Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Osmanabad413501

तुळजापुर नगराध्यक्ष उम्मीदवार के विवाद पर विधायक का बयान: मीडिया ट्रायल गलत

DPdnyaneshwar patange
Nov 20, 2025 08:49:17
Dharashiv, Maharashtra
तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवरून वाद पेटला; 'गुन्हेगार ठरवणं मीडियाचं काम नाही' — भाजपा आमदार राणा जगजीत सिंह पाटील तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीवर उसळलेल्या वादावर आमदार राणा जगजीत सिंह पाटील यांची प्रतिक्रिया. 'कोण गुन्हेगार किंवा आरोपी आहे हे न्यायव्यवस्था ठरवते, मीडिया नाही,' असा पाटील यांचा विरोधकांना पलटवार. उमेदवार विनोद गंगणे यांची सगळी पार्श्वभूमी पाहूनच उमेदवारी दिल्याचा दावा. गंगणे यांनी तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात फक्त कायदेशीर मदत दिली, पोलिसांनी त्यांना आरोपी केल्याचा पाटील यांचा पोलिस यंत्रणेवर आरोप. मीडिया ट्रायल करून कोणाला आरोपी ठरवू नका, असं म्हणत पाटील विनोद गंगने याची पाठराखण केली
134
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Nov 20, 2025 10:46:11
Thane, Maharashtra:मुंब्रा में खेल मैदान नहीं होने के कारण चार दिनों से मुंब्रा कौसा स्पोर्ट्स कौन्सलिंग की ओर से उपोषण किया जा रहा था जिसे आज राष्ट्रवादी अजित पवार गट के ठाणे जिलाअध्यक्ष नजीब मुल्ला की मौजूदगी में शांत किया गया। मुंब्रा के मल nisaran प्रकल्प के पास पालिका के आरक्षित भूखंड को क्रिकेट प्रेमियों के लिए आज मुक्त किया गया। नजीब मुल्ला ने पालिका प्रशासन के अधिकारियों के साथ मैदान की जांच की। हालांकि एमसीए के लिए भूखंड और पालिका से मिली जगह एमसीए क्रिकेट प्रशिक्षण के लिए दी गई, जिससे क्रिकेट प्रेमी नाराज़ थे। भविष्य में मैदान पर होने वाले कार्यों पर भी चर्चा हुई और आश्वासन दिया गया कि पांच एकड़ क्षेत्र को बच्चों द्वारा खेलने के लिए सुरक्षित रखा जाएगा।
0
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:31:55
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 10:22:01
Chandrapur, Maharashtra:नगर परिषद स्थापनेनंतर पहिल्यांदाच होत असलेल्या चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीतील नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर , थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले अँकर:--2020 साली ग्रामपंचायत निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला. मात्र सर्वपक्षीय नेत्यांनी यावर बहिष्कार घातला. अखेर राज्य सरकारला घुग्गुस या औद्योगिक नगरीत नगर परिषद स्थापनेची घोषणा करावी लागली. लगेच नगर परिषदेवर प्रशासक नेमण्यात आले आणि कारभार सुरू झाला. त्यानंतर कोविड आणि लांबलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका यामुळे स्थापनेनंतर पहिल्यांदाच इथे निवडणूक होत आहे. चंद्रपूर जिल्ह्यातील घुग्गुस या औद्योगिक नगरीत कोळसा खाणी, ऊर्जा- सिमेंट प्रकल्प आहेत. प्रदूषणाची राजधानी असलेल्या या शहरात नगरपरिषद निवडणुकीत भाजप- काँग्रेस समोरासमोर आहेत. 33 हजार मतदार 22 नगरसेवक निवडणार असून नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिला असे राखीव आहे. कोळसा आणि सिमेंट कामगार बहुल असलेल्या या शहरात दीर्घकाळ ग्रामपंचायतीत भाजपची सत्ता राहिली आहे. थेट लढतीमुळे या क्षेत्रात राजकीय वातावरण तापले आहे. दोन्हीकडून विकासाचे दावे करण्यात येत आहेत. बाईट १) शारदा दुर्गम, भाजप उमेदवार बाईट २) दीप्ती सोनटक्के, काँग्रेस उमेदवार आशीष अम्बाडे झी मीडिया चंद्रपूर
114
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 20, 2025 10:05:37
169
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 20, 2025 10:02:06
Akola, Maharashtra:शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याने प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला हे 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडी आयोजित करण्यात आली आहे. यंदा कापसातील उत्पादन घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरलेली पातळी यामुळे शेतकरी अडचणीत आहेत. शेतकऱ्यांना एकरी 15 क्विंटल मिळत असून शासन केवळ 5.6 क्विंटल खरेदी करत आहे ही मर्यादा 11 क्विंटल पर्यंत करावी या मागणीसाठी ही पायदळ वारी काढण्यात आली. सीसीआयने खरेदीसाठी दिलेल्या नियमांमुळे शेतकऱ्यांचे कापूस विक्रीप्रक्रियेवर निर्बंध आले आहेत. या अन्यायाविरोधात शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप पाटील वसु यांच्या नेतृत्वाखाली ही दिंडी काढण्यात आली आहे.
108
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 20, 2025 09:54:32
Kalyan, Maharashtra:डोंबिवली ते ठाणे लोकल मध्ये मराठी–हिंदी वादातून मराठी विद्यार्थ्याला मारहाण, तणावातून विद्यार्थ्याची आत्महत्या मराठी बोलता येत नाही का ? मराठी बोलायची लाज वाटते का ? असे बोलत चार ते पाच तरुणांनी केली मराठी विद्यार्थ्याला होती मारहाण. मानसिक तणावातून १९ वर्षीय मराठी विद्यार्थ्याने गळफास घेत जीवन संपवलं. लोकल ट्रेन मध्ये चढताना हिंदीत बोलला त्यावरून तुला मराठी बोलता येत नाही का ? यावरून वाद झाला . काही तरुणांनी लोकल प्रवासात झालेल्या वादातून १९ वर्षीय विद्यार्थ्याला मराठी बोलता येत नाही का ? मराठी बोलण्याची लाज वाटते का ? असे बोलत यावरून मारहाण केली. डोंबिवली ते ठाणे दरम्यान ही घटना घडली. झालेल्या मारहाणीमुळे हा विद्यार्थी मानसिक तणावात होता . याच तणावातून या विद्यार्थ्याने कल्याण मध्ये आपल्या घरी येऊन गळफास घेत आत्महत्या केली . अर्णव खैरे असे या मयत विद्यार्थ्याचे नाव आहे .या प्रकरणी कोलशेवाडी पोलीस ठाण्यात अर्णव चे वडील जितेंद्र यांनी जबाब नोंदवला असून पोलीस या प्रकरणी पुढील तपास करत आहेत .दरम्यान लोकल मधली झुंडशाही ,मराठी हिंदि वाद कोणत्या टोकाला पोहचला हेच या घटनेवरून दिसून येत आहे .पोलिसांनी अर्णव याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी अर्णव च्या कुटुंबीयांनी केली आहे वडील जितेंद्र खैरे यांच्या तक्रारी नुसार कल्याण पूर्व तिसगाव नाका येथील सहजिवन रेसिडेन्सीमध्ये राहणाऱ्या अर्णव खैरे हा मुलुंडच्या केळकर कॉलेजमध्ये सायन्स शाखेत शिकत होता. मंगळवार, १८ नोव्हेंबर रोजी तो नेहमीप्रमाणे कल्याणहून लोकलने कॉलेजकडे निघाला होता. ट्रेनमध्ये गर्दी असल्याने गर्दीत अर्णव याने हिंदीत थोडा आगे हो असे बोलला . इतक्यात आजूबाजूच्या चार ते पाच जणांच्या टोळयांनी तु मराठी बोलात येत नाही का ? अशी विचारणा करत तु मराठी बोलण्याची लाज वाटते का असे म्हणत त्याला ठोशांनी बुक्क्यांनी मारहाण केली . या घटनेने घाबरलेला अर्णव ठाणे स्टेशनला उतरला आणि मागील लोकलने मुलुंडला गेला. त्याने प्रॅक्टिकल पूर्ण केले पण मानसिक तणावामुळे कॉलेज अर्धवट सोडून दुपारी घरात परतला. याच दरम्यान अर्णवने वडिलांना फोन करून आपली भीती व्यक्त केली. सायंकाळी ७च्या सुमारास वडील घरी आले असता घराचा दरवाजा आतून बंद होता. शेजाऱ्यांच्या मदतीने दार उघडण्यात आले. बेडरूममध्ये अर्णवने ओढणीने गळफास घेतल्याचे आढळले. तातडीने रुख्मिणीबाई हॉस्पिटलमध्ये नेले असता डॉक्टरांनी त्याला रात्री ९:०५ वा. मृत घोषित केले यानंतर अर्णव याच्या वडिलांनी कल्याण कोळशेवाडी पोलीस ठाण्यात याप्रकरणी जवाब नोंदवला असून पोलिसांनी नोंद करत वडिलांच्या जबाबानुसार तपास सुरू केला आहे मात्र या घटनेने परिसरामध्ये खळबळ उडाली आहे. वडिलांच्या सांगण्यावरून कोळसेवाडी पोलीस स्टेशन मध्ये आकस्मित मृत्यू म्हणून गुन्हा दाखल केला असून पुढील तपास महिला पोलीस करत आहे...
145
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 20, 2025 09:32:21
Ratnagiri, Maharashtra:पक्षांतर्गत कारवाईच्या इशारानंतर खेडमध्ये वैभव खेडेकर यांची नरमाईची भूमिका... महायुती जाहीर झाल्यानंतरही पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासह नगरसेवक पदासाठी अर्ज केलेल्या वैभव खेडेकर यांचा यु टर्न. भाजपला कमी जागा दिल्यामुळे खेडमधील पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली होती नाराजी. भाजपमध्ये जाऊन वैभव खेडेकर यांचे हात रिकामेच...... रत्नागिरीतील महायुतीच्या मेळाव्याच्या नंतर वैभव खेडेकर यांची अर्ज मागे घेण्याची प्रक्रिया सुरू. योगेश कदम विरुद्ध वैभव खेडेकर यांच्या शित युद्धात योगेश कदम पुन्हा ठरले वरचढ... अर्ज मागे घेण्याची उद्याची शेवटची तारीख असताना वैभव खेडेकर आजच घेणार माघार. वैभव खेडेकर यांनी तलवार केली म्यान, शिवसेनेच्या कार्यालयात जाऊन रामदास कदम आणि योगेश कदम यांची घेतली भेट रामदास कदम यांनी यांनी केलं vaibhav खेडेकर यांचं स्वागत
131
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 20, 2025 09:21:52
147
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 20, 2025 09:18:42
Washim, Maharashtra:वाशिम: नगरपरिषद निवडणुकीत नामांकन अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या टप्प्यात बंडखोरी रोखण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना प्रयत्न करावे लागत आहेत.अशा पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाचे जिल्हा उपप्रमुख नागोराव ठेंगडे यांनी पक्षातील पदाधिकाऱ्यां च्या उपस्थितीत UBT शिवसेनेकडून वाशिम नगराध्यक्षपदासाठी नामांकन अर्ज दाखल केला होता.मात्र, अखेरच्या क्षणी परिस्थिती बदलली.ठेंगडे यांनी दाखल केलेल्या अर्जावर शिवसेनेचा अधिकृत ‘एबी फॉर्म’ न देता जिल्हाप्रमुख सुरेश मापारी यांनी तो फॉर्म त्यांची पत्नी रेखा मापारी याच्या नामांकनावर लावला.त्यामुळे नागोराव ठेंगडे यांची नगराध्यक्षपदाची उमेदवारी ऐनवेळी बाद झाल्याचा आरोप ठेंगडे यांनी जिल्हाप्रमुख याच्यावर केला.मात्र जो अपक्ष म्हणून अर्ज भरलेला होता तो कायम आहे या प्रकारामुळे संतप्त झालेल्या नागोराव ठेंगडे यांनी जिल्हाप्रमुखांवर तीव्र नाराजी व्यक्त करत उपजिल्हा प्रमुखपदाचा राजीनामा देत शिवसेनेला रामराम ठोकला त्यांच्यासह शिवसेनेतील इतर काही पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिले आहेत.नागोराव ठेंगडे यांनी सांगितले की,त्यांनी नगराध्यक्षपदासाठी दाखल केलेला अर्ज कायम असून ते अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात राहणार आहेत. “एका सच्च्या शिवसैनिकाला डावलले गेल्याची खंत आहे,”असे त्यांनी यावेळी बोलून दाखवली. बाईट:नागोराव ठेंगडे, उपजिल्हाप्रमुख शिवसेना उबाठा,वाशिम
151
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 20, 2025 08:49:46
Chandrapur, Maharashtra:भारतीय पुरातत्व सर्वेक्षण खात्याच्या वतीने 19 ते 25 नोव्हेंबर दरम्यान राबविल्या जाणाऱ्या जागतिक वारसा सप्ताह निमित्त चंद्रपूरच्या गोंड राजे समाधी परिसरात चित्रकला स्पर्धेचे आयोजन झाले. या चित्रकला स्पर्धेचे मोठ्या संख्येने शालेय विद्यार्थी-विद्यार्थिनी सहभागी झाले. या वारसा सप्ताहाच्या माध्यमातून आपल्या आसपासच्या परिसरातील संपन्न वारशाच्या जतनाबाबत जनजागृती करण्यात आली. चंद्रपूर जिल्ह्यात गोंडकालीन व ऐतिहासिक अनेक वास्तू किल्ले व पर्यटन स्थळे आहेत यात भद्रावती चा किल्ला, बल्लारशा येथील किल्ला, चंद्रपूरचा 11 किलोमीटर पसरलेला मैदानी किल्ला, यासह गोंड राजे समाधी, देवी महाकाली मंदिर आणि अंचलेश्वर मंदिराबाबत या विद्यार्थ्यांना चित्रकला स्पर्धेद्वारे वारसा संवर्धन प्रोत्साहन दिले गेले. सहभागी विद्यार्थ्यांनी या उपक्रमाबाबत आनंद व्यक्त केला.
125
comment0
Report
SKShubham Koli
Nov 20, 2025 08:48:33
Thane, Maharashtra:कचरा समस्येवरच सत्ताधाऱ्यांचे कचरा फेक आंदोलन ठाणे महानगरपालिका हद्दीत गेल्या काही दिवसांपासून कचरा व्यवस्थापनाचा गंभीर प्रश्‍न निर्माण झाला आहे. दिवाळीीनंतर डम्पिंग ग्राउंडच्या बाहेर ग्रामस्थांनी गाड्या अडवल्यामुळे शहरातील रस्त्यांवरचा कचरा उचलला जात नाही आणि नागरिक त्रस्त झाले आहेत. या पार्श्वभूमीवर सत्ताधारी भाजपनेच महापालिकेच्या किंवा प्रभाग समितीच्या गेटबाहेर कचरा टाकून आंदोलन छेडले. प्रशासनाच्या निष्क्रियतेविरोधात केलेल्या या आंदोलनामुळे आता राजकीय चर्चांना चांगलाच ऊत आला आहे. काही दिवसांपूर्वीच कळवा परिसरातील पाणीप्रश्नावर भाजपने मोर्चा काढला होता. त्यानंतर आता कचरा फेक आंदोलनामुळे ठाण्यातील कचरा व्यवस्थापन व प्रशासनावरील टीका अधिक तीव्र होत आहे.
150
comment0
Report
Advertisement
Back to top