Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगांव में विखे पाटिल-कोल्हे परिवार के बीच मुख्यमंत्री के सामने घमासान जारी

KJKunal Jamdade
Nov 24, 2025 17:17:49
Shirdi, Maharashtra
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या समोरच भाजपच्या विखे कोल्हेंमध्ये जुंपली... भाजपच्या आजी माजी नेत्यांचा अंतर्गत वाद भाजपच्या मंचावर चव्हाट्यावर... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसमोरच भाजपच्या कोल्हे माय - लेकांवर विखे पाटलांनी व्यक्त केला संताप... 2019 विधानसभा निवडणुकीत स्नेहलता कोल्हे यांचा पराभव झाल्यानंतर विखे विरुद्ध कोल्हे हा संघर्ष आला होता समोर... विवेक कोल्हे यांनी विखे पाटलांवर केली होती आका शब्द वापरत नाव न घेता टीका... पालकमंत्री विखेंनी घेतला फडणवीसांसमोर कोल्हे माय लेकाचा समाचार... भाजप माजी आ.स्नेहलता कोल्हे भाषण मुद्दे - तुमच्यावर मोदी साहेबांवर प्रेम करणारी ही कोपरगावची जनता.. आज पालकमंत्री देखील इथे आले आहेत.. कोपरगावच्या आम्ही शहांचा कार्यक्रम लोणी पेक्षा चांगला झाला , अतिशय सुंदर झाला असं त्यावेळी आजचे समोरच्या पार्टीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार यांनी आम्हाला सांगितलं... विवेक भैय्यांची दृष्ट काढा.. त्यामुळे पालकमंत्री साहेब कोणाला किती पाठीशी घालायचं हे तुम्ही ठरवा.. माणसं अशी दल बदलू असतात.. ( राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या जवळीक वरून टीका ) भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील भाषण मुद्दे - स्नेहलता कोल्हे आणि विवेक कोल्हे यांचेवर विखे पाटीलांनी मुख्यमंत्री यांचेसमोरच व्यक्त केला संताप... कोपरगाव मध्ये भाजपाचा उमेदवार हाच आपला उमेद्वार त्यामुळे कोणी शंका उपस्थित करू नये... *कोणी मला आका म्हणटलय , कोणाला आका म्हणायच यावर मर्यादा ठेवावा...* *आकाच्या मनात आले तर काय घडते हे माहितीच आहे..* मामावर शांत स्वभावाचा , भाची ( स्नेहलता कोल्हे ) यांना सांगतो... निवडणुक आपण जिंकणारच आहोत... मुख्यमंत्री यांनी स्पष्ट सांगितलय... पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी व्यक्त केला विवेक कोल्हे आणि स्नेहलता कोल्हे ‌यांचेवर संताप... मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस भाषण - ऑन विखे - कोल्हे टिका प्रतिटिका - *पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी भाचीला खणखणितपणे सांगितलय...कमळ म्हणजे कमळच...* शंका - कुशंका संपलेल्या आहेत , आणि खणखणीतपणे ठरलय ... मुख्यमंत्री यांची विखे - कोल्हे राजकीय संघर्षावर भाषणातून प्रतिक्रीया...
101
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
PPPRAFULLA PAWAR
Nov 24, 2025 15:45:34
Chendhare, Alibag, Maharashtra:मंत्री भरत गोगावले यांचे श्री हरिहरेश्वरला साकडे. लोकसभेला आम्ही प्रामाणिक काम केलं असेल तर भलं कर चुकीचं काम केलं असेल तर शिक्षा दे. भरत गोगावले यांचे गाऱ्हाणे. रायगड जिल्ह्यात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत कुणी कुणाचं काम केलं किंवा कुणी नाही केलं यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस मधील वाद विकोपाला गेलाय. त्यावरून देवासमोरील फुल उचलण्याची भाषा सुरू झाली आहे. आज मंत्री भरत गोगावले यांनी थेट हरिहरेश्वरला साकडे घातलं. जर लोकसभेला आम्ही चांगलं काम केलं असेल तर आमचं भलं कर आणि चुकीचं काम केलं असेल तर तुला योग्य वाटेल ती शिक्षा दे. मात्र विधान सभेला कुणी चुकीचं काम केलं असेल तर त्यालाही शिक्षा व्हायला पाहिजे, असं गाऱ्हाणे भरत गोगावले यांनी श्री हरिहरेश्वराला घातले.
174
comment0
Report
CBCHANDRASHEKHAR BHUYAR
Nov 24, 2025 14:47:40
Ambernath, Maharashtra:अंबरनाथ मतदाता याद्यांतील गोंधळावर रविंद्र चव्हाण संतप्त; सुधारणा न झाल्यास ‘कठोर पावले’ उचलण्याचा इशारा आगामी निवडणुकांसाठी मतदार याद्या तपासण्याची गरज अनेक प्रभागांत उचलली गेली आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांनी अंबरनाथ नगरपालिका कार्यालयात भेट घेऊन निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली. त्यांनी सांगितले की अनेक प्रभागांमध्ये बाहेरील प्रभागातील मतदारांची नावे टाकण्यात आली आहेत, तर काही ठिकाणी एका प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत. उल्हासनगरमधील माजी नगरसेवक, नगरसेवक आणि महापौरांची नावेही अंबरनाथच्या प्रभागांमध्ये घुसडल्याचे समोर आले. या गोंधळाला त्वरीत दूर करावं आणि याद्या सुधारित न केल्यास कठोर पावले उचलावी लागतील, अशी चेतावणी त्यांनी दिली. याद्या तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाईची मागणीही त्यांनी केली. आगामी निवडणुकांपूर्वी सर्व याद्या नीट तपासून योग्य स्वरूपात प्रकाशित करण्याची आग्रही मागणी निवडणूक अधिकाऱ्यांकडे त्यांनी केली.
135
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 24, 2025 14:46:23
Mumbai, Maharashtra:मुलुंडमधील वाहतूक कोंडीस मोठा दिलासा; ६० फूट जोडरस्ता उभारणीला सुरूवात पूर्व द्रुतगती मार्ग ते मुलुंड पूर्व येथील टाटा कॉलनीपर्यंतच्या ६० फूट जोडरस्त्याच्या कामाचे भूमिपूजन आज भाजप आमदार मिहीर कोटेचा यांच्या हस्ते पार पडले. गेल्या अनेक वर्षांपासून संध्याकाळच्या गर्दीच्या वेळेत म्हाडा सिग्नल, लक्ष्मीबाई शाळा आणि कॅम्पस हॉटेल जंक्शन परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी निर्माण होत होती. त्यामुळे प्रवाशांना ३० ते ४० मिनिटांचा अतिरिक्त प्रवास करावा लागत होता. आमदार मिहीर कोटेचा यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे सर्व आवश्यक मंजुळ्या मिळाल्यानंतर या रस्त्याच्या कामाला अंतिम मान्यता मिळाली आणि भूमिपूजनानंतर काम तात्काळ सुरू करण्यात आले. हा रस्ता तयार झाल्यानंतर वाहतूक कोंडी तब्बल ६० टक्क्यांनी कमी होणार असल्याची माहिती आमदार कोटेचा यांनी दिली. भाजप आमदार मिहीर कोटेचा म्हणाले, “आम्ही भारतीय जनता पार्टीचे प्रतिनिधी आहोत. ज्याचे भूमिपूजन आम्ही करतो, त्याचे लोकार्पणही आम्हीच करतो. अवघ्या एका महिन्यात वाहतुकीसाठी हा रस्ता खुला करण्यात येणार आहे. या जोडरस्त्यामुळे मुलुंडकरांना घरी जाण्यासाठी लागणारा वेळ मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री असताना मुंबई आणि महाराष्ट्रात विकास झपाट्याने होत आहे, त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा ६० फूटाचा जोडरस्ता प्रकल्प आहे.” Byte, भाजप आमदार मिहीर कोटेचा
68
comment0
Report
APAMOL PEDNEKAR
Nov 24, 2025 14:32:09
Mumbai, Maharashtra:चेंबूर वाशीनाका स्मशानभूमी मधील कालीमाता मंदिरातील कालीमातेच्या मूर्तीला चक्क मदरमेरी चे रूप देण्यात आल्याने मोठा वाद निर्माण झाला होता. हे कृत्य मंदिराचा पुजारी रमेश योगेश्वर याने केले होते. त्याला नागरिकांनी विचारणा केली असता देवी स्वप्न्यात आली आणि मला मदर मेरी चे रूप देण्यास सागितले असे त्याने लोकांना सांगितले होते. मात्र हा धर्मांतरणचा डाव असल्याचे हिंदुत्ववादी संघटनांचे म्हणणे असून या प्रकरणी आरसीएफ पोलिसांनी गुन्हा दाखल करके पुजाऱ्याला अटक केली आहे.न्यायालयाने त्याला दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. मात्र या मागे आणखी काही आरोपी असून हे धर्मांतरनाच्या षडयंत्राचा बघ असल्याचा आरोप हिंदुत्ववादी संघटना करीत आहेत.
95
comment0
Report
SGSagar Gaikwad
Nov 24, 2025 13:06:21
Nashik, Maharashtra:झाडांच्या कत्तली बाबत झालेल्या सुनावणीत गोंधळ अँकर नाशिकच्या तपोवन येथील १८०० झाडांची कत्तल नाशिकमध्ये पर्यावरणप्रेमी, नागरिकांच्या संतापाची लाट पसरलीये.. याचा संदर्भात अनेक पर्यावरण प्रेमी कडून या झाडांच्या कत्तली संदर्भात हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती या सुनावणी दरम्यान सर्वत्र गोंधळच गोंधळ पाहायला मिळालाय... नाशिकच्या तपोवन येथील वृक्षांचा मुद्दा भारताला थेट नेपाळ श्रीलंका करण्यापर्यंत जाऊन पोहोचला अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी नाशिकच्या तपोवनात साधू ग्राम उभारण्यासाठी त्या परिसरातील जवळपास 1800 झाडांची कत्तल करण्याचा निर्णय घेण्यात आला आणि यामुळे नाशिक शहरातील पर्यावरण प्रेमी वृक्षप्रेमी नाशिककर नागरिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं अनेकांकडून त्या अगोदर या ठिकाणी आंदोलन करण्यात आली आज देखील सुनावणीच्या अगोदर नाशिक मध्ये या निर्णयाचा निषेध नोंदविण्यात आला वृक्षांची कत्तल केली जाणार असल्यामुळे अनेकांकडून हरकती घेण्यात आल्या होत्या या हरकतींवर आज सुनावणी होणार होती मात्र या ठिकाणी उच्चपदस्थ अधिकारी लोकप्रतिनिधी नसल्याने पर्यावरण प्रेमींनी गोंधळ घातला .. मात्र या सुनावणीच्या प्रक्रियेमधून पर्यावरण प्रेमीचं कुठलंही समाधान न झाल्याने पर्यावरण प्रेमींकडून संताप व्यक्त करण्यात आला नाशिक शहरातील तपोवन येथील वृक्षांच्या फांद्यांना जरी हात लावला तरी कश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यंत तरुण एकत्र होऊ आणि नेपाळ व श्रीलंका करू असा देखील इशारा दिला ...
72
comment0
Report
PPPRASHANT PARDESHI
Nov 24, 2025 12:00:22
196
comment0
Report
KJKunal Jamdade
Nov 24, 2025 11:37:00
163
comment0
Report
ABATISH BHOIR
Nov 24, 2025 11:20:30
Kalyan, Maharashtra:कल्याण-डोंबिवली निवडणूक यादीत घोळ? भाजप निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांचा गंभीर आरोप विरोधी पक्षांनी केडीएमसी निवडणूक यादीत घोळ असल्याचा आरोप करत हरकती घेतल्या होत्या मात्र आता सत्ताधारी भाजपनेही याद्यातील नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्याची हरकत घेतली आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात सर्वांच्या भुवया उचलल्या आहेत कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक यादीत मोठ्या प्रमाणावर हेरफेर झाल्याचा आरोप भाजपचे कल्याण-डोंबिवलीचे निवडणूक प्रमुख नाना सूर्यवंशी यांनी केला आहे. पालिकेच्या निवडणूक विभागातील कर्मचाऱ्यांनी जाणून-बुजून चुकीचे फेरबदल केल्याचे आरोप केला आहे. एका प्रभागाच्या सीमेत येणारी हजारो मतदारांची नावे दुसऱ्या प्रभागात टाकण्यात आली आहेत. ही केवळ चुकून झालेली किंवा अपघाती चूक नसून जाणून-बुजून केलेला गैरप्रकार असल्याच त्यांनी सांगितले. भाजपला निवडणुकीत अडचणीत आणण्यासाठीच हा प्रकार घडवून आणल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. चुकांना तातडीने दूर कराव्या. अन्यथा संबंधित कर्मचाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी आम्ही करू. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक वातावरणात झाली पाहिजे, आणि जर या तक्रारी दखल घेतल्या नाहीत, तर भाजपकडून पुढील पावले उचलली जातील. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक ठेवण्यासाठी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून दुरुस्ती करावी, अशी मागणी भाजपकडून करण्यात आली आहे. अन्यथा भाजप कडून यांची दखल घेऊन योग्य ती कारवाई केली जाईल. त्याचं बरोबर पॅनल क्रमांक ३ मधील १५ ते १६ हजार नावे ही पॅनल क्रमांक चार मध्ये टाकण्याची तक्रार भाजपचे टिटवाला मंडळ अध्यक्ष शक्तिवान भोईर यांनी देखील केली आहे. नाना सूर्यवंशी जिल्हा अध्यक्ष
101
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Nov 24, 2025 11:08:52
Yavatmal, Maharashtra:यवतमाठ्ाच्या वणी येथे शिवसेनेने पुन्हा भाजपला झटका दिला आहे, भाजपच्या सात माजी नगरसेवकांपाठोपाठ आता भाजप जिल्हाध्यक्ष कुणाल चोरडिया यांनीही भाजपला रामराम ठोकला असून पक्षामध्ये स्थानिक पातळीवर अन्याय होत आहे. बीजेपी म्हणजे बॉदकुरवार जनता पार्टी झाली आहे असा आरोप त्यांनी केला आहे. नगरपरिषद निवडणукिचा प्रचार सुरू असताना कुणाल चोरडिया पक्षातून बाहेर पडले असून आपल्याला शिवसेना शिंदे गटासह ठाकरे यांच्या शिवसेनेची ही ऑफर असल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 26 नोव्हेंबरला वणी येथे येत असून त्यांच्या उपस्थितीत कुणाल चोरडिया शिवसेनेत पक्ष प्रवेश करतील अशी माहिती आहे. बाईट : कुणाल चोरडिया
139
comment0
Report
Advertisement
Back to top