icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

उल्हासनगर में जात पंचायती के डर से महिलाओं पर अमानवीय मारपीट; केस दर्ज

Ambernath, Maharashtra:उल्हासनगर में जात पंचायती के विवाद के कारण परिवार के सदस्य महिलाओं को अमानुषिक मारहाण कर लाठियाँ और डंडों से पिटाई की गई, उनके बाल कापे गए और धिंड निकाल दी गई। इस प्रकरण में सात लोगों के खिलाफ मामला दर्ज किया गया है। CCTV फुटेज और वीडियो सोशल मीडिया पर वायरल हो रहे हैं। मंदिर प्रवेश को लेकर पहले से सामाजिक बहिष्कार किया गया था और आरोप लगाया गया कि वे “बुरे काम” करते हैं। परिवार के सदस्यों ने पुलिस थाने में शिकायत दर्ज करवाई, किन्तु रास्ते में ही मारहाण का सामना करना पड़ा। घटना के बाद इलाके में आक्रोश है और आरोपियों के विरुद्ध कठोर कार्रवाई की मांग उठ रही है; जात पंचायती पर कानून मौजूद होने के बावजूद ऐसी घटनाओं में कमी नहीं आ रही है।
0
0
Report

सातारा के माण-खटाव में पानी टंचाई पर किसानों का उग्र मोर्चा

Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील माण-खटाव तालुक्यात पाणीटंचाईच्या प्रश्नावरून शेतकरी आक्रमक झाले असून म्हसवडमध्ये शेकडो शेतकरी महिलांनी तीव्र आक्रोश मोर्चा काढला. सिद्धनाथ रथगृहापासून तहसील कार्यालयापर्यंत निघालेल्या मोर्चात प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. पाणी वाटपातील अन्याय, पाणी चोरी आणि पाटबंधारे विभागाच्या कथित संगनमताविरोधात आंदोलन करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते महेश करचे यांनी “पाणी घोटाळा करणाऱ्यांना जनता माफ करणार नाही,” असा इशारा दिला. आंदोलनानंतर काही शेतकऱ्यांनी रक्तदान करून “भले आमचं रक्त घ्या, पण आमच्या हक्काचं पाणी द्या,” अशी भावनिक प्रतिक्रिया व्यक्त केली. संबंधित अधिकाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणीही आंदोलकांनी केली आहे.
0
0
Report

चंद्रपुर जंगल में अवैध रेत तस्करी, हाईवा ने सांभर को गम्भीर चोटें दी

Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर जिल्ह्यात अनिर्बंध आणि अवैध रेती तस्करीचा कहर, जुनोना जंगलात रेतीभरल्या हायवाने दिली भल्या थोरल्या सांबर प्राण्याला धडक, सांबर गंभीर जखमी चंद्रपूर जिल्ह्यातील जुनोना जंगलात अपघाताचे सत्र सुरूच आहे. आज सकाळी 6 च्या सुमारास रेती वाहून नेणाऱ्या हायवा ट्रॅक ने सांबराला जोरदार धडक दिल्याने तो गंभीररित्या जखमी असून सतत रक्तस्त्रावं सुरु आहे. सांबराचा जबडा पूर्णपणे तुटला असून, उजवा पोटाचा मांडीचा भाग व मान पूर्ण रस्त्यावर घासून रक्तस्त्रावं सुरु आहे. गंभीर बाब म्हणजे सांबराचे मागचे दोन्ही पाय तुटले असून वाचण्याची शक्यता फार कमी आहे. पुढील उपचारासाठी त्याला ट्रांझीट ट्रीटमेंट सेंटर ला नेण्यात आले आहे. ही घटना कक्ष क्रमांक 488 मध्ये वनविकास महामंडळाच्या जंगलात घडली आहे.
0
0
Report
Advertisement

मराठा आंदोलन की अगली दिशा तय करने के लिए मनोज जरांगे की बैठक, प्रदर्शन तेज

Beed, Maharashtra:“मराठ्यांचा संयम संपला”; मनोज जरांगे यांच्या बैठकीसाठी बीडहून अंतरवलीकडे समाज रवाना..! ANC - मराठा आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी अंतरवली सराटी येथे महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी बीडमधील मराठा समाज बांधवांनी छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याला अभिवादन करून अंतरवली सराटीकडे रवाना झाले. यावेळी आंदोलकांनी सरकारला इशारा देत, “पुन्हा मनोज दादांना आंदोलन आणि उपोषणाची वेळ आणू नये, अन्यथा मराठा समाजाच्या रोषाला सामोरे जावे लागेल,” असे स्पष्ट केले आहे. आंदोलनानंतर मराठवाड्यासाठी काढलेल्या जीआरची अंमलबजावणी अद्याप झालेली नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. तसेच सातारा गॅझेट लागू झाले नाही, शिंदे समितीच्या नोंदी सापडूनही प्रमाणपत्र मिळत नसल्याने सरकारकडून मराठा समाजाची अडवणूक होत असल्याची भावना व्यक्त करण्यात आली. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जातात, मात्र अंमलबजावणी होत नसल्याने समाजात तीव्र नाराजी असून, गरज पडल्यास पुन्हा मुंबईत आंदोलन छेडण्याचा इशाराही आंदोलकांनी दिला. बाईट: गंगाधर काळकुटे, मराठा समन्वयक
0
0
Report

गंगूबाई गायकवाड़ ने बिबटिये के घर घुसने से बचाया; वन विभाग ने जेरबंद किया

Shirdi, Maharashtra:संगमनेर तालुक्यातील खरशिंदे गावातील 65 वर्षीय गांगुबाई गायकवाड यांच्या धाडसाची चांगलीच चर्चा होतयं। गंगुबाई सकाळच्या सुमारास घराच्या दरवाजाजवळ असणाऱ्या चुलीवर स्वयंपाक करत असताना अवघ्या काही फुटांच्या अंतरावरून बिबट्या थेट घरात शिरला। त्यावेळी मुलगा हरिभाऊ गायकवाड हे दरवाजालगत झोपलेले होते। गंगुबाई यांनी प्रसंगावधान राखत मुलाला बिछान्यासह बाहेर ओढले आणि मोठ्या चातुर्याने घराच्या दरवाजाला बाहेरून कडी लावली। घटनेची माहिती मिळताच वन विभागाचे पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले। बराच वेळ बिबट्या घरात इकडून तिकडे उड्या मारत वन कर्मचाऱ्यांना चकवा देत होता। वन विभागाने रेस्क्यू ऑपरेशन राबवत ग्रामस्थांच्या सहकार्याने बिबट्याला जेरबंद केले। या सर्व प्रसंगात 65 वर्षीय गांगुबाई गायकवाड यांनी दाखवलेल्या समयसूचकतेचे आणि धाडसाचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0
0
Report
Advertisement

मुंबई-गोवा हायवे पर टोल शुरू, स्थानीय विरोध के बीच टोल मुक्त प्रवास की मांग

Chendhare, Maharashtra:मुंबई गोवा महामार्गावर टोलवसुली सुरू ..... खारपाडा इथला पहिला टोलनाका सुरू ...... टोलवसुलीला कोकण वासियांचा विरोध ...... महामार्गाचे काम पूर्ण झालेले नसताना टोल आकारणीला कोकण वासियानी विरोध करायला सुरुवात केली आहे. विशेषतः स्थानिकांना विश्वासात घेता टोलनाका सुरू करण्यात आल्याने नाराजी आहे. स्थानिक वाहनांना टोलमुक्त प्रवास करता आला पाहिजे अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. ३१ मे पर्यंत मुंबई गोवा महामार्ग १०० टक्के पूर्ण होईल असं आश्वासन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे. परंतु सद्यस्थिती पाहता हे आश्वासन पूर्ण होईल असं दिसत नाही. असं असताना टोलवसुली कशासाठी असा सवाल उपस्थित केला जात आहे. महामार्ग प्राधिकरणाच्या धोरणाविरोधात कोकण वासियांना मध्ये नाराजी असून लोकप्रतिनिधींनी यात लक्ष घालावं अशी मागणी होत आहे.
0
0
Report

ईंधन संकट के बीच EV कारों की मांग बढ़ी, शहरों में बुकिंग तेज

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:इंधनाची टंचाई भाव वाढ, आणि इ व्ही वापरायचे आवाहन यामुळं आता EV गाड्यांची मागणी प्रचंड वाढलीय, छत्रपती संभाजी नगर शहरात ज्या शो रूम मधून एक गाडी दिवसाला जायची तिथं आता 5 गाड्या जाताय, EV लोकांनी घ्यावी म्हणून मार्केटिंग टीम ला लोकांना राजी करावे लागे मात्र आता लोकच माहिती घेताय असे चित्र EV विक्रेते अनुभवताय, ज्या शहरात महिन्याला अवघ्या 30 EV विकल्या जायचा तो आकडा आता 200 वर गेलाय, बुकिंग वाढली आणि आता गाड्यांसाठी वैटिंग आली, असे विक्रेते सांगताय, EV च्या चारचाकी आणि दुचाकी दोन्ही गाड्यांसाठी हीच अवस्था आहे.. त्यामुळे इंधनाची टंचाई आणि EV वापरण्याच्या आवाहनानंतर EV गाड्यांना आणि त्याच्या विक्रेत्यांना चांगले दिवस आले असे म्हणता येईल..
0
0
Report

यवतमाल पेट्रोल पंप पर दंपति को टिपर से धक्का, दोनों घायल

Yavatmal, Maharashtra:पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन पेट्रोल भरण्यासाठी आलेल्या पती-पत्नीला एका टिप्पर ने धडक दिली जात दोघेही जखमी झाले आहेत. यवतमाळच्या लाडखेड येथील रेणुका पेट्रोल पंपावर. सीसीटीव्ही मध्ये अपघाताची दृश्य चित्रित झाली आहे. मोरगव्हाण गावातील सुलभा व एकनाथ राठोड हे दाम्पत्य पेट्रोल पंपावर दुचाकी घेऊन आले. पेट्रोल भरल्यानंतर डोक्याला दुपट्टा बांधत असताना तेथे आलेल्या दोघांनाही टिप्परने धडक दिली, ज्यात सुलभा राठोड यांच्या पायाला गंभीर दुखापत झाली आहे. त्यांना पुढील उपचारासाठी नागपूर येथे हलविण्यात आले.
0
0
Report
Advertisement

चंद्रपूर नगर निगम में जनगणना घोटाले में 15 कर्मचाऱ्यां पर मामला, भद्रावती बीएलओ पर कार्रवाई

Chandrapur, Maharashtra:टायटल:--- चंद्रपूर शहर मनपा हद्दीत जनगणना कामात हयगय करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल, भद्रावती येथे बीएलओ देखील कारवाईच्या कक्षेत अँकर:-- जनगणना कामात हयगय करणाऱ्या 15 कर्मचाऱ्यांवर चंद्रपूर शहर मनपा हद्दीत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. याशिवाय भद्रावती तालुक्यात एका बीएलओ वर देखील प्रशासकीय कामात ढिसाळपणा दाखवण्याच्या मुद्द्यावरून गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यामुळे एकीकडे प्रशासन ॲक्शन मोडवर असल्याचे स्पष्ट होत आहे तर जनगणनेच्या कामात कुचराई करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे धाबे दणाणले आहेत. चंद्रपूर शहर मनपाच्या सहाय्यक आयुक्तांनी यासंदर्भात तक्रार दिली असून यातील सर्वाधिक कर्मचारी सोमय्या पॉलिटेक्निक या संस्थेचे आहेत. भद्रावती तालुक्यातील शिक्षक धनराज मगरे यांच्यावर बीएलओ म्हणून जबाबदारी होती. मात्र त्यांनी हे काम टाळले. यासंदर्भात त्यांना कारणे दाखवा नोटीस देखील देण्यात आली होती मात्र त्यानंतरही कुठलाही समाधानकारक उत्तर न मिळाल्याने ही कारवाई करण्यात आली
0
0
Report
Advertisement

परतवाड़ा के आठवड़ी बाजार में शॉर्ट-सर्किट से बीयर शॉप में आग, लाखों का नुकसान

Amravati, Maharashtra:परतवाडा येथील आठवडी बाजार परिसरातील बिअर शॉपीला शॉर्टसर्किटमुळे भीषण आग; आगीने व्यापाऱ्यांचे लाखोंचे नुकसान आगीची माहिती मिळताच अचलपूर नगरपालिकेच्या अग्निशमन विभागाने तातडीने धाव घेत आग नियंत्रणात आणली आहे. अग्निशमन दलाच्या प्रयत्नांमुळे आग इतर दुकानांमध्ये पसरण्यापासून रोखण्यात यश आले असून या आगीत दुकान संचालक जयस्वाल आणि सुरेश वाधवानी यांचे लाखोंचे आर्थिक नुकसान झाले असून व्यापाऱ्यांनीही आग विझविण्यासाठी मदत केली आहे. सुदैवाने या आगीत कुठलीही जीवित हाणी झाली नाही.
0
0
Report

बोरगांव में बिबटिए के हमले से पांच भेड़ें मौत, किसान भयभीत

Sangli, Maharashtra:स्लग - बोरगावात बिबट्याचा थरार.. बिबट्याच्या हल्ल्यात पाच शेळ्यांचा जागीच मृत्यू.. अँकर :- सांगलीच्या वाळवा तालुक्यातील बोरगाव येथे हल्ल्यात पाच शेळ्या जागीच ठार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.बोरगाव येथील शेतकरी लहू सलगर यांच्या शेतात रात्रीच्या वेळी मेंढ्या व शेळ्यांचा कळप बसवण्यात आला होता. रात्री २ वाजण्याच्या sुमारास दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक या कळपावर हल्ला चढवला.बिबट्याचा हा हल्ला इतका भयानक होता की,यात निपाणी येथील मेंढपाळ संजय हजारे यांच्या २ कोकरू आणि ३ मेंढ्या अशा एकूण ५ जनावरांचा जागीच मृत्यू झाला. हल्ल्यानंतर परिसरात जनावरांची मोठी पळापळ झाली.या थरारक घटनेमुळे संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून, वारंवार होणाऱ्या वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे शेतकऱ्यांमधून तीव्र संताप व्यक्त होत असून वनविभागाने तात्काळ नुकसान भरपाई देऊन बिबट्याचा बंदोबस्त करावा,अशी मागणी करण्यात आली आहे.
0
0
Report

प्रशांत बंब का इंधन बचत प्लान: ग्रामीण कर्मचारियों को मुख्यालय में रहने की सलाह

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:देशात राज्यात सगळीकडे सध्या इंधन वाचवा असे आवाहन केल्या जातंय, त्यात भाजप आमदार प्रशांत बंब यांनीच इंधन अपव्यव बाबत एक गंभीर मुद्दा उपस्थित केलाय. ताफ्यातील वाहने इतर गोष्टी करून थोडी बहुत बचत होईल मात्र मात्र ग्रामीण भागात काम करणारे कर्मचारी मुख्यालयी राहिले तर कोट्यवधींचे शेकडो लिटर इंधन वाचेल असे त्यांच्या म्हणणे आहे.. प्रशांत बंब छत्रपती संभाजी नगरातील गंगापूर चे आमदार आहेत त्यांच्या मतदार संघात 1600 वर शिक्षक, 300 वर आरोग्य कर्मचारी, ग्रामसेवक, तलाठी, असे 2300 वर कर्मचारी आहेत हे सगळे शहरात राहतात आणि कामांसाठी अप डाउन करतात, नियमानुसार या कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे असे नियम आहे त्याची तर सर्रास पायमल्ली होत असल्याचं बंब म्हणतात, किमान या कठीण काळात हे सगळे कर्मचारी मुख्यालयी राहिले तर इंधन बचत होईल असे बंब सांगताय.. एक तालुक्यत 2300 म्हणजे जिल्ह्यातील 9 तालुक्यत 21 हजार वर कर्मचारी आणि हेच गणित राज्यावर लावले तर हा आकडा शेकडो कर्मचारी कोट्यवधी पैसे, आणि लाखो लिटर इंधन पर्यंत जातोय, त्यामुळे सत्ताधारी आमदारांचा हा प्रस्ताव बाबत राज्य सरकार काही निर्णय घेईल का याचीच चर्चा आहे...
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top