icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

ठाणे महापालिका के नौ विभाग अध्यक्ष निर्वाचित; मुंब्रा में भगत की जीत

Thane, Maharashtra:Thane flash ठाणे पालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांवर अध्यक्ष विराजमान; मुंब्र्यात बिनविरोधची परंपरा खंडित,राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी... Anchor:- ठाणे महानगरपालिकेच्या नऊ प्रभाग समित्यांच्या अध्यक्षपदासाठीची निवडणूक मंगळवारी महापालिकेच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात पार पडली. या निवडणुकीत आठ प्रभाग समित्यांवर अध्यक्षांची बिनविरोध निवड झाली असून, मुंब्रा प्रभाग समितीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) दिपाली भगत विजयी झाल्या आहेत.ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांनी या निवडणुकीत पीठासीन अधिकारी म्हणून काम पाहिले. बिनविरोध निवडून आलेल्या अध्यक्षांमध्ये वागळे प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी एकता एकनाथ भोईर, लोकमान्य सावरकरनगर येथे निर्मला कणसे, नौपाडा-कोपरी येथे मिनल संख्ये, वर्तकनगर येथे जयश्री डेविड (गायकर), माजीवडा-मानपाडा येथे सिद्धार्थ ओवळेकर, उथळसर येथे नारायण पवार, कळवा येथे विजया लासे आणि दिवा प्रभाग समितीच्या अध्यक्षपदी दीपक जाधव यांचा समावेश आहे.मुंब्रा प्रभाग समिती अध्यक्षपदासाठी 'एमआयएम'चे अन्साशी नफीस अहमद आणि 'राष्ट्रवादी'च्या (शरद पवार गट) दिपाली भगत यांच्यात लढत झाली. यात दिपाली भगत यांना १०, तर अन्सारी यांना ४ मते मिळाल्याने भगत यांना विजयी घोषित करण्यात आले. या सर्व नवनिर्वाचित अध्यक्षांचा महापौर शर्मिला पिंपळोलकर, आमदार रवींद्र फाटक, आमदार राजेश मोरे आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
0
0
Report

पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील के निधन पर कोल्हापुर में राज ठाकरे ने श्रद्धांजलि दी

Kolhapur, Maharashtra:पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापुरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या ९१वर्षी निधन झाले. राजकारण, समाजकारण आणि शिक्षण क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणाऱ्या डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आज कोल्हापूरातील कसबा बावडा येथील त्यांच्या निवासस्थानी दाखल झाले. यावेळी त्यांनी डॉ. डी. वाय. पाटील यांच्या पार्थिवाचे अंत्यदर्शन घेत श्रद्धांजली अर्पण केली. तसेच काँग्रेस आमदार सतेज पाटील, डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय पाटील आणि इतर कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.
0
0
Report

भेसळ दूध पर कार्रवाई से ग्रामीण अर्थव्यवस्था में उछाल

Kolhapur, Maharashtra:राज्यात भेसळयुक्त दुधाविरोधात सुरू झालेल्या कठोर कारवाईचा सर्वात मोठा सकारात्मक परिणाम आता ग्रामीण अर्थकारणावर दिसू लागलाय. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या कारवाईनंतर ग्राहकांचा कल पुन्हा दर्जेदार आणि शुद्ध दुधाकडे वळला आहे. त्यामुळे चांगल्या प्रतीच्या दुधाची मागणी झपाट्याने वाढली आहे, इतकंच नाही तर दुधाळ म्हशी आणि गायींच्या किमतींमध्येही मोठी वाढ झाली आहे. भेसळीच्या दुधावर तुकाराम मुंढे याची कारवाई, शुद्ध दुधाची वाढली मागणी. दुधाळ जनावरांच्या किमतीत मोठी वाढ, दुग्ध व्यवसायाला नवी संजीवनी. मुऱ्हा आणि जाफराबादी म्हैशीच्या किमतीत तब्बल 40 ते 50 हजाराची वाढ. दुधाचे दर स्थिर राहिले आणि शुद्ध दुधाला अशीच मागणी कायम राहिली तर ग्रामीण भागात दुग्ध व्यवसाय पुन्हा एकदा फायदेशीर ठरू शकतो. अनेक तरुणही शेतीसोबत दुग्ध व्यवसाय सुरू करण्याचा विचार करत असल्याचं चित्र आहे. एका कारवाईमुळे फक्त भेसळ रोखली गेली असं नाही, तर संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेलाच नवं चैतन्य मिळालं आहे. पण त्याचा फारसा आर्थिक फायदा दूध उत्पादकांना होताना दिसत नाहीये, त्यामुळे दूध उत्पादक शेतकरी दुधाला भाव वाढवून देण्याची मागणी करत आहेत. जनावरांच्या खरेदी-विक्रीपासून पशুখाद्य, औषधे, वाहतूक आणि दुग्ध संकलन केंद्रांपर्यंत संपूर्ण साखळीला याचा आर्थिक लाभ होत आहे. परंतु प्रत्यक्षात फायदा शुद्ध दुधाची निर्मिती करणाऱ्याला झालेला दिसत नाही.
0
0
Report
Advertisement

91 वर्ष की आयु में डॉ. डी. वाय. पाटील का निधन; कोल्हापुर में अंतिम दर्शन और अंतिम संस्कार की तैयारी

Kolhapur, Maharashtra:देशातील शिक्षण क्षेत्राला नवी दिशा देणारे, ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, आणि माजी राज्यपाल पद्मश्री डॉ. डी. वाय. पाटील यांचे आज कोल्हापूरातील त्यांच्या निवासस्थानी वयाच्या 91 व्या वर्षी निधन झाले. शिक्षण, राजकारण, क्रीडा आणि सामाजिक क्षेत्रात त्यांनी दिलेल्या उल्लेखनीय योगदानामुळे त्यांची ओळख देशभर होती. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच सर्व स्तरांतून शोक व्यक्त करण्यात येत असून, त्यांच्या अंतिम दर्शनासाठी कोल्हापूरातील यशवंत निवास या निवासस्थानी नागरिक, विविध क्षेत्रांतील मान्यवर, राजकीय नेते, शिक्षण क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विद्यार्थ्यांनी मोठी गर्दी केली आहे. उद्या 5 ऑगस्ट रोजी सकाळी 11 ते सायंकाळी 4 वाजेपर्यंत यशवंत निवास, कसबा बावडा इथ त्यांच्या पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. त्यानंतर सायंकाळी 4 वाजाता अंत्ययात्रा निघणार असून, सायंकाळी 5 वाजता कोल्हापूरातील लाईन बाजार इथल्या डॉ. डी. वाय. पाटील मेडिकल कॉलेजच्या मैदानावर शासकीय इतमामात त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
0
0
Report

भारत में बच्चों के लिए अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड द्वारा स्वास्थ्य जोखिम: अमेरिकी अध्ययन

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:बाजारात लहान मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या अनेक पॅकेज्ड खाद्यपदार्थांबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अमेरिकेत करण्यात आलेल्या एका नव्या अभ्यासानुसार, ६ ते ३६ महिन्यांच्या मुलांसाठी विकल्या जाणाऱ्या तब्बल ८१ टक्के खाद्यपदार्थांचा समावेश 'अल्ट्रा-प्रोसेस्ड फूड' या प्रकारात होतो. एवढेच नव्हे, तर जवळपास निम्मे पदार्थ जागतिक आरोग्य संघटनेच्या (WHO) पोषण निकषांवरही अपुरे ठरले आहेत. हे संशोधन तूर्तास फक्त अमेरिकेत झाले असले तरी जगभरात असलाच प्रकार होत असल्याचे पुढं आलं आहे त्यामुळं हे पदार्थ तुम्ही खात असाल वा मुलांना देत असाल तर सावधान प्रोसेसस्ड अन्न पदार्थ खाताय सावधान प्रोसेसस्ड अन्न पदार्थमुळे अनेक आजारांना आमंत्रण लहान मोठे सगळ्यांना आजाराचा गंभीर धोका लहान मुलं पाकिटातील पदार्थ खातात आता घरोघरी प्रोसेस फूडचे पाकिटे येतात मात्र हे सगळे पदार्थ खायला जरी चांगले वाटले तरीसुद्धा हे तुमच्या आरोग्याला अपायकारक आहे सातत्याने या पदार्थांबरोबर जागरूकता केल्यावरही हे पदार्थ खाण्यात वाढ झाली आहे आणि त्यामुळे हे पदार्थ खाणे हा थेट जीवाशी खेळ असल्याचं आता पुन्हा एकदा नव्याने पुढे आलाय अमेरिकेतील टेक्सास राज्यातील ऑस्टिन शहरातील २१ किराणा दुकानांमधील २,७८३ पॅकेज्ड टॉडलर फूड उत्पादनांचा अभ्यास करण्यात आला. त्यामध्ये फळांचे पाउच, मॅकरोनी अँड चीज, ओट बार्स, चीज पफ्स, पीनट बटर पफ्स यांसारख्या उत्पादनांचा समावेश होता. संशोधनात काय आढळले? १७% उत्पादनांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त होते. २५% उत्पादनांमध्ये सोडियम (मीठ) अधिक होते. ११% उत्पादनांमध्ये चरबीचे प्रमाण शिफारशीपेक्षा जास्त होते. १२% उत्पादने आवश्यक ऊर्जा घनतेच्या निकषांवर अपयशी ठरली. अनेक पालकांचा असा समज असतो की लहान मुलांसाठी विकले जाणारे सर्व पदार्थ पोषणदृष्ट्या सुरक्षित असतात. मात्र प्रत्यक्षात तसे नसल्याने पॅकेजवरील घटक आणि पोषणमूल्यांची माहिती काळजीपूर्वक वाचणे अत्यंत आवश्यक आहे. तज्ज्ञांच्या मते, आयुष्याच्या पहिल्या एक हजार दिवसांतील आहार हा मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. या काळात जास्त साखर, मीठ आणि प्रक्रिया केलेले पदार्थ खाल्ल्यास भविष्यात आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याचा धोका वाढू शकतो. यामुळं लहान पानापासून मधुमेह, रक्तदाब असले आजार बळावत आहेत..", लठ्ठपणा आणि वजन वाढणे: अल्ट्रा-प्रोसेसेड अन्नामध्ये पोषकतत्त्वे अतिशय कमी आणि 'एम्प्टी कॅलरीज' जास्त असतात. यामुळे भूक पटकन भागते पण काही वेळातच पुन्हा भूक लागते, ज्यामुळे ओव्हरईटिंग होते. हृदयविकाराचा धोका: या पदार्थांमधील ट्रान्स फॅट्स आणि अतिप्रमाणातील मीठ मुळे रक्तातील वाईट कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब वाढतो. टाइप-२ मधुमेह : प्रोसेसेड पदार्थांमध्ये रिफाईन्ड साखर व मैद्याचा वापर जास्त असतो. यामुळे रक्तातील साखरेची पातळी अचानक वाढते व 'इन्सुलिन रेझिस्टन्स' तयार होतो. पचनसंस्थेचे आजार: प्रक्रिया दरम्यान अन्नातील नैसर्गिक फायबर निघून जातात. यामुळे बद्धकोष्ठता , ॲसिडिटी आणि आतड्यांचे आरोग्य बिघडणे यांसारख्या समस्या उद्भवतात. थकवा आणि मूड स्विंग्स: अशा अन्नामुळे शरीराला तात्पुरती ऊर्जा मिळते, पण थोड्याच वेळात ऊर्जेची पातळी खालावते . यामुळे दिवसभर आळस आणि थकवा जाणवतो. विशाल करोळे छत्रपती संभाजी नगर...
0
0
Report

अनिल देशमुख मामले में NIA चार्जशीट पर सवाल, परमवीर सिंह को नाम से बाहर रखने पर बहस

Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट - अनिल देशमुख, माजी गृहमंत्री - चार वर्षांपूर्वी मुकेश अंबानी यांच्या घरासमोर स्फ़ोटके बॉम्ब ठेवण्यात आले. त्यावेळी तपास केला. मी गृहमंत्री होतो. ATS ने जेव्हा तपास केला, त्यावेळी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मास्टरमाइंड असल्याचे आमच्या लक्षात आले. त्यानंतर त्यांनी माझ्यावर शंभर कोटींचे आरोप लावले. त्यानंतर हा तपास ATSकडून NIA कडे तपास गेला. NIAच्या तपासात अनेक पुरावे मिळाले. - मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांनीही बोलताना सांगितले की, NIA नेही परमवीर सिंग बाबत सर्व पुरावे असतानाही आरोपी केले नाही. मुंबई पोलीस आयुक्त असताना त्यांनी आपल्या कार्यालयातून कारस्थान केले. परमबीर सिंग यांच्या विरुद्ध इतके सारे पुरावे असतानाही... NIA ने चार्जशीट दाखल करताना आरोपी म्हणून परमवीर सिंग यांचं नाव नाही हे आश्चर्यकारक आहे? परमबीर सिंग यांच्यावर कोणाचा आशीर्वाद आहे? याचा तपास होणे आवश्यक आहे. - पोलीस घोटाळा.. समता नगर PS - अतिशय आश्चर्य वाटते की, अशा पद्धतीने पोलीस नसतानाही वेतन देण्यात आले. ही अत्यंत गंभीर प्रशासकीय बाब आहे. या संपूर्ण प्रकरणाची गृहखात्याने चौकशी केली पाहिजे. पोलीस खात्यात नसतानाही पगार देण्यात आला, याची सखोल चौकशी करून दोषींवर कारवाई झाली पाहिजे. पोलीस खात्यात भरतीसाठी आमचे तरुण मेहनत घेतात, परीक्षा देतात आणि नियुक्तीची वाट पाहतात. मोठ्या प्रमाणात नवीन भरतीची आवश्यकता आहे. अशा परिस्थितीत पोलीस नसतानाही पगार देण्यात आला असेल, तर त्याची चौकशी होऊन संबंधितांवर कठोर कारवाई झाली पाहिजे. - डी. वाय. पाटील यांच्या निधन (शोक संवेदना) - डी. वय. पाटील यांनी त्रिपुराचे आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल म्हणून काम केले. तसेच महाराष्ट्र विधानसभेत आमदार म्हणूनही त्यांनी काम केले. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षण क्षेत्रासाठी त्यांनी अतिशय महत्त्वाचे कार्य केले. महाराष्ट्राबाहेरही त्यांनी शैक्षणिक संस्थांचे जाळे उभे केले. डी. वाय. पाटील यांच्या निधनाबद्दल मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोकसंवेदना व्यक्त करतो.
0
0
Report
Advertisement

अभिजीत दीपके को Z+ सुरक्षा देने की मांग, हत्या के खतरे की आशंका

Nagpur, Maharashtra:अभिजीत दीपके यांना झेड प्लस सुरक्षा द्या.. त्यांचीही नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे सारखी हत्या होऊ शकते... राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांच्या कास्ट्राईब महासंघाने केली मागणी.... कॉक्रोच जनता पार्टी म्हणजेच सी जे पी चे संस्थापक अभिजीत दिपके यांच्या जीविताला धोका आहे... त्यांचीही डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते.. त्यामुळे त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी "महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघ"ने केली आहे.... अभिजीत दिपके फक्त शिक्षण क्षेत्रातील घोटाळे आणि भ्रष्टाचार बद्दल आवाज उचलत नाही आहे, तर ते शिक्षण क्षेत्रात अपेक्षित व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्नरत आहेत... यापूर्वीही ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रात व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न केले, त्यांची हत्या करण्यात आली डॉ. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखीच अभिजीत दिपके यांचीही हत्या होऊ शकते असं कास्ट्राईब कर्मचारी महासंघाचे म्हणणे आहे... त्यामुळे महासंघाने राष्ट्रपती तसेच महाराष्ट्राच्या गृह विभागाला पत्र पाठवून दिपके यांना झेड प्लस सुरक्षा देण्याची मागणी केली आहे... दिपके आज लाखो लोकांच्या अपेक्षांचे प्रतिनिधी बनले आहे... अशात त्यांची सुरक्षा महत्त्वाची असून दिल्लीतील जंतर-मंतरच्या आंदोलनानंतर त्यांना धमक्या मिळत आहे.. त्यामुळे सरकारने दीपके यांच्या सुरक्षिततेचा विषय गांभीर्याने घ्यावा आणि त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे विदर्भ अध्यक्ष अरुण गाडे यांनी केली आहे...
0
0
Report

कन्हान नदी में नागपुर महिला की मौत, प्रेमी दोस्त पर शक; आत्महत्या या हत्या?

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपुरातील एका महिलेचा मृतदेह कन्हान नदीच्या पात्रात आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत महिलेचे नाव अश्विनी उर्फ आशी डे असे आहे. तिचा मृत्यू आत्महत्येमुळे झाला की घातपात झाला, याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. मृत महिलेचा कन्हान येथील एका पुरुष मित्रासोबत वाद सुरू होता. या संदर्भात तिने यापूर्वी पोलिसांत तक्रारही केली होती. तसही, अमली पदार्थांशी संबंधित काही प्रकरणांमध्ये खबऱ्या म्हणून काम करत होती ..अशी माहिती समोर येत आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही. त्यामुळे आशीचा मृत्यू अपघाती, आत्महत्या की अन्य कोणत्या कारणामुळे झाला, याबाबत अद्याप कोणताही ठोस निष्कर्ष समोर आलेला नाही. मृत महिलेचा मोबाईल अद्याप सापडलेला नसून त्याचा शोध सुरू आहे. मोबाईल कॉल डिटेल्स, तिच्या संपर्कातील व्यक्ती तसेच इतर तांत्रिक बाबींची पोलिसांकडून सखोल तपासणी करण्यात येणार असून, या तपासातून महत्त्वाची माहिती समोर येण्याची शक्यता आहे.
0
0
Report
Advertisement

नदी में लोहे की साकव टूटने से बैल की मौत, 7 अन्य पशु घायल

Ratnagiri, Maharashtra:गुहागर-रत्नागिरी गुहागरात साकव कोसळून बैलाचा मृत्यू. सात जनावरे जखमी. ग्रामस्थांनी वाचविले. नदीवरील लोखंडी साकव तुटून त्याखाली ८ जनावरे अडकल्याची दुर्घटना गुहागर तालुक्यातील कुटगिरी गावठाण वाडी येथे घडली. या दुर्घटनेत दिलीप नारायण लिंगात यांच्या मालकीच्या एका बैलाचा मृत्यू झाला असून सात जनावरे जखमी झालीत. जखमी झालेल्या जनावरांना नदीतून बाहेर गावकाऱ्यांनी काढली. स्थानिक ग्रामस्थांच्या म्हणण्यानुसार हा लोखंडी साकव सुमारे १० ते १२ वर्षांपूर्वी उभारण्यात आला होता,काही दिवसांपूर्वी साकवाचे सर्वेक्षण करण्यात आले होते. नवीन साकवासाठी प्रस्ताव तयार करण्याचे काम सुरू असून अधिकाऱ्यांनीही पाहणी केली होती. ही दुर्घटना घडली त्यावेळी साकवावरून जनावरे जात होती. साकाव तुटल्याने सर्व जनावरे नदीत पडून साकवाखाली अडकली. नदीत मोठ्या प्रमाणात पाणी असल्याने तसेच sाकवाचे जड लोखंडी साहित्य जनावरंवर कोसळल्यामुळे बचाव कार्य करताना मोठ्या अडचणी निर्माण होत होत्या.
0
0
Report

बुजुर्गों को पुलिस अफसर दिखाकर लूटने वाला अंतरराज्यीय ठग गिरफ्तार

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:ANC : वृद्धांना पोलीस अधिकारी असल्याचे भासवून लुटणाऱ्या एका सराईत आंतरराज्यीय भामट्याला अटक करण्यात संभाजी नगर पोलिसांनी यश मिळवले आहे. आफताब ऊर्फ फईम अहमद शेख असे आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून तब्बल २६.५ तोळे सोने, चोरीची दुचाकी असा सुमारे २९ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आरोपीची ओळख पटवण्यासाठी गुन्हे शाखेच्या पथकाने तब्बल २५० सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे तांत्रिक विश्लेषण केले. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी आरोपीने पळून जाताना एकामागून एक तीन रिक्षा बदलल्या, मात्र अखेर पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या. आफताब हा अचूक मराठी बोलत असल्याने तो स्वतःला पोलीस अधिकारी असल्याचे सांगून वृद्धांचा विश्वास संपादन करायचा. टक्कल लपवण्यासाठी तो बनावट विग वापरत असे. 'तुम्हाला लॉटरी लागली आहे' किंवा 'मी पोलिस अधिकारी आहे' अशा थापा मारून तो एकटे असलेल्या वृद्धांकडील दागिने हातचलाखीने लंपास करत होता. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली असून, त्याच्याकडून आणखी गुन्ह्यांचा उलगडा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

चाकण MIDC सड़क दुर्घटना में महिला की मौत, चिखल पर बाइक फिसली, चालक फरार

Chakan, Maharashtra:चाकण MIDCच्या रस्त्यांचा आणखी एक बळी, रस्त्यावरील चिखलात दुचाकी घसरली अन अवजड वाहनाच्या चाकाखाली आल्यानं महिलेचा मृत्यू, अपघातानंतर चालक फरार चाकण पोलीस चालकाचा शोध घेतायेत. अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचं सानवी पांचाळ असं नाव असून त्यांचं वय 42 होतं. भोसरीतील इंद्रायणीनगर मध्ये राहणाऱ्या सानवी स्कोडा कंपनीत सिक्युरिटी म्हणून कार्यरत होत्या. ड्युटी संपवून त्या घरी निघाल्या होत्या. पावस सुरु असल्यानं चाकण midc मधील अंतर्गत सिमेंटच्या रस्त्यावर चिखल झाला होतं, यामुळं रस्ता निसरडा झाला होता. याचं मार्गावरून घरी निघाल्या सानवी यांची दुचाकी घसरली, गाडीचा तोल गेला अन त्या रस्त्यावर कोसळल्या. त्याचवेळी एक अवजड वाहन मागून येत होतं. काही कळायच्या आत सानवी अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली आल्या, या दुर्घटनेत त्यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघातानंतर चालक अवजड वाहनासह पसार झालाय, चाकण पोलीस चालकाचा शोध घेतायेत. या दुर्दैवी घटनेनंतर चाकण आणि midc अंतर्गत रस्त्यांच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. एकतर इथल्या मार्गावर खड्डयांनी साम्राज्य केलंय तर जिथं म्हणायला चांगले रस्ते आहेत, ते चिखलामुळं निसरडे झालेत. पाच फेजमध्ये विस्तारलेल्या चाकण midc मध्ये जगातील नामांकित कंपन्यांसह जवळपास दीड हजार कंपन्या आहेत. या कंपन्यांमध्ये रोज दहा लाखांहून अधिक कर्मचारी ये जा करतात. पण इथल्या रस्त्यांची अवस्था पाहता, त्यांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. सानवी यांच्या प्रमाणे अनेकांचे जीव याआधी ही गेलेत, अनेक कामगार जायबंदी ही झालेत. सरकारच्या तिजोरीत हजारो कोटींचा महसूल देणाऱ्या या चाकण midc मध्ये प्रशासन मूलभूत सुविधांची पुरवू शकत, ही मोठी शोकांतिका आहे. आता आणखी कोणाचा जीव जाण्याआधी सरकार आणि प्रशासनाला जाग येईल, अशी अपेक्षा आहे.
0
0
Report

शिर्डी में नकली खाते घोटाला: 60 करोड़ से अधिक लेन-देन, शाखा प्रबंधक गिरफ्तार

Shirdi, Maharashtra:भोंदू अशोक खरात याचे बनावट बँक खाते आणि आर्थिक व्यवहार प्रकरण...समता पतसंस्थेच्या राहाता शाखा व्यवस्थापकाला पोलिसांनी केली अटक...शिर्डी पोलिसांनी शाखा व्यवस्थापक मिलिंद बनकर याला केली अटक...समता पतसंस्थेत उघडली होती अशोक खरात नॉमिनी असणारी शंभर खाती...57 भक्तांची कागदपत्रे वापरून उघडली गेली 100 खाती...खात्यांवरून 60 कोटींहून अधिकचा व्यवहार...बनावट खाते प्रकरणात अशोक खरात आहे शिर्डी पोलिसांच्या ताब्यात...खरात पाठोपाठ राहाता शाखेच्या मॅनेजरलाही ठोकल्या पोलिसांनी बेड्या...मॅनेजरच्या अटकेने बनावट खाती आणि आर्थिक व्यवहार प्रकरणात आणखी खुलासे होण्याची शक्यता...
0
0
Report

शिरूर के अण्णापूर में यूरिया की दबी दरारें, किसानों की लंबी कतारें और तंगी

Shirur, Maharashtra:शिरूर तालुक्यातील अण्णापूर येथे युरिया खतासाठी शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या चित्र पाहायला मिळतंय. प्रशासनाच्या नियोजनशून्य कारभारामुळे ऐन शेतीच्या हंगामात खतांचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून, युरिया मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना तासन्‌तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागत आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्याने दुकानदारांना अखेर अर्धे शटर बंद करून व्यवहार करावे लागत आहेत. कृषी विभाग आणि प्रशासनाच्या या अकार्यक्षमतेमुळे बळीराजा कमालीचा हैराण झाला आहे. या संपूर्ण परिस्थितीवर सामाजिक कार्यकर्ते निलेश वाळुंज यांनी प्रशासनावर सडकून टीका करत तात्काळ खत पुरवठा करण्याची मागणी केली आहे
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top