Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Bhandara441904

भंडारा जिले के वरठी क्षेत्र सोनोली गाँव में सोलर वायर चोरी से किसान भय

PTPRAVIN TANDEKAR
Mar 20, 2026 02:31:57
Bhandara, Maharashtra
भंडाऱ्याच्या सोनुलीत सोलर वायर चोरीचा कहर. शेतकरी भीतीच्या छायेत, पिकांवर संकट. वरठी पोलीसात गुन्हा नोंद. भंडारा जिल्ह्यातील वरठी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनोली गावात सोलर पॅनलच्या कनेक्टर वायर चोरीच्या घटनांनी शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. काल रात्री अज्ञात चोरट्यांनी सात शेतकऱ्यांच्या शेतातील सोलर पॅनलच्या वायर व कनेक्टर चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. यापूर्वी १७ मार्च रोजीही पाच शेतकऱ्यांना अशाच प्रकारे फटका बसला होता. सलग घडणाऱ्या चोरीमुळे शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यासाठी सोलर पंपांवर अवलंबून असताना वायर चोरीमुळे पाणीपुरवठा खंडित होत आहे. त्यामुळे पिकांचे मोठे नुकसान होण्याची bhiती आहे. संतप्त शेतकऱ्यांनी पोलिसांकडे तक्रार दाखल करून तत्काळ कारवाईची मागणी केली आहे.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:50:08
Nagpur, Maharashtra:नागपूर - शिक्षकांना उन्हाळी सुट्टीत जनगणनेचे कामे, त्यामुळे सुट्टीत कामे केल्याच्या बदल्यात विशेष सुट्टीची मागणी - १६ मे ते १५ जूनदरम्यान शिक्षकांना जनगणनेच्या कामासाठी हजर राहण्याचे आदेश - डिजिटल जनगणनेसाठी शिक्षकांचे प्रशिक्षणही होणार - सुट्टीत मुख्यालय सोडता येणार नाही, शिक्षण अधिकाऱ्यांचे निर्देश - ३० एप्रिलला शैक्षणिक सत्र समाप्त, २ मेपासून सुट्ट्या सुरू, २६ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्षाला सुरुवात - उन्हाळी सुट्टीतही शिक्षकांना कामावर हजर राहावे लागणार, निवडणुकांनंतर पुन्हा शासकीय कामात शिक्षक गुंतणार - सुट्टीतील कामाच्या बदल्यात विशेष रजेची शिक्षकांची मागणी, बाहेरगावी जाण्याचे नियोजन बिघडल्याने शिक्षकांमध्ये नाराजी - जनगणना कामासाठी शिक्षकांना सज्ज राहण्याचे आदेश
0
comment0
Report
AKAMAR KANE
Mar 20, 2026 03:49:51
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Mar 20, 2026 03:48:58
0
comment0
Report
SKSACHIN KASABE
Mar 20, 2026 03:33:54
Pandharpur, Maharashtra:सोलापूर जिले के सांगोला तालुक्यात अवकाळी गारपिटीने कोट्यावधी रुपयांचे नुकसान झाले आहे. आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानीची पाहणी केली आहे. तर माजी आमदार दीपक साळुंखे यांची तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. सांगोल्याच्या पूर्व भागातील सहा गावांना अवकाळी आणि गारपीटने जोरदार झोडपले आहे. या मध्ये काढणीला आलेल्या द्राक्ष बागा डाळिंब, मका आणि इतर पिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे. सांगोल्याचे आमदार डॉक्टर बाबासाहेब देशमुख यांनी नुकसानग्रस्त बागांची पाहणी करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. तसेच मुख्यमंत्री आणि कृषी मंत्री यांना संपर्क करून याबाबत माहिती दिली. सोमवारी याबाबत अधिवेशनात प्रश्न उपस्थित करणार असल्याचे सांगितले. सांगोल्याचे माजी आमदार दीपक साळुंखे यांनी या अवकाळी नुकसानी बाबत पालकमंत्री जयकुमार गोरे यांना तातडीने पंचनामे करण्याची मागणी केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकारी यांच्याकडून नुकसानग्रस्त पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश दिल्याचे सांगितले.
851
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 03:02:43
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात गारपिटीसह झालेल्या अवकाळी पावसाचा तडाखा काढणीस आलेल्या गव्हाला आणि आंब्यासह फळपिकांना बसला. शेतकऱ्यांच्या नुकसानीची परिस्थिती अद्याप समोर आलेली नाही; परंतु विभागातील काही जिल्ह्यांत नुकसान झाल्याची प्राथमिक माहिती आयुक्तालयाकडे आली आहे. २२ मार्चपर्यंत अवकाळी पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे तर  छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात बुधवार आणि गुरुवार असे सलग दोन दिवस वादळी वाऱ्यासह झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीने रब्बी हंगामातील पिकांची दाणादाण उडवली आहे. फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव, गंगापूर आणि खुलताबाद तालुक्यात निसर्गाच्या या प्रकोपाचा सर्वाधिक फटका बसला असून, काढणीला आलेला गहू, मका, हरभरा आणि कांदा पिके अक्षरशः मातीमोल झाली आहेत. सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेकडो एकर क्षेत्रातील उभी पिके आडवी पडली असून शेतकऱ्यांचे वर्षभराचे कष्ट वाया गेले आहेत.
943
comment0
Report
PNPratap Naik1
Mar 20, 2026 02:45:25
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या राजकारणात महायुतीचे घटक पक्ष असणाऱ्या राष्ट्रवादी आणि शिवसेनेमध्ये जोरदार दोस्तीतील कुस्ती सुरू असल्याच दिसून येत आहे. राष्ट्रवादी गटनेचे आदिल फरास आणि शिवसेना गटनेते शारंगधर देशमुख हे भर सभागृहात एकमेकाला बघून घेण्याची भाषा करण्याबरोबरच चौकात ये तुला दाखवतो अशी धमकी देखील देत आहेत. या टोकाच्या वादानंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या प्रमुख नेत्यांनी वाद मिटवला जाईल अस आश्वासन दिल आहे. राष्ट्रवादीचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी तर राष्ट्रवादीचा पदाधिकारी असल्यामुळे माफी मागत असल्याचं म्हटलय. जर का या दोघांमधील वाद मिटले नाही तर कोल्हापुरातील ऐतिहासिक खासबाग मैदानात या दोघांची कुस्ती लावू अशी टिप्पणी करत उपरोधिक चिमटा काढला आहे.
931
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:55
1071
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:33:02
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजी नगर जिल्हा परिषदेत भविष्यात शिवसेनेकडून अविश्वास ठराव आणत सत्तेला सुरुंग लागू नये यासाठी राष्ट्रवादी आणि अपक्षांना सभापती पदासह स्थायी समितीत घेण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. प्रयत्न करूनही शिवसेना सत्तेत येऊ शकले नाही त्यामुळे शिवसेना दुखावली आहे आणि सातत्याने भाजपची या सत्तेत अडचणी निर्माण करण्यासाठी शिवसेना प्रयत्न करू शकते, त्यामुळं ज्यांनी ज्यांनी सत्ता स्थापन करताना भाजपला मदत केली ते जर फुटले तर भाजपाला धोका होऊ शकतो, त्यामुळे भाजपने सावध खेळ सुरू केली आहे , सत्ता स्थापनेत ज्यांनी साथ दिली अशा सगळ्यांना काहीतरी देण्याचा भाजपाचा प्रयत्न सुरू आहे...
1042
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Mar 20, 2026 02:30:36
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:जिल्हा परिषद अध्यक्ष और उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत उद्धवसेनेचे छत्रपती संभाजी नगरचे जिल्हाप्रमुख तथा विधान परिषदेचे माजी विरोधी पक्षनेते अंबाडास दानवे यांनी आमचा १८ कोटी रुपयांना सौदा केला. त्यातील ४ कोटी रुपये स्वतः हडपले, असा आरोप शिऊर गटाच्या उद्धवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी केला... स्वःपक्षाच्या काही सदस्यांवर पैसे खाल्ल्याचा आरोप दानवे यांनी केला होता. यावर निकम म्हणाले, १० ते १७ मार्च या कालावधीत निवडून आलेल्या नऊ सदस्यांना इगतपुरी, ठाणे, नवी मुंबई, कर्जत आणि गोवा अशा विविध ठिकाणी सहलीला नेण्यात आले. तिथे ओलीस ठेवून आमचे मोबाईल काढून घेण्यात आले होते. दानवे यांनी आमचा परस्पर १८ कोटी रुपयांत सौदा केला होता. त्यातील काही रक्कम आगाऊ मिळाली होती, तर उर्वरित रक्कम मतदानानंतर मिळणार होती. त्यातील काही रक्कम ते सदस्याच्या पदरात टाकणार होते. याची चाहूल लागताच आम्ही तातडीने पक्षाचे संपर्क प्रमुख विनोद घोसाळकर आणि आ. मिलिंद नार्वेकर यांच्याशी संपर्क केला व आपली भूमिका सांगितली. त्यानंतर आम्ही कुठल्प पक्षाला मतदान न करण्याचा निर्णय घेतला असा खुलासा संजय निकम यांनी केलाय... Byte संजय निकम, जीप सदस्य उद्धव ठाकरे गट
1099
comment0
Report
GMGajanan MAchindar
Mar 20, 2026 02:19:34
1076
comment0
Report
Advertisement
Back to top