Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

इंदापुर के नीर-भीमा कारखाने ने 6400 मी.टन ऊस गाळप कर इतिहास रचा

JMJAVED MULANI
Dec 04, 2025 12:15:42
Baramati, Maharashtra
नीरा-भीमा साखर कारखान्याची उच्चांकी कामगिरी – एका दिवसात 6400 मे.टन ऊस गाळप. शाहाजीनगर येथील नीरा-भीमा सहकारी साखर कारखाण्याने गाळप हंगामात ऐतिहासिक विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याने एका दिवसात तब्बल 6400 मे.टन ऊस गाळप करून नवीन उच्चांक नोंदवला. कारखान्याच्या 25 व्या ऊस गळीत हंगामात आतापर्यंत जवळपास 1.89 लाख मे.टन ऊस गाळप आणि 140360 क्विंटल साखर उत्पादन झाले आहे. साखर उतारा 10.60 टक्के तर सरासरी उतारा 9.95 टक्के नोंदवला आहे. तसेच सहवीज, इथेनॉल, बायोगॅस व सेंद्रिय खत प्रकल्पही पूर्ण क्षमतेने कार्यरत असल्याची माहिती अध्यक्षा सौ. भाग्यश्री पाटील यांनी दिली. एका दिवसातील या उच्चांक कामगिरीबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघ नवी दिल्लीचे अध्यक्ष व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी सर्वांचे अभिनंदन केले आहे...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Dec 04, 2025 12:58:44
Pandharpur, Maharashtra:Anchor - राज्य निवडणूक आयोगाने सरकारची इज्जत वेशीवर टांगली, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार उत्तम जानकर यांची निवडणूक प्रक्रियेवर कडक शब्दात टीका राज्यात भयानक चित्र आहे. कोणाचा पायपोस कोणाला नाही. निवडणूक आयोग झोकांड्या खातोय भेलकांडत आहे. कधी कुणाची निवडणूक थांबवतो. कुणाची निवडणूक सुरू करतो. भयानक दहशती खाली काम सुरू आहे आहे. कोण या सगळ्या यंत्रणेला दाबत आहे. सोलापूर जिल्ह्यात कुण्या पुरुषाने निवडणूक लढवायची नाही. सगळे भाजपचे हवेत. त्यांच्या मित्र पक्षानं सुद्धा नगराध्यक्ष निवडणूक लढण्याच्या परवानगी नाही. क्यूआरटी पथकाच्या नळ्या लावून निवडणूक लढवावी लागते. काय पारदर्शकात आहे. एकावर अन्याय दुसऱ्याला पैसे वाटण्याची परवानगी देतात. पोलिसांच्या वाहनातून पैसे वाटायचे. निवडणूक निर्णय अधिकारी हे सांगतात तसे निर्णय देतात. ईव्हीएम मशिन फोडल्या. सोलापूरच्या पालकमंत्री सांगतात विरोधात काम करणाऱ्याची चिठ्ठी पाठवा त्याचा कार्यक्रम लावतो. सैराट मध्ये आर्ची परशाला सांगते थेट रस्ता शेतात जातो. पालकमंत्र्याला कुठे थेट मानच्या खोऱ्यात नेऊन कार्यक्रम लावायचा आहे. सध्या 20 दिवस मतदान यंत्र ठेवली असं वाटतं न्यायालय सुद्धा यांची कीव आली नाही. सगळ्या देशावर राज्यावर काळोख पसरलेला आहे वाटायला लागले . आता कोणी वाचवेल अशी परिस्थिती नाही राज्यात सध्या सरकारची इज्जत घालवणारा आक्रोश सुरू आहे बेधुंद झालेला आहे. कोलमडलेला निवडणूक आयोग, त्यांची ही अवस्था सरकार म्हणत हे आवडल नाही मग केले कोणी अधिकारी ऐकतात कुणाचे.. राज्य सरकारची इज्जत वेशीवर मांडली. निकाल तात्काळ लावा. बंद पेट्या उघडा.. देशात राजेशाही हुकुमशाही एकत्र आली अशी अवस्था आहे
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 04, 2025 11:38:31
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातूर तहसील कार्यालय परिसरात आज एक अनोळखी ड्रोन कोसळल्याने काही काळ मोठी खळबळ उडाली. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या नागरिकांनी अचानक आकाशातून खाली पडलेली वस्तू पाहताच परिसरात गर्दी केली. नेमका हा ड्रोन कुठून आला आणि कोणाचा आहे, याबाबत उपस्थितांमध्ये चर्चा सुरू झाली. ड्रोन कोसळल्याची माहिती मिळताच तहसील कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी सावधगिरीचा उपाय म्हणून परिसराची पाहणी केली. काही क्षणांसाठी भीतीच्या वातावरणामुळे नागरिकांमध्ये गोंधळ निर्माण झाला. मात्र काही वेळाने ड्रोनविषयीचा गैरसमज दूर झाला. चौकशीअंती हा ड्रोन शाळकरी मुलांनी विज्ञान प्रकल्पासाठी तयार केलेला असल्याचे स्पष्ट झाले. ड्रोन खाली पडताच संबंधित मुलांनीच तेथून ते उचलून नेल्याची माहिती मिळाली. ड्रोन शालेय प्रकल्पाचा असल्याचे उघड होताच नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. काही वेळ निर्माण झालेला तणाव निवळल्यानंतर परिसरात पुन्हा एकदा नेहमीची स्थिती परतली.
197
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 04, 2025 11:15:40
115
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 04, 2025 11:15:19
118
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 10:46:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:साई इन्स्टिट्यूट कॉलेज ची पोलखोल आता विद्यापीठाने केलीय, मूलभूत पायाभूत सुविधा नसलेले हे कॉलेज आहे याबाबत अहवाल सादर करण्यात आलाय, त्यामुळं त्यांची संलग्नता घेतली नसल्याचं खुलासा विद्यापीठाने केला... विद्यापीठाला संलग्न नाही याबाबत पत्र नाही त्यामुळं विद्यापीठचा याबाबत संबंध नाही , हो सगळी चूक कॉलेज ची आहे असं विद्यापीठ सांगताय. याबाबत एक अहवाल बनवण्यात आला होता त्या अहवालात सगळ्या त्रुटी नमूद केल्यास विद्यापीठांना सांगितलं.. काय आहे अहवालात या कॉलेज ची संलग्निकरण नाकारण्यासाठी शिफारस करण्यात येत आहे. १) प्रस्तूत महाविद्यालयास मान्यता प्राप्त प्राचार्य उपलब्ध नाही. परंतू MBA या विषया करीता मान्यता प्राप्त शिक्षक व प्राचार्य यांची नेमणूक अद्याप केलेली नाही. २) प्रस्तूत महाविद्यालयात MCA अभ्यासक्रमा करीता लागणाऱ्या संगणकांची संख्या उपलब्धता नाही. ३) प्रस्तूत महाविद्यालयाने MCA विषयाकरीता पुस्तके प्रत्यक्षात खरेदी केलेली दिसून येत नाही. ४) प्रस्तूत महाविद्यालयाने संस्था व कुलसचिव यांच्या संयुक्त नावे असलेली मुदत ठेवी बाबत कार्यवाही केलेली नाही. अ.क्र ५० अन्वये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या वेतन करीता १० लक्ष रुपयांची तरतूद केलेले प्रमाणपत्र उपलब्ध नाही. ५) प्रस्तूत महाविद्यालयास मागील १५ वर्षा पासून MBA हा अभ्यासक्रम चालू असून अद्यापर्यत NAAC महाविद्यालयाने केलेली नाही. ६) महाविद्यालय दिव्यांग विद्यार्थी व विद्यार्थ्यांसाठीच्या सुविधा उपलब्ध नाही. ७) अधिष्ठाता मंडळ बैठक दिनांक २४-११-२०२५ रोजी झालेल्या बैठकीमध्ये तज्ञ समितीच्या अहवालानुसार सदर महाविद्यालयास प्रथम संलग्निकरण देण्यात येऊ नये असे ठरले आहे.
39
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 04, 2025 10:18:53
144
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 04, 2025 10:12:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:कॉलेजाच्या गलथान कारभारामुळे 133 विद्यार्थ्यांना परीक्षेला मुकावे लागलेय हा प्रकार संभाजीनगर मधील श्री साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट मध्ये घडला आहे. हे विद्यार्थी कालपासून कॉलेजमध्ये हॉल तिकीट आणायला जाताय, मात्र त्यांना कोणीही दाद न दिल्याने अखेर या विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनची पायरी गाठली आहे. कॉलेज ची घोडचूक, 133 विद्यार्थी परीक्षेला मुकले; न्याय मागण्यासाठी विद्यार्थी पोलीस ठाण्यात. कॉलेज संचालक मात्र बेपत्ता. रडणाऱ्या विद्यार्थ्यांच्या शॉट्स पासून सुरुवात करा. एमसीएच्या प्रथम वर्षात शिकणारे हे सर्व विद्यार्थी आजपासून सुरू होणाऱ्या परीक्षेला मुकले आहेत; यात चूक विद्यार्थ्यांची नाही तर ज्य कॉलेजचा ते शिकत होते त्या कॉलेजची आहे; त्यांच्या कॉलेजने विद्यार्थ्याकडून पैसे घेतले परंतु विद्यापीठात ते भरलेच नाही. अखेर विद्यार्थ्यांनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यावर झी मीडियाची टीम साई इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट कॉलेजमध्ये गेली परंतु कार्यालय व वर्गखोल्या रिकाम्या होते. कॉलेजचे अध्यक्ष विक्रांत जाधव यांना फोनवरून संवाद साधण्याचा प्रयत्न झाला, परंतु ते वेळ मारून नेली. विद्यापीठाच्या या कॉलेजला सलग्नता नव्हती त्यामुळे त्यांच्यावर कारवाई न होणार असल्याचे सांगितले, परंतु प्रवेश झाले पैसेही घेतले; विद्यार्थ्यांनी परीक्षाही दिली नाहीत; त्यामुळे फसवणुकीचा प्रश्न उभा राहतो. पुढील तपास विशाल करोळे, छत्रपती संभाजी नगर.
173
comment0
Report
Advertisement
Back to top