Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
DhuleDhule

अर्जेंटीना के कृषी मंत्री ने धुळे के किसानों से मुलाकात की; कृषि सहयोग का संकेत

PPPRASHANT PARDESHI
Nov 05, 2025 10:59:22
Dhule, Maharashtra
अर्जेंटिनाच्या क्रुषी खात्याचे ॲटेच मंत्री मेरीडाने बहरीन यांनी धुळे जिल्ह्यातील केशरानंद जिनींग ला भेट दिली असून, त्यांनी दाऊळ गावातील शेतकरी बांधव यांच्या शेतात जाऊन पाहणी केली. शेतकरी जे काम शेतात करतात आणि ज्याप्रकारे ते हवामान, पाऊस, थंडी आणि उन्हाळा अशा सगळ्या परिस्थितींना सामोरे जातात, ते काम जगात कुठेही अत्यंत कठीण असते. इथे भारतात लोक शेतकऱ्यांबद्दल जो आदर आणि प्रेम बाळगतात, तो खरोखरच कौतुकास्पद आहे, असं त्यांनी उवेळी सांगितले. मला वाटते की भारतात राजकारणदेखील शेतीशी खूप जवळून जोडलेले आहे, कारण शेतकरी हे भारताच्या अर्थव्यवस्थेचा एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहेत, असं बहरीन यांनी सांगितले. माझ्यासाठी इथे येऊन तुम्हाला भेटणे, आणि तुम्ही कापूस कसा पिकवता, शेती कशी करता हे पाहणे, हा एक सन्मान आहे, असल्याचे बहरीन यांनी सांगितले. भारत आणि अर्जेंटिना या दोन देशांमध्ये अनुभवांची देवाणघेवाण करण्यासारख्या अनेक गोष्टी आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 13:27:19
Jalna, Maharashtra:या फूटेजमध्ये मयत तरुणाचे व्हिडीओ आणि फोटो आहे तसेच त्याच्या काकांचा एक बाईट आहे\n\nजालना : ब्रेकिंग\n\nछत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन वरील पिवळ्या बोर्डखाली लघुशंका करताना व्हिडीओ व्हायरल झालेल्या तरुणाची आत्महत्या\n\nमहेश आडे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव\n\nमाफी मागूनही व्हिडीओ व्हायरल होत असल्याने विहिरीत उडी घेऊन संपवले जीवन\n\nव्हिडिओ व्हायरल आणि फोन करून धमकी देणारांवर कारवाईची मागणी\n\nअँकर- काही दिवसांपूर्वी दोन तरुण छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशन इथल्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओतील एका तरूणाने विहिर्ही उडी घेत आत्महत्या केलीये.. महेश आढे असं आत्महत्या केलेल्या तरुणाचं नाव असून तो जालन्यातील परतूर तालुक्यातील ठोकमळ तांडा येथील रहिवासी आहे..\nमहेश आढे आणि त्याचा एक मित्र छत्रपती संभाजीनगर रेल्वे स्टेशनच्या पिवळ्या बोर्डखाली लघवी करत होते. तिथे एका तरुणाने त्यांचा व्हिडीओ काढला. तेव्हा हे दोन तरुण नशेत असल्याचं कळलं. लघवी करतानाचा या तरुणांचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर व्हायरल झाला नंतर दुसऱ्या दिवशी या दोघांचा माफीचा एक व्हिडीओ आला.. ज्यात त्यांनी झालेल्या कृत्याबद्दल माफी मागितली होती.. पण तरीही यांचे व्हिडीओज sगळ्या इंस्टाग्राम वर व्हायरल केले.या व्हिडीओमध्ये या तरुणाचे पत्ते आणि फोन नंबर टाकण्यात आला होता. या मुलांना रोज धमकीचे मेसेज आणि फोन येत होते. त्यामुळे महेश आडे या तरुणाने काल-परवा घरी आणि मित्रांना सांगितलं की मी जीव देईन मला हे सगळं सहन होत नाही. म्हणून त्याने आज गावच्या जवळ असलेल्या विहिरीत उडी मारून जीवन संपवले.दरम्यान ज्यांनी कुणी त्याचे व्हिडीओ व्हायरल केलेत त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी नातेवाईकांनी केली आहे...महेश याने आत्महत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह परतूर येथील रुग्णालयात पडून होता.जोपर्यंत व्हिडीओ व्हायरल करणाऱ्यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा ईशारा मयत महेशच्या नातेवाईकांनी दिला आहे\n\nबाईट : ज्ञानेश्वर आडे,मयत महेशचे काका
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Nov 05, 2025 13:25:54
Ratnagiri, Maharashtra:राजेश सावंत हे चांगले कार्यकर्ते आहेत. पण ते सध्या अडचणीत आले. त्यांच्या मुलीचे लग्न झाले आहे. ती सध्या रत्नाकरती सध्या रत्नागिरीतील नगराध्यक्षपदासाठी इच्छुक आहे. त्यामुळे पक्षाचे काम करताना कुठेही अडचण नको. याचमुळे राजेश सावंत यांनी राजीनामा दिला. त्यांचा राजीनामा मला मिळाला असून मी आणि वरिष्ठ यावरती विचार करू आणि निर्णय घेऊ अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली आहे. चिपळूण येथे राजेश सावंत यांनी चव्हाण यांच्याकडे राजीनामा दिला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या तोंडावर भाजप जिल्हाध्यक्षांनी दिलेला राजीनामा कोकणातल्या राजकीय वर्तुळामध्ये चर्चेचा विषय ठरला. त्यावर आता चव्हाण यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 13:25:33
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये नाल्यात रासायनिक सांडपाणी सोडला जात असल्याचा प्रकार समोर आला आहे. यामुळे हजारो लोकवस्तीस उग्र रासायनिक दुर्गंधी आणि श्वसनाच्या त्रासाचा सामना करावा लागत आहे. एमपीसीबीने केमिकल सोडणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. अम्बरनाथच्या लोकनगरी बायपासच्या बाजूने वाहणारा नाला गोविंद पूलमार्गे शिवगंगानगर, स्वामी देवप्रकाश गार्डन, मोहनपुरम, गुरुकुल शाळेच्या मागून वाहतो. काही दिवसांपासून कोणतीही प्रक्रिया न केलेलं रासायनिक सांडपाणी नालेत सोडलं जातंय; त्यामुळे नाल्याचं पाणी रंगात बदलेल. नाल्यातून केमिकलचा उग्र वास येतोय. या दुर्गंधीमुळे नागरिकांनी पोलिस, अग्निशमन दल आणि एमपीसीबीकडे धावा केल्या आहेत. सामाजिक संस्थांनी प्रदुषण करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. त्यामुळे एमपीसीबीने अंबरनाथ शहर प्रदूषित करणाऱ्यांवर कागदी कारवाई न करून ठोस कारवाई करण्याची गरज आहे. चंद्रशेखर भुयार, अंबरनाथ
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 05, 2025 13:11:56
Nagpur, Maharashtra:नागपूर वृष्टी जैन, वरिष्ठ पोलीस अधिकारी, नागपूर ग्रामीण 3 तारखेला उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीत दोन लोकांचा मृत्यू झाला होता... आणि तेथील स्मशान घाटात त्यांचे अंत्यसंस्कार झाले होते... चार तारखेला त्यांचं कुटुंब अस्थि विसर्जना करता अस्थि करता तिथे गेले होते... मात्र त्यांना तिथे अस्थि ( राख ) भेटली नाही. म्हणून त्यांनी आमच्याकडे येऊन तक्रार केली.. आम्ही त्या वर गुन्हा दाखल.. अंधश्रद्धा कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला उमरेड पोलीस या प्रकरणी तपास करत आहे... आजूबाजूच्या सर्व स्मशानभूमी चेक केले आहे... CCTV ची मदत घेत आहे... तांत्रिक वगैरे आहे का या दृष्टीने ही तपास सुरू आहे अंधश्रद्धेमुळेच हे झालं असेल असा आम्हाला संशय आहे... त्या अनुषंगानेच आम्ही तपास करत आहोत
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 05, 2025 13:03:09
Kalyan, Maharashtra:डोंबिवली टिळक नगर पोलीस ठाण्याच्या पोलीस कर्मचाऱ्याचा वादग्रस्त व्हिडीओ व्हायरल ! पोलीस कर्मचाऱ्याला नागरिकांनी आरोप करत विचारला जाब.. Anc. ठाकुर्ली खबाळपाडा परिसरातील फेरीवाले, दुकानदार, रिक्षा चालक, वॉचमनला टिळकनगर पोलीस स्टेशन मधील एका पोलिस कडून नागरिकांना व फेरीवाल्याना दारू पिऊन पैसे मागितले जाते पैसे दिले नाहीत तर त्रास दिलं जात असल्याचे तेथील नागरिकांनी आरोप केला आहे याबाबत मनसे च्या एका कार्यकर्तेने पोलीस हवालदार ला जाब विचारत व्हिडिओ वायरल केला आहे या या पोलिसाने नागरिकांना त्रास द्यायचा थांबवलं नाही तर त्या पोलिसा विरोधात आम्ही उपोषणाला बसू असा इशारा दिल्याचे या व्हिडिओमध्ये पाहायला मिळत आहे.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 05, 2025 12:41:34
Kalyan, Maharashtra:शहाड पुलाच्या कामामुळे कल्याण शहर ठप्प; वालधुनी–अशोकनगर–शिवाजी नगर–रामबाग–सिंडिकेट परिसरात भीषण ट्रॅफिक, रुग्णवाहिकाही अडकल्या शाहाड रेल्वे उड्डाणपुलाच्या दुरुस्तीच्या कामामुळे शहरातील वाहतूक व्यवस्था पूर्णपणे कोलमडली आहे. वाल्धुनी, अशोकनगर, शिवाजी नगर, रामबाग आणि सिंडिकेट या परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी पाहायला मिळाली. या ट्रॅफिक जामचा सर्वाधिक फटका सामान्य नागरिकांबरोबरच आपत्कालीन सेवांना बसला असून रुग्णवाहिकाही तासन्‌तास कोंडीत अडकल्या. पीक अवर दरम्यान तर परिस्थिती अत्यंत भीषण होती. साधारण 10 ते 15 मिनिटांचा मार्ग पार करण्यासाठी 45 मिनिटांपासून तब्बल एक तास लागल्याची तक्रार नागरिकांनी केली. शाळेच्या बसेस, दुचाकी, चारचाकी, ऑटो–रिक्षा सर्व वाहने कासवचालीने रेंगत होती. काही मुख्य चौकांवर वाहतूक पोलिसांनी कोंडी नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न केला; मात्र भगवान मेडिकल चौकात वाहतूक पोलिसांचा अभावामुळे वाहनधारक आणि स्थानिक नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला. या ठिकाणी नेहमीच कोंडी होते, त्यामुळे येथे वाहतूक पोलीस तैनात करणे अत्यावश्यक असल्याची मागणी नागरिकांनी केली.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Nov 05, 2025 12:29:36
Chandrapur, Maharashtra:गडचिरोली जिल्ह्यातील अहेरीजवळ 'नागेपल्ली' येथील आशीर्वाद हॉस्टेलवर ऐतिहासिक कारवाई, मान्यता नसताना ख्रिश्चन संस्थेने चालविले होते अवैध हॉस्टेल, बहुतांश आदिवासी मुलेमुली होती दाखल, शासकीय पथकाने 91 बालकांचे केले स्थानांतर, जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासन, पोलीस आणि बालकल्याण विभागाची संयुक्त कारवाई. बालकांच्या सुरक्षित भविष्यासाठी आणि अनधिकृत संस्थांवर कारवाईचा बडगा उगारत, गडचिरोली जिल्हा प्रशासनाने अहेरी तालुक्यात मोठी आणि निर्णायक कारवाई केली आहे. शासकीय सर्वेक्षणात अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील आय. टी. आय. (ITI) जवळ असलेले 'आशीर्वाद हॉस्टेल' हे अनधिकृत बालगृह असल्याचे उघड झाले. या संस्थेवर धाड टाकून 49 मुली व 42 मुले अशा एकूण 91 निराधार बालकांना ताब्यात घेऊन त्यांच्या सुटका करण्यात आली आहे. ही संस्था बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम तरतुदींचे सर्रास उल्लंघन करून विनापरवाना चालवत होती. अशा विनापरवाना संस्थांमध्ये बालकांना डांबून ठेवून त्यांचे शारीरिक, मानसिक किंवा लैंगिक शोषण होण्याचा धोका असल्याने, प्रशासनाने तातडीने कठोर भूमिका घेतली. 11 वर्षांपासून सुरू असलेल्या या हॉस्टेलमध्ये एकूण 90 मुले (48 मुली, 42 मुले) दाखल असल्याचे आढळले. संस्थेकडे कोणतीही अधिकृत मान्यता किंवा नोंदणी प्रमाणपत्र नव्हते. या संस्थेत केवळ ख्रिश्चन धर्म प्रसाराचे साहित्य आढळून आले. अनधिकृत संस्थेतील सर्व संबंधित दस्तऐवज तातडीने ताब्यात घेण्यात आले. सर्व बालकांना सुरक्षितपणे ताब्यात घेऊन पुढील कार्यवाहीसाठी तात्पुरत्या निवारा आणि पुनर्वसनाची व्यवस्था करण्यात आली आहे.
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Nov 05, 2025 12:06:46
Jalna, Maharashtra:जालना : सुरक्षा रक्षकाकडून 60 वर्षीय वृद्धाला अमानुष मारहाण, उपचारादरम्यान मृत्यू; मध्यरात्री गुन्हा दाखल, भोकरदन बस स्थानकावरील घटना अँकर : जालना जिल्ह्यातील भोकरदन शहरातील बस स्थानकावर एक धक्कादायक घटना घडली आहे. बसस्थानकामध्ये सुरक्षा रक्षकाने केलेल्या मारहाणीत 60 वर्षीय मजीद खा अन्वर खा या वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झालाय. मजीद खा लघुशंकेसाठी जात असताना सुरक्षा रक्षक सुरेश वनारसे याला संशय आला. त्याने कोणतीही चौकशी न करता लाठीने वृद्धाला बेदम मारहाण केली.यानंतर गंभीर जखमी अवस्थेत नागरिकांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं.या घटनेची माहिती पोलिसांना रात्री उशिरा मिळाली, त्यानंतर भोकरदन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.मात्र उपचारादरम्यान पहाटे मजीद खा यांचा मृत्यू झाला.या घटनेनंतर परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं आहे. नागरिक आणि नातेवाईकांनी आरोपीवर खूनाचा गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला आहे.
0
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 05, 2025 11:42:38
Ambernath, Maharashtra:अंबरनाथमध्ये प्रदूषणाचा रात्रीस खेळ चाले! रात्री २ वाजेपर्यंत एमपीसीबी अधिकाऱ्यांकडून पाहणी अंबरनाथमध्ये मंगळवारी रात्री पुन्हा एकदा प्रदूषणकारी कंपन्यांनी गॅस उत्सर्जन केल्यामुळे संपूर्ण शहरात रासायनिक धूर और उग्र दर्प पसरला होता. याची तक्रार एमपीसीबीकडे केल्यानंतर रात्री २ वाजेपर्यंतएमपीसीबी अधिकाऱ्यांनी संपूर्ण अंबरनाथ शहरात प्रदूषणाची पाहणी केली. अंबरनाथच्या मोरीवली एमआयडीसीतून मागील काही दिवसात सातत्याने गॅस सोडण्याच्या घटना घडत असून एमपीसीबी कडून कंपन्यांवर कारवाई होऊन देखील प्रदूषण मात्र कायम आहे. मंगळवारीही मोरीवली एमआयडीडीसीतून अशाच पद्धतीने सोडण्यात आलेला गॅस संपूर्ण अंबरनाथ शहरात पसरला होता. याची माहिती एमपीसीबी अधिकाऱ्यांना देताच एमपीसीबी अधिकाऱ्यांनी निसर्ग ग्रीन परिसरात येऊन रात्री दोन वाजेपर्यंत पाहणी केली. या प्रदूषणकारी कंपन्यांवर केवळ कागदी कारवाई न करता कठोर कारवाई तातडीने करावी अशी मागणी नागरिकांनी केली. त्यामुळे एमपीसीबीच्या कारवाईलाही न घाबरणाऱ्या प्रदूषणकारी कंपन्यांवर काय कारवाई होते, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 05, 2025 11:42:02
Nagpur, Maharashtra:नागपुर नागनदी के प्रश्न पर कांग्रेस ने नागपुर में पर्यावरण विभाग को निवेदन दिया। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ने देशभर की प्रदूषित नदियों की सूची जारी की है, जिसमें नागपुर की नागनदी का उल्लेख नहीं है। कांग्रेस ने इस मुद्दे पर केंद्रीय पर्यावरण मंत्रालय पर निशाना साधा है। महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस के सचिव केतन विकास ठाकरे के नेतृत्व में कांग्रेस कार्यकर्ताओं ने पर्यावरण विभाग के अधिकारियों को 9 सील बंद Botty में नाग दी के दूषित पानी के नमूने सौंपे। कांग्रेस कार्यकर्ताओं ने Civil Lines, नागपुर स्थित केंद्रीय सचिवालय के पर्यावरण विभाग में धावा बोला। कांग्रेस के प्रतिनिधि मंडल ने नाग नदी के विविध स्थानों से इकट्ठे किए गए दूषित जल नमूनों को पर्यावरण मंत्रालय के अधिकारियों को सौंपा और केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव के नाम एक निवेदन भी दिया। नाग नदी की वास्तविक स्थिति और प्रदूषण स्तर आधिकारिक रिकॉर्ड में प्रतिबिंबित नहीं होने का मुद्दा कांग्रेस ने गंभीरता से उठाया। केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ ने हाल ही में देशभर के 271 प्रदूषित नदियों की सूची जारी की है, जिसमें महाराष्ट्र के 54 नदियाँ शामिल हैं, फिर भी नागपुर की नाग नदी इस सूची में नहीं होने पर स्थानीय नागरिकों और पर्यावरण प्रेमियों के अनुसार स्थिति अत्यंत दयनीय है। वहां का पानी गंभीर रूप से दूषित है और स्वास्थ्य के लिए हानिकारक माना जाता है। निरंतर दुर्गंध, कचरा और शहर के untreated wastewater के प्रवाह के कारण नाग नदी का स्वरूप पूरी तरह बदल गया है। इस स्थिति में इस नदी को प्रदूषित नदियों की सूची में स्थान न मिलना पर्यावरण विभाग के अधिकारियों की कार्यशैली पर सवाल उठाता है।
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 05, 2025 11:41:22
Baramati, Maharashtra:पुण्याच्या इंदापुरात राजकीय घडामोडींना वेग.... शहा परिवाराकडून घरोघरी जात प्रचाराचा शुभारंभ...... माजी नगराध्यक्ष अंकिता शहा करतायेत भरत शहांचा प्रचार..... पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा नागरिकांसमोर मांडण्याचा प्रयत्न..... माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार.... इंदापूर नगर परिषदाच्या निवडणुकीकरिता नगराध्यक्ष पदासाठी इंदापूर मधील शहा परिवार मैदानात उतरला आहे. शहा परिवारातील इंदापूर नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष भरत शहा हे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत. नगरपरिषदेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर होताच इंदापूर मध्ये राजकीय घडामोडींना वेग आला असून शहा परिवारांन प्रचाराचा शुभारंभ देखील केलाय.... माजी नगराध्यक्ष अंकिता मुकुंद शहा आणि वैशाली शहा यांसह शहा समर्थक घरोघरी जाऊन पाच वर्षात केलेल्या कामाचा लेखाजोखा जनतेसमोर मांडत आहेत.शहा परिवारातील अंकिता मुकुंद शहा या इंदापूर नगरपरिषदेच्या 2017 साली झालेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या चिन्हावर निवडून आलेल्या नगराध्यक्ष होत्या. मागील पाच वर्ष इंदापूर नगर परिषदेवरती शहा परिवाराची सत्ता राहिली आहे. आता त्याच कुटुंबातील माजी उपनगराध्यक्ष भरत शहा नगराध्यक्ष पदासाठी मैदानात आहेत.
0
comment0
Report
Advertisement
Back to top