूण-संगमेश्वरचे आमदार शेखर निकम यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर एक आमदार निवडून दिला जातो. ही जागा पूर्वीपासून राष्ट्रवादीकडे राहिली असून भास्कर जाधव, अनिल तटकरे आणि सध्या अनिकेत तटकरे यांनी या मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. त्यामुळे ही जागा पुन्हा राष्ट्रवादीचाच मिळावी, अशी महायुतीतील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांची मागणी असल्याचे निकम यांनी म्हटले आहे. देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार हे एकत्र बसून यावर योग्य तोडगा काढतील आणि महायुती म्हणून ही निवडणूक लढवली जाईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. दरम्यान, शिवसेनेचे सदानंद चव्हाण यांनीदेखील या जागेवर दावा सांगितल्याने महायुतीत संघर्षाची शक्यता व्यक्त केली जात आहे.0
0
Report
Advertisement
