Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Amravati444601

अमरावती महापालिका चुनाव: कांग्रेस स्वबल पर, ठाकूर के दावों से टकराव की तैयारी

ADANIRUDHA DAWALE
Dec 23, 2025 05:46:05
Amravati, Maharashtra
नगरपरिषद, नगरपंचायती पाठोपाठ अमरावती महापालिका निवडणुकीत काँग्रेस स्वबळावर; सत्ताधारी आमदार आमच्या उमेदवाराला धमकावत आहे यशोमती ठाकुरांचा खळबळ जनक दावा अँकर :– महापालिका निवडणुकीच बिगुल वाजला असून आजपासून नामांकन अर्ज दाखल करण्यात येणार आहे. मात्र नगरपरिषद आणि नगरपंचायत निवडणुकीपाठोपाठ अमरावती महापालिका निवडणुकीतही काँग्रेस स्वबळावर निवडणूक लढणार आहे. त्यामुळे अमरावती तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. अमरावतीत भाजप शिंदे यांची शिवसेना आणि आमदार रवी राणांची युवा स्वाभिमान पार्टी यांच्यासोबत युती करणार आहे तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते संजय खोडके हे स्वबळावर निवडणुック लढणार आहे. त्यापाठोपात आता काँग्रेसने सुद्धा स्वबळाचा इशारा दिल्याने अमरावती तिहेरी लढत होण्याची शक्यता आहे. दरम्यान सत्ताधारी पक्षातील आमदार आमच्या उमेदवारांना धमकावत असल्याचा खडबड जनक दावा यशोमती ठाकूर यांनी केला आहे त्यामुळे पुन्हा एकदा राणा विरुद्ध ठाकूर आणि खोडके विरुद्ध ठाकूर वाद सुरू होण्याची शक्यता आहे. याविषयी यशोमती ठाकूर यांच्याशी अधिक बातचीत केली आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SRSHRIKANT RAUT
Dec 23, 2025 07:20:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार जांबा उर्फ सचिन कराळे या अतिशय सर्वसामान्य व रुग्णसेवकाने प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवाराला धूळ चारत विजय संपादित केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचे निकटस्थ व पंधरा वर्षांपासून नगरसेवक असलेल्या सुभाष भोयर यांना त्याने पराभवाची धूळ चारली आहे. दिवसभर रस्त्यांवर फिरून कोणाच्याही मदतीला धावणारा, रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांची सेवा करणारा, रात्री रुग्णालयातच मुक्काम ठोकणारा असा हा निर्धन उमेदवार. भाजपासाठी विस्तारक निघून जिल्ह्यात संघटन मजबूत करणाऱ्या जांबाला पक्षाने उमेदवारी नाकारली, पैसा व कार्यकर्ते नाहीत असे कारण त्याला दिले. मात्र जनतेने लोक वर्गणी गोळा करून जांबा ला निवडणुकीत उतरविले. या ठिकाणी लोकशाहीची ताकद दिसली आणि जांबा भरघोस मतांनी विजयी झाला. पालिकेतही जनतेचा सच्चा सेवक म्हणून कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी दिला आहे. बाईट : जांबा उर्फ सचिन कराळे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 07:05:03
Parbhani, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी गावाच्या शिवारामध्ये आज भली मोठी मगर आढळून आली आहे. गावाच्या शेत शिवारात असलेल्या एका उसाच्या फडामध्ये ही मगर नागरिकांना दिसून आली. त्यानंतर गावातील नागरिकांनी या मगरीला दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्याने पकडल असून जवळच असलेल्या ईसापुर धरणातून किंवा या धरणाच्या कालव्यातून ही मगर बाहेर आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. या मगरीने आतापर्यंत एकाही व्यक्तीवर हल्ला किंवा तसा प्रयत्न केलेला नाही परंतु पहिल्यांदाच मगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काहीसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेण्यासाठी वन विभागाचे टीम दाखल झाली होती. वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेत तिला पाण्यामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:51:43
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून झाल्या दहा ठाणेदारांच्या बदल्या तर अन köz? (दया) आश्चर्य व्यक्त होतेय आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा दिले गेले तेच पोलीस ठाणे अँकर : वर्ध्यात एकीकडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकले…तर दुसरीकडे त्यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहेय. नेमक्या या बदल्या कुणाच्या आदेशाने असाही प्रश्न आता उपस्थित जेला जातोय. वर्ध्यात पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच,मध्यरात्री उशिरा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात बदली दिली असल्याची बाब समोर आलीय. तडकाफडकी तब्बल दहा ठाणेदाराच्या बदल्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय. नगर परिषद निवडणुकीत भाजपला देवळी, पुलगाव आणि वर्ध्यात मिळालेल्या अपयशामुळे हा प्रकार तर घडला नाही ना? अशीही शक्यता वर्तविली जातं आहे. पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याबरोबर त्यांनी ठाणेदारांच्या बदल्या केल्याने पोलीस विभागात देखील आश्चर्य व्यक्त केले जातेय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 06:48:19
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशासनाने ही तयारी पूर्ण केलेली आहे. शहरांमध्ये 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 19 प्रभागांमध्ये ७४ जागांची विभागणी करण्यात आलेली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडे एक खिडकी योजना सुरु केळी आहे. एकीकडे महाआघाडी आणि महायुती संदर्भात अंतिम निर्णय झालेले नसताना, आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाल्यामुळे येणारे काही दिवस अजून सस्पेन्स कायम राहील आणि उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार गर्दी करतील असेच एकंदरीत चित्र दिसून येत आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:30:52
Wardha, Maharashtra:वर्धा एमडी प्रकरणामुळे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली वर्ध्याचं एमडी प्रकरण पोलिसांना भोवले? अँकर - वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील कोट्यवधींच्या एमडी मादक पदार्थ प्रकरणामुळे पोलीस प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणी आमदार सुमित वानखेडे यांनी विधिमंडळात थेट जबाबदारीचा सवाल उपस्थित केला होता. ठाणेदारांवर कारवाई झाल्यानंतरही ठोस कृती काय, हा प्रश्न कायम होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची अचानक बदली झाली. त्यामुळे वर्ध्याचं एमडी प्रकरण पोलीस प्रशासनाला भोवल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 23, 2025 06:20:26
Beed, Maharashtra:बीड़ नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पद ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार? भाजपा नेत्या तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सारिका क्षीरसागर यांचे संकेत बीड़ नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष पदासाठी निसटता पराभव झाला. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांचा साडेतीन हजाराने विजय झाला. मात्र आता उपनगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी अजित दादांच्या राष्ट्रवादीसह भाजपाची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झालीय. अशातच भाजपा नेत्या सारिका क्षीरसागर यांनी बीड़ क्षीरसागर मुक्त होत नाही. माझे दीर (संदीप क्षीरसागर) त्यांचे देखील नगरसेवक सोबत आहेत. असं म्हणत भाजपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले. तर यावर प्रतिक्रिया देत आमदार विजयसिंह पंडित यांनी ते दोघेही पहिल्यापासून एकत्रच असल्याच सांगितले. विचारधारा आपल्या सोयीने बदलणारी ही लोकं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्षीरसागरांच्या तीन पिढ्यांना ताकद देऊन सत्तेत ठेवले . भूमिका बदलणाऱ्या या लोकांना बीड़कर कधीच स्वीकारणार नाहीत. यांना हद्दपार करून बीड़मध्ये घड्याळाचा गजर होईल आणि तो क्षीरसागर व्यतिरिक्त असेल असं विजयसिंह पंडित यांनी ठाम सांगितलं. दरम्यान या राजकीय चर्चेबाबत बीड़चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 23, 2025 05:47:34
Nanded, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. काल नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे गाडीतून अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांचे पुत्र प्रवीण पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सुपारी देऊन अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली होती. दोन कोटीच्या आर्थिक व्यवहारातून अपहरण आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप घोगरे पाटील यांनी केलाय. त्यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्टीकरण दिले. घोगरे पाटील यांच्या मुलाचा फोन आल्यानंतर आपण स्वतःहून पोलीस अधीक्षकांना फोन करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचे चिखलीकर म्हणाले. त्यांच्यावर अनेकांचे देणे झाले आहे त्यातून हे झाले असेल, माझ्यावर आरोप करण्यामागे त्यांच्या पाठीशी कुणी असेल, चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असे चिखलीकर म्हणाले.
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 05:45:18
Chakan, Maharashtra:चाकण नगरपरिषदेचा सावळा गोंधळ! विजयी उमेदवारांच्या प्रमाणपत्रावर २०१५ चा शिक्का, दोन दिवसांनी दुरुस्ती करून दिली. चाकण नगरपरिषदेचा अजब कारभार पुन्हा एकदा समोर आला आहे. विजयी उमेदवारांना देण्यात आलेल्या प्रमाणपत्रांवरील अधिकृत शिक्क्यावर वर्ष २०१५ नमूद असल्याने प्रशासनाच्या निष्काळजीपणावर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ही चूक लक्षात आल्यानंतर दोन दिवसांनी दुरुस्त प्रमाणपत्रे देण्यात आली असून, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षाची ही ठळक उदाहरणं ठरत आहेत. चाकण नगरपरिषदेच्या निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर विजयी उमेदवारांना प्रमाणपत्रे देण्यात आली. मात्र या प्रमाणपत्रांवरील शिक्क्यावर वर्ष २०१५ लिहिलं गेल्याचं उघड झाल्यानंतर नगरपरिषदेच्या कारभारावर टीकेची झोड उठली. दोन दिवसांनंतर दुरुस्त प्रमाणपत्रे देऊन प्रशासनाने चूक सावरण्याचा प्रयत्न केला असला तरी, निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे संपूर्ण प्रक्रियेच्या विश्वसनीयतेवर प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे.
0
comment0
Report
VBVAIBHAV BALKUNDE
Dec 23, 2025 04:31:35
Latur, Maharashtra:अहमदपूरमध्ये पूर्ववैमनस्यातून तरुणाची निर्घृण हत्या….. लातूर जिल्ह्यातील अहमदपूर शहरात पूर्ववैमनस्यातून एका 26 वर्षीय तरुणाची चाकू आणि काठीने वार करून निर्घृण हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. मागील वादाची कुरापत काढत सहा जणांनी संगनमत करून अमिर बागवान आणि शोएब बागवान या दोन तरुणांवर प्राणघातक हल्ला केला. आरोपींनी जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकू आणि काठीने बेदम मारहाण केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झाल्याने शोएब बागवान याचा जागीच मृत्यू झाला, तर उमेर हा गंभीर जखमी असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी अहमदपूर पोलीस ठाण्यात सहा आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील दोन आरोपी जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल असून, चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींच्या शोधासाठी पोलिसांची विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत……
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 04:19:38
0
comment0
Report
Advertisement
Back to top