Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Raigad402201

13 साल से रुके मुंबई-गोवा मार्ग पर टोल वसूली की तैयारी, यात्रियों पर बोझ

PPPRAFULLA PAWAR
Mar 06, 2026 05:18:45
Chendhare, Maharashtra
तुम्ही दिलेल्या सामग्रीतून निष्कर्षानुसार, मुंबई गोवा महामार्गावर प्रवासासाठी आता टोल भरावा लागणार असल्याची अधिसूचना येण्याची शक्यता प्रखरपणे सांगितली गेली आहे. १३ वर्षे रखडलेल्या महामार्गाच्या कामाचा तर, प्रवाशांकडून टोल वसुलीची तयारी सुरू असल्याची माहिती दिली गेली आहे. महामार्गावर ठिकठिकाणी उभारलेले टोलनाके कार्यान्वित करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. येत्या आठवड्यात या बद्दल अधिसूचना जारी होण्याची शक्यता महामार्ग प्राधिकरणातील सूत्रांनी दिली आहे. हे टोलनाके सुरू झाल्यास कोकणात येणाऱ्या प्रवाशांना प्रवासासाठी पैसे मोजावे लागतील. निधीची कमतरता, ठेकेदाराची निष्क्रियता, भूसंपादनातील अडचणी यामुळे हे काम रखडलं आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 06, 2026 06:07:08
Shirdi, Maharashtra:विधानसभा निवडणुकीत संगमनेर विधानसभा मतदारसंघात सत्तांतर झाल्यानंतर शिवसेनेचे आमदार अमोल खताळ व बाळासाहेब थोरात यांचे भाचे अपक्ष आमदार सत्यजित तांबे यांच्यात सुरू असलेली श्रेयवादाची लढाई अजूनही सुरूच आहे.. नगरपालिका निवडणुकीत तांबे यांनी बाजी मारली.. मात्र आता संगमनेर शहरात नियोजित छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यावरून पुन्हा एकदा श्रेयवादाची रस्सीखेच सुरू झाली आहे.. शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला बस स्थानक परिसरात दोन्ही आमदारांकडून शक्ती प्रदर्शन पाहायला मिळाले... एकीकडे तांबे यांच्या माध्यमातून स्मारकासाठी जनतेतून मते मागवण्यात आली तर दुसरीकडे अमोल खताळ यांनी होय अश्वारूढच पुतळा उभारणार अशा पद्धतीने देखावे सादर करत डीजेच्या तालावर कार्यक्रम घेण्यात आले... विधानसभा निवडणुकीपासून अपक्ष आमदार सत्यजित तांबे व शिवसेनेचे आमदार अमोल खताळ यांच्यात सुरू असलेली ही श्रेयवादाची लढाई मतदारसंघाला विकासाकडे नेणार की यातून भविष्यकाळात वाद निर्माण होणार याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे...
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 06, 2026 06:05:48
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Mar 06, 2026 06:05:24
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 06, 2026 06:04:04
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Mar 06, 2026 06:03:28
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Mar 06, 2026 06:03:13
Nashik, Maharashtra:उन्हांच्या झळा प्रखर होताच जलसाठे आटण्यास सुरुवात अँकर नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा प्रखर होऊ लागल्या असून, सात दिवसांत जिल्ह्यातील एकूण उपयुक्त पाणीसाठा सहा टक्क्याने घटला आहे. शहराची तहान भागविणाऱ्या गंगापूर धरणात ३ हजार ४१२ दलघफूपर्यंत पाणीपातळी आली असून, ६० टक्के इतका जलसाठा शिल्लक राहिला आहे. तसेच मुकणे धरणात अद्याप ५ हजार २२१ दलघफूपर्यंत पाणीपातळी असल्याने ७२ टक्के इतका पाणीसाठा टिकून आहे...जिल्ह्यातील मोठे, मध्यम, लघुप्रकल्प असलेल्या विविध धरणांमधील एकूण उपयुक्त जलसाठा ६६.५४ टक्क्यांवर आला आहे. ४६ हजार ९९३ दलघफू इतका उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे. गोदावरी खोऱ्यामध्ये गंगापूर, पालखेड समूहात लहान-मोठी १९ धरणे आहेत. तसेच गिरणा नदीच्या खोरे धरण समूहात सात धरणे आहेत. जिल्ह्यात अशी २६ लहान-मोठी धरणे आहेत. फेब्रुवारीच्या अखेरच्या आठवड्यापासूनच उन्हाच्या झळा तीव्र होण्यास सुरुवात झाली आहे. मार्च महिना उजाडताच अधिक प्रखरपणे ऊन जाणवू लागले आहे. यामुळे पुढील आठवड्यात जिल्हा प्रशासनाला संभाव्य पाणीटंचाईच्या दृष्टीने नियोजन करावे लागणार असून, टँकरच्या फेऱ्यांचेही समीकरण जुळवावे लागणार आहे.... गंगापूर धरण परिसरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सागर यांनी
0
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Mar 06, 2026 06:01:04
Mumbai, Maharashtra:संजय राऊत ऑन युद्ध चांगली गोष्ट आहे जरी इराणच्या दृष्टीने दुखत गोष्ट असली तरी जगासाठी सुद्धा हे दुःखद घटना आहे एखा देशाच्या अशा पद्धतीने ठार करणं एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला रात्री त्याच्या घरात घुसून किडन्याप करून न्यूयॉर्कला आणला एखाद्या देशाच्या राष्ट्रप्रमुखाला ठार करा अशी चेतावणी देणार त्या गोष्टी जागतिक पातळीवरती निषेधार्य आहे त्या देशातील सत्ता उलथून टाकण्याचं काम हे लोकशाही मार्गाने तेथील जनतेने केले पाहिजे उद्या नरेंद्र मोदी यांच्या विषयी प्रेसिडेंट ट्रम्पला वाटलं येथे सैन्य घुसवेन आणि नरेंद्र मोदींना उचलून टाकेल आम्ही हे होऊ देणार नाही आम्ही त्यांच्या सत्तेचा पराभव लोकशाही मार्गाने करू उद्या इजराइल वाटलं मोदी आमच्या ऐकत नाही आणि स्वतंत्रपणे निर्णय घेऊ लागले राष्ट्रीय हिताचे म्हणून आम्ही त्यांच्यावर हल्ला करू आम्ही हे एक देश म्हणून कदापि होऊ देणार नाही पण जर इराणच्या बाबतीत अशा गोष्टी घडत असतील तर भारतासारख्या मोठ्या राष्ट्रात त्याचा निषेध केला पाहिजे खरं म्हणजे मोदी इतके मोठे नेते आहेत असे त्यांचे लोक मानतात त्यांनी या युद्धात मध्यस्थी करून हे युद्ध थांबवलं पाहिजे आणि इराण आणि गाजामध्ये जो नरसहार सुरू आहे इजराइल च्या माध्यमातून तो थांबला पाहिजे एका मुलींच्या शाळेमध्ये हल्ला होतो आणि 200 लहान मुलींना ठार केलं जातं याचा कौतुक इजराइल आणि अमेरिकेला असेल तर मानवतेच्या दृष्टिकोनातून भारताने त्याचा निषेध केला पाहिजे असं मला वाटते आम्ही काही युद्धात एखाद्या राष्ट्राचे बाजू घ्या असे म्हणत नाही भारताच्या सागरी हल्ल्यांमध्ये नौ दलाच्या संचालनासाठी प्रदर्शनासाठी आपल्या आमंत्रणावरून इराणचा नौदल इकडे आलं त्यांची युद्ध नौका इकडे आली आमची जबाबदारी आहे त्यांना सुखरूप पाठवना पण पाहुणे म्हणून इकडे येतात त्यांच्या सुरक्षतेची काळजी घेणं आणि त्यांना पुन्हा घरापर्यंत पोहोचवणं हे यजमान देशाची भूमिका असले पाहिजे पण इराणच्या नौ दलातील युद्धनौका आमच्या भारतामध्ये ते राष्ट्रपती समोर त्यांच्या संचालन होतं आणि जाताना हिंद महासागरामध्ये त्या बोटीवर अमेरिका हल्ला करते इजराइल हल्ला करते आणि ती बोट बुडवून 90 सैनिकांना ठार केलं जातं आणि त्याचा सुद्धा भारताकडून निषेध होत नाही हे सुद्धा दुःखद आणि धक्कादायक आहे नक्कीच जगाना अश्रू झाल्या वरती लोक लजेस्ट व्यक्त केलेले हे दुःख आहे पण भारताला आता कोणत्याही राष्ट्रीय धोरण नाही परराष्ट्रीय धोरण नाही आणि भारत कोणाच्यातरी गुलाम म्हणून काम करत आहे की काय हे आता चिंताजनक चित्र पाहायला मिळत आहे ऑन अमेरिका बिजनेस डील अमेरिका भारताला सांगत आहे की आम्ही तुम्हाला परवानगी दिली आहे रशियाकडून तेल घ्यायला आम्ही ठरवत नाही आहोत भारताला अमेरिका नाचत आहे नरेंद्र मोदी हे अमेरिकेचे कटपुतले आहेत अमेरिकेने त्यांच्या फॉरेन सेक्रेटरीने ट्विट केला आहे समाज माध्यमावरती आम्ही भारताला परवानगी दिलेली आहे परवानगी गुलामांना देतात आम्ही तुम्हाला आज परवानगी दिली आहे की तुम्ही हे खरेदी करू शकता तुम्ही फिरू शकता तुम्ही यांच्याशी बोलू शकता अशी परवानगी फक्त गुलाम राष्ट्रांना दिली जाते गुलाम अमेरिकेने परवानगी दिल्यामुळे आम्ही रशियाकडून तेल खरेदी करू शकतो आम्हाला गरज आहे सध्याची युद्ध परिस्थिती म्हणून आम्हाला रशियाकडून तेल खरेदी करण्याची हिंमत नाही अमेरिकेच्या मेहरबानी वरती आम्ही रशियाकडून तेल खरेदी करणार असेल तर थू तुमच्या जिंदगानी वर ऑन चीन आणि रशिया हे इराण बाजू हळू हळू बरेचसे जगातील अनेक प्रमुख राष्ट्र हे युद्धघोरीच्या विरोधात उभे राहिले आणि या जगामध्ये दोन देश युद्धकार आहेत ज्यांनी इराणवर हल्ला केला भारताने कायम शांततेचा संदेश दिला पंचशीला चा मार्ग स्वीकारला पंडित नेहरू यांचा तडस्थतेचा मार्ग स्वीकारला आणि भारताला सुद्धा भविष्यात याच मार्गाने जावं लागेल पण ज्या पद्धतीने भारताचे नेतृत्व या सगळ्या प्रश्नांची चूप आहे याचा अर्थ त्या युद्धावर लांडगे विरुद्ध उभे राहिले त्यांचे हिम्मत नाही आता नाटो सदस्य असलेले राष्ट्र आहेत ते अनेक राष्ट्रांनी युद्धापासून माघार घेतली आम्ही इजराइल आणि अमेरिकेबरोबर युद्धात सहभागी होणार नाही त्याच्यामध्ये स्पेनच्या राष्ट्रांमध्ये भूमिका घेतली ब्रिटनच्या प्राईम मिनिस्टर यांनी भूमिका घेतली त्यानंतर इतर काही राष्ट्र याच भूमיקेत आहेत हे युद्ध बराच काळ चालणार आहे इराण जनता झुंजार आहे असे माझे कायम म्हणणं आहे त्यांना फार मोठे परंपरा आहे शेकडे वर्षाची आणि त्याचे परिणाम भविष्यात भारताला भोगावे लागतील असं मला सारखं आम्हाला वाटत आहे ऑन निर्यात ठप्प शेतकऱ्यांच्या प्रचंड नुकसान त्यानंतर निर्याती वरती फार बंधन आली आहेत आमच्या शेती उत्पादन आमचं फळ आमचा इतर काही अनेक गोष्टी कपडा तर गोष्टी वरती बंधन आले आहेत आणि याच्यावरती सरकारचे कोणतेही भूमिका या शनि नाही आमची हजारो लोक अडकून पडली आहेत याच्यावर सरकारचे कोणतेही भूमिका नाही ते लोक काय करणार आहेत त्यात काही विद्यार्थी आहेत पर्यटक आहेत तिथे काम धंद्याला गेलेले लोक आहेत त्याऎमुळे ही परिस्थिती फार गंभीर आहे ऑन राज्यसभा निवडणूक जर निवडणुकीची गरज नसेल तर उगाच घोडेबाजार करण्यात अर्थ नाही घोडेबाजार कोणीही महाराष्ट्रात यापुढे करू नये या मताचा मी आहे महाराष्ट्रातला प्रत्येक निवडणुकीमध्ये विधानपरिषद आणि राज्यसभा आहे दोन विधानपरिषद आणि एक राज्यसभा निवडून देण्याचे बळ महाविकास आघाडीमध्ये आहे पण कोणाला असं वाटत असेल आपण घोडेबाजार करावा आणि महाराष्ट्राला ते चटक लागली आहे राजकारणात पैशाची ती चटक वाढवावी तर त्या राज्याच्या प्रतिष्ठेला विकृतीला धक्का लागेल काही हरकत नाही बिनविरोध व्हायची आम्ही लोक मिळून इतर आमचे समाज उदय पार्टी इतर पक्ष मिळून आम्ही साधारण 50 च्या दरम्यान आहोत तर एक काय दोन विधानपरिषद विरोधी पक्ष जिंकू अशा परिस्थितीमध्ये सरकार पक्षाच डाशवी बहुमत आहे त्याने महाराष्ट्रामध्ये घोडेबाजार करू नये दिल्लीच्या सूचनेनुसार दिल्लीचा सरकार हे घोडे बाजारातून आलेल्या सरकार आहे पण महाराष्ट्र सरकार त्यांच्याकडे आज बहुमत आहे त्यांच्याकडे बहुमत कसा आणला हे पुढला प्रश्न स्वतः भारतीय जनता पक्षाकडे बहुमतय त्यांनी या राज्यात भविष्यात घोडेबाजाराचा कलंक लावू देऊ नये ऑन शिंदे शिवसेना उमेदवार ज्योती वाघमारे हा त्यांच्या पक्षाच्या प्रश्न आहे त्यांच्या हाय कमांड काही निवड केली असेल तर तो त्याच्यावरती मी मध व्यक्त करणार नाही पण एखाद्या सामान्य कुटुं18 ्बारातील कार्यकर्त्या दलित शोषित कुटुंबातील कार्यकर्ता महत्त्वाचा पद मिळत असेल तर तो कोणत्याही पक्षाचा जरी असेल तरी त्याचा स्वागत करण्याची भूमिका हे कायम आम्ही घेतली आहे ठीक आहे आमचे राजकीय मतभेद आहेत पण एक सामान्य कार्यकर्त्याला एक पद मिळत असेल तर त्याचा स्वागत खुला दिलाने केले पाहिजे आता तुम्ही ज्या ज्योती वाघमारे यांच्या नाव घेत आहेत त्या आमच्यावर टीका करतात अपशब्द वापरतात असे मी ऐकलं मला लोक सांगतात ठीक आहे ही त्यांची संस्कृती किंवा पक्षाचे संस्कार असतील तरी त्या एका सामान्य कुटुंबातील आहेत त्यांनी महाराष्ट्रातल्या तळागाळातील शोषितांसाठी काम करावं ऑन आनंदराव अडसूळ राज्यपाल आश्वासन चुकीचा आहे माझ्या माहितीप्रमाणे शिंदे गटाला राज्यपालापेक्षाही अमेरिकेचा हाय कमिशनर अमेरिका आणि फ्रान्समध्ये तुम्हाला दोन हाय कमिशनर पद देऊ तुम्ही माणसं निवडून आमच्याकडे पाठवा अमेरिका आणि फ्रान्स असं काहीतरी ते आहे राज्यपाल हे खूप लहान पद आहे ऑन फडणवीस अर्थसंकल्प त्याने चांगलं आणि उत्तम प्रकारे अर्थसंकल्प सादर करावा शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी महाराष्ट्रामध्ये गोरगरीब शेतकरी कष्टकरी मजूर मध्यमवर्गी यांना दिलासा देणारा अर्थसंकल्प सादर करावा आणि हा अर्थसंकल्प आपल्या उद्योगपती मित्रांसाठी आहे अशी लोकांची भावना होऊ नये असे काळजी घ्यावी ऑन सभागृह आमदार क्रिकेट मॅच चर्चा अबोल अर्थसंकल्प आहे बोलतील हळूहळू क्रिकेटचा जोर उतरल्यावर जनतेच्या जोर त्यांना चढेल
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 05:31:54
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:संपूर्ण प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गा विरोधात इटकरे ग्रामस्थांचे आंदोलन, शक्तीपीठ प्रतिकृतीचे दहन. सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यातील प्रस्तावित शक्तिपीठ महामार्गा विरोधात इटकरे येथे आंदोलन झाले. ग्रामपंचायतीसह विविध संस्था आणि शेतकऱ्यांच्या वतीने प्रस्तावित नागपूर-गोवा शक्तीपीठ रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन करत महामार्गाच्या प्रतिकृतीचे दहन झाले. कोणत्याही परिस्थितीमध्ये वाळवा तालुक्यातून शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही, असा निर्धार यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आला आणि प्रस्तावित शक्तीपीठ महामार्ग रद्द करावा अशी मागणी करण्यात आली.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 06, 2026 05:31:02
Bhandara, Maharashtra:भंडाऱ्याच्या कोसरा (पवनी तालुका) येथे शॉर्टसर्किटमुळे आग लागली; संपूर्ण घर भस्मस्त, रोख रक्कम व दागिने सहित अंदाजे २० लाख रुपयांचे नुकसान. गावकऱ्यांनी आग विझवण्यासाठी प्रयत्न केले; परंतु जुने घर मातीचे आणि लाकूडाचे असल्याने काही वेळातच आगीने परिसर प्रखरपणे व्यापून टाकला. पांख, पोलिस, अग्नीशामक दलाला पाचारण केले गेले. पवनी नगर पालिका आग्निशामक दलाने घटनास्थळी पोहचून आग आटोक्यात आणली; मात्र नुकसानाच्या थक्क करणाऱ्या स्वरुपात काहीही वाचवता आले नाही. दरम्यान, वीज वितरण कंपनीचे अधिकारी, पोलिस निरीक्षक धनंजय पाटील व गावचे तलाठी आदींनी घटनास्थळाला भेट देऊन पंचनामा केला.
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 06, 2026 05:03:56
Pandharpur, Maharashtra:अमेरिका इजराइल और इराणच्या युद्धाचा द्राक्ष निर्यातावर परिणाम, पंढरपूर तालुक्यात कोट्यवधींची द्राक्षे शेतात पडून, कवडीमोल दराने द्राक्ष विकण्याचा पर्याय सध्या रमझान हा मुस्लिम धर्मियांचा धार्मिक महिना सुरू आहे. या काळात विविध प्रकारच्या फळांना मोठी मागणी असते. आखाती देशात महाराष्ट्रातून द्राक्ष सुद्धा निर्यात होतात. मात्र सध्या असलेल्या युद्धजन्य परिस्थिती मुळे फळे निर्यात करणाऱ्या व्यापाऱ्यांनी खरेदी साठी पाठ फिरवली आहे. याचा अर्थिक फटका द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना बसला आहे. पंढरपूर तालुक्यातील लक्ष्मी टाकळी येथील सुरेश टिकोरे यांचा बारा एकर निर्यात क्षम द्राक्ष बागेचा प्लॉट आहे. आठ दिवसात ही द्राक्षे दुबईच्या बाजारात निर्यातदार व्यापाऱ्याच्या माध्यमातून विक्री साठी जाणार होती. प्रति किलो शंभर रुपये दर ठरला होता. द्राक्ष तोडणीसाठी साठी मजूर व्यापारी येणार होते. पण युद्धाची तीव्रता वाढली आणि व्यापाऱ्यांनी द्राक्ष खरेदी करायला नकार दिला. त्यामुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हताश झाला आहे. सध्या टिकोरे यांचा दोन कोटी रूपयांची द्राक्षे बागेवर पडून आहेत. आता स्थानिक बाजारपेठेत ही द्राक्ष कवडीमोल दराने विकावी लागणार आहे. याचा परिणाम चाळीस लाख रूपयांचे प्राथमिक नुकसान त्यांना दिसत आहे. निर्यात होणारी द्राक्षे आता मिळेल त्या दराने स्थानिक बाजारपेठेत विकावी लागणार आहे. पंढरपूर तालुक्यातील कासेगाव लक्ष्मी टाकळी या परिसरातून अनेक शेतकरी द्राक्ष निर्यात करतात. मात्र युद्धाच्या परिस्तिथी मुळे कोट्यवधी रुपयांची द्राक्षे बागेत आहेत.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 06, 2026 05:02:58
Amravati, Maharashtra:बच्चू कडूंच्या मेळघाट संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट दिसायला सुरुवात; प्रशासनासोबत जनता दरबार घेत बच्चू कडू जाग्यावर सोडवत आहे समस्या, शेतकरी आणि आदिवासी बांधवांना दिलासा अँकर :- शेतकरी कर्जमाफीची आठवण देण्यासाठी आणि मेळघाटातील आदिवासींचा संघर्ष पुढे आणण्यासाठी गेल्या सहा दिवसापासून माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मेळघाटात मेळघाट संघर्ष यात्रेला सुरुवात केली आहे. त्यांच्या या संघर्ष यात्रेचा आज सहावा दिवस आहे. मेळघाटात बच्चू कडूंची यात्रा सुरू असताना बच्चू कडू प्रशासनासोबत मेळघाटातील आदिवासींचा जनता दरबार घेत असून अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले आदिवासी आणि शेतकऱ्यांचे प्रश्न जाग्यावरच सोडवत असल्याने बच्चू कडू च्या संघर्ष यात्रेचा इम्पॅक्ट पाहायला मिळत आहे त्यामुळे बच्चू कडू च्या मेळघाट संघर्ष यात्रेला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिसून येत आहे. दरम्यान बच्चू कडू यांच्या संघर्ष यात्रेचा नऊ तारखेला चिखलदरा येथे समारोप होणार असून मेळघाटातील आदिवासींनी मोठ्या संख्येने समारोपय सभेला एकत्र येण्याचा आव्हान बच्चू कडू यांनी केला आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Mar 06, 2026 04:50:36
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषदेच्या 14 कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. जिल्हा परिषदेचे CEO विशाल नरवाडे यांनी ही कारवाई केली आहे. वारंवार सूचना देऊनही दिव्यांग ओळखपत्र व यूडीआयडी कार्ड सादर न केल्याने 14 कर्मचाऱ्यांवर ही कारवाई करण्यात आली आहे. यामध्ये 13 शिक्षक व एक शिपाई कर्मचारीाचा समावेश आहे. बोगस दिव्यांग प्रमाणपत्राच्या आधारे नोकरी आणि सवलत लाटल्याचा प्रकार राज्यात समोर आल्यानंतर सांगली जिल्हा परिषदेत चौकशी सुरू झाली होती, त्यानुसार जिल्हा परिषदेकडून संबंधित कर्मचाऱ्यांना दिव्यांग ओळखपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र 13 शिक्षक व एका शिपाई कर्मचाऱ्यांकडून कोणत्याही प्रकारचे दिव्यांग प्रमाणपत्र व यूडीआयडी कार्ड सादर न केल्याने जिल्हा परिषदेकडुन त्यांच्यावर निलंबित करण्यात आले आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top