Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशीम नगरपरिषद में चुनाव प्रक्रिया के कारण 70 लाख रुपयों की वसूली, राजस्व में उछाल

GMGANESH MOHALE
Nov 25, 2025 04:35:38
Washim, Maharashtra
वाशीम जिल्ह्यात परिषदेच्या निवडणूक प्रक्रियेचा अनपेक्षित सकारात्मक परिणाम महसूलवाढीत दिसून आला आहे. नगरसेवक व नगराध्यक्ष पदांसाठी अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांची मोठ्या प्रमाणात धावपळ झाली. अर्ज दाखल करताना उमेदवारांकडे मालमत्ता कर, पाणीपट्टी, बांधकाम परवाना शुल्क, व्यवसाय कर आदिंची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र अनिवार्य असल्यामुळे इच्छुक निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांनी आपली जुनी थकबाकी भरून काढली. याचा थेट फायदा नगरपालिकेच्या महसुलाला झाला असून, केवळ पंधरा दिवसांत वाशीम नगरपरिषदेकडे तब्बल ७० लाख रुपयांची वसुली झाली आहे. यामुळे नगरपरिषदेच्या कर विभागावर असलेला प्रलंबित वसुलीचा ताणही मोठ्या प्रमाणात कमी झाला आहे. निवडणूक प्रक्रियेच्या निमित्ताने झालेली ही महसूल वाढ नगरपालिकेसाठी दिलासादायक ठरली आहे.
153
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRANAV POLEKAR
Nov 25, 2025 06:21:04
Ratnagiri, Maharashtra:राजापूर नगर परिषदेच्या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. कारण या ठिकाणी माजी आमदार हुस्नबानू खलिफे या महाविकास आघाडीकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात पुन्हा एकदा उतरल्या आहेत. त्यांच्यासमोर महायुतीच्या श्रुती ताम्हणकर यांचं आव्हान आहे. ताम्हणकर या शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. राजापूरमधील घराणेशाही आम्हाला मोडून काढायची आहे, एवढी वर्ष झाली राजापूरचा विकास काही झाला नाही, त्यामुळे राजापूरचा विकास हेच आमचं व्हिजन श्रुती ताम्हणकर यांनी म्हटलं आहे. तसेच केंद्रात आणि राज्यात आमचं सरकार असल्यामुळे आम्हाला इथे निधी चांगला मिळेल. त्यामुळे राजापूरचा विकास मी नक्की करेन.. प्रचारा दरम्यान आम्हाला जनतेचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. लोकांना नवा चेहरा हवा आहे, त्यामुळे आपण नक्की जिंकू असा विश्वास श्रुती ताम्हणकर यांनी व्यक्त केला आहे.. दरम्यान आमदार किरण सामंत हे देखील आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याचं ताम्हणकर यांनी यावेळी सांगितलं..
112
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 25, 2025 06:19:28
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:संजय शिरसाठ पीसी शिवसेना भाजप एनसिपी मध्ये अलिखित करार झालाय,  पक्षाचे लोक आप आपसात  घ्यायचे नाही तरी संभाजी नगरात पैशांची मस्ती काहींना आलीय त्या जीवावर फोडाफोडी केली जातेय, त्या बाबत अहवाल आम्ही शिंदे साहेबना देणार आहोत याचा परिणाम सगळ्यांना भोगावे  लागेल, वर्चस्व सिद्ध करायला आम्ही पाऊल उचलले तर मग वाईट वाटून घेऊ नाका, संयम पाळला आहे मात्र जास्त काळ टिकणार नाही संयमाची मर्यादा असते.. नाराजी वाढतेय संभ्रम निर्माण होतोय, फुलंब्री गंगापूर वैजापूर सगळीकडे असे सुरू असेल तर महायुती म्हणून काय आपला रोल आहे, हे थांबवा एकाच परिणाम दुसऱ्या निवडणूक वर होईल.. महायुती मध्ये असे सुरू असले तर निवडणूक लढवता येणार नाही, एक लक्षात ठेवा अकॅशन ला reaction असेल याबाबत वरिष्ठ नी काळजी घ्याबी,  बरं प्रचार करायचा की फोडा फोडी करावी हे ही ठरवा... On बावनकुळे लोक ऑप्शन शोधत असतात याचा अर्थ प्रवेश द्या असे होत नाही,  बावनकुळे ला माहिती आहे ते सगळीकडे होते.. असे प्रवेश घेत असाल तर तुम्हाला लखलाभ..  आम्ही भाजप चे लोक घेत नाही मग त्यांनी फोडणे कितपत योग्य आहे, जाणीवपूर्वक आहे की स्थानिक कार्यकार्ये मस्ती आहे कळेना On चंद्रकांत पाटील... अजित दादा अर्थमंत्री आहेत त्यांना अधिकार आहेत मान्य  मात्र मुख्यमंत्री हे मोठे असतात त्यांना सर्वाधिकार असतात आणि तिजोरी मालक कुणी असेना ठरवताना सगळे ठरवतात... विकासाच्या आड कुणी येऊ शकत नाही अजित पवार विधान अंबेजोगाई... अजित पवारांनी ते बारामती पुरते बोलले असावे, सगळे नेते विकास करतात, प्रत्येकाला आपला भाग प्रिय आहे, त्यांच्या नेत्यांबद्दल बोलले असेल तर तो त्यांचा अधिकार आहे..मात्र त्यांनी इतर नेत्यांबद्दल असे बोलू नये... ओबीसी आरक्षण आज कोर्टाचा निकालावर लक्ष आहे , आकडेवारी पहिली तर तफावत दिसते न्यायालयाच्या लक्षात आलाय वेगळा निर्णय येऊ शकतो निवडणूक पुढे जाऊ शकतात असे वाटते ... निवडणूक आयोगाला पत्र विरोधकांनी दिलेले निवडणूक आयोगाला पत्र हा लोकशाहीचा अधिकार आहे त्यांनी वेगळे असे काही सांगितले नाही त्रुटी दुरुस्त करायला हवा आमचेही मत आहे राजकारणात घराणेशाही बाबत घराणेशाही लाट आलेली आहे मान्य आहे लोकशाहीत कॉन्फिडन्स असेल तर जनता तुम्हाला स्वीकारेल.. हे लोण सगळीकडे पसरले आहे कुणाला नाव ठेवण्यात अर्थ नाही... निवडणूक यादी बनवणे खेळ नाही , कुठलाही अधिकारी याद्या कशा असाव्यात असे विचारात नाही On चाकणकर  विधान सगळे असे म्हणायला लागले तर चावी तुमच्याकडे आणि जनतेच्या हातात कटोरा आहे का ते जनतेचे पैसे आहे, आपण watchman आहोत लक्षात ठेवा... धनंजय मुंडे आठवण दोस्ती असेल मी त्यावर भाष्य करणार नाही बीड बातमी नाही आली तर पेपर वाचला सारखे वाटत नाही याबाबत तिथल्या नेत्यांनी बघावे आज कराड आठवण आली उद्या आणखी कुणाची येईल... मुंबई मनसे मुंबईत प्रत्येक पक्षाची ताकत आहे , ताकत एकत्र आल्या तर उमेदवार विजयी होतो, सगळ्यांची ताकत आहे... कुणाल कामरा  टी शर्ट आता याचा अर्थ काय घ्यायचा ते त्या पक्षाचे नेते ठरवतील गेल्या वेळी मोदी साहेब शिंदे साहेब वर टीका केली आम्ही उत्तर दिले आता हिम्मत वाढली संघावर टीका करतोय याचे उत्तर भाजपने द्यावे On बॉम्बे मुंबई विधान ते खुश असून चालणार नाही....नाव बदलले आहे ज्यांना बॉम्बेचा पुळका आहे त्यांनी तो सोडून द्यायला हवे...नावासोबत तडजोड नाही होणार, सर्व नाव बदलेले गॅझेट निघालेले आहे. मुंबईच्या नावासोबत तडजोड नाही होणार. ऑन बावनकुळे  जयस्वाल आरोप पक्षात अनेक नवीन नवीन घेतले ते तपासून घेतले पाहिजे......कोणत्याही पक्षाने यातखी दखल घेतली पाहिजे, गुन्हेगारी लोक घेतले तर नुकसान होते, त्यांच्या पक्षातील त्यांनी पाहावे.. ऑन पुणे जमीन घोटाळा वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल, मुख्यमंत्री योग्य ती दखल घेतील, मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे कारवाई होणार  तर नक्की होईल... ऑन सचिन सावंत  मालवणी निवडणुकीत सर्व जाती आठवतात आता जातीय भांडवल करतील ऑन मुखाड घटना काही माजलेला लोक  असे करतात,  त्यांचे ड्रायव्हिंग लायसन रद्द केले पाहिजे आणि कारवाई व्हायला पाहिजे...
79
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 25, 2025 05:46:57
Nashik, Maharashtra:सिन्नरमध्ये पोलीस उपनिरीक्षक एक लाखांची लाच घेताना जाळ्यात पोलीस कोठडी न देण्यासाठी मागितले होते पैसे नाशिक जिल्ह्यातील सिन्नर पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक राजू बिजलाल पाटील यांना एक लाखांची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहात पकडले आहे सिन्नर पोलीस ठाण्यातील दाखल असलेल्या अत्याचाराच्या गुन्ह्यात आरोपीला पोलीस कोठडी न मागणे जामीनास मदत करणे तसेच कोर्टात चार्टशीट दाखल केल्यानंतर केस कच्चे ठेवण्यासाठी एक लाख 60 हजार रुपयांची लाचेची मागणी पोलीस उपनिरीक्षक राजू पाटील यांनी केली होती तडजोडीनंतर एक लाख रुपये घेण्याचे ठरले आणि पाटील यांनी ते मान्य करत एक लाख रुपये ची लाच स्वीकारली यावेळी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचत त्यांच्यावर कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले आहे....
174
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 05:33:35
Nagpur, Maharashtra:नागपूर - नगरपरिषदेच्या निवडणुकीत उच्च शिक्षित महिला निवडणुकीच्या रिंगणात नागपूर जिल्ह्यातील सावनेर नगरपरिषद निवडणुकीत इंजिनीअर, एमबीए, शिक्षिका असलेल्या महिला उमेदवार सावनेर नगराध्यक्ष पदासाठी भाजपकडून संजना मंगळे यांना उमेदवारी, संजना मंगळे या इंजिनिअर नागपूर मेट्रोतील असिस्टंट सेक्शन इंजिनिअरची नोकरी सोडून निवडणूक लढवत आहेत रिमा बालाखे या एमबीए आहेत, त्या नगरसेविका पदासाठी भाजपकडून निवडणूक लढवत आहेत शिक्षिका असलेल्या योगिता घोरमारे आणि कला शाखेतील पदवीधर नगरसेविका होण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात ग्रामीण भागातल्या निवडणणक्याेत या उच्च शिक्षित आणि तरुण महिलांचा सहभाग कौतुकास्पद आहे, या महिला उमेद्वारांशी बातचीत केलीय आमचे प्रतिनिधी अमर काणे यांनी
155
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 05:09:14
Nagpur, Maharashtra:नागपूर - बाईट - चंद्रशेखर बावनकुळे, महसूलमंत्री On अपक्ष चिन्हवाटप विलंब - राज्य निवडणूक आयोगाने लावलेल्या कार्यक्रमात बघितला तर चिन्ह वाटपाची तारीख आलेली है आणि राज्य निवडणूक आयोगाच्या कार्यक्रमानुसार सर्वांना द्यावे लागतो On ओबीसी आरक्षण सुनावणी - आमचं एवढंच म्हणणं होतं की ओबीसी 18 पगड जाती बारा बलुतेदार जाती आहेत, या वर्गाला 27 टक्के आरक्षण दिलं गेलं पाहिजे, ते महाराष्ट्र सरकारने राज्य निवडणूक आयोगाच्या माध्यमाने देण्यात आला, आता सुप्रीम कोर्ट त्यात काय भूमिका घेतात ते महत्त्वाचा आहे, जो काही सुप्रीम कोर्टाचा निकाल असेल त्याला पुढे जाऊ पण ओबीसींना 27 टक्के आरक्षण मिळावा हे महत्त्वाचे आहे On दुबार मतदार नावे - दु बार नावं सर्व महाराष्ट्रात आहेत, नागपुरात आहेत प्रत्येक मतदारसंघात आहेत, डिलीशनची प्रक्रिया सोपी नसल्याने होत नाही, एडिशन खूप होतात, त्यामुळे जोपर्यंत एस आय आर होत नाही तोपर्यंत मतदार याद्या दुरुस्त होणार नाही - दुबार जरी नावं असले तरी एकच मतदान व्हावं On अमेडिया मुद्रांक शुल्क मुदत - त्यांनी मुदतवाढ मागितली आणि आम्ही जर दिले नाही तर ते लीगल पॉईंट ठेवतात, वारंवार मुदत वाढ देणार नाही, त्यांना नियमाप्रमाणेच जावं लागेल On फुलंब्री पक्ष प्रवेश - अनेक ठिकाणी होत आहे, शिवसेनेचा कार्यकर्ता भाजपात आणि भाजपचा कार्यकर्ता शिवसेनेत जात आहे, आमचे कार्यकर्ते शिवसेेनत गेले आहेत, ऑप्शन लोकं शोधत असतात पण आमची युती मजबूत आहे, निवडणुकीनंतर सर्वांशी चर्चा करू आणि योग्य निर्णय घेऊ On काँग्रेस भकास झालीय वक्तव्य - विकसित भारताच्या संकल्प मोदीजींनी केला, महाराष्ट्रचा संकल्प मुख्यमंत्री फडणवीस यांनी केला, एकीकडे विजन वर मत मागतोय, डबल इंजिन सरकारच विकास करू शकतो यावर मी म्हटलं की काँग्रेसकडे केवळ कन्फ्युजनचा राजकारण आहे विकासाचे नाही On महायुती समन्वय - आम्ही सर्वांनीच निर्णय घेतला आहे की मित्र पक्षाला कोणी टाकून बोलायचं नाही, महायुतीत कुठलेही मनभेद व्हावे नाही याची काळजी घ्यायची आहे आमच्या पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना रवींद्र चव्हाण यांनी सूचना जिल्ह्यातील कोणीही चुकीच्या पद्धतीचे स्टेटमेंट करू नका On पट्टे वाटप वक्तव्य - माझा अधिकार महसूल मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांनी दिला आहे की राज्यातील सर्व नगरपालिका नगरपरिषद ग्रामीण भागात पट्टे वाटप हा अधिकार आमचा आहे - 2024 च्या पूर्वी खाजगी घर आहेत ज्यांनी भूखंड घेतले एनएटीपी केला नाही त्या गरीब माणसाचे घर आम्ही कायदेशीर करून द्यायचा निर्णय घेतला आहे - आपला अजेंडा सांगने प्रलोभन नाही, मी महसूल मंत्री म्हणून मला अधिकार प्राप्त आहेत त्यांच्या खात्याचे अधिकार आहेत, हा विकासाचा अजेंडा आहे On धनंजय मुंडे वाल्मिकी कराड - याचे उत्तर त्यांनीच दिलं पाहिजे याबद्दल मी काय बोलणार On आशिष देशमुख नाराजी - जिल्हा भाजपने निर्णय घेतला होता, पण पक्षप्रवेशाचा निर्णय हा जिल्हा भाजपने घेतला त्यामुळे कोणी भेटायला आला तर भेटलं पाहिजे,हाच त्या ठिकाणी माझा भाग होता On चॅद्रकांत पाटील/अजित पवार - राज्याचा कुठल्याही फायनान्स डिपार्टमेंटचा निर्णय हे तीनही नेते बसूनच होतो, शेवटी आम्ही मंत्री आहेत, सगळे अधिकार मुख्यमंत्र्यांना प्राप्त असतात, आम्हाला जे अधिकार दिले त्यावर ओवररुल करायचा असेल तर मुख्यमंत्री करू शकतात On कुणाल कामरा आरएसएस - कोणी आक्षेपार्ह पोस्ट टाकले असेल त्यावर पोलीस कारवाई करतील On राममंदिर - राम मंदिर हे आमच्या आस्थेचा प्रतीक आहे
134
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 25, 2025 04:47:18
Wardha, Maharashtra:वर्धा के गिरड खुर्सापार क्षेत्र के जंगल में एक वाघीण के साथ उसके तीन पिल्ले और एक नर वाघ का समूह दिखाई दिया है, जिसने दिन-रात लोगों के लिए डर पैदा किया है। वनविभाग को 30 दिसंबर तक भीमजर्सी बंदी कर पिंजरे में डालने की अनुमति मिली है। वनविभाग के अधिकारी- कर्मचारियों द्वारा दिवसरात्र कोशिशें जारी हैं ताकि वाघ को पिंजरे में कैद किया जा सके। जंगल में ट्रैप कॅमेरे और ड्रोन से निगरानी की जा रही है, ताकि वाघ के हर कदम पर नज़र रखी जा सके। अभी तक इस वाघ ने 30 से अधिक पालतू जानवरों को मारने के बावजूद किसी मनुष्य को नुकसान नहीं पहुंचाया है। गिरड खुर्सापार मार्ग पर रोज़ वाघ परिवार को देखने से लोग उत्साहित भी होते हैं, परistence डर का माहौल बना हुआ है। क्षेत्र के कुछ खेतों में कामकाज भी इस वजह से बाधित हो रहा है और लोगों की मांग है कि वाघ का नियंत्रण किया जाए ताकि आम जीवन सामान्य हो सके।
150
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Nov 25, 2025 04:45:19
Bhandara, Maharashtra:आपण कोणाला भितो का? आम्ही बांगड्या घातलेल्या नाही, मर्द आहोत; प्रचार सभेतून प्रफुल पटेलांची सडकून टीका, बंडखोरांना सुनावलं आमचे जूने मित्र आता त्यांच्या पुतण्याच्या मागं लागले आहेत. ते कुणाच्या पार्टीत आहे आणि कितव्या पार्टीत गेले घरातील पोरं भटकले आहेत, त्यांच्यामागे जाण्याची गरज नाही. भटकलेला उद्या वापस येईल. पण, भटकलेल्याच्या मागे आपल्याला जायचं नाही. समझनेवाले को इशारा काफी... और ना समझे ओ..... असं म्हणत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांच्या विरोधात बंडखोरी करणाऱ्या सागर गभणे याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी टोला लगावला बंडखोर सागर गभने आणि माजी खासदार मधुकर कुकडे यांच्यावर निशाणा साधला.
215
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 25, 2025 04:36:41
145
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 25, 2025 04:33:19
Dhule, Maharashtra:कधी पाऊस, कधी थंडी तर कधी धुकं अश्या निसर्गाच्या दुष्टचक्रात भेंडी उत्पादक शेतकरी सापडला आहे. धुक्याची दाट चादर भेंडी पिकावर दुष्परिणाम केल्याने उत्पन्न घाटले आहे. उत्पन्न जमीन झाल्याने शेतकऱ्यांना आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. धुळे तालुक्यातील कापडणे देवभाने शिवारातील शेतकरी सध्या आसमानी संकटाने मोडून पडले आहेत. पावसाच्या दुष्परिणामातून सावरत असतानाच हिवाळ्यातील दाट धुक्याने भेंडी पिकावर पुन्हा संक्रांत आणली आहे. शिवारातील शेतकरी उत्पादक मोठ्या अडचणीत सापडले असून उत्पादनातील झपाट्याने झालेली घट आणि बाजारभावातील घसरण यामुळे आर्थिक संकट तीव्र झाले आहे. पूर्वी दोन बिघामधून सरासरी वीस कॅरेटपर्यंत भेंडीचे उत्पादन सहज मिळत होते. मात्र सध्या त्याच क्षेत्रातून जेमतेम पाच कॅरेट मिळत असल्याचे शेतकऱ्यांचे सांगणे आहे. थंडीत वाढलेल्या धुक्यामुळे झाडांची वाढ खुंटून रोगराईने डोके वर काढले आहे. परिणामी भेंडीची गुणवत्ता आणि प्रमाण दोन्ही घटले आहे. उत्पादनात घट झाल्याने भावही कोसळले असून पिकातून मजुरीदेखील निघेनाशी झाली आहे. “शेतीवर हजारो रुपये खर्च केले, पण हातात काहीच पडत नाही. मजुरी भागवणेही कठीण झाले आहे,” अशी खंत विजय शांताराम माळी या शेतकऱ्याने व्यक्त केली आहे. या सर्व परिस्थितीत शासनाने तातडीने पिकनुकसानीचे पंचनामे करून आर्थिक मदत द्यावी, अशी ठोस अपेक्षा शेतकरी बांधवांनी देखील व्यक्त केली आहे.
112
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 25, 2025 04:21:15
Nagpur, Maharashtra:नागपूर * नागपूरच्या मेयो रुग्णालयातील फॉरेन्सिक मेडिसिन आणि विषविज्ञान विभागाच्या प्रमुखाविरोधात निवासी महिला डॉक्टरांची सामूहिक तक्रार.. * लैंगिक छळ, शैक्षणिक गैरवर्तन, आणि सतत्याच्या मानसिक छळाचे गंभीर आरोप करत तक्रार करण्यात आलीय.. * या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स (मार्ड) ने थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही तक्रारीचे निवेदन सादर केले आहे.. * या तक्रारीची दखल घेत मेयो रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर रवी चव्हाण यांनी विशाखा समिती गठन केली आहे.. * चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित विभागाचे त्वरित निलंबित करण्यात यावे, सोबतच व्हाट्सअप संदेश, कॉल रेकॉर्डिंग, ई-मेल, आणि 9 डिसेंबर 2025 रोजी सायंकाळपर्यंतचे सीसीटीव्ही फुटेसह सर्व डिजिटल पुरावे प्रशासनाने तात्काळ जतन करावे अशी निवासी मागणी केली आहे..
91
comment0
Report
Advertisement
Back to top