Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

सतारा के पुलिस आयुक्त की छुट्टी पर चुनाव प्रक्रिया में उठे सवाल

TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:47:33
Satara, Maharashtra
सातारा:ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे बाईट पॉईंटर सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांच्या रजे विषयी ज्यांना जसे वाटते तसा अर्थ घ्यावा.. कोणाला वाटत असेल सक्तीची रजा तर त्याने त्याचा आनंद घ्यावा. कोणाला वाटत असेल ती रजा अर्जित आहे. तर त्याने तसे समजून घ्यावे. पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहे हे सत्य आहे... मला आपणाकडूनच माहिती मिळाली पोलीस अधीक्षक रजेवर गेले आहेत ते खर आहे. पोलीस अधीक्षक प्रकरणाची चौकशी लागली ही माहिती सुद्धा मीडियाकडूनच समजत आहे. याची अतिरिक्त माहिती नाही. मात्र या निवडणूक प्रक्रियेत कायद्याचे उल्लंघन कोणी केल आहे याची चौकशी झाली पाहिजे. निवडणूक प्रक्रिया पार पडत असताना निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये बाधा आणणे हे उचित नाही. लोकप्रतिनिधी म्हणून आपण जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत याचं उल्लंघन झालं नाही पाहिजे जी चौकशी लागली आहे त्याची चौकशी होईल आणि सत्य बाहेर येईल पालकमंत्री शंभूराज देसाई आणि मी चांगले मित्र आहोत. आमचे व्यक्तिगत हेवेदावे काही नाही ते आणि मी एका मंत्रिमंडळात आम्ही काम करत आहोत.. राहिला निवडणुकीचा प्रश्न ते त्यांच्या पक्षाचे काम करतात मी माझ्या पक्षाचे काम करतो. आमची व्यक्तिगत लढाई नसून राजकीय लढाई आहे. माझं पहिल्यापासून सांगणं होतं जिल्हा परिषदेचा अध्यक्ष भाजपचा होईल जादूचा आकडा आमच्याकडे आला आणि आज 33 सदस्य आमच्या सोबत आहेत. अगदी अटक झालेल्या त्या लोकांची जरी मतं नोंद झाली असती तरी 30+2= 32 झाले असते आमचे 33 होतात.. यामुळे यावर वाद उपस्थित करणे योग्य नाही आमचे लोक 33 झाले म्हणून काही लोकांना बादा आणायची होती. हे मात्र नक्की. सभापती निवडीमध्ये मी बरोबर घेणारा मी कोण. मलाच फोन बरोबर घेत नाही. महायुती म्हणून सर्वांनी एकत्र येऊन काम करावे हा आमची भूमिका आहे. नाही एकत्र आलो तरी भारतीय जनता पार्टीचे सभापती झाले पाहिजे ही माझी भावना आहे पोलीस अधीक्षकांच्या चौकशीचे असे कोणतेही निर्देश माझ्या माहितीनुसार दिले नसावेत. किंवा याबाबत मला कल्पना नाही. अशा चौकशीसाठी शासनाची शिफारस लागते मुख्यमंत्री निर्णय घेतात
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
HCHEMANT CHAPUDE
Mar 30, 2026 14:17:21
Shirur, Maharashtra:मंचर/पुणे Anc - आंबेगाव तालुक्याच्या चांडोली बुद्रुक गावातील 44 वर्षीय सुरेश पांडुरंग थोरात हे शेतकरी त्यांच्या शेतात पाणी भरत असताना जवळच असलेल्या विजेच्या खांबावरील विद्युत प्रवाह पाण्यात उतरल्याने विजेचा Shock लागून त्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. घटनेची माहिती मिळताच मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पाहणी केली असून पुढील तपास सुरू आहे. मयत सुरेश थोरात यांच्या शेताशेजारी असणाऱ्या महावितरणच्या खांबाला काही दिवसापूर्वी अज्ञात वाहनाने धडक दिल्यामुळे सदर खांब वाकला होता. वाकलेला हा खांब दुरुस्त करावा अशी मागणी स्थानिक ग्रामस्थांनी महावितरण कडे केली होती. मात्र महावितरण कडून कुठलीही उपाययोजना झाली नसल्याने सुरेश पांडुरंग थोरात यांच्या मृत्यूला महावितरणचा हलगर्जीपणा जबाबदार असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 30, 2026 14:11:20
Junnar, Pune, Maharashtra:उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, आंबेगाव आणि खेड तालुक्यांमध्ये अचानक हवामान बदलल्याने वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीला सुरुवात झाली आहे. विजांच्या कडकडाटासह आलेलेल्या या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची मोठी चिंता वाढली आहे. विशेषतः जुन्नर तालुक्यातील प्रसिद्ध शिवनेरी हापूस आंबा पिकाला मोठा फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. तसेच भाजीपाला, कांदा, बटाटा आणि इतर पिकांचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती व्यक्त होत आहे. अचानक आलेल्या या नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकरी हवालदिल झाले असून, झालेल्या नुकसानीचे पंचनामे करून तातडीने मदत देण्याची मागणी जोर धरत आहे.
766
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 14:11:05
Kalyan, Maharashtra:कर वसुलीसाठी केडीएमसी ची धडक कारवाई.. 14 कोटी थकबाकीमुळे वाधवा BOT प्रकल्प सील माधव बँक्वेट, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेलला टाळे..लग्नसमारंभ ठप्प, आयोजक अडचणीत कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेने थकबाकीदारांवर मोठी कारवाई करत केडीएमसी ने वाधवा बिल्डरला BOT प्रकल्पांमधील विविध व्यावसायिकासाठी देण्यात आलेल्या प्रॉपर्टी सील करण्यात आले आहे वाडेघर जलकेंद्र BOT प्रकल्पांतर्गत येणाऱ्या या प्रॉपर्टींचे मासिक भाडे अनेक वर्षांपासून थकले होते. याबाबत पालिकेकडून 2023 पासून नोटीस बजावण्यात अल्या होत्या मात्र, वारंवार सूचना देऊनही थकबाकी भरली न गेल्याने अखेर पालिकेने कठोर पाऊल उचलत सुमारे 14 कोटी रुपयांची थकबाकी वसुलीसाठी ही कारवाई केली.या कारवाईत माधव बँक्वेट हॉल, नक्षत्र लॉन आणि ग्रीन लीफ हॉटेल यांना सील करण्यात आले.अचानक झालेल्या या कारवाईमुळे येथे सुरू असलेले व्यवसाय आणि कार्यक्रम पूर्णपणे ठप्प झाले आहेत
780
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 30, 2026 14:10:48
Akola, Maharashtra:राज्यभरात अवकाळी पावसाने अनेक ठिकाणी हजेरी लावली असून अकोल्यातही आज सायंकाळी अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. दुपारच्या सुमारास अचानक वातावरणात बदल होऊन आकाश ढगाळ झाले होते. त्यानंतर सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली.Gेल्या काही दिवसांपासून अकोला शहरासह जिल्ह्यात उष्णतेचा प्रचंड तडाखा जाणवत होता. तापमान तब्बल ४२ अंशांपर्यंत पोहोचले होते. मात्र आज अचानक झालेल्या अवकाळी पावसामुळे वातावरणात काही प्रमाणात गारवा निर्माण झाला आहे आणि नागरिकांना उकाड्यातून दिलासा मिळाला आहे. मात्र या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली असून अनेक ठिकाणी उभ्या पिकांना फटका बसण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. विशेषतः गहू, हरभरा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान होण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, हवामान खात्याने पुढील काही दिवसही ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता वर्तवली असून अवकाळी पावसाचा फटका शेतीला बसू नये, यासाठी शेतकऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी असे आवाहन करण्यात येत आहे.
785
comment0
Report
SNSWATI NAIK
Mar 30, 2026 13:21:59
985
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Mar 30, 2026 12:46:52
Satara, Maharashtra:सातारा - शिरवळ गावची ग्रामदैवत असलेल्या अंबिका मातेच्या पालखी सोहळ्याला यंदाही मोठ्या उत्साहात सुरुवात झाली असून शासनकाठीसह तुळजापूरकडे पायी वारीचे प्रस्थान करण्यात आले. या वारीत शिरवळ गावातील काटकर समाजासह हजारो भाविक मोठ्या श्रद्धेने सहभागी झाले आहेत. अंबिका माता ही जागृत देवस्थान आणि नवसाला पावणारी देवी म्हणून ओळखली जाते. त्यामुळे या पालखी सोहळ्यासाठी पंचक्रोशीसह बाहेरगावांहूनही मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते. पालखी सोहळ्यादरम्यान शिरवळ गावातील प्रत्येक चौकात आकर्षक रांगोळ्या आणि फुलांची सजावट करण्यात आली होती. पारंपारिक ढोल-लेझीम, तुतारी, हलगी, संबळ यांच्या गजरात आणि फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये हा सोहळा उत्साहात पार पडला. भक्तिभावाने देवीचे पूजन करून हजारो भाविकांनी मिरवणुकीत सहभाग घेतला. जय अंबिका माता च्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. श्रद्धा, परंपरा आणि एकोप्याचे प्रतीक असलेला हा पालखी सोहळा यंदाही मोठ्या भक्तिभावात आणि उत्साहात पार पडला.
1080
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 30, 2026 12:32:06
Mumbai, Maharashtra:अँकर मुंबई बाहेरील गॅस ग्राहकांना कमर्शिअल सिलेंडर देण्याचा मुद्दा आता चांगलाच भेटला आहे पाच किलोचे आणि 14 किलोचे कमर्शियल सरेंडर हे मुंबईमध्ये फक्त स्थलांतरित गॅस ग्राहकांना त्यांची कागदपत्रे तपासून देण्याचे सर्क्युलर गॅस वितरण कंपन्यांना गॅस कंपन्यांकडून देण्यात आलेले आहेत त्यानंतर आता गॅस एजन्सी या पाच किलोचे सिलेंडर हे मुंबई बाहेरून आलेल्या स्थलांतरित कामगारांना सिलेंडरचे वाटप केले जाते मनसे ने आक्रमक पवित्रा घेत या गॅस सिलेंडरचे वितरण थांबविले आणि गॅस सिलेंडर घेण्यासाठी आलेल्या परप्रांतीयांना त्या ठिकाणाहून हुसकावून लावण्याचा प्रकार भांडुप मध्ये समोर आला आहे हे त्याला आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी अमोल पेडणेकर यांनी
1053
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 30, 2026 12:21:44
Shirdi, Maharashtra:सुषमा अंधारेनी आरोप केलेला नामकरण आवारे आता भोंदूबाबा खरातच्या प्रकरणांमध्ये चर्चेत आलाय. एकीकडे आवारे याने अशोक खरात यांच्याशी कुठलेही संबंध नसल्याचं म्हणल असले तर दुसरीकडे मात्र नामकरण आवारे आरोपी खरातचा निकटवर्तीय असल्याचं समोर आलंय. सुषमा अंधारे यांनी काही फोटो दाखवत प्रत्येक फोटोत दिसणारा नामकरण कोण..? असा प्रश्न उपस्थित झाल्यानंतर चर्चेत आलेले नामकरण आवारे याचे अशोक खरात समवेत असणारे घनिष्ठ संबंध अधोरेखित झालेत आहेत... विशेष म्हणजे नामकरण आवारे याने 2012 साली लिहिलेल्या "असा मी नामकरण" या पुस्तकाचे प्रस्तावना अशोक खरात याने लिहिले तर नामकरण आवारे याने अशोक खरात याला ब्रम्हांडनायक म्हणत तो सिद्धपुरुष असल्याचं त्याच्या पुस्तकात मांडलय. झी 24 तासने मागील दोन दिवसांपूर्वी नामकरण आवारे यांची मुलाखत घेतली होती आणि त्या मुलाखतीत अशोक खरात आणि रूपाली चाकणकर हे मंत्री दीपक केसरकर यांच्या समवेत पाहुणे म्हणून सिन्नर औद्योगिक वसाहतिला भेट देण्यासाठी आले होते अशी प्रतिक्रिया दिली होती. खरात आणि आवारे यांच्या संबंधाबाबत सविस्तर माहिती दिलीये आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी....
1086
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Mar 30, 2026 12:21:17
Ahilyanagar, Maharashtra:शिवसेना की हर्षदा काकडे के नेतृत्व में अहिल्यानगर के शेवगाव में आनंद दिघे धर्मवीर सुविधा केंद्र की शुरुआत की गई है. शिवसेना एकनाथ शिंदे गट के सचिव संजय मोरे की उपस्थिति में केंद्र का उद्घाटन हुआ. ग्रामीण क्षेत्र के नागरिकों को विभिन्न योजनाओं का लाभ दिलाने के लिए यह केंद्र काम करेगा. काफी ग्रामीण पात्र होते हुए भी जानकारी न मिलने के कारण लाभ से वंचित रहते हैं; इस केंद्र के माध्यम से पात्र नागरिकों को योजनाओं का लाभ मिल सकेगा और आवश्यक कागजात उपलब्ध कराए जाएंगे. शहरी भाग में आनंद दिघे केंद्र के जरिए काफी दिनों से काम चल रहा है; ग्रामीण भाग में पहली बार होने के कारण किसान और जरूरतमंद लोगों को इसका वास्तविक लाभ मिलेगा, ऐसा संजय मोरे ने कहा.
1010
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 30, 2026 11:48:18
Washim, Maharashtra:अकोला-वाशिम जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाले असून यात प्रस्थापितांना धक्का बसला आहे.वाशिम तालुक्यातून धनंजय गोरे यांनी विजय मिळवला.रिसोड तालुक्यातून माजी मंत्री दिवंगत सुभाष झनक यांच्या पत्नी शोभाताई झनक विजयी झाल्या.मंगरुळपीर तालुक्यातून रामेश्वर सुभाष ठाकरे,मालेगाव तालुक्यातून नितीन दिलीपराव जाधव, तर कारंजा तालुक्यातून विश्वनाथ पाटील ताथोड यांनी बाजी मारली.मानोरा तालुक्यातून अरविंद पाटील इंगोले हे यापूर्वीच बिनविरोध निवडून आले होते.विजयी उमेदवारांच्या समर्थनार्थ गुलाल उधळून मिरवणुका काढण्यात आल्या असून कार्यकर्त्यांनी जल्लोष साजरा केला.
1000
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 30, 2026 11:47:22
Kalyan, Maharashtra:कल्याण पूर्वत पाणी टचाईच्या विरोधात केडीएमसी ड प्रभागात आंदोलन.. चार दिवसांमध्ये पाण्याची समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू सर्व पक्षीय नगरसेवकांचा इशारा.. कल्याण पूर्वेतील नेहरू नगर,खडेगोलेवली, विठ्ठलवाडी, कैलाश नगर,या ठिकाणी पाणी येत नाही त्यामुळे पाणीटंचाईमुळे नागरिक हैराण आहेत नागरिकांना पाण्यासाठी वन वन फिरावं लागत आहे आम्ही टॅक्स भरतो आम्हला पाणी द्या पिण्यासाठी पाणी नाही,आंघोळीसाठी पाणी नाही तर जेवणासाठी देखील पाणी येत असल्याने आज अखेर कल्याण पूर्व ड प्रभाग मध्ये नागरिकांसह सेना,भाजपा उभाठाचे नगरसेवकांनी अधिकाऱ्यांना घेराव घातला चार दिवसांमध्ये पाण्याची समस्या सुटली नाही तर उग्र आंदोलन करू व संपूर्ण रस्ते जाम करू असा इशारा देत अधिकाऱ्यांना जाब विचारत गोंधळ घातला पाणी देतं नसेल तर देता येत नसेल तर,पाण्याच्या टाकीत विष टाकून आम्हाला मारून टाका अशा सतप्त राग वेक्त करत पाणी विभागाच्या अधिकाऱ्यांच्या कार्यालयात जाऊन घेराव घालत जाब विचारला बाईट, पूजा गायकवाड, नगरसेविका भाजप, बाईट, मधुर म्हात्रे, शिवसेना शिंदे गट,नगरसेवक
1069
comment0
Report
Advertisement
Back to top