icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

अमरावती के मोर्शी में आंधी-बारिश से संतरे और गेहूं समेत फसलें बर्बाद

Amravati, Maharashtra:अमरावतीच्या मोर्शी तालुक्याला अवकाळी पावसासह गारपिटीचा फटका; वादळी वाऱ्याने संत्र्याची झाडे पडली ऊन-मळून, गहू, कांदा आणि संत्राच नुकसान अमरावती जिल्ह्यात काल मध्यरात्री मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने हजेरी लावली असून मोर्शी तालुक्याला मोठ्या प्रमाणात गारपिटीचा फटका बसला आहे. मोर्शी तालुक्यातील नेरपिंगळाई मोठ्या प्रमाणात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली या वादळी वाऱ्यामुळे संत्रा बागेतील संत्र्याची झाडे ऊन-मळून पडली असून शेतात काढून ठेवलेला गहू उन्हाळी कांदा आणि संत्रा च नुकसान झालं आहे. दरम्यान अचानक आलेल्या या अवकाळी पावसामुळे बळीराजा पुन्हा हवालदिल झाला असून सरकारकडे मदतीची आस लावून बसला आहे.
0
0
Report

रेड्स ऐप से नागपुर के अज्ञात शव की पहचान सिर्फ दो घंटे में

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप'चा डंका!.. नागपुरातील 'त्या' अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटली... अँकर तंत्रज्ञानाच्या जोरावर गुन्हेतपासाला वेग देणाऱ्या रत्नागिरी पोलिसांच्या 'रेडस् ॲप' (REDS App) ने पुन्हा एकदा आपली उपयुक्तता सिद्ध केली आहे.या ॲपच्या मदतीने नागपूर पोलिसांनी एका अज्ञात मृतदेहाची ओळख अवघ्या दोन तासांत पटवून गुन्हे तपासात मोठी यश मिळवले आहे.. नागपूरच्या वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका जंगलात विद्रूप अवस्थेत मृतदेह सापडला होता.ज्याची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान होते.. रत्नागिरीचे पोलीस अधीक्षक नितीन बगाटे यांच्या कल्पकतेतून तयार झालेल्या 'रेडस् ॲप'ची मदत घेतली गेली.यातील एआय तंत्रज्ञानाद्वारे विद्रूप चेहऱ्याचे डिजिटल पुनर्निर्माण करण्यात आले.. या प्रक्रियेनंतर तयार झालेल्या अचूक छायाचित्रामुळे त्या व्यक्तीची ओळख पटली.. रत्नागिरी पोलिसांचे हे तंत्रज्ञान आता महाराष्ट्र पोलीस दलासाठी खऱ्या अर्थाने वरदान ठरताना दिसत आहे.. रत्नागिरी पोलिसांच्या या तांत्रिक यशाचे सध्या सर्वत्र कौतुक होत आहे..
0
0
Report

रत्नागिरी के परशुराम घाट पर कार दुर्घटना, नाशिक के पर्यटक की मौत, तीन घायल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. परशुराम घाटात कारचा भीषण अपघात; नाशिकच्या पर्यटकाचा मृत्यू, तिघे गंभीर! रत्नागिरी जिल्ह्यातून एक मोठी आणि दुर्दैवी बातमी समोर येत आहे. मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील परशुराम घाटात मध्यरात्री एका कारचा भीषण अपघात झाला आहे..पर्यटनासाठी गणपतीपुळे येथे जात असताना, चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटलं आणि कार थेट रस्त्याच्या कडेला जाऊन पलटी झाली. या अपघातात नाशिकच्या रोहित संतोष भालेकर या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. कारमधील इतर तिघेजण गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर चिपळूणच्या लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. नाशिकमधील कांची येथील हे सर्व पर्यटक कारने गणपतीपुळ्याला जात होते. परशुराम घाटात चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बचावकार्य राबवले.. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास खेड पोलीस करत आहेत.
0
0
Report
Advertisement

सातारा: जिल्हा परिषद अध्यक्ष चयन के दौरान पुलिस ने पत्रकारों को रोका

Satara, Maharashtra:सातारा - आज देखील जिल्हा परिषद सभापती निवडीवेळी सातारा पोलिसांची आडमुट भूमिका पहायला मिळत आहे. सभापती पदाचा वृत्तंकनासाठी जाणाऱ्या पत्रकारांना जिल्हा परिषदेच्या इमारती पर्यंत देखील जाऊ दिले जात नाही. मागे 20 मार्च ला देखील जिल्हा परिषद अध्यक्ष ,उपाध्यक्ष निवडी वेळी देखील याच पद्धतीने पोलिसांनी आडमुठ भूमिका घेतल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई आणि मंत्री मकरंद पाटील यांना पोलिसांकडून धक्काबुक्की झाली होती. वास्तविक पाहता वृत्तांकना पासून पोलिसांनी पत्रकारांना रोखने इतपत योग्य आहे असा सवाल उपस्थित केला जातो आहे. याचाच आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी तुषार तपासे यांनी...
0
0
Report
Advertisement

वाशीम में गारपिट से टरबूज व कांदों की फसलें भारी नुकसान

Washim, Maharashtra:वाशीम जिले में काल झालेल्या गारपिटाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. वाशीम तालुक्यातील केकत उमरा येथील शेतशिवारात बिजवाई कांदासह टरबूज पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. विक्रीसाठी तयार असलेली टरबूज पिके गारांच्या तडाख्याने फुटली असून, शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. आधीच वाढलेला उत्पादन खर्च आणि बाजारातील अनिश्चित दर यामुळे शेतकरी अडचणीत असताना या गारपिटिने संकट अधिकच गडद केले असून प्रशासनाने तात्काळ पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी अशी मागणी होत आहे.
0
0
Report

बीड़ के केज क्षेत्र में गारपात के साथ आंधी-बारिश, तेलंगाना में भी तूफानी मौसम

Beed, Maharashtra:बीड: केज परिसरात गारपीट तर, तेलगाव मध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी ANC - बीडमध्ये पुन्हा अवकाळी पावसाने झोडपले आहे. केज परिसरात वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झालाय. त्याचबरोबर तेलगाव परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांची धांदल उडालेली दिसून आलीय. गेल्या काही दिवसात होत असलेला अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकऱ्याच्या तोंडाशी आलेले अनेक पिकं गेल्याचं पाहायला मिळाले.प्रामुख्याने यामध्ये आंबा,गहू ज्वारी यास भाजीपाल्याचाही समावेश आहे. त्यामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडलाय.
0
0
Report
Advertisement

दिंडोरी कुएं में गाड़ी गिरने से 9 मौत, नातेवाईकों ने मालिक खिलाफ कार्रवाई मांग

Nashik, Maharashtra:विहिरी मालकावर कारवाई करा मृत्यू झालेल्या नातेवाईकांचे मागणी नाशिकच्या दिंडोरी मधील शिवाजीनगर परिसरात असलेल्या एका विहिरीत चार चाकी वाहन पडून नऊ जणांचा दुर्दैवी मृत्यू झालाय... ह्या मृत्यूमुळे दिंडोरी तालुक्यात हळहळ व्यक्त करत केलीये... चौफुलीत असलेल्या विहिरी भोवती कुठल्याही कडे बांधलेले नाहीत, जाळी बांधलेली नाही आणि कुठला ही बोर्ड ही लावलेला नाही... यामुळे नातेवाईकांनी विहिरी मालकावर आणि नगरपंचायतीवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे... गेल्या अनेक वर्षांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडल्या असून यावर दुर्लक्ष केलं जात असल्याचा आरोप देखील नातेवाईकांनी केलाय... यामुळे विहिरी मालकावर कारवाई करावी अशी मागणी नातेवाईक केलीये... यासंदर्भात अपघातात मृत्यू झालेल्या नातेवाईकांशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी....
0
0
Report

रत्नागिरी में लक्ष्मी ऑरगॅनिक के खिलाफ महाआंदोलन, PFAS विरोधी मार्च 6 अप्रैल

Ratnagiri, Maharashtra:रत्नागिरी.. लोकेशन - midc lote रत्नागिरीत पेटणार संघर्षाची मशाल!.. 'लक्ष्मी ऑरगॅनिक'विरोधात ६ एप्रिलला धडकणार महामोर्चा.. अँकर.. खेड तालুক्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमधील 'लक्ष्मी ऑरगॅनिक' कंपनीविरोधात आता जनक्षोभ उसळला आहे..मानवी आरोग्याला घातक असणाऱ्या PFAS उत्पादनाविरोधात येत्या ६ एप्रिलला एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. कोकण नागरी संघर्ष समिती आणि लोटे पंचकोशी पर्यावरण समितीच्या नेतृत्वाखाली हा लढा पुकारला गेला आहे.. केवळ रत्नागिरीच नव्हे, तर शेजारील जिल्ह्यांतील विविध संघटना आणि नागरिक या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.. महत्त्वाची बाब म्हणजे, केंद्रातील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनीही आपल्या पदाधिकाऱ्यांना या मोर्चाला पाठिंबा देण्याच्या सूचना केल्याचे समितीकडून सांगण्यात आले आहे.. Bt उपोषणकर्ते.. Vs दिपक पाटील ( लक्ष्मी ऑरगॅनिक कंपनीचे वरिष्ठ उत्पादन विभाग उपाध्यक्ष)..
0
0
Report
Advertisement

अवकाली बारिश ने लातूर के टमाटर किसान बर्बाद, 1.5 लाख रुपए का नुकसान

Latur, Maharashtra:लातूर ब्रेकिंग न्यूज... अवकाळी पावसाने टोमॅटो उत्पादकांचे कंबरडे मोडले... खराब झालेले टोमॅटो उकिरड्यावर फेकण्याची वेळ... लातूर जिल्ह्यात अवकाळी पावसाने थैमान घातलंय… पण या पावसाचा सर्वात मोठा फटका बसलाय तो टोमॅटो उत्पादक शेतकऱ्यांना… अहमदपूर तालुक्यातील सताळा येथे एका शेतकऱ्याने अक्षरशः रक्ताचं पाणी करून उभं केलेलं टोमॅटो पीक आता उकिरड्यावर फेकून दिले आहे.... दीड लाखांचा खर्च… दिवस-रात्र केलेली मेहनत… आणि मोठ्या आशेने घेतलंलं पीक… पण अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे सगळं काही एका क्षणात उद्ध्वस्त झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसमोर मोठं आर्थिक संकट उभं ठाकलं आहे…
0
0
Report

प्रकाश महाजन ने अंजलि दमानीया کی गिरफ्तारी और कॉल डिटेल्स کی जांच کی मांग की

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:अंजली दमानियांना यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर खरात प्रकरणात आरोप केले आहे, याबाबत दमानिया याना अटक करा अशी मागणी शिंदे गटाचे नेते प्रकाश महाजन यांनी केली आहे.. दमानी यांना अटक करून त्यांना कॉल डिटेल कोणी दिले याची चौकशी करा.. अंजली दमानिया या स्वतःला काय पोलीस महासंचालक समजतात का .त्यांना कॉल डिटेल्स कसे मिळतात..हे सुरक्षेच्या दृष्टीने घातक आहे.. असेही महाजन म्हणाले.. उद्या एकनाथ शिंदे कुठे बाहेर गेले आणि त्यांची माहिती अशी बाहेर गेली तर त्यांच्या जीवाला घोका आहे .. त्यांना कॉल डीटेल्स मिळतात कसे याची चौकशी करा. एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आहेत सर्वसामान्यांमध्ये मिसळणारा नेता आहे असेही महाजन म्हणाले...
0
0
Report

२१ लाख कर्ज के दबाव में २६ वर्षीय युवक ने छत्रपती संभाजी नगर में आत्महत्या

Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:२१ लाखांचे कर्ज काढून घेतलेला ट्रक चोरीला गेला... दीड वर्ष उलटूनही पोलिसांना तो शोधता आला नाही. मात्र, दुसरीकडे बँकेचे हप्ते फेडण्याचा तगादा सुरूच राहिला. या दुहेरी कोंडीत अडकून कर्जबाजारी झालेल्या २६ वर्षीय तरुणाने छत्रपती संभाजी नगरात   सुसाइड नोट लिहून आपली जीवनयात्रा संपवली. संदेश दिनकर गवळी असे या दुर्दैवी तरुणाचे नाव  आहे,... संदेश हा आई-वडील, दोन भाऊ आणि बहिणीसह जयभवानीनगरमध्ये राहायचा. तो टँकरचा व्यवसाय करायचा. गुरुवारी सायंकाळी घरात कुणीही नसताना त्याने नैराश्यातून विष प्राशन केले. ही माहिती समजताच कुटुंबीयांनी तातडीने धाव घेत त्याला एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, मध्यरात्री उपचारादरम्यान संदेशची प्राणज्योत मालवली.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top