Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane410210

वाशी पुलिस ने रात की चोरी के सरायित आरोपी को गिरफ्तार किया; लाखों के गहने बरामद

SNSWATI NAIK
Nov 16, 2025 08:06:49
Navi Mumbai, Maharashtra
रात्री घरफोडी करने वाले सरायित गुन्हेगार को वाशी पुलिस ने अटक किया। वाशी सेक्टर 8 में बंद रोहाउस में घुसकर 29 लाख 36 हजार रुपये मूल्य के सोन्याचांदी के दागिनों की चोरी हुई थी। जाँच के दौरान आरोपी के इस्तेमाल की गई रिक्षा की जानकारी सीसीटीवी से 8 दिनों तक विश्लेषित करके मिली, जिससे आरोपी का चेहरा और रिक्षा क्रमांक पहचान में आए। उसके बाद पुलिस ने सापळा रचकर आरोपी यूसुफ शेख को गिरफ्तार किया और उसके पास से 13 लाख 53 हजार रुपये मूल्य के सोने के दागिने बरामद किए। वाशी पुलिस आगे की जांच कर रही है और बाकी माल की तलाश भी जारी है।
108
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
GMGANESH MOHALE
Nov 16, 2025 10:04:58
Washim, Maharashtra:वाशिम शहरात मानवतेला काळिमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे. पद्मतीर्थाजवळील स्मशानभूमीत आज नवजात अर्भक मृतावस्थेत आढळल्याने परिसरात खळबळ उडाली. ‘मोक्षधाम’ परिसरातील जागेत मातीखाली पुरलेल्या अर्भकाला एका कुत्र्याने उकरून काढल्याचे प्रथम नागरिकांच्या निदर्शनास आले. त्या कुत्र्याने अर्भकाचे लचके तोडत असल्याचे हृदयद्रावक दृश्य पाहताच उपस्थितांनी तात्काळ धाव घेत हस्तक्षेप केला. त्यांनी अर्भक कुत्र्याच्या तावडीतून सोडवून घेऊन पुन्हा त्या ठिकाणी पुरून ठेवले.घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अर्भकाला स्मशानभूमीत टाकून देणाऱ्या अज्ञात व्यक्तीचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी जोर धरत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:50:13
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 16, 2025 09:47:31
Satara, Maharashtra:सातारा: कोल्हापूर राजे घराण्यातील खा.शाहू महाराज यांनी आज साताऱ्यातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची साक्ष सांगणाऱ्या प्रतापगडाची पाहणी केली. या पाहणी वेळी त्यांनी गडावरील भवानी मातेच्या मंदिरात जाऊन विधीवत पूजा आरती केली. या नंतर त्यांनी गडावरील सुरू असलेल्या सुशोभीकरणाची पाहणी करत अनेक त्रुटीं निदर्शनास आणतं त्यावर चर्चा केली. त्यानंतर त्यांनी श्रीमंत छत्रपती कल्पना राजे भोसले यांना फोन करून या गडाबाबतची माहिती घेतली. छत्रपती शाहू महाराज गडावर येणार म्हटल्यावर अनेक शिवभक्त बरोबर मावळ्यांनी गडांवर गर्दी केली होती. यावेळी बोलताना शाहू महाराज काय म्हणाले आपण पाहूया..
26
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 16, 2025 09:47:19
Baramati, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर उद्या इंदापूर नगरपरिषद पदाच्या नगराध्यक्ष पदासाठी स्थानिक आघाडीतून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाने दिलेल्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवाराच्या विरुद्ध जिल्हाध्यक्ष गारटकर आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. त्यामुळे इंदापूर मध्ये अजित पवार गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार भरत शहा यांच्या विरोधात प्रदीप गारटकरचा सामना पाहायला मिळणार आहे. याशिवाय जिल्हाध्यक्ष गारटकर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचा पुणे जिल्हाध्यक्ष पदाचा राजीनामा देणार आहेत. त्यामुळे पुणे जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला धक्का मानला जातोय. मी आजपर्यंत काम केलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराच्या विरोधात माझीच उमेदवारी आहे. मला नैतिकता सांगते की आपण या ठिकाणी राजीनामा देऊनच पुढे जाऊ या. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या जिल्हाध्यक्ष पदाचा मी राजीनामा देतो अशी प्रतिक्रिया गारटकर यांनी दिली आहे. बाईट _ प्रदीप गारटकर, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून इंदापूर नगर परिषदेसाठी माजी उपनगराध्यक्ष भरत शहा यांना उमेदवारी देण्यात आली आहे. आज भरत शहा यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश होणार आहे. या उमेदवारीला जिल्हाध्यक्ष गारटकर यांच्या विरोध होता; परंतु नेतृत्वाने भरत शहा यांना उमेदवारी दिली. विरोध असल्यास आपण पक्ष सोडून स्थानिक आघाडी करून नगरपरिषद निवडणूक लढवू असे इशारा मागील दोन दिवसांपूर्वी गारटकर यांनी दिला होता. अखेर पक्षाने शहा यांना नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दिल्याने गारटकर यांनी हा निर्णय घेतला.
24
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:46:05
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगरच्या सिडको चौकात आज वसंतराव नाईक यांच्या पुतळ्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते अनावरण झालं, वसंतराव नाईक यांनी महाराष्ट्रासाठी भरीव योगदान दिले आहे हे विसरणे शक्य नाही आणि त्यामुळे प्रेरणा मिळावी म्हणून वसंताराव नाईकांच्या पुतळ्याची उभारणी केली असल्याचे यावेळी देवेंद्र फडणवीस म्हणाले, यावेळी शहरासाठी निधी देण्याची मागणी पालकमंत्री संजय शिरसाठ यांनी केली. मुख्यमंत्र्यांनी संभाजीनगर वर आमचेही प्रेम आहे असं सांगत टोला लागावला. सगळ्यांना जय सेवालाल नाईक साहेबांनी समाजासाठी खूप काम केले, महाराष्ट्र च्या इतिहासात नाईक साहेब सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिले आहेत. 1972 च्या दुष्काळात त्राहिमाम झाले होते, त्यावेळी नाईक साहेबांनी दुष्काळ मुक्त करण्यासाठी जलसंधारण काम सुरू केले. दुष्काळ निवारण सुरू केले, महाराष्ट्राला स्वयं पूर्ण करेल नाहीतर राजीनामा देईल म्हणणारे वसंतराव नाईक होते. त्यांचा आदर्श घेऊन आपण जलयुक्त शिवार योजना सुरू केली... पोहरादेवी ला पहिला पुतळा आम्ही लावला तो वसंतराव नाईक साहेबांचा लावला. काळाच्या ओघात समाज मागे राहिला त्या समाजाला आपल्याला गत वैभव द्यायचे आहे... शिरसाठ साहेब काळजी करू नका, संभाजी नगर ह्रदयात आहे त्याला कमी पडू देणार नाही.
32
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 16, 2025 09:36:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर मध्ये भाजप कार्यालयाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं हे विभागीय कार्यालय आणि इथून पुढे भाजपचे सर्व कार्यक्रम इथून होईल असे फडणवीस म्हणाले. तर विरोधकांवर यावेळी कडाडून टीका केली... सीएम भाषण पॉइंटर्स कार्यालय रूपाने भाजपचा आज इथं गृह प्रवेश झालाय बिहार च्या जनतेने मोदी जी यांच्यावर विश्वास ठेवला, विरोधी पक्षाचा सुपडा साफ केला बहुमत मिळाले त्याबद्दल बिहारी जनता आभार आणि पंतप्रधान यांचे अभिनंदन.... सातत्याने जे फेक नारेटिव्ही तयार होताय त्याला जनता उत्तर देतेय, कॉंग्रेस जनतेत येणार नाही जनतेसाठी काम करणार नाही तो पर्यंत त्यांची अशीच माती होईल वोट चोरी, सह इतर मुद्दे सातत्याने मांडतात मात्र पुरावे मागितले की देत नाही अजूनही सुधारले नाही तर येणाऱ्या निवडणुकीत माती होईल असे भाकीत मी व्यक्त करतो भाजपच्या वाटचालीत प्रमोड जी गोपीनाथ जी यांचे योगदान आहे पक्षाचे कार्यालय असावे हे ते सातत्याने म्हणायचे, जसे शक्य झाले तसे कार्यालय चालवले... हे कार्यालय विभागीय मुख्यालय आहे, या कार्यालयाचा उपयोग करून जण सामान्य अडचणी सोडवणे आणि पक्षाचा विस्तार करणे ध्येय ठेवा, संभाजी नगर पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आपण सोडवतोय... शरद पवार, उबठा, काँग्रेस च्या इथल्या लोकांना लाज ही वाटत नाही, 800 कोटींचा भर महापालिकेवर टाकलेला मात्र तो हिस्सा आपण भरला.. आंदोलन करणारे लोक हे सरकार आल्यावर महापालिकेने पैसे भरावे म्हणून मागे लागले ले योजना थांबली होती पुन्हा आपली सरकार आल्यावर आपण काम योजना सुरू केली, काम सुरुय, लवकर मुबलक पाणी मिळेल, जे लोक आंदोलन करताय हे सगळे लोक खोटारडे आहेत, संभाजी नगरात हजारो कोटींची गुंतवणूक आली हजारो लोकांना काम मिळतंय, देशाचे e v कॅपिटळ संभाजी नगर होईल आम्हाला अभिमान आहे आपण एनडीआरएफ चे तर पैसे दिलेत पण hेक्टरी दहा हजार रुपये पुन्हा वरचे आपण त्या ठिकाणी शेतकऱ्यांना दिले आणि आता आपले पैसे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये देखील त्या ठिकाणी जवळपास 70 टक्के पैसे पोचलेत आणि पुढच्या तीन-चार दिवसात शंभर टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे पोहोचतील यावंवेळी कधी नव्हे ते आमचे उद्धवजी मराठवाड्यात दौरा करण्याकरता आले आणि मराठवाड्यात थांबले आणि त्यांनी दौरा केला पण दुर्दैव बघा आपल्यापैकी अनेकांनी बघितलं असेल गावांमध्ये गेल्यानंतर माणसंच नसायचे आमचे अंबादास दानवे माणस कुठे गेले अरे माणस आणा अरे माणसा आणा असे म्हणायचे याचं कारण लोकांचा तुमच्यावर विश्वास नाही लोकांना माहिती आहे आपत्तीमध्ये ही भारतीय जनता पार्टी महायुतीच त्यांच्या पाठीशी उभी राहणार आहे आणि म्हणून मी तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलोय की आता या कार्यालयाचे उद्घाटन झालेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका चाललेले आहेत आता नगरपालिकेच्या निवडणुका आहेत मग जिल्हा परिषदेच्या महानगरपालिकेच्या आहेत या सगळ्या निवडणुकांमध्ये आपल्याला प्रचंड विजय मिळवायचाय मघाशी अध्यक्ष म्हणाले मी अध्यक्षला एवढंच सांगू इच्छितो जिथे जिथे शक्य आहे त्या त्या ठिकाणी आपल्याला महायुती करायची आहे जिथे शक्य नाही तिथे आपण करू शकणार नाही पण एवढं मात्र लक्षात ठेवायचं आहे की एखाद्या ठिकाणी आपली महायुती जरी झाली नाही तरी आपल्यासमोर लढणारे पक्ष आपले मित्र पक्ष आहेत ते आपले शत्रू नाहीयेत विरोधकही नाही आहेत ते आपले मित्र पक्ष आहेत हे आपण लक्षात ठेवूनच या ठिकाणी ही लढाई करायची आहे त्यामुळे पुढच्याही काळामध्ये या महाराष्ट्रातल्या स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो, या महाराष्ट्रातल्या प्रत्येक जो काही या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था आहे त्या संस्थेमध्ये जो कोणी सत्तेवर येईल तो महायुतीचाच असला पाहिजे अशा प्रकारचा प्रयत्न आपण करू आणि अर्थातच या सगळ्या प्रयत्नामध्ये पुन्हा एकदा तुमच्यामुळे तुमच्या आशीर्वादाने तुमच्या महिन्यातील भाजपच नंबर एकचा पक्ष असेल हा विश्वास या निमित्ताने व्यक्त करतो आणि पुन्हा एकदा या कार्यालयाकरिता ज्यांनी ज्यांनी मेहनत केली त्या सगळ्यांचं अभि अभिनंदन करतो..
71
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 16, 2025 09:36:03
Pune, Maharashtra:स्थानीय स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कुणासोबत आघाडी करायची याबाबत स्थानिक पातळीच्या नेत्यांना मोकळीक दिल्याचे राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवारांनी म्हंटलं... याबाबत राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी प्रतिक्रिया दिली असून , शरद पवार यांच्यासमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक राहिलेला नाही...त्यांच्या पक्षात माणसंच राहिलंं नाही...त्यामुळे त्यांना कुणाशी युती केल्याशिवाय पर्यायच राहिलेला नाही... त्यांच्या पक्षाच अस्तित्वच संपुष्टात चालला आहे... त्यांनी इतके वर्ष जे राजकारणात पेरलं त्याचंच प्रायश्चित्त करण्याची वेळ आलीये अशी टीका विखे यांनी केली.
106
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 16, 2025 09:35:50
Kalyan, Maharashtra:के डी एम सी निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापलं.. शिवसेना शिंदे गटासह ठाकरे गटाला भाजपने दिला झटका ! शिंदेंचे विधानसभा सहसंपर्कप्रमुख तर ठाकरेंच्या नगरसेविका भाजपच्या गोटात सामील महापौर भाजपचाच बसणार !भाजप जिल्हाध्यक्षांचा दावा.. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीमधील शिवसेना भाजपामध्ये फोडाफोडीच्या राजकारण सुरू झाले आहे. ज्यांचे जास्त नगरसेवक त्यांचाच महापौर या फॉर्मुल्यावर सुरू असलेले हा स्पर्धा तीव्र झाली आहे . या दोन्ही पक्षातील नेते पदाधिकारी एकमेकांवर आरोप, प्रत्यारोप , दावे ,प्रतिदावे करताना देखील दिसत असल्याने आता कल्याण डोंबिवली मधील राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. नंदू परब कल्याण जिल्हा अध्यक्ष
67
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:33:10
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्ह्यात काँग्रेस सोबत नगरपरिषदा लढवण्याचा जयंत पाटलांचा सुतोवाच.. अँकर - सांगली जिल्ह्यातील निवडणूका कॉंग्रेस सोबत लढणार असल्याबाबतचा सुतोवाच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला आहे. जिल्ह्यातील नगरपरिषद निवडणूक लढवण्याबाबत काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम, खासदार विशाल पाटील यांच्याशी तीन वेळा बैठका होऊन,कशा पद्धतीने निवडणूक लढवायच्या यावर चर्चा झाली असून त्या दृष्टीने आम्ही पावले टाकत असल्याचे देखील अस्पष्ट करत ईश्वरपूरपूर नगरपरिषद निवडणुकीत काँग्रेसने पाठिंबा दिल्याचेही जयंत पाटलांनी स्पष्ट केला आहे.त्याच बरोबर जत आणि शिराळा नगर परिषदेसाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आले आहेत,यावरून बोलताना राष्ट्रवादी एकत्रित आले,हा प्रयोग केलेला नाही.त्या ठिकाणी इच्छुकांनी घड्याळकडे जाण्याचा निर्णय घेतलाय,त्यामुळे हा प्रयोग आहे किंवा एकत्रित मिळून निवडणूक लढवतोय,असं नाही.त्याठिकाणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष हा तुतारी चिन्हावर लढला पाहिजा होता, असे मत देखील जयंत पाटलांनी यावेळी व्यक्त केलं आहे,ते सांगलीच्या उरुण ईश्वरपूर मध्ये बोलत होते. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी काँग्रेस
42
comment0
Report
SNSWATI NAIK
Nov 16, 2025 09:16:00
Navi Mumbai, Maharashtra:नेरुळ येथे मनसे नेते अमित ठाकरे आक्रमक. अमित ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली मनसेचे आक्रमक आंदोलन. नेरूळ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभारण्यात आलेल्या महाराजांच्या पुतळ्याचे मनसे नेते अमित ठाकरे यांच्या हस्ते प्रतिकात्मक अनावरण. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावर घालण्यात आलेला पडदा फाडून टाकत महाराजांची मूर्ती केली मोकळी. महाराजांच्या मूर्तीला पाण्याने धुवून अमित ठाकरे यांनी पुष्पहार घालत महाराजांच्या पुतळ्याचे केले अनावरण. चार महिन्यांपासून महाराजांना अशा अवस्थेत ठेवण्यात आले ते मला पहावल नाही. अनेक नेते विविध कार्यक्रमांसाठी आले मात्र त्यांना महाराजांच्या मूर्तीचे अनावरण करण्यासाठी वेळ मिळत नव्हता. याप्रकरणी माझ्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल महाराजांसाठी गुन्हा घेण्यास तयार. बाईट - अमित ठाकरे - मनसे नेते
52
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:04:09
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - विरोधकांचे माझ्यावर विशेष प्रेम, म्हणून मी टार्गेट - जयंत पाटलांच्या विरोधकांना चिमटा.. अँकर - मला टार्गेट वर्ग करतात,कारण माझ्यावर विशेष प्रेम आहे,पण माझ्या ऐवजी विरोधकांनी ईश्वरपूरच्या विकासला टार्गेट करावा,असा टोला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी विरोधकांना लगावला आहे. गेल्या 9 वर्षात ईश्वरपूर शहराचा विकास विरोधकांना करता आला नाही त्यावर विरोधकांनी बोललं पाहिजे आपण आणलेल्या विकास कामे देखील पूर्ण झाले नाहीत,त्यावर विरोधकांनी बोलायला हवं,असा आवाहन देखील आमदार जयंत पाटलांनी विरोधकांना केला आहे.ईश्वरपूर नगर परिषदेसाठी महायुतीतील आणि ईश्वरपुर मधील सर्व विरोधक जयंत पाटलांच्या विरोधात एकवटले आहेत,त्यामुळे चुरशीने निवडणूक पार पडत आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी - शरद पावर पक्ष.
73
comment0
Report
SMSarfaraj Musa
Nov 16, 2025 09:03:06
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - उरुण-ईश्वरपुरसाठी राष्ट्रवादीकडून नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल.. अँकर - सांगलीच्या उरूण ईश्वरपूर नगरपरिषद निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदाची उमेदवारी राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे.राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून आनंदराव मलगुडे यांना उमेदवारी देण्यात आली असून आमदार जयंत पाटलांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीचा अर्ज दाखल करण्यात आला आहे.उरुण ईश्वरपूरनगर परिषदेच्या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गट आणि काँग्रेस संयुक्तपणे आघाडी करत निवडणूक लढवत आहेत.तर त्यांच्या विरोधात महायुती आणि जयंत पाटलांचे विरोधक एकत्रित आले आहेत.त्यामुळे अत्यंत चुरशीने नगराध्यक्ष पदासह इतर जागांसाठी लढत होत आहे. बाईट - जयंत पाटील - आमदार - राष्ट्रवादी शरद पवार पक्ष.
113
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 16, 2025 08:46:50
Chendhare, Alibag, Maharashtra:भरत गोगावलेंच्या मतदारसंघात तटकरेंचे जोरदार शक्तिप्रदर्शन...... महाडमध्ये राष्ट्रवादी , भाजप युती कडून उमेदवारी अर्ज दाखल..... सुनील तटकरेंनी शिवसेनेच्या आमदारांना सुनावले.... जिल्ह्यातील महायुतीत चांगलेच वाजले आहे जिल्ह्यातील नगर पालिका निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ने शिवसेनेला बाजूला ठेवून भाजप सोबत युती केली मंत्री भरत गोगावले यांच्या मतदारसंघातील महाड नगर पालिकेसाठी राष्ट्रवादी , भाजप युतीने आज जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. यावेळी खासदार सुनील तटकरे , भाजपचे जिल्हाध्यक्ष व खासदार धैर्यशील पाटील उपस्थित होते. तटकरे यांनी यावेळी शिवसेनेच्या आमदारांनी केलेल्या वक्तव्याची दखल घेत चांगलेच सुनावले अश्लाघ्य शब्दांत टिका करून सुरूवातीपासूनच राष्ट्रवादी सोबत युती नको अशी भूमिका शिवसेनेने घेतली त्यामुळे जिल्ह्यात भाजप व राष्ट्रवादीने युती केल्याचे सुनील तटकरे यांनी स्पष्ट केले
157
comment0
Report
Advertisement
Back to top