Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

वसंत देशमुख- सुधीर मुनगंटीवार की घर पर मुलाकात से राजनीतिक चर्चाएं बढ़ीं

AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 06:19:04
Chandrapur, Maharashtra
टायटल: काँग्रेसवाली झालेले भाजपचे माजी नगरसेवक वसंत देशमुख यांची आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घर जाऊन भेट घेतली; या भेटीने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले. अँकर: चंद्रपूर शहर मनपा मध्ये भाजप सुधीर मुनगंटीवार यांनी करून दाखवलेला करिष्मा राज्याने बघितला. केवळ एका मताने भाजपच्या महापौर संगीता खांडेकर निवडून आल्या. भाजपचे जुने कार्यकर्ते आणि विद्यमान काँग्रेस नगरसेवक वसंत देशमुख यांनी सुधीर मुनगंटीवार यांनी थेट घर जाऊन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. वसंत देशमुख हा मनपा वर्तुळातील महत्त्वाचा बहुजन चेहरा आहे. सतत भाजपमधून निवडून येत असलेल्या वसंत देशमुख यांनी दोन वर्षांपूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला होता. मात्र ऐन निवडणुकीच्या तोंडावर धानोरकर- वडेट्टीवार वादात त्यांचे तिकीट कापले जाते की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तेव्हा त्यांनी पुन्हा एकदा भाजपचे दार ठोठावले होते. मात्र त्यात यश आले नाही. अखेर काँग्रेसचे तिकीट घेत त्यांनी निवडणूक जिंकली. आता मनपात उबाठा शिवसेनेला कबूल करण्यात आलेले स्थायी समिती अध्यक्षपद असो वा झोन समित्यांचे गठन अशा सर्व निर्णयांमध्ये भाजपला सहकार्याची गरज आहे. फक्त एका मताच्या फरकाने अस्थिर असलेल्या सत्तेला वसंत देशमुख यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काही बळ मिळते ka? याची चर्चा होत असून भेटीकडे राजकीय चष्म्यातून बघितली जात आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSACHIN KASABE
Feb 21, 2026 08:02:01
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर तालुक्यातील उंबरगाव येथील सारिका लोहार या महिलेचे गावातीलच शेखर चंदनशिवे याच्याशी अनैतिक संबंध होते. या प्रकरणाची कुणकुण सासूला लागली होती यावरून सासू सुनेचा वाद होत होता.दरम्यान सारिकाचा प्रियकर शेखर याने विषारी औषध असलेले बाटली सारिकाकडे दिली. यानंतर ही बाटली सासू पाणी पिते त्या पाणी भरलेल्या काळशीत सारिका ने ओतली. अशाच्या प्रकारे सासूला मारण्यासाठी सुनेने कट रचला. रात्री सासूने कळशीतील पाणी पिले मात्र चव कडू लागल्याने पाण्याचा तांब्या जेवण करत असलेल्या मुलगा समाधान जवळ ठेवला. त्याने ते पाणी पिले यानंतर समाधान यास रात्री उलट्या होऊ लागल्या उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल केले असता. त्याचा मृत्यू झाला. सासूला मारण्यासाठी सुनेने केलेला विष प्रयोगात नवऱ्याचा जीव गेल्याची घटना झाली. या प्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिसांनी सारिका लोहार हिला अटक केली आहे.
0
comment0
Report
CFChandrakant Funde
Feb 21, 2026 08:00:58
Pune, Maharashtra:दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाची क्रोनोलॉजी वाईज नोव्हेंबर 2024- खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना अजितदादांचा फोन येतो, नागपुरात दोन्हीमध्ये एकञ येण्यासंबंधी प्राथमिक चर्चेला प्रारंभ...सुप्रिया सुळे यांना चर्चेची माहिती दिली जाते...दोन्ही बाजूंकडून Go Ahead चा सिग्नल ... 12 डिसेंबर 2024 रोजी अजित पवार party split नंतर पहिल्यांदा शरद पवारांना वाढदिवसांच्या शुभेच्छा द्यायला दिल्ली निवासस्थानी पुष्प गुच्छ घेऊन जातात पण तिथे प्रफुल पटेल असल्याने फक्त सदिच्छा भेट होते ... पुढे 16 मे 2025 रोजी... भवानीनगर साखर कारखाना इलेक्शन प्रचारसभेनंतर अजित ताफा सोडतात आणि डॉ. अमोल कोल्हे सोबत बारामती ते पुणे असा एकञ प्रवास करतात, त्यात बऱ्यापैकी पुणे जिल्ह्यातील एकञिकरणावर चर्चा होते... 21 मे रोजी जयंत पाटील यांच्या मुंबईतील निवासस्थानी सुप्रिया सुळे, अजितदादा, जयंत पाटील आणि कोल्हे यांच्यात पुन्हा एकञ बैठक...ताई आणि दादा पहिल्यांदा इथे एकञ येतात... राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनालाच विलिनीकरण करायचं का? इथपर्यंत ही चर्चा जाते...पण बिहार इलेक्शन मुळे भाजप पक्ष श्रेष्ठीकडून रेड सिग्नल मिळाल্যामुळे सगळंच पुन्हा थांबते....पुण्यातच दोन्ही राष्ट्रवादीचे स्वतंत्र वर्धापन दिन साजरे होतात...पवार गटाचा वर्धापन दिन तर अगदी ऐनवेळी ठरतो...यातून ही एकञिकरणाची चर्चा कुठपर्यंत गेलती हे स्पष्ट होते... पुढे मग 5 ऑक्टोबर 2025 रोजी प्रवरानगरच्या प्रोग्रामला अजित पवार हे अमिक शहा यांच्याकडे पुन्हा एकदा राष्ट्रवादी विलीनीकरणाचा विषय काढतात...त्यावर दिल्ली त बोलू असं ठरतं... त्यानुसार शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार द्यायला अजित पवार पुन्हा दिल्लीला जातात और एकटेच अमित शाह यांना भेटतात...तिथूनच फडणवीस यांना राष्ट्रवादी विलिनीकरणाची कल्पना दिली जाते त्यावर ते स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका होऊ द्या असं सांगतात. 14 नोव्हेंबर 2025 रोजीच्या अमित शाह यांना भेटल्याचे ट्वीट पण अजित पवार 16 नोव्हेंबर रोजी आपल्या अकाउंट वरून करतात... 16 जानेवारी 2015 @प्रेमकोर्ट, मुंबई अजित पवार यांच्या घरी अजित पवार, सुप्रिया सुळे आणि सुनील तटकरे यांच्यात एकञित बैठक होते, त्यात तटकरे यांना विलीनीकरणाबाबत दोन्ही बहिण-भाऊ तटकरेंना पूर्व कल्पना देतात 17 जानेवारी 2025 गोविंद बाग
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Feb 21, 2026 08:00:39
Chandrapur, Maharashtra:चंद्रपूर शहरातील महाकाली मंदिर ते इंजिनिअरिंग कॉलेज परिसराला जोडणाऱ्या मुख्य मार्गाची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना दररोज जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अपघाताचा धोका देखील वाढला आहे. गेल्या काही वर्षांपासून या भागात नगरसेवक नसल्याने नागरिकांना महानगरपालिकेसोबत संवाद साधण्याचा प्रभावी मार्ग नव्हता. त्यामुळे रस्त्यांची दुरवस्था बिकट होत गेली. आता नव्याने स्थापन झालेल्या चंद्रपूर महानगरपालिकेने या मार्गाची तातडीने दुरुस्ती करून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत प्रवासाची सुविधा द्यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 07:31:56
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Feb 21, 2026 06:48:29
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर.. ऑन दोन्ही सभागृह विरोधीपक्ष नेता. - असणार नाही, घटनेने दिलेले नियम म्हणजे 10 टक्के संख्याबळ कुठल्याही पक्षाकडे नाही. करायचं तर अध्यक्षांकडे अधिकारी आहे. ऑन दानवे सुरक्षा काढली. - सुरक्षा देणे किंवा काढणे ही भूमिका सरकारची नाही. सुरक्षा कुणाला द्यायची याची कमिटी आहे जैन त्यांचे अध्यक्ष आहे. जितेंद्र आव्हाड यांना एक्सट्रा सुरक्षा दिली. Ubt च्या किती लोकांना दिली. तो विधान परिषदेचा सदय नाही. विरोधी पक्ष नेता नाही. पद गेल्याकंतर 4 महिन्यांनी काढले आहे. - संजय राऊत का अस्मिता हा शब्द कळतो का? दरवेळेस मराठीचा मुद्दा काढायचं... महाराष्ट्राची अस्मिता म्हणजे ubt, संजय राऊत. का? हा ढोंग कळलेला आहे. राज ठाकरे यांनी कुठे जावे किंवा नाही ही संजय rाऊत यांनी ठरवावे का? डुबलेल्या पक्षाच्या प्रवक्त्याने सांगू नये.... ऑन विलीनीकर. - विलीनीकरांचा मुद्दा मागे पडत चालला आहे. भुजबळ मागें राज्यसभेत जाण्यासाठी तयार होते. आता भाष्य करणे गैर आहे. Icu ऑन राज ठाकरे. - महाराष्ट्र ubt च्या राज्यात icu मधे होता, त्यातून महायुतीने महाराष्ट्राला बाहेर काढले आहे. कोस्टल रोड, नवी मुंबई विमानतळ अनेक कामे केली. सूज उतरविण्याचा काम महायुतींने केलं.. राज ठाकरे यांना आम्ही विकासासाठी सोबत घेणार.... ऑन हिरे खटला. - जेव्हा खटला दाखल केला होता त्यावेळचे लेख बघा, आता शेपटी घालायचे काम सुरू आहे. ऑन अनिकेत तटकरे चालक. - एकतर शासकीय वाहन वापरताना, शासकीय चालक असणे गरजेचे आहे. नियम आहे. उत्साहाच्या भरात काही अघटीत घडले तर त्याला जबाबदार कोण? सर्वांनी भान ठेवले पाहिजे. ऑन राहुल गांधी न्यायालयात हजर. - त्यांनी जे बेताल वक्तव्य केले होते त्यावर हा खटला दाखल केला. कायद्याच्या पुढे कितीही मोठा असला तरी यावेच लागेल. - राहुल गांधी हा अपयशी माणूस आहे. सत्ताधारी पक्षाने काळे झेंडे दाखवायला नको, काँग्रेसनेच काळे झेंडे दाखवायला पाहिजे. ऑन मराठी शाळा.... - ज्या शाळेत विद्यार्थी नाही. शाळेच्या नावाखाली कुणी उखळ पांढरे करीत असेल तर ते खपवून घेणार नाही मात्र मराठी शाळा बंद होऊ देणार नाही.... ऑन काँग्रेस - विजय वड्डेटीवर यांनी माफी मागितली की नाही हे गुलदस्त्यात आहे. मात्र काँग्रेस मध्ये दोन तीन गट आहे. त्याचा परिणाम निवडणुकीत झाला.. ऑन भूषण गवई भाष्य. - भूषण गवई यांनी काही तत्वे पाळली आहे. सर्वोच्च न्यायमूर्तीने जो खटला वर्ग केला. त्यावेळी इतर निकाल त्यांनी घेतला नाही. या प्रकरणात त्यांचा अभिनंदन केले पाहिजे. ऑन रोहित पवार pc - त्यांच्या कडे अनेक प्रश्न, अनेक शंका, या सर्व पत्रकार परिषदेची दाखल तपास यंत्रणा घेतलं असेल पत्रकार परिषदे घेणे चुकीचे नाही... ऑन संभाजीनगरमधे बिबट्यांचा वावर वाढला. - अनेक ठिकाणी बिबट्याचा वावर वाढला आहे. वन अधिकाऱ्यांना आता विशेष अधिकार देण्यात आला आहे. आता वावर कमी झाला आहे. अशी प्रकार घडू नये म्हणून उपाययोजना ऑन विद्रुपीकरण - शहरातील विद्रुपीकरण होऊ देणार नाही आयुक्तांनी तातडीने बॅनर काढले पाहिजे. बॅनर काढताना एकच शॉक लागून जीव गेला आहे. कुणाचीही पर्वा न करता कारवाई झाली पाहीज. एक दोन दिवस मोठ्या उत्सव वेळी ठीक आहे. ज्यांचे बॅनर त्यावर कारवाई करून गुन्हा दाखल करावा.. ऑन संभाजीनगर शहर पाणीपुरवठा. - न्यायालयामध्ये सर्व माहिती आयुक्तांनी दिली आहे. शहर वासियाना मुबलक पाणी पुरवठा केला जाईल. महिनाभरात पाणी कसे मिळेल याचं प्रयत्न सुरू आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 21, 2026 06:30:27
Baramati, Maharashtra:अजित पवार यांच्या अभिमान अपघाताची पारदर्शक निपक्षपाती चौकशी करा. बारामतीच्या सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा राष्ट्रपती पंतप्रधान मोदींचा केंद्रीय गृहमंत्र्यांना पत्र. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताची पारदर्शक, निःपक्षपाती आणि सखोल चौकशी व्हावी यासाठी बारामती तालुक्यातीन राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी शेकडोंच्या सह्या असणार पत्र देशाचे राष्ट्रपती पंतप्रधान यासोबत केंद्रीय गृहमंत्री आणि केंद्रीय नागरी विमान उड्डाण मंत्री तसेच राज्यपाल आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांना पाठवल आहे. बारामती तालुक्यातील सोमेश्वर येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी हे पत्र पाठवलं आहे.
0
comment0
Report
JMJAVED MULANI
Feb 21, 2026 06:15:38
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Feb 21, 2026 06:15:21
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Feb 21, 2026 05:50:00
Amravati, Maharashtra:28 तारखेच्या आत मेळघाटनातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा करा अन्यथा नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडू; बच्चू कडू यांचा पुन्हा इशारा. बच्चू कडू यांच्या इशाऱ्यानंतर मनरेगा अंतर्गत काम करणाऱ्या आदिवासी क्षेत्रातील मजुरांना होळीपूर्वी राज्य शासनाकडून मोठा दिलासा मिळाला आहे. प्रलंबित असलेल्या मजुरीसाठी राज्य शासनाकडून 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून पुढील दोन ते तीन दिवसात मजुरांच्या खात्यात मजुरीची रक्कम जमा होणार आहे तसेच मार्च अखेर पर्यंत मजुरांना नियमित रोजगार उपलब्ध होऊन मजूरीही वेळेत दिली जाणार आहे. मात्र तरीही 28 तारखेच्या आत मेळघाटातील आदिवासींच्या खात्यात पैसे जमा झाले नाही तर नागपूर येथील आदिवासी आयुक्तांचे कार्यालय फोडण्याचा इशारा बच्चू कडू यांनी पुन्हा दिला आहे. त्यामुळे आता मेळघाटातील आदिवासींची होळी साजरी होणार असल्याचं चित्र आहे.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Feb 21, 2026 05:48:00
Nagpur, Maharashtra:नागपूर - बारावीच्या दोन्ही विषयांचे पेपर फुटले, नागपूरच्या सदर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. व्हाट्सअप ग्रुप तयार करून हा सगळा पेपर फोडण्याचा प्रकार सुरू असल्याची पोलिसांना मिळाली माहिती. बारावीच्या विज्ञान शाखेचे फिजिक्स आणि केमिस्ट्रीचा पेपर परीक्षेच्या तासाभरापूर्वीच व्हाट्सअप वर आल्याची माहिती गुरुवारी बारावी केमिस्ट्रीचा पेपर होता मात्र परीक्षा आधी पेपर विद्यार्थ्यांच्या व्हाट्सअप ग्रुपवर आला होता, सदर परिसरातील सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर हे प्रकरण उघडकीस आले आहे. सेंट उर्सुला परीक्षा केंद्रावर एक विद्यार्थिनी वारंवार प्रसाधन गृहात जात होती त्यामुळे केंद्रावरील प्रेक्षकांना संशय झाला. तिची शिक्षकेच्या माध्यमातून झडती घेण्यात आल्यावर एक स्मार्टफोन जप्त करण्यात आला तो तपासला असता त्यामध्ये एका व्हाट्सअप ग्रुप वर परीक्षा सुरू होण्यापूर्वी पेपर आलेला होता. केंद्रप्रमुखांनी सदर पोलिसांना माहिती दिल्यावर पोलिसांनी तपास करून गुन्हा दाखल केला. मोबाईल मध्ये व्हाट्सअप वर 15 विद्यार्थ्यांचा एक ग्रुप तयार करण्यात आल्याचे आढळून आले आहे. दोन्ही विद्यार्थिनीची चौकशी केली असता खाजगी शिकवणी वर्गातील एका शिक्षकाने पैसे घेऊन पेपर फोडल्याची माहिती दिली. अन्य 13 विद्यार्थी शहरातील वेगवेगळ्या परीक्षा केंद्रावर पेपर सोडवत होते, पोलीस अधिक तपास करत आहेत.
0
comment0
Report
PTPRAVIN TANDEKAR
Feb 21, 2026 05:46:34
0
comment0
Report
Advertisement
Back to top