Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Satara415001

मंत्री शम्भूराज देसाई ने घायल युवक को बचाया, माण में मानवता के दर्शन

TTTUSHAR TAPASE
Sept 29, 2025 16:45:32
Satara, Maharashtra
TUSHAR TAPASE 1 FILE SLUG NAME -SAT_DESAI_HELP सातारा:पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी आज माण तालुक्यातील अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागाचा दौरा केला हा दौरा आटपून ते पुन्हा साताऱ्याच्या दिशेने येत असताना कोरेगाव तालुक्यातील त्रिपुटी खिंडीजवळ एका युवकाचा खड्ड्यात दुचाकी आदळून अपघात झाला असल्याचे त्यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी त्यांच्या गाड्यांचा ताफा थांबवून जखमी युवकाला धीर दिला संबंधित युवकाच्या डोक्यात गंभीर दुखापत झाल्यामुळे मंत्री शंभूराज देसाई यांनी स्वतःच्या ताफ्यातील गाडीतून त्याला रुग्णालयात उपचारासाठी रवाना केले. यामधून मंत्री शंभूराज देसाई यांचे माणुसकीचे दर्शन पाहायला मिळाले...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 17:30:31
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2909ZT_JALNA_DISCUSS_FAIL(1 FILE) जालना | राज्य सरकारसोबत धनगर समाजाची बैठक निष्फळ उपोषणकर्ते दिपक बो-हाडे यांची माहिती दिपक बो-हाडे आपल्या मागण्यांवर ठाम अँकर | राज्य सरकार आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळाची बैठक निष्फळ ठरली असल्याची माहिती खुद्द उपोषणकर्ते दिपक बो-हाडे यांनी दिलीये. धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावं यासाठी दिपक बो-हाडे उपोषण करत आहेत. त्यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. मात्र अद्याप त्यांची मागणी मान्य झालेली नाहीये. आज राज्य सरकार आणि धनगर समाजाच्या शिष्टमंडळांमध्ये चर्चा झाली. मात्र या बैठकीत कोणतीही सकारात्मक चर्चा झाली नसून ही बैठक निष्फळ ठरली असल्याचं बो-हाडे यांनी म्हंटलंय. दरम्यान सरकार जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य करत नाही तोपर्यंत उपोषण सुरुच राहणार असल्याचा निर्धार दिपक बो-हाडे यांनी केला आहे. बाईट- दिपक बो-हाडे, उपोषणकर्ते
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Sept 29, 2025 17:30:12
Kalyan, Maharashtra:तामिळनाडू करूर येथे झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या शिष्टमंडळात शिवसेनेचे खासदार डॉ श्रीकांत शिंदे यांची वर्णी .. तामिळनाडूतील करूर येथे टीव्हीके पक्षाच्या रॅलीदरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर करूरला भेट देण्यासाठी, घटनेची चौकशी करण्यासाठी, बाधित कुटुंबांना भेटण्यासाठी आणि अहवाल सादर करण्यासाठी एनडीएचे  शिष्टमंडळ स्थापन करण्यात आले आहे.खासदार हेमामालिनी नेतृत्व करत असलेल्या शिष्टमंडळात खासदार श्रीकांत शिंदे यांची वर्णी लागली .खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासोबत खासदार अनुराग ठाकूर, खासदार तेजस्वी सूर्या, खासदार ब्रज लाल,खासदार रेखा शर्मा ,टीडीपीचे खासदार पुट्टा महेश कुमार ,खासदार अपराजिता सारंगी यांचा समावेश आहे. byte... श्रीकांत शिंदे खासदार
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Sept 29, 2025 17:16:04
Jalna, Maharashtra: FEED NAME | 2909ZT_JALNA_NIMBALKAR(15 FILES) जालना | धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि खासदार संजय जाधव यांची दिपक बो-हाडेंच्या उपोषणस्थळी भेट सरकारने दिपक बो-हाडेंचा जास्त अंत पाहू नये- संजय जाधव धनगर समाजाचा एसटी प्रवर्गासाठी राज्य सरकारने केंद्राकडे प्रस्ताव पाठवावा जालन्यात धनगर समाजाचे नेते दिपक बो-हाडेंच्या उपोषणाचा तेरावा दिवस अँकर- जालन्यात सुरु असलेल्या धनगर समाजाचे उपोषणकर्ते दिपक बो-हाडे यांची धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर आणि परभणीचे खासदार संजय जाधव यांनी भेट घेतलीये.. दिपक बो-हाडे यांच्या उपोषणाचा तेरावा दिवस आहे. मात्र सरकार फक्त चर्चा करून गेलंय.. यावर तोडगा काही निघत नाहीये.. त्यामुळं राज्य सरकारने धनगर समाजाचा एसटी प्रवर्गात समावेशाचा प्रस्ताव केंद्राके पाठवावा असं खासदार संजय जाधव यांनी म्हंटलंय. तर राज्याने लवकरात लवकर हा प्रश्न मार्गी लावाला दिपक बो-हाडेंचा अंत पाहू नये असं ओम राजे निंबाळकर यांनी म्हणत दिपक बो-हाडेंना पाठिंबा दिला आहे. बाईट- ओम राजे निंबाळकर, खासदार बाईट- संजय जाधव, खासदार
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 16:45:41
Dhule, Maharashtra:ANCHOR - सततचा पाऊस हा आता शेतकऱ्यांच्या जीवावर उठला आहे. पावसामुळे होणारा नुकसान आता शेतकऱ्यांना बघावल जात नसल्यामुळे ते हवालदार झाले आहेत. शेतकऱ्यांचा धीर सुटत चाललेला आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुक्यात एका शेतकऱ्याने अति पावसामुळे झालेल्या नुकसाना मुळे शेतातच विष प्राशन करून आत्महत्या केले आहे. अवकाळी पावसात कापूस पिकाचे झालेल्या प्रचंड नुकसानामुळे तरुण शेतकऱ्या युवराज कोळी यां कुरखळी गावातील शेतकऱ्याने आपल्या शेतातच आत्महत्या केली आहे. पावस थांबल्यानंतर शेतात फेरफटका मारण्यासाठी गेल्यानंतर कापूस पिकाचे नुकसानीचे दृश्य बघितल्यानंतर शेतातच विषारी औषध प्राशन करून युवराज यां तरुण शेतकऱ्याने जिवन संपवले. डोक्यावर कर्जाचे डोंगर असतांनाच पुन्हा हाता तोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरवला गेल्याने कोळी यांनी आत्महत्या केल्याची चर्चा आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 16:45:21
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळे शहरातील स्थानिक राजकारणामुळे एका नागरिकाला आपला जीव गमावा लागलेला आहे. राजकीय विरोधामुळे धुळे शहरातील दत्त मंदिर चौकातील अतिक्रमण निर्मूलन मोहीम थंडावले होते. त्यामुळे या भागामध्ये वाहतूक कोणी नित्याचे झाले होते चिंचोळा रस्त्यांवरती वाहन चालवणे अवघड झाले होते अशातच एसटी बसने जयवंत पाटील यां वृद्धाला चिरडले असून, त्यात त्याचा जागेच मृत्यू झाला आहे. बसं चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. काही दिवसापूर्वीच या भागातला अतिक्रमण काढून रस्ते मोकळे करण्यासाठी पुढाकार घेण्यात आला होता. मात्र महानगरपालिकेच्या निवडणुका लक्षात घेऊन या मुद्द्याला राजकीय रंग दिले गेले. त्यामुळे अखेर एका निरपरात धुळेकर नागरिकाला आपला जीव गमावावा लागला आहे. प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 16:45:13
Dhule, Maharashtra:ANCHOR - धुळ्यात ग्रामीणचे आमदार राघवेंद्र भदाणे यांच्या निवासस्थानासमोर संभाजी ब्रिगेडचे डफली वाजवत आंदोलन करण्यात आले. “ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची कर्जमाफी करा” घोषणा देत हे आंदोलन करण्यात आले. राज्यात अतिवृष्टी आणि महापुरामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले असून शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. या पार्श्वभूमीवर संभाजी ब्रिगेड व अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या माध्यमातून, आमदारांच्या निवासस्थानासमोर डफली वाजवून सरकारला जागे करण्यासाठी अनोखे आंदोलन करण्यात आले. आंदोलनकर्त्यांनी “राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी करा, हेक्टरी एक लाख रुपये मदत द्या, आणि जनावरांच्या बाजारभावानुसार नुकसानभरपाई द्या" अशा ठोस मागण्या निवेदनाद्वारे केल्या. डफली वाजवून झालेल्या घोषणाबाजीमुळे परिसर दणाणून गेला आणि आंदोलनाने लोकांचे लक्ष वेधून घेतले. byte - आंदोलक प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:47:55
Dhule, Maharashtra:ANCHOR - शिरपूर तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे. पिंपरी गावात येणारे चहू बाजूंच्या रस्त्यांची दयनीय अवस्था आहे. शिरपुर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो. रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यापेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाही. तर गेल्या तीन वर्षांपासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिला नाही. त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. रस्त्यावर हातभर खड्डे असुन सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होवुन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले आहे.‌ यामुळे वाहण चालकांना खड्यांचा अंदाज येत नाही. म्हणून अनेक वाहणे खड्यात रुततात. रोज लहान मोठे अपघात होतात. त्यात वाहणाचे टायर फुटणे, छोट्या कारचे चेंबर फुटणे या गोष्टी नित्यांच्या झाल्या आहेत. अनेक वाहणे घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर चिखल माती झाली आहे. पिंपरी येथील रस्त्याच्या समस्येवर गावातील शिष्टमंडळाने लोकप्रतिनिधिची वेळोवेळी भेट घेतली, रस्त्यांची समस्या त्यांच्यासमोर मांडली. मात्र रस्त्याच्या कामासाठी शासनाकडून पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने काम करता येत नाही, असे सांगितले जातं आहे. बाईट - मनोज उमेशसिंग राजपूत पिंपरी ता. शिरपुर जि.धुळे प्रशांत परदेशी, धुळे.
1
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:45:35
Dhule, Maharashtra:ANCHOR - वर्षभराचा हंगाम डोळ्यासमोर मातीमोल झाल्याने धुळे जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांना अश्रू अनावर झालेले आहेत. डोळ्यासमोर पिकांची राख रांगोळी झाल्यामुळे शेतकऱ्यांचा धीर सुटत चालला आहे. धुळ्यात दोन दिवसापासून पावसाने कहर केल्याने तासाभरात होत्याचं नव्हतं झाल्याने शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले, जोरदार झालेल्या पावसाने डोळ्यादेखत पाच एकर मधील संपूर्ण शेवगा पिक उध्वस्त झाल्यामुळे शेतकऱ्याने हंबरडा फोडला आहे, रामदास मोरे असं यां शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सावकारी कर्ज आणि बँकेच कर्ज फेडण्याची ताकद उरली नसून आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याची शेतकऱ्याने भावना व्यक्त केली आहे, मायबाप सरकार लक्ष देत नसल्यामुळे आत्महत्या करणे हाच सोपा उपाय असल्याची भावना नुकसानग्रस्त शेतकऱ्याने बोलताना व्यक्त केली आहे, धुळे तालुक्यातील वडेल शिवारात रामदास मोरे या शेतकऱ्याचं पाच एकर क्षेत्रात असलेल्या उभ्या शेवगा पिकाचं पावसामुळे नुकसान झाले आहे. byte - पीडित शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:45:24
Dhule, Maharashtra:Anchor - धुळे जिल्ह्यामध्ये अति पावसामुळे पिकांचा मोठा नुकसान झाले आहे. अजूनही अनेक शेतांमध्ये पाणी साचलेल आहे. मात्र प्रशासनाकडून पिकांच्या नुकसानीचे पंचनामे केली जात नसल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. शेतकऱ्यांकडून महसूल, कृषी विभागाच्या कर्मचाऱ्यांना पंचनामासाठी विनवणी केली जात आहे. मात्र मुजोरपणे उत्तर दिले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलेला आहे. शेतकऱ्यांचे दुःख जाणून घेण्याची मानसिकता प्रशासनाची नाही असा आरोप शेतकरी करीत आहेत. शेतकऱ्यांचे दुःख हे समजून घेण्यासाठी प्रशासन बांधावर यायला तयार नसल्याच एकंदरीत चित्र जिल्ह्यात दिसून येत आहे. पालकमंत्र्यांनी पंचनामेचे आदेश दिले असले तरी प्रत्यक्षात कृषी आणि महसूल यंत्रणा मात्र सुस्त दिसून येत आहे. या यंत्रणांचा बेफिकीरपणा हा शेतकऱ्यांच्या जिवावर उठला आहे. बाईट नुकसानग्रस्त शेतकरी बाईट नुकसानग्रस्त शेतकरी प्रशांत परदेशी, धुळे.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:31:26
Dhule, Maharashtra:ANCHOR - सर्वत्र मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे धुलाईन नंदुरबार जिल्ह्यामध्ये तापी नदीचा रुद्र रूप पाहायला मिळत आहे. तापी नदीच्या पाणी पातळी मध्ये वाढ झाली असून, सातपुड्यामध्ये झालेल्या मुसळधार पावसानंतर तापी नदीच्या उपनद्यांना आलेल्या पुरामुळे पाणी पातळीत वाढ झाली आहे. एकूणच तापी नदीतील प्रकाशा बॅरेजच्या पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी प्रकाशा बॅरेजचे बारा दरवाजे पूर्ण क्षमतेने ओळखण्यात आले असून तापी नदी पात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग करण्यात येत असून तापी नदी काठावरील गावांना सावधानतेचा इशारा प्रशासनाच्या वतीने देण्यात आला आहे अजून पुढील तीन ते चार तासात तापी नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता प्रशासनाच्या वतीने व्यक्त करण्यात आली आहे प्रशांत परदेशी, धुळे.
2
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Sept 29, 2025 15:30:58
Dhule, Maharashtra:Anchor - नंदुरबार तालुक्यात गेल्या तीन दिवसापासून होत असलेल्या मुसळधार पावसामुळे शेती पिकांच्या अतोनात नुकसान झालेलं आहे. ऐन काढणीवर आलेल्या पिकांचे नुकसान होत असल्याने शेतकऱ्यांच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावल्या गेल्याची प्रतिक्रिया शेतकरी देत आहेत. अनेक उभ पीक आडवे झाले आहेत तर काही शेतांमध्ये पाणी शिरल्याने उत्पन्न येणार नाही अशी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर उपस्थित झाली आहे नंदुरबार तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे केळी पपई कापूस सोयाबीन मिरची आणि मका पिकाचे सर्वाधिक नुकसान झालेलं आहे ऐन काढणीवर आलेल्या पीक उध्वस्त होत असल्याने केलेला खर्चही निघणार नाही अशी परिस्थिती या पिकांची झालेली असल्याने दुष्काळात तेरावा महिना अशी गत झाली आहे यामुळे शासनाने तात्काळ पंचनामे करून आम्हा शेतकऱ्यांना मदत करावी अशी अपेक्षा बळीराजाकडून व्यक्त केली जात आहे. प्रशांत परदेशी, नंदुरबार.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Sept 29, 2025 15:01:40
0
comment0
Report
MNMAYUR NIKAM
Sept 29, 2025 14:00:26
Buldhana, Maharashtra:संभाजी ब्रिगेडकडून जिल्ह्यात ठिकठिकाणी आंदोलन , मलकापूर आमदारांच्या घरासमोर 'संभळ आंदोलन'; पूरग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदतीची मागणी Anchor -महाराष्ट्रावर ओढवलेल्या अस्मानी संकटामुळे शेतजमिनी खरडून गेल्या, उभी पिके सडली व वाहून गेली. अनेक गावांना पुराचा फटका बसला आहे. या भयावह परिस्थितीकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संभाजी ब्रिगेडने संपूर्ण राज्यात २९ सप्टेंबर रोजी सत्ताधारी पक्षाच्या आमदार/खासदार यांच्या घरासमोर संभळ, टाळ-मृदंग वाजवत आंदोलन केले. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा मतदार संघाचे आमदार चैनसुख संचेती यांच्या घरासमोर संभाजी ब्रिगेडच्या वतीने भव्य संभळ आंदोलन करण्यात आले. तर मेहकर मतदार संघात आक्रमक आंदोलन करण्यात आले. तत्काळ शेतकरी कर्जमाफी करा, पूरग्रस्त शेतकरी व गावकऱ्यांना तत्काळ मदत जाहीर करा, पीकविमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करा. राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा, सोयाबीन व इतर पिकांवर आलेल्या रोगांमुळे हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांना दिवाळीच्या आत आर्थिक मदत द्या अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या....आंदोलनानंतर आमदारांच्या प्रतिनिधीमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आले.
0
comment0
Report
Navaratri 2025
Advertisement
Back to top