Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Washim444505

वाशिम में सोयाबीन कीमतें उछली: बिजवाई दर और सामान्य दर में बड़ा अंतर, किसान नाराज/खुश प्रतिक्रियाएं

GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 03:20:43
Washim, Maharashtra
अँकर: वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत सोयाबीनची आवक सातत्याने वाढत आहे. काल तब्बल १४ हजार क्विंटल सोयाबीनची नोंद झाली. यात बिजवाई सोयाबीनला प्रतिक्विंटल ७ हजार ३०० रुपये इतका उच्चांकी दर मिळाला आहे. मात्र सामान्य सोयाबीनला केवळ ४ हजार ३८० रुपये प्रतिक्विंटल दर मिळत असल्याने दोन्ही दरांमध्ये जवळपास तीन हजार रुपयांचा फरक दिसून येत आहे.बिजवाई सोयाबीनचा दर हा सरकारच्या हमीभावापेक्षाही अधिक निघाला असल्याने बिजवाई करणारे शेतकरी समाधानी दिसत आहेत.परंतु साधे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अपेक्षित दर न मिळाल्याने त्यांच्यात नाराजी व्यक्त होत आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Nov 07, 2025 05:20:29
Thane, Maharashtra:मानसिक त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या; परिसरात संताप... संजय नगर, मुंब्रा परिसरात एका 19 वर्षीय तरुणीने मानसिक त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, संबंधित तरुणीचा वडील महिंद्रा पांडे हे ऑटो रिक्षा चालक असून परिसरातील काही युवकांकडून छेडछाड व मानसिक त्रास दिला जात असल्याचे परिवाराने सांगितले. या त्रासाला कंटाळून तिने आपल्या राहत्या घरी गळफास घेतला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटमध्ये काही व्यक्तींची-nावे नमूद असून पोलिस तपास सुरू आहे. तसेच सदर परिसरात रात्री युवकांची मोठी गर्दी जमते, असा स्थानिकांचा आरोप असून पोलिसांनी तातडीने कारवाई करावी, अशी मागणी होत आहे. तरुणीच्या अंत्यसंस्कारावेळी स्थानिक नागरिक, मित्रपरिवार आणि रिक्षाचालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, उद्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात आंदोलन व रिक्षा युनियनकडून निवेदन देण्यात येणार आहे.
3
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 07, 2025 05:16:47
Beed, Maharashtra:बीड ब्रेक: अजित पवारांच्या राष्ट्रवादी कडून गेवराई नगर परिषदेसाठी पहिला उमेदवार जाहीर. राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून नगराध्यक्ष पदासाठी शितल महेश दाभाडे यांच्या नावावर शिक्कामूर्त अधिकृत उमेदवारीची घोषणा. बातमी गेवराईच्या नगरपरिषद निवडणुकी संदर्भात आहे.. होऊ घातलेल्या नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून पहिलाच नगराध्यक्ष पदाचा उमेदवार जाहीर करून प्रचारात आघाडी घेतली आहे.. बीड जिल्ह्यामध्ये सहा नगर परिषदेमध्ये निवडणूक होत आहेत. त्यापैकी गेवराई नगर परिषदेमध्ये आमदार विजयसिंह पंडित यांच्या गटाकडून माजी नगराध्यक्ष महेश दाभाडे यांच्या पत्नी शितल महेश दाभाडे यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. काल कार्यकर्त्यांच्या बैठकीत राष्ट्रवादीचे नेते अमरसिंह पंडित यांच्याकडून या उमेदवारीची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे.
6
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 07, 2025 05:00:14
Chendhare, Alibag, Maharashtra:म्हसळ्यातल्या ठाकरोली गावाबाहेर लक्ष्यवेधी पाट्या जमिन बचाव, गाव बचाव ग्रामस्थांचं अनोख अभियान जमिनी न विकण्याचा ग्रामस्थांचा निर्णय जमिनी वाचवा, गाव वाचवा हे अभियान त्यांनी हाती घेतलं आहे. ठाकरोली ग्रामस्थानी आपल्या जमिनी न विकण्याचा निर्णय घेतला असून तसे फलक गावाच्या मुख्य रस्त्यावर लावले आहेत. महत्वाचं म्हणजे गावातील तरुणाईने यात पुढाकार घेतलाय. मागील काही वर्षांपासून मुंबई पुण्यातील व्यावसायिक, गुंतवणूकदार यांचं लक्ष रायगड जिल्ह्यातील जमिनींवर गेलं आहे. त्यांनी इथल्या जमिनी खरेदी करण्याचा सपाटा लावलाय. अशावेळी ठाकरोली ग्रामस्थानी घेतलेला निर्णय लक्ष्यवेधी ठरतो आहे. गावाबाहेरील फलकांची सध्या सर्वत्र चर्चा सुरू आहे.
7
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 07, 2025 04:16:32
Kolhapur, Maharashtra:Kop Gurhal Feed:- 2C Anc:- कोल्हापूर जिल्ह्यातील अर्जुनवाडा गावांमधील अनेक गुर्हाळ मालक गुऱ्हाळाला जळण म्हणून टायर, प्लास्टिक चपला, कुशनचा वापर करत आहेत, त्यामुळे या परिसरात मोठ्याप्रमाणात विषारी वायू पसरत आहे. गावातील ग्रामस्थांनी या संदर्भात अनेक वेळा तक्रारी करून देखील हा प्रकार थांबलेला नाही, त्यामुळे प्रशासनाने तातडीने या संदर्भात कारवाई करावी अशी मागणी गावातील ग्रामस्थ करत आहेत. ज्या ज्या वेळेला गुऱ्हाळ सुरू होतात त्यावेळेला आकाशात काळेकुट्ठ धुरांचे लोट आकाशात पाहायला मिळतात. इतकच नव्हे तर या धुरामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न देखील निर्माण झाले आहे. राधानगरी तालुक्यातील बहुसंख्य गुर्हाळ मालक जळण म्हणून अशा प्रकारे प्लास्टिकचे घटक वापरत आहेत त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यानी तातडीने यामधे हस्तक्षेप करून संबधित यंत्रणेला कारवाईसाठी सूचना द्यावेत अशीही मागणी होत है.
13
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Nov 07, 2025 03:47:30
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 03:45:50
14
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 03:37:00
14
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 07, 2025 03:34:11
Pune, Maharashtra:मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगेंच्या हत्याचा कट रचल्याची बाब उघड झाली आहे. या घटनेनंतर राज्यात खळबळ उडाली आहे. यासंदर्भात जालना पोलिसांत फिर्याद देखील दाखल करण्यात आली आहे. जालना जिल्ह्याचे पोलिस अधीक्षक या प्रकरणात तपास करीत आहेत. या प्रकरणात बीडमधून दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरु झाली आहे. दरम्यान याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी मंत्री विखे म्हणाले ही बाब गंभीर असून राज्य सरकारने तत्काळ कारवाई केली पाहिजे. एखादा नेता विशिष्ट प्रश्नासाठी उभा राहतोय आणि त्यांच्याच हत्येचा कट कोणी करत असेल तर त्यांना संरक्षण दिले पाहिजे. राज्य सरकार तसेच मुख्यमंत्र्यांकडे स्वतः मनोज जरांगे यांच्या संरक्षणाची तसेच कटात सामील असणाऱ्या दोषींवर कारवाई करण्याची मागणी करणार असल्याचे मंत्री विखे पाटील यांनी केली आहे.
14
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 03:33:55
14
comment0
Report
Advertisement
Back to top