Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Parbhani431401

पालम के खरब धानोरा में पीक विमा कंपनियों के प्रतिनिधियों पर धोखाधड़ी के आरोप

GDGAJANAN DESHMUKH
Oct 15, 2025 10:08:31
Parbhani, Maharashtra
अँकर- शेतकऱ्यांना विमा परतावा नाकारण्यासाठी विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोगावेळी बेकायदेशीर वजन काटा वापरल्याचा धक्कादायक प्रकार परभणीच्या पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे उघडकीस आलाय. या प्रकरणी दोघांविरुद्ध पालम पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय, या प्रकारांमुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून परभणी जिल्ह्यात झालेले सगळे पीक कापणी प्रयोग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांमधून केली जाऊ लागलीय. या प्रकारामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होऊन त्यांना विमा मदत मिळू नये यासाठी जाणूनबुजून हा प्रयत्न केल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केलाय. या प्रकारामुळे तालुका कृषी विभाग व ग्रामस्तरीय विमा समितीने अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेडच्या दोन्ही प्रतिनिधींविरुद्ध पालम पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. हा फसवणुकीचा प्रकार इतर ठिकाणी झालेल्या कापणी प्रयोगात ही झाला असावं म्हणून आतापर्यंत जिल्ह्यात घेण्यात आलेले सर्व कापणी प्रयोग रद्द करून नव्याने घेण्याची मागणी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवलिंग बोधने यांनी केलीय. जर हि प्रकिया रद्द न झाल्यास पीक विमा कंपनीच्या कार्यालायत घुसून कर्मचार्यांना चोपून काढु असा ईशारा देण्यात आलाय. पर्यंत शेतकऱ्यांना पीकविमा द्यायचा निर्णय कंपनी ठरवते. परभणीच्या पालम तालुक्यातील खरब धानोरा येथे काल अॅग्रीकल्चर इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया लिमिटेड या पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींनी पीक कापणी प्रयोग घेतला. यावेळी पीक विमा कंपनीच्या प्रतिनीधिने सोबत आणलेल्या वजन काट्यात सोयाबीन पाच किलो भरत होते. एवढे कमी सोयाबीन असतांना 5 किलो वजन सोयराबीनचे कसे भरले यावरून शेतकऱ्यांना संशय आला, गावातील दुकानातील एक वजन काटा आणून त्याच सोयाबीनची मोजणी केली असता, सदर सोयाबीन केवळ 3 किलो भरण्यात आले. शेतकऱ्यांच्या डोळ्यात धूळ फेक करून अधिकची आणेवारी दाखवण्याचा पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधींचा प्रयत्न शेतकऱ्यांनी हाणून पाडला. सदर पीक विमा कंपनीच्या प्रतिनिधीवर आणि कंपनीवर गुन्हा दाखल करावा म्हणून शेतकार्यांनी पालम पोलीस ठाण्यात ठिय्या दिला होता, त्यानंतर पालम पोलीस ठाण्यात पीक विमा कंपनीच्या दोन प्रतिनिधींवर पालम तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या तक्रारी वरून शेतकर्यांची फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. विमा कंपनीचे प्रतिनिधी अनिकेत रामदास शेरे आणि रणदीप भालेराव या दोघांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. त्यामुळे पीक विमा कंपन्या शेतकर्यांची अशीच फसवणूक करून नुकसान होऊन ही पीकविमा देण्यास टाळाटाळ करीत असल्याचा आरोप शेतकरी नेते करतायेत. बाईट- सुभाष कदम- माजी जिल्हा परिषद सदस्य
11
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 13:54:45
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 15, 2025 13:54:31
Chandrapur, Maharashtra:14 हजार किलो भेसळीचे खाद्यतेल पकडले: ऐन दिवाळीच्या मुहूर्तावर चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या धडक कारवाई; मुल तालुक्यात निकृष्ट खाद्यतेलाचा साठा जप्त. चंद्रपूरच्या अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने जिल्ह्यातील मुल येथील खाद्यतेल रिपॅकिंग युनिटवर धडक कारवाई केली. ऐन दिवाळीच्या काळात ही धाड झाल्यामुळे खळबळ. गुप्त माहितीच्या आधारावर जेठमल भंवरलाल सारडा यांच्या चामोर्शी रोड येथील रिपॅकिंग युनिटवर धाड, पथकाने विविध ब्रँडच्या रिफाइंड सोयाबीन तेलाचे पाच नमुने घेतले; 22 लाख रु किंमतीचा सुमारे 14 हजार किलो साठा जप्त. पुनर्वापर केलेली तेल पिपे वापर आणि निकृष्ट दर्जाचा संशय. सहाय्यक आयुक्त (अन्न) प्रवीण उमप मार्गदर्शनाखाली कारवाई.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Oct 15, 2025 13:47:52
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - ज्यांना सगळं समजतं ते पवार साहेब आहेत... पवार साहेबांच्या सगळं लक्षात आलं म्हणून आज त्यांच्यासोबत गेले नाहीत - मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बाईट पॉइंटर्स ऑन विरोधक - इतके कन्फ्युज विरोधक मी माझ्या जीवनात पाहिले नाहीत - इतके मोठे मोठे लोक त्यांना कोणाकडे गेलं पाहिजे कायदा काय आहे ह्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत का नाही हे माहिती नाही - पण मला असं वाटतं की त्यांना सगळं माहिती आहे, केवळ परसेप्शन क्रिएट करण्याकरिता निवडणूकित हरलो त्याकरिता करत आहेत - काल ते चोकलिंगम यांच्याकडे गेले होते चोकलिंगम यांच्याकडे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत काहीच नाही - स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांकरिता वेगळा कायदा आहे, त्यातून स्टेटूटरी इलेक्शन कमिशन तयार झाला आहे ... ते इलेक्शन कमिशन दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वात आहे - सर्व कंट्रोल कायद्याने त्यांना देण्यात आलेला आहे राज्य सरकारचा काही संबंध नाही - हे सर्व महाभाग काल त्यांना जाऊन भेटले... तेव्हा त्यांच्या लक्षात आलं आपल्याला भेटायचं होतं दिनेश वाघमारेंना.. मग त्यांच्यााशी चर्चा करून थातूरमातूर सांगितलं... - हे इलेक्शन कमिशनर त्या कमिशनर यांना बोलवणार आहेत... या इलेक्शन कमिशनरला त्या इलेक्शन कमिशनरला बोलवण्याचा अधिकार नाही, ह्या वेगळ्या दोन बॉडीज आहेत - स्थानिक स्वराज्य संस्थांचे इलेक्शन हे ते कमिशन या ठिकाणी कंडक्ट करत - आज त्यांना भेटले आणि तिथे काय मागणी करायची हे महाविकास आघाडीच्या नेत्यांना कळले नाही - राज्यातल्या जेवढा निवडणुका आहेत ते राज्य निवडणूक आयोग घेत असतं - लोकसभा विधानसभाची वोटर लिस्ट ते पहिल्यांदा अडॉप्ट करतात त्यानंतर ऑब्जेक्शन घेण्याची संधी असते - त्या काळात यांच्याकडे काही पुरावे असतील तर ते त्यांनी दिले पाहिजेत - कायदा समजून घ्यायचा नाही केवळ नरेटीव सेट करायचा प्रयत्न करत आहेत - कोणीतरी आम्हालाही आव्हान केल आहे... आमची सर्व सहकार्य करण्याची तयारी आहे... निवडणुका चांगल्या झाल्या पाहिजेत.. - वोटर लिस्ट मध्ये काही सुधारणा करायच्या असतील तर आमचा पाठिंबा आहे ऑन वोटरलिस्ट - वोटर लिस्टमध्ये काही डुप्लिकेट नावे आज आहेत का? वीस वर्षांपासून नावे आहेत .. आम्ही सुद्धा अनेक वेळा त्याच्यावर ऑब्जेक्शन घेतलेला... - तुम्ही ज्या वेळेस सत्तेत होता तेव्हा सुद्धा तेच होतं - मला वाटतं पराभव स्वीकारावा जनतेत जावं पुन्हा निवडणूकीला उभ राहावं - पण यांचा कोणाचाही भारतीय संविधानावर विश्वास नाही - संविधानाने तयार केलेल्या संस्थांवरही यांचा विश्वास नाही, यातून त्यांचा नारी टू तयार करण्याचे काम आहे - दोन दिवसांच्या त्यांच्या चक्रा फियास्को आहेत , कल्पना देखील नाही कोणाकडे काय मागणी केली पाहिजे - यात ज्यांना सगळं समजतं ते पवार साहेब आहेत... पवार साहेबांच्या सगळं लक्षात आलं म्हणून आज त्यांच्यासोबत गेले नाहीत ऑन राज ठाकरे - कोणालाही सोबत घेऊ दे, कोणालाही कुठेही जाता येईल - कोणी कोणाचे धरलेले बांधलेले नाहीत - कोणी कोणासोबत गेला तरी महायुतीच निवडून येणार, महायुती भक्कम आहे राज्यातील जनता महायुतीच्या पाठीशी आहे - महायुती पुन्हा एकदा निवडून आल्यानंतर आताचे फोटो पुन्हा एकदा दाखवून वोटर लिस्ट मध्ये गडबडी, गडबडी ( ॲक्शन करत असा शब्द वापरला ) - त्यांना रडण्याची सवय आहे बाकी काही नाही बाईट - देवेंद्र फडणवीस ( मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य )
2
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 15, 2025 13:47:04
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 15, 2025 13:04:04
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Oct 15, 2025 11:55:22
Pune, Maharashtra:संग्राम जगताप यांना नोटीस पाठवण्यात आली असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मुंबई येथे भेट झाली. या बैठकीत पक्षाची भूमिका आणि धोरण प्रत्यक्षात आणण्याबाबत चर्चा झाली. हिंदुत्व बाबत बोलताना सांगितले की हिंदुत्व कोणत्याही समाजाबद्दल द्वेष नाही, ती एक संस्कृती आहे. दीपावली सण हिंदू सण असला तरी सर्व समाजाचे लोक फटाके उडवतात, संक्रांति मध्ये सर्व समाज पतंग उडवतात; आम्ही कधीही कुठेही द्वेष बोललो नाही. आम्हाला कोणत्याही समाजाचा द्वेष नाही; मात्र ज्यांचे त्रास देणाऱ्या लोकांवर बोलण्याचा प्रयत्न करतो. बाजारातील खरेदीबाबत काही पत्रके वाटल्या जातात, परंतु त्या सर्वच समाजातील लोकांकडून असतात. पोलिसांनाही माहिती आहे, आम्ही कोणाचा द्वेष करत नाही.
6
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Oct 15, 2025 11:31:43
5
comment0
Report
Advertisement
Back to top