Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Akola444001

अकोला पुलिस ने चोरी गए मोबाइल और संपत्ति लौटाकर दिवाली खुशी दिलाई

JJJAYESH JAGAD
Oct 16, 2025 13:36:53
Akola, Maharashtra
Anchor : अकोला शहर पोलिसांनी चोरीला गेलेले मोबाईल, दुचाकी वाहने आणि इतर मौल्यवान वस्तू मूळ मालकांना परत देण्यात यश मिळवले आहे. मागील सहा महिन्यांमध्ये नागरिकांचे गर्दीच्या ठिकाणांहून तसेच घरातून तब्बल १ कोटी ३० लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीस गेला होता, जो अकोला पोलिसांनी शोधून मूळ मालकांकडे सुपूर्द केला आहे.पोलिसांनी विशेष मोहिम राबवून चोरीच्या मोबाईल फोनचा मागोवा घेतला. विविध ठिकाणी शोधमोहीम राबवून संबंधित व्यक्तींना शोधण्यात आले आणि त्यांच्याकडून मोबाईल तसेच इतर वस्तू जप्त करून मूळ मालकांना परत देण्यात आल्या.या मोहिमेत काही दुचाकी आणि मौल्यवान वस्तूंचाही समावेश आहे.आपल्या मोबाईल आणि मौल्यवान वस्तू परत मिळाल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंदाचे हास्य फुलले आहे. दिवाळीपूर्वी आपल्या मौल्यवान वस्तू परत मिळाल्याने नागरिकांनी पोलिसांनीच आपली दिवाळी उजळवली असल्याचं समाधान व्यक्त केलं आहे.चोरट्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचा तसेच चोरीच्या घटनांवर नियंत्रण ठेवण्याचा अकोला पोलिसांचा जोर कायम असल्याचं पोलिस प्रशासनाने स्पष्ट केलं आहे.
1
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
APAMOL PEDNEKAR
Oct 16, 2025 16:02:00
0
comment0
Report
PPPRAFULLA PAWAR
Oct 16, 2025 16:01:48
0
comment0
Report
PNPratap Naik1
Oct 16, 2025 16:00:46
Kolhapur, Maharashtra:यंदाच्या ऊस हंगामात पहिली उचल विना कपात 3751 रुपये मिळायलाच हवी, अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या ऊस परिषदेमधून करण्यात आली आहे . शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी ही मागणी केली आहे . जर साखर कारखानदारांनी 10 नोव्हेंबर पर्यंत ही मागणी मान्य केली नाही तर शेतकरी आणि साखर कारखानदार यांच्यातील संघर्ष अटळ आहे असा इशारा देखील राजू शेट्टी यांनी दिला आहे . दरवर्षी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नावाने ओरडलं जातं की उसाचा हंगाम शेतकरी स्वाभिमानी शेतकरी संघटनेमुळे लांबला जातो पण यावेळी 25 दिवस साखर कारखानदारांना वेळ देतोय त्यामुळे त्यांनी नंतर ओरड करू नये असं देखील शेट्टी म्हणालेत . यावेळी साखर कारखान्याच्या काटा मारी संदर्भात बोलताना राजू शेट्टी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली . काटामारी कशाप्रकारे केली जाते हे मी फडणवीस यांना सांगितले आहे, पण बहुतेक फडणवीस हे साखर कारखानदार यांना ब्लॅकमेल करण्यासाठी वापरत असतील अशी देखील टीका केलीय . एकीकडे साखर ऊस उत्पादन वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करा असं सांगत आहेत, पण त्यानी काटामारी रोखण्यासाठी AI तंत्रज्ञानाचा वापर करावा असं देखील ऊस परिषदेत सुचवले आहे .
0
comment0
Report
GDGAJANAN DESHMUKH
Oct 16, 2025 14:32:28
Parbhani, Maharashtra:अँकर- परभणीच्या जिंतूर तालुक्यातील कोक गावात दूषित पाणी पुरवठा झाल्याने गावात गॅस्ट्रोची साथ पसरली असून नागरिकांना उलटी जुलाबचा त्रास होऊ लागलाय, या मध्ये दोघे जण गंभीर असून सहा जण रुगणालयात उपचार घेत आहेत. आतापर्यंत गावातील १३९ नागरिकांना ही लक्षणे आढळलीत. त्यामुळे संपूर्ण गावात भीतीचे वातावरण पसरलय. १४ ऑक्टोबरपासून गावातील नागरिकांना उलटी जुलाबचा त्रास सुरू झालाय, बोरी येथील ग्रामीण रुग्णांलयात अनेकांवर प्राथमिक उपचार करण्यात आले असून दोघा जणांवर परभणी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गावातील शाळेत तात्पुरता आरोग्य कॅम्प उभारून उपचार व तपासणीची सुविधा सुरू करण्यात आलीय.
3
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 16, 2025 14:17:07
Chandrapur, Maharashtra:नेते एकत्र आले तरी जनता एकत्र येत नाही हीच रिपब्लिकन ऐक्या मधली सर्वात मोठी समस्या असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वक्तव्य केलं आहे. सोबतच आमच्या समाजात सर्वच राष्ट्रीय अध्यक्ष असल्याचं म्हणत रामदास आठवले यांनी रिपब्लिकन ऐक्यावर कोपरखळी देखील मारली. रिपब्लिकन ऐक्यात नवीन गट-तट पडू नये हे पाहणं देखील जनतेची जबाबदारी असल्याचं म्हणत बाळासाहेब आंबेडकर जोपर्यंत रिपब्लिकन ऐक्यात येणार नाही तोपर्यंत लोकांना ऐक्य झालं असं वाटणार नाही, त्यामुळे बाळासाहेब आंबेडकर यांनी नेतृत्व स्वीकारावं अशी भूमिका ही रामदास आठवले यांनी मांडली. चंद्रपूर धम्मदीक्षा अनुप्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमात सामील होण्यासाठी रामदास आठवले आज चंद्रपुरात आले असता त्यांनी रिपब्लिकन ऐक्याबाबत आपली ही भूमिका स्पष्ट केली.
2
comment0
Report
AAASHISH AMBADE
Oct 16, 2025 13:57:36
1
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Oct 16, 2025 13:56:42
Shirur, Maharashtra:शिरूर पुणे जिल्ह्यात बिबट्या-मानव संघर्ष गंभीर बनला असून बिबट्याच्या हल्ल्यात पाच वर्षी चिमुकलीचा मृत्यू झाल्यानंतर शिरूर तालुक्यातील पिंपरखेड परिसरातील शेतकरी आक्रमक झाले असून आक्रमक शेतकऱ्यांनी बेल्हे जेजुरी महामार्ग रोखून आंदोलन सुरू केलंय. गेली पाच तासांपासून हे आंदोलन सुरू असून भर पावसात शेतकऱ्यांसह सर्वपक्षीय कार्यकर्ते माजी खासदार आमदार लोकप्रतिनिधी या आंदोलनाला उपस्थित आहेत. या रास्ता रोको आंदोलनामुळे महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण झाली असून आमच्या हद्दीत बिबट्या नकोच वनविभागाने त्यांच्या फॉरेस्टच्या जागेत बिबट्याचा बंदोबस्त करावा यांसारख्या विविध मागण्यासाठी शेतकऱ्यांकडून हे आंदोलन सुरू आहे.
1
comment0
Report
PPPRANAV POLEKAR
Oct 16, 2025 13:17:06
Ratnagiri, Maharashtra:चिपळूण-भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गुन्हा दाखल; पोस्को अंतर्गत दुसऱ्यांदा कारवाई खेड तालुक्यातील वारकरी संप्रदायाशी संबंधित भगवान कोकरे महाराज यांच्यावर आणखी एक गंभीर गुन्हा दाखल झाल्याची माहिती समोर आली आहे. या नव्या प्रकरणात भारतीय दंड संहिते कलम 64(2), 65(1), 74, 351(3)(5) तसेच POCSO अधिनियमाच्या कलम 4 आणि 8 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदर गुन्हा अल्पवयीन मुलीवरील अत्याचाराशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. यापूर्वी नोंदवलेल्या गुन्ह्यात कोकरे महाराज यांना पोलीस कोठडी देण्यात आली होती, मात्र आज त्या पहिल्या प्रकरणात त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (MCR) मिळाली आहे. दरम्यान, याच दिवशी नव्याने आणखी एक गुन्हा दाखल झाल्याने, कोकरे महाराज पुन्हा अडचणीत आले आहेत. तपास यंत्रणांनी आता या दोन्ही प्रकरणांचा तपास एकत्रितपणे वेगाने सुरू केला असून, आश्रमातील कार्यकर्ते आणि संबंधित व्यक्तींची चौकशीही सुरु आहे. या प्रकरणामुळे खेड व चिपळूण परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. POCSO कलमांनुसार हा गुन्हा गंभीर आणि अजामिनपात्र असल्याने, पुढील काही दिवसांत या प्रकरणात निर्णायक कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
2
comment0
Report
UJUmesh Jadhav
Oct 16, 2025 13:16:52
Thane, Maharashtra:भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना गेल्या चार महिन्यांपासून पगार आणि दिवाळी भत्ता न मिळाल्याने कामगारांनी केला निषेध... दिवाळीनिमित्त, संपूर्ण शहर प्रकाश आणि आनंदाच्या उत्सवाच्या तयारीत व्यस्त असताना, भिवंडी-निजामपूर महानगरपालिकेच्या अंतर्गत काम करणाऱ्या आशा कामगार त्यांच्या न्याय हक्कांसाठी रस्त्यावर उतरल्या आहेत. आशा कामगारांनी महानगरपालिका प्रशासनाविरुद्ध तीव्र निषेध नोंदवत म्हटले आहे की, गेल्या चार ते पाच महिन्यांपासून त्यांना त्यांचे मानधन (पगार) मिळालेले नाही आणि त्यांचा दिवाळी भत्ताही रोखण्यात आला आहे. नाराजी व्यक्त करताना आशा कामगार म्हणाल्या, "आम्ही जनतेची सेवा करण्यासाठी रात्रंदिवस शेतात काम करतो. मध्यरात्री गर्भवती महिलेच्या प्रसूतीबद्दल फोन आला की आम्ही लगेच घटनास्थळी धाव घेतो. पण आता, सणासुदीच्या काळातही, आम्हाला आमचे मानधन आणि बोनस दिला जात नाही. यामुळे आमच्या कुटुंबांना उदरनिर्वाह करणे कठीण झाले आहे."
2
comment0
Report
Advertisement
Back to top