445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
भरत गोगावले ने तटकरे के आवास पर गौरी गणपती दर्शन से डिप्लोमसी हवा बना दी
Chendhare, Maharashtra:राज्याचे फलोत्पादन मंत्री भरत गोगावले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देऊन गौरी गणपतींचे दर्शन घेतले. तटकरे कुटुंबीयांनी त्यांचा आदर सत्कार केला. यावेळी मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे आणि तटकरे कुटुंबीय उपस्थित होती. रायगड जिल्ह्यातील शिवसेनेचे पदाधिकारी सुनील तटकरे यांच्यावर सातत्याने टीका करत असताना भरत गोगावले यांच्या दर्शन डिप्लोमसीची सर्वत्र चर्चा आहे.0
0
Report
चंद्रपुर में तुकूम राजा गणेश मूर्ति: चावल-डाल से बनी अनोखी प्रतिमा
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूरच्या तुकूम परिसरात ‘तुकूमचा राजा’ म्हणून प्रसिद्ध असलेल्या श्री छत्रपती गणेश मंडळाने यंदा अनोख्या पद्धतीने गणरायाची मूर्ती साकारली आहे. कडधान्यांपासून तयार करण्यात आलेली ही मूर्ती भाविकांचे विशेष आकर्षण ठरत आहे. तांदूळ, चण्याची डाळ, साबुदाणा, मुगाची डाळ आणि शेंगदाणे यांचा वापर करून ही गणेशमूर्ती तयार करण्यात आली आहे. मंडळाचे हे पाचवे वर्ष असून, दररोज विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. श्री छत्रपती गणेश मंडळाच्या वतीने दरवर्षी गणेशोत्सवानिमित्त गणेशमूर्ती तयार करताना वेगवेगळ्या संकल्पनांचा वापर केला जातो. गणेशोत्सवानिमित्त दररोज मंडपात विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. अनोख्या संकल्पनेतून साकारलेला ‘तुकूमचा राजा’ यंदाच्या गणेशोत्सवाचे विशेष आकर्षण ठरत आहे.0
0
Report
चंद्रपूर में आकाशीय बिजली ने दो लोगों की मौत, एक महिला गंभीर रूप से घायल
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात आज आकाशीय वीजेने अक्षरशः कहर केला. पोंभूर्णा आणि मूल तालुक्यात घडलेल्या दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून दोन जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. तर एका महिलेला गंभीर दुखापत झाली आहे. पोंभूर्णा तालुक्यातील चेकठाणेवासना येथे शेतातून घरपरतत असताना केशव डोनु गुडी यांच्या अंगावर वीज कोसळली. या घटनेत त्यांचा मृत्यू झाला, तर त्यांच्या पत्नी वैशाली गुडी गंभीर जखमी झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. तर दुसरीकडे मूल तालुक्यातील उसराळा येथे शेळ्या चारण्यासाठी गेलेल्या ३५ वर्षीय दीपक नारायण मडावी यांच्या अंगावर वीज पडल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. अचानक आलेल्या वादळी पावसादरम्यान घडलेल्या या दोन्ही घटनांमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.0
0
Report
Advertisement
CNG सिलिंडर फटने से ट्रक जळकर खाक, गाव में डर का माहौल
Washim, Maharashtra:वाशिम: बिटोडा भोयर गावाजवळ CNG गॅस वाहून नेणाऱ्या ट्रकमधील सिलेंडरचा स्फोट होऊन ट्रक जळून खाक झाला. कारंजाहून वाशिमकडे येत असताना ही घटना घडली. स्फोटानंतर मोठा आवाज झाल्याने गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत चालकाला सुरक्षितस्थळी हलवलं. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मात्र ट्रकचं मोठं नुकसान झालं. ट्रकमध्ये CNG सिलेंडर असल्याने परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं. खबरदारी म्हणून रस्त्यावरील वाहतूक थांबवण्यात आली. दरम्यान, आग नेमकी कशामुळे लागली, हे अद्याप स्पष्ट झालं नाही.0
0
Report
कोकण में गौरी उत्सव: 87 वर्ष पुरानी परंपरा, डेरवण में भक्तिमय उत्सव
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. कोकणात माहेरवाशीण गौराईचे उत्साहात आगमन; डेरवणमध्ये गुरप कुटुंबीयांची दोन-दोन गौरी आणण्याची ८७ वर्षांची परंपरा!.. विघ्नहर्त्या गणरायाच्या आगमनानंतर कोकणात आज लाडक्या गौराईचे मोठ्या भक्तीभावात आणि उत्साहात आगमन झाले आहे.. पुढील तीन दिवस माहेरवाशीण म्हणून राहणाऱ्या महालक्ष्मीच्या स्वागतासाठी रत्नागिरीसह चिपळूण परिसरातील घराघरांमध्ये आकर्षक आरास आणि रोषणाई करण्यात आली आहे.. कोकणात कुठे एक तर कुठे दोन-दोन गौरी आणण्याची प्रथा पूर्वापार चालत आली आहे.. याच परंपरेनुसार डेरवण-सावर्डे येथील गिरीश गुरप यांच्या घरी तब्बल ८७ वर्षांची आणि चौथ्या पिढीची नवसाच्या दोन-दोन गौरी आणण्याची अनोखी प्रथा आजही मोठ्या भक्तिभावाने जपली जात आहे.. बाप्पाच्या आगमनानंतर चौथ्या दिवशी माहेरी आलेल्या या लाडक्या माहेरवाशिणीच्या आगमनाने संपूर्ण कोकणात चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे..0
0
Report
Modi के जन्मदिन पर महिला किसान प्रमाणपत्र पोर्टल का ऑनलाइन लॉन्च, भरणे ने कहा
Rui, Maharashtra:गणपती बाप्पाच्या चरणी कृषी मंत्र्यांचे काय साकडं. पंतप्रधान मोदींच्या वाढदिवशी राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलचं लॉन्चिंग. कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते झालं ऑनलाइन अनावरण. महिला स्वतःच्या पायावर उभ्या राहतील: मंत्री भरणे. राज्यातील शेतकरी अडचणीत, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी : मंत्री भरणे. नियम निकष बाजूला ठेवून शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहणार : मंत्री भरणे. राज्यात गणेशोत्सवाची धामधूम सुरू आहे. राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या निवासस्थानी बाप्पा विराजमान झालेत. विशेष म्हणजे मंत्री भरणे यांच्या निवासस्थानी महिला सशक्तीकरणावर आधारित माहिती देणारा देखावा उभारण्यात आलाय. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाचे निमित्त साधून राज्य सरकारच्या महिला शेतकरी प्रमाणपत्र पोर्टलच कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलेल आहे. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे मात्र सर्व निकष नियम बाजूला ठेवून हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा राहील असा विश्वास कृषी मंत्र्यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय त्यांच्याशी संवाद साधला आमचे प्रतिनिधी जावेद मुलाणी यांनी0
0
Report
Advertisement
रायगढ़ में गौरी का पारंपरिक आगमन, महिलाओं में उत्साह की लहर
Chendhare, Maharashtra:रायगढ़ जिल्ह्यात गौरीचे पारंपारिक पद्धतीने आगमन झाले आहे. ढोलताशांच्या गजरात गौरीचे जोरदार स्वागत करण्यात आले. महिलांनी गौरीचे सामूहिक पूजन करून तिचे स्तवन केले. गौरी आगमनाने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण आहे. कोकणात माळरानावरून तेरडा वनस्पतीच्या गौरी आणण्याची प्रथा आहे. गौरीचा मुखवटा परातीत घेऊन कुंकवाची पाच पावले उमटवत तुळशीपाशी तिची पूजा केली जाते. पानाफुलानी सजवून गौरीला आनंदाने घरात आणली जाते. यात गौरीची गाणी म्हणतानाचा व्हिडिओ देखील आहे.0
0
Report
गडचिरोली में सड़क न होने से गर्भवती आशा सेविका को खाट पर ले जाना पड़ा
Gadchiroli, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यात गर्भवती आशा सेविकेला 3 KM खाटेवरून नेले, एटापल्ली तालुक्यातील नैनगुडा गावात रस्ता नसल्याने या गर्भवतीला खाटेवरून रुग्णवाहिकेपर्यंत आणले, वाटेतच झाली प्रसूती0
0
Report
नागपुर में मोदी के जन्मदिन पर ‘आशीर्वाद का दीया’ कार्यक्रम
Nagpur, Maharashtra:नागपूर - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनानिमित्त देशभरात ‘आशीर्वाद का दीया’ अभियान. - राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरात कार्यक्रमाचे आयोजन. - नागपूरच्या अजनी मेट्रो स्टेशनवर अभियानाचा होणार कार्यक्रम होणार. - ५०० लाभार्थींच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात येणार. - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सार्वजनिक जीवनातील २५ वर्षांच्या सेवेला अभिवादन. - ‘सेवा संकल्प’ अभियानांतर्गत विविध सामाजिक आणि सेवाभावी उपक्रमांचे आयोजन. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह भाजपचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित राहणार. live फ्रेम मिळेल0
0
Report
Advertisement
कोकण बचाओ, प्रकृति बचाओ: वैजी में अम्ब्रे परिवार का पर्यावरण जागरूकता प्रदर्शन
Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. ‘कोकण वाचवा, निसर्ग वाचवा!’: चिपळूणच्या वैजी येथे आंब्रे परिवाराने साकारला पर्यावरण संवर्धनाचा जिवंत देखावा.. या देखाव्यात कोकणातील समृद्ध निसर्ग, डोंगर-दऱ्या आणि पारंपरिक घरांचे सौंदर्य दाखवतानाच वाढते प्रदूषण,जंगलतोड आणि निसर्गाच्या विनाशावर थेट भाष्य करण्यात आले आहे.. 'कोकण वाचवा, निसर्ग वाचवा आणि जैवविविधता जपा' अशी साद घालणारा हा पर्यावरणपूरक देखावा पाहण्यासाठी परिसरातील नागरिकांसह निसर्गप्रेमी मोठी गर्दी करत आहेत..0
0
Report
भरत गोगावले और चंद्रहार पाटील ने महेंद्र दळवी के निवास पर गणेश के दर्शन किए
Chendhare, Maharashtra:भरत गोगावले यांनी महेंद्र दळवी यांच्या घरच्या गणरायाचे दर्शन. पैलवान चंद्रहार पाटील यांचीही उपस्थिती. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी यांच्या निवासस्थानी विराजमान झालेल्या बाप्पाचे आज मंत्री भरत गोगावले और महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांनी अलिबाग येथे जाऊन दर्शन घेतले. यावेळी मंत्री भरत गोगावले आणि महाराष्ट्र डबल केसरी चंद्रहार पाटील यांचे शिवप्रतिमा देऊन आमदार दळवी यांच्या स्वागत केलं0
0
Report
दानापूर वान नदी के उत्खनन पर नोटिस, निधि से करोड़ों के अवैध काम का आरोप
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील दानापूर येथील वान नदी पात्रातून अकोला–खंडवा ब्रॉडगेज रेल्वे प्रकल्पासाठी सुरू असलेल्या मोठ्या प्रमाणावरील उत्खननाबाबत, सामाजिक कार्यकर्ते, जनहित व पर्यावरण विषय अभ्यासक रजनीश पोटे यांनी नुकतीच केंद्र व राज्य शासनाच्या सात प्रमुख अधिकारी व यंत्रणांना, मुख्य सचिव केंद्रीय पर्यावरण मंत्रालय दिल्ली, दक्षिण मध्य रेल्वेचे महाप्रबंधक व मुख्य अभियंता सिकंदराबाद, महाराष्ट्र शासनाचे जलसंपदा विभाग मुख्य सचिव मंत्रालय, जिल्हाधिकारी अकोला, कार्यकारी अभियंता पाटबंधारे विभाग अकोला व संबंधित रेल्वे कंत्राटदार यांना कायदेशीर नोटीस बजावली आहे. अकोला–खंडवा रेल्वे गेज परिवर्तन प्रकल्पांतर्गत, रेल्वे कंत्राटदाराने वान नदीतून "गाळ" (Ordinary Earth) काढून तो रेल्वे भरावासाठी वापरण्याचा प्रस्ताव, आपल्या Corporate Social Responsibility (CSR) निधीतून जलयुक्त शिवार , नदी खोलीकरण , पूर नियंत्रण इत्यादी नावाखाली "मोफत काम" करून देण्याच्या नावाखाली, जिल्हाधिकारी अकोला यांच्याकडे सादर केला होता. अकोला जिल्हाधिकारी यांनी 05 मे रोजी या प्रस्तावास मंजुरी देत, २,५६,७९५.२५ ब्रास (सुमारे ७ लाख २६ हजार ७३० घनमीटर) इतक्या प्रचंड प्रमाणात उत्खननास परवानगी दिली होती, मात्र संबंधित कॉन्ट्रॅक्टरने अवैधरित्या नदीतील वापरला असल्याचा आरोप करण्यात आला आहे. सर्वोच्च न्यायालयाचा निकाल डावलून, शासनाच्याच परस्परविरोधी नोंदीं आधारे कोट्यवधींचे नैसर्गिक संपत्ती खाजगी कंत्राटदाराला मोफत बहाल केल्याचा गंभीर आरोप रजनीश पोटे यांनी केला आहे.. राज्य आणि केंद्र सरकारने याचे दखल घ्यावी अशी मागणी याचिकाकर्ते ने केली आहे.0
0
Report
Advertisement
लातूर में भीषण जलसंकट: रातभर पानी के लिए लोग कतारों में
Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... रात्री एक वाजता पाण्यासाठी हंड्यांच्या रांगा... वडमुरांबी गावात भीषण जलसंकट... मराठवाड्यात सर्वाधिक पावसाची तूट असलेल्या लातूर जिल्ह्यात परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे... भर पावसाळ्यातच पिण्याच्या पाण्यासाठी गावकऱ्यांना रात्र जागून काढावी लागतेय... लातूर जिल्ह्यातील देवणी तालुक्यातल्या वडमुरांबी गावातील लोकांना रात्री उशिरापर्यंत पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे... पावसाळ्यातच पाण्यासाठी अशी वणवण करावी लागत असेल, तर येणाऱ्या उन्हाळ्यात परिस्थिती काय असेल, याची कल्पनाही करवत नाही... वडमुरांबी गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावातच पाणीसाठा शिल्लक नसल्याने गावकऱ्यांसमोर पाण्याचं गंभीर संकट उभं राहिलं आहे... त्यामुळे गावाला तातडीने टँकरद्वारे पाणीपूरवठा सुरू करावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून केली जात आहे.0
0
Report
चंद्रपूर जिले के नागभीड़ में धान उत्पादक किसान आक्रोश ट्रैक्टर मोर्चा; हजारों किसान ट्रैक्टर मोर्चा में शामिल हुए
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिले के नागभीड़ में धान उत्पादक किसान आक्रोश ट्रैक्टर मोर्चा; हजारों किसान ट्रैक्टर मोर्चा में शामिल हुए. धान को उचित भाव और बोनस मिलने की मांग के साथ नागभीड़ के किसानों ने आक्रोश का प्रदर्शन किया. तलोधी, नागभीड़ और ब्रह्मपुरी तालुकों के किसान बड़ी संख्या में आंदोलन में शामिल थे. आंदोलन के नेतृत्व में किसानों ने अपनी मागताओं के लिए जोरदार आक्रोश व्यक्त किया. किसानों को राहत मिले और शासन उनकी मागों पर तुरंत निर्णय ले.0
0
Report
शिरूर नगरपालिका विरोध में कर्मचारियों का अनिश्चितकालीन प्रदर्शन, वेतन व नियुक्ति की मांग
Shirur, Maharashtra:पुण्याच्या शिरूर नगर परिषदेतील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रश्नावरून मनसे आक्रमक झाली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेचे सभासदत्व स्वीकारल्याच्या रागातून ठेकेदाराने पूर्वसूचना न देता कामावरून काढून टाकल्याचा आरोप करत, या कामगारांनी नगर परिषदेसमोर बेमुदत धरणे आंदोलन सुरू केले आहे. अनेक वर्षांपासून स्वच्छता आणि घंटागाडीवर काम करणाऱ्या स्थानिक कामगारांना किमान वेतनापासून वंचित ठेवले जात असून, कामाच्या ठिकाणी अपमानास्पद वागणूक दिली जात असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. हक्काचे वेतन आणि कामावर पुन्हा रुजू करून घेईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा इशारा कामगारांनी दिला आहे.0
0
Report
Advertisement
