Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Sangli416416

ईश्वरपूर में महायुती उम्मीदवार के घर के सामने करणी-भानामती का रहस्य उजागर

SMSarfaraj Musa
Dec 06, 2025 08:19:12
Sangli Miraj Kupwad, Maharashtra
स्लग - ईश्वरपूर मध्ये महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर करणी-भानामतीचा प्रकार. अँकर - सांगलीच्या ईश्वरपूरमध्ये निवडणुकीनंतर करणी भानामतीचा प्रकार समोर आला आहे.महायुतीच्या उमेदवारांच्या घरासमोर हा करणीचा प्रकार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.एका कागदात काळी बाहुली आणि करणीचे साहित्य गुंडाळून रात्रीच्या दरम्यान टाकण्यात आल्याचा प्रकार घडला आहे.ईश्वरपूर नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीकडून कपिल ओसवाल व मन्सूर मोमीन हे उमेदवार असून ते राहत असलेल्या सावकार मशीद परिसरामध्ये त्यांच्या घरासमोर हा प्रकार घडला आहे.या घटनेनंतर ईश्वरपूर शहरामध्ये एकच खळबळ उडाली असून निवडणुकीतून हा प्रकार झाल्याची चर्चा सध्या सुरू असून विरोधी उमेदवारांकडून हा प्रकार करण्याचा आल्याचा आरोप महायुतीच्या उमेदवारांकडून करण्यात येतोय,ईश्वरपूर पोलीस ठाण्यामध्ये सदरच्या घटनेची नोंद झाली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Dec 06, 2025 09:46:28
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - बार्शीत पुन्हा एकदा हातात कोयता घेऊन दहशत माजवण्याच्या प्रयत्न, सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद - बार्शी शहरात कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न, दुकान तोडफोडीचा प्रकार सीसीटीव्ही कॅमेरा कैद - बार्शीत मोबाईल दुकानदाराला धमकवत कोयत्याने दुकान फोडले, रिचार्ज करण्यावरून झाला वाद - कोयता हातात घेऊन दहशत माजवत दुकानाची तोडफोड करतानाचा व्हिडिओ सीसीटीव्ही कॅमेरा कैद - मोबाईल दुकानदाराकडून बायकोच्या मोबाईलचा रिचार्ज केल्यानंतरही झालं नसल्यामुळे रागातून दुकानाची केली तोडफोड - बार्शी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू, आरोपी फरार.. - बार्शी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बालाजी कुकडे अधिक तपাস करत आहेत..
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 06, 2025 09:39:01
Virar, Maharashtra:जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील आज वसई विरार दौऱ्यावर बविआला शह देण्यासाठी भाजपची ताकद स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार अँकर - राज्याचे जलसंपदा मंत्री आणि अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील आज वसई–विरार आणि नालासोपारा दौऱ्यावर आहेत. विरार येथील जीवदानी देवी मंदिर पायथ्याशी हेलिकॉप्टर उतरल्यावर आमदार राजन नाईक यांनी त्यांचे स्वागत केले. आज दिवसभर मंत्री विखे पाटील भाजप पदाधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांशी संवाद साधणार असून विविध विकासकामांच्या कार्यक्रमांना उपस्थित राहणार आहेत. वसई–विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा दौरा महत्त्वाचा मानला जात आहे. हितेंद्र ठाकूर यांच्या बालेकिल्ल्यात घुसखोरी करण्यासाठी भाजपने रणनीती आखायला सुरुवात केल्याचे या दौऱ्याने स्पष्ट होत असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
46
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 09:36:40
Kolhapur, Maharashtra:बेळगाव जिल्ह्यातील निपाणी शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरीचे प्रमाणात अचानक वाढ झाली.. या पार्श्वभूमीवर निपाणी पोलीस सतत गस्त वाढवून संशयितांच्या मागावर होते. दरम्यान, माने प्लॉट परिसरात काही संशयित व्यक्ती चोरी करण्याच्या उद्देशाने फिरत असल्याची माहिती स्थानिक नागरिकांनी पोलिसांना दिली. त्यानंतर मिळालेल्या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलीस पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. त्यावेळी चार चोरटे एका घरामध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत होते. त्याचवेळी पोलिसांनी त्यांना पाहिले आणि इतर सहकाऱ्यांना बोलावून या चोरट्यांना पकडण्याचा प्रयत्न केला, पण पोलीस जवळ पोहोचताच यातील चोरटे आक्रमक होत पोलिसांवर हल्ला चढवून पळ काढला. ही सर्व दृश्ये CCTV मध्ये कैद झाली आहेत.
39
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 09:30:19
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरे शिवसेनेने महाविकास आघाडीविरोधात आक्रमक भूमिका घेतली असून आघाडीतले मतभेद चव्हाट्यावर आले आहेत. जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी स्पष्ट सवाल केला आहे की महाविकास आघाडी आमचा वापर करून घेणार का? प्रत्येक निवडणुकीत ठाकरे शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसला, पण यावेळी हे होऊ देणार नसल्याचा इशाराही त्यांनी दिला. काँग्रेसचे आमदार सतेज पाटिल आणि खासदार शाहू महाराज छत्रपती यांनी शिवसेना पदाधिकाऱ्यांना काय निधी दिला, असा थेट प्रश्न त्यांनी उपस्थित केला. ठाकरे शिवसेनेकडे सक्षम उमेदवारांची मोठी फळी असून 61 जणांनी उमेदवारीची इच्छा व्यक्त केली आहे; मात्र आघाडीचा सन्मान राखत फक्त 33 जागांची मागणी आम्ही केली, असं इंगवले म्हणाले. वरून ग्रीन सिग्नल मिळाल्यास आम्ही कोणाशीही युती करू शकतो, असं सूचक विधान करत त्यांनी नवे राजकीय संकेत दिले. शहराध्यक्ष सुनील मोदी यांनीही जिथे ठाकरे शिवसेनेकडे मजबूत उमेदवार आहेत, त्या जागा आम्हालाच मिळाल्या पाहिजेत, असा ठाम पवित्रा घेतला. त्यांच्या या वक्तव्यांमुळे कोल्हापूर महाविकास आघाडीत तणाव वाढला असून सीटवाटपाची लढाई अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.
37
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 06, 2025 09:16:04
Shirdi, Maharashtra:माजी राज्‍यसभा खासदार तथा सिने अभिनेत्री जयाप्रदा यांनी साईबाबांच्या मध्यान्ह आरतीचा लाभ घेत साईबाबांच्‍या समाधीचे दर्शन घेतले...मी चित्रपट सृष्टीत आल्यापासुन नेहमी शक्य होईल तेव्हा साईदर्शनासाठी येत असते...साई मंदिराचा विकास आणि येथील दर्शन व्यवस्था कौतुकास्पद असुन देशातूनच नव्हतर विदेशातील भाविक दर्शनासाठी येतात... या जन्मात आणखी काही नको , साईबाबांचे आशिर्वाद सोबत राहोत ,ते आपली रक्षा करत राहो एवढीच साईचरणी प्रार्थना असल्याच जयाप्रदा यांनी बोलताना सांगितलय...दरम्यान दर्शनानंतर साईबाबा संस्‍थानचे वतीने उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी भिमराज दराडे यांनी त्‍यांचा सत्कार केला.
56
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 06, 2025 09:02:50
Nagpur, Maharashtra:हिंगणा विधानसभा में मतदारसंघ के भाजपा आमदार समीर मेघे यांची अनिल देशमुख यांच्या आरोपांवर प्रत्युत्तर देणारी प्रेस कॉन्फरन्स नागपूर On अनिल देशमुख आरोप * ज्यांचे नाव मतदार यादीत असेल आणि तो बाहेर गावी राहत असेल त्यांनी मतदान केले ते योग्य कि अयोग्य.. * स्वतः अनिल देशमुख हे नागपुरात राहतात आणि त्यांचं मतदान काटोल मध्ये आहेत.. मग ते बोगस मतदान करतात का..? * येणाऱ्या 21 तारखेला निकाल मात्र त्यांच्या मोठा पराभव दिसू लागला.. * त्यामुळे पराभवानंतर हे सर्व निवडणूक आयोगावर आरोप करणार आहे.. * 16 वर्षातील विकास आराखडा त्यांनी सादर करावा आणि 11 वर्षाचा आराखडा मी सादर करतो.. यावर एकदा खुली चर्चा व्हायला हवी.. * तुम्हाला जनतेची सेवा करण्यात अपयश आल्याने असे खोटं नाटक करणे बंद करावे ही विनंती... * हे सर्व खोट नेरिटिव्ह बंद करून त्यांनी वेळ आणि ठिकाणी ठरवून विकासाचा आराखडा सादर करावा.. * निवडणूक प्रक्रिया सुरू असताना आक्षेप घेण्याची संधी होती, त्यावेळी योग्य ती कारवाई केली असती.. मग का त्यावेळी मागणी केली नाही...
61
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 06, 2025 09:02:35
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग ऑन गुजरात हापूस दावा --- मागण्या कोणी करू शकत मागणीण्यात काही हरकत नाही आमच्या कोकणातील हापूस आंब्याची बाजू लावून धरण्यासाठी आम्ही सक्षम आहोत. केंद्रात राणे साहेब आहेत सुनील तटकरे साहेब आहेत माहितीचे सगळे लोकप्रतिनिधी आहोत आम्ही सगळे ताकतीने आमच्या हापूस आंब्याच्या मागे उभे आहोत ऑन सुप्रिया सुळे --- सुप्रिया ताईंनी आमच्या मुख्यमंत्री साहेबांचं सकाळचं भाषण आवर्जून पाहिला हवं कदाचित ताई लग्नामध्ये फार बिझी आहेत . मुख्यमंत्री साहेबांचे भाषण ऐकलं तर तो प्रकल्प किती लवकर पूर्ण होईल त्याचा अंदाज त्यांना येईल ऑन मनसे आंदोलन --- हिंदू देशांच्या बरोबर खांदेळाला खांदा लावून काम करणारा मनसे नावाचा पक्ष तयार होतोय. हिंदुरुदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंच्या कुशीत तयार झालेले राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा धागा धरून जर राजकारण केलं तर बाळासाहेबांची छाप त्यांच्यात दिसेल. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा आणि आणि हिंदुत्वासी जे लांब गेले त्यांची काय अवस्था झाली ते राज साहेबांनी आपल्या घरातच पहावं. उद्धव ठाकरेचे पतन आणि त्यांच्या पक्षाची जी अवस्था झाली आहे. ती हिंदुत्व सोडल्यामुळेच आहे. जो हिंदुत्वाच्या लांब गेलाय तो संपलाय. ह्याचा बोध आदरणीय राज साहेबांनी घ्यावा ऑन बंगाल बाबरी मशिद ( हिंदी ) --- बंगाल हो या हमारा भारत देश हे हिंदू राष्ट्र है. जहाजहा हमारे हिंदुत्ववादी लोक रहते है वो इस तरह के जिहादी मानसिकता के लोगो को कभी सहन नही करेंगे. हमारे पंतप्रधान नरेंद्र मोदी जी के नेतृत्व में जल्दी पश्चिम बंगाल में भी हिंदुत्व सोचके सरकार बनने जा रही है
93
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 06, 2025 08:46:04
111
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 06, 2025 08:15:19
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शिवसेना नेते अंबादास दानवे बाईट पॉइंटर ऑन महाआरती. - हिंदुस्थानच्या इतिहासात आजचा दिवस महत्वाचा आहे.कारण आज महापरिनिर्वाण दिन आणि प्रभू श्रीराम जिथे जन्मले तेथे मंदीत स्थापन झाले. यामुळे महत्वाचे आहे. ऑन मत चोरी.. - मत चोरी ही देशातील सर्वात मोठी चोरीची घटना आहे. लोकशाहीत सर्वात मोठा अधिकार मतदानाचा आहे,आणि तोच चोरी होत असेल तर आवाज उठवावा लागेल. कुणीही आवाज उठवला तर त्यामागे सहभागी होणे गरजेचे आहे... ऑन हापूस आंबावर गुजरात दावा... - कोकणाचा , रत्नागिरीचा हापूस आंबा हा महाराष्ट्राची नव्हे तर देशाची शान आहे. गुजरातचा आंबा म्हणतात हा नवीनच काही होत आहे.. हापूस हा कुठला आहे हे कुणाला सांगायची गरज नाही. शिंदेंचे लोकप्रतिनिधी मुख्यमंत्री कार्यक्रमाला गैरहजर. - शासकीय कार्यक्रमाला मुख्यमंत्री असताना पालकमंत्री असले पाहिजे. कारण शिष्टाचार महत्वाचा असतो. कार्यक्रमाला एखादा आमदार आला नाही, किंवा येऊ शकले नाही.ते समजू शकते मात्र शासकीय कार्यक्रमात पालकमंत्री यांना यायला पाहिजे होते. ऑन भाईंदर मध्ये मांसाहारी असल्याने घर नाकारलं. - कोणी शाकाहारी असेल, कुणी मांसाहारी असेल ते ज्याचा त्याचा अधिकार.आम्ही याबत अधिवेशनात कायदा करावा, अशी मागणी केली होती. मात्र सरकारला यात इंटरेस्ट दिसत नाही. ऑन महापौर वाद... - बाजारात तुरी.... अशी म्हण आहे. बाजारात तुरी असताना यांचा महापौर बसणार नाही. जन्मांत यांचा महापौर बसणार नाही. ठाकरेंच्या विचारांचा महापौर बनणार... ऑन लोढा. - लोढा हे बिल्डर आहे. सर्व धंदे लपविण्यासाठी लोढण्याचा मुख्यंत्र्यांची चपळुसी करावी लागते... ऑन वृक्षतोडी - मंदिरावर वृक्षाचं चित्र आहे. अश्यात तपोवनातील सर्वभूमी नष्ट करण्याचे काम सुरू आहे. रामाच्या पदस्पर्शाने पावन झालेली ती भूमी आहे. सर्वजण या वृक्षतोडीच्या विरोधात आहे. ऑन हर्षवर्धन जाधव प्रवेश वाद. - मी माझ्या मनाने कोणतीही गोष्ट करीत नाही, उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने सर्व होत असते. ठाकरेंच्या आदेशाची अंमलबजावणी करणे माझे काम आहे. उद्धव ठाकरे आणि हर्षवर्धन जाधव दोघेही मातोश्रीवर भेटले. त्यांच्यात काय चर्चा झाली मला माहिती नाही. खैरे साहेबापेक्षा उद्धव ठाकरेंचं मत महत्वाच्या.... ऑन निवडणुका... - निवडणुका जानेवारीच्या आत कराव्याच लागणार आहे.....
134
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 06, 2025 08:07:47
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर ते वैभववाडी या महत्त्वाच्या नव्या रेल्वे मार्गाला गती द्यावी, अशी जोरदार मागणी खासदार धनंजय महाडिक यांनी राज्यसभेत केली आहे. २०१७ मध्ये सुरेश प्रभू यांनी या मार्गाची घोषणा करून पायाभरणीही केली होती. पण २००५ पासून कोल्हापूरकरांची असलेली ही मागणी आजही मार्गी लागलेली नाही. या संपूर्ण प्रकल्पामुळे आयात–निर्यात, व्यापार आणि पर्यटनाला मोठा फायदा होणार आहे. पण केंद्र सरकार मात्र याकडे लक्ष देताना दिसत नाहीये. इतकच नाही तर मागील दोन अर्थसंकल्पात या मार्गाचा साधा उल्लेख आहे करण्यात आलेला नाही. त्यामुळेच राज्यसभा खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर वैभववाडी मार्गाचा प्रश्न उपस्थित केला.
177
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 06, 2025 07:54:31
Satara, Maharashtra:सातारा - 2022 मध्ये आमचे नेते एकनाथ शिंदे यांनी भूमिका घेतली त्यामुळेच भाजप सत्तेमध्ये आलं, भाजपला सत्तेमध्ये चांगला वाटा मिळाला त्यामुळे भाजप शिवसेनेची पुन्हा भक्कम युती झाली आणि पर्यायाने भाजप ताकदवान व्हायला एकनाथ शिंदे यांचा उठाव असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी सांगितले आहे.आम्ही सत्ते मध्ये होतो पण आम्हाला सत्तेतून बाहेर जाण्याची गरज नव्हती त्यात पुढे काय होणार आहे,बहुमत होणार आहे का नाही,युती टिकणार आहे की नाही याचा आम्ही विचार केला नाही त्यामुळे या गोष्टीचा भाजप नेते मंगलप्रभात लोढा यांनी विचार करावा असा सल्ला मंत्री शंभूराज देसाई यांनी दिला आहे.मंगलप्रभात लोढा यांनी काल 2014 पर्यंत भाजप राज्यात तेवढी ताकदवान नव्हती असं वक्तव्य केलं होते या प्रश्नावर उत्तर देताना मंत्री शंभूराज देसाई यांनी भाजपला सुनावले आहे.
70
comment0
Report
Advertisement
Back to top