Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Aurangabad431001

छत्रपति संभाजीनगर नगरपालिका चुनाव: मतदाता सूची में गड़बड़ियों के आरोप, 7 ने दायर विरोध

VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:34:21
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
छत्रपती संभाजीनगर महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी महापालिका प्रशासनाने मतदार याद्या जाहीर केल्या. इच्छुक उमेदवारांनी मतदार याद्यांचा अभ्यास सुरू केला. त्यामध्ये प्रचंड चुका असल्याचे समोर येत आहे. एका प्रभागातील हजार ते दीड हजार मतदार पलीकडील तिसऱ्या प्रभागात दर्शविण्यात आले आहेत. त्यामुळे शुक्रवारी ७ जणांनी निवडणूक विभागात आक्षेप दाखल केले. आक्षेप घेण्यासाठी ७ दिवसांचा अवधी देण्यात आला आहे. निवडणूक विभागाने शुक्रवारी प्राप्त हरकतींची फेरतपासणी सुरू केली आहे. हरकती- सूचनांवर सुनावणी घेतल्यानंतर अंतिम मतदार यादी ५ डिसेंबरला निवडणूक आयोगाला पाठवली जाईल. नवीन मतदान केंद्रांची पाहणी करण्यासाठी प्रशासनाने अभियंत्यांची स्वतंत्र टीम तयार केली आहे...
210
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SGSagar Gaikwad
Nov 22, 2025 03:33:42
Nashik, Maharashtra:बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांबाबत जिल्ह्यात पंचसूत्री नाशिक जिल्ह्यात बिबट्यांच्या वाढत्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर वनविभागासह जिल्हा प्रशासनाने पंचसूत्री तयार केली असून न्यायालयाच्या आदेशानुसार ज्या ठिकाणी बिबट्यांचा जास्त वावर अाढळला आहे, अथवा हल्ल्याच्या घटना घडलेल्या आहेत... अशा १२५ ठिकाणांचा आपत्तीग्रस्त ठिकाणांमध्ये समावेश होणार आहे. यासंदर्भात सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे. बिबट्याचा संचार नागरिकांसाठी डोकेदुखी ठरू लागला आहे. त्यावर उपाययोजनेसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात काल वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांची भेट घेत त्यांच्याशी चर्चा केली. त्यात बिबट्याच्या समस्येपासून बचावासाठी पंचसूत्री ठरवण्यात आली. त्यात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांच्या आधारे मानव-प्राण्यांचा संपर्क व संघर्ष जास्त प्रमाणात आढळणाऱ्या सर्व भागांना आपत्तीग्रस्त घोषित करण्यात येणार आहे. मागील दहा वर्षातील उपलब्ध पॅटर्ननुसार सुमारे १२० ठिकाणी संघर्षाची प्राथमिक नोंद आहे...
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 22, 2025 03:31:45
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या पुसद नगर परिषद नगराध्यक्ष पदाच्या निवडणुकीत राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांची पत्नी मोहिनी ह्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार आहेत, तर मंत्री इंद्रनील यांचे बंधू माजी आमदार निलय नाईक यांच्या नेतृत्वात भाजपा स्वतंत्र लढत आहे. असे असतानाही मोहिनी नाईक यांना मत द्या असे संभाषण असलेली निलय नाईक यांची एक व्हिडिओ क्लिप व्हायरल केल्या जात आहे. दरम्यान ही क्लिप म्हणजे खोडसाळपणाचा प्रकार असून राजकारण इतक्या खालच्या पातळीवर नेऊ नका असा इशारा निलय नाईक यांनी दिला आहे. ही क्लिप उमेदवारी न मिळालेल्या काही नाराजांनी तयार केल्याचंही त्यांनी म्हटले आहे. मी माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचा नातू व सुधाकरराव नाईक यांचा पुतण्या आहे. याआधीही काका मनोहर नाईक व भाऊ इंद्रनील यांच्याविरुद्ध मी निवडणूक लढवली आहे. नात्यात मोहिनी नाईक माझी मुलगी आहे, त्यांना माझे आशीर्वाद असले तरी भाजपाचा सच्चा सेवक म्हणून मी भाजपच्या उमेदवारालाच विजयी करून दाखवील असे निलय नाईक यांनी म्हटले आहे.
0
comment0
Report
AAABHISHEK ADEPPA
Nov 22, 2025 03:30:21
Solapur, Maharashtra:सोलापूर ब्रेकिंग - मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात त्या पिपाणीत काही दम नाही, पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या टीका उमेश पाटीलांचे नाव न घेता. मोहोळ येथील सभेतून पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांचे नाव न घेता जळजळीत टीका. मोहोळ तालुक्यात सातत्याने वाजत असतात, त्या पिपाणीत काही दम नाही. माध्यमांसमोर यायचं आणि बोलायचं, बोलून विकास होत नसतो. लोकांच्या सोबत घेऊन लोकांच्या अडचणी समजून घेऊन ते काम करावं लागतं. काम करण्यासाठी क्षमतेने मेहनत करावी लागते. सगळं सुंदर दिसतं ते सगळं चांगलं असतं असं नसतं. बराच वेळा जे पिवळे दिसते, ते सोनं नसतं, काही वेळ ते बेन्टेक्सपण असतं. पालकमंत्री गोरे यांनी उमेश पाटील यांचे नाव न घेता घेतला समाचार. माझ्याआधी मुख्यमंत्र्यांनी मोहोळची माहिती घेतली होती, मोहोळचचा नगराध्यक्ष भाजपचा होतंय.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Nov 22, 2025 03:17:45
Wardha, Maharashtra:वर्ध्यात शहर पोलिसांकडून देशी- विदेशी दारूच्या 150 पेट्या जप्त. 12 लाख 93 हजारांचा देशी-विदेशी दारू जप्त. वर्धा पोलिसांनी एकाच दिवशी 150 दारूच्या पेट्या पकडल्या. स्थानिक स्वराज्य संस्था च्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोठी कारवाई. पोलीस उपनिरीक्षक विशाल सवई यांच्या पथकाने केली कारवाई. अवैध दारू तस्करीचा पर्दापाश. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याकडून शहर पोलिसांचे कौतुक. पोलिसांच्या कारवाईने अवैध दारू तस्करी करणाऱ्या टोळीचे दाबे दणाणले. अवैध दारूची तस्करी करणाऱ्या दोन आरोपींना अटक. दोन मोबाईल,चारचाकी गाडी,150 पेट्या असा 13 लाखांचा मुद्देमाल जप्त. 15 दिवसातली दुसरी मोठी शहर पोलिसांची कारवाई
113
comment0
Report
GMGANESH MOHALE
Nov 22, 2025 03:16:43
Washim, Maharashtra:वाशीम: रिपोर्टर:गणेश मोहळे, वाशिम अँकर:वाशिम नगर परिषद निवडणुकीसाठी प्रभाग क्रमांक २ मधून नगरसेवक पदाची निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या भाजपच्या अभियंता सेलचे विभागीय सह संयोजक धनंजय घुगे यांच्या ऐवजी दुसऱ्याला उमेदवारी दिल्यानं त्यांनी चक्क उमेदवारी कापणाऱ्यांचे धन्यवाद मानणारे बॅनर लावलेत.आणि पक्षनिष्ठा सिद्ध करण्याची संधी दिल्याची संधी दिल्याचा मजकूर बॅनर वर लिहलाय.या संदर्भात त्यांना विचारलं असता माझी उमेदवारी कापल्या नंतर मी पक्ष सोडेल किंव्हा पक्षाच्या उमेदवाराला अडाचणीत आणण्याचे कामं करेल अशी चर्चा रंगली होती. या चर्चेला पूर्णविराम देण्यासाठी आणि मी पक्षाशी एकनिष्ठ आहे हे सांगण्यासाठी मी बॅनर लावलेत असं त्यांनी सांगलं. बाईट :धनंजय घुगे,विभागीय सह संयोजक भाजप अभियंता सेल.
115
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 03:03:14
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:मराठवाड्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना शासनाने ८ हजार ७०८ कोटींचे अनुदान जाहीर केले. त्यातील ५ हजार २८७ कोटी रुपये ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झाले. ई-केवायसी किंवा अग्रिस्टॅक नोंद नसलेल्या ४० टक्के शेतकऱ्यांना रक्कम वाटपाची अजूनही प्रतीक्षा आहे. सुमारे ६ लाख ७८ हजार ३५९ शेतकऱ्यांचे ई-केवायसी प्रलंबित आहे. त्यामुळे ४१२ कोटींचे अनुदान अडकले आहे. जिल्हानिहाय वाटप पाहता बीड जिल्ह्यात सर्वाधिक १३ लाख ३१ हजार ८६५ शेतकरी बाधित झाले. त्यांना ९८४.४९ कोटींचे अनुदान मिळाले. नांदेडमध्ये ११ लाख ३१ हजार ३५६ शेतकऱ्यांना ९११.३८ कोटी, लातूरमध्ये ११ लाख ५० हजार ७६३ शेतकऱ्यांना ७५५.७० कोटी, धाराशिवमध्ये ७लाख ९० हजार ६०५ शेतकऱ्यांना ६८७.११ कोटी, परभणीत ८ लाख ३३ हजार ९२७ शेतकऱ्यांना ५५३.१८ कोटी, छत्रपती संभाजीनगरमध्ये ७लाख ६५ हजार ४७५ शेतकऱ्यांना ५९९.१३ कोटी, जालन्यात ५ लाख ९२ हजार १७७ शेतकऱ्यांना ४०४.७३ कोटी, हिंगोलीत ४ लाख ९६ हजार ५६६ शेतकऱ्यांना ३९१.८१ कोटींचे अनुदान मिळाले. एकूण ७० लाख ९२ हजार ७३४ शेतकऱ्यांना ५ हजार २८७.५६ कोटींचे अनुदान बँक खात्यात जमा झाले आहे...
107
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 03:02:54
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्तीसगड, दिल्लीच्या टोळ्यांसोबत हातमिळवणी करून संभाजी नगर शहरातील पाच उच्चशिक्षित तरुणांनी बोगस ऑनलाइन गेमिंग, सट्टेबाजीचे सेंटर उघडले. मात्र, हे रॅकेट पूर्णपणे ते चालवत नव्हते. दुबई व देशाच्या मुख्य सूत्रधारांकडून या जुगाराच्या वेबसाइटची टक्केवारीवर फ्रेंचायजी मॉडेल चालवण्यासाठी दिले जाते. अशा विविध वेबसाइट, अॅपद्वारे अब्जावधी रुपयांची उलाढाल होते. हा सर्व व्यवहार हवालामार्फत चालतो, अशी माहिती आता पुढे आली आहे... अनेकदा देशविघातक कृत्यासाठी या माध्यमाचा वापर केला जातो. परिणामी, केंद्रीय गुप्तचर यंत्रणांकडून अशा वेबसाइटचे काम करणारे, वापरले जात असलेल्या बँक खात्यांचा शोध सुरू करण्यात आल्यानेच आता असे रॅकेट उघडकीस येत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. कुंभेफळ येथे स्वतःला सॉफ्टवेअर इंजिनीअर सांगून भाडेतत्त्वावर रो-हाऊस घेऊन २४ तास देशासह आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध ४० खेळांसह गेम्सद्वारे डिजिटल जुगार खेळवला जात होता. महिन्याभरापूर्वी सुरू झालेल्या या सेंटरवर पोलिसानी 2 दिवस पूर्वी छापा घालून 5 जणांना अटक केलीय..
113
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 22, 2025 02:48:41
Yavatmal, Maharashtra:यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेतील 242 कोटी रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार ज्या गुन्हे दाखल झाले त्या अधिकारी, कर्मचारी व संचालकांना पोलिसांनी राजकीय दबावापोटी अभय दिले आहे असा आरोप बँकेचे सभासद अतुल जगताप यांनी केला आहे. विशेष म्हणजे या घोटाळ्यात ज्यांच्यावर गुन्हे दाखल आहेत ते कर्मचारी बँकेत कार्यरत राहून महत्त्वाची कागदपत्रे हाताळतात व इतर आरोपी देखील राजरोसपणे मोकाट असल्याचे पुरावे देखील जगताप यांनी दाखविले. पोलीस मात्र आरोपींना सोडून तक्रारदारांनाच मानसिक त्रास देत असल्याचा आरोप देखील जगताप यांनी केला. बँक घोटाळ्यातील आरोपींना नेमके संरक्षण कोणाचे असा प्रश्न आता उपस्थित झाला आहे.
99
comment0
Report
CRCHAITRALI RAJAPURKAR
Nov 22, 2025 02:47:36
Pune, Maharashtra:Headline : तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकित १९ जागा बिनविरोध, ९ जागांवर रंगणार चुरस. Anchor: तळेगाव दाभाडे नगरपरिषद निवडणुकीत अर्ज माघारीच्या अखेरच्या दिवशी मोठी घडामोड झाली. एकूण ३२ उमेदवारांनी माघार घेतली असून, याआधी ७ अर्ज मागे घेतले होते. त्यामुळे एकत्रित ३९ अर्जांची माघार नोंदली गेल्याने १९ जागा बिनविरोध ठरल्या आहेत. परिणामी, तळेगावमध्ये आता केवळ ९ प्रभागांमध्येच प्रत्यक्ष मतदानाची लढत होणार आहे. तर नगराध्यक्षपदावर तिरंगी लढत स्पष्ट. नगराध्यक्ष पदासाठीची स्पर्धाही निर्णायक रूप धारण केली. दोन उमेदवारांनी माघार घेतल्यानंतर तिरंगी सामना होणार आहे. अंतिम लढत पुढीलप्रमाणे संतोष हरिभाऊ दाभाडे (महायुती – राष्ट्रवादी/भाजप युती) (file no.02) किशोर छबुराव भेगडे (अपकम – भाजप बंडखोर) (file no.03) रंजना रघुनाथ भोसले (अपकम – काँग्रेस बंडखोर)(file no.04) या तिन्ही उमेदवारांमुळे नगराध्यक्षपदाची निवडणूक अधिकच रंगतदार होणार आहे.
213
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:45:16
160
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Nov 22, 2025 02:34:53
Akola, Maharashtra:शासनाच्या धोरणांमुळे आणि सीसीआयच्या मर्यादित खरेदीमुळे शेतकऱ्यांना योग्य दर न मिळाल्याच्या निषेधार्थ प्रहार जनशक्ती पक्षातर्फे अकोट ते अकोला असा तब्बल 50 किलोमीटर पायदळ कापूस दिंडीचे आयोजन करण्यात आले होते. यंदा कापूस उत्पादनात झालेली घट, वाढती खर्चिक परिस्थिती आणि बाजारभावातील घसरण यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. सध्या शेतकऱ्यांना एकरी सरासरी 15 क्विंटल उत्पादन मिळत असतानाही शासन केवळ 5.6 क्विंटलपर्यंतच खरेदी मर्यादा ठेवत आहे. ही मर्यादा वाढवून 11 क्विंटलपर्यंत करण्याची प्रमुख मागणी या पायदळ वारीतून करण्यात आली. तसेच सीसीआयने खरेदीसाठी घालून दिलेल्या कडक नियमांमुळे कापूस विक्री प्रक्रियेत शेतकऱ्यांवर अनेक निर्बंध येत असून त्यांचा मोठ्या प्रमाणात तोटा होत असल्याचा आरोपही करण्यात आला. शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष कुलदीप वसु यांच्या नेतृत्वाखाली ही कापूस दिंडी काढण्यात आली. अखेर ही दिंडी अकोल्यातील सीसीआय कार्यालयासमोर दाखल झाली आणि शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने मान्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.
136
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Nov 22, 2025 02:33:37
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सहा नगरपरिषद आणि १ नगरपंचायतीसाठी दाखल केलेले अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी १६१ सदस्यांनी मैदान सोडले. यात नगरसेवक पदासाठी १४९, तर नगराध्यक्षपदाच्या १२ उमेदवारांसह एकूण १६१ जणांचा समावेश आहे. निवडणूक मैदानात ६५९ उमेदवार शिल्लक राहिले आहेत. यात नगराध्यक्षपदासाठी ४२, तर नगरसेवकपदासाठी ६१७ उमेदवार आमने-सामने लढणार आहेत. जिल्ह्यात कुठेही बिनविरोध निवडणूक झालेली नाही. काहींनी न्यायालयात धाव घेतल्याने २६ नोव्हेंबरपर्यंत त्यावर सुनावणी झाल्यानंतर निवडणूक मैदानात असलेल्यांचा अंतिम आकडा समोर येणार आहे. तूर्तास ६५९ उमेदवारांमध्ये राजकीय दंगल होणार आहे. छाननीनंतर नगरपरिषद, नगरपंचायतीत आपल्याला सहज विजय मिळावा म्हणून विरोधकांचे अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. यात काहींना यशही आले. २१ नोव्हेंबरअखेरीस निवडणूक मैदानात ६५९ उमेदवार आपले राजकीय भाग्य अजमावणार आहेत.
185
comment0
Report
Advertisement
Back to top