Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

मराठवाड़ा में अचानचालू बरसात-तडाके ने गहूं, मक्का और फलों की फसलें बर्बाद कर दीं

VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 03:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडवली आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया गेले आहेत.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KJKunal Jamdade
Mar 20, 2026 04:16:38
Shirdi, Maharashtra:अहिल्यानगर जिल्ह्यातील कोल्हार गावात देवांचे सोंग नाचवण्याची अनोखी परंपरा अनेक दशकांपासून जपली जातेय.. बिरोबा देवाच्या यात्रेच्या निमित्ताने गुढीपाडव्याच्या दिवशी भरणारी हि यात्रा सर्वांसाठी आकर्षण असते.. गुढीपाडव्यापासून महाराष्ट्रातील ग्रामीण भागात यात्रा जत्रांचा माहोल असतो.. अनेक गावात अनोख्या परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.. राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द गावात अनेक दशकांपासून देवांचे सोंग नाचवण्याची परंपरा आजही मोठ्या उत्साहाने जोपासली जात आहे.. सुत्रधार, विदूषक, गणपती सरस्वती यांच्या सोंगाने या आखाडीला सुरूवात होते आणी रात्रभर विष्णूचे दशावतार आणी विविध सोंग नाचत येतात.. हि कला बघण्यासाठी जिल्ह्यासह राज्यभरातून नागरिक आवर्जून हजेरी लावतात.
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Mar 20, 2026 04:16:11
Amravati, Maharashtra:वीज थकबाकीदारांना स्मार्ट मीटरची शिक्षा; वसुलीसाठी महावितरण आक्रमक, जुने मीटर काढायला सुरुवात अँकर :- वीज बिल थकवणाऱ्या ग्राहकांवर महावितरण ने कडक भूमिका घेत वसुली मोहिमेला गती दिली आहे. थकबाकी वाढत असल्याने अशा ग्राहकांचे थेट वीज मीटर काढण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. महावितरणकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक मिळून लाखो ग्राहकांकडे कोट्यवधी रुपयांची थकबाकी आहे. त्यामुळे थकबाकी वसुलीसाठी आता आक्रमक पावले उचलली जात आहेत. कारवाई अंतर्गत थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करून मीटर काढले जात असून, पूर्ण थकबाकी आणि पुनर्जोडणी शुल्क भरल्याशिवाय पुन्हा वीजपुरवठा सुरू केला जाणार नाही. याशिवाय संबंधित ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचे निर्देशही देण्यात आले आहे. ज्यामुळे पुढील थकबाकी टाळण्याचा प्रयत्न आहे. दरम्यान, काही ठिकाणी अनधिकृत वीज वापराचे प्रकारही समोर आले असून अशा प्रकरणांवर कडक कारवाईचा इशारा देत, वीज चोरी करणाऱ्यांवर कायदेशीर गुन्हे दाखल करण्याची तयारी महावितरणने दर्शवली आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 20, 2026 04:05:22
473
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:50:08
Nagpur, Maharashtra:नागपूर - शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे कामे, त्यामुळे सुट्टीत कामे केल्याच्या बदल्यात विशेष सुट्टीची मागणी - १६ मे ते १५ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश - डिजिटल जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही होणार - सुट्टीत मुख्यालय सोडता येणार नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश - ३० एप्रिलला शैक्षणिक सत्र समाप्त, २ मेपासून सुट्ट्या सुरू, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात - उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना कामावर हजर राहावे लागणार, निवडणुकांनंतर पुन्हा शासकीय कामात शिक्षक गुंतणार - सुट्टीतील कामाच्या बदल्यात विशेष रजेची शिक्षकांची मागणी, बाहेरगावी जाण्याचे नियोजन बिघडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी - जनगणना कामासाठी शिक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश
930
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:49:51
1038
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 03:48:58
1007
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 03:33:54
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिले के सांगोला तालुक्यात अवकाळी गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तर माजी आमदार दीपक साळुंखे यांची तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. सांगोल्याच्या पूर्व भागातील सहा गावांना अवकाळी आणि गारपीटने जोरदार झोडपले आहे. या मध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागा डाळिंब, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. सोमवारी याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
982
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 02:45:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार दोस्तीतील कुस्ती सुरू असल्याच दिसून येत आहे. राष्ट्रवादी गटनेचे आदिल फरास आणि शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख हे भर सभागृहात एकमेकाला बघून घेण्याची भाषा करण्याबरोबरच चौकात ये तुला दाखवतो अशी धमकी देखील देत आहेत. या टोकाच्या वादानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वाद मिटवला जाईल अस आश्वासन दिल आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्यामुळे माफी मागत असल्याचं म्हटलय. जर का या दोघांमधील वाद मिटले नाही तर कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानात या दोघांची कुस्ती लावू अशी टिप्पणी करत उपरोधिक चिमटा काढला आहे.
935
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:55
1071
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत भविष्यात शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणत सत्तेला सुरुंग लागू नये यासाठी राष्ट्रवादी आणि अपक्षांना सभापती पदासह स्थायी समितीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रयत्न करूनही शिवसेना सत्तेत येऊ शकले नाही त्यामुळे शिवसेना दुखावली आहे आणि सातत्याने भाजपची या सत्तेत अडचणी निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करू शकते, त्यामुळं ज्यांनी ज्यांनी सत्ता स्थापन करताना भाजपला मदत केली ते जर फुटले तर भाजपाला धोका होऊ शकतो, त्यामुळे भाजपने सावध खेळ सुरू केली आहे , सत्ता स्थापनेत ज्यांनी साथ दिली अशा सगळ्यांना काहीतरी देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे...
1042
comment0
Report
Advertisement
Back to top