Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Chhatrapati Sambhajinagar431001
स Sambhaji Nagar में महायुति के लिए मुश्किल, भाजपा-गठबंधन टूटने की चर्चाएं
VKVISHAL KAROLE
Dec 23, 2025 06:52:53
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra
राज्यात शिवसेना भाजपा महायुतीत लढणार असे चित्र निर्माण केल्या जातंय मात्र छत्रपती संभाजी नगर मध्ये ही युती फिस्कटणार असे चित्र दिसतंय भाजप भेटायला सुद्धा वेळ देत नाही अवास्तव जागांची मागणी करते असं असेल तर यामुळे महायुतिचे नुकसान होईल असं पालकमंत्री संजय शिरसाठ म्हणाले आणि जर भाजपाला युती करायची नसेल तर आम्ही वेगळे लढण्यास समर्थ आहोत असेही संजय शिरसाठ म्हणाले त्यांच्यासोबत बातचीत केलिय आमचे प्रतिनिधी विशाल करोळे यांनी
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
SKShubham Koli
Dec 23, 2025 08:05:40
Thane, Maharashtra:दिवा शहरातील बेडेकर नगर, दिवा–आगासन रोड परिसरात कुत्रा चावल्याच्या घटनेनंतर उपचार सुरू असतानाच ५ वर्षीय निशा शिंदे या चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना अत्यंत गंभीर असून यामुळे महापालिका प्रशासन व सार्वजनिक आरोग्य यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. १७ नोव्हेंबर रोजी घराबाहेर खेळत असताना एका पिसाळलेल्या कुत्र्याने चिमुकलीवर हल्ला केला होता. त्यानंतर तिला तातडीने डोंबिवली येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू करून आवश्यक इंजेक्शन्स दिल्याची माहिती देण्यात आली. पुढील काही आठवडे तिच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. ३ डिसेंबर रोजी तिचा वाढदिवस साजरा करण्यात आला, त्यावेळी तिची प्रकृती स्थिर असल्याचे कुटुंबीयांना सांगण्यात आले होते. मात्र १६ डिसेंबर रोजी चौथे इंजेक्शन दिल्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि रेबिजची लक्षणे दिसू लागल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले. परिस्थिती गंभीर झाल्यानंतर तिला मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयात हलवण्यात आले. मात्र तेथे पोहोचल्यानंतर तिची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले आणि उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. उपचार सुरू असताना दीर्घ कालावधीनंतर रेबिजची लक्षणे दिसणे हे गंभीर स्वरूपाचे असल्यामुळे उपचार पद्धती, औषधांचा दर्जा, वैद्यकीय निरीक्षण व संदर्भ प्रक्रियेबाबत वस्तुनिष्ठ तपास होणे आवश्यक आहे, असे ॲड. रोहिदास मुंडे यांनी नमूद केले. या प्रकरणात कोणतीही वैद्यकीय अथवा प्रशासकीय त्रुटी झाली आहे का, याची सक्षम यंत्रणेमार्फत चौकशी करून दोषी आढळणाऱ्यांवर नियमानुसार कारवाई करण्यात यावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. तसेच दिवा शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दीर्घकाळापासून प्रलंबित असून सार्वजनिक सुरक्षिततेच्या दृष्टीने याबाबत प्रशासनाने प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबवण्याची गरज असल्याचेही त्यांनी सांगितले. या घटनेमुळे नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, या प्रकरणाची सखोल चौकशी करून भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी योग्य उपाययोजना केल्या जातील, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे....
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 23, 2025 07:48:36
0
comment0
Report
PNPratap Naik1
Dec 23, 2025 07:46:59
Kolhapur, Maharashtra:कोल्हापूर महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसच्या “ कोल्हापूर कसं तुम्ही म्हणशील तसं” या कॅम्पिंगच्या फलकाचे अनावरण केलं. यावेळी काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांनी महाविकास आघाडी म्हणूनच आम्ही सर्वजण निवडणूकीला सामोरे जाणार असल्याचे सांगितले. एकीकडे हे सांगत असताना दुसरीकडे मात्र सतेज पाटलांनी महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांसह महायुतीच्या काही नेत्यांना चांगलाच दम भरला... तुम्ही आता जो त्रास आमच्या उमेदवारांना देत आहात, तुम्ही लक्षात ठेवा 16 जानेवारीला आम्हीच आहोत... अशा शब्दात भर पत्रकार परिषदेतच सतेज पाटील यांनी कोल्हापूर महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांना दरडावले.. पाहूया सतेज पाटील नेमकं काय म्हणाले..
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 23, 2025 07:33:56
Sangli Miraj Kupwad, Maharashtra:क्या बडा तो सबसे दम बडा.. आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही - ईश्वरपूर मध्ये जयंत पाटलांच्या डायलॉग बाजींचे लागले बॅनर्स.. अँकर - सांगलीच्या ईश्वरपूर नगरपरिषदेवर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर ईश्वरपूर शहरात विरोधकांना इशारा देणारे,जयंत पाटलांच्या डायलॉग बाजीचे बॅनर झळकले आहेत."क्या बडा तो, सबसे दम बडा...आणि सगळ्यांना हाणलं नाही,तर जयंत पाटील नाव सांगणार नाही,"या जयंत पाटलांच्या डायलॉगचे पोस्टर ईश्वरपूर शहरात ठीक ठिकाणी झळकले आहेत. ईश्वरपूर नगरपरिषदे निवडणुकीच्या निमित्ताने जयंत पाटलांना पाय दिसत सर्व विरोधकांनी घेण्याचा प्रयत्न केला मात्र जयंत पाटलांनी ईश्वरपूर नगरपरिषदेवर एक हाती सत्ता मिळवली आहे, या विजयानंतर जयंत पाटलांचा कार्यकर्त्यांनी विरोधकांना डिवचत सगळ्यांना हाणलं नाही तर जयंत पाटील नाव नाही या आशयचे फलक लावले आहेत, हे फलक सध्या संपूर्ण जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरत असून नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 23, 2025 07:20:15
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगरपरिषद निवडणुकीत भाजपचा बंडखोर अपक्ष उमेदवार जांबा उर्फ सचिन कराळे या अतिशय सर्वसामान्य व रुग्णसेवकाने प्रतिस्पर्धी दिग्गज उमेदवाराला धूळ चारत विजय संपादित केला आहे. पालकमंत्री संजय राठोड यांचे निकटस्थ व पंधरा वर्षांपासून नगरसेवक असलेल्या सुभाष भोयर यांना त्याने पराभवाची धूळ चारली आहे. दिवसभर रस्त्यांवर फिरून कोणाच्याही मदतीला धावणारा, रुग्णालयात येणाऱ्या गरजू रुग्णांची सेवा करणारा, रात्री रुग्णालयातच मुक्काम ठोकणारा असा हा निर्धन उमेदवार. भाजपासाठी विस्तारक निघून जिल्ह्यात संघटन मजबूत करणाऱ्या जांबाला पक्षाने उमेदवारी नाकारली, पैसा व कार्यकर्ते नाहीत असे कारण त्याला दिले. मात्र जनतेने लोक वर्गणी गोळा करून जांबा ला निवडणुकीत उतरविले. या ठिकाणी लोकशाहीची ताकद दिसली आणि जांबा भरघोस मतांनी विजयी झाला. पालिकेतही जनतेचा सच्चा सेवक म्हणून कार्यरत राहू असा विश्वास त्यांनी दिला आहे. बाईट : जांबा उर्फ सचिन कराळे
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Dec 23, 2025 07:05:03
Parbhani, Maharashtra:हिंगोली जिल्ह्यातील ढोलक्याची वाडी गावाच्या शिवारामध्ये आज भली मोठी मगर आढळून आली आहे. गावाच्या शेत शिवारात असलेल्या एका उसाच्या फडामध्ये ही मगर नागरिकांना दिसून आली. त्यानंतर गावातील नागरिकांनी या मगरीला दोरी आणि इतर साहित्य सामग्रीच्या सहाय्याने पकडल असून जवळच असलेल्या ईसापुर धरणातून किंवा या धरणाच्या कालव्यातून ही मगर बाहेर आली असावी असा अंदाज व्यक्त केला जातो. या मगरीने आतापर्यंत एकाही व्यक्तीवर हल्ला किंवा तसा प्रयत्न केलेला नाही परंतु पहिल्यांदाच मगर आढळून आल्याने गावकऱ्यांमध्ये काहीसं भीतीदायक वातावरण निर्माण झालं होतं. दरम्यान वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेण्यासाठी वन विभागाचे टीम दाखल झाली होती. वन विभागाच्या वतीने या मगरीला पकडून नेत तिला पाण्यामध्ये सोडण्यासाठी घेऊन गेले आहेत.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:51:43
Wardha, Maharashtra:वर्ध्यात पोलीस अधीक्षकांच्या बदलीनंतर रात्रीतून झाल्या दहा ठाणेदारांच्या बदल्या तर अन köz? (दया) आश्चर्य व्यक्त होतेय आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा दिले गेले तेच पोलीस ठाणे अँकर : वर्ध्यात एकीकडे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकले…तर दुसरीकडे त्यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्याने सर्वत्र आश्चर्य व्यक्त केले जात आहेय. नेमक्या या बदल्या कुणाच्या आदेशाने असाही प्रश्न आता उपस्थित जेला जातोय. वर्ध्यात पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांच्या बदलीचे आदेश धडकताच,मध्यरात्री उशिरा पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांनी अनेक ठाणेदारांच्या बदल्या केल्या. विशेष म्हणजे आठ महिन्यापूर्वी बदलून गेलेल्या ठाणेदाराला पुन्हा त्याच पोलीस ठाण्यात बदली दिली असल्याची बाब समोर आलीय. तडकाफडकी तब्बल दहा ठाणेदाराच्या बदल्या केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेय. नगर परिषद निवडणुकीत भाजपला देवळी, पुलगाव आणि वर्ध्यात मिळालेल्या अपयशामुळे हा प्रकार तर घडला नाही ना? अशीही शक्यता वर्तविली जातं आहे. पोलीस अधीक्षकांची बदली झाल्याबरोबर त्यांनी ठाणेदारांच्या बदल्या केल्याने पोलीस विभागात देखील आश्चर्य व्यक्त केले जातेय.
0
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Dec 23, 2025 06:48:19
Dhule, Maharashtra:धुळे महानगरपालिकेसाठी आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. प्रशासनाने ही तयारी पूर्ण केलेली आहे. शहरांमध्ये 74 जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडणार आहे. 19 प्रभागांमध्ये ७४ जागांची विभागणी करण्यात आलेली आहे. वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी शहरात सहा वेगवेगळ्या ठिकाणी निवडणूक कार्यालय सुरू करण्यात आली आहे. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही तैनात करण्यात आलेला आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत पार पाडावी यासाठी प्रशासनाकडे एक खिडकी योजना सुरु केळी आहे. एकीकडे महाआघाडी आणि महायुती संदर्भात अंतिम निर्णय झालेले नसताना, आजपासून उमेदवारी अर्ज दाखल करायला सुरुवात झाल्यामुळे येणारे काही दिवस अजून सस्पेन्स कायम राहील आणि उमेदवारी अर्ज भरायच्या शेवटच्या टप्प्यात उमेदवार गर्दी करतील असेच एकंदरीत चित्र दिसून येत आहे.
0
comment0
Report
MAMILIND ANDE
Dec 23, 2025 06:30:52
Wardha, Maharashtra:वर्धा एमडी प्रकरणामुळे पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची बदली वर्ध्याचं एमडी प्रकरण पोलिसांना भोवले? अँकर - वर्धा जिल्ह्यातील कारंजा घाडगे येथील कोट्यवधींच्या एमडी मादक पदार्थ प्रकरणामुळे पोलीस प्रशासन अडचणीत आले आहे. या प्रकरणी आमदार सुमित वानखेडे यांनी विधिमंडळात थेट जबाबदारीचा सवाल उपस्थित केला होता. ठाणेदारांवर कारवाई झाल्यानंतरही ठोस कृती काय, हा प्रश्न कायम होता. दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीनंतर अवघ्या दोन दिवसांत पोलीस अधीक्षक अनुराग जैन यांची अचानक बदली झाली. त्यामुळे वर्ध्याचं एमडी प्रकरण पोलीस प्रशासनाला भोवल्याची चर्चा आता जोर धरू लागली आहे.
0
comment0
Report
MMMahendrakumar Mudholkar
Dec 23, 2025 06:20:26
Beed, Maharashtra:बीड़ नगर परिषदेत उपनगराध्यक्ष पद ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येणार? भाजपा नेत्या तसेच नवनिर्वाचित नगरसेविका सारिका क्षीरसागर यांचे संकेत बीड़ नगर परिषदेत भाजपाचा नगराध्यक्ष पदासाठी निसटता पराभव झाला. या ठिकाणी राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या उमेदवार प्रेमलता पारवे यांचा साडेतीन हजाराने विजय झाला. मात्र आता उपनगराध्यक्ष पद मिळवण्यासाठी अजित दादांच्या राष्ट्रवादीसह भाजपाची संख्याबळाची जुळवाजुळव सुरू झालीय. अशातच भाजपा नेत्या सारिका क्षीरसागर यांनी बीड़ क्षीरसागर मुक्त होत नाही. माझे दीर (संदीप क्षीरसागर) त्यांचे देखील नगरसेवक सोबत आहेत. असं म्हणत भाजपा आणि शरद पवारांची राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत दिले. तर यावर प्रतिक्रिया देत आमदार विजयसिंह पंडित यांनी ते दोघेही पहिल्यापासून एकत्रच असल्याच सांगितले. विचारधारा आपल्या सोयीने बदलणारी ही लोकं आहेत. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने क्षीरसागरांच्या तीन पिढ्यांना ताकद देऊन सत्तेत ठेवले . भूमिका बदलणाऱ्या या लोकांना बीड़कर कधीच स्वीकारणार नाहीत. यांना हद्दपार करून बीड़मध्ये घड्याळाचा गजर होईल आणि तो क्षीरसागर व्यतिरिक्त असेल असं विजयसिंह पंडित यांनी ठाम सांगितलं. दरम्यान या राजकीय चर्चेबाबत बीड़चे आमदार संदीप क्षीरसागर यांनी मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
0
comment0
Report
SMSATISH MOHITE
Dec 23, 2025 05:47:34
Nanded, Maharashtra:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली. काल नांदेडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस जीवन घोगरे पाटील यांचे गाडीतून अपहरण करून त्यांना मारहाण करण्यात आली होती. आमदार प्रताप पाटील चिखलीकर त्यांचे पुत्र प्रवीण पाटील आणि काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी सुपारी देऊन अपहरण आणि मारहाण केल्याचा आरोप जीवन घोगरे पाटील यांनी केल्याने खळबळ उडाली होती. दोन कोटीच्या आर्थिक व्यवहारातून अपहरण आणि मारहाण करण्यात आल्याचा आरोप घोगरे पाटील यांनी केलाय. त्यावर आमदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी स्पष्टीकरण दिले. घोगरे पाटील यांच्या मुलाचा फोन आल्यानंतर आपण स्वतःहून पोलीस अधीक्षकांना फोन करून प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केल्याचे चिखलीकर म्हणाले. त्यांच्यावर अनेकांचे देणे झाले आहे त्यातून हे झाले असेल, माझ्यावर आरोप करण्यामागे त्यांच्या पाठीशी कुणी असेल, चौकशीतून सर्व सत्य समोर येईल असे चिखलीकर म्हणाले.
0
comment0
Report
Advertisement
Back to top