Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Thane400601
ठाणे महापालिका विकास निधि पर सवाल, बीजेपी पार्षद ने जांच की मांग
SKShubham Koli
Nov 07, 2025 07:22:42
Thane, Maharashtra
ठाण्यातील विकासकामांच्या निधीवर प्रश्नचिन्ह? भाजप नगरसेवक नारायण पवार यांची फडणवीस यांना चौकशीची मागणी ठाणे महानगरपालिकेतील विकासकामांकरिता 2022 नंतर तब्बल 3900 कोटी रुपयांचा निधी देण्यात आला असूनही नागरिकांना मूलभूत सुविधा न मिळाल्याने ठाण्यातील भाजप नगरसेवक नारायण शंकर पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना चौकशी करण्याची मागणी पत्राद्वारे केली आहे. पवार यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, केंद्र व राज्य सरकारकडून ठाणे महानगरपालिकेला मिळालेल्या निधीतून रस्ते, गटारे, पाणीपुरवठा, प्रकाशयोजना, सांडपाणी व्यवस्थापन यांसारख्या मूलभूत सेवांचा दर्जा अजूनही समाधानकारक नाही. नागरिकांना अनेक ठिकाणी अडचणींना सामोरे जावे लागत असून, मोठा निधी खर्च झाल्याचे सांगितले जात असले तरी त्याचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांना मिळत नाही, असे त्यांनी नमूद केले आहे. नगरसेवक पवार यांनी पुढे स्पष्ट केले आहे की, केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांतर्गत 2022 पासून ठाणे महानगरपालिकेला एकूण 3900 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. मात्र, या निधीचा वापर पारदर्शकतेने झाला आहे काय, याबाबत शंका निर्माण झाली असून, त्यावर सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे. दरम्यान, सत्तेत जरी महायुती असली तरी ठाणे महानगरपालिकेत मात्र फक्त शिवसेनेच्या नगरसेवकांनाच निधी दिला जातो, तर भाजपच्या नगरसेवकांना निधी मिळत नाही, अशी चर्चा ठाण्यातील राजकीय वर्तुळात सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पवार यांनी कंटाळूनच हे पत्र लिहिलं की काय, असा सवालही स्थानिक पातळीवर उपस्थित केला जात आहे. भाजपच्या नगरसेवकाकडून आलेल्या या पत्रामुळे ठाणे महापालिकेतील निधीवाटप आणि विकासकामांच्या पारदर्शकतेबाबत नव्याने चर्चेला उधाण आले आहे..
5
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Nov 07, 2025 09:50:25
Nagpur, Maharashtra:नागपुर बाइट - रवि राणा, भाजप आमदार. बच्चू कडूंचा आंदोलन म्हणजे स्वतःचं राजकीय पुनर्वसन करण्यासाठी होतं.. हिंसक वळण देत नागपुरात आंदोलन झाल्याने कोर्टाने देखील ताशेरे ओढले आहे.. शेतकऱ्यांसोबत मुख्यमंत्री आणि सरकार आहे..मात्र शेतकऱ्यांचा सहारा घेत आपलं राजकीय पुनर्वसन व्हावे याकरिता हे आंदोलन होत एकनाथ शिंदे यांच्यासोबत वीस मिनिटे बच्चू कडू यांची एकांतात बैठक झाली.. यावरून वाटते लवकरच बच्चू कडू यांचं शिंदे गटात राजकीय पुनर्वसन होणार.. ज्याव्हा उद्धव ठाकरे किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होते.. तेव्हा त्यांनी कधीही शेतकऱ्यांचा मुद्दा काढला नाही.. आता पराभव झाल्यावर त्यांना शेतकरी आठवला.. ज्यांनी आपल्या मतदारसंघातील शेतकऱ्यांना न्याय दिला नाही.. तो व्यक्ती आता शेतकऱ्यांना वेठीस धरून आपले राजकीय पुनर्वसन करत आहे.. 32 हजार कोटीचे पॅकेज सरकारने दिल्यावर, अशा पद्धतीने आंदोलन करणे हा स्वतःच्या राजकीय पुनर्वसनासाठी केलेलं नाटक.. (On एकनाथ शिंदे बच्चू कडू संगनमत ) मुख्यमंत्री स्वतः शेतकऱ्यांसोबत असल्यामुळे त्यांना कोणीही अडचणीत आणू शकत नाही.. बच्चू कडूंनी एकनाथ शिंदे सोबत केलीली 20 मिनिटांची बैठक याचा सार म्हणजे येणाऱ्या काळात बच्चू कडूंचे शिंदे गटात पुनर्वसन होणार.. (On बच्चू कडू हवाई महल) असा कोणताही शेतकरी असू शकत नाही ज्याचं 75 एकर जागेत हवाई महल असलेले... स्विमिंग पूल पासून सर्व आधुनिक सुविधा यामध्ये उपलब्ध आहेत... पुणे मुंबई नाशिक अशा अनेक ठिकाणी असणाऱ्या त्यांच्या संपत्त्याचा मोठा गट्टा मुख्यमंत्र्यांकडे जमा झालाय.. थोड्या दिवसात अवैध संपत्तीचे केसेस बच्चू कडूवर दाखल होतील.. ही अवैध संपत्ती अशा पद्धतीचे आंदोलन आणि ब्लॅकमेलिंग करून संपत्ती जमवली आहे..
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Nov 07, 2025 09:49:26
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 07, 2025 09:39:47
Shirdi, Maharashtra:कोपरगाव / अहिल्यानगर कृषिमंत्री दत्ता भरणे बाईट पॉईंटर - ऑन शेतकरी अडचणीत - अतिवृष्टी आणि बाजार भाव नसल्याने शेतकरी अडचणीत... राज्यात 1 कोटी 19 लाख हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय... अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना उभ करण्यासाठी सरकारने मदत केली आहे... 31 हजार कोटींपैकी आजपर्यंत 20 हजार कोटींची मदत शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली आहे... आम्हीही शेतकऱ्यांची मुलं... एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात परदेशी कमिटीचा अहवाल येईल... 30 जून पर्यंत शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला जाईल... ऑन सिल्लोड भाजप कार्यकर्ते बोगस खते विक्री अंबादास दानवे आरोप - काल रात्रीची याबाबत माहिती मिळाली... या प्रकरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई केली जाईल... कृषी मंत्र्यांचे आश्वासन... ऑन ऑन राजू शेट्टी कोल्हापूर आंदोलन - राजू शेट्टींची मागणी चुकीची नाही... साखर कारखान्यांचे चेअरमन आणि शेतकरी प्रतिनिधींना सोबत घेऊन मार्ग काढला जाईल ऑन उद्धव ठाकरे धाराशिव दौरा - हे दिवस राजकारण करण्याचे नाहीत तर शेतकऱ्यांना उभं करण्याचे आहेत... राज्य शासनाचा प्रयत्न शेतकऱ्यांसाठी चांगलं करण्याचा... ऑन नितेश राणे कुंभमेळा वक्तव्य - याबाबतीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस बोलतील... ऑन_parth_pawar - पक्षाची प्रतिमा मलीन होण्याचा विषय नाही... अजितदादांनी याबाबतीत कालच खुलासा केलाय... त्यांनी खुलासा केल्यानंतर मी त्या गोष्टींवर बोलणं योग्य नाही... ऑन धाराशिव जिल्हा मध्यवर्ती बँक अनुदान रक्कम सक्ती - कोणतीही बँक असे करत असेल तर त्यांना सूचना दिल्या जािल... अशा पद्धतीने अनुदानाची रक्कम खात्यावर ठेवता येणार नाही... ऑन अजित पवार शेतकरी वक्तव्य - अजित दादा आजच्या परिस्थितीवर नाही तर भविष्यावर बोललेत... दादांचा तसा उद्देश नव्हता... माळेगाव कारखान्याच्या कार्यक्रमात घरच्या माणसांसारखं ते बोलले... त्यांच्या बोलण्याचा अर्थाचा अनर्थ केला गेला... त्यांचा असा कुठलाही उद्देश नव्हता... दादांनी स्वतः उसाचे बेन दाबले, चारा गाडीत भरलाय, ट्रॅक्टर चालवलाय, दुधाची धार काढलीय, पोल्ट्री फार्म असताना स्वतः अंडी गोळा केली आहेत... माझ्यापेक्षाही अजित दादा हाडाचे शेतकरी आहेत... शेतकऱ्यांच्या दुःखाची त्यांना जाणीव आहे... पुण्यात स्थानिक स्वराज्य संस्था दोन्ही राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढवणार? - याबाबतीत पक्षाचे अध्यक्ष सुनील तटकरे, अजित दादा आणि प्रफुल्ल पटेल निर्णय घेतील... ऑन कांदा निर्यात - याबाबतीत राज्याचे पणन मंत्री जयकुमार रावल यांनी लक्ष घातलय... त्यांच्याकडून योग्य तो पाठपुरावा सुरू आहे... मागच्याच आठवड्यात ते दिल्लीला जाऊन आलेत...
4
comment0
Report
AKAMAR KANE
Nov 07, 2025 09:38:05
Nagpur, Maharashtra:नागपूर\n\nबाईट - अल्पसंख्याक आयोग अध्यक्ष, प्यारे खान.\n\n- नितेश राणे यांच्या वक्तव्याला कोणीही सिरियसली घेत नाही. मागील काळात त्यानी खूप वक्तव्य केले आहे..\n\n- मुसलमानाचा मागील 70 वर्षात मोठ्या प्रमाणात बहिष्कार झाला आहे. मुसलमानाची आकडेवारी पाहिल्यास आता कुठेतरी प्रगती करत आहे.\n\n- हिंदूंचे मोठे लोक अशा पद्धतीचे वक्तव्य करत नाही...मोहन भागवत, नितीन गडकरी, देवेंद्र फडणवीस आहे, हे सगळे नेते हिंदूंसाठी काम करतात, सर्व धर्मासाठी काम करतात तरी सुद्धा असे वक्तव्य करत नाही...\n\n- नाशिक मध्ये दशकानंतर कुंभ होत असतो... इलाहाबाद मध्ये मुस्लिम लोक दुकान लावतात मात्र नाश्कमध्ये तसं होत नाही\n\n- लोक तिथे आस्थेने येत असताना. शंभर दोनशे रुपयाची विक्री करणाऱ्या मुस्लीम लोकांवर काय बहिष्कार टाकत आहे..येणाऱ्या लोकांचं मन परिवर्तन करण्याचा प्रयत्न करू नका असा सल्लाही अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष पॅरे खान यांनी दिला.
4
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 09:34:28
Nashik, Maharashtra:नाशिक - - नाशिकमधील सिडकोच्या पवननगर परिसरात मद्यधुंद टवाळखोरांकडून दहशत माजवण्याचा प्रयत्न - सिडको परिसरातील अक्षय चौक, शिवनेरी गार्डन, विज्ञान चौक भागात शस्त्र मिरवत टवाळखोरांनी घातला धुडगूस - परिसरातील घरांवर टवाळखोरांकडून दगडफेक - टवाळखोरांना हटकणाऱ्या नागरिकांना दाखवली शस्त्रांचा धाक - काही धाडसी नागरिकांनी टवाळखोरांपैकी एकाला पकडून दिला चोप - संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद - नाशिक जिल्हा कायद्याचा बालेकिल्ला मोहीम राबवून गुन्हेगारांना अद्दल घडवणाऱ्या नाशिक पोलिसांना टवाळखोरांकडून आव्हान - पोलिसांकडून टवाळखोरांविरोधात कारवाईला सुरुवात
3
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 07, 2025 09:33:55
Kalyan, Maharashtra:सर्वपक्षीय हक्क संरक्षण समिती तर्फे रस्ता रोको. आंदोलनात खासदार सुरेश बाळ्या मामा आमदार किसन कथोरे सहभागी झाले. 27 गावांची स्वतंत्र नगरपालिका करण्यासाठी आंदोलन. कल्याण डोंबिवली महानगरपालिका विरुद्ध स्वतंत्र संघर्ष 27 गावांची नगरपालिका करावी याकरता लाक्षणिक उपोषण झाले होते. या वेळी सर्व पक्षीय हक्क संरक्षण समितीचे अध्यक्ष बाळ्या म्हात्रे, आमदार किसन कथोरे व सर्व पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. लाक्षणिक उपोषणानंतर कल्याण शिळरोडवर काही वेळ रस्ता रोको झाले. रस्ता रोकोमध्ये खासदार बाळ्या मामा म्हात्रे, आमदार किसन कथोरे व कार्यकर्ते सहभागी झाले. पोलिसांच्या विनंतीनंतर रस्ता रोको मागे घेण्यात आले. आंदोलनामध्ये प्रमुख नेते सर्व पक्षांचे होते. या संघर्षाला यश मिळेल अशी माझी खात्री आहे. आज सकाळी किसन कचरे यांनी मुख्यमंत्री यांच्याशी बोलणं केलेलं आहे; मागे आम्ही बोललो होतो ते सकारात्मक आहे. मुख्यमंत्र्यांनकडे हीच विनंती असेल की या विषयाची लवकरात लवकर बैठक घेऊन 27 गावांचा निर्णय घ्यावा. गावकऱ्यांना स्वतंत्र असावं अशी मागणी ग्रामपंचायतपासून होती; आता लोकसंख्या वाढल्यामुळे या ग्राम पंचायतीची स्वतंत्र नगरपालिका करावी ही आमची मागणी आहे. 27 गावांना न्याय द्यावा ही राज्य सरकारला मागणी आमची आहे. मुख्यमंत्री यांना पत्र दिलं गेलं असल्यामुळे लवकर बैठकीची शक्यता आहे. कोणत्याही परिस्थितीत या गावांची नगरपालिका झाली पाहिजे ही भूमिका संघर्ष समितीची आणि आमचा पाठिंबा आहे. माझी दृष्टी नेहमी विकासाकडे; या गावांची नावे मला माहिती आहेत; गावाने प्रेम केलं त्यामुळे या गावातून जाऊ नये अशी माझी भावना होती. गावांची नगरपालिका झाली पाहिजे ही मागणी आमची आहे.
3
comment0
Report
YKYOGESH KHARE
Nov 07, 2025 09:04:46
Nashik, Maharashtra:अँकर - राजकीय वर्तुळात सध्या भाजप मंत्री नितेश राणे आणि नाशिकचे भाजप पदाधिकारी सुधाकर बडगुजर यांच्या भेटीची, बडगुजर यांनी नितेश राणे यांना पुष्पगुच्छ देत केलेल्या स्वागताची आणि राणे यांनी हसतमुख चेहऱ्याने स्वीकारलेल्या त्या स्वागताची जोरदार चर्चा रंगलीये. सलीम कुत्ता प्रकरणावरून नितेश राणेंनी बडगुजर यांना देशद्रोही ठरवले होते, या मुद्द्यावरुन आक्रमक होत राणे यांनी अधिवेशन गाजवले होते तर भाजपनेही त्यांच्या विरोधात जोरदार प्रचार केला होता पण काळाच्या ओघात परिस्थिती बदलली. काही महिन्यापूर्वी सुधाकर बडगुजर भाजपात दाखल झाले आणि गुरुवारी त्यांनीच नाशिकमध्ये दाखल झालेल्या नितेश राणेंचे स्वागत केले. भाजप कार्यालयात त्यांच्यामध्ये चर्चाही झाली, मंचावर नितेश राणेंच्या रांगेतही बडगुजर बसले होते. याशिवाय सायंकाळी गोदाकाठी झालेल्या महाआरतीला दोघेही उपस्थित होते. सोशल मिडीयात सध्या राणे, बडगुजर भेटीचे हे फोटोज सोशल मिडीयात जोरदार व्हायरल होत असून रंगतदार चर्चा रंगलीय. सुधाकर बडगुजर हे एकेकाळी संजय राऊत यांचे अत्यंत निकटवर्तीय होते. बडगुजर यांनीच नारायण राणे यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती त्यानंतर नाशिक पोलिसांनी राणेंच्या अटकेसाठी मोर्चा थेट कोकणकडे वळवला होता.. एकंदरीतच काय तर राजकारणात कोणीही कोणाचे कायमस्वरूपी मित्र किंवा शत्रू नसतात हे पुन्हा एकदा सिद्ध झालं असून कार्यकर्त्यांची काय ति बिचाऱ्यांची अडचण होतेय हे मात्र नक्की..
4
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 07, 2025 09:02:40
Baramati, Maharashtra:अजित पवारांची मंत्रिमंडळातून हाकलपट्टी करा ...... बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव काळुराम चौधरी यांची मागणी..... Anchor _ मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळातून अजित पवार यांची तात्काळ हकलपट्टी करावी ज्यामुळे पार्थ पवार यांच्याशी निगडित असणाऱ्या या जमीन खरेदी प्रकरणाची निपक्षपातीपणे चौकशी करता येईल अशी मागणी बहुजन समाज पार्टीचे प्रदेश सचिव काळूराम चौधरी यांनी पत्रकार परिषदेत केली आहे. अजित पवारांच्या पदाचा फायदा त्यांच्या मुलाला होऊ शकतो त्यामुळे अजित पवारांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा. अशी मागणी चौधरी यांनी केली आहे. बारामती तालुक्यातील सोनगाव येथील नंबर 353 मध्ये जमिनीचा मूळ मालक डाकू कांबळे यांची जमीन यासोबत मेडद येथील पाच एकर मागासवर्गीयांची जमीन मिळत ग्रामपंचायतीने ठराव करून अजित पवारांच्या ताब्यात असणाऱ्या बारामती खरेदी-विक्री संघ याला दिली मी आता तिथे व्यवसाय सुरू झाले आहेत या मागासवर्गीय यांच्या जमिनीत लाटल्या आहेत असा आरोप चौधरी यांनी केलाय. आपण दिग्दर्शक प्रवीण तरडे यांच्याकडे काटेवाडी पॅटर्न नावाचा सिनेमा काढा अशी मागणी करणार आहोत आणि त्यामध्ये जो नायक असेल उपमुख्यमंत्र्यांचा पोरगा दाखवा. मुळशी पॅटर्न पेक्षा जास्त हा सिनेमा चालेल असं चौधरींनी म्हटलं आहे.
1
comment0
Report
SKSudarshan Khillare
Nov 07, 2025 08:36:29
2
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 07, 2025 08:33:42
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - कोरेगाव प्रकरणात जर काही चुकीचं असेल किंवा अनियमितता असेल तर कारवाई केली जाईल - मंत्री जयकुमार गोरे. जयकुमार गोरे, पालकमंत्री. ऑन वंदे मातरम. वंदे मातरम मधून देश प्रेमाची प्रेरणा मिळते. पंतप्रधान मोदी यांनी मन की बात मधून आव्हान केलं. सोलापुरातील दयानंद महाविद्यालयाने सुंदर प्रकारे वंदे मातरम गायनाचं काम केलं. महाविद्यालयातील विद्यार्थिनी चांगल्या प्रकारे भारताची प्रतिकृती तयार करून हातात तिरंगा घेऊन वंदे मातरम गायले. ऑन अबू आझमी. देशप्रेम नसलेल्या प्रवृत्ती देशात आहे त्यांच्याकडे जास्त न लक्ष देता, देशाचा समान कसा वाढेल, देशाप्रती कसं प्रेम वाढेल याकडे लक्ष दिले पाहिजे. ऑन जरांगे पाटील. यासंदर्भात कल्पना नाही मात्र काही घटना घडली असेल तर माहिती घेऊन बोलू. ऑन सुप्रिया सुळे वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस काम करत आहेत त्यामुळे राज्यात चुकीच्या कामाला पाठबळ मिळणार नाही. या चुकीचं काम असेल तर त्यात नक्की कारवाई केली जाईल आदेश मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. कोरेगाव प्रकरणात जर काही चुकीचं असेल किंवा अनियमितता असेल. तर कारवाई केली जाईल. प्रथमदर्शनी काही गोष्टी लक्षात आल्यानंतर तहसीलदार आणि संबंधित अधिकाऱ्यांना निलंबित केलं. आणखीन काही असेल तर चौकशी करून कारवाई करण्याची भूमिका मुख्यमंत्री महोदय घेतली. कोण काय म्हणते, याकडे लक्ष न देता मुख्यमंत्र्यांनी लक्ष घालून चौकशी सुरू आहे. कुणी दोष असेल त्यावर कारवाई होणार. ऑन अजित पवार राजीनामा. काही लोकांना सातत्याने राजीनामा मागायची सवय असते. या प्रकरणी पहिली चौकशी होऊ द्यावी त्यानंतर जे निष्पन्न होईल, डायरेक्ट आणि इन डायरेक्ट त्यांचा हात होता नव्हता. यावरून त्यावर निर्णय झाला पाहिजे. चौकशी न करता एखाद्याला शिक्षा देणे उचित ठरणार नाही. ऑन कोरेगाव प्रकरण ॲट्रॉसिटी. मुख्यमंत्री याबाबत चौकशीच्या आदेश दिले आहेत.. यात काय घडलं असेल तर 100 टक्के मुख्यमंत्र्यांनी कारवाईची भूमिका बजावली आहे.. ऑन दिलीप माने प्रवेश. आता फक्त ऑपरेशन लोटची सुरुवात झाली आहे.. आगे आगे देखो होता है क्या.. आपण एवढ्या लवकर निष्कर्षापर्यंत येऊ नये, ही सातत्याने चालणारी प्रोसेस आहे.. योग्य वेळी योग्य बटन दाबलं की इनफॅक्ट चांगला होतो. एकाच वेळी वेगवेगळे बटन दाबून चालणार नाही. स्थानिक लोकांना विचारात घेऊन पक्षाचा विस्तार करताना प्रत्येकालाच गोष्ट चांगली वाटते असं नाही. परंतु पक्ष वाढवत असताना किंवा पक्षाचा विस्तार होत असताना आवडणारे किंवा न आवडणारे निर्णय घ्यावे लागतात. याबाबत पक्षश्रेष्ठी निर्णय घेतील, तो निर्णय मलाही मान्य करावा लागणार आहे.. तो कुणालाही मान्य करावा लागेल.. पक्षश्रेष्ठीने निर्णय घेईपर्यंत यावर बोलणं उचित होणार नाही, आपली जी भूमिका आहे ती मांडण्यासाठी पक्षाचा कार्यालय हे व्यासपीठ आहे. त्या ठिकाणी पक्षश्रेष्ठ मुख्यमंत्री भेटतील त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणी योग्य आहे. पक्ष विस्तारासाठी लागणाऱ्या सर्व गोष्टी पक्ष नेतृत्व करेल.
7
comment0
Report
JMJAVED MULANI
Nov 07, 2025 08:32:46
4
comment0
Report
SKShubham Koli
Nov 07, 2025 08:32:20
Thane, Maharashtra:बंकिमचंद्र चटर्जी यांनी रचलेल्या वंदे मातरम् या राष्ट्रीय गीताला आज, ०७ नोव्हेंबर रोजी १५० वर्षे पूर्ण झाली. त्यानिमित्ताने देशभरात सामुहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. ठाणे महापालिकेतही अधिकारी आणि कर्मचारी यांनी सामुहिक वंदे मातरम गायनाने या राष्ट्रीय गीताचा स्मरणोत्सव साजरा केला. सर्व जनमानसात देशभावना जागृत होण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या 'वंदे मातरम् ' या गीतास दि. ७ नोव्हेंबर २०२५ रोजी १५० वर्ष पूर्ण झाली. त्यानिमित्ताने भारत सरकारच्या संस्कृती मंत्रालयाने वर्षभराच्या कार्यक्रमांचे नियोजन केले आहे. त्याची सुरूवात मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत नवी दिल्ली येथे इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये मुख्य सोहळ्याने झाली. या सोहळ्याचे थेट प्रक्षेपण महापालिकेच्या अधिकारी आणि कर्मचारी यांनी मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात पाहिले.
3
comment0
Report
Advertisement
Back to top