Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Kolhapur416005

ED की छापेमारी के बाद Hasan Mushrif ने दी क्लीन चिट, क्या बोले?

PNPratap Naik1
Nov 21, 2025 09:01:18
Kolhapur, Maharashtra
इडीच्या आरोपातून माझी निर्दोष मुक्तता झाल्याचा दावा मंत्री हसन मुश्रीफ यांनी केला आहे. हसन मुश्रीफ यांच्यावर शरद पवार यांच्यासोबत असताना इडी चे छापे पडले होते. त्यांच्या कागल इथल्या घरी पडलेल्या छाप्या मागे कोण असा सवाल उपस्थित होत होता, भाजप नेते किरीट सोमय्या यांनीही मुश्रीफ यांच्यावर गंभीर आरोप केले होते. कारखाना उभा करताना मनी लाँड्रिंग केल्याचा आरोप सोमय्यांनी करत मुश्रीफ याना अडचणीत आणले होते, मात्र आता मुश्रीफ यांनीच आपण निर्दोष सुटल्याचे जाहीर केले आहे. पाहूया हसन मुश्रीफ यांनी नेमकं काय म्हटलय.
147
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
VKVISHAL KAROLE
Nov 21, 2025 09:23:23
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:शरीरातील व्हिटॅमिन D चे प्रमाण अत्यंत कमी असल्यास नैराश्याचा धोका वाढू शकतो, असा निष्कर्ष एका व्यापक अभ्यासमुळे समोर आला आहे. 31 देशांतील 66 अभ्यासांचे विश्लेषण केल्यानंतर संशोधकांनी सांगितले की ज्यांच्यात व्हिटॅमिन D चे प्रमाण 30 नॅनोमोल/L पेक्षा कमी आहे, अशा प्रौढांमध्ये डिप्रेशनची शक्यता अधिक आढळते. व्हिटॅमिन D ची कमतरता नैराश्यचा धोका असू शकतो. काही परिणामांमध्ये थकवा, स्नायू वेदना, हाडे दुखणे आणि सतत आजारी पडणे या लक्षणांचा समावेश होतो. या संदर्भात डॉ अजय दंडे, हृदयरोग तज्ज्ञ यांनी सप्लिमेंट घेण्याबद्दल सल्ला दिला आहे, परंतु קודם कॅल्शियम पातळी तपासावी; तसंच दररोज 10-30 मिनिटे सकाळी सूर्यप्रकाश मिळवा. व्हिटॅमिन D समृद्ध अन्नांमध्ये दूध, मशरूम, दही, पनीर, संत्रेचा रस, सोया मिल्क यांचा समावेश आहे. सकाळी 8 ते 9 च्या वेळात सूर्योदय हा व्हिटॅमिन D साठी उपयुक्त ठरतो, त्यामुळे आपल्या शरीरातील व्हिटॅमिन D पातळी तपासणी करणे गरजेचे आहे.
62
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 09:02:00
Nagpur, Maharashtra:नागपूर *माय लेकाचा करंट लागून दुर्दैवी मृत्यू, खापरखेडा मधील जयभोले नगरातील घटना* - आज सकाळी घडलेली घटना... कपडे वळविण्यासाठी लोखंडी तारेवर कपडे टाकताना आई व मुलाचा करंट लागून मृत्यू झाला - निर्मला उत्तम सोनटक्के वय 51 तर मृतक मुलाचे नाव लोकेश उत्तम सोनटक्के वय ३१ असे आहे... - मृतक लोकेश हा भानेगाव कोळसा खाणीत खाजगी कंपनीत कार्यरत होता.. लोकेश कामावरून घर परतला रात्रपाळी झाल्यामूळे लोकेश झोपला होता - यावेळी लोकेशची आई वायर वर कपडे वाळवित असताना तारेच्या वरच्या भागाला जिवंत तार होती, अचानक कपडे वाळवत असलेल्या तारेमध्ये विद्युत प्रवाह आला.. - निर्मला यांना जोरदार करंट लागला..यावेळी आवाजामुळे झोपेत असलेला लोकेश उठला... आईच्या दिशेने मदतीकरता धाव घेतली.. आईला वाचविण्याच्या प्रयत्नात लोकेशला करंट लागला... - सदर घटनेत आई -मुलाचा मृत्यू झाला..
147
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 21, 2025 08:40:30
Nagpur, Maharashtra:नागपूर सलील देशमुख ने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्ष आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्याकडे ऑल इज नॉट वेल असल्याचे चित्र आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत काटोल येथील काही जागांवरून सलील देशमुख नाराज असल्याची कबुली जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे पाटील यांनी झी24 तासशी बोलताना दिली। ते दुसऱ्या कोणत्याच पक्षात जाणार नसल्याचा ठाम विश्वास व्यक्त करताना उद्या ते आमच्या सोबत प्रचारात दिसतील असेही सांगितले। दरम्यान जीपीओ चौकातील अनिल देशमुख यांच्या निवासस्थानवर सकाळपासूनच कार्यकर्ते पोहोचत आहेत। मात्र दुसरीकडे सलील देशमुख यांच्या राजीनाम्यानंतर अनिल देशमुख प्रसिद्धी माध्यमांशी याबाबत काही बोलण्यास तयार नाहीत। माजी गृहमंत्र्यांबद्दल घडलेल्या या सभामालावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रवीण कुंटे यांच्याशी संवाद साधला आहे आमचे प्रतिनिधी अमर कांडे यांनी.
162
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 08:39:36
Amravati, Maharashtra:काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर येत्या सहा महिन्यांत भाजपमध्ये दिसतील; आमदार रवी राणा यांचा खळबळ जनक दावा एक खडबड उडाली आहे. काँग्रेसच्या नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर येणाऱ्या सहा महिन्यांत भाजपामध्ये दिसतील हा काळ्या दगडावरील पांढरी रेघ आहे असा दावा रवी राणा यांनी केला आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात चर्चांना उधाण आले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत यशोमती ठाकूर यांची भेट झाली होती तेव्हा त्यांनी तिवसा विधानसभा मतदारसंघाची भाजपची तिकीट मागितली होती भाजपची तिकीट मला मिळत असल्यास मी भाजपमध्ये यायला तयार आहे असेही यशोमती ठाकूर म्हणाल्या असल्याचा खडबड जनक दावा रवी राणा यांनी केला आहे. त्यामुळे राणा विरुद्ध ठाकूर हा वाद पुन्हा पेटण्याची शक्यता आहे.
125
comment0
Report
PNPratap Naik1
Nov 21, 2025 08:35:41
Kolhapur, Maharashtra:आरोगymmंत्री प्रकाश आबिटकर बाईट मुद्दे On swine fever आफ्रिकन डुकरांमध्ये अशा प्रकारचा आजार आढळून येत आहे. नाशिकच्या कलेक्टर आणि त्या संदर्भात सक्तीच्या सूचना दिल्या आहेत. क्वारंटाईन देखील केलंय. स्वाइन फ्लू हा विषय डुकरांच्या संबंधित आहे. माणसांना कोणताही प्रादुर्भाव होत नाही. तरीदेखील हा संसर्ग वाढू नये, यासाठी नाशिकच्या जिल्हाधिकारीांनी खबरदारी घेतली आहे Long Covid त्रास पोस्ट कोविड मध्ये असे प्रकार दिसत आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने आपण एक बैठक घेतली आहे. लोकांनी कशा प्रकारची काळजी घ्यायला पाहिजे या संदर्भातल्या सूचना आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात येत आहे. On भाजपा शिंदे गटा विरोधात भूमिका या स्थानिक पातळीवरच्या निवडणुका आहेत, याला स्थानिक संदर्भ.. गटातटाचे राजकारण.. सर्वांना संधी देण्यासंदर्भात नेत्यांची होत असलेली कसरत त्याचाही तो भाग आहे. आपण पाहिले असेल शिरोळ कुरुंदवाड आणि जयसिंगपूर मध्ये तिथले विद्यमान आमदार माजी मंत्री यड्रावकर यांचे स्थानिक पातळीवर ज्या पद्धतीचा समन्वय व्हायला पाहिजे होता तो होऊ शकला नाही, तसेच प्रसंग अनेक ठिकाणी दिसून येत आहेत. स्थानिक संदर्भानेच अशा निवडणुका होत असतात.. तिथल्या संदर्भांना जिल्हास्तर आणि राज्य स्तरावर जोडण्याचा प्रयत्न झाला, तर वड्यावरचे तेल वांग्यावर करण्यासारख्या आहे. स्थानिक पातळीवरच्या निवडणुका ह्या स्थानिक पातळीवरच होत असतात.. On कोल्हापूर जिल्ह्यातील 35 गावांना ब कार्ड ग्रामविकास विभाग आणि सार्वजनिक बांधकाम विभाग त्यांचे महत्त्वाचे काम म्हणजे पाण्याची गुणवत्ता.. दूषित पाण्यामुळेच बहुतांशी सर्व आजारांना निमंत्रण दिले जाते.. त्यामुळे त्याच्यासाठी आरोग्य विभागाचे टीम सातत्याने काम करत असते. कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या CO यांनी जी माहिती घेतली, त्यानंतर त्यांनी ज्या गावांना पिवळं कार्ड मिळाला आहे त्या गावातील ग्रामपंचायतींना पाण्या संदर्भात काळजी घेण्याची सूचना दिली आहे.
158
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Nov 21, 2025 08:21:06
Pune, Maharashtra:राज्यातील नगरपरिषद निवडणुकांमध्ये काही ठिकाणी बिनविरोध नगराध्यक्ष पदाची निवड झाली आहे बिनविरोध झालेले नगराध्यक्ष सत्ताधारी पक्षातील बड्या नेत्यांचे नातलग असल्याचा देखील समोर आला आहे यावर आता विरोधकांकडून जोरदार टीका होऊ लागली आहे अहिल्या नगरच्या राहुरी मतदारसंघातील राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे माजी मंत्री प्राजक्त तनपुरे यांनी सत्ताधाऱ्यांकडून लोकशाहीचा गळा घोटला जात असल्याची टीका केली आहे लोकांना आपल्या मतदानाचा अधिकार असताना सत्तेच्या माध्यमातून त्यांना मतदान न करून देण्याचा प्रकार सबंध महाराष्ट्र पाहत असल्याचं तनपुरे यांनी म्हटलं आहे
172
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 21, 2025 08:20:49
Ratnagiri, Maharashtra:अनेक जण आज उमेदवारी अर्ज मागे घेतील - सामंत समज - गैरसमजूत झाल्याने काही फॉर्म भरले गेले - सामंत फॉर्म मागे घेतल्यामुळे अनेक नगरसेवक बिनविरोध - सामंत आणखीन देखील काही जण फॉर्म मागे घेतील - सामंत नगराध्यक्ष फार मोठ्या मताधिक्याने जिंकणार - सामंत बंडखोरी मागे घेण्याबाबतचे यश आले ते मी तुम्हाला सांगतोय - सामंत चिपळूण नगर परिषदेतील वस्तुस्थिती 3 नंतर कळेल - सामंत रवींद्र चव्हाण सिंधुदुर्ग मध्ये युती तुटण्यास जबाबदार असं निलеш राणे बोले नाहीत... सिंधुदुर्गातील राजकारणातील संकेत वेगळे - सामंत शेखर निकामी आणि आंधळा विश्वास कोणावर टाकला हे माहीत नाही... शेखर निकम माझे सहकारी - सामंत मित्रा पक्षातील सर्व कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळाला पाहिजे.. नौपाडा मारहाणीवर सामंत यांचं उत्तर दोन्ही बाजूंनी मानसन्मान मिळाला पाहिजे..आमची थोडीफार नाराजी होती ती आम्ही मुख्यमंत्री फडणवीस यांना सांगले - सामंत मुंबई महानगरपालिकेमध्ये महायुती म्हणून आम्हाला पुढे जायचं आहे..भाजपचा 100 जागा मिळण्याचा सर्व्हे यावरती सामंत यांचं उत्तर मुख्यमंत्र्यांचा आणि उपमुख्यमंत्र्यांचा राजा शिष्टाचार वेगळा असतो.... एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यातील नाराजी दूर झाले नाही यावरती सामंत यांचे उत्तर एकनाथ शिंदे एनडीए मधील तीन नंबरचे नेते - सामंत जे टीका करतात ते सहाव्या सातव्या रांगेमध्ये बसतात... शिंदे साहेब हे अमित शहा आणि मोदी यांच्या खुर्चीला खुर्ची लावून बसतात - सामंत मित्रपक्ष म्हणून सन्मान ठेवला पाहिजे... युतीमध्ये अडचण निर्माण होणार नाही याची दक्षता घेऊ.. पार्थ पवार यांचे प्रकरण सुनील तटकरे यांनी बाहेर काढले.. असं थोरवे बोलले होते.. या प्रश्नाला सामंत यांचे उत्तर मी काही भाजपमध्ये गेलो नाही..काहीजणांना पोटशुळ उठतो...मी माझ्या मर्यादा सोडल्या नाहीत... सुषमा अंधारे यांना गांभीर्याने घेता कामा नये - सामंत पार्थ पवार प्रकरणांमध्ये चौकशी करा असं मुख्यमंत्री बोलले आहेत... त्यामुळे मी काहीही बोलणे उचित नाही - सामंत Byte - उदय सामंत, उद्योगमंत्री लोकेशन - रत्नागिरी
112
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 08:09:30
Pandharpur, Maharashtra:शहाजी बापू पाटील आदर्शवत आहेत. मैत्रीपूर्ण लढत व्हावी हा त्यांचाच प्रस्ताव होता. सांगोल्यातील नगरपालिका निवडणूकित सुरू असलेल्या घडामोडी वरून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले स्पष्ट शब्दात उत्तर मी सोलापूर जिल्ह्याचा पालकमंत्री असूनही शहाजी बापू पाटील यांनी युती मध्ये लढण्याचा प्रस्ताव दिला नाही. एकदा भेटले तेव्हा त्यांनी मैत्रीपूर्ण लढू अशी भूमिका त्यांनी घेतली. शहाजी बापू जवळचे मित्र आहेत सहकारी आहेत. गावातली परिस्थिती बघून व्यथित झाले आहेत. निवडणुकीत आणि त्यानंतरही आमचे संबंध चांगले राहतील. ते काल ही आमचे मित्र होते उद्याही राहतील. अशी भूमिका घेऊन शहाजी बापू पाटील यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला
125
comment0
Report
TTTUSHAR TAPASE
Nov 21, 2025 08:04:00
Satara, Maharashtra:सातारा - तपोवन मधील झाडे तोडून कुंभमेळ्यासाठी झाडे तोडणे दुर्दैवाची गोष्ट आहे. याला खूप विरोधच करावा लागणार आहे. तुम्ही एक झाड तोडून दहा झाडे लावणार असे फालतू विधान करत असाल तर आम्ही एक झाड तोडू नये यासाठी 100 माणसे मारू पण एक झाड तोडून देणार नाही.. सरकार आपला असून सुद्धा ते बेजबाबदार वागत आहे माझ्या तोंडात शिव्या येत आहेत अशा शब्दात आपला राग व्यक्त अभिनेते सयाजी शिंदे यांनी केला आहे . नागपूरला 45 हजार झाडे तोडणार आहेत,कर्जत मध्ये झाडे तोडणार आहेत. आपल्या डोळ्यासमोर जी झाडे तोडणार आहेत ती आपल्याला वाचवायचे आहेत. नाहीतर माणसं पेटून उठतील मी फक्त निमित्त पात्र आहे. राज्य सरकारने डोळे उघडले पाहिजे, झाडे लावलेल्या हिशोब द्या तर देणार.. तुम्ही काय आवाज उठवला तर त्याचा आवाज दाबला जातो पाहिजे त्याला बोलता आले पाहिजे .. ढोंगी सर्व पक्षातील लोक बोलायला लागले आहेत.. अभिनेते सयाजी शिंदे यांनी आपले खंत मांडली.. बाईट - सयाजी शिंदे
70
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 21, 2025 07:55:18
156
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 21, 2025 07:50:29
Amravati, Maharashtra:काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांकडून नजरकैद केल्याने यशोमती ठाकूर आक्रमक; कृषिमंत्री दत्तामामा भरणे यांच्या विरोधात होणार होते आंदोलन काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी नजर कैदेत ठेवल्याने काँग्रेस नेत्या यशोमती ठाकूर पोलिसांवर संतापल्या असून पोलिसांच्या नजर कैदेत असलेल्या कार्यकर्त्यांना यशोमती ठाकूर यांनी स्वतःच्या गाडीत बसवत परत आणलं आहे. अमरावतीच्या चांदूर बाजार–शिराळा मार्गावर काँग्रेस कार्यकर्ते आंदोलन करणार होहो. पोलिसांनी वर्दीचा गैरफायदा फायदा घेऊ नये पोलिसांना आम्ही घाबरत नाही अमरावतीमध्ये आमदार संजय खोडके यांची दादागिरी चालली आहे अशी टीका यशोमती ठाकूर यांनी आमदार संजय खोडके यांच्यावर केली आहे. खोडके यांना महापालिकेतील खुली जागा हरपायची आहे त्यामुळे हे सगळं ते करत आहे. तसंच आम्ही पोलिसांना घाबरत नाही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे घाबरले त्यामुळे ते सत्तेत गेले मात्र आम्ही शेतकऱ्यांसोबत राहू असे यशोमती ठाकूर म्हणाल्या आहे.
140
comment0
Report
Advertisement
Back to top