Back
हर्षवर्धन सपकाळ ने मुख्यमंत्री पर लगाए आरोप, चुनावी धांधली की नई मुमेन्ट
ADANIRUDHA DAWALE
Nov 20, 2025 10:51:11
Amravati, Maharashtra
यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत आहे; हर्षवर्धन सपकाळ यांची मुख्यमंत्र्यांवर जहरी टीका
या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – हर्षवर्धन सपकाळ
चिखलदरा नगरपरिसदेच्या निवडणुकीत काँग्रेस उमेदवारसह नवन्ना सदस्यांनी निवडणुकीतून माघार घेतल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामेभाऊ आल्हाद कोलोती हे बिनविरोध निवडून आले आहेत. यावर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी जोरदार टीका केली असून यापूर्वी भाजप पक्ष वोट चोरी करत होता मात्र आता भाजप उमेदवारांचीही चोरी करत असल्याचा आरोप हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. हा मत चोरीचा दुसरा भाग असून भाजपने आता उमेदवार चोरी सुरू केली आहे. त्यामुळे महाराष्ट्रात फ्री अँड फेअर इलेक्शन होत नाही. हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं अशोभनीय काम आहे त्याचा आम्ही धिक्कार करतो. मुख्यमंत्र्याचे एक मामी भाऊ धर्मादाय आयुक्त आहे ते जैन बोर्डिंग ची जमीन विकत आहे तर दुसरे मामेभाऊ चिखलदऱ्याची जमीन घेण्याकरिता निवडून आणत. आहे ही मुख्यमंत्र्याची गुंडशाही महाराष्ट्र खपवून घेणार नाही असा इशारा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी दिला आहे. काँग्रेस उमेदवाराला धमक्या दिल्या जात आहे किडन्याप केला जात आहे दडपशाही आणल्या जात आहे आज ही वेळ काँग्रेसवर आहे उद्या सामान्य माणसाच्याही घरात घुसायला हे मागेपुढे पाहणार नाही तसेच मुख्यमंत्री लोकशाहीची थट्टा करत असून महाराष्ट्रात हुकूमशाही आणायला पहात आहे. या सर्व कटाचे मुख्य आका हे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असल्याचंही हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे.
भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खुट्याला बांधली आहे; यशोमती ठाकूर यांचे मुख्यमंत्र्यांवर टीका
दरम्यान या संपूर्ण प्रकारामध्ये आमदार रवी राणा यांनी मध्यस्थी केली असून त्यांच्या मदतीला मोठे यश आला आहे त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रवी राणा यांना फोन करून शुभेच्छा दिल्या आहेत यावर यशोमती ठाकूर यांनी प्रतिक्रिया दिली असून भाजप हा पक्ष मुख्यमंत्र्यांनी राणा दाम्पत्याच्या खूट्याला बांधली असल्याची टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे. मुख्यमंत्री हे दमदाटी करत आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री असण्याचा दुरुपयोग करत तिथल्या लोकांना दमदाटी करत आहे आल्हाद कलोति यांच्या विरोधात असलेल्या उमेदवारांना पैसे दिले तसेच जीवे मारायच्या धमक्या दिल्या व त्यांना फॉर्म मागे घ्यायला लावले. मुख्यमंत्र्यांचे लक्ष चिखलदऱ्यातील जमिनीवर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या राज्याच्या इतिहासात सर्वात क्रूर मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातील असही यशोमती ठाकूर म्हणाले आहे. भाजपमध्ये भाजपचे कमी व भाड्याचे आणलेले उमेदवार जास्त आहे. भाजपचे लोक १०० टक्के घाबरलेल्या अवस्थेत असल्यामुळे या प्रकारे ते दमदाटी करत असून चिखलदरा नगरपरिषदेत अल्हाद करोती हे शंभर टक्के पडले असते व यामुळे मुख्यमंत्र्यांची नाचक्की झाली असती म्हणून मुख्यमंत्र्यांनी साम, दाम, दंड भेद या सर्वांचा उपयोग करून आल्हाद करोती यांच्या विरोधातील सर्व उमेदवारांना फॉर्म मागे घ्यायला लावले अशी देखील टीका यशोमती ठाकूर यांनी केली आहे दरम्यान मुख्यमंत्र्यांनी भाजप पक्ष राणा दांपत्याच्या खूट्याला बांधला असल्याचं यशोमती ठाकूर यांनी म्हटलं आहे.
124
Report
For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com
Advertisement
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
FollowNov 20, 2025 12:49:4195
Report
SRSHRIKANT RAUT
FollowNov 20, 2025 12:35:4083
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:32:08115
Report
PPPRASHANT PARDESHI
FollowNov 20, 2025 12:17:1477
Report
GMGANESH MOHALE
FollowNov 20, 2025 12:04:45111
Report
KPKAILAS PURI
FollowNov 20, 2025 11:36:4289
Report
JMJAVED MULANI
FollowNov 20, 2025 11:19:59171
Report
PPPRAFULLA PAWAR
FollowNov 20, 2025 11:04:0272
Report
AAABHISHEK ADEPPA
FollowNov 20, 2025 11:01:02257
Report
AKAMAR KANE
FollowNov 20, 2025 10:54:05181
Report
SNSWATI NAIK
FollowNov 20, 2025 10:50:1286
Report
VKVISHAL KAROLE
FollowNov 20, 2025 10:49:5394
Report
SKShubham Koli
FollowNov 20, 2025 10:46:1193
Report
PNPratap Naik1
FollowNov 20, 2025 10:31:55169
Report