Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अतिवृष्टि से सोयाबीन बर्बाद, जसापूर किसान ने रोटावेटर चलाकर फसल नष्ट कर राहत मांगी

ADANIRUDHA DAWALE
Oct 09, 2025 05:14:57
Amravati, Maharashtra
अतिवृष्टि के कारण सोयाबीन खराब होने से जसापूर, अमरावती के किसान अभिजित पोहोकार ने सतत बारिश से प्रभावित फसल पर रोटावेटर चलाकर पीक नष्ट कर दिया. सोयाबीन में शेंगा नहीं होतीं, जिससे आय नहीं हो रही. किसान ने शेतात ट्रैक्टर लगाकर रोटावेटर से सोयाबीन पीक नष्ट किया और सरकार का विरोध किया. सरकार ने ओला दुष्काळ घोषित करने, किसानों को हेक्टरी 50 हजार रु. मदद और कर्जमुक्त करने की मांग की जा रही है.
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKSudarshan Khillare
Oct 09, 2025 07:51:02
Yeola, Maharashtra:येवला (नाशिक) मंत्री छगन भुजबळ बाईट पॉइंटर मंत्री छगन भुजबळ on अन्य योजनेचा लाभ घेणाऱ्या महिलांना लाडकी बहीण लाभ घेऊ नये - साधारण नियम आहे की शासकीय अधिकारी असेल कर्मचारी असतील... - किंवा इतर जे लाभ असतात वयामुळे मिळालेले... - निराधार महिलेला मिळालेले लाभ असतात... - इतर जे लाभ मिळत असतील ते दीड हजार रुपये महिन्याच्या वरती मिळत असतात... - तर त्यांना डबल देऊ नये हा पहिल्यांदाच निघालेला जीआर आहे... - तर कोणाला द्यायचा तर दोनच महिलेला द्यायचा आहे... - ज्या महिला अगोदरच बाकीच्या योजनेचा लाभ घेताय त्यांना मिळणार नाही... - हे पहिल्यापासून ठरलेला आहे... - परत त्यांनी तसं सांगितलं असेल की हे लक्षात घ्या... - शेवटी लाडक्या बहिणींना सगळे पैसे जाणार आहे... - या खिशातून जातात की त्या खिशातून जातात... - मुद्दा तो नही... मंत्री छगन भुजबळ on सचिन घायवळ फरार - मला काही कल्पना नाही पण मी टीव्हीला बघत असतो घायवळ फरार आहे... - कोणाला लायसन्स मिळालेले... - मला वाटते की पुणे पोलिसांनी होम डिपार्टमेंट योग्य ती काळजी घ्यावी... - कडक कारवाई करावी कोण गुन्हेगार असेल तर... मंत्री छगन भुजबळ on कबूतर खाण्यासाठी जैन समाजाची धर्मसभा - मला असं वाटतं की हायकोर्टाने यामध्ये काहीतरी निर्णय दिलेला आहे... - हायकोर्टाने असे आदेश दिलेले असतील तर आपल्या देशातील सर्वच नागरिकांना सर्व धर्मीयांना मला असं वाटतं की ते पाळणा आवश्यक्य आहे... - आपण जर कोर्टाचे आदेश सुद्धा मानायचं नाही असं ठरवलं आपल्या लोकशाहीचा हा ज्यो डोलारा आहे... - लोकसभा संसद, प्रशासन आणि न्यायालय खांबावर उभा आहे अर्थातच मीडिया त्या सगळ्यांचा आपण आदर राखला पाहिजे मला एवढंच म्हणणं आहे... मंत्री छगन भुजबळ on बिहार लाडकी बहीण दहा हजार रुपये बाईट हिंदीत आहे - दहा हजार रुपये एकर शेतकऱ्यांना मदत दिली जाते... - पहिल्यांदीच एवढा मोठा पॅकेज नुकसानग्रस्तांसाठी दिले... - नैसर्गिक नुकसानीसाठी... - देशामध्ये कोणते राज्य आहे की लाडक्या बहिणीसाठी चाळीस-पन्नास हजार रुपये देत आहे... - एक वेळेसाठी आम्ही देत नाही तर दर महिन्याला दीड-दीड हजार रुपये देतोय बहिणींसाठी... - दीड हजार रुपये महिना प्रमाणे वर्षाचे अठरा हजार रुपये आम्ही लाडक्या बहिणीला देतोय... - आणि तेथे वर्षाला दहा हजार रुपये दिले जातील... - त्यांच्यापेक्षा जास्त पैसे आम्ही देतोय... मंत्री छगन भुजबळ on केंद्राचे पॅकेज आली तर मदतीत वाढ होणार का - पॅकेज जे पण येईल असं थोडी आहे की वीस पंचवीस हजार कोटी रुपये भारत सरकार देईल... - त्यांनी पंजाब मध्ये किती दिले... - हजार बाराशे करोड रुपये दिले... - याच्यावरून तुम्हीच हिशोब लावा किती मिळणार... - आम्ही राज्य सरकारकडून खर्च करतोय त्यामुळे सर्व पहावे लागेल... छगन भुजबळ on आनंदाचा शिधा - यावर्षी शेतकऱ्यांना आपण 32 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिले... - महिलांना सुद्धा आपण 45 हजार कोटी रुपयांचं पॅकेज दिले... - कमीत कमी एका घरामध्ये गरिबांच्या फक्त महिलांच्या माध्यमातून तीन हजार रुपये दर महिन्याला जाताय... - बाकीच्या या सर्व योजना आहे त्याचा पण फायदा मिळतोय... - मी मगाशी सांगितले यावर्षी जरा अडचण आहे... - पुढे आपण बघू...
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 07:36:57
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील आलेगाव येथील ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी मराठा आरक्षणासाठी हैदराबाद गॅजेट लागू झाल्याने ओबीसींच्या आरक्षणाला धक्का बसेल या चिंतेतून आत्महत्या केली.या घटनेने ओबीसी समाजात तीव्र संताप आणि असंतोष निर्माण झाला आहे.या पार्श्वभूमीवर ओबीसी नेते प्रकाश तायडे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण द्यावे, मात्र ओबीसींच्या आरक्षणाला कोणताही धक्का लागू नये.” बोचरे यांच्या आत्महत्येतून ओबीसी समाजाचा प्रश्न किती गंभीर आहे हे स्पष्ट झाल्याचे तायडे यांनी नमूद केले आहे.तर अशा टोकाच्या मार्गाचा अवलंब करू नका ,लढा लोकशाही मार्गानेच पुढे नेऊया असे आवाहन प्रकाश तायडे यांनी ओबीसी बांधवांना केले आहे.
0
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 09, 2025 07:21:51
Chandrapur, Maharashtra:आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्च चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसचा न्यायासाठी एल्गार दलित समाजावर होणारे अन्याय, अत्याचार आणि हिंसाचाराच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर, तसेच सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याच्या निषेधार्थ, 'आय लव डॉ. बाबासाहेब आंबेडकर' मार्च चे आयोजन चंद्रपूर शहर जिल्हा युवक काँग्रेसच्या पुढाकारातून करण्यात आले. गांधी चौकातून या मार्चला सुरुवात झाली. त्यानंतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा जयघोष करत, संविधानाच्या रक्षणासाठी लढा देण्याचा निर्धार व्यक्त करत, काँग्रेस कार्यकर्त्यांनी घोषणा दिल्या. मार्चची सांगता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ करण्यात आली.
0
comment0
Report
AKAMAR KANE
Oct 09, 2025 07:17:54
Nagpur, Maharashtra:Nagpur बाईट - विजय वडेट्टीवार, काँग्रेस नेते - On ओबीसी मोर्चा - - उद्याचा ओबीसीचा मोर्चा एक ऐतिहासिक असा मोर्चा होईल, नागपुरात ओबीसीच्या सकल ओबीसी समाजाच्या वतीने 2 सप्टेंबर चा काळा जीआर आहे तो जीआर रद्द झाला पाहिजे ही सर्व समाजाची एकमुखी मागणी आहे - जीआर काढून सरकार ओबीसींच्या मानेवर सुळी चालवण्याचा काम करत आहे - लाखोच्या संख्येने या मोर्चात उद्या लोक सहभागी होतेल, उद्या साडे अकरा ते बाराच्या दरम्यान मोर्चाची सुरुवात होईल महाराष्ट्रातून अनेक ओबीसींचे नेते या मोर्चात येणार आहेत - नेत्यांसोबत सामाजिक संघटना ओबीसींच्या हक्कासाठी लढणाऱ्या संघटनांचे प्रतिनिधी सुद्धा मार्गदर्शन करण्यासाठी आम्ही पाचारण केलं आहे - ओबीसींचे तज्ञ,ज्यांचा ओबीसींच्या प्रश्नावर अभ्यास आहे त्यांना सुद्धा सकल ओबीसी समाजाला मार्गदर्शन करता येईल अशी सुविधा आहे - महायुती आणि फडणवीस सरकार जे म्हणतात की आमचा डीएनए ओबीसी आहे, तो डीएनए कोणाचा आहे हे सिद्ध करणारा उद्याचा मोर्चा असणार - जीआर रद्द करा हीच आमची प्रमुख मागणी आहे - नाहीतर गावागावात जाऊन सर्व लोकप्रतिनिधींना ओबीसी समाज जाब विचारेल - आम्ही कोणालाही पत्रिका किंवा निमंत्रण पत्रिका दिली नाही कारण कोणाचं लग्न नाही आणि बारसं नाही - हा ओबीसी समाजाचा मोर्चा आहे इथे कुठल्याही ओबीसीला येण्यास बंधन नाही जो कोणी ओबीसींच्या हिताचं रक्षण करतो त्यांनी स्वतः यावं - मी काही नेतृत्व करत नाही, मी एक ओबीसींचा कार्यकर्ता म्हणून कार्यकर्ते - आम्ही सगळ्यांनाच या मोर्चामध्ये सहभागी येण्याचा आवाहन केला आहे ही कुठे संघटना पक्ष बंधन नाही - ज्यांना- ज्यांना घ्यायचा आहे त्यांनी या मोर्चात सहभागी व्हावं - समाजाला मार्गदर्शन करणारे पाच भाषणे 15 -15 मिनिटाचे असतील आणि आभार मी मानेल, फार मोठ्या राजकीय नेत्यांचे भाषण व्हावे आणि कुठेतरी आंदोलन बरगळावे अशी आमची इच्छा नाही आम्हाला काही नको आम्हाला आमच्या हक्काचं संरक्षण हवं आहे - काँग्रेसच नाही तर भाजप, राष्ट्रवादी सर्वच पक्षाचे नेते येथील अशी मला अपेक्षा आहे On योगेश कदम - - सरकारने आता जागोजागी काउंटर लावले पाहिजे आणि गुन्हेगारांना शस्त्र परवाना देण्यासाठी गृहराज्य मंत्र्यांची नियुक्ती केली आहे, खुशाल यावं आणि माझ्याकडून प्रमाणपत्र घेऊन जावे अशी जाहिरात आणि काउंटर महाराष्ट्रात जागोजागी लावले पाहिजे, म्हणजे गुन्हेगारांना शस्त्र परवाना देताना कुठेही अडचण येणार नाही - जनतेला धाक दपट देऊन निवडणुकांमध्ये त्याचा उपयोगही करता येईल अशी पद्धती महाराष्ट्रात सुरुवात करावी, म्हणजे गुंडांना त्यासाठी योगेश कदम या गृहमंत्र्यांची पर्मनंट नियुक्ती करावी आणि त्यांना एवढेच काम करावे असेच सांगावे On घायवळ - - घायवळच्या डोक्यावर कोणाचा आशीर्वाद होता, हे सत्ता पक्षाच्या भाजपच्या एका नेत्यांनी जो काही काळा पुण्याचा पालकमंत्री राहिलाय त्याने त्याला विचारलं तर हे सर्व तो कोणामुळे मोठा झाला कशामुळे मोठा झाला कोणी मोठा केलं आणि ज्या काही योजना नवीन महाराष्ट्रात आणली पाहिजे - लाडकी बहीण आणली त्याप्रमाणे लाडका गुंड अशी योजना आणावी आणि महाराष्ट्रात गुंडांचा पालन पोषण करणारी एकमेव आमची महायुती सरकार आहे अशी जाहिरात द्यावी म्हणजे महाराष्ट्रात आनंद राहील On ओबीसी तरुण आत्महत्या - - ओबीसी तरुणांमध्ये या जीआरमुळे फार निराशा आली आहे तरी पण या सरकारचे डोळे उघडत नाही हे दुर्दैव आहे, कुंभकरणाच्या झोपेसारखा हे सरकार आहे - महाराष्ट्रात ओबीसी संपावायचा असा दिसतय, 374 जाती संपल्या पाहिजे, ते गुलाम झाले पाहिजे हे आमच्या ताटाखालची मांजर म्हणून जगली पाहिजे अशा प्रकारची व्यवस्था निर्माण करण्याचं काम जरांगे कडून आणि सरकारकडूनही होताना मला दिसत आहे - आमचे तरुण आत्महत्या करत असतील तर हा जीआर रद्द करावा आणि मी तरुणांना आवाहन करतो आम्ही लढतो आहेत तुमच्या हक्कासाठी तुम्ही आत्महत्या करू नका आणि त्या मार्गाने जाऊ नका अशी माझी विनंती महाराष्ट्रातील ओबीसी तरुणांना आहे On सामाजिक न्याय निधी लाडकी बहीण - - आदिवासी आणि सामाजिक न्याय विभाग असे दोनच विभाग दिसतात निधी वळवण्यासाठी - दलित शोषित माणसांचा निधी वळवला तर कोणी आवाज उठवू शकत नाही, यांच्यात लढण्याची किंवा आवाज उठवण्याची क्षमता नाही, हे बोंबाबोंब करू शकत नाही, त्यामुळे सामाजिक न्याय असेल आदिवासी विभाग असेल यांना खड्ड्यात घाला आणि यांचा निधी लाडक्या बहिणीला द्या, हे धोरणच या सरकारने आखलं आहे - मी दलित आदिवासी बांधवांना आवाहन करतो की या निर्णयाविरुद्ध संविधानिक असलेल्या निधी जो लोकसंख्येच्या प्रमाणातच दिला पाहिजे पण तो दिला जातो बजेटमध्ये आणि प्रत्यक्षात मात्र दुसरीकडे वळूवून खर्च केला जातो, याविरुद्ध सुद्धा एक मोठा संघर्ष आम्हाला करावा लागेल On धर्मरावबाबा आत्राम - - शेवट हे सरकारच पैसा मिळवण्यासाठी तयार झालेला आहे, यांची नजर नेहमी पैसे मिळवण्यासाठी कमिशन खोरीसाठी यांची निर्मिती झाली आहे - त्यामुळे खनिज निधीवरून आजी-माजी मंत्री सामोरे येत असेल तर या दोघांमध्ये कुठेतरी टक्केवारीवरून बिघडला आहे, त्या खनिज निधीतून 20-20 टक्के वसूल करण्याचं काम त्या जिल्ह्यामध्ये सुरू आहे - काम वाटून घेतल्या जात आहेत ते सह पालकमंत्री आहेत त्यांचा जिल्ह्याची काही संबंध नाही तरी पण जाऊन माझा वाटा पाहिजे तर हे वाट्यासाठी वाट्यांमध्ये घाटा झाला, यांना जनतेशी काही देणंघेणं नाही On मोर्चा - - जेवढे जनता येईल त्यांच्या दृष्टीने आम्ही विचार केला होता प्रशासनाने संविधान चौक दिला आहे On एटीएस पुणे कारवाई - - कारवाई होऊ द्या आणि जो कोणी गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे तो कुठल्या धर्माचा आहे ते न बघता कारवाई होणे आवश्यक आहे On दि बा पाटील विमानतळ - - भारतातील सर्वात मोठा विमानतळ बघून आणि त्याची व्याप्ती बघून अमेरिकेच्या किंवा लंडनच्या हित्रो एअरपोर्ट एवढा मोठा विमानतळ होत आहे, त्यामुळे मोदी साहेबांना वाटलं असेल की त्यांचं नाव या विमानतळाला मिळावा असं त्यांच्या डोक्यात आलं असेल म्हणून त्यांनी कदाचित नावाची घोषणा केली नसेल
0
comment0
Report
SNSWATI NAIK
Oct 09, 2025 06:50:43
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 06:50:25
Akola, Maharashtra:अकोला जिल्ह्यातील पातुर तालुक्यातील आलेगाव येथे ओबीसी चळवळीतील कार्यकर्ते विजय बोचरे यांनी आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. “ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये” असा व्हॉट्सअ‍ॅप स्टेटस ठेवून त्यांनी जीवन संपवल्याचे समोर आले आहे.या घटनेनंतर आलेगाव परिसरात हळहळ व्यक्त होत असून ओबीसी बांधवांनी जिल्हाधिकारी घटनास्थळी येऊन भेट देईपर्यंत मृतदेह शवविच्छेदनासाठी हलविणार नाही, असा निर्णय घेतला होता.यानंतर अकोला जिल्हाधिकारी वर्षा मीणा यांनी आलेगावला भेट देऊन घटनास्थळी परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी समाज बांधवांशी संवाद साधत शांततेचे आवाहन केले आणि शवविच्छेदन करण्यासाठी विनंती केली.जिल्हाधिकाऱ्यांच्या भेटीनंतर समाज बांधवांनी सहमती दर्शवली असून विजय बोचरे यांचा मृतदेह आता शवविच्छेदनासाठी अकोल्याला रवाना करण्यात आला आहे.
0
comment0
Report
DPdnyaneshwar patange
Oct 09, 2025 06:06:20
Dharashiv (Osmanabad), Maharashtra:अतिवृष्टीने शेताचं होत्याचं नव्हतं झालं.. अक्षरशः चूल बंद पडली! पैसेाअभावी प्रांजलीचं शिक्षण अडकलं.. ‘लढ’ म्हणत आहे खोचरे कुटुंब धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील गंभीरवाडी गावचं खोचरे कुटुंब आज अभूतपूर्व संकटात सापडलं आहे. संपत खोचरे यांच्याकडे फक्त 90 गुंठे शेती आहे. शेतीवरच त्यांच्या संसाराचा गाडा चालतो. पत्नी रोजंदारी करून मुलांचं शिक्षण भागवतात. मात्र, यंदाच्या अतिवृष्टीने या कुटुंबाचं होत्याचं नव्हतं केलं. पावसाने शेतातील सर्व पीक वाहून गेलं. शेती उद्ध्वस्त झाली. रोजंदारीचं काम बंद पडलं आणि घरात चूलही बंद पडली. या संकटात सर्वात मोठा फटका बसला तो त्यांच्या मुलीला — प्रांजली संपत खोचरे हिला. पुण्यात इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असलेली प्रांजली आता शिक्षण पुढे सुरू ठेवू शकत नाही. कारण घरात पैसा नाही. वडिलांनी उसनवारी केली, सावकारांच्या दारात गेले — पण उपयोग झाला नाही. आज खोचरे कुटुंबाला फक्त आर्थिक मदतीची गरज आहे — जेणेकरून प्रांजली पुन्हा शिक्षणाच्या मार्गावर उभी राहू शकेल.
0
comment0
Report
SMSamruddhi M Kolhe
Oct 09, 2025 05:14:22
Karjat, Maharashtra:मागील दोन दिवसांपासून कर्जतच्या भिवपुरी येथील Tata Power पंप स्टोरेज वीज प्रकल्पाविरोधात गावकऱ्यांनी सुरू केलेले बेमुदत साखळी उपोषण अखेर मागे घेतलय. स्थानिकांच्या मागण्या प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य केल्याने गावकऱ्यांनी हे उपोषण मागे घेतलं. कर्जत तालुक्यातील भिवपुरी येथे अक्षय ऊर्जा आणि स्थानिक विकासासाठी टाटा समूहाकडून हा टाटा पॉवर जलविद्युत प्रकल्प उभारण्यात येत आहे. या प्रकल्प उभारणीदरम्यान गावकऱ्यांनी या समूहाकडे काही स्थानिक मागण्या अतिशर्तीवर समोर ठेवल्या होत्या. यामध्ये गावामधील विविध उपक्रम अंतर्गत विकासकामे, भिवपुरी ग्रामपंचायत मधील पाणी टाकीवर पाणी शुद्धीकरण संयंत्राची उभारणी. स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे इत्यादी महत्त्वपूर्ण अटी गावकऱ्यांच्या या प्रकल्प अधिकाऱ्यांनी मान्य करताच गावकऱ्यांनी अखेर आपली तटस्थ भूमिका मागे घेतली.
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Oct 09, 2025 05:12:51
0
comment0
Report
Advertisement
Back to top