445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
रोहित पवार ने मुंबई आंदोलन पर सरकार को चेतावनी दी, मराठा आरक्षण पर नया संघर्ष शुरू?
Latur, Maharashtra:मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई आंदोलनावर आ. रोहित पवारांचा राज्य सरकारला सल्ला... मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत आंदोलन करण्याची भूमिका जाहीर केलीय... त्यामुळे सरकारसमोर पुन्हा एकदा मोठं आव्हान उभं राहिलंय...दरम्यान, जरांगे पाटील यांच्या मुंबई आंदोलनापूर्वीच सरकारने चर्चेतून मार्ग काढावा, असा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिलाय... लातूरमध्ये एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आक्रोश मोर्चानंतर रोहित पवार बोलत होते... अजूनही वेळ गेलेली नाही... सरकारने आजच मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन आपली भूमिका स्पष्ट करावी आणि चर्चेतून तोडगा काढावा, अशी मागणी रोहित पवार यांनी केलीय... जरांगे पाटील मुंबईत आंदोलनासाठी गेल्यास आंदोलकांसोबतच मुंबईतील सर्वसामान्य नागरिकांनाही अडचणींचा सामना करावा लागू शकतो... त्यामुळे परिस्थिती चिघळण्याआधीच सरकारने पुढाकार घेऊन चर्चा करावी, अशी भूमिका रोहित पवार यांनी मांडलीय...0
0
Report
सोलापूर के सांगोलात दुष्काळ में टेंभू योजना के अधिकारी उदासीन, लाखों लीटर पानी बर्बाद
Pandharpur, Maharashtra:सोलापूरच्या सांगोल्यात दुष्काळी परिस्थिती मात्र टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या उदासीनते मुळे लाखो लिटर पाणी वाया जात असल्याच वास्तव समोर आले आहे. सांगोला तालुक्यातील निजामपूर, अकोला वाटम्बरे लोणविरे जवळा गावातील शेतकऱ्यांना टेंभू योजनेचे पाणी आवर्तन सुरू आहे. टेल टू हेड असा पाणी वाटपाचा नियम असताना. काही शेतकऱ्यांनी योजनेचे व्हॉल्व तोडून पाणी घेतल्याने लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांच्या नियोजन शून्य कार्यपद्धती आणि उदासीनते मुळे ऐन दुष्काळ परिस्थितीत लाखो लिटर पाणी वाया जात आहे. टेंभू योजनेच्या अधिकाऱ्यांनी मात्र बघतो करतो अशी भूमिका घेतली आहे。0
0
Report
मोरबे डैम के पानी पर गणेश नाईक बनाम प्रशांत ठाकूर के बीच तकरार
Navi Mumbai, Maharashtra:मोरेबे धरणाच्या पाण्यावरून वनमंत्री गणेश नाईक आणि भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांच्यात जुंपली. मोरबेचे पाणी गणेश नाईकांनी आम्हाला देऊ नये पण नवी मुंबईकर गरजेपेक्षा जास्त पाणी वापरत आहेत असे सिडको म्हणत असेल तर जबाबदारी घेऊन पनवेलवासियांना पाणी उपलब्ध करुन द्यावे अन्यथा आम्ही राज्यसरकारकडे न्याय मागणार तसेच गणेश नाईक नवी मुंबईकरांच्या हिताचं बोलत असतील तर मी पनवेलकरांच्या हिताचं बोलणार अशी प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रशांत ठाकूर यांनी व्यक्त केलेय. तर याला वनमंत्री गणेश नाईक यांनी सडेतोड उत्तर देत अडचणीच्या वेळी टँकरने काही दिवस पाणी पुरवठा करू मात्र पाईपलाईनने पाणी देणार नाही असे ठामपणे सांगितलेय. तर पाण्याची पाईपलाईन पनवेल मधूनच जाते असे म्हणणाऱ्यांना देखील गणेश नाईकांनी सडेतोड उत्तर देत कुठल्याही सुशिक्षित माणसाची ही भाषा नाही अशी प्रतिक्रिया व्यक्त केलेय.0
0
Report
Advertisement
यवतमाळ: डीजे से स्वास्थ्य पर असर, राठोड ने डीजे बंदी के निर्देश दिए
Yavatmal, Maharashtra:डीजेच्या आवाजात नाचल्यामुळे आपल्याला ऐकायला कमी येत असल्याचं मंत्री संजय राठोड यांनी सांगितले आहे. यवतमाळ मध्ये शांतता समितीच्या बैठकीत त्यांनी सार्वजनिक उत्सव मंडळाच् पदाधिकाऱ्यांसमोर ही आपबीती सांगितली. मतदार संघात कार्यकर्त्यांनी डीजेच्या समोर नाचण्याचा आग्रह धरला, मात्र त्यामुळे ऐकायला कमी येऊ लागले असे संजय राठोड यांनी सांगितले. कानठळ्या वाजवणाऱ्या डीजेचे हे दुष्परिणाम आहेत, त्यामुळे आगामी सन उत्सवाच्या काळात कुठल्याही मंडळाने डीजे, बँजो वाजवला तर जप्त करा... डीजे सुरू ठेवण्याबाबत पोलिसांना कुठल्याही राजकीय भाऊ, दादांचा फोन आला तर पोलिसांनी दबावात न येता कारवाई करा....असे स्पष्ट निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले. कुठल्याही मंडळापर्यंत डीजे पोहोचण्याच्या आधीच नाकाबंदी करून डीजे जप्त करा, असे निर्देश पालकमंत्री संजय राठोड यांनी दिले.0
0
Report
मुंबई-गोवा मार्ग पर ट्रैफिक जाम के बीच सरकार ने राहत और सुविधाओं का दावा
Navi Mumbai, Maharashtra:आज सगळ्यात जास्त गाड्या आणि वाहतूक कोकणाकडे आहे. एसटीच्या 5200 गाड्यांची बुकिंग आहे रेल्वेची वेगळी आहे प्रायव्हेट गाड्या वेगळे आहेत स्वतःच्या गाड्या वेगळ्या आहेत आणि एवढी वाहतूक ज्या वेळेला एका रस्त्याला जाते त्यावेळेला थोडीफार होईल परंतु पूर्वीसारखी अडचण या वेळेला नाही आहे. आम्ही दहा ठिकाणी सुविधा केंद्र उभारले आहेत. जर कुठे ट्राफिक थांबली तर त्या ठिकाणी चहापाणी औषध आणि शौचालयाची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे कोणाची अडचण होणार नाही एवढी काळजी शासनाने आणि आम्ही घेतली आहे. मनोज जरांगे मुंबईला आले तरी काही हरकत नाही आणि नाही आले तरी काही हरकत नाही. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आम्ही सगळेच त्यांच्या ज्या काही योग्य मागण्या आहेत त्या देण्याला तयार आहोत. शासनाच्या माध्यमातून सरकार देऊ शकतं ते आम्ही द्यायला तयार आहोत. आता परवा गणेशोत्सव आहे सर्वत्र मंडप घातलेले असतात मोठ्या प्रमाणावर गर्दी असते हे पाहून मनोज जरांगे यांनी गणेशोत्सवात थोडं पाठीपुढे सरकावं. कोणावरही अन्याय न होता मराठ्यांना योग्य न्याय द्यायचा आहे तो देण्यासाठी आमचे सरकार कटीबद्ध आहे.0
0
Report
गणेशोत्सव के दौरान मुंबईकरों को कोई परेशानी नहीं होगी; मनोज जरांगे मुंबई नहीं आयें—उदय सामंत का आह्वान
Ratnagiri, Maharashtra:गणेशोत्सवात मुंबईकरांना अडचण नको; मनोज जरांगेंनी मुंबईत येऊ नये – उदय सामंत यांचे आवाहन.. मंत्री उदय सामंत pointer दापोली प्रकल्पाबाबत: दापोलीतील प्रकल्पाबाबतची प्राथमिक माहिती माध्यमांकडूनच समोर आली आहे.. हा प्रकल्प नेमका कधी, कुठे आणि कसा येणार आहे,याची सर्व तांत्रिक माहिती आधी तपासून घेतली जाईल आणि त्यानंतरच त्यावर अधिकृत भाष्य केले जाईल.. मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनावर: मनोज जरांगे पाटील यांना शासनाकडून यापूर्वीही वारंवार नम्र विनंती करण्यात आलेली आहे.. सरकार ज्या मागण्या मान्य करू शकत होते, त्या सर्व मागण्या मान्य करण्यात आलेल्या आहेत.. गणेशोत्सवाचे महत्त्व आणि कायदा-सुव्यवस्था: गणेशोत्सव हा केवळ राज्यातच नव्हे, तर संपूर्ण जगात आणि विशेषतः मुंबईत अत्यंत मोठ्या उत्साहात साजरा होणारा हिंदूंचा सण आहे.. अशा पवित्र सणाच्या काळात मुंबईकरांना किंवा भाविकांना कोणतीही अडचण किंवा त्रास होणार नाही,याची काळजी मनोज जरांगे यांनी घेतली पाहिजे; हीच सरकारची स्पष्ट भूमिका आहे..0
0
Report
Advertisement
अंधेरी के गणपति: अयोध्या जैसी झलक, भक्तों में उत्साह और सुरक्षा व्यवस्था
Mumbai, Maharashtra:अंधेरीचा राजा बाप्पाच्या मुखदर्शनासाठी भाविकांची गर्दी! अयोध्या नगरीचा भव्य देखावा ठरतोय आकर्षणाचं केंद्र मुंबईतील प्रसिद्ध अंधेरीचा राजा गणपती बाप्पाच्या मुखदर्शनाचा सोहळा आज मोठ्या उत्साहात पार पडला. यंदाच्या वर्षी अंधेरीच्या राजाचा मंडप चक्क अयोध्या नगरीच्या रूपात साकारण्यात आला आहे, प्रभू श्रीराम मंदिराची भव्य प्रतिकृती या ठिकाणी उभारण्यात आली आहे. अयोध्येतील राम मंदिराचं दर्शन घेता येत नसलेल्या गणेश आणि रामभक्तांसाठी अंधेरीच्या राजाच्या मंडपातच अयोध्येचा भव्य अनुभव देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे या देखाव्याने भाविकांचं विशेष लक्ष वेधून घेतलं आहे. विशेष म्हणजे अंधेरीच्या राजाच्या दर्शनासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही अनेक प्रसिद्ध अभिनेते आणि कलाकार स्वतःहून बाप्पाच्या दर्शनासाठी येणार आहेत. त्यांना कोणत्याही प्रकारचं निमंत्रण दिलं जात नसून, बाप्पावरील श्रद्धेपोटी कलाकार स्वतः दर्शनासाठी उपस्थित राहतात. दरम्यान, बाप्पाच्या दर्शनासाठी पूर्ण पोशाखात येण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. पुरुष हाफ पँट किंवा निकरमध्ये आल्यास त्यांना लुंगी देण्यात येते, तर महिलांनी दुपट्टा न घेतल्यास त्यांना दुपट्टा उपलब्ध करून दिला जातो. मात्र, कोणत्याही भाविकाला दर्शनापासून रोखलं जात नाही. ‘आपली संस्कृती जपा’, असं आवाहनही मंडळाकडून करण्यात आलं आहे. दुसरीकडे, सध्या एफडीएकडून खाद्यपदार्थांवर मोठ्या प्रमाणात कारवाई सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर अंधेरीच्या राजाच्या मंडपातही विशेष खबरदारी घेण्यात आली आहे. भाविकांना प्रसाद म्हणून केवळ शेंगदाणे आणि फुटाणे देण्यात येणार असून, भेसळयुक्त किंवा संशयास्पद कोणताही खाद्यपदार्थ देण्यात येणार नसल्याचं मंडळाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे भव्य अयोध्या नगरीचा देखावा, संस्कृती जपण्याचा संदेश आणि सुरक्षित प्रसादाची व्यवस्था, यामुळे यंदाचा अंधेरीचा राजा भाविकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे.0
0
Report
तिवरे डैम हादसे धरणग्रस्तों के लिए 33 घरों का लोकार्पण; अब तक 57 कुटुंब पुनर्वसन
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण/ रत्नागिरी तिवरे धरणग्रस्तांना ३३ घरांची भेट; पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण धरणग्रस्तांना घरांच्या चाव्या प्रदान; आतापर्यंत ५७ कुटुंबांचे पुनर्वसन रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील तिवरे धरण फुटून झालेल्या दुर्घटनेत २१ जणांचा मृत्यू झाला होता, तर अनेकांची घरे पाण्यात वाहून गेली होती. या दुर्घटनेतील धरणग्रस्तांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय महाराष्ट्र शासनाने घेतला. त्यानुसार आज शनिवारी उद्योगमंत्री तसेच रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ३३ घरांचे लोकार्पण करण्यात आले आणि धरणग्रस्तांना घरांच्या चाव्या प्रदान करण्यात आल्या. आतापर्यंत एकूण ५७ घरे धरणग्रस्त कुटुंबांना देण्यात आली आहेत. यावेळी आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण, माजी आमदार संजय कदम, रमेश कदम, सभापती सूर्यकांत घाडगे, शशिकांत चव्हाण, नगराध्यक्ष उमेश सकपाळ यांच्यासह लोकप्रतिनिधी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.0
0
Report
OBC आरक्षण खतरे में नहीं: माराठा आंदोलन ने नई मांग से किया इनकार
Nagpur, Maharashtra:बबनराव तायवाडे, अध्यक्ष, राष्ट्रीय ओबीसी महासंघ आज उन्होंने(माराठा आंदोलकांनी) तारीख जाहीर केली... संपूर्ण पत्रपरिषद मध्ये कोणतीच नवी मागणी केली नाही सरकारने जो मसुदा त्यांना दिला त्यामध्ये OBC समाजाच कोणतं नुकसान नाही.. सरसकट कुणबी प्रमाणपत्र देणार नसल्याच स्पष्ट केले आहे *त्यामुळे आम्ही कोणते आंदोलन करणार नाही*.. OBC च्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याकडे आमचे लक्ष आहे मुंबईत आणि कोकणात गणेशोत्सव फार मोठ्या प्रमाणात होतो.... अशा वेळी भाविक रस्त्यावर असतात अशा वेळी आंदोलक यांच्यामध्ये संघर्ष नको सर्वसामान्य नागरिकांच्या जनजीवनावर परिणाम नको0
0
Report
Advertisement
मराठा आंदोलन: अंतरवालीत से मुंबई तक शांतिपूर्ण मार्ग पर आंदोलन की तैयारी
Jalna, Maharashtra:जालना : जरांगे पाटील बैठक मुद्दे बैठक सुरू समाजाच्या हितासाठी सर्वांनी लक्ष ठेवा मुंबईत जायचं की अंतरवालीतच आंदोलन सुरु ठेवायचं, जरांगे यांचा सवाल मुंबईत आंदोलन करणार, जरांगे यांच्याकडून घोषणा कुणाला खुन्नस देण्यासाठी आपल्याला मुंबईत जायचं नाही. आपल्याला कुणी खुन्नस दिली तर त्याला खुन्नस देऊ नका, मुंबईत जाण्यासाठी मराठ्यांना 3-4 दिवस लागतील ज्याच्या गाडीत बसायला माणसं नाही ते एका दिवसात मुंबईत जाऊ शकतात, लक्ष्मण हाके यांना जरांगे यांचा टोला बिड जिल्ह्यातील पाटोदा येथे पहिला मुक्काम, दुसरा मुक्काम श्रीगोंदा अहमदनगर, तिसरा हडपसर येथे, चौथा मुक्काम खोपोली जी. रायगड, त्यानंतर आझाद मैदानावर पोहचणार, मुंबईत जाताना 4 ठिकाणी मुक्काम करणार मुक्काामाच्या ठिकाणावरील सर्व मराठ्यांनी कामाला लागावे-जरांगे जाण्याचा रूट अंतरवाली, बिड, पाली, मांजरसुबा, लिंबागणेश, पाटोदा, आंदोलना दरम्यान आम्हाला आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर या ज्या मराठा बांधवांकडे चारचाकी वाहनं आहे पण ते मुंबईत येऊ शकत नाही त्यांनीं त्या गाडी मुंबईला जाण्यासाठी मराठा आंदोलकांना द्यावी मुंबईत बेमुदत आमरण उपोषण करणार सर्व आंदोलकांनी एकाच रूटने मुंबईला जायचं आहे न्यायदेवता काल आपल्याकडून झाली. सरकारने आपल्यावर अन्याय करत ते न्यायदेवता करत नाही न्यायदेवता गोर-गरिबांच्या बाजूने असल्यामुळे न्यायदेवतेचा आपल्याला सन्मान करायचा आहे. अंतरवालीत निघाल्यापासून मुंबईत शेवटपर्यंत शांततेत आंदोलन करायचं आहे दगडफेक, धिंगाणा, जाळपोळ करायचा नाही न्यायदेवता आपल्या बाजूने झाल्यापासून माझं मन बदललं. न्यायाधीश न्यायदेवता चांगले वागतात. भलेही सरकार चांगलं वागत नसावे. कुणीही शांतता बाळगली नाही तर मी आंदोलन करणार नाही पोलिसांनी अंतरवाली ते मुंबई आम्हाला अडवायचं नाही. शांततेत जाऊन आम्हाला आंदोलन करायचं आहे. आम्हाला अडवून राज्य अस्थिर करू नका. पोलिसांनी अडवल्यास शांततेत पडून राहा देवेंद्र फडणवीस मराठ्यांना अडवू नका आमचा रोष अंगावर घेऊ नका, आम्हाला अडवल्यास मराठा मतदार तुमच्यापासून दूर जाईल काही कलेक्टर सरकारपेक्षा मोठे, असा फासा टाकीन की रडायला माणूस राहणार नाही, जालना जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांना ईशारा कायदेशीर आदेशानुसार आम्ही नियम पाळून आंदोलन करू, आमच्यावर अडवण्याची गरज नाही, आंदोलन मुंबईतच आणि शांततेच होणार आमच्या मागण्यां पूर्ण झाल्याशिवाय आंदोलन बंद होणार नाही शपथपत्राच्या आधारावर हैद्राबाद गॅझेटनुसार प्रमाणपत्र देता येत नाही असें अधिकारी शिबिरात संगतात मग शपथ पत्रानुसार जात प्रमाणपत्र देऊ असा जीआर का काढला? आरक्षण आंदोलन पूर्ण होऊ द्या, जैyekवाडीचं पाणी गावा गावात फिरवण्यासाठी आंदोलन करणार मराठा समाजाची एकी तुटू देऊ नका मराठा समाजाचं हे शेवटचं आंदोलन, सर्वांनी आशीर्वाद देण्यासाठी रस्त्यावर आंहो मराठ्यांची या लढ्यात हार होऊ देऊ नका मराठयांच्या शेवटच्या लढ्यात सहभागी व्हा मराठ्यांचा जगावर दबदबा निर्माण करा मराठ्यांची शेवटची लढाई सुवर्ण अक्षरांनी लिहिली जाणार, या लढाईचे साक्षीदार व्हा बिड जिल्हयातील सर्व मराठ्यांनी मुक्कामाच्या ठिकाणी कामाला लागावे मुंबईत मराठा बांधवांनी आपल्या आंदोलनाची तारीख सांगून आंदोलनाला परवानगी मिळवा पैशाची अडचण असेल तर कर्ज काढून मुंबईला येऊ नका आम्ही आंदोलन शांततेत करणार आमचे आंदोलक मुंबईत कुणालाही त्रास देणार नाही आमच्या पोरांना काही झालं तर अवघा महाराष्ट्र 10 मिनिटात बंद होईल. मुंबईत आंदोलकांना धक्का लावल्यास तालुक्याच्या ठिकाणी ठिय्या आंदोलन करा यावेळी महिला आंदोलक मुंबईत येणार आहेत. ज्या महिलांना यायचं त्यांनी अमृता ताईंच्या आणि लता ताईंच्या घरी जाऊन हळदी कुंकवाचा कार्यक्रम घ्या हे हळदी कुंकू त्यांना लावताना साहेबांना आरक्षण द्यायला सांगा असा निरोप त्यांना द्या फडणवीस शिंदेंच्या पत्नी घराबाहेर हळदी कुंकवाला आल्या नाही तर हे हिंदूंचे आहे की नाही असा प्रश्न निर्माण होईल-जरांगे महिला आंदोलक शिंदेंच्या लाडक्या बहिणी तर फडणवीस यांच्या लाडक्या दीदी आहेत फडणवीस शिंदे निबार माणसं,त्यांच्याकडे भरपूर माल,त्यांचा माल त्यांनी दुसऱ्याकडे ठेवायला दिलेला आहे मराठ्यांचं वादळ तसूभरही कमी होऊ देऊ नका पश्चिम महाराष्ट्र खान्देश विदर्भातील लोकांनी आमच्या मदतीला यावे वेळप्रसंगी आम्हीही तुमच्या मदतीला येऊ मुंबई मराठा आंदोलनासाठी ताकदीने कामाला लागा मुंबई आंदोलनासाठी आम्हाला आशीर्वाद द्यायला या.मि परत येईल की नाही मला माहिती नाही मि मेलो तरी चालेल मागे हटणार नाही पक्ष,नेता मोठे करू नका, समाज मोठा करा समाज मोठा आहे नेता नाही. समाजाला बाप माना नेता किंवा पक्षाला नाही आधी लेकरं मोठे करा नंतर पक्ष आणि नेत्याला मोठं करा तुमच्या संकट काळात तुमचा नेता कामाला येत नाही सगळ्या पक्षाच्या नेत्यांनी रस्त्यावर दिसावे,जो रस्त्यावर दिसणार नाही त्या नेत्याला मराठ्यांनी निवडणुकीत पराभूत करून टाकावे सातारा संस्थान गॅझेट सरकारने आश्वासन देऊनही वर्षभरापासून दिलं नाही.दुसरी संधी मे महिन्यात दिली. म्हणून आम्ही मुंबईत आंदोलनासाठी येत आहोत. तिसरी संधी या उपोषणादरम्यान 15 दिवसांची होती पण सरकारने गॅझेट लागू केले नाही त्यामुळे आम्ही मुंबईत येतोय आजपासून आम्ही मुंबईत येईपर्यंत आमचे प्रश्न मार्गी लावा ही तुमच्यासाठी संधी आम्ही मुंबईत येईपर्यंत देखील सरकारसाठी संधी 12 सप्टेंबर ते आमही मुंबईत येईपर्यंत मार्ग काढा,मग आम्ही मुंबईत येणार नाही.राष्ट्यानेही सरकार येऊ शकत पण मागण्यांपासून हटणार नाही मराठ्यांना अडवल्यास मराठा मतदान भाजपपासून बाजूला जाईल-जरांगे मराठ्यांच्या वाटेला जाल तर अख्ख्या जाती मराठ्यांच्या मदतीला येतील माझ्या आजूबाजूच्या लोकांची फडणवीस यांनी ईडी चौकशी लावली कुणाला तरी हाताशी धरून माझ्या आंदोलनाला पाठिंबा मिळू नये म्हणून माझ्या लोकांना ईडी नोटीस ईडीने अटक केले माझे लोक जेलमध्ये बसायला तयार फडणवीस यांच्याकडे गेलं की जेल नाही,नाही गेलं तर जेल आमच्या लोकांच्या ईडीकडे तक्रारी करणाऱ्यांच्या आणि त्यांच्या पाहुण्यांच्या आमचेही पोरं आता ईडीकडे तक्रारी करणार आहेत.मग पाहू ईडी त्यांची कशी चौकशी करत नाही ऑन बावनकुळे बावनकुळया कोणत्या जिल्ह्यात कामे झाली नाहीत.त्या जिल्ह्यात दारु कशी आहे हे आता आम्ही बघू,भुजबळ म्हणतो कलेक्टर नर्व्हस झाल्या हे भुजबळ यांना आणि बावणकुलेंना कसं माहीत.? बावणकुळ्या, तू कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नको बावणकुळेला सांगा,कलेक्टरला आमच्या अंगावर घालू नको,कलेक्टरला सांगतो तुमची इज्जत केली बावणकुळेच ऐकून गरिबांच्या अन्नात विष कालवण्याचं काम करू नका.जातीयवाद करू नका तुम्हाला जड जाईल.तुमचा सन्मान होईल असंच वागा,जनता ही नेते आणि अधिकाऱ्यांना बोलतच असतात कलेक्टर लिंगभेद, वर्णभेद करू नका.आम्ही देऊ शकत नाही हे सांगणे कलेक्टरचे काम नाही ते मुख्यमंत्र्यांचे काम आहे.मराठ्यांना सगळं दिलं हे सांगण्याच काम तुमचं नाही.मराठा समाजात इज्जत राहील असं वागा कायदा सुव्यवस्था अबाधित राहील असं वागा,आमच्यावर ताशेरे ओढाल तर तुमचा पुढचा काळ अवघड जाईल आंदोलन तारीख रॅली तारीख आणि रूट 14 तारखेला गणपती बसवा 15 सप्टेंबरहुन अंतरवालीतून मुंबईकडे निघणार 15 सप्टेंबर मुक्काम पाटोदा 16 सप्टेंबर श्रीगोदा 17 सप्टेंबर हडपसर 18 सप्टेंबर खोपोली 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार 15 सप्टेंबर मुक्काम पाटोदा 16 सप्टेंबर श्रीगोदा 17 सप्टेंबर हडपसर 18 सप्टेंबर खोपोली 19 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता आझाद मैदानात उपोषण सुरू करणार 15 सप्टेंबरला सकाळी 11 वाजता अंतर वालीतून मुंबईच्या दिशेने निघणार-जरांगे जरांगे सध्या सुरू असलेले उपोषण सोडणार नाही,उपोषण करतच मुंबईला जाणार,सध्या सुरु असलेले उपोषण थांबवले जाणार नाही मराठा बांधवांनी आवश्यक साहित्य सोबत घ्यावे,औषध गोळ्याही सोबत ठेवा आंदोलकांच्या आरोग्यासाठी मुक्काम ठिकाणी डॉक्टरांचे कॅम्प लावा मराठा बांधवांनी फक्त सेवा करा,जेवण द्या,वर्गणी कुणालाही देऊ नका मुंबई जाण्याचा रूट 15 सप्टेंबरला सकाळी 10 वाजता अंतरवालीतून निघणार मुक्काम बीडमध्ये पाटोदा येथे होणार 16 सप्टेंबरला मुक्काम श्रीगोंदा,अहिल्यानगर येथे होईल 17 सप्टेंबर पुणे जिल्ह्यातील हडपसर येथे मुक्काम 18 सप्टेंबरला रायगड जिल्ह्यातील खोपोली येथे मुक्काम होईल 19 सप्टेंबर ला आझाद मैदान मुंबई येथे सकाळी 10 वाजता आमरण उपोषण सुरू0
0
Report
सांगली के उमदी की कुएँ से पेट्रोल जैसा पानी निकलने से हलचल मच गई
Sangli, Maharashtra:दुष्काळी तालुक्यात जिथे पाण्यासाठी वणवण सुरू आहे, तिथे चक्क पेट्रोलची खाण लागली आहे, सांगलीच्या दुष्काळी उमदी येथे विहिरीतून पाण्यात चक्क पेट्रोलचा झरा लागला असून उमदीच्या विहिरीतून पेट्रोलसदृश पाणी बाहेर येऊ लागले आहे. विहिरीच्या पाण्यातून पेट्रोल सदृश्य वास येत होता, मात्र आता या विहिरीतून पेट्रोल सदृश पदार्थ बाहेर पडू लागला. शेताला पाणी सोडण्यासाठी मोटर चालवताना पाईप मधून पेट्रोल सदृश पदार्थ बाहेर पडला. ग्रामस्थांच्या मते विहिरीच्या पाण्यात पेट्रोलसदृश पाणी येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे; प्रशासन तपास चालू असून विहिरीच्या समोरच एक पेट्रोल पंप असल्याचे निदर्शनास आल्याने लिकेजचा शक्यता तपासली जात आहे.0
0
Report
गोकुळ दूध संघ चुनाव: राष्ट्रवादी बड़ा भाई बनकर सत्ता पाया क्या?
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने महायुतीतील राजकीय समीकरणांवरूनही दावे-प्रतिदावे सुरू झालेत. केंद्रात आणि राज्यात भाजप मोठ्या भावाच्या भूमिकेत आहेत. पण दुसरीकडे गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादीच मोठा भाऊ असल्याचं विधान मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलय. मुश्रीफ यांच्या या विधानामुळे गोकुळच्या सत्तेच्या राजकारणात महायुतीतील जागावाटपाचा फॉर्म्युला काय असणार, याची चर्चा सुरू झाली आहे. कोल्हापूरच्या राजकारणात गोकुळ दूध संघाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. गोकुळची सत्ता म्हणजे जिल्ह्याच्या राजकारणावर पकड. त्यामुळे गोकुळच्या निवडणुकीत प्रत्येक पक्षाकडून आपलं राजकीय वजन दाखवण्याचा प्रयत्न सुरू आहे…गोकुची निवडणूक जाहीर होताच प्रत्येक पक्षाच्या नेत्यांनी पायाला भिंगरी लावून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. या निवडणुकीत महायुती विरुद्ध आमदार सतेज पाटील यांची समविचार आघाडी अशी थेट लढत होण्याची शक्यता आहे. महायुतीमध्ये भाजप, शिवसेना, जनसुराज्य आणि राष्ट्रवादी हे चार प्रमुख घटक पक्ष आहेत. मात्र, गोकुळच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचं दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केलाय. राजकीय विश्लेषक गुरुबाळ माळी म्हणाले की राज्यात महायुती सरकारमध्ये भाजप सर्वात मोठा पक्ष, तर केंद्रातही भाजपच्या नेतृत्वाखालील सरकार आहे. अशा परिस्थितीत गोकुळमध्ये राष्ट्रवादी पक्ष मोठ्या भाऊच्या भूमिकेत असल्याचं हसन मुश्रीफ यांचे विधान गोकुळाच्या निवडणुकीत जागा वाटपात कोण वरचढ ठरणार हे अधोरेखित करतं... गोकुळच्या निवडणुकीत जागावाटपाचा प्रश्न महायुतीसमोर महत्त्वाचा ठरणार आहे. राष्ट्रवादीकडे गेल्या 5 वर्षाच्या काळातील गोकुळच्या राजकारणाचा अनुभव आणि मजबूत संस्थात्मक नेटवर्क आहे, तर भाजपकडूनही गोकुळच्या सत्तेत आपला वाटा वाढवण्यासाठी जोरदार प्रयत्न होण्याची शक्यता आहे. पण भाजप नेत्या आणि गोकुळच्या संचालिका Shau.mika Mahadik ने मात्र जागा वाटपाचा फॉर्मुला वरिष्ठ नेते बसून ठरवतील असं सांगत त्यावर अधिक भाष्य करणं टाळलं.0
0
Report
Advertisement
यवतमाळ के आकाश पलण में बेरिंग फँसने से महिला के बाल खिंचे, खोपड़ी घायल
Yavatmal, Maharashtra:Anchor : जत्रेत, मीना बाजार किंवा अम्युझमेंट पार्कमध्ये गेल्यावर आकाश पाळण्यात बसत असाल तर खबरदार, आकाश पाळणा किंवा कोणत्याही वेगवान चक्राकार फिरणाऱ्या पाळण्यांमध्ये 'बेरिंग' आणि 'गिअर्स' उघडे असतात. जेव्हा कोणी महिला मुलगी लांब केस मोकळे ठेवून झुल्यात बसते, तेव्हा हवेच्या वेगामुळे केस त्या फिरत्या भागांमध्ये अडकण्याचा मोठा धोका असतो. केस फिरत्या बेरिंगमध्ये अडकल्यास केस मुळासकट ओढले जातात, ज्यामुळे डोक्याची त्वचा सोलून निघण्याची अत्यंत वेदनादायक आणि भयानक दुर्घटना घडू शकते. VO 1 : यवतमाळच्या फुलसावंगी येथे आकाश पाळण्यात बसलेल्या महिलेचे केस पाळण्याच्या बेअरिंग मध्ये अडक्ल्याने तिच्या केसांसह डोक्याची चामडी निघाली. यात महिला गंभीर जखमी झाली आहे. बाली टाळीकोटे असे जखमी महिलाेचे नाव असून, ती पुणेश्वर मंदिर येथील यात्रेत गेली होती. तेथील आकाश पाळण्यात बसून ही महिला झोका घेत असताना तिचे केस पाळण्याच्या बेअरीिंगमध्ये अडकले, त्यामुळे तिचे केस डोक्याच्या चामडीसह ओढल्या गेले. या अपघातानंतर पाळणा थांबविण्यात आला, महिलेला उपचारासाठी पुसद येथे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. VO 2 : महिला आणि मुलींनी पाळण्यात बसण्यापूर्वी आपले केस व्यवस्थित आणि घट्ट बांधून घ्यावेत, केस मोकळे ठेवणे किंवा हवेत उडतील असे सोडणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. ओढणी, साडीचा पदर, स्कार्फ पाळण्याच्या बेरिंगमध्ये अडकणार नाहीत याची काळजी घ्या. पाळणा चालू असताना किंवा संथ गतीने फिरत असतानाही कधीही उतरण्याचा किंवा चढण्याचा प्रयत्न करू नका. आनंद घेण्यासाठी गेलेल्या ठिकाणी एका छोट्याशा निष्काळजीपणामुळे आयुष्यभराचे नुकसान होऊ शकते, त्यामुळे अशा ठिकाणी नेहमी सतर्क राहणे गरजेचे आहे.0
0
Report
उमदी के कुएं में पानी के साथ पेट्रोल-जैसा पदार्थ, ग्रामीणों में हड़कंप
Sangli, Maharashtra:स्लग - विहिरीच्या पाण्यात चक्क पेट्रोल !.पाण्याला उग्र पेट्रोलसदृश्य वास.. काडीपेटी ओढताच भडका ! अँकर - सांगलीच्या जत तालुक्यातील उमदी येथे एका शेतकऱ्याच्या विहिरीतून पाण्याबरोबर चक्क पेट्रोलसदृश्य द्रव बाहेर येत असल्याचा प्रकार समोर आला आहे. उमदी येथील दुंडाप्पा माळी यांच्या विहिरीच्या पाण्यात गेल्या वर्षभरापासून पेट्रोलसदृश्य वास येत असल्याचे सांगण्यात येत होत,मात्र काल सायंकाळी पाण्यावर पेट्रोलसदृश्य पदार्थचे तवंग स्पष्टपणे दिसून येत असल्याचे ग्रामस्थांच्या निदर्शनास आले. विहिरीतील पाणी शेतात सोडण्यात आले असता, पेट्रोलचा वास आणि तवंग मोठ्या प्रमाणात येऊ लागल्याने या ठिकाणी काही शेतकऱ्यांनी काडीपेटी ओढल्यावर आग लागल्याचा दावा ग्रामस्थांनी केला आहे.ज्या ठिकाणापर्यंत पाणी गेले होते, त्या भागातही आग लागल्याचे सांगण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच प्रशासनाकडून देखील घटनास्थळी धाव घेत नेमका हा प्रकार कशामुळे घडत असल्याचं तपासण्यात येत आहे. विहिरीच्या समोरच्या बाजूलाच एक पेट्रोल पंप पासून त्या ठिकाणाहून गळती होऊन विहिरीत पेट्रोल येत आहे,का याचा देखील शोध घेण्यात येत आहे.मात्र पाण्यासोबत पेट्रोल सदृश्य पदार्थ येऊ लागल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.0
0
Report
गणेशोत्सव से पहले फूलों के दाम तेज़ी से बढ़े, मार्केट में भीड़ बढ़ी
Kalyan, Maharashtra:गणेशउत्सवाच्या तोंडावर फुलांचे भाव वाढले.. फुलमार्केट मध्ये फुल घेण्यासाठी व्यापाऱ्यांची गर्दी.. गणेशोत्सवात विविध फुलांना मोठी मागणी असते. गणेशोत्सवामध्ये निमित्त मुंबईच्या दादर फुलमार्केट नंतर ठाण्यातील कल्याण फुलमार्केट मध्ये गर्दी पहायला मिळत आहे. गणेश उत्सव दोन दिवसांवर आल्याने फुलांचे दरात वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी झेंडू, शेवती, गुलाब, काकडा चे भाव कोसळले होते. मात्र गणेश उत्सवाला अवघे दोन दिवस राहिल्याने फुलांची मागणी वाढलीय. झेंडू 60 ते 70 रुपये शेवती 150, गुलाब 300 रुपये भाव वाढले आहेत तर उद्या आणखी भाव वाढण्याची शक्यता असल्याचं व्यापाऱ्यांनी सांगितले. यांचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी आतिश भोईर यांनी. कल्याण0
0
Report
Advertisement
