Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune412210

पुणे जिला परिषद चुनाव: बगावत से हलचल, उम्मीदवारों की वापसी प्रक्रिया शुरू

HCHEMANT CHAPUDE
Jan 23, 2026 09:17:38
Shirur, Maharashtra
पुणे जिल्हा परिषदेची निवडणूक मोठी रंगदार आणि चुरशीची होणार असून उमेदवारी अर्जांची छाननी झाल्यानंतर आजपासून उमेदवारी अर्ज माघारी घ्यायला सुरुवात झालीय, 27 तारखेला दुपारी तीन वाजेपर्यंत ही उमेदवारी अर्ज माघारीची प्रक्रिया सुरू राहणार असून अनेक राजकीय पक्षांत बंडखोरी झाल्याने बंडखोरांची मनधरणी करण्याचे सध्या प्रयत्न सुरू असून बंडखोरी क्षमवण्यात आणि मनधरणी करण्यात राजकीय पक्षाच्या दिग्गजांना किती यश येत हे येत्या दोन-तीन दिवसात स्पष्ट होणार आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MMMahendrakumar Mudholkar
Jan 23, 2026 11:35:48
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Jan 23, 2026 11:01:10
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत हवा कुणाची ? साडेतीन वर्षाहून अधिक काळ सोलापूर जिल्हा परिषदेत प्रशासकीय राज होते. सोलापूर जिल्हा परिषदेचे 68 गट आणि 11 पंचायत समितीमध्ये 136 गणासाठीची निवडणूक प्रक्रियेला सुरुवात झालीय. त्यामुळे आता गाव गड्यातील कार्यकर्त्यांमधील नेतृत्वाची स्पर्धा रंगणार आहे. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे. सोलापूर जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या जागांसाठी भाजप, सेना, राष्ट्रवादीत सामना रंगणार आहे. जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये भाजपा विरुद्ध शिंदेसेना असाच सामना पहायला मिळणार आहे. *सोलापूर जिल्हा परिषद 2017 चे पक्षीय बलाबल* *सोलापूर जिल्हा परिषदेत एकूण सदस्य - 68* एकूण संख्या - 68 - राष्ट्रवादी - 23 - काँग्रेस - 7 - दीपक साळुंखे/गणपतराव देशमुख गट- 5 - भाजप - 14 - शिवसेना - 5 - परिचारक गट -3 - शहाजीबापू पाटील - 2 - महाडिक गट - 3 - समाधान आवताडे गट - 3 - संजय शिंदे यांचे - 2 - सिद्रामप्पा पाटील गट- 1 सोलापूर जिल्ह्यातील अकरा तालुक्यांमध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लागल्या आहेत. जिल्ह्यात एकूण 24 लाख 59 हजार 227 मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी साठी राखीव असल्याने 18 गटात चुरस असणार आहे. सोलापूर जिल्ह्यातील सहा मतदारसंघात महाविकास आघाडीचे तर पाच मतदार संघात भाजपचे आमदार आहेत. नगरपालिका निवडणुकीत बार्शी वगळता इतरत्र भाजपला नगराध्यक्ष निवडणुकीत यश मिळवता आले नाही मात्र पूर्वीपेक्षा नगरसेवकांची संख्या वाढली आहे हे मात्र नक्की. उर्वरित पाच मतदारसंघ पैकी तीन जागा सोलापुरातील तर अक्कलकोट आणि पंढरपूर - मंगळवेढा मतदारसंघ असे मिळून पाच जागांवर भाजपचे आमदार आहेत. यामध्ये अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याणशेट्टी, दक्षिण सोलापूरचे आ. सुभाष देशमुख, आ. समाधान आवताडे हे शहरी राजकारणासह ग्रामीण राजकारणावर वर्चस्व राखून आहेत. भीमा नदीच्या प्रदूषणामुळे आरोग्यासह पाण्याचा आणि स्वच्छतेचा प्रश्न चिंतेचा आहे. जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा अभावी विद्यार्थी गळती, शाळा बंद पडण्याचा धोका, प्राथमिक आरोग्य सुविधांचा विकास, शेती कर्जमाफी, रखडलेल्या सिंचन योजना, अंतर्गत ग्रामीण रस्ते, बस सुविधा या प्रमुख समस्या असणार आहेत. भाजप जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सर्व जागी उमेदवार दिलेले आहेत. सर्व ठिकाणी ताकतीने लढत आहे. महापालिकेप्रमाणे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत प्रत्येक तालुक्यामध्ये चिन्हावर लढत आहे. त्यामुळे भाजपचे रेकॉर्ड ब्रेक उमेदवार निवडून येण्याचा विश्वास भाजपा जिल्हाध्यक्षांनी व्यक्त केलाय. बाईट - शशिकांत चव्हाण ( भाजप, जिल्हाध्यक्ष ) (पांढरा शर्ट ) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सर्व विधानसभा मतदारसंघा नुसार पंचायत समिती गणामध्ये फॉर्म दाखल केले असल्याची माहिती ठाकरे सेनेच्या जिल्हाप्रमुखांनी दिली आहे. सध्याच्या निवडणुका अस्सल ग्रामीण भागातील निवडणुका असून सर्वच पक्ष सावध भूमिका घेत आहेत. जिल्ह्यात युती आघाडी बाबत सर्वत्र भेळ मिसळ झाले असल्याची प्रतिक्रिया राजकीय विश्लेषकांनी व्यक्त केलीय. प्रशांत माने ( राजकीय विश्लेषक तथा जेष्ठ पत्रकार ) ( ( मागे काच ) जयकुमार गोरे यांच्याकडे राज्याचे ग्रामविकास मंत्री पद असल्याने सोलपुर जिल्हा परिषद ही भाजपच्या ताब्यात असावी यासाठी सुरुवातीपासून रडण्याची आखण्यात येत आहे. तुल्यबळ नसलेल्या ठिकाणी भाजपा प्रस्थापित नेत्यांना सोबत घेत कमळ चिन्हावर निवडणुकीला सामोरे जात आहे. प्रमोद बोडके ( राजकीय विश्लेषक ) ( काळा शर्ट ) जिल्हा परिषAerणुकीच्या निवडणुकीमध्ये गटातटाचे राजकारण दिसून येणार असून राजकीय सोयीसाठी प्रत्येक पक्षाने गटातटाची आरास मांडली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील प्रत्येक गटातील निवडणूक ही अटीतटीची होणार असल्याच जेष्ठ पत्रकारांना वाटतं आहे. शरीफ सय्यद ( जेष्ठ पत्रकार ) ( डार्क निळा शर्ट ) सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीवर कायम मोहिते पाटील यांचे वर्चस्व राहिलेले आहे. सध्या मोहिते पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेतृत्व करीत आहेत. जिल्हा परिषदेच्या सर्वाधिक नऊ जागा आहेत. त्या पाठोपाठ पंढरपुरात 8, माढा व सांगोल्यातून 7 जागा आहेत. साधारण चार तालुक्यांमध्ये 31 जागा आहेत त्यावर झेडपी सत्ता वर्चस्वाचे गणित असेल. करमाळा बार्शी मोहोळ दक्षिण सोलापूर अक्कलकोट मधून सहा जागा तर उर्वरित मंगळवेढ्यातून 4, उत्तर तालुक्यातून 3 जागा असे अकरा तालुक्यात 68 गटातून प्रतिनिधी निवडले जाणार आहेत. नगरपालिका निवडणुकीत भाजपने ऑपरेशन लोटस राबवले त्याचा फायदा जिल्हा परिषद निवडणुकीत होतो का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. ग्रामविकास मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे हे सोलापुरात ठिय्या मांडून आहेत त्यामुळे ग्रामीण भागातल्या या निवडणुकांमध्ये वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी भाजप सज्ज असली तरी जिल्हा परिषदेत हवा कुणाची होणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. प्रतिनिधी - अभिषेक आदेप्पा, सोलापुर
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 23, 2026 11:00:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:राजकारणातील घराणेशाहीचा पॅटर्न गेल्या काही दिवसात प्रत्येक पक्षात पाहायला मिळतोय. छत्रपती संभाजीनगरमध्ये तर शिंदे की शिवसेनेत घराणेशाहीने अक्षरशः टोक गाठले आहे. मराठवाड्यातही काही वेगळी स्थिती नाही त्यामुळं शिवसेनेतील कार्यकर्त्यांनी फक्त सतरंज्या उचलायच्या का असा प्रश्न या कार्यकर्त्यांना पडला आहे...\nशिंदे सेनेत घराणेशाहीचा वर चष्मा\nमहापालिकेनंतर आता झेडपी मध्येही घराणेशाही\कार्यकर्त्यांना तोंड दाबून बुक्क्यांचा मार !!!\nराजकारण आणि घराणेशाही हा नेहमीच चर्चिला जाणार विषय आहे, संभाजीनगरमध्ये तर शिवसेनेत महत्त्वाच्या नेत्यांच्या घरातच सत्ता फिरत असल्याचे चित्र आहे. कुणी आमदार आहे, तर कुणी भावाला नगरसेवक केले, काही नेत्यांनी तर तीन-तीन लोकप्रतिनिधीचे पद आपल्याच घरात ठेवली आहे. मंत्री संजय शिरसाट, खासदार संदीपान भुमरे, आमदार अब्दुल सत्तार, आमदार प्रदीप जैस्वाल, आमदार रमेश बोरणारे यांचा यात समावेश आहे. महापलिकेनंतर आता जिल्हा परिषदे निवडणुकात हेच चित्र आहे...\nअब्दुल सत्तार यांनी नगरपालिका निवडणुकीत त्यांचा मुलगा समीर यांना निवडून आणल्यानंतर त्यांचे दुसरे चिरंजीव आमेर सत्तार यांना झेडपीच्या भवई गटातून जिल्हा परिषदेसाठी उमेदवारी दिली आहे. खासदार संदीपान भुमरे यांचा मुलगा विलास हे सध्या आमदार आहेत. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये पाचोड गटातून त्यांनी त्यांचे पुतणे शिवराज भुमरे यांना उमेदवारी दिली आहे. धाराशिवचे माजी खासदार रविंद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड हे सध्या उमरगा नगरपालिकेमध्ये नगराध्यक्ष आहेत. आता त्यांच्या पत्नी उषा गायकवाड यांना जिल्हा परिषदेमध्ये उमेदवारी दिली आहे. उमरगा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या कन्येला पंचायत समितीमध्ये उमेदवारी दिली आहे. धाराशिव जिल्ह्यातील भूम परंडा मतदारसंघात तानाजी सावंत यांचा पुतण्या धनंजय सावंत हे जिल्हा परिषदेच्या राजकारणात पूर्वीपासून होते. त्यांनी आता स्वतंत्र उमेदवारही दिले आहेत. त्यामुळं चाललंय काय असा प्रश्न निर्माण होतोय...\nजालना जिल्ह्यातून माजी मंत्री अर्जुन खोतकर यांनी त्यांनीची मुलगी दर्शना यांना निवडून आणण्यासाठी जीवाचे रान केले. बंधूही जिल्हा परिषदेमध्ये काम करत होते. बाजारसमितीवरही त्यांच्या वर्चस्व आहे.\nधाराशिवचे माजी खासदार रवींद्र गायकवाड यांचा मुलगा किरण गायकवाड सध्या उमरगा नगरपालिकेचे नगराध्यक्ष आहेत. \nनांदेड जिल्ह्यातील आमदार बालाजी कल्याणकर यांच्या चिरंजीव सुहास कल्याणकर नगरसेवक, नांदेडचे जिल्हा प्रमुख उमेश मुंडे यांच्या मुलगा योगेश मुंडे निवडून आले. युतीमध्ये असताना त्यांच्या आई नगरसेवक म्हणून निवडून येत असे.\nआमदार संतोष बांगर यांच्या भावजयी आता हिंगोलीच्या नगराध्यक्ष आहेत. आमदार बांगर यांचे मोठे बंधू श्रीराम यांच्या पत्नी निवडून आल्या. यावर शिंदे सेनेच्या संजय शिरसाठ याना मात्र काहीही वेगळं वाटत नाही... इतरही पक्षात हेच चित्र असल्याचे ते सांगताय...
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 23, 2026 10:56:18
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : जगासमोर आता केवळ पाणीटंचाई नाही, तर 'जल दिवाळखोरी'चे मोठे संकट उभे राहिले आहे. संयुक्त राष्ट्र विद्यापीठाच्या ताज्या अहवालानुसार, मानवाने गोड्या पाण्याच्या स्रोतांचा इतका उपसा केला आहे की, आता त्यांची भरपाई होणे जवळपास अशक्य झाले आहे. आपण आपले भूजल आणि नैसर्गिक जलाशय पूर्णपणे खर्च करून टाकली आहे, हे सांगण्यासाठी आता 'बँकरप्सी' हा शब्द वापरला जात आहे. संपूर्ण जग पाणी टंचाईच्या उंबरठ्यावर गोड्या पाण्याचे साठे संपण्याच्या मार्गावर जल दिवाळखोरी जगातील पटलावर गंभीर जगात गोड्या पाण्याचे साठे आता अटायला लागले आहेत, जग जल दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आलंय संयुक्त राष्ट्रांच्या अहवालात हा सगळा धक्का दायक प्रकार उघड झालाय...शेती आणि उद्योगांसाठी पाणी मिळणार नाहीत. तर पिण्याचे पाणी देखील आता पेट्रोल-डिझेलप्रमाणे मोजून घेण्याची वेळ येणार आहे. असा धोका वर्तवण्यात आलाय... अहवालात नक्की म्हटले काय ? जलायश आटले : जगातील एक चतुर्थांश लोकसंख्या अशा जलाशयांवर अवलंबून आहे, ज्यांचे अर्धे पाणी १९९० नंतर सुकून गेले आहे. पुरवठा असुरक्षित : जगातील तीन चतुर्थांश लोकसंख्या अशा देशांमध्ये राहते जिथे पाणी पुरवठा पूर्णपणे असुरक्षित किंवा गंभीर स्थितीत आहे. भूजलावर संकट : जगातील निम्मी लोकसंख्या आपल्या गरजांसाठी भूजलावर अवलंबून आहे, जे वेगाने संपत चालले आहे. भीषण पाणीटंचाई: जगात साधारणपणे ४ अब्ज लोक वर्षातील किमान एक महिना भीषण पाणी संकटाचा सामना करत आहेत. यंत्रणा कोलमडणार : नगरपालिकांची पाणीपुरवठा यंत्रणा ठप्प होऊ शकते, तेथे परिस्थिती बिकट आहे. वाढत्या तापमानामुळे पिकांची पाण्याचा गरज वाढत असून सिंचनासाठी अधिक पाणी लागत आहे. तसेच वाढते प्रदूषण आणि कचरा यामुळे उरलेले पाणीही वापरायोग्य राहिलेले नाही. Byte श्रीनिवास औंधकर, तज्ञ अहवालात इशारा 3 देण्यात आला आहे की, जर जागतिक देखरेख यंत्रणा आताच तयार केली नाही, तर भविष्यात चांगला पाऊस होऊनही पाण्यासाठी संघर्ष करावा लागेल. धक्कादायक म्हणजे डे झीरो'च्या या उंबरठ्यावर जगातील अनेक मोठी शहरे आहेत... इराणची राजधानी तेहरानमध्ये पाण्याची इतकी कमतरता आहे की, तिथून राजधानी हलवण्याची किंवा शहर रिकामे करण्याची वेळ येऊ शकते. लॅटिन अमेरिका, दक्षिण आशिया आणि उप-सहारा आफ्रिकेत मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होण्याची शक्यता आहे. बंगळुरू, चेन्नई व दिल्ली यांसारखी महानगरे 'डे झीरो'च्या अत्यंत जवळ आहेत Byte  सतीश नागरे, जल तज्ञ Vo 3... जल ही कल है अशी एक संकल्पना आहे आणि आता ती राबवायची वेळ आली आहे...पाण्यासाठी विश्वयुद्ध होतील असे भाकीत आधीच वर्तवण्यात आले आहेत त्यामुळं ही च वेळ आता जागे होण्याची म्हणावी लागेल... विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर...
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Jan 23, 2026 10:52:30
Nanded, Maharashtra:तब्बल 52 एकर परिसर, एकाचवेळी पन्नास हजारापेक्षा जास्त भाविक बसू शकतील असा मुख्य टेन्ट, हजारो भाविकांना एकाचवेळी जेवणाची व्यवस्था करण्यासाठी दहा लंगर, अश्या भव्य दिव्य हिंद दी चादर सोहळ्याचे आयोजन नांदेडमध्ये करण्यात आले आहे. शिखांचे नववे गुरू श्री गुरू तेग बहादुरजी यांच्या 350 व्या शहिदी समागमा निम्मित नांदेड मध्ये ' हिंद दि चादर ' या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. 24 आणि 25 जानेवारी असे दोन दिवस विवीध धर्मांच्या संताच्या उपस्थितीत हा सोहळा होणार आहे. नांदेड शहराजवळच्या कौठा भागात हा कार्यक्रम संपन्न होणार आहे. कार्यक्रमाची जय्यत तयारी सुरु असून तब्बल 52 एकर जागेत हा भव्य दिव्य कार्यक्रम होणार आहे. यासाठी मंडप उभारणीसह , लंगर , आणि विवीध स्टॉल लावण्यात येत आहेत. जिथे मुख्य सोहळा होणार आहे तो टेन्ट अतिशय विशाल आहे. एकाचवेळे पन्नास हजारापेक्षा जास्त भाविक बसून धार्मिक कार्यक्रम पाहू शकणार आहेत. या ठिकाणी दहा लंगर सुरु करण्यात आले आहेत जिथे हजारो भाविक भोजन करू शकणार आहेत. या कार्यक्रमाला 24 जानेवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह अन्य मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. 25 जानेवारी रोजी देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विवीध राज्यातील मुख्यमंत्री आणि मंत्री उपस्थितीत राहणार आहेत. श्री गुरू तेग बहादुरजी यांनी धर्म रक्षणाकरिता बलिदान दीले, त्यांना हिंद दि चादर अर्थात भारताची ढाल असे संबोधले जात होते. त्यांचा इतिहास तरुण पिढी आणि प्रत्येक भारतीयाला कळावा यासाठी हिंद दि चादर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात शिख, शिखलकरी , बंजारा , लबाना , सिंधी , मोहयाल , वाल्मिकी , उदासीन , भगत नामदेव, वारकरी संप्रदायातील भाविक मोठया संख्येने सहभागी होणार आहेत. दोन दिवसात दहा लाख भाविक या कार्यक्रमात सहभागी होतील असा अंदाज आहे. भाविकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सामील व्हावे असे आवाहन खासदार अशोक चव्हाण यांनी केले आहे.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Jan 23, 2026 10:51:04
Akola, Maharashtra:सत्ता ज्यांच्या हातात आहे, तेच महापालिकेत सत्ता स्थापन करणार, असं ठाम वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी केलं आहे. महापालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा एक उमेदवार निवडून आला असून, सध्या सत्ता स्थापनेसाठी भाजप आणि काँग्रेसकडून जोरदार हालचाली सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या नगरसेविकेचे पती काँग्रेससोबत फिरताना दिसल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. मात्र या सर्व चर्चा फेटाळून लावत आमदार अमोल मिटकरी यांनी आमचा उमेदवार कुठेही गेलेला नसून तो महायुतीसोबतच आहे, असं स्पष्ट केलं. विरोधी पक्षांकडून कितीही दावे केले तरी अखेर अकोला महापालिकेत सत्ता महायुतीचीच स्थापन होणार, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Jan 23, 2026 10:46:00
Dhule, Maharashtra:धुळे महापालिकेत 50 जागा जिंकत भारतीय जनता पार्टीने यश मिळवल्यानंतर आता सत्ता स्थापनेसाठी हालचालींना वेग आला आहे. भाजपचे सर्व नवनिर्वाचित नगरसेवक आज नाशिक येथील विभागीय कार्यालयात निघाले असून, तेथे अधिकृतपणे गट स्थापन करून नोंदणी केली जाणार आहे. यानंतर महापौर पदाचा उमेदवार 31 जानेवारीपूर्वी निश्चित केला जाणार आहे. यावेळेस भाजपाकडून 28 महिला नगरसेविका निवडून आल्याने, यावेळी महापौर पदावर कोणत्या महिला उमेदवाराची वर्णी लागते ? याबाबत सर्वांना उत्सुकता आहे.यासंदर्भात आमदार अनूप अग्रवाल यांनी सांगितले की, धुळे शहरासाठी योग्य आणि सक्षम असा चेहरा महापौरपदी दिला जाईल. मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच जिल्ह्यातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Jan 23, 2026 10:04:44
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:सांगली जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आमदार रोहित पाटलांनी राष्ट्रवादी शरद पक्षाचा जाहिरनाम केला प्रसिध्द. सांगली जिल्हा परिषद निवडणुकिची रणधुमाळी सुरू झालेली है, तासगाव- कवठेमहांकाळ तालुक्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून स्वबळाचा नारा देण्यात आला है, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पाटील यांनी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा जिल्हा परिषद निवडणुकीचा जाहीरनामा आज प्रसिद्ध केला है. तासगाव मध्ये पार पडलेल्या या जाहीरनामा प्रकाशन सोहळ्यामधून रोहित पाटलांनी जिल्हा परिषदेने पंचायत समिती निवडणूक या स्वबळावरच लढल्या जातील,अशी संकेत देत आघाडीबाबत घटक पक्षांसोबत बोलणी देखील सुरू असल्याचे सांगितले आहे.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Jan 23, 2026 09:36:01
Amravati, Maharashtra:पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल; या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल. सहर शेख यांच्या वक्तव्यावर नवनीत राणा यांचा पलटवार. अँकर :- एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत त्यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी पलटवार केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा नव्या वादाला तोंड फुटले असून राणा यांनी सहर शेख यांना पाकिस्तानात जाण्याचा सल्ला दिला आहे काय आहे ही भानगड पाहूया झी 24 तास स्पेशल रिपोर्ट. दोन आवाज बुलेट स्पष्ट करतात: एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेवीका सहर शेख यांनी पूर्ण मुंब्रा हिरवा करू असं वक्तव्य केले होत यांच्या या वक्तव्यावर नवनीत राणा यांनी टीका केली आहे. पूर्ण हिरवा करायचा असेल तर पाकिस्तान मध्ये जावं लागेल या देशात फक्त भगवा आणि निळा चालेल असे म्हणत भाजप नेत्या नवनीत राणा यांनी एमआयएमच्या नगरसेवीका सहर शेख यांच्या वक्तव्यावर पलटवार केला आहे. कुणी कितीही म्हटलं की हिरवा करू पण त्यांचं स्वप्न कधीच पूर्ण होणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचाराचा रक्त घेऊन आम्ही काम करतो या देशातून भगवा कोणीच हटवू शकत नाही असेही नवनीत राणा म्हणाल्या आहेत. या संपूर्ण प्रकारावर बावनकुळे यांनी सहर शेख यांचे कान टोचले आहेत. निवडून आल्यावर अतिउत्साहीपना दाखवणे योग्य नाही पाकिस्तानचा झेंडा व भडकवणे हे करू ते करू असे योग्य नाही आणि असे उत्साह जास्त काळ टिकू शकत नाही असा सल्ला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिला आहे. उत्साहात भाषण केल्याप्रकरणी सहर शेख यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कान टोचले आहे. मात्र अशाच प्रकारचे भडकावू भाषण भाजपमधील काही हिंदुत्ववादी नेत करत असतात त्यामुळे त्यांचेही कान बावनकुळे टोचणार का असा सवाल या निमित्ताने उपस्थित होत आहे.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Jan 23, 2026 09:33:12
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:माजी मंत्री धनंजय मुंडे यांनी मनोज जरांगे यांना संपवण्यासाठी दोन कोटींची सुपारी दिल्याच्या आरोप प्रकरणात मोठी अपडेट समोर येत आहे. जरांगगेंची सुपारी घेतल्याचा आरोप असलेल्या तीन आरोपी पैकी एकाला जामीन मंजूर करण्यात आला आहे. कांचन साळवी असे या आरोपीचे नाव आहे. अमोल खुणे आणि दादा गरड यांच्यावर अडीच कोटींची सुपारी घेतल्याचा आरोप होता. तर यासाठी कांचन साळवी याने धनंजय मुंडे आणि दोन्ही आरोपींमध्ये मध्यस्थी केल्याचा आरोप होता. दरम्यान वकील धनंजय गव्हाड पाटील यांनी आरोपींच्या वतीने औरंगाबाद खंडपीठात जामिनीसाठी अर्ज केला होता. ज्यात साळवी यांचा जामीन अर्ज मान्य करण्यात आला आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top