icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

भिवंडीत गलत मार्गदर्शन से अटका कंटेनर पेड़ की शाखाओं में, स्कूल बसें फंसीं

Thane, Maharashtra:भिवंडीत कंटेनर अडकून तासभर वाहतूक ठप्प - शाळेच्या बसेस कोंडीत... चुकीच्या मार्गाने आलेला कंटेनर झाडात अडकला - दिलदार हॉटेलसमोर गोंधळ... सकाळच्या वेळी भिवंडीत वाहतूक कोंडी - फांद्या कापून मार्ग मोकळा... अँकर भिवंडीत आज सकाळी चुकीच्या मार्गदर्शनामुळे एक मालाने भरलेला कंटेनर शहरात अडकला. वंजारपट्टी नाका येथील दिलदार हॉटेलसमोर कंटेनर झाडाच्या फांद्यांमध्ये अडकल्याने परिसरात मोठी वाहतूक कोंडी झाली. शाळेच्या वेळेत झाल्याने विद्यार्थी आणि पालकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. *VO - 1* ही घटना आज सकाळी वंजारपट्टी नाका परिसरातील दिलदार हॉटेलसमोर घडली. भिवंडीकडून वाड्याकडे जाणाऱ्या कंटेनर चालकाला चुकीचा मार्ग दाखवण्यात आला. शहरातील अरुंद रस्त्यावर आलेला कंटेनर दिलदार हॉटेलसमोरील झाडाच्या फांद्यांमध्ये अडकला. कंटेनरमध्ये माल भरलेला असल्याने तो ना पुढे जात होता, ना मागे घेता येत होता. *VO - 2* या प्रकारामुळे परिसरात अचानक मोठी वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटना सकाळी शाळेच्या वेळेत घडली असल्याने हॉली मेरी स्कूल, डॉ. ओमप्रकाश अग्रवाल इंग्लिश हायस्कूल, स्कॉलर स्कूलसह परिसरातील शाळांच्या बसेस या कोंडीत अडकल्या. सुमारे 45 मिनिटे ते 1 तास विद्यार्थी आणि पालकांना रस्त्यावरच थांबावे लागले. अखेर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी झाडाच्या फांद्या कापून कंटेनर बाहेर काढला आणि वाहतूक सुरळीत केली. कंटेनर चालकांना शहरात प्रवेशासाठी पर्यायी मार्गांची माहिती नसल्याने अशा घटना वारंवार घडत आहेत. वाहतूक पोलिसांनी अशा वाहनांसाठी योग्य मार्गदर्शन करावे अशी मागणी आता नागरिक करत आहेत.
0
0
Report

गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलवादियों को राशन कार्ड व कल्याण योजनाओं का लाभ

Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली में आत्मसमर्पित नक्सलवाद्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार के पुनर्वसन धोरण के तहत तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम और मदनी गणपत तोरेम को शिधापत्रिका विमोचित कर दी गई है और उन्हें राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना समेत विभिन्न कल्याणकारी योजनाओं का लाभ मिल रहा है। तारक्का उर्फ विमल चंद्रा सिडाम पहले दंडकारण्य स्पेशल झोनल कमिटी की सदस्य थीं। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस के नेतृत्व में इस प्रक्रिया के अंतर्गत उनके पति सोनू उर्फ भूपती ने भी आत्मसमर्पण किया है और विकास के मुख्य प्रवाह में प्रवेश किया है। शासन के पुनर्वसन धोरण के अनुसार आत्मसमर्पित नक्सलवादियों को आवश्यक कागजी प्रमाण पत्र और अन्य सुविधाएँ मुहैया कराकर लाभ दिलाने के लिए प्रशासन निरंतर प्रयत्नशील है। शिधापत्रिका मिलने से लाभार्थियों को राष्ट्रीय खाद्य सुरक्षा योजना और अन्य योजनाओं का लाभ अधिक सहजता से मिल सकेगा।
0
0
Report
Advertisement

नाशिक में ऑपरेशन टाइगर फिर चर्चा में, अजय बोरस्ते के दावे पर राजनीति गरम

Nashik, Maharashtra:नाशिक मध्ये ऑपरेशन टायगर ला सुरुवात...उपनेते अजय बोरस्ते नाशिकच्या राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा 'ऑपरेशन टायगर' चर्चेत आले आहे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे नगरसेवक शिवसेनाच्या संपर्कात असल्याच्या चर्चा जोर धरू लागली आहे त्यामुळे नाशिक मध्ये देखील ऑपरेशन टायगर पुन्हा एकदा चर्चेत आल्याचे पाहायला मिळत आहे. फक्त नाशिकच नव्हे, तर राज्यातील अनेक नेते शिवसेनेत प्रवेशासाठी इच्छुक असल्याचा दावा शिवसेना उपनेते अजय बोरस्ते यांनी केला आहे. नाशिकमध्येही ऑपरेशन टायगरला सुरुवात झालीये असा दावा शिवसेने उपनेते अजय बोरस्ते यांनी केलाय...
0
0
Report
Advertisement

कोल्हापुर के प्रकाशक प्रशांत आंबी पर धमकी मामला; हाईकोर्ट में नया मोड़

Kolhapur, Maharashtra:शिवाजी कोण होता? या पुस्तकाच्या शीर्षकावरून कोल्हापुरातील प्रकाशक प्रशांत आंबी यांना शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी शिवीगाळ केर्‍त जीवे मारण्याची धमकी दिली होती, त्याच बरोबर महामानवांच्या नावावरून शिवीगाळ करून रोज 100 पुरुष घरी येतील अस देखील संजय गायकवाड यांनी म्हटल्याच आरोप करत आमदार संजय गायकवाड यांच्या विरोधात हायकोर्टात रीटपिटीशन दाखल केली होती. पण हायकोर्टाने यासंदर्भात जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला प्रशांतच्या वकिलांना दिला आहे.. त्यानुसार प्रकाशक प्रशांत आंबी हे कोल्हापूर जिल्हा न्यायालयात दाद मागण्याचे ठरवले आहे.
0
0
Report

यवतमाल के वेकोली क्षेत्र में भाजपा आंदोलन से कोयला खदानों की ढुलाई ठप

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ च्या वणी येथील वेकोली क्षेत्रात असलेल्या मुंगोली, कोलगाव आणि पैनगंगा कोळसा खाणीची वाहतूक भाजपा च्या आंदोलनामुळे ठप्प झाली आहे. शंभरहून अधिक कोळसा वाहतूक करणारे ट्रक भाजपचे नेते विजय पिदुरकर आणि माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांनी आंदोलन करून रोखून धरल्याने कोळसा खाणीतील कोट्यवधी रुपयांचे व्यवहार ठप्प पडले. दरम्यान वेकोलीच्या अधिकाऱ्यांनी रस्ता दुरुस्तीसाठी तीन दिवसांचा वेळ मागितला आहे. कोळसा वाहतुकीमुळे कोलगांव चेकपोस्ट ते कोलगांव फाट्यापर्यंत प्रमुख जिल्हा मार्ग पूर्णतः उखडलेला आहे. कोलगांव फाटा ते भिमनगर मुंगोली रस्ता वेकोली ने नियमबाह्य परावर्तीत केला आहे. त्यामुळे ग्रामस्थांचे जीव धोक्यात आले आहे. वेकोली चे अधिकारी मुजोरपणे वागत असून येथे होणाऱ्या जीवितहानीस तेच जबाबदार राहतील असा ईशारा भाजपने दिला. मुंगोली कोलगांव कंत्राटी कामात बेरोजगार स्थानिकांना रोजगार द्यावा. शिवनी रस्त्यावरील पुलाला पिचींग करावे. रेल्वे अंडरपास साखरा, कैलासनगर, मुंगोली चेकपोस्ट, शिवनी येथील साचलेले चिखलमय पाण्याची विल्हेवाट लावावी, सर्वत्र स्ट्रिटलाईट लावावे अशी मागणी भाजपचे विजय पिदुरकर यांनी केली.
0
0
Report

नागपुर के उमरेड़ वन क्षेत्र में महिला पशुवैद्य ने वाघिण को जेरबंद कर बेशुद्ध किया

Nagpur, Maharashtra:नागपूर -- - वाघीण जेरबंद करनेासाठी पशुवैद्यकीय अधिकारी पिंजऱ्यात, पिंजऱ्यात बसून अचूक नेम साधत केले वाघाला ट्रँक्यूलाईज (Tranquilize) - नागपूर जिल्ह्यातील उमरेड वनपरिक्षेत्रात गेल्या काही महिन्यांपासून सुमारे अडीच ते तीन वर्षांच्या वाघिणीने धुमाकूळ घातला होता. वाघिणीच्या हल्ल्यात २७ मार्चला निर्मला गभणे व सहा जूनला दिगांबर पाटील यांचा बळी गेला. हे दोघेही शेतात काम करत होते. यानंतर दोन ते तीन जणांना जखमी केले. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते - दोन जणांचा बळी घेतलेल्या आणि अनेक दिवसांपासून वनविभागाला हुलकावणी देणाऱ्या वाघिणीला अखेर जेरबंद करण्यात यश आले. मात्र, या कारवाईमागे एका महिला पशुवैद्यकीय अधिकाऱ्याचे धाडस निर्णायक ठरले. - बचाव पथकाची वाहने मागे घेतल्यानंतर जंगलात ठेवलेल्या पिंजऱ्यात स्वतः बसून डॉ. प्रियल चौरागडे यांनी वाघिणीवर अचूक बेशुद्धीकरणाचा नेम साधला. - विशेष म्हणजे, महाराष्ट्रात वाघाला नेम धरून बेशुद्ध करणाऱ्या त्या पहिल्याच महिला पशुवैद्यकीय अधिकारी आहेत. - वाघिणीला जेरबंद करण्यासाठी गावकऱ्यांनी चक्काजाम आंदोलन केले होते. - वाघिणीच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी कॅमेरा ट्रॅप लावण्यात आले होते. तसेच दोन ठिकाणी भक्ष्य बांधण्यात आले होते. मात्र, त्या भक्ष्याकडे न जाता वाघिणीने मोकाट जनावराची शिकार केली आणि ते जंगलात ओढून नेले. - त्यानंतर ती त्याच परिसरात असल्याचे स्पष्ट झाल्यावर वन्यप्राण्यांच्या वाहतुकासाठी वापरला जाणारा पिंजरा आडोशाला ठेवण्यात आला. या पिंजऱ्यात डॉ. प्रियल चौरागडे आणि त्यांचे सहकारी प्रतीक घाटे बसले. - काही वेळाने वाघीण पिंजऱ्याजवळ येऊन गेली आणि पुन्हा भक्ष्याकडे वळली. पिंजऱ्यातून दिसणारे दृश्य मर्यादित असल्याने नेम साधणे आव्हानात्मक होते. मात्र, योग्य संधी मिळताच डॉ. चौरागडे यांनी अचूक नेम साधला. - अवघ्या १५ मिनिटांत वाघीण बेशुद्ध झाली. त्यानंतर तिला त्याच पिंजऱ्यातून नागपूर येथील ट्रान्झिट ट्रिटमेंट सेंटरमध्ये हलवण्यात आले. - सध्या वैद्यकीयदृष्ट्या वाघीण सुदृढ असून तिच्याबाबत वनविभाग निर्णय घेईल
0
0
Report
Advertisement

पिंपळगाव घोडे में भारी बारिश से विशाल बांगर का घर-खेत जलमग्न

Shirur, Maharashtra:पुण्यातील आंबेगाव तालुक्यातून एक अत्यंत धक्कादायक आणि चिंताजनक बातमी समोर येत आहे. तालुक्यात झालेल्या मुसळधार अतिवृष्टीमुळे पिंपळगाव घोडे येथील विशाल बांगर या शेतकऱ्याचं प्रचंड नुकसान झालं आहे. परिसरात झालेल्या ढगफुटीसदृश पावसामुळे नदी-नाल्यांना मोठा पूर आला आणि या पुराच्या पाण्याने विशाल बांगर यांच्या संपूर्ण घराला वेढले. पुराचा वेग इतका प्रचंड होता की, घराबाहेर उभा असलेला ट्रॅक्टर, कार आणि दुचाकी वाहने पाण्यात पूर्णपणे अडकली आणि त्यांचे मोठे नुकसान झाले. इतकेच नव्हे, तर पुराचे पाणी थेट घरात घुसल्याने घरातील अन्नधान्य, फर्निचर आणि इतर सर्वच साहित्याचं अतोनात नुकसान झालं आहे. एका रात्रीत या शेतकऱ्याचा संसार उघड्यावर आला असून, शासनाने तातडीने या भागाचे पंचनामे करून बाधित शेतकऱ्याला तात्काळ आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी आता स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
0
0
Report

वाशीम में तीन साल की बच्ची अपहरण मामले में आरोपी गिरफ्तार, बच्ची सुरक्षित

Washim, Maharashtra:वाशीम शहरातून तीन महिन्यांपूर्वी अपहरण झालेल्या तीन वर्षीय चिमुकलीची वाशिम पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. या प्रकरणी आरोपी राम लांडकर याला अटक करण्यात आली आहे. २४ मार्च २०२६ रोजी पुसद नाका परिसरातून आईसोबत असलेल्या चिमुकलीचे अपहरण करण्यात आले होते. याप्रकरणी वाशीम शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी विविध पथके रवाना करून आरोपीचा शोध सुरू केला होता. आरोपी सतत ठिकाणे बदलत असल्याने तो पोलिसांना चकवा देत होता. अखेर अहिल्यानगर जिल्ह्यातील खडकी येथून आरोपीला ताब्यात घेऊन चिमुकलीची सुखरूप सुटका करण्यात आली. आरोपीविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हे दाखल करून त्याला अटक करण्यात आली असून,चिमुकलीला तिच्या आईच्या स्वाधीन करण्यात आले आहे.
0
0
Report

मंगरुळपिर बसस्टॉप पर घायल दो: अज्ञात हल्लेखोर कोयता से हमला

Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपिर शहरातील बसस्थानक परिसरात अज्ञात हल्लेखोराने कोयत्याने दोन जणांवर जीवघेणा हल्ला केल्याची घटना घडली आहे.हल्लेखोराने दोघांवर सपासप वार केल्याने ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर मंगरुळपिर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.हल्ल्यानंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाला असून हल्ल्याचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.घटनेची माहिती मिळताच मंगरुळपिर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून आरोपीचा शोध सुरू आहे.या घटनेमुळे शहरात एकच खळबळ उडाली असून रुग्णालय परिसरात नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
0
0
Report
Advertisement

येवल्या पैठणी कला दुबई तक पहुंची, चेतन धसे ने स्वामी समर्थ की प्रतिमा उकेरी

Yeola, Maharashtra:येवल्याच्या पैठणीला आता भक्तीचा अनोखा स्पर्श लाभला आहे. 'देऊळ बंद 2' चित्रपटातून प्रेरणा घेत दुबईतील स्वामीभक्त कौस्तुभ कमलापुरकर यांनी येवल्यातील पैठणी कारागीर चेतन धसे यांना पैठणीच्या साडीवर श्री स्वामी समर्थांची प्रतिमा साकारण्याची विशेष ऑर्डर दिली. चेतन धसे यांनी आपल्या हस्तकलेतून पैठणीच्या पदरावर स्वामी समर्थांची आकर्षक प्रतिमा विणली असून ही अनोखी पैठणी दुबईला पाठवण्यात आली आहे. या कलाकृतीमुळे येवल्याच्या पैठणी कलेची कीर्ती पुन्हा एकदा सातासमुद्रापार पोहोचली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top