Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Solapur413304

डॉक्टर बाबासाहेब देशमुख पर घर फोड़ने की कोशिश का आरोप; चुनाव प्रचार के दौरान राजनीतिक भिड़ंत

SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 11:51:14
Pandharpur, Maharashtra
दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे नातू शेकाप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी माजी आमदार शहाजी बापू पाटील यांच्याावर दिवंगत माजी आमदार गणपतराव देशमुख यांचे घर फोडण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप केला आहे. सांगोला नगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात शहाजी बापू पाटील यांनी खालची पातळी गाठली आहे. गणपतरावांचे नातू डॉक्टर अनिकेत देशमुख आणि आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांच्यामध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न शहाजी बापू करत आहेत. यामुळे घर फोडण्याचा त्यांचा डाव असल्याचा गंभीर आरोप आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी केला आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SMSarfaraj Musa
Dec 01, 2025 12:20:49
94
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Dec 01, 2025 12:04:21
Bhandara, Maharashtra:परिणय फुके प्रायवेट लिमिटेड पार्टी. पैसे विचारून उमेदवारी देत असल्याच्या कारणावरून भंडाऱ्यातील नाराज भाजप कार्यकर्त्यांनी पत्रकार परिषदेतून व्यक्त केली नाराजी. फुकेंच्या नेतृत्वात वेगळा सिंडिकेट तयार झाला असल्याचा केला आरोप. भंडारा भाजपमध्ये विवादाची मालिका पाहायला मिळत आहे. परिणय फुके व त्यांच्या सह भाजपचा एक वेगळा गट तयार करत परिणय फुके अँड प्रायव्हेट लिमिटेड पार्टी झाली आहे असा आरोप पत्रकार परिषदेतून करण्यात आला आहे. भंडाऱ्यात पाच ते सहा लोकांचा एक सिंडिकेट तयार झालेला आहे. जिल्हाध्यक्ष आशु गोंडाणे यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून हे सगळे खऱ्या व योग्य कार्यकर्त्यांना डावलण्याचे निर्णय होत असून उमेदवारी देताना निवडणुकीत किती पैसे लावायला तयार आहात असं विचारलं जातं असा आरोपही पत्रकार परिषदेत नाराज कार्यकर्त्यांनी केलाय. आम्हाला सांगण्यात आले तुम्ही याचे माणसं त्याचे माणसं गटबाजी करता, मागच्या वर्षी आम्ही महायुतीचं काम केले होतं. भाजपचं काम केल्यामुळे हे फळ आम्हाला मिळत आहे. आम्ही पक्षाचे एकनिष्ठ काम करतो कोणत्याही ग्रुप मध्ये नाही. आम्हाला कोणतेही ठेकेदारी नाही पाहिजे. जो त्यांनी सिंडिकेट तयार केलाय त्याचा फक्त एकच उद्देश आहे की आम्हाला फक्त ठेकेदारी पाहिजे. भाजपची उमेदवारी मागितली असताना पैसे दाखवला लावले. 21 निष्ठावंत कार्यकर्ते डावलून आयाराम यांना भाजपाने तिकिट दिली म्हणून आम्ही पक्षाला रामराम केला आहे. असा आरोप भाजपाच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. जुनी भाजपा उरली नसुन फक्त प्रायव्हेट लिमिटेड पार्टी बनून राहिली आहे.
120
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 01, 2025 11:51:58
Washim, Maharashtra:अँकर:वाशिम जिल्ह्यातील रिसोड, कारंजा, मंगरुळपीर या तीन नगरपरिषदांसह मालेगाव नगरपंचायतीसाठी उद्या मतदान होणार आहे. निवडणुकीची सर्व तयारी जिल्हा प्रशासनाने पूर्ण केली असून संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून.या चार ठिकाणी नगर अध्यक्ष पदासाठी २७ उमेदवार,तर सदस्य पदासाठी ३७४ उमेदवार रिंगणात आहेत.एकूण ५३ प्रभागांमध्ये मतदान होणार आहे.मतदानासाठी १७८ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सर्व केंद्रांवर एकूण ९६१ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.निवडणूक सुरळीत व शांततेत पार पाडण्यासाठी ९२८ पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.चारही स्थानिक स्वराज संस्थांसाठी एकूण मतदार संख्या १ लाख ४८ हजार ५८१ असून यामध्ये पुरुष मतदार ७५,०१६, महिला मतदार ७३,५६१ इतर ४ या मतदारांचा समावेश आहे. उद्या सकाळी मतदानाला सुरुवात होणार असून जिल्हा प्रशासनाने मतदारांना शांततेत व सक्रीय सहभागाने मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
129
comment0
Report
AAASHISH AMBADE
Dec 01, 2025 11:48:08
21
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 01, 2025 11:39:25
Kolhapur, Maharashtra:राज्यात नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सांगली सातारा आणि सोलापूर जिल्ह्यातील कोण कोणत्या नेत्यांचा कस लागला आहे यावर एक नजर टाकूया... सुरुवातीला कोल्हापूर जिल्ह्यात नजर टाकूया. 1) उच्च शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ, आजरा नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2) वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची कागल, मुरगूड आणि गडहिंग्लज नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 3) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी याची जयसिंगपूर, कुरुंदवाड, शिरोळ नगरपरिषद निवडणुकीच्या निमित्ताने प्रतिष्ठापणाला लागली आहे. 4) भाजपा राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांची मुरगूड, गडहिंग्लज, चंदगड, शिरोळ, कुरुंदवाड, जयसिंगपूर आणि हुपरी नगरपंचायत निमित्ताने कस लागला आहे. 5) पन्हाळा, पेठ वडगाव, मलकापूर नगरपालिका निवडणुकीत जनसुराज्य पक्षाचे आमदार विनय कोरे यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. सांगली जिल्ह्यात पार पडणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायत निवडणुकीसाठी कोणकोणत्या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया. 1) ईश्वरपूर नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे, 2) तासगाव नगर परिषदेसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित आर आर पाटील आणि माजी खासदार संजय काका पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 3) जत नगर परिषदेसाठी भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर आणि काँग्रेसचे माजी आमदार विक्रम सावंत व राष्ट्रवादी अजित पवार गटाचे माजी आमदार विलासराव जगताप यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 4) पलूस नगरपरिषदेसाठी काँग्रेसचे आमदार विश्वजीत कदम यांची प्रतिष्ठा पणाला लागली असल्य. 5) विटा नगर परिषदेसाठी शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर यांची तर माजी नगराध्यक्ष वैभव पाटील व माजी आमदार सदाशिव पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 6) आटपाडी नगरपंचायतीसाठी आमदार गोपीचंद पडळकर आणि शिवसेना शिंदे गटाचे आमदार सुहास बाबर व माजी आमदार राजेंद्र अण्णा देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे 7) शिराळा नगरपंचायतीसाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे माजी आमदार मानसिंगराव नाईक व अजित पवार गटाचे माजी आमदार शिवाजीराव नाईक आणि भाजपा आमदार सत्यजित देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सातारा जिल्ह्यात कोणकोणत्या नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे त्यावर एक नजर टाकूया. 1) मेढा नगरपंचायत निवडणुकीत स्थानिक आ.मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची आणि त्याचा विरोधात मंत्री शंभूराज देसाई यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 2) म्हसवड नगरपालिका निवडणुकीत मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.विरोधात अजित पवार गट आहे 3)पाचगणी आणि वाई नगरपालिकेत मंत्री मकरंद पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. सोलापूर जिल्ह्यात देखील अनेक नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. 1) अक्कलकोट आणि दुधनी नगरपरिषदेत भाजप वि. शिवसेना शिंदे गट अशी लढत असणार आहे. याठिकाणी भाजपा आमदार सचिन कल्याणशेट्टी आणि माजी मंत्री शिंदे सेनेचे नेते सिद्धाराम म्हेत्रे या नेत्यांची प्रतिष्ठापनाला लागली आहे. 2) अकलूज नगरपालिका निवडणुकीत माजी आमदार राम सातपुते आणि खासदार धैर्यशील मोहिते पाटील याची प्रतिष्ठा पणाला. 3) पंढरपूर नगरपालिकेत माजी आमदार प्रशांत परिचारक याची प्रतिष्ठा पणाला. 4) सांगोला नगरपालिका माजी आमदार शहाजी बापू पाटील आणि आमदार डॉ बाबासाहेब देशमुख यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.
59
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Dec 01, 2025 11:39:05
Navi Mumbai, Maharashtra:मुंबईच्या हवेत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. याला मेट्रोची कामे जबाबदार असून या बाबत कारवाई ची मागणी भाजपचेच आमदार मिहिर कोटेचा यांनी केली आहे. मुलुंड परिसरात सुरू असलेल्या मेट्रो चार च्या कामाच्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे, ज्या उपाययोजना कंत्राटदराने करणे आवश्यक आहे त्या तो करत नाही हा देखील पाचशे कोटींचा घोटाळा आहे. याचे शंभर फोटो घेऊन आपण एमएमआरडीए ला तक्रार करणार असल्याचे मिहिर कोटेचा म्हणाले. स्थानिक नागरिकांनी या बाबत तक्रार केल्यावर मिहिर कोटेचा यांनी या कामाच्या ठिकाणी स्वतः जाऊन पाहणी केली होती. या ठिकाणी अस्वच्छता आणि प्रदूषण बाबत शंभर पेक्षा जास्त फोटो त्यांनी काढले आहेत. हे सर्व मोठे ते मुख्यमंत्री आणि एमएमआरडीए ला देणार असून कारवाई ची मागणी करणार आहेत.
137
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 01, 2025 11:09:29
Shirdi, Maharashtra:शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत संगमनेर शहरात भव्य रॅली.. भाजप सेनेच्या उमेदवारांसाठी मोटार सायकल रॅली.. तांबे थोरात यांच्या विरोधात महायुतीचे आव्हान... काही दिवसापूर्वी एकनाथ शिंदे यांनी देखील घेतली होती सभा... आमदार अमोल खताळ यांच्यासह भाजपा सेना युतीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी... शिवसेना खासदार श्रीकांत शिंदे बाईट पॉईंटर्स - ऑन निवडणुक स्थगिती - एक दिवस राहिला असताना स्थगितीचा निर्णय देण चुकीच... काही निवडणुका पूर्णपणे रद्द केल्या गेल्या... काही हजार उमेदवारांच्या निवडणुकीला स्टे दिला... आयोगाने अगोदर मतदार यादयांमध्ये घोळ केला , याद्यांमध्ये दुरूस्ती करत करत त्यानंतर याद्या मिळाल्या... निवडणुक आयोगाच अस काम कधीच पाहिल नव्हत... पहिल्यांदा असा घोळ झालाय , लोकांची थट्टा करायच काम आयोगाने केलय... आयोगाने गांभिर्यपुर्वक विचार केला पाहिजे... पुढे जिल्हा परिषद , महापालिका निवडणुका आहेत... त्यात चुका होता कामा नये ... 2 तारखेला मतदान आहे त्यानंतर 3 तारखेला मतमोजणी पण 3 तारखेला मतमोजणी करू नये कारण त्याचा परिणाम राहिलेल्या मतदारसंघावर होवू शकतो... मतदानाचा निकाल 20 डिसेंबर नंतर द्या... ऑन संजय राऊत - त्यांना मी खुप खुप शुभेच्छा देतो , त्यांची कमी सर्वांनाच भासत होती... आजारी असताना देखील माध्यमांसमोर आले आहेत... लवकरात लवकर ते बरे होवोत अशा त्यांना शुभेच्छा !! ऑन शिंदे गट आमदार फुट - निवडणुका आता एका महिन्यात आहेत... जावू द्या , साहेब पण बोललेत... उगाचच टिकेला टिकेने उत्तर देण काय उपयोगाच ? कामातून उत्तर द्यायला हव , वेळ सगळ्यांना सारखा आहे...ज्या गोष्टी होणार आहेत त्या होतील... bite - खा. श्रीकांत शिंदे
113
comment0
Report
SKSACHIN KASABE
Dec 01, 2025 11:04:41
Pandharpur, Maharashtra:सांगोल्यात धाड सत्र प्रकरणावर माजी आमदार शहाजी बापू पाटील यांनी केलेले आरोप हास्यास्पद , त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. माजी आमदार दीपक साळुंखे यांनी खडसावले. सांगोला मधील शिवसेना माजी आमदार शहाजी पाटील यांच्या कार्यालयावर पडलेली धाड याप्रकरणी माजी आमदार दीपक साळुंखे यांना जबाबदार धरले आहे. यावर माजी आमदार साळुंखे यांनी कडक शब्दात फटकारले आहे. शहाजी पाटील यांना अशी नाटके करायची सवय आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत माझा मुळे गुलाल उधळला. आता माझावर आरोप कशासाठी करता. निवडणूक झाल्यानंतर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात दाखल करावे लागेल. लबाड लोकांचे अधिवेशन घेतले तर शहाजी पाटील बिनविरोध अध्यक्ष होतील अशी टीका माजी आमदार दीपक साळुंखे यांनी केली
37
comment0
Report
GMGANESH MOHALE
Dec 01, 2025 10:55:16
Washim, Maharashtra:अकोल्याचे आमदार साजीद खान पठाण यांनी भाजपावर हल्लाबोल करत विधान सभेत माझ्या मतदार संघात बटेंगे तो कटेंगे चा नारा चला नही असे म्हणत मालेगावातील धार्मिक एकता, सामाजिक ऐक्य आणि गंगा-जमुना संस्कृतीचे कौतुक केले. शहरातील हिंदू-मुस्लिम समाजाने वर्षानुवर्षे जपलेला बंध हा मालेगावची ओळख असून पुढेही हा सामाजिक सलोखा कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.सत्ताधारी पक्षाने विधानसभा निवडणुकीत “बटेंगे तो कटेंगे” अशा घोषणांद्वारे समाजात धार्मिक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न केला मात्र मालेगावकरांनी त्याला झुगारून सामंजस्याचा मार्ग निवडला,असा यासह लाडक्या बहिणी योजनेवरून टोला पठाण यांनी भाजपासह महायुती सरकार लगावला. स्टेज बाईट: आ.साजिद खान पठाण
195
comment0
Report
SGSagar Gaikwad
Dec 01, 2025 10:48:50
Nashik, Maharashtra:बिहार और कनाडा से कुरियर के जरिए भेजे गए 'ट्रीपल तलाक' का मामला Nashik शहर के मुंबईनाका पुलिस स्टेशन की सीमा में रहने वाली एक विवाहित महिला के साथ सामने आया है। उसकी शादी 24 जनवरी 2022 को 쇼ध पर मुस्लिम तरीके से हुई थी और अब तक उसके पति ने सास-ससरे के साथ मिलकर उसे शारीरिक-मानसिक शोषण किया। आरोपियों ने माहिर पैसे न देने पर गालियाँ दीं और मारहाण की, तथा विवाह में मिलने वाले आठ तोले के गहने भी जबरदस्ती छीन लिए गए। इसके बाद पति ने लिखित रूप से अपने हस्ताक्षर के साथ ट्रिपल तलाक का पत्र कुरियर के जरिए भेज दिया। पीड़ित ने महिला सुरक्षा शाखा में आवेदन और फिर मुंबईनाका पुलिस थाने में शिकायत दर्ज कराई। मामले में मुस्लিম महिला विवाह अधिकार संरक्षण कानून की धारा 4 और भारतीय दंड संहिता की धारा 85 के अंतर्गत विवाहित को अपमानित करने और प्रताड़ित करने के आरोप लगे हैं। बैक-एंड बाइट: वरिष्ठ पुलिस निरीक्षक, मुंबई नाका पुलिस स्टेशन। ट्रिपल तलाक इस देश में अवैध है और 2019 के मुस्लिम महिला विवाह अधिकार संरक्षण कानून के तहत इसे अपराध माना गया है; फिर भी कुछ धार्मिक समूह और लोग इसे चुनौती दे रहे हैं, तथा यह प्रथा अभी भी जारी है।
93
comment0
Report
Advertisement
Back to top