Become a News Creator

Your local stories, Your voice

Follow us on
Download App fromplay-storeapp-store
Advertisement
Back
Ahilyanagar423109

कोपरगावात समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भररस्त्यात हल्ला, गंभीर जखमी; आरोपींची कठोर कारवाईची मागणी

KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:49:46
Shirdi, Maharashtra
कोपरगाव / अहिल्यानगर कोपरगावात समता पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यावर भररस्त्यात हल्ला.. समता पतसंस्थेचे कर्मचारी बाबासाहेब ठोंबरे यांना अज्ञातांकडून मारहाण. बेट नाक्याजवळ हल्लेखोरांनी अडवून केली बेदम मारहाण... “सोशल मीडियाचे पेज कोण चालवतोस ?” अशी विचारणा करून हल्ला.. हल्ल्यात बाबासाहेब ठोंबरे गंभीर जखमी.. जखमी कर्मचाऱ्यावर खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार... घटनेनंतर कोपरगाव पोलीस ठाण्याजवळ मोठी गर्दी.. समता पतसंस्थेचे कर्मचारी, संचालक मंडळ पोलीस ठाण्यात दाखल.. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्तेही आक्रमक आरोपींवर कठोर कारवाईची मागणी... संचालक संदीप कोयटे यांची पोलिसांकडे तातडीची कारवाईची मागणी. कोपरगाव शहरात घटनेमुळे खळबळ... गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू.. पुढील तपास कोपरगाव पोलीस करत आहेत...
0
comment0
Report

For breaking news and live news updates, like us on Facebook or follow us on Twitter and YouTube . Read more on Latest News on Pinewz.com

Advertisement
DPdnyaneshwar patange
Dec 15, 2025 10:21:53
Dharashiv, Maharashtra:धाराशिव\nवीज बंद… सौर पंप रखडले… रब्बी पिकं धोक्यात!\nधाराशिवमध्ये वीज–सौर पंप संकट, शेतकरी मेटाकुटीला\nराज्य सरकारकडून शेतकऱ्यांची नवीन वीज जोडणी बंद…\nआणि सौर पंप घेण्याची सक्ती…\nमात्र प्रत्यक्षात सौर पंप मिळत नाहीत…\nपरिणामी रब्बी हंगामातील पिकं पाण्याअभावी सुकत आहेत…\nधाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि वाशी तालुक्यात\nशेतकरी अक्षरशः दुहेरी संकटात सापडलेत…\nपाहूया याविषयीचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट\nधाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडा आणि वाशी तालुके…\nरब्बी हंगाम जोमात असतानाच\nशेतकऱ्यांवर विजेचं मोठं संकट कोसळलंय…\nराज्य सरकारने नवीन वीज जोडण्या बंद केल्या…\nआणि पर्याय म्हणून सौर पंप सक्तीचे केले…\nमात्र सौर पंपासाठी अर्ज करून\nमहिने-महिने प्रतीक्षा करावी लागत आहे…\nपैसे भरले…\नोंदणी झाली…\nपण पंप मात्र अजूनही मिळालेला नाही…\nपरिणाम काय…\nरब्बी हंगामातील\nगहू, हरभरा, कांदा, भाजीपाला\nपाण्याविना सुकत चाललेत…\nशेतकऱ्यांच्या मेहनतीवर\nअक्षरशः पाणी फिरण्याची भीती शेतकरी व्यक्त करत आहेत\nशेतकऱ्यांच्या मागण्या स्पष्ट आहेत…\nतात्काळ डीपी बसवाव्यात\nप्रलंबित सौर पंप लगेच द्यावेत\nतोपर्यंत तात्पुरत्या वीज जोडण्या सुरू कराव्यात\nअन्यथा रब्बी हंगाम पूर्णपणे हातातून जाण्याची भीती…\nशेतकऱ्यांचा जीव पिकांमध्ये अडकलेला असताना\nसरकार तात्पाळ निर्णय घेणार का?\nहा सवाल आता उपस्थित होतोय…\nज्ञानेश्वर पतंगे\nZEE 24 TAAS, धाराशिव
0
comment0
Report
NMNITESH MAHAJAN
Dec 15, 2025 10:06:27
Jalna, Maharashtra:जालना : नाफेडच्या हमी भाव केंद्रावर शेतकऱ्यांचे हेलपाटे, सोयाबीन विक्रीसाठी बायोमेट्रिक वर हाताचे ठसे मिळत नसल्यानं अडचण (पॅकेज) अँकर : राज्य सरकारने कापूस आणि सोयाबीनची हमीभावाने खरेदी सुरु केलीय.मात्र अनेक वयोवृद्ध शेतकऱ्यांच्या हाताचे ठसे आधारशी मॅच होत नसल्यानं या शेतकरीांची सोयाबीन विक्रीसाठीची नोंदणी अडचणीत आलीय.जालना जिल्ह्यात देखील अशा समस्यांना शेतकरी सामोरा जातोय बघूया हा स्पेशल रिपोर्ट व्हिओ :१:69 वर्षाचे तुकाराम काकडे हे जालन्यातील भारज येथील नाफेडच्या सोयाबीन खरेदी केंद्रावर सोयाबीनच्या विक्रीसाठी नोंदणी करण्यासाठी आलेत.पण त्यांचं सोयाबीन त्यांच्या नावावर त्यांना विक्री करता येत नाही.कारण त्यांच्या हाताला वृद्धापकाळामुळे सुरकुत्या पडल्यायत. त्यामुळे त्यांच्या हाताचे ठसे बायोमेट्रिकवर आधारशी मॅच होत नाहीय.त्यामुळे काकडे हैराण झालेत.आता हमीभावाने सोयाबीन विकायची तर आहे पण नाफेडकडे नोंदणी करायची तरी कशी आणि सोयाबीन जास्त असेल तर सगळी सोयाबीन विकायचं कसं असा सवाल काकडे यांना पडलाय. बाईट : तुकाराम काकडे,शेतकरी व्हिओ :२:काकडे यांच्या सारखीच अवस्था जिल्ह्यात हजारो शेतकऱ्यांची झालीय.हातावर सुरकुत्या पडून हात शेतीकाम करून खराब झाल्यानं सोयाबीन विक्रीसाठी नोंदणी करताना बायोमेट्रिक मशीनवर अडचणी येतायत.अशा परिस्थितीत हमीभाव केंद्रावर शेतकऱ्यांच्या घरातील ईतर सदस्यांच्या नावावर सोयाबीन विक्रीचा पर्याय नाफेड खरेदी केंद्र चालकांकडून दिला गेलाय.तसेच हाताचे तसे येत नसतील मोबाईल फेस आयडी केला जातो.मात्र वृद्धापकाळामुळे चेहऱ्यावर देखील सुरकुत्या आल्यानं त्यातही अडचण पाहायला मिळते.त्यामुळे अशा शेतकऱ्यांना आधार अपडेट सेंटरवर जाऊन हाताचे ठसे अपडेट करण्याचा पर्याय दिला जातोय. बाईट : अमोल पडघन,नाफेड हमीभाव खरेदी केंद्र चालक, व्हिओ :३:सध्या सोयाबीन हमीभाव केंद्रावर 5 हजार 328 रुपये दराने हमीभाव शेतकऱ्यांना दिला जातोय.राज्य सरकारने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना एकरी 6.48 क्विंटल तर हेक्टरी 16.50 क्विंटलची मर्यादा घालून दिलिय.त्यातच आता हमीभावाने सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना बायोमेट्रिकच्या अडचणी येत असल्यानं शेतकऱ्यांचे हे हेलपाटे थांबणार कधी असा सवाल उपस्थित होतोय. नितेश महाजन,झी-२४ तास,जालना
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 15, 2025 10:05:58
0
comment0
Report
JJJAYESH JAGAD
Dec 15, 2025 09:48:33
Akola, Maharashtra:नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या टप्पा–2 साठी शासनाने समितीच्या रचनेत सुधारणा करत सह-अध्यक्ष पद निर्माण केले असून या पदावर भाजपचे अकोला पूर्वेचे आमदार रणधीर सावरकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महायुती शासनाने हा निर्णय घेतला असून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच कृषी विभागाच्या मान्यतेनंतर 13 डिसेम्बर 2025 रोजी शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखालील या सुकाणू समितीत रणधीर सावरकर सह-अध्यक्ष म्हणून काम पाहणार असून त्यांच्यावर प्रकल्प अंमलबजावणी, धोरणात्मक मार्गदर्शन, वार्षिक कृती आराखड्यास मान्यता, विभागांमध्ये समन्वय आणि जागतिक बँकेच्या मार्गदर्शक सूचनांनुसार बदलांना मान्यता देणे ही जबाबदारी असेल.हवामान बदलांच्या पार्श्वभूमीवर शाश्वत, हवामान-अनुकूल व किफायतशीर शेतीस चालना देणाऱ्या या प्रकल्पात आमदार रणधीर सावरकरांच्या नियुक्तीचे सर्व स्तरातून स्वागत व अभिनंदन करण्यात येत आहे.
0
comment0
Report
UPUmesh Parab
Dec 15, 2025 08:50:13
Oros, Maharashtra:सिंधुदुर्ग जिल्हा बँक दरोडेखोरांपासून वाचवा अशी मोहीम सध्या शिवसेना शिंदे गटाच्या माजी आमदार राजन तेली यांनी हाती घेऊन मंत्री नितेश राणे यांच्या निकटवर्ती असलेले सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जिल्हा बँकेने महाजन यांना 59 कोटींचं कर्ज शेतमांगर 3.39 जागेवर दिलेलं आहे. त्या जागेचं व्हॅल्युएशन 88 लाख आहे. याची नोंद सातबारा उतारांवर दिसतंय. दहा कोटीच्या जागेवर एवढ्या मोठ्या रकमेची उचल बँकेकडून घेतली जाते तोच घोटाळा आहे. याला कारणीभूत बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी आणि CEO प्रमोद गावडे हेही यामध्ये आरोपी आहेत यांच्यावर कारवाई करावी अशी माझी मागणी आहे. ऑन --दीपक केसरकर केसरकर काय म्हणतात याला अर्थ नाही केसरकर हवेत आहेत केसरकरांना मी भेटून सांगितलं आहे. कोणाच्या प्रेमात ते वाकडी घेत नाहीत. आणि मी कोणाला घाबरत नाही एक घोटाळे नसले तर मी कशाला बँकेची बदनामी करू. मनीष दळवी यांना काय अनुभव आहे ते पहिल्यांदा चेअरमन झालेत. केसरकर यांच्या मतदार संघात भोगवे ग्रामपंचायत येते त्या ग्रामसेवकला बोलून घ्या घरी..एक गहान खत वेंगुर्ले तर दुसरं गहान खत कुडाळमध्ये झालं. तुम्ही प्रामाणिक काम करता येतं करा ना कशाला दडून करताय. बाईट ---राजन तेली
0
comment0
Report
HCHEMANT CHAPUDE
Dec 15, 2025 08:49:29
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 08:35:05
Shirdi, Maharashtra:बिबट्या मुक्त संगमनेर तालुक्यासाठी जन आक्रोश मोर्चा। आमदार सत्यजित तांबे आक्रमक। प्रांतअधिकारी निवेदन घेण्यासाठी कार्यालयाखाली येत नसल्याने तांबे आक्रमक। आमदार सत्यजीत तांबे पोलिस अधिकाऱ्यांवर संतापले। निवेदन घ्यायला दहा मिनिटात खाली या। अन्यथा या ठिकाणी कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती निर्माण झाल्यास पोलीस जबाबदार राहतील। प्रांत अधिकारी खाली न आल्यास जिल्हाधिकारी इथे येतील अशी परिस्थिती निर्माण करेल। आमदार सत्यजीत तांबे यांचा इशारा। तांबे यांच्या इशाऱ्यानंतर प्रांत अधिकाऱ्यांनी कार्यालयाखाली येत स्वीकारले निवेदन। प्रांतअधिकाऱ्यांना निवेदन देऊन आंदोलन संपले.
0
comment0
Report
VKVISHAL KAROLE
Dec 15, 2025 08:15:17
Chhatrapati Sambhajinagar, Maharashtra:Anchor : राज्यात शिवसेना भाजप आणि अजित पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस यांनी एकत्र निवडणूक लढवण्याची ठरवलं असलं तरी सुद्धा स्थानिक पातळीवर कुरघोडीचा राजकारण सुरूच आहे त्यात सध्याची राजकीय परिस्थिती पाहता भाजपाच मोठा भाऊ असल्याचं भाजप नेत्यांचे म्हणणं आहे , त्यामुळे आपसूकच लवकरच होणाऱ्या जागा वाटपात भाजपला जास्त जागा हव्या आहेत असा संदेशच भाजपाने मित्र पक्षांना दिला आहे मात्र यावरून राजकारण चांगलंच सुरू झाला आहे... संभाजी नगरात भाजपचा जास्त जागांवर दावा मोठ्या भावाच्या भूमिकेत भाजप असल्याचं स्पष्टीकरण तर इतिहासाची जाणीव ठेवावी शिवसेनेचा टोला महापालिका निवडणुकांचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे महायुतीचं एकत्र लढण्याचे ठरलं असलं तरी स्थानिक पातळीवर मात्र कोणाच्या किती जागा यावरनं चांगलीच रस्सीखेच सुरू आहे , त्यात भाजपाने छत्रपती संभाजी नगरात एक सर्वे केला त्या सर्वेत लोकांनी भाजपला पसंती दिली आहे त्यामुळे आता आम्ही धाकट्या भावाच्या भूमिकेतून थोरल्या भावाच्या भूमिकेत गेल्याचा भाजप शहर अध्यक्ष यांचं म्हणणं आहे यानुसारच पुढील गणित ठरतील असेही त्यांनी म्हटलं म्हणजेच भाजपने जास्त जागा त्यांनाच हव्यात असे संकेत यातून दिले आहेतVisual: विशाल शिरसाठ, वर्षानुसार संभाजी नगर...
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 15, 2025 08:06:00
Nagpur, Maharashtra:Vidarbha महानगर पालिका पक्षीय बलाबल नागपूर महानगर पालिका 2017 पक्षनिहाय बलाबल... एकूण 151 भाजपा- 108 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष--1( राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात प्रवेश केला ) ------- काँग्रेस-29 UBT शिवसेना-2 राष्ट्रवादीSp -1 ---- बसपा-10 ----------------------------- अमरावती महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल... एकूण जागा 87 भाजप : 45 शिवसेना : 05 राष्ट्रवादी : 00 युवा स्वाभिमान पक्ष, रवि राणा : 03(हे आता भाजपा सोबत आहे) काँग्रेस : 15 राष्ट्रवादी SP : 00 शिवसेना UBT :02 मनसे : 00 ---------------------- BSP : 05 MIM : 10 RPI : 01 अपक्ष : 01 ----------------------------- चंद्रपूर महानगर पालिका पक्षनिहाय बलाबल... एकूण 66 भाजपा- 36 शिवसेना-0 राष्ट्रवादी-0 अपक्ष - 3 काँग्रेस -12 UBT शिवसेना - 2 राष्ट्रवादी SP - 2 मनसे - 2 -------- बसपा- 8 प्रaher - 1 ------------------------------ अकोला महानगरपालिका पक्षनिहाय बलाबल..... एकूण जागा : 80 भाजप : 48 राष्ट्रवादी : 5 शिवसेना ( शिंदे ) : 6 काँग्रेस : 13 राष्ट्रवादी ( श. प ) : 0 शिवसेना ( उबाठा) : 2 अपक्ष भारिप - बहूजन महासंघ (सध्याची वंचित बहुजन आघाडी)-- 3 अपक्ष--2 एमआयएम : 1
0
comment0
Report
AKAMAR KANE
Dec 15, 2025 08:05:04
0
comment0
Report
SMSarfaraj Musa
Dec 15, 2025 08:04:52
0
comment0
Report
SRSHRIKANT RAUT
Dec 15, 2025 07:36:03
Yavatmal, Maharashtra:यवतमाळ नगर परिषद निवडणुकीत काँग्रेस सोबत हात मिळवनी केल्याने शिवसेना उबाठा चे विधानसभा प्रमुख संतोष ढवळे यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. संतोष ढवळे ह्यांची निष्ठावान शिवसैनिक म्हणून ओळख आहे. ते शिवसेनेचे जिल्हाप्रमुख देखील होते. विधानसभा निवडणुकीत दोन वेळा फार कमी मतांनी त्यांचा पराभव झाला. दरम्यान नगरपरिषद निवडणुकीत महाविकास आघाडी फुटली, तरी संतोष ढवळे यांनी काँग्रेस उमेदवारांचा प्रचार सुरू केला, शिवसेनेच्या खासदारा विरुद्ध देखील आरोप केले. त्यामुळे पक्षविरोधी कार्य केल्याचा ठपका ठेवत, त्यांची उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आलेली आहे. शिवसेना नेते तथा सचिव विनायक राऊत यांच्या आदेशावरून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून ही कारवाई करण्यात आली.
0
comment0
Report
KJKunal Jamdade
Dec 15, 2025 07:16:12
Shirdi, Maharashtra:संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चा... वाढत्या बिबट्यांच्या हल्ल्याविरोधात नागरीक आक्रमक... बिबटेमुक्त तालूका करा मागणी... बिबट्यांच्या हल्ल्यात अनेकांना गमवावा लागला जिव... बिबट्यांच्या दहशतीमुळे नागरीकांचे जगणे झाले मुश्किल... शाळकरी मुलं, शेतकरी यांच्यावर बिबट्यांचे वाढते हल्ले... संगमनेर शहरात जनआक्रोश मोर्चाचे आयोजन... शेकडोंच्या संख्येने ग्रामीण भागातील शेतकऱ्यांसह महिला मोर्चात सहभागी... आ.सत्यजीत तांबे आणि जयश्री थोरात यांनी धरलं वनविभागाच्या मंत्र्यांसह अधिकाऱ्यांना धारेवर... या मोर्चातून आढावा घेत आमदार सत्तेत तांबे आणि बाळासाहेब थोरात यांच्या कन्या जयश्री थोरात यांच्या सोबत बातचीत केलीये आमची प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी...
0
comment0
Report
Advertisement
Back to top