icon-pinewzicon-zee
PINEWZ
become creator
Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pinewz
445001
Shrikant Ramchandra RautShrikant Ramchandra RautFollow7 Oct 2024, 07:22 am
0
0
Report

हमें फेसबुक पर लाइक करें, ट्विटर पर फॉलो और यूट्यूब पर सब्सक्राइब्ड करें ताकि आप ताजा खबरें और लाइव अपडेट्स प्राप्त कर सकें| और यदि आप विस्तार से पढ़ना चाहते हैं तो https://pinewz.com/hindi से जुड़े और पाए अपने इलाके की हर छोटी सी छोटी खबर|

कोल्हापुर गोकुळ चुनाव: सतेज पाटील की सर्वपक्षीय मुलाकातों से बन रहा नया समीकरण

Kolhapur, Maharashtra:इतर फीडwhatsup ला पाठवतो. ANC :- कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळच्या निवडणुकीचं बिगुल वाजलंय… गोकुळच्या सत्तेसाठी महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा सामना रंगण्याची शक्यता आहे… एका बाजूला महायुतीच्या नेत्यांची तगडी फळी… तर दुसरीकडे गोकुळची निवडणूक स्वबळावर लढण्याची घोषणा करणारे काँग्रेस नेते सतेज पाटील… मात्र, निवडणुकीच्या आधीच सतेज पाटलांनी भाजपा सह सर्वपक्षीय नेत्यांच्या गाठीभेटींवर भर दिलाय… VO 1 : गोकुळच्या निवडणुकीचा बिगुल वाजला आणि त्याचबरोबर जिल्ह्यातील राजकीय हालचालींनाही वेग आलाय… गोकुळच्या सत्तेसाठी महायुती आणि महाविकास आघाडी आमनेसामने येण्याची शक्यता असताना, काँग्रेस नेते सतेज पाटील यांनी मात्र आपली रणनीती आखण्यास सुरुवात केलीय…गोकुळची निवडणूक लढवणार असल्याचं सतेज पाटील यांनी आधीच जाहीर केलंय… त्यामुळे मतदारांशी संपर्क वाढवतानाच सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या भेटीगाठींवर भर दिलाय… मात्र, सतेज पाटील यांच्या या राजकीय दौऱ्यातील सर्वाधिक चर्चेत असलेला मुद्दा म्हणजे… भाजप नेत्यांच्या घेतलेल्या भेटी. कोल्हापूर ग्रामीणचे भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांच्या निवासस्थानी जाऊन सतेज पाटील यांनी भेट घेतली…तसंच भाजपचे सहयोगी आमदार आणि भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या संपर्कात असलेले आमदार शिवाजी पाटील यांचीही सतेज पाटील यांनी सदिच्छा भेट घेतली… गोकुळच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या भेटींमुळे राजकीय चर्चांना चांगलंच उधाण आलाय. गोकुळच्या राजकारणात महायुतीची ताकद मोठी मानली जाते… एकीकडे मंत्री हसन मुश्रीफ, भाजप आणि महायुतीतील इतर नेत्यांची तगडी फळी…तर दुसरीकडे सतेज पाटील यांची गोकुळच्या मैदानात स्वतंत्र रणनीती… अशा परिस्थितीत भाजपच्या स्थानिक नेत्यांच्या थेट भेटी घेऊन सतेज पाटील नेमका कोणता संदेश देतायत? शत्रूंचा शत्रू तो आपला मित्र, या राजकीय समीकरणानुसार सतेज पाटील नवी मोट बांधण्याचा प्रयत्न करतायत का? अशी चर्चा आता जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झालीय. कारण मंत्री हसन मुश्रीफ यांच्यावर टीकेची झोड उठवणाऱ्या आमदार शिवाजी पाटील आणि ग्रामीण भाजपाचे जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर यांची भेट घेतल्याने जिल्ह्याच्या राजकारणात आश्चर्य व्यक्त केल जात आहे. VO 2 : मंत्री हसन मुश्रीफ यांनी सतेज पाटील यांच्या भेटीगाठींवर फारसं आश्चर्य व्यक्त केलेलं नाही… उलट, प्रत्येकाला निवडणूक लढवण्यासाठी प्रयत्न करावे लागतात, असं म्हणत त्यांनी सतेज पाटील यांच्या रणनीतीवर भाष्य केलंय… मात्र, भाजप नेत्यांच्या भेटीमुळे गोकुळच्या निवडणुकीत नवी राजकीय समीकरणं तयार होणार का? हा प्रश्न मात्र कायम आहे.. दुसरीकडे, भाजप नेत्यांच्या भेटीबाबत सतेज पाटील यांनीही आपली भूमिका स्पष्ट केलीय… निवडणूक प्रचाराच्या निमित्ताने आपण अनेकांना भेटत असतो… त्याचप्रमाणे भाजप नेते आणि आमदारांनाही भेटलो… यात काहीही गैर नसल्याचं सतेज पाटील यांनी स्पष्ट केलंय… महत्त्वाचं म्हणजे, सहकार संस्थांच्या निवडणुका या पक्षविरहित असतात…असं सांगत त्यांनी भाजप नेत्यांच्या भेटींचं समर्थन केलंय… Byte : आमदार सतेज पाटील, नेते भाजपा VO 3: सतेज पाटील यांची भूमिका स्पष्ट असली… तरी गोकुळच्या निवडणुकीच्या तोंडावर भाजपच्या नेत्यांच्या घेतलेल्या भेटींकडे राजकीय अर्थाने पाहिलं जातंय… कारण गोकुळची निवडणूक ही केवळ दूध संघाची निवडणूक नसून… कोल्हापूर जिल्ह्यातील सहकाराच्या राजकारणावर प्रभाव टाकणारी निवडणूक मानली जाते… त्यामुळे प्रत्येक मतदारसंघात, प्रत्येक गटात आणि प्रत्येक नेत्याच्या भूमिकेला महत्त्व प्राप्त झालंय… महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी लढत होण्याची शक्यता असली तरी, गोकुळमध्ये स्थानिक पातळीवरील समीकरणं अनेकदा पक्षीय गणितांपेक्षा वेगळी ठरतात… याचाच फायदा घेण्यासाठी सतेज पाटील यांनी सर्वपक्षीय नेत्यांशी संपर्क वाढवलाय… भाजपच्या स्थानिक नेत्यांना थेट भेटून त्यांनी मदतीची चाचपणी केल्याची चर्चा आहे… आता या भेटींचं रूपांतर राजकीय पाठिंब्यात होतंय का? की या केवळ सदिच्छा भेटी ठरतात? याचं उत्तर गोकुळच्या निवडणुकीच्या पुढील टप्प्यात स्पष्ट होणार आहे…
0
0
Report

Ajit Dada के साथ Mahayuti की चुनाव रणनीति और Gokul जीत की उम्मीद

Kolhapur, Maharashtra:मंत्री हसन मुश्रीफ प्रेस मुद्दे ऑन अजितदादा अजितदादा आमच्यातून जाणे हा आमच्यासाठी काळाकुट्ट दिवस होता, लोकसभेच्या निवडणुकीनंतर आमच्या जागा कमी झाल्या होत्या युति म्हणून अजित दादा, देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेतला आणि लाडकी बहीण योजना आणली त्याच्या जाण्यानंतर पहिल्यांदा रक्षाबंधन सण येतोय. आम्हा सर्वांना दुःख वेदना होत आहे. त्यांच्या या पवित्र स्मृतीला मी वंदन करतो. ऑन गोकुळ सतेज पाटील भेटी मी दोन्ही बातम्या वाचल्यात की भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना सतेज पाटील भेटतायत. खरोखर एक स्तुत्य उपक्रम आहे. त्यांच्या या उपक्रमाचे मी मनापासून स्वागत करतो आणि त्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो. पण ते निवडणूक लढणार आहेत. आम्ही मात्र युतीमार्फत गोकुळ निवडणुका लढणार आहोत सतेज पाटील हे काँग्रेसचे मोठे नेते असल्यामुळे ते स्वतंत्र लढणार आहेत. गोकुळ निवडणुकीत आता महायुतीचा विजय हा काळ्या दगडावरचं पंढरी रेघ आहे. त्यामध्ये आता कसलाही संशय राहिलेला नाही. पण तो शेवटी त्यांनाही प्रयत्न करावे लागतील निवडणुकीसाठी, एकदा उमेदवार उभे राहिल्यानंतर, उमेदवारांना चेतना आणावी लागेल, त्याच्यात आत्मविश्वास आणावा लागेल. त्या पद्धतीचे ते प्रयत्न करत आहेत. ऑन सतेज पाटील आणि महाडीक संवाद वाढला मला ते काय माहिती नाही. परंतु, शेवटी निवडणुकीमध्ये कोण शत्रू किंवा मित्र असं नसतं. राजकारणामध्ये कधीच शत्रू हा शत्रू राहत नाही, मित्र हा मित्र राहत नाही. त्यांचा जर तसा प्रयत्न असेल तर त्याला ही माझ्या शुभेच्छा. ऑन केडीसीसी बँक परिणाम हे बघा आम्ही युती म्हणून जिल्हा मध्यवर्ती बँक किंवा गोकुळ एकत्र लढणार. जिल्हा मध्यवर्ती बँकेचा आज विषय नाही.. कारण अजून यादी दुरुस्त व्हायची आहे. यादी झाल्यावर आम्ही सर्वजण बसून आम्ही निर्णय घेऊ. ऑन गोकुळ सुनावणी वादाची ठणकी खरं आहे की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, जनसुराज्य आणि शिवसेना, यांचीच बहुतांशी या संस्था होत्या. कारण ज्या वेळेला सत्ता होती त्या वेळेला महाविकास आघाडी सरकार होतं. आम्ही सगळे एकत्र होतो आणि तीन वर्षाचा कट ऑफ डेट असल्यामुळे या संस्था आम्ही आधीच काढल्या होत्या. त्या वाचवणं हे आमचं काम आहे. आता ते कशासाठी प्रयत्न करतायत ते मला माहिती नाही. सत्य परेशान हो सकता है, पराजित नही. ऑल पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये आतापर्यंत एकूण 29,427 शेतकरी लाभार्थी आहे. 235 कोटी 16 लाख रुपये आता बँकेकडे आलेले आहेत. ऑन राज्यातील साखरेचा भाव आता जे साखरेचे जे भाव वाढलेले होते, जे कृत्रिम वाढलेले होते, ते कमी झालेले आहेत. साखर कारखान्याच्या साठ्यावर नियंत्रण ठेवण्याची केंद्रानं आवश्यकता होती. अनेक साखर कारखान्याने आपल्या गरजेचे प्रमाणे साखर विकलेली आहे. इथेनॉल देखील फारसं काढलंलं नाही. खाजगी कारखाण्यांना बी-हेवी सुद्धा फारसं काढून दिलं नाही. सी-हेवी काय करावंच लागतं, त्याला काही इलाजच नाही. इथेनॉलला फारशी साखर गेली असं नाही, परंतु पहिल्यांदा साखर कारखान्यांनी आपली साखर विकल्यामुळं आणि केंद्र सरकारने कंट्रोल न ठेवला नसल्यामुळं त्यांची साठेबाजी झाली असेल आणि त्याचे परिणाम हे दर वाढण्यावर झाले. ऑन पिकांवर पाऊस वातावरणाचा परिणाम विशेषतः मराठवाडा, सोलापूर जिल्हा, जी ऊस पिकवणारी जिल्हे आहेत खानदेश याठिकाणी पावसाचा खंड पडलेला आहे. धरण देखील फारशी भरलेली नाहीत. एका सुदैवाने आपल्या राज्यातील सगळी मोठी धरणं भरली. परंतु अनेक छोटी-छोटी धरणं भरलेली नाहीत, तलाव भरलेले नाहीत. कोल्हापूर जिल्ह्यातील काळम्मावाडी धरण सुद्धा काल भरलं. आता त्यातून १६००-२१०० क्युसेक पाणी पॉवर हाऊस मधून सोडल जात आहे. मी जलसंपदा विभागाला पाण्याचा विसर्ग कॅनॉल द्वारे करा आणि कॅनॉलने तलाव जिथं भरता येतील तिथं भरा असं सुचवले आहे. अनेक जिल्ह्यातील पिकं करपून गेलेली आहेत. असा जर खंड पडला असेल तर छोटी पीक वाचवणं अवघड आहे आपल्याला ती वाचवावी लागतील ऑन लाडकी बहीण केवायसी आता ६५ वर्षाच्या वरती आपण संजय गांधी निराधार योजना त्यांना देतो. केवायसी करण्यासाठी थोडा वेळ दिलेला आहे. त्यामुळं मला वाटतं ज्या अपात्र झाल्या या कारणामुळं त्या पात्र होतील ज्या महिला नोकरी करतायेत, ज्यांची परिस्थिती चांगली आहे, त्यांनी केवायसी केलेली नाही. त्यामुळे अपात्र आहे ते अपात्रच राहणार. ऑन मुंबई ऑटो रिक्षा चालकांना मुदतवाढ ६०-७० टक्के मराठी लोक आहेत त्यांना मराठी शिकवणे शक्य नव्हतं आणि म्हणून मुख्यमंत्री महोदयांनी स्वतः काल निर्णय घेतला की एक वर्षाची मुदतवाढ द्यावी मला वाटतं एक वर्षाच्या नंतर त्यांना निदान लोकांना समजेल एवढे तरी मराठी आले पाहिजे, ही आमची अपेक्षा आहे. ऑन महायुती धुसफूस महायुतीमध्ये कोणतीहि धुुसफुस नाही आमचा संसार आनंदाने सुरू आहे आणि मुख्यमंत्री महोदय सर्वांना विश्वासात घेऊन निर्णय घेत असतात . मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेब आम्ही एकत्र होतो , मी कालच भेटलो त्यांना त्यामुळे दोघांनी बसूनच हा निर्णय घेतलाय. ऑन सूर्यघर योजना पीएम सूर्यघर योजना. देशामध्ये कुठल्याही जिल्हा मध्यवर्ती बँकेनी अशी योजना काढली नाही, ती योजना आम्ही काढली आहे. ऑन जिल्हा बँक निवडणूक रणनीती आता एकदा पक्की यादी झाली की, त्याबद्दल मी संपूर्ण तुम्हाला सांगेन, कसं होणार आहे. ऑन शक्तीपीठ राजू शेट्टी अधिकाऱ्यांना चोप देणार स्टेटमेंट शासनाने एकदा निर्णय घेतला, कायदा व्यवस्थेत हातामध्ये घेणे काही योग्य नाही. म्हणून आपण एकदा पुन्हा मुख्यमंत्र्यांना भेटले पाहिजे, त्यांना विनंती केली पाहिजे. आणि त्यांची मतं आपण आजमावली पाहिजे. ऑन पेपर फुटी प्रकरण हे वास्तव्य हे चुकीच आहे. एमपीएससी ही स्वायत्त संस्था आहे. त्यामुळे शासनाचा काही संबंध नाही. त्याला आपण अधिकार दिलेत. ज्या पद्धतीने पेपर फुटीच्या बातम्या आलेली आहे, त्यामुळे लोकांचा विश्वास जातोय. ही गोष्ट शासनाने लक्षात घेतलेली आहे. याबद्दल मला वाटतं कडक ते कडक, या गुन्हेगाराला तर शिक्षा होईलच. जिथं ज्याचे धागेदोरे असतील, ते सुद्धा मुख्यमंत्री महोदय याचा निपटारा केल्याशिवाय गप्प बसणार नाहीत. ऑन साखर तस्करी, अमित शहा संशय- राजू शेट्टी आरोप अमित शहा साहेब याच्याकडे सहकार खात आहे. देशामध्ये पहिल्यांदा सहकार खातं निर्माण झालंय. पूर्वी ते कृषी खात्याच्या अंतर्गत होतं आणि त्यामुळे त्यांच्या बराचसा अभ्यास याचा आहे आणि गुजरातमध्ये सुद्धा सहकार मोठ्या प्रमाणात आहे. ते जिल्हा मध्यवर्ती बँकेत सुद्धा अहमदाबादचे संचालक चेअरमन होते, त्यामुळे इथे परिपूर्ण माहिती त्यांना आहे आणि मला वाटते अशा प्रकारची पुराव्याशिवाय आरोप करणं, हे काय योग्य मला वाटत नाही. ऑन साखर दरवाढ आरोप प्रत्यारोप जरुर याची चौकशी व्हावी आणि चौकशी होऊन कठोरत कठोर उपाययोजना केल्या जातील. कृत्रिम साठा करून गरिबांना, सामान्य माणसांना या महागाईला तोंड द्यावा लागणं हे बरोबर नाही. पहिल्यांदा साखर कोट्यापेक्षा जास्त आणल्यामुळं आणि त्यानंतर त्याच्यावर नियंत्रण न ठेवल्यामुळं ही परिस्थिती उद्भवलेली आहे. ऑन मुंबई महापालिका महापौर पदाची खांडोळी ज्या वेळेला दोन-तीन पक्ष एकत्र येतात, त्यावेळेला अशा पदांच्या वाटण्या कराव्या लागतात. तो नाइलाज असतो. असलं तरी त्याचा विकासावर परिणाम होणार नाही, याची काळजी तिथं घेणं महत्त्वाचं आहे.
0
0
Report
Advertisement
0
0
Report

नाशिक में 100 इलेक्ट्रिक बसें, पहले चरण में 50 से शुरू, CCTV लिफ्ट सहित

Nashik, Maharashtra:नाशिक शहरातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम आणि आधुनिक करण्याच्या दिशेने मोठं पाऊल उचलण्यात आलं आहे... मुंबई आणि पुणे नंतर आता नाशिक शहर बस सेवेत तब्बल 100 इलेक्ट्रिक अर्थात EV बसेस दाखल होणार आहेत... यातील पहिल्या टप्प्यातील 50 EV बसेसचा आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शहर बस सेवेत समावेश करण्यात येणार आहे... तर दुसऱ्या टप्प्यात आणखी 50 इलेक्ट्रिक बसेस शहर बस सेवेत दाखल होणार आहेत... अत्याधुनिक पद्धतीने या बसेसची निर्मिती करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी बसमध्ये CCTV कॅमेऱ्यांची सुविधा देण्यात आली आहे... तसंच प्रवाशांच्या सोयीसाठी एसीची सुविधा आणि दिव्यांग प्रवाशांसाठी स्वतंत्र हायड्रोलिक लिफ्ट ची व्यवस्था करण्यात आली आहे... त्यामुळे नाशिककरांचा प्रवास आता अधिक सुरक्षित, आरामदायी आणि पर्यावरणपूरक होणार आहे... या संदर्भात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर गायकवाड यांनी
0
0
Report

फार्मेसी छात्रा के फोटो मॉर्फ कर इंस्टाग्राम पर पोस्ट करने वाला आरोपी गुजरात गिरफ्तार

Yavatmal, Maharashtra:यवतमाळ मधील फार्मसी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थिनीचे फोटो मॉर्फ करून ते बनावट इंस्टाग्राम अकाउंट वरून अपलोड करणाऱ्या आरोपीला पोलिसांनी गुजरात मधून अटक केली आहे. फरहान अली सुभान अली असे आरोपीचे नाव असून तो उत्तर प्रदेश येथील रहिवासी आहे. याप्रकरणी विद्यार्थिनींनी तक्रार केल्यानंतर आरोपी गुजरात मध्ये लपून बसला होता. त्याने दोन फेक इंस्टाग्राम आयडीवर विद्यार्थिनीच्या मित्र व मैत्रिणींचे फोटो मॉर्फ करून अश्लील फोटो तयार केले. त्या फोटोंना अश्लील मजकूर देऊन ते इंस्टाग्राम सारख्या सार्वजनिक प्लॅटफॉर्मवर अपलोड केले. आरोपीला पोलिसांनी न्यायालयात हजर केले असता त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
0
0
Report
Advertisement

पंढरपूर कॉरिडोर के मुआवजे मुंबई दरों के अनुरूप, पुनर्वसन सहित दीर्घकालीन योजना

Pandharpur, Maharashtra:पंढरपूर प्रस्तावित कॉरिडॉर मधील जमीन व मालमत्ता अधिग्रहणासाठी देण्यात येणारा मोबदला हा थेट मुंबईतील दरांच्या धर्तीवर देण्यात आला आहे. संपूर्ण भारतात एवढा मोठा मोबदला अन्यत्र दिला गेला नसावा, बाधितांच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती प्रस्तावित कॉरिडॉर बाधितांची मुख्यमंत्र्या सोबत बैठक झाली. पंढरपूरचा विकास हा पुढील ५० वर्षांचा विचार करून भाविकांच्या सोयी-सुविधांसह स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देण्याच्या उद्देशाने केला जात आहे, दरवर्षी पंढरपुरला येणाऱ्या भाविकांची संख्या वाढत असल्याने संपूर्ण शहराचा एकात्मिक आणि दीर्घकालीन विचार करून नियोजन होत आहे. बाधितांचे योग्य पुनर्वसन करून ‘जागेस जागा’ देण्याचे शासनाचे धोरण आहे.विकास आराखड्यामुळे बाधित होणारे दुकानदार, रहिवासी आणि इतर व्यावसायिक यांच्या पुनर्वसनाला शासनाचे सर्वोच्च प्राधान्य राहील. पूर्वीच्या अनुभवांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेला अविश्वास दूर करण्यासाठी शासन कटिबद्ध आहे. बाधित दुकानदारांना पर्यायी दुकाने, तर बाधित होणाऱ्या ५०० हून अधिक घरांतील नागरिकांना योग्य पर्याय उपलब्ध करून देत नियोजन केले आहे
0
0
Report

नागपुर जलशुद्धीकरण केंद्र में क्लोरीन गैस लीकेज, सुरक्षित निकासी

Nagpur, Maharashtra:नागपूर - नागपूर जिल्ह्याच्या शंकरपूर येथील महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या जलशुद्धीकरण प्रकल्पात क्लोरीन वायू गळतीची घटना. गोधनी येथील क्लोरीन वायू गळतीची घटना ताजी असताना गुरुवारी संध्याकाळी शंकरपूर मध्येही वायू गळती झाली. या प्रकारामुळे परिसरात काही काळ घबराट पसरली होती मात्र तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे मोठी दुर्घटना टळली. जलशुद्धीकरण प्रकल्पात 900 किलो चे सिलेंडर लावण्यात आले होते, त्याचे वॉशर निघाल्याने गॅस गळती झाल्याची माहिती. जलशुद्धीकरण प्रकल्पात उपस्थित कर्मचाऱ्यांना गॅसची दुर्गंधी आल्यावर तात्काळ पोलीस आणि आग्निशमन विभागाला माहिती दिली. पोलिसांनी आजूबाजूचा परिसर रिकामा करून घेतला, तसेच अग्निशमन विभागाने गॅस गळती बंद करून सिलिंडरला तेथून हटवण्यात आले. हा जलशुद्धीकरण प्रकल्प गावापासून दूर असल्याने कुणीही प्रभावित झाले नाही. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या या जलशुद्धीकरण केंद्रातून आजूबाजूच्या 14 गावातील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो.
0
0
Report
Advertisement

वर्धا में शेड मामले पर सांसद अमर काळे ने प्रशासन की कार्रवाई पर सवाल उठाए

Wardha, Maharashtra:वर्ध्यात खासदार अधिकाऱ्यांवर संतापले; थार गावातील शेड प्रकरणावरून प्रशासनाला जाब अँकर - वर्ध्याच्या आष्टी तालुक्यातील थार गावात सर्वसामान्य नागरिकाच्या शेडविषयी सुरू असलेल्या कारवाईवरून खासदार अमर काळे यांनी प्रशासनातील अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरल्याची घटना समोर आली आहे. भास्कर घोरपडे यांच्या सुमारे २० वर्षांपासून अस्तित्वात असलेल्या शेडवर कारवाई करण्यासाठी प्रशासन आणि आमदार दबाव आणत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. घोरपडे यांच्यावर वैयक्तिक रागातून ही कारवाई केली जात असल्याचा दावा करण्यात आला असून, या प्रकरणामुळे स्थानिक पातळीवर संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. संबंधित प्रकरणाची माहिती मिळाल्यानंतर खासदार अमर काळे यांनी अधिकाऱ्यांशी चर्चा करत सर्वसामान्य नागरिकावर अन्याय होणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश दिल्याचे सांगण्यात येत आहे. शेड हटविण्याच्या कारवाईमागे राजकीय दबाव असल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खासदारांनी अधिकाऱ्यांना जाब विचारत संबंधित नागरिकाला न्याय मिळवून देण्यासाठी भूमिका घेतल्याने या घटनेची परिसरात चर्चा रंगली आहे.
0
0
Report

रक्षा बंधन के पूर्व धनूर में मोटरसाइकिल दुर्घटना: मेघना शिरसाट की मौत

Dhule, Maharashtra:धुळे तालुक्यातील धनूर लोणकुटे येथील विवाहित महिला ऐन रक्षा बंधनाच्या पूर्वसंध्येला एका दुर्दैवी अपघातात जागीच मृत्युमुखी पावली आहे. या घटनेने सर्वत्र हळहळ व्यक्त झाली आहे. धनूर लोणकुटे येथील मेघना धनराज शिरसाट (४०) या विवाहित महिला गुरुवार दि. २७ रोजी रक्षाबंधनाचे औचित्य साधून आपल्या पतीसोबत मोटरसायकलने अंमळनेर येथील बहिणीकडे रक्षा बंधन साजरा करण्यासाठी जात होत्या. यावेळी पतीसोबत मोटर सायकलने जात असतांना वाघाडी गावाजवळ अज्ञात वाहनाने हुलकावणी दिल्याने तोल जाऊन मेघना शिरसाट दुखापतग्रस्त झाल्या. त्यांना जखमी अवस्थेत धुळे जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र डॉक्टरांनी डोक्याला जबर मार लागल्याने मृत घोषित केले. त्यांनी गुरुवार रोजी सायंकाळी धनूर लोणकुटे येथील सासरी सायंकाळी अंत्यसंस्कार झाले; त्यांच्या पित्य, दोन मुली, एक मुलगा, सासू, सासरे असा परिवार आहे. त्या धुळे दूध संघाचे संचालक अरविंद भालचंद्र शिरसाट यांच्या सून होती.
0
0
Report

देवेंद्र फडणवीस को एक वर्ष का एक्सटेंशन मिला: हिंदी-मराठी भाषा पर बहस तेज

Nagpur, Maharashtra:देवेंद्र फडणवीस को एक वर्ष का एक्सटेंशन मिला। उन्होंने बाहर के दुश्मन खत्म किए, पर अंदरूनी स्थितियाँ बाकी रहीं। शिवसेना के खिलाफ विरोध हो रहा है क्योंकि बाहरी राज्य में चुनाव हैं। कोई हिंदी में बोल रहा है, उग्र व्यवहार किया जा रहा है। आकांक्षा की माँ-बाप मराठी नहीं जानते, वे प्रांत से आए हैं; वे दुखी हैं; मैंने उनके साथ हिंदी में बात की। परदेशी भाषा से मराठी उच्चारण से लोगों को बोलना कठिन लगता है। अगर कोई उग्र बोलता है या लोगों को परेशान करता है तो उसे चोट लग सकती है। आप हिंदी में बोलिए, ऐसी न कहा जाए? कितने वाक्य सीखना जरूरी है— दायें जाएँ, बाएँ जाएँ। ओटीपी क्या है— क्या एक वर्ष में सीखना संभव है। किसी धोखाधड़ी चुनाव के लिए एक्सटेंशन देना उचित है。
0
0
Report
Advertisement

साखर की कृत्रिम कमी के आरोप, निर्यात-स्टॉक सवालों के घेरे में

Kolhapur, Maharashtra:राजू शेट्टी, नेते स्वाभिमानी शेतकरी संघटना Byte मुद्दे मुळामध्ये साखरेची टंचाई आहे का हा प्रश्न आहे.. साखरेची एव्हढा चढ उतार कशासाठी पेट्रोल टंचाई असल्यानंतर पेट्रोल घेण्यासाठी लोकांची राग असते, खतटंचाई असल्यानंतर खताच्या दुकानासमोर लोक रांगेत उभे असतात मग दुकानांच्या समोर साखरेसाठी रांगा का लागल्या नाहीत ? कोणत्याही दुकानदाराने आमच्याकडे साखर नाही असं का सांगितले नाही. बाजारपेठेत साखर मुबलक होती, केंद्र सरकारच्या नियमाप्रमाणे प्रत्येक महिन्याला 22 लाख मॅट्रिक टन साखर रिलीज करत आहे. साखर मिळत नाही असं कुठेही तक्रार आलेली नाही. कारण यावर्षी आपल्या गरजेएवढी साखर उपलब्ध होती सीजन सुरू असताना 47 लाख मॅट्रिक टन साखर शिल्लक होती. एकूण ठरलेल्या कोट्या पैकी केवळ आठ लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली... मग उर्वरित साखर गेली कुठे. आता सरकार म्हणते 35 लाख टन साखर शिल्लक आहे. मग राहिलेली 35 ते 40 लाख मेट्रिक टन साखर कुठे गेले उर्वरित साखर नेपाळ मार्गे बांगलादेशला गेली का ? केंद्र सरकारने मोठ्या व्यापाऱ्यांचे स्टॉक तपासले असते तर सगळं सापडले असते. कृत्रिम रीतीने दरवाढ करण्यात आली. जनतेमध्ये घबराट निर्माण करून अधिक पैसे कमवायचे असा यांचा डाव होता साखरेचे भाव अचानक वाढले का ? आणि ते नंतर कमी का झाले ? याचे उत्तर आम्हाला मिळायला पाहिजे आता जे साखरेचे भाव आहेत ते स्थिर राहावेत असे आमचे मत आहे , 4800 च्या खाली भाव जाता कामा नये आयात होणारी साखर ही आक्टोंबर महिन्यात येणार आहे. त्याचा काहीच उपयोग होणार नाही. कर्नाटकातील कारखाने अवघ्या काही दिवसात सुरू होणार आहेत. मग साखर आयात करण्याची गरज काय होती आत्ताच भाव कसे खाली आले याची चौकशी सरकारने करायला पाहिजे. *ऑन मंत्री अमित शहा आणि प्रल्हाद जोशी* केंद्राने 15 लाख मॅट्रिक टन साखर निर्यात करण्याचा कोटा दिला होता. त्यातील फक्त आठ लाख मेट्रिक टन साखर निर्यात झाली, उर्वरित साखर गेली कुठे ? अमित शहा यांना सध्या साखरेची खूप काळजी वाटू लागली आहे. त्यामुळे त्यांनी याचे उत्तर द्यायला हवं. अन्नपुरवठा मंत्री प्रल्हाद जोशी यांना देशातील साखर कारखानदारांकडे किती साखर शिल्लक आहे याची माहिती तात्काळ उपलब्ध होते, ती साखर तपासायचे अधिकार त्यांच्याकडे आहेत, मग ते का तपासत नाहीत. कारण तस्करीच्या मार्गे ही साखर बाहेर देशात गेली असेल. काही व्यापाऱ्यानी साखरेची कृत्रिम टंचाई निर्माण करून sाखर जादा दराने विकायची या उद्देशाने साखरेचा साठा केला असेल. खाजगी व्यापाऱ्यांच्या गोडाऊनवर धाडी टाकायला पाहिजे होत्या. साखर देशाबाहेर गेले असेल तर आमचे गृहमंत्री अमित शहा काय करत होते ? अमित शहा यांना जबाबदारी झटकता येणार नाही.
0
0
Report
0
0
Report

भारत में चीनी के दाम छूते, सरकार आयात से कीमतें नियंत्रण में लाने को तत्पर

Kolhapur, Maharashtra:Anc :- साखर उत्पादनात ब्राझील जगात आघाडीवर तर भारताचा क्रमांक दुसरा… भारत जगातील सर्वात मोठ्या साखर उत्पादक देशांपैकी एक असला, तरी सध्या देशात साखरेच्या दराने उच्चांक गाठलाय… यंदा उत्पादन घटलं… साखरेचा साठा कमी झाला… आणि सणासुदीच्या पार्श्वभूमीवर मागणी वाढली… त्यामुळे साखरेचे दर वाढले असा दावा केला जात आहे…पण प्रत्यक्षात ही स्थिती नसल्याचा दावा काही साखर अभ्यासक आणि शेतकरी नेते करत आहेत. त्यामुळे आगामी काळात वाढलेले साखरेचे भाव कमी होणार की स्थिर राहणार याची चर्चा सुरू झाली आहे.. पाहूया त्याचाच स्पेशल रिपोर्ट. साखर... प्रत्येकाच्या घरातील रोजच्या वापरातील वस्तू...चहा असो… मिठाई असो… बेकरी पदार्थ असोत किंवा शीतपेय, साखरेचा वापर मोठ्या प्रमाणात होतो, म्हणूनच साखरेच्या दरात झालेली थोडीशी वाढही थेट ग्राहकांच्या खिशावर परिणाम करते… त्यामुळे साखरेचा नेमकं गणित काय आहे याकडे सर्वांचेच लक्ष असते.. जगाच्या बाजारपेठेत साखर उत्पादनात ब्राझील नंतर भारताचा नंबर लागतो. पण ब्राझील आणि भारताच्या साखर उद्योगात मोठा फरक आहे… ब्राझील हा जगातील सर्वात मोठा साखर निर्यातदार आहे, तर भारतात तयार होणाऱ्या साखरेचा मोठा हिस्सा देशांतर्गत बाजारातच वापरला जातो, भारताचं साखर गणित… देशात दरवर्षी साधारण 280 ते 285 लाख टन साखरेची गरज असते… त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी उत्पादन, सुरुवातीचा साठा, आयात आता या तिन्ही गोष्टी महत्त्वाच्या ठरतात. पण 2025-26 च्या हंगामात उत्पादनाला मोठा फटका बसला… सुरुवातीला देशात सुमारे 343 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज होता… पण उत्पादन झालं 305 लाख मॅट्रिक टन इतके. येत्या हंगामात देखील साखरेचे उत्पादन सुमारे 306 लाख टन राहण्याची शक्यता आहे… यातील देशांतर्गत बाजारपेठेत 280-285 लाख टन मॅट्रिक टन साखर लागणार आहे. त्यामुळे उत्पादित झालेली साखर आणि स्थानिक बाजारपेठेत लागणारी साखर यातील अंतर कमी आहे.. मागील साठा, निर्यात, इथेनॉलकडे वळवलेली साखर आणि बाजारातील उपलब्धता…या सगळ्याचा विचार केला तर देशातील उपलब्ध साठ्यावर दबाव निर्माण झाला आणि याचाच परिणाम साखरेच्या दरावर झाल्याचे पाहायला मिळाले. गेल्या दोन-तीन महिन्यातील बाजारपेठेत साखरेला मिळणारा भाव पहिला तर जुलैमध्ये साखरेचा सरासरी किरकोळ दर सुमारे 50 रुपये किलो होता. ऑगस्टमध्ये तो 55 रुपयांपेक्षा पुढे गेला आणि आता अनेक बाजारपेठांमध्ये किरकोळ दर 65 रुपये किलोच्या आसपास पोहोचला आहे… याचा अर्थ जवळपास 40% हून अधिक भाववाढ काही महिन्यात झाली. तोंडावर गणेशोत्सव, दसरा, दिवाळी…हे सणासुदीची दिवस असताना वाढलेले साखरेचे दर ग्राहकांना चटका देणारे आहेत. त्यामुळे साखरेच्या भावाने अचानक घेतलेल्या उसळीमुळे ग्राहक संतप्त झालेला पाहायला मिळाला. त्यामुळे केंद्र सरकार देखील खडबडून जागे झाले. बाजारात साखरेचा पुरवठा वाढवण्यासाठी 10 लाख टन कच्ची साखर शुल्कमुक्त आयात करण्यास परवानगी दिली आहे. याशिवाय परदेशातून कच्ची साखर आयात करून प्रक्रिया करणाऱ्या रिफायनर्सकडील सुमारे 3 ते 3.5 लाख टन तयार साखर देशांतर्गत बाजारात आणण्याचा निर्णय घेण्यात आलाय. म्हणजेच एकीकडे आयात आणि दुसरीकडे उपलब्ध साठा बाजारात आणण्याचा प्रयत्न केंद्राने केला आहे. यामध्ये केंद्राची भूमिका ही साखरेचा पुरवठा वाढवून दर नियंत्रणात आणण्याची आहे, सरकारच्या या निर्णयाचा परिणाम बाजारात दिसायलाही लागलाय. पण झालेला हा बदल ग्राहकांना अपेक्षित असणारा असा नाहीये. त्यामुळेच शेतकरी संघटनेचे नेते देखील या भाव वाढीमुळे आवाक झाले आहेत.. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
0
Report
Advertisement
Advertisement
Back to top