445001
काँग्रेस नेते ठाकरे: मोदींचा भाषण बंजारा समाजाचा अपमान!
Yavatmal, Maharashtra:काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे म्हणाले की, पंतप्रधान मोदींनी पोहरादेवी येथे केलेले राजकीय भाषण दुर्दैवी आणि निषेधार्ह आहे. मोदींचा काँग्रेसवर आरोप आणि बंजारा बांधवांचा अपमान सहन केला जाणार नाही, असे ते म्हणाले. काँग्रेसने वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक यांना मुख्यमंत्री पदाची संधी दिली होती, ज्यामुळे बंजारा समाजाची प्रगती झाली. मोदींनी त्यांच्या कुटुंबियांना निमंत्रण न देता त्यांचा अपमान केला, यावरून मोदींना बंजारा समाजाबद्दल आस्था नसल्याचे दिसते, असे ठाकरे यांनी म्हटले.
0
0
Report
हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|
अण्णाभाऊ साठे के भारतरत्न पर बहस तेज, समाज के आवाज़ बनते साहित्यकार
Sangli, Maharashtra:स्लग - "अण्णा भाऊ साठे : ज्यांचा गौरव सातासमुद्रापार,पण भारतरत्नाची प्रतीक्षा अजूनही कायम!" अँकर - आज आपण स्मरण करत आहोत अशा एका लोकशाहीराचे... ज्यांनी अक्षरशः रस्त्यावरून साहित्याच्या विश्वात झेप घेतली... ज्यांची लेखणीतून वंचित, शोषित, कष्टकरी समाजाला आवाज मिळाला... ज्यांची शाहिरीने संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याला बळ दिले... आणि ज्यांची साहित्याचा गौरव रशियापासून जगभर झाला...पण प्रश्न आजही कायम आहे...इतकं मोठं योगदान देणाऱ्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेना आजपर्यंत भारतरत्न का मिळालं नाही ? पाहूया हा स्पेशल रिपोर्ट... व्ही वो - १ ऑगस्ट...हा दिवस केवळ एका साहित्यिक जयंती नाही..तर हा दिवस आहे,संघर्षाचा... शोषित वंचित दिन दुबळ्यांचा कामगारांचा आणि अन्यायाविरुद्ध उभं राहण्याच्या प्रेरणेचा...ते नाव म्हणजे लोकशाहीर अण्णा भाऊ साठे... ज्यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत शिक्षणाशिवायही जगाला साहित्याची ताकद दाखवून दिली. व्ही वो - सांगलीच्या वाळवा तालुक्यातल्या वाटेगाव येथे एका छोट्याशा घरात अण्णाभाऊ साठेंचा जन्म झाला,जिथून अण्णाभाऊ साठे यांच्या जीवन संघर्षाच्या प्रवासाला सुरुवात झाली,तो संघर्ष अगदी मरेपर्यंत सुरू राहिला.. बाईट - मोहन साठे - ग्रामस्थ,वाटेगाव. व्ही बो - अण्णा भाऊ साठे यांनी कथा, कादंबऱ्या, पोवाडे, लावण्या, लोकनाट्य अशा विविध साहित्यप्रकारांत विपुल लेखन केलं. 'फकिरा'सारखी कादंबरी आजही मराठी साहित्यात मैलाचा दगड मानली जाते. त्यांच्या साहित्याचा केंद्रबिंदू होता,शेतकरी,कामगार,दलित,वंचित,आणि सामान्य माणसाचं आयुष्य.त्यांच्या साहित्याचे अनेक भारतीय आणि परदेशी भाषांमध्ये भाषांतर झाले असून त्यांची लोकप्रियता भारता बाहेरही पोहोचली. बाईट - प्रकाश साठे - ग्रामस्थ - वाटेगाव ( सफारी शर्ट ) व्ही वो - संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीचा इतिहास लिहिताना,अण्णा भाऊ साठेंचं नाव वगळणं अशक्य आहे.'लाल बावटा' कला पथकाच्या माध्यमातून त्यांनी गावोगावी फिरत पोवाडे,लावण्या आणि लोकनाट्य सादर करत जनजागृती केली.मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात त्यांच्या शाहिरीने हजारो कार्यकर्त्यांना प्रेरणा दिली. बाईट - तानाजी साठे - ग्रामस्थ - वाटेगाव. बाईट - दीपक चव्हाण - ग्रामस्थ - वाटेगाव व्ही वो - अण्णाभाऊ साठेंचा गौरव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिला नाही.त्यांच्या साहित्याला सोव्हिएत रशियासह अनेक देशांत मान्यता मिळाली.त्यांच्या विचारांनी सीमा ओलांडल्या,पण विडंबना अशी की, जगभरात गौरव झालेल्या लोकशाहीर किंबहुना अण्णाभाऊच्या विचारांचा गौरव भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान भारतरत्न देऊन का झाला असा सवाल साठे उपस्थित केला जातो. व्ही वो - दरवर्षी त्यांच्या जयंतीनिमित्त भारतरत्न देण्याची मागणी विविध सामाजिक, सांस्कृतिक आणि राजकीय स्तरावरून पुन्हा जोर धरते.महाराष्ट्र शासनाने त्यांच्या नावाने 'साहित्यरत्न लोकशाहीर अण्णा भाऊ साठे पुरस्कार' सुरू करून त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.वाटेगाव येथे अण्णाभाऊंचे जीवन चरित्र शिल्प सृष्टीच्या माध्यमातून साकारले आहे, त्यांचं जन्म झालं ते घर देखील जतन केलं जात आहे.पण देशाच्या सर्वोच्च नागरी पुरस्कारानेही अण्णा भाऊ साठेंचा गौरव व्हावा,हीच जनभावना आहे. End ऑफ - एका हातात डफ,दुसऱ्या हातात लेखणी, आणि मनात सामाजिक परिवर्तनाचं स्वप्न,अशी ओळख असलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठेंनी केवळ साहित्य निर्माण केलं नाही.तर समाजाला विचार,स्वाभिमान और संघर्षाची दिशा दिली...अश्या लोकशाहीर अण्णाभाऊनां भारतरत्न कधी मिळणार?0
0
Report
हेडगेवार निवास में विशेष डाक आवरण और मुहर का लोकार्पण
Nagpur, Maharashtra:राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार यांच्या नागपूर येथील ऐतिहासिक निवासस्थान 'डॉ. हेडगेवार निवास नागपूर' याच्या विशेष आवरण, सूचना पुस्तिका आणि कव्हर, कायमस्वरूपी सचित्र टपाल मुद्रेचे लोकार्पण आज झाले. यह अवसर पर सरसंघचालक मोहन भागवत यांनी संघाच्या कार्याचा विस्तार, राष्ट्रसेवा आणि व्यक्तिनिर्माणावर उद्बोधन केले. डॉ. हेडगेवार निवास पर आधारित विशेष आवरण, सूचनापુस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर का लोकार्पण नागपुर, 31 जुलाई 2026। भारतीय डाक विभाग, नागपुर द्वारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ के संस्थापक डॉ. केशव बलिराम हेडगेवार के ऐतिहासिक निवास "डॉ. हेडगेवार निवास, नागपुर" पर आधारित विशेष आवरण (Special Cover), सूचनापुस्तिका (Brochure) तथा स्थायी सचित्र डाक मुहर (Permanent Pictorial Cancellation) का लोकार्पण समारोह आयोजित किया गया। इस अवसर पर अपने संबोधन में सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत ने कहा कि डॉ. हेडगेवार और संघ एक-दूसरे से अभिन्न हैं। उनके जीवन में संघ कार्य और राष्ट्रकार्य के अतिरिक्त कोई दूसरा विषय नहीं था। इसी ऐतिहासिक भवन की ऊपरी मंजिल पर स्थित उनकी कोठरी में विजयादशमी के दिन राष्ट्रीय स्वयंसेवक संघ की स्थापना हुई थी। उस समय संघ छोटा था, किंतु आज उसका कार्य देश-विदेश तक व्यापक रूप से पहुँचा है। उन्होंने कहा कि संघ के कार्य का विस्तार हुआ है और देश-विदेश में उसके प्रति उत्सुकता निरंतर बढ़ रही है। केवल जिज्ञासा ही नहीं, बल्कि मनुष्य निर्माण की संघ की कार्यपद्धति आज विकास के पथ पर अग्रसर अनेक देशों की आवश्यकता बनती जा रही है। व्यक्ति निर्माण की यह परिणामकारक पद्धति समाजों के लिए उपयोगी सिद्ध हो रही है। डॉ. भागवत ने कहा कि यह संघ के लिए गौरव का नहीं, बल्कि दायित्व और उत्तरदायित्व के बढ़ने का विषय है। संघ का कार्य राष्ट्रसेवा का कार्य है और संघ ने कभी प्रचार या प्रसिद्धि की अपेक्षा नहीं की। किंतु आज जब समाज और विश्व इसके प्रत्यक्ष परिणामों को देख रहा है, तब अनेक सज्जन लोग इसके विस्तार में सहयोग की भावना से आगे आ रहे हैं। उन्होंने भारतीय डाक विभाग का आभार व्यक्त करते हुए कहा कि विशेष आवरण, सूचनापुस्तिका एवं स्थायी सचित्र डाक मुहर जारी कर विभाग ने मनुष्य निर्माण के इस कार्य के प्रति अपनी सद्भावना व्यक्त की है। इससे संघ के कार्य और उसके उद्देश्य की जानकारी अधिकाधिक लोगों तक पहुँचेगी तथा समाज में इस कार्य को नई गति मिलेगी। उन्होंने विश्वास व्यक्त किया कि राष्ट्र की अपेक्षाओं के अनुरूप चरित्रवान, सक्षम और सेवाभावी नागरिकों का निर्माण इस कार्य के माध्यम से और अधिक गति से होगा तथा समाज का सहयोग इस दिशा में महत्वपूर्ण भूमिका निभावेगा। कार्यक्रम में प्रांत सह संघचालक श्रीधरजी गाडगे, महानगर संघचालक श्री राजेशजी लोया, डॉ. सुधीरजी जाखेरे, डाक सेवाएँ, नागपुर क्षेत्र के निदेशक, श्री रामचंद्र जायभाये, मुख्य पोस्टमास्टर जनरल, महाराष्ट्र एवं गोवा परिमंडल, डाक विभाग नागपुर के अधिकारी एवं कर्मचारी तथा डॉ. हेडगेवार स्मारक समिति, नागपुर के सदस्य उपस्थित थे。0
0
Report
इंदापूर के वडापुरी में संत तुकोबाराय का पालखी शोभा यात्रा पहुँची; भक्तों ने किया गर्मजोशी से स्वागत
Rui, Maharashtra:परतीच्या वाटेवर संत तुकोबारायांचा पालखी सोहळा वडापुरीत विसावला. परतीच्या मार्गावर पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील वडापुरी येथील श्रीनाथ मंदिरामध्ये पालखी सोहळा मुक्कामासाठी विसावला आहे. वडापुरी येथील श्रीनाथ मंदिर हे श्री मच्छिंद्रनाथ आणि श्री गोरक्षनाथ यांच्या पद स्पर्शाने पावन झाले आहे अशी आख्यायिका सांगितली जाते. पालखी सोहळ्याचे वडापुरी गावात आगमन होताच गावकऱ्यांनी मोठ्या भक्ती भावात या सोहळ्याचे स्वागत केले.0
0
Report
Advertisement
कल्याण के खड्डों पर कांग्रेस का जोरदार प्रदर्शन; ठेके में 25.70 करोड़ का सवाल
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील खड्ड्यांमुळे काँग्रेस आक्रमक झाली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी खड्ड्यांमध्ये चिखल टाकून कमळ अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत अनोखे आंदोलन केले. यावेळी राज्य आणि केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर केडीएमसी मुख्यालयाचे गेट बंद करण्याचा इशाराही काँग्रेसने दिला आहे. कल्याण पूर्वेतील चक्की नाका-मलंगगड रोडवरील मोठमोठ्या खड्ड्यांमुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांच्या नेतृत्वाखाली अनोखे आंदोलन करण्यात आले. रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये चिखल टाकून त्यात कमळ लावण्यात आले. तसेच अगरबत्ती लावत नारळ फोडून खड्ड्यांचे श्राद्ध घालत प्रशासनाचा निषेध करण्यात आला. यावेळी काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी राज्य सरकार तसेच केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी केली. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री यांचे फोटो असलेले बॅनर व खड्डे भरा असे फलकही आंदोलनात झळकले. महानगरपालिकेने खड्डे बुजवण्यासाठी २५ कोटी ७० लाख रुपयांचे ठेके दिले असतानाही पावसाळ्यापूर्वी कामे झाली नसल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. दरम्यान, आठ दिवसांत खड्डे बुजवले नाहीत तर महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर खडी डांबर टाकून अधिकाऱ्यांचे येणे-जाणे बंद करू, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नवीन सिंग यांनी दिला आहे. बाईट, नवीन सिंग, जिल्हाध्यक्ष काँग्रेस,0
0
Report
उजनी डैम 100% भरा, 81 हजार 600 क्यूसेक पानी छोड़ने से भीमा नदी के तट सतर्क
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिल्ह्याची वरदान असलेल्या उजनी धरणाच्या वरील क्षेत्रामध्ये जोरदार पाऊस सुरू असल्याने उजनी धरण 100% भरले आहे. उजनी धरण व्यवस्थापन विभागाने पूर नियंत्रण करण्यासाठी उजनी धरणातून भीमा नदीमध्ये 81 हजार 600 क्यूसेक पानी छोड़ा गया है ताकि भीमा नदीकाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. भीमा नदी दुथडी भरून वाहत असल्याने पाण्याचा प्रवाह जोरात वाहत आहे. शेतकऱ्यांनी तसेच नदीकाठच्या गावातील ग्रामस्थांनी नदीकाठी जाऊ नये असे आवाहन सोलापूरचे जिल्हाधिकारी एस कार्तिकीयन यांनी केले आहे0
0
Report
महाड के शिवथर घाट में भारी बारिश, तीन गांवों का संपर्क टूट गया
Chendhare, Maharashtra:महाडच्या शिवथर खोऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने आंबेनळी, आंबे शिवथर आणि सह्याद्री वाडी या तीन गावांचा महाड तालुक्याशी संपर्क तुटला आहे. वाहतूक व्यवस्था पूर्णपणे ठप्प झाली आहे प्रशासनाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि नदी-नाल्यांपासून दूर राहण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
Advertisement
कृष्णा नदी की बाढ़ ने Wai शहर के महागणपती मंदिर को पानी में डुबो दिया
Satara, Maharashtra:सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस सुरू असून कृष्णा नदीला पूर आला आहे. धोम धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू असल्याने कृष्णा नदीच्या पाणीपातळीत झपाट्याने वाढ झाली आहे. यामुळे दक्षिणकाशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या वाई शहरातील ऐतिहासिक महागणपती मंदिराला कृष्णा नदीच्या पाण्याचा वेढा पडला असून गणरायाच्या मूर्तीपर्यंत पुराचे पाणी पोहोचले आहे. तसेच कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून शहरातील प्रसिद्ध कृष्णा घाटासह सर्व घाट जलमय झाले आहेत. वाई तालुक्याच्या पश्चिम भागात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून जांभळी धरणही शंभर टक्के भरले आहे. प्रशासन परिस्थितीवर लक्ष ठेवून नागरिकांनी नदीपात्र आणि पुलांवर जाणे टाळावे, असे आवाहन करण्यात आले आहे.0
0
Report
रोहित पवार ने चंद्रकांत पाटिल के फिंगरप्रिंट दावों पर तीखा हमला
Ahilyanagar, Maharashtra:रोहित पवार ऑन चंद्रकांत पाटल: दिल्लीतील दगडफेक प्रकरणात केलेल्या वक्तव्यावरून उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी जोरदार टीका केली आहे. फिंगरप्रिंट आणि तंत्रज्ञानाबाबतच्या दाव्याची खिल्ली उडवत, चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना प्रशिक्षण द्यावे, इतकेच नव्हे तर अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनाही हे तंत्रज्ञान शिकवावे, असा टोला रोहित पवार यांनी लगावला. पेपरफुटीच्या घटनांचा उल्लेख करत त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्यावर उपरोधिक निशाणा साधला. रोहित पवार म्हणाले, दिल्लीतील दगडफेकीनंतर रस्त्यावर पडलेल्या प्रत्येक दगडावरील फिंगरप्रिंट तपासून आरोपी शोधता येतात, असे जर चंद्रकांत पाटील यांना वाटत असेल तर त्यांनी या विषयावर मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांसाठी मार्गदर्शनाची मालिका सुरू करावी. गृहमंत्र्यांना गृहविभागाकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळत नसेल, तर ती जबाबदारीच चंद्रकांत पाटील यांच्याकडे द्यावी, असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. फक्त महाराष्ट्रातच नव्हे तर अमेरिकेत जाऊन ट्रम्प आणि तेथील प्रशासनालाही हे फिंगरप्रिंट तंत्रज्ञान शिकवावे अशी मिश्कील टिप्पणी त्यांनी केली. महाराष्ट्रातील पेपरफुटीच्या घटनांमध्येही हेच फिंगरप्रिंट लॉजिक वापरून दोषींना शोधून दाखवावे असे टोला त्यांनी चंद्रकांत पाटील यांना लगावला. रोहित पवार ऑन विद्यार्थिनी आत्महत्या: नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील 19 वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणानंतर कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सरकारवर आणि तपास यंत्रणेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत. नीट पेपरफुटीची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत, आत्महत्येच्या नोंदीत नीटचा उल्लेख टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. कर्जत तालुक्यातील जलालपूर येथील अंकिता सुरेश सांगळे या 19 वर्षीय विद्यार्थिनीने नीट परीक्षेत अपेक्षित गुण न मिळाल्याच्या नैराश्यातून राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. अंकिताला नीट परीक्षेत 166 गुण मिळाले होते. डॉक्टर होण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत तिने सुसाईड नोटमध्ये व्यक्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या नोटमध्ये आपल्या मृत्यूसाठी आई-वडील किंवा भावाला जबाबदार धरू नये, असेही नमूद करण्यात आले आहे. घटनेनंतर आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केले. त्यांनी नीट पेपरफुटीमुळे अनेक विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडले असल्याचे सांगितले. दोषींवर कठोर कारवाई करण्याबरोबरच भविष्यात पेपरफुटी होणार नाही, यासाठी सरकारने प्रभावी यंत्रणा उभी करावी, अशी मागणी त्यांनी केली. रोहित पवार यांनी आणखी एक गंभीर आरोप करत, आत्महत्येच्या प्राथमिक नोंदीत नीटचा उल्लेख करण्यात आलेला नसून तो टाळण्यासाठी पोलिसांवर दबाव असल्याची शक्यता व्यक्त केली. या प्रकरणात संबंधित अधिकाऱ्यांची भेट घेऊन वस्तुस्थिती जाणून घेणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. रोहित पवार ऑन शिवेंद्रराजे भिसले: साताऱ्यातील कथित सोसायटी ठराव प्रकरणावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शिवेंद्रराजे हे स्वभावाने चांगले मंत्री असले तरी दबाव आणि गुंडांच्या माध्यमातून ठराव मंजूर करून घेण्याचा प्रयत्न झाल्याची माहिती मिळाल्याचा दावा रोहित पवार यांनी केला. ते भाजपसोबत गेल्यानंतर अशा प्रकारच्या घटना घडत असल्याचेही ते म्हणाले. मंत्र्याशी जुना परिचय असून त्यांच्या परिवाराबद्दल आदर असल्याचे सांगत आमदार रोहित पवार यांनी टीकेची सुरुवात केली. मात्र साताऱ्यात नुकत्याच घडलेल्या कथित सोसायटी ठराव प्रकरणात दबाव आणि गुंडांचा वापर करून ठराव मंजूर करून घेतल्याची माहिती समोर आल्याचा दावा त्यांनी केला. भाजपसोबत गेल्यावर अशा घटनांचा हा निर्णय शिवेंद्रराजेंचा होता की तिच्या पाठीमागे भाजप नेत्यांचा सल्ला होता याबाबत आपण काही ठाम बोलू शकत नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. लोकांच्या न्यायासाठी संघर्ष करणे वेगळे, मात्र दबावाचे राजकारण करून निर्णय घेणे योग्य नसल्याचे सांगत अशा पद्धतीला लोकांची मान्यता नसल्याचा दावा रोहित पवार यांनी केला.0
0
Report
कळवण के पुनद धरण से 2981 क्यूसेस पानी छोड़ने पर नागरिकों को सतर्क रहने की चेतावनी
Nashik, Maharashtra:नाशिकच्या कळवण येथील पुनद धरणातून 2981 क्युसेसने पाणी सोडण्यात आल्याने पुनद व गिरणा नदीकाठच्या नागरीकांना नदीप्रवाहात कोणीही जावू नये तसेच नदीकाठ लगतच्या आपली पशु-धन, चीजवस्तु, शेतीमोटार पंप सुरक्षित स्थळी हलविण्यात यावे असे आवाहन करण्यात आले असून या परिसरात संततधार पाऊस सुरू असल्याने पाण्याची आवक नुसार सदर विसर्ग वाढण्याची शक्यता आहे. तरी संबंधित शासकीय यंत्रणांनी याबाबत दक्षता घ्यावी असे आदेश देखील देण्यात आले आहेत.0
0
Report
Advertisement
28 साल बाद गिरफ्तार: जोगेश्वरी पुलिस ने 1998 के आरोपी उमेश गौंडर को पकड़ा
Mumbai, Maharashtra:मुंबईतील जोगेश्वरी पोलिसांनी तब्बल २८ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. जोगेश्वरी पोलीस ठाण्यात १९९८ साली गुन्हा क्रमांक १०७/१९९८ अंतर्गत घरात घुसखोरी, फसवणूक, मालमत्तेचे नुकसान आणि चोरीच्या आरोपांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी उमेश मुत्तुस्वामी गौंडर हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात अंधेरी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट आणि जाहीरनामा जारी केला होता. दरम्यान, २७ जुलै २०२६ रोजी जोगेश्वरी पोलीस ठाण्याच्या समन्स वॉरंट पथकाला गोपनीय माहितीच्या आधारे आरोपीचा मोबाईल क्रमांक मिळला. तांत्रिक तपासाद्वारे आरोपी डोंबिवली परिसरात राहत असल्याची खात्री झाल्यानंतर पोलिसांनी सापळा रचून त्याला त्याच्या राहत्या घराजवळून ताब्यात घेतले. आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला दोन हजार रुपयांचा दंड, दहा हजार रुपयांच्या रोख जामिनावर आणि पंधरा हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर मुक्त करण्याचे आदेश दिले.0
0
Report
साकीनाका पुलिस ने वर्षों से फरार आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी को गिरफ्तार किया
Mumbai, Maharashtra:मुंबईतील साकीनाका पोलिसांनी तब्बल १५ वर्षांपासून फरार असलेल्या आरोपीला अटक करत महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. साकीनाका पोलीस ठाण्यात २०१० मध्ये गुन्हा क्रमांक ५४९/२०१० अंतर्गत जमावबंदीचे उल्लंघन, शासकीय कर्मचाऱ्याच्या कामात अडथळा आणणे आणि हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील आरोपी अयुब मोहम्मद सफात चौधरी हा गुन्हा दाखल झाल्यानंतर न्यायालयात हजर राहत नसल्याने त्याच्याविरोधात न्यायालयाने स्थायी अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते. दरम्यान, २९ जुलै २०२६ रोजी साकीनाका पोलीस ठाण्याच्या तडीपार पथकाला गोपनीय माहिती मिळाली की आरोपी पालघर जिल्ह्यातील विरार पश्चिम येथील सपकाळे नाका परिसरात वास्तव्यास आहे. या माहितीच्या आधारे पोलिसांनी शिताफीने सापळा रचत आरोपीला ताब्यात घेतले. त्यानंतर आरोपीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली.0
0
Report
गडचिरोली पुलिस की मदद से लाहेरी में रोगी का हेलीकॉप्टर से तात्कालिक मेडिकल ट्रांसफर
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली पोलीस दलाच्या सहकार्याने अतिदुर्गम लाहेरी येथील रुग्णाचे हेलिकॉप्टरच्या सहाय्याने तात्काळ वैद्यकीय स्थलांतर, जिल्हा रुग्णालयात दाखल, तातडीच्या हालचालींमुळे वाचला जीव. मागील काही दिवसांपासून गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पाऊसामुळे इंद्रावती, पामुलगौतम व पर्लकोटा नद्यांना आलेल्या पाण्यामुळे पुर परिस्थिती निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील अतिदुर्गम भामरागड तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलेला आहे. अशातच भामरागड तालुक्यातील मौजा लाहेरी येथील रहिवासी शामसुंदर नरोटी ( 35 ) यांची प्रकृती विषबाधा अथवा सर्पदंश कारणाने गंभीर झाली. मदतीची माहिती मिळताच त्यांना तातडीने गडचिरोलीला हलवण्याची व्यवस्था करण्यात आली. गडचिरोली पोलीसांचे पवन हंस हेलिकॉप्टर तात्काळ भामरागडसाठी रवाना करण्यात आले. शामसुंदर नरोटी यांना सुरक्षितपणे गडचिरोलीला आणण्यात आले आहे, त्यांना पुढील उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे दाखल करण्यात आले असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आणि धोक्याबाहेर आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये कुठल्याही अंधश्रद्धेला बळी न पडता तात्काळ जवळच्या रुग्णालयात किंवा आपत्कालीन सेवांशी संपर्क करुन वेळेत उपचार मिळवावे असे आवाहन पोलीस प्रशासनाने केले आहे.0
0
Report
Advertisement
पानी के लिए आमरण उपोषण: रत्नागिरी के कुटगिरी-येडगेवाडी में नया गतिरोध
Ratnagiri, Maharashtra:कुटगिरी-येडगेवाडी पाण्यासाठी आमरण उपोषण; चर्चahi निष्फळ, संघर्ष दुसऱ्या दिवशीही कायम रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील कुटगिरी-येडगेवाडी येथील धनगर समाजाच्या पाच कुटुंबांनी पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नासाठी देवरुख पंचायत समिती कार्यालयासमोर सुरू केलेले आमरण उपोषण दुसऱ्या दिवशीही सुरू आहे. शासकीय विहिरीवरून टाकण्यात आलेली पाणीपुरवठ्याची पाईपलाईन तोडल्यामुळे गेल्या तीन महिन्यांपासून या कुटुंबांना तीव्र पाणीटंचाईचा सामना करावा लागत असल्याचा आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे.दरम्यान,उपसभापती,प्रभारी गटविकास अधिकारी,सरपंच तसेच संबंधित अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी प्रत्यक्ष कुटगिरी-येडगेवाडी गावात जाऊन पाणीपुरवठा योजनेची पाहणी केली. त्यानंतर उपोषणकर्त्याशी पहाटे सहा वाजेपर्यंत चर्चाही झाली.मात्र,कोणताही समाधानकारक तोडगा निघाल्याने उपोषण दुसऱ्या दिवशीही कायम असून प्रशासनाच्या पुढील निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.0
0
Report
धुले में तीव्र वर्षा से बाढ़, कन्नेर नदी में पिता-पुत्र लापता
Dhule, Maharashtra:धुळे जिल्ह्यात पाऊसाने हाहाकार माज्वला आहे. आंबोडे येथे कन्नेर नदीच्या पुरात पिता-पुत्र वाहून गेल्याची घटना समोर आली असून, त्यांना शोधाण्याचे कामं सुरु आहे. धुळे शहरासह जिल्ह्यात मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावली असून अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली आहे. धुळे तालुक्यातील आंबोडे गावात कन्नेर नदीला आलेल्या पुरामुळे दुर्दैवी घटना घडली आहे. नदीकाठावर असलेल्या श्रीराम नाश्ता सेंटर या दुकानातील पिता-पुत्र पुराच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे. वाहून गेलेल्यांची नावे आनंदा पारखे (वय ६०) आणि त्यांचा मुलगा दिनेश आनंदा पारखे (वय २५) अशी आहेत. घटनेची माहिती मिळताच पोलीस, महसूल प्रशासन आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली असून दोघांचा शोध घेण्यासाठी बचावकार्य युद्धपातळीवर सुरू करण्यात आले आहे. प्रशासनाने नागरिकांना नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आणि सुरक्षित ठिकाणी राहण्याचे आवाहन केले आहे.0
0
Report
संगमनेर नदी में डूबे युवक की तलाश जारी, 48 घंटे बाद भी नहीं मिला परिणाम
Shirdi, Maharashtra:प्रवरा नदीत बुडालेल्या व्यक्तीचा अद्याप शोध लागेना. 48 तास उलटून गेल्यावरही शोध सुरूच. काल दुपारी नदीत बुडालेल्या व्यक्तीचा शोध अद्याप सुरूच. आमदार अमोल खताळ घटनास्थळी पोहचले. ड्रोनच्या माध्यमातून परिसरात शोध सुरू. प्रशासनाला दिल्या शोध घेण्यासाठी सूचना. बेपत्ता झालेल्या युवकाच्या कुटुंबीयांनी व्यक्त केली नाराजी. संगमनेर तालुक्यातील ऋषिकेश गडाख कालपासून बेप्ता. नदीत आंघोळीला गेल्यावर झालाय बेपत्ता.0
0
Report
Advertisement
