Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chandrapur442401

चंद्रपूर में ‘वंदे मातरम्’ के 150वीं वर्षगांठ पर सामूहिक गायन महोत्सव

AAASHISH AMBADE
Nov 07, 2025 05:50:29
Chandrapur, Maharashtra
वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त चंद्रपूरात सामूहिक गायनाच्या आयोजनाची माहिती दिली गेली. चंद्रपूर जिल्हा क्रीडा संकुलात आज वंदे मातरम् गीताच्या १५० वर्षपूर्ती निमित्त ‘सार्ध शताब्दी महोत्सवाची’ भव्य सुरुवात झाली. कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभाग, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय, महाराष्ट्र राज्य तसेच शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी देशभक्तीच्या भावनेने ‘वंदे मातरम्’ गीताचे सामूहिक गायन केले. या निमित्ताने कौशल्य विकास विभागाच्या वतीने राज्यभर विविध सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. देशप्रेम जागवणारा आणि राष्ट्रीय एकतेचा संदेश देणारा हा महोत्सव जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांमध्ये उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमात, अधिकारी, कर्मचारी आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले. राष्ट्रगीताच्या स्वरांनी आणि देशभक्तीच्या घोषांनी जिल्हा क्रीडा संकुल दुमदुमून गेले
14
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
KPKAILAS PURI
Nov 07, 2025 08:15:53
Pimpri-Chinchwad, Maharashtra:पुणे शहरातील आणखी एक मोठा जमीन घोटाळा समोर राज्याच्या कृषी विभागाच्या जमिनी बाबत अपहार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल सरकारी जमिनीवर bекаयदेशीर ताबा मिळवल्यापलब्द तहसीलदार सूर्यकांत येवले यांच्यासह शितल तेजवानी, दिग्विजय पाटील यांच्यावर आणखी गुन्हा दाखल खडक पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल सूर्यकांत येवले, कुलमुखत्यारधारक हेमंत गवंडे, राजेंद्र विध्वंस, ऋषिकेश विध्वंस, मंगल विध्वंस, विद्यानंद पुराणिक, जयश्री एकबोटे, शितल तेजवानी आणि दिग्विजय पाटील यांच्या विरोधात गुन्हा दाखल नायब तहसीलदार प्रवीणा चव्हाण यांनी केली तक्रार दाखल १२ फेब्रुवारी २०२४ ते १ जुलै २०२५ पर्यंत घडला प्रकार पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मुंबई कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ चा महानगरपालिका क्षेत्रात लागू नसतानाही बोपोडी येथील ९ हेक्टर जमीन सन १८८३ पासून अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट खात्याकडे म्हणजेच शासनाच्या ताब्यात व वहिवाटीत असतानाही, तसेच सदर जमीनीचे मालक व कब्जेदार सदरी अॅग्रीकल्चर डिपार्टमेंट यांचे नाव असल्याबाबत वरिष्ठांनी स्पष्ट आदेश पारित केलेले असतांनाही, सदर जमीनीचा अपहार केला या जमीनीवर व्हिजन प्रॉपर्टी तर्फे अर्जदार हेमंत गवंडे, राजेंद्र रामचंद्र विध्वंस, रुषीकेश माधव विध्वंस, मंगल माधव विध्वंस, विदयानंद अविनाश पुराणिक, जयश्री संजय एकबोटे, शितल किसनचंद तेजवाणी, दिग्विजय अमरसिंह पाटील संचालक मेसर्स अमेडिया एंटरप्रायझेस एलएलपीचेशी हातमिळवणी व संगनमत करुन सरकारी मिळकतींवर या लोकांच्या मालकी हक्क दिसून आला. बेकायदेशीर आदेश आणि पत्र तयार करुन अशाप्रकारे शासनाची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल kailas wkt+ vis
0
comment0
Report
ADANIRUDHA DAWALE
Nov 07, 2025 08:15:03
Amravati, Maharashtra:खडसेंच्या नावाने बोंबाबोंब झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादा का राजीनामा देत नाही; यशोमती ठाकूर यांचा मुख्यमंत्र्यांना सवाल अँकर :– पुणे येथील जमीन घोटाळा प्रकरण झी 24 तास ने बाहेर काढल्यानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे. या प्रकरणात पार्थ पवार चांगलेच अडचणी आले आहे. यावर यशोमती ठाकूर यांनी आपली प्रतिक्रिया दिली असून हा सगळा मिलाजूला कार्यक्रम असल्याचा म्हटला आहे. पार्थ हे अजित पवारांचे सुपुत्र आहेत तर चॅरिटी कमिशनर हे मुख्यमंत्र्यांचे बंधू आहे. अमेडियात एक टक्का पार्टनर असणाऱ्या दिग्विजय पाटलांवर एफ आय आर होते पण 99 टक्के पार्टनर असणाऱ्या पार्थ पवारांवर एफ आय आर दाखल होत नसल्याचाही गंभीर प्रश्न यशमती ठाकूर यांनी उपस्थित केला आहे. खडसेंच्या नावाने बोंबाबोंब झाल्यावर त्यांना राजीनामा द्यावा लागला मग अजितदादा का राजीनामा देत नाही. असा सवाल याच्यामध्ये ठाकूर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपस्थित केला आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांचा हा मिलाजूला कार्यक्रम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार दोघांनीही राजीनामा द्यायला पाहिजे असेही ठाकूर म्हणाले आहे. पार्थ पवार हे अजित पवार यांचे पुत्र आहे अजितदादा यांचा संबंध का नाही? आपला मुलगा काय करतो हे अजित पवारांना माहित नाही का? शेतकऱ्यांचे हाल करायचे व पुत्राला सर्व माफ करायचं तर पार्थ पवारांचे नाव एफ आय आर मध्ये का नाही दरम्यान कमळ आणी घड्याळ यांचं लग्न झालं आहे. हे सगळे बदमाशी करत आहे हे राज्य चालवण्यासाठी करत नाही तर हे सगळं कुटुंब चालवण्यासाठी व स्वतःची मालमत्ता वाढवण्यासाठी हे लोक सत्तेत आहे असा गंभीर आरो यशोमती ठाकूर यांनी केला आहे.
0
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 08:01:01
Thane, Maharashtra:मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी मंगळवारी होणार निर्णयाची शक्यता मुंब्रा रेल्वे अपघात प्रकरणी अभियंत्यांच्या अंतरिम जामीन अर्जावर आज sunavhali पार पडली. न्यायालयाने अर्ज फेटाळला नसून मंगळवारी सर्व पुरावे तपासल्यानंतर निर्णय दिला जाण्याची शक्यता आहे. न्यायाधीश जी. टी. पवार यांच्या न्यायालयात झालेल्या सुनावणीत तपास अधिकाऱ्यांना मंगळवारी सर्व पुरावे सादर करण्याचे आदेश देण्यात आले. यावेळी रेल्वे अधिकाऱ्यांचा आणि रेल्वे पोलिसांचा अहवाल दोन्ही तपासले जाणार आहेत. आरोपींचे वकीل बलदेव राजपूत यांनी सांगितले की, पाच वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांनी सादर केलेल्या अहवालात अपघाताचे कारण अतिरिक्त गर्दी असल्याचे नमूद केले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, “हा अहवाल जर आधीच पोलिसांकडे दिला असता तर एफआयआर दाखल झाला नसता.” राजपूत यांनी पुढे दावा केला की, “जीआरपीचे काम होते पायदानावरील अतिरिक्त प्रवाशांना हटवणे, परंतु त्यांनी आपले कर्तव्य बजावले नाही. त्यामुळे ही चूक जीआरपीची आहे.” तसेच, आरोपींच्या वकिलांनी हेही नमूद केले की आरोपी गेली २४ वर्षे नोकरीत असून प्रवाशांची काळजी फुलासारखी घेतात. १ नोव्हेंबर २०२५ पासून पोलिसांनी त्यांच्या मागे ससेमिरा लावल्याचा आरोपही त्यांनी केला. “त्या दिवशी सुमारे २०० गाड्या त्याच पटरीवरून धावल्या, जर काही तांत्रिक बिघाड असता तर आणखी अपघात झाले असते,” असेही वकिलांनी सांगितले. या प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज, छायाचित्रे आणि अपघाताचा संपूर्ण अहवाल न्यायालयासमोर सादर करण्यात आला असून, मंगळवारी या सर्व पुराव्यांच्या तपासणीनंतर न्यायालय आपला निर्णय देणार आहे.
0
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 07, 2025 07:47:47
Washim, Maharashtra:वाशिम जिले के सीताफल उत्पादक किसान इस समय भारी आर्थिक संकट में हैं। इस सीजन में सीताफलों को केवल 10 से 15 रुपये प्रति किलो इतने कम दाम मिल रहे हैं जिससे किसानों को बड़ा नुकसान हो रहा है। इस दर पर उत्पादन बेचने से बागों के खर्च भी नहीं निकल पाएंगे, ऐसी स्थिति बन गई है। जिले के कई किसानों ने पिछले कुछ वर्षों से पारंपरिक फसल के बजाय फलों के बाग लगाने का निर्णय लिया। इसमें सीताफल बागों की खेती बड़े पैमाने पर की गई। मगर इस वर्ष अतिवृष्टि के कारण इन बागों को भारी नुकसान हुआ। इसके अलावा स्थानीय बाजार की कमी और क्षेत्र में फल प्रसंस्करण उद्योग न होने के कारण व्यापारी किसानों से सीताफलों को सिर्फ 10-15 रुपये प्रति किलो कीमत पर खरीद रहे हैं। इस दर के कारण किसानों के हाथ खर्च भी वापस नहीं आ रहे, परिणामस्वरूप उनके ऊपर आर्थिक संकट आ पहुँचा है। किसानों ने कहा कि सीताफल बागों से अच्छा आय मिलने की उम्मीद के साथ निवेश किया गया था और इस वर्ष उनकी उम्मीदें टूट गई हैं। जिले के सीताफल उत्पादक किसानों को तुरंत बाजार, दर की गारंटी और प्रसंस्करण उद्योग की आवश्यकता है।
3
comment0
Report
UPUmesh Parab
Nov 07, 2025 07:33:42
Oros, Maharashtra:अँकर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीत भाजपने स्वबळाचा नारा दिल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेने आपली ताकद वाढवायला सुरू केली आहे. कणकवली नगरपंचायती मध्ये भाजपचे इच्छुक उमेदवार समीर नलावडे यांच्या विरुद्ध महाविकास आघाडी आणि एकनाथ शिंदे सेना हे एकत्र येताना दिसत आहेत. यासाठी कणकवली शहर विकास आघाडी च्या माध्यमातून उद्धव ठाकरे सेना व शिंदे शिवसेना या पदाधिकाऱ्यांची एकत्रित बैठक झाली असल्याची माहिती पुढे येत आहे. यामध्ये नगराध्यक्ष म्हणून उद्धव ठाकरे सेनेचे नेते संदेश पारकर यांचे नाव पुढे येत असून त्याला शिंदे शिवसेनेचा पाठिंबा असल्याचे देखील समजत आहे. तस झाल्यास राज्याच्या राजकारणात नवीन समीकरण उदयास येण्याची शक्यता आहे.
1
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:23:45
3
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:22:42
Thane, Maharashtra:ठाण्यातील विकासकामांच्या निधीवर प्रश्नचिन्ह? भाजप नगरसेवक नारायण पवार यांची फडणवीस यांना चौकशीची मागणी ठाणे महानगरपालिकेतील विकासकामांकरिता 2022 नंतर तब्बल 3900 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने ठाण्यातील भाजप नगरसेवक नारायण शंकर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र व राज्य सरकारकडून ठाणे महानगरपालिकेला मिळालेल्या निधीतून रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सेवांचा दर्जा अजूनही समाधानकारक नाही. नागरिकांना अनेक ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत असून, मोठा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. नगरसेवक पवार यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत 2022 पासून ठाणे महानगरपालिकेला एकूण 3900 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीचा वापर पारदर्शकतेने झाला आहे काय, याबाबत शंका निर्माण झाली असून, त्यावर सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सत्तेत जरी महायुती असली तरी ठाणे महानगरपालिकेत मात्र फक्त शिवसेनेच्या नगरसेवकांनाच निधी दिला जातो, तर भाजपच्या नगरसेवकांना निधी मिळत नाही, अशी चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी कंटाळूनच हे पत्र लिहिलं की काय, असा सवालही स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. भाजपच्या नगरसेवकाकडून आलेल्या या पत्रामुळे ठाणे महापालिकेतील निधीवाटप आणि विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चेला उधाण आले आहे..
4
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:21:33
Thane, Maharashtra:ठाणे महानगरपालिका हद्दीतील दिवा प्रभाग समिती अंतर्गत येणाऱ्या अनधिकृत इमारतींवर गेल्या आणि दिवसांपासून न्यायालयांच्या आदेशानुसार ठाणे महानगरपालिकेच्या वतीने जेसीबीच्या साह्याने कारवाई करण्यात येत आहे.. या कारवाईला रहिवाशांनी कडाडून विरोध दर्शवला होता मात्र सलग तीन ते चार दिवस ही धडक कारवाई सुरू होती.. या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांनी आता ठाणे महानगरपालिके बाहेर एक मोर्चा काढला आहे घरांच्या बदल्यात घरे द्या अशी मागणी हे रहिवासी करत आहेत मोठा पोलिसांचा फौज फाटा सध्या ठाणे महानगरपालिके बाहेर पोलिसांचा तैनात करण्यात आला आहे त्यामुळे आता महापालिका या अनधिकृत इमारतींमध्ये राहणाऱ्या रहिवाशांचा प्रश्न कशाप्रकारे मार्गी लागेल हे पाहणे महत्त्वाचे ठरेल..
3
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 07:02:39
Nagpur, Maharashtra:आणि Ngp Pwd byte या स्लगने पीडब्ल्यूडी अधिकाऱ्याचा बाईट पाठवला आहे — नागपूर हिवाळी अधिवेशनाच्या तयारीवर कमीत कमी खर्च करा - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सार्वजनिक बांधकाम विभागाला सूचना - मुख्यमंत्री काल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची बैठक घेतली - रवि भवन परिसरातील मंत्र्यांच्या बंगल्यावर अतिरिक्त खर्च होणार नाही - सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिक्षक अभियंता जनार्दन भानुसे यांची माहिती - काही बंगल्यांचं स्ट्रक्चरल ॲाडीट नंतर सुचविलेल्या दुरुस्त्यानुसार बंगल्यांची कामं सुरु सुरु - देवगिरी बंगला दोन माळ्यांचा आहे, तिथे लिफ्ट लागणार - हिवाळी अधिवेशनापर्यंत बंगले सज्ज केले जाणार
7
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 07:00:56
3
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 07, 2025 06:32:58
8
comment0
Report
SKSACHIN KASABE
Nov 07, 2025 06:19:36
Pandharpur, Maharashtra:पंढरपूर मध्ये मराठा समाजाचे पदाधिकारी आणि ओबीसी नेते लक्ष्मण हाके समोरासमोर आल्यानंतर मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा दिल्या यानंतर हाके यांनी पोलीस प्रोटेक्शन मागवले छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांची लक्ष्मण हाके यांना एलर्जी आहे का असावा मराठा पदाधिकारी उपस्थित केला यानंतर लक्ष्मण हाके आणि मराठा पदाधिकारी एकमेकांना जोरदार भिडले यावेळी दोघांनीही एकमेकांची लाज काढत एकमेकांचा बाप सुद्धा काढला सार्वजनिक जागेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणा देऊ शकत नाही का असा प्रश्न मराठा समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी पोलिसां समोर उपस्थित केला यावेळी काही वेळ लक्ष्मण हाके यांची बोलती बंद झाली होती
14
comment0
Report
Advertisement
Back to top