Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nashik422303

निफाड तालुक्य में बिबटों की संख्या बढ़ी, पालतू कुत्तों पर हमला

SKSudarshan Khillare
Nov 09, 2025 02:02:49
Niphad, Maharashtra
नाशिकच्या निफाड तालुक्यात बिबट्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून नागरिकांवर व पाळीव प्राण्यांवर बिबटे हल्ले करीत आहेत. कोठारी शिवारातील शेतकरी बापू निवृत्ती मोरे यांच्या वस्तीवर रात्रीच्या सुमारास बिबट्याने दोन पाळीव कुत्र्यांना आपले भक्ष्य केले असून या भीतीने वस्तीवर लावण्यात आलेल्या कॅमेऱ्यामध्ये बिबट्याची दहशत कैद झाली आहे दरम्यान वनविभागाने या ठिकाणी पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी होत आहे.
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 03:35:08
Chendhare, Alibag, Maharashtra:तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल मंत्री भरत गोगावले यांचा मित्र पक्षांना सूचक इशारा महायुतीबाबत रायगडात शिवसेना आशावादी युती होवो अथवा न होवो आमची तयारी झालीय रायगड जिल्ह्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील वादामुळे महायुतीचं मेतकूट जमायची चिन्हं दिसत नाहीत तरीही नगरपालिका निवडणुकीसाठी एकत्र येण्याबाबत शिवसेना अजूनही आशावादी आहे महायुती म्हणून एकत्र आलो तर जिल्ह्यात विरोधकांना फारसे स्थान उरणार नाही पण वेगवेगळे लढण्याची भाषा कुणी करत असेल तर जनता त्यांना त्यांची जागा दाखवून देईल असा सूचक वक्तव्य मंत्री भरत गोगावले यांनी केलंय आमची भाजप बरोबर चर्चा सुरू आहे पण अजूनही त्यांच्याकडून निरोप आलेला नाही निरोप आलााच तर विचार करू युती झाली किंवा नाही झाली तरी आम्ही आमची तयारी केल्याचं गोगावले म्हणाले
5
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Nov 09, 2025 03:33:04
5
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 09, 2025 03:32:42
6
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 03:01:29
12
comment0
Report
HPHARSHAD PATIL
Nov 09, 2025 03:00:11
14
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 09, 2025 02:45:46
14
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Nov 09, 2025 02:45:31
Latur, Maharashtra:हमि भावाने सोयाबीन खरेदीसाठी जिल्ह्यात १५ केंद्रांवर नोंदणीची प्रक्रिया सुरू आहे... हमीभावाने सोयाबीन खरेदीसाठी नोंदणीच्या प्रक्रियेला सुरुवात होताच याचा परिणाम लातूरच्या आडत बाजारातील सोयाबीनच्या आवकवर झाला आहे... गेल्या आठवड्याच्या तुलनेत सध्या बाजारात जवळपास ४० टक्क्यांनी सोयाबीनची आवक घटली आहे... गेल्या आठवड्यात बाजारात दररोज जवळपास २५ ते २६ हजार क्विंटल इतकी आवक होती.. सध्या बाजारात १७ हजार क्विंटल इतकी आवक होत आहे... अडत बाजारात सध्या सोयाबीनला मिळणारा हमीभावापेक्षा कमी दर लक्षात घेता शेतकऱ्यांचा हमीभावाने सोयाबीन विक्रीकडे कल अधिक असल्याचे यावरून दिसत आहे...
14
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Nov 09, 2025 02:31:18
Beed, Maharashtra:बीड: ऑटो रिक्षाचा स्कार्पिओ चा समोरासमोर अपघातात एक जण ठार ऑटो रिक्षा चालकास स्कार्पिओने दीड किमी फरफट नेल्याने झाला जागीच मृत्यू बीडच्या माजलगावातील केसापुरीजवळ भीषण अपघात समोरासमोर धडक झाल्यानं एका तरुणाचा जागीच मृत्यू झालंय. देशमुख पेट्रोल पंपाजवळ सादोळ्याकडे जाणाऱ्या ऑटो रिक्षाला समोरून आलेल्या स्कॉर्पिओने जोरदार धडक दिली धडकेनंतर स्कॉर्पिओने ऑटो रिक्षा चालकाला तब्बल दीड किलोमीटरपर्यंत फरफटत नेलं. या भीषण घटनेत शेख अमीर इलाही या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एक जण या घटनेत गंभीर जखमी असून त्याला प्राथमिक उपचारानंतर संभाजीनगर येथे हलवण्यात आलं आहे.. अपघातानंतर स्कॉर्पिओ चालक घटनास्थळावरून फरार झाला असून पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे… या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे…
14
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 09, 2025 02:18:52
Satara, Maharashtra:सातारा : दुष्काळी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या खटाव तालुक्यातील औंधजवळील वरुड गावाने लोकसहभागाची ताकद दाखवून दिली आहे. ग्रामस्थांनी काही संस्थांच्या मदतीने गावातील कोरडे पडलेले सरोवर पुन्हा जिवंत केले असून, ते कास तलावाच्या धर्तीवर आकर्षक बनवले आहे. या ‘वरुड सरोवर’ प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते पार पडला. यावेळी त्यांनी सरोवराचे काम पाहून गावकऱ्यांच्या उपक्रमाचे तोंडभरून कौतुक केले. मंत्री गोरे म्हणाले, “या सरोवरात बारा महिने पाणी राहील यासाठी मी स्वतः कटिबद्ध राहीन.” या उपक्रमामुळे वरुड ग्रामस्थांनी दुष्काळी भागात जलसंपन्नतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 09, 2025 02:16:37
Nandgaon Rural, Uttar Pradesh:अँकर:-नगर परिषद, नगर पंचायतीची निवडणूक जाहीर झाल्यानंतर मनमाड, चांदवड, येवला, नांदगावंसह नाशिक जिल्ह्यात वेगाने राजकीय घडामोडी घडू लागल्या.. निवडणुकीत महायुती एकत्रिपणे लढणार की स्वबळावर या बाबत वेगवेगळ्या चर्चा सुरु असतांना आज मनमाडला नांदगावंचे शिवसेना आमदार सुहास कांदे, चांदवडचे आमदार डॉ. राहुल आहेर, शिवसेना नेते भाऊसाहेब चौधरी यांची संयुक्त बैठक झाली त्यात महायुती अभेद्य असून मनमाड, चांदवड, येवला, नांदगावंसह नाशिक जिल्ह्यात आम्ही नगर परिषद, नगर पंचायत आणि जिल्हा परिषद निवडणूक एकत्रितपणे लढणार असल्याचे आमदार कांदे, आमदार आहेर यांनी सांगिले. यावेळी नगर परिषदेच्या नगराध्यक्ष आणि नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेल्या उमेदवारांनी मोठी गर्दी केली होती.
14
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 09, 2025 02:16:00
Chandwad, Maharashtra:नाशिक के चांदवड तालुक्यात पिंपळगाव धाबली में खळबळजनक घटना घडली है, यहां की 22 वर्षीय विवाहित ने घर में गला दबाकर आत्महत्या कर ली है, सासर वालों ने गाड़ी और मोबाइल फोन तुम्हारे माहेर वालों ने नहीं दिया, विवाह में कुछ नहीं दिया, घर से पैसे लेकर आओ जैसी बार-बार माँग करते हुए उसे पिटाई, गाली-गलौज करते, इस अत्याचार से तंग आकर मोहिनी चंद्रकांत आहिरे ने आत्महत्या कर ली, उसकी माहेर वालों को सूचना मिलते ही बड़ी संख्या में माहेर के लोग पिंपळगाव ढाबली पहुंचे और संतप्त रिश्तेदारों ने मोहिनी के सासर के घर के सामने चिता बिठाकर उसका अंत्यविधि किया, इस घटना से तनाव पैदा हुआ था, इस प्रकरण में चांदवड पुलिस में पति समेत सासर के 6 व्यक्तियों के खिलाफ दर्ज किये गये, पुलिस अधिक जांच कर रही है.
12
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Nov 09, 2025 02:03:07
Chendhare, Alibag, Maharashtra:नगर पालिका निवडणुकीसाठी भरत गोगावले यांचा नवीन फॉर्म्युला ...... ज्याची ताकद जास्त त्याला जास्त जागा ......... या आधी गोगावले यांनी दिला होता जिल्हा परिषदेचा प्रस्ताव ....... सुनील तटकरे यांनी झिडकारला होता प्रस्ताव .......... आता नवीन फॉर्म्युल्याकडे सर्वांचं लक्ष ........ स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी रायगड जिल्ह्यास महायुतीचं सूत जुळताना दिसत नाही. जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मंत्री भरत गोगावले यांनी शिवसेनेकडून ठेवलेला जागा वाटपाचा फॉर्म्युला सुनील तटकरे यांनी झिडकारला असतानाच आता भरत गोगावले यांनी नगर पालिका निवडणुकीसाठी नवा प्रस्ताव ठेवलाय. ज्या नगर पालिकेत ज्या पक्षाची ताकद जास्त आहे त्याला जास्त जागा द्यायच्या, ताकद पाहून जागा वाटपाचा हा प्रस्ताव आहे. आता महायुतीमधील घटक पक्ष त्याला कसा प्रतिसाद देतात हे पहावं लागणार आहे.
14
comment0
Report
Advertisement
Back to top