Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

दरियापुर में सिलेंडर चेक के दौरान हंगामा, घरेलू गैस सिलेंडर का खुलासा

ADANIRUDHA DAWALE
Mar 16, 2026 03:50:03
Amravati, Maharashtra
दरियापुरात सिलेंडर तपासणी दरम्यान हॉटेल व्यवसायाची सरकारी अधिकाऱ्याला धक्काबुक्की; कारवाईदरम्यान गोंधळ, जप्त गॅस सिलेंडर जमावाने पळविले दर्यापूरात महसूल विभागाने हॉटेलवर सर्च मोहीम राबवली असून त्यामध्ये हॉटेल व्यवसायिक घरगुती सिलेंडर वापरत असल्याचे स्पष्ट झाले. यावर महसूल विभागाने धडक कारवाई सुरू केली आहे. दर्यापूर शहरातील अंजनगाव टी-पॉईंट परिसरातील काही हॉटेलमधून अधिकाऱ्यांनी घरगुती गॅस सिलेंडर जप्त केले. मात्र कारवाईदरम्यान परिसरात मोठ्या प्रमाणात नागरिक जमले आणि गोंधळ निर्माण झाला. काहींनी अधिकाऱ्यांशी धक्काबुक्की करत पंचनामे फाडल्याची घटना समोर आली आहे. तसेच जप्त केलेले काही सिलेंडर सरकारी वाहनातून काढून काही जण घेऊन गेल्याची घटना घडली आहे. घटनेची माहिती मिळताच दर्यापूर पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून दरम्यान, नायब तहसीलदार प्रमोद काळे यांच्या मार्गदर्शनाखाली दर्यापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. पुढील तपास पोलिसांकडून केला जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
MNMAYUR NIKAM
Mar 16, 2026 05:02:57
Buldhana, Maharashtra:बुलडाण्यात घरगुती गॅस सिलिंडरचा हॉटेलमध्ये अवैध वापर.. तहसीलदार विठ्ठल कुमरे यांची धडक कारवाई.. कारवाईत 14 सिलेंडर जप्त .. तर फौजदारी करणार असल्याची तहसीलदार यांची माहिती .. यामध्ये ठिकठिकाणी छापे टाकले. गॅस सिलिंडरचा कृत्रिम तुटवडा निर्माण होऊ नये आणि घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर थांबावा, हा या मोहिमेचा मुख्य उद्देश होता.. या मोहिमेदरम्यान पथकाने जवळपास ४० हॉटेल्स आणि प्रतिष्ठानांची झाडाझडती घेतली.. यामध्ये धक्कादायक वास्तव समोर आले असून, अनेक ठिकाणी घरगुती गॅस सिलिंडरचा वापर सर्रासपणे व्यावसायिक कारणांसाठी केला जात होता.. दरम्यान १४ घरगुती गॅस सिलिंडर जप्त करण्यात आले आहे .. तर काही हॉटेल मालकांनी कारवाईची कुणकुण लागताच सिलिंडर लपवून ठेवण्याचाही प्रयत्न केला.. अशा साठेबाजी करणाऱ्या सर्व दोषींवर आता फौजदारी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Mar 16, 2026 04:49:58
Dharashiv, Maharashtra:कळंब तालुक्यात हरभरा पिकाची गंज पेटवली; दोन एकरवरील पीक जळून खाक कळंब तालुक्यात हरभरा पिकाच्या गंजीला अज्ञात व्यक्तीने आग लावल्याची घटना समोर आली आहे.या आगीत सुमारे दोन एकरवरील काढून ठेवलेले हरभरा पीक पूर्णपणे जळून खाक झाले असून शेतकऱ्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी आग विझवण्याचा प्रयत्न केला, मात्र तोपर्यंत मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.या प्रकरणी शेतकरी अशोक हनुमंत सुरवसे यांनी पोलिसात तक्रार दाखल केली असून अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे.या घटनेमुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये संताप व्यक्त झाला असून पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे.
116
comment0
Report
GMGANESH MOHALE
Mar 16, 2026 04:49:39
Washim, Maharashtra:कारंजा बाजार समिति में गहू बिक्री के लिए आज सुबह से shेतकऱ्यांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार-रविवारी बाजार समिती बंद होती तसेच हवामान खात्याने अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची काढणी करून विक्रीसाठी बाजार समितीत आणत आहेत. त्यामुळे बाजार समिती परिसरात ट्रॅक्टर व इतर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. अनेक शेतकरी सकाळपासूनच क्रमांक लागण्याची प्रतीक्षा करत थांबले आहेत. अचानक वाढलेल्या गर्दीमुळे हजारो क्विंटल गहू बाजार समितीत दाखल झाला असून खरेदी प्रक्रिया जलद करण्यासाठी मोजणी काटे वाढवावेत, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. त्यामुळे खरेदी प्रक्रियेला वेग देण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे राहिले आहे.
151
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:34:11
Malegaon, Maharashtra:नाशिकच्या बागलाण तालुक्यात बिबट्याचा धुमाकूळ... १३ मेंढ्यांचा पाडला फडशा, तर कोंबड्यांच्या खुराड्यावरही केला हल्ला... घटना cctv कॅमेऱ्यात कैद.. नाशिकच्या बागलाण तालुक्यातील दसाने, विंचुरे परिसरात बिबट्याने धुमाकूळ घातला असून मध्यरात्री बिबट्याने दसाने येथील एका शेडमध्ये घुसून तब्बल १३ मेंढ्यांचा फडशा पाडला आहे. या हल्ल्यात शेतकरी बापू सोनवणे यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तर दुसरीकडे विंचुरे गावात या बिबट्याने शेतातील कोंबड्यांवर हल्ला केला असून सदर घटना cctv कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दरम्यान, या बिबट्याचा तात्काळ बंदोबस्त करावा आणि परिसरात पिंजरा बसवावा अशी मागणी विंचुरे येथील नागरिकांकडून वनविभागाकडे करण्यात येत आहे.
141
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 16, 2026 04:31:01
159
comment0
Report
KJKunal Jamdade
Mar 16, 2026 04:22:03
Shirdi, Maharashtra:मी राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा कार्यकर्ता आहे.. त्यांच्याबद्दल माझ्या मनात मोठा आदर असून त्यांचे कार्य कुणी डावलू शकत नाही.. मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शेतकऱ्यांसाठी सौरऊर्जेच्या बाबतीत केलेल्या कामाचे देखील कौतुक केले पाहिजे असे वक्तव्य माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपूरे यांनी केलंय.. पोटनिवडणूक लढवण्याबाबत कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेतल्यानंतरच निर्णय जाहीर करू असे सांगताना तनपुरे यांनी देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केल्याने, प्राजक्त तनपूरे यांच्या मनात नेमकं काय? याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेसाठी 23 एप्रिल रोजी पोटनिवडणूक जाहीर झाली आहे.. पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांशी चर्चा करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याचं प्राजक्त तनपूरे यांनी म्हटलंय.. दरम्यान बारामती आणि राहुरी येथील पोटनिवडणूका बिनविरोध व्हाव्यात अशी इच्छा असून, आमच्यावर निवडणुका लादल्या तर आम्ही लढायला तयार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय.. भाजपचे आमदार शिवाजी कर्डिले यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या राहुरी विधानसभेच्या जागेवर त्यांचे पुत्र अक्षय कर्डिले यांना उमेदवारी मिळावी यासाठी कार्यकर्ते आग्रही आहेत.. तर अक्षय कर्डिले यांनी मुंबईत जाऊन वरिष्ठांच्या गाठीभेटी घेत आपणच प्रबळ दावेदार असल्याचं अधोरेखित केले आहे.. पक्ष बेरजेच्या राजकारणावर चालतो, कारण एकएक आमदार महत्वाचा असतो.. ज्याला जनतेचे समर्थन असेल त्यालाच मुख्यमंत्री उमेदवारी देतील अशी स्पष्ट भूमिका भाजपचे माजी खासदार सुजय विखे यांनी मांडली आहे.. सुजय विखे, माजी खासदार भाजप माजी मंत्री तथा राहुरीचे माजी आमदार प्राजक्त तनपुरे यांनी देखील पोटनिवडणूक लढवण्याचे संकेत दिले आहेत.. मात्र ते कोणत्या पक्षाकडून निवडणूक लढवणार हे अद्याप त्यांनी गुलदस्त्यात ठेवले आहे.. तनपूरे यांनी गेल्या काही दिवसांपासून घेतलेली हिंदुत्ववादी भूमिका आणि मुख्यमंत्र्यांचे केलेले कौतुक बघता, आगामी काळात राहुरीच्या राजकारणात काय घडामोडी घडतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
124
comment0
Report
VNVishal Nagesh More
Mar 16, 2026 04:21:41
Malegaon, Maharashtra:विशाल मोरे, मनमाड ( नाशिक ) - नाशिकच्या मनमाड गुरुद्वाराने केली गॅस टंचाईवर मात... लंगरचा स्वयंपाकासाठी वापरतात वाफेची यंत्रणा... 8 ते दहा हजार भाविकांना दिला जातो अखंडित लंगर... Anc:- युद्धामुळे निर्माण झालेल्या गॅस टंचाईचा सर्वाधिक फटका जो देशभरातील देवस्थानाला बसला आहे.गॅस अभावी अन्नछत्र व महाप्रसाद कसा द्यावा असा प्रश्न सतावत आहे.मात्र नाशिकच्या मनमाडमधील प्रसिद्ध गुरुद्वाराने या गॅस टंचाईवर आधीच उपाय योजना करून ठेवली आहे.गुरुद्वारांमध्ये होणारा लंगर हा पूर्णपणे वाफेवर तयार होता.त्यासाठी लाकडे जाळून एका बॉयलरमध्ये पाण्यासून वाफ तयार केली जाते आणि त्या वाफेवर या ठिकाणी पोळी, भाजी, दाल , भात असा लंगर तयार केला जातो.त्यामुळे गॅस टंचाई जरी असली तरी मनमाडच्या गुरुद्वारात दररोज 8 ते दहा हजार भाविकांना रोज अविरतपणे लंगर सेवा सुरू आहे. सुरजित सिंग, लंगर प्रमुख
77
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Mar 16, 2026 04:05:11
157
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Mar 16, 2026 04:03:13
Bhandara, Maharashtra:ऐन हंगामात शेतकऱ्याचे स्वप्न जळून खाक...शेतात उभा असलेला ट्रॅक्टर जळून खाक....6 लाख रुपयांचे नुकसान...कुडेगाव येथील घटना... शेतकऱ्याची कुडेगाव - गवराळा मार्गालगत मालकीची शेती आहे.या शेतात खरीप हंगामानंतर त्यांनी विविध रब्बी पिकांची पेरणी केली होती. सध्या रब्बी पिकांची कापणी करून उन्हाळी धान पिकाच्या लागवडीपूर्वी ते आपल्या ट्रॅक्टरने शेतीची मशागत करत होते. घटनेच्या दिवशी त्यांनी दिवसभर आपल्या 'जॉन डिअर' कंपनीच्या ट्रॅक्टरने शेतीची कामे केली आणि रात्री ट्रॅक्टर शेतातच उभा करून ठेवला होता.मध्यरात्री ट्रॅक्टरला आग लागल्याने त्याचे इंजिन पूर्णपणे जळून खाक झाले.शेतात गेल्यावर हा प्रकार लक्षात येताच पीडित शेतकऱ्याने स्थानिक ग्रामस्थांसह पोलीस प्रशासनाला माहिती दिली.
123
comment0
Report
Advertisement
Back to top