Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Nagpur440001

नागपुर में पानी बचाने के संदेश के साथ गुलाल की होली: युवाओं में जागरूकता

AKAMAR KANE
Mar 03, 2026 08:46:44
Nagpur, Maharashtra
*नागपुर में होली का रंग देखते ही बन रहा है, नागपुर की सड़कों पर लोगों के समूह के समूह होली में झूमते नजर आ रहे हैं, नागपुर में अधिकांश स्थानों पर गुलाल की होली खेल कर पानी बचाओ का संदेश देने का प्रयास युवाओं द्वारा किया जा रहा है, तमाम लड़के लड़कियां गुलाल से होली खेलते हुए नजर आ रहे हैं, नागपुर के अधिकांश युवाओं ने निश्चय किया है कि वह पानी की होली नहीं खेलेंगे, जल ही जीवन के तर्ज पर वह गुलाब से होली खेल रहे हैं, आम नागरिक भी पानी का दुरुपयोग ना करें इसकी वह अपील भी कर रहे हैं*
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Mar 03, 2026 10:33:07
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर शहरात पोलिसांनी एका ट्रक चालकाला बेदम मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंढरपूर शहरातील सांगोला कडे जाणाऱ्या चौकात अवजड वाहतूक करणाऱ्या एक ट्रक चालकाला पोलिस बेदम असल्याचे व्हिडिओ मध्ये दिसत आहे. सदर ट्रक चालकाने नो एन्ट्री मध्ये वाहन आणल्याने पोलिसांनी दोन हजार रुपये घेतले तसेच घेतलेल्या रकमेची पावती दिली नाही. असे आरोप ट्रक चालकाने केला आहे. तसेच काही अंतर गेल्यावर चालकाच्या मोबाईल वर एक हजार रुपये दंड आल्याचा मेसेज आला. यानंतर चालकाने दंड कसला याबाबत पोलिसांना विचारणा करण्यासाठी परत आला असता पोलिसांनी वाहन चालकाला बेदम मारहाण केल्याचे त्याचे म्हणणे आहे. हे व्हिडिओ आज समाज माध्यमांवर व्हायरल झाले. हा प्रकार घडत असताना मोहोळचे आमदार राजाभाऊ खरे त्या ठिकाणाहून जात असताना त्यांच्या कडे स्थानिक नागरिकांनी घटना सांगितली असता त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून असा प्रकार बाबत नाराजी व्यक्त केली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 03, 2026 10:16:55
Solapur, Maharashtra:SOLAPUR BREAKING - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेऊन आत्महत्या ( PKG ) - SOLAPUR जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यात घडलेल्या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला - मोबाईल पाहण्यास न दिल्याने तेरा वर्षीय चिमुकल्याची गळफास घेत आत्महत्या - मोबाईल घेतला चिमुकल्याचा जीव? घटनेला जबाबदार कोण ? - पालकहो सावधान मोबाईलच्या हट्टापायी आपली चिमुकली संपवतायत जीवन - मोहोळ जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील मन सुन्न करणारी घटना घडली आहे. मोबाईल वापरण्यास न दिल्याच्या कारणावरून एका तेरा वर्षीय चिमुकल्याने अक्षरशः गळफास घेत स्वतःला संपवले आहे. यशराज धर्मराज डोके राहणार - पेनुर असे मृत चिमुकल्याचे नाव आहे. कोणाचाही विश्वास बसणार नाही अशा पद्धतीची ही दुर्दैवी घटना सोलापूर जिल्ह्यात काल घडलीय. बदलत्या तंत्रज्ञानाच्या काळात प्रत्येक जण बदलणं हे गरजेचे आहे मात्र याचाच अतिवापरामुळे लहान मुलांचा जीव जाण्याची वेळ आली आहे. यशराज धर्मराज डोके याचे आई-वडील शेती करून आपली उपजीविका भागवतात. एक मार्च रोजी सायंकाळी सातच्या सुमारास यशराज डोके याने मोबाईल वापरण्यास का दिला नाही? याचा राग मनात धरत राहत्या घरातील पत्राच्या लोखंडी अँगल ला साडीच्या सहाय्याने गळफास घेऊन स्वतःला संपविले आहे. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीयांनी त्याला तात्काळ मोहोळ येथील शासकीय रुग्णालयासाठी उपचारासाठी आणले असता डॉक्टरांनी उपचारापूर्वीच होता असल्याचे घोषित केले. सदर घटनेची नोंद मोहोळ पोलीस ठाण्यात करण्यात आली असून पोलिसांनी अधिकची माहिती दिलीय. - बाईट - बाजीराव पोवार ( वरिष्ठ पोलीस निरीक्षक, मोहोळ पोलीस ठाणे ) सदरच्या घटना या केव्हाच अचानकपणे घडत नाहीत. पालकांनी आपल्या पाल्यास योग्य संस्कार केले आणि मर्यादित गोष्टी ठेवल्या की असे प्रसंग टाळता येतात. घडलेली घटना ही अत्यंत दुर्दैवी असून प्रत्येक गोष्ट आपल्या पाल्याला दिलीच पाहिजे असे नाही. मुलांमध्ये धीर धरण्याची वृत्ती कमी होत चालली आहे त्याच्यामध्ये नक्कीच पालकांचा देखील दोष असल्यास मत मानसोपचार तज्ञ डॉ. नितीन भोगे यांनी म्हटलं आहे. - डॉ. नितीन भोगे ( मानसोपचार तज्ञ ) END P2C मोहोळ मध्ये घडलेल्या दुर्दैवी घटनेने सर्वत्र खळबळ माजलीय. आज डोके कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळलाय मात्र ही वेळ आपल्या कुटुंबावर येऊ नये यासाठी पालकांनी देखील वेळीच जाग होणार गरजेच आहे. अभिषेक आदेप्पा, झी - 24 तास, सोलापूर
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Mar 03, 2026 09:46:23
Jalna, Maharashtra:जालना : माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी कार्यकर्त्यांसोबत केली रंगपंचमी साजरी.. भोकरदन येथे निवासस्थानी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंग उधळत रंगपंचमी.. उध्दव, राज ठाकरेंसह संजय राऊत आणि अब्दुल सत्तारांवर केली टिका आज संपूर्ण देशभरात रंगपंचमी मोठ्या उत्सवात साजरी होत आहे, त्याच पार्श्वभूमीवर जालनाचे माजी खासदार आणि भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते रावसाहेब पाटील दानवे यांनी जालन्यातील भोकरदन येथे त्यांच्या निवासस्थानी रंगपंचमी मोठ्या उत्साहात साजरी केली आहे, यावेळी दानवेंनी कार्यकर्त्यांच्या अंगावर रंगाची उधळण करत रंगपंचमी साजरी केली आहे. तसेच सर्व देशवासीयांना रंगपंचमीच्या शुभेच्छा सुद्धा दिल्यात. यावेळी दानवेंनी संजय राऊत यांच्यासह उध्दव ठाकरे,राज ठाकरे आणि अब्दुल सत्तार यांच्यावर टिका केलीय.उद्धव ठाकरे हे हिरव्या रंगात जाऊन बसले असून त्यांना आता हिरवा रंगच शोभून दिसतो असं म्हणत संजय राऊत सकाळी कोंबड्यासारखे ओरडतात अशी टिका दानवेंनी केली.अब्दुल सत्तरांनी सिल्लोडमध्ये दंगल घडवून आणली असूनते हिरव्या रंगात जन्मले अशी टिका दानवेंनी केली
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 03, 2026 09:30:14
Kolhapur, Maharashtra:सगळीकडे होळीचा सण उत्साहात आणि आनंदात साजरा केला जातो. रंग, जल्लोष आणि पारंपरिक होळी दहन ही या सणाची ओळख आहे. मात्र होळी पेटवताना मोठ्या प्रमाणात शेणी आणि लाकडांचा वापर केला जातो. पर्यावरणाचा विचार करता हा मुद्दा गंभीर ठरतो. यालाच सकारात्मक पर्याय देत पुरोगामी शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोल्हापूरमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून एक स्तुत्य उपक्रम राबवला जाण्यात आला. शहरातील विविध तालीम संस्था आणि तरुण मंडळांकडून ‘शेणीदान’ हा उपक्रम सातत्याने राबवला जातो. या उपक्रमांतर्गत अनेक मंडळे होळी दहनासाठी प्रतीकात्मक स्वरूपात केवळ पाच शेणींचा वापर करतात आणि उर्वरित शेणी दान स्वरूपात देतात. या शेणी थेट पंचगंगा स्मशानभूमी येथे पाठवण्यात येतात. अंत्यसंस्कारासाठी पंचगंगा स्मशानभूमीला दरवर्षी सरासरी सुमारे 35 लाख शेणींची आवश्यकता असते. ही गरज लक्षात घेऊन होळीच्या निमित्ताने समाजोपयोगी काम करण्याचा संदेश या उपक्रमातून दिला जातो. यंदा होळी निमित्ताने तब्बल 6 लाख शेणी जमा झाल्या असून, हा उपक्रम केवळ पर्यावरणपूरकच नाही तर सामाजिक बांधिलकी जपणारा आदर्श ठरत आहे. सण साजरा करतानाच समाजकार्याची जोड देताना हा कोल्हापूरचा उपक्रम खऱ्या अर्थाने प्रेरणादायी ठरत आहे
0
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 03, 2026 09:02:03
Kolhapur, Maharashtra:दुबईमध्ये तणावपूर्ण परिस्थितीत अडकलेला कोल्हापूर जिल्ह्यातील हुपरी येथील २५ जणांचा ग्रुप आज सकाळी सुखरूप मायदेशी परतला आहे. दोन विमानांद्वारे आखाती देशांतून भारतात आणण्यात आलेल्या प्रवाशांपैकी एका विमानात हा संपूर्ण ग्रुप होता. दुबईतील तणावग्रस्त भागात या ग्रुपचे वास्तव्य होते. त्यांनी राहिलेल्या हॉटेलच्या परिसरात हल्ल्यांच्या घटना घडल्या होत्या. त्यामुळे काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. जीव मुठीत घेऊन या सर्वांनी दुबईहून अबुधाबीपर्यंत रस्तामार्गे प्रवास केला. सुदैवाने भारतासाठी निघालेल्या दोन विमानांपैकी एका विमानाचे तिकीट या ग्रुपला मिळाले आणि त्यांची सुखरूप सुटका झाली. भारतात पोहोचल्यानंतर आणि कोल्हापूरमध्ये घरी परतताच कुटुंबीयांनी मोठ्या आनंदाने त्याचे स्वागत केले. यावेळी घरातील वडीलधाऱ्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहताना पाहायला मिळाले. काही काळ भीतीच्या छायेत राहिलेल्या या कुटुंबांसाठी हा क्षण दिलासा देणारा ठरला. दरम्यान, निर्माण झालेल्या परिस्थितीबाबत दिलगिरी व्यक्त करत दुबई प्रशासनाकडून प्रत्येक प्रवाशाला सुमारे २५ हजार रुपयांचे गिफ्ट देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या सर्वांनी दुबईतील हल्ल्यांचे दृश्य, विमानतळावरील तणावपूर्ण स्थिती आणि आकाशातून झालेल्या हल्ल्यानंतर उठलेले धुराचे लोट प्रत्यक्ष अनुभवल्याचे सांगितले. मात्र सुदैवाने सर्वजण सुरक्षितपणे मायदेशी परतल्याने समाधान व्यक्त केले जात आहे.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Mar 03, 2026 08:15:19
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Mar 03, 2026 07:45:36
Kalyan, Maharashtra:कल्याणात विद्यार्थी सुरक्षा ,उपयोजना मार्गदर्शन शिबिर. सुरक्षित विद्यार्थी ,सुरक्षित शाळा,सुरक्षित प्रवास. ठाणे पोलीस आयुक्तालय ,परिमंडळ 3 आणि प्रादेशिक परिवहन मंडळ यांच्या संयुक्त बैठकीचे आयोजन करण्यात आली या बैठीकीला कल्याण डोंबिवलीतील शाळांचे प्रतिनिधी,बस मालक, रिक्षा चालक,आर टी ओ अधिकारी ,वाहतुक पोलीस उपस्थित होते. कल्याण–डोंबिवली परिसरात विद्यार्थी सुरक्षेला प्राधान्य देत विशेष विद्यार्थी सुरक्षा व उपयोजना मार्गदर्शन शिबिराचे आयोजन कल्याणच्या के सी गांधी शाळेत करण्यात आले. विद्यार्थ्यांचा शाळेकडे आणि शाळेतून घरी सुरक्षित प्रवास व्हावा, यासाठी आवश्यक नियम, खबरदारी आणि कायदेशीर तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. स्कूल बसची तांत्रिक तपासणी, चालकांचे परवाने, वेग मर्यादा, बसमध्ये CCTV, अग्निशामक यंत्रणा, महिला सुरक्षा उपाय अशा विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. या वेळी डिसिपी अतुल झेंडे यांनी य नियमांचे काटेकोर पालन करण्याचे आवाहन करत, “विद्यार्थ्यांची सुरक्षा ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे,” असे स्पष्ट केले. नियमभंग केल्यास कडक कारवाई करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Mar 03, 2026 07:22:56
Baramati, Maharashtra:दुबई में दौंड के निवासियों के फंसे के बारे में जानकारी सामने आई है; दौंडचे भाजप आमदार राहुल कुल यांनी संपर्क साधला, व्हिडीओ कॉलद्वारे माहिती घेतली गेली. इराण आणि इस्रायलमधील तणावामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा विस्कळित झाल्यामुळे भारतीय पर्यटकांना मोठा फटका बसला असून दौंड तालुक्यातील काही आरोग्य विमा प्रतिनिधी सध्या दुबईत अडकले आहेत; युद्धाच्या सावटाखाली अनेक विमान फेऱ्या रद्द झाल्याने भारतात परतणे कठीण झाले आहे. दुबईतील हॉलिडे इन हॉटेलमध्ये थांबलेल्या संपत बनकर व इतरांशी दौंडचे आमदार राहुल कुल यांनी व्हिडिओ कॉलद्वारे संपर्क साधला. दुबईस्थिती जाणून घेऊन त्यांनी सुरक्षितपणे भारतात परत आणण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयाशी बोलण्याचे विचार व्यक्त केले.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 03, 2026 07:22:29
0
comment0
Report
sidebar-img
Advertisement
Back to top