Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001

जमीन के दावे के विवाद में पूर्व सरपंच दादा पठान की हत्या, एक आरोपी गिरफ्तार

VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 03:22:03
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
गावातीलच जमिनीवरील ताब्यावरून अनेक वर्षापासून सुरू असलेल्या वादातून अकरा जणांच्या गावगुंडांच्या टोळीने जटवाडा रस्त्यावरील ओव्हरगावचे माजी सरपंच दादा सांडू पठाण यांची बुधवारी क्रूरपणे हत्या केली. एकीकडे पठाण यांच्या कुटुंबातील महिला हल्लेखोरांना हात जोडून वाद मिटवण्यासाठी विनवण्या करत होत्या. तेव्हा डोक्यात गुंडगिरी भिनलेली क्रूर टोळी मात्र लाठीकाठा, लाठांनी पठाण यांच्यासह त्यांच्या दोन्ही मुलांवर घात घालत होती. यात पठाण यांचा मृत्यू झाला. याबाबत रात्री एकास अटक झाली. बाकीचे हल्लेखोर पसार आहेत. पठाण यांच्या कुटुंब मूळ ओव्हरगावचेच असून, घरासमोरच त्यांची शेती आहे. काही अंतरावर शाळेजवळ त्यांच्या जमीन आहे. या जमिनीच्या शेजारून एक वाट जाते. सुरुवातीला आरोपींच्या टोळीने या छोट्या वाटेवरून वाद घालण्यास सुरुवात केली. कालांतराने पूर्ण जमिनीवरच दावा करण्यास सुरुवात केली. यातून अनेकदा वाद झाले. बुधवारी पठाण यांनी जमिनीचे सपाटीकरण करण्यासाठी जेसीबी बोलावला. दहा ते अकरा जणांच्या टोळीने पठाण यांच्यावर लाठीकाठ्या, रॉडने हल्ला केला. दादा पठाण जागीच मरण पावले.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Dec 18, 2025 09:45:47
Nagpur, Maharashtra:नागपूर बाईट विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते On प्रज्ञा सातव - हा धक्का वगैरे अजिबात नाही.. स्वार्थी लोक आहेत, खरंतर आमचे कुटुंबातील एक व्यक्ती आणि त्यांना विधान परिषदेला पूर्णवेळ दिलं... एवढं सगळं काँग्रेसने दिलं ---- कुटुंबाकडे राहुल गांधी यांचे एक भावनिक संबंध होते पण मला वाटत नव्हतं की हे सर्व विसरून प्रज्ञाताई हा निर्णय घेतील, त्यामध्ये नेमका काय राजकीय स्वार्थ आहे हे कळत नाही ---- पाच वर्षाची आमदारकी शिल्लक होती, अशा परिस्थितीत हा निर्णय घेणार कुठेतरी काही अडचण आहे का आता आम्ही त्यापर्यंत गेलो नाही, तो विषय आमच्या पुढे सध्या नाही पण पक्षाने सर्व देऊन त्यांच्या कुटुंबाला, असं एक समर्पित काँग्रेसचे घराणं होतं ---- प्रज्ञाताई सोबत फार कार्यकर्ते गेले असं नाही, त्यांचं संघटनेतही फार योगदान आहे असं नाही, पण राजीव सातव यांची अर्धांगिनी म्हणून तेवढाच एक त्यांचा संबंध पक्षाशी आहे (On काँग्रेस परिषद विरोधीपक्ष नेते दावा - जाणार) ---- हे तर आता अडवण्याचा काम आहे, राज्याच्या मुख्यमंत्र्यांना विरोधी पक्ष नेता नको आहे,... विरोधी पक्ष नेत्याशिवाय सरकार चालवायचा आहे असा त्यांना प्रयोग करायचा आहे.. m त्यामुळे कदाचित ती बाजू सुद्धा असू शकते की त्यांच्या राजीनामे मागे वरच्या हाऊसचा विधान परिषदेचा विरोधी पक्ष नेता हा काँग्रेस पासून दूर नेता येईल ---- तिथे काही अट नव्हती, आमदारा आमच्याकडे होते, या अधिवेशनात ते करू शकले असते, हे ठीक आहे खाली अडचण आहे दहा टक्के ची अट पूर्ण होऊ शकत नाही पण वर कुठे होते ---- दानवे गेल्यानंतर एवढा वेळ का घालवला (On अशोक चव्हाण आरोप नाना पटोले त्यावेळेस राजीनामा दिला म्ह्णून वेळ आली) --- यामध्ये अर्धसत्य आहे.. की त्यावेळ त्यांनी (नाना पटोले) राजीनामा दिला नसता तर ही घटना घडली नसती असं म्हटलं जातं...., परंतु शिंदे साहेबांनी ज्यावेळी शिवसेना फोडली त्यामुळे हा विषयच नाही, त्यामुळे याला फार काही या भूमिकेला महत्त्व देण्याची गरज वाटत नाही (On कोकाटे - सिडको) ---- कोकाटे संदर्भात सरकारची भूमिका ही कायद्याला धरून नाही... कायदा पायदळी तुडवण्याची भूमिका आहे न्यायालयाचा अवमान करणारी भूमिका आहे. संविधानाला न जुमानणारी भूमिका आहे आणि ही भूमिका म्हणजे न्यायालयापेक्षा सरकार मोठे आहोत.. आम्ही कोणालाही जो मानत नाही आम्हाला वाटेल ते आम्ही करू अशी ती भूमिका आहे --- जर सुनील केदार यांचा आमदारकी 24 तासाच्या आत रद्द केल्या जाऊ शकते, राहुल जी चे घर खाली केल्या जाऊ शकते.. तर जे काही अभय दिल्या जातात या सरकारला वाटतं की सरकारमधील एक मंत्री गजाआड होताना आमची मान खाली झुकेल आणि महाराष्ट्रातील जनतेपुढे त्यांचे मान नक्कीच खाली झुकलेली आहे ---- त्या पलीकडे जाऊन सांगतो इथे काहीही करा, उद्या कोणाचे मर्डर केले तरी ते बेलवर आहेत म्हणून सरकारमध्ये उद्या उपमुख्यमंत्री वगैरे झालेले भविष्यात तुम्हाला दिसतील, कारण कितीही मोठा गुन्हा केला तरी त्याला वाचवण्याचा प्रयत्न होईल आणि तो सुरू आहे तो अनेक केस मध्ये आहे (On धनंजय मुंडे शहा भेट... -तटकरे यांना माहित नाही) - ---सर्वांना सर्वच माहित आहे..पण राजीनामा मागील कोण आणि घेईल कोण? राहिला धनंजय मुंडे यांचा विषय त्यांचा रिप्लेस म्हणून घेत असतील तर त्यांचा प्रश्न आहे - त्यांना राजीनामा का द्यावा लागला? येथून नव्याने सुरुवात करावी लागेल, परंतु आज तरी मला वाटतं की त्यांचा नंबर लागतो की नाही या संदर्भात कुठे स्पष्ट भूमिका नाही (On मुंबई शरद पवार- ठाकरे युती - काँग्रेस एकटी) ---- यातून भूमिका पुढे येताना दिसतंय, आमच्या मुंबईच्या लोकांना वाटते की आम्ही मनसे -shivaji sena सोबत आघाडी करायची नाही..त्यांनी ती भूमिका स्वीकारली आहे, मुंबईला स्वतंत्र प्रदेश अध्यक्षपद आहे, वर्षा ताईंची तन् नेत्यांबरोबर बैठक झाली त्यांनी एक नाही दोन नाही तीनदा ही भूमिका स्पष्ट केली आहे त्यामुळे काय होईल कोण कोणाबरोबर जाईल कोणाची नव्याने युती होईल कोणती नवी आघाडी होईल त्यापेक्षा काँग्रेसची भूमिका स्पष्ट आहे - प्रत्येकाचा अनुभव वेगळा असतो, त्यांचा (वर्षा गायकवाड) अनुभव वेगळा आहे, त्यांनी त्यांचा अनुभव क्लिअर केलाय उलट पक्षाला मनसेमुळे नुकसान होईल अशी त्यांची भूमिका मांडली आहे (On नाशिक मनसे -काँग्रेस युती - ) --- स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत वेगवेगळी भूमिका तिथली मंडळी सोयीनुसार घेतात, ती कदाचित त्यांच्या सोयीची आहे, म्हणून त्यांनी ती भूमिका घेतली असावी (सanjay raut. on.शरद पवार-अजित पवार हातमिळवणी) - 2014 पासून महाराष्ट्रातला राजकारण नासावल गेल आहे, हे सडक राजकारण झालय, राजकारणाला संस्कार राहिले नाहीत, कृती राहिली नाही, इमानदारी नाही राहिली, मैत्री राहिली नाही ...- राजकारणात आता गुन्हेगारी सुद्धा जवळची वाटायला लागली आहे, त्यामुळे परिस्थितीनुसार सोयीने सगळ्या गोष्टी चालल्या आहेत, हे महाराष्ट्राच्या Rajakiya संस्कृतीला खड्ड्यात घालणार आहे हे आता स्पष्ट होत आहे (On शरद पवार मनसेसोबत जा सूचना) - मला माहित नाही, मी माहिती घेऊन सांगतो (On संजय शिरसाट /सातव - ) - संजय शिरसाट यांना माहिती कुठून मिळाली हे माहित नाही, ज्यांना निवडून न येता आहे ती आमदारकी विधान परिषदेची मिळत असेल, वाढलेलं ताट मिळतं, स्वयंपाक करायची गरज नाही आणि हाताला काही चटके लावून घेण्याची गरज नाही (On सिडको - कंत्राटदार) --- मला माहित नाही मी काही त्यातला मेंबर नाही, आणि मी काही घरं घेतली नाही, मी एकदाच आमदाराला जे मिळतं म्हाडाच्या घरातून ते घर एकदा घेतलाय, एकच वेळा कारण माझा मुंबईत कुठलाही घर नव्हता त्यामुळे कुठली कोणती सोय घेतो सोय न करतो - आता विदर्भातील एका आमदाराने केला आहे, त्याच्यावर गुन्हाही दाखल झालाय आणि हायकोर्टात केसही आहे, त्यामुळे अनेक जणाला ती माहिती आहे, तो चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार आहे आणि त्यांनी सुद्धा असाच फायदा घेतलेला आहे आणि त्याचे केस हायकोर्ट पेंडींग आहे, त्यामुळे कोण काय करतो --- सत्तेत राहून सगळं चालतं, विरोधात अजिबात चालत नाही, महाराष्ट्र लुटून खाल्ला तरी सत्तेत ऑल बेल आहे परंतु विरोधकांनी छोटीशी चूक केली तरी त्याला सोडता कामा नये हे नव राजकारण महाराष्ट्रात प्रचंड रुजत चाललेला आहे (On महापालिका निवडणूक विदर्भ - ) - नागपूर- चंद्रपूर मध्ये आम्ही समाविचारी पक्षांशी वाटाघाटी सुरू आहेत.. आणि दोन-तीन दिवसात त्या संपूर्ण वाटाघाटी पूर्ण होतील - वंचित सोबत देखील चर्चा सुरू आहे =On चंद्रपूर आमदार घर) - मला वाटतं त्यांना विचारावं त्यांचे उत्तर मी काय देऊ शकेल (On सिडको -) - आता सगळं चाललेला आहे आभाळ फाटलेला आहे शिवणार कुठून चादर फाटली तर शिवता येईल आभाळ फाटलेला आहे आणि आभाळा एवढं सगळं काम चाललेलं आहे - सगळी स्वायत्तता संपुष्टात आली आहे आणि जे मिळेल सरकार ते अधिकारी करतात काँट्रॅटदीय करतात त्यामुळे महाराष्ट्र हे एकदम स्वच्छ कारभार करणारा महाराष्ट्र अशी बिरुदावली लावून घेण्यासाठी सगळे मोकळे आहेत
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Dec 18, 2025 09:45:17
Baramati, Maharashtra:बारामती नगरपरिषद निवडणूक जेडीईव्हेडीत तपशील: बारामतीतील उमेदवारांचे मतांमध्ये परिवर्तन आणण्याचा विश्वास. आमच्या उमेदवारांना निवडून द्या तर पाणीपट्टी, घरपट्टी थांबवण्याचे पहिले आश्वासन असेल. बारामतीत विकासाचा दिसणारा भाग असला तरी आतमध्ये विकास झालेला नाही; स्थानिक नगरसेवकांनी वर्षे काहीच केले नाही. परदेशात जसे हॉकर्सचे क्वालिटी झोन तयार करण्याचा आशय, कमी खर्चात जागा देण्याचे प्रयत्न, कचरारोगी वाहने वेळेवर येईल याचे काम. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार साहेबांचा पक्ष आणि मित्र पक्ष बारामतीकरांसाठी पर्याय म्हणून उभे आहेत. लोकशाहीत विरोधक असला पाहिजे आणि विरोधी निवडून गेली तरच नागरिकांचे प्रश्न मार्गी लागतील. उद्या सांगता सभा, शशिकांत शिंदे व मेहबूब शेख उपस्थित असणार.
0
comment0
Report
ABATISH BHOIR
Dec 18, 2025 09:40:53
Kalyan, Maharashtra:मनसे नेते राजू पाटील यांची आमदार वरुण सरदेसाईची भेट. येणाऱ्या निवडणुकीतच्या पार्श्वभूमीवर मनसे नेते ची भेट. ठाकरे गट–मनसे केडीएमसी निवडणूक एकत्र लढविण्याची इच्छा लवकरच निर्णय होणार - आमदार वरूण सरदेसाई यांची माहिती ठाकरे गट आणि मनसे केडीएमसीची आगामी महानगरपालिका निवडणूक एकत्रितपणे लढवन्याच्या हालचालीना वेग याच पार्श्वभूमीवर आमदार वरूण सरदेसाई यांनी मनसेचे नेते राजू पाटील यांची भेट घेतली. यावेळी बोलताना वरूण सरदेसाई म्हणाले की, केडीएमसीची निवडणूक आम्ही संपूर्ण ताकदीने लढवणार आहोत. मनसेला आणि शिवसेनेला मतदान करणारा मोठा वर्ग आहे. कल्याण डोंबिवली मध्ये आहे लोकसेभा निवडणुकीला मोठ्या प्रमाणात मतदान सेनेला झालं होतं ठाकरें बंधूंवर प्रेम करणारा वर्ग मोठ्या प्रमाणात कल्याण–डोंबिवलीत राहतो. त्यामुळे ठाकरे बंधू एकत्र आल्यास त्याची ताकद नक्कीच दिसून येईल.
0
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Dec 18, 2025 09:14:40
Ratnagiri, Maharashtra:मुरुड समुद्रकिनारे पर स्टंटबाजी के खिलाफ पुलिस प्रशासन ने कड़ी कार्रवाई शुरू कर दी है। दापोली थाना के पुलिस निरीक्षक महेश तोरस्कर ने स्पष्ट कहा कि मुरुड बीच पर स्टंटबाजी को चलने नहीं दिया जाएगा। समुद्रकिनारे वाहन लाने पर रोक है और नियम उल्लंघन करने वालों के विरुद्ध मोटर वाहन कानून की कड़ी धाराओं के अंतर्गत कार्रवाई शुरू कर दी गई है। अनधिकृत प्रवेश रोकने के लिए प्रमुख मार्गों पर बैरिकेड्स लगाए गए हैं और भीड़ के समय स्थायी पुलिस बल तैनात है। नियम उल्लंघन करने वालों पर तात्कालिक दंडात्मक कार्रवाई होगी। पर्यटक नियमों का पालन करें और मुरुड बीच की सुरक्षा तथा शांति बनाए रखें, यह संदेश पुलिस निरीक्षक तोरस्कर ने दिया।
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 08:50:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.... अंबादास दानवे यांची पत्रकार परिषद... ON संजय शिरसाठ चौकशी.... मी संजय शिरसाठ यांना प्रश्नच केला नव्हता.या प्रकरणात सहभागी असलेल्या लोकांचा चौकशी समितीमध्ये सहभाग नोंदवला आहे. मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं हाय पावर कमिटी स्थापन करणार आहे मात्र ही कोणती हाय पावर समिती आहे हे लोक पालकमंत्र्यांची चौकशी कशी करणार या कमिटीमध्ये निवृत्त न्यायाधीश आणि बाहेरच्या अधिकारी असायला पाहिजे अशी आमची मागणी आहे या संदर्भात मी मुख्यमंत्र्यांना या संदर्भात पत्र देणार आहे मला असं वाटतं ki मी त्यांना सल्ला मागितला नाही मी त्यांना प्रश्न देखील केला नाही माझा सरकारला सवाल केला आहे या प्रश्नाला सरकार उत्तर देईल. स्थापन केलेल्या चौकशी समिती समोर मी पुरावे सादर करणार आहे ON प्रज्ञा सातव प्रवेश... विधान परिषदेमध्ये असं प्रघात नाहीये, काँग्रेस किंवा भाजपचा हा अंतर्गत प्रश्न आहे प्रज्ञा सातव्या काँग्रेसच्या सदस्य आहेत त्यावर आम्ही बोलणं योग्य होणार नाही. विधान परिषदेमध्ये संख्या कितीही हो आमचं महाविकास आघाडी म्हणून विधानसभेत परिषदेमध्ये काँग्रेसचा विरोधी पक्ष नेता व्हावा असा प्रस्ताव आम्ही दिला आहे ON सातारा ड्रग्स प्रकरण... या ट्रक प्रकरणाची चौकशी होण्याची गरज आहे या प्रकरणात जे नाव येत आहे त्याचे धागेद्वारे मुख्य उपमुख्यमंत्र्यापर्यंत पोहोचत आहे कारण तिथला रिझल्ट तिथे काम करणारे लोक या प्रकरणात ज्यांनी या लोकांना काम करायला बोलावलं त्यांना नाही तर तिथल्या लोकांना अटक करत आहेत साताऱ्याचे पोलीस अधीक्षक यांची ही जबाबदारी होती मात्र मुंबई पोलिसांनी इथे कारवाई केली आहेत याचा अर्थ सातारा पोलिसांचा यात सपोर्ट होता ON सिडको टेंडर घोटाळा.... मला असं वाटतं महाराष्ट्रातच हे सुरू आहे मागच्या तीन-चार वर्षांमध्ये राज्यात გुत्तेदार ठरवून टेंडर ठरवले जात आहेत या प्रकरणात मी उदाहरण दिलं आहे मेघा इंजीनियरिंग 13000 कोटीचा टेंडर 16000 कोटीला देण्यात आला आहे यामुळे इथल्या महानगरपालिकेपासून राज्यातल्या सर्वच ठिकाणी गुत्तेदार समोर ठेवून टेंडर ठरवले जात आहेत या टेंडरची चौकशी झाली तर समोर येईल मनपा मध्ये कोणत्या कंपनीला कचऱ्याचे टेंडर मिळेल की मी अगोदरच सांगितलं होतं ते तसंच झालं ON आमदार सिडको घर... आमदार खासदारांना मुंबईत घर असावं या हा उद्देश याचा आहे काही आमदार खरंच गरीब आहेत सगळेच गरीब आहे असं मी म्हणणार नाही मात्र काही आमदार खरंच गरीब आहे त्यांना मिळालं तर यात वावरा असण्याचे कारण नाही ON कुडाळकर... ही केस अनेक दिवसांपासून सुरू होती या प्रकरणात आता निकाल लागला आहे म्हाडाच्या आरक्षित भूखंडामध्ये कॉम्प्लेक्स बांधला आहे काही सदनिका बांधले आहेत याचे परिणाम कुडाळकरांना भोगावे लागणार आहे. ON पैठण जादूटोणा.... जादूटोणा करणारे लोक तुम्हाला माहित आहे जादूटोणा करणारी कंपनी कोणती आहे हे तुम्हाला माहित आहे शिवसैनिक बाळासाहेबांचा आहे प्रबोधनकारांच्या विचारांचा आहे जादूट होणे शिवसेनाप्रमुखांच्या विचारात कधीच नव्हते ON भाजप सेना युती.... आम्हाला अनेक उमेदवारांचे फोन सुरू आहेत आम्हाला भाजप सेनेकडून मादवारी मिळाली नाही तर आम्हाला उमेदवारी मिळेल का असा विचारणा केली जात आहे. त्या लोकांना आम्ही प्रतिक्रिया दिली नाही मात्र असे फोन आम्हाला सुरू आहेत एवढेच मी तुम्हाला सांगत ON वाल्मीक कराड.... वाल्मीक कराड हा धनंजय मुंडे यांचाच माणूस आहे. नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांना वानभेद कराडची आठवण झाली. वाल्मीक कराड सुटला तर हत्तीवरून साखर वाटण्याची तयारी मुंडे यांच्या बगलबच्चानी केली होती. धनंजय मुंडे किंवा वाल्मिक कराड असो वाल्मीकरांचा या प्रकरणात थेट संबंध आहे वाल्मीक कराडचा जामीन झाला नाही ते चांगलं झालं. ON धनंजय देशमुख.... धनंजय देशमुख या प्रकरणातच माझी भेट घ्यायला आलेले आहेत. ON दोन राष्ट्रवादी एकत्र.... अजित दादाच्या राष्ट्रवादी बरोबर पवार साहेबांचे राष्ट्रवादीने जाणं म्हणजे अजित पवार हे भाजपला मदत करत आहेत महाविकास आघाडी म्हणून एकत्र लढले पाहिजे अशी आमची भूमिका आहे मग काँग्रेस असो किंवा राष्ट्रवादी असो आणि आमची शिवसेना अशा पद्धतीने आपली आघाडी व्हावी असा आमच मत आहे. ON शरद पवार संजय राऊत भेट... मी जे बोललो त्याचाच तो भाग असू शकतो सगळ्यांनी मिळून ही निवडणूक लढवली पाहिजे.
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 18, 2025 08:31:20
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या देवळा शिवारात मुंबई आग्रा महामार्गावर चिंचवे चौफुलीवर अपघात - दुचाकीस्वाराचा बळी चिंचवे चौफुली, नाशिक: नाशिकच्या देवळा तालुक्यातील मुंबई आग्रा महामार्गावर चिंचवे चौफुली कामानिमित्त बाहेरून घरी परतत असताना वसंत पवार हे चिंचवे येथील मुख्य चौफुलीवरील धोकादायक डिव्हायडर ओलांडत होते. त्याच वेळी चांदवडच्या दिशेने अतिवेगात आलेल्या अज्ञात वाहनाने त्यांना उडवले. डोक्याला जबर मार बसून ते रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर कोसळले. जखमी अवस्थेत पवार यांना रुग्णवाहिकेतून मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच वाटेतच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर चिंचवे परिसरात तीव्र संताप उसळला आहे. याठिकाणी तातडीने स्ट्रीट लाईट बसवावेत, रस्त्यावरील सुरक्षा उपाय पूर्ण करावेत व कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अन्यथा मोठे आंदोलन छेडण्यात येईल, असा स्पष्ट इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 18, 2025 08:20:44
Nagpur, Maharashtra:नागपूर - महापालिका निवडणुकीत ३० टक्क्यांपेक्षा अधिक नवीन आणि तरुण चेहऱ्यांना भाजप संधी देण्याचा तयारीत - महापालिका निवडणुकीच्या इच्छुकांचा मुलाखती सुरू आहे,उमेदवारी देताना निष्क्रिय माजी नगरसेवकाना फटका बसणार आहे.. - उमेदवारीसाठी इच्छुकांची मोठी यादी, पक्षाकडे मागील पाच वर्षांचा कामगिरी अहवाल, सोबत सर्वेक्षणात रिपोर्टकार्ड खराब असलेल्याना फटका बसणार आहे.. निष्क्रिय माजी नगरसेवकांवर चे तिकीट कटणार... 2024 लोकसभा–विधानसभा निवडणुकीत निष्क्रिय राहिलेल्या माजी नगरसेवकांवर भाजप नाराज, असल्यानं नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचा तयारीत... - प्रचार, जनसंपर्क आणि पक्षकार्याऐवजी फोटो आणि सोशल मीडियापुरती मर्यादित - सुस्त नगरसेवकांमुळे जनतेत नाराजी, मतदानावरही परिणाम होईल यादृष्टीने भाजप च पाऊल - भाजपच्या सर्वेक्षणात ३० टक्क्यांहून अधिक नगरसेवकांचे रिपोर्ट कार्ड नकारात्मक असल्याचं बोललं जातं
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Dec 18, 2025 08:00:36
Chendhare, Alibag, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचा शेकाप ला दे धक्का ..... जयন্ত पाटील यांचे विश्वासू सहकारी अस्लम राऊत यांचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित..... मंत्री आदिती तटकरेने केली घोषणा....... अँकर - जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकी पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस ने शेकाप पक्षाला मोठा धक्का दिला आहे शेकाप नेते जयंत पाटील यांचे विश्वासू सहकारी , तीन वेळा जिल्हा परिषद सदस्य राहिलेले व रायगड जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक अस्लम राऊत यांनी शेकाप ला रामराम करत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत याची घोषणा करत अस्लम राऊत यांचे स्वागत केले. 20 डिसेंबर रोजी माणगाव तालुक्‍यातील मोर्बा येथे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा होणार असल्याची माहिती आदिती तटकरे यांनी दिली. बाईट - आदिती तटकरे , मंत्री महिला व बालकल्याण विभाग
0
comment0
Report
MKManoj Kulkarni
Dec 18, 2025 07:48:45
Mumbai, Maharashtra:अंकर: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट के नेता और सांसद संजय राऊत शरद पवार की भेट के लिए सिल्वर ओक पर गए थे. आगामी मुंबई महानगरपालिका और राज्य की अन्य नगरपालिका/निवडणुकांच्या संदर्भात आणि अन्य कुछ विषयों पर चर्चा के लिए सिल्वर ओक जाने की बात बताई गई थी. दुपारी लगभग बारह बजे संजय राऊत सिल्वर पहुँचे और 20–25 मिनट की बैठक के बाद मीडिया से बातचीत के बिना लौट गए. बैठक के दौरान मुंबई महापालिका चुनाव और राज्य की अन्य चुनावी चर्चाओं पर महत्त्वपूर्ण चर्चा हुई. शरद पवार की राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी को किनके साथ लेकर चलने जैसी बातें भी चर्चा में आईं। इसके अलावा अन्य राजनीतिक चर्चाएं भी सूत्रों से मिलीं. मनोज कुळकर्णी
0
comment0
Report
VNVishal Nagesh More
Dec 18, 2025 07:24:43
Malegaon, Maharashtra:मालेगाव ब्रेकिंग डोंगराळे प्रकरणात आजपासून सुनावणी। मालेगाव तालुक्यातील डोंगराळे प्रकरणात विशेष सरकारी वकील उज्वल निकम यांच्या नियुक्तीनंतर आज पहिली सुनावणी। डोंगराळे येथील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व हत्या प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी नागपूर अधिवेशनात करण्यात आली होती। या प्रकरणाचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले असून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी आंदोलनांतून होत आहे। १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीनंतर आज आरोपी विजय खैरनारला न्यायालयात हजर करण्यात येणार आहे। आक्रोश मोर्चाच्या दिवशी घडलेल्या घटनेची न्यायालयाने गंभीर दखल घेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आरोपीला हजर केले होते। आज विशेष सरकारी वकील उज्वल निकम प्रत्यक्ष न्यायालयात उपस्थित राहणार की पुन्हा व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी होणार, याकडे सर्वांचे लक्ष。
0
comment0
Report
LBLAILESH BARGAJE
Dec 18, 2025 07:18:30
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 18, 2025 07:05:55
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. मंत्री संजय शिरसाट पत्रकार परीषद पॉइंटर. ऑन राष्ट्रवादी आघाडी शक्यता. मुंबई में आनेारी निवडणूक शिवसेना भाजप महायुती बीच लढणार है यह जवळपास निश्चित हुआ है. ज्या पक्षाचे नेतृत्व नवाब मलिक करेल त्यांच्यााशी युती नाही असे भाजपने स्पष्ट केले. त्यांचा निर्णय आहे आमचा विरोध करायचे कारण नाही. मराठी माणूस, मुंबई या विषयावर निवडणूक लढविली जाईल. महायुतीचा भगवा मुंबईवर कसा फडकेल. नवाब मलिक आमचे शत्रू आहे हे आम्ही जाहीर केले आहे. त्यांच्यामुळे युती तुटत आहे. त्यांनी शरद पवार सोबत करावी किंवा कुणासोबत करावी. त्यांचा पक्ष आहे. नवाब मलिक जेल मधून सुटून आल्यावर आम्ही सांगितल्यावर अजितदादा यांनी ऐकले होते. एखाद्याने केलेला गुन्हा हा त्यांच्या कुटुंबावर टाकता येत नाही. इतर भूमिका वठवली तर त्यांच्या विरोधात देखील भूमिका घेऊ. ऑन प्रताप सरनाईक विधान - उठाव केला तेंव्हा अनेक नगरसेवकांनी शिंदे साहेबांवर विश्वास ठेवला, 55 पेक्षा अधिक नगरसेवकांनी आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे. शिंदे यांनी एखादा शब्द दिला तो पूर्ण होतो. त्यांचं विधान असे नसावे.. ऑन ubt Ubt सर्व जगा लढवावी लागतील, त्यांच्यासोबत काँग्रेस आणि राष्ट्रवादी नाही. आमच्या माहिती प्रमाणे मनसेला ज्या जागा पाहिजे त्या कितपत ubt सोडेल त्यावर ही युती अवलंबून आहे. नसता राज ठाकरे ऐकणार नाही. ऑन संजय राऊत - संजय राऊत यांचा आत्मविश्वास मोठा आहे ते काय बोलतील नेम नाही. आकडे सांगत नाही मात्र बातमी बनवणे त्यांचा धंदा आहे. पोकळी , वावड्या उठवणे , भीती पोटी केलेलं संजय राऊत यांचे वक्तव्य आहे. एकनाथ शिंदे हे कार्यकर्त्याच्या मागे भक्कम उभे राहतात. हा महाराष्ट्राला आलेला अनुभव आहे. ते मुंबई मध्ये चमत्कार घडवतील ही भीती त्यांना आहे. ड्रग्स तस्कर यांना घेऊन डान्स करणारे लोक तुम्ही आहात, कर्जत, कसारा मध्ये तुम्ही पार्टी करायचे तुम्ही काय drugs प्रकरणावर बोलता... मंगेश कुडाळकर आदेश. - त्यांनी जो निधी वापरला आहे. तो लोक हिताचा आहे. त्यांचा आणि यांचा काहीही संबंध नाही. ऑन कोकाटे. - कोर्टाने जो निकाल दिला आहे त्यावर अजितदादा निर्णय घेतील. त्यांचा खाते काढले आहे मात्र अंतिम निर्णय झाला नसल्याची माहिती... ऑन सातव प्रवेश... - ते अस्वस्थ होत्या, त्यांना त्रास दिला जात होता. त्या त्रासाला कंटाळून त्यांनी प्रवेश केला. विरोधी पक्षासाठी त्यांनी प्रवेश केला नाही. एखादी महिलेला त्रास दिला जातोय आणि तुमच्या सोयीच्या राजकारणासाठी महिलेने त्रास सहन करायचा का? ऑन विरोधी पक्ष नेता. - लोकांनी यांना नाकारले, यांचा संख्याबळ होऊ शकले नाही.त्याच आमचा दोष काय? विरोधीपक्ष नेते पद देता येत नाही. चहाच्या बहाण्याने देता का विरोधी पक्ष नेते पद म्हणता, लाचारीची काहीतरी सीमा असते. नियमानुसार काम होते हे आम्ही दाखवून दिले.... ऑन जी.प.निवडणूकित अर्ज बाद केल्यास कोर्टात जाता येणार नाही. - आता नगरपालिकेच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये स्थगिती मिळाल्या आहेत. सर्वसामान्य माणसाला वेठीस ठरू नये म्हणून निर्णय घेतला असावा . काही झाल्यास शासन निर्णयावर शासन विचार करूही शकते. कायद्याची चौकट सर्वांना बंधनकरण आहे. अधिकाऱ्यांनी कुणाचेही अर्ज बाद करावे असे होणार नाही.. ऑन जलील नोटा उधळण प्रकरण वक्तव्य. - इम्तियाज जलील किंवा ओवेसीं ही हैदराबादची पिलावळ आहे. आविर्भाव त्यांच्या रक्तात आहे. बाकी सर्व गुलाम, आम्ही नवाब, ही त्यांच्या मुकुमशाही पद्धतीची रचना आहे. तुम्ही नवाब घराण्याचे आहे तर तुम्ही सातरा वर्षे काय केले... नोटा उधळले ही तुमचे छंद आहे का? दलाली करणे, समाजामध्ये तेढ निर्माण करणे हे तुमचे छंद आहे. स्वाभिमानी मुस्लिम तुमच्यासोबत राहणार नहीं. आता हैदराबादला जा, लोकांनी तुम्हाला बाद केले आहे. नोटा , करंसी उधळणे हा गुन्हा आहे. त्यावर गुन्हा दाखल झाले पाहिजे असे मी आयुक्तांना सांगणार आहे. ऑन दानवे X पोस्ट - राष्ट्रपतीला नेमा, सुप्रीम कोर्टाला नेमा, काहीही माहिती नाही, अकलीचा तुमचा काहीही संबंध नाही. उंटावर बसून शेळ्या हाकलू नका, अर्धा किलोमीटरवर कोर्ट आहे. रिट दाखल करा.... ट्विट करणारे थकले. ऑन इम्तियाज मुस्लिम मतासाठी वक्तव्य - विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे कुणाच्या मतावर निवडून आले होते. दलाली करणारे. ही सभा घ्यायला पैशे देतात हे लपलेले नाही. तुमचा बाजार आता उठायला लागले आहे. Mim ही दलालांची टीम आहे. ऑन पैठण उमेदवार जादू . सुया लिंबू वरून निवडणूक जिंकत असतील तर प्रचार कशाला केले असते. अशी अंधश्रधा बाळगतात हा निव्वळ मूर्खपणा आहे. ऑन सुप्रिया. हा प्रश्न जर तर चा प्रश्न आहे, याला अर्थ नाही. ते काल कोणत्या कारणाने भेटले हे धनंजय मुंडे सांगतील, अजित पवार किंवा धनंजय मुंडे हेच सांगू शकतील. ऑन अजित पवार नको. - ज्या मुद्द्याला घेऊन मुंबई मध्ये निवडणूक होत असेल आणि त्यालाच ठोस पोहोचत असेल तर युती होणार नाही. त्या स्थानिक राजकारणाच्या अनुषंगाने घेतलेला तो निर्णय आहे. ऑन भाजप ताकद वाढली वक्तव्य - महायुतीवर परिणाम होईल असे वक्तव्य करू नका, आमची ताकद घटली असेल, त्यांची वाढली असेल मात्र असे वक्तव्य नको, टळले पाहिजे. ऑन भाजप ४५ वर्ष वरील उमेदवार नको. - तो त्यांच्या पक्षाचा निर्णय आहे. त्यांची नीती आहे.त्यावर आम्ही बोलणे उचित होणार नाही.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 18, 2025 06:49:13
Akola, Maharashtra:एक व्यक्ती बिबट्याच्या पिल्लाला काखेत घेऊन बसल्याचा व्हिडिओ सध्या समाज माध्यमांवर चांगलाच व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अकोला–बुलढाणा जिल्ह्याच्या सीमेवर असलेल्या कसुरा गावाजवळ बिबट्याची तीन पिल्ले आढळून आली आहेत.शेगाव दर्शनासाठी पायदळ वारी करणाऱ्या भाविकांना रस्त्याच्या कडेला अचानक ही बिबट्याची पिल्ले दिसून झाली. या मार्गावरून दररोज हजारो भाविक शेगावकडे पायदळ प्रवास करतात. बिबट्याची पिल्ले दिसताच काही भाविकांनी त्यांच्यासोबत फोटोसेशन केल्याचेही समोर आले आहे. याच दरम्यान एका व्यक्तीने पिल्लाला काखेत घेतल्याचा व्हिडिओ व्हायरल झाल्याने वन्यजीव सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.यानंतर या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आल्याची माहिती आहे. वन विभागाकडून पिल्लांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती कारवाई करण्यात येणार असून नागरिकांनी वन्यप्राण्यांपासून सुरक्षित अंतर ठेवावे, तसेच त्यांच्याशी छेडछाड करू नये, असे आवाहन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
Advertisement
Back to top