Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Mumbai City400003

नितीन देशमुख ने संजय राऊत से मुलाकात कर वार्ड 124 सीट छोड़ने की मांग की

APAMOL PEDNEKAR
Dec 23, 2025 10:52:39
Mumbai, Maharashtra
राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांच्या निवडणुकीच्या जागे संदर्भात संजय राऊत यांची भेट घेतली. राज ठाकरे यांची देखील नितीन देशमुख यांनी भेट घेतली होती. तिकीट मिळवण्यासाठी उमेदवारांची धावाधाव झाली असल्याचं पाहायला मिळत आहे; आज उमेदवारी अर्ज भरण्याचा पहिला दिवस असला तरी अजूनही अनेक उमेदवार हे आपल्याला समर्थन मिळावे यासाठी इतर पक्षाच्या पाहिऱ्या झिजवत आहेत. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचे प्रवक्ते नितीन देशमुख यांनी आज संजय राऊत यांची भेट घेतली व वार्ड क्रमांक 124 मधील जागा आपल्यासाठी सोडावी अशी मागणी केली. यासोबत नितीन देशमुख यांनी काल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची देखील भेट घेतली होती.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
JJJAYESH JAGAD
Dec 23, 2025 12:16:26
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगरपरिषदेच्या निकालाबाबत संशयाचे वातावरण निर्माण झाले असल्याबद्दल उबाठा गटाच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार शिवानी थाटे यांनी तेल्हारा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. तक्रारीनुसार, २१ डिसेंबर रोजी निकालाच्या दिवशी सकाळी १०.३५ वाजता, भाजपचे चिन्ह आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचा फोटो असलेल्या एका व्हॉट्सॲप नंबरवरून शिवानी थाटे यांच्या मोबाईलवर संदेश प्राप्त झाला. या संदेशात “तुम्ही ९४१ मतांनी पराभूत होणार” असे स्पष्टपणे नमूद करण्यात आले होते. विशेष बाब म्हणजे हा संदेश आलेला मोबाईल नंबर महाराष्ट्राबाहेरील असल्याची माहिती प्राथमिक तपासातून समोर येत आहे. प्रत्यक्ष निकालात भाजपच्या वैशाली पालीवाल या १२४२ मतांनी विजयी झाल्या, तर संदेशात निकालाआधीच ९४१ मतांनी पराभवाचा अंदाज वर्तवण्यात आला होता. त्यामुळे ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाली असावी, असे गंभीर संशय शिवानी थाटे यांनी व्यक्त केला असून त्याला पोलिसात they यांनी या संदर्भात तक्रार नोंदविली आहे. इतर उमेदवारांनाही अशा प्रकारचे संदेश मिळाल्याचे निष्कर्ष समोर आले आहेत. या प्रकरणाचा सखोल तपास करण्याची मागणी उबाठा गटाकडून करण्यात येत आहे. पोलिसांनी तक्रार नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे. मात्र या संदर्भात पोलिसांनीही हा मेसेज कोणी पाठवला व त्याच्याकडे हे आकडे कसे आले याचा तपास केला पाहिजे आणि पोलिसांनी जर या प्रकरणात तपास नाही केला तर आम्ही कोर्टामार्फत तपास करायला लावू असे इशारा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी दिला आहे. या प्रकारामुळे तेल्हारा नगरपरिषदेच्या निवडणूक प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले असून आता या प्रकरणाची दखल वंचित बहुजन आघाडीने सुद्धा घेतली आहे. त्यामुळे पोलिसांच्या चौकशीकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 23, 2025 12:09:55
Jalna, Maharashtra:जालना महापालिका निवडणुकीतील युतीसाठी भाजपला खोतकरांकडून 2 दिवसांचा अल्टीमेटम. भाजपने दोन दिवसांत युतीबाबत निर्णय न झाल्यास वेगळा विचार करावा लागेल. भाजप शिवसेना युती न झाल्यास भाजपसह शिवसेनेला तोटा होणार -खोतकर. आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको. अँकर :जालन्यात महापालिका निवडणुकीसाठी भाजपने युतीबाबत दोन दिवसांत निर्णय घेया otherथा वेगळा विचार करावा लागेल असा ईशारा शिवसेना आमदार अर्जुन खोतकर यांनी भाजपला दिलाय. महापालिका निवडणुकीत शिवसेना भाजप युती न झाल्यास दोन्हीही पक्षांना तोटा होणार असल्याची शक्यता खोतकरांनी व्यक्त केलीय.दरम्यान आम्ही युती न केल्याचं पाप आमच्या डोक्यावर नको असा ईशारा देखील खोतकर यांनी भाजपच्या स्थानिक नेत्यांना दिला आहे.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 12:03:37
Khed, Maharashtra:*शिरूर–भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग भूसंपादनावरून शेतकऱ्यांचा ठिय्या; प्रांतअधिकारी गैरहजर* राजगुरुनगर/पुणे भीमाशंकर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० साठी होत असलेल्या भूसंपादन प्रक्रियेत पारदर्शकतेचा पूर्ण अभाव असल्याचा आरोप करत शेतकऱ्यांनी आज राजगुरुनगरमध्ये प्रांत अधिकाऱ्याच्या कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन छेडले. भूसंपादनाच्या शिक्क्यांबाबत कोणतीही माहिती न देता सातबाऱ्यावर नोंदी झाल्याने शेतकऱ्यांकडून प्रचंड संताप व्यक्त होत आहे. भीमाशंकर–तळेघर–वाडा–राजगुरुनगर या मार्गाला नुकतीच राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६० ची मान्यता मिळाली असून या प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात जमीन संपादित होणार आहे. मात्र, कोणतीही ग्रामसभा, चर्चा किंवा वैयक्तिक नोटीस न देता थेट शेतकऱ्यांच्या सातबारा उताऱ्यांवर भूसंपादनाचे शिक्के मारल्याचा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून होत आहे. हरकती नोंदवण्यासाठी शेतकऱ्यांना राजगुरुनगर येथील उपविभागीय कार्यालयात बोलावण्यात आले होते. पण ठरलेल्या वेळेत येथे प्रांत अधिकारीच अनुपस्थित राहिल्याने शेतकऱ्यांचा रोष चांगलाच भडकला आणि शेतकऱ्यांनी कार्यालयाच्या बाहेरच ठिय्या धरला
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Dec 23, 2025 11:56:09
Navi Mumbai, Maharashtra:तळोजा एमआयडीसी परिसरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर नवी मुंबई गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत एका अल्पवयीन बांगलादेशी मुलीसह सात पीडित महिलांची सुटका केली आहे. सुटका करण्यात आलेल्या महिलांपैकी दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याची माहिती पोलिसांनी दिली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाने ही कारवाई केली. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, तळोजा एमआयडीसी येथील हॉटेल नवनाथ इन, लॉजिंग येथे लॉज मॅनेजर ग्राहकांकडून २,००० रुपये घेऊन महिलांना दाखवून वेश्याव्यवसाय करून घेत आहे. या माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवला. त्याच्या सांकेतिक इशाऱ्यावरून रात्री ११.५८ वाजता लॉजवर छापा टाकण्यात आला. छाप्यात लॉजमध्ये वेश्याव्यवसायासाठी ठेवलेली एक अल्पवयीन बांगलादेशी मुलगी व सहा पीडित महिला आढळून आल्या. तपासात लॉज मालक वसंत गणेश शेट्टी, लॉज मॅनेजर गिरीश विठ्ठल शेट्टी व सर्व्हिस बॉय रोशन रामजित यादव यांनी संगनमत करून महिलांना वेश्याव्यवसायासाठी लॉजमध्ये ठेवले असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी आरोपींविरोधात भारतीय न्याय संहिता २०२३ मधील संबंधित कलमे, अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायदा तसेच POCSO कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तिन्ही आरोपींना २२ डिसेंबर २०२७ रोजी अटक करण्यात आली असून पुढील तपास तळोजा पोलीस ठाणे करीत आहे.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 11:33:13
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं! ANC :- कोल्हापूर महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं शहरात एक नवी टॅगलाईन आणली आहे — “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” शहरातील अनेक भागात या टॅगलाईनचे बॅनर झळकले असून, काँग्रेसचे नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत या मोहिमेची सविस्तर माहिती दिली आहे. पण या टॅगलाईन नंतर भाजपा शिवसेनेहम India आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीने देखील काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. VO 1: कोल्हापूर शहरात सध्या एकाच टॅगलाईनची चर्चा आहे — “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसनं ही टॅगलाईन पुढे आणत जनतेकडून थेट अपेक्षा आणि सूचना मागवण्याचा निर्णय घेतला आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं की, कोल्हापूर जसं नागरिकांना हवं आहे, तसं शहर घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. यासाठी शहरातील नागरिकांसह, मूळचे कोल्हापूरचे पण देश-परदेशात राहणाऱ्या नागरिकांकडूनही सूचना मागवण्यात येणार आहेत. BYTE –आमदार सतेज पाटील VO 2: सतेज पाटील यांनी यावेळी हेही स्पष्ट केलं की, 400 पेक्षा जास्त इच्छुकांनी उमेदवारीची मागणी केली असून, प्रत्येक वॉर्डचा स्वतंत्र जाहीरनामा सादर केला जाणार आहे. दरम्यान, या टॅगलाईनवरून राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरूझाले आहेत. भाजप, शिवसेना आणि इंडिया आघाडीतून बाहेर पडलेल्या आम आदमी पार्टीने काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. BYTE – महेश जाधव, प्रदेश सचिव महाराष्ट्र भाजप BYTE – संदीप पाटील आप, पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक (((((बंटी साहेब तुमचे गैर नही…लेकिन आप तुम्हारे बगल बच्चे की खैर नही. सत्तेत तुम्हीच होता…टक्केवारी रोखू शकला नाही,कोल्हापूरचे प्रश्न मिटवू शकला नाही. म्हणूनच आज जनता म्हणते ..‘कोल्हापूर कसं… आता तुम्ही घरात बस्स!’ ))))) VO 3 :- एकीकडे महानगरपालिका निवडणुकीच्या निमित्ताने नवी टॅग लाईन आणत काँग्रेस जनतेकडून थेट सहभाग घेण्याचा दावा करत आहे, तर दुसरीकडे विरोधकांनी इतके दिवस काँग्रेस सत्तेत होते, त्यावेळी काय केले ? असा सवाल उपस्थित करत या टॅगलाईनवर सडकून टीका सुरू केली आहे. नेहमी निवडणुकीच्या तोंडावर वेगळा टैगळांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाणारे काँग्रेस नव्याने आणलेल्या “कोल्हापूर कसं… तर तुम्ही म्हणशीला तसं!” ही टॅगलाईन जनतेला कशी भावते, आणि त्याचं मतदानावर काय परिणाम होतो हे निवडणूक निकालानंतर स्पष्ट होणार आहे. प्रताप नाईक झी 24 तास कोल्हापूर.
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 10:05:26
Kolhapur, Maharashtra:कोंग्रेस पक्षाच्या वतीने आज कोल्हापूर महानगरपालिकेसाठी कोल्हापूर कस्सं.. तुम्ही म्हणाल तस्स ही टॅग लाइन जाहीर केली. या टॅगलाईनची आपच्या नेत्याने चांगलाच खरपूस समाचार घेतलाय. आम आदमी पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र प्रदेश संघटक संदीप पाटील यांनी काँग्रेसवर टीका करत असताना बंटी साहेब तुमचे गैर नही.. लेकिन आप तुम्हारे बगल बच्चे की खैर नही असं वक्तव्य केले. इतकच नाही तर कोल्हापूर कसं.. तुम्ही म्हणशीला तस .. या टॅगलाईनचे समाचार घेतताना "अरे सत्तेत तुम्हीच होता.. तुम्ही टक्केवारी रोखू शकला नाही.. तुम्ही कोल्हापूरचे प्रश्न मिटू शकला नाही, त्यामुळे कोल्हापुरातील जनता "कोल्हापूर कस्सं... आता तुम्ही घरात बस्स" अशी टीका केलीय. आम आदमी इंडिया आघाडीतून बाहेर पडतात काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.
0
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Dec 23, 2025 10:04:48
Satara, Maharashtra:साताऱ्यातील यशवंत सहकारी बँकेतील 112 कोटींच्या कथित घोटाळा प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ED) मोठी कारवाई सुरू केली आहे. सातारा जिल्ह्यातील कराड, सातारा आणि फलटण येथील बँकेच्या तीनही शाखांवर ईडीचे छापे टाकण्यात आले आहेत. या प्रकरणी काही दिवसांपूर्वी कराड शहर पोलीस ठाण्यात 50 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात झाला होता. भाजपच्या खासदार मेधा कुलकर्णी यांनी याबाबत पत्रकार परिषद घेऊन घोटाळ्याचा मुद्दा उपस्थित केला होता. भाजपचे पदाधिकारी आणि माजी सहकार परिषदेचे अध्यक्ष शेखर चरेगांवकर यांच्याशी संबंधित ही बँक असल्याची चर्चा आहे. दरम्यान, काही संचालकांना ईडीने ताब्यात घेतल्याची माहिती असून त्यांच्याकडून सखोल चौकशी सुरू आहे.
0
comment0
Report
SKSudarshan Khillare
Dec 23, 2025 10:04:32
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 23, 2025 10:01:23
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:स्लग - तासगाव मध्ये भाजपाचे डिपॉझिट जप्त,तालुकाध्याशांची हकालपट्टी करण्याची भाजप पदाधिकारयांची मागणी... अँकर - राज्यातील नगरपरिषद व नगरपंचायत निवडणूक मध्ये एक नंबर बनलेल्या भाजपाची सांगलीच्या तासगाव मध्ये मात्र धुळदान उडाली आहे.भाजपाच्या नगराध्यक्षसह सर्व उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झाले आहे.भाजपाच्या नामुष्की जनक पराभवानंतर भाजपाच्या तासगाव मधील पदाधिकाऱ्यांनी थेट तालुकाध्यक्षांच्या राजीनाम्याबरोबर हकालपट्टीची मागणी केली आहे.तासगाव भाजपात पक्षातील अंतर्गत गटबाजी आणि भाजप किसान मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस संदीप गिड्डे पाटलांना डावलल्याना बरोबर मनमानी कारभारामुळे भाजपावर ही वेळ आल्याचा आरोप करत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे लेखी तक्रार करून मागणी करणार असल्याची माहिती यावेळी भाजप पदाधिकारी व पराभूत उमेदवारांनी दिली आहे. बाईट - विशाल भोसले ( शहर सरचिटणीस भाजप ) बाईट - शिवाजी गुळवे ( उमेदवार, भाजप )
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 23, 2025 09:04:10
Mira Bhayandar, Maharashtra:महानगरपालिकेच्या निवडणुका तोंडावर असतानाच स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. काँग्रेसचे माजी आमदार मुझफर हुसेन यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत भाजपाचे प्रदेश कार्यालय सदस्य अजय अर्जुन शिंग राजपूत यांनी तब्बल ४०० कार्यकर्त्यांसह काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. ढोल–ताशांच्या गजरात आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा पार पडला. या प्रवेशामुळे काँग्रेस पक्षाला मोठा दिलासा मिळाला असून भाजपासाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात आहे. आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून, याचा थेट परिणाम स्थानिक राजकीय समीकरणांवर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. प्रवेशावेळी माजी आमदार मुझफर हुसेन यांनी पक्ष संघटन मजबूत करण्याचा निर्धार व्यक्त केला, तर अजय शिंग राजपूत यांनी काँग्रेसची विचारधारा आणि नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत आगामी निवडणुकांमध्ये जोमाने काम करण्याचा संकल्प केला आहे.
0
comment0
Report
PTPRATHAMESH TAWADE
Dec 23, 2025 09:00:52
Nala Sopara, Maharashtra:तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा नालासोपाऱ्यात संपन्न अॕकर : विनर्स कप 2025,कराटे प्रिमियर लीग पर्व 3 राष्ट्रीय कराटे स्पर्धा रविवारी नालासोपारा येथे संपन्न झाली.विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या माध्यमातून या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यात देशभरातील 200 हून अधिक स्पर्धकांचा सहभाग होता. शोतोकाई कराटे असोसिएशनची हि तिसरी राष्ट्रीय कराटे स्पर्धा आहे. नालासोपारा पश्चिम येथील वसई विरार शहर महानगरपालिकेच्या कला रंगमंच ,छेडा नगर येथे आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत गुजरात, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, आंध्र प्रदेश, केरळ, दिल्ली, राजस्थान अशा 15 राज्यातील दोनशे स्पर्धकांनी नोंदणी केली केली होती. आयोजक आशीयाई सुवर्णपदक विजेते व विनर्स स्पोर्ट्स क्लबचे संचालक सागर शेलार यांनी याचे आयोजन केले होते. या स्पर्धेत वय वर्ष 4 ते खुला गट असा महिला व पुरुषांचा समावेश होता. विजेत्या स्पर्धकांना सुवर्ण, रौप्य व कांस्यपदक,चषक, रोख रक्कम व प्रशस्तीपत्रक दिले गेले. या स्पर्धेसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय दर्जाचे पंच उपस्थित होते . कराटे महिलांना आत्मविश्वास, शारीरिक बळकटी आणि स्वसंरक्षणाचे तंत्र देऊन सक्षम करते, ज्यामुळे त्या स्वतःचे रक्षण करू शकतात आणि कोणत्याही परिस्थितीत सामोरे जाण्यास तयार राहतात. हे प्रशिक्षण केवळ शारीरिक नसून मानसिक शिस्त, लक्ष केंद्रित करण्याची क्षमता आणि सामाजिक कौशल्ये देखील विकसित करते, ज्यामुळे महिलांना हिंसाचाराचा सामना करण्यासाठी आणि जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक साधने मिळतात. विनर्स स्पोर्ट्स क्लबच्या नालासोपारा, विरार,दहिसर व बोरीवली येथे शाखा असून तेथे मुला-मुलींना कराटे प्रशिक्षण दिले जात असल्याची माहिती राष्ट्रीय कराटे प्रशिक्षीका व क्लबच्या सहसचिव पल्लवी म्हात्रे दळवी यांनी दिली .
0
comment0
Report
Advertisement
Back to top