Back
नाशिक में प्रेमी ने नंबर ब्लॉक करके युवती का अपहरण करने की कोशिश की
SGSagar Gaikwad
Feb 25, 2026 11:37:59
Nashik, Maharashtra
*नंबर ब्लॉक केल्याचा राग; प्रियकराकडून युवतीवर मिरची पूड फेकत अपहरणाचा प्रयत्न!*
*पालकांनी लग्नास नकार दिल्याने संताप; सातपूर पोलिसांकडून मुख्य संशयित अटकेत, तिघांचा शोध सुरू*
अँकर
नाशिकमधील कामगार नगर परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीने मोबाईल नंबर ब्लॉक केल्याचा राग मनात धरून प्रियकराने थेट अपहरणाचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. युवतीच्या डोळ्यात मिरची पूड टाकत तिला जबरदस्तिने पळवून नेण्याचा प्रयत्न करण्यात आला. या प्रकरणी सातपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक करण्यात आली आहे.
आनंद राजभर आणि संबंधित युवती यांच्यात प्रेमसंबंध होते. मात्र, युवतीच्या पालकांनी लग्नास नकार दिल्यानंतर तिने संबंध तोडत त्याचा मोबाईल नंबर ब्लॉक केला.याचाच राग मनात धरून संशयिताने ‘माझी नाही तर दुसऱ्या कोणाचीही होऊ देणार नाही’ या विकृत मानसिकतेतून तीन मित्रांना युवतीच्या मागावर पाठवले. दुचाकी देत पाळत ठेवण्याचे आदेश दिले होते.
सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या sुमारास युवती कामगारनगर येथील किराणा दुकानात आली असता, दुचाकीवरून आलेल्या तिघांनी तिला रस्त्यात अडवले. तिच्या डोळ्यात मिरची पूड टाकून हल्ला केला आणि अपहरणाचा प्रयत्न केला. स्थानिक नागरिकांनी तत्परता दाखवत संशयितांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी शिवीगाळ करत पळ काढला. तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तत्काळ तपास करत मुख्य संशयित आनंद राजभर याला अटक केली असून इतर तिघांचा शोध सुरू आहे.
बाईट - भाऊसाहेब दहिफळे -तपास अधिकारी
मानसोपचार तज्ज्ञांच्या मते, काही व्यक्तींमध्ये तीव्र मालकीभाव, नकार सहन न होणे आणि त्वरित अपेक्षा पूर्ण न झाल्यास आक्रमक वर्तन दिसून येते. Indian Psychiatric Society च्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, भावनिक परिपक्वतेचा अभाव आणि राग नियंत्रण न होणे यामुळे काही तरुण अतिशय टोकाची पावले उचलतात. तरुण पोरांमध्ये हे प्रमाण अतिशय वेगाने वाढत आहे कारण हवे ते गोष्टी लगेच मुलांना लगेच मिळतात आणि त्यामुळे ती गोष्ट न मिळाल्या कारणाचा राग मनात येतो आणि यामुळे अतिशय टोकाचे पावलं हे मुलं उचलतात.... मुलांना भावनिक दृष्ट्या समजून सांगणे महत्त्वाचे आहे... त्यांची काउन्सलिंग करायला महत्त्वाचा आहे एखादी गोष्ट तुम्हाला मिळाली नाही म्हणजे आयुष्य संपत नाही.... अशा पद्धतीच्या गोष्टी आई-वडिलांनी समजून सांगितल्या पाहिजे...
बाईट - नकूल कोळी (मानस रोग तज्ज्ञ)
याशिवाय
नाशिकमध्ये घडलेली ही घटना पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आणते आहे. प्रेमसंबंधातील मतभेद इतके टोकाचे रूप धारण करणे ही चिंतेची बाब आहे..
0
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
HCHEMANT CHAPUDE
FollowFeb 25, 2026 13:03:580
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 12:52:200
Report
MMMahendrakumar Mudholkar
FollowFeb 25, 2026 12:35:180
Report
JMJAVED MULANI
FollowFeb 25, 2026 12:34:410
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 11:40:39Malegaon, Maharashtra:मालेगाव महानगरपालिकेत नमाज पठणानंतर वादाची ठिणगी, हिंदुत्ववादी संघटनांकडून हनुमान चालिसाचे पठण
0
Report
SKSACHIN KASABE
FollowFeb 25, 2026 11:34:440
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:32:210
Report
ABATISH BHOIR
FollowFeb 25, 2026 11:03:460
Report
TTTUSHAR TAPASE
FollowFeb 25, 2026 10:21:310
Report
VNVishal Nagesh More
FollowFeb 25, 2026 10:20:170
Report
DPdnyaneshwar patange
FollowFeb 25, 2026 10:01:490
Report
ADANIRUDHA DAWALE
FollowFeb 25, 2026 10:00:180
Report
VKVISHAL KAROLE
FollowFeb 25, 2026 09:52:280
Report
PNPratap Naik1
FollowFeb 25, 2026 09:43:080
Report