Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Pune413133

बारामती में अजित पवार हादसे की तेज़ चौकशी की मांग उठी

JMJAVED MULANI
Feb 23, 2026 07:50:45
Baramati, Maharashtra
अजित पवारांच्या अपघाताची निपक्षपाती चौकशी व्हावी: बारामती मधील नागरिकांची मागणी दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघात तपास चौकशीसाठी प्रशासकीय भवनासमोर बारामतीकर एकवटले प्रांताधिकारी यांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान दुर्घटनेच्या अपघाताची चौकशी होण्यासाठी देण्यात आले निवेदन आमदार रोहित पवारांना झेड प्लस सुरक्षा द्यावी. निवेदन: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री दिवंगत अजित पवार यांच्या अपघाती मृत्यूची सखोल चौकशी व्हावी या प्रकरणातील सर्व घडामोडींचा सविस्तर पाठपुरावा करत असणारे आमदार रोहित पवार यांच्या बाबतीत कोणतीही अघटित घटना होऊ नये यासाठी त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करावी.. या अपघाताच्या घटनेची फास्टट्रॅक पद्धतीने पारदर्शक चौकशी पूर्ण करून वस्तुस्थिती जनतेसमोर मांडण्यात यावी.. अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी शासनाने आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे गरजेचे आहे अशा मागण्या देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने शासनाने दिल्याव निवेदनात केल्यायेत
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Feb 23, 2026 09:18:26
Nagpur, Maharashtra:नागपुर में बारावी दो पेपर फूटल्याप्रकरणी शिकवणी वर्गाच्या संचालकासह चौघांना पोलिसांनी गजआड करण्यात केलेय . निशिकांत मून, फरहान, जुनेद और मुस्तफा अशी अटकेतील चौघा आरोपीची नावे आहेत.. आरोपी निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेसचा संचालक आहे... या पेपरफुटी प्रकरणी पोलीसांना अजून काही धागेदोरे मिळाले आहे. दरम्यान याप्रकरणी एसआटी स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती गृहराज्यमंत्री पंकज भोयर दिलीय नागपूर नागपूरात बारावीच्या दोन विषयांचे पेपर फुटल्याच उघडकीस आल्यापासून खळबळ उडालीय ... एका व्हाट्सअप ग्रुपवर बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचे पेपर परीक्षा सुरू होण्याच्या अर्ध्या तास अगोदरच आले असल्याचे आढळून आले होते .. दरम्यान याप्रकरणी आतापर्यंत चार आरोपीना अटक केलीय.. निशिकांत मून आणि फरहान या दोघांना अगोदर अटक करण्यात आली... निशिकांत मून हा एका ट्युशन क्लासेस चा संचालक आहे... तोतरे फरहान तिथे शिक्षक म्हणून काम करतो... त्या दोघांनी अजून काही जणांना हाताशी घेऊन पेपर लीक केल्याची शक्यता आहे... दरम्यान पोलिसांनी या प्रकरणी जुनेद आणि मुस्तफा अजून य दोन आरोपींना अटक केली आहे... या पेपर फुटी प्रकरणाचे रॅकेट बरेच मोठे असल्याची शक्यता आहे.. दरम्यान गृहराज्यमंत्री व शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांनी याप्रकरणी एसआयटी स्थापित करण्यात आल्याची माहिती दिली आहे बाईट -- पंकज भोयर, गृहराज्यमंत्री ( आज मुंबईत याबाबत त्यांचा बाईट झाला आहे तो वापरावा ) Vo ---दहावी आणि बारावीच्या परीक्षा दरम्यान कॉपी आणि पेपर फुटी टाळण्यासाठी शिक्षण विभागाकडून आटोकाट प्रयत्न करण्यात येतो... मात्र नागपुरात बारावीचे फिजिक्स आणि केमिस्ट्री हे दोन पेपर फुटल्याची धक्कादादायक घटना घडल्यापासून मोठी खळबळ उडाली आहे. सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर गुरुवारी बारावीच्या केमिस्ट्रीच्या पेपर दरम्यान हे पेपर फुटीचे प्रकरण पर्यवेक्षकाच्या सतर्कतेमुळे उघडकीस आले ..सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती. त्यामुळे केंद्रावरील पर्यवेक्षकाना संशय आला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला. तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता ---------------------------------- -------- --------GFX IN --- व्हाट्सअप ग्रुप तयार करूनहा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू होता ---XII नावाच्या whats up ग्रुपवर परीक्षेच्या अर्धा तास अगोदर पेपर ग्रुप वर आले होते ---XII नावाच्या whats up ग्रुपवर पेपर परीक्षेपूर्वीच आले होते. --- बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या सुमारे अर्धा तासपूर्वीच व्हाट्सअप वर आले असल्याचे आढळून आले ---- XII ग्रुपवर हे पेपर फुटले त्याच्यामध्ये 21 सदस्य आहेत GFX out ------- ----------------*****----------** ---- बाईट -- शिवलिंग पटवे, संचालक उच्च माध्यमिक नागपूर विभाग मंडळ (slug --2102ZT_NGP_BBord_React --------------------- Final Vo -- पेपर फुटी प्रकरणी निशिकांत मून या ट्युशन क्लासेस संचालकसह अजून काही क्लासेसच्या संचालकांचा समावेश आहे काय? हे रॅकेट बरेच मोठे असल्याचा संशय ही पोलिसांना आहे.... आता राज्यमंत्र्यांनी एसआयटी घोषित केल्यामुळे या प्रकरणाची तपासाची व्याप्ती ही वाढणार आहे... अजून काही जणांना अटक व मोठे खुलासे होण्याची शक्यता आहे
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Feb 23, 2026 09:17:00
0
comment0
Report
KPKAILAS PURI
Feb 23, 2026 08:48:49
Pimpri-Chinchwad, Maharashtra:इंद्रायणी नदी स्वच्छतेची मोहीम ,.. महापौर उतरले नदीत..... pimpri indrayani kailas puri Pune 23-2-26 feed by 2c ANCHOR - सात मावळे संवर्धन संस्था आणि स्थानिक प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या इंद्रायाणी स्वच्छता अभियानात पिंपरी-चिंचवडचे महापौर रवि लांडगे , आळंदीचे नगराध्यक्ष प्रशांत कुऱ्हाडे यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला. यावेळी नदीपात्रातील प्रदूषणाची भीषणता पाहून महापौरांनी आक्रमक पवित्रा घेत, नदी प्रदूषणास कारणीभूत ठरणाऱ्या कंपन्या आणि संस्थांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश प्रशासनाला देणार असल्याचे जाहीर केले. या मोहिमेदरम्यान केवळ पाहणी न करता, महापौरांनी स्वतः इंद्रायणी नदीच्या पात्रात उतरून स्वच्छता केली. यावेळी नदीच्या पाण्यात मिसळणारे सांडपाणी, रसायने आणि कचरा यामुळे होणाऱ्या प्रदूषणाचे गंभीर स्वरूप त्यांच्या निदर्शनास आले. या परिस्थितीबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. इंद्रायणी नदीच्या प्रदूषणास पिंपरी-चिंचवड महानगरपालिका हद्दीतील काही औद्योगिक कंपन्या आणि संस्था जबाबदार असल्याचे दिसून येत आहे. या संस्थांमुळे नदीचे पावित्र्य धोक्यात आले असून, पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. यावर तातडीने नियंत्रण मिळवण्यासाठी संबंधित दोषींवर कडक कारवाईचे आदेश प्रशासनातर्फे काढण्यात येतील अस लांडगे यावेळी म्हणाले...! BYTE: रवी लांडगे ( महापौर , पिंपरी चिंचवड )
0
comment0
Report
SGSagar Gaikwad
Feb 23, 2026 08:33:16
Nashik, Maharashtra:नाशिक नाशिक महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभापतीपदासाठी भाजपाकडून मच्छिंद्र सानप यांनी अधिकृतपणे अर्ज दाखल केला आहे.भाजप आणि शिवसेना युती झाल्यानंतर मच्छिंद्र सानप यांना आपला उपमहापौर पदाचा अर्ज मागे घ्यावा लागला होता. मात्र आता स्थायी समिती सभापती पदासाठी त्यांचे नाव पुढे आले आहे.विशेष म्हणजे, या पदासाठी केवळ भाजपकडूनच अर्ज आल्यामुळे निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.बुधवारी निवड प्रक्रिया पार पडणार असून, सानप यांच्या निवडीवर अधिकृत शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे... बाईट- हिमगौरी आडके महापौर बाईट- मच्छिंद्र सानप बाईट-अजय बोरस्ते
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 23, 2026 08:18:59
Jalna, Maharashtra:जालना : अप्रैल महिन्यात परीक्षा नको,विद्यार्थी शिक्षकांची मागणी\nवाढत्या उन्हाचा विद्यार्थ्यांना त्रास\nमार्च महिन्यांत परीक्षा घेण्याची मागणी\nअँकर : प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या परीक्षा दरवर्षी एप्रिल महिन्यात पार पाडतात.पण यावर्षी फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यातच उन्हाचा कडाका पाहायला मिळतोय.त्यामुळे एप्रिलमध्ये आणखीनच उन्हाच्या झळा बसण्याची शक्यताय.परिणामी पहिली ते नववी पर्यंतच्या विद्यार्थ्यांकांच्या परीक्षा एप्रिल महिन्यात न घेता मार्च महिन्यातच घेण्याची मागणी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी केली आहे.सध्या उन्हाचा कडाका दुपारी जास्त असल्यानं विद्यार्थ्यांचा उन्हापासून बचाव करण्यासाठी शाळेत फॅन सुरू ठेवले जातायत.विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त पाणी पिण्यास सांगितलं जातं.तर टिनपत्राच्या शाळा असलेल्या ठिकाणी विद्यार्थ्यांना उन्हाच्या झळापासून वाचवण्यासाठी झाडांच्या सावलीत बसून शिकवलं जातं आहे.\nबाईट :3 विद्यार्थीनी\nबाईट : श्रीनाथ वाढेकर,मुख्याध्यापक,रंगनाथ पाटील विद्यालय,जामवाडी(हाफ शर्ट असलेले)\nबाईट : वामन घडलिंग,शिक्षक(व्हाइट शर्ट)
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 23, 2026 08:03:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. शिवसेनेचे नेते अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद पॉइंटर - सरकारची भूमिका नाही असे कसे म्हणता येईल. माझ्याकडे एक fir आहे. नमुना दाखल.. अजून 5 fir आहे. सरकारने या कंपन्यांना मोफत म्हणता येईल आहे किमतीत जमिनी दिल्या आहे. 99 कोटी बुडाल्याची पोलिस ठाण्यात केलेली अधिकारीचीच तक्रार माझ्याकडे आहे. यात 5 अधिकारी सस्पेंड झाले त्यांचे नाव आहे. सरकारचा हात नाही मग अधिकारी का सस्पेंड केले. सहाय्यक मुख्य अभियंता बागडे सह पाच जण आहे. पोलिस ठाणे निर्मल नगर. मधे गुन्हा दाखल आहे. सरकारची जागा दिली मग मुख्यमंत्री कसे म्हणतात. 99 कोटी 90 लाख रूपये फसवणूक आहे. मग महाजनकोचे अधिकारी का सस्पेंड केले आहे. या प्रकरणात बनावट बँक गॅरंटी आहे. या लोकांच्या अटकेचा वॉरंट निघाला आहे. यांच्या जमिनीला कोणीही विरोध करीत नाहीं. यांच्या जमिनीला सरकारने विरोध केला तर सरकारचा हात नाही असे समजेल. ऑन काँग्रेस सूचना. या विषयी उद्धव ठाकरे निर्णय घेतील. काँग्रेसने दिलेली सूचना वाईट आणि चुकीची आहे. असे मला वाटत नाही. ऑन झिरवाळ. असे मंत्र्यांच पुरावे नसतात, आडव्या रेषा मारल्या जातात एका रेषेला 50 हजार दोन रेषेला एक लाख .. ही प्रॅक्टीस काही नवीन नाही. मंत्रालयात एजंट आहे. ज्यांची ओळख नाही त्यांचे परवाने पैशे दिल्यास पूर्ववत होत नाही. ऑन विरोधी पक्ष नेता. लोकशाहीचा आत्मा आहे. तत्काळ विरोधीपक्षाची नियुक्ती केली पाहिजे, विरोधी पक्षाच्या भूमिकेचा सरकारला फायदा होत असते. सभापती अध्यक्षणा निर्णय घेत आले पाहिजे. ऑन शौचालय साईन बोर्ड महाराज फोटो.. अशा पद्धतीने शौचालयाला फोटो लावू नये. महाराज यांचे फोटो वापरणाऱ्यांना जोड्यांनी मारले पाहिजे. ऑन राष्ट्रवादी गैरहजर. कधी कधी एखादा गैर हजार राहत होतो आदित्य ठाकरेंनी चुका दुरुस्त केला आहे त्यांना वाटणं हेच मोठा आहे. ऑन विलीनीकरण एक गट होऊ दुसरा नाही म्हणतोय, कुणाच्या घरात घुसन योग्य नाही. ऑन रोहित पवार आरोप. रोज रोज रोहित पवार बोलत आहेत. हे अती झाले आहे. रिपीट बोलण्याने गांभीर्य कमी होत आहे. ऑन पंतप्रधानसाठी मनात जागा वक्तव्य. हे असत्य आहे अश्यात भात नाही. 12 वर्ष होत आहे. शेतकऱ्यांना लुटण्याचे आणि बेरोजगारांना उध्वस्त करण्याचं काम केले आहे. अमेरिकेच्या बोलण्यावर मोदी आणि भाजप नाचत आहे. शेतकरी व देशाच्या समस्यावर बोलत नाही. आयात केले जाणार आहे त्या मुळे भारतीय शेतकऱ्यांचे हाल होणार आहे. नेपाळ आणि बांगलादेश आपल्याशी वाकडे वागतात, अतिरेकी घुसतात, महागाई वाढली काय केले मोदींनी.....
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Feb 23, 2026 07:34:48
Beed, Maharashtra:बीड: वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पावसाने पीके आडवी.. 300 हेक्टरहून जास्त शेतीपिकांचे नुकसान..! ANC - परळी तालुक्यातील मांडेखेल येथे काल सायंकाळी अवकाळी पावसाने व वादळी वाऱ्याने मोठा कहर केला. अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे आणि वाऱ्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. मांडेखेल गाव परिसरातील तब्बल 300 हेक्टर क्षेत्रावरील ज्वारी पिके आडवी झाली असून फळबागांनाही मोठा फटका बसला आहे. विशेषतः डाळिंब, आंबा व इतर फळबागांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी पिके पूर्णपणे जमिनीवर पडली असून काढणीस आलेले उत्पादनही खराब झाले आहे. दरम्यान, नुकसानीचे तातडीने पंचनामे करून सरसकट आर्थिक मदत द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी प्रशासनाकडे केली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Feb 23, 2026 07:32:00
Jalna, Maharashtra:जालना: ओबीसी नते नवनाथ वाघमारे बाईट वंजारी समाजाला टार्गेट करून दंगल टु घडवण्याचा जरांगेचा प्रयत्न; गृहविभागाने त्यांच्यावर लक्ष ठेऊन त्यांना बिनभाड्याच्या खोलीत डांबावे—वाघमारे. अधिवेशन आता पूर्वीसारखं सामान्य माणसांसाठी राहिलेलं नाही—वाघमारे. जरांगेंनी कुणाच्या सुपाऱ्या घेतल्या हे अमोल खुणेला माहीत असल्यानं जरांगे खुणेला टार्गेट करतोय. अमोल खुणेच्या जीवाचं बरंवाईट झाल्यास जरांगेजबाबदार राहतील. चिखला गावात जाऊन जातीय पोळी भाजण्याचा जरांगेंचा प्रयत्न. चिखला प्रकरणात योग्य कारवाई व्हावी, जरांगेला राजकारण करण्यासाठी संधी देऊ नये. बाईट: नवनाथ वाघमारे, ओबीसी नेते,
0
comment0
Report
PNPratap Naik1
Feb 23, 2026 07:18:39
Kolhapur, Maharashtra:Kop Raju Gore Byte Feed:- Live U Anc:- पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रे यांच्या हत्याकांड प्रकरणात सात वर्षे उलटूनही कुटुंबीयांना अद्याप न्याय मिळालेला नाही. या दीर्घकाळ चाललेल्या न्यायप्रक्रियेविरोधात संतप्त झालेल्या अश्विनी बिद्रे यांच्या कुटुंबीयांनी अखेर टोकाचे पाऊल उचलत देशाचे राष्ट्रपती आणि सरन्यायाधिश यांच्याकडे इच्छा मरणाची मागणी केली आहे. अश्विनी बिद्रे यांच्या मृत्यूनंतर न्यायालयाने हा खून असल्याचे स्पष्टपणे सिद्ध केले आहे. मात्र, इतके असूनही प्रशासनाकडून अद्याप त्यांच्या मृत्यूचा अधिकृत दाखला दिला जात नसल्याचा गंभीर आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. मृत्यूचा दाखला नसल्यामुळे अश्विनी बिद्रे यांच्या सेवेशी संबंधित कोणतेही शासकीय लाभ — पेन्शन, अनुकंपा लाभ अथवा इतर हक्क कुटुंबीयांना मिळालेले नाहीत. एकीकडे ही बाब असताना दुसरीकडे मात्र या हत्याकांडातील प्रमुख आरोपी अभय कुरुंदकर याला पोलीस यंत्रणेकडून तुरुंगात थेट मदत केली जात असल्याचा गंभीर आरोप अश्विनी बिद्रे यांचे पती राजू गोरे यांनी केला आहे. आरोपीला विशेष सवलती दिल्या जात असून सामान्य कुटुंबीय मात्र न्यायासाठी दरवाजे ठोठावत असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 23, 2026 07:18:01
Baramati, Maharashtra:इंदापुरात बंद पुकारलेला असताना भिगवण बाजारपेठ सुरू.... व्यापाऱ्यांनी सांगितलं नेमकं कारण..... Anchor _पुण्याच्या भिगवण घटनेच्या पार्श्वभूमीवर आज सकल हिंदू समाजाच्या वतीने इंदापूर दौंड आणि बारामती बंदच आवाहन करण्यात आलेल आहे मात्र असं असताना ज्या भिगवण मध्ये ही घटना घडल्ली त्या भिगवणची बाजारपेठ मात्र आज सुरू ठेवण्यात आली आहे. घटना घडल्यानंतर 18 फेब्रुवारीला भिगवण करांनी कडकडीत बंद पाळत या घटनेचा निषेध नोंदवला होता. त्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांची आणि नागरिकांची वाताहात होऊ नये याकरिता व्यापारी वर्गाने बाजारपेठ सुरू ठेवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले आहे.याशिवाय जी घटना घडली त्याचा आम्ही निषेध करत असून पीडित कुटुंबाच्या पाठीशी व्यापारी उभे असल्यासही त्यांनी सांगितल आहे.
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Feb 23, 2026 07:15:41
Chendhare, Maharashtra:स्‍लग – विद्यार्थ्‍यांच्‍या जिज्ञासुवृत्‍तीला चालना देण्‍याचा प्रयत्‍न अलिबाग तालुक्‍यातील शाळांचे विज्ञान प्रदर्शन विद्यार्थ्‍यांनी कल्‍पकतेतून साकारला आविष्‍कार 50 हून अधिक शाळांचा प्रदर्शनात सहभाग अगस्‍त्‍या फाऊंडेशनने आयोजीत केलेल्‍या या प्रदर्शनात अलिबाग तालुक्‍यातील 50 हून अधिक शाळांनी सहभाग नोंदवला असून विद्यार्थ्‍यांनी स्‍वतःच्‍या कल्‍पकतेतून साकारलेल‍या प्रतिकृती इथं मांडण्‍यात आल्‍या आहेत. यात नवीन तंत्रज्ञानाचा आधार घेण्‍यात आला आहे. विद्यार्थ्‍यांमध्‍ये विज्ञानविषयक दृष्‍टिकोन जागृत व्‍हावा तसेच त्‍यांच्‍या जिज्ञासुवृत्‍तीला चालना मिळावी या हेतूने या प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आल्‍याचे आयोजकांनी सांगितले. अगस्‍त्‍या फाऊंडेशनच्‍या या उपक्रमाबददल पालकांनीही समाधान व्‍यक्‍त केले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top